{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/bengaluru-raids-116120200007_1.html", "date_download": "2018-04-24T05:07:45Z", "digest": "sha1:DAO2PGHLKEPG4EPJIA44DEAOJBLKXNZL", "length": 9385, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बंगळुरुत 5 कोटी रुपयांच्या नवीन नोटा जप्त | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबंगळुरुत 5 कोटी रुपयांच्या नवीन नोटा जप्त\nबंगळुरु- आयकर विभागाने कर्नाटकाच्या आयटी सिटीत छापा मारला. त्या दरम्यान 5 कोटी रूपयांच्या नवीन नोटा जप्त केल्या गेल्या.\nआयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की या रेडमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन नोटा जप्त झाल्या आहेत. ज्या ठिकाणांवर छापा मारण्यात आला आहे ते पीडब्ल्यूडीचे दोन अधिकारी आहेत. विभागाप्रमाणे छाप्यात 5 किलो सोनं आणि 6 किलो सोन्याचे दागिनेही जप्त केले गेले आहे.\nयाव्यतिरिक्त महागड्या गाड्याही सापडल्या आहेत. कारवाई सुरू असून आणखी संपत्ती समोर येण्याची शक्यता असल्याचे सांगितल्याचे कळते.\nविवाहीत स्त्री-पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहणे कायद्याने गुन्हा\nकिरीट सोमय्यांची उडवली पोस्टर मधून खिल्ली\nआयकर संशधोन विधयेकाविषयी राहुल नाराज\nया प्रकारचे सोने नाही होणार जप्त\nपेट्रोल पंपांवर कमिशन त्यामुळे ५०० रु. नोटबंदी होणार\nयावर अधिक वाचा :\nबंगळुरुत 5 कोटी रुपयांच्या नवीन नोटा जप्त\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4878182186243068669&title=Marathi%20Culture%20and%20festivals&SectionId=5577970538859695308&SectionName=%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B2", "date_download": "2018-04-24T05:00:06Z", "digest": "sha1:MWB4LOFTPJK4Y4TVEX32WTZBMPDTR3MK", "length": 10317, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल्स", "raw_content": "\nमराठी कल्चर अँड फेस्टिव्हल्स\nमहाराष्ट्राला दिवाळी अंकांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. मराठी माणूस जगभरात कोठेही गेला, तरी त्याला महाराष्ट्रातील सणसमारंभांची आठवण स्वस्थ बसू देत नाही. मग दिवाळी अंक तरी त्याला अपवाद कसे असणार परदेशस्थ अनेक साहित्यप्रेमी मराठी माणसे ई-दिवाळी अंक प्रसिद्ध करतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल्स’ हा अंक. ऑनलाइन वाचनासाठी मोफत उपलब्ध असलेल्या या अंकाचा हा संक्षिप्त परिचय...\nविविध देशांमध्ये असलेल्या भारतीयांना आपल्या भारतीय संस्कृतीची आणि परंपरांची ओळख व्हावी, या उद्देशाने अमेरिकेत ‘मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल्स’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या संस्थापिका आणि व्यवस्थापकीय संचालिका ऐश्वर्या कोकाटे यांनी मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल्स (http://www.marathicultureandfestivals.com) या नावानेच एक इंग्रजी वेबसाइट सुरू केली आहे. त्यावर काही मराठी लेख आणि साहित्यही उपलब्ध आहे. केवळ भारतीयच नव्हे, तर भारताबाहेरील लोकांनाही मराठी संस्कृतीची ओळख व्हावी, हा वेबसाइट सुरू करण्यामागचा उद्देश आहे.\nदिवाळीच्या निमित्ताने मागील दोन वर्षांपासून ‘मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल्स’मार्फत ई-दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. यंदाचा हा तिसरा दिवाळी अंक आहे. एक हौस म्हणून पहिल्या वर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या दिवाळी अंकाला उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे दरवर्षी हा ई-दिवाळी अंक प्रकाशित करण्याचे ठरवले गेले. सुरुवातीला केवळ अमेरिकेतील मराठी व्यक्तींकडून साहित्य उपलब्ध होत असे. यंदा मात्र इतरही ठिकाणहून साहित्य उपलब्ध झाले आहे.\nयंदाच्या दिवाळी अंकात शर्मिला माहूरकर यांचा ‘बाप्पा मोरया’ हा लेख आहे. डॉ. गोखले यांचा बा. सी. मर्ढेकर यांच्यावरील लेख, डॉ. मुकुंद मोहरीर यांचा ‘आइनस्टाइन एक महान योगी’, किरण डोंगरदिवे यांचा ‘काव्यसरस्वती बहिणाबाई चौधरी’, जयदीप भोगले यांचा, ‘माध्यमे आणि बोलीभाषांचे वाढते महत्त्व’, धनश्री देसाई यांचा ‘आम्ही मराठी-तुम्ही मराठी’ यांसारख्या दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण मराठी आणि इंग्रजी भाषांमधील लेखांचा समावेश आहे. तसेच शाळा, पाऊसपाणी, एक्झरसाइजच्या सागरात शोभाची नौका अशा कवितांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त मुलांसाठी ‘भारतीय फेस्टिव्हल्स अँड कल्चर्स’, ‘दिवाली’ असे काही लेख आहेत. शिवाय दिवाळीसाठी विशेष अशा काही रेसिपीजही या अंकात देण्यात आल्या आहेत.\nया दिवाळी अंकाचे सहसंपादक म्हणून पुण्याचे आशुतोष बापट, अमेरिकेतील श्री. व सौ. माटे आणि अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील शोभना डॅनिएल यांनी काम पहिले आहे.\n(हा दिवाळी अंक ऑनलाइन वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे. त्यासाठी येथे क्लिक करा.)\n...आणि दिवाळी पहाट खुलू लागली मोटके-पाटलांचे डिजिटल गो संगोपन नात्यांचा उत्सव उलगडणारा अंक मराठी भाषेतील ज्ञानसागर असलेले विश्वकोश पेन ड्राइव्हमध्ये एका वेगळ्या विक्रमाच्या निमित्ताने...\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\nस्वानंद समुद्र यांना मानाचा ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅवॉर्ड’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-04-24T04:43:46Z", "digest": "sha1:OSO45UXMTTDKC5YULNA7WGVIJZ7XHGLT", "length": 5132, "nlines": 193, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९१६ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९१६ मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १९१६ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nपहिला फ्रान्झ योजेफ, ऑस्ट्रिया\nफ्रांझ जोसेफ पहिला, ऑस्ट्रिया\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१० रोजी १६:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/complaint-against-dead-farmer-chakan-police-1663622/", "date_download": "2018-04-24T04:59:25Z", "digest": "sha1:RUK2KAIKEBZHU4Y5CJYQNP52MYIMMWY2", "length": 15335, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Complaint against dead farmer chakan police | मृत शेतकऱ्यावर गुन्हा दाखल, चाकण पोलिसांचा अजब कारभार | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nमृत शेतकऱ्यावर गुन्हा दाखल, चाकण पोलिसांचा अजब कारभार\nमृत शेतकऱ्यावर गुन्हा दाखल, चाकण पोलिसांचा अजब कारभार\nउपविभागीय अधिकाऱ्यांनी दाखल केली फिर्याद. चुकून मृत व्यक्तीचे नाव आल्याचे पोलीस निरीक्षकांचे म्हणणे. ग्रामस्थांत खळबळ.\nउपाविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी स्वतः चाकण पोलिसांत ७ एप्रिल रोजी फिर्याद दिली असून मृत नामदेव बांदल यांच्यावर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nभामा आसखेड धरण कार्यालयात घुसून जबरदस्तीने उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांच्यासह तेथील कर्मचाऱ्यांना दमबाजी करून धरणातून सोडलेले पाणी बंद करण्यास भाग पाडल्याप्रकरणी धरणग्रस्त शेतकऱ्यांवर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, या गुन्ह्यात चक्क मृत धरणग्रस्त शेतकऱ्याचे नाव टाकण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.\nअधिक माहिती अशी की, दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करंजविहिरे येथील भामा आसखेड कार्यालयात १०० धरणग्रस्त शेतकरी आले होते. त्यांनी बळजबरीने कार्यालयात जाऊन तेथील उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांच्यासह तेथील कर्मचाऱ्याना दमबाजी करत धरणातील सोडलेले पाणी बंद करण्यास भाग पाडले होते. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मेमाणे यांनी चाकण पोलिसांत तक्रार केली होती. परंतु यात काही महिन्यांपूर्वी मृत्यू पावलेल्या नामदेव बांदल यांचं नाव देखील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चाकण परिसरात खळबळ उडाली आहे.\nउपाविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी स्वतः चाकण पोलिसांत ७ एप्रिल रोजी फिर्याद दिली असून मृत नामदेव बांदल यांच्यावर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दि. ६ एप्रिल रोजी १०० धरणग्रस्त शेतकरी हे कार्यालयात आले होते. त्यांच्या प्रलंबित मागण्या होत्या. तसेच त्यांचे पुनर्वसन झाले नाही. हे सर्व प्रश्न सुटल्याशिवाय धरणातून पाणी सोडू देणार नाहीत असा दम धरणग्रस्त शेतकऱ्यांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nचुकून मृत व्यक्तीचे नाव आले..\nफिर्याद ही उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी दिली होती. त्यात मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांना देविदास बांदल यांचं नाव द्यायचे होते. परंतु, नाव चुकून मृत नामदेव बांदल यांचं लिहिण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. आज सकाळी २०० ते ३०० धरणग्रस्त शेतकरी चाकण पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनी हे गुन्हे खोटे असल्याचे म्हटले आहे. आम्ही योग्य तो तपास करून चौकशी करू, असे शेतकऱ्यांना सांगितल्याचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nनाणार प्रकल्प विदर्भात आणा: भाजपा आमदाराची मागणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/devi-saraswati-117012700025_1.html", "date_download": "2018-04-24T05:04:46Z", "digest": "sha1:47CIKNDKLTFC75UXRTK4PWXMUXPXVSO2", "length": 10707, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सरस्वती देवीची नामावली | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविद्यार्थ्यांनी सरस्वती देवीची पुढील नामावली पाठ करावी.\nमिनी विधानसभेची रणधुमाळी सुरु\n'तो' वादग्रस्त आदेश मागे\nआगामी 25 वर्षात बिल गेट्‌स जगातील पहिले “ट्रिलीयन’ बनण्याची शक्‍यता\n'भीम’ अॅप चे नवे व्हर्जन दाखल, आता ७ भाषांमध्ये उपलब्ध\nवास्तूप्रमाणे कॅश बॉक्स कुठे असायला पाहिजे\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nकाही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.\nआपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.\nशांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.\nयोजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.\nघरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.\nआर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.\nपैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.\nजर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.\nआजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.\nसुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.\nव्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.\nआज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/wifi-service-in-train-116110300008_1.html", "date_download": "2018-04-24T05:08:17Z", "digest": "sha1:YZVPEVT2HBE2LUECGHWML2G7UAORCUPZ", "length": 10316, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आता लोकलप्रमाणेच मेल, एक्स्प्रेसमध्ये मोफत वायफाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआता लोकलप्रमाणेच मेल, एक्स्प्रेसमध्ये मोफत वायफाय\nयेत्या वर्षभरातच प्रवाशांना लोकलप्रमाणेच मेल, एक्स्प्रेसमध्ये मोफत वायफायची सुविधा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या रेलटेल कंपनीने पुढाकार घेतला आहे. येत्या दोन वर्षात ही सेवा सुरु केली जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईसह देशभरातील प्रमुख रेल्वे स्टेशन्सवर मोफत वायफाय पुरवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रकल्प यशस्वीपणे राबवला जात आहे. याकडे पाहाता येत्या\nवर्षभरात मुंबईतील लाखो प्रवाशांप्रमाणेच देशभरातील 100 प्रमुख मेल, एक्स्प्रेसमध्ये मोफत वायफायचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात आला आहे. पीपीपी (सार्वजनिक, खासगी सहभाग) तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यासाठी रेलटेल कंपनीने पुढाकार घेतला आहे.\nदुसऱ्याचा आनंद एक बालक गमावणार डोळे\nचोरांची सुट्टी दुसऱ्याच्या घरात साजरी\nमहास्वच्छता अभियन सांगता समारंभाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात झाले भव्य बाईक रॅलीचे आयोजन\nवन रँक वन पेन्शनसाठी लढा मागणीचे आश्वासन पूर्ण न झाल्याने सैनिकाची आत्महत्या\nक्रूरकर्मा बापाकडून दोन चिमुकल्यांची हत्या\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4613618826592045212&title=swapnil%20bacame%20Producer&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-24T04:59:17Z", "digest": "sha1:4WATNHQN6NSAZ5WW6AFUCL5VAB3BIHHD", "length": 7968, "nlines": 115, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "स्वप्नील जोशी निर्मितीत", "raw_content": "\nमुंबई : अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडली’ ही मालिका २७ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच सादर झाला असून, एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो.या प्रोमोला सोशल मीडियामध्ये उदंड प्रतिसाद मिळत असून, हा प्रोमो स्वप्नीलने ट्विटही केला. सिने आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील, स्वप्निलच्या मित्रमंडळींनं त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. स्वप्नीलने अर्जुनसिंह बरन आणि कार्तिक निशानदार यांच्या जीसीम्स या निर्मिती संस्थेत सहभागी होत,या मालिकेची निर्मिती केली आहे .\nस्टार प्रवाहने आपल्या मालिकांतून कायमच नवे आणि वेगळे विषय सादर केले आहेत. ‘नकळत सारे घडले’ ही मालिकाही त्याला अपवाद नाही. छोटी मुलगी, तिचे बाबा आणि डॉक्टर आंटी यांच्यातले विलक्षण नाते यात पहायला मिळत आहे. हरीश दुधाडे ,नुपूर परूळेकर आणि बाल कलाकार सान्वी रत्नलिकर हे मुख्य कलाकार आहेत.\nयाबाबत स्वप्नील म्हणाला, ‘निर्मिती करण्याचा विचार बऱ्याच काळापासून माझ्या मनात होता. माझं आणि स्टार प्रवाहचं जुनं नातं आहे. म्हणूनच, स्टार प्रवाहबरोबर मालिका करायला मी खूप कम्फर्टेबल असतो. ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्या रुपानं हा विचार प्रत्यक्षात आला आहे. आजवर प्रेक्षकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. तसंच या माझ्या नव्या कलाकृतीवरही करतील याची खात्री आहे.’\nTags: Mumbaistar pravahSwapnil JoshiHarish Dudhadeमुंबईस्वप्नील जोशीनकळत सारे घडलेस्टार प्रवाहप्रेस रिलीज\nऑफिस बॉय झाला गीतकार ‘शतदा प्रेम करावे’मध्ये ज्ञानदा रामतीर्थकर ‘कुलस्वामिनी’ फेम संग्रामच्या घरी आली कार विठू माऊलीच्या ‘स्टार’ आरतीचा सोशल मीडियावर ‘प्रवाह’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\nस्वानंद समुद्र यांना मानाचा ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅवॉर्ड’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4690554506546282152&title=India%20at%20100th%20position%20in%20world%20ease%20of%20doing%20business%20report&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-24T04:55:03Z", "digest": "sha1:W2EAX6M6PRF3KCG7GQEF5PMC6GHHRMLJ", "length": 20777, "nlines": 134, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "उचित ‘अर्थ’बोध महत्त्वाचा", "raw_content": "\nजागतिक बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात व्यवसाय सुलभता अर्थात ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’मध्ये भारताने १३०व्या स्थानावरून यंदा शंभराव्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे. हे यश प्रशंसनीय असले, तरी त्यातील मर्यादा लक्षात घेऊन छुप्या आव्हानांचा बोध घेणे आवश्यक आहे.\nजागतिक बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात व्यवसाय सुलभता अर्थात ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’मध्ये भारताने गेल्या वर्षीच्या १३०व्या स्थानावरून यंदा शंभराव्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे. भारताने या क्रमवारीत इतकी मोठी झेप घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या दहा वर्षांत भारताचे स्थान या यादीत वर गेले नव्हते. या पार्श्वभूमीवर, उद्योगांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यात भारताला आलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या विविध सुधारणांचा हा परिपाक आहे, असे म्हणता येईल. सर्वच स्तरावर प्रशंसा होत असून, आता पहिल्या ५० देशांच्या यादीत स्थान मिळवणे अशक्य नसल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.\nजागतिक बँकेने विविध निकषांच्या आधारे १९० देशांच्या अर्थव्यवस्थांचा आढावा या अहवालात घेतला. व्यवसायावर परिणाम करणाऱ्या १० विविध बाबींचा आढावा यात घेण्यात आला आहे. यामध्ये नवीन व्यवसायाची सुरुवात, बांधकामासाठी लागणाऱ्या परवानग्या, वीजपुरवठा, मालमत्तेची नोंदणी, छोट्या गुंतवणूकदारांचे हितरक्षण, कर भरण्याचे प्रमाण, सीमेपलीकडील व्यवसाय, कंत्राटे लागू करणे, बँक्रप्ट (दिवाळखोरी) प्रक्रिया निवारण, कर्ज सुलभता या मुद्द्यांचा समावेश आहे. दर वर्षी त्यात कामगार नियंत्रण कायदे या निकषाचाही समावेश असतो; मात्र यंदाच्या अहवाल प्रक्रियेत त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. एक जून २०१७पर्यंतच्या परिस्थितीचा या निकषांवर आढावा घेऊन हा अहवाल सादर करण्यात आला आहे. तसेच दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांमधील परिस्थितीचे सर्वेक्षण करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.\nगेल्या वर्षात लक्षणीय सुधारणा करणाऱ्या दहा देशांच्या यादीत भारताचा समावेश आहे. भारतासह थायलंड, उझबेकिस्तान, झांबिया, नायजेरिया, ब्रुनेई , मालावी, कोसोवो, एल साल्वाडोर आणि दिजीबोटी या देशांनी आपल्या अर्थव्यवस्थेची प्रगती व्हावी यासाठी अत्यंत महत्वाच्या सुधारणा केल्या असून, व्यवसाय सुलभतेसाठी या देशांनी एकूण ५३ महत्त्वपूर्ण सुधारणा राबवल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. व्यवसाय सुलभतेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणाऱ्या देशांच्या यादीत न्यूझीलंडने सलग दुसऱ्या वर्षी पहिले स्थान पटकावले आहे, तर भारताचा प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या चीनने ७८वे स्थान मिळवले आहे.\nभारत आणि थायलंडने २०१६-१७ या वर्षात सर्वाधिक व्यावसायिक सुधारणा केल्या आहेत. या देशांनी आठ अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. आर्थिक सुधारणा कधी होतात, याबाबत एक सिद्धांत मांडला जातो. एखाद्या देशात जेव्हा आर्थिक सुधारणा करण्यावाचून पर्याय नसतो, अशा वेळी म्हणजे आर्थिक संकटाच्या काळात अत्यंत आक्रमक आणि पायाभूत सुधारणा नक्कीच केल्या जातात. दुसरी वेळ म्हणजे जेव्हा एखादे सरकार नुकतेच निवडून आलेले असते, अशा काळात अनेक सुधारणा होतात. २००८-०९मध्ये निर्माण झालेल्या आर्थिक मंदीनंतर २०१-११मध्ये अनेक देशांनी आपल्या आर्थिक धोरणांमध्ये, कायदे, नियम यांमध्ये अनेक बदल केल्याचे दिसून आले आहे.\nभारतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाची अर्थव्यवस्था प्रगतिपथावर नेण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण बदल केले. जगभरातील अनेक देशांना भेटी देऊन भारतात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्याने केले. त्यामुळे बाह्य जगतात भारताची प्रतिमा सुधारली, गुंतवणुकीचा ओघ वाढला. ‘मेक इन इंडिया’ उपक्रम राबवून त्याद्वारे परदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय करणे सुकर करण्यात आले. देशात व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या प्रकिया ऑनलाइन उपलब्ध करण्यात आल्या. त्यात गतिमानता आली. भारतीय नव्या उद्योजकांसाठी स्टार्टअप धोरण राबवले. करसवलत, जलद कर्ज उपलब्धता या सोयी दिल्याने अनेक स्टार्टअप कंपन्या देशात सुरू झाल्या. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सर्व प्रक्रिया मानवी हस्तक्षेपमुक्त करण्यावर भर देण्यात आला. त्याचाही फायदा भारतातील वातावरण सकारात्मक होण्यास झाला. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आठ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तसेच प्रदीर्घ काळ रखडत असलेला, देशभरात एक कररचना लागू करणारा ‘वस्तू आणि सेवा कर’ कायदा (जीएसटी) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय एक जुलैपासून लागू करण्यात आल्याने जागतिक बँकेच्या अहवालात याचा विचार करण्यात आलेला नाही. तसेच नोटाबंदी (निश्चलनीकरण) निर्णय अन्य १९० देशांमध्ये नसल्याने तो समान मुद्दा नसल्याने अहवालात त्याचाही विचार अंतर्भूत नाही. हे लक्षात घेता हा अहवाल मर्यादित ठरतो.\nयाच बाबतीत निती आयोगाने दोनच महिन्यांपूर्वी केलेली पाहणी काही वेगळे सांगते. त्याचीही दखल घेणे महत्त्वाचे आहे. निती आयोगाने देशातील २३ विविध क्षेत्रांमधील तीन हजार २७६ उद्योगांच्या पाहणीवरून काही निष्कर्ष मांडले आहेत. नवीन व्यवसाय सुरू करणे, कर आकारणी, कर्ज उपलब्धता आदी निकषांनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीची कामगिरी वाईट झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. अनेक उद्योजक नवीन सुधारणांबाबत अनभिज्ञच असल्याचेही पुढे आले आहे. या अहवालाची दाखल घेऊन योग्य पावले टाकणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nएखादा व्यवसाय तोट्यात गेला, तरी तो बंद करता येत नाही किंवा दिवाळखोरी जाहीर करता येत नाही. ही त्रुटी दिवाळखोरी कायद्यामुळे दूर झाली. ही महत्त्वपूर्ण सुधारणा भारताचे जागतिक बँकेच्या क्रमवारीत स्थान पुढे नेण्यास महत्त्वाची ठरली आहे. त्याच वेळी वीजपुरवठा, वीज जोडणी, सीमेपलीकडील व्यवसाय आणि नवीन व्यवसाय सुरू करणे या तीन निकषांवर आपली कामगिरी घसरली आहे. मालमत्तेची नोंदणी आणि बांधकाम परवाने या क्षेत्रात तर काळजी वाटावी अशी घसरण झाली आहे. या क्षेत्रात मूलभूत सुधारणा करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे.\nरोजगारनिर्मिती हे सरकारसमोरचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देतानाच कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण व्हावी याकरिता कौशल्यविकासावर लक्ष देणेही गरजेचे आहे. कर आकारणी क्षेत्रात काही सुधारणा होत असली, तरी प्रशासकीय यंत्रणेत जिथे नोकरशाहीचा प्रभाव असतो, तिथे मानसिकता बदलणे अत्यंत महत्वाचे ठरते. यासाठी प्रशासकीय पातळीवर उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याची मानसिकता निर्माण करणे, त्याचबरोबरीने समाजातही अशी मानसिकता निर्माण करणे आवश्यक आहे. कायदे बदलून फरक घडणार नाही, तर मानसिकता बदलण्याच्या दृष्टीने काही पावले उचलणे उपयुक्त ठरेल. तसे झाले तर भारताला या यादीतील स्थान आणखी पुढे नेणे सहज शक्य होईल यात शंका नाही.\nव्यवसाय स्थिती : २९\nव्यवसाय सुरू करणे : १५६\nबांधकाम परवाने : १८१\nछोट्या गुंतवणूकदारांचे हितरक्षण : ५\nवीज जोडणी : १२८\nकंत्राट लागू करणे : १६४\nमालमत्ता नोंदणी : १५४\nसीमेपलीकडील व्यापार : १४६\n‘नेहरू, इंदिराजींनंतर मोदीच’ ‘अशांततेपेक्षा नवनिर्माणाचा ध्यास घ्या’ सुधारलेले भारतीय सार्वभौम पतमूल्यन डोनाल्ड ट्रम्प, कडून मोदींना अमेरिका भेटीसाठी आमंत्रण \"उत्तम अर्थसंकल्प' मांडल्याचे मत - नरेंद्र मोदी\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n..आणि मी निद्रेच्या आधीन झालो..\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\nस्वानंद समुद्र यांना मानाचा ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅवॉर्ड’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tuljabhavani.in/festival.html", "date_download": "2018-04-24T05:00:19Z", "digest": "sha1:FHQJI6ISAL5A6AIHY2RQPM3GNW7X5B5C", "length": 40364, "nlines": 92, "source_domain": "www.tuljabhavani.in", "title": " Navratri Festival", "raw_content": "\nतुळजाभवानी तुळजापूरची तुळजाभवानी माता ही राज्याचे पहिले शक्तिपीठ असून, नवरात्रात नऊ दिवस प्रत्येक दिवशी वाढणाऱ्या माळेने भाविकांच्या श्रद्धेस आराधनेची भरती येते.नवरात्राच्या नऊ माळा असल्या तरीही तुळजाभवानीचा उत्सव तसा 21 दिवसांचा असतो. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात घटस्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेस होत असली तरीही तत्पूर्वी देवीचे धार्मिक उत्सव भाद्रपद वद्य नवमीस सायंकाळपासून सुरू होतात. देवीचीप्रत्यक्ष मूर्तीची शेजघरातील निद्रा वद्य नवमीस सायंकाळी सुरू होते. वरात्रापूर्वी देवीची शेजघरातील निद्रा असते. तुळजाभवानी मातेचे स्थान बालाघाट म्हणजेच यमुनाचलावर वसलेले आहे. संरक्षणासाठी दोन्हीकडे पारंपरिक वसाहत आहे. संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत चांगली व्यवस्थालावून मंदिराची उभारणी केली आहे. तुळजाभवानी मातेचे मंदिर तसेच पूर्णतः खोलगट भागात असून, सुरक्षेच्या भौगोलिकदृष्ट्या तुळजाभवानी मंदिरात जाण्यासाठीउताराच्या दृष्टीने जावे लागते. मंदिरात जाताना डावीकडे तीर्थकुंडे आहेत. एकशेआठ झऱ्यांचे उगमस्थान असणारे कल्लोळतीर्थ, तसेच अमृतकुंड म्हणजेच पूर्वीचे अंधारकुंड असे नाव प्रचलित होते.उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. तुळजाभवानी मातेस पार्वतीचा अवतार समजण्यात येते. त्यामुळे गोमुख तीर्थकुंडातही महादेवाची मूर्ती आहे. त्यापाठीमागे दत्तपादुकाआहेत. त्यानंतर पहिल्यांदा कोणत्याही कार्यास सुरवात करताना गणेशदर्शन करणे हे पुराणातून सांगितले आहे. त्यामुळे गणेशदर्शन करून तुळजाभवानीच्या मुख्य रावरंभा निंबाळकर दरवाजामधून देवीच्या मंदिरात प्रवेश केला जातो. गणेशमूर्तीच्या पाठीमागे मार्कंडेय ऋषी आहेत.उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर अवघ्या पूर्वीच्या पाच पायऱ्या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन हेमांडपंती आहे.होमकुंडावर उजव्या बाजूस टेकून गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी रक्तभैरवाची मूर्ती आहे. तुळजाभवानीचे होमकुंड सुमारे दहा फूट लांब – रुंद असून, साधारण सात फूट खोल आहे. वर्षाला आश्विन शुद्ध दुर्गाष्टमी ते अश्विनी पौर्णिमा या कालावधीत होमकुंड प्रज्वलित असते. त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या मुख्य स्थानाशिवायदेवीचा सीमोल्लंघन पार आहे. सीमोल्लंघन पाराची रचना ही अत्यंत पुरातन असून, पूर्णतः दगडी बांधकाम केलेले आहे. साधारण बारा फूट लांबी-रुंदीचा सीमोल्लंघन पार आहे. पारावर खोलगट सुपारीच्या आकाराचे छोटे छोटे खड्डे आहेत. देवीच्या सीमोल्लंघन पारावर जाण्यासाठी केवळ पश्‍चिम बाजूने वर जाण्यासाठी रस्ता आहे. सीमोल्लंघन पाराच्यामध्यभागी पिंपळाचे प्राचीन झाड आहे. सीमोल्लंघन पारावर सूर्योदयाचा प्रकाश येतो. त्यामुळे देवीच्या मुखावर सूर्यप्रकाश येतो. तुळजाभवानीचा मुख्य दरवाजा पितळी असून, नेपाळचा राजा परमार हा देवीचा निस्सीम भक्त होता, असा इतिहास सांगण्यात येतो. त्यामुळे तुळजाभवानीचे स्थान केवळ राज्य आणि दक्षिण भारतातल्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राच्यामर्यादित नव्हते, हे आजही स्पष्ट होते. पितळी दरवाजातून देवीच्या गाभाऱ्यासमोरील परिसर दिसतो. त्यानंतर देवीचे मुख्य सिंहासन आहे. देवीच्या सिंहासनाच्या उत्तर बाजूस देवीचे न्हाणीगृह आहे. देवीच्या मुख्य गाभाऱ्याबाहेरसभामंडपाच्या बाजूला देवीचे शेजघर आहे. शेजघराच्या स्थानात देवीचा पाळणा आणि चांदीचा पलंग आहे. पलंगाची जागा तशी मर्यादित आहे. मात्र पलंगावर असणारी गादी भव्यदिव्य आहे. देवीसमोर भवानी शंकराची मूर्ती आहे. भवानी ही पार्वतीचे रूप आहे. भवानी शंकराच्या समोरील सभामंडपात दगडी खांबावरच मंदिराची उभारणी केलीआहे. तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्रात विष्णू स्थानास महत्त्व आहे. देवीच्या मंदिराकडे जाताना पुरातन ओवरीचे स्थान आहे. मंदिराप्रमाणेच खोल परिसर असून, तेथेही तीर्थकुंड आहे. या ठिकाणी आजही रहिवासी आहेत. पूर्वी तुळजाभवानीचेस्थान अनेक कडव्या धर्मविरोधकांचे लक्ष असणारे स्थान असल्याने, या ठिकाणी मंदिराप्रमाणे व तत्सम स्थान राहावे यासाठी हे स्थान निर्माण केले असून, अनेक आक्रमणांच्या वेळी देवी त्या ठिकाणी वास्तव्यास होती, असेसांगण्यात येते. मंदिरात आश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना देवीच्या सिंहाच्या सभामंडपामध्ये होते. त्या ठिकाणी ईशान्य दिशेला धान्याची पेरणी करण्यात येते. तेथे नंदादीप असतो. घटाचा मान घटे कुटुंबीयांचा आहे. घटे कुटुंबीय मूलतः मुरूम ता.उमरगा येथील आहे. त्यांचे वास्तव्य सोलापूर – पुणे भागात आहे. घटस्थापना ते महानवमी या कालावधीत घराची पूजा होते. देवीस दररोज दोन वेळा अभिषेक पूजा कायमस्वरूपी असतात. नवरात्रातही त्याच पद्धतीने पूजा चालू असतात. नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री छबिना निघतो. त्यानंतर प्रशाळपूजा होते. त्यानंतर देवीस विड्याच्या पानाचे घर बांधण्यात येते. नवमीला घटोत्थापन आणि अजावळीआजही होमकुंडावर देण्यात येतो. दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते. नगरचे भगत (तेली) कुटुंबीय पालखी घेऊन येतात. सुमारे 45 पिढ्यांपासून ही प्रथा चालू आहे, असे सांगण्यात येते. भिगारच्या पलंगावर देवीची पाच दिवस निद्रा असते. सार्वत्रिक सीमोल्लंघनाच्या वेळी तुळजाभवानी निद्रेत असते.त्यानंतर अश्विनी पौर्णिमेला मोठी यात्रा होते. आजपर्यंतच्या ऐतिहासिक राज्यकर्त्यांनी तुळजापूरला अनेक दाने मातृत्वभावनेने दिली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची पुतळ्याची माळ, अहल्याबाई होळकरांची पाण्यासाठीची विहीर, हैदराबादच्या रावबहादूरसंस्थानचे कार्य कोल्हापूरच्या राजे छत्रपतीचे देवीसाठी दिलेली जमिनीची देणगी अशी अनेक नावे आहेत. आता शहरात नवीन विकास योजनेचे पर्व पुढे येऊ घातले आहे. तीनशे 15 कोटी रुपयांचा दमदार आराखडा मंजूर केला आहे. आता ही विकासाची कामे कोणत्या प्रकारे गतीने होतात, त्याकडे लक्ष लागले आहे. आराखड्यापूर्वी सरकारने प्राधिकरण केले असून, त्यासाठी सध्या सरकारी पातळीवरनियोजन चालू आहे. राज्यात तुळजाभवानी माता हे पहिले पूर्णपीठ आहे. याशिवाय माहुरची रेणुकामाता, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ आहे. देवी ही सौदर्यवाहिनी आहे. भाळी गंध त्यावर सुवर्णअलंकारानेघातलेला चोप, गळ्यात वेगवेगळे दागदागिने यामुळे तुळजाभवानीचे रूप भाविकांना मोहून टाकते.\n✽ श्री तुळजाभवानीचे नवरात्र ✽\nअश्विन शु. प्रतिपदा ते अश्विन शु. पौर्णिमा या कालावधीत श्री तुळजाभवानी देवीचे नवरात्र असते.नवरात्र कालावधीत लाखो देविभक्त देविच्या दर्शन घेण्यासाठी तुळजापुरात दाखल होतात.श्री देवीने अश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत महिशासूर या दैत्याचा पराभव केला त्या प्रसंगाची आठवण म्हणून नवरात्र उत्सव साजरा केला जातो.या उत्सवाची सुरुवात अश्विन शु. प्रतिपदापासून घटस्थापनेने होते व सांगता अश्विन शु. पौर्णिमेने होते. या कालावधीत अनेक देवीभक्त देवीचा उपवास करतात.नवरात्र कालावधीत देवीच्या पादुकांची मंदिर आवारात मिरवणूक काढली जाते.त्यास छबिना/पालखी म्हणतात.तो पालखी सोहळा पाहण्यासाठी अनेक भक्त कवड्याची माळ धारण करून पोत ओवाळण्यासाठी मंदिरात जमा होतात.अनेक देवीभक्त नवरात्राचे नऊ दिवस उपवास पाळतात.उपासनेचे प्रकार वेगवेगळे असले तरी देवीची कृपा संपादन करणे हाच त्यामागचा हेतू आहे.\nतुळजाभवानी देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्राला अनन्यसाधारण महत्व असून या प्रसंगी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते आणि हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. अश्विन प्रतिपदे पासून (सप्टेंबर-ऑक्टोबर) या शारदीय उत्सवास सुरुवात होते. त्यामागील पौराणिक कथेनुसार महिषासुर दैत्याबरोबर नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर दमल्याने देवी निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते. नवरात्र संपताच दहाव्या दिवशी विजयादशमीला भारतीय संस्कृतीतला मोठा सण दसरा असतो. त्या दिवशी देवी सीमोल्लंघनास बाहेर पडते. त्याचे प्रतीक म्हणून देवीची मूर्ती गाभार्‍यातून समारंभपूर्वक शिलंगणासाठी बाहेर काढली जाते. तो सोहळा पाहायला लक्षावधी भाविक येतात. देवीची मूर्ती पालखीत घालून प्रचंड उत्साहात वाद्यांचा गजर करीत व देवीची गाणी म्हणत जल्लोषात सीमोल्लंघनास जाते व नंतर पुन्हा मंचकी निद्राधीन होते. त्यानंतर पाच दिवसांनी, म्हणजे अश्विन शुद्ध पौर्णिमेला देवीची निद्रा संपून देवीची मूर्ती पुन्हा गाभार्‍यात प्रस्थापित केली जाते. अश्विन शुद्ध पौर्णिमेला (कोजागिरी पौर्णिमेला) मंदिरात देवीचा छबिना काढला जातो व त्यासाठी जवळपास १० लाख भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून व शेजारच्या कर्नाटक व आंध्र प्रदेश या प्रांतातून तुळजापुरात येतात. लक्षावधी लोक सोलापूर, उस्मानाबाद, बार्शी येथून भक्तीभावाने देवीच्या दर्शनासाठी पायी चालत येतात.\nप्रत्येक वर्षी पौष महिन्यात (डिसेंबर/जानेवारी) शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो. शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्यांचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र महोत्सवात होते. शारदीय नवरात्राच्या सोहळ्याचे वैभव पाहण्याचा योग ज्यांना येत नाही, असे भाविक शाकंभरी नवरात्राच्या सोहळ्या करिता तुळजापूरला येतात. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे देवस्थान संस्थानाच्या वतीने नाटक, संगीत जलसा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक ख्यातनाम गायक, वादक, व रंगमंच आणि सिनेमा क्षेत्रातील कलाकार इ. या सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या कलेचे प्रदर्शन करतात. वर्ष २००९-१० मध्ये झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी रंगमंचावरील आघाडीचे कलाकार श्री प्रशांत दामले, संगीतकार श्री श्रीधर फडके व लोक गायक श्री विठ्ठल उमप यांनी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम सादर केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील महिलांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाची व कर्तृत्वाची नोंद घेण्यासाठी देवस्थान संस्थानने \"श्री तुळजा स्त्री शक्ती पुरस्कार\" देखील सुरू केला आहे.\nमहाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते.उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जाग्रृत असते.निद्रा समयी देवीला १०८ साड्यांचे वेष्टन (दंड नेसवने)केले जाते. व विधिवत् पलंगावर निद्रेसाठी ठेवले जाते. असे असणारे तुळजाभवानी शक्तीपिठ एकमेव द्वितीय आहे.देवीची मंचकी निद्रा २१ दिवसात विभागलेली आहे .मंचक याचा अर्थ पलंग असा आहे.देवी भवानीची निद्रा तीन प्रकारात विभागली आहे ती अशी -१)घोर निद्रा :- नवरात्रीच्या आधी देवी योगनिद्रेत होती म्हणजे महिषासुराशी युध्द करण्यापूर्वीदेवी ही निद्रा घेत होती पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्म-विष्णू आणि महेश देवीला आठ दिवसानंतर योग निद्रेतून उठवून देवदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात.या निद्रेतून जागी होऊन देवीने घोर रूप प्रकट केले या मुळे या निद्रेस घोर निद्रा म्हणतात. २)श्रम निद्रा :- घोर निद्रेतुन जागी होऊन देवीने महिषासुराचे चाललेले अधर्म कारस्थान पाहून युद्धास तयार झाली नऊ दिवस आसुरांसोबत युध्द केले. नवव्या दिवशी आसूर शरण आला देवीच्या चरणी स्थान मागून देवतांची माफी मागितली. यावेळी नऊदिवस युध्दामुळे देवीला थकवा आल्याने शारदिय नवरात्रा नंतर पाच दिवसाची निद्रा घेते यालाच श्रमनिद्रा असे म्हणतात. या निद्रे साठी तुळजाभवानी चे माहेर अहमदनगराहुन पलंग येतो त्यावर आईसाहेब निद्रा घेतात या निद्रेस मंचकी निद्रा म्हणतात. ३)मोह निद्रा :- शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी काळात देवी निद्रिस्त असते. देवीची मोह निद्रा हे स्रृजनाचे प्रतिक असुन ८ दिवस हे निद्रा काळाचे संपल्या नंतर नवमी म्हणजे तुळजाभवानी प्रकट दिवस किंवा जन्म दिवस असतो. त्या मुळे या निद्रेस मोह निद्रा म्हणतात हे नऊ दिवस म्हणजे नऊ महिन्यांचे सुचक आहेत जसे नऊ महिन्यांनी स्रृजन होते तसाच हा कालावधी असतो.\nदेवी शारदीय अश्विन नवरात्रा आधी आठ दिवस चांदीच्या मंचकावर निद्रा घेते. शारदीय अश्विन नवरात्रानंतर,पाच दिवस माहेरच्या चंदनाच्या,पलंगावर विश्रांती निद्रा घेते आणि शाकंभरी पौष नवरात्री दरम्यान देवी आठ दिवस चांदीच्या मंचका वर निद्रा घेते .अशा अवघ्या विश्वाचा भार सोसुन विसावा घेण्यासाठी आई गादीवर असते म्हणुन तमाम देवी भक्त तथा देवीचे आराधी या या निद्राकालात गादी ,उशी, तक्क्या यांचा त्याग करतात.उपवास धरतात.\nअश्विन शु. १ ते अश्विन शु.३ , अश्विन शु. ९ देवीची अलंकार महापूजा -\nअश्विन शु. ४ रथ अलंकार महापूजा भगवान सूर्यनारायणांनी श्री देवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला.त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा बांधली जाते.\nअश्विन शु. ५ मुरली अलंकार महापूजा तुळजाभवानी मातेने दैत्याचा वध केल्यानंतर सर्व देव देवता दैत्याच्या त्रासातून मुक्त झाल्या त्याप्रसंगी श्रीकृष्णाने आपली मुरली श्रीस अर्पण केली.त्यामुळे मुरली अलंकार पूजा बांधली जाते.श्रीने मुरली वाजवील्यानंतर सर्व भयभीत देव स्वर्गप्राप्तीचा अनुभव घेऊ लागले.\nअश्विन शु. ६ शेषशाही अलंकार महापूजा भगवान विष्णू शेषशैयेवरती विश्राम करत असताना मातेने यांचे नेत्रकमळात विश्राम घेतला यावेळी भगवान विष्णू यांच्या मलापासून निर्माण झालेल्या दोन दैत्यांचा वध श्री देवीने ब्रह्मदेवाने स्तुती करून श्रीस जागविल्यानंतर भवानीने केला त्यानंतर विष्णूने आपली शैया श्रीस अर्पण केली.त्यामुळे षष्टीस शेषशाही अलंकार पूजा बांधली जाते.\nअश्विन शु. ७ भवानी अलंकार महापूजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी भवानीने प्रसन्न होऊन धर्मरक्षणासाठी भवानी तलवार देवून आशीर्वाद दिले.यामुळे भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात येते.\nअश्विन शु. ८ महिषासुरमर्दिनी अलंकार साक्षात पार्वती असणाऱ्या जगदंबा तुळजाभवानीने दैत्यराज असणाऱ्या महिषासुराचा वध केला.त्यामुळे महिषासूरमर्दिनी हा अलंकार बांधण्यात येतो.या दिवशी तुळजाभवानी मंदिरात असणाऱ्या यज्ञ कुंडामध्ये होमहवन करून पूर्णाहुती दिली जाते.\nअश्विन शु.९ महानवमी नवमीला धार्मिक विधी होतात.नवमीस घटोत्थापन केले जाते.\nअश्विन शु.१० विजयादशमी दसरा उषःकाली देवीचे सीमोल्लंघन केले जाते.या दिवशी बर्हाणपूर येथून पालखी व भिंगार येथून पलंग यांचे आगमन होते.तसेच पालखीतून मिरवणूक पार पडून देवी पलंगावर विश्रांती(श्रमनिद्रा) घेते.\nअश्विन शु.१५ पौर्णिमा पौर्णिमेस देवीला महापूजा बांधण्यात येते.या दिवशी सोलापूरच्या काठ्यासह छबिना काढण्यात येतो.या दिवशी अनेक भाविक सोलापूर पासून तुळजापूरला चालत येतात.या दिवशी नवरात्राची सांगता होते.\n✽ नवरात्र आरती ✽\nआश्‍विनशुद्धपक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो\nप्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनी हो\nमूलमंत्रजप करूनी भोंवते रक्षक ठेवूनी हो\nब्रह्मा विष्णू रुद्र आईचें पूजन करिती हो \nउदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो\nउदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो \nद्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो\nसकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो \nकस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरूनी हो\nउदोकारें गर्जती सकल चामुंडा मिळूनी \nतृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो\nपातळ चोळी कंठी हार मुक्ताफळां हो \nकंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो\nअष्टभूजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो \nचतुर्थीच्या दिवशी विश्‍वव्यापक जननी हो\nउपासकां पाहसी प्रसन्न अंतकरणी हो \nपूर्णकृपें जगन्माते मनमोहिनी हो\nभक्तांच्या माऊली सूर ते येती लोटांगणी हो \nपंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो\nअर्ध्यपाद्यपूजनें तुजला भवानी रतविती हो \nरात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो\nआनंदे प्रेम तें आले सद्‌भावे क्रीडतां हो \nषष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो\nघेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो \nकवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो \nसप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो\nतेथे तूं नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो \nजाईजुईसेवंती पूजा रेखियली बरवी हो\nभक्त संकटी पडतां झेलुनि घेता वरचेवरी \nअष्टमीचे दिवशी अष्टभूजा नारायणी हो\nसह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो \nपहिलें शरण आलों तुजलागुनी हो\nस्तनपान देऊनी सुखी केले अंतकरणी \nनवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणें हो\nसप्तशतीजप होमहवनें सद्‌भक्ती करूनी हो \nषड्‌सअन्ने नैवेद्यासी अर्पियेली भोजनी हो\nआचार्य ब्राह्मणां तृप्त केलें त्यां कृपेकरूनी हो\nदशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो\nसिंहारूढ दारुण शस्त्रे अंबे त्वां घेऊनी हो \nशुभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणी हो\nविप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-rain-10572", "date_download": "2018-04-24T05:19:32Z", "digest": "sha1:5JAILCKW2JZ5MVNZRYATIF6IXFUBKSG5", "length": 10218, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri rain रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला\nबुधवार, 6 जुलै 2016\nरत्नागिरी- रत्नागिरीत सात दिवसांनंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी दिवसभर थांबून थांबून सरी कोसळत होत्या. अमावस्येनंतरच्या उधाणाने आज दुसऱ्या दिवशीही किनारी भागात ठिकठिकाणी पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. मांडवीसह काळबादेवी परिसरात पाणी घुसले होते.\nरत्नागिरी- रत्नागिरीत सात दिवसांनंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी दिवसभर थांबून थांबून सरी कोसळत होत्या. अमावस्येनंतरच्या उधाणाने आज दुसऱ्या दिवशीही किनारी भागात ठिकठिकाणी पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. मांडवीसह काळबादेवी परिसरात पाणी घुसले होते.\nआज सकाळी साडेआठपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी 64.33 मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक नोंद गुहागरला 97 मिलिमीटर झाली. मंडणगडला 42, दापोली 72, खेड 80, चिपळूण 79, संगमेश्‍वर 65, रत्नागिरी 37, लांजा 52, राजापूर 55 एवढी नोंद झाली. वेगवान वाऱ्यांमुळे किनारी भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसले होते. लाटांचा आनंद घेण्यासाठी मांडवी जेटीवर अनेक तरुण-तरुणींची गर्दी होती.\n\"पाणी घेता का पाणी...'\nऔरंगाबाद - नागरी क्षेत्रातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उद्योगांना देण्याचे धोरण...\nआगामी पाच वर्षांत कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरेल \nगुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार हे दिशादर्शकाचं काम करतात. गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि यशस्वीरीत्या गुंतवणूक करण्यासाठी त्यातून योग्य...\nफुरसुंगीत वाया जाते पाणी\nफुरसुंगी - भेकराईनगरच्या ढमाळवाडीत पालिकेने टॅंकरचे पाणी साठविण्याच्या पुरेशा टाक्‍या न ठेवल्याने थेट टॅंकरच्या पाइपमधूनच नागरिक पाणी भरत असल्याने...\nशहरात चार ठिकाणी प्री-पेड रिक्षा स्टॅंड\nपुणे - शहरात स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानक, पुणे स्टेशन आणि संगमवाडीतील खासगी बस स्टॅंडजवळ प्री-पेड रिक्षा स्टॅंड उभारण्याचे निश्‍चित झाले आहे. मे...\nहायटेक औद्योगिक वसाहतीत सुरवातीला होणार रुग्णालय, शाळा\nऔरंगाबाद - औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ऑरिकच्या बिडकीन नोडच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. एक हजार हेक्‍टरच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sanhita-sathottari-news/scientific-studies-of-senior-citizens-health-1654594/", "date_download": "2018-04-24T05:04:08Z", "digest": "sha1:A4P2BEEMQH2DJR2REOLOC47AYE6RCRHR", "length": 28632, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Scientific studies of Senior Citizens Health | शास्त्रीय अभ्यास | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nसामान्य माणसालासुद्धा याची कल्पना नाही.\nवाढती संख्या, बदलांचा वेग आणि वाढत्या समस्या या साऱ्यांचा एकत्रित परिणाम वृद्धांवर होतो आहे हे आपल्या सर्वानाच जाणवायला लागले आहे. आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माणसाचे आरोग्य, त्याची मानसिक स्थिती आणि त्याचे सामाजिक संबंध वेगवेगळे असतात. बाल, तरुण, मध्यमवय, वृद्ध, अतिवृद्ध अशा त्या त्या वयाचे वेगळेपण असते म्हणून त्यांचे प्रश्नही वेगळे असतात. त्यावरचे उपायही अर्थातच वेगळे असतात. त्यानुसार वैद्यकीय क्षेत्राचा विचार केला तर लहान बाळांचे, स्त्रियांचे वेगळे डॉक्टर असतात; पण म्हाताऱ्यांचे वेगळे डॉक्टर आपल्याकडे तरी फारसे म्हणजे खरे तर आढळतच नाहीत. कोटय़वधी म्हातारी माणसे आहेत त्यांच्या समस्या वेगळ्या आहेतच, पण त्यात तज्ज्ञ असणारे डॉक्टर नाहीत. वैद्यकशास्त्राची वृद्धवैद्यकशास्त्र (Geriatrics) नावाची शाखा आहे याची गंधवार्तासुद्धा नाही.\nसामान्य माणसालासुद्धा याची कल्पना नाही. वृद्धाच्या आरोग्याच्या समस्यांचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. कारण डॉक्टरकडे जायचे ते बरं होण्याकरिता हा सरळ विचार असतो, तर वृद्ध व्यक्ती डॉक्टरकडे जाते त्या वेळी बरे होण्याची शक्यता मर्यादित असते. कारण शरीर थकलेले, झिजलेले असते. त्यामुळे बरे होण्यातला आजार नसेल तर त्यासह जगणे सुसह्य़ व्हावे अशा अपेक्षेने वृद्धवैद्यकशास्त्रात विचार केला जातो आणि हेच वृद्धवैद्यकशास्त्राचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे वृद्धवैद्यकशास्त्राला तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करावे लागते. वृद्धांना प्रथम आहे त्या मर्यादांचा स्वीकार करणे आवश्यक आहे हे पटवून द्यावे लागते. या बदलांची अपरिहार्यता – दात पडणार, ऐकू कमी येणार, केस पांढरे होणार, सुरकुत्या पडणार इत्यादी समजावून देणे आवश्यक असते. त्यासाठीचे उपाय करायला लावावे लागतात. अनेकदा ज्येष्ठ (तरुणांच्या बरोबरीचे समजून काठी घेऊन चालणे, चष्मा लावणे, कानाला यंत्र लावणे इत्यादी टाळतात आणि मोठय़ा परावलंबित्वाला आमंत्रण देतात.)\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nदुसरी पातळी म्हणजे वयाबरोबर येणाऱ्या मर्यादा येऊ नयेत म्हणून काळजी घेण्याचा असतो. हाडे ठिसूळ होऊ नयेत म्हणून काळजी घेण्याचा असतो. हाडे ठिसूळ होऊ नयेत म्हणून उपचार, मधुमेह-रक्तदाब आटोक्यात राहावे म्हणून आहारविहारात सुधारणा यासाठी वृद्धवैद्यकशास्त्राची मदत घेतली जाते. प्रत्येक देशाच्या आणि प्रदेशाच्या हवामानावर, जेवणखाणाच्या पद्धतीवर आणि सामाजिक संकल्पनेवर वेगवेगळे प्रतिबंधक उपाय करावे लागतात. यासाठी संशोधनाची गरज असते. प्रगत राष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात सखोल संशोधन केले जाते त्याप्रमाणे वृद्धवैद्यकशास्त्रातही संशोधन केले गेले आहे; पण आपली प्रवृत्ती मुळात पूर्वजनांच्या पुण्याईवर डोळे मिटून चालण्याची असल्याने मूलगामी तर जाऊ दे, पण वरवरचे संशोधनही भारतात केल्याचे आढळत नाही. त्यामुळे नेमकी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे ते तेवढे स्पष्ट होत नाही.\nतिसरी पातळी ही योग्य काळजी न घेतल्याने किंवा काळजी घेऊनसुद्धा झालेल्या रोगासह जगण्याची तयारी करण्याच्या दृष्टीने केलेली उपाययोजना. म्हणजे झालेला रोग बरा नाही होणार, पण वाढ रोखता आली, किमान कमी करता आली तर त्यासाठी केलेले उपचार. उदाहरणार्थ पार्किन्सन , डिमेन्शिया वा विस्मरण यावर १०० टक्के उपाय नाहीत, पण त्याच्यासह जगणे सुसह्य़ व्हावे यासाठी केलेले औषधोपचार हे वृद्धवैद्यकशास्त्राच्या कक्षेत येते. मुळात संशोधनाचा अभाव आणि वर्षांनुवष्रे आपल्या प्रकृतीची नस न् नस ओळखणाऱ्या ‘फॅमिली डॉक्टर’ या संकल्पनेचा होणारा ऱ्हास यामुळे वृद्धांच्या समस्या अधिकच गंभीर झाल्या आहेत.\nबदलत्या परिस्थितीचा वेग न झेपल्यामुळे आणि वाढलेल्या आयुष्याचा सजगपणे विचार न केल्यामुळे वृद्धांना मानसिक आजारांना मोठय़ा प्रमाणावर सामोरे जावे लागते आहे हे सत्य आहे त्यामुळे खरं तर वृद्धमानसशास्त्र तज्ज्ञांची आवश्यकता आहे आणि तसे शास्त्रही (Geropsychology) आहे. थोडक्यात एवढेच सांगते की, आपल्याकडे याचा विचार खूप कमी केला जातो. मानसिक आणि शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक, आर्थिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. याही सर्व क्षेत्रांत वृद्धांचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. उदाहरणार्थ ४० वर्षांच्या माणसाला दिलेला आर्थिक\nगुंतवणुकीबद्दलचा सल्ला सत्तरीच्या वृद्धाला कसा देणार त्याची गरज आणि प्राधान्य वेगळे. याचेही एक वेगळे शास्त्र आहे. त्याला वृद्धकल्याणशास्त्र (Gerontology) असे म्हणतात. हे तुलनेने नवे शास्त्र आहे.\nवृद्धावस्थेमध्ये व्यक्ती जास्तीत जास्त चांगली कशी राहील या दृष्टीने वृद्धकल्याणशास्त्रात विचार केला जातो. मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, वृद्धसंख्याशास्त्र, शिक्षणशास्त्र यांसारख्या सर्व सामाजिक शास्त्रात जो जो भाग वृद्धाशी संबंधित असतो तो एकत्र करून वृद्धांचा सर्व दृष्टिकोनातून विचार या शास्त्राच्या माध्यमातून केला जातो. एका अर्थाने परावलंबी, पण दुसऱ्या अर्थाने नशीबवान असे हे वृद्धकल्याणशास्त्र आहे. कारण संशोधन त्या त्या शास्त्रात होत असते ते फक्त वापरायचे काम हे शास्त्र करते. त्यामुळे वृद्धकल्याणशास्त्र हे तुलनेने नवे असले तरी त्याची प्रगती झपाटय़ाने होताना दिसते. बदलत्या काळानुरूप बदलणारे हे एक गतिमान शास्त्र आहे. या शास्त्रात ज्या गोष्टींचा विचार केला जातो त्यावर फक्त नजर टाकली तर त्याची व्याप्ती लक्षात येते. सेवानिवृत्तीपूर्व व सेवानिवृत्तीपश्चात नियोजन, वृद्धसेवा संस्था स्थापन नियोजन, वृद्ध आणि प्रसिद्धी माध्यमे, वृद्धांची प्रतिमा, वृद्धांचा छळ, पिळवणूक, गुन्हेगारी, ग्रामीण वृद्धांसाठी योजना, वृद्ध स्त्रियांच्या समस्या, वृद्धाश्रम निर्माण, व्यवस्थापन, धर्म, धार्मिक, आध्यात्मिक भावना आणि वृद्ध, वृद्धसेवा, वृद्धत्वाचा स्वीकार, मृत्यूचा स्वीकार, वृद्धांच्या अंत्यसंस्कारसंबंधी विचार, वृद्धांसाठी अर्थार्जनाच्या संधी इत्यादी इत्यादी (यादी अजून मोठी आहे, पण आत्ता थांबते). थोडक्यात- वृद्धांना सन्मानाने जगण्यासाठी हे शास्त्र मार्गदर्शक ठरू शकते.\nपण पुन्हा भारतात असणाऱ्या वृद्धांविषयीच्या अनास्थेमुळे या शास्त्रासंबंधी माहितीच कोणी करून घेत नाही तर वापरायची शक्यता कोठून येणार एखादा समाज वृद्धांना कसं वागवतो यावर तो समाज प्रगत आहे अथवा नाही याचं मूल्यमापन केलं जातं. भारतीय समाजात वृद्धांची स्थिती कशी होती, कशी आहे आणि कशी होण्याची शक्यता आहे हे प्रश्न प्रत्येकानेच विचार करण्यासारखे आहेत.\nखरं तर मुंबईला टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने एक पदविका अभ्यासक्रम (diploma in gerontolgy) सुरू केला होता. (मी पुण्याहून जाऊन येऊन केला). पण पूर्ण वर्षांचा आणि १६ विषयांचा असल्यामुळे तो फारसा लोकप्रिय झाला नाही; पण विषय थोडे कमी करून नोकरीसाठी नाही, पण वृद्धांना वृद्धत्वाला सामोरे जाण्यासाठी त्याचा निश्चित उपयोग होऊ शकेल असे वाटते. सेवानिवृत्तीपूर्व प्रशिक्षणात वृद्धकल्याणशास्त्राचा समावेश प्राधान्याने करायला हवा. ‘सनवर्ल्ड फॉर सीनियर्स’च्या माध्यमातून वृद्धकल्याणशास्त्रातील एक किंवा दोन विषयांवर मी छोटय़ा कार्यशाळा घेते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. यावरून ज्येष्ठांना या अभ्यासाची आवश्यकता पटते आहे असे लक्षात येते, ही एक समाधानाची गोष्ट म्हणायला हवी. घेणाऱ्याच्या भूमिकेची मानसिकता असणाऱ्या वृद्धांमध्ये त्यांच्याकडे असणाऱ्या कौशल्य आणि क्षमतेचा वापर करून वृद्धत्व सन्मानाने आणि समाधानाने कसे व्यतीत करता येईल याचे मार्गदर्शन वृद्धकल्याणशास्त्र करू शकते. हे लक्षात आल्यावाचून राहात नाही.\nअ‍ॅरिस्टॉटल एकदा म्हणाला होता की, ‘म्हातारी माणसं आशेवर जगण्याऐवजी स्मृतींवर जगतात.’ किती खरं आहे हे विधान वयाबरोबर माणसाची इतर अनेक नाती आपली रूपं पालटतात. त्याप्रमाणे त्याचं काळाशी असलेलं नातंही बदलतं. भूतकाळ अधिकाधिक दीर्घ भरीव होत जातो. मग या भरीव भूतकाळाच्या आश्रयाने जगणं त्याला सोयीचे वाटते. त्यातल्या त्यात तारुण्याच्या रम्य स्मृती आणि बालपणातल्या आनंद स्मृतीत रमणं हे वार्धक्याचं एक ठळक लक्षण असतं.\nपण स्मृती प्रिय असल्या तरी रोजच्या जगण्यासाठी समाज किंवा आजूबाजूचे लोक लागतातच. आजचा दिवस हा आजच जगावा लागतो. कालचा दिवस आज जगता येतच नाही हे वास्तव नाकारून कसं चालेल\n– डॉ. रोहिणी पटवर्धन\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nछान. आपल्याकडे गेरोन्टोलॉजि नवीनच उदयास येत आहे. भारतीयांची मानसिकता ani उपलब्ध पैसे यांची सांगड घालून पहाणेहीताचे ठरेल. माहितीबद्दल आभारी आहोत.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4819181857799990164&title=Silver%20Jubilee%20of%20'Ruturang'%20Magzine&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-24T05:04:46Z", "digest": "sha1:2UMH3CFIKIMWYX4L4YP7O6KCJUUIFTJG", "length": 12392, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘ऋतुरंग’च्या रौप्यमहोत्सवानिमित्त ‘ग्रंथाली’ची रसिकांसाठी विशेष योजना", "raw_content": "\n‘ऋतुरंग’च्या रौप्यमहोत्सवानिमित्त ‘ग्रंथाली’ची रसिकांसाठी विशेष योजना\nमुंबई : ‘ऋतुरंग’चा हा सलग २५वा अंक असून, मनातील आठवणींना वाट मोकळी करून देणारे मान्यवरांचे लेख हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्यात गुलजार, लता मंगेशकर, डॉ. उदय निरगुडकर, गिरीश कुबेर, संदीप वासलेकर, राजीव खांडेकर, सौमित्र, अशोक कोठावळे यांसारख्या मान्यवरांचा समावेश असून, २७२ पानांच्या या अंकाची किंमत २०० रुपये इतकी आहे.\n‘ग्रंथाली’तर्फे दर वर्षी काही दर्जेदार दिवाळी अंक आणि पुस्तके एकत्र करून त्यांचा संच सवलतीच्या दरात रसिकांना उपलब्ध करून दिले जातात. यंदा त्या संचात ‘ऋतुरंग’, ‘उत्सव नात्यांचा’ आणि ‘शब्द रुची’ या तीन दिवाळी अंकांसोबत अरुण शेवते यांनी संपादित केलेली ‘आठवणींचे असेच असते’ (आठवणी आपल्या मनात रुंजी घालत असतात. आठवणी या त्या काळचे प्रतिबिंब असते), ‘मला उमगलेला पुरुष’ (‘स्त्री’ला पुरुष कसा उमगतो हे उलगडून दाखवणारे पुस्तक), ‘मी स्त्री आहे म्हणून’ (‘स्त्री’ला स्त्री आहे म्हणून काय वाटते याचा शोध घेणारे पुस्तक) ही तीन पुस्तके आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे ‘मागे वळून पाहताना’ हे चिंतनपर ललित गद्य असा एक हजार २०० रुपये किंमतीचा ऐवज केवळ ८०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येत आहे. संच कुरिअरने पाठविण्यासाठी प्रत्येकी ८० रुपये स्वतंत्र शुल्क आकारण्यात येईल, असेही ‘ग्रंथाली’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.\n‘झी मराठी’ आणि ‘ग्रंथाली’ची संयुक्त निर्मिती असणारा ‘उत्सव नात्यांचा’ हा पहिलावहिला दिवाळी अंक या संचाचे खास वैशिष्ट्य ठरले आहे. गेली १८ वर्षे मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘झी मराठी’ची जडणघडण, वर्तमान आणि भविष्य यांचा विविधांगी आढावा घेणारा हा लेख मान्यवर, विचारवंत आणि कलावंतांच्या साहित्याने, आठवणींनी आणि चिंतनपर साहित्याने सजलेला आहे. त्यात शारदा सुंदर, नितीन वैद्य, भारतकुमार राऊत, माधवी मुटाटकर, जयदेव डोळे आणि सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर यांच्यापासून ‘झी’चे सर्व कलाकार, लेखक, निर्माते गीतकार अशा अनेक मान्यवरांचा समावेश आहे. सुप्रसिद्ध नाटककार प्रशांत दळवी यांनी अंकाचे संपादन केले असून, २७२ पानांच्या या अंकाची किंमत केवळ १०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.\nया वर्षीचा ‘शब्द रुची’चा दिवाळी विशेषांक नेहमीप्रमाणे विविधांगी साहित्याने नटलेला आणि संग्राह्य असा झाला आहे. डॉ. वीणा सानेकर यांनी या अंकाचे संपादन केले असून, वसंत आबाजी डहाके, उषा मेहता, महेंद्र तेरेदेसाई, डॉ. प्रतिमा इंगोले, वसंत लिमये, जयदेव डोळे, दिनकर गांगल, प्रवीण बांदेकर असे अनेक मान्यवर या अंकाचे शिलेदार आहेत. ‘ग्रंथाली’चे आधारस्तंभ आणि चतुरस्र लेखक अरुण साधू यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना वाहिलेली आदरांजली आणि त्याबरोबरच अन्य मान्यवरांच्या कथा, कविता, ललित, परिसंवाद, विविध विषयांवरील चर्चा अशा साहित्याने नटलेला हा २०० पानांचा अंक स्वतंत्रपणे दीडशे रुपये किंमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे.\n‘ग्रंथाली प्रकाशनने भेट स्वरूपात उपलब्ध करून दिलेले हे संस्कृतीसंचित प्रत्येक रसिक माणसाच्या संग्रही राहील आणि त्याला त्याच्या सांस्कृतिक श्रीमंतीची आठवण करून देईल,’ असा विश्वास सुदेश हिंगलासपूरकर यांनी व्यक्त केला आहे.\nहा संच पुढील ठिकाणी उपलब्ध असेल : बुकगंगा (पुणे), अक्षरधारा (पुणे), ज्योती स्टोअर्स (नाशिक), साहित्ययात्रा (ठाणे), मॅजेस्टिक बुक स्टॉल (गिरगाव/शिवाजी मंदिर/ठाणे), मॅजेस्टिक बुक हाउस (दादर/विलेपार्ले/डोंबिवली), आयडियल पुस्तक त्रिवेणी (दादर).\n‘ग्रंथाली’चा ‘शब्द रुची’ प्रसिद्ध ‘ग्रंथाली’तर्फे दिवाळीनिमित्त वाचकांसाठी माहितीचा खजिना ग्रंथालीचा वाचकदिन सोहळा २४ आणि २५ डिसेंबरला ‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाचे एक ऑगस्टला प्रकाशन ‘चला हवा येऊ द्या’ला ‘यूके’त प्रचंड प्रतिसाद\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nआवर्जून वाचावी अशी ‘रानबखर’\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\nस्वानंद समुद्र यांना मानाचा ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅवॉर्ड’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/rupee-be-large-bank-mergers-13130", "date_download": "2018-04-24T05:05:17Z", "digest": "sha1:BICIBSGXKXBLXKCTH2FCUP6DYCNPWVHO", "length": 15907, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rupee to be a large bank mergers! ‘रुपी’चे मोठ्या बॅंकेत विलीनीकरण व्हावे! | eSakal", "raw_content": "\n‘रुपी’चे मोठ्या बॅंकेत विलीनीकरण व्हावे\nज्ञानेश्‍वर बिजले - @dbijale_Sakal\nमंगळवार, 4 ऑक्टोबर 2016\nरुपी सहकारी बॅंकेवर आर्थिक निर्बंध घालून साडेतीन वर्षे होऊन गेली. बॅंकेत अडकून पडलेली रक्कम कधी मिळणार, या चिंतेत सहा लाखांपेक्षा अधिक खातेदार आहेत. त्यांनी संयम बाळगला आहे. त्यातील पंधरा-वीस जणांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरासमोर सहा महिन्यांपूर्वी धरणे आंदोलन केले. त्यात ज्येष्ठ नागरिक, महिला होत्या. पाच मिनिटे त्यांनी भजन केले. तेवढ्यात पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्यावर आज न्यायालयात आरोपपत्र दाखल होत आहे.\nरुपी सहकारी बॅंकेवर आर्थिक निर्बंध घालून साडेतीन वर्षे होऊन गेली. बॅंकेत अडकून पडलेली रक्कम कधी मिळणार, या चिंतेत सहा लाखांपेक्षा अधिक खातेदार आहेत. त्यांनी संयम बाळगला आहे. त्यातील पंधरा-वीस जणांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरासमोर सहा महिन्यांपूर्वी धरणे आंदोलन केले. त्यात ज्येष्ठ नागरिक, महिला होत्या. पाच मिनिटे त्यांनी भजन केले. तेवढ्यात पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्यावर आज न्यायालयात आरोपपत्र दाखल होत आहे.\nकायद्याने पोलिसांची कारवाई योग्यही ठरेल. पण रक्कम कधी मिळणार, हा त्या पंधरा-वीस लोकांचा प्रश्‍न. त्याचे उत्तर देण्याची जबाबदारी कोणाची बापट तीन वर्षांपूर्वी विरोधी पक्षाचे आमदार असताना त्यांनी आणि आमदार माधुरी मिसाळ यांनी ठेवीदारांची बाजू घेत आंदोलन केले होते. रुपीच्या संचालकांच्या घरासमोर धरणे आंदोलन केले. विधिमंडळात जोरदार भाषणे केली. बॅंकेचे तत्कालीन संचालक, अधिकारी आणि कर्ज थकविणारे कर्जदार यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची त्यांची मागणी तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मान्य केली. त्यानुसार अधिकारी नेमले. चौकशी झाली. सहकार कायद्याच्या कलम ८८ नुसार तत्कालीन संचालकांवर आर्थिक जबाबदारी निश्‍चित करण्यात आली. कर्जदारांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची घोषणा झाली.\nया घोषणांना आता वर्ष-दीड वर्ष उलटून गेले. राज्यात सत्तांतर होऊनही दोन वर्षे होत आली. पालकमंत्री यांच्या घरासमोर पाच-दहा मिनिटे धरणे धरणाऱ्यांविरुद्ध तत्परतेने कारवाई होत असेल, तर ज्यांनी बॅंकेचे आर्थिक नुकसान केले, त्यांच्याविरुद्धच्या कारवाईला विलंब का होतो आहे, त्याचे उत्तरही सत्तारूढ पक्षाच्या मंत्र्यांनी दिले पाहिजे, ही सर्वसामान्य ठेवीदारांची अपेक्षा आहे.\nथकबाकीदारांकडून रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न बॅंकेच्या प्रशासक मंडळाकडून सुरू असले, तरी त्यालाही मर्यादा आहेत. जे कर्जदार रक्कम देतच नाहीत, त्यांच्याविरुद्ध, तसेच तत्कालीन संचालकांविरुद्धही कारवाई केली पाहिजे. सध्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि सहकार विभाग त्यात चालढकल करीत असल्याचे दिसून येते.\nराष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये ‘रुपी’चे विलीनीकरण करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना सहकार मंत्र्यांनी बॅंकेच्या प्रशासक मंडळाला केली होती. त्यानुसार, अशा बॅंकांना प्रस्ताव पाठविले पाहिजेत. केंद्रीय अर्थ विभागाशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साह्य करीत आहेत. मात्र, बॅंकेचे प्रशासक मंडळच त्यांच्या संपर्कात आहे. सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी ‘रुपी’च्या विलीनीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या दोन-तीन वर्षांत असे फारसे प्रयत्न झाले नसल्याचे दिसून येते. ‘रुपी’ बॅंकेचा तोटा अधिक असल्याने, मोठ्या बॅंकेत तिचे विलीनीकरण करणेच सर्व खातेदारांच्या दृष्टीने फायद्याचे ठरू शकते. त्या दिशेने प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे.\nअनधिकृत गौण खनिजाविरुद्ध मोहीम\nमालवण - तालुक्‍यात अनधिकृतरीत्या वाळू वाहतूक, गौण खनिज वाहतूक तसेच वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या होड्यांवर महसूल प्रशासनाने धडक मोहीम हाती घेत...\nम्हेत्रे कुटुंबीयांकडुन सात हजार पुस्तके दान\nतासगाव - ज्येष्ठ द्राक्षतज्ज्ञ एन. बी. म्हेत्रे यांच्या आई रुक्‍मिणी बाबूराव म्हेत्रे आणि शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त प्रयोगशील शेतकरी आर. डी. (...\nयात्रेकरुंची तहान भागवण्यासाठी सरसावले 'जल'दाते\nशिर्सुफळ : शिर्सुफळ (ता.बारामती) येथील श्री शिरसाई देवी यात्रेच्या दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांची होणारी गैरसोय...\nअग्निशमन दलाचा मला सार्थ अभिमान वाटतो - विश्वनाथ महाड़ेश्वर\nमुंबई : अग्निशी झुंज देत मुंबईकरांच्या जीवन व मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुंबईचे महापौर विश्वनाथ...\n‘व्यवस्थे’मुळेच होतेय आरोग्याची हेळसांड\nसरकारी दवाखान्यात प्रशिक्षणार्थी म्हणून आणि नंतर डॉक्‍टर म्हणून काम केल्यामुळे ही व्यवस्था जवळून पाहिली आहे. सरकारी दवाखान्यांच्या दावणीला बांधलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/poor-people-diwali-13254", "date_download": "2018-04-24T05:13:38Z", "digest": "sha1:Q6N5PHL7R4OJ4TNGYMJF4E5RYVT6GXOF", "length": 14060, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "poor people diwali गरिबांच्या दिवाळीत ‘गोडी’ नाहीच | eSakal", "raw_content": "\nगरिबांच्या दिवाळीत ‘गोडी’ नाहीच\nगुरुवार, 6 ऑक्टोबर 2016\nदारिद्र्यरेषेखालील नागरिकांना फक्त १६० ग्रॅम जास्त साखर\nपुणे - गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी पुरवठा विभागाने प्रतिमाणशी अवघी १६० ग्रॅम जादा या प्रमाणानुसार १४८७ क्विंटल साखर उपलब्ध करून देऊन आपले कर्तव्य पार पाडले आहे. तर पामतेलाचा अद्याप पत्ताच नाही. विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत साखरेच्या कोट्यात एक क्विंटलची घट केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nदारिद्र्यरेषेखालील नागरिकांना फक्त १६० ग्रॅम जास्त साखर\nपुणे - गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी पुरवठा विभागाने प्रतिमाणशी अवघी १६० ग्रॅम जादा या प्रमाणानुसार १४८७ क्विंटल साखर उपलब्ध करून देऊन आपले कर्तव्य पार पाडले आहे. तर पामतेलाचा अद्याप पत्ताच नाही. विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत साखरेच्या कोट्यात एक क्विंटलची घट केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nशहरात अंत्योदय योजनेखाली ११ हजार ७७२ लाभार्थी असून, दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांची संख्या ३० हजार ५९७ आहे. अशा सुमारे ४२ हजारांहून अधिक कुटुंबांना पुरवठा विभागाकडून रेशन दुकानामार्फत दिवाळीसाठी साखर, पामतेल, डाळ पुरविली जाते. दरमहा प्रति माणशी ५०० ग्रॅम साखर साडेतेरा रुपये किलो या दराने वितरित करण्यात येते. या महिन्यात दिवाळी असल्याने साखरेच्या प्रमाणात माणशी १६० ग्रॅम वाढ करून हे प्रमाण ६६० ग्रॅम एवढे करण्यात आल्याची माहिती शहर पुरवठा अधिकारी शहाजी पवार यांनी दिली.\nसरकारच्या प्रमाणानुसार एका घरात सरासरी चार व्यक्ती गृहीत धरल्यास दिवाळीसाठी एका कुटुंबाला नेहमीपेक्षा केवळ अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त साखर सवलतीच्या दरात मिळणार आहे. गेल्या महिन्यात (सप्टेंबर) शहरासाठी १४८८ क्विंटल साखरेचा कोटा मंजूर झाला होता. या महिन्यात दिवाळी असल्याने त्यापेक्षा जास्त साखर उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. परंतु पुरवठा विभागाने गेल्या महिन्यापेक्षा एक क्विंटल कमी साखर उपलब्ध करून देऊन गरिबांविषयी अनास्था दाखवून दिली आहे. तुटपुंजी साखर उपलब्ध करून दिल्याने गरिबांनी दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nदरम्यान, पामतेल आणि डाळ अद्याप उपलब्ध झालेली नाही. याबाबत पवार यांना विचारले असता याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. केवळ या महिन्यासाठी साखरेचा कोटा उपलब्ध करून दिला असून, तो शिवाजीनगर येथील धान्य गोदामात आल्याचे त्यांनी सांगितले.\nदात कोरून पोट भरणे ही म्हण ऐकली आहे, परंतु सरकार आणि प्रशासन यांच्या या निर्णयाने दात कोरून सण साजरा करा, अशी नवी म्हण उदयाला आली आहे. गरिबाने अर्धा किलोमध्ये दिवाळीसारखा सर्वांत मोठा सण साजरा करावा, अशी सरकारची इच्छा दिसत आहे. राज्याचे पुरवठामंत्री गिरीश बापट हे पुण्यातील असून, त्यांनी याबाबत योग्य निर्णय घेणे आवश्‍यक आहे.\n- नितीन पवार (सामाजिक कार्यकर्ते)\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nपिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ५० मिडीबस शहरात दाखल झाल्या असून, २७ मार्गांवर त्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला...\nपालिकेत जाऊनही उंड्रीकर तहानलेलेच\nउंड्री - शासनाला कराच्या रूपाने कोट्यवधींचे उत्पन्न देणारे उंड्री गाव सध्या पाणीटंचाईने प्रचंड त्रस्त आहे. पुणे महापालिकेत समावेश झाल्यानंतर...\nरेल्वे बंदमुळे नोकरदारांचे हाल\nदुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे बंद असल्याने नोकरदार, विद्यार्थी, कामगार आदींचे सोमवारी (ता. २३) हाल झाले. पुणे मंडळाच्या वतीने पुणे- दौंडमधील...\nशेतमजुरामुळे वाचले बेवारस अर्भकाचे प्राण\nनारायणगाव - कांदळी (ता. जुन्नर) येथे अज्ञात व्यक्तीने टाकून दिलेल्या बेवारस नवजात अर्भकाचे प्राण शेतमजूर रवी चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे वाचले. ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-246255.html", "date_download": "2018-04-24T05:08:43Z", "digest": "sha1:IDH5N3CECGCDEGMXG6IE7ERBRFNJKRJV", "length": 16217, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "4 पॅनकार्ड वापरणाऱ्या कृपा शंकर सिंहांभोवती आयकर विभागाचा फास", "raw_content": "\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : अस्सा होता आपल्या 'सचिन'चा सुरुवातीचा प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n4 पॅनकार्ड वापरणाऱ्या कृपा शंकर सिंहांभोवती आयकर विभागाचा फास\n23 जानेवारी : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेसचे नेते कृपा शंकर सिंह यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झालीये. याआधी एसीबी आणि सीबीआय यांच्या चौकशीने कृपाशंकर सिंह यांना घाम फोडला होता तर आता ईडी आणि आयकर विभागाच्या चौकशीचा फास कृपाशंकर सिंह यांच्याभोवती आवळणार असं दिसतंय.\nकृपाशंकर सिंह यांच्यावर दाखल असलेले गुन्हे, आरोप आणि तपास लक्षात घेतां हे प्रकरण मनी लाँड्रिंग एक्ट मध्ये मोडत असल्याचं दिसतंय. त्यामुळे या प्रकरणी ईडीचं काय म्हणणं आहे अशी विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला नोटीस जारी केलीये. तर दुसरीकडे कृपाशंकर सिंह यांच्या ४ पॅनकार्डबाबत तक्रारारदाराने दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने आज न्यायालयात अहवाल सादर केला. त्यानुसार ४ पैकी २ पॅनकार्ड नंबर हे चुकीचे असून, एक पॅनकार्ड रद्द झाले असून एक पॅनकार्ड हे सुरु असल्याची माहिती आयकर विभागाने मुंबई उच्च न्यायालयाला दिली.\nत्यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करत, एका व्यक्तीचे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असणे हा गुन्हा नाही का आयकर विभागाला यांची कल्पना नाही का आयकर विभागाला यांची कल्पना नाही का तुम्ही याबाबत काही तपास केलाय का तुम्ही याबाबत काही तपास केलाय का गुन्हा दाखल केलाय का गुन्हा दाखल केलाय का अशा कारवाईबाबत आयटी एक्ट मध्ये काही तरतूद आहे का अशा कारवाईबाबत आयटी एक्ट मध्ये काही तरतूद आहे का अशा प्रश्नांची फैरी झाडत आयकर विभागाला मुंबई उच्च न्यायालयाने झापले. आणि दोन आठवड्यात आपलं म्हणणं मांडावं असे आदेश आयकर विभागाला दिलेत. न्यायमुर्ती रंजीत मोरे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिलेत.\nकृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात दाखल बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी आतापर्यंत काय तपास केला तपास संपला आहे की अद्यापही सुरू आहे आणि असल्यास त्याची सध्या स्थिती काय आहे, अशी प्रश्नांची सरबत्ती करत त्याबाबतचा मोहोरबंद अहवाल तीन आठवडय़ात सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला गेल्या सुनावणीला दिले होते.\nएसीबीकडून या प्रकरणाचा योग्य तपास करण्यात आलेला नाही, असा आरोप करत तपासाची सूत्रे सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी तुलसीदास नायर यांनी एका याचिकेद्वारे मागणी केली होती. त्यावेळी सुनावणीच्या वेळेस न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने या प्रकरणाच्या स्थितीबाबत विचारणा करत त्याबाबतचा मोहोरबंद अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त सरकारी वकील एफ. आर. शेख यांना दिले होते.\nपरंतु तपास एसीबीतर्फे करण्यात येत आहे. तसंच उच्च न्यायालयाने वा राज्य सरकारने तपासाची सूत्रे वर्ग केली तरच सीबीआयकडून तपास केला जातो. याप्रकरणी अद्याप असे काहीच झालेले नाही, असे सीबीआयच्या वतीने अ‍‍ॅड्. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितलं होतं. त्यामुळे एसीबीच्या अहवालानंतर तपास सीबीआयच्या ताब्यात जाणार की नाही हे निश्चित होईल. कृपाशंकर सिंह आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उच्च न्यायालयाने एसीबीला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते, परंतु चौकशीच्या नावाखाली एसीबीने काहीच केलेले नाही. त्यामुळे हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी याचिकाकर्ते नायर यांनी न्यायालयाकडे गेल्या सुनावणीला केली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 'ईडीCongressआयकर विभागकाँग्रेसकृपाशंकर सिंह\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1848", "date_download": "2018-04-24T04:30:35Z", "digest": "sha1:6UAARX42NQRNAXFYJXAIUJZDOPLYRBYC", "length": 4775, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची अमेरिकेचे अर्थमंत्री आणि वाणिज्य मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा\nजागतिक बँक आणि जागतिक नाणेनिधीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यादरम्यान जेटली यांनी वॉशिंग्टन येथे अमेरिकेचे अर्थमंत्री आणि वाणिज्य मंत्र्यांशी भारत-अमेरिका वित्तीय सहकार्य, विशेषत: द्विपक्षीय गुंतवणूक आणि व्यापार याविषयी चर्चा केली. दोन्ही देशांमधला व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी काय पावलं उचलता येतील यावर या बैठकीत भर देण्यात आला. भारतात गेल्या तीन वर्षात करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांची त्यांनी माहिती दिली. सरकारने वस्तू आणि सेवा कर लागू करणे, वित्तीय समावेशन आणि काळ्या पैशामुळे निर्माण झालेल्या समांतर अर्थव्यवस्थेला संपवण्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयांची यांनी यावेळी माहिती दिली. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भारतातील कुशल युवकांचे योगदान मोठे असल्याचे सांगत अमेरिकेने त्याची दखल घ्यावी असे जेटली म्हणाले. एच वन-बी/एल वन व्हिसा प्रक्रियेत बदल करणे आणि अमेरिकेत असलेल्या भारतीय व्यावसायिकांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देणे या दोन्ही मुद्यांवर जेटली यांनी भर दिला.\nया बैठकीत आधी वित्तीय व्यवहार विभाग आणि वित्त विभागाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी मायक्रो पेन्शन या विषयावर बैठकीत माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-04-24T04:46:44Z", "digest": "sha1:TDRTG6TK3X5FLIPUWOAZFFXX7FZZZAA5", "length": 2822, "nlines": 48, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"ताजमहाल\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"ताजमहाल\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां ताजमहाल: हाका जोडणी करतात\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1849", "date_download": "2018-04-24T04:55:03Z", "digest": "sha1:IA5TAVLGNSUCGLYFMGG6LRMO576GHZQR", "length": 4713, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nकेंद्र सरकारच्या आर्थिक संरचनात्मक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची भक्कम शाश्वत आणि समतोल विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु\nकेंद्र सरकारने केलेल्या आर्थिक संरचनात्मक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल भक्कम, शाश्वत आणि समतोल विकासाकडे सुरु झाली आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले. “भारतीय संधी” या विषयावर फिक्कीने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात ते आज बोलत होते. विमुद्रीकरण, वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर विकास दराची मंदावलेली गती हा तात्पुरता परिणाम होता आणि भारतीय अर्थव्यवस्था आता प्रगतीच्या मार्गावर आहे असे जेटली म्हणाले. सरकारने केलेल्या धाडसी आर्थिक सुधारणांमुळे पायाभूत संपत्तीचे वाद निकाली निघण्यासाठी मदत झाली असून परदेशी गुंतवणूक वाढण्याच्या दृष्टीने ही पोषक गोष्ट असल्याचे जेटली म्हणाले.\n1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू होणे ही सरकारने टप्प्याटप्प्याने केलेल्या वित्तीय सुधारणांमधली महत्वाची पायरी होती. त्या आधी केलेले विमुद्रीकरण आणि इतर संरचनात्मक सुधारणांशी हा निर्णय सुसंगतच होता असे सांगत या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेचा मार्ग आणि गती दोन्ही सुरळीत झाला असल्याचे ते म्हणाले. गेल्या वर्षात भारतात थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला असून भारतीय अर्थव्यवस्थेविषयी जागतिक स्तरावर विश्वास वाढल्याचेच हे निदर्शक आहे असे त्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5086340494848815633&title=Tanmay%20Salwekar%20Shines%20In%20Chinese%20Essay%20Reading%20Competition&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-24T05:01:43Z", "digest": "sha1:6EJW4TEFSV2MHES66HVIZDOEL5HQSNMI", "length": 6356, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "चिनी निबंध वाचन स्पर्धेत तन्मय साळवेकर तिसरा", "raw_content": "\nचिनी निबंध वाचन स्पर्धेत तन्मय साळवेकर तिसरा\nपुणे : चायनीज एज्युकेशन मिनिस्ट्रीतर्फे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निबंध वाचन स्पर्धेत मिलेनियम नॅशनल स्कूलच्या तन्मय साळवेकरला तिसरे पारितोषिक मिळाले.\n‘माझी चिनी भाषा शिक्षिका’ या विषयावरील निबंधाचे वाचन तन्मय साळवेकरने केले होते. तन्मयच्या या यशाबद्दल त्याचा सत्कार मिलेनियम स्कूलचे संचालक अन्वित फाटक यांच्या हस्ते करण्यात आला.\nया वेळी ‘येह चायना’ संस्थेच्या संचालक उषा साहू, ‘यिन -यांग सेंटर फॉर चायनीज लँग्वेज’च्या संचालक यशोधरा गाडगीळ उपस्थित होत्या.\nमिलेनियम नॅशनल स्कूलमध्ये दोन वर्षांपासून चिनी भाषेचे वर्ग घेतले जात आहेत. या उपक्रमात ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असून त्यांना विविध परीक्षांत यश मिळाले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव देखील यावेळी करण्यात आला.\nलोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nमहाश्रमदानात सहभागी होण्याचे आमिर खानचे आवाहन\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\nस्वानंद समुद्र यांना मानाचा ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅवॉर्ड’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2018-04-24T04:35:11Z", "digest": "sha1:A4Y2IFXO2NND3DPPOATR73J776PBEEAH", "length": 4012, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:वारकरी संप्रदाय - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► पंढरपूर‎ (५ प)\n► वारकरी संप्रदायातील व्यक्ती‎ (२३ प)\n\"वारकरी संप्रदाय\" वर्गातील लेख\nएकूण १५ पैकी खालील १५ पाने या वर्गात आहेत.\nसाचा:हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१२ रोजी ११:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://british111.blogspot.com/", "date_download": "2018-04-24T04:21:41Z", "digest": "sha1:74O7XRVDDLDQUTJHN6IXI4GYY4SO6KFE", "length": 3755, "nlines": 39, "source_domain": "british111.blogspot.com", "title": "१८५७ च्या लढ्यातील इंग्रज अधिकारी", "raw_content": "\n१८५७ - ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरीया\n(जन्म - २४ मे १८१९ - म्रत्यु - २२ जाने. १९०१ )\nपुर्ण नाव Alexandrina Victoria, राज्याभिषेक २८ जुन १९३८\nमागे - स्वातंत्र्यसमर १८५७ चा\nगर्व्हर्णल जनरल भारत १८५७ - Charles John Canning\n१८५७ च्या बंडाच्या काळात Charles Canning हे भारताचे गर्व्हर्णल जनरल होते.\nत्यांचा कार्यकाल १९३७ ते १८५९ होता.\nहेंन्री हॅवलॉक हे १८५७ च्या बंडाच्या काळात, कानपुर भारतीयानकडुन परत जिंकण्याबद्द्ल प्रसिध्द होते. त्यांनी त्यांचे सहकारी हेंन्री लौरेंन्स, लखनव व व्हिलर कानपुर यांना भारतीय सैन्याविरुध्द मदत केली.\nहे भारतीय उठावाच्या काळातील ब्रिटीशांचे हिरो म्हणुन ओळखले जायचे - कानपुर . त्यानी १८५७ च्यावेळी अनेक शहरात सैनिकांनर मात केली.\nमेजर जनरल सर ह्युज व्हिलर\nहे भारतीय उठावाच्या काळात कानपुर येथे होते. कानपुरच्या युध्दात सैनिकांनी त्यांचा खुन केला\nहे पुना येथे होते. तसेच त्यानी झाशी, ग्वालेरला अनेक लढाया लढल्या. त्यात ग्वालेरला त्याचा सामना तात्या टोपेशीसुध्दा झाला.\nहे दिल्लीतील लढाईत त्यांच्या कावेबाज पध्दतीसाठी प्रसिध्द होते.\nटाइम्स वृत्तपत्राचे पत्रकार डब्ल्युएच रसैल १८५८ मध्ये भारतात आले\nमागे - स्वातंत्र्यसमर १८५७ चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/blast-in-balaghat-firecracker-factory-at-least-20-dead-262415.html", "date_download": "2018-04-24T05:06:27Z", "digest": "sha1:77PA6IQN3M26U74VBP7M3N47XLMWFFMD", "length": 10620, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मध्य प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 20 ठार", "raw_content": "\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : अस्सा होता आपल्या 'सचिन'चा सुरुवातीचा प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nमध्य प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 20 ठार\nमध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामध्ये २० कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. तर ८ जण जखमी आहेत.\n07 जून : मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामध्ये २० कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. तर ८ जण जखमी आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, ग्राम खैरी जंगलामध्ये वारसी फटाक्यांच्या कंपनीत दुपारी 2 च्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कारखान्याला लागून गोदाम पण होते. त्यामुळे स्फोटाची तीव्रता जास्त होती. कारखान्यात ३० ते ४० जण होते. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thanevarta.in/?cat=87", "date_download": "2018-04-24T04:31:22Z", "digest": "sha1:ZLMYGAGKYB3CZVU5WVODIAMPWYCFPF74", "length": 8433, "nlines": 75, "source_domain": "thanevarta.in", "title": "railway – Thanevarta", "raw_content": "\nठाणे रेल्वे स्थानकात सवलतीच्या दरात २४ तास वैद्यकीय सेवा\nठाणे रेल्वे स्थानकाला १६५ वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून ठाणे रेल्वे स्थानकात २४ तास वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली आहे.\nठाणे रेल्वे स्थानकात ऐतिहासिक ठेवा जतन करण्यास मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात काम सुरू करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी\nठाणे रेल्वे स्थानकात ऐतिहासिक ठेवा जतन करण्यास मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात काम सुरू करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.\nदेशातील पहिल्या रेल्वे सेवेला १६५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं केक कापून प्रवाशांनी साजरा केला वर्धापन दिन\nआशिया खंडात रेल्वे सेवा सुरू झालेल्यास १६५ वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर १६५ वर्षापूर्वी म्हणजे १६ एप्रिल १८५३ ला मुंबईहून ठाण्याला रेल्वे सेवा सुरू झाली.\nविदर्भ आणि अमरावती एक्सप्रेसला ठाण्यात थांबा – श्रेय लाटण्यासाठी विदर्भ एक्सप्रेस दोन वेळा थांबवली\nविदर्भ आणि अमरावती एक्सप्रेसला ठाण्यामध्ये थांबा देण्यात आल्यावरून राजकीय पक्षांमध्ये झालेल्या श्रेयासाठीच्या चढाओढीमुळं प्रवाशांना मनस्ताप होण्याबरोबरच एकच गाडी दोन दोनवेळा थांबवावी लागली.\nठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस चढण्या-उतरण्यासाठी दोन नविन सरकते जिने\nठाणे रेल्वे स्थानकात दोन नविन सरकते जिने बसवण्यात आले असून त्याचं लोकार्पण खासदार राजन विचारे यांच्या हस्ते झालं.\nठाणे रेल्वे स्थानक पूर्व बाजूच्या परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी\nकोपरीच्या वाहतूक कोंडीवर उतारा ठरणा-या ठाणे रेल्वे स्थानक पूर्व बाजूच्या परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्पास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे.\nठाणे रेल्वे स्थानकात बेवारस बॅगेमुळं खळबळ\nठाणे रेल्वे स्थानक परिसरात एका बेवारस बॅगेनं खळबळ उडवून दिली.\nनविन ठाणे रेल्वे स्थानक लवकर मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडं\nनविन ठाणे रेल्वे स्थानक लवकर मार्गी लावावे असे साकडे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांना घातलं आहे.\nठाणे पूर्वतील सॅटीस २ प्रकल्पाला लवकरात लवकर मान्यता देण्याचं रेल्वेमंत्र्यांचं आश्वासन\nठाणे पूर्वतील सॅटीस २ प्रकल्पाला लवकरात लवकर मान्यता देण्याचं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे.\nठाणे रेल्वे स्थानकातील नविन पादचारी पूल आणि सरकत्या जिन्यांचं लोकार्पण\nठाणे रेल्वे स्थानकातील नविन पादचारी पूल तसंच ठाणे पूर्वला चढण्या-उतरण्यासाठी दोन्ही बाजूस असलेल्या सरकत्या जिन्यांचं लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं.\nविस्थापितांचं पुनर्वसन हे त्यांच्या सहमतीनं आणि जगण्याशी सुसंगत असावं – मेधा पाटकर\nसुट्टीच्या दिवशी पालिका आयुक्तांनी पत्नीसमवेत केली झोपड्यांची रंगरंगोटी\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षपदी रविंद्र मोरे यांची नियुक्ती\nअल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलानेच फूस लावून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार\nइंदिरानगर झोपडपट्टीमधील जवळपास दीडशे मुलांनी चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत सहभाग घेऊन पालिका आयुक्तांसोबत साजरी केली रविवारची सुट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5326023330106386387&title=IAPAR%20-%20Play%20Reading&SectionId=5574535684314453706&SectionName=%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-04-24T05:02:04Z", "digest": "sha1:UC7BWXN2H723P6HPRJRD7MCTJ7CF4LXZ", "length": 15528, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "नाट्यवाचन स्पर्धेत ‘फर्ग्युसन’ची बाजी", "raw_content": "\nनाट्यवाचन स्पर्धेत ‘फर्ग्युसन’ची बाजी\nआयपार इंटरनॅशनल फेस्टिव्हलच्या निमित्ताने पुण्यातील रसिकांना विविध देशांतील उत्तम कलाकृती पाहायला मिळत आहेत. त्यातच विद्यार्थ्यांनाही सहभाग घेण्याची एक संधी ‘आयपार’ने आंतरमहाविद्यालयीन नाट्यवाचन स्पर्धेच्या निमित्ताने दिली.\nआयपार इंटरनॅशनल फेस्टिव्हलच्या निमित्ताने पुण्यातील रसिकांना विविध देशांतील उत्तम कलाकृती पाहायला मिळत आहेत. त्यातच विद्यार्थ्यांनाही सहभाग घेण्याची एक संधी ‘आयपार’ने आंतरमहाविद्यालयीन नाट्यवाचन स्पर्धेच्या निमित्ताने दिली. सहा, सात व आठ नोव्हेंबर रोजी कलाछाया कॅम्पसमध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे यंदाचे पहिलेच वर्ष होते.\nकलाकार म्हणून आवाज, वाचन यावर प्रभुत्व मिळविणे, भाषा आणि डिक्शन (शब्दांचा वापर) सुधारणे व त्याचबरोबर कमीत कमी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन केवळ नाट्यवाचनाच्या कलेवर तरुण कलाकारांनी लक्ष केंद्रित करावे, हा या स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य हेतू असल्याचे संयोजकांनी सांगितले. सहसा नाट्यवाचनाच्या स्पर्धेचा कालावधी २० ते ३० मिनिटांपर्यंत असतो; पण हाच कालावधी किमान एक तास ते दोन तास असा करत स्पर्धकांसमोर आयोजकांनी खऱ्या अर्थाने आव्हान ठेवले, हे या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य\nस्पर्धेबाबत बोलताना परीक्षक पौर्णिमा मनोहर म्हणाल्या, ‘प्रसाद वनारसे यांच्याकडून ही संकल्पना ऐकली, तेव्हाच खूप आनंद झाला. फक्त वाचिक अभिनयावर फोकस करून एक तास सादरीकरण करणे हे स्पर्धकांसाठी अवघड होते; पण काही त्रुटी वगळता स्पर्धकांनी उत्तम सादरीकरण केले.’ परीक्षणाबाबतचा अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, ‘स्पर्धेचं परीक्षण करताना खूप मजा आली. एक तास आहे म्हणून त्याचा कंटाळा आला असे कुठेच झाले नाही. या स्पर्धेमध्ये लाइव्ह संगीत वापरायला परवानगी होती. त्यामुळे तोंडाने विविध आवाज काढण्याचे प्रकार टाळले गेले. संगीत किंवा इतर गोष्टी या पूरक असायला हव्यात; पण काही स्पर्धकांनी त्याचा अति वापर केल्याचेही जाणवले. त्याचबरोबर अजून एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे वाचनादरम्यान खूप स्पर्धक पाणी प्यायचे. एक नट म्हणून या काही गोष्टी स्पर्धकांनी ध्यानात घेतल्या पाहिजेत. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संघाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. अत्यंत कमी, पण वेगळ्या आणि पूरक अशा अपेक्षित संगीताचा वापर त्यांनी केला.’ नाट्यवाचन करताना खूप मेहनत घेणे, प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घेऊन ते सादर करणे खूप गरजेचे आहे, असा सल्लादेखील त्यांनी स्पर्धकांना दिला.\nया स्पर्धेत पुण्यातील सहा महाविद्यालयीन संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाच्या व मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या संघांना अनुक्रमे पहिले व उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक संकेत पारखे (फर्ग्युसन) याला, तर उत्तेजनार्थ पारितोषिक अनघा काकडे (मॉडर्न) यांना मिळाले. पुरुष वाचिक अभिनयाचे पारितोषिक ‘फर्ग्युसन’चा संकेत पारखे व मॉडर्न महाविद्यालयाच्या (गणेशखिंड) प्रथमेश सावंत याला मिळाले. मॉडर्न महाविद्यालयाच्या (गणेशखिंड) गौरी ढोके हिने स्त्री वाचिक अभिनयाचे पारितोषिक पटकाविले. स्पर्धेचे परीक्षण श्याम जोशी व पौर्णिमा मनोहर यांनी केले.\n‘जास्त वेळेत जास्त गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला’\nस्पर्धेबाबत काहीसे उशिरा कळल्यामुळे संहिता ठरविण्यासाठी फारसा वेळ हातात नव्हता. तेवढ्यात महेश एलकुंचवार यांची ‘वासनाकांड’ ही कथा वाचनात आली. केवळ दोन पात्रांची कथा असल्याने ते एक प्रकारचे चॅलेंज होते. पहिल्या वाचनात फारसे काही हाती लागले नाही; पण नंतर अनेक मुद्दे सापडत गेले व त्यामुळे आम्ही चांगले सादरीकरण करू शकलो. कथेच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच चांगले काही तरी हाती लागते, असे मला वाटते. स्पर्धेतील सादरीकरणाचा कालावधी ही नवी गोष्ट होती; पण त्याकडे संधी म्हणून पाहत जास्त वेळेत जास्त गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला. संयोजकांनीही सगळ्याच पातळीवर आम्हाला भरपूर सहकार्य केले.\n- संकेत पारखे, फर्ग्युसन महाविद्यालय\n‘‘हिरकणी’ला अनेकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश’\nविश्वनाथ खैरे यांच्या ‘हिरकणी’ या पुस्तकाचे नाट्यरूपांतर करून मी ‘हिरा’ ही संहिता लिहिली व ती सादर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या फेस्टिव्हलमधील स्पर्धा असल्याने थोडा दबाव होता; पण आपल्या मातीतील कथा मांडून हिरकणीला अनेकांपर्यंत पोहोचविणे हादेखील हेतू ही संहिता निवडण्यामागे होता. स्पर्धेत वेळेची अट पूर्ण करताना आमचा कस लागला. शिवाय नाट्यक्षेत्रातील अनेक दिग्गजांसमोर सादरीकरण करायला मिळाले. त्या निमित्ताने त्यांच्याकडून चार गोष्टी शिकण्याची संधीसुद्धा मिळाली. रांगड्या बाजाची कथा असल्यामुळे त्यात पोवाडे व लोकसंगीताचा वापर आम्ही केला. तसेच तबला, डफ, डग्गा अशी वाद्ये वापरली. त्यामुळे सादरीकरण जास्त उठावदार झाले.\n- अनघा काकडे, मॉडर्न महाविद्यालय\n(‘आयपार महोत्सवा’चे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील वार्तांकन वाचण्यासाठी https://goo.gl/12cDAa येथे क्लिक करा.)\n‘आयपार’मध्ये कलाकारांची मांदियाळी सांस्कृतिक देवाणघेवाण पार्टी रामराम... घाशीराम...\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nमहाश्रमदानात सहभागी होण्याचे आमिर खानचे आवाहन\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\nस्वानंद समुद्र यांना मानाचा ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅवॉर्ड’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=26&t=3517&p=4240&sid=921635d003fa3d0ff2401b3e2bbfb5e3", "date_download": "2018-04-24T04:31:28Z", "digest": "sha1:A7G3RVDZQEQQCOS3I732FEYKITND46PU", "length": 4667, "nlines": 134, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "पाव भाजी - Pav Bahji - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान खाना-खज़ाना व्हेज रेसिपीज\nयेथे केवळ व्हेज रेसिपी च प्रसिद्ध कराव्यात\nबटाटा - 200 ग्रॅम चिरलेला\nगाजर - 100 ग्रॅम चिरलेला\nफुलकोबी - 100 ग्रॅम चिरलेला\nमटार 100 ग्रॅम किंवा 1 कप\nतेल किंवा तूप 2 टे स्पून\nजिरे - 1/2 चमचा\nReturn to “व्हेज रेसिपीज”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://garkhindi.com/", "date_download": "2018-04-24T04:58:03Z", "digest": "sha1:5KY5ZW3ZCTZSCOOWO4JMMUZRG6PB4GLD", "length": 6772, "nlines": 72, "source_domain": "garkhindi.com", "title": " आमची गारखिंडी", "raw_content": "\nश्री गारेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान\nश्री. मळगंगा व लिंबाई माता देवस्थान\nश्री गणेश तरुण मित्र मंडळ, वरंगळवाडी\nजय हनुमान बहुउद्देशीय मित्र मंडळ,गारखिंडी\nशिवझुंजार कला क्रीडा सांस्कृतिक आणि सार्व.नवरात्रोत्सव मंडळ,गारखिंडी.\nश्री खंडेश्वर मित्र मंडळ,खळवाडी\nदेव दिपावली व दिपोत्सव\nकै. रामदास भाऊ झिंजाड\nगारखिंडी गावाचे आराध्य दैवत\nगावाचा पालन व तारण करता म्हणजे हनुमंतराया\nडोंगराच्या व निसर्गाच्या कुशीत असलेले छोटे गाव\nगावाला तिन्ही बाजूला डोंगर आणि एका बाजूला पठार असा निसर्गसमृद्ध वारसा लाभला आहे.\nमहादेवाचे पुरातन स्वयंभू देवस्थान\nअंबरीश ऋषीने या भागात तपचर्या व वास्तव्य केले, या भागाला आंबदरा असे नाव पडले आहे\nगावाच्या माहितीसाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी गावाचे अधिकृत संकेतस्थळ दि. २२/०८/२०१५ रोजी प्रकाशित केले आहे.\nअनावधानाने कुणाचा नामोउल्लेख राहून गेला असेल किंवा काही माहिती टाकण्यात त्रुटी राहिल्या असतील त्याबद्दल आम्ही सर्व वेब टीम दिलगीर आहोत. काही सुधारणा असतील तर नक्की कळवा,धन्यवाद.\nगारखिंडी गावात आपले हार्दिक स्वागत\nहनुमान मंदिर, विठ्ठल रुखमाई मंदिर, महादेव मंदिर, पीरसाहेबा देवस्थान, श्री मळगंगा व लिंबाआई देवस्थान\nदेव दीपावली आणि दीपोत्सव, बैल पोळा\nस्वातंत्र्य काळात शिक्षणाचे वारे देशभर वाहू लागले. गावातही त्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या. सन १९५९ साली जिल्हा परिषदच्या शाळेची गावात सुरुवात झाली.\nगावाची ग्रामपंचायत स्थापना सन १९५८ साली अस्तित्वात आली.\nश्री गारेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान,गारखिंडी.\nगावच्या विकासाच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलणारे मंडळ\nश्री गारेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित.\nगावच्या ग्रामस्थांचा आर्थिक स्तंभ\nगावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना\n(महाराष्ट्र जमिन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या\nमतदार यादीमध्ये नाव पहा\nआपले नाव मतदार यादीत पाहण्यासठी आणखी वाचा\nनोकरीविषयक माहितीसाठी आणखी वाचा\nश्री.सचिन बाबाजी चौधरी, श्री.दादाभाऊ (दादु) चौधरी\nमाहिती व फोटो सौजन्य\nश्री.रंगनाथ गुरुजी झिंजाड,विनायक झिंजाड,गुलाब दादा चौधरी,अर्जुन अण्णा झिंजाड,विश्वनाथ झिंजाड,सुरेश आवारी,संतोष रावजी झिंजाड,तुषार चौधरी\n©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-28-02-2017-113092800001_1.html", "date_download": "2018-04-24T05:05:51Z", "digest": "sha1:JRK2YNTCL2DTXSVSS5EIJWRPXWHQILKE", "length": 10472, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Free Yotish in Marathi, Marathi Vastu, Marathi Fengshuie, Marathi Numrology | आज तुमचा वाढदिवस आहे | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआज तुमचा वाढदिवस आहे (28.03.2017)\n28 तारखेला जन्म घेणार्‍या व्यक्तीचा मूलक 2+8 = 10 अर्थात 1 असेल. तुम्ही राजसी प्रवृत्तीचे आहात. तुम्हाला तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे शासन पसंत पडत नाही. तुम्ही निडर आणि जिज्ञासु आहात. तुमचा मूलक सूर्य ग्रहाद्वारे संचालित होतो. तुम्ही फारच महत्वाकांक्षी आहात. तुमची मानसिक शक्ति प्रबल असेल. तुम्हाला समजूण घेणे फारच अवघड असते. तुम्ही आशावादी असल्यामुळे प्रत्येक परि‍स्थितीचा सामना करण्यास सक्षम असता. तुम्ही सौन्दर्यप्रेमी आहात. तुम्ही आत्मविश्वासी असल्यामुळे प्रत्यके अडचणींना मात करू शकता.\nईष्टदेव : सूर्य उपासना\nशुभ रंग : लाल, केशरी, क्रीम,\nतुमच्यासाठी हे वर्ष कसे असेल\n1, 10, 19, 28 तारखेला जन्म घेणार्‍या व्यक्तींसाठी हे वर्ष फारच उत्तम आहे. तुम्ही ज्या काही काम हातात घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. शासकीय कामात यश मिळेल. व्यापार-व्यवसायात प्रगती मिळण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता दूर होईल. राजकारणातील व्यक्ती सफल होतील. अविवाहितांसाठी वेळ अनकूल आहे. सूर्य जेव्हा मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु व मीनमध्ये येईल तेव्हा-तेव्हा तुमच्या पदरी यश येईल.\nमूलक 1 के प्रभाव वाले विशेष व्यक्ती\nआज तुमचा वाढदिवस आहे (27.03.2017)\nआज तुमचा वाढदिवस आहे (26.02.2017)\nनीलम रत्न : शनीचे मौल्यवान रत्न\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nरघुराम राजन यांचा बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी विचार\nरघुराम राजन यांच्या नावाचा विचार बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी केला जातो आहे असे ...\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://sahityasuchi.erasik.com/default", "date_download": "2018-04-24T04:27:15Z", "digest": "sha1:LAWTJHSRK4FALO2CAKE4W47K6AMZHJVN", "length": 2386, "nlines": 23, "source_domain": "sahityasuchi.erasik.com", "title": "साहित्य सूची - मराठी पुस्तक - Sahitya Suchi - Marathi Book", "raw_content": "\nसाहित्य सूची हे मराठी वाड्मयाला वाहिलेले नियतकालिक दरमहा हजारो वाचक सवयीने वाचतात.\nमुख्यतः नवीन आलेल्या पुस्तकांची सूची या भूमिकेतून हे मासिक सुरु झाले. चोखंदळ वाचकांची बदलती अभिरुची जपण्याची परंपरा या मासिकाने कसोशिने सांभाळली. त्यायोगे वाचकोपयोगी वैविध्यपूर्ण सदरं प्रकाशित केली.\nवैविध्यपूर्ण लेखन साहित्यरुपाने खऱ्या अर्थाने पुस्तकांद्वारे वाचकांपर्यंत पोहोचते. पुस्तक ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून ’नव्याने प्रकाशित झालेली’, ’आगामी’, आणि ’ पूर्वी प्रकाशित झालेली’ आशा तीनही काळातील काही पुस्तकांचा परिचय दरमहा करुन दिला जातो.\nया परिचयाला माहितीची जोड म्हणून एका ओळीतील परिचयासह नवीन पुस्तकांची इतंभूत माहिती देणारी सूची इतर चार सूचींसह दरमहा वाचायला मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://krishidesh.com/2011/09/07/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE/", "date_download": "2018-04-24T04:46:33Z", "digest": "sha1:A4L4XXVEXEK6XZO6KLJTRGSELYZRC6MP", "length": 7800, "nlines": 94, "source_domain": "krishidesh.com", "title": "दिल्ली मधील दहशतवादी बॉम्ब हल्ला. - कृषी देश", "raw_content": "\nएक विचार, एक प्रवास\nमहाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\n कसला असुरी आनंद घेता नाचक्की करून\nश्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते\nशासन व्यवस्था का व कशी पाहिजे – मोदी\nमेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना\nपोरा संग बसून नका काढू फोटू\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\nCategories Select Category Freedom Team (3) Personal Disputes (1) Travel (2) World Affairs (15) अभंग (3) आंबेडकर (2) आतंकवाद (5) आत्महत्या (4) इतिहास (16) उद्यम व्यवसायिकता (4) उपक्रम (10) कविता (15) ग्रामपंचायत (2) चळवळ (4) चाणक्य (1) तुकाराम महाराज (2) पंथ (3) भटकंती (1) भारत (119) मराठी (48) माझे विचार (45) राजकारण (76) शिवाजी (5) शेती (67) संभाजी (3) संस्कृत (4) स्वातंत्र्य (2) हिंदी (11) हिंदू (11)\nऐल तटावर पैल तटावर »\nदिल्ली मधील दहशतवादी बॉम्ब हल्ला.\nदिल्ली पोलिसांनी जाहीर केलेल्या संशियीतांची छायाचित्रे.\nपुन्हा एकदा आपल्या शंड आणि निष्क्रिय राजकीय नेतृत्त्वामुळे भ्याड दहशतवाद्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आवारात बॉम्ब हल्ला घडवून आणला. ह्या भ्याड हल्ल्यामध्ये ११ मृत्युमुखी पडले तर ७६ हून अधिक जखमी आहेत. जखमींमध्ये १५ जणांपेक्षा जास्त लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. हुजी (हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी) ह्या पाकिस्तान आणि बांगलादेशस्थित इस्लामिक दहशतवादी संघटनेने ह्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.\nआणि ह्याच सरकारचे म्होरके असलेले पंतप्रधान मनमोहन सिंघ आसामचा ६०० एकरहून अधिक भाग बांगलादेशाला द्यायला गेलेले आहेत. कारण काय तर बांगलादेशातील बेकायदेशीर घुसखोरांनी जमीन बळकावली म्हणून, अरे उद्या दिल्ली बळकावतील घुसखोरी करून मग काय दिल्ली पण देणार का\nह्या भ्याड हल्ल्यासाठी १३ जुलै चा मुंबई हल्ला, त्या आधीचा दिल्ली मधील माशिदिबाहेरील गोळीबार आणि शीतला घाटावरील बॉम्ब हल्ला ह्या गोष्टींची न झालेली चिकित्सा आणि त्याकडील दुर्लक्ष कारणीभूत आहे. तसेच काँग्रेस सरकारची देशातील सर्वच मुसलमानांना दहशतवादी समर्थक समजून काही माथेफिरुंवर कारवाई न करण्याची वृत्ती देखील. हा मुसलमानांचा अपमान तर आहेच पण देशाच्या सुरेक्षेचा मोठा प्रश्न आहे.\nमाझी मुसलमान बंधू-भगिनींना कळकळीची विनंती आहे कि त्यांनी असल्या जातीय तेढ वाढविणाऱ्या काँग्रेस सरकारला चांगलाच धडा शिकवावा.\nरागावलेल्या पीडितांच्या नातेवाईकांनी राहुल गांधीला “श्री राम मनोहर लोहिया रुग्णालयातून” हाकलून दिले.\nऐल तटावर पैल तटावर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/holi-110030200072_1.html", "date_download": "2018-04-24T05:07:04Z", "digest": "sha1:3E34WJNLJUABL6CXEGBXN2BZMNMQGXVY", "length": 10190, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "होळीचा रंग कसा काढाल? | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहोळीचा रंग कसा काढाल\n'कलरफूल फेस्टिवल' म्हणजे होळी रंग-तरंग आणि उमंग यांचे महान पर्व म्हणून आपण होळी मोठ्या हर्षोल्हासा‍त साजरी करत असतो. होळीचे सप्तरंग खेळायला प्रत्येकाला आवडतात. रंग खेळायला मज्जा येते मात्र तोच रंग काढताना नाकी नऊ आल्याशिवाय राहत नाही. याच धाकाने बहुतांश लोक होळीच्या रंगापासून स्वत:ला जपतात. मात्र ''बुरा न मानो होली है,'' म्हणून त्यांच्या अंगावर कोणी रंग टाकून जातोच. रंग खेळून झाल्यानंतर तो रंग काढायचा कसा रंग-तरंग आणि उमंग यांचे महान पर्व म्हणून आपण होळी मोठ्या हर्षोल्हासा‍त साजरी करत असतो. होळीचे सप्तरंग खेळायला प्रत्येकाला आवडतात. रंग खेळायला मज्जा येते मात्र तोच रंग काढताना नाकी नऊ आल्याशिवाय राहत नाही. याच धाकाने बहुतांश लोक होळीच्या रंगापासून स्वत:ला जपतात. मात्र ''बुरा न मानो होली है,'' म्हणून त्यांच्या अंगावर कोणी रंग टाकून जातोच. रंग खेळून झाल्यानंतर तो रंग काढायचा कसा असा प्रश्न आपल्याला पडला असेलच. यासाठी तुमच्यासाठी काही खास टिप्स...\n* आजकाल केमिकलयुक्त रंग होळीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात असतात. त्याचा आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे रंग खेळून झाल्यानंतर लगेचच रंग धुवून टाकला पाहिजे. रंग जास्त वेळ त्वचेवर राहिल्यास त्याचे साईड इफेक्टस् होण्‍याची शक्यता नाकारता येत नाही.\n* कपडे तसेच डोक्यावरी‍ल कोरडा रंग आधी चांगला झटकून घ्या. नंतर एका मुलायम कपड्याने आपल्या चेहर्‍यावरील तसेच त्वचेवरील रंग काढावा.\n* रंग हलक्या हाताने काढावा अन्यथा जोरात रगडून काढल्याने त्वचेचे सालटे निघतात व त्वचा आग ही मारते.\n* बेसन पीठात लींबूचा रस मिसळून रंग काढावा. खोबरेल तेल अथवा दही त्वचेवर लावून रंग हळूवार काढता येतो.\n* रंग काढण्यासाठी रॉकेल, केमिकल, डिटर्जेंट अथवा कपडे धुण्याचा साबण उपयोगात आणू नका.\n* केसांमध्ये असलेला कोरडा रंग आधी चांगल्या प्रकारे झटकून घ्या त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवावेत. बेसन, दही अथवा आवळा पावडरने डोके धुतल्यास रंग लवकर निघतो. आवळा पावडर रात्रीच पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर केसांना शॉम्पू करावा.\n* डोळ्यात रंग गेल्यास आधी पाण्‍याने ते स्वच्छ करावेत. डोळ्याची आग थांबत नसेल तर एका वाटीत पाणी घेऊन त्यात डोळ्यांची उघड झाप करावी. थोड्या वेळानंतर डोळ्यांमध्ये गुलाब जल टाकावे. याशिवाय आय ड्रॉपचाही वापर आपण करू शकता.\n* रंग खेळून झाल्यानंतर तुम्ही फेशियल, मॅनिक्योर व पॅडीक्योर देखील करू शकतात.\nहोळी स्पेशल : अमृतखंड\nहोळी स्पेशल : पुरण पोळी\nहोळी खेळा आपल्या राशीनुसार\nयावर अधिक वाचा :\nरघुराम राजन यांचा बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी विचार\nरघुराम राजन यांच्या नावाचा विचार बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी केला जातो आहे असे ...\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vedashri.blogspot.com/2009/06/", "date_download": "2018-04-24T04:37:01Z", "digest": "sha1:GKO2U45AJLDQRAXE4WA2LPA324QK5GAY", "length": 25474, "nlines": 70, "source_domain": "vedashri.blogspot.com", "title": "वेदश्री: June 2009", "raw_content": "\nगुरुवार, २५ जून, २००९\nआत्ता खरं तर अजिबात बरं वाटत नाहीये मला. सकाळी जाग येऊनही निपचित पडूनच होते.. आता बहुतेक हे लिहून परत जाऊन झोपेनच. तसं काही खास झालेले नाही.. अशक्तपणाने तापल्यागत होऊन सांधे दुखतायत.. बस्स. तुम्ही म्हणाल मग मरायला इथे काय करतेयस बरोबर आहे तुमचं विचारणं.. तुम्हाला पटणार नाही पण मॅथ्यूकाकूंच्या इडल्यांमुळे आले मी ऑनलाईन\nपुण्यात नवा फ्लॅट घेतला याचा जितका मला आनंद झाला नव्हता तितका शेजारी एक वयस्कर जोडपं राहते आहे हे कळल्यावर झाला होता. हे कळायला पण मजेशीर अनुभव आला. माझा फ्लॅट १०१ (१ बीएचके) तर त्यांचे १०५ (२ बीएचके) आणि १०६ (२ बीएचके). नवे बांधकाम असलेली इमारत आणि अजून कॉमन सोयींची दारोमदार बिल्डरच्या हातात अशी आमची अवस्था (अजूनही आहे). गॅस वगैरे गोष्टींचा जुगाड अजून झालेला नाही त्यामुळे साडेनवाच्या हापिसला पोहोचायला अगदी साडेआठला उठून आवरले तरी चालेल अशी ऐश कोणी ओरडायला नसल्याने सुखेनैव चाललेली. त्यादिवशीही अशीच मजा झाली. गोडगुलाबी स्वप्नातून मोबाईलच्या गजराने (योग्य वेळी उठण्यासाठी गजर अत्यंत जरुरी नसता गुलाबी स्वप्नातून लवकर सुटका होणे नाही ) जाग येऊन उठले. मिटलेल्या डोळ्यांनी ब्रशवर पेस्ट लावून दात घासायला सुरूवात. तोंड धुवायला बेसिनचा नळ चालू केला तर पाण्याचा पत्ताच नाही ) जाग येऊन उठले. मिटलेल्या डोळ्यांनी ब्रशवर पेस्ट लावून दात घासायला सुरूवात. तोंड धुवायला बेसिनचा नळ चालू केला तर पाण्याचा पत्ताच नाही आता काय करायचं बाथरूममध्ये असलेल्या थोड्या साठवलेल्या पाण्याने तोंड धुतलं पण आंघोळीचे काय धड कपडे घालून सिक्युरिटीवाल्या मगरकाकांना ओरडायला खाली पळाले तर त्यांनी सांगितले की एक बोअरींग बंद पडली त्यामुळे पाणी चढवता आलेले नाही. पाण्याचा टँकर सांगितला आहे.. १०:३० पर्यंत येईल.\n\"वरच्या टाकीतले पाणी असेकसे संपले पूर्ण भरत नाही तुम्ही ती टाकी. इनमीन ४-५ कुटुंब रहायला आली नाही तरी सांगितलेल्या २ तासाच्या वेळेतसुद्धा पाणी येत नाही. माझे ऑफिस साडेनऊला आहे.. लवकर मागवा पाणी.. \" असा मी सूर लावताच ते हसून म्हणाले, \"ताई, मी काय करणार आता अशी पंचाईत झाली तर पूर्ण भरत नाही तुम्ही ती टाकी. इनमीन ४-५ कुटुंब रहायला आली नाही तरी सांगितलेल्या २ तासाच्या वेळेतसुद्धा पाणी येत नाही. माझे ऑफिस साडेनऊला आहे.. लवकर मागवा पाणी.. \" असा मी सूर लावताच ते हसून म्हणाले, \"ताई, मी काय करणार आता अशी पंचाईत झाली तर मालकांनी सांगितलं १०:३० ला टँकर येईल तेच सांगून राहिलो तुम्हाला. \" मला त्या बिल्डरचा इत्तका राग आला की खाऊ की गिळू असे झाले. तूर्ताचा प्रश्न सोडवणे भाग होते नसता हकनाक हाफ डे सुट्टी पडली असती. काय करावे असे विचार करता शेजाऱ्यांकडे बादलीभर पाणी मागायचे असे ठरवले. आता कोणत्या शेजाऱ्याकडे मागायचे मालकांनी सांगितलं १०:३० ला टँकर येईल तेच सांगून राहिलो तुम्हाला. \" मला त्या बिल्डरचा इत्तका राग आला की खाऊ की गिळू असे झाले. तूर्ताचा प्रश्न सोडवणे भाग होते नसता हकनाक हाफ डे सुट्टी पडली असती. काय करावे असे विचार करता शेजाऱ्यांकडे बादलीभर पाणी मागायचे असे ठरवले. आता कोणत्या शेजाऱ्याकडे मागायचे बिल्डर म्हणालेला की तरूण पोरांनीच फ्लॅट घेतलेत जवळपास सगळे.. अशा अवतारात कोणा बॅचलरच्या फ्लॅटची बेल दाबली गेली तर बिल्डर म्हणालेला की तरूण पोरांनीच फ्लॅट घेतलेत जवळपास सगळे.. अशा अवतारात कोणा बॅचलरच्या फ्लॅटची बेल दाबली गेली तर छ्या खालून वरती येताना सहज पहिल्या मजल्यावरच्या ओनर्सच्या नावांची पाटी वाचली. जोशी, छेत्री, जाधव, अली, मॅथ्यू आणि मॅथ्यू. काही उपयोग झाला नाही. डोक्यातले डेब्री विचार बाजुला ठेवून हातातल्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रीत करायचे ठरवून छेत्रींच्या फ्लॅटची बेल दाबली. एक बाई बाहेर आली (हुश्श ) - \"क्या चाहिए ) - \"क्या चाहिए\n\"जी मैं सामनेवाले फ्लॅटमे रहती हूं पानी नहीं हैं बिल्कुलभी पानी नहीं हैं बिल्कुलभी नहाके ऑफिस जाना था नहाके ऑफिस जाना था आप एक बालटी पानी दे सकती है क्या आप एक बालटी पानी दे सकती है क्या\n\"मेरेपास भी पानी नहीं हैं. जो भरके रखा था वो तो रातभरमे खतम हो गया ये बच्चे पुरा पानी खतम कर डालते हैं ये बच्चे पुरा पानी खतम कर डालते हैं वैसे कल शामसेही पानी नहीं हैं वैसे कल शामसेही पानी नहीं हैं\nमाझ्या (अ)ज्ञानात आणखी भर पडली. आदल्यादिवशी हापिसातून परतायलाच १० वाजले होते. त्यानंतर जेवायलाच ताकद नव्हती तर पाणी आहे की नाही कुठले तपासत बसायला बोलताना कळलं की त्या छेत्री नाहीत तर छेत्रीच्या भाडेकरू आहेत.. छेत्री २५ वर्षाचा पोरगा आहे म्हणे बोलताना कळलं की त्या छेत्री नाहीत तर छेत्रीच्या भाडेकरू आहेत.. छेत्री २५ वर्षाचा पोरगा आहे म्हणे मला मणभर बरे वाटले त्या मुलाने इतका सभ्य निर्णय घेतल्याबद्दल. इमारतीतल्या सर्वच मुलांनी असा निर्णय घेतला असल्यागत मी अगदी निर्भय होऊन जाधवांच्या फ्लॅटची बेल दाबणार तर छेत्रींच्या भाडेकरणीने (तिने तिचे आडनाव सांगितले पण माझ्या ते लक्षात नाही राहिले) सांगितले की ते अजून इथे रहायला आलेले नाहीत मला मणभर बरे वाटले त्या मुलाने इतका सभ्य निर्णय घेतल्याबद्दल. इमारतीतल्या सर्वच मुलांनी असा निर्णय घेतला असल्यागत मी अगदी निर्भय होऊन जाधवांच्या फ्लॅटची बेल दाबणार तर छेत्रींच्या भाडेकरणीने (तिने तिचे आडनाव सांगितले पण माझ्या ते लक्षात नाही राहिले) सांगितले की ते अजून इथे रहायला आलेले नाहीत असलम अलींकडेही तीच परिस्थिती असलम अलींकडेही तीच परिस्थिती मला इतका राग आला ते रहायला न आल्याचाही की बस्स. मॅथ्यूंच्या घराची बेल दाबली तर नव्याने लक्षात आले की त्यांनी सेफ्टी डोअर बसवलेले होते. दरवाजाची रंगसंगती आणि वापरलेल्या लाकडाचा दर्जा पाहूनच जीव एकदम खुष झाला. 'यांच्याकडे तरी मला द्यायला बादलीभर पाणी असू दे' अशी मनोमन प्रार्थना करत असतानाच सेफ्टी दारापलिकडे - एक वयस्कर गृहस्थ आले.\n\"काका, नळाला पाणीच येत नाहीये आणि मला ऑफिसला जायची घाई आहे. बादलीभर पाणी देऊ शकाल का मला\n\"बाकी तो समझमे आया थोडाथोडा लेकीन ये बादलीभर क्या होता है\n\"ओके ओके.. लेकीन तुम है कौन\n\"सॉरी अंकल.. मैं १०१वाले फ्लॅटमे रहती हूं लास्ट वीकमें आयी यहा रहनेको लास्ट वीकमें आयी यहा रहनेको ये बिल्डर साला लुटारू है ये बिल्डर साला लुटारू है\nमाझ्या शेवटच्या वाक्यावर खुष होऊन काकांनी काकूंना बोलावलं आणि हिला काय पाहिजे बघ सांगितलं. काका आणि काकू दोघेही गप्पिष्ट (तशी मी काय कमी आहे पण परिस्थिती अशी होती की मला वेळच नव्हता बोलत बसायला. काकूंनी त्यांच्याच बादलीत मला पाणी दिले आणि ते घेऊन येऊन आंघोळ करून हापिसाला पळाले मी.\nमॅथ्यूंची बादली परत करायच्या निमित्ताने मी घरी लवकर आले आणि मग तेव्हापासून जी ओळख झाली ती आजतागायत. काका ७५+ तर काकू ६५+ आणि त्यांच्या घरात (१०५) ते राहणारे दोघेच त्यामुळे मला जाम आवडले ते दोघे. आठवडाभरात वेळ मिळाला नाही तरी जेव्हाही शनि/रविवारी कंटाळा येईल तेव्हा त्यांच्याकडे जाऊन मस्त गप्पा मार असा प्रोग्राम सुरू झाला. तसे ते दोघे (खास करून काका) रिझर्व्हड म्हणावे अशा प्रकारातले पण त्याने मला फरक पडत नव्हता.. मी अगदी माझंच घर असल्यासारखी त्यांच्या घरात वावरत, बोलत होते. त्यांच्याकडे फर्निचरचे काम चालू होते तर मी त्यांना म्हणत होते की हे इकडे नाही तिकडे छान दिसेल. इकडे हा पसारा का पडलाय काकांना ओरडले की ते काकूंना मदत करत नाहीत वगैरे. आपण तिघे संध्याकाळी खालच्या सो कॉल्ड गार्डनमध्ये फेऱ्या मारायला जात जाऊया असे मी त्यांना सुचवले मात्र ते म्हणाले - नहीं जमेगा काकांना ओरडले की ते काकूंना मदत करत नाहीत वगैरे. आपण तिघे संध्याकाळी खालच्या सो कॉल्ड गार्डनमध्ये फेऱ्या मारायला जात जाऊया असे मी त्यांना सुचवले मात्र ते म्हणाले - नहीं जमेगा मी आश्चर्यचकित झाले. मी माझाच मुद्दा लावून धरला तेव्हा ते म्हणाले की त्यांना चालायला त्रास होतो आणि एक मजला उतरून (तेव्हा लिफ्ट तयार झालेली नव्हती) मग चालायला जमणार नाही. बॅलन्स ठेवायला आताशा जमत नाही म्हणाले. माझ्या मोकळेपणाने म्हणा किंवा त्यांना नकोशा झालेल्या त्यांच्या एकटेपणामुळे असेल रिझर्व्डपणा थोडाथोडा सोडून देत त्यांनि माझ्याशी मनमोकळे बोलायला सुरूवात केली. तब्ब्येतीच्या तक्रारींपासून सुरूवात झाली. दोघांना शुगरचा प्रॉब्लेम. काकूंना ऍलोपाथीच्या औषधांचा प्रॉब्लेम तर काकांना रसायनांच्या वासाचा प्रॉब्लेम, हाय ब्लडप्रेशर वगैरे वगैरे हजार गोष्टी. फोनची पण सोय नाही त्यामुळे पुण्यातल्या मुलाला संपर्क करायचा तरी त्रास होतो असे म्हणाले. मी माझ्या फोनच्या कनेक्षनसाठी बीएसएनएलच्या ऑफिसात जायचीच होते, तेव्हा यांचेही काम होईल तर पहायचे असे मनोमन ठरवून टाकले.\nमाझा फोनचा डबा आला तेव्हा मी त्यांच्याकडेही कनेक्षन येईल याची दक्षता घेतली. त्यांना खूप आनंद झाला त्या गोष्टीने. मला काही वेगळ्याने तोशीस घ्यावी लागली असे नाही पण कामात काम त्यांचेही होऊन गेले याचा मलाही आनंद झाला.\n\"अभी आप मुझसे आपका नंबर छुपा नहीं सकते, अंकल मुझे पता है की मेरे नंबरमे २ मिलाओ तो आपका नंबर मिलता है मुझे पता है की मेरे नंबरमे २ मिलाओ तो आपका नंबर मिलता है\" आजवरच्या त्यांच्या रिझर्व्हडनेसवर केलेल्या या टिप्पणीने दिलखुलास हसून घेतले त्यांनी. म्हातारी माणसं आम्ही.. कोणी काय अर्थ काढून काय नाटक उभे करेल सांगता येत नाही म्हणून थोडे जपूनच राहतो असे म्हणाले. मी एकटी राहते कळल्यापासून त्यांचं माझ्यावरही नजर ठेवणे सुरू झाले. परवा शिर्डीवाल्या साईबाबांच्या पालखीसाठी देणगी मागायला मुलं आली तर त्याअगोदर काकांचा फोन.. अशी अशी २ मुलं आपल्या फ्लोअरवर आली आहेत. त्यांच्या डांबरटपणाकडे लक्ष देऊ नकोस आणि त्यांना हाकलून दे\" आजवरच्या त्यांच्या रिझर्व्हडनेसवर केलेल्या या टिप्पणीने दिलखुलास हसून घेतले त्यांनी. म्हातारी माणसं आम्ही.. कोणी काय अर्थ काढून काय नाटक उभे करेल सांगता येत नाही म्हणून थोडे जपूनच राहतो असे म्हणाले. मी एकटी राहते कळल्यापासून त्यांचं माझ्यावरही नजर ठेवणे सुरू झाले. परवा शिर्डीवाल्या साईबाबांच्या पालखीसाठी देणगी मागायला मुलं आली तर त्याअगोदर काकांचा फोन.. अशी अशी २ मुलं आपल्या फ्लोअरवर आली आहेत. त्यांच्या डांबरटपणाकडे लक्ष देऊ नकोस आणि त्यांना हाकलून दे मी २ मिनिट त्या फोनच्या रिसीव्हरकडे बघतच बसले. त्या मुलांना मी हाकलेतो काका त्यांच्या दरवाजात उभे होते मी २ मिनिट त्या फोनच्या रिसीव्हरकडे बघतच बसले. त्या मुलांना मी हाकलेतो काका त्यांच्या दरवाजात उभे होते त्यांची काळजी पाहून डोळ्यात पाणीच आलं माझ्या.\nहापिसातल्या राजकारणी कटकटींनी माझा जीव हैराण होऊन जायचा आजकाल. माझा मूड खूपच हटेला असतो अशावेळी. कशाला उगाच माझ्या किरकिरीचा कोणाला त्रास म्हणून मी घरातच बसून रहायला लागले. इच्छाही होत नव्हतीच म्हणा कुठे जायची. काकू येऊन मला घेऊन गेल्या त्यांच्या घरी (माझ्या घरी अजून पुरेशा फर्निचरचा पत्ता नाही). आमची परिस्थिती अगदी उलट होती आता. पुर्वी ते गप्प असायचे आणि मी बडबड बडबड.. आता ते बोलत होते आणि मी जेवढ्याला तेवढं हूं हां.\n बोलता क्यूं नहीं है तुम\n\"ऑफिसकी खिटपिटसे तंग आ गयी, अंकल\n\"हमेशाका ही है.. मुझे बोअर हो गया अभी\n\"मन लगाके काम करनेवालोंकोही क्युं हमेशा तकलीफ होती है\n\"गॉडके मन मे कुछ अच्छा होएगा इसलिये.. \"\nकाकांना त्यांचं वाक्य पूर्णच न करू देता मी एकदम उसळले..\n\"ये गॉड वॉड कुछ नहीं होता अंकल.. ये सब धकियानुसी बातें है और अगर होगा भी तो कुछ काम नहीं करता है वोह आजकल..\" मी सात्त्विक संतापाने घामेजले होते पूर्ण.\nएरव्ही इतकी विनोदी, शांत, हसूनखेळून बोलणारी मुलगी आज अचानक इतकी काय संतापलीये त्यांना काहीच कळायला मार्ग नव्हता. काकांची आणि माझी मग जुगलबंदी चालली होती २ तास गॉड या विषयावर. काकू मध्येमध्ये काकांना मदत करत होती त्यांचा मुद्दा समजवून सांगायला उदाहरणे पुरवून गॉड असतो आणि तो मदत करतो अशी त्यांची भूमिका होती तर असं काही नसतं अशी काहिशी माझी भूमिका होती. ते त्यांची उदाहरणे देत होते तर मी माझी देत होते. असे चालू असताना ते म्हणाले,\"हमे ३ लडके हैं.. एकभी बेटी नहीं गॉड असतो आणि तो मदत करतो अशी त्यांची भूमिका होती तर असं काही नसतं अशी काहिशी माझी भूमिका होती. ते त्यांची उदाहरणे देत होते तर मी माझी देत होते. असे चालू असताना ते म्हणाले,\"हमे ३ लडके हैं.. एकभी बेटी नहीं तीनो बेटे बहोत अच्छे है और बहुएंभी. बहुओंको तो हमने बेटीयों जैसाही प्यार दिया है तीनो बेटे बहोत अच्छे है और बहुएंभी. बहुओंको तो हमने बेटीयों जैसाही प्यार दिया है दो बेटे फॉरेनमे है तो तिसरा यहा पुनेमे दो बेटे फॉरेनमे है तो तिसरा यहा पुनेमे हरेक को अपना अपना संसार है.. पता नहीं क्यौं कुछ दिन पहले गॉडको प्रे करते टाईम मेरे दिलमे आया की मुझे एक बेटी होती तो कितना अच्छा होता..और उसी दिन तुम आयी थी बादलीभर पानी मांगने के लिये हरेक को अपना अपना संसार है.. पता नहीं क्यौं कुछ दिन पहले गॉडको प्रे करते टाईम मेरे दिलमे आया की मुझे एक बेटी होती तो कितना अच्छा होता..और उसी दिन तुम आयी थी बादलीभर पानी मांगने के लिये मैं बोलता है ना.. गॉड होता है और वोह सुनता है मैं बोलता है ना.. गॉड होता है और वोह सुनता है\" असे म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. जुगलबंदीत सहजी हार पत्करणारातली मी नाहीच पण त्यांच्या या उदाहरणाला मी काय म्हणू तेच मला कळले नाही. डोळ्यातलं पाणी गालावर कधी ओघळलं कळलंच नाही. मनातलं मळभ अचानक वितळून गेल्यासारखं वाटलं आणि मी मग भरभरुन बोलत बसले त्यांच्याशी. आध्यात्मिक, कौटुंबिक, सामाजिक वगैरे काय काय विषयांवर बोलत होतो आम्ही त्याला काही सुमारच नाही.. खूपच शांत वाटले एकंदरीत.\nकालपासून अंगात कणकण वाटत होती आणि सांधे आखडल्यासारखे झाले होते. पोट बिघडले ते वेगळेच. मी म्हटलं की थोडे लंघन केले तर बरे वाटेल म्हणून तापावरची गोळी घेऊन पडून राहिले. थोड्या वेळापुर्वी बेल वाजली म्हणून आयपीसमधून बघितलं तर मॅथ्यूकाकू. शक्य तितका हसरा चेहरा ठेवून दरवाजा उघडला.. हो उगाच जास्तच आजारी आहे असे वाटून त्यांनी काळजी करत बसायला नको ना..\n अभीतक सो राहा है क्या हुआ तुम्हारा बाल्कनी झाडू नहीं देखकेही मुझे लगा की कुछ तो गडबड है\n\"तबियत थोडी खराब है उठनेका बिल्कुल मन नहीं कर राहा है उठनेका बिल्कुल मन नहीं कर राहा है\n ये लो इडली.. डायजेशनको अच्छा शामको आना घरपे.. ठीक है शामको आना घरपे.. ठीक है\nकाय बोलावे तेच सुचत नव्हते. अजुनही सुचत नाहीये.\nलेखिका : वेदश्री 1 टिप्पणी:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nकृपया आम्हाला जगू द्या...\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dalalstreetwinners.com/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B/", "date_download": "2018-04-24T04:28:04Z", "digest": "sha1:4NHTKAWVR23JSLTOHCQODWAKBQHU3QWK", "length": 16118, "nlines": 98, "source_domain": "www.dalalstreetwinners.com", "title": "टेक्निकल अनालिसिसचा उपयोग करावा कि नाही ? – Dalal street winners™", "raw_content": "\nटेक्निकल अनालिसिसचा उपयोग करावा कि नाही \nटेक्निकल अनालिसिस एक शस्त्र\nआपण अगोदरच्या पोस्ट मध्ये पाहिलं कि कसे टेक्निकल अनालिसिस एका ट्रेडरला किंमती समजण्यास मदत करते. आणि कसे ते बाजारातील मागणी आणि आपूर्ति यांचा अभ्यास करते. एक अनुभवी ट्रेडर ह्या सर्व गोष्टींचा उपयोग बाजारात फायदा कमवण्यासाठी करू शकतो. आणि आपली जोखीम हि नियंत्रित ठेवण्यासाठी हि करू शकतो. एका ट्रेडर चे काम असते कि, शेअर्स च्या किंमतीचा चार्टवर ( वाचा : शेअर बाजारातील चार्टचे प्रकार ) अभ्यास करून त्याचा भविष्यातील ट्रेंड ठरवणे आणि ह्या माहितीच्या आधारे बाजारात खरीदी वा विक्री करून फायदा कमविणे.\nटेक्निकल अनालीसीस हे एक ट्रेडिंग साठी एक उत्कृष्ट साधन आहे, जे प्रत्येक सेकंदात हजारो ट्रेडर्सना खरीदी आणि विक्री करण्याचे निर्णय घेण्यास मदत करत असते. हे फक्त ट्रेडर्स हि नाही तर निवेशकांना सुद्धा हाच प्रकारे मदत करीत असते.\nअजूनही हि दुविधा कायम आहे कि, एका निवेशकाने टेक्निकल अनालीसिसचा निवेश करताना उपयोग करावा कि नाही. पण मी हे अनुभवावरून सिद्ध करू शकतो कि टेक्निकल अनालिसिस हे एका निवेशकची एका ट्रेडरप्रमाणेच मदत करते आणि त्याच्या यशात सहभागी होते. फरक फक्त होल्डिंग टाइम चा असतो.\nकारण एक ट्रेडर चा होल्डिंग टाइम हा काही मिनिटापासून काही आठवड्यापर्यंत चा असतो तर निवेशक हा शेअर्स ची होल्डिंग काही महिन्यापासून ते काही वर्ष्यापर्यंत करतो. माझ्यामते ट्रेडर आणि निवेशकात जास्त काही फरक नाही. एक ट्रेडर हि निवेशाकाप्रमाणे शेअर जर अप ट्रेंड मध्ये असेल तरच खरीदी करतो. जर एक निवेशकाचे लक्ष्य अल्पावधीत पूर्ण झाले तर तो निवेशक ट्रेडर मध्ये बदलून जातो.\nतसे ट्रेडिंग वा निवेशात आपण ट्रेडर आहात कि निवेशक हे महत्वाचे नसते तर आपण किती कमी जोखीम घेवून किती जास्त फायदा कमविता हा असतो.\nट्रेडर वा निवेशक दुविधा\nसुरवातीच्या काळात अथवा बाजारात नवीन असताना ट्रेडर्स हे एका दुविधेत फसलेले आढळतात, कि मी एक ट्रेडर बनू कि एक निवेशक आणि काही वेळेस तर ते चुकीच्या कारणामुळे ट्रेडर पासून एक वाईट निवेशक बनतात. जेव्हा तुम्ही मार्केट मध्ये पाउल ठेवता, तेव्हा तुमचा उद्देश हा योग्य वा कमी जोखीम घेवून फायदा कसा कमवावा हा असतो. पण बरेच जण काळाच्या ओघात हे सर्व विसरून जातात आणि चुकीच्या गोष्टींवर स्वतचे लक्ष्य केंद्रित करतात.\nटेक्निकल अनालिसिस चा उपयोग ट्रेडर एका घंट्याच्या ट्रेडसाठी हि करू शकतो तर एक निवेशक त्याचा उपयोग १० वर्ष्याच्या निवेशासाठी हि करू शकतो. टेक्निकल अनालिसिस एक ट्रेडर ला योग्य किंमत आणि मोके शोधण्यास मदत करते तर एका निवेशकाला एका चांगल्या शेअर्सच्या किंमतीचा तळ आणि शीर्ष शोधण्यास मदत करत असते. ज्यामुळे तो तळात खरीदी करून शीर्ष स्थानी चांगला मोठा फायदा कमवून बाहेर पडू शकतो. अजून टेक्निकल अनालिसिस च्या मदतीने एक निवेशक शेअर्स थोड्या थोड्या प्रमाणात जमा करू शकतो आणि वर जाताना थोडा थोडा फायदा बुक करू शकतो. जर शेअर्स चा मुख्य ट्रेंड काही बातम्या वा मुलभूत कारणामुळे खराब होतो तर अश्या शेअर्स मधून टेक्निकल अनालिसिस ची मदत घेवून जास्त नुकसान होण्या अगोदर एक निवेशक बाहेर पडू शकतो. कारण त्याचा मुख्य ट्रेंड हा चांगला आहे कि खराब झाला हे फक्त टेक्निकल अनालिसिस द्वारेच कळू शकते.\nत्यामुळेच परिस्थिती नुसार एक ट्रेडर वा एक निवेशक टेक्निकल अनालिसिस चा उपयोग एका शस्त्राप्रमाणे करून फायदा हातात ठेवणे आणि नुकसानी पासून वाचण्यासाठी सहज करू शकतो. त्याचप्रमाणे टेक्निकल अनालिसिस वेगवेगळ्या शेअर्स आणि सेक्टर्सचे विश्लेषण करून त्यात किती मोके आहेत हे सुद्धा शोधू शकतो. त्यामुळे ट्रेडर्स आणि निवेशाकाला आपला पैसा हा योग्य ठिकाणी लावता येतो. ह्या सर्व गोष्टी ट्रेडर्स आणि निवेशाकाला बाजारात जिंकण्याची संधी प्रदान करतात. ह्या सर्व गोष्टी एक ट्रेडर ला आणि एका निवेशाकाला समान स्वरुपात लागू होतात.\nशेवटी थोडक्यात एवढेच सांगेल कि आपण एक ट्रेडर असाल वा निवेशक यांनी काही फरक पडत नाही, कारण तुमचा बाजारात येण्याचा मुख्य उद्देश आहे फायदा कमविणे आणि बाजाराला पछाडने हा आहे. त्यामुळे उगाच ट्रेडर कि निवेशक ह्यात वेळ न घालता टेक्निकल अनालिसिस आणि त्याच्या शाखांचा ट्रेडिंग आणि निवेशात योग्य उपयोग करा आणि फायदा मिळवा.\nबाजारात किमत नेहमी महत्वाची असते किमतीच्या बाबतीत सर्व काही बाजारात किमती ह्या गर्दीच्या देवाण घेवाणावरून ठरतात. खरीददार आणि विक्रेता यांच्यातील रस्सीखेचामुळे बाजारात किमती शोधल्या जातात आणि नंतर निश्तित होतात. किमतीमध्ये बाजाराची रूपरेषा , बाजाराची आधारभूत...\nटेक्निकल अनालिसिस कधी कधी काम करते आणि कधी नाही टेक्निकल अनालिसिस नेमके काय आहे टेक्निकल अनालिसिस नेमके काय आहे टेक्निकल अनालीसीस मध्ये मुख्यत चार्टसवर किंमतीचा अभ्यास केला जातो. किंमती ह्या बाजाराची मनोदशा आणि भावनाचे प्रतिबिंब स्वरूप असते. ह्याच कारणामुळे टेक्निकल अनालिसिस खूप वेळेस काम...\nटेक्निकल अनालिसिसचा जादुई डब्बा टेक्निकल अनालिसिस चा प्रारंभिक परिचय शेअर बाजारात टेक्निकल अनालिसिसचा उपयोग किमती ओळखण्यासाठी व त्याची भविष्यवाणी करण्यासाठी करतात. ह्यामुळे ट्रेडर्स व निवेशक ह्यांना किमतीवरून खरेदी व विक्री चे निर्णय करण्याची मदत...\nटेक्निकल एनालिसिस का उपयोग निवेशक करे या ना करे टेक्निकल एनालिसिस एक साधन हमने देखा है की कैसे टेक्निकल एनालिसिस ट्रेडर्स को शेअर्स की कीमते समज़ने का मोका देता है और मार्केट में मांग और आपूर्ति का अभ्यास करता...\nटेक्निकल अनालिसिस सोबत ट्रेडिंगची यात्रा बाजारात किंमती आणि त्यांची दिशा हि महत्वपूर्ण गोष्टी असतात. एका ट्रेडर चे काम आहे कि किंमतीचा अभ्यास करून त्याची योग्य दिशा ओळखून त्या दिशेने ट्रेड करून फायदा कमवणे. आणि त्यासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/rahul-gandhi-should-go-to-temple-in-ayodhya-276236.html", "date_download": "2018-04-24T05:08:13Z", "digest": "sha1:24N4S5225NTFSFMXE4SV3DO5KC43DBPD", "length": 12315, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राहुल गांधींनी एकदा अयोध्येच्या राम मंदिरात जावं-संजय राऊत", "raw_content": "\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : अस्सा होता आपल्या 'सचिन'चा सुरुवातीचा प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nराहुल गांधींनी एकदा अयोध्येच्या राम मंदिरात जावं-संजय राऊत\nसध्या गुजरात निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. आणि राहुल गांधी प्रचारादरम्यान सोमनाथसह अनेक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत आहेत. याचबरोबर, राम मंदिर वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सामनामध्ये राहुल गांधीचं कौतुक सुरू आहे.\n07 डिसेंबर: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भावी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आवाहन केलंय. राहुल गांधी ज्याप्रमाणे सोमनाथच्या मंदिरात गेले, त्याचप्रमाणे त्यांनी अयोध्येतल्या राम मंदिरातही जावं, असं संजय राऊत म्हणालेत.\nसध्या गुजरात निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. आणि राहुल गांधी प्रचारादरम्यान सोमनाथसह अनेक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत आहेत. याचबरोबर, राम मंदिर वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सामनामध्ये राहुल गांधीचं कौतुक सुरू आहे. पण आज अचानक सेनेनं राहुलना हे आवाहन केलंय.\nराम मंदिरावर अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू झाली आहे. फेब्रुवारीत नियमित सुनावणी ही सुरू होणार आहे. त्यामुळे रामजन्मभूमीचा मुद्दा पुन्हा पेटण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.\nशिवसेना खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींना अयोध्येत जावून राम मंदिरात पूजा करण्याचं आव्हान दिलंय. राहुल गांधी मतांसाठी गुजरातच्या मंदिरात जातात तर त्यांनी अयोध्येच्या मंदिरातही जावं असं आव्हन संजय राऊत यांनी दिलंय. त्यामुळे आता राहूल गांधी खरंच राम मंदिराच्या राजकारणात उडी घेतात की नाही हे पडणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/44", "date_download": "2018-04-24T04:45:18Z", "digest": "sha1:OUSNSV2QGJ2MJMBUMQJM6IXXLCEGBTJV", "length": 32113, "nlines": 206, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गुलजार नावाचा कवी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nफार वर्षांपूर्वींची गोष्ट. रेडिओ सिलोनवर रविवारी'एस.कुमार्स का फिल्मी मुकद्दमा' नावाचा एक कार्यक्रम लागत असे. 'सजीली रंगीली टेरीन की बहार, संजो लाये है एस. कुमार' हे त्याचं जिंगल अद्यापि लक्षात आहे. त्या कार्यक्रमात एकदा गीतकार गुलजार यांच्यावर आरोप केला गेला होता, की त्यांची गाणी फार दुर्बोध, कळायला अवघड अशी असतात. उदाहरणार्थ\n'पत्थर की हवेली को\nशीशे के घरोंदों में\nइस मोड पे जाते है'\nगुलजार यांनी याचं काय स्पष्टीकरण दिलं हे लक्षात नाही, पण त्यांनी असं सांगितल्याचं आठवतं की माझ्या ओळींचे शब्दशः अर्थ घेऊ नका. 'नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे' मधल्या 'आवाज' चा अर्थ स्वरयंत्रातून बाहेर पडणारा ध्वनी असा नाही. 'हमारा देश हमें आवाज दे रहा है' मधला 'आवाज'चा अर्थ काय आहे पहा 'है नाम होटोंपे अब भी लेकिन, आवाज में पड गयी दरारें' मधल्या 'आवाज' चा अर्थ पहा\n'मोरा गोरा अंग लइ ले, मोहे शाम रंग दइ दे ' पासून गीतलेखनाला सुरुवात करणाऱ्या गुलजार यांची ओळख अशी सांकेतिक गाणी लिहिणारा गीतकार अशीच आहे. यातल्या बऱ्याच गाण्यांना आर.ड़ी. बर्मन यांचा परीसस्पर्श झाल्यानं ती अधिक सुंदर झाली हे खरं, पण तो झाला नसता तरी ती तितकीच आशयसंपन्न राहिली असती असं वाटतं. अर्थात या पहिल्या गाण्यावर असलेली शैलेंद्रच्या लोकगीतांची छाप लपून रहात नाही. (तोहे राहू लागे बैरी, मुसकाये जी जलायके) पण नंतर बाकी गुलजार यांची गीते अगदी स्वतंत्र अंगाने गेलेली दिसतात. खरंतर हा माणूस आधी कवी आणि मग गीतकार. म्हणून गुलजार यांच्या गाण्यांत काव्यगुण विपुलतेने आढळतो.\nगुलजार यांच्या रचना समजून घ्यायच्या तर त्यांच्या गीतांमधील ही सांकेतिकता कळावी लागेल. 'वो यार है जो खुशबू की तरहा, जिस की जुबाँ उर्दू की तरहा' याचा अर्थ काय हे समजावून सांगणं कठीण आहे. 'उर्दू की तरहा' म्हणजे उर्दू की गैरउर्दू असा प्रश्न इथे गैरलागू आहे. 'तावीज बनाके पहनूं उसे, आयत की तरह मिल जाये कहीं' याचा आपल्याला कळालेला अर्थ आणि गुलजार यांना अभिप्रेत असलेला अर्थ एकच आहे का मग अशा वेळी गालिबसारखे गुलजार यांचेही काव्य 'या तो आप समझे या खुदा समझे' म्हणून सोडून द्यायचे का\nसंवेदनशीलता आणि तरल भाव हे गुलजार यांच्या गाण्याचं एक वैशिष्ट्य आहे. 'जीने के लिये सोचा ही नही दर्द संभालने होंगे, मुस्कराये तो मुस्करानेके कर्ज उतारने होंगे' असं लिहून जाणारे गुलजार 'वक्त के सितम कम हसीं नही,आज यहां है कल कहीं नही' असंही लिहितात. 'सुरमई अंखियोंमें नन्हा मुन्हा एक सपना दे जा रे' ही लोरी 'सदमा' ला काय करूण झालर देऊन जाते 'आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है' हा गुलजार यांचा खट्याळपणा आणि 'सीधे सीधे रास्तोंको हल्का सा मोड दे दो, बेजोड रूहोंको थोडासा जोड दे दो' हा अबोल प्रेमभाव 'आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है' हा गुलजार यांचा खट्याळपणा आणि 'सीधे सीधे रास्तोंको हल्का सा मोड दे दो, बेजोड रूहोंको थोडासा जोड दे दो' हा अबोल प्रेमभाव गुलजार यांच्या गीतांमध्ये रात्र, स्वप्न. चंद्र यांचे उल्लेख अनेकवेळा येतात.कुठे सलील चौधरींच्या सुरावटीवर मुकेश 'कभी कभी तो आवाज देकर मुझको जगाया ख्वाबोंने' म्हणतो तर कुठे किशोरकुमार कधी 'चांद चुराके लाया हूं, चल बैठे चर्च के पीछे' म्हणतो तर कधी 'फिर वही रात है ख्वाबोंकी' गुलजार यांच्या गीतांमध्ये रात्र, स्वप्न. चंद्र यांचे उल्लेख अनेकवेळा येतात.कुठे सलील चौधरींच्या सुरावटीवर मुकेश 'कभी कभी तो आवाज देकर मुझको जगाया ख्वाबोंने' म्हणतो तर कुठे किशोरकुमार कधी 'चांद चुराके लाया हूं, चल बैठे चर्च के पीछे' म्हणतो तर कधी 'फिर वही रात है ख्वाबोंकी' गुलजार यांच्या पहिल्यावाहिल्या गीतातही 'छुप जाउंगी रात ही में, मोहे पीहा संग दई दे' आहे आणि 'बदरी हटाके चंदा, छुपकेसे झाके चंदा' हेही आहे गुलजार यांच्या पहिल्यावाहिल्या गीतातही 'छुप जाउंगी रात ही में, मोहे पीहा संग दई दे' आहे आणि 'बदरी हटाके चंदा, छुपकेसे झाके चंदा' हेही आहेरस्ता, वळण हीही गुलजार यांची आवडती प्रतिमा. रस्ता वळाला की चाल वळणे हे तुमचेआमचे झाले. 'मै मुड गया तो साथ साथ, राह मुड गयी' हा तो खास गुलजार टचरस्ता, वळण हीही गुलजार यांची आवडती प्रतिमा. रस्ता वळाला की चाल वळणे हे तुमचेआमचे झाले. 'मै मुड गया तो साथ साथ, राह मुड गयी' हा तो खास गुलजार टच 'इस मोडसे जाते है, कुछ सुस्त कदम रस्ते , कुछ तेज कदम राहे' इथेही रस्ते आहेतच ,पण 'इन रेशमी राहोंमें, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है' यातला हळुवारपणा पहा 'इस मोडसे जाते है, कुछ सुस्त कदम रस्ते , कुछ तेज कदम राहे' इथेही रस्ते आहेतच ,पण 'इन रेशमी राहोंमें, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है' यातला हळुवारपणा पहा तीच गोष्ट 'जब भी ये दिल उदास होता है, जाने कौन आसपास होता है' या गाण्याची. 'प्यार की तुम इंतेहा हो, प्यार का आगाज हम' या ओळीतले सौंदर्य जसे मोहवणारे तसेच 'जीने की तुमसे वजह मिल गयी है, बडी बेवजह जिंदगी जा रही थी' या ओळीतलेही.\nगालिबचा गुलजार यांच्या शायरीवरील प्रभाव हाही एक फार मनोरंजक विषय आहे. 'दिल ढूंढता है, फिर वही फुर्सत के रात दिन, बैठे रहे तसव्वरे जाना किये हुये' या गालिबच्या मुखड्याचा वापर करून गुलजार यांनी एक स्वतंत्र गीत लिहिले आहे हे तर आपल्याला माहिती आहेच. पण उपमा उत्प्रेक्षांचा चमत्कारिक वाटावा असा कल्पक वापर हेही दोघांचे समान वैशिष्ट्य आहे. गालिबप्रमाणेच गुलजार यांच्या प्रतिमा सांकेतिक असल्यामुळेच की काय कुणास ठाऊक, पण अगदी वेगळ्या असतात. प्रेयसीच्या आगमनाला आम शायरांनी थंड हवेच्या झुळुकीची उपमा सर्रास दिली आहे. गुलजार बाकी याला 'तेरा आना भी गर्मियोंकी लू है' म्हणतात प्रेयसीच्या बोलण्यात इतरांना चंदनाचा, वाळ्याचा वगैरे सुगंध दिसतो, गुलजारना बाकी 'तेरी बातों में किमाम की खुशबू है' असे म्हणावेसे वाटते. या किमामच्या आणि जर्द्याच्या खुशबूमध्ये जे रंगीलेपण आहे ते इतर सुगंधांत नाही प्रेयसीच्या बोलण्यात इतरांना चंदनाचा, वाळ्याचा वगैरे सुगंध दिसतो, गुलजारना बाकी 'तेरी बातों में किमाम की खुशबू है' असे म्हणावेसे वाटते. या किमामच्या आणि जर्द्याच्या खुशबूमध्ये जे रंगीलेपण आहे ते इतर सुगंधांत नाहीयाच गीतात दिल्लीचा उल्लेख ते 'बल्लीमारा'च्या गल्लीसकट करतात. याच गल्लीत गालिबचे वास्तव्य होते हे आपण जाणतोच.\nधडकत्या हृदयावर तर शेकड्यानी गाणी लिहिली गेली आहेत, पण या जळत्या हृदयातल्या आगीवर बिडी पेटवून घे असं आवाहन करणाऱ्या प्रियेची कल्पना गुलजारच करू जाणोत ('बीडी जलायले जिगरपे पिया, जिगरमां बडी आग है'- इथेही ती बिडी आहे, सिग्रेट नव्हे - हे सिग्रेट सोडून बिडी ओढायला लागणाऱ्या चांगदेव पाटलाइतके - किंवा सिग्रेटीचे मचूळ ब्रँड सोडून वडारणीच्या रासवट अलिंगनासारखी चार मिनार ओढणाऱ्या दत्तू जोशीसारखे साक्षात्कारी ('बीडी जलायले जिगरपे पिया, जिगरमां बडी आग है'- इथेही ती बिडी आहे, सिग्रेट नव्हे - हे सिग्रेट सोडून बिडी ओढायला लागणाऱ्या चांगदेव पाटलाइतके - किंवा सिग्रेटीचे मचूळ ब्रँड सोडून वडारणीच्या रासवट अलिंगनासारखी चार मिनार ओढणाऱ्या दत्तू जोशीसारखे साक्षात्कारी\nगुलजार यांची ही सांकेतिक संवेदनशीलता कधीकधी त्यांची मर्यादा होते की काय अशीही शंका येऊ लागते. 'जब तारें जमीं पर चलते हैं, आकाश जमीं हो जाता है, उस रात नही फिर घर जाता, वो चांद यही सो जाता है' हे थोडेसे उबवलेले वाटते. 'आंखे भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है' हे नकोसे वाटते. मग तेवढ्यात वसंतरावांनी बांधलेले सुरेल 'पपीहरा' आठवते.\nइक घन बरसे, इक मन प्यासा\nइक मन प्यासा, इक मन तरसे\nसावन तो संदेसा लाये\nमेरे आंख से मोती पाये\nदान मिले बाबुलके घरसे\nगुलजार यांच्या गैरफिल्मी रचनांतून त्यांच्यातला गीतकाराआधीचा कवी दिसतो. 'स्पर्श' मालिकेसाठी वापरलेल्या\nहाथ छूटे भी तो रिश्ते नही छोडा करते\nवक्त की शाख से लम्हे नही तोडा करते\nशाम से आंख में नमी सी है\nआज फिर आपकी कमीसी है\nया ओळी पहा. इथली 'कमीसी' या शब्दाची निवड हीच ती गुलजार शैली.\n'जिंदगी यूं हुई बसर तन्हा,\nकाफिला साथ और सफर तन्हा'\nहीपण एक शीच सुरेख गजल.\nआणि शेवटी गुलजार यांची एक अप्रतिम कविता. स्रहद्दीपलीकडचे लोक आणि आपण यांच्याविषयी एक गीतकार नव्हे तर एक हळुवार कवी किती कमी शब्दांत किती काय काय सांगून जातो हेच पहा:\nसुबह सुबह इक थाप की दस्तक पर दरवाजा खोला, देखा\nसरहद के उस पार से कुछ मेहमान आये है\nआंखों से मानूस थे सारे, चेहरे सारे सुने सुनाये\nपांव धोये, हाथ धुलाये, आंगन में आसन लगवाये\nऔर तंदूर पे मकई के कुछ मोटे मोटे रोट पकाये\nपोटली में मेहमान मेरे, पिछली सालोंकी फसलोंका गुड लाये थे\nआंख खुली तो देखा घर में कोई नही था\nहाथ लगाकर देखा तो तंदूर अभीतक बुझा नही था\nऔर होटोंपर मीठे गुड का जायका अबतक चिपक रहा था\nख्वाब था शायद, ख्वाबही होगा\nसरहद पर कल रात सुना है चली थी गोली\nसरहद पर कल रात सुना है कुछ ख्वाबोंका खून हुवा है\nमीठे गुड का जायका\nविसोबा खेचर [25 Mar 2007 रोजी 07:06 वा.]\nयातल्या बऱ्याच गाण्यांना आर.ड़ी. बर्मन यांचा परीसस्पर्श झाल्यानं ती अधिक सुंदर झाली हे खरं,\nप्रश्नच नाही. पंचमदा आणि गुलजार यांचं नातं औरच होतं\nआंखों से मानूस थे सारे, चेहरे सारे सुने सुनाये\nपांव धोये, हाथ धुलाये, आंगन में आसन लगवाये\n क्या बात है..ते आंगण डोळ्यापुढे आलं बघा रावसाहेब\nपोटली में मेहमान मेरे, पिछली सालोंकी फसलोंका गुड लाये थे\nसरहद पर कल रात सुना है चली थी गोली\nसरहद पर कल रात सुना है कुछ ख्वाबोंका खून हुवा है\nआणि रावसाहेब, तुम्हालाही सलाम\nआपल्या या लेखाचा जायका बरेच दिवस आमच्याही जिभेवर राहील\nअब क्या बताऊ आपको रावसाब, या गुलजार, पंचमदा, आणि हरिभाई या तिघांचे खूप उपकार आहेत हो\nखुप झकास लिहीले आहे. गुलजार यांच्या गीतांचा चाहता मी आहेच. पण आपल्याला आवडलेल्या कवीचे एवढे सुंदर चित्रण करतायेतं हे वाचून खुप छान वाटले. इतर खुप काही लिहू शकनार नाही. पण एवढं सांगतो की लेख मनापासून आवडला.\nखुप छान लेख आहे.\nगुलजारच्या गीतांचा चाहता कोणी मिळणार नाही असे व्हायचे नाही. कविता तर फारच सुरेख. त्यांचा जन्मच पाकिस्तानात झाला असल्याने फाळणी, सरहद, शत्रुत्व अशा विषयांबद्दल त्यांच्या भावना फार हळूवार असल्याचे अनेकदा लक्षात येते.\nबरेचदा त्यांना नक्की काय सांगायचे आहे हे कळत नाही आणि बरेचदा साध्या शब्दांतून बरेच काही सांगून जाते तशीच ही कविता आणि माझे आवडते गाणे -\nतेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं\nतेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं\nलेख अप्रतिम आहे. आवडला.\n सुंदर लेख, गुलजारच्या एखाद्या गाण्यासारखाच.\nमुसाफिर हूं यारो, जाने क्या सोचकर, ओ माझी रे, थोडी सी जमीं वगैरे पासून रॉकफोर्ड मधल्या आसमां के पार पर्यंत गुलजारची गाणी एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. या लेखामुळे अनेक सुंदर आठवणींना उजाळा मिळाला.\nवरील मतांशी सहमत आहे.\nरावसाहेब् - क्या बात् है\nमंदार बर्वे [25 Mar 2007 रोजी 22:18 वा.]\nगुलजार न आवडणारा माणूस शोधणं कठिणच आहे, पण गुलजार समजणारा माणूस सापडणं त्याहूनही अवघड आहे. आम्ही मात्र दोन्ही गटांत मोडतो (एकात आहे म्हणून आणि दुसर्यात् नाही म्हणून)- गुलजारची अशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदनही...\nबाबा त्रिकाल [26 Mar 2007 रोजी 11:31 वा.]\nगुलजारांची बालगीते ('मोगली'चे सुरवातीचे गाणे ) सुद्धा फारच सुंदर आणि सहज. याची आठवण झाली.\nआपण शेवटी उल्लेखलेल्या कविता जगजीत-गुलजार यांच्या मरासिम् अल्बम मध्ये आहेत.\nगुलजारची गैरफिल्मी गीते थोडी जास्तच चांगली आहेत :)\n(याचा अर्थ फिल्मी गीते मात्र वाईट आहेत् असा नाही.)\nमुझको भी तरकीब सिखादे..\nहा लेख पाहून त्याचे ठिगळे लावलेले लेख आठवत, 'मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे \nमुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे\nअकसर तुझको देखा है कि ताना बुनते\nजब कोई तागा टूट गया या खत्म हुआ\nफिर से बांध के\nऔर सिरा कोई जोड़ के उसमे\nआगे बुनने लगते हो\nतेरे इस ताने में लेकिन\nइक भी गांठ गिरह बुन्तर की\nदेख नहीं सकता कोई\nमैनें तो एक बार बुना था एक ही रिश्ता\nलेकिन उसकी सारी गिराहें\nसाफ नजर आती हैं मेरे यार जुलाहे\nमनोगतावर ह्या लेखाला प्रतिसाद देताना मला हीच कविता आठवली.\nग्रेट माईंडस थिंक अलाइक :-)\nआपला लेख मनापासून आवडला. गुलजार यांची गाणी गुणगुणत लेख वाचायला खुपच छान वाटले.\nमाधवी गाडगीळ [27 Mar 2007 रोजी 20:10 वा.]\nलेख छानच उतरला आहे.\nगुलजार या व्यक्तिबद्दल नेहमीच एक कुतुहल वाटत आले आहे. नुसतं त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहूनही मनात एक आदरभाव उत्पन्न होतो. पांढऱ्या शुभ्र वेषातील एक साधं परंतु अत्यंत प्रतिभावान व्यक्तिमतव\nइथे प्रतिसाद दिलेल्या सर्वांचा आभारी आहे. काही मित्रांना आता 'म' स्वर वर्जित आहे, त्यामुळे त्यांचे इथे प्रतिसाद वाचून बरे वाटले\nविसोबा खेचर [28 Mar 2007 रोजी 08:25 वा.]\nकाही मित्रांना आता 'म' स्वर वर्जित आहे, त्यामुळे त्यांचे इथे प्रतिसाद वाचून बरे वाटले\nशेवटी आलातच ना 'कबड्डी' 'कबड्डी' करत आणि कुणीही पकडायच्या आत माझ्या ओझरती एक टपलीत मारून गेलात\nठीक आहे, आता पुढची सर्वीस माझी\nगुलजारलिखित बहुतेक गाणी म्युझिकइंडियाऑनलाइन च्या या पानावरून ऐकता येतील. हल्ली हे सं॰ स्थ॰ अधूनमधून चालत नाही. म्युझिकइंडियाऑनलाइनचा गाण्यांचा संग्रह सर्वात चांगला आहे पण ध्वनिमुद्रणाचा दर्जा तितकासा चांगला नाही.\nधिंगाणा.कॉम असे एक नवे सं॰ स्थ॰ पाहण्यात आले. धिंगाणा.कॉम वरही गुलजारची काही गाणी ऐकता येतील. तिथे जास्त गाणी उपलब्ध नसली तरी आवाजाचा दर्जा उत्तम आहे. धिंगाणा.कॉम वर मराठी गाण्याचा संग्रह चांगला आहे.\nरंग माझा वेगळा [29 Mar 2007 रोजी 15:47 वा.]\nसाथिया मध्ये एक गीत आहे\nदोस्तों से झुठीमुठी दुसरों का नाम लेके फिर मेरी बातें करना\nयाचा अनुभव घेतलाय कधी\nगुलझार यांची गीते अनुभवण्यासाठी असतात.\nसन्जोप राव यांचा व्यासंग , मेहनत , अभ्यासु वृत्ती हे सर्व अनूकरणीयच आहे. वादच नाही. पण एक शंका... नव्हे २ शंका \n१] ' मोरा गोरा अंग लैले . . . . . ' हे गाणे मा झ्या माहिती प्रमाणे ' बंदिनी ' चीत्रपटातले. मग तिथे शैलेंद्र हवा.\n२] ' कभी कभी तो आवाज . . . . ' हे गाणे 'आनंद ' मधिल . गितकार = योगेश. [ असे मला वातते .]\nकृपया शंका समाधान करावे.\nकेशव, प्रतिसादाबद्दल आभारी आहे. 'मोरा गोरा अंग' हे बंदिनीतले गाणे गुलजार यांचेच आहे. गुलजार यांच्या गीतलेखनाची सुरुवात इथूनच झाली. 'आनंद' ची गाणी योगेश आणि गुलजार यांची आहेत. पैकी 'मैने तेरे लिये' हे गाणे गुलजार यांचे आहे.\n परवाच गुरू सिनेमातलं \"ऐ हैरत ऐ आशिकी\" गाणं ऐकलं. त्यातला \"दो चार महीन् से लमहो मे उमरोंके हिसाब होतें है\" हा सवाल व त्यावरचा \"जिन्हे देखा नहीं कलतक ...(पुढचे शब्द आठवत नाहित)\" हा जवाब मस्त वाटला\nकल्याणी_कुलकर्णी [19 Jun 2007 रोजी 07:49 वा.]\nगुलजार यांच्या उपमा या नेहमीच काहीतरी वेगळ्या असतात. लेकीन या सिनेमातील 'सूरमयी शाम' या गाण्यात संध्याकाळ होण्याला अशीच एक उपमा वापरली आहे.\n'जैसे खुशबू नजर से छू जाए'. असे काहीतरी क्वचितच दुसर्‍या कोणी लिहीले असेल\n ओ माझी रे - हे गीत् कुणी येथे देऊ शकेल् का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nagpur-oppositon-ajit-pawar-over-ncp-road-protest-488684", "date_download": "2018-04-24T04:55:53Z", "digest": "sha1:2J43MLQ6RXY2MK6C573TNBAYZZJJRXSP", "length": 14501, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नागपूर : चक्काजाम आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे आमदार बजोरिया महिला पोलिसाच्या अंगावर धावले", "raw_content": "\nनागपूर : चक्काजाम आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे आमदार बजोरिया महिला पोलिसाच्या अंगावर धावले\nराष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनानंतर आज नागपुरात खासदार सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन सुरु केलं. मात्र यावेळी आंदोलकांना महिला पोलिस ताब्यात घेत असताना राष्ट्रवादीचे आमदार महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याचं दिसलं. संदीप बजोरिया असं या आमदारांचं पूर्ण नाव असून ते यवतमाळमधले राष्ट्रवादीचे आमदार आहेत. हल्लाबोल आंदोलन नागपुरात दाखल होताच आधी वर्धा रस्त्यावरच्या विमानतळाजवळ सुळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम केला.\nब्रेकफास्ट न्यूज : नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून कास्टिंग काऊचचं समर्थन\nअहमदनगर : केडगाव शिवसैनिकांची हत्या प्रकरण : काँग्रेस नगरसेवकाला अटक\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\n712 : कोल्हापूर : 70 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज\nयोग माझा : अर्धचंद्रासनाचे शरीराला अनेक फायदे\nमुंबई : महिलेला धक्का लागला म्हणून लोकलखाली ढकललं\nमुंबई : वृक्षतोडीसंदर्भातील पालिका आयुक्तांचे विशेषाधिकार हायकोर्टाकडून रद्द\nठाणे : मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्ती लांबणीवर\nब्रेकफास्ट न्यूज : नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून कास्टिंग काऊचचं समर्थन\nअहमदनगर : केडगाव शिवसैनिकांची हत्या प्रकरण : काँग्रेस नगरसेवकाला अटक\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\n712 : कोल्हापूर : 70 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज\nयोग माझा : अर्धचंद्रासनाचे शरीराला अनेक फायदे\nनागपूर : चक्काजाम आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे आमदार बजोरिया महिला पोलिसाच्या अंगावर धावले\nनागपूर : चक्काजाम आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे आमदार बजोरिया महिला पोलिसाच्या अंगावर धावले\nराष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनानंतर आज नागपुरात खासदार सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन सुरु केलं. मात्र यावेळी आंदोलकांना महिला पोलिस ताब्यात घेत असताना राष्ट्रवादीचे आमदार महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याचं दिसलं. संदीप बजोरिया असं या आमदारांचं पूर्ण नाव असून ते यवतमाळमधले राष्ट्रवादीचे आमदार आहेत. हल्लाबोल आंदोलन नागपुरात दाखल होताच आधी वर्धा रस्त्यावरच्या विमानतळाजवळ सुळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम केला.\nब्रेकफास्ट न्यूज : नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून कास्टिंग काऊचचं समर्थन\nअहमदनगर : केडगाव शिवसैनिकांची हत्या प्रकरण : काँग्रेस नगरसेवकाला अटक\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\nKXIPvDD: आखिरी नहीं, इस ओवर में पलट गई दिल्ली की जीती हुई बाज़ी\nWATCH: अंतिम छह गेंदो पर जीतते-जीतते कैसे हार गई दिल्ली की टीम\nKXIPvDD: मुजीब की आखिरी गेंद पर खत्म हुआ श्रेयस का संघर्ष, दिल्ली को मिली 4 रनों से हार\nDD vs KXIP: घर में भी नहीं रुका दिल्ली के हार का क्रम, जीत के साथ पंजाब टॉप पर\nDD vs KXIP: दिल्ली की शानदार गेंदबाजी, 143 पर रुका किंग्स का कारवां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T04:32:52Z", "digest": "sha1:AEZ3MGELZJNUW5TTQPLST4QMUKQ4L5IW", "length": 23573, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेवासा तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहा लेख नेवासा तालुका विषयी आहे. नेवासा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\nनेवासा तालुक्याचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान\nलोकसभा प्रतिंनिधि = सदाशिव लोखंडे\nनेवासा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.\nया तालुक्याचे ठिकाण, प्रवरा नदीच्या काठावर वसलेले नेवासे हे गाव आहे. याच गावात राहून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि पहिल्यांदा वाचून दाखविली.\nनेवासा तालुका २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला आहे. यापूर्वी नगर-नेवासा आणि नेवासा-शेवगाव अशा दोन मतदार संघांत तालुका विभागलेला होता. राजकीय दृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या राजकीय पक्षांना अनुकूल असलेला हा तालुका असून अलीकडेच भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचेही बळ वाढतांना दिसत आहे. मारुतराव घुले , यशवंतराव गडाख, वकीलराव लंघे इत्यादी व्यक्तींमुळे तालुक्याची राज्याच्या राजकारणात ओळख टिकून राहिली आहे. सध्या या सर्वांची पुढची पिढी राजकारणात उतरत आहे .\nपूर्वी शेवगाव नेवासा असा संयुक्त मतदार संघ होता ,\nहा तालुका कायम विद्रोही विचाराचा व परिवर्तनवादी तालुका म्हणून ओळखला जातो . पूर्वीं शेवगाव नेवासा असा संयुक्त मतदार संघ असतांना सुद्धा या तालुक्यातील मतदारांनी कधीच शेवगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी निवडून दिला नाही , जरी नरेंद्र पाटील घुले हे शेवगाव चे असले तरी त्यांच कार्यक्षेत्र हे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा हे असल्या मुळे ते ही याच तालुक्यातील गणले जातात ,\nह्या तालुक्यातील मतदारांनी यशवंतराव गडाख यांच्या सारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून वकिलराव लंघे पाटील यांच्या सारख्या कम्युनिस्ट नेत्याला दोन वेळा आमदार केलं . त्याच लंघे पाटलांचा पराभव करत पुन्हा दहा वर्ष काँग्रेस चे संभाजीराव फाटके हे आमदार राहिले , त्यानंतरच्या निवडणुकीत मारुतराव घुले पाटलांसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करत तरुण व अपक्ष उमेदवार तुकाराम पाटील गडाख हे आमदार झाले , त्यानंतर तुकाराम गडाख यांचा पराभव करत पांडुरंग अभंग यांच्यासारखे राजकारणात अगदी नवखे व सामान्य व्यक्तिमत्व निवडून आले , त्यानंतर जवळपास १५ वर्ष कुठलीही सहकारी संस्था,हाताशी नसतांना वकिलराव लंघे यांचे सुपुत्र विठ्ठलराव लंघे यांनी घुले पाटलांना काट्याची टक्कर या निवडणुकांमध्ये लोक त्यांना वर्गणी करून निधी देत असत , पुढे नेवासा हा स्वतंत्र मतदार संघ झाल्यावर यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकरराव गडाख हे या मतदार संघाचे प्रतिनिधी झाले , विठ्ठलराव लंघे ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यातील विरोधक संपला अस चित्र निर्माण झालं असतांना , काँग्रेस चे तात्कालीन तालुका अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे हे पुढे आले , त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस ने २ जिल्हापरिषद गट व २ पंचायत समिती गणात विजय मिळवला, एक गटात अतिशय निसटता पराभव झाला , त्यानंतर मुरकुटे काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टीत गेले व शंकरराव गडाखांचा पराभव करून ते निवडून आले , हा तालुका कायम परिवर्तनाला साथ देणारा तालुका असून इथला मतदार अतिशय स्वाभिमानी आहे\n२ औद्योगिक आणि शैक्षणिक\nनेवासे तालुक्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे शनी-शिंगणापूर हे धार्मिक स्थळ याच तालुक्यात आहे. या शिवाय देवगड आणि प्रवरासंगम ही स्थानेदेखील प्रसिद्ध आहेत.\nनेवासा तालुक्यातील चांदा येथील श्री दत्त साधकाश्रम दत्त मंदिर प्रसिद्ध आहे त्याविषयी -\nश्री दत्त साधकाश्रम चांदा\nअहमदनगर जिल्हा हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे तसेच आध्यात्मिक दृष्ट्यादेखील.. अहमदनगर जिल्ह्यात अनेक देवस्थाने आहेत शिर्डी , शिंगणापूर, मोहता देवी , देवगड नेवासा इ. श्री क्षेत्र नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी शके १२१२ मध्ये विश्वाच्या कल्याणासाठी जे पसायदान मागितले ते याच श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी.\nनेवासा या ठिकाणी गेल्या काही दशकांपासून नवीन देवस्थान उदयास आले आणि ते म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधकाश्रम चांदा. हे देवस्थान श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी आहे . चांदा हे गाव पुणे-औरंगाबाद महामार्गावर घोडेगावपासून पूर्वेकडे ६ किमी तर शनी-शिंगणापूर पासून ११ किमी अंतरावर आहे . शनी शिंगणापूर कडे जाणाऱ्या मार्गाच्या विरुद्ध हे गाव आहे . हे गाव मोठे असून आर्थिक दृष्ट्या व आध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण असे हे गाव आहे. या गावामध्ये पूर्वीपासूनच परमार्थ मोठ्या प्रमाणात घडतो आहे. अनेक थोर संत महापुरुषांचे वास्तव्य या गावात झाले आहे. जुन्या काळी जेव्हा मोगलांचे आक्रमण झाले तेव्हा शिवाजी महाराजसुद्धा या गावात आले होते. आणि आता तर या गावात परमार्थाची लाटच पसरली आहे. आणि ती लाट म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधाकाश्रम होय. दत्त साधकाश्रमाची सुरुवात श्री संत रोहिदास महाराज यांनी केली. त्यांनी त्यांच्या कठोर तपश्चर्येचे प्रतीक म्हणून हा आश्रम उभारला आहे. रोहिदास महाराज हे मूळचे शेवगाव तालुक्यातील वाघोली गावाचे. परंतु महाराजांचे बालपण चांदा गावामध्ये गेले. त्यांची तपश्चर्याही लहानपणापासूनच सुरू होती. त्यांच्या घराण्याला देखील ईश्वर भक्तीचे वेड होते. महाराजांचे वडील हे भगवान शंकराची भक्ती करत असत. महाराजांनी आळंदी व पंढरपूर या ठिकाणी वारकरी शिक्षण घेतल्यानंतर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी, समाजाला ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी आणि आनंद संप्रदायाचा वारसा चालवण्यासाठी, श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी थांबण्याचे व या ठिकाणाला आध्यात्मिक केंद्र बनवण्याचे ठरवले. आणि मग १९७१ साली नवीन दत्त मंदिराचे काम केले व त्यामध्ये भक्तिभावाने ओवाळून आणलेली दत्त मूर्तीची स्थापना केली. याच दत्त प्रभूंच्या प्रेरणेने महाराजांनी हजारो भक्तांचे जीवनच बदलून टाकले, अनेक व्यसनग्रस्तांना व्यसनमुक्त केले. व अनेकांना भगवंतप्राप्तीचा सोपा मार्ग दाखवला. महाराजांच्या सहवासामध्ये कसाही मनुष्य आला तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक संचार झाल्याशिवाय राहत नाही.\nसृष्टीच्या आरंभी श्री हंस भगवंताने जो उपदेश ब्रम्हदेवाला केला आणि मग ब्रम्हदेवाकडे सृष्टी स्थापन करण्याचे सामर्थ्य आले. तोच उपदेश गुरुपाराम्पारेने महाराजांकडे आलेला आहे . आणि अश्या प्रभावी मार्गाकडे अनेक भक्तांना महाराजांच्या आशीर्वादाने भगवंताचा अनुभव आलेला आहे आणि येत आहे.\nदत्त साधकाश्रमाचाच परिसर निसर्गरम्य आहे. या परिसरामध्ये जर मन उद्विग्न झालेली व्यक्ती आली तर येथे प्रवेश केल्या केल्या मनामध्ये आनंदाचा संचार होतो . त्यामुळे एक पर्यटन स्थळ म्हणून भेट देण्यास हा परिसर मस्त आहे\nअहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध आहे. नेवासे तालुक्यात मुळा सहकारी साखर कारखाना, सोनई आणि ज्ञानेश्वर साखर कारखाना हे दोन साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांच्या अनुषंगाने येथे काही शिक्षणसंस्था निघाल्या आहेत व दुग्धव्यवसायाचा विकास झालेला दिसतो आहे. येथील सोनईच्या मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद शंकरराव गडाख यांचेकडे आहे.\nमुळा एज्युकेशन सोसायटी ही तालुक्यातील एक उत्तम शिक्षणसंस्था असून या संस्थेमार्फत माध्यमिक, उच्च माध्यमिक, आणि इतर सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी सोय करण्यात आली आहे. अहमदनगर येथे भरलेल्या ७० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन याच संस्थेने केले होते.\nनेवासे गाव प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. या शिवाय गोदावरी आणि मुळा या दोन नद्यासुद्धा या तालुक्यातून वाहतात. या तीन नद्या आणि त्यावरील धणांणातील पाणी यांमुळे या तालुका सुपीक आहे.\n\"नेवासा तालुक्याचा नकाशा\" (मराठी मजकूर). ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.\nअकोले तालुका • संगमनेर तालुका\nनगर तालुका • नेवासा तालुका\nकर्जत तालुका • जामखेड तालुका\nश्रीरामपूर तालुका • राहुरी तालुका\nकोपरगाव तालुका • राहाता तालुका\nश्रीगोंदा तालुका • पारनेर तालुका\nपाथर्डी तालुका • शेवगांव तालुका\nअहमदनगर • अकोले • कर्जत • कोपरगाव • जामखेड • नेवासा • पाथर्डी • पारनेर • राहाता • राहुरी • शेवगांव • शिर्डी • श्रीगोंदा • श्रीरामपूर • संगमनेर\nमुळा नदी • प्रवरा नदी • सीना नदी • गोदावरी नदी • घोड नदी • भीमा नदी\nमुळा धरण • भंडारदरा धरण • निळवंडे धरण • मांडओहळ धरण • आढळा प्रकल्प • सीना धरण • विसापूर तलाव • पिंपळगाव खांड धरण\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/astrology/ramshalaka/index.htm", "date_download": "2018-04-24T05:02:51Z", "digest": "sha1:MN5P7XMDLDFSTMUMOKAAZ36LQVO3RYRT", "length": 5399, "nlines": 40, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Ram Shalaka | Shri Ramshalaka | Shri Ram Shalaka | रामशलाका | श्रीराम शलाका | भविष्य", "raw_content": "\nजीवनात असे अनेक प्रसंग येतात तेव्हा आपल्याला कळत नाही की काय करायचे आणि काय नाही अशा वेळी श्रीराम शलाका प्रश्नावलीच्या रूपाने आपल्याकडे एक परंपरागत ठेव आहे की त्यातून आपल्याला उभरता येईल. याचा उपयोग एकदम सरळ आहे. सगळ्यात आधी श्रीरामाचे श्रध्दापूर्वक ध्यान करावे व ज्या प्रश्नावर देवाचे मार्गदर्शन पाहिजे आहे त्या प्रश्नाबद्दल विचार करावा. त्यानंतर खाली दिलेल्या चौकटीच्या आत कोणत्याही जागी कर्सर नेऊन डोळे बंद करावेत व क्लिक करावे. काही वेळातच आपण क्लिक केल्याच्या अनुरूप रामशलाका प्रश्नावली च्या नऊ पैकी कोणत्याही एका चौपाईतून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.\n|| सुफल मनोरथ होहुँ तुम्हारे ||\n|| राम लखनु सुनि भए सुखारे ||\nबालकांडतील वाटिकेतून फूल आणल्यावर विश्वामित्रांचा आशीर्वाद\nफळ: प्रश्न फारच चांगला आहे, काम जरूर पूर्ण होईल.\n|| सुफल मनोरथ होहुँ तुम्हारे ||\n|| राम लखनु सुनि भए सुखारे ||\nबालकांडतील वाटिकेतून फूल आणल्यावर विश्वामित्रांचा आशीर्वाद\nफळ: प्रश्न फारच चांगला आहे, काम जरूर पूर्ण होईल.\n|| उधरें अंत न होइ निबाहू ||\n|| कालनेमि जिमि रावन राहू ||\nबालकांडच्या सुरूवातीला चांगल्या लोकांची सोबत करण्याची शिकवण.\nफळ: हे काम सोडून द्या, यशाबद्दल आशंका आहे.\n|| बिधि बस सुजन कुसंगत परहीं ||\n|| फनि मनि सम निज गुन अनुसरहीं ||\nबालकांडाच्या सुरूवातीला वाईट लोकांच्या संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला\nफळ: वाईट लोकांपासून दूरच रहा हे काम बहुतेक होईल.\n|| प्रबिसि नगर कीजै सब काजा ||\n|| हृदय राखि कोसलपुर राजा ||\nसुंदरकांडमध्ये हनुमानच्या लंका प्रवेशाचा प्रसंग.\nफळ: देवाचे ध्यान धारणा करावी यश वाट बघत आहे.\n|| मुद मंगलमय संत समाजू ||\n|| जिमि जग जंगम तीरथ राजू ||\nबालकांडात संतांच्या सत्संगातील महत्वाचा प्रसंग.\nफळ: मनोरथ चांगला आहे, काम सुरू करा पूर्ण होईल.\n|| होइ है सोई जो राम रचि राखा ||\n|| कोकरि तरक बढावहिं साषा ||\nबालकांडातील शिवपार्वती यांच्यातील सुरूवात.\nफळ: काम होण्याबद्दल आशंका आहे, हे दैवावर सोडून द्यावे तेच चांगले आहे.\n|| बरुन कुबेर सुरेस समीरा ||\n|| रन सनमुख धरि काह न धीरा ||\nलंका कांडातील विधवा मंदोदरीचा वियोग.\nफळ: गप्प बसा काम पूर्ण होणार नाही.\n|| गरल सुधा रिपु करय मिताई ||\n|| गोपद सिंधु अनल सितलाइ ||\nहनुमानाचा लंकेत प्रवेशाचा प्रसंग.\nफळ: संकल्प फार चांगला आहे, आपले काम पूर्ण होणार.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1252", "date_download": "2018-04-24T04:55:21Z", "digest": "sha1:MRKRP4YFZXCBQXCWJ6KLCJK25CQCWLY6", "length": 3868, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nअलीकडच्या काळात वाढत्या सिझेरियन प्रसुती प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारच्या उपाययोजना\nगेल्या काही वर्षात सिझेरियन प्रसुती प्रकरणांच्या वाढत्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये मोठी वाढ झाल्याबद्दल केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी फेब्रुवारी 2017 मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे चिंता व्यक्त केली होती.\nप्रसुती प्रकरणांमध्ये सिझेरियन शस्त्रक्रियांचे प्रमाण सरासरी 10 ते 15 टक्क्यांपर्यंत असू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मात्र तामिळनाडूमध्ये 34 टक्के तर तेलंगणामध्ये 54 टक्के प्रसुती सिझेरियन शस्त्रक्रियांद्वारे करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मनेका गांधी यांनी म्हटले होते. हे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2143", "date_download": "2018-04-24T04:55:40Z", "digest": "sha1:SBTN7CMJPYYSOSS3MKPXSXRW5222EGKX", "length": 3943, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nआसाममधल्या गुवाहाटी येथे 5 ते 7 डिसेंबर 2017 दरम्यान सहाव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळ्याचे आयोजन\nभारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने ईशान्येकडच्या राज्यांच्या सहकार्याने आसाममधल्या गुवाहाटी येथे 5 ते 7 डिसेंबर 2017 दरम्यान सहाव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळाव्याचे आयोजन केले आहे. आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन होईल. पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) के. जे. अल्फॉन्स आणि मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल कार्यक्रमाला उपस्थित असतील.\nईशान्य राज्यांमध्ये दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. खरेदीदार, विक्रेते, माध्यम, सरकारी संस्था आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधितांमध्ये थेट संवाद व्हावा आणि ईशान्येकडल्या राज्यांमधल्या पर्यटनाच्या संधी अधिक विस्ताराव्यात या हेतूने या मेळाव्याचे आयोजन केले जाते.\nया मेळाव्यात देशातल्या विविध भागांमधल्या पर्यटन क्षेत्राशी संबंधित तसेच पौर्वात्य देशांसह काही युरोपीय देशांतील आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा 29 देशांमधले प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://hi.picsearch.com/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95-pictures.html", "date_download": "2018-04-24T04:37:27Z", "digest": "sha1:H2M4LBD44EDSMU7YXCW3W7I4TSJNI7YU", "length": 6676, "nlines": 32, "source_domain": "hi.picsearch.com", "title": "अटक तस्वीरें", "raw_content": "\nFollow @zee24taasnews मुंबई : मुंबई महापालिका अभियंत्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणूकप्रकरणी मनसे... Follow @zee24taasnews हैदराबाद : वेश्‍याव्यवसाय चालविल्याप्रकरणी एका शिक्षिकेसह शिक्षकाला अटक... Follow @zee24taasnews नवी दिल्ली : भारताचा कबड्डीपटू रोहित कुमार चिल्लरला पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी... Follow @zee24taasnews मुंबई : लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला एनआयनं मुंबई विमानतळावरून अटक केली... Follow @zee24taasnews पणजी : दहशतवादी हल्ल्याच्या अफवा पसरवण्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात एका... पणजी : सिंगर रेमो फर्नांडिसला अल्पवयीन मुलीला धमकावल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अटक केली आहे. ... Follow @zee24taasnews श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील फुटिरतावादी नेता मसरत आलमला अटक श्रीनगर पोलिसांनी... Follow @zee24taasnews वसई : वसई विरार परिसरात एम् डी ड्रग्स वितरित करणाऱ्या मुख्य डिलरला पोलिसांनी... Follow @zee24taasnews औरंगाबाद : जिल्ह्यात पुरवठा विभागातल्या एका तहसिलदाराला २५ हजारांची लाच घेताना... Follow @zee24taasnews बदलापूर : बदलापूरमधील राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामले प्रकरणी सात जणांना अटक... Follow @zee24taasnews अहमदनगर : जवखेडामधील दलित हत्याकांडाप्रकरणी मयत संजय जाधवचा पुतण्या प्रशांत... Follow @zee24taasnews मुंबई: पश्चिम बंगालमधील ७१ वर्षीय ननवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी एका... Follow @zee24taasnews मुंबई : मुंबई भाजपचे माजी सदस्य आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन अध्यक्षचे... Follow @zee24taasnews मुंबई: महिला ड्रगमाफिया असलेल्या बेबी पाटणकरला अखेर अटक करण्यात आलीय. बेबी... Follow @zee24taasnews अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीत तालुक्यात तरूणाची विवस्त्र धिंड... Follow @zee24taasnews नवी दिल्ली : हेरगिरीप्रकरणी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातल्या एका... Follow @zee24taasnews औरंगाबाद: धनंजय मुंडे यांना अटक होण्याची शक्यता आहे. बीड जिल्हा बँक... सांगली : ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचा कार्यकर्ता समीर विष्णू... Follow @zee24taasnews मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला जे.जे. मार्ग पोलिसांनी अटक... Follow @zee24taasnews हैदराबाद : 'अल कायदा' या दहशवादी संघटनेत सहभागी व्हायला निघालेल्या... Follow @zee24taasnews नवी दिल्ली : केरळच्या कोझिकोड आणि कन्नाकमाला जिल्ह्यातून सहा संशयित... Follow @zee24taasnews मुंबई : एटीएम व्हॅनमधील रक्कम घेऊन प्रसार झालेला व्हॅनचा चालक अमरदीप सिंग याला... Follow @zee24taasnews सेऊल : जगातल्या सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक कंपन्यांपैकी एक असणाऱ्या सॅमसंगचे...\nकेवल काला और सफेद\nआपको सामग्री के मालिक से Picsearch के किसी भी चित्र को जोड़ने के लिए उसका प्रयोग करने के लिए सही आज्ञा हासिल करनी चाहिए\nPicsearch के बारे मे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4724919493802464716&title=Tree%20of%20light%20from%20Bottles&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-24T04:57:35Z", "digest": "sha1:3SAUW65RYZWXMUFONFYTAUCTOA5NEFEQ", "length": 12827, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "काचेच्या बाटल्यांमधून साकारला प्रकाशवृक्ष", "raw_content": "\nकाचेच्या बाटल्यांमधून साकारला प्रकाशवृक्ष\nपुणे : महान विचारवंत साहित्यिक राल्फ वाल्डो इमर्सन यांनी म्हटले आहे, ‘सर्व जीवनच एक प्रयोग आहे. तुम्ही जेवढे अधिक प्रयोग करता तितके उत्तम’. अशाच तीन प्रयोगवेड्या मुलांनी काचेच्या बाटल्यांमधून चक्क नऊ फूट उंचीचा प्रकाशवृक्ष साकारला आहे.\nअन्वम नागपाल (वय १७), आर. सिद्धार्थ (वय २४) आणि अन्विका नागपाल (वय १२) या तिघांनी एकत्र येऊन काचेचे देखणेपण आणि प्रकाशाची चमक यांच्या समन्वयातून ‘अर्बोल द ला लुझ’ (ट्री ऑफ लाईटसाठीचा स्पॅनिश शब्द) ही शिल्पकृती साकारली आहे. वापरलेल्या काचेच्या बाटल्या आणि इतर सामग्रीचा कुशल वापर करुन त्यांनी हा अनोखा प्रकाशवृक्ष निर्माण केला आहे. त्याचबरोबर फेरप्रक्रिया (रिसायकलिंग) ही रंजक कृती कशी ठरते, याचाही वस्तुपाठ घालून दिला आहे.\n‘सिम्बॉयसिस’चे संस्थापक व अध्यक्ष, पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजूमदार यांच्या हस्ते, ८१, क्लोव्हर हिल्स, एनआयबीएम रोड येथे या शिल्पकृतीचे अनावरण करण्यात आले. ‘अर्बोल द ला लुझ’ ही शिल्पकृती ९ फूट उंच व एक टनाहून अधिक वजनाची आहे. त्यात १०० हून अधिक बाटल्या व किमान २५० प्रकाशरचनांचा वापर करण्यात आला आहे. ही कलाकृती साकारताना या तिघांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. अन्वम आणि अन्विकाचे वडील अपूर्व नागपाल गेली अनेक वर्षे वापरलेल्या बाटल्या जमा करत होते. त्यातून त्यांना एक व्हिंटेज कार बनवायची होती. नंतर ती कल्पना सोडून देऊन त्यांनी यातून एक झाड निर्माण करण्याची साधी कल्पना मांडली. तेही तितके सोपे नव्हते,पण या मुलांनी हे आव्हान स्वीकारले आणि ते यशस्वीरीत्या पूर्णही केले.\nयाबाबत अन्वम नागपाल म्हणाला, ‘झाडाच्या प्रत्येक स्तराची जुळणी व जोडणी करणे, त्यातील प्रत्येक फांदीला प्रकाश देणे, तो पोकळ्यांमधून नागमोडी नेणे, या गोष्टी प्रकल्पाचा सर्वाधिक अवघड भाग होत्या. मात्र या आव्हानांवर मात करणे, तसेच गेले सहा महिने हा प्रकल्प काही थोड्या बाटल्यांपासून ते अगदी फांद्या आणि फळांनी परिपूर्ण अशा झाडापर्यंत पूर्ण होताना बघणे ही खूप आनंदाची बाब होती’.\nसिद्धार्थ म्हणाला, “काचेला आधार देणे व तरीही ती लवचिक ठेवणे जेणेकरुन जसजसा प्रकल्प विकसित होत जाईल तसतशी रचना बदलेल, हा भाग मला सर्वात औत्सुक्याचा वाटला. बाटल्यांच्या कडा, विविध आकाराच्या बाटल्यांची उपलब्धता, त्यांचे रंग अशा सर्व घटकांनी ही रचना निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि रचना साकारताना अनेक स्रोतांकडून मतप्रदर्शनाचीही कमतरता नव्हती.”\nअन्विका म्हणाली, ‘आम्ही या बाटल्या चिकटवलेल्या स्थितीत स्थिर राहाव्यात, यासाठी सुपरग्लू, सिलिकॉन, चिकणमाती व अगदी वायर वापरुन अनेक चाचण्या केल्या. अखेर विविध बाटल्या व आकारांची कल्पक रचना करुन आणि विशेषतः झाडाच्या वेगवेगळ्या भागांसाठी निरनिराळ्या माध्यमांचा एकत्रित वापर केल्याने आम्हाला अपेक्षित परिणाम मिळाला. हा प्रकल्प अगदी सहज साकारला नाही. उलट तो दमवणूक करणारा, कठीण, आव्हानात्मक आणि प्रसंगी निराशाजनकही होता. काही बाटल्यांपासून अख्खे झाड साकारल्यावर वापरलेल्या सामग्रीवर फेरप्रक्रिया करताना आपल्यातील कल्पकतेची उर्मी बाहेर काढणे, हे खरोखर परिपूर्तीचा अनुभव देणारे होते.\nअन्वम नागपाल हा सिम्बॉयसिस इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असून त्याला विविध क्षेत्रांत रस आहे. त्याने वादविवाद स्पर्धा, फूटबॉलमध्ये अनेक बक्षीसे मिळवली असून चित्रपट, संगीत, कला व छायाचित्रण (कल्पक इन्स्टाग्रामर) यातही त्याने चमकदार कामगिरी केली आहे.आर. सिद्धार्थ नुकताच आयआयएम अहमदाबादमधून उत्तीर्ण झाला असून सध्या तो आरबीएल बँकेच्या कॉर्पोरेट बँकिंग विभागाचा कर्मचारी आहे, तर अन्विका नागपाल ही व्हिबग्योर हाय इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. ती नृत्यपारंगत असून गानवृंदामध्ये गायनाचा सराव करते.\nTags: PuneSymbiosysDr. S.B.MujumdarTree Of Lightअर्बोल द ला लुझपुणेडॉ. शां.ब.मुजुमदारअपूर्व नागपालप्रेस रिलीज\nमहाश्रमदानात सहभागी होण्याचे आमिर खानचे आवाहन लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n..आणि मी निद्रेच्या आधीन झालो..\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\nस्वानंद समुद्र यांना मानाचा ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅवॉर्ड’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/dhule-eknath-khadse-pinching-bjp-in-his-speech-473951", "date_download": "2018-04-24T04:42:16Z", "digest": "sha1:7LGGURKBMZQCSCNSEEBXWBT5WSWPIHYY", "length": 14625, "nlines": 142, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "धुळे : भाजपला सत्तेत आणणारे बाहेर, अन् राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत : एकनाथ खडसे", "raw_content": "\nधुळे : भाजपला सत्तेत आणणारे बाहेर, अन् राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत : एकनाथ खडसे\nज्यांनी पक्ष वाढवला, सत्ता आणली असे नेते भाजपबाहेर जातात, मात्र नारायण राणेंसारखे त्यागी नेते भाजपमध्ये येतात, अशा बोचऱ्या शब्दात पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपवर नाराजी व्यक्त केली. धुळ्यात ''आणीबाणी चिंता आणि चिंतनाचा विषय'' या पुस्तकाचं प्रकाशन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.\nखडसेंनी भाजपचे उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्यासमोरच स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांना चिमटे काढले. ज्यांना आणीबाणीचा काळ माहिती आहे, असे मोजकेच नेते सध्या भाजपत आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी आता फक्त प्रशिक्षणाचीच उरल्याचा टोलाही त्यांनी लगावला.\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\n712 : कोल्हापूर : 70 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज\nयोग माझा : अर्धचंद्रासनाचे शरीराला अनेक फायदे\nमुंबई : महिलेला धक्का लागला म्हणून लोकलखाली ढकललं\nमुंबई : वृक्षतोडीसंदर्भातील पालिका आयुक्तांचे विशेषाधिकार हायकोर्टाकडून रद्द\nठाणे : मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्ती लांबणीवर\nकल्याण, ठाणे : अवघ्या सहा दिवसाच्या मुलीची आईकडून हत्या\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातून नाट्यमयरित्या कैदी फरार, प्रकार सीसीटीव्हीत कैद\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\n712 : कोल्हापूर : 70 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज\nयोग माझा : अर्धचंद्रासनाचे शरीराला अनेक फायदे\nमुंबई : महिलेला धक्का लागला म्हणून लोकलखाली ढकललं\nमुंबई : वृक्षतोडीसंदर्भातील पालिका आयुक्तांचे विशेषाधिकार हायकोर्टाकडून रद्द\nधुळे : भाजपला सत्तेत आणणारे बाहेर, अन् राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत : एकनाथ खडसे\nधुळे : भाजपला सत्तेत आणणारे बाहेर, अन् राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत : एकनाथ खडसे\nज्यांनी पक्ष वाढवला, सत्ता आणली असे नेते भाजपबाहेर जातात, मात्र नारायण राणेंसारखे त्यागी नेते भाजपमध्ये येतात, अशा बोचऱ्या शब्दात पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपवर नाराजी व्यक्त केली. धुळ्यात ''आणीबाणी चिंता आणि चिंतनाचा विषय'' या पुस्तकाचं प्रकाशन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.\nखडसेंनी भाजपचे उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्यासमोरच स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांना चिमटे काढले. ज्यांना आणीबाणीचा काळ माहिती आहे, असे मोजकेच नेते सध्या भाजपत आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी आता फक्त प्रशिक्षणाचीच उरल्याचा टोलाही त्यांनी लगावला.\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\n712 : कोल्हापूर : 70 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज\nयोग माझा : अर्धचंद्रासनाचे शरीराला अनेक फायदे\nKXIPvDD: आखिरी नहीं, इस ओवर में पलट गई दिल्ली की जीती हुई बाज़ी\nWATCH: अंतिम छह गेंदो पर जीतते-जीतते कैसे हार गई दिल्ली की टीम\nKXIPvDD: मुजीब की आखिरी गेंद पर खत्म हुआ श्रेयस का संघर्ष, दिल्ली को मिली 4 रनों से हार\nDD vs KXIP: घर में भी नहीं रुका दिल्ली के हार का क्रम, जीत के साथ पंजाब टॉप पर\nDD vs KXIP: दिल्ली की शानदार गेंदबाजी, 143 पर रुका किंग्स का कारवां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/donald-trump-praises-hindu-community-us-12576", "date_download": "2018-04-24T05:01:48Z", "digest": "sha1:O5BJJTGKHXIYSIONELFULGV26LN5YP2P", "length": 10992, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Donald Trump praises Hindu community in US 'अमेरिकेच्या संस्कृतीत हिंदू समुदायाचा मोठा वाटा' | eSakal", "raw_content": "\n'अमेरिकेच्या संस्कृतीत हिंदू समुदायाचा मोठा वाटा'\nसोमवार, 26 सप्टेंबर 2016\nवॉशिंग्टन - जागतिक आणि अमेरिकेच्या संस्कृतीत हिंदू समुदायाचा विलक्षण वाटा असल्याचे, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.\nवॉशिंग्टन - जागतिक आणि अमेरिकेच्या संस्कृतीत हिंदू समुदायाचा विलक्षण वाटा असल्याचे, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.\nपुढील महिन्यात न्यू जर्सी येथे होणाऱ्या भारत-अमेरिका संयुक्त कार्यक्रमाला ट्रम्प हजेरी लावणार आहेत. हा कार्यक्रम 15 ऑक्टोबरला होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात हिंदू समुदायाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. तसेच त्यांनी अमेरिकेला आणखी प्रगत होण्यासाठी या कार्यक्रमाचा फायदाच होणार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या कार्यक्रमा बॉलिवूडमधील काही नेते आणि गायक सहभागी होण्याची शक्यता आहे.\nट्रम्प म्हणा, की या कार्यक्रमाचा मुस्लिम दहशतवादाविरोधात जागतिक स्तरावर लढण्यासाठी फायदा होणार आहे. हिंदू समुदायाचे अमेरिकेच्या संस्कृतीतील योगदान हे मोलाचे आहे. निस्वार्थ सेवा, कठोर मेहनत, कुटुंबमूल्ये आणि मजबूत परराष्ट्र धोरण यासाठी हिंदू संस्कृतीचा खूप फायदा झाला आहे.\nमुकाबला विकासाच्या शत्रूंशी (अग्रलेख)\nमाओवाद्यांविरुद्ध जंगलांमध्ये आक्रमक होतानाच त्यांना सर्व प्रकारचे साह्य देणाऱ्या शहरी पांढरपेशा संघटनांचीही नाकाबंदी केली पाहिजे. मात्र माओवाद्यांना...\nअमली पदार्थांची काळी दुनिया\nदेशातील ड्रग्जचा व्यापार गुंतागुतींचा आहे. झोपडीपासून आलिशान वस्त्यांपर्यंत हे मायाजाल पसरले आहे. विशेष म्हणजे या व्यवसायाच्या उलाढालीचा अंदाज अजूनही...\nभारतातल्या युवकांमध्ये निर्मितिक्षम सामर्थ्य सुप्त स्वरूपात आहे, असं मला वाटतं. ते जागृत करण्यासाठी आपल्याला प्रथम प्राचीन भारतातली कामगिरी व...\nकाँग्रेसने देशाचा खोटा इतिहास लिहिला : डॉ. दा. वि. नेने\nसांगली : सत्ताधारी काँग्रेसने देशाचा खोटा इतिहास लिहिला. नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर माझ्या सारख्यांना तो इतिहास खोटा असल्याचे...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/kopardi-gang-rape-case-vidhan-sabha-11088", "date_download": "2018-04-24T05:15:36Z", "digest": "sha1:VVXYZ3YNTTQGRRG67U6LEQVN55VIH7US", "length": 30422, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kopardi gang rape case in Vidhan Sabha ‘कोपर्डी’वरून विधिमंडळ दणाणले | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016\nसंचालक अपात्रतेचा अध्यादेश पुन्हा\n१३ हजार ३२ कोटींच्या पुरवणी मागण्या\nभाजीपाला-फळे विनियमन अध्यादेश मांडला\n‘नमामि चंद्रभागा’ प्राधिकरणाची स्थापना\nमुंबई - नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणावरून सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ दणाणले. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनही केले. मात्र, मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेवर सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी, अशी मागणी आक्रमकपणे करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विधानसभेमध्ये स्थगन प्रस्तावावर चर्चा न घेतल्याने विरोधक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत आहेत. विधान परिषदेतही सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळला. मात्र, हा विषय गंभीर असल्याचे मान्य करीत यावर उद्या अल्पकालीन चर्चा घेण्याचे जाहीर केले.\nकोपर्डी येथील बलात्कार व निर्घृण हत्येसंबंधात मांडलेल्या स्थगन प्रस्तावाला मान्यता नाकारल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. कोपर्डीप्रकरणी स्थगन प्रस्ताव दाखल करून घेत चर्चा व्हायला हवी, अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली होती. मात्र, विधानसभाध्यक्ष बागडे यांनी ती स्वीकारण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सुरू केले. सरकार पक्षाबाबत अध्यक्ष पक्षपाती वागत असल्याने आता त्यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव दाखल करणे हाच मार्ग असल्याचे विरोधी आमदार नमूद करत आहेत. या ठरावावर स्वाक्षऱ्या घेण्याची मोहीमही सुरू झाली आहे. २९ विधानसभा सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या तर हा अविश्‍वास ठराव तांत्रिकदृष्ट्या स्वीकारावा लागेल. अर्थात विधानसभेत सत्तारूढ आघाडीकडे असलेले बहुमत लक्षात घेता हा ठराव मंजूर होण्याची शक्‍यता दुरापास्त आहे.\n‘पीडित कुटुंबाला आठ लाख’\nकोपर्डी बलात्कारप्रकरणी सरकार चर्चेला तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगूनही विरोधकांनी चर्चेची मागणी आक्रमकपणे लावून धरली. शेवटी मुख्यमंत्र्यांनी सरकारतर्फे पीडित कुटुंबाला आठ लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली; तसेच हा खटला ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात चालविण्यात येईल व यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने नगर बलात्कार प्रकरणी सरकारची कोंडी केली. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सर्व कामकाज बाजूला सारून तातडीने कोपर्डी घटनेवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. ही अतिशय गंभीर घटना असल्याचे सांगून विखे-पाटील म्हणाले, ‘‘नगरच्या पालकमंत्र्यांनी या घटनेनंतर दोन दिवसांनी भेट दिली. सरकार असंवेदनशील असून सरकारला या घटनेचे गांभीर्य नसल्याचे यावरून दिसून येते.’’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. या मागणीवर विरोधी पक्षाचे सर्व सदस्य आक्रमक झाले होते. अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन सदस्यांनी घोषणाबाजीही केली.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढविला. दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाइतकीच ही घटना गंभीर असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, ‘‘या घटनेमुळे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्याचीही आता लाज वाटायला लागली आहे. पीडित मुलगी ही आपल्या घरातील मुलीसारखीच असल्याचे समजून या घटनेवर तातडीने चर्चा करायला हवी. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना शिक्षा करा. या प्रकरणाचे आम्हाला राजकारण करायचे नाही. अशा गुन्ह्यांबाबत कठोर कायदे केले पाहिजेत. निर्भया प्रकरणानंतर ज्या पद्धतीने कायद्यात बदल करण्यात आला त्याहून अधिक कठोर कायदा करण्याची शिफारस राज्याने केंद्राला करावी. भविष्यात आया-बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होता कामा नये.’’\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘या दुर्दैवी घटनेत आरोपी जितेंद्र शिंदे याला २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर संतोष भवाळ आणि नितीन भयदुले यांना २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा खटला चालविण्याची विनंती मान्य केली आहे. सरकार या प्रकरणी चर्चेला तयार असून गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करून योग्य ती वेळ निश्‍चित करावी.’’\nविधानसभेचे माजी सदस्य आणि राज्याचे माजी मंत्री बाबूराव भास्कर, माजी आमदार हरीश मानधना, गंगाधर स्वामी, मोहंमद अमीन खंडवाणी, देविसिंग राठोड आणि हरिश्‍चंद्र पाटील यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक प्रस्ताव मांडून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनीही दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.\nकोपर्डीतील बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, सरकार त्यासंबंधात योग्य ती पावले उचलत आहे. उभय सभागृहात यासंबंधीचे ठराव मान्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: उत्तर देणार असताना या घटनेला पक्षीय राजकारणाचा विषय करत अध्यक्षांविरोधात ठरावाच्या हालचाली करणे हे दुर्दैवी आहे.\n- गिरीश बापट, विधिमंडळ कामकाज मंत्री\nराज्याच्या गृह विभागाचे तीन तेरा वाजले आहेत. राज्यात आयाबहिणी सुरक्षित नसतील तर आम्हाला कोणाची पर्वा नाही, असा घणाघात विधान परिषदेतील काँग्रेसचे सदस्य नारायण राणे यांनी केला. विधान परिषदेत निवडून आल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी नारायण राणे यांनी आपली चुणूक दाखवत विरोधी पक्षाचा किल्ला लढवला, त्यांना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची साथ मिळाली.\nकोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येचा निषेध करीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कामकाजाच्या सुरवातीलाच २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला होता. त्यावर बोलताना राणे यांनी सरकारवर चौफेर टीका केली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळला. मात्र हा विषय गंभीर असल्याचे मान्य करीत यावर उद्या अल्पकालीन चर्चा घेण्याचे जाहीर केले.\nविधान परिषदेचे सभागृह नेते चंद्रकात पाटील यांनी याविषयी निवेदन करताना, ‘‘राज्य सरकारने याप्रकरणी जेवढे करता येईल तेवढे तत्परतेने केलेले आहे. घटना हादरवणारीच आहे. याविषयी चर्चेला सरकार तयार असून, सदस्यांनी चर्चेद्वारे याबाबत अधिक मार्गदर्शन करावे,’’ असे त्रोटक उत्तर दिले. यावर नारायण राणे यांनी वैतागून, ‘‘ही घटना गंभीर असून, ताबडतोब चर्चा झाली पाहिजे आणि इथे काय मार्गदर्शन करायला शाळा काढल्यात का’’ असा टोलाही हाणला.\n‘‘मुख्यमंत्र्यांचे नागपूर जिथे सुरक्षित नाही तिथे राज्याचे काय कायदा सुव्यवस्था सांभाळणारे अधिकारी ऐकत नाहीत, असेही मंत्री म्हणतात तर अशा परिस्थितीत कोणावर विश्‍वास ठेवायचा,’’ अशी चिंता राणे यांनी सभागृहात व्यक्‍त केली.\nकोपर्डीतील घटना राज्याला मान खाली घालायला लावणारी असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली. ‘‘आरोपीच्या नावाच्या साधर्म्यामुळे माझ्याकडून चूक झाल्यावर मंत्र्यांना पाठीशी घालायला दहा मिनिटांतच मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले, कुठल्या मंत्र्यांनी कुठे जावे - जाऊ नये याबाबतचे ट्विटदेखील मुख्यमंत्री करतात; परंतु कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची घटना घडून तीन दिवस झाले, तरी मुख्यमंत्री नराधमांना सोडणार नाही, असे ट्विट मात्र करीत नाहीत,’’ अशी जोरदार चपराक लगावली. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री तीन दिवस त्या कुटुंबाची भेट घेत नाहीत, हे शोभनीय नसल्याचाही चिमटा त्यांनी काढला. पोलिसांचाही त्या कुटुंबावर दबाव असल्याने तेही काही बोलत नसल्याची माहितीही मुंडे यांनी सभागृहासमोर मांडली.\nशिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी याच विषयावर औचित्याचा मुद्दा मांडण्याची परवानगी सभापतींकडे मागितली होती. सभापतींनी त्यांचा औचित्याचा मुद्दा मान्य करून त्यांना बोलण्याची परवानगी दिली. त्या वेळी नीलम गोऱ्हे यांनी बलात्कारासारख्या प्रकरणातही जातीच्या प्रश्‍नांवर ध्रुवीकरण होत असल्याचे निरीक्षण नोंदवले; तसेच मुलीच्या आईने चार आरोपींची नावे सांगितलेली असताना ‘एफआयआर’मध्ये सुरवातीला एकाच आरोपीचे नाव कसे काय होते, असा सवाल करीत पोलिस यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.\nदरम्यान, काँग्रेसचे आ. जनार्दन चांदूरकर यांनी हा स्थगन प्रस्ताव एकमताने व्हावा अशी, तर हा प्रस्ताव मतदानास टाकावा, अशी सूचना नारायण राणे यांनी मांडली, मात्र सभापतींनी ती नाकारून उद्या या प्रश्‍नावर अडीच तासाची चर्चा होणार असल्याचे जाहीर केले.\nविधान परिषदेत वर्णी लागलेल्या नारायण राणे यांनी परिषदेच्या पहिल्याच दिवशी जोरदार ‘ओपनिंग’ केली. कोपर्डी बलात्कर प्रकरणी राणे यांनी सरकारवर हल्ला करत काँग्रेसला परिषदेत ‘आवाज’ मिळवून दिला. नारायण राणे यांच्या अनुभवाचा प्रत्यय सभागृहाला आला. काँग्रेसचे परिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांनी बोलण्याची संधी दिल्यावर राणेंनी कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावर सरकारची पिसे काढली. त्यांना रोखणारे सत्ताधारी बाकावर कोणी नव्हते. त्या वेळी विधान परिषदेचे माजी सभागृहनेते एकनाथ खडसे यांची कमतरता सत्ताधारी सदस्यांनाही नक्‍कीच जाणवली. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते शरद रणपिसे, भाई जगताप, जनार्दन चांदूरकर असे अगदीच मोजकेच आमदार सभागृहात तोंड उघडणारे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेसची फौज सत्ताधाऱ्यांपुढे कमकुवत ठरत असे. आज मात्र विधान परिषदेत नारायण राणेंनी काँग्रेसमध्येच ‘जान’ आणल्याचे चित्र निर्माण झाले होते.\nकेडगाव प्रकरण - विशाल कोतकरला कामरगावमध्ये अटक\nनगर : केडगावमधील शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख संशयित आरोपी व काँग्रेस नगरसेवक विशाल...\nअनधिकृत गौण खनिजाविरुद्ध मोहीम\nमालवण - तालुक्‍यात अनधिकृतरीत्या वाळू वाहतूक, गौण खनिज वाहतूक तसेच वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या होड्यांवर महसूल प्रशासनाने धडक मोहीम हाती घेत...\nम्हेत्रे कुटुंबीयांकडुन सात हजार पुस्तके दान\nतासगाव - ज्येष्ठ द्राक्षतज्ज्ञ एन. बी. म्हेत्रे यांच्या आई रुक्‍मिणी बाबूराव म्हेत्रे आणि शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त प्रयोगशील शेतकरी आर. डी. (...\nयात्रेकरुंची तहान भागवण्यासाठी सरसावले 'जल'दाते\nशिर्सुफळ : शिर्सुफळ (ता.बारामती) येथील श्री शिरसाई देवी यात्रेच्या दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांची होणारी गैरसोय...\nअग्निशमन दलाचा मला सार्थ अभिमान वाटतो - विश्वनाथ महाड़ेश्वर\nमुंबई : अग्निशी झुंज देत मुंबईकरांच्या जीवन व मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुंबईचे महापौर विश्वनाथ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/benefits-of-drinking-water-on-world-water-day-1648325/", "date_download": "2018-04-24T05:03:39Z", "digest": "sha1:CAAY5HQP57WLDPNG6URFBL25323WLE4W", "length": 21383, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Benefits of drinking water on World Water Day | हे ‘जीवन’ आरोग्यदायी आहे! | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nहे ‘जीवन’ आरोग्यदायी आहे\nहे ‘जीवन’ आरोग्यदायी आहे\nदिवसभरात जास्त शारीरिक कामे करत नसू तर दिवसाला साधारणपणे दोन लिटर पाणी पुरेसे आहे\n आपल्या आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. येत्या २२ मार्च या जागतिक जलदिनाच्या निमित्ताने पाणी का प्यावे, कसे प्यावे आणि किती प्यावे याचे मार्गदर्शन..\nआपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता का\nआपल्या शरीरामध्ये ६० टक्के पाणी असते. शरीरामध्ये लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थाचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते. मेंदूच्या मागच्या भागात असलेल्या ग्रंथीच्या(पिच्युटरी ग्लॅण्ड) माध्यमातून मेंदू आणि मूत्रपिंड यांच्यामध्ये समन्वय साधला जातो आणि मूत्राद्वारे किती पाणी बाहेर फेकावे ते ठरते. जेव्हा आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासते, तेव्हा मेंदू शरीरातील तहान लागण्याची भावना जागृत करतो. अशा वेळी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी किंवा सरबत, ताक यांसारखे द्रवपदार्थ पिणे आवश्यक आहे. मात्र तहान लागल्यानंतर अल्कोहोलयुक्त द्रवपदार्थ पिणे टाळावे. कारण अल्कोहोलमुळे मेंदू आणि मूत्रपिंडामधील समन्वयामध्ये बाधा येऊन प्रमाणापेक्षा जास्त पाणी मूत्राद्वारे शरीरातून बाहेर फेकले जाते. ज्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासू शकते.\nआपण पुरेसे पाणी पितो का\nमूत्राचे प्रमाण आणि रंग यावरून आपण पुरेसे पाणी पितो का याची खात्री केली जाऊ शकते. जर दर दोन किंवा चार तासांनी मूत्रविर्सजन करत असून त्या वेळी मूत्राची मात्रा मुबलक प्रमाणात आणि रंग फिकट असेल तर ते शरीराला पुरेसे पाणी मिळत असल्याचे लक्षण आहे. जर सुमारे आठ तास मूत्रविसर्जन करत नसाल तर हे धोकादायक असून शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याचे लक्षणे आहे.\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nतहान लागल्यावर पाणी उपलब्ध नसल्यास काय करावे\nतहान लागल्यानंतर पाणी पिणे हेच योग्य आहे. मात्र काही वेळा पाणी उपलब्ध नसल्यास अल्कोहोलजन्य पदार्थ वगळता कोणत्याही द्रवपदार्थाचे सेवन करावे. फळे व अन्नामध्येदेखील पाणी असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मांसामध्ये ६० टक्के पाणी असते.\nसाधे पाणी पिणे कंटाळवाणे वाटत असेल तर काही लोक पाण्यामध्ये फळांचे तुकडे किंवा पुदिना आदी पदार्थ घालून पाणी पितात.\nपाणी शरीराला घातक आहे का\nदिवसभरात जास्त शारीरिक कामे करत नसू तर दिवसाला साधारणपणे दोन लिटर पाणी पुरेसे आहे. हृदय, मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांमध्ये काही वेळा पाण्याचे सेवनावर काही प्रमाणात प्रतिबंध घातले जातात. पिण्याचे पाणी र्निजतुक नसेल तर विषाणूंचा प्रादुर्भाव होऊन अतिसार, कावीळ, विषमज्वर यासारखे आजार होऊ शकतात. काही वेळा पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असल्याने असे पाणी पचायला जड असते.\nजास्तीत जास्त पाणी पिण्याचे शरीराला होणारे फायदे\nशारीरिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी पाण्याची मदत होते. शरीरातील दोन टक्के पाणी कमी झाले तरी पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. व्यायामामधून घाम येऊन शरीरातील पाणी कमी होत असते. खेळाडूंनी हे लक्षात ठेवून जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी कमी प्यायल्यास त्यांना व्यायाम करते वेळी थकवा येणे, शरीरातील तापमान नियंत्रण न होणे आदी त्रास होऊ शकतो. आपल्या शरीरातील सर्व स्नायूंमध्ये पाण्याचे प्रमाण ८० टक्केअसते. शारीरिकदृष्टय़ा जास्त थकवणारे व्यायाम करताना स्नायूंमध्ये निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी शरीरामध्ये पाणी मुबलक पाणी असणे आवश्यक आहे.\nवैद्यकीय अभ्यासानुसार, शरीरातील सुमारे १ ते ३ टक्के पाणी कमी झाल्याने देखील मनाचा कल, स्मरणशक्ती आदी मेंदूच्या विविध कार्यावर परिणाम होऊ शकतो. १ ते ३ टक्के पाण्याची कमतरता भासल्याने होणारे परिणाम हे साधारणपणे ६८ किलो वजनाच्या व्यक्तीचे ०.५ ते २ किलोपर्यंतचे वजन कमी होण्याने होणाऱ्या परिणामांइतके आहेत.\nशरीराला आवश्यक एवढय़ा पाण्याचे सेवन न केल्यास काही व्यक्तींना डोकेदुखी, अर्धशिशी यांसारखे आजार उद्भवू शकतात.\nबद्धकोष्ठता सध्या सर्वसाधारणपणे आढळला जाणारा आजार आहे. जास्तीत जास्त पाण्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा आजार मोठय़ा प्रमाणामध्ये दूर होऊ शकतो.\nजास्तीत जास्त पाणी प्यायल्याने, मूत्रपिंडाद्वारे बाहेर पडणाऱ्या मूत्राची मात्रा वाढल्याने त्यासोबत शरीरातील क्षारही बाहेर फेकले जातात. त्यामुळे मूतखडा निर्माण होण्याची शक्यता कमी होते.\nमुबलक प्रमाणात पाणी प्यायल्याने वजनदेखील कमी करण्यास मदत होते. पाण्यामुळे चयापचयाचे प्रमाण वाढते. अर्धा लिटर पाणी प्यायल्याने चयापचयाचा दर सुमारे २४ ते ३० टक्के वाढतो. याप्रमाणे जर दिवसभरामध्ये दोन लिटर पाणी प्यायल्याने शरीरातील जवळपास ९६ कॅलरी जाळल्या जातात.\nत्वचा तजेलदार आणि तुकतुकीत दिसण्यासाठी पाण्याची मदत होते. त्वचेमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असून शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी त्वचा संरक्षणात्मक म्हणून काम करत असते. शरीरातील पाणी कमी झाल्यास त्वचा कोरडी होऊन सुरकुत्या पडतात. तेव्हा त्वचेवर मॉईश्चरायझर लावल्याने शरीरातील पाणी कमी होण्यापासून रोखले जाऊ शकते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bolghevda.blogspot.in/2013/02/blog-post.html", "date_download": "2018-04-24T04:34:11Z", "digest": "sha1:EDNRKEVF4LQ7NTE6ERTHUECRYBZBB6MG", "length": 45219, "nlines": 121, "source_domain": "bolghevda.blogspot.in", "title": "बोलघेवडा: सियाचीन ग्लेशीयर .............भाग ३", "raw_content": "\nबोलघेवडा ह्या नावाचे ‘कॅसेट मॅगझीन’ आम्ही मित्रांनी मिळुन कॉलेजात असताना सुरु केले होते. त्यात काही तिखट तर काही गोड असे लेख असायचे. आता परत ब-याच वर्षांच्या कालावधी नंतर हाच प्रयास ह्या ब्लॉग वर करु इच्छीतो.\nसियाचीन ग्लेशीयर अर्थात आयूष्याची दोरी\nसियाचीन ग्लेशीयर .............भाग ३\n........हेलिकॉप्टरने त्या हिमखाईच्या वरती होवर करून ‘जीपीएसचे’ संदर्भ घेतले व जरा लांब वर जाऊन हेलिकॉप्टर उतरवले. तेथेच उतरवले असते तर त्याच्या फिरणाऱ्या पंख्याच्या वाऱ्याच्या रेटाने, अडकलेल्या जवानांना त्रास झाला असता. पॅट्रोल लीडरने रेस्क्यू टीमला भेटून हिमखाई दाखवली. तो पर्यंत हेलिकॉप्टर रेस्क्यू टीमच्या दुसऱ्या दोन जवानांना घेऊन येण्यासाठी परत बेस कँपकडे उडले.......\nरेस्क्यू टीम लीडर एक कॅप्टन होता. हिमखाईत डोकावून, आपल्या विजेरीचा झोत हिमखाईत सगळ्या दिशेने पाडत, डोके नकारार्थी हालवत, कॅप्टन स्वतःशीच पुटपुटला, \"विश्वासच बसत नाही\". हिमखाई, अंदाजे वीस ते तीस फुटा पर्यंत खोल गेली होती. पुढे अरुंद होऊन घळी सारखी आत गेली होती. अरुंद झालेल्या खाईमुळे तो आत पडलेला जवान वाचला होता. पण खाली पडण्याच्या जोराने तो खाईच्या त्या अरुंद फटीत अडकला होता असे वाटत होते. कारण त्याच्याकडून कसलीच हालचाल होत नव्हती. हिमखाईच्या भिंती इतक्या जवळ होत्या की त्या अडकलेल्या स्थितीत त्याला जोरच लावता येत नसावा.\nकॅप्टनने त्याच्या विजेरीचा प्रखर झोत त्या जवानाच्या पलीकडे पाडून अजून आत पर्यंत डोकावायचा प्रयत्न केला तेव्हा त्याला काळोखा व्यतिरिक्त काहीच दिसले नाही. विजेरीच्या झोतात अडकलेल्या जवानाला कॅप्टनने न्याहाळले, कोठेही रक्ताच्या खुणा नव्हत्या, हिमखाईत पडल्यामुळे त्याला फार इजा झाली असेल असे वाटत नव्हते. त्याचे हातही मोकळे होते, त्यातल्या त्यात हे बरे होते. टीम लीडर कॅप्टनने त्याला हाक देऊन हात हालवायला सांगितले. पण एका तासापासून त्या गोठवणाऱ्या हिमखाईत राहिल्यामुळे तो जवान अशक्त झाला होता. अशक्तपणा आल्याने त्याच्या हात हालवण्यात काही दम राहिला नव्हता. पण जाणीव अजून कायम होती, त्या निमुळत्या होत गेलेल्या खाईमुळे कदाचित त्याचे कमरे खालील अंग दिसू शकत नव्हते.\nपरिस्थितीचे प्राथमिक अवलोकन करून झाल्यावर, रेस्क्यू टीमने कामाला सुरवात केली. असे ठरले की पहिल्यांदा बरोबर आणलेल्या एका दुसऱ्या दोरीने त्या जवानाला बांधायचे. बांधलेल्या दोरीचे दुसरे टोक खाईच्या बाहेर काढायचे व पक्क्या बर्फात पहारीने खणून डांबरी खिळ्यांनी पक्के करायचे. हे केल्याने त्या जवानाचे वजन ती दोरी घेईल व निदान तो वजनामुळे अजून आत जाणार नाही. त्याला बांधायचे म्हणजे टीमला हिमखाईच्या आत उतरावे लागणार होते. हे करण्यासाठी टीम, हिमखाईच्या तोंडाजवळचा बर्फ बाजूला करायला लागून व भक्कम अशी नढासळणारी जागा शोधायला लागले. त्यांना डांबरी खिळ्यांनी रेस्क्यू टीमची दोरी पक्की बांधता यावी अशी जागा पाहिजे होती. थोड्याच वेळात, रेस्क्यू टीम ने वापरायची दोरी बांधलेल्या जागेवरून सुटणार, तुटणार किंवा सटकणार नाही अशी जागा शोधली. हे काम चालले होते तेव्हा जवानाला कसे पटकन वाचवता येईल ह्याचा विचार कॅप्टनला सतावत होता. हिमखाईतून एखाद्याला वाचवण्याचे काम खूप अवघड व धोक्याचे असते. बऱ्याच वेळेला हिमखाईमध्ये वितळळेल्या बर्फाचे पाणी होऊन खाली पडता पडताच परत बर्फ तयार होतो त्यामुळे असंख्य निमुळते बर्फाचे भाले, खाईच्या तोंडातून खाली ओघळलेल्या स्थितीत गोठून तयार होतात. भयंकर कडक व टोकदार. ह्या भाल्यांचे नीट ध्यान ठेवले गेले नाहीतर जवानाला वर खेचताना त्याच्या अंगात हे बर्फाचे भाले रुतूनच तो मरायचा. हे टाळण्यासाठी, असे ठरले की, टीम मधल्या एकाने कमरेला दोरी बांधून खाली जायचे, त्या खाईतल्या जवानाला आपल्या पाठीवर बांधायचे, कारण स्वतःहून काही करायची ताकद त्याच्यात बहुदा राहिली नसावी. त्याला पाठीवर बांधल्यावर, आपले स्वतःचे तोंड खाईच्या भिंतीकडे करायचे व हातात वरून येणारी दोरी धरलेली असताना पायांनी भिंतीला जोरात रेटा द्यायचा. रेटा दिल्याने आपण व तो जवान क्षण भर भिंती पासून दूर जातो, त्याचवेळी, वरती असणाऱ्या टीम मधल्या एकाने ती दोरी वर ओढायची. हिमखाईत असणाऱ्याने भिंतीला रेटा देणे व वरच्याने दोरी ओढणे हे एका वेळेला झाले पाहिजे. नाहीतर वरच्या टीम मधल्या जवानाच्या नुसतेच दोरी ओढण्याने ते खाईतले दोघेही भिंतीवर घसटून वर येत असताना बर्फात तयार झालेल्या भाल्यांनी दोघांनाही भोसकले असते. नशिबाने ह्या हिमखाई मध्ये असे टोकदार भाले कमी होते. पण येथे दुसरेच एक संकट होते. अडकलेल्या जवानाला बराच वेळ झाल्यामुळे त्याच्यावर बर्फाची पुटे चढून तो हालू शकत नव्हता. जमलेल्या बर्फाने त्याचे वजनही वाढले होते. कॅप्टनच्या मनात विचार आला... काहीही झाले तरी त्याचे पाय तर गेलेच आहेत. ५० मिनिटे ह्या गोठणाऱ्या शून्यापेक्षा खाली ४० सेल्सियस तापमानात राहिल्याने त्याला वाचवल्यावर सुद्धा बेस कँपवर गेल्यावर डॉक्टर्स ना त्याचे पाय कापूनच टाकावे लागणार होते. कारण एवढा वेळ गेल्यावर नक्कीच त्याला फ्रॉस्ट बाइट झाला असणार होता. कापण्याशिवाय गत्यंतर नाही. पण कॅप्टनला त्याचे पाय कापले जाण्याची काळजी एवढी वाटत नव्हती किंवा दुःख नव्हते. त्याचे पहिले काम त्या जवानाला हिमखाईतून काढायचे होते. तो मरायच्या आधी. बेस कँपवर त्याच्या पायांचे काय होणार ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या होत्या व सद्ध्य परिस्थितीत गौण वाटाव्या असा प्रसंग होता.\nहे करता असताना त्यांना परत एकदा हेलिकॉप्टराचा आवाज कानावर पडायला लागला. हेलिकॉप्टर, रेस्क्यू करणाऱ्या दुसऱ्या दोन जवानांना घेऊन आले होते. आत उतरण्या आधी अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची राहिली होती.... हिमखाई किती खोल आहे ते नेमके समजत नव्हते. त्याचा अंदाज घेणे खूप जरूरीचे असते. हिमखाई खूप खोल असेल तर अडकलेल्या जवानाला वाचवण्यासाठी वेगळे प्रकार करावे लागतात. जोखीम पत्करून टीम स्वतःला बांधलेली दोरी सोडून त्यात उतरतात, कारण मोकळ्या हाताने व न बांधल्या गेलेल्या शरीराने काम करायला सोपे जाते व पटकन होते, हे खाई कमी खोल असेल तरच करता येते.\nहिमखाईच्या खोलीचा अंदाज सगळ्यात शेवटी घेतला जातो. अगदी आत उतरण्या आधी. असे करण्याला कारण असते. जे खाईत सापडलेले असतात त्यांच्या प्रतिक्रियांचा अंदाज बांधता येतो. आत पडल्यावर त्यांचे वागणे जसा वेळ जाईल तसे बदलत जाते. कधी भीतीने आरडाओरड तर मन स्थिरावल्यावर बदलणारे वागणे ह्या सगळ्याचे एक चक्र असते. हिमखाईत पडल्यापडल्या पहिल्यांदा, व्यक्तीला भीतीने घेरले जाते, व आता आपण मरणार ह्या कल्पनेने अशी व्यक्ती, हातवारे व जोरजोरात किंकाळ्या फोडायला लागतात. जे पडल्या पडल्या मरतात त्यांच्या डोक्यात मरायच्या आधी काय विचार येत असतील ते कळायला मार्ग नाही. पण जे काहीच भाग्यवान असतात व ज्यांना खाईच्या बाहेर जिवंत निघता येते, ते सांगतात की पहिल्या काही मिनिटातच मनावर ताबा बसतो व शांत होऊन बाहेर कसे निघायचे त्याचा विचार सुरू होतो. थोड्याच वेळात त्यांना जेव्हा समजते की त्यांच्यासाठी बाहेरून वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत तेव्हा त्यांची आशा वाढते व ते पण त्यांच्याकडून प्रयत्न करायला लागतात. अशा भाग्यवानांना मनातून ठाऊक असते की जिवंत राहायची किंमत मोजावी लागेल कदाचित.., कधी हात, किंवा पाय, किंवा हाताची बोटे फ्रॉस्टबाईट मुळे कापावी लागतात. खूप थंड गोठणाऱ्या तापमानात आपले शरीर, बचावासाठी, हाता पायांच्या रक्ताच्या कॅपीलरीज आक्रसून घेतात. हे शरीराचे बचाव तंत्र आहे. त्याने शरीराचे तापमान काही प्रमाणात स्थिर राहते. पण फार वेळ त्या कॅपिलरीज आक्रसलेल्या अवस्थेत राहिल्या तर शरीराचा तेवढा भाग मरून जातो. पण म्हणतातना – सीर सलामत तो पगडी पचास.... ह्या हातपाय गमावण्याच्या विचारांनी ते दुःखी होत नाहीत. पण हे तेव्हाच घडते जेव्हा त्यांना जाणवते की, आपण ज्या हिमखाईत पडलो आहोत ती खूप खोल नाही, मदतीला लोकं आली आहेत, प्रयत्न चालू आहेत, बाहेर हेलिकॉप्टराचा आवाज यायला लागला आहे, व काही वेळातच आपण खाईतून बाहेर येऊ शकू. अशा स्थितीत एकदम मनाला उभारी येते व मना बरोबर शरीर साथ द्यायला लागते. पण काही वेळेला जेव्हा अडकलेल्या जवानाला समजते की परिस्थिती वाटली होती त्या पेक्षा भयंकर आहे तेव्हा कमी झालेली भीती, परत मनात घर करते. अशा अडकलेल्या जवानाच्या मनाला जोरात झटका बसतो. त्याला त्याच्या पुढे उभे ठाकलेल्या मरण ह्या सत्याची जाणीव होते. असा जवान जोर जोरात आरडा ओरडा करायला सुरवात करतो. त्याच बरोबर सुटकेसाठी जेवढे त्राण राहिले उरले असतील ते जमवून तडफड करायला लागतो. आता पण असेच झाले. एका तासाहून जास्त वेळ हिमखाईत पडल्यामुळे प्रचंड थंडीने त्याच्या शरीराच्या सगळ्या संवेदना गेलेल्या होत्या. अशा लोकांना संवेदना गेल्यात हेच समजत नाही व असे वाटत राहते की आपण खाईच्या तळाशी उभे आहोत. जे फसवे असते. फक्त मनाची विचार करायची शक्ती शाबूत असते. नेमक्या अशा वेळेला जर त्या अभाग्याला एकदम जाणीव झाली की खाली हजारो फूट खोल खाईत तो मध्येच लटकला आहे किंवा अडकला आहे, त्या वेळेला त्याला नुकतेच पोहायला शिकलेल्या मुलाला पोहता पोहता एकदम जसे कळते की तो पुलाच्या खोल भागात आला आहे तेव्हा जसे त्याला वाटते तसेच वाटते.\nखाईतची खोली जाणून घेण्यासाठी टीम लीडरने हळूच बर्फाचा एक दगड त्या खाईत ढकलला.\n'शीट्’. त्या ढकलेल्या दगडाचा खाईच्या भिंतींना आपटत खाली जाण्याचा न थांबणारा किणकिणाट ऐकून कॅप्टन निराशेने उच्चारला. हिमखाई खूपच खोल होती. त्याने स्वतःची दोरी कंबरेला नीट बांधली गेली आहे ते तपासले व अजून वेळ न घालवता खाईत उतरू लागला. खाई बाहेर उभा असलेला त्याचा साथीदार दोरी धरून, हळूहळू जसे लागेल तसे दोरीला ढील द्यायला लागला. हेलिकॉप्टराने आलेल्या टीम मधल्या बाकीच्या दोघांनी सुद्धा खाईत खाली जायची तयारी सुरू केली.\n\"माइक वन टू बेस. वी आर इन\" रेस्क्यू टीम मधल्या एकाने रेडिओत खेकसले.\nपंधरा किलोमीटर आणि १०००० फुटा खाली बेस कँपवर एका स्पीकर मधून आवाज प्रसारित झाला. प्रयत्न सुरू झाल्याचे बेस कमांडरला कळले व बेस कमांडरने निःश्वास टाकला. बेस कँपच्या बेस कंट्रोल रूम मध्ये बसलेले अनुभवी नेहमीच अशा संकटाच्या वेळेला रेस्क्यू टीम लीडरला सल्ला लागला तर द्यायला तयार बसलेले असतात. कंट्रोल रूम मध्ये एक डॉक्टर पण असतो. अशीच वेळ आली तर प्राथमिक उपचाराचा सल्ला तो देऊ शकतो. रेस्क्यू टीमला प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण दिलेलेच असते. काम करताना रेस्क्यू टीमला अजून कशाची जरूर भासली तर ताबडतोब निर्णय घेऊन बेस कमांडर अजून एका हेलिकॉप्टर बरोबर शक्य असतील त्या गोष्टी पाठवतो.\nजवानाला वाचवता वाचवता कधी कधी भावनेच्या भरात रेस्क्यू टीमच्या हातून चुकीचा निर्णय घेतला जातो, त्याने बाकीच्यांच्या जीविताला धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. अडकलेल्या जवानाला वाचवता वाचवता बाकीच्या सगळ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशा वेळेला कंट्रोलरुम मधले अनुभवी असले भावनेच्या भरात चुकीचे घेतलेले निर्णय रद्दबादल करतात. हे त्यांचे काम असते. नाहीतर भावनेच्या भरात खाईत पडलेल्याला वाचवण्यासाठी असे काही विपरीत निर्णय घेतले जातात की सगळ्यांचा जीव धोक्यात येतो.\nरेस्क्यू टीमला जाऊन आता एक तास झाला होता. कंट्रोल रूम मधले सगळे घड्याळाकडे बघत डॉक्टरकडे प्रश्नार्थी मुद्रेने नजर वळवली. डॉक्टरने मान हालवत न विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले \"स्लिम्, व्हेरी स्लिम चांसेस ऑफ हिज सर्व्हायव्हल\"\n\"बेस वि आर कमींग बॅक.\" चॉपर पायलटचा रेडिओ बोलत होता. रेस्क्यू टीमला पोहोचवण्याचा त्यांच्या कामाचा पाहिला भाग पूर्ण झाला होता. आता दुसऱ्या भागात रेस्क्यू टीम व त्या आठव्या अडकलेल्या जवानाला घेऊन बेसला परत यायचे राहिले होते. सगळ्यात महत्त्वाचे तेच होते. हा दुसरा भाग त्यांना पूर्णपणे नेहमी जमायचाच असे नाही. कधीकधी त्यांच्या परतीच्या लोकांच्या यादीत म्हणजे मॅनीफेस्ट मध्ये घेऊन गेलेल्या संख्ये पेक्षा कमीच नावे असायची असे झाले तर फार वाईट वाटायचे सगळ्यांना.\nअरुंद तोंडाच्या हिमखाईमुळे तेथल्या टीमने असा निर्णय घेतला की एका वेळेला दोनच मदतनीस खाईत उतरतील. दुसरे दोन, आतले दमले की आत जाण्यास किंवा आत गेलेल्यांना मदत करण्यास खाईच्या तोंडाशी तयार राहतील. अजून एका कारणासाठी ते बाहेर सज्ज राहिले होते ते म्हणजे, वाचवता वाचवता रेस्क्यू टीम मधलेच कोणी फसले तर त्याला लागलीच ओढून बाहेर काढायला.\nटीम लीडर, खाईत उतरून अडकलेल्या जवाना जवळ गेला. आता पर्यंत एकटे पडलेल्या जवाना जवळ कोणीतरी आल्यामुळे, त्या जवानाच्या तोंडावर कृतज्ञतेचे भाव उमटले. टीम लीडरने त्याच्या हाताचा विळखा त्याच्या अंगा भोवती घातला तेव्हाच खाली गेलेल्या दुसऱ्या मदतनिसाने एका दोरीचा लूप करून अडकलेल्या जवानाच्या वरच्या अंगाला दोरीने बांधले. तो अजून खाली घसरू नये म्हणून व त्याला वर खेचायला सोपे जावे म्हणून पण. विजेरीच्या प्रकाशात अजून जवळून त्याला बघितल्यावर मदत पथकाला असे कळून आले की तो त्या घळीमध्ये अडकला आहे. काम अवघड आहे पण पूर्वी केलेले असल्या कारणाने त्यांना खात्री होती.\nटीम लीडरने दोरीला दोनदा ताण दिला, वरच्यांना कळले आता ओढायला सुरवात करायची म्हणून. सगळ्यांनी मिळून दोरी ओढली. काहीच झाले नाही. त्यांना काही कळेना असे का होत आहे, दोरी कोठे फसली तर नाही ते बघितले पण कोठेही फसली नव्हती. खाईत त्या जवाना बरोबर असलेल्या टीम लीडरने ओरडून अजून जोरात ओढा म्हणून ऑर्डर सोडली.\nआता जेवढे जवान खाईच्या वरती होते त्या सर्व जणांनी सगळी ताकद लावली तरी काही होईना. त्या ओढण्याने मात्र त्या अडकलेल्या माणसाला बसलेला दोरीचा विळखा अजूनच घट्ट झाला. एवढे करून सुद्धा अडकलेला जवान थोडा सुद्धा सरकला नाही. परिस्थितीचे गांभीर्य टीम लीडरला पहिल्यांदा कळले, मग टीमला कळले आणि शेवटी त्या अडकलेल्या जवानाला देखील. तो पर्यंत तो अडकलेला जवान शांत होता. त्याला वर काढले जायची आशा होती. रेस्क्यू टीम आल्याने त्याच्या आशा उंचावल्या होत्या. टीमने सुद्धा त्याला धीर दिला होता. रेस्क्यू टीमला तशी शिकवणच असते. अशा खाईत अडकलेल्याला पहिल्यांदा आशा दाखवायची. जीवनासाठी अतिशय महत्त्वाची असते. आशेच्या जोरावर माणूस कठीण परिस्थितही तग धरतो. पण आता त्या आठव्या जवानाला समजून चुकले की आपण अडकलो आहोत. हे कशामुळे झाले असेल ज्या वेळेला तो खाईत पडला तेव्हा पासून सगळे त्याला सांगत होते हालू नकोस म्हणून. कारण हालण्याने, त्या बर्फाच्या खाईत तो अजून अजून रुतेल किंवा अजूनच आत जाईल व एकदा रुतला गेला की मग तिथे मदत पोहचवता येणार नाही. ह्या भयाने सगळे त्याला हालू नकोस अशी सूचना करत होते. त्याचे मन पण त्याला हेच इशारत होते. कारण हालचालीने ठिसूळ बर्फ तुटतो व आधार सुटल्यावर सरळ खाली हजारो फूट पृथ्वीच्या पोटाशी पडणे जेथून सुटका नाही. पण न हालण्याचा ह्याच निर्णयामुळे सगळा सत्यानाश झाला होता. सगळ्यांना एकदम समजून चुकले की जवान खाईत पडल्यावर जेथे अडकला होता तेथला बर्फ नेहमी आढळणारा ठिसूळ बर्फ नव्हता पण त्या उलट येथे असणारा बर्फ टणक होता. त्यामुळे अशी घट्ट पकड बसली गेली होती की त्याला बांधलेल्या दोरीला कितीही जोर लावून ओढले तरी तो जवान काही सुटत नव्हता. ओढण्यामुळे मात्र दोरी त्याच्या शरीराला आवळत चालली होती. साऱ्यांच्या आशेवर पाणी पडले. आता काहीतरी दुसरा उपाय शोधावा लागणार होता. वेळ निघत चालली होती. तो जेव्हा पडला तेव्हा त्याचे शरीर त्या बर्फाच्या भिंतीला लागल्या मुळे अगदी निमिषासाठी त्याच्या अंगाच्या गरमीने बर्फाचा पृष्ठभाग थोडा वितळता वितळता लागलीच असलेल्या गारठ्याने गोठला गेला असावा व त्या प्रक्रियेत त्याचे अंग बर्फाच्या भिंतीला पक्के चिकटले गेले असावे. आपल्या फ्रीजमध्ये जसे कधीकधी बर्फाचा ट्रे फ्रीझर मध्ये चिकटून बसतो तसा. असे झाले असेल किंवा, ग्लेशीयरच्या पोटामध्ये सारखी हालचाल होत असते, नेमकी तो पडल्या पासून कदाचित खाईचा निमुळता होत गेलेला भाग अजूनच जवळ आला असेल व आपल्या मगर मिठीत त्याला घेतले असेल. हे कारण का ते कारण, कोणालाच कळायला मार्ग नव्हता. ह्या गोष्टीवर विचार करण्या इतका त्यांच्या जवळ वेळ पण नव्हता. त्या घटकेला टीम लीडरला एवढे कळत होते की वरच्या नऊ लोकांची एकवटलेली ताकद त्या दोरीला ओढत होती तरी सुद्धा अडकलेला जवान निघू शकत नव्हता.\nटीम लीडरला सुचेनासे झाले. त्याने आपली दोरी दोनदा विशिष्ट तऱ्हेने ओढली, हा वरच्या साथीदारांना बाहेर काढण्यासाठी इशारा होता. त्याला बाहेर येऊन रेडिओवरून बेस कँपच्या कंट्रोल रूम मधल्या अनुभवी लोकांना विचारावेसे वाटत होते. त्यांना माहिती असेल. पूर्वी कधी असे झाले नव्हते. इतकी घट्ट पकड पूर्वी कधी त्याने अनुभवली नव्हती. त्या आणीबाणीच्या प्रसंगामध्ये तो असा एकदम त्या अडकलेल्या जवानाला सोडून वरती आल्याने त्या जवानाच्या मनात काय कोलाहल माजला असेल ह्याचा क्षणासाठी त्याला विसर पडला होता. त्याच्याच्याने हा विचारच झाला नाही. ह्या सगळ्याचा विचार करायची ही वेळ पण नव्हती. त्याला बाहेर कसे काढायचे हा एवढाच विचार काय तो उरला होता.\nवरच्या लोकांना दुसऱ्या दोरीची दोनदा झालेली इशाऱ्याची ओढ जाणवली. त्यांनी ओढत असलेली पहिली दोरी सोडली व टीम लीडरला बाहेर काढण्यासाठी, ते दुसरी दोरी ओढू लागले. बाहेर येताक्षणीक टीम लीडरने ऑपरेटर कडून हॅन्डसेट हिसकावून घेतला व हॅन्डसेट तोंडाशी धरून त्यात बोलू लागला \"ही इज स्टक. वी कांट पुल हिम आऊट\". बेस कंट्रोल रूम मध्ये ही बातमी विजे सारखी चमकली. बेस कमांडरला विश्वासच बसेना. \"माइक वन्, कम अगेन\" रेडिओ वरून त्याने विचारले. \"ही इज स्टक. डॅम इट. ही इज फ्रोझन लाइक एन आईस क्यूब. वी ट्राईड पुलींग हिम. ही इज नॉट बजींग.\" दुसऱ्या ठिकाणी, बऱ्या परिस्थितीत, बेस कमांडरला बरे वाटले असते त्याला कोणी तरी सल्ला विचारत आहे हे जाणून. ह्या कठीण परिस्थितीत त्याच्या कडे देण्यासारखा सल्लाच नव्हता.\n\"यू नीड मोर मेन अप\nटीम लीडरने उत्तर दिले \"नो यूज. द रोप ईज स्ट्रेचींग.\" त्याच्या ह्या वाक्याचा अर्थ कंट्रोल रूम मधल्या साऱ्यांना कळले. त्या दोरीला जर का मन असते तर आज तिला ‘दोरी’ असा शब्दप्रयोग करणआऱ्यांचा राग आला असता व अपमान वाटला असता. ही दोरी विशेष वेगळी असते. अद्ययावत तंत्रज्ञान वापरून ह्या महागड्या दोरीची निर्मिती केलेली असते. निर्मिती झाल्यावर प्रत्येक दोरीची वजन उचलण्याच्या क्षमतेची चाचणी केली जाते. ही दोरी शक्तिवान धाग्यांनी बनवलेली असते व शक्तिवान धाग्यांची अशी वेणी घातलेली असते की अगदी सडपातळ दिसणाऱ्या दोरीत भयंकर ताकद असते. पण तरी सुद्धा तिच्यावर जर असीम जोर पडला तर ती ताणली जाऊ लागते व इशारा करते की जोर जास्त होत आहे. ती दोरी सहजच पाच सहा माणसांचे वजन घेऊ शकते.\nकंट्रोल रूम मधली मंडळी गोंधळली. टीम लीडरला अजून वाटत होते व विश्वास होता की काही तरी चांगला सल्ला कंट्रोल रूम मधून मिळेल म्हणून. अशा परिस्थितीत कंट्रोल रूम मधल्या लोकांनी काहीतरी सल्ला देणे भागच होते.\nआपण राष्ट्रव्रत घेतले का त्या बद्दल येथे वाचा\nलेखक राष्ट्रार्पण वेळ 12:15 AM\nब्लॉगला भेट दिलीत. धन्यवाद\nराष्ट्रव्रता बद्दल अजून वाचायचे आहे\nआपण माझी अनुदिनी वाचलीत, आपल्याला धन्यवाद\nमराठी माणसांचे आपले हक्कांचे मी मराठी संकेतस्थळ ५६०० लेख, १६०० सदस्य व अनेक सोयींनी युक्त असे मराठी संकेतस्थळ \n मग गुगलवर क्लिक करा ----\nपाकिस्तानचा कट व आपले धोरण\nसियाचीन ग्लेशीयर .. आयुष्याची दोरी.. (शेवटचा भाग)\nसियाचीन ग्लेशीयर .............भाग ३\nHERE TO AWAKEN NATIONAL WILL ON RELEVANT ISSUES. ह्या महान राष्ट्राचा एक नागरिक. ज्वलंत प्रश्नांवर जनमानस जागृत करण्याच्या प्रयत्नात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/vikram-ghokhale-117032800012_1.html", "date_download": "2018-04-24T05:05:25Z", "digest": "sha1:P7YR4IM2FSEQG3P5AOYNN6ZOESULIZ26", "length": 11329, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'विक्रम' लवकरच पडद्यावर | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविक्रम गोखलेवर आधारित माहितीपट लवकरच\nअभ्यासू, चोखंदळ आणि शिस्तीचा कलावंत असे विविध कंगोरे असणाऱ्या दिग्गजांच्या यादीत विक्रम गोखले याचे नाव मानाने घेतले जाते. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटातून सहजगत्या रसिकांच्या मनाचा वेध घेण्यास यशस्वी ठरलेल्या या कसबी कलाकाराची अभिनय कारकीर्द प्रदिर्घ आहे.\nविक्रम गोखले यांच्या घराण्यातच कलावंतशाही मुरलेली दिसून येते. त्यांच्या आजी कमलाबाई गोखले या पहिल्या महिला बालकलाकार तर वडील चंद्रकांत गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील नावाजलेले अभिनेते होते. अशाप्रकारे\nअभिनयाची गेली १०० वर्षे जुनी परंपरा असणा-या 'गोखले' कुटुंबियाचे विक्रम गोखले एक महत्वाचे शिलेदार आहेत\nघराणेशाहीच्या जोरावर अभिनयक्षेत्रात दमदार पाऊल टाकण्याचा मार्ग त्यांनी कधीच स्वीकारला नाही, त्यापेक्षा स्वकर्तुत्वाची कास धरत आणि अभिनयाचे सूक्ष्म कंगोरे आत्मसात करत आपला वेगळा ठसा उमटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मराठी, हिंदी आणि गुजराती अशा तीन भाषेमध्ये काम करत विक्रम गोखले यांनी आपल्यातील कलावंताला अधिक प्रगल्भ केले.\nअभिनय क्षेत्राची तब्बल ५० वर्ष अविरत सेवा करताच त्यांनी दुसरीकडे सामाजिक बांधिलकीचा वसा देखील जपला.\nअपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी वडील चंद्रकात गोखले यांसोबत\nगेली कित्येक वर्षे ते सक्रिय कार्य करीत आहे. अशा या मातब्बर नटश्रेष्टाच्या कारकीर्दीचा आढावा लवकरच माहितीपटातून घेतला जाणार आहे. थीम्स अनलिमिटेड आणि इंडियन फिल्म स्टुडियोच्या बेनरखाली ह्या माहितीपटाचे चित्रीकरण होत असून, योगेश सोमण, आशिष वाघ आणि उत्पल आचार्य या तीन निर्मात्यांची फक्कड तिकडी याला लाभली आहे, तसेच या माहितीपटाची संकल्पना आणि दिग्दर्शनविवेक वाघ करीत आहेत.\nशेखर ढवळीकर लिखित या माहितीपटातून विक्रम गोखले यांच्या अभिनयाची प्रदीर्घ कारकीर्द रसिकांसमोर सादर केली जाणार आहे, या माहितीपटाबरोबरच विक्रम गोखले यांच्या आयुष्यातील महत्वाच्या लोकांकडून त्यांचा जीवनप्रवास देखील\nकथित केला जाईल, शिवाय, खुद्द विक्रम गोखले देखील आपल्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या माहितीपटातून करताना दिसतील. अभिनयाचा वारसा लाभलेल्या विक्रम गोखले या विक्रमी कलावंताचा हा माहितीपट लवकरचप्रदर्शित होत आहे.\nटाइगर जिंदा है च्या सेटवर सलमान आणि कॅटरीना (फोटो)\nपठडीबाहेरील लिखाण करणे खरे चॅलेंजिंग- शिल्पा नवलकर\nफक्त ऐश्वर्या-अभिषेकच नाही तर पूर्ण बच्चन फॅमिली दिसेल या चित्रपटात\n‘संघर्षयात्रा’ 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार\nगुलशन देवय्या मांडणार मराठीत 'डाव'\nयावर अधिक वाचा :\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-251861.html", "date_download": "2018-04-24T05:08:18Z", "digest": "sha1:JWQ7YOFRIYT53TWJVDL2MF6Z2MLYGKUB", "length": 11847, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nashik Municipal Election Results 2017 : नाशिकमध्ये मनसेचा सुपडा साफ ; 'कमळ' उमलले", "raw_content": "\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : अस्सा होता आपल्या 'सचिन'चा सुरुवातीचा प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n23 फेब्रुवारी : नाशिक महापालिका निवडणुकांमध्ये मनसेचा पार धुव्वा उडालाय आणि भाजपने जोरदार मुसंडी मारलीय. अवघ्या पाच वर्षांत इथे मनसेचं साम्राज्य धुळीला मिळाल्याचं चित्र आहे. मनसेला आपल्या या बालेकिल्ल्यात अवघ्या तीन जागा मिळवता आल्या. मागच्या निवडणुकीत नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती हे सांगितलं तर कुणाचा विश्वास बसणार नाही, असं चित्र इथे आहे.\nनाशिकमध्ये मनसेनं कसं चांगलं काम केलंय हे राज ठाकरेंनी प्रेझेंटेशन सादर करून वारंवार सांगून पाहिलं. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही, असंच दिसतंय. मराठी कलाकार आणि उद्योगपतींनी कौतुक करूनही मतदारांनी मात्र मनसेकडे पाठ फिरवली.\nफक्त नाशिकच नाही तर मुंबई, पुणे, ठाण्यात तरी मनसेचं काय झालंय मागच्या वेळेस मुंबईत राज ठाकरेंनी दणदणीत यश मिळवलं होतं. मराठीच्या मुद्द्यावर मतदारांनी राजना भरभरून मतं दिली आणि 27 नगरसेवक पहिल्याच झटक्यात निवडून दिले. पण आता मात्र मनसेला फक्त 7 जागा मिळाल्या आहे. मनसेचे माजी महापौर यतीन वाघ यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. मनसेनं पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवली पण नाशिकरांनी मनसेच्या इंजिनला आता यार्डात ढकललंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/mns-on-cong-office-attack-new-275699.html", "date_download": "2018-04-24T05:08:20Z", "digest": "sha1:XZKH7VXQAQIINSG7WBOPOSHZFUFTIABL", "length": 13171, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "होय, संजय निरुपम यांच्या कार्यालयावर आम्हीच सर्जिकल स्ट्राईक केलाय- संदीप देशपांडे", "raw_content": "\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : अस्सा होता आपल्या 'सचिन'चा सुरुवातीचा प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nहोय, संजय निरुपम यांच्या कार्यालयावर आम्हीच सर्जिकल स्ट्राईक केलाय- संदीप देशपांडे\nमुंबई काँग्रेस कार्यालयावर मनसेनं हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय. याबाबत स्वतः संदीप देशपांडेंनी ट्विट करून याबाबतची माहिती दिलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक.. इट का जवाब पथ्थर से मिलेगा..असा या ट्विटचा मजकूर आहे. दरम्यान, काँग्रेसने या तोडफोडीचा तीव्र निषेध केलाय. पोलिसांनीही तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलंय.\n01 नोव्हेंबर, मुंबई : मुंबई काँग्रेस कार्यालयावर मनसेनं हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय. याबाबत स्वतः संदीप देशपांडेंनी ट्विट करून याबाबतची माहिती दिलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक.. इट का जवाब पथ्थर से मिलेगा..असा या ट्विटचा मजकूर आहे. काँग्रेसने या तोडफोडीचा तीव्र निषेध केलाय. पोलिसांनीही तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलंय. दरम्यान, पोलिसांनी मनसेचं कार्यालय राजगड आणि काँग्रेस कार्यालयाबाहेरील बंदोबस्त वाढवलाय.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक..\nइट का जवाब पथ्थर से मिलेगा..\nफेरीवाल्यांच्या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांच्यात उभा संघर्ष पेटलाय. याच वादातून हा हल्ला झाल्याचं स्पष्ट झालंय.. हल्ला झाला त्यावेळी काँग्रेसच्या कार्यालयात कोणीच उपस्थित नव्हतं. त्यामुळे या तोडफोडीत कोणीच जखमी झालेलं नाही.\nदरम्यान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी मनसेला प्रत्युत्तर दिलं आहे.\n#MNS के कायर,नपुंसक और लुक्खे कार्यकर्ताओं ने हमारे पार्टी मुख्यालय तब तोड़फोड़ किया,जब वहाँ कोई नहीं था\nपुलिस स्टेशन 25 मीटर दूरी पर हैअगर CM @Dev_Fadnavis कार्रवाई नहीं करेंगे तो\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/258", "date_download": "2018-04-24T04:30:20Z", "digest": "sha1:WUIU6WTEQUEXZZI3ZTIAFK37SYNIJW7J", "length": 10794, "nlines": 88, "source_domain": "mr.upakram.org", "title": "खरडवहीचे नियम? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nखरडवही संबंधात उपक्रमाचे काही नियम आहेत का की इथे कुणीही कुणाच्याही खरडवहीत काहीही खरडू शकतो\nएखाद्या व्यक्तिने आपल्या खरडवहीत काहीही लिहू नये असे वाटत असेल तर त्यावर काही उपाय आहे का\nनुकतेच ऐहिक यांनी माझ्या खरडवहीत मनोगत आणि उपक्रम संदर्भात दोन टिप्पणे खरडली होती ती मला अप्रस्तुत वाटली. पुन्हा या व्यक्तिने माझ्य खरडवहीत काहीही लेखन करू नये याकरता काही तांत्रिक बंदोबस्त करता येईल का\nमी श्री. संजोप राव यांच्या 'उपक्रम - काल आज आणि उद्या' या लेखावर माधवी गाडगीळ यांनी लिहिलेल्या प्रतिसादावर जे उपप्रतिसाद लिहिले होते तेच त्यांच्या खरडवहीत चिकटवले होते. हे प्रतिसाद संपादक काढून टाकण्याची शक्यता असल्याने आणि ते गाडगीळ यांना कळणे आवश्यक असल्याने मला हे करणे भाग पडले. ज्यांना आपल्या लिखाणावर इतरांनी प्रतिसाद देणे पसंत नाही त्यांनी सार्वजनिक संकेतस्थळांवर येऊच् नये\nमाधवी गाडगीळ [05 May 2007 रोजी 04:30 वा.]\nहे प्रतिसाद संपादक काढून टाकण्याची शक्यता असल्याने\nयाचाच अर्थ आपल्या लेखनाबद्दल आपणच खुद्द् गिल्टी होतात असा होत नाही का म्हणूनच आपले लेखन संपादक कदाचित काढून टाकतील असे आपल्याला वाटले\nआणि ते गाडगीळ यांना कळणे आवश्यक असल्याने मला हे करणे भाग पडले.\n) मला कळण्याची आवश्यकता भासल्यास मी आपण जाहीरपणे जे लिहिता ते अवश्य वाचत जाईन. माझ्या खरडवहीत लिहून आपण ते मला कळवायची काहीही गरज नाही.\nज्यांना आपल्या लिखाणावर इतरांनी प्रतिसाद देणे पसंत नाही त्यांनी सार्वजनिक संकेतस्थळांवर येऊच् नये\nआपण माझ्या लिखाणावर जाहीरपणे कोणताही प्रतिसाद द्या, त्याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही. माझ्या खरडवहीत येऊन लिहिण्याबद्दल माझा आक्षेप होता, आहे.\nयाचाच अर्थ आपल्या लेखनाबद्दल आपणच खुद्द् गिल्टी होतात असा होत नाही का म्हणूनच आपले लेखन संपादक कदाचित काढून टाकतील असे आपल्याला वाटले\nम्हणजे आतापर्यंत ज्यांचे ज्यांचे लेखन संपादकांनी काढून टाकले त्यांना त्याबद्दल अपराधी वाटले पाहिजे का\nमाधवी गाडगीळ [05 May 2007 रोजी 04:43 वा.]\nआपले लेखन कदाचित काढून टाकले जाईल अशी जर का आपल्या मनात शंका असेल तर आपण त्या भावनेला काय म्हणाल\nमाझ्या आणि संपादकात मतभेद आहेत इतकेच समजेन.. त्यात अपराधी काय वाटायचे ..फार फार तर सर्किट रावांसारखे संतापून एखाद दोन ग्लेन फिदिच रिचवावेत इतकेच :-))\nमाधवी गाडगीळ [05 May 2007 रोजी 04:39 वा.]\nऐहिक या व्यक्तिचे लेखन माझ्या खरडवहीत राहू नये असे मला वाटले म्हणून मी ते आता काढून टाकले आहे.\nखरडवही ही सार्वजनिक असते. मला कुणाचीही खरडवही वाचता येते.\nमग खरडवहीत लिहिणे म्हणजे माझे म्हणणे सगळ्यांनी वाचावे, हे उद्देश्य.\nतुमचे असे उद्देष्य होते का \nयाचाच अर्थ आपल्या लेखनाबद्दल आपणच खुद्द् गिल्टी होतात असा होत नाही का म्हणूनच आपले लेखन संपादक कदाचित काढून टाकतील असे आपल्याला वाटले\nया प्रश्नाचे उत्तर वरुण यांनी दिलेच आहे. आपण ज्या व्यक्तीच्या लिखाणाविषयी एवढे गदगदून लिहिले आहे, त्या व्यक्तीचे बरेचसे लिखाण उपक्रमवरुन आणी संपूर्ण लिखाण मनोगतवरून काढून टाकले आहे. याचा अर्थ ती व्यक्ती स्वतःच्या लिखाणाविषयी अपराधीपणाची भावना बाळगून आहे असा होतो का त्यांच्या ब्लॉगवरील लिखाणातून तर असे अजिबात जाणवत नाही\nऐहिक या व्यक्तिचे लेखन माझ्या खरडवहीत राहू नये असे मला वाटले म्हणून मी ते आता काढून टाकले आहे.\n तुमच्या लिखाणावरील जाहीर प्रतिसादाला तुमचा आक्षेप नाही तर तेच लिखाण तुमच्या खरडवहीत ठेवताना तुम्हाला गिल्टी का वाटते\nकाय मस्त वाद वाचायला मिळाला \nएका गोष्टीकडे बघण्याच्या किती पद्धती असतात \nजसे जसे वाचत जावे, एक एक मुद्दा पटत गेला, आणि थोडे पुढे गेल्यावर तो पुन्हा पटेनासाही झाला.\nएनिवे, खरडवहीतील प्रतिसाद काढून टाकणे हाच सध्यातरी एकमेव उपाय दिसतोय.\nजरि कलहकारणे व्यय न हो साचा हा व्यर्थ भार बुद्धीचा\nप्रकाश घाटपांडे [06 May 2007 रोजी 07:01 वा.]\nखरडवही म्हणजे ज्यात खरडपट्टी काढता येते ती वही\nआपल्याला आमचा उघड पाठींबा. आपण स्रीयांशी न भांडणे केव्हाही चांगले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.sgtrekkers.in/2018/k2s-trek-by-vishvas-trikutkar/", "date_download": "2018-04-24T04:44:37Z", "digest": "sha1:QX52A35PZYNXHGHQBVBHFICNMVB7NLTI", "length": 7590, "nlines": 103, "source_domain": "www.sgtrekkers.in", "title": "K2S: याच साठी केला होता अट्टहास ! – SG-Trekkers", "raw_content": "\nK2S: याच साठी केला होता अट्टहास \n१३ टेकड्या पार करुन आणि १६ किलोमीटर अंतर रात्री पायी चालून हे दृश्य दिसनार असेल तर मग,\nमनात खूप दिवसांपासून होतं कि कात्रज ते सिंहगड नाईट ट्रेक एकदातरी करायला पाहीजे. २४ मार्च २०१८ ला “स्वछंद गिर्यारोहक” ह्या ट्रेकिंग क्लब सोबत हा ट्रेक पूर्ण केला. खरंच प्रत्येक ट्रेकरने एकदातरी हा अनुभव घ्यावा असा हा ट्रेक \nआम्ही संध्याकाळी ७:३० ला स्वारगेट वरून PMT च्या बसने जुन्या कात्रज बोगद्या जवळ पोहचलो आणि वाघजाई मंदिरपाशी जाऊन थांबलो. अजून एक ग्रुप यायचा बाकी होता, ते आल्यावर सर्वांनी सोबत निघायचं अस ठरलं. तोपर्यंत आम्ही रात्रीच्या रोषणाईमध्ये मढलेल्या पुण्याकडे पाहत बसलो. दुसरा ग्रुप आल्यानंतर कळलं कि आम्ही एकूण ५४ जण आहॊत. ट्रेक lead विशाल काकडेच्या instruction ऐकून रात्री ९:४५ ला आमचा प्रवास चालू झाला.\nरात्रीची ती निरव शांतता, वर आकाशात सुंदर चांदणं आणि एका बाजूंला रोषणाई मध्ये झोपलेलं पुण हे सर्व डोळ्यामध्ये साठवत एका मागून एक टेकड्या पार करायला लागलो. ७वी टेकडी पार करून आराम करत असताना कळलं कि शेवटच्या दोन टेकड्या खूप दमछाक करणाऱ्या आहेत, म्हणून मग परत एकदा जोमानी चालायला सुरवात केली. खरंच शेवटच्या दोन टेकड्या कस काढणाऱ्या होत्या. एकतर इथे पोहचता पोहचता आमच्या कडच पाणी संपलं होत आणि पायपण आता बोलायला लागले होते.\nसकाळी ४:३० वाजता, १३वी टेकडी उतरून आम्ही last मीटिंग पॉईंटला पोहचलो. प्रत्येकाचं कपडे घामानी भिजले होते, पायाचे तुकडे पडले होते पण मनात मात्र आनंद होता काहीतरी मिळवल्याचा , काहीतरी पूर्ण केल्याचा \nआता मात्र सर्व जण जिथे जागा मिळेल तिथे झोपले होते कारण मागे अजून खूप जण राहिले होते. घरच्या गादी पेक्षा इथे वाळलेल्या गवताची जमीन आता मऊ लागत होती. पुढचा ३ किलोमीटरचा प्रवास जीपने करून आम्ही सकाळी ६:०० ला सिंहगडाच्या पार्किंग ला पोहचलो.\nएव्हरेस्ट सर केल्यावर जो आनंद व्हावा त्याच्या ०.००१% च हा आनंद असेलही पण अनुभव मात्र खूप प्रेरणादायक होता.\nस्वछंद गिर्यारोहक टीमचे विशष आभार कारण ५० लोकांनां घेऊन त्यांनी ही अवघड वाटणारी मोहीम लीलया पार पाडली.\nमोजक्या शब्दात यथार्थ वर्णन….\nएका ट्रेकला मी आणि उषाने टेकड्या मोजल्या.त्या 15 तर नक्कीच आहेत…\nतुम्ही 13 नाही 15 टेकड्या पार केल्या आहेत…..\nहो…खरोखर हा ट्रेक अतिशय सुंदर आनुभव देऊन जातो…\nप्रतेक वेळी नविन कही तरी अनुभवल्याचा आनंद मिळतो…😊\nउकसण आणि पाल लेणी\nK2S: याच साठी केला होता अट्टहास \nPravin Bhagat on K2S: याच साठी केला होता अट्टहास \nUsha on K2S: याच साठी केला होता अट्टहास \nमहेंद्र घोरपडे on K2S: याच साठी केला होता अट्टहास \nSavita Kanade on K2S: याच साठी केला होता अट्टहास \nVinay on K2S: याच साठी केला होता अट्टहास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vegetarian-recipes/capsicum-vegetable-117061200016_1.html", "date_download": "2018-04-24T05:08:47Z", "digest": "sha1:IL4B332IVMIEPHN4IV7FTKZRTELP7BPY", "length": 6782, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Veg Recipe : सिमला मिरचीची भाजी | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nVeg Recipe : सिमला मिरचीची भाजी\nसाहित्य : पाव किलो सिमला मिरची, 2 कांदे, मोहरी, हिंगपूड, हळद, बेसन.\nकृती : सिमला मिरच्यांचा आतील बियांचा भाग काढून टाकावा व लहान फोडी करून घ्याव्यात. कांदे बारीक चिरून घ्यावेत. मोहरी हिंगपूड, हळद घालून 4 चमचे तेलाची फोडणी करून त्यात कांदे व मिरचीच्या फोटी घालून परतावे. मीठ घालावे. शिजल्यावर पिठल्याला लावतो त्याप्रमाणे हळूहळू बेसन घालावे व सर्व मिळून पुन्हा परतावे.\nMomos : आपल्या पसंतीचे मोमोज\nBiryani : मलबार चिकन बिर्याणी\nयावर अधिक वाचा :\nरघुराम राजन यांचा बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी विचार\nरघुराम राजन यांच्या नावाचा विचार बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी केला जातो आहे असे ...\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/know-who-became-first-captain-of-bigg-boss-marathi-1664470/", "date_download": "2018-04-24T05:00:08Z", "digest": "sha1:ABKM3RNLGTMHQSTRZR26KZUDOBCCKCMP", "length": 15196, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "know who became first captain of bigg boss marathi | नियतीने त्याला बनवलं ‘बिग बॉस मराठी’चा पहिला कॅप्टन | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nनियतीने त्याला बनवलं ‘बिग बॉस मराठी’चा पहिला कॅप्टन\nनियतीने त्याला बनवलं ‘बिग बॉस मराठी’चा पहिला कॅप्टन\n'बिग बॉस'च्या नियमाप्रमाणे प्रत्येक आठवड्याला १५ स्पर्धकांपैकी एकाला कॅप्टन म्हणून निवडले जाते, जो सर्वांचं प्रतिनिधित्व करेल. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे हक्क कॅप्टनला मिळतात.\nवादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय ठरलेला ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो मराठीतही सुरू झाला आहे. या शोमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होतील याची उत्सुकता अनेकांनाच होती. रविवारी प्रसारित झालेल्या ग्रँड प्रिमिअरच्या दिवशी ‘बिग बॉस मराठी’चा १०० दिवसांचा खेळ कोणामध्ये रंगणार हे स्पष्ट झालं. १५ स्पर्धकांची ओळख प्रेक्षकांना झाली आणि पहिल्याच दिवशी या शोने प्रेक्षकांची मनं जिंकली.\n‘बिग बॉस’च्या नियमाप्रमाणे प्रत्येक आठवड्याला १५ स्पर्धकांपैकी एकाला कॅप्टन म्हणून निवडले जाते, जो सर्वांचं प्रतिनिधित्व करेल. घरातल्या सर्वांची मतं घेऊन ज्याला बहुमत मिळेल तो कॅप्टन ठरतो. पहिला कॅप्टन कोण ठरणार याचं कुतूहल प्रेक्षकांनाही होतं. ‘बिग बॉस मराठी’चा पहिला कॅप्टन ठरला तो म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका, अर्थात विनीत भोंडे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या विनोदवीर विनित भोंडेने बाजी मारली. कॅप्टनसाठी चिठ्ठ्या टाकल्या गेल्या आणि त्या चिठ्ठीत विनीतचं नाव आलं. अशाप्रकारे नियतीने विनीतला पहिला कॅप्टन ठरवलं. त्यानुसार पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील महत्त्वाचे निर्णय घेण्याचा हक्क त्याला मिळाला आहे.\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nBigg Boss Marathi: पंधरा कलाकार आणि शंभर दिवसांचा खेळ\nथुकरटवाडीच्या मंचावरील त्याचा उत्साह पाहून सगळेच त्याला ‘छोटा पॅकेट, बडा धमाका’ असं म्हणायचे. त्याचा मोठा चाहता वर्गही तयार झाला आहे. त्यामुळं हा ‘छोटा पॅकेट’ बिग बॉसच्या घरात काय धमाका करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.\nमूळचा औरंगाबादचा असलेल्या विनीत भोंडे यानं निशिकांत कामत यांच्या ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटातून अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळं. आता बिग बॉस मराठीत्या घरात विनीतचे प्रश्न, त्याचा हजरजवाबीपणा, त्याचा मिश्कील स्वभाव प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mpsc-iod.blogspot.com/2012/02/blog-post_18.html", "date_download": "2018-04-24T05:00:42Z", "digest": "sha1:QPYGFB6FJ4FP2VN2D2ECSPZTVW2ZQPPK", "length": 9917, "nlines": 166, "source_domain": "mpsc-iod.blogspot.com", "title": "MPSC: महत्वाच्या घडामोडी", "raw_content": "\n*भारतीय लष्करातील पहिली जवान होण्याचा बहुमान कोणत्या महिलेने मिळवला आहे \n* गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या नव्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली- डॉ. व्ही. एस. आईचवार\n* राज्यातील महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनेसाठी उच्च व तांत्रिक विभागाने यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे - डॉ. अरुण निगवेकर\n* मिफ्ता पुरस्कार सोहळा - 2011 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली- तेजस्विनी पंडित (मी सिंधुताई सपकाळ).\n* महाराष्ट्रात 2010 ते 2015 या कालावधीत जलस्वराज्य प्रकल्प कोणत्या बँकेच्या मदतीने राबवला जाणार आहे\n* 2010 चा 46 वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणास जाहीर करण्यात आला - नाटककार चंद्रशेखर कंवार\n* राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे- ममता शर्मा (राजस्थान)\n* सन 2012 मध्ये फिफाचे सध्या अस्तित्वात असलेले आशियातील कोलंबो येथील मुख्यालय कोठे स्थलांतर करणार आहे \n* कोणत्या दोन भारतीय खेळाडूंना भारतीय लष्करामधील लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली - महेंद्रसिंग धोनी व अभिनव बिंद्रा\n* भारतातील सर्व शहरे झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी सर्व देशभर राबवण्यात येणारी एकमेव योजना कोणती आहे - राजीव आवास योजना\n* 2011 चा मध्य प्रदेश सरकारच्या वतीने दिला जाणारा कालिदास सन्मान पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे\n* ‘एका स्टुडिओचे आत्मवृत्त’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे\n* भारतातील संपूर्ण बँकिंग स्टेट म्हणून कोणत्या राज्याची निवड करण्यात आली आहे \n* भारतातील पहिले संरक्षण विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे \n* महाराष्ट्रातील कोणत्या शहराची आदर्श सौर शहर म्हणून निवड करण्यात आली आहे \n* महाराष्ट्र शासनाने कोणता दिवस हा माहितीचा अधिकार दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे \n* पहिले अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन हे कोठे आयोजित करण्यात आले आहे\n* सन 2011 मध्ये फॉर्म्युला वन शर्यतीचे आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात आले होते- नोयडा, उत्तर प्रदेश\n* भारतातील पहिली डबल डेकर वातानुकूलित रेल्वेगाडी या दोन स्थानकांदरम्यान सुरू झाली आहे \n* वेस्ट इंडीजविरुद्ध कोणत्या भारतीय फलंदाजाने द्विशतक झळकावून विक्रम प्रस्थापित केला आहे\n* मराठी नाट्यसृष्टीत विष्णुदास भावे पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे \n* 92 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली \n* भारतातील बहुनामांकित टाटा ग्रुप कंपनीच्या नव्या चेअरमनपदी कोणाची निवड करण्यात आली \n* महाराष्ट्र सरकारने कोणत्या दोन जिल्ह्यांत महानगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे - चंद्रपूर व लातूर\nमाझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा\nमुख्य परीक्षेतील मराठी विषयाची तयारी\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान\nमहाराष्ट्र अर्थसंकल्प २०११-१२ - ठळक वैशिष्टय़े\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2016/03/03/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC/", "date_download": "2018-04-24T04:41:37Z", "digest": "sha1:D4KG5SF4D4QL5N7RXVXC75CT5RMZWFQU", "length": 35167, "nlines": 580, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "रक्‍तदाब | Abstract India", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे\nवाढलेला रक्तदाब गोळ्या घेऊन कमी केला म्हणजे झाले,\nअसा हिशेब मांडणे एखादे गणित सोडवावे इतके सोपे नाही.\nरक्‍तदाबाचा विकार मुळात होऊ नये यासाठी अगोदरच काळजी घ्यावी.\nपण तरीही रक्‍तदाब झालाच तर रक्‍तदाब नियंत्रित ठेवण्याबरोबरच मुळातून\nबरा होण्यासाठी योग्य उपचार करावेत. योग्य उपचारांना संतुलित आहार,\nनिर्व्यसनी जीवनपद्धती, व्यायाम, चालणे, योग, संगीत व मानसिक स्वास्थ्य यांची जोड द्यावी.\nकाही वर्षांपूर्वी रक्‍तदाब म्हणजे चाळिशीनंतर होणारा आजार, अशी सर्वसामान्य धारणा होती.\nसध्या मात्र तिशीच्या आसपासही अनेकदा रक्‍तदाबाचा त्रास सुरू झाल्याचे दिसते.\nसरासरीपेक्षा (80-120) वाढलेला किंवा कमी झालेला रक्‍तदाब हा “रक्‍तदाब विकार‘ म्हणून ओळखला जातो. वाढलेला रक्‍तदाब\nगोळ्यांच्या साह्याने कमी केला म्हणजे झाले, इतका साधा हिशेब अनेकांच्या मनात असतो; पण एखादे गणित सोडवावे तसा हा\nसर्वप्रथम रक्‍तदाब म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊ.\nरक्‍त जरी सर्व शरीराला व्यापून असले व रात्रंदिवस गतिशील असले, तरी ते रक्‍तवाहिन्यांमध्ये बंदिस्त असते.\nमेंदू, हृदय, मूत्रपिंड वगैरे मोठे अवयव असोत किंवा करंगळीचे टोक असो, सर्व दूर रक्‍तवाहिन्यांमधून रक्‍त\nफिरत असते. यालाच “रक्‍ताभिसरण क्रिया‘ म्हणतात व त्यातूनच रक्‍तदाब तयार होत असतो. अर्थातच\nरक्‍तावर सरासरी दाब प्रत्येक व्यक्‍तीला असतोच, कारण त्याखेरीज रक्‍ताभिसरण होऊच शकणार नाही.\nनिरोगी अवस्थेतही रक्‍तदाब प्रसंगानुरूप थोडा फार कमी जास्ती होत असतो. भरभर चालण्याने, पळण्याने,\nजशी श्‍वासाची गती वाढते, तसेच श्रम झाल्यास रक्‍तदाब थोडा वाढतो. पण विश्रांती घेतल्यावर आपला\nआयुर्वेदात “रक्‍तदाब‘ या नावाने वेगळा असा व्याधी सांगितलेला आढळत नाही. मात्र शरीरातील रस, रक्‍त\nधातूंच्या गतीतील विकृतीमुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य विकारांपैकी हा एक विकार होय. ही गती विकृती\nरक्‍ताभिसरणास कारणीभूत असणाऱ्या हृदय किंवा रक्‍तवाहिन्यातील बिघाडामुळे होऊ शकते, शरीरातील\nअतिरिक्‍त क्‍लेदांश मूत्रामार्फत वाहून नेणाऱ्या किडनीचे काम व्यवस्थित होत नसल्याने उद्‌भवू शकते किंवा\n“चिन्त्यानां चाति चिन्तनात्‌‘ न्यायानुसार अति मानसिक ताणामुळे, अति विचार करण्यामुळे अर्थातच\nमेंदूच्या अति श्रमानेही होऊ शकते.\nतसेच रक्‍तदाब वाढला असता किंवा कमी झाला असताही शरीर, मनावर दिसणारी लक्षणे वात, पित्त दोष\nवाढल्याची असतात. म्हणून आयुर्वेदानुसार रक्‍तदाबावर उपचार करताना त्रिदोष संतुलनाबरोबरच, रक्‍तदाबाचा\nत्रास होण्याचे मूळ कारण काय आहे याचा विचार केला जातो व त्यानुसार केलेल्या उपचारांनी रक्‍तदाबावर\nयशस्वी चिकित्सा करता येऊ शकते.\nरक्‍तदाबाची सामान्य कारणे अशी सांगता येतील –\nपचायला जड अशा मेदस्वी पदार्थांचे अतिसेवन उदा. तेल, चीज, मांसाहार\nखाण्यापिण्यातील व वागण्यातील अनियमितता, एकंदर जीवनशैलीतील अनिर्बंधता व बेशिस्तपणा\nअतिरिक्‍त धूम्रपान व मद्यपान\nअतिचिंता तसेच कामामध्ये अतिव्यस्तता\nयाखेरीज किडनीचे कार्य नीट न होणे, अनेक वर्षांचा मधुमेह, रक्‍तवाहिन्या कठीण व जाड होणे, स्त्रियांच्या\nबाबतीत गर्भारपणात रक्‍तदाब वाढल्याचा इतिहास असणे, तसेच गर्भाशय काढून टाकणे इत्यादींमुळे रक्‍तदाब\nमुळात रक्‍तदाबाचा विकार मागे लागूच नये म्हणून खबरदारी घ्यायला हवी. हा विकार ओळखणे खरे पाहता\nअतिशय सोपे आहे. रक्‍तदाब मोजणे हे अक्षरशः दोन मिनिटांचे काम असते. आजकाल तर घरच्या घरीसुद्धा\nसाध्या यंत्राच्या साह्याने रक्‍तदाब मोजता येणे शक्‍य आहे. या विकाराची अगदी सुरवातीला फार काही लक्षणे\nदिसत नाहीत. पण जेवढ्या लवकर निदान होईल तेवढ्या चांगल्या प्रकारे उपाययोजना करता येत असल्याने\nवयाच्या पस्तिशीनंतर वर्ष-सहा महिन्यांनी एकदा तरी रक्‍तदाब मोजून घ्यावा. घरी रक्‍तदाबाची किंवा\nहृद्ररोगाची आनुवंशिकता असणाऱ्यांनी तर अधिकच दक्ष राहावे. वर सांगितलेली कारणे लागू होत\nअसणाऱ्यांनीही अधिक काळजी घ्यावी.\nरक्‍तदाब वाढण्याची सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.\nडोके दुखणे, चक्कर येणे, डोके जड वाटणे.\nअशक्‍तपणा वाटणे, गळून गेल्यासारखे वाटणे.\nअवेळी डोळ्यांवर झापड येणे पण योग्य वेळी झोप न येणे.\nभरभर चालताना किंवा जिने चढताना दम लागणे.\nसुरवातीला ही लक्षणे सतत दिसत नाहीत, काही वेळाने आपोआप नाहीशी होतात. अशा वेळेला लक्षणे दिसत\nअसताना आवर्जून तपासणी करून घेतली तरच उच्च रक्‍तदाबाचे निदान होऊ शकते.\nकैक वेळेला रक्‍तदाब वाढला तरी व्यक्तीला काहीही लक्षणे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत बहुधा त्रास होत\nनाही म्हणून तपासणी केली जात नाही किंवा औषधांची नियमितता राखली जात नाही.\nया दोन्ही गोष्टी आरोग्यास घातक होत.\nरक्‍तदाबाचा त्रास सुरू झाला की तो शेवटपर्यंत राहणार, आयुष्यभर औषधे घ्यावी लागणार हे मात्र\nप्रत्येक केस मध्ये लागू होत नाही. वेळीच निदान होणे, मूळ कारण लक्षात घेऊन ते टाळायची तयारी असणे\nव रस-रक्‍ताच्या गती-विकृतीवर योग्य उपचार सुरू करणे या गोष्टींनी रक्‍तदाब बराही होऊ शकतो. अर्थातच\nजितक्‍या लवकर, नियमित व योग्य उपचार केले जातील तितका लवकर व चांगला उपयोग होताना दिसतो.\nरक्‍तदाब असणाऱ्यांनी पुढील गोष्टींवर लक्ष ठेवावे.\nतळलेले, तेलकट पदार्थ शक्‍यतो टाळावेत.\nचीज, श्रीखंड, मांसाहार, अंडी, वाटाणा, पावटा, चवळी, हरभरा वगैरे पचायला जड असणाऱ्या व\nकच्चे मीठ किंवा वरून मीठ घ्यायची सवय सोडावी.\nवजन प्रमाणापेक्षा अधिक वाढलेले असल्यास योग्य उपायांनी हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करावा.\nरात्री उशिरा जेवण्याची सवय मोडावी.\nरोज 30-35 मिनिटे चालायला जावे, योगासने करावीत. मात्र शरीराला थकवणारे व्यायामप्रकार टाळावेत.\nरात्री लवकर झोपावे व प्रकृतिनुरूप किमान सहा ते सात तास शांत झोप लागेल याकडे लक्ष ठेवावे.\nदिवसभराच्या कामाचा ताण किंवा नातेसंबंधातील तणावाचा स्वतःवर कमीत कमी परिणाम होईल यासाठी\nप्रयत्नरत राहावे, झोपण्यापूर्वी दहा मिनिटे डोळे बंद करून शांत बसणे, आपल्या आवडत्या छंदात मन गुंतवणे,\nमनःशांती देणारे स्वास्थ्यसंगीत ऐकणे, ध्यान करणे अशा सारखा जमेल तो उपाय करावा.\nकाम करताना थकवा जाणवावयास सुरवात झाल्यास वेळीच विश्रांती घ्यावी. शरीर व मन दोहोंवर जबरदस्ती\nरक्‍तदाब वात-पित्त असंतुलनातून तयार होत असल्याने दूध, घरी बनवलेले साजूक तूप, साधा, सात्त्विक\nपण चौरस आहार ठेवावा. वजन वा कोलेस्टेरॉल वाढण्याच्या भीतीने हृदय, मेंदूला पोषक व वात-पित्तशामक\nआहार पदार्थ अकारण बंद करू नयेत. मात्र चुकीच्या पद्धतीने बनवलेले तूप, बाजारातील लोणी वगैरे गोष्टी\nरक्‍ताभिसरण वाढवण्यासाठी, रसरक्‍तधातूंच्या गतीचे नियमन करण्यासाठी व शरीरातील रक्‍तवाहिन्यांतील\nकाठिण्य नष्ट होण्यासाठी “अभ्यंग‘ करणे हा एक श्रेष्ठ व सहज करता येण्यासारखा उपाय आहे.\nअभ्यंगासाठी वापरलेले तेल आयुर्वेदिक पद्धतीने शास्त्रशुद्धरीत्या तयार केलेले असावे. अशा शास्त्रशुद्ध अभ्यंगाची\nविशेषता अशी की याने कमी झालेला रक्‍तदाब पुन्हा पूर्ववत होऊ शकतो तसेच वाढलेला रक्‍तदाब कमी होऊ\nआयुर्वेदशास्त्राने सांगितलेले त्रिदोष संतुलन करणारे स्नेहन स्वेदनपूर्वक पंचकर्म शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घ्यावे. विशेषतः विरेचन, बस्ती या उपक्रमांचा रक्‍तदाबात उत्कृष्ट फायदा होताना दिसतो. बरोबरीने मूळ कारणानुरूप शिरोधारा, शिरोबस्ती, कर्णपूरण,\nपिंडस्वेदन वगैरे उपचार उत्तम फायदा करणारे आहेत.\nशवासन, योगनिद्रा या योगातल्या क्रियांचा वाढलेला रक्‍तदाब कमी करण्यासाठी खूप उपयोग होतो.\nआत्मसंतुलन केंद्रात असंख्य रुग्णांनी अनुभव घेतल्यानंतर युनिव्हर्सिटी संलग्न संशोधनातून योगनिद्रा\nसंगीताचा उपयोग सिद्ध झालेला आहे. तेव्हा अशा योगनिद्रा संगीताचाही रक्‍तदाब नियंत्रणासाठी उपयोग\nरक्‍तदाब कमी करणाऱ्या इतर औषधांच्या बरोबरीने मुळापासूनच रक्‍तदाब बरा करू शकणारी आयुर्वेदिक\nऔषधेही सुरू करावीत म्हणजे हळूहळू त्रिदोषसंतुलन प्रस्थापित झाले, रस-रक्‍तधातूतील गती विकृती\nनाहीशी झाली व बरोबरीने आहार-विहारातील अनुशासन कायम ठेवले की रक्‍तदाबापासून मुक्‍ती मिळू शकते.\nरक्‍तदाबाचे एक विशिष्ट असे औषध नसते, तर प्रकृती, वय, रक्‍तदाबाचा त्रास होण्याचे कारण वगैरे गोष्टींचा\nविचार करून योग्य औषध निवडावे लागते.किडनीचे काम व्यवस्थित होत नसल्यास गोमूत्र, पुनर्नवासव,\nगोक्षुरादि चूर्ण, चंद्रप्रभा वगैरे औषधांचा वापर करावा लागतो. हृदयामुळे, रक्‍तवाहिन्यांमधील काठिण्यामुळे\nरक्‍तदाबाचा त्रास होत असल्यास बृहत्वातचिंतामणी, सुवर्णभस्म, अभ्रकभस्म, अर्जुनारिष्ट, सुवर्णसूतशेखर,\nवगैरे औषधे प्रकृतीनुरूप योजावी लागतात. तर रक्‍तदाबाचे मूळ कारण मेंदूशी संबंधित असल्यास जटामांसी,\nब्राह्मी, ब्राह्मीघृत, वगैरे औषधांचा उत्तम उपयोग होताना दिसतो.\nथोडक्‍यात सांगायचे झाले तर, रक्‍तदाबाचा विकार मुळात होऊ नये यासाठी अगोदरच काळजी घ्यावी. पण\nतरीही रक्‍तदाब झालाच तर रक्‍तदाब नियंत्रित ठेवण्याबरोबरच मुळातून बरा होण्यासाठी योग्य उपचार करावेत.\nयोग्य उपचारांना संतुलित आहार, निर्व्यसनी जीवन पद्धती, व्यायाम, चालणे, योग, संगीत व मानसिक\nस्वास्थ्य यांची जोड द्यावी.\nfrom → अतिचिंता, ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, रक्‍तदाब, व्यायाम\n← तरुणांमधील उच्च रक्तदाब\nनातं हृदयाशी – अति रक्तदाब : कारणे, लक्षणे व उपचार →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/register-mobile-number-through-atm-12066", "date_download": "2018-04-24T05:00:57Z", "digest": "sha1:VIC46ZZUWITTHWB7ISRBG3EVHTQK2NJH", "length": 9885, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Register Mobile number through ATM आता 'एटीएम'मधून नोंदवा मोबाईल क्रमांक | eSakal", "raw_content": "\nआता 'एटीएम'मधून नोंदवा मोबाईल क्रमांक\nबुधवार, 31 ऑगस्ट 2016\nमुंबई - कोणत्याही बॅंकेच्या \"एटीएम‘मधून ग्राहकांना त्यांचा मोबाईल क्रमांक नोंद करण्याची सुविधा देण्याच्या सूचना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना दिल्या आहेत.\nमुंबई - कोणत्याही बॅंकेच्या \"एटीएम‘मधून ग्राहकांना त्यांचा मोबाईल क्रमांक नोंद करण्याची सुविधा देण्याच्या सूचना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना दिल्या आहेत.\nअलिकडच्या काळात बॅंकिंग व्यवहारासाठी मोबाईल क्रमांक महत्त्वाचा ठरत आहे. आपला मोबाईल क्रमांक नोंद करण्यासाठी ग्राहकांना पूर्वी त्यांच्या मूळ शाखेत जाणे गरजेचे होते. मात्र त्यानंतर कोणत्याही शाखेत मोबाईल क्रमांक नोंदविण्याची सुविधा देण्यात आली. आता आरबीआयने कोणत्याही बॅंकेच्या एटीएममधून ग्राहकांना मोबाईल क्रमांक नोंदविण्याची सुविधा देण्याच्या सूचना बॅंकांना केल्या आहेत. शिवाय इंटरनेट बॅंकिंगद्वारेही मोबाईल क्रमांक नोंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता केवळ मोबाईल क्रमांक नोंदणीसाठी बॅंकेच्या शाखेत जाण्याची गरज उरणार नाही.\nअग्निशमन दलाचा मला सार्थ अभिमान वाटतो - विश्वनाथ महाड़ेश्वर\nमुंबई : अग्निशी झुंज देत मुंबईकरांच्या जीवन व मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुंबईचे महापौर विश्वनाथ...\nसाखर सात रुपयांनी स्वस्त\nमुंबई - किरकोळ बाजारात साखर सात रुपयांनी स्वस्त झाली आहे. वर्षभर 40 ते 42 रुपये किलोवर असणाऱ्या...\nमिरज-सोलापूर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल\nसोलापूर - सोलापूर-मिरज रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रस्ताव सोलापूर विभागाला पाठविण्यात आला...\nराज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट\nमुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक...\nजालन्यात पकडले नऊ सट्टेबाज\nजालना - 'आयपीएल\" स्पर्धेतील सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी रविवारी (ता. 22)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.junnartourism.com/forts/shivneri/", "date_download": "2018-04-24T05:00:31Z", "digest": "sha1:6MQ6X44UWNU6H2UIH55MIEPQRXC6XE3A", "length": 26889, "nlines": 158, "source_domain": "www.junnartourism.com", "title": "शिवनेरी - Junnar Tourism", "raw_content": "\nनोंद : ह्या संकेतस्थळावरील माहिती सतत अद्ययावत होत आहे.\nश्री क्षेत्र आणे उत्सव\nश्री क्षेत्र आणे उत्सव\nपुणे परिसरातील शिवाजी महाराजांच्या कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. योगोयोग म्हणावा का ते माहित नाही पण त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मुघलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मुघलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला.\nस्थळ : जुन्नर, ता.जुन्नर जि.पुणे\nकिल्ल्याची ऊंची : 3400 फूट\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nजीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. इ. स 1170 ते 1308 च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. इ. स 1595 मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधारावांनी 500 स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. “शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म जाला शके 1556 क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार.’ इ. स. 1632 मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि 1637 मध्येमोगलांच्या ताब्यात गेला. 1650 मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ. स. 1673 मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ. स. 1678 मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे 40 वर्षांनंतर 1716 मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरीत करण्यात आला.\nशिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरित झालेले मावळातले महादेव कोळी वीर खेमा नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. शिवनेरीसकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले. दख्खन पादाक्रांत करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन आला होता. त्याने एक मुघल सरदार रणदुल्ला खान यास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचे बंड मोडून काढण्यास पाठविले. एवढ्या प्रचंड फौजेपुढे मावळे टिकले नाहीत. कित्येक मारले गेले आणि खेमा नाईकासमवेत दीड हजार बंदी बनविण्यात आले. मुघलांची दहशत बसावी म्हणून नाईकाच्या रक्तसंबंधातले तान्ह्या बाळापासून तर वृद्धांपर्यंत तमाम लोक पकडून आणून कापले गेले आणि नाईकास निर्वंश केले. त्याचबरोबर सगळ्या दीड हजार बंदी केलेल्यांची शीरेदेखील कापली गेली. त्या शीरांच्या ढीगावरच एक चबुतरा बांधण्यात आला. हाच तो कोळी चौथरा जो आजही शिवनेरीवर पाहायला मिळतो. इतिहासाच्या कुठल्याच नोंदीत त्या वीरांची नावे उपलब्ध नाहीत. नाईकाचे खरे नाव, गाव आदी काहीच उपलब्ध नाही. खेमा/खेमू नाईक असा त्या शूर वीराचा उल्लेख फक्त काही ठिकाणी आढळतो.\nह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा नावाने संबोधिले जाते. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखिल आहेत.\nदुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. इस्लामी राज्यकर्त्यांनी त्यावेळी केलेल्या अनेक नरसंहारांपैकी एक म्हणून ही घटना गणली जाते.\nशिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.\nशिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.\nएस.टी स्टॅण्डच्या मागे शिवनेरी किल्ला दिसतो. येथून हा किल्ला चार किलोमीटर आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते.अंतरावर एका डोंगरमाथ्यावर हा किल्ला बांधलेला असून डोंगराच्या मध्यभागी जवळपास ५० बौद्ध लेणी कोरलेली आहेत. किल्ला आणि लेणी एकत्रित असलेला हा एकमेव डोंगर .\nनाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली.\nशिवाई देवी मंदिर – सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पुढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे ‘ मंदिर लागते. मंदिराच्या मागे असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे.\n• अंबरखाना – शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितीस या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात. एक वाट समोरच असणाऱ्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते.\n• पाण्याची टाकी – वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात.\n• शिवकुंज – हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. याची स्थापना व उद्‌घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले. जिजाबाईच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी, हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आविर्भावातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा’मध्ये बसविला आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशीद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो.\n• कोळी चौथरा, शिवनेरी – पुणे परिसरातील शिवाजी महाराजांच्या कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. योगोयोग म्हणावा का ते माहित नाही पण त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मुघलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला.\nह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मुघलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला.\nशिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरित झालेले मावळातले महादेव कोळी वीर खेमा नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. शिवनेरीसकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले. दख्खन पादाक्रांत करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन आला होता. त्याने एक मुघल सरदार रणदुल्ला खान यास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचे बंड मोडून काढण्यास पाठविले. एवढ्या प्रचंड फौजेपुढे मावळे टिकले नाहीत. कित्येक मारले गेले आणि खेमा नाईकासमवेत दीड हजार बंदी बनविण्यात आले. मुघलांची दहशत बसावी म्हणून नाईकाच्या रक्तसंबंधातले तान्ह्या बाळापासून तर वृद्धांपर्यंत तमाम लोक पकडून आणून कापले गेले आणि नाईकास निर्वंश केले. त्याचबरोबर सगळ्या दीड हजार बंदी केलेल्यांची शीरेदेखील कापली गेली. त्या शीरांच्या ढीगावरच एक चबुतरा बांधण्यात आला. हाच तो कोळी चौथरा जो आजही शिवनेरीवर पाहायला मिळतो. इतिहासाच्या कुठल्याच नोंदीत त्या वीरांची नावे उपलब्ध नाहीत. नाईकाचे खरे नाव, गाव आदी काहीच उपलब्ध नाही. खेमा/खेमू नाईक असा त्या शूर वीराचा उल्लेख फक्त काही ठिकाणी आढळतो.\nह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा नावाने संबोधिले जाते. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखिल आहेत.\nदुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. इस्लामी राज्यकर्त्यांनी त्यावेळी केलेल्या अनेक नरसंहारांपैकी एक म्हणून ही घटना गणली जाते.\n• शिवजन्मस्थान इमारत – शिवकुंजापासूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवाजीचा जन्म झाला तेथे त्याचा एक पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी’नामक पाण्याचे टाके आहे.\n• कडेलोट कडा – येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दीड हजार फूट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.\nगड फिरण्यास 2 तास पुरतात.\nवर किल्ल्यावरून चावंड, नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडज धरणाचा जलाशय लक्ष्य वेधून घेतो.\nगडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग\nसाखळीची वाट : या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टॅंड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे.येथे चार रस्ते एकत्र मिळतात . डाव्या बाजूस जाणा-या रस्त्याने साधारणत: एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिरलागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते.भिंतीला लावलेल्यासाखळीच्या साह्याने आणि कातळात खोदलेल्या पाय-यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.\nसात दरवाज्यांची वाट : शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पाय-यांपाशी घेऊनजातो. या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.\nमाहिती आभार : सचिन तोडकर (पत्रकार)\nशिवनेरी बद्दलची आणखी माहिती वाचा\nजुन्नरमधील व आजुबाजुच्या ताज्या घडामोडी, बातम्या, कार्यक्रम, सुचना, ज्ञानवर्धक लेख आणि बरंच काही आता तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईल मध्ये मिळणार आहे. जुन्नर बातम्या नावाचेअँड्रॉइड अँप तुमच्या मोबाईल मधे इन्स्टॉल करुन ठेवा. हे ऍप मोफ़त तुमच्या मोबाईल मधे इन्स्टॉल करण्यासाठी येथे उपलब्ध आहे : https://play.google.com/store/apps/details\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-actress-surveen-chawla-speaks-about-her-comfort-and-personal-space-with-husband-1664559/", "date_download": "2018-04-24T05:03:59Z", "digest": "sha1:EGZLBNCDFXXCBFXU7VIP7YT62YJLMRSV", "length": 17861, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bollywood actress surveen chawla speaks about her comfort and personal space with husband | ‘किसिंग असो किंवा न्यूड सीन, माझ्या पतीचा आक्षेप नसतोच’ | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n‘किसिंग असो किंवा न्यूड सीन, माझ्या पतीचा आक्षेप नसतोच’\n‘किसिंग असो किंवा न्यूड सीन, माझ्या पतीचा आक्षेप नसतोच’\nमी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं होतं, याचा अर्थ असा नाही की लग्न करण्याचा माझा विचारच नव्हता. लग्न आणि करिअर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.\nआपल्या बोल्ड अदांसाठी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सुरवीन चावला पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. जानेवारी महिन्यात सुरवीनने तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सर्वांसमोर आणल्या. मुळात तिच्या लग्न झाल्याच्या चर्चांनी अनेकांनाच धक्का बसला. २०१५ मध्येच सुरवीनने अक्षय ठक्कर या तिच्या प्रियकरासोबत लग्न केलं होतं. सहसा अभिनेत्री विवाहबंधनात अडकल्यानंतर कलाविश्वापासून दूर राहण्याचा निर्णय घेतात. पण, सुरवीनने यातही तिचं वेगळेपण सिद्ध केलं.\nलग्नानंतर प्रथमच सुरवीनने तिच्या आणि अक्षयच्या नात्याविषयी खुलेपणाने बोलत आपल्या आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा केला. मुख्य म्हणजे लग्नानंतर आपल्या आयुष्यात फार काही कमालीचे बदल झाले नाही आणि बदल झाले असले तरीही ते सकारात्मकच होते, असं तिचं म्हणणं आहे.\n‘माझ्या लग्न करण्यामुळे इतरांनी थक्क होण्याचं कारणच नाही. ते दिवस गेले जेव्हा अभिनेत्री त्यांच्या करिअरमधील काही ध्येय पूर्ण करुन त्यानंतरच लग्नाचा विचार करत असायच्या. आता तर लग्नानंतरही अनेक अभिनेत्री त्यांच्या करिअरमध्ये पुढे जातात. मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं होतं, याचा अर्थ असा नाही की लग्न करण्याचा माझा विचारच नव्हता. लग्न आणि करिअर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि हे लोकांनी ध्यानात ठेवलं पाहिजे’, असं सुरवीनने स्पष्ट केलं.\nखासगी आयुष्याविषयीसुद्धा सुरवीनने या मुलाखतीदरम्यान काही खुलासे केले. सुरुवातीला आपण लग्नाचा विचार करताना धास्तावल्याचंही तिने स्पष्ट केलं. रिलेशनशिपमध्ये आलेल्या काही अडचणींमुळेच सुरवीनच्या मनात ही भीती होती. पण, अक्षयच्या बाबतीत सर्व गोष्टी लक्षात घेतच ती या निर्णयावर पोहोचली.\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nवाचा : बलात्कार करणाऱ्यांना जगण्याचा हक्क नाही; रेणुका शहाणे यांची जळजळीत पोस्ट\nआपल्या पतीसोबतच्या नात्यातील सहजतेविषयी सांगत सुरवीन म्हणाली, ‘मी माझ्या सहकलाकाराला ऑनस्क्रिन किस करु शकते. इतकच काय, तर चित्रपटाची गरज असल्यास न्यूड सीनही देऊ शकते. मी ते सर्व करु शकते, जे कथानकाच्या दृष्टीने गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. त्यावर माझ्या पतीचा कधीच आक्षेप नसेल. मुळात आम्ही एकमेकांसोबत इतक्या सहजपणे वावरु शकतो याची जाणीव झाल्यानंतरच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. एखाद्या महिलेला आणखी काय हवंय ज्यावेळी मला एखाद्या चांगल्या चित्रपटाची ऑफर येते त्यावेळी अक्षय नेहमीच माझ्या पाठीशी उभा असतो. त्यामुळे आता विवाहित अभिनेत्रींविषयी सर्वांनीच आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे’, असं सुरवीन म्हणाली. सुरवीनच्या या मुलाखतीची सध्या कलाविश्वात बरीच चर्चा सुरु आहे. येत्या काळात मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचा आपला कोणताच बेत नसल्याचं तिने या मुलाखतीदरम्यान सांगितलं असून, एका चांगल्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आपण असल्याचंही तिने सांगितलं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://krishidesh.com/2014/10/", "date_download": "2018-04-24T04:48:37Z", "digest": "sha1:H2BDFKS6EKWSJWWD57X57TJW2W7VBMCQ", "length": 20180, "nlines": 254, "source_domain": "krishidesh.com", "title": "October 2014 - कृषी देश", "raw_content": "\nएक विचार, एक प्रवास\nमहाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\n कसला असुरी आनंद घेता नाचक्की करून\nश्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते\nशासन व्यवस्था का व कशी पाहिजे – मोदी\nमेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना\nपोरा संग बसून नका काढू फोटू\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\nCategories Select Category Freedom Team (3) Personal Disputes (1) Travel (2) World Affairs (15) अभंग (3) आंबेडकर (2) आतंकवाद (5) आत्महत्या (4) इतिहास (16) उद्यम व्यवसायिकता (4) उपक्रम (10) कविता (15) ग्रामपंचायत (2) चळवळ (4) चाणक्य (1) तुकाराम महाराज (2) पंथ (3) भटकंती (1) भारत (119) मराठी (48) माझे विचार (45) राजकारण (76) शिवाजी (5) शेती (67) संभाजी (3) संस्कृत (4) स्वातंत्र्य (2) हिंदी (11) हिंदू (11)\nPosted in आतंकवाद, माझे विचार, राजकारण | 2 Comments »\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४:\n२३३६ उमेदवारांपैकी ७९८ (३४%) उमेदवारांनी गुन्हेगारी खटले जाहीर केले आहेत. कॉंग्रेस, भाजप, मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या १३१८ उमेदवारांपैकी ६४० (४९%) उमेदवारांनी गुन्हेगारी खटले जाहीर केले आहेत. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेस, भाजप, मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी उतरवले ६९८ उमेदवारांपैकी ३५२ (५०%) उमेदवारांनी गुन्हेगारी खटले घोषित केले होते.\nगुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार:\nपक्षनिहाय गुन्हे आणि आरोपपत्र दाखल असलेले उमेदवार:\n१२ उदेवारांवर खूनाचा तर ४४ उमेदवारांवर खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे\n४२ उमेदवारांनी महिलांवर अत्याचार केल्याचा गुन्हा असल्याचे जाहीर केले आहे.\n२७ उमेदवारांनी बळजबरीने विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे जाहीर केले आहेत.\n३२ उमेदवारांनी अपहरण केल्याचा गुन्हा असल्याचे जाहीर केले आहे.\nदरोडा आणि चोरी केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे ५२ उमेदवारांनी जाहीर केले आहे.\nजातीय तणाव निर्माण केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे १३ उमेदवारांनी जाहीर केले आहे.\n१५६ मतदारसंघ संवेदनशील आहेत (३ किंवा अधिक उमेदवारांनी फौजदारी गुन्हा असल्याचे जाहीर केले असे)\nशासन आणि त्याचे काम\nशासन आणि त्याचे काम\n१९४७ ला केवळ परकीय राज्यकर्ते जाऊन स्वकीय राज्यकर्ते आले. त्यामध्ये स्वातंत्र्य आलेच नाही. ब्रिटिशांनी लुटण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था तशीच पुढे चालवण्यात आली. लुट करायला मदत करण्यासाठी नेमलेले अधिकारी तसेच पुढे सेवेत घेण्यात आले. त्यामुळे, आजही सरकारी अधिकारी म्हणजे सेवा-पुरवणारा पगारदर नसून साहेब असल्याच्या गुर्मीत वावरतो.\nराजकीय पक्षांनी सर्वकष सामाजिक जागृती करण्याचा प्रयत्न केलाच नाही. कारण त्यामध्ये त्यांचे हित नाही. जर नागरिक स्वयंपूर्ण झाला तर बाहुबली नेत्यांना कोण विचारणार त्यामुळे त्यांनी आहे तीच व्यवस्था दृढ करण्यासाठी काम केले.\nमाझ्या मते सर्वकष सामाजिक जागृती म्हणजेच प्रत्येक नागरिकाने त्याच्या अधिकार आणि कर्तव्याप्रती जागरूक होणे. एकदा जाणीव झाली कि मागणीचा रेटा वाढेल आणि लोक जागृतपणे कर्तव्य आणि अधिकाराची काळजी घेतील.\nआपल्याला फक्त स्वराज मिळाले स्वातंत्र्य नाही. आता प्रत्येक नागरिक जागृत होणे आवश्यक.\nवेळ आली आहे कि आपण संपूर्ण स्वातंत्र्याचा लढा उभा करावा.\nकिती विचित्र प्रकार आहे बघा:\n– स्वस्त धान्य दुकाने:\nकेंद्र आणि राज्य सरकार दिल्ली, मुंबई मध्ये बसून वाटप करतात. ह्यापेक्षा वेडपट नियोजन असू शकत नाही. ग्रामपंचायतीला संपूर्ण अधिकार आणि जबाबदारी द्यायला पाहिजे, धान्य जमवणे, वाटणे आदि. आणि जर कोणीही धन्य मिळाले नाही म्हणाला तर त्या ग्राम्संस्थेला जबाबदार ठरवायला पाहिजे. आज नाही मिळाले तरी कोणाला जाब मागायचा (हा एक विचार आहे, असे अनेक आणि याहून चांगले विचार निर्माण होतील जर सरकारने प्रश्न सोडवायचे ठरवले तर)\n– ग्रामीण भागात वैद्य:\nग्रामीण भागात वैद्य मिळत नाही. अहो, मिळेल कसा वैद्य होण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा मोजण्याची ताकद, आर्थिक चणचण असलेला ग्रामीण तरुण कुठून उभा करेन वैद्य होण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा मोजण्याची ताकद, आर्थिक चणचण असलेला ग्रामीण तरुण कुठून उभा करेन आणि केला तरी तो शहरात जाऊन परत कमावण्याचा प्रयत्न करणार नाही का आणि केला तरी तो शहरात जाऊन परत कमावण्याचा प्रयत्न करणार नाही का उगीच बुडीत गुंतवणूक कोणी करते का\nवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी १ कोटी रुपये अनामत म्हणून भरावे लागतात, त्यात बाकीचा खर्च निराळाच. म्हणजे ज्यांना कळ आहे ते प्रयत्न सुद्धा करू शकत नाहीत. आणि ज्यांनी अनामत भरून विद्यालय सुरु केले ते पैसा वसूल करणारच ना त्यामुळे, वैद्यकीय महाविद्यालय उभा करण्यासाठी सरकारने वाट मोकळी करावी. काही लोकांच्या फायद्यासाठी मनमानी कारभार करू नये.\n– शेतमाल आणि त्याचे मुल्य:\nसरकारला शेतकऱ्याच्या मालाचा बाजार स्वतःच निश्चित करायचा आहे. का शेतकरी वेडा आहे का शेतकरी वेडा आहे का एकदा चुकेल दोनदा चुकेल परंतु नंतर न चुकता तो शेती फायद्याची करू शकतो.\nसरकारी यंत्रणेने त्याला फसवून घरगुती बियाणे, खत, व पशुधन संपवले आणि त्याला बियाणे आणि खत विकणाऱ्या खाजगी कंपन्यांच्या दावणीला बांधले.\nपाणी व्यवस्थापन केंद्रीय पद्धतीने करून ग्रामस्थांना प्रक्रियेतून दूर केले, परिणामी पाण्याचे दुर्भिक्ष.\n– हिंदू देऊळ सरकारी यंत्रणा सांभाळतात. का\n– गावची मुख्य अर्थव्यवस्था शेती आणि शेती पूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. परंतु ग्रामीण भागात शाळा शेतीविषयी अद्ययावत ज्ञान देण्यास तयार नाहीत. का\n– घरात संडास बांधावे म्हणून ह्यांचा आटापिटा चाललाय. परंतु पाण्याचा प्रश एवढा भयानक आहे कि लोक संडास बांधतील पण हगायला बाहेरच जातील.\nअसे अनेक मुद्दे आहेत जे बदलणे आवश्यक आहे.\nपरंतु एक निश्चित. केंद्रीय पद्धतीने केवळ बाह्यांतर्गत सुरक्षा, परराष्ट्र संबंध, न्यायव्यवस्था आणि पायाभूत सुविधा एवढेच काम करावे. उगीच कारखाने, शाळा, हॉटेले, देऊळे, विमानं, दुध संस्था, वित्त संस्था, बस सेवा चालवत बसू नये. परंतु दुर्दैव कि सुरक्षा, पायाभूत सुविधा, न्यायसंस्था मोडकळीस आल्यात आणि केंद्र/राज्य सरकार हे सोडून बाकी सगळे उद्योग करत बसले आहे.\nTags: राजकारण, शासनाचे काम, सरकारचे काम\nPosted in मराठी, माझे विचार, राजकारण | No Comments »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1859", "date_download": "2018-04-24T04:36:11Z", "digest": "sha1:5U5SCFEG5EIOUV5FDMOSCOAJNKDISJPL", "length": 4741, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभारतीय मानक संस्थेकडून जागतिक मानक दिन साजरा\nजागतिक मानक दिनानिमित्त, भारतीय मानक संस्थेने मुंबईत आज एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. सी पी डब्लू डी चे पश्चिम विभाग 1 चे मुख्य अभियंता डॉ के एम सोनी यांनी या चर्चासत्राचे उदघाट्न केले. \" स्टॅंडर्ड मेक्स सिटीज स्मार्टर\" अशी या वर्षीच्या जागतिक मानक दिनाची संकल्पना आहे.\nपश्चिम विभागाचे उप महा संचालक बी व्ही एस एन राव यांनी स्वागतपर भाषणात, केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाचे उद्दिष्ट साध्य करण्यात मानकांची भूमिका विशद केली. स्मार्ट सिटी म्हणून परिवर्तन घडवण्यासाठी, प्रत्येक शहराला स्वतःच्या समस्या आहेत असे सांगून या समस्यांवर तयार तोडगा उपलब्ध करून हे काम सुलभ करण्यात मानके महत्वाची भूमिका बजावतात असे त्यांनी सांगितले.\nस्मार्ट शहरांसाठी निश्चित करण्यात आलेली मानके, स्मार्ट शहरांच्या सर्व समावेशक आणि अविरत विकासासाठी मोलाची मदत करतील असे डॉ सोनी यांनी सांगितले. देशातल्या शंभर स्मार्ट शहरांसाठी ठरवण्यात आलेल्या मानकाच्या अंमलबजावणीच्या तातडीची गरज त्यांनी व्यक्त केली. पुण्यातल्या के पी आय टी चे, स्मार्ट अँड सस्टेनेबल टेक्नॉलॉजी मार्केटिंगचे विश्वजीत जोशी, मुंबईतल्या सी एम एस कॉम्पुटरचे एनर्जी मॅनॅजमेंटचे प्रमुख रायपोरे राममोहन यांनीही आपले विचार व्यक्त केले. उद्योग क्षेत्र, सरकारी संस्था आणि ग्राहक संस्था यांचे सुमारे 120 प्रतिनिधी या चर्चासत्राला उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/medicinal-importance-of-cowhage-plant-1637475/", "date_download": "2018-04-24T04:57:43Z", "digest": "sha1:AHJH7XPN6BTBKDQHGRP3TIBWZ45SXPOC", "length": 16137, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Medicinal importance of Cowhage plant | पिंपळपान : खाजकुहिली | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nखूप वारा सुटल्यामुळे त्या शेंगांची- खाजकुहिलीच्या वरची तुसे त्वचेला चिकटून प्रचंड खाज सुटली होती.\nकपिकच्छुर्भृशं वृष्यामधुरा बृंहणी गुरू: तिक्ता वातहरी बल्यावातपित्तास्त्रनाशिनी (भा. प्र.)\nखाजकुहिलीचे गुणकर्म सांगण्याअगोदर माझा एक गमतीदार अनुभव सांगण्याचा मोह मला अजिबात आवरत नाही. मी गेली जवळपास ४० वर्षे सर्वसामान्यांकरिता आयुर्वेदाचे वर्ग चालवत आहे. खूप वर्षांपूर्वी अशाच एका वर्गाची सहल कर्जतजवळील एका जंगलात वनस्पती अभ्यासकांनी नेली होती. आम्ही सर्वजण त्या जंगलातील वनस्पतींचे निरीक्षण करत चालत होतो. एकाएकी सर्वजण आपले अंग खाजवायला लागले. मला एकदम प्रसंगावधानाने सर्वाना सल्ला द्यायचे सुचले. ‘‘दोन्ही हात मागे घ्या, अजिबात खाजवू नका, चालत राहा.’’ लोकांनी ऐकले. पाच मिनिटांनी खाज पूर्णपणे बंद झाली. मी आजूबाजूला बघितले होते. झाडावर कसल्या तरी वेली होत्या. खूप वारा सुटल्यामुळे त्या शेंगांची- खाजकुहिलीच्या वरची तुसे त्वचेला चिकटून प्रचंड खाज सुटली होती.\nकपिकच्छु (संस्कृत), कौचा (गुजराती), कवच (हिंदी), कामाच (बंगाली) अशा विविध नावांनी ओळखली जाणारी वेल जंगलात विविध मोठय़ा वृक्षांच्या आधारे वाढते. जळगावजवळील एका लहान गावाच्या माळरानात याच्या बिया वेगळय़ा कशा करतात हे बघायला मी मुद्दाम गेलो होते. तिथे एका प्रचंड खोल आणि विस्तीर्ण खड्डय़ांत खाजकुहिलीच्या शेंगा टाकल्या होत्या. काही काळाने त्या आपोआप फुटणार होत्या. मग हातात खांद्यापर्यंत मोजे घालून त्यातील बिया गोळा केल्या जाणार होत्या.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nऔषधाकरिता वापरल्या जाणाऱ्या खाजकुहिलीच्या बियांव्यतिरिक्त एक पांढरट, हिरवट रंगाच्या बियांची एक वेगळी जात असते. मुंबईत त्या शेगांची भाजी करतात. त्यांना खाज नसते. कवचबीला आत्मगुप्ता, ऋष्यप्रोक्ता, शूकशिम्बी, मर्कटी, वानरी अशीही नावे आहेत. औषधांत शेंगावरील कुसे, बिया आणि मूळ वापरतात. बिया खूप पौष्टिक आहेत. कुसे उत्तम कृमिघ्न आहेत. मूळ मज्जातंतूव्यूहास उत्तेजक आणि मूत्रजनन आहे.\nगोल जंत मरण्यास शेंगेवरचे केस मधातून देतात. एक वेळ एका शेंगेवरचे कुसे खरडून दिल्यास पुरीशी होतात. ज्वरांत भ्रम झाला असल्यास, मज्जातंतूव्यूहाच्या अशक्तपणात मुळांचा काढा द्यावा. महामारीत मुळाचा फांट मधाबरोबर देतात. मुळाच्या काढय़ाने लघवीचे प्रमाण खूप वाढते, म्हणून असा काढा मूत्रपिंडाच्या रोगात देतात. सर्वागास लेप करतात. व्रणावर पाने बांधतात.\nकवचबींचा खरा वापर ‘पुरुषत्व गमावलेली मंडळी’ मोठय़ा श्रद्धेने करतात आणि त्यांचा १०० टक्के लाभही मिळतो. त्याकरिता बाजारात कौचापाक हे तयार औषध मिळते. मात्र यासाठी वापरल्या जाणाऱ्या कवचबीच्या शेंगा या भाजीच्या शेंगा असतात, त्यांच्या बाहेरील आवरणाला तुसे नसतात. मात्र खाजकुहिलीच्या शेंगा या जुनाट नसतील ही काळजी अवश्य घ्यायला हवी.\n– वैद्य प. य. वैद्य खडीवाले\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nनाणार प्रकल्प विदर्भात आणा: भाजपा आमदाराची मागणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/india-pakistan-117041000031_1.html", "date_download": "2018-04-24T05:02:35Z", "digest": "sha1:46B42TPINBGLS4VR4NEQFMJWFDMORZAR", "length": 9252, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भारत पाकच्या 12 कैद्यांची सुटका करणार नाही | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभारत पाकच्या 12 कैद्यांची सुटका करणार नाही\nभारत बुधवारी पाकिस्तानच्या 12 कैद्यांची सुटका करणार होता. मात्र, भारतानं निर्णय बदलला असून पाकिस्तानच्या कैद्यांची सुटका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनवाल्यानंतर भारतानंही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. कायदा आणि न्यायाचे मुलभूत नियम न पाळता कुलभूषण जाधव यांना फाशी दिली तर ती आम्ही पूर्वनियोजित हत्या समजू, असं पत्र भारताने पाकिस्तान उच्च आयोगाला लिहिलं आहे.\nनाशिकमध्ये पकडल्या ५०० आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा\n या शहरात मृत्यूची मनाई आहे ...\nकुपवाडा सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नातील चार दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\n10 वर्षांच्या लढ्यानंतर बीएमसीतील 2 हजार 700 कंत्राटी सफाई कामगार सेवेत कायम\nमलाला युसूफझई संयुक्त राष्ट्राची शांतिदूत\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/big-blast-near-pakistan-court-12111", "date_download": "2018-04-24T05:13:26Z", "digest": "sha1:VGM4YDL266QKYDO4V3IMIJSVGWGISG7E", "length": 11124, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Big Blast near Pakistan court पाकिस्तानमध्ये न्यायालयाबाहेर स्फोट; 12 ठार | eSakal", "raw_content": "\nपाकिस्तानमध्ये न्यायालयाबाहेर स्फोट; 12 ठार\nशुक्रवार, 2 सप्टेंबर 2016\nपेशावर- वायव्य पाकिस्तानमधील मरदान जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात 12 ठार तर 52 जखमी झाल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी घडली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.\nअधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाबाहेर आज दुहेरी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये वकिलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. परिसर ताब्यात घेण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.\nपेशावर- वायव्य पाकिस्तानमधील मरदान जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात 12 ठार तर 52 जखमी झाल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी घडली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.\nअधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाबाहेर आज दुहेरी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये वकिलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. परिसर ताब्यात घेण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.\nदहशतवाद्यांनी आत्मघाती स्फोट घडवून आणल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी आज वेगवेगळ्या ठिकाणी चार बॉम्बस्फोट घडवून आणले असून, सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत चार दहशतवादी ठार झाले आहेत.\nआमदार विलासराव जगतापांच्या मुलाविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा\nमाडग्याळ - जत तालुक्‍यातील कोंतेवबोबलाद येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून श्रीशैल सौदाप्पा कांबळे (वय ५०) यांना काठी व पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात...\nराजकीय वर्चस्ववादातून दोन खून\nकोल्हापूर - अशोक पाटील यांच्या खुनानंतर त्याचा सूड म्हणून धनाजी गाडगीळ यांचा खून करण्यात आला. त्यामुळे संवेदनशील पाचगाव धुमसत राहिले. राजकीय...\nअधिकारांचा मोह सरकारला सुटेना\nपंचायतराज संस्थांच्या कारभारात आमूलाग्र बदल घडविणारी ७३ वी घटनादुरुस्ती २४ एप्रिल १९९३ पासून अमलात आली. त्यास आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत....\nराज्यात राबवणार 'एक ई-चलन उपक्रम'\nमुंबई - वाहतुकीला शिस्त लागावी आणि पारदर्शक कारभारासाठी आता राज्यात \"एक राज्य-एक ई-चलन' हा उपक्रम...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2016/02/03/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-1/", "date_download": "2018-04-24T04:47:47Z", "digest": "sha1:4RCPRX7Z6U4U4BRXDNDXRVI7LVL2HRA4", "length": 23144, "nlines": 482, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "स्रोतस सिद्धांत -1 | Abstract India", "raw_content": "\nएखाद्या तळ्यात कमळदलाचे जाळे इतस्ततः पसरलेले असते किंवा एखादी वेल तिच्या फांद्यांनी सर्वदूर पसरते, त्याप्रमाणे शरीरातही स्रोतसांचे जाळे सर्वत्र पसरलेले असते. शरीरात जेथे जेथे रिकामी जागा आहे, अवकाश आहे, जेथे शरीरभावांचे परिवहन होत असते, त्या सर्वांना स्रोतस समजले जाते.\n‘आयुर्वेद उवाच’ या सदरात आता आपण आयुर्वेदातील ‘स्रोतस’ या सिद्धांताची माहिती घेणार आहोत. चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांगहृदय, अष्टांगसंग्रह वगैरे सर्व महत्त्वाच्या आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये स्रोतस ही संकल्पना समजावलेली आहे. शरीरातील विविध क्रिया कशा होत असतात आणि शरीरातील विविध संरचनांचा, अवयवांचा परस्परांशी कसा संबंध असतो, दोन शरीरभाव शारीरिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर असले तरी कार्यामुळे कसे जोडलेले असतात, अशा अनेक गोष्टी ‘स्रोतस’ सिद्धांतामुळे समजू शकतात.\n‘स्रोतस’ शब्दाची निरुक्‍ती चरकसंहितेत ‘स्रवणात्‌ स्रोतांसि’ अशी केलेली आहे. म्हणजे ज्या मार्गातून सतत काहीतरी स्रवत असते त्याला ‘स्रोतस’ असे म्हणतात. चरकसंहितेमध्ये स्रोतस सिद्धांत पुढील सूत्राद्वारा समजावलेला आहे,\nयावन्तः पुरुषे मूर्तिमन्तो भावविशेषास्तावन्त एवास्मिन्‌ स्रोतसां प्रकारविशेषाः \nसर्वे हि भावाः पुरुषान्तरेण स्रोतांसि अभिनिर्वर्तन्ते, क्षयं वा अपि अभिगच्छति \nस्रोतांसि खलु परिणामआपद्यमानानां धातूनाम्‌ अभिवाहिनी भवन्ति अयनार्थेन \nव्यक्‍तीच्या शरीरात जे जे मूर्तिमंत भावविशेष (म्हणजे आकारमान असणारे शरीरघटक) आहेत तेवढे शरीरात स्रोतसांचे प्रकार आहेत. स्रोतसांशिवाय शरीरातील भाव तयार होऊ शकत नाहीत किंवा क्षीणही पावू शकत नाहीत. शरीरातील सर्व धातू तयार होण्याचे काम; तसेच त्यांचे शरीरात वहन करण्याचे काम स्रोतसांकरवीच होत असते. या सूत्रावरून तीन महत्त्वाचे मुद्दे लक्षात येतात,\n१. व्यक्‍तीच्या शरीरात जेवढे म्हणून भावविशेष (शरीरघटक) आहेत, त्या प्रत्येकाचे आपापले असे एक-एक स्रोतस आहे.\n२. शरीरातील कोणत्याही घटकाची उत्पत्ती किंवा क्षय स्रोतसाच्या माध्यमातूनच होत असतो.\n३. धातूंचे परिणमन आणि धातूंचे परिवहनही स्रोतसांच्या माध्यमातून होत असते.\nअर्थात शरीरात असंख्य स्रोतसे आहेत, त्यांना संख्येत मोजता येणे अशक्‍य होय. स्रोतसाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शरीरातील कोणकोणत्या रचनांना स्रोतस म्हणता येते हे चरकसंहितेत पुढील सूत्राद्वारा सांगितलेले आहे,\nस्रोतांसि, सिराः, धमन्यः रसायन्यः, रसवाहिन्यः, नाड्यः, पन्थानः, मार्गाः, शरीरच्छिद्राणि, संवृतासंवृत्तानि, स्थानानि, आशयाः, निकेताश्‍चेसि, शरीरधात्ववकाशानां लक्ष्यालक्ष्याणां नामानि भवन्ति\nसिरा, धमनी, रस वाहून नेणारी रसायनी, नाडी, पंथ, मार्ग, शरीरछिद्र, एका बाजूला बंद दुसऱ्या बाजूला उघडलेले किंवा दोन्ही बाजूंनी उघडलेले स्थान, आशय, दोन शरीरधातूंमधले डोळ्यांनी दिसणारे किंवा न दिसणारे अवकाश या सर्वांनाच स्रोतसात मोजता येते.\nथोडक्‍यात शरीरात जेथे जेथे रिकामी जागा आहे, अवकाश आहे, जेथे शरीरभावांचे परिवहन होत असते त्या सर्वांना स्रोतस समजले जाते. ज्याप्रमाणे एखाद्या तळ्यात कमळनालाचे जाळे इतस्ततः पसरलेले असते किंवा ज्याप्रमाणे एखादी वेल तिच्या फांद्यांनी सर्वदूर पसरते, त्याप्रमाणे शरीरातही स्रोतसांचे जाळे सर्वत्र पसरलेले असते. फक्‍त शरीरातील स्रोतसे आतून पोकळ असतात. कारण त्यातून शरीरातील भावपदार्थ वहन करत असतात. अशा प्रकारे वास्तविक शरीरात असंख्य स्रोतसे असतात. तरीही त्यात काही मुख्य स्रोतसे अशी असतात की त्यांना नाव देता येते. चरकसंहितेमध्ये अशी तेरा मुख्य स्रोतसे सांगितलेली आहेत.\nप्राणवह स्रोतस, उदकवह स्रोतस, अन्नवह स्रोतस, रसवह, रक्‍तवह, मांसवह, मेदोवह, अस्थिवह, मज्जावह, शुक्रवह अशी सात धातूंची सात स्रोतसे, मूत्रवहस्रोतस, पुरीषवह स्रोतस आणि स्वेदवह स्रोतस अशी तेरा स्रोतसे नावाने सांगता येतात. ही स्रोतसे महत्त्वाची का आहेत हे आपण पुढच्या वेळी पाहूया.\nfrom → उदकवह, दोष, प्राणवह, स्रोतस सिद्धांत\nस्रोतस सिद्धांत -2 →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/virodh-vikas-vaad-news/rajiv-sane-article-in-loksatta-virodh-vikas-vaad-1656755/", "date_download": "2018-04-24T04:51:03Z", "digest": "sha1:4VTQ3QGRJU4JNUYMR4WNDE4QK2LRJQQP", "length": 31866, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rajiv sane article in loksatta virodh vikas vaad | लेखमालेची भूमिका व आढावा | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nलेखमालेची भूमिका व आढावा\nलेखमालेची भूमिका व आढावा\nसध्या विविध रंगांत पण प्रतिक्रियावादी असा जो विकासाला विरोध करणारा (प्र)वाद पसरला आहे\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\n‘विरोध-विकास-वाद’ या लेखमालेतील पहिले तेरा लेख झाले. हे सगळे कशासाठी आवश्यक आहे आणि पुढे कुठे जाणार आहे आणि पुढे कुठे जाणार आहे असे प्रश्न पडले असतील. म्हणून हे मनोगत व पुनरावलोकन\nसदराचे नाव ठरविताना, सध्या विविध रंगांत पण प्रतिक्रियावादी असा जो विकासाला विरोध करणारा (प्र)वाद पसरला आहे, त्याचा फोलपणा ध्यानात आणून देणे आणि आशावादाला जागा कशी आहे हे निदर्शनास आणणे, हा हेतू होता. तरीही ‘विकास-विरोधी वादांचे खंडन’ असे नाव न देता विरोध-विकास-वाद म्हणजे डायलेक्टिक्स, या मार्क्‍सवादी परंपरेतून आलेल्या शब्दातला क्रम तसाच ठेवला. याचे कारण आपल्याला खरोखर डायलेक्टिक्स म्हणजे काय हे जर उमगले तर विरोधासाठी विरोध ही जी विकृती निर्माण झाली आहे ती दूर होण्यास मदतच होईल. लेखमालेत यथावकाश डायलेक्टिक्स हा विषय येईलही.\nअर्थात विकासालाच विरोध करणे ही फक्त कम्युनिस्टांची खासियत नसून गांधीवादी, पर्यायी विकासनीतीवादी, लोहियावादी, ठेंगडी-प्रणीत स्वदेशीवादी, पूर्वगौरव-पश्चिमद्वेषग्रस्त हिंदू-पुनरुत्थानवादी, सनातनी, अतिरेकी-पर्यावरणवादी अशा बऱ्याच प्रवाहांचा त्यात समावेश आहे. इतकेच नव्हे तर मध्यममार्गी म्हणून प्रसिद्ध पावलेली काँग्रेस असो वा ‘आर्थिक-उजवे’पणा खरे तर नसलेला, मध्यममार्गीच भाजप असो वा मुलायम, मायावती, लालूछाप तिसरे असोत वा प्रादेशिकता‘वादी’ पक्ष असोत, सर्वात एक गोष्ट सामाईक आहे. ती अशी की, सत्तेत नसताना आर्थिक सुधारणांना विरोध करायचा. मात्र सत्तेत आल्यावर आर्थिक सुधारणाही चालू ठेवायच्या आणि जनानुरंजनही चालू ठेवायचे. ही दांभिकता का चालू राहते आहे डावे-पुरोगामी म्हणून जे संभाषित (डिस्कोर्स – संज्ञाव्यूह), (जणू भारतातले एकमेव संभाषित असल्यासारखे) अ‍ॅकेडेमिक्स आणि पत्रकारिता या क्षेत्रात मुरलेले आहे, त्यात सगळे बसवण्यासाठी दांभिकताच लागते\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nनरेंद्र मोदी या माणसाने वेगळे संभाषित (विकास, सुशासन, ‘सब का साथ..’) मुख्य प्रवाहात आणले. त्यांच्या घोषणांची कार्यवाही करण्यात ते कितपत यशस्वी झाले हा मुद्दा वेगळा आहे. परंतु आपले संभाषित आऊटडेटेड होताना पाहून बावचळलेले मांडणीकार आणि पराभवामुळे बावचळलेले भाजपेतर यांनी फॅसिझमचा उदय म्हणून एकच कल्लोळ सुरू केला. संघ-परिवारातील सनातन्यांनी त्यांची विचारशून्य बडबड चालू ठेवलीच आहे. यातून चाललेल्या ‘कलगीतुऱ्या’त सर्वाधिक बळी पडते आहे ती वैचारिकता हा मुद्दा वेगळा आहे. परंतु आपले संभाषित आऊटडेटेड होताना पाहून बावचळलेले मांडणीकार आणि पराभवामुळे बावचळलेले भाजपेतर यांनी फॅसिझमचा उदय म्हणून एकच कल्लोळ सुरू केला. संघ-परिवारातील सनातन्यांनी त्यांची विचारशून्य बडबड चालू ठेवलीच आहे. यातून चाललेल्या ‘कलगीतुऱ्या’त सर्वाधिक बळी पडते आहे ती वैचारिकता भारताच्या किंवा सध्याच्या मानवाच्या समस्या उलगडण्यासाठी जो विवेक व वस्तुनिष्ठता हवी आहे ती बाजूलाच राहून मोदीभक्ती किंवा मोदीद्वेष, यापैकी एका बाजूने तुम्ही असलेच पाहिजे, असा दबाव माध्यम-जगतात तरी आहे. मला भक्ती/द्वेषछाप हाणामाऱ्यांत रस नाही. ब्रँडनेम-वॉरला तात्त्विक समजण्यात आपण का सापडा भारताच्या किंवा सध्याच्या मानवाच्या समस्या उलगडण्यासाठी जो विवेक व वस्तुनिष्ठता हवी आहे ती बाजूलाच राहून मोदीभक्ती किंवा मोदीद्वेष, यापैकी एका बाजूने तुम्ही असलेच पाहिजे, असा दबाव माध्यम-जगतात तरी आहे. मला भक्ती/द्वेषछाप हाणामाऱ्यांत रस नाही. ब्रँडनेम-वॉरला तात्त्विक समजण्यात आपण का सापडा ज्यांना दूरगामी समस्या उलगडण्यात रस आहे आणि विधायक स्वरूपाची आस्था आहे, त्यांना माझ्या परीने मदत करणे (किंवा त्यांची मदत घेणे), हेच माझे काम ज्यांना दूरगामी समस्या उलगडण्यात रस आहे आणि विधायक स्वरूपाची आस्था आहे, त्यांना माझ्या परीने मदत करणे (किंवा त्यांची मदत घेणे), हेच माझे काम म्हणूनच विकासाला विरोध करण्यासाठी ज्या सैद्धांतिक मांडण्या उभ्या केल्या जातात, त्यांच्यातले दोष आणि पर्यायी मांडण्या, असे या लेखमालेचे स्वरूप आहे.\nपहिल्याच लेखात ‘एक पाय जुगारावर आणि एक पाय क्रौर्यावर ठेवून उत्क्रांतीदेवी उभी आहे’ असे अलंकारिक आणि काहीसे भडक वाक्य का आले असेल निसर्गात संतुलने असतातच, पण संतुलन म्हणजे सुसंवाद नव्हे. ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे’ ही एका (अलौकिक) मनुष्यालाच स्फुरलेली प्रार्थना आहे. सामान्य माणसालासुद्धा सहसा क्रौर्य कसेसेच वाटते ही चांगलीच गोष्ट आहे. विवेक, सहवेदना आणि रीती सापडणे यांच्या बळावर मनुष्य अधिकाधिक सभ्य होत गेलेला आहे. इतिहास ही प्रक्रियादेखील, कोणी तरी कळवळ्याने बोलले म्हणून सारेच कळवळले, अशी भाबडी नव्हती. ऐतिहासिक नाइलाजही कमी नव्हते व नाहीत. मनुष्यस्वभाव हा हार्डवायर्ड नाही. तो बदलू शकतो. पण आपले प्राणी म्हणून असणे टाकून देता येत नसते. त्यावर कोणते वृत्तीवैभव चढवणे, (स्वयंनिर्धाराने) पण कोणत्या टप्प्यात शक्य होईल, हे आपल्या वैयक्तिक लहरींवर अवलंबून नसते (मार्क्‍स निसर्गात संतुलने असतातच, पण संतुलन म्हणजे सुसंवाद नव्हे. ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे’ ही एका (अलौकिक) मनुष्यालाच स्फुरलेली प्रार्थना आहे. सामान्य माणसालासुद्धा सहसा क्रौर्य कसेसेच वाटते ही चांगलीच गोष्ट आहे. विवेक, सहवेदना आणि रीती सापडणे यांच्या बळावर मनुष्य अधिकाधिक सभ्य होत गेलेला आहे. इतिहास ही प्रक्रियादेखील, कोणी तरी कळवळ्याने बोलले म्हणून सारेच कळवळले, अशी भाबडी नव्हती. ऐतिहासिक नाइलाजही कमी नव्हते व नाहीत. मनुष्यस्वभाव हा हार्डवायर्ड नाही. तो बदलू शकतो. पण आपले प्राणी म्हणून असणे टाकून देता येत नसते. त्यावर कोणते वृत्तीवैभव चढवणे, (स्वयंनिर्धाराने) पण कोणत्या टप्प्यात शक्य होईल, हे आपल्या वैयक्तिक लहरींवर अवलंबून नसते (मार्क्‍स). कितपत अपेक्षा ठेवायच्या याचा रास्त अंदाज घेऊनच स्वार्थाना वळण लावणे करत राहावे लागणार आहे. कार्यपद्धती ठरवताना आदर्श माणूस नव्हे तर आत्ताचा माणूसच गृहीत धरावा लागतो. राजकारणी कसे लबाड असतात हे शिळे झाले आहे. नागरिकही सरळ नसतात व त्यांचे नको ते दबाव व प्रोत्साहने राजकारण्यांना प्रेरित करत असतात हेही लक्षात ठेवायला हवे.\nतंत्र हे भौतिक प्रगतीचे इंजिन आहे. आत्मिक/नैतिक उन्नतीसाठी जो वाव निर्माण होतो तो दुर्भिक्षात होत नसतो. मुबलकतेने आपोआप उन्नती होते असेही नाही, पण भौतिक प्रगती रोखून ते जमणार नसते. बिगरतंत्रज्ञांनासुद्धा, कशाने काय साधले जात आहे, याची कल्पना असायला हवी. नुसता ‘ऑ’ निर्माण झाला तर विनाअट स्वागत किंवा विनाअट विरोध निर्माण होतात. साधी अवजारे, यांत्रिकीकरण, स्वयंचलितीकरण, चिन्हांतरण, सायबरनेटिक्स या गोष्टींचे गूढनिवारण झालेच पाहिजे. म्हणूनच लेखांक २, ३, ४ त्यासाठी आहेत. एन्ट्रॉपी (लेखांक ६) हा तसा ऑप्शनला टाकण्याचाच विषय. परंतु या शब्दाचा गैरवापर आधी नकळत आणि नंतर हेतुत: केला जात आहे. परंतु सुव्यवस्थेची कुव्यवस्था होणे असा एन्ट्रॉपीचा अर्थ नसून विरळीकरण एवढा मर्यादितच आहे. पेट्रोलियमचा अनिर्बंध थांबवावाच लागेल. त्याच वेळी पेट्रोलियममुक्त होणे, हे नुसते ठरवले आणि आर्थिक विकासाच्या निरपेक्ष करून टाकले, असे होणार नाहीये. नुसती ऊर्जा पुरत नाही तर ऊर्जेची सघनता लागते एवढे तरी समजले पाहिजे यासाठी लेखांक ५ मध्ये ऊर्जानिर्मिती हा विषय घेतला.\nतंत्राची निवड विज्ञानाने आपोआप होत नसून तो एक मूल्यनिर्णय असतो. मूल्ये ही ‘दोन मिनिटे शांतता पाळू’ अशी पाळण्याची गोष्ट नसून ती निर्माणही करावी लागतात. १०० टक्के बरोबर किंवा १०० टक्के चूक असे निर्णय घ्यायची संधी क्वचितच असते. ‘ट्रेड-ऑफ’ ही गोष्टच नाकारून जास्त चांगला ट्रेड-ऑफ कसा करणार\nयावर लेखांक ७ येऊन गेला. उत्पादकतेची फक्त फळेच भोगणाऱ्यांना ती प्राप्त करण्यासाठी केवढी मगजमारी आणि निगुती लागते याची कल्पना येत नाही. श्रमविभागणी हा भागाकार नसून गुणाकार असतो हे कळल्याशिवाय, शून्य बेरजेचा खेळ (झीरो सम गेम) या कालबाह्य़ संकल्पनेतून आपण कधी बाहेर पडणार आणि विन-विन सोल्यूशन्स कधी शोधणार आणि विन-विन सोल्यूशन्स कधी शोधणार (लेखांक ८). श्रमजीवन नकोसे का होते (लेखांक ८). श्रमजीवन नकोसे का होते याचे उत्तर ‘नफ्याच्या हव्यासापोटी’ एवढेच नाहीये. ते कसे सुधारता येईल किंवा पत्करावे लागेल हे त्यात उतरून पाहावे लागते. (लेखांक ९).\n व धडेही घेतले. पण मार्क्‍सवादय़ांनी भांडवलशाहीत होत गेलेले बदल ‘वाचले’च नाहीत. यात ना मार्क्‍सचा दोष आहे ना भांडवलदारांचा वा कामगारांचा. मार्क्‍सकालीनच राहिलेल्या मार्क्‍सवादय़ांना वाटत राहाते की, श्रमबाजारपेठेत फेअर प्ले जरी असता तरी ‘श्रमशक्ती विकली गेली रे गेली की शोषण होणारच’. यामुळे फेअर प्ले का नसतो व कसा आणणार या प्रश्नात उतरलेच जात नाही. पण सामान्य कामगाराला ‘मालकालाही परवडावे लागते’ हा सेन्स असतो. असामान्य क्रांतिकारकांना नसतो (लेखांक ११). श्रम म्हणजे फक्त शारीरिकच आणि भांडवल, उद्योजकता हे उत्पादक घटकच नव्हेत ही गैरसमजूत घालविण्यासाठी कारागिराच्या कामात किती कार्ये (फंक्शन्स) दडलेली असतात हे लेखांक १० मध्ये उलगडले आहे.\nबऱ्याच वर्षांपूर्वी मी ‘युगांतर’ नावाचे पुस्तक लिहिले होते व त्यात ‘राबेल त्याचे खपेल काय’ हे प्रकरण ‘उत्पादकता कमी राखून रोजगारनिर्मिती’ कशी अशक्य आहे हे सांगते. ब्लॉगद्वारे हे पुस्तक फ्री-डाऊनलोड उपलब्ध आहे. त्याशिवाय लेखांक १२ मध्ये रोजगाराचे स्वरूप कसकसे बदलत जाईल व माणसाने माणसाशी करण्याच्या गोष्टींचा वाव कसा वाढत जाईल हेही दिलेले आहे. लँड म्हणजे भूसंपदा हा घटक मात्र खास करून राजकीय आहे. राज्यसंस्थेचे मूळ युद्धसंस्थेत आहे. मूलत: दमनशक्ती हीच शोषण शक्ती बनते. युद्धखोर विरुद्ध उत्पादक हा मूळ वर्गसंघर्ष आहे आणि इतिहास हा हळूहळू पण निश्चितपणे उत्पादकाची सरशी होण्याचा इतिहास आहे. या आशावादी नोटवर लेखांक १३ संपला.\nआता पुढल्या लेखांकात आपण कॉम्प्लेक्सिटी कशी उलगडायची याची एक पद्धती पाहणार आहोत. पुढे अनेक विषय येणार आहेत. पारदर्शकता कशी वाढवायची प्रशासकीय सुधारणा, ‘समते’त दडलेल्या नको त्या गोष्टी, वगैरे.\nबाजार-व्यवस्था (भांडवलशाही म्हणू हवे तर) धडपणे चालवल्याखेरीज, तिच्यात होत जाऊ शकणाऱ्या सुधारणा होणार कशा सुधारणा होत जाऊन पुढची व्यवस्था कसकशी उगवेल येईल सुधारणा होत जाऊन पुढची व्यवस्था कसकशी उगवेल येईल याचे उत्तर सुधारणा रोखून मिळणार नाही हे निश्चित.\nलेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे ‘स्वातंत्र्य—समृद्धी—सवरेदय—वादी’ आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल rajeevsane@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nनाणार प्रकल्प विदर्भात आणा: भाजपा आमदाराची मागणी\nलेखमाला वाचनीय आहे, पण ती किती खोलात जाणार ते समजत नाही. मूळ वर्गसंघर्ष युद्धखोर विरुद्ध उत्पादक असा आहे हे विधान आवडले. मात्र वर्गसंघर्षाच्या मुळाचा शोध या वाक्याशी संपत नाही. इंग्रजीमध्ये ज्याला ‘पी द ऑनियन’ म्हणतात त्यातले एक पी वरील वाक्यात दिसते. ती प्रक्रिया तशीच चालू ठेवली तर ते वर्गसंघर्षाचे वा कुठल्याही संघर्षाचे मूळ स्वतःचाच तात्कालिक स्वार्थ आणि दूरगामी स्वार्थ यातल्या संघर्षात रुजलेले दिसेल. दूरगामी म्हणजे किती दूरचा, उद्याचा, परवाचा, की पुढील महिन्याचा / वर्षाचा याच्या आकलनातून सगळे ट्रेड-ऑफ निर्माण झालेले आढळतील. स्वतःच्याच दूरगामी स्वर्थाला महत्व द्यायला माण शिकवले तर अनेक प्रश्न नष्ट होतील. परंतु आज आहे उद्या नाही अशा चंचल, नश्वर, आणि अशाश्वत जगात आला दिवस साजरा करणे सोडून दूरगामी स्वार्थाची चिंता वाहणे झेपणार तरी कोणाला हा प्रश्न निर्माण होतो. त्यावर उतारा म्हणून मग अमर असलेल्या आत्म्याची, मरणोत्तर स्वर्ग / असण्याची, आणि पुनर्जन्माच्या संकल्पनेची गरज पडते का, इथपर्यंत हे सारे विवेचन जाऊ शकते. लेखमाला अध्यात्माची खोली गाठणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/the-return-of-rebel-2-billa-in-hindi-117061400008_1.html", "date_download": "2018-04-24T05:08:24Z", "digest": "sha1:2BQ3Q7D4V5IS77EE5X7BAKGZJXU6FSVA", "length": 9233, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हिंदीत प्रदर्शित होणार प्रभास आणि अनुष्काचा बिल्ला | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहिंदीत प्रदर्शित होणार प्रभास आणि अनुष्काचा बिल्ला\nजगभरात बाहुबली 2 च्या ऐतिहासिक यशानंतर बाहुबली प्रभास हा लोकप्रिय झाला आहे. लोक बाहुबलीमुळे केवळ प्रभासचेच नाही तर देवसेनेची भूमिका करणार्‍या अनुष्का शेट्टीचे फॅन झाले आहेत. या दोघांची जोडी कमालीची लोकप्रिय झाल्यामुळे या दोघांना पुन्हा पुन्हा एकत्र बघण्यासाठी त्यांचे फॅन आतुर झाले आहेत.\nबाहुबली आधीही काही साऊथ चित्रपटांमध्ये प्रभास आणि अनुष्काने एकत्र काम केले आहे. त्यांचा 2009 मध्ये आलेला बिल्ला हा चित्रपट सुपरहिट झाला होता. हाच चित्रपट आता हिंदी भाषेत रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाचे निर्माता या दोघांची लोकप्रियता कॅश करण्याच्या प्रयत्नात आहेत. सध्या या दोघांची चर्चा जोरात रंगली असल्याने निर्मात्यांनी या चित्रपटाचा एक हिंदी टीजरही रिलीज केला आहे.\nप्रभास अॅक्शन अवतारात तर अनुष्का शेट्टी ही आधुनिक ग्लॅमरस लूक या टीजरमध्ये बघायला मिळत आहे. प्रभासने या चित्रपटात डबल रोल साकारला आहे.\nहिंदीत हा चित्रपट रेबल 2 या नावाने रिलीज केला जाणार आहे. बिल्ला याच नावाने तमिळामध्ये बनलेल्या चित्रपटाचा रिमेक होता. या आधी या चित्रपटाच्या तेलुगू व्हर्जनमध्ये एनटी रामा राव आणि तमिळ व्हर्जनमध्ये रजनीकांतने मुख्य भूमिका केली होती.\nअसे म्हटले जाते की 1978 मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट डॉन वरून या चित्रपटाचे हे दोन्ही व्हर्जन प्रेरित आहेत.\n‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर लवकरच ‘बाहुबली’\nबाहुबली प्रभासचा क्लीन शेव लुक झाला वायरल...\nदोन्ही चित्रपटांमध्ये तुलना नको : आमिर\nबाहुबलीशी लग्न करू इच्छित होती देवसेना पण...\n1600 कोटी कमाई करणार्‍या बाहुबली-2 वर पुस्तकंदेखील\nयावर अधिक वाचा :\nअनुष्का शेट्टी बिल्ला हिंदीत\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/22?page=4", "date_download": "2018-04-24T04:45:35Z", "digest": "sha1:B2WN4HRDKLQ3YKTMHHPMQDI5V2RRRSKB", "length": 6604, "nlines": 149, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कला | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग २-अंतिम\nपुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग १\nएकूण राजवटीची ओळख झाल्यावर कथानकाकडे वळू.\nनासिकरोडवरून देवळाली कँपकडे जातांना जकात नाका ओलांडल्यावर, डाव्या हाताला बेलतगव्हाणकडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याच्या पुढे 'मॅराथॉन आर्केड' या इमारतीत श्री.\nछायाचित्र : क्रिस्टीन फॉल्स\nमाउंट रेनियर नॅशनल पार्क ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील अतिशय सुंदर जागा आहे.\nमाउंट रेनियर हे मूख्य आकर्षण असले तरी तिथल्या कडेकपारीत काही छान झरेही बघण्यासारखे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे क्रिस्टीन फॉल्स.\nहाजीअली घराजवळच असल्याने येता-जाता हाजीअलीचेच फोटो टिपणे होते. विशेषत: सूर्यास्ताचे फोटो\nप्रत्यक्ष सूर्यास्तापेक्षा सूर्यास्तानंतर रंगांची, ढगांची फार छान आतषबाजी होते\nअशीच एक सूर्यास्तोत्तर संध्याकाळ\nएम ८० चा वापर\nकॅमेरा नीकॉन कूलपिक्स ९९०. ऑटो मोड अंतर १० व २० फूट\nमाऊंटन ब्लू-बर्ड (डोंगरी नीलपक्षी\nमुंबईच्या वरळी कोळीवाड्यात सागरीसेतूचे फोटो काढायला गेलो असताना तिथे एक सागरकन्या खेळताना दिसली. बालकवींच्या 'फुलराणी' सारखी\nएक सूर्यास्त - लायन्स व्ह्यू पॉईंट, लोणावळा\nलोणावळ्यापासून १२ किमि अंतरावर, ऍम्बी व्हॅली मार्गावर लायन्स व्ह्यू पॉईंट आहे. तेथील एक सूर्यास्त\nछायचित्र टिका - सोलोमन टेंपल\nहे छायाचित्र 'सोलोमन टेंपल ', बक्स्टन इग्लंड येथील आहे. बक्स्टन येथील एका लहानशा टेकडीवर वरिल छायाचित्रातील वास्तु बांधलेली आहे.\nहिंदू कादंबरीः आनंदाची बातमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://alhadmahabal.wordpress.com/tag/work/", "date_download": "2018-04-24T04:58:52Z", "digest": "sha1:S7424AN24ILXTEKM56G6J4LUFDYFMYCU", "length": 8272, "nlines": 131, "source_domain": "alhadmahabal.wordpress.com", "title": "work – आल्हादक प्रतिबिंब!", "raw_content": "\nआल्हादने लिहीलेल्या गोष्टी, कविता वगैरे वगैरे…\nइथून उचलेगिरी करू नये\nब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.\nता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.\nकुठून कुठून येतात लोकं…\nVoid वाचन सुरू ठेवा\nPosted on मार्च 16, 2012 मार्च 16, 2012 Categories EnglishTags angerश्रेण्याfathomश्रेण्याfillश्रेण्याhatredश्रेण्याlifeश्रेण्याofferश्रेण्याvoidश्रेण्याwork4 टिप्पण्या Void वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/", "date_download": "2018-04-24T04:34:03Z", "digest": "sha1:2U3I6IR2MHNQDKMBEJU56CAYR364FQ7X", "length": 30118, "nlines": 182, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "मराठी कविता संग्रह | कविता मला आवडलेल्या …..", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nPosted on एप्रिल 9, 2018 by सुजित बालवडकर\t• Posted in केदारनाथ सिंह, हिन्दी कविता\t• Tagged केदारनाथ सिंह, हिन्दी कविता\t• यावर आपले मत नोंदवा\nजब समय न मिले\nघडवीन असे मी वृत्त\nPosted on एप्रिल 9, 2018 by सुजित बालवडकर\t• Posted in ग्रेस\t• Tagged ग्रेस\t• यावर आपले मत नोंदवा\nघडवीन असे मी वृत्त\nअन करीन पाऊस इथला\nतू गळ्यात घेशील हार\nPosted on एप्रिल 9, 2018 by सुजित बालवडकर\t• Posted in संत तुकडोजी महाराज\t• Tagged संत तुकडोजी महाराज\t• यावर आपले मत नोंदवा\nराजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली\nती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥\nभूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे\nप्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥ Continue reading →\nपुस्तक : गडकिल्ले महाराष्ट्राचे\nPosted on डिसेंबर 1, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in पुस्तक, भटकंती\t• Tagged पुस्तक, भटकंती\t• यावर आपले मत नोंदवा\nपुस्तक : गडकिल्ले महाराष्ट्राचे\nलेखक : दुर्गमहर्षी प्रमोद मारुती मांडे\nफोटो – पुस्तक बिस्तक\nहरिश्चंद्रगडावरच्या स्थानिक हॉटेलधारक मित्रांना आवाहन.\nPosted on नोव्हेंबर 29, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in इतर, भटकंती\t• Tagged इतर, भटकंती\t• यावर आपले मत नोंदवा\nहरिश्चंद्रगडावरच्या स्थानिक हॉटेलधारक मित्रांना आवाहन.\nमहाराष्ट्र वनविभागाने गडावर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कचऱ्याची भीषण समस्या लक्षात घेऊन भावी काळापासून गडावर कॅम्पिंग व हॉटेल चालवण्यास बंदी घालण्याचा विचार कळवला आणि यामुळे अनुक्रमे गिर्यारोहक व स्थानिक हॉटेलधारक यांचं धाबं दणाणलं. स्थानिक हॉटेलधारक येणाऱ्या गिर्यारोहकांना त्यांच्या मोठ्या संख्येमुळे थर्माकोल किंवा प्लास्टिकच्या प्लेट्समधून खाद्यपदार्थ व चहा/ कॉफी देत असल्याने बेशिस्त पर्यटकांना आयतं कोलीत मिळालं आणि गडावर कचऱ्याचे ढिग दिसू लागले. गड कळसूबाई हरिश्चंद्र अभयारण्याच्या परिक्षेत्रात येत असल्याने व वनविभागाने हे सगळं थांबवण्यासाठी आत्तापार्यंत केलेल्या कंठशोषला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्याही संयमाचा कडेलोट झाला आणि अखेर वन्यजीव कायद्यांना अनुसरून ही कामगिरी करण्यात आली.\nअजूनपर्यंत अधिकृत नोटीस न आल्याने गडावरची हॉटेल्स चालू आहेत. यानिमित्ताने भविष्यात हरिश्चंद्रगडाला या कचऱ्याच्या व बेशिस्त पर्यटनाच्या कलियुगातून मुक्ती मिळावी म्हणून सर्व हॉटेलधारक मित्रांना समस्त गिर्यारोहकांच्या वतीने हे आवाहन. आपला मित्र भास्कर बादडने या कार्याचा शुभारंभ केलाच आहे. इतर स्थानिक मित्रांना वनविभागाला सहकार्य करण्यासाठी हे आवाहन. ह्यामुळे ट्रेकर्सचा गडाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊन वनविभागाच्या स्तुत्य उपक्रमाला हातभार लागून एक सुवर्णमध्य निघू शकतो.\nगडावर यापुढे (हॉटेल्स चालू ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतल्यास) कोणत्याही परिस्थितीत थर्माकोलच्या प्लेट्स व प्लॅस्टिकचे ग्लास चहा/कॉफी साठी वापरणं ताबडतोब बंद करा आणि स्टीलच्या भांड्यांमध्ये जेवण पुरवण्यास सुरूवात करा. तुम्ही टेंट्ससाठी पाच सहा हजार सहज खर्च करू शकता तर तेच बजेट यासाठी वापरा.\nतुमच्याकडे जेवणाची ऑर्डर देण्यासाठी ग्रुप लिडरचा फोन आल्यास त्याला त्याच्यासकट सर्व सदस्यांना आपापले ताट,वाटी, चमचा व Mug आणायला सांगा व त्याची तयारी नसल्यास ती ऑर्डर घेऊ नका. गडाची विदारक अवस्था बघता धंदा महत्वाचा नसून गडावरील वातावरण सुरळीत होणं अत्यंत गरजेचं आहे.\nअनेकदा ग्रुपमध्ये काही लोक बॅचलर असतात किंवा वेगळ्या शहरात राहत असतात ज्यांच्याकडे हे घरगुती सामान मिळू शकत नाही. अश्या लोकांसाठी तुम्ही तुमची भांडी वापरल्यास त्यांच्याकडून त्याचं नाममात्र शुल्क घ्या आणि त्यांनाच ती भांडी स्वच्छ करायला सांगा.एका ग्रुपमागे फक्त दोन किंवा तीनच लोकांना तुमच्याकडून ताट वाट्या मिळतील असं स्पष्ट सांगा म्हणजे जो उठेल तो त्याच्यासाठी या सगळ्याची सोय तुम्हाला करायला लावणार नाही.\nगडावर गोळ्या,बिस्किटं, चॉकलेट्स, वेफर्स इत्यादी प्लॅस्टिकबंद पदार्थ विकणे (जर विकत असाल तर) ताबडतोब बंद करा. कारण याचाच अतिरेक झाल्याने आज गडाकर ही कारवाई झाली आहे. हे पदार्थ ट्रेकला खाल्ले नाहीत तर कोणीही मरत नाही.\nआपापल्या हॉटेल्सच्या बाहेर पॉलिथिन बॅग्स सक्तीने लावून ठेवा आणि पर्यटकांनी (हा शब्द मुद्दाम वापरला आहे) स्वतःबरोबर आणलेलं प्लास्टिक त्यातच टाकायची कडक सूचना करा. तसं त्यांनी न केल्यास त्यांच्या पुढच्या ऑर्डर्स सरळ कॅन्सल करा (सगळ्यांनीच हे केलं तर या लोकांच्या जेवणाखाण्याची बोंब होईल). चार पैसे मिळत आहेत असा हव्यास धरलात तर हॉटेल कायमचं बंद होईल आणि तुम्ही तिथे नाही म्हणल्यावर हे सगळं नियमित करण्यासाठी वनविभागावर मनुष्यबळाचा अतिरीक्त ताण पडेल. तेव्हा वेळीच जागे व्हा. तुम्ही गिर्यारोहक आणि वनविभाग यांच्यातला स्थानिक दुवा आहात हे लक्षात ठेवा.\nपॉलिथीन बॅगमध्ये गोळा केलेला सुका कचरा रविवारी गडाखाली आणून त्याची योग्य विल्हेवाट लावा. गडावर प्लास्टिकचा कचरा जाळल्याने पर्यावरणाला नुकसान झाल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.\nआज गडाची अवस्था भयाण झाली आहे. त्यामुळे वनविभागाला सहकार्य करणं ही गिर्यारोहकांबरोबर स्थानिकांचीही समान जबाबदारी आहे आणि हॉटेलधारक हे सगळं पाळत आहेत का नाही यावर लक्ष ठेवायची जबाबदारी आपलीच आहे. गडावरील हॉटेल बंद झाल्यास रोजगाराचा प्रश्न तर उत्पन्न होणारच आहे पण बेशिस्त पर्यटनावर नजर ठेवायला मात्र तिथे स्थानिक पातळीवर कोणीही नसेल. तेव्हा आपला हरिश्चंद्रगड वाचवायची जबाबदारी आता आपली आहे. सर्वांनी एकत्र येऊन हा गोवर्धन पर्वत उचलूया आणि हरिश्चंद्राच्या देखण्या रुपयाला पुनरुज्जीवीत करूया.\nटीप : जे स्थानिक हॉटेलधारक फेसबुकवर नाहीत त्यांच्यापर्यंत हा मेसेज Whatsapp च्या माध्यमातून पोचवण्यात येत आहे.\nकाही कमेंटबहाद्दरांना नम्र विनंती : पोस्टचा मतीदार्थ लक्षात घ्यावा. काही उपयुक्त सूचना असल्यास शांतपणे कराव्यात. पण उगाच “हे कसं चुकलं. आम्हीच कसे बरोबर” असली बोटं घालून स्वतःच्या अपमानाची तरतूद करून घेऊ नका म्हणजे झालं.\nअलफाज डॉट कॉम – फारूक एस.काझी\nPosted on नोव्हेंबर 15, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in पुस्तक, फारूक एस.काझी\t• Tagged पुस्तक, फारूक एस.काझी\t• यावर आपले मत नोंदवा\nअलफाज डॉट कॉम….धम्माल कथा\nआज एक स्वप्न पूर्ण होतंय. खरंतर अलफाज डॉट कॉम काय आहे हे बरेच दिवस एक गुपित होतं. ही माझी वेबसाईट आहे असंच बऱ्याच जणांना वाटलं. या कथा आहेत अलफाज आणि त्याच्या भावविश्वाच्या. तुम्हासर्वांसाठी या कथा घेऊन आलो आहोत.\nयात माझ्यासोबत योगदान दिलं ते Yogita Dhote आणि प्रवीण लोहार या मित्रांनी. आमची ओळख फक्त फेसबुकवरची. आम्ही एकदाही भेटलेलो नाही. whatsapp हे एकमेव माध्यम. त्यांची मदत नसती तर कदाचित हे स्वप्न पूर्ण होणं शक्य नव्हतं. Masik Rugved मधून या कथा क्रमश: प्रकाशित झाल्या. आता E Sahity Pratishthan कडून ह्या कथा एका सुंदर ई बुक स्वरुपात तुमच्या समोर आणत आहोत. याचं प्रकाशन जरी १४ नोव्हेबरला असलं तरी याची खरी तारीख २१ ऑक्टोबर ही आहे. तो अलफाजचा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसाला त्याच्या अब्बूची त्याला भेट…….\nया कथा सत्य घटना असून त्यांना कथारूप देण्याचा प्रयत्न आहे.\nया कथा फक्त मुलांसाठी नाहीत, हे मी आधीच स्पष्ट केलं पाहिजे. कारण या कथा मुलांशी संबंधित असणाऱ्या सर्वांसाठी आहे. वाचून आपला अभिप्राय जरूर नोंदवा. हे पुस्तक मोफत आहे, फुकट नाही. याची जाणीव वाचकांना निश्चितच असेल. कारण यासाठी तुम्ही आपली काही मिनिटं खर्ची घालायची आहेत. एक मला कळवा, चित्रांसाठी योगिता, सुलेखनासाठी प्रवीण आणि प्रकाशनाला कळवा. आम्ही आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत.\nसादर आहे अलफाज डॉट कॉम आपल्या सर्वांसाठी.\nखूप सारं प्रेम आणि दुआ आमच्या सोबत असू दया.\nखाली दिलेल्या लिंकवर जाऊन हे पुस्तक download करून घ्या. आनंदाचं एक वर्तुळ पूर्ण करुया. आपल्या मित्र मैत्रिणी यांना शेअर करा. शिक्षक ,तरून कार्यकर्त्यांना विनंती, मुलापर्यंत हे पुस्तक पोचवा. ज्यांच्यासाठी हा अट्टाहास त्यांच्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. तुम्हीच आता आनंदाचे दूत व्हावे.\nPosted on ऑक्टोबर 16, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in ग्रेस\t• Tagged ग्रेस\t• यावर आपले मत नोंदवा\nमंदिरे सुनी सुनी, कुठे न दीप काजवा\nमेघवाहि श्रावणात ये सुगंधी गारवा\nरात्र सूर पेरुनी अशी हळूहळू भरे\nसमोरच्या धुक्यातली उठून चालली घरे\nगळ्यात शब्द गोठले, अशांतता दिसे घनी\nदुःख बांधुनी असे क्षितीज झाकिले कुणी\nएकदाच व्याकुळा प्रतीध्वनीत हाक दे\nदेह कोसळून हा नदीत मुक्त वाहू दे\nयापूर्वी तिनं इतक्या उत्कटपणे कशाचीच इच्छा केली नव्हती आणि ते सगळं इतक्या पटकन संपलं होतं. तो तिचा विरहाचा आणि दुःखाचा, जीवनातला पहिलाच अनुभव होता. - तोत्तोचान . . . #तोत्तोचान #tottochan #totto-chan #books #पुस्तक_बिस्तक #पुस्तक #tetsukokuroyanagi #tomoi\n karanda करवंदाची फुलं पहिली आणि कोकणात मार्च मधेच मे महिन्याचा फील देणारा उन्हाळा काही क्षण विसरून गेलो. आता पुढचे ट्रेक नीट plan करायला हवेत.☺ . . #karanda #sahyadri #raigad #konkan #march @makarand09 धन्यवाद\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/pmt-bus-in-pune-1658262/", "date_download": "2018-04-24T04:39:45Z", "digest": "sha1:RVFZUTH7XR5IFTSAAWI66HQF2WI7IICI", "length": 16412, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PMT bus in Pune | ‘दीडवाहने’ शहर.. | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nसरकार आणि सरकारी यंत्रणा अत्यंत पारदर्शक आहेत\nसरकार आणि सरकारी यंत्रणा अत्यंत पारदर्शक आहेत; इतक्या की त्या पाण्यासारख्याच आहेत. हे कुणा संताचे, विद्वानाचे किंवा गेलाबाजार कुणा अन्य लेखकाचे मत नसून आम्हीच ते लकडीपुलावरून गरवारे उड्डाणपुलाकडे तोंड आणि अलका टॉकीजकडे पाठ करून मांडणार आहोत. दिवसाच्या कोणत्याही क्षणी आम्ही हे शब्द उच्चारले, तरी पाचेक हजार माणसे आणि त्यांच्या दीडपट संख्येने- म्हणजे साडेसात हजार वाहने आमच्या आगेमागे असतीलच. ऐकणाऱ्यांपैकी बरेचजण आमच्याच शहरातले, त्यामुळे ‘या इथल्या मुळामुठेच्या पाण्यासारखं अस्तं की काय सरकार’ अशी पृच्छा येणारच. त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही आमच्या व्याख्यानाचा उत्तरपक्ष सुरू करणार. म्हणजे गरवारे उड्डाणपुलाकडे पाठ फिरवणार आणि दूर ज्ञानप्रबोधिनीचे घुमट झाकणाऱ्या एखाद्या जाहिरातीच्या बोर्डाकडे नजर लावून म्हणणार, ‘दोष रहिवाशांचा आहे..’ एव्हाना समोरच्या गर्दीत एकच हलकल्लोळ.. पण आम्हीही खमकेपणाने सुरूच ठेवणार..\nहोय, पुणे आणि परिसरात तर सर्व सरकारी, निमसरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यंत्रणाही पारदर्शकच आहेत. काही तर इतक्या पारदर्शक आहेत की दिसतच नाहीत. खोटे वाटत असल्यास बालगंधर्वच्या पुलावरून उजवीकडे मनपाच्या दिशेने पाहा. जोशी वडेवाले दिसतील, पण मनपा नाही दिसणार. आता हडपसरपासून औंधपर्यंत कुठेही पाहा.. ‘पीएमटी’ची (नवे नाव ‘पीएमपीएमएल’)बस दिसते ज्याअर्थी मनपा, पुण्यात वाहतुकीसह अन्य कित्येक लोकोपयोगी कार्याचा डोंगर रचणारी आणि बसगाडय़ाही बाळगणारी पीएमटी, हे दिसत नाही आणि तरी ते ‘आहे’; त्याअर्थी ते पारदर्शकच आहे. सर्वानाच वाट पाहण्यातला संयम शिकवून धीरोदात्त करून टाकणारी ही यंत्रणा आहे. तिचे वाहक प्रवाशांना येताजाता सौजन्याचे सर्वागीण धडे देत असतात आणि तिचे चालक तर, पादचारी वा अन्य वाहनांचे चालक हे मानवासारखेच दिसत असले तरी त्यांचा अथवा त्यांच्या कुटुंबीयांचा जगातील कोणत्या प्राण्याशी कसा संबंध आहे हे अचूक ओळखून तेथल्या तेथे संबंधितांना सांगणारे मानववंशशास्त्रज्ञच होत. ही मानववंशशास्त्रीय सल्ल्याची मोफत सेवा घेण्यासाठी आपण फक्त पीएमटी बसच्या दृष्टिपथात यायचे. या सेवेबाबत पुण्याचे रिक्षाचालकच पीएमटीशी स्पर्धा करू शकतील, पण या रिक्षाचालकांनी आधीच वेळ आणि अंतर यांच्या स्पर्धेची जबाबदारी रिक्षाच्या मीटरवर सोपवलेली असते. शिवाय गिऱ्हाइक नवखे असले, तर रिक्षाचालकही नवथरपणे बावरून, रस्ता शोधतच गाडी हाकतात. इतकी पारदर्शक सार्वजनिक वाहतूक यंत्रणा या शहरात असूनदेखील येथील रहिवासी स्वतच्या वाहनांचा सोस करतात. त्या चैनीसाठी बँका कर्जे देतात, वाहनविक्रेते सवलतीही देऊ करतात. याच कारणाने, ‘दोष रहिवाशांचा आहे..’\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nतोही इतका की, पुण्यातली वाहनसंख्या २०१७-१८ या आर्थिक वर्षांत तीन लाखाने वाढून लोकसंख्येपेक्षा जास्त झाली. किती जास्त माणसांच्या संख्येपेक्षा सुमारे दीडपट अधिक. या शहरातल्या रहिवाशांना दीडशहाणे म्हटलेले आम्हांसही खपत नाही. पण आता ‘दीडवाहने’ म्हटलेले खपवून घ्यावे लागेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाणार प्रकल्प विदर्भात आणा: भाजपा आमदाराची मागणी\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/radheshyam-mopallars-inquiry-committees-clean-chit-275760.html", "date_download": "2018-04-24T05:06:46Z", "digest": "sha1:ZG6BETRXTK7E35JJOXAK7I7JMQLNQMQW", "length": 12532, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राधेश्याम मोपलवारांना चौकशी समितीची क्लीन चिट, सेवेत परतणार ?", "raw_content": "\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : अस्सा होता आपल्या 'सचिन'चा सुरुवातीचा प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nराधेश्याम मोपलवारांना चौकशी समितीची क्लीन चिट, सेवेत परतणार \nसमृद्धी हायवे जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना चौकशी समितीने क्लीन चिट दिली आहे.\n01 डिसेंबर : समृद्धी हायवे जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना चौकशी समितीने क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे मोपलवार पुन्हा सेवेत परतणार आहे.\nसमृद्धी हायवे जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात राधेश्याम मोपलवार यांची दलालासोबतची एक ऑडिओ क्लिप व्हारयल झाली होती. मोपलवार यांच्या 'सेटलमेंट'चा आरोप होतोय. या आरोपानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. विरोधकांच्या दबाबमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅगस्ट 2017 मध्ये मापेलवार यांच्यावर एक चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने आता आपला अहवाल दिलाय. या अहवालात कथित आॅडिओ क्लिपमध्ये छेडछाड करण्यात आलीये असा निष्कर्ष चौकशी समितीने काढलाय.\nचौकशी समितीने मोपलवार यांना क्लिन चिट दिल्यामुळे मोपलवार यांचा सेवेत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, विरोधकांनी यावर आक्षेप घेतला असून चौकशी समिती निव्वळ फार्स होती. मोपलवार यांना क्लिन चिट देण्यासाठी ही चौकशी समिती होती असा आरोप काँग्रेसने केलाय.\nहीच ती मोपलवारांची वादग्रस्त 'आॅडिओ क्लिप'\nराधेश्याम मोपलवारांची कुंडली काय सांगतेय\nराधेश्याम मोपलवार यांना पदावरून हटवलं ; 'आयबीएन लोकमत' इम्पॅक्ट\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: radheshyam mopalwarSamruddhi highwayनागपूर मुंबई समृद्धी महामार्गमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळराज्य रस्ते विकास महामंडळराधेश्याम मोपलवार\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://nokarimargadarshan.blogspot.com/2013/05/199.html", "date_download": "2018-04-24T04:43:31Z", "digest": "sha1:EANWR6LJMCQKXBFIBNHCWC7R2SHI74XR", "length": 12085, "nlines": 206, "source_domain": "nokarimargadarshan.blogspot.com", "title": "नोकरी मार्गदर्शन: मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर 199 जागा", "raw_content": "मराठी नोकरी मार्गदर्शन केंद्र = रोजगार / नोकरी मार्गदर्शन - मराठीत् नोकरी संदर्भ\nनोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या\nमुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर 199 जागा\nमुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर स्टुडिओ टेक्निशियन (1 जागा), संशोधन सहायक- उपयोजित मानसशास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-राज्यशास्त्र व नागरिक शास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-अर्थशास्त्र (2 जागा), संशोधन सहायक-संस्कृत (1 जागा), संशोधन सहायक-विधी (2 जागा), संशोधन सहायक-समाजशास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-भाषाशास्त्र (1 जागा), कनिष्ठ लघुलेखक (9 जागा), अभिलेख सहाय्यक (2 जागा), सांख्यिकी लिपिक (1 जागा), वीजतंत्री (2 जागा), सुतार (1 जागा), मिस्त्री -बांधकाम (1 जागा), कनिष्ठ टंकलिपिक -सा. प्र. (140 जागा), कनिष्ठ टंकलिपिक - वि.व.ले. (25 जागा), यांत्रिकी नि वाहनचालक (1 जागा), दूरध्वनी चालक (2 जागा), दूरध्वनी परिचर (1 जागा), अर्हताप्राप्त परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल २०१३ आहे.\nयासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 28 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nअधिक माहिती व अर्ज http://www.mu.ac.in/Careers.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nपोस्टात 1,349 जागा रिक्त; जानेवारीपर्यंत होणार भरती\nकेंद्र व राज्य शासनाच्या विवीध विभागांमध्ये हजारो पदांची भरती\nजिल्हाधिकारी कार्यालय परभणी मध्येतलाठी, लिपिक, शिपाई पदांची भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2013 जिल्हाधिकारी कार्यालय य...\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती प्रादेशिक निवड समिती मार्फत जलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये सरळ ...\nसार्वजनिक बांधकाम विभागात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 10 जागा महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ...\n19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नांदेडला सैन्यभरती मेळावा\nमध्य रेल्वेमध्ये ग्रुप डी मधील 905 जागांची भरती\nमध्य रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये माजी सैनिक कोट्याअंतर्गत ग्रुप डी मधील 905 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंत...\nजळगाव जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांच्या 227 जागा\nजळगाव जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक-टंकलेखक 89 जागा आणि तलाठी 138 जागा एकूण 227 पदे. ऑनलाईन अ...\nभारतीय हवाई दलात ( Indian Air Force ) ग्राऊंड ड्युटी विभागात नोकरीच्या संधी\nभारतीय हवाईदलामधील हवामान विभागात ग्राऊंड डयुटी विभागात पर्मनंट कमिशन तसेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये अधिकारीपदासाठी भरती केली जाणार आहे....\nभारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ग्रुप मध्ये परिवीक्षा अधिकारी (Probationary Officers) पदाच्या एकूण 1837 जागा . Age Re...\nजिल्हा निवड समिती (1)\nतक्रार निवारण प्राधिकारी (1)\nरयत शिक्षण संस्था (1)\nऔरंगाबाद येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्य...\nपुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये 38 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये परिचार...\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन वि...\nमुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर 199 जागा\nराष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरमध्ये 34 जागा\nकस्टम्स आयुक्त (जनरल) कार्यालयात खेळाडूंसाठी कर सह...\nभंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 541 जागा\nपुणे येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालया...\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत 58 जागा\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत अपंगांसाठी 8 जाग...\nभारतीय रिजर्व बँकेत खेळाडूंसाठी सहायकाच्या (50 जाग...\nभंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 541 जागा\nपुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत 17 ज...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्य...\nटाटा मूलभूत संशोधन संस्थेत 13 जागा\nउस्मानाबाद जिल्हा परिषदेत अपंग अनुशेष अंतर्गत 8 जा...\nमहाराष्ट्र शासनानाच्या उद्योग संचालय\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3181", "date_download": "2018-04-24T04:47:55Z", "digest": "sha1:F2GHYRHL3RFMSPXB3V5DBLSGTM562ONH", "length": 28298, "nlines": 136, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आसाराम बापू - एक कल्ट | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआसाराम बापू - एक कल्ट\nआसाराम बापू हे एक गंभीर प्रकरण आहे. ते आध्यात्मिक, व्यावहारिक, व्यावसायिक किंवा भोंदू किती ते स्वत:ला आणि काही अंशी इतर त्यांना हिंदू धर्माचे रक्षक, प्रसारक मानतात. एकंदरीतच त्यांच्या सत्संगातून, प्रवचनातून आध्यात्मिक खोली किंवा अध्यात्मावर अभ्यासपूर्ण विवेचन दिसत नाही. त्याच्या विरोधात अनेक घटना गेल्या काही वर्षात समोर आलेल्या आहेत. आसाराम बापुंचा समुदाय हा कल्ट या प्रकारात मोडतो का ते स्वत:ला आणि काही अंशी इतर त्यांना हिंदू धर्माचे रक्षक, प्रसारक मानतात. एकंदरीतच त्यांच्या सत्संगातून, प्रवचनातून आध्यात्मिक खोली किंवा अध्यात्मावर अभ्यासपूर्ण विवेचन दिसत नाही. त्याच्या विरोधात अनेक घटना गेल्या काही वर्षात समोर आलेल्या आहेत. आसाराम बापुंचा समुदाय हा कल्ट या प्रकारात मोडतो का उपक्रम सदस्यांपैकी कोणी त्याचे अनुयायी आहेत का उपक्रम सदस्यांपैकी कोणी त्याचे अनुयायी आहेत का असल्यास जरुर कळवा मला त्यांना अनेक प्रश्न समक्ष भेटून विचारयचे आहेत.\nउपक्रम सदस्यांपैकी कोणी त्याचे अनुयायी आहेत का \n रिटे आणि यना. ;-) स्वारी रिटे, यना आणि इतर सर्वांनी हलकेच घ्या.\nअसो. उपक्रमावर आसारामबापूच कशाला इतर कोणा बाबा-बुवांचे अनुयायी नसावेत असे वाटते. कल्टवर दिलेला दुवा चांगला आहे. अजून विस्तारीत करता येईल. बाबाबुवांच्या आणि बापूंच्या चर्चा उपक्रमींना आवडतात असे वाटते.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.महेंद्र यांनी प्रश्न विचारले आहेत त्यांची माझ्या समजुतीप्रमाणे उत्तरे:\n*प्रश्नः-आसाराम बापू हे आध्यात्मिक, व्यावहारिक, व्यावसायिक किंवा भोंदू किती \nउत्तरः--आध्यात्मिक अत्यल्पप्रमाणात; व्यावहारिक,व्यावसाईक मोठ्या प्रमाणात;\nप्रश्नः--आसाराम बापूंचा समुदाय हा कल्ट या प्रकारात मोडतो का \nउत्तरः--(तुम्ही दिलेला संदर्भ धागा वाचून) हो.\nप्रश्नः--उपक्रम सदस्यांपैकी कोणी त्याचे अनुयायी आहेत का \nश्री.महेंद्र यांनी संदर्भ दिलेला श्री.विजय कुलकर्णी यांचा लेख अभ्यासपूर्ण आणि वाचनीय आहे.\nचीड येत नाही का\nबाबासाहेब जगताप [10 Mar 2011 रोजी 10:43 वा.]\nबाबाबुवांच्या आणि बापूंच्या चर्चा उपक्रमींना आवडतात असे वाटते.\nमॅडम हा मनोरंजनाचा किंवा आवडीनिवडीचा विषय नव्हे. लाखो लोकांना नाडणारे हे महाभोंदू आणि त्यांचे कारनामे पाहून चीड येत नाही का तुम्हाला\nमॅडम हा मनोरंजनाचा किंवा आवडीनिवडीचा विषय नव्हे. लाखो लोकांना नाडणारे हे महाभोंदू आणि त्यांचे कारनामे पाहून चीड येत नाही का तुम्हाला\n आसारामबापू किंवा इतर कोणी बुवाबाबा माझ्या कुटुंबातील लोकांना नाडत नाहीत किंवा माझे कुटुंबीय त्यांच्याकडे जात नाहीत. या लेखानुसार हे विश्वचि माझे घर असे म्हणणे म्हणजे 'तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे' असे आहे तेव्हा मला जगाच्या किंवा लाखो लोकांच्या चिंतेने चीड का बरे यावी असे म्हणणे म्हणजे 'तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे' असे आहे तेव्हा मला जगाच्या किंवा लाखो लोकांच्या चिंतेने चीड का बरे यावी तसेही ही काही उपक्रमावरली बाबा-बुवांची पहिली चर्चा नाही. अशा चर्चा दर महिन्या-दोन महिन्यांनी उपक्रमावर येत असतात.\nचीड येण्यालायक जगात काय कमी विषय आहेत - म्याडमसमोर झुकणारे एअर-इंड्याचे जुने मानचिन्ह पगडीधारी महा\"राजा\", राजा शब्द उच्चारला की आठवणारे ए. राजा, दिल्लीत त्या मुलीला गोळी घालून मारताना काही लोक तमाशा बघण्यात दंग होते, नेदरलँडसमोर आपली टीम ढेपाळते. बरे ते जाऊ द्या भरभक्कम टॅक्स देऊन आमच्या इथल्या रस्त्यांवर इतके खड्डे झाले आहेत की टायर पंक्चर होऊन फटका बसेल का ही रोज चिंता पडलेली आहे. चीड येतेच. आज कारमध्ये गॅस भरला ३.४५/ गॅ. च्या भावाने. निसर्ग तरी कसला बदमाश... जरा तापमान वर जात होतं तर आज पुन्हा स्नो होणार असं भाकित आहे. बरं स्नो होईल असेही नाही कारण हवामानखाते निसर्गापेक्षा लहरी असते म्हणे.\nआता सांगा किती आणि कुठे कुठे चिडत राहायचं चिडण्याचे दुष्परिणाम असतात ना चिडण्याचे दुष्परिणाम असतात ना विज्ञान चीडप्रतिबंधक लस काढेल ना तेव्हा मनमोकळे चिडेन हं मी सर्वांवर विज्ञान चीडप्रतिबंधक लस काढेल ना तेव्हा मनमोकळे चिडेन हं मी सर्वांवर ;-) तोपर्यंत चिडून, उगीच रक्तदाब वगैरे मागे लागेल आणि मग उर्वरित आयुष्य गोळ्या खात जगावे या भीतीत राहून कशाला जगायचे\nपुढला मुद्दा आवडनिवडीचा, मागे एकदा बापूंच्या चर्चेत रिटेने विचारले होते \"येणार का कोणी स्टींग ऑपरेशनसाठी माझ्याबरोबर\" एक पठ्ठा पुढे आला नाही उपक्रमावरला. तेव्हा या बाबाबुवांच्या चर्चा भरल्यापोटी, सुपारी-मुखवास चघळत करण्यासाठीच येतात इथे. जसे दुपारच्या वेळात काही गृहिणी सास-बहु मालिका पाहून टिपे ढाळतात तसाच बुवा-बाबांच्या चर्चा हा उपक्रमींच्या टैमपासाचा विषय आहे.\nबाबासाहेब जगताप [11 Mar 2011 रोजी 11:32 वा.]\nजसे दुपारच्या वेळात काही गृहिणी सास-बहु मालिका पाहून टिपे ढाळतात तसाच बुवा-बाबांच्या चर्चा हा उपक्रमींच्या टैमपासाचा विषय आहे.\nअतिशय झणझणीत अंजन घातलेत. सगळ्या उपक्रमाविषयीच आता मळभ दाटून येते आहे......\n काय भोंदूपण आहे त्यांच्यात मी त्यांची अनुयायी नाही.\nपण जरा शोध घेतला तर काही गोष्टी सापडल्या जसे - या संत विभूतींवर काही आरोप झाले पण ते खोटे होते हे सिद्ध झाले.\nतांत्रीक सुखरामने सांगितले की हा अघोरी आश्रम आहे. पण हा आरोप खोटा होता. आणि हा माणूस फालतू असून त्याने अनेकांवर असे वाटेल ते आरोप केले आहेत. एका जिल्हाधिकार्‍यांवरही त्याने बेसलेस आरोप केले होते. खोटे आरोप केले म्हणून हा माणूस आता गजाआड आहे.\nस्टिंग ऑपरेशन - स्टिंग ऑपरेशन करणार्‍या लोकांचे खरे स्वरूप उघड झाले आहे. त्यांनी सनसनसाठी बातम्यांसाठी हे केले होते हे ही कबूल केले आहे.\nभुखंड प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे. पण कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. सिद्ध होई पर्यंत त्यांना दोषी कसे मानता येईल\nबालमृत्यु - यातून सी आय डी ने त्यांना एप्रिल २०१० मध्येच दोषमुक्त केले आहे.\nही सर्व माहिती Asaram Bapu विकीपिडीयावर आहे.\nआसाराम बापूंचा आश्रम गोरगरीबांना अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण अशी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे असे त्यांच्या आश्रमातील काही लोकांशी बोलल्यावर जाणवले. शिवाय भारतीय औषधांवर तेथे काम सुरु आहे असेही समजले. आश्रमात पूर्वग्रह बाजूला ठेऊन एकदा भेट द्या. न पटल्यास परत जायची सक्ती थोडीच असते हवी असलेली माहिती फर्स्त हँड मिळेल.\nमाझा स्वतःचा कोणत्याही चेनलवर विश्वास उरलेला नाही. काहीही दाखवतात हे लोक.\nस्वतःला काहीही माहिती नसतांना कुणावरही आरोप करायला कसे जमते\nस्लीपर सेल ऍक्टिवेट झालेले बघणे मजेशीर असते.\nस्वतःला काहीही माहिती नसतांना कुणावरही आरोप करायला कसे जमते\nहा प्रश्न विचारू नये. ते सर्वांना जमतेच. दुसर्‍यावर स्वत:च्या भावना लादून तो असाच आहे किंवा ती अशीच आहे हे म्हणणे अगदी सोपे असते, त्यासाठी पुरावे लागत नाहीत. (याचा अर्थ मी बापूंची समर्थक आहे असा घेऊ नये, मला हे बापू काळे का गोरे, तेही माहिती नाही).\nकल्टबद्दल बोलण्यात विशेष अर्थ नाही. कल्ट असणे हे आपण होऊन फारसे वाईट नसावे.\nतेव्हा आसारामबापू कल्ट आहे, म्हणून जाऊ नका, असे म्हणण्यापेक्षा लोक तेथे का जातात - त्यांच्या नक्की कोणत्या गरजा या आश्रमांमध्ये भागतात ज्या बाहेर भागत नाहीत - ह्या गरजा वाईटच असतील असेही म्हणण्याचे कारण नाही - हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आसारामबापू ही व्यक्ती कशी आहे हे माहिती नाही. लोकांच्या डोक्यात, हृदयात कसलीतरी तृष्णा असते. त्या तृष्णेला शांत करायला काही ना काही लागते. कधीतरी तृष्णा एवढी मोठी असते की ती शांत करायला कसलीतरी व्यसनेच लागतात. तेव्हा असे अनेक बापू गेले तरी कोण ना कोणीतरी त्यांची जागा घ्यायला येणारच. हे एकेका बापूंच्या मागे लागण्यापेक्षा ही व्यसने कशी काबूत आणावीत हा प्रश्न असला पाहिजे. व्यसनांवर उपाय म्हणजे व्यसने बंद करायला लावणे, त्याचे साईड इफेक्टस झेलता यावे याची तयारी ठेवणे आणि काही चांगल्या कामात मन लावणे*. व्यसनी लोकांचा तिरस्कार करून हे काम यशस्वी होणार नाही. व्यसनी लोक व्यसने का करतात याचा खुलासा इथले काही लोक असा काहीसा करताना दिसतात की लोकांना बुद्धी नसते, किंवा असते ती लहानपणापासून भरवलेल्या देवाच्या कल्पनांनी भ्रष्ट झालेली असते, मंद झालेली असते. पण याहून वेगळी कारणे असू शकतात असे वाटते. लोकांना पर्याय नसतात असे वाटते. त्यांना अशा ठिकाणी असे सपोर्ट ग्रूप मिळत असावेत जे एरवी मिळत नसावेत. जे लोक व्यसनी लोकांना या व्यसनांपासून मुक्ततेसाठी जास्तीचे पर्याय देणार नाहीत, सपोर्ट देणार नाहीत, त्यांचे या विरुद्ध बोलणे नुसतेच बोलणे ठरेल.\n*उपक्रमावर लिहीणे, मिपावर लिहीणे हेही माझ्यासाठी एक व्यसनच. ते कमी करण्याची इच्छा आहे\nकल्ट असणे हे आपण होऊन फारसे वाईट नसावे.\nह्या गरजा वाईटच असतील असेही म्हणण्याचे कारण नाही\nव्यसन या शब्दाच्या व्याख्येतच वाईटपणा अध्याहृत असतो असे वाटते.\nव्यसनी लोक व्यसने का करतात याचा खुलासा इथले काही लोक असा काहीसा करताना दिसतात की लोकांना बुद्धी नसते, किंवा असते ती लहानपणापासून भरवलेल्या देवाच्या कल्पनांनी भ्रष्ट झालेली असते, मंद झालेली असते. पण याहून वेगळी कारणे असू शकतात असे वाटते. लोकांना पर्याय नसतात असे वाटते. त्यांना अशा ठिकाणी असे सपोर्ट ग्रूप मिळत असावेत जे एरवी मिळत नसावेत.\nकाहींना कोणत्याही आधाराची आवश्यकता नसते, त्यांच्यापेक्षा या लोकांना मंदबुद्धीचे ठरविले तर त्यात चूक ते काय\nसंस्थळांवर आल्यामुळे काही नुकसान (उदा. नोकरीधंद्याकडे दुर्लक्ष किंवा संस्थळांवर शक्य असलेली फसवणूक) होत नसेल तर त्याला व्यसन म्हणू नये असे मला वाटते.\nडार्क मॅटर यांनी काही काळापूर्वी उल्लेख केला होता की इतरांनी माती खाल्ली तरी आम्हाला आनंदच होतो. या आनंदप्राप्तीस क्रौर्य म्हणता येईल, त्यासाठी उपक्रमवर येणार्‍यांना स्वार्थी, लोभी, इ. दूषणे द्यायची तर द्यावी परंतु त्यालासुद्धा व्यसन म्हणू नये असेही मला वाटते.\nव्यसन या शब्दाच्या व्याख्येतच वाईटपणा अध्याहृत असतो असे वाटते.\nजरी बर्‍याचदा वाईटपणा अध्याहृत असला तरी समानशीले व्यसनेषु सख्यम् वगैरे आपण ऐकतोच. ते वाईट अर्थाने असते असे नाही. व्यसन याचा एक अर्थ Devoted attachment or intent application to. असाही आहे.\nकाहींना कोणत्याही आधाराची आवश्यकता नसते, त्यांच्यापेक्षा या लोकांना मंदबुद्धीचे ठरविले तर त्यात चूक ते काय\nव्यसन याचा एक अर्थ डिवोटेड अटॅचमेंट असा असला तर आहेच ना संकेतस्थळांवर येऊन लिहीण्याची ही खाज नसती तर कशाला प्रतिसाद दिला असता हा\nआणखी काही मुद्दे आणि प्रश्न\nv=GNoyfFCzLQo हे कशाचे लक्षण आहे \n२. आसाराम बापूचा मुलगा नारायण साई ने दुसरा स्वतंत्र आश्रम का सुरू केला \n३. बापूच्या मुलीचा काडीमोड का झाला \n५. त्यांच्या सुरतमधील आश्रमावर बुल्डोझर का फिरवण्यात आला \n६. पुण्याच्या केळगाव आळंदी येथील आश्रमातर्फे जमीन खरेदी करुन सोसायटी स्थापन करण्यासंदर्भात घेतलेली रु. ७०,००० प्रत्येकी, त्याचे गेल्या ८/१० वर्षात काय झाले. लोकांना त्याची जमिन किंवा पैसे काहीच परत मिळाले नाही. हा कसला प्रकार म्हणायचा \n७. आश्रमातील दोन वाघेला नामक मुलांचा संशयास्पद म्रुत्यू झाला, त्याच्या चौकशी संदर्भातील केस न्यायालयात असताना, ते न्यायालयात का हजर होत नाहीत\n८. आसाराम बापूंनी नार्को टेस्ट का नाकारली ज्याला कर नाही त्याला डर कशाला \n९. एकुणच हे बाबा बुवा काश्मिर सारख्या गंभीर आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवण्यासाठी आपली अध्यात्म शक्ती का वापरत नाहीत लोकांच्या वैयक्तीक प्रश्नातच फक्त ते का लक्ष घालतात\n१०. पुण्यात (केळगाव, आळंदी ) झालेल्या त्याच्या \"सत्संगात\" आलेला पाऊस लगेच थांबला. तो ही आपणच थांबवला हे सांगायला ते विसरले नाहीत. ते जगद्नियंते आहेत का\n११. बापुच्या आश्रमाबाहेर कंडोमची पाकिटे कशी सापडतात\n१२. चमत्काराने निर्माण केलेल्या वस्तू या हातात मावण्या इतक्याच कश्या असतात\nजरा आपली सदसद विवेक बुद्धी जागी ठेवली. तर्क संगत विचार केला आणि आपली मते निसर्ग नियमांबरोबर ताडून पाहिली की मग हा साधू खरा की भोदू हे ओळखायला वेळ लागणार नाही.\nआसाराम बापूच्या आश्रमाच्या वेबसाईट चा वर उल्लेख झाला. ही वेबसाईट अमेरिकेतुन चालते. आपण त्याचे DNS record तपासू शकता. आणि त्यांच्या संस्थेचा उल्लेख Incorporation असा करण्यात आला आहे.\nआसाराम बापू .. अगाध लीला..\nविठ्ठल् विठ्ठल विठ्ठला.. हरि ॐ विठ्ठला...\nहे कधी 'त्या' भेसूर आवाजात ऐकलं आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://siddharthpuraniks.blogspot.com/p/blog-page_02.html", "date_download": "2018-04-24T04:44:28Z", "digest": "sha1:CKFV3NLMY543FMEB26TXQE3XVLZWJNWS", "length": 1901, "nlines": 19, "source_domain": "siddharthpuraniks.blogspot.com", "title": "Cobweb by Siddharth: मराठी ब्लॉगसूची", "raw_content": "\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमी सिध्दार्थ पुराणिक,मनातले काही विचार,काही अनुभव मूर्त स्वरुपात यावे,काही आठवणीत राहावेत म्हणून ब्लॉग लिहायला सुरुवात केली,बघू कसे जमते ते.ही विचारांची गुंतागुंत होईल जरा कोळीष्टकासारखी,सुंदर,पण अडकवून ठेवणारी विषयाचे बंधन नसलेली,पण संयत.. येथे आल्याबद्दल धन्यवाद,सूचना, सुधारणांचे स्वागत..स्तुती आणि टीका दोन्ही नावासकट असली तर मजा येते..अनामिक सूचनांमध्ये ती मजा नाही...हो ना\nआलो कुठून कोठे तुडवीत पायवाट \nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.punezp.org/nivida.html", "date_download": "2018-04-24T04:33:31Z", "digest": "sha1:UGCSJVNNX75DO6NY3GWFRWNOVPXNTSL7", "length": 2099, "nlines": 40, "source_domain": "www.punezp.org", "title": " Zilla Parishad Pune", "raw_content": "\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nअ.क्र विभागाचे नाव निविदा डाउनलोड लिंक\n1 देखभाल दुरुस्ती कक्ष (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग)\nहातपंपाचे जुने साहित्यांचा लिलाव\n2 महिला व बालकल्याण विभाग\nभारत सरकार | महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे | NIC ई-मेल | जि. प. ई-मेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2008/10/14/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-2/", "date_download": "2018-04-24T04:30:54Z", "digest": "sha1:LXNNY6XU2T37Y2JLNKODGV3EJ5LCYKAA", "length": 32864, "nlines": 525, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "उपचार वातविकारांवर | Abstract India", "raw_content": "\n(डॉ. श्री बालाजी तांबे)\nसर्वसामान्यपणे ज्यात सांधे दुखतात तो “संधिवात’ असे मानले जात असले, तरी सांधेदुखीने त्रस्त व्यक्‍तीवर योग्य उपचार होण्यासाठी नेमके निदान होणे आवश्‍यक असते. …….\nज्याच्या नावातच वात आहे, असा हा रोग वातविकारांपैकी एक आहे. सर्वसामान्यपणे ज्यात सांधे दुखतात तो संधिवात असे मानले जात असले तरी सांधेदुखीने त्रस्त व्यक्‍तीवर योग्य उपचार होण्यासाठी नेमके निदान होणे आवश्‍यक असते. हे निदान करण्यासंदर्भात आयुर्वेदाने अत्यंत बारकाईने मार्गदर्शन केलेले आहे.\nहन्ति सन्धिगतः सन्धिन्शूलशोफौ करोति च \nजेव्हा सांध्यांमध्ये वातदोष वाढतो तेव्हा संधिवेदना व सूज निर्माण करतो.\nएखादाच सांधा दुखणे व सगळे सांधे दुखणे असे याचे दोन प्रकार आहेत. यातील पहिला प्रकार म्हणजे एखादा सांधा दुखण्याचे प्रमाण खूप मोठे असल्याचे दिसते. घोटा दुखणे वा गुडघे दुखणे, मान वा कंबर दुखणे अशा सर्व तक्रारी वाताने त्या त्या ठिकाणी बस्तान बसविल्याच्या निदर्शक असतात. आजकाल दिवसेंदिवस कमी वयातही असा त्रास होण्याचे प्रमाण वाढताना जाणवते आहे.\nसगळे सांधे दुखणे हा विकार खूपच त्रासदायक असतो. वेळेवर योग्य उपचारांच्या अभावी हा रोग व्यक्‍तीला अंथरुणावर खिळवून ठेवू शकतो. अशा व्यक्‍तीत फक्‍त सांध्यातच नाही तर एकंदर सर्व शरीरात वातदोष मोठ्या प्रमाणात वाढल्याची लक्षणे दिसत राहतात.\nयुगपत्‌ कुपितौ अन्त त्रिकसन्धिप्रवेशकौ \nस्तब्धं च कुरुतो गात्रनामवातः स उच्यते \nजेव्हा आमदोष व वातदोष हो दोघे एकत्रित रीत्या कुपित होतात तेव्हा ज्या ज्या सांध्यात आमापाठोपाठ वातदोष जातो त्या त्या ठिकाणी हालचाल बंद करवतो, जखडण निर्माण करतो. या विकाराला आमवात असे म्हणतात.\nसंधिवातात सांध्यांमध्ये वातदोष असतोच पण आमवातामध्ये या दोघांच्या जोडीला आमही असतो. म्हणूनच आमवात बरा होण्यास दुष्कर व चिवट रोग समजला जातो. यात सुरुवातीला ताप येणे, अंग जड होणे, सांधे जखडणे अशी लक्षणे असतात. क्रमाक्रमाने जखडणाऱ्या सांध्यांची संख्या व तीव्रता वाढत जाते, सांध्यांवर सूज असणे, सांधा स्पर्शाला गरम लागणे, तीव्र वेदना होणे, स्पर्शही सहन न होणे ही आमवाताची लक्षणे असतात. आमवाताचे वैशिष्ट्य म्हणजे आम ज्या सांध्यात जाईल तेथे वेदना होतात. म्हणून बऱ्याचदा आमावातात फिरत्या वेदना असतात.\nप्राक्‍पादौ तदनु प्रधावति वपुकण्ड्‌वार्तिसुप्त्यादयः \nकुपित झालेला व अवरोध झालेला वायू दूषित रक्‍तासह मिळून प्रथम पायाचा आश्रय घेतो व नंतर संपूर्ण शरीरात धावतो. यामध्ये सांध्यांच्या ठिकाणी वेदना, खाज व बधिरता ही लक्षणे जाणवतात.\nप्रत्यक्षातही पायाच्या किंवा हाताच्या अंगठ्यापासून याची सुरुवात होताना दिसते. सांध्यांच्या ठिकाणी लालसरपणा, वेदना, सूज ही लक्षणे दिसतात. क्रमाक्रमाने ही लक्षणे घोटा, गुडघा अशी वर वर सरकतात.\nवातशोणिजः शोथो जानुमध्ये महारुजः \nज्ञेयः क्रोष्टुकशीर्षस्तु स्थूलः क्रोष्टुकशीर्षवत्‌ \nक्रोष्टुक म्हणजे कोल्हा. सूजेमुळे गुडघा कोल्ह्याच्या डोक्‍याप्रमाणे दिसू लागतो तो रोग म्हणजे क्रोष्टुकशीर्ष.\nहा रोग फक्‍त गुडघ्यांपुरताच मर्यादित असतो व ह्यात रक्‍तधातूच्या जोडीने वात कुपित झालेला असतो.\nरक्‌पादे विषमे न्यस्ते श्रमाद्वा जायते यदा \nपाऊल चुकीच्या पद्धतीने टाकल्याने किंवा अत्यधिक परिश्रम करण्याने जेव्हा वात गुल्फसंधीचा म्हणजे घोट्याचा आश्रय घेतो तेव्हा त्याला वातकंटक म्हणतात.\nअंसदेशे स्थितो वायुः शोषयित्वा अंसबन्धनम्‌ \nअंस म्हणजे खांदा. खांद्यामध्ये जेव्हा वायू कुपित होतो व तेथील संधिबंधनांना सुकवतो तेव्हा त्याला अंसशोष म्हणतात. तर तिथल्या शिरा आखडल्यामुळे जेव्हा हात उचलता येत नाही तेव्हा त्याला अवबाहुक असे म्हणतात.आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये याप्रकारे सांधा सुकणे व जखडणे हे फक्‍त खांद्यांच्या संदर्भात सांगितले असले तरी ते इतर सांध्यांच्या बाबतीतही घडू शकते. विशेषतः आजकाल मांडी व कंबरेच्या सांध्यांच्या ठिकाणी रक्‍तप्रवाह पोचणे बंद होऊन तीव्र वेदना, चालता न येणे यासारखी लक्षणे असणारा रोग तरुण वयातच होताना दिसतो. हा यातलाच प्रकार समजावा लागतो. सर्व संधिवात विकारांवर दुःख कमी करण्याबरोबर रोग बरा व्हावा व झीज भरून निघावी म्हणून “संतुलन शांती तेल’ वापरता येते, तसेच पाठीच्या मणक्‍यांची झीज, दोन मणक्‍यांमधील कूर्चा व नसा यांच्यासाठी “संतुलन कुंडलिनी तेल’ वापरता येते.\nपाठीचे मणके हे सुद्धा छोटे छोटे सांधेच असतात. हे सांधे जोपर्यंत लवचिक असतात तोपर्यंत ठीक असते. पण, मणक्‍यांमध्ये वातदोष वाढला, लवचिकता कमी झाली तर दुखण्याची, जखडण्याची सुरुवात होते.\nया सर्व वर्णनावरून एक लक्षात येईल की सांधा दुखतो या तक्रारीच्या मागे अनेक कारणे असू शकतात.\nवातप्रकोप हे त्यातले सामान्य व प्रमुख कारण असले तरी त्याचा प्रकोप कशामुळे झाला, कोणासमवेत झाला याचीही दखल घेणे आवश्‍यक असते. प्रत्यक्ष उपचार करताना तर व्यक्‍तीची प्रकृती, तिचे राहणीमान, खाण्या-पिण्याच्या सवयी, वय, कुटुंबातला इतिहास, ताकद, पचनशक्‍ती अशा अनेक लहानसहान गोष्टींचा विचार करावा लागतो व त्यानुसार नेमके उपचार योजावे लागतात.\nस्नेहन – बाहेरून करायचे स्नेहन म्हणजे वातशामक द्रव्यांनी तेल लावणे तर आतून करायचे स्नेहन म्हणजे घृृतपान. अंगाला “संतुलन अभ्यंग तेला’सारख्या तेलाने नियमित अभ्यंग करणे, सांध्यांना “संतुलन शांती तेला’सारखे आतपर्यंत जिरून सांध्यांना पूर्ववत वंगण देण्याची क्षमता असणारे तेल लावणे हे संधिवात होऊ नये म्हणून चांगले असते आणि संधिवात झालेल्यांनाही आवश्‍यक असते.\n-स्वेदन – वातदोषाला शमविण्यासाठी स्वेदन म्हणजे शेकणे हाही उत्तम उपाय असतो. निर्गुडी, एरंड, शेवगा वगैरे वातशामक वनस्पतींच्या पानांचा शेक करण्याने वेदना शमतात, सूजही कमी होते. यासाठी तयार “संतुलन अस्थिसंधी पॅक’ही वापरता येतो. आमाचा संबंध असणाऱ्या संधिववेदनेमध्ये रुक्ष स्वेदन म्हणजे विटकरीच्या किंवा वाळूच्या साहाय्याने शेक करणे उपयुक्‍त असते.\n-विरेचन – वाताला संतुलित करण्यासाठी हलके विरेचन हा उत्तम उपचार होय. स्नेहपान, बाष्पस्वेदन घेऊन शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन घेणे उत्तम असतेच पण घरच्या घरी पंधरा दिवसातून एकदा एरंडेल तेल घेऊन किंवा गंधर्वहरीतकी, योगसारक चूर्ण घेऊन पोट साफ करणे हेही वातासाठी चांगले असते. शरीराचे स्नेहन व्हावे व कोठासाफ व्हावा यासाठी पोळी किंवा भाकरी करताना त्यात चमचाभर एरंडेल तेलाचे मोहन टाकता येते. दिवसातून एकदा अशी गरम पोळी किंवा भाकरी खाण्याचा सर्व प्रकारच्या सांधेदुखीवर चांगला उपयोग होताना दिसतो.\n-बस्ती – वातावरचा हुकुमी उपचार म्हणजे बस्ती. दशमूलासारख्या वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेलाची बस्ती घेणे सर्व सांधेदुखीवर उत्तम असते. अशी आयुर्वेदिक बस्ती पोट साफ होण्यासाठी नाही तर वातशमन करणारी असते. वैद्यांच्या मार्गदर्शनाने अशी बस्ती घेता येते. तसेच घरच्या घरीही तयार तेलाच्या पाऊचची बस्ती घेता येते. उदा. संतुलन आयुर्वेद सॅनबस्ती\nवातशामक औषध म्हणूून योगराजगुग्गुळ, वातबल गोळ्या, गोक्षुरादी चूर्ण. दशमूलारिष्ट, महारास्नादि काढा पंचतिक्‍तघृत वगैरे योग घेता येतात. मात्र, त्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घेणे अधिक सयुक्‍तिक.\n-पथ्य – तांदूळ, गहू, कुळीथ, पचतील एवढ्या प्रमाणात उडीद, परवर, शेवगा, लसूण, बोर, डाळिंब, मनुका, खडीसाखर, तूप, दूध, मनुका, सैंधव मीठ\n-अपथ्य – रुक्ष धान्ये म्हणजे जव, नाचणी वगैरे; जड कडधान्ये (पावटा, चवळी, हरबरा, वाटाणा वगैरे); कडू व तिखट चवीचे पदार्थ, प्रवास, जागरण, नैसर्गिक वेगांचा अवरोध, अधिक परिश्रम, उपवास, अति मैथुन, चिंता.\nसगळे सांधे दुखणे हा विकार खूपच त्रासदायक असतो. वेळेवर योग्य उपचारांच्या अभावी हा रोग व्यक्‍तीला अंथरुणावर खिळवून ठेवू शकतो. अशा व्यक्‍तीत फक्‍त सांध्यातच नाही तर एकंदर सर्व शरीरात वातदोष मोठ्या प्रमाणात वाढल्याची लक्षणे दिसत राहतात.\nडॉ. श्री बालाजी तांबे यांच्याशी संपर्कासाठी टाईप करा fdoc आणि पाठवा 54321 वर\n– डॉ. श्री बालाजी तांबे\nfrom → वातदोष, वातविकार, संधिवात\nनका देऊ वाताला संधी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology-2/new-offers-launched-by-jio-264900.html", "date_download": "2018-04-24T05:05:51Z", "digest": "sha1:5WRRMMRMEJG3V6OO2FYSTOOXZBYSEAFA", "length": 11136, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जिओची नवी आॅफर, 399 रूपयात मिळेल 3 महिने अनलिमिटेड डेटा", "raw_content": "\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : अस्सा होता आपल्या 'सचिन'चा सुरुवातीचा प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nजिओची नवी आॅफर, 399 रूपयात मिळेल 3 महिने अनलिमिटेड डेटा\nहे नवीन प्लॅन 11 जुलैपासून सगळ्या नवीन आणि जुन्या ग्राहकांना लागू होणार आहेत.\n12 जुलै: रिलायन्स जिओने आपल्या प्राईम मेंबरसाठी आणखी एक धमाकेदार आॅफर लाँच केलीये. 399 रुपयांच्या रिचार्जमध्ये तुम्हाला आता 3 महिने अनलिमिडेट डेटा मिळणार आहे. तसंच\n309 रुपयांच्या रिचार्जवरही तुम्हाला 2 महिने डेटा वापरता येणार आहे. याशिवाय पोस्ट पेड प्लॅनच्या व्हेलिडिटीमध्येही वाढ करण्यात आलीये.\nहे नवीन प्लॅन 11 जुलैपासून सगळ्या नवीन आणि जुन्या ग्राहकांना लागू होणार आहेत.या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला 1 जीबी डेटा वापरता येईल. 1 जीबीपेक्षा अधिक डेटा वापरला तर तुम्हाला 128 केबीपीएस इतका स्पीड मिळेल. अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि नॅशनल कॉल या प्लॅनमध्ये फ्री मिळणार आहेत. त्यासोबतच अनलिमिटेड एसएमएसही करता येणार आहेत. ही योजना खास जिओच्या प्राईम मेंबर्ससाठीच आहे. जिओचा प्राईम मेंबरशीप मार्चमध्ये लॉँच झाली होती. लाखो ग्राहकांनी याची मेंबरशीप घेतलेली आहे.\nया सगळ्या प्लॅनसची माहिती खाली दिलेल्या टेबलमध्ये आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबजेटमध्ये मिळतोय विवोचा नवा स्मार्टफोन\nगुगलचं नवं एंड्राॅइड आॅपरेटिंग सिस्टिम लाँच\nएअरटेलकडून आयपीएलच्या खोट्या जाहिराती, जिओने एअरटेलला खेचलं कोर्टात\nएअरटेल कंपनीच्या जाहिराती खोट्या, हायकोर्टाचा निर्णय\nआता पासवर्ड होणार इतिहासजमा\n टेबलावर वेटर नाही, ट्रेन आणून देते जेवण, व्हिडिओ व्हायरल\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/first-batch-pilgrims-who-returned-haj-13455", "date_download": "2018-04-24T05:13:52Z", "digest": "sha1:JT2DN5XRKVXYZD2DSG6STDWM72HO5FIF", "length": 11983, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "The first batch of pilgrims who returned haj हजला गेलेल्या २७५ भाविकांचा पहिला जत्था परतला | eSakal", "raw_content": "\nहजला गेलेल्या २७५ भाविकांचा पहिला जत्था परतला\nसोमवार, 10 ऑक्टोबर 2016\nऔरंगाबाद - महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत हजला गेलेल्या मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील २७५ भाविकांचा पहिला जत्था रविवारी (ता. नऊ) दुपारी चिकलठाणा विमानतळावर पोचला.\nऔरंगाबाद - महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत हजला गेलेल्या मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील २७५ भाविकांचा पहिला जत्था रविवारी (ता. नऊ) दुपारी चिकलठाणा विमानतळावर पोचला.\nदुपारी २.४५ वाजता विमानतळावर भाविक आल्यानंतर कागदपत्रांची कारवाई पूर्ण करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष इब्राहिम भाईजान, महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाचे अध्यक्ष एम. एम. शेख, हज समितीचे सदस्य मोईनुद्दीन कासमी, खिदमाते हुज्जाज समितीचे अध्यक्ष करीम पटेल यांनी सर्व भाविकांचे स्वागत केले. विमानतळाच्या इमारतीतून बाहेर पडल्यानंतर सर्व भाविकांची त्यांच्या आप्तस्वकियांची गळाभेट घेतली. येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी दोन्ही बाजूंनी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या सेवेसाठी अल्तमश ग्रुपच्या २०० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.\n११ ऑक्‍टोबरला कोणतेही उड्डाण नाही\n१ ते १६ ऑक्‍टोबरदरम्यान भाविक परतणार असले तरी ११ ऑक्‍टोबर रोजी उड्डाण नसल्याने या दिवशी भाविक येणार नाहीत. तर १ सप्टेंबर रोजी हजला गेलेले भाविक हे १२ ऑक्‍टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता चिकलठाणा विमानतळावर पोचणार असल्याची माहिती खिदमाते हुज्जाज समितीचे अध्यक्ष करीम पटेल यांनी दिली.\n२ हजार ३४१ भाविक परतणार\nहज यात्रेसाठी चिकलठाणा विमानतळावरून मराठवाडा विभाग, नगर जिल्ह्यातून ३ हजार ३९५ भाविक गेले होते. आता ९ ते १६ ऑक्‍टोबरपर्यंत सर्व भाविक परतणार आहेत. जे भाविक हजला गेले होते त्यांपैकी ४ भाविकांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. त्यात औरंगाबादेतील इक्‍बाल मोमीन, कन्नड येथील खातूनबी, नांदेड येथील सय्यद गुलाब, जालना, अंबड येथील कंकर शेख यांचा समावेश आहे.\nटंचाईग्रस्तांच्या संख्येत 59 गावांची भर\n76 ने वाढली टॅंकरची संख्या; 142 ने वाढले विहिरींचे अधिग्रहण औरंगाबाद - मागील आठवड्याच्या...\nएसटीचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ\nऔरंगाबाद - दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटीच्या औरंगाबाद विभागातील बसच्या देखभाल दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील दोन्ही आगाराच्या...\n‘ऑरिक’ आता एका क्‍लिकवर\nऔरंगाबाद - स्मार्ट सिटीच्या कारभाराला स्मार्ट करण्यासाठी ‘एआयटीएल’ने एक पाऊल पुढे टाकत आपले हरहुन्नरी ॲप लाँच केले. रोजगाराच्या संधी,...\nरिक्षाचालक देतो अंध, अपंगांना मोफत सेवा\nऔरंगाबाद - औरंगाबाद शहरातील हरिशचंद्र जाधव हे रिक्षाचालक सहा वर्षांपासून अंध आणि अपंगांना मोफत रिक्षा...\nसेवाक्षेत्रासाठी औरंगाबादला प्रचंड वाव : सुरेश प्रभू\nऔरंगाबाद : \"औरंगाबाद औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी योग्य उमेदवार आहे, त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रासाठी या शहराला प्रचंड वाव आहे. यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.inmyschool.in/bloganswer.php", "date_download": "2018-04-24T04:35:55Z", "digest": "sha1:ZWUYOPUQONSCZIR6IPF4M3INME6D3K5D", "length": 2816, "nlines": 51, "source_domain": "www.inmyschool.in", "title": "Inmyschool.in :: -", "raw_content": "\nप्राथमिक शाळा नोंदणी सर्व जिल्ह्यासाठी सुरु.\nअधिकारी पत्रव्यवहार प्रवेश (523)\nप्राथमिक जिल्हा व्यवस्थापन नोंद\nप्राथमिक जिल्हा व्यवस्थापन प्रवेश\n10 वी प्रशिक्षणाबाबत—सर्व पाठांंवर चचा होणार का \nमहाराणी देवी अहिल्याबाई होळकर 222 वी जयंती\nरावसाहेब पाटील पर्यवेक्षक बरिस्टर टी के शेडगे माध्य व उच्च माध्य विद्यालय पेड\nTET la पर्याय ctet चालेल काय\nमोबाईल वर सुचना दिसत नाहीत.\nतुम्ही सुंदर भारताचे स्वप्न साकार करणार यात काही संशय नाही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा\n[इंग्रजी मध्ये सूचना नोंदविताना CTRL + G अशी की बोर्ड वरील अक्षरे दाबावीत ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8B_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-04-24T04:38:11Z", "digest": "sha1:ZYCK222AH4P4RCKLBRGEAPOZ6CPW2H54", "length": 4105, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्विदो ग्रांदीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nग्विदो ग्रांदीला जोडलेली पाने\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ग्विदो ग्रांदी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nऑक्टोबर १ ‎ (← दुवे | संपादन)\nलुइगी ग्विदो ग्रांदी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nग्विडो ग्रांडी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nलुइगी ग्विडो ग्रांडी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nग्वि़दो ग्रँदी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nग्विडो ग्रँडी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nलुइगी ग्विडो ग्रँडी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nलुइजी ग्विदो ग्रांदी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://nokarimargadarshan.blogspot.com/2012/10/24-2012-30-2012.html", "date_download": "2018-04-24T04:32:52Z", "digest": "sha1:C44OHHUPVHU6OUYKOLJYOF33IHIKKTTC", "length": 14401, "nlines": 219, "source_domain": "nokarimargadarshan.blogspot.com", "title": "नोकरी मार्गदर्शन: मागोवा - 24 सप्टेंबर 2012 ते 30 सप्टेंबर 2012", "raw_content": "मराठी नोकरी मार्गदर्शन केंद्र = रोजगार / नोकरी मार्गदर्शन - मराठीत् नोकरी संदर्भ\nनोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या\nमागोवा - 24 सप्टेंबर 2012 ते 30 सप्टेंबर 2012\nमाजी विधानसभा अध्यक्ष श्री कृष्णराव रखमाजीराव देसाई उर्फ बाबासाहेब कुपेकर यांचे निधन .\nकोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील कानडेवाडी या गावाच्या सरपंच पदावरून राजकीय कारर्किदीची सुरुवात .\nकोल्हापूर जि. प. वर काम पाहीले .\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार .\n2005 साली विधानसभा अध्यक्ष.\nराज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणूनही काम पाहीले .\nप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय सूरकर यांचे निधन .\nचित्रपट: चौकट राजा , आनंदाचं झाड , सातच्या आत घरात , तू तिथं मी .\n' सुखान्त ' हा त्यांचा चित्रपट इच्छामरणाचा विषय हाताळणारा होता .\nमालीका: अवंतिका , सुकन्या . .\nहैदराबाद मुक्ती संग्रामातील अग्रणी , थोर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ताराबाई परांजपे यांचे निधन .\nउपमुख्यमंत्रीपदाचा अजित पवार यांचा राजीनामा .\nअजित पवार यांनी वित्त व नियोजन मंत्री आणि ऊर्जामंत्री पदाचाही राजीनामा दिला .\nभारताच्या 39 व्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती अल्तमश कबीर यांची नियुक्ती .\nया पूर्वी झारखंड आणि कोलकता या उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्तीपद त्यांनी भूषविले .\nन्यायमूर्ती एस. एच. कपाडिया सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले त्या जागी कबीर यांची नियुक्ती करण्यात आली .\n27 सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन .\nविद्यमान केंद्रीय रेल्वेमंत्री: सी. पी. जोशी\nकेंद्रीय अर्थमंत्री: पी. चिदंबरम\nमुंबई महानगरपालिका स्वतः 20 MW क्षमतेचा विद्युतनिर्मीती प्रकल्प उभा करणार आहे . मोरबे धरणाच्या 100 एकर जमीनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे .\nकेंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग ( CBI ) 1993 पासूनच्या कोळसा खाण वाटपाची चौकशी करणार.\nराज्यात 4 हजार 637 ग्रामपंचायतीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार.\nभारताचा आजतागायताचा सर्वात जास्त ( 3 हजार 400 किलो ) वजनाच्या GSAT - 10 ह्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण .\n' गगन ' साठी हा उपग्रह उपयुक्त असेल . शिवाय - प्रगत दळणवळणासाठी उपयोगी\nदक्षिण अमेरिकेतील ' फ्रेंच गियाना ' इथल्या युरोपीय प्रक्षेपण तळावरून तो प्रक्षेपित करण्यात आला .\nराष्ट्रीय व्यवस्थापन परिषद मुंबईत संपन्न.\nचोवीसावे ' अखिल भारतीय मराठी बालकुमार साहीत्य संमेलन ' डिसेंबर 2012 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ओणी ता. राजापूर येथे होणार आहे .\nसंयुक्त राष्ट्र संघटनेचे ' जैवविविधता ' ( Biodiversity ) ह्या विषयावरील जागतिक परिसंवाद हैदराबादेत संपन्न .\nकेंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री :जयंती नटराजन\nराज्यात 2 ऑक्टोबर 2012 ते 31 ऑक्टोबर 2012 या कालवधीत ' महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जागृती अभियान ' राबविले जाणार .\nस्वयंपूर्ण ग्राम राज्याची उभारणी हा महात्मा गांधीचा संकल्प होता . त्या दृष्टीने हे अभियान राबविले जाणार आहे .\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी संदीप पाटील यांची नियुक्ती .\nसत्ताविसावा ' इंदीरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ' कवी गुलजार यांना जाहीर . 31 ऑक्टोबरला म्हणजे इंदीरा गांधींच्या स्मृतीदिनी तो त्यांना प्रदान केला जाईल\nपोस्टात 1,349 जागा रिक्त; जानेवारीपर्यंत होणार भरती\nकेंद्र व राज्य शासनाच्या विवीध विभागांमध्ये हजारो पदांची भरती\nजिल्हाधिकारी कार्यालय परभणी मध्येतलाठी, लिपिक, शिपाई पदांची भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2013 जिल्हाधिकारी कार्यालय य...\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती प्रादेशिक निवड समिती मार्फत जलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये सरळ ...\nसार्वजनिक बांधकाम विभागात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 10 जागा महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ...\n19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नांदेडला सैन्यभरती मेळावा\nमध्य रेल्वेमध्ये ग्रुप डी मधील 905 जागांची भरती\nमध्य रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये माजी सैनिक कोट्याअंतर्गत ग्रुप डी मधील 905 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंत...\nजळगाव जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांच्या 227 जागा\nजळगाव जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक-टंकलेखक 89 जागा आणि तलाठी 138 जागा एकूण 227 पदे. ऑनलाईन अ...\nभारतीय हवाई दलात ( Indian Air Force ) ग्राऊंड ड्युटी विभागात नोकरीच्या संधी\nभारतीय हवाईदलामधील हवामान विभागात ग्राऊंड डयुटी विभागात पर्मनंट कमिशन तसेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये अधिकारीपदासाठी भरती केली जाणार आहे....\nभारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ग्रुप मध्ये परिवीक्षा अधिकारी (Probationary Officers) पदाच्या एकूण 1837 जागा . Age Re...\nजिल्हा निवड समिती (1)\nतक्रार निवारण प्राधिकारी (1)\nरयत शिक्षण संस्था (1)\nमहाराष्ट्र भूजल एमपीएससीतर्फ उपअभियंत्यांच्या 16 ज...\nबेस्टमध्ये बस वाहकाच्या 1170 जागा\nमागोवा - 24 सप्टेंबर 2012 ते 30 सप्टेंबर 2012\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/wont-impose-restrictions-pakistan-says-usa-12249", "date_download": "2018-04-24T04:56:15Z", "digest": "sha1:THQ2GO7SZLC3RDQ5MZ2VFFPWKN735NTX", "length": 11903, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wont impose restrictions on Pakistan, says USA पाकिस्तानवर निर्बंध लादणार नाही: अमेरिका | eSakal", "raw_content": "\nपाकिस्तानवर निर्बंध लादणार नाही: अमेरिका\nबुधवार, 7 सप्टेंबर 2016\nवॉशिंग्टन - दहशतवादी संघटनांविरोधात समाधानकारक कारवाई न केल्याबद्दल पाकिस्तानवर निर्बंध लादण्याचा कोणताही विचार सध्या नसल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मार्क टोनी यांनी यासंदर्भातील माहिती दिली.\nवॉशिंग्टन - दहशतवादी संघटनांविरोधात समाधानकारक कारवाई न केल्याबद्दल पाकिस्तानवर निर्बंध लादण्याचा कोणताही विचार सध्या नसल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मार्क टोनी यांनी यासंदर्भातील माहिती दिली.\nअमेरिकेचे संयुक्त राष्ट्रसंघामधील माजी राजदूत झलमाय खलिझाद यांनी पाकिस्तानवर निर्बंध लादण्यासंदर्भातील पर्यायाचा अमेरिकेने आता गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत नुकतेच व्यक्त केले आहे. या पार्श्‍वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्‍नास उत्तर देताना टोनी यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. मात्र 26/11 सहित इतर सर्व दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग असलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात पाकिस्तानने कारवाई केलीच पाहिजे, यात कोणतीही शंका नसल्याचेही टोनी यांनी सांगितले.\n\"\"या दहशतवादी हल्ल्यांत अमेरिकन नागरिकांनीही प्राण गमावले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहशतवादविरोधी सहकार्यास अमेरिकेकडून अनेक वर्षांपासून पाठिंबा देण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तान व भारतामधील माहितीच्या देवाणघेवाणीचाही समावेश आहे. यामुळेच पाकिस्तानच्या शेजारी देशांमध्ये हल्ले घडविणाऱ्या दहशतवादी संघटनांविरोधात पाकिस्तानकडून कारवाई व्हायलाच हवी,‘‘ असे टोनी म्हणाले.\nकाश्‍मीरमध्ये पाकला मोकळे रान - दुलत\nपुणे - ‘‘काश्‍मीरमधील तरुण आता पाकिस्तानऐवजी अल्लाहसाठी लढत आहेत. हिंसाचार वाढण्याबरोबरच २०१६ पासून काश्‍मीरमध्ये पाकिस्तानला मोकळे रान मिळाले आहे....\nअमली पदार्थांची काळी दुनिया\nदेशातील ड्रग्जचा व्यापार गुंतागुतींचा आहे. झोपडीपासून आलिशान वस्त्यांपर्यंत हे मायाजाल पसरले आहे. विशेष म्हणजे या व्यवसायाच्या उलाढालीचा अंदाज अजूनही...\nभारतातल्या युवकांमध्ये निर्मितिक्षम सामर्थ्य सुप्त स्वरूपात आहे, असं मला वाटतं. ते जागृत करण्यासाठी आपल्याला प्रथम प्राचीन भारतातली कामगिरी व...\nकाँग्रेसने देशाचा खोटा इतिहास लिहिला : डॉ. दा. वि. नेने\nसांगली : सत्ताधारी काँग्रेसने देशाचा खोटा इतिहास लिहिला. नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर माझ्या सारख्यांना तो इतिहास खोटा असल्याचे...\nकिम जोंग यांचा अण्वस्त्र परीक्षण न करण्याचा निर्णय ही आनंदाची बातमी - ट्रम्प\nवॉशिंग्टन - उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि आण्विक हल्ल्याची धमकी दिल्याने अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/akshay-kumar-and-bhumi-new-song-from-264877.html", "date_download": "2018-04-24T05:08:02Z", "digest": "sha1:UGY66DSD5RH7WSR74UKCZN6KB6IM6I7B", "length": 10725, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भूमी का मारतेय अक्षयला?", "raw_content": "\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : अस्सा होता आपल्या 'सचिन'चा सुरुवातीचा प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nभूमी का मारतेय अक्षयला\nगंमत अशी की अक्षय कुमारही तिचा मार हसत हसत खातोय आणि म्हणतोय 'गोरी तू लठ मार'.\n12 जुलै : 'दम लगा के हैश्या'मधून लोकांची मनं जिंकणारी भूमी पेडणेकर अक्षय कुमारला मारतेय. तेही साधंसुधं मारणं नाही तर काठीने मारतेय. गंमत अशी की अक्षय कुमारही तिचा मार हसत हसत खातोय आणि म्हणतोय 'गोरी तू लठ मार'.\n अक्षय काही वेडाबिडा झालेला नाही. अक्षय कुमारच्या टॉयलेट सिनेमाचं नवीन गाणं आलंय. या गाण्यात अक्षय आणि भूमी होळी खेळत आहेत. एकामेकांना रंगही लावत आहेत. भूमी अक्षयवर रूसली आहे. म्हणून भूमी अक्षयला लाठीनं मारतेय. तिला मनवायला हा प्रेमाचा मार तो आनंदानं सहनही करतोय. हे सुरेल गाणं गायलंय सोनू निगम आणि पलक मुच्छलने. हे गाणं ट्विट करताना अक्षय म्हणतो 'केशव और जया की प्रेम कहानी में क्यू आ गयी लाठी'.\nस्वच्छ भारत मिशनवर आधारित असलेल्या 'टॉयलेट:एक प्रेम कथा' या चित्रपटातलं हे तिसरं गाणं आहे. हा सिनेमा 11 आॅगस्टला थिएटर्समध्ये झळकणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Akshay Kumartoilet ek premkathaअक्षय कुमारटाॅयलेट एक प्रेमकथा\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/photos/yogi-adityanath-short-introduction-380341", "date_download": "2018-04-24T04:52:04Z", "digest": "sha1:QCID77L6Y7I5NSM2BDOYF7AQPDA5LGLW", "length": 12434, "nlines": 116, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "योगी आदित्यनाथ यांचा अल्प परिचय", "raw_content": "\nयोगी आदित्यनाथ यांचा अल्प परिचय\nयोगी आदित्यनाथ यांचा अल्प परिचय\nBy: एबीपी माझा वेब टीम अधिक माहिती: CM uttarpradesh Yogi Adityanath अल्प परिचय उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\nउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.\nभाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची आज लखनऊमध्ये बैठक झाली. त्यामध्ये त्यांच्या नावार एकमत झालं. उद्या (19 मार्च) योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.\nदिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार आहे.\nउत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबत बरेच तर्कवितर्क सुरु होते. अखेर आज योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आज सुरुवातीला मनोज सिन्हा, केशव मौर्य यांचं नाव आघाडीवर होतं. पण या दोघांना मागे टाकत योगी आदित्यनाथ यांनी शेवटच्या क्षणी बाजी मारली.\nयोगी आदित्यनाथ हे आज चार्टर्ड विमानं दिल्लीला रवाना झाले होते. त्यानंतर भाजपच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला.\nदरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा झाल्यानं अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत.\nदरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा झाल्यानं अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. कट्टर हिंदुत्ववादी अशी आजवर आदित्यनाथ यांची ओळख आहे. त्यामुळे विकासाच्या राजकारणासोबत भाजप या निमित्तानं हिंदुत्वाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न करीत असल्याचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे.\nमहंत योगी आदित्यनाथ यांचा जन्म ५ जून १९७२ रोजी उत्तराखंडच्या गढवालमध्ये झाला. त्यांचं मुळ नाव अजय सिंह असं आहे.\n1998 पासून ते गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत.\nअधिक माहिती: CM uttarpradesh Yogi Adityanath अल्प परिचय उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\nपाकिस्तानच्या 'या' खेळाडूची मदतीसाठी भारताकडे याचना\nयजुवेंद्र चहल 'या' अभिनेत्रीसोबत लग्न बंधनात अडकणार\nमिलिंद सोमण आणि अंकिता कोवरच्या लग्नाचे फोटो\nमगरीने ओढलेल्या सागरचा मृतदेह शोधण्यात अखेर यश\nगेलने या आयपीएलमधला सर्वात मोठा विक्रम मोडला\nअरबाज खान कुणाला डेट करतोय माहितीय का\nशाहरुखच्या रिल लाईफमधील मुलीचं बोल्ड फोटोशूट\nन्या. लोयांच्या मृत्यूची CBI चौकशी नाही, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं\nटिप्स : भरजरी साड्यांची काळजी कशी घ्यावी\nब्रेकफास्ट न्यूज : नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून कास्टिंग काऊचचं समर्थन\nअहमदनगर : केडगाव शिवसैनिकांची हत्या प्रकरण : काँग्रेस नगरसेवकाला अटक\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\nKXIPvDD: आखिरी नहीं, इस ओवर में पलट गई दिल्ली की जीती हुई बाज़ी\nWATCH: अंतिम छह गेंदो पर जीतते-जीतते कैसे हार गई दिल्ली की टीम\nKXIPvDD: मुजीब की आखिरी गेंद पर खत्म हुआ श्रेयस का संघर्ष, दिल्ली को मिली 4 रनों से हार\nDD vs KXIP: घर में भी नहीं रुका दिल्ली के हार का क्रम, जीत के साथ पंजाब टॉप पर\nDD vs KXIP: दिल्ली की शानदार गेंदबाजी, 143 पर रुका किंग्स का कारवां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.com/2012/08/blog-post_8310.html", "date_download": "2018-04-24T04:59:07Z", "digest": "sha1:43YLIC2NKCRIVDDD5TGBSIWYGRBK32DD", "length": 8851, "nlines": 172, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.com", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: मोहदरी घाट (छायाचित्रे)", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nनाशिक व सिन्नर यांना जोडणाऱ्या ’नाशिक-पुणे’ राष्ट्रीय महामार्गावर हा छोटा घाट आहे. नाशिकपासून २२ तर सिन्नरपासून हा ६ किमी अंतरावर आहे.\nलेबल्स घाट, नाशिक जिल्हा, मोहदरी घाट, सिन्नर तालुका\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nचामर लेणी / चांभार लेणी\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमाझी ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरी... आमच्या कन्येचं १४ वर्षांपूर्वी ठरविलेलं नाव. संत ज्ञानेश्वरांची भावार्थदिपिका वाचली तेव्हाच ठरवलं, माझ्या मुलीचं नाव ’ज्ञानेश्वरी’ ठेविल. चौ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marketaanimi.com/2012/10/22/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AC-%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-24T04:59:54Z", "digest": "sha1:VW7WX5YUUS23AVOY643W6FWWX3PNL2BV", "length": 13914, "nlines": 101, "source_domain": "marketaanimi.com", "title": "भाग १० – सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है !! | Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nभाग १० – सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है \nअगदीच काही सरफरोशी नव्हे पण शेअर मार्केट पर्यंत पोहोचण्यासाठी जे काही करायला लागणार होतं त्यासाठी मी तयार होते. मी गेल्या भागात सांगितलं, तसं share demat करण्याच्या process मध्ये मला थोड्या फार अडचणी आल्या खऱ्या. मी म्हटलं ना, की या वेळी प्रोब्लेम system चा नव्हता .. कारणं अशी होती की कोणी काही करू शकत नव्हतं. एक एक करून सांगते काय काय झालं आणि मी काय काय केलं ते. बघा तुम्हाला काही उपयोगाचं वाटलं तर..\nतसं forms भरून तर सगळे वेळेवर दिले होते.. ८ एक दिवस झाले तरी काही पत्ता नाही पुढे काय करायचं त्याचा ह्यांना विचारलं तर हे म्हणतात कसे – ‘ अगं सगळीकडे काही मी नसतो की तू बोललीस की पटकन काम करून टाकायला ह्यांना विचारलं तर हे म्हणतात कसे – ‘ अगं सगळीकडे काही मी नसतो की तू बोललीस की पटकन काम करून टाकायला प्रत्येक ठिकाणी थोडा वेळ लागायचाच .. थोडा धीर धर.. होईल सगळं’ आणि मग गेले आपले कामाला निघून.\nदुपार होते तशी दरवाज्याची बेल वाजली आता या वेळी कोण असेल असा विचार करत दार उघडते तर दारात पोस्टमन उभा एक registered AD घेवून – प्रकाश फाटक यांच्या नावाचं.. तसं नेहेमी काही मी यांचं टपाल उघडायला जात नाही पण वाटलं की काही share संबंधी असेल म्हणून यांना phone केला आणि उघडलं टपाल. त्यात बघते तर नवीन share certificates.. मी म्हटलं की आहे ती रद्दी संपवता नाकी नऊ आले आणि आता हे लोक अजुन कसले कागद पाठवतात वाचून बघण्याशिवाय पर्याय नव्हता ..\nमग काय तर घातला चष्मा आणि काढलं वाचून. वाचाल तर वाचाल हे तसं थोडं फार खरं आहे हे त्या दिवशी अजून एकदा कळलं. ते वाचलं, आणि समजलं की आमच्या कडे यांच्या नावावर जे share होते त्या share चं ‘SPLIT’ असं काही तरी झालेलं होतं. उगाच मोठे मोठे इंग्रजी शब्द वाचून आधी थोडी बावचळले मी पण नंतर कळलं की आमच्या कडे आधी १० रुपायचा एक असे १०० share होते आता त्याचे २ रुपायचा १ असे ५०० share झालेले आहेत. त्यामुळे कंपनी ने नवीन share certificates पाठवलेली आहेत. आणि त्यामुळे माझं काम वाढणार आहे. ह्या certificates साठी परत forms भरून पाठवायला लागणार होते. तेव्हा इतकच कळत होतं की आपलं काम वाढतंय आणि share market पर्यंत पोहोचण्यासाठी अजून थोडं वेळ लागणार होता.\nअजून १ २ सांगण्या सारख्या गोष्टी झाल्या या सगळ्या demat च्या भानगडीत पण त्या पुढच्या भागात सांगेन..\nपुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nमी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.\n← भाग ९ – निजरूप दाखवा हो.. हरी दर्शनास या हो भाग ११ – एक दिवस असा यावा, सगळे share demat करून जावा भाग ११ – एक दिवस असा यावा, सगळे share demat करून जावा\n7 thoughts on “भाग १० – सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है \nपिंगबॅक एक दिवस असा यावा, सगळे share demat करून जावा\nपिंगबॅक भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं \nपिंगबॅक भाग ९ – निजरूप दाखवा हो.. हरी दर्शनास या हो \nस्नेहा संतोष राणे नोव्हेंबर 4, 2017 येथे 7:45 pm\nताई मी तुमचे लेख वाचतेय. खुप मार्गदर्शन मिळाले. मलाही शेअर बाजार रत गुंतवणूक करायची आहे. पण…. टेंन्शन येते\nमनावर येणारा ताण दूर होईपर्यन्त भातुकलीच्या खेळाप्रमाणे पेपर ट्रेडिंग करून बघा. जेव्हा आपले अंदाज बरोबर येऊ लागतील तेव्हा थोड्या प्रमाणात व्यवहार करा. सुरवातीला थोडेफार टेन्शन येणे नैसर्गिक आहे. टेन्शनच्या आहारी न जाता व्यवस्थित अभ्य्यास करून शेअर मार्केटमध्ये व्यवहार करा.\nब्लॉग ३१ ३९ ५७ यामध्ये demat आणी स्प्लिट विषयी सविस्तर माहिती दिली आहे ती वाचा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआठवड्याचे-समालोचन - सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा - १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८\nभाग 62 - शेअर मार्केट आणि ब्रेक्झीट\nतुमचे प्रश्न – माझी उत्तरं : July - September 2017\nआठवड्याचे-समालोचन – सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा – १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८\nआठवड्याचे समालोचन – शेअर मार्केट एक ‘अक्षय पात्र’ – ९ एप्रिल २०१८ ते १३ एप्रिल २०१८\nआठवड्याचे समालोचन – साप शिडीचा खेळ – २ एप्रिल २०१८ ते ६ एप्रिल २०१८\nलेखमाला – ‘माझी वाहिनी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5755407582196767781&title=Vishnu%20Moreshwar%20Mahajani,%20Pandurang%20Mahadev%20Bapat,%20Ravsaheb%20Ranaji%20Kasabe&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-24T04:58:41Z", "digest": "sha1:2SFTSUDDCLTDEZABT2KESDOS6J4KHDP6", "length": 10888, "nlines": 131, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "विष्णू मोरेश्वर महाजनी, पांडुरंग महादेव बापट, रावसाहेब राणोजी कसबे", "raw_content": "\nविष्णू मोरेश्वर महाजनी, पांडुरंग महादेव बापट, रावसाहेब राणोजी कसबे\nब्राउनिंग, लाँगफेलो, वर्ड्स्वर्थ, शेली, कोलरिज आणि शेक्सपियर यांसारख्यांच्या अनेक कलाकृती मराठीत आणणारे विष्णू महाजनी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे अग्रणी असणारे सेनापती बापट आणि दलित साहित्याचे प्रसिद्ध अभ्यासक रावसाहेब कसबे यांचा १२ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय....\n१२ नोव्हेंबर १८५१ रोजी पुण्यामध्ये जन्मलेले विष्णू महाजनी हे भारताच्या ब्रिटिश कालखंडातले एमए झालेले कवी आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘विविधज्ञानविस्तार’मधून त्यांनी विपुल लेखन केलं होतं. त्यांना रावबहादूर अशी उपाधी मिळाली होती.\nब्राउनिंग, लाँगफेलो, वर्ड्स्वर्थ, शेली, कोलरिज यांसारख्या अनेक इंग्लिश कवींच्या प्रसिद्ध रचना त्यांनी ‘कुसुमांजली’ या संग्रहाच्या रूपाने मराठीत आणल्या होत्या.\nशेक्सपिअरच्या नाट्यकृतींच्या आधारे त्यांनी लिहिलेली मोहविलसित, वल्लभानुनय, तारा अशी नाटकं गाजली होती. १९०७ सालच्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.\n१६ फेब्रुवारी १९२३ रोजी त्यांचं निधन झालं.\n१२ नोव्हेंबर १८८० रोजी पारनेरमध्ये जन्मलेले पांडुरंग बापट हे सेनापती बापट या उपाधीने प्रसिद्ध असणारे प्रमुख सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक आणि लढाऊ समाजसेवक\n१९२१ ते १९२४मधल्या तीन वर्षांच्या काळात पुण्यामधल्या मुळशी पट्ट्यातल्या धरणग्रस्त गावकऱ्यांसाठी त्यांनी शेकडो सत्याग्रहींचं नेतृत्व करून लढा दिला. त्यामुळे ‘सेनापती बापट’ ही उपाधी त्यांना मिळाली होती.\nकॉलेजकाळात त्यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे भारत स्वतंत्र करण्याची शपथ तलवारीवर हात ठेवून घेतली होती. नंतर श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मदतीने त्यांनी रशियन क्रांतिकारकांकडून प्रचंड स्फोटक बॉम्बची तंत्रविद्या हस्तगत केली होती.\nपुढे भारत स्वतंत्र झाल्यावरसुद्धा त्यांनी भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन आणि मुख्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामधे पुढाकार घेतला होता. भारतीय संस्कृतीचा पाया, दिव्यजीवन अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.\n२८ नोव्हेंबर १९६७ रोजी त्यांचं निधन झालं.\n१२ नोव्हेंबर १९४४ रोजी जन्मलेले रावसाहेब राणोजी कसबे हे समीक्षक, विचारवंत आणि दलित साहित्याचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना दलित साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. ते अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.\nझोत, डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना, आंबेडकर आणि मार्क्स, आंबेडकर वाद : तत्त्व आणि व्यवहार, मानव आणि धर्मचिंतन अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.\n(रावसाहेब कसबे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)\nTags: BOIDinmaniदिनमणीविष्णू मोरेश्वर महाजनीपांडुरंग महादेव बापटरावसाहेब राणोजी कसबेVishnu Moreshwar MahajaniPandurang Mahadev BapatRavsaheb Ranaji Kasabe\nजेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे नेपोलिअन हिल, केशव सदाशिव रिसबूड द्वारकानाथ पितळे, संदीप वासलेकर, कृष्णराव देशपांडे, कृष्णराव बाबर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\nस्वानंद समुद्र यांना मानाचा ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅवॉर्ड’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/c-v-rajendran-indian-film-director-1656013/", "date_download": "2018-04-24T05:02:58Z", "digest": "sha1:XS3XGAYNPVETDFPUNK7OUTVJFCDLRHVU", "length": 15687, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "C V Rajendran Indian film director | सी. व्ही. राजेंद्रन | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nचित्रपटसृष्टीत मोठी स्पर्धा असूनही त्यांनी कधी कुणाचा मत्सर केला नाही, हा त्यांचा स्वभावविशेष.\nतामिळ चित्रपटसृष्टीत सर्वच निर्मात्यांकडून सी. व्ही. राजेंद्रन यांना दिग्दर्शक म्हणून मागणी होती. त्यातूनच तीन दशके त्यांनी तमिळ, कन्नड, मल्याळम्, तेलुगू आणि हिंदी अशा भाषांतून चित्रपट केले. शिवाजी गणेशन व जयललिता या जोडीला एकत्र आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. या राजेंद्रन यांचे नुकतेच निधन झाले. दिवंगत सी. व्ही. श्रीधर यांच्या युनिटमध्ये ते काम करीत असत, श्रीधर हे त्यांचे चुलतबंधू. त्यांचे बहुतांशी चित्रपट तमिळ होते. त्यातही गलाटाकल्याणम्, सुमथी एनसुंदरी, पून्नून्जल हे चित्रपट विशेष गाजले. चित्रपटसृष्टीत मोठी स्पर्धा असूनही त्यांनी कधी कुणाचा मत्सर केला नाही, हा त्यांचा स्वभावविशेष.\nराजेंद्रन हे मूळचे मधुरानथंगमजवळील चित्तमूरचे. चित्रालय गोपू यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांचे संवाद लिहिले. गोपू यांच्याशी ते नेहमी गप्पा मारत असायचे. मींडा सोर्घम या चित्रपटासाठी त्यांनी प्रथम सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. श्रीधर यांच्याच कथालिका नेरामिलाई या चित्रपटाच्या दिग्दर्शनातही ते सहायक होते. राजेंद्रन हे श्रीधर यांच्या युनिटमधील उत्तम तंत्रज्ञही होते. त्यानंतर युनिटमधील अनेक जण काळाच्या पडद्याआड गेले तरी राजेंद्रन यांनी मल्याळम् व कन्नड चित्रपटांचे दिग्दर्शन सुरू ठेवले. अनुभवम पुडुमाई या चित्रपटापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी कलत्ता कालयनम या चित्रपटात शिवाजी गणेशन व जयललिता यांना प्रथम एकत्र आणले. नील कावनी कदाली या कमी खर्चाच्या चित्रपटातही ही जोडी एकत्र होती. हा चित्रपट चांगलाच हिट झाला. शिवाजी गणेशन यांचा मुलगा प्रभू याला त्यांनीच ‘सांगिली’ या चित्रपटात संधी दिली. शिवाजी गणेशन हे त्यांच्या किमान २० चित्रपटांत प्रमुख भूमिकेत होते. गाण्यांना कथेइतकेच महत्त्व देणाऱ्या राजेंद्रन यांच्या चित्रपटांतील अनेक गाणी संस्मरणीय ठरली. जयललिता यांच्या मृत्यूच्या एक वर्ष आधी त्यांच्या गाण्यांवर आधारित थेन किन्नम हा कार्यक्रम त्यांनी ‘जया टीव्ही’साठी केला. त्या वेळी लगेचच जयललितांनी राजेंद्रन यांना दूरध्वनी करून त्यांचे कौतुक केले होते.\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nजयललिता, रजनीकांत, कमल हासन, राजकुमार, जितेंद्र, जयशंकर, विष्णुवर्धन, व्ही. रविचंद्रन, श्रीनाथ अशा अनेक कलाकारांबरोबर त्यांनी काम केले. पावा मानिपू व राजा हे त्यांचे शिवाजी गणेशन यांच्याबरोबरचे दोन चित्रपट पुन्हा मोठय़ा पडद्यावर प्रदर्शित होणार होते पण त्याआधीच त्यांचे निधन झाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.assalkolhapuri.com/2012/10/its-not-done.html?utm_source=feedburner&utm_medium=feed&utm_campaign=Feed%3A+AssalKolhapuri+%28Assal+Kolhapuri%29", "date_download": "2018-04-24T04:56:58Z", "digest": "sha1:HOGDG6OGUMIMDXIT2P3JJY5HGWTK4APF", "length": 8612, "nlines": 57, "source_domain": "www.assalkolhapuri.com", "title": "अस्सल-कोल्हापूरी: लता दीदी It's Not Done !!!!", "raw_content": "\nआपण भारतातीलच नव्हे तर जगभरातील तमाम कानसेनांच्या गळ्यातील ताईत आहात. संगीत क्षेत्रात आपले नाव व कामगिरी अजरामर आहे. अखंड भारत वर्षात आपले नाव फार आदराने घेतले जाते. त्यामुळे आपण मराठी/ महाराष्ट्रीय असल्याचा आम्हास खचितच अभिमान आहे.\nआपल्या संगीत क्षेत्रातील कामगिरीचा श्रीगणेशा मराठी सिने-सृष्टीतून किंबहुना कोल्हापुरातून झाला हे सर्वश्रुत आहे. भलेही आपण आज जी उंची गाठली आहे त्यात कोल्हापूरचा, कोल्हापुरकरांचा अथवा मराठी चित्रपट सृष्टीचा वाटा काहीच नसेल; आम्हास मान्य आहे कि आपण आपल्या प्रतिभेच्या आणि कष्टांच्या जोरावरच आजचे हे स्थान मिळवले आहे त्यात काही शंका नाही.\nपण आज आपले जे उच्च स्थान आहे जो आदर आहे, त्याचा उपयोग आपण मराठी सिनेमाच्या विकासासाठी करणे आवश्यक आहे. किंबहुना आपण अधिकारवाणीने चित्रपट व्यावसायिकांना, शासकीय यंत्रणेला खडे बोल सुनावून त्यांच्या कडून काम करून घेतले पाहिजे अशी आमची अपेक्षा होती. तेवढा आपला अधिकारच आहे.तुमच्या बाजूने विचार करता आपल्या वयामुळे किंवा इतर कारणांमुळे आपणास असे कार्य करणे शक्य नसेल तरीही हरकत नाही.\nपण आज महाराष्ट्रभर गाजणाऱ्या \"जयप्रभा स्टुडीओ\" च्या प्रश्नावर आपण घेतलेली तद्दन व्यावसायिक भूमिका खरोखरच आक्षेपार्ह आहे; आपल्या जन-माणसातील प्रतिमेला तडा जाणारी आहे.भलेही आज तो स्टुडीओ व भोवतालची जागा कायदेशीर रित्या आपल्या नावावर असेल; पण त्याबद्दलची कोल्हापुरकरांची भावना आणि त्या जागेचे महत्व लक्षात घेता त्याजागेवर आज जरी (आपण म्हणत असल्याप्रमाणे) चित्रपटांचे शुटींग करणे परवडणारे नसले तर खचितच विधायक दृष्टीकोनातून त्या जागेचा वापर होऊ शकतो.\nआपण आज जो १६ कोटी रुपयांसाठी हि जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीचे नुकसान होईलच पण आपले जनमानसातील स्थान सुध्धा शिल्लक राहणार नाही.\n(काही वर्षापूर्वी सामान्य लोकांच्या सोयीचा विचार न करता आपल्या मुंबईतील घराशेजारून जाणाऱ्या उड्डाणपुलाला मंगेशकर कुटुंबीयांनी केलेला विरोध अजून जनतेच्या लक्षात आहेच)\nबिल्डर काय त्या जागेच्या प्रसिध्धीचा पुरेपूर वापर करून तुम्हाला दिलेल्या १६ कोटींच्या बदल्यात १६० कोटी कमावतील\nआजच्या घडीला गरज आहे ती आपण, आपले सल्लागार कोल्हापूरचे प्रसिध्ध गायक सुरेश वाडकर व इतर यांनी सामान्य जनतेच्या मतांचा आदर करण्याची; कुणीतरी म्हणून ठेवलेलच आहे \"जो स्वतःसाठी जगला तो संपला; जो दुसर्यांसाठी मेला तोच जगला\" आणखी काय बोलू आपण सुज्ञ आहा.\n‘सकाळ’ भारी का ‘पुढारी’\nमागच्याच आठवड्यात दै. सकाळ मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली कोल्हापुरात खपात ' सकाळ ' नंबर वन लगेच दुसरयाच दिवाशी ‘ दै. पुढारी ’ ने प...\nहेंच असं आसतय बघा.\nआज कालच्या पोरींचा काय नेम नाही. ह्या कुठ कधी कशा वागतील हेचा भरवसा हेंच्या आई-बापालाच काय पण प्रत्यक्षात ब्रह्मदेवाच्या बाला सुध्धा देता ...\nगेल्या ५-६ महिन्यात मुन्नी आणि शीला या दोन नावांचा भलताच बोलबाला झाला. मुन्नीची बदनामी आणि शिलाची जवानी दोन्ही अगदी टॉपवर होत्या. त्यामुळ बा...\nपोलीस खात्याच्या आयचा घो.\n(सविस्तर बातमी वाचण्यासाठी शेजारील चित्रावर क्लिक करा) आता काय बोलणार जरा तर काय जनाची नाही तर मनाची जरा तर काय जनाची नाही तर मनाची लोक बोलतात ते काय उगीच नाही. हेंच...\nबघा काय Adjust हुतंय का \nआमच 'दादया' म्हणजे रांगडा गडी. वारणेकाठच्या गावातला. घरची बक्कळ शेती, टेन्शन म्हणून कसलं ते नाही. त्यामुळं ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/today-farmers-will-get-thier-debt-money-276510.html", "date_download": "2018-04-24T05:08:32Z", "digest": "sha1:3HGPITIIDFS6GUCRISJXRW36KQPWZLWR", "length": 11130, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आज होणार जमा, सहकारी बँका राहणार सुरू", "raw_content": "\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : अस्सा होता आपल्या 'सचिन'चा सुरुवातीचा प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आज होणार जमा, सहकारी बँका राहणार सुरू\nकर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी, राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज सुरू राहणार आहेत.\n10 डिसेंबर : शेतकरी कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याच्या कामाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी, राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज सुरू राहणार आहेत.\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यासाठी 19 हजार 537 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे.\nशेतकरी आंदोलनानंतर सरकारनं कर्जमाफी तर केली. पण शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे येणार, यावर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. आज खात्यात पैसे पडल्यानंतर शेतकऱ्याला दिलास मिळेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1268", "date_download": "2018-04-24T04:30:10Z", "digest": "sha1:OXB6ZVYBIJORNX2NBC7K2C2V46IHSUNU", "length": 2966, "nlines": 58, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nमाता आणि बालक सुरक्षा कार्ड\nकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच महिला आणि बाल विकास मंत्रालयाने संयुक्तरित्या माता आणि बालक सुरक्षा कार्ड तयार केले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री फगन सिंह कुलस्ते यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. सार्वजनिक आरोग्य सुविधा असलेल्या सर्व ठिकाणी प्रत्येक गर्भवती महिलेला हे नोंदणी कार्ड दिले जाईल. गर्भारपणादरम्यान आणि प्रसूतिकाळात तसेच प्रसूतीनंतर महिलेला दिल्या जाणाऱ्या सेवांची देखरेख, मूल तीन वर्षांचे होईपर्यंत त्याच्या वाढीबाबत देखरेख यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2159", "date_download": "2018-04-24T04:29:45Z", "digest": "sha1:SGJPD2QJUJYPGMHSUW7R5ITDFVTTPBSJ", "length": 4374, "nlines": 74, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञान प्रशिक्षणार्थी पदांसाठी इसरोमध्ये 2017-18 साठी भरती प्रक्रिया\nभारतीय अवकाश संशोधन संस्था, इसरोने पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञान प्रशिक्षणार्थी इत्यादी पदांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2017 आहे.\nया पदांसाठी अर्हता पुढीलप्रमाणे –\n· शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी किंवा अभियांत्रिकी तंत्रज्ञान परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असायला हवा. (सर्व सेमिस्टरची सरासरी टक्केवारी 65 टक्के इतकी आवश्यक) अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या संबंधित क्षेत्रात 10 पैकी 6.84 गुण मिळवलेले असावेत.\n· राज्य तंत्रशिक्षण बोर्ड/विद्यापीठाची संबंधित विषयाची पदविका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली असणे आवश्यक.\n· उमेदवाराचे वय 15.12.2017 रोजी 35 वर्षांपेक्षा अधिक असू नये.\nवयोमर्यादेत शिथिलता : - पुढील गटांना वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे\nवेतनश्रेणी :- पदवीधर प्रशिक्षणार्थी- 5000 रुपये\nतंत्रज्ञान प्रशिक्षणार्थी – 3542 रुपये\nनिवडप्रक्रिया :- खालील प्रक्रियेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.\nशुल्क :- अर्जप्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/chattisgarh-jawan-killed-two-others-injured-bomb-blast-12725", "date_download": "2018-04-24T05:00:42Z", "digest": "sha1:OXEX6BXXIP2XXZKX7OEIFGUSHOB4VJQY", "length": 11106, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chattisgarh: Jawan killed, two others injured in bomb blast छत्तीसगडमध्ये बॉम्ब स्फोटात जवान हुतात्मा | eSakal", "raw_content": "\nछत्तीसगडमध्ये बॉम्ब स्फोटात जवान हुतात्मा\nबुधवार, 28 सप्टेंबर 2016\nरायपूर (छत्तीसगड)- नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी आज (बुधवार) सकाळी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात एक जवान हुतात्मा तर दोघे जण जखमी झाले आहेत.\nवरिष्ठ पोलिस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका रस्त्याच्या कामाचे शुभारंभाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर जवान निघाले होते. यावेळी माओवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. स्फोटात पुराण पोताई हे हुतात्मा झाले तर अन्य दोन जवान जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nदरम्यान, जवानांनी परिसर ताब्यात घेतला असून, माओवाद्यांविरोधात शोध मोहिम हाती घेतली आहे.\nरायपूर (छत्तीसगड)- नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी आज (बुधवार) सकाळी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात एक जवान हुतात्मा तर दोघे जण जखमी झाले आहेत.\nवरिष्ठ पोलिस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका रस्त्याच्या कामाचे शुभारंभाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर जवान निघाले होते. यावेळी माओवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. स्फोटात पुराण पोताई हे हुतात्मा झाले तर अन्य दोन जवान जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nदरम्यान, जवानांनी परिसर ताब्यात घेतला असून, माओवाद्यांविरोधात शोध मोहिम हाती घेतली आहे.\nआमदार विलासराव जगतापांच्या मुलाविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा\nमाडग्याळ - जत तालुक्‍यातील कोंतेवबोबलाद येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून श्रीशैल सौदाप्पा कांबळे (वय ५०) यांना काठी व पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात...\nपुणे - चिंचवडमध्ये दोन दुकाने फोडली\nपिंपरी (पुणे) : चिंचवड पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आणि मुख्य रस्त्यावर असलेली दोन दुकाने चोरट्यांनी फोडली, ही घटना मंगळवारी (ता. २४...\nराजकीय वर्चस्ववादातून दोन खून\nकोल्हापूर - अशोक पाटील यांच्या खुनानंतर त्याचा सूड म्हणून धनाजी गाडगीळ यांचा खून करण्यात आला. त्यामुळे संवेदनशील पाचगाव धुमसत राहिले. राजकीय...\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nअहेरी दलम कमांडरसह सहा नक्षलवादी ठार\nगडचिरोली - अहेरी तालुक्‍यातील राजाराम खांदला जंगल परिसरात आज रात्री नऊच्या सुमारास पोलिसांबरोबर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/leaves-center-state-mouth-12346", "date_download": "2018-04-24T05:17:06Z", "digest": "sha1:DZLXXN3VDUVRBKTVLKTKDVBE5M4DGFEW", "length": 16142, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Leaves the center of the state of mouth राज्याच्या तोंडाला केंद्राची पुन्हा पाने | eSakal", "raw_content": "\nराज्याच्या तोंडाला केंद्राची पुन्हा पाने\nप्रशांत बारसिंग - सकाळ न्यूज नेटवर्क\nबुधवार, 14 सप्टेंबर 2016\nयंदाच्या वर्षी म्हणजेच सन 2016-17 मध्ये अपूर्णवास्थेतील प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विशेष म्हणजेच या 28 प्रकल्पांची कामे 80 ते 90 टक्‍के पूर्ण झाली असली, तरी उर्वरित कामे पूर्ण करण्यास सरकारला निधीअभावी अडचण आहे. या प्रकल्पांसाठीही केंद्राकडे निधीसाठी पाठपुरावा करावा लागणार आहे.\n28 प्रकल्पांची कामे बहुतांश पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामांसाठी केंद्र सरकार राज्याला निश्‍चितपणे निधी देईल.\n- विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री\nमुंबई - राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. दुष्काळी भागातील 26 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने 36 हजार कोटींची मागणी केली असता केंद्राने फक्‍त 3600 कोटी रुपये देण्याचे कबूल केले असून \"नाबार्ड‘च्या माध्यमातून 12 हजार 500 कोटींचे कर्ज देण्यात येणार आहे. दुसरीकडे जवळपास 80 ते 90 टक्‍के कामे पूर्ण झालेले आणखी 28 प्रकल्प रखडले असून त्यासाठी पुन्हा केंद्राकडे हात पसरण्याची वेळ राज्यावर आली आहे.\nकॉंग्रेस आघाडी सरकारच्या कालखंडात \"एआयबीपी‘ योजनेंतर्गत सिंचन प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी देण्यात येतो. केंद्रात आता सत्तांतर झाल्यानंतर योजनेचे नाव बदलून \"प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना‘ असे नामांतर करण्यात आले. या योजनेंतर्गत राज्याला केंद्राच्या वाट्याचा निधी तातडीने वितरित करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या अनुषंगाने राज्यातील अपूर्णवस्थेतील प्रामुख्याने दुष्काळी जिल्हे, शेतकरी आत्महत्याग्रस्त विभागांतील अपूर्ण प्रकल्पांचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठविला. यामध्ये राज्यातील 26 प्रकल्पांचा समावेश असून, त्यासाठी केंद्राच्या वाट्याच्या 36 हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. राज्याच्या अपूर्णावस्थेतील प्रकल्पांसाठी केंद्राकडून 3600 कोटी रुपये देण्याचे केंद्राने कबूल केले आणि \"नाबार्ड‘च्या माध्यमातून राज्य सरकारला 12 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेण्यात आला. सध्या राज्याच्या डोक्‍यावर साडेतीन लाख कोटींचे कर्ज असून, खुल्या बाजारात सरकारची पत खालावली असल्याने \"नाबार्ड‘ यातून काय मार्ग काढणार, याकडे सरकारचे लक्ष लागले आहे.\nबहुतांश कामे पूर्ण झालेले 28 प्रकल्प\nवाघ लघुप्रकल्प ठाणे ः कालव्याची 85 टक्‍के कामे पूर्ण, तिलारी मोठा प्रकल्प, सिंधुदुर्ग ः शाखा कालव्यांची 60 टक्‍के कामे पूर्ण, वाघूर जळगाव ः उजवा तट कालवा 94 टक्‍के पूर्ण, वाघझिरा लघुप्रकल्प जळगाव ः बंदिस्त कालवा व सांडव्याचे काम अपूर्ण, निम्न पांझरा धुळे ः डावा कालवा 60 तर उजव्या कालव्याचे 90 टक्‍के काम पूर्ण, पुरंदर उपसा पुणे ः कामे प्रगतिपथावर, निवकणे लघू सातारा ः मातीकाम 80 टक्‍के पूर्ण, पिंपळगाव सोलापूर ः धरणाचे काम पूर्ण; मात्र कालवा आणि वितरण व्यवस्थेची कामे अपूर्ण, पळसुंदे नगर ः वाळू लिलाव बंद असल्याने काम ठप्प, नांदगाव लघू औरंगाबाद ः घळभरणी वगळता प्रकल्पाचे 60 टक्‍के काम पूर्ण, बाणेगाव जालना ः कालव्यांची 90 टक्‍के कामे पूर्ण, निम्नदुधना परभणी ः विमोचकाचे 90 टक्‍के काम पूर्ण व कालव्याची कामे प्रगतिपथावर, उगलेवाडी लघुप्रकल्प लातूर ,नांदूर मधमेश्‍वर नाशिक, बावनभडी भंडारा, सपन, झटाझमरी आणि आमपाटी अमरावती, वाई अकोला, कुकसा, सुरखंडी वाशीम, अमडापूर, लखमापूर यवतमाळ, बोराखेडी, दिग्रस आणि मासरूळ बुलडाणा.\nअग्निशमन दलाचा मला सार्थ अभिमान वाटतो - विश्वनाथ महाड़ेश्वर\nमुंबई : अग्निशी झुंज देत मुंबईकरांच्या जीवन व मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुंबईचे महापौर विश्वनाथ...\n‘व्यवस्थे’मुळेच होतेय आरोग्याची हेळसांड\nसरकारी दवाखान्यात प्रशिक्षणार्थी म्हणून आणि नंतर डॉक्‍टर म्हणून काम केल्यामुळे ही व्यवस्था जवळून पाहिली आहे. सरकारी दवाखान्यांच्या दावणीला बांधलेल्या...\nसोलापूर - घोळवेवाडी ही जिल्ह्यातील प्रथम पेपरलेस ग्रामपंचायत\nपांगरी (सोलापूर) : मराठवाड्याच्या हद्दीलगत असलेल्या घोळवेवाडी (ता.बार्शी) ग्रामपंचायतीने पेपरलेस होऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविला...\nराजकीय वर्चस्ववादातून दोन खून\nकोल्हापूर - अशोक पाटील यांच्या खुनानंतर त्याचा सूड म्हणून धनाजी गाडगीळ यांचा खून करण्यात आला. त्यामुळे संवेदनशील पाचगाव धुमसत राहिले. राजकीय...\nपुणे जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर\nशिर्सुफळ (पुणे) : राज्य निवडणूक आयोगाने जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या, तसेच रिक्त जागा असणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://chinmaye.com/2017/11/08/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AC-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-24T04:24:05Z", "digest": "sha1:6SFYRZERPYPWADCJMJZUWQSZVPYQ5JIT", "length": 31247, "nlines": 160, "source_domain": "chinmaye.com", "title": "लाल कोट ते कुतुब मिनार | Chinmaye", "raw_content": "\nलाल कोट ते कुतुब मिनार\nराजधानी दिल्लीला म्हणतात शहरों का शहर … गेल्या हजार वर्षांत विविध शासकांनी इथं शहरं वसवली. वेगवेगळी नावं .. विविध रचना आणि त्याचा रोचक असा इतिहास. या ब्लॉगमालिकेतून आपण दिल्लीच्या सात शहरांचा इतिहास जाणून घेणार आहोत. यापूर्वी या ब्लॉगवर शाहजहानाबाद आणि तुघलकाबाद बद्दल लिहीलं आहे. शाहजहानाबाद म्हणजे आजची पुरानी दिल्ली जिथं लाल किल्ला आणि जामा मस्जिद आहे… हे दिल्लीचं सातवं शहर … घियासुद्दीन तुघलकने वसवलेलं तुघलकाबाद हे तिसरं शहर ते सुद्धा या ब्लॉगवर तुम्हाला सापडेल. आज आपण वेध घेणार आहोत दिल्लीतल्या पहिल्या शहराचा. तोमर शासकांनी लाल खडकांच्या तटबंदीने उभा केला तो लाल कोट हा दिल्लीचा जुना ‘लाल किला’. किला हा फार्सी शब्द आहे. पूर्वी या ठिकाणाला दुर्ग राय पिठोरा म्हंटले गेले. आज या तटबंदीचे अवशेष मेहरौली, साकेत, कुत्ब कॉम्प्लेक्स वसंत कुंज या भागात पाहता येतात\n.तोमर शासक अनंगपाल प्रथमने ७३१ CE मध्ये दिल्ली शहरात आपली राजधानी वसवली. त्याला पुढे तटबंदी निर्माण करण्यात आली शेवटचा तोमर शासक अनंगपाल दुसऱ्याकडून. पुढे चौहान शासकांनी तोमरांना पराभूत करून दिल्लीवर वर्चस्व निर्माण केले. लाल कोटाच्या तटबंदीत भर घालून किला राय पिथौरा बांधला गेला.\nकुत्ब मिनारजवळच संजय वनमध्ये जाऊन हे अवशेष पाहणे शक्य आहे. भाग थोडासा दुर्गम आहे. त्यामुळे एकट्याने जाणे टाळावे. सकाळी बरेच लोक इथं धावायला येतात त्यामुळे वर्दळ असते. झुडपांतून जाताना किडे आणि सापांची काळजी घेतली पाहिजे. फुलपॅण्ट व बूट घालून जाणे उत्तम. एक मजला उंच आणि साधारण २० फूट रुंद असलेला तटबंदीचा अवशेष मी पाहिला. काही अंतर या तटबंदीवरच्या पायवाटेने चालत जाता येते. पलीकडे दिसतो कुतुब मिनार. ज्याची निर्मिती केली महमूद घुरी म्हणजे मुईझुद्दीन इब्न समच्या बरोबर आलेल्या व गुलाम घराण्यातील पहिल्या शासकाने म्हणजे कुतबुद्दीन ऐबकने.\nमामलूक घराण्याच्या शासकांनी लगेच नवे शहर वसवले नाही. उलट लाल कोट भागातील बांधकामे, मंदिरे पाडून त्यांचं शहर वसवलं. साधारणपणे अल्लाउद्दीन खिलजीच्या काळापर्यंत या शहराला महत्त्व होते. कुत्ब मिनार परिसर पाहताना या संपूर्ण काळाचे दर्शन होते. ११९२ CE ला पृथ्वीराज चौहानचा पराभव करून दिल्लीवर मोहम्मद घुरीने राज्य स्थापन केले व आपला विश्वासू गुलाम कुतुबुद्दीन ऐबकला शासक म्हणून नेमले. पुढे १२०६ मध्ये मोहम्मदाच्या मृत्यनंतर ऐबकाने स्वतःला सुलतान घोषित केले व मामलूक म्हणजे गुलाम घराण्याची सुरुवात झाली. पुढे अल्लाउद्दीन खिलजीने सिरी शहराची बांधणी १३०३ च्या सुमारास केली. तोपर्यंतचा प्रवास विविध पुरातन वास्तूंच्या माध्यमातून पाहणे शक्य आहे.\nकुत्ब मिनार आता मेट्रो स्टेशन आहे तिथून बॅटरीवली रिक्षा १० रुपयांत आपल्याला कुत्ब संकुलाजवळ आणून सोडते. तिकीट काढून आत शिरताच आपल्याला एक सुंदर दार दिसते. ते मंत्र मुघल काळात बांधलेले आहे. पुढे आल्यावर आपण प्रवेश करतो एका मशिदीच्या प्रांगणात. कुवत-उल-इस्लाम म्हणजे इस्लामचं सामर्थ्य असे नाव या मशिदीला ऐबकाने दिले. गमतीचा भाग असा की जवळजवळ २७ हिंदू व जैन मंदिरे पाडून जी साधन सामग्री मिळाली ती एकत्र करूनच इस्लामच्या सामर्थ्याला जन्म दिला गेला. त्यामुळे एकाच ठिकाणी शैव/ वैष्णव/ जैन सर्व प्रकारचे कोरीव काम पाहता येते. काही ठिकाणी जुन्या शिल्पांमध्ये जिथं मानवी आकृत्या होत्या त्या मुद्दाम विद्रुप केलेल्या दिसतात.\nऐबकाचा बखरकार हसन निझामी म्हणतो – मूर्तिपूजक आणि मूर्तींना ध्वस्त करण्याच्या संकेताला धरून ऐबकाने मंदिरे पाडली आणि जेत्याप्रमाणे एक ईश्वर (अल्लाह) मानणाऱ्या लोकांची मशीद उभी राहिली (पृष्ठ ५२ पुरातत्व विभाग विश्व वारसा मालिका माहितीपुस्तक)\nया खांबांची भूमिती भुरळ पडावी इतकी आकर्षक आहे. त्यात विविध कोनातून डोकावणारे प्रकाशकिरण आणि सावल्या अजून गंमत निर्माण करतात. पुढे आपण येतो ऐबक आणि शमसुद्दीन इल्तुतमिशने बांधलेल्या स्क्रीनकडे. ही दोन बांधकामं विविध काळातील विविध रचनाशैलींबद्दल आपल्याला बरंच काही सांगतात आणि हिंदू-मुस्लिम रचनापद्धतीचा विकास कसा झाला याची कल्पना आपल्याला येते.\nकुतुबुद्दीन ऐबकाने बांधलेल्या कमानींवरील कोरीव काम हिंदू कारागिरांनी इस्लामी मुकादमांच्या हाताखाली बांधलेले आणि कोरलेले आहे. त्यामधील सर्पाकृती वेलबुट्टी हिंदू तर त्यातून बहरलेली फुले इस्लामी धाटणीची आहेत. अरेबिक लिपीत कोरलेल्या आयतीसुद्धा अगदी सरळ साध्या पद्धतीने कोरलेल्या दिसतात.\nइल्तुतमिशच्या काळात झालेल्या कोरीवकामावर इस्लामी शैलीची छाप जास्त स्पष्टपणे दिसते. कूफिक आणि तुघरा या दोन्ही शैलीची कॅलिग्राफी आणि भारताच्या पश्चिमेला पार स्पेनपर्यंत दिसणाऱ्या सारासेनिक वळणाचे कोरीव काम आपल्याला इथं दिसून येईल. असा दावा केला जातो की भारतात कमानी बांधायला किस्टोन आणि विशिष्ट आकाराच्या दगडांची रचना केली जात नसे त्यामुळे त्या कमानी कॉर्बेल पद्धतीने बांधल्या जात – ज्यात दगड पायऱ्यांप्रमाणे रचून मग गोल आकारात कोरले जात. कुतुब मिनारजवळ मेहरौलीत बल्बनच्या मकबऱ्यात प्रथम खऱ्या कमानीचा वापर केला गेला असा दावा काही अभ्यासक करतात. काही याला चूक मानतात… दोन्ही बाजूंचे पुरावे पाहणे मजेशीर ठरेल. इल्तुतमिश आणि खिलजी दोघांनी या मशिदीचा विस्तार केला आणि मग कुत्ब मिनारही कुव्वत उल इस्लामच्या सीमेच्या आत आला.\nइल्तुतमिश आणि ऐबकाच्या स्क्रिनसमोर आपल्याला दिसतो एक काळा लोखंडी स्तंभ. चौथ्या शतकात हा स्तंभ एखाद्या विष्णूच्या मंदिराचा भाग म्हणून बांधला गेला असावा आणि विष्णूचे वाहन गरुड त्यावर स्थापित करण्यात आले असावे असा कयास बांधता येतो. या स्तंभावर गुप्त शैलीच्या लिपीत कोरलेल्या लेखावरून स्पष्ट होते की चौथ्या शतकात चंद्रगुप्त दुसरा या राजाच्या काळात विष्णुपद नावाच्या ठिकाणी हा ध्वजस्तंभ उभा केला गेला असावा. अनंगपाल तोमरने हा दुसऱ्या स्थानातून इथे आणला अशी मान्यता आहे कारण इतर कोणतेही समकालीन गुप्त अवशेष कुतुब परिसरात दिसत नाहीत. अनेक शतकं लोटलेली असूनही हा स्तंभ गंजला नाही. सर रॉबर्ट हाडफिल्ड यांनी केलेल्या रासायनिक तपासणीप्रमाणे या स्तंभात ९९.७२०% शुद्ध लोखंड आहे. वैज्ञानिकांनी असाही निष्कर्ष काढलाय की हे काम साच्यातील नसून फोर्ज केलेल्या लोखंडाचे आहे – संदर्भ जे पेज गाईड टू कुत्ब आणि ASI माहिती पुस्तक पण क्रमांक ५७ थोडक्यात काय तर चौथ्या शतकात भारतात उत्कृत्ष्ट दर्जाचं लोखंड ओतलं जाऊ शकत होतं. भारतीय पारंपरिक विज्ञानात शिकण्याजोगं बरंच काही आहे पण त्यासाठी वैदिक विमाने उडवण्याऐवजी असे चोख पुरावे एकत्र करावे लागतील. नाहीतर तेजोमहालयाच्या भाकडकथांसारखं व्हायचं\nहा स्तंभ मध्य प्रदेशातील विदिशाजवळ असलेल्या उदयगिरीहून आणला गेला असावा असं काही अभ्यासक मानतात. हा जग जिंकणाऱ्या राजाचा विष्णुभक्त राजाचा कीर्ती-स्तंभ आहे हे वाचून अल्लाउद्दीन खिलजीसारख्या महत्त्वाकांक्षी सुलतानाने काय विचार केला असेल असा प्रश्न पडतो.\nअफगाण सुलतान जिथून आले त्या गझनीजवळ कुतुब मिनारासारखेच मिनार आहेत. पश्चिम अफगाणिस्तानात जामचा मिनार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिनार कुतुब मिनारच्या 10 वर्षे आधी बांधला गेला असावा आणि त्यातूनच कुतुबुद्दीन ऐबकाला कुत्ब मिनार बांधण्याची कल्पना सुचली असावी असं म्हणता येईल. जामचा मिनार गझनवीद राज्यावर विजय मिळाला म्हणून बांधला गेला आणि त्याची उंची ६० मीटर आहे. हा मिनार घुरींना पृथ्वीराजवर विजय मिळाला म्हणून बांधला असेही काही ब्रिटिश पुरातत्ववेत्ते मानतात.\n७० मीटरपेक्षा अधिक उंचीचा कुत्ब मिनार दक्षिण दिल्लीत अनेकदा क्षितिजावर दिसतो. ११९९ CE मध्ये बांधकामाला सुरुवात केली कुतुबुद्दीन ऐबकने तर पूर्ण झाला असावा अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात … खिलजीने स्वतः असा अजून एक मिनार बांधायचा प्रयत्न सुरु केला ज्याचं नाव होतं अल्ला-इ-मिनार. पण सुमारे २५ मीटर बांधकाम झाल्यावर खिलजी मरण पावला असावा आणि मग हा प्रकल्प गुंडाळून ठेवला गेला.\nया मिनारच्या तीन टप्प्यांवर कोरीव काम आणि बाल्कनी आहे.stalactite vaulting (ज्याला अरेबिकमध्ये मोकाराब किंवा मुकारना म्हणतात) या पद्धतीचा वापर करून हे छज्जे बांधलेले आहेत. पुढे तीनदा या मिनारावर वीज पडली व पुन्हा पुन्हा अगदी फिरुज शाह तुघलकच्या काळापर्यंत याची दुरुस्ती करावी लागली. लोधी शासकांच्या काळातही दुरुस्ती केली जाऊन संगमरवरासारखे नवे पैलू जोडले गेले असावेत.\nमिनारच्या कोरीवकामात आपल्याला नक्ष पद्धतीच्या अक्षरांची सजावट दिसते. पूर्वी या मिनारच्या शीर्षावर असलेल्या जुन्या कपोलाचे (शिखराच्या डोमचे)१८०३ CE मध्ये झालेल्या भूकंपात नुकसान झाल्यामुळे मेजर स्मिथने कपोला बांधला. तेव्हा १७००० रुपयांचे बजेट त्यासाठी देण्यात आले. पण इंडो-सॅरसेनिक शैलीच्या मिनारावर हा बंगाली छत्री पद्धतीचा कपोला विजोड वाटू लागला आणि लॉर्ड हार्डिंजने तो कपोला काढून बसवला बागेत. त्याला आज स्मिथची फॉली (चूक) म्हणून ओळखले जाते.\nशमसुद्दीन इल्तुतमिशचा मकबराही याच आवारात आहे. सुंदर कोरीवकाम पण घुमट कोसळल्याने खुल्या आकाशाखाली असलेली कबर असा इथला देखावा. या मकबऱ्याला तीन मेहराबी आहेत. अरेबिक पद्धतीची फुलांची नक्षी सर्व भिंतींवर कोरलेली दिसते आणि काही ठिकाणी हिंदू शैलीचे मोटिफ असणारी वेलबुट्टीही दिसते. squinch पद्धतीच्या कमानी हे या मकबऱ्याचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल.\nइथं असलेला अजून एक मकबरा म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीचा मकबरा व त्याला जोडून असलेला मदरसा. मुख्य मकबऱ्याचा घुमट कोसळलेला दिसतो पण मदरशावरील घुमट शाबूत आहेत. हिंदू शैलीच्या कोनिकल डोमपेक्षा हे घुमट गोल पेंडेंटिव्ह पद्धतीने बांधलेले असल्याने वेगळे दिसतात.. या इस्लामिक शैलीचा वापर इथून पुढे अनेक ठिकाणी दिसतो. खिलजीच्या मकबऱ्याचे काम सेलजुक पद्धतीने झाले असे तज्ज्ञ मानतात. मध्य आशियातील सेलजुक घराणे असत झाल्यावर भारतात तुलनेने स्थिर परिस्थिती असल्याने ते कारागीर कामाच्या, आश्रयाच्या शोधात आले अशी मान्यता आहे.\nइमाम जमीनचा मकबरा हा या परिसरातील तिसरा मकबरा. पण हा पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला सिकंदर लोधीच्या कारकिर्दीत बांधला गेला असावा. तुर्कस्तानहून आलेल्या इमाम जमीन उर्फ मोहम्मद अली कडे कुवत-उल-इस्लाम मशिदीमधील महत्त्वाचे अधिकारपद असावे म्हणून त्याच्या कबरीला तिथं जवळ स्थान मिळालं असावं असा कयास आहे. स्टुको किंवा जाळीकामाचे सुंदर नमुने आपल्याला तिथं पाहता येतात. लाल वालुकाश्म आणि संगमरवर यांचा मिलाफ आपल्याला दिसतो.\nउंच कुतुबमिनार प्रसिद्ध आहे त्याच्या पायथ्याशी असलेल्या दरवाजाकडे लोकांचं लक्ष तितकंसं जात नाही. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात हा दरवाजा बांधण्यात आला म्हणून याचे नाव अल्लाह-इ-दरवाजा. या दरवाजाचे कोरीव काम इतके सुंदर आहे की फक्त हा दरवाजाच एक पुरातन वास्तू म्हणून अभ्यासावा लागेल. इस्लामिक रचनापद्धतीची कलाकुसर, समतोलता, भौमितीय अचूकपणा आणि त्याच्या जोडीला हिंदू-जैन पद्धतीचे मोटिफ. कमळाच्या कळ्यांचे तोरण दरवाजाच्या सर्व कमानींना सजावट देते. दरवाजाच्या आतील व बाहेरील कोरीवकाम खरोखर शब्दांच्या पलीकडचं आहे.\nकुतुब मिनारची कुवत उल इस्लाम मशीद बांधताना हिंदू-जैन मंदिरे पडून त्याचे स्तंभ वापरले गेले हा अधिकृत इतिहास आहे .. पण तरीही वास्तू म्हणून किंवा मटेरियल कल्चरच्या दृष्टीने कुतुब मिनार हा महत्त्वाचा वारसा आहेच भारताचा. वेरूळचे दशावतार लेणे बौद्ध गुंफेला वापरून कोरले गेले या आधारावर आज वेरूळला नावं ठेवणार का जरी गोव्यातील देवालये तोडून चर्चेस बांधली गेली तरीही ओल्ड गोवा चर्चेज हा भारताचाच काय विश्व वारसा आहेच. उद्या इंडोनेशिया मुस्लिम बहुल आहे म्हणून तिथल्या हिंदू मंदिरांचा विरोध केलेला किंवा कंबोडियात कशाला मंदिर पाहिजे म्हणून अंगकोर वाटचा विरोध केला तर आपल्याला पटेल का जरी गोव्यातील देवालये तोडून चर्चेस बांधली गेली तरीही ओल्ड गोवा चर्चेज हा भारताचाच काय विश्व वारसा आहेच. उद्या इंडोनेशिया मुस्लिम बहुल आहे म्हणून तिथल्या हिंदू मंदिरांचा विरोध केलेला किंवा कंबोडियात कशाला मंदिर पाहिजे म्हणून अंगकोर वाटचा विरोध केला तर आपल्याला पटेल का इतिहास तर वस्तुनिष्ठपणे अभ्यासायला हवाच पण पुरातन वास्तू म्हणजे काही फक्त ऐतिहासिक वारसा नव्हे … तो आपल्या देशाचा डिझाईनचा, कलेचा, मूर्त संस्कृतीचा वारसा आहे आणि तो कोणत्याही उपासना पद्धतीशी जोडलेला असला तरीही जपायला हवा असं मला वाटतं … याची दुसरी बाजू ही फक्त मुघल गोष्टींना हाइप केले जाणे ही सुद्धा आहे. हिंदू सोडा दिल्लीत अनेक इतर मुसलमान शासकानी बांधलेल्या अनेक इमारती आहेत पण त्या दुर्लक्षित आहेत त्याचा शोध घेताना पुढच्या वेळेला आपण जाऊ शेरशहा सूरच्या काळात शेरगढ शहर पाहायला.\nबाबासाहेब: बालपण आणि शिक्षण\nबाबासाहेब जाणून घेताना – विषयप्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-24T04:43:05Z", "digest": "sha1:ZOUCHJSHYONSGWMBL6CVVFHFB2VRK7ZA", "length": 6752, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "समुद्रशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसमुद्रशास्त्र तथा सागरशास्त्र (ग्रीक शब्द ὠκεανός म्हणजे \"महासागर\" आणि γράφω म्हणजे \"लिहिणे\" चा अर्थ), हा भौगोलिक आणि जैविक जैविक घटकांचा अभ्यास आहे. हे पर्यावरणीय तंत्रज्ञानासह विविध विषयांचा समावेश असलेल्या पृथ्वी विज्ञान आहे; महासागर प्रवाह, लाटा, आणि भौगोलिक द्रव गतिशीलता; प्लेट टेक्टोनिक्स आणि समुद्राच्या तळावरील भूगोल; आणि महासागर आणि त्याच्या सीमा ओलांडून विविध रासायनिक पदार्थ आणि भौतिक गुणधर्म असणारी या वैविध्यपूर्ण विषयांवर अनेक विषयांचा अभ्यास करण्यात आला आहे ज्यात समुद्रशास्त्रज्ञ जगभरातील अधिक ज्ञान आणि त्यातील प्रक्रियेची समज वाढवतात: खगोलशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, हवामानशास्त्र, भूगोल, भूगर्भशास्त्र, जल विज्ञान, हवामानशास्त्र आणि भौतिकशास्त्र. पॅलिओ ओशनोग्राफी भूगर्भीय भूतकाळात महासागरांच्या इतिहासाचा अभ्यास करते\n१ . समुद्रमार्ग, महासागरांच्या तळाशी आणि सागरी वनस्पती आणि प्राणी यांच्यासह महासागरांचा अभ्यास.\n२. महासागरांचा अभ्यास आणि त्यांचे जीवन.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जानेवारी २०१८ रोजी १९:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/stomach-food-item-1662815/", "date_download": "2018-04-24T04:40:25Z", "digest": "sha1:GMLIIQ7VZBEGW4MM53CJLQYHW5QWR6AA", "length": 12221, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Stomach food item| पोट साफ होण्यासाठी हे पाच पदार्थ ठरतात उपयुक्त | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपोट साफ होण्यासाठी हे पाच पदार्थ ठरतात उपयुक्त\nपोट साफ होण्यासाठी हे पाच पदार्थ ठरतात उपयुक्त\nसकाळी उठल्यानंतर पोट साफ झाले नाही तर संपूर्ण दिवसभर एकप्रकारची अस्वस्थतता जाणवते. कुठल्याही आजाराची सुरुवात पोटापासून होते असे म्हटले जाते.\nसकाळी उठल्यानंतर पोट साफ झाले नाही तर संपूर्ण दिवसभर एकप्रकारची अस्वस्थतता जाणवते. कुठल्याही आजाराची सुरुवात पोटापासून होते असे म्हटले जाते. पोट साफ नसेल तर दुसऱ्या आजारांचीही लागण होते. त्यामुळे पोट साफ ठेवण्यासाठी या पाच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.\n– पोट साफ ठेवण्यासाठी सफरचंद खाणे खूप उपयुक्त ठरू शकते. एका सफरचंदात ४.५ ग्रॅम फायबर असते. तुमची पचन क्रिया व्यवस्थित ठेवण्यात फायबर महत्वाची भूमिका बजावते.\n– पोटाच्या आरोग्यासाठी संत्र सुद्धा खूप उपयुक्त आहे. एका संत्र्यामध्ये ४ ग्रॅम फायबर असते तसेच त्यामध्ये कॅलरीचा स्तरही खूप कमी असतो. क जीवनस्तव असलेले संत्र खाल्ल्यानंतर तुमची रोगप्रतिकारक शक्ति सुद्धा खूप वाढते. संत्र्यामध्ये फ्लेवेनॉल असते. संत्र तुमच्या त्वचेसाठी सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे.\n– पॉपकॉर्न सुद्धा पोटाच्या स्वच्छतेसाठी महत्वपूर्ण आहे. एक कप पॉपकॉर्नमध्ये १ ग्रॅम फायबर असते.\n– अपचनाचा त्रास असेल तर ओट्सही उपयुक्त ठरु शकतात. एक कप ओट्समध्ये दोन ग्राम सोल्यूबल आणि इनसोल्यूबल फायबर असते. पोटाला तंदुरुस्त ठेवण्यामध्ये ओट्स उपयुक्त ठरु शकतात.\n– एलोवेराचा उपयोग लोक त्वचेच्या आणि केसांच्या सौंदर्यासाठी करतात. पण ते तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. एलोवेराच्या सेवनानंतर पोटाचे विकार दूर होऊ शकतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nनाणार प्रकल्प विदर्भात आणा: भाजपा आमदाराची मागणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/majha-katta-vidya-balan-477990", "date_download": "2018-04-24T04:50:31Z", "digest": "sha1:HH3UNOT2UKVWYUPWCU6QFM7EV7QURSNP", "length": 15568, "nlines": 143, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "माझा कट्टा : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसोबत दिलखुलास गप्पा", "raw_content": "\nमाझा कट्टा : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसोबत दिलखुलास गप्पा\nबॉलिवूडची ‘उलाला गर्ल’ अशी तिची ओळख असली, तरी ‘डर्टी पिक्चर’शिवाय परीणिता, पा, इश्किया, कहानी अशा अनेक चित्रपटात बहुरंगी व्यक्तिरेखा अभिनेत्री विद्या बालनने साकारल्या आहेत. ‘माझा कट्टा’वर गप्पा मारताना विद्याने बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच होत असल्याची खंत व्यक्त केली. शनिवारी रात्री 9 वाजता विद्या बालनसोबतच्या ‘माझा कट्टा’ चं ‘एबीपी माझा’वर प्रक्षेपण होईल.\nबॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच होतं. एखादी भूमिका किंवा मोठा ब्रेक हवा असेल, तर काही निर्माते नवोदितांना ‘कॉम्प्रोमाईझ’ करण्यासाठी सांगतात, असं विद्याने सांगितलं. वैयक्तिक आयुष्यात आपल्याला असा अनुभव आला नसल्याचं ती म्हणाली. मुलींना पुरुषांच्या वाईट नजरेपासून वाचण्यासाठी काही सल्ला देण्याऐवजी पुरुषांनीच मर्यादेत रहावं, आपली दृष्टी बदलावी, असं विद्याने सांगितलं.\nब्रेकफास्ट न्यूज : नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून कास्टिंग काऊचचं समर्थन\nअहमदनगर : केडगाव शिवसैनिकांची हत्या प्रकरण : काँग्रेस नगरसेवकाला अटक\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\n712 : कोल्हापूर : 70 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज\nयोग माझा : अर्धचंद्रासनाचे शरीराला अनेक फायदे\nमुंबई : महिलेला धक्का लागला म्हणून लोकलखाली ढकललं\nमुंबई : वृक्षतोडीसंदर्भातील पालिका आयुक्तांचे विशेषाधिकार हायकोर्टाकडून रद्द\nठाणे : मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्ती लांबणीवर\nब्रेकफास्ट न्यूज : नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून कास्टिंग काऊचचं समर्थन\nअहमदनगर : केडगाव शिवसैनिकांची हत्या प्रकरण : काँग्रेस नगरसेवकाला अटक\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\n712 : कोल्हापूर : 70 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज\nयोग माझा : अर्धचंद्रासनाचे शरीराला अनेक फायदे\nमाझा कट्टा : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसोबत दिलखुलास गप्पा\nमाझा कट्टा : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसोबत दिलखुलास गप्पा\nबॉलिवूडची ‘उलाला गर्ल’ अशी तिची ओळख असली, तरी ‘डर्टी पिक्चर’शिवाय परीणिता, पा, इश्किया, कहानी अशा अनेक चित्रपटात बहुरंगी व्यक्तिरेखा अभिनेत्री विद्या बालनने साकारल्या आहेत. ‘माझा कट्टा’वर गप्पा मारताना विद्याने बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच होत असल्याची खंत व्यक्त केली. शनिवारी रात्री 9 वाजता विद्या बालनसोबतच्या ‘माझा कट्टा’ चं ‘एबीपी माझा’वर प्रक्षेपण होईल.\nबॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच होतं. एखादी भूमिका किंवा मोठा ब्रेक हवा असेल, तर काही निर्माते नवोदितांना ‘कॉम्प्रोमाईझ’ करण्यासाठी सांगतात, असं विद्याने सांगितलं. वैयक्तिक आयुष्यात आपल्याला असा अनुभव आला नसल्याचं ती म्हणाली. मुलींना पुरुषांच्या वाईट नजरेपासून वाचण्यासाठी काही सल्ला देण्याऐवजी पुरुषांनीच मर्यादेत रहावं, आपली दृष्टी बदलावी, असं विद्याने सांगितलं.\nब्रेकफास्ट न्यूज : नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून कास्टिंग काऊचचं समर्थन\nअहमदनगर : केडगाव शिवसैनिकांची हत्या प्रकरण : काँग्रेस नगरसेवकाला अटक\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\nKXIPvDD: आखिरी नहीं, इस ओवर में पलट गई दिल्ली की जीती हुई बाज़ी\nWATCH: अंतिम छह गेंदो पर जीतते-जीतते कैसे हार गई दिल्ली की टीम\nKXIPvDD: मुजीब की आखिरी गेंद पर खत्म हुआ श्रेयस का संघर्ष, दिल्ली को मिली 4 रनों से हार\nDD vs KXIP: घर में भी नहीं रुका दिल्ली के हार का क्रम, जीत के साथ पंजाब टॉप पर\nDD vs KXIP: दिल्ली की शानदार गेंदबाजी, 143 पर रुका किंग्स का कारवां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2012/11/03/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-24T04:46:11Z", "digest": "sha1:DX47QFAB7NRLFEYG4LIGY4WAHOWVJKBM", "length": 28925, "nlines": 482, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "चंद्राचा अमृतरस दुधात! | Abstract India", "raw_content": "\nशुद्ध दुधाचे माहात्म्य जाणून घ्या. केवळ कोजागरीलाच नव्हे, तर रोजच पित्त शमन करण्यासाठी पाव कप थंड दूध थोडी साखर घालून घेण्यास आयुर्वेदाने सुचविलेले आहे. शरद ऋतूत प्रकुपित झालेला पित्तरूपी अग्नी सगळे अन्न जाळून टाकणार नाही, पण केवळ पचनासाठी मदत करेल, हे पाहणे इष्ट असते. सर्जनप्रक्रियेचे चक्र निरंतर सुरू राहावे, या हेतूने शरद पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणाऱ्या अमृताचा स्वीकार केलेले दूध सेवन केले जाते. सर्वांनी निसर्गाबरोबर आनंद साजरा करावा, या हेतूने कोजागरी साजरी केली जाते.\nशरद ऋतूचे आगमन झाले, पावसाळा संपला. पहिल्या पावसाचे पहिले थेंब मातीवर पडल्यावर येणारा सुवास प्रत्येक प्राणिमात्रास मोहित करतो. हा सुवास कशामुळे येतो व तो पसरतो कसा उन्हाळ्याने पृथ्वीच्या मातीला भाजून काढलेले असते. गरम तव्यावर पाणी पडल्यास त्याचा सुंदर आवाज होऊन वाफ होऊन उडून जाते, तसेच पृथ्वीच्या पोटात साठवलेल्या उष्णतेमुळे पहिल्या पावसाच्या पाण्याची वाफ होते व या वाफेबरोबर भूमितत्त्वाचा वास सगळीकडे पसरतो व सर्व जण मोहित होतात.\nपावसाळ्यामध्ये मनुष्याच्या शरीरात साठलेला पित्तदोष बाहेर ऊन पडल्यावर अशाच तऱ्हेने उफाळून येतो. शरीरातील पित्त काढून टाकण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेला विरेचन विधी तसा वर्षभर करता येत असला तरी शरदात विरेचन विधी केल्यास शरीरात अनायासे प्रकुपित झालेले पित्त बाहेर टाकायला मदत होते. शरीरात झालेला अग्नीचा प्रताप म्हणजे पित्तदोष असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे संपूर्ण जीवन माणसाच्या नात्यातील उष्णतेच्या उबेवर, कर्तृत्वशक्‍तीसाठी लागणाऱ्या अग्नीच्या शक्‍तीवर, शरीराचे व्यवहार नीट चालण्यासाठी हॉर्मोन्सच्या अग्नीवर अवलंबून असते. अग्नीला जीवनात एकूणच अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो अग्नी संतुलित राहावा व पित्तदोष वाढू नये ही अपेक्षा असते, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे रोग किंवा शारीरिक, मानसिक त्रास पित्तामुळेच होत राहतात. त्वचा लाल होणे, त्यावर बारीक पुटकुळ्या येणे, गांधी येणे, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, आंबट-कडू उलट्या होणे, छोट्याशा कारणाने राग येणे, राग मस्तकात जाणे, असे अनेक त्रास पित्तामुळे होत राहतात.\nपित्तदोष वाढून त्रास होऊ नये यासाठी अनेक नियम सांगितलेले असतात. अग्नी हा वायूचा मित्र आहे. तेव्हा पित्तदोषाबरोबरच वातदोषही वाढतो व पावसाळ्यातील वातदोष पित्ताला उफाळण्यास मदत करत असावा. म्हणून वात-पित्ताची जोडी सांभाळावीच लागते. त्यासाठी आहार-विहारावर नियंत्रण ठेवावे लागते. निसर्गातील ऋतुबदल प्राणिमात्रांच्या शरीरातही परिणाम घडवतात. त्याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने भारतीय परंपरेत सणावारांची योजना केलेली आहे.\nऋग्वेदातील पुरुषसूक्‍तातील 16 ऋचांपैकी सहाव्या ऋचेत म्हटले आहे-\nयत्‌ पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत \nवसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः \nशरीराची व एकूणच आरोग्याची काळजी घेणारी व देवत्व धारण करणारी केंद्रे अन्नाचे ऊर्ध्वगमन करून शक्‍ती व जाणिवेत रूपांतर करण्यासाठी होणाऱ्या यज्ञाला वातावरणातील बदल जबाबदार असतात, असे या ऋचेत सुचविलेले आहे. वसंत ऋतू एक प्रकारे या सर्व क्रियेचे नियमन करतो व आज्य म्हणून मदत करतो; ग्रीष्म ऋतू अग्नी पेटविण्यासाठी व अग्नी प्रकट करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाचे काम करतो व त्यातून शरद ऋतूत अन्न तयार होते, जे आहुती म्हणून यज्ञात द्यावे लागते. मनुष्याच्या जीवनातील सर्व स्थित्यंतरे या यज्ञावरच म्हणजे या शक्‍तिपरिवर्तनाच्या क्रियेवर चालतात. त्यासाठी आवश्‍यक असते अन्न. “अन्नाद्‌ भवन्ति भूतानि’ म्हणजे सर्व प्राणिमात्र अन्नानेच अस्तित्वात येतात, अन्नानेच वाढतात, अन्नानेच त्यांचा उत्कर्ष होतो, असे म्हटलेले आहे. असे अन्न शरद ऋतूत शरीररूपी यज्ञात आहुतीरूपाने व्यवस्थित दिले गेले तर पुढे वर्षभर ताकद व स्फूर्तीचा लाभ होतो. पण या ऋतूत प्रकुपित झालेला पित्तरूपी अग्नी सगळे अन्न जाळून टाकणार नाही, पण केवळ पचनासाठी मदत करेल हे पाहणे इष्ट असते. म्हणून शरद ऋतूत प्रथम येणाऱ्या नवरात्रोत्सवात शक्‍तीची उपासना करून शक्‍तीला एका विशिष्ट मार्गाने आशीर्वादाच्या मर्यादेत आणून नंतर भौतिक पातळीवर शरद पौर्णिमेच्या दिवशी एक खास उत्सव केला जातो.\nसर्जनाची प्रक्रिया जेथून सुरू झाली ते लक्षात राहावे या हेतूने ज्येष्ठ अपत्याला मान दिला जातो. नंतर हे चक्र सतत चालू राहावे या हेतूने शरद पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणाऱ्या अमृताचा दुधामध्ये स्वीकार करून ते दूध सेवन करावे आणि सर्वांनी निसर्गाबरोबर आनंद साजरा करावा, या हेतूने कोजागरी साजरी केली जाते. आपल्या शरीरात होणारे बदल बाहेरील निसर्गात होणाऱ्या बदलांना समांतर राहिले तर आयुष्य व्यवस्थित राहते, अन्यथा ऋतुमानातील प्रत्येक बदल प्रकृती अस्वास्थ्य उत्पन्न करू शकतो.\nशरीरात साठलेले पित्त शरद पौर्णिमेला किंवा कोजागरी पौर्णिमेला रात्री बारा वाजता दूध पिऊन शांत व्हावे ही झाली सुरवात; परंतु संपूर्ण शरद ऋतूत किंवा एरवीही वाढलेल्या पित्ताचे शमन करण्यासाठी पाव कप थंड दूध थोडी साखर घालून घेण्यास आयुर्वेदाने सुचविलेले असते. शरीरातील पित्त अशा प्रकारे संतुलित राहिल्यानंतर वर्षभर शरीराला ताकद मिळू शकेल, असे अन्न दीपावलीच्या निमित्ताने प्रत्येकाने खावे, अशी योजना असते. ही सर्व उत्सवांची योजना पाहिल्यानंतर भारतीय परंपरा व आयुर्वेद एकमेकांत हात घालून कसे जातात व एकूण मनुष्यमात्राचे जीवन सुखी कसे करतात, हे लक्षात येईल.\nप्रत्येकाने दूध अवश्‍य प्यावे, पण ते होमोजिनाइज केलेले नसावे. शुद्ध ताजे दूध मिळाले तर उत्तम, अन्यथा पाश्‍चराइज केलेले दूध चालू शकते; पण ते उकळण्याच्या बिंदूपर्यंत किंवा साय धरून फुगा येईल इथपर्यंत एकदा तापवलेले असावे. ज्या दुधात किमान पाच-सात प्रतिशत स्निग्धांश आहे असे दूध अमृतासमान असते व ते शरीराला कायम उपयोगी पडू शकते. दूध हे रोगहारक आहे. दुधाचा सत्त्वांश म्हणजे तूप. पारंपरिक व आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेले तूप अमृतासमान असते व ते आरोग्यासाठी अप्रतिम असते, हे लक्षात ठेवून दीपावलीच्या शुभमुहूर्तावर तुपाचा उपयोग संपूर्ण स्वयंपाकासाठी करावा. योग्य प्रकारे बनविलेले तूप सेवन केले असता शरीरातील अतिरिक्‍त चरबी तर घटतेच, पण शरीरात साठलेले इतर दोष शरीराबाहेर काढून टाकायला मदत होते. अमृताने जसे आयुष्य वाढते तसे तुपामुळे शरीरातील दोष दूर झाल्यानेही आयुष्य वाढते.\nया कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांनाच या अमृताचा लाभ व्हावा व आता तरी शुद्ध दुधाचे माहात्म्य ओळखून पुन्हा एकदा भारतवर्षात शुद्ध दुधाचे पर्व सुरू होईल हा विश्‍वास\nfrom → कोजागरी, दुध, पित्त, पित्तशमन, पौर्णिम, शरद ऋतू\n← नको भीती भाताची\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/49?page=2", "date_download": "2018-04-24T04:40:30Z", "digest": "sha1:CSFOH56JQZVTWQ5EPB4LSML4OB4P4XCJ", "length": 8090, "nlines": 161, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आस्वाद | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमाझ्या संग्रहातील पुस्तके-१५ 'गुलाबी सिर- द् पिंक हेडेड डक'\n'गुलाबी सिर- दी पिंक हेडेड डक' या संतोष शिंत्रेच्या पहिल्या कथासंग्रहाच्या 'ब्लर्ब' मध्ये म्हटलेलं आहे, 'नव्या शतकाच्या पहिल्या अकरा वर्षांमध्ये लिहिलेल्या या कथा.\nगुढीपाडव्याचे संवत्सर चक्र कसे चालते\nआज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९३४, नन्दननाम संवत्सराचा प्रारंभ होतो आहे.\nगुढीपाडव्याच्या , मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.\nपहा ग़ालिब काय म्हणतो\n\"पहा ग़ालिब काय म्हणतो,\" असे म्हणत समीक्षकसाहेबांनी हा शेर ऐकवला --\nबक़द्रे शौक़़ नहीं ज़र्फ़े-तंगनाए-ग़ज़ल\nकुछ और चाहिए वुस‌्‌अत मेरे बयाँ के लिए\nपुन्हा बालभारतीच्या शाळेत शिकायचं आहे\nतुम्हाला बालभारतीच्या कविता आठवतात\nखूप नॉस्टेल्जिक व्हायला होते ना\nतुम्हाला परत शाळेत शिकायचे आहे\nअगदी तोच अभ्यासक्रम नसेल पण सध्याचा अभ्यासक्रम वाचूनही तुम्ही शाळेत शिकल्याचा अनुभव घेऊच शकाल.\nछत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य : नरहर कुरुंदकर\nजंगलवाटांवरचे कवडसे - १\n\"हा घे भंडारा नि जा आपल्या वाटेने\" असं म्हणत भुत्याने एका मळक्या तेलकट पिशवीतून काळसर रंगाची पूड काढली आणि रामण्णापुढे धरली. त्याच्या लबाडीचा रामण्णाला राग आला. \"माझे डोळे काही अजून परट्यांची भोकं झालेली नाहीत\nफार वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा वर्षभरात प्रदर्शित होणार्‍या सर्व हिंदी चित्रपटांपैकी केवळ एक अथवा फार फार तर दोन चित्रपट पाहणं शक्य होतं, कारण नवे चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पाहावे लागत आणि आर्थिक दृष्ट्या ते परवडणं शक्य नव\nगूढकथेचा एक अस्सल नमुना: द अदर्स\nगूढकथेमध्ये संदेह (सस्पेन्स) असतो. कधीकधी भयकल्पनेचाही कमी-जास्त अंश असतो. त्यामुळे (अधिक विचार न करता) गूढकथा आणि भयकथा या एकच, असे समजण्याची चूक केली गेली. वास्तविक भयकथेमध्ये प्रमुख तत्त्व 'भय' हेच असते.\nपुस्तक शिफारसः द क्वेस्ट\nपंधरा एक वर्षापूर्वी कुठल्याश्या मराठी वर्तमानपत्रात जगातील सर्व खनिज तेल २०२७ साली खात्रीलायक संपणार आहे असे भाकीत वाचले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-04-24T04:40:04Z", "digest": "sha1:ZQUT67RZQGG3JAYJAF4NUEPR6B76V5SW", "length": 4936, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "छोटाउदेपूर (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर छोटाउदेपूर (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nअमरेली • अहमदाबाद पश्चिम • अहमदाबाद पूर्व • आणंद • कच्छ • खेडा • गांधीनगर • छोटाउदेपूर • जामनगर • जुनागढ • दाहोद • बारडोली • पंचमहाल • पाटण • पोरबंदर • बनासकांठा • भरूच • भावनगर • महेसाणा • नवसारी • राजकोट • वडोदरा • वलसाड • साबरकांठा • सुरत • सुरेंद्रनगर\nअहमदाबाद • धंधुका • कपडवंज • मांडवी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑगस्ट २०१५ रोजी १९:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1669", "date_download": "2018-04-24T04:34:47Z", "digest": "sha1:YE3W3VYVU3XNYG62VJS3M2H6KXURC5JO", "length": 7667, "nlines": 64, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग\nवर्ष 2020 पर्यंत 5 कोटी महिलांना सौर चरखा प्रशिक्षणाचे उदिृष्ट तर लिज्जत पापड समुहाच्या 5 कोटी महिलांना स्वयंचलित यंत्र प्रशिक्षणाचे उद्दिष्ट- गिरीराज सिंग\nमहात्मा गांधीच्या स्वप्नातील भारतात चरख्याच्या जास्तीत जास्त वापराद्वारे स्वावलंबी व्हावे हे उद्दिष्ट होते. त्यांच्या स्वप्नपुर्ततेसाठी आम्ही वर्ष 2020 पर्यंत 5 कोटी महिलांना सौर चरखा प्रशिक्षण देण्याचे ठरवले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी आज मुंबईत केले.\nते लिज्जत पापड श्री महिला गृह उद्योग समूहाच्या 51 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.\nसिंग पुढे म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेत या उद्योगाचा खारीचा वाटा असला तरी या समुहाने महिलांना 1952 पासून स्वकर्तृत्वावर उद्यमशीलता शिकवली. लिज्जत पापड उद्योग समूहाला खादी ग्राम उद्योगाने मान्यता दिली. आज या समूहाचा वटवृक्ष झाला असून वार्षिक उलाढाल सोळाशे कोटी रुपये तर सरासरी वार्षिक दरडोई उत्पन्न 6,000 रुपये आहे.\nबदलत्या यांत्रिकीकरणाच्या युगात लघू उद्योगांनी सुद्धा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असून या क्षेत्रात संशोधन आणि विकासाची गरज असल्याचे गिरीराज सिंग यांनी सांगितले. त्यांनी लिज्जत पापड विपणन विभागाची विशेष बैठक घेऊन पूरक उद्योगांना चालना देण्यासाठी आणि स्वयंचलित यंत्राचा वापर करण्यास अभिप्रेरित करण्यासाठी कर्ज योजना चालू करावी असे सूचवले. यामुळे बेरोजगारी कमी होईल. ते पुढे म्हणाले की, या समुहांतर्गत काम करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या नावाने लिज्जततर्फे एक विक्री केंद्र असायला हवे. यासाठी केंद्र सरकारच्या विशेष अर्थसहाय्य योजना असल्याचे त्यांनी सांगितले.\nलिज्जत पापड समूहाचा वार्षिक अहवाल सादर केल्यानंतर संस्थेचे ऑडिटर भरत व्यास यांनी संस्थेची आर्थिक स्थिती समाधानकारक असून वर्ष 2017-18 मध्ये 750 कोटी रुपये निव्वळ विक्री झाली असल्याचे तर 65 कोटी पेक्षा जास्त निर्यात झाली असल्याचे सांगितले. महात्मा गांधींच्या 2 ऑक्टोबर गांधी जयंतीचे उदिृष्ट ठेवून त्यांनी महिलांना 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या पंधरवड्यात विशेष स्वच्छता अभियान राबविण्याचा आग्रह केला.\nयावेळी धर्मदाय संयुक्त आयुक्त करमरकर, प्रसिद्ध सिने अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, विमल बेन, जसवंती बेन पोपट, प्रतिभा सावंत, स्वाती पराडकर आणि हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.\nपार्श्वभूमी- श्री.महिला गृह उद्योग लिज्जत पापड ही विविध उत्पादन निर्मिती करणारी (जसे पापड, मसाला, कणीक,ससा डिटर्जंट पावडर, लिक्विड सोप इत्यादी) महिला संस्था असून लिज्जत पापड या समूहाचे मध्यवर्ती कार्यालय मुंबईत आणि देशभरात 81 शाखा तसेच 27 विभागीय कार्यालये आहेत. तर 43,000 महिला भारतभर कार्यरत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2016/02/04/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A8-2/", "date_download": "2018-04-24T04:43:32Z", "digest": "sha1:WHWUKE2URDG4LJH6WAHM6ZZZHKWPGNXX", "length": 30926, "nlines": 477, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "आरोग्यासाठी प्रसन्न मन -2 | Abstract India", "raw_content": "\nआरोग्यासाठी प्रसन्न मन -2\nअनुभव घेत असताना किंवा कार्य करत असताना त्या कार्याचा अनुभव काल्पनिक तर घेतला जात नाही ना, यावरही लक्ष ठेवून मनाला तशी सूचना देण्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. विषयापासून निवृत्ती साधता आली, तर काही मदत होऊ शकेल. मन प्रसन्न होत नाही, पण आपण याची जबाबदारी याच्यावर की त्याच्यावर, असा विचार करत ‘विषया’पर्यंत आलो. सर्व जबाबदारी विषयाची असल्यामुळे विषयामुळे मन प्रसन्न राहू शकत नाही. कारण विषय हे इंद्रियांना स्वतःच्या बाजूला वळवितात. इंद्रियांना वेगवेगळी लालूच दिल्यामुळे त्यांच्यावर निर्बंध टाकले, तरी काल्पनिक अनुभव किंवा विचार मनात येत राहतात. त्यामुळेही मन प्रसन्न व्हायला अडचण येते.\nजग हे जडापासून बनलेले आहे. या विश्वातील मायेच्या चमक-दमककडे आकर्षित होऊन किंवा चुकीच्या आवाहनामुळे मनुष्य चुकीच्या मार्गाला जातो. यामुळे मन प्रसन्नता हा सोम्यागोम्यासाठीचा मार्ग नव्हे असे म्हणून आपण मोकळे होतो. पण प्रत्येक माणसाला आज ना उद्या स्वतःचे आरोग्य, समृद्धी, आत्मसमाधान व तेजाचा विचार करावाच लागेल. कारण सरतेशेवटी शांती त्या ठिकाणीच मिळणार असते.\nमन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व थोड्या थोड्या फरकाने एकमेकांपासून वेगळे असले, तरी ते सर्व एकच आहेत. यातील बुद्धी आहे महत्त्वाची. अहंकार हा अंधकारच होय. तेथे सगळ्याचाच अभाव असतो. तेथे असतो फक्‍त स्वार्थीपणा व लंपटपणा. चित्त हे बुद्धीचे आदेश मनापर्यंत पोचविण्याचे माध्यम. बुद्धीचे व्यवस्थित मार्गदर्शन मनाला मिळाले तर मन शांत होऊ शकते, प्रसन्न होऊ शकते. एखादा मनुष्य नशीबवान आहे असे आपण म्हणतो. तो नशीबवान होतो, कारण त्याला योग्य वेळी योग्य गोष्टी सुचतात. त्याला खरोखर भगवंतांचा कृपाशीर्वाद मिळत असणार, जेणेकरून त्याला जीव, आत्मा व परमात्म्याच्या श्रेयस गोष्टी सुचतात. बुद्धीने अशा प्रकारे ऐनवेळेला सु-विचार सुचविण्यासाठी, चांगली कल्पना सुचविण्यासाठी, चांगल्या अनुभवाचा साक्षीदार करून देण्यासाठी खूप पूर्वतयारी असण्याची गरज असते. म्हणून ज्ञान हे अनुभवावर आधारित असते.\nएक गृहस्थ मोठे कवी होते. त्यांनी गंगेवर एक छान काव्य रचले होते. त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. पुरस्कार घेण्यासाठी एवढ्या लांब आलेलो आहोत, तेव्हा गंगास्नान करून जावे अशा हेतूने ते गंगेवर पोचले. ते पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करत होते. काठावर असलेल्या एकाने सांगितले येथे उतरू नका, कारण येथे खूप मगरी, सुसरी आहेत. त्यावर कवी म्हणाले की, मगरी-सुसरी या तर गंगेचे वाहनच आहेत. मी तळापर्यंत जाणारच नाही, कारण वाहनावर गंगा आरूढ झालेली आहे. मी फक्‍त वर वरच्या पाण्यात स्नान करणार आहे. पाण्यात उतरल्यावर मगरीने पाय धरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या वाहनाचा अनुभव आधी घ्यायला पाहिजे होता असे लक्षात आले. गंगेचे वाहन मगर आहे म्हणत असताना मगर गंगेच्या पाण्यावर विहरत असतात, गंगा मगरावर आरूढ झालेली नसते. हा अनुभव नसल्याने नुसत्या शब्दाच्या माध्यमातून लिहिलेल्या काव्याला पुरस्कार मिळू शकतो, पण व्यवहारात त्याचा उपयोग होत नाही. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. शंकरांनी विषप्राशन केल्यानंतर त्यांच्या कंठाची आग होऊ लागली, तेव्हा त्यांनी सर्प थंड असतो म्हणून सर्पाला कंठाभोवती लपेटून घेतले. परंतु प्रत्यक्ष सर्पाचा थंडपणा अनुभवल्यावर मिळणारे ज्ञान वेगळे असते. असे अनेक प्रसंग आठवतील की, ज्यात बुद्धी व बुद्धीवर बसविलेले तर्क यांनाच ज्ञान समजून आचरण केल्याने आयुष्यात चांगल्या संधीला मुकावे लागले.\nअनुभव घेत असताना किंवा कार्य करत असताना त्या कार्याचा अनुभव काल्पनिक तर घेतला जात नाही ना, यावरही लक्ष ठेवून मनाला तशी सूचना देण्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. विषयापासून निवृत्ती साधता आली, तर काही मदत होऊ शकेल. मन प्रसन्न होत नाही, पण आपण याची जबाबदारी याच्यावर की त्याच्यावर असा विचार करत आपण ‘विषया’पर्यंत आलो. सर्व जबाबदारी विषयाची असल्यामुळे विषयामुळे मन प्रसन्न राहू शकत नाही. कारण विषय हे इंद्रियांना स्वतःच्या बाजूला वळवितात. इंद्रियांना वेगवेगळी लालूच दिल्यामुळे त्यांच्यावर निर्बंध टाकले, तरी काल्पनिक अनुभव किंवा विचार मनात येत राहतात. त्यामुळेही मन प्रसन्न व्हायला अडचण येते. विषयांवर जबाबदारी टाकणे म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूचे पॅकिंग फारच आकर्षक असल्यामुळे ती वस्तू आपण वापरतो, एखादा मनुष्य दिसायला अतिशय स्मार्ट व रुबाबदार किंवा स्त्री सौंदर्यवान दिसत असल्यामुळे त्यांच्याकडे आमचे मन आकर्षित होते अशा प्रकारे विषयावर जबाबदारी टाकली जाते. विषय मनाला विचलित करतात हे एका दृष्टीने बरोबर आहे.\nप्रत्येक इंद्रिय वेगवेगळ्या गुणांनी बांधलेले असते. विषयांचे पण स्वतःचे गुण ठरलेले असतात. त्यामुळे इंद्रिये विषयाकडे आकर्षित होतात. सृष्टीने सृजनासाठीचे आणि जीवन व्यवस्थित चालण्यासाठी काही नियम केलेले आहेत. त्यातही अशी आकर्षणे निसर्गतःच टाकून ठेवलेली आहेत, उदा. प्रजोत्पादनासाठी उपयोगी पडणारे पुरुष व स्त्री यांच्यातील आकर्षण. पुरुष व स्त्री यांच्यातील आकर्षणामुळे जीवनात शृंगाररस उत्पन्न होतो व एकूण जीवनाचे सौंदर्य कळून जीवनाविषयी आकर्षण उत्पन्न होते. विषयांना समजून घेणे खूप आवश्‍यक आहे. विषय कशासाठी आहे हे पाहणे आवश्‍यक असते. शिडी ही वरच्या मजल्यावर जाण्यासाठी साधन आहे. शिडी कितीही उत्तम दर्जाची बनवायची असे ठरविले, तरी ती सोन्याची बनवता येत नाही, कारण सोने मऊ असल्याने सोन्याच्या पायऱ्या वाकू शकतात. शिडीच्या पायऱ्या सुंदर दिसणाऱ्या चकचकीत धातूच्याही करता येत नाहीत, कारण शिडीच्या पायऱ्यांवर पाय द्यायचाच असतो. शिडीवरून चढून गेल्यावर आपल्या परमप्रिय व्यक्‍तीची भेट झाली, तर शिडीची कोणी पूजा करत नाही आणि कायम शिडी बरोबर घेऊनही कोणी फिरत नाही.\nअशा प्रकारे प्रत्येक बाह्यवस्तूचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे प्रत्येकाने नक्की केले, तर विषयांपासून सुटका होण्याचे नक्की होऊ शकते. जेवल्याशिवाय राहता येत नाही. पाण्याला जीवन म्हटले जाते, ते प्रत्येकाला आवश्‍यक असतेच. परंतु ज्या वेळी जिवावर बेतण्याची वेळ येते तेव्हा पाण्यावर भागत नाही. अन्नावाचून चालत नसले, तरी त्यावाचून महिनाभर राहता येऊ शकते. आवडीच्या वस्तू जेवणात असल्या, तर जेवण जाते; अन्यथा तोंडात घास गोल फिरतो असे म्हणणारी व्यक्‍ती उपासमार झाली की गणपतीला वाहिलेल्या दूर्वा खायलाही मागे-पुढे पाहत नाही.\nप्रत्येक विषयाचे चिंतन करून आपले जीवन चालविण्यासाठी, जीवनात हाती घेतलेले कार्य तडीस नेण्यासाठी मुळात कुठले विषय अगदी निकडीचे आहेत ते ठरविणे, त्या विषयांची वर्गवारी लावून, त्यांचे आपल्या आयुष्यात असलेले प्राधान्य ठरवून नंतर त्या विषयांचे आपल्या आयुष्यातील स्थान नक्की करावे. विवाहिताला पत्नी व तिच्यापासून मिळणारे सुख हा विषय महत्त्वाचा असणे साहजिक आहे. परंतु लग्न न झालेल्या अनेक व्यक्‍ती असतात. आपल्याला जीवनाच्या लक्ष्याप्रत पोचण्यासाठी काय अत्यावश्‍यक आहे हेही ठरवावे लागते. श्रीमद्‌ आदि शंकराचार्यांनी ‘भज गोविन्दम्‌’ या स्तोत्रात ‘एतद्‌ मांसवसादिविकारम्‌’ असे म्हटलेले आहे. म्हणजे ज्या वस्तूंची डोळ्यांना भुरळ पडते ते आयुर्वेदातील मज्जा व मांस यांचे खेळ असतात. तेव्हा त्यांना अवास्तव महत्त्व न देता हे मज्जा व मांस ज्या जिवाशी संबंध ठेवून असतात त्या जिवाचा, त्या व्यक्‍तीचा विचार करणे अधिक आवश्‍यक असते.\nअसे करत गेल्याने सरतेशेवटी अणूरेणूत असलेल्या परमात्म्यापर्यंत पोचल्यानंतर विषयनिवृत्ती सोपी होऊ शकेल. अशी विषयनिवृत्ती झाली, तर इंद्रियांवर अनुशासन करणे सोपे होईल.\nfrom → खिन्नता, ताणतणाव, प्रसन्न मन, बुद्धी, मानसिक ताण, मानसोपचार, स्वभाव\n← प्रसन्न मन -1\nआरोग्यासाठी प्रसन्न मन -3 →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/karnatka-government-to-start-new-tv-channel-269412.html", "date_download": "2018-04-24T05:07:17Z", "digest": "sha1:N2LC6KWQKQQOKFWS7O25UL7TJ2YOWRCH", "length": 11052, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्नाटक सरकार सुरू करणार नवीन टी.व्ही चॅनल", "raw_content": "\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : अस्सा होता आपल्या 'सचिन'चा सुरुवातीचा प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकर्नाटक सरकार सुरू करणार नवीन टी.व्ही चॅनल\nहे टी. व्ही. चॅनेल ग्रामीण विकास पंचायतराज खात्यातर्फे चालवण्यात येणार आहे. टी. आर. मीडिया एंटरटेनमेंट प्रा. लि.तर्फे हे चॅनेल प्रसारित करणार आहे.\nबेंगळुरू, 08 सप्टेंबर: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आता सरकारी योजना आणि कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी कर्नाटक राज्य सरकार 'ग्राम स्वराज' हे नवीन टी. व्ही. चॅनेल सुरू करणार आहे.\nटी.व्ही चॅनलचा प्रस्ताव कर्नाटक सरकारतर्फेच तयार करण्यात आला आहे. हे टी. व्ही. चॅनेल ग्रामीण विकास पंचायतराज खात्यातर्फे चालवण्यात येणार आहे. टी. आर. मीडिया एंटरटेनमेंट प्रा. लि.तर्फे हे चॅनेल प्रसारित करणार आहे. या चॅनलसाठी कर्नाटक सरकार 10 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. यासाठी दरमहा 1.5 कोटी रुपयांचा खर्चही येणार आहे. सरकारी योजनांबद्दल जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी सरकारतर्फेच चालविण्यात येणाऱ्या टी.व्ही. चॅनेलची गरज असल्याचं कर्नाटक राज्याचे ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.com/2013/01/blog-post_27.html", "date_download": "2018-04-24T05:00:24Z", "digest": "sha1:NC3Q6MY4R4NAMCBWWXZKMU7MJCH6HWPP", "length": 22089, "nlines": 171, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.com", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: दुर्गराज राजगड", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nगडांचा राजा व राजांचा गड असे ज्या किल्ल्याचे वर्णन केले जाते, तो किल्ला म्हणजे दुर्गराज राजगड. मराठा साम्राज्याची पहिली राजधानी म्हणून राजगड ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात अनेक वर्षे राजगड स्वराज्याची राजधानी होती. राजगड हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात मोडतो. राजगड हा एक बुलंद, बळकट व बेलाग असा किल्ला आहे. शिवाजीराजांनी त्याचा ताबा घेण्यापूर्वी या गडाला मुरुंबदेवाचा किल्ला म्हणून ओळखले जायचे. सातवाहनकाळात ब्रह्मर्षी ऋषींचे वास्तव्य या किल्ल्यावर होते. आजही किल्ल्यावर ब्रह्मर्षी ऋषींचे मंदिर दिसून येते. कालांतराने हा किल्ला आदिलशाही व निझामशाही राजवटींमुळे फिरत राहिला. त्या काळात राजगडचा बालेकिल्लाच मुख्य किल्ला म्हणून गणला जात होता. शिवाजी महाराजांनी त्याचा ताबा कधी घेतला, याचा लिखित उल्लेख कोणत्याही कागदपत्रांत सापडत नाही. सन 1646-1647च्या सुमारास तोरणासोबत राजांनी हाही किल्ला जिंकून घेतला होता. त्याचे नामकरण त्यांनी ‘राजगड’ असे केले.\nमुरुंबदेवाच्या या डोंगराचे चार भाग पाडतात. त्यात संजीवनी, सुवेळा व पद्मावती या तीन माची व बालेकिल्ल्याचा समावेश होतो. त्यामुळे किल्ल्याचा विस्तार प्रचंड मोठा असल्याचे दिसून येते. राजगडावर पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, सिंहगड मार्गे पावे गावातून भोसलेवाडी या गावी येणे होय. पुण्यापासून राजगड 75 कि.मी. अंतरावर आहे. सिंहगड रस्त्याने सिंहगडच्या पायथ्याशी डोणजे या गावी पोहोचल्यावर वेल्हे गावात जाण्याकरिता उजवीकडे एक फाटा फुटतो. या ठिकाणावरून राजगड तीस कि.मी. अंतरावर आहे. या मार्गे बसने फक्त पावे गावापर्यंतच पोहोचता येते. तेथून पुढे कानद नदी पार करून राजगडाच्या पायथ्याशी जाता येते. राजगडचा मुख्य दरवाजा-पाली दरवाजा हा याच मार्गे सर करता येतो. पाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. रस्त्यात निम्म्यापर्यंत पायवाट व निम्मा रस्ता पायर्‍यांनी बांधलेला आहे. दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार हे भक्कम व मोठे आहे. त्यातून हत्तीसुद्धा आत येऊ शकतो. दुसरे प्रवेशद्वार बुरुजांवर बांधलेले व पहिल्यापेक्षा अधिक भक्कम आहे. या प्रवेशद्वाराद्वारे आपण पद्मावती माचीवर येऊन पोहोचतो. डाव्या बाजूला संजीवनी माचीकडे व उजव्या बाजूचा रस्ता सुवेळा माचीकडे जातो. प्रथम संजीवनी माची, नंतर सुवेळा माची, पद्मावती माची व बालेकिल्ला असा क्रम ठेवला तर एका दिवसात किल्ला पाहण्यास सोपे पडते. मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूने एक चिंचोळा रस्ता संजीवनी माचीच्या दिशेने जातो. या माचीची एकूण लांबी सुमारे अडीच किलोमीटर आहे. माचीवरून तोरणा किल्ला स्पष्ट दिसतो. तीन टप्प्यांमध्ये ही माची बांधली गेलेली आहे. अनेक राहत्या घरांचे अवशेष या माचीवर दिसून येतात. शिवाय तिच्या प्रत्येक टप्प्यावर चिलखती बुरुज बांधलेले आहेत. एकंदर 19 बुरुज या माचीवर बांधलेले आहेत. माचीच्या मध्यभागी उंच टेहळणी बुरूज उभारण्यात आलेला आहे. या बुरुजावरून व माचीच्या टोकावरून आजूबाजूचा प्रचंड परिसर न्याहाळता येतो. माचीवरून परत फिरताना उजव्या बाजूला भाटघर धरण दृष्टीस पडते. डोंगरांच्या रांगांत मोठ्या परिसरात भाटघर धरण पसरलेले आहे. संजीवनी माचीकडून सुवेळा माचीकडे जाण्याकरता बालेकिल्ल्याच्या उजव्या बाजूने रस्ता आहे. हा रस्ता म्हणजे, एक पायवाटच असल्याने येथून हळू चालत जावे लागते. सुवेळा माचीही संजीवनी माचीइतकीच प्रशस्त व लांब आहे. तिची लांबी दोन किलोमीटर आहे. मुरुंबदेवाचा किल्ला हस्तगत केल्यावर शिवरायांनी प्रथम या माचीचे बांधकाम केले होते. संजीवनीपेक्षा सुवेळा माचीची रुंदी तुलनेने कमी आहे.\nसुवेळा माचीलाही तीन टप्पे आहेत. शेवटपर्यंत तिची रुंदी कमी होत गेलेली आहे. या माचीवरून डावीकडे सिंहगड व समोरच्या बाजूला पुरंदर व वज्रगड पडतात. माचीच्या सुरुवातीला एक टेकडीसारखा भाग आहे. त्याला ‘डुबा’ असे म्हटले जाते. सुवेळा माचीवर मध्यभागी एक उंच खडक लागतो. या खडकावर 3 मीटर व्यासाचे छिद्र आढळून येते. त्यास हस्तीप्रस्तर म्हणतात. माचीवर हस्तीप्रस्तराच्या विरुद्ध बाजूला गुप्त दरवाजा आहे. त्यास ‘मढे दरवाजा’ म्हणतात. हस्तिप्रस्तर संपल्यावरही असाच गुप्त दरवाजा नजरेस पडतो.\nसुवेळा माचीवरून परत फिरताना बालेकिल्ल्याच्या उजव्या बाजूने पद्मावती माचीकडे जाता येते. लांबीने कमी असली तरी ही प्रशस्त माची आहे. पद्मावती माची प्रशस्त असल्याने इथे निवासाची बरीच ठिकाणे दिसून येतात. शिवाय पद्मावती देवीचे मंदिर, सईबार्इंची समाधी, पद्मावती तलाव, रत्नशाळा, सदर, हवालदारांचा वाडा, दारूगोळ्याची कोठारे व गुप्त दरवाजा ही ठिकाणे पद्मावती माचीवर आहेत. शिवरायांनी मुरुंबदेव किल्ल्याचे राजगड असे नामकरण केल्यावर पद्मावती मंदिराची स्थापना केली होती. या मंदिरात सध्या 20-25 जणांची राहण्याची सोय होते. तसेच शेजारीच असलेल्या पाण्याच्या टाकांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणीही उपलब्ध होते. माचीच्या टोकावर गुप्त दरवाजा आहे. वाजेघर गावातून या दरवाजामार्गे किल्ल्यावर येता येते. राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. पद्मावती माचीकडून बालेकिल्ल्याकडे सरळ रस्ता आहे. हा रस्ता कठीण व अरुंद असल्याने त्यावर सांभाळून चालावे लागते. या रस्त्यावर सध्या संरक्षक कठडे टाकल्याने बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाण्याचा रस्ता फारसा अवघड वाटत नाही. महादरवाजा आजही अत्यंत सुस्थितीत असल्याचे दिसून येते. त्यावर कमळ व स्वस्तिक ही शुभचिन्हे कोरलेली आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर नजरेस पडते व मागे पाहिल्यास महादरवाजातून सुवेळा माचीचे दर्शन होते. बालेकिल्ल्याला साधारण 15 मीटर उंचीची तटबंदी बांधलेली आहे. तसेच चंद्रतळे ओलांडून गेल्यावर उत्तरबुरूज नजरेस पडतो. बालेकिल्ल्यावरून पद्मावती माची, सुवेळा माची व संजीवनी माची पूर्णपणे न्याहाळता येतात. पद्मावती माचीकडे उतरणारी एक वाट सध्या बंद केली गेलेली आहे. उत्तर बुरुजाच्या बाजूलाच ब्रह्मर्षी ऋषींचे मंदिर आहे. शिवाय बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी भग्न इमारती, वाडे व दारूगोळ्याच्या कोठारांचे अवशेष दिसून येतात. स्वच्छ वातावरण असेल तर केवळ तोरणा, सिंहगड, पुरंदरच नाही तर रोहिडा, रायरेश्वर, लोहगड, विसापूर व रायगड हेही किल्ले पाहता येतात.\nलेबल्स किल्ला, गड, छत्रपति शिवाजी, दै. दिव्य मराठी, पुणे जिल्हा, राजगड, वेल्हे\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nस्वराज्याची ऐतिहासिक राजधानी: रायगड\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमाझी ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरी... आमच्या कन्येचं १४ वर्षांपूर्वी ठरविलेलं नाव. संत ज्ञानेश्वरांची भावार्थदिपिका वाचली तेव्हाच ठरवलं, माझ्या मुलीचं नाव ’ज्ञानेश्वरी’ ठेविल. चौ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/at-kalyan-lady-fight-with-trafic-police-275261.html", "date_download": "2018-04-24T05:02:10Z", "digest": "sha1:DF777NHKNEMXSQ4YWCD7V2CQUPC5RG54", "length": 11185, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कल्याणमध्ये महिलेची ट्रॅफिक महिला पोलिसाला धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल", "raw_content": "\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : अस्सा होता आपल्या 'सचिन'चा सुरुवातीचा प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकल्याणमध्ये महिलेची ट्रॅफिक महिला पोलिसाला धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल\nकल्याणमध्ये एका वाहनचालक महिलेनं महिला ट्रफिक पोलीस धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आलाय. गाडी टो करण्याच्या वादातून महिलेनं हा तमाशा केला. नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी टो करत असताना हा धक्काबुक्कीचा प्रकार समोर आला.\nकल्याण, 26 नोव्हेंबर : कल्याणमध्ये एका वाहनचालक महिलेनं महिला ट्रफिक पोलीस धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आलाय. गाडी टो करण्याच्या वादातून महिलेनं हा तमाशा केला. नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी टो करत असताना हा धक्काबुक्कीचा प्रकार समोर आला.\nमॉलबाहेर पार्क केलेली महिलेची दुचाकी टोईंग व्हॅनने अनाऊंन्समेंट करून उचलली. मात्र यावेळी महिलेनं गाडी उतरवण्याची मागणी केली. यावरून तिचा आणि पोलीस यांच्यात वाद झाला. याच वादाचं रूपांतर धक्काबुक्कीत झालं.\nदरम्यान, आपण जागेवर फाईन भरून गाडी देण्याची मागणी करत होतो, मात्र पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप महिलेनं केलाय. पोलिसांनी आपली तक्रार घेतली नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thanevarta.in/?p=8470", "date_download": "2018-04-24T04:24:58Z", "digest": "sha1:H4DBCL56M4J5ZPZJO7AFENZA2662TDT4", "length": 8577, "nlines": 85, "source_domain": "thanevarta.in", "title": "एलईडी दिव्यांमुळे ठाणे महापालिकेची वार्षिक ३ कोटींची बचत – Thanevarta", "raw_content": "\nएलईडी दिव्यांमुळे ठाणे महापालिकेची वार्षिक ३ कोटींची बचत\nवीज बचतीच्या उपाययोजना राबवण्यात अग्रेसर राहिलेल्या ठाणे महापालिकेनं एलईडी दिव्यांचा वापर करून दरमहा सरासरी ४ कोटी ८४ लाख युनिट वीजेची बचत केली आहे. यामुळं महापालिकेची प्रतिवर्षी ३ कोटींची बचत होणार आहे. यापुढे सोडीयम व्हेपर दिव्यांऐवजी सर्वत्र एलईडी दिवे लावण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी विद्युत विभागाला दिले आहेत. वीज संवर्धनासाठी ठाणे महापालिका कायम प्रयत्नशील असून महापालिकेला याबाबत अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. वीज बचतीसाठी गेल्यावर्षीपासून ठाण्यातील रस्त्यांवर सोडीयम व्हेपर दिव्यांऐवजी उर्जा कार्यक्षम एलईडी दिव्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळं महापालिका क्षेत्रातील अनेक रस्ते चंदेरी प्रकाशानं उजळले असून या दिव्यांच्या वापरानं वीज बीलातही मोठी बचत झाली आहे. महापालिकेनं ३८ हजार सोडीयम व्हेपर दिव्यांपैकी एस्को प्रकल्पांतर्गत साडेसात हजार एलईडी दिवे लावले असून महापालिकेच्या भांडवली निधीतून १४ हजार एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. त्यामुळं पथदिपांच्या वीज बिलामध्ये सरासरी ४ कोटी ८४ लाख वीज युनिटची बचत झाली असून त्यापोटी वार्षिक सरासरी ३ कोटीपेक्षा जास्त रक्कमेची बचत झाली आहे.\n३१ मे पूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश\nठाणे शहरातील नालेसफाईची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. Related\nदुस-याचा विचार करतानाच महिलांनी स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करायला हवा – महापौर मिनाक्षी शिंदे\nजागतिक महिला दिन हा एकच दिवस महिलांसाठी नसून वर्षाचे 365 दिवस हे महिलांचे आहेत. स्त्रिया या नेहमी दुस-यांचा विचार करत असतात, पण स्वतःचा विचार करत नाही दुस-याचा विचार करतानाच महिलांनी स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करायला हवा असे सांगत ठाण्याच्या नवनिर्वाचित महापौर मिनाक्षी शिंदे यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. Related\nउर्जा संवर्धनासाठी ठाणे महापालिका पुन्हा एकदा दोन राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित\nठाणे महापालिका उर्जा संवर्धन आणि अपारंपरिक उर्जा क्षेत्रात पुन्हा एकदा अव्वल ठरली असून महापालिकेनं या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल २ राज्यस्तरीय पुरस्कारानं ठाणे महापालिकेला सन्मानित करण्यात आलं आहे. Related\nसुरक्षारक्षकानंच गृहसंकुलातील ४ वर्षीय चिमुकलीचा लैंगिक छळ केल्याचा संतापजनक प्रकार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकरी जनतेची मानवंदना\nविस्थापितांचं पुनर्वसन हे त्यांच्या सहमतीनं आणि जगण्याशी सुसंगत असावं – मेधा पाटकर\nसुट्टीच्या दिवशी पालिका आयुक्तांनी पत्नीसमवेत केली झोपड्यांची रंगरंगोटी\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षपदी रविंद्र मोरे यांची नियुक्ती\nअल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलानेच फूस लावून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार\nइंदिरानगर झोपडपट्टीमधील जवळपास दीडशे मुलांनी चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत सहभाग घेऊन पालिका आयुक्तांसोबत साजरी केली रविवारची सुट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/job-creation-back-on-track-1658379/", "date_download": "2018-04-24T05:02:36Z", "digest": "sha1:GJBLOW24O62OYVOG34SQUMQDJ4AS4RQ4", "length": 13541, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Job creation back on track | Good News – भारतात नोकऱ्यांची निर्मिती सात वर्षातील उच्चांकी पातळीवर | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nGood News – भारतात नोकऱ्यांची निर्मिती सात वर्षातील उच्चांकी पातळीवर\nGood News – भारतात नोकऱ्यांची निर्मिती सात वर्षातील उच्चांकी पातळीवर\nविविध कंपन्या कर्मचारी संख्या वेगाने वाढवत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. निक्की इंडिया सर्व्हीसेस बिझनेस अॅक्टीव्हीटीचा निर्देशांक मार्च महिन्यात ५०.३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यात\nभारतात रोजगार निर्मितीसंबंधी एक चांगली बातमी आहे. मार्च महिन्यात विविध क्षेत्रांमध्ये नोकऱ्या निर्मितीचे प्रमाण वाढले असून रोजगार निर्मिती सात वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. विविध कंपन्या कर्मचारी संख्या वेगाने वाढवत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.\nनिक्की इंडिया सर्व्हीसेस बिझनेस अॅक्टीव्हीटीचा निर्देशांक मार्च महिन्यात ५०.३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यात हाच निर्देशांक ४७.८ टक्क्यांवर होता. निर्देशांक ५० च्या पुढे असणे हा अर्थव्यवस्था विस्तारत असल्याचे लक्षण आहे. फेब्रुवारीमध्ये निर्देशांकात झालेली घट ही क्षणिक ठरली आहे. एकूणच भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर आहे असे अर्थतज्ञ आशना दोधिया यांनी सांगितले.\nहा सर्वेक्षण अहवाल राजकीय आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी दिलासा देणारी बाब आहे. कारण काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष रोजगाच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. मोदींच्या राजवटीत बेरोजगारी वाढल्याचा त्यांचा आरोप आहे. निक्की इंडियाच्या मार्चच्या अहवालानुसार सेवा आणि उत्पादन या दोन्ही प्रमुख क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.\nमागणी वाढल्यामुळे सध्या जे स्त्रोत आहेत, व्यवस्था आहे त्यावर दबाव येत आहे. त्यामुळे सर्वा पुरवठादरांनी मागणी पूर्ण करण्यासाठी कर्मचारी संख्येमध्ये वेगाने वाढ केली आहे. जून २०११ नंतर ही आशादायक स्थिती आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nतुम्हीच भेदू शकता काचेचे छत\nनोकऱ्यांची पदे वाढलीत. शिकलेले उमेदवार, जे योग्य आहेत ते, घेणे हे त्या त्या संस्थेचे काम आहे. अजूनही विरोधी पक्ष टीकाच करणार.\nअकरावीत प्रवेश न मिळाल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये मुलीची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/experience-in-sweden-1653967/", "date_download": "2018-04-24T04:47:48Z", "digest": "sha1:APU6PIUSJZNXDO3QQDACTC6E373OPILZ", "length": 28235, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "experience in Sweden | ‘जग’ते रहो : ‘नोबेल’ देशीच्या गोष्टी | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n‘जग’ते रहो : ‘नोबेल’ देशीच्या गोष्टी\n‘जग’ते रहो : ‘नोबेल’ देशीच्या गोष्टी\nइथले लोक समोर आल्यावर हसतमुखाने भेटल्याशिवाय पुढे जात नाहीत.\nपुनीत कर्णिक-थोरात हेलसिंगबॉरी, स्वीडन\nस्वीडन देश प्रसिद्ध आहे तो नोबेल पुरस्कारामुळे. ‘स्टॉकहोम’ या स्वीडनच्या राजधानीत ‘स्टॉकहोम सिटीहॉल’च्या वास्तूत ‘ब्लू हॉल’मध्ये दरवर्षी नोबेल पारितोषिक वितरणाचा समारंभ साजरा होतो. स्वीडनमधील आमचं हेलसिंगबॉरी शहर खूप छान आहे. एकूणच युरोपमध्ये पहिल्यांदा पाऊ ल ठेवल्यावर जे ‘वॉव’वालं फीलिंग येतं, तेच या शहरात आल्यावर आलं होतं. सध्या इथे सिरियन निर्वासितांना निवारा देण्यात आला आहे. इथे स्वीडिश, सिरियन आणि भारतीय लोक जास्ती दिसतात. भारतीय लोक अधिकांशी आयटीमधले असून ते बंगलोर, मुंबईहून येत आहेत. इथली जीवनशैली स्वीडिश आणि सिरियन या दोन्ही लोकांच्या पद्धतीची आहे. इथली ‘लून्थ युनिव्हर्सिटी’ स्कँडिनेव्हियातील उच्च शिक्षणासाठीच्या नामवंत युनिव्हर्सिटीपैकी एक गणली जाते. तिथे परदेशी विद्यार्थी शिकायला येतात. तिथे जागा मिळायला थोडंसं मुश्किल जातं, पण प्रवासात वेळ घालवायची तयारी असेल तर थोडी लांब जागा मिळू शकते. त्यामुळे आमच्या शहरात तिथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.\nइथले लोक समोर आल्यावर हसतमुखाने भेटल्याशिवाय पुढे जात नाहीत. त्यासाठी ओळखदेख लागत नाही. ती सवय आम्हालाही लागली आहे. भारताबद्दल त्यांना भरपूर कौतुक आणि कुतूहल वाटतं. ‘तुमच्याकडे लोकसंख्या भरपूर’, असा बोलण्यात एक सूर जाणवतो. त्यांचं त्यांच्या भाषेवर प्रचंड प्रेम आहे. फार कमी लोक इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला आम्हाला या गोष्टीचं नवल वाटलं होतं. इतकंच नाही तर काहींनी आम्हाला विचारलं की, भारतात तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम का राहिला नाहीत इंग्रजांनी तुमच्यावर राज्य केलं आणि तुम्ही त्यांचीच भाषा आत्मसात केलीत.. भाषेवरचं हे प्रेम संपूर्ण युरोपभर दिसतं. ज्यांना इंग्लिश कळत नाही, ते इंग्लिश जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाहीत. विशेषत: ज्येष्ठांमध्ये हे भाषाप्रेम अधिककरून दिसतं. तरुणाईला इंग्रजी कळतं. त्यासाठी सोशल मीडियासारखी माध्यमं आहेतच. पण शाळा, व्यावहारिक गोष्टींसह संवादही स्वीडिशमध्ये होतो. त्यामुळे स्वीडिशेतर लोकांना नोकरी मिळणं प्रचंड कठीण आहे. इथे सोशल सिक्युरिटी नंबर मिळतो. त्यानंतर तुम्ही स्वीडिश भाषा शिकू शकता. सगळे व्यवहार स्वीडिश भाषेतच होत असल्याने ट्रान्सलेटर वापरण्यावर मर्यादा येतात. मी सध्या स्वीडिश भाषा शिकते आहे. आम्हाला काही सिरियन शिक्षकही शिकवतात. एक नवीन भाषा शिकण्याचं समाधान मला मिळतं आहे. स्वीडिश शिकायला लागल्यापासून स्वत:मध्येही फरक जाणवतो आहे. मला भोवतालच्या लोकांचं बोलणं थोडंथोडं कळायला लागलं आहे. अगदीच नाईलाज असल्यावर इंग्लिशचा वापर केला जातो. सुरुवातीला आम्ही काही शब्द शिकून घेतले होते, माझा नवरा आयटीमध्ये असल्याने त्यांचं काम भाषेमुळे अडत नाही.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nइथली मुलं करिअर ओरिएंटेड आहेतच. कोणत्याही कामाला कमी लेखलं जात नाही. काम करणाऱ्या प्रत्येकाचा आदर केला जातो. या गोष्टी आपण शिकण्यासारख्या आहेत. तरुणाई मोठय़ा हौसेने टॅटू काढून घेते. प्रत्येकाच्या कानात हेडफोन असतातच. स्वीडनमधल्या परंपरेनुसार ‘सेंट लुसीया डे’ हा दर १३ डिसेंबरला साजरा केला जातो. त्यात तरुणाई विशेषत: मुलींचा सहभाग लक्षणीय असतो. या समारंभात दरवर्षी एकीची लुसीया म्हणून निवड केली जाते, तिला मुकूट घातला जातो. इथल्या प्रत्येक शहरात एक इंटरनॅशनल स्कूल आहे. तिथे इंग्लिशमध्ये शिकवलं जातं. शाळांमध्ये छान वातावरण असतं. ०-६ वर्षे वयोगटासाठी प्रीस्कूल असतं. आऊ टडोअर अ‍ॅक्टिव्हिटीजवर अधिक भर असतो. अगदी खराब हवामान असेल तरच त्यांना वर्गात बसवतात.\nसुरुवातीला इथल्या वातावरणात रुळायला वेळ लागला. आमचे पहिले काही महिने कपडे खरेदीतच गेले. विंटरमध्ये शूज, स्कार्फ , कोट आणि जॅकेट्स घातली जातात. त्यात प्रचंड फॅशन आहे. समर म्हणजे सेलिब्रेशन टाइम मानलं जातं. तेव्हा पहाटे चार वाजल्यापासूनचा उजेड रात्री पावणेनऊ-दहापर्यंत असतो. ‘मिडसमर इव्ह’चा फेस्टिव्हल असतो. समरमध्ये इथले मूळचे राहाणारे दोन महिने सुट्टी घेऊ न बाहेर जातात. उन्हात बीचवर एन्जॉय करतात. बार्बेक्यू होतात. फ्लोरल ड्रेसेस, वनपीस, शॉर्ट्स, हलकं जॅकेट आणि रीप् जीन्स असा पेहराव असतो. व्हाइट शूज वापरले जातात. काळा, राखाडी, निळा, जांभळा, गुलाबी आदी इंग्लिश रंगांचा वापर अधिकांशी केला जातो. ही रंगसंगती पेहरावापासून बेडशीटपर्यंत अनेक गोष्टींत परावर्तित झालेली दिसते. सुरुवातीला भोवतालातून रंग हरवलेत की काय, असं अनेकदा मनात यायचं. इथे काळा आणि पांढरा रंग अत्यंत प्रिय आहेत सगळ्यांना. सिरियन मुली फारशी फॅ शन करत नाहीत. खाण्याच्या बाबतीत सांगायचं तर बीफ, पोर्क आणि फिश आवडीने खाल्ले जातात. सलाड खाण्यावर जास्ती भर दिला जातो. आपल्यासारखं सगळं साग्रसंगीत जेवण नसल्याने आम्ही घरीच पोळी-भाजी वगैरे स्वयंपाक करतो. सेम्लॉर हे डेझर्ट सगळ्या स्वीडिश कॅ फेमध्ये मिळतं आणि ते तरुणाई आवडीने खाते. सगळे फास्टफूड ब्रँण्ड्स इथे आहेत. कॉफीप्रेमींची संख्या खूप आहे. ते बिनसाखरेची ब्लॅक कॉफी पितात. प्रत्येकाच्या हातात कॉफीचा ग्लास असतोच. ‘झोएगा’ ब्रॅण्डची कॉफी इथे खूप प्रसिद्ध असून त्यांचे कॉफीशॉप्स सगळीकडे आहेत. शिवाय दूध आणि दुधाच्या पदार्थाचं उत्पादन खूप होतं त्यामुळे विविध प्रकारचं चीज, बटर अमाप मिळतं. शिवाय इथे प्रचंड प्रमाणात दारू प्यायली जाते.\nस्टॉकहोम आणि आमच्या शहरात जमीन-अस्मानाचा फरक आहे. स्टॉकहोमला गेल्यावर राजधानीचा फील येतोच. प्रसिद्ध अभिनेत्री इनग्रिड बर्गमन याच भूमीतली. इथे चित्र आणि नाटय़सृष्टी आहे. ऑपेराला खूप महत्त्व दिलं जातं. भाषा समजत नसल्यामुळे आम्ही अद्याप फारसं काही पाहिलेलं नाही. कधीतरी लागणारे बॉलीवूड चित्रपट बघतो. मराठी चित्रपट इथे आणायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. मराठी लोक एकत्र यावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘आम्ही मराठी मंडळा’तर्फे गणेशोत्सव साजरा केला. घरापासून लांब राहिल्यावर संस्कृती जपणं, सणवार साजरे करणं या गोष्टी कराव्याशा वाटतात. मुंबई आणि आसपासचे लोक भेटत असून त्यांच्या ओळखी होत आहेत. नुकताच आम्ही गुढीपाडवाही साजरा केला. लोकांच्या रसिकतेची झलक त्यांच्या चर्चेस, आर्किटेक्चरवरून दिसते. इथेच नाही तर युरोपातच बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यातल्या काही पाहिल्या आणि भारावून गेल्यासारखं झालं. स्वीडनमधल्या प्रत्येक शहरात चर्च, कॅथड्रिल, म्युझियम्स इत्यादी मोठाल्या वास्तू आहेत. त्या प्रत्येकाला एक इतिहास आहे. गुस्ताव अँडॉल्फ चर्च शहराच्या मध्यभागी आहे. ‘करनान’ हा मध्ययुगीन डॅनिश गढीतला मनोरा (टॉवर) असून त्या काळातला तो एकमेव साक्षीदार उरला आहे. सोफिएरो कॅसल ही स्वीडिश राजघराण्याची गढी १८७६ मध्ये बांधली गेली. आता तिथे म्युझिक कॉन्सर्ट होतात. नोरा जोन्स, बॉब डिलन, ब्रायन अँडम्ससारख्या कलाकारांनी तिथे परफॉर्म केलं आहे. इथले लोक कुटुंबाला पहिले प्राधान्य देतात. इस्टर, ख्रिसमसला सगळे कुटुंबीय एकत्र जमतात. अख्खं मार्केट बंद असतं आणि प्रत्येकजण फॅमिली टाइम एन्जॉय करायला प्राधान्य देतात. ऑफिसची ८ ते ५ वेळ असेल आणि त्यापुढंही थांबलात तर ते ओव्हरटाइम मानलं जातं. सध्या कामाचे तास कमी करायचा विचार सुरू आहे. आपल्या देशावर, झेंडय़ावर ही मंडळी नितांत प्रेम करतात. ही मंडळी एकदम फिट असतात. जिममध्ये खूप गर्दी असते. शहरात बऱ्याच मॅरेथॉन आयोजित केल्या जातात. त्यात लोक उत्साहाने सहभागी होतात. मीही या दीड वर्षांतली माझी पहिली मॅरेथॉन धावले होते. योगासनं करणं तरुणाईला भावतं. बरेच योग स्टुडिओ आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेबाबतीत अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. पोलीस सर्रास रस्त्यावर दिसत नसले तरी त्यांचा धाक आहे. मध्यंतरी गरिबी, बेरोजगारीमुळे चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं दिसलं. इन्फ्रास्ट्रक्चर हा इथला यूएसपी आहे. सार्वजनिक वाहतूक वक्तशीरच आहे. तिकिटाशिवाय प्रवास करताच येत नाही. अपंग, ज्येष्ठांना वावरण्यासाठी सोईचं म्हणून इलेक्ट्रिक कारची सोय केली जाते. बसमध्येही त्यांच्यासाठी योग्य ती सोय केली आहे. मोठाल्या ब्रॅण्डेड गाडय़ा लोक रोजच चालवतात. एकूणच वर्तनात शिस्तबद्धता आहे. अत्याधुनिक सुविधा असणारा हा कॅशलेस देश आहे. आपली लोकसंख्या आणि अन्य समस्या लक्षात घेतल्या तरी या सगळ्या गोष्टींतून आपण खूप काही शिकण्यासारखं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nनाणार प्रकल्प विदर्भात आणा: भाजपा आमदाराची मागणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nokarimargadarshan.blogspot.com/2013/06/115.html", "date_download": "2018-04-24T04:23:48Z", "digest": "sha1:HR3BDSRVWDGO632SZDWJU46MIPDSUNJQ", "length": 12511, "nlines": 220, "source_domain": "nokarimargadarshan.blogspot.com", "title": "नोकरी मार्गदर्शन: यवतमाळ जिल्हा परिषदेत 115 जागा", "raw_content": "मराठी नोकरी मार्गदर्शन केंद्र = रोजगार / नोकरी मार्गदर्शन - मराठीत् नोकरी संदर्भ\nनोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या\nयवतमाळ जिल्हा परिषदेत 115 जागा\nयवतमाळ जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, आरेखक, कनिष्ठ आरेखक, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी), पर्यवेक्षीका (महिला), पशुधन पर्यवेक्षक,\nकंत्राटी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी (सांख्यिकी),\nलघुलेखक ( नि. श्रे.), परिचर (वर्ग ४) पदाच्या 115 जागा\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-June-2013\nस्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेत चलान भरून आल्यानंतरच सविस्तर अर्ज भरावा.\nLabels: जिल्हा परिषद, यवतमाळ\nपोस्टात 1,349 जागा रिक्त; जानेवारीपर्यंत होणार भरती\nकेंद्र व राज्य शासनाच्या विवीध विभागांमध्ये हजारो पदांची भरती\nजिल्हाधिकारी कार्यालय परभणी मध्येतलाठी, लिपिक, शिपाई पदांची भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2013 जिल्हाधिकारी कार्यालय य...\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती प्रादेशिक निवड समिती मार्फत जलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये सरळ ...\nसार्वजनिक बांधकाम विभागात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 10 जागा महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ...\n19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नांदेडला सैन्यभरती मेळावा\nमध्य रेल्वेमध्ये ग्रुप डी मधील 905 जागांची भरती\nमध्य रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये माजी सैनिक कोट्याअंतर्गत ग्रुप डी मधील 905 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंत...\nजळगाव जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांच्या 227 जागा\nजळगाव जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक-टंकलेखक 89 जागा आणि तलाठी 138 जागा एकूण 227 पदे. ऑनलाईन अ...\nभारतीय हवाई दलात ( Indian Air Force ) ग्राऊंड ड्युटी विभागात नोकरीच्या संधी\nभारतीय हवाईदलामधील हवामान विभागात ग्राऊंड डयुटी विभागात पर्मनंट कमिशन तसेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये अधिकारीपदासाठी भरती केली जाणार आहे....\nभारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ग्रुप मध्ये परिवीक्षा अधिकारी (Probationary Officers) पदाच्या एकूण 1837 जागा . Age Re...\nजिल्हा निवड समिती (1)\nतक्रार निवारण प्राधिकारी (1)\nरयत शिक्षण संस्था (1)\nजिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव मध्ये तलाठी पदांची भर...\nराज्यातील कृषी महाविद्यालयांत संचालक व अधिष्ठाताच्...\nधर्मदाय आयुक्त कार्यालयात ५८२ विविध पदांची महाभरती...\nसशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल-वाहनचालकाच्या 645 जाग...\nकोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात लिपीक टंकलेखक/...\nकृषि आयुक्तालय व विभागीय कार्यालयामध्ये 1031 जागां...\nसशस्त्र सीमा दलात ट्रेडसमन पदाच्या ८१० जागा\nपुण्यातील राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्रात 2 ज...\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दलात वैद्यकीय अधिकारीच्या 6...\nभारतीय तटरक्षक दलात नाविक-जनरल ड्युटी पदासाठी भरती...\nपुणे विद्यापीठात विवीध ४२ पदांसाठी ३१० जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध जागा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 2...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयकाच्या 78 जागा\nThe Press Trust of India मध्ये विवीध पदांच्या अनेक...\nपुसद अर्बन बँकेत ३२ जागा\nअंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका ५७१...\nयवतमाळ अर्बन बँकेत अधिकारी, लिपिक व शिपाई पदाच्या ...\nराष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानांतर्गत विवीध 193 प...\nयवतमाळ जिल्हा परिषदेत 115 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये शिक्षकांची 754 पदे (...\nकोकण विभागीय माहिती कार्यालयात विवीध पदांची भरती\nभारतीय रिजर्व बँक (आरबीआई) मध्ये (वर्ग-२) अधिकाऱ्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षका...\nगोंदिया, गडचिरोली, बिड, रायगड, चंद्रपुर, औरंगाबाद,...\nभारतीय रिजर्व बैंक (RBI) मध्ये ५२५ सहाय्यकांची भरत...\nबीड व अहमदनगर जिल्हा परिषद भरती परिक्षेच्या उत्तरत...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी ...\nविमा कंपन्यांमध्ये सहाय्यक पदाच्या २६०० जागा\nपुणे, कोल्हापुर, सातारा, सांगली व सोलापुर जिल्ह्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://thanevarta.in/?p=8473", "date_download": "2018-04-24T04:25:53Z", "digest": "sha1:W4SSH2NWVJ5F55HFUHNEYYJRHIMDGTHX", "length": 7971, "nlines": 85, "source_domain": "thanevarta.in", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकरी जनतेची मानवंदना – Thanevarta", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकरी जनतेची मानवंदना\nभारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती ठाणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राजे, भोसले, फुले, शाहू, आंबेडकर प्रतिष्ठानातर्फे या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरात ठीक रात्री १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आंबेडकरी जनतेनं मोठ्या संख्येनं जमून मानवंदना दिली. आंबेडकर अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून आंबेडकरांना अभिवादन केलं. तर काही आंबेडकर अनुयायांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून आंबेडकरांना अभिवादन केलं. यंदा अमेरिकेतून भिक्कणी खांम्पि खेमा या प्रमुख पाहुण्या म्हणून ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी सांगितले की, अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेतलेले डॉ. बाबासाहेब हे भारतासह जगातील कोट्यावधी शोषित, पिडीत, क्रांतीकारी आणि मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रेल्वे स्थानका समोरील पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात आली.\nठाण्यामध्ये १० फेब्रुवारी रोजी सीकेपी साहित्य संमेलनाचं आयोजन\nठाण्यामध्ये १० फेब्रुवारी रोजी सीकेपी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून सीकेपी हॉलमध्ये होणा-या या संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. Related\nभगवान महावीर यांची २६१७वी जयंती जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरी\nभगवान महावीर यांची २६१७वी जयंती जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. Related\nशासकीय कार्यालयांत पूजा चालणार नसेल तर पूजेच्या ठिकाणी शासनाची लुडबूड चालणार नाही – हिंदू जनजागृती समिती\nशासन धर्मनिरपेक्ष आहे या न्यायाने जर शासकीय कार्यालयांत पूजा चालणार नसेल, तर पूजेच्या ठिकाणी शासनाची लुडबूड चालणार नाही अशी परखड भूमिका हिंदु जनजागृती समितीने घेतली आहे. Related\nएलईडी दिव्यांमुळे ठाणे महापालिकेची वार्षिक ३ कोटींची बचत\nदेशातील पहिल्या रेल्वे सेवेला १६५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं केक कापून प्रवाशांनी साजरा केला वर्धापन दिन\nविस्थापितांचं पुनर्वसन हे त्यांच्या सहमतीनं आणि जगण्याशी सुसंगत असावं – मेधा पाटकर\nसुट्टीच्या दिवशी पालिका आयुक्तांनी पत्नीसमवेत केली झोपड्यांची रंगरंगोटी\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षपदी रविंद्र मोरे यांची नियुक्ती\nअल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलानेच फूस लावून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार\nइंदिरानगर झोपडपट्टीमधील जवळपास दीडशे मुलांनी चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत सहभाग घेऊन पालिका आयुक्तांसोबत साजरी केली रविवारची सुट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/india-gdp-rate-rajiv-kumar-vice-chairman-niti-aayog-1664239/", "date_download": "2018-04-24T04:53:45Z", "digest": "sha1:MPH4LUWSIZTMJE7A7VR3GT2ZR5VEDCCK", "length": 15861, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India GDP rate Rajiv Kumar Vice Chairman NITI Aayog | देशाचा विकास दर ७.५ टक्के राहणार | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nदेशाचा विकास दर ७.५ टक्के राहणार\nदेशाचा विकास दर ७.५ टक्के राहणार\nभारतीय संदर्भ लक्षात घेऊन आपले आर्थिक धोरण आखावे लागेल.\nमुंबई शेअर बाजाराच्या सभागृहात सोमवारी झालेल्या पुस्तक प्रकाशन समारंभास सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.\nनीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांचा विश्वास\nभारतीय संदर्भ लक्षात घेऊन आपले आर्थिक धोरण आखावे लागेल. भारताला २०२२ पर्यंत जगात एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून नावारूपाला आणण्यासाठी नीती आयोग एक विकास आराखडा तयार करत असून त्यात ८.५ ते ९ टक्के विकास दराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे जाहीर करत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी आता देशाची अर्थव्यवस्था प्रगतीच्या वाटेवर असून या वर्षी विकास दर ७.५ टक्के राहील, असा विश्वास सोमवारी व्यक्त केला.\n‘सोशियो-इकॉनॉमिक डायनॅमिक्स ऑफ इंडियन सोसायटी : अ हिस्टॉरिकल ओव्हरव्ह्य़ू’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई शेअर बाजाराच्या सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजीव कुमार बोलत होते. विवेक समूह, मुंबई शेअर बाजार व पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्था यांच्यातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी त्याचे संपादन केले आहे.\nमुंबई शेअर बाजाराचे अध्यक्ष एस. रवी, आशीषकुमार चौहान, संजय पानसे, विवेक समूहाचे दिलीप करंबेळकर आदी यावेळी उपस्थित होते.\nधोरण लकव्यासह विविध कारणांमुळे काही वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था अधोगतीकडे गेली होती. भाजप सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे, जीएसटीसारख्या कररचनेमुळे आता आपण अशा अवस्थेला आलो आहोत की देशाची प्रगतीच होईल. ट्रक, सिमेंट, वाहन उद्योग यांची वाढ होत आहे. ईपीएफओचे आकडे पाहिले तर देशात आता दरवर्षी ७० लाख रोजगार निर्माण होत आहेत. त्यामुळे यावर्षी देशाचा विकास दर ७.५ टक्के राहील. आज आपण नवीन भारताच्या निर्माणाचा संकल्प केला तर २०२२ पर्यंत ८.५ ते ९ टक्क्यांनी विकास साधत निश्चितच नवा भारत उदयाला येईल, असा विश्वास राजीव कुमार यांनी व्यक्त केला. रोजगारनिर्मिती होतच नाही या नकारात्मक मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे. अर्थात रोजगाराजा दर्जा वाढवण्याची गरज आहे व त्याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nउज्ज्वला, सौभाग्य, जनधन, आयुष्यमान या सरकारच्या योजनांमुळे देशातील गरीबांना थेट लाभ झाला आहे, असेही राजीवकुमार म्हणाले. सर्वाना सोबत घेऊन विकास साधण्याच्या भाजप सरकारच्या धोरणामुळे यापुढे गतीने विकास होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nनाणार प्रकल्प विदर्भात आणा: भाजपा आमदाराची मागणी\nभाजपविषयी चांगली बातमी द्यावी लागलीच तर ती बातमी कोपऱ्यात कुठेतरी खाली ढकलून टाकायची. लोकसत्ताचा केविलवाणा प्रयत्न\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/uttar-pradesh-7-year-old-girl-raped-and-killed-during-wedding-ceremony-in-etah-1664600/", "date_download": "2018-04-24T04:49:48Z", "digest": "sha1:Z3NQYHZOJSBSHL5IDTK2QRUMYKTDXK3I", "length": 12984, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Uttar Pradesh 7 year old girl raped and killed during wedding ceremony in Etah | संतापजनक! लग्नसमारंभादरम्यान ७ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n लग्नसमारंभादरम्यान ७ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या\n लग्नसमारंभादरम्यान ७ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या\nइटाह जिल्ह्यातील शीतलापूर गावात सोमवारी संध्याकाळी एका पत्रकाराच्या बहिणीचे लग्न होते. या लग्नसमारंभात एक दाम्पत्य, त्यांच्या सात वर्षांच्या मुलीसह आले होते.\nदेशभरात कठुआ आणि सुरतमधील लहान मुलीवरील बलात्कार प्रकरणावरुन संतापाची लाट उसळली असतानाच आता उत्तर प्रदेशमधील इटाह जिल्ह्यात सात वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा सर्व प्रकार एका लग्नसमारंभादरम्यान घडला आहे.\nइटाह जिल्ह्यातील शीतलापूर गावात सोमवारी संध्याकाळी एका पत्रकाराच्या बहिणीचे लग्न होते. या लग्नसमारंभात एक दाम्पत्य, त्यांच्या सात वर्षांच्या मुलीसह आले होते. पीडित मुलीचे आईवडील लग्नसमारंभात कामात व्यस्त असताना सोनू जातव ( १९ वर्ष) या नराधमाने चिमुरडीला गाठले. यानंतर त्याने पीडित मुलीला लग्नसमारंभापासून जवळ असलेल्या एका पडक्या घरात नेले. त्याने पीडित मुलीवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली.\nदुसरीकडे बराच वेळ मुलगी दिसत नसल्याने आई- वडिलांनी अन्य नातेवाईकांच्या मदतीने मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. शेवटी सोमवारी रात्री साडे बाराच्या सुमाराच पीडित मुलगी पडक्या घरात बेशुद्ध अवस्थेत सापडली. ती अर्धनग्न अवस्थेत होती आणि तिच्यावर शरीरावर जखमा होत्या आणि कपड्यांवर रक्ताचे डाग होते. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. पीडित मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्यानंतरच हत्या कशी झाली हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपी सोनूला अटक करण्यात आली आहे, असे इटाह पोलीस अधीक्षक अखिलेश चौरसिया यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nनाणार प्रकल्प विदर्भात आणा: भाजपा आमदाराची मागणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/chandu-chavan-health-young-13295", "date_download": "2018-04-24T04:56:59Z", "digest": "sha1:MNOJEBH7ZUDGAMYCXQMRAAW7E7IMZFEY", "length": 18217, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chandu Chavan with the health of young ... !! जवान चंदू चव्हाण यांच्या पाठीशी राहूया...!! | eSakal", "raw_content": "\nजवान चंदू चव्हाण यांच्या पाठीशी राहूया...\nगुरुवार, 6 ऑक्टोबर 2016\nभारतीय सीमेवरील पूंछ सेक्‍टरमध्ये कर्तव्यावर असलेले जवान चंदू बाबूलाल चव्हाण (वय 23, रा. बोरविहीर, धुळे) 28 सप्टेंबर 2016 रोजी नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेले अन् पाकिस्तानच्या सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतले. पाकिस्तानी लष्कराच्या ट्विटरवरून चंदू चव्हाण यांना ताब्यात घेतल्याची माहिती प्रसिद्धही केली गेली. पाकिस्तानी लष्कराने त्यांना अज्ञातवासात ठेवल्याची माहिती तेथील प्रसारमाध्यमांनी दिली. मात्र, पुढे पाकिस्तान यू-टर्न घेत चंदू चव्हाण आमच्या ताब्यात नसल्याचे सांगत आहे.\nभारतीय सीमेवरील पूंछ सेक्‍टरमध्ये कर्तव्यावर असलेले जवान चंदू बाबूलाल चव्हाण (वय 23, रा. बोरविहीर, धुळे) 28 सप्टेंबर 2016 रोजी नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेले अन् पाकिस्तानच्या सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतले. पाकिस्तानी लष्कराच्या ट्विटरवरून चंदू चव्हाण यांना ताब्यात घेतल्याची माहिती प्रसिद्धही केली गेली. पाकिस्तानी लष्कराने त्यांना अज्ञातवासात ठेवल्याची माहिती तेथील प्रसारमाध्यमांनी दिली. मात्र, पुढे पाकिस्तान यू-टर्न घेत चंदू चव्हाण आमच्या ताब्यात नसल्याचे सांगत आहे.\nचंदू चव्हाण हे लहान असतानाच यांच्या आई- वडिलांचे निधन झाले आहे. त्यांना एक भाऊ व विवाहीत बहीण आहे. तिघा भावंडांचा त्यांच्या आजी-आजोबांनी (आईचे आई-वडिल) सांभाळ केला आहे. चंदू चव्हाण यांचा भाऊसुद्धा लष्करात आहेत. चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडल्याची माहिती त्यांच्या घरी समजली. नातू पकडला गेल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यांच्या आजी लीलाबाई चिंधा पाटील (चव्हाण) यांचे निधन झाले. या संपूर्ण घटना-घडामोडींनी त्या कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. चंदू जोपर्यंत भारतात परतत नाही तोपर्यंत आजीच्या अस्थिचे विसर्जन न करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला आहे.\nया पार्श्‍वभूमीवर संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ. भामरे यांनी चंदू यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन उच्चस्तरीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही चंदू लवकरच भारतात परततील, असे सांगितले आहे. चंदू यांना परत आणण्यासाठी सरकारने कंबर कसली असून, त्यांच्या सुटकेबाबच्या प्रयत्नांची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली आहे. परंतु, चंदू चव्हाण आमच्या ताब्यात नसल्याचे पाकिस्तान सांगत आहे. त्यामुळे चंदू भारतात कधी अन् केव्हा परततील याबाबत संभ्रम आहे.\nसीमेवर दक्ष असलेल्या सैनिकांमुळेच देशातील नागरिक निवांत दैनंदिन व्यवहार करू शकतात. कुटुंबापासून दूर असलेले व आपले कर्तव्य चोख पार पाडणारे जवान हेच खरे देशाचे हिरो आहेत. परंतु, लष्करात कोणी जायला सांगितले, असे अभिनेते ओम पुरी जेव्हा म्हणतात ना तेव्हा सर्वसामान्य नागरिकांच्या मनात चीड निर्माण होते. असो...अनेकजण वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करतात. मुळ मुद्दा आहे की चंदू चव्हाण हे भारतात केव्हा परततील...\nचंदू चव्हाण यांना पकडल्यानंतर अनेक पाकिस्तानी नेटिझन्सनी पाकिस्तानमधील वृत्तपत्रांच्या ऑनलाइन संकेतस्थळांवर प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. चंदू चव्हाण यांची पाकिस्तान सरकारने लवकरात लवकर सुटका करावी, असे मत अनेकांनी नोंदविले आहे. आपल्या सैनिकांप्रमाणेच ते एक आहेत. भारत-पाकिस्तानचा प्रश्न राजकीय नेत्यांनी बैठकीत सोडवावा. परंतु, जवानाला भारताच्या ताब्यात सुपूर्त करण्यात यावे, अशाही प्रतिक्रिया वाचायला मिळतात.\nजालंधरमध्ये तहानेने व्याकूळ होऊन नकळतपणे तन्वीर (वय 12) पाकिस्तानमधील मुलगा भारतीय हद्दीत दाखल झाला होता. जवानांनी तन्वीरला रात्री आपल्यासोबत ठेवून घेत त्याची काळजी घेतली. भारतीय जवानांनी पाकिस्तानकडे सोपवून आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडविले. गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले असले तरी तन्वीरला पाकिस्तानकडे सोपवून आपल्यातील माणुसकी अद्याप जीवंत असल्याचा प्रचिती भारतीय सैनिकांनी सर्वांना दिली. याच धर्तीवर नजरचुकीने सीमा ओलांडलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांना सोडण्याचे औदार्य पाकिस्तान दाखविणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nचंदू चव्हाण यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आपण राहूया...त्यांना लवकरात लवकर भारतात परतण्यासाठी शुभेच्छा देऊया...सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण सध्यातरी तेवढेच करू शकतो. प्रतिक्रियांच्या माध्यमातून दिलेल्या आपल्या शुभेच्छा नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचतील अन् ते भारतात परततील, अशी अपेक्षा बाळगूया.\n‘व्यवस्थे’मुळेच होतेय आरोग्याची हेळसांड\nसरकारी दवाखान्यात प्रशिक्षणार्थी म्हणून आणि नंतर डॉक्‍टर म्हणून काम केल्यामुळे ही व्यवस्था जवळून पाहिली आहे. सरकारी दवाखान्यांच्या दावणीला बांधलेल्या...\nआमदार विलासराव जगतापांच्या मुलाविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा\nमाडग्याळ - जत तालुक्‍यातील कोंतेवबोबलाद येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून श्रीशैल सौदाप्पा कांबळे (वय ५०) यांना काठी व पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात...\nराजकीय वर्चस्ववादातून दोन खून\nकोल्हापूर - अशोक पाटील यांच्या खुनानंतर त्याचा सूड म्हणून धनाजी गाडगीळ यांचा खून करण्यात आला. त्यामुळे संवेदनशील पाचगाव धुमसत राहिले. राजकीय...\nराज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट\nमुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक...\n'गरज पडली तर राजकीय पक्ष काढू' - रघुनाथदादा पाटील\nलातूर - 'मलाही राजकीयदृष्ट्या सेटल व्हायचे आहे. ताकाला जाऊन मोरवं आम्ही लपवीत नाही. आमची उमेदवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/vijay-mallya-11151", "date_download": "2018-04-24T05:16:09Z", "digest": "sha1:5LOIU2R27KEOTHEE6EL4O3DYFPZDDOAM", "length": 16299, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "vijay mallya विजय मल्ल्यांकडून रु.900 कोटींचा गैरव्यवहार? | eSakal", "raw_content": "\nविजय मल्ल्यांकडून रु.900 कोटींचा गैरव्यवहार\nगुरुवार, 21 जुलै 2016\nमुंबई: कर्ज बुडविण्यासंदर्भात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या विजय मल्ल्यांसमोर आणखी एक आव्हान निर्माण झाले आहे. सक्तवसुली संचलनालयाने युनायेट स्पिरिट्सच्या तक्रारींच्या आधारावर मल्ल्यांविरोधात 900 कोटी रुपयांच्या परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.\nमुंबई: कर्ज बुडविण्यासंदर्भात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या विजय मल्ल्यांसमोर आणखी एक आव्हान निर्माण झाले आहे. सक्तवसुली संचलनालयाने युनायेट स्पिरिट्सच्या तक्रारींच्या आधारावर मल्ल्यांविरोधात 900 कोटी रुपयांच्या परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.\nगेल्या आठवड्यात युनायटेड स्पिरिट्सने मल्ल्यांविरोधात अनेक तक्रारी दाखल केल्या. कंपनीने केलेल्या चौकशीदरम्यान 1225 कोटी रुपयांचे ‘अनियमित व्यवहार‘ झाल्याचे आढळून होते. मल्ल्यांनी स्वतःकडे युएसएलची मालकी असताना सुमारे अर्धा डझनपेक्षा जास्त परदेशी कंपन्यांमध्ये बेकायदेशीर पद्धतीने निधी वळविल्याचा कंपनीचा आरोप आहे. सक्तवसुली संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी या आरोपाला दुजोरा दिला आहे. मल्ल्यांनी निधी वळविलेल्या बहुतांश कंपन्या ‘टॅक्स हॅवन्स‘मध्ये आहेत. युएसएलने सादर केलेल्या कागदपत्रांचा तपास सुरु झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.\n\"युएसएलच्या उपकंपन्यांमार्फत सुमारे सात कंपन्यांना हा निधी वळविण्यात आला आहे. त्यापैकी चार कंपन्या ब्रिटनमध्ये, दोन बहामाज् तर एक युरोपातील आहे. मल्ल्यांच्या कुटुंबियांच्या नावे वेगवेगळ्या ट्रस्ट्सना हा पैसा वळविण्यात आला आहे.\", अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. मल्ल्यांनी पैसा वळविलेल्या परदेशी कंपन्यांमध्ये फोर्स इंडिया फॉर्म्युला वन टीम, वॅटसन, कॉन्टिनेन्टल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, मोडाल सिक्युरिटीज्, अल्ट्रा डायनॅमिक्स आणि लोम्बार्ड वॉल कॉर्पोरेट सर्व्हिसेसचा समावेश आहे. ऑक्टोबर 2010 ते जुलै 2014 दरम्यान हा निधी वळविण्यात आला आहे.\nमागील तीन महिन्यांमध्ये मल्ल्यांशी याविषयी चर्चा करण्यासाठी युएसएलने अनेकवेळा पुढाकार घेतला. परंतु त्यात त्यांना अपयश आले आहे. त्याशिवाय, कंपनी शेअरधारकांशी संबंधित विषयांवरदेखील चर्चा करण्यास इच्छुक आहे. परंतु आपल्यावर झालेले आरोप बिनबुडाचे असून सर्व व्यवहार युएसएलचे संचालक व शेअरधारकांच्या मंजुरीनेच झाले होते, असा मल्ल्यांचा दावा आहे.\nकाही वर्षांपूर्वी मल्ल्यांनी युएसएलमधील आपला मोठा हिस्सा दिआज्जिओ कंपनीला विकला होता. तरीसुद्धा अध्यक्षपद स्वतःकडे ठेवले होते; परंतु, कंपनी मल्ल्या यांच्या मालकीची असतानाच्या काळातील आर्थिक व्यवहार व मोठ्या रकमा \"किंगफिशर एअरलाइन्स‘ला दिल्यावरून \"दिआज्जिओ‘ आणि मल्ल्या यांच्यात वादंग सुरू होते. \"युनायटेड स्पिरिट्‌स‘ला या पूर्वीच्या व्यवहारांबाबत आर्थिक व्यवहार नियामक संस्थांकडून नोटिसा आल्या होत्या. तरीही अनेक दिवस मल्ल्या \"युनायटेड स्पिरिट्‌स‘च्या अध्यक्षपदाला चिकटून राहिले होते. परंतु, \"दिआज्जिओ‘ व्यवस्थापनाचा दबाव दिवसेंदिवस वाढत होता. अखेर मल्ल्या यांनी वाटाघाटी करून कंपनीचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला. याकरिता त्यांनी कंपनीकडून 515 कोटी रुपये पदरात पाडून घेतले. त्यांनी पुढील पाच वर्षे \"युनायटेड स्पिरिट्‌स‘चे शेअर विकत घेणार नसल्याचे आणि संपूर्ण जगात (इंग्लंड वगळता) कंपनीशी स्पर्धा करणारा कोणताही उद्योग सुरू करणार नसल्याचे कबूल केले आहे.\nआयडीबीआय बॅंकेच्या 900 कोटींच्या कर्जथकबाकी प्रकरणी मल्ल्यांसह किंगफिशर एअरलाईन्सच्या इतर अधिकाऱ्यांची ईडीकडून मनी लॉंडरिंगअंतर्गत चौकशी केली जात आहे. विजय मल्ल्यांची मालकी असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सकडे बँकांचे तब्बल 9,000 कोटी रुपयांचे कर्ज थकित आहे.\nकेडगाव प्रकरण - विशाल कोतकरला कामरगावमध्ये अटक\nनगर : केडगावमधील शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख संशयित आरोपी व काँग्रेस नगरसेवक विशाल...\nअनधिकृत गौण खनिजाविरुद्ध मोहीम\nमालवण - तालुक्‍यात अनधिकृतरीत्या वाळू वाहतूक, गौण खनिज वाहतूक तसेच वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या होड्यांवर महसूल प्रशासनाने धडक मोहीम हाती घेत...\nम्हेत्रे कुटुंबीयांकडुन सात हजार पुस्तके दान\nतासगाव - ज्येष्ठ द्राक्षतज्ज्ञ एन. बी. म्हेत्रे यांच्या आई रुक्‍मिणी बाबूराव म्हेत्रे आणि शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त प्रयोगशील शेतकरी आर. डी. (...\nयात्रेकरुंची तहान भागवण्यासाठी सरसावले 'जल'दाते\nशिर्सुफळ : शिर्सुफळ (ता.बारामती) येथील श्री शिरसाई देवी यात्रेच्या दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांची होणारी गैरसोय...\nअग्निशमन दलाचा मला सार्थ अभिमान वाटतो - विश्वनाथ महाड़ेश्वर\nमुंबई : अग्निशी झुंज देत मुंबईकरांच्या जीवन व मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुंबईचे महापौर विश्वनाथ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://chinmaye.com/tag/marathi-cinema/", "date_download": "2018-04-24T04:40:47Z", "digest": "sha1:HKC5RXKKRFHY6XLKKHP7WL2I3XEA7WOU", "length": 6026, "nlines": 101, "source_domain": "chinmaye.com", "title": "marathi cinema | Chinmaye", "raw_content": "\nया चित्रपटाचे ट्रेलर पाहिले तेव्हाच मनात उत्सुकता निर्माण झाली आणि रिव्यू वाचून पिक्चर पाहावा की नाही हे ठरवण्यापेक्षा ट्रेलर पाहून चांगला अंदाज येतो आणि रिव्यू वाचून पिक्चर पाहावा की नाही हे ठरवण्यापेक्षा ट्रेलर पाहून चांगला अंदाज येतो शिवाय सचिन कुंडलकर चा चित्रपट पाहणे म्हणजे एक हैप्पी जर्नी नाही का शिवाय सचिन कुंडलकर चा चित्रपट पाहणे म्हणजे एक हैप्पी जर्नी नाही का पण मग लेका तू कशाला रिव्यू लिहितो आहेस असे तुम्ही विचारणे साहजिक आहे पण मग लेका तू कशाला रिव्यू लिहितो आहेस असे तुम्ही विचारणे साहजिक आहे चित्रपट हा एक अनुभव असतो चित्रपट हा एक अनुभव असतो तो दोघांनी एकत्र बसून पाहिला तरी प्रत्येकाच्या मनात तो एक वेगळा अनुभव म्हणून घर करतो … पिच्क्चर पाहिला रे पाहिला के त्याबद्दल गप्पा मारायची खुमखुमी येते … […]\nकिल्ला – एक चित्रमय अनुभव\nकाही चित्रपट गोष्ट सांगतात तर काही चित्रपट म्हणजे अनुभवांची गोष्ट असते. किल्ला हा एक असाच अनुभव उभा करणारा चित्रपट. अकरा वर्षांच्या चिन्मय काळेच्या भावविश्वात वडीलांच्या जाण्याने काहूर माजलेले असतानाच त्याच्या आईची दूर गुहागरला बदली होते. ओळखीच्या आणि गजबजलेल्या पुण्यातून दूर या छोट्या ठिकाणी राहणे त्याला फारसे पटलेले नसते. हा बदल स्वीकारायला चिन्मय तयार नसतो. त्याला सोबत फक्त त्याच्या आईची … ती देखील तिच्या दु:खातून न सावरलेली … अनोळखी शहरात एकटी आपल्या मुलाने या नवीन ठिकाणी एक नवी सुरुवात करावी असा […]\nबाबासाहेब: बालपण आणि शिक्षण\nबाबासाहेब जाणून घेताना – विषयप्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://thanevarta.in/?p=8477", "date_download": "2018-04-24T04:25:28Z", "digest": "sha1:6SGWEVGXU6LPFCR2NAJA5L4QKJ3YL7ON", "length": 8871, "nlines": 85, "source_domain": "thanevarta.in", "title": "देशातील पहिल्या रेल्वे सेवेला १६५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं केक कापून प्रवाशांनी साजरा केला वर्धापन दिन – Thanevarta", "raw_content": "\nदेशातील पहिल्या रेल्वे सेवेला १६५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं केक कापून प्रवाशांनी साजरा केला वर्धापन दिन\nआशिया खंडात रेल्वे सेवा सुरू झालेल्यास १६५ वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर १६५ वर्षापूर्वी म्हणजे १६ एप्रिल १८५३ ला मुंबईहून ठाण्याला रेल्वे सेवा सुरू झाली. १४ डब्यांच्या गाडीत त्यावेळी मुंबईतील ४०० मान्यवर होते. बोरीबंदर रेल्वे स्थानकात २१ तोफांच्या सलामीत या गाडीचा शुभारंभ झाला. या गाडीला बोरीबंदरवरून ठाण्याला यायला १ तास १५ मिनिटं लागली. आज १६५ वर्षानंतरही या वेळेत फारशी घट झालेली नाही. संपूर्ण आशिया खंडात मुंबई ते ठाणे मार्गावर प्रथम रेल्वे धावल्यामुळं या मार्गाचं ऐतिहासिक महत्वही मोठं आहे. हे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन या रेल्वे स्थानकाला पूर्वीचं गतवैभव प्राप्त करून देण्याच्या घोषणा झाल्या पण त्या फक्त वल्गनाच ठरल्या आहेत. रेल्वे सेवेला १६५ वर्ष उलटूनही रेल्वे प्रवाशांना फारशा सुविधा मात्र अद्यापही उपलब्ध झालेल्या नाहीत. १६५ वर्षापूर्वी गाडीतून प्रवास करणं म्हणजे एक नवल होतं मात्र १६५ वर्षानंतर रेल्वे प्रवासी इतक्या गर्दीतून करत असलेला प्रवास जगाच्या दृष्टीनं नवल ठरला आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या वाढली असुन अनेक प्रवाशांना यामुळे जीव गमवावे लागले आहेत. पण रेल्वे प्रशासन माञ यावर उपाययोजना करण्यास अयशस्वीच ठरल्याचे दिसत आहे. आज खासदार राजन विचारे यांनी कोकण रेल्वे आणि इतर रेल्वे प्रवासी संघटना यांच्यासह फलाट क्रमांक २ वर केक कापून ठाणे रेल्वे स्थानकाचा १६५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.\nठाणे रेल्वे स्थानकातील गेले तीन महिने बंद पडलेल्या आपत्कालीन वैद्यकीय कक्षाला नवसंजीवनी\nमध्य रेल्वे आणी ट्रान्सहार्बर मार्गावरील महत्वाचे स्थानक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातील गेले तीन महिने बंद पडलेल्या आपत्कालीन वैद्यकीय कक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. Related\nठाणे रेल्वे स्थानकाजवळील कारशेडमध्ये उपनगरीय गाडीच्या डब्याला आग\nठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ जवळील कारशेडमध्ये उभ्या असलेल्या एका उपनगरीय गाडीच्या डब्यास काल दुपारच्या सुमारास आग लागल्यानं खळबळ उडाली. Related\nउपनगरीय गाडीमध्ये जागेवरून वाद करणा-या १० ते १५ महिलांना रेल्वे पोलीसांनी घेतलं ताब्यात\nउपनगरीय गाडीमध्ये जागा मिळावी म्हणून गुंडगिरी करणा-या मुजोर महिलांवर रेल्वे पोलीसांनी कारवाई केली आहे. Related\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकरी जनतेची मानवंदना\nराबोडी कोळीवाड्याचा विकास स्वत:च करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार\nविस्थापितांचं पुनर्वसन हे त्यांच्या सहमतीनं आणि जगण्याशी सुसंगत असावं – मेधा पाटकर\nसुट्टीच्या दिवशी पालिका आयुक्तांनी पत्नीसमवेत केली झोपड्यांची रंगरंगोटी\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षपदी रविंद्र मोरे यांची नियुक्ती\nअल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलानेच फूस लावून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार\nइंदिरानगर झोपडपट्टीमधील जवळपास दीडशे मुलांनी चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत सहभाग घेऊन पालिका आयुक्तांसोबत साजरी केली रविवारची सुट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/media-42066505", "date_download": "2018-04-24T05:40:32Z", "digest": "sha1:45GXMZA7EKTU7ZTS3WEZDD5ZZ5VZC3DL", "length": 7682, "nlines": 117, "source_domain": "www.bbc.com", "title": "म्यानमारच्या राखिनमधील हिंदूंच्या स्थितीचा ग्राउंड रिपोर्ट - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nम्यानमारच्या राखिनमधील हिंदूंच्या स्थितीचा ग्राउंड रिपोर्ट\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nरोहिंग्या मुस्लिमांच्या वंशसंहाराचे आरोप म्यानमार सरकारनं वारंवार फेटाळले आहेत. तसंच मु्स्लीम जहालवाद्यांनी हिंदूंवर हल्ले करून त्यांना ठार केल्यानं धार्मीक अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्यासाठी सरकाराला लष्कर पाठवावं लागलं असं म्यानमार सरकारचं म्हणणं आहे.\nराखिन प्रांताला भेट देणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय पत्रकारांमध्ये बीबीसीचे नितीन श्रीवास्तव यांचाही समावेश आहे. म्यानमारच्या सितवेमध्ये अंतर्गतरित्या विस्थापित झालेल्या हिंदूंना ते भेटले. राखिन प्रांतात सप्टेंबरमध्ये हिंदूंची सामूहिक कबर सापडली. या सरकारच्या दाव्याचाही त्यांनी वेध घेतला. त्यांचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.\nरिपोर्टर - नितीन श्रीवास्तव\nशूटिंग - यान नैंग\nएडिटिंग - प्रीतम रॉय\nरोहिंग्या मुस्लीम का करत आहेत धर्मांतर\nरोहिंग्या मुस्लीम आहेत तरी कोण\nरोहिंग्यांवरच्या संकटामुळे का आहे पर्यावरणाला धोका\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ सीमाप्रश्नाविषयी बेळगावच्या तरुणांना काय वाटतं\nसीमाप्रश्नाविषयी बेळगावच्या तरुणांना काय वाटतं\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ - आणि त्याने चक्क गाढवांच्या पाठीवरच फिरतं वाचनालय सुरू केलं\nपाहा व्हीडिओ - आणि त्याने चक्क गाढवांच्या पाठीवरच फिरतं वाचनालय सुरू केलं\nव्हिडिओ अंतराळवीर संडासला कुठे जातात\nअंतराळवीर संडासला कुठे जातात\nव्हिडिओ यांचं नाक का आहे जगात सर्वांत मोठं\nयांचं नाक का आहे जगात सर्वांत मोठं\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ: हिमवादळाचा तडाखा बसतो तेव्हा...\nपाहा व्हीडिओ: हिमवादळाचा तडाखा बसतो तेव्हा...\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : शाळेत जाण्यासाठी या मुलांचा जीवघेणा प्रवास\nपाहा व्हीडिओ : शाळेत जाण्यासाठी या मुलांचा जीवघेणा प्रवास\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marketaanimi.com/2013/09/23/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A9%E0%A5%A9-day-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A5%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B8/", "date_download": "2018-04-24T04:58:52Z", "digest": "sha1:D6SO6AE5A26YXIBZ5U3HFJKDZ3ECYXJY", "length": 15825, "nlines": 103, "source_domain": "marketaanimi.com", "title": "भाग ३३ day-ट्रेडचं वेड – २ – करे सो आज कर आज करे सो अब !! | Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nभाग ३३ day-ट्रेडचं वेड – २ – करे सो आज कर आज करे सो अब \nintra day हा शब्दप्रयोग शेअरमार्केटमध्ये वारंवार होतो . याला day- ट्रेड किंवा intra –day ट्रेड असं म्हणतात . असा ट्रेड करणाऱ्यांना पंटर म्हणतात . पंटर जलद नफा होण्यासाठी व्यवहार करतात. या ट्रेडमध्ये पैसा गुंतवावा लागत नाही . किंवा फार मोठ्या भांडवलाची आवश्यकता नसते. पण फायदा पटकन आणी कमी श्रमात मिळते . कधी कधी तर महिन्याच्या पगाराएवढा फायदा पाच मिनिटात होतो . तसा झाला तर तोटा पण तितकाच पटकन आणि जास्त होवू शकतो\nहा ट्रेड दोन प्रकाराने करता येतो. प्रथम खरेदी करायची आणी नंतर वाढलेल्या भावाला त्यादिवशी मार्केटच्या वेळात विक्री किंवा आधी विक्री आणि नंतर त्यापेक्षा कमी भावाला त्याच दिवशी मार्केटच्या वेळात खरेदी. आधी विकण्याला ‘short’ करण असं म्हणतात . या मार्केटमध्ये हीच तर मजा आहे शेअर विकण्यासाठी तो तुम्ही खरेदी केलेला असायची गरज नाही. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्यासारखीच ही कथा. आपल्या मालकीची वस्तू नसताना ती वस्तू दान करून पुण्य मिळवण होय.\nday-ट्रेडसाठी दलाली कमी आकारली जातें .रुपये १००ला ५पैसे या दराने आकारली जाते . परंतु या ट्रेडमध्ये धोक्याचे प्रमाण जास्त असते . हे एक वेगळ्या प्रकारचं कौशल्यच आहे . झटपट निर्णय घेण्याची क्षमता यासाठी आवश्यक असते . मार्केट सतत बदलत असते या अनिश्चिततेमुळे खूप फायदा मिळवण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही .\nजर मार्केटला क्रिकेटच्या सामन्याची उपमा द्यावयाची तर मोठ्या अवधी साठी ( तीन ते पांच वर्षे ) केलेली गुंतवणूक ही कसोटी क्रिकेट, छोट्या मुदतीसाठी केलेली गुंतवणूक म्हणजे एक दिवसाचा सामना आणी डेट्रेड म्हणजे T -२० चा सामना\n१००रुपये प्रती शेअर किमत असलेले १००शेअर्स खरेदी करून १०१रुपये प्रती शेअर भावाने त्याच दिवशी मार्केटच्या वेळात विकले तर १०रुपये दलाली व इतर चार्जेस वजा होऊन ९०रुपये फायदा होतो. या ट्रेडसाठी तुम्हाला शेअर्सच्या खरेदीसाठी गुंतवणूक करावी लागत नाही. १००रुपये प्रती शेअर या भावाने १००शेअर विकले व त्याच दिवशी मार्केटच्या वेळेत ९९ प्रती भावाने खरेदी केले तर दलाली व इतर चार्जेस रुपये १० जाऊन ९०रुपये फायदा होतो . अशा प्रकारे दिवसातून कितीही वेळेला डेट्रेड करता येतो .\nजर शेअर्सच्या किमतीत तुमच्या अंदाजाप्रमाणे वाद किंवा घट झाली नाही तर तुम्हाला तोटा सहन करावा लागतो . कारण तुम्ही खरेदी केलेले शेअर्स आजच मार्केटच्या वेळेत विकावे लागतात आणी विकलेले शेअर्स आजच मार्केटच्या वेळेत खरेदी करून तुम्हाला position square करावी लागते . म्हणजे आपण म्हणतो त्याप्रमाणे याची देही याच डोळा सर्व याच जन्मात भोगायचे आहे असा हा day-ट्रेड.\nतुमच्या अपेक्षेप्रमाणे किमतीत बदल न झाल्यामुळे तोट्यात जात असाल तर तुम्ही खरेदी केलेल्या शेअर्सची किमत देवून तुम्ही तेच शेअर्स किमतीत तुम्हाला हवा तेवढा अनुकूल बदल झाल्यावर विकू शकता. थोडक्यात डेट्रेडचे रुपांतर छोट्या अवधीच्या गुंतवणुकीत होते. आता हे सगळं तुमच्याकडे किती भांडवल आहे आणि तुम्ही किती दिवस तग धरू शकता या वर अवलंबून आहे. shortingच्या बाबतीत मात्र हा पर्याय उपलब्ध नाही.\nआधी सांगितलं तसं day-ट्रेड वाटत तितक सोप नाही आणि जरी भांडवलाची फार गरज नसली तरी धोकासुद्धा तितकाच जास्त आहे. तुमचा अभ्यास, वाचन आणि शेअरच्या किमतीत होणार्या बदलाचे निरीक्षण चांगले असेल तर day-ट्रेड मध्ये यश मिळू शकतं. कसं ते पुढच्या भागात बघूया\nपुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nमी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.\n← भाग ३२ – dayट्रेडचं वेड भाग ३४ – day-ट्रेडचं वेड 3 : आखूड शिंगी बहुगुणी भाग ३४ – day-ट्रेडचं वेड 3 : आखूड शिंगी बहुगुणी \n7 thoughts on “भाग ३३ day-ट्रेडचं वेड – २ – करे सो आज कर आज करे सो अब \nपिंगबॅक चक्रव्यूह डेट्रेडचा आणि अभिमन्यू आपला \nपिंगबॅक भाग ३६ – चक्रव्यूह डेट्रेडचा आणि अभिमन्यू आपला \nपिंगबॅक भाग ३२ – dayट्रेडचं वेड \nपिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July – Aug २०१५ | Stock Market आणि मी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआठवड्याचे-समालोचन - सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा - १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८\nभाग 62 - शेअर मार्केट आणि ब्रेक्झीट\nतुमचे प्रश्न – माझी उत्तरं : July - September 2017\nआठवड्याचे-समालोचन – सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा – १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८\nआठवड्याचे समालोचन – शेअर मार्केट एक ‘अक्षय पात्र’ – ९ एप्रिल २०१८ ते १३ एप्रिल २०१८\nआठवड्याचे समालोचन – साप शिडीचा खेळ – २ एप्रिल २०१८ ते ६ एप्रिल २०१८\nलेखमाला – ‘माझी वाहिनी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marketaanimi.com/2016/06/02/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-11/", "date_download": "2018-04-24T04:59:34Z", "digest": "sha1:COQHIS2JA6GEHK2CQFA3BP4IRAVRAJTT", "length": 39984, "nlines": 220, "source_domain": "marketaanimi.com", "title": "तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Mar 2015 – Apr 2016 | Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nतुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Mar 2015 – Apr 2016\nआधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nतुमचा प्रश्न : मी बँकेत फोन केला होता त्यांनी मला DMat a/c ओपन करायच सांगीतले तर मला ट्रेडीं a/c पण ओपण करावे लागेल का\nशेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी ट्रेडिंग अकौंट ओपन करणे जरुरीचे असते. जर आपला ट्रेडिंग अकौंट याआधीच उघडलेला असेलं तर पुन्हा उघडण्याची जरुरी नाही. तुम्ही तुमचा ट्रेडिंग अकौंट कोणत्याही ब्रोकरकडे ओपन करू शकता.\nमाझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल.\nआपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहे. ज्यांना कोणाला शेअरमार्केटमध्ये काम करताना अडचण येत असेल त्यांना मदत करा आणी ब्लोगचा फायदा घ्यायला सांगा.\nकोणत्याही मार्केटमध्ये ट्रेडिंग करा पण फायदा मिळवणे हे ध्येय ठेवा. आणी त्या प्रकाराची पूर्ण माहिती घेऊनच व्यवहार करा. माझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल.\nसपोर्ट म्हणजे पाठींबा आणी रेझिस्टन्स म्हणजे प्रतिकार. जर मार्केटचा कल तेजीचा असेल तर ज्या पाईंटला आल्यानंतर मार्केट वाढते त्याला सपोर्ट म्हणतात. आणी ज्या पाईंटला आल्यानंतर मार्केट पडते त्या पाईंटला रेझिस्टन्स असे म्हणतात. मार्केटचा ट्रेंड किंवा विशिष्ट शेअरचा ट्रेंड या दोघानाही हे लागू आहे. पण जर मार्केटचा कल मंदीचा असेल तर सपोर्टचा पाईंट रेझिस्टन्स बनतो आणी रेझिस्टन्सचा पाईंट सपोर्ट बनतो. हे शेअर्सच्या किंमातीलाही लागू आहे.\nओंन लाईन ट्रेडिंगस्कीममध्ये डेट्रेडिंग करण्याची प्रक्रिया आपण समजावून घ्या. माझ्या ‘मार्केट आणी मी’ या ब्लोगवरील ३२ ते ३६ हे इंट्राडेशी संबंधीत लेख वाचा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.\nतुमचा प्रश्न : सर्वसाधारणपणे असे दिसून येते ( असे माझे निरीक्षण आहे ) की FMCG चे समभाग बाजार खाली असताना देखील बर्यापैकी स्थिर राहतात फार घट होत नाही पण सध्या काही दिवस FMCG चे दादा colgate नि HUL गटांगळ्या खात आहेत . रामदेवबाबा factor चा परिणाम आहे कि खरोखर त्यांची विक्री नि नफ्याची क्षमता खालावली आहे\nअगदी थोडा पातंजलीचा परिणाम आहे परंतु जागतिक पातळीवर पाहतां सगळीकडे मंदी आहे. आणी त्यामुळे या कंपन्यांच्या volumeवर परिणाम होत आहे. कोलगेट आणी HUL या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यामुळे जागतिक मंदीचा फटका त्यांनाही बसत आहे.\nकॅश मार्केट मध्ये ट्रेडिंग करायचे असेल तर आपण कोणतीही वस्तू विकत घेतों त्याप्रमाणे शेअर विकत घेतो. आपण त्या शेअर्सचे मालक बनतो. लाभांश, बोनस, राईट्स हे सर्व फायदे मिळतात. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला शेअर विकता येतो. पण शेअर्सची पूर्ण किंमत मोजावी लागते. आता वायदा बाजारांत फक्त मार्जिन मनी भरावा लागतो लॉट मध्ये खरेदी करावी लागते. फ्युचर्स ट्रेडमध्ये अमर्याद फायदा किंवा अमर्याद तोटा होतो. परंतु ऑप्शन ट्रेडमध्ये मात्र तुमचा फायदा, तोटा मर्यादेत राहतो. पण वायदेबाजारांत कॅश मार्केटपेक्षा कमी रक्कम गुंतवावी लागते.पण लाभांश बोनस राईट्स इत्यादी फायदे मिळत नाहीत.\nतुमची शेअर्सची निवड जर बरोबर असली तर तुम्हाला त्या शेअर्सची किंमत वाढल्यावर खूप फायदा होऊ शकतो त्यासाठी किती कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावे, किती रकम गुंतवावी यावर मिळणारा फायदा अवलंबून नाही. शेअर्सची किंमत पुष्कळ परस्पर विरोधी गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळे तुमची शेअरची निवड, ती निवड करायची वेळ, आणी शेअर्स विकायची योग्य वेळ निवडलीत तर तुम्हाला एका कंपनीच्या शेअर्समध्येही खूप फायदा होऊ शकतो. परंतु आपल्या पोर्टफ़ोलिओ मध्ये असे १० ते १५ शेअर्स असले तर उत्तमच. …..\nमाझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल\nतुमचा प्रश्न : लाभांश बद्ल माहिती हवी आहे\nकंपनी आपल्या शेअरहोल्डर्सना लाभांश देते. हा लाभांश तीन प्रकारचा असू शकतो. फायनल, अंतरिम, विशेष. कंपनीला होणार्या फायद्यापैकी काही भाग कंपनी शेअर होल्डर्सना देते. फायनल लाभांश वार्षिक निकालांबरोबर जाहीर होतो. तर अंतरिम लाभांश कंपनी वर्षात कधीही जाहीर करू शकते. विशेष लाभांश कंपनीला जर भरपूर अतिरिक्त नफा झाला किंवा कंपनीला २५, ५० , १०० वर्ष झाली तर कंपनी जाहीर करते. परंतु कंपनी कितीही नफा करीत असली तरी लाभांश देण्याचे किंवा लाभांश किती द्यावा याचे बंधन कंपनीवर नसते. रेकॉर्ड डेटला ज्या शेअरहोल्डर्सच्या नावे शेअर्स असतील त्यांना हे लाभांश मिळतात.\nही सर्व माहिती कंपनीच्या साईटवर गेल्यास आपल्याला उपलब्ध होईल. तसेच यापैकी काही माहिती BSE वर त्या शेअर्सच्या किमतीचे पेज उघडले तरी मिळते. बुक VALUE म्हणजे :- कंपनीचे ASSETS वजा कंपनीच्या लायबिलीटीज (देणी) भागिले कंपनीच्या शेअर्सची संख्या\nवेगवेगळ्या कंपन्यांचा अभ्यास करून आपल्याला योग्य वाटेल त्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा. पण गुंतवणूक करताना आपल्याला जास्तीतजास्त फायदा होईल याची काळजी घ्या.\nया शेअर्स मध्ये गुंतवणूक केल्यावर फायदा होतोच असे नाही. फायदा होणे हे या कंपनीच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.\nतुमचा प्रश्न : 1)balance sheet kashi pahaychi.2)व kay pah कंपनीच्या BALANCE SHEET मध्ये कंपनीची नफा कमवण्याची क्षमता, कंपनी ज्या उद्योगांत काम करीत आहे त्या उद्योगामध्ये प्रगतीची शक्यता. सरकारी हस्तक्षेप., नफ्याचे प्रमाण,,\nकंपनीला असलेल्या कर्जाचे प्रमाण, कंपनीत असलेले प्रमोटर्सचे शेअरहोल्डिंग, कंपनी देत असलेले लाभांशाचे प्रमाण, जर कंपनी एकापेक्षा जास्त उद्योगांत कार्यरत असेल तर कोणत्या उद्योगांत जास्त नफा कमवीत आहे या गोष्टी पहाव्यात …\nआपण एकाचवेळी इतक्या मार्केट्स मध्ये व्यवहार करण्या ऐवजी कोणत्यातरी एका विभागाचे व्यवहार आत्मसात केल्यास आपल्याला फ्यादेशीर होईल.\nया बाबतीत तुम्ही तुमच्या TAX सल्लागाराचा सल्ला घ्या. .\nमाझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल. माझ्या ब्लोगमध्ये इंट्राडे, अल्प मुदतीसाठी मध्यम मुदतीसाठी आणी दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करताना शेअर्सची निवड कशी करावी हे स्पष्ट केले आहे.\nजे शेअर ब्रोकर्स आपल्या गीर्हैकांसाठी शेअर्सची खरेदीविक्री करतात पण गुंतवणुकीच्या बाबतीत कोणताही सल्ला देत नाहीत ते हे काम standard ब्रोकर्सपेक्षा कमी ब्रोकरेज आकारून करतात. आपल्याला जर आपला स्वतःचा अभ्यास करून शेअर्सची खरेदी विक्री करायचे असेल तर आपण डीसकौंट ब्रोकरच्या मार्फत खरेदी विक्री कार्यास हरकत नाही.\nकंपनी वाढीव भांडवल उभारताना जेव्हा आपल्या वर्तमान भागधारकांना त्यांच्या शेअरहोल्डीन्ग्च्या प्रमाणांत आणी एका ठराविक भावाने शेअर्स ऑफर करते त्याला राईट्स इशू असे म्हणतात.. हे राईट्स इशू वर्तमान शेअर होल्डर दुसऱ्या माणसाच्या नावाने RENUNCIATE करू शकतात. तसेच राईट्स ऑफर मध्ये ऑफर केलेल्या शेअर्स पेक्षा जास्त शेअर्स साठी अर्ज करू शकतात.\nतुमच्या शेअर्समधील उलाढालीवर नाही तर तुम्हाला होणार्या नक्त नफ्यावर ( तुमचा नफा – ब्रोकरेज आणी इतर कर – तुम्हाला झालेला तोटा ) आयकर आकारला जातो\nआपल्याला कुठलेही ट्रेनिंग घेण्याची जरुरी नाही पण चिकाटी धैर्य आत्मविश्वास आणी सातत्य या गोष्टींची जरुरी आहे. त्याचबरोबर आपली अर्थव्यवस्था, आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी योग्य\nवाटणार्या कंपन्या यांची दूरदर्शनवरील वाहिन्या, BSEची साईट तसेच प्रत्येक कंपनीच्या साईटवर जाऊन आपण माहिती मिळवू शकता.. आपण माझा ‘मार्केट आणी मी ‘हा ब्लोग पूर्ण वाचा.\nआणी प्रत्यक्ष पैशाची गुंतवणूक करण्याआधी आपले निर्णय बरोबर येतात की नाही ते वहीतल्या वहीत लिहून बाघा.\nडेटइक्विटी रेशियो, प्राईस तो बुक रेशियो, रिटर्न ओंन इक्विटी, CAGR (COMPOUNDED ANNUAL GROWTH RATE), रिटर्न on कॅपिटल, SOLVANCY रेशियो, प्राईस अर्निंग रेशियो, ऑपरेटिंग मार्जिन,. प्रत्येक उद्योगातील कंपनीच्या BALANCE SHEET च्या अभ्यासासाठी काही विशिष्ट रेशियो महत्वाचे असतात.\nमी गोल्डमध्ये ट्रेडिंग करत नाही.\nमाझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल.\nतुमचा प्रश्न : मला इंट्रा डे ट्रेडिंग विषयी व शेअर माक्रे्े़ेट नविन खाते काढणे संबधीत माहीती द्यावी\nमाझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल. माझे ३२ ते ३६ नंबरचे लेख इंट्राडे ट्रेड विषयी आहेत ते वाचावे.\nजर आपली होल्डिंग CAPACITY असेल तर थांबा. आणी नसेल तर याच कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीवर लक्ष ठेवून किंमत सुधारल्यावर हे शेअर विकून टाका. आणी प्रगतीशील आणी ब्लुचीप कंपन्यांमध्ये गुंतवा म्हणजे तोट्याचे रुपांतर फायद्यांत होईल. आणी काळजी लागणार नाही.\nम्युच्युअल फंडस्सुद्धा शेअर मार्केटमध्येच गुंतवणूक करीत असतात. त्यामुळे शेअरमार्केटमधील धोक्यांपासून म्युच्युअल फंडाची सुटका होऊ शकत नाही. जर अर्थव्यवस्थाच ढासळत असेल तर प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणांत तोटा होतो त्याला म्युच्युअल फंड्स अपवाद नाहीत\nमाझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल\nमाझ्या ब्लोगवरील ३२ ते ३६ लेख वाचा.\nइंट्राडे ट्रेडिंग मध्ये तुम्हाला कितीही % नफा होऊ शकतो तुमची खरेदीची किंमत ,वेळ शेअरची किंमत किती वाढते आणी तुम्ही किती मर्यादेपर्यंत शेअर वाढण्याची वाट पाहू शकता या वर अवलंबून असते. पण लक्षांत असू द्या की तोटाही तेव्हढ्याच प्रमाणांत होऊ शकतो.\nमाझ्या ‘मार्केट आणी मी ‘ या ब्लोग्मधील ३२ ते ३६ हे लेख वाचा.\nकोणत्याही शेअर बद्दल मी टीप देत नाही.\nशेअरमार्केटमढील करिअरला भविष्यांत खूप SCOPE आहे. पण कोणत्याही व्यवसायांत असणारे फायदे तोटे आणी त्याचप्रमाणे धोके यामध्येही आहेत. योग्य आणी त्वरीत निर्णय घेण्याची क्षमता तुमच्या जवळ असली पाहिजे.\nमाझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल\nम्युच्युअल फंड म्हणजे पुष्कळ लोकांनी एकत्र येऊन जमा केलेल्या पैशाची परस्परांना फायदेशीर गुंतवणूक करणे आणी झालेला फायदा सभासदांना वाटणे.हे गुंतवणूकदार ह्या गुंतवणुकीसाठी\nजबाबदारी व्यावसायिक व्यवस्थापनाकडे सोपवतात. ही युनिट्स या भांडवलाच्या छोट्या छोट्या भागांच्या माध्यमातून गुंतवणूकदार विकत घेतात. हे भांडवल शेअर्समध्ये कर्जरोख्यामध्ये गुंतवले जाते. .\nतुमचा प्रश्न : Call put option ची माहिती सविस्तर नाही समजली .\nमी वायादेबाजारांत ट्रेडिंग करीत नाही.\nमी कोणत्याही शेअर्सबद्दल टीप डेट नाही.\nमाझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल\nमी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.\n← आठवड्याचे समालोचन – २३ मे ते २७ मे २०१६ – लगीनघाई भाग 61 – P notes म्हणजे नक्की काय\nमॅडम ब्रोकरची आवशकता असतेच का\nआणि नसेल तर कोणत्या पध्दतीने आणि कसे व्यवहार करावे\nDmat & treding a/c बॅक काढुन देउ शकते का\nनमस्कार अनिल, जेव्हा बँक तुम्हाला हे account काढून देते तेव्हा बँक तुम्ही ब्रोकर असते. शेवटी ब्रोकर लागतोच.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआठवड्याचे-समालोचन - सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा - १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८\nभाग 62 - शेअर मार्केट आणि ब्रेक्झीट\nतुमचे प्रश्न – माझी उत्तरं : July - September 2017\nआठवड्याचे-समालोचन – सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा – १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८\nआठवड्याचे समालोचन – शेअर मार्केट एक ‘अक्षय पात्र’ – ९ एप्रिल २०१८ ते १३ एप्रिल २०१८\nआठवड्याचे समालोचन – साप शिडीचा खेळ – २ एप्रिल २०१८ ते ६ एप्रिल २०१८\nलेखमाला – ‘माझी वाहिनी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-24T04:41:56Z", "digest": "sha1:75GRO33TAZ2AN5OEUWSR3FFEWGJLHMEF", "length": 5242, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मद्रास अणुऊर्जा केंद्र - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहे पान अनाथ आहे.\nमे २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.\nमद्रास अणुऊर्जा केंद्र हा तमिळनाडूतील कान्चिपुरम जिल्ह्यातील कल्पाकम येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे. हा २२० मेगावॉट क्षमतेच्या २ अणुभट्ट्या क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प आहे.\nतारापुर अणुऊर्जा केंद्र‎ · जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प · काकरापार अणुऊर्जा केंद्र ·कैगा अणुऊर्जा केंद्र · कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प · नरोरा अणुऊर्जा केंद्र · राजस्थान अणुऊर्जा केंद्र‎ · मद्रास अणुऊर्जा केंद्र‎\nभाभा अणुसंशोधन केंद्र · प्लाझ्मा संशोधन केंद्र · इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र‎ · राजा रामण्णा अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र\nसिंगरौली · कोरबा · रामागुंड्म\nपवनचक्की · सौर ऊर्जा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २०१३ रोजी १८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra-manoranjan/saiyami-kher-debuts-rakeysh-omprakash-mehras-mirzaya-13359", "date_download": "2018-04-24T05:11:48Z", "digest": "sha1:J5BOREYP65ATWL3LHDS7GXISDKPHMQM3", "length": 18546, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Saiyami Kher debuts in Rakeysh Omprakash Mehra's Mirzaya' मिर्झिया: नाशिकच्या संयमीची बॉलिवूडमध्ये एंट्री | eSakal", "raw_content": "\nमिर्झिया: नाशिकच्या संयमीची बॉलिवूडमध्ये एंट्री\nश्रीकृष्ण कुलकर्णी : सकाळ वृत्तसेवा\nशुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016\nनाशिक- प्रेम... अडीच अक्षरी शब्द, पण याच प्रेमासाठी गरीब-श्रीमंत, जातपात-वर्णभेदाच्याही पलीकडे जाऊन, लादलेले बंधन तोडून एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे, प्रसंगी एकमेकांसाठी जीव देण्यासही तयार असणारे युगूल आपण चित्रपटांतून अनेकदा पाहिले. मग त्यात ‘लैला-मजनू‘, \"हिर-रांझा‘, \"सोहनी-महिवाल‘पासून अगदी अलीकडे आलेल्या ‘देवदास‘, ‘रामलीला‘, \"प्रेम रतन धन पायो‘ यांसारखे चित्रपटही काहीशी याचीच साक्ष देतात. या सर्वांमध्ये आता मिर्झा-साहिबानच्या पंजाबी लोककथेवर आधारित राकेश ओमप्रकाश मेहरांच्या \"मिर्झिया‘ची भर पडली आहे.\nनाशिक- प्रेम... अडीच अक्षरी शब्द, पण याच प्रेमासाठी गरीब-श्रीमंत, जातपात-वर्णभेदाच्याही पलीकडे जाऊन, लादलेले बंधन तोडून एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे, प्रसंगी एकमेकांसाठी जीव देण्यासही तयार असणारे युगूल आपण चित्रपटांतून अनेकदा पाहिले. मग त्यात ‘लैला-मजनू‘, \"हिर-रांझा‘, \"सोहनी-महिवाल‘पासून अगदी अलीकडे आलेल्या ‘देवदास‘, ‘रामलीला‘, \"प्रेम रतन धन पायो‘ यांसारखे चित्रपटही काहीशी याचीच साक्ष देतात. या सर्वांमध्ये आता मिर्झा-साहिबानच्या पंजाबी लोककथेवर आधारित राकेश ओमप्रकाश मेहरांच्या \"मिर्झिया‘ची भर पडली आहे.\n\"भाग मिल्खा भाग‘, \"रंग दे बसंती‘ आणि \"दिल्ली 6‘ यांसारख्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट रसिकांना देणारे राकेश मेहरा \"मिर्झिया‘च्या निमित्ताने पुन्हा एकदा वेगळा विषय घेऊन आले आहेत. पंजाब प्रांतात त्या काळी गाजलेल्या मिर्झा-साहिबान, हिर-रांझा, सोहनी-महिवाल, सासी-पुनाऊन या प्रेमकथा चांगल्याच गाजल्या. त्यांपैकी हिर-रांझा, सोहनी-महिवाल हे प्रेमकथेचे विषय घेऊन चित्रपट निघाले. मेहरा यांनी मिर्झा-साहिबानच्या लोककथांना आपल्या शैलीत साकारण्याचा प्रयत्न करत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. ऍक्‍शन, ड्रामा रोमान्स या त्रिसूत्रीवर आधारित असलेल्या या चित्रपटाद्वारे नाशिकची संयमी आणि हर्षवर्धन हे दोघेही प्रथमच बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहेत. दोघांनीही चित्रपटांसाठी खूप मेहनत केली आहे.\n\"रे‘ या तेलगू चित्रपटाद्वारे संयमीने आपल्या करिअरची सुरवात केली होती. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील अनुभव तिला आहे. पण हिंदीत काम करताना थोडी धाकधूक होती, असे ती प्रामाणिकपणे नमूद करते. पण काहीही असो सुखदुःखाच्या प्रसंगांना तसेच येणाऱ्या प्रत्येक संकटाला हर्षवर्धनला तिने खंबीरपणे साथ देत प्रेमीयुगुलाने शेवटपर्यंत कसे एकसंध राहिले पाहिजे हेच दाखविले आहे. हर्षवर्धन चित्तथरारक स्टंट करण्याबरोबरच मोटारसायकल चालविणे, घोडेस्वारी करताना दिसेल.\nचित्रपटातील सौंदर्य आणि नयनरम्य दृश्‍यही डोळ्यांना सुखावणारे आहे. सर्वाधिक चित्रीकरण लडाख, राजस्थान व बाडमेर येथे झाले असून, पाकिस्तानपासून केवळ सतरा किलोमीटर दूरवरही काही चित्रीकरण केले आहे. लडाखचा नैबारा, पहलगाम, उदयपूर, फतेहगड पॅलेस, शिवनिवास पॅलेससारख्या ठिकाणी शूटिंग करताना दोघांचाही कस लागला. प्रख्यात गीतकार गुलजार यांचे टायटल सॉंगचे शब्द आणि कथा-पटकथाही आहे. वेगळ्या धाटणीचे संगीत शंकर एहसान लॉय या त्रिवेणी जोडीने संगीतबद्ध केले आहे. त्याचे आमिर खाननेसुद्धा कौतुक केले आहे. दलेर मेहंदीने गायलेल्या मिर्झिया टायटल सॉंगला आधीच प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतले आहे. त्यापाठोपाठ \"सौ गवा है‘ गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.\nशंकर-एहसान-लायच्या संगीताने चित्रपटाला चारचॉंद प्राप्त होतील, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. चित्रपटात अंजली पाटील ही हर्षवर्धनची बालपणाची मैत्रीण दाखविली आहे.\nसंयमीच्या रूपाने तिसऱ्या पिढीचे पदार्पण\nमूळची नाशिकची असणाऱ्या संयमीच्या आजी उषाकिरण यांनी वेगळ्या भूमिका आणि गाण्यांमुळे एके काळी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. त्यांची ही नात आणि आई मिस इंडिया उत्तरा खेर-म्हात्रे, वडील प्रख्यात मॉडेल, व्यावसायिक अद्वैत खेर यांची कन्या आहे. संयमीच्या रूपाने खेर घराण्याची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याने त्यामुळेच तिच्या भूमिकडेही रसिकांचे लक्ष आहे. एवढेच नव्हे, तर तन्वी आझमी तिच्या आत्या आहेत. त्यामुळे नाशिकला झालेले शिक्षण आणि घरातच मिळालेले बाळकडू हा आणखी एक प्लस पॉइंट आहे.\nजेव्हा संयमीचा जन्म झाला तेव्हा डाव्या हाताच्या कोपरावर तिला घेतले होते आणि ती एवढ्या लवकर मोठी कशी झाली ते कधी कळलेच नाही. आम्ही दोघे बोलत असतो तेव्हा आमचा नेहमी विषय होतो, मुली किती छोट्या होत्या (संस्कृती आणि संयमी) आणि किती पटकन मोठ्या झाल्या. संयमीचा आज चित्रपट प्रदर्शित होत आहे याचा आनंद शब्दात न व्यक्त करण्यासारखा आहे.\n- अद्वैत खेर आणि उत्तरा म्हात्रे-खेर\nजालन्यात पकडले नऊ सट्टेबाज\nजालना - 'आयपीएल\" स्पर्धेतील सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी रविवारी (ता. 22)...\nउन्हाळ कांद्याला भाव नाही तर चाळीत साठणूक सही\nयेवला : शेतातील उन्हाळ कांद्याची काढणी वेगात सुरू असताना सध्या समाधानकारक दर नसल्याने कांदा उत्पादकांना त्याचा फटका बसत आहे.परिणामी काढलेला...\nआयपीएल सट्टा प्रकरणी चार जण पोलिसांच्या ताब्यात\nजालना - आयपीएल क्रिकेट लिगवर सट्टे बाजार सुरू झाला आहे. याचे लोण जिल्ह्यात देखील आहे. जालना शहरातील बाबुराव काळे चौकातील एका हॉटेलमध्ये बसून आयपीएल...\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nकाश्‍मीरमध्ये पाकला मोकळे रान - दुलत\nपुणे - ‘‘काश्‍मीरमधील तरुण आता पाकिस्तानऐवजी अल्लाहसाठी लढत आहेत. हिंसाचार वाढण्याबरोबरच २०१६ पासून काश्‍मीरमध्ये पाकिस्तानला मोकळे रान मिळाले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/shaheed-milind-kishore-khairnar-special-story-467307", "date_download": "2018-04-24T04:56:13Z", "digest": "sha1:CXZCKSZJUBPP73ENVMRVP27UGK2XUBUJ", "length": 15068, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नाशिक : बांदीपोरात दहशतवाद्यांशी लढताना नंदुरबारचे मिलिंद खैरनार धारातीर्थी", "raw_content": "\nनाशिक : बांदीपोरात दहशतवाद्यांशी लढताना नंदुरबारचे मिलिंद खैरनार धारातीर्थी\nकाश्मीरमधील बांदिपोरामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. मात्र दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दोन जवान शहीद झालेत. त्यात महाराष्ट्रातल्या नंदुरबारमधल्या सुपुत्राचा समावेश आहे. मिलिंद किशोर खैरनार असं या जवानाचं नाव आहे. ते नंदूरबार जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रहिवाशी आहेत. तर एक जवान जखमी झाल्याची माहिती मिळतेय. मिलिंद खैरनार यांचं पार्थिव उद्या 9 वाजेपर्यंत ओझरला पोहोचेल त्यानंतर नंदुरबारकडे त्यांच्या मूळगावी रवाना होईल. बांदिपोरामधील हाजिन भागात पहाटे पावणे पाचपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला. भारतीय जवानांकडून या भागात ऑपरेशन केलंय.\nब्रेकफास्ट न्यूज : नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून कास्टिंग काऊचचं समर्थन\nअहमदनगर : केडगाव शिवसैनिकांची हत्या प्रकरण : काँग्रेस नगरसेवकाला अटक\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\n712 : कोल्हापूर : 70 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज\nयोग माझा : अर्धचंद्रासनाचे शरीराला अनेक फायदे\nमुंबई : महिलेला धक्का लागला म्हणून लोकलखाली ढकललं\nमुंबई : वृक्षतोडीसंदर्भातील पालिका आयुक्तांचे विशेषाधिकार हायकोर्टाकडून रद्द\nठाणे : मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्ती लांबणीवर\nब्रेकफास्ट न्यूज : नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून कास्टिंग काऊचचं समर्थन\nअहमदनगर : केडगाव शिवसैनिकांची हत्या प्रकरण : काँग्रेस नगरसेवकाला अटक\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\n712 : कोल्हापूर : 70 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज\nयोग माझा : अर्धचंद्रासनाचे शरीराला अनेक फायदे\nनाशिक : बांदीपोरात दहशतवाद्यांशी लढताना नंदुरबारचे मिलिंद खैरनार धारातीर्थी\nनाशिक : बांदीपोरात दहशतवाद्यांशी लढताना नंदुरबारचे मिलिंद खैरनार धारातीर्थी\nकाश्मीरमधील बांदिपोरामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. मात्र दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दोन जवान शहीद झालेत. त्यात महाराष्ट्रातल्या नंदुरबारमधल्या सुपुत्राचा समावेश आहे. मिलिंद किशोर खैरनार असं या जवानाचं नाव आहे. ते नंदूरबार जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रहिवाशी आहेत. तर एक जवान जखमी झाल्याची माहिती मिळतेय. मिलिंद खैरनार यांचं पार्थिव उद्या 9 वाजेपर्यंत ओझरला पोहोचेल त्यानंतर नंदुरबारकडे त्यांच्या मूळगावी रवाना होईल. बांदिपोरामधील हाजिन भागात पहाटे पावणे पाचपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला. भारतीय जवानांकडून या भागात ऑपरेशन केलंय.\nब्रेकफास्ट न्यूज : नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून कास्टिंग काऊचचं समर्थन\nअहमदनगर : केडगाव शिवसैनिकांची हत्या प्रकरण : काँग्रेस नगरसेवकाला अटक\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\nKXIPvDD: आखिरी नहीं, इस ओवर में पलट गई दिल्ली की जीती हुई बाज़ी\nWATCH: अंतिम छह गेंदो पर जीतते-जीतते कैसे हार गई दिल्ली की टीम\nKXIPvDD: मुजीब की आखिरी गेंद पर खत्म हुआ श्रेयस का संघर्ष, दिल्ली को मिली 4 रनों से हार\nDD vs KXIP: घर में भी नहीं रुका दिल्ली के हार का क्रम, जीत के साथ पंजाब टॉप पर\nDD vs KXIP: दिल्ली की शानदार गेंदबाजी, 143 पर रुका किंग्स का कारवां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/twinkal-116111400020_1.html", "date_download": "2018-04-24T05:07:49Z", "digest": "sha1:QUI2YDF2D6NFOUY6JFWOXD7T5PI7IMU5", "length": 10399, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "माझी आई अक्षय कुमारला गे समजतं होती म्हणून लग्नासाठी ठेवली होती एक अट | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमाझी आई अक्षय कुमारला गे समजतं होती म्हणून लग्नासाठी ठेवली होती एक अट\nट्विंकल देखील काही ना काही बोलून जाते. मग तिचा नवरा अक्षय कुमारशी निगडित काही का नसो. त्याच्या अफेयर्सबद्दल ट्विंकलने काहीच बोलले नाही. ट्विंकलने एक मजेदार प्रसंग सांगितला की तिच्या लग्नाअगोदर आई डिंपलचे अक्षयबद्दल काय विचार\nकरण जौहरच्या टॉक-शो 'कॉफी विद करण'मध्ये अक्षय कुमार-ट्विंकल खन्नाने बरेच खुलासे केले आहे. पूर्ण शोमध्ये ट्विंकल बोलत होती आणि अक्षय चुपचाप तिच्या गोष्टी ऐकत होता.\nलग्नाच्या संबंधाबद्दल विचारल्याने ट्विंकलने सांगितले की जेव्हा मी आईजवळ अक्षयसोबत लग्नाची गोष्ट केली तेव्हा ती म्हणाली तू आधी एक वर्ष त्याच्यासोबत राहून बघ. फिरा आणि एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करा, नंतर विचार करू.\nनंतर मला समजले की माझ्या आईला वाटत होते की अक्षय कुमार गे आहे. त्याला महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त रुची आहे. अशात तिची बिलकुल इच्छा नव्हती की माझे लग्न त्याच्यासोबत व्हावे.\nलग्नाबाबत ट्विंकल म्हणाली की लग्नाबद्दल माझ्याकडून होकार आल्यावर जेव्हा क्षय माझ्या आईशी लग्नाची बोलणी करायला गेला तेव्हा तिला फारच आश्चर्य वाटले.\nपुढे ट्विंकल, म्हणाली तिच्या आईला एका पत्रकार मित्राने सांगितले होते की अक्षय गे आहे. म्हणून ती फारच घाबरलेली होती.\nत्याशिवाय ट्विंकलने काही अजून खुलासे केले होते. तिने म्हटले होते की राणी मुखर्जीचे करियर देखील मीच बनवले होते. जर मी चित्रपट कुछ कुछ होता है...ला साइन केले असते तर राणीचे करियर बनले नसते. त्यानंतर तिने जोराने एक ठहाका लावला.\nअक्षय म्हणाला की सलमान, शाहरुख आणि सलमानने जर सिगारेट ओढणे सोडले तर ते माझ्याहून पुढे जातील आणि जर ओढत राहिले तर मी पुढे राहीन.\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी अॅप तयार करूया: अक्षय कुमार\nअक्षय कुमार शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेणार\nबॉलीवूड हिरो ने केली देश सेवेत आपले जीवन देणाऱ्या खऱ्या हिरोंना मदत\nगणपती बाप्पाला अर्पण करा ‘वह्या’\nया कलाकारांनी करवले आहे हेअर ट्रान्सप्लांट\nयावर अधिक वाचा :\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://vedashri.blogspot.com/2009/08/", "date_download": "2018-04-24T04:40:18Z", "digest": "sha1:IEC7GFOHTOGMBMRZQ5DDYA2ZI6ZGE3DT", "length": 12519, "nlines": 85, "source_domain": "vedashri.blogspot.com", "title": "वेदश्री: August 2009", "raw_content": "\nबुधवार, १२ ऑगस्ट, २००९\n\"अहो मॅडम, ते नेतायत ती गाडी तुमची आहे का\" माझ्यामागून हे विचारणार्‍याचा हात कुठल्याबाजूने निर्देश करतोय तिकडे बघत मी पाहिले तर माझीच अ‍ॅक्टीव्हा होती. मी धावतच त्या अवैध ठिकाणी पार्कींग केल्याबद्दल गाड्या उचलून नेणार्‍या गाडीकडे धावत गेले.\n\"है मिस्टर, हाऊ यू डेअर्ड टू टच माय अ‍ॅक्टीव्हा\n\"काय रे, हे कालेजातलं पाखरू काय फिसफिस करून र्‍हायलंय इंग्लिसमदी\n\"थोबाड संभाळून बोल बे. जास्त फडफड करू नको. गपगुमान माझी गाडी खाली उतरव नाहीतर...\" एव्हाना माझा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. योग्य ठिकाणी गाडी लावूनही ही दमदाटी ऐकून घ्यायला मी काही पोचट नाही.\n\"नाहीतर काही खास नाही. माझी अ‍ॅक्टीव्हा तुम्ही चोरलीत अशी पोलिसात तक्रार करेन फक्त. बस्स \" असे म्हणून मी परत गुरूनानक मध्ये जायला लागले.\n\"गाडी चुकीची लावत्या त्ये लावत्या आन् वर ही शिरजोरी व्हय\nमी चवताळून वळले. \"इथे कोणालाही विचारून घ्या माझी अ‍ॅक्टीव्हा बरोबर लावलेली होती की नाही ते. एकजरी साक्षीदार मिळाला तर तुम्ही म्हणाल तितके पैसे देते शिक्षा म्हणून.\"\nत्याने खरेच एका माणसाला बोलावले.\n\"काय वो सायेब ही अ‍ॅक्टीव्हा हितं या पेवमेंटच्या हर्द्या गट्टूवर व्हती की नाय\n\"गाडी बरोबर लावलेली होती. हो पण आता गाड्या इतक्या खचाखच भरलेल्या आहेत तर आता तुमचा तो अर्धा गट्टूबिट्टू ते काय माहिती नाही. अर्ध्या गट्टूवर असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण मी तितके नीट पाहिले नाही त्यामुळे.. \"\n\"बस्स. बस्स. जालं तुमचं काम. जावा तुमी.\" असे त्या माणसाला म्हणत,\"आता बोला म्याडम. काय म्हनत व्हता तुमी म्होरं बसलेल्या सायेबाकडून घ्यावा जा पावती..\"\nआता मात्र माझं डोकं जामच सटकलं होतं. याचा साहेब कोण तीसमारखां आहे आणि आणिक काय तारे तोडतो ते पहावे म्हणून गेले.\n\"सायेब, हे कालेजातलं पाखरू भिरभिरून र्‍हायलं व्हतं नो पार्कींगमध्ये गाडी लावून. मांडवली करायचं म्हनतंय..\"\nत्या साहेबाची मुक्ताफळे ऐकून मग काय बोलायचे ते ठरवायचे असे ठरवले तरीही गप्प बसायला खूप कष्ट पडले मला.\n\"किती पैसे आहेत तुझ्याकडे आत्ता\n\"नो पार्कींगमध्ये गाडी लावायचे ७५० रुपये घेतो आम्ही... लायसन्स दाखवा.\"\n\"ते माहिती नाही. आत्ता आहे का तुझ्याकडे नाही. मग त्याचे आणखीन १५० रुपये. गाडीची कागदपत्रं नाही. मग त्याचे आणखीन १५० रुपये. गाडीची कागदपत्रं तीपण नसणारच.. त्याचे आणखीन १५० रुपये.\"\nएव्हाना डोकं तडकलं होतं माझं. माझी अख्खी पर्सच गाडीच्या डिक्कीत होती ज्यात हे सगळे सामान होते. मी फक्त पैशाचे वॉलेट घेऊन साबुदाण्याची खिचडी घ्यायला गुरूनानकमध्ये गेले होते\n\"हे सर्व असंच्या असं लिहून पावत्या फाडा. मी देते १०५० रुपये. अजून काही सुचत असेल तर तेही जोडून घ्या. नाही.. काय आहे.. काही राहून जायला नको ना..\"\n\"इतकी पावती देत नसतो आम्ही. फक्त ५०ची पावती देऊ. आडनाव सांग तुझं..\"\n\"आडनावातही प्रश्न आहे का जोडून घ्या त्याचेही १००-२०० रुपये.\"\n\"नाही. तुझ्याकडे बघून वाटत नाही शेख असशील असं..\"\n\"तूर्तास शेखच आहे.. परवातेरवा धर्मांतर करून ज्यू धर्म स्विकारणार आहे मग बदलेन हवेतर. तसा मला कश्मिरी पंडीतांचा धर्मही पटलाय.. झालंच तर.. \"\n\"बस्स बस्स.. अकलेचे तारे तोडणे बस्स झाले. आडनाव सांग काय ते.\"\n\"शेख.\" एकेका अक्षरावर जोर देत मी म्हणाले.\n\"शेवटचं सांगतोय.. सेन्सिबल बोल..\"\n\"तुम्ही जितकं सेन्सिबल बोलताय तितकंच मीही बोलतेय. पेव्हमेंटच्या अर्ध्या गट्टूवर गाडीचा काही भाग आला म्हणून ७५० रुपये आणि तुम्ही जप्त केलेल्या गाडीच्या डिक्कीत असलेली कागदपत्रं मी तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणून ३०० रुपये तुमच्या या गाडीचा नंबर मी लक्षात ठेवणार आहेच शिवाय तुमचा चेहराही.. हे पाखरू कालेजात फिरायला नाही तर कोर्टात समर्थपणे उडायला जन्मलंय हे तर तुम्ही बघायलाच पाहिजेय साहेब. पावती फाडा... नाव.. मिस. वेदश्री शेख. \"\nमाझी नजर खुनशी झाली होती एव्हाना..\n\"हे बघा मॅडम, कोर्टाबिर्टाची भाषा काढायची काय जरूर आहे\" अचानक अगंतुगंवरून अहोजाहोवर\" अचानक अगंतुगंवरून अहोजाहोवर.. ह्म्म.. थांब बेट्या..\n\"पावती फाडताय ना ५०ची उशीर होतोय तुम्हाला साहेब. ही एक गाडी जी अख्खी पेव्हमेंटवर आहे ती उचलायची बाकी आहे की अजून. एकाच पावतीत इतका वेळ गेला तर... \"\n\"हे बघा मॅडम.. जास्त ताणू नका. पोरांकडून चूक होते कधीकधी. गाडी काहीशी का होईना नो पार्कींगमध्ये होतीच की नाही मग चला.. तुमचं नाही माझं नाही.. १५० देऊन टाका. \"\n\"दिडशेची पक्की पावती देणार का\n\"हो. देतो. पब्लिकसमोर पंचनामा करू नका प्लिज.\"\n\"मॅडम, आतातरी खरे आडनाव सांगा.\"\nदोन पावत्या फाडून माझ्या हवाली केल्या गेल्या.\n\"मॅडमची अ‍ॅक्टीव्हा उतरव रे खाली.\" असे साहेब ओरडले.\nअ‍ॅ़क्टीव्हा नीट जागी लावायला मी घेऊन जात होते तर त्या साहेबाचे शब्द ऐकू आले.\n\"काय रे बेअकलीच्या.. पाखरू पाखरू काय करत होतास ही कुठल्यातरी राजकारण्याची नातेवाईक असणार नक्कीच. कोणाच्याही गाड्या उचलत जाऊ नको.. कळलं काय रे कावळ्या ही कुठल्यातरी राजकारण्याची नातेवाईक असणार नक्कीच. कोणाच्याही गाड्या उचलत जाऊ नको.. कळलं काय रे कावळ्या\nत्या बेअकलीच्या साहेबाचा झालेला गैरसमज दूर करायच्या भानगडीत मी पडले नाही. हकनाक दिडशे रुपयांचा भुर्दंड पडला असला तरी मला पाखरू म्हणणार्‍याचा कावळा झाल्याबद्दल मात्र अतोनात आनंद झाला होता. अर्ध्या गट्टूची किंमत पुरती कळली मला आता.. १५० रुपये\nलेखिका : वेदश्री ८ टिप्पण्या:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nकृपया आम्हाला जगू द्या...\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://zpchandrapur.maharashtra.gov.in/mr/act_rules", "date_download": "2018-04-24T04:33:55Z", "digest": "sha1:6EYOUKVCCFARNBXY6EUEVRREK5ZDNE6G", "length": 7248, "nlines": 66, "source_domain": "zpchandrapur.maharashtra.gov.in", "title": "जिल्हा परिषद, चंद्रपूर", "raw_content": "जि.प. चे अधिकृत संकेतस्थळ\nमहिला व बाल कल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nपाणी व स्वच्छता विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपर्याय निवडा कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग पर्यावरण विभाग वित्त विभाग अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग सामान्य प्रशासन विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग गृह विभाग गृहनिर्माण विभाग उद्योग, उर्जा व कामगार विभाग माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग विधी व न्याय विभाग मराठी भाषा विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अल्पसंख्याक विकास विभाग संसदीय कार्य विभाग नियोजन विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग महसूल व वन विभाग ग्राम विकास विभाग शालेय शिक्षण व क्रीडा विभाग कौशल्य विकास व उदयोजकता विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आदिवासी विकास विभाग नगर विकास विभाग जलसंधारण विभाग जलसंपदा विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महिला व बाल विकास विभाग\nकायदे / नियम नाव\n1 विधी व न्याय विभाग प्रसूतिविषयक लाभ अधिनियम, 1961 23-06-1994 Download\n2 सामान्य प्रशासन विभाग विभागीय चौकशी नियमपुस्तिका, चौथी आवृत्ती, 1991 10-07-1991 Download\n3 वित्त विभाग महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, 1984 19-07-1984 Download\n4 विधी व न्याय विभाग माहितीचा अधिकार अधिनियम-2005 20-12-2005 Download\n5 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, 1964 29-08-1964 Download\n6 सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 20-05-1998 Download\n7 सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 04-12-2008 Download\n8 सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 04-12-2008 Download\n9 वित्त विभाग महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेनून काढुन टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, 1981 08-11-1984 Download\n10 वित्त विभाग महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन ) नियम, 2009-वेतननिश्चिती संबंधी सूचना 29-04-2009 Download\n11 वित्त विभाग महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 26-09-1985 Download\n12 वित्त विभाग महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, 1981 09-08-1984 Download\n13 वित्त विभाग महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 27-06-1985 Download\n14 वित्त विभाग महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, 1981 28-03-1985 Download\n15 विधी व न्याय विभाग महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (मराठी) 01-11-2006 Download\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/marathi-joke-117041900027_1.html", "date_download": "2018-04-24T05:01:04Z", "digest": "sha1:2OTUAAXUC4VAIEQIHPF35ITC4CRCFFUP", "length": 6113, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डॉक्टर आणि वकील | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआमच्या देशात प्रत्येक माणसात एक डॉक्टर आणि एक वकील लपलेला असतो...\nमात्र आपल्याला समस्या मांडण्याची गरज असते...\nगोलूला आवडली विवाहित स्त्री\nउन्हाळ्यात थंडावा जाणवतो जेव्हा...\nयावर अधिक वाचा :\nव्हॉट्स अॅप मराठी विनोद\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.punezp.org/aarthvibhag.html", "date_download": "2018-04-24T04:34:43Z", "digest": "sha1:UU6SMLZNHXSBGCSLQ4KXUPHSP3VAQFM7", "length": 35502, "nlines": 140, "source_domain": "www.punezp.org", "title": "Zilla Parishad Pune", "raw_content": "\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा परिषदेचे सर्व आर्थिक व्यवहारा संदर्भात कार्यवाही वित्त विभागाकडून करण्यात येत असते. जिल्हा परिषदेतील वित्त विभागाचे प्रमुख हे मुख्य लेखा व वित्त अधिकारी असून ते महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. लेखा आणि अर्थसंकल्पीय अंदाज या बाबी तसेच आर्थिक नियमांच्या अंमलबजावणी सबंधी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचा वित्तीय सल्लागार व प्राथमिक लेखा परिक्षक म्हणून ते काम करतात. त्यांना सहाय्यक म्हणून वरिष्ठ लेखा अधिकारी (वर्ग1) व तीन लेखा अधिकारी (वर्ग2) असतात. त्याच्या सल्ल्याशिवाय कोणताही प्राधिकारी आर्थिक व्यवहारास मंजुरी देत नाही.\nवित्त विभागातर्गत होणार्या विविध शाखांमार्फत खालील प्रमाणे कामकाज केले जाते.\nआस्थापना शाखा आस्थापना शाखेमार्फत वित्त विभागातील राजपत्रीत अधिकारी व लेखा संवर्गातील कर्मचारी यांचे आस्थापना विषयक कामकाज केले जाते. लेखा संवर्गातील कर्मचार्यांचे आस्थापना व इतर कामकाज (उदा.नेमणूका, पदोन्नत्या, बदल्या, आगावू वेतनवाढी, जेष्ठता यादया, सेवानिवृत्ती, गोपनिय अभिलेख, 54 वर्षे पुनर्विलोकन केले जाते.इ.) लेखा संवर्गातील कर्मचायांचे सर्व परिक्षाविषयक कामकाज, सेवानिवृत्तीवेतन, भ.नि.नि., गट विमा, अधिकारी/कर्मचारी यांचे वैद्यकिय प्रतीपुर्ती प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी सादर करणे. अतिरिक्त पदभार प्रकरणे मंजूरी, मा.आयुक्त तपासणी बाबतची कार्यवाही इ.बाबतचे कामकाज.\nरोख शाखा रोख शाखेत वेतन, बांधकाम/रस्ते व इतर देयके मंजुर झाल्यावर त्यांचे कामकाजाबाबतचे धनादेश तयार करून वितरीत केले जातात. कोषागारातून प्राप्त धनादेश व इतर जमांची नोंद रोखवहीमध्ये घेतली जाते. तसेच प्रत्येक दिवसांचे/मासिक जमा व खर्चाच्या नोदीचां बँकेशी ताळमेळ घेतला जातो.\nभांडार शाखा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता 1968 मधील नियम 202 प्रमाणे जिल्हा परिषदेचा मालसंग्रह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ठिकाणी ठेवता येईल. जिल्हा परिषदे कडील सर्व विभाग व पंचायत समिती यांना आवश्यक असणारे स्टेशनरी, फॉर्म व नोंदवहयांची खरेदी भांडार शाखे मार्फत करून वितरीत केली जाते.\nमध्यवर्ती लेखा परिक्षण शाखा मध्यवर्ती लेखा शाखेमध्ये जिल्हा परिषदेतील खाते प्रमुखांकडून प्राप्त होणार्या प्रस्तावांवर प्रशासकिय मान्यता/खर्चास मान्यतेबाबतचे अभिप्राय देण्यात येतात.तसेच प्राप्त होणार्या सर्व प्रकारच्या देयकांची तपासणी करुन आदाई बाबतचे शेरे नोंदविण्यात येऊन झालेल्या जमा व खर्चाच्या नोंदी करुन मुख्यालयाचा मासिक लेखा तयार केला जातो. तसेच केंद्ग शासनाकडील 13 व्या वित्त आयोगाकडून प्राप्त निधीचे नियोजन करून त्याच्या वितरणाची संपुर्ण कार्यवाही या विभागाकडून केली जाते.\nअंदाजपत्रक व ताळमेळ शाखा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नियम 137 व 138 मधील तरतूदी नुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्वनिधीचे मुळ अंदाजपत्रक, तसेच सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात येते. सदरच्या अंदाजपत्रकाची छाननी वित्त समितीमध्ये करण्यात येते. समितीने शिफारस केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेकडे सदरचे अंदाजपत्रक मंजूरीसाठी सादर करण्यात येते. सर्वसाधारण सभेत मा.जिल्हा परिषद सदस्यांनी सुचविलेल्या दुरुस्त्या व सुचनांचा समावेश करुन सुधारित अंदाजपञक व मुळ अंदाजपञक मंजूर केले जाते. जिल्हा परिषदेचे अंदाजपञक मंजूरी नंतर संबधित विभागाकडे मंजुर निधीचे वितरण करण्यात येते.\nसंकलन शाखा जिल्हातील सर्व पंचायत समिती व मुख्यालयातील जमा व खर्चाचे लेखे एकञित करुन जिल्हा परिषदेचा मासिक लेखा तयार केला जातो. मासिक लेखे दरमहाच्या\nवित्त समितीच्या मंजूरी नंतर स्थायी समिती समोर अंतिम मान्यतेसाठी ठेवले जातात.सबंधीत विभागाकडून मासिक लेख्याशी ताळमेळ घेतला जातो. मासिक लेख्यांवरुन जिल्हा परिषदेचा वार्षीक लेखे तयार केला जातो. सदर वार्षिक लेख्याची छाननी वित्त समितीच्या सभेमध्ये केल्यानंतर सप्टेंबर पूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या मंजूरीसाठी सादर केले जातात.जिल्हा परिषद सभेच्या मंजूरी नंतर सदरचे लेखे 15 नोंव्हेबर पुर्वी शासन राजपत्रात प्रसिध्द केले जातात.\nभविष्य निर्वाह निधी शाखा जिल्हा परिषदेकडील शिक्षकेत्तर वर्ग 3 व वर्ग 4 च्या सर्व कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे वित्त विभागामार्फत ठेवले जातात. सदर लेखे आदयावत ठेवण्यासाठी संगणकीकृत प्रणालीचा वापर केला जातो. भविष्य निर्वाह निधीचे परतावा/नापरतावा तसेच अंतिम अदाईचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर कोषागारातून धनादेश प्राप्त करण्याची कार्यवाही त्वरीत केली जाते. तसेच जिल्हा परिषद सेवेत असताना मृत्यु झालेल्या कर्मचार्यांचे वारसास ठेवसंलग्न योजनेचा लाभ सत्वर अदा केला जातो. गटविमा रक्कमेचे प्रदान सबंधीत कर्मचार्यांना करण्यात येते.\nबाह्य लेखा परिक्षण शाखा महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांचे कडील संदर्भ क्र. एपीटी/ 1092/सीआर/76613 दि.7/10/1997 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील लेख्याच्या तपासणी साठी जिल्हा स्तरावर अंतर्गत लेखा परिक्षण पथके निर्माण करणेत आली आहेत. सदर पथकामार्फत पुर्ण झालेल्या आर्थिक वर्षाचे खाते प्रमुख व पंचायत समितीचे अंतर्गत लेखा परिक्षण करण्यात येते. स्थानिक निधी लेखा, पंचायत राज समिती व महालेखापाल कार्यालयाकडील लेखा आक्षेपांची पुर्तता करणसाठी समन्वय व मार्गदर्शन केले जाते. जिल्हा परिषद कर्मचार्यांचे वेतन आयोगानुसार होणार्या सुधारित वेतन निश्चिती पडताळणी या विभागामार्फत केली जाते.\nनिवृत्त वेतन शाखा महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) 1982 च्या नियमाचे अधिन राहून जिल्हा परिषद कर्मचार्यांचे वर्ग 3 च्या बाबतीत वयास 58 वर्ष व वर्ग 4 च्या बाबतीत 60 वर्ष पुर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त होणार्या तसेच इतर प्रकारे सेवानिवृत्त होणार्या कर्मचार्यांच्या प्रकरणांची छाननी करुन सेवानिवृत्ती वेतन मंजूर केले जाते. पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षक निवृत्तीवेतन धारक 11500 व शिक्षकेत्तर निवृत्तीवेतनधारक 2604 इतके आहेत. सदर निवृत्तीवेतनधारकांना विहीत मुदतीत दरमहा निवृत्तीवेतन अदा करण्याची दक्षता वित्त विभागाकडून घेतली जाते.\nभविष्य निर्वाह निधी शाखा जिल्हा परिषदेकडील शिक्षकेत्तर वर्ग 3 व वर्ग 4 च्या सर्व कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे वित्त विभागामार्फत ठेवले जातात. सदर लेखे आदयावत ठेवण्यासाठी संगणकीकृत प्रणालीचा वापर केला जातो. भविष्य निर्वाह निधीचे परतावा / नापरतावा तसेच अंतिम अदाईचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर कोषागारातून धनादेश प्राप्त करण्याची कार्यवाही त्वरीत केली जाते. तसेच जिल्हा परिषद सेवेत असताना मृत्यु झालेल्या कर्मचार्यांचे वारसास ठेवसंलग्न योजनेचा लाभ सत्वर अदा केला जातो.\nवित्त विभागामध्ये खालील निधी निहाय लेखे ठेवले जातात.\n1) जिल्हा परिषद योजना (जिल्हा निधी)\n2) अभिकरण योजना (अभिकरण निधी)\n3) हस्तांतरीत योजना (शासकीय निधी)\n4) दुरूस्ती देखभाल निधी\n* मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्ये\n१) म.जि.प.व पं.स. अधिनियम, १९६१ व म.जि.प. पं.स. लेखा संहिता, १९६८मध्ये विहीत केल्या प्रमाणे तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अधिकार व कर्तव्ये\n२)वित्तीय सल्लागार व प्राथमिक लेखा परिक्षक म्हणून काम पहाणे.\n३)वित्तीय व्यवस्थापन व गुंतवणूका यावर नियंत्रण ठेवणे.\n४)अर्थसंकल्प जि.प.चे स्वतःचे उत्पन्न, शासकीय विविध योजना लेखा संवर्गाची जिल्हा स्थापना अर्थ विभागाची कार्यालयीन आस्थापना . म.वि.व लेखा संवर्गाच्या अधिका-यांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे.\n५)पंचायत राज संस्था व महालेखाकार यांच्या अहवालात समाविष्ट लेखा आक्षेप व महत्वाचे लेखा आक्षेप याबाबत समन्वय ठेवणे.\n६)रु.५०,०००/- वरील देयके पारीत करणे व धनादेश अदा करणे.\n७)वित्त विभागास प्राप्त होणा-या सर्व नस्त्यांचे पूर्वलेखापरिक्षण करणे व अभिप्राय देणे.\n८)अनुदान निर्धारण ,जमा खर्चाचा ताळमेळ ,अर्थोपाय अग्रीम ,जि.प. खरेदी व्यवहार यावर नियंत्रण ठेवणे.\n* वरिष्ठ लेखाधिकारी यांचे अधिकार व कर्तव्ये\n१)वित्त विभागाचे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून काम करणे.\n२)निवृत्तीवेतन, भनिनि व गटविमा योजना या संबंधित प्रकरणांना मंजूरी देणे पूर्ण अधिकार.\n३)वित्त विभागाची कार्यालयीन आस्थापना सांभाळणे.\n४)रु.५०,०००/-पर्यंतची देयके पारीत करणे व धनादेश अदा करणे.\n५)लेखापरिक्षणाचे बाबतीत समन्वय ठेवून काम करणे.\n* लेखाधिकारी (१ ) यांचे अधिकार व कर्तव्ये -\n१)जिल्हा परिषदेचे स्वतःचे व शासनाच्या विविध योजनांचा अर्थ संकल्प तयार करुन वरिष्ठांना सादर करणे.\n२)पंचायतसमित्यांच्या अर्थसंकल्पाबाबत तपासणी व पंचायत समित्यांचा उपकर अर्थ संकल्पाचे संकलन करणे व एकत्रित अर्थ संकल्प तयार करुन सादर करणे.\n३)कार्यक्रम अंदाजपत्रक- सर्व कामे\n४)अर्थोपाय अग्रीमे, रोख अनुदान व सहाय्यक अनुदाने यांची देयके तयार करुन घेऊन सादर करणे.\n५)आहरण केलेल्या रक्कमांचा महालेखापाल कार्यालयाच्या लेख्यांशी ताळमेळ घालणे व ताळमेळाचा अहवाल सादर करणे.\n६)अर्थपाय अग्रीम रक्कमांचे समायोजन व ताळमेळ करण्याचे काम पहाणे.\n७)अर्थसंकल्पीय मंजूर तरतूदींचे पंचायत समित्यांना वाटप प्रस्तावित करणे.\n८)केंद्गीय वित्त आयोग व महाराष्ट्र वित्त आयोग यांच्याशी संबंधीत माहिती संकलित करुन सादर करणे.\n९)अर्थसंकल्पाशी संबंधित व उपरोक्त विषयाबाबत सर्व नोंदवहया अदययावत ठेवणे,नियतकालीक अहवाल सादर करणे व सर्व प्रकारचा पत्रव्यवहार करणे.\n१)सर्व विभागांच्या लेखा शिर्षांचे जमा व खर्चाचे लेखे ठेवणे.\n२)पंचायत समित्यांचे लेखे स्विकारणे, तपासणे व संकलन करणे.\n३)मासिक खर्चाचे विवरणपत्र तयार करुन विहीत दिनांकास सादर करणे.\n४)वार्षिक लेखे तयार करणे व सादर करणे.\n५)अर्थसंकल्पीय तरतूदीपेक्षा कमी अथवा अधिक झालेल्या खर्चाचे विवरणपत्र तयार करुन सक्षम प्राधिकार्‍यास मंजूरीस्तव सादर करणे.\n६)अनुदान निर्धरणः मंजूर आर्थिक तरतूद खर्च प्रमाणित करुन देणे.\n७)उपयोगिता प्रमाणपत्रः मंजूर आर्थक तरतूद व खर्च प्रमाणित करुन देणे.\n८)जिल्हा परिषदेस शासनाकडून येणे व शासनाला देणे असलेल्या रकमांची माहिती काढून सादर करणे.\n९)खाते प्रमुखांकडील नोंदवहयांची पंचायत समित्यांच्या खर्चासह लेखाशिर्षनिहाय खर्चाचा दरमहा मेळ घालणे.\n* लेखाधिकारी (२) यांचे अधिकार व कर्तव्ये -\n१)शालेय पोषण आहार : शालेय पोषण आहार योजनेसंदर्भात सोपविलेली सर्व कामे.\n२) वेतन निश्चिती पडताळणी : वेतन निश्चिती पडताळणी पथकाचे नियंत्रण व या संदर्भातील सर्व कामे.\n३)जागरुकता पथक :- सदर पथकाचे नियंत्रक म्हणून काम करणे. पंचायत समित्यांची तपासणी व भांडार पडताळणी :- अंतर्गत लेखा परिक्षण मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी आदेशीत केल्याप्रमाणे विशेष निवड केलेल्या विभाग / पंचायत समितीचे अंतर्गत लेखा परिक्षण तथा भांडार पडताळणी करणे.\nटीपः- सर्व नियमीत अंतर्गत लेखा परिक्षण व भांडार पडताळणी सदयस्थितीत शक्य नसल्याने प्राधान्य ठरवून अत्यावश्यक कार्यक्रम आखावा.\n४)लेखा परिक्षण अहवाल :- पंचायत राज संस्थांच्या लेख्यांवरील लेखापरिक्षा पुनर्विलोकन अहवाल ,स्थानिक निधी लेखा विभागाचे लेखापरिक्षण अहवाल भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक यांचे अहवाल,महालेखापालाचे निरिक्षण अहवाल व आयुक्त यांचे अहवालातील लेखा आक्षेपाबाबत पाठपुरावा व मदत करुन अनुपालन अहवाल तयार करुन मद्दे वगळून घेणे.\n५)लेखा परिक्षणात/तपासणीत आढळून आलेल्या उणिवा व अनियमिततेबाबत उपाय योजना सुचविणे.\n६)लेखा परिक्षणाबाबत नियतकालिक अहवाल पाठविणे व संपूर्ण पत्रव्यवहार.\n७)सर्व विभाग प्रमुखांच्या नोंदवहया तपासून अर्थ समितीस सादर करणे.\n८)मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सोपविलेली इतर कामे व आदेशंचे पालन करणे.\n* लेखाधिकारी (४) यांचे अधिकार व कर्तव्ये -\n१)पुर्व लेखापरिक्षाः अ) सामान्य प्रशासन विभाग ब) पंचायत विभाग क) बांधकाम विभाग ड) समाज कल्याण विभाग ई) महिला व बालकल्याण विभाग फ) शिक्षण विभाग या विभागातील प्रकरणांची पुर्व लेखापरिक्षण करणे.रु५०,०००/- पर्यंतच्या नस्त्या वरिष्ठ लेखाधिकारी व रु.५०,०००/- च्या वरील नस्त्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे. वरिल विभागांच्या देयकांची पूर्व लेखा परिक्षा करुन .रु५०,०००/- पर्यंतची देयके वरिष्ठ लेखाधिकारी व रु.५०,०००/- च्या वरील देयके मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.\n२)सर्वसाधारणे भविष्य निर्वाह निधी :\nजिल्हा परिषदेकडे सध्या असलेल्या नवीन वर्ग होणार्‍या व वर्ग झालेल्या सर्व अधिकारी/ कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे सर्व काम पहाणे व लेखे ठेवणे. मंजूरी व अदाईची प्रकरणे वरिष्ठ लेखा अधिकारी यांना सादर करणे.\n२)कर्मचारी गटविमा योजना :\nराज्य शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी / अधिकारी यांची गटविमा योजना विषयक सर्व कामे पहाणे व लेखे ठेवणे. गटविमा योजनेचे संदर्भातील मंजूरी व अदाईची सर्व प्रकरणे वरिष्ठ लेखाधिकारी यांना सादर करणे.\n४)अर्थ विभागाचे अहवाल :\nअर्थ विभागाचे स्थनिक निधी लेखापरिक्षण अहवाल , महालेखापाल यांचे निरिक्षण अहवाल आणि आयुक्त यांचे तपासणी अहवाल यातील लेखा आक्षेपांचे संबंधित शाखेकडून अनुपालन तयार करुन घेणे व संबंधितास अनुपालन दर्शवून लेखा आक्षेप वगळून घेणे. अर्थ विभागाच्या लेखा परिक्षा पुनर्विलोकन अहवाल व भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांच्या अहवालातील प्रलंबित परिच्छेदावर तात्काळ व प्राधान्याने कार्यवाही करणे.\n५) सोपविण्यात आलेल्या विभागाच्या योजना,अर्थसंकल्प व अडचणी इत्यादीबाबत समन्वयक म्हणून काम करणे व याबाबतची माहिती वरिष्ठ लेखाधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना वेळोवेळी सादर करणे.\n६ं)संबंधित विषय समित्यांच्या सभेला उपस्थित राहून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सभेचा वृतांत अवगत करुन देणे.\nसभां बाबतचा थोडक्यात तपशील\nवित्त समितीच्या अखत्यारितील विषयांना मंजूरी देणे व कामकाज करणे.\nवित्त समितीच्या कामासंबधी तपशीलः- मासिक लेखे व वार्षिक लेख्यास मंजूरी देऊन स्थायी व जिल्हा परिषद सभेपुढे मंजुरीसाठी सादर करणे\nविषय समितीच्या मासिक सभेमध्ये दरमहा येणारे विषय :-\nमासिक लेख्यांस मान्यता देणे\nदर तीन महिन्यांनी लेखाविषयक नोंदवहयांचा आढावा घेणे\nजिल्हा परिषद सदस्यांच्या तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या प्रवास भत्ते अदाईस मंजुरी देणे\nपुरवणी व सुधारित अंदाजपत्रक विषय समितीपुढे अवलोकनार्थ ठेऊन मा.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेकडे शिफारस करणे.\nअर्थ विभागाकडील वार्षिक प्रशासन अहवाल व कार्यक्रम अंदाजपत्रक यांस मंजूरी देणे.\nजिल्हा परिषदेचे वार्षिक लेख्यांबाबत कमी जास्त जमा खर्चाच्या कारणांचे तसेच पंचायत समिती वाढीव उपकर निधीचे कमी जास्त जमा खर्चाच्या कारणांचे अवलोकन करून मा.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेकडे शिफारस करणे\nघसारा पुनर्स्थापन व दुरुस्ती निधीची रक्कम जिल्हा निधीत जमा करण्यास मा.स्थायी समितीकडे शिफारस करणे.\nस्थानिक निधी लेखा परिक्षण प्रथम अनुपालनास मंजूरी देणे.\n1 सेवा निवृत्ती पेपर संच\nभारत सरकार | महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे | जि. प. ई-मेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.shyamjoshi.org/category/vrat-yagya-shanti/", "date_download": "2018-04-24T04:56:44Z", "digest": "sha1:UPNDGRDHSM6DMJZ3X3HQTKLXA477BC2Z", "length": 8677, "nlines": 162, "source_domain": "www.shyamjoshi.org", "title": "व्रत यज्ञ शान्ति – अथातो ब्रह्मजिज्ञासा", "raw_content": "\nउद् बुद् ध्यस्वाग्ने प्रतिजागृहि\nकर्म कांड / यज्ञ याग\nश्री अनघाष्टमी व्रत श्री दत्तगुरूंचे ‘अवधूत’ हे स्वरूप तर आहेच पण त्या व्यतिरिक्तही त्यांची अनेक स्वरूपतत्त्वे आहेत. अनेकानेक स्वरूपात साकारणाऱ्या या लीलामूर्तीला एक गृहस्थस्वरूपही आहे. याच गृहस्थस्वरूपाला अनघस्वामी असे नाव आहे आणि अर्थातच त्यांच्या अर्धांगीला अनघालक्ष्मी असे म्हणतात. व्यासोक्त दत्तपुराणात\nरुक्मिणी स्वयंवर 10 to 18\nरुक्मिणी स्वयंवर http://www.shyamjoshi.org/rukmini-svayamvar1 रुक्मिणी स्वयंवर प्रसंग दहावा श्रीगणेशाय नम: ॥ राय चलिले मुगुटांचे ॥ थोर बळ गवेषणाचें सैन्य पातलें मागधाचें युद्ध त्याचे दारुण ॥ १ ॥ वेगीं धनुष्या वाहिला गुण शितीं लावूनियां बाण \nएक नक्षत्र जनन शांती बहीण भावंडें अथवा पिता पुत्र , माता पुत्र इत्यादिकांचा जन्म जर एकाच नक्षत्रावर झाला, तर अत्यंत त्रासदायक घटना घडण्याची शक्यता असते. अर्थात इतरही ग्रहदोष व कर्म याचा सुद्धा भाग त्यात आलाच.. बापाच्या अथवा आईच्या किंवा भावंडांच्या\nरुक्मिणी स्वयंवर 01 to 09\nश्री रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे वाचन , पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुयोग्य , सुस्वरूप व अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे. रुक्मिणी स्वयंवर रुक्मिणी स्वयंवर-प्रस्तावना श्री एकनाथ महाराजांनी आपल्या “रुक्मिणी स्वयंवर” या आख्यान काव्यात सर्व\nतुळशी विवाह व मंगलाष्टके\nकार्तिकी द्वादशी , म्हणजे तुळशी विवाहारांभ : विष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीबरोबर विवाह लावून देणे, असा हा विधि आहे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. हा विधि कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात. त्यासाठी विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://nokarimargadarshan.blogspot.com/2013/10/blog-post_19.html", "date_download": "2018-04-24T04:50:09Z", "digest": "sha1:ZDZJMOTBCNONQRSAK5ZYVWQACV7MMOYF", "length": 16786, "nlines": 202, "source_domain": "nokarimargadarshan.blogspot.com", "title": "नोकरी मार्गदर्शन: करिअर मेळाव्यांतून बेरोजगारांची फसवणूक", "raw_content": "मराठी नोकरी मार्गदर्शन केंद्र = रोजगार / नोकरी मार्गदर्शन - मराठीत् नोकरी संदर्भ\nनोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या\nकरिअर मेळाव्यांतून बेरोजगारांची फसवणूक\nकरिअर मेळाव्यांच्या नावाखाली ब्रँडेड कंपन्यांचे लोगो जाहिरातींवर वापरून बेरोजगार तरुणाईकडून नोंदणी रक्कम लाटणाऱ्या संस्थांचा विदर्भात सुळसुळाट झाला आहे. अनेक जिल्ह्य़ांमध्ये करिअर मेळाव्यांचे पीक आले आहे. यासाठी नोंदणीच्या नावाखाली मोठी रक्कम बेरोजगारांकडून घेतली जाते. करिअर फेअरमध्ये लावलेल्या आकर्षक जाहिरातींवर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या लोगोचा वापर करून त्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून आमिष बेरोजगारांना दाखवले जात आहे. त्यामुळे बेरोजगार अशा करिअर मेळाव्यांच्या जाळ्यात अडकून स्वत:च्या पायावर आर्थिक धोंडा पाडून घेत आहेत. प्रत्यक्षात यापैकी कोणालाही बडय़ा कंपन्यांमध्येनोकरी मिळालेली नाही.\nकरिअर मेळावा हा आता प्रस्थापित धंदा झाला आहे. मार्केटिंग फंडे वापरून पैसा कमावण्याचे तंत्र अशा संस्थांनी अवगत केले आहे. हाती काहीच लागत नसतानाही बेरोजगार यात अडकत चालले असल्याची स्थिती आहे. मेळावे आयोजित करणाऱ्या या संस्थांच्या विश्वासर्हतेची चौकशी केली जात नाही वा त्यांच्याविरोधात तक्रारीही येत नाहीत. नोकरीच्या शोधातील हजारो बेरोजगारांचे रजिस्ट्रेशनची रक्कम भरून मोठे नुकसान होत आहे. ही रक्कम हजारो रुपयात असते. काही बेरोजगारांनी 'लोकसत्ता' कार्यालयात येऊन या फसवणुकीची माहिती दिली. यापैकी एकाला मोठय़ा पगाराची नोकरी असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात कंपनीने ६ हजार रुपयांवर पगार देणार नाही, असे त्याला सांगितले. जॉब रजिस्ट्रेशनसाठी भरलेली रक्कम पाण्यात गेल्याची आपबिती त्याने सांगितली.\nअनेक करिअर मेळाव्यांमध्ये रजिस्ट्रेशन करणारा एक विद्यार्थी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाला, दोन वर्षांपूर्वी अभियांत्रिकीचीपदवी ७५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालो. करिअर मेळाव्यातील जाहिरातींना भुलून अनेकवेळा रजिस्ट्रेशन केले. दोन वर्षांपासून चांगल्या नोकरीची वाट पाहत आहे. अद्याप कुठूनही कॉल आलेला नाही. सध्या एका मोबाईल कंपनीत विक्री प्रतिनिधी म्हणून ७ हजार रुपये पगारावर काम करीत आहे. असे करिअर मेळावे म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे लोगो करिअर मेळाव्यात सर्रास वापरले जात आहेत. बेरोजगारांना जाळ्यात ओढण्यासाठी याचा वापर केला जात असल्याने याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.\nकरिअर क्षेत्रातील एका तज्ज्ञाशी संपर्क साधला असता असे प्रकार मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे त्याने मान्य केले. काही संस्थांचा करिअर मेळाव्यासाठी नोंदणी शुल्क घेऊन महिन्याला कोटय़वधी रुपये कमावण्याचा धंदा झाला आहे. यातून रोजगाराच्या शोधात असलेल्यांचा काहीही फायदा होत नाही. कंपन्यांची गरज आणि अपेक्षा यात कुठेही ताळमेळ बसत नाही. नोकरी असली तरी जेवढा सांगितला जातो तेवढा पगार दिला जात नाही, असेही त्याने स्पष्ट केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूर शहरात कॅम्पस सिलेक्शन करण्यासाठी येणाऱ्या कंपन्यांची संख्या यंदा कमी झाली आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षांला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने विदर्भातील महाविद्यालयांमधून विद्यार्थी-विद्यार्थिनींचे लोंढे नोकरीच्या अपेक्षेने बाहेर पडत आहेत. त्यांच्यापैकी फारच थोडय़ांना नोक ऱ्या उलपब्ध होतात.\nपोस्टात 1,349 जागा रिक्त; जानेवारीपर्यंत होणार भरती\nकेंद्र व राज्य शासनाच्या विवीध विभागांमध्ये हजारो पदांची भरती\nजिल्हाधिकारी कार्यालय परभणी मध्येतलाठी, लिपिक, शिपाई पदांची भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2013 जिल्हाधिकारी कार्यालय य...\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती प्रादेशिक निवड समिती मार्फत जलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये सरळ ...\nसार्वजनिक बांधकाम विभागात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 10 जागा महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ...\n19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नांदेडला सैन्यभरती मेळावा\nमध्य रेल्वेमध्ये ग्रुप डी मधील 905 जागांची भरती\nमध्य रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये माजी सैनिक कोट्याअंतर्गत ग्रुप डी मधील 905 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंत...\nजळगाव जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांच्या 227 जागा\nजळगाव जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक-टंकलेखक 89 जागा आणि तलाठी 138 जागा एकूण 227 पदे. ऑनलाईन अ...\nभारतीय हवाई दलात ( Indian Air Force ) ग्राऊंड ड्युटी विभागात नोकरीच्या संधी\nभारतीय हवाईदलामधील हवामान विभागात ग्राऊंड डयुटी विभागात पर्मनंट कमिशन तसेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये अधिकारीपदासाठी भरती केली जाणार आहे....\nभारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ग्रुप मध्ये परिवीक्षा अधिकारी (Probationary Officers) पदाच्या एकूण 1837 जागा . Age Re...\nजिल्हा निवड समिती (1)\nतक्रार निवारण प्राधिकारी (1)\nरयत शिक्षण संस्था (1)\nकोल्हापूर सैन्यभरती मेळाव्याचे ४ ते ११ जानेवारी २०...\nमहाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सं...\nअमरावती येथे ६ ते १३ नोव्हेंबर २०१३ दरम्यान सैन्यभ...\nकारागृह महानिरीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवर संशोध...\nप्रादेशिक परिवहन विभागात लिपिक-टंकलेखक पदाच्या 208...\nआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात लिपिक टंकले...\nमाझगाव डॉकमध्ये 39 जागा\nअंबरनाथ ऑर्डनन्स ओर्डीनन्स डेपो मध्ये ट्रेडमन पदाच...\nकेंद्रीय राखीव पोलीस दलात ट्रेड्समन पदाच्या 815 जा...\nस्टील अथोरिटी ऑफ इंडिया मध्ये टेक्निकल पदाच्या 550...\nकरिअर मेळाव्यांतून बेरोजगारांची फसवणूक\nमुंबई विद्यापीठातील नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉज...\nभारतीय रेल्वेच्या कोलकाता विभागात 2830 जागांची भरत...\nभारतीय रेल्वेच्या भुवनेश्वर विभागात 1626 जागांची भ...\nMPSC मार्फत सहायक वाहन निरीक्षकाच्या 215 जागा\n19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नांदेडला सैन्यभरती मेळा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marketaanimi.com/2015/06/10/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AB%E0%A5%AB-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A1/", "date_download": "2018-04-24T05:01:36Z", "digest": "sha1:SCGSH65JYPDCGSYFUQBUUWMLPUSCWVUW", "length": 23546, "nlines": 120, "source_domain": "marketaanimi.com", "title": "भाग ५५ – लक्ष्मण-रेषा – एक्स-डेट आणी रेकार्ड-डेट | Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nभाग ५५ – लक्ष्मण-रेषा – एक्स-डेट आणी रेकार्ड-डेट\nमागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nउन्हाळ्याचे दिवस होते. लोड-शेडींग होते. त्यामुळे अर्थातच लाईट्स नव्हते. लाईट्स नाहीत म्हणजे टी व्ही नाही. इन्टरनेट नाही. आधुनिक साधनांचा उपयोग शून्य. त्यामुळे अर्थातच झाली पंचाईत. म्हणून उठले , स्वयंपाक उरकून घेतला.माझी धोपटी उचलली आणी आमच्या ऑफिसमध्ये गेले. आमचं ऑफिस आमच्या घरापासून २ मिनिटांच्या अंतरावर आहे त्यामुळे सहज शक्य झालं. नाहीतर काय करायचं हा प्रश्नच.\nऑफिसमध्ये पोहोचल्याबरोबर ऐकू येणारा एकच संवाद. “काय MADAM लाईट गेलेले दिसतात. तेव्हांच तुमचे पाय ऑफिसकडे वळले.”\n“हो रे बाबांनो पण तुमचं काय नुकसान\n“ काही नाही हो MADAM, चेष्टा आपली पाणी हवंय कां विचारपूस करतोय नाहीतर म्हणाल पाणी सुद्धा विचारलं नाही. काकांचा ओरडा बसेल”\nमी माझ्या जागेवर बसून मार्केट पाहू लागले. आज काही ट्रेड करतां येईल कां याचा विचार करू लागले. तेव्हढ्यात चार-पांच जण आले. मी विचारलं “ काय हवंय तेव्हां अविनाश म्हणाला “ क्लायंट आहेत तेव्हां अविनाश म्हणाला “ क्लायंट आहेत MADAM, बसा हं\n“आम्ही बसायला नाही आलो.”\n चेक हवंय बील हवंय स्टेटमेंट हवंय की आणखी काहीआणखी काही हवे असेल तर मात्र साडेतीननंतर , मार्केट संपल्यानंतर सांगा”\nतेव्हढ्यांत ऑफिसमध्ये काका आल्रे. त्यासरशी ते लोक काकांकडे आले.\n“ काय अंदाधुंदीचा कारभार असतो मार्केटमध्य. आज तुम्ही शेअर्स घेतलेत तर बोनस किंवा डीव्हीदण्ड मिळेल की नाही याची कोणालाच नक्की माहिती नसतं . त्यावर अवलंबून लोक शेअर्स घेतात किंवा विकतात. आणि मग फसवणूक झाल्यासारख होतं.”\nकाकांचा स्वभाव खूपच शांत आहे. “ तुम्ही भांडू नका. मला काय झालं ते सांगाल कां \n“आम्ही खरे पाहतां बोनस आणी स्प्लिट हवा म्हणूनच घाईघाईने अकौंट उघडला.माझ्या मित्राला पैशाची गरज होती. बोनस जाहीर झाला की त्या शेअर्सचा भाव वाढतो तेव्हां विकावा असे समजले होते.त्यामुळे त्यांनी १९ तारखेला विकले. आता जर १९ मार्च ही EX-डेट होती व २० मार्च ही रेकॉर्ड डेट होती तर आम्हाला बोनस मिळायला पाहिजे ना\n“१९ मार्चला तुम्ही खरेदी केलेत तर ते शेअर्स तुमच्या ‘DEMAT’ अकौंटवर २१ तारखेला जातात. २० तारखेला ज्यांचे शेअर्स ‘DEMAT’ अकौंटवर असतील त्यांनाच बोनस मिळेल आणी शेअर्स स्प्लिटचाही फायदा मिळेल. त्यामुळे १९ तारखेला ज्यांनी शेअर्स खरेदी केले असतील त्यांना बोनस आणी स्प्लिटचा फायदा मिळणार नाही. उलटपक्षी तुम्ही १९ तारखेला शेअर्स विकले तर ते सर्व प्रक्रिया होऊन २१ तारखेला तुच्या ‘DEMAT’ वरून वजा होतात. त्यामुळे त्यांनी विकले असले तरी त्यांना बोनस आणी स्प्लिटचा फायदा मिळेल.या मध्ये दोष कुणाचा कुणाचाच नाही. सध्या रोलिंग सेटलमेंट T+2 अशी आहे”\n“ आम्हाला काहीच कळत नाही.आम्ही विकत घेतले तेव्हां तरी कोणी तरी सांगायला पाहिजे होतं.”\nकाकांना काही समजेना. काका मला म्हणाले “ काय करू आता \nतेव्हां मी पुढे झाले “ उद्या तुम्ही तुमचे बिल घेवून या. शनिवार आहे मार्केट नसते शांतपणे बसून बोलू.”\n“ अहो तुम्ही सांगता शनिवारी या. आम्ही शनिवारी मुद्दाम येणार व नेमके आम्हाला शटर बघून परत जावे लागेल”\n“ तुम्ही निघताना फोन करा. आम्ही ऑफिसांत आहोत की नाही याची खात्री करूनच मग निघा.” असे म्हटल्यावर ती माणसे थोडी शांत झाली.\nशनिवारी येतो असे सांगून निघून गेली. ऑफिसमधला गोंगाट कमी झाला. मी काकांना म्हटलं\n“कदाचित तारीख सांगताना काही गोंधळ होऊ शकतो. आपणही आपले रेकॉर्ड बघू. विचार करायला काय घडले, चूक कोणाची याची शहानिशा करायला थोडा वेळ मिळेल.”\nठरल्याप्रमाणे ते सर्वजण शनिवारी आले. मला काकांनी बजावले होते “ MADAM, तुम्ही नक्की यायला पाहिजे.” त्याप्रमाणे मी ऑफिसमध्ये गेले. १९ तारखेला शेअरचा भाव बोनस आणी स्प्लिट झाल्यावर १:४ या प्रमाणांत विभागून आला.६९८ रुपये चा भाव होता.\n” हे पहा फक्त समजुतीचा घोटाळा झाला. तुम्हाला Rs २८००चे शेअर्स Rs ७०० च्या जवळपासच्या किमतीला मिळाले म्हणून तुम्ही हरखून गेलांत. पण वस्तुस्थिती तशी नाही. कंपनीने १:१ बोनस आणी त्यानंतर एका शेअरचे २शेअर्स स्प्लिट असे जाहीर केले. म्हणजेच १० शेअर्सला १०शेअर्स बोनस आणी त्या २० शेअर्सचे स्प्लिट म्हणजेच ४० शेअर्स होणार. म्हणजेच ज्या माणसाकडे १ शेअर असेल त्याला ४ शेअर्स मिळणार. त्यामुळे १९ तारखेला म्हणजेच EX- डेट ला शेअरची किमत १/४ होऊन आली. म्हणजेच Rs.६९८ ला १ शेअर झाली. त्या हिशेबानेच तुम्ही ६९८ रुपयाला एक या प्रमाणे १० शेअर्स घेतलेत असे बिलाप्रमाणे दिसते आहे. जर तुम्हाला बोनस आणी स्प्लिट मिळायचे असते तर २८०० रुपयाच्या किमतीला १ शेअर खरेदी करावा लागला असता.\nत्याचप्रमाणे तुमच्या मित्राने १९ तारखेला १० शेअर्स ६९० च्या भावाने विकले असतील तरी त्यांच्या ‘DEMAT’ अकौंटवर आणखी ३० शेअर्स रेकॉर्डडेटनंतर येतील. ते ३० शेअर्स तुम्ही नंतर त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे आणी तुमच्या गरजेप्रमाणे विकू शकता. त्यांचाही काही फायदा नाही आणी तुमचेही काही नुकसान नाही फक्त समजुतीचा घोटाळा आहे.”\nEX-डेट म्हणजेच लक्ष्मणाने सीतेसाठी घालून दिलेली मर्यादा आहे असे समजा. त्या तारखेच्या आधी खरेदी करणाऱ्याला बोनस DIVIDEND स्प्लिट , RIGHTS, मर्जर डीमर्जर , स्पिन ऑफ अशा प्रकारच्या कॉर्पोरेट ACTIONचा फायदा मिळतो. य़ा तारखेला किंवा या तारखेनंतर घेतलेल्या शेअर्सवर हे फायदे मिळत नाहीत.जसे रावणाने सीतेला लक्ष्मणरेखा पार केल्यावर पळवून नेले तसे एकदा ही तारीख निघून गेल्यावर ही सर्व फायदे मिळत नाहीत.\nत्यामुळे शेअर्स खरेदी करताना तसे काही उद्देश असेल तर खरेदी केलेले शेअर्स ‘DEMAT’ अकौंटवर कधी येतील हे विचारूनच शेअर्स खरेदी घेत चला .\nहे शेअर्स रेकॉर्ड डेटला तुमच्या ‘DEMAT’ अकौंटवर असतील तरच तुम्हाला हे सर्व फायदे मिळतील. तसेच शेअर विकताना ते तुमच्या ‘DEMAT” अकौंटवर कधी वजा होतील हे विचारून घ्या. जर ते रेकॉर्ड डेटला किंवा त्याच्या आधी तुमच्या अकौंटवरून वजा होणार असतील तरी तुम्हाला या सर्व कॉर्पोरेट ACTION चा फायदा मिळणार नाही. या सर्व माहितीसाठी ब्रोकरवर किंवा दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच इंटरनेटवर जाऊन (जे आता तुमच्या मोबाईलवरही असते) माहिती करून घ्या.\nभेटू या पुढच्या भागांत…\nमी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.\n← आठवड्याचे समालोचन – १ जून ते ५ जून २०१५ – भीतीच्या भिंती आठवड्याचे समालोचन – ८ जून २०१५ ते १३ जून २०१५ – ये रे घना ये रे घना →\n5 thoughts on “भाग ५५ – लक्ष्मण-रेषा – एक्स-डेट आणी रेकार्ड-डेट”\nपण ब-याचदा रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट जी दिलेली असते त्याच्या एक/दोन दिवस आधीच नंतरचा भाव दिसतो असे का होते. मध्यांतरी माझ्या बाबतीत ही असे घडले होते. समजा 15 ही एक्स डेट दिली आहे याचा अर्थ 15 तारखेला नविन भावाप्रमाणे भाव दिसायला हवा पण तो 14 लाच सकाळी बदलला होता.\nआपल्याकडे T+२ ही पद्धत स्वीकारली आहे. आपण विचारल्याप्रमाणे १४ तारखेला एखाद्याने जर शेअर विकत घेतला तर तो १५ तारखेला DEMAT अकौंटवर जमा होणे शक्य नाही. सगळ्या लोकांना रेकॉर्ड डेटची माहिती नसते. त्यामुळे त्यांची फसगत होण्याची शक्यता गृहीत धरून १४ तारखेलाच भावात बदल केला जातो\nदुसरा प्रश्न असा आहे की सध्या नेस्लेचे maggi प्रकरण गाजते आहे. पण public memory is short, वातावरण निवळल्यावर याचा भाव वाढेल की कमी होईल थोड़े घेऊन ठेवावेत का\n​नेस्लेचे शेअर्स घ्यावेत की नाही यासंबंधी सर्व चर्चा गेल्या खेपेच्या आठवड्याचे समालोचन या भागांत केली आहे. नेसले ही कंपनी चांगली असली तरी वातावरण निवळायला काही काळ जावा लागेल. सध्या मार्केटचा त्या प्रमाणांत SUPPORTही नाही. पावसाला म्हणावी अशी सुरुवात होईल,असे दिसत नाही. या सर्व अडचणी लक्षांत घेवून तुम्ही निर्णय घ्या. ​\nपिंगबॅक भाग ५६ – कॉर्पोरेट एक्शन : बोनस इशू | Stock Market आणि मी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआठवड्याचे-समालोचन - सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा - १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८\nभाग 62 - शेअर मार्केट आणि ब्रेक्झीट\nतुमचे प्रश्न – माझी उत्तरं : July - September 2017\nआठवड्याचे-समालोचन – सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा – १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८\nआठवड्याचे समालोचन – शेअर मार्केट एक ‘अक्षय पात्र’ – ९ एप्रिल २०१८ ते १३ एप्रिल २०१८\nआठवड्याचे समालोचन – साप शिडीचा खेळ – २ एप्रिल २०१८ ते ६ एप्रिल २०१८\nलेखमाला – ‘माझी वाहिनी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/panchak-117022500010_1.html", "date_download": "2018-04-24T05:06:05Z", "digest": "sha1:H2NYVVX4VVOSIJ2AYTRVB2PG4Y4BTRCG", "length": 14603, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पंचकामध्ये चुकूनही हे काम करू नये! | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपंचकामध्ये चुकूनही हे काम करू नये\nज्योतिषमध्ये पंचकाला शुभ नक्षत्र मानले जात नाही. याला अशुभ आणि हानीकारक योग मानले जाते. नक्षत्रांच्या या संयोगाला पंचक म्हटले जाते. जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत राहतो, तेव्हा त्या वेळेला पंचक म्हणतात.\nयाच प्रकारे घनिष्ठा ते रेवती पर्यंत जे पाच नक्षत्र (घनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद व रेवती) असतात, त्याला पंचक म्हणतात.\nपंचकाचा तुमच्या जीवनावर काय प्रभाव पडतो :\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे योग निर्माण होतात. पूर्वाभाद्रपद रोग कारक नक्षत्र असतो.\nउत्तराभाद्रपदांत धनाचा अपव्यय होतो व रेवती नक्षत्रात धनहानी होण्याची शक्यता असते.\nलक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी :\nपंचकच्या वेळेस जेव्हा घनिष्ठा नक्षत्र असतो त्या वेळेस गवत, लाकूड, इंधन इत्यादी एकत्रित नाही करायला पाहिजे, यामुळे अग्नीचा भय असतो.\nपंचकाच्या वेळेस दक्षिण दिशेत यात्रा करण्यास टाळायला पाहिजे, कारण दक्षिण दिशा, यमाची दिशा असते. या नक्षत्रांमध्ये दक्षिण दिशेची यात्रा करणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे.\nपंचकात जेव्हा रेवती नक्षत्र असतो, त्या वेळेस घराचे छत छप्पर तयार करण्यास टाळायला पाहिजे, असे विद्वानांचे मत आहे. यामुळे धनहानी आणि घरात क्लेश निर्माण होतो. अशी मान्यता आहे की पंचकात पलंग तयार केला तर अधिक क्लेश होतो.\nजी सर्वात जास्त प्रचलित मान्यता आहे ती म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची मृत्यू पंचकात झाली असेल तर पंचकात त्याचे क्रियाकर्म केले तर त्या कुटुंबातील किंवा नजीकच्या पाच लोकांचा मृत्यू होणे निश्चित आहे.\nया अवघड स्थितीपासून बचाव करण्यासाठी, शवासोबत पाच पुतळे कणीक किंवा कुश (एका प्रकारचे गवत)ने बनवून अर्थी वर ठेवावे आणि यांचे शवाप्रमाणे पूर्ण विधी-विधानाने अंतिम संस्कार करावे, तर पंचक दोष समाप्त होतो.\nगृह प्रवेश: कधी करावे, कधी नाही\nपापमोचनी एकादशी : या सरळ विधीने करा हे व्रत\nरस्त्यावर पडलेले लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये\nतेहतीस कोटी देव कोणते \nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nकाही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.\nआपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.\nशांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.\nयोजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.\nघरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.\nआर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.\nपैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.\nजर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.\nआजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.\nसुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.\nव्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.\nआज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=26&t=3506&sid=1918f778fc47827eb891ca90e6ae7060", "date_download": "2018-04-24T04:38:12Z", "digest": "sha1:QPO5WF4AN7DLLNZIMENYFOGSND6UTDFM", "length": 4825, "nlines": 135, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "मोतीचूर लाडू - motichoor ladoo recipe - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान खाना-खज़ाना व्हेज रेसिपीज\nयेथे केवळ व्हेज रेसिपी च प्रसिद्ध कराव्यात\n४ कप बेसन ( थोडे जाड दळलेले )\n२ ते ३ कप साखर\n१ किलो तेल वा तूप\nकाजू किंवा सुका मेवा (पर्यायी )\nचिमुटभर लाडू रंग (पर्यायी)\nReturn to “व्हेज रेसिपीज”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/seaface-beach-tourist-1662824/", "date_download": "2018-04-24T04:54:41Z", "digest": "sha1:M5HT5PZZAOVUFVFWXMZKYFORV64UVYGN", "length": 14231, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "seaface beach tourist | सुट्टीत फिरण्यासाठी हे आहेत पाच समुद्र किनारे | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nसुट्टीत फिरण्यासाठी हे आहेत पाच समुद्र किनारे\nसुट्टीत फिरण्यासाठी हे आहेत पाच समुद्र किनारे\nभारत एक विशाल देश असून इथली विविधतेत नटलेली एकता, निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक इथे येत असतात. प्रवास करणे प्रत्येक वयाच्या लोकांना आवडते.\nभारत एक विशाल देश असून इथली विविधतेत नटलेली एकता, निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक इथे येत असतात. प्रवास करणे प्रत्येक वयाच्या लोकांना आवडते. कारण प्रवासामध्ये एक वेगळा आनंद, समाधान असते. भारतात अनेक अशा जागा आहेत जिथे सौंदर्य आणि शांतता एकाचवेळी तुम्हाला अनुभवता येईल. समुद्र किनारे अशा जागांपैकी एक आहेत. समोर पसरलेला विशाल, अथांग सागर आणि किनाऱ्यावरची हिरवीगार वनराई मनाला मोहून टाकते. जाणून घेऊया देशातील काही समुद्र किनारे.\n– कोवालम बीच – कोवालम हा केरळमधला प्रसिद्ध बीच आहे. या बीचवरची शांतता आणि सौंदर्य तुम्हाला प्रेमात पाडते. तिरुवनंतपूरमपासून १८ किलोमीटर अंतरावर हा बीच आहे. इथे येऊन लोक भरपूर आनंद लुटतात.\n– राधा नगर बीच – अंदमानमधील हॅवलॉक आयलँडचा बीच राधा नगर बीच म्हणून ओळखला जातो. टाइम मॅगजीनने २००४ साली या समुद्र किनाऱ्याला आशियातील सर्वोत्तम बीच ठरवले होते. ज्या लोकांना शांतता हवी आहे त्यांच्यासाठी राधा नगर बीच उत्तम ठिकाण आहे.\n– उल्लाल बीच – कर्नाटकातही सुंदर सुमद्र किनारे आहेत. कर्नाटकात मँगलोर, उल्लाल, देवबाग आणि गोकरणा बीच आहेत. यापैकी उल्लाल बीच फेमस आहे. कर्नाटकातील हा बीच लोकांना भरपूर आकर्षित करतो.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\n– कलंगुट बीच – गोव्यातील कलंगुट बीच भरपूर फेमस असून इथे वर्षाचे बाराही महिने गर्दी असते. गोवा फिरायला येणारे पर्यटक हमखान या ठिकाणी येतात. इथे तुम्ही वॉटर स्पोटर्स आणि पॅराग्लायडिंगचा आनंद लुटू शकता.\n– जुहू बीच – मुंबईतला जुहू समुद्र किनाराही प्रसिद्ध आहे. मुंबई फिरायला येणारे बहुसंख्य पर्यटक हमखास या समुद्र किनाऱ्याला भेट देतात. बॉलिवूडचे अनेक कलाकारही या भागात राहत असल्याने जुहू बीचला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nनाणार प्रकल्प विदर्भात आणा: भाजपा आमदाराची मागणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/dombivali-youth-killed-by-crowd-475187", "date_download": "2018-04-24T04:35:58Z", "digest": "sha1:AC7CQ56TOGZ7QIQAFAWKQRPUOFYBQTBH", "length": 12549, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "डोंबिवली : जमावाच्या मारहाणीत माथेफिरुचा मृत्यू", "raw_content": "\nडोंबिवली : जमावाच्या मारहाणीत माथेफिरुचा मृत्यू\nडोंबिवलीच्या खोणी गावात जमावाच्या मारहाणीत एका माथेफिरुचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर बघ्याची भूमिका घेणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\n712 : कोल्हापूर : 70 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज\nयोग माझा : अर्धचंद्रासनाचे शरीराला अनेक फायदे\nमुंबई : महिलेला धक्का लागला म्हणून लोकलखाली ढकललं\nमुंबई : वृक्षतोडीसंदर्भातील पालिका आयुक्तांचे विशेषाधिकार हायकोर्टाकडून रद्द\nठाणे : मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्ती लांबणीवर\nकल्याण, ठाणे : अवघ्या सहा दिवसाच्या मुलीची आईकडून हत्या\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातून नाट्यमयरित्या कैदी फरार, प्रकार सीसीटीव्हीत कैद\nस्पेशल रिपोर्ट : पिंपरी : वंशाचा दिवा नसल्याने 46 वर्षीय पुरुषाशी तरुणीचं लग्न\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\n712 : कोल्हापूर : 70 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज\nयोग माझा : अर्धचंद्रासनाचे शरीराला अनेक फायदे\nमुंबई : महिलेला धक्का लागला म्हणून लोकलखाली ढकललं\nमुंबई : वृक्षतोडीसंदर्भातील पालिका आयुक्तांचे विशेषाधिकार हायकोर्टाकडून रद्द\nठाणे : मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्ती लांबणीवर\nडोंबिवली : जमावाच्या मारहाणीत माथेफिरुचा मृत्यू\nडोंबिवली : जमावाच्या मारहाणीत माथेफिरुचा मृत्यू\nडोंबिवलीच्या खोणी गावात जमावाच्या मारहाणीत एका माथेफिरुचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर बघ्याची भूमिका घेणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\n712 : कोल्हापूर : 70 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज\nयोग माझा : अर्धचंद्रासनाचे शरीराला अनेक फायदे\nमुंबई : महिलेला धक्का लागला म्हणून लोकलखाली ढकललं\nKXIPvDD: आखिरी नहीं, इस ओवर में पलट गई दिल्ली की जीती हुई बाज़ी\nWATCH: अंतिम छह गेंदो पर जीतते-जीतते कैसे हार गई दिल्ली की टीम\nKXIPvDD: मुजीब की आखिरी गेंद पर खत्म हुआ श्रेयस का संघर्ष, दिल्ली को मिली 4 रनों से हार\nDD vs KXIP: घर में भी नहीं रुका दिल्ली के हार का क्रम, जीत के साथ पंजाब टॉप पर\nDD vs KXIP: दिल्ली की शानदार गेंदबाजी, 143 पर रुका किंग्स का कारवां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1472", "date_download": "2018-04-24T04:51:16Z", "digest": "sha1:37O5CHTXDCOVGJOEW57DXQ2VHU6CZZYF", "length": 11370, "nlines": 71, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nस्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांच्या देशातील जनतेला शुभेच्छा\n71 व्या स्वातंत्र्यदिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले.\nदेशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या, थोर स्त्री-पुरुषांचे त्यांनी स्मरण केले.गोरखपूर दुर्घटना आणि नैसर्गिक आपत्तीत भारताची जनता खांद्याला खांदा भिडवून त्यांच्या सोबत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.\nभारत छोडो आंदोलनाची 75 वर्षे, चंपारण्य सत्याग्रहाची शताब्दी,बाळ गंगाधर टिळक यांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाचा 125 वा वर्धापनदिन याच वर्षात असल्याने हे वर्ष विशेष असल्याचे ते म्हणाले.\n1942 आणि 1947 च्या मधे राष्ट्राने सामूहिक शक्तीचे दर्शन घडवले, त्याचा कळसाध्याय म्हणजे भारताचे स्वातंत्र्य. अशाच सामूहिक निर्धाराचे दर्शन घडवत 2022 पर्यंत आपण न्यू इंडिया अर्थात नव भारत घडवायचा आहे.आपल्या देशात प्रत्येक नागरिक समान आहे यावर भर देतानाच आपण सर्व एकजुटीने गुणात्मक परिवर्तन घडवू शकतो असे पंतप्रधान म्हणाले.\n\"चलता है\" अर्थात असू दे, असेच चालायचे, ही मनोवृत्ती सोडून त्याजागी \"बदल सकता है '' म्हणजे बदलू शकतो ही वृत्ती बाणवायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.\nभारताच्या सुरक्षेला आपले प्राधान्य असून लक्ष्यभेदी हल्ल्याने ते अधोरेखित झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.जगात भारताची शान उंचावत आहे.दहशतवादाविरोधातल्या लढाईत अनेक देश भारताला सहकार्य करत आहेत.देशाला आणि गरिबांना लुटणारे आता शांततेची झोप घेऊ शकत नाहीत, प्रामाणिकपणाचा आज उत्सव होत असल्याचे, विमुद्रीकरणासंदर्भात बोलताना ते म्हणाले.काळ्या पैशाविरोधातला लढा जारीच राहील असे आश्वस्त करतानाच पारदर्शकतेसाठी तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल असे सांगून डिजिटल व्यवहारांसाठी त्यांनी जनतेला प्रोत्साहन दिले.\nवस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी म्हणजे सहकार्यात्मक संघीयवादाचे उत्तम उदाहरण आहे.आर्थिक समावेशकतेसाठीच्या उपक्रमाद्वारे गरीबही, देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.जलद गती आणि प्रक्रियेची सुलभता याद्वारे सुप्रशासनावर त्यांनी भर दिला. जम्मू-काश्मीरविषयी बोलताना, .\"ना गोली से, ना गाली से, परिवर्तन होगा गले लगाने से\",अपशब्दांनी अथवा गोळ्यांनी नव्हे तर स्नेहपूर्ण गळाभेटीने प्रश्न सुटू शकतो असे ते म्हणाले.\nयावर्षी विक्रमी धान्य उत्पादनाबद्दल ,शेतकरी आणि कृषी वैज्ञानिकांची त्यांनी प्रशंसा केली.या वर्षी सरकारने 16 लाख टन डाळीची खरेदी केल्याचं सांगून याआधीच्या वर्षापेक्षा ही खरेदी खूपच जास्त असल्याचे ते म्हणाले.\nतंत्रज्ञानाच्या बदलत्या स्वरूपामुळे, रोजगारासाठी विविध कौशल्यांची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.रोजगार मिळवणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बनण्याच्या दृष्टीने युवकांना घडवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. तिहेरी तलाक मुळे त्रास सोसावा लागणाऱ्या महिलांचा उल्लेख करत या प्रथेविरुद्ध उभे राहणाऱ्यांच्या धैर्याची त्यांनी प्रशंसा केली.या लढ्यात संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले.\nभारत,शांतता, एकता आणि सलोखा यांचा पाईक आहे. जातीयवादाने कोणाचे भले होणार नाही तर नुकसानच होईल. श्रद्धेच्या नावाखाली हिंसाचाराला थारा देण्याचा त्यांनी तीव्र निषेध केला आणि हे खपवून घेतले जाणार नाही असे बजावले. भारत छोडो चळवळीत भारत छोडो अशी घोषणा होती मात्र सध्याच्या काळात भारत जोडो ची साद आहे असे ते म्हणाले.\nदेशाच्या पूर्व आणि ईशान्य भागाच्या विकासाकडे प्रामुख्याने लक्ष पुरवण्यात येत असल्याचे सांगून सरकार, भारताला, विकासाच्या नव्या पथावर नेत असल्याचे त्यांनी सांगितले.\nपुराण शास्त्रातल्या वचनांचा उल्लेख करत, योग्य वेळी एखादे काम पूर्ण केले नाही तर त्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही,असे सांगून टीम इंडियाने, नव भारत बनवण्याचा संकल्प करण्याची हीच वेळ असल्याचे ते म्हणाले.\nजिथे गरिबाकडे पक्के घर असेल, वीज असेल,पाणी असेल, जिथे,शेतकऱ्याला विवंचना नसतील, तो सुखाची झोप घेऊ शकेल,आजच्यापेक्षा त्याचे उत्पन्न आजच्यापेक्षा दुप्पट असेल,जिथे,युवकांना, महिलांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संधी उपलब्ध असेल, जिथे, दहशतवाद,जातीयवाद, भ्रष्टाचाराला थारा नसेल आणि भारत जो, स्वच्छ, तंदुरुस्त असेल असा नव भारत घडवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.\nशौर्य पुरस्कार विजेत्यांच्या सन्मानार्थ एक संकेत स्थळ जारी केल्याची घोषणा त्यांनी केली.\nए.एस -नि चि -अनघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1671", "date_download": "2018-04-24T04:45:50Z", "digest": "sha1:R3UVP3J35H3B43V5EBOL4N5EH7FZ57AR", "length": 3045, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nअभियंता दिनानिमित्त पंतप्रधानांचे अभियंत्यांना अभिवादन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त देशभरातील अभियंत्यांना अभिवादन केले आहे. भारतरत्न एम. विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांनाही आदरांजली वाहिली.\n“अभियंता दिनानिमित्त मी सर्व अभियंत्यांना अभिवादन करतो आणि देशाच्या विकासात त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक करतो.\nभारतरत्न एम. विश्वेवरैय्या यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांनाही आदरांजली अर्पण करतो. स्वत: असामान्य अभियंता असणारे विश्वेश्वरैय्या हे अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1870", "date_download": "2018-04-24T04:44:02Z", "digest": "sha1:2O4I7GWI736XGTH53NMJLK4SO3CDS3RK", "length": 3468, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसीआयपीएएम-डीआयपीपी यांच्यातर्फे देशातील भौगोलिक संकेतांकांसाठी लोगो आणि टॅगलाइन स्पर्धा\nवाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील औद्योगिक धोरण प्रोत्साहन विभागांतर्गत येणाऱ्या आयपीआर प्रोत्साहन आणि व्यवस्थापन पथकाने MyGov.in या संकेतस्थळावर देशातील भौगोलिक संकेतस्थळांच्या लोगो आणि टॅगलाइन/घोषणा यांसाठी स्पर्धा आयोजित केली आहे.\nभौगोलिक संकेतांक हा प्रामुख्याने विशिष्ट भौगोलिक प्रदेशात उगम झालेल्या कृषी, नैसर्गिक किंवा उत्पादित वस्तूंसाठी (हस्तकला आणि औद्योगिक वस्तू) असतो. उदा. दार्जिलिंगचा चहा, नागपूरची संत्री, काश्मिरी पश्मिना, इ.\nभौगोलिक संकेतांक आपल्या समृद्ध वारशांबरोबरच देशभरातल्या शेतकऱ्यांच्या कारागिरांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी साहाय्यभूत ठरत असतो.\nस्पर्धेसाठीची अधिक माहिती MyGov.in ऑनलाईन मंचावर उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewforum.php?f=5&sid=45e39e55de42c763b0503f68c4a78203", "date_download": "2018-04-24T04:47:11Z", "digest": "sha1:TEJW4V5SQ5YH3L7GQBHNFANFQ6BOZBDR", "length": 5530, "nlines": 160, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "मेंबर नसलेल्यांसाठी - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान मेंबर नसलेल्यांसाठी\nया फोरम मधे मेंबर नसलेले म्हणजे केवळ भेट देण्यासाठी आलेले लोकच लिहू शकतील\nRegister करताना येणा~या आडचणी, किंवा इतर कोणत्याही आडचणी इथे लिहून कळवा. आम्ही आपणास आवश्य मदत करू.\nब्लोग सन्केत स्थळाशि जोडायचा आहे :\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/swachh-bharat-abhiyan-workshops-will-be-held-friday-12832", "date_download": "2018-04-24T05:11:22Z", "digest": "sha1:7DTGQ26U72QIARRQCS4JPAEOZYAO5AGO", "length": 9129, "nlines": 57, "source_domain": "www.esakal.com", "title": "swachh bharat abhiyan workshops will be held on Friday अध्यक्षा व \"सीईओं'ना दिल्लीचे बोलावणे | eSakal", "raw_content": "\nअध्यक्षा व \"सीईओं'ना दिल्लीचे बोलावणे\nगुरुवार, 29 सप्टेंबर 2016\nसोलापूर - केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत दिल्ली येथे कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. 30) दिवसभर ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड व मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांना निमंत्रण दिले आहे.\nदिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची घोषणा केली होती. येत्या 2 ऑक्‍टोबरला महात्मा गांधी यांची जयंती आहे. त्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या या कार्यशाळेला महत्त्व प्राप्त झाले आहे.\nसोलापूर - केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत दिल्ली येथे कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. 30) दिवसभर ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड व मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांना निमंत्रण दिले आहे.\nदिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची घोषणा केली होती. येत्या 2 ऑक्‍टोबरला महात्मा गांधी यांची जयंती आहे. त्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या या कार्यशाळेला महत्त्व प्राप्त झाले आहे.\nस्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने केलेल्या कामाची केलेली अंमलबजावणी विचारात घेऊन अध्यक्षा व \"सीईओं'ना कार्यशाळेसाठी बोलावण्यात आले आहे. राज्यातील केवळ आठ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व सीईओंना यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामध्ये सोलापूरसह सिंधुदुर्ग, बीड, सातारा, पुणे, नागपूर, जळगाव, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. या आठही जिल्ह्यांत स्वच्छतेच्या संदर्भात झालेल्या कामाची दखल घेऊन या कार्यशाळेसाठी निमंत्रण दिले आहे. या कार्यशाळेसाठी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार हेही उपस्थित राहणार आहेत.\nशुक्रवारी होणाऱ्या कार्यशाळेचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ही कार्यशाळा दिवसभर चालणार आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचा मान अध्यक्षा गायकवाड व सीईओ डोंगरे यांना मिळाला आहे.\nबलात्कार रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे....\nजम्मूमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरातमधील सुरत आदी ठिकाणी झालेले बलात्कार व हत्या प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली, टीकेचा भडिमार झाला...\nमहापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च\nवज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात...\nपीकविमा भरून घेण्यात देशात बीड अव्वल\nबीड - शेतकऱ्यांकडून पीकविमा भरून घेण्यात बीड जिल्हा प्रशासनाने देशभरात अव्वल कामगिरी केली आहे. त्यामुळे या कामाची दखल पंतप्रधानांनी घेतली असून...\nरण कर्नाटकी... (श्रीराम पवार)\nसाधारणतः या वर्षाच्या अखेरीपासून लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजू लागेल. सत्तारूढ असलेला भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष म्हणून प्रभावहीन ठरलेला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/osho-mhane-news/osho-philosophy-part-10-1646848/", "date_download": "2018-04-24T05:00:35Z", "digest": "sha1:DKNEJJCQIE4JS35YHNE2C6QXPYMEBQQI", "length": 32815, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Osho Philosophy Part 10 | आनंदी आनंद चोहीकडे | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nमाणसाला हवा असतो आनंद, परिपूर्ण आणि शुद्ध आनंद, कारण तिथेच सगळ्या इच्छा संपतात.\nमाणसाला हवा असतो आनंद, परिपूर्ण आणि शुद्ध आनंद, कारण तिथेच सगळ्या इच्छा संपतात. जोपर्यंत इच्छा आहेत, तोवर दु:ख आहे, कारण जिथे इच्छा आहे, तिथे शांती असूच शकत नाही. इच्छा पूर्णपणे संपल्या आहेत अशी अवस्था आनंद घेऊन येते. या आनंदासोबत स्वातंत्र्य आणि मुक्तीही येते, कारण जिथे अपूर्णत्वाची भावना असते, तिथे बंधन आणि अवलंबित्वही असतंच. जिथे कशाचाही अभाव नसतो, तिथे पूर्ण स्वातंत्र्याची शक्यता असते.. स्वातंत्र्यासोबत आनंद येतो आणि आनंद म्हणजे मोक्ष पूर्ण आनंद आणि अंतिम स्वातंत्र्याची इच्छा प्रत्येकामध्ये सुप्त स्वरूपात असतेच. ती एका बीजाच्या स्वरूपात असते. या बीजामध्ये एक झाड दडलेलं असतं. त्याचप्रमाणे, मानवाच्या अंतिम इच्छेचं समाधान त्याच्या स्वभावातच कुठे तरी दडलेलं असतं. ही एक पूर्णपणे विकसित अवस्था आहे. आनंदी असणं, स्वतंत्र असणं हा आपला स्वभाव आहे. आपला खरा स्वभाव ही एकच गोष्ट सत्य आहे आणि तिला परिपूर्णतेकडे नेलं तर पूर्ण समाधान लाभू शकतं.\nआपल्या स्वत:च्या स्वभावाचं समाधान करण्याचा प्रयत्न जो माणूस करत नाही, तो वैभवामुळे सर्व दु:खं दूर होतील या गैरसमजात राहतो; पण भौतिक संपदा कधीही त्याच्या आतील रिक्तता भरून काढू शकत नाही आणि म्हणून, एखादा माणूस जगातील शक्य ते सारं मिळवतो; पण तरीही त्याला काही तरी राहून गेलंय असं वाटत राहतं. त्याचा गाभा रिकामाच राहतो. बुद्ध एकदा म्हणाले होते, ‘‘इच्छेचं समाधान करणं कठीण आहे.’’\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nमाणसाने कितीही यश संपादन केलं, तरी तो कधीच समाधानी नसतो हे काहीसं विचित्र आहे. त्याला आणखी मोठं यश हवंसं वाटतं आणि म्हणून भिकाऱ्याची आणि सम्राटाची गरिबी सारखीच असते. या स्तरावर, त्यामध्ये काहीसुद्धा फरक नसतो.\nबाहेरच्या जगात माणसाने काहीही कमावलं, तरी ते अस्थिर आहे. ते हरवू शकतं, कधीही नष्ट होऊ शकतं आणि अखेरीस मृत्यू सगळ्याचा घास घेतोच. त्यामुळे अशा प्रकारच्या सहजपणे हिरावल्या जाऊ शकणाऱ्या गोष्टींनी कोणाच्याही हृदयाचं आतून समाधान होत नाही, यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. अशा प्रकारचं वैभव माणसाला कधीही सुरक्षिततेची जाणीव देत नाही, त्याने या वैभवाचा कितीही कष्टाने पाठलाग केला तरी. खरं तर काय घडतं, माणसाला त्याने प्राप्त केलेल्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठीही प्रयोजन करावं लागतं.\nबाह्य़ सत्ता आणि वैभव यामुळे एखाद्याच्या मनातली काही तरी हवं असल्याची भावना, असुरक्षितता, भीती नाहीशी होत नाही, हे प्रथम स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. या भावना लपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्मवंचना. समृद्धीचा नेहमीच कैफ चढतो; त्यामुळे आयुष्यातलं वास्तव विसरलं जातं आणि अशा प्रकारचा विसराळूपणा हा गरिबीपेक्षा वाईट असतो, कारण या खऱ्याखुऱ्या गरिबीचं निवारण करण्यापासून माणसाला हा विसराळूपणा रोखतो.\nदारिद्रय़ हाही एक मादक पदार्थच आहे; तोही आयुष्यातलं वास्तव लपवतो. कोणत्याही भौतिक गोष्टीच्या अभावामुळे दारिद्रय़ येत नाही किंवा दारिद्रय़ म्हणजे श्रीमंती किंवा समृद्धीची कमतरताही नव्हे, कारण एखादा माणूस श्रीमंत आणि प्रभावशाली झाला, तरीही त्याच्या ठायी गरिबी असतेच. ज्यांच्याकडे सर्व काही आहे असं भासतं, त्यांची गरिबी तुम्ही बघू शकत नाही का तुमच्या मालकीच्या भौतिक गोष्टींमुळे कधी ओझं हलकं झालंय तुमच्यावरचं\nसमृद्धी आणि समृद्धीचा भ्रम यांच्यात खूप मोठा फरक आहे. ही बाह्य़ संपत्ती, शक्ती आणि सुरक्षितता या तुमच्या आतमध्ये वसत असलेल्या श्रीमंतीच्या केवळ सावल्या आहेत. तुम्हाला गरिबीची भावना जाणवते ती बाह्य़ जगातील काही तरी साध्य करता आलं नाही म्हणून नव्हे, तर स्वत:पासून पाठ फिरवल्यामुळे आणि म्हणूनच ही भावना बाहेरच्या कशानेही नष्ट होणार नाही, ती आतून काढून टाकायला हवी.\nपरमानंद हा स्वत्वाचा स्वभाव आहे. हा काही स्वत्वाचा गुण नाही, तर स्वत्वाचं सार आहे. आनंदाचं स्वत्वाशी नातं नाही, तर स्वत्व हाच आनंद आहे. ती एकाच सत्याची दोन नावं आहेत. आम्ही स्वत्व म्हणजे आनंद असं म्हणतो ते काहीशा अनुभवात्मक दृष्टिकोनातून, त्यामुळे तुम्हाला आनंद आणि खरा आनंद यात गल्लत होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. खरा आनंद म्हणजेच स्वत्व. जेव्हा हा आनंद सापडतो, तेव्हा सर्व गोष्टींचा शोध संपतो. फसवा आनंद साध्य झाला, की हा शोध अधिक तीव्र होतो आणि गमावण्याची भीतीही तीव्र होते, असा आनंद मन:शांती ढळून टाकतो. माणसाची तृषा वाढवणारं पाणी हे खरं पाणी नव्हेच. ख्रिस्त म्हणाले होते, ‘‘या, मला तुम्हाला अशा एका विहिरीकडे घेऊन जाऊ द्या, जिचं पाणी तुमची तहान कायमस्वरूपी भागवेल.’’\nआपण सुख आणि आनंद यात कायम गल्लत करत राहतो. सुख ही केवळ एक सावली आहे, आनंदाचं केवळ प्रतिबिंब आहे. मात्र, आनंदाचा हा आभास म्हणजेच आयुष्य आहे या भ्रमात बहुतेक लोक जगतात आणि मग साहजिकच अखेरीस त्यांच्या वाटय़ाला निराशा येते. हे म्हणजे चंद्राचं प्रतिबिंब म्हणजेच खरा चंद्र असं समजून तो पकडायचा प्रयत्न करण्यासारखं आहे. तळ्यात पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब पकडण्यासाठी खोल खोल पाण्यात शिरणारा माणूस खऱ्या चंद्रापासून अधिकाधिक दूर जात असतो. आणि त्याचप्रमाणे, सुखाच्या शोधातली माणसं आनंदापासून अधिकाधिक दूर जात राहतात. हा रस्ता केवळ दु:खाकडे घेऊन जातो. तुम्हाला मी सांगतोय, त्यातलं सत्य लक्षात येतंय का सुखाच्या पाठीमागे धावलं तर केवळ दु:ख वाटय़ाला येतं हे तुमच्या आयुष्यानेही बघितलं असेलच; पण ते अगदी नैसर्गिक आहे. प्रतिबिंब वरकरणी तंतोतंत मूळ गोष्टीसारखंच भासतं, पण ते वास्तव अजिबात नसतं.\nप्रत्येक सुखामध्ये आनंदाचा वायदा असतो, किंबहुना सुख म्हणजे आनंदच असं ही सुखं सांगत असतात – पण सुख ही आनंदाची केवळ सावली आहे. त्यामुळे सुखाला आनंद म्हणून स्वीकारल्याची परिणती अपयशात आणि खेदाच्या भावनेत होते. तुमची सावली धरून मी तुम्हाला कसं पकडू शकेन आणि तुमची सावली मी अगदी पकडली, तरी ती माझ्या हातात येईल का\nलक्षात ठेवा, प्रतिबिंब हे नेहमी बिंबाच्या विरुद्ध असतं. मी आरशासमोर उभा राहिलो, तर मी प्रत्यक्षात जसा उभा आहे, त्याचा बरोबर उलट माझं प्रतिबिंब दिसेल आणि हे सुखाबाबतही खरं आहे. सुख हे आनंदाचं केवळ प्रतिबिंब आहे. आनंद हा अंत:स्थ गुण आहे, तर सुख हे बाह्य़ प्रदर्शन आहे. सुख केवळ भौतिक जगात अस्तित्वात असते. केवळ आनंदातच कल्याण असतं. सुखाचा शोध सुरू ठेवून बघा आणि मी सांगतोय ते किती खरं आहे हे तुमच्याच लक्षात येईल. सर्व सुखांची अखेर दु:खात होते.\nपण काही वेळा जे अखेरीस असतं, तेच सुरुवातीलाही असू शकतं. तुमची दृष्टी तेवढी खोलवर पोहोचू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला जे सुरुवातीला लक्षात यायला हवं ते शेवटी कळतं. एखाद्या घटनेच्या अखेरीस जे समोर आलं, ते सुरुवातीला नव्हतंच, असं तर शक्य नाही. अखेर ही प्रारंभाचीच तर विकसित अवस्था असते. सुरुवातीला लपलेलं असतं, ते अखेरीस समोर येतं.\nपण तुम्ही गोष्टींकडे उलटय़ा क्रमाने बघा- अर्थात तुम्हाला काही दिसत असेल तर. पुन:पुन्हा तुम्हाला दु:खाकडे, वेदनेकडे, पश्चात्तापाकडे नेणाऱ्या रस्त्यांवरूनच तुम्ही चालत राहता. शेवटी दु:खच पदरी पडणार आहे, तर माणूस त्याच त्या गोष्टी पुन:पुन्हा का करत राहतो का कदाचित त्याला समोर दुसरा कोणता रस्ता दिसतच नाही. म्हणूनच मी म्हणतो की, तुमची दृष्टी अंधूक आणि विपरीत आहे; म्हणूनच मला प्रश्न पडतो, तुम्हाला दृष्टी आहे की नाही\nस्वत:च्या डोळ्यांचा खऱ्या अर्थाने वापर करणारे खूप थोडे लोक आहेत. प्रत्येकाला दोन डोळे असतात, तरीही बहुतेक लोक अंध असतात. जो माणूस स्वत:च्या आतमध्ये बघत नाही, तो डोळ्यांचा वापरच करत नाही. ज्या माणसाने स्वत्वाकडे बघितलं आहे, तोच डोळ्यांचा वापर करतो. जो माणूस स्वत:कडे बघू शकत नसेल, तो खरोखर अन्य काही पाहू शकेल का\nमित्रांनो, तुम्ही स्वत:कडे बघू लागता तेव्हाच तुमच्यात बघण्याची क्षमता येते. जेव्हा माणूस स्वत:कडे बघू लागतो, तेव्हाच तो आनंदाच्या दिशेने सरकू लागतो. मग तो सुखाकडे वळून बघत नाही आणि त्याच्यातला हा बदल इतरांनाही जाणवतो. सुखाची दिशा ही स्वत:कडून जगाकडे जाणारी आहे आणि आनंदाची दिशा जगाकडून स्वत:कडे येणारी.\nआनंद ही नैसर्गिक जाणीव\nआनंद हा माणसाचा स्वभाव आहे. आनंदाची काळजी करण्याची गरजच नाही, तो अगोदरपासूनच तुमच्यात आहे, तुमच्या हृदयात आहे. तुम्ही फक्त दु:खी राहणं थांबवा, दु:ख निर्माण करणाऱ्या यंत्रणेचं काम थांबवा; पण हे करायला कोणीच तयार दिसत नाही. लोक म्हणतात, ‘मला आनंद हवाय.’ हे तर एकीकडे मला चांगलं आरोग्य हवंय, असं म्हणत दुसरीकडे आजाराला चिकटून राहण्यासारखं आहे. तुम्ही आजाराला दूर जाऊच देत नाही. तुम्ही डॉक्टरांनी दिलेली औषधं घेत नाही, सकाळी चालायला जात नाही, पोहायला जात नाही, कोणताच व्यायाम करत नाही, खाण्याचा हव्यास सोडत नाही. तुमचं आरोग्य तुम्हीच नष्ट करून टाकता आणि दुसरीकडे म्हणता की, चांगलं आरोग्य हवंय. अनारोग्यकारक यंत्रणा मात्र बदलत नाही. आरोग्य ही कुठून तरी साध्य करून आणण्याची गोष्ट नाही, ते काही साध्य नाही. आरोग्य ही पूर्णपणे वेगळी जीवनशैली आहे. तुम्ही ज्या प्रकारे जगता, त्यामुळे आजार निर्माण होतात. तुम्ही ज्या प्रकारे जगता, त्यामुळे दु:खं निर्माण होतात.\nलोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की, त्यांना आनंदी राहायला आवडेल, पण ते मत्सर सोडू शकत नाहीत. मत्सराचा त्याग तुम्ही करत नाही, तोपर्यंत प्रेम निर्माण होऊ शकत नाही. प्रेमाच्या गुलाबाला मत्सराचं तण मारून टाकतं आणि प्रेम निर्माण झालं नाही, तर तुम्ही आनंदी होऊ शकत नाही. कारण प्रेमाशिवाय कोण आनंदी होईल प्रेमाचा गुलाब तुमच्यात उमलला नाही, त्याचा सुगंध सर्वत्र पसरला नाही, तर तुम्ही आनंदी होऊच शकणार नाही.\nआता लोकांना आनंद हवा असतो, पण नुसता हवा असणं पुरेसं नाही. तुम्हाला तुमच्या दु:खाच्या जाणिवेकडे बघावं लागेल. ती कशी निर्माण झाली- तुम्ही दु:खी कसे झालात- काय होतं तुमचं तंत्र कारण आनंद नैसर्गिक आहे- जर कोणी आनंदी असेल, तर काहीच कौशल्य नाही, त्यासाठी काहीच विशेष करावं लागत नाही.\nप्राणी आनंदी असतात, झाडं आनंदी असतात, पक्षी आनंदी असतात. मानव वगळला, तर संपूर्ण अस्तित्व आनंदी आहे. दु:ख निर्माण करण्याची हुशारी केवळ मानवातच आहे. हे कौशल्य कोणाकडेही नाही. म्हणूनच तुम्ही आनंदी असता, तेव्हा सगळं सोपं असतं, निष्पाप असतं; पण तुम्ही दु:खी असता, तेव्हा तुम्ही स्वत:सोबत काही तरी महान करता, तुम्ही खूप कठोर मेहनत घेत असता.\n(‘द लाँग, द शॉर्ट अॅण्ड द ऑल’ या लेखाचा सारांश/ओशो टाइम्स इंटरनॅशनल/सौजन्य ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन/ www.osho.com)\nभाषांतर – सायली परांजपे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-shivsena-and-youth-congress-rada-at-chembur-468677", "date_download": "2018-04-24T04:40:09Z", "digest": "sha1:47CJJQMZ334NMNMXARYATQRFQQR6A6WE", "length": 14983, "nlines": 144, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी", "raw_content": "\nमुंबई : शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी\nशिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा मुंबईतल्या चेंबुरमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. पोलिसांनी लावलेले बॅरिगेटिंग तोडून शिवसैनिकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी बाचाबाची केली.\nमहागाई विरोधात युवक काँग्रेसतर्फे चेंबुरमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे शिवसैनिकांनी पोलिसांनी लावलेली बँरिगेटींग तोडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची केली.\nया किरकोळ बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करुन गर्दी पांगवली. सध्या या परिसरात कार्यकर्ते असले तरी तणावपूर्ण शांतता आहे.\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\n712 : कोल्हापूर : 70 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज\nयोग माझा : अर्धचंद्रासनाचे शरीराला अनेक फायदे\nमुंबई : महिलेला धक्का लागला म्हणून लोकलखाली ढकललं\nमुंबई : वृक्षतोडीसंदर्भातील पालिका आयुक्तांचे विशेषाधिकार हायकोर्टाकडून रद्द\nठाणे : मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्ती लांबणीवर\nकल्याण, ठाणे : अवघ्या सहा दिवसाच्या मुलीची आईकडून हत्या\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातून नाट्यमयरित्या कैदी फरार, प्रकार सीसीटीव्हीत कैद\nस्पेशल रिपोर्ट : पिंपरी : वंशाचा दिवा नसल्याने 46 वर्षीय पुरुषाशी तरुणीचं लग्न\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\n712 : कोल्हापूर : 70 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज\nयोग माझा : अर्धचंद्रासनाचे शरीराला अनेक फायदे\nमुंबई : महिलेला धक्का लागला म्हणून लोकलखाली ढकललं\nमुंबई : वृक्षतोडीसंदर्भातील पालिका आयुक्तांचे विशेषाधिकार हायकोर्टाकडून रद्द\nठाणे : मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्ती लांबणीवर\nमुंबई : शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी\nमुंबई : शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी\nशिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा मुंबईतल्या चेंबुरमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. पोलिसांनी लावलेले बॅरिगेटिंग तोडून शिवसैनिकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी बाचाबाची केली.\nमहागाई विरोधात युवक काँग्रेसतर्फे चेंबुरमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे शिवसैनिकांनी पोलिसांनी लावलेली बँरिगेटींग तोडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची केली.\nया किरकोळ बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करुन गर्दी पांगवली. सध्या या परिसरात कार्यकर्ते असले तरी तणावपूर्ण शांतता आहे.\nलंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य\n712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी\n712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ\nपाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट\n712 : कोल्हापूर : 70 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज\nयोग माझा : अर्धचंद्रासनाचे शरीराला अनेक फायदे\nमुंबई : महिलेला धक्का लागला म्हणून लोकलखाली ढकललं\nKXIPvDD: आखिरी नहीं, इस ओवर में पलट गई दिल्ली की जीती हुई बाज़ी\nWATCH: अंतिम छह गेंदो पर जीतते-जीतते कैसे हार गई दिल्ली की टीम\nKXIPvDD: मुजीब की आखिरी गेंद पर खत्म हुआ श्रेयस का संघर्ष, दिल्ली को मिली 4 रनों से हार\nDD vs KXIP: घर में भी नहीं रुका दिल्ली के हार का क्रम, जीत के साथ पंजाब टॉप पर\nDD vs KXIP: दिल्ली की शानदार गेंदबाजी, 143 पर रुका किंग्स का कारवां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://marketaanimi.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-24T04:47:10Z", "digest": "sha1:T4ZUUABOWNO6IWLSBPXBFIQZRYHCTHUR", "length": 13110, "nlines": 131, "source_domain": "marketaanimi.com", "title": "तुमचे प्रश्न | Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nतुम्हाला मार्केटबद्दल जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्या इथे विचारा. मला जमेल तसं उत्तर द्यायचा प्रयत्न मी नक्की करेन. सगळ्या प्रश्नांना एक एक करून उत्तर देण्याऐवजी, मी प्रत्येक महिन्यात आलेले प्रश्न एकत्र करून उत्तर द्यायचं ठरवलंय. तुमच्या आणि इतरांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही ‘माझी उत्तरं‘ या पानावर अससेल्या लिंक क्लिक करून वाचू शकता. कोण सांगो तुम्हाला पडलेला प्रश्न अजून बऱ्याच जणांना पडला असेल.\nतुमचा प्रश्न अनुत्तरीत राहिल्यास मला जरूर कळवा. मी पुढच्या भागात उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन.\nकुठला ब्लोग पोस्ट वाचून हा प्रश्न पडला\nपिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Dec २०१४ | Stock Market आणि मी\nपिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Nov २०१४ | Stock Market आणि मी\nपिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Oct २०१४ | Stock Market आणि मी\nपिंगबॅक गुढीपाडवा सण मोठा नाही आनंदा तोटा… | Stock Market आणि मी\nतुम्ही ब्रोकरकडेच ‘DEMAT’ अकौंट उघडला पाहिजे असे नाही. कोणत्याही बँकेत जेथे ही सुविधा उपलब्ध असेल तेथे अकौंट उघडू शकता. ऑन -लाईन ट्रेडिंगच्या सुविधेचा फायदा घेवून ट्रेडिंग करू शकता. ICICI, HDFC, KOTAK MAHINDRA बँक, AXIS बँक यांच्या साईटवर जावून आपण ऑन- लाईन ट्रेडिंग विषयी नाहीती घेवू शकता .आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी यापैकी एखाद्या बँकेची शाखा असेल तर काही अडचण आल्यास संपर्क करणे सोपे जाईल.\nनमस्कार मॅडम मला शेअरहोल्डिंगमधील FII’s NRI’s, OCB’s, GDR, ADR यांची सविस्तर माहिती हवी आहे. कंपनीने मे 2016 मध्ये 80% Divident दिला म्हणजे एका शेअरला किती रुपये भेटतील.\nलाभांश मग तो फायनल असो किंवा अंतरिम असो तो शेअरच्या दर्शनी किंमतीचे पर्सेनटेज म्हणून जाहीर होतो. जर शेअर्सची दर्शनी किंमत Rs १ असली तर ८०% लाभांश म्हणजे Rs ०.८० ( ८० पैसे) प्रती शेअर होतो. आपल्या बाकीच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी भविष्यांत लेख ब्लॉगवर लिहिण्याचा विचार करता येईल\nमी माझ्या ब्लॉग नंबर ४९ ‘एक मार्केट समांतर ग्रे मार्केट’ असा लिहिला आहे तो वाचा\nGST नोंदणी फी असते \nGST नोंदणी फी KITI असते \nडिलिव्हरी साठी शेअर्स घेतले तर ते तुमच्या DEMAT अकौंटमध्ये जमा झाल्याची खात्री करून मगच ते तुम्ही विकू शकता.. समजा Rs १०० प्रती शेअर भावाचे १०० शेअर्स घेतलेत तर Rs १००० ला Rs ५ ब्रोकरेज पडत असेल तर खरेदीला Rs ५० आणी विक्रीसाठी Rs ५० किंवा त्याच्या आसपास ब्रोकरेज पडेल. इतर करा पोटी Rs ५० पकडा म्हणजेच प्रत्येक शेअरची एकूण खरेदी किंमत Rs १०१.५० पडेल. हेच शेअर्स जर तुम्ही Rs ११२ प्रती शेअर या भावाने विकलेत तर या व्यवहारामध्ये प्रती शेअर Rs १० प्रमाणे Rs १००० फायदा होईल\nब्लॉग हा त्या आठवड्यात घडणाऱ्या घटनांवर आधारलेला असतो. बोनस जाहीर झाला, हे ब्लोगमध्ये लिहिलेले असते, पण अशा प्रत्येक कॉर्पोरेट एक्शनचा उपयोग करून कोणकोणत्या पद्धतीचा ट्रेड करता येतो हे सांगितलेले नसते. थिअरीनुसार मार्केट कसे करावे ते पुस्तकात आहे आणी परिस्थिती बदलल्यानंतर हाव आणी भीती याला बाजूला सारून मार्केटमध्ये व्यवहार कसे करायचे हे ब्लॉगमध्ये सांगितलेले अस\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआठवड्याचे-समालोचन - सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा - १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८\nभाग 62 - शेअर मार्केट आणि ब्रेक्झीट\nतुमचे प्रश्न – माझी उत्तरं : July - September 2017\nआठवड्याचे-समालोचन – सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा – १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८\nआठवड्याचे समालोचन – शेअर मार्केट एक ‘अक्षय पात्र’ – ९ एप्रिल २०१८ ते १३ एप्रिल २०१८\nआठवड्याचे समालोचन – साप शिडीचा खेळ – २ एप्रिल २०१८ ते ६ एप्रिल २०१८\nलेखमाला – ‘माझी वाहिनी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chintandhara-news/loksatta-chintan-dhara-part-73-1663698/", "date_download": "2018-04-24T05:04:43Z", "digest": "sha1:XK6EGXYRMTVSNGS5V3S64J53NCPAE32P", "length": 17118, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Chintan Dhara Part 73 | | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nसाताऱ्याचे पेठेकाका यांनी असे प्रयोग सुचवणारं ‘वृत्त्यंतरप्रकाश’ हे मनोज्ञ पुस्तक लिहिलं आहे\nपरमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे, असं गोंदवलेकर महाराज म्हणत. अर्थात परमार्थ हा नुसता बोलण्यापुरता उरू नये, तो आचरणातच उतरला पाहिजे. आपण भारंभार वाचू शकतो, भारंभार ऐकू आणि त्याहून अधिक बोलू शकतो, पण तसं आचरण काही तीळमात्र साधत नाही तुकाराम महाराज सांगत ना तुकाराम महाराज सांगत ना ‘बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टिर कांपे ‘बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टिर कांपे’ पण जोवर परमार्थ हा आचरणात येत नाही, जगण्याचा भाग होत नाही, तोवर काही अर्थ नाही. त्यासाठी जो खऱ्या तळमळीनं परमार्थ करू पाहतो तो काही छोटे-मोठे प्रयोगही स्वयंस्फूर्तीनं करीत असतो. पण हे प्रयोग बरेचदा अहंभाव वाढवण्याचाही धोका असतो. म्हणजे कुणी कुणी ठरवतात की अमुक एक पारायण करीत जायचं, त्यावर चिंतन करीत जायचं. तर मग त्या चिंतनातून जे जे गवसू लागतं त्यानं केवळ शाब्दिक ज्ञानात, शाब्दिक आकलनात भर पडण्याचा धोका असतो. तशी भर पडली की आपल्याला इतरांपेक्षा अधिक काही समजू लागलं, असा भ्रम होण्याचाही धोका असतो. त्यामुळे परमार्थ जगण्यात उतरवण्यासाठीचा जो अभ्यास आहे, जे प्रयोग आहेत ते आपल्या वृत्तीत पालट घडवणारे असले पाहिजेत. त्याचा एक सोपा उपाय असा की, रोज रात्री झोपी जाण्यापूर्वी श्रीमहाराजांची प्रवचनं किंवा कुणाही सत्पुरुषाच्या बोधवचनाचं पुस्तक हाती घ्यावं. त्यातील कोणतंही पान उघडून जिथं नजर स्थिरावेल तो भाग वाचावा. त्या वाचनातून कृतीत आणण्यासारखा एखादा बोध सूत्ररूपानं गवसू शकतो. त्या विचाराचं सखोल चिंतन करत झोपी जावं. हा गवसलेला बोध उद्या आचरणात आणायचा आहे, या भावनेनं हे चिंतन व्हावं. मग दुसरा दिवस उजाडेल तो त्याच विचाराच्या सोबतीनं आणि मग दिवसभर त्या सूत्रानुसार आचरणाचा प्रामाणिक प्रयत्न केला तर त्या प्रमाणात आचरणात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू होते. जेव्हा असा अभ्यास सुरू होतो आणि त्याचा आपल्यावर परिणाम किती घडतो, आचरणात किती बदल होतो, याचं निरीक्षण करीत गेलं तरी आपण आपल्या स्वभावात, वर्तनात कितीतरी बदल घडवू शकतो, ही जाणीव होते. ती हुरूप वाढवणारी आणि अभ्यासाला बळ देणारी असते. तेव्हा ज्याला अध्यात्माच्या मार्गावर खरी वाटचाल करायची आहे त्याला असे प्रयोग करून पाहावेच लागतील. त्यातूनच आपली आपल्याला नव्यानं ओळख होईल. आपल्यातील चिकाटी, धैर्य, प्रामाणिकपणा यांची तपासणी करता येईल. त्यातून कुठं काय चुकतं आणि ते कसं सुधारावं, याचं भान वाढेल. साताऱ्याचे पेठेकाका यांनी असे प्रयोग सुचवणारं ‘वृत्त्यंतरप्रकाश’ हे मनोज्ञ पुस्तक लिहिलं आहे. त्यात वृत्तीपालटाला चालना देण्यासाठीचे १६ प्रयोग सूत्ररूपानं सुचविले आहेत. त्यांचं अगदी सखोल मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. मुळात असे प्रयोग करणं माणसाला आवडू शकतं आणि त्यात मूळ उपासना दुय्यम ठरण्याचा धोका असतो. कारण काहीतरी ‘करायला’ माणसाला आवडतं, काहीतरी ‘करण्यात’ जो आनंद मिळतो तो उपासनेत एका जागी शांत बसायचं असल्यानं मिळत नाही, अशी माणसाची भ्रामक समजूत असते. त्यामुळे असे काही प्रयोग करायला मन उत्सुक असू शकतं आणि त्यातून उपासनेकडे दुर्लक्ष होऊ शकतं. तर या प्रयोगांना उपासनेची जोड हवीच, त्या उपासनेशिवाय या प्रयोगांना बळ मिळणार नाही, असं पेठेकाकांनी ही सूत्रं मांडण्याआधीच स्पष्ट केलं आहे.\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marketaanimi.com/2016/04/22/%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2018-04-24T04:44:51Z", "digest": "sha1:ET5RUXS6PCZ4QA3WHHHXCO7DU5SLLHHW", "length": 25092, "nlines": 126, "source_domain": "marketaanimi.com", "title": "आठवड्याचे समालोचन – १८ एप्रिल ते २२ एप्रिल – SEE SAW वर शेअर मार्केट | Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nआठवड्याचे समालोचन – १८ एप्रिल ते २२ एप्रिल – SEE SAW वर शेअर मार्केट\nआधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nआपल्याला गोड जेवण जेवल्यावर जशी सुस्ती येते तसे काहीसे मार्केटचे झाले. निफ्टी ६८०० पासून ते ७९०० पर्यंत मार्केट वाढले. ज्यांनी काही दिवसापूर्वी शेअर्सच्या किंमती पाहिल्या असतील त्यांना शेअर्स महाग वाटू लागले. पण या महिन्यांत कंपन्यांचे वार्षिक निकाल लागतात. जर निकाल चांगले आले तर रीरेटिंग होण्याची शक्यता निर्माण होईल आणी येथूनही मार्केट वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना याची चाहूल लागली आहे असे म्हणता येईल. त्यामुळे तेजी मंदीच्या SEE-SAW वर मार्केट खेळतंय असं वाटतय.\nदोहा येथे जी ओपेकची (ओईल प्रोड्युसिंग कंट्रीज) मीटिंग झाली तिच्यांत क्रूडचे उत्पादन गोठवण्यावर कोणताही निर्णय झाला नाही. इराणने या मीटिंगमध्ये भाग घेतला नाही. त्यामुळे क्रुडचा भाव वाढायला वेळ लागेल.\nECB ने (युरोपिअन सेन्ट्रल बँक) आपल्या व्याज दरांत कोणताही बदल केला नाही. डीपॉझीट रेट -०.४ % आणी लेंडिंग रेट ०.२५ % कायम ठेवला.\nचीनने मार्च २०१६ पर्यंत १२० मिलियन टन स्टील निर्यात केले. यामुळे इतर देशातील (यांत भारत, USA, UK हे देशही आले) स्टील उद्योगाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. परंतु चीन आपले स्टीलचे उत्पादन आणी निर्यात कमी करण्यास तयार नाही. त्यामुळे आता बहुतेक देश आपला स्टील उद्योग वाचवण्यासाठी स्टील आयातीवर ड्युटी लावण्याची शक्यता आहे. प्रत्येक देश स्टील आयातीवर antidumping ड्युटी लावत आहे आणी आपला स्टील उद्योग वाचवण्यासाठी इतर उपाय करत आहे.\nUK सरकारने टाटा स्टीलच्या UK बिझीनेसमधील २५% स्टेक घेण्याची तयारी दाखवली आहे. तसेच कर्जातही सूट देण्याची तयारी दाखवली आहे. टाटाने आपला लॉंग प्रॉडकट बिझीनेस ग्रे बुल कॅपिटलला विकला आहे. त्यांच्या पोर्ट टोलबॉट येथील बिझीनेस विकत घेण्यांत लिबर्टी हाऊस आणी टोलबॉटच्या व्यवस्थापनाने स्वारस्य दाखवले आहे.\nएपिक सिस्टीम या US मधील अमेरिकन कंपनीने अमेरिकन कोर्टांत दाखल केलेल्या केसमध्ये टी सी एस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीला कोर्टाने US$ ९४० मिलियन दंड ठोठावला आहे.टी सी एस ने जाहीर केले आहे की याबाबतीत ते योग्य ती कार्यवाही करतील.\nमेथीलीन क्लोराईड या केमिकलच्या बाबतीत सरकार ANTIDUMPING ड्युटी लावण्याच्या विचारात आहे. यामुळे S H केळकर, गुजराथ फ्लुरो, गुजरात अल्कली या कंपन्यांना फायदा होईल.\nतसेच सरकार कोल्ड रोल्ड स्टीलवरही antidumping ड्युटी लावण्याच्या विचारांत आहे.\nजेम्स and जुवेलरी बिझीनेससाठी ड्युटीफ्री सोने उपलब्ध करून दिले जाईल असे सरकारने जाहीर केले.\nDOT ने रिलायंस जियो आणी आर कॉम या कंपन्यांना ९ सर्कल मध्ये स्पेक्ट्रम शेअरिंगसाठी मंजुरी दिली.\nभारताचा WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) सतत १७ व्या महिन्यांत कमी झाला. WPI मे २०१६ मध्ये -२.३३% होता. स्वस्त क्रूड आणी उत्पादित वस्तूंच्या किमतीमधील घट हे दर्शवितात की मागणी कमी झालेली आहे.\nCPI मार्च मध्ये ४.८३% (फेब्रुआरी ५.१८%) झाला. याचा अर्थ महागाई कमी होत आहे. निर्यात सतत कमी होत आहे.\nरिझर्व बँक ऑफ इंडिया, सेबी, आणी इतर प्रशासनिक संस्था\nRBI ने १५० कर्जफेड करण्याऱ्या कंपन्यांचा परामर्ष घेण्याचे ठरवले आहे. या कंपन्यांना दिलेल्या कर्जांवर RBIने प्रोविजन करावयास सांगितली होती. या कंपन्यांना कर्ज दिलेल्या बँकांनी असे सांगितले आहे की अलीकडच्या काळांत या कंपन्याची आर्थिक स्थिती सुधारत आहे. आणी या कंपन्या कर्जफेड करीत आहेत. त्यामुळे या कंपन्यांना दिलेल्या कर्जावर प्रोविजन करण्यांत RBI सूट देण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा फायदा जे पी अस्सोसिंएट ग्रूप आणी त्यांना कर्ज देणार्या बँकांना होईल. या RBI च्या निर्णयामुळे बँकांच्या शेअर्स मध्ये वाढ झाली.\nRBI ने पंजाब राज्याला दिलेल्या फूड क्रेडीटसाठी बँकांच्या कॉन्सोर्शीयमला प्रोविजन करायला सांगितली.या कर्जाला आवश्यक असणारी धान्याच्या साठ्यांची सिक्युरिटी पंजाब सरकारच्या गोदामांत उपलब्ध नव्हती. यामुळे बँकांनी यापुढे आम्ही पंजाबच्या राज्य सरकारला धान्य खरेदी करण्यासाठी कर्ज देणार नाही असा निर्णय घेतला.\nभारती एअरटेल ही कंपनी त्यांच्या भारती इन्फ्राटेलमधील ५% स्टेक विकून आपले कर्ज कमी करणार आहे या विक्रीमधून Rs ३७०० कोटी मिळतील.\nसुप्राजीत आणी फिनिक्स यांचे मर्जर झाले. सुप्राजीतच्या ४ शेअर्सला फिनिक्सचे ५ शेअर्स मिळतील.\n२१ ते २३ मार्च या काळांत USFDA ने अलेम्बिक फार्माच्या तालुका प्लांटची तपासणी केली. त्यांत फार्मुलेशन युनिटमध्ये ४ त्रुटी आढळल्या.\nकंटेनर कॉर्पोरेशन ने PSP लायसेन्स खरेदी केले. त्यामुळे आता कंटेनर बरोबर बल्क गुडस्चे HANDLING करू शकतील.\nविप्रोचा वार्षिक निकाल निराशाजनक आला. तसेच त्यांनी २०१७च्या पहिल्या तिमाहीसाठी निराशाजनक गायडंस दिला. याचा परिणाम शेअरच्या किमतीवर दिसला. विप्रोने जाहीर केले की ते Rs ६२५ प्रती शेअर या भावापर्यंत Rs २५०० कोटी शेअर्स buyback साठी वापरतील. तसेच Rs १ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.\nइन्फोसिसचा वार्षिक निकाल चांगला लागला. कंपनीने २०१७-२०१८ साठी चांगला गायडंस दिला. कंपनीने Rs १४.२५ लाभांश जाहीर केला.\nTCS या कंपनीचे बर्याच कालावधीनंतर वार्षिक निकाल चांगले आले. त्यांनी २०१७-१८ साठी चांगला गायडंस दिला. कंपनीने Rs २७ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.\nLIC हौसिंग फायनान्स, गृह फायनांस, इंडस इंड बँक, यांचे वार्षिक निकाल चांगले आले.\nहिंदुस्थान झिंक या कंपनीचा वार्षिक निकाल ठीक होता.\nHDFC बँकेचा वार्षिक निकाल चांगला आला. profit Rs ३३७० कोटी झाले NPA ची पोझिशन स्थिर राहिली. कंपनीने Rs ९.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.\nया आठवड्यांत इक्वीटास होल्डिंग्स या कंपनीचे चांगले लिस्टिंग झाले. IPOमध्ये Rs ११० दिलेल्या शेअरचे Rs १४५ ला लिस्टिंग झाले. गुंतवणूकदारांना चांगला लिस्टिंग गेन झाला.\nTHYROCARE TECHNOLOGIES ही कंपनी आपला IPO एप्रिल २७ ते एप्रिल २९ या काळांत आणत आहे.प्राईस band Rs ४२० ते Rs ४४६ आहे. ही कंपनी Rs ४४९ कोटी ते ४७७ कोटी उभारत आहे. ही हेल्थकेअर क्षेत्रातील कर्जमुक्त कंपनी आहे. ही कंपनी WATER टेस्टिंग, IMAGING CENTRES या दोन नव्या कॅनसर डायाग्नोस्टिक क्षेत्रांत प्रवेश करीत आहे कंपनीचे यश नवनवीन प्रादेशिक lab उघडण्यावर, तसेच निरनिराळ्या प्रकारच्या टेस्ट्स डेव्हलप करण्यावर आणी लार्जस्केल इकोनोमीज मिळण्यावर अवलंबून आहे. कंपनीचे मॉडेल DR लाल पाथ lab वर आधारीत आहे.\nपुढील आठवड्यांत उज्जीवन या मायक्रो फायनांस क्षेत्रातील कंपनीचा ipo येत आहे. कंपनीचा IPO २८ एप्रिलला उघडून २ मेला बंद होईल. प्राईस band Rs २०७ ते Rs २१० आहे. ipo द्वारा ही कंपनी Rs ८५० कोटी उभारेल. या कंपनीला small फायनांस बँकेचे लायसेंस मिळाले आहे. या कंपनीच्या २४ राज्यांत आणी केंद्रशासित प्रदेशांत ४७० शाखा आहेत. ही कंपनी ग्रूप कर्ज, मायक्रो आणी SMALL उद्योगांना कर्ज तसेच घरांसाठी कर्ज ही कंपनी देते.\nभारती इन्फ्राटेल या कंपनीची लाभांश तसेच BUYBACK वर निर्णय घेण्यासाठी २६ एप्रिल २०१६ ला कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.\nया आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं\nआतापर्यंत आलेले निकाल अपेक्षेपेशा चांगले आले. त्यातून पुढील आठवडा एक्स्पायरीचा आहे. भारताची आर्थिक स्थिती सुधारते आहे. त्यामुळे कल तेजीचा दिसतो आहे. मार्केट पडल्यानंतर खरेदी होते आहे. निराशेचे सावट दूर झाले आहे. पण सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे निफ्टीमध्ये १००० अंकांची वाढ झाली. येथून जर मार्केट पडले तर चढ्या भावाचे शेअर्स आपल्याजवळ राहतील अशी भीती आहे. अदलाबदल किंवा चर्नींग चालू आहे. त्यामुळे काही काळ मार्केट मंदीत राहिले तर लगेच मार्केट तेजीत येते. लहान मुले जशी एका लांब फळीवर बसून पाय जमिनीला टेकवून वर खाली झुलत राहतात तशी स्थिती मार्केट्ची आहे. मार्केटला एक माणूस समजून मनुष्यस्वभावाप्रमाणे मार्केटच्या व्यवहाराचे निरीक्षण केल्यास व्यवहार छान समजतात आणी मजाही येते. शेअरमार्केट आपल्या आयुष्याचा एक भाग बनते.\nसेन्सेक्स २५८३८ वर आणी निफ्टी ७९०० वर बंद झाले.\nमी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.\n← आठवड्याचे समालोचन – ११ एप्रिल ते १६ एप्रिल – ये रे ये रे पावसा, दे मला पैसा आठवड्याचे समालोचन – २५ एप्रिल ते २९ एप्रिल – पास/नापास →\n2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – १८ एप्रिल ते २२ एप्रिल – SEE SAW वर शेअर मार्केट”\nपिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २५ एप्रिल ते २९ एप्रिल – पास/नापास | Stock Market आणि मी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआठवड्याचे-समालोचन - सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा - १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८\nभाग 62 - शेअर मार्केट आणि ब्रेक्झीट\nतुमचे प्रश्न – माझी उत्तरं : July - September 2017\nआठवड्याचे-समालोचन – सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा – १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८\nआठवड्याचे समालोचन – शेअर मार्केट एक ‘अक्षय पात्र’ – ९ एप्रिल २०१८ ते १३ एप्रिल २०१८\nआठवड्याचे समालोचन – साप शिडीचा खेळ – २ एप्रिल २०१८ ते ६ एप्रिल २०१८\nलेखमाला – ‘माझी वाहिनी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE,_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE_%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-04-24T04:55:29Z", "digest": "sha1:ATYKOAR4AQZ5YMOZQZGF7RDSKX6USTQU", "length": 4423, "nlines": 60, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "अय्या, त्रिविक्रम दत्ताराम - विकिपीडिया", "raw_content": "\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nअय्या, त्रिविक्रम दत्तारामः (जल्मः 23 मार्च 1937, बेलवाडो- पैंगीण-काणकोण)[बदल]\nगोंयचो सुचके झुजारी.ताणें मराठींतल्यान माध्यमिक मेरेन शिक्षम घेतलां. नॅशनल काँग्रेस गोंय हें संघचनेचो तो वांगडी आशिल्लो. 26 जानेवारी 1955 ह्या दिसा गोविंद नारायण प्रभुदेसाय हाच्या फुडारपणाखाल ताणें सत्याग्रहांत वांटो घेतिल्लो. तेन्ना पोलिसांनी ताका धरलो. उपरांत प्रादेशीक लश्करी दंडाधिकाऱ्या मुखार ताची चवकशी जावन ताका चार वर्सां बंदखणीची खर ख्यास्त फर्मायली. तशेंच दर दिसा 30 इस्कूद ह्या प्रमाण दोन वर्सां दंड भरूंक लायलो वा दंडभरपाये बदला दोन वर्सां बंदखणीची ख्यास्त दिली. 31 डिसेंबर 1954 ह्या दिसा ताची बंदखणीतल्यान सुटका जाली. 1972 भारत सरकारान ताम्रपत्र दिवन सुटके झुजांतल्यान ताच्या वावराचो भोवमान केला.\ntitle=अय्या,_त्रिविक्रम_दत्ताराम&oldid=162052\" चे कडल्यान परतून मेळयलें\n गोयेकार - फामाध व प्रसिद\nखंयचेंय आदलें मदलें पान\nहें पान उधृत करात\nह्या पानांत निमाणो बदल,3 ऑगस्ट 2016 वेर 05:30 वेळार केल्लो\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/saurabh-rao-new-municipal-commissioner-of-pune-and-naval-kishor-ram-appointed-as-a-district-collector-1663983/", "date_download": "2018-04-24T04:47:28Z", "digest": "sha1:UMLMZVYOOFN2SBCBAJPC7RANHP3NXVQO", "length": 14825, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "saurabh rao new municipal commissioner of pune and naval kishor ram appointed as a district collector | पुण्याच्या महापालिका आयुक्तपदी सौरभ राव तर जिल्हाधिकारीपदी नवलकिशोर राम | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपुण्याच्या महापालिका आयुक्तपदी सौरभ राव तर जिल्हाधिकारीपदी नवल किशोर राम\nपुण्याच्या महापालिका आयुक्तपदी सौरभ राव तर जिल्हाधिकारीपदी नवल किशोर राम\nराहुल द्विवेदी हे अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी असतील. तर नगरचे विद्यमान जिल्हाधिकारी अभय महाजन यांची मुंबई येथे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात बदली झाली आहे.\nपुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली असून औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे.\nपुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली असून औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे.\nपुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांचा साडेतीन वर्षांचा कालावधी झाल्याने मागील महिन्यात त्यांची बदली झाली होती. त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार शासन आदेशानुसार दहा दिवसांपूर्वी सोडल्याने त्यांच्या जागी कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापदावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांचीच नियुक्ती केली जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. सौरभ राव यांना जिल्ह्यासह महापालिकेचे कामकाज आणि शहराच्या प्रश्नांविषयी माहिती असल्याने राज्यशासनाकडून त्यांची नियुक्ती होईल असे बोलले जात होते. सौरभ राव यांची नियुक्ती सत्ताधारी भाजपला फायदेशीर ठरणार आहे. त्यांच्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकाळात पुरंदर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. महापालिका क्षेत्रातील कामेही गतीने पूर्ण होतील, असे बोलले जात आहे.\nदरम्यान, औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्यात काही अधिकाऱ्यांचीही बदली झाली आहे. त्यामध्ये राहुल द्विवेदी हे अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी असतील. तर नगरचे विद्यमान जिल्हाधिकारी अभय महाजन यांची मुंबई येथे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात बदली झाली आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nनाणार प्रकल्प विदर्भात आणा: भाजपा आमदाराची मागणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1618", "date_download": "2018-04-24T04:43:34Z", "digest": "sha1:EBQ5GJKZZARXKYJ47EWAYGW6P4RWK2TF", "length": 42060, "nlines": 255, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गुगल आणि मराठी भाषांतर | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगुगल आणि मराठी भाषांतर\nगुगलवर आता हिंदी भाषेत भाषांतर होउ शकते, पण मराठीत नाही\nदेवनागरीच असली तरी नाही\nपण इतर भाषातही लवकरच होईल असे म्हंटले आहे.\nया दुव्यावर पाहिले असता,\nआप अनुवाद के लिए अतिरिक्त भाषाओं को समर्थन कब देंगे\nअसा प्रश्न दिसला. त्याचे उत्तर खालील प्रमाणे;\nहम दूसरी भाषाओं को समर्थन देने के लिए कार्य कर रहे हैं और जैसे ही स्वचालित अनुवाद हमारे मानकों पर खरा उतरेगा, हम उन्हें प्रस्तुत कर देंगे. यह कहना कठिन है कि इसमें कितना समय लगेगा, क्योंकि समस्या जटिल है और हर भाषा खुद अपनी खास चुनौतियाँ प्रस्तुत करती है.\nनए सिस्टम विकसित करने के लिए, हमें भारी मात्रा में द्विभाषी पाठों की आवश्यकता है. अगर आपके पास भारी मात्रा में ऐसे द्विभाषी पाठ हैं जिसका आप योगदान करना चाहते हैं, तो कृपया हमें बताएँ.\nमग, आता आपण मराठी माणसांनीच यांना मदत केली पहिजे असे वाटले.\nत्या मदती साठी आपले नाव नोंदवा\nमध्ये जाऊन मराठी भाषेसाठी विचारणा करा आणि भाषांतर तसेच मराठीच्या इतर मदतीसाठी आपली इच्छा आहे असे लिहा.\nपुणे विद्यापीठाचा (व इतरही )मराठी विभाग झक मारत बसला आहे का अशी शंका मनात आल्याशिवाय राहिली नाही\nअहो गुंडोपंत, गुगलला खरी इच्छा असेल् तर् ४-५ मराठी माणसांना नोकर्‍या देणं सहज शक्य आहे. ते हा खटाटोप् करत् नाहीत कारण् अजून् मराठीसाठी काम करून् नफा मिळेल याची त्याना खात्री नाही.\nआपणच काही केले तर काही घडेल ना\nनफ्याचे नंतर पाहता येईल, पण अनेक मराठी ब्लॉग्स वर आज गुगलच्या ऍड्स् दिसतातच ना\nआज एक गुगल सारखी संस्था इतर भाषात भाषांतराची सुवीधा देते आहे. हे सगळे फुकट आहे. हीच सुवीधा मराठीतही देवू शकेल अशी आशा आहे.\nमग आपण कमीत कमी आपण मराठीसाठी काम करायला तयार आहोत अशी इच्छा तर दाखवू या...\nमागितले तर मिळेल ना...\nदे रे हरी खाटल्या वरी करत बसलो तर उपाशीच मरू...\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [29 Jan 2009 रोजी 02:15 वा.]\nआपण कमीत कमी आपण मराठीसाठी काम करायला तयार आहोत अशी इच्छा तर दाखवू या...\nआपणच काही केले तर काही घडेल ना\nहो याच्याशी मी सहमत् आहे. पण् ते करण्याबाबत् तुम्ही जे सुचवले आहे त्याच्याशी नाही.\nखाली शंतनू यांचा \"जी.पी.एल. लायसन्स\" हा प्रतिसाद पहा. गुगलला फु़कट् मदत् करण्याऐवजी मराठीत् मुक्तस्रोतप्रणालीसाठी जे जे काही प्रयत्न् चालू आहे त्यांना मदत (वेळेची, प्रचाराची, पैश्याची - जी जमेल ती) करावी अशा मताचा मी आहे. गुगलनेही अनेक् प्रकल्प् मुक्तस्रोत म्हणून् घोषीत् केले आहे त्यानाही मदत् करण्यास हरकत् नाही.\nगुंड्याभाऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे फीडब्याक दिला आहे. बघू काय होते ते. मराठी विभागच कशाला आम्ही सगळेच झोपलो आहोत :)\nआशा आहे, झोपेतून जागे होवू या\nपुणे विद्यापीठाचा काय संबंध\nयात पुणे विद्यापीठाचा झक मारण्याचा कसा संबंध लागतो हे गुंडोपंत यांनी माझ्यासाठी स्पष्ट करुन सांगावे अशी विनंती आहे.\nआपल्या मराठी विकीपीडियावर मराठी लेख किती आहेत आणि असलेले कशा दर्जाचे आहेत हे इथल्या जवळजवळ सर्वच लोकांना माहित आहे. इंग्रजी विकीवरचे लेख (माझ्यामते) सर्वसामान्य लोक लिहतात.(केंब्रिज/आक्सफर्ड मधले झंटलमन आणि मडमा लिहीतही असतील. नाही असे नाही) तर आता या चर्चाप्रस्तावाशी संबंधित आहे की माहित नाही पण माझा असा प्रश्न आहे की मराठी माणसं कुठे गरदडली आहेत/झक मारत बसली आहेत\nयात पुणे विद्यापीठाचा झक मारण्याचा कसा संबंध लागतो हे गुंडोपंत यांनी माझ्यासाठी स्पष्ट करुन सांगावे अशी विनंती आहे.\nसांगतो ना, अगदी सु-स्पष्ट करुन सांगतो.\nअहो, झक मारण्याचाच नाही, अजून जे काय मारता येईल ते मारण्याची वेळ आली आहे या मराठीच्या विभागांची.\nकारण मराठी भाषेची प्रगती होईल असे पाहणे, हे विद्यापीठांचे काम आहे. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांनी भाषेसाठी करून घ्यायचा आहे. त्यासाठी गुगल ला त्यांचे नाव चटकन सूचायला हवे आहे. - गुगललाच कशाला, मलाही मराठीची कोणतीही मदत लागली तर विद्यापीठाच्या संकेत स्थळावरच जावेसे वाटले पाहिजे.\nकारण नवीन तंत्रज्ञान व त्याचा उपयोग करून मराठी भाषेला काही मदत करणं हे यांचे काम आहे. आपण जे काही कर सरकार ला देतो त्यातला पैसा वापरून कुलगुरु त्यांच्या वातानुकुल हपीसात टैम्स आफ इंड्या वाचत बसतात. जमेल तसे कुणाला वर आणायचे आणि कुणाला खाली दाबायचे याचे राजकारण करतात.\nमग त्यांनी काय करायचे आहे\nकुलगुरूंनी खरी दिशा द्यायची आहे विद्यापीठाला.\nकुलगुरूंनी विद्यापीठाचे कार्य दूरदर्शीपणे हाताळायचे आहे.\nकुलगुरूंनी आपल्या विद्यापीठाचा रिसर्च जागतिक कसा होईल, हे पाहायचे आहे.\n* आपले विद्यापीठ जागतिक स्पर्धेत कुठे आहे आजमावायचे आहे. त्या स्पर्धेत आपण सर्वात पुढे असुन आपला ठसा उमटेल हे पाहायचे आहे.\n*सर्व कुलगुरूंनी इ.स. २०२० मध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठे कमीत कमी २०% जागतिक विद्यार्थी पैसे भरून शिकायला येतील अशी वेळ आणायची आहे.\nत्यासाठी धोरणीपणे निर्णय घ्यायचे आहेत. जगाला बदलत्या परिस्थितीत पुढे कोणते अभ्यासक्रम योग्य ठरतील हे पाहून ते आखुन घ्यायचे आहेत. ते आधुनिक कसे राहतील हे पाहायचे आहे.\nते अभ्यासक्रम सर्वोत्कृष्ठ दर्जानेच चालतील/चालवले जातील याची ऑडिट यंत्रणा उभारायची आहे.\nइतर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी संधान साधायचे आहे. त्यांचे विद्यार्थी आपल्या कडे मराठी शिकायला येतील हे पाहायचे आहे. त्यासाठी मराठीतले काम व त्याचा उपयोग याचा जागतिक प्रचार करायचा आहे. किती चीनी, जपानी, कोरियन, मलेशियन विद्यापीठांशी आपल्या विद्यापीठांचे उत्तम संबंध आहेत\nआज एक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी किमान ५ लाख रुपये फी देतो. विद्यापीठात दर वर्षी ६०,००० आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आले तर किती पैसा वाहील\n* त्या पैशातून अजून सुवीधा आणि मराठी समाजाला/भाषेला पुढे काय उपयुक्त राहील यांची साद घायची आहे. ते धोरण कसे पुर्ण करायचे हे पाहायचे आहे. शासनाला त्यांच्या उच्च शिक्षण धोरणात आपल्या बाजूला वळवायचे आहे.\n साधे महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ कसे असावे, अजून ५ वर्षांनी कसे असले पाहिजे, याचा एक प्रोजेक्टही विद्यापीठाकडे नाही. ते तर लांबचे झाले, पुणे विद्यापीठाची साईट पाहा आणि इतर कोणत्याही आंतरराष्त्रीय विद्यापीठाची साईत पाहा - लगेच जाणवेल झक का व कशी मारते आहे ते - इतर विद्यापीठांचे नावही नको - ते अजून झोपेतच आहेत - इतर विद्यापीठांचे नावही नको - ते अजून झोपेतच आहेत\nयातले काही दूरवर तरी घडतांना दिसते आहे का\nउरले मराठी चे विभाग आणि त्यांचे प्रमुख- यांनी तर जीवच द्यावा चमचाभर पाण्यात.\nकोणत्या विद्यापीठाच्या मराठी विभागाने आजवर मराठी भाषेच्या संगणकीकरणात आपला हातभार लावला आहे\n* किती डॉक्टरेट चे रिसर्च थेसिस मराठी भाषा आणि संगणकीकरण यावर आले आहेत युनिकोड व मराठी भाषा यावर कधी काम केले पाहिजे, हा साधा विचारही आला नाही.\nकिती प्राध्यापकांना मराठी संकेतस्थळे माहिती आहेत हा फार मोठा प्रश्न आहे. - ज्यांना आजचे मराठी भाषेचे स्वरूपच काही माहिती नाही ते उद्याचे भविष्याच्या काय योजना बनवणार\n* गेल्या ५ वर्षात मराठी भाषेच्या संदर्भात किती रिसर्च पेपर्स आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहेत\n* मराठी भाषा व इतर भाषांचे आक्रमण कसे थोपवता येईल आणि सहकार्य कसे वाढीस लागेल यावर काय काम झाले आहे\n* मराठी इतर भाषिकांना सुलभतेने शिकता यावी यासाठी किती विभांगांनी काय प्रयत्न केले आहेत हे त्यांचे काम नाही का\n* मराठीच्या चांगल्या प्रसिद्धीसाठी मराठी विभागांनी काय धोरण राबवले आहे\n* इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांना भाषिक गोडी लावण्यासाठी काय करता येईल ही पाहिले का कधी - आजवर जे काही मराठी भाषेच्या संगणक प्रगति विषयक घडले आहे, त्यात संगणक शाखेच्या विद्यार्थ्यांचाच सहभाग आहे ही गोष्ट जाहिर आहे. त्याचा योग्य उपयोग नको करून घ्यायला\n* मराठी शाळांचे भविष्य सुखरूप कसे राहील यावर काही काम - (कसे करणार यांचीच मुले सेंट झेवियर्स ला शिकतात हो\n* पुणे, शिवाजी, उत्तर महाराष्ट्र आणि दिल्ली या विद्यापीठांतील मराठी विभागांचे, पुढील १० वर्षात मराठीसाठी काय करणार याचे काही धोरण तरी जागेवर आहे का\nवरील सर्व मुद्द्यांवर काम करणे हे या मंडळींचे कर्तव्य नाही का\nसरकार आणि पर्यायाने आपणही त्यांना विभागिय राजकारण करण्यसाठी पैसा पुरवतो का\nजर जे आवश्यक आहे ते कामच करत नाहीत तर कशाला हवेत ही लोकं समाजाला\nअसे ते दिव्य एचओडी, प्राध्यापक आणि त्यांचे संत साहित्या वरचे थेसिस - इंद्रायणीत बुडा आणि बुडवा त्यांना\nआता मला सांगा, यातले काही घडते आहे का नाही काहीच दिसत नाही, कधे ऐकलेही नाही\n कारण आम्ही झक मारतो आहोत\nपंत, म्हणने पटते राव \nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [29 Jan 2009 रोजी 09:32 वा.]\nआमच्या विद्यापीठात नुकतेच तसे प्रयत्न सुरु झाले आहेत. प्राचीन साहित्य स्कॅन करुन सेव्ह केले आहे. मात्र ऑनलाइन वाचकांना ते वाचायला मिळाले पाहिजेत. त्याबाबतीत मात्र उदासिनता आहेच.मराठी विषयाचे प्रबंध युनिकोडमधे असावेत हा मुद्दा मला वयक्तिक पटतो.\nकिती प्राध्यापकांना मराठी संकेतस्थळे माहिती आहेत हा फार मोठा प्रश्न आहे. - ज्यांना आजचे मराठी भाषेचे स्वरूपच काही माहिती नाही ते उद्याचे भविष्याच्या काय योजना बनवणार\nआमच्या अख्ख्या औरंगाबाद जिल्ह्यात आम्ही एकमेव प्राध्यापक असू की, जे मराठी संस्थळावर (वाचन करीत)पडलेले असतात :)\nबाकीचे फक्त इंटरनेटवर लै माहिती मिळते, या निमित्ताने कधी तरी जालावर भटकत असतील असे वाटते, तेही अपवादाने आणि कामाच्या निमित्ताने \nबाकी राहिलेले मुद्यांचे समर्थन / विरोध सायंकाळी निवांत करीन \nपंत, तुम्ही विद्यापीठाने काय करायला हवे हे इतरच बरेचसे सांगितले आहे. पण प्रश्न गुगल भाषांतराचा आहे. यातही विद्यापीठाने काही केले तर चांगलेच आहे. पण तुम्ही तडकाफडकी विद्यापीठ, त्यातही मराठी विभाग शिवाय झक मारत बसणे इ. निष्कर्ष कसे काढले यासाठी मी स्पष्टीकरण मागितले होते.\nविद्यापीठाला दोष देऊन काय उपयोग कदाचित विद्यापीठाने याकामी एखादी समिती नेमावी, मग सदस्यांनी काम करुन मराठी भाषांतर सुविधा मिळवून द्यावी असे तुम्हाला वाटत असावे.\nअशी भाषांतराची सुविधा हवी असेल तर जास्तीत जास्त मराठी लोकांनाच काहीतरी करावे लागणार आहे. उगाच विद्यापीठ, महाराष्ट्र सरकारची वाट बघत बसल्यावर मग संपलेच सगळे\nमराठी विकिवर २२००० लेख आहेत\nमराठी विकिवर २२०००+ लेख आहेत.\nयासोबतच आता आपला विकि ५७व्या स्थानावर पोचला आहे हे ही लक्षात घ्या\nही संख्या अगदी वाईट नाही.\nगुंडोपंतांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिसाद दिला आहे. पाहू काय होते ते.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nगुंडोपंतांनी म्हटल्याप्रमाणे प्रतिक्रिया दिली आहे\nआयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे\nप्रतिसाद दिला आहे. पण मला वाटते प्रतिसाद हजारोंच्या संख्येत पोहचले तर् कार्यवाही होऊ शकेल.\nहो अगदी बरोबर आहे. पण जास्त विचारणा व्हाव्यात या साठी काय करता येईल\nगमभनकार ओंकार याने गमभनची शुद्धलेखन सुविधा सुरु करण्याबाबत मदतीची अपेक्षा केली असता त्याला शब्द देऊन गेल्या वर्षभरात एकाही नव्या शब्दाची भर घातलेली नसली तरी त्याच प्रकल्पात अद्यापही गुंतलेली आहे.() ;-) इथे मदत करण्याची इच्छा असली तरी ते झेपणे अवघड वाटते.\nमागणी नोंदवणे महत्त्वाचे आहे\nअगदी मदत नाही केली तरी येथे मागणी नोंदवणे महत्त्वाचे आहे ताई...\nतेंव्हा नाव नोंदवा हो\nअगदी मदत नाही केली तरी येथे मागणी नोंदवणे महत्त्वाचे आहे ताई...\nमराठी विकिवर बरेच चांगले लेख आहेत. काही दुवे देते, जरूर वाचा.\nमराठी विकिवर चांगले लेख यावेत यासाठी तुम्हीही प्रयत्न करा.\nमी पण प्रतिसाद दिला\nगुगलच्या साईटवर जाऊन मी पण मराठी भाषांतराबद्दल विचारणा केली आहे आणि मदतीचा प्रतिसाद दिला आहे. बघूया पुढे काय होते ते. आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत हेच खरे.\nबाकी पुणे विद्यापीठाने काय करायला हवे याबद्दलचे गुंडोपंतांचे विचार अतिशय मार्गदर्शक आहेत. मात्र हे विचार योग्य त्या संस्थांजवळ / व्यक्तींजवळ पोहोचले पाहिजेत तरच त्यांच्या अंमलबजावणीची शक्यता निर्माण होईल.\nकाही माहिती द्या ना.\nकुणाला आणि कसे पाठवू या\nतुम्ही लोकसत्ता अथवा सकाळ पेपर ला देवू शकता का हे\n(म्हणजे योग्य ते संपादन करून हो\nराज्य मराठी विकास संस्था\nथोडेफार काम राज्य मराठी विकास संस्था\nकरते आहे. पण ते इतके धीमेपणाने चालले आहे की विचारता सोय नाही.\nतरी अशी संस्था आहे आणि ती काही तरी काम करते आहे हेच दिलासादायक वाटते.\nसंस्थेच्या स्थळावर पुस्तकसूची अप्रतिम आहे.\nइतिहासाच्या अभ्यासकांना हा खजिनाच वाटेल.\nअसो, गुगल ला यांची आठवण यायला हरकत नव्हती.\nतसेच संस्थेकडे स्वयंसेवक म्हणून काम करण्याचीही सोय असायला हवी असे वाटले.\nही माहिती येथे दिल्याबद्दल धन्यवाद, पंत. वरील दुव्यावर जाऊन मदतीसाठी नावनोंदणी आणि मराठीसाठी विचारणा केली आहे.\nगुगलला सहकार्य करण्यात काहीच गैर नाही. पण शेवटी गुगल ही देखील शेअरहोल्डर्सची मालकी असलेली एक कंपनी आहे आणि त्यांच्याकडे असलेल्या विदागाराचा सोर्स ते कधिही ओपन करणार नाहीत ही त्यातली मेख लक्षात घेतली पाहिजे. गुगलच्या मानाने ओंकार जोशी अथवा त्याच्यासारख्या इतरांचे प्रयत्न नगण्य म्हणता येतील. पण ओंकार करीत असलेली निर्मिती ही LGPL License खाली वितरीत होते आणि गुगल तसे करीत नाही हा मुलभूत फरक भविष्यात निर्णायक ठरेल. ओंकारचे सोफ्टवेअर / विदागार मला हवे तसे वापरता येते, संगणकावर, वेबवर कसेही जोडता येते, त्यात हवा तसा बदल करून फुकट वापरण्याचा कायदेशीर परवाना मला मिळतो, हे पाहिल्यावर मी अशा गोष्टीसाठी वर्षानुवर्षे थांबण्यास तयार आहे.\n'राव गेले पंत आले' या न्यायाने मायक्रोसोफ्ट काय किंवा गुगल काय हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अर्थात 'दगडापे़क्षा वीट मऊ' या न्यायाने गुगलचा वेग (दिशा) मायक्रोसोफ्टपेक्षा नक्कीच चांगला आहे. पण एल.जी.पी.एल. लायसन्स खाली वितरीत होणारा कोणताही लहानसा प्रयत्न देखील माझ्यासाठी खूप मोठा आहे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत झाले.\nलाखाचे बोललात्. १००% सहमत\nमग मी यामुळेच तर वैतागलो आहे.\nमाझ्या मुळ प्रस्तावात मी महाराष्ट्रातल्या मराठीसाठी काम करणार्‍या प्रमुख संस्था म्हणून पुणे विद्यापीठावर उगाच राग काढतो आहे असे वाटले की काय\nत्याचा तपशील येथे आहेच.\nत्यांचे काम नाही का हे त्यांनी पण दिशा द्यावी ना प्रकल्पांना\nहे मुख्य आधारस्तंभ आहेत. या विद्यापीठाकडे जगातले मराठीचे प्रमुख माहितीचे खजिने आहेत. हे बसलेत त्यांना रद्दीत दाबून राज्य मराठी संस्थाही काही करू शकली नाही तेथे गुगल शिवाय कुणी येतंय का सांगा राज्य मराठी संस्थाही काही करू शकली नाही तेथे गुगल शिवाय कुणी येतंय का सांगा असा प्रकल्प करावा हे ही सुचत नाही त्यांना\nओपन लायसंसचे तुम्ही म्हणता ते १००% पटतंय\nपण मराठी भाषेचा स्वार्थ कसा साधावा जो कुणी काही भाषेसाठी करतांना दिसेल त्याला प्रोत्साहन देणे याशिवाय काय सुचते\nमाफ करा मी सहमत् नाही\nतुमच्या मतांशी मी सहमत् नाही. कारण् या सगळ्याचे कारण् म्हणजे विद्यापीठाची आर्थीक् परिस्थिती चांगली नाही (इतर आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या तुलनेत्). इतर विद्यापीठात असे संशोधन् का चालते कारण् त्याना उद्योगधंद्याकडून् / उद्योगपतींकडून् देणग्या (Endowment) मिळतात्. त्या केंव्हा मिळतात् जेंव्हा त्यात त्याना कुठे तरी नफा/फायदा/(Influence) दिसतो तेंव्हा. अमेरिकेतल्या एखाद्या मोठ्या विद्यापीठाचा लॅटीन् भाषा शिकवणारा विभाग् पहा आणि दिसेल् की तिथे परिस्थिती पुणे विद्यापीठापेक्षा वेगळी नाही. आणि या उलट मुंबई आय आय टि चा संगणक विभाग पहा. कुठल्याही आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या इतकीच साधने तिथे आहेत.\nजो पर्यंत् मराठीत् धंदा/नफा दिसत् नाही किंवा एखादा मराठी उद्योगपती मराठीसाठी देणग्या देत् नाही तो पर्यंत् ही तफावत दिसेल्. (म्हणजे नुसते गप्प बसून् वाट पहा असे मला म्हणायचे नाही. पण् नुसते स्वय्ंसेवी प्रयत्न् करण्याऐवजी मराठी उद्योगाला / उद्योगपतीना चालना मिळेल अशा प्रयत्नाना मदत् केली पाहिजे).\nएक उदा देतो. अमेरिकेत आजकाल् भारतीयांसाठी भरपूर् इंग्रजी प्रकाशने आहेत् ज्यात् ICICI/CITIBANK यांच्या NRI मंडळीना उद्देशून् भरपुर् जाहिराती असतात्. पण् बृहन् महाराष्ट्र मंडळाचे वृत्त, एकता अशा मराठी प्रकाशनांना कुणीच् या जाहिराती देत् नाही. एकता ला बरेच दिवस् फारतर् जाई काजळ् यांची जाहिरात मिळायची. कारण् या मंडळींच्या मते मराठी माणसाकडे पैसे नसतात् किंवा तो खर्च करत नाही. आणि अशा बॅंकांचे NRI ला ग्राहकसेवा देणारे बहुतेक् अमराठी असतात्. मी महाराष्ट्रात् गेलो कि माझ्या बॅंकेत् मुद्दाम् मराठीत् बोलतो. समोरचा अमराठी असला तरी. अमेरिकेत् मराठी NRI किती भरपुर् आहेत् त्याना Target करा आवर्जून् सांगतो. बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला पैसे खर्च् करून् जातो. तिथल्या उद्योजकांकडून् सेवा किंवा वस्तू खरेदी करतो.\nमी काही फार् थोर् करतो असे मला मुळीच म्हणायचे नाही. पण् ज्यातून् मराठि उद्योगाला फायदा होणार् आहे असे काहितरी करुया असे मी म्हणत् होतो. म्हणजे एकदा मराठीमधे फायदा आहे हे कळाले की आपोआप् मराठी भाषेला प्रोत्साहन् मिळेल्.\nधनंजय मिराशी [11 Feb 2009 रोजी 02:47 वा.]\nचांगली कल्पना आहे. जर इंग्रजी पुस्तक वाचताना गूगल वरून् डायरेक्ट मराठीत अर्थ कळला शब्दाचा तर किती मजा येईल. मी गुंडोपंतानी सुचवलेल्या मार्गाचा अवलंब् केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.com/2016/11/blog-post_26.html", "date_download": "2018-04-24T04:59:58Z", "digest": "sha1:XA5WA5BAD2O7XSKGQG5H66FAC2HCK7JT", "length": 11384, "nlines": 169, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.com", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: गिरिभ्रमण [मानमोडी पूर्वेकडून]", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nकालचा दुधारीचा ट्रेक करताना दूरवर मनमोडीचा डोंगर नजरेस पडला. तेव्हाच उद्या मानमोडीचा ट्रेक करायचे ठरविले. नियोजित वेळेप्रमाणे सकाळी खानापूर-धामनखेल च्या रस्त्याने गाडी पळवत नेली. सातवाहनांच्या लेण्यांमुळे हा डोंगर परिचित होताच, पण ह्या पर्वताच्या टोकावर दोन मंदिरांचे दर्शन झाले होते. त्यामुळे पुन्हा मानमोडीच्या दिशेने मोर्चा वळवला होता.\nपायथ्याशी वैभव वर्पे यांची गाठ पडली व त्यांच्या रूपाने नवा गिरीमित्र अन वाटाड्या भेटला. छोटयाश्या जंगलातून वाट काढत पठारावर पोहोचलो. पूर्ण माळरानच ते. पुढची वाटचाल करताना टोकावरचे खंडोबा मंदिर दृष्टीस पडले. आजूबाजूचा परिसर धुक्याच्या लोळात अंधुक दिसत होता. त्याच धुक्यात सूर्यदेवही अगदीच अंधुक दिसू लागले होते. मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा साडेसात वाजून गेले तरी पहाटे सहाचा अनुभव येत होता. या ठिकाणावरून मानमोडी डोंगराची लांबी, रुंदी अन उंची पूर्णपणे कळते. लेण्यांचे दर्शन मात्र होत नाही. दूरवर याच डोंगरकपारीत असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन झाले तेव्हा उद्याचा बेत ठरला होता...\nहजारो वर्षांपासून अंगाखांद्यावर लेण्या घेऊन इतिहासाची साक्ष देणाऱ्या या डोंगराचा पूर्वेकडून केलेला छोटेखानी ट्रेकही तितकाच रिफ्रेशिंग होता.\nलेबल्स खंडोबा, जुन्नर तालुका, पर्वत, पुणे जिल्हा, मंदिर, मानमोडी\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमाझी ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरी... आमच्या कन्येचं १४ वर्षांपूर्वी ठरविलेलं नाव. संत ज्ञानेश्वरांची भावार्थदिपिका वाचली तेव्हाच ठरवलं, माझ्या मुलीचं नाव ’ज्ञानेश्वरी’ ठेविल. चौ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%B2-28-02-2017-113032800002_1.html", "date_download": "2018-04-24T05:06:10Z", "digest": "sha1:5G7B7SFMPPFXQGTT7HXTO6BPQTYAVZEX", "length": 10895, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Free Daily Rashi, Jyotish, Grahman, Vastu | | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : अनावश्यक कामांपासून लांब रहा. व्यापारात उन्नति. घरातील लोकांचा सहयोग. एखाद्ये विशेष काम झाल्याने मन आनंदित राहील.\nवृषभ : आळस करू नये आणि कामांना वेळेत करण्याचा प्रयत्न करा.मुलांकडून प्रसन्नता वाटेल. स्वविवेकाने काम करा.\nमिथुन : आजपासून नवीन कार्य सुरू करू नका. प्रशंसा करण्यांशी दूर रहा. परिश्रम प्रमाणे यश मिळणार नाही. सामाजिक प्रतिष्ठेत कमी येईल.\nकर्क : पैश्याच्या बाबतीत स्थिती सुधरेल. नोकरी मिळण्याचे योग. धन मिळवण्याकरिता केलेले प्रयत्नात यश मिळेल. दुसर्‍यांच्या भानगडीत पडू नका.\nसिंह : पाहुणे येऊ शकतात. उन्नती होईल. विद्यार्थींनी भावुक न होऊन अध्ययनाकडे लक्ष घालावे नाहीतर हानी झेलावी लागेल.\nकन्या : अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. विद्यार्थींने नवीन भावुकता सोडा, अन्यथा हानि होण्याची शक्यता.\nतूळ : जमीनी संबंधी काम होईल. नवीन योजनांचा सूत्रपात होईल. स्वत:च्या प्रयत्नाने सामाजिक सन्मान प्राप्त होईल.\nवृश्‍चिक : चुकल्यामुळे विरोधी हावी होऊ शकतात. समस्यांचा निकाल पूर्ण विचारांती करा. व्यावसायिक लाभ मिळेल. भेट प्राप्त होण्याची शक्यता.\nधनु : सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या.\nमकर : मानसिक संतोष, प्रसन्नता राहील. मुलांची प्रगति होईल. पूर्व कर्म फलीभूत होतील. सुखद यात्रा योग. आर्थिक स्थिति सुदृढ राहील.\nकुंभ : संपत्तीच्या खरेदीत लाभ होईल. महत्वाची कामे होतील. नवीन विचार किंवा योजनांवर चर्चा होईल. सामाजिक आणि राजकीय ख्याति वाढेल.\nमीन : मानसिक संयम ठेवा. विशेष यात्रा आणि कलात्मक कामात लाभ प्राप्तिचा योग. आर्थिक वादात विशेष कार्य योग.\nआज तुमचा वाढदिवस आहे (27.03.2018)\nजन्मवारावरुन ओळखा तुमचा स्वभाव\nआज तुमचा वाढदिवस आहे (26.03.2018)\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nरघुराम राजन यांचा बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी विचार\nरघुराम राजन यांच्या नावाचा विचार बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी केला जातो आहे असे ...\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/sehwag-116111800009_1.html", "date_download": "2018-04-24T05:07:58Z", "digest": "sha1:X4WE36JTFXGMX5KPDILFHWYKUF7CUJJM", "length": 7169, "nlines": 104, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अभिनय करणार सेहवाग! | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभारतीय क्रिकेट संघामधील एक हरहुन्नरी नाव म्हणजे विरेंद्र सेहवाग. क्रिकेच्या सामन्यादरम्यान खेळपट्टीवर ज्याप्रमाणे सेहवाग त्याचे वर्चस्व सिद्ध करायचा त्याचप्रमाणे सध्या तो सोशल मीडिया गाजवत आहे.\nसेहवाग एका वेब सीरिजच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता ‍अभिनय क्षेत्रातही सेहवागची फटकेबाजी पाहता येणार आहे असेच चित्र दिसत आहे.\nकोहली, डीव्हिलियर्स, रूट सर्वोत्तम फलंजदाज\nप्रदूषण कमी करण्यासाठी कोहलीचे दिल्लीकरांना आवाहन\nधोनीला हटवणे चूक ठरू शकते: कर्स्टन\nशोएबची इंग्रजी वाचून पोट धरून हसाल\nयावर अधिक वाचा :\nअभिनय करणार विरें सेहवाग वेब सीरिज\nराष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ...\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nइस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर ...\nराष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक\nतेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर ...\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी ...\nतर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा\nआग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2011/11/07/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-24T04:39:20Z", "digest": "sha1:FICZNVLRF2JK3KAXXXL47UEOQIGAUCUY", "length": 32724, "nlines": 482, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "वृंदावनातील क्रीडा | Abstract India", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे\nभारतीय संस्कृतीचे जणू प्रतीक असणारी “तुळस’ ही घराघरात आपले हक्काचे स्थान टिकवून आहे. भारतात सर्वत्र तुळस उगवतेच; फक्‍त हवामान व जमिनीनुसार तिचे स्वरूप थोडेफार बदलते. उष्ण हवामान असणाऱ्या ठिकाणची तुळस गडद रंगाची, काळसर असते, तर थंड प्रदेशातील तुळस हिरवी असते. गडद रंगाची पाने व जांभळी फुले येणाऱ्या तुळशीला कृष्णतुळशी म्हणतात, तर हिरव्या रंगाची पाने व पांढरी फुले येणाऱ्या तुळशीला श्‍वेततुळस वा रामतुळस म्हणतात. तुळशीच्या या प्रकारांशिवाय “वनतुळस’ हाही एक प्रकार असतो, जिची पाने व मंजिऱ्या घरात लावल्या जाणाऱ्या तुळशीपेक्षा मोठी व थोडी राठ असतात.\nतुळशीचे संपूर्ण झाडच औषधी गुणधर्मांनी युक्‍त असते, विशेषतः तुळशीची पाने, देठ, बी व मूळ औषध म्हणून वापरले जाते.\nप्राचीन ग्रंथात तुळस कधी तोडावी यासंबंधी काही गोष्टी दिलेल्या आहेत. पौर्णिमा, अमावस्या, संक्रांती, द्वादशी या तिथींना; मंगळवार, शुक्रवार व रविवार या वारी, ग्रहणकाळात, जननशौच, मृताशौच काळात तुळस तोडू नये. रात्रीच्या वेळी, तसेच दोन्ही संधिकाळात तुळस तोडू नये.\nघरात कोणत्याही प्रकारची दुर्गंधी, दुष्टी येऊ नये म्हणून दारात तुळस ठेवण्याची प्रथा आहे. वाळलेली रानतुळस घरात टांगली असता त्याच्यावर मच्छर बसतात असा अनुभव येतो. तसेच पाणी साठलेल्या ठिकाणी तुळस लावली असता मच्छरांचा उपद्रव कमी होतो. तुळस उत्तम जंतुघ्न व कृमिघ्न असते. साथीचे रोग पसरू नयेत यासाठी तुळस उपयुक्‍त असते. मध्ये बसण्यासाठी चौथरा तयार करून त्याच्या भोवती चारी बाजूने तुळशीची झाडे लावावीत किंवा तुळशीच्या कुंड्या ठेवाव्यात. या चौथऱ्यावर रोज काही वेळ बसण्याने अस्थमा, छातीचे विकार, हृदयविकार, फीट वगैरे विकारांवर उत्तम गुण येतो, असा अनुभव आहे.\nतुळशीला संगीत कळते. किर्लियन कॅमेऱ्याने ऑराचा फोटो काढला असता त्यातून तुळशीतून उत्सर्जित होणारी प्राणशक्‍ती लक्षात येऊ शकते.\nभारतीय परंपरेपुढे व आपल्या ऋषिमुनींपुढे नतमस्तक व्हावे असे वाटते. त्यांनी काय कल्पना केल्या असतील व या सामाजिक रीतीरूढी कशा बसविल्या असतील, याचे आश्‍चर्य वाटते. तुळशीविवाहाची पद्धत समाजाला अनेक चांगल्या गोष्टी देते. हा एक धार्मिक विधी आहे, असे वाटण्याची शक्‍यता आहे; पण यात धार्मिक असे काहीही नाही. आपल्या रोजच्या जीवनात सुखसमृद्धी नांदावी व आपल्या जीवनाचे नाना तऱ्हेचे अर्थ समजावेत या दृष्टीने हा सर्व विधी केलेला आहे. आपण असे पाहतो, की तुळशीची माळ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मोलाची आहे. गळ्यात असलेली सोन्याची साखळी व तुळशीची माळ या दोन्हीपैकी सोन्याची साखळी कोणीतरी ओढून नेली व तुळशीची माळ राहिली तर तो देवाचे आभार मानतो की “बरे झाले; माझी तुळशीची माळ राहिली आहे, सोन्याची साखळी तर मी पुन्हा विकत घेईन,’ अशी या तुळशीच्या माळेची महती आहे.\nपांडुरंगाला प्रिय असलेल्या तुळशीचे महत्त्व काय असावे लग्न ही आपल्या पृथ्वीवरच्या तमाम मनुष्यजातीला आवश्‍यक असणारी गोष्ट आहे. लग्न कुठल्या पद्धतीने केले जाते याला फारसे महत्त्व नाही. रजिस्टर लग्न करा, ऍग्रिमेंट लग्न करा किंवा तसेच एकत्र राहा; पण स्त्री-पुरुषांनी एकत्र राहणे अभिप्रेत असते.\nदानातील अत्युच्च दान म्हणजे कन्यादान. अनेक जण आपल्याला मुलगा व्हावा म्हणून प्रयत्नशील असतात; परंतु कन्यादान दिले नाही तर आयुष्य विफल जाईल. कन्यादान देण्यासाठी मुलगी पाहिजे की नाही मुलगी नसली तर कन्यादान कसे करणार मुलगी नसली तर कन्यादान कसे करणार ज्यांना मुलगी नाही, म्हणजे ज्यांना कन्यादान करणे शक्‍य नाही, त्यांनी तर हे तुळशीचे लग्न अवश्‍य करायला पाहिजे. एखाद्या घरात एकच मुलगा किंवा एकच मुलगी असली तर त्याचे लग्न झाले की अनेक वर्षे घरात काही लग्नकार्यच होत नाही. त्या मुलाला मूल होऊन ते मोठे झाल्यावर जे मुंज, लग्न कार्य होणार तेच त्यांच्या घरातील कार्य. घरात मुंज, लग्न असे काही नसले की घरातील वातावरण बदलत नाही, वातावरण थंड पडत जाते. घरात कुठलेतरी मंगलकार्य झाले तर आपला उत्साह वाढतो. या दृष्टीने घरात एकदा तुळशीचे लग्न करायची पद्धत उत्तम आहे. साधे तुळशीचे लग्न असले तरी घरात चार दिवस उत्साह संचारतो.\nआपण आज हाकाटी करतो आहे की स्त्रीला महत्त्व यायला पाहिजे, तिला हक्क असायला पाहिजे; पण पूर्वीच्या ऋषीमुनींनी याचा किती खोलवर विचार केला आहे हे आपल्याला कळते. अनेक गोष्टींचा विचार करून तुळशीच्या लग्नाची आखणी केलेली दिसते.\nतुळशीचे दुसरे नाव वृंदा असे होते. जेथे तुळशी असते ते वृंदावन. या वृंदावनातील श्रीकृष्णांच्या सर्व लीला आपल्या सर्वांना माहिती असतात. वृंदा ही जालंधर नावाच्या राक्षसाची पत्नी होती. दुसऱ्याला पिडणे हे या दानवाचे काम होते. सुख देणारा तो देव व पिडणारा तो दानव, ही व्याख्या आहेच. मस्ती आली की दोन गोष्टी असतात. मस्ती आली की चैन वाढत जाते आणि प्रत्येक वस्तूवर आपलाच हक्क आहे असे वाटत राहते. जालंधराने एकदा स्वर्गावर स्वारी केली, स्वर्ग जिंकला, इंद्राला बंदिवान केले, इंद्राणीला उचलून स्वतःकडे आणले, बंदिवासात टाकले व तिला त्रास द्यायला सुरुवात केली. मुळात दुसऱ्याच्या स्त्रीवर नजर ठेवणे किंवा दुसऱ्या स्त्रीला घरात आणणे हे घरातल्या स्त्रीला आवडत नाही. जालंधराने इंद्राणीला घरी आणल्याने अनेक शत्रू तयार झाले. तो इंद्राणीला त्रास देत असे, हे त्याच्या बायकोला म्हणजे वृंदेला मुळीच आवडले नाही. वृंदेने मागच्या दाराने इंद्राणीला मदत करायला सुरवात केली. इंद्राणीला उपाशी ठेवायचे जालंधराने ठरविले तर वृंदा तिला अन्न पोचवत असे. इंद्राला बंदिवासातून कसे सोडवायचे याबद्दलची निरोपानिरोपी करायला मदत करायला सुरवात केली. विष्णूशी संधान बांधून इंद्र-इंद्राणीला सोडवण्याची खटपट वृंदेने सुरू केली.\nवृंदेचे हे कार्य अर्थातच जालंधराला आवडले नाही. तो खवळला. “जोपर्यंत तुझी बायको तुझ्या मताप्रमाणे चालेल, जोपर्यंत ती तुझी अनुगामिनी असेल तोपर्यंत तू मरणार नाहीस; पण ज्या दिवशी तुझी बायको तुझ्या विरोधात जाईल, त्या दिवशी तुझी सगळी शक्‍ती नष्ट होईल’ असा वर पूर्वी जालंधराला मिळालेला होता. वृंदा आपल्या विरोधात काम करते आहे, विष्णूला निरोप पोचवते, त्याची प्रार्थना करते असे पाहून जालंधराने “तू मला समर्पित असलेच पाहिजे’ असा हेका धरला. ती ऐकत नाही असे पाहून त्याने तिची जीभ कापून टाकली. तिला आता बोलता येणार नाही, त्यामुळे आता ती विष्णूची प्रार्थना करू शकणार नाही असे त्याला वाटले. श्रीविष्णूंना हे सर्व जेव्हा कळले तेव्हा त्यांनी उद्धार करण्याच्या दृष्टीने तिची सुटका केली. ती म्हणाली, “”तुम्ही मला या राक्षसाच्या जाचातून तर सोडवाल; पण मला तुमच्या चरणाशी राहता यावे अशी योजना करा.” विष्णू म्हणाले, “”ठीक आहे, तुझे रूपांतर तुळशीत होईल आणि यापुढे लोक ती तुळस मला वाहतील. या दृष्टीने तुझे-माझे मिलन नेहमीच होत राहील.” विष्णुरूपी शाळिग्रामावर तुळशी वाहण्याची पद्धत तेव्हापासून सुरू झाली. या कथाभागाचे मर्म लक्षात घेऊन आपल्या ऋषीमुनींनी तुळशीविवाहाची योजना केली.\nआपल्या मानेच्या ठिकाणी असणाऱ्या जय, विजय या ग्रंथींचे नाव जालंधर आहे. योगामध्ये जालंधरबंध नावाची क्रिया असते. आपल्या मस्तकातून खाली पडणारा अमृतरस सरळ सूर्यचक्रात पडला तर सूर्य या अमृतरसाला जाळून टाकतो. असे झाल्यास आपल्या शरीराला ताकद मिळत नाही, ग्रंथी नीट काम करत नाही. तेव्हा हा अमृतरस घरंगळू द्यायला हवा. आपल्या मस्तकातील सर्व केंद्रे आपले जीवन चालवतात म्हणून ह्या केंद्रांना (देवतांना) तसेच हा अमृतरस मिळावा यासाठी जालंधरबंध असतो. जालंधरबंधाच्या वेळी श्‍वास थांबवला जातो व हनुवटी दाबून धरली जाते. मेंदूत असणारे केंद्र (देवता) जे शरीराच्या सर्व क्रिया व चेतासंस्था चालवते, त्या शक्तिकेंद्राला विष्णू हे नामकरण केले, तर विष्णुप्रिया तुळशीच्या औषधी गुणांचा आणि श्रीकृष्ण व श्रीविष्णूंचा संबंध समजून येईल.\nतुळशीचा व थायरॉइड ग्रंथीचा, तसेच तुळशीचा व आपल्या प्राणशक्‍तीचा संबध आहे. ही गोष्ट आता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध केलेली आहे. तुळशीच्या आजूबाजूला असलेल्या वायूत ओझोनचे प्रमाण अधिक असते व तेथे प्राणशक्‍तीचा संचार अधिक असतो. आपल्याला कुणी प्राणशक्‍ती दिली तर अजून काय हवे आपण प्राणशक्‍तीवरच जिवंत असतो. प्राणशक्‍ती तुळशीतून उत्सर्जित होत असते म्हणून ज्या ठिकाणी तुळशी लावलेली आहे, त्या ठिकाणी दुष्टशक्‍ती सोडाच; पण तेथे कुठल्याही प्रकारची रोगराई, वाईट विचार वा वाईट शक्‍ती राहू शकत नाही, उलट प्राणशक्‍तीचा प्रभाव अनुभवता येतो.\nfrom → कृष्णतुळशी, तुळस, रामतुळस, वनतुळस, श्‍वेततुळस\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AD", "date_download": "2018-04-24T04:39:10Z", "digest": "sha1:43H5RJRUSINQP5UC3WGAWSFJBD6DLP7T", "length": 4985, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ७ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. २ रे शतक - पू. १ ले शतक - १ ले शतक\nदशके: पू. २० चे - पू. १० चे - पू. ० चे - ० चे - १० चे\nवर्षे: पू. १० - पू. ९ - पू. ८ - पू. ७ - पू. ६ - पू. ५ - पू. ४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ० चे दशक\nइ.स.पू.चे १ ले शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://thanevarta.in/?p=8480", "date_download": "2018-04-24T04:23:47Z", "digest": "sha1:B7G7U4DYXPRFAMMSFJNS4EYDF3PX3MXI", "length": 11921, "nlines": 85, "source_domain": "thanevarta.in", "title": "राबोडी कोळीवाड्याचा विकास स्वत:च करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार – Thanevarta", "raw_content": "\nराबोडी कोळीवाड्याचा विकास स्वत:च करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार\nराबोडी कोळीवाड्याचा विकास ग्रामस्थांनी स्वत:च करण्याचा निर्धार केला आहे. समूह विकास योजना आणि घरांचा विकास यावर मार्गदर्शन करण्याकरिता एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत हा निर्धार करण्यात आला. चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी या सभेत मार्गदर्शन केलं. समूह विकास योजनेद्वारे घरांचा विकास करण्याबाबत राबोडी कोळीवाड्यामधील कोळी बांधव आणि रहिवाशांच्या मनात संभ्रम आणि भीती निर्माण झाली होती. समूह विकास योजनेनुसार राबोडी कोळीवाडा हा विभाग अनधिकृत झोपडपट्टी असून ही झोपडपट्टी तोडून तिथे इमारती बांधण्यात येतील असा प्रचार आणि प्रसार करण्यात येत होता. त्यामुळं राबोडी कोळीवाड्यातील रहिवाशांच्या मनात आपली घरं अनधिकृत असून ती तोडून नविन इमारती बांधण्याचा अधिकार समूह विकास योजनेमुळं शासनाला मिळाल्याची भीती निर्माण झाली होती. कोळीवाडे हे जमिन महसूल संहितेप्रमाण गावठाणे असून गावठाण म्हणून असलेले सर्व अधिकार राबोडी कोळीवाड्याला आहेत. त्यामुळं ज्या जमिनीवर घरं उभी आहेत त्या जमिनीचे मालक राबोडी कोळीवाड्याचे रहिवासी आहेत. त्यामुळं राबोडी कोळीवाड्यातील रहिवाशांच्या संमतीशिवाय कुणीही समूह विकास योजना लादू शकत नाही. ज्याप्रमाणे गावकीचे सण-उत्सव एकजुटीनं साजरे केले जातात त्याचप्रमाणे एकसंघतेनं आपल्या घरांचा विकास आपण करू शकता असे मार्गदर्शन चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी केलं. ठाणे महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी शहरामध्ये १०० गावठाणे होती. मात्र महापालिका अस्तित्वात आल्यानंतर कोळीवाडे आणि गावठाण्यांचं अस्तित्व शहर आराखड्यातून कायमचं पुसलं गेलं. विकास आराखड्यात कोळीवाडे आणि गावठाणे ही समूह वस्त्या म्हणजेच झोपडपट्ट्या म्हणून दर्शवल्या गेल्या आहेत. याबाबत कधीही कोणीही आक्षेप नोंदवला नाही. जमिन महसुल संहितेनुसार गावठाणांना प्राप्त असलेले विकासाचे सर्व अधिकारी महापालिका क्षेत्रात येणा-या कोळीवाड्यांना आहेत. त्यानुसार पालिका क्षेत्रातील कोळीवाड्यांचे सीमांकन करून तेथील रहिवाशांना त्यांच्या घराच्या मालकी हक्काच्या सनदा द्याव्यात अशी मागणी शासनाकडे करावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं. मुंबईत ज्याप्रमाणे कोळीवाडे आणि गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे तो ठाण्यालाही लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जमीन महसुल संहितेनुसार सीमांकन झाल्यास घरांचा विकास, पूर्व परंपरागत मंदिरं, वहिवाटीच्या जागा, कोळीवाड्याच्या मालकीच्या होऊन आपल्या घरांचा विकास ग्रामस्थ स्वत: करू शकतील ही बाब या सभेत अधोरेखित करण्यात आली.\nविश्वास सामाजिक संस्थेच्या मुलांनी तयार केलेल्या गुढ्यांना अमेरिकेतून मागणी\nठाण्यातील विश्वास सामाजिक संस्थेतर्फे यंदाही छोट्या गुढ्या तयार करण्यात आल्या आहेत. विश्वास सामाजिक संस्थेतर्फे गतिमंद मुलांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी शिक्षण दिलं जातं. Related\nवृक्षवल्ली प्रदर्शन आयोजित करणा-या महापालिकेनंच प्रवेशद्वारासमोर झाडांची बेफिकीरपणे छाटणी केल्याचा ठाणे मतदाता जनजागरण अभियानाचा आरोप\nवृक्षवल्ली प्रदर्शन आयोजित करणा-या ठाणे महापालिकेनं या प्रदर्शनाकरिता वडाच्या झाडाच्या फांद्या बेफिकीरपणे कापल्या आहेत. Related\nजिल्ह्यातील शासकीय सेवेतील महिला कर्मचारी आणि अधिका-यांचं आपल्या प्रलंबित मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवून साकडं\nसर्वत्र आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत असतानाच राज्यातील सर्व जिल्ह्यातील शासकीय सेवेतील महिला कर्मचारी आणि अधिका-यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांचं एक निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवून साकडं घातलं आहे. Related\nदेशातील पहिल्या रेल्वे सेवेला १६५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं केक कापून प्रवाशांनी साजरा केला वर्धापन दिन\nरिक्षात विसरलेल्या सव्वा तीन लाखांच्या दागिन्यांच्या पिशवीचा पोलीसांनी अवघ्या २४ तासात लावला छडा\nविस्थापितांचं पुनर्वसन हे त्यांच्या सहमतीनं आणि जगण्याशी सुसंगत असावं – मेधा पाटकर\nसुट्टीच्या दिवशी पालिका आयुक्तांनी पत्नीसमवेत केली झोपड्यांची रंगरंगोटी\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षपदी रविंद्र मोरे यांची नियुक्ती\nअल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलानेच फूस लावून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार\nइंदिरानगर झोपडपट्टीमधील जवळपास दीडशे मुलांनी चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत सहभाग घेऊन पालिका आयुक्तांसोबत साजरी केली रविवारची सुट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vedashri.blogspot.com/2006_07_01_archive.html", "date_download": "2018-04-24T04:26:19Z", "digest": "sha1:7YWYWDEZOWBCRB2XODTC3CRXMCWPGQ22", "length": 8120, "nlines": 47, "source_domain": "vedashri.blogspot.com", "title": "वेदश्री: July 2006", "raw_content": "\nमंगळवार, २५ जुलै, २००६\nआज मैं उपर.. आसमा नीचे...\n\"येस्स... येस्स्स... येस्स्स......\" असं आनंदातिशयानं चित्कारणाऱ्या मला बघून हापिसातल्या इतरांना काही कळेना की नक्की या बयेला अचानक झालं तरी काय ते त्यांना काय कळणार होत्या, इतक्या दिवसांनी माझा ब्लॉग विनाथांबा पूर्णपणे यशस्विरित्या रिपब्लिश झाल्याने माझ्या मनात फुटणाऱ्या आनंदाच्या उकळ्या \nमराठीब्लॉग्स.नेटवर प्रश्नोत्तर रुपाने पवनकडून मदत मिळाल्याने मी माझा हा ब्लॉग नटवायचा मनापासून प्रयत्न करत होते. तांत्रिकदृष्ट्या बऱ्यापैकी मठ्ठ असूनही प्रयत्नात यश मिळत असलेले पाहून आणखीन स्फुरण चढत होतं आणि प्रयत्न करायला हुरूप येत होता. पण... एके दिवशी अचानक मी 'अहिनकुल'बद्दलचे माझे अनुभव लिहिले आणि..... ब्लॉगने रीपब्लिश व्हायला ठाम नकार दिला. २%च्या पुढे गाडी जायलाच तयार नाही कित्तीवेळा प्रयत्न केला पण २च्या पुढची गणतीच जणूकाही विसरल्यासारखं माझा ब्लॉग वागायला लागला. अहिनकुल लिहिताना त्यात 'नकुल' सोडून निघून गेल्याने मी आधीच जबरदस्त भावूक झालेले आणि त्यात माझे विचार मुक्तपणे मांडायची मोकळीक देणारा माझा ब्लॉगही बंद पडला.. डोळ्यात पाणी उभं राहिलं माझ्या \nकित्येक दोस्त विचारायला लागले,\"वेदश्री, ब्लॉगचं काय झालं नविन काही लिहित नाहीस आजकाल.. काय झालं नविन काही लिहित नाहीस आजकाल.. काय झालं\" वगैरे वगैरे.. त्यांना द्यायला एकच उत्तर होतं माझ्याकडे .. 'ब्लॉग बंद पडला माझा \" वगैरे वगैरे.. त्यांना द्यायला एकच उत्तर होतं माझ्याकडे .. 'ब्लॉग बंद पडला माझा '.. माझ्या मनाला होणारे क्लेश मी काय सांगू त्यांना. मला माझा हाच ब्लॉग परत हवा होता.. जसा असेल तसाच '.. माझ्या मनाला होणारे क्लेश मी काय सांगू त्यांना. मला माझा हाच ब्लॉग परत हवा होता.. जसा असेल तसाच ब्लॉगरवाल्यांना पत्र लिहिलं, इथूनतिथून सर्वांकडून मार्गदर्शन घ्यायचा प्रयत्न केला पण कोणालाच रामबाण असा उपाय माहिती असलेला दिसला नाही. हा ब्लॉग बंद पडण्याच्या अनपेक्षित धक्क्याने एकंदरीतच मनमोकळं, स्वतःचं असं काहीही लिहिण्याचाच उत्साह मावळला माझा. 'वर्डप्रेसमध्ये उघड तुझा ब्लॉग, तिथे असे प्रॉब्लेम आल्याचं ऐकीवात नाही' वगैरे ऐकायला मिळालं. मनाविरुद्ध मी तिकडे माझा ब्लॉग काढला.. काहीबाही लिहिलंही.. पण ...... या ब्लॉगची सवय झालेली असल्याने अनुभवांती आलेला मनमोकळेपणा, साहजिकता, सोपेपणा जो इथे वाटायला लागला होता तो मला तिथे जाणवेना. या ब्लॉगची खूपच सवय झाल्याने आणि त्याहून जास्त या ब्लॉगवर जीव जडलेला असल्याने मला तिकडे परकं परकं वाटायला लागलं. पर्यायाने ब्लॉग लिहिणंच बंद पडलं आणि परत एकदा माझ्या डायरीची पानंच्या पानं भरायला लागली.\nआज इतक्या दिवसांनी उगाच वाटलं की जाऊन बघुयात का एकदा आपल्या ब्लॉगवर बंद पडलेला असला तरी काय झालं बंद पडलेला असला तरी काय झालं शेवटी आहे तर माझाच ब्लॉग ना.. एके काळी यालाच सजवायला किती इरेला पेटले होते मी.. मी लिहिलेला एकेक लेख इथे जमवायला किती आटापिटा केलेला.. पाऽऽर वेडावलं मला या ब्लॉगने.. विचार करताकरता कधी लॉगिन केलं गेलं आणि 'रिपब्लिश एंटायर ब्लॉग' वर क्लिक केलं गेलं माझं मलाच कळलं नाही.. धडधडत्या हृदयाने वाट पहात बसले की परत २% वर अडकतेय की काय गाडी शेवटी आहे तर माझाच ब्लॉग ना.. एके काळी यालाच सजवायला किती इरेला पेटले होते मी.. मी लिहिलेला एकेक लेख इथे जमवायला किती आटापिटा केलेला.. पाऽऽर वेडावलं मला या ब्लॉगने.. विचार करताकरता कधी लॉगिन केलं गेलं आणि 'रिपब्लिश एंटायर ब्लॉग' वर क्लिक केलं गेलं माझं मलाच कळलं नाही.. धडधडत्या हृदयाने वाट पहात बसले की परत २% वर अडकतेय की काय गाडी पण काय आश्चर्य काय हर्षोन्माद संचारला सर्वांगात.. जणू काही मला माझा अनमोल ठेवाच परत मिळाला आहे \nआज मैं उपर, आसमा नीचे,\nआज मैं आगे, जमाना है पीछे,\nटेल मी ओ खुदा, अब मैं क्या करू\nचलू सीधी के उल्टी चलू \nलेखिका : वेदश्री ६ टिप्पण्या:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nकृपया आम्हाला जगू द्या...\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/44?page=3", "date_download": "2018-04-24T04:35:35Z", "digest": "sha1:3U4HF7UNOZAFOJJI3RRO6J5FIFUXKIIU", "length": 8653, "nlines": 131, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रवासवर्णन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदख्खनच्या पठारावर – 7\nबदामी गावाच्या परिसरात शिरत असताना प्रथम मला कसली आठवण होते आहे ती म्हणजे अमेरिकेतील ऍरिझोना राज्यामधील सिडोनाच्या भव्य खडकांची(Sedona). बदामी गावाला लागून सिडोनासारखेच लाल रंगाचे ऊंच दगडी डोंगर उभे आहेत.\nदख्खनच्या पठारावर – 6\nइसवी सनानंतरच्या सहाव्या शतकापासून ते आठव्या शतकापर्यंत, दख्खनच्या पठारावर आपली सत्ता अबाधित राखणार्‍या चालुक्य राजवंशातील राजांनी, प्रथम आपली राजधानी ऐहोले येथे स्थापन केली असली तरी नंतर त्यांनी ती कर्नाटक राज्यामधल्या ब\nजेजुरी पासून दहा किलोमीटर अंतरावर पांडेश्वर आहे,महाराष्ट्रातील बहुतेक मंदिरे पांडव कथेशी जोडलेली असतात तसेच या मंदिराविषयी सांगितल\nदख्खनच्या पठारावर उदयास आलेले सर्वात जुने साम्राज्य, आंध्र राजघराण्यातल्या गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शालीवाहन या राजाने इ.स.78 च्या सुमारास प्रस्थापित केले होते.\nहंपीच्या राज निवासाचे भग्न अवशेष काल बघितल्यापासून एक प्रश्न माझ्या मनात येतो आहे. काल मी राज निवास बघितला, राण्यांचे जलक्रीडा केंद्र बघितले, परंतु राण्यांचे निवासस्थान वगैरे कोठेच दिसले नाही. याचे कारण आज मला समजते आहे.\nहंपीमधल्या विरूपाक्ष मंदिराच्या प्रवेश द्वारासमोर असलेल्या हंपी बाजारापासून, हेमकूट टेकडीला वळसा घालून, दक्षिणेकडे जाणार्‍या एका रस्त्याने मी आता बाळकृष्ण मंदिराकडे निघालो आहे.\nहंपीमधले सासिवेकालु गणेश मंदिर एका टेकडीच्या पायथ्याशी आहे. या टेकडीचे नाव आहे हेमकूट टेकडी. ही टेकडी तशी छोटेखानीच आहे परंतु या मंदिराच्या बाजूने चढण्याचा प्रयत्न केला तर रस्ता एकदम चढा आहे.\nएखाद्या लहान पोराच्या हातातल्या खेळण्यातून निघावे तसले आवाज करत आमची बस रस्त्याने खडखडत, धडधडत धावते आहे. बसणार्‍या प्रत्येक धक्क्याबरोबर, बसखालच्या स्प्रिंगा किरकिर, चिरचिर करत राहतात.\nदेवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 6\nचविष्ट ख्मेर भोजनाचा आस्वाद घेऊन मी रेस्टॉरंटच्या बाहेर येतो. समोरच्याच बाजूला असलेला हा जलाशय जगातील सर्वात मोठा पोहण्याचा तलाव म्हणून ओळखला जातो. याचे नाव आहे स्रा स्रान्ग(Sra Srang). या नावाचा अर्थ होतो शाही स्नानगृह.\nदेवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 5\nमी अंगकोर मधल्या प्रसिद्ध, बांते स्राय(Banteay Srei) या मंदिराला भेट देण्यासाठी निघालो आहे. हे मंदिर ‘अंगकोर आर्किऑलॉजिकल पार्क मधल्या मंदिरांच्या पैकी एक गणले जात नाही. ते सियाम रीप पासून अंदाजे 25 ते 30 किमी अंतरावर तरी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thanevarta.in/?p=8483", "date_download": "2018-04-24T04:22:20Z", "digest": "sha1:GVD5CBBHPQJ6OSEV7QI43VLYAOILTTNN", "length": 8512, "nlines": 85, "source_domain": "thanevarta.in", "title": "रिक्षात विसरलेल्या सव्वा तीन लाखांच्या दागिन्यांच्या पिशवीचा पोलीसांनी अवघ्या २४ तासात लावला छडा – Thanevarta", "raw_content": "\nरिक्षात विसरलेल्या सव्वा तीन लाखांच्या दागिन्यांच्या पिशवीचा पोलीसांनी अवघ्या २४ तासात लावला छडा\nरिक्षात विसरलेल्या सव्वा तीन लाखांच्या दागिन्यांच्या पिशवीचा पोलीसांनी अवघ्या २४ तासात छडा लावला आहे. डोंबिवलीत राहणारे राजरत्नम नाडर हे आपल्या पत्नीसह पोखरण रोड नंबर २ येथे राहणा-या आपल्या नातेवाईकांकडे आले होते. ठाणे स्टेशनवरून सुभाषनगर येथे जाण्यासाठी त्यांनी रिक्षा पकडली. सुभाषनगर येथील महाकाली डेव्हलपर्सच्या ऑफीसजवळ ते उतरले. मात्र रिक्षातून उतरताना नाडर हे आपली पिशवी रिक्षातच विसरले. त्यांच्या पिशवीमध्ये १०० ग्रॅमचे सोन्याचे दागिने होते. रिक्षातून उतरल्यानंतर पिशवी विसरल्याचं नाडर यांच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत रिक्षा निघून गेली होती. नाडर यांनी त्वरीत चितळसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलीसांनी नाडर जिथे रिक्षातून उतरले होते तेथील क्लोज सर्किट टीव्हीचे फूटेज तपासले. या फूटेजमध्ये रिक्षाचा क्रमांक दिसत होता पण सिरीज दिसत नव्हती. तरीही पोलीसांनी रिक्षाचा क्रमांक आणि नाडर यांनी दिलेल्या रिक्षा चालकाच्या वर्णनावरून शोध सुरू केला. नाडर ज्या रिक्षात पिशवी विसरले होते ती रिक्षा कळवा-विटावा येथील असल्याचं समोर आले. अखेर पोलीसांनी ही रिक्षा शोधून काढली. रिक्षा चालक संतोष आंबेडकर याच्याकडून सोन्याचे दागिने असलेली पिशवी हस्तगत करून नाडर यांना परत केली. दरम्यान रिक्षावालाही या पिशवीसाठी नाडर यांचा शोध घेत होता.\nकळव्यातील एका मुलीचे आक्षेपार्ह फोटो व्हॉटस् अॅपवर टाकणा-या तिघांजणाविरुध्द गुन्हा\nकळव्यातील एका मुलीचे आक्षेपार्ह फोटो व्हॉटस् अॅपवर टाकणा-या तिच्या मिञांसह तिघांजणाविरुध्द कळवा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. Related\nअंबरनाथमध्ये आणखी एका बनावट कॉलसेंटरचा पर्दाफाश – ८ जणांना अटक\nकर्जाचे आमीष दाखवून अमेरीकन नागरीकांना लुबाडणा-या अंबरनाथ येथील बोगस कॉलसेंटरचा पोलीसांनी पर्दाफाश करुन आठ आरोपींना अटक केली आहे तर १८ संशयीतांची चौकशी चालू आहे. Related\nदोन मुलींची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेला जन्मठेपेची शिक्षा\nआपल्या स्वत:च्याच दोन मुलींची हत्या करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणा-या गीना अगरवाल ठाणे जिल्हा न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. Related\nराबोडी कोळीवाड्याचा विकास स्वत:च करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार\nसांबर जातीच्या हरणाच्या शिंगाची तस्करी करणा-या एका व्यक्तीला अटक\nविस्थापितांचं पुनर्वसन हे त्यांच्या सहमतीनं आणि जगण्याशी सुसंगत असावं – मेधा पाटकर\nसुट्टीच्या दिवशी पालिका आयुक्तांनी पत्नीसमवेत केली झोपड्यांची रंगरंगोटी\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षपदी रविंद्र मोरे यांची नियुक्ती\nअल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलानेच फूस लावून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार\nइंदिरानगर झोपडपट्टीमधील जवळपास दीडशे मुलांनी चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत सहभाग घेऊन पालिका आयुक्तांसोबत साजरी केली रविवारची सुट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://janarth-avs.org/resources", "date_download": "2018-04-24T04:48:24Z", "digest": "sha1:II53LRWQ7HKDAJWRTQ6KM3EKCXX37YC3", "length": 1607, "nlines": 23, "source_domain": "janarth-avs.org", "title": "Resources", "raw_content": "\nलोकजागर अंक १ला - बालविवाह प्रतिबंध आणि इतर महिलाविषयक कायदे\nलोकजागर अंक २रा - स्त्रियांच्या आरोग्यासाठी विविध सरकारी योजना\nलोकजागर अंक ३रा - बाळाच्या जन्माआधी सुजाण पालक जन्मावा\nलोकजागर अंक ४था - आर्थिक मदत देण्याऱ्या काही सरकारी योजना\nलोकजागर अंक ५वा - बाळाच्या जन्माचा आनंद मिळू दे - मातेचा मृत्यू टळू दे\nलोकजागर अंक ६वा - कुपोषण कायमचे मिटवूया\nलोकजागर अंक ७वा - स्त्री प्रजनन संस्थेचे आजार (भाग १)\nलोकजागर अंक ८वा - स्त्री प्रजनन संस्थेचे आजार (भाग २)\nलोकजागर अंक ९वा - स्त्री प्रजनन संस्थेचे आजार (भाग ३)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/uri-12365", "date_download": "2018-04-24T05:11:09Z", "digest": "sha1:AJ3JRWMOPAZPS3LFP72NUTD7LUMGE4HO", "length": 10948, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "Uri उरीमधील हल्ल्याचा तीव्र निषेध- नरेंद मोदी | eSakal", "raw_content": "\nउरीमधील हल्ल्याचा तीव्र निषेध- नरेंद मोदी\nसोमवार, 19 सप्टेंबर 2016\nनवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरच्या उरीमधील एका लष्करी तळावर शनिवारी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या घृणास्पद आणि भ्याड हल्ल्यामागे असलेल्यांना शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही, अशा कठोर शब्दांत इशारा दिला.\nनवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरच्या उरीमधील एका लष्करी तळावर शनिवारी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या घृणास्पद आणि भ्याड हल्ल्यामागे असलेल्यांना शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही, अशा कठोर शब्दांत इशारा दिला.\nहल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करताना पंतप्रधानांनी हुतात्मा झालेल्या जवानांना आम्ही सलाम करतो आणि त्यांची देशसेवा नेहमीच लक्षात राहील, असे नमूद केले. उरीमधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. मी देशाला आश्‍वासन देतो की, या हल्ल्यामागे असलेल्यांना शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही, असे ट्विट मोदी यांनी केले. हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना मी सलाम करतो. त्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही. संपूर्ण देश हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसमवेत आहे, असे ट्विट त्यांनी केले. गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांशी माझी चर्चा झाली असून, संरक्षणमंत्री स्वत: जम्मू-काश्‍मीरमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी करतील, असेही मोदी यांनी नमूद केले.\nअनधिकृत गौण खनिजाविरुद्ध मोहीम\nमालवण - तालुक्‍यात अनधिकृतरीत्या वाळू वाहतूक, गौण खनिज वाहतूक तसेच वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या होड्यांवर महसूल प्रशासनाने धडक मोहीम हाती घेत...\nम्हेत्रे कुटुंबीयांकडुन सात हजार पुस्तके दान\nतासगाव - ज्येष्ठ द्राक्षतज्ज्ञ एन. बी. म्हेत्रे यांच्या आई रुक्‍मिणी बाबूराव म्हेत्रे आणि शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त प्रयोगशील शेतकरी आर. डी. (...\nयात्रेकरुंची तहान भागवण्यासाठी सरसावले 'जल'दाते\nशिर्सुफळ : शिर्सुफळ (ता.बारामती) येथील श्री शिरसाई देवी यात्रेच्या दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांची होणारी गैरसोय...\nअग्निशमन दलाचा मला सार्थ अभिमान वाटतो - विश्वनाथ महाड़ेश्वर\nमुंबई : अग्निशी झुंज देत मुंबईकरांच्या जीवन व मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुंबईचे महापौर विश्वनाथ...\n‘व्यवस्थे’मुळेच होतेय आरोग्याची हेळसांड\nसरकारी दवाखान्यात प्रशिक्षणार्थी म्हणून आणि नंतर डॉक्‍टर म्हणून काम केल्यामुळे ही व्यवस्था जवळून पाहिली आहे. सरकारी दवाखान्यांच्या दावणीला बांधलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/40?page=2", "date_download": "2018-04-24T04:53:59Z", "digest": "sha1:L56BEDQSFX4EUA3JUJHYF3KNMZ7Y3NOW", "length": 6956, "nlines": 153, "source_domain": "mr.upakram.org", "title": "क्रीडा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nविहारा वेळ द्या जरा \nजीवन जगण्यालायक करणार्‍या गोष्टी\nवुडी ऍलनच्या मॅनहॅटन ह्या चित्रपटात एक स्वगत आहे. ज्यात कथेतील पात्र एक यादी बनवते, की हे आयुष्य का जगावेसे वाटते कारण; (why is life worth living\nज्यामधे काही कलाकार, खेळाडू, संगित, सिनेमे, पुस्तके, वैयक्तिक गोष्टी अशी यादी हे पात्र सांगते.\nएक मोठा आयत अनेक छोट्या आयतांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक छोट्या आयताच्या कमीत कमी एका बाजूची लांबी पूर्णांक एककात आहे.\nयावरून मोठ्या आयताच्या कमीत कमी एका बाजूची लांबी पूर्णांक एककात आहे हे कसे सिद्ध करता येईल\nराष्ट्रकुल स्पर्धा खेळाडू निवास\nखालील दुव्यावरील चित्रे पहा. आणखी काही लिहिण्यासारखे आहे असे वाटत नाही.\nआपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही \nआपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही \nसचिनला एलजी जनता पारितोषिक मिळावे म्हणून.....\nएक राष्ट्रकुल स्पर्धा १२ भानगडी\nएक राष्ट्रकुल स्पर्धा १२ भानगडी\nविश्वनाथन आनंदच्या जगज्जेतेपदाबरोबरच माझे बुद्धिबळाबाबतचे कुतुहल वाढले आहे. लास्कर् डिफेन्स, क्विन्स् गॅम्बिट असले शब्द बर्‍याच वेळा ऐकले आहेत. पण बुद्धिबळाचा हा पट इथे उपक्रमावर कोणी उलगडवून दाखवेल काय\nमॅरेथॉन शर्यत- शहरांचा शरीर आणि मानसिक आरोग्य आरसा\nमुंबई मॅरेथॉन मधे माझ्या सहकाऱ्यांपैकी ३ जण - २ अर्ध व १ पूर्ण मॅरेथॉन धावले, शर्यत पुर्ण केली. त्यांच्या उत्साहाकडे आणि अनुभवाकडे पाहून मॅरेथॉन एका वेगळ्या नजरेने पाहिल्याची जाणीव झाली. त्यांची वये ३० शीच्या आसपास.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/44?page=6", "date_download": "2018-04-24T04:46:09Z", "digest": "sha1:HNHKZDGYCXWAK2VDZJUE3TMQQLHSSUKY", "length": 7372, "nlines": 129, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रवासवर्णन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nईटानगर् किल्ल्याचे बांधकाम हे १४ ते १५ व्या शतकातील आहे. संपुर्ण किल्ल हा विटांनी बांधला आहे म्हणुनच याचे नाव ईटाफोर्ट् असे असावे. किल्ल्याचे बांधकाम हे अव्यवस्थीत रित्या बांधल्यासारखे वाटते.\nबेट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर जी कल्पना साकार होते त्यास छेद देणारे असे हे माजुली बेट.\nकाझिरंगा - मिसिंग फोटो\nमागील लेखात मी फोटो दिले आहेत पण ते दिसत नाहीत त्यामुळे मी पुन्हा ते देण्याचा प्रयत्न करित आहे.\nमला अरुणाचल मध्ये १३/१०/२००९ पर्यंत फिरावयाचे होते.\nखंडेरायाचा गड. वाट चढी. म्हणून दर्शनाला निघालेला गडावर निघालेला हा वाघ्या वाईच थांबला आणि निवांत झोपलेल्या आजीबाई शेजारी बसला.\nकॅमेरा - मोबाईलचा साधा :)\nस्थळ: मल्हार देवरगुड्डा, ता. राणीबेन्नूर, जि. धारवाड, कर्नाटक.\nमाजुली-नव वैश्नवी पंथाचे मज्जाकेंन्द्र\nशिलांग ला आल्यापासुन मेघालयातील खेडेगावात एक दिवस तरी राहावे असे मनात होते. माझे तेथील मार्गदर्शक श्री प्रशांत जी ना मी माझी इच्छा बोलुन दाखवीली.\nडावकी-भारत बांगला देश चेक् पोस्ट\nडावकी हे गाव शिलांग शहरापासुन ८२ कि.मी. वर असुन राष्ट्रीय महामार्ग क्र्. ४० वर आहे. या महामार्गाचे अंतर २१६ कि.मी आहे. येथुन उमगोट नदी ही जयंतीया हिल जिल्हा आणि पुर्व खासी जिल्हा यांना आपल्या दोन बाजुला ठेवुन वहाते.\nपुर्वांचलात विवेकानंद् केन्द्राचे कार्य\nविवेकानंद केन्द्राने पूर्वांचलातील आसाम व अरुणाचलप्रदेशात आपल्या कार्याचे जाळे विणले आहे. या संस्थेचे विशेष कार्य अरुणाचल प्रदेशात आहे.\nहुसैनीवाला बॉर्डर- शहिद स्मारक\n१९७८ च्या दसृयाला माझी बदली हरयाणा च्या अंबाला या शहरातून् फिरोजपूर येथे झाली. सतलज नदिच्या किनार्‍यावरील हे पंजाब राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण लाहोर येथून जवळच १०० कि.मि.च्या आत. त्या काळी भारतात टी वी सर्वत्र यावयाचे होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thanevarta.in/?p=8486", "date_download": "2018-04-24T04:26:39Z", "digest": "sha1:P4TWPHXFA3BC5RRQRNHGLJAIVHEROMD2", "length": 6586, "nlines": 85, "source_domain": "thanevarta.in", "title": "सांबर जातीच्या हरणाच्या शिंगाची तस्करी करणा-या एका व्यक्तीला अटक – Thanevarta", "raw_content": "\nसांबर जातीच्या हरणाच्या शिंगाची तस्करी करणा-या एका व्यक्तीला अटक\nसांबर जातीच्या हरणाच्या शिंगाची तस्करी करणा-या एका व्यक्तीला पोलीसांनी अटक केली आहे. उपवन येथील एका हॉटेलात एक व्यक्ती वन्य प्राण्यांची शिंगं विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस उपनिरिक्षक शिवराज बेंद्रे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचून शिंगे विक्रीसाठी आलेल्या संतोष बामणे या व्यक्तीला अटक केली. यावेळी त्याच्याकडून सांबर जातीच्या हरणांची दोन जोडी शिंगं हस्तगत करण्यात आली.\nनववर्षाच्या जल्लोषादरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या चालकांवर कारवाई केली जात असतानाच पोलीसांवरच हल्ला करण्याच्या २ घटना\nनववर्षाच्या जल्लोषादरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या चालकांवर कारवाई केली जात असतानाच पोलीसांवरच हल्ला करण्याच्या २ घटना घडल्या आहेत. Related\nकॉलसेंटर घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार सागर ठक्करला अटक\nकोट्यावधी रूपयांच्या कॉलसेंटर घोटाळा प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सागर ठक्करला अटक केली आहे. Related\nबिबट्याची कातडी विकण्यासाठी नाशिकहून ठाण्याला आलेल्या रामचंद्र भुसारे याला अटक\nबिबट्याची कातडी विकण्यासाठी नाशिकहून ठाण्याला आलेल्या रामचंद्र भुसारे याला ठाणे पोलीसांनी अटक केली आहे. Related\nरिक्षात विसरलेल्या सव्वा तीन लाखांच्या दागिन्यांच्या पिशवीचा पोलीसांनी अवघ्या २४ तासात लावला छडा\nमहापालिकेच्या उद्यानातून फुलपाखरू चोरून नेणा-या दुकलीला गजाआड करण्यात ठाणे पोलीसांना यश\nविस्थापितांचं पुनर्वसन हे त्यांच्या सहमतीनं आणि जगण्याशी सुसंगत असावं – मेधा पाटकर\nसुट्टीच्या दिवशी पालिका आयुक्तांनी पत्नीसमवेत केली झोपड्यांची रंगरंगोटी\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षपदी रविंद्र मोरे यांची नियुक्ती\nअल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलानेच फूस लावून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार\nइंदिरानगर झोपडपट्टीमधील जवळपास दीडशे मुलांनी चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत सहभाग घेऊन पालिका आयुक्तांसोबत साजरी केली रविवारची सुट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/arun-h-gaikwad", "date_download": "2018-04-24T04:47:38Z", "digest": "sha1:U2J5QYZEWSE744Z5UAV6I3B6S52FV5LD", "length": 17027, "nlines": 410, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक अरुण एच. गायकवाड यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (4)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (457)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (47)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (34)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (14)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nप्रोफ. डॉ. अरुण एच. गायकवाड\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रोफ. डॉ. अरुण एच. गायकवाड ची सर्व पुस्तके\nप्रो. डॉ. सुधाकर यू. जाधवर, प्रोफ. डॉ. जी. एम. दुंबरे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. रमेश डी. दरेकर, प्रोफ. डॉ. अरुण एच. गायकवाड ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. जी. एम. दुंबरे, प्रोफ. डॉ. एम. जी. मुल्ला ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. अरुण एच. गायकवाड, प्रोफ. डॉ. व्ही. डी. बर्वे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. रमेश डी. दरेकर, प्रोफ. डॉ. अरुण एच. गायकवाड ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रो. डॉ. सुधाकर यू. जाधवर, प्रोफ. डॉ. रमेश डी. दरेकर ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nभांडवल बाजार आणि वित्तीय सेवा\nप्रोफ. डॉ. जी. एम. दुंबरे, प्रोफ. डॉ. अरुण एच. गायकवाड ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. अरुण एच. गायकवाड\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. जी. एम. दुंबरे, प्रोफ. डॉ. एम. जी. मुल्ला ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. जी. एम. दुंबरे, प्रोफ. डॉ. अरुण एच. गायकवाड ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. जी. एम. दुंबरे, प्रोफ. डॉ. एम. जी. मुल्ला ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. जी. एम. दुंबरे, प्रोफ. डॉ. अरुण एच. गायकवाड ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2011/12/31/%E0%A4%8A%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-2/", "date_download": "2018-04-24T04:36:52Z", "digest": "sha1:QZFNOSYRFC4PRSFDIXAOVU23EE7BIXKA", "length": 24630, "nlines": 480, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "ऊब आहाराची – 2 | Abstract India", "raw_content": "\nऊब आहाराची – 2\nडॉ. श्री बालाजी तांबे\nभारतीय परंपरेतील सर्व सण-उत्सव, त्या उत्सवांच्या देवता, त्या सणाच्या देवतांना प्रसादरूपात अर्पण करायच्या वस्तू व पक्वान्ने या सर्वांचा हिशेब ऋतुमानाप्रमाणे व प्रकृतिमानाप्रमाणे केलेला असतो. थंडीच्या दिवसांत सूर्यध्यान व्हावे, या हेतूने सूर्याकडे पाहणे, पतंग उडवणे किंवा सूर्यप्रकाशात बसणे हे जेवढे महत्त्वाचे, तेवढेच तिळगूळ खाणे व गुळाची पोळी खाणे हे सणाशी संबंधित ठेवलेले आपण पाहतो. शरद पौर्णिमेला रात्री प्यावयाचे दूध असो, श्रावण महिन्यातील गोपालकाला असो, रामनवमीचा सुंठवडा असो- या सर्वांचा संबंध शरीराच्या तापमानाशी, आरोग्याशी जोडलेला दिसतो.\nआ युर्वेद शास्त्राचा एक नियम आहे, की सम गुणांनी वृद्धी होते आणि विरुद्ध गुणांनी क्षय होतो. जसे मनुष्यप्रकृतीचे वात, पित्त, कफ असे स्वभाव असतात, तसेच प्रत्येक वस्तूचेसुद्धा वात, पित्त, कफ असे स्वभाव असतात. मनुष्याच्या प्रकृतीचे उष्ण प्रकृती, शीत प्रकृती असे प्रकार असतात, तसेच वस्तूंमध्ये उष्ण वीर्य, शीत वीर्याच्या वस्तू असतात. त्यामुळेच शरीरात उष्णता वाढावी असे वाटत असेल तर कोणत्या गोष्टींचे सेवन करावे, याचे नियोजन करता येते.\nभारतीय परंपरेतील सर्व सण-उत्सव, त्या उत्सवांच्या देवता, त्या सणाच्या देवतांना प्रसादरूपात अर्पण करायच्या वस्तू व पक्वान्ने या सर्वांचा हिशेब ऋतुमानाप्रमाणे व प्रकृतिमानाप्रमाणे केलेला असतो. थंडीच्या दिवसांत सूर्यध्यान व्हावे या हेतूने सूर्याकडे पाहणे, पतंग उडवणे किंवा सूर्यप्रकाशात बसणे हे जेवढे महत्त्वाचे, तेवढेच तिळगूळ खाणे व गुळाची पोळी खाणे हे सणाशी संबंधित ठेवलेले आपण पाहतो. शरद पौर्णिमेला रात्री प्यावयाचे दूध असो, श्रावण महिन्यातील गोपालकाला असो, रामनवमीचा सुंठवडा असो- या सर्वांचा संबंध शरीराच्या तापमानाशी, आरोग्याशी जोडलेला दिसतो.\nशीत गुणधर्माच्या वस्तूंमध्ये दुधाचा क्रमांक सर्वांत वरचा आहे. त्याचा रंग पांढरा असतो. वस्तू जसजशा उष्ण वीर्याच्या होत जातील तसतशा त्या लाल रंगाकडे झुकू लागतात. वात प्रकृतीच्या वस्तू निळ्या, काळ्या, गडद रंगाच्या असतात. जांभळ्या वा बैंगनी रंगाचे वांगे वातकारक आहे, असे वेगळे सांगावे लागत नाही. गडद हिरव्या रंगाचे वाटाणेही वातवृद्धी करतात. शीत गुणाच्या वस्तू मऊसर असतात व त्यात जलतत्त्वाचे प्रमाण अधिक असते.\nवात गुणाच्या वस्तू कठीण, पोकळ व रसभाव कमी असलेल्या असतात. सिमला मिरची पोकळ असते व त्यातील बिया खुळखुळ वाजू शकतात, तिच्यावर आकाशतत्त्वाचा व वायुतत्त्वाचा प्रभाव अधिक असतो. लाल रंगाचे टोमॅटो, बीट, चिंच वगैरे द्रव्ये उष्ण स्वभावाची व पित्तकर असतात. गडद रंगाचा गहू पित्तकर असला तरी त्याचे पीठ केल्यावर त्याचा पित्तगुण कमी होतो व कफभाव वाढतो. गव्हापासून बनविलेला मैदा अतिसूक्ष्म असल्याने तो अधिक जागा व्यापतो, म्हणजे तो आकाशतत्त्वाशी जवळीक करतो, त्यामुळे वात वाढवतो. घडीच्या पोळीला पापुद्रे असणे इष्ट असले तरी ते पापुद्रे एकमेकांच्या जवळ असतात, जेणेकरून पोळी शरीराला पुष्ट करेल, पण वात वाढवणार नाही. रुमाली रोटी मैद्याची बनवलेली असते व ती बनवताना आकाशाकडे फेकून, तिला गती देऊन पातळ केलेली असल्याने ती पचायला जड असून वातकारक असते, हे सहज लक्षात येते. एखादे आंबट फळ उष्णता वाढविणारे व पित्तकर असू शकते, पण तेच फळ वाफवून शिजवल्यावर त्यात रसतत्त्व वाढल्यामुळे व मऊ झाल्यामुळे त्याचा पित्त गुण कमी होऊ शकतो. वस्तूचा स्वभाव व त्यांची पाककृती यांची विशेष योजना करून “आयुर्वेदिक अन्नयोगा’ची योजना केलेली असते. यामुळे पदार्थ पचनाला सोपे- हलके होतात.\n“ऊब आहाराची” या विषयाचा विचार करत असताना आयुर्वेदिक अन्नयोगाचा विचार करून पदार्थ तयार केले तर थंडीला तोंड देणे सोपे होऊ शकते. त्याउलट चव व नावीन्य या नावाखाली कुठल्यातरी चार-पाच वस्तू एकत्र करून तयार केलेली पाककृती वाढताना आकर्षक दिसण्यासाठी त्यावर विशेष मेहनत घेण्यावर भर दिल्यास त्या वस्तू अन्नयोग संकल्पनेपासून दूर जाऊ शकतात.\nआलेपाक, हळिवाचे लाडू, डिंकाचे लाडू, केळ्यावर मध घालून तयार केलेले पक्वान्न, केळ्यावर मध, लिंबू व साखर घालून तयार केलेले पक्वान्न, सुक्‍या मेव्यात तूप व इतर द्रव्ये घालून तयार केलेले पक्वान्न वगैरे अन्नयोगात सुचविलेल्या पाककृती पाहिल्या तर आरोग्याचा किती सुंदर विचार केलेला आहे, हे समजते.\nfrom → आलेपाक, आहारशास्त्र - अन्नयोग, ऊब, ऊर्जा, ऋतू, तिळगूळ, थंडी, सण-उत्सव, सूर्यध्यान\n← ऊब आहाराची : १\nहिवाळ्यातील ऊब – आहार 2 →\nव्यवस्थापक - मराठी ब्लॉग जगत permalink\nजानेवारी 6, 2012 5:06 सकाळी\nनमस्कार, आपला ब्लॉग मराठी ब्लॉग जगतशी जोडला गेलेला आहे. म. ब्लॉ.ज.ला भेट देणार्‍या वाचकांना आपल्या ब्लॉगची माहिती देण्यासाठी म.ब्लॉ.ज.चे ओळखचिन्ह आपल्या ब्लॉगवर अवश्य लावा. म.ब्लॉ.ज.च्या फेसबुक पेजला व ट्विटर पेजला देखील अवश्य भेट द्या.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://ghaati.wordpress.com/", "date_download": "2018-04-24T04:54:36Z", "digest": "sha1:NMAPXA6DFPSKSH2HOLXI2VB7UIBV2VOW", "length": 7792, "nlines": 90, "source_domain": "ghaati.wordpress.com", "title": "एक जुना धागा | काही विसरलेली नाती, परत जोडण्यासाठी", "raw_content": "\nकाही विसरलेली नाती, परत जोडण्यासाठी\nजरा ओव्हर द टॉप वाटतंय\nतेंव्हा मी गप्प राहिलो\nकाही दु:ख असतातच तशी\nथोडीशी ‘ओव्हर द टॉप’\nआणि ते बरेच आहे\nउतरली खाली जर ती तर\nजातील थेट काळजाच्या आरपार\nकाही दु:ख असतात हेकेखोर\nकुठेही कपडे काढून आपले\nती तर असतातच मस्तवाल\nदिसतो फक्त तो वेश, तो आवेश\nपण तो वेश असतो त्या नग्नतेला\nतू पण फसतोस त्या दिखाव्याला\nआणि अस्सल गावरान दुःखाला\nसुटाबुटातला साहेब समजून तोलतोस\nत्त्याच कर्जाने आणलेल्या मापदंडाने\nम्हणूनच मी गप्प राहतो\nकारण तुझ्या कर्जाऊ मापदंडाचे हप्ते\nतुला असेंच तर फेडावे लागणार\nमी मात्र त्या मापदंडाप्रमाणे\nत्या दु:खांना कुठे बांधू\nत्यांना जाउदे ‘ओव्हर द टॉप’\nमी थोडा छोटा झालोच त्यामध्ये\nती दु:खं तरी मोठी होतील\nआणि मी पण मोठा झालोच आहेकी\nमाझा मोठेपणाही कर्जाउच आहे ना\nरोखठोक – सत्यदेव दुबे\nसाप्ताहीक सकाळच्या २००७ दिवाळी अंकातील माधव वझे यांनी घेतलेली सत्यदेव दुबे यांची मुलाखत झकास आहे.\n“मी युजिनिओ बार्बाचा एक लेख वाचला आहे. This is all bullshit त्यांना तिकडे पश्चिमेकडे डोक्याला शांती पाहिजे. Acting ला तर अशांत माणूस पाहीजे. That is why you should act in a play. Acting केल्यावर मग शांती. ते लोक काय बोलतात ते निरर्थक आहे”\nपश्चिमेकडून आले म्हणजे बरोबर अशी आजकाल एक धारणा होऊन बसली असताना, हे मला फारच आवडले.\n“प्रेक्षकांनापण मला सांगायचे आहे, की तुम्हीही सरेंडर करायला शिकले पाहीजे. हे आवडले, ते नाही आवडले, हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहेच; पण अनुभव घेताना स्वतःला सोडून द्या. नाहीतर it is like sex. It can’t haapen. Sex चे उदाहरण दिलेकी आपल्याला लवकर समजत. म्हणून तीच analogy वापरून मी म्हणतो, problem with acting is the same as it is with sex; people only talk”\nहाहा. पण तथ्य आहे\nयापुढे थांबू नको तू\n(कवी: बा. भ. बोरकर )\nयापुढे थांबू नको तू; आपुल्या वाटा निराळ्या;\nवाढत्या संध्येत माझ्या सावल्या वाटेत आल्या\nचांदणे भोगून झालॆ; सावल्यांची ओढ आता\nमैफली गाउन झाल्या; मौन झाले गोड आता\nलौकिकी रंगुन जा तू, और त्याला वर्ख आहे\nलौकिकापल्याडच्या त्या अद्‌भुती मी गर्क आहे\nपावसाचे शैत्य येथे, काजव्यांची लख्ख झाडे;\nगर्द कालेखातसुद्‍धा चित्त चाकाटे उजेडे\nजा कुठेही, जा कसाही; शेवटी येशील येथे\nवाकडी वा वाट वेडी या इथे विश्राम घेतॆ\nअतुल सबनीसनॆ वर्डप्रेसमधे मराठी language category आणली आणी मला विचारले की थोडे भाषांतर करशील का. आता विषयांतर करायची सवय असलेल्या मला त्यातूनच कल्पना सुचली की मराठी blog च चालू करून टाकूया त्या नादाने. नाहीतरी मराठी लिहीणे होते कोठे आजकाल\nतर आता हे पानही आपण भरवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/cwg-2018-manika-batra-becomes-first-indian-woman-to-win-gold-in-table-tennis-singles-1663416/", "date_download": "2018-04-24T04:58:43Z", "digest": "sha1:5YR56UOCE43ESK6XU26ZBZHRZUYDRDA7", "length": 13579, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CWG 2018 Manika Batra becomes first Indian woman to win gold in table tennis singles| टेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक, मनिका बत्राचा अनोखा विक्रम | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nटेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक, मनिका बत्राचा अनोखा विक्रम\nटेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक, मनिका बत्राचा अनोखा विक्रम\nएकेरी टेबल टेनिसमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी मनिका बत्रा एकमेव भारतीय खेळाडू\nराष्ट्रकुलमध्ये विक्रमी सुवर्ण कामगिरी करणारी भारताची मनिका बत्रा\nभारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्राने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. टेबल टेनिसच्या एकेरी प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई करणारी मनिका बत्रा पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. मनिकाने अंतिम फेरीत सिंगापूरच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर ११-७, ११-६, ११-२, ११-७ अशी मात करत सुवर्णपदक आपल्या नावावर निश्चीत केलं. या राष्ट्रकुल स्पर्धेतलं मनिका बत्राचं हे तिसरं पदक ठरलं आहे. भारतीय महिलांनी सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. या संघातही मनिका बत्राने भारताच्या विजयात मोठा हातभार लावला होता. यानंतर महिला दुहेरी सामन्या मौमा दासच्या साथीने खेळताना मनिका बत्राला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता, यामुळे भारताला या प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. यानंतर आज एकेरीच्या अंतिम सामन्यात मनिका बत्राने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करत सुवर्ण पदक आपल्या नावावर जमा केलं.\nदहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे पदकतालिकेतलं भारताचं तिसरं स्थान अजुन भक्कम झालं आहे. सध्या भारत २४ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. या स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस आहे. त्यामुळे उद्या भारतीय खेळाडू आपल्या खात्यात किती पदकांची भर घालतात हे पहावं लागणार आहे. सध्या भारताच्या खात्यात ५५ पदकं जमा आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराहुल आवारे-सुशील कुमारला कुस्तीत सुवर्णपदक, अॅथलेटिक्समध्येही भारताचं खातं उघडलं\nराष्ट्रकुल २०१८ – जाणून घ्या सुवर्णपदक जिंकणाऱ्या श्रेयसी सिंहबद्दल..\nतेजस्विनी सावंतची सोनेरी कामगिरी, विक्रमी खेळ करत सुवर्णदक टाकलं खिशात\nवयाच्या १५ वर्षी अनिश भनवालाची सोनेरी कामगिरी, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ठरला पदक मिळवणारा सर्वात तरुण भारतीय\nराष्ट्रकुल २०१८ – राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंगाची कमाल, कुस्तीत भारताला आणखी एक सुवर्णपदक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://thanevarta.in/?p=8488", "date_download": "2018-04-24T04:26:15Z", "digest": "sha1:O44EZVNBCTIJOMONPHCOPITYUIV37ILZ", "length": 6872, "nlines": 85, "source_domain": "thanevarta.in", "title": "महापालिकेच्या उद्यानातून फुलपाखरू चोरून नेणा-या दुकलीला गजाआड करण्यात ठाणे पोलीसांना यश – Thanevarta", "raw_content": "\nमहापालिकेच्या उद्यानातून फुलपाखरू चोरून नेणा-या दुकलीला गजाआड करण्यात ठाणे पोलीसांना यश\nमहापालिकेच्या उद्यानातून फुलपाखरू चोरून नेणा-या दुकलीला गजाआड करण्यात ठाणे पोलीसांना यश आलं आहे. पालिकेच्या पोखरण रस्ता क्रमांक २ वरील उद्यानाचं सुशोभिकरण करण्यात आलं होतं. या सुशोभिकरणाअंतर्गत रस्त्यांवरील झाडांवर फायबरची कृत्रिम फुलपाखरं लावण्यात आली होती. या फुलपाखरांची माहितीही देण्यात आली होती. मात्र गेल्या बुधवारी यातील गुलाबी आणि जांभळ्या रंगाचे फायबरचे एक फुलपाखरू चोरट्याने पळवून नेले होते. फुलपाखरू चोरीला गेल्याची तक्रार महापालिकेनं नोंदवली होती. पोलीसांनी याप्रकरणी कसून तपास करून निहाल सिंग आणि गोविंद चौहान या दोघा चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेले फुलपाखरूही हस्तगत केले आहे.\nठाणे पालिका प्रशासनानं केली अनधिकृत लेडीज बार आणि लॉजेसवर कारवाई\nठाणे पालिका प्रशासनानं अनधिकृत लेडीज बार आणि लॉजेसवर कारवाई सुरू केली आहे. Related\nदोन मुलींची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेला जन्मठेपेची शिक्षा\nआपल्या स्वत:च्याच दोन मुलींची हत्या करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणा-या गीना अगरवाल ठाणे जिल्हा न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. Related\nठाण्याच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदे यांची उमेदवारी दाखल\nठाण्याच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदे यांनी आज उमेदवारी दाखल केली आहे. Related\nसांबर जातीच्या हरणाच्या शिंगाची तस्करी करणा-या एका व्यक्तीला अटक\nशालेय प्रवेशासाठी मुलीची प्रमाणपत्रं घेण्याकरिता सासरी आलेल्या सूनेवर रॉकेल ओतून पेटवून देण्याची धक्कादायक घटना\nविस्थापितांचं पुनर्वसन हे त्यांच्या सहमतीनं आणि जगण्याशी सुसंगत असावं – मेधा पाटकर\nसुट्टीच्या दिवशी पालिका आयुक्तांनी पत्नीसमवेत केली झोपड्यांची रंगरंगोटी\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षपदी रविंद्र मोरे यांची नियुक्ती\nअल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलानेच फूस लावून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार\nइंदिरानगर झोपडपट्टीमधील जवळपास दीडशे मुलांनी चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत सहभाग घेऊन पालिका आयुक्तांसोबत साजरी केली रविवारची सुट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/safar-us-chi-11426", "date_download": "2018-04-24T05:03:47Z", "digest": "sha1:4SBUGZPDBCE2QVZ3NMSDEETG7JVA3TVC", "length": 17951, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "safar US chi सफर अमेरिकेची (मुक्तपीठ) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 5 ऑगस्ट 2016\nअमेरिकेत ड्रायव्हिंग लायसन्सधारकाला बारा पॉइंट्‌स दिले जातात. गुन्हा नोंदला गेल्यास संबंधिताचे पॉईंट कमी केले जातात. बॅलन्स शून्य झाल्यास संबंधिताचे लायसन्स जप्त केले जाते. दंड झाल्यास ऑनलाइन भरणा करावा लागतो, त्यामुळे तडजोड करणे किंवा चिरीमिरी देऊन प्रकरण मिटविण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही\nअमेरिकेत ड्रायव्हिंग लायसन्सधारकाला बारा पॉइंट्‌स दिले जातात. गुन्हा नोंदला गेल्यास संबंधिताचे पॉईंट कमी केले जातात. बॅलन्स शून्य झाल्यास संबंधिताचे लायसन्स जप्त केले जाते. दंड झाल्यास ऑनलाइन भरणा करावा लागतो, त्यामुळे तडजोड करणे किंवा चिरीमिरी देऊन प्रकरण मिटविण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही\nअमेरिकेला भेट देण्याचे स्वप्न मुलामुळे साकारले. विमानतळावर उतरल्यावर तो कारने नेण्यास आला होता. त्यामुळे सर्वप्रथम दर्शन घडले ते अमेरिकेतील शिस्तबद्ध वाहतुकीचे. रहदारीचे नियम असलेले फलक वाहनचालकांना स्पष्टपणे दिसतील अशा पद्धतीने सर्वत्र लावलेले होते. रस्ते चारपदरी, सहापदरी, तर काही ठिकाणी आठपदरी आहेत. खड्डे पडलेले रस्ते कुठेही आढळले नाहीत. प्रत्येक वाहनचालक लेनची शिस्त कसोशीने पाळतो. वाहतुकीचे सिग्नल चोवीस तास सुरू असतात. कोणीही सिग्नल तोडत नाही. पादचाऱ्यांसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला स्वतंत्र फुटपाथ असतात. त्यांच्यासाठीही स्वतंत्र सिग्नल असतो. रस्ता चौकातूनच ओलांडावा लागतो. नॅशनल हायवेवर कोठेही रस्ता एकमेकांना \"क्रॉस‘ होत नाही. हायवेबाहेर पडावयाचे असल्यास तीन मैलांवर \"एक्‍झिट रोड‘ असतो. त्याची पूर्वकल्पना अर्धा मैल अगोदरच देण्यात येते. तेथे पेट्रोल पंप, रेस्ट रूम आणि हॉटेल्सची व्यवस्था असते.\nऍटलांटा ते रिचमंड हा 530 मैलांचा प्रवास आम्ही अवघ्या साडेदहा तासांत पूर्ण केला. प्रवासात अजिबात शीण आला नाही. कोठेही गाड्यांचा खडखडाट नाही, की हॉर्नचा आवाज नाही. रस्त्याकडेला कार थांबवून माणसे लघुशंका करीत आहेत, असे दृश्‍य कोठेही दिसले नाही. \"लेफ्टहॅण्ड ड्राइव्ह‘ची पद्धत असल्यामुले डाव्या बाजूच्या गाड्या ताशी 120 किलोमीटर वेगाने धावत होत्या. नॅशनल हायवेवर उजव्या आणि डाव्या बाजूने सर्व्हिस रोड असतो. तेथे दीड फुटी स्लॉटेड पट्टा म्हणजे \"साइड पट्टी‘ असते. प्रवासात एकाच ठिकाणी टोलनाका लागला. सर्व गाड्यांची नोंद सिग्नलप्रमाणे बसविलेल्या कॅमेऱ्यात होत होती. पावती, पैसे देणे-घेणे इत्यादीविषयक वादावादी अजिबात होत नव्हती.\nमहत्त्वाची बाब म्हणजे, डाव्या बाजूने जाणाऱ्या गाड्या नेमून दिलेल्या वेगानेच जात होत्या. ट्रॅफिक जाम असल्यास कोणीही सर्व्हिस रोडमधून गाडी पुढे घालण्याचा प्रयत्न करीत नव्हता. हायवेवर यदाकदाचित अपघात झाल्यास त्याची पूर्वसूचना डिजिटल बोर्डाच्या माध्यमातून दोन-तीन मैल अगोदरच दिली जाते. हायवेवर घाटात एखादा निसर्गरम्य पॉइंट असल्यास त्याची पूर्वकल्पनादेखील एक-दीड मैल अगोदरच माध्यमातून दिली जाते. त्या ठिकाणी कार-पार्किंगसाठी प्रशस्त जागा असते.\nअमेरिकेत शहरी भागांत ऑटोमॅटिक पार्किंग बूथ आहेत. बूथमधील कॉइन बॉक्‍समध्ये नाणे टाकून कार पार्क करता येते. पेट्रोलपंपावर स्वतःच पेट्रोल-हवा भरावी लागते. सर्व व्यवहार क्रेडिट कार्डद्वारे होतात. कोणीही सिग्नल तोडला किंवा अतिवेगाने कार चालविली तर त्या व्यक्तीचे लायसन्स पाहून पूर्वेतिहास कॉम्प्युटरवर पाहिला जातो. प्रत्येक ड्रायव्हिंग लायसन्सधारकाला बारा पॉइंट्‌स दिले जातात. गुन्हा नोंदला गेल्यास संबंधिताचे पॉइंट कमी केले जातात. बॅलन्स शून्य झाल्यास संबंधिताचे लायसन्स जप्त केले जाते. दंड झाल्यास ऑनलाइन भरणा करावा लागतो, त्यामुळे तडजोड करणे किंवा चिरीमिरी देऊन प्रकरण मिटविण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही\nशालेय विद्यार्थ्यांसाठी पिवळ्या रंगाच्या मोठ्या बसेस असतात आणि त्यावर \"स्कूल बस‘ असे ठळक अक्षरात लिहिलेले असते. बसच्या चारही बाजूंना पिवळ्या रंगाचे दिवे आणि कॅमेरे लावलेले असतात. मुले उतरत असतात, त्या वेळी चारही बाजूचे दिवे उघडझाप करीत असतात. बसमधून मुले उतरत नाहीत, तोपर्यंत दोन्हीकडील वाहतूक पूर्णपणे थांबवली जाते. लहान मूल गाडीत असल्यास \"बेबी ऑन बोर्ड‘ फलक गाडीवर लावणे बंधनकारक आहे. सर्व प्रवासी खासगी वाहनांना दरवर्षी पासिंग करावे लागते. वाहनाचे पासिंग दोन तासांत केले जाते; त्यासाठी कोठेही एजंटची गरज भासत नाही. सार्वजनिक वाहतुकीच्या सर्व बसेस, ट्रकच्या केबिनसुद्धा वातानुकूलित असतात. प्रवासी सिटी बसेस विनावाहक असून, ड्रायव्हिंगची कामे महिला करीत असतात.. आपल्या देशात अशी वाहतूक व्यवस्था निर्माण होईल, तो सुदिन असेल\n\"पाणी घेता का पाणी...'\nऔरंगाबाद - नागरी क्षेत्रातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उद्योगांना देण्याचे धोरण...\nलहानपणीची एखादी सहज केलेली कृतीही पुढे आयुष्यभर प्रेरणा देत राहणारी ठरते. महर्षी अण्णासाहेबांच्या सत्काराची कल्पना राबवतानाचा अनुभवही असाच...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\n\"जे.पीं'नी जागतिक शिक्षणाला दृष्टी दिली - शरद पवार\nउत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची...\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vedashri.blogspot.com/2008/09/", "date_download": "2018-04-24T04:25:43Z", "digest": "sha1:AGLUEQ35ZCJ32ZCFUBL6J5IO35JPG4S2", "length": 7532, "nlines": 54, "source_domain": "vedashri.blogspot.com", "title": "वेदश्री: September 2008", "raw_content": "\nशुक्रवार, १२ सप्टेंबर, २००८\nमनोगतींच्या ठाणे येथे आनंदात, उत्साहात पार पडलेल्या कट्ट्यात काय झालं हे तर बरेच जणं सांगतीलच, पण कट्ट्यानंतर मला काय अनुभवायला मिळालं हे मला सांगावंसं वाटत आहे.\nसर्वांचा निरोप घेऊन मी ठाण्याच्या स्टेशनला पोहोचले. तिकिट काढून मला हव्या त्या फलाटापर्यंत पोहोचेपर्यंत माझी लोकल मला वाकुल्या दाखवत माझ्या समोर निघून गेली. अखंड-प्रवास नशिबात नाही आज, असं काहीसं पुटपुटत खंड-प्रवासासाठी कुर्ल्याच्या फलाटाकडे गेले. फाष्ट लोकल पकडून कुर्ल्याला आले आणि मग तिथून माझ्या ठिकाणी नेऊन पोहोचवेल अशी लोकल पकडली. वटवटा स्वभाव गप्प कुठे बसायला नेहमीप्रमाणे स्त्रियांसाठी राखीव असलेल्या डब्यात शिरल्याने माझ्याजवळ एक मध्यमवयीन बाई उभ्या होत्या. होताहोता गप्पा सुरू झाल्या, ज्यातून कळलं की त्या बऱ्याचदा ये-जा करतात लोकलने. मी मध्येच म्हटलं,\"लोकलचीही तिकिटं किती महाग झाली आहेत आताशा नेहमीप्रमाणे स्त्रियांसाठी राखीव असलेल्या डब्यात शिरल्याने माझ्याजवळ एक मध्यमवयीन बाई उभ्या होत्या. होताहोता गप्पा सुरू झाल्या, ज्यातून कळलं की त्या बऱ्याचदा ये-जा करतात लोकलने. मी मध्येच म्हटलं,\"लोकलचीही तिकिटं किती महाग झाली आहेत आताशा नेहमी ये-जा करावं लागतं माझ्या एका मैत्रिणीला तर आम्ही परवा पासच काढून घेतला. खूप पैसे वाचतात त्याने.\"\nमाझ्या या वक्तव्यावर त्यांनी माझ्याकडे एक कारुण्यमय कटाक्ष टाकला त्यांच्या त्या नजरेचा मला काहीच अर्थ उमगेना. माझा चेहरा गोंधळलेला.\n\"पासला किती पैसे घेतले त्यांनी\" पुर्वीच्या काळी मुनिम लोकं उलट तपासणी घ्यायचे हिशेबाची, त्या खाक्याने त्यांनी मला विचारलं.\n\"१५० रुपये.\" प्रश्नाचा रोख लक्षात न येताही मी उत्तर दिलं.\n\"वेड्या आहात तुम्ही मुली \" या त्यांच्या वाक्यावर मी उडालेच ( लाक्षणिक अर्थाने \" या त्यांच्या वाक्यावर मी उडालेच ( लाक्षणिक अर्थाने \n\" माझ्या या बोलण्याने मी माझ्या वेडेपणावर शिक्कामोर्तबच केलं असल्यासारखं त्या माझ्याकडे बघायला लागल्या.\n\"फक्त ५० रुपयात काम झालं असतं तुमचं, तिथे तुम्ही १५० रुपये घातलेत.\" आता माझ्या डोक्यात थोडीशी ट्यूब पेटली, पण अजूनही ती पुकपुकतच होती.\n\"बघू मला तुमचा पास\n\"पासची काही गरज नाही \n तुम्ही तिकिट काढलेलं नाही आणि पासही काढलेला नाही\" टीसीने पकडलं तर काय, या प्रश्नाने माझीच सट्टीपट्टी गुल झालेली.\n\"नाही. मी लोकलच्या प्रवासाचा विमा उतरवला आहे \n'हे काय गौडबंगाल आहे विम्याचं' असं विचारणं अगदी माझ्या ओठाशी आलेलं पण तोवर आम्हां दोघींचं अपेक्षित स्टेशन आलेलं असल्याने बोलणं बंद करून आम्ही उतरलो.\n\"अच्छा, भेटू परत.\" असं म्हणून त्या निघाल्या आणि डोक्यात सुरू झालेलं विचारचक्र घेऊन मीही माझ्या रस्त्याने निघाले. तेवढ्यात मला टीसीचा आवाज आला,\"तिकिट दाखवा.\"\n\"नाही आहे.\" शब्दांचा आवाज ओळखीचा वाटला. मी वळून बघितलं तर त्याच माझ्यासोबत ज्या होत्या त्या बाई तिथे होत्या. त्यांच्या बोलण्याने सुरू झालेल्या माझ्या विचारचक्राचं काय उत्तर मिळत असेल तर ते कळावं या हेतूने मी दोन मिनिट थांबले त्या बाई काय उत्तर देतात ते ऐकायला. त्यांचं उत्तर होतं,\"XXXX हमालाला दिलाय मी या महिन्याचा हप्ता \nलेखिका : वेदश्री कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nकृपया आम्हाला जगू द्या...\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.shyamjoshi.org/category/stotra-mantra/mangal-stotra/", "date_download": "2018-04-24T04:49:03Z", "digest": "sha1:R6DHWKILPYTS6KGOXC34JTPRYCDYJNEM", "length": 5330, "nlines": 113, "source_domain": "www.shyamjoshi.org", "title": "मंगळ स्तोत्र – अथातो ब्रह्मजिज्ञासा", "raw_content": "\nउद् बुद् ध्यस्वाग्ने प्रतिजागृहि\nकर्म कांड / यज्ञ याग\n॥ अङ्गारकस्तोत्रम् ॥ अस्य श्री अङ्गारकस्तोत्रस्य विरूपाङ्गिरस ऋषिः अङ्गारकः शक्तिधरो लोहिताङ्गो धरासुतः कुमारो मङ्गलो भौमो महाकायो धनप्रदः ॥ १॥ ऋणहर्ता दृष्टिकर्ता रोगकृद्रोगनाशनः कुमारो मङ्गलो भौमो महाकायो धनप्रदः ॥ १॥ ऋणहर्ता दृष्टिकर्ता रोगकृद्रोगनाशनः विद्युत्प्रभो व्रणकरः कामदो धनहृत् कुजः\n॥ ऋणमोचकमङ्गलस्तोत्रम् ॥ ज्यांना कर्ज देणे आहे , जे कर्जात अडकलेले आहेत व कर्जातून लवकर मुक्त व्हायचे आहे त्या सर्वांनी हे स्तोत्र नियमितपणे श्रद्धेने भक्तिभावाने पठण करावे , कोणत्याही एका चांगल्या दिवसापासून किंवा मंगळवार पासून सुरू करावे , लवकरात लवकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1280", "date_download": "2018-04-24T04:40:49Z", "digest": "sha1:HOFYJHPPULXLARYDY4OZ75M7S4HUHHEO", "length": 3967, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nदिल्ली अर्थशास्त्र परिषद 2017 चे शनिवारी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन\nसिंगापूरचे उपपंतप्रधान थर्मन षण्मुगरत्नम यांचे “भारतीय विकास व्युहरचना आणि जागतिकीककरणानंतरच्या आंतरराष्ट्रीय संबंध” या विषयावर उद्‌घाटनपर भाषण\nकेंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते शनिवारी 22 जुलैला राजधानी दिल्लीत “दिल्ली अर्थशास्त्र 2017”चे उद्‌घाटन होणार आहे. तसेच परिषदेत सिंगापूरचे उपपंतप्रधान थर्मन षण्मुगरत्नम यांचे “भारतीय विकास व्युहरचना आणि जागतिकरणानंतरच्या आंतरराष्ट्रीय संबंध” या विषयावर उद्‌घाटनपर भाषण होणार आहे.\nएक दिवस चालणाऱ्या या परिषदेत पहिले सत्र “रोकडचे भवितव्य” या विषयांवर असून हॉवर्ड विद्यापीठातले अर्थशास्त्राचे प्राध्यापक केनेथ रॉजफ वक्ते असतील.\nपरिषदेत यूआयडीआयचे माजी प्रमुख नंदन नीलेकेणी यांचे 21व्या शतकातील तेल सांख्यिकी : भारताचा प्रतिसाद या विषयावर व्याख्यान होईल तर नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. मॉण्टेकसिंग अहलुवालिया, माजी वित्त सचिव विजय केळकर हे देखील सहभागी होणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2171", "date_download": "2018-04-24T04:40:31Z", "digest": "sha1:FS7UEURAWGQY46MSYHOOF4AMZZ565FLD", "length": 5358, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nमनरेगामुळे लोकांच्या उत्पन्नात वाढ, भूजल पातळीही वाढली\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे गावातल्या मजूरांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे या योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे 2015 पासून भूजल पातळीतही वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यासंदर्भात देशातल्या 30 जिल्हयांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले, सुमारे 1100 कुटुंबांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणानुसार, लोकांच्या उत्पन्नात 11 टक्क्यांची वाढ झाली आहे तर विविध डाळी उत्पादनही 11.5 टक्के आणि भाजीपाला उत्पादन 32 टक्क्यांनी वाढले आहे.\nमनरेगाअंतर्गंत, केलेल्या कामांमुळे भूजल पातळीत 30 टक्क्यांपासून ते 95 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे अनेक कुटुंबांना जनावरांसाठी चारा आणि इतर कृषी उत्पादने मिळू लागली आहेत. पाळीव जनावरांची उपलब्धताही वाढली आहे.\nमनरेगाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याचे अनेक प्रयत्न गेल्या तीन वर्षात करण्यात आले. मनरेगाअंतर्गंत, मिळणाऱ्या कामांचे पैसे आधार क्रमांकामार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ लागले त्यामुळे या योजनेतला भ्रष्टाचार आणि गळती कमी झाली आहे. तसेच मजूरांना वेळेत त्यांची मजूरी मिळणे शक्य झाले आहे. यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालय आणि राज्य सरकारांनी एकत्रित प्रयत्न केले आहे. मात्र अद्याप काही राज्यांमध्ये मनरेगाच्या अंमलबजावणीत सुधारणा आवश्यक असल्याचे या अहवालात म्हटले आहे.\nमनरेगाअंतर्गंत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, स्वच्छतागृह बांधणे, घनकचरा व्यवस्थापन, खत निर्मिती, रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण, अंगणवाडी केंद्र उभारणे अशी कामे केल्यामुळे ग्रामीण भागातल्या जनतेच्या जीवनमानात सुधारणा झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/bhandarkar-oriental-research-institute-rfid-1646402/", "date_download": "2018-04-24T05:03:48Z", "digest": "sha1:LG3ZT4I37SVRZKOQFAAQPZCPYUETAAUL", "length": 20132, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhandarkar Oriental Research Institute RFID | ‘भांडारकर’ संस्थेतील पुस्तकांना अत्याधुनिक प्रणालीचा आधार | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n‘भांडारकर’ संस्थेतील पुस्तकांना अत्याधुनिक प्रणालीचा आधार\n‘भांडारकर’ संस्थेतील पुस्तकांना अत्याधुनिक प्रणालीचा आधार\nपरदेशातील ग्रंथालयांमध्ये ‘आरएफआयडी’ ही प्रणाली उपयोगात आणली जात असून त्याला यश मिळाले आहे.\n‘आरएफआयडी’ प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय\nप्राच्यविद्या क्षेत्रात जगभरात नावाजल्या गेलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या ग्रंथालयातील पुस्तकांना आता अत्याधुनिक प्रणालीचा आधार लाभणार आहे. संस्थेच्या डॉ. रा. ना. दांडेकर ग्रंथालयातील अनमोल ठेवा असलेल्या पुस्तकांसाठी ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाईस’चा (आरएफआयडी) वापर करण्याचा निर्णय संस्थेने घेतला असून त्यामुळे पुस्तके गहाळ होणे किंवा पुस्तकांची चोरी अशा प्रकारांना आळा बसणार आहे.\nशताब्दी वर्ष साजरे केलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या ग्रंथालयामध्ये वेद, पुराण, उपनिषद, रामायण, महाभारत, आयुर्वेद यांसह विविध विषयांवरील सुमारे एक लाख ३० हजार पुस्तकांचा संग्रह आहे. अर्धशतकाहून अधिककाळ संस्थेच्या मानद सचिवपदाची धुरा समर्थपणे सांभाळून संस्थेच्या नावलौकिकामध्ये भर घालणारे ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा. ना. दांडेकर यांचे नाव ग्रंथालयाला देण्यात आले आहे. संस्थेच्या ग्रंथालयामध्ये विविध विषयांवरील अमूल्य ग्रंथांची भर पडेल याची जाणीवपूर्वक दक्षता दांडेकर यांनी घेतली होती. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरील अनमोल ज्ञानाचा साठा असलेल्या या ग्रंथालयातील पुस्तकांना सातत्याने मागणी असते. हा अनमोल ठेवा सुरक्षितपणे जतन करण्याच्या उद्देशातून संस्थेच्या कार्यकारी मंडळाने ग्रंथालयातील पुस्तकांसाठी ‘आरएफआयडी’ ही अत्याधुनिक प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर आणि दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनचे काम पाहणारे डॉ. सुधीर वैशंपायन यांनी दिली.\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nपरदेशातील ग्रंथालयांमध्ये ‘आरएफआयडी’ ही प्रणाली उपयोगात आणली जात असून त्याला यश मिळाले आहे. त्यामुळे या प्रणालीचा वापर करुन संस्थेच्या ग्रंथालयातील पुस्तकांचे जतन केले जावे, या साठी हा निर्णय घेतला असल्याचे बहुलकर यांनी सांगितले. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार असून ग्रंथालयातील सर्वच पुस्तकांसाठी ही प्रणाली उपयोगात आणावी की टप्प्याटप्प्याने ही प्रणाली कार्यान्वित करावी हे लवकरच निश्चित केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\n‘आरएफआयडी’ प्रणालीमध्ये प्रत्येक पुस्तकामध्ये एक मायक्रोचीप बसविली जाते. त्या चीपला असलेल्या सेन्सरमुळे ग्रंथालयात जाणारी व्यक्ती जसजशी पुस्तकाजवळ जाईल तसा त्या पुस्तकातील चीपचा आवाज मोठा होत जाईल आणि वाचकाला ते पुस्तक नेमके कोठे आहे हे समजू शकेल, असे डॉ. वैशंपायन यांनी सांगितले. या प्रणालीमुळे पुस्तक गहाळ होणे किंवा चोरीला जाणे अशा प्रकारांना आळा बसणार आहे. या प्रणालीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. वाचकांना घरबसल्या, त्यांना हवे असलेले पुस्तक सध्या ग्रंथालयामध्ये आहे किंवा ते कोणाकडे आहे याची माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे पुस्तक घेण्यासाठी ग्रंथालयात येण्याचा त्यांचा हेलपाटा वाचू शकेल. त्याचप्रमाणे ग्रंथालयामध्ये पुस्तक उपलब्ध असेल तर, वाचकाला ‘एसएमएस’द्वारे कळविण्याची सुविधा देणे शक्य होणार आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे वाचकांना लेखकानुसार, विषयानुसार, शीर्षकानुसार पुस्तक शोधता येणार आहे, असेही वैशंपायन यांनी सांगितले. टप्प्याटप्प्याने ही प्रणाली कार्यान्वित करावी हे लवकरच निश्चित केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\n‘आरएफआयडी’ प्रणालीमध्ये प्रत्येक पुस्तकामध्ये एक मायक्रोचीप बसविली जाते. त्या चीपला असलेल्या सेन्सरमुळे ग्रंथालयात जाणारी व्यक्ती जसजशी पुस्तकाजवळ जाईल तसा त्या पुस्तकातील चीपचा आवाज मोठा होत जाईल आणि वाचकाला ते पुस्तक नेमके कोठे आहे हे समजू शकेल, असे डॉ. वैशंपायन यांनी सांगितले.\nया प्रणालीमुळे पुस्तक गहाळ होणे किंवा चोरीला जाणे अशा प्रकारांना आळा बसणार आहे. या प्रणालीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. वाचकांना घरबसल्या, त्यांना हवे असलेले पुस्तक सध्या ग्रंथालयामध्ये आहे किंवा ते कोणाकडे आहे याची माहिती मिळू शकणार आहे.\nत्यामुळे पुस्तक घेण्यासाठी ग्रंथालयात येण्याचा त्यांचा हेलपाटा वाचू शकेल. त्याचप्रमाणे ग्रंथालयामध्ये पुस्तक उपलब्ध असेल तर, वाचकाला ‘एसएमएस’द्वारे कळविण्याची सुविधा देणे शक्य होणार आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे वाचकांना लेखकानुसार, विषयानुसार, शीर्षकानुसार पुस्तक शोधता येणार आहे, असेही वैशंपायन यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2011/12/29/%E0%A4%8A%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A5%A7/", "date_download": "2018-04-24T04:43:03Z", "digest": "sha1:F3ECBYI7XEXSR3TQVGKI6TJ2PBG3V5DI", "length": 24373, "nlines": 480, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "ऊब आहाराची : १ | Abstract India", "raw_content": "\nऊब आहाराची : १\nडॉ. श्री बालाजी तांबे\nशरीराला ऊब हवी हे खरे; पण शरीरात अतिउष्णता असली तर शरीराचे क्षरण लवकर होईल व म्हातारपणाकडे वाटचाल होईल. उष्णतेपेक्षा ऊब अधिक महत्त्वाची समजली जाते. जीवनासाठी उष्णता व ऊब यांची आवश्‍यकता असते. शरीराची ऊब टिकावी व कार्यासाठी उत्साह राहावा म्हणून आहारावर खूप लक्ष ठेवावे लागते. प्रत्येकाने स्वतःची प्रकृती ओळखून ऋतुमानाप्रमाणे आहार करावा हे जितके खरे, तितकेच थंडीत आहाराची ऊब मिळणेही महत्त्वाचे असते.\nपोटात अन्नाचा कण नसला की नुसती थंडीच वाजते असे नाही, तर हात-पाय लटलटायलाही लागतात, उभे राहताना ग्लानी येऊ शकते आणि काहीही करू नये असे वाटले तर नवल नसते. थंडीच्या दिवसांत उबदार पांघरूण घेऊन झोपणे आणि सकाळी जाग आली तरी “आज व्यायाम झाला नाही तरी चालेल’, “आज फार थंडी आहे तेव्हा ऑफिसला दांडी मारू’, अशा तऱ्हेचे विचार मनात येऊ लागतात. कारण पांघरुणाची ऊब त्यातून बाहेर आल्यावर मिळू शकत नाही. शेवटी शरीराची ऊब असो वा प्रेम असो, ते आतूनच यावे लागते; त्याचे सोंग घेता येत नाही किंवा त्याचा कल्पनेने अनुभव घेता येत नाही, ते प्रकट व्हावे लागते व त्यासाठी लागते शक्‍ती.\nजानेवारी महिन्यात करण्यात येणारी गुळाची पोळी सर्वांच्या परिचयाची असते. त्याचबरोबर थंडीच्या ऋतूत गूळपापडी, तिळपापडी, दाणेपापडी, रेवडी, गजक या गोष्टींची चलती असते. थोडेसे पुढे गेले तर डिंकाचे लाडू, अहळिवाचे लाडू, सुक्‍या मेव्याच्या लाडू, तसेच मिरचीचा ठेचा, लसणाची चटणी याही गोष्टी खाण्यात अधिक प्रमाणात येतात.\nमनुष्याचे पूर्ण जीवन आहारावर अवलंबून असते. सर्व शक्‍ती आहारातूनच मिळवावी लागते. आहारातून शक्‍ती काढून घेत असताना किंवा त्या शक्‍तीचा इंद्रियचलनासाठी वा कुठलेही कार्य करण्यासाठी वापर होताना शरीरात उष्णता उत्पन्न होते. पण तरीही मुळातच आहार जर उष्णवीर्य असला, तर तो सहज पचू शकतो; त्यातून ऊबही मिळू शकते. तिळाच्या रेवड्या किंवा गुळाची पोळी उन्हाळ्यात खाल्ली असता हातापायाची, डोळ्यांची जळजळ होणे किंवा मूळव्याधीसारखा त्रास होण्याची शक्‍यता असते.\nआहारातील गोष्टींचा विचार केला, तर तांदूळ थंड असतो व गहू उष्ण असतो. तिखट, खारट व आंबट वस्तू साधारणतः उष्ण असतात; गोड वस्तू साधारणतः शीत असतात.\nअपवाद म्हणता येणार नाही, पण आंबट-गोड चवीचा गूळ उष्णवीर्याचा असतो; साखर मात्र वीर्याने थंड असते म्हणून तिचे नामकरण आयुर्वेदाने शीता-सीता असे केलेले दिसते.\nसेवन केलेल्या आहाराचे अपचन झाले की शरीरात मेदोत्पत्ती होते. हा मेद स्पर्शाला थंड असतो, त्यामुळे तो शरीरात अति प्रमाणात वाढला की शरीराला अधिक उबेची गरज भासू लागते. रक्‍ताभिसरणासाठी उष्णता लागते आणि रक्‍ताभिसरण झाले की उष्णता वाढते. हृदयाच्या धडधडीमुळे शरीराची उष्णता वाढते व थंडीमुळे हृदयाला काम करणे अवघड होते. बाहेरून थकून भागून आलेल्या व्यक्‍तीला “या-बसा’ अशा प्रेमाच्या स्वागताने मिळालेली ऊब पुरशी नसल्याने, त्याला गूळ-दाणे देण्याची पद्धत दिसते.\nशरीर थंड पडले की प्राण गेला असे लक्षात येते. तसा संशय आल्यास कपाळावर हात लावून धुगधुगी आहे की नाही, म्हणजे उष्णता प्राण आहे की नाही याचा अंदाज घेतला जातो. जिवंत मनुष्य व उष्णता यांचा संबंध नक्कीच असतो. हाता-पायाची घडी घालून एखादा मनुष्य शांत बसून राहिलेला असला तर “काय थंडपणे बसून राहिला आहेस, काय मेल्यासारखा बसला आहेस’ असा प्रश्‍न विचारला जातो.\nगती व उष्णता यांचाही संबंध आपल्याला दिसतो. उष्णतेसाठी गती आवश्‍यक असते. एकूणच जीवनासाठी उष्णता व ऊब यांची आवश्‍यकता असते. शरीराची ऊब टिकावी व कार्यासाठी उत्साह राहावा म्हणून आहारावर खूप लक्ष ठेवावे लागते. एक गोष्ट खरी, की शरीराला ऊब हवी हे खरे असले तरी शरीरात अतिउष्णता असली तर शरीराचे क्षरण लवकर होईल व म्हातारपणाकडे वाटचाल होईल.\nम्हणून उष्णतेपेक्षा ऊब अधिक महत्त्वाची समजली जाते. असे काही पदार्थ आहेत, की ज्यामुळे उष्णता वाढली तर त्रास होऊ शकतो. त्यामुळे मिरची, मिरी, गूळ वगैरे अतिउष्ण वीर्याचे पदार्थ अति प्रमाणात खाऊन चालत नाही, कारण अशा पदार्थांच्या अति प्रमाणात सेवनाने उबेपेक्षा उष्णता वाढू शकते.\nमनुष्याची वात, पित्त, कफ अशी तीन प्रकारची प्रकृती असते व त्यांचे असंतुलन झाले की रोगाची निर्मिती होते. तसेच आहारपदार्थांचे वर्गीकरण शीतवीर्य, उष्णवीर्य असे करता येते. मुळात गरम गरम अन्न सेवन करण्याने शरीरात सहजतेने पचते, तर शिळे, थंड पदार्थ शरीरात लवकर सात्म्य होत नाही, लवकर पचत नाहीत. तेव्हा प्रत्येकाने स्वतःची प्रकृती ओळखून ऋतुमानाप्रमाणे आहार करावा हे खरे असले, तरी थंडीत आहाराची ऊब मिळणे महत्त्वाचे असते, हे लक्षात ठेवणे इष्ट असते.\nfrom → आहारशास्त्र, ऊब, थंडी\n← मानसोपचाराने ठेवा हृदय शाबूत\nऊब आहाराची – 2 →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/donald-trump-116112200008_1.html", "date_download": "2018-04-24T05:07:55Z", "digest": "sha1:ZY3RHIB5BLR7UXNKBEXQRUTY4SB4DOCY", "length": 9708, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फसवणुकीचा खटला मिटवणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक केलेला खटला 25 दशलक्ष अमेरिकन डॉलर देऊन मिटविण्यास अमेरिकेचे नियोजित\nडोनाल्ड ट्रम्प यांनी तयारी दाखवली आहे. ट्रम्प युनिव्हर्सिटी स्थापन करून तिच्या माध्यमातून स्थावर मालमत्तांच्या व्यवसायात यशस्वी कसे व्हावे हे शिकविण्याचे आश्वासन दिले होते. आता हे विद्यापीठच अस्तित्वात नाही. युनिव्हर्सिटीत नाव नोंदविण्यास विद्यार्थ्यांनी 35 हजार डॉलरचे शुक्ल भरले होते. विद्यापीठाने आश्वासन पूर्ण केले नाही व फसवणूक झाली असा विद्यार्थ्यांचा आरोप होता.\nसुशीलकुमार शिंदे यांना विद्यापीठाची डी.लिट.\nआगीत होरपळून माय लेकराचा मृत्यू\nअबब किती मोठा डोम\nआरबीआयकडून कर्जदारांना दिलासा, कर्ज परत फेडीसाठी ६० दिवसांची अतिरिक्त मुदत वाढ\nलासलगावला कांद्याला उच्चांकी भाव\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marketaanimi.com/2014/11/05/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82-oct/", "date_download": "2018-04-24T05:00:29Z", "digest": "sha1:QU45NV4IRODUK3VO7L6KQ2TXRIQ7FYMS", "length": 16421, "nlines": 109, "source_domain": "marketaanimi.com", "title": "तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Oct २०१४ | Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nतुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Oct २०१४\nतुमचे स्वत:चे काही प्रश्न किंवा शंका असतील तर पानावर जावून त्या मला कळवा\nकाही दिवसापूर्वी मी ‘तुमचे प्रश्न’ हा नवीन उपक्रम ब्लोगवर चालू केला. आतापर्यंत मला बर्याच वाचकांकडून प्रश्न आलेले आहेत. सगळ्या प्रश्नांना एक एक करून उत्तर देण्याऐवजी, मी प्रत्येक महिन्यात आलेले प्रश्न एकत्र करून उत्तर द्यायचं ठरवलंय. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही ‘माझी उत्तरं‘ या पानावर अससेल्या लिंक क्लिक करून वाचू शकता. तुमचा प्रश्न अनुत्तरीत राहिल्यास मला जरूर कळवा. मी पुढच्या भागात उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन.\nगजेंद्र घुले : कॉर्पोरेट action बद्दल चौकशी.\nकॉर्पोरेट actionला कॉर्पोरेट इव्हेंट असेही म्हणतात. कॉर्पोरेट action म्हणजे अशी घटना जी पब्लीक लिमिटेड कंपनीच्या बाबतीत घडते. ज्याचा परिणाम शेअरचा भाव , शेअरची liquidityयावर होतो. त्याचप्रमाणे याचा परिणाम debt securitiesवरही होतो . यामध्ये dividend, बोनस , coupon पेमेंट, स्प्लीट, स्पीनऑफ, मर्जर, या व अशा सर्व गोष्टी येतात. याची खुलासेवार चर्चा मी माझ्या ब्लोगवर करीन. तुम्ही ते वाचा.\nदीपक पवार : गुंतवणूक करण्यासाठी कोणते शेअर्स घेऊ आणि आणि कोणत्या कंपनीचे फार्म भरू.\nप्रत्येक कंपनीचे शेअर्स विकत घेण्यासाठी फार्म भरावा लागत नाही. फार्म भरून जे शेअर्स ‘IPO’ मध्ये मिळतात त्याला प्रायमरी मार्केट म्हणतात. असे शेअर्स नेहेमी मिळत नाहीत. ब्रोकरकडे ऑर्डर देवून तुमहाला शेअर्स कधीही खरेदी करतां येतात.त्यासाठी ट्रेडिंग तसेच ‘DEMAT’ अकौंट उघडावा लागतो. तुम्ही तुमच्या सवडीप्रमाणे माझा ब्लोग वाचा म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.\nग्रे मार्केट्ची ठराविक अशी मार्केटप्लेस नसते हे मी ब्लोगमध्ये सांगितले आहे. तुम्ही जर ब्रोकरकडे चौकशी केलीत तर ब्रोकर तुमची या मार्केटनाध्ये व्यवहार करणार्या लोकांशी गाठ घालून ओळख करून देतो.\nसागर जाधव : BSE MIDCAP आणि BSE SMALL कॅप ही काय भानगड आहे\nया ठिकाणी कॅप या शब्दाचा अर्थ टोपी , टोपी घालणे किंवा टोपी बदलणे नव्हे. कॅप म्हणजे कॅपिटलचा SHORTFORM. मार्केट कॅप म्हणजे शेअरचा बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. या मार्केटकॅप प्रमाणे कंपन्यांचे वर्गीकरण केले जाते. या कंपन्या BSEवर लिस्टेड असतात. त्याचा निर्देशांक असतो. त्यालाच BSEमिडकॅप आणि BSE SMALLकॅप INDEX असे म्हणतात.\nसागर दुगम : Stock मार्केट मध्ये trade करण्यासाठी ब्रोकर हवाच का On line आपला आपण trade नाही का करू शकत\nशेअर मार्केट मधे trade करायला ब्रोकर हा लागतोच. सगळेच लोग BSE कडे direct जायला लागले तर किती गोंधळ होईल याचा विचार करा तुमची अगदी On line trading जरी केलत तरी ते ब्रोकेरच्या माध्यमातूनच करावं लागतं. त्यामुळे ब्रोकर ला पर्याय नाही. IPO चे शेअर मात्र तुम्हाला ब्रोकर च्या मध्यस्थी शिवाय मिळतात पण ते सुद्धा मार्केट मध्ये विकायचे असतील तर ब्रोकर ची गरज लागते\nसागर दुगम : प्रत्येक शेअर ची स्वताची किमत असते तर मग मार्केट चा काय उपयोग आणि BSE, NSE मध्ये वेगळी किमत का\nशेअर ची किमत मार्केट ठरवतं त्यामुळे शेअरची किमत हि त्या मार्केटमधली किमत असते . हि किमत demand आणि supply च्या तत्वावर ठरवली जाते. प्रत्येक मार्केट मध्ये demand आणि supply वेगळा असतो त्यामुळे किंमत वेगळी असू शकते.\nपंकज – मी नोकरी करतो आणि नोकरीवर मला पूर्ण वेळ TV बघण शक्य नाही. मग मी invest केलं तर त्या investment ची position काय हे मला कसं कळणार\nआजकाल सगळ्यांकडे mobile phone असतात आणि त्यावर इंटरनेट access सुद्धा असतो. त्यामुळे तुम्ही mobile वापरून तुमच्या शेअर ची किमत किती आहे हे बघू शकता. Lunchtime मध्ये तुमच्या ब्रोकर ला phone करून मार्केटचा आणि तुमच्या शेअर्स चा अंदाज घेवू शकता. मला नक्की माहित नाही पण तुमच्याकडे असलेल्या शेअर्स वर तुम्ही alerts सेट करू शकता. बर्याच websites हि सुविधा देतात.\nअजून काही प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर इथे क्लिक करा\nतुमचे स्वत:चे काही प्रश्न किंवा शंका असतील तर पानावर जावून त्या मला कळवा\nमी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.\n← भाग ५० – IPO – पुढच्यास ठेच मागचा शहाणा भाग ५१ – एक ‘IPO’ , बारा भानगडी \n3 thoughts on “तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Oct २०१४”\nविनय शिंगाडे एप्रिल 18, 2018 येथे 1:57 pm\nमॅडम ऑप्शन बद्दल सविस्तर माहिती द्या\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआठवड्याचे-समालोचन - सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा - १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८\nभाग 62 - शेअर मार्केट आणि ब्रेक्झीट\nतुमचे प्रश्न – माझी उत्तरं : July - September 2017\nआठवड्याचे-समालोचन – सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा – १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८\nआठवड्याचे समालोचन – शेअर मार्केट एक ‘अक्षय पात्र’ – ९ एप्रिल २०१८ ते १३ एप्रिल २०१८\nआठवड्याचे समालोचन – साप शिडीचा खेळ – २ एप्रिल २०१८ ते ६ एप्रिल २०१८\nलेखमाला – ‘माझी वाहिनी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://nangnoor.gadhinglaj.org/", "date_download": "2018-04-24T04:52:52Z", "digest": "sha1:XSQRY45VBQRJP7B6BSB3AFRQZCZRPOUO", "length": 5000, "nlines": 45, "source_domain": "nangnoor.gadhinglaj.org", "title": "Nangnoor Grampanchayat", "raw_content": "\nहिरण्यकेशी नदीच्या तीरावर, सुरम्य वनश्रीच्या मध्यात वसलेल नांगनुर हे आमचं गावं. गडहिंग्‍लज तालुक्यापासून 22 किमी अंतरावर वसलेले नांगनुर हे आमचं गांव. गावाला हिरण्यकेशी नदी लाभली आहे. तसेच गावामध्ये बोअरवेल व विहिरी खणल्या आहेत या पाण्‍याचा वापर पिण्‍यासाठी व शेतीसाठी केला जातो. ग्रामपंचायतीने म.ग्रा.रो.ह. योजने अंतर्गत रस्‍तांच्‍या दुतर्फा बाजुस झाडे लावलेली आहेत. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम, प्लास्टिक निर्मुलन जनजागृती प्रभातफेरी आदी कार्यक्रम राबिविले जातात. गावामध्येच पोस्ट ऑफिस असल्याने गावातूनच पत्रव्यवहार करणे सुलभ झाले आहे. तसेच गावामध्येच शुक्रवारी बाजार भरतो.\nआपली माहिती website व app वर SHARE करा.\nआमच्या गावात ग्रामपंचायतीची स्थापना 5 सप्टेंबर 1957 साली झाली. गावची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. गावाची लोकसंख्या 2508 असून गावातील घरांची संख्या 846 आहे. गावामध्ये 510 कुटुंबे वास्तव्य करत असून ती 3 वार्डमध्ये विभागली गेली आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर आठ सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे.\nगावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.\nश्री. विकास मारुती मोकाशी\nगावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.\nश्री. संदिप भैरू तोरस्कर\nगावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.\nपंचायत समिती ग्रामपंचायत कार्यकारी सदस्य\nग्रामपंचायत कर्मचारी आपली समस्या मांडा विविध योजना फोटो गैलरी सुचना व न्युज\nआपली समस्या,विचार व विकास मांडा.\nआम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1487", "date_download": "2018-04-24T04:26:37Z", "digest": "sha1:2YHEVSB5HVQPKOMH6QDMJZG5KWGNKTQD", "length": 4779, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nनव्या मेट्रो रेल्वे धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, शहर विकास, किफायतशीरपणावर भर, खाजगी गुंतवणुकीला मोठा वाव\nशहरांच्या,मेट्रो रेल्वेविषयीच्या वाढत्या आकांक्षांची पूर्तता करणाऱ्या नव्या मेट्रो रेल्वे धोरणाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्याआज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणाद्वारे मेट्रोच्या विविध कार्यासाठी खाजगी गुंतवणुकीला मोठी संधी उपलब्ध झाली असून नव्या मेट्रो प्रकल्पासाठी, केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी अनिवार्य करण्यात आली आहे.मोठ्या क्षमतेच्या मेट्रो प्रकल्पांसाठी प्रचंड भांडवलाच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी खाजगी गुंतवणूक आणि वित्त पुरवठ्याचे इतर कल्पक प्रकार अनिवार्य करण्यात आले आहेत.\nनव्या मेट्रो प्रकल्पासाठीच्या प्रस्तावात राज्यांनी त्यांच्या प्रकल्प अहवालात या सेवेसाठी उपलब्ध प्रस्ताव आणि गुंतवणूकही दर्शवायची आहे. ही सेवा किफायतशीर राहावी यासाठी इतर सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांचे मूल्यमापनही करावे लागणार आहे.\nसध्या मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकत्ता, चेन्नई, कोची, जयपूर, गुरुग्राम अशा 8 शहरात एकूण 370 किलोमीटरचा मेट्रो रेल्वे मार्ग कार्यन्वित आहे. या शहरांसह, हैदराबाद, नागपूर, पुणे, अहमदाबाद आणि लखनौ अशा 13 शहरात एकूण 537 किलोमीटरच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे.\nसप्रे -नि चि -दर्शना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5625624758156107586&title=Vijay%20Padalkar,%20Mukund%20Taksale,%20Ma.Va.Dhond&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-24T05:04:24Z", "digest": "sha1:VPGYDYEXSSVZX6G5TIJGHKDLJSKVLAPD", "length": 12924, "nlines": 130, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "विजय पाडळकर, मुकुंद टाकसाळे, म. वा. धोंड", "raw_content": "\nविजय पाडळकर, मुकुंद टाकसाळे, म. वा. धोंड\n‘मुझे लगता है, हिंदुस्तान की हर जुबान मे, सेनिमापर लिखने के लिए एक विजय पाडलकर की जरूरत है’ असं साक्षात गुलजारजींनी ज्यांच्याविषयी म्हटलं ते विजय पाडळकर, आजच्या घडीचे अत्यंत लोकप्रिय विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे आणि ज्येष्ठ समीक्षक म. वा. धोंड यांचा चार ऑक्टोबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा थोडक्यात परिचय...\nचार ऑक्टोबर १९४८ रोजी बीडमध्ये जन्मलेले विजय पाडळकर हे चित्रपट आणि साहित्य विषयावर लिहिणारे एक अत्यंत अभ्यासू आणि लोकप्रिय लेखक-समीक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांचं पुस्तकांवर प्रेम आहे, त्यांना साहित्यिकांबद्दल प्रेम आहे आणि मुख्य म्हणजे सिनेमा आणि दिग्दर्शकांबद्दल त्यांना विशेष आत्मीयता आहे आणि ते त्यांच्या लिखाणातून स्पष्ट जाणवतं.\nज्या वाचकांना सिनेमा या विषयात रस असतो आणि सिनेमा हा ज्यांच्या अभ्यासाचा विषय असतो त्यांना विजय पाडळकरांचं लेखन वाचणं महत्त्वाचं ठरतं, इतका त्यांचा त्याविषयीचा अभ्यास आहे. उदाहरणार्थ, अकिरा कुरासोवा यांच्या ‘राशोमान’ सिनेमावर त्यांनी ‘गर्द रानात भर दुपारी’ हे एक स्वतंत्र पुस्तकच लिहिलं आहे. साक्षात गुलजार यांनी पाडळकरांच्या ‘गंगा आये कहां से’च्या प्रस्तावनेत म्हटलंय, ‘मुझे लगता है, हिंदुस्तान की हर जुबान में, सेनिमापर लिखने के लिए एक विजय पाडलकर की जरुरत है’ त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाले आहेत.\nअल्पसंख्य, सिनेमायाचे जादूगार, देखिला अक्षरांचा मेळावा, गगन समुद्री बिंबले, मोरखुणा, मृगजळाची तळी, पाखराची वाट, शेक्सपियर आणि सिनेमा, वाटेवरले सोबती, येरझारा, आंधी, बखर गीतकारांची, चंद्रावेगळं चांदणं, सिनेमाचे दिवस – पुन्हा, देवदास ते भुवनशोम, एक स्वप्न पुन्हा पुन्हा, कवडसे पकडणारा कलावंत, रावीपार, उमराव जान अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. विजय पाडळकर यांची आणि त्यांच्या साहित्याची समग्र माहिती देणारी http://www.vijaypadalkar.com/ ही अधिकृत वेबसाइट अलीकडेच सुरू करण्यात आली आहे. पाडळकर यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचकांना त्याचा नक्की उपयोग होईल.\nचार ऑक्टोबर १९५१ रोजी जन्मलेले मुकुंद टाकसाळे हे आजच्या घडीचे मराठीतले एक लोकप्रिय विनोदी साहित्यिक म्हणून ओळखले जातात. निर्मळ विनोद हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य.\nसमकालीन समाजकारण आणि राजकारणावर चुरचुरीत भाष्य अशा प्रकारचं त्यांचं लेखन चांगलंच वाचकप्रिय आहे. ‘पुलं’वरच्या आत्यंतिक प्रेमापायी त्यांनी संपादित केलेला ‘पु. ल. नावाचे गारुड’ हा ग्रंथ म्हणजे ‘पुलं’विषयी काही वेगळं वाचण्यासाठी अवश्य वाचावा असाच.\nमहाराष्ट्र राज्याचे मराठी विनोदी साहित्याचे पुरस्कार, मराठी साहित्य परिषदेचा चिं. वि. जोशी पुरस्कार, जयवंत दळवी स्मृती पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.\nगमतीगमतीत, आणखी गमतीगमतीत, मुका म्हणे, साडेसत्राव्वा महापुरुष, तेंडुलकर : असेही तसेही, उंदरावलोकन, आनंदीआनंद, हसंबद्ध, हास्यमुद्रा, मिस्कीलार, नाही मनोहर तरी, राधेने ओढला पाय, सक्काळी सक्काळी, टाकसाळीतील नाणी, टप्पू सुलतानी अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.\nचार ऑक्टोबर १९१४ रोजी जन्मलेले म. वा. धोंड हे मराठीतले ज्येष्ठ समीक्षक म्हणून ओळखले जातात. कोणत्याही विषयाचे विविध पैलू बारकाईने तपासून ते त्याचं विश्लेषण करीत आणि त्यावर त्यांचं अभ्यासपूर्ण लेखन असे.\nमराठी वाङ्मयकोशाच्या संपादनात त्यांचा सहभाग होता. ‘ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’ या त्यांच्या पुस्तकाला १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता.\nऐसा विटेवर देव कोठे, काव्याची भाषणे, मऱ्हाटी लावणी, ज्ञानेश्वरी - स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य, चन्द्र चवथीचा, जाळीतील चंद्र असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.\nपाच डिसेंबर २००५ रोजी त्यांचं मुंबईमध्ये निधन झालं.\nTags: BOIDinmaniदिनमणीविजय पाडळकरमुकुंद टाकसाळेम. वा. धोंड\nजेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे नेपोलिअन हिल, केशव सदाशिव रिसबूड द्वारकानाथ पितळे, संदीप वासलेकर, कृष्णराव देशपांडे, कृष्णराव बाबर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\n..आणि मी निद्रेच्या आधीन झालो..\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\nस्वानंद समुद्र यांना मानाचा ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅवॉर्ड’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/ram-kharche-vice-president-of-mcaer-scam-in-agriculture-department-recruitment-1648870/", "date_download": "2018-04-24T05:02:12Z", "digest": "sha1:H3KO53DTDA247TSUU5374BMP5NNLTMXR", "length": 17888, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ram Kharche Vice President of MCAER scam in agriculture department recruitment | ‘राम’राज्याची चुणूक! | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nअच्छे दिन खरोखरीच अस्तित्वात असतात आणि त्यांचे थेट ‘लाभार्थी’देखील असतात.\n‘अच्छे दिन’ हा ‘चुनावी जुमला’ आहे असे आपले नेते कितीही सांगत असले, तरी ते खरे नाही. अच्छे दिन खरोखरीच अस्तित्वात असतात आणि त्यांचे थेट ‘लाभार्थी’देखील असतात. आपल्याकडे आहे त्याहून अधिक काही तरी प्राप्त करणे ज्याला जमले, त्याला ‘अच्छे दिन’ लाभले असेच म्हणायला हवे आज भाजपच्या मार्गदर्शक मंडळात असलेल्या नेत्यांनी दोन दशकांपूर्वी तेच स्वप्न पाहिले होते. फक्त तेव्हा त्याचे नाव ‘रामराज्य’ असे होते. नव्या सरकारने अनेक जुन्या योजना नव्या नावाने अमलात आणल्या त्या सत्ताप्राप्तीनंतर.. त्याआधीच, रामराज्य नावाची संकल्पना अच्छे दिन या नव्या नावाने लोकप्रिय केली. त्यामुळे वास्तवात असंख्य लोक केवळ हातावर हात घेऊन अच्छे दिन धुंडाळत बसले असले, तरी ते प्रत्यक्षात पाहण्यासाठी स्वत:ला काही तरी करावे लागते, याचा मात्र त्यांना विसर पडला. ज्यांना हातपाय हलविण्याची संधी मिळाली, त्यांनी ते अच्छे दिन स्वत:समोर खेचून आणले. एकीकडे बेरोजगारीने ग्रासलेला युवा वर्ग आंदोलने करीत आपल्या निराशेला वाट करून देत असताना, राज्याच्या कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष असलेल्या पदाधिकाऱ्याने स्वकर्तृत्वाच्या बळावर अच्छे दिन स्वत:कडे खेचून आणले हे पाहता, अच्छे दिन मिळविण्यासाठी हातपाय हलवावे आणि डोकेदेखील चालवावे लागते हे सिद्ध झाले आहे. कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष राम खच्रे यांनी स्वत:च स्वत:च्या सहीने स्वत:स पदोन्नती देणारा आदेश २०१६ च्या सप्टेंबरात काढला, पदावर हक्कप्रस्थापित केला आणि कायद्यातील तरतुदी वाकवून स्वत:च्या शिरावर राज्यमंत्र्याच्या दर्जाचा राजमुकुटही चढवून घेतला. या कर्तबगारीला महाराष्ट्रात तोड नाही.\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nअसे अधिकारी आणि त्याच्या उभ्या कर्तबगारीबद्दल अनभिज्ञता दाखवीत कानावर हात ठेवणारे मंत्री ज्या ठिकाणी जन्म घेतात, त्या ठिकाणी ‘अच्छे दिन’ प्राप्त करून ‘लाभार्थी’ होणे अवघड नाही. लहानसहान मागण्यांसाठी जिवाला त्रास देत उन्हातान्हात आंदोलने करणारा बेरोजगार तरुणवर्ग पाहिला, की या कर्तबगारीचे महत्त्व आपोआपच अधोरेखित होते. राम खच्रे यांनी स्वत:चे असे रामराज्यच कृषी खात्यात स्थापन केले आहे. शेवटी, रामराज्य ही कल्याणकारी व्यवस्थेची संकल्पना आहे. राम खच्रे यांच्या रामराज्यात त्यांचे कल्याण झाले आहे. आता कृषिमंत्र्यांना त्याबद्दल काहीच कल्पना नाही, ही बाब अलाहिदा सरकारने अशा लहानसहान बाबींत लक्ष घातलेच पाहिजे, ही अपेक्षा गरच असते. सरकारला अस्तित्वाची कसरत करण्याचा मोठा व्याप पाठीशी असताना, कुणी स्वत:च आपली नियुक्ती करून स्वत:स राज्यमंत्र्याचा दर्जा प्राप्त करून घेऊ पाहात असेल, तर त्यामुळे सरकारी व्यवस्थेतील फायलींच्या प्रवासाचे किती तरी फाटे टळून तो सहज सोपा होऊन जात असतो. राम खच्रे यांनी सरकारी यंत्रणेतील अनेकांना आपापले रामराज्य कसे स्थापन करता येऊ शकते याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. सरकार कानावर हात ठेवून बसले आहे, तोवर ज्यांना ज्यांना शक्य आहे, त्यांनी कायद्याचा बारकाईने अभ्यास करून, अडसर नाही ना याची खात्री करून घेऊन स्वत:च्या पदोन्नतीचे आदेश काढून घेऊन लवकरात लवकर त्या पदाचा ताबा घेतल्यास, महत्त्वाची पदे तातडीने भरली जातील आणि रिक्त पदांपायी येणारा धोरणलकवा टाळणे सोयीचे होईल. मुख्यमंत्री आणि संबंधित खात्यांचे मंत्री यांनी केवळ ‘मला काहीही माहिती नाही’ असा आशीर्वाद द्यावा, बाकी पदोन्नती आणि नेमणुका आपल्या आपण होत राहतील\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nबिहार, युपी, मध्य प्रदेश, छत्तीगढ या राज्यांमुळे देश मागास; नीति आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त वक्तव्य\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1687", "date_download": "2018-04-24T04:47:59Z", "digest": "sha1:WH37BL4TPP2RVI6NX3VBKNN3OUGT2SL3", "length": 5520, "nlines": 62, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nरस्ते आणि महामार्ग वाहतूक\nमहाराष्ट्रातील सिंचन क्षेत्र 40 टक्क्यांपर्यंत वाढणार – नितीन गडकरी\nमहाराष्ट्रातील 26 सिंचन प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली असून, यामुळे आगामी 2 वर्षात सिंचन क्षेत्रात 22 टक्क्यांवरुन 40 टक्क्यांपर्यंत वाढ होईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक महामार्ग आणि नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते आज ‘पुरोगामी महाराष्ट्र 2017 आणि पायाभूत सुविधा परिवर्तन : सद्यस्थिती आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीवर प्रभाव’ यावरील राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत बोलत होते. फिक्कीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. ते म्हणाले की, सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे महाराष्ट्रातील आत्महत्या प्रवण शेतकऱ्यांना मदत होईल.\nबंदर विकास, सागरमाला, अंतर्गत जलमार्ग आणि चार पदरी महामार्ग यासारख्या केंद्र सरकारी योजनांमुळे महाराष्ट्राला आर्थिक विकासात मदत मिळेल, असे ते म्हणाले.\nक्रुझ पर्यटनाबाबत बोलतांना गडकरी म्हणाले की, मुंबईत क्रुझ टर्मिनल सुरु करण्यात येईल. पाच वर्षांनंतर 950 क्रुझ बोटी या टर्मिनलला भेट देतील. मुंबई आणि महाराष्ट्रातील अन्य पर्यटन प्रकल्पांवर याचा बहुआयामी परिणाम दिसून येईल. मुंबईतल्या जलवाहतुकीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.\nगंगा स्वच्छतेबाबतच्या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले की, गंगा नदी ही पवित्र नदी असून, ती स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांनी खाजगी कंपन्यांना गंगा नदीवर ‘मोक्षधाम’ बांधण्याचे आवाहन केले. कंपनी सामाजिक उत्तरदायीत्व योजने अंतर्गत कंपन्या गुंतवणूक करु शकतील आणि अशा प्रकारच्या ‘मोक्षधाम’वर त्यांचे नाव देऊ शकतील.\nआगामी दोन वर्षात महाराष्ट्रातील पायाभूत विकासात मोठा बदल झालेला दिसून येईल, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/youth-farmer-marraige-problem-264894.html", "date_download": "2018-04-24T05:03:43Z", "digest": "sha1:NRE33OHBWF45TPORUKFM5E7CAN4ONCYG", "length": 15282, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'शेतकरी नवरा नको गं बाई!' ग्रामीण भागात 3 हजार तरुणांचे विवाह रखडले !", "raw_content": "\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : अस्सा होता आपल्या 'सचिन'चा सुरुवातीचा प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n'शेतकरी नवरा नको गं बाई' ग्रामीण भागात 3 हजार तरुणांचे विवाह रखडले \nअहमदनगर जिल्ह्यातल्या 45 गावांमधून हे सर्वेक्षण करण्यात आलं त्यात शेती व्यवसायाशी निगडित असल्याने तब्बल 3 हजार 68 तरुणांचे विवाह रखडल्याचं आढळून आलंय.\nमुंबई, 11 जुलै : सरकार एकिकडे शाश्वत शेतीच्या गप्पा मारत असतानाच तिकडे ग्रामीण भागात मात्र, शेती कसणाऱ्या लग्नाळू युवकांना कोणी पोरीच द्यायला तयार नाहीये. सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या सर्वेक्षणातून हे भयावह वास्तव समोर आलंय. अहमदनगर जिल्ह्यातल्या 45 गावांमधून हे सर्वेक्षण करण्यात आलं त्यात शेती व्यवसायाशी निगडित असल्याने तब्बल 3 हजार 68 तरुणांचे विवाह रखडल्याचं आढळून आलंय. आपल्या मुलीला नोकरीवालाच नवरा मिळवून द्यायच्या या मानसिकेतपोटीच बहुतांश पालक आपल्या मुली शेतकरी तरुणांना द्यायला तयार होत नसल्याचं या पाहणीतून पुढे आलंय.\nशिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे ग्रामीण भागातही मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढतंय. पण या शिकलेल्या मुलींचा लग्नासाठीचा कल मात्र, नोकरदाराकडे वाढताना दिसतोय. मुलगा एखाद्या कंपनीत शिपाई असला तरी चालेल पण तो नोकरीला असला पाहिजे. अशीच भूमिका आता ग्रामीण भागातल्या मुली बोलून दाखवताहेत. नापिकी, हमी भावाचा पत्ता नाही आणि कर्जबाजारीपणामुळे शेतीचा व्यवसाय अलिकडच्या काळात आतबट्ट्याचा व्यवहार होत चाललाय, त्यातून शेतकरी आत्महत्या वाढताहेत. कर्जमाफीची तात्पुरती मलमपट्टी या शेतीला फायद्यात आणू शकत नाहीये. म्हणूनच आजच्या पिढीच्या मुली 'शेतकरी नवरा नको गं बाई,' या मानसिकतेपर्यंत येऊन पोहोचल्यात.\nमुलींचे पालक लग्नावेळी नोकरदारालाच प्राधान्य देत असल्याने गावाकडचे तरूण विवाह जमेपर्यंत शहरांजवळच्या छोठ्यामोठ्या कंपन्यामधून नोकरी मिळवायची धडपड करताना या सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेत. पिंपळगाव देपा येथील ज्ञानेश्वर उंडे हे वर्षाकाठी १०० हून अधिक लग्ने जमवायचे पूर्वी त्यांच्याकडे मुलींचे बाप हेलपाटे मारायचे आता मात्र, चित्रं नेमकं उलटं आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्याकडे मुलांचे वडील चकरा मारत असल्याचंही या सर्वेक्षणात आढळून आले.\nसोलापूर, पुणे जिल्ह्यातील १० गावांमध्येही ३१९ तरुणांची लग्ने रखडल्याचे आढळून आले. विवाह रखडल्याने या तरुणांना नैराश्य येत असून ते व्यसनाधीन होत असल्याचेही दिसून येतंय. सर्वेक्षण झालेल्या 45 गावांमध्ये २५ ते ३० वयोगटातील २२९४ तर ३१ ते ४० वयोगटातील ७७४ तरुणांचे विवाह रखडले आहेत. एमबीए झालेल्या चार तरुणांचे तर केवळ शेती करीत असल्याने विवाह रखडल्याचं धक्कादायक वास्तव या पाहणीत आढळून आलंय. तिशी उलटलेल्या तरुणांनी तर विवाहाची आशाच सोडून दिली आहे. काही गावांमध्ये विवाह रखडलेले २५० ते ३०० तरुण आहेत. केवळ अल्प भूधारकच नाही, तर १० एकर जमीन असलेल्या कुटुंबांमध्येही विवाह रखडले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: farmer marrage problemshetkariशेतकरी नवरा नको गं बाईशेतकऱ्यांचे विवाह रखडले\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/david-warner-steve-smith-broke-down-in-tears-1655554/", "date_download": "2018-04-24T04:46:43Z", "digest": "sha1:PXDMWD6SADHBKK2DSEXP6MNF3RJZS47A", "length": 15852, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "David Warner Steve Smith broke down in tears | तीन अंकी शोकांतिका.. | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nएकामागोमाग एक संघांना धूळ चारत कांगारूंचा विजयरथ तुफान निघाला होता.\nडेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ,\nहल्ली आम्ही टीव्हीवर बातम्या पाहू धजावतच नाही. केव्हाही बातम्यांचा च्यानेल लावला, की कोणी एखादा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रडतानाच पाहायला मिळतो. ‘आय हेट टियर्स’ असं म्हणताना कधी आमच्याही हृदयात कालवाकालव होऊन डोळ्यांच्या कडा पाणावतात. नक्की बातम्याच पाहतोय की एखादी टीव्ही मालिका अशीही शंका मनाला शिवून जाते. त्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या सोबतीला कधी वडील असतात, आई असते नाही तर पत्नी असते. डेव्हिड वॉर्नर नामे क्रिकेटर तर दक्षिण आफ्रिकेतून ऑस्ट्रेलियात उतरल्यापासून कडेवर मूल, सोबत पत्नी नि तिच्याही कडेवर मूल असा कुटुंबकबिलाच घेऊन वावरतोय.. माझा नको पण किमान त्यांचा तरी विचार करा ना असंच जणू सुचवायचा प्रयत्न करतो. किती क्लेश होतात अशी दृश्ये पाहून परवा स्टीव्ह स्मिथच्या साथीला त्याचे वडील उभे होते. शोकात्म वातावरणात आम्हीही त्याचं म्हणणं ऐकून घेत होतो, तर आमचा एक व्रात्य मित्र हकनाक ‘मुन्नाभाई’ स्टाइलमध्ये ‘गल्ती तेरे बाप का है, दो लाफा बचपन मेंही मारता तो..’ असा बोल्ता झाला. प्रसंग काय नि हा बोल्तो काय परवा स्टीव्ह स्मिथच्या साथीला त्याचे वडील उभे होते. शोकात्म वातावरणात आम्हीही त्याचं म्हणणं ऐकून घेत होतो, तर आमचा एक व्रात्य मित्र हकनाक ‘मुन्नाभाई’ स्टाइलमध्ये ‘गल्ती तेरे बाप का है, दो लाफा बचपन मेंही मारता तो..’ असा बोल्ता झाला. प्रसंग काय नि हा बोल्तो काय कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर, प्रशिक्षक डॅरेन लेहमान हे सगळेच चेंडू खरवडल्याप्रकरणी पायउतार झाले किंवा केले गेले. ऑस्ट्रेलियात पत्रकारांसमोर आल्यानंतर बोलत रडले किंवा रडत बोलले. टफ, हार्ड की काय म्हणतात तसले हे क्रिकेटपटू ना कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर, प्रशिक्षक डॅरेन लेहमान हे सगळेच चेंडू खरवडल्याप्रकरणी पायउतार झाले किंवा केले गेले. ऑस्ट्रेलियात पत्रकारांसमोर आल्यानंतर बोलत रडले किंवा रडत बोलले. टफ, हार्ड की काय म्हणतात तसले हे क्रिकेटपटू ना मग असे रडत कशाला बोलतात मग असे रडत कशाला बोलतात मन काही वर्ष मागे गेलं. त्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या दिग्विजयी संघाचा कर्णधार होता स्टीव्ह वॉ. एकामागोमाग एक संघांना धूळ चारत कांगारूंचा विजयरथ तुफान निघाला होता. आपल्या विजयाचं रहस्य स्टीव्ह गुर्मीत सांगायचा.. मेंटल डिसिंटिग्रेशन मन काही वर्ष मागे गेलं. त्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या दिग्विजयी संघाचा कर्णधार होता स्टीव्ह वॉ. एकामागोमाग एक संघांना धूळ चारत कांगारूंचा विजयरथ तुफान निघाला होता. आपल्या विजयाचं रहस्य स्टीव्ह गुर्मीत सांगायचा.. मेंटल डिसिंटिग्रेशन म्हणजे समोरच्या संघाला, त्या संघातील महत्त्वाच्या खेळाडूंना मानसिक पातळीवर उद्ध्वस्त करायचं. झालंच तर रडवायचं. ऑस्ट्रेलियासमोर दारुण हरल्यामुळे इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान अशा संघांचे कर्णधार, खेळाडू अक्षरश: रडवेले होत क्रिकेटबाहेर फेकले गेले हेही खरंच. त्याच संघातून हल्लीच्या संघाचे मास्तर डॅरेन लेहमानही अधूनमधून खेळायचे. अशी मेंटल डिसिंटिग्रेशनची जाज्वल्य परंपरा असलेल्या संघाचे सध्याचे अधिपती मात्र स्वतच उद्ध्वस्त झाले हे पाहून मन खंतावलंच जरा. त्यांनी चेंडूत फेरफारच केले, म्याच फिक्सिंग नाही केलं काही, असा एक समर्थनार्थ सूर. तर फेरफार काय नि फिक्सिंग काय, फसवणूक ती फसवणूक असा विरोधी सूर. आयपीएल नाही, पुरस्कर्ते नाहीत म्हणूनही असेल ही रडारड, असाही एक खास पुणेरी कणसूर. आमचं मन मात्र स्टीव्ह वॉच्याही आधीच्या काळात रुंजी घालू लागलं नि लख्खकन प्रकाश पडला. त्या वेळी आम्ही शाळेत होतो. काही तरी भयंकर अपराध घडला होता. हातावर हेडमास्तरांच्या हस्ते फूटपट्टीचे पाच रट्टे अशी शिक्षा. त्या मानांकितांच्या लायनीत आम्ही तिसरे. पहिले दोघे मख्खपणे रट्टे खात होते. आम्ही भोकाड पसरलं. हेडमास्तर आले, तसे जमिनीवर लोळू लागलो. हेडमास्तरांच्या डोळ्यात संतापाऐवजी कणव. तरीही म्हणाले, हात पुढे कर.. एक बारीकसा रट्टा दिल्या न दिल्यासारखा बसला.. कसंबसं ओठांवर आलेलं हसू दाबलं आणि..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nनाणार प्रकल्प विदर्भात आणा: भाजपा आमदाराची मागणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/make-up-base/expensive-make-up-base-price-list.html", "date_download": "2018-04-24T05:10:56Z", "digest": "sha1:BSXDL2YAK656CZWJIJCNKRYSQSJTO6R6", "length": 13281, "nlines": 360, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग मके उप बसे | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nExpensive मके उप बसे Indiaकिंमत\nExpensive मके उप बसे India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,699 पर्यंत ह्या 24 Apr 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग मके उप बसे. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग मके उप बसे India मध्ये कॅमेलिन मेकअप किट ग्१६६८ Rs. 1,395 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी मके उप बसे < / strong>\n10 मके उप बसे रुपये अधिक उपलब्ध आहेत. 1,019. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,699 येथे आपल्याला कॅमेलिन मेकअप किट ग्२६७२ उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 14 उत्पादने\nशीर्ष 10 मके उप बसे\nताज्या मके उप बसे\nकॅमेलिन मेकअप किट ग्२६७२\nकॅमेलिन मेकअप किट 398\nकॅमेलिन मेकअप किट जक२०७७\nकॅमेलिन मेकअप किट ग्१६६८\nकॅमेलिन मेकअप किट ग्२६५१\nकॅमेलिन मेकअप किट ग्१६८८\nकॅमेलिन मेकअप किट ग्१६६५\nकॅमेलिन मेकअप किट ग्१९८०\nकॅमेलिन मेकअप किट ग्१९७८ब\nकॅमेलिन मेकअप किट 316\nकॅमेलिन मेकअप किट 2331\nकॅमेलिन मेकअप किट ग्१६८९\nकॅमेलिन मेकअप किट ग्१६७२\nकॅमेलिन मेकअप किट 10511\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/tonar-115120800015_1.html", "date_download": "2018-04-24T05:06:58Z", "digest": "sha1:K7W5K5VQSN3GPEI2EN45HJ2SZV7PP657", "length": 7400, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वापरा नॅचरल टोनर | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचेहरा ऑइली असेल तर घरगुती बनवलेल्या टोनरच्या सहाय्यानं सुस्थितीत राखता\nयेतो. तेलकट त्वचेसाठी काकडीपासून बनवलेलं टोनर उपयुक्त ठरतं. त्याचप्रमाणे\nटोमॅटोपासून बनवलेल्या टोनरच्या वापरानं चेहर्‍याचा वर्ण उजळतो आणि मुरुमांची\nतुलसी टोनरही विशेष लाभकारक ठरतं. यासाठी तुळशीची पानं चुरडून उकळण्यता\nपाण्यामध्ये सोडावीत. थंड झाल्यावर या पाण्यामध्ये एक चमचा कोरफडीचा गर\nमिसळवा. आता तयार मिश्रण बाटलीत भरून टोनरसारखं वापरावं, याच पद्धतीनं मेथ्याघालून अथवा हळदीच्या सहाय्यानं टोनर बनता येतं. हळदीचं टोनर बनवताना एक\nचमचा लिंबाचा रस मिसळण्यास विसरू नये.\nटिप्स: प्रेग्नेंसीमध्ये या गोष्टींकडे लक्ष्य ठेवा\nव्यापार सुरू करण्याआधी अमलात आणा ह्या वास्तू टिप्स\nहळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय\nबिल्व वृक्ष लावा, रोगांना घालवा...\nयावर अधिक वाचा :\nरघुराम राजन यांचा बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी विचार\nरघुराम राजन यांच्या नावाचा विचार बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी केला जातो आहे असे ...\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-04-24T04:25:57Z", "digest": "sha1:AZD7OISSRKLOFFIWEZYXUBUW4GONNF5Q", "length": 4025, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतातील बौद्ध विहारे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► उत्तर प्रदेशातील बौद्ध विहारे‎ (३ प)\n► बिहारमधील बौद्ध विहारे‎ (१ क, २ प)\n► मध्य प्रदेशातील बौद्ध विहारे‎ (१ प)\n► महाराष्ट्रातील बौद्ध विहारे‎ (१ क, ४ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जुलै २०१७ रोजी १७:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4847362133308875541&title=Maginificent%20Mary&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-24T04:56:02Z", "digest": "sha1:3M5SMS6M7PF4ZTSVMRY3D6HM6AHMTYA2", "length": 13726, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मॅग्निफिसंट मेरी", "raw_content": "\nआशियाई स्पर्धेचे अजिंक्यपद पाचव्यांदा मिळवणारी मेरी कोम एकाच वेळी अनेक आघाड्यांवर यशस्वी कामगिरी करते आहे. राज्यसभेची खासदार, मुष्टियुद्ध प्रशिक्षण संस्थेची संचालिका, स्पर्धेसाठीचा सराव, मुष्टियुद्ध क्रीडा प्रकाराची राष्ट्रीय निरीक्षक म्हणून असलेली जबाबदारी आणि तीन मुलांची आई म्हणून असलेली कौटुंबिक जबाबदारी या सर्वच आघाड्या मेरी यशस्वीपणे सांभाळते आहे. ‘मॅग्निफिसंट मेरी’ हे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने तिला दिलेले नामाभिधान तिच्या कर्तृत्वाला सार्थ असेच आहे.\nआपल्याकडे देवीची मूर्ती बऱ्याचदा अष्टभुजा स्वरूपात असते. आपल्या आठ हातांत धरलेल्या निरनिराळ्या आयुधांच्या साह्याने ती एकाच वेळी प्रेरक, तारक व संहारक शक्तीचे रूप दर्शविते. हे कल्पनेतील देवीला शक्य आहे, मग वास्तवातील एखाद्या स्त्रीला शक्य आहे का या प्रश्नाचे उत्तर मुष्टियोद्धी मेरी कोमने आपल्या जगण्यातून दिले आहे. आशियाई स्पर्धेचे अजिंक्यपद पाचव्यांदा मिळवणारी मेरी कोम गेल्या वर्षभरात एकाच वेळी अनेक आघाड्यांवर यशस्वी कामगिरी करते आहे. ‘माझे प्रत्येक पदक ही संघर्षाची एक स्वतंत्र कहाणी आहे,’ ही अजिंक्यपद मिळवल्यानंतर तिने ‘पीटीआय’ला दिलेली प्रतिक्रिया म्हणूनच सहज, स्वाभाविक ठरते.\nराज्यसभेची खासदार, मुष्टियुद्ध प्रशिक्षण संस्थेची संचालिका, स्पर्धेसाठीचा सराव, मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकाराची राष्ट्रीय निरीक्षक म्हणून असलेली जबाबदारी आणि तीन मुलांची आई म्हणून असलेली कौटुंबिक जबाबदारी या सर्वच आघाड्या मेरी यशस्वीपणे सांभाळते आहे. नुसतीच सांभाळते आहे असे नाही, तर त्या प्रत्येक आघाडीवर ती कौतुकास्पद कामगिरी करते आहे. राज्यसभेवर नियुक्ती झालेल्या, पण सभागृहात गैरहजर राहाणाऱ्या नामवंत खासदारांबद्दल आपण नेहमीच ऐकतो. मेरी यालाही अपवाद ठरलीय संसदेच्या अधिवेशन काळात राज्यसभेत तिची नियमित उपस्थिती असते. मुष्टियुद्ध क्रीडा प्रकाराची राष्ट्रीय निरीक्षक म्हणून संबंधित सर्व बैठकांना ती हजर राहते. ‘हे सगळं करताना कधीकधी माझं मलाच कळत नाही, की मला इतक्या आघाड्यांवर काम करणं कसं काय जमतंय,’ असंही ती मनमोकळेपणाने बोलून जाते.\nगेल्या वर्षी तिने ५१ किलोऐवजी ४८ किलो वजनी गटात खेळण्याचा निर्णय घेतला आणि नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत ती याच गटात खेळली. ‘हा माझा नैसर्गिक वजनी गट आहे. याआधी ज्यांच्यासोबत ५१ किलो वजनी गटात खेळले, त्यांना या स्पर्धेत हरवल्यामुळे माझे मनोधैर्य खूपच उंचावले आहे,’ असे मेरी म्हणते. ही स्पर्धा पाच वेळा जिंकून तिने स्वतःच्या नावावर नवा विक्रम नोंदवला आहे. आशियाई अजिंक्यपद मिळवण्यासाठी तिने घेतलेली मेहनत सुवर्णपदकाच्या रूपाने फळाला आली आहे.\nमुष्टियोद्धी म्हणून गेली दोन दशके कारकीर्द गाजवणाऱ्या मेरीची जादू आजही कायम आहे. त्यामुळेच की काय, तिच्यासमोर उभे राहताच प्रतिस्पर्धी खेळाडूचे निम्मे अवसान गळून पडते; पण असे म्हणणे मेरीला तितकेसे आवडत नाही. ती म्हणते, ‘प्रतिस्पर्धी खेळाडूच्या अशा पवित्र्यामुळे खरे तर त्रास होतो. परंतु अशा वेळी मला स्वतःचा तोल ढळू देऊन चालत नाही. हा काही मिनिटांचा, सेकंदांचा खेळ आहे. त्यामुळे मला क्षणार्धात स्वतःला सावरावं लागतंच.’\n२०१४मध्ये तिच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यापूर्वीचा तिच्या आयुष्यातील संघर्ष आपण सर्वांनी या चित्रपटात पाहिला आहे; परंतु त्यानंतरही ती वैयक्तिक आयुष्यात व क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी करत असलेले कठोर परिश्रम थांबलेले नाहीत तिसरा मुलगा प्रिन्स याच्या जन्मानंतर २०१४मध्ये तिने क्रीडा क्षेत्रात पुनरागमन केले. त्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिला अवघ्या काही गुणांनी पदकापासून वंचित राहावे लागले; मात्र इंचिऑन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले.\n२०२०मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवून भारताचा झेंडा उंचावणे हे आता तिचे लक्ष्य आहे. ‘स्वतःच्या कर्तृत्वाने भारताचा झेंडा उंचावणे हे खूप भाग्याचे आहे,’ असे मेरी मानते. ‘मॅग्निफिसंट मेरी’ हे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने तिला दिलेले नामाभिधान तिच्या कर्तृत्वाला सार्थ असेच आहे.\nTags: Mary KomAsian Boxing ChampionshipGold MedalInternational Boxing Associationमेरी कोमआ शियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धासुवर्णपदकआंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनसुरेखा जोशी\nअनुष्काला नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण मैदानसम्राज्ञी अनुभवश्रीमंती देणारा बिनपैशाचा प्रवास साहित्य अन् कलांच्या अधिष्ठात्री ‘आकांक्षा’ फुलवणारी ‘बालरंगभूमी’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n..आणि मी निद्रेच्या आधीन झालो..\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\nस्वानंद समुद्र यांना मानाचा ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅवॉर्ड’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/ashadhi-cause-elderly-health-camp-11719", "date_download": "2018-04-24T05:06:59Z", "digest": "sha1:S6JDUWMNGQ3JWUM5IKIKR35TSXQRD2EE", "length": 11545, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "'Ashadhi' cause elderly health camp 'आषाढी'निमित्त ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर | eSakal", "raw_content": "\n'आषाढी'निमित्त ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर\nबुधवार, 10 ऑगस्ट 2016\nनाशिक : पाथर्डी फाटा \"तनिष्का‘ गटातर्फे आषाढी एकादशीचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शनि मंदिरात झालेल्या शिबिरात तनिष्का डॉक्‍टर्स फोरम तसेच सिप्ला कंपनीने मोफत सेवा उपलब्ध करून दिली.\nनाशिक : पाथर्डी फाटा \"तनिष्का‘ गटातर्फे आषाढी एकादशीचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शनि मंदिरात झालेल्या शिबिरात तनिष्का डॉक्‍टर्स फोरम तसेच सिप्ला कंपनीने मोफत सेवा उपलब्ध करून दिली.\nया वेळी परिसरातील नागरिकांसाठी नेत्रतपासणी, हिमोग्लोबिन, रक्तगट आदींसह अन्यही तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. तनिष्का डॉक्‍टर्स फोरमच्या प्रमुख डॉ. आशालता देवळीकर, डॉ. उज्ज्वला निकम, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. वैशाली खरे, डॉ. मेधा कुमावत, कविता पाटील, जयश्री पवार आदींसह सिप्ला कंपनीच्या वैद्यकीय प्रतिनिधींनी सहभाग घेतला. शिबिरात शंभरावर नागरिकांनी सहभाग नोंदविला. पोलिस उपायुक्त साहेबराव चौधरी यांनी सांगितले, की \"तनिष्का‘ व्यासपीठातर्फे राबविले जाणारे उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद असून, महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला बळकटी मिळण्यास मदत झाली आहे. डॉ. देवळीकर, अनिता जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. शिबिरासाठी पोलिस उपायुक्त साहेबराव चौधरी, अनिल गायकवाड, गटप्रमुख अनिता सोनवणे, अनिता जाधव आदींसह \"तनिष्का‘ सदस्य उपस्थित होते. \"तनिष्का‘चे जिल्हा समन्वयक विजयकुमार इंगळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. \"तनिष्का‘ गटप्रमुख ज्योती गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.\nम्हेत्रे कुटुंबीयांकडुन सात हजार पुस्तके दान\nतासगाव - ज्येष्ठ द्राक्षतज्ज्ञ एन. बी. म्हेत्रे यांच्या आई रुक्‍मिणी बाबूराव म्हेत्रे आणि शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त प्रयोगशील शेतकरी आर. डी. (...\n‘व्यवस्थे’मुळेच होतेय आरोग्याची हेळसांड\nसरकारी दवाखान्यात प्रशिक्षणार्थी म्हणून आणि नंतर डॉक्‍टर म्हणून काम केल्यामुळे ही व्यवस्था जवळून पाहिली आहे. सरकारी दवाखान्यांच्या दावणीला बांधलेल्या...\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\n‘व्यवस्थे’मुळेच होतेय आरोग्याची हेळसांड\n‘..तर माझं बाळ अन्‌ ती वाचली असती’ या ‘सकाळ’मधील बातमीवर वाचकांनी आपले अनुभव, मते लिहून पाठविली. त्यापैकी काही प्रातिनिधिक मते देत आहोत. सरकारी...\nजालन्यात पकडले नऊ सट्टेबाज\nजालना - 'आयपीएल\" स्पर्धेतील सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी रविवारी (ता. 22)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mpsc-iod.blogspot.com/2012/01/blog-post_15.html", "date_download": "2018-04-24T05:01:38Z", "digest": "sha1:RPYHJDR65TMRB2OHSY24FGFSVSDE73NK", "length": 42013, "nlines": 180, "source_domain": "mpsc-iod.blogspot.com", "title": "MPSC: संर्पकव्यवस्था व प्रसारमाध्यमे", "raw_content": "\nसमाजामध्ये संर्पक साधनांना अनन्यसाधारण महत्व आहे. धंदा, व्यापार विकास, प्रशासकीय सेवांचा विस्तार या सर्वांसाठी कार्यक्षम संर्पकयंत्रणा आवश्यक आहे. गेल्या सुमारे पन्नास वर्षामध्ये संर्पक यंत्रणेमध्ये नवनवीन माध्यमे उपलब्ध झाली. त्यामुळे आर्थिक व्यवहार, प्रशासकीय सेवा, शिक्षण, करमणुक या क्षेत्रामंध्ये क्रांती झाली, तर्‍हेतर्‍हेची माहिती द्रुतगतीने मिळविणे, ती माहिती साठवून तिचे वर्गीकरण करणे, त्या माहितीवर प्रक्रिया करणे, ती योग्य ठिकाणी ताबडतोब पोहोचवणे आता शक्य होते. त्यामुळे लोक जवळ येण्यास मदत झाली आहे. देशाचे संरक्षण, कायदा, सुव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योगधंदे अशा सर्व बाबतीमधील प्रगतीचे टप्पे केवळ संर्पक माध्यमांच्या विकासामुळे गाठले गेले आहेत.\nसंर्पक व्यवस्थेत व्यक्तींशी संर्पक साधणार्‍या कोणत्याही माध्यमाचा समावेश होऊ शकतो. तसेच माहिती-ज्ञान- धोरण-सिध्दांत- तज्ञ्ल्त्;व यांच्या प्रचारांचा अंतर्भाव होऊ शकतो. सरकारी पातळीवर वापरली जाणारी आणि जनसामान्यांमध्ये रूजून गेलेली अशी मुख्य प्रसार साधने: चित्रपट, आकाशवाणी, दुरदर्शन व वृत्तपत्रे. प्रमुख संर्पक साधने दूरवाणी, टपाल, तार, टेलेक्स. वरीलपैकी वृत्तपत्रे आणि मुदि्रत वाङ्मय ही खाजगी मालकीची असून इतर बहुतेक प्रचारमाध्यमे केंद्र सरकारमार्फ़त कार्यांन्वित केली जातात. करमणुकीसाठी चित्रपटांचा प्रसार खाजगी क्षेत्रामार्फ़त होतो. परंतु महाराष्ट्र्र शासनमर्ाफत वृज्ञ्ल्त्;ा आणि विचारांच्या प्रसारासाठी चित्रपट माध्यमांचा प्रभावीपणे उपयोग केला जातो. कीर्तनाचा उपयोग कुटुंबकल्याण, आरोग्य, शिक्षणाचे महत्व यांच्या प्रसारासाठी यशस्वीपणे साधला गेला आहे. अशा साधनांमधून माहितीचा प्रसार, लोकशिक्षण व करमणूक अशी तीनाही उद्दीष्टे साध्य होतात.\nमहाराष्ट्र्रामध्ये उद्योगधंदे, व्यापार, साक्षरता यांचा प्रसार इतर राज्यांच्या तुलनेने पुष्कळ समाधानकारक असल्यामुळे वरील सर्व माध्यमांचा लाभ राज्यास बर्‍यापैकी झालेला आहे. देशामध्ये टपाल कचेर्‍यांची संख्या आज १,५३,४२३ आहे. त्यातील ८९ टक्के पोस्ट कचेर्‍या ग्रामिण भागात आहेत. महाराष्ट्र्रात आज १२,४२३ टपाल कचेर्‍या आहेत. यांपैकी सुमारे ८९ टक्के ग्रामिण भागात आहेत. एक टपाल कचेरी राज्यात सरासरी सुमारे ६,००० व्यक्तींना टपालसेवा पुरवते. संपूर्ण देशात हे प्रमाण ५,८२७ आहे. राज्यात सरासरी २५.७७ चौ.कि.मी. मागे एक टपाल कचेरी आहे तर भारतात हे प्रमाण सुमारे २२ चौ.कि.मी. मागे टपाल कचेरी असे आहे. राज्यातील सर्व खेडयापर्यंत टपालसेवा पोचली आहे. टपाल साहित्याची विक्री, बचत बॅंक, द्रुत टपाल-सेवा, फॅक्स सेवा रात्रीची टपालसेवा, आयुर्विमा, बचत प्रमाणपत्रांचे व्यवहार, युनिट ट्रस्टचे व्यवहार, आयकर, पासर्पोट, आवेदनपत्रे, वाहन कर भरणे आशा सेवा टपाल कचेर्‍यांमार्फ़त मिळतात. ८ ठिकाणी रात्रीची टपालसेवा आहे. टपालसेवा हाताळण्याचे मुंबई हे देशात मोठे केंद्र आहे. पोस्टाच्या तिकीटांचा संच करणार्‍या छंदास उत्तेजन देणारी सेवाही राज्यात ऊपलब्ध आहे. अशी ३ केंद्रे राज्यात आहेत. जलद टपालसेवा (स्पीड पोस्ट) देशात ७३ ठिकाणी सुरू असून राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, नागपुर, औरंगाबाद, कोल्हापुर अशा अनेक ठिकाणी ही सेवा आहे. थोडा जादा आकार घेतला जाऊन देशातील निवडक शहरांमध्ये २४ तासात रजिस्ट्रड पत्रे पोचविण्याची ही योजना आहे. टपालाची वेगाने हाताळणी होण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा मुंबईत बसविण्यात येत आहे. तेथे कॉम्प्युटर व मायक्रोप्रोसेसर बसवला जात आहे. जलद टपाल सेवेच्या सर्व शहरांमध्ये यावर्षीपासून जलद मनिर्ऑडर सेवा देणे सुरू झाले. टपाल खात्यात उल्लेखनीय काम करणार्‍या कर्मचार्‍यांना टपालसेवा पुरस्कार व मेघदूत पुरस्कार दिलेे जातात.\nभारतातील सर्वात मोठी तारकचेरी मुंबईत असून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सेवा या केंद्रामार्फ़त पुरवल्या जातात. आज भारतात ६९,९८६ तारकचेर्‍या आहेत. पैकी महाराष्ट्र्रात २,४५२ आहेत. आठव्या योजनाकाळात राज्यात २०० नवी तार ऑफिस सुरू करण्याचा प्रस्ताव असून ६५० तारघरांचे नव्या इलेक्ट्रॉनिक पध्दतीने आधुनिकीकरण करण्यात येत आहे.\nटेलेक्सची सोय देशात १९६३ मध्ये सुरू झाली. १९६९ मध्ये देवनगरीमध्ये टेलेक्स संर्पक सुरू झाला. महाराष्ट्र्रामध्ये मुंबई, पुणे, नागपुर, नाशिक, कोल्हापुर, अमरावती, औरंगाबाद, अमळनेर येथे टेलेक्सची व्यवस्था आहे. मुंबई येथे इलेक्ट्रॉनिक टेलेक्स एक्स्चेंजची सोय यावर्षी झाली. फॅक्स, व्हिडीओ टेक्स अशा सेवा गेल्या वर्षी सुरू झाल्या.\nदूरवाणी (टेलिफोन) च्या बाबतीत महाराष्ट्र्र संपूर्ण देशात आघाडीवर आहे. १९९८ च्या सुरूवातीस भारतात दूरवाणीची सुमारे ९० लाख कनेक्शन दिली होती. त्यांपैकी ३९ लाख महाराष्ट्र्रात होती. (त्यात मुंबईचा वाटा फार मोठा आहे). स्वयंचलित दूरवाणी केंद्र, आंतरराष्ट्रीय दूरवाणी संर्पक, थेट अंतर्गत व आंतरराष्ट्रीय ट्रंककॉल सेवा, (जगातील अनेक शहरांशी आता डायल फिरवून थेट बोलता येते). जहाजांवरून जमिनीवर मिळणारा दूरवाणी संर्पक\nकिनार्‍यापासून ७५० कि.मी. पर्यंतच्या जहाजांना किनार्‍याशी दूरवाणी सदृश संर्पक साधता येतो मागणीनुसार ट्रंक सेवा अशा सर्व सेवा महाराष्ट्र्रातही उपलब्ध असून मुंबई हे त्याचे मुख्य केंद्र आहे. मुंबई शहराचा राज्यातील ११९ शहरांशी व देशातील १३८० शहरांशी दूरवाणीसंर्पक साधण्यात आला आहे. जगातील २१० देशातील अनेक शहरांशी मुंबईचा थेट संर्पक आहे. मुंबई व नवी दिल्ली या महानगरांसाठी एप्रिल १९८६ मध्ये महानगर टेलिफोन निगमाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे अधिक वित्त सहाय्य हया प्रकल्पासाठी गोळा करता आले. एकटया मुंबई शहरात एकोणीस लाखाहून अधिक दूरध्वनी असून १९९५ नंतर मागेल त्याला तात्काळ दूरध्वनी देणे सुरू झाले आहे. राज्यात उत्पन्नात होणारी वाढ, बॅंक, विमा, धंदा, व्यापार, प्रशासन अशा सेवांचा विस्तार यांमुळे दूरवाणीची मागणी पुढे कित्येक पटींनी वाढेल, अधिक कनेक्शन्स् देऊन दूरवाणीची वाढ होईल. टपाल व तारखात्यामार्फ़त चालवले जाणारे दूरसंर्पक यंत्रसामग्रीचे चार कारखाने सध्या देशात असून त्यातील एक मुंबईला आहे.\nआंतरराष्ट्रीय संर्पकसेवा हा देशाच्या आणि राज्याच्या संर्पक यंत्रणेतील एक महत्वाचा भाग आहे. या सेवेचेही प्रमुख केंद्र मुंबई येथे आहे. कामासाठी विदेश संचार निगम लि. ची स्थापना एप्रिल १९८६ मध्ये करण्यात आली. बाहेरील देशांशी तार, दूरवाणी, टेलेक्स, रेडिओ, फोटो, आंतरराष्ट्रीय दूरदर्शन, रेडिओ कार्यक्रमांची देवाण-घेवाण या सेवा उपग्रहांमार्फ़त दिल्या जातात. त्यासाठी देशात दोन ठिकाणी-डेहराडून (उ.प्र. येथे, स्थापना १९७६) व महाराष्ट्र्रात आर्वी येथील (ता. जुन्नर, जि, पुणे, स्थापना १९७१) येथे केंद्रे उभारण्यात आली आहेत. आर्वी येथील कृत्रिम उपग्रह केंद्र जगातील सर्वात मोठे असून त्यामुळे देशांतर्गत परदेशी बोटी, विमाने यामधील संदेशवहन सुलभ होते. हिंदी महासागरावर भूस्थिर केल्या गेलेल्या इंटरसॅट या उपग्रकामार्फ़त १५० देशांशी सध्या संर्पक साधला जातो. विविध तर्‍हेचा आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयामार्फ़त देशात २१ सूत्रसंचालन केंद्र उभारली आहेत. राज्यात मुंबई व नागपुर येथे ती केंद्र आहेत. बिनतारी संदेशाची देवाण घेवाण करणार्‍या परवानाधारक अधिकृत केंद्रावर निरीक्षण करण्यासाठी देशात दहा ठिकाणी उपकेंद्रे उभी करण्यात आली आहेत. राज्यात मुंबई व नागपुर येथे ही केंद्रे आहेत. जानेवारी २००० पर्यंत राज्यात सुमारे १,३२,५०५ इंटरनेट कनेक्शन्स दिली गेली होती.\nकरमणुकीचे कार्यक्रम, वृत्तप्रसार, आरोग्य-कुटुंब-कल्याण आदींचा प्रसार शेतकर्‍यांना मार्गदर्शन, हवामान, बाजारभाव यांची दैनंदिनी माहिती यांच्याप्रसारासाठी आकाशवाणी हे माध्यम प्रभावी आहे. ही सेवा उपलब्ध करून देणे केंद्र सरकारच्या माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असले तरी घटक राज्यांमधील केंद्रांना कार्यक्रमाच्या निवडीस काही प्रमाणात स्वातंत्र्य देण्यात आले आहे. प्रादेशिक भाषामधील कार्यक्रमांवर भर देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. स्वातंत्र्यापूर्वी १९२७ मध्ये प्रथम मुंबई येथे रेडिओ केंद्र सुरू झाले. १९४७ मध्ये भारतात फक्त ६ रेडिओ केंद्रे होती.\nआज भारतात १९७ रेडिओ केद्रें आहेत. महाराष्ट्र्रात त्यापैकी १३ केंद्रे आहेत. औरंगाबाद, मुंबई, जळगाव, नागपुर, परभणी, पुणे, रत्नागिरी, सांगली, कोल्हापुर, सातारा, नाशिक, अहमदनगर व सोलापुर. राज्यात नांदेड, बीड, मालवण, धुळे, चंद्रपुर, उस्मानाबाद, अकोला, यवतमाळ येथे स्वतंत्र आकाशवाणी केंद्रे होत आहेत. मुंबई केद्रांची सेवा लघुलहरीवरूनाही प्रक्षेपित होते. आकाशवाणीवरील प्रक्षेपणाचा सुमारे ३८ टक्के वेळ संगीतासाठी असतो. तसेच उपशास्त्रीय, सुगम-सिने लोकसंगीत, वाद्यवृंद जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यास आकाशवाणीचे माध्यम कारणीभूत ठरले आहे. याशिवाय नभोनाटये, वृत्तनिवेदन, चालू घडामोडींवरील चर्चा, संथगतीतील बातम्या, संसद समालोचन, विज्ञानचर्चा, पुस्तक परिक्षणे, कामगार, लहान मुले, विद्यार्थी, युवक, महिला, सैनिक, ग्रामिण जनता व शेतकरी वर्ग यासाठी विशेष कार्यक्रम आकाशवाणीवर असतात. देशातील लोकांसाठी २३ भाषा व ३५ आदिवासी उपभाषा यांमधून वृत्तनिवेदन केले जाते. विविध भारतीचे करमणूक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होऊन राज्यात पुणे व नागपुर येथून पुन:क्षेपित होतात. १ नोव्हेंबर १९६७ रोजी मुंबई केंद्रावर व्यापार विभाग प्रथमच सुरू झाला. आज त्यावर जाहिराती आणि प्रायोजित कार्यक्रम सादर केले जातात.\nमुंबईमध्ये २ ऑक्टोबर १९७२ रोजी दूरदर्शन केंद्र सुरू झाले. सध्या राज्यामध्ये मुंबई, नागपुर येथून कार्यक्रमाचे प्रसारण व पुणे, सोलापुर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापुर, सातारा, अमरावती येथून कार्यक्रमाचे पुन:क्षेपण होते. मुंबई केद्रावर दुसरी वाहिनी मे १९८५ मध्ये सुरू झाली. पुणे येथून कार्यक्रमाचे प्रक्षेपण सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या राज्यात ५ उच्च शक्ती दूरदर्शन प्रक्षेपक केंद्रे व ४० लघुशक्ती प्रक्षेपक केंद्रे आहेत.\nराज्यातील शहरी व ग्रामिण अशा दोन्ही लोकसंख्येला दूरदर्शनचा फायदा मिळतो. दूरदर्शन हे जाहिरातीचे कार्यक्रम, युवादर्शन, कामगार विश्व, संगीत, चर्चा, प्रात्यक्षिके, वृज्ञ्ल्त्;ा, सिनेमा, नाटक, मुलाखती, खेळाचे सामने अशा तर्‍हेने दृश्य व श्राव्य माध्यमांव्दारे लोकांपर्यंत पोहोचते. नभोवाणी व दूरदर्शन यांचा समाजावर परिणाम निश्चितपणे होत असतो. समाजशिक्षण, प्रौढांसाठी कार्यक्रम, नागरिकांची कर्तव्ये, सामाजिक सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य, संगणक शिक्षण, प्रदूषण, योगशिक्षण, विज्ञानकला व छंद, कुटुंबकल्याण, वृत्तसेवा, बधिरांसाठी वृत्तसेवा, गुंतवणुकीसाठी सल्ला अशा विविध विषयांतून या माध्यमाने लोकसंर्पक साधला आहे. शालेय दूरवाणी व विद्यापीठ अनुदान आयोगासाठी केलेल्या शैक्षणिक कार्यक्रमांचाही राज्यातील जनतेस लाभ मिळतो. दिल्लीमध्ये १९५९ साली कार्यक्रमाव्दारे लोकशिक्षणाचे काम दूरदर्शनने प्रभावीपणे केल्याची नोंद अनेक जाणकारांनी दिली आहे. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, हॉकीचे सामने, क्रिडास्पर्धा यांचा आस्वाद, दृश्य व श्रवण माध्यमातून घेणे ही आधुनिक युगातील विशेष उपलब्धी आहे. शिक्षणप्रसार, करमणुकीची गरज व वाढते राहणीमान यामुळे दुरदर्शन या माध्यमाच्या अत्यंत जलद प्रसार होईल व पुढील काही वर्षे नभोवाणी व दुरदर्शनच्या वापरातील महाराष्ट्र्राची आघाडी कायम राहील.\n१९४७ पासून राज्यात सामूहिक दूरचित्रवाणी योजना वर्गणी तत्वावर अंमलात आली आहे. याव्दारे सार्वजनिक संस्था, शाळा, रूग्णालये, ग्रामपंचायती, ग्रंथालये इत्यादी ठिकाणी दूरदर्शन संच शासनातर्फे बसवले जातात. त्यासाठी बसवण्याची व परिरक्षणाची फी आकारली जाते. १९९२ पर्यंत असे १०१९० संच राज्यातील विविध भागात बसवले होते. त्यापैकी १७०० आदिवासी भागात होते.\nदैनिके व नियतकालिके :\nनियतकालिकांच्या प्रसाराच्या बाबतीत देशात उत्तरप्रदेशाचा क्रम पहिला दिल्लीचा दुसरा व महाराष्ट्र्राचा क्रम तिसरा लागतो. १९९९ मध्ये देशात ४३,८२८ नियतकालिके (दैनिके, साप्ताहिके, व्दिसाप्ताहिके धरून) प्रसिध्द होत होती; पैकी महाराष्ट्र्रात ३६१४ होती. त्यापैकी ३२५ दैनिके होती. १९९९ मधील देशातील दैनिक व नियतकालिकांपैकी २०४६ (४.७%) मराठीत होती. महाराष्ट्र्रात मराठीबरोबर बहुतेक सर्व राष्ट्रीय भाषामध्ये, उपभाषामध्ये व अनेक विदेशी भाषामध्ये नियतकालिके प्रसिध्द होत असतात. वृत्तपत्रांचा प्रसार हा साक्षरतेवर अवलंबून असतो. मराठीतील वृत्तपत्राचा रोज एकुण खप १७ लाख असला तरी हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रांचा खप मराठीपेक्षा जास्त आहे.\nराज्यातील प्रमुख मराठी दैनिके: महाराष्ट्र्र टाइम्स-लोकसज्ञ्ल्त्;ाा-नवशक्ती (मुंबई), सकाळ-केसरी-लोकसज्ञ्ल्त्;लोकमत- (पुणे) लोकमत- (नागपुर), ऐक्य (सातारा), प्रजावाणी (नांदेड), गावकरी (नाशिक), पुढारी (कोल्हापुर), संचार (कोल्हापुर), संचार (सोलापुर), अंजिठा- मराठवाडा, लोकमत (औरंगाबाद), सागर (चिपळूण) इ.\nप्रमुख इंग्रजी दैनिक : टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, फ्री प्रेस जर्नल, इंडिपेन्डन्ट (मुंबई), नागपुर टाईम्स (नागपुर), महाराष्ट्र्र हेरॉल्ड (पुणे), लोकमत टाइम्स (औरंगाबाद). मुंबईतील गुजराती भाषेतील बॉंबे समाचार हे देशातील सर्वात जूने चालू दैनिक आहे. (स्थापना १८२२)\nनियतकालिकांच्या वाढीस आणि प्रसारात वृत्तपत्र कागदाच्या टंचाईमुळे आणि छपाईच्या साधनांच्या महागाईमुळे अडथळे येतात. त्यांची झळ विशेषत: प्रादेशिक भाषामधील वृत्तपत्रांना पोहोचते. सरकारी आणि खाजगी कागद गिरण्यांमार्फत वृत्तपत्र कागदाच्या उत्पादनाचे मोठे प्रयत्न आजपर्यंत झाले. तरी देखील १९९८ मध्ये एकुण मागणीपैकी सुमारे ७०- पुरवठा आयात करून भागवावा लागतो. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्तसंस्था इंग्रजीमध्ये वृत्तवितरण करतात. समाचार भारती, हिंदुस्थान समाचार या मराठी आणि इतर प्रादेशिक भाषामध्ये वृत्तवितरण करतात. सरकारने 'हमारा देश' या नावाने मोठया पाक्षिया भिज्ञ्ल्त्;िापत्रकाचे प्रसारण १९७० मध्ये सुरू केले. ते मराठीसह १२ भाषामध्ये प्रसारित होते व ग्रंथालय, टपाल कचेर्‍या, बॅंका, रेल्वे स्थानके व सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे लावले जाते. त्यामध्ये प्रमुख घटना, विकास कार्यक्रमात गाठलेले टप्पे, क्रीडा, शेती, उद्योगधंदे अशा क्षेत्रांमध्ये मिळविलेले विशेष नैपुण्य सोप्या भाषेत आणि मोठया अक्षरात सचित्र प्रस्तुत केले जाते. सामान्य नागरिक, प्रौढ साक्षर विद्यार्थी अशा लोकांपर्यंत संर्पकसाधण्याचा हा प्रभावी मार्ग बनला आहे.\nवृत्तपत्रांच्या माध्यमातून सरकारी धोरणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केंद्रे सरकारने वृत्तपत्र विभागाची स्थापना केली. ती सेवा राज्यातही उपलब्ध आहे. सरकारी क्षेत्रातील उपक्रम, राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या प्रचारयंत्रणेत सुसूत्रता राखवण्याचे काम या विभागातर्फे केले जाते. तसेच वृत्तपत्रात येणार्‍या बातम्यांचा व मतांचा परामर्श सरकारपर्यंत पोहोचविण्याची कामगिरीही या विभागावर आहे. बातम्या छायाचित्रे, निवेदन, वृत्तसारांश ही सर्व साधने मराठी- इंग्रजी अशा भाषामंध्ये राज्यात सर्वत्र उपलब्ध होतात.\nदेशातील चित्रपट व्यवसाय मुंबई, कलकज्ञ्ल्त्;ाा व मद्रास येथे एकवटला आहे. १९९८ साली ६९३ पूर्ण वेळ करमणूक चित्रपट प्रकाशित झाले. त्यापैकी ६४% मद्रास येथून होते तर २८% मुंबईत होते. यावर्षी हिंदीत १५७ तर मराठीत २१ चित्रपट प्रकाशित झाले. मुंबई हे मराठी व हिंदी चित्रपट निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. एकेकाळी देशातील सुमारे ८०% चित्रपटांची निर्मिती महाराष्ट्र्रात होत असे. आता ते प्रमाण इतके कमी आले आहे. मराठी चित्रपट निर्मिती पुणे, कोल्हापुर येथेही होत आहे. राज्यात या व्यवसायात कोटयावधी रूपयांची उलाढाल होते. कार्टून, वार्तापट, अनुबोधपट यांयासहाय्याने या माध्यमाचा उपयोग करून घेतात. सर्व भारतीय भाषामध्ये प्रकाशित होणारे हे चित्रपट मुख्य चित्रपटाआधी दाखवणे कायद्याने बंधनकारक आहे. व्हिडिओव्दारा होणार्‍या चित्रपट चोरीला आळा घालण्यासाठी व ग्रामिण भागातील सर्वसामान्य माणसाला चित्रपट पहाणे शक्य व्हावे म्हणून किमान ३००० वस्तीच्या गावांमध्ये १६ मि.मी. चित्रपट गृहे सुरू करण्याची शासनाची योजना असल्याचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्र्यांनी ऑगस्ट १९८६ मध्ये जाहिर केले. राज्यातील करमणूक करात ५०% ने कपात करण्याचा निर्णय शासनाने १९९४ मध्ये जाहिर केला. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे म्हणून करमणूक कर परत करण्याची योजना चालू आहे. मराठी चित्रपट वर्षातून चार आठवडे दाखवणे राज्यातील प्रत्येक चित्रपटगृहास बंधनकारक आहे.\nराज्यात पुणे नॅशनल फिल्म अकाईव्हची कचेरी आहे. तेथे अनेक भाषामधील चित्रपट, वार्तापट, चित्रपटविषयक पुस्तके, नियतकालिके, पत्रके, गीतपुस्तके, ध्वनिमुद्रीका, ध्वनिफीती, सूक्ष्मचित्रपट, पुस्तकाचित्रे, छायाचित्रे, जाहिराती यांचा संग्रह जतन वर्ग घेतले जातात. प्रदर्शन भरवली जातात. तसेच चित्रपट सप्ताह साजरे केले जातात.\nपुणे येथे फिल्म व टेलिव्हिजन इन्स्ट्टियूट आहे. तेथे अभिनय संकलन, छायाछित्रण, ध्वनिमुद्रण यांचे पदविका शिक्षण दिलेे जाते.\nमहाराष्ट्रात महत्वाच्या विकास योजना\nसंज्ञापन तंत्राच्या विकासातील क्रांतिकारक टप्पे\n**छत्रपती शाहूमहाराज व भारताचे स्वातंत्र्य यांचे अ...\nसंयुक्त राष्ट्रसंघाशी निगडीत महत्त्वाच्या संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/rss-chief-mohan-bhagwat-ayodhya-ram-temple-117041300001_1.html", "date_download": "2018-04-24T05:02:10Z", "digest": "sha1:4IUMMNK53PNDP2WRA3JH3QJ6YO46HFEX", "length": 10044, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुस्लीम नव्हे तर गुंडांचा राम मंदिरास विरोध: भागवत | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुस्लीम नव्हे तर गुंडांचा राम मंदिरास विरोध: भागवत\nअयोध्येत राम मंदिर उभारण्यास मुस्लीम आणि ख्रिश्चनांचा विरोध नाही: यावरून राजकारण करणारे कट्टरपंथी आणि गुंड लोकच राम मंदिर उभारू देत नसल्याचा आरोप राष्ट्रीवय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला. यावरच न थांबत त्यांनी न्यायालयाकडून यावर तोडगा निघणार नाही, असेही स्पष्ट केले.\nविशेष म्हणजे सर्वोच्च् न्यायालयात राम मंदिर वादावरून परस्पर समझोता व्हावा म्हणून सर्वोच्च न्यायालय प्रयत्न करत असतानाच भागवत यांनी हे वक्तव्य केले आहे. अशा प्रकारच्या संवेदनशील प्रकरणावर परस्पर सहमतीने तोडगा काढला जावा. दोन्ही पक्षांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्यास न्यायालय मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे मत सर्वोच्च न्यायलयाचे सरन्यायाधीश जे एस खेहर यांनी नोंदवले होते.\nगोहत्या बंदी कायदा देशभर लागू करावा: भागवत\nराम मंदिर प्रश्नी मध्यस्थीस केंद्राची तयारी\n सुरक्षादलातील जवानांवर काश्मिरी लातांची मार ...(व्हिडिओ)\nपरिक्षेत 10 पैकी 10 ग्रेड पॉईंटस मिळाले नाही म्हणून आत्महत्या\nसगळ्यांनी एकत्र येऊन साजरा केला सुमित्रा महाजन यांचा वाढदिवस\nयावर अधिक वाचा :\nराष्ट्रीवय स्वयंसेवक संघ मोहन भागवत\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://nokarimargadarshan.blogspot.com/2013/08/blog-post_1265.html", "date_download": "2018-04-24T04:34:56Z", "digest": "sha1:INBW53RNO4726WZH54NLLGUHM4FFNCVM", "length": 18604, "nlines": 263, "source_domain": "nokarimargadarshan.blogspot.com", "title": "नोकरी मार्गदर्शन: पुणे, नागपूर, अकोला, ठाणे, लातूर आरोग्य विभागात विविध पदांची मोठी भरती", "raw_content": "मराठी नोकरी मार्गदर्शन केंद्र = रोजगार / नोकरी मार्गदर्शन - मराठीत् नोकरी संदर्भ\nनोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या\nपुणे, नागपूर, अकोला, ठाणे, लातूर आरोग्य विभागात विविध पदांची मोठी भरती\nपुणे, नागपूर, अकोला, ठाणे, लातूर\nआरोग्य विभागात विविध पदांची मोठी भरती\nपुणे, नागपूर, अकोला, ठाणे, लातूर आरोग्य विभागात वरिष्ठ लिपिक, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, अधिपरिचारिका पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१३ आहे.\nअधिक माहिती http://oasis.mkcl.org/DHS या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nपुणे आरोग्य विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 321 पदांची भरती\nनागपूर आरोग्य विभागात विविध पदांची भरती\nनागपूर आरोग्य विभागात वरिष्ठ लिपिक (7), लिपिक (24),\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ (3), रक्तपेढी तंत्रज्ञ (9), प्रयोगशाळा सहाय्यक (2), औषध निर्माण अधिकारी (24), अधिपरिचारिका (184) पदांची भरती\nअकोला आरोग्य विभागात विविध पदांची भरती\nअकोला आरोग्य विभागात वरिष्ठ लिपिक (7), लिपिक (39),\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ (7), रक्तपेढी तंत्रज्ञ (4), प्रयोगशाळा सहाय्यक (16), औषध निर्माण अधिकारी (17), अधिपरिचारिका (71) पदांची भरती\nठाणे आरोग्य विभागात विविध पदांची भरती\nठाणे आरोग्य विभागात वरिष्ठ लिपिक (8), लिपिक (36),\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ (9), रक्तपेढी तंत्रज्ञ (9), प्रयोगशाळा सहाय्यक (15), औषध निर्माण अधिकारी (23), अधिपरिचारिका (14) पदांची भरती\nलातूर आरोग्य विभागात विविध पदांची भरती\nलातूर आरोग्य विभागात वरिष्ठ लिपिक (6), लिपिक (26),\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ (5), रक्तपेढी तंत्रज्ञ (4), प्रयोगशाळा सहाय्यक (9), औषध निर्माण अधिकारी (9) पदांची भरती\nकेंद्र व राज्य शासनाच्या विवीध विभागांमध्ये\nस्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,\nशासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती\nपोस्टात 1,349 जागा रिक्त; जानेवारीपर्यंत होणार भरती\nकेंद्र व राज्य शासनाच्या विवीध विभागांमध्ये हजारो पदांची भरती\nजिल्हाधिकारी कार्यालय परभणी मध्येतलाठी, लिपिक, शिपाई पदांची भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2013 जिल्हाधिकारी कार्यालय य...\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती प्रादेशिक निवड समिती मार्फत जलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये सरळ ...\nसार्वजनिक बांधकाम विभागात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 10 जागा महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ...\n19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नांदेडला सैन्यभरती मेळावा\nमध्य रेल्वेमध्ये ग्रुप डी मधील 905 जागांची भरती\nमध्य रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये माजी सैनिक कोट्याअंतर्गत ग्रुप डी मधील 905 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंत...\nजळगाव जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांच्या 227 जागा\nजळगाव जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक-टंकलेखक 89 जागा आणि तलाठी 138 जागा एकूण 227 पदे. ऑनलाईन अ...\nभारतीय हवाई दलात ( Indian Air Force ) ग्राऊंड ड्युटी विभागात नोकरीच्या संधी\nभारतीय हवाईदलामधील हवामान विभागात ग्राऊंड डयुटी विभागात पर्मनंट कमिशन तसेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये अधिकारीपदासाठी भरती केली जाणार आहे....\nभारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ग्रुप मध्ये परिवीक्षा अधिकारी (Probationary Officers) पदाच्या एकूण 1837 जागा . Age Re...\nजिल्हा निवड समिती (1)\nतक्रार निवारण प्राधिकारी (1)\nरयत शिक्षण संस्था (1)\nवाशीम जिल्हाधिकारी कार्यालयात भरती\nनाशिक जलसंपदा विभागात विविध 177 पदांसाठी भरती\nनियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयात...\nनागपूर जलसंपदा विभागात भरती\nजलसंपदा विभागाच्या विवीध परिमंडळात चतुर्थश्रेणी पद...\nचंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक पदाची भरती\nसोलापूर जिल्हा परिषद मध्ये 139 जागा\nअमरावती जलसंपदा विभागात विवीध पदांची महाभरती\nजलसंपदा विभागात रायगड जिल्ह्यात भरती\nजलसंपदा विभागाच्या पुणे परिमंडळात विविध पदांसाठी भ...\nजलसंपदा विभागाच्या कोकण मंडळात भरती\nसिंधुदुर्ग जिल्हा निवड समितीमार्फत जलसंपदा विभागात...\nमध्य रेल्वेमध्ये विविध पदांच्या 3892 जागांची महाभर...\nBSF (सीमा सुरक्षा दल) मध्ये 1436 ट्रेडसमन पदाची भर...\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदांची भरती\nनाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ...\nठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर आरक्षकाच्या 385 ज...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत हृदय आलेख तंत्रज्ञाच्या ज...\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरत...\nविदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत १४० कंत्रा...\nपुणे, नागपूर, अकोला, ठाणे, लातूर आरोग्य विभागात वि...\nफूड कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये सहव्यवस्थापकाच्या ३...\nसार्वजनिक आरोग्य विभागात भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक पदाच्या 89 जा...\nसार्वजनिक बँकातील लिपिक वर्गीय कर्मचारी भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधीक्षक पदाच्या जाग...\nमहाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेत 4 जागा\nUPSC मार्फत वैज्ञानिक अधिकारीसह विविध 225 जागांची ...\nसीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत भरती\nअकोला जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तलाठी पदांची भर...\nएकात्मिक आदिवासी प्रकल्प कळवण मध्ये विविध पदांची भ...\nपरभणी नोंदणी व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात भर...\nअमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदाची भरती\nबीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 148 जागांची भरती\nजिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा मध्ये २१ जागांची भरत...\nमहाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागात विविध पदांची ...\nमुंबई अग्निशमन दलात जीवरक्षकाची 1 जागा\nउस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक, तलाठी व ...\nनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध पदांची भर...\nजिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी मध्ये तलाठी, लिपिक...\nधुळे महानगरपालिकेत मध्ये ३५ विविध कंत्राटी जागांची...\nऔरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लिपिक, तलाठी...\nनांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लिपिक, तलाठी, ...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयात 22 जागांसाठी भरती...\nठाणे जिल्हा निवड समितीमार्फत तलाठी पदांची भरती\nधुळे जिल्हा निवड समितीमार्फत तलाठी पदांची भरती\nजिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ मध्ये तलाठी पदांची भर...\nजिल्हाधिकारी कार्यालय जालना मध्ये तलाठी, लिपिक, शि...\nअमरावती वनवृत्ताच्या आस्थापनेवर लिपिक, शिपाई सह वि...\nजिल्हाधिकारी कार्यालय परभणी मध्ये तलाठी, लिपिक, शि...\nजिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार मध्ये ५३ जागांची भर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/media-42042362", "date_download": "2018-04-24T05:41:02Z", "digest": "sha1:LFAA4HTGHBA6I6NCT4EMDLLBA4IECIZM", "length": 7121, "nlines": 113, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : मोदी आणि राहुलसोबत 'दिल की बात' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : मोदी आणि राहुलसोबत 'दिल की बात'\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मोर्चे, जनसभा, भाषणं आणि आश्वासनं झाली आहेत. पण नेमका गावातला हाल काय आहे\nहे जाणून घेण्यासठी बीबीसीने अहमदाबाद जिल्ह्यातल्या एका गावाला भेट दिली. तिथं नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी होते, अर्थातच पोस्टर-रुपात.\nगावकऱ्यांना सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न विचारा या नेत्यां समोर विचारा, काही भावना व्यक्त करा.\nकाही गावकऱ्यांनी मोदींबद्दल तक्रारी आहेत, तर काहींना गांधीबद्दल फारसं माहीत नाही. पाहा काय म्हणते गुजरात्यांची 'दिल की बात'.\nव्हीडिओ : दिव्या आर्य, दीपक जसरोटिया\nभारतात लष्करी उठाव शक्य आहे का\n'गेंड्याची कातडी असेल तर, राजकारणात नेहमी फायदा होतो'\n'कोपर्डी असो वा खैरलांजी, महिलेची जात न पाहता तिला जलद न्याय मिळावा'\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ सीमाप्रश्नाविषयी बेळगावच्या तरुणांना काय वाटतं\nसीमाप्रश्नाविषयी बेळगावच्या तरुणांना काय वाटतं\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ - आणि त्याने चक्क गाढवांच्या पाठीवरच फिरतं वाचनालय सुरू केलं\nपाहा व्हीडिओ - आणि त्याने चक्क गाढवांच्या पाठीवरच फिरतं वाचनालय सुरू केलं\nव्हिडिओ अंतराळवीर संडासला कुठे जातात\nअंतराळवीर संडासला कुठे जातात\nव्हिडिओ यांचं नाक का आहे जगात सर्वांत मोठं\nयांचं नाक का आहे जगात सर्वांत मोठं\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ: हिमवादळाचा तडाखा बसतो तेव्हा...\nपाहा व्हीडिओ: हिमवादळाचा तडाखा बसतो तेव्हा...\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : शाळेत जाण्यासाठी या मुलांचा जीवघेणा प्रवास\nपाहा व्हीडिओ : शाळेत जाण्यासाठी या मुलांचा जीवघेणा प्रवास\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.punezp.org/mahila_v_bkalyan.html", "date_download": "2018-04-24T04:33:11Z", "digest": "sha1:VJIOYXXR5PER6S7GS3B2PUCSMTRLHU4Y", "length": 98363, "nlines": 822, "source_domain": "www.punezp.org", "title": "Zilla Parishad Pune", "raw_content": "\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nमहिला व बालकल्याण समिती\nमहिला व बाल कल्याण समिती सभा दिनंाक 22 एप्रिल 2013 मधील विषय क्र.96 ठराव क्रं.82 चा कारणा पुरता उतारा\nविषय क्रं.96 :- महिला व बाल कल्याण समिती मार्फत सन 2013-14 मध्ये राबविणेचे योजनांचे\nअटी व शर्ती निश्चित करणे.\nठराव क्रं.82 :- महिला व बाल कल्याण समिती मार्फत सन 2013-14 मध्ये राबविणेचे योजनां बाबत समिती\nसभेत चर्चा होवून खालील प्रमाणे अटी व शर्ती निश्चित करणेंत येत आहेत.\nमहिला व बालकांच्या विकासासाठी विविध योजना महिला व बाल कल्याण समिती मार्फत राबविणेत येतात. शासन निर्णय 10 मार्च 2011 अन्वये काही योजनांत वाढ झालेने, तसेच काही योजनांचा नव्याने समावेश प्रस्तावित असलेने, या साठीचे वैयक्तिक व इतर योजनांचे अटी व शर्ती निश्चित करणे साठी खालील प्रमाणे अटी व शर्ती प्रस्तावित करणेंत येत आहेत.\nपंचायत समिती स्तर, बाल विकास प्रकल्प अधिकारी व महिला बचत गट यांचे माध्यमातून योजनेचा प्रसार करुन कागदपत्र पूर्तता करुन घेणेंचे प्रस्तावित आहे. अनू. जाती/ जमाती या सह सर्व स्तरातील महिलांंसाठी महिला व बाल कल्याण विभागाकडील योजनांचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. अंदाजपत्रकात करणेंत आलेल्या तरतूदी नुसार घ्यावयाच्या योजना व त्यांचे अटी व शर्ती खालील प्रमाणे राहतील.\nगट अ प्रशिक्षण व सक्षमीकरण योजना.\nकंत्राटी प्रशासकीय सेवा शुल्क\nविभागाचे लक्षांका नुसार साध्य होणेसाठी विभागास या व्यतिरिक्त चार-पाच कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सदरचे कर्मचारी समितीस मिळणाऱ्या निधीतून कंत्राटी व शासनाची मान्यता प्राप्त होताच विहीत पध्दतीने नेमणूक करुन घेणेत येतील.\nया साठी समितीस आवश्यक असणारी तरतूद समितीस जिल्हा परिषदे कडून मिळणारे निधीतून करता येईल.\nराजमाता जिजाउ कुपोषण मुक्त अभियान\nमाता सभा :- 4570 अंगणवाडयांमध्ये दरमहा एक या प्रमाणे माता सभा आयोजित करणेत येणार आहे व या सभा मध्ये कुपोषणा संदर्भांत मार्गदर्शन करणेंचे प्रस्तावित आहे.\nकुपोषण निर्मूलना संदर्भात दरमहा एक या प्रमाणे माता सभा घेणे साठी प्रति सभा / महिना रुपये 175/- या प्रमाणे अनुदान प्रकल्पांना पंचायत समिती स्तरावर वितरीत करणेत येईल.\nप्रकल्पंा मार्फत आर्थिक वर्षा करीता आवश्यक अशी रक्कम अंगणवाडी सेविका यांचे खात्यावर जमा करणेत येईल. या मधून या साठीचा प्रत्यक्ष खर्च अंगणवाडी सेविका करेल.\nया सभासाठीचे इतिवृत्त, उपस्थितीपत्रक, व खर्चाची प्रमाणके अंगणवाडी स्तरावर राहतील.\nजिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे संयुक्त विद्यमाने योजना राबविणेत येईल.\nसभा, सभेचे उपस्थितीपत्रक, इतिवृत्त इ. नोंदी सजातील सर्व पर्यवेक्षिका त्यांचे दॉऱ्याचे वेळी तपासणी करुन तशा नोदी तपासले बाबतच्या स्वाक्षऱ्या करतील.\nदारिद्रय रेषे वरील महिला बचत गट सक्षमी करण अभियान\nसंघटीका मानधन :- जिल्हयातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांची संख्या साधारण 30000 इतकी आहे. 15 बचत गटांसाठी एक संघटीका या प्रमाण्ेा एकूण 2000 संघटीका मार्फत बचत गटांचे सक्षमीकरण करणेचे प्रस्तावित आहे. प्रति संघटीकासाठी दरमहा रु.500/- महिना या प्रमाणे सुरवातीस 6 महिन्यांसाठी योजना प्रस्तावित आहे. (60,00,000/-)\nग्रामीण भागातील 15 बचत गटांसाठी एक संघटीका या प्रमाणे 2000 संघटीका पंचायत समिती स्तरावरुन नेमणेत येतील.\nसंघटीका मार्फत बचत गटांचे सक्षमीकरण करणेत येईल.\nसंघटीकांचे मानधन पंचायत समितीस वितरीत करणेंत येईल.\nविधवा / परितक्ता महिलांना सेवा पुरविणे\nसर्व्हेक्षण :- ग्रामीण भागातील विधवा / परितक्ता महिलांचे सर्व्हेक्षण ए बा वि सेवा योजनांचे कार्यरत अंगणवाडी सेविका / मदतनीस यांचेकडून करुन घेणेचे प्रस्तावित असून या साठी आवश्यक ते फार्म छपाई इ. करणेत येणार आहे. (10,000)\nसेवा / सुविधा पुरविणे :- सर्व्हेक्षणा नुसार प्राप्त माहितीचे आधारे समिती मार्फत राबविणेत येत असलेल्या योजनांमधून गरजे नुसार विधवा / परितक्ता महिलांना सेवा सुविधा / साहीत्य पुरविणेत येईल. या साठी समितीस स्वत:चे निधीतून दिनंाक 10 मार्च 2011 तील शासन निर्णय व वेळोवेळी करणेत आलेल्या सुधारणा नुसार योजना राबविता येईल. (1,90,000/-)\nग्रामीण भागातील बेरोजगार मुलीं व महिलां साठीच्या योजना\n1) लाभार्थी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणासाठी शासनाने निश्चित केलेले मर्यादेनुसार किमान वय व शैक्षणिक पात्रता धारण करीत असला पाहिजे.\n2)लाभार्थी दारिद्रय रेषे खालील असावा या बाबत ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक राहील, किंवा तलाठी यांचेकडील उत्पन्न रु.50,000/- चे आत असले बाबत दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक राहील.\n3)शासकीय / अशासकीय प्रशिक्षण संस्थांना द्यावयाची प्रशिक्षण फी, व परिक्षा शुल्क हे शासनाने विहीत केलेल्या दरानुसार लाभार्थीचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व तसे शासकीय प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावरच अनुज्ञेय राहील.\n4)प्रति लाभार्थी रुपये 5000/- पर्यंतचे प्रशिक्षण शुल्क प्रशिक्षण देणा-या संस्थांना अदा करणेत येतील.\n5)या योजनेत 10 टक्के लाभार्थी हिस्सा लाभार्थीकडून घ्यावयाचा असलेने, अशी रक्कम लाभार्थी प्रशिक्षण घेणा-या संस्थेकडे भरणा करील, व 90 टक्के प्रमाणे अनुदानाची रक्कम अनुज्ञेय असेल.\n6)कुटुंबातील कोणीही व्यक्ती ग्रा.पं./पं.स. किंवा जि.प.सदस्य नसावी, तसेच कुटुंबातील शासकीय / निमशासकीय सेवेत नसावी, याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावासोबत आवश्यक राहील.\n7)लाभार्थी निवड ग्रामसभेव्दारे करणे आवश्यक आहे.\nमुलींना स्वसंरक्षणा साठी व त्यांच्या शारीरिक विकासा साठी प्रशिक्षण योजना\nया योजनेमध्ये शासन निर्णया नुसार मुलींना कराटे, योगाचे प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित आहे. या बाबतच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे राहतील.\nलाभार्थीकडून कोणतेही शुल्क वसूल करणेंत येणार नाही.\nवयाची कोणतीही अट नाही.\nसदरचे प्रशिक्षण वर्ग शाळा/विद्यालये/महाविद्यालयात व त्यांचेशी समन्वयाने आयोजित करणे आवश्यक राहील.\nसदर प्रशिक्षण किमान तीन महिन्याचे आयोजित करणेंत येतील. व प्रशिक्षण देणारे संस्थेस प्रति लाभार्थी रुपये 300/- प्रतिमहा या प्रमाणे प्रशिक्षकाचे मानधन म्हणून रक्कम अदा करणेंत येईल.\nकुटूंबातील कोणीही व्यक्ती ग्रा.पं./पं.स. किवा जि. प. सदस्य नसावी, तसेच कूटूंबातील कोणीही व्यक्ती शासकीय / निमशासकीय सेवेत नसले बददल ग्राम सेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक राहील.\nमहिलां साठी समुपदेशन केंद्र चालविणे\n1. समुपदेशक व सल्लागाराची निवड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा सरकारी वकील, सिनीयर जे एफ एम सी (ज्युडीशिअल मॅजिस्ट्रेट) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा क) यांच्या समिती मार्फत करणेत येईल.\n2.नव्याने सुरु करणेंत येणाऱ्या व सद्यस्थितीत कार्यान्वित असलेले समुपदेशन केंद्रातील समुपदेशक यांना समितीस उपलब्ध करुन देणेंत आलेल्या निधीतून निधी उपलब्धते नुसार 10 मार्च 2011 चे शासन निर्णयानुसार वाढीव मानधन अनुज्ञेय राहील. तथापि या बाबतची मर्यादा उपलब्ध निधीनुसार समितीस निश्चित करता येईल.\nदहावी व बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण देणे.\nप्रशिक्षणाचे वेळी लाभार्थी किमान 10 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nप्रशिक्षण सन 13-14 मध्ये घेत असलेले लाभार्थींसाठीच व एमएस सीआयटी व समकक्ष अभ्यासक्रमासाठी अनुदान अनुज्ञेय राहील.\nप्रति लाभार्थी जास्तीत जास्त रुपये 2500/- किंवा लाभार्थी घेत असलेल्या प्रशिक्षणासाठी आकारणेत येत असलेली फी या पैकी जी कमी असेल ती अनुज्ञेय राहील.\nकुटूंबातील कोणीही व्यक्ती ग्रा.पं./पं.स. किवा जि. प. सदस्य नसावी, तसेच कूटूंबातील कोणीही व्यक्ती शासकीय / निमशासकीय सेवेत नसले बददल ग्राम सेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक राहील.\nया बाबत उत्पन्नाची कोणतीही अट नाही.\nलाभार्थी निवड ही ग्रामसभेव्दारे करणे आवश्यक आहे.\nआर्थिक दृष्टया गरीब मुला मुलींसाठी गरजे नुसार पाळणाघराची योजना समिती मार्फत राबविणेत येईल.\nकिशोर वयीन मुलींना व महिलांना जेंडर बाबत तसेच आरोग्य व कुटूंब नियोजना बाबत प्रशिक्षण देणे.\nसदरचे प्रशिक्षण वर्ग शाळेत / महाविद्यालयात आवश्यकते नुसार आयोजित करता येतील.\nप्रशिक्षण वर्ग साधारण 1 ते 2 तासाचे असावेत.\nप्रत्येक सत्रासाठी रक्कम रुपये 400/- तज्ञांना मानधन म्हणून शाळा / महाविद्यालयांना अदा करणेंत येतील.\nशाळा / महाविद्यालये यांचे मागणी नुसार मानधनाची रक्कम शाळा / महाविद्यालये यांना पंचायत समिती स्तरावरुन अदा करणेंत येईल.\nप्रशिक्षण वर्ग ए बा वि सेवा योजना व आरोग्य विभाग यांचे समन्वयाने राबविणेत येतील.\nयोजनेसाठीचे अनुदान पंचायत समिती स्तरावर वितरीत करणेंत येईल.\nमहिलांना कायदेशीर / विधी विषयक सल्ला देणे.\nसदरचे प्रशिक्षण वर्ग राज्य महिला आयोग तसेच UNFPA (United Nation Population Fund) यांचे मार्फत अथवा तज्ञांचे सहकार्याने आयोजित करता येतील.\nया मध्ये प्रति प्रशिक्षण वर्गासाठी प्रशिक्षकाला रुपये 500/- इतके मानधन अनुज्ञेय असेल.\nमहिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यात ए बा वि सेवा योजनांचे प्रकल्प कार्यालया मार्फत शिबीर आयोजित करता येतील.\nया साठी प्रशिक्षकाचे मानधनासह रक्कम रुपये 2000/- प्रति प्रशिक्षण वर्ग या प्रमाणे अनुदान पंचायत समितीस वितरीत करणेंत येईल.\nअंगणवाडी इमारत / शौचालय बांधकाम\n1. अंगणवाडी बांधकामासाठी जिल्हा निधीतून शासनाचे मर्यादे पर्यंतचे अनुदान वितरीत करणेंत येईल.\n2. या व्यतिरिक्त मागील 3.00 लक्षचे मंजूर अंगणवाडयांना अतिरिक्त निधी वितरीत करणेंत येईल.\nअंगणवाडी केंद्रासाठी शौचालय बांधकामांना प्रति युनिट रुपये 20,000/- पर्यंतचे अनुदान वितरीत करणेंत येईल.\nअगणवाडी केंंद्रासाठी निधी वितरीत करतांना प्राधान्याने गरज असलेल्या अंगणवाडी केंद्रांसाठी समितीचे मंजूुरीने निधी वितरीत करणेत येईल.\nमहिला प्रतिनिधीं ची अभ्यास सहल. (800000)\nग्रामपंचायत / पंचायत समिती / जिल्हा परिषद महिला सदस्यांची जिल्हा व जिल्हया बाहेर पंचायत राज, आदर्श ंगंाव, निर्मल ग्राम, महिला बळकटीकरण, महिला व बाल विकासाचे उपक्रम इ. विषयाची माहिती घेण्यासाठी अभ्यास सहलीचे आयोजन करता येईल. या बाबत समितीस या निधीतील अभ्यास सहलीचे नियोजन करता येईल.\nएक किंवा एकापेक्षा जास्त अभ्यास सहलींसाठी रक्कम रुपये 5.00 लक्ष पर्यंत खर्च समितीचे मान्यतेने करता येईल.\nपंचायत राज संस्थां मधील महिला लोक प्रतिनिधींना प्रशिक्षण\nपंचायत राज संस्थामधील तिन्ही स्तरावरील (ग्रा.प/पंचायत समिती/जिल्हा परिषद) महिला लोकप्रतिनिधंी साठी कामाकाजाचे प्रशिक्षणासबंधी प्रशिक्षण वर्ग / मेळावे आयोजित करता येतील.\nमहिला शक्ती अभियान समिती मार्फत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद महिला सदस्यांसाठी जिल्हा परिषदेत मार्गदर्शन केंद्र स्थापन करता येईल.\nया योजनेसाठी महिला शक्ती अभियान समितीस एकूण रक्कम रुपये 500000/- पर्यंतचे निधीचे खर्चाचे नियोजन करता येईल.\nआदर्श अंगणवाडी / बालवाडी सेविकांना पुरस्कार\nअंगणवाडी / बालवाडी मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सेविकांना प्रत्येक प्रकल्पातून प्रत्येकी एक-एक पुरस्कार देणेत येईल.\nया साठी आवश्यक असणाऱ्या निकषा नुसार प्रस्ताव प्रकल्पांकडून मागवून त्याचे छाननी नंतर या मधून गुणांवर निवड निश्चित करणेंत येईल.\nउपलब्ध अनुदानानुसार पुरस्काराची रक्कम, कार्यक्रमाचे ठिकाण, व या कार्यक्रमाचे नियोजन महिला व बाल कल्याण समिती मार्फत करणेंत येईल.\nया साठीचे पुरस्कार वितरणाचे समारंभासाठी समितीस विहीत कार्यपध्दतीनुसार खर्च करता येईल.\nगट ब च्या योजना (वस्तू खरेदीच्या योजना).\nकिशोरवयीन मुलींसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सहकार्याने ही योजना राबविणेत येणार आहे.\nयोजनेतून किशोरवयीन मुलींसाठी आरोग्या सबंधात आवश्यक अशा वस्तू / साहीत्याचे वाटप महिला व बाल कल्याण समितीचे मंजूरीने करणेंत येईल.\nकुपोषित मुला-मुलींसाठी अतिरिक्त आहार.\nग्रामीण / आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी कुपोषित मुलांना अंगणवाडया मार्फत मुला-मुलींसाठी दुप्पट आहार दिला जातो. तथापि कुपोषण कमी करण्यासाठी तो पुरेसा नसलेने कुपोषित मुलांना अंगणवाडीत पुरविणेंत येणाऱ्या आहारा व्यतिरिक्त आहार म्हणून अंगणवाडीत मुलांना Micronutrient Supplement Syrup चा पुरवठा करणेची योजना खालील अटी-शर्ती नुसार राबविणेंत येत आहे.\nप्रकल्पांकडून लगतच्या महिन्याचा कुपोषित बालकां बाबत अहवाल प्राप्त करुन घेउन त्या नसार Micronutrient Supplement Syrup किंवा कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक अशा खाद्य / औषधे यांचा पुरवठा 100 टक्के अनुदानावर करावा.\nप्रत्यक्ष मात्रा देतांना आरोग्य विभागाकडील स्थानिक कर्मचारी / अधिकारी यांचा सल्ला व मार्गदर्शन घेणे बाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत सर्व सबंधितांना सूचना द्याव्यात.\nअंगणवाडी केंद्रांना वजनकाटे पुरविणे\nया मधून खालील अटी-शर्ती नुसार वजनकाटे पुरवठा पुरवठा अंगणवाडी / बालवाडी यांना करणेंत येईल.\nया पूर्वी या योजनेचा लाभ दिला नसलेल्या व प्राधान्याने गरज असलेल्या अंगणवाडी / बालवाडी केंद्रांची यादी नावासह बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडून प्राप्त करुन घ्यावी.\nमागणी ü व उपलब्ध तरतूदी नुसार समिती मार्फत योजना राबविणेत येईल.\nग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी पुरविणे.\nलाभार्थीचे वय किमान 18 पूर्ण असावे. या साठी शाळा सोडल्याचा दाखला प्रत किंवा मतदान ओळखपत्र छायांकित प्रत प्रस्तावा सोबत जोडणे आवश्यक आहे.\nलाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावे व या साठी ग्रामसेवक यांचा दारिद्रय रेषेखालील दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक आहे. अथवा तलाठी यांचेकडील मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न रुपये 25,000/- चे आत उत्पन्न असले बाबतचा दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक राहील.\nयोजनेमध्ये 10 टक्के लाभार्थी हिस्सा घ्यावयाचा असलेने, अशी रक्कम भरणा करणेंस तयार असले बाबतचे हमी पत्र प्रस्तावा सोबत आवश्यक आहे.\nलाभार्थी कुटूंबाकडे शौचालय असणे आवश्यक असून, त्याचा वापर कुटूंब करीत असले बाबत ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक आहे.\nलाभार्थी कडे / कुटूंबाकडे विद्युत पुरवठयाची सोय असले बाबत पुराव्या साठी राज्य विद्युत मंडळाचे देयकाची छायांकित प्रत प्रस्तावा सोबत आवश्यक आहे.\nलाभार्थी निवड ही ग्रामसभेव्दारे करणे आवश्यक आहे.\nविधवा / परितक्ता / निराधार महिलांना प्राधान्याने या योजनेचा लाभ देणेंत यावा. व अशा लाभार्थींसाठी सरपंच व ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत घ्यावा.\nलाभार्थीने या योजनेचा लाभ जिल्हा परिषदेचे इतर विभाग अगर या विभागाकडून मागील पाच वर्षांत घेतलेला नसावा. या बाबत तसा ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत जोडावा.\nजि.प.शाळेतील इ.5वी ते 7वी तील मुलींना / शिष्यवृत्ती प्राविण्य मिळविलेल्या मुलींना सायकल पुरविणे\nजिल्हा परिषद निधी / शासन निधी मधून जिल्हा परिषदेचे सर्व शाळांमधील इ 5 वी ते इ.7 वी तील मुलींना व व शिष्यवृत्ती प्राविण्य मिळविलेल्या मुलींना मोफत सायकल ही योजना राबविणेंत येत आहे.\nजिल्हा परिषदेच्या शाळेत इ. 5 वी ते 7 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या व शिष्यवृत्ती प्राविण्य मिळविलेल्या सर्वच मुलींना उत्पन्न अथवा अंतर याची कोणतीही अट न ठेवता सायकल पुरविणेत येणार आहे.\nजिल्हा परिषदेच्या शाळेत इ. 5 वी ते 7 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या व शिष्यवृत्ती प्राविण्य मिळविलेल्या सर्व मुलींची यादी सबंधित जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक यांचेकडून यादी प्राप्त करुन घेउन त्यानुसार सायकलींचे मोफत वाटप शक्यतो शाळा सुरु होतानाच करणेत येईल.\nग्रामीण भागातील महिलांना ü सौर कंदील पुरविणे.\nवय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.\nलाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावे व या साठी ग्रामसेवक यांचा दारिद्रय रेषेखालील दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक आहे. अथवा तलाठी यांचेकडील मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न रुपये 25,000/- चे आत उत्पन्न असले बाबतचा दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक राहील.\nयोजनेमध्ये 10 टक्के लाभार्थी हिस्सा घ्यावयाचा असलेने, अशी रक्कम भरणा करणेंस तयार असले बाबतचे हमी पत्र प्रस्तावा सोबत आवश्यक आहे.\nलाभार्थी कुटूंबाकडे शौचालय असणे आवश्यक असून, त्याचा वापर कुटूंब करीत असले बाबत ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक आहे.\nलाभार्थी निवड ही ग्रामसभेव्दारे करणे आवश्यक आहे.\nविधवा / परितक्ता / निराधार महिलांना प्राधान्याने या योजनेचा लाभ देणेंत यावा. व अशा लाभार्थींसाठी सरपंच व ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत घ्यावा.\nलाभार्थीने या योजनेचा लाभ जिल्हा परिषदेचे इतर विभाग अगर या विभागाकडून मागील पाच वर्षांत घेतलेला नसावा. या बाबत तसा ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत जोडावा.\nअंगणवाडी केंद्रातील मुला मुलींसाठी गणवेश पुरविणे\nया मधून खालील अटी-शर्ती नुसार गणवेश पुरवठा अंगणवाडी / बालवाडी यांना करणेंत येईल.\nया पूर्वी या योजनेचा लाभ दिला नसलेल्या व प्राधान्याने गरज असलेल्या अंगणवाडी / बालवाडी केंद्रांतील मुला मुलींची संख्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडून प्राप्त करुन घ्यावी.\nमागणी ü व उपलब्ध तरतूदी नुसार समिती मार्फत योजना राबविणेत येईल.\nग्रामीण भागातील महिलांना शेवया मशिन पुरविणे\nलाभार्थीचे वय किमान 18 पूर्ण असावे. या साठी शाळा सोडल्याचा दाखला प्रत किंवा मतदान ओळखपत्र छायांकित प्रत प्रस्तावा सोबत जोडणे आवश्यक आहे.\nलाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावे व या साठी ग्रामसेवक यांचा दारिद्रय रेषेखालील दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक आहे. अथवा तलाठी यांचेकडील मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न रुपये 25,000/- चे आत उत्पन्न असले बाबतचा दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक राहील.\nयोजनेमध्ये 10 टक्के लाभार्थी हिस्सा घ्यावयाचा असलेने, अशी रक्कम भरणा करणेंस तयार असले बाबतचे हमी पत्र प्रस्तावा सोबत आवश्यक आहे.\nलाभार्थी कुटूंबाकडे शौचालय असणे आवश्यक असून, त्याचा वापर कुटूंब करीत असले बाबत ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक आहे.\nलाभार्थी कडे / कुटूंबाकडे विद्युत पुरवठयाची सोय असले बाबत पुराव्या साठी राज्य विद्युत मंडळाचे देयकाची छायांकित प्रत प्रस्तावा सोबत आवश्यक आहे.\nलाभार्थी निवड ही ग्रामसभेव्दारे करणे आवश्यक आहे.\nविधवा / परितक्ता / निराधार महिलांना प्राधान्याने या योजनेचा लाभ देणेंत यावा. व अशा लाभार्थींसाठी सरपंच व ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत घ्यावा.\nलाभार्थीने या योजनेचा लाभ जिल्हा परिषदेचे इतर विभाग अगर या विभागाकडून मागील पाच वर्षांत घेतलेला नसावा. या बाबत तसा ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत जोडावा.\nग्रामीण भागातील महिलांना मसाला पल्वलायझर पुरविणे\nलाभार्थीचे वय किमान 18 पूर्ण असावे. या साठी शाळा सोडल्याचा दाखला प्रत किंवा मतदान ओळखपत्र छायांकित प्रत प्रस्तावा सोबत जोडणे आवश्यक आहे.\nलाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावे व या साठी ग्रामसेवक यांचा दारिद्रय रेषेखालील दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक आहे. अथवा तलाठी यांचेकडील मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न रुपये 25,000/- चे आत उत्पन्न असले बाबतचा दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक राहील.\nयोजनेमध्ये 10 टक्के लाभार्थी हिस्सा घ्यावयाचा असलेने, अशी रक्कम भरणा करणेंस तयार असले बाबतचे हमी पत्र प्रस्तावा सोबत आवश्यक आहे.\nलाभार्थी कुटूंबाकडे शौचालय असणे आवश्यक असून, त्याचा वापर कुटूंब करीत असले बाबत ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक आहे.\nलाभार्थी कडे / कुटूंबाकडे विद्युत पुरवठयाची सोय असले बाबत पुराव्या साठी राज्य विद्युत मंडळाचे देयकाची छायांकित प्रत प्रस्तावा सोबत आवश्यक आहे.\nलाभार्थी निवड ही ग्रामसभेव्दारे करणे आवश्यक आहे.\nविधवा / परितक्ता / निराधार महिलांना प्राधान्याने या योजनेचा लाभ देणेंत यावा. व अशा लाभार्थींसाठी सरपंच व ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत घ्यावा.\nलाभार्थीने या योजनेचा लाभ जिल्हा परिषदेचे इतर विभाग अगर या विभागाकडून मागील पाच वर्षांत घेतलेला नसावा. या बाबत तसा ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत जोडावा.\n3 टक्के अपंग कल्याण व पुनर्वसन निधी\nग्रामीण भागातील अपंग महिलांना अनुदाना वर पिठाची गिरणी पुरविणे. 14100000\nलाभार्थीचे अंपंगत्व किमान 40 टक्के किवा त्यापेक्षा जास्त असले बाबतचे मा. जिल्हा शल्य चिकीत्सक, यांचेकडील प्रमाणपत्राच्‌ी साक्षांंकित प्रत प्रस्तावा सोबत आवश्यक राहील.\nवय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.\nअपंग लाभार्थींसाठी उत्पन्नाची किंवा दारिद्रय रेषेची कोणतीही अट नाही.\nअपंगाचे या योजनेमध्ये 10 टक्के लाभार्थी हिस्सा घ्यावयाचा नाही.\nलाभार्थी कुटूंबाकडे शौचालय असणे आवश्यक असून, त्याचा वापर कुटूंब करीत असले बाबत ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक आहे.\nलाभार्थी कडे / कुटूंबाकडे विद्युत पुरवठयाची सोय असले बाबत पुराव्या साठी राज्य विद्युत मंडळाचे देयकाची छायांकित प्रत प्रस्तावा सोबत आवश्यक आहे.\nलाभार्थी निवड ही ग्रामसभेव्दारे करणे आवश्यक आहे.\nलाभार्थीने या योजनेचा लाभ जिल्हा परिषदेचे इतर विभाग अगर या विभागाकडून मागील पाच वर्षांत घेतलेला नसावा. या बाबत तसा ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत जोडावा.\nया व्यतिरिक्त समितीस शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून सर्वसाधारण योजनांसाठी वरील प्रमाणेच निकष राहतील तथापि विशेष घटक योजना / टिएसपी व ओटीएसपी या योजनां साठी द्यावयाच्या लाभांसाठी 1. सक्षम अधिकारी यांनी दिलेले जाती बाबतचे प्रमाणपत्र सत्य प्रत, 2. शाळा सोडल्याचे दाखल्यावरील जाती बाबतचा उल्लेख अथवा 3. ग्रामसेवक व सरपंच यांनी संयुक्त स्वाक्षरीने दिलेला जाती बाबतचा दाखला योजनेसाठी ग्राहय धरणेत येईल.\nमहिला व बाल कल्याण समिती सभा दिनंाक 08 ऑगस्ट 2013 मधील ठराव क्रं.120 चा कारणा पुरता उतारा\nठराव क्रं.120: 22353266 विशेष घटक योजना (शासन निधी) सन 2013-14 व जिल्हा वार्षिक योजना 2013-14 अंतर्गत अदिवासी उपयोजना क्षेत्रातील (TSP) व अदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील(OTSP) 22352297 समितीने सुचविलेल्या योजनांच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे निश्चित करुन मंजूरी देणेत आली.\nग्रामीण भागातील महिलांना पिठगिरणी पुरविणे\n22353266 विशेष घटक योजना\n(शासन निधी) सन 2013-14\nलाभार्थीचे वय किमान 18 पूर्ण असावे. या साठी शाळा सोडल्याचा दाखला प्रत किंवा मतदान ओळखपत्र छायांकित प्रत प्रस्तावा सोबत जोडणे आवश्यक आहे.\nलाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावे व या साठी ग्रामसेवक यांचा दारिद्रय रेषेखालील दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक आहे. अथवा तलाठी यांचेकडील मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न रुपये 50,000/- चे आत उत्पन्न असले बाबतचा दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक राहील.\nयोजनेमध्ये 10 टक्के लाभार्थी हिस्सा घ्यावयाचा असलेने, अशी रक्कम भरणा करणेंस तयार असले बाबतचे हमी पत्र प्रस्तावा सोबत आवश्यक आहे.\nलाभार्थी कुटूंबाकडे शौचालय असणे आवश्यक असून, त्याचा वापर कुटूंब करीत असले बाबत ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक आहे.\nलाभार्थी कडे / कुटूंबाकडे विद्युत पुरवठयाची सोय असले बाबत पुराव्या साठी राज्य विद्युत मंडळाचे देयकाची छायांकित प्रत प्रस्तावा सोबत आवश्यक आहे.\nलाभार्थी निवड ही ग्रामसभेव्दारे करणे आवश्यक आहे.\nविधवा / परितक्ता / निराधार महिलांना प्राधान्याने या योजनेचा लाभ देणेंत यावा. व अशा लाभार्थींसाठी सरपंच व ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत घ्यावा.\nलाभार्थीने या योजनेचा लाभ जिल्हा परिषदेचे इतर विभाग अगर या विभागाकडून मागील पाच वर्षांत घेतलेला नसावा. या बाबत तसा ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत जोडावा.\n1. सक्षम अधिकारी यांनी दिलेले जाती बाबतचे प्रमाणपत्र सत्य प्रत, 2. शाळा सोडल्याचे दाखल्यावरील जाती बाबतचा उल्लेख अथवा 3. ग्रामसेवक व सरपंच यांनी संयुक्त स्वाक्षरीने दिलेला जाती बाबतचा दाखला\nदहावी व बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण देणे 22353266 विशेष घटक येाजना (शासन निधी) सन 2013-14\nप्रशिक्षणाचे वेळी लाभार्थी किमान 10 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nप्रशिक्षण सन 13-14 मध्ये घेत असलेले लाभार्थींसाठीच व एमएस सीआयटी व समकक्ष अभ्यासक्रमासाठी अनुदान अनुज्ञेय राहील.\nप्रति लाभार्थी जास्तीत जास्त रुपये 2800/- किंवा लाभार्थी घेत असलेल्या प्रशिक्षणासाठी आकारणेत येत असलेली फी या पैकी जी कमी असेल ती अनुज्ञेय राहील.\nकुटूंबातील कोणीही व्यक्ती ग्रा.पं./पं.स. किवा जि. प. सदस्य नसावी, तसेच कूटूंबातील कोणीही व्यक्ती शासकीय / निमशासकीय सेवेत नसले बददल ग्राम सेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक राहील.\nया बाबत उत्पन्नाची कोणतीही अट नाही.\nलाभार्थी निवड ही ग्रामसभेव्दारे करणे आवश्यक आहे.\n1. सक्षम अधिकारी यांनी दिलेले जाती बाबतचे प्रमाणपत्र सत्य प्रत, 2. शाळा सोडल्याचे दाखल्यावरील जाती बाबतचा उल्लेख अथवा 3. ग्रामसेवक व सरपंच यांनी संयुक्त स्वाक्षरीने दिलेला जाती बाबतचा दाखला\nएकात्मिक बाल विकास सेवा योजना\nबाल्यावस्था हा मुलांच्या वाढीच्या व विकासाच्या टप्प्यातील अंत्यंत महत्वाचा कालावधी आहे. जन्माला येण्यापूर्वी तसेच जन्मानंतर बालकांना पुरेशा सेवा देण्याचे राष्ट्रीय धोरण आपल्या देशाने स्वीकारले आहे. या धोरणनुसारच 2 ऑक्टोंबर 1975 साली प्रायोगिक तत्वावर एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुलांचे सर्वांगीण विकासासाठी म्हणून आरोग्य, आहार व शिक्षण एकत्रितपणे देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली. गरीब कुंटूंबातील महिला आणि मुले यांच्यासाठीचा आणि तळागाळपर्यंत पोहचलेला राज्यभरात 88,272 अंगणवाडी केंद्गे असणाराव ग्रामीण भागात 364 प्रकल्प, 85 आदिवसी प्रकल्प व 104 शहरी प्रकल्प असणारा हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे.\nया कार्यक्रमाखली 1) पूरक पोषण आहार, 2) लसीकरण 3)आरोग्य तपासणी 4)संदर्भ आरोग्य सेवा, 5) आरोग्य आणि सकस आहार विषयक शिक्षण 6) अनौपचारिक शालेय पुर्व शिक्षण इ. सहा महत्वाच्या सेवा दिल्या जातात. एकात्मिक बाल विकास सेवा योजना हि केंद्ग शासन पुरस्कृत योजना असून या योजनेची सुरूवात अमरावती जिल्हयातील धारणी या आदिवसी व धारावी , मुंबई या नागरी प्रकल्पाच्या स्थापने पासून महाराष्ट्र राज्यात झाली. टप्प्याटप्याने योजनेच्या प्रकलप संख्येत वाढ होऊ न राज्यातील विविध नागरी , ग्रामीण व आदिवसी प्रकल्पातून योजनेचे प्रकल्प स्थापनेत आले.\nएकात्मिक बाल विकास सेवा योजना कशासाठी \nदेशाच्या मानवी साधनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी.\nकोवळ्या बालवयातच, मुलांच्या शरीराच्या, मनाच्या आणि सामाजिक जाणीवेच्या विकासाचा\nबालमृत्यू, शारीरीक अपंगत्व, कुपोषण, शाळाशिक्षणात प्रगति असूनही शिक्षण अर्धवट सोडावे\nलागण्याची परिस्थीती आणि विकसनक्षमतेची प्रतिकूलता यांच्यामुळे उद्‌भवणारा अपव्यय\nबाल विकासाव्या क्षेत्रामध्ये जनतेचा सामूहिक सहभाग लाभावा आणि बाल विकासाच्या कार्यक्रमाला स्वयंपूर्णता प्राप्त व्हावी यादृष्टीने चालना देण्यासाठी.\nएकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे उद्देश :-\n0 ते 6 वयोगटातील मुलांचा पोषण व आरोग्य दर्जा सुधारणे.\nमुलांचा योग्य मानसिक, शाररीक व सामाजिक विकासाचा पाया घालणे\nबालमृत्यूचे, बालरोगाचे, कुपोषणाचे व मध्येच शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे.\nबाल विकासाला चालना मिळावी म्हणून विविध विभांगांमध्ये धोरण व अंमलबजावणी\nयाबाबत परिणामकारक समन्वय साधणे.\nयोग्य पोषण व आरोग्य विषयक शिक्षणाद्वारे बालकांचे सर्वसामान्य आरोग्य व त्यांच्या पोषण विषयक गरजांकडे लक्ष पुरविण्याबाबत मातांची क्षमता वाढविणे.\nएकात्मिक बाल विकास सेवा योजना व्याती\nएकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी केंद्ग/ प्रकल्प कार्यन्वीत करणेसाठी आवश्यक लोकसंख्येबाबतचे निकष\nडोंगराळ, दुर्गम आणि वाळवंटी क्षेत्रामध्ये 300 किंवा अधिक लोकसंख्या असणारे प्रत्येक लहान गावे/खेडी यामध्ये अंगणवाडया स्थापित करता येतील. अगदी लहान खेडी (300 हून कमी लोकसंख्या असणारे) यांना जवळच्या अंगणवाडीशी जोडता येईल किंवा तेथे मिनी अंगणवाडी कें द्ग स्थापित करता येईल.\n0 ते 5 वर्षे बालक संख्क्ष्या\n0 ते 6 वयोगटातील मुले\nगरोदर माता व स्तनदा माता\n15 ते 45 वयोगटातील स्त्रिया\n5) अनौपचारिक शालेय पुर्व शिक्षण\n(3 ते 6 वयोगटातील मुले)\nआहार व आरोग्य शिक्षण\n1) आहार व आरोग्य शिक्षण\nअंगणवाडी केंद्गस्तरावर पूरक पोषण आहार पुरविणेत येत असलेने ग्रामीण क्षेत्रातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, मुलांच्या शाररीक व बौध्दिक विकास करणे व आजाराचे प्रमाण कमी करणे, रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे, माता व महिलांना आहार व आरोग्य संबधिचे शिक्षण देणे इ. उद्दिष्टे साध्य होतात.\n3 ते 6 वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहाराव्दारे दोन वेळेस 500 कि.ग्रॅ्‌.उष्मांक आणि 12 ते 15 ग्रॅम प्रथिनेयुकत आहार स्थानिक महिला बचत गटांमार्फत मुलांना देण्यात येतो. या आहारामध्ये सकाळचा गरम नाष्टा (शेंगदाना लाडू, चिक्की, शिरा इ.) व दुपारी पूरक पोषण आहार (लापशी, उसळ, खिचडी) इ. समावेश आहे.\nघरी घेऊन जाण्यासाठी आहार पुरवठा. (- )\nराज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्र. एबावि 2008/प्र.क्र.-59/का-5 दिनांक 24/08/2009 नुसार सुधारित आर्थिक निकष व सुधारित प्रमाणकानुसार 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील लाभार्थी, 6 महिने ते 6 वर्ष तीव्र कमी वजनाची बालके, गरोदर व स्तनदा माता यांनी घरी घेऊन जाण्यासाठी आहार पुरवठा करणेत येत आहे. स्वरुपातील अन्न हे विशेष पध्दतीने तयार केलेले असुन सुक्ष्म पोषक तत्वांनी युक्त अशा पद्‌ध्तीने समृध्द केलेले तसेच स्वच्छतापूर्ण वातावरणात तयार केलेले व उष्मांकयुक्त ( ) आहे.\nसर्व पाककृतींसाठी लाभार्थी प्रकारानुसार 25 दिवसांची (एक महिना) पॅकींग साईज, प्रति दिन प्रति लाभार्थी सर्व्हीग साईज, प्रति दिन प्रति लाभार्थी देय आर्थिक निकष, हे केंद्ग व राज्य शासनाने निश्चित केले आहेत. प्रति दिन प्रति लाभार्थ्यास द्यावयाच्या शिरा, उपमा, सत्तु व सुखडी या आहाराचे प्रमाणानुसार 25 दिवसांसाठीच्या आहाराचे पाकीटे तयार करण्यात आलेली आहेत. त्यामुळे प्रति लाभार्थीस देय असलेल्या 25 दिवसांसाठीच्या प्रमाणकानुसार खालील कोष्टकाप्रमाणे लाभार्थीना आहाराचे पाकीटे देण्यात येतात.\nएका महिन्यासाठी लाभार्थीस द्यावयाच्या आहाराचे प्रमाण\n6 महिने ते 3 वर्षे\n6 महिने ते 3 वर्षे पर्यंतची तीव्र कमी वजनाची बालके\n60 ग्रॅम प्रति दिन प्रति लाभार्थी\n1500 ग्रॅम चे अतिरिक्त आहाराचे पाकीट\n3 वर्षे ते 6 वर्षे पर्यंतची तीव्र कमी वजनाची बालके\nगर्भवती व स्तनदा माता\nबालकांचे आरोग्य व पोषण यांचा धनिष्ठ संबंध आहे. बालकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करून त्यांचे आरोगय चांगले ठेवणेचे दृष्टीने एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभाग यांचे समन्वयाने 6 वर्षाखालील सर्व बालकांना वयानुसार सहा बालरोगांपासून संरक्षण करण्यासाठी डांग्या खोकला, घटसर्प, क्षयरोग, पोलिओ, गोवर लसी देण्यात येतात. तसेच गरोदर स्ञियांना धनुर्वातापासुन संरक्षण करण्यासाठी धनुर्वात प्रतिबंधक लस देण्यात येते.\nअंगणवाडी कार्यक्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व किशोरी तसेच 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी वर्षातून किमान 4 वेळा आरोग्य विभागाकडून केली जाते. अंगणवाडीमार्फत 100्‌% लाभार्थीची आरोग्य तपासणी होणेसाठी पाठपुरावा करणेत येतो. प्रत्येक अंगणवाडी केंद्गामार्फत प्राप्त मेडिकल किटमधून लाभार्थींस प्राथमिक औषोधोपचार केले जातात.\n4) संदर्भ आरोग्य सेवा\nग्रामीण भागातील लाभर्थींची आरोग्य तपासणी झाल्यानंतर गंभीर स्वरुपाचे आजार असल्यास अशा महिला व बालकांना सविस्तर सेवेकरिता ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. तथापि अंगणवाडी केंद्गामार्फत संदर्भ सेवा देणेत येते. रुग्ण, बालके/ महिलांना संदर्भ सेवेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्ग/ ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात येते. ज्यांचे पालक औषधे खरेदी करण्याकरिता पैसे नसल्याने उपचार घेण्याचे टाळतात, अशा करीता प्राथमिक आरोग्य केंद्गातून औषधी पुरविण्यास निधी उभारणे तसेच ग्रामस्थांकडुन मदत घेऊन औषधे उपलब्ध करून देण्यासाठी अंगणवाडीमार्फत प्रयत्न करणेत येतात.\n5) आरोग्य आणि सकस आहार विषयक शिक्षण\n15 ते 45 वर्षे वयोगटातील स्त्रिया, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना बालकांचा विकास साधण्याचे दृष्टीने पोषण आहार व आरोग्य विषयक शिक्षण दिले जाते. यासाठी आंगणवाडी स्तरावर नियमितपणे गृहभेटी देऊन तसेच महिला मंडळांच्या सभा/ स्वयंसहाय्यता गटाच्या सभा, गरोदर स्त्रिया व स्तनदा\tमातांच्या तपासणीचे वेळी उपकेंद्गामध्ये, बालकांची वजने घेण्याचे दिवशी, लसीकरणाच्या दिवशी, उत्सव, जत्रा, आठवडा बाजार यावेळी माता बाल संगोपन, सकस आहार प्रात्यक्षिके, वैयक्तिक स्व्च्छता, परिसर स्वच्छता इत्यादी विषयांवर माहिती दिली जाते.\n6) अनौपचारिक शालेय पुर्व शिक्षण\n3 ते 6 वर्षातील बालकांचा बौद्धीक, सामाजिक, भावनिक, व शारीरीक कौशल्येही विकसित होणे आवश्यक आहे. मुलांना शाळेची ओळख व गोडी निर्माण करण्याचे दृष्टिने लहान मुलांना शाळापूर्व शिक्षण औपचारिक पद्‌ध्तीने न देता अनौपचारीक पद्धतीने देण्यात येते. निसर्गातील पाने, झाडे, फळे, फुले व स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्यामधून आनंददायी शिक्षण देणेत येते.\nजन्मल्यापासुन बालकाच्या शारीरिक, मानसिक व बौध्दीक विकास झपाटयाने व एका विशिष्ठ क्रमाने होत असतो. बालकांचे वजन व उंचीत होणारी वाढ ही देखील एका ठराविक प्रमाणात असते. जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या बालकांच्या वाढीचे नवीन मापदंड सन 2006 नुसार बालकांच्या वृध्दीचे संनियंत्रण वृध्दी आलेखाच्या सहाय्याने वयानुसार वजन यानिर्देशांकाद्वारे केले जाते. योजनेद्वारे अगंवाडीस्तरावर दरमहा 10 ते 15 तारखे दरम्यान मुलांचे व मुलींचे वृध्दीपत्रक वेगवेगळे करुन बालकांचे वजन घेऊन त्याची नोंद वृध्दी पत्रकात घेतली जाते. बालकाच्या वाढीच्या टप्प्यात अडथळा येत असेल तर सहज लक्षात येऊन वेळेवर योग्य ती प्रतिबंधात्मक काळजी घेता येते. अति तीव्र कमी वजनाची बालके अति धोकादायक असल्यामुळे ताबडतोब वैद्यकीय उपचार व संदर्भ सेवा देण्यात येते. बालकांचे वजन घटण्यास व वाढ न होण्यास कारणभूत असणा-या अनेक कारणांची , आजारांची माहिती शोधून (उदा.डायरिया,श्वसन,जंतुसंसर्ग ,अपुरा आहार,आईचे आजारपण इ.) त्यानुसार वेळेवर सुधारात्मक उपचार करणे सहज शक्य होते. बालकांना दयावयाचा पुरेसा आहार, आरोग्याची काळजी तसेच त्यांच्या वृध्दी व विकासासंबंधी मातांचे व कुटुंबातील सदस्यांचे समुदेशन करणे या गोष्टी प्रभावीपणे करणेस मदत होते.\nनाविन्यपूर्ण उपक्रम -- ग्राम बाल विकास केंद्ग (ॄ)\nकुपोषणाच्या समस्येवर मात करणेसाठी शासनाने गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत. पुरक पोषण आणि आरोग्य सेवा या दोन्ही एकत्रितपणे आणि समन्वयाने पुरविल्या तरच हा प्रश्न सोडविता येतो. कुपोषण निर्मूलन व बालमृत्यू कमी करण्यासाठी 'ग्राम बाल विकास केंद्ग'योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. महिला बाल विकास अंतर्गत 'एकात्मिक बाल विकास सेवा योजना 'आणि सार्वजनिक विभागाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यांचे समन्वयाने ग्राम बाल विकास केंद्गामार्फत 6 वर्षाखालील तीव्र कुपोषित () व मध्यम कुपोषित (ं) बालकांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्यात येते .\nग्राम बाल विकास केंद्गामध्ये गावातील 6 महि­ने ते 6 वर्षे वयोगटातील कुपोषित बालकां­ना दाखल करणेत येत आहे. एक महि­न्याच्या कालावधीमध्ये सदर बालकान­ा गांव पातळीवरील ग्राम बाल विकासे केंद्गातील आहार संहितेचा वापर करु­न त्या बालकांच्या श्रेणीत सुधार करणेचे प्रयत्न करणेत येत आहेत. बालकान­ा दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत केंद्गात दाखल करणेत येऊन पोषणाबाबत काळजी घेतली जाते. बालकांना दररोज नियमितपणे आहार व औषधे देणेत येतात. ग्राम बाल विकास केंद्गामुळे पालकाची दवाखा­न्यात ये-जा करण्याची अडचण दुर होते, मातांना आहार व आरोग्याविषयी मार्गदर्शन मिळते तसेच गावातील इतर ग्रामस्थ दिल्या जाणा-या आहाराची माहिती घेवू­न सक्षम होणेस मदत होते. या केंद्गांना संबंधीत गावांतील ग्राम पंचायती व ग्रामस्थांचेही चांगल्याप्रकारे सहकार्य मिळत आहे. ग्राम बाल विकास केंद्गाचा प्रति बालक प्रतिदिन खर्च रु .32/- शासनाने निर्धारित केलेला असुन केंद्गाची किरकोळ डागडुजी , सुशोभीकरण , बाळकोपरा इ. एका वेळचा रु. 400/- खर्च करणेस परवानगी देणेत आलेली आहे.\nसदरच्या केंद्गास संबंधीत गावांतील ग्राम पंचायती व ग्रामस्थांचेही चांगल्याप्रकारे सहकार्य मिळत आहे तसेच काही ठिकाणी पूर्णतः लोकसहभागातू­ा ग्राम बाल विकास केंद्गे यशस्वीपणे राबविणेत आलेली आहेत. जिल्ह्यामध्ये प्रथमतः पुरंदर प्रकल्पामध्ये प्रायोगिक तत्वावर 15 अंगणवाड्यांमध्ये ग्राम बाल विकास केंद्गाची स्थाप­ना करणेत आलेली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे ग्राम बाल विकास केंद्गांची स्थापना करणेत आलेली आहे\nवज­ा वाढ झालेली बालके\nमधू­ा मध्ये समाविष्ठ झालेली बालके\n/ मधू­ा मध्ये समाविष्ठ झालेली बालके\nजिल्हा वार्षिक योजना सन 2009-10 अंतर्गत पुणे जिल्ह्यास 176.12 लक्ष अनुदान प्राप्त झाले होते. सन 2010-2011 अंतर्गत 1103.88 लक्ष अनुदान प्रति अंगणवाडी 4.00 लक्षप्रमाणे 401 अंगणवाडी केंद्गाना प्राप्त झाले आहे.\nअंगणवाडी केंद्ग बांधकामे संख्या\nमहिला तक्रार निवारण समिती\nमहाराष्ट्र शासन महिला व बाल कल्याण विभाग यांचेकडील निर्णय दिनांक 19 सप्टेंबर 2006 अन्वये शासकीय/ निमशासकीय सेवेतील महिलोआ कर्मचा-यांच्या लैंगिक लैंगिक छळाबाब समस्यांची तपासणी करण्यासाठी महिला व तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे. महिला तक्रार निवारण समिती सर्व पंचायत समितीस्तरांवर कार्यरत आहेत. या समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे.\nआदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कारासाठी निकष\nअंगणवाडी कार्यकर्ती कामाचा तपशिल व मुल्यमापन\nसर्व्हेक्षण क्षमता 90 % पेक्षा जास्त\nकुपोषित मुलाची (श्रेणी 3 व 4 ची)संख्या कमी करणे श्रेणी 3 व 4 - 0 मुले 3 गुण, श्रेणी 4 चे - 0 मात्र 3 चे असल्यास -1 गुण\nअंगणवाडी वर्गीकरण स्टार स्पर्धा (5 स्टार-5 गुण) (4 स्टार- 3 गुण )\nसर्वसाधारण श्रेणीतील मुलांचे प्रमाण 85 % पेक्षा जास्त असल्यास - 5 गुण, 75 ते 85% 3 गुण, 65 ते 75% 2 गुण, 65% पेक्षा कमी 1 गुण\nलसीकरण नियमीत करणे(उपस्थिती व नोंदी)\nपालकांनी मुलांची वजन घेणे 100% साध्य असल्यास 5 गुण, 90 ते 100 % 3 गुण 80 ते 90 % 1 गुण, 80% पेक्षा कमी 0 गुण\nपुरकपोषण आहार वाटप लाभार्थी एकूणलाभार्थीच्या\n80 टक्केपेक्षा जास्त असेल तर 5 गुण, 70 ते 80 % असेल तर 3 गुण, 60 ते 70 असेल तर 2 गुण, 60% पेक्षा कमी 0 गुण\n3 ते 6 पटावरील मुलांची सरासरी उपस्थिती सर्व्हेच्या 80 टक्के असेल तर 5 गुण, 70 ते 80 % असेल तर 3 गुण, 60 ते 70 असेल तर 2 गुण , 60% पेक्षा कमी 0 गुण\nलोकांचा सहभाग /लोकवर्गणी/वस्तु रुपाने (रु.10000/-पेक्षा जास्त पेक्षा जास्त)्‌ 0ते2500/- लोकवर्गणी 1 गुण, 2500/-ते5000/-लोकवर्गणी 2 गुण, 5000/-ते7500/-लोकवर्गणी 3 गुण, 7500/-ते10000/-लोकवर्गणी 4 गुण\nकुपोषितांना दरमहा संदर्भ सेवा\nअंगणवाडीतील दप्तर अद्यावत ठेवणे - सर्व रजीस्टर्स्‌\nसर्व्‌ मुलांची दरमहा वजने घेणे 100%-5,98% - 3,95ते98 -1, 95%पेक्षा कमी 0 गुण\nआरोग्य व रोगनिदान शिबीरास लाभार्थी उपस्थित ठेवणे्‌\nमाता समिती सभा दरमहा घेणे(वर्षभरात घेतली नसल्यास 0 गुण), वर्षभरात 5 वेळा सभा आयोजन 2 गुण वर्षभरात 10 वेळा सभा आयोजन 3 गुण\nपालकसभा / मेऴावे दरमहा घेतल्यास 3,तीन महिन्यातुन एकदा-1 गुण\nअंगणवाडी कार्यकर्तीच्या गृहभेटी दैनंदिन 5 भेटी -- 5 गुण, प्रतिभेट 1 गुण\nजन्म मृत्यू नोंदी /बालमृत्यू नोंदी नियमित व अचूक घेणे\nनाविन्यपूर्ण/ विशेष उपक्रम (उपक्रम नमुद करावा)\n(कुटुंबनियोजन,अल्प बचत, बालकांना गणवेश,ओळखपत्र इ.)\nअंगणवाडी स्वच्छता टापटिप(परिसर सह) 3 गुण आकर्षक रंगरंगोटी 2 गुण\nमुलांचे अध्यापन शिस्त /प्रगती (पुर्व प्राथ.शिक्षण मुलांची प्रगती)\nशैक्षणिक साहित्याचा वापर उदा. तक्ते, खेळणी\nअंगणवाडीसाठी समुदाय वृध्दीपत्रकाचा वापर (दरमहा -5 गुण, तीन महिन्यातून एकदा 2)\nग्राम बाल विकास केंद्ग सुरु करणे व त्याचा 6 महिने फॉलोअप घेणे मुलांची योग्य सुधारणा, बाल विकास अधिका-यांचीशिफारस\nसन 200-10 आदर्श अंगणवाडी सेविका/मदतनिस पुरस्कार\nसन 2010-2011 या वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये आदर्श कार्य असणा-या सेविका / मदतनिस यांना च्आदर्श अंगणवाडी सेविका/ मदतनिसछ पुरस्कारासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी सन 2009-10 या आर्थिक वर्षामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या सेविका/ मदतनिसचा प्रस्ताव सादर केले आहेत. बाल विकास प्रकल्प अधिका-यांनी आपल्या प्रकल्पातून येणा-या प्रस्तावांची निकषाच्या आधारे व्यवस्थित छाननी करून प्रत्येक प्रकल्पातून एक अंगणवाडी सेविका व एक अंगणवाडी मदतनिसची शिफारस जिल्हा कक्षामध्ये केलेली आहे.\nआदर्श अंगणवाडी मदतनिस पुरस्कारासाठी निकष\nअंगणवाडी मदतनिस कामाचा तपशिल व मुल्यमापन\nवजन क्षमता सर्व्‌ मुलांची दरमहा वजने घेणे 3 गुण 80% पेक्षा जास्त 2 गुण\nपालकांनी मुलांची वजन घेणे\n100% साध्य असल्यास 5 गुण, 90 ते 100 % 3 गुण, 80 ते 90 % 1 गुण\nश्रेणी 3 व 4 - 0 मुले 3 गुण,श्रेणी 4 चे - 0 मात्र 3 चे असल्यास - 2 गुण\nसर्वसाधारण श्रेणी बालके 85 % पेक्षा जास्त\nस्टार स्पर्धा (5 स्टारसाठी-5 गुण), (4 स्टारसाठी - 3 गुण )\nपुरक पोषण आहार वाटप 80 टक्केपेक्षा जास्त असेल तर 5 गुण, 70 ते 80 % -- 3 गुण, 60 ते 70 असेल तर 2 गुण\nपूर्व प्राथमिक शिक्षण उपस्थिती\n3 ते 6 पटावरील मुलांची सरासरी उपस्थिती सर्व्हेच्या 80 टक्के असेल तर 5 गुण, 70 ते 80 % असेल तर 3 गुण, 60 ते 70 असेल तर 2 गुण\nपालकसभा / मेऴावे आरोग्य व रोगनिदान शिबीर आयोजन 3 गुण, महिला मेळावा/पालक सभा 2 गुण\nनाविन्यपूर्ण उपक्रम (उपक्रम नमुद करावा)\nलोकांचा सहभाग लोकवर्गणी/वस्तु इ. रु.5,000/- पर्यंत 5 गुण रु. 5000/- पेक्षा जास्त 10 गुण\n1)अंगणवाडी केंद्गातील स्वच्छता 5 गुण 2)आकर्षक रंगरंगोटी 2 गुण 3)परिसर स्वछता 5 गुण 4)शौचालय स्वच्छता 3 गुण 5) बालकांची वैयक्तिक स्वच्छता 5 गुण\nबालकांची प्रगती मुलांचे अध्यापन शिस्त /प्रगती 5 गुण\nशैक्षणिक साहित्याचा वापर, उदा. तक्ते, खेळणी\nग्राम बाल विकास केंद्ग\nकार्यन्वित करणे व 6 महिने फॉलोअप घेणे मुलांची योग्य सुधारणा\n1 संगणक प्रशिक्षण फी मिळने बाबत\n2 संगणक प्रशिक्षण फी मिळने बाबत - अपंग\n3 इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यीनिना सायकल मिळणे\n4 योजना सौर कंदील पुरवणे\n6 योजना पीठगिरणी - अपंग\nभारत सरकार | महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे | जि. प. ई-मेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B8.html", "date_download": "2018-04-24T05:11:56Z", "digest": "sha1:6KB5QVK7PKSFHBYJAFE4JT7SOZNYA54E", "length": 11781, "nlines": 118, "source_domain": "zeenews.india.com", "title": "गॅस - Latest News on गॅस | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nGood News : मागासवर्गीयांना मोफत एलपीजी गॅस जोडणी\nदेशातल्या सर्व दलित आणि मागासवर्गीयांना मोफत एलपीजी गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.\nसीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या किंमती वाढणार\nयेत्या काही दिवसात सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या किंमती तीन ते चार टक्क्यांनी वाढण्याची चिन्हं आहेत.\nइंदापूरमध्ये पेट्रोलियम पदार्थ साठा शोधण्यासाठी चाचणी\nतालुक्यात सध्या पेट्रोलियम पदार्थाचे साठे शोधण्याच्या चाचण्या सुरु आहेत. देशातील गाळयुक्त खोऱ्यांमध्ये हॅड्रोकार्बनचे साठे पाण्याची शक्यता तपासण्यासाठी २-डी सेस्मिक डेटा संकललनाच्या कामानं वेग घेतला आहे.\nया बँक खात्यावर मिळणार नाही LPG सबसिडी\nसरकारकडून एलपीजी गॅस सिलेंडरची सबसिडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते.\nइंधन दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर\nपेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात यात सातत्यानं वाढच होतेय\nआता दरमहिन्याला वाढेल सिलेंडरची किंमत, सबसिडी बंद होणार\nकेंद्र सरकार आता एलपीजी सिलेंडरवर सबसिडी पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, सरकारी क्षेत्रातील तेल कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत सबसिडी पूर्णपणे संपवण्यासाठी प्रत्येक महिन्यात अनुदानीत एलपीजी सिलेंडरवर (14.5 किलोग्राम) दरमहा 4 रुपये वाढवण्यासाठी सांगण्यात आले आहे.\nछोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, करप्राप्त उत्पन्नात २ टक्के सूट\nदेशात नोटाबंदीला 42 दिवस पूर्ण होत असताना सरकारनं छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी डीजीटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना करप्राप्त उत्पन्नात दोन टक्के सूट दिली आहे.\nअनुदानित सिलिंडर दोन रुपयांनी महागले\nकेंद्र सरकारने गृहीणींना दुसऱ्यांदा धक्का दिलाय. आधी विनाअनुदानित सिलिंडरमध्ये वाढ केली होती. आता अनुदानित सिलिंडरच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली आहे.\nइंधनाची पाईपलाईन... मुंबई ते थेट नागपूर\nनागपूर सुपर एक्सप्रेस हायवेला समांतर अशी एक गॅस पाईपलाइन टाकली जाणार आहे.\nबॅड न्यूज, पेट्रोलनंतर अनुदानित सिलिंडर महागला\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक दे धक्का दिलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीपाठोपाठ आता अनुदानित सिलिंडरच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ 2 रुपयांनी करण्यात आली आहे.\nपोटात गॅस झाल्यास ५ घरगुती उपाय\nपोटात गॅस होणे ही समस्या अनेकांना असते. त्यावर काही घरगुती उपाय करून गॅसची समस्या तुम्ही घालवू शकता.\nघरगुती विनाअनुदानित गॅस सिलिंडर स्वस्त\nघरगुती वापरावयाचा गॅस सिलिंडरच्या किमतीत घट होणार आहे. मात्र, हा विनाअनुदानित सिलिंडर असून ६१.५० रुपयांनी तो स्वस्त होणार आहे.\nपोटातील गॅसपासून सुटका होण्यासाठी हे पाच उपाय\nपोटात गॅस झाल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय करण्यासाठी लोक डॉक्टरांकडे जातात. मात्र, पोटात गॅस होऊ म्हणून घरच्या घरी करा पाच उपाय आणि गॅसपासून मुक्ती मिळवा.\nआता, घरच्या गॅस सिलिंडरचे पैसेही ऑनलाईन भरा\nतुम्हीही घरी एलपीजी सिलिंडर वापरत असाल तर तुमच्या एक खुशखबर आहे. आता तुम्हाला घरी गॅस सिलिंडर आल्यावर डिलिव्हरी बॉयकडे पैसे द्यावे लागणार नाहीत... कारण, देशात पहिल्यांदाच गॅस सिलिंडरचे पैसे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध होतेय.\nसिलिंडरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अशी होते चोरी...\nस्वयंपाकाचा गॅस सिलिंडर १५ दिवसांपूर्वी लावला होता. लगेचच संपला, त्याआधीचा सिलिंडर २२ दिवस चालला. यावेळी असं कसं झालं, अशी सहज प्रतिक्रिया गृहिंणीमध्ये ऐकायला मिळते. मात्र, तुम्हाला मिळणारा सिलिंडर कमी वजनाचा असतो. म्हणजेच चोरी झालेली असते.\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nआता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का\nनवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा\nनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या\nआयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर\nधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती\nशूजमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी '5' घरगुती उपाय\nअभिनेता राजपाल यादवला ६ महिन्याची जेल\nलग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये येतात या समस्या\nनाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0.html", "date_download": "2018-04-24T05:11:51Z", "digest": "sha1:TQL6ITV5ET2466QKL3G46PDBWAZSVW2V", "length": 10128, "nlines": 122, "source_domain": "zeenews.india.com", "title": "लष्कर - Latest News on लष्कर | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nपद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी लष्कराच्या गणवेशात\nभारताचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.\nपाकिस्तानची सैन्य ताकद वाढली, भारत चौथ्या स्थानी\nहेलिकॉप्टर्सचाही समावेश आहे. तर चीनकडे ३ हजार लढाऊ विमानं आहेत.\nसिरीयामध्ये लष्कराने केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू\nसीरियामध्ये सेना आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी २४ तासात केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू झाला आहे.\nलष्कराने नाही उतरु दिलं मुख्यमंत्र्यांचं हॅलिकॉप्टर, हॅलिपॅडवर ठेवले ड्रम\nलष्कराच्या एका अधिकाऱ्याने चक्क मुख्यमंत्र्यांच्याच हॅलिकॉप्टर लँडिंगला मनाई केली.\nमाझी अजून मुलं असती तरीही लष्करात पाठवली असती- शहीद कपिलची आई\nपाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात लष्कराचे 23 वर्षीय कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासह 4 जवान शहीद झाले आहेत.\nएलफिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळील पुलाचे काम ९० टक्के पूर्ण\nएल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळ लष्करामार्फत उभारण्यात येणा-या पुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झालंय. या पुलाची लांबी 240 फूट तर रुंदी 12 फूट इतकी आहे.\nएल्फिन्स्टन रेल्वे पुलावर गर्डर टाकण्यासाठी आज 'मेगा ब्लॉक'\nएल्फिन्स्टन रेल्वे पुलावर आज लष्कराकडून गर्डर टाकण्याचं काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी मध्य-पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येतोय.\nजवानांवर दगडफेक करणारी मुलं जेव्हा त्यांच्यासोबतच क्रिकेट खेळतात...\nजुलै २०१६मध्ये दहशतवादी बुरहान वाणीचा खात्मा केल्यानंतर काश्मीरमध्ये तणाव पसरला होता.\nलष्कराचे हेलिकॉप्टर नादुरूस्त, सटाणात इर्मजन्सी लँडिंग\nभारतीय सैन्यातले शहीद लान्स नायक योगेश भदाणे यांचं पार्थिव धुळे इथे पोहोचवून परत जात असताना लष्कराचं हेलिकॉप्टर नादुरूस्त झालं. त्यामुळे ते सटाणा तालुक्यातील अजमेर सौंदाणे गावात उतरवावं लागलं.\nया ५ शूर महिलांनी भारताची मान उंचावली\nभारतीय सेना आज ७०वा आर्मी दिवस साजरा करत आहे.\nतुलना भारत, इस्त्रायल, चीन आणि पाकिस्तानच्या लष्करी ताकदीची...\nइस्त्रायल पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या भारतभेटीमुळे सर्वाचं लक्ष इस्त्रायलकडे लागलं आहे.\n२०१७मध्ये भारतीय लष्करानं १३८ पाकिस्तान सैनिकांचा केला खात्मा\n२०१७ या वर्षामध्ये भारतीय लष्करानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.\nउपचार नाकारल्याने वीरपत्नीचा मृत्यू\nआधार नसल्याने एका वीरपत्नीला हरयाणातील रुग्णालयाने उपचार नाकारल्याने तीला जीव गमवावा लागल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.\nलष्कराच्या जवानाकडून महिलेची गावभर धिंड\nगळ्यात चप्पल घालून ही धिंड काढण्यात आली, उमरगा तालुक्यातील आलूर येथील ही घटना आहे.\nजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nजम्मू काश्मीर जिल्ह्यातल्या शोपियान जिल्ह्यामध्ये दोन दहशतवाद्यांना लष्करानं कंठस्नान घातलं. रात्रभर ही चकमक सुरु होती.\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nआता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का\nनवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा\nनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या\nआयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर\nधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती\nशूजमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी '5' घरगुती उपाय\nअभिनेता राजपाल यादवला ६ महिन्याची जेल\nलग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये येतात या समस्या\nनाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thanevarta.in/?p=8493", "date_download": "2018-04-24T04:24:25Z", "digest": "sha1:QDWIWHZRHD7YB7OI2N44LNHY5D5LLC44", "length": 8860, "nlines": 85, "source_domain": "thanevarta.in", "title": "ठाणे रेल्वे स्थानकात ऐतिहासिक ठेवा जतन करण्यास मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात काम सुरू करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी – Thanevarta", "raw_content": "\nठाणे रेल्वे स्थानकात ऐतिहासिक ठेवा जतन करण्यास मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात काम सुरू करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी\nठाणे रेल्वे स्थानकात ऐतिहासिक ठेवा जतन करण्यास मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात काम सुरू करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. देशातील पहिली रेल्वे १६५ वर्षापूर्वी बोरिबंदर ते ठाणे अशी धावली होती. त्यामुळं ठाणे रेल्वे स्थानक हे एक ऐतिहासिक ठेवा आहे. याची माहिती पुढील पिढीला रहावी यासाठी त्या रेल्वेच्या इंजिनाची प्रतिकृती ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ठेवण्याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे आमदार संजय केळकर यांनी मागणी केली होती. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या पाठोपाठ पियुष गोयल यांनीसुध्दा याला मान्यता दिली असली तरी प्रत्यक्ष काम सुरू करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. देशातील पहिली रेल्वे धावली त्याला १६५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं रेल्वे प्रवासी संघानं ठाणे रेल्वे स्थानकात आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन साजरा केला. यावेळी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसंच मिठाईही वाटण्यात आली. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, कर्मचारी तसंच रेल्वे संघटनांसाठी काम करणा-या महिलांचा यावेळी आमदार केळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.\nठाणे रेल्वे स्थानकातील पार्कींग प्लाझामधील तळमजला दुचाकींसाठी खुला\nठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाश्यांच्या दुचाकी वाहनासाठी नव्याने बांधण्यात येत असलेल्या पार्किंग प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावरील पार्कींग आता खुले करण्यात आले असून त्याचे उदघाटन खासदार राजन विचारे, यांच्या हस्ते झाले. Related\nडेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न तातडीनं सोडवण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची मागणी\nकेंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामुळे डोंबिवलीनजीकच्या प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट होत असून नुकसान भरपाईचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. Related\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वे स्थानकातील स्वच्छता मोहिम ठाणे रेल्वे स्थानकात ठरली दिखावू\nस्वच्छ भारत अभियान ठाणे रेल्वे स्थानकाबाबत तरी दिखावू ठरलं आहे. Related\nशालेय प्रवेशासाठी मुलीची प्रमाणपत्रं घेण्याकरिता सासरी आलेल्या सूनेवर रॉकेल ओतून पेटवून देण्याची धक्कादायक घटना\nशहरातील खाड्यांचे सुशोभिकरण करताना स्थानिकांच्या सूचनांचा विचार करण्याची भूमिपुत्रांची मागणी\nविस्थापितांचं पुनर्वसन हे त्यांच्या सहमतीनं आणि जगण्याशी सुसंगत असावं – मेधा पाटकर\nसुट्टीच्या दिवशी पालिका आयुक्तांनी पत्नीसमवेत केली झोपड्यांची रंगरंगोटी\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षपदी रविंद्र मोरे यांची नियुक्ती\nअल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलानेच फूस लावून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार\nइंदिरानगर झोपडपट्टीमधील जवळपास दीडशे मुलांनी चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत सहभाग घेऊन पालिका आयुक्तांसोबत साजरी केली रविवारची सुट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/liquid-mephedrone-worth-rs-7-cr-seized-from-chemical-factory-in-badlapur-midc-1663720/", "date_download": "2018-04-24T04:42:01Z", "digest": "sha1:CR3WZ6MR2XVEL26SRT6Q2IG55P54MEBH", "length": 17458, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Liquid mephedrone worth Rs 7 cr seized from chemical factory in Badlapur MIDC | अमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर छापा | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nअमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर छापा\nअमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर छापा\nशाहच्या चौकशीतून बदलापूर येथील शारदा केमिकल्सची माहिती पथकाला मिळाली\nमालकासह दोघांना अटक, सात कोटींचे एमडी जप्त\nबदलापूर एमआयडीसीतील श्री शारदा केमिकल्स या कारखान्यावर छापा घालून तब्बल सात कोटी किमतीचे द्रव मेफ्रेडॉन(एमडी अमली पदार्थ) हस्तगत केल्याची माहिती अंबोली पोलिसांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून कारखान्यात रसायन निर्मितीआड एमडीचे उत्पादन घेतले जात होते, असा दावा पोलीस करतात. या प्रकरणी कारखान्याचे मालक नारायणभाई पटेल (७४) यांच्यासह दोघांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या असून त्यांच्याकडे अन्य साथीदार, वितरणसाखळीबाबत चौकशी सुरू आहे.\n१३ एप्रिलला अंबोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दया नायक आणि पथकाने शाहीर शाह या तरुणाला ३०० ग्रॅम एमडीसह अटक केली. शाहच्या चौकशीतून बदलापूर येथील शारदा केमिकल्सची माहिती पथकाला मिळाली. या कारखान्यात द्रव स्वरूपात एमडी तयार केले जाते. वितरक द्रव स्वरूपातले एमडी या कारखान्यातून घेऊन जातात आणि त्यावर पुढील प्रक्रिया करून एमडीची पूड मिळवतात, या माहितीच्या आधारे नायक आणि पथकाने कारखान्यावर छापा घातला. तेव्हा तेथे ७५ लिटर द्रव स्वरूपातील एमडी आढळले. त्यानुसार मालक पटेल यांना अटक केली गेली. पटेल रसायनशास्त्राचे पदवीधर असून रसायन निर्मितीत माहीर आहेत. त्यामुळे एमडी तयार करण्यासाठी आवश्यक असलेली विविध कच्ची रसायने, नेमक्या प्रमाणात, नेमक्या पद्धतीने त्यांचे मिश्रण पटेल यांना अवगत असल्याचे, पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. पटेल यांचे साथीदार, कारखान्यात केव्हापासून एमडी तयार करण्यास सुरुवात झाली, पटेल ते शाह यांच्यामधली वितरण साखळी अशी माहिती पोलीस मिळवत आहेत. दरम्यान, पुरावे नष्ट होऊ नयेत या उद्देशाने कारखान्याला टाळे ठोकले.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nसहा कोटींचे हेरॉईन हस्तगत\nमुंबई : राजस्थानातून मुंबईत हेरॉईनचा साठा घेऊन आलेल्या मांगिलाल मेघवाल (४०) या तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने शनिवारी माटुंगा परिसरातून अटक केली. अटक आरोपीकडून सुमारे चार किलो हेरॉईन हस्तगत करण्यात आले. हा साठा आंतराष्ट्रीय बाजारपेठेत सहा कोटी रुपयांना विकला जाईल, असे पथकाकडून सांगण्यात आले.\nहेरॉईनचा मोठा साठा वितरणासाठी माटुंगा येथील टी. एच. कटारिया मार्गावर येणार, अशी माहिती पथकाच्या वांद्रे कक्षाचे प्रभारी निरीक्षक अनिल वाढवणे यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून मेघवाल याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीत ४ किलो १०० ग्रॅम हेरॉईन आढळले. अफगाणिस्तान हे हेरॉईन उत्पादनाचे जगातले सर्वात मोठे केंद्र आहे. तेथून पाकिस्तानमार्गे राजस्थान आणि तेथून हेरॉईनचा प्रवास देशाच्या कानाकोपऱ्यांत होतो. तसेच बांगलादेश, पश्चिम बंगालमार्गे हेरॉईन भारतात येते. याशिवाय देशात ज्या ज्या ठिकाणी सरकारमान्य अफू शेती केली जाते त्या त्या ठिकाणी थोडय़ा फार प्रमाणात हेरॉईनची निर्मिती चोरीछुपे केली जाते. या कारवाईत हस्तगत केलेले हेरॉईन सीमेपलीकडून आले की देशात तयार केले गेले हे जाणून घेण्यासाठी पथकाकडून आरोपी मेघवाल याची कसून चौकशी सुरू आहे.\nआतापर्यंतच्या चौकशीत मेघवाल हा साठा दक्षिण मुंबईतल्या वितरकाला देणार होता. तसेच हे हेरॉईन मुंबईतल्या मुंबईतच विकले जाणार होते, अशी माहिती पथकाच्या हाती लागली आहे. पथकाकडून दक्षिण मुंबईतल्या वितरकाबाबत माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nनाणार प्रकल्प विदर्भात आणा: भाजपा आमदाराची मागणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://zpchandrapur.maharashtra.gov.in/mr/about_us", "date_download": "2018-04-24T04:38:59Z", "digest": "sha1:HQWWDRDDBYBUUKZ2WIZCIIMVQSWNLCD6", "length": 9424, "nlines": 58, "source_domain": "zpchandrapur.maharashtra.gov.in", "title": "जिल्हा परिषद, चंद्रपूर", "raw_content": "जि.प. चे अधिकृत संकेतस्थळ\nमहिला व बाल कल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nपाणी व स्वच्छता विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nचंद्रपूर जिल्ह्यात एकुण 15 तालुके असुन माहे ऑक्टोंबर 2004 मध्ये कोरपना व राजुरा विकास खंडामध्ये विभाजन होऊन जिवती या विकास खंडाची निर्मिती झाली याप्रमाणे जिल्ह्यात एकुण 15 पंचायत समित्या आहेत. जिल्ह्यात एकुण 847 ग्राम पंचायती आहेत. या जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा असून पुर्वी येथे गोंडराजे अनेक वर्षे राज्य करीत होते. पांडव वंशियांच्या इतिहासाची सुरुवात ही कोततामिलल नावाच्या गोंडवशीयापासून झाली असून गोंडवंशियांचा प्रथम अधिपती भिम व लालभिंग पासून होवून शेवटी निळकंठशहापर्यंत गोंडवंशिय राजवट होती. याच राजवटीत बल्लारशाह यांनी चंद्रपूर शहर भोवती मजबूत असा दगडी परकोट (भिंत) संरक्षणासाठी बांधली ती चंद्रपूर शहराची वैशिष्टे म्हणून आज अस्तित्वात आहे. याशिवाय भद्रावती, बल्लारपूर व माणिकगड येथे सुध्दा मोठे किल्ले आहेत. येथे अंचलेश्वर व महाकाली मातेची इतिहास प्रसिध्द मंदिरे गोंड राजांनी बांधली. येथे दरवर्षी चैत्र पोर्णिमेला महाकाली यात्रा भरते. या यात्रेसाठी परभणी, नांदेड, भागातून हजारो भाविक मोठ्या प्रमाणात येतात.\nजिल्ह्यात पूर्व सिमेवर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी वैनगंगा आणि पश्चिम सिमेवर वाहणा-या वर्धा नदीने जिल्ह्याचे दोन नैसगिक सिमा आखल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. जिल्ह्यात विविध प्रकारची विपुल खनिज संपत्ती आहे. दगडी कोळसा, कच्चे लोखंड, चुनखडी यांचे फार मोठे साठे आहेत. तसेच उत्कृष्ठ विपुल नैसर्गिक संपत्ती हे ह्या जिल्ह्याचे वैशिष्ठे आहेत. जंगलात मौल्यवान सागवान लाकूड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. याशिवाय जळावू लाकूड, तेंदूपत्ता, बांबू, डिंक, इत्यादी वनउपजही मोठ्या प्रमाणत मिळतात. जिल्ह्यातील 80 टक्के लोक शेतीवरच आपली उपजिविका करतात. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात भात हे प्रमुख पिक आहे. इतर भागात सोयाबीन, ज्वारी, कापूस व तूर ही पिके प्रमुख आहेत. वर्धा, इरई, अंधारी, वैनगंगा, पैनगंगा, बारमाही वाहणा-या नद्या आहेत. जिल्ह्यात एकुण चार सिमेंट कारखाने आहेत. तसेच प्रत्येक एक याप्रमाणे कागद, पोलाद, मॅगनिज, रेफ्रिजरेटर निर्माण करण्याचे कारखाने आहेत.\nजिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र :- १०,७९३.०९ चौ.कि.मी. चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण व पूर्वभागात १८.४ ते २०.५ या उत्तर अंशावर व ७८.५ ते ८०.६ टक्के या पूर्णरेखांष या भौगोलिक पट्टयात बसला आहे.\nजिल्हयाची लोकसंख्या :- जिल्हयाची २००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या २०,७१,१०१ यापैकी ग्रामीण लोकसंख्या १५,१३,४०२ आहे.\nप्राकृतिक रचना :- टेकडयाचा भाग, नद्याचे सखोल मैदान व डोंगराळ भाग.\nभूगर्भरचना :- प्रस्तर लाव्हांचा समावेच्च आहे. कार्बन, ऍमाशिस्ट कुळसाईट, ऍसे, जैस्पर यासारखी खनिजे, खडक साधारण काळा पांढ-या चुनखडी व वाळू. जमिन काळी असून ऍल्युमिनियम, कॉबोर्नेटमॅग्नेशियम व काही प्रमाणात पोटॅशियम नग व स्फुरद यांचा समावेश आहे.\nनद्या :- वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, अंधारी या नद्यामुळे शेतजमीन सुपीक बनली आहे.\nतलाव :- जिल्हयात एकुण १६७८ माजी मालगुजारी तलाव असून मध्यम तलाव ७ आहेत. नलेश्‍वर, चारगांव, आसोलामेंडा, लभानसराड, अमलनाला, चंदईनाला, घोडाझरी या तलावामुळे मत्स्यव्यवसाय मोठयाप्रमाणात होतो. ० ते१०० हेक्टर चे८० लघुपाटबंधारे तलाव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/wedding-was-called-off-because-of-a-rasgulla-in-uttar-pradesh-117042000007_1.html", "date_download": "2018-04-24T05:00:07Z", "digest": "sha1:HVKOSKWN4ROALWAQBID7LGRSXKKIWHNH", "length": 11081, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एका रसगुल्ल्यामुळे तुटले लग्न | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएका रसगुल्ल्यामुळे तुटले लग्न\nमुलगा किंवा मुलगी पसंत न आल्याने किंवा अगदी फिल्मी स्टाइल वधू किंवा वर लग्नाच्या दिवशी पळून गेल्याने लग्न तुटल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एक लग्न तुटले ते फक्त एक रसगुल्ल्यावरून झालेल्या मारामारीमुळे.\nउत्तर प्रदेशची राजधानी असणार्‍या लखनऊपासून 70 किलोमीटर असणार्‍या उनाओ जिल्ह्यातील कुर्मापूर येथे मुलीच्या गावी हा प्रकार घडला. मुलीच्या गावी लग्न असल्याने एक दिवस आधीच मुलाकडील वर्‍हाडी कुर्मापूरमध्ये दाखल झाले. दिवसभर लग्नाच्या आधीचे कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री कार्यक्रमानंतर जेवणाचा कार्यक्रम लगेच उरकून घेण्याची मागणी मुलीच्या वडिलांनी केली. जेवणामध्ये प्रत्येक वर्‍हाड्याला एकच रसगुल्ला देण्याचे आदेश कॅटर्सला दिले होते. मात्र, मुलाच्या चुलत भावाने स्वत:ला एकऐवजी दोन रसगुल्ले वाढून घेतल्याने वाद झाला.\nशाब्दिक वादाचे रूपातंर हाणामारीत झाले आणि काही क्षणांतच जेवणाच्या काउंटवरील भांडी अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली होती. हा सर्व प्रकार बघू बाल्कनीमधून पाहात होती. त्यावेळी मुलांच्या नातेवाईकांनी मुलीच्या वडिलांना मारहाण केली असल्याचे लक्षात आल्याने मुलीनेच लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या वडिलांनी वर्‍हाड्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.\n5800 लग्नाच्या मागण्या... बाहुबलीचा आणखी एक रेकॉर्ड\n'स्वच्छ भारत’ चा लोगो लग्न पत्रिकेवर, मोदींनी केले रिट्वीट\nसंसारात 'नो कुस्ती', विरूच्या साक्षीला शुभेच्छा\nलग्नाअगोदर ह्या हिरॉईन्स होत्या प्रेग्नेंट\nभारतीय ज्योतिषानुसार जोडीदाराची निवड\nयावर अधिक वाचा :\nएका रसगुल्ल्यामुळे तुटले लग्न\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://thanevarta.in/?p=8496", "date_download": "2018-04-24T04:23:09Z", "digest": "sha1:4HEJF6GMBNYLQOI5RMR5IF4SWIXEG3JQ", "length": 8735, "nlines": 85, "source_domain": "thanevarta.in", "title": "शहरातील खाड्यांचे सुशोभिकरण करताना स्थानिकांच्या सूचनांचा विचार करण्याची भूमिपुत्रांची मागणी – Thanevarta", "raw_content": "\nशहरातील खाड्यांचे सुशोभिकरण करताना स्थानिकांच्या सूचनांचा विचार करण्याची भूमिपुत्रांची मागणी\nशहरातील खाड्यांचे सुशोभिकरण करताना स्थानिकांच्या सूचनांचा विचार केला जावा अशी मागणी भूमिपुत्रांनी केली आहे. शनिवारी कासारवडवली येथील राम मंदिरात झालेल्या चर्चेदरम्यान ही मागणी करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांच्या या सभेस वाघबीळ, गायमुख, भाईंदरपाडा, ओवळा, कासारवडवली, मोगरपाडा, कोळीवाडा आणि भिवंडी या परिसरातील भूमिपुत्र मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाण्यातील आगरी-कोळी समाज खाडी किनारी मासेमारी आणि पारंपरिक डुबी पध्दतीनं वाळू उत्खनन करत असतो. गेल्या ४ वर्षापासून रेती व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. स्थानिक भूमिपुत्रांना विचारात न घेता खाडी किना-यांचं सुशोभकरण होत असल्याबद्दल भुमिपुत्रांमध्ये नाराजी आहे. भूमिपुत्रांचा विकासाला विरोध नसून विकासामध्ये भूमिपुत्रांनाही वाटेकरू करून घेतलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. खाडी किनारी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प राबवत असताना उपलब्ध होणा-या उद्योगधंद्यांमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य दिलं पाहिजे, भविष्यात रेती व्यवसाय सुरू झाल्यास त्यासाठी आत्तापासूनच भूखंड राखून ठेवले पाहिजेत अशा भूमिपुत्रांच्या प्रमुख मागण्या आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिका-यांना निवेदन दिलं जाणार असून याबाबत लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचं काम सुरू होऊ देणार नाही असा इशारा भूमिपुत्रांनी दिला आहे. येणा-या दिवसात भूमिपुत्रांच्या समस्यांचं निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सागर पाटील यांनी दिला आहे.\nराष्ट्रवादीचा पालिका आयुक्तांना पाठिंबा\nएकीकडे पालिका आयुक्त आणि भारतीय जनता पक्षाची जुंपली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र आयुक्तांना पाठिंबा जाहीर केला आहे. Related\n२४ तास पाणी मिळण्यासाठी उथळसर प्रभाग समितीत प्रायोगीक तत्वावरील प्रकल्प राबविला जाणार\nठाणेकरांना २४ तास पाणी पुरवठा करण्याचा पालिकेचा प्रयत्न असून याबाबतचा प्रायोगीक तत्वावरील प्रकल्प उथळसर प्रभाग समितीत राबविला जाणार आहे. Related\nज्यांचा गौरव करायचा त्यांनाच ताटकळत ठेवण्याचा महापालिकेत प्रकार\nज्यांचा गौरव करायचा आहे त्यांनाच ५ तास ताटकळत ठेवण्याचा प्रकार काल महापालिकेत घडला. Related\nठाणे रेल्वे स्थानकात ऐतिहासिक ठेवा जतन करण्यास मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात काम सुरू करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी\nठाणे जिल्हा नियोजन समितीच्या ४० सदस्यांसाठी १० मे ला निवडणूक\nविस्थापितांचं पुनर्वसन हे त्यांच्या सहमतीनं आणि जगण्याशी सुसंगत असावं – मेधा पाटकर\nसुट्टीच्या दिवशी पालिका आयुक्तांनी पत्नीसमवेत केली झोपड्यांची रंगरंगोटी\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षपदी रविंद्र मोरे यांची नियुक्ती\nअल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलानेच फूस लावून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार\nइंदिरानगर झोपडपट्टीमधील जवळपास दीडशे मुलांनी चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत सहभाग घेऊन पालिका आयुक्तांसोबत साजरी केली रविवारची सुट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/43?page=7", "date_download": "2018-04-24T04:38:38Z", "digest": "sha1:SN6QXN57C5HYAELWGCRMJK7HXYDY4CJC", "length": 5385, "nlines": 140, "source_domain": "mr.upakram.org", "title": "इतिहास | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपहिल्यांदा \"अक्साई चीन\" हा शब्द वाचला-ऐकला होता तेव्हा एक परिचित \"हा चीनने भारताचा ढापलेला प्रदेश आहे\" अशी माहिती मला तावातावाने देत होते.\nरामानुजन, रामायण, दिल्ली विश्वविद्यालयाचा अभ्यासक्रम आणि दुखावलेल्या भावना\nदिल्ली विश्वविद्यालयाच्या बी ए. इतिहास ऑनर्स च्या एका कोर्स मध्ये सुप्रसिद्ध लेखक ए. के. रामानुजन यांचा एक निबंध रीडिंग लिस्ट मध्ये होता.\nलाल परी कलंदर (उत्तरार्ध)\n१८५७-५८ सालातील सातारा आणि वाईची काही छायाचित्रे\nलाल परी कलंदर (पूर्वार्ध)\nमराठा डिच, भास्कर राम इत्यादि.\nउत्तर मराठेशाही बद्दल काही शंका... सनद, चौथाई वगैरे\nमराठेशाहीचा शिवाजी ते संभाजी तसेच राजाराम इथवरचा इतिहास थोडाफार समजण्यास सोपा वाटला, कमीत कमी तो एका हेतूने प्रेरित असा वाटतो (जेवढा वाचला तो तरी) .. अगदी औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत 'मोघल सत्तेशी लढा' असे म्हणता येते..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82._%E0%A4%A6%E0%A4%BE._%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-24T04:40:24Z", "digest": "sha1:2C7ORJQG7VR44FTTDSZYOMO6DGSO53NS", "length": 7422, "nlines": 75, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "विं. दा. करंदीकार - विकिपीडिया", "raw_content": "\nहुपून वचात:\tदिशा-नियंत्रण, सोद\nविं. दा. करंदीकार विंदा हे मराठींतले लेखक, कवी, लघुनिबंदकार आनी टीकाकार. देशाच्या साहित्य क्षेत्रांतलो सर्वोच्च प्रतिष्ठेचो एकोणचाळिसावो ज्ञानपीठ पुरस्कार तांका अष्टदर्शने ह्या साहित्यकृतीखातीर मेळ्ळो. वि. स. खांडेकर आनी कुसुमाग्रज हांचे उपरांत हो पुरस्कार मेळोवपी ते तिसरे मराठी साहित्यीक.\n6 पुरस्कार आनी पदव्य़ो\n23 ऑगस्ट 1918, घालवण, सिंधुदुर्ग\nगोविंद विनायक करंदीकार हांचो जल्म 23 ऑगस्ट 1918 ह्या दिसा कोंकणांतल्या मालवणांत जालो. देशाच्या साहित्य क्षेत्रांतलो सर्वोच्च प्रतिष्ठेचो एकोणचाळिसावो ज्ञानपीठ पुरस्कार तांका अष्टदर्शने ह्या साहित्यकृतीखातीर मेळ्ळो. वि. स. खांडेकर आनी कुसुमाग्रज हांचे उपरांत हो पुरस्कार मेळोवपी ते तिसरे मराठी साहित्यीक.विंदाचे जगप सामकें सादें, स्वावलंबी आसलें. ताणी स्वातंत्त्य सैनिकांक मेळपी पगारूय सरकारा कडल्यान घेवपाक न्हयकारलें. विंदा हाणीं हैदराबाद मुक्ति संग्रामात भाग घेतालो आनी ते खातीर बंदखणूय बी भोगली. कोकणाच्या आर्थिक परिस्थिती खातीर ते खूब्ब चिंतन करताले. सैनिकांक मेळपी पगारूय सरकारा कडल्यान घेवपाक न्हयकारलें.\nविंदान आपलें शिक्षण कोल्हापूराक पुराय केलें. तांणी खंयच्याच संघटनेचे सदस्यत्व स्विकारूंक ना.\nपोट भरपाखातीर ताणी अध्यापन केलें. बसवेश्र्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविध्यालय, मुंबई, एस. आय. ई. एस. कॉलेज ह्या महाविध्यालयांत ते इंग्लिशीचे प्राध्यापक आशिल्ले.\nकरंदीकारांनी काय पुरस्कार आनी पदव्यो जोडल्यात त्यो म्हळ्यार- सीनीयर फुलब्राइट फेलोशिप(1967-68), सोव्हिएट लॅण्ड नेहरु लिटररी पुरस्कार(1970), कुमारन् आसन पुरस्कार(1970), महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार(1985), कवी कुसुमाग्रज पुरस्कार(1987),कबीर सन्मान(1991), जनस्थान पुरस्कार(1993), कोणार्क सन्मान(1993)साहित्य अकादमी महत्तम सदस्यता(1996), महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार(1997), भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार(1999), डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार(2002), ज्ञानपीठ पुरस्कार(2003).ज्ञानपीठ पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार, कोणार्क सन्मान.\n14 मार्च 2010, मुंबय, महाराष्ट्र\ntitle=विं._दा._करंदीकार&oldid=167724\" चे कडल्यान परतून मेळयलें\nखंयचेंय आदलें मदलें पान\nहें पान उधृत करात\nह्या पानांत निमाणो बदल,7 फेब्रुवारी 2017 वेर 19:59 वेळार केल्लो\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/answer-separate-state-11484", "date_download": "2018-04-24T05:18:53Z", "digest": "sha1:DUYCO2THGJSEYU7OE5OUODSGWJJZT65F", "length": 37311, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "The answer is 'separate state'! 'वेगळे राज्य' हेच उत्तर ! | eSakal", "raw_content": "\n'वेगळे राज्य' हेच उत्तर \nसोमवार, 8 ऑगस्ट 2016\nवेगळ्या विदर्भाच्या मागणीला आधार आहे. या भागात शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या, त्याबद्दल राज्य सरकार उदासीन असून सरकारच्या प्राधान्यक्रमात ही बाबच नाही. विदर्भावर सातत्यानं अन्याय झालाय. वेगळ्या विदर्भाची मागणी काही मूठभर लोकांचीच आहे, असाही चुकीचा आरोप केला जातो. ‘वेगळा विदर्भ’ हेच विदर्भातल्या अनेक समस्यांवर उत्तर आहे.\nवेगळ्या विदर्भाच्या मागणीला आधार आहे. या भागात शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या, त्याबद्दल राज्य सरकार उदासीन असून सरकारच्या प्राधान्यक्रमात ही बाबच नाही. विदर्भावर सातत्यानं अन्याय झालाय. वेगळ्या विदर्भाची मागणी काही मूठभर लोकांचीच आहे, असाही चुकीचा आरोप केला जातो. ‘वेगळा विदर्भ’ हेच विदर्भातल्या अनेक समस्यांवर उत्तर आहे.\n‘वेगळ्या विदर्भाचा मुद्दा’ विधिमंडळाच्या या पावसाळी अधिवेशनात चर्चेला आला. या मुद्द्याला विरोध करणारी मंडळी आणि समर्थक यांच्यात जोरदार वादावादी झाली. विविध राजकीय पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी यासंदर्भात आपापली मतं व्यक्त केली. राज्यभर हा मुद्दा वादळी चर्चेला निमंत्रण देणारा ठरला. यासंदर्भात ‘वेगळा विदर्भ का हवा’ हे सांगत आहेत ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे, तर वेगळ्या विदर्भाच्या मागणीतल्या उणिवा व या मागणीच्या बाजूनं तिथले सर्व-सामान्य लोक कसे नाहीत, हे सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी...\nमहाराष्ट्रातून बाहेर पडून विकासाबाबतचे निर्णय आमचे आम्हाला घेऊ द्या, ही विदर्भातून सातत्यानं पुढं येणारी मागणी आहे, ती लोकचळवळ आहे. या चळवळीमागची लोकभावना, त्यातला तर्कशुद्ध भाग तसंच वर्षानुवर्षे त्या भूभागावर झालेला अन्याय याची माहितीच अन्य ठिकाणी राहणाऱ्या माणसांना नसते, त्यामागची तीव्रता कळणं हा तर फार दूरचा विषय. महाराष्ट्र विधिमंडळाच्या सलग तीन अधिवेशनात विदर्भाचा विषय गाजला. त्यासंबंधीच्या चर्चेमुळं कामकाज ठप्प झालं. कायदेमंडळाच्या प्रक्रियेत त्यामुळं गतिरोध निर्माण झाला, असं घडलं की, त्या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होते. वर्षानुवर्षे, सातत्यानं सुरू असलेल्या आंदोलनांना अशी तात्कालिक प्रसिद्धी काही वेळा मिळते. तर्कनिष्ठ, न्यायोचित आणि कायद्याच्या चौकटीत एखादी मागणी पुढं नेण्यासाठी, त्यामागची कारणमीमांसा जनतेपर्यंत पोचवण्यासाठी लोकशाहीच्या चौकटीत सुरू असलेल्या अभियानांची माहिती नेहमी समोर येत नाही, त्यासाठी विधिमंडळाचं कामकाज बंद पडावं लागतं, हे दुर्दैवी. त्या त्या विशिष्ट भागातली प्रसिद्धिमाध्यमं या आंदोलनांची दखल घेत असतात खरी, पण त्याची व्याप्ती अन्य भागांत कळत नाही. वेगळ्या विदर्भाच्या मागणीचंही नेमकं असं होतं, त्या भागाशी कुठलेही भावनिक ऐक्‍य नसलेले पश्‍चिम महाराष्ट्रासारखे भूभाग इथल्या परिस्थितीपासून अनभिज्ञ असतात. गेली पाच दशकं सातत्यानं केली जाणारी ही मागणी विदर्भापलीकडच्या मंडळींपर्यंत कितपत पोचते हाच संशोधनाचा विषय, त्यामुळं त्या मागचं तर्ककारण समजून घेण्याचा किती मंडळी प्रयत्न करतात, हे विचारणंही कठीण.\nविधिमंडळ अधिवेशनाचं कामकाज बंद पडली, की मग वेगळ्या विदर्भाच्या मागणीला वृत्तपत्रात जागा मिळू लागते, त्यामागची कारणं चार दोन दिवस चर्चेला येतात. विदर्भाच्या प्रश्‍नावरून विधिमंडळ कामकाज गेल्या आठवड्यात काही काळ बंद पडल्यानं हा विषय नव्यानं चर्चेला आला आहे. खासदार नाना पटोले यांनी लोकसभेत मांडलेल्या वेगळ्या विदर्भाबाबतच्या अशासकीय ठरावामुळं, खासगी विधेयकामुळं पावसाळी अधिवेशनात हा विषय उपस्थित झाला. त्यामुळं कामकाज बंद पडलं असं होणं योग्य नाही. विधिमंडळं ही मूलत: कायदेमंडळे आहेत. तिथं एखाद्या विषयावर साधकबाधक चर्चा होऊन कायदे तयार व्हावेत, अशी घटनाकारांची अपेक्षा होती. वर्षातील जेमतेम तीन महिने कायदा तयार करणारे लोकप्रतिनिधी एकत्र बसतात, त्यात गतिरोध येत असतील तर चुकीचं आहे. कायदे तयार करण्याचं काम झालं नाही की, अध्यादेशावर सरकार चालू लागतं, न्यायालयांच्या निर्णयावर कारभार चालू लागतो. न्यायालयं सक्रिय झाल्याची चर्चा सुरू होते. विदर्भाच्या विषयावरून हे पुन:पुन्हा घडत आहे, ते योग्य नाही. महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय आमदारांनी कामकाज बंद पाडण्याऐवजी विदर्भावर चर्चा केली असती तर बरं झालं असतं. असो. या निमित्तानं विदर्भाची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.\nविदर्भाच्या वेगळ्या राज्याची मागणी कित्येक दशकाची आहे. या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. सर्वात पहिला टप्पा अर्थात १९५६ मध्ये राज्य फेररचनेसाठी आयोग नेमला गेला तेव्हाचा. त्या वेळी विदर्भाच्या वेगळ्या राज्याची मागणी ही अभावातून, विपन्नावस्थेतून समोर आली नव्हती. विदर्भाबाहेरच्या मंडळींनी ही पार्श्‍वभूमी लक्षात घेतली पाहिजे. त्या वेळी अस्मिता दुखावल्याचंही कारण नव्हते, तर लोकनायक अणे आणि ब्रिजलाल बियाणी यांनी विदर्भ वऱ्हाडाचा संपन्न प्रदेश नव्यानं निर्मिती होणाऱ्या अभावग्रस्त राज्याला का जोडता, त्यामुळं संपन्न प्रदेशाची फरफट होईल असा युक्‍तिवाद करत विलीनीकरणाला विरोध केला गेला होता. त्या वेळी संपन्न असलेला हा प्रदेश काळाच्या ओघात राज्य एकत्र झाल्यावर विपन्नावस्थेत गेला. विदर्भाच्या आंदोलनातला दुसरा टप्पा नेमका येथेच सुरू झाला. हा काळ होता १९८० नंतरचा. विदर्भाच्या विकासासाठी आवश्‍यक असलेल्या वचनांची पूर्तता होत नसल्यानं जनता अस्वस्थ होती. त्याचं परिवर्तन उग्र आंदोलनात होत गेलं. अकोल्याचे कृषी विद्यापीठ राहुरीला हलवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वाखाली जनता पेटून उठली. आमच्याकडील साधनं पळवून नेत महाराष्ट्रातले अन्य प्रदेश संपन्न होत आहेत ही भावना वाढत गेली. सरकार न्यायोचित मागण्यांसाठी काही करत नाही, उलट सापत्नभाव वाढवत असते, या मानसिकतेतून लोकप्रक्षोभ निर्माण झाला होता. त्यावर फुंकर मारायला दांडेकर समिती स्थापन केली गेली. सिंचन, रस्ते, शिक्षण, तंत्रशिक्षण, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, भूविकास, पशुवैद्यक सेवा आणि ग्रामीण विद्युतीकरण अशा नऊ निकषांवर विदर्भाचा अनुशेष तपासला गेला. तो मोठा होताच. शिवाय तो दूर करायचा असेल, तर राज्याच्या अर्थसंकल्पातील तब्बल ७४ टक्‍के रक्‍कम बाजूला टाकावी लागेल, असे सुचवण्यात आलं होतं.\nविदर्भाला विरोध करणाऱ्या मंडळींना याची कल्पना आहे काय हा अहवाल स्वीकारला गेला नाहीच, पण विशिष्ट निधी विदर्भाकडं वर्ग करण्याचा निर्णय मात्र घेतला गेला. ती रक्‍कमही जेव्हा मिळेना तेव्हा विदर्भाची मागणी पुन्हा नव्यानं पुढं आली. हा या आंदोलनाचा तिसरा टप्पा आहे. आत्ता सुरू असलेली संपूर्ण लोकशाहीमार्गी चळवळ ही उणीपुरी चार दशके सुरू असलेल्या या तिसऱ्या टप्प्याचा भाग आहे.\nराज्याचा अर्थसंकल्प मागास भागांचे प्रश्‍न सोडवू शकत नसल्यानं राज्यपालांनी विशेष निधी देण्याची तरतूद करण्यात आली.\nविदर्भ तसेच अन्य मागास भागांसाठी राज्यपालांनी निधी देण्याची वेळ येणं हे आणीबाणी लागू करण्याएवढंच गंभीर प्रकरण आहे. पण विदर्भाबाहेरच्या मंडळींना या प्रश्‍नाची व्याप्ती समजून घ्यायची नव्हती असं राहून राहून वाटतं. योग्य वेळेला योग्य निधी दिला गेला असता, तर विदर्भाची वेगळ्या राज्याची मागणी विरून गेली असती. तसं न झाल्यानं ही मागणी बाळसं धरू शकली. सध्या तर वेगळाच मुद्दा विदर्भाला विरोध करणाऱ्या युक्‍तिवादासाठी हाती धरला जातो. विदर्भातील मंडळी मुख्यमंत्री, अर्थमंत्री अशा प्रमुख पदांवर असल्यानं विकासाचे मार्ग खुले होतील, वेगळ्या राज्याची गरज काय, असा सध्याचा प्रतिवाद. यापूर्वीही राज्याचं नेतृत्त्व विदर्भाकडं काही काळ होतंच, पण तरीही प्रगतीची द्वारे खुली झाली नाहीत. आता पगाराव्यतिरिक्‍तचे खर्च भागवण्यासाठी, विकासाच्या प्रत्येक योजनेसाठी कर्ज काढणारे राज्य विदर्भासारख्या दुर्लक्षित भागासाठी निधी उभा करणार कुठून मुंबईतल्या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी आज पैसा नाही अशी स्थिती. मग, दूरवरच्या विदर्भात पैसा पाठवणार तरी कसा मुंबईतल्या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी आज पैसा नाही अशी स्थिती. मग, दूरवरच्या विदर्भात पैसा पाठवणार तरी कसा आज नागपूरचे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत हे मान्य, पण ते अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यानं त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे आहेत. महाराष्ट्राचं भारतातलं स्थान कायम राखण्यासाठी आज नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाची गरज आहे. या विमानतळ उभारणीला अन्य कुठलाही पर्याय नाही. तो विमानतळ रस्त्यांशी, सागरीमार्गाशी जोडला जावा, यासाठी प्रचंड प्रमाणात निधी आवश्‍यक असेल, ही महाराष्ट्राची गरज आहेच, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. ही गरज भागवण्याला प्राधान्यक्रम देणे भाग असलेला मंत्री किंवा सरकार, विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पैस देऊ शकत नाही.\nप्राधान्यक्रमाचे कोष्टक लावले तर एकस्तंभीय राज्याला अनेक प्रश्‍न हाताळायचे आहेत, त्यात आत्महत्या या विषयाचं महत्त्व सरकारदरबारी फारसं नाही. पण वेगळ्या विदर्भात ते तसं नसेल. विदर्भातील २७ हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, अनधिकृत स्तरावर हा आकडा तब्बल ४२ हजारांवर असल्याचं सांगितलं जातं. महाराष्ट्रासाठी हा प्रश्‍न दुय्यम असेलही, पण विदर्भासाठी तो विक्राळ आहे. तो सोडवणं हा विदर्भ राज्याचा प्राधान्यक्रम असेल; कारण ती आमची वेदना आहे.\nमेळघाट हा निसर्गरमणीय भाग कुपोषणाच्या विळख्यात आहे. आज विदर्भातले चार जिल्हे नक्षलवादी चळवळीचे लक्ष्य ठरले आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी विदर्भाचं वेगळे राज्य प्रभावीपणानं ठोस पावलं उचलेल. विदर्भाचे प्रश्‍न महाराष्ट्रापेक्षा अत्यंत वेगळे आहेत, ते महाराष्ट्रात राहून सुटू शकणार नाहीत, हे राज्याच्या अन्य भागांतल्या मंडळींनी लक्षात घ्यायला हवं. विदर्भाचे राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल काय, हा सतत पुढे केला जाणारा आणखी एक प्रश्‍न. संपूर्ण राष्ट्र हे जीएसटीसारख्या एककरप्रणालीत जात असताना अन्य राज्यं जशी प्रगती करतील तशी ती विदर्भही करेल. त्याची काळजी इतरांनी का करावी \nमी राजकारणी नाही, त्यामुळं विदर्भाच्या प्रश्‍नावर मी लोकभावना निर्माण करण्याच्या कामात माझा सहभाग असू शकत नाही, पण आज विदर्भाच्या मागणीला पाठिंबा नाही, असा दावा करणाऱ्या मंडळींनी तिथली वस्तुस्थिती लक्षात घेणं गरजेचं आहे. वेगळ्या विदर्भाला पाठिंबा नाही म्हणणाऱ्या मंडळींनी लोकमंच या संस्थेनं घेतलेल्या मतदानात इथल्या जनतेनं वेगळ्या राज्याला कौल दिला हे लक्षात घ्यायला हवं. लोकमंच ही नाणावलेली स्वयंसेवी संस्था आहे. अर्थात त्यांनी घेतलेल्या जनमत चाचणीवर विश्‍वास नसेल तर अन्य यंत्रणेनं सार्वमत घ्यावे. जनमनाचा कौल काय आहे ते पुन्हा नव्यानं समजून घ्यावं. गोव्याप्रमाणे सरकारनं स्वतःहून असं मतदान घेण्यास आमची हरकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसही अशाच आशयाची मागणी करत असते. अर्थात अशा प्रकारे राज्यनिर्मितीबद्दल सार्वमत घेणं उचित नाही असं वाटत असेल, तर त्याबाबतही आम्ही खुले आहोत. नाहीतरी उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड या राज्यांची निर्मिती करण्यापूर्वी कौल घेतला गेला नव्हताच. जनमत काय आहे, हे लक्षात न घेताच विदर्भाच्या मागणीला उठाव नाही हे म्हणणे चूक आहे, अन्यायकारक आहे. राज्यनिर्मितीचा विषय मार्गी लावण्याची मागणी करताना आम्ही विदर्भवादी कार्यकर्ते भाजपला मिळालेल्या मतांची आकडेवारी युक्‍तिवादासाठी पुढे करू. विधानसभेच्या निवडणुकीला भाजप स्वबळावर सामोरा गेला. वेगळ्या विदर्भाचा विषय निवडणूक घोषणापत्रात होताच. विदर्भात मोडणाऱ्या ६६ मतदारसंघांतून भाजपचे ४४ आमदार निवडून आले. याचा अर्थ ही मागणी जनतेला मान्य आहे. आमचा हाही दावा मान्य न करता आमच्याकडून उग्र आंदोलन व्हावं, अशी छुपी अपेक्षा तर बाळगली जात नाही ना विदर्भाची चळवळ आज तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात आहे.\nलोकशाहीवादी मार्गानं आम्ही राज्याची मागणी करतो आहोत. तेलंगणात वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी उसळलेल्या हिंसाचारात १२०० तरुण हकनाक मारले गेले. अशी वेळ विदर्भावर येऊ न देणे ही या देशातल्या, राज्यातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. न्याय्य वाटा द्यायचा नाही, अर्थकारणात प्रचंड कोंडी करायची, शिवाय विदर्भाची मागणी काही मूठभर मंडळींची मोहीम असल्याची वस्तुस्थितीशी संबंध नसलेले आरोप करायचे हा प्रकार गैर आहे. विदर्भाबाहेरच्या मंडळींना या प्रश्‍नाची व्याप्ती माहीत नाही, ती त्यांना समजूनही घ्यायची नाही की काय, अशी शंका विदर्भातल्या मंडळींच्या मनात डोकावत असते. मराठीभाषकांची दोन राज्यं असणं यात काही अनुचित नाही, हेही समजून घेणं गरजेचं झालं आहे. छोट्या राज्यांसाठी राष्ट्रीय परिषद स्थापन झाली आहे. अरविंद केजरीवालांना वाढीव अधिकार हवे आहेत, बुंदेलखंडची मागणी या फोरमवर केली जाते आहे. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे यांच्यापासून सर्व थोरांनी विदर्भाच्या वेगळ्या राज्याची गरज मान्य केली होतीच. जनभावना वेगळ्या राज्याचा कौल देतं आहे, तो मान्य करण्यासाठी सार्वमत घ्या किंवा संसदेचा ठराव करा, पण तिथल्या समस्या सोडवण्यासाठी आता वेगळ्या राज्याला पर्याय नाही हे समजून घ्या, असं विदर्भवासीयांचं नम्र निवेदन आहे.\n(शब्दांकन : मृणालिनी नानिवडेकर)\nम्हेत्रे कुटुंबीयांकडुन सात हजार पुस्तके दान\nतासगाव - ज्येष्ठ द्राक्षतज्ज्ञ एन. बी. म्हेत्रे यांच्या आई रुक्‍मिणी बाबूराव म्हेत्रे आणि शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त प्रयोगशील शेतकरी आर. डी. (...\n‘व्यवस्थे’मुळेच होतेय आरोग्याची हेळसांड\nसरकारी दवाखान्यात प्रशिक्षणार्थी म्हणून आणि नंतर डॉक्‍टर म्हणून काम केल्यामुळे ही व्यवस्था जवळून पाहिली आहे. सरकारी दवाखान्यांच्या दावणीला बांधलेल्या...\nआमदार विलासराव जगतापांच्या मुलाविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा\nमाडग्याळ - जत तालुक्‍यातील कोंतेवबोबलाद येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून श्रीशैल सौदाप्पा कांबळे (वय ५०) यांना काठी व पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात...\nबार्शीत पणीबाणी, ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल\nबार्शी (सोलापूर) : उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असताना वीजपुरवठा व लीकेज बाबतीत नगरपालिकेचे नियोजन ढासळ्याने बार्शीकरांना पाणीबाणीला सामोरे जावे...\nसोलापूर - घोळवेवाडी ही जिल्ह्यातील प्रथम पेपरलेस ग्रामपंचायत\nपांगरी (सोलापूर) : मराठवाड्याच्या हद्दीलगत असलेल्या घोळवेवाडी (ता.बार्शी) ग्रामपंचायतीने पेपरलेस होऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marketaanimi.com/2016/06/18/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A5%A7%E0%A5%A9-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-24T05:00:40Z", "digest": "sha1:HROBZL25WGZKHARIQ4YE67UE3SRVHZ6U", "length": 29121, "nlines": 135, "source_domain": "marketaanimi.com", "title": "आठवड्याचे समालोचन – १३ जून ते १७ जून २०१६ – ढगांचा गडगडाट आणी पावसाचा खडखडाट | Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nआठवड्याचे समालोचन – १३ जून ते १७ जून २०१६ – ढगांचा गडगडाट आणी पावसाचा खडखडाट\nआधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nया आठवड्यांत महत्वाच्या घटनांची रांगच लागली आहे. IIP, महागाईचे आकडे, फेडची मीटिंग, ब्रेक्झीट, भारताला NSG(न्युक्लीअर सप्लायर्स ग्रूप) मध्ये सामील करणार कां या गोष्टी घडणार आणी त्याचे परिणाम काय होतील हे सर्वजण बघत होते. ब्रेक्झीटचे परिणाम तर सर्वांना नवीनच त्यामुळे प्रत्येकजण चाचपडत होता. त्यामुळे small कॅप, मिडकॅप शेअरमधील थोडी तेजी वगळता अधिक काल मंदीचाच होता.\nमायक्रोसॉफ्ट ही कंपनी LinkedIn ही कंपनी US $ २६ बिलियन किमतीला विकत घेणार आहे. मायक्रोसॉफ्ट LinkedIn च्या शेअरहोल्डर्सना US$ १९६ प्रती शेअर या भावाने कॅश पेमेंट करेल.\nचीन मधले ‘A’ ग्रुपचे शेअर्स सध्या तरी MSCI निर्देशांकांत सामील केले जाणार नाहीत. २०१७ मध्ये रिव्हूसाठी हे शेअर्स ठेवले जातील.\nनायजेरियामध्ये ज्या कंपन्या काम करतात त्याना तोटा होईल कारण नायजेरीयाच्या चलनाची किंमत कमी होत आहे. उदा :- भारती एअरटेल.\n२३ जून २०१६ रोजी UK ECU (युरोपिअन कॉमन युनियन) मध्ये राहणार की नाही यावर सार्वमत घेतले जाईल. एक्झिट पोल असे दाखवीत आहेत की सार्वमताचा कौल ECU मधून बाहेर पडण्याकडे आहे. UKच्या अर्थमंत्री आणी UKच्या सेन्ट्रल बँकेने इशारा दिला आहे की ब्रेक्झीटमुळे UK मधून भांडवल बाहेर पडेल, त्यामुळे CAD मध्ये वाढ होईल, GBPचा विनिमय रेट कमी होऊन UK मधील महागाई वाढेल. याचा परिणाम म्हणजे ECU मधून बाहेर पडण्यासाठी बाकीच्या देशांतील मागणी वाढेल आणी ECU चे आणी त्यांच्या युरो या चलनाचे अस्तित्व धोक्यांत येईल.\nफेडने वाढणारी अर्थव्यवस्था पण ढासळणारे लेबर मार्केट यामुळे व्याजदरांत करायची वाढ पुढे ढकलली.\nतसेच बँक ऑफ जपानने आपल्या धोरणांत कोणताही बदल केला नाही.\nसरकारने एव्हिएशन पॉलिसी जाहीर केली.या पॉलिसीनुसार आता आंतरराष्ट्रीय वाहतूक करण्यासाठी पुर्वानुभावाची जरूर नाही पण त्या एअरलाईनकडे २० विमाने असली पाहिजेत. १ तासापेक्षा कमी वेळ लागणाऱ्या उडडानांसाठी सरकारने Rs २५०० ची विमान भाड्यावर मर्यादा ठरवली. जर एअरलाईन्सला या उड्डाणासाठी Rs २५०० पेक्षा जास्त खर्च येणार असेल तर Rs २५०० पेक्षा जास्त लागणार्या खर्चाएवढी सरकार सबसिडी देईल. यासाठी सरकार प्रत्येक उड्डानामागे Rs ८००० कर आकारेल. या प्रमाणे गोळा केलेल्या Rs ५००० कोटी फंडामधून सबसिडी देईल. तसेच मेंटेनन्स आणी रिपेअर्स ऑपरेशनसाठी भारतामध्ये जो कर लावला जातो त्यांत २५% कपात केली जाईल. यामुळे आपल्या देशातच मेंटेनन्स आणी ऑपरेशन करणे स्वस्त होईल. तसेच जे प्रादेशिक विमानतळ बांधले जातील त्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमातळावर असतात त्या सर्व सुविधा असणार नाहीत त्यामुळे या विमानतळावरून विमानांचे उड्डाण करणे सोपे जाईल. तसेच या विमानतळांवर ज्या मेंटेनन्स आणी ऑपरेशन सुविधा असतील त्यांना infrastructure सेक्टरमध्ये सामील केले जाईल\nGST चा मसुदा दोन बाबी सोडून राज्य सरकारांच्या अर्थमंत्र्यांच्या हाय पॉवर कमिटीमध्ये मंजूर झाला. या दोन बाबींवर जुलैमध्ये होणाऱ्या राज्य सरकारच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत एकमत होऊन हे बिल संसदेच्या पावसाळी अधिवेशनांत मंजूर होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.\nभारत बांगलादेश दरम्यान हाय पॉवर नेटवर्क करायचे आहे याचा फायदा सिमेन्सला होईल.\nतनेजा एअरोस्पेस आणी ग्लोबल व्हेक्ट्रा या MRO(मेंटेनन्स, रिपेअर्स आणी ओवरहॉलिंग) स्पेसमध्ये असणाऱ्या कंपन्यांना इंफ्राचा दर्जा दिला जाईल.\nसरकारने स्टेट बँकेत स्टेट बँकेच्या ५ असोशीएट बँकांच्या आणी भारतीय महिला बँकेच्या स्टेट बँकेत होणाऱ्या मर्जरला मान्यता दिली. सरकारच्या या निर्णयामुळे स्टेट बँकेच्या असोसिएट बँकांच्या शेअर्सची किंमत मोठ्या प्रमाणांत वाढली.\nनीती आयोगाने ३२ सार्वजनिक क्षेत्रातील तोट्यांत चालणाऱ्या कंपन्याच्या बाबतीत डीसइन्व्हेस्टमेंट करण्याचे ठरवले आहे. त्यापैकी १० कंपन्यांत ताबडतोब डीसइन्व्हेस्टमेंट केली जाईल तर उरलेल्या २२ कंपन्या पुनरुज्जीवित करून नंतर त्यांची डीसइन्व्हेस्टमेंट केली जाईल.\nसेबी, RBI आणी इतर प्रशासनिक संस्था\nNIIT टेक आणी सिंटेक्स ह्या कंपन्यांचे शेअर्स १ जुलै २०१६ पासून F & O मध्ये सामील होतील.\nसेबी लवकरच ALGORITHMIC ट्रेडिंगवर काही बंधने घालण्याच्या विचारांत आहे. हे ट्रेडिंग गुंतवणूक करणाऱ्या संस्था आणी प्रोप्रायटरी ट्रेडर्समध्ये लोकप्रिय आहे.\nRBI ने NPA असणाऱ्या कंपन्यांसाठी SUSTAINABLE STRUCTURING OF STRESSED ASSETS (S4A ) ही योजना जाहीर केली. यांत बॅंका लोनचे दोन भाग करतील (१) SUSTAINABLE लोन (२) UNSUSTAINABLE लोन. यासाठी बॅंका प्रोजेक्टच्या कॅश फ्लोचा विचार करतील. जो लोनचा भाग वर्तमान किंवा भविष्यांत अंदाज बांधण्यासारख्या कॅश फ्लोने SUSTAIN करण्यासारखा आहे तो पार्ट A म्हणजेच SUSTAINABLE आणी उरलेला भाग B म्हणजे UNSUSTAINABLE असेल आणी हा B भाग इक्विटीमध्ये किंवा कन्व्हरटिबल सिक्युरिटीमध्ये बदलला जाईल. ह्या लोनचे दोन भाग TECHNO-ECONOMIC VIABILITY स्टडीनंतर ठरवले जातील. ज्या प्रोजेक्टना Rs ५०० कोटी लोन दिले आहे आणी ज्यांनी कमर्शिअल ओपरेशंस सुरु केले असतील असे अकौंट S4A योजेनेखाली पात्र असतील. JOINT लेन्डर्स फोरम ह्या योजनेखाली प्लान तयार करून IBA च्या ओवरसीइंग कमिटीकडे देईल.\nIIP ( इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीअल प्रोडक्शन) -०.८ झाले. कन्झुमर गुड्स प्रोडक्शन एप्रिल २०१६ मध्ये १.२% कमी झाले तर कन्झुमर नॉन ड्युरेबल आउटपुट ९.७% ने कमी झाला. ह्यामुळे ग्रामीण मागणी कमी झाली असे दर्शवले जाते.\nकॅपिटल गुड्सचे प्रोडक्शन २४.९% ने कमी झाले. ह्यामुळे भांडवली गुंतवणूक कमी प्रमाणांत झाली असे दर्शविते.\nकन्झुमर्स ड्युरेबल गुड्सचे उत्पादन ११.८ % ने वाढले ही वाढ शहरी आणी अर्ध शहरी भागांत मागणी वाढल्याचे दाखविते.\nCPI (कन्झुमर प्राईस इंडेक्स) मे महिन्यांत ५.७६% ने वाढला. ही वाढ मुख्यतः डाळी, साखर, आणी भाजीच्या भावात झाली. ही वाढ RBIने ठरवलेल्या ५% लक्ष्यापेक्षा जास्त आहे.\nWPI (होलसेल प्राईस इंडेक्स) मध्ये मे २०१६ मध्ये ०.७९% वाढ झाली.एप्रिल महिन्यांत ही वाढ ०.३४% होती.\nभारताच्या निर्यातीमध्ये गेल्या १८ महिन्यांतली कमीतकमी घट झाली (०.७९%) आयातीमध्ये १३.१६% घट झाली त्यामुळे ट्रेड डेफिसिट मे महिन्यांत US $ ६.३ बिलियन एवढी झाली.\nया आठवड्यांत रुपयाचा US $ मध्ये विनिमय दर १ US $ =Rs ६७ एव्हढा झाला सोने Rs ३००००/झाले.\nटाटा पॉवर या कंपनीने आपल्या सबसिडी टाटा पॉवर रिन्यूवेबल एनर्जी मार्फत वेलस्पनचे ग्रीन एनर्जी युनिट Rs. १०००० कोटींना खरेदी केले. यांत ९९० mw सोलर पॉवर प्रोजेक्ट आणी १५० mw विंड पॉवर प्रोजेक्टचा समावेश आहे. टाटा पॉवर ही कंपनी रीसर्जंट पॉवर या कंपनीट २५ % स्टेक US$ ३०० मिलियनला खरेदी करणार आहे. यांत मुख्यतः कोळशावर चालणारे आणी हायड्रोपॉवर बेस्ड assets आहेत.\nRCOM आणी एअरसेल या दोन कंपन्यांचे मर्जर या महिन्यांत पुरे होईल. या दोन कंपन्यांचे मर्जर झाल्यावर अस्तीवांत येणारी कंपनी भारतांत तिसऱ्या नंबरची कंपनी असेल.\nMCX वर आता AGRI कमोडीटीमध्ये व्यवहार करणार आहे. सुरुवात काळी मिरी पासून करणार आहेत\nHAVELLS ही कंपनी सोलर पॉवर जनरेटिंग सिस्टीम, सोलर पंप्स, सोलर स्ट्रीट लाईट्स, होम लाईटिंग किट्स जून २०१६ मध्ये देशभरांत LAUNCH करील. निमराना येथे ही प्रोडक्ट्स ASSEMBLE केली जातील.\nआंध्र प्रदेश आणी तेलंगाणा येथे सिमेंटची मागणी वाढली आहे. त्यामुळे NCL, आंध्र सिमेंट, डेक्कन सिमेंट, इंडिया सिमेंट काकतिया सिमेंट, या कंपन्याच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या.\nसोमवारी चहा कॉफी साखर तांदूळ यांच्याशी संबंधीत कंपन्यांचे शेअर्स जोरांत वाढले.\nटाटा स्पॉंजला कोल इंडिया कोल लिंकेज देते. हा करार आता १० वर्षांकरता केला जाईल.\n‘उडता पंजाब’ हा सिनेमा वितरणापूर्वीच खूप प्रसिद्धीत आला. हा सिनेमा १७ जून रोजी रिलीज होईल याचा फायदा बालाजी टेलि या कंपनीला होईल.\nSKS मायक्रोफायनान्स या कंपनीने आपले नाव बदलून भारत फ़ायनान्सिअल इन्क्लुजन असे ठेवले.\nकजारिया सेरेमिक्स ही कंपनी एका शेअरचे २ शेअरमध्ये तर व्ही गार्ड ही कंपनी एका शेअरचे १० शेअर्स मध्ये विभाजन करेल.\nHDFC लाईफ आणी MAX लाईफ यांचे मर्जर करण्याचा निर्णयाला पुष्टी मिळाली. .\nइमामी REALTY आणी इमामी रेनबोचे विलीनीकरण इमामी इंफ्रामध्ये होईल.\nभारती इन्फ्राटेल ही टेलिकॉम क्षेत्रातील भारती एअरटेल ग्रूपची कंपनी ४७ मिलियन शेअर्स Rs ४२५ प्रती शेअर या भावाने अंदाजे Rs २००० कोटींना BUYBACK करेल.\nIप्रिमीयर एक्स्प्लोझीव्स ही कंपनी १७ जून २०१६ ला NSE वर लिस्ट झाली.\nनजीकच्या काळांत येणारे IPO\nCICI प्रूडेनशीअल लाईफचा iPO सप्टेंबर २०१६ मध्ये येईल. या IPO द्वारा Rs ६५०० ते Rs ७५०० कोटी उभारले जातील. Rs २६० ते Rs २८० हा प्राईस band असेल.\nSBI STANDARD लाईफचा इशू येणार आहे.\nमहानगर gas या कंपनीचा IPO २० जून २०१६ ते २२ जून २०१६ या कालावधीत येणार आहे. या IPO चा प्राईस band Rs ४५५ ते Rs ४८५ असेल. या IPO द्वारा कंपनी Rs १००० ते Rs १२०० कोटी उभे करील.\nहुडकोच्या IPO ला मंजुरी मिळाली. हुडकोमधील १०% स्टेक सरकार डायव्हेस्ट करेल.\nया आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं\nया आठवड्यांत जे ढग जमा झाले होते त्यावैकी WPI आणी CPI म्हणजेच घाऊक आणी किरकोळ बाजारातील किंमती वाढल्या, IIP चे आकडे निराशाजनक आले, भरीसभर म्हणून पावसानेही आपले आगमन लांबवले.यामुळे RBIने रेट कट न करण्याचा निर्णय घेतला. फेडने मात्र रेट वाढवले नाहीत. BREXIT ची टांगती तलवार मार्केटला अस्वस्थ करीत आहे.मात्र स्टेट बँकेत स्टेट बँकेच्या असोसिएट बँकांच्या होणार्या मर्जरमुळे या बँकांचे शेअर्स वाढून सगळ्यांच्या झोळीत भरपूर दान पडले. जेव्हा अशा मोठ्या घटनांची नांदी असते त्यावेळी फक्त निरीक्षण करणेच योग्य ठरते. जे स्माल कॅप आणी मिडकॅप शेअर चालतात त्यांत volume आहे कां ते पहावे आणी ट्रेड करावा. डिलिव्हरी volume जास्त असेल तर short टर्म ट्रेड करावा. पण ट्रेडिंग volume जास्त असेल तर stoploss ठेवून इंट्राडे ट्रेड करावा.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स २६६२५ वर तर निफ्टी ८१७० वर बंद झाले\nमी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.\n← आठवड्याचे समालोचन – ६ जून ते १० जून २०१६ – कमाईसाठी शिक्षण आणी शिक्षणातून कमाई आठवड्याचे समालोचन – २० जून ते २४ जून २०१६ – हवा बदलली, पोर्टफ़ोलिओ बदला →\nOne thought on “आठवड्याचे समालोचन – १३ जून ते १७ जून २०१६ – ढगांचा गडगडाट आणी पावसाचा खडखडाट”\nपिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २० जून ते २४ जून २०१६ – हवा बदलली, पोर्टफ़ोलिओ बदला | Stock Market आणि मी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआठवड्याचे-समालोचन - सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा - १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८\nभाग 62 - शेअर मार्केट आणि ब्रेक्झीट\nतुमचे प्रश्न – माझी उत्तरं : July - September 2017\nआठवड्याचे-समालोचन – सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा – १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८\nआठवड्याचे समालोचन – शेअर मार्केट एक ‘अक्षय पात्र’ – ९ एप्रिल २०१८ ते १३ एप्रिल २०१८\nआठवड्याचे समालोचन – साप शिडीचा खेळ – २ एप्रिल २०१८ ते ६ एप्रिल २०१८\nलेखमाला – ‘माझी वाहिनी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/review/movie-review/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%AF/1647065/", "date_download": "2018-04-24T04:50:07Z", "digest": "sha1:CZF5ASIC34X27MM3TJ27NZO5RB55YBWI", "length": 21192, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta movie review on red Ajay Devgan | कालातीत आशय | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n१९८१ साली घडलेल्या सत्यघटनेवर आधारित ‘रेड’ हा चित्रपट आहे.\n१९८१ साली घडलेल्या सत्यघटनेवर आधारित ‘रेड’ हा चित्रपट आहे. सत्यघटनेवर आधारित चित्रपट करत असताना कित्येकदा त्या घटनेच्या नायकाला जाणूनबुजून हिरो म्हणून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचे असामान्यत्व हे त्याने त्या परिस्थितीत दाखवलेल्या कर्तृत्वामुळे अधोरेखित झालेले असते याचे भानच कित्येकदा विसरले जाते. दिग्दर्शक म्हणून राजकुमार गुप्ता यांनी हा मोह टाळून त्या घटनेशी प्रामाणिक राहत त्यातून अनेक विषयांवर बोट ठेवले आहे. प्रशासकीय-शासकीय अधिकारी, त्यांचे काम, या अधिकाऱ्यांना आपल्या दावणीला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करणारे राजकीय नेते, भ्रष्ट्राचार हे विषय वर्षांनुवर्ष त्याच पद्धतीने पुढे जात राहिले आहेत. ‘रेड’ मध्ये एका सामान्य प्राप्तिकर अधिकाऱ्याने दाखवलेल्या धाडसाची कथा सांगण्याच्या निमित्ताने दिग्दर्शकाने पुन्हा सर्वानाच या विषयांवर नव्याने विचार करायला भाग पाडले आहे. प्राप्तिकर अधिकाऱ्यांचे छापे आणि त्या जाळ्यात अडकणारी बडी बडी धेंडे, या छाप्यांच्या बाबतीत पाळावी लागणारी गुप्तता याचा पुरेपूर वापर बॉलीवुडने आपल्या तद्दन व्यावसायिक चित्रपटांसाठी करून घेतला आहे.\n‘रेड’मध्ये मात्र आपल्या देशात सर्वाधिक काळ चाललेली प्राप्तिकर अधिकाऱ्यांची कारवाई म्हणून ओळखली जाणारी घटना दिग्दर्शकाने चित्रपटातून पडद्यावर जिवंत केली आहे. १९८१ मध्ये कानपूर शहरात काँग्रेसच्या आमदाराच्या घरावर प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. या छाप्यात त्यांना प्रचंड मोठी रोकड, दागिने हाती लागले होते. या घटनेवर चित्रपटाची कथा बेतली आहे. लखनऊ शहरात ३९ व्या बदलीवर आलेल्या प्राप्तिकर अधिकाऱ्याची अमय पटनाईकची (अजय देवगण) कथा चित्रपटात पहायला मिळते. लखनऊमध्ये येऊन कामाची सूत्रे हातात घेतल्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच त्याला ‘खबर’ मिळते. मिळालेली खबर आणि संबंधित व्यक्तीची करविवरणपत्रे याचा अभ्यास केल्यानंतर संबंधित माहिती बरोबर आहे याची खातरजमा केल्यानंतर अमय पटनाईक विभागाकडून रितसर परवानगी घेऊन आमदार रामेश्वर सिंग (सौरभ शुक्ला) यांच्या घरावर छापा मारतो. पैशाच्या, सत्तेच्या जोरावर आपण काहीही करू शकतो याचा माज असलेला आमदार या अधिकाऱ्याला आल्या पावली परत जाण्याची धमकी देतो. त्यानंतरचा चित्रपट हा रामेश्वर सिंग यांच्या घरातील अधिकाऱ्यांची कारवाई, दडवलेल्या बेहिशेबी मालमत्तेचा शोध, त्यादरम्यान त्यांची होणारी अडवणूक या सगळ्या गोष्टी चित्रपटात पहायला मिळतात.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\n१९८१ साली घडलेल्या या घटनेचे चित्रण पाहताना परिस्थिती आजही बदललेली नाही हे दिग्दर्शकाने अधोरेखित केले आहे. ऐंशीच्या दशकात जेव्हा मोबाईल सोडाच अन्य सुविधाही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या होत्या. एखाद्या अधिकाऱ्याला मारून टाकणे आणि त्याची कानोकान माहिती न मिळणे ही सोपी अस्त्रे होती. त्याकाळात केवळ आपला प्रामाणिकपणा आणि कर्तव्य चोख बजावण्याच्या भावनेतून वावरणाऱ्या अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही इतकी मोठी कारवाई प्रत्यक्षात आणली. उत्तरप्रदेश आणि परिसरात त्यावेळी प्राप्तिकर अधिकाऱ्यांवरचे हल्ले, त्यांना मारहाण हे प्रकार राजरोसपणे होत होते आणि त्याचे चित्रण दिग्दर्शकाने तितक्याच सरळ पध्दतीने केले आहे. अर्थातच इथे नायक अजय देवगण असल्याने त्याच्य तोंडी हमखास टाळ्या मिळतील, असे संवाद दिग्दर्शकाने पेरले असले तरी कुठल्याही क्षणी हा हिरो बंदूक घेऊन समोरच्या नेत्याचे काम तमाम करेल किमानपक्षी ‘सिंघम’ स्टाईल धोबीपछाड करेल, असे आपल्याला वाटत राहते. प्रत्यक्षात तसे होत नाही. कुठल्याही परिस्थितीत दबावाला बळी न पडता आपल्या चोख कामातून गुन्हेगाराला अडकवण्याची त्याची जिद्द हीच इथे हिरो ठरते. सरकारी व्यवस्थेतील कच्चे दुवे माहित असतानाही त्याच व्यवस्थेत राहून, इतर सहकाऱ्यांमध्येही कर्तव्याची भावना जागवत आपले कर्तव्य बजावण्याची प्रेरणा जागवणाऱ्या अशा अनेक सामान्य अधिकाऱ्यांच्या असामान्य कथा या आजच्या काळात लोकांसमोर येणे गरजेचे आहे. जे काम दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी केले आहे. अजय देवगण आणि सौरभ शुक्ला यांच्या अभिनयाची जुगलबंदी हे चित्रपटाचे वैशिष्ठय़ ठरले आहे, मात्र या दोघांशिवाय कोही व्यक्तिरेखा अधिक ठळकपणे यायला हव्या होत्या. त्यांची ओळख दिग्दर्शक मुद्दामहून करून देतो मात्र आता त्यांचे काम दिसेल, नंतर दिसेल अशी वाट पाहणाऱ्यांच्या हाती मात्र निराशाच येते. तीच गोष्ट अवेळी वाजणाऱ्या गाण्यांची. अजय देवगण आणि इलियाना यांच्यातील प्रेमभरे प्रसंग रंगवण्यासाठी वाजणारी ही गाणी कथेच्या दृष्टीने गरजेची नव्हती. त्यामुळे त्यांचा खोळंबाच जास्त वाटतो. मात्र या एखाददोन गोष्टी सोडल्या तर दिग्दर्शकाने त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये एक सुंदर वास्तवाच्या जवळ नेणारा, कालातीत आशय असणारा चित्रपट दिला आहे.\nदिग्दर्शक – राजकुमार गुप्ता\nकलाकार – अजय देवगण, इलियाना डिक्रुझ, सौरभ शुक्ला, गायत्री अय्यर, सानंद वर्मा, अमित सियाल, अमित बिमरोत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nनाणार प्रकल्प विदर्भात आणा: भाजपा आमदाराची मागणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nतीन दिवसांचा संसार; रस्ता चुकलेल्या नवदाम्पत्याचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू\nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://zpchandrapur.maharashtra.gov.in/mr/directories", "date_download": "2018-04-24T04:36:15Z", "digest": "sha1:PVHKEAHW2E2EXFH52ZTKQ46ECCMZMPTB", "length": 36065, "nlines": 245, "source_domain": "zpchandrapur.maharashtra.gov.in", "title": "जिल्हा परिषद, चंद्रपूर", "raw_content": "जि.प. चे अधिकृत संकेतस्थळ\nमहिला व बाल कल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nपाणी व स्वच्छता विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपर्याय निवडा केंद्रिय राज्यमंत्री पालकमंत्री जि. प. अध्यक्ष खासदार विधान परिषद सदस्य विधानसभा सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. पदाधिकारी जि. प. सदस्य विभाग प्रमुख पं. स. सदस्य गट विकास अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी उप अभियंता (बांध./सिंचाई /ग्रापापु) गटशिक्षणाधिकारी पशुधन विकास अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी इतर\n1 श्री. एस.पी. गडकरी, उपअभियंता (सिंचाई), राजूरा उप अभियंता (बांध./सिंचाई /ग्रापापु) 07173 223085 , 9420138654 -\n2 श्री. एस. बी. वालदे, उपअभियंता (सिंचाई), मूल उप अभियंता (बांध./सिंचाई /ग्रापापु) 07174 202407 , 9421718365 -\n3 श्री. पी. जी. मेश्राम, उपअभियंता (सिंचाई), चिमूर उप अभियंता (बांध./सिंचाई /ग्रापापु) 07170 266516 , 9673890574 -\n4 श्री. डी. एन. देशमुख, उपअभियंता (सिंचाई), सिंदेवाही उप अभियंता (बांध./सिंचाई /ग्रापापु) 07178 288088 , 9420956403 -\n5 श्री. डी. एन. देशमुख, उपअभियंता (सिंचाई), गोंडपिपरी उप अभियंता (बांध./सिंचाई /ग्रापापु) 07171 220657 , 9420956403 -\n6 श्री. पी. एस. सुखदेवे, उपअभियंता (सिंचाई), नागभिड उप अभियंता (बांध./सिंचाई /ग्रापापु) 07179 240704 , 9545705089 -\n7 श्री. ए. पिदुरकर, उपअभियंता (सिंचाई), भद्रावती उप अभियंता (बांध./सिंचाई /ग्रापापु) 07175 265064 , 9763728050 -\n8 श्रीमती संगीता एल. भांगरे (चंद्रपूर) बाल विकास प्रकल्प अधिकारी 07172 271446 , 9421565439 -\n9 श्री. एम. बी. डोंगरे (मूल) बाल विकास प्रकल्प अधिकारी 07174 220663 , 9890673412 -\n10 श्रीमती अनिता भांडारकर (प्रभारी सावली) बाल विकास प्रकल्प अधिकारी 07174 274539 , 9421105435 -\n11 श्रीमती एस. पी. केवठे (प्रभारी सिंदेवाही) बाल विकास प्रकल्प अधिकारी 07178 288224 , 9421724475 -\n12 श्रीमती यु. एम. कापसे (नागभिड) बाल विकास प्रकल्प अधिकारी 07179 240970 , 9637760974 -\n13 श्री. आर. एम. टेटे (ब्रम्हपूरी) बाल विकास प्रकल्प अधिकारी 07177 273109 , 9405513558 -\n14 श्री. ए. आर. बावणे (प्रभारी भद्रावती) बाल विकास प्रकल्प अधिकारी 07175 266272 , 7798288805 -\n15 श्रीमती आएशा कारदार (प्रभारी वरोरा) बाल विकास प्रकल्प अधिकारी 07176 282052 , 9890323020 -\n16 श्री. एस. एम. मुल्ला (चिमूर) बाल विकास प्रकल्प अधिकारी 07170 266435 , 9421360506 -\n17 श्री. व्हि. एल. पेंदाम (बल्लारपूर) बाल विकास प्रकल्प अधिकारी 07172 243855 , 9423620497 -\n18 श्री. व्हि. एल. पेंदाम (प्रभारी राजूरा) बाल विकास प्रकल्प अधिकारी 07173 223136 , 9423620497 -\n19 श्री. एल. बी. चव्हाण (प्रभारी कोरपना) बाल विकास प्रकल्प अधिकारी 07173 243855 , 9921265303 -\n20 श्री. संदीप गोडशेलवार (प्रभारी जिवती) बाल विकास प्रकल्प अधिकारी 07173 258119 , 9422891102 -\n21 श्री. जे. आर. गहाणे (गोंडपिपरी) बाल विकास प्रकल्प अधिकारी 07171 220734 , 9764091649 -\n22 श्री. एस. पी. गाडेवार (प्रभारी पोंभूर्णा) बाल विकास प्रकल्प अधिकारी 07171 265834 , 9404107641 -\n23 श्री.अशोक सिरसे.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विभाग प्रमुख 07172-258122 , - add.ceozpchandraur@gmail.com\n24 डॉ. दिपक सेलोकर, सहा. संचालक, कुष्ठरोग इतर 07172 253275 , 9420683875 -\n25 डॉ. दिपक सेलोकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी (प्रभारी) इतर 07172 253275 , 9420683875 -\n26 डॉ. एन. एन. जिवने, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्र इतर 07172 253275 , 9028380268 -\n27 श्री. सुधीर मेश्राम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी इतर 07172 253275 , 9422838430 -\n28 डॉ. संदिप गेडाम, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी इतर 07172 253275 , 9561940093 -\n29 डॉ. सरोज पुल्लकवार, वैद्यकिय अधिकारी, साथरोग इतर 07172 253275 , 9689682705 -\n30 डॉ. पी. एम. नगराळे (बल्लारपूर) तालुका वैद्यकीय अधिकारी - , 9420444834 -\n31 डॉ. अंकुश राठोड (प्रभारी, वरोरा ) तालुका वैद्यकीय अधिकारी - , 9623262749 -\n32 डॉ. यु. पी. पाटील (राजूरा) तालुका वैद्यकीय अधिकारी - , 7875895974 -\n33 डॉ. पी. एम. नगराळे (प्रभारी, पोंभूर्णा) तालुका वैद्यकीय अधिकारी - , 9420444834 -\n34 डॉ. एस. के. मेश्राम ( मूल ) तालुका वैद्यकीय अधिकारी - , 9422838430 -\n35 डॉ. दिगांबर मेश्राम (चिमूर) तालुका वैद्यकीय अधिकारी - , 9423675610 -\n36 डॉ. विलास दुधपचारे (नागभिड) तालुका वैद्यकीय अधिकारी - , 9422644068 -\n37 डॉ. मनिषा सागुळले (प्रभारी, सिंदवाही) तालुका वैद्यकीय अधिकारी - , 9545519552 -\n38 डॉ. पी. व्ही. चरपे (प्रभारी, भद्रावती) तालुका वैद्यकीय अधिकारी - , 9822722638 -\n39 डॉ. एन. एन. जिवने (प्रभारी, चंद्रपूर) तालुका वैद्यकीय अधिकारी - , 9028380268 -\n40 डॉ. विलास दुधपचारे (ब्रम्हपूरी ) तालुका वैद्यकीय अधिकारी - , 9422644068 -\n41 डॉ. विजया धात्रम (प्रभारी, गोंडपिपरी) तालुका वैद्यकीय अधिकारी - , 9423418226 -\n42 डॉ. मनोहर मडावी (सावली) तालुका वैद्यकीय अधिकारी - , 9422126806 -\n43 डॉ. एस. बी. उईके (प्रभारी, कोरपना) तालुका वैद्यकीय अधिकारी - , 7385461326 -\n45 श्री. आर. बी. तालेवार, प्रभारी उपअभियंता (या) इतर 07172 263377 , 9422835851 -\n47 श्री. व्ही. एस. उध्दरवार, उपअभियंता (स्था) इतर - , 9763900808 -\n48 श्री. ए. एस. मुसानी, उपअभियंता (स्था) इतर - , 9422891069 -\n49 श्री. सी. आर. शामकुवर, उपविभाग(स्था) इतर 07178 288049 , 9850901555 -\n50 श्री. व्ही. टी. शेंन्डे, उपभियंता (स्था) इतर - , 9881723240 -\n52 श्री. बि. एन. देवतळे, ( राजूरा) गटशिक्षणाधिकारी - , 7758031875 brcpsrajura@yahoo.in\n53 श्री. ए. जी. सावरकर (पोंभूर्णा) गटशिक्षणाधिकारी - , 9890742551 brcpombhurna@gmail.com\n54 श्री. बाबूराव मडावी ( प्रभारी, चंद्रपूर) गटशिक्षणाधिकारी - , 9422909775 brcyashawantnagar@gmail.com\n55 श्री. पी. बि. उपलंचिवार (प्रभाार, चिमूर) गटशिक्षणाधिकारी - , 9403321737 beochimur@rediffmail.com\n56 श्री. सेलोकर (प्रभारी, ब्रम्हपूरी) गटशिक्षणाधिकारी - , 9011540719 beo bramhapuri@rediffmail.com\n57 श्री. एन. के. भानारकर (प्रभारी, सिंदेवाही) गटशिक्षणाधिकारी - , 9421880425 ssabrcsindewahi@gmail.com\n58 श्री. खुने (प्रभारी, नागभिड) गटशिक्षणाधिकारी - , 9421725143 brcnagbhid@gmail.com\n59 श्री. खडाळे (प्रभारी, मूल) गटशिक्षणाधिकारी - , 9421723400 mulbrc@gmail.com\n60 श्री. श्रीरंग कुमरे (प्रभारी सावली) गटशिक्षणाधिकारी - , 9420754983 brcsaoli@yahoo.com\n62 श्री. रामराव चव्हाण (प्रभारी वरोरा) गटशिक्षणाधिकारी - , 9420301610 brcwarora@gmail.com\n63 श्री. उराडे (प्रभारी गोंडपिपरी) गटशिक्षणाधिकारी - , 9405683369 beo.gondpipari@gmail.com\n65 श्री. मुसळे (प्रभारी जिवती) गटशिक्षणाधिकारी - , 9604647013 beojiwati@rediffmail.com\n66 श्री.संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) विभाग प्रमुख 07172-252560 , - eopzpchadrapur@gmail.com\n68 श्री. राजीव मनोहर सोरते (प्रभारी) लेखाधिकारी (शा. पो.आ.) चंद्रपूर इतर - , 9423422677 eopzpchadrapur@gmail.com\n70 श्री. विलास देशमुख, अधिक्षक वर्ग-2 ( शा. पो. आ.), गोंडपिपरी इतर - , 9273960111 beo.gondpipari@gmail.com\n71 श्री. ए. बी. शेटे, उपअभियंता (बांधकाम), चिमूर उप अभियंता (बांध./सिंचाई /ग्रापापु) 07172 265664 , 9423104622 -\n72 श्री. एस. व्हि. खांडरे, उपअभियंता (बांधकाम), चंद्रपूर उप अभियंता (बांध./सिंचाई /ग्रापापु) - , 9423608190 -\n73 श्री. डी. डब्ल्यु. डेहनकर, उपअभियंता (बांधकाम), राजूरा उप अभियंता (बांध./सिंचाई /ग्रापापु) 07173 222253 , 9423107123 -\n74 श्री. डि. डब्ल्यु. डेहनकर, (प्रभारी) उपअभियंता (बांधकाम), मूल उप अभियंता (बांध./सिंचाई /ग्रापापु) 07174 220529 , 9423107123 -\n75 श्री. एच. एस. धानकुटे, उपअभियंता (बांधकाम), वरोरा उप अभियंता (बांध./सिंचाई /ग्रापापु) 07176 208243 , 9422912095 -\n76 श्री. आर. टी. साळवे, उपअभियंता (बांधकाम), पोंभूर्णा उप अभियंता (बांध./सिंचाई /ग्रापापु) 07171 268535 , 9422644606 -\n77 श्री. ए. जी. लिचडे, उपअभियंता (बांधकाम), जिवती मुख्या, कोरपना उप अभियंता (बांध./सिंचाई /ग्रापापु) - , 9881925335 -\n78 श्री. एस. एस. नस्कुलवार, (प्रभारी)उपअभियंता (बांधकाम), ब्रम्हपूरी उप अभियंता (बांध./सिंचाई /ग्रापापु) 07177 272072 , 9421721881 -\n79 डॉ. आर. डी. देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विभाग प्रमुख 07172 260177 , 9763721091 dahozpchadrapur@gmail.com\n80 डॉ. अशोक अडकिने, प. वि. अ., जिल्हा पशुसंवर्धन विभाग, जि. प. चंद्रपूर पशुधन विकास अधिकारी 07172 260177 , 8149278701 -\n81 डॉ. जी. बी. ठाकूर, प.वि.अ.(वि.), पं. स, चंद्रपूर पशुधन विकास अधिकारी - , 9421884967 -\n82 डॉ. पी. डी. कडुकर, प. वि. अ. पवैद श्रेणी-1, पांढरकवडा, पं. स. चंद्रपूर पशुधन विकास अधिकारी - , 9822898207 -\n83 डॉ. जी. एच. गायकवाड, प. वि. अ., पवैद श्रेणी-1, घुग्गूस, पं. स. चंद्रपूर पशुधन विकास अधिकारी - , 9604937328 -\n84 डॉ. विजय लेखामी, प. वि. अ., पवैद श्रेणी-1, बल्लारपूर, पं. स. बल्लारपूर पशुधन विकास अधिकारी - , 9405275870 -\n85 डॉ. सचिन हगवणे, प. वि. अ. (वि.), पं. स. मूल पशुधन विकास अधिकारी - , 9422808079 -\n86 डॉ. पी. एस. जिभकाटे, प. वि. अ., पवैद श्रेणी-1, राजोली, पं. स. मूल पशुधन विकास अधिकारी - , 9960221175 -\n87 डॉ. पूनम गणविर, प. वि. अ. (वि.), पं. स. नागभिड पशुधन विकास अधिकारी - , 9764154327 -\n88 डॉ. एस. एम. बारमासे, प. वि. अ., पवैद श्रेणी-1, तळोधी, पं. स. नागभिड पशुधन विकास अधिकारी - , 9370733997 -\n89 डॉ. पी. आर. खोब्रागडे, प. वि. अ., पवैद श्रेणी-1, गिरगाव, पं. स. नागभिड पशुधन विकास अधिकारी - , 9403242057 -\n90 डॉ. उदय कोराने, प. वि. अ. (वि.), पं. स. ब्रम्हपूरी पशुधन विकास अधिकारी - , 9420012300 -\n91 डॉ. सुनिल कळमकर, प. वि. अ. (वि.), पं. स. वरोरा पशुधन विकास अधिकारी - , 9822944336 -\n92 डॉ. माधवी गोंगले, प. वि. अ, पवैद श्रेणी-1, शेगाव, पं. स. वरोरा पशुधन विकास अधिकारी - , 9665242264 -\n93 डॉ. राहूल शेंद्रे, प. वि. अ., पवैद श्रेणी-1, चारगांव, पं. स. वरोरा पशुधन विकास अधिकारी - , 9822944336 -\n94 डॉ. जल्लेवार, प. वि. अ. (वि.), पं. स. राजूरा पशुधन विकास अधिकारी - , 8657164759 -\n97 श्री.ओमप्रकाश यादव (वरोरा) गट विकास अधिकारी 07176-282052 , - bdopswarora@gmail.com\n98 श्री महेश्वर डोंगरे (चिमूर) गट विकास अधिकारी 07170-265535 , - bdochimur@gmail.com\n109 श्रीमती संध्या दिकोंडवार (बल्लारपूर) गट विकास अधिकारी 07172-243855 , 8275728713 bdopsballarpur@gmail.com\n110 मा.नाम.श्री.सुधिर सच्चिदानंद मुनगंटीवार पालकमंत्री ०२२-२२८४३६५७ , २२८४३६४७ , 9822223102 min.finance@maharashtra.gov.in\n112 मा.श्रीमती शोभाताई फडणविस विधान परिषद सदस्य 07174-220462 , 9422135500 -\n113 मा.श्री.मितेश भांगडीया विधान परिषद सदस्य 0712-2460120 , 7798252627 -\n114 मा.श्री.अनिल सोले विधान परिषद सदस्य - , 9822578953 -\n116 मा.श्री.नानाभाऊ शामकुळे विधानसभा सदस्य - , 9923596004 -\n117 मा.श्री.किर्तीकुमार भांगडिया विधानसभा सदस्य 07170-260120 , 9767622222 -\n118 मा.श्री.बाळूभाऊ धानोरकर विधानसभा सदस्य दुरध्वनी क्र.07176-280586 , 9923232462 info@balubhaudhanorkar.com\n119 मा.श्री.संजय धोटे विधानसभा सदस्य 07172-222299 , 9822565746 -\n120 श्री.श्रीराम गोगुलवार (जिल्हा आरोग्य अधिकारी) विभाग प्रमुख 07172-253275 , 9422153260 dhocha@gmail.com\n121 श्री दशरथ पिपरे , कार्यकारी अभि.(ग्रापापू) विभाग प्रमुख 07172-273978 , - eerwszpchandrapur@gmail.com\n122 श्री.प्रभू जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) विभाग प्रमुख 07172-25592 , - dyceogzpchandrapur@gmail.com\n123 श्री.ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) विभाग प्रमुख 07172-250660 , - dyceopzpchandrapur@gmail.com\n124 श्री.संजय जोल्हे, महिला व बाल विकास अधिकारी विभाग प्रमुख 07172-272606 , - dyceobkzpchandrapur@gmail.com\n126 श्री. संतोष वाहुळे , मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी विभाग प्रमुख 07172-250273 , 9922334478 cafozpchandrapur@gmail.com\n127 श्री.संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) विभाग प्रमुख 07172-255013 , 9404818089 eoszpchandrapur@gmail.com\n128 श्री.बुरांडे , कार्यकारी अभियंता (बांधकाम) विभाग प्रमुख 07172-250518 , 8805419712 eewzpchandrapur@gmail.com\n130 श्री.सुनिल जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विभाग प्रमुख 07172-255933 , 9987565455 swozpchandrapur@gmail.com\n131 प्रिती खारतुडे, वरिष्ठ लेखा अधिकारी विभाग प्रमुख 07172-250273 , - cafozpchandrapur@gmail.com\n132 श्री. रविंद्र टी. मोहीते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.) विभाग प्रमुख 07172-274352 , - nbazpchandrapur@gmail.com\n133 श्री. एस. एस. बोदेले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मग्रारोहयो) विभाग प्रमुख 07172-277711 , - mgnregacellzpchandrapur@gmail.com\n135 श्री.जितेंद्र पापळकर (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी ०७१७२-२५६४०१ , - zillaparishadchandrapur@gmail.com\n137 श्री.क्रिष्णलाल बाजीराव सहारे जि. प. पदाधिकारी 07172-256293 , 9421717618 -\n138 श्री.संतोष सुधाकर तंगडपल्लीवार जि. प. पदाधिकारी 07172-255629 , 7038066333 -\n139 सौ.अर्चना नरेंद्र जिवतोडे जि. प. पदाधिकारी 07172-256229 , 9763720341 -\n141 सौ.गोदावरी सुरेश केंद्रे जि. प. पदाधिकारी 07172-250872 , 7875483454 -\n143 श्री.गौतम झिटूजी निमगडे जि. प. सदस्य - , 9423418068 -\n144 श्रीमती रोशनी अनवर खान जि. प. सदस्य - , 9405145459 -\n145 श्री.रणजित गजानन सोयाम जि. प. सदस्य 07172-285909 , 9689023383 -\n146 श्रीमती नितु विनोद चौधरी जि. प. सदस्य 7517381774 , 7517381774 -\n147 श्रीमती वनिता नामदेवराव आसुटकर जि. प. सदस्य 9922089521 , 9921322841 -\n148 श्री.हरिष मारोतराव गेडाम जि. प. सदस्य - , 9422153250 -\n149 श्रीमती वैशाली राजु बुध्दलवार जि. प. सदस्य - , 9822742469 -\n150 श्रीमती संध्याताई रुपेश्वर गुरनुले जि. प. सदस्य - , 9422191222 -\n151 श्रीमती शितल प्रशांत बाम्बोडे जि. प. सदस्य 9604053891 , 9422947290 -\n152 श्री.पृथ्वीराज उध्दव अवताडे जि. प. सदस्य - , 8379055024 -\n153 श्रीमती मनिषा मोतीराम चिमुरकर जि. प. सदस्य 9420111139 , 8007773668 -\n154 श्रीमती योगिता धनराज डबले जि. प. सदस्य 9767874525 , 9422364300 -\n155 श्रीमती वैशाली सुरेश शेरकी जि. प. सदस्य 9637461052 , 7057683628 -\n156 श्री.राहुल शरद संतोषवार जि. प. सदस्य - , 9422908102 -\n157 श्रीमती कल्पना उत्तम पेचे जि. प. सदस्य - , 8605437114 -\n158 श्रीमती विना सुरेश मालेकर जि. प. सदस्य - , 9689992342 -\n159 श्री.शिवचंद्र जगनाथ काळे जि. प. सदस्य - , 9922413227 -\n160 श्रीमती मेघा दिलीप नलगे जि. प. सदस्य - , 9595363365 -\n161 श्री.गोदरु रामशाव जुमनाके जि. प. सदस्य - , 9420138750 -\n162 श्री.सुनिल बाबुराव उरकुडे जि. प. सदस्य 07173-203310 , 9422152250 -\n163 श्री.नामदेव बापुजी करमनकर जि. प. सदस्य - , 9657346761 -\n164 श्रीमती कमलाबाई दत्ता राठोड जि. प. सदस्य - , 9423620009 -\n165 श्रीमती कल्पना संदिप अवथरे जि. प. सदस्य - , 9765984462 -\n166 श्रीमती वैष्णवी अमर बोडलावार जि. प. सदस्य - , 9420363213 -\n167 श्रीमती स्वाती किशोर वडपल्लीवार जि. प. सदस्य - , 9545634278 -\n168 श्री.मनोहर इसन मामीडवार जि. प. सदस्य 9421720589 , 9421720589 -\n170 श्रीमती रेखाबाई दिलीप कारेकार जि. प. सदस्य - , 8975561966 -\n171 श्री.गजानन तुकाराम बुटके जि. प. सदस्य 9545925604 , 9657817781 -\n172 श्रीमती ममता घनश्याम डुकरे जि. प. सदस्य 9423690564 , 8390147979 -\n173 श्री.संजय होमराज गजपुरे जि. प. सदस्य 07179-240467 , 7588550055 -\n174 श्री.खोजराम गोविंदा मरस्कोल्हे जि. प. सदस्य - , 9657417678 -\n175 श्रीमती नैना विनाश गेडाम जि. प. सदस्य - , 9011070398 -\n176 श्री.गोपाळा मारोती दडमल जि. प. सदस्य - , 9421721767 -\n177 श्रीमती स्मिता राजेश पारधी जि. प. सदस्य 9637663317 , 8698648914 -\n178 श्री.प्रमोद रघुनाथ चिमुरकर जि. प. सदस्य 7066246989 , 9623370820 -\n179 सौ.दिपाली रविंद्र मेश्राम जि. प. सदस्य 8308415025 , 8308636269 -\n180 श्री.राजेश मारोतराव कांबळे जि. प. सदस्य 9422138522 , - -\n181 श्री.प्रविण सुर जि. प. सदस्य - , 9922930924 -\n182 श्री.मारोती वामन गायकवाड जि. प. सदस्य - , 9875649564 -\n183 श्री.यशवंत रामभाऊ वाघ जि. प. सदस्य - , 9422574349 -\n184 श्रीमती ज्योती विकास वाकडे जि. प. सदस्य 9657089806 , 9921836433 -\n185 श्रीमती विद्या संदिप किन्नाके जि. प. सदस्य 9822363691 , 8975177224 -\n186 श्रीमती सुनंदा शेषराव जिवतोडे जि. प. सदस्य 07172-223074 , 9763720341 -\n187 डॉ.आसावरी विजय देवतळे जि. प. सदस्य - , 9822946583 -\n188 श्री.रमाकांत श्रीधर लोधे जि. प. सदस्य - , 9422837835 -\n189 श्री.मानीक तुळशिराम घोडमारे जि. प. सदस्य - , 9545707849 -\n190 श्री.नागराज मुकुटराव गेडाम जि. प. सदस्य - , 9545707870 -\n191 श्रीमती रुपा विजय सुरपाम जि. प. सदस्य - , 7507519832 -\n192 श्री.राजु मारोती गायकवाड जि. प. सदस्य - , 9767987709 -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1293", "date_download": "2018-04-24T04:28:04Z", "digest": "sha1:QCF5ZMJR7EWKZCQPGMOQTCFBN4ITZQD2", "length": 2999, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nन्यू एक्सचेंज ट्रेडेड फंडच्या पर्यायी व्यवस्थेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीमध्ये न्यू एक्सचेंज ट्रेडेड फंडच्या पर्यायी व्यवस्थेला मान्यता देण्यात आली.\nयामध्ये एक्सचेंज ट्रेडेड फंड, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका, सूचीबद्ध सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था, विमा कंपन्या यांच्या निधीसंबंधी व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे.\nत्याचबरोबर निर्गुंतवणुकीविषयी निर्णय घेण्यासंबंधी व्यवस्था करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/bhavishya-news/astrology-13th-to-19th-april-1662152/", "date_download": "2018-04-24T04:38:31Z", "digest": "sha1:ENEA5QEJVZRBPRYDPOGVCAXPGTWAZW3S", "length": 23366, "nlines": 264, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Astrology 13th to 19th april | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nभविष्य : दि. १३ ते १९ एप्रिल २०१८\nभविष्य : दि. १३ ते १९ एप्रिल २०१८\nज्या गोष्टी तुम्ही बऱ्याच प्रयत्नानंतर मार्गी लावल्या होत्या, त्यामध्ये अचानक वेगळी कलाटणी मिळेल.\nमेष ज्या गोष्टी तुम्ही बऱ्याच प्रयत्नानंतर मार्गी लावल्या होत्या, त्यामध्ये अचानक वेगळी कलाटणी मिळेल. तुम्हाला वाकडी वाट करून पुढे जावे लागेल. व्यापारउद्योगात ठरविलेले काम पूर्ण करण्याकरिता बरीच मेहनत करावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी त्यांच्या सूचना बदलल्यामुळे तुम्हाला गोंधळात पडल्यासारखे होईल. घरामध्ये प्रत्येकाच्या गरजा समजून घेणे थोडेसे जड जाईल. सप्ताह धावपळीचा जाईल.\nवृषभ काही बदल असे असतात की, जे आपण प्रयत्न करूनही टाळू शकत नाही. या आठवडय़ामध्ये एखादा असा बदल स्वीकारावा लागेल. व्यापारउद्योगात काही दिलासा देणाऱ्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी सत्तेपुढे शहाणपण नसते हे लक्षात ठेवून वरिष्ठांचे मूड सांभाळा. नोकरीमध्ये बदल करण्यापूर्वी त्याचा साधकबाधक विचार करा. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचे तंत्र सांभाळावे लागेल. एखादा छोटा समारंभ ठरेल.\nमिथुन सरळ चाललेल्या कामामध्ये नवीन प्रयोग करून बघण्याची खुमखुमी येईल, पण त्यामुळे तुमचा तोटा होणार नाही याची खबरदारी घ्या. व्यापारउद्योगात तुमच्या कार्यपद्धतीमध्ये थोडेसे फेरफार करणे भाग पडेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अचानक वेगळ्या प्रकारचे काम तुम्हाला सांगतील. त्यामुळे तुमचे नियोजन तुम्हाला उपयोगी पडणार नाही. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींशी शक्यतो वादविवाद टाळावा.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nकर्क सभोवतालचे वातावरण जसे असते तसे तुम्ही तुमचे धोरण बदलता. या आठवडय़ात करियरमध्ये तुम्ही आधुनिक असाल तर घरामध्ये तुमची संस्कृती जपण्याचा प्रयत्न कराल. व्यापारउद्योगात कोणत्याही अडथळ्यांनी गांगरून न जाता तुम्ही हाती घ्याल ते तडीस न्याल. पशाची आवक वाढेल. नोकरीच्या ठिकाणी संस्थेच्या धोरणामध्ये काही मोठे बदल होण्याचे संकेत दिसू लागतील. घरामध्ये इतरांना तुमचा आधार वाटेल.\nसिंह एखादी गोष्ट मिळविण्याकरिता या आठवडय़ात तुम्ही वेडावाकडा निर्णय घ्याल, त्यामुळे थोडासा धोका संभवतो. व्यापारउद्योगात सभोवतालच्या व्यक्तींचा मतलब समजल्याशिवाय तुमचे विचार व्यक्त करू नका. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी फटकून वागलात तर त्याचा पुढे त्रास होईल. ठरविलेली कामे तुम्ही वेळेत पूर्ण कराल. घरामध्ये दोन पिढय़ांतील तफावत जाणवेल. मुलांच्या उपद्व्यापाकडे लक्ष देणे भाग पडेल.\nकन्या काही बदल असे असतात जे आपल्याला बिलकूल नको असतात, अशा वेळेला जास्त विचार न करता ‘कालाय तस्म नम:’ असे म्हणून पुढे जाणे योग्य ठरेल. व्यापारउद्योगात बाजारातील चढ-उतारांचा अभ्यास केल्यानंतर तुमचे ठरविलेले बेत थोडे फार बदलावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे मूड बदलत राहतील. त्यानुसार काम करणे कठीण होईल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या विचित्र वागणुकीला तोंड द्यावे लागेल.\nतूळ या आठवडय़ात काही नवीन बदलांची नांदी होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये तुमचा पवित्रा सावध ठेवा. व्यापारउद्योगात स्पर्धकांच्या हालचालींकडे लक्ष असू द्या. जे पसे मिळतील ते हातात राखून ठेवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे मूड सांभाळावे लागतील. आपण केलेल्या कामाचे काहीच महत्त्व नाही असे वाटेल. घरामधे प्रत्येकाची मोट बांधणे थोडेसे कठीण होईल. एखादा कार्यक्रम निश्चित होण्यापूर्वी त्यावर उलटसुलट चर्चा होईल\nवृश्चिक एखाद्या घटनेमुळे किंवा कारणांमुळे या आठवडय़ात तुमचे ठरलेले बेत अचानक रद्द करावे लागतील. त्यामुळे पर्यायी योजनेचा विचार करून ठेवा. व्यापारउद्योगात पूर्वी जे खर्च तुम्ही टाळण्याचा प्रयत्न केला होता ते आता अनिवार्य होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे मूड बदलत राहिल्याने तुमची तारांबळ उडेल. घरामध्ये छोटय़ा कारणावरून तुमचा रागाचा पारा वर जाईल. रक्तदाब, हृदयविकार असेल तर अतिश्रम टाळा.\nधनू माणूस अनुभवाने शहाणा होतो. जे अनुभव तुम्हाला नुकतेच आले होते त्यावरून निष्कर्ष काढा. कदाचित त्याकरिता तुम्हाला तुमची वागण्या-बोलण्याची पद्धत बदलावी लागेल. व्यापारउद्योगात स्पध्रेला तोंड देण्यासाठी नवीन व्यक्तींशी हातमिळवणी करण्यापूर्वी त्याच्यासंबंधी नीट माहिती मिळवा. नोकरीमध्ये स्वत:ची पात्रता वाढविण्याकरिता एखादे नवीन प्रशिक्षण घ्यावे लागेल. नवीन भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या.\nमकर तुम्हाला कामाचा थोडासा कंटाळा आला असेल. आपले कर्तव्य करायचे, पण ते आरामात करायचे असे तुम्ही ठरवाल. पण अचानक घडणाऱ्या घटनांमुळे तुम्हाला तुमचा बेत रद्द करावा लागेल. व्यापारउद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता जे नियोजन केलेले होते त्यामध्ये फेरफार करावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा मूड बदलल्यामुळे तुम्हाला त्यांच्या तालावर नाचावे लागेल. घरामध्ये आपुलकीची व्यक्ती हजेरी लावेल.\nकुंभ या आठवडय़ात तुम्ही किती काम करता याला महत्त्व नसून समोरच्या व्यक्तीकडून तुम्ही काम कसे करून घेता हे महत्त्वाचे. व्यापारउद्योगात एखादा विचित्र अनुभव येईल. त्यामुळे कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आधी ठरलेले बेत बदलतील त्यामुळे तुमचा गोंधळ उडेल. घरामधल्या मोठय़ा व्यक्तींशी एखाद्या प्रश्नावरून तात्त्विक मतभेद होतील. अशा वेळी त्यांचे मत शांतपणे ऐकून घ्या.\nमीन दोन वेगवेगळ्या आघाडीवर दोन वेगळे अनुभव देणारा आठवडा आहे. घरामध्ये एखादा विचित्र अनुभव येईल. तर करियरमध्ये तुम्ही कोणतेही काम धाडसाने पूर्ण कराल. व्यापारउद्योगात पशासंबंधी निर्णय घेताना त्याचा किती फायदा होईल याचे गणित कागदावर मांडून बघा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नका.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाणार प्रकल्प विदर्भात आणा: भाजपा आमदाराची मागणी\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपी विशाल कोतकरला अटक\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vedashri.blogspot.com/2006/10/", "date_download": "2018-04-24T04:40:01Z", "digest": "sha1:ZJRJMP3MSOYWUNY6UG7GQ4GYTUAQWCC7", "length": 17223, "nlines": 48, "source_domain": "vedashri.blogspot.com", "title": "वेदश्री: October 2006", "raw_content": "\nसोमवार, ९ ऑक्टोबर, २००६\nपारख मनांची - १\n१२ ऑक्टोबर २००५, दसऱ्याचा दिवस. आदल्या दिवशीच्या १ पर्यंत चाललेल्या दांडियाने जब्बरी थकलेलो सगळेजणं. सगळेजणं म्हणजे मी आणि माझ्या रुपा ( रूम पार्टनर ) प्रिताश्री, रत्तिका आणि विनया. तिघीही दाक्षिणात्य पण वेगवेगळ्या प्रांतातल्या आणि एक कंपनी हाच काय तो आम्हाला जोडणारा दुवा. आम्ही सगळ्याच बोलक्या असल्याने गट्टी जमायला अजिबातच वेळ लागला नव्हता. प्रिताकडून मी तमिळ शिकत होते आणि विनयाकडून तिचं तमिळ टोनमधलं मराठी समजून घ्यायचा प्रयत्न करत होते तर रत्तिका माझ्याकडून हिंदी शिकायचा प्रयत्न करत होती. रत्तिका रोज म्हणायची की मलाही यायचंय बॅडमिंटन खेळायला पण ८ - ८:३० ला उठत असल्याने मी आणि प्रिताच जायचो सकाळी बॅडमिंटन खेळायला जवळच्या कोर्टवर. तिथेच विनयची ओळख झाली. एरवी त्याला कंपनीच्या बसमध्ये पाहिलेलं पण खरी ओळख झाली बॅडमिंटनच्या प्रांगणात. तो निघायच्या वेळेस अखिलेश जॉगिंग करून आलेला असायचा, त्यामुळे त्याच्याशीही जुजबी ओळख झाली होती. नवरात्रीचे नऊ दिवस आम्ही सगळेच आमच्या परीसरात असलेल्या एका ठिकाणी गरबा - दांडिया खेळायला जायचो. या सर्व दाक्षिणात्यांना हा नाचाचा प्रकार अगदीच नवखा असल्याने त्यांना मी स्टेप्स शिकवल्या. नवव्या दिवशी विनयसोबत एक नविन मुलगा आला होता, त्याचं नाव नितिन. ओ की ठो येत नव्हतं त्याला नाचता तरीही इतरांचं बघत बघत आणि तसं नाचायचा प्रयत्न करत थोड्याच वेळात तोही छान नाचायला लागला. बरेच जणं थकत गेले तसे तसे बाजुला ओत गेले. मी, प्रिता, विनय आणि नितिन फुल्टू गुंग झालो होतो नाचण्यात, संगीत भिनलं होतं नसानसात जणु काही. समोर कोणी आहे, नाही आहे याचं भानच नव्हतं उरलेलं मला. मी पूर्ण त्या संगिताच्या तालावर धुंद होऊन नाचत होते. एक-दीडच्या दरम्यान संगित थांबलं, तेव्हा कुठे मी भानावर आले. घामाने पूर्ण चिंब झाले होते, पण एक अलौकीक आनंद चेहऱ्यावर झळकला होता माझ्या.\nदसऱ्याचा रविवार असूनदेखील घरात स्वस्थ कोण बसायला. मला झोप येत असूनही\n\"वेधा, प्लिज कम ना यार. यू आर मराठी, सो यू कॅन बार्गेन व्हेरी वेल अँड हेल्प अस टू सी द प्लेसेस..\" वगैरे रत्तिकाच्या मखलाशीला भुलून मी मार कौतुकाने तयार झाले. मी, रत्तिका, प्रिताश्री, नितिन, विनय, अखिलेश असा आमचा कंपू दुकानं दरदर हिंडायच्या चढाईवर जाण्यास सज्ज झाला. रत्तिका आणि प्रिताश्री माझ्या रुपा तर विनय आणि नितीन आमचे बॅडमिंटन मधले प्रतिस्पर्धी आणि अखिलेश त्यांचा आणि रत्तिकाचा मित्र. बसने जायचं की लोकलने यावर थोडीशी चर्चा झाली आणि कौल लोकलला मिळाला. मी थोडीशी नाराजच झाले या निर्णयाने कारण मला स्वतःला ऍक्सलरेटर विशेषतः ब्रेक्स माझ्या हातात नसलेल्या वाहनात बसायचं म्हणजे धडकी भरते. रिक्षा, बस वगैरेंची सवय झालेली असल्याने भीती किंचित कमी झालेली असली तरी मनात कुठेतरी 'जलतुजलातु..' जप चालूच असतो म्हणायला हरकत नाही. तरी मी भीड भिकेची बहिण बनले आणि लोकलने जायला तयार झाले. विनयने सगळ्यांची तिकिटं ( लोकलची ) काढली आणि प्लॅटफॉर्मकडे आम्ही निघालो. एक लोकल लागलेलीच होती तिथे.\n\"वो अपनीही लोकल है.. पकडो.. भागो..\" असं अखिलेश ओरडल्याने आम्ही सगळे पळायला लागलो. मी, अखिलेश आणि विनय त्या भरगच्च भरलेल्या डब्यात चढलो लोकलच्या. प्रिता आणि रती चढणारच होत्या पण प्रिताच्या मोबाईलवर कॉल आल्याने ती बोलण्यात गुंग झाल्याने चढलीच नाही आणि तिचा हात पकडलेला असल्याने रतीही चढली नाही. सगळेजणं पुढच्या लोकलने सोबत जाऊ असं म्हणत विनय खाली उतरला, तेव्हा लोकल हलकेहलके सुरू झाली होती. मला आधीच भीती वाटायची त्यात हे काय होतं आहे कळायला मार्गच नव्हता, तेवढ्यात अखिलेशनेही 'वेधा, कुदो लोकलसे.. जल्दी.. ' असं ओरडत माझा हात धरला आणि खसकन ओढून स्वतः उडी मारली. मी 'नहीं..' म्हणत माझा हात सोडवून घेतला आणि लोकलमध्येच रहायचा प्रयत्न केला पण या सगळ्यातून बसलेल्या हिसक्याने माझा हँडलला पकडलेला दुसरा हात निसटला आणि मागून रेटा चाललेलाच असल्याने मी लोकलच्या बाहेर फेकले गेले. काही कळायच्या आत मी प्लॅटफॉर्मवर पडले होते आणि कसा वळून कोण जाणे डाव्या पायाचा खालचा भाग मुडपला होता. दोन मिनिट मला काही कळलंच नाही काय झालंय ते. लक्षात आलं तेव्हा माझ्यासोबतचे सगळेजणं धावत आलेले दिसले, अखिलेश आणि रत्तिका सगळ्यात मागे होते तर प्रिता, नितीन पुढे. मला त्यावेळेस काहीच कळ वगैरे जाणवत नव्हती, वाटलं की काही नाही तोल सावरता न आल्याने पडले इतकंच असेल. सत्य परिस्थितीची थोडीशी कल्पना तेव्हा आली जेव्हा प्रिताच्या आधाराने मी उठायचा प्रयत्न केला. सण्णकन् एक कळ शिरशिरत डोक्यात गेली आणि पायोबांनी पुकारलेला सत्याग्रह लक्षात आला. तरीही थोड्यावेळाने प्रिताच्या मदतीने उठले आणि लंगडत लंगडत तिथल्याच एका बसण्याच्या जागेसदृश एका जागेवर जाऊन बसले. नितीनने पाण्याची बाटली आणली होती तोवर. प्रिता आणि विनय विचारत होते की कुठे दुखतं आहे वगैरे.. प्रिता तर जाम चिडली होती माझ्यावर असा पराक्रम केल्याबद्दल. रत्तिका अखिलेशला म्हणत होती,\"ओऽऽह यार.. व्हॉट द हेल्ल इज धिस.. नाउ आय डोंट थिंक वुई कुड गो फॉर शॉपिंग.. आय हॅड टू गेट अ ड्रेस टूडे यार.. व्हाय पिपल मेक सच नॉनसेन्स आय जस्ट कांट इमॅजिन.. \" वगैरे वगैरे. पाय दुखत असल्याने वाटलं नसेल इतकं खोलवर दुखले मला तिचे ते शब्द. यावर मी प्रिताकडे नुसतं बघितलं तर तिने फक्त डोळे थोडावेळ बंद करून उघडले. माझ्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. नितीनने पाणी प्यायला दिलं आणि म्हणाला,\"वेदश्री, तुम चल पाओगी क्या अभी यहा अच्छा हॉस्पिटल नहीं है.. हम वाशीमे जाएंगे तो वहा एक हॉस्पिटल मुझे पता है..\"या त्याच्या म्हणण्यामुळे मी पुढच्या ट्रेनमध्ये बसून त्यांच्यासोबत वाशीला गेले. अखिलेश मध्येच एका कुठल्याशा स्टेशनला उतरून गेला. नितिनला माहित असलेलं ते हॉस्पिटल रविवारी बंद असल्याने खूप वाईट परिस्थिती झाली माझी. मध्ये मला आणि प्रिताला एके ठिकाणी बसवून नितिन जवळपास कुठे आणखी कुठला दवाखाना आहे का बघायला गेला आणि विनयला घेऊन रत्तिका शॉपिंगला जाऊन आली. नितिनला हॉस्पिटल कुठलं सापडलं नाही, खूप उतरलेल्या चेहऱ्याने तो परत आला. मी दादाला फोन केला मग आणि ,\"दादा, माझ्या एका मैत्रिणीला पायाला लागलं ती लोकलमधून पडल्याने, काही औषध सांग ना पटकन फरक पडेल असा. तिला अजिबात चालता येईना झालं आहे..\"\n\"तिकडेसुद्धा धडपडाट करायची सुरूवात झाली का तुझी\nमाझ्या आवाजातली वेदना दादाने अचूक ओळखली, यातून तो मला किती बरोब्बर ओळखतो याची खात्री पटली. त्याच्या रागवण्यामागचं प्रेम कळल्याने त्याही अवस्थेत मला सॉल्लिड आनंद झाला.\n\"दादा, आईबाबांना सांगू नकोस पण बरं का..\"\n\"नाही.\" म्हणून त्याने गोळीचं नाव सांगून कशी घ्यायची तेही सांगितलं. लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा सांगत वरचेवर फोन करून परिस्थिती कशी आहे ते कळवत रहायची तंबी दिली. गोळीचं नाव नितीनला सांगितल्यावर तो अख्खी स्ट्रिपच घेऊन आला. आवश्यक सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये, ( जे आमच्या रूमच्या जवळच होतं ) पोहोचायला रात्रीचे १० वाजले ) पोहोचायला रात्रीचे १० वाजले तोवर माझा पाय टम्म फुगला होता आणि अजिबात हात लाऊ देईना झाला होता. तो जमिनीवर टेकवणं पूर्णच अवघड झालं होतं मला. या सगळ्याच्या दुःखाऐवजी, \"डेली लेट नाईट यू वेअर डांसिंग इन दॅट दांडिया.. नाऊ टूडे यू कांट गो.. सो बिकॉज ऑफ धिस गॅप, यू कांट गेट द प्राईज ..\" या रत्तिकाच्या टोचणीने कुरतडली गेलेली माझी मानसिक जखम जास्त दुखत होती.\nलेखिका : वेदश्री ४ टिप्पण्या:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nकृपया आम्हाला जगू द्या...\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5338763394168550107&title=Mersal%20GST&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-24T04:56:40Z", "digest": "sha1:NKYLX6F5MQBGZI7CEQ2KIPASWEFRUAAJ", "length": 18385, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘जीएसटी’पलीकडचा ‘मेर्सल’", "raw_content": "\n‘मेर्सल’च्या एकूण आशयामध्ये एक शतांशही नसलेल्या ‘जीएसटी’बद्दलच्या किरकोळ संवादावरून वादळ उठले आणि सगळा विषय भरकटत गेला. ‘मेर्सल’चे आंधळे समर्थन करणाऱ्यांनी आणि आंधळा विरोध करणाऱ्यांनी त्यात काय दाखवलेय हे पाहिले तरी आहे का पाहिले असते तर त्यात स्तुती करण्यासारखे त्यांना बरेच काही दिसले असते.\nऐन दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘मेर्सल’ या चित्रपटाने गेले दोन आठवडे बातम्यांची बरीच जागा अडविली आहे. मेर्सल या तमिळ शब्दाचा अर्थ आहे धक्का, खळबळ, झटका वगैरे. नावाप्रमाणेच या चित्रपटाने खळबळ माजविली हे नक्की. सुपरस्टार विजय याची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.\nआतापर्यंत पोंगल किंवा दिवाळीच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याची प्रथा विजयने पाळली आहे. दोन वर्षांपूर्वी ‘कथ्थि’ आणि गेल्या वर्षी ‘तेरी’ या चित्रपटानंतर ‘मेर्सल’ने ही परंपरा पुढे नेली आहे. सणासुदीच्या निमित्ताने प्रेक्षकांना आकर्षित करायचे आणि जमेल तेवढा गल्ला जमवायचा, ही विजय किंवा त्याच्या निर्माता-दिग्दर्शकांची खुबी. आतापर्यंत ही भट्टी जमून आली. यंदा त्या भट्टीला तडका मिळाला तो वस्तू व सेवा कराबाबतच्या (जीएसटी) संवादाने.\nया संवादावर तमिळनाडूतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भावना दुखावल्या म्हणे आणि त्यांनी त्यावर आक्षेप घेतला. यात विजयच्या तोंडी असलेल्या ‘जीएसटी’बाबतच्या संवादात चूक आहे म्हणून हा संवाद काढून टाकावा, अशी मागणी लगेच भाजप नेत्यांनी केली. राज्य भाजपच्या अध्यक्षा तमिळिसै सौंदरराजन आणि राष्ट्रीय चिटणीस एच. राजा यांनी हा संवाद काढून टाकण्याची मागणी केली. आता त्यांनी विरोध केला म्हणजे जे काय पडद्यावर दिसेल ते चांगले आणि योग्यच असेल, असा विश्वास उरी बाळगून विरोधकांनी चित्रपटाची (आणि विजयची) पाठराखण केली. झाले, बघता-बघता एक साधा मारधाडपट राजकीय स्टंट बनला आणि त्याचा बंपर फायदा ‘मेर्सल’ला झाला.\nआता यातली गंमत पाहा. ‘जीएसटी’ला विरोध करणारा संवाद चित्रपटात आहे म्हणून प्रेक्षकांनी ‘मेर्सल’ला गर्दी करायची. अन् त्यांच्या तिकिटातून मिळालेल्या रकमेवरच जीएसटी मिळणार आणि सरकारची तिजोरी भरणार पण विरोधा-विरोधाच्या खेळात अशा तपशीलांकडे आणि विसंगतीकडे कोण पाहणार पण विरोधा-विरोधाच्या खेळात अशा तपशीलांकडे आणि विसंगतीकडे कोण पाहणार फार कशाला, नायकाच्या रूपाने विजयच्या तोंडी देशातील वैद्यकीय सेवा व्यवसायावर बरेच भाष्य आले आहे. या टिप्पणीमुळे आमचा अपमान झाला आहे, असा निषेधाचा सूर सरकारी डॉक्टरांनीही काढला होता. परंतु भाजपच्या तुतारीपुढे त्या पिपाणीचे काही चालले नाही अन् तो विषय तिथेच थांबला.\nजाऊ दे, प्रश्न तो नाही. प्रश्न हा आहे, की ‘मेर्सल’चे आंधळे समर्थन करणाऱ्यांनी आणि आंधळा विरोध करणाऱ्यांनी त्यात काय दाखवलेय हे पाहिले तरी आहे का पाहिले असते तर त्यात स्तुती करण्यासारखे त्यांना बरेच काही दिसले असते. सर्वांत आधी चित्रपटाचा नायक विजय याच्याबद्दल. तमिळ चित्रपटसृष्टीत विजय याला आतापर्यंत इळैय दळपती (तरुण नेता) म्हणून ओळखले जात होते. या चित्रपटातून त्याला दळपती (नेता) पदापर्यंत बढती मिळाली आहे. (तमिळनाडूत दळपती हे द्रमुक पक्षाचे नेते एम. के. स्टॅलिन यांचे नामाभिधान आहे; मात्र त्यांनी यावर काही आक्षेप घेतलेला नाही, हे सुदैवच). या चित्रपटाला ए. आर. रेहमानने संगीत दिले आहे. हिंदीतील ‘अंधा कानून’ आणि’ गिरफ्तार’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक चंद्रशेखर यांचा विजय हा मुलगा. अॅटली या दिग्दर्शकाने हा चित्रपट बनविला असून, सामाजिक मुद्द्यांवर चित्रपट काढण्याबाबत त्याची ख्याती आहे. चित्रपटासाठी १३० कोटी रुपये खर्च आला आहे; मात्र आतापर्यंत २०० कोटी रुपयांच्या जवळपास कमाई करून त्याने सगळी गुंतवणूक वसूल केली आहे. यात अर्थातच डिजिटल इंडिया आणि ‘जीएसटी’च्या वादाचा मोठा वाटा आहे. आता हाच चित्रपट तेलुगूमध्ये ‘अदिरिंदि’ या नावाने येत आहे आणि त्यातूनही भरघोस कमाई होण्याची शक्यता आहे.\nअन् गंमत इथेच सुरू होते. ‘मेर्सल’मध्ये अथपासून इतिपर्यंत तमिळ भाषा व तमिळ संस्कृतीचे गुणगान आहे. पहिल्याच प्रसंगात वेष्टी (लुंगी) आणि खादीच्या सदऱ्यावर जाणाऱ्या नायकाची पॅरिसच्या विमानतळावर झडती घेण्यात येते. त्या वेळी ‘कपड्यांवरून आणि रंगावरून कोणाची किंमत ठरवू नये,’ असा सल्ला हा डॉक्टर नायक अधिकाऱ्यांना देतो. नंतर एका पुरस्कार सोहळ्यात आंतरराष्ट्रीय समुदायापुढे तो तमिळ भाषेतच बोलतो. ‘जगातील सर्वांत जुन्या आणि सर्व भाषांची जननी असलेल्या माझ्या मातृभाषेतच मी बोलणार,’ असा निश्चय तो व्यक्त करतो.\n‘मेर्सल’मध्ये विजयची तिहेरी भूमिका असून, तिसऱ्या पात्राचा प्रवेश पंजाबमधील प्रसंगात होतो. अलीकडच्या बहुतेक सर्व व्यावसायिक तमिळ चित्रपटांचे हे लक्षण बनले आहे. तमिळ भाषेत तयार होत असले, तरी त्यांची कथा तमिळनाडूबाहेर किंवा कधी-कधी देशाबाहेरही घडते. सूर्याचा ‘अंजान’ मुंबईत घडतो, अजितचा ‘वेदाळम’ कोलकात्यात घडतो. खुद्द विजयचा ‘तुप्पाक्कि’ (हिंदीतील अक्षयकुमार अभिनित ‘हॉलिडे’) आणि ‘तलैवा’ हे चित्रपट तमिळनाडूचा अवाक्षरानेही संदर्भ न येता ऑस्ट्रेलिया व मुंबईत घडतात. ‘मेर्सल’चा मुख्य नायक वेट्रिमारन पंजाबमध्ये कुस्ती लढतो आणि पंजाबी मल्लाला हरवितो. त्यानंतर तो गाणे म्हणतो ते म्हणजे ‘आळपोरान तमिळन’ (राज्य करणार तमिळ व्यक्ती). तमिळनाडूत परत येऊन तो जल्लिकट्टू खेळतो.\nत्यानंतर त्याच्या मुलाला तो कसा जन्मला, याची कथा सांगताना वेट्रिमारन त्याला या पंजाबी लोकांच्या उदारतेची कथा सांगतो. (त्याची पत्नीही पंजाबी दाखवली आहे). कुठलाही ठावठिकाणा माहीत नसताना त्या लोकांनी मदत केली, म्हणूनच तुझा जन्म झाला असे त्याला सांगतो. याचा अर्थ गैर-तमिळांविरुद्ध द्वेष न पसरवता तमिळनाडूची भलामण त्यातून करण्यात आली आहे. ‘तुप्पाक्कि’मध्ये नायकाच्या (विजय) तोंडी देशभक्तिपर संवाद होते; पण त्यात तमिळवादाचा लवलेशही नव्हता. येथे तो आहे; मात्र त्याचा एकूण भारतीयतेवर परिणाम होत नाही, हीच त्याची खुबी आहे. जयललिता यांच्या निधनानंतर तमिळनाडूत राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून काही जणांनी याकडे पाहिले, तर नवल नाही.\n...पण ‘मेर्सल’च्या एकूण आशयामध्ये एक शतांशही नसलेल्या किरकोळ संवादावरून वादळ उठते काय आणि सगळा विषय भरकटत जातो काय अलीकडच्या प्रथेप्रमाणे लवकरच हा चित्रपट हिंदीत डब होऊन वाहिन्यांवर येईलही, तेव्हा तरी हे पैलू चित्रपटात शाबूत राहावेत, हीच इच्छा.\n(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)\nशपथ न घालता वाजणारा ‘डीजे’ चिरतरुण ढोंगबाजीचा विजय असो तमिळनाडू पुन्हा १९६५कडे देवा तूचि ‘गाणे’शु असं आपण केव्हा करणार\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n..आणि मी निद्रेच्या आधीन झालो..\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\nस्वानंद समुद्र यांना मानाचा ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅवॉर्ड’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2014/03/31/%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC/", "date_download": "2018-04-24T04:47:33Z", "digest": "sha1:OMOKLGIS4Y2H7NVVQUNQCY3D46TNLFLW", "length": 25664, "nlines": 478, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "कडू चवीचे गोड औषध कडुनिंब | Abstract India", "raw_content": "\nकडू चवीचे गोड औषध कडुनिंब\n– डॉ. श्री बालाजी तांबे\nकेवळ गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची चटणी खायची असे नसून, वर्षाच्या सुरवातीला महत्त्वाच्या गोष्टीची आठवण राहावी अशा हिशेबाने कडुनिंबाची चटणी खायला सुचविलेली आहे. कडुनिंबाच्या झाडाची सावली हीसुद्धा शीतल असते. कडुनिंबाच्या झाडाच्या वातावरणात अंगावर उठणारी खाज, त्वचाविकार वगैरे विकारांवर आराम मिळू शकतो. कडुनिंबाच्या सालीचा व फुलांचाही खूप उपयोग होतो.\nक डुनिंबाचा वृक्ष हा जणू कल्पवृक्षच आहे. या झाडाच्या पानांची, फळांची, फुलांची चव कडू असली तरी त्याचा उपयोग अत्यंत गोड म्हणजे कल्याणकारी असतो. आरोग्याच्या बाबतीत तर कडुनिंबाला तोड नाही. कडुनिंबाच्याच अंगाखांद्यावर खेळणारी वनस्पती म्हणजे गुळवेल. गुळवेलही अत्यंत कडू असते, परंतु वर्षाच्या सुरवातीला येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी गुळवेलीची आठवण न येता कडुनिंबाची आठवण येण्याचे कारण म्हणजे या ऋतूत गुळवेलीवर पाने नसतात, तर नुसतेच झाडाला लपेटलेले खोड दिसते. कडुनिंबाचेच अपत्य असल्यासारखी गुळवेल ही सर्वोत्तम मानली जाते आणि तिला “अमृता’ असेही म्हटले जाते. ज्या कडुनिंबाने गुळवेलीला वाढवले, पोसले तो कडुनिंबही अमृतासमान नसला तरच नवल. दत्तक दिलेली ही गुळवेल एखाद्या दुसऱ्या झाडावर पोसली गेली तर ती तेवढी गुणकारी ठरत नाही. उन्हाळा भरपूर आहे अशा ठिकाणी आणि ज्या ठिकाणी जमिनीत पाणी थांबून राहत नाही अशा ठिकाणी कडुनिंबाची झाडे विपुल प्रमाणात दिसतात व त्या मर्यादेत अशा ठिकाणी गुळवेलही अधिक प्रमाणात असल्याचे दिसते. आयुष्यात जर मधुररसाची प्राप्ती हवी असेल तर वर वर कडू वाटणाऱ्या या दोन वनस्पतींची मदत घेतल्याशिवाय काम भागणार नाही.\nम्हणून वर्षांच्या पहिल्याच दिवशी कडुनिंबाची आठवण होते. याचा वृक्ष छान मोठा डेरेदार असतो. “चंदामामा चंदामामा भागलास का, निंबोळीच्या झाडामागे लपलास का’ हे गीत प्रत्येकाने लहानपणी अनेकदा ऐकलेले असते. निंबोळ्या छान पिवळ्याधमक व आकर्षक असतात. त्या कडू असल्या तरी मनुष्यमात्राच्या उपयोगी ठरणाऱ्या असतात.\nबहुउपयोगी कडुनिंब सुंठ व आल्याच्या उपयोगाने जसे वेगवेगळ्या प्रकारचे रोग बरे होऊ शकतात, तसेच अनेक रोग कडुनिंबानेही बरे होऊ शकतात. कडुनिंब वीर्याने शीतल असतो, तो कफदोष व पित्तदोषाचे शमन करतो व अग्नीला म्हणजेच हॉर्मोनल सिस्टिमला उपयुक्‍त असतो. खोकला, ताप, तोंडाला चव नसणे, जंत, त्वचारोग अशा अनेक विकारांमध्ये उपयोगी असणारा हा वृक्ष.\nभारतात कडुनिंब सर्वत्र उगवलेला दिसतो, पण अति पाऊस असलेल्या ठिकाणी व जमिनीत पाणी थांबत असलेल्या ठिकाणी कडुनिंब उगवणे व जगवणे अवघड असते. कडुनिंबाच्या लाकडाला तर कीड लागत नाहीच, पण तो जंतावर औषध म्हणूनही मदत करतो. कडुनिंबाचे झाड पर्यावरणाची शुद्धी करून घरात जंतुसंसर्ग थांबविण्यासाठी मदत करते. कडुनिंबाची पाने अंथरुणावर पसरून त्यावर चादर घालून झोपणे उत्तम असते. कडुनिंबाच्या पानांचा काढा स्नानाच्या पाण्यात टाकून स्नान करणे चांगले असते.\nएकूणच, कडुनिंबाचे महत्त्व कल्पवृक्षासमान असल्यामुळे वर्षाच्या सुरवातीच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी याच्या पानांची चटणी सेवन करून जणू कडुनिंबाचा सत्कार केला जातो. कडुनिंबाच्या पानांत सैंधव, मिरी, जिरे, ओवा, हिंग, चिंच व गूळ घालून चटणी केली जाते. कडुनिंबाचा रस घेण्याऐवजी या प्रकारे चटणी करून घेणे अधिक चांगले असते. ही चटणी चैत्र, वैशाख या दोन महिन्यांत रोज खाल्ली तर वर्षभर लाभ होऊ शकतो.\nशीतल सावली मधुमेह असणाऱ्यांनी हे दोन महिने रोज कडुनिंबाच्या पानांची चटणी खावी. यानंतर गुळवेलीच्या वेलाची बोटाएवढ्या जाडीची व बोटभर लांबीची कांडी जराशी चुरून रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी सेवन करावे (दोन-तीन दिवस परत परत तीच कांडी वापरता येते). हा प्रयोग दोन-तीन महिने केल्यास मधुमेहावर उपचार होतो का याचा अंदाज घेता येतो. अंतःस्रावी ग्रंथीचा त्रास असणाऱ्यांनाही हा प्रयोग करायला हरकत नाही. प्रतिकारशक्‍ती कमी असणाऱ्यांनी किंवा ज्यांच्या शरीरात पांढऱ्या व लाल पेशींचे गणित चुकते आहे, त्यांनीही हा प्रयोग करायला हरकत नसावी.\nभारतासारख्या देशात पोटात जंत होण्याचे प्रमाण खूप असते, त्यांनाही कडुनिंबाच्या चटणीची दोन महिने योजना केल्यावर फायदा व्हावा. कडुनिंबाच्या झाडाची सावली हीसुद्धा शीतल असते. कडुनिंबाच्या झाडाच्या वातावरणात अंगावर उठणारी खाज, त्वचाविकार वगैरे विकारांवर आराम मिळू शकतो. कडुनिंबाच्या सालीचा व फुलांचाही खूप उपयोग होतो. कडवट वाटल्या तरी आम्ही लहानपणी निंबोळ्या खात असू.\nअशा प्रकारे एकूणच कडुनिंबाचे महत्त्व सर्व वनस्पतींमध्ये खूप वरच्या स्थानावर दिसून येते. रोज कडुनिंबाची चटणी खाणे जमले नाही, तर कडुनिंबाची पाने व आवळकाठीचे चूर्ण यांचे मिश्रण रोज पाण्याबरोबर घ्यायला हरकत नाही. यामुळेही त्वचारोग, अंगावर खाज सुटणे वगैरेंत उपयोग होऊ शकेल. केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची चटणी खायची असे नसून, वर्षाच्या सुरवातीला महत्त्वाच्या गोष्टीची आठवण राहावी अशा हिशेबाने कडुनिंबाची चटणी खायला सुचविलेली आहे. हे लक्षात घेऊन आपण कडुनिंबाचा उपयोग आपले आयुष्य निरामय व सुखी करण्यासाठी करून घेता येईल.\nfrom → कल्पवृक्ष, गुढीपाडव, गूळ, त्वचाविकार, पित्त, प्रतिपदा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5398419113440413334&title=Accreditation%20To%20B.%20Farm.%20Degree&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-24T05:03:51Z", "digest": "sha1:AGEZIVLCIDLJU4SOCNGWJNGVCYIY2LHO", "length": 6579, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘अल्लाना’च्या बीफार्म अभ्यासक्रमास अधिस्वीकृती", "raw_content": "\n‘अल्लाना’च्या बीफार्म अभ्यासक्रमास अधिस्वीकृती\nपुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी संचलित अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीच्या बीफार्म अभ्यासक्रमास ‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडिटेशन’ (नवी दिल्ली) यांच्याकडून अधिस्वीकृती (अॅक्रीडिटेशन) मिळाली आहे. ही अधिस्वीकृती तीन वर्षांसाठी आहे.\nयानिमित्त आझम कॅम्पस येथे कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आय.पी.ए. कम्युनिटी फार्मसी डिव्हिजनचे अध्यक्ष डॉ. एम. डी. बुरांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम डॉ. ए. आर. शेख असेम्ब्ली हॉल मध्ये झाला.\nएमसीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. प्रवीण चौधरी, डॉ. सोहन चितलांगे, डॉ. साधना शाही हे मान्यवर उपस्थित होते.\nमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दिलनवाझ पठाण यांनी आभार मानले. या वेळी विद्यार्थी, प्राध्यापक, पालक उपस्थित होते.\nसमीर मुजावरचे यश मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन ‘रंगूनवाला’मध्ये माजी विद्यार्थी मेळावा ‘एमसीई’च्या महाविद्यालयांतर्फे रक्तदान, नेत्र तपासणी शिबीर ‘बुक रिव्ह्यू’ स्पर्धेस चांगला प्रतिसाद\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\n..आणि मी निद्रेच्या आधीन झालो..\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\nस्वानंद समुद्र यांना मानाचा ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅवॉर्ड’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2018-04-24T04:23:27Z", "digest": "sha1:KXVKTU2LRQCP6SY56V3OUQHEKZPXA6SQ", "length": 32042, "nlines": 257, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\n(पुणे विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nयः क्रियावान् स पण्डितः\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठ आहे.\nमराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.\n४६ शैक्षणिक विभाग आहेत.\nसुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या आहे.\n२ पुणे विद्यापीठाचे कुलगुरू\n६ विभाग आणि संशोधन केंद्रे\n८ संदर्भ आणि नोंदी\nपुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. इ.स. १९६२ मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. इ.स. १९९० मध्ये धुळे व जळगाव यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.\nबॅ. डॉ. मुकुंद रामराव जयकर (इ.स. १९४८ ते १९५६)\nरँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे (१९५६ ते १९५९)\nप्राचार्य दत्तात्रेय गोपाळ कर्वे (१९५९ ते १९६१)\nमहामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार (१९६१ ते १९६४)\nन.वि. गाडगीळ (१९६४ ते १९६६)\nडॉ. धनंजयराव गाडगीळ (१९६६ ते १९६७)\nह.वि. पाटसकर (१९६७ ते १९७०)\nडॉ. बा.पां आपटे (१९७० ते १९७२)\nप्राचार्य डॉ. ग.स. महाजनी (१९७२ ते १९७५)\nप्राचार्य देवदत्त दाभोळकर (१९७५ ते १९७८)\nडॉ. राम ताकवले (१९७८ ते १९८४)\nडॉ. वि.ग. भिडे (१९८४ ते १९८९)\nडॉ. श्रीधर चंद्रशेखर गुप्ते (१९८९ ते १९९५)\nडॉ. वसंत गोवारीकर (१९९५ ते १९९८)\nडॉ. अरुण निगवेकर (१९९८ ते २०००)\nडॉ. अशोक कोळस्कर (२००१ ते २००६)\nडॉ. नरेंद्र जाधव (२००६ ते २००९)\nडॉ. रघुनाथ शेवगावकर (२०१० ते २०११)\nडॉ. वासुदेव गाडे (२०१२ ते २०१७)\nडॉ. नितीन करमाळकर (१८ मे २०१७पसून)\nइ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ करावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या नावाशी, स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुले यांचे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. [१]\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रांमध्ये असलेल्या चुकांनी यावेळीही विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. यावर्षी विद्यापीठाने इंग्रजी आणि मराठीतून पदवी प्रमाणपत्र दिले. मात्र काही विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी प्रमाणपत्रे वेगवेगळ्या नावाची मिळाली आहेत. नावेच वेगळी असल्यामुळे प्रमाणपत्राच्या वैधतेबाबतच प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राचा वापर कोठेही अर्ज करण्यासाठी करता येऊ शकत नाही. नावांमधील चुकांबाबत विद्यापीठाकडे तक्रार करूनही अद्यापही सुधारित प्रमाणपत्र मिळाले नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. याशिवाय नाव, जन्मतारीख, आई-वडिलांचे नाव अशा तपशिलातही चुका झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.[२]\nपुणे विद्यापीठात २० अध्यासने आहेत.\nविभाग आणि संशोधन केंद्रे[संपादन]\nशैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्र\nपुणे विद्यापीठात एकूण ४६ विभाग आहेत, ज्यांमध्ये कला, विज्ञान, विधी, भाषां, मानव्यशास्त्रे, आणि अनेक आधुनिक ज्ञानशाखांच्या अध्यापनाचे आणि संदर्भातील संशोधनाचे काम केले जाते.\nक्रांतिज्योती सावित्रीबाई फ़ुले स्त्री अभ्यास केंद्र\nअध्यापनशास्त्र आणि विस्तार विभाग\nसंरक्षण शास्त्र आणि सामरिक शास्त्र\nप्रगत संस्कृत अध्यापन केंद्र\nग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग\n↑ \"पुणे विद्यापीठाचा नामांतराचा प्रस्ताव मंजूर\". आयबीएन लोकमत (मराठी मजकूर). ३० ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.\nपत्ता: गणेशखिंड रस्ता, पुणे-४११००७, महाराष्ट्र, भारत.\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्‍न ·\nसंत तुकाराम ·शहाजी भोसले · जिजाबाई ·छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे ·नानासाहेब पेशवे ·बाळ गंगाधर टिळक ·शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल ·विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्‍या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन्‌ एम्‌ वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे ·सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड · इन्फोसिस · आय.बी.एम. · के पी आय टी कमिन्स इन्फोसिस्टिम्स लिमिटेड\nपुण्यातील रस्ते#मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग • पुणे-नाशिक NH 50 • पुणे-सोलापूर रस्ता • कर्वे रस्ता • एफ सी रस्ता • जंगली महाराज रस्ता • टिळक रस्ता • एम जी रस्ता • लक्ष्मी रस्ता • सिंहगड रस्ता • पुणे-पौड • लॉ कॉलेज रस्ता • कॅनॉल रस्ता • छत्रपती शिवाजी रस्ता • बाजीराव रस्ता\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे ·अभिनव कला महाविद्यालय ·आबासाहेब गरवारे महाविद्यालय ·आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज ·नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · पुणे विद्यापीठ · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी ·तळजाई ·वाघजाई ·येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी ·मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nपुणे कॅन्टोनमेंट · येरवडा · कल्याणी नगर ·वडगांव शेरी · कोरेगाव पार्क · कोथरूड · स्वारगेट · शिवाजीनगर · औंध ·लोहगाव · सोपान बाग · डेक्कन जिमखाना · नळ स्टॉप · एरंडवणे · पौड फाटा · पर्वती · मुकुंदनगर · महर्षीनगर · गुलटेकडी · एरंडवणे · सॅलीसबरी पार्क · बोपोडी · हिरा बाग\nरेंज हिल्स · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · गणेशखिंड · दत्तवाडी · सहकारनगर · धनकवडी · बिबवेवाडी · लुल्लानगर · अप्पर कोंढवा · घोरपडी · फातिमानगर · वानवडी · विश्रांतवाडी · रामवाडी · वनाझ · खराडी · गोखले नगर\nउंड्री · औंध · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · खडकी · दापोडी · देहू रोड · धनकवडी · धायरी · निगडी (पुणे) · पाषाण · पिसोळी · बाणेर · बोपखेल · भोसरी · वडगांव बुद्रुक · विठ्ठलवाडी (पुणे) · आनंद नगर (पुणे) ·\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ\nश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ\nकविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ\nमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ\nअजिंक्य डी.वाय. पाटिल विद्यापीठ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://vedashri.blogspot.com/2008/10/", "date_download": "2018-04-24T04:25:03Z", "digest": "sha1:WAW3OM7H23M54QCKVW6NOZDCBDLSJXOZ", "length": 3012, "nlines": 67, "source_domain": "vedashri.blogspot.com", "title": "वेदश्री: October 2008", "raw_content": "\nरविवार, १२ ऑक्टोबर, २००८\nनेहमी असंच घडणार आहे\n'ते' न बोलताच संपणार आहे\nतरी अजून काय ठरणार आहे\nबोलायचं पटकन पण वेडं मन\nत्याचाही मुहुर्त पाहणार आहे \nभेटतो तेव्हाच माहित असतं\nनिघायची वेळ येणार आहे\nपटकन विचारावा प्रश्न हवासा\nतर शब्द ओठीच अडणार आहे \nमी न विचारताच तू काय\nहवं ते उत्तर देणार आहे\nहे पुरतं कळतंय तरीही\nतोंड माझं का बोलणार आहे\nन बोलता बोललेले शब्द\nतुला वेड्याला कळणार आहे\nमी बोलले/न बोलले तरी गप्पच\nनेहमीसारखा तू राहणार आहे \nउष्ट्या कुल्फीची चव मात्र\nस्वप्न माझं हे संपलं तरीही\nमनात तूच उरणार आहे\nतुझ्यात मी नसले तरी\nमाझ्यात तूच सापडणार आहे \nलेखिका : वेदश्री कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nकृपया आम्हाला जगू द्या...\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vedashri.blogspot.com/2009_10_01_archive.html", "date_download": "2018-04-24T04:29:00Z", "digest": "sha1:NVPGR67QOUFTZAIYFEFFWINZONRIVE7B", "length": 18837, "nlines": 85, "source_domain": "vedashri.blogspot.com", "title": "वेदश्री: October 2009", "raw_content": "\nसोमवार, २६ ऑक्टोबर, २००९\n फीचे पैसे कधी मिळणार तुमचे तुमच्या लाडक्या लेकीला एकही धडका ड्रेस नाही.. तो घ्यायचाय आणि जरा भाजीही आणायची होती.\"\n\"आली होती पण खर्च झाली. आईला एमटी केलेत पैसे.\"\n आईंना आत्ता गेल्याच महिन्यात तर एमटी केलेलीत ना तुम्ही मग आता परत\n\"भाऊला लागत होते हातऊसने..\"\n\"बास्स.. त्यांच्या उधळपट्टीला ठिगळे लावायला पैसे आहेत पण पोरांना कपडे घ्यायला नाहीत पैसे.. इतक्या दिवसांनी आलेली ती मेली फी, तीही टाकलीत देऊन आणि परत म्हणा मीच कर्कशा म्हणून..\"\n\"माझ्याकडे नाहीयेत आत्ता अजिबात पैसे. कडधान्यं कर काही दिवस.\"\n\"बाबा, आईला का त्रास देता तुम्ही पैसे असताना नाहीत असे सांगू नये.\"\nमाझ्या या मध्येच बोलण्याने दोघेही चमकले. बाबांचा पारा भलताच वर गेला..\n\"काय गं कार्टे, काय बडबडतेस खोटं काय बोललो मी खोटं काय बोललो मी पैसे नाहीचेत माझ्याकडे..बघ हवे तर खिशात..\"\n खिशात नाहीत पण आहेत..\"\n\"कुठे आहेत गं बबडे पैसे\n थांबा मी काढून दाखवते..\" असं म्हणून मी खुर्ची आणून त्यावर चढले. हात उंच करून अवकळा करकरून ते पुस्तक कसेबसे काढले.. त्या पुस्तकाचे वजन माझ्या लहान हातांना खूपच जास्त होते पुस्तक उलटे धरून पानं फर्रर्र करताच एक १०ची नोट खाली पडली\n\"आहे की नाही पैसे\" माझा विजयीमुद्रेने प्रश्न.\n अजुन कुठेकुठे लपवून ठेवलेत तुम्ही पैसे\n\"अगं मला खरंच माहिती नाही ती नोट त्या पुस्तकात कशी काय गेली ते. वाचतावाचता पान लक्षात ठेवण्यासाठी म्हणून ठेवली असेल वाचनाच्या धुंदीत एखादवेळी. चला.. तुझ्या भाजीची तर सोय झाली. आता बबडीच्या ड्रेसचे बघू काय ते नंतर..\"\n\"मला ड्रेस नको.. आहे मला ड्रेस..\"\nबाबांच्या गालाला लगेच खळी पडली. \"बघ.. लेक लाडकी का आहे कळले का ती म्हणतेय आहेत तिच्याकडे ड्रेस मग तू का मागे लागली आहेस माझ्या कधीची ती म्हणतेय आहेत तिच्याकडे ड्रेस मग तू का मागे लागली आहेस माझ्या कधीची\n\"किती आणि कसे आहेत विचारा ना तुम्हीच..\"\n\"शाळेचा गणवेश आहे की चांगला. बस्स झाला तेवढा मला.\"\nलेखिका : वेदश्री ३ टिप्पण्या:\nशनिवार, २४ ऑक्टोबर, २००९\nकाळजात (जनरल पब्लिक याला कॉलेज म्हणते) असताना 'अर्न अँड लर्न' करत असल्याने काळजातल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचा जरा कमीच चान्स मिळायचा पण तरीही वेळ काढून शेवटच्या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमातल्या अंताक्षरी खेळात भाग घेतला होता. प्रोफेसर विरुद्ध विद्यार्थी असा सामना होता. खेळतखेळत मी अंतिम फेरी गाठली आणि त्यात सामना टाय झाला. खुद्द काळजाचे प्रिन्सिपलच होते विरुद्ध) असताना 'अर्न अँड लर्न' करत असल्याने काळजातल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचा जरा कमीच चान्स मिळायचा पण तरीही वेळ काढून शेवटच्या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमातल्या अंताक्षरी खेळात भाग घेतला होता. प्रोफेसर विरुद्ध विद्यार्थी असा सामना होता. खेळतखेळत मी अंतिम फेरी गाठली आणि त्यात सामना टाय झाला. खुद्द काळजाचे प्रिन्सिपलच होते विरुद्ध टायब्रेकर फेरी होती.. आर या पार.. एक शब्द देणार होते जो आपण म्हणायच्या असलेल्या गाण्याच्या पहिल्या दोन ओळीत येणे अपेक्षित होते. काळजातली (कॉलेज या अर्थाने नाही हो टायब्रेकर फेरी होती.. आर या पार.. एक शब्द देणार होते जो आपण म्हणायच्या असलेल्या गाण्याच्या पहिल्या दोन ओळीत येणे अपेक्षित होते. काळजातली (कॉलेज या अर्थाने नाही हो) धडधड वाढली होती...\nधडधड आणिक वाढवणारी नको ती भलामण लावून देत शेवटी एकदाचा शब्द ऐकू आला 'हंस' मी आणि सर जवळपास एकाचवेळी सुरू झालो आमच्या गाण्यांनी.. त्यांचे होते 'दो हंसोका जोडा बिछड गयो रे..' तर माझे होते 'ओ हंसनी, कहा उड चली..' मी आणि सर जवळपास एकाचवेळी सुरू झालो आमच्या गाण्यांनी.. त्यांचे होते 'दो हंसोका जोडा बिछड गयो रे..' तर माझे होते 'ओ हंसनी, कहा उड चली..' दिलखेचक शब्दांमुळे की गाण्याच्या तालामुळे किंवा काय माहिती नाही पण सर्वांनी माझेच गाणे उचलून धरले आणि अख्खा हॉल अगदी सरांसकट तेच गाणे म्हणायला लागला. धुंद करणारा अनुभव होता अगदी दिलखेचक शब्दांमुळे की गाण्याच्या तालामुळे किंवा काय माहिती नाही पण सर्वांनी माझेच गाणे उचलून धरले आणि अख्खा हॉल अगदी सरांसकट तेच गाणे म्हणायला लागला. धुंद करणारा अनुभव होता अगदी स्पर्धेच्या पंचांचा निकाल अर्थातच माझ्याविरुद्ध गेला कारण माझ्या गाण्यात 'हंस' नाही तर 'हंसनी' आली होती\nमंचावरून खाली उतरून पुढचे कार्यक्रम बघण्यासाठी प्रेक्षकांमध्ये जाऊन बसायला निघालो तेव्हा सरांनी कौतुकाने म्हटले,\"इतकावेळ खेळताना एकही चूक केली नाहीस, मग आता शेवटच्या क्षणीच कशी काय चुकलीस तू\nरंगेहाथ पकडणाराच प्रश्न होता तो.. गोरीमोरी होऊन मी फक्त 'जीवनतालमें भटक रहा रे मेरा हंसा' इतकेच हलक्याने गायले. सर खळखळून हसतच होते कितीतरी वेळ मग काहीवेळाने म्हणाले,\"न जाणो मलाही या पोरीने युनिव्हर्सिटीतून बार केले तर.. या कल्पनेने घाबरला असणार तो तुला म्हणून बसला असेल भटकत..\" आता दिलखुलास हसण्याची वेळ माझ्यावर आली होती.\nलेखिका : वेदश्री कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nअगदी आईबाबांसारखीच माया करणार्‍या मॅथ्यूंच्या घरात घुसले की माझी अखंड टकळी सुरू होऊन जाते आजकाल. रोज धावतपळत का होईना पण किमान एक चक्कर तरी मारायचीच ५-१० मिनिटाचीतरी असा अलिखित नियमच झालाय माझा. माझी त्यांना आणि त्यांची मला खूपच सवय झाली आहे आता. त्यांना त्यांच्या तब्ब्येतीच्या असंख्य प्रश्नांमुळे घराबाहेर पडता येत नाही आणि मला कामानिमित्त हापिसात जावे लागत असल्याने घरात रहायला वेळ मिळत नाही. असे असल्यानेच की काय.. त्यांची बाहेरची कामे मी करायची आणि माझी घरातली काही कामे करण्यात त्यांनी मला मदत करायची, हे अगदी न सांगता आपोआपच जमून आले आहे. अशीच एकदा गावाहून परत आल्यावर त्यांच्या घरी गेले तेव्हा..\n हे बघा.. मी काय आणलेय रव्याच्या वड्या, भडंग..\" मी माझ्याच बोलण्यात गुंग होते आणि नजरेने काकूंना शोधत होते. बाहेरच्या खोलीत दिसल्या नाही तर स्वैपाकखोलीत पाहिले. तिथे त्या खुर्ची घेऊन बसल्या होत्या आणि ओट्यावर मान टाकून निपचित पडल्या होत्या. मी हादरलेच एकदम.\n अंकल, आंटी देखो.. अंकल..\" मी बोलावले तर काका आले. ते म्हणाले की तिला बरे वाटत नाहीये. अचानक पाऊस पडून बरीच थंडी पडल्याने तिला खूप त्रास होतोय.\nकाकांना स्वयंपाकातल्या जुजबी गोष्टी जरी काकूंनी आता शिकवल्या असल्या तरी एखादा जिन्नस बनवणे त्यांना जमणे शक्य नव्हते.\n\"आंटी, आपकी तबियत इतनी खराब है तो आप यहा किचनमे क्या कर रही हो जाओ, आराम करो आप. मैं बनाती हूं आप दोनोंके लिये खाना..\"\n\"नो माय चाईल्ड, रहने दो. तुम्हे नहीं आएगा.\"\n\"त्यात काय आहे न येण्यासारखं साखर अजिबात वापरायची नाही. मसाला, तिखट, मीठ वगैरे सगळं अगदी हात राखून टाकायचं.. बस्स. एवढं येईल की मलाही जमवता.. जा तुम्ही.. मी करते.\"\nकाकांच्या मदतीनी काकूंना उठवून दिवाणावर झोपवून किचनमध्ये आले परत. पोळीभाजी बनवायची असा डोक्यात विचार काहिसा पक्का होत होता तेवढ्यात काकूंनी करून ठेवलेली थोडीशी तयारी पाहिली आणि लक्षात आले की मला त्यातले काहीच येत नाही.. कारण तयारी सगळी अंड्याच्या कुठल्याशा पदार्थाची होती आता आली का पंचाईत.. माझ्याबरोबर परत किचनमध्ये आलेल्या काकांना माझ्या चेहर्‍यावरचे सटास्सट बदललेले भाव काही न बोलताच कळले.\"\n\"आंटीने बोला था ना.. तुम्हे नहीं जमेगा\nमाझ्या मनातला कल्लोळ काहीच न बोलता समोरच्याला कळला की मला भारी राग येतो माझ्या अपरोक्ष माझ्याच चेहर्‍यावर प्रदर्शन मांडणार्‍या माझ्या भावनांचा.. पण ते असो. काका म्हणत होते ते खरंच होतं. आता काय करायचं\n\"मुझे आता नहीं तो क्या बात है कुछ प्रॉब्लेम नहीं.. मैं आंटीको पुछके सीख लुंगी तो बना सकुंगी. सीखनेका मैने अगर एकबार ठान लिया ना तो बस्स.. \"\n\"लेकीन तुमको तो चलता नहीं ना.. फिर तुम कैसे बनाओगी\n\"अरे अंकल, मुझे ये अंडावंडा पसंद नहीं, लेकीन वो बुरी चीज थोडी ना है| और वैसेभी.. मुझे सिर्फ पकाना तो है.. खाना थोडी है\nकाकूंना विचारुन मी भुर्जी बनवली.. कशी झाली ते सांगता येणार नाही कारण चव बघता आली नाही मला त्या दोघांनीही चांगली झाली असल्याची पावती मात्र दिली.\nमग किमान सकाळचा स्वयंपाक मी त्यांना करून द्यायला लागले.. संध्याकाळी करायची इच्छा असली तरी ऑफिस असल्याने काही जमत नव्हते. दोनेक दिवसात हवेतला गारवा कमी झाला तर काकूंची तब्येत सुधारली आणि त्या परत नव्या दमाने रोजच्या कामाला लागल्या.\nरविवारी दुपारी काकूंकडे गप्पा मारायला गेले होते तेव्हा गप्पा मारतामारता त्यांच्या डोक्याला तेलमालिश करून देत होते. त्या नकोनको म्हणत असतानाही मला हौस असल्याने मी करते म्हणून हट्ट केल्याने त्या तयार झाल्या होत्या. काय माहिती काय झाले.. त्यांना एकदम गहिवरूनच आले.\n\"तुम इतना क्यौं जान लगाता है हमको\n\"मैने कहां लगाई जान वो तो आपहीने लगाई है| याद है वो तो आपहीने लगाई है| याद है मुझे जबरदस्त अ‍ॅसिडीटी हुई थी तो मैं आपके घरमे आके सोफेपे सो गई थी. तब मुझे वोमिटींग हुआ तो आपने मेरे पीठपर प्यारसे हाथ फेरा था.. ऐसा प्यारा हाथ आजतक मेरी जिंदगीमे सिर्फ मेरी आईने फेरा है| आपनेभी इतना प्यारा हाथ पीठपर रख्खा, तो फिर आप मेरी कौन हुई मुझे जबरदस्त अ‍ॅसिडीटी हुई थी तो मैं आपके घरमे आके सोफेपे सो गई थी. तब मुझे वोमिटींग हुआ तो आपने मेरे पीठपर प्यारसे हाथ फेरा था.. ऐसा प्यारा हाथ आजतक मेरी जिंदगीमे सिर्फ मेरी आईने फेरा है| आपनेभी इतना प्यारा हाथ पीठपर रख्खा, तो फिर आप मेरी कौन हुई मेरे अम्माअप्पा के लिये कुछ किया तो उसमे क्या खास बात है मेरे अम्माअप्पा के लिये कुछ किया तो उसमे क्या खास बात है\nलेखिका : वेदश्री कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nकृपया आम्हाला जगू द्या...\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1497", "date_download": "2018-04-24T04:32:11Z", "digest": "sha1:IZQDQNUO7XJMW6LESAHE6SW7L4BGKJR5", "length": 4888, "nlines": 63, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nरस्ते आणि महामार्ग वाहतूक\nइलेक्ट्रॉनिक टोलवसुलीसाठी फास्ट टॅग सुलभ उपलब्ध व्हावेत, यासाठी एनएचएआयने उचलली पावले\nयेत्या 1 सप्टेंबरपासून सर्व टोल प्लाझांवर फास्ट टॅग वाहनांसाठी विशेष मार्गिका\nइलेक्ट्रॉनिक टोल वसुलीसाठी फास्ट टॅग सुलभ उपलब्ध व्हावेत, यासाठी एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिझर्व्ह बँक आणि एनपीसीआय यांच्याशी चर्चा करुन दोन क्रांतीकारी पावले उचलली आहेत. यात फास्ट टॅगच्या ऑनलाईन विक्रीसह सर्व टोल प्लाझांजवळ सामायिक सेवा केंद्राच्या माध्यमातून ऑफलाइन विक्री करण्यात येईल.\nफास्टटॅग जारी करणाऱ्या बँका, एनएचएआय, आयएचएमसीएल यांच्या संकेतस्थळांवरुन फास्टटॅगची ऑनलाईन खरेदी करता येईल आणि कुरिअरने ते ग्राहकांच्या घरी पोहोचवले जाईल. यामुळे फास्टटॅग अधिक सुलभपणे उपलब्ध होऊन विक्रीत वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.\nऑनलाईन खरेदीविक्री उद्या 18 ऑगस्टपासून टोल प्लाझांच्या जवळ उभारल्या जाणाऱ्या सामायिक सेवा केंद्राच्या विक्री केंद्रांवरही फास्टटॅगची खरेदी करता येईल.\nफास्टटॅग वाहनांसाठी येत्या 1 सप्टेंबरपासून एक विशेष मार्गिकाही सुरु केली जाणार आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोखरहित अर्थव्यवस्था मोहिमेला अनुसरुन एनएचएआय आपल्या अधिकारक्षेत्राखालील सर्व टोल प्लाझांवर ईटीसी आधारभूत ढाच्याची उभारणी आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी काम करत आहे. एनएचएआय उचलत असलेल्या पावलांमुळे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास सुगम आणि सुरक्षित होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4801645634492241391&title=Mathematician%20Anandkumar's%20biopic%20with%20hritik%20roshan&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-24T05:04:39Z", "digest": "sha1:4UAVBNV4QYXODDPHATSLKVGY4ZA5MPNC", "length": 18078, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "गणितज्ञाचा ‘रूपेरी’ गौरव", "raw_content": "\nभारतीय गणितज्ञ एस. रामानुजन यांचा वारसा चालवणारे बिहारमधील गणितज्ञ आणि ‘सुपर ३०’ अभिनव उपक्रमाचे जनक आनंदकुमार यांचे कार्य आता रूपेरी पडद्यावर येणार आहे. त्या निमित्ताने आनंदकुमार आणि त्यांच्या कार्याबद्दल...\nगणितज्ञ आनंदकुमार यांच्यावर येणाऱ्या चित्रपटाचे नाव ‘सुपर ३०’ असे असून, या चित्रपटात हृतिक रोशन त्यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. आनंदकुमार यांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आपला जीवनप्रवास चित्रपटाच्या माध्यमातून बघण्यासाठी ते उत्सुक आहेत. विकास बहल हे चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, अलीकडेच त्यांनी हृतिक रोशनसह आनंदकुमार यांची भेट घेतली.\nबिहारस्थित आनंदकुमार यांनी आपल्या अपार बुद्धिमत्तेने देश-परदेशात नावलौकिक कमावला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील गणित विषयातील जर्नल्समध्ये त्यांचे लेख, संशोधन प्रबंध नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. आयआयटी जेईई परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ते पाटण्यात ‘सुपर ३०’ नावाचा मोफत मार्गदर्शन उपक्रम राबवतात. २००२मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात २०१७पर्यंत ४५० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ३९६ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.\nडिस्कव्हरी वाहिनीने याची दखल घेऊन मार्च २००९मध्ये आनंदकुमार यांच्यावरील एक माहितीपट प्रसारित केला. आनंदकुमार यांना मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, हार्वर्ड विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया, टोकियो युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये या उपक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’मध्येही त्यांच्या या उपक्रमाची माहिती प्रसिद्ध झाली होती. माजी जपान सुंदरी आणि अभिनेत्री नोरिका फुजिवारा हिने पाटण्याला भेट देऊन एक माहितीपट तयार केला. ‘बीबीसी’वरदेखील अनेक कार्यक्रमांमध्ये आनंदकुमार यांना आमंत्रित करण्यात आले होते. ‘टाइम मॅगझिन’ने ‘बेस्ट ऑफ आशिया २०१०’मध्ये आनंदकुमार यांच्या ‘सुपर ३०’ उपक्रमाची दखल घेतली. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही याची नोंद झाली आहे. आनंदकुमार यांना ‘इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डॉक्युमेंटेशन’तर्फे जुलै २०१०मध्ये ‘एस. रामानुजन’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. याशिवायही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. कॅनडास्थित मानसोपचारतज्ज्ञ बिजू मॅथ्यू यांनी आनंदकुमार यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले आहे.\nएका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आनंदकुमार यांना दुर्बल आर्थिक स्थितीमुळे चांगल्या खासगी शाळेऐवजी हिंदी माध्यमाच्या सरकारी शाळेमध्ये शिक्षण घ्यावे लागले; मात्र तिथेच त्यांना गणिताची गोडी लागली. पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘नंबर थिअरी’ नावाचा शोधनिबंध सादर केला आणि तो ‘मॅथेमॅटिकल स्पेक्ट्रम आणि मॅथेमॅटिकल गॅझेट’मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांना केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळाला; मात्र दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि आर्थिक परिस्थिती प्रतिकूल होती. त्यामुळे ते तिथे जाऊ शकले नाहीत.\nघरची जबाबदारी पार पाडण्यासाठी आनंदकुमार सकाळी गणिताचा अभ्यास करत आणि संध्याकाळी पापड विकण्याचा व्यवसाय करत; तसेच गणिताच्या शिकवण्यादेखील घेत. त्यांना हवी असलेली परदेशातील पुस्तके पाटणा विद्यापीठात मिळत नसल्याने ते सुट्टीच्या दिवशी सहा तासांचा प्रवास करून वाराणसीला जात. तिथे त्यांचा लहान भाऊ एन. राजम यांच्याकडे व्हायोलीन शिकत असे. तो हॉस्टेलमध्ये राहत असते. त्याच्या खोलीत शनिवार, रविवारी थांबून बनारस हिंदू विद्यापीठातील सेंट्रल लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करत आणि सोमवारी घरी परत येत.\n१९९२मध्ये त्यांनी एक जागा भाड्याने घेऊन रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स सुरू केले. दोन विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या गणित वर्गाला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एका वर्षातच ३६वर पोहोचली. तीन वर्षांनंतर त्यांच्या या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ५०० झाली होती. २०००च्या सुमारास त्यांनी ‘आयआयटी जेईई’साठी मार्गदर्शन सुरू केले. त्यासाठी ते अत्यंत माफक शुल्क आकारत; पण एका गरीब विद्यार्थ्याला तेही भरणे परवडत नव्हते. त्यामुळे त्याने मोफत मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा आनंदकुमार यांच्याकडे व्यक्त केली. यातूनच आनंदकुमार यांना ‘सुपर ३०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. २००२पासून त्यांनी हा उपक्रम राबवायला सुरुवात केली. दर वर्षी मे महिन्यात ‘रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स’तर्फे एक स्पर्धा परीक्षा घेतली जाते. त्यातून गरीब, पण हुशार, होतकरू अशा ३० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यांची वर्षभर राहण्याची, अभ्यासाची, वह्या-पुस्तकांची सर्व सोय केली जाते. आनंदकुमार यांच्या आई जयंतीदेवी स्वतः या सर्व मुलांसाठी जेवण बनवतात, तर त्यांचा भाऊ प्रणवकुमार सर्व व्यवस्थापन पाहतो.\n२००३ ते २०१७ दरम्यान त्यांच्याकडे शिकलेल्या ४५० पैकी ३९१ विद्यार्थ्यांची ‘आयआयटी’मध्ये निवड झाली आहे. २००८ ते २०१०पर्यंत दर वर्षी त्यांचे सर्वच्या सर्व तीसही विद्यार्थी आयआयटी जेईई परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर या प्रमाणात दर वर्षी अगदी अल्प प्रमाणात घसरण झाली; पण २०१७मध्ये पुन्हा ३० पैकी ३० विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले.\n‘सुपर ३०’ उपक्रमासाठी आनंदकुमार यांना सरकारकडून किंवा कोणत्याही खासगी संस्थेकडून मदत मिळत नाही. कोणतीही देणगीही ते घेत नाहीत. रामानुजन इन्स्टिट्यूटमधून मिळणाऱ्या उत्पन्नामधूनच ते हा खर्च करतात. ‘सुपर ३०’च्या लक्षणीय यशानंतर त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या, तसेच सरकारकडूनही आर्थिक मदतीची विचारणा झाली; पण त्यांनी त्याला नकार दिला. स्वबळावरच ते हा उपक्रम राबवत आहेत.\nत्यांच्या या कार्याची दखल घेऊन गेल्या दोन सप्टेंबर रोजी प्रसारित झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमातही त्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आता चित्रपट तयार होणार असल्यामुळे त्यांचे कार्य अधिक प्रकाशात येण्यासाठी आणि आणखी अनेकांना प्रेरणा मिळण्यासाठी मदत होणार आहे.\n(आनंदकुमार यांच्याबद्दलच्या एका कार्यक्रमाचा व्हिडिओ https://youtu.be/tVSzJsNEBtU या लिंकवर पाहता येईल.)\nTags: पुणेआनंदकुमारगणितज्ञसुपर ३०पाटणाहृतिक रोशनरामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्सBOI\nअंधश्रद्धा पसरवणाऱ्या कृतींना आळा ‘अॅटमगिरी’ उद्यापासून रूपेरी पडद्यावर ‘दी गिफ्ट ट्री’च्या उपक्रमाला १४ पासून सुरुवात मोहोळ यांची बिनविरोध निवड डॉ. वसंतराव पटवर्धनांचा ‘मसाप’तर्फे सत्कार\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nआवर्जून वाचावी अशी ‘रानबखर’\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\nस्वानंद समुद्र यांना मानाचा ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅवॉर्ड’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/", "date_download": "2018-04-24T05:05:34Z", "digest": "sha1:3PJDOAJQZMWEDFVS55QBSPBP7IHCN7QO", "length": 17237, "nlines": 226, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat: Marathi News, Breaking News in Marathi, Politics, Sports News Headlines", "raw_content": "\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nसोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : अस्सा होता आपल्या 'सचिन'चा सुरुवातीचा प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nनाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nदेश Apr 24, 2018 कर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nमहाराष्ट्र Apr 24, 2018 सोलापूरात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू\nस्पोर्टस Apr 24, 2018 बर्थडे स्पेशल : अस्सा होता आपल्या 'सचिन'चा सुरुवातीचा प्रवास\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\n'मी पण 'गेम' खेळायला हवा होता'\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nबर्थडे स्पेशल : अस्सा होता आपल्या 'सचिन'चा सुरुवातीचा प्रवास\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अॅट्रोसिटी कायद्याचा हेतूच संपुष्टात-जस्टिस सावंत\n'ओए लकी...' पाहुन केल्या 11 ठिकाणी चोऱ्या, गोव्यात उडवले पैसे ; आता गजाआड \nझोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची जपानमधील कराटे स्पर्धेसाठी निवड पण...\nविशेष रिपोर्ट : गुरुजी झाला डाॅन \nचार वर्षांनंतर गडकरी बीडमध्ये, पंकजा मुंडे-गडकरी राजकीय मनोमिलन \nसाखर कारखान्यांना 'डायबिटीज', 70 ते 75 टक्के साखर विक्रीविना पडून \n'मार्शल'ची थाटात सेवानिवृत्ती, सांगली पोलिसांकडून लाडक्या मित्राला निरोप\nकडुलिंबाची पानं खा आणि निरोगी रहा\nलाईफस्टाईल Apr 19, 2018\nउन्हाळ्यात 'अशी' घ्या त्वचेची काळजी \nलाईफस्टाईल Apr 10, 2018\n हे उपाय करून पहा\nलाईफस्टाईल Apr 3, 2018\nकेसांच्या कंडिशनरचा 'असाही' उपयोग\nबजेटमध्ये मिळतोय विवोचा नवा स्मार्टफोन\nगुगलचं नवं एंड्राॅइड आॅपरेटिंग सिस्टिम लाँच\nएअरटेलकडून आयपीएलच्या खोट्या जाहिराती, जिओने एअरटेलला खेचलं कोर्टात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n10 सामन्यांनंतर बदलला आहे आयपीएलमध्ये सामने जिंकायचा फॉर्म्यूला\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nविशेष कार्यक्रम -सिनेमाचं गाव\n#News18RisingIndia Summit- नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nविशेष कार्यक्रम : सुला फेस्ट 2018\nस्वानंद किरकिरेंसोबत वाचाल तर वाचाल\nमराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा स्पेशल शो - 'विजय उंबरखिंडीचा'\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nटेक्नोलाॅजी Apr 21, 2018\nबजेटमध्ये मिळतोय विवोचा नवा स्मार्टफोन\nगुगलचं नवं एंड्राॅइड आॅपरेटिंग सिस्टिम लाँच\nएअरटेलकडून आयपीएलच्या खोट्या जाहिराती, जिओने एअरटेलला खेचलं कोर्टात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/2008/12/17/%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-3/", "date_download": "2018-04-24T04:33:18Z", "digest": "sha1:ZUS7VHMNXPVIOCRAMGHZSEOQNM2V2SCS", "length": 13112, "nlines": 100, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nतू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी\nPosted on डिसेंबर 17, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in आरती प्रभू, पं. ह्रदयनाथ मंगेशकर\t• Tagged आरती प्रभू\t• 2 प्रतिक्रिया\nतू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,\nतू ऐल राधा, तू पैल संध्या,\nतू काही पाने, तू काही दाणे,\nतू नवीजुनी, तू कधी कुणी\nतू हिर्वी-कच्ची, तू पोक्त सच्ची,\nतू कुणी पक्षी : पिसांवर नक्षी\nगीत – आरती प्रभू\nसंगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर\nस्वर – पं. हृदयनाथ मंगेशकर\nचित्रपट – निवडूंग (१९८९)\n← सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला\nगगनि उगवला सायंतारा →\n2 thoughts on “तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी”\nआपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा. उत्तर रद्द करा.\nयापूर्वी तिनं इतक्या उत्कटपणे कशाचीच इच्छा केली नव्हती आणि ते सगळं इतक्या पटकन संपलं होतं. तो तिचा विरहाचा आणि दुःखाचा, जीवनातला पहिलाच अनुभव होता. - तोत्तोचान . . . #तोत्तोचान #tottochan #totto-chan #books #पुस्तक_बिस्तक #पुस्तक #tetsukokuroyanagi #tomoi\n karanda करवंदाची फुलं पहिली आणि कोकणात मार्च मधेच मे महिन्याचा फील देणारा उन्हाळा काही क्षण विसरून गेलो. आता पुढचे ट्रेक नीट plan करायला हवेत.☺ . . #karanda #sahyadri #raigad #konkan #march @makarand09 धन्यवाद\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1897", "date_download": "2018-04-24T04:46:27Z", "digest": "sha1:GVFPOPOKJLHUQ3T5HJRTDP2EPCYOOB7Y", "length": 3538, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nआयएनएस सुकन्या इंडोनेशियामध्ये दाखल\nभारताच्या ‘ॲक्ट ईस्ट धोरणाचा’ एक भाग म्हणून ‘आयएनएस सुकन्या’ ही युद्धनौका कमांडर एस.ए.देवधर यांच्या नेतृत्वाखाली इंडोनेशियामध्ये बेलावान येथे दाखल झाली. ही युद्धनौका कॉरपॅटच्या 30व्या आवृत्तीमध्ये तसेच भारतीय आणि इंडोनेशियन नौदलाच्या तिसऱ्या द्विपक्षीय अभ्यासात सहभागी होणार आहेत. दोन्ही देशांमधील सागरी संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबवले जात आहेत.\n24 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळात कॉरपॅटचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमांतर्गत भारताची इंडोनेशियाप्रती वचनबद्धता आणि भारताच्या सागरी सुरक्षेसाठीची सज्जता यासंदर्भात प्रात्यक्षिके केली जाणार आहेत.\nबेलावान बंदरावर या युद्धनौकेचे वास्तव्य राहील. या अवधीत नौकेवरील अधिकारी आणि कर्मचारी नौदल संबंधी विविध प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946564.73/wet/CC-MAIN-20180424041828-20180424061828-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/man-of-the-match-shikhar-dhwan-is-destinys-child/", "date_download": "2018-04-24T06:49:18Z", "digest": "sha1:5U54HCUD2U5US3ECAXTW3OFOWTP2BBSV", "length": 7600, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मालिकेपूर्वी सुट्ट्यांचा आनंद घ्यायला ऑस्ट्रेलियाला जाणार असलेला शिखर धवन 'सामनावीर' - Maha Sports", "raw_content": "\nमालिकेपूर्वी सुट्ट्यांचा आनंद घ्यायला ऑस्ट्रेलियाला जाणार असलेला शिखर धवन ‘सामनावीर’\nमालिकेपूर्वी सुट्ट्यांचा आनंद घ्यायला ऑस्ट्रेलियाला जाणार असलेला शिखर धवन ‘सामनावीर’\nपहिल्या डावात १९० धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून घोषित करण्यात आले. परंतु आपण ऐकून आश्चर्यचकित व्हाल की हा फलंदाज या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला परिवाराबरोबर सुट्ट्यांचा आनंद घ्यायला जाणार होता.\nश्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी ९ जुलै रोजी भारतीय संघाची घोषणा झाली. त्यात शिखर धवनचे नाव नव्हते. त्यामुळे वेस्ट इंडिजवरील मालिकेनंतर हा फलंदाज थेट हाँग काँग येथे परिवाबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेत होता. धवन तिथून ऑस्ट्रेलियाला परिवाराबरोबर रवाना होणार होता परंतु भारताचा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मुरली विजयने दुखापतीमुळे या मालिकेतुन माघार घेतली.\nतरीही धवनला किती संधी मिळेल याबद्दल शंका होती कारण संघात अभिनव मुकुंद आणि केएल राहुल हे पूर्णवेळ सलामीवीर होते. सामन्याला दोन दिवस बाकी असताना केएल राहुलला तापामुळे सामन्यात भाग घेता आला नाही. त्यामुळे एकदिवसीय सामन्यात जबदस्त कामगिरी करणाऱ्या धवनला संघात स्थान देण्यात आले.\nनशिबामुळे मिळालेल्या संधीचे सोने करत धवनने पहिल्या डावात १९० धावांची जबदस्त खेळी केली. अभिनव मुकुंदनेही दुसऱ्या डावात ८१ धावांची खेळी आहे. तर २५ मार्चला धरमशाला कसोटीमध्ये दोनही डावात अर्धशतकी खेळी होती परंतु तो दुखापतीमुळे तेव्हापासून संघाबाहेर होता.\nश्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात या तीन खेळाडूंपैकी कर्णधार विराट कोहली कुणाला संधी देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.\n190 Runs१९० धावाIndia tour of Srilanka 2017Shikhar Dhawanऑस्ट्रेलियापरिवारपहिली कसोटीशतकी खेळी\nभारताचा पहिल्या कसोटीमध्ये मोठा विजय\nप्रो कबड्डी: त्या खेळाडूने गोंदले बॉलीवूड स्टार अक्षय कुमारचे टॅटू\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sachin-vs-australia/", "date_download": "2018-04-24T06:35:35Z", "digest": "sha1:ANTOCMCIPM2LYT5FZZKLLPLZADYSCF5N", "length": 13916, "nlines": 111, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सचिन विरुद्ध ऑस्ट्रेलिया... - Maha Sports", "raw_content": "\nमागच्या दशकातला ऑस्ट्रेलिया एक अपराजित संघ. ऑस्ट्रेलियाला जर का हरवायचे असेंल तर जीवाचे रान करावे लागायचे आणि त्यातही शाश्वती नसायची की आपण शेवटी आपण जिंकू की नाही. ऑस्ट्रेलिया एक संघ नसून ती एक जिंकण्याची मानसिकता होती. विरोधी संघाच्या आव्हानातील हवा कशी काढायची हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. हेडन, गिलख्रिस्ट, बेव्हन, मार्क वॉ, गिलेस्पी, सायमंड्स यांना पाहून धडकी भरायची. त्यात भर म्हणून की काय तो चतुर, धूर्त कर्णधार रिकीं पॉन्टिंग. रिकी पॉन्टिंग नक्कीच शकुनीचा आधुनिक अवतार असणार इतका चालाक आणि त्याचे दोन हुकूमी एक्के होते वॉर्न आणि मॅग्राथ. हे सर्व मिळून बनायची ती ऑस्ट्रेलियन टीम.\nत्यांच्या समोर असायचा तो एक टिपिकल मुंबईकर, भारताचा वंडर बॉय सचिन, नाम तो सूना ही होगा… नाव -: सचिन तेंडुलकर, पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर, इंडिया. तो एकटा ऑस्ट्रेलियन टीमची जितकी धुलाई करायचा तितकी अग्निपथमध्ये शेवटी ह्रितिक कांचाची पण करत नाही. माणूस शूर बनतो तो त्याच्या आत्मविश्वासाने, बिकट परिस्थितीला सामोरे जाण्याच्या ध्येर्याने. सचिन वि. ऑस्ट्रेलिया एक युद्ध असायचे. वन फॉर ऑल स्थिती सचिनने बनवली होती. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक अस्त्राचे उत्तर सचिनची बॅट होती.\nजितके आव्हान मोठे तितका विजय मोठा. परिणामी जो विजयाचा शिल्पकार तो मोठा. सचिनच्या बॅटने कांगारूंविरुद्ध खूप धावा केल्या आणि कित्येकदा त्यांना पराभवाची चव चाखायला लावली. पराभवाची चव त्यांना पचनी पडायची नाही तेव्हा तेव्हा हेच ऑस्ट्रेलियन खेळताना काहीही टिप्पणी करायचे पण सचिनचे लक्ष अर्जुनासारखे माश्याच्या डोळ्यावर म्हणजे विजयावर असायचे. सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच सर्वाधिक रन्स काढले.\nरोबोची अचूकता असणाऱ्या मॅग्राथच्या चेंडूंना त्याने पुढे सरसावत अलगद मैदना बाहेर भिरकावलेले. आपण हेही पाहिले आहे तर जादुई फिरकी गोलंदाज वॉर्नची जादूही त्याने संपवून टाकली. वॉर्नची गोलंदाजी ही एखाद्या महान चित्रकाराने कुंचला हातात घ्यावा आणि दोन एक फ़टकारात एक अप्रतिम लोभस चित्र रेखाटावे अशी होती खरी, पण सचिन समोर ती थोटकी वाटायची इतके वैविध्यपूर्ण फटके सचिन मारायचा की ते पाहणे म्हणजे पर्वणी असायची.\nसचिनने कांगारूंविरुद्ध सर्व प्रकारात मिळून १४४ डावात खेळताना ६७०७ धावांचा डोंगर उभा केला. त्याने ४९च्या सरासरीने धावा बनवत २० शतके तर ठोकलीच सोबत ३१ अर्धशतकेही ठोकली. कसोटी क्रिकेटमध्ये ३९ सामन्यात ७४ डावात फलंदाजी करताना सचिनने ५५च्या सरासरीने ३६३० धाव केल्या ज्यात त्याने ११ शतके आणि १६ अर्धशतके ठोकली. एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनची कामगिरी तर कसोटी पेक्षाही जबदस्त होती. सचिनने ७१ सामन्यात ७० डावात खेळताना ४४.५९ च्या सरासरीने ३०७७ धावा बनविल्या त्यात ९ मोठी शतके आणि १५ अर्धशतके आहेत ज्यात त्याचा सर्वाधिक स्कोर हा १७५ धावांचा आहे.\nघरच्या मैदानावर खेळताना सचिनने कांगारून विरुद्ध क्रिकेटच्या दोनही प्रकारात खेळताना ४९ सामन्यात ६६ डावात खेळताना ५४.५४ च्या सरासरीने ३३८२ धावा केल्या त्यात सचिनने ९ शतके आणि १८ अर्धशतके ठोकली. २१६ हा त्यामधला सर्वाधिक स्कोर होता. सचिनने ऑस्ट्रेलियात जाऊनही त्यांची धुलाई केली. सचिनने ऑस्ट्रेलियात खेळलेल्या ४५ सामन्यात ६३ डावात फलंदाजी करताना ४३.९४ च्या सरासरीने २५४९ धावा बनविल्या. त्यात स्टिव्ह वॉच्या अखेरच्याच्या कसोटी सामन्यातील २४१ नाबाद धावा हा सचिनचा तेथील सर्वोत्तम आहे तर त्यात सचिनने ९ शतके आणि १८ अर्धशतके ठोकली. २००७-०८ च्या व्ही. बी. सिरीजच्या अंतिम सामन्यात ठोकलेले शतक ही आहे आणि दुसऱ्या सामन्यात केलेल्या ९१ धावा ही आहेत. त्यावेळेस भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशात जाऊन हरवून एकदिवसीय मालिका जिंकली होती.\nसचिनने तटस्थ ठिकाणीही कांगारुंची चांगलीच खातीरदारी केली. त्याने तटस्थ ठिकाणी खेळलेल्या १६ सामन्यात १५ डावात फलंदाजी करताना ५१.७३च्या सरासरीने आणि ९५च्या स्ट्राइक रेटने ७७६ धावा त्यात ४ शतके आणि १ अर्धशतक आहे. यात त्याने शारजा मध्ये केलेल्या दोन शतकीय खेळींचा सामावेश आहे. सचिन ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना लोक भान हरवून सचिनची फलंदाजी पाहायचे.\nऑस्ट्रेलियन खेळाडू कधी कोणाची जास्त स्तुती करत नाहीत पण त्यांनी सचिनची महानता कित्येकदा मान्य केली. त्याच्या फलंदाजीच्या भीतीने कित्येकदा झोप आली नसल्याची कबुली वॉर्न देतो तर महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनची वाहवाह करताना त्यांना त्यात स्वतः फलंदाजी करत असल्यासारखे वाटले.\n( टीम महा स्पोर्ट्स )\n(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)\nस्वप्नांना सोडू नका, त्यांचा पाठलाग करा, ती नक्कीच पुर्ण होतील…\nसचिन तेंडुलकरची 200 वी कसोटी कुठे\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/preview-india-vs-pakistan-champions-trophy-2017/", "date_download": "2018-04-24T06:44:47Z", "digest": "sha1:BTPK3EQHR65VK6LO7IVF5BMKTTOGWM56", "length": 9331, "nlines": 119, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारत विरुद्ध पाकिस्तान : कोण ठरणार वरचढ ? - Maha Sports", "raw_content": "\nभारत विरुद्ध पाकिस्तान : कोण ठरणार वरचढ \nभारत विरुद्ध पाकिस्तान : कोण ठरणार वरचढ \nसर्व जगातील क्रिकेट रसिक ज्या सामन्याची आतरुतेने वाट बघत आहेत, तो सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान उदया रविवारी दुपारी 3 वाजता बेमिन्हमच्या एडगबस्टन मैदानावर खेळण्यात येणार आहे.\nभारत या सामन्यात फेवरेट म्हणून खेळेल तर भारताला पराभवाचा धक्का देण्याचापर्यंत पाकिस्तान करेल. २०१६मध्ये झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती. भारत आतापर्यंत पाकिस्तानकडून विश्वचषकामध्ये एकदाही हरला नाही,पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने 2 वेळा भारताला मात दिली आहे. २०१३ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला हरवून स्कोर२-१ केला आहे,पण उद्या होणाऱ्या सामन्यात जिंकून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा स्कोर २-२ करणार का याकडे सर्व भारतीय रसिकांचे लक्ष लागले आहे.\nया मैदानावर २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडचा सामना पावसामुळे रद्द झाला. तरी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने चांगली धावसंख्या उभारली होती त्यावरून खेळपट्टी प्रथम फलंदाजी करण्यासाठी चांगली आहे असे दिसून येते. प्रथम फलंदाजी करणारा संघ ३००च्या आसपास धावसंख्या उभारले अशी खेळपट्टी आहे. सध्या याच जागेवर वातावरण ढगाळ आहे . त्यामुळे पावसाचं सावट सामन्यावर असणार आहेच.\nभारत – विराट कोहली\nभारताने मागील काही काळात जे सामने पाकिस्तान बरोबर खेळले आहेत त्या सर्व सामन्यांमध्ये विराटची कामगिरी उत्तम राहिली आहे. मग ते २०१५ विश्वचषकामधलं शतक असो वा २०१६ टी२० विश्वचषकामधील अर्धशतक असो, कोहलीने नेहमीच पाकिस्तान विरुद्ध आपला खेळ उंचावला आहे.\nपाकिस्तान – महंमद आमिर\nपाकिस्तान चा वेगवान गोलंदाज महंमद अमीरने आशिया कप २०१६ ला भारत विरुद्ध गोलंदाजी करताना आपली प्रतिभा दाखवून दिली होती. आता पाकिस्तानला ही अमीरकडून अशीच का ही अपेक्षा असणार आहे.\nभारत – धवन,रोहित,कोहली,युवराज, धोनी,पांड्य,अश्विन,जडेजा,उमेश,भुवनेश्वर.\nअझर अली,अहमद शेहजाद, बाबर आजम,\nमहंमद हाफीज,शोहेब मलिक,सारफरझ इहमद,इमद वसीम,फहिम्म असर्फ, महंमद अमीर,जुनिद खान .\nभारताचा सध्याचा फॉर्म बघता भारत सहज सामना जिंकणार असे दिसून येत आहे पण जर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला आणि फलंदाजनीही त्याना साथ दिली तर काहीही होऊ शकते. पाकिस्तानला जिंकण्यासाठी अमीरकडून अपेक्षा असतील तर भारताला कोहलीकडून\nकोहलीने जडेजाला बनवलं वेगवान गोलंदाज\nभारत विरुद्ध पाकिस्तान: क्रिकेटच महायुद्ध.\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/anup-kumar-will-make-new-500-empty-red-record-in-upcoming-pro-kabbadi-league/", "date_download": "2018-04-24T06:45:28Z", "digest": "sha1:NAMM3IRGQ5FKPFZCM3BTIY5DVDWBVAPD", "length": 8342, "nlines": 109, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अनूप कुमार: कबड्डीचा सचिन तेंडुलकर - Maha Sports", "raw_content": "\nअनूप कुमार: कबड्डीचा सचिन तेंडुलकर\nअनूप कुमार: कबड्डीचा सचिन तेंडुलकर\nभारतीय कबड्डीमधील सर्वाधिक वलयंकित खेळाडू, कॅप्टन कूल,बोनस का किंग आणि” द मन हू रन्स धिस प्लेस “म्हणून ओळखला जाणाऱ्या अनुप कुमार हा भारतातीलच नव्हे तर पूर्ण जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. भारतीय कबड्डी संघाला सलग तिसरा विश्वचषक जिंकून देत भारताचा तो यशश्वी कर्णधार बनला.\nआपल्या शांत आणि मोक्याच्या वेळी सामना जिंकून देण्याच्या खेळाने तो खूप प्रसिध्द झाला. भारतीय संघाला आणि प्रो कबड्डीमधील त्याचा संघ असणाऱ्या यू मुम्बाला त्याने शेवटच्या काही मिनिटात सामने जिंकून देत कबड्डीतील थरारक शाण्ण दिले आहेत.\nअनेक विक्रम आपल्या नावावर असणारा अनुप कुमार या प्रो कबड्डी सीज़न 5मध्ये प्रो कबड्डी मधील काही विक्रम करू शकतो त्यापैकी काही\n५००एम्प्टी रेड करणारा पहिला खेळाडू\nअनुप ने कित्येकदा मोक्याच्या वेळी पॉईंटस् घेऊन संघाला जिंकून दिले असले तरी आपल्या खेळात त्याने दुसऱ्या मोसमापासून काही बदल केले आहेत आणि बोनस सोबत एम्प्टी रेडचा खूप चांगला उपयोग करत सामने यू मुम्बाच्या बाजूने झुकवले आहेत.शेर अपने पूरे नाखून सिर्फ शिकार के वक्त निकलता है कान खूजाने को नही तसेच काहीसे अनूप कुमारचे आहे. एम्प्टी रेड हे शस्रासारख वापर करणाऱ्या अनुपने प्रो कबड्डी मध्ये आता पर्यंत ४९६ एम्प्टी रेड केल्या आहेत.जर त्याने आणखी ४ एम्प्टी रेड केल्या तर तो ५०० एम्प्टी रेड करणरा पहिला खेळाडू बनेल.त्याचा खेळ पहाता तो हाही विक्रम प्रो कबड्डी पाचव्या मोसमातील यू मुम्बाच्या पहिल्याच सामन्यात करेन असे वाटते.\n१००० रेड टाकणारा पहिला खेळाडू बनू शकतो\nअनुप कुमार सामन्यात खूप रेड करतो. सामना सुरू असल्यास तुम्ही त्याला विरोधी संघाविरूध्द आपले कसब दाखवण्यावाचून रोखू शकत नाहीत.अनुपने प्रो कबड्डीच्या पहिल्या 4 सीज़नमध्ये मिळून एकूण ९३८ रेड केल्या आहेत जर त्याने आणखी ६२ रेड केल्या तर तो १०००रेड करणारा पहिला खेळाडू बनेल.\nअनुप कुमारने आजपर्यंत प्रो कबड्डीमध्ये ५७ सामन्यांत ९३८ रेड मारल्या असून, त्यातील फक्त १३५ अयशस्वी रेड आहेत. ३०७ यशस्वी रेड मारलेल्या अनूपने एम्प्टी रेड ४९६ मारल्या आहेत.\nअनिल कुंबळेची गुगली: विराट कोहलीला कर्णधार म्हणून वेगळं मानधन मिळालं पाहिजे\nआयपीएल २०१७ मधील आकडयांचा खेळ\nएका मोठ्या कबड्डी प्रशिक्षकाची गच्छंती\nबोकडासाठी प्रभादेवीत घुमला कबड्डी… कबड्डीचा आवाज\nआयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम\nमुंबईमध्ये वाळूवरील कबड्डीचा थरार बुधवारपासून\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/hot-gossip/vaibbhav-tatwawdi-and-prarthana-behere-in-a-movie/20731", "date_download": "2018-04-24T06:53:51Z", "digest": "sha1:PERJ5K7UHFHXPIDOLAM35Y3NMX2QGRNO", "length": 23862, "nlines": 244, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Vaibbhav Tatwawdi and prarthana behere in a movie | ​वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरेची जोडी पुन्हा जमली | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\n​वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरेची जोडी पुन्हा जमली\n​वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी प्रेक्षकांना कॉफी आणि बरेच काही आणि मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी या चित्रपटांमध्ये आवडली होती. आता पुन्हा एकदा ते एका चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.\nवैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहेरे यांची जोडी प्रेक्षकांना कॉफी आणि बरेच काही या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील या दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटातील दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. कॉफी आणि बरेच काही या चित्रपटानंतर कॉफी आणि बरेच काही या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस यावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. वैभव आणि प्रार्थनाला या चित्रपटाच्या सिक्वलबाबत नेहमीच विचारले जाते. या चित्रपटानंतर त्या दोघांच्या फॅन फॉलॉव्हिंगमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे.\nवैभव आणि प्रार्थना कॉफी आणि बरेच काही या चित्रपटानंतर मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी या चित्रपटात देखील झळकले होते. या चित्रपटातील त्यांची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता वैभव आणि प्रार्थनाच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. प्रार्थना आणि वैभव पुन्हा एकदा एका चित्रपटात एकत्र झळकणार आहेत आणि याबद्दल स्वतः वैभवने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून त्याच्या फॅन्सना सांगितले आहे.\nवैभवने त्याच्या ट्विटरच्या अकाऊंटवर प्रार्थनासोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोत त्याने म्हटले आहे की, खूप मोठ्या कॉफी ब्रेकनंतर मी प्रार्थनासोबत एक नवा चित्रपट करत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मी लवकरच सुरुवात करणार आहे.\nवैभवने या चित्रपटाचे नाव काय असणार अथवा या चित्रपटात प्रार्थना आणि त्याच्याशिवाय कोण झळकणार या सगळ्याबाबत मौन राखणेच पसंत केले आहे. पण या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या दोघांच्या फॅन्सना या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागली आहे.\nवैभव तत्ववादीला दादासाहेब फाळके सर्...\nशायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग...\n'बाजीराव मस्तानी' सिनेमातल्या भिऊबा...\n​प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे,...\nप्रियदर्शन जाधव करणार मस्का या चित्...\nसोशल मीडियावर 'अप्सरा'चे नववधूप्रमा...\n​‘डान्स महाराष्ट्र डान्स’च्या सेटवर...\nवैभव तत्ववादीच्या या सिनेमाच शूटिंग...\nवैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे...\nकंगना राणौत म्हणते बॉयफ्रेंडमध्ये ह...\nवैभव तत्ववादी आणि अंकिता लोखंडे यां...\n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करण...\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात...\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्या...\nऋषिकेश जोशीच्या या फोटो मागचं गुपित...\nअक्षय तृतीयाच्या शुभमूहुर्तावर बोनस...\n'रणांगण'च्या निमित्ताने मराठी सिनेस...\n‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांच...\nसौंदर्याचं मर्म उलगडणारा ‘जश्न-ए-हु...\nगायिका सावनी रविंद्रचं भावी पतीसह प...\nअवधूतच्या आवाजातलं 'रणांगण' चित्रपट...\nवयाची चाळीशी ओलांडूनही इतकी दिसते स...\n​प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली... या...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://raigad.wordpress.com/2017/01/24/letter-to-sarjerao/", "date_download": "2018-04-24T06:37:24Z", "digest": "sha1:R2LAQIO63REWL2XJWFFSEGE5RRJWUUTS", "length": 15195, "nlines": 154, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "शिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र | इतिहासातील सत्याच्या मागावर...", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \n… आम्ही केवळ निमित्य \n← आमची नवीन पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा : भाग २ – शौर्य – पुरंदरे – रणझुंजार\nप्रतापसूर्य बाजीराव – श्री निनाद बेडेकर यांचे दुर्मिळ व्याख्यान →\nशिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र\nजानेवारी 24, 2017 by raigad यावर आपले मत नोंदवा\nमध्ययुगीन इतिहासात आपण अनेकदा पाहतो ते सरदारांचे एका सत्तेकडून दुसऱ्या सत्तेकडे जाणे. बहुतांश वेळा या सत्ता एकमेकांच्या विरोधात असत पण आज प्रस्तुत करत असलेले हे पत्र त्या अर्थाने वेगळे आहे. शिवाजी महाराजांचे सरदार सर्जेराव जेधे आणि सर्जेराव जेधे यांच्या पदरी असणारे त्यांचे लोक अशी उभी राज्य मांडणी असताना जेध्यांची माणसं त्यांच्या कडून थेट महाराजांकडे येत असावी आणि म्हणून सर्जेरावांनी महाराजांना पत्र लिहिले असावे. त्या पत्राचे हे उत्तर शिवाजी महाराजांनी दिले आहे. सदर पत्रात फुटून आलेल्या लोकांना नोकरीवर ठेवणार नाही असे आश्वासन महाराजांनी दिलेले आहे. या वरून हे समजते की नोकरी बदलणे म्हणजे प्रत्येक वेळी पक्ष किंवा स्वामी बदलणे असे नसून एकाच सत्तेखाली अथवा स्वामीत्वा खाली देखील लोक चाकरी बदलत होते.\nसर्जेराव जेधे यांना पत्र\nआपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा - उत्तर रद्द करा.\nFollow इतिहासातील सत्याच्या मागावर… on WordPress.com\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nताज्या ऐतिहासिक नोंदी –\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nखटासी पाहिजे खट फेब्रुवारी 8, 2017\nमहाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज फेब्रुवारी 3, 2017\n‘समरधुरंधर’ वाचकांच्या चरणी अर्पण फेब्रुवारी 1, 2017\nफिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो फेब्रुवारी 1, 2017\nप्रतापसूर्य बाजीराव – श्री निनाद बेडेकर यांचे दुर्मिळ व्याख्यान जानेवारी 30, 2017\nशिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र जानेवारी 24, 2017\nआमची नवीन पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा : भाग २ – शौर्य – पुरंदरे – रणझुंजार जानेवारी 18, 2017\nअपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया ऑक्टोबर 6, 2016\nछत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण सप्टेंबर 28, 2016\nशिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र ऑगस्ट 23, 2016\nअपरिचित इतिहास – भाग ४ – छत्रपतींचे पेशवे – पूर्वार्ध ऑगस्ट 17, 2016\nवीर खुदिराम बोस ऑगस्ट 11, 2016\nअपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र ऑगस्ट 11, 2016\nगुलाम कादर जेरबंद ऑगस्ट 9, 2016\nभगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\nबटुकेश्वर दत्त यांचे किशनसिंग यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\n“वासुदेव बळवंत फडके यांना अटक…….” ऑगस्ट 3, 2016\nआम्ही कशासाठी लढत आहोत\nसमस्या समाधान – १ – शंभूराजे आणि तारापूर ऑगस्ट 1, 2016\nअपरिचित इतिहास – भाग दोन – १० महत्वाच्या घडामोडी – पेशवा माधवराव जुलै 27, 2016\nअपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज जून 16, 2016\nखरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली जून 9, 2016\nमलिक-ए-मैदान तोफेतून नाण्यांचा बार मे 20, 2016\nइतिहासाच्या पाऊलखुणा मराठी Podcast – भाग १ – “पालखेडची मोहीम” – १७२८ मे 16, 2016\nश्री. निनाद बेडेकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मे 12, 2016\nशिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण मे 10, 2016\nअभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे” मे 4, 2016\nतैसा शिवाजी नृप जिंकवेना मे 3, 2016\nब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी … मे 1, 2016\nमुहंमद कुली खान / नेतोजी पालकर याचा औरंगजेबाला अर्ज एप्रिल 29, 2016\nछत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा एप्रिल 7, 2016\nशिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर मार्च 18, 2016\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nइतर अभ्यासकांची उपयुक्त संकेतस्थळे\nआमची ऐतिहासिक टिव-टिव s s \nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही समस्या समाधान … आम्ही केवळ निमित्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T06:49:18Z", "digest": "sha1:AXYY7IQUJAB45FWTKHSFGLAD3HRHWNUL", "length": 5022, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झीटाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख झीटा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाचा:ग्रीक अक्षरे ‎ (← दुवे | संपादन)\nग्रीक वर्णमाला ‎ (← दुवे | संपादन)\nआल्फा ‎ (← दुवे | संपादन)\nबीटा ‎ (← दुवे | संपादन)\nगामा ‎ (← दुवे | संपादन)\nडेल्टा (अक्षर) ‎ (← दुवे | संपादन)\nइप्सिलॉन ‎ (← दुवे | संपादन)\nईटा ‎ (← दुवे | संपादन)\nथीटा ‎ (← दुवे | संपादन)\nझिटा (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nटाउ ‎ (← दुवे | संपादन)\nआयोटा ‎ (← दुवे | संपादन)\nकॅपा ‎ (← दुवे | संपादन)\nलँब्डा ‎ (← दुवे | संपादन)\nम्यू ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू (अक्षर) ‎ (← दुवे | संपादन)\nझी (अक्षर) ‎ (← दुवे | संपादन)\nओमिक्रॉन ‎ (← दुवे | संपादन)\nपाय (अक्षर) ‎ (← दुवे | संपादन)\nरो ‎ (← दुवे | संपादन)\nसिग्मा ‎ (← दुवे | संपादन)\nउप्सिलॉन ‎ (← दुवे | संपादन)\nफाय ‎ (← दुवे | संपादन)\nकाय (ग्रीक अक्षर) ‎ (← दुवे | संपादन)\nप्साय (अक्षर) ‎ (← दुवे | संपादन)\nओमेगा ‎ (← दुवे | संपादन)\nवाउ ‎ (← दुवे | संपादन)\nसान ‎ (← दुवे | संपादन)\nकोपा ‎ (← दुवे | संपादन)\nसांपी ‎ (← दुवे | संपादन)\nस्टिग्मा ‎ (← दुवे | संपादन)\nहेटा ‎ (← दुवे | संपादन)\nशो ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/stats-india-vs-australia-first-t20-match-at-ranchi/", "date_download": "2018-04-24T06:43:33Z", "digest": "sha1:N5TL2LCCFFM2KLIJJJ5YWKWOO54P2YBY", "length": 6010, "nlines": 106, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय संघाने केले हे ५ विक्रम - Maha Sports", "raw_content": "\nभारतीय संघाने केले हे ५ विक्रम\nभारतीय संघाने केले हे ५ विक्रम\n-भारतीय संघाचा टी२० मधील हा ५० वा विजय आहे. यापूर्वी पाकिस्तान(६९), दक्षिण आफ्रिका(५७) आणि श्रीलंका (५१) या संघांनी ५० किंवा त्यापेक्षा जास्त विजय टी२० सामन्यात मिळवले आहेत.\n-भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सलग ७ टी२० सामने जिंकले आहेत. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा पराभव २०१२ मध्ये झाला होता.\n-विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी२०मधील शेवटच्या ५ खेळी अशा- ९०*, ५९*, ५०, ८२*, २२*\n-भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया आजपर्यंत १४ टी२० सामने खेळला असून त्यात ८ सामन्यात वेगवेगळ्या कर्णधारांनी ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. तर भारताकडून १४ सामन्यात विराट केवळ दुसरा कर्णधार आहे.\n–युझवेन्द्र चहलने सलग ४ आंतरराष्ट्रीय सामन्यात ४वेळा ग्लेन मॅक्सवेलला बाद केले आहे. त्यात पहिल्या तीन वनडे सामन्यांचा आणि आजच्या टी२० सामन्याचा समावेश आहे.\n–या सामन्यात तब्बल ६ फलंदाज त्रिफळाचित झाले आहेत. यापूर्वी टी२० सामन्यात ६ त्रिफळाचित होण्याचा योग ४वेळा आला आहे.\nशेवटच्या मिनिटातील गोलमुळे जर्मनीने केला कोस्टारिकाचा पराभव\nविडिओ: विराट कोहलीने करून दिली अझरुद्दीनच्या क्षेत्ररक्षणची आठवण\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AB_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB,_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%A8", "date_download": "2018-04-24T06:25:19Z", "digest": "sha1:XTF5JUMXFIETL5L5GQIVCHWZWYYCCY43", "length": 5359, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ, स्वीडन - विकिपीडिया", "raw_content": "गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ, स्वीडन\n(गुस्ताफ सहावा एडॉल्फ, स्वीडन या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२९ ऑक्टोबर १९५० – १५ सप्टेंबर १९७३\n११ नोव्हेंबर, १८८२ (1882-11-11)\n१५ सप्टेंबर, १९७३ (वय ९०)\nगुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ (संपूर्ण नाव: ऑस्कर फ्रेड्रिक विल्हेल्म ओलाफ गुस्ताफ ॲडॉल्फ; स्वीडिश: Oscar Fredrik Wilhelm Olaf Gustaf Adolf; ११ नोव्हेंबर १८८२ - १५ सप्टेंबर १९७३) हा स्वीडन देशाचा राजा होता. तो १९५० ते १९७३ सालांदरम्यान राज्यपदावर होता.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १८८२ मधील जन्म\nइ.स. १९७३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१४ रोजी १४:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-vs-australia-3rd-odi-at-holkar-stadium-indore/", "date_download": "2018-04-24T06:32:33Z", "digest": "sha1:2SH3LIK5MVVTTIP2ZQ4DMKZM4BUDZDR2", "length": 6162, "nlines": 108, "source_domain": "mahasports.co.in", "title": "होळकर मैदान भारतासाठी कायम लकी ! - Maha Sports", "raw_content": "\nहोळकर मैदान भारतासाठी कायम लकी \nहोळकर मैदान भारतासाठी कायम लकी \n भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना उद्या इंदोरच्या होळकर स्टेडियम येथे होत असून हा या मैदानावरील ६वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. असे जरी असले तरी हे मैदान भारतासाठी कायमच लकी ठरले आहे.\nअशा या मैदानाचा हा छोटासा इतिहास-\n-भारतीय संघ या मैदानावर ४ वनडे सामने खेळला असून चारही सामने जिंकला आहे.\n– भारतीय संघ येते एकमेव कसोटी सामना खेळला असून तो सामनाही भारताने जिंकला आहे.\n-शेवटच्या दोनही आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर हा पुरस्कार भारतीय कर्णधाराने पटकावला आहे.\n-महान फलंदाज वीरेंद्र सेहवागने ८ डिसेंबर २०११ साली याच मैदानावर २१९ धावांची तडाखेबंद वनडे खेळी केली होती. विशेष म्हणजे तेव्हा सेहवाग संघाचा कर्णधारही होता.\n-भारतीय कर्णधार विराट कोहलीने ८ ऑक्टोबर २०१६ रोजी याच मैदानावर न्यूझीलँड संघाविरुद्ध २११ धावांची खेळी केली होती.\n-माजी कॅप्टन कूल धोनीने या मैदानावर खेळताना १४ ऑक्टोबर २०१५ रोजी ९२ धावा केल्या होत्या. या सामन्यातही धोनी सामनावीर होता.\nHolkar Stadiumindia vs australiaIndoreteam indiaइंदोरइंदोर वनडेऑस्ट्रेलिया संघक्रिकेट\nभारतीय संघाचं इंदोरला आगमन, ऑस्ट्रेलियन संघाचे आज पहिले सराव सत्र\n५ गोष्टी ज्या केल्या तर ऑस्ट्रेलिया तिसरा वनडे सामना आरामात जिंकू शकते\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.vidyawarta.com/01/?p=4279", "date_download": "2018-04-24T06:42:02Z", "digest": "sha1:35OR7R6XCMOMVMSDUHR5DB4HLEPGXUCH", "length": 9532, "nlines": 187, "source_domain": "www.vidyawarta.com", "title": " Historical Books | Vidyawarta", "raw_content": "\nUGC द्वारा यथा अधिसूचित संदर्भित पत्रिकाए Jr.No.43053 & 62759\nआंतरराष्ट्रीय बहुभाषिक संशोधन पत्रिका\nशोधपत्र भेजने कि अंतिम तिथी: 20 (हर माह)\nशोधपत्रिका प्रकाशन तिथी 30 (हर माह)\nजर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत\n2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास\n4. आसे होते मोगल\n5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार\n6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा\n8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र\n9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास\n10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८\n11. घोरपडे घराण्याचा इतिहास\n12. छत्रपती शिवाजी महाराज\n13. तंजावरचे मराठे राजे\n14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१\n18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास\n19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक\n22. पुणे अखबार भाग १\n23. पुणे अखबार भाग 2\n24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २\n25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३\n28. पेशवाईचे दिव्य तेज\n30. पेशवाईतील पश्चिम दिग्विजय\n31. पेश्वीतील उत्तर दिग्विजय\n33. पेश्वीतील धर्म संग्राम\n34. पोर्तुगीज मराठा संबंध\n35. प्राचीन दक्षिण हिंदुस्थान\n37. भगवान बुद्ध पूर्वार्ध\n39. भारत इतिहास संशोधक मंडळ अहवाल शके १८३२\n40. भारतवर्षाचा संक्षिप्त इतिहास\n41. भारतीय लिपींचे मौलिक एकरूप\n42. मराठांच्या राज्य कथा\n43. मराठी दफ्तर रुमाल दुसरा\n44. मराठी बखर गद्य\n45. मराठी रियासत मध्य विभाग ३\n46. मराठे व इंग्रज आवृत्ती तिसरी\n47. मराठे व इंग्रज आवृत्ती दुसरी\n51. मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दफ्तर खंड तिसरा १६६३ – १७३९\n52. मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा १७२० – १७४०\n53. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास १८०२ – १८१८\n57. महाराष्ट्र व गोवे शिलालेख\n58. महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग २ (१७०७ ते १८१८ )\n59. महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास\n60. महाराष्ट्रातले खलपुरूष घाशीराम कोतवाल\n62. महाराष्ट्रातील स्वतंत्र लढे\n63. महेश्वर दरबारची बातमीपत्रे\n65. मुंबई इलाख्यातील जाती\n67. मुघल साम्राज्याचा ऱ्हास भाग १\n69. मुसलमान सुफी संतांचे मराठी साहित्य\n70. मुसलमानपुर्व महाराष्ट्र इ.पु. २०० ते इ.स. १३१८\n72. मोगल दरबारची बातमीपत्रे खंड २\n73. मोगल दरबारची बातमीपत्रे\n74. म्हणे लढाई संपली \n76. राजा राममोहन राय\n77. रायगडची जीवनकथा पहिली आवृत्ती\n79. वंश आणि वंशवाद\n80. वसईची मोहीम १७३७ ते १७३९\n82. शिव – चरित्र – निबंधावली\n83. शिवकाल १६३० ते १७०७\n84. शिवकालीन महसुल व्यवस्था\n87. श्री छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र\n88. श्री भाऊंच्या वीरकथा\n90. श्री शिवराज्याभिषेक प्रयोग\n91. श्रीमंत महाराज भोसले यांची बखर\n93. श्रीरामदासांची एतिहासिक कागदपत्रे\n96. सह्याद्रीच्या पायथ्याशी आक्रमण १ ले\n98. हि रामाची आयोध्या\n99. हिंदुस्तानची सामाजिक उत्क्रांती १७९० – १९४०\n100. हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त\n101. हैदराबाद स्वतंत्र संग्राम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://amrutmanthan.wordpress.com/category/%E0%A5%A6%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%95-%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%95/%E0%A5%A6%E0%A5%AB-%E0%A5%A8-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2018-04-24T06:26:02Z", "digest": "sha1:SHWKK6KJFFMPASMCNSUVXUATFDITL6VK", "length": 32286, "nlines": 239, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nश्रेणी: ०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख\nलक्षवेधी, रोचक, महत्वाच्या बातम्या किंवा माहितीपूर्ण लेख\nस्वा० सावरकर आणि ’महापौर’चा जन्म (दै० सामना दि० २२ ऑक्टोबर २०१०)\nगुरूवार, 28 ऑक्टोबर 2010 अमृतयात्री7 प्रतिक्रिया\nपत्र मिळताच पुण्याचे मेयर गणपतराव नलावडे आपल्या कार्यालयाबाहेर धावले. त्यांनी शिपायाला ’मेयर ऑफ पुणे’ ची पाटी काढायला लावली. लगोलग ’महापौर’ची पाटी तयार झाली. तेव्हापासून हा शब्द सहज रुळला.\nहिंदी आणि मराठीचे महाभारत (ले० अब्दुल कादिर मुकादम, लोकसत्ता, १४ मार्च २०१०)\nरविवार, 14 मार्च 2010 रविवार, 14 मार्च 2010 अमृतयात्री3 प्रतिक्रिया\n“सलील कुलकर्णी यांच्या १५ नोव्हेंबरच्या लेखात हिंदी ही राष्ट्रभाषा नसून ती केंद्र सरकारच्या व्यवहाराची राजभाषा आहे आणि तरीही ती राष्ट्रभाषा असल्याचा आभास जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आल्याचे आग्रही प्रतिपादन करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रतिपादनाला पाठिंबा देणारी वाचकांची पत्रेही प्रसिद्ध झाली. कुलकर्णी यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज करून केंद्र सरकारकडून तसे कबुलीपत्रही मिळविले. याबरोबरच मराठी शिवाय इतर कुठल्याही भाषेला महाराष्ट्रात स्थान मिळणार नाही. तेव्हा अमराठी लोकांनी मराठी शिकले पाहिजे, असा आणखी एक मुद्दा या वादाला जोडण्यात आला आहे.”\nसर्वप्रथम मातृभाषेत शिकणे हीच सर्वोत्तम पद्धत (ले० स्वामीनाथन एस० अंकलेसरिया अय्यर, टाईम्स ऑफ इंडिया)\nबुधवार, 10 फेब्रुवारी 2010 रविवार, 14 ऑगस्ट 2011 अमृतयात्री22 प्रतिक्रिया\nमर्द मराठ्यांची ऑनलाईन लढाई (ले० कीर्तिकुमार शिंदे, लोकप्रभा, ८ जाने० २०१०)\nसोमवार, 4 जानेवारी 2010 अमृतयात्री6 प्रतिक्रिया\nप्रचंड मोठय़ा संख्येने पण मुख्यत: तलवार आणि भाले घेऊन लढणाऱ्या भारतीय सैन्यांना बंदुका व तोफांसारख्या आधुनिक शस्त्रास्त्रांच्या बळावर मूठभर इंग्रजांनी सहज हरवलं होतं, हा आपला इतिहास आहे. आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचं झालं तर जगभरात संगणक व माहितीजालाचा उपयोग माहिती आणि संज्ञापनासाठी वाढत असताना मराठी नागरिक व ग्राहक म्हणून स्वत:चे अधिकार मिळवण्यासाठी आपणही संगणक व महाजालाचा प्रभावी वापर करायला शिकले पाहिजे. पत्रव्यवहार व दूरध्वनी या जुन्या साधनांवरच जर आपण अवलंबून राहिलो तर आधुनिक जगात मागे राहू.\nअबू आझमीने उस्ताद अब्दुल करीम खानसाहेबांचा कित्ता गिरवावा (ले० जावेद नकवी, इंग्रजी दै० डॉन, पाकिस्तान, दि० १९ नोव्हें० २००९)\nशुक्रवार, 4 डिसेंबर 2009 बुधवार, 9 डिसेंबर 2009 अमृतयात्री13 प्रतिक्रिया\nहिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध किराणा घराण्याचे संवर्धक-प्रवर्तक उस्ताद अब्दुल करीम खान साहेब यांच्या महाराष्ट्र व मराठी संस्कृतीला दिलेल्या योगदानाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याचा सल्ला अबू आझमीला देण्यासाठी श्री० जावेद नकवी ह्या पाकिस्तानातील डॉन या अग्रगण्य दैनिकाचे प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक ह्यांनी लिहिलेला हा इंग्रजी लेख.\nजरी श्री० नकवी यांची काही राजकीय मते आपल्याला कदाचित पटणार नाहीत; पण तरीही त्यांचा भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास, तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संपन्नता आणि प्रगल्भतेबद्दलची जाण आणि आदरभावना ह्या गोष्टी आश्चर्यचकित करतात आणि अटकेपार झेंडे रोवलेल्या मराठ्यांच्या कीर्तीचे पडघम अजुनही दूरपर्यंत वाजताहेत हे समजल्यावर छाती अभिमानाने फुलून येते.\nमहाराष्ट्र… काय होता, काय झाला, कुठे पोचला (ले० चंद्रशेखर धर्माधिकारी)\nमंगळवार, 28 जुलै 2009 मंगळवार, 15 सप्टेंबर 2009 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nनिवृत्त न्यायाधीश आणि ज्येष्ठ विचारवंत श्री० चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या ’महाराष्ट्र टाईम्स’मध्ये महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या एका अत्यंत वाचनीय लेखातील काही भाग आपल्या वाचनासाठी टाचला आहे.\nधर्माधिकारींनी लिहिलेल्या प्रत्येक वाक्यामागे असलेले त्यांचे खोल विचार, तसेच समाजातील दुर्भागी आणि पीडित लोकांबद्दल त्यांना वाटणारी कणव व गेल्या पन्नास वर्षांत अशा लोकांचे दुःख आणि गैरसोई कमी करण्यास पूर्णपणे अपयशी ठरलेले राजकारणी आणि राज्यकर्ते यांच्याबद्दलची चीडसुद्धा स्पष्टपणे दिसून येते.\nलेख वाचल्यावर आपले मन आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. लेखात नमूद केलेल्या प्रत्येक प्रकारच्या दुर्दशेला आपणच सर्व कारणीभूत नाही का त्यात चर्चिलेल्या प्रश्नांपैकी एकही प्रश्न अमेरिका, चीन, पाकिस्तान किंवा कर्नाटक, उत्तर प्रदेश व बिहारने निर्माण केलेला नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक समस्येस आपण महाराष्ट्रीय मंडळीच बर्‍याच प्रमाणात सामुहिकरित्या व काही प्रमाणात व्यक्तिशः जबाबदार आहोत हे आपण नीट समजावून घेतले पाहिजे आणि त्या चुका सुधारण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत.\nखजुराहो: एक नितांत सुंदर अनुभव (ले० राधिका टिपरे)\nशुक्रवार, 24 जुलै 2009 मंगळवार, 15 सप्टेंबर 2009 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nभटकंतीची आवड असणारे, पुरातन भारतीय संस्कृतीचे जिज्ञासू किंवा अभ्यासक, सृजनकलांचे भोक्ते, तरल भावनाशील मनाच्या व्यक्ती अशा विविध स्वभावपैलूंच्या माणसांनी आयुष्यात एकदा तरी अवश्य भेट द्यावी आणि मन तृप्त करावे असे हे ठिकाण.\n‘स्त्री-पुरुषांचं एकमेकांमध्ये मिसळून एकाकार होणं म्हणजे जीवनातील परमोच्च सुख होय… या सुखसमाधीतूनच निर्वाणप्राप्ती होते…’ हे तत्त्वज्ञान खजुराहोच्या कामशिल्पांतून अनुभवायला मिळतं. लेखिकेचे हे उद्गार ऐकल्यावर आचार्य रजनीश (ओशो) यांच्या ’संभोगातून समाधीकडे’ या तत्त्वज्ञानाच्या स्फूर्तीमागे ह्या शिल्पांचाही काही भाग असेल का, अशी शंका मनाला स्पर्श करून जाते.\n‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र’ (ले० सत्वशीला सामंत)\nशुक्रवार, 24 जुलै 2009 मंगळवार, 15 सप्टेंबर 2009 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nकाही वर्षांपूर्वीची गोष्ट. नाशिकमधील एका मराठी विद्यार्थिनीला ‘कुसुमाग्रज कोण होते’ असं शिक्षकांनी विचारलं तेव्हा तिला उत्तर देता आलं नाही, त्यामुळे ते शिक्षक अतिशय खंतावले. ही गोष्ट पुण्याच्या संजीवनी बोकील या संवेदनशील कवयित्रीच्या कानी आली तेव्हा त्यांच्या मनात ठिणगी पडली आणि एक बीज पेरलं गेलं. कालांतरानं ते रुजलं आणि आता त्यातून एक सुंदर रोपटं जन्माला आलं असून, दिवसेंदिवस ते तरारून दमदारपणे वाढत आहे…….\n‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ या उक्तीनुसार मुलांचे मनोरंजन करण्यासाठी पुढे सरसावणारे नामवंत कलाकार हा या उपक्रमाचा तिसरा स्तंभ होय. डॉ. गिरीश ओक, वंदना गुप्ते, जितेंद्र जोशी, श्रीरंग गोडबोले, अनिल इंगळे, राजेश देशमुख, किरण पुरंदरे, शांभवी वझे, अनुराधा मराठे.. नावं तरी किती घ्यावीत’ या उक्तीनुसार मुलांचे मनोरंजन करण्यासाठी पुढे सरसावणारे नामवंत कलाकार हा या उपक्रमाचा तिसरा स्तंभ होय. डॉ. गिरीश ओक, वंदना गुप्ते, जितेंद्र जोशी, श्रीरंग गोडबोले, अनिल इंगळे, राजेश देशमुख, किरण पुरंदरे, शांभवी वझे, अनुराधा मराठे.. नावं तरी किती घ्यावीत अक्षरश: न संपणारी नामावळी अक्षरश: न संपणारी नामावळी\nया स्थानिक उपक्रमाची सर्वदूर प्रसिद्धी करण्यामागील मुख्य हेतू हा की, त्यापासून महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या मराठीप्रेमी व्यक्तींना प्रेरणा मिळावी.. ज्योत से ज्योत जलाते चलो लवकरच सोलापूर येथे अशा प्रकारचा उपक्रम सुरू होणार असून, सांगली येथेही तशीच हालचाल सुरू झालेली आहे. उपक्रमशील व्यक्तींनी आपापल्या भागांत जर अशी चळवळ सुरू केली तर मराठीचं भवितव्य निश्चित उज्ज्वल होईल.\nअंधार फार झाला, पणती जपून ठेवा\nलोकसत्ता, चतुरंग पुरवणी (१८ जुलै २००९) मधील सत्वशीला सामंतांचा लेख खालील दुव्यावर पहा.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर\nराईट बंधूंच्या आधी विमानोड्डाण करणारा भारतीय \n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n\"हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही\" - केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nविचारमंथन - तिन्ही सांजा सखे मिळाल्या (प्रश्नकर्ता: सुशांत देवळेकर)\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/and-the-highest-paid-athlete-of-all-time-is-well-it-s-not-a-footballer-or-cricketer/", "date_download": "2018-04-24T06:28:22Z", "digest": "sha1:LBDF5Y54XKIXSHQ6VJRHFV6FPOONWNRY", "length": 8281, "nlines": 133, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टॉप २५: हे आहेत जगातील सार्वकालीन श्रीमंत खेळाडू ! - Maha Sports", "raw_content": "\nटॉप २५: हे आहेत जगातील सार्वकालीन श्रीमंत खेळाडू \nटॉप २५: हे आहेत जगातील सार्वकालीन श्रीमंत खेळाडू \nजगप्रसिद्ध मासिक ‘फोर्ब्स’ने नुकत्याच घोषित केलेल्या सार्वकालीन श्रीमंत खेळाडूंच्या यादीत बास्केटबॉल मायकल जॉर्डनने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याची एकूण संपत्ती १.७ बिलियन डॉलर या यादीत सांगण्यात आली आहे.\nया यादीत दुसऱ्या क्रमांकावर गोल्फर टायगर वूड्स असून त्याची संपत्तीही १.७ बिलियन डॉलरच्या आसपास आहे. २००८ साली टायगर वूड्सने मोठा विजय मिळवल्यानंतर त्याला वैयक्तिक जीवनातील घडामोडींमुळे सतत अपयश आले आहे.\nसध्या तो जागतिक क्रमवारीत १,१८९व्या स्थानावर आहे. पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारा वूड्स हा एकमेव सध्या खेळत असलेला खेळाडू आहे.\nदिवंगत अमेरिकन गोल्फर अरनॉल्ड पाल्मर १.४ बिलियन डॉलरसह तिसरा, माजी गोल्फर जॅक निकलास १.२ बिलियन डॉलरसह चौथा आहे.\nप्रसिद्ध फॉर्मुला १ ड्राइवर आणि सातवेळचा विजेता मायकल शूमाकर १ बिलियन डॉलरसह पाचवा आहे. ४८ वर्षीय शूमाकर हा त्यावेळचा या खेळातील दिग्गज ड्राइवर म्हणून ओळखला जात असे. तो १९९०मध्ये जगातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.\nमाजी फुटबॉलपटू डेविड बेकहॅम, अमेरिकन बॉक्सर फ्लॉइड मेवेदर, टेनिसपटू रॉजर फेडरर आणि लिओनेल मेस्सी आणि क्रिस्तिआनो रोनाल्डो ह्या यादीत स्थान मिळवू शकले आहेत.\nविशेष म्हणजे या यादीत कोणताही क्रिकेटपटू स्थान मिळवू शकला नाही.\nहे आहेत जगातील सार्वकालीन श्रीमंत खेळाडू\n१९.ऑस्कर दे ला होया\nडे-नाईट कसोटी सामन्यांसाठी सौरव गांगुलीची जोरदार फलंदाजी \nक्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांना अटक, चारचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू\nकोपा डेलरेच्या विजेतेपदावर बार्सेलोनाचा सलग चौथ्यांदा शिक्कामोर्तब\nआणि टेनिस इतिहासात नदालचे नाव सोनेरी अक्षरांनी लिहीले गेले\nराफेल नदाल रोलेक्स मास्टर्सच्या १२व्यांदा अंतिम फेरीत\nअखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत सानिका भोगाडे, सिद्धार्थ मराठे, रुमा…\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/the-advent-of-technology-has-changed-the-way-cricket-is-played-and-viewed-by-spectators-around-the-world/", "date_download": "2018-04-24T06:28:43Z", "digest": "sha1:JQIHXKIRHFRO7X6YPP46ZAWB3Q4SENNG", "length": 7938, "nlines": 108, "source_domain": "mahasports.co.in", "title": "डीआरएस पद्धतीचा जन्म ते तिचा प्रवास - Maha Sports", "raw_content": "\nडीआरएस पद्धतीचा जन्म ते तिचा प्रवास\nडीआरएस पद्धतीचा जन्म ते तिचा प्रवास\n१९९२ बेन्सन आणि हेगेस विश्वचषकात पहिल्यादा क्रिकेट खेळताना खेळाडूंनी रंगीत कपड्याचा वापर केला होता. तसेच पहिल्यांदाच वनडे क्रिकेटमध्ये पांढरा चेंडू वापरण्यात आला होता. या विश्वचषकातच पहिल्यांदा डे नाइट सामने खेळवण्यात आले होते. तेव्हा पासून आयसीसीने नेहमीच वनडे क्रिकेटच्या नियमांमध्ये बद्दल केले आहेत. चला तर मग पाहुयात काय आहेत हे बद्दल \nनवीन तंत्रज्ञानामुळे झालेले नियमांमधील बद्दल\nक्रिकेटमधील वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे क्रिकेट जगात मोठे बद्दल झाले आहेत. क्रिकेट खेळण्याची आणि बघण्याची पद्धतच बदलून गेली आहे. मोठ्या स्क्रिन पासून ते स्पायडरकॅमपर्यंतच्या सर्व तंत्रज्ञानाने क्रिकेट विश्व् बदलून गेले आहे.\nउदाहरणार्थ, ११९० ते २००० च्या दशकाच्या पूर्वार्धात, तिसऱ्या पंचांचा निर्णय लाल किंवा हिरव्या रंगाच्या प्रकाशाने संप्रेषित केला जात होता परंतु आता ‘OUT’ किंवा ‘NOT OUT’ शब्दाद्वारे मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित केले जात आहे.\nतसेच तंत्रज्ञानामुळे पंचांचे जीवन अधिक सोपे झाले आहे आणि निर्णयक्षमता अधिक अचूक बनली आहे. सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम किंवा डीआरएस आहे जे २०११ मध्ये प्रथम एकदिवसीय क्रिकेटमध्ये वापरण्यात आले होते.\nप्रथम हे वापरणे अनिवार्य होते पण नंतर ते पर्यायी करण्यात आले त्याचा अर्थ असा की द्विपक्षीय मालिकेत डिअरएस तेव्हाच वापरला जाऊ शकतो जेव्हा दोन्ही संघ त्याचा वापर करण्यास सहमत असतील. डीआरएसचे विविध घटकांपैकी एक बॉल-टॅकिंग आहे जे एलबीडब्ल्यू निर्णयांसाठी वापरले जाते जे की खूप विवादात्मक ठरले आहे.\nबॉल-टॅकिंग आणि हॉक आय सारखे तंत्रज्ञाना अपुरे आहे असे बीसीसीआयचे मत आहे. त्यामुळे बीसीसीआय भारताच्या मालिकेत डिअरएस वापरण्यास नकार आहे.\nसध्या, प्रत्येक एकदिवसीय सामन्यात प्रत्येक संघासाठी एक रिव्हिव उपलब्ध असतो, जो की प्रत्येक यशस्वी आव्हानासाठी परत मिळवितो.\nटॉप ५: कोहलीचे हे वनडे’मधील विराट विक्रम \nवाचा: तब्बल २६ विश्वविक्रम तेही एका सामन्यात\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/lifestyle/beauty-and-makeup?page=22", "date_download": "2018-04-24T06:41:04Z", "digest": "sha1:JFDIAAMMO2I2CB7PML6CJFFIYTHL7ICX", "length": 18607, "nlines": 244, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Lifestyle Beauty & Makeup | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nहृदयविकारावर मात करणारे प्रोटिन\nपोट फुगल्यानंतर करा हे घरगुती उपचार\nचिंता घालविण्यासाठी करा हे उपाय ...\nदारु सेवनामुळे होतात हे आजार ...\n​कोंडा घालविण्यासाठी घरगुती उपचार\n​सुंदर पाय दिसायला हवेत\nउन्हाळ्यातील थकवा घालविण्यासाठी ...\n​डाळींबामुळे रक्तस्त्राव राहतो नियंत्रीत\nकॉम्प्युटरवर काम करताना डोळ्यांची काळजी आवश्यक\nखरबूजाच्या सेवनाने त्वचा होते सुंदर\nजीभ जळाल्यानंतर करा हे घरगुती उपचार\nजिममध्ये न जाताही रहा फिट\nनियमीत पाळीसाठी हे घरगुती उपाय\n​अशी वाढवा केसांची चमक\nकॅन्सरच्या निदानासाठी स्मार्टफोनचा उपयोग\nअसे बनवा पिकनीक सलाड\nवजन कमी करण्यासाठी केळी खा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.vidyawarta.com/03/?p=4279", "date_download": "2018-04-24T06:32:17Z", "digest": "sha1:CICGY4O2DWH72HS2A6UK5B3MKCAF5NP5", "length": 9456, "nlines": 184, "source_domain": "www.vidyawarta.com", "title": " Historical Books | Printing Area", "raw_content": "\nUGC द्वारा यथा अधिसूचित संदर्भित पत्रिका Printing Area, Jr.No.43053\nआंतरराष्ट्रीय बहुभाषिक संशोधन पत्रिका\nशोधपत्र भेजने कि अंतिम तिथी: 20 (हर माह)\nशोधपत्रिका प्रकाशन तिथी 30 (हर माह)\nजर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत\n2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास\n4. आसे होते मोगल\n5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार\n6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा\n8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र\n9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास\n10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८\n11. घोरपडे घराण्याचा इतिहास\n12. छत्रपती शिवाजी महाराज\n13. तंजावरचे मराठे राजे\n14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१\n18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास\n19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक\n22. पुणे अखबार भाग १\n23. पुणे अखबार भाग 2\n24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २\n25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३\n28. पेशवाईचे दिव्य तेज\n30. पेशवाईतील पश्चिम दिग्विजय\n31. पेश्वीतील उत्तर दिग्विजय\n33. पेश्वीतील धर्म संग्राम\n34. पोर्तुगीज मराठा संबंध\n35. प्राचीन दक्षिण हिंदुस्थान\n37. भगवान बुद्ध पूर्वार्ध\n39. भारत इतिहास संशोधक मंडळ अहवाल शके १८३२\n40. भारतवर्षाचा संक्षिप्त इतिहास\n41. भारतीय लिपींचे मौलिक एकरूप\n42. मराठांच्या राज्य कथा\n43. मराठी दफ्तर रुमाल दुसरा\n44. मराठी बखर गद्य\n45. मराठी रियासत मध्य विभाग ३\n46. मराठे व इंग्रज आवृत्ती तिसरी\n47. मराठे व इंग्रज आवृत्ती दुसरी\n51. मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दफ्तर खंड तिसरा १६६३ – १७३९\n52. मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा १७२० – १७४०\n53. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास १८०२ – १८१८\n57. महाराष्ट्र व गोवे शिलालेख\n58. महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग २ (१७०७ ते १८१८ )\n59. महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास\n60. महाराष्ट्रातले खलपुरूष घाशीराम कोतवाल\n62. महाराष्ट्रातील स्वतंत्र लढे\n63. महेश्वर दरबारची बातमीपत्रे\n65. मुंबई इलाख्यातील जाती\n67. मुघल साम्राज्याचा ऱ्हास भाग १\n69. मुसलमान सुफी संतांचे मराठी साहित्य\n70. मुसलमानपुर्व महाराष्ट्र इ.पु. २०० ते इ.स. १३१८\n72. मोगल दरबारची बातमीपत्रे खंड २\n73. मोगल दरबारची बातमीपत्रे\n74. म्हणे लढाई संपली \n76. राजा राममोहन राय\n77. रायगडची जीवनकथा पहिली आवृत्ती\n79. वंश आणि वंशवाद\n80. वसईची मोहीम १७३७ ते १७३९\n82. शिव – चरित्र – निबंधावली\n83. शिवकाल १६३० ते १७०७\n84. शिवकालीन महसुल व्यवस्था\n87. श्री छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र\n88. श्री भाऊंच्या वीरकथा\n90. श्री शिवराज्याभिषेक प्रयोग\n91. श्रीमंत महाराज भोसले यांची बखर\n93. श्रीरामदासांची एतिहासिक कागदपत्रे\n96. सह्याद्रीच्या पायथ्याशी आक्रमण १ ले\n98. हि रामाची आयोध्या\n99. हिंदुस्तानची सामाजिक उत्क्रांती १७९० – १९४०\n100. हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त\n101. हैदराबाद स्वतंत्र संग्राम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/nail-clippers/nail-clippers-price-list.html", "date_download": "2018-04-24T07:18:09Z", "digest": "sha1:IXF3MRWGEXMWV7POFBD5TKEYQYA6PWIF", "length": 11989, "nlines": 284, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "नाही कॅलिप्पेर्स India मध्ये किंमत | नाही कॅलिप्पेर्स वर दर सूची 24 Apr 2018 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nनाही कॅलिप्पेर्स India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nनाही कॅलिप्पेर्स दर India मध्ये 24 April 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 1 एकूण नाही कॅलिप्पेर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन मिमी दिलूक्सने नाही कॅलिप्पेर विथ मॅग्निफार पिंक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Indiatimes, Snapdeal, Flipkart सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी नाही कॅलिप्पेर्स\nकिंमत नाही कॅलिप्पेर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन मिमी दिलूक्सने नाही कॅलिप्पेर विथ मॅग्निफार पिंक Rs. 179 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.179 येथे आपल्याला मिमी दिलूक्सने नाही कॅलिप्पेर विथ मॅग्निफार पिंक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 1 उत्पादने\nशीर्ष 10 नाही कॅलिप्पेर्स\nमिमी दिलूक्सने नाही कॅलिप्पेर विथ मॅग्निफार पिंक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/this-indian-player-made-his-debut-under-azruddin-captaincy-and-still-plays-for-india/", "date_download": "2018-04-24T06:46:34Z", "digest": "sha1:3KQLLOEJRVAYGR47YNM4OCAXYZ7CK5AH", "length": 8418, "nlines": 106, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली पदार्पण केलेला तो खेळाडू आजही खेळतोय भारतीय संघातून - Maha Sports", "raw_content": "\nअझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली पदार्पण केलेला तो खेळाडू आजही खेळतोय भारतीय संघातून\nअझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली पदार्पण केलेला तो खेळाडू आजही खेळतोय भारतीय संघातून\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु होणाऱ्या टी २० मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली. भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराने उत्तम फिटनेसनच्या जोरावर संघात पुनरागमन केलं आहे. वयाच्या ३८ व्या वर्षी युवांसाठी ओळखल्या जाणाऱ्या टी २० क्रिकेटच्या प्रकारासाठी संघात निवड झाल्याने सर्वांनीच कौतुकाबरोबरच आश्चर्यही व्यक्त केले आहे.\nमोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली आशिष नेहराने भारतीय संघात २४ फेब्रुवारी १९९९ ला श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले होते. या कसोटी सामन्यात नेहराला १ बळी मिळाला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता.अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला हा एकमेव खेळाडू सध्या भारतीय संघात खेळत आहे. हरभजन सिंगचे आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली झाले आहे परंतु तो सध्या संघाचा भाग नाही.\nपुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये नेहरा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १९ वर्ष पूर्ण करणार आहे. एका वेगवान गोलंदाजासाठी ही एक मोठी कामगिरी आहे. १२ शस्रक्रिया झाल्यानंतरही संघात निवड होणे ही नक्कीच कौतुकाची तसेच अभिमानाची गोष्ट आहे.\nअझरुद्दीननंतर आलेल्या जवळ जवळ सर्वच कर्णधारांच्या नेतृत्वाखाली नेहरा खेळला आहे. अझरुद्दीन नंतर कसोटी संघाचे ७ कर्णधार झाले तसेच वनडेचे ११ तर टी २० चे ५ कर्णधारांनी भारतीय संघाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळेच नेहरा असा खेळाडू आहे जो अझरुद्दीन ते विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली खेळाला आहे.\nउत्तम फिटनेस आणि रोज योग्य सराव असेल तर खेळात उत्तम कामगिरी करता येते याचे एक उत्तम उदाहरण आशिष नेहराने सर्वांपुढे ठेवले आहे. आजही तो पाहिल्यासारखाच वेगाने गोलंदाजी करतो. आत्ताही नेहरा जवळजवळ १४० च्या वेगाने गोलंदाजी करतो.\nआत्तापर्यंत नेहराने १७ कसोटी, १२० वनडे आणि २६ टी २० सामने खेळले आहेत. या सर्व प्रकारात मिळून त्याने एकूण २३५ बळी घेतले आहेत.\nमँचेस्टर युनाइटेडच्या टार्गेटवर हा अंडर १७ भारतीय संघातील खेळाडू\nजाणून कोणत्या अभिनेत्री आवडतात भारताच्या या दोन युवा खेळाडूंना\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t10911/", "date_download": "2018-04-24T06:46:23Z", "digest": "sha1:A5JX7FYDIO26LVBC6RFDYDTWDIJ7V4RU", "length": 4646, "nlines": 89, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-वाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे.........?", "raw_content": "\nवाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे.........\nAuthor Topic: वाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे.........\nवाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे.........\nअलगुज मनातील बोलून जातील जरासे....\nत्या गप्पांमधे दोन जीव जातील रमून जरासे....\nवाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे...........\nतुला बघताना वाटेल मला तुही बघावेस माझ्याकडे जरासे....\nकिंचित नजर वर करून बघशील तू वाटेल पुन्हा झुकवावे\nवाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे........... \nनको नको म्हणताना तुला ही वाटेल थांबावेसे जरासे.....\nवाटेल क्षण सारे इथेच स्तब्ध व्हावे जरासे.......\nवाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे........... \nवाटेल अजुन थोडेसे उरावे एकमेकांजवळ जरासे....\nहातांच्या ओंजळीत साठवलेले सोनेरी उन\nतुझ्या ओंजळीत रीते करावे जरासे........\nवाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे...........\nजाताना मग गुंफलेले हातामधले हात गुंतुन राहतील जरासे\nपुन्हा भेटण्याचे वचन देऊन जाशील का जरासे........\nवाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे.........\nवाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे.........\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: वाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे.........\nRe: वाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे.........\nRe: वाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे.........\nवाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे.........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.vidyawarta.com/01/?p=4878", "date_download": "2018-04-24T06:19:11Z", "digest": "sha1:SHYTHLA7IJA7HJPOVNW3NZOQPLUGZLEG", "length": 12182, "nlines": 188, "source_domain": "www.vidyawarta.com", "title": " CAS, API आणि शोधनिबंधाविषयी | Vidyawarta", "raw_content": "\nUGC द्वारा यथा अधिसूचित संदर्भित पत्रिकाए Jr.No.43053 & 62759\nआंतरराष्ट्रीय बहुभाषिक संशोधन पत्रिका\nशोधपत्र भेजने कि अंतिम तिथी: 20 (हर माह)\nशोधपत्रिका प्रकाशन तिथी 30 (हर माह)\nHome Important CAS, API आणि शोधनिबंधाविषयी\nCAS, API आणि शोधनिबंधाविषयी\nवेगवेगळ्या सेमिनार, कॉन्फरन्स अथवा संशोधन विषय नियतकालीकामध्ये शोधनिबंध पाठविताना प्राध्यापकांकडून HP कडे नेहमीच काही प्रश्नांची संबंधीतांना विचारणा करण्यात येते.आपला शोधनिबंध प्रोसेडींग मध्ये अथवा रिसर्च जनरलमध्ये प्रकाशित करण्यासाठी व CAS अथवा API साठीची परिपूर्ती करण्यासाठी आपले लेख अथवा शोधनिबंध प्रकाशित करणे आवश्यकच आहे.\nअनेक प्राध्यापकांकडे चांगल्या प्रकारचे ज्ञानभंडार उपलब्ध असते, मात्र ते व्यवस्थीत सादर न करु शकल्यामुळे त्यांना UGC च्या नियमांची पुर्तता करणे कठीण जाते. आजकाल रिसर्च जर्नल अथवा प्रोसेडींगसाठी शोधनिबंध पाठविण्याची प्रक्रिया संगणकीकृत व ऑनलाईन झालेली आहे. विद्यावार्ताकडे या संबंधी वारंवार कांही प्रश्न विचारले जातात. त्याची पुर्तता पुढीलप्रमाणे करता येईल.\n1) शोधनिबंध कसा लिहावा\n– आपल्या विषयाशी संबंधीत कोणत्याही मुद्यावर आधारित शोध निबंध अथवा लेख लिहीता येतो. त्यामध्ये सारांश, प्रस्तावना, नमुना शब्द, लेखन साहित्याचा आढावा, विश्लेषण, समारोप व संदर्भसुची इत्यादी संशोधन विषयक पायर्यांचा अवलंब केलेला असावा. विद्यावार्तामध्ये सर्व विषयांचे व सर्व विद्याशाखांचे लेख आणि शोधनिबंध प्रकाशित केले जातात.\n2) शोधनिबंध कसा पाठवावा \n– कॉम्प्युटरद्वारे टाईपकरुन संबंधीत लेख केवळ ई-मेलने पाठवावा. पेजमेकर किंवा एम.एस.वर्डमध्ये टाईप केलेली मुळफाईल (Open File) vidyawarta@gmail.com वर पाठवावी. pdf अथवा scan केलेले पेजेस, फोटो पेजेस पाठवू नयेत शक्यतो. लेख स्वतःच्याच ई-मेल आयडीवरुन पाठवावा.\n3) फाँट व फॉर्मेटींग कशी हवी \n– हिंदी व मराठीसाठी Ism-Dvb-TT-Surekh,किंवा Kruti Dev055 किंवा Shreelipi 708 हा फाँट वापरा, साईज 14, इतर सर्व सेटींग नॉर्मल असावी. इंग्रजी भाषेसाठी Times New Roman साईज 12, इतर सेटींग नॉर्मल ठेवावी. लेखामध्ये ग्राफ, नकाशे, चित्र, टेबल्स असतील तर ते योग्य पद्धतीने, योग्य जागी सेटींग केलेले असावे. लेख 3000 शब्दापर्यंत (5-6 पेजेस) असावा. वरील फॉरमेल्टि शिवाय इतर बाबींचा अवलंब केल्यास संपादक डॉ.बापूजी घोलप यांना कळवावे.\n4) फिस कशी जमा करावी \n– आपला रिसर्च पेपर स्विकारल्यानंतर हर्षवर्धन प्रकाशनाच्या बँक खात्यावर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून 800/- रुपये फिस जमा करता येते. फिस जमा करण्यासाठी ऑनलाईन, ऑफलाईन, मनीऑर्डर, चेक डिपॉझीट अथवा एखादे मोबाईल अॅप्लीकेशन वापरुन फिस पाठविता येते. फिस जमा केल्यानंतर त्याचे डिटेल्स पाठविने किंवा संपादकांना फोनकरुन माहिती कळविणे अत्यंत गरजेचे आहे.\n5) हे विसरु नका \n– लेखासोबत आपले संपुर्ण नांव, पत्ता, पिनकोड, मोबाईल नंबर, ई-मेल द्यावा.\n-पाठविलेला ई-मेल विद्यावार्तास मिळाला की नाही याची खात्री करा.\n-आपणास किती प्रती हव्या आहेत. त्यानुसार फीस जमा करुन पावती पाठवावी.\n-पाठवित असलेला लेख संपूर्णपणे निर्दोश, परिपुर्ण व अप्रकाशित असेल तरच पाठवा.\n– अंडरटेकिंग फॉर्म स्वहस्तक्षरात भरुन, स्कॅन करुन पाठवावा.\n– हर्षवर्धन प्रकाशनाच्या कोणत्या जर्नलमध्ये लेख प्रकाशित करायचा आहे ते कळवावे.\n6) विद्यावार्ता संबंधी महत्वाच्या तारखा \n– लेख ई-मेलद्वारे पाठविणे : 20\n-फीस जमा करणे : 25\n-जर्नल प्रकाशित होते : 30\n-जर्नल ऑनलाईन उपलब्ध : 05\n-जर्नलची हार्डकॉपी मिळेल: 10\nवरील प्रमाणे जर्नल प्रकाशनाचे वेळापत्रक (प्रत्येक महिन्यास) असून स्थलकाल परिस्थितीनुसार या मध्ये 4-5 दिवसांचा फरक होऊ शकतो.\n7) विद्यावार्तास मान्यता व दर्जा काय \n8) हर्षवर्धन प्रकाशनाच्या इतर सुविधा\n-M.Phil, Ph.D.च्या प्रबंधाचे ISBN सह पुस्तक प्रकाशित केले जाते.\n-विद्यावार्ता व प्रिंटींग एरिया जर्नलच्या संपादक मंडळावर नियुक्तीची संधी मिळेल.\n– शैक्षणिक ग्रुपशी जोडले जाते व अपडेट्स कळविण्यात येतात.\n– कॉन्फरन्स, सेमीनारच्या विशेषांकाचे ISBN सह प्रकाशन केले जाते.\n9) प्रकाशन स्थळ, पत्ता\n10) अधिक माहितीसाठी संपर्क\n» कृती देव ०५५ फॉन्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F.%E0%A4%AC%E0%A5%80.%E0%A4%8F._%E0%A4%98%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-04-24T06:18:23Z", "digest": "sha1:SAJVQUM6A4FYQMHTYJYJBFWVSY2EWZSQ", "length": 4864, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ए.बी.ए. घनी खान चौधरी - विकिपीडिया", "raw_content": "ए.बी.ए. घनी खान चौधरी\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nए.बी.ए. घनी खान चौधरी (नोव्हेंबर १, इ.स. १९२७- एप्रिल १४, इ.स. २००६) हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९८०, इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील मालदा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इंदिरा गांधी सरकारमध्ये इ.स. १९८० ते इ.स. १९८२ दरम्यान उर्जामंत्री आणि इ.स. १९८२ ते इ.स. १९८४ दरम्यान रेल्वेमंत्री होते. लोकसभेत निवडून जाण्यापूर्वी ते इ.स. १९५२ ते इ.स. १९८० या काळात पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्य होते.\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी\n७ वी लोकसभा सदस्य\n८ वी लोकसभा सदस्य\n९ वी लोकसभा सदस्य\n१० वी लोकसभा सदस्य\n११ वी लोकसभा सदस्य\n१२ वी लोकसभा सदस्य\n१३ वी लोकसभा सदस्य\n१४ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९२७ मधील जन्म\nइ.स. २००६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://jeevantarang.wordpress.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-24T06:49:30Z", "digest": "sha1:SJIJJLDOUM524MWBG4KGAN4Q4J2VEBPH", "length": 8564, "nlines": 111, "source_domain": "jeevantarang.wordpress.com", "title": "चमनबहार « जीवनतरंग....", "raw_content": "\nविचार… मत… अनुभव… वास्तव….निरीक्षणें….\nखूप दिवसांनी ब्लॉगवर आलेय्‌. नाशिक सोडून सध्या आम्ही चेन्नईला स्थायिक झालो आहोत. नवीन ठिकाण, भाषेपासून खाण्यापिण्यापर्यंत सगळं काही नवीन. आम्ही जून महिन्यात चेन्नईला आलो. श्रृतीची शाळा, घर लावणे , नवा परिसर माहित करून घेणे, नव्या ओळखी , नव्या मैत्रिणी , तामिळ भाषेची जुजबी ओळख करून घेणे या सगळ्यात नवी पोस्ट लिहायला जमलेच नाही. अर्थात इकडे आल्यावर भटकंती बरीच झाली आहे. वेल्लोरचे गोल्डन टेंपल , कांचीपुरम्‌ , पॉंडीचेरी, महाबलीपुरम्‌ अशी जवळपासची बरीच ठीकाणं बघून झालीयेत्‌ . त्याबद्द्लची सविस्तर पोस्ट नंतर टाकेन.\nआज चक्क मी एक रेसिपी सांगणार आहे. ‘सुपारीशिवाय सुपारी’ म्हणजे सुपारी न वापरता केवळ बडीशेप वगैरे वापरून एक वेगळ्या प्रकारची सुपारी किंवा मुखवास ही मूळ रेसिपी माझ्या आतेसासूबाईंची – कुमुदआत्यांची आहे. त्या यामध्ये कच्ची सुपारी फोडून थोड्या तुपात परतून वापरायच्या. लहान असताना श्रृती ही सुपारी आवडीने खायची. म्हणून मी मूळच्या रेसिपीमधला ‘कच्ची सुपारी’ हा भाग वगळून थोडी रेसिपी modify केली आहे. करायला अगदी सोपी आहे आणि पटकन्‌ होणारी आहे. तेव्हा करून बघा आणि कळवा कशी झालीय्‌ ते \n२५० ग्रॅम बडिशेप (जाड किंवा देशी मिळाली तर उत्तम)\n५० ग्रॅम सुके खोबरे किसून\n५० ग्रॅम ओवा (थोडा जास्त घेतला तरी चालेल)\n१०० ग्रॅम जेष्ठ्मध पावडर\n४ वेलदोडे (सालासकट आख्खे वेलदोडे घ्यावेत)\nचमनबहार २ टी स्पून (‘चमनबहार’लाच रोझ पावडर म्हणतात.)\n१. प्रथम कढई गरम करून त्यात किसलेले खोबरे थोडे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावे. फार लाल करू नये किंवा जास्त भाजू नये.\n२. ते खोबरे ताटात काढून त्याच कढईत बडिशेप भाजून घ्यावी. ती ही फार भाजू नये. फार कुरकुरीत करू नये.\n३. त्यातच आता ओवा, लवंगा आणि वेलदोडे घालून थोडे परतावे.\n४. आता गॅस बंद करून त्याच कढईत पहिल्यांदा गरम केलेले खोबरे घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे.\n५. हे सर्व मिश्रण पूर्ण गार होऊ द्यावे.\n६. हे गार झालेले मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यावे. थोडेसे भरडच ठेवावे, फार बारिक करू नये.\n७. एका मोठ्या भांड्यात हे मिश्रण काढून त्यात मीठ, चमनबहार आणि निम्मी जेष्ठ्मध पावडर घालून चांगले मिसळून घ्यावे.\n८. जर गोडीला कमी वाटले तर थोडी थोडी जेष्ठ्मध पावडर घालून चांगले मिसळून घ्यावे.\n९. सुपारीशिवाय सुपारी तयार आहे. ही हवाबंद डब्यात साठवावी.\nटीप – चमनबहार हे सुवासासाठी वापरतात आणि त्याला साधारण पानमसाल्यासारखी चव असते. आपल्या आवडीप्रमाणे याचे प्रमाण वाढवले तरी चालते. पण खूप जास्त झाले तर थोडी कडवट चव लागू शकते.\n2 प्रतिक्रिया Posted in असंच काहीही Tagged चमनबहार, बडीशेप, सुपारी\nस्टीफन कोवेचे ९०-१० तत्त्व\nहोतं असं कधी कधी….\nसर्वाधिक वाचल्या गेलेल्या पोस्टस्‌\n मग पुढचे लिखाण तुमच्या ई-मेल वर मिळवा.... इथे तुमचा ई-मेल पत्ता द्या.....\nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeemarathijagruti.com/blog/how-to-choose-perfect-sunglasses/", "date_download": "2018-04-24T06:46:40Z", "digest": "sha1:DT2IEEOWIMEYRVULHZ4BNAOX6SYW7SEY", "length": 14346, "nlines": 245, "source_domain": "zeemarathijagruti.com", "title": "निवड परफेक्ट सनग्लासेसची! - Zee Marathi Jagruti", "raw_content": "\nफॅशनेबल लूकसाठी ‘चेरी ऑन दि टॉप’ असणा-या गॉगल्सचे वेगवेगळे प्रकार बाजारात वर्षभर पहायला मिळतात. गोल, चौकोनी, पंचकोनी अशा कुठल्याही आकारातील फ्रेम्स व भरपूर रंगांमध्ये उपलब्ध असणा-या त्याच्या लेन्सेसना तोडच नाही मात्र हे गॉगल्स ख-या अर्थाने ऑन ड्युटी असतात ते उन्हाळ्यामध्ये, सूर्याच्या प्रखर किरणांपासून डोळ्यांना सुखरुप ठेवणारे सनग्लासेस आता प्रत्येकीच्या पर्समध्ये हमखास असतील आणि असायलाच हवेत कारण डॉळ्यांना थंडावा देण्यासाठी ते गरजेचेच आहेत.\n• गॉगल विकत घेताना प्रथम ट्रायल घ्यावी, चेहरापट्टीनुसार शोभून दिसणाराच गॉगल निवडावा.\n• वेगवेगळ्या रंगातील गॉगल्स दिसायला जरी आकर्षक असले, तरी उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी ब्लॅक, ब्राऊन किंवा ग्रे असे गडद रंग अधिक फायदेशीर ठरतात.\n• स्वस्त किंवा निकृष्ट दर्जाचा गॉगल वापरु नये.\n• गॉगल विकत घेताना अतिनिल किरणांपासून सुरक्षित असणा-या ग्लासेसची निवड करावी.\n• काचेवर चरे पडलेला गॉगल वापरु नये, अशा काचांतून धूरकट दिसण्याने डोळ्यांना त्रासही होऊ शकतो.\n• तसेच, गॉगलच्या काचा नियमित स्वच्छ न केल्यास त्याला सतत धूळ व घाम लागल्यानेही धूसर दिसायला लागते.\n• टर्कीश रुपाल किंवा पेपर नॅपकीनने ग्लास स्वच्छ केल्यास काचेवर चरे पडू शकतात, म्हणून काचा लेन्स क्लिनर स्प्रेनेच साफ कराव्यात.\n• गॉगलसोबत मिळणा-या केसमध्येच गॉगल ठेवावा, बॅगेत किंवा खिशात ठेवल्याने त्याच्या दांड्या वाकून काचाही खराब होऊ शकतात.\n• केसमध्ये ठेवताना गॉगलच्या काचा नेहमी वरच्या बाजूस राहतील याची काळजी घ्यावी.\n• गॉगलच्या दांड्या वाकल्यास किंवा नोजपॅड निघाल्यास लगेच दुरुस्त करुन घ्यावे, यामुळे गॉगल बॅलेन्स रहातो.\n• उन्हाळ्यात चष्मा किंवा गॉगल कारमध्ये ठेवू नये, सततच्या जास्त उष्णतेने ग्लासचे कोटिंग निघू शकते.\nउष्णतेपासून डोळ्यांना आराम मिळावा या उद्देशासोबत फॅशन म्हणूनही ड्रेसनुसार गॉगल बदलण्याचा ट्रेंड सुरु आहे. तुम्हीही विविध त-हेचे सनग्लासेस वापरु शकता अगदी बिनधास्त, वरील टिप्सच्या मदतीने योग्य गॉगल निवडता येईल व फेवरेट गॉगलची प्रमाने जपणूकही करता येईल\nबलात्कारास कपडे जबाबदार नसतात\nमनमोकळं बोल म्हणतेय, ‘मी टू’ मोहिम\nपिकल्या पानांच्या छायेतलं घरकुल\nरेसिपी – कुरकुरे लॉलीपॉप्स\nरेसिपी – व्हेज चीज पराठा\n१४ फेब्रुवारी ‘मोहिम स्त्रियांच्या सुरक्षेची’\nरेसिपी – लेमन पुडींग\nइनडोअर बागेत लावावीत ‘ही’ झाडे\nसाड्यांचे आयुष्य वाढवतील ‘हे’ उपाय\nमेकअप करताना होतात ‘या’ चुका\nरेसिपी – गार्लिक ब्रेड\nशिळ्या भाताच्या चवदार रेसिपीज\nझटपट होणा-या ‘नेल आर्ट’ डिझाईन्स\nरेसिपी – साबुदाणा पुरी\nया १० कल्पक छंदांपैकी एकाशी तरी मैत्री कराच\nवर्ष २०१७ मधील ८ जगजेत्या भारतीय महिला\nअसे बनवता येईल ‘किचन गार्डन’\nरेसिपी – मिरीयुक्त रस्सम\nनववर्षी करु असे ‘भन्नाट संकल्प’\nरेसिपी – बिनअंड्याचा केक\nहिवाळ्यात या ठिकाणांना भेट द्यावीच\nजुन्या साड्यांचा फॅशनेबल उपयोग\nरेसिपी – चना चिली\nरेसिपी – पोह्यांचा ढोकळा\nलग्नझालेल्या ‘ती’ समोरील प्रश्न\nतुम्ही पाहिल्या नसतील अशा मेहंदी डिझाईन्स\nरेसिपी – सोया नगेट्स\nरेसिपी – काश्मिरी मटण चॉप्स\nरेसिपी – बटर मुरुक्कु\nदिवाळीची सुट्टी मिळत नसेल, तर हे वाचा\nरेसिपी – बंगाली मिठाई ‘संदेश’\nया ५ गोष्टींमुळे महिलांना आवडतो ‘श्रावण’\nलहान मुलांना स्मार्टफोन देताय की आजार…\nअशी असते माझी ‘दुपार’\nइथे नाही गेलात, मग पावसाळा काय अनुभवलात\nअसा दम द्याल, तर नावडते पालक व्हाल\nविश्वविक्रमी एक्स्प्रेस झुलन गोस्वामी\nरेसिपी – सोयाबीन कटलेट\nब्युटीपार्लरची किमया साधणारे घरगुती फेसपॅक\nऑक्टोबर हिट, आईस्क्रीमची ट्रिट\nतुला साजेचा ‘हेअर कट’\nपालक म्हणून मोठे होताना\nफळांच्या स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी\nअंतराळी झेप घेई ‘भारतकन्या’\n‘नाताळ’ होईल अधिक चविष्ट\nदिवाळी रंगे, फराळा संगे\nझटपट बनणारे पौष्टिक पदार्थ\nसणांचे क्षण करा आणखी गोड\nजाणून घ्या महत्त्वपूर्ण कायदे\nआकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी द्या साथ स्वतःला स्वतःची \nझटपट होणारे काही गोडाचे पदार्थ\nस्वत:तील ‘स्व’चा शोध घ्यायचायं\nजागृतीची साथ मिळणार आणि सुंदर मी होणार \nस्त्री मनातील स्वसंरक्षणाचा ‘संकल्प’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2018-04-24T06:27:53Z", "digest": "sha1:IX4BDOUMWHH7WN75AESFYM3EOTADCENA", "length": 4204, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एडवर्ड बॅलियोल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएडवर्ड बॅलियोल (इ.स. १२८३ - इ.स. १३६७) स्कॉटलंडचा राजा होता.\nहा जॉन बॅलियोल व इसाबेला दि वॉरेनचा सगळ्यात मोठा मुलगा होता. त्याने ईंग्लंडचा राजा एडवर्ड तिसरा याच्या साहाय्याने स्कॉटलंडचा तत्कालीन बालराजा डेव्हिड दुसऱ्याला पदच्युत केले व राज्य मिळवले.\nत्याने इ.स. १३३२चे काही महिने, इ.स. १३३३-इ.स. १३३४ व इ.स. १३३५-इ.स. १३३६ या काळात स्कॉटलंडवर राज्य केले.\nइ.स. १२८३ मधील जन्म\nइ.स. १३६७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ००:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://zeemarathijagruti.com/blog/aajibaicha-batava", "date_download": "2018-04-24T06:52:48Z", "digest": "sha1:UO5NE6Y7V7TSKPZQACX4FLNTQQKYQQXZ", "length": 12382, "nlines": 244, "source_domain": "zeemarathijagruti.com", "title": "Aajibaicha Batwa,आजीबाईचा बटवा,घरचा वैद्य,घरगुती उपाय,Home Remedies - Zee Marathi Jagruti", "raw_content": "\nतब्येतीच्या छोट्या मोठ्या कुरबुरी होतचं असतात.त्यावर प्रथमोपचार म्हणून घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. पारंपरिक दृष्टीने या औषधांना महत्त्व आहे. आजीबाईच्या बटव्यातील रामबाण उपाय आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. जुनं ते सोनं ही म्हण प्रचलित आहे त्याचप्रमाणे जुन्या काळातले हे उपाय आजही तितकेच फायदेशीर असल्याचे मत फिटनेस एक्स्पर्टने मांडले आहे. त्यातील काही उपाय जाणून घेऊयात\n1. घशाला त्रास होत असेल किंवा आवाज बसला असेल तर गरम दुधात हळद घालून प्यावे\n2. पोटात गॅसचा त्रास झाला असेल तर लिंबाच्या रसासोबत ओवा खाल्ला तर त्रास की कमाई होतो.\n3. जुलाब होत असतील तर चमचाभर मीठ, दोन चमचे साखर मिश्रित लिंबू पाणी घेतल्यास आराम मिळतो\n4. कावीळ झाली असेल तर आठवडाभर ऊस चावून खावा.\n5. सर्दी- कफ झाला असेल तर जेष्ठमध खावे\n6. सतत खोकला येत असेल १ ते २ चमचे मध घ्यावे किंवा खडीसाखर चघळावी.\n7. तोंड आले असेल तर जाईच्या पानांचा रस लावावा.\n8. लघवी करताना जळजळ होत असेल तर धान्याचे पाणी प्यायल्याने त्रास कमी होऊ शकतो.\n9. भाजलं किंवा पोळलं असेल तर त्यावर तूप लावावे\n10. पित्त झालं असेल तर आमसुलाचे पाणी प्यावे.\nअसे काही घरगुती उपाय आपल्याला नक्की फायदेशीर पडू शकतात.\nबलात्कारास कपडे जबाबदार नसतात\nमनमोकळं बोल म्हणतेय, ‘मी टू’ मोहिम\nपिकल्या पानांच्या छायेतलं घरकुल\nरेसिपी – कुरकुरे लॉलीपॉप्स\nरेसिपी – व्हेज चीज पराठा\n१४ फेब्रुवारी ‘मोहिम स्त्रियांच्या सुरक्षेची’\nरेसिपी – लेमन पुडींग\nइनडोअर बागेत लावावीत ‘ही’ झाडे\nसाड्यांचे आयुष्य वाढवतील ‘हे’ उपाय\nमेकअप करताना होतात ‘या’ चुका\nरेसिपी – गार्लिक ब्रेड\nशिळ्या भाताच्या चवदार रेसिपीज\nझटपट होणा-या ‘नेल आर्ट’ डिझाईन्स\nरेसिपी – साबुदाणा पुरी\nया १० कल्पक छंदांपैकी एकाशी तरी मैत्री कराच\nवर्ष २०१७ मधील ८ जगजेत्या भारतीय महिला\nअसे बनवता येईल ‘किचन गार्डन’\nरेसिपी – मिरीयुक्त रस्सम\nनववर्षी करु असे ‘भन्नाट संकल्प’\nरेसिपी – बिनअंड्याचा केक\nहिवाळ्यात या ठिकाणांना भेट द्यावीच\nजुन्या साड्यांचा फॅशनेबल उपयोग\nरेसिपी – चना चिली\nरेसिपी – पोह्यांचा ढोकळा\nलग्नझालेल्या ‘ती’ समोरील प्रश्न\nतुम्ही पाहिल्या नसतील अशा मेहंदी डिझाईन्स\nरेसिपी – सोया नगेट्स\nरेसिपी – काश्मिरी मटण चॉप्स\nरेसिपी – बटर मुरुक्कु\nदिवाळीची सुट्टी मिळत नसेल, तर हे वाचा\nरेसिपी – बंगाली मिठाई ‘संदेश’\nया ५ गोष्टींमुळे महिलांना आवडतो ‘श्रावण’\nलहान मुलांना स्मार्टफोन देताय की आजार…\nअशी असते माझी ‘दुपार’\nइथे नाही गेलात, मग पावसाळा काय अनुभवलात\nअसा दम द्याल, तर नावडते पालक व्हाल\nविश्वविक्रमी एक्स्प्रेस झुलन गोस्वामी\nरेसिपी – सोयाबीन कटलेट\nब्युटीपार्लरची किमया साधणारे घरगुती फेसपॅक\nऑक्टोबर हिट, आईस्क्रीमची ट्रिट\nतुला साजेचा ‘हेअर कट’\nपालक म्हणून मोठे होताना\nफळांच्या स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी\nअंतराळी झेप घेई ‘भारतकन्या’\n‘नाताळ’ होईल अधिक चविष्ट\nदिवाळी रंगे, फराळा संगे\nझटपट बनणारे पौष्टिक पदार्थ\nसणांचे क्षण करा आणखी गोड\nजाणून घ्या महत्त्वपूर्ण कायदे\nआकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी द्या साथ स्वतःला स्वतःची \nझटपट होणारे काही गोडाचे पदार्थ\nस्वत:तील ‘स्व’चा शोध घ्यायचायं\nजागृतीची साथ मिळणार आणि सुंदर मी होणार \nस्त्री मनातील स्वसंरक्षणाचा ‘संकल्प’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://weltnews.eu/hi/solider-maschinenbau-kurze-ruestzeiten-und-hohe-leistung-ueberzeugen-holzer-druck-und-medien/", "date_download": "2018-04-24T06:38:46Z", "digest": "sha1:GFR74XJR6GHKWWITOOCTR3T4GY7CR3TX", "length": 8828, "nlines": 103, "source_domain": "weltnews.eu", "title": "Solider Maschinenbau, kurze Rüstzeiten und hohe Leistung überzeugen Holzer Druck und Medien – Weltnews.eu", "raw_content": "\nजर्मनी से समाचार, यूरोप और दुनिया\nApril 16, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों न्यू मीडिया और संचार 0\nटिप्पणी करने वाला पहला व्यक्ति बनें\nउत्तर छोड़ दें उत्तर रद्द करे\nआपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा.\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nऑटो समाचार & यातायात समाचार\nनिर्माण, निवास, Haus, उद्यान, ध्यान\nकंप्यूटर और दूरसंचार सूचना\nई-बिजनेस, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स und इंटरनेट समाचार\nइलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रिक और उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स\nपरिवार और बच्चों, बच्चों जानकारी, परिवार & सह\nवित्तीय समाचार और व्यापार समाचार\nकंपनी, राजनीति और कानून\nव्यवसाय, शिक्षा और प्रशिक्षण\nकला और संस्कृति ऑनलाइन\nचिकित्सा और स्वास्थ्य, चिकित्सा विशेषज्ञों और कल्याण\nन्यू मीडिया और संचार\nनई प्रवृत्तियां ऑनलाइन, फैशन के प्रति रुझान और जीवन शैली\nजानकारी और पर्यटक सूचना यात्रा\nखेल समाचार, खेल आयोजन\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\nसाहसिक कार्य शेयरों श्रम बर्लिन बैलेंस शीट कमोडिटी टीवी अनुपालन को नियंत्रित करना डाटा सुरक्षा डिजिटलीकरण कीमती धातुओं यूरोप वित्त नेतृत्व प्रबंधन तकनीकों काले धन को वैध प्रबंध स्वास्थ्य सोना हैम्बर्ग हॉगकॉग हांगकांग हांगकांग व्यापार विकास परिषद (HKTDC) होटल Humor अचल संपत्ति यह कनाडा संचार तांबा प्यार तरलता रसद प्रबंध मेक्सिको नेवादा रेटिंग ROHSTOFF टीवी कच्चे माल चांदी कॉर्पोरेट प्रबंधन व्यवसाय बिक्री अर्थव्यवस्था ज़िंक\nकॉपीराइट © 2018 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2018-04-24T06:49:41Z", "digest": "sha1:36OTTB3SJR4TQXOKUDOXOBZYLR2QQVWA", "length": 15588, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चिदंबरम सुब्रमण्यम - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n(३० जानेवारी १९१०- ७ नोव्हेंबर २०००)\nचिदंबर सुब्रमण्यम यांचा जन्म. कोइंमतूर जिल्ह्यातील सेनगुट्ट पलयम येथे झाला. शालेय शिक्षण संपवून ते उच्च शिक्षणासाठी मद्रासमध्ये दाखल झाले. चक्रवर्ती राजगोपालाचारी व पंडित नेहरु या नेत्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला व स्वातंत्र्यलढयात त्यांनी भाग घेतला. १९४२ मध्ये महात्मा गांधींनी सुरु केलेल्या 'चले जाव' चळवळीत त्यांनी भाग घेतला.\nतत्कालीन मद्रास प्रांतात १९५२ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले व राज्यमंत्रिमंडळातही त्यांची निवड झाली. तमिळनाडूत राजगोपालाचारी, के. कामराज व भक्तवत्सलम आदी नेत्यांबरोबर त्यांनी काम केले व कुशल, कर्तबार व कडक शिस्तीचा प्रशासक म्हणून छाप पाडली. राज्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण हिच गुरुकिल्ली आहे, या भावनेने सुब्रमण्यम यांनी सर्वासाठी मोफत शिक्षण असूनही भयंकर दारिद्य, भूक यामुळे मुले शाळेत येत नसल्याचे लक्षात आाल्यानंतर त्यांनी या मुलांना एक वेळचे जेवण मोफत देण्यास प्रारंभ केला व देशभर त्यांच्या या योजनेचे कौतुक झाले.\nकेंद्रीय मंत्री म्हणून श्री. सुब्रमण्यम यांचे काम अनन्यसाधारण आहे. ज्येष्ठ नेते कृषी खाते सांभाळण्यास तयार नसताना पंतप्रधान लालबहादूरशास्त्रींनी त्यांना हे खाते सोपविले. अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्णकडे नेण्यासाठी विविध योजना राबवून श्री. सुब्रमण्यम यांनी शास्त्रीजींचा विश्वास सार्थ ठरविला. देशोदेशीचे उत्कृष्ट बियाणे वापरण्यास त्यांनी शेतकर्‍यांना प्रवृत्त केले व १९७२ मध्ये भारतात गव्हाचे सर्वाधिक पीक निघाले आणि ही हरितक्रांतीची नांदी ठरली. या त्यांच्या कृषिविषयक नव्या धोरणामुळे 'आधुनिक कृषी धोरणाचे शिल्पकार' अशी त्यांची ओळख झाली.\nस्वातंत्र्योत्तर काळात देश घडवण्यासाठी भरलेल्या खर्‍या व ज्येष्ठ देशभक्तांच्या परिषदेचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. सुब्रमण्यम यांनी घटना परिषदेवरही काम करून घटना निर्मीतीत मोलाची साथ दिली.\nपन्नास वर्षे सक्रिय राजकारणात असणाऱ्या सुब्रमण्यम यांनी १९७७ मध्ये निवृत्ती जाहीर केली. परंतु वेळोवेळी राजकीय व विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शनासाठी आपल्या अनुभवांचा ठेवा त्यांनी उपलब्ध करून दिला.\n१५ फेब्रुवारी १९९० मध्ये ते महाराष्ट्र्राचे राज्यपाल झाले हे पद सोडल्यानंतर भारतीय विद्या भवन या अग्रगण्य शैक्षणिक संस्थेच्या कार्यात स्वत:ला झोकून दिलेे. केंद्र सरकारच्या एरोनॉटिक्स उद्योग, समितीचे अध्यक्ष, राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष इ. महत्त्वाची पदेही त्यांनी संभाळली. वॉर ऑन पॉवर्टी . 'सम कंट्रीज हिच आय व्हिजिटेड राऊंड द्र वर्ल्ड, 'द्र इंडिया ऑफ माय ड्रीम' इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली.\nदेश वर्षानुवर्षे अन्नधान्य आयात करत असतानाच सुब्रमण्यम यांच्यामुळे झालेल्या कृषी क्षेत्रातील क्रांतीने संपुर्ण जगभर त्यांचे कौतुक झाले. तसेच अर्थमंत्री असतांना विभागीय ग्रामीण बँका' सुरु करून बँकांचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोचवून या भागाला बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले.\nभारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे सुब्रमण्यम यांनी शेतकर्‍यांसाठी व ग्रामीण भाग विकसित करण्यासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. भारत सरकारने विविध क्षेत्रांतून निरंतर देशसेवा करणाऱ्या या नेत्याला १९९८ मध्ये 'भारतरत्न ' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.\nकॉलव्हिल · सिंग · बाजपाई · महताब · प्रकाश · सुब्बरायण · पंडित · चेरियन · जंग · अली · मेहरा · लतीफ · प्रभाकर राव · शर्मा · का. रेड्डी · सुब्रमण्यम · अलेक्झांडर · फझल · कृष्णा · जमीर · शंकरनारायण · विद्यासागर राव\nसर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४) • चक्रवर्ती राजगोपालाचारी (१९५४) • चंद्रशेखर वेंकट रामन (१९५४) • भगवान दास (१९५५) • मोक्षगुंडम विश्वेश्वरया (१९५५) • जवाहरलाल नेहरू (१९५५) • गोविंद वल्लभ पंत (१९५७) • धोंडो केशव कर्वे (१९५८) • बिधन चंद्र रॉय (१९६१) • पुरूषोत्तम दास टंडन (१९६१) • राजेंद्र प्रसाद (१९६२) • झाकिर हुसेन (१९६३) • पांडुरंग वामन काणे (१९६३)\nलाल बहादूर शास्त्री (१९६६) • इंदिरा गांधी (१९७१) • वराहगिरी वेंकट गिरी (१९७५) • के. कामराज (१९७६) • मदर तेरेसा (१९८०) • विनोबा भावे (१९८३) • खान अब्दुल गफारखान (१९८७) • ए‍म.जी. रामचंद्रन (१९८८) • बाबासाहेब अांबेडकर (१९९०) • नेल्सन मंडेला (१९९०)\nवल्लभभाई पटेल (१९९१) • राजीव गांधी (१९९१) • मोरारजी देसाई (१९९१) •\nसुभाषचंद्र बोस (१९९२)नंतर परत घेतले • मौलाना अबुल कलाम आझाद (१९९२) • जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा (१९९२) • सत्यजित रे (१९९२) • ए.पी.जे. अब्दुल कलाम (१९९७) • गुलझारीलाल नंदा (१९९७) • अरुणा आसफ अली‎ (१९९७) • एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९९८) • चिदंबरम सुब्रमण्यम (१९९८) • जयप्रकाश नारायण (१९९८) • पंडित रविशंकर (१९९९) • अमर्त्य सेन (१९९९) •\nलता मंगेशकर (२००१) • बिस्मिल्ला खाँ (२००१) • भीमसेन जोशी (२००८) • सी.एन.आर. राव (२०१३) • सचिन तेंडुलकर (२०१३) • मदनमोहन मालवीय (२०१४) • अटलबिहारी वाजपेयी (२०१४)\nभारतीय राज्यघटना समितीचे सदस्य\n३ री लोकसभा सदस्य\n५ वी लोकसभा सदस्य\n६ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९१० मधील जन्म\nइ.स. २००० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०१८ रोजी १६:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://raigad.wordpress.com/2017/02/12/bajirao-delhi/", "date_download": "2018-04-24T06:39:10Z", "digest": "sha1:SLQAJHV5J2JZ3RATPT6IGRUP3AOWPLK2", "length": 14918, "nlines": 155, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "थोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक | इतिहासातील सत्याच्या मागावर...", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \n… आम्ही केवळ निमित्य \n← खटासी पाहिजे खट\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन →\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक\nफेब्रुवारी 12, 2017 by raigad यावर आपले मत नोंदवा\nआपल्या २० वर्षांच्या वादळी कारकिर्दीत थोरल्या बाजीराव साहेबांनी काही अचाट धैर्य केली. त्यातील एक होते थेट दिल्लीवर चढाई करणे. १७३७ साली सादतखानावर केलेली ही चढाई इतिहास प्रसिद्ध आहे. ह्या स्वारी बद्दल थेट राउंनीच अप्पांना पत्र लिहून कळवले होते. हे पत्र त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्वपूर्ण ठरावे असेच आहे. पत्रातील एक वाक्य तर कायम स्मरणात रहावे असे आहे, त्यावरून त्या काळातील राजकारणावर भरपूर प्रकाश पडतो – “दिल्ली महास्थळ, अमर्याद केल्यास राजकारणाचा दोर तुटतो”.\nइतिहास प्रेमींच्या अभ्यासाकरिता सदर पत्र संपूर्ण उपलब्ध करत आहोत. पत्र जरा लांबलचक आहे परंतु अत्यंत महत्वाचे आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे मुद्दाम अधोरेखित केले आहेत. वाचकांनी हे पत्र जरुर वाचावे.\nथोरल्या बाजीरावांचे चिमाजी अप्पांना पत्र\nआपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा - उत्तर रद्द करा.\nFollow इतिहासातील सत्याच्या मागावर… on WordPress.com\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nताज्या ऐतिहासिक नोंदी –\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nखटासी पाहिजे खट फेब्रुवारी 8, 2017\nमहाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज फेब्रुवारी 3, 2017\n‘समरधुरंधर’ वाचकांच्या चरणी अर्पण फेब्रुवारी 1, 2017\nफिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो फेब्रुवारी 1, 2017\nप्रतापसूर्य बाजीराव – श्री निनाद बेडेकर यांचे दुर्मिळ व्याख्यान जानेवारी 30, 2017\nशिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र जानेवारी 24, 2017\nआमची नवीन पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा : भाग २ – शौर्य – पुरंदरे – रणझुंजार जानेवारी 18, 2017\nअपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया ऑक्टोबर 6, 2016\nछत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण सप्टेंबर 28, 2016\nशिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र ऑगस्ट 23, 2016\nअपरिचित इतिहास – भाग ४ – छत्रपतींचे पेशवे – पूर्वार्ध ऑगस्ट 17, 2016\nवीर खुदिराम बोस ऑगस्ट 11, 2016\nअपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र ऑगस्ट 11, 2016\nगुलाम कादर जेरबंद ऑगस्ट 9, 2016\nभगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\nबटुकेश्वर दत्त यांचे किशनसिंग यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\n“वासुदेव बळवंत फडके यांना अटक…….” ऑगस्ट 3, 2016\nआम्ही कशासाठी लढत आहोत\nसमस्या समाधान – १ – शंभूराजे आणि तारापूर ऑगस्ट 1, 2016\nअपरिचित इतिहास – भाग दोन – १० महत्वाच्या घडामोडी – पेशवा माधवराव जुलै 27, 2016\nअपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज जून 16, 2016\nखरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली जून 9, 2016\nमलिक-ए-मैदान तोफेतून नाण्यांचा बार मे 20, 2016\nइतिहासाच्या पाऊलखुणा मराठी Podcast – भाग १ – “पालखेडची मोहीम” – १७२८ मे 16, 2016\nश्री. निनाद बेडेकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मे 12, 2016\nशिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण मे 10, 2016\nअभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे” मे 4, 2016\nतैसा शिवाजी नृप जिंकवेना मे 3, 2016\nब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी … मे 1, 2016\nमुहंमद कुली खान / नेतोजी पालकर याचा औरंगजेबाला अर्ज एप्रिल 29, 2016\nछत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा एप्रिल 7, 2016\nशिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर मार्च 18, 2016\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nइतर अभ्यासकांची उपयुक्त संकेतस्थळे\nआमची ऐतिहासिक टिव-टिव s s \nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही समस्या समाधान … आम्ही केवळ निमित्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-04-24T06:41:44Z", "digest": "sha1:Y4LOXZVC4NERWIZ4AMRJ3KFI757QGTPK", "length": 36124, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "ग्रंथनिर्मिती | मराठीमाती", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्याच्या आजच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यापीठीय पातळीवर मराठी भाषा आणि साहित्य, तसेच या विषयाशी निगडीत असणारा प्राध्यापकवर्ग यांच्यावर कोणते परिणाम झाले, याची सर्वत्र चर्चा चालू आहे. पण होणाऱ्या परिणामांची कोणीही गंभीरपणे दखल घेत नाही अथवा विचार करीत नाही, असे चित्र दिसून येते. बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था मराठी भाषिकांची होऊ नये म्हणून प्राध्यापक, विचारवंत, लेखक यांनी विद्यापीठाय पातळीवरील मराठीच्या अध्यापनावर आलेले हे अरिष्ट परतवून लावले पाहिजे असे मला वाटते. विद्यापीठीय पातळीवरचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आखण्यासाठी मुंबई विद्यापीठाने अनेक विषयतज्ज्ञांनी एक समिती नेमली होती. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांत भाषा आणि साहित्य यांचा अभ्यास अनिवार्य असावा अशा प्रकारची सूचना या समितीचे एक सदस्य के. सी. महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक सरदेशपांडे यांनी केली होती. (यावेळी मराठीचे प्राध्यापक कुठे गेले होते न कळे) या सूचनेचा विचार करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु पुढे उपसमिती नेमण्यात आली आणि या समितीने कला विभागाकडेच फक्त भाषा आणि साहित्य यांचा अभ्यासक्र्म अनिवार केला. विज्ञान व वाणिज्य शाखांतून भाषा साहित्याला अर्धचंद्र देण्यात आला. मात्र (अर्थशास्त्रासारखा विषय विज्ञान, वाणिज्य कला या तिन्ही शाखांत ठेवण्यात आला. ज्यांचे वजन होते त्यांनी आपल्या विषयांची अशी सोय करून घेतली.) वाणिज्य आणि विज्ञान शाखांकडे मराठीची असलेली अनेक वर्षांची अध्यापनाची सोय रद्द करण्यात आली. या समितीत भारतीय भाषांच्या प्राध्यापकांना प्रतिनिधित्व नव्हते. त्यामुळे भारतीय भाषांवर फार मोठा अन्याय झाला. बाजारात ज्या विषयांना मागणी त्याच विषयांचा अभ्यास विद्यापीठाने मान्य केला. याला कारण अभ्यासक्रम ठरविणाऱ्या समितीचा एकांगी आणि पक्षपाती दृष्टीकोण हे होय.\nया दृष्टीकोणाचा प्रत्यय पुन्हा कला शाखेकडे नेमलेल्या विषयांच्या पेपर्सवरून येईल. कला शखेत बी. ए. च्या पहिल्या वर्षासाठी साहित्यचे दोन पेपर अनिवार्य करण्यात आले व वाणिज्य, विज्ञान शाखांत पूर्वीच्या अभ्यासक्रमात असलेल्या साहित्य विषयांना मूठमाती देण्यात आली. कला शाखेत सहित्याचे दोनपेपर सक्तीचे असले तरी त्यातील भारतीय भाषांचा पेपर सक्तीचा करण्यात आला आहे. दुसरा पेपर भारतीय भाषांचा ठेवला आहे. परंतु या पेपरला प्राचीन भाषा, आधुनिक युरोपीय भाषा आणि इंग्रजीचा दुसरा पेपर, असे पर्याय ठेवले आहेत. यावरून असे दिसेल की, भारतीय भाषांना गौण लेखण्यात आले आहे. कला शाखेतील साहित्याचे मह्त्त्व कमी करणारी आणखी एक गोष्ट इथे नमूद करता येईल. कला शाखेतील अभ्यासक्रमाचे दोन ग्रुप करण्यात आलेले आहेत. भाषांचा एक ग्रुप आणि समाजशास्त्रांचा दुसरा. या ग्रुपपैकी विद्यार्थ्यांनी कोणताही एक ग्रुप `मेजर’ ग्रुप म्हणून निवडाययाचा आहे. (मेजर ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ६ किंवा ८ पेपर एका विषयाचे घ्यावयाचे आहेत) यापैकी साहित्याचा पेपर घेणाऱ्या विद्यार्थ्यास आठ पेपरांबरोबर समाजशास्त्राचे कमीत कमी दोन (गौण) पेपर घेण्याची सक्ती आहे. समाजशास्त्राचा ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यास मात्र भाषा विषयातील दोन पेपर घेण्याची सक्ती केलेली नाही. याचाच अर्थ असा होतो की, साहित्याचे पेपर न घेताही फक्त इतर विषय घेऊन कला शाखेची पदवी परीक्षा पास होता येते. भाषा-साहित्य आणि कला यांच्या अभ्यासाशिवाय कोणत्याच ज्ञानशाखेचा अभ्यास पूर्ण होत नाही अशी मार्क्स, शीलर, दर्खाइम्‌, फ्रॉईड, युंग, सॉस्सूर इत्यादी नामवंत मानव शास्त्रज्ञ व मानववंशशास्त्रज्ञांची भूमिका आहे. मात्र मुंबई विद्यापीठातील समाजशास्त्र व इतर विषयांतील अभ्यासक्रम आखणाऱ्या तथाकथित विद्वानांना वरील थोर विचारवंतांच्या भूमिकेची जाणीव नसावी, याचे सखेद आश्चर्य वाटते. अर्थात समितीत बसल्यावर आपल्याच विषयांचे घोडे पुढे दामट्यापलीकडे ज्यांची दॄष्टी गेली नाही अशा विद्वानांकडून मार्क्स, सॉस्सूर आदी विचारवंताच्या भूमिकेचा आदर केला जाईल, अशी अपेक्षा करणेच चूक आहे. परंतु यांच्या एकांगी तर्कदुष्ट व आपमतलबी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे नुकसान होते याचे दुःख होते.\nविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वाणिज्य व विज्ञानशाखांत कलासाहित्याचा अभ्यास आवश्यक आहे. परंतु मुंबई विद्यापीठाने अभ्यासक्रमाची योजना आखताना अर्थशास्त्र आणि विज्ञान यासारख्या विषयांवरच अवाजवी भर टाकलेला आहे. अर्थशास्त्र या विषयांचे अनेक पेपर्स तिन्ही शाखात ठेवलेले दिसतील. तसेच शिक्षण हे बाजारू व व्यवसायाभिमुख करण्याकडे अधिक कल आहे. माणसाच्य़ आंतरिक, मानसिक, वृत्ती-प्रवूत्तींच्या विकासाकडे कुठेच लक्ष दिलेले नाही. विद्यार्थ्यांच्या मानसिक, आंतरिक विकासाच्या दृष्टीने विज्ञान, वाणिज्य शाखांत, साहित्य, कला, धर्मशास्त्र आदी विषयांचाही समावेशा होणे आवश्यक आहे. कला शाखेत वाणिज्य, विज्ञान, अर्थ या शाखांना गौण स्थान; तर विज्ञान शाखेत कला, वाणिज्य, अर्थशास्त्र यांना गौण स्थान; असे तत्त्व स्वीकारून विषयांची आखणी करता आली असती तर तीच अधिक तर्कसंगत ठरली असती, पण अशी तर्कसंगतीची बैठकच मुळी या समितीने धुडकावून लावून आपल्या विषयांची सोय करून घेतलेली दिसते.\nत्यातही मुम्बई विद्यापीठाने इंग्रजी, फ्रेंच भाषांबद्दल भरपूर प्रेम दाखविले आहे. आणि आधुनिक भारतीय भाषांना वाटाण्याच्या अक्षता लाअल्या आहेत. उदा. वाणिज्य अर्थशास्त्र शाखेतील अभ्यासक्रमात या परदेशस्थ भाषांचा एक एक पेपर शिकविण्याची सोय केली आहे. मराठीसारख्या राज्यभाषेकडे आणि इतर आधुनिक भारतीय भाषांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. भारतीय साहित्याचा अभ्यास (राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे) करण्याऐवजी परदेशी भाषांचा, साहित्याचा अभ्यास सतत करावा असा उलटा न्याय वाणिज्य शाखेला लावण्यात आला आहे. या संदर्भात भारतीय भाषा-साहित्याचे दोन पेपर वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमात अंतर्भुत केले असते तर ते तर्कसंगत ठरले असते. महाराष्ट्रातल्या इतर विद्यापीठात विज्ञान, वाणिज्य शाखेत (कर्नाटक, केरळ राज्यातही अशी सोय आहे) ही तरतूद करण्यात आली आहे. आणि प्रतिगामी ठरलेल्या लोकविन्भुख मुंबई विद्यापीठाला ही गोष्ट कळायला आणखी पन्नास वर्षे लागल्यास नवल वाटू नये. मुंबई विद्यापीठ आता मुंबईशहरापुरते राहिले नाही. तर रत्नागिरी, कुलाबा, ठाणे इत्यादी जिल्ह्यातील महाविद्यालये त्यात अंतर्भुत करण्याट आली आहेत. यामुळे मराठीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, पण याची जाणीव इथल्या तथाकथित विद्वानांना नसावी असे दिसते. विज्ञानशाखेत अर्थशास्त्र, भूगोल, कॅटरिंग, योगासारखे विष्य सुरू करण्यात येतात तर मराठीचा-आधुनिक भारतीय भाषेचा अंतर्भाव का करता येऊ नये\nविद्यापीठीय भाषा विषयांकडे पाहाण्याचा, या सापत्नभावाचा मराठी, भाषा आणि साहित्य यांच्या अभ्यासावर व विकासावर दूरगामी असा विपरीत परिणाम घडून आल्याशिवाय राहाणार नाही. अनेक साहित्यिक, विचारवंत यांच्या प्रयत्नामुळे मराठीचे अध्यापन मुंबई विद्यापीठात सुरू झाले. परंतु मराठी भाषेच्या विकासाच्या मूळ हेतूकडे विद्यापीठाने अक्षम्य असे दुर्लक्ष केले आहे. मराठी विभागासाठी योग्य माणूसच मिळत नाही म्हणून जागा रिकामी ठेवण्यात आली. पूर्वी विभागच सुरू करण्यासाठी खळखळ करण्यात आली. विद्यापीठात मराठी माध्यम सुरू करावे अशी शासनाकडून सुचना आली असतानाही ती विद्यापीठाने डावलली. वस्तुतः अनेक प्रकारच्या योजना आखून मराठी भाषेच्या अभिवृद्दीसाठी अनेक गोष्टी करता आल्या असत्या. विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष असताना श्री. सी. डी. देशमुख यांनी मराठीच्या अध्यापनाविषयी सूचना केल्या होत्या. पण त्याहीवेळी विद्यापीठाने कालहरण केले. ग्रामीण भागातील विद्यापीठांनी मराठीच्या विकासासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. पण या विद्यापीठाला इंग्लंड-अमेरिकेत असल्यासारखे वाटते. भविष्यकाळात मराठी मातृभाषा, राज्यभाषा म्हणून शिक्षणाचे माध्यम अवश्य व्हावी. विविध विषयांवर ग्रंथनिर्मिती, पारिभाषिक कोश, जगन्मान्य ग्रंथांची भाषांतरे, इत्यादी उपक्रमांचा अवलंब करून मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी हातभार लावता आला असता. परंतु यापैकी विद्यापीठाने काहीही केले नाही. मात्र महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांनी, महाराष्ट्राबाहेरील अनेक सांस्कृतिक संस्थांनी वरील प्रकारचे उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीरीत्या पार पाडले.\nइंग्रजीच्या प्रेमामुळे अनेक प्राचार्य मराठी विषयाकडे उपेक्षेनेच पाहातात. प्रवेशा देण्यापासून तो विषय ठेवण्यापर्यंत चालढकल करीत राहातात. अगदी थोड्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाचा. संख्या कमी म्हणून विभाग बंद करण्याच्या कारवाया करायच्या. तीन तीन हजार विद्यार्थी संख्या असलेल्या महाविद्यालयात मराठी साहित्यातील ग्रंथ विकत घेण्यासाठी रक्कम ठरविताना खळखळ करायची. मराठी विभागासाठी फार तर चारपाचशे रूपयांचीच रक्कम मंरूर करायची. इंग्रजीसारख्या विभागासाठी तीनचार हजार रूपये मजूर करायचे. भाषेच्या प्राध्यापकांच्या पीरियडची संख्या कमी करून वर्ग मोठे करायचे. हे विद्यापीठाच्या नियमात बसत नाही, तरीही चालू असते, एका कॉलेजात प्रथम वर्षाच्या वर्गात २७३ विद्यार्थी होते. वर्गात बसण्याची व्यवस्था फक्त १४८ विद्यार्थ्यांची. कनिष्ठ महाविद्यालयातही ही प्रथा चालू होती. पुढेही चालू राहाणार आहे. ८०-१०० विद्यार्थ्यांची अट असली तरी १२५ पर्यंत वर्गाट विद्यार्थ्यांची संख्या ठेवायची. पीरीयडस्‌ कमी केल्यामुळे दोन प्राध्यापकांच्या जागी एक तर एकाच्या जागी पुढे पार्ट टाईम नेमायचा. शेवटी कंत्राट पद्धतीवर नेमला जातो. अमराठी मुलांनी मराठी शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली, अर्ज केले तर कालहरण करीत राहायचे. शेवटी वाटाण्याच्या अक्षता लावायच्या. अशा अनेक युक्त्याप्रयुक्त्या करून मराठी विषयाची उपेक्षा करावयाची. बरे ही गोष्ट अमराठी प्राचार्यच करतात असे नव्हे, तर मराठी प्राचार्यही या गोष्टी बिनदिक्कत करीत असतात. मराठी ही प्रांतभाषा, राज्यभाषा म्हणून तिचे महत्त्व आहे. त्यामुळे नोकरई धंद्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या अमराठी कुटुंबातील विद्यार्थी मराठी शिकू पाहातात, पण त्यांची सोयच केलेली नसते. अनेक महविद्यालयातील प्रवेश घेण्याच्या फॉर्म्समध्ये मराठी, निम्नस्तर मराठी हे विषयच दिलेले नसतात. त्यामुळे आज ते विद्यार्थी हिन्दीसारख्या विषयाकडे वळतात. मुलाखतीच्या संदर्भात भेटलो असता अनेक विद्यर्थ्यांनी, प्राध्यापकांनी याबाबतीतील तक्रारी सांगितल्या त्या सविस्तर सांगणे शक्य नाही. पण एका प्राचार्यानी सांगितलेली माहिती सांगतो. मराठी (निम्नस्तर) आपल्याकडे का नाही असे विचरता त्यांनी सांगितलेकी, सिनियर कॉलेजमध्ये निम्नस्तर मराठी हा विषय मिळेलच याची खात्री नसल्यामुळे आमच्याकडे मुलांनी हा विषय निवडला नाही. त्यांनी हिन्दी विषय पसंत केला, त्यामुळे हिन्दीच्या दोन लेक्चररच्या जागा भराव्या लगल्या. मराठीच्या वर्गात पुरेशी संख्या नसल्यामुळे तो बंद करण्यात आला. हीच गोष्ट (सीनियर) महाविद्यालयाबाबत प्राचार्याना विचारले की ते म्हणतात निम्नस्तर मराठीसाठी मुलेच येत नाहीत,म्हणून आम्ही सीनियरचा वर्ग सुरू करू शकलॊ नाही. हे दुष्टचक्र वाचकांच्या लक्षात आले असेलच.\n१४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने एका सरकारी परिपत्रकाद्वारे सर्व महाविद्यालयांना अशी ताकीद दिली होती की, मराठी विषयांनी मागणी असेत तर तो विषय त्वरित सुरू करावा. पण या आदेशाचे किती महाविद्यालयांनी पालन केले खरे म्हणजे हे परिपत्रक प्राध्यापक व विद्यार्थी यांना दाखविण्यातच आले नाही. एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी २४ ऑगस्ट १९७६ रोजी अर्ज करून प्राचार्यकडे निम्नस्तर मराठी विषय सुरू करावा म्हणून मागणी केली होती. पण कालहरण करून प्राचार्यांनी मुलांना गंडविले. या विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाची एक प्रतही मला दाखविली. २५ अमराठी विद्यार्थ्यांचा तो अर्ज होता.\nया सर्व गोष्टींची विद्यार्थी संघटनांनी दखल घ्यावी, कारण त्यांच्या जीविताशी हा खेळ मांडलेला आहे. महाराष्ट्रातील महाराष्ट्र साहित्यपरिषदांसारख्या संस्थांनीही या गोष्टींची दखल घ्यावी.\nमराठीभाषासाहित्य यांची हकालपट्टी केल्यामुळे आपल्याच घरात मराठीच्या प्राध्यापकांची केविलवाणी स्थिती झाली आहे. आजच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे प्राध्यापकांवर बेकारीची आपत्ती आली. ही आपत्ती विलक्षण आहे. १०+२+३ मुळे महाविद्यालयाचे प्रथम वर्ष कमी झाले. महाविद्यालयातील हे ५० टक्के विद्यार्थी प्रथम वर्षात असतात. म्हणजे त्याप्रमाणात प्राध्यापक प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालयात गेले. जे राहिले, त्यातील ५० टक्क्यांना हाकलण्याची तरतूद वेगळ्या पद्धतीने करण्यात आली. नवीन अभ्यासक्रमात आठवड्याला एका विषयासाठी ५ तासिका (४+१) असाव्यात अशी मूळ योजना होती. आणिबाणीच्या काळात ही संख्या तीन वर आली. म्हणजेच तासिका कमी झाल्यामुळे बेकारीचा हादुसरा टप्पा झाला. आता पुन्हा नवीन योजने प्रमाणे पूर्वीची १७ तासिकांची अट जाऊन प्राध्यापकांना २४ तासिकांची अट घालण्यात आली. हा तिसरा टप्पा म्हणू. या वर्गातील ठराविक संख्येचा नियम धाब्यावर बसवून दोन वर्ग एकत्र दाखविण्यात येतील. त्यामुळे आठवड्याच्या एका वर्गाच्या तीन तासिका कमी दाखवून तो प्राध्यापक नोटीस देण्यास पात्र आहे, हे दाखविण्यात येईल. हा झाला चौथा टप्पा. कनिष्ठ महाविद्यालयातही हेच तत्त्व मान्य होत आहे. कारण शेवटी वातावरण एकच, प्राचार्य तेच.\nमुंबई विद्यापीठातील मराठी अभ्यासमंडळाने आणि शिक्षकसंघटनेने या सर्व परिस्थितीवर कशी मात करता येईल याबाबतीत अनेक उपयुक्त सूचना वेळोवेळी केल्या आहेत. पण विद्यापीठातील संबधित अधिकारी, प्राचार्य, यांना या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल तेव्हा ना बेकारीची कुऱ्हाड ही भाषासाहित्य शिकविणाऱ्या प्राध्यापकांवर कोसळ्ली आहे. पण यात मराठीच्या प्राध्यापकांचा कणा मोडल्यासारखा झाला आहे. महाराष्ट्रात मराठीचा सार्थ अभिमान बाळगाणाऱ्यांच्या वाट्याला ही परिस्थिती येऊ नये. हीच परिस्थिती कायमराहिली तर आजची शैक्षणिक व्यवस्था ढासळून पडेल, यात शंका नाही.\nThis entry was posted in मराठी लेख and tagged कला शाखा, ग्रंथनिर्मिती, डॉ.दता पवार, परिपत्रक, मराठी, महाराष्ट्र, मुंबई विद्यापीठ, युरोपीय भाषांचे प्रेम, लेख, साहित्यपरिषद, सैमिती on जानेवारी 26, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-24T06:28:47Z", "digest": "sha1:6JAZ5MO7CTS46PSGOS7Q4DEVM4ZVP6TB", "length": 2941, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फिजीचे पंतप्रधान - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"फिजीचे पंतप्रधान\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nरतु सर कामिसेसे मारा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ मार्च २००७ रोजी ०६:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/hot-gossip/shahid-kapoor-shared-a-cute-video-with-her-daughter-misha/22601", "date_download": "2018-04-24T06:58:17Z", "digest": "sha1:GGDDFOGBQT3K6XZ3TBFJUX3BSZM3IZI2", "length": 23931, "nlines": 244, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "shahid kapoor shared a cute video with her daughter misha | IIFA 2017 : Watch Video : ‘बुमरॅँग’ व्हिडीओमध्ये डॅडी शाहिद कपूरसोबत पहा मीशाचा क्युट अंदाज!! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nIIFA 2017 : Watch Video : ‘बुमरॅँग’ व्हिडीओमध्ये डॅडी शाहिद कपूरसोबत पहा मीशाचा क्युट अंदाज\nअभिनेता शाहिद कपूर आणि त्याचा परिवार सध्या न्यू यॉर्क येथे सुरू असलेल्या ‘आयफा २०१७’मध्ये सहभागी झाले आहेत.\nअभिनेता शाहिद कपूर आणि त्याचा परिवार सध्या न्यू यॉर्क येथे सुरू असलेल्या ‘आयफा २०१७’मध्ये सहभागी झाले आहेत. वास्तविक शाहिद याअगोदर बºयाचदा आयफामध्ये सहभागी झाला आहे. परंतु त्याची पत्नी मीरा राजपूत आणि मुलगी मीशा पहिल्यांदाच आयफामध्ये सहभागी झाले आहेत. मुंबई येथून निघाल्यापासूनच शाहिद आणि त्याची मुलगी मीशा यांच्यातील केमिस्ट्री बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे आयफाने यावेळी आपल्या लाडकीचा चेहरा न लपविता बिनधास्तपणे तिला माध्यमांसमोर आणले. शिवाय तिच्यासोबतचे मस्तीच्या मुडमधील काही व्हिडीओज्देखील तो शेअर करीत आहे. नुकताच त्याने आपल्या ११ महिन्यांच्या लाडकीसोबतचा एक बुमरॅँग व्हिडीओ शेअर केला आहे. शाहिदने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ब्रेकफास्ट शुगर रश’\nव्हिडीओमध्ये मीशा डॅडी शाहिदच्या कडेवर असून, डॅडीच्या फेव्हरेट गॉगलबरोबर ती खेळत आहे. शाहिददेखील फनी मुडमध्ये बघावयास मिळत आहे. एका पाठोपाठ एक फनी फेसेस तो बनविताना दिसत आहे. दोघेही या फोटोमध्ये क्युट दिसत असल्याने त्यांच्या चाहत्यांकडून हा व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे. शिवाय शाहिदच्या चाहत्यांकडूनच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही केला जात आहे.\nमहिनाभरानंतर मीशाचा बर्थ डे सेलिब्रेट केला जाणार असून, मम्मी मीरा आणि शाहिद यासाठी विशेष प्लॅन करीत असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच शाहिद आणि मीराच्या लग्नाचा वाढदिवस होता. दोघांनी अतिशय साध्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा केला होता. मात्र मीशाचा बर्थ डे धुमधडाक्यात सेलिब्रेट करण्याचा प्लॅन मीरा करीत आहे. सूत्रानुसार प्री-बर्थ डेची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अ...\n​‘पल्लू लटके...’ गाण्यावर अशी थिरकल...\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या...\n​सुश्मिता सेनला पुन्हा आठवला ‘एक्स...\nअबब... प्रियांका चोप्राच्या ‘या’ ड्...\nफक्त पाचवीपर्यंत शिकली बॉलिवूडची ‘ह...\nशिल्पा शेट्टीचे शिर्डीतील फेव्हरेट...\nभावाच्या लग्नात सपना चौधरीने लावले...\nअर्धनग्न आंदोलन करणाऱ्या अभिनेत्रील...\nएकेकाळी बार डान्सर असलेल्या ‘या’ तर...\nअसे काय घडले असेल की ‘या’ अभिनेत्या...\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला...\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बि...\nसेल्फीवेड्या चाहत्यांमुळे ‘या’ अभिन...\nगर्दीचा फायदा घेत चाहत्याने ‘या’ अभ...\nबिग बीच्या नातवासोबत डिनर डेटला गेल...\nश्रीदेवी यांच्या लहान मुलीने केले ग...\n‘या’ कारणामुळे हेलिकॉप्टरने सेटवर ज...\nचंकी पांडेने गायले लेकीचे गोडवे; म्...\nअट्टल गुन्हेगारांच्या यादीत सलमान ख...\nदिशा पाटनी-विजे बानीची जमली जोडी; ए...\nइंटरनेट सनसनी प्रिया प्रकाशचा पुन्ह...\nआपल्या आजीसोबत थिरकणाऱ्या ‘या’ अभिन...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-24T06:30:22Z", "digest": "sha1:HAA6KUSIHZQ6DLZX3Y3JA6E2L3F5RXIZ", "length": 5306, "nlines": 135, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गंगासागर | मराठीमाती", "raw_content": "\n१ किलो ताजे दही\n४-५ थेंब रासबेरी इसेंस\n१ चिमूट लाल रंग\nक्रीम, व्हॅनिला इसेन्स व साखर एकत्र करून चांगले फेटावे व गार करण्यास ठेवावे. दही फ्रिजमध्ये ठेवावे. गार झाल्यावर त्यात साखर, रंग व रासबेरी इसेन्स घालून फेस येईपर्यंत मिक्सरच्या जारमध्ये फिरवावे. सुंदर गुलाबी रंगाची लस्सी तयार होईल. देताना प्रथम लस्सी व त्यावर गार केलेले साखर क्रीमचे मिश्रण घालून द्यावे.\nThis entry was posted in सरबते व शीतपेये and tagged गंगासागर, पाककला on फेब्रुवारी 17, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/five-indians-move-into-round-two-at-asian-junior-tennis-championship-2017/", "date_download": "2018-04-24T06:29:47Z", "digest": "sha1:CYPCRLEWTEU5G7RZ3KKGMVXRYAMW3AEE", "length": 10458, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद २०१७ स्पर्धेत भारताच्या पाच खेळाडूंचा दुसऱ्या फेरीत प्रवेश - Maha Sports", "raw_content": "\nआशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद २०१७ स्पर्धेत भारताच्या पाच खेळाडूंचा दुसऱ्या फेरीत प्रवेश\nआशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद २०१७ स्पर्धेत भारताच्या पाच खेळाडूंचा दुसऱ्या फेरीत प्रवेश\nपुणे, ३० मे २०१७: एचसीएल यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या संलग्नतेने आशियाई सर्किटमधील १८ वर्षाखालील गटांतील एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद २०१७ स्पर्धेत मुलांच्या गटात मेघ भार्गव पटेल याने, तर मुलींच्या गटात आकांक्षा भान, रिया वर्मा, वैदेही चौधरी, तनिशा कश्यप या ५ भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.\nएमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सूरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात पहिल्या फेरीत भारताच्या मेघ भार्गव पटेल याने चीनच्या ताओ मु याचा २-६, ६-४, ६-४ असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. थायलंडच्या अकणीत पमजित याने भारताच्या रित्वीक बोलीपल्लीला ६-४, ६-२ असे नमविले. क्वालिफायर हाँग काँगच्या डेंटन हो याने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या प्रसन्ना बागडेचा ६-०, ६-३ असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले. थायलंडच्या कशिदीत समरेज याने भारताच्या रिषभ शारदाचा ६-२, २-६, ६-३ असा तीन सेटमध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.\nमुलींच्या गटात पहिल्या फेरीत भारताच्या व तिसऱ्या मानांकित आकांक्षा भान हिने चीनच्या जिओक्सी झाओचा टायब्रेकमध्ये ७-६(४), ६-४ असा पराभव करून आगेकूच केली. आठव्या मानांकित रिया वर्माने कोरियाच्या जिहो शीणचा ६-३, ७-६(५) असा पराभव केला. जपानच्या सकुरा होसोगी हिने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या युब्रानी बॅनर्जीचा ६-१, ६-१ असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली. भारताच्या व सातव्या मानांकित वैदेही चौधरीने जपानच्या आयु सुगीयामाचे आव्हान ६-०, ६-०असे मोडीत काढले. जपानच्या मना कवामुराने भारताच्या शिवानी मंजनाला ६-३, ६-१ असे पराभूत केले.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: पहिली फेरी: मुले:अकणीत पमजित(थायलंड) वि.वि.रित्वीक बोलीपल्ली(भारत)६-४, ६-२; डेंटन हो(हाँग काँग)वि.वि.प्रसन्ना बागडे(भारत)६-०, ६-३; कशिदीत समरेज(थायलंड)वि.वि.रिषभ शारदा(भारत)६-२, २-६, ६-३; मेघ भार्गव पटेल(भारत)वि.वि.ताओ मु(चीन)२-६, ६-४, ६-४.\nमुली: सकुरा होसोगी(जपान)वि.वि.युब्रानी बॅनर्जी(भारत)६-१, ६-१; ली कुआन यी(तैपेई,४)वि.वि.मुस्कान गुप्ता(भारत)६-३, ६-३; तनिशा कश्यप(भारत)वि.वि.श्रीवल्ली भामिदिप्ती(भारत)७-५, ६-२; आदित्या करुणरत्ने(श्रीलंका)वि.वि.तेजस्वी काटे(भारत)६-१, ६-२; वैदेही चौधरी(भारत,७)वि.वि.आयु सुगीयामा(जपान)६-०, ६-०; माई नपात निरुद्रोण(थायलंड,५)वि.वि.शिवानी अमिनेनी(भारत)६-३, २-६, ७-६(२); मना कवामुरा(जपान)वि.वि.शिवानी मंजना(भारत)६-३, ६-१; आकांक्षा भान(भारत,३)वि.वि.जिओक्सी झाओ(चीन)७-६(४), ६-४; रिया वर्मा(भारत,८)वि.वि.जिहो शीण(कोरिया)६-३, ७-६(५)\nआयटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंना महत्वपूर्ण गुण मिळविण्याची संधी\nपहिल्यावहिल्या अल्टीमेट टेबल टेनिस लीगची घोषणा\nआणि टेनिस इतिहासात नदालचे नाव सोनेरी अक्षरांनी लिहीले गेले\nराफेल नदाल रोलेक्स मास्टर्सच्या १२व्यांदा अंतिम फेरीत\nअखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत सानिका भोगाडे, सिद्धार्थ मराठे, रुमा…\n16 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत एकेरीत शरण्या गवारे, क्रिश पटेल यांना…\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2018-04-24T06:44:42Z", "digest": "sha1:SFM25MLHFWJN6IR6LOTB3PDGSOK6C3DU", "length": 3683, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मैजीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मैजी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nफेब्रुवारी ३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८६७ ‎ (← दुवे | संपादन)\nनोव्हेंबर ३ ‎ (← दुवे | संपादन)\nजुलै ३० ‎ (← दुवे | संपादन)\nसम्राट मैजी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमात्सुहितो (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nजपानी साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nरशिया–जपान युद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nपहिले चीन–जपान युद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/after-jersey-virat-kohli-gifts-a-bat-to-shahid-afridi-heres-why/", "date_download": "2018-04-24T06:19:10Z", "digest": "sha1:DIOG72BAZVJLBCT4NPP3KLCHNYX4YLU2", "length": 6161, "nlines": 109, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जाणून घ्या का विराट कोहलीने दिली आफ्रिदीला बॅट गिफ्ट? - Maha Sports", "raw_content": "\nजाणून घ्या का विराट कोहलीने दिली आफ्रिदीला बॅट गिफ्ट\nजाणून घ्या का विराट कोहलीने दिली आफ्रिदीला बॅट गिफ्ट\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानच्या माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या चॅरिटी’ फंडला स्वतःची बॅट दान केली आहे. आफ्रिदीने मंगळवारी संध्याकाळी या बद्दल ट्विट केले आणि भारतीय क्रिकेट सुपरस्टारने अर्थातच विराटने लगेच त्याला रिप्लाय दिला.\nसध्या सुरू असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेत असलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये शाहिद आफ्रिकाला तसेच त्याच्या फॉउंडेशनला शुभेच्छा दिल्या.\nभारतीय संघाने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर शाहिद आफ्रिदीला सर्व खेळाडूंच्या स्वाक्षरीसह विराट कोहलीची जर्सी गिफ्ट केली होती.\nवाचा भारतीय संघाची पुढील ४ महिन्यातील क्रिकेट मालिकांची संपूर्ण यादी\nनेमांजा मॅटिकची मँचेस्टर सोबत नवीन सुरवात\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/fc-pune-city-appoint-ranko-popovic-as-new-head-coach/", "date_download": "2018-04-24T06:53:40Z", "digest": "sha1:5A5C7PLDDTITGQTARK5RNW2WTGPIPTKR", "length": 12526, "nlines": 111, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रॅंन्को पोपोवीक यांची एफसी पुणे सिटीच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड - Maha Sports", "raw_content": "\nरॅंन्को पोपोवीक यांची एफसी पुणे सिटीच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड\nरॅंन्को पोपोवीक यांची एफसी पुणे सिटीच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड\nपुणे, दि २५ सप्टेंबर२०१७ – राजेश वाधवान यांच्या मालकीच्या इंडियन सुपर लीगमधील फ्रॅंचाईजी एफसी पुणे सिटी संघाने रॅंन्को पोपोवीक यांच्या नावाची संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणुन घोषणा केली. निवडीबरोबर या सरबीयनने एफसी पुणे सिटी संघासह २०१७-१८ च्या इंडियन सुपर लीगमध्ये व्यावसायीक पदार्पन केले आहे.\nपोपोवीक यांनी २००१ मध्ये ऑस्ट्रेलीयन क्लब टस(TuS) एफसी अर्नफेल्स यांच्यासह आपल्या व्यावसायीक कारकिर्दीला सुरूवात केली. यानंतर ऑस्ट्रेलीयाच्याच एफ सी पंचेर्न संघासोबत २००४ ते२००६पर्यंत काम केले. २००६ मध्ये त्यांनी जे १ लीगमध्ये सनफ्रेकस हिरोशिमाची सूत्रे हाती घेतली. २००९ साली आपल्या मायदेशी परतून सर्बीयन सुपर लिगा मध्ये एफसी स्पारटक सुबोतीका संघाचे प्रशिक्षक म्हणुन काम पाहिले.\nपोपोवीक यांनी जपानच्या ओइया ट्रिनिटा, एफसी मखीदा झेलविया, एफसी टोकिओ या संघांचे व्यवस्थापकीय संचालक होते. याशिवाय जपानमधील लीग फुटबॉलमधील सर्वात बलशाली संघांपैकी एक असलेल्या सेरेझो ओसाकाचे संघाचेही त्यांनी व्यवस्थापक म्हणुन काम केले. क्लबने उरुग्वेचा स्टार खेळाडू डिएगो फोरलॉनशी करार केला तेव्हा त्याच्या व्यवस्थापकीय आराखडयात ते होते. आपल्या काळात जपानमध्ये त्यांनी अनेक तरुण खेळाडूंना पदोन्नती दिली ज्यांनी पुढे राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले.\nदोनवेळा त्याच्या संघांनी लीगमध्ये सर्वाधिक गोल नोंदवण्याचा विक्रम केला.\n२०१४-१५ मध्ये ते सेगुंडा डिवीजन क्लब रिअल झारागझोचे प्रशिक्षक म्हणून स्पेनला गेला आणि तेथे त्यांच्या संघाने ला लीगा प्ले-ऑफच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. काही काळानंतर त्यांनी थाई प्रीमियर लीग चॅम्पियन्स मध्ये सहभाग घेतला व बेरुराम युनायटेड एफसी संघाने थायलंड लीग कप आणि मेकाँग क्लब चॅम्पियनशिप जिंकली.\nएफसी पुणे सिटी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले की, “संघाला १५ वर्षाचा व्यावस्थापनाचा प्रदिर्घ अनुभव असलेले प्रशिक्षक लाभले आहेत. पोपोवीक यांनी विविध लिग मध्ये प्रशिक्षक म्हणुन काम पाहिले आहे. आशियातील विभिन्न सांस्कृतीक वातावरणात व फुटबॉल पर्यावरणात त्यांनी यशस्वीरीत्या काम केले आहे. एफसी पुणे सिटी संघासाठी त्यांचा अनुभव अत्यंत लाभदायक ठरणार आहे. रँके बहुभाषिक आहेत आणि युवा खेळाडूंच्या विकास व्हावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. पुणे येथे त्यांच्यासोबत वेळ घलवताना माझ्या असे लक्षात आले की, फुटबॉल खेळाविषयीचे त्यांचे सखोल ज्ञान, यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आणि भारतीय कर्मचार्यांशी अखंडपणे काम करण्याची क्षमता या गोष्टींनी मी प्रभावित झालो.”\nसंघातील आपल्या निवडीबीबत बोलताना रॅंन्को पोपोवीक म्हाणाले की, एफसी पुणे सिटी संघातील निवडीमुळे मी आनंदी आहे. क्लबमधील सर्व लोक, त्यांची क्लबसंदर्भातील स्वप्ने, क्लबचा एकत्रितपणे विकास करण्याची त्यांची इच्छा यामुळे संघ पुर्ण क्षमतेने बांधला गोला आहे. यामुळे संघाला खाली खेचणे कठिण आहे. मी संघामध्ये लवकरात लवकर कार्यरत होऊ इच्छीतो असेही पोपोवीक म्हणाले.\nयदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-\n# एफसी पुणे सिटी संघाचे या अदोगरचे प्रशिक्षक अंतोनिओ हब्बास हे होते.\n# अंतोनिओ हब्बास यांनी इंडियन सुपर लीगच्या पहिल्या आणि दुसऱ्या मोसमाचे विजेतेपद मिळवले होते. पाहिल्या मोसमात ते अथलेटिको डी कोलकता या संघाचे प्रशिक्षक होते तर दुसऱ्या मोसमात ते चेन्नईयन एफसी या संघाचे प्रशिक्षक होते.\n# तिसऱ्या मोसमात ते एफसी पुणे सिटी संघाचे प्रशिक्षक झाले. या मोसमात ते पुणे संघाला उपांत्यफेरी पर्यंन्त देखील घेऊन जाऊ शकले नाहीत. चौथ्या मोसमाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आपण यावर्षी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार नाही, असे त्यांनी एफसी पुणे सिटी व्यावस्थापनाला कळवले होते.\nAntonio HabasFC Pune CityISL 2017-18Renko Popovikअँटोनिओ हब्बासएफसी पुणे सिटीराजेश वाधवानरॅंन्को पोपोवीक\nऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका, हा खेळाडू मालिकेबाहेर \nहा अभिनेता साकारणार कपिल देवची भूमिका, १९८३च्या विश्वचषकावर बनणार चित्रपट \nकोपा डेलरेच्या विजेतेपदावर बार्सेलोनाचा सलग चौथ्यांदा शिक्कामोर्तब\nमॅनचेस्टर सिटीला मिळाले प्रिमियर लीगचे विजेतेपद\nबार्सेलोनाला पराभवाचा धक्का, रोमाचा पुढील फेरीत प्रवेश\nएफसी पुणे सिटी संघाचा दिल्ली डायनॅमोस एफसी संघावर विजय\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/05/blog-post_43.html", "date_download": "2018-04-24T06:39:40Z", "digest": "sha1:JRPNTOD3ELVYCOC2NRZATIZ5GH7IX2AX", "length": 26132, "nlines": 296, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: ध्यान : उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nध्यान : उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली\nध्यान म्हणजे सतत बडबड करणाऱ्या अस्वस्थ मनाला शांत करणे \nत्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो \nध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.\nडोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.\nआध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.\nध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो \nसर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.\nध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर...........\n*वाईट सवयी नष्ट होतात\nखूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.\nकोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.\nभरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.\n*झोपेचे तास कमी होतात\nध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.\nआध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.\nआपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.\nआपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.\nध्यानामध्ये काय ताकद आहे\nसामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे\nजेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.\nआइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.\nहीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.\nजर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.\nमहर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला \"महर्षी इफेक्ट\" असे नाव दिले. ध्यानामधील ही ताकद आहे.\nआपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nपालकांनी नक्की वाचावा असा लेख\nसचिन तेंडुलकर यांना पत्र..\nआपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु क...\nनवीन नियमाने तासिका नियोजन व संचमान्यता\nअतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे\nध्यान : उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली\nवाडगेभर निर्जीव अन्न :\nकंबर दुखी व मान दुखीपासून कायमची सुटका\nशरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी\nस्वतः साठी एवढं तरी करा...\nशाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड\nनवीन 9 तासांचे वेळापत्रक\n'हॅकर्स' पासून वाचण्यासाठी हे नियम पाळा.\nघन आकृती महत्त्वाची सूत्रे\nसामान्यज्ञान प्रश्नसंच क्रमांक 1\nफास्ट वर्गमूळ कसे काढावे \nसंगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करणे....\nYou tube वरील videos कसे डाउनलोड करावेत \nविद्यार्थी प्रमोट करणे विषयी\nपे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु\nशासनाची ई - नाम योजना\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-04-24T06:25:51Z", "digest": "sha1:6X7XGIIL5CJVW2MPZAYNKBRKH43454DK", "length": 3751, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बॅम्बी वूड्स - विकिपीडिया", "raw_content": "\n(बाम्बी वूड्स या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nबॅम्बी वूड्स (इ.स. १९५५ - ही एक रतिअभिनेत्री आहे. हिने डेबी डझ डॅलस या सुरुवातीच्या काळातील रतिचित्रात भूमिका केली होती. आजतगायत हिचे खरे नाव कोणालाही कळलेले नाही.\nइ.स. १९५५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ११:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://jeevantarang.wordpress.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%97/", "date_download": "2018-04-24T06:35:18Z", "digest": "sha1:UH23G54PJAWEIDLW4EKW3XAOX3BYMCHZ", "length": 15273, "nlines": 93, "source_domain": "jeevantarang.wordpress.com", "title": "दगदग « जीवनतरंग....", "raw_content": "\nविचार… मत… अनुभव… वास्तव….निरीक्षणें….\nहोतं असं कधी कधी….\nअसं कधी कधी होतं नां की एखादा दिवस हा खूप दगदगीचा, वैतागाचा जातो. माझा परवाचा शनिवार असाच होता. सकाळी चक्क सगळी कामं लवकर आवरून झाली. मग छान मूडमध्ये विचार आला की बरेच दिवसांपासून जी काही छोटी मोठी खरेदी करायची राहिली आहे, ती आज ऑफिसमधून लवकर निघून करून टाकू. हाच हाच तो क्षण ज्याने सुरवातीचा आनंदी मूड हा वैतागात बदलला ( आता असं वाटतंय्‌ तेव्हा मात्र वाटलं होतं की वा काय मस्त प्लॅनिंग केलं आहे. ) झालं मग मेन रोडला जाऊन खरेदी करायची तर माझी स्कूटी घेऊन जाणं जरूरी होतं. आजकाल मी बसनंच ऑफिसला जाते, अगदीच काही कारण असेल तरच स्कूटी नेते. कारणइथे वाचा . त्यामुळे गाडीत पेट्रोल संपत आलंय्‌ हे लक्षात नव्हतं.\nठरवल्याप्रमाणे ऑफिसमधून लवकर बाहेर पडले, मेन रोडला गेले. आमच्या भागात ज्या झाडूची किंमत ७० रू. सांगितली होती, त्यापेक्षा जास्त चांगला झाडू ५० रू. ला मिळाला. लगेच स्वतःची पाठ थोपाटून घेतली. खरेदी करायचा उत्साह अजून वाढला. नवीन टेबलक्लॉथ घ्यायचाय्‌ असं बरेच दिवसांपासून घोकत होते. मेनरोडला सर्व प्रकारचे कव्हर्स मिळणारे एक नवीनच झालेले दुकान दिसले. मग माझा मोर्चा तिकडे वळवला…. वेगवेगळ्या प्रकारची कव्हर्स, टेबलक्लॉथ वगैरे पहात होते, तेवढ्यात काय झाले माहीत नाही पण डोळ्यांसमोर हळूहळू अंधारी यायला लागली, सगळं दुकान माझ्याभोवती गरगर फिरायला लागलं, मला चक्कर येतेय हे लक्षात आल्यावर मी तिथल्या सेल्समनला म्हंटलं, “भैया कुछ बैठने के लिए है क्या मुझे चक्कर आ रहा है”. आता नवल वाटतंय्‌ की मला हे म्हणायला कसं सुचलं मुझे चक्कर आ रहा है”. आता नवल वाटतंय्‌ की मला हे म्हणायला कसं सुचलं सिनेमात दाखवतात तसं मी धाडकन्‌ पडले कशी नाही सिनेमात दाखवतात तसं मी धाडकन्‌ पडले कशी नाही तसा मला चक्कर येण्याचा फार अनुभव नाही. आणि काल चक्कर यायला काही कारण पण नव्हतं. नाष्टा, जेवण सर्व वेळेवर करून मग मी बाहेर पडले होते. कदाचित उन्हामुळे असेल… असो. आत्ता जे इथे लिहलंय्‌ ते सगळे विचार मी थोडीशी सावरल्यावर मनात आले. थोडं पाणी पिल्यावर बरं वाटायला लागलं. मग तिथून टेबलक्लॉथ घेतला , अजून थोडी खरेदी केली आणि तिथून निघाले. त्या दुकानदाराने विचारले, ” आप ठीक तो है नां , इस्कूटी पे जाओगे कैसे तसा मला चक्कर येण्याचा फार अनुभव नाही. आणि काल चक्कर यायला काही कारण पण नव्हतं. नाष्टा, जेवण सर्व वेळेवर करून मग मी बाहेर पडले होते. कदाचित उन्हामुळे असेल… असो. आत्ता जे इथे लिहलंय्‌ ते सगळे विचार मी थोडीशी सावरल्यावर मनात आले. थोडं पाणी पिल्यावर बरं वाटायला लागलं. मग तिथून टेबलक्लॉथ घेतला , अजून थोडी खरेदी केली आणि तिथून निघाले. त्या दुकानदाराने विचारले, ” आप ठीक तो है नां , इस्कूटी पे जाओगे कैसे” श्रृती यायच्या आत मला घरी पोचायचं होतं त्यामुळे तशीच निघाले. तसा अजून १५ मि. अवकाश होता. तसं बरंच जड सामान , एका साईडला झाडू अशी माझी वरात निघाली स्कूटीवरून…\nओव्हरब्रिजवरून खाली उतरले आणि स्कूटी आचके द्यायला लागली. गाडी रिझर्व्हला आलीय वाटतं असा विचार करून गाडी साईडला घेतली आणि पेट्रोलकॉक पाहीला तर तो ऑलरेडी रिझर्व्ह वर होता. माझ्या गाडीतले पेट्रोल संपले होते. चक्कर आल्याने आधीच थोड्ं अस्वस्थ वाटत होतं त्यात गाडीतलं पेट्रोल संपलेलं, जवळपास पेट्रोलपंप नाही, घड्याळाचे काटे पुढे सरकायला लागलेले, श्रृती आता पाच मिनिटांत घरी येईल, काय करायचं. मग लगेच डिसिजन घेतला की गाडी इथेच लावून रिक्षाने घरी जायचे. त्यातल्यात्यात थोडं डोकं चालवून, जवळच असणार्‍या मोठं हॉस्पिटलच्या जवळ स्कूटी लावली. हातात झाडू, जड पिशव्या, मनात वैताग,चरफड आणि मी पहातेय्‌ रिक्षाची वाट… मेली एक रिक्षा रिकामी दिसेना आणि जवळच्या रिक्षास्टॉपवरच्या रिक्षावाले कमी अंतर आहे म्हणून घरापर्यंत यायला तयार नाहीत. टेंशन वाढत चालले होते. तेवढ्यात समोरून एक रिक्षा येताना दिसली. पण ती शेअर-रिक्षा होती, ती काही घरापर्यंत आली नसती, जवळच्या स्टॉपपासून मला घरी चालत जायला लागणार होतं पण अजून वाट पहाणं परवडणार नव्हतं. हातात झाडू, जड पिशव्या, मनात वैताग,चरफड, रणरणणारे ऊन ,जवळचे पाणीही संपलेलं, त्यात अजून वैताग की घरी जाण्यासाठी तीन मजले चढून जायचेय्‌ (आमच्या अपार्ट्मेंटला लिफ्ट नाहीय्‌) … चालत चालत चालत मी घरी पोचले, दुसर्‍या मजल्यापर्यंत पोचतेय्‌ तेवढ्यात श्रुतीचा आवाज ऐकू आला. हुश्श…. केलेली खरेदी बघायचाही उत्साह उरला नव्हता. अजून परत जाऊन स्कूटी घेऊन यायची होती. तासाभरात निघू असा विचार करून थोडी झोप काढली.\nउठल्यावर बघते तर पावसाला सुरवात झाली होती…. अरे मगाशी थोड्यावेळापूर्वी ऊन मी म्हणत होतं आणि आत्ता मुसळधार पाऊस श्या काय चाललंय्‌ हे श्या काय चाललंय्‌ हे जसजसा वेळ जाऊ लागला तसतसे मनात काहीबाही विचार येऊ लागले.मी हॉस्पिटलजवळ गाडी लावून आता चार-पाच तास होऊन गेलेत…. सध्याचे दिवस किती वाईट आहेत…. कुणी गाडीला काही केलं तर जसजसा वेळ जाऊ लागला तसतसे मनात काहीबाही विचार येऊ लागले.मी हॉस्पिटलजवळ गाडी लावून आता चार-पाच तास होऊन गेलेत…. सध्याचे दिवस किती वाईट आहेत…. कुणी गाडीला काही केलं तर बेवारस गाडीतच बॉम्ब वगैरे असतात नां बेवारस गाडीतच बॉम्ब वगैरे असतात नां ती माझी गाडी आहे हे मला माहीत आहे पण त्या एरियाला ती गाडी अनोळखी आहे, बराच वेळापासून ती गाडी तिथेच आहे, बेवारस गाडी म्हणून कुणा तत्पर नागरिकाने पोलिंसांना कळवले तर ती माझी गाडी आहे हे मला माहीत आहे पण त्या एरियाला ती गाडी अनोळखी आहे, बराच वेळापासून ती गाडी तिथेच आहे, बेवारस गाडी म्हणून कुणा तत्पर नागरिकाने पोलिंसांना कळवले तर मनात शंकाकुशंकांनी थैमान घातले. मी चक्क टी व्ही लावून लोकल न्यूज चॅनलवर पाहिले अशी काही बातमी दिसतेय्‌ कां ते मनात शंकाकुशंकांनी थैमान घातले. मी चक्क टी व्ही लावून लोकल न्यूज चॅनलवर पाहिले अशी काही बातमी दिसतेय्‌ कां ते पावसाचा जोर जरासा कमी होताच रिकामी बाटली घेऊन श्रृती आणि मी पहिल्यांदा पेट्रोलपंपापर्यंत गेलो, पेट्रोल घेतले, मग उलट दिशेने जाणारी रिक्षा शोधायला लागले. नशिबाने रिक्षा लवकर मिळाली. परत त्या हॉस्पिटलजवळ पोचेपर्यंत धीर निघत नव्हता…. गाडी मी जशी लावली होती, तशीच ती आहे हे बघून जिवात जीव आला. पेट्रोल टाकून गाडी चालू झाल्यावर एक सुटकेचा निश्वास सोडला…. आता घरी जाऊन संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करणे शक्यच नव्हते. नवर्‍याला फोन करून एका नेहमीच्या ठिकाणी यायला सांगितले. नवर्‍याला भेटल्यावर सकाळपासून काय काय झालं ते बोलून टाकलं…. खरंतर चक्कर आलीय हे सांगायला नको होतं कारण तो उगाच काळजी करत बसतो. आता डॉक्टरकडे जाऊन सगळं चेकअप करू म्हणून मागे लागलाय्‌. असो. सगळं ऎकून झाल्यावर तो म्हणाला “मग कुठे जाऊया जेवायला पावसाचा जोर जरासा कमी होताच रिकामी बाटली घेऊन श्रृती आणि मी पहिल्यांदा पेट्रोलपंपापर्यंत गेलो, पेट्रोल घेतले, मग उलट दिशेने जाणारी रिक्षा शोधायला लागले. नशिबाने रिक्षा लवकर मिळाली. परत त्या हॉस्पिटलजवळ पोचेपर्यंत धीर निघत नव्हता…. गाडी मी जशी लावली होती, तशीच ती आहे हे बघून जिवात जीव आला. पेट्रोल टाकून गाडी चालू झाल्यावर एक सुटकेचा निश्वास सोडला…. आता घरी जाऊन संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करणे शक्यच नव्हते. नवर्‍याला फोन करून एका नेहमीच्या ठिकाणी यायला सांगितले. नवर्‍याला भेटल्यावर सकाळपासून काय काय झालं ते बोलून टाकलं…. खरंतर चक्कर आलीय हे सांगायला नको होतं कारण तो उगाच काळजी करत बसतो. आता डॉक्टरकडे जाऊन सगळं चेकअप करू म्हणून मागे लागलाय्‌. असो. सगळं ऎकून झाल्यावर तो म्हणाला “मग कुठे जाऊया जेवायला” बस्स आवडत्या हॉटेलात मनासारखं जेवण झाल्यावर (मनासारखी खरेदी झाली होतीच ती आत्ता जाणवली) दिवसभराचा वैताग , शीण , मानसिक / शारिरिक थकवा कुठल्या कुठे पळून गेला…..\n6 प्रतिक्रिया Posted in असंच काहीही, दैनंदिन घडामोडी Tagged ऊन, चक्कर, दगदग, वैताग\nस्टीफन कोवेचे ९०-१० तत्त्व\nहोतं असं कधी कधी….\nसर्वाधिक वाचल्या गेलेल्या पोस्टस्‌\n मग पुढचे लिखाण तुमच्या ई-मेल वर मिळवा.... इथे तुमचा ई-मेल पत्ता द्या.....\nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sachin-tendulkar-help-this-kaun-banega-crorepati-contestants-dream-come-true-heres-how/", "date_download": "2018-04-24T06:52:59Z", "digest": "sha1:ON6JGWOAZ4DPWWKCDLLHFIWSBMZNIOL3", "length": 6607, "nlines": 107, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सचिनचा असा फॅन पाहिलाय का? - Maha Sports", "raw_content": "\nसचिनचा असा फॅन पाहिलाय का\nसचिनचा असा फॅन पाहिलाय का\n मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज ट्विटरवर एक खास विडिओ शेअर केला आहे ज्यात केबीसीमध्ये भाग घेतलेला तो व्यक्ती सचिनवर किती प्रेम करतो याचा तो विडिओ आहे.\nराजूदास राठोड असे त्या चाहत्यांचे नाव असून तो मोठा सचिन प्रेमी आहे. या विडिओमध्ये अमिताभ बच्चन त्या चाहत्याला एक प्रश्न विचारतात. त्यावर राठोड म्हणतात, ” मला १९९६ पासून चांगलं क्रिकेट समजतं. तेव्हापासून मी सचिनचा एकही सामना सोडला नाही. मी सचिन जेव्हा शतक करतो तेव्हा पुढचे दोन-तीन दिवस आंनदी राहायचो. तर तो ९९ धावांवर किंवा लवकर बाद झाला तर मला खूप वाईट वाटायचे. मी सचिन ज्या सामन्यात खेळत असे त्या सामन्याला एक तास आधीच टीव्ही समोर बसत असे. “\nहा चाहता पुढे म्हणतो, ” मी प्रत्येक चेंडूवर सचिनचं स्वागत करत असे. सचिन एवढा आनंद आणि दुःख मला आजपर्यत कुणीच दिल नाही. माझी मुलगी जेव्हा कार्टून पाहायची तेव्हा मी अनेक वेळा रिमोट फोडला आहे. “\nयावर मास्टर ब्लास्टरने एक खास प्रतिक्रिया दिली आहे. ” राजूदास राठोड आपण केबीसीमध्ये छान खेळलात. तुमच्या गप्पा ऐकून मजा आली. मला विश्वास आहे की तुम्ही पुन्हा रिमोट फोडणार नाही. आपण लवकरच भेटू. “\nसचिनच्या या ट्विटला तब्बल १ हजार रिट्विट आणि १० हजार लाइक्स फक्त ४ तासात आल्या आहेत.\nभुवनेश्वर कुमारला मिळाली लाईफ पार्टनर \nआशिष नेहरा करतो रोज ८ तास जिम \nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t18922/", "date_download": "2018-04-24T07:00:26Z", "digest": "sha1:6RWN2FN36MQLHD4LYGANV5J3VUDHAELJ", "length": 4350, "nlines": 101, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-प्रिये तु माझ्या आयुष्यात आलीस...", "raw_content": "\nप्रिये तु माझ्या आयुष्यात आलीस...\nAuthor Topic: प्रिये तु माझ्या आयुष्यात आलीस... (Read 902 times)\nएक शापित प्रेम वेडा (Alone Kils)\nप्रिये तु माझ्या आयुष्यात आलीस...\nप्रिये तु माझ्या आयुष्यात\nसारे क्षण तुझ्या पुढ्यात\nत्याच मोल शब्दात मांडण्या\nएवढ मात्र नक्की तुझ्याविना\nमी अपुर्ण आहे ...\nतुझी जन्मो जन्मीची साथ हवी\nएवढच मांगण आहे ...\nतुला वजा केल्यावर बाकी काही\nतुझ्या शिवाय आयुष्य मि\nआयुष्यच धरत नाही ...\nतु गेल्यावर वाटत खुपस सांगाच\nहोत तु खुपस दिल तरी\nमुक मुक राहुण तुझ पाहत\nतु माझी असण किती छान\nआहे नाहीतर हे जग\nमाणसांच रान आहे …\nतुझ्यावर रागावण हा एक\nतु आलीस की तो जातो\nतसा माझा राग शहाणा आहे …\nतुझी आठवण नित्ये नवा\nपाकळी वरच दव आहे …\nतु सोबत असलीस की माझाही\nमला आधार लागत नाहीं\nतु फक्त राहा मी आणखी\nकाही मांगत नाही …\nतुझ हे नेहमीचच झालय\nकुणीतरी हव असत आपल्याला\nप्रिये तु माझ्या आयुष्यात आलीस...\nप्रिये तु माझ्या आयुष्यात आलीस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/05/blog-post_71.html", "date_download": "2018-04-24T06:19:10Z", "digest": "sha1:QQMK7T7GZFHSDSG47QZDGU67APO4PIOS", "length": 18763, "nlines": 265, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: पे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nपे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु\nमोबाईलचा वापर करून खरेदी विनिमयाचे माध्यम पेटीएमने आपल्या पेमेंट्स बँकेची सुरुवात 23 मे 2017 पासून सुरू केली. ऑनलाईन व्यवहारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून ग्राहकाला अकाऊंटमध्ये किमान बॅलन्स ठेवण्याचीही आवश्यकता नसलेली ही भारतातील पहिली बँक आहे. पेटीएमच्या पेमेंट बँकेचे डिझाईन देशात आर्थिक समावेशन साध्य करण्यात मदत करण्यासह अर्ध्या अब्ज भारतीयांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या पेटीएमच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. कंपनीचे हेतू ग्राहकांना रोख व्यवहारांकडून डिजिटल पेमेंट्स इकोसिस्टममध्ये आणण्याचा आहे.\nपेटीएम पेमेंट्स बँक खाते सुरूवातीस केवळ-आमंत्रण तत्त्वावर उपलब्ध असतील. पहिल्या टप्प्यात, कंपनी आपल्या कर्मचा-यांसाठी आणि सहकारिंसाठी बीटा बँकिंग ऍप्लकेशन तयार करेल. पेटीएम ग्राहक ऍप्लकेशनवर जाऊन आमंत्रणाकरिता विनंती करू शकतात.\nयाबाबत पेटीएम पेमेंट्स बँकेचे अध्यक्ष विजय शेखर शर्मा म्हणाले, आरबीआयने आम्हाला जगात एक नवीन मॉडेल बनविण्याची संधी दिली आहे. ग्राहकांचे पैसे सरकारी बाँडमध्ये सुरक्षित पद्धतीने राहणार आहेत आणि देशाच्या प्रगतीसाठी हे अतिशय फायद्याचे ठरणार आहे. या ठेवींना सुरक्षेचा कोणताही धोका नसेल.’\nपेटीएम पेमेंट बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेणू सत्ती यांनी सांगितले की, ’आम्ही पेटीएम पेमेंट बँक दाखल करताना अतिशय आनंदित आहोत आणि बँक सुविधेरहित ग्राहकांकरिता आर्थिक सेवा घेऊन आलो आहोत. आमची महत्वाकांक्षा भारतातील सर्वात विश्वसनीय आणि ग्राहक-अनुकूल बँक बनण्याची आहे. तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर करीत आम्हाला 2020 पर्यंत 50 कोटी भारतीयांची आवडीची बँक बनायचे आहे.’\nपेटीएम बँकेत निधी ठेवल्यास 4 टक्के व्याज देण्यात येईल. याचप्रमाणे बँक खात्यात 35 हजारापर्यंत रक्कम जमा केल्यास 250 रुपये कॅशबॅक मिळेल. ऑनलाईन व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागू होणार नाही.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nपालकांनी नक्की वाचावा असा लेख\nसचिन तेंडुलकर यांना पत्र..\nआपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु क...\nनवीन नियमाने तासिका नियोजन व संचमान्यता\nअतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे\nध्यान : उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली\nवाडगेभर निर्जीव अन्न :\nकंबर दुखी व मान दुखीपासून कायमची सुटका\nशरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी\nस्वतः साठी एवढं तरी करा...\nशाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड\nनवीन 9 तासांचे वेळापत्रक\n'हॅकर्स' पासून वाचण्यासाठी हे नियम पाळा.\nघन आकृती महत्त्वाची सूत्रे\nसामान्यज्ञान प्रश्नसंच क्रमांक 1\nफास्ट वर्गमूळ कसे काढावे \nसंगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करणे....\nYou tube वरील videos कसे डाउनलोड करावेत \nविद्यार्थी प्रमोट करणे विषयी\nपे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु\nशासनाची ई - नाम योजना\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/alvaro-morata-could-make-his-chelsea-debut-today-the-striker-is-on-the-bench-for-chelseas-friendly-v-bayern/", "date_download": "2018-04-24T06:30:50Z", "digest": "sha1:ELBEAZOTDX6642PZ7JPHNRATCCP7HJ4K", "length": 9130, "nlines": 106, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अल्वारो मोराटा चेल्सीचा नवीन नंबर ९ - Maha Sports", "raw_content": "\nअल्वारो मोराटा चेल्सीचा नवीन नंबर ९\nअल्वारो मोराटा चेल्सीचा नवीन नंबर ९\nअल्वारो मोराटा या नवीन मोसमपासून चेल्सी संघाकडून खेळणार आहे. चेल्सी संघाने मोराटाला ११६ मिलियन डॉलर इतकी मोठी रक्कम देऊन संघासाठी करारबद्ध केले आहे. चेल्सी संघाकडे आधीपासून खूप मोठे खेळाडू होते. संघ यावर्षीचा प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ असल्याने ते या वर्षीच्या युइफा चॅम्पियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. यंदा त्यांचा मनसुबा युइफा चॅम्पियन्स लीग जिंकण्याचा आहे, म्हणनू त्यांना संघात प्रभावी स्ट्रायकर्स हवे आहेत जे स्पॅनिश संघाना धूळ चारू शकतील.\nमागील चार वर्षात युइफा चॅम्पियन्स लीगचे चारही विजेतेपद स्पॅनिश संघानी जिंकली आहेत. त्यापैकी तीन रिअल माद्रिदने तर २०१४-१५ मोसमात बार्सेलोनाचा संघ विजेता होता. अल्वारो मोराटा हा रिअल माद्रिदचा दुसऱ्या फळीतील खेळाडू होता, ज्याला मुख्य संघात बऱ्याच वेळा खेळवले जात नसे आणि त्यामुळेच त्याने माद्रिद सोडण्याचा निर्णय घेतलेला असावा.\n२०१३-१४ साली अल्वारो मोराटाला जुवेंटस संघाने माद्रिदकडून विकत घेतले होते. युइफा चॅम्पियन्स लीगच्या सेमी फायनल माद्रिद आणि जुवेंटस यासंघांमध्ये झाली होती, तेव्हा पहिल्या लेगमध्ये अल्वारो मोराटा याने जुवेंटसला बढत मिळवून दिली आणि पहिला लेग जुवेंटसने २-१ अशा फरकाने जिंकला. तर दुसऱ्या लेगमध्ये जुवेंटस आणि माद्रिद दोघांनी १-१ गोल केले होते, त्यात मोराटाने गोल केला आणि जुवेंटस गोल फरकाच्या आधारे जिंकली आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. पण मोराटाने दोन्ही गोल केल्यावर आनंद व्यक्त केला नव्हता आणि आपण आपल्या जुन्या संघाशी अजून बांधील आहोत हे दाखवले होते. त्याला परत माद्रिद संघाने करारबद्ध केले आणि दोन वर्ष संघासोबत ठेवले.\nआपल्याला माद्रिद संघातून पुरेशी संधी मिळत नसल्याने त्याने चेल्सी संघासोबत करार मान्य केला आणि तो आता आपल्या आवडत्या जर्सी नंबर ९ सोबत चेल्सी संघाकडून खेळणार आहे.\nफुटबॉलमध्ये का आहे नंबर ९ ला इतके महत्व\nफुटबॉलमध्ये नंबर १०ची जर्सी खूप महत्वाची मानली जाते कारण ती संघातील सर्वात मुख्य खेळाडूला दिली जाते. पण संघासाठी जो मुख्य स्ट्रायकर असतो त्याला नंबर ९ जर्सी दिली जाते. या अगोदर स्पॅनिश खेळाडू फर्नांडो टोरेस याला चेल्सीने नंबर ९ जर्सी दिली होती आणि त्याने चेल्सी संघासाठी युइफा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून दिले आहे.\n११६ मिलियन डॉलरअल्वारो मोराटाकरारबद्धचेल्सी संघप्रीमियर लीगचा चॅम्पियनयुइफा चॅम्पियन्स लीग\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पाहण्याची तिची इच्छा पूर्ण\nश्रीलंका विरुद्ध भारत: हे पाच विक्रम या मालिकेत मोडले जाणार \nकोपा डेलरेच्या विजेतेपदावर बार्सेलोनाचा सलग चौथ्यांदा शिक्कामोर्तब\nमॅनचेस्टर सिटीला मिळाले प्रिमियर लीगचे विजेतेपद\nबार्सेलोनाला पराभवाचा धक्का, रोमाचा पुढील फेरीत प्रवेश\nएफसी पुणे सिटी संघाचा दिल्ली डायनॅमोस एफसी संघावर विजय\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/dubaissf-silver-for-pv-sindhu-after-she-loses-21-15-12-21-19-21-in-the-final-to-akane-yamaguchi/", "date_download": "2018-04-24T06:47:16Z", "digest": "sha1:PU6OEXO2AZYWQHR26N2KV37QVBSU2G2D", "length": 7828, "nlines": 106, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Dubai Open: पीव्ही सिंधू अंतिम सामन्यात पराभूत, परंतु जिंकली करोडो भारतीयांची मने - Maha Sports", "raw_content": "\nDubai Open: पीव्ही सिंधू अंतिम सामन्यात पराभूत, परंतु जिंकली करोडो भारतीयांची मने\nDubai Open: पीव्ही सिंधू अंतिम सामन्यात पराभूत, परंतु जिंकली करोडो भारतीयांची मने\n भारताच्या पीव्ही सिंधूने दुबई सुपर सिरीज फायनल्स स्पर्धेत अंतिम सामन्यात जपानच्या अंकाने यामागूचीला २१-१५, १२-२१, १९-२१ असे पराभूत झाली. तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.\nया स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी सिंधू ही केवळ चौथी भारतीय खेळाडू ठरली होती. यापूर्वी २०११मध्ये भारताची साईना नेहवाल महिला एकेरीत तर २००९मध्ये ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजू यांनी महिला दुहेरीची अंतिम फेरी गाठली होती.\nपहिला सेट २१-१५ असा जिंकणाऱ्या सिंधूला दुसऱ्या सेटमध्ये मात्र जोरदार पराभवाला सामोरे जावे लागले. तिला दुसऱ्या सेटमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या यामागूचीने १२-२१ असे पराभूत केले.\nतिसऱ्या सेटमध्ये मात्र सिंधूने पहिल्यापासून आघाडी घेतली. ३-० अशा आघडीवर असणाऱ्या सिंधू पुढे ही आघाडी ५-३ अशी वाढवली परंतु यामागूचीने ही आघडी जास्त वेळ टिकून दिली नाही. तिने चांगला खेळ करत ५-५ अशी बरोबरी केली. पुढे ही आघाडी अनुभवाच्या जोरावर कमी करत सिंधूने १०-७ अशी आघाडी घेतली. सामन्यात मिळालेली आघडी सिंधूला फार काळ टिकवता आली नाही आणि यामागूचीने ११-१० अशी आघडी कमी केली.\nयावेळी पुन्हा चांगला खेळ करत सिंधूने आघाडी १२-१० अशी केली. पुन्हा आघाडी कमी करताना सिंधू-यामागूचीमध्ये तब्बल ३१ शॉट्सची रॅली झाली. पुढे सामन्यात १५-१५ अशी बरोबरी झाली. दोन्हीही खेळाडूंची चांगलीच दमछाक झाली होती. शेवटी हा सेट सिंधू १९-२१ असा पराभूत झाली.\nसाखळी सामन्यात सिंधूने यामागूचीला सरळ सेटमध्ये पराभूत केले होते. यामागूचीला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या तर सिंधू तिसऱ्या स्थानी आहे.\nVideo: धोनीची विजेच्या वेगाने स्टम्पिंग, अंपायरही अवाक्\nशिखर धवनचा धमाका, केले हे खास विक्रम\nपुणे: तब्बल १६ देशांच्या बॅडमिंटनपटूंनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन\nजागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारत अ संघाची भारत ब संघावर मात\nजागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारत अ संघाने पटकावले उपविजेतेपद\nजागतिक शालेय बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघाची चीन, युएईवर मात\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/isl-2017-fc-goa-fight-back-for-a-point-against-atk/", "date_download": "2018-04-24T06:47:36Z", "digest": "sha1:H5YO7QEFXN5MO27IH3274UNJKAYGDOOF", "length": 12295, "nlines": 114, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2017: एटीकेला गोव्याने बरोबरीत रोखले - Maha Sports", "raw_content": "\nISL 2017: एटीकेला गोव्याने बरोबरीत रोखले\nISL 2017: एटीकेला गोव्याने बरोबरीत रोखले\nकोलकता: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एटीकेला एफसी गोवा संघाने 1-1 असे बरोबरीत रोखले. गोवा संघाला ऐनवेळी कोलकत्यात दाखल व्हावे लागले, पण त्यांनी एक गुण खेचून आणत महत्त्वाचा निकाल साधला.\nदोन्ही गोल पूर्वार्धात झाले. चौथ्याच मिनिटाला मार्की खेळाडू रॉबी किन याने खाते उघडल्यानंतर वीस मिनिटांनी फेरॅन कोरोमीनास उर्फ कोरो याने गोव्याला बरोबरी साधून दिली. कोरोने वैयक्तिक नववा गोल करीत गोल्डन बुटच्या शर्यतीत आघाडी घेतली. गोव्याचे सात सामन्यांत 13 गुण झाले, तर एटीकेने सात सामन्यांतून नऊ गुण मिळविले आहेत. गोव्याने सरस गोलफरकाच्या जोरावर मुंबई सिटी एफसीला मागे टाकले.\nमुळ कार्यक्रमानुसार गोव्याचा संघ मंगळवारी रात्री रवाना होणार होता, पण चार्टर्ड विमानात बिघाड झाल्यामुळे प्रयाण लांबले. बुधवारी दुपारी संघ जाण्याचे ठरले होते, पण दाबोळी विमानतळावर मिग विमानाला अपघात झाला. विमानतळ काही काळ बंद ठेवावे लागले. अखेरीस संघ संध्याकाळी रवाना झाला आणि कोलकत्यात दाखल होऊन थेट मैदानावर उतरला. नियोजीत वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होणारा सामना अखेरीस रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी सुरु झाला.\nतिसऱ्याच मिनिटाला एटीकेला फ्री-किक मिळाली. उजव्या बाजूला महंमद अली याचा हात चेंडूला लागला. रायन टेलर याने फ्री-कीकवर अफलातून फटका मारला. त्याने उजव्या पायाने मारलेला चेंडू नेटच्या डावीकडील कोपऱ्यात उंच गेला, तेथे सज्ज असलेल्या किनने हेडींग करीत चेंडू नेटमध्ये अचूक मारला. गोव्याचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. यानंतर किनने नेहमीच्या शैलीत कोलांटउडी घेत जल्लोष केला.\nप्रतीस्पर्ध्याने खाते लवकर उघडले तरी गोव्याने हार मानली नाही. 14व्या मिनीटाला कॉर्नर मिळाल्यानंतर ब्रँडन फर्नांडीसने मारलेला चेंडू सेरीटॉन फर्नाडीसकडे गेला. त्याने हेडींग करून कोरोसाठी संधी निर्माण केली, पण कोरोने मारलेला उंच मारलेला चेंडू बाहेर गेला.\nत्याआधी मंदार रावदेसाई याने सुद्धा प्रयत्न केला होता. गोव्याच्या अथक प्रयत्नांना 24व्या मिनिटाला फळ मिळाले. मॅन्यूएल लँझारोटेने उजवीकडून घोडदौड करीत कोरोला सुंदर पास दिला. कोरोने एटीकेचा गोलरक्षक देबजीत मुजुमदार मार्गात येणार नाही अशा ठिकाणाहून नेटच्या दिशेने किक मारली. नेटमध्ये जाणारा चेंडू अडविण्यासाठी एटीकेचा बचावपटू प्रबीर दासने कसोशीने प्रयत्न केले, पण चेंडू त्याच्या पायाला लागून नेटमध्ये गेला.\nपुर्वार्धात टेलरचा एक फटका कट्टीमनी याने अचूकपणे अडविला. अखेरच्या मिनिटाला गोव्याच्या एदू बेदीयाने आगेकूच करीत फटका मारला. एटीकेचा गोलरक्षक देबजीत मुजुमदार झेप टाकूनही चकला, पण त्याच्या आणि एटीकेच्या सुदैवाने चेंडू बाहेर गेला. पूर्वार्धात 1-1 अशी बरोबरी होती.\nउत्तरार्धात 53व्या मिनीटाला किनने मारलेला चेंडू थोडक्यात बाहेर गेला. त्यानंतरची काही मिनिटे धसमुसळा खेळ झाला. लँझारोटेने एटीकेचा बदली खेळाडू रुपर्ट नाँगरूमला ढोपराने मारले. रुपर्टने मग प्रत्यूत्तर देत त्याला ढकलून दिले. पंचांनी वेळीच धाव घेत दोघांना बाजूला केले. 63व्या मिनीटाला गोव्याच्या ब्रुनो पिन्हैरोने एटीकेच्या हितेश शर्माला पाडले.\nत्यानंतर सेरीटॉन फर्नांडीसने मारलेला चेंडू हितेशच्या डोक्याला लागला. हे पाहून रुपर्ट भडकला आणि त्याने ब्रुनोला जाब विचारला. हे घडत असताना लँझारोटे पंचांशी बोलत होता, तोच एटीकेच्या झिक्यूइन्हाचा धक्का चुकून डोळ्यापाशी लागला. मग या दोघांत वाद सुरु झाला, पण पंचांनी सर्वांना शांत केले.\n74व्या मिनिटाला गोव्याची चांगली संधी हुकली. मंदारला ताकदवान फटका मारता आला नाही. रिबाऊंडवर अहमद जाहौहने लँझारोटेला पास दिला, पण त्याचा फटका मुजुमदारने अडविला.\nएटीके: 1 (रॉबी किन 4)\nएफसी गोवा: 1 (फेरॅन कोरोमीनास 24)\nत्याने देशासाठी खेळल्या आहेत सलग १५० टेस्ट, अशी कामगिरी करणारा दुसराच खेळाडू\nया मोठ्या खेळाडूला मिळणार कोलकाता नाइट रायडर्सकडून डच्चू\nकोपा डेलरेच्या विजेतेपदावर बार्सेलोनाचा सलग चौथ्यांदा शिक्कामोर्तब\nमॅनचेस्टर सिटीला मिळाले प्रिमियर लीगचे विजेतेपद\nबार्सेलोनाला पराभवाचा धक्का, रोमाचा पुढील फेरीत प्रवेश\nएफसी पुणे सिटी संघाचा दिल्ली डायनॅमोस एफसी संघावर विजय\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/kieron-pollard-becomes-the-second-batsman-to-500-t20-sixes/", "date_download": "2018-04-24T06:46:54Z", "digest": "sha1:CINYJW6BSF6SH4XHPYEYO5YIN2LMKL7P", "length": 5649, "nlines": 107, "source_domain": "mahasports.co.in", "title": "किरॉन पोलार्डचा टी२० क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम - Maha Sports", "raw_content": "\nकिरॉन पोलार्डचा टी२० क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम\nकिरॉन पोलार्डचा टी२० क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम\n येथे सुरु असलेल्या बांगलादेश प्रीमियर लीग अर्थात बीपीएलमध्ये किरॉन पोलार्डने टी२० कारकिर्दीतील ५००वा षटकार खेचला. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा खेळाडू बनला.\nत्याने ३९२ टी२० सामन्यात खेळताना ही कामगिरी केली आहे. हा विक्रम करण्यासाठी त्याला या सामन्यापूर्वी ३ षटकारांची गरज होती. त्याने ढाका डायनॅमिट्सकडून आज खेळताना २५ चेंडूत ५२ धावा केल्या. यात त्याने ३ षटकार आणि ५ चौकार खेचले.\nटी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ख्रिस गेलने मारले आहेत. त्याने ३०९ सामन्यात ७७२ षटकार खेचले आहेत.\nटी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू\n७७२ ख्रिस गेल (सामने-३०९)\n५०० किरॉन पोलार्ड (सामने-३९४)\n३९९ ब्रेंडन मॅक्क्युलम (सामने-२९७)\nभारत वि. श्रीलंका: श्रीलंका संघाला दुसरा मोठा झटका\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत दुहेरीत बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक व क्रोशियाच्या अॅन्ट पावीक या जोडीला विजेतेपद\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/155", "date_download": "2018-04-24T06:25:17Z", "digest": "sha1:V2CZTDLPJOMF5C7Q7G3BOW6OKLKESNLT", "length": 13167, "nlines": 229, "source_domain": "www.misalpav.com", "title": "दिवाळी अंक २०१५ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nदिवाळी अंक in दिवाळी अंक\nस्वागत दीपावलीचे... : विशाल कुलकर्णी\nRead more about अनुक्रमणिका\nरामदास in दिवाळी अंक\nया वर्षी मिपाच्या दिवाळी अंकात काही नवी भर घालावी असा विचार बरेच दिवस करत होतो.जे इतर दिवाळी अंकात नसेल असे ते मिपाच्या दिवाळी अंकात असावे असे नेहेमी वाटते. हाच विचार पुढे नेत या निष्कर्षावर पोहचलो की दृकश्राव्य स्वरुपात जर काही करता आले तर ते करावे. एका संध्याकाळी किसनरावांचा फोन आला \" काका,अरुण म्हात्र्यांच्या काही कविता ध्वनीमुद्रीत करून द्याला का \" मी अरुणला विचारलं त्यानी पण होकार दिला. चिन्मय मांडलेकरच्या मुलाखतीची तयारी केली .\nअभ्या.. in दिवाळी अंक\nRead more about दिवाळी अंक मुखपृष्ठ\nऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे होस्टेज रेस्क्यू\nमोदक in दिवाळी अंक\nही कथा आहे अपहरण झालेल्या एका विमानाची..\nदोनशे ऐंशी इस्रायली जवानांची..\nजगातल्या प्रत्येक देशाची, त्यांच्या पंतप्रधानांची, त्यांच्या प्रजेची..\nRead more about ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे होस्टेज रेस्क्यू\n'ट्वेल्व्ह अँग्री मेन' आणि ’मॅनेजरियल ग्रिड’ .....\nविशाल कुलकर्णी in दिवाळी अंक\nRead more about 'ट्वेल्व्ह अँग्री मेन' आणि ’मॅनेजरियल ग्रिड’ .....\nइति'श्री' in दिवाळी अंक\nतू समईतील मंद ज्योत, मी\nअविरत तू तेजस्वी तेवता\nश्रान्त उभा मी मिणमिणणारा\nबाभळीतला काटा मी अन\nकाट्यातील तू ग़ुल गोजिरा\nपतंग दंग तू भिरभिरणारा\nनवी पालवी तू वासंतिक\nसुकून अंति मी ओघळणारा\nधूर कोंडता मी वणव्याचा\nतू गंध मृदेचा दरवळणारा\nनूतन सावंत in दिवाळी अंक\nगेल्या वर्षी १५ किंवा १६ फेब्रुवारीला वर्धनचा फोन आला. आवाजात अधीरता ओसंडून जात होती. ”आत्या, स्काईपवर ये ना. तुला एक न्यूज द्यायचीय.” गेला महिनाभर नेटचा घोळ चालू होता. रस्त्याचे काम सुरू होते नि एम.टी.एन.एल.च्या वायर्स उघड्या झाल्याने वाय फाय बंद. स्मार्टफोनही नव्हता. त्यामुळे आता स्काईपवर येणे शक्य नाही असे त्याला सांगितल्यावर तो हिरमुसलाच.\nRead more about प्रत्यक्षात आलेले स्वप्न\nदिवाकर कुलकर्णी in दिवाळी अंक\nRead more about शेअरडे बाप-लेक\nमिपाकरांची मनकी बात अर्थात मिपाकर फर्माईश.\nनाखु in दिवाळी अंक\nफार पूर्वी रेडिओ सिलोन 'बिनाका गीतमाला' हा एक लोकप्रिय कार्यक्रम सादर करीत असे. त्यामध्ये लोकांच्या पसंतीची गाणी त्यांना मिळालेल्या गुणपसंतीने क्रमवार वाजवीत असत आणि त्यात एक गाणे सरताज गीत म्हणून शेवटी वाजवले जात असे. त्याची वार्षिक मानांकन पद्धतही होतीच.\nRead more about मिपाकरांची मनकी बात अर्थात मिपाकर फर्माईश.\nकैलासवासी सोन्याबापु in दिवाळी अंक\nजनरल टोप्टिगिन (रशियन लोककथेचा भावानुवाद क्र. 2)\nमूळ लेखक निकोलाई नेकरासोव\nRead more about जनरल टोप्टिगिन\nमराठी भाषा गौरव दिन २०१८\nजागतिक मराठी गौरव दिन २०१८: अनुक्रमणिका\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 23 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2018-04-24T06:51:39Z", "digest": "sha1:JMVCDBGU5T5FAW7BBBPV4KDQVVPTCYFI", "length": 11519, "nlines": 132, "source_domain": "www.marathimati.net", "title": "किटक नाशके | मराठीमाती", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यातील सैय्यद पिंप्री येथील मनोज जाधव या तरुण द्राक्ष बागाईतदाराने सन २०१० या सिझनमध्ये नवीन रंगीत निर्यातक्षम द्राक्षाचे विक्रमी उत्पादन घेऊन रंगीत द्राक्षांची निर्यातही केली. त्यांनी पहिल्या वर्षीच्या द्राक्ष बागेत एकरी ८.५ टन मालाचे उत्पादन घेऊन ५ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.\nरंगीत निर्यातक्षम द्राक्षाचे विक्रमी उत्पादन घेण्याविषयी मनोज जाधव यांनी चर्चा करतांना सांगितले की, माझ्याकडे वडिलांनी लावलेली ओनरुटची १५ वर्षाची जुनी सिडलेस बाग होती. बाग जुनी झाल्याने उत्पन्न कमी मिळत होते. म्हणून ती बाग काढून तिथे ९५ अंतरावर बंगलोर डॉगरीजची स्टस्टॉक हुंडी मार्च २००८ मध्ये लावली. मार्च ते सप्टेंबर ह्या सहा महिन्याच्या कालावधीत माती परिक्षणाच्या अहवालानुसार खतांचे नियोजन केले. शेणखत २३:२३:०, १९:१९:१९ (लिकीड खत) व युरीया यांचा वापर करून झाड चांगले काढून घेतले.\nकमी खर्चात जास्त उत्पादन मिळावे यासाठी प्रत्येक शेतकरी प्रयत्नात असतो. कमीत कमी कालावधीत कमीत कमी संजीवके वापरुन १८ पल्स साईज देणारी, १८ च्या पुढे ब्रिक्स असणारी स्थानिक व निर्यात करण्या योग्य असणारे द्राक्ष जात कोणती, हा विचार मनोज जाधव करीत असतांनाच त्यांचा कल पहिल्यापासून रंगीत जातीकडे अधिक होता. कलर व्हरायटीला साईज मिळण्यास विशेष अडचण येत नाही. पेपर लावायची गरज पडत नाही. नोव्हेंबर, डिसेंबर मधील खाली जाणाऱ्या तापमानांना कलर व्हरायटीज आकर्षक रंग येण्यास फायदाच होतो. स्थानिक बाजार पेठेत सुद्धा सफेद द्राक्षापेक्षा कलर व्हरायटीला १०/- रुपयाने किलोमागे दर व मागणी जास्त असते.\nकलर व्हरायटीज करण्यासाठी नानासाहेब परमल या जातीचे वाण खरेदी करण्याचे मनोज जाधव यांनी निश्चित केले. नानासाहेब परमल जातीच्या वाणाची काही ग्रिफ्टींगसाठी आणली. १ सप्टेंबर २००८ ला पाऊस झाल्यानंतर ग्रिफ्टींगनंतर जे वातावरणे फुटण्यासाठी पाहिजे ते तयार झाले १२ सप्टेंबर पासून डोळे फुटण्यास सुरुवात झाली. सुरुवातीस उडद्या, गोगलगायीपासून डोळ्यांचे संरक्षण केले. सुरुवातीपासून आंतरप्रवाही बुरशीनाशकाचे योग्य नियोजन केल्यामुळे डायनीतून ग्राफटींग केलेली बाग वाचविली.\nसप्टेंबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत व्यवस्थित अन्नद्रव्य व्यवस्थापन करून रिकूटपर्यंत बागेची चांगली वाढ करुन घेतली. नंतर ३.५ फुटावर रिकूट घेतला. व ७.५ सबकेन स्टॉप अ‍ॅन्ड गो पद्धतीने तयार केल्या व एक झाडावर सप्टेंबरपर्यंत १२ ते १४ कांड्या चांगल्या करून घेतल्या. नाशिक जिल्ह्यातील बऱ्याचशा द्राक्ष बागाईतदारांनी ग्रिफ्टींगसाठी कांडीची मागणी केली. सप्टेंबर महिन्यात १ लाख डोळे नाशिकमधील द्राक्ष बागाईतदारांना ग्रिफ्टींगसाठी दिले. इथ्रेल स्प्रे करून पानगळ करून बागेची छाटणी केली.\nपहिल्याच वर्षी सप्टेंबर २००९ ला कांडी देऊन एका झाडावर ४० ते ४५ घड निघाले ते विरळणीमध्ये कमी करून एक झाडावर मोजून २२ घड ठेवले. सर्व कामे वेळेवर केलीत आणि निर्यातक्षम दर्जाचा २० प्लस साईजचा व १८+ ब्रिक्स शुगरचा मल तयार झाला. द्राक्ष शेती करतांना योग्य वानाची निवड, योग्य नियोजन वेळीच औषधे किटक नाशकांचा वापर केल्यास एकरी जास्त उत्पादन काढता येते असे मनोज जाधव यांनी सांगितले.\nThis entry was posted in हिरवळ and tagged अशोक साळी, किटक नाशके, नाशिक, निर्यात, बागाईतदार, मनोज जाधव, योग्य नियोजन, रंगीत द्राक्ष, वानाची निवड on जानेवारी 8, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://transposh.org/mr/tag/wordpress-3-0/", "date_download": "2018-04-24T06:54:17Z", "digest": "sha1:GORISFX6XE22DLG7HX2XKPKTPSZZK4UM", "length": 8600, "nlines": 45, "source_domain": "transposh.org", "title": "वर्डप्रेस 3.0", "raw_content": "transposh.org WordPress प्लगइन शोकेस आणि समर्थन साइट\nजून महिना 18, 2010 द्वारा ऑफर 20 टिप्पण्या\nआपण WordPress अद्याप आपल्या vuvuzelas हाताने का 3.0 सोडा आता आपण हे आणि WordPress नवीनतम transposh प्लगइन नवीन WordPress समर्थन देते की आनंद घेऊ शकता, आणि बोनस म्हणून, buddypress समर्थन. Buddypress या समर्थन आता व्युत्पन्न आणि उत्तरे URL ची आता अनुवादयोग्य घालेल.\nअधिक बदल केलेल्या UI unworkable केले की अटी अतिरिक्त समर्थन समाविष्टीत, उदाहरणार्थ jQuery साधने काही प्लगइन किंवा थीम वापरले होते, आता – आम्ही ते कार्य करण्यास सक्षम आहेत.\nवर्डप्रेस एक नवीन मुख्य आवृत्ती असल्यापासून पूर्वी आवडले, आम्ही जुन्या WordPress अधिकृत समर्थन यास सोडत आहेत 2.8 आवृत्ती, प्लगइन अद्याप कार्य पाहिजे पण चाचणी केली आणि पॅच की आवृत्तीसाठी आणि आम्ही आपल्याला सुधारीत शिफारस करतो जाणार नाही.\nनेहमीप्रमाणेच – आम्ही आपणास बोलू इच्छित, आपण इच्छुक समाविष्टीत काय आणि जो संघ वर्ल्ड कप जिंकणे जाईल आणि जो संघ वर्ल्ड कप जिंकणे जाईल फक्त येथे आपल्या टिप्पण्या ड्रॉप.\nअंतर्गत दाखल: सामान्य संदेश सह टॅग केले: बग, किरकोळ, सोडा, वर्डप्रेस 3.0, वर्डप्रेस प्लगइन\nआवृत्ती 0.5.3 – URL मध्ये अनुवाद करण्याची क्षमता\nजून महिना 1, 2010 द्वारा ऑफर 44 टिप्पण्या\nया नवीन आवृत्ती दिलेल्या लक्ष्य भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी साइटवरील URL परवानगी देते. आम्हाला हान्स याबद्दल आभार मानू इच्छितो Cosmedia (सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया व उपचार बद्दल वेबसाइट) हे वैशिष्ट्य काम sponsoring साठी, तसेच सानुकूल permalinks प्लगइन समर्थन करण्यासाठी पॅच sponsoring. आपण एक वैशिष्ट्य गहाळ असल्यास, विकास साइटवर आमच्यासाठी तिकीट तयार आणि आम्ही आमच्या TODO यादीत जोडेन. आपण आम्हाला मदत करू इच्छित असल्यास, एक वैशिष्ट्य विकास sponsoring आम्हाला लवकर तसे होण्यासाठी मदत होईल, आणि समुदाय संपूर्ण उत्पादन मिळविण्यासाठी.\nअशा पूर्वनिर्धारीत पेक्षा वेगळे भाषा केल्या टिप्पण्या एक जसे चिन्हांकित मुलभूत भाषा येथे अनुवादयोग्य बनतात वस्तुस्थितीवर म्हणून समाविष्ट पुढील सुधारणा देखील आहेत (आपण सेटिंग्ज मध्ये अनुवाद मुलभूत भाषा पर्याय चिन्हांकित करणे आवश्यक), वर्डप्रेस सुपर कॅशे प्लगइन करीता उत्तम समर्थन, आणि jQueryUI आवृत्तीतील लहान सुधारणा WordPress सह मदत करतो वापरली 3.0 येत्या समर्थन.\nही सूचना विषयात अंतिम आयटम आम्ही तृतीय पक्षीय प्लगइन सहत्वता यादी राखण्यासाठी जेथे तुम्ही आम्ही आमच्या विकास साइटवर पृष्ठ असल्याचे जाणून घेऊ इच्छित आहे (पॅचेस सह आवश्यक असल्यास). आमच्या wiki वरील प्लगइन समर्थन मॅट्रिक्स पान, त्याचे एक विकी म्हणून, फक्त साइटवर वापरकर्ता तयार करा आणि हे संपादित आणि सुधारण्यासाठी मोकळ्या.\nअंतर्गत दाखल: सामान्य संदेश सह टॅग केले: देणग्या, किरकोळ, सोडा, एसइओ, trac,, वर्डप्रेस 3.0, WP-सुपर कॅशे\nमुलभूत भाषा सेट करा\nआम्ही आमच्या प्रायोजक याबद्दल आभार मानू इच्छितो\nकनेक्ट कलेक्टर्स: नाणी, स्टॅम्प आणि अधिक\nजस्टीन हॅव्र रिअल इस्टेट\nत्रुटी आढळली आहे, जे कदाचित फीड खाली आहे याचा अर्थ. पुन्हा प्रयत्न करा.\n@ Transposh अनुसरण करा\nऑफर वर आवृत्ती 0.9.9.2 – नाही Git\nश्रीमंत वर आवृत्ती 0.9.9.2 – नाही Git\nऑफर वर आवृत्ती 0.9.9.2 – नाही Git\n0.7 APC बॅकअप सेवा Bing (MSN) दुभाष्या वाढदिवस बग बग फिक्स नियंत्रण केंद्र CSS sprites दान अनुवाद देणग्या eaccelarator Facebook बनावट मुलाखती ध्वज sprites gettext Google-XML-साइटमॅप Google Translate ची मुलाखत घेणे घेणे मोठा किरकोळ अधिक भाषांमध्ये पार्सर सोडा replytocom RSS शोध शोध securityfix एसइओ सामाजिक गति सुधारणा प्रारंभ trac, किलबिलाट UI व्हिडिओ विजेट wordpress.org वर्डप्रेस 2.8 वर्डप्रेस 2.9 वर्डप्रेस 3.0 वर्डप्रेस प्लगइन WP-सुपर कॅशे xcache\nद्वारा डिझाईन LPK स्टुडिओ\nनोंदी (माझे) आणि टिप्पण्या (माझे)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t17893/", "date_download": "2018-04-24T06:58:10Z", "digest": "sha1:RLGHHW76ZOOT33YFITQU256RMXRH3AKA", "length": 3198, "nlines": 70, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-टिपटीप पाणी..", "raw_content": "\nया जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....\nमी आठवणीं, मोकळ्या करीत होतो...\nतीच छत्री काढुन मी उंघड बंद केली\nतु सुध्दा रेनकोटची घडी उगा विस्कटली\nवॉलेट फाटकं मी पुन्हा पुन्हा कुरवाळलं\nसुकल्या गजरयातीलं फुल, तु ही गोंजारलं\nथेबां सोबत मी अश्रुंना मोकळी वाट दिली\nअस्पष्ट हुंदक्यांनी त्यानां तु पण साथ केली\nमी आठवणीं, मोकळया करीत होतो...\nरात्रभर बरयाच आठवणी गोळा झाल्या\nरात्रभर सा-या पाण्यात सोडीत होतो\nरात्रभर थेंबन् थेंब अंगी घेउन भिजलो\nरात्रभर गात्र गात्र चिंब करीत होतो\nरात्रभर शुष्क नात्यांना ओलावित होतो\nमी आठवणीं, मोकळ्या करीत होतो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t20871/", "date_download": "2018-04-24T06:58:16Z", "digest": "sha1:YFYNX4OIQ4KPSUVHUB6PCVV6DSZORJSI", "length": 2969, "nlines": 65, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-पितृपक्ष", "raw_content": "\nगंपू आला म्हणता गंपू जाई\nदिवंगत वाडवडिलांचे आशीर्वाद घेण्याची संधी देतो\nमग काऊची मज्जा होते\nयेरव्ही काऊची पाठवणी होते\nया पंधरवड्यात त्याची मिन्नत्वारी होते\nकाय आहे अर्थ या पितृपक्षाचा'\nखरच पितरांना आपण मन देतो कि करतो उपेक्षा\nकाय आहेत आपल्याकडून वाडवडिलांच्या अपेक्षा\nत्यांचे सदगुण जोपासावे हि नसेल का त्यांची इच्छा\nप्रसादाच्या नावाखाली असे हवे तसे हवे हा पिच्छा\nखरच अर्थ कोणाला कळला का पितृपक्षाचा\nखरे तर वाडवडीलांचे आशीर्वाद घेण्याची देव देतो संधी\nपण याच पितृपक्षाला अशुभ समजते आपुली बुद्धी\nसौ सुप्रिया समीर मडये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://anjalisblogschool.blogspot.com/2013/11/tips-to-write-your-journal.html?utm_source=feedburner&utm_medium=feed&utm_campaign=Feed%3A+blogspot%2FnOqHM+%28%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80+%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97+%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE+%21%29", "date_download": "2018-04-24T07:56:23Z", "digest": "sha1:XVABXV5LVPIQBQ2XAIRH4CZ6PVJHZCSR", "length": 17945, "nlines": 166, "source_domain": "anjalisblogschool.blogspot.com", "title": "Tips to write your journal (तुमची रोजनिशी लिहिण्याच्या टिप्स) | माझी ब्लॉग शाळा !", "raw_content": "\nमराठी तरुण तरुणी, गृहिणी तसेच घरी बसून काम करण्याची इछा असणारे मराठी मन याना माझा हा Blogging चा अनुभव समर्पित शिका आणि कमवा - बस एवढेच करा\nTips to write your journal (तुमची रोजनिशी लिहिण्याच्या टिप्स)\nएक नविन लेखक म्हणून; रोजनिशी लिहिण्यासाठी तुम्हाला काही टिप्स आत्मसात करायला हव्यात. तुमच्या लिहिण्याच्या ध्येय यावर आधारित तुम्हाला ...\nBlogging करताना तुम्ही काही महत्वाच्या बाबी कशा गमावू शकता\nहे सांगायची गरज नाही की, blogging हा विषय पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर (modern technology) अवलंबून आहे. इथे अशी एक शक्यता असते कि त...\nब्लॉग ( Blog ), एक माध्यम - तुमचे आमचे विचार जगासमोर मांडण्याचं - मग ते विचार काहीही असोत, फ़क्त एकच - ते ह्रुदयातुन यायला हवेत. मला वाटते की...\nHow To Create Catchy Blog Names (आकर्षित करणारी ब्लॉग ची नांवे तयार करण्याची पद्धती)\nमित्रांनो , ब्लॉगचे नांव हे त्या ब्लॉग साठीचे हृदय असते यात काही शंकाच नाही . ब्लाँगचे नांव हा एक महत्वाचा घटक असून तो तुमच्या ब्लॉगला ...\nMaking the Blog (ब्लॉग तयार करताना) - १\nकोणताही विषय web वर शोधत (search) असताना तुम्ही search engine ( Google - माझ्या आवडीचे ) पासून सुरुवात करता . मी तुम्हाला द...\nजुन्या काळी बरेचसे पालक आपल्या शाळेत जाणा - या मुलांना रोजनिशी लिहिण्याचा सल्ला द्यायचे . याचे दोन फायदे होते . एकतर, मुलांचे...\nमित्रहो , blogging क्षेत्रात येण्या अगोदर मी असे गृहीत धरतो की तुम्ही माझा “ Before Moving Towards blogging ( ब्लॉगिंग कडे जाण...\n हया प्रश्नाचे खरेतर उत्तर असुनही ब - याच जणांसाठी हा अनुत्तरित प्रश्न आहे . वेगवेगळ्या पद्धतीने आपण ब्लॉग ...\nTips to write your journal (तुमची रोजनिशी लिहिण्याच्या टिप्स)\nएक नविन लेखक म्हणून; रोजनिशी लिहिण्यासाठी तुम्हाला काही टिप्स आत्मसात करायला हव्यात. तुमच्या लिहिण्याच्या ध्येय यावर आधारित तुम्हाला तुमचे विचार किंवा भावना वर्णन करण्यासाठी तुम्ही तुमचे खाते सुरू करा. कविता किंवा लघुकथा लिहा, किंवा मग तुम्ही तुमची लेखन क्षमता वाढवू शकता.\nया गोष्टींचा तुम्ही तुम्हाला हवा तो अर्थ काढू शकता, इथे मी तुमच्यासाठी रोजनिशी सुरू करण्यासाठी ९ उपयोगी सूचना देत आहे (Nine helpful tips to start writing a journal).\nमला तरी असे सुस्पष्ट दिसत आहे कि, हि रोजनिशी लिहिण्याची सुरूवात आहे. जे काही असेल ते, तुमच्या रोजनिशी मध्ये लिहा. तुमचे विचार, भावना, तुमच्या डोक्यात जे काही येत असेल ते लिहा. हे सर्व तुम्हाला तुमच्या लिहिण्याची सवय तयार करण्यास मदतच करेल. खरेतर हे म्हणजे तुमच्यासाठी पुढे जाण्याचा एक मार्गच आहे.\n०२. हे सर्व तुमच्या बरोबर घेऊन चला (Carry it with you):\n यामुळे तुम्हाला दररोज लिहिण्याची सवय लागेल. मी नेहमी एक छोटीशी नोटबूक जी माझ्या खिशात सहजपणे मावेल ठेवत असतो. ती नोटबुक मला नेहमी काहीतरी लिहिण्यासाठी स्मरण करून देते. तुम्ही जर तुमची रोजनिशी लिहिण्याचे विसरलात तर तुम्ही काही नोट्स तुमच्या सेल फोनमध्ये घेऊन त्या नंतर रोजनिशी लिहिण्यासाठी वापरू शकता.\n०३. तुमच्या सेल फोनवर रीमाइण्डर सेट करून ठेवा (Set a Reminder on Your Phone):\nबाकी लोकांसारखे (जिकडे जाईल तिकडे) मी माझा सेलफोन माझ्या बरोबरच ठेवतो. कारण माझ्या गरजा भागविण्यासाठी मी अनेकदा त्याच्या वापर करू शकतो. प्रत्येक काही तासानंतर रोजनिशी लिहिण्यासाठीचे स्मरण करून देण्यासाठी मी टाइमर लावून ठेवत असतो. ते प्रत्येक वेळेस रिंग वाजवून मी करत असलेले काम थांबायला लावते आणि एक मिनिट रोजनिशी लिहिण्यासाठी वापरायला लावते.\n०४. एक चांगली रोजनिशी लिहायला हवी (Have a Cute Journal):\nजेव्हा तुम्ही एक चांगली रोजनिशी लिहिण्याचे ठरवता तेव्हा त्या पानांना तूमच्या लिहिलेल्या विचारांनी आकर्षकपणा येतो. मला माझ्या एका मित्राने एक नोटबुक दिले आहे ज्याचे पहिले आणि शेवटचे पृष्ठ सुशोभित केलेले आहे. ते नोटबुक मला त्यामध्ये लिहावे यासाठी नेहमी उद्धुक्त करत असते. मी देखील त्यामध्ये एका विशेष पेनाने ती रोजनिशी लिहित असतो आणि ती नेहमी माझ्याबरोबर ठेवत असतो. याच प्रकारे, रोजनिशी लिहिणे म्हणजे एक प्रकारचा भव्य प्रसंग असतो याची नेहमी मला प्रचीती येत असते.\nवाचन हे तुमचे विचार आणि कल्पना ढवळून काढण्यास मदत करते, जे नंतर एक रोजनिशिमधील सुंदर लेखन बनून जाते. वाचन हे आपल्याला आपले विचार, मत विस्तृत करण्यास मदत करते. वाचन हे आपल्याला माहित नसलेल्या गोष्टींचे आव्हाने स्वीकारायला तसेच नवीन दृष्टांत मिळविण्यासाठी मदत करतात. कोणतेही एक जुने गाजलेले पुस्तक उचला किंवा एखादे नवीन पुस्तक जे तुम्हाला नेहमी वाचावयास आवडते तिथून सुरुवात करा. जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर इंटरनेटवर काही लघुकथा किंवा कविता शोधा आणि वाचा. \"वाचाल तर वाचाल\" हि म्हण लक्षात असू द्या.\n०६. शब्दांबरोबर खेळा (Play with Words):\nअलीकडे मी अधिकाधिक चटकन लिहून घेतलेल्या छोट्याशा टिप्स यांची लिस्ट करत असतो आणि त्या टिप्स एकत्र करून त्यामधून एक संलग्न आणि अर्थपूर्ण विचार मांडायचा प्रयत्न करत असतो. कधी कधी हा प्रयत्न चालून जातो, कधी चालत नाही. या सगळ्याचे सार एकच, ते म्हणजे, हे शब्द (शब्दांचे हे खेळ) एकमेकांबरोबर कसे काम करतात याचा तुमच्या मनात विचार सुरू करण्याची प्रक्रिया करत असतात. मी जेव्हा अडखळतो तेव्हा मला मदत करते ती मी तयार केलेली लिस्ट, परत मी त्या तयार केलेल्या लिस्ट कडे जातो आणि हे पहातो ( रोजनिशी लिहिण्यासाठी) कि कोणते शब्द चालतात आणि कोणते नाहीत.\n०७. तुमच्या भोवतीच्या सर्व बाबींची नोंद घ्या (Take Note of Everything around You):\nकधीकधी मी दररोज आयुष्यात घडत असलेल्या गोष्टीं लिहित असतो, किंवा मी कार्य करीत असताना जे नेहमी पहातो ते लिहित असतो. सभोवतालच्या या गोष्टी नंतर मला लघुकथा किंवा कविता करण्यास प्रेरणा देतात. याचबरोबर या गोष्टी मला जगात चाललेल्या गोष्टींची दाखल घेण्यास भाग पाड्तात. रोजनिशी लिहिण्यासाठी हि एक सुंदर आणि प्रेरक गोष्ट आहे. या विविध प्रकारच्या व्यायामाचे सार एवढेच कि, हे सगळे तुम्हाला सर्व वेळ लिहित रहाण्याची, किमान विचार करण्याची संधी देते.\n०८. लेखकाच्या जागेची काळजी करू नका (Don't Worry about Writer’s Block\nलेखकांची जागा हि प्रत्येक लेखकासाठी एक नैसर्गिक अनुभव असतो. या प्रक्रियेस आलंगण देऊन त्याचा आनंद घ्या. असे जर घडले तर, रील्याक्स रहा. लेखन हे छोटेसे काम नसून ती एक गंमत असते. जर तुम्हाला एखाद्या दिवशी लिहावेसे वाटत नसेल तर काही हरकत नाही. कदाचित तुम्ही त्या दिवशी निसर्गाच्या सानिध्यात फिरावयास जा, किंवा मग वाफाळलेल्या चहाबरोबर शांतपणे एका ठिकाणी बसून पुस्तक वाचा. कुणास माहित हि गोष्ट तुम्हाला लेखनाच्या विभागात कदाचित मदतही करेल\nआज, आत्ता लगेच सुरुवात करा. तुम्हाला नेहमी जे काहीतरी करावयाचे होते त्यासाठी \"आत्ता\" हीच सर्वोत्तम वेळ आहे. जरी ते तुम्ही restaurant मधील napkin च्या तुकड्यवरिल लिहिलेले असेल अथवा सुंदर अशा लेदरचे आवरण असलेल्या रोजनिशी मध्ये लिहिलेले असेल, प्रत्यक्षात लिहिणे सुरु करा. उर्वरित टिप्स या तुम्हाला लिहिण्याची सवय जोपासण्यासाठी नक्कीच मदत करेल.\nहँपी न्यू इयर २०१२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/news/govind-nihalani-first-marathi-deubt-film-ti-ani-itar-releasing-soon/19656", "date_download": "2018-04-24T06:37:51Z", "digest": "sha1:OSLBWLIXJ7URD55KIV24IMXAZWVWT4J5", "length": 24455, "nlines": 241, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Govind nihalani First Marathi Deubt Film Ti ANi Itar Releasing Soon | ​‘ती आणि इतर’सिनेमात प्रिया मराठेची आव्हानात्मक भूमिका | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\n​‘ती आणि इतर’सिनेमात प्रिया मराठेची आव्हानात्मक भूमिका\nआधुनिक विचारसरणी असणारे हे कपल आहे. मात्र काही वेळानंतर त्यांचे विचार बदलत जातात अशी ती भूमिका असून नक्कीच रसिकांना सिनेमातून एक चांगला मेसेज पाहायला मिळणार त्यामुळे आतापासूनच सिनेमाची रसिकांना उत्सुकता लागल्याचे पाहायला मिळतेय.\nलवकरच ‘ती आणि इतर’ हा मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, भूषण प्रधान, प्रिया मराठे अमृता सुभाष, आविष्कार दार्वेकर अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.प्रत्येक कलाकाराने या सिनेमात वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मुळात या सिनेमाची कथा ही फक्त संध्याकाळी घडणा-या गोष्टींवर आधारित आहे. संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत काय काय घडते हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. सगळ्यात महत्त्वाचे आणि विशेष म्हणजे गोविंद निहलानी यांचा हा पहिला मराठी सिनेमा असून दिग्दर्शक आणि डीओपीसुद्धा गोविंद निहलानी हेच असल्यामुळे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या असल्याचे प्रिया मराठेने सांगितले.या सिनेमात मी आणि भूषण कपल आहोत. आधुनिक विचारसरणी असणारे हे कपल आहे. मात्र काही वेळानंतर त्यांचे विचार बदलत जातात अशी ती भूमिका असून नक्कीच रसिकांना सिनेमातून एक चांगला मेसेज पाहायला मिळणार त्यामुळे आतापासूनच सिनेमाची रसिकांना उत्सुकता लागल्याचे पाहायला मिळतेय. तसेच याविषयी भूषणने सांगतिले की, चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांसमोर ते गुढ उलगडणार आहे. यामध्ये माझी भूमिका बायकोवर वर्चस्व गाजवणाऱ्या पतीची आहे. या चित्रपटात प्रिया मराठेने माझ्या बायकोची भूमिका साकारली आहे. अहंकारामध्ये वाहून गेलेला आणि बायकोला तिचे मत व्यक्त न करू देणाऱ्या पतीची भूमिका साकारण्याचा अनुभव फारच वेगळा होता. सुबोध, अमृता, सोनाली यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. तसेच गोविंद निहलानी हे बॉलिवुडमधील नामवंत दिग्दर्शक असले तरीही ते प्रत्येक कलाकाराचा प्रचंड आदर करतात. कलाकारांचे जर काही चुकले तर ते न रागावता शांतपणे समजावून सांगतात. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच प्रेक्षकांना ती आणि इतर कोण आहे हे समजेल.\"\nऑनस्क्रीन रंगणार भूषण आणि पल्लवीच्य...\nअसे आहे गुलाबजाम सिनेमाचे दुसरे पोस...\nशूटिंग हिंदी सिनेमाचं, पण या गोष्टी...\n'ती आणि इतर'ट्रेलर प्रदर्शित,स्त्री...\n‘साथ निभाना साथियाँ’च्या सेटवर इफ्त...\nम्हणून निगेटिव्ह भूमिका भावतात – प्...\nकधी पाहिलाय का अभिनेत्री सोनाली कुल...\nथर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव\nगोविंद निहलानी यांना जीवनगौरव पुरस्...\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरे...\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्...\n​'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये स्पृहा...\n​ऋत्विक केंद्र दिसणार 'सरगम' मध्ये\nसंगीत देवबाभळी नाटक पाहून भारावले न...\n​माधुरी दिक्षीतने केली सुमेध मदगलकर...\nरणांगण चित्रपटाचं आगळं – वेगळं पोस्...\nमाधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या...\n“सायकलच्या” प्रमोशनसाठी मुंबईत व्हि...\nअस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गु...\nचिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम क...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B8_(%E0%A4%A8%E0%A4%BF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2018-04-24T06:47:40Z", "digest": "sha1:LEZAMMAN46SOBI5GAFQWHXW77RFOACDI", "length": 4921, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोलंबस (नि:संदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nतुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात वरीलपैकी योग्य तो दुवा घालावा.\nकोलंबस ह्या नावाचे खालील लेख मराठी विकिपीडियावर आहेतः\nख्रिस्तोफर कोलंबस - अमेरिका खंडाचा शोध लावणारा युरोपियन खलाशी.\nकोलंबस, ओहायो - अमेरिकेच्या ओहायो राज्याची राजधानी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०६:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A8%E0%A5%AE", "date_download": "2018-04-24T06:37:36Z", "digest": "sha1:UZ6ORSU64EO3P6NOSQY6Z75HNKNLRQPT", "length": 4649, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५२८ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १५२८ मधील जन्म‎ (२ प)\n► इ.स. १५२८ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १५२८\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १५२० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जून २०१३ रोजी १२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.in/2013/10/", "date_download": "2018-04-24T06:24:14Z", "digest": "sha1:UXSNHPJXNTNOYN4EPKSCRKDRBDXH4Z7K", "length": 11515, "nlines": 120, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.in", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: October 2013", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nआश्विन पोर्णिमेला विदर्भात आसनीचा सण साजरा करतात. या दिवशी संध्याकाळी प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठ अपत्याला वाढदिवसाप्रमाणे ओवाळतात. त्या अपत्याला नवीन कपडे भेट म्हणून देतात.\nसाधारणतः ८० च्या दशकात या दिवशी संध्याकाळी प्रत्येक घरा-वाड्यांमध्ये भुलाबाइ चा खेळ रंगायचा. एका ठिकाणी शंकर-पार्वतीची (भुलोजी आणि भुलाबाई) च्या पार्थिव मूर्तीची स्थापना व्हायची. (सोवळे वगैरे नाही. गणपतीच्या पार्थिव मूर्तीची होते त्याप्रमाणे साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा पण नाही.) संध्याकाळी लहान मुले आणि आसपासच्या मुली एकत्र येउन भुलाबाईची गाणी म्हणत.\nगाणी मजेदार असत. तत्कालीन किंवा थोड पूर्वकालीन स्त्री जीवनाचे प्रतिबिंब त्या गाण्यात पडलेले दिसायचे. महत्वाची गाणी थोडी आठवतात\n\" या या भुलाबाई, आमच्या आई, तुमच्या आई, तुमच्या अंगात लाल चोळी, लाल चोळीवर बसला मोर, बसला मोर. बसल्या मोरावर सांडले अत्तर, भुलोजी डॊक्टर घरी नाही, घरी नाही \"\n\" यादवराया राणी रुसूनी बैसली कैसी, सासूरवाशि सून घरात येना कैसी \"\n\" अडकीत जाउ खिडकीत जाउ, खिडकीत होता बत्ता, भुलोजीला मुलगा झाला, नाव ठेवा दत्ता \"\n\" आला माझ्या माहेरचा वैद्य, डोक्याला टोपी जरीकाठी, अंगातला सदरा मखमली \"\nत्यानंतर प्रत्येक घरातून खिरापत यायची. ही खिरापतही रहस्य असायची आणि कुठल्या डब्यात काय हे ओळखण्याचा आणि त्यासाठी क्ल्यु म्हणून तो खाद्यपदार्थ असलेला डब्बा वाजवून त्या घरातील सदस्य इतर सगळ्यांना तो पदार्थ ओळखायला लावायचा. त्यासाठी दुपार पासूनच मोर्चे बांधणी सुरू व्हायची. आपल्या घरातल्या स्वयंपाकघरापर्यंत कुणी पोहोचू नये मात्र आपण काही ना काही कारण काढून दुस-यांच्या स्वयंपाकघरातले गुपीत माहिती करून घ्यायची धडपड चालायची. खूप मजा यायची आणि त्यातच रात्री ती खिरापत आणि आटवलेले दूध पिउन कोजागिरीची सांगता व्हायची.\nत्या वेळी दूध एव्हढ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नसायचे. सकाळी उठून दूध केंद्रावर रांगा लावाव्या लागयच्या. कोजागिरीच्या आधी दोन तीन दिवस शासकीय दूध योजनेतून कोजागिरी निमित्त ज्यादा दूध उपलब्ध होणार असल्याची बातमी चक्क वर्तमानपत्रांमध्ये यायची आणि आपल्याला जर त्यादिवशी ज्यादा दूध लागणार असेल तर त्या केंद्र प्रमुखाला तशी दोन दिवस आधी सूचना आणि आदल्या दिवशी आठवण करून द्यावी लागायची.\nपण एव्हढ करून जी मजा यायची ती आज मुबलक दूध उपलब्ध असताना, भरपूर साधनं असताना येत नाही हे खरंय. माणसं हरवलीयत. माणसा माणसातल्या नातेसंबंधांची, त्यातल्या अकृत्रिम बंधांची मजा हरवलीय अस प्रामाणिकपणे वाटतय.\nLabels: आसनी (आश्विनी) पोर्णिमा, भुलाबाई\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2010/12/blog-post_26.html", "date_download": "2018-04-24T07:02:52Z", "digest": "sha1:3WQ4J5JKCHISD5DLTFLCM3UIQ4YKYGAY", "length": 14230, "nlines": 323, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: भारतकुमार राऊत-राजच्या मैत्रीने उद्धव नाराज", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nरविवार, 26 दिसंबर 2010\nभारतकुमार राऊत-राजच्या मैत्रीने उद्धव नाराज\nभारतकुमार राऊत-राजच्या मैत्रीने उद्धव नाराज\nमुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाजप कार्यालयातील भेटीमुळे युतीमध्ये निर्माण झालेला तणाव निवळला असला, तरीही शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांनी थेट राज यांना दिलेल्या निमंत्रणानुसार ते त्यांच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिले. या सर्व प्रकारामुळे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे संतप्त झाले असून भारतकुमार व राज यांच्या पडद्यामागील मैत्रीचा निषेध म्हणून ते शनिवारी राऊत यांच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यास अनुपस्थित राहिल्याचे समजते.\nराज यांनी गेल्या आठवड्यात भाजप कार्यालयाला दिलेल्या भेटीमुळे युतीत तणाव निर्माण झाला होता. भाजचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने हा तणाव निवळला; मित्रपक्ष भाजपच्या हरकतींवरून नाराज झालेल्या उद्धव यांनी आपली नाराजी जाहीरपणे बालून दाखविली; पण भारतकुमार यांनी आपल्या मुलाच्या विवाहाचे निमंत्रण थेट राज यांना दिल्याचा मुद्दा पुढे आणत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राज भाजप कार्यालयात आलेले तुम्हाला चालत नाहीत; पण तुमच्या खासदारांनी त्यांना भेटून निमंत्रण दिलेले कसे चालते, असा सवालही भाजपच्या गोटातून उपस्थित करण्यात आला. राजकारणात शिवसेना व मनसे समोरासमोर उभी ठाकली असतानाच आपल्या खासदारांचे हे \"मैत्री'पूर्ण वर्तन उद्धव यांना रुचले नाही. आपण समोरासमोर टीका करायची व पुन्हा शिवसेनेचे काही नेते आपल्या जुन्या मैत्रीचे हवाले देणार, या दुटप्पीपणामुळे उद्धव नाराज झाल्याचे समजते. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध राज यांनी टीका केली होती. \"एलआयसी'मध्ये शिवसेनेला टक्कर देण्यासाठी मनसेने युनियन स्थापन करायची, हे दाखले ताजे असतानाच शिवसेनेचे खासदार जुन्या मैत्रीचे हवाले देतात, हा प्रकार त्यांना रुचला नाही. सध्या राजकारणाच्या प्रत्येक वाटेवर शिवसेना व मनसेमध्ये जाहीर संघर्ष सुरू आहे. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या महायुद्धात भारतीय विद्यार्थी सेना व मनविसे समोरासमोर उभी ठाकली असतानाच, शिवसेनेच्या खासदाराच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यास मनसे अध्यक्षांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नेमका कुठला संदेश जाणार, याकडेही शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने लक्ष वेधले आहे.\nराज या सोहळ्यास उपस्थित राहिले होते. म्हणूनच उद्धव \"बीकेसी' येथे झालेल्या विवाह सोहळ्यास गेले नाहीत. त्यांच्या भूमिकेचे शिवसेनेतून स्वागत होत असून पडद्यामागून मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी मैत्री ठेवणाऱ्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना यामुळे चांगलीच चपराक मिळेल, अशी प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nवाढदिवसाचे होर्डिंग लावू नयेत - राज ठाकरे\nदादोजींच्या पुतळ्यावरून राजकारण - राज\nभारतकुमार राऊत-राजच्या मैत्रीने उद्धव नाराज\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-24T06:36:18Z", "digest": "sha1:VOIYRMT6ORRIGAA4JAM2ETGFLUAVF6U4", "length": 3171, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तायांग खान - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनैमन टोळीचा प्रमुख. याने जमुगाला आश्रय दिल्याने चंगीझ खानाचा रोष ओढवून घेतला. चंगीझने याच्या टोळीवर हल्ला करून तायांगला ठार केले व त्याच्या मुलाला परागंदा होण्यास भाग पाडले.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ फेब्रुवारी २०१७ रोजी २२:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A8", "date_download": "2018-04-24T06:36:05Z", "digest": "sha1:OTKMYBYSNNYQTOK3IFARTTETCYQGYGIS", "length": 3822, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ह्वांग कुन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहे चिनी नाव असून, आडनाव ह्वांग असे आहे.\nह्वांग कुन (देवनागरी लेखनभेद: हुआंग कुन; पारंपरिक चिनी लिपी: 黄昆 ; पिन्यिन: Huáng Kūn) (सप्टेंबर २, १९१९ - जुलै ६, २००५) हा चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील विख्यात |भौतिकशास्त्रज्ञ होता. तो चिनी विज्ञान अकादमीचा सभासद होता. जनता-प्रजासत्ताकात विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या 'विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सर्वोच्च शासकीय पारितोषिकाने' २००१ साली त्याला गौरवण्यात आले.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://zeemarathijagruti.com/blog/the-festivals-and-the-sweet-moments", "date_download": "2018-04-24T06:53:12Z", "digest": "sha1:4ILILX7NFDJ3BJM5A4ADYEAWUHCPSKO2", "length": 17095, "nlines": 251, "source_domain": "zeemarathijagruti.com", "title": "सणांचे क्षण करा आणखी गोड! - Zee Marathi Jagruti", "raw_content": "\nसणांचे क्षण करा आणखी गोड\nसणवार म्हणजे सुगरणींच्या हक्काचे दिवस. घरात पाहूण्यांची रेलचेल, पूजेची तयारी सुरु असताना नैवेद्याकडेही लक्ष द्यावे लागते. आधीच पंचपक्वानांचा बेत त्यात गोडाधोडाचे करणे आलेच, अशावेळी झटपट होणा-या पदार्थांचा शोध सुरु होतो. काहीतरी नवे व थोड्याच वेळात तयार होईल अशी रेसिपी हवी असते. मैत्रिणींनो तुमचे हे काम थोडे हलके व्हावे यासाठी काही गोड पदार्थांच्या रेसिपीज् तुमच्यासाठी,\nसाहित्य: १/२ कप खिरापत, १/२ कप मैदा, १/२ कप बारीक रवा, २ टेस्पून तेल, चिमूटभर मिठ, तळण्यासाठी तेल/ तूप, १ टीस्पून दूध\nमैदा व रवा एकत्र करून घ्यावा. दोन चमचे तेल गरम करून मोहन घालावे. किंचित मीठ घालावे. थोडे थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. साधारण अर्धा तास झाकून ठेवावे. अर्ध्या तासाने पीठ पुन्हा एकदा चांगले मळून घ्यावे व मळलेल्या पिठाचे साधारण दिड इंचाचे समान गोळे करून घ्यावे. तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवावे. प्रत्येक गोळ्याची पुरी लाटून घ्यावी. पुरी एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्‍या हानाने मुखर्‍या पाडाव्यात. मध्यभागी जो खळगा झाला असेल त्यात एक चमचा सारण भरावे. सर्व मुखर्‍या एकत्र करून कळी बनवावी आणि एक थेंब दुधाचं बोट घेवून कळी नीट बंद करावी. सर्व मोदक मंद आचेवर तळून घ्यावेत व तयार झालेले चविष्ट मोदक सर्व्ह करावेत.\nसाहित्य: १ लिटर दूध, ४ टेस्पून साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त), २ छोटी संत्री १ टीस्पून वेलचीपूड, १/२ टीस्पून केशर , सजावटीसाठी बदाव-पिस्त्याचे काप\nप्रथम दूध एका भांड्यात तापवायला ठेवावे. दुधाला एक उकळी आली की गॅस मंद आचेवर ठेवून दूध आटू द्यावे. मधे मधे थोडे ढवळत राहावे. दूध जरा घट्ट झाले की त्यात वेलचीपूड, केशर व साखर घालावी व ढवळावे. साखर विरघळली असता थोडे बदाम-पिस्त्याचे काप घालावे व गॅस बंद करावा. संत्रे सोलून त्यामधील गर घ्यावा. दूध पूर्ण गार झाले, की त्यामध्ये संत्र्याचा गर घालावा व खीर फ्रिजमध्ये ३-४ तास थंड होण्यासाठी ठेवावी. आदल्या रात्री खीर करुन ठेवली असता संत्र्याचा स्वाद आणखीन खीरीत उतरतो ज्यामुळे ती अधिक चविष्ट लागते.\n(टीप- गरम दूधात संत्र्याचा गर घातल्यास दूध नासते.)\nसाहित्य: १ वाटी कोरडी, हलकी भाजलेली मुगाची डाळ, १ वाटी पाणी, २ वाट्या दूध, १ वाटी चिरलेला गूळ, २ टीस्पून साखर, २ टेस्पून ओला नारळ, १ टीस्पून वेलचीपूड, १/४ टीस्पून जायफळपूड, सुकामेवा सजावटीसाठी\nमुगाची डाळ, दूध व पाणी एकत्र करुन शिजवून घ्यावे. शिजलेल्या डाळीच्या मिश्रणात गूळ, ओला नारळ, साखर घालून मिश्रण एकजीव करावे. हे मिश्रण शिजायला ठेवावे व थोडे घट्ट होईपर्यंत ढवळत रहावे. मुगाची खीर तयार झाली असता वेलचीपूड किंवा सुकामेवा घालून खीर सर्व्ह करावी.\nसाहित्य: १ वाटी तयार दलिया, १ लिटर दूध, १ वाटी गूळ, १ वाटी ओलं खोबरं, सजावटीसाठी काजू\nदलिया तीन-चार तास भिजवून ठेवा. नंतर त्यात एक वाटी गूळ आणि वाटीभर ओलं खोबरं घालून कुकरला चांगलं मऊ शिजवून घ्यावे. मिश्रण घट्ट होऊ नये यासाठी शिजवतावना पुरेसे पाणी घालावे. हे मिश्रण जरासे कोमट असताना त्यामध्ये जायफळ पूड घालून एकजीव करुन घ्यावे. मिश्रण थंड झाल्यावर त्यात दूध घालावे. त्यामध्ये काजूचे तुकडे घालावे व तयार दलियाची खीर सर्व्ह करावी.\nनक्की करुन पाहा आणि आपल्या मैत्रिणींनाही सांगा, या झटपट होणा-या गोड पदार्थांच्या साहाय्याने सणवारांचा सोहळा करा आणखी गोड\nबलात्कारास कपडे जबाबदार नसतात\nमनमोकळं बोल म्हणतेय, ‘मी टू’ मोहिम\nपिकल्या पानांच्या छायेतलं घरकुल\nरेसिपी – कुरकुरे लॉलीपॉप्स\nरेसिपी – व्हेज चीज पराठा\n१४ फेब्रुवारी ‘मोहिम स्त्रियांच्या सुरक्षेची’\nरेसिपी – लेमन पुडींग\nइनडोअर बागेत लावावीत ‘ही’ झाडे\nसाड्यांचे आयुष्य वाढवतील ‘हे’ उपाय\nमेकअप करताना होतात ‘या’ चुका\nरेसिपी – गार्लिक ब्रेड\nशिळ्या भाताच्या चवदार रेसिपीज\nझटपट होणा-या ‘नेल आर्ट’ डिझाईन्स\nरेसिपी – साबुदाणा पुरी\nया १० कल्पक छंदांपैकी एकाशी तरी मैत्री कराच\nवर्ष २०१७ मधील ८ जगजेत्या भारतीय महिला\nअसे बनवता येईल ‘किचन गार्डन’\nरेसिपी – मिरीयुक्त रस्सम\nनववर्षी करु असे ‘भन्नाट संकल्प’\nरेसिपी – बिनअंड्याचा केक\nहिवाळ्यात या ठिकाणांना भेट द्यावीच\nजुन्या साड्यांचा फॅशनेबल उपयोग\nरेसिपी – चना चिली\nरेसिपी – पोह्यांचा ढोकळा\nलग्नझालेल्या ‘ती’ समोरील प्रश्न\nतुम्ही पाहिल्या नसतील अशा मेहंदी डिझाईन्स\nरेसिपी – सोया नगेट्स\nरेसिपी – काश्मिरी मटण चॉप्स\nरेसिपी – बटर मुरुक्कु\nदिवाळीची सुट्टी मिळत नसेल, तर हे वाचा\nरेसिपी – बंगाली मिठाई ‘संदेश’\nया ५ गोष्टींमुळे महिलांना आवडतो ‘श्रावण’\nलहान मुलांना स्मार्टफोन देताय की आजार…\nअशी असते माझी ‘दुपार’\nइथे नाही गेलात, मग पावसाळा काय अनुभवलात\nअसा दम द्याल, तर नावडते पालक व्हाल\nविश्वविक्रमी एक्स्प्रेस झुलन गोस्वामी\nरेसिपी – सोयाबीन कटलेट\nब्युटीपार्लरची किमया साधणारे घरगुती फेसपॅक\nऑक्टोबर हिट, आईस्क्रीमची ट्रिट\nतुला साजेचा ‘हेअर कट’\nपालक म्हणून मोठे होताना\nफळांच्या स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी\nअंतराळी झेप घेई ‘भारतकन्या’\n‘नाताळ’ होईल अधिक चविष्ट\nदिवाळी रंगे, फराळा संगे\nझटपट बनणारे पौष्टिक पदार्थ\nसणांचे क्षण करा आणखी गोड\nजाणून घ्या महत्त्वपूर्ण कायदे\nआकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी द्या साथ स्वतःला स्वतःची \nझटपट होणारे काही गोडाचे पदार्थ\nस्वत:तील ‘स्व’चा शोध घ्यायचायं\nजागृतीची साथ मिळणार आणि सुंदर मी होणार \nस्त्री मनातील स्वसंरक्षणाचा ‘संकल्प’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-04-24T06:27:04Z", "digest": "sha1:NSLYD7J6YBHFTQ3D6SBOT2JQ3A34OLB6", "length": 5188, "nlines": 190, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८५० मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८५० मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १८५० मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १८५० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१५ रोजी २३:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-04-24T06:38:40Z", "digest": "sha1:CWJLU4NPRQJRZUSXFVQXE6RMNOKBSL4K", "length": 3984, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हखामनी साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"हखामनी साम्राज्य\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १८:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2018-04-24T06:38:28Z", "digest": "sha1:KDWLITQH5XTA4ETC4W7F5Y2ET4R2YSUM", "length": 4366, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्‍यक्तिवाद - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २०१४ रोजी १९:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://khattamitha.blogspot.com/", "date_download": "2018-04-24T06:22:45Z", "digest": "sha1:QSRBKOFKTRTTCYJY6XNMAZEVHLEVDTGT", "length": 21872, "nlines": 136, "source_domain": "khattamitha.blogspot.com", "title": "खट्टा मिठा", "raw_content": "\nसंत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला\nयंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.\nतुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून वेध घेणारी ही लेखमाला.\nखट्टामिठाच्या वाचकांसाठी तिचे खास पान...\n(लोकसत्ताचे चित्रकार नीलेश जाधव यांच्या खास चित्रांसह)\nतुलसी आंबिले यांचा पत्ता - tulsi.ambile@gmail.com\nमस्तानीची बदनामी : एक माजघरी कारस्थान\nबाजीराव-मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाणे हे इतिहासाला धरून नसल्याने त्याविरोधात गेल्या महिन्यात (नोव्हेंबर-डिसेंबर २०१५) संतापाची लाट निर्माण झाली. सर्वांचे म्हणणे एकच होते, की इतिहासाचा विपर्यास सहन केला जाणार नाही, करता कामा नये. ही एक चांगलीच गोष्ट झाली. इतिहासाशी वृथा खेळ नको असा आग्रह धरला जाणे ही नक्कीच अभिनंदनीय बाब आहे. असा आग्रह धरल्यामुळे आणखी एक झाले. ते फारसे कुणाच्या लक्षात आलेले दिसत नाही, पण पुराव्यांनिशी इतिहास जे सांगतो ते आणि तेवढेच मान्य करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या अंगावर आली.\nमस्तानी ही काही राजनर्तकी नव्हे. ती बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या. हा राजा हिंदू. त्याला मुस्लिम राणीपासून झालेली मस्तानी ही कन्या. तेव्हा ती अनौरसही नाही. छत्रसाल हा प्रणामी पंथाचा. हा पंथ सेक्युलर विचारांचा. त्या प्रभावाखाली मस्तानी लहानची मोठी झालेली आहे. त्यामुळेच ती नमाजही पढते आणि कृष्णाची पूजाही करते. उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती नृत्यकुशल आहे. कृष्णाची भजने गात ती नाचते. याचा अर्थ ती कोठ्यावर बसणारी कलावंतिण वा वारयोषिता नाही. पण पिंगा गाण्यावर आक्षेप घेणारांना फक्त काशीबाईची प्रतिष्ठा तेवढी दिसते आणि मस्तानीबाबत शब्दही काढावा वाटत नाही, याचे कारण आजवरच्या कथाकादंब-या आणि बखरींनी बनविलेली तिची प्रतिमा.\nलोकप्रभाच्या २७ नोव्हेंबर २०१५च्या अंकातील\nटाचणी आणि टोचणी या रवि आमले यांच्या सदरातील लेख.\nमद्यपुराण (प्रशस्ती ते बंदी)\nवैदिक धर्मशास्त्रामध्ये मद्यपान निषिद्ध मानण्यात आले आहे. मनुने तर मद्य जाणताच काय, पण अजाणतासुद्धा पिऊ नये अशी आज्ञा दिली आहे.\nधार्मिक हिंदूंच्या दृष्टीने अत्यंत पवित्र आणि पूज्य असलेल्या अशा मनुस्मृतीमधील ही आज्ञा आहे. तेव्हा तिचे महत्त्व लक्षात यावे. हा ग्रंथ स्थूलमानाने इ.स. २०० ते ३०० या काळातला आहे. मौर्य सम्राट ब्रहद्रथ मौर्य याचा त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने खून केला आणि स्वत:ला सम्राट म्हणून घोषित केले. त्याच्या काळात वैदिक धर्माला खूप चांगले दिवस आले. मनुस्मृती ही त्या शुंगकाळातली. हिंदूंचे धर्म कायदे त्यात सांगितले असल्याने तो अतिशय महत्त्वाचा ठरतो, तर या ग्रंथाने दारू पिणे हे पाप असल्याचे म्हटले आहे. त्याच्या मते-\nसुरा वै मलमन्नानां पाप्मा च मलमुच्यते\nतस्माद् ब्रा’राजन्यौ वैशच्य न सुरां पिबेत्\nदारू म्हणजे अन्नाचा मळ. आणि मळास पाप म्हणतात. तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी दारू पिऊ नये. शूद्रांबाबत येथे मनू काही सांगत नाही. त्यांचे मद्यसेवन त्याने दुर्लक्षिले आहे. ब्राह्मणांना मात्र तो सूट देण्यास तयार नाही. कारण ज्या ब्राह्मणाच्या देहातील वेदज्ञान एकदासुद्धा दारूत बुडते त्याला शूद्रत्व प्राप्त होते (मनु. ११.९७), असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे ब्राह्मणाने दारू जाणूनबुजून तर पिऊच नये, पण अज्ञानाने प्यायली तरी त्याला मनुने कडक प्रायश्चित्त सांगितले आहे.\nगेली साधारणतः दोन-अडीचशे वर्षे अत्यंत लोकप्रिय असलेली ही पूजा त्याआधीच्या धार्मिक जीवनाचा भाग नव्हती. ही पूजा शिवकालात नव्हती. छत्रपतींच्या कारकिर्दीत अनेक - विवाहसमारंभापासून किल्ले उभारणीपर्यंत – मंगलकार्ये झाली. परंतु शिवाजी महाराजांनी कधी सत्यनारायण घातल्याचे उल्लेख नाहीत. अगदी पेशवाईतसुद्धा ही पूजा घातली जात नव्हती. या देवतेचा उल्लेख हिंदूंच्या अन्य कोणत्याही प्राचीन धार्मिक ग्रंथात नाही. तेव्हा प्रश्न असा येतो की या देवतेस कोणी जन्मास घातले सत्यनारायणाची कथा मुळात आली कोठून\nतर त्याचे उत्तर आहे – बंगालमधून. तेथील एका मुस्लिम पीराच्या कथेमधून. तिचे नाव – सत्यपीरेर कथा...\nलोकप्रभाच्या २२ मे २०१५च्या अंकातील टाचणी आणि टोचणी या रवि आमले यांच्या सदरातील लेख... लोकसत्ताच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध झालेल्या या लेखावरील तीव्र प्रतिक्रिया वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nखंडोबाची कथा - मूळ लेख\nखंडोबाची मूळकथा या प्रा. विश्वनाथ शिंदे यांच्या लेखाची लिंक खट्टामिठावर दिली होती. परंतु ई-सकाळची ती लिंक सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे हा लेख मुळातूनच या ब्लॉगवर प्रसिद्ध केला आहे. जिज्ञासूंनी तो जरूर वाचावा. त्यासाठी येथे क्लिक करा -\nऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील २८ वे सूक्त इंद्राला उद्देशून आहे. त्यात म्हटले आहे, की हे इंद्रा, अन्नाच्या इच्छेने तुझ्यासाठी जेव्हा हवन केले जाते, त्यावेळी यजमान तातडीने दगडाच्या तुकड्यावर सोमरस तयार करतात. तो तू पितोस. यजमान बैल शिजवतात आणि तो तू खातोस. (अद्रिणा ते मन्दिन इन्द्र तुयान्त्सुन्वन्ति सोमान्पिबसि त्वमेषाम पचन्ति ते वृषभाँ अत्सी तेषां पृक्षेण यन्मधवनहूयमान : | - ऋग्वेद १०.२८.३ ) या इंद्राला बहुधा बीफ अतिशय प्रिय असावे. याच मंडलातील ८६व्या सूक्तातील एका ऋचेत इंद्राचे उद्गार आले आहेत. तो म्हणतो – इंद्राणीद्वारा प्रेरीत यज्ञकर्ते माझ्यासाठी पंधरा बैल शिजवतात. मी त्यांचे मांस खातो आणि त्याने माझे पोट भरते. ते माझे पोट सोमरसानेही भरतात. (उक्षणों ही में पंचदंश साकं पंचंती: विश्तिम् | उताहंमदिंम् पीव इदुभा कुक्षी प्रणन्ती में विश्व्स्मान्दिन्द्र |)\nसध्या गोमाता भलतीच चर्चेत आहे. राज्यात गोवंशहत्याबंदी कायदा लागू झाला आहे. तो देशातही लागू करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. या पार्श्वभूमीवर गोहत्येबाबतची ही प्राचीन ग्रंथांतील माहिती उद्बोधक ठरेल...\nलोकप्रभाच्या ३ एप्रिल २०१५ च्या अंकातील रवि आमले यांचा टाचणी आणि टोचणी या सदरातील लेख...\nपुस्तकं फार क्रूर असतात.\nअनेकदा आपल्यासमोर अशा काही गोष्टी ठेवतात, की आपण अगदी हेलपाटूनच जातो.\nअखेर आपण माणूस‌ म्हटल्यावर आपली काही श्रद्धास्थानं असतातच.\nकुणाच्या तरी खांद्यावर आपणही श्रद्धेने मान ठेवलेली असतेच.\nसंस्कृतीबिंस्कृतीची कदर आपल्यालाही असतेच.\nपण ही ही पुस्तकं ते स‌र्व काही तहेसनहेस करून टाकतात अनेकदा.\nअर्थात कधी कधी तसं होणंही आवश्यकच असतं म्हणा...\nमाणूस म्हणून जगण्यासाठी... माणुसकी नावाचं स‌त्य जपण्यासाठी.\nत्यासाठीच हा एक उपद्व्याप.\nमला पुस्तकांतून सापडलेलं हे उघडं नागडं स‌त्य\nते आजचं स‌त्य आहे. कोण जाणे ते उद्या खोटंही ठरेल.\nपण म्हणून ते आजच नाकारण्यात काय हशील आहे\nतुका लोकी निराळा - तुलसी आंबिले\nअधिक वाचले गेलेले लेख\nअठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे, असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे दैवत. संतां...\nसंभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी\nसंभाजी महाराजांबद्दल बखरी जे म्हणतात ते खरे मानले, तर मराठ्यांचा हा युवराज बलात्कारी होता. आपला पिता शिक्षा करील या भयाने दिलेरखानाकडे जाऊन ...\nसूर्याजी पिसाळ फितूर नव्हता\nएखादे असत्य वारंवार सांगितले, की ते सत्यच वाटू लागते. इतिहास वाचताना हे अनेकदा दिसून येतं. मराठ्यांच्या इतिहासातलं असं एक प्रकरण म्हणजे सूर्...\nस‌मर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू होते काय, हा गेल्या अनेक वर्षांपासून वादाचा विषय राहिलेला आहे. या वादात स्वाभाविकच दोन पक्ष आहेत. प...\n'खट्टामिठा'मध्ये रामायणासंबंधीच्या एकूण चार पोस्ट आल्या आहेत. त्यातील पहिल्या पोस्टमध्ये वाल्मीकींनी वर्णिलेला राम आणि लोकमानसात असल...\n'गोब्राह्मण प्रतिपालक' हे कोठून आलं\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामागे ज्या बिरूदावल्या लावल्या जातात त्यात \"गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवतंस' ही खूपच प्रसिद्ध ...\nछत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार कुठे आहे, हा एक मोठा गूढ प्रश्‍न आहे. लोकमान्य टिळकांच्या काळापासून हा प्रश्‍न अधूनमधून चर्चेत येतोच, ...\nताईमहाराज प्रकरण व टिळकांवरील बलात्काराचा (खोटा) आरोप\nआपल्या संस्कृतीत काम हा पुरुषार्थ मानला गेलेला असला, तरी त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी भल्तीच विचित्र, विकृत असते. त्यात पुन्हा एकपत्नीव्रत ...\nसंभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी\nहे वर्णन पाहा - \"...हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्...\nछत्रपती शिवाजी महाराजांचा कृष्णा घोडी आणि वाघ्या कुत्र्यावर फार जीव होता. ही दोन्ही जीवाला जीव देणारी इमानी जनावरं. त्यातही वाघ्याच्या स्वाम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T06:37:09Z", "digest": "sha1:3UBPILV3P7MP3BV7HFSUO2XTSKMOZQCB", "length": 5348, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आणंद जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२,९५१ चौरस किमी (१,१३९ चौ. मैल)\n५५८ प्रति चौरस किमी (१,४५० /चौ. मैल)\nआणंद जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. आणंद शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nआणंद जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे.\nअहमदाबाद • अमरेली • अरवली • आणंद • कच्छ • खेडा • गांधीनगर • गीर सोमनाथ • छोटाउदेपूर • जामनगर • जुनागढ • डांग • तापी • दाहोद • देवभूमी द्वारका • नर्मदा • नवसारी • पंचमहाल • पाटण • पोरबंदर • बनासकांठा • बोटाड • भरूच • भावनगर • महीसागर • महेसाणा • मोर्बी • राजकोट • वडोदरा • वलसाड • साबरकांठा • सुरत • सुरेंद्रनगर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१५ रोजी १६:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://jeevantarang.wordpress.com/2011/02/", "date_download": "2018-04-24T06:33:10Z", "digest": "sha1:FAIFECFL5YHTZQUBGGP22U3L6H24GEV3", "length": 16321, "nlines": 108, "source_domain": "jeevantarang.wordpress.com", "title": "फेब्रुवारी « 2011 « जीवनतरंग....", "raw_content": "\nविचार… मत… अनुभव… वास्तव….निरीक्षणें….\nकाल आमच्या ऑफिसच्या बाजूला साईबाबांचा प्रसाद म्हणून तांदळाची खिचडी (ज्याला भंडारा म्हणतात) वाटप चालू होते. येणारे जाणारे बहुतेक सर्वजण थांबून साईबाबांच्या प्रतिमेला नमस्कार करून प्रसाद घेत होते. माझे लेक्चर संपवून मी बाहेर पडले. खाली सर्व विद्यार्थी रांग लावून प्रसाद घेत होते. मी स्कूटी काढायला आल्यावर माझे सर्व विद्यार्थी आता मी काय करते याकडे लक्ष नाही असं दाखवत, बघायला लागले. डोळ्याच्या कोपर्‍यातून म्हणतात नां तसं.मी साईबाबांना नमस्कार केला पण प्रसाद न घेताच निघून गेले.\nआज सकाळी लेक्चर संपल्यावर एका विद्यार्थ्याने विचारलेच,” मॅडम, तुम्ही बाबांचा प्रसाद घेतला नाही”. मी फक्त हसले.आणि पुढ्च्या लेक्चरला गेले. पण यावरूनच माझ्या मनात विचारमालिका चालू झाली.मी जाणीवपूर्वक प्रसाद घेतला नाही.तिथे एका मोठ्या पातेल्यात खिचडी ठेवली होती.त्यातून एका ताटाने ती खिचडी एकजण काढायचा, दुसरा हाताने बचकभर खिचडी प्लॅस्टीकच्या द्रोणातून आलेल्यांना द्यायचा.एका मोठ्या टेबलवर खिचडीचे ताट , प्लॅस्टीकच्या द्रोण, प्यायला पाणी वगैरे ठेवले होते. आणि त्या टेबलच्या शेजारीच बहुतेकांनी खिचडी खाऊन टाकलेल्या द्रोणांचा पसारा पडला होता. एकूणच ते सगळं पाहून मला प्रसाद घ्यावासा वाटला नाही. मग मी नास्तिक आहे कां\nमी चतुर्थीचा उपवास करते.मागच्या महिन्यात आम्ही हैद्राबादला गेलो होतो तेव्हा प्रवासात असताना चतुर्थी आली होती. (२ दिवस आधीपासून माहीत होते की अमुक दिवशी चतुर्थी आहे आणि आपण प्रवासात असणार आहोत.) मी तेव्हा उपवास केला नाही. (यावेळी उपवास नको करायला असं कदाचित मनात आधीच ठरवलं होतं कां) प्रवासात आधीच खाण्याचे हाल असतात, त्यात उपवास करून तब्येत बिघडेल असा विचार मनात होता. पण हेच जर घरी असताना चतुर्थी आहे हे लक्षात नसताना सकाळी चहा–बिस्कीट खाल्ले किंवा दिवसभर उपवास केला आणि संध्याकाळी भेळ किंवा असंच दुसरं काही खाण्यात आलं तर मात्र चुटपुट लागून रहाते. “अरे आज चतुर्थी आहे हे कसं लक्षात राहीलं नाही) प्रवासात आधीच खाण्याचे हाल असतात, त्यात उपवास करून तब्येत बिघडेल असा विचार मनात होता. पण हेच जर घरी असताना चतुर्थी आहे हे लक्षात नसताना सकाळी चहा–बिस्कीट खाल्ले किंवा दिवसभर उपवास केला आणि संध्याकाळी भेळ किंवा असंच दुसरं काही खाण्यात आलं तर मात्र चुटपुट लागून रहाते. “अरे आज चतुर्थी आहे हे कसं लक्षात राहीलं नाही”. परिस्थिती वेगवेगळी असली तरी दोन्हींचा End Result सारखाच आहे – उपवास मोडणं.”. परिस्थिती वेगवेगळी असली तरी दोन्हींचा End Result सारखाच आहे – उपवास मोडणं. मग एका प्रसंगात मनाला लागत नाही आणि दुसर्‍या प्रसंगात मनाला टोचणी लागते की माझा उपवास मोडला. असं कां होतं मग एका प्रसंगात मनाला लागत नाही आणि दुसर्‍या प्रसंगात मनाला टोचणी लागते की माझा उपवास मोडला. असं कां होतं आपण आपल्या सोईप्रमाणे वागत असतो कां आपण आपल्या सोईप्रमाणे वागत असतो कां वरच्या खिचडीच्या प्रसंगामध्ये मनात कुठेतरी ‘हायजीन’ चा विचार होता पण हाच विचार हॉटेलमध्ये किंवा स्टॉलवरचा चमचमीत वडापाव खाताना येत नाही. कां\nमी काही फार देवभोळी ,अस्तिक वगैरे नाही पण कठीण परिस्थिती आधार वाटतो तो देवाचाच. मनातल्या मनात गणपतीचा धावा चालू होतो. देवाचं अस्तित्व माझ्या मनात सतत असतं. त्यामुळंच प्रत्येक गोष्ट ही सद्स‌द्‌विवेकबुद्धीला अनुसरून केली जाते. मी काही चुकीचं वागले तर देवाला काय वाटेल, देव काय म्हणेल असा विचार असतो. देव रागावेल, शाप देईल असा नसतो. देवाला मी माझा मित्र, पालक मानते. एक प्रेमळ वडीलधारी व्यक्ती जिचा आदरयुक्त दरारा वाटतो पण भीती नाही वाटत. असं वाटतं की देव मला समजून घेईल पण मी त्याला गृहीत धरत नाही. घरी देवाची पूजा रोज आई करतात, पण त्या कधी बाहेरगावी गेल्या तर माझ्याकडून पूजा रोज होतेच असं नाही. एकूणच मला कर्मकांडात अडकायला आवडत नाही. पूजा–अर्चा, धूप, फुलं, अक्षता या गोष्टींनी देव प्रसन्न होतो की नाही ते माहीत नाही पण त्यामुळे माझ्या मनाला प्रसन्नता मिळते. मग ती प्रसन्नता मिळण्यासाठी मी पूजा करते. अशा बाह्य गोष्टींनी प्रसन्नता तेव्हाच मिळवावी लागते, जेव्हा मन अशांत असते. म्हणजे काय तर मी देव मानते पण तो मूर्तीतच आहे असं न मानता चांगुलपणा, माणुसकी आणि एकूणच विवेकी वागणे यात त्याचं अस्तित्व पाहते.\nता.क – ही पोस्ट मी शनिवारीच टाकणार होते, पण नेट खूप स्लो होते, ‘नवीन नोंद’ चे पेज लोड व्हायलाच १० मि. लागली. शेवटी विचार केला की जाऊ दे, देवाच्याच मनात नाहीय. सोमवारी टाकू पोस्ट.\nता.ता.क – नाही नाही… ही पोस्ट शनिवारीच टाकावी असं देवाच्या मनात आहे.\n8 प्रतिक्रिया Posted in जीवनमूल्ये Tagged देव, प्रसन्न, प्रसाद, सद्स‌द्‌विवेकबुद्धी\nएका forwarded mail मधून आलेली एक भन्नाट मिश्कीली, मूळ इंग्लीशमध्ये असलेली ‘Simple living avoids complications’ ‘साधी राहणी – तणावरहीत जीवन’ अशी अनुवादीत करून ती इथे देत आहे. (तंबी दुराईंच्या दोन फुल , एक हाफ स्टाईलमध्ये )\nमुकेश अंबानी त्यांच्या २७ मजली घरात() राहत असतात. एके दिवशी ऑफिसला जाण्यासाठी स्वतःच मर्सीडीज ‘ड्राईव्ह’ करत जायचे असं ठरवून १७ व्या मजल्यावर उठतात, १९ व्या मजल्यावर ‘बाथ’ घेऊन २१ व्या मजल्यावर ‘ब्रेकफास्ट’ साठी जातात. नंतर ऑफिसला जायची तयारी करण्यासाठी १५ व्या मजल्यावर जातात. मुलांचा निरोप २२ व्या मजल्यावर आणि पत्‍नी नीताला १६ व्या मजल्यावर ‘बाय’ करून मर्सीडीज घेण्यासाठी ३ र्‍या मजल्यावर जातात. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येते की गाडीच्या किल्ल्या त्यांच्या खिशात नाहीत. मग त्या राहील्या कुठे) राहत असतात. एके दिवशी ऑफिसला जाण्यासाठी स्वतःच मर्सीडीज ‘ड्राईव्ह’ करत जायचे असं ठरवून १७ व्या मजल्यावर उठतात, १९ व्या मजल्यावर ‘बाथ’ घेऊन २१ व्या मजल्यावर ‘ब्रेकफास्ट’ साठी जातात. नंतर ऑफिसला जायची तयारी करण्यासाठी १५ व्या मजल्यावर जातात. मुलांचा निरोप २२ व्या मजल्यावर आणि पत्‍नी नीताला १६ व्या मजल्यावर ‘बाय’ करून मर्सीडीज घेण्यासाठी ३ र्‍या मजल्यावर जातात. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येते की गाडीच्या किल्ल्या त्यांच्या खिशात नाहीत. मग त्या राहील्या कुठे १७ व्या,१९ व्या,१५ व्या, २१ व्या, २२व्या, की १६ व्या मजल्यावर १७ व्या,१९ व्या,१५ व्या, २१ व्या, २२व्या, की १६ व्या मजल्यावर सगळे नोकर किल्लीची शोधाशोध चालू करतात. पण किल्ली काही मिळत नाही. शेवटी 5 व्या मजल्यावरची ‘शोफर ड्रीव्हन’ BMW घेऊन ते ऑफिसला जातात.\nचार दिवसांनी नीताला ती किल्ली मिळते. कुठे तर मुकेशरावांच्या इस्त्रीला द्यायच्या पॅंट्च्या खिशात. ती तिथे कशी तर मुकेशरावांच्या इस्त्रीला द्यायच्या पॅंट्च्या खिशात. ती तिथे कशी याची चौकशी केल्यावर कळते, की घरात आलेल्या एका तात्पुरत्या नोकराने पॅंट्चे खिसे चेक न करताच ती पॅंट् धुतलेली असते. केवळ नीताच्या जागरूकपणामुळे, इस्त्रीला द्यायचे कपडे स्वतः चेक करण्याच्या सवयीमुळे ती किल्ली मिळते.\nया कहाणीत अजून एक छोटा किस्सा बाकी आहे. किल्ली ज्या दिवशी हरवते, त्याच्या दुसरे दिवशी नीता मुकेशला विचारते, “काल रात्री घरी यायला तुला इतका उशीर कां झालारात्री ३ वाजता झालेल्या हेलिकॉप्टरच्या आवाजाने माझी जी झोपमोड झाली, त्यानंतर मला लवकर झोप आली नाही.” मुकेश म्हणतात, “अगं ते हेलिकॉप्टर माझं नव्हतं तर मर्सीडीजची लोकं डुप्लीकेट किल्ली देण्यासाठी आली होती“.\n11 प्रतिक्रिया Posted in मिश्कीली, विनोदी Tagged किल्ली, जागरूक, मुकेश अंबानी, Live Simple\nस्टीफन कोवेचे ९०-१० तत्त्व\nहोतं असं कधी कधी….\nसर्वाधिक वाचल्या गेलेल्या पोस्टस्‌\n« डिसेंबर मार्च »\n मग पुढचे लिखाण तुमच्या ई-मेल वर मिळवा.... इथे तुमचा ई-मेल पत्ता द्या.....\nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A", "date_download": "2018-04-24T06:32:13Z", "digest": "sha1:JAFMLLM32JS7BQJ5HSC4QULQERO3MJEB", "length": 4250, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सरपंच - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात.सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कारभार पहात असतो. त्याच्या मदतीला ग्रामपंचायतीचा सेवक किंवा शिपाई व ग्रामसेवक असतो.\nसरपंचाचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो. तरी गैर वर्तवणुक या कारणावरुण त्याला पदावरुण पदच्यूत करता येते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जुलै २०१७ रोजी २२:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://jeevantarang.wordpress.com/2012/02/", "date_download": "2018-04-24T06:46:15Z", "digest": "sha1:DXKSYQ6REIR75K34T5GTE6KIFPALUTZ5", "length": 13847, "nlines": 92, "source_domain": "jeevantarang.wordpress.com", "title": "फेब्रुवारी « 2012 « जीवनतरंग....", "raw_content": "\nविचार… मत… अनुभव… वास्तव….निरीक्षणें….\nथांबा , ई-मेल नावावरून मी तुम्हाला बोगस ई-मेल कशा येतात, या फॉरवर्डेड ई-मेल्सनी कसा वैताग आणलाय किंवा दिलेल्या सेरीजच्या पुढचा नंबर ओळखून अ‍ॅटॅच केलेल्या फाईलमध्ये तुमचे नांव टाका अशा प्रकारच्या कथा सांगून बोअर करणार नाहीय्‌. माझा एक वेगळाच प्रश्न आहे, “I have sent you an e-mail” या वाक्याचं मराठीत भाषांतर तुम्ही काय करता मी तुला एक मेल पाठवलीय्‌ , मी तुला एक मेल पाठवलाय्‌ की मी तुला एक मेल पाठवलंय्‌ मी तुला एक मेल पाठवलीय्‌ , मी तुला एक मेल पाठवलाय्‌ की मी तुला एक मेल पाठवलंय्‌ आता कसं आहे की कुणी आजकाल ई-मेल असं म्हणत नाही तर फक्त मेल असं म्हणतात कारण मेल म्हणजेच ई-मेल हे आपण गृहीत धरलंय्‌. अगदीच बाय पोस्ट काही पाठवायचं असेल तर आपण कुरिअर करतो नाही कां आता कसं आहे की कुणी आजकाल ई-मेल असं म्हणत नाही तर फक्त मेल असं म्हणतात कारण मेल म्हणजेच ई-मेल हे आपण गृहीत धरलंय्‌. अगदीच बाय पोस्ट काही पाठवायचं असेल तर आपण कुरिअर करतो नाही कां\nतर माझा प्रश्न असा आहे की ती मेल, तो मेल की ते मेल झालं कन्फ्यूजन पूर्वी माझं याबाबतीत नेहमी कन्फ्यूजन व्हायचं. आम्ही इंजिनियरिंगला असताना मुळात इंटरनेट ही नवीन गोष्ट होती आणि त्यात ई-मेल म्हणजे तर खूपच नवीन. त्यामुळे त्याकाळात ( अगदी सोपं सांगायचं तर १२/१५ वर्षापूर्वी ) ई-मेल अकाउंट असणे ही अभिमानाची बाब होती. (आम्ही तेव्हा ई-मेल अकाउंट म्हणायचो , मेल आय्‌डी नाही) “अय्या, तुझं ई-मेल अकाउंट नाहीय्‌ अगं मग काढ नां, मी तुला ई-मेल पाठवते.” असं कॉलेजात रोज भेटणार्‍या मैत्रिणीला सांगायचो. अर्थात तेव्हा ई-मेल पाठवणं ही फार सोपी गोष्ट नव्हती. कारण तेव्हा घरोघरी इंटरनेट नव्हतं. कॉलेजात फक्त काही वेळापुरतेच इंटरनेट वापरायला परवानगी असायची. मग नेट सर्फिंग करायचे किंवा ई-मेल पाठवायचा ( तेव्हा मी ते पत्र सारखं तो मेल असं म्हणायची, मेल हा ती किंवा ते कसं असेल, तो ‘तो’ च असणार असा मे बी यामागे विचार असेल) तर सायबर कॅफेत जाऊन ताशी ४० रू. द्यावे लागायचे. आजकाल कसे गल्लोगल्ली सायबर कॅफे दिसतात तसे तेव्हा नसायचे. हळूहळू ई-मेल असं म्हणणं मागासलेपणाचं वाटायला लागला त्यापेक्षा नुसतं मेल असं म्हणायला आवडायला लागलं. जर कुणी चुकून ई-मेल असं म्हंट्लं तर कळायचं की ये अभी बच्चा है. तर आम्ही कोल्हापुरात तो मेल असं म्हणायचो. त्यावेळी पुण्यात राहणारी माझी मैत्रिण मला म्हणाली, “वैशाली , मी तुला एक मेल पाठवली होती, मिळाली कां अगं मग काढ नां, मी तुला ई-मेल पाठवते.” असं कॉलेजात रोज भेटणार्‍या मैत्रिणीला सांगायचो. अर्थात तेव्हा ई-मेल पाठवणं ही फार सोपी गोष्ट नव्हती. कारण तेव्हा घरोघरी इंटरनेट नव्हतं. कॉलेजात फक्त काही वेळापुरतेच इंटरनेट वापरायला परवानगी असायची. मग नेट सर्फिंग करायचे किंवा ई-मेल पाठवायचा ( तेव्हा मी ते पत्र सारखं तो मेल असं म्हणायची, मेल हा ती किंवा ते कसं असेल, तो ‘तो’ च असणार असा मे बी यामागे विचार असेल) तर सायबर कॅफेत जाऊन ताशी ४० रू. द्यावे लागायचे. आजकाल कसे गल्लोगल्ली सायबर कॅफे दिसतात तसे तेव्हा नसायचे. हळूहळू ई-मेल असं म्हणणं मागासलेपणाचं वाटायला लागला त्यापेक्षा नुसतं मेल असं म्हणायला आवडायला लागलं. जर कुणी चुकून ई-मेल असं म्हंट्लं तर कळायचं की ये अभी बच्चा है. तर आम्ही कोल्हापुरात तो मेल असं म्हणायचो. त्यावेळी पुण्यात राहणारी माझी मैत्रिण मला म्हणाली, “वैशाली , मी तुला एक मेल पाठवली होती, मिळाली कां” बाकी कशाकडे माझं लक्ष न जाता, मैत्रिण ती मेल म्हणाली याकडे जास्त लक्ष गेलं आणि ती ‘पुण्यातली’ मैत्रिण होती. नंतर माझा चाळाच होऊन बसला की बोलताना बाकी सगळे काय म्हणतायत्‌ ती मेल, तो मेल की ते मेल” बाकी कशाकडे माझं लक्ष न जाता, मैत्रिण ती मेल म्हणाली याकडे जास्त लक्ष गेलं आणि ती ‘पुण्यातली’ मैत्रिण होती. नंतर माझा चाळाच होऊन बसला की बोलताना बाकी सगळे काय म्हणतायत्‌ ती मेल, तो मेल की ते मेल त्यावेळेस जास्तीत जास्त रेटींग ती मेल ला मिळालं होतं.\nत्यावेळेस बहुतेकांची ई-मेल अकाउंटस्‌ ही हॉट्मेल नाहीतर याहूवर असायची. कोणत्या वेबसाईटवर किती जास्त स्पेस मिळते हे पाहून तिथे इ-मेल अकाउंट उघडले जायचे. इंटरनेट सिक्युरिटी किंवा इतर फॅसिलीटीज्‌ जसं की चॅटींग, व्हिडिओ कॉलिंग वगैरे गोष्टी तर कोसों दूर होत्या. माझें सर्वात पहिलं अकाउंट हे युएस्‌ए.नेट वर होते कारण जेव्हा त्यावर ७ जीबी स्पेस मिळत होती, तेव्हा याहू, हॉटमेल वगैरे ५० ते ७० एम्‌बी स्पेस देत होते. आता ते अकाउंट बंद केलंय्‌. आजकाल ई-मेल अकाउंट ओपन करताना स्पेस हा क्रायटेरियाच लागू होत नाही कारण बहुतेक वेबसाईटस्‌वर अमर्यादीत जागा उपलब्ध करून दिलेली असते. सध्या मला तर वाटतंय्‌ की जीमेल आय्‌डी नाही अशी व्यक्ती (अर्थात नेट वापरणार्‍यांपैकी) शोधावी लागेल.\nसंवाद साधण्याचे साधन म्हणून राजेमहाराजेंच्या काळात कबुतरांना प्रशिक्षण देऊन संदेशाची देवाणघेवाण व्हायची. ब्रिटीशांच्या काळात संदेशाची देवाणघेवाण जलद होण्यासाठी पोस्ट ऑफिस ही संकल्पना आली. मला आठवतंय्‌ माझे आजोबा तर सकाळचा काही वेळ हा पत्र लिहण्यासाठी राखून ठेवायचे. या पोस्ट ऑफिसची जागा कुरियरने कधी घेतली हे कळालेच नाही. १०/१५ वर्षापूर्वी जर काही वस्तू सुरक्षितरित्या आणि जलद पाठवायची असेल तरच कुरियर केले जायचे. नंतर हळूहळू पत्रं, लग्नाची निमंत्रणं ही सुध्दा कुरियर केली जाऊ लागली. इंटरनेट्चा जसा प्रसार झाला आणि लोकांना याची उपयुक्तता पटली तेव्हा तर संदेशाची देवाणघेवाण अतिजलद होण्यासाठी ई-मेल , चॅटींग या गोष्टी वापरल्या जाऊ लागल्या. आजकालच्या लहान मुलांना पोस्ट ऑफिस काय असतं हे माहितच नाहिय्‌. शाळेत EVEच्या फिल्ड व्हिजीट मध्ये त्यांना पोस्ट ऑफिस दाखवले जाते. आता तर सोशल नेटवर्किंग साईट्स्‌ मुळे लोकांना ई-मेल वापरही कमी झालाय्‌. मध्यंतरी मी एका पेपरला वाचलं होतं की जसं पोस्ट हे कालबाह्य झालं आहे तसं येत्या काही वर्षात ई-मेल करणं हे ही कालबाह्य होईल. ऑफिशियल काही कामासाठी मेल वापरले जातील पण व्यक्तिगत संपर्काचे माध्यम म्हणून ई-मेलचा वापर खूपच कमी होईल. याची प्रचिती आत्ताच येऊ लागली आहे. ८/१० वर्षापूर्वी नवरा कामानिमित्त जेव्हा परदेशात जायचा तेव्हा संपर्कात राहण्याचे सर्वात स्वस्त माध्यम ई-मेल हेच होते. नंतर स्काईप आलं आणि सगळं चित्रच बदलून गेलं. नेटवर्किंग साईट्स्‌, ब्लॉग्ज, व्हिडीओ चॅटिंग यासारख्या सुविधा असताना ई-मेल चा वापर केवळ आलेल्या ई-मेल फॉरवर्ड करण्यासाठीच होतो. या सगळ्या बदलाचे आपण साक्षीदार आहोत हे काय कमी आहे\n2 प्रतिक्रिया Posted in असंच काहीही, दैनंदिन घडामोडी Tagged ई-मेल, चॅटिंग, पोस्ट, वेबसाईट\nस्टीफन कोवेचे ९०-१० तत्त्व\nहोतं असं कधी कधी….\nसर्वाधिक वाचल्या गेलेल्या पोस्टस्‌\n« नोव्हेंबर ऑगस्ट »\n मग पुढचे लिखाण तुमच्या ई-मेल वर मिळवा.... इथे तुमचा ई-मेल पत्ता द्या.....\nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/did-you-know/marathi-celebrity-thoughts-on-mothers-day/20585", "date_download": "2018-04-24T06:37:26Z", "digest": "sha1:UIUJ7CSYWG55T4GJELJ35RW2NBPF2PDJ", "length": 28160, "nlines": 257, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Marathi Celebrity Thoughts on Mothers Day | माँ तुझे सलाम! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nआई ही कुणाचीही असो, ती केवळ ‘आई’ असते. मग, आपले लाडके सेलिब्रिटीही त्यांच्या आईच्या ऋणातच आहेत.\n‘आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’ ही गीतकार ग.दि.माडगूळकर यांच्या गीताची ओळ ‘आई’ या शब्दांतील समर्पण, प्रेम, त्याग यांची अनुभूती घडवते. आईची थोरवी शब्दांत सांगता येत नाही. आपल्या आयुष्यात तिच्या केवळ ‘असण्याने’ किती बदल होतात हे अनुभवाअंती समजते. आई ही कुणाचीही असो, ती केवळ ‘आई’ असते. मग, आपले लाडके सेलिब्रिटीही त्यांच्या आईच्या ऋणातच आहेत. जाणून घेऊया, नुकत्याच झालेल्या ‘मदर्स डे’ निमित्त त्यांनी त्यांच्या आईविषयी काय विचार मांडले आहेत ते...\nआईच्या प्रोत्साहनाने मिळाले बळ\nमी माझ्या आईला एक बिझनेसवुमन मानतो. तिने गश्मीर महाजनी नावाचे एक प्रोडक्ट बनवलं आहे. २० वर्षांत जे काही कमावलं आहे ते सर्व तिच्यामुळेच. मी जेव्हा १५ वर्षांचा आणि आई ५० वर्षांची होती तेव्हा आम्ही एका आर्थिक चणचणीत अडकलो होतो. कर्ज न फेडल्याने आमच्या घराला बँकेने सील केले. माझ्या आईचा पाठिंबा आणि प्रोत्साहन यांच्यामुळे मी डान्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. त्यावेळी आई एका थ्री स्टार हॉटेलमध्ये केवळ ३००० रूपयांसाठी हाऊसकिपरची नोकरी करत होती. तेव्हा रात्री आम्ही पूण्याच्या रस्त्यांवर माझ्या डान्स कंपनीचे पोस्टर्स चिटकवत फिरलो. त्यावेळी मला कुठलेही काम हे कमी दर्जाचे नसते हे कळून चुकले. नंतर दिवस पालटले, मात्र तरीही आम्ही एकमेकांसोबत तेवढेच अटॅच होतो. नुकतेच मी माझ्या आईला यूएसला जाण्यासाठी तिकीटे दिली. तसेच तिला हव्या असलेल्या सोन्याच्या बांगड्याही गिफ्ट केल्या आहेत.\nमी खूप लकी आहे की, ‘माझ्या आयुष्यात अशा दोन स्त्रिया आहेत ज्यांच्याशी मी भांडू शकते, ज्यांच्याजवळ माझं मन मोकळं करू शकते. जेव्हा मी दु:खी असते तेव्हा त्या दोघी माझा आधार असतात, ज्यांचा मी नितांत आदर करते. लोकांसाठी त्या दोघी माझी आई आणि माझ्या सासूबाई आहेत, पण माझ्यासाठी त्या माझ्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत.\nआई म्हणजे सर्वस्व, सपोर्ट सिस्टीम.. आज मी जे काही आहे ते आईमुळे.. तिच्या प्रोत्साहनामुळे आणि पाठिंब्यामुळेच मी इंडस्ट्रीमध्ये आहे.. माझी मैत्रीण तर ती आहेच.. मैत्रीणीसारख्या आम्ही खूप भांडतोही.. पण मला माहितीये काहीही झालं तरी ती माझ्या पाठीशी नेहमीच असेल... अ‍ॅट एनी कॉस्ट...स्ट्राँगली...\nमाझी आई ही माझा आधारस्तंभ आहे. ती एक अशी व्यक्ती आहे जिला मी नेहमीच माझ्यावर अपार प्रेम करताना पाहिलं आहे. ती माझ्याशी पूर्णपणे कमिटेड आहे. ती आहे म्हणून माझं आयुष्य सुरळीत चाललं आहे. नाही तर सर्व गोंधळ असता माझ्या आयुष्यात. माझं तिच्यावर किती प्रेम आहे किंवा ती माझ्यासाठी किती स्पेशल आहे हे सगळ्यांना सांगायला मला शब्द नक्कीच कमी पडतील. पण, माझं आणि तिचं नातं शब्दांत वर्णन करायचं झालं तर मी म्हणेन की, मी तिची आणि ती माझी सावली आहे.\nआईबद्दलच्या भावना शब्दात कशा मांडायच्या, त्यासाठी शब्द खरंच कमी पडतील. आज मी या क्षेत्रात माझ्या आईमुळेच आहे आणि तीच माझं इन्स्पिरेशन आहे. मी असं नाही म्हणणार की, माझी आई माझी मैत्रीण आहे कारण मला मैत्रिणी खूप आहेत. पण आई एकच आहे आणि ती माझ्यासाठी आई म्हणूनच खूप स्पेशल आहे. मित्र मैत्रिणींसोबत तुम्ही सर्व गोष्टी शेअर करता, मी माझ्या आईसोबत सर्व गोष्टी शेअर करते, असं जर मी म्हणाले तर ते साफ खोटं ठरेल. मी ही आईपासून काही गोष्टी एका आईसाठी असलेल्या आदरयुक्त भीतीपोटी लपवते. एका आई मुलीचं नातं जसं असतं आमच्या दोघींचं नातं अगदी तसंच आहे. मला ते कायम तसंच हवंय. पण माझी खरी आई माझे बाबा होते, त्यांनी माझ्या बुटाची लेस बांधण्यापासून ते गँदरिंगमध्ये माझा मेकअप करण्यापर्यंत सर्व काही केलंय. ‘मदर्स डे’ निमित्त मला माझ्या बाबांना ‘थँक यु’ म्हणायचंय.\n“सायकलच्या” प्रमोशनसाठी मुंबईत व्हि...\nअस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गु...\nअस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गु...\nसई पुन्हा एकदा अवतरली रॅम्पवॉकवर,अस...\nमनोज वाजयेपी सोबत अमृता खानविलकर झळ...\nकरण जोहर नंतर जॉन अब्राहम सोबत झळकण...\nअमृता सुलतान खिलजीची दिवानी\nडान्स इंडिया डान्स ६ च्या गँड फिनाल...\n'मेड फॉर इच अदर' कपल पियुष रानडे आण...\n​अमृता खानविलकर सांगतेय तिच्या फिटन...\nया कलाकारांनी हजेरी लावली महाराष्ट्...\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळक...\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप क...\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या...\nअक्षय तृतीयाच्या शुभमूहुर्तावर ‘Onc...\nम्युजिकल लव्हस्टोरी 'तुझीच रे'चा मु...\nअमजद अली खान, आशा भोसले, अनुपम खेर...\nमराठी बिग बॉसच्या स्पर्धकांनी आणल्य...\nगायिका कविता राम यांचा फ्युजन साँग...\n‘राजा’ चित्रपटाचे शानदार संगीत अनाव...\n‘राजा’ चित्रपटाचे शानदार संगीत अनाव...\n​प्रिया बापट, उमेश कामत, सुबोध भावे...\nसस्पेंस थ्रिलर आणि फॅमिली ड्रामा पा...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/pradeep-narwal-surpasses-one-more-record-to-add-to-the-list-of-his-never-ending-record-list/", "date_download": "2018-04-24T06:49:37Z", "digest": "sha1:RP6EF66R4VMVR6AOM47JRNK45F4UZVUX", "length": 8249, "nlines": 107, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विक्रमवीर प्रदीप नरवाल - Maha Sports", "raw_content": "\nपटणा पायरेट्सचा कर्णधार डुबकी किंग प्रदीप नरवाल याने आज बेंगलूरु बुल्स विरुद्ध खेळताना एका मोसमात २०० गुण मिळवण्याचा खूप मोठा कारनामा केला आहे. या अगोदर अशी कामगिरी कोणत्याही खेळाडूला करता आलेली नव्हती. मागील काही सामान्यांपासून हा मोठा विक्रम त्याला सात्यत्याने खुणावत होता.\nया सामन्यात त्याने सुरुवातीपासून त्याचे मनसुबे स्पष्ट केले. त्याने रेडींगमध्ये उत्तम कामगिरी केली. त्याने सुपर रेड करत २०० गुणांच्या जादुई संख्येला गवसणी घातली. या रेडमध्ये त्याने रोहित कुमार, आशिष कुमार आणि प्रीतम चिल्लर या महत्वाच्या खेळाडूंना बाद केले.\nएका मोसमात सर्वाधिक गुणांचा विक्रम देखील प्रदीप नरवालच्याच नावे आहे. या सामन्याच्या अगोदर त्याने या मोसमात १४ सामने खेळताना १९१ गुण मिळवले होते. या सामन्यात त्याने ११ गुण मिळवून गुणांची संख्या २०२ गुणांवर नेली. विशेष बाब म्हणजे या मोसमात त्याने सर्व गुण फक्त रेडींगमध्येच मिळवले आहेत. एकही गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवलेला नाही.\nयदाकदाचित आपणास माहिती नसेल तर:\n# प्रदीप नरवालने आपल्या प्रो कबड्डी कारकिर्दीची सुरुवात २०१५ साली म्हणजे प्रो कबड्डीच्या दुसऱ्या मोसमात केली. त्याला बेंगलूरु बुल्स संघाने करारबद्ध केले होते. परंतु त्याला जास्त संधी मिळाली नाही. त्याला बदली खेळाडू म्हणूनच जास्त संधी देण्यात यायची. त्यामुळे त्याने ६ सामन्यात फक्त ९ गुणांची कमाई केली होती.\n# तिसऱ्या मोसमात त्याला पटणा संघाने करारबद्ध केले. या मोसमात त्याने आपल्या कौशल्याने सर्वांना प्रभावित करत १२१ गुणांची कमाई केली. त्याने या मोसमात डुबकी या कौशल्याचे खूप उत्तम प्रदर्शन केले. त्यामुळे त्याला डुबकी किंग या टोपण नावाने कबड्डीचे चाहते ओळखू लागले. त्याने या मोसमात सर्वाधीक गुण मिळवले होते. पटणाला तिसऱ्या मोसमाचा विजेता संघ बनवण्यात प्रदीपचा खूप मोठा वाटा होता.\n# चौथ्या मोसमात पहिल्या काही सामन्यात त्याला रेडींगमध्ये गुण मिळवण्यात थोडे अपयश आले होते. परंतु त्यानंतर त्याने लय पकडली आणि संघाला सलग दुसरे विजेतेपद मिळवून दिले.\nअनुप कुमार सर्वोत्कृष्ठ – श्रीकांत जाधव\nआता होणार ४ दिवसांचा कसोटी सामना \nएका मोठ्या कबड्डी प्रशिक्षकाची गच्छंती\nबोकडासाठी प्रभादेवीत घुमला कबड्डी… कबड्डीचा आवाज\nआयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम\nमुंबईमध्ये वाळूवरील कबड्डीचा थरार बुधवारपासून\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9A", "date_download": "2018-04-24T06:47:00Z", "digest": "sha1:QEKLOGX3PCCI3PNL2XGELPBORHAY2FHN", "length": 4796, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तोमिस्लाव्ह निकोलिच - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१५ फेब्रुवारी, १९५२ (1952-02-15) (वय: ६६)\nतोमिस्लाव्ह निकोलिच (सर्बियन सिरिलिक: Томислав Николић; जन्म: १५ फेब्रुवारी १९५२) हे सर्बिया देशामधील एक राजकारणी व देशाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहेत.\nइ.स. १९५२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १९:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.misalpav.com/node/38994", "date_download": "2018-04-24T06:31:14Z", "digest": "sha1:VM6FG2BDZW54DDDST5VDVFSZDFRZ2GZG", "length": 39663, "nlines": 273, "source_domain": "www.misalpav.com", "title": "मराठी भाषा दिन २०१७: ते का करुन रायली असन बा : फुकटच दुखण (वर्‍हाडी) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमराठी भाषा दिन २०१७: ते का करुन रायली असन बा : फुकटच दुखण (वर्‍हाडी)\nते का करुन रायली असन बा : फुकटच दुखण\nमाया एक सोबती हाय, पवन्या. हाय आमच्या गावचंच पोरगं, पण आता पुण्याले रायते तर सोताले साहेब समजते. दहावीत पहल्यांदी नापास झालता. ते इंग्रजी गाववाल्यायले रडवतेच न जी. मंग सप्लीमेंटरीच्या टायमाले म्याच माया काकाले घेउन त्याले पेपर तपासनाऱ्या मास्तरकड घेउन गेलतो. तसं पोरगं हुशार होतं, फक्त इंग्रजीच तरास देत होती. तसबी इंग्रजी शिकून कोठ कालेजात प्रोफेसर व्हाचं होतं आमी त्या मास्तरले बंद बराबर समजावून सांगतलं, मास्तरले बी पटलं आन झालं पोरगं पास. पुढ जाउन आयटीआय केलं आन पुण्यात कोण्या कंपनीत जाउन चिकटलं. आता हे पोट्ट पुण्यात रायते तर मले शिकवते, \"काहून नको म्हणत जाउ बे, का बरं म्हणत जा.\" म्या काय कमी हाय का, म्याच त्याले वर इचारतो, \"काहून बा, काहून काहून नाही म्हणाचं आमी त्या मास्तरले बंद बराबर समजावून सांगतलं, मास्तरले बी पटलं आन झालं पोरगं पास. पुढ जाउन आयटीआय केलं आन पुण्यात कोण्या कंपनीत जाउन चिकटलं. आता हे पोट्ट पुण्यात रायते तर मले शिकवते, \"काहून नको म्हणत जाउ बे, का बरं म्हणत जा.\" म्या काय कमी हाय का, म्याच त्याले वर इचारतो, \"काहून बा, काहून काहून नाही म्हणाचं काहून म्हटल तर का बिघडल काहून म्हटल तर का बिघडल\" त्याच्या बहीणीचा तिळवा होता तवा तो संक्रांतीले गावाकड आलता. मले म्हणे, \"चल, नागपुरात जाउ पिक्चर बिक्चर पाहू, थोडीसी दारु गिरु पिउ.\" तसे मले का कमी काम होते का सोयाबीन मार्केटात न्याच होत, कापसाले बाया पाहाच्या होत्या, तूरीवर फवारा माराचा होता, पण दोस्तीखातर जाच लागनार होत. बायकोले सांगतलं, \"तू कापसाले बाया पायजो, म्या सोयाबीन मार्केटात नेउन टाकतो आन पवन्यासंग नागपुरले जाउन येतो. त्याले काही खरेदी कराची हाय म्हणे.\"\nसकायी सकायीच सोयाबीन हिंगणघाटाच्या मार्केटात टाकलं, तेथूनच बस पकडून नागपुरले आलो. पवन्या म्हणे कोणचा का मराठी पिक्चर पाहू, 'ते का करुन रायली असन बा.' मी तर मराठी पिक्चर पाहतच नाही न जी. ते पुणे मुंबइवाले मराठी पिक्चर आपल्याले काही समजत नाही, तवा कायले फालतू टाइमपास कराचा आता इतक्या वर्षात तो सैराटच का तो पायला होता. नाहीतर मराठी पिक्चरशी संबंधच नाही. माया सोबती पक्का पुणेवाला झाला. मले म्हणे, \"आबे नाय तू पाय, मस्त पिक्चर हाय.\" दोस्तीखातर माणूस काहीबी कराले तयार रायते, तर मंग पिक्चर पाहाले का जाते आता इतक्या वर्षात तो सैराटच का तो पायला होता. नाहीतर मराठी पिक्चरशी संबंधच नाही. माया सोबती पक्का पुणेवाला झाला. मले म्हणे, \"आबे नाय तू पाय, मस्त पिक्चर हाय.\" दोस्तीखातर माणूस काहीबी कराले तयार रायते, तर मंग पिक्चर पाहाले का जाते\nतुमाले सांगतो राजेहो, हा पिक्चर म्हणजी मजाक हाय, बंदा पिक्चर मजाक मजाक मधी बनवलाय. पिक्चरची स्टोरी ना धड लवस्टोरी हाय, ना बदला हाय काहीतरी भलतीच मजाक हाय. मजाक मजाक मधी एकाच कालेजात शिकलेली पोर पोरी एकत्र येते. बसून दारु गिरु पेते, कालेजातले फोटो पायते. कालेजातल्या गोष्टी करते. आता हे नाही इचारच हे समद कराची जरुरत का हाय बा. आम्ही का कालेजात गेलो नाही का कधी मले तर मालूम हाय, अर्ध कालेज चहाच्या टपरीवर गेल रायते आन अर्ध पानठेल्यावर गेल रायते. कालेज आठवाच म्हणजे का ते टपरी आठवाची का पानठेले मले तर मालूम हाय, अर्ध कालेज चहाच्या टपरीवर गेल रायते आन अर्ध पानठेल्यावर गेल रायते. कालेज आठवाच म्हणजे का ते टपरी आठवाची का पानठेले जाउ द्या, पुणेवाल्यायच कालेज हाय ते. त्यायन कान व्हाटसअप वर ग्रुप जमवून मिटिंग ठरवली. आपल्याच कालेजात शिकलेल्या पोट्ट्यायले भेटायले कायले य़ेवढ्या झंझटी पायजे. आमले तर नाही लागत, मायाकड फोन नाही अस नाही. वाटण्या होउन मले इस एकराची शेती आलती. कोरडवाहू शेतीत पंप लावले आन वलीत केल. आजही माणूस माणूस पऱ्हाटी उभी हाय आपल्या वावरात. मायाकड बी सॅमसंगचा फोन हाय. दुसरा तिसरा घेतच नाही आपण. ते व्हाटसअप बी हाय. रायले कालेजातले पोट्टे ते तर भेटतच रायते. पोट्टे जाउन जाउन जाइन कुठ जी, हिंगणघाटात नाहीतर वर्धेत, मोठच झाल तर नागपुरात. सणवार रायला का गावाकड येत रायते तवा भेट होतच रायते. कालेजातल्या पोट्ट्यायले भेटण्यात अस का खास हाय हेच मले समजल नाही. अशी स्टार्टींगच समजली नाही तर फुडं पिक्चर का समजन जी\nपिक्चरमधला हिरो, त्याच लगीन झाल हाय, त्याले बायको हाय, गोड पोरगी हाय, पिक्चरची हिरोइन तिचबी लगीन झाल हाय, तिलेबी नवरा हाय, तिलेबी गोड पोरगी हाय. अस दोघायचबी समद मस्त चालल असताना मंग 'ते का करुन रायली असन बा' अशी झंझट कायले पायजेन म्हणतो मी. फुकटच दिमागाले तरास द्याचा. काहो, तुम्हीच सांगा, फालतूचाच डोक्याले ताप हाय का नाही हा पण नाही, हा लफूट पोट्ट्य़ावाणी तिच्या मांग मांग हिंडत रायते. चांगल्या शिकल्या सवरल्या संसारी माणसाले हे शोभते का जी पण नाही, हा लफूट पोट्ट्य़ावाणी तिच्या मांग मांग हिंडत रायते. चांगल्या शिकल्या सवरल्या संसारी माणसाले हे शोभते का जी मले तर समजतच नाही पोट्टे शिकले का काहून जास्त इचार कराले लागते ते मले तर समजतच नाही पोट्टे शिकले का काहून जास्त इचार कराले लागते ते तिच्या मांग लागूनबी याले का भेटनार होत, तिच तर लगीन झालत याचबी झालत. ना याले तिच्याशी लगन कराच होत ना तिले याच्याशी लगन कराच होत. मंग कायले भेटाची भानगड कराची तिच्या मांग लागूनबी याले का भेटनार होत, तिच तर लगीन झालत याचबी झालत. ना याले तिच्याशी लगन कराच होत ना तिले याच्याशी लगन कराच होत. मंग कायले भेटाची भानगड कराची मले तर ते गणित काही समजल नाही. बरं, हा असा बहकला जाउ द्यास, पोट्ट व्हय, कधी नशेत बहकते. पण त्या पोरीन तरी बराबर वागाव का नाही मले तर ते गणित काही समजल नाही. बरं, हा असा बहकला जाउ द्यास, पोट्ट व्हय, कधी नशेत बहकते. पण त्या पोरीन तरी बराबर वागाव का नाही सांगाव ना, बाबा जे होत ते झाल गंगेल जाउन मिळाल, आता माया नवरा हाय, पोरगी हाय तवा आता माया मांग काही हिंडू नको. पण नाय तिले बी याले भेटाच रायते. भेटून का लगीन करनार होती का त्याच्याशी, आपल्या नवऱ्याले आन सोन्यासारख्या पोरीले टाकून त्याच्या मांग हिंडनार होती सांगाव ना, बाबा जे होत ते झाल गंगेल जाउन मिळाल, आता माया नवरा हाय, पोरगी हाय तवा आता माया मांग काही हिंडू नको. पण नाय तिले बी याले भेटाच रायते. भेटून का लगीन करनार होती का त्याच्याशी, आपल्या नवऱ्याले आन सोन्यासारख्या पोरीले टाकून त्याच्या मांग हिंडनार होती आता तुम्हीच सांगा हे मजाक नाही तर काय आता तुम्हीच सांगा हे मजाक नाही तर काय हा मजाक मजाक मंधी तिले भेटाले जाते आन तेबी मजाक मजाक मंधी याले भेटते. हे अशी मजाक पायत टाइमपास करण्यापेक्षा बर्डीवर मॉलमंधी हिंडू, सावजीले जाउन ताव मारु अस पवन्याले सांगाव म्हणून म्या पवन्याकड पायल. तर पायतो काय ते आमच गाववाल पोट्ट आता पार पुण्याच झालत. ते मधेच हासत का होत, त्याच्या डोयात पाणी का येत होत. पार येड झालत. मले तर समजतच नव्हत त्याच्याकड पाहून हासाव का रडाव. तवा म्या मस्त एसी मंधी ताणून देल्ली.\nमधे मधे उठत होतो आन पिक्चर पाहात होतो आन पुन्हा झोपत होतो. येकदा पायल त्यान भावाची जिन्स घातली म्हणून त्याच कवतुक चालल होत. त्याले का लागते म्या तर अख्ख कालेज बापाची आल्टर केलेली पँट घालून काढल. दाहावीपर्यंत आम्ही हाफपँटीतच फिरत होतो, आमचा बाप फुलपँट देतच नाही म्हणे. तवा कालेजात गेल्यावर फुलपँट भेटली तर केवढ कवतुक आमाले, बापाची आल्टर केलेली पँट म्हणून का झाल फुलपँट तर होती. येथ यान भावाची जिन्स घातली म्हणून कवतुक, मजाक नाही तर का जी हे राजेहो येकदा पायल पोरगी पोरायसाठी बापाची उरलेली दारु आणून देते. म्या बी चार पावसाळे पायले. जर कोणची पोरगी लग्नाअगुदर का तुमाले तिच्या बापाची उरलेली दारु आणून देत असन तर तिच्यासारखी बायको या जगात दुसरी कोणची नाही. य़ेकदम बेस नंबर वन. लग्नाअगुदर पासूनच तुमची प्याची सोय करनारी बायको सापडते का आजच्या जमान्यात. अशा पोरीले सोडून देनार पोरग भैताडच म्हणा लागन. हे असे भैताड अशा पिक्चमंधीच सापडते असली जिंदगानीत नाही सापडत. म्हणून म्हणतो मी, बंदा पिक्चर मजाक हाय.\nपिक्चरचा येंड आला, तवा म्या जोरजोरात घोराले लागलो होतो. बाकीचे मायकड पाहात होते म्हणून माया दोस्ताले मायी लाज वाटली. त्यान मले उठवल. डोकच उठल माय. म्या पवन्याले इचारल ‘हे दोघ कोठ आले बे आंधाराचे’ पवन्यान मले चूप बसाले सांगतल. आता याले येकट्यालेच पिक्चर पाहाचा होता तर मले कायले घेउन आलता देव जाने. म्या झोपलो होतो तर मले सांगाले का जाते जी’ पवन्यान मले चूप बसाले सांगतल. आता याले येकट्यालेच पिक्चर पाहाचा होता तर मले कायले घेउन आलता देव जाने. म्या झोपलो होतो तर मले सांगाले का जाते जी तेथ आंधारात बसून ते दोघबी लंबाले डायलाग फेकत होते. आता पिक्चरचा येंड आलता आन हे डायलाग फेकत होते. अस रायते का कधी तेथ आंधारात बसून ते दोघबी लंबाले डायलाग फेकत होते. आता पिक्चरचा येंड आलता आन हे डायलाग फेकत होते. अस रायते का कधी बर डायलाग फेकाचे असन तर आपण कोण आहो हे तर पायल पायजे का नाही बर डायलाग फेकाचे असन तर आपण कोण आहो हे तर पायल पायजे का नाही आपण का अमिताभ आहो का दिलीप कुमार, मंग कायले बकबक कराची आपण का अमिताभ आहो का दिलीप कुमार, मंग कायले बकबक कराची हे बकबकच, डायलाग नाही. येकदाची त्यायची बकबक संपली पिक्चर संपला. म्या सुटलो येकदाचा. कैदेतून सुटल्यावाणी झालत मले. आमच्या पवन्याले हे पिक्चर लयीच आवडल. मले म्हणे,\n“याले म्हणते पिक्चर जन्या. कस आपल्या मनातल सांगते. आपल्याले बी वाटते ना कधी कधी ते आता का करुन रायली असन बा\n“कायले वाटाले पायजे बे सारेतली गोष्ट येगळी होती आताची येगळी. आता काही त्या साऱेतल्या सुबाभळीवाणी रायल्या नसन साऱ्या वडाच्या झाडावाणी सुटल्या असन. वडाच्या फांद्यावाणी येका खांद्यावर येक पोरग आन येका हातात दुसर पोरग. का करनार हाय बे त्या दुसर सारेतली गोष्ट येगळी होती आताची येगळी. आता काही त्या साऱेतल्या सुबाभळीवाणी रायल्या नसन साऱ्या वडाच्या झाडावाणी सुटल्या असन. वडाच्या फांद्यावाणी येका खांद्यावर येक पोरग आन येका हातात दुसर पोरग. का करनार हाय बे त्या दुसर बायाच्या मांग हिंडाच, घरचा सैपाकपाणी कराच, बाजाराले जाच. आपल्याच घरात पाहाच. जे आपल्या घरात चालल रायते तेच समद्यायच्या घरात. समदीकड मातीच्याच चुली हायेत पाय.”\n“तस नाही जन्या, वाटत लेका. तुले कधी इमलीची आठवण येत नाही\nम्या म्हणतो फोड बसल्यावर त्याच्यावरची खिपली कायले काढाची जे व्हाच ते होउन गेल. खिपली काढून कायले पाहाच फोड बसला का नाही ते जे व्हाच ते होउन गेल. खिपली काढून कायले पाहाच फोड बसला का नाही ते फोड बसल्याबिगर का खिपली येते का फोड बसल्याबिगर का खिपली येते का मले असा घुस्सा आलता. इमली आमच्या सारेत होती हायस्कूलले. येका वरसान लहान होती मायी सारा सुटल्यावरच म्या तिले पायल होत. ते दुसऱ्या गावावरुन बसन येत होती तिच्या गावात सारा नव्हती. आम्ही पोट्टेबाट्टे तेथच फाट्यावरच्या पानठेल्यावर बसून राहत होतो. तिले पायल न दिलखूष. येकदम सुबाभुळीवाणी होती. मंग तिच्या बसच्या टायमाले म्या तेथच बसून राहो. रोज तिले जसाजसा पाहत होतो तशीतशी पोरगी लइ आवड्याले लागली होती. तवा म्या आधी तिची चवकसी केली कणच्या गावची हाय, तिचा बाप का करतो. उद्या लफड नाही पायजे न जी. तिचा बाप चांगला दोन बैलजोडीचा कास्तकार होता तवा फुड जाउन काही लफड नव्हत. आमच्या बापाले पटवता आल असत. आपल बंद काम प्लॅनींगनच रायते.\nयेकदिस हिम्मत करुन तिच्यासंग बोलाच ठरवल. ते फाट्यावर उतरली आन गावाकड चालली होती, गाव थोड दूर होत. उन तापल हात तवा रस्ता तसा सुनसान होता. कोणी चिटपाखरु नव्हत. मनात मारुतीच नाव घेतल आन म्या तिले इचारल ‘तुय नाव का हाय व इमले’ म्या अस इचाराची सोय आन ते अशी पराली जी. ढोऱ्यायच्या शेपटीखाली हात लावला का ढोर कसे परते तसी पराली जी. मले समजतच नव्हत म्या अस का केलत ते. म्या तर फकस्त नावच इचारल होत. तिच नाव मले मालूम होत पण काहीतरी बोलाच म्हणून नाव इचारल. त्या दिसापासून मायी तिच्याशी बोलाची हिम्मतच झाली नाय. मी चुपचाप रोज फाट्यावर तिची वाट पाहात होतो अन मंग कालेजले जात होतो. तिची दाहावी संपली आन तिच आमच्या गावात येन बंद झाल. मले काही चैन पडत नव्हती. रातभर झोप येत नव्हती. कसकस होत होत. कालेजात मन लागत नव्हत. म्या तिच्या गावात चकरा माराले लागलो. लय भेव वाटत होत. तिच्या गावच्या पोट्यायन पायल तर केवढ्याची आली असती’ म्या अस इचाराची सोय आन ते अशी पराली जी. ढोऱ्यायच्या शेपटीखाली हात लावला का ढोर कसे परते तसी पराली जी. मले समजतच नव्हत म्या अस का केलत ते. म्या तर फकस्त नावच इचारल होत. तिच नाव मले मालूम होत पण काहीतरी बोलाच म्हणून नाव इचारल. त्या दिसापासून मायी तिच्याशी बोलाची हिम्मतच झाली नाय. मी चुपचाप रोज फाट्यावर तिची वाट पाहात होतो अन मंग कालेजले जात होतो. तिची दाहावी संपली आन तिच आमच्या गावात येन बंद झाल. मले काही चैन पडत नव्हती. रातभर झोप येत नव्हती. कसकस होत होत. कालेजात मन लागत नव्हत. म्या तिच्या गावात चकरा माराले लागलो. लय भेव वाटत होत. तिच्या गावच्या पोट्यायन पायल तर केवढ्याची आली असती तरीबी रोज घरुन वावरात जात होतो आन तेथून चालत तिच्या गावात जात होतो. तेथूनच बस पकडून कालेजले जात होतो. कधी ते दिसत होती कधी नाही. तिले मालूम झालत का म्या तिच्यासाठीच तिच्या गावात येउन रायलो ते. गाडी येथच अडकली होती, फुडं का कराव काही समजत नव्हत. कोणाले इचारव बा त्याचाच इचार करत होतो तवा माया मामा घरी आलता. तो करंजीले रायते हे तरोड्यापासच करंजी. मामा मायाच वयाचा म्हणान जी पाच वरसान मोठा. त्यान बारावी करुन डियेड केलत आन कोण्या सारेत मास्तर होता. म्या त्याले बंद समजावून सांगतल. त्याले घेउन तिच्या गावात गेलो. त्या दिवशी ते आमच्यासंगच बसमंधी आलती, तिचा बाप, माय, भाऊ बंदे बसमंधी होते. कोठका लग्नाले चालले असन. मले मामान सांगतल,\n“जन्या, हे पोरगी काही अशी भेटनार नाही. तू काही हिच्यापायी तुय कालेज बरबाद करु नको. तिच्या गावात तर जाउच नको. पकडल्या गेला तर लइ मार खाशीन. तू कालेज कर बराबर, मंग शिद्दा तिच्या बापालेच जाउन इचार.”\nमामाच म्हणन मले पटल म्या तिच्या गावात जान बंद केल. ते घरुनच परीक्षा देत होती, तवा कधीकधी बसमंधी दिसे. साहा आठ महिन्यान मामाच लगन जमल. टिका लावाचा प्रोग्राम करंजीलेच होता. अस गडबडीतच लगन जमल होत, तवा मायले घेउन मलेच जा लागल. तवा मले समजल माया मामा लइ चालू निंगाला. कंसमामा तरी बरा पण हा नको. लेकान मलेच मामा बनवल.\n‘ते का करुन रायली असन बा’ याच मले काही देनघेन, पण म्या का करुन रायलो ते तुमाले सांगतो राजेहो. दर दिवाळी आन दसऱ्याले करंजीले जातो, ...............................आसीरवाद घ्याले.\nता. हिंगणघाट, जि. वर्धा.\nजानराव जगदाळे लै भारी समीक्षक आहेत त्यांच्या आयुष्यात अशी कथा घडावी याचं मात्र वाईट वाटलं.\nमित्रहो, तुम्हाला डार्क विनोद अप्रतिम जमतो आहे. जियो\nमी तुमचा पंखा झालो आहे मित्रहो भौ..\nलग्नाअगुदर पासूनच तुमची प्याची सोय करनारी बायको सापडते का आजच्या जमान्यात. अशा पोरीले सोडून देनार पोरग भैताडच म्हणा लागन. हे असे भैताड अशा पिक्चमंधीच सापडते असली जिंदगानीत नाही सापडत.\n---> लग्नानंतर तुम्हाला प्यायची असेल (घरात बसून) तर विनाकारण कोणताही वाद न घालता चकणा वगैरेची सोय करणारी तरी भेटते बऱ्याच जणांना.\n वाचतांना मजा आली . विशेषतः शेवट छान जमला. पुलेशु.\nभाषा पण समजली सगळी. आनंद झाला..\nजोरदार वऱ्हाडी झटका आहे.\nहा खास वऱ्हाडी ठेच्याचा झटका दिसतोय\nमाझ्या एका मित्राची कथा थोडीशी याच वळणाने गेली. मात्र शेवट मित्राच्या मनाजोगता झाला. त्याचा मामा असाच दोनतीन वर्षांनी मोठा. मित्राच्या शाळेतली एक मुलगी दहावीपासून मित्राच्या नजरेत होती. यथावकाश ग्राज्वेट होऊन एकदोन वर्षं नोकरी केल्यावर ती मामाला दाखवली गेली. तेव्हा या दोघांना अधिक कालक्रमण व्यर्थ असल्याचा साक्षात्कार झाला. मित्राने मग स्वत:चा बार निगुतीनं उडवला. इतके वर्षं काय करंत होतास म्हणून विचारलं की गप राहतो. ;-)\nसर्व मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.\nहो चकणा देनारी भेटते हल्ली.\nअसे घडू शकते असे माहीत होते पण प्रत्यक्षात घडल्याचे ऐकले नव्हते. आमच्या शाळतले सर नेहमी म्हणायचे अरे ह्या मुलींपैकी कुणी उद्या तुमची काकू, वहीनी नाहीतर मामी असेल. हा विचार ठेवून वागत चला.\nमी तुमचा पंखा झालो आहे मित्रहो भौ.. >> +1\nआता इतक्या वर्षात तो सैराटच का तो पायला होता. नाहीतर मराठी पिक्चरशी संबंधच नाही. >> इथे मात्र थोडंसं बेअरींग चुकल्यासारखं वाटलं. चुकलं नसेलही कदाचीत; पण मी तिथे अडखळले.\nसाधारण वर्ष दीड वर्षापूर्वी आमच्या गावातल्या एका व्यक्तीने 'आपण मराठी पिक्चर टाकीजमंधी जाउन पाहतच नाही न भाऊ' हे ऐकवले होते. तेच पकडून लिहीले होते.\n'आपण मराठी पिक्चर टाकीजमंधी\n'आपण मराठी पिक्चर टाकीजमंधी जाउन पाहतच नाही न भाऊ' >> हां हे वाटतय वर्हाडी ढंगात. ती मी कोट केलेली वाक्यं प्रमाणभाषेशी जास्त जवळ वाटली... मला एकटीलाच तसं वाटत असेल कदाचीत. पण छान एका लयीत वाचत असताना तिथे अडखळले खरी :)\nसतत प्रमाण भाषाच बोलत असल्याने ही शैली प्रमाण भाषेची की बोली भाषेची असा गोंधळ नक्कीच उडू शकतो.\nअरे खत्तरनाक लिहिले आहे.\nअरे खत्तरनाक लिहिले आहे.\nजबरदस्त लिहीलंय. भाषेची बेअरींग शेवटपर्यंत तशीच्या तशीच राहतेय.\nमराठी भाषा गौरव दिन २०१८\nजागतिक मराठी गौरव दिन २०१८: अनुक्रमणिका\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 28 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-win-by-26-runs/", "date_download": "2018-04-24T06:37:40Z", "digest": "sha1:YH2QANZMPJN6OM675P3732U6H7FZYEUH", "length": 8497, "nlines": 106, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रोमहर्षक सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर २६ धावांनी विजय - Maha Sports", "raw_content": "\nरोमहर्षक सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर २६ धावांनी विजय\nरोमहर्षक सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर २६ धावांनी विजय\n येथे आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे २६ धावांनी विजय मिळवला. भारताने निर्धारित ५० षटकांत २८१ धावा केल्या होत्या. परंतु डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ऑस्ट्रेलिया समोर २१ षटकांत १६४ धावांचे लक्ष ठेवण्यात आले.\nभारताच्या गोलंदाजी पुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज टिकू शकले नाही. ऑस्ट्रेलियाने २१ षटकांत ९ बाद १३७ धावांपर्यंत मजल मारली. त्यात ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नर (२५), मॅक्सवेल (३९) आणि फॉकनर (३०) यांनी दोन आकडी धावसंख्या केली. भारताकडून युझवेन्द्र चहल (३), कुलदीप यादव(२), हार्दिक पंड्या(२), जसप्रीत बुमराह(१) आणि भुवनेश्वर कुमार (१) यांनी विकेट्स घेतल्या.\nतत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ७ विकेट्स गमावत २८१ धावा केल्या आहेत. पांड्याने दणदणीत अर्धशतक करत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ६६ चेंडूत ८३ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीने ८८ चेंडूत ७९ धावा केल्या. धोनीने आपली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १००वी अर्धशतकी खेळी केली.\nसलामीवीर फलंदाज आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर भारताचा डाव हार्दिक पंड्या आणि धोनीने सांभाळला. या दोघांनी ६ व्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. पंड्या बाद झाल्यानंतर धोनीने भुवनेश्वर कुमारला साथीला घेत अर्धशतकी भागीदारी केली.\nभारताला पहिला झटका संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या रूपाने लागला. त्यानंतर लगेचच कर्णधार विराट कोहलीही बाद झाला. विराटला तर भोपळाही फोडता आला नाही. मनीष पांडे ही शून्य धावा करून तंबूत परतला. केदार जाधव आणि रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसत होते. पण स्टोयनिक्सच्या गोलंदाजीवर शर्मा बाद झाला. त्यानंतर केदार जाधव व माजी कर्णधार धोनीने संघाला सांभाळले व संघाची धावसंख्या २८०च्या पुढे नेली.\nऑस्ट्रेलियाकडून नॅथन कॉल्टर-नाइल आणि स्टोयनिक्सने सुरेख गोलंदाजी केली. नॅथन कॉल्टर-नाइलने ३ विकेट्स घेतल्या तर स्टोयनिक्स २ विकेट्स घेतल्या.\nआज रिअल माद्रिदचा भिडणार रिअल सोसइदाद संघाशी\nवाचा: भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यातील तब्बल २१ विक्रम\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8", "date_download": "2018-04-24T06:24:25Z", "digest": "sha1:3TINOR4D3OV4CJ65ZOB7KX2OMFDUGFWI", "length": 3850, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केरळ मधील लाल पाऊस - विकिपीडिया", "raw_content": "केरळ मधील लाल पाऊस\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकेरळ मधील लाल पाऊस[१]\n↑ लाल पावसाचे रहस्य[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://assn.org.in/ourschools.html", "date_download": "2018-04-24T07:01:20Z", "digest": "sha1:RYRD6V3RDCOIYGSIROCEPD4Q2DOOURNI", "length": 3043, "nlines": 50, "source_domain": "assn.org.in", "title": " आदिवासी सेवा समिती", "raw_content": "\nकर्मवीर भाऊसाहेब हिरे कृषी विद्दयालय,\nमानूर, ता. कळवण, जि. नाशिक.\nश्री बच्छाव सचिन दादाजी\nकृषी विद्दयालय, चिंचवड, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक.\nश्री धनगर उज्वल दयाराम\nकला, वाणिज्य विज्ञान महाविद्दयालय,\nमानूर, ता. कळवण, जि. नाशिक. संकेतस्थळ:www.assn.org.in/manurcollege/\nआश्रम शाळा व मुख्याध्यापक यांची भ्रमणध्वनी सहीत यादी\nडोंगराळ व अतिदुर्गम भागात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली आहे\nभविष्यात याच भागातील लोकांना तंत्रशिक्षण, वैद्यकीय महाविद्यालये व स्वयंरोजगार मिळवून देणारे उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.\nसंस्थे बद्दल नवीन काही :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/lifestyle/beauty-and-makeup/low-height-not-fashionable-avoid-this-fashion-of-low-height-person/17273", "date_download": "2018-04-24T07:05:53Z", "digest": "sha1:FIDG6UY2Y5TAKSEVBE3Q3BI6A77EN2WE", "length": 23242, "nlines": 248, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "low height not fashionable, avoid this fashion of low height person | FASHION : कमी उंची असेल तर हे वापरणे टाळा ! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nFASHION : कमी उंची असेल तर हे वापरणे टाळा \nबहुतांश फॅशन शो मध्ये उंच लोक दिसतात. यामुळे मार्केटमध्ये उंच लोकांना डोळ्यासमोर ठेऊनच कोणतेही फॅशन प्रॉडक्ट आणले जाते. अशात ठेंगण्या लोकांसाठी बाजारात काय आहे व काय घातल्यावर ठेंगणी व्यक्ती चांगली दिसेल हे ठरवणे कठीण होते.\nफॅशन जगतात उंच व्यक्तींना वेगळे स्थान असते. कारण कुठलीही फॅशन उंच व्यक्तींवर उठावदार दिसते. म्हणून बहुतांश फॅशन शो मध्ये उंच लोक दिसतात. यामुळे मार्केटमध्ये उंच लोकांना डोळ्यासमोर ठेऊनच कोणतेही फॅशन प्रॉडक्ट आणले जाते. अशात ठेंगण्या लोकांसाठी बाजारात काय आहे व काय घातल्यावर ठेंगणी व्यक्ती चांगली दिसेल हे ठरवणे कठीण होते. उंच मुलींनी काहीही घातले तरी त्यांना ते शोभून दिसते. परंतु ठेंगण्या मुलींना सगळेच कपडे शोभून दिसत नाही. आजच्या सदरात कमी उंचीच्या मुलींनी नेमकी कोणते कपडे वापरु नयेत जेणेकरुन त्या फॅशनेबल दिसतील याविषयी जाणून घेऊया.\nआडव्या प्रिंटचा ड्रेस - आडवी प्रिंट असलेले शर्ट, टॉप किंवा ड्रेस घालू नका. यामुळे तुम्ही अधिक ठेंगणे दिसाल.\nबरमूडा शॉर्ट्स - हे घातल्याने कमी उंची असेल तरीही तुम्ही खूप ठेंगण्या असल्याचे जाणवणार नाही. वाटल्यास तुम्ही मध्यम उंचीचे ट्राऊजरही घालू शकता.\nओव्हर-साईझ बॅग्स - आपल्या उंचीला अनुसरून बॅगची लांबी निवडा. ओव्हर-साईझ बॅगमुळे तुम्ही खूप सुंदर दिसू शकता.\nवाईड लेग्ड पँट - अशा पॅन्ट मुळीच घालू नका. यामुळे उंची अधिक कमी दिसते.\nशर्ट ड्रेसेस - हे ड्रेसेस फार सुंदर दिसतात परंतु तुम्हाला ते शोभून दिसणार नाही. त्यामुळे शर्ट ड्रेस न घातलेला बरा.\nमिड-काफ-बूट - हे बूट दिसायला छान दिसतात. परंतु ते घातल्यावर उंची कमी वाटते. त्यामुळे ठेंगण्या मुलींनी हे घालू नये.\nSEE PICS : हातात हात घालून रॅम्पवर...\nवैभव तत्ववादीला दादासाहेब फाळके सर्...\nसैराटनंतर नागराजनं लिहिला ‘पावसाचा...\nमंदिरा बेदीचा खुलासा, ‘माझ्या हेअरस...\nदिशा पाटनीने सिक्स पॅक अ‍ॅब्ज दाखवि...\n​अक्षय कुमारने पैशाने विकत घेतली स्...\nआॅफिस कल्चरसाठी ‘देसी साडी’ देई हटक...\n​मल्टिपल थीमने रंगले अमेझॉन फॅशन वी...\n​ जॅकी श्रॉफ यांच्या ‘शून्यता’ने जि...\nशॉर्ट ड्रेसमध्ये आजीसोबत फोटो काढणा...\nमुग्धाने राहुल देवसोबत प्रेमात असल्...\nगिरीजा ओक दिसणार एका वेगळ्या माध्यम...\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक न...\nघरगुती शॅम्पूने खुलवा केसांचे सौंदर...\nरिमुव्हर शिवाय काढा नेलपॉलिश\nडागरहित उजळ त्वचेसाठी हळद उपयुक्त\nआॅईली स्कीनची अशी घ्या काळजी\nउन्हाळ्यात घ्या केसांची काळजी\nBeauty : स्टोन मसाज थेरपीने असे खुल...\n​सेलिब्रिटींसारखे गुलाबी ओठ हवे आहे...\nआता बिनधास्त वापरा 'बॅकलेस ब्लाऊज'...\n​लग्नाच्या बांगड्या खरेदी करताना ‘ह...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/news/sidharth-menons-new-look/20793", "date_download": "2018-04-24T06:54:22Z", "digest": "sha1:FRI2DFRUPTF2CRKMMDWO7LOSZEGNW7T7", "length": 23261, "nlines": 245, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "sidharth menon's new look | ​सिद्धार्थ मेननचा नवा लूक पाहिला का? | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\n​सिद्धार्थ मेननचा नवा लूक पाहिला का\n​सिद्धार्थ मेननचा नवा लूक खूपच छान आहे. सध्या तो पटियाला पँट आणि शर्ट या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.\nअभिनेत्री नेहमीच त्यांच्या लूकच्या बाबतीत अलर्ट असतात. एखाद्या पार्टीला अथवा सार्वजनिक कार्यक्रमाला जाताना काय घालायचे याचा त्या 100 वेळा विचार करतात. पण त्यांच्या तुलनेत अभिनेते फॅशनच्या बाबतीत तितके सतर्क असलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. पण सिद्धार्थ मेनन हा त्याच्या फेशन सेन्सबाबत प्रचंड अलर्ट असतो. आपली फॅशन ही सगळ्यांपेक्षा वेगळी असावी यासाठी तो प्रयत्न करत असतो. काही दिवसांपूर्वी तो एका आगळ्या वेगळ्या फॅशनमध्ये पाहायला मिळाला होता.\nसिद्धार्थने काही दिवसांपूर्वी शर्टच्या खाली एक पटियाला पँट घातली होती. या पटियाला पँटची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानेदेखील या पटियाला पँट आणि शर्ट घातलेला त्याचा व्हिडिओ फेसबुकला शेअर केला होता. आणि त्यावर पटियाला पँट लगाके... नाचुंगा नाचुंगा असे लिहिले होते.\nसिद्धार्थचा हा लूक कोणत्या फॅशन डिझायनरने नव्हे तर त्याच्या पत्नीने डिझाइन केला होता. त्यामुळे त्याने ही पोस्ट लिहिताना या लूकसाठी त्याची पत्नी पौर्णिमा नायरचे आभार मानले आहेत.\nसिद्धार्थचा हा लूक त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडत आहे. त्याच्या या लूकची सध्या चांगलीच चर्चा आहे. फेसबुकला त्याच्या या फोटोवर अनेक कमेंट अाले असून अनेकांनी या पोस्टला लाइक केले आहे.\nसिद्धार्थ मेननने खूप कमी काळात मराठी चित्रपटसृष्टीत चांगले नाव कमावले आहे. पोस्टर गर्ल, अँड जरा हटके, हॅपी जर्नी, पोपट यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. त्याने चित्रपटांसोबत काही वेब सिरिजमध्ये देखील काम केले आहे.\nबिग बॉसच्या घरामध्ये पुष्कर जोगला झ...\nबॅक वर्कआऊटच्या व्हिडीओ मार्फत रीना...\nमराठमोळ्या अभिनेत्यासह लग्नबंधनात अ...\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनवरही झिंग...\nहोळी स्पेशल मराठी रोमँटीक गाण्यांच...\nहा प्रसिद्ध मराठी अभिनेता करणार चित...\nमराठी चित्रपटसृष्टीला रेडिओ सिटीची...\n​बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा...\n​आता हा मराठी अभिनेता बनला बाबा\n​अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनंतर...\nमराठी अभिनेत्यांची पडद्यावरील आणि प...\n​या मराठी अभिनेत्याने केले गुपचूप ल...\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरे...\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्...\n​'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये स्पृहा...\n​ऋत्विक केंद्र दिसणार 'सरगम' मध्ये\nसंगीत देवबाभळी नाटक पाहून भारावले न...\n​माधुरी दिक्षीतने केली सुमेध मदगलकर...\nरणांगण चित्रपटाचं आगळं – वेगळं पोस्...\nमाधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या...\n“सायकलच्या” प्रमोशनसाठी मुंबईत व्हि...\nअस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गु...\nचिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम क...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-24T06:55:30Z", "digest": "sha1:3HGBAKTUHYXRFY2KR2WZO37S235XSIDP", "length": 20572, "nlines": 138, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "श्रीसाईसच्चरित - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nHome / Tag Archives: श्रीसाईसच्चरित\nश्रीसाईसच्चरित वाचताना त्या ध्वनीची स्पन्दने आमच्या मनात उत्पन्न होत असतात. मोठ्याने वाचले काय किंवा मनातल्या मनात वाचले काय, ही ध्वनिस्पंदने उत्पन्न होत राहतात. मनातल्या मनात वाचण्यात तर अधिक ताकदीची स्पंदने उत्पन्न होतात. म्हणून श्रीसाईसच्चरित वाचताना ते स्वत: प्रेमाने ऐकणेदेखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून या स्पंदनांचा स्वीकार करता येईल. श्रीसाईसच्चरित कसे वाचावे याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च २००५ ...\tRead More »\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant’s Journey\nअनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ...\tRead More »\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – ३)\nहेमाडपंतांच्या (Hemadpant) मित्राच्या मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो आणि हेमाडपंतांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. हेमाडपंतांच्या मित्राचं पुढे काय झालं हे आपल्याला माहित नाही. जी परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राची आहे तीच परिस्थिती सपटणेकरांची आहे. सपटणेकरांच्याही मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो. हेमाडपंतांच्या मित्राला आयुष्यात पुढे शांती मिळाली किंवा नाही ह्या विषयी हेमाडपंत काही सांगत नाहीत. पण साईनाथांकडे येण्यापूर्वी जी परिस्थिती सपटणेकरांची आहे तीच परिस्थिती हेमाडपंतांच्या ...\tRead More »\nनव्या फोरमची सुरुवात : साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंत – २ (Hemadpant)\nहेमाडपंतांविषयी (Hemadpant) आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. (१) हेमाडपंत(Hemadpant) ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते. (२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित(Kakasaheb Dixit) व नानासाहेब चांदोरकर (Nanasaheb Chandorkar) यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१) (३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे(Sai) येण्याच्या वेळेस कशी होती तर अतिशय उद्विग्न. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा(Saibaba) ...\tRead More »\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – २)\nअनेक जणांनी माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रामवरती “श्री साई सच्चरित Discussion” हा श्रीसाईसच्चरितावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे ...\tRead More »\nश्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा – पारितोषिक वितरण समारोह (Shree Saisatcharit Panchshil Exam)\nगत इतवार अनेक श्रध्दावानों को एक बहुत ही अनोखे समारोह में शामिल होने अवसर मिला मैं भी उस में शामिल था मैं भी उस में शामिल था यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया इस समारोह में इन परिक्षार्थियों ...\tRead More »\nकहे साई वही हुआ धन्य धन्य| हुआ जो मेरे चरणों में अनन्य || (Sai the Guiding Spirit Saisatcharit)\nपिछले ड़ेढ दो साल से सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ‘श्रीसाईसच्चरित’ (Shree Saisatcharit) पर हिन्दी में प्रवचन कर रहे हैं इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों ...\tRead More »\nसाई म्हणे तोचि तोचि झाला धन्य | झाला जो अनन्य माझ्या पायीं ||\nआज मागची दीड दोन वर्ष बापूंची “श्रीसाईसतचरित्रावर” हिंदीतून प्रवचनं चालू आहेत. त्याआधी बापूंनी श्रीसाईसच्चरित्रावरील “पंचशील परीक्षा” सुरू केल्या (फेब्रुवारी १९९८) व त्या परिक्षांच्या प्रॅक्टिकल्सची लेक्चर्सही घेतली. त्यावेळेस आम्हा सर्वांना श्रीसाईसच्चरित्राची नव्याने ओळख झाली. ११ फेब्रुवारी १९९९ मध्ये बापूंनी पंचशील परीक्षांना का बसायचं हे समजावून सांगितलं. बापू म्हणतात, “आपल्याला प्रत्येकाला ओढ असते की मला माझं आयुष्य चांगलं करायचं आहे, जे काही ...\tRead More »\nहा प्रसंग हेमाडपंताच्या आयुष्याला वळण देणारा आहे. हेमाडपंतांनी साईनाथांना बघितलेलं ही नाही, फोटो ही पाहिलेला नाही. उलट काकासाहेब दिक्षीतांनी त्यांना सांगितल्यानंतरही शिर्डीला जायचा विचार हेमाडपंत सोडून देतात. कारण मनात प्रश्‍न उद्‍भवलेला असतो की ’सद्‍गुरूचा उपयोग काय’ पण त्यानंतर नानासाहेब चांदोरकरांच्या विनंतीनंतर हेमाडपंत शिर्डीस जायला निघतात. हेमाडपंतांची शिर्डीला जाणारी गाडी सुटू शकते हे जाणून, तसेच साईनाथ त्यांच्या भक्ताचा म्हणजेच नानासाहेब चांदोरकरांचा ...\tRead More »\nसाईंनिवास – डाक्यूमेंट्री अब हिंदी में भी उपलब्ध (डबींग की हुई) (Sainiwas Documentary)\nSainiwas Documentary हरी ॐ मित्रों, पिछले गुरूवार को, अर्थात ३१ जनवरी २०१३ को श्रद्धावनों के लिए स्वस्तिक्षेम संवाद के बाद, जो बापूजी के हिंदी प्रवचन के लिए बैठते हैं उनके लिए साईंनिवास डाक्यूमेंट्री (हिन्दी में डबींग की हुई) लगाई गयी थी चूंकि मूल प्रति की अवधि २ घंटों की है, इसका संक्षिप्त प्रारूप, जिसकी अवधि ४५ मिनटों की है, वह दिखाई गई चूंकि मूल प्रति की अवधि २ घंटों की है, इसका संक्षिप्त प्रारूप, जिसकी अवधि ४५ मिनटों की है, वह दिखाई गई\nll हरि ॐ ll श्री साईसच्चूरित में कई भक्तों की बातें आती हैं जिसकी वजह से भक्तों की श्रद्धा दृढ होती जाती है और सदगुरुचरणों में भक्ति भी दृढ होने लगती है सदगुरु श्री अनिरुद्ध बापूजी के भक्तों को ऐसे कई अनुभव हुए हैं सदगुरु श्री अनिरुद्ध बापूजी के भक्तों को ऐसे कई अनुभव हुए हैं कई अनुभव विशेषांक में छपे हैं और कई अनुभव कृपासिंधु में भी छपते रहते हैं कई अनुभव विशेषांक में छपे हैं और कई अनुभव कृपासिंधु में भी छपते रहते हैं \nll हरि ॐll Sadguru Shree Aniruddha Bapu श्री साईसच्‍चरितामध्ये अनेक भक्तांच्या गोष्टी येतात ज्यामुळे भक्तांची श्रध्दा दृढ होत जाते आणि सद्‌गुरुचरणी भक्तीहीदृढ व्हायला लागते. सद्‌गुरु श्रीअनिरुध्द बापूंच्या भक्तांना असे अनेक अनुभव आलेले आहेत.अनेक अनुभव विशेषांकामधून आले आहेत आणि अनेकअनुभव कृपासिंधुमध्येही येतात.त्याशिवाय हे अनुभव आपल्या “अनिरुध्द बापू व्हिडीयोज” युट्युब चॅनलवर (http://www.youtube.com/user/manasamarthyadatavid/videosflow=grid&view=1) देखील पहायला मिळतात.हे अनुभव प्रत्येक श्रध्दावानाला मार्गदर्शक तर ...\tRead More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/news/today-marathi-relase-of-fugay-and-dhyanimani/17713", "date_download": "2018-04-24T06:44:51Z", "digest": "sha1:4NJ6ZDGO2KFWBDHRZQUJDZCDBKANF3BE", "length": 26018, "nlines": 244, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "today marathi relase of fugay and dhyanimani | फुगे आणि ध्यानीमनी चित्रपट आज होणार प्रदर्शित | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nफुगे आणि ध्यानीमनी चित्रपट आज होणार प्रदर्शित\nआज फुगे आणि ध्यानीमनी हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आजचा दिवस हा चित्रपटांच्याबाबतीत खूपच खास असणार आहे.\nआज फुगे आणि ध्यानीमनी हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या दोन चित्रपटांची चर्चा बºयाच दिवसांपासून रंगत होती. त्याचबरोबर हे दोन चित्रपट\nपाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक होते. आज फायनली प्रेक्षकांची ही उत्सुकता संपणार आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही चित्रपट कथा, पटकथा, कलाकार अशा गोष्टींनी ताकदवान आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना आजचा दिवस हा चित्रपटांच्याबाबतीत खूपच खास असणार आहे.\nस्वप्ना वाघमारे दिग्दर्शित फुगे हा चित्रपट आहे. मित्रांची दुनिया ही न्यारीच असते. धम्माल, मजा-मस्ती, रुसवे-फुगवे आणि वेळ पडली तर एकमेकांसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची तयारी असलेले मित्र. मैत्रीच्या आणाभाका घेत एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकण्याची तयारी असलेले मित्र रियल लाइफमध्ये आपल्या आजूबाजूला असतातच मात्र रिल लाइफमध्येही मैत्रीवर आधारित विविध सिनेमा आले आहेत. शोलेमधील जय वीरु, यारी है इमान मेरा यार मेरा जिंदगी म्हणणारे अमिताभ-प्राण, सलामत रहे दोस्ताना म्हणणारे अमिताभ आणि शत्रुघ्न सिन्हा आणि मराठमोळी दुनियादारी. अशा एक ना अनेक सिनेमांमधून मैत्रीचे विविध पैलू रसिकांनी रुपेरी पडद्यावर अनुभवले आहेत. आता याच मैत्रीवर आधारित फुगे हा सिनेमा आहे. मैत्रीच्या घनिष्ट नात्यावर आधारित फुगे या सिनेमात पहिल्यांदाच स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांना पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटात प्रेक्षकांना या दोघांसोबत प्रार्थना बेहेरे, नीता शेट्टी असे अनेक कलाकार दिसणार आहे. .या सिनेमाची निर्मिती एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बर्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांनी केली असून इंदर राज कपूर या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत.\nचंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ध्यानीमनी हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता महेश मांजरेकर आणि आश्विनी भावे पहिल्यांदा एकत्रित येत आहे. या दोन दिग्गज कलाकारांसोबत प्रेक्षकांना अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे पाहायला मिळणार आहे. मानसिक जीवनातील रहस्य उलगडणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाचीदेखील प्रेक्षकांना अधिक उत्सुकता आहे. महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर आणि अनिरुद्ध देशपांडे यांच्या ग्रेट मराठा एंटरटेन्मेंटनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच स्मिता ठाकरे, अमोलख सिंग गाखल, इक्बालसिंग गाखल आणि राजेश बंगा सहनिमार्ते आहेत. तसेच नाटककार प्रशांत दळवी यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. संदीप खरे यांनी गीतलेखन आणि अजित परब यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे हे दोन्ही चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे नक्की.\n​माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील गॅ...\nअभिजीत खांडकेकर पत्नी सुखदासह या ठि...\nअंमली पदार्थांविरोधात रवी जाधवचा एल...\n'गॅरी’च्या रिअल पत्नीचा हॉट अंदाज प...\n​माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला...\nSEE PICS:'माझ्या नवऱ्याची बायको'माल...\nGlamorous अंदाजात दिसली अभिनेत्री,...\n‘गॅरी’ आणि त्याच्या रिअल लाईफ ‘राधि...\nशनायाच्या चेह-यावर फासलेल्या काळ्या...\nशनायाच्या चेह-यावर फासलेल्या काळ्या...\nशनायाला डेंग्यूची लागण,रुग्णालयात उ...\nतर असे अश्विनी भावे आणि तिच्या चाहत...\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरे...\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्...\n​'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये स्पृहा...\n​ऋत्विक केंद्र दिसणार 'सरगम' मध्ये\nसंगीत देवबाभळी नाटक पाहून भारावले न...\n​माधुरी दिक्षीतने केली सुमेध मदगलकर...\nरणांगण चित्रपटाचं आगळं – वेगळं पोस्...\nमाधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या...\n“सायकलच्या” प्रमोशनसाठी मुंबईत व्हि...\nअस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गु...\nचिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम क...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2018-04-24T06:51:23Z", "digest": "sha1:AVQQKC6RYEHFXPVMU6N3BAXAM4ROZ65W", "length": 33598, "nlines": 736, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अष्टांगिक मार्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nधम्मचक्रातील आठ आरे हे अष्टांगिक मार्ग दर्शवतात.\nअष्टांगिक मार्ग (पाली: अरियो अठ्ठ्ंगिको मग्ग) हा गौतम बुद्धांनी सांगितलेला काम, क्रोध, द्वेष, इ. दोष दूर करून जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा मार्ग आहे. यासं मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात.\nहा लेख बौद्ध धर्म या प्रकल्पाचा एक भाग आहे\nबौद्ध धर्माच्या शिकवणुकीत अष्टांगिक मार्गाला फार महत्त्व आहे. अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण अवलंब केला तर मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही कल्पना समजावून देताना म्हटले आहे की, निर्वाण म्हणजे धर्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा ताबा आपल्या प्रवृत्तींवर असणे. निब्बाण (निर्वाण) म्हणजे निर्दोष जीवन. काम, क्रोध, द्वेष वगैरे दोष आपले जीवन दूषित करून सोडतात. हे दूर करून जीवन निर्मळ करण्याचा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग. हा मार्ग मनुष्याला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो, ज्ञान देतो. त्यामुळे चित्ताला शांती लाभू शकते. मनुष्याच्या दैनंदिन जीवनात मनुष्य जितके या मार्गाने वाटचाल करतील तितके जीवन अधिक आनंदी होत जाईल.\n१) सम्यक् दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.\n२) सम्यक् संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.\n३) सम्यक् वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.\n४) सम्यक् कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.\n५) सम्यक् आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.\n६) सम्यक् व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.\n७) सम्यक् स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.\n८) सम्यक् समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे\n९ हे ही पहा\nअष्टांगामध्ये पहिले सूत्र आहे- सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे जे आहे, जसे आहे तसे पाहणे. एखाद्या व्यक्तीविषयी मनात राग असेल किंवा काही पूर्वग्रह असतील तर ती व्यक्ती जे काही करेल त्यात आपल्याला दोषच दिसू लागतात. कधी कधी मन विषादाने भरून गेले असले की भव्य आकाश, तेजस्वी नक्षत्रे, सुगंधाची आणि सौंदर्याची बरसात करणारी फुले यांच्या दर्शनाने आनंद होत नाही. मूळ वस्तू जशी आहे तशी न बघता विकारग्रस्त मनाने बघितली की तिच्या बाबतीतील आपले आकलन दूषित होते. म्हणून माणूस, वस्तू, निसर्ग सगळ्यांकडे शांत, समतोल, पूर्वग्रहविरहित दृष्टीने बघावे. म्हणजे बघणारा आणि बघितले जाणारे यांच्यात योग्य संबंध प्रस्थापित होतात.\nदुसरे सूत्र आहे सम्यक संकल्प. आपला संकल्प, आपले ध्येय हे फार आवाक्याबाहेरचे नको तसेच फार साधे, अगदी सहजसाध्य, कुवतीपेक्षा पुष्कळ कमी असेही नको. आपल्या नेहमीच्या जगण्यात, विशेषत: आजच्या काळात तर सम्यक संकल्प फार महत्त्वाचा ठरतो. आपल्या मुलांसाठी अवास्तव अपेक्षा बाळगणारे पालक मुलांसमोर न झेपणारे ध्येय ठेवतात. त्या ध्येयाकडे वाटचाल करताना मुले आणि पालक दोघेही दु:खी होतात. ध्येय साध्य झाले नाही की आत्मविश्वास ओसरू लागतो. ताण येतो. आपण पालकांच्या अपेक्षा पुऱ्या करू शकलो नाही याचे दु:ख होते. अशा वेळी आत्यंतिक निराशेने मुलांनी आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत. याखेरीज संकल्पामध्ये दुराग्रह असू शकतो. खोटी प्रतिष्ठा आणि अहंकारापायी अमुक एक करून दाखवीन आणि मगच विसावेन, या संकल्पामुळे आयुष्यातील मौल्यवान काळ फुकट जाऊ शकतो. मनापासून नको असलेली गोष्ट करणे म्हणजे मानसिक शक्तींचा अपव्यय असतो. दुसरीकडे आळशीपणा करून, आपल्याकडे असलेली शक्ती, ताकद, कौशल्य फुकट घालविणे हे सुद्धा दु:खदच म्हणावे लागेल. ही माणसे आपले आणि समाजाचे नुकसान करीत असतात. तेव्हा कुवतीनुसार समतोल ध्येय म्हणजे सम्यक संकल्प आवश्यक असतो\nहे तिसरे सूत्र आहे, सम्यक वाणी. आपले बोलणे सत्य, सरळ आणि प्रिय असावे. खोटेपणा, ढोंग फसवणूक आपले अनेक तऱ्हांनी नुकसान करतात. आपल्या रोजच्या जगण्यात पुष्कळदा आपण आत काहीतरी दडवतो. एखाद्याबद्दल राग असताना बाहेर मात्र गोड गोड बोलतो. राग दडपल्यामुळे तो वेगळ्या प्रसंगी वेगळ्या मार्गाने बाहेर पडू शकतो. अशी माणसे अकारण हिंसक होऊ शकतात. विपरीत किंवा बदलून न सांगता जे आहे जसं आहे तसं सांगायला हवे . राजाचे हेर किंवा मंत्री खोटे आणि गोड बोलू लागले तर राज्याचा विनाश ओढवेल. स्तुतीही नव्हे आणि निंदाही नव्हे. साधेपणी अहिंसात्मक तऱ्हेने सत्य सांगणे. गरज नसताना वृथा न बोलणे या सर्व बाबी सम्यक वाणीत समाविष्ट होतात.[१]\nचौथं सूत्र आहे सम्यक कर्मात. योग्य ते आणि योग्य तेवढं कर्म करणं म्हणजे सम्यक कर्मात. यात आत्महत्या, चोरी, हिंसा, परस्त्रीविषयी लोभ, अशी सारी कर्मे निषिद्ध आहेत. दुसरीकडे कितीही मिळाले तरी, ‘अजून हवे’ची लालसा न सुटणे, त्यासाठी जिवाच्या आकांताने कर्म करीत राहणे हे सुद्धा वर्ज्य असावे. सगळे ज्ञानी लोक याचा उद्घोष करतात. या संदर्भातील टॉलस्टॉयची कथा प्रसिद्ध आहे. एका माणसाला सांगितले गेले की, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू जिथपर्यंत धावत जाशील तेवढी जमीन तुझी होईल. सूर्यास्तापर्यंत खूप अंतर पार करायला हवे म्हणून तो लोभामुळे जोराने धावत राहिला. सूर्यास्त झाल्यावर तो थांबला आणि अतिश्रमाने मृत्यू पावला. त्याला पुरण्यास साडेतीन हात जमीन पुरेशी झाली. आपल्याला योग्य असे साध्य ठरविल्यावर त्या दिशेने शांतपणे कर्म करत राहणे, म्हणजे सम्यक कर्मात.\nसम्यक उपजीविका हे पाचवे सूत्र आहे. आपली उपजीविका ही आपल्या आवडीनुसार असावी. परंतु त्यापासून इतरांना त्रास, दु:ख, कष्ट, कोणतीही इजा होता कामा नये. उपजीविका सन्मार्गाने करावी. चोरी, फसवाफसवी, पाप, हिंसा करून उपजीविका करू नये. आपण जितक्या खोटय़ा गोष्टी करून आणि इतरांना त्रास देऊन उपजीविका करतो तितके आपण अपराधी, भीतिग्रस्त, संतापी असतो. समाधानी, शांत जीवनापासून वंचित राहतो. चंबळच्या डाकूंना सुद्धा ही गोष्ट अनुभवाला आली म्हणून त्यांनी खून, दरोडे, मारामाऱ्या, लुटालूट सोडून विनोबांपुढे शस्त्रे ठेवीत शरणागती पत्करली व शेतीसारखी कष्टाची पण शांत, समाधानी उपजीविका पत्करली.\nसम्यक व्यायाम हे सहावे सूत्र आहे. वाईट विचार मनात उत्पन्न होऊ नये म्हणून प्रयत्न करणे. उदा. दुसऱ्याचे धन हडप करावे असा विचार मनात नसतो, पण तशी संधी समोर आली तर मोह होऊ शकतो. अशा प्रसंगीही वाईट विचार न करण्याचे वळण मनाला लावायला हवे. वाईट विचारांनी फक्त विध्वंस घडतो. त्यामुळे एकतर मनाला टोचणी लागते किंवा अधिक विध्वंसाची आग भडकते. चांगली कृत्ये करणे, मनात सुविचार उत्पन्न होतील असा प्रयत्न करणे, सुविचार मनात नीट रुजविणे, ते पूर्णत्वाला नेऊन जीवनात त्यांचा अंतर्भाव करणे या मानसिक प्रयत्नांना सम्यक व्यायाम म्हणतात.\nसम्यक स्मृती हे सातवे सूत्र आहे. व्यर्थ ते विसरणे आणि सार्थ ते स्मरणात ठेवणे दैनंदिन जीवनात घडावयास हवे. पण उलटच घडते. वाईट गोष्टींच्या स्मृती पक्क्या होतात. कोणी आपल्याकरता काय केले हे लक्षात राहात नाही. उलट काय केले नाही तेवढे मात्र लक्षात राहते. दैनंदिन जीवनात हे दु:खाला कारणीभूत ठरते. आपल्या शरीरमनातील सुखदु:खादींचे साक्षित्वाने अवलोकन करीत त्यांचे स्वरूप समजावून घेणे, त्याबाबतीत मन सावध, जागृत व संतुलित असणे म्हणजे सम्यक स्मृती.\nसम्यक समाधी हा अंतिम टप्पा आहे. दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करणे कठीण आहे. दु:ख आणि षड्रिपूंच्या पलीकडे जात अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी सात्त्विक मार्गाने जगता जगता हळूहळू मनाची तयारी होऊन ‘हर्ष खेद ते मावळले’ अशी स्थिती आली की मन विशुद्ध आनंदाने भरून जाते. अंतर्यामीच्या या स्थितीला सम्यक समाधी म्हणता येईल.\nलुंबिनी, बोधगया, बोधीवृक्ष, महाबोधी विहार\nजगातील धर्मांमध्ये गौतम बुद्ध\nबौद्ध धर्म विषय सूची\nबौद्ध धर्म • बौद्ध सण • बौद्ध वर्ष\nमहाप्रजापती गौतमी (मावशी, सावत्र आई)\nबुद्धांनी वास्तव्य केलेली स्थळे\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\nभारतामध्ये बौद्ध धर्माचा इतिहास\nभारतामध्ये बौद्ध धर्माचा ऱ्हास\nबौद्ध धर्म आणि रोमन जग\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०१८ रोजी १०:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-04-24T06:42:21Z", "digest": "sha1:YGRH3FATT24U5NFHLMDGTLA7FOWPBICQ", "length": 5173, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "चणे | मराठीमाती", "raw_content": "\nएक मनुष्य खापरात चणे भाजीत असता, ते चणे फड फड करून उडया मारू लागले. ते पाहून, जवळच एक लठ्ठ डोक्याचा मुलगा बसला होता तो म्हणाला, ‘हे चणे किती मुर्ख आहेत यांचे सगळे अंग भाजले जात असता ह्यांना गाणे सुचते आहे, तेव्हा यांच्या शहाणपणाची धन्य आहे, असे म्हटले पाहिजे’.\nतात्पर्य:- अवेळी कोणतीही गोष्ट करणारा मनुष्य स्वतःस हास्यास्पद करून घेतो.\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, इसापनीती कथा, कथा, गोष्ट, गोष्टी, चणे, मुलगा on मार्च 14, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2012/03/blog-post_06.html", "date_download": "2018-04-24T06:58:48Z", "digest": "sha1:RNGDSSZ4KWFD666WNCZDAKHOLKKYAXHH", "length": 14199, "nlines": 326, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: राज ठाकरेंच्या भूमिकेने भाजपाचे कमळ फुलले!", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nमंगलवार, 6 मार्च 2012\nराज ठाकरेंच्या भूमिकेने भाजपाचे कमळ फुलले\nराज ठाकरेंच्या भूमिकेने भाजपाचे कमळ फुलले\nसिद्धेश्‍वर डुकरे - सकाळ न्यूज नेटवर्क\nमुंबई - 'जनमताचा आदर करीत' ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सर्वांत जास्त जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सशर्त पाठींबा देण्याच्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेने भाजपाचे कमळ फुलले आहे राज यांच्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणातील भविष्यकालीन समीकरणे बदलणार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना सत्तापालटासाठी संधी प्राप्त होईल, अशी आशा भाजप नेत्यांना वाटत आहे.\n\"याचसाठी केला होता अट्टाहास, मनसेशी मनोमिलन व्हावे' ही भाजपाची भूमिका असली तरी शिवसेना यात अडसर ठरत होती. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये मनसेला पाठिंबा देण्यावरून भाजपचे नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे विचारणा करण्यास गेले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी \"सत्तेसाठी भलत्या सलत्या बिळात शिरू नका' असा सल्ला या नेत्यांना दिला होता. तरीही भाजपचे नेते हिरमुसले नव्हते. भाजपस शिवसेनेशी काडीमोड घेऊन मनसेबरोबर घरोबा कोणत्याही परिस्थितीत करायचा नव्हता आणि नाही. मात्र मनसेसोबत जेथे शक्‍य होईल तेथे संधान साधता आले तर आपल्या पथ्यावरच पडेल ही आशा भाजपच्या नेत्यांनी सोडली नव्हती. त्यांच्या या आशेला ठाण्यातील वातावरण आणि परिस्थितीने मदत केली. ठाण्यात शिवसेना क्रमांक एकवर असली तरी महापौर पदाचा जादूई आकडा पार करण्यासाठी सेनेला बाहेरच्या रसदीचा गरज होती. त्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या बरोबरचे \"मधूर' संबंध वापरत महायुती-मनसेमधील मनोमिलनामधील अंतर \"ठाणे पॅटर्न'च्या निमित्ताने कमी केल्याचे बोलले जाते. त्यामुळे \"राज ठाकरे यांची आजची भूमिका केवळ एक पाऊल पुढे येण्याची नसून ती झेप आहे', ही बोलकी प्रतिक्रीया भाजपच्या एका नेत्याने व्यक्‍त केली.\nमनसेसोबत आघाडी करावी, हा भाजपश्रेष्ठींचा मनसूबा आता गुपित राहिलेला नाही, असे पक्षात बोलले जाते. शिवसेना-भाजपा-रिपाई-मनसे हा चतुष्कोन 2014 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात सत्तापालटासाठी हमखास उपयोगी पडेल याची खात्री भाजपच्या नेत्यांना आहे. शिवसेना, भाजपा आणि मनसे या पक्षांनी आपली बलस्थाने, ताकद ओळखून आघाडीचा सामना केला तर त्याचा फायदा सर्वांनाचा होणार आहे. या अर्थाने हा चतुष्कोन होणे किती गरजेचे आहे, याचे व्यावहारीक गणितही या नेत्याने सांगितले. विधानसभेच्या सुमारे 100 जागांवर मनसेची मते प्रभाव पाडू शकतात. ही वस्तूस्थिती आमच्या जोडीदाराने जाणून घेतली तर \"कार्याध्यक्षांना' महायुतीचा आताचा त्रिकोण हा चौकान करण्यात काहीही वावगे वाटणार नाही. तरच राज्यात आघाडी सरकारला आपण खाली खेचू शकतो, असे भाजपच्या नेत्यांना वाटत आहे\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nगद्दारी सहन करणार नाही\nशिवसेनेने दाखवला राज यांना कात्रजचा घाट\nमनसेच्या मातोश्रीच्या प्रवासावर नाशिकची सुभेदारी\nराज ठाकरेंच्या भूमिकेने भाजपाचे कमळ फुलले\nठाण्यात मनसेचा शिवसेनेला पाठिंबा- राज ठाकरे\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/modern-pentathlon-competition-in-pune/", "date_download": "2018-04-24T06:48:35Z", "digest": "sha1:JDNRM5WUKH7BAPJQRS6WM2AFZGMQ23OH", "length": 10148, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "८ व्या मॉडर्न पेंटॅथलॉन राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेचे पुण्यात आयोजन - Maha Sports", "raw_content": "\n८ व्या मॉडर्न पेंटॅथलॉन राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेचे पुण्यात आयोजन\n८ व्या मॉडर्न पेंटॅथलॉन राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेचे पुण्यात आयोजन\nपुणे : मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियातर्फे ८ व्या मॉडर्न पेंटॅथलॉन राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ आणि १२ आॅगस्ट २०१७ दरम्यान बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा होणार आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये स्पेन येथे होणाºया जागतिक बायथले आणि ट्रायथले स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड या स्पर्धेतून होणार आहे, अशी माहिती मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष सुनील पुर्णपात्रे यांनी दिली.\nस्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक ११ आॅगस्ट रोजी होणार आहे. यावेळी मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव नामदेव शिरगावकर, प्रशिक्षक जितेंद्र खासनीस उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत धावणे आणि जलतरण या स्पर्धा होणार आहे. ८ वर्षांखालील ते ६० वर्षांवरील खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत.\nसुनील पुर्णपात्रे म्हणाले, स्पर्धेतील ८ वर्षांखालील गटात २०० मीटर धावणे, ५० मीटर पोहणे आणि २०० मीटर धावणे, १३ वर्षांखालील गटात ४०० मीटर धावणे, ५० मीटर पोहणे आणि ४०० मीटर धावणे, १५ वर्षांखालील गटात ८०० मीटर धावणे, १०० मीटर पोहणे आणि ८०० मीटर धावणे, १७ वर्षांखालील गटात १२०० मीटर धावणे, २०० मीटर पोहणे, आणि १२०० मीटर धावणे, १९, २१ व ३९ वर्षांखालील गटात १६०० मीटर धावणे, २०० मीटर पोहणे आणि १६०० मीटर धावणे , मास्टर्स गटात (४० ते ५० वर्षांखालील) १२०० मीटर धावणे, २०० मीटर पोहणे आणि १२०० मीटर धावणे, ६० वर्षांखालील गटात ८०० मीटर धावणे,१०० मीटर पोहणे आणि ८०० मीटर धावणे तसेच अपंग गटात २०० मीटर धावणे, ५० मीटर पोहणे आणि २०० मीटर धावणे अशा स्पर्धा होणार आहेत.\nजितेंद्र खासनीस म्हणाले, स्पर्धा पूर्ण करणाºया प्रत्येक स्पर्धकाला पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. मागील ७ वर्षे महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे. वेदांत गोखले, सवर अकुसकर, अर्जुन अडकर हे मागील वर्षीच्या जागतिक स्पर्धेतील विजेते स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सौरभ पाटील, विराज परदेशी, अजिंक्य बालवडकर, प्रसाद भार्गव, पार्थ खराटे, जुई घम, आदिती पाटील या खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पहायला मिळेल.\nस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक १२ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. यावेळी बाळासाहेब लांडगे, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, एशियन मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशनचे सचिव नामदेव शिरगावकर, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे उपस्थित राहणार आहेत.\n१०० मीटर पोहणे१०० मीटर पोहणे आणि ८०० मीटर धावणे१३ वर्षांखालील गटात ४०० मीटर धावणे१५ वर्षांखालील गटात ८०० मीटर धावणे१६०० मीटर धावणे१७ वर्षांखालील गटात १२०० मीटर धावणे२०० मीटर धावणे२०० मीटर पोहणे\nवाचा एकाच ट्विटमध्ये रोहित शर्माने केलं कोहली, धवन, पंड्याला ट्रोल\nदेशाची पहिली आणि शंभरावी कसोटी खेळणारा तो एकमेव खेळाडू \n2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेतुन नेमबाजी वगळणे भारतासाठी मोठा धक्का – अभिनव…\nरौप्यपदक आणि सुवर्णपदक यातील अंतर आता लक्षात आले – आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू…\nमुंबई शरीरसौष्ठव संघटनेकडून भारत श्री विजेते आणि कुटुंबियांचा गौरव\nएप्रिल हिट राईड : नाईट बीआरएम राईड 38 सायकलिस्टने केली पूर्ण\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathiecards.com/greet_birthday.htm", "date_download": "2018-04-24T06:18:42Z", "digest": "sha1:PFXKXOQIQNVQEQM2IX3F4DT5LGMY7WHM", "length": 6763, "nlines": 134, "source_domain": "marathiecards.com", "title": "मराठी वाढदिवस शुभेच्छापत्रे, मराठी बर्थडे ग्रीटींग्स, marathi birthday greetings, marathi birthday ecards, birthday greetings in marathi", "raw_content": "\nवाढदिवसाच्या वॉलपेपर साठी एथे क्लिक करा\nमराठी शुभेच्छापत्रे English Greetings\n७२ दीराचा वाढदिवस 30 For someone\n६८ वाढदिवस हळूवार मनाच्या माणसाचा 26 For you on your birthday\n६६ तुम्हीच माझे श्रध्दास्थान 24 For Your Birthday\n६५ आनंददायी क्षण 23 Happy Birthday\n६३ जीवनाच्या प्रवाहाचा राजहंस 21 Happy Birthday from all of us\n५७ अभीष्टचींतन वाढदिवसानिमीत्त 15 On Your Special Birthday\n५६ अशा माणसांपैकीच एक तुम्ही 14 Birthday Greetings\n५५ बाबांचा वाढदिवस 13 Wish for you\n५४ बाबा तुमचा वाढदिवस 12 May each birthday\n५३ बहिणीस वाढदिवस अभिष्ट... 11 Its your birthday\n५२ बहिणी तुझी माया 10\n५१ दिदीस वाढदिवस अभिष्ट....... 9\n५० हा वाढदिवस खास आहे 8\n४९ ईश्वरचरणी प्रार्थना 7\n४७ जीवलगाचा वाढदिवस 5\n४६ जीवलगाचा वाढदिवस १ 4\n४५ मुलीचा वाढदिवस 3\n४४ मुलास शुभाशिर्वाद 2\n४३ वाढदिवस प्रेमळ आईचा 1\n४०. प्रिय बहिणीचा वाढदिवस\n३८. साद घालणारी प्रिय सखी\n30. आदरणीय तुम्ही मझ्यासाठी\n27. शुभेच्छाची अमूल्य देणगी\n26. वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा\n25. जीवन म्हणजे काय\n24. शुभेच्छा तुला वाढदिवसाच्या\n23. वाढदिवसाच्या भावस्पर्शी शुभेच्छा\n22. शुभेच्छा जिवाभावाच्या व्यक्तिला\n20 वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा\n17 वाढदिवसाच्या अगणीत शुभेच्छा\n16 वाढदिवस येतो कशासाठी\n15. शुभेच्छांच्या फुलाला भावनांचे गन्ध\n14. आज तुझा वाढदिवस\n8. एक छोटसं फुल\n7. मन हे सांगे\n6. आज तुझा वाढदिवस\n1. गाढ व्हावी मैत्री\nø प्रेम ø मैत्री ø तुझी आ‍ठवण ø वाढदिवस\nø लग्नाचा वाढदिवस ø माफ करा ø अभिनंदन ø आभारी आहे\nø नाताळ ø सेवानिवृत्ती ø नवीन वर्ष\nø मकर संक्रात ø होळी ø गुढीपाडवा ø रक्षाबंधन\nø कृष्ण जन्माष्टमी ø गणेश चतुर्थी ø दसरा ø दिपावली\nø १५ आँगस्ट स्वातंत्र्यदिन ø २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/television/did-you-know/meet-dhanashri-kadgaonkars-husband-durvesh-deshmukh/25214", "date_download": "2018-04-24T06:49:11Z", "digest": "sha1:NSRYVX4BYCF5FFDEVHZ5Q4RQIZQPWRC5", "length": 24751, "nlines": 230, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Meet Dhanashri Kadgaonkar's Husband Durvesh Deshmukh | रिल लाइफ प्रमाणे रिअल लाइफमध्येही विवाहित आहे 'राणा'च्या'वहिनीसाहेब'! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nरिल लाइफ प्रमाणे रिअल लाइफमध्येही विवाहित आहे 'राणा'च्या'वहिनीसाहेब'\nसोशल मीडियावर धनश्रीच्या लग्नाच्या खास फोटोंना खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत.धनश्रीचा हा वेडींग अल्बम नेटीझन्सच्या पसंतीस उतरत असून तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तिच्या साडी पासून ते तिच्या मेकअपपर्यंत सगळ्या गोष्टीची माहिती मिळवत असल्याचे पाहायला मिळत आहेत.\n‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंशी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनीला तुम्ही कसे बरे विसरणार. नंदिनी वहिनी म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगांवकरला या मालिकेमुळे चांगली लोकप्रियता मिळाल्याचे पाहयाला मिळतंय. मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनेही रसिकांचे मनं जिंकली आहेत.या मालिकेतील राणा दा (हार्दिक जोशी) आणि पाठकबाईंच्या (अक्षया देवधर) जोडीनं रसिकांची मनं आधीच जिंकली आहेत.त्यापाठोपाठ धनश्रीही आता सा-यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतेय.रसिकांना नंदिनी वहिनीचा येणारा राग हीच धनश्रीच्या भूमिकेची पोचपावती म्हणावी लागेल. राणादाच्या या वहिनी आणि सूरजच्या पत्नीची भूमिका साकारणारी धनश्री ही ख-या आयुष्यात विवाहित आहे.खुद्द धनश्रीनेच तिच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.ज्यांना धनश्री ही विवाहीत असल्याची बातमी वाचली असणार असे चाहते तरूणांसाठी नक्कीच दुखावली गेले असतील.मात्र सोशल मीडियावर धनश्रीच्या लग्नाच्या खास फोटोंना खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत.धनश्रीचा हा वेडींग अल्बम नेटीझन्सच्या पसंतीस उतरत असून तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तिच्या साडी पासून ते तिच्या मेकअपपर्यंत सगळ्या गोष्टीची माहिती मिळवत असल्याचे पाहायला मिळत आहेत. रिल लाईफमध्ये जितकी धनश्री सुंदर दिसते तितकीच रिअल लाईफमध्येहीधनश्रीवर चाहते फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. धनश्रीचे अरेंज मॅरेज असून डिसेंबर 2013 मध्ये इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले आहे. सध्या मालिकेमुळे घराघरांत पोहचलेली नंदिनी वहिनीच्या (धनश्री) चाहत्या वर्गातही दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.ती सतत फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही अॅक्टिव आहे. त्यामुळे तिचे इन्स्टाग्रामवर तब्बल 1 लाखाहून अधिक फॉलोव्हर्स आहेत.धनश्री छोट्या पडद्याप्रमाणे मोठ्या पडद्यावरही झळकली होती. 'ब्रेव्हहार्ट' या सिनेमातून धनश्रीची मोठ्या पडद्यावर झळकली होती.संग्राम समेळ आणि धनश्री काडगांवकर अशी नवी जोडी रसिकांना या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळाली होती. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेला सध्या चांगलाच टीआरपी मिळत आहे. रांगडा गडी राणा आणि गावातील शिक्षिका अंजली यांची प्रेमकथेप्रमाणे वहिनी साहेबांचा खट्ट्याळपणाही प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे.\nमराठी स्टार्सच्या उपस्थितीत रंगला झ...\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभ...\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभ...\n'शक्ति अस्तित्व के एहसास की' मालिके...\n‘खिचडी’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भ...\nअसा होता बिग बॉस मराठीच्या घरामधील...\n​बिग बॉस मराठीतील या स्पर्धकाला मिळ...\nमोहित मलिकवर अंजली आनंद फिदा\n'कलीरें'मध्ये शिल्पा सकलानी बनणार ख...\nसुपरस्टार रजनीकांत आणि सोनाक्षी सिन...\n‘तीन पहेलिया’ एक थरारक मालिका सादर...\nनिकलोडियनची मुंबई शहराला भेट, टुगेद...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.hindi-marathi-jokes.com/2010/04/funniest-telephonic-conversation.html", "date_download": "2018-04-24T06:54:51Z", "digest": "sha1:JMXESZPSNRMGP6KFZ6U3JERP536C6D4F", "length": 11429, "nlines": 150, "source_domain": "www.hindi-marathi-jokes.com", "title": "Hindi & Marathi Jokes: Funniest Telephonic Conversation", "raw_content": "\nमुलगी - हॅल्लो.... हॅल्लो...\nमम्मी - हां हॅल्लो...\nमुलगी - हॅल्लो, मम्मी मी बोलतेय.\nमम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या \nमम्मी - कशाने गं \nमम्मी - मग काही घेतलस की नाही \nमुलगी - घेतलं ना. दुसरं आईसक्रिम.. म्हटलं काट्यानेच काटा काढावा.\nमम्मी - सुपीक आहेस हो, आज अचानक कसा काय फोन केलास \nमुलगी - अग, 'करेन करेन' म्हणत होते. जमलच नाही. तसं आताच कळलय यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणून. तसा केला फोन.\nमम्मी - खरच की काय \nमुलगी - मग. हवं तेवढं बोलू. फुल्ल टॉकटाईम आहे.\nमम्मी - बरं, तू कशी आहेस \nमुलगी - कशी काय तशीच आहे. पाच फुट दोन इंच, रंग गोरा...\nमम्मी - अग कशी म्हणजे ... मजेत आहेस ना \nमुलगी - अगदी मजेत.\nमम्मी - आणि जावयबापू काय म्हणताहेत \nमुलगी - कुठे काय म्हणतोय तो घरात असला तर म्हणेल ना \nमम्मी - देवा, तुझी सेकंड लेंग्वेज निदान मराठी घ्यायला हवी होती. कसे आहेत जावयबापू \nमुलगी - काय माहीत. असेल कदाचित. त्याचा ना एक प्रोब्लेमच झालाय.\nमम्मी - काय ग, काय झालं \nमुलगी - कसं सांगू लाज वाटते बघ सांगायला.\nमम्मी - अरे देवा, अस झालय तरी काय \nमुलगी - अग त्याला ना...... अ‍ॅसिडीटी झालीय.\nमुलगी - हो ना.... त्याला हा प्रोब्लेम छोटाच वाटतो पण मला किती मोठा प्रोब्लेम होतो म्हणून सांगू \nमम्मी - तुला कसला ग प्रोब्लेम \nमुलगी - अगं, हा कायम पोट धरून आणि मी नाक धरून.\nमम्मी - पण अचानक अ‍ॅसिडीटी कशी काय झालीय \nमुलगी - काही नाही ग. हा सगळा बाहेरख्यालीपणाचा परिणाम\nमम्मी - अग, काय बोलतेस काय तू \nमुलगी - खरं तेच सांगतेय.\nमम्मी - इतक्या कॅज्युअली कसं काय बोलू शकतेस \nमुलगी - आता जे आहे ते आहे. सांगायला लाज कसली \nमम्मी - म्हणजे तुला त्याचा हा बाहेरख्यालीपणा चालतो \nमुलगी - नाईलाज आहे ग माझा. मी तरी काय करू मला नाही जमत.. सकाळी सकाळी उठायला... डबा बनवायला..\nमम्मी - आता हा डबा कुठे आला मध्येच \nमुलगी - अग, मी जेवणाचा डबा बनवून देत नाही म्हणून तर तो...\nमम्मी - तुला हे बोलवतं तरी कसं एवढ्याश्या कारणांमुळे तो दुसर्‍या बायकांकडे जातो आणि तू...\nमुलगी - अग मीच सांगितल त्याला. जा म्हणून.\nमुलगी - घरगुती जेवण असतं त्या बायकांकडे. पण याला काही स्वतःची अक्कल आहे की नाही रोज रोज ती करी, बिरयाणी कशाला खायची रोज रोज ती करी, बिरयाणी कशाला खायची असलं चमचमीत खाल्ल्यावर होणारच ना अ‍ॅसिडीटी.\nमम्मी - तू काय बोलतेयस हेच मला कळत नाही.\nमुलगी - अग, असं उठसुठ बाहेर खाल्ल तर मग दुसरं काय होणार \nमम्मी - याला तू बाहेरख्यालीपणा म्हणतेस \nमुलगी - असं काय करतेस तुझं मराठी एकदम विक झालय बघ. बाहेर खाण्याला हाच शब्द आहे मराठीत.\nमम्मी - कळलं तुझ ज्ञान. एक काम कर, रोज त्याला दुध देत जा.\nमुलगी - चल.... काहीतरीच काय दुध प्यायला तो काय कुक्कुलं बाळ आहे \nमम्मी - अगं, माझ्या बाये, थंड दुध देत जा. त्याने अ‍ॅसिडीटी कमी होईल. अजून काही प्रोब्लेम नाही ना \nमुलगी - नाही कसा हल्ली फारच आंबटशौकीन झालय तो.\nमम्मी - अरे देवा, हे आता काय नवीन \nमुलगी - हो ना. परवा कैर्‍या घेऊन आला, काल आवळे आणि आज लिंबू आणणार आहे म्हणे. लोणचं कर म्हणतो मला कुठे येतय ते मला कुठे येतय ते \nमम्मी - माझ्याकडे पाठव.\nमम्मी - गधडे, कैर्‍या, आवळे माझ्याकडे पाठव. मी देईन लोणचं बनवून.\nमुलगी - तुला कुठे येतं लोणचं बनवायला आपल्याकडे तर जेवणसुद्धा बाबाच बनवतात. लोणचं बनवायला शिकले की काय ते \n अग तुझे बाबा जाऊन चार वर्षे झाली विसरलीस की काय तू मधूराच बोलतेयस ना \nमुलगी - नाही. मी माधूरी.... अय्या, राँग नंबर लागला वाटतं. सॉरी हें... मधुराच्या मम्मी...\nआणखी काही पुणेरी पाट्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t19138/", "date_download": "2018-04-24T06:55:47Z", "digest": "sha1:4W75EF7J4QG3YNTNZM62OZWXYQZ7R5F3", "length": 2721, "nlines": 62, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-काय असते ही कविता ?", "raw_content": "\nकाय असते ही कविता \nAuthor Topic: काय असते ही कविता \nकाय असते ही कविता \nअसते निव्वळ शब्दांची ठेवण ,\nकी त्यात असते एखाद्याचे दीर्घ जीवन …\nअसते केवळ शब्दांचे बिछाने ,\nकी असते एखाद्याचे बिनधास्त तऱ्हाने …\nअसते कविता एकाने केलेले वर्णन ,\nकी जणू आपणच केली आहे अशी वाटणारी शब्दांची घडण …\nअसते एखाद्याची निर्मळ कल्पना ,\nकी जणू आपल्यालाच सुचणाऱ्या अशा काही विचार-धारणा …\nकवितांतून होते भावनांची देवाण-घेवाण ,\nजिच्या मोहक अर्थाने भारावून जातात काहीजण …\nकविता आहेच अशी संकल्पना ,\nसंपूर्ण जगाला जी देऊ शकते अफाट प्रेरणा …\nकाय असते ही कविता \nकाय असते ही कविता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://sonalmm.blogspot.com/2008/12/blog-post_23.html", "date_download": "2018-04-24T06:42:42Z", "digest": "sha1:L4OJE66GLV73VCRRTFFSYQKAODDOQNDM", "length": 13810, "nlines": 141, "source_domain": "sonalmm.blogspot.com", "title": "Silence Speaks..: जीवनाचा आनंद", "raw_content": "\nएकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...\nअसं वाटण्याची जागा मग, मुल झालं की....मोठं घर झालं की..... अशा अनेकांच्या आशा अंगाने वाढतच जाते. दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठिक होईल अशी आपण मनाची समजुत घालतो. मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितच्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरुन जाईल, असं आपल्या वाटत असतं. आपण नवरा-बायको जरा नीट वागायला लागलं की....आपल्या दाराशी एक गाडी आली की...आपल्याला मनाजोगी सुट्टी मिळाली की...निवृत्त झालो की...आपलं आयुष्य कसं सुखानं भरुन जाईल, असं आपण स्वत:शीच घोकत असतो.\nखरं असंय, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणारच आहेत. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलता आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का\nजगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीय , असं बराच काळ वाटत राहतं. पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ ध्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं...आणि अगदी शेवटी कळतं , की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.\nया दृष्टीकोनातुन पाहिलं की कळतं, आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही..\nआनंद हाच महामार्ग आहे... म्हणुन प्रत्येक क्षण साजरा करा.\nशाळा सुटल्यावर... पुन्हा शाळेत जाण्यासाठी... वजन चार किलो कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी.... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणुन...शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी... नव्याको-या गाडीची वाट बघण्यासाठी...पावसासाठी... थंडीसाठी.... सुखद उन्हासाठी... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी आपण थांबुन राहिलेलो असतो.\nएकदाचा तो टप्पा पार पाडला की, सारं काही मनासारखं होईल अशी आपणच आपली समजुत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापुर्वी आनंदी होण्याचं ठरवा. आता जरा या पुढे दिलेल्या पश्नांची उत्तरं द्या पाहु -\n१. जगातल्या पहिल्या दहा सर्वात श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहु.\n२. गेल्या पाच वर्षात विश्वसंदरी किताब मिळवणा-यांची नावं आठवतायत\n३. या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील\n४. गेल्या दोन वर्षात ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का\n असं वाटलं असेल ना तुम्हाला पण असं वाटलं नसलं तरी या प्रश्नांची उत्तरं देनं तसं सोपं नाहीच, नाही का पण असं वाटलं नसलं तरी या प्रश्नांची उत्तरं देनं तसं सोपं नाहीच, नाही का टाळ्यांचा कडकडात हवेत विरुन जातो...पदकं आणि चषक धुळ खात पडतात..जेत्यांचाही लवकरच विसर पडतो..\nआता या चार प्रश्नांची उत्तरं द्या पाहु -\n१. तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे, अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.\n२. तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणा-या तीन मित्रांची नावं सांगता येतील\n३. आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणा-या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला\n४. तुम्हाला ज्यांच्या बरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं.\nक्षणभर विचार करा... आयुष्य अगदी छोटं आहे. तुम्ही कोणत्या यादीत असाल काही अंदाज लागतोय मी सांगतो...जगप्रसिद्ध व्यक्तिंच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये पण हा मेल ज्यांना आवर्जुन पाठवाव असं मला वाटलं, त्या यादीत तुमचें नाव नक्कीच आहे....\nआता एक गोष्ट. काही वर्षापुर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेलेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरु होण्याच्या संकेताची वाट पहात जय्यत तयारीत उभे होते. ही सारी मुलं शारीरीक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती. पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरु झाली. सा-यांनाच पळता येत होतं असं नाही भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं. धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्या काऊन तो पडला आणि रडु लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकुन अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण...\n\"डाउन सिन्ड्रोम\"ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्याजवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि विचारलं \"आता बरं वाटतंय\nमग सा-यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावुन चालत गेले.\nते दृष्य पाहुन मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावुन गेले. उभे राहुन मानवंदना देत सा-यांनी टाळ्यांचा कडकडात केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता...त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजुनही त्या घडनेची आठवण काढतात.\n कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कीतीतरी मोठी असते.\nआयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळेप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.\nशक्य तितक्या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडुन येईल... कदाचित इतरांचही...दुसरी मेणबत्ती लाव्ण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही... नाही का\nअ ब क ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/did-you-know/first-look-of-sara-ali-khan-from-movie-kedarnath/25297", "date_download": "2018-04-24T06:48:07Z", "digest": "sha1:4FITCL7CZLSALD7VYM6SNAEBGCS23RWI", "length": 25074, "nlines": 246, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "first look of sara ali khan from movie kedarnath | ​‘केदारनाथ’मध्ये अशा सिंपल लूकमध्ये दिसणार सैफची मुलगी सारा अली खान! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\n​‘केदारनाथ’मध्ये अशा सिंपल लूकमध्ये दिसणार सैफची मुलगी सारा अली खान\nसैफ अली खान व अमृता सिंह यांची लाडकी लेक सारा अली खान ही आपल्या पहिल्या डेब्यू चित्रपटाबद्दल जितकी उत्सूक आहे,तितकेच चाहतेही. सारा ‘केदारनाथ’द्वारे बॉलिवूड डेब्यू करते आहे. ​‘केदारनाथ’ चित्रपटातील साराचा लूकही समोर आला आहे. या फर्स्ट लूकमध्ये सारा कमालीची सुंदर दिसतेय.\nसैफ अली खान व अमृता सिंह यांची लाडकी लेक सारा अली खान ही आपल्या पहिल्या डेब्यू चित्रपटाबद्दल जितकी उत्सूक आहे,तितकेच चाहतेही. सारा ‘केदारनाथ’द्वारे बॉलिवूड डेब्यू करते आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात साराचा हिरो आहे, सुशांतसिंह राजपूत. सारा व सुशांतने अलीकडे या चित्रपटाच्या शूटींगचे पहिले शेड्यूल संपवले.\nअभिषेक कपूर यांनी स्वत: सारा, सुशांतसोबतचा एक फोटो शेअर करत, याची माहिती दिली आहे. ‘शूटींग शानदार राहिले. डोंगरद-यांमध्ये शूटींग करणे सोपे नसते. वातावरण सतत बदलत असते. पण परमेश्वराची कृपा राहिली आणि पहिले शेड्यूल निपटले,’असे त्यांनी लिहिले. याच चित्रपटातील साराचा लूकही समोर आला आहे. या फर्स्ट लूकमध्ये सारा कमालीची सुंदर दिसतेय. सूटमध्ये असलेली सारा घोड्यावर बसलेली आहे आणि डोक्यावर तिने छत्री पकडलेली आहे. तिच्या मागे उंच पहाड दिसत आहेत. साराचा हा फोटो अतिशय सिंपल आहे पण तरिही ‘लाजवाब’ आहे. निश्चितपणे सारा हा लूक तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला सांगायला विसरू नका.\n‘केदारनाथ’ हा चित्रपट एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे आणि तीर्थयात्रेशी संबधित आहे. येत्या १८ जूनमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.\nमध्यंतरी सारा या चित्रपटाच्या सेटवर बरेच नखरे दाखवू लागल्याची बातमी आली होती. साराच्या नखºयांमुळे चित्रपटाचा संपूर्ण क्रू वैतागला असल्याचे यात म्हटले गेले होते. ड्रेस आणि मेकअपबद्दल जरा जास्तच सिलेक्टिव्ह असल्यामुळे शूटींगचा वेळोवेळी खोळंबा होत असल्याचेही या बातमी म्हटले गेले होते. अर्थात नंतर मेकर्सनी ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले होते.\nALSO READ : केदारनाथच्या सेटवर सारा अली खान दाखवतेय नखरे \nसुशांतचा या आधी आलेला ‘राबता’ बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला होता. त्यामुळे ‘केदारनाथ’कडून त्याला अधिक अपेक्षा आहेत. ‘केदारनाथ’नंतर सुशांत ‘चंदामामा दूर के’ या चित्रपटात बिझी होणार आहे. याशिवाय ‘फॉल्ट इन अवर स्टार्स’ या हॉलिवूडपटाच्या रिमेकमध्येही त्याची वर्णी लागली आहे. द ग्रेट खलीच्या बायोपिकमध्येही सुशांत दिसणार असल्याची चर्चा आहे.\n​सारा अली खानसाठी आनंदाची बातमी\n​ सारा अली खानच्या ‘डेब्यू’च्या मार...\n​सुशांत सिंग राजपूतने घेतला ‘केदारन...\n​राधिका आपटेने या अभिनेत्याला म्हटल...\n​सारा अली खानचे ताजे फोटो...तुम्हाल...\n ​सुशांत सिंग राजपूतच्या ‘मूड...\n​‘लव्हबर्ड्स’ सुशांत सिंग राजपूत व...\n​‘या’ रिमेकमध्ये सुशांत सिंग राजपूत...\n​- तर चित्रपटात ‘न्यूड’ होण्यास सुश...\nसुशांत सिंह राजपूतसोबतच्या रिलेशनशि...\n ​भर रस्त्यात ड्रायव्हरशी भिडल...\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टी...\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री...\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले...\n होय, हुमा कुरेशीला ओळ...\n​शाहरुख खानची पहिली कमाई होती केवळ...\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का...\n​‘अल्कोहोलिक’ म्हणताच भडकली पूजा भट...\nसोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या लग्नाच...\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर...\n​सारा अली खानचे आई अमृता सिंग व डिम...\nपाहा, मिलिंद सोमण आणि अंकिता कंवर य...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://jeevantarang.wordpress.com/2011/03/", "date_download": "2018-04-24T06:34:35Z", "digest": "sha1:AOEOUVZ7CREJ5D66CZQXVJBUX7P4MSNV", "length": 22974, "nlines": 103, "source_domain": "jeevantarang.wordpress.com", "title": "मार्च « 2011 « जीवनतरंग....", "raw_content": "\nविचार… मत… अनुभव… वास्तव….निरीक्षणें….\nट्रॅफिकचे नियमांचं पालन करायचं असतं कां\nकाल मी एका ट्रॅफिक सिग्नलवर तो सिग्नल हिरवा व्हायची वाट पहात होते त्या ३०-३५ सेकंदात जे घडलं ते पाहून वरचा प्रश्न माझ्या मनात आला. तर काल घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा नाशिकच्या अगदी मेन रोडवर सिग्नलसाठी थांबावे लागले. आता या सिग्नलवर (चक्क ) चालू असलेल्या ‘टायमर’ मुळे कळाले की सिग्नल सुटायला अजून ५१ सेकंद बाकी आहेत. मग स्कूटीचे इंजिन बंद करून सिग्नल सुटायची वाट पहात थांबले. हळूहळू वाहनांची गर्दी वाढायला लागली. सिग्नल सुटायला ३१ सेकंद बाकी असताना तीन बाईकस्वार आले. म्हणजे एकाच बाईकवर तिघेजण होते आणि जोरजोरात , कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत , बाकीच्या वाहनांना सरकून जागा द्यायला लावत ते पुढे आले. सिग्नल सुटायला अजून २७ सेकंद बाकी होते. मग “च्याxxx, एवढा वेळ वेट कोण करणार) चालू असलेल्या ‘टायमर’ मुळे कळाले की सिग्नल सुटायला अजून ५१ सेकंद बाकी आहेत. मग स्कूटीचे इंजिन बंद करून सिग्नल सुटायची वाट पहात थांबले. हळूहळू वाहनांची गर्दी वाढायला लागली. सिग्नल सुटायला ३१ सेकंद बाकी असताना तीन बाईकस्वार आले. म्हणजे एकाच बाईकवर तिघेजण होते आणि जोरजोरात , कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत , बाकीच्या वाहनांना सरकून जागा द्यायला लावत ते पुढे आले. सिग्नल सुटायला अजून २७ सेकंद बाकी होते. मग “च्याxxx, एवढा वेळ वेट कोण करणार” असं म्हणत तो सिग्नल तोडून पुढे निघाले, जात असताना मागच्यांना मूर्खात काढायला विसरले नाहीत. आता परिस्थिती अशी होती की आमच्या उजव्या बाजूचा सिग्नल संपून ३ सेकंद झाले होते तरीही तिकडची वाहने जाण्याचे थांबले नव्हते, आमच्या समोरचा सिग्नल चालू होता आणि तिकडूनही वाहने जाणे चालू होते, तशात हे ‘सिग्नल तोडे’ मधे घुसलेले…..त्या तिघांनी जोरजोरात , कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत वाजवत पुढे जाणे चालू ठेवले, बाकिच्यांनी त्यांचा उद्धार चालू केला तरी त्यांना काही फरक पडत नव्हता , कारण त्यांना असं किती अंतर पार करायचं होतं ” असं म्हणत तो सिग्नल तोडून पुढे निघाले, जात असताना मागच्यांना मूर्खात काढायला विसरले नाहीत. आता परिस्थिती अशी होती की आमच्या उजव्या बाजूचा सिग्नल संपून ३ सेकंद झाले होते तरीही तिकडची वाहने जाण्याचे थांबले नव्हते, आमच्या समोरचा सिग्नल चालू होता आणि तिकडूनही वाहने जाणे चालू होते, तशात हे ‘सिग्नल तोडे’ मधे घुसलेले…..त्या तिघांनी जोरजोरात , कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत वाजवत पुढे जाणे चालू ठेवले, बाकिच्यांनी त्यांचा उद्धार चालू केला तरी त्यांना काही फरक पडत नव्हता , कारण त्यांना असं किती अंतर पार करायचं होतं (आणि महत्वाचं म्हणजे भारत-पाकिस्तान मॅच थोड्याच वेळात चालू होणार होती नां (आणि महत्वाचं म्हणजे भारत-पाकिस्तान मॅच थोड्याच वेळात चालू होणार होती नां) इतर कुणाच्या लक्षात येईपर्यंत ते दुसर्‍या टोकाला पोचले सुध्दा आणि निघूनही गेले. मग आमच्यासारखे जे अजूनही सिग्नल सुटायची वाट पहात होते, त्यांच्यात आपापसात बोलणं चालू झालं ,”पाहिलंत, काय ती पोरं”, “च्याxxx, आपण काय वेडे म्हणून सिग्नल सुटायची वाट पहात थांबलोय कां) इतर कुणाच्या लक्षात येईपर्यंत ते दुसर्‍या टोकाला पोचले सुध्दा आणि निघूनही गेले. मग आमच्यासारखे जे अजूनही सिग्नल सुटायची वाट पहात होते, त्यांच्यात आपापसात बोलणं चालू झालं ,”पाहिलंत, काय ती पोरं”, “च्याxxx, आपण काय वेडे म्हणून सिग्नल सुटायची वाट पहात थांबलोय कां” , “कानाला धरून एकेकाला ट्रॅफिकचे नियम शिकवायला पाहिजेत”, “बापाकडे पैसा असेल चिक्कार , मग सुचतात असले धंदे. “……\nखरंच रहदारीचे नियम हे प्रत्येकाला माहिती असतात पण त्याचं पालन मात्र आपल्या सोईनुसार, स्वभावानुसार, सव‌यीनुसार केलं जातं. आमच्या ऑफिसच्या उजव्या बाजूचा रस्ता हा फक्त जाण्यासाठी वन-वे आहे आणि डाव्या बाजूचा रस्ता मागच्या रस्त्यावरून येण्यासाठे वन-वे आहे. पण प्रत्येकालाच घाई एवढी असते की तो वन-वे चा बोर्ड पहाण्याइतकाही कुणाला वेळ नसतो. थोडंसंच अंतर जायचं म्हणून चुकिच्या दिशेने वाहने चालवली जातात. जोराजोरात हॉर्न वाजवत १००-१२० च्या वेगात वाहन चालवणं, पुढे जाताना मागच्या वाहनाला ‘कट’ मारून पुढे जाणं हे तर खूप कॉमन झालंय्‌…आपल्याला पुढे उजव्या/डाव्या बाजूला वळायचं आहे, तर आपले वाहन थोडं आधीपासूनच त्या दिशेला चालवणं हे योग्य असतं. कळतंय्‌ पण वळत नाही. अर्थात या नियमांचं पालन हे आवर्जून केलं जातं पण कधी तर ‘मामा’ आपल्या नजरेच्या टप्प्यात असेल तर एरवी चलने दो. मग जे प्रामाणिकपणे नियम पाळतात, त्यांनाही कधीतरी वाटतंच की “अरे,आपणच काय घोडं मारलंय्‌ म्हणून आपण शिस्तीत वागायचं तर ‘मामा’ आपल्या नजरेच्या टप्प्यात असेल तर एरवी चलने दो. मग जे प्रामाणिकपणे नियम पाळतात, त्यांनाही कधीतरी वाटतंच की “अरे,आपणच काय घोडं मारलंय्‌ म्हणून आपण शिस्तीत वागायचं” मग तेही ह्ळूहळू नियमांचं उल्लंघन करू लागतात. (सगळेच असं करत नाहीत. याची कृ. नों. घ्या.)\nशेवटी शिस्त पाळणं हे आपल्याच फायद्याचं असतं. वरच्या प्रसंगात जर काही अपघात झाला असता तर गाडीचं झालेलं नुकसान भरून येऊ शकेल, पण त्या व्यक्तीला काही दुखापत झाली तर त्याच्या आयुष्यातले काही महत्वाचे तास, दिवस, वर्षे वाया जातात, त्याची मोजदाद कशातही करता येत नाही. आपल्याला स्वत:ला काही झालं तर ठिक आहे, आपल्याच चुकीनं हे घडलं म्हणून पश्चाताप तरी करता येईल पण जर आपल्या चुकीची सजा दुसर्‍या कुणाला भोगावी लागली तर आयुष्यभर ही गोष्ट पोखरत राहते. तेव्हा कृपया रहदारीचे नियम पाळा, जे पाळत आहेत त्यांनी तसंच चांगलं वागणं चालू ठेवा आणि इतरांनाही रहदारीच्या नियमांचं पालन करण्यासाठी प्रवृत्त करा……\n(कोणाला सल्ला देण्याएवढी मी मोठी नाहीय्‌, पण कळकळीनं जे सांगावसं वाटलं ते इथं सांगितलेय्‌….)\n१ प्रतिक्रिया Posted in दैनंदिन घडामोडी, नविन काहीतरी Tagged ट्रॅफिकचे नियम, फायदा, रहदारीचे नियम, सिग्नल\nलहानपणी जाग यायची ती रेडीओवर वाजणार्‍या लता मंगेशकर, आशा भोसले किंवा सुमन कल्याणपूरच्या सुमधूर आवाजातील भजनाने किंवा भक्तीसंगीताने. मग बातम्या, प्रभातीचे रंग ( त्याची टायटल लाईन अजून आठवतेय – “काही बातम्या, घडामोडी आणि संगीतावर आधारीत विशेष कार्यक्रम“), कृषीवाणी वगैरे ऎकत शाळेची तयारी व्हायची कशी व्हायची ते कळायचे नाही. त्यावेळी कोल्हापूरला सांगली आकाशवाणी केंद्र लागायचे. त्यावरची फिनोलेक्स पाईपची जाहीरात अजूनसुद्धा त्याच्या र्‍हीदमसकट आठवतेय. ” —– पाणी, आणायचं कुणी सांगतो राणी… फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावाणी…. फिनोलेक्स पाईप“…. टंग्‌ssssss . हा टंग्‌ssssss तर आकाशवाणीचा खास असायचा. एका कार्यक्रम संपला हे यातून कळायचे. त्यावेळेपासून फार इच्छा होती की हे आकाशवाणी केंद्र आतून पहायचे. तिथे ध्वनीमुद्रण कसे चालते ते पहायचे. पण तो योग काही तेव्हा आला नाही.\nआमच्या इन्स्टीट्यूटने नाशिक आकाशवाणीवर ‘हार्डवेअर आणि नेटवर्कींग’ वर एक शैक्षणिक मालिका करायचे ठरवले. तेव्हा ही मनातली इच्छा परत उफाळून आली. मी आमच्या मॅमना म्हंटलं, “मी नेटवर्कींगचा एक एपिसोड करू कां” चक्क दोन एपिसोडची परवानगी मिळाल्यावर आधी पूर्ण भाषण लिहून काढले. आम्हाला प्रत्येक एपिसोडसाठी साडेतीन मिनिटे मिळणार होती , त्यात कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्कींगची माहिती द्यायची होती. आकाशवाणीवर भाषण द्यायचे म्हणून व्यवस्थित मराठीत (बरहाताईंच्या मदतीने) सर्व माहिती लिहून काढली. सर्व टेक्निकल माहिती मराठीत लिहताना बरीच झटापट करावी लागली. मग हे भाषण वेळ लावून वाचून पाहिले तर ५ मि. ५० से. लागले. मग काटछाट केली, काही मुद्यांचे स्पष्टीकरण कमी केले आणि पुन्हा एकदा वाचले तर ३ मि. २५ से. लागले. आमच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली.\nआकाशवाणीकडून ध्वनीमुद्रणासाठी शनिवार दुपार ४.३० ची वेळ मिळाली होती. शनिवारी आम्ही तिथे पोचलो. मनात आधीच दडपण होते. पूर्वी शाळेत असताना नाट्यवाचन, नाट्यछ्टा, शालेय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वगैरे मी केले होते. तेव्हा शिकलेल्या काही गोष्टी म्हणजे आवाजाची पातळी कशी ठेवायची, पॉज कुठे, कसा, किती घ्यायचा, आवाजात चढउतार कसा करायचा, बोलताना वाक्य अगदी शेवटच्या शब्दापर्यंत पूर्ण म्हणायचे याची मनातल्या मनात उजळणी चालू होती. तो आकाशवाणीचा साउंडप्रूफ स्टुडीओ, भिंतींवर लावलेले वेलवेट, कॉम्प्युटरला जोडलेले ध्वनिमुद्रणाचे मशिन (‘लगे रहो मुन्नाभाईत’ विद्या बालन RJ दाखवली आहे, त्यात ते मशिन दाखवलंय्‌), दोन मोठे माइक्स, खुर्ची सरकवल्याचाही आवाज होऊ नये म्हणून जमिनीवरही अंथरलेले वेलवेटचे कार्पेट, मोठे मोठे स्पीकर्स आणि हेडफोन्स ….. हळूहळू धडधड वाढायला लागली होती.\nध्वनिमुद्रण करणार्‍या सरांनी सांगितले,” हे बघा, अजिबात टेंशन घेऊ नका. एकदम रिलॅक्स आणि आवाजात फुल थ्रो देऊन बोला. ( हे म्हणजे फोटोग्राफरने ‘मी आता फोटो काढतो, एकदम नॅचरली हसा’ असे सांगण्यासारखे होते. असो) असं समजा की तुम्ही तुमच्या वर्गात विद्यार्थ्यांसमोर बोलताय्‌ आणि हे बघा बोलताना काही चुकलं तर थोडा जास्त पॉज घेऊन तेच वाक्य परत म्हणायचं. जिथे ‘फ’ चा उच्चार करायचा असेल तिथे मान थोडी बाजूला करून बोला. डायरेक्ट माईकवर बोललेला ‘फ’ ऎकायला गोड वाटत नाही“. एका दमात सगळ्या सुचना देऊन झाल्या. पहिल्यांदा माझी ‘साउंड टेस्ट’ घेतली. त्यात आवाज एकदम ओके आहे असे कळल्यावर जीव भांड्यात पडला. मग चालू झाले रेकॉर्डींग. मी ठरवल्याप्रमाणे वाचायला सुरवात केली. “थांबा, असं वाचल्यासारखं बोलू नका हो. तुम्ही आकाशवाणीवरून श्रोत्यांशी संवाद साधताय्‌. तेव्हा एकदम बोली भाषा ठेवा. श्रोतेहो अशी काही काही वाक्यांची सुरवात करायची म्हणजे ऎकणारी लोकं रीलेट करतात कार्यक्रमाशी. चला परत सुरवात करू” . मग नंतर आवाजाचा टोन, एकूण भाषण वगैरे छान झाले. पण एका दमात भाषण झाल्यामुळे सुरवात दमदार आणि आवाजाची पातळी नंतर कमी कमी झाली होती. असे ४ –५ रीटेक झाल्यावर भाषण ओके झालं. आता मी व्यवस्थित भाषण करू शकते असा विश्वास आला आणि दुसरं भाषण चक्क २ टेकमध्ये ओके झालं. नंतर ध्वनीमुद्रण केलेली दोन्ही भाषणं त्यांनी ऎकवली.\nमाझा विश्वासच बसत नव्हता की लहानपणीची इच्छा पूर्ण झाली आणि माझ्या आवाजाचं आकाशवाणीवर ध्वनीमुद्रण झालं आहे. तिथे असणार्‍या असिस्टंट मॅमनी मला सांगितले “तुमचा आवाज खूप गोड आहे आणि रेडीओला सुटेबल आहे. तुम्ही आकाशवाणीवर ऑडीशन टेस्ट कां देत नाही तिथे असणार्‍या असिस्टंट मॅमनी मला सांगितले “तुमचा आवाज खूप गोड आहे आणि रेडीओला सुटेबल आहे. तुम्ही आकाशवाणीवर ऑडीशन टेस्ट कां देत नाही मी आत्ताच सांगते की तुम्ही पास झाल्या आहात. तुम्ही तुमची नोकरी सांभाळूनही आकाशवाणीवर अनाऊन्सर म्हणून काम करू शकता…..” अरे काय ऎकतेय्‌ मी मी आत्ताच सांगते की तुम्ही पास झाल्या आहात. तुम्ही तुमची नोकरी सांभाळूनही आकाशवाणीवर अनाऊन्सर म्हणून काम करू शकता…..” अरे काय ऎकतेय्‌ मी ‘आंधळा मागतो एक नी देव देतो दोन डोळे’ अशी माझी गत झाली होती. तसं मला खूप जणांनी सांगितलं आहे की तुमचा आवाज गोड आहे, उच्चार खूप स्पष्ट आणि शुद्ध आहेत म्हणून , पण लहानपणापासून जे एक आवाजाचं स्टॅंर्ड्ड मनात होतं तिथून सर्टीफिकेट, कौतुक मिळणं हे खूप छान वाटलं.\nता.क – तिथून परत आल्यावर माझी मनस्थिती अगदी ‘आज जमींपर नही है मेरे कदम’ अशी होती– इति माझा नवरा. \n4 प्रतिक्रिया Posted in नविन काहीतरी Tagged आकाशवाणी, इच्छापूर्ती, गोड आवाज, ध्वनीमुद्रण\nस्टीफन कोवेचे ९०-१० तत्त्व\nहोतं असं कधी कधी….\nसर्वाधिक वाचल्या गेलेल्या पोस्टस्‌\n« फेब्रुवारी मे »\n मग पुढचे लिखाण तुमच्या ई-मेल वर मिळवा.... इथे तुमचा ई-मेल पत्ता द्या.....\nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://live.anandnagri.com/news/health/2330/How_nvadhatya_unhapasuna_read!.html", "date_download": "2018-04-24T06:56:31Z", "digest": "sha1:WY64QXESGXJIGDYKVY6SVHDO2ACW3NPG", "length": 7212, "nlines": 91, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " ंवाढत्या उन्हापासुन कसे वाचाल! - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nंवाढत्या उन्हापासुन कसे वाचाल\nवाढत्या उन्हाचा त्रास सगळ्यांनाच होत आहे. यापासून रक्षण करण्यासाठी शूज, हात-पाय मोजे, गॉगल, छत्री, स्कार्प, सनस्क्रीन लोशन याचा वापर केला जात आहे. परंतु याबरोबरच काही घटकांचाही आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही निरोगी राहू शकाल. या काही टिप्स तुम्हाला उन्हाळ्यातही ठेवतील फिट\n1) पाणी- सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी पिणे. यामुळे बॉडी डिटॉक्स होते आणि पचनक्रियाही चांगली होते.\n2) झोप - रोज सहा ते आठ तास झोप घ्या. यामुळे तुम्ही निरोगी आणि फ्रेश राहाल.\n3) मीठ - पौष्टिक ब्रेकफास्टने सकाळची सुरुवात करा, परंतु यात मिठाचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा. सकाळी मीठ कमी खाल्ल्यास चरबी कमी होते.\n4) भाज्या आणि फळं- यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते. तसेच पचक्रियाही सुरळीत होते.\n5) व्यायाम - सकाळ-सकाळी व्यायाम केल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित होते. तसेच जास्त असलेली चरबी कमी करण्यास मदत होते.\n6) ब्रेकफास्ट - सकाळचा ब्रेकफास्ट कधीही टाळू नका. तुम्ही जर दिवसाची सुरुवात पौष्टिक ब्रेकफास्टने करत असाल तर दिवसभर तुम्ही फ्रेश राहून काम करू शकाल.\n7) पायऱ्या - लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांचा वापर करा. यामुळे ऊर्जा खर्च होऊन तुमच्या शरीरावर चरबी सुटणार नाही.\nउन्हाळ्यात कसे जपाल आरोग्य\nउन्हाळ्यात कसे जपाल आरोग्य\n8) कांदा - उन्हात फिरत असताना जवळ कांदा ठेवावा. कांदा तुमच्या शरिरापर्यंत उन्हाची झळ येऊ देत नाही. विशेषतः पांढरा कांदा ठेवल्यास तो संध्याकाळपर्यंत पिवळसर पडतो. त्याने तुम्हांला उन्हाचा त्रास होत नाही.\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nजिल्ह्यात 203 अंगणवाड्या आयएसओ\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/hollywood/news/avatar-sequel-again-postponed/18917", "date_download": "2018-04-24T06:43:01Z", "digest": "sha1:DQJEZODXMNSJGBPI56BPKXQUAOC46BNZ", "length": 22525, "nlines": 231, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Avatar sequel again postponed | ‘अवतार’चा सिक्वल पुन्हा एकदा टळला! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\n‘अवतार’चा सिक्वल पुन्हा एकदा टळला\n​दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांनी स्पष्ट केले की, ‘अवतार’ या सिनेमाचा सिक्वल पुन्हा एकदा टळला आहे. एका मुलाखतीत कॅमरून यांनी म्हटले की, ‘अवतार’ या सिनेमाचा सिक्वल २०१८ पर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहचविला जाईल, अशी चर्चा होती.\nदिग्दर्शक जेम्स कॅमरून यांनी स्पष्ट केले की, ‘अवतार’ या सिनेमाचा सिक्वल पुन्हा एकदा टळला आहे. एका मुलाखतीत कॅमरून यांनी म्हटले की, ‘अवतार’ या सिनेमाचा सिक्वल २०१८ पर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहचविला जाईल, अशी चर्चा होती. मात्र आता ही चर्चा फोल ठरणार असून, पुन्हा एकदा सिक्वलच्या निर्मितीत बदल करण्यात आले आहे.\nपुढे बोलताना कॅमरून म्हणाले की, आम्ही अद्यापपर्यंत सिनेमाच्या रिलीजची घोषणा केलेली नाही. जेव्हा त्यांना सिनेमाच्या निर्मितीत विलंब का होत आहे, याविषयीचे कारण विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, लोकांना एक गोष्ट समजायला हवी की आम्ही ‘अवतार-२’ बनवित नसून, २, ३, ४ आणि ५ या सर्व भागांची निर्मिती करणार आहोत.\nत्यामुळे ही बाब म्हणावी तेवढी सोपी नाही. मुळात ही कल्पनाच एखाद्या महाकाय उपक्रमाप्रमाणे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे थोडे वेगळे असले तरी, आम्ही ते प्रत्यक्षात आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कॅमरून यांच्या स्टुडिओच्या सहकाºयाने २००९ च्या विज्ञानावर आधारित ‘महाकाव्य यूबी सॉफ्ट’ हा एक नवा व्हिडीओ गेम बनविला आहे. यूबी सॉफ्ट व्हिडीओम गेम बनविणारी एक कंपनी असून, त्यांच्यासोबत आम्ही अवतारची निर्मिती करणार आहोत.\nअवतार हा जगभरात रोमांचक आणि अद्भुत असेल हे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो. जेव्हा अवतार रिलीज होणार तेव्हा जगभरात त्याची चर्चा असेल, असा विश्वासही कॅमेरून यांनी व्यक्त केला. दरम्यान ‘अवतार’ एक वेगळी दुनिया दाखविण्यात आली होती. प्रेक्षकांनी त्यास जबरदस्त पसंती दिली होती. त्यावेळी अवतारने कमाईचे अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले होते.\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर...\nएक्समॅन ह्यू जॅकमॅनने केले चाहत्या...\nदिग्दर्शक संजय जाधव यांचा नवीन उपक्...\n#MeToo : प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलास...\n‘हॅरी पॉटर’च्या चाहत्यांसाठी गुड न्...\nBox Office : या चित्रपटाने महिनाभरा...\nOscars 2018 : आॅस्कर सोहळ्यात ‘या’...\nOscars 2018 : आॅस्कर सोहळ्यापूर्वीच...\nकिम कर्दाशियांला भारतीयांच्या या दो...\nरॅम्बोच्या निधनाची अफवा पसरविणारे म...\n​६१ वर्षांच्या या अभिनेत्याने कमी क...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/lifestyle/beauty-and-makeup/this-oil-is-useful-for-new-hair-growth/21378", "date_download": "2018-04-24T06:48:26Z", "digest": "sha1:4D3L2TYJGXN2QN5ALCLLL4AZDHS7JOWP", "length": 22169, "nlines": 248, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "this-oil-is-useful-for-new-hair-growth | Beauty : डोक्यावर नवे केस हवे असल्यास या तेलाचा असा करा वापर ! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nBeauty : डोक्यावर नवे केस हवे असल्यास या तेलाचा असा करा वापर \nआपणही या समस्येने त्रस्त असाल तर खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार तेल बनविल्यास आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास नक्की फायदा होईल.\nशरीरातील हार्मोनल बदल तसेच इतर कारणाने बहुतांश लोकांना केस गळतीची समस्या आहे. या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी बरेच प्रयत्नदेखील केले जातात. त्यात केमिकल्स उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याचा फायदाऐवजी नुकसानच जास्त होताना दिसते. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार तेल बनविल्यास आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास नक्की फायदा होईल.\n* तेल बनविण्यासाठी साहित्य\n२-३ ताजे आवळे, ६-७ लसणाच्या पाकळ्या, ३ चमचे एरंडेल तेल, ४ चमचे नारळाचे तेल आणि १ छोटा चिरलेला कांदा,\n* कसे बनविणार तेल \nएका बाऊलमध्ये नारळ आणि एरंडेल तेल एकत्र घेऊन मिश्रण तयार करा. या मिश्रणात लसणाच्या पाकळ्या, कांदा आणि आवळा मिसळून मंद आचेवर ५ मिनिटांसाठी ठेवा.\nथंड झाल्यानंतर हे तेल वापरु शकता. या तेलाचा नियमित वापर केल्यास केसांचा गळणे कमी होईल तसेच नवे केस उगवण्यास सुरुवात होईल.\nAlso Read : ​HEALTH TIPS : केस गळतीची समस्या आहे, तर रोज ‘हे’ खा \n​​OMG : डोक्याला टक्कल पडलीय, करा १० घरगुती उपाय \n​कमी बजेट चित्रपटांनी केली बक्कळ कम...\nआॅईली स्कीनची अशी घ्या काळजी\n​स्वप्निल जोशीचे NO. 1 यारी विथ​ स्...\nPadman review : गंभीर विषयावर हलक...\n​पॅडमॅननंतर आता मिल्कमॅनवर बनवला जा...\nभूमी पेडणेकरला करायचंय दंगल-2 काम\n​Beauty : चेहऱ्यावरील पिंपल्स दूर क...\nBeauty : ​गुलाब तेलाने खुलवा सौंदर्...\nBeauty : दाट व आकर्षक पापण्यांसाठी....\nआला गुलाबी थंडीचा महिना,कशी घ्याल त...\nचेह-यावरील काळ्या डागांमुळे हैराण आ...\n​ऐश्वर्या राय बच्चनने गुपचूप आॅर्डर...\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक न...\nघरगुती शॅम्पूने खुलवा केसांचे सौंदर...\nरिमुव्हर शिवाय काढा नेलपॉलिश\nडागरहित उजळ त्वचेसाठी हळद उपयुक्त\nउन्हाळ्यात घ्या केसांची काळजी\nBeauty : स्टोन मसाज थेरपीने असे खुल...\n​सेलिब्रिटींसारखे गुलाबी ओठ हवे आहे...\nआता बिनधास्त वापरा 'बॅकलेस ब्लाऊज'...\n​लग्नाच्या बांगड्या खरेदी करताना ‘ह...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathiecards.com/GREETINGS.HTM", "date_download": "2018-04-24T06:19:50Z", "digest": "sha1:J3UFTLM7TZ6XY3Q2UHPOTOROYIVTI55H", "length": 6726, "nlines": 152, "source_domain": "marathiecards.com", "title": "मराठी शुभेच्छापत्रे , मराठी ग्रीटींग्स Free Greetings, Indian Greetings, Marathi Greetings, Love Greetings marathiecards.com/ shreeyoginfo.com", "raw_content": "\nø प्रेम ø मैत्री ø तुझी आ‍ठवण ø वाढदिवस\nø लग्नाचा वाढदिवस ø माफ करा ø अभिनंदन ø आभारी आहे\nø नाताळ ø सेवानिवृत्ती ø नवीन वर्ष\nø मकर संक्रात ø होळी ø गुढीपाडवा ø रक्षाबंधन\nø क्रुष्ण जन्माष्टमी ø गणेश चतुर्थी ø दसरा ø दिपावली\nø १५ आँगस्ट स्वातंत्र्यदिन ø २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन,\nTruly Dear Friend आपली मैत्री गोड सुरेल.\nDear friends आपली मैत्री अथांग\nYour Friendship मैत्री तुझी माझी\nWish for you ५० वा वाढदिवस\nMay each birthday शुभेच्छा तुला वाढदिवसाच्या\nIts your birthday वाढदिवसाच्या भावस्पर्शी शुभेच्छा\nHappy Birthday शुभेच्छा जिवाभावाच्या व्यक्तिला\nMy birthday wish शुभेच्छा वाढदिवसाच्या\nI Love You हळुवार पावलांनी\nFrom Me To You हे बंध रेशमाचे\nRetirement सेवा निवृत्ती Top\nNew Year नवीन वर्ष\nHappy new year. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nNew year greeting. नववर्षासाठी शुभेच्छांची किरणे\nLoving wishes. नुतन वर्षाभिनंदन\n15 August / स्वतंत्र दिन, 26 January / प्रजासत्ताक दिन / 1 may / महाराष्ट्र दिन\nOn independence Day (flash) स्वातंत्रदिन शुभेच्छा\nमराठी सणांची शुभेच्छापत्रे :-\nWishes for gudhipadwa गुढी उभारु प्रेमाची\nगुढीपाडवा सण हा आला\nमंगल दिन आज आला\nWith greeting on rakhi रक्षाबंधनाच्या अगणित शुभेच्छा\nRakhi For You. मेरे प्रिय भैया के लीए\nFor A Brother राखी रेशमी धागा\nLoving Wishes On Rakhi. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा (Flash)\nKrishna janmasthmi क्रुष्ण जन्माष्टमी Top\nश्री गणेशाय नमः (Flash)\nVery special day सोनेरी शुभेच्छा\nमराठी वॉलपेपर (दसरा व नवरात्र)\nWarm wishes शुभ संक्रात १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/history/", "date_download": "2018-04-24T07:05:24Z", "digest": "sha1:7KAUMZVAVW2MW54XOPINRCNGNDQPRQIR", "length": 8398, "nlines": 104, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "history - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nश्रीसूक्तावरील प्रवचनासंबंधीची सूचना (Announcement Regarding The Discourses On Shree-Suktam) श्रीहरिगुरुग्राम येथे गुरुवार दिनांक १२ मार्च २०१५ रोजी ‘श्रीश्वासम्’बद्द्ल सद्‍गुरु श्री अनिरुद्ध म्हणजेच बापू स्वत: माहिती देणार आहेत. त्याचबरोबर त्यापुढील गुरुवारपासून बापू ‘श्रीसूक्ता’वर (Shree-Suktam) बोलण्यास सुरुवात करणार आहेत हेदेखील बापुंनी सांगितले. श्रीसूक्तात पवित्र, शुभ, मंगल असे सर्व काही आहेत. श्रीसूक्ताचा महिमा सांगून श्रीसूक्तावरील प्रवचनासंबंधीची सूचना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २६ फेब्रुवारी २०१५ ...\tRead More »\nवैश्विक वास्तव (The Universal Truth) फोरमवर पोस्ट लिहिण्यासाठी येथे क्लिक करावे – http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/topic/प्रारंभ–2/ `सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या (Shree Aniruddha) ‘तुलसीपत्र’ ह्या अग्रलेखमालिकेत आतापर्यंत बापूंनी (Bapu) अनेक विषयांचे विवेचन केलेले आहे. तुलसीपत्र-९९७ पासून एक वेगळ्याच आणि अद्भुत वाटाव्या अशा विषयाची सुरुवात झाली आहे. तुलसीपत्र-९९६ मध्ये मूषक हा श्रीगणपतीचे वाहन म्हणून अनसूयामातेच्या आश्रमात सिद्ध होतो आणि देवीसिंह असणाऱ्या परमशिव, चण्डिकाकुल वाहने आणि नारदांसह कैलास ...\tRead More »\nImportance of Agralekhs about History of Vasundhara वसुन्धरेवर राहणार्‍या सर्व मानवांचा इतिहास वेगवेगळा नाही. मानवाच्या सध्याच्या जीवनातील अनेक गोष्टी अशा का आहेत, याचा संबंध वसुन्धरेच्या इतिहासाशी आहे. प्रत्यक्ष या दैनिकात तुलसीपत्र अग्रलेखमालेत सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे या संदर्भातील अग्रलेख प्रकाशित होत आहेत. वसुन्धरेच्या इतिहासाच्या अभ्यासातून भौतिक स्तरावरील गोष्टींप्रमाणे मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरील अनेक पैलूंवर प्रकाश पडतो. मानवाला भगवंताने स्वत: अवतरित होऊन भक्ती ...\tRead More »\nपरम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २० फ़ेब्रुवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिविक्रमाचा प्रतिनिधि असणाऱ्या जलाचा अध्यात्मिक इतिहास काय आहे, हे सांगीतले. बापूंनी पुढील व्हिडिओमध्ये हा मुद्दा स्पष्ट केला आहे.\tRead More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/hardik-pandya-clears-the-air-about-mystery-girl-in-viral-photo/", "date_download": "2018-04-24T06:19:49Z", "digest": "sha1:BFOSH44YDBSZGWEUAQAW6IAQTFXKN74Z", "length": 5845, "nlines": 109, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ती मुलगी कोण? हार्दिक पंड्याकडून स्पष्टीकरण - Maha Sports", "raw_content": "\nगेले दोन-तीन दिवस सोशल मीडियावर हार्दिक पंड्याचा एक फोटो एका मुलीबरोबर शेअर होत होता आणि त्याबद्दल जोरदार चर्चा होती. परंतु या अष्टपैलू खेळाडूने आता समोर येत ती मुलगी आपली बहीण असल्याचं म्हटलं आहे.\nhardikpandya_official या इंस्टाग्राम अकाउंटवरून ३ दिवसांपूर्वी एक फोटो पोस्ट करण्यात आला होता. हे अकाउंट क्रिकेटरचे आणि खासकरून हार्दिकचे फोटो शेअर करत असते.\nयामुळे डीएनए या न्यूज पोर्टलने याची बातमी केली. तसेच ही अनोळखी मुलगी कोण असा प्रश्न केला.\nहार्दिकने स्वतः आपल्या ट्विटरच्या माध्यमातून याला उत्तर दिले आहे. हार्दिक म्हणतो, ” शंका दूर झाली आहे ती माझी बहीण आहे. ”\nलवकरच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिका सुरु होणार आहे. हार्दिककडून याही मालिकेत मोठ्या अपेक्षा आहेत.\nसाधा फोन वापरणाऱ्या आशिष नेहराला ट्रोल करण्याआधी ह्या गोष्टी माहित करून घ्या\nमुलींना बघून काय प्रतिक्रिया देतात भारताचे हे दोन युवा फिरकीपटू\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t20804/", "date_download": "2018-04-24T06:57:29Z", "digest": "sha1:USHAEOKWKKQF2G2O57G3VANDT72QD53D", "length": 2732, "nlines": 62, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस", "raw_content": "\nआज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस\nAuthor Topic: आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस (Read 1278 times)\nआज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस\nआज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस\nजे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते\nआज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस..\nआली आहेस तर तुला एकच मागणे मागतो\nतुझे हे प्रेम माझ्यासाठी असेच जपुन ठेव..\nजगण्याचे कारण आहे प्रेम तुझे\nअसेच ते जपुन ठेव..\nमाझे आयुष्य तर कधीच संपले होते\nमाझा प्राण बनुन तु आलीस..\nमरेल ग तु दुर गेलीस तर\nमला तुझ्या मिठित ठेव..\nआज तु पुन्हा प्रेमाची जाणिव करुन दिलीस\nआज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस\nआज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://assn.org.in/index.html", "date_download": "2018-04-24T07:00:47Z", "digest": "sha1:BU4YJWTUITU2UTUJ7LEVANESQRFCL4C3", "length": 7475, "nlines": 28, "source_domain": "assn.org.in", "title": " आदिवासी सेवा समिती", "raw_content": "\nसंस्थेची स्थापना उद्दिष्टे व सध्यास्थिती :\nआदिवासी सेवा समिती, नाशिक या संस्थेची स्थापना थोर स्वातंत्र्यता सेनानी शि़क्षक व सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी १ जुन १९४५ रोजी केली. सामाजिक व सेवाभावी दृष्टीने शैक्षणिक क्षॆत्रात स्वातंत्रपुर्व काळापासुन आदिवासी सेवा समिती, संस्थेचे अत्यंत महत्त्वपुर्ण योगदान राहीले आहे. आदिवासी सेवा समिती, नाशिक ज्या-ज्या भागात आपले कार्य सुरु करील त्या-त्या भागात साधारणपणे सर्व प्रकारच्या शैक्षणिक चळवळी सुरु करणे की, ज्यामुळे शिक्षणात वाढ होईल व विषेशत: त्या भागातील लोकांच्या सांस्कृतिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्यांकडे अधिक लक्ष दिले जाईल. संस्थेत सध्या ३ बालमंदिरे, ४ प्राथमिक शाळा, १३ माध्यामिक शाळा, २ उच्च माध्यामिक विद्दालये, १८ प्राथमिक आश्रमशाळा, १७ माध्यमिक आश्रमशाळा, २ क्रुषी तंत्रनिकेतन आज मितीस यशस्वी रित्या चालविण्यात येत आहेत. तसेच मागासवर्गीय मुला-मुलींसाठी ५९ वसतिगृह संस्थे मार्फ़त चालविण्यात येत आहेत.\nआजपर्यंतच्या संस्थेच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे व वळणे :\nआदिवासी व मागास जमाती स्वातंत्र्यपूर्व काळात जे जीवन कंठीत होते तसे जीवन स्वातंत्र्यानंतरही आर्थिक आणि शैक्षणिक लाभ न मिळाल्याने जगत होते आणि केवळ बहूजन समाजासमोर आदिवासी मागासवर्गीय जनतेत शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि त्यांचे जीवनमान उंचावले जावे या उदान्त हेतूने कै. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या दीपस्तंभासारख्या आधाराने आदिवासी सेवा समितीच्या कार्याची सुरुवात १ जून १९४५ रोजी केली. संस्थेने प्रथमत: मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी वसतिगृहे व व्होलंटरी शाळा सुरु करुन आपले कार्य सुरु केले.\nसंस्थेचे संस्थापक कै. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर संस्थेची धुरा कै. लोकनेते व्यंकटराव हिरे यांनी सन १९६१ ते १९८० पर्यत मोठ्या धडाडीने सांभाळून २० वर्षाच्या कारकिर्दीत अनेक शाखा सुरु करुन सुसज्ज अशा इमारती बांधून संस्थेचे शैक्षणिक कार्य संबंध जिल्हाभर व शेजारील जिल्ह्यात पसरविले.\nकै. व्यंकटराव हिरे यांच्या दुख:द निधनानंतर सन १९८० ते आजतगायत संस्थेचे सेक्रेटरी, समाज श्री. प्रशांतदादा हिरे यांनी अनेक लोक उपयोगी उपक्रम राबवून संस्थेच्या कार्याची वाटचाल हिरक महोत्सवाकडे सुरु केली आहे.\nडोंगराळ व अतिदुर्गम भागात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली आहे\nभविष्यात याच भागातील लोकांना तंत्रशिक्षण, वैद्यकीय महाविद्यालये व स्वयंरोजगार मिळवून देणारे उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.\nसंस्थे बद्दल नवीन काही :\nसध्या चे नवीन काही :\nसंस्थेच्या ध्येय धोरणानुसार त्या त्या भागातील लोकांच्या शैक्षणिक तसेच सांस्क्रूतिक जीवनात सुधारणा होण्याच्या द्दूष्टीने शिक्षणाबरोबरच क्रूषी फलोद्यान, दुग्धविकास,सुतारकाम व संगीत या सारखे शिक्षणही देण्य़ाचे पवित्र कार्य संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच सभासद व शाखाप्रमुख कर्मचारी यांच्या प्रयत्नातून अविरत चालू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.vidyawarta.com/02/?p=5314", "date_download": "2018-04-24T06:25:21Z", "digest": "sha1:HFYH6VRD6JB73F4ADPSPFBR2LJ6Z22UU", "length": 11961, "nlines": 167, "source_domain": "www.vidyawarta.com", "title": " CAS & API आणि शोधनिबंधाविषयी | Vidyawarta", "raw_content": "\nUGC द्वारा यथा अधिसूचित संदर्भित पत्रिकाए Sr.No.8431, 7912, 4673, 7775, 7790\nआंतरराष्ट्रीय बहुभाषिक संशोधन पत्रिका\nशोधपत्र भेजने कि अंतिम तिथी: 20 (हर माह)\nशोधपत्रिका प्रकाशन तिथी 30 (हर माह)\nCAS & API आणि शोधनिबंधाविषयी\nवेगवेगळ्या सेमिनार, कॉन्फरन्स अथवा संशोधन विषय नियतकालीकामध्ये शोधनिबंध पाठविताना प्राध्यापकांकडून HP कडे नेहमीच काही प्रश्‍नांची संबंधीतांना विचारणा करण्यात येते.आपला शोधनिबंध प्रोसेडींग मध्ये अथवा रिसर्च जनरलमध्ये प्रकाशित करण्यासाठी व CAS अथवा API साठीची परिपूर्ती करण्यासाठी आपले लेख अथवा शोधनिबंध प्रकाशित करणे आवश्यकच आहे.\nअनेक प्राध्यापकांकडे चांगल्या प्रकारचे ज्ञानभंडार उपलब्ध असते, मात्र ते व्यवस्थीत सादर न करु शकल्यामुळे त्यांना UGC च्या नियमांची पुर्तता करणे कठीण जाते. आजकाल रिसर्च जर्नल अथवा प्रोसेडींगसाठी शोधनिबंध पाठविण्याची प्रक्रिया संगणकीकृत व ऑनलाईन झालेली आहे. विद्यावार्ताकडे या संबंधी वारंवार कांही प्रश्‍न विचारले जातात. त्याची पुर्तता पुढीलप्रमाणे करता येईल.\n1) शोधनिबंध कसा लिहावा\n– आपल्या विषयाशी संबंधीत कोणत्याही मुद्यावर आधारित शोध निबंध अथवा लेख लिहीता येतो. त्यामध्ये सारांश, प्रस्तावना, नमुना शब्द, लेखन साहित्याचा आढावा, विश्‍लेषण, समारोप व संदर्भसुची इत्यादी संशोधन विषयक पायर्‍यांचा अवलंब केलेला असावा. विद्यावार्तामध्ये सर्व विषयांचे व सर्व विद्याशाखांचे लेख आणि शोधनिबंध प्रकाशित केले जातात.\n2) शोधनिबंध कसा पाठवावा \n– कॉम्प्युटरद्वारे टाईपकरुन संबंधीत लेख केवळ ई-मेलने पाठवावा. पेजमेकर किंवा एम.एस.वर्डमध्ये टाईप केलेली मुळफाईल (Open File) vidyawarta@gmail.com वर पाठवावी. pdf अथवा scan केलेले पेजेस, फोटो पेजेस पाठवू नयेत शक्यतो. लेख स्वतःच्याच ई-मेल आयडीवरुन पाठवावा.\n3) फाँट व फॉर्मेटींग कशी हवी \n– हिंदी व मराठीसाठी Ism-Dvb-TT-Surekh,किंवा Kruti Dev055 किंवा Shreelipi 708 हा फाँट वापरा, साईज 14, इतर सर्व सेटींग नॉर्मल असावी. इंग्रजी भाषेसाठी Times New Roman साईज 12, इतर सेटींग नॉर्मल ठेवावी. लेखामध्ये ग्राफ, नकाशे, चित्र, टेबल्स असतील तर ते योग्य पद्धतीने, योग्य जागी सेटींग केलेले असावे. लेख 3000 शब्दापर्यंत (5-6 पेजेस) असावा. वरील फॉरमेल्टि शिवाय इतर बाबींचा अवलंब केल्यास संपादक डॉ.बापूजी घोलप यांना कळवावे.\n4) फिस कशी जमा करावी \n– आपला रिसर्च पेपर स्विकारल्यानंतर हर्षवर्धन प्रकाशनाच्या बँक खात्यावर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून 800/- रुपये फिस जमा करता येते. फिस जमा करण्यासाठी ऑनलाईन, ऑफलाईन, मनीऑर्डर, चेक डिपॉझीट अथवा एखादे मोबाईल अ‍ॅप्लीकेशन वापरुन फिस पाठविता येते. फिस जमा केल्यानंतर त्याचे डिटेल्स पाठविने किंवा संपादकांना फोनकरुन माहिती कळविणे अत्यंत गरजेचे आहे.\n5) हे विसरु नका \n– लेखा सोबत आपले संपुर्ण नांव, पत्ता, पिनकोड, मोबाईल नंबर, ई-मेल द्यावा.\n-पाठविलेला ई-मेल विद्यावार्तास मिळाला की नाही याची खात्री करा.\n-आपणास किती प्रती हव्या आहेत. त्यानुसार फीस जमा करुन पावती पाठवावी.\n-पाठवित असलेला लेख संपूर्णपणे निर्दोश, परिपुर्ण व अप्रकाशित असेल तरच पाठवा.\n– अंडरटेकिंग फॉर्म स्वहस्तक्षरात भरुन, स्कॅन करुन पाठवावा.\n-हर्षवर्धन प्रकाशनाच्या कोणत्या जर्नलमध्ये लेख प्रकाशित करायचा आहे ते कळवावे.\n6) विद्यावार्ता संबंधी महत्वाच्या तारखा \n– लेख ई-मेलद्वारे पाठविणे : 20\n-फीस जमा करणे : 25\n-जर्नल प्रकाशित होते : 30\n-जर्नल ऑनलाईन उपलब्ध : 05\n-जर्नलची हार्डकॉपी मिळेल: 10\nवरील प्रमाणे जर्नल प्रकाशनाचे वेळापत्रक असून स्थलकाल परिस्थितीनुसार या मध्ये 4-5 दिवसांचा फरक होऊ शकतो.\n7) विद्यावार्तास मान्यता व दर्जा काय \n8) हर्षवर्धन प्रकाशनाच्या इतर सुविधा\n-M.Phil, Ph.D.च्या प्रबंधाचे ISBN सह पुस्तक प्रकाशित केले जाते.\n-विद्यावार्ता व प्रिंटींग एरिया जर्नलच्या संपादक मंडळावर नियुक्तीची संधी मिळेल.\n– शैक्षणिक ग्रुपशी जोडले जाते व अपडेट्स कळविण्यात येतात.\n-कॉन्फरन्स, सेमीनारच्या विशेषांकाचे ISBN सह प्रकाशन केले जाते.\n9) प्रकाशन स्थळ, पत्ता\n10) अधिक माहितीसाठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AC_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-04-24T06:20:38Z", "digest": "sha1:L5WBGSIIMSG2G3ASAGIPO3LCTPK2C6UI", "length": 10736, "nlines": 236, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९७६ हिवाळी ऑलिंपिक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nXII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा\nस्पर्धा ३७, ६ खेळात\nअधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष रुडॉल्फ कर्चश्लागर\n◄◄ १९७२ १९८० ►►\n१९७६ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १२वी आवृत्ती ऑस्ट्रिया देशाच्या इन्सब्रुक गावात ४ ते १५ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३७ देशांमधील १,१२३ खेळाडूंनी भाग घेतला. इन्सब्रुकला ऑलिंपिक यजमानपदाचा मान दुसर्‍यांदा मिळाला. ही स्पर्धा आधी अमेरिकेतील डेन्व्हर शहरामध्ये होणार होती परंतु वाढत्या खर्चाच्या भितीने येथील मतदारांनी ही स्पर्धा फेटाळून लावली व शेवटी ही स्पर्धा इन्सब्रुकला ठेवण्यात आली.\nखालील ३६ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. तैवान ह्या स्पर्धेत शेवटच्या वेळी चीनचे प्रजासत्ताक ह्या नावाने भाग घेतला. ह्या नंतरच्या सर्व ऑलिंपिक स्पर्धांमध्ये त्याला चिनी ताइपेइ हे नाव वापरावे लागत आहे.\nह्या स्पर्धेत खालील १० खेळांचे आयोजन केले गेले.\n१ सोव्हियेत संघ १३ ६ ८ २७\n२ पूर्व जर्मनी ७ ५ ७ १९\n३ अमेरिका ३ ३ १ ७\n४ नॉर्वे ३ ३ १ ७\n५ पश्चिम जर्मनी २ ५ ३ १०\n६ फिनलंड २ ४ १ ७\n७ ऑस्ट्रिया (यजमान) २ २ २ ६\n८ स्वित्झर्लंड १ ३ १ ५\n९ नेदरलँड्स १ २ ३ ६\n१० इटली १ २ १ ४\nखेळ • पदक • रा.ऑ.सं. • पदक विजेते • चिन्ह\n१८९६ • १९०० • १९०४ • (१९०६) • १९०८ • १९१२ • १९१६ १ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४० २ • १९४४ २ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६ • २०२० • २०२४ • २०२८\n१९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४० २ • १९४४ २ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४ • २०१८ • २०२२\nअलीकडील स्पर्धा: तुरीन २००६ • बीजिंग २००८ • व्हँकूव्हर २०१० • लंडन २०१२ • सोत्शी २०१४\n१ पहिल्या महायुद्धामुळे रद्द. २ दुसर्‍या महायुद्धामुळे रद्द.\nइ.स. १९७६ मधील खेळ\nहिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑक्टोबर २०१३ रोजी १३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.holmbygden.se/mr/2018/04/09/arsmote-for-holms-fiskevardsomrade-torsdag-124/", "date_download": "2018-04-24T06:53:50Z", "digest": "sha1:ALQ6SMACVEPGZNAVVUYKAXBT5SZKREHH", "length": 5311, "nlines": 108, "source_domain": "www.holmbygden.se", "title": "Holms Fiskevårdsområde गुरुवारी वार्षिक बैठक 12/4 | Holmbygden.se", "raw_content": "\nमेल- आणि टेलिफोन यादी\nगेम सॉफ्टवेअर, परिणाम आणि टेबल\nसमर्थन Holms सुरेश (मोफत) आपण स्वीडिश खेळ खेळू तेव्हा\nHolm जिल्हा फुटबॉल कॅलेंडर\nHolm फायबर आर्थिक असोसिएशन\nHolm च्या स्थानिक इतिहास सोसायटी\nDrakabergets सुरेश – मोटरसायकल आणि स्नोमोबाइल\nVike ना-नफा व्याज गट\nबोट, पोहणे आणि जल क्रीडा\nAnund फार्म आणि Vike जॉगिंग ट्रॅक\nHolm वन पासून एक शोध काढूण अहवाल द्या\nHolm मध्ये निवास व्यवस्था जाहिरात\nआम्ही Holm भाग-वेळ रहिवासी\nलॉग इन Loviken मध्ये कॅबिन\nसुंदर सरोवर दृश्य सह व्हिला\nकल मध्ये विलक्षण स्थान\nकार्यशाळा आणि अविवाहित सह व्हिला\nGimåfors व्हिला किंवा सुट्टी पान\nजबरदस्त आकर्षक दृश्ये छान व्हिला\nअत्यंत वसलेले घर मी Anundgård\nधान्याचे कोठार सह घर\nÖstbyn मध्ये आकर्षक शताब्दी\nदीप पाईप मध्ये सुट्ट्यांमध्ये घर\nसाठी Holm आणीबाणी माहिती\nराष्ट्रीय ग्रामीण बातम्या (विकास)\nHolm चर्च आणि Holm तेथील रहिवासी\nHolm चित्रपट – इंग्रजी मध्ये\nतुम्हाला माहीत आहे का…\nवर पोस्टेड 9 एप्रिल, 2018 करून Holmbygden.se\nHolms मासेमारी अधिक वाचा.\nही एंट्री मध्ये नोंदवलेला बातम्या करून Holmbygden.se. बुकमार्क प्रचिती.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2009/12/blog-post_13.html", "date_download": "2018-04-24T07:00:38Z", "digest": "sha1:CP6TIOX6OPG62YXINMTZ7AI3LJDA3BCA", "length": 18981, "nlines": 332, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: विदर्भाच्या लढाईसाठी राज ठाकरे उद्या नागपूरच्या रणांगणात!", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nरविवार, 13 दिसंबर 2009\nविदर्भाच्या लढाईसाठी राज ठाकरे उद्या नागपूरच्या रणांगणात\nस्वतंत्र तेलंगणाच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भात घोषणा दिल्या जात आहेत. विदर्भातील प्रश्नांना केवळ वाचाच फुटावी म्हणून नव्हे, तर ते सुटावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या मंगळवारी नागपूरच्या रणांगणात उतरणार आहेत. राज ठाकरे यांच्या नागपुरातील आगमनामुळे थंड पडलेल्या विधानसभा अधिवेशनात जान येणार असून राज यांच्या स्वागताची जय्यत तयारी विदर्भातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावरील मनसेची भूमिका राज ठाकरे स्पष्ट करणार आहेत.\nराज्यात शिवसेना-भाजप युती गेले दोन दशकांहून अधिक काळ असून हिंदूत्वाच्या मुद्यावर एकत्र आलेले हे दोन पक्ष स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर मात्र दोन टोकांवर आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्वतंत्र विदर्भाला विरोध असून सेनेतून फुटून स्वत:चा पक्ष काढलेल्या राज ठाकरे हे त्यांच्या काकांप्रमाणेच अखंड महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहणार की, तेलंगणाच्या धर्तीवर स्वतंत्र विदर्भाची पाठराखण करणार, याचा उलगडा होणार आहे. विदर्भातील शेतक ऱ्यांच्या आत्महत्या, कापूस माफियांचा प्रश्न, नक्षलवादी कारवाया, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, सोयाबीन, धान या विदर्भाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवरून ते सरकारवर तुटून पडतील, असे संकेत आहेत.\nविधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले असून १२ व्या विधानसभा अधिवेशनात शपथविधीच्या वेळी मुंबईत मनसेच्या आमदारांनी सपाचे आमदार अबू आझमी यांना दिलेल्या झटक्यापासून मनसेची व राज ठाकरे यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. अबू आझमी यांना कानफटात मारल्यामुळे तसेच, गोंधळ घातल्यामुळे मनसेच्या चार आमदारांना चार वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांना विधानसभेच्या आवारातही प्रवेश करण्यास बंदी घातली असून राज ठाकरे यांच्यासमवेत रमेश वांजळे, वसंत गिते, राम कदम आणि शिशिर शिंदे हे चारही आमदार उपस्थित राहणार आहेत. यातील शिशिर शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ न घेतल्यामुळे वैधानिक पेचप्रसंग निर्माण झाला असून त्यांना शपथ द्यावयाची झाल्यास विधानसभेत शपथविधी पुरता प्रवेश देण्याचा ठरावा मांडावा लागणार आहे. त्यामुळे सध्या विधानसभेत मनसेचे नऊ आमदार किल्ला लढवत आहेत. विदर्भात अधिवेशन घेण्यामागे येथील प्रश्न सुटणे, ही प्रमुख भूमिका असूनही विदर्भाच्या तोंडाला कायमच सरकारकडून पाने पुसली जात असल्याचा आरोप मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.\nनक्षलवाद्यांचा प्रश्न हा केवळ गडचिरोली व चंद्रपूर पुरता मर्यादित राहिलेला नसून तो केव्हाही नागपूपर्यंत येऊन ठेपेल, अशी भीती जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. वरिष्ठ पोलीस अधिकारी नागपूरमध्येच मुक्काम ठोकतात. त्यांनी गडचिरोलीमध्ये जाणे आवश्यक आहे, तर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी एक दिवस तरी गडचिरोलीत मुक्काम करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान बाळा नांदगावकर यांनी केले आहे. गेल्या चार महिन्यात नक्षलवाद्यांकडून ५२ पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली असून या शहिदांच्या विधवांना निवासस्थाने खाली करण्याच्या नोटिसा पाठवण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. हा प्रश्न राज ठाकरे उचलून धरणार असून गोसीखुर्द, बेंबळ तसेच, उध्र्व वर्धा प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि शेतक ऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरून राज ठाकरे हे सरकारला जाब विचारणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. गेल्या पाच वर्षात सात हजार शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य शासन व पंतप्रधान पॅकेजमधील मदतीनंतरही शेतकरी आत्महत्या का करत आहेत तसेच, या पॅकेजमधील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली जाणार आहे.\nविमानतळापासून राज यांची भव्य रॅली निघणार असून विधानभवनाच्या प्रांगणातील मनसेच्या कार्यालयाला भेट देणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.\nहिवाळी अधिवेशनातील मोठा मोर्चा\nहिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नागपूर भेटीमुळे कुतूहल निर्माण झाले आहे. गेल्या तीन वर्षात राज यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले असले तरी नागपूरमधील लोक राज यांनी शिवसेनेत असताना विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून १९९३ साली काढलेल्या मोर्चाचीच आठवण आजही काढतात. १९९३ मध्ये हिवाळी अधिवेशनाच्या वेळी राज यांनी बेरोजगार व विद्यार्थ्यांचा मोठा मोर्चा काढला होता. नागपूरच्या गेल्या २५ वर्षाच्या राजकीय इतिहासात सर्वात मोठा मोर्चा आदिवासी गोवारींचा होता. त्यात सुमारे ३० हजार गोवारी सहभागी झाले होते. त्यानंतरचा मोठा मोर्चा राज ठाकरे यांचा होता. तेव्हापासून आजपर्यंत राज ठाकरेंच्या मोर्चापेक्षा मोठा मोर्चा निघालेला नाही.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nबेनामी 13 दिसंबर 2009 को 11:33 pm\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nस्वतंत्र विदर्भासाठी गरज भासल्यास सार्वमत घ्या - र...\nराज ठाकरेंचे विदर्भात उत्साहात स्वागत\nतर \"वर्ल्ड कप 2011' प्रदर्शित होऊ देणार नाही\nविदर्भाच्या लढाईसाठी राज ठाकरे उद्या नागपूरच्या रण...\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A5%AA-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2018-04-24T06:49:39Z", "digest": "sha1:MKIJP45L4IAWC5JTNN3A37CUOEMRNDG7", "length": 5033, "nlines": 136, "source_domain": "www.marathimati.net", "title": "४ एप्रिल | मराठीमाती", "raw_content": "\nमार्टीन ल्यूथर किंग (ज्यु.)\n१९४९ : पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे ‘नाटो करार’ करण्यात आला.\n१९६८ : अमेरिकेतील गांधीवादी निग्रो नेते मार्टीन ल्यूथर किंग (ज्यु.).\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, मार्टीन ल्यूथर किंग, मृत्यू, ४ एप्रिल on एप्रिल 4, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/prithvi-shaw-impresses-trent-boult-with-great-knock/", "date_download": "2018-04-24T06:26:13Z", "digest": "sha1:MBTLEQGNZID7YYYHMKQSLQ23YXKNCDEF", "length": 7743, "nlines": 106, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पृथ्वी शॉ समोर उत्तम कारकीर्द : ट्रेंट बोल्ट - Maha Sports", "raw_content": "\nपृथ्वी शॉ समोर उत्तम कारकीर्द : ट्रेंट बोल्ट\nपृथ्वी शॉ समोर उत्तम कारकीर्द : ट्रेंट बोल्ट\nमुंबई| काल झालेल्या अध्यक्षीय संघ विरुद्ध न्यूजीलँड सराव सामन्यात प्रतिभावान युवा खेळाडू पृथ्वी शॉने अर्धशतकी खेळी केली होती. इतक्या कमी वयात प्रतिभावान कामगिरी सध्या पृथ्वी करत आहे. तो सध्या फक्त १७ वर्ष ३४३ दिवसांचा आहे.\nत्याच्या या कामगीनंतर न्यूजीलँडचा वेगवान गोलंदाज ट्रेंड बोल्टने त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. तो पृथ्वीबद्दल म्हणाला की “मी ऐकलं आहे तो फक्त १७ वर्षांचा आहे. तो खूप चांगला खेळला. सुरवातीला बॉल चांगला वळत होता पण असं वाटत होत की त्याच्यावर याचा काहीही परिणाम होत नाही. तो अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांच्यासमोर सगळं नीट झालं तर उत्तम कारकीर्द आहे. त्याच्या पहिल्याच भेटीत त्याने प्रभावित केले आहे.”\nपृथ्वी शॉने आत्तापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३ सामन्यात २ शतके तसेच १ अर्धशतक केले आहे.\nत्याचबरोबर बोल्ट कालच्या सामन्याविषयीही बोलला “दुपारी इथे फार गर्मी होती. पराभवामुळे निराशा झाली. गोलंदाजीत विविध योजना राबण्याची उत्तम संधी मिळाली. इथे येऊन योग्य लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी बरोबरच फलंदाजांना बाद करणेही महत्वाचे आहे. ते चांगले खेळले.”\nत्याचबरोबर तो म्हणाला ” विरुद्ध संघाच्या सलामीवीरांनी चांगली कामगिरी केल्यामुळे बाकीच्या फलंदाजांना चांगले व्यासपीठ मिळाले” तसेच सामन्याच्या सुरवातीला २-३ बळी घेणे महत्वाचे असेल आणि योग्य गुणवत्ता असलेल्या संघाविरुद्ध खेळताना चूक करण्याचा वाव नसतो, असेही तो सांगत होता.\nतो त्याच्या गोलंदाजी बद्दल म्हणाला की तो सामन्याच्या सुरवातीला बॉल स्विंग करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. तसेच यॉर्कर आणि डॉट बॉल टाकण्याचाही त्याचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर तो म्हणाला की इथे आयपीएलचा अनुभव उपयोगी येईल.\nPrithvi ShawTrent Boultअध्यक्षीय संघ विरुद्ध न्यूजीलँडभारत विरुद्ध न्यूजीलँडमुंबईसराव सामना\nआशिया हॉकी कप २०१७: भारतीय हॉकी संघाची दमदार कामगिरी\nनदाल स्विस इनडोअर स्पर्धेला दुखापतीमुळे मुकणार\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://live.anandnagri.com/news/editorial/1709/50_crore_in_three_years_will_be_planting_a_tree.html", "date_download": "2018-04-24T06:49:57Z", "digest": "sha1:FWT6P3IMGOZQRR3M3OHYQHGQY5I5A7LN", "length": 15602, "nlines": 76, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " तीन वर्षात होणार 50 कोटींची वृक्ष लागवड - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nतीन वर्षात होणार 50 कोटींची वृक्ष लागवड\nजागतिक तापमान वाढ, हवामान आणि ऋतू बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी संपूर्ण विश्वात पर्यावरण, संवर्धन आणि संरक्षण यावर आधारित विविध कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडही करण्यात येत आहे. या अंतर्गत यावर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्र शासनाने 2 कोटी वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविला. यात शासनाच्या विविध विभागांबरोबरच शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, एन.एस.एस., एन.सी.सी.स्काऊट न्ड गाईडस्, अशासकीय, स्वयंसेवी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था, औद्योगिक समूह, सीएसआर, लोकप्रतिनिधी, गृहनिर्माण संस्था, सहकारी संस्था, शासकीय कर्मचारी/अधिकारी इत्यादींचा देखील सहभाग होता. लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे 2 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट सहजगत्या पूर्ण झाले. 1 जुलै 2016 रोजी राज्यात 2 कोटी 82 लाख वृक्ष लागवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी \"मन कि बात\" या कार्यक्रमातून 2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्येही या अभिनव उपक्रमाची नोंद झाली. ब्राझीलमध्ये झालेल्या ऑलंम्पिक सोहळ्याच्या उदघाटन समारंभातही वृक्ष लागवडीचे महत्व, पर्यावरण रक्षण, जागतिक तापमानातील वाढ आदी बाबी ठळकपणे अधोरेखित करण्यात आल्या. उदघाटनाच्या वेळी सहभागी खेळाडूकडून बीज लावून घेण्यात आले. ध्वजवाहकाच्या समोर चालणाऱ्या प्रत्येक मुलाच्या हातात छोटी-छोटी रोपे देण्यात आली होती. वसुंधरेला वाचविण्याची आर्त हाक या साऱ्यांमधून दिली जात आहे. 2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये शासनाला मिळालेले यश उल्लेखनीय असून वृक्षरोपणाची ही गती तुटू न देण्यासाठी पुढील तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामध्ये वन विभाग व इतर विभाग मिळून 75 टक्के व 25 टक्के उद्दिष्ट अनुक्रमे देण्यात आले होते. पुढील तीन वर्षाकरीताही हेच प्रमाण ठेवण्यात येणार आहे. याशिवाय ग्रामपंचायतींना पुढील तीन वर्षामध्ये 12 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सन 2017 मध्ये 15 जून ते 7 जुलै या कालावधीत सर्व साधारणपणे पावसाची सुरुवात झाल्यानंतर वन विभागास 2 कोटी 25 लाख इतर विभागाना 75 लाख, ग्रामपंचायतीस 1 कोटी असे एकूण 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सन 2018 मध्ये वन विभागाला 7 कोटी 50 लाख, इतर विभागाना 2 कोटी 50 लाख, ग्रामपंचायतींना 3 कोटी असे एकूण 13 कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सन 2019 मध्ये वन विभागाला 18 कोटी 75 लाख, इतर विभागांना 6 कोटी 25 लाख, ग्रामपंचायतींना 8 कोटी असे एकूण 33 कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तीन वर्षात वन विभाग, इतर विभाग आणि ग्रामपंचायती यांना 50 कोटी वृक्षरोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्षारोपणासाठी उंच, कमीत कमी दीड ते दोन वर्ष वयाची दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आणि पाण्याची उपलब्धता, हवामान, भौगोलिक परिस्थिती यांच्याशी अनुरुप शक्यतो स्थानिक प्रजातींच्या रोपांची उपलब्धता विविध विभाग, खाजगी व्यक्ती, संस्था, शेतकरी यांना करावी लागणार आहे. त्यासाठी सुमारे 60 कोटी रोपे उपलब्ध करावी लागतील. यासाठी वन, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र वन विकास मंडळ आदीमार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि इतर योजनांतर्गत निधीतून रोपवाटिका विकसित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. कृषी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी आदी विभागांमार्फत एम-नरेगा व अन्य उपलब्ध निधीतून रोपवाटिका सुरु करण्याबाबत आणि रोपांच्या उपलब्धतेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वृक्ष लागवडीचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी 33 कलमी कार्यक्रम तयार केला आहे. त्यामध्ये रोपवाटिका विकसित करण्यापासून वन आणि वनेत्तर क्षेत्र यांची उपलब्धता, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, संरक्षण, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याबरोबरच राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध करुन घेणे, जलयुक्त शिवार अभियानास बांबू मिशनची जोड देणे आदी महत्वूपर्ण योजनांचा समावेश आहे. वृक्ष लागवडीपासून संगोपनापर्यंतचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी ग्रामस्तरापासून राज्यस्तरापर्यंत समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या बैठका प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येऊन जनतेकडून यामध्ये नाविण्यपूर्ण संकल्पना, सूचना मागविण्यात येतील. जन सहभाग वाढवून कार्यक्रमाला लोक चळवळीचे स्वरुप देण्यात येईल. राज्यातील 36 जिल्हे, 358 तालुके आणि 27 हजार 500 ग्रामपंचायतीमधील समित्यांचे सदस्य सचिव, समन्वय अधिकारी यांची नावे व मोबाईल नंबर असलेली पुस्तिका प्रसिद्ध करण्यात येईल. वृक्ष लागवडीमध्ये कमीत कमी 10 टक्के बांबू प्रजातींची लागवड व्हावी यासाठी विविध बांबू प्रजातींची रोपे विकसित करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. वृक्ष लावगडीसाठी किती जागा उपलब्ध होऊ शकेल, यासाठी जिल्हानिहाय सर्व्हे 30 नोव्हेंबर 2016 पूर्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. वन विभागाने विकसित केलेल्या जिओ टॅगिंग या संगणकीय प्रणालीद्वारे अक्षांश रेखांशासह केलेल्या कामकाजाचा अहवाल भरावा लागणार आहे. रोपांचे जगण्याचे प्रमाणे 80 ते 90 टक्के राहण्याच्या दृष्टीने संगोपनासाठी यापूर्वीच शासनाने नियोजन केले आहे. शासनाची दिशा, प्रशासनाची जिद्द आणि लोकांचा सहभाग यातून येत्या काही काळातच महाराष्ट्र हिरवागार झालेला दिसेल हे नक्की.\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nजिल्ह्यात 203 अंगणवाड्या आयएसओ\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.in/2010/12/", "date_download": "2018-04-24T06:42:04Z", "digest": "sha1:WKC3KCVIY7FEWREGIGCB74NU35OEEQ4F", "length": 8928, "nlines": 143, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.in", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: December 2010", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nकाही काही दिवस असेच असतात की ठरवलेले एकही काम होत नाही. काही विशेष नसतानाही उगाच कामे रेंगाळतात. आजचा दिवस असाच. भाकड दिवस.\nकाल मी प्रवासाची जंत्री पोस्ट केली खरी पण त्यात फ़ॊर्मॆटिंग काही जमली नाही. But better late than never. सुरू तर करूयात म्हणून तसेच ठेवले. आता त्यात इतर प्रवासांच्या माहितीची भर घालेन. विशेषतः काही चित्तथरारक प्रवासांची.\nपहिला मराठी लेखन प्रयत्न.\nजेव्हा मी विचार केला की या वर्षात मी एकही किलोमीटर रेल्वेने प्रवास केला नाही तेव्हा माझ्या गेल्या काही वर्षांतील प्रवासांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरेल. थोडक्यात ही जंत्री.\nमधल्या काही वर्षांची बेरीज बाकी आहे. ती झाली की पूर्ण रिपोर्ट च पेश करुयात.\nवर्ष रेल्वे प्रवास किमी. एकूण प्रवास किमी. रेल्वे प्रवास टक्केवारी\n१९८९ ७७९४ १३६६७ 57.03\n१९९० १०९७० १८७१५ 58.62\n१९९१ १२०७६ १५७११ 76.86\n१९९२ ५४०७ १०१२५ 53.4\n१९९३ ४६४३ ११७५१ 39.51\n१९९४ ५९९३ ९५१५ 62.98\n२००२ २१९३६ २६२३८ 83.6\n२००३ १२८२३ १६००६ 80.11\n२००४ ८१९९ १६१९२ 50.64\n२००६ २३७२४ ३१०३७ 76.44\n२००७ ४७६९ ८९१४ 53.5\n२००८ ४४२३ ८१३४ 54.38\nLabels: प्रवासाचे विवरण, मराठी लेखन\nपहिला मराठी लेखन प्रयत्न.\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/hollywood/news/gigi-hadid-self-photoshoot/18769", "date_download": "2018-04-24T06:43:32Z", "digest": "sha1:ENYTSGSCQC6CTZNHUQ4XTFSS77X5UYY4", "length": 21884, "nlines": 230, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "gigi hadid self photoshoot | गीगी हदीदने स्वत:च काढले स्वत:चे फोटो | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nगीगी हदीदने स्वत:च काढले स्वत:चे फोटो\n​अमेरिकी सुपरमॉडेल गीगी हदीद हिने ‘वी’ साप्ताहिकाच्या फोटोंसाठी स्वत:च कॅमेरा घेऊन स्वत:चे फोटो काढले आहेत.\nअमेरिकी सुपरमॉडेल गीगी हदीद हिने ‘वी’ साप्ताहिकाच्या फोटोंसाठी स्वत:च कॅमेरा घेऊन स्वत:चे फोटो काढले आहेत. मॉडेलिंग क्षेत्रात वावरताना गीगीची फोटोग्राफीची हौस कधीच लपून राहिली नाही. तिला जेव्हा संधी मिळते तेव्हा ती तिची आवड पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असते.\nपेजसिक्स डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, गीगीने या आठवड्यात फोटोग्राफर मारियो टेस्टिनो, अभिनेत्री साश लेन आणि डिझायनर ओलिवर रॉसटेनिंग यांचेही काही फोटो काढले. यावेळी ‘वी’ मॅगझिनचे संपादक स्टीफन गॅन फोटोशूट ठिकाणी पोहोचले होते. त्यांनी गीगीची फोटोग्राफी बघून तिचे कौतुक केले. त्याचबरोबर गीगीने शूट केलेले काही फोटोज् साप्ताहिकात प्रसिद्ध केले जाणार असल्याचे संकेतही दिले. स्टीफन गॅन यांच्या या कौतुकामुळे गीगी चांगलीच भारावून गेली होती. यासाठी तिने स्टीफन गॅन यांचे आभारही मानले होते.\nदरम्यान गीगीने ‘वी’ साप्ताहिकासोबत एका कार्यक्रमाचे आयोजन केले असून, कार्यक्रमात डिझायनर कार्ल लॅगरफेल्ड, डोनाटेला वर्साचे, टॉमी हिलफिगर आणि गीगीची बहीण बेला उपस्थित राहणार आहे. मॉडेलिंग क्षेत्रात काम करताना अगदी कमी कालावधीत गीगीने स्वत:चा लौकिक निर्माण केला आहे. मॉडेलिंग क्षेत्रात तिचा हा दबदबा माध्यम क्षेत्रात नेहमीच नावाजला गेला आहे. त्यामुळे गीगी आतापर्यंत जवळपास सर्वच सेलेब्स साप्ताहिकांच्या मुखपृष्ठावर झळकलेली आहे.\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अ...\n‘जीजी माँ’च्या सेटवर कलाकारांना झाल...\n‘बिग बॉस’फेम पूजा मिश्रा इतरांना दे...\nचित्रपटातील भूमिकेसाठी मला सुजयदांक...\nमोहित मलिकवर अंजली आनंद फिदा\nपाठलाग करणाऱ्याला फरनाझने शिकवला धड...\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर...\nसेल्फीवेड्या चाहत्यांमुळे ‘या’ अभिन...\nश्रीदेवी यांच्या लहान मुलीने केले ग...\n‘कुमकुम भाग्य’मालिकेत येणार 7 वर्षा...\nजेव्हा लग्नमंडपातूनच पळ काढला या अभ...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.in/2012/12/", "date_download": "2018-04-24T06:35:49Z", "digest": "sha1:XXESM2U7G7GVI5KAL5EMM4NDUZH7PLD7", "length": 24977, "nlines": 158, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.in", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: December 2012", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nयाचा विचार गांभीर्याने व्हावा.\nएकूणच मी भटक्या प्राणी आहे. भारतात तर भटकलोच आहे महाराष्ट्रातही मी फार भटकलेलो आहे. स्वतः ची गाडी घेतल्यानंतर तर या भटकंतीत आणखी भर पडत गेली. गाडी चालवताना मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे रस्त्यावर असलेला चालत्या बोलत्या मृत्युदूतांचा अनिर्बंध वावर.\nरस्ता अपघात ही आजकाल आपणा सर्वांच्या अंगवळणी पडलेली गोष्ट झालेली आहे. खरतर हे आपल दुर्दैव आहे. रोजच्या रोज वर्तमानपत्रात यासंबम्धी बातम्या आपण केवळ वाचून सोडून देतो. या अपघातांच्या कारणांचा आपण खोलवर शोध घेतला तर आपल्या लक्षात येईल की ९५ % वेळा अपघात हे मानवी कारणांमुळे होतात. यंत्रांचा दोष फक्त ५ % एव्हढाच असतो.\nपण मला राहून राहून अस वाटतंय की यातले बरेच अपघात टळू शकतात. आपल्याकडे कायदे चांगले आहेत पण रस्त्यावरचा कायदा राबवणारी यंत्रणा जर पुरेश्या शक्तीने आणि प्रामाणिक हेतूने आपले काम करील तर यातले बरेच अपघात टळू शकतात. अनेक निरपराध प्राण वाचू शकतात. वानगीदाखल ही काही उदाहरणे.\nवाहनांना मागल्या बाजूला टेल लाईट्स हवे असा कायदा आहेच. पण या ट्रक सारखे अनंत ट्रक आज महाराष्ट्रात सर्वत्र फिरताहेत. एकतर यांना टेल लाईटस नसतातच किंवा असलेच तर ते बंद करून रात्री ट्रक चालवले जातात. (मागल्या बाजूचे दिवे बंद ठेवल्याने यांच्या किती बेटरीची बचत होते हे यांनाच माहित. यांचेच काही भाउबंद रात्री समोरच्या दोन दिव्यांपैकी केवळ एकाच दिव्यावर ट्रक चालवण्याचे दिव्य करतात. आणि समोरचा वाहन चालक जवळ आला की त्याचे डोळे दिपावण्यासाठी दुसरा दिवा सुरू करतात. दुरून ही चारचाकी आहे की दुचाकी असा संभ्रम निर्माण होता असतानाच अचानक हा डोळे दिपवणारा प्रकाश हा अपघातांना निमंत्रण देणारा असतो.)\nमधल्या काही काळात आर टी ओ ने वाहनांवर चमकत्या रिफ्लेक्टर पट्ट्या सक्तीच्या केलेल्या होत्या. (आजही आहेत.) पण किती जण हा नियम पाळताहेत हे पाहणारी यंत्रणा झोपी गेलेली आहे. त्या रिफ्लेक्टर पट्ट्या कायम स्वछ्च ठेवल्या पाहिजेत याबद्दल वाहन मालक आणि चालकां मध्ये जागृती कोण करणार \nरात्रीच्या वेळेला असला हा ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला असेल तर मागून येणाऱ्या वाहनाला न दिसण्याची शक्यता जास्त आहे. अशा वेळी धडक अपरिहार्य आहे.\nआजकाल आपले वाहन घेऊन किंवा भाड्याने वाहन घेऊन प्रवासाला निघणारी बरीच मंडळी आहेत. एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रात्रभर वाहनाचा प्रवास करून दिवस वाचवू म्हणणारी ही मंडळी पाहिली म्हणजे त्यांच्या धाडसाच कौतुक वाटत की मूर्खपणाची कीव येते हे सांगण अवघड आहे. रात्रभर अवघडलेला प्रवास करून सकाळी आंबलेल्या अंगाने दिवसभर काम कसे होईल पर्यटनाचा आनंद कसा मिळेल पर्यटनाचा आनंद कसा मिळेल याचा विचार ही मंडळी करत नसावीशी वाटतात. रात्रभर प्रवास करण्यात आपण किती धोका पत्करतोय याची जाणीवच यांना नसते. कितीही चांगला ड्रायव्हर असला तरी शरीर धर्मानुसार त्याला पहाटे झोप येणारच हे गृहीत धरायलाच हवे. ड्रायव्हर ची अपुरी झोप ही सुध्दा बऱ्याच अपघातांचे कारण होत चाललेली आहे.\nआता हा ट्रक बघा.\nसिमेंट वाहून नेणाऱ्या या ट्रकला मागल्या एका एक्सलला दोन चाकेच नाहीयेत. हा ट्रक चांगला वर्दळीच्या मार्गावरून जात होता. कुठल्याही क्षणी अपघाताला कारण होऊ शकणारा हा ट्रक यंत्रणेला दिसला नाही असे समजणे नुसताच भाबडेपणा नाही तर चक्क मूर्खपणा ठरेल.\nया ट्रक ला ना नंबरप्लेट , ना रिफ्लेक्टर, ना टेल लाईटस. तरीपण हा हमरस्त्यावर आहे हे यंत्रणेचे अपयश नाही का \nआजकाल ट्रक मध्ये त्याच्या क्षमते एव्हढाच माल भरला जावा ही अपेक्षा अत्यंत चुकीची आणि अवास्तव समजली जायला लागलीये. १२ आणि १५ टन क्षमतेच्या ट्रक्स मध्ये कमीतकमी २० टन आणि २० टन क्षमतेच्या ट्रकमध्ये कमीतकमी ३५ टन माल भरलेले हे ट्रक्स आर. टी .ओ. ला दिसत नसतील तर या राष्ट्रात पुरेश्या प्रमाणात नेत्रतज्ञ निर्माण होण्यासाठी देशव्यापी चळवळ उभारली जायला हवी. आकारमाना चाही विचार करता महामार्गावरून जाणाऱ्यां इतर वाहनांसाठी हे ट्रक्स खूप धोका निर्माण करत आहेत.\nएकेकाळी \"रस्ता तेथे एस.टी .\" हे एस. टी . चे ब्रीदवाक्य होते. आता \"रस्ता तेथे (आणि रस्ता नसेल तेथेही) खाजगी वाहतूक हे ग्रामीण भागातील नेत्यांचे आणि त्यांच्या चाहते कम चमच्यांचे बोधवाक्य झालेले आहे.\nकाळी पिवळी, अधिकृत, अनधिकृत जीप्स यांच्यातून त्यांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवाशांची वाहतूक होताना तुम्हा आम्हाला दिसते. फक्त नियंत्रण करणारया यंत्रणेला ती दिसत नाही. यात अनेक आर्थिक हितसंबंध आहेतच आणि खूपश्या ठिकाणी अश्या जीप्स ची मालकी स्थानिक पुढारी / फौजदार यांचीच असते हे भीषण वास्तव आहे.\nया सर्व बाबींचा मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार होऊन यंत्रणे तर्फे प्रामाणिक प्रयत्न आणि जनजागृती व्हायला हवीये.\nकृष्णभूमीत ६ : राधेचे गाव - बरसाना\nकृष्णभूमीत १ : नागपूर ते नवी दिल्ली\nकृष्णभूमीत २ : नवी दिल्लीत\nकृष्णभूमीत ३ : आग्रा\nकृष्णभूमीत ४ : फ़तेहपूर सीकरी\nकृष्णभूमीत ५ : वृंदावन\nश्रीकृष्ण चरित्र ज्याप्रमाणे श्रीराधेच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे त्याप्रमाणेच कृष्णभूमीची सहलही श्री राधेच्या गावाला, बरसान्याला, भेट दिल्याखेरीज पूर्ण होत नाही. भर दुपारी तळपत्या उन्हात आम्ही सगळे बसने निघालोत. बरसाना हे राजस्थानात आहे. वृंदावनाच्या नैऋत्येला साधारण ३५ किमी वर. पण राजस्थानातल्या या गावी पोचलो तेव्हा वातावरण ब-यापैकी ढगाळ झालेले होते. साधारणतः एका टेकडीवर हा श्रीराधारानीचा महाल आहे. आपल्या बसेस खालीच ठेवून इथल्या वाहनांनी ती अरूंद चढण चढावी लागते. हौशी आणि आत्यंतिक भाविक मंडळींसाठी पाय-या पण आहेत पण इथल्या उन्हाचा गेले दोन तीन दिवस चांगलाच अनुभव घेतल्याने आमच्यापैकी कुणीही तशी इच्छा प्रगट केली नाही.\nगड चढून वर गेलो मात्र सगळा शीण विसरायला लावणारा अप्रतिम वास्तुकलेतला नमुना बघायला मिळाला. संपूर्ण राजवाडा हा एक उत्तम वास्तुचा नमुना आहे हे जाणवले. श्री राधेचे हे मंदीर आणि राजवाडा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला आहे. इथले लोक मोठ्या अभिमानाने बरसाना ही व्रजभूमीची राजधानी असल्याचे सांगतात. ते खरेही आहे. वृंदावनातले दैन्य इथे दृष्टीला पडत नाही. सगळे ऋषी, साधू, महात्मे आणि योगी पुरूष जन्मभर ज्याच्या प्राप्तीसाठी तळमळतात, तो बांके बिहारी श्रीराधे साठी वृंदावनावरून इथे येतो. श्रीराधा ही श्रीकृष्णाचे अंतःस्थ प्राण आहे याचा प्रत्यय इथे येतो. सर्वत्र प्रसन्नता अनुभवायला येत असते.\nया राजवाड्याच्या सर्वच भिंतींवर श्रीकृष्णचरित्रातील काही छान प्रसंग रेखाटले आहेत. जवळपास ३०० वर्षांनंतरही त्यातले रंग आणि ते प्रसंग आपल्याला मोहवून टाकतात. त्यात भर म्हणजे हे प्रसंग आपल्या व्रज भाषेत अधिक खुलवून रसाळ करणारे एक पंडित आम्हाला गाईड म्हणून लाभले होते. सर्वांनी तिथे छान फ़ेर धरला, फ़ुगड्या खेळल्यात, भजने सुरू झालीत. श्रीराधा आणि बांके बिहारी आम्हाला मोहवून गेलेत, नश्वर जगाचा विसर पाडून गेलेत.\nवृंदावनात राधेच वर्णन श्रीराधा असेच करतात . ही असली नाममुद्रा सर्वत्र, जवळपास सर्वच घरांवर दिसते.\nऐन उन्हाळ्यातल्या दुपारी निष्पर्ण वृक्षावरील पोपटांचा थवा .\nव्रज भूमी चे वैशिष्टय असलेले हे मोर . यांचा वावर सर्वत्र आणि सहज असतो.\nआपल्याकडे मे महिन्याच्या सुरुवातीला येणारा आंबा उत्तर भारतात मे महिन्याच्या शेवटी शेवटी येतो.\nश्री कृष्णाला प्रिय असलेली तुलसी आणि तेव्हढेच सुरेख वृंदावन.\nइथली नाजूक कलाकुसर पाहून तर आम्ही थक्कच झालोत. अप्रतिम \nश्रीराधा राणीच्या महालातून दिसणारे बरसाना गाव. इथली \"लठमार\" होळी प्रसिध्द आहे.\nसंपूर्ण सहलीत उत्साह टिकवून ठेवणारा आमच्यां तरूण मंडळींचा हा ग्रुप.\nसहलीचे को मेनेजर: श्री. वैभव गोसावी. यांच्या विशेष टिप्पण्या सहलीत रंग भरायाच्यात.\nआमचे सी. ई. ओ. कौस्तुभ खातखेडकर. एम.बी.ए.ची डिग्री घेण्याची यांना काहीच गरज नाही. अगदी लहान वयातच मोठमोठे कार्यक्रम यशस्वीरीत्या कसे आयोजित करावेत याच प्रशिक्षण ते कुठून तरी आधीच मिळवून आलेले आहेत.\nप्रत्यक्ष भागवतकार भगवान वेदव्यासांना ज्या रासक्रीडे ची भूल पडली ती रासक्रीडा चित्रांमध्ये. ही चित्रे कमीत कमी ३०० वर्षे आधी चितारली गेली आहेत.\nबरसाना येथील पौराणिक होळी. सब तो उस्सीके रंग मी रंग गयी हैं. उसे क्यो रंगा रही है \nमध्ययुगीन काळातील नागर वैभव. चित्रकाराची गोकुळ मथुरेची कल्पना.\nकृष्णकथा आपल्या रसाळ व्रजबोलीत ऐकवणारा तिथला गाईड.\nगोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. (खट्याळ बाललीला)\nवृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे\nआहे की नाही गम्मत कृष्णभूमीत \"बरसाना\" कधीही चुकवू नका.\nLabels: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, बरसाना, बांके बिहारी, व्रजभूमी\nयाचा विचार गांभीर्याने व्हावा.\nकृष्णभूमीत ६ : राधेचे गाव - बरसाना\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shrigondavalekarmaharaj.org/maharaj_home/home", "date_download": "2018-04-24T06:16:00Z", "digest": "sha1:CKZZ4N5JIZ3W7H3O3H53PJEWSHDBCCNT", "length": 8018, "nlines": 102, "source_domain": "shrigondavalekarmaharaj.org", "title": "Shri Gondavalekar Maharaj Official Website", "raw_content": "\nश्रीमहाराजांनी आपल्या जीवनात प्रसिद्धी व लौकिकाला फारच गौण स्थान दिले. नंतरच्या विश्वस्तांनीही तोच आदर्श ठेवून आजवर काम केले. पण आज या तंत्रज्ञानाच्या युगात, गोंदवले व श्री महाराजांविषयी विश्वासार्ह माहिती देणारे संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट), या माहितीच्या महाजालात असणे ही काळाची गरज आहे. यादृष्टीने हे संकेतस्थळ श्रींचरणी अर्पण करण्यास आनंद होत आहे. या संकेतस्थळा बाबतीत आपल्या सूचना वा प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्यात.\nजेथे दिसे सद्गुरू चरण तेची आम्हा गोकर्ण\nया श्री ब्रह्मानंद महाराजांच्या प्रसिद्ध अभंगावर यावर्षीच्या गुरूपौर्णिमा महोत्सवात श्री रवींद्र पाठक यांनी केलेली निरूपणे\nस्थळ : श्री ब्रह्मानंद सभामंडप,गोंदवले\nसंतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे.\nमी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे, तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे. जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात; तिकडे लक्ष देऊ नये. मनाच्या विषादाला कारण एकच असावे की, मी अजून भगवंताचा झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे. भगवंताचे रूप आनंदमय आहे, आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोहोचवीत असतो. अत्यंत दरिद्र्यालासुद्धा आनंदाची जागा असतेच....\nभक्तिरंगात रंगला पुण्यतिथी सोहळा \nगोंदवले , १२ डिसेंबर २०१७, हजारो भाविकांनी खचाखच भरलेला मंडप ... तेवढयाच गर्दीने ओसंडलेले लगतचे रस्ते आणि मनात फक्त श्री च्या समाधी दर्शनाची आस , आशा भक्तिमय वातावरणात पाच वाजून ५५ मिनिटांनी श्रींच्या...\n आपण सीमित आहोत. देहबुद्धीने मर्यादित आहोत. ईश्वर हा दृष्यापलिकडे असल्याने असीम आहे. तो ‘आहे’ एवढेच सांगता येतं; हेच नाम म्हणून नाम घेणं हेच सीमोल्लंघन म्हणून नाम घेणं हेच सीमोल्लंघन नाम व भगवंत एकरूप आहेत व...\n(निरुपणे श्री रवींद्र पाठक )\nप्रथम सोपान, बालकांड-कथाचिंतन क्रमांक ७\nरामनवमी व हनुमान जयंती उत्सव\n१८ मार्च ते २५ मार्च २०१८\nश्रीमहाराज स्थापित थोरल्या रामाच्या प्रतिष्ठापनेची १२६ वर्ष ह्या रामनवमीला पूर्ण होत आहे. १८ मार्च...\nगोंदावले बुद्रुक, ता. माण,\nगोंदवले संस्थानची अधिकृत वेबसाईट\nआपल्या प्रतिक्रियांसाठी पुढील ईमेल वर संपर्क करावा - info@shrigondavalekarmaharaj.org", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/ranbeer-kapoor.html", "date_download": "2018-04-24T07:27:31Z", "digest": "sha1:FWHUFYBH2DOREV4E3RAGSLVUSITLVY6D", "length": 12662, "nlines": 117, "source_domain": "zeenews.india.com", "title": "ranbeer kapoor - Latest News on ranbeer kapoor | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\n'या' व्यक्तीसाठी दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र येणार\nअभिनेत्री दीपिका पादूकोन आणि रणबीर कपूर ही बॉलिवूडमधील हीट जोडीपैकी एक आहे. दीपिका आणि रणबीर रिलेशनशीपमध्ये असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र कालांतराने हे दोघेही एकमेकांपासून दूर झाले. वेगळे झाल्यानंतरही त्यांनी 'तामशा' हा चित्रपट केला होता. मात्र आता ते पुन्हा एकत्र आले आहेत.\nपरदेशात होणार आलिया भट्टच्या 25व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन\nबॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट ही आघाडीच्या नव्या आणि दमदार कलाकारांपैकी एक आहे.\n...जेव्हा रणबीरला पाहून बिग बी ही गोंधळले\nबॉलीवूडचे असे काही आगामी सिनेमे ज्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे संजय दत्तच्या जीवनावरील चित्रपट. या सिनेमात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारलीये.\n'पाक' कलाकारांचा वाद : सलमानने केला राज ठाकरेंना फोन\nउरी हल्ल्यानंतर देशात संतापाचं वातावरण आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जावू देऊ नका अशी मागणी सर्वत्र होत आहे. सरकार देखील पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न करत आहे. यापासून तर हा वाद आता पाकिस्तानी कलाकारांना देशातून निघून जाण्यास सांगण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.\nकरण जोहर, रणबीर, वरूण आणि आलिया भट्ट झाले 'सैराट'\nनागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमाचा फिव्हर अजूनही कायम\nकॅटरिनासोबत ब्रेकअपनंतर 'ती' आली रणबीरच्या जीवनात\nरणबीर कपूर आणि कॅटरिना कॅफ यांचं ब्रेकअप झाल्यानंतर एकटा पडलेला रणबीर कपूर आता पुन्हा एकीच्या प्रेमात पडलाय. कॅटरिना कॅफ आणि रणबीर हे दोघेही यावर बोलणं टाळताय आणि एकमेकांच्या समोर येणं ही.\nकॅटरिना म्हणते, कोणी म्हटलं माझा ब्रेकअप झाला\nरणबीर कपूर आणि कॅटरिना कॅफ हे अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. पण याबाबत दोघांकडूनही कोणताही खुलासा अजून करण्यात आलेला नाही. पण दोघेही कार्यक्रमांमध्ये एकमेकांसमोर न येण्याचा प्रयत्न करत असतात.\nब्रेकअपनंतर कॅटरिनाची रणबीर कपूरवर अप्रत्यक्ष टीका\nरणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्या ब्रेकअपनंतर दोघेही सतत चर्चेत आहेत. दोघांमध्ये ब्रेकअप का झाला हा तर गॉसिपींगचा विषय बनला आहे. पण कॅटरिनाने स्वता:च मागचं सत्य उघड केलं आहे.\nरणबीर-कॅटरिनाचा 21 कोटींचा ब्रेकअप\nएखाद्या ब्रेकअपची किंमत ही २१ कोटी असू शकते.\nसलमानमुळे कॅटरिना आणि रणबीरमध्ये झालं ब्रेकअप \nकॅटरिना कैफ आणि रनबीर कपूर यांच्यामधलं रिलेशनशिप आता संपुष्टात आलं आहे. हे दोघेही आता कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाही. पण दोघांमधील रिलेशनशिप संपुष्टात येण्यामागे सलमान खान असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.\nहे काय सलमाननं कतरिनाला चक्क म्हटलं ‘कतरिना कपूर’\n१८ नोव्हेंबरला सलमानची लाडकी बहीण अर्पिताच्या लग्नाला कतरिना कैफही उपस्थित होती. यादरम्यान, तिनं खूप धमाल केली आणि नृत्यही केलं.\nफेब्रुवारीत रणबीर-कतरीना लग्नगाठ बांधणार\nबॉलिवूडची सर्वात चर्चित जोडी रणबीर-कतरीना लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये हे दोघे जण लग्न गाठ बांधणार असल्याची चर्चा जोरात आहे.\nअखेर रणबीर-कतरीना 2015मध्ये होणार विवाहबद्ध\nस्पेनमधील त्या हॉट फोटोंनंतर चर्चेत आलेली रणबीर-कतरीनाची जोडी अखेर लग्न करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. रणबीर कपूर आणि कतरीना कैफ हे हॉट कपल पुढील वर्षी म्हणजेच 2015मध्ये लग्न करू शकतात.\nन होणारी `भाभी` बेबोवर अजूनही नाराज\n`कॉफी विथ करण` या कार्यक्रमात कतरीनाला `भाभी` म्हणून संबोधत करीनानं कॅटचा रोष ओढावून घेतला होता... आणि कॅटचा हाच राग अद्यापही शांत झालेला नाही.\nसलमान माझ्यापासून केवळ एक मॅसेज दूर : कतरिना\nबॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिनं पुन्हा आपल्या आणि सलमान खान यांच्या नात्यातला गोडव्याची मीडियासमोर उघड उघड चर्चा केलीय. त्यामुळे, पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया या दोघांच्या नात्याकडे उंचावल्यात.\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nपेट्रोलने गाठला 55 महिन्यांचा उच्चांक, डिझेलच्या ही दरात मोठी वाढ\nनवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा\nआयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर\nअभिनेता राजपाल यादवला ६ महिन्याची जेल\nलग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये येतात या समस्या\nसांंधेदुखीचा त्रास आटोक्यात आणायला मदत करेल 'हे' घरगुती पेय\nराजस्थानला सनसनाटी विजय मिळवून देणारा गौतम, लिलावात मिळालेली किंमत ऐकून थक्क व्हाल\nकर्नाटक : भाजपने कापले येडियुरप्पांचे दोर, मुलाला नाकारली उमेदवारी\nफायदा कळेल तर, केळी नव्हे सालच खाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/news/after-11-years-atul-kulkarni-and-this-south-indian-superstar-will-work-toghether/25327", "date_download": "2018-04-24T06:51:49Z", "digest": "sha1:4DG3MIU4MENTR5WS4SWADP7G2L6FE7TA", "length": 25002, "nlines": 244, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "After 11 years Atul kulkarni and this south indian superstar will work toghether | तब्बल 11 वर्षांनंतर अतुल कुलकर्णीची 'या' साऊथच्या सुपरस्टारसोबत जमणार जोडी | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nतब्बल 11 वर्षांनंतर अतुल कुलकर्णीची 'या' साऊथच्या सुपरस्टारसोबत जमणार जोडी\nअतुल कुलकर्णी ‘दि हाऊस नेक्सट डोअर’ हा चित्रपट येत्या 3 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साऊथचा सुपरस्टार दिसणार आहे.\nसाऊथ आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीतला स्टार सिध्दार्थ येत्या 3 नोव्हेंबरला त्यांचा ‘दि हाऊस नेक्सट डोअर’ चित्रपट घेऊन येतोय. ह्या चित्रपटाची निर्मिती करण्यासोबतच सिध्दार्थने ह्या सिनेमात अभिनयही केलेला आहे.\nसिध्दार्थसोबत या चित्रपटात अभिनेता अतुल कुलकर्णीही दिसणार आहे. अतुल आणि सिध्दार्थने 11 वर्षांपूर्वी ‘रंग दे बसंती’ चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट 2006 सालचा सुपरहिट चित्रपट होता. यात सिद्धार्थ आणि अतुलसोबत आमीर खान, सोहा अली खान, कुणाल कपूर आणि शर्मन जोशी यांच्या मुख्य भूमिका होत्या. याचित्रपटातून देशभक्तीवर भाष्य करण्यात आले होते. ह्या चित्रपटानंतर आता अतुल कुलकर्णी आणि सिध्दार्थचे चाहते ‘दि हाऊस नेक्सट डोअर’ मधून पुन्हा एकदा दोघांना एकत्र पाहू शकतील.\n‘दि हाऊस नेक्स्ट डोअर’ हा चित्रपट व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि इताकी एन्टरटेन्मेटची निर्मिती आहे. मिलिंद राव ने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात सिध्दार्थ, एन्ड्रीया जेरेमिया आणि अतुल कुलकर्णी आहेत. हा चित्रपट 3 नोव्हेंबर 2017ला झळकणार आहे.\nअतुल कुलकर्णी कंगना राणौवतच्या 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' चित्रपट दिसणार आहे. यात तो तात्याराव टोपेंच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातून सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अकिंता लोखंडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. यात ती झलकारी बाईच्या भूमिकेत दिसणार आहे. झलकारी बाई या राणी लक्ष्मीबाईंच्या खास व्यक्तिंपैकी एक होत्या. इतिहासात इलकारीबार्इंचे अनन्यासाधारण स्थान आहे.. झलकारी बाईंने इंग्रजांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. युद्धात राणी लक्ष्मीबाई यांच्या जागी झलकारी बाई यांना ठेवण्यात आले होते. झलकारी बाईने आपल्या शौर्याने आणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईंच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. एका इंटरव्ह्यु दरम्यान अंकिता म्हणाली होती की, ''झलकारी बाईंबदल लोकांना फारशी माहिती नाही आहे. खूप काही लोकांना राणी लक्ष्मीबाई आणि झलकारी बाई यांच्या नात्याविषयीदेखील माहिती आहे''. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत कंगाना राणौवत दिसणार आहे.\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळक...\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केले...\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात...\nबॉलिवूडची ही अभिनेत्री करते सेंद्री...\n​अतुल कुलकर्णी करतोय इतका बोल्ड चित...\n​सोशल मीडियापासून का दूर पळते कंगना...\nFitness : पन्नाशीनंतरचे फिटनेस फिक्...\n‘चॅम्पियन फिल्में हर दिन’ 7 एप्रिल...\nबॉलिवूड ‘क्वीन’ कंगणाची आई साकारल्य...\n‘डीआयडी लिटिल मास्टर्स’मध्ये झाला प...\n'या' अभिनेत्याच्या मदतीसाठी धावून आ...\nसिद्धार्थ सागरने केला खुलासा त्याची...\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्...\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या...\n​‘पद्मावत’वर भारी पडतोय महेशबाबूचा...\n'कलंक'नंतर म्युझिकल चित्रपटात दिसणा...\n​‘पल्लू लटके...’ गाण्यावर अशी थिरकल...\nअर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राच्या...\nलवकरच सनी लिओनी सुरु करणार आपल्या ब...\n‘बेगम खान’ वाचवणार का सिद्धार्थ मल्...\n​यशराज कंपूत होतेयं शाहरूखची वापसी;...\nSEE PICS : ​सलमान खान मैत्रीला जागल...\n​मिलिंद सोमण चढणार बोहल्यावर, बघा...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-04-24T06:39:45Z", "digest": "sha1:22IHMIBNWH5GJUFJKKOSQAUQYGSTFHUH", "length": 10266, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डावी आघाडी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nडावी आघाडी ही भारत देशामधील समान वैचारिक धोरणे असलेल्या काही कम्युनिस्ट पक्षांची एक प्रमुख आघाडी आहे. प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये प्रबळ असलेली डाव्या आघाडी ह्या राज्यामध्ये १९७७ ते २०११ ह्या प्रदीर्घ काळादरम्यान सत्तेवर होती.\nभारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)\nइतर अनेक लहान साम्यवादी विचारांचे पक्ष\nकेरळ राज्यामध्ये देखील डाव्या आघाडीचे सरकार राहिले होते.\nडावी आघाडी • राष्ट्रीय लोकशाही आघाडी • संयुक्त पुरोगामी आघाडी\nबहुजन समाज पक्ष • भारतीय जनता पक्ष • भारतीय कम्युनिस्ट पक्ष • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष\nआम आदमी पार्टी • महाराष्ट्र नवनिर्माण सेना • अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम • फॉरवर्ड ब्लॉक • अरुणाचल काँग्रेस • आसाम गण परिषद • बिजू जनता दल • भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एम.एल.) लिबरेशन • द्रविड मुन्नेत्र कळघम • मणिपूर फेडरल पक्ष • डोंगर राज्य पीपल्स लोकशाही पक्ष • राष्ट्रीय लोक दल • स्वयंभू राष्ट्रवादी त्वीप्रा पक्ष • जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स • जम्मु काश्मीर राष्ट्रीय पँथर्स पक्ष • जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी • जनता दल (धर्मनिरपेक्ष) • जनता दल (संयुक्त) • जनाधिपतीय संरक्षण समिती • झारखंड मुक्ति मोर्चा • झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) • केरळ काँग्रेस (मणी) • केरळ काँग्रेस • महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष • मणिपूर पीपल्स पक्ष • मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम • मेघालय लोकशाही पक्ष • मिझो राष्ट्रीय दल • मिझोरम पीपल्स सम्मेलन • मुस्लिम लीग केरळ राज्य मंडळ • नागालँड पीपल्स फ्रंट • राष्ट्रवादी लोकशाही चळवळ • राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेस • पटाली मक्कल कात्ची • राष्ट्रीय जनता दल • राष्ट्रीय लोक दल • क्रांतीकारी समाजवादी पक्ष • समाजवादी पक्ष • शिरोमणी अकाली दल (सिम्रनजीत मानसिंग) • शिरोमणी अकाली दल • शिवसेना • सिक्कीम लोकशाही दल • तेलुगु देशम पक्ष • संयुक्त लोकशाही पक्ष • संयुक्त गोवा लोकशाही पक्ष • उत्तराखंड क्रांती दल • झोरम राष्ट्रवादी पक्ष • अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस • इंडियन युनियन मुस्लिम लीग\nऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन • भारतीय नवशक्ती पक्ष • लोक जनशक्ती पक्ष • लोकतांत्रिक जन समता पक्ष • राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष • आर.पी.आय. (आठवले) • समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय)\nइतर नविन किंवा लहान पक्ष\nलोकसंग्राम पक्ष • जनसुराज्य पक्ष •\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मार्च २०१५ रोजी ११:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.in/2015/12/", "date_download": "2018-04-24T06:24:37Z", "digest": "sha1:J2TXQOFLZKCUOGNVICNI5BYDPDXCL2MW", "length": 77663, "nlines": 210, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.in", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: December 2015", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ४\nपूर्वपिठीका : आचार्य पदवीसाठी ( Ph. D. ) वर्ष भराचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. तो मुंबईला पूर्ण करायचा म्हणून यावर्षी मुंबईच्या दर शनिवारी वाऱ्या झाल्यात. बहुतांशी वेळा खाजगी गाड्यांतून हा एका दिवसाचा साधारण ७८० किमी चा प्रवास पूर्ण करत गेलो. (त्यासंबधी चा तपशील इथे ).\n२३ डिसेंबर ला शेवटची परीक्षा. लागून आलेल्या सुट्ट्या. त्यामुळे खाजगी गाड्यांचे भाडे गगनाला भिडलेले. ज्या प्रवासाला साधारणतः ७५० ते ८०० रुपये लागतात त्या प्रवासासाठी १८००, २००० रुपये मोजायचे जिवावर आले होते. मग माझ्यातल्या प्रवासी पक्षाने पर्यायी मार्गाचा शोध सुरू केला. आणि एका वेगळ्याच प्रवासाची मजेदार सुरुवात झाली.\n२२ डिसेंबर : महाविद्यालयातून दुपारी लवकरच निघालो. महाविद्यालयाच्या समोरच धुळ्याला जाणाऱ्यां वाहनांसाठी उभा ठाकलो. शिरपूर - नाशिक बस आली पण आमच्या थांब्यावर थांबली मात्र नाही . मग मात्र तगमग वाढू लागली. नशीबाने एक मारुती गाडी थांबली . आतली मंडळी ओळखीची निघाली. धुळ्यापर्यंत आरामात प्रवास झाला.\n२२ डिसेंबर २०१५ सायंकाळी १८. ३० : धुळे स्टेशनवर चाळीसगावावरून येणाऱ्या पॅसेंजर ची वाट बघत आहोत. हीच पॅसेंजर परतीच्या प्रवासात धुळे मुंबई डबे घेऊन परतते. धुळे स्टेशनावर थोडी भटकंती झाली.\n२२ डिसेंबर २०१५ सायंकाळी १८. ४५ : चाळीसगाव - धुळे पॅसेंजर आली. डबा ठरला होता. B - ४ कोचं . बरेच प्रवासी खालच्या वर्गातून या एकमेव ए. सी. थ्री टायर मध्ये अपग्रेड झालेले होते. लालू प्रसाद यादव या इसमाने भारतीय रेल्वेत आणलेल्या काही चांगल्या गोष्टीं पैकी ही एक. मला स्वतःला हे अपग्रेडेशन एक दोनदा नव्हे तर तीनवेळा मिळाले आहे.\nयावेळी माझा बर्थ साईड लोअर (१५ नं. ) आहे. त्यामुळे छानपैकी सामान वगैरे लावून गाडीच्या निरीक्षणासाठी मी बाहेर आलोय. पुणे शेडचे WDM ३A १६३४९ R भाऊ गाडीच्या धुळे टोकाकडून आता चाळीसगाव टोकाकडे निघाले होते. आत्तापर्यंत SHF असलेले एंजिन आता रिव्हरसल मुळे साहजिकच LHF झाले.\nरेल्वे कोच फ़ॅक्टरी कपुरथला येथे जुलै २०१४ ला बनलेला कोच.\nचाळीसगाव ला ११०५८ अप अमृतसर - मुंबई एक्सप्रेसला जोडण्यात येणाऱ्या ४ कोचेसपैकी हा एक कोच . ( एक गार्डाचा आणि जनरल डबा, दोन स्लीपर डबे आणि एक ए.सी . थ्री टायर )\nपॅसेजचा प्रकाश आत येउ नये या दृष्टीने छान डिझाईन केलेला कोच चा दरवाजा.\nबरोबर १९.२० ला गाडी हलली. अनेक छोटी स्टेशन्स घेत चाळीसगावला १३ मिनिटे उशीरा २०. ४२ ला पोहोचली. अमृतसर - मुंबई एक्सप्रेस वेळेवर धावत असल्याचे वर्तमान आंतरजालावरून कळलेच होते त्यामुळे माझ्या मागील लेखात अंदाज वर्तवल्याप्रमाणे part B टाईपचे शंटिंग होणार हे नक्की होते. ते बघायला आणि अमृतसर - मुंबई एक्सप्रेस चे एंजिन बघायला मी उत्सुक होतो. दारातच उभा राहून हे मी बघत होतो.\nअमृतसर - मुंबई एक्सप्रेस वेळेवर आली. शंटिंग करताना तिचे इंजिनही दिसले. गाझियाबाद शेडचे दुरांतो गाड्यांच्या रंगसंगतीचे ३०२४५ WAP 7. ११०५८ या गाडीच्या वेळापत्रकावर जर आपण नजर टाकली तर लक्षात येईल की या गाडीला अत्यंत आक्रमक (लवकर वेग घेणाऱ्या ) इंजिनाची अत्यंत आवश्यकता आहे. आणि भारतीय रेल्वेतली काही संवेदनाशील मंडळी त्या प्रकारचे इंजिन हल्ली या गाडीला देतातही.\nजेवण वगैरे केले आणि नेहेमीप्रमाणे मस्तपैकी बर्थ लावून निद्राधीन होण्याचा विचार करू लागलो. या गाडीला नेहेमीच मध्य रेल्वेची नवीन चांगली आणि स्वच्छ अंथरूणे पांघरूणे मिळतात.\nजाग आली तेव्हा बाजूच्या सहप्रवाशांची उतरण्याची लगबग सुरू झाली होती . पहाटेचे अडीच वाजले होते. कल्याण ला गाडी पहाटे ३. ०० वाजताच पोहोचत असल्याने सगळ्या प्रवाशांच्या झोपेचे खोबरे होणार हे नक्की आहे. याला इलाज नाही .\nखरेतर ठाण्याला सौ. छोटी ताई कडे उतरायचं ठरलं होत पण पहाटे ४ वाजता त्यांच्याकडे जाउन त्यांच्याही झोपेचे खोबरे करण्याचे जिवावर आले होते. अनायासे तिकीट मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत होतेच. मग फुल पैसा वसूल करण्यासाठी थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत गेलो. गाडी फक्त ७ मिनिटे उशीरा म्हणजे ४. १५ ला पोहोचली . कल्याणपासून मागे ११०२८ चेन्नई मुंबई एक्सप्रेस होती .\nमुंबई त कधी नव्हे ती खूप थंडी पडली होतॆ. बोचरे वारे अंगावर घेत ठाणे लोकलने पुन्हा ठाणे गाठले आणि वृंदावन सोसायटीत सौ. छोटी ताई कडे पहाटे ५.३० ला पोहोचलो.\n२३ डिसेंबर २०१५ सकाळी १०. ४५ : अंधेरीला पोहोचण्यासाठी ठाण्यावरून निघालो. मुलुंड बस स्थानकावर ए. ४२२ ही बेस्ट प्रशासनाची ए.सी . बस उभीच होती . चिनी बनावटीची किंगलॉंन्ग सेरीटा ही व्हॉल्व्हो ला पर्याय म्ह्णून साधारण २००९-१० मध्ये पुढे आली होती. महाराष्ट्र एस. टी. ने महाबसच्या माध्यमातून हा प्रयोग केला पण मुंबई पुणे प्रवासात नवीन घाटातही ही बस धापा टाकायला लागल्यावर महाराष्ट्र शासनाने हा प्रयोग बंद केला. काही खाजगी ऑपरेटर्स नी ही ह्या गाडीत हात पोळून घेतल्यावर पुन्हा या गाड्या रस्त्यावर दिसल्या नाहीत. पण बेस्टने मात्र हट्टाने याच गाड्या घेतल्या. यात तत्कालीन बेस्ट प्रशासनाचा काय स्वार्थ असेल हे आपण लक्षात घेउ शकतो. सर्वत्र नाकारल्या गेलेली ही बस बेस्टने मात्र स्वीकारली. पण बेस्ट कर्मचा-यांचे खरोखर कौतुक करण्यासारखे आहे. त्यांनी या गाड्या खूप नीट जपून ठेवल्या आहेत.\nमजास आगाराची २०११ मधली ही बस.\nआज याच मार्गावर (मुलुंड / ठाणे ते अंधेरी ) बेस्टला नवी मुंबई प्रशासन बससेवेची (एन. एम. एम. टी.) आणि ठाणे महापालिका बससेवेची (टी. एम. टी.) स्पर्धा आहे.\nटी . एम. टी . ची व्हॉल्व्हो\nत्यांच्याकडे व्हॉल्व्हो ८४०० मॉडेलच्या (सध्यातरी) छान असलेल्या बसेस आहेत. त्यांची भाडीही बेस्टपेक्षा कमी आहेत. पण २ वर्षांनंतर ते या बसेस कशा ठेवतात याच्यावरच या स्पर्धेचा निकाल ठरवता येईल. आत्तापर्यंतचा या दोन्हीही प्रशासनाचा अनुभव लक्षात घेता बेस्टच जिंकेल असे वाटतेय. हातात आलेली कसलीही फ़तरी पाने घेउन डाव जिंकायला खूप जिगर पाहिजे, खेळाडू निष्णात पाहिजे.\nप्रवासात पवईपर्यंत एक डुलकी लागली. पहाटे २, २.३० ला उठल्याचा परिणाम जाणवत होता. प्रश्नपत्रिका सोडवताना मात्र टक्क जागा होतो हे नशीब. चार वाजता पेपर संपला. सर्व सहका-यांचा निरोप घेतला. त्यांनी वर्षभर केलेल्या सहकार्याबद्द्ल त्यांचे खरोखर आणि मनापासून आभार मानलेत. मी एव्हढ्या दूर असताना त्यांनी वेळोवेळी जी मदत केली त्याला तोड नाही. अशावेळी कृतज्ञता व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात.\nपरतीचा प्रवास जरा वेगळा होता. १२१०९ मुंबई - मनमाड पंचवटी एक्सप्रेसने मनमाडपर्यंत प्रवास होता. मनमाडपुढे अनिश्चितता होती. दादर स्टेशनवर आलो.\nबाहेरगावी जाणा-या गाड्यांसाठी ५ नं. चा फ़लाट आहे खरा पण मध्य रेल्वे, सह्याद्री, विदर्भ, पंचवटी या गाड्या ४ नं. च्या, लोकल्सच्या, फ़लाटावरून सोडते. प्रवाशांना संध्याकाळी लोकलची गर्दी अंगावर घेत आपल्या डब्यापाशी जायला काय त्रास होतो हे एकदा अधिका-यांनी अनुभवायला हवय. त्या वेळी ५ नं. फ़लाटावरून दादर - कल्याण फ़ास्ट लोकल्स सुटतात म्हणून ही अडनिडी व्यवस्था.\n२३ डिसेंबर २०१५, १८.१० वाजता : जवळपास २१ तास उशीरा धावणारी १२३२२ मुंबई- हावडा मेल (अलाहाबाद मार्गे) ५ नं. च्या फ़लाटावर घेतायत. आश्चर्य म्हणजे गाडी बहुतांशी रिकामी आहे. दरम्यान ४ नं वरून लोकल गाड्यांचा रतीब ठाण्याकडे सुरूच आहे. १८.३० झालेत तरी मेलला जाण्यासाठी परवानगी नाही. आता हिला थांबवून बहुतेक पंचवटीच्या मागे सोडतील ही आशा. पण नशीब आपल्या मनासारखे कधीच वागत नाही याचा पुन्हा प्रत्यय आला. मध्य रेल्वेच्या हद्दीत मध्य रेल्वेच्या सुपरफ़ास्ट आणि प्रतिष्ठित गाडीला प्राधान्य न देता पूर्व रेल्वेच्या आधीच रखडलेल्या गाडीला प्राधान्य देण्यात आले आणि मनमाडपर्यंत ही गाडी आमच्या पंचवटीपुढे होती. त्यासाठी पंचवटी एक्सप्रेसला २० मिनीटे उशीर होत होता. भारतातल्या इतर कुठल्याही भागात दुस-या विभागाच्या गाडीसाठी हे असले औदार्य दाखवले जात नाही.\nपंचवटीच्या ए. सी. चेअर कार मध्ये मला ७५ क्र. चे आसन मिळाल्यामुळे मी जरा चिंतीत होतो. आजवर ज्या ज्या गाड्यांच्या ए. सी. चेअर कार ने मी प्रवास केला होता त्यांना ७१ किंवा ७३ आसने होती. मी माझी शंका फ़ेसबुकवर व्यक्त केल्यानंतर माझा रेल्वे फ़ॅन मित्र कुणाल खैरनार ने मनमाड स्टेशनवर जाउन त्या चेअर कारचा फ़ोटो काढून पाठवून दिला. त्यात एकूण आसने ७५ दाखवल्यामुळे माझी शंका फ़िटली तरी ७५ आसनांची नवीन व्यवस्था कशी असेल याची उत्सुकता मात्र कायम होती.\n१८. ३८ झालेत आणि दिमाखात पंचवटी एक्सप्रेस दादर स्टेशनात दाखल झाली. 21950 WCAM 3 टाइपच्या कल्याण शेडच्या बुवांकडे पूर्ण मनमाडपर्यंत या गाडीची जबाबदारी होती. गाडीत शिरल्या शिरल्या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. खरंतर डब्यात ७३ च आसने होती पण सोयीसाठी ३ आणि ७३ क्रमांकाची आसनेच नव्हती.\nडबा नवीन होता. १२ मार्च २०१५ रोजी पेरांबूर चेन्नई येथे बनलेला. जनशताब्दी रंगसंगतीचा हा डबा होता. मध्य रेल्वेच्या औरंगाबाद किंवा मडगाव जनशताब्दीला हा डबा न देता पंचवटी एक्सप्रेसला हा डबा देण्यात आलेला होता.\nउलटसुलट कसाही वाचा तोच नं. स्पेशल डबा. Palindrome number.\nडेक्कन क्वीन नंतर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची लाडकी पंचवटी एक्सप्रेस. सुरू झाली तेव्हा मुंबई - नाशिक होती पण मनमाड्च्या रेल्वे वर्कशॉपच्या कर्मचा-यांनी मनमाडपर्यंत पळवली. तशीच गत गोदावरी एक्सप्रेसची झाली. तपोवन एक्सप्रेसची झाली. आता तपोवन एक्सप्रेस तर नांदेड पर्यंत वाढवल्या गेली. मुंबई - पुण्यासाठी डेक्कन क्वीन, इंद्रायणी, इंटरसिटी, डेक्कन एक्सप्रेस, सिंहगड या गाड्या असताना फ़क्त मुंबई - नाशिक साठी एकही गाडी नाही हे दुर्दैव आहे. गोदावरी आणि पंचवटी या दोन्ही गाड्या ९५ % नाशिकलाच भरतात आणि परतीच्या प्रवासात नाशिकलाच रिकाम्या होतात. तरीही मनमाडवाल्यांच्या दादागिरीमुळे मनमाडपर्यंत धावतात.\nबरोबर १८.४० ला गाडी हलली. लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे असेल पण गाडी पूर्ण भरलेली होती. ७५ क्र. म्हणजे खिडकी होती. गाडी मुंबईच्या उपनगरांमधून जात असताना मी मात्र खिडकीबाहेर पाहत गेल्या ६ महिन्यांच्या इतिहासात रमलो होतो. गेल्या ६ महिन्यांमध्ये ज्या मुंबईच्या वा-या झाल्यात त्यांची आज सांगता होत होती. परीक्षा झाली होती. २५ डिसेंबरनंतर ख्रिसमसच्या सुट्ट्या लागणार होत्या. मी आनंदात होतो.\nकल्याण स्टेशनची अधिकृत वेळ १९.१० / १९.१३ आहे पण पुढे काढलेल्या हावडा मेलमुळे आम्ही हळूहळू जात होतो. कल्याण १९.३६ ला आले आणि आम्ही १९.४० ला रवाना झालो. दिवसभराच्या थकव्यामुळे कल्याणनंतर पुन्हा डोळ्यांवर झापड आली आणि आम्ही कधी निद्रादेवीच्या राज्यात गेलो हे कळलेच नाही.\nजागा झालो तेव्हा गाडी कसारा स्टेशन सोडून थळ घाट चढत होती. भुकेची जाणीव झाली होती. गाडीत विदर्भ, तपोवन एक्सप्रेस प्रमाणे जेवण येणार नाही याची माहिती मिळाली होती त्यामुळे इगतपुरीला बाहेर जाउन काहीतरी खायला घेउन येण्याचा निश्चय झाला होता. आणि झालेही तसेच. इगतपुरीला बाहेर जाउन उपलब्ध असलेली एकमेव डिश (वडापाव) खालली. आजकाल इगतपुरीला एंजिन वगैरे बदलत नसल्याने इगतपुरीत फ़क्त ५ मिनीटे थांबलो. (२१.१० / २१.१५). अधिकृत वेळ २०.४८ / २०.५०. म्हणजे २५ मिनीटे उशीर.\nइगतपुरीनंतर मग गाडीने वेग घेतला पण WCAM एंजिनाची महत्तम वेग मर्यादा १०५ किमी प्रतितास असल्यामुळे जरी हा विभाग १२० किमी प्रतितास साठी बनविल्या गेला असला तरी गाडी तो वेग गाठू शकत नव्हती. मला या मार्गावर सेवाग्राम एक्सप्रेस मधून केलेल्या अनंत प्रवासांची आठवण झाली. कसल्या तुफ़ान वेगात व्हायचा हा प्रवास इगतपुरी ते देवळाली हा ४५ किमी चा प्रवास सेवाग्राम बरोबर ३२ मिनीटांत करायची. पण पंचवटीला या प्रवासाला ४० मिनीटे लागलीत. देवळालीत ५० % गाडी रिकामी झाली. बरेच नाशिककर हल्ली देवळाली आणि परिसरात स्थायिक झालेत की काय \nदेवळालीला दोन मिनीटे (२१.५५ / २१.५७) थांबून निघालो. अधिकृत वेळ (२१.२३ / २१.२५) म्हणजे ३२ मिनीटे उशीर. मनमाडनंतर प्रवासाची अनिश्चितता असल्याने मनमाड लवकरात लवकर गाठले गेले पाहिजे ही मनात जाणीव होती. लवकर पोहोचलो तर जास्त बसेस / खाजगी गाड्यांचा पर्याय मिळेल अशी आशा होती. ठीक आहे. ३०, ३५ मिनीटे उशीर म्हणजे फ़ार नाही. नाशिक २२.०५ ला आले. गाडी जवळपास ९५ % रिकामी झाली. आमच्या डब्यात आम्ही केवळ ५ प्रवासी आणि रेल्वेचे टी. टी. ई. उरलोत. २२.०९ ला नाशिकवरून निघालोत. अधिकृत वेळ (२१.३८ / २१.४०) म्हणजे नाशिकला पुन्हा २५ मिनीटे उशीर.\n1999 मध्ये बनलेली ए. सी . चेअर कार.\nनाशिकनंतर रिकाम्या झालेल्या गाडीत फ़ेरफ़टका मारायचे ठरवले. बाजूचाच सी. २ कोचपण जवळपास रिकामा झाला होता. फ़क्त तिघेजण होते. त्यानंतरचा मासिक पास धारकांसाठीचा ए.सी. डबा मस्त होता. जुना होता पण त्यातली आसने विशेष होती.\nथोड्या अधिक शोधकार्यानंतर कळले की हा एकेकाळी डेक्कन क्वीनचा डबा होता. आता पंचवटीला जोडला गेला होता. डेक्कन क्वीनचे वेळापत्रक गाडीत लावलेले होते.\nफ़ारसे काही विशेष न घडता निफ़ाड आणि लासलगाव स्थानके आलीत आणि गेलीत. रात्री २२.५० ऐवजी तब्बल २५ मिनीटे उशीरा पंचवटी एक्सप्रेस २३.१५ ला मनमाडला पोहोचली. घाईघाईतच स्टेशनबाहेर पडलो. साधारण एखादा किलोमीटर चालून बसस्थानकावर आलोत.\nफ़ार वाट पहायला न लावता साधारण ११.५० च्या सुमारास मध्य प्रदेश परिवहनची पुणे - इंदोर बस आली. माझा अंदाज खरा ठरला. रात्रीच्या वेळेला दोनतीन तरी पुणे- इंदोर किंवा शिर्डी - इंदोर बसेस थेट शिरपूरला जायला मिळतील या अंदाजावर शिक्कामोर्तब झाल्याने मी खूष. केबीनमधल्या आसनावर बसलो. गाडी ठेचून भरली होती.\nटिपीकल मध्य प्रदेशी स्टाइलने बस निघाली. ड्रायव्हरसकट दोन तीन प्रवाशांनी विड्या शिलगावल्या. धुराने केबीन भरून गेली. कंडक्टर साहेबांनी तिकीट म्हणून एक कागदाचा तुकडा दिला. \" शिरपूरपर्यंत तिकीट किती \" या माझ्या प्रश्नावर त्यांनी मला नीट न्याहाळून \"१४० रूपये\" असे उत्तर दिले. माझ्या अंगावर अदिदासचे जॅकेट नसते तर कदाचित १२० रूपयात काम भागले असते असे मला वाटून गेले.\nहाच तो दिव्य तिकीट नावाचा कागद. मध्य प्रदेश परिवहनाची अनागोंदी .\nAshok Leyland VIKING मॉडेल. सर्वत्र हेच मॉडेल चालत असताना महाराष्ट्र एस. टी. मात्र लेलॅण्डच्या चित्ता मॉडेलचाच आग्रह धरते.\nमालेगावला साधारण ५० मिनीटांत पोहोचलो. गाडी जवळपास अर्धी रिकामी झाली. फ़ार न थांबता निघालो. धुळ्यापर्यंत मग ड्रायव्हर आणि कंडक्टर साहेबांशी गप्पांची मैफ़ल जमविली. धुळ्यात स्टॅंडवर गाडीचे आणि इतर गाड्यांचे फ़ोटोसेशन केले.\nMP -11 / P 3455. पुणे शिर्डी इंदोर बस.\nत्याच मार्गावरील दुसरी गाडी . MP -11 / P 4455. धुळे स्थानकांत\n३ बाय २ आसन व्यवस्था.\nकेबीन मधून काढलेला फ़ोटो\nकेबीन मध्ये असलेला बाक कम बर्थ.\nशिरपूरला महाविद्यालयासमोर गाडी थांबली तेव्हा रात्रीचे ३.०० वाजले होते. वेगळ्या पद्धतीने प्रवास करण्याचा हा एक वेगळा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे सुख मनात घेउन घरी परतलो आणि उरलेली झोप गोळा करायला लागलो.\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात आपली येष्टी.\nमहाराष्ट्र राज्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या बहुतेक प्रत्येकाला आपल्या या येष्टी बद्दल आपुलकी वाटत असतेच असते. आमच्या सारखी काही वेडी मंडळी वयाने वाढली तरी बालपणापासून आकर्षण असलेल्या एस.टी. च्या बाबतीत वृत्तीने वाढायला तयार नसतात. म्हणून मोठे झालो तरी ड्रायव्हर काकांच्या मागच्या आडव्या बाकावर सर्व प्रवाशी प्रवासाच्या दिशेच्या उलट बसले असताना सीटसवर पाय उलटे ठेवून ड्रायव्हर काकांच्या कौशल्याकडे आणि समोरून येणा-या वाहनांकडे पहात केलेला प्रवास असो, किंवा कंडक्टर काकांशी खास गट्टी जमवून एशियाडमध्ये त्यांच्या केबीनमधल्या सीटसवर बसायला मिळावे म्ह्णून केलेली आर्जवे असोत, आमच्या निजशैशवाला कधी धक्का लागला नाही. एस.टी. आम्हाला प्राणापलीकडे प्रिय आहे.\nपण गेल्या दोन अडीच दशकात या आमच्या प्रिय एस.टी.ची जी घसरण सुरू झालेली आहे त्यामुळे एकंदर एस.टी.च्या अस्तित्वाचेच संकट उभे ठाकले आहे. अनेक कारणे त्यात आहेत. त्यातल्या काही कारणांचा घेतलेला हा आढावा. (आमच्या काही एस.टी. प्रेमी मित्रांना काही मुद्द्यांबद्दल राग येण्याचीही शक्यता आहे. पण मित्रांनो पेशंट वाचवायचा असेल तर \"कडवी दवा\" पाजण्याचे दिवस आता आलेले आहेत.)\nकेवळ आमचे प्रेम आहे म्हणून आपली एस.टी. सर्वश्रेष्ठ आहे अशा भ्रमातून आपण बाहेर पडले पाहिजे. भारतीय राज्य परिवहन महामंडळांचा विचार केला तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही दोन महामंडळे आपल्या कानामागून येउन तिखट झालेली आहेत. (त्यांच्या कारणांचा शोधही खालील आढाव्यात घेतलेला आहे.) एस.टी. च्या सध्याच्या तब्येतीबद्दल एका एस. टी. प्रेमीने दिलेला हा तपासणी अहवालच (पॅथॉलॉजी रिपोर्टच) म्हणाना. फ़क्त याच्या वर विचार करून योग्य ती औषधयोजना करणे हे महामंडळातील उच्च अधिका-यांच्या हातात आहे.\n१. संगणकीकरण : भारतात संगणकीकरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून जवळपास दशक दीड दशकांचा कालावधी लोटला आहे पण एस. टी ने त्याचा मनापासून अंगीकार केला आहे असे वाटत नाही. किंवा त्याचे फ़ायदे एस. टी. च्या लक्षात आलेले आहेत असे वाटत नाही. आरक्षित तिकीटे खरेदी करायला स्थानकापर्यंत जाउन स्थानकाच्या आरक्षण कार्यालयांसमोर रांगा लावून उभे राहण्याचे दिवस ८० च्या दशकाबरोबर मागे पडलेत हे एस. टी. ला कुणीतरी सांगायला पाहिजे. नाही म्हणायला, एस. टी. ची आरक्षणाची वेबसाइट आहे पण त्यात असंख्य त्रुटी आहेत आणि वर्षानुवर्षे त्या तशाच आहेत. मी स्वतः आंध्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांच्या बसेसच्या वेबसाइटवर जाउन त्यांची मेंबरशिप घेतलेली आहे. गंमत म्हणून \"क्ष\" ठिकाणापासून \"य\" ठिकाणापर्यंत बुकींगचे प्रयत्नही केलेले आहेत. पण तामिळनाडूचा अपवाद वगळला तर वर उल्लेखलेली दोन्ही राज्ये आपल्या पुढे आहेत हे आपल्या लक्षात येइल.\nसांगोला ते सोलापूर. दर १५ मिनीटांना गाडी असताना मला महाराष्ट्र एस. टी. च्या वेबसाइटवर मात्र सकाळच्या एकाच गाडीचे (कोल्हापूर-उस्मानाबाद) आरक्षण उपलब्ध आहे. त्यातही आजकाल सर्व गाड्या २ बाय २ झाल्याचे वेबसाइटच्या गावीही नाही. मी आरक्षित केलेल्या सीटसच मला मिळतील याबद्द्ल वेबसाइटच मला \"खात्री नाही\" असे सांगते. मग मला गर्दीच्या दिवसांमध्ये मुलाबाळांसह प्रवास करण्यासाठी ऐनवेळी स्थानकावर जाउन मिळेल त्या बसमध्ये मिळेल त्या जागेवर बसून प्रवास करायला एस. टी. भाग पाडतेय असे म्हणायला हवे. मी आरक्षित तिकीटे काडून, ज्यादा अधिभार भरून, जायला तयार असतानाही. सर्वत्र हीच अडचण आहे. तिकीटे आरक्षणासाठी वेबसाइटवर आहेत पण बहुतांशी बसच्या सुरूवातीच्या स्थानकापासून शेवटच्या स्थानकापर्यंतच.\nभारतीय रेल्वेच्या जगडव्याळ कारभारामध्ये जर संपूर्ण तिकीट व्यवस्थेचे संगणकीकरण होउ शकते मग आपल्या एस. टी. मध्ये का नाही उत्तर महामंडळाच्या उच्चाधिका-यांची तंत्रज्ञानाच्या वापराबाबत उदासीनता, \"लोक कुठे जाताहेत आपल्याशिवाय उत्तर महामंडळाच्या उच्चाधिका-यांची तंत्रज्ञानाच्या वापराबाबत उदासीनता, \"लोक कुठे जाताहेत आपल्याशिवाय \" ही मग्रूरी. मग \"प्रवासी वाढवा अभियान\" वगैरे केवळ दिखावा ठरतो.\nमी नुसती टीका करून थांबणार नाहीये. तर त्यावर उपाययोजनापण सुचविणार आहे.\nअ) भारतीय रेल्वेच्या उदाहरणाला डोळ्यापुढे ठेवून एस. टी. तिकीटांचे संगणकीकरण करा. महाराष्ट्रात कुठूनही कुठचे जाण्याचे आणि येण्याचे आरक्षण सहजगत्या उपलब्ध असायला हवे. जाण्याचे आणि येण्याचे आरक्षण जर घरबसल्या मिळत असेल तर खाजगी गाड्यांकडला ओढा कमी होइल.\nआ) सलग तिकीट काढून प्रवासाची सेवा संगणकीकरणातून उपलब्ध करून द्यायला हवी. समजा मला सांगोला ते नागपूर असा थेट गाडीचा पर्याय उपलब्ध नाही तरीसुद्धा मी सांगोला ते नागपूर असे थेट तिकीट काढू शकलो पाहिजे. त्यात सांगोला ते पंढरपूर हा प्रवास कुठल्याही गाडीने आणि पंढरपूर ते नागपूर हा प्रवास थेट गाडीने करण्याची मुभा हवी. किंवा मला कोल्हापूर-उमरखेड आणि उमरखेड-नागपूर अशा दोन्ही बसने आरक्षित प्रवास करण्याची संधी द्यावी. अर्थात या सर्वासाठी उचित ते शुल्क आकारूनच. भारतीय रेल्वे हे करतेय. त्यांना खाजगीतून स्पर्धा नसतानाही.\nइ) संगणकीकरणामुळे एस. टी. ला पूरक (फ़ीडर) सेवा सुरू करता येइल. उदाहरणार्थ : नागपूर-पुणे बस नागपूरवरून निघते ती अमरावतीपर्यंतच्या १५० किमी च्या अंतरात कोंढाळी, कारंजा (घाडगे), तळेगाव, तिवसा आणि मोझरी असे थांबे घेत जाते. किती प्रवासी कोंढाळी ते पुणे, कारंजा ते पुणे प्रवास करतात ही माहिती आजकाल वाहकांकडल्या तिकीट यंत्रांवरून सहज उपलब्ध होउ शकेल मग ही संख्या जर अगदीच कमी असेल तर त्यांच्या साठी ही पूरक सेवा महत्वपूर्ण ठरू शकेल.\nकोंढाळी ते पुणे थेट तिकीट काढून कोंढाळी ते अमरावती हा प्रवास महामंडळाच्या दुस-या कुठल्याही बसने आरक्षणासह करून नागपूर-पुणे बस त्या प्रवाशाला अमरावतीवरून पकडता येइल. त्या प्रवाशाला सध्याच्या वेळेपेक्षा १५-२० मिनीटे लवकर बस कोंढाळीवरून घ्यावी लागेल हे खरे असले तरी एका प्रवाशासाठी कोंढाळी बस स्थानकात जाण्या येण्याच्या व्यापातून संपूर्ण बसची मुक्तता होइल आणि बसच्या धाववेळेत बचत होइल. नागपूर ते पुणे हे अंतर खाजगी आरामगाड्या १४ तासात कापत असतानाच एस. टी. ची हिरकणी मात्र १९९० च्या दशकातील वेळापत्रकानुसारच धावत किमान १७ तास घेत धावते. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे हे अकारण थांबे कमी केलेत तर थेट प्रवासी मिळण्याचे प्रमाण वाढेल आणि भारमानही वाढेल.\nई) तशीच सोय परतीच्या प्रवासालाही उपलब्ध व्हायला हवी. पुणे ते काटोल थेट तिकीट काढून नागपूर किंवा अमरावतीवरून या पूरक सेवेचा वापर करून गंतव्य स्थळी जलद पोहोचता यायला हवे. आता ही पूरक सेवा सुरू करायची म्हणजे विशेष बसगाड्या सोडायच्या असे नव्हे तर असलेल्या बसगाड्यांचे योग्य नियोजन आणि संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून घेत प्रवाशांच्या सेवेसाठी योग्य ते नियोजन मात्र झाले पाहिजे. नागपूर ते अमरावती या मार्गावर दर पंधरा मिनीटांनी एक बस असते. मग नागपूर-पुणे कोंढाळीला न थांबवता थेट प्रवास करू इच्छिणा-या प्रवाशाला त्याआधी ३० मिनीटे धावणा-या नागपूर-अमरावती बसने अमरावतीत आणून पुढल्या प्रवासाला रवाना करणे सहज शक्य होइल.\nवरीलप्रमाणे अशी अनेक उदाहरणे विभागशः पहायला मिळतील .\n२) बस बांधणी बाबत : महाराष्ट्रात महामंडळाच्या स्वतःच्या तीन कार्यशाळा आहेत. नागपूर, दापोडी (पुणे) आणि औरंगाबाद (चिकलठाणा) येथे. वर्षानुवर्षे एकाच प्रकारच्या बसगाड्यांची बांधणी तिथे होते. ३ बाय २ ऐवजी २ बाय २ असा फ़रक एव्हढ्यात पडलाय पण मूलभूत अशा स्वरूपाचा फ़रक मात्र नाही. भारतातील बसगाड्या बांधणीचे तंत्रज्ञान या कालावधीत कुठल्या कुठे पोहोचलेय याची साधी जाणीव महामंडळाला नाही.\nआज ज्या पुशबॅक निमआराम गाड्या आल्यात म्हणून आपण सर्व एस . टी प्रेमी आनंद व्यक्त करतोय, आपल्या कार्यशाळांची पाठ थोपटून वगैरे घेतोय, मुळात ते तंत्र १९९० च्या दशकातील आहे हे आपण विसरून आपली एका प्रकारे आत्मवंचना करतोय. आता गरज आहे ते बाजारात कुठल्या प्रकारच्या स्पर्धेला आपल्याला तोंड द्यायचे आहे याचा बारकाईने अभ्यास करून उपाय योजना आखण्याची.\nआता गरज आहे ती म्हणजे कार्यशाळेतल्या कर्मचा-यांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देउन नवनवीन प्रकारच्या बसगाड्या बांधण्याची. (महामंडळाने मागे एकदा स्लीपर बसचा प्रयोग केलेला होता. औरंगाबाद कार्यशाळेने. पण तो प्रयोग प्रयोगापुरताच मर्यादित राहिला. आज नागपूर - पुणे, मुंबई - बंगलोर मार्गावर सर्वत्र स्लीपर बसेस धावत असताना महामंडळाने मात्र अजूनही ८० च्या दशकातल्या डिझाईनच्या निम आराम बसेसच चालवण्या्चे ठरवले असेल तर कसे मिळणार उत्पन्न कसा वाढणार तुमचा नफ़ा कसा वाढणार तुमचा नफ़ा ) नवनवीन आराम बसेस, स्लीपर बसेस, एअर सस्पेन्शन बसेस महामंडळ स्वतः किफ़ायतशीर रित्या बांधू शकते आणि चालवू शकते.\nआता नवीनच आलेल्या बातमीनुसार महामंडळ अशा स्लीपर कोच बसगाड्या भाड्याने घेणार आहे म्हणे. म्हणजे फ़ायदा शेवटी खाजगी कंत्राटदारांचाच. खाजगी कंत्राटदारांकडून बस घेऊन चालवण्याच्या प्रकारात पुण्याची शहर बस सेवा आज डबघाईला आलेली आहे. फार कशाला स्वतः महामंडळाचा शिवनेरी बसेस कंत्राटावर घेण्याचा अनुभव फारसा चांगला नाही.\nमला आठवतेय १९९० च्या दशकात खाजगी आराम गाड्यांचे पेव फ़ुटल्यानंतर त्या गाड्या प्रामुख्याने तीन ठिकाणी बांधल्या जायच्यात. इंदौर येथील बरीचशी खाजगी मंडळी (माळवा, भगीरथ, सनातन वगैरे) अगदी बाळबोध गाड्या बांधायचीत. आझाद बंगलोर येथे स्टेनलेस स्टीलचा भरपूर वापर असलेल्या गाड्या बांधल्या जायच्यात. (वोल्व्हो तेव्हा आझाद कडे बांधायला यायच्या होत्या.) आणि गोव्याचे ए.सी.जी.एल. जरा ब-यापैकी गाड्या बांधायचेत. सतलज ने बस बांधणी क्षेत्रात पहिली क्रांती घडवून आणली. त्यांच्या एस. ३३५ एस. ३३९ या मॉडेल्सने इंदौरवाल्यांना स्वतःच्या कार्यकुशलतेत फ़रक घडवायला लावला होता.\nआज प्रत्येक राज्यात चांगल्या बस बांधणी करून देणारी अनेक मंडळी आहेत. अहमदाबाद मधले साई कोचेस, गोव्याचे दामोदर कोचेस, बंगलोरचे प्रकाश कोचेस, वीरा कोचेस एकापेक्षा एक कोच बांधताहेत आणि त्यांच्या तुलनेत महामंडळ कुठेच नाही ही जाणीव अस्वस्थ करणारी आहे. बाहेरून निम आराम गाड्या बांधून त्या वापरण्यापेक्षा स्वतःच्याच कर्मचा-यांना योग्य प्रशिक्षण देवून नवनवीन प्रकारच्या बसगाड्या महामंडळ स्वतःसाठी बांधू शकत नाही \nएअर सस्पेन्शन तंत्रज्ञान म्हणजे रॉकेट सायन्स नव्हे पण महामंडळाच्या कार्यशाळेत बांधल्या जाणा-या अनेक बसना हे साधे तंत्रज्ञान नाही. यामागे वरीष्ठ अधिका-यांच्या इच्छाशक्तीचा आणि दूरदृष्टीचा अभाव हे एकमेव कारण आहे.\nआज सैनी सारखा १९९० मध्ये शून्यातून सुरूवात करणारा खाजगी संचालक २०० चा बसताफ़ा बाळगून नफ़्यात जाउ शकतो तर १५००० ताफ़ा असलेली आपली एस. टी. का नाही शासनाचे नियम, कर इ. जाचक अटी एस. टी. ला पाळाव्या लागतात हे मान्य आहे. पण त्यावर उपाय प्रवाशांवर भुर्दंड किंवा प्रवाशांना कमी सोयी सुविधा देणे हा होऊ शकत नाही. महामंडळाने शासनासमोर आपल्या अडचणी समर्थपणे मांडल्या पाहिजेत आणि टोलमाफ़ी वगैरे मागण्या मान्य करून घ्यायला पाहिजेत. (मुळात महामंडळाचे अध्यक्षपद ही एक राजकीय नेमणूक असल्याने आपल्या आश्रयदात्यांना अध्यक्ष काही ठणकावू वगैरे शकतील ही शक्यता धूसर आहे आणि त्यामुळेच महामंडळाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार अटळ आहे. हे बदलायला हवेय.)\n३ ) रूटस (बसमार्गा) बाबत : बसमार्गांचे नियोजन अत्यंत ढिसाळ आणि नियोजनशून्य पद्धतीने केले जाताना दिसते. नियोजनाबाबत महामंडळाच्या चालक वाहकांना विचारत घेऊनच \"ख़ालून वर\" अशा पद्धतीचे नियोजन व्हायला हवे आहे. अगदी जुन्या काळापासून चालत आलेले पण आता कालबाह्य झालेले रूटस आता बदलायला हवेत.कॉम्पुटरायझेशनच्या युगात इलेक्ट्रॉनिक तिकीटाची मशीन आली पण त्यातून येणाऱ्या माहितीचे विश्लेषण कोण करणार कुठल्या मार्गावर किती गर्दी आहे कुठल्या मार्गावर किती गर्दी आहे कुठल्या टप्प्यात किती प्रवाशी बसतात या माहितीचे विश्लेषण करून मग शास्त्रशुद्ध पद्धतीने मार्गांची आखणी हवीय.\nसर्व तालुक्यांना जिल्ह्याला जोडणारी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी सकाळी १० किंवा १०. ३० च्या आसपास पोहोचवणारी बससेवा मुद्दाम नियोजन करायला हवीय. गर्दीचा रेटा असेल तर एकापेक्षा अधिक गाड्या त्याच वेळेत त्याच मार्गावर सोडता येतील. परतीच्या प्रवासातही या सर्व गाड्या साधारण संध्याकाळी ५ किंवा ५. ३० च्या सुमारास जिल्ह्यातून निघून परत आसपासच्या तालुक्यांना पाठवता येतील. मोठया शहरांमधील दूर अंतरे आणि महाग रिक्शा वगैरे व्यवस्था बघता या गाड्या बसस्थानकावर नेण्याआधी थेट मध्यवर्ती कार्यालय संकुलात नेता येतील आणि संध्याकाळी तिथूनच सोडता येतील. अशाच प्रकारचे नियोजन प्रत्येक छोट्या गावाला तालुक्याच्या ठिकाणाशी जोडण्यासाठीही होऊ शकेल.\nउदाहरणच द्यायच झाल तर नागपूर रेल्वे स्थानकाला लागून महामंडळाचे जुने बसस्थानक आहे. अत्यंत मोक्याच्या जागेवरचे हे स्थानक सध्या मध्य प्रदेशातल्या खाजगी गाड्यांना आंदण दिल्यासारखे आहे. (पूर्वी त्याला लागूनच मध्य प्रदेश मार्ग परिवहनचे स्थानक होते पण आता त्या महामंडळाचे पूर्ण खाजगीकरण झाल्याने सर्व खाजगी बसेस त्यांच्या जागेचा वापर करतात आणि रात्री राजरोसपणे आपल्या महामंडळाच्या जागेतही पार्किंग करतात.) त्या ठिकाणाहून रात्रीच्या वेळी स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांसाठी शटल सर्व्हिस सुरू करता आली असती. हे बसस्थानक शहर बस वाहतुकीचे मोक्याचे केंद्र बनवता आले असते.\nमहामंडळाने आता आपल्या जुन्या समाजवादी विचारसरणीतून बाहेर पडण्याची नितांत गरज आहे. प्रवासी हां केंद्रबिदू मानून नियोजन करण्याचे दिवस आता आहेत. आपलीच व्यवस्था, आपलीच संसाधने हे केंद्रबिंदू ठेवून त्यामागे प्रवाशांना फरफटत नेणारे ८० चे दशक संपले हे महामंडळाला कधी कळणार \nनागपूर - सावनेर मार्गावर पण तीच गाड़ी आणि नागपूर - पुणे मार्गावर पण तीच गाड़ी हे धोरण आता बदलले गेले पाहिजे. (मंत्र्यांच्या गावासाठी नव्या बसेस पाठवून थोड्या जुन्या बसेस फायद्याच्या मार्गावर पाठवायच्या हे तसही समाजवादाचे ढोंग आहे.) त्याऐवजी फायद्याच्या मार्गांवर खाजगी गाड्यांशी आरामाच्या आणि तिकीटांच्या बाबतीत स्पर्धा करतील आशा गाड्या पाठवून, तो नफ़ा बिना फायद्याच्या पण आवश्यक सेवांच्या cross subsidy साठी वापरता येईल. \"खाजगी वाले बिन फायद्याच्या मार्गांवर सेवा का पुरवीत नाहीत \" या त्राग्यापेक्षा आपल्या जवळ असलेल्या अफाट संसाधनांचा सुयोग्य वापर करून खाजगी क्षेत्राला पळता भुई थोड़ी करता आले असते. हे खाजगीचे संकट १९९० च्या दशकात जेव्हा उभे झाले तेव्हापासून जरा असा सकारात्मक विचार झाला असता तर खाजगी क्षेत्राचा हा भस्मासुर एव्हाना संपवता आला असता. सुरूवातीच्या काळात अति आत्मविश्वासाने आणि आताच्या काळात खाजगीच्या रेट्याने आत्मविश्वास हरवून ज्या चुका झाल्या खऱ्या पण आता गरज आहे ती आपल्याच कर्मचाऱ्यांकडून आपले strong points धुंडाळण्याची आणि खाजगी क्षेत्राचे weak points हेरून त्यावर आघात करण्याची. ब्रांड एम्बेसेडर वर पैसा खर्च करून जनतेचे कधी भले झाले नाही आणि होणारही नाही.\n४) स्पीड लॉक आवश्यकता : मला माहिती आहे हा मुद्दा सुरक्षेच्या बाबतीत ज़रा संवेदनशील आहे. पण आपल्या महामंडळाचे चालक हे खाजगी चालकांपेक्षा बरेच अनुभवी असतात अशा अनुभवी चालकांना जर लांब पल्ल्याच्या स्पीड लॉक नसलेल्या गाडया सोपवल्या तर वेळेची बचत होऊन प्रवाशी पुन्हा महामंडळाकडे वळतील. भारतीय रेल्वेत नव्या चालकांना पहिल्यांदा मालगाड्या चालवायला देतात. थोड्या अनुभवानंतर हळूहळू एक्सप्रेस , सुपर एक्सप्रेस आणि सरतेशेवटी राजधानीसारख्या प्रीमियम गाड्या चालवायला देतात. त्या मॉडेलचा अवलंब आता महामंडळातही व्हायला हवाय.\nआपल्या चालकांवर विश्वास टाकून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे स्पीड लॉक काढून टाकण्याची वेळ आता आलेली आहे हे महामंडळाने पुरते लक्षात घेतले पाहिजे. आज कुठल्याच खाजगी गाड्यांना स्पीड लॉक नसतात म्हणून रोजच्या रोज त्यांचे अपघात होतात असेही नाही. शेवटी किती वेगाने आणि किती कंट्रोलने गाड़ी चालवायची ते चालकावर अवलंबून आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवा थोड़ा.\n५) मूलभूत सोयी सुविधा : बसस्थानके, तिथली स्वछतागृहे आणि त्यातली उपहारगृहे यांच्यात सुधारणेला भरपूर वावा आहे. हजारो लोक वावरताना मॉल्स स्वच्छ राहू शकतात तर बसस्थानके का नाहीत याचा विचार महामंडळाने करून त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. कालबाह्य \"सुलभ \" ला बाहेरचा रस्ता दाखवून या सुविधा खाजगीकरणाकडे न्यायला हव्या आहेत.\nचकचकीत, स्वच्छ आणि व्यावसायिकपणे अन्न पुरविणारी कॅन्टीन्स जर लांब पल्ल्याच्या गाड्याच्या प्रवाशांना उपलब्ध झालीत तरी बरेच प्रवासी महामंडळाकडे वळू शकतात. आज खाजगी गाड्यांचे प्रवासी घाणेरड्या ढाब्यांना त्यातल्या अरेरावीला आणि अव्वाच्या सव्वा किंमतींना वैतागले आहेत. साधारणतः ९० च्या दशकात सातारा एस.टी. असा एक चांगला लौकिक होता. आज असे एस. टी. कॅंटीन बघायला मिळत नाही.\nछोटे थांबे टाळून अशा मोठ्या थांब्यांवर थांबले की किमान अर्धा तास तरी बस चहा नाश्ता , जेवण वगैरे साठी थांबवता येईल. अशा वेळी प्रत्येक बससाठी एखाद्या सुरक्षा रक्षकाची नेमणूक महामंडळानी करावी. त्यासाठी अधिभार म्हणून प्रत्येक लांब प्रवासाच्या प्रवाशांकडून नाममात्र अधिभार घ्यावा.\nमित्रांनो, परखड लिहीलेय , माफ़ करा. यामागे आपली एस. टी. टिकावी , वाढावी एव्हढीच सदिच्छा आहे. (मला वाटत प्रत्येक सच्च्या मराठी माणसाची हीच इच्छा आहे. ) एकेकाळी सर्व महाराष्ट्राचे भूषण असलेली ही एस. टी. मध्य प्रदेश परिवहन प्रमाणे खाजगी बसेस भाड्याने घेऊन चालवणार हे वाचले की जीव दुःखतो. महामंडळाने आपल्या कुंभकर्णी निद्रेतून जागे व्हावे आणि झेप घ्यावी हीच इच्छा.\nमहामंडळाच्या पंखांमध्ये अजूनही तेव्हढे बळ आहे हे नक्की.\n(सर्व एस. टी. प्रेमीसाठी काही आत्ता काढलेले फोटो टाकतो आहे. त्याचा आणि त्या परिच्छेदातील विषयाचा संबंध लावू नए ही नम्र विनंती.)\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ४\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात आपली ...\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/will-india-win-the-test-series-tomorrow-and-claim-the-title/", "date_download": "2018-04-24T06:41:11Z", "digest": "sha1:TKT7UJLRQLW3ZVRJAHYRJLTLZA7CBOPW", "length": 9613, "nlines": 120, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारत मालिकेवर वर्चस्व राखणार का ? - Maha Sports", "raw_content": "\nभारत मालिकेवर वर्चस्व राखणार का \nभारत मालिकेवर वर्चस्व राखणार का \nभारत उद्या बुधवारी श्रीलंकेविरुद्ध या मालीकेतला दुसरा कसोटी सामना कोलंबोच्या मैदानावर खेळणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारताने या मालिकेत बढत मिळवली आहे, आता उद्याचा सामना जिंकून भारत मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.\nश्रीलंकेचा संघ हा भारताच्या संघापुढे खूपच नवखा दिसत आहे. सामने बघताना असे वाटत आहे की एका कुस्तीच्या सामन्यात दोन वेगळ्या वजनी गटातील कुस्तीपटू खेळत आहेत. त्यात श्रीलंकेला संकटांनी चारही बाजूनी घेरले आहे असे दिसून येत आहे. श्रीलंकेचा कसोटी कर्णधार दिनेश चंडिमल पहिल्या सामन्याला निमोनियामुळे मुकला तर आता त्याचा जो स्टॅन्ड इन कर्णधार आहे म्हणजे रंगणा हेराथही आता आजारी आहे आणि तो सामना खेळणार का नाही या वर शंका आहे.\nदुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर भारताकडे सलामीला कोण येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. के एल राहुल जो की पहिला सामना खांद्यच्या दुखापतीमुळे मुकला तो संघात परत आला आहे आणि आता मागील सामन्यात चांगला खेळ करण्याऱ्या अभिनव मुकुंदला संघात संधी मिळणार का राहुल संघात कम बॅक करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.\nमागील ५ सामन्यातील कामगिरी:\nहार, विजय, हार, विजय, हार.\nविजय, विजय, अनिर्णित, विजय, हार.\nदुखापत होऊन बाहेर जाण्याच्या आधीच्या ७ डावात त्याने ६ अर्धशतके केली आहेत. त्यात बंगलोर मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध ९० धावांची खेळी ही आहे. राहुलने त्याची क्षमता वेळोवेळी दाखवली आहे त्यामुळेच त्याला डायरेक्ट ११ मध्ये एन्ट्री मिळू शकते.\nश्रीलंकेचा कर्णधार जो की आजारातून बाहेर येत आहे, तो पहिल्या सामान्यपासूनच चांगली खेळी करेल अशी श्रीलंकेला अपेक्षा असेल. मागील सामन्यात भारताने श्रीलंकेच्या फलंदाजीचा मधल्या फळीचा धुव्वा उडवला होता. आता चंडिमल आल्या नंतर श्रीलंकेच्या फलंदाजीला समतोल मिळेल असे वाटते आहे.\nश्रीलंका : उपुल थरंगा, दमुथा करूरतने, कुशल मेंडिस, दिनेश चांदीमल (कर्णधार), अँजेलो मॅथ्युज, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), धनंजय डिसिल्वा, दिलरुवंन परेरा, मलिंदा पुष्पाकुमार, रंगना हेराथ, नुवान प्रदीप.\nभारत: के एल राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रविचंद्र अश्विन, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी.\nखेळपट्टीवर वाळलेले गवत आहे, पण ही खेळपट्टी गॉलच्या खेळपट्टी पेक्षा सपाट ज्यामुळे फलंदाजीसाठी मदत होऊ शकते. साधारणत: या मैदानावर चेंडू तिसऱ्या दिसवसापासून वळण्यास सुरुवात होईल. थोडाफार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.\nचेतेश्वर पुजाराची ५०वी कसोटी: त्याच्या ६ सर्वोत्तम खेळींचा आढावा \nविराट कोहलीने दिल्या उसेन बोल्टला शुभेच्छा\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/lifestyle/beauty-and-makeup/be-smart-on-valentine-day/17827", "date_download": "2018-04-24T06:42:07Z", "digest": "sha1:DBTTNKCQNLICVVKYRFXT2NH6BXVO2OIT", "length": 23815, "nlines": 256, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "be smart on valentine day | ​VALENTINE DAY SPECIAL : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला केस व त्वचा बनवा सुंदर ! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\n​VALENTINE DAY SPECIAL : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला केस व त्वचा बनवा सुंदर \n‘व्हॅलेंटाईन डे’ला आकर्षक दिसून आपल्या व्हॅलेंटाईनसोबतच सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी या काही खास टिप्स....\nप्रेम व्यक्त करण्याचा दिवस ‘व्हॅलेंटाईन्स डे’ केवळ काही दिवसांवर आला आहे. यादरम्यान आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते आणि आपल्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी आपली त्वचा आणि केसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी आपण ‘व्हॅलेंटाईन डे’ला आकर्षक दिसून आपल्या व्हॅलेंटाईनसोबतच सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी या काही खास टिप्स देत आहोत.\nत्वचेचा ओलावा कायम ठेवा\nत्वचा कोमल व टवटवीत ठेवण्यासाठी चांगल्या दजार्चे आॅईल बेस असलेले मॉईश्चरायझर वापरा. उन्हाशी संबंध येणाºया अवयवांची विशेष काळजा घ्या. ग्लिसरीन त्वचेला कोमल ठेवण्यासाठी गुणकारी आहे. ओठांना लावण्यासाठी लिप बाम वापरा.\nबाहेर गेल्यावर त्वचा टॅन होते. अंघोळ करताना लूफाच्या मदतीने शरीरावरची मृत त्वचा काढून टाका. बेसन किंवा इतर हर्बल स्क्रब वापरून तुम्ही स्क्रब करू शकता.\nउन्हात निघण्याच्या २० मिनिटांपूर्वी सनस्क्रीन लावा. एसपीएफ १५ किंवा त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन वापरा.\nतेलाने डोक्याला चांगल्या प्रकारे मसाज करा. रात्रभर केसांना तेल लावून ठेवा. त्यानंतर स्पा करून घ्या किंवा घरीच चांगला शॅम्पू व कंडिशनरने केस धुवा. केसांना पोषण मिळण्यासाठी असे दर आठवड्याला करा.\nकेसांना चांगली स्टाईल द्या\nहेअर ड्रायर, फ्लॅट आयर्न किंवा कर्ल आयर्न मुळीच वापरू नका. ही सगळी साधने उष्णतेवर आधारित आहेत. यामुळे काही वेळाने तुमचे केस रूक्ष व कोरडे होतात. याऐवजी थंड ड्रायरने केस सेट करा. जर परवडणारे असेल तर व्हॅलेंटाईन्स डेच्या एक आठवडा आधी चांगल्या सलूनमध्ये जाऊन केसांची प्रोटीन ट्रिटमेंट करून घ्या.\n​सारा अली खानचे आई अमृता सिंग व डिम...\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या...\n​१९ वर्षे अभिनय केल्यानंतर ‘या’ अभि...\n​सोशल मीडियावर हे काय करून बसले अमि...\nप्रियांका चोप्राच नव्हे तर ‘हे’ कला...\nकलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टा...\nआता पाकिस्तानातील ‘या’ सलमानने म्हट...\nमोठा झाला सलमान-आमिरचा आॅनस्क्रिन म...\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक न...\nश्रीलंकेच्या रस्त्यावर दिसला ‘ डॉ....\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nघरगुती शॅम्पूने खुलवा केसांचे सौंदर...\nरिमुव्हर शिवाय काढा नेलपॉलिश\nडागरहित उजळ त्वचेसाठी हळद उपयुक्त\nआॅईली स्कीनची अशी घ्या काळजी\nउन्हाळ्यात घ्या केसांची काळजी\nBeauty : स्टोन मसाज थेरपीने असे खुल...\n​सेलिब्रिटींसारखे गुलाबी ओठ हवे आहे...\nआता बिनधास्त वापरा 'बॅकलेस ब्लाऊज'...\n​लग्नाच्या बांगड्या खरेदी करताना ‘ह...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/07/blog-post_7.html", "date_download": "2018-04-24T06:36:18Z", "digest": "sha1:JASN7MFDP2AKRSTFJW6RUQ33DYGMTTZW", "length": 14622, "nlines": 255, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: शालेय पोषण आहार एक्सेल शीट पूर्ण वर्षासाठी", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nशालेय पोषण आहार एक्सेल शीट पूर्ण वर्षासाठी\nआपल्यासाठी आज पूर्ण वर्षासाठीची अत्यंत सोपी व सुटसुटीत शीट देत आहे.\n१. कोणत्याही वर्षासाठी वापरता येईल. फक्त वर्ष टाकले की सर्व ३६५ दिवसाच्या तारखा वारासाहित ऑटो जनरेट होतात.\n२. साठा नोंदवही आपोआप तयार होते.\n३. मोबाईल वरून वापरता येते\nवार्षिक वापरासाठीची शीट पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nयु डायस म्हणजे काय \nशालेय पोषण आहार एक्सेल शिट अपडेट - 3\nकसा भरावा कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज \nजिल्हाअंतर्गत बदली संवर्ग 2 बाबत महत्वाच्या सूचना\nसातत्यपूर्ण सर्वंकष नोंदी एक्सेल सॉफ्टवेअर\nशा.पो.आ. App डाऊनलोड व App सेटींग\nशालेय पोषण आहार शीटस युनिकोड\nशालेय पोषण आहार एक्सेल शीट पूर्ण वर्षासाठी\nशालेय पोषण आहार एक्सेल शीट एक महिन्यासाठी\nशालेय पोषण आहार केंद्र एकवट\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.asm.ac.in/avmmpps/about-us/", "date_download": "2018-04-24T07:02:35Z", "digest": "sha1:MVH66XFOEIITHA2UW62D6IGCF5W7NVGV", "length": 11914, "nlines": 146, "source_domain": "www.asm.ac.in", "title": "AVMMPPS – About Us – Adarsha Shikshan Mandali", "raw_content": "\nअभिनव म्हणजे……………धमाल गंमत सुरेल गाणीनृत्य, अभिनय सुरेख वाणीश्लोक, प्राथना, बडबडगाणीएकाग्र होऊन ऐकू या कहाणीकथा, कविता अन मनसोक्त खेळणंहसत, खेळत शिक्षण घेणंसर्वांगीण विकासाची पर्वणी साधणंयावर अभिनवचे शिक्षण आधारित आहे.\nअशी पद्धती – नेई ध्येयाप्रति – ठळक वैशिष्ट्ये\nविशेष उल्लेखनिय यश कामगिरी, स्पर्धा\nहस्त खेळत शास्त्रीय पद्धतीनुसार संस्कारक्षम शिक्षण\nशिशुरंजन आणि पूर्व प्राथमिकपर्यंत २० / २५ मुलांना एक शिक्षिका\nमानसशास्त्रीय दृष्ट्या मुलांच्या विकासाचा क्रमवार विचार\nनृत्य, नाट्य, अभिनय, कलाविष्कार यात तज्ज्ञ असलेला शिक्षकवर्ग\nविविधांगी नैपुण्य कार्यक्रमात शाळा कायमच आघाडीवर\nस्वयंशिक्षण, स्वयंमूल्यमापन, स्वयंशिस्त, स्वावलंबन, स्वयंस्पर्धा, स्वच्छता इत्यादी तत्वानुसार मुलांच्या भावनिक, सामाजिक असा सर्वांगीण विकासाचा ध्यास\nशिशुरंजनपासून इंग्रजी विषयाचा परिचय व शिशुगटापासून इंग्रजी शिकविण्यास सुरुवात.\nबाल गटापासून इंग्रजी संभाषणाची प्राथमिक सुरुवात आणि संस्कृत विषयाचा परिचय\nदृकश्राव्य माध्यमातून शाळेने तयार केलेल्या सी. डी. द्वारे शिक्षण\nधिटाई, निर्णयाशक्ती, निश्चय, मैत्री, खिलाडूवृत्ती, जिद्द, नवनिर्मिती, कलास्वाद, सामाजिक जाणीव इ. गुंवाधीसाठी प्रयत्न\nप्राथमिक पासून संगणक शिक्षक आणि इ. १ली पासून सेमी इंग्रजीची सुविधा.\nसंगीत खोली – संगीत साधनांचा वापर करून मुलांचा नियमित संगीताचा तास.\nखेळाची साधने – घसरगुंड्या, सायकली, झोपाळे, साहसी खेळ\nशालेय दैनंदिनी – मुलांना वाचण्यायोग्य अशा चित्रांचा व खुणांचा उपयोग करून वर्षभराचे नियोजन असलेली दिनदर्शिका आणि अभ्यासक्रमाची रूपरेषा असलेले नियोजन पुस्तक, शिक्षकांसाठी अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन असलेले वेळापत्रक\nपालकासाठी तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने\nआजी – आजोबा संमेलन\nपालकासाठी आणि मुलांसाठी संस्थेने पालकांच्या मदतीने चालवलेले विनामुल्य ग्रंथालय.\nअनेक वर्ष सरदार किराड ट्रस्ट, नाथ पै संस्कार केंद्र, गुरुकुल, वृंदा-वन कला प्रतिष्ठान, सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन, महेश विद्यालय आयोजित अंतर शालेय पातळीवर अभिनय गीत, नृत्य, तालनृत्य, समूहगीत, समूहगायन इ. स्पर्धांमध्ये शाळेचा सहभाग आणि पारितोषिके प्राप्त. ट्री पब्लिक फाउंडेशन तर्फे होणाऱ्या अंतर शालेय नृत्य नाट्य स्पर्धेत मुख्याध्यापिका विद्या साताळकर लिखित संगीतकेस सलग तीन वर्ष पारितोषिक प्राप्त. पुणे आकाशवाणी बालोद्यान मध्ये शाळेतील मुलांचा अनेक वर्षापासून सहभाग.\n२०१६ -१७ या शैक्षणिक वर्षात ‘पुस्तक वाचा नक्की समजेल’ – मुख्याध्यापिका विद्या साताळकर लिखित संगितिकेचे पुणे आकाशवाणी बालोद्यान मध्ये मुलांचे उत्तम सादरीकरण.\nमुख्याध्यापिका – विद्या साताळकर – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्वयंसिद्धा पुरस्कार, बालकथा, लेखन पुरस्कार\nउपमुख्याध्यापिका – वर्षा पाठक – गुणवंत शिक्षक पुरस्कार, गुरुकुल पुरस्कार\nशिक्षिका – लीना जोगळेकर – आंतरशालेय बालकथा लेखन स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त\nमिताली फडके – आंतरशालेय बाल अभिनय गीत स्पर्धा अनेक वेळा पारितोषिक प्राप्त\nसुप्रिया कुलकर्णी – आंतरशालेय बाल अभिनय गीत स्पर्धा पारितोषिक प्राप्त\nमी जगाच्या पाठीवर कुठेही असलो / तरी माझ्या भारत देशाचा अभिमान बाळगेन.\nवाढदिवसाला दिव्याची ज्योत विझविणार नाही, तर त्या दिवशी मी एक झाड लावेन आणि त्या झाडाला वाढवेन.\nअन्नाचा अनादर करणार नाही आणि सकस अन्नाचा आग्रह धरेन.\nवीज, पाणी वाया जाऊ देणार नाही.\nमाझ्या वाट्याला आलेले काम उत्तम करण्याचा प्रयत्न करेन आणि काम करताना योग्य मार्गाचाच वापर करेन.\nरस्त्यावर कचरा टाकणार नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही.\nमी इतर भाषांचा जरूर आदर करेन पण मराठी भाषा येणाऱ्या व्यक्तीशी माझ्या मातृभाषेतून- मराठीतूनच बोलेन.\nरोज थोडेतरी अवांतर वाचन करेन.\nटीव्ही जास्त वेळ पाहणार नाही.\nमी चांगल्या गोष्टींना चांगले म्हणेन.\nचांगल्या गोष्टींमध्ये रस घेईन.\nमी गरजू व्यक्तीना सदैव मदत करीन.\nकामासाठी ज्या क्षेत्राची निवड करेन त्याच्या शिखरावर जाण्याचा प्रयत्न करेन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/nadal-blasts-into-second-shanghai-final/", "date_download": "2018-04-24T06:48:54Z", "digest": "sha1:K4WH2F4LMJRQKK3KBEIPXR43RUVYF6WU", "length": 6213, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राफेल नदाल शांघाय ओपनच्या अंतिम फेरीत, फेडररशी होणार लढत - Maha Sports", "raw_content": "\nराफेल नदाल शांघाय ओपनच्या अंतिम फेरीत, फेडररशी होणार लढत\nराफेल नदाल शांघाय ओपनच्या अंतिम फेरीत, फेडररशी होणार लढत\nशांघाय| अव्वल मानांकित राफेल नदालने आज शांघाय ओपनच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. हा त्याचा कारकिर्दीतील १११ वा अंतिम सामना आहे. त्याने याआधी चीन ओपन स्पर्धा जिंकली आहे.\nत्याचा आजचा सामना चौथ्या मानांकित मरिन चिलीचशी होता. हा सामना २ तास ११ मिनिट चालला. या सामन्यात दोन्हीही सेटमध्ये चिलीचने नदालला चांगली झुंज दिली. परंतु अनुभवाच्या जोरावर नदालने सरशी केली.\nपहिल्या सेटमध्ये चिलीच नदालला चांगली लढत देत होता. पण ७-५ असा सेट जिंकत नदालने सामन्यात आघाडी मिळवली. तर दुसऱ्या सेटमध्ये दोघांनीही आपापली क्षमता पणाला लावली होती. परंतु नदालने ७-६(७-३) असा चुरशीचा सेट जिंकत या वर्षातल्या १० व्या अंतिम सामन्यात धडक दिली.\nनदालचा हा आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतला ८७१ वा विजय होता.\nअंतिम फेरीत नदालचा सामना रॉजर फेडररशी होणार असून फेडररने यावर्षी नदालला ३ वेळा पराभूत केले आहे. फेडररला स्पर्धेत द्वितीय मानांकन आहे.\nअमीर खानला माहित नाही भारतीय महिला संघाच्या कर्णधाराचे नाव \nडेव्हिड वॉर्नरने मानले भारतीयांचे आभार\nआणि टेनिस इतिहासात नदालचे नाव सोनेरी अक्षरांनी लिहीले गेले\nराफेल नदाल रोलेक्स मास्टर्सच्या १२व्यांदा अंतिम फेरीत\nअखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत सानिका भोगाडे, सिद्धार्थ मराठे, रुमा…\n16 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत एकेरीत शरण्या गवारे, क्रिश पटेल यांना…\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/highest-test-total-in-last-one-year-ind-7597-ind-6876-ind-63110-aus-6248-ind-6229-ind-6039-ind-60010-2/", "date_download": "2018-04-24T06:31:32Z", "digest": "sha1:DC52QOKDDB57MFAOXGDDVPQRBOO3PN5J", "length": 6157, "nlines": 104, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय संघाने गेल्या एक वर्षात केली ही मोठी कामगिरी ! - Maha Sports", "raw_content": "\nभारतीय संघाने गेल्या एक वर्षात केली ही मोठी कामगिरी \nभारतीय संघाने गेल्या एक वर्षात केली ही मोठी कामगिरी \nआज भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध ६२२ धावांचा डोंगर उभा केला. याबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वखाली भारताने तब्बल ६ वेळा ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला.\nपरंतु आपण एक गोष्ट ऐकून आश्चर्यचकित व्हाल की गेल्या एका वर्षात ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा डावात करण्याचा विक्रम ७ वेळा झाला असून त्यातील ६ वेळा हा विक्रम भारताने केला आहे.\nभारताने फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशविरुद्ध ६८७/६, इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीमध्ये डिसेंबर महिन्यात Ind: ७५९/७, रांची कसोटीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध ६०३/९, डिसेंबर महिन्यात मुंबई कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६३१/१०, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीमध्ये ६००/१० आणि आज दुसऱ्या कसोटीमध्ये ६२२/९ अशा त्या कामगिरी आहेत.\nगेल्या एका वर्षात भारत सोडून केवळ ऑस्ट्रेलियाला ६०० पेक्षा जास्त धावा एकदा करता आल्या आहेत. त्यांनी डिसेंबर महिन्यात पाकिस्तान विरुद्ध ६२४/८ अशी कामगिरी केली होती.\nअसा एक विक्रम ज्यात अश्विनने हेडली, बोथम, इम्रान खान यांना टाकले मागे \nआणि ३५ मिनिटात अश्विनने पुन्हा तो विक्रम आपल्या नावे केला \nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://shrigondavalekarmaharaj.org/gallery/photos_download", "date_download": "2018-04-24T06:19:29Z", "digest": "sha1:4XHL57EQS3QYMAWV4R3GSAV7HUZGX533", "length": 4610, "nlines": 107, "source_domain": "shrigondavalekarmaharaj.org", "title": "Shri Gondavalekar Maharaj Official Website", "raw_content": "\nसाईझ: (१२\" x ८.७५\")\nश्रीमहाराज (प्रतिकृती - पेंटिंग)\nसाईझ: (१२\" x ८.७५\")\nसाईझ: (१०\" x ८\")\nसाईझ: (१०\" x ८\")\nसाईझ: (१२\" x ८.७५\")\nसाईझ: (८.५\" x १२\")\nश्रीमहाराज-२ (हर्दा येथील ओरिजिनल फोटो)\nसाईझ: (८ x ११.५\")\nनित्योपासना, काकड आरती, दासबोध निरुपणे (श्री रवींद्र पाठक)\nुण्यतिथी उत्सव यु ट्युब लिंक्स, श्री महाराज जन्म, अभिषेक व पूजा इ.\nनित्यपाठ- नमस्कार त्रयोदशी, रामपाठ, हाची सुबोध गुरूचा इ.\nपुण्यतिथी उत्सव क्षणचित्रे, वचन परिमळ इ.\nपू. बाबा बेलसरे यांच्या प्रवचनातील निवडक वेचे\nविश्वस्तांचे मनोगत, आगामी कार्यक्रम इ.\nपुढील पौर्णिमेचा वार व दिनांक\nगोंदावले बुद्रुक, ता. माण,\nगोंदवले संस्थानची अधिकृत वेबसाईट\nआपल्या प्रतिक्रियांसाठी पुढील ईमेल वर संपर्क करावा - info@shrigondavalekarmaharaj.org", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://zeemarathijagruti.com/Knowledge-hub/Health/Hair-care-tips-for-winter/", "date_download": "2018-04-24T06:56:40Z", "digest": "sha1:V2XCA3YN6EM5JNCYFMP7ACPRUMQSUILH", "length": 20717, "nlines": 386, "source_domain": "zeemarathijagruti.com", "title": "केसांचे आरोग्य जपणारे ५ हिवाळी उपाय! - Zee Marathi Jagruti", "raw_content": "\nकेसांचे आरोग्य जपणारे ५ हिवाळी उपाय\nपावसाळ्यातील दमट कुबट हवा, तर उन्हाळ्यातील जीवघेणा उकाडा आता सुट्टीवर गेला असून, वातावरणात सुखद गारवा भरुन राहिला आहे. ठेवणीतले लोकरीचे कपडे लवकरच ट्रेंडी फॅशनचा भाग बनतील आणि त्यासोबत चेह-याचा लूकही जपावा लागेल. हातापायांची किंवा चेह-याची त्वचा कोरडी पडल्यास कोल्ड क्रिमचा पर्याय आहे, पण शुष्क होणा-या केसांचे काय सततचे तेल लावून वावरणे शक्य नाही. म्हणूनच, हिवाळ्यात केसांची काळजी घेताना पुढील उपाय नियमित करुन पाहा.\nकेस धुण्याच्या आदल्या दिवशी किंवा किमान तीन ते चार तास आधी केसांना तेलाने मसाज करावा. डोक्यावरील त्वचेसही नीट तेल लागायला हवे. यामुळे, केसांच्या मुळांना रक्तपुरवठा होऊन, केसांमधील आर्दता वाढते.\nकेसांमध्ये भरपूर कोंडा होत असल्यास, आठवड्यातून किमान दोन वेळा केस धुणे गरजेचे आहे. नाहीतर कोंडा केसांच्या मुळांशी साचत जाऊन तेथील त्वचेला बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यता बळावते.\nहलक्या हाताने केस धुवायला हवेत. कारण, कोरडे केस जराश्या झटक्यानेही तुटतात.\nकेस धुतल्यानंतर पुन्हा कोरडे होऊन नयेत, म्हणून केस धुताना ओल्या नारळाचा रस वापरावा. यातून केसांना नैसर्गिक प्रोटिन्स मिळतात.\nकेस सुकवताना हेअर ड्रायरचा वापर करु नये. तसेच, मुख्यत्वे हिवाळ्यात केसाला आयर्न किंवा कर्ल करु नये. यामुळे, केसांमधील ओलावा संपूर्णपणे नष्ट होते आणि पुन्हा केस पुर्ववत होण्यास वेळ लागतो.\nमैत्रिणींनो, हिवाळ्यात केसांची काळजी घेताना या मुख्य पाच टिप्स नीट लक्षात ठेवा. थंडीनंतर थेट विरुद्ध हवामानाचा उन्हाळा येत असल्याने, आत्ताच केसांचे आरोग्य उत्तमरित्या जपलेत, तर ऋतूबदलानंतर केसांचा पोत बिघडणार नाही.\nअट एकच : घरकामात मदत करावी\n‘कांदे पोहे’ शिजले, ‘लग्न’ ठरले\nतुम्हाला आवडतील या हटके नोजपिन्स\n‘या’ वस्तू ठरतील अचूक हळदी कुंकवाचे ‘वाण’\nतुम्हालाही या ५ कारणांमुळे दिवाळी आवडते का\nलग्नानंतर मुलीचं नाव बदलतं तेव्हा….\nनवरात्रीत या ५ ठिकाणांना भेट द्यावीच\nयेणार बाप्पाची स्वारी, तर सजावट हवी भारी\nअक्षय तृतीयेच्या दिवशी करावे हे ‘शुभकार्य’\nगगनी सजली संस्कृतीची ‘गुढी’\nकाळ्या मातीतली डौलदार मराठी\nएकोप्याचे ‘वाण’ हळदी कुंकू\nनिसर्गाला दिवाळी सप्रेम भेट \nसण वटपौर्णिमेचा, आनंद पतीप्रेमाचा आणि निसर्गाच्या जागृतीचा\nहोळी-रंगपंचमीच्या निमित्ताने ‘जागृतीची नवी प्रेरणा’ \nसंस्कृतीतील नवा पायंडा : कुटुंबाची कर्ती आता ‘ती ‘ \nजाणून घ्या महिला दिनाची पार्श्वभूमी\nमकरसंक्रांतीच्या माहितीचा खरा गोडवा\nमुलांना पैशाची किंमत कळावी म्हणून\nस्त्री पुरुष समान वेतन आईसलॅंडमध्ये\nसेकंड होमचा विचार करण्याआधी हे वाचा\nबॅंकलॉकर घेताना असे सतर्क रहावे\nघरगुती व्यवसायासाठी भांडवल उभारताना\nलहान मुलांसाठी बॅंकेचे व्यवहार\nव्यवहारात सुरक्षित ‘प्लॅस्टिक मनी’\nशेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना\nस्वत:चं पहिलं घर विकत घेताना…\nगुंतवणुकीने करा भविष्य सुरक्षित\n“प्लॅस्टिकची पिशवी नको म्हणजे नको\nसार्वजनिक ठिकाणी स्तनपान देताना…\nकेस गळणे थांबवतील ‘हे’ पदार्थ\nउन्हामुळे टॅन होणा-या त्वचेसाठी\nब्रेकफास्ट करावा तर हा ‘असा’\nवयात येणा-या मुलीशी आईने ‘असे’ बोलावे\nऑफिसमध्ये कंटाळवाणे वाटल्यास, ‘हे’ ५ उपाय करा\n‘गर्भसंस्कार’ व्हावेत तर असे\nपोटाचा घेर कमी करणारी ५ योगासने\nडाएटमध्ये फक्त ‘सॅलेड’ खाणे घातक, कारण…\n‘या’ ५ सवयी तुम्हाला ठेवतील फिट\nत्वचा व केसांच्या आरोग्यासाठी ‘हे’ पदार्थ खावेत\nटूथब्रशच्या स्वच्छतेसाठी इतके कराच\nरजोनिवृत्तीच्या काळात तब्येत साभांळावी अशी\nनखांचं सौंदर्य खुलवणं स्वस्त व मस्त\nपेट्रोलियम जेलीचे हे ५ उपयोग माहित आहेत\nकेसांचे आरोग्य जपणारे ५ हिवाळी उपाय\nऑफीसमध्ये बसल्याजागी करावेत हे व्यायाम\nलहान मुलांचा हिवाळी आहार असा हवा\nपांढ-या केसांची समस्या पळवा दूर\nग्रीन टी घेण्याआधी ‘हे’ वाचा\nतुम्ही अन्न घटक वाचवता का\nहेअर ड्रायर वापरता, मग आधी हे वाचा\nतर, केस गळण्याची समस्या होईल दूर\nस्तनपान करताना या ५ चुका करु नयेत\n‘त्या’ पहिल्या दिवशी कशी जाऊ ऑफिसला\nजॉगिंगचे आहेत हे काही नियम….\nशांत झोप हवी असेल, तर हे वाचाच\nपावसाळ्यात कपड्यांची अशी काळजी घेताय ना\nगरोदरपणात ‘असा’ आहार घेणे आवश्यक\nप्रवासात स्वास्थ्य सांभाळावे असे..\nथंडीत कुरळ्या केसांना जपावे असे\nत्वचेची अशी काळजी घेताय ना\n‘योगा’ की ‘व्यायाम’ काय निवडावे घ्या जाणून\nतब्येत सांभाळ, आता उकडतयं फार\nआईची तान्ह्यासाठी ‘मातृत्व रजा’\nसूर्यनमस्कार – एक संपूर्ण व्यायाम प्रकार\nनिरोगी आरोग्यासाठी आहाराची पंचसूत्र\nपौष्टिक अन्न हे पूर्णब्रह्म \n…. तर आजार जाईल पळून\nऑनलाईन हॉटेल बुक करताना ‘हे’ लक्षात ठेवा\nअनोळखी शहरात एकटीने प्रवास केलाय\nएक्सपायरी डेट पाहा, तक्रार ‘इथे’ करा\nकरिअरसाठी घरापासून दूर रहाणा-या मुली\nतुमच्या पर्समध्ये काय असतं\nलहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी, हे नक्की करा\nआता मुलेच फटाके नको म्हणतील\nकॅबमधून एकटीने प्रवास करताना…\nदागिने चमकविणारे ‘हे’ ५ उपाय\nवॅक्स करताय… मग हे वाचाच\nउन्हाच्या झळा न लागो घराला\nसुगरणीस ठाऊक हव्यात या युक्त्या\n‘जागृक ग्राहक’ घडविणारा ‘कायदा’\nकरार मालक व भाडेकरुचा\nचेक भरताना घ्यायची काळजी\nपर्यटनाला जाताना घ्यायची काळजी :\nऑनलाइन शॉपिंग करताना हे लक्षात ठेवा\nचांगले मार्क्स मिळवलेस, तर देईन\nमातृत्व रजेनंतर कामावर रुजू होताना\nस्वत:चा ऑनलाईन ब्रॅण्ड तयार करताना\nनोकरी व घर : दोन्हीचे संतुलन\n‘परिक्षा’ मुलांहून अधिक पालकांची\nमुलांशी करिअरविषयी बोलावे असे\nऑफिसमध्ये वागाव असं, नाहीतर होतं हसं\nलग्नानंतरही शिक्षण पूर्ण करता येईल\nनोकरी शोधताय, तर आधी हे वाचा\nसंधी मिळत नाही तर ती मिळवावी लागते \nपेनड्राईव्ह विकत घेताय, मग आधी ‘हे’ वाचा\nमोबाईल विकत घेताय, मग आधी हे वाचा\nमायक्रोव्हेवचा असा वापर केलायेत कधी\nतुमचे इअरफोन्स लवकर खराब होतात, कारण\nमनोरंजनात नको ‘गॅप’, आलयं झी मराठी ‘अॅप’\nमोबाईल ‘अॅप्स’ सोडवतील प्रश्न\nतंत्रज्ञान मातृत्त्वासाठी आशेचा किरण\nमोबाईल बॅंकींग या महत्त्वाच्या सुविधा देते\nइंटरनेट वापरताना बाळगा सावधगिरी\nआपल्याला मिळणार अॅपची साथ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://jeevantarang.wordpress.com/", "date_download": "2018-04-24T06:47:31Z", "digest": "sha1:JLZAZM7A72HUU22DBOKY5JWGKSGF4PXZ", "length": 64964, "nlines": 177, "source_domain": "jeevantarang.wordpress.com", "title": "जीवनतरंग.... « विचार… मत… अनुभव… वास्तव….निरीक्षणें….", "raw_content": "\nविचार… मत… अनुभव… वास्तव….निरीक्षणें….\nईकडे चेन्नईला बदली झाल्यापासून आमचे दर वीकेंडला कुठे ना कुठे भटकणे चालू आहे. पॉंडेचेरी (खरा उच्चार पुडुचेरी) , क्वीन्सलॅंड थीम पार्क , वेल्लोरचे गोल्डन टेंपल अशी काही चेन्नईच्या आसपासची ठिकाणे पाहून झाली आणि एका रविवारी महाबलीपुरम्‌ पाहून आलो. आपण जरी महाबलीपुरम्‌ असे म्हणत असलो तरी याचा स्थानिक उच्चार ममलापुरम्‌ असा आहे.\nमहाबलीपुरम्‌ म्हणजे शिल्पकृतींचे गाव आहे. बघावे तिकडे देवदेवतांच्या मोठमोठाल्या शिल्पकृती दिसतात. तिथे कृष्णकुंज म्हणून एक स्थान पल्लवाने तयार केले आहे. कृष्ण जन्मापासून कृष्णाच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग जसे की कालिया मर्दन , गोवर्धन पर्वत हातावर उचलून घेणे, पांडवांच्या गुंफा हे सर्व प्रसंग तेथे अखंड अशा दगडामधून कोरून काढले आहेत. त्या अखंड अशा दगडावर एकूण १५३ शिल्पे कोरलेली आहेत. आणि प्रत्येक शिल्प हे कलाकु सरीचा उत्तम नमुना आहे.\nकृष्ण याठिकाणी कधीच आला नव्हता पण चित्ररूपाने इकडच्या लोकांना महाभारत समजावण्यासाठी पल्लवाने हे सारे कोरीव काम सुमारे १४०० वर्षांपूर्वी केले आहे. पण पल्लव कोण होते आणि त्यांनी कृष्णकुंज करण्यासाठी याच ठिकाणाची निवड कां केली हे मात्र समजू शकले नाही. ( आमचा गाईड पल्लवाज्‌ म्हणून उल्लेख करत होता, म्हणजे मला तरी असं वाटतंय्‌ की पल्ल्वांच्या अनेक पिढ्यांनी येथे काम केले असावे.) तिथून थोडं पुढे गेल्यावर एक प्रचंड मोठी शिळा आहे , नैसर्गिकरित्या स्वतःला तोलून धरणारी ती शिळा अशा एका टोकावर उभी आहे की जरासा धक्का लागला तर ती कधीही खाली कलंडू शकेल असे वाटते. पण आमच्या गाईडच्या सांगण्यानुसार सात हत्तींनी धक्का मारूनसुध्दा ती शिळा जागची हलली नाही. Balancing चा हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. या शिळेला म्हणतात ’Krishnas Butter Ball’ \nतिथेच थोडं पुढे गेलं की दोन शिळा एकमेकांना टेकून तयार झालेली नैसर्गिक गुंफा दिसते. ही होती फॅक्टरी जिथे पल्लवाने कोरीव काम करण्यासाठी हत्यारे तयार केली. मोठमोठाल्या शिळा फोडण्यासाठी डायनॅमो वगैरे न वापरता एक वेगळेच तत्त्व येथे वापरले होते. जो दगड फोडायचा आहे, त्यावर छोटे छोटे छेद करून घ्यायचे, त्यामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या लाकडाचे तुकडे टाकून त्यामध्ये गरम पाणी ओतायचे, त्या गरम पाण्याने लाकूड प्रसरण पावते आणि १५-२० दिवसांत तो दगड फुटतो. हे ऎकतानाच अंगावर काटा आला. आपले पूर्वज काय अफाट बुध्दीमत्तेचे होते नं हातात फारशी काही साधने नसताना १४०० वर्षापूर्वी केवळ आम जनतेला माहिती व्हावे म्हणून एवढे कष्ट करून पल्लवांनी या शिल्पकृती तयार केल्या आहेत. मनातून खूप भरून आलं होतं. याच ठिकाणी गंगा नदी आणि शिवशंकराचाही देखावा तयार केला आहे. इंदिरा गांधी महाबलीपुरम्‌ला बर्‍याचदा यायच्या म्हणे हातात फारशी काही साधने नसताना १४०० वर्षापूर्वी केवळ आम जनतेला माहिती व्हावे म्हणून एवढे कष्ट करून पल्लवांनी या शिल्पकृती तयार केल्या आहेत. मनातून खूप भरून आलं होतं. याच ठिकाणी गंगा नदी आणि शिवशंकराचाही देखावा तयार केला आहे. इंदिरा गांधी महाबलीपुरम्‌ला बर्‍याचदा यायच्या म्हणे येथे बकरी आणि हरीण बसलेले एक शिल्प आहे, जे आपल्या पूर्वीच्या १० रु.च्या नोटेवर छापले\nहोते, याठिकाणाची स्मृती म्हणून \nयाच भागात वेगवेगळया छोट्या गुंफा आहेत, त्यामध्ये विष्णूचे जे दहा अवतार आहेत, त्यापैकी वराह अवतार आणि वामनावतार यामधील काही शिल्पे कोरलेली आहेत. कृष्णकुंज बघून बाहेर पडताना आपण एका भारलेल्या अवस्थेतच असतो.\n4 प्रतिक्रिया Posted in असंच काहीही, नविन काहीतरी Tagged चेन्नई, महाबलीपुरम्‌\nखूप दिवसांनी ब्लॉगवर आलेय्‌. नाशिक सोडून सध्या आम्ही चेन्नईला स्थायिक झालो आहोत. नवीन ठिकाण, भाषेपासून खाण्यापिण्यापर्यंत सगळं काही नवीन. आम्ही जून महिन्यात चेन्नईला आलो. श्रृतीची शाळा, घर लावणे , नवा परिसर माहित करून घेणे, नव्या ओळखी , नव्या मैत्रिणी , तामिळ भाषेची जुजबी ओळख करून घेणे या सगळ्यात नवी पोस्ट लिहायला जमलेच नाही. अर्थात इकडे आल्यावर भटकंती बरीच झाली आहे. वेल्लोरचे गोल्डन टेंपल , कांचीपुरम्‌ , पॉंडीचेरी, महाबलीपुरम्‌ अशी जवळपासची बरीच ठीकाणं बघून झालीयेत्‌ . त्याबद्द्लची सविस्तर पोस्ट नंतर टाकेन.\nआज चक्क मी एक रेसिपी सांगणार आहे. ‘सुपारीशिवाय सुपारी’ म्हणजे सुपारी न वापरता केवळ बडीशेप वगैरे वापरून एक वेगळ्या प्रकारची सुपारी किंवा मुखवास ही मूळ रेसिपी माझ्या आतेसासूबाईंची – कुमुदआत्यांची आहे. त्या यामध्ये कच्ची सुपारी फोडून थोड्या तुपात परतून वापरायच्या. लहान असताना श्रृती ही सुपारी आवडीने खायची. म्हणून मी मूळच्या रेसिपीमधला ‘कच्ची सुपारी’ हा भाग वगळून थोडी रेसिपी modify केली आहे. करायला अगदी सोपी आहे आणि पटकन्‌ होणारी आहे. तेव्हा करून बघा आणि कळवा कशी झालीय्‌ ते \n२५० ग्रॅम बडिशेप (जाड किंवा देशी मिळाली तर उत्तम)\n५० ग्रॅम सुके खोबरे किसून\n५० ग्रॅम ओवा (थोडा जास्त घेतला तरी चालेल)\n१०० ग्रॅम जेष्ठ्मध पावडर\n४ वेलदोडे (सालासकट आख्खे वेलदोडे घ्यावेत)\nचमनबहार २ टी स्पून (‘चमनबहार’लाच रोझ पावडर म्हणतात.)\n१. प्रथम कढई गरम करून त्यात किसलेले खोबरे थोडे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावे. फार लाल करू नये किंवा जास्त भाजू नये.\n२. ते खोबरे ताटात काढून त्याच कढईत बडिशेप भाजून घ्यावी. ती ही फार भाजू नये. फार कुरकुरीत करू नये.\n३. त्यातच आता ओवा, लवंगा आणि वेलदोडे घालून थोडे परतावे.\n४. आता गॅस बंद करून त्याच कढईत पहिल्यांदा गरम केलेले खोबरे घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे.\n५. हे सर्व मिश्रण पूर्ण गार होऊ द्यावे.\n६. हे गार झालेले मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यावे. थोडेसे भरडच ठेवावे, फार बारिक करू नये.\n७. एका मोठ्या भांड्यात हे मिश्रण काढून त्यात मीठ, चमनबहार आणि निम्मी जेष्ठ्मध पावडर घालून चांगले मिसळून घ्यावे.\n८. जर गोडीला कमी वाटले तर थोडी थोडी जेष्ठ्मध पावडर घालून चांगले मिसळून घ्यावे.\n९. सुपारीशिवाय सुपारी तयार आहे. ही हवाबंद डब्यात साठवावी.\nटीप – चमनबहार हे सुवासासाठी वापरतात आणि त्याला साधारण पानमसाल्यासारखी चव असते. आपल्या आवडीप्रमाणे याचे प्रमाण वाढवले तरी चालते. पण खूप जास्त झाले तर थोडी कडवट चव लागू शकते.\n2 प्रतिक्रिया Posted in असंच काहीही Tagged चमनबहार, बडीशेप, सुपारी\nथांबा , ई-मेल नावावरून मी तुम्हाला बोगस ई-मेल कशा येतात, या फॉरवर्डेड ई-मेल्सनी कसा वैताग आणलाय किंवा दिलेल्या सेरीजच्या पुढचा नंबर ओळखून अ‍ॅटॅच केलेल्या फाईलमध्ये तुमचे नांव टाका अशा प्रकारच्या कथा सांगून बोअर करणार नाहीय्‌. माझा एक वेगळाच प्रश्न आहे, “I have sent you an e-mail” या वाक्याचं मराठीत भाषांतर तुम्ही काय करता मी तुला एक मेल पाठवलीय्‌ , मी तुला एक मेल पाठवलाय्‌ की मी तुला एक मेल पाठवलंय्‌ मी तुला एक मेल पाठवलीय्‌ , मी तुला एक मेल पाठवलाय्‌ की मी तुला एक मेल पाठवलंय्‌ आता कसं आहे की कुणी आजकाल ई-मेल असं म्हणत नाही तर फक्त मेल असं म्हणतात कारण मेल म्हणजेच ई-मेल हे आपण गृहीत धरलंय्‌. अगदीच बाय पोस्ट काही पाठवायचं असेल तर आपण कुरिअर करतो नाही कां आता कसं आहे की कुणी आजकाल ई-मेल असं म्हणत नाही तर फक्त मेल असं म्हणतात कारण मेल म्हणजेच ई-मेल हे आपण गृहीत धरलंय्‌. अगदीच बाय पोस्ट काही पाठवायचं असेल तर आपण कुरिअर करतो नाही कां\nतर माझा प्रश्न असा आहे की ती मेल, तो मेल की ते मेल झालं कन्फ्यूजन पूर्वी माझं याबाबतीत नेहमी कन्फ्यूजन व्हायचं. आम्ही इंजिनियरिंगला असताना मुळात इंटरनेट ही नवीन गोष्ट होती आणि त्यात ई-मेल म्हणजे तर खूपच नवीन. त्यामुळे त्याकाळात ( अगदी सोपं सांगायचं तर १२/१५ वर्षापूर्वी ) ई-मेल अकाउंट असणे ही अभिमानाची बाब होती. (आम्ही तेव्हा ई-मेल अकाउंट म्हणायचो , मेल आय्‌डी नाही) “अय्या, तुझं ई-मेल अकाउंट नाहीय्‌ अगं मग काढ नां, मी तुला ई-मेल पाठवते.” असं कॉलेजात रोज भेटणार्‍या मैत्रिणीला सांगायचो. अर्थात तेव्हा ई-मेल पाठवणं ही फार सोपी गोष्ट नव्हती. कारण तेव्हा घरोघरी इंटरनेट नव्हतं. कॉलेजात फक्त काही वेळापुरतेच इंटरनेट वापरायला परवानगी असायची. मग नेट सर्फिंग करायचे किंवा ई-मेल पाठवायचा ( तेव्हा मी ते पत्र सारखं तो मेल असं म्हणायची, मेल हा ती किंवा ते कसं असेल, तो ‘तो’ च असणार असा मे बी यामागे विचार असेल) तर सायबर कॅफेत जाऊन ताशी ४० रू. द्यावे लागायचे. आजकाल कसे गल्लोगल्ली सायबर कॅफे दिसतात तसे तेव्हा नसायचे. हळूहळू ई-मेल असं म्हणणं मागासलेपणाचं वाटायला लागला त्यापेक्षा नुसतं मेल असं म्हणायला आवडायला लागलं. जर कुणी चुकून ई-मेल असं म्हंट्लं तर कळायचं की ये अभी बच्चा है. तर आम्ही कोल्हापुरात तो मेल असं म्हणायचो. त्यावेळी पुण्यात राहणारी माझी मैत्रिण मला म्हणाली, “वैशाली , मी तुला एक मेल पाठवली होती, मिळाली कां अगं मग काढ नां, मी तुला ई-मेल पाठवते.” असं कॉलेजात रोज भेटणार्‍या मैत्रिणीला सांगायचो. अर्थात तेव्हा ई-मेल पाठवणं ही फार सोपी गोष्ट नव्हती. कारण तेव्हा घरोघरी इंटरनेट नव्हतं. कॉलेजात फक्त काही वेळापुरतेच इंटरनेट वापरायला परवानगी असायची. मग नेट सर्फिंग करायचे किंवा ई-मेल पाठवायचा ( तेव्हा मी ते पत्र सारखं तो मेल असं म्हणायची, मेल हा ती किंवा ते कसं असेल, तो ‘तो’ च असणार असा मे बी यामागे विचार असेल) तर सायबर कॅफेत जाऊन ताशी ४० रू. द्यावे लागायचे. आजकाल कसे गल्लोगल्ली सायबर कॅफे दिसतात तसे तेव्हा नसायचे. हळूहळू ई-मेल असं म्हणणं मागासलेपणाचं वाटायला लागला त्यापेक्षा नुसतं मेल असं म्हणायला आवडायला लागलं. जर कुणी चुकून ई-मेल असं म्हंट्लं तर कळायचं की ये अभी बच्चा है. तर आम्ही कोल्हापुरात तो मेल असं म्हणायचो. त्यावेळी पुण्यात राहणारी माझी मैत्रिण मला म्हणाली, “वैशाली , मी तुला एक मेल पाठवली होती, मिळाली कां” बाकी कशाकडे माझं लक्ष न जाता, मैत्रिण ती मेल म्हणाली याकडे जास्त लक्ष गेलं आणि ती ‘पुण्यातली’ मैत्रिण होती. नंतर माझा चाळाच होऊन बसला की बोलताना बाकी सगळे काय म्हणतायत्‌ ती मेल, तो मेल की ते मेल” बाकी कशाकडे माझं लक्ष न जाता, मैत्रिण ती मेल म्हणाली याकडे जास्त लक्ष गेलं आणि ती ‘पुण्यातली’ मैत्रिण होती. नंतर माझा चाळाच होऊन बसला की बोलताना बाकी सगळे काय म्हणतायत्‌ ती मेल, तो मेल की ते मेल त्यावेळेस जास्तीत जास्त रेटींग ती मेल ला मिळालं होतं.\nत्यावेळेस बहुतेकांची ई-मेल अकाउंटस्‌ ही हॉट्मेल नाहीतर याहूवर असायची. कोणत्या वेबसाईटवर किती जास्त स्पेस मिळते हे पाहून तिथे इ-मेल अकाउंट उघडले जायचे. इंटरनेट सिक्युरिटी किंवा इतर फॅसिलीटीज्‌ जसं की चॅटींग, व्हिडिओ कॉलिंग वगैरे गोष्टी तर कोसों दूर होत्या. माझें सर्वात पहिलं अकाउंट हे युएस्‌ए.नेट वर होते कारण जेव्हा त्यावर ७ जीबी स्पेस मिळत होती, तेव्हा याहू, हॉटमेल वगैरे ५० ते ७० एम्‌बी स्पेस देत होते. आता ते अकाउंट बंद केलंय्‌. आजकाल ई-मेल अकाउंट ओपन करताना स्पेस हा क्रायटेरियाच लागू होत नाही कारण बहुतेक वेबसाईटस्‌वर अमर्यादीत जागा उपलब्ध करून दिलेली असते. सध्या मला तर वाटतंय्‌ की जीमेल आय्‌डी नाही अशी व्यक्ती (अर्थात नेट वापरणार्‍यांपैकी) शोधावी लागेल.\nसंवाद साधण्याचे साधन म्हणून राजेमहाराजेंच्या काळात कबुतरांना प्रशिक्षण देऊन संदेशाची देवाणघेवाण व्हायची. ब्रिटीशांच्या काळात संदेशाची देवाणघेवाण जलद होण्यासाठी पोस्ट ऑफिस ही संकल्पना आली. मला आठवतंय्‌ माझे आजोबा तर सकाळचा काही वेळ हा पत्र लिहण्यासाठी राखून ठेवायचे. या पोस्ट ऑफिसची जागा कुरियरने कधी घेतली हे कळालेच नाही. १०/१५ वर्षापूर्वी जर काही वस्तू सुरक्षितरित्या आणि जलद पाठवायची असेल तरच कुरियर केले जायचे. नंतर हळूहळू पत्रं, लग्नाची निमंत्रणं ही सुध्दा कुरियर केली जाऊ लागली. इंटरनेट्चा जसा प्रसार झाला आणि लोकांना याची उपयुक्तता पटली तेव्हा तर संदेशाची देवाणघेवाण अतिजलद होण्यासाठी ई-मेल , चॅटींग या गोष्टी वापरल्या जाऊ लागल्या. आजकालच्या लहान मुलांना पोस्ट ऑफिस काय असतं हे माहितच नाहिय्‌. शाळेत EVEच्या फिल्ड व्हिजीट मध्ये त्यांना पोस्ट ऑफिस दाखवले जाते. आता तर सोशल नेटवर्किंग साईट्स्‌ मुळे लोकांना ई-मेल वापरही कमी झालाय्‌. मध्यंतरी मी एका पेपरला वाचलं होतं की जसं पोस्ट हे कालबाह्य झालं आहे तसं येत्या काही वर्षात ई-मेल करणं हे ही कालबाह्य होईल. ऑफिशियल काही कामासाठी मेल वापरले जातील पण व्यक्तिगत संपर्काचे माध्यम म्हणून ई-मेलचा वापर खूपच कमी होईल. याची प्रचिती आत्ताच येऊ लागली आहे. ८/१० वर्षापूर्वी नवरा कामानिमित्त जेव्हा परदेशात जायचा तेव्हा संपर्कात राहण्याचे सर्वात स्वस्त माध्यम ई-मेल हेच होते. नंतर स्काईप आलं आणि सगळं चित्रच बदलून गेलं. नेटवर्किंग साईट्स्‌, ब्लॉग्ज, व्हिडीओ चॅटिंग यासारख्या सुविधा असताना ई-मेल चा वापर केवळ आलेल्या ई-मेल फॉरवर्ड करण्यासाठीच होतो. या सगळ्या बदलाचे आपण साक्षीदार आहोत हे काय कमी आहे\n2 प्रतिक्रिया Posted in असंच काहीही, दैनंदिन घडामोडी Tagged ई-मेल, चॅटिंग, पोस्ट, वेबसाईट\nस्टीफन कोवेचे ९०-१० तत्त्व\nस्टीफन कोवे , एक अमेरिकन विचारवंत.. 7 habits of highly effective people या आणि यासारख्या बर्‍याच पुस्तकांचे लेखक आहेत . अलिकडेच एका ई-मेलमधून स्टीफन कोवेचे हे तत्त्व वाचनात आलं. एक चांगला विचार माझ्या वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी ही पोस्ट….\nज्या गोष्टीत आपण प्रतिक्रिया / प्रतिसाद देतो त्यामध्ये ९०-१० तत्त्वाचा अंगीकार केला तर आपलं आयुष्य बदलण्याची क्षमता या ९०-१० तत्त्वात आहे असा स्टीफन कोवेचा दावा आहे. काय आहे हे ९०-१० तत्त्व आपल्या बाबतीत जे काही घडतं आणि ज्यावर आपला ताबा नसतो अशा गोष्टी फक्त १० टक्के असतात. उदा. आपल्या कारचे ब्रेक फेल होणं, एखाद्या महत्वाच्या मिटींगला जात असताना बस / ट्रेन / फ्लाईट यासारख्या गोष्टी ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा येणं , एखाद्या पार्टीला जायचं ठरलेलं असताना जवळच्या व्यक्तीला दुखापत होणं वगैरे. तर अशा गोष्टी ज्या घडण्यापासून आपण थांबवू शकत नाही आणि त्या गोष्टींचा आपल्यावर होणारा परिणाम आपण टाळू शकत नाही , अशा गोष्टी फक्त १० टक्के असतात. मग राहिलेल्या ९० टक्के गोष्टी आपल्या बाबतीत जे काही घडतं आणि ज्यावर आपला ताबा नसतो अशा गोष्टी फक्त १० टक्के असतात. उदा. आपल्या कारचे ब्रेक फेल होणं, एखाद्या महत्वाच्या मिटींगला जात असताना बस / ट्रेन / फ्लाईट यासारख्या गोष्टी ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा येणं , एखाद्या पार्टीला जायचं ठरलेलं असताना जवळच्या व्यक्तीला दुखापत होणं वगैरे. तर अशा गोष्टी ज्या घडण्यापासून आपण थांबवू शकत नाही आणि त्या गोष्टींचा आपल्यावर होणारा परिणाम आपण टाळू शकत नाही , अशा गोष्टी फक्त १० टक्के असतात. मग राहिलेल्या ९० टक्के गोष्टी या तुम्ही ठरवत असता….. कशा या तुम्ही ठरवत असता….. कशा तर त्या १० टक्क्यावर तुम्ही जी प्रतिक्रिया / प्रतिसाद देता त्यावर उरलेल्या ९० टक्के होत असतात…. पटतंय्‌ तर त्या १० टक्क्यावर तुम्ही जी प्रतिक्रिया / प्रतिसाद देता त्यावर उरलेल्या ९० टक्के होत असतात…. पटतंय्‌ ठीक आहे , आपण यासाठी एक उदाहरण पाहू.\nघरात सकाळची गडबड चालू आहे, तुम्हाला ऑफिसला जायचे आहे, मुलीची शाळेची तयारी चालू आहे, बायकोलाही स्वयंपाक, आवराआवर करून ऑफिसला जायचे आहे . सर्व काही आवरून , ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन तुम्ही नाष्टा करत आहात आणि मुलीच्या हाताचा धक्का चुकून चहाच्या कपाला लागतो आणि तो चहा तुमच्या शर्टवर, पॅंटवर सांडतो. ही १० टक्क्यांमधली गोष्ट झाली जी तुमच्या ताब्यात नाही पण यावर तुम्ही कसा प्रतिसाद देता यावर पुढच्या ९० टक्के गोष्टी होत असतात…. नाही पटत….\nप्रतिसाद १ – तुमच्या शर्ट-पॅंट्वर चहा सांडल्यावर तुमची चिडचिड होते आणि तुम्ही मुलीवर रागावून ओरडता. आधीच बावरलेली तुमची मुलगी रडायला सुरवात करते. आता तुम्हाला तिची समजूत घालणं भाग आहे आणि बालस्वभावानुसार तुम्ही समजूत घालायला लागल्यावर मुलगी जास्त जोरात रडायला लागणार… 🙂 तिची शाळेची तयारी पूर्ण होईपर्यंत स्कूलबस निघून जाणार. तुम्हाला तिला शाळेत सोडून मग ऑफिसला जावं लागतं , नेहमीपेक्षा उशिरा ऑफिसला पोचल्याने तुमची चिडचिड अजून वाढणार, मग दिवस असाच वैतागात, इतरांवर रागावण्यात जाणार ….\nम्हणजे बघा हं, जो दिवस नेहमीसारखाच चालू झाला होता, तो केवळ एका घटनेमुळं वैतागवाण्या दिवसात बदलणार… ती एक घटना कोणती तुमच्या शर्ट्वर चहा सांडला ही …. तुमच्या शर्ट्वर चहा सांडला ही …. नाही…. तर त्या चहा सांडण्यावर तुम्ही जो प्रतिसाद दिला ती….. जर तुम्ही तुमचा प्रतिसाद बदलला असता तर\nप्रतिसाद २ – तुमच्या शर्ट-पॅंट्वर चहा सांडल्यावर तुमची चिडचिड होते , पण ती व्यक्त न करता तुम्ही मुलीला म्हणता की ” बेटा, माझे कपडे खराब झाले नां.. पुढच्या वेळी काळजी घे हं. ok, no problem ” आणि पटकन्‌ कपडे बदलायला तुम्ही जाता… मुलगी वेळेत आवरून स्कूलबसमधून शाळेत जाते ( कारण मधला रडण्याचा कार्यक्रम होणार नाही … 🙂 ), तुम्ही हसत तिला टाटा करता, आणि ऑफिसला जाता, नेहमीप्रमाणे वेळेत तुमची कामे चालू होतात आणि आनंदात दिवस संपतो….काय पटतंय्‌ कां….\nज्या आपल्या आवाक्याबाहेरच्या असतात त्या तुम्ही टाळू , बदलू किंवा थांबवू शकत नाही अशा फक्त १० टक्के गोष्टी असतात आणि त्यावर तुम्ही जी प्रतिक्रिया , प्रतिसाद देता त्यावर पुढे होणार्‍या ९० टक्के गोष्टी अवलंबून असतात. हो नां थोडक्यात कोणत्याही गोष्टीचं Happy Ending कसं करायचं हे आपल्याच हातात असतं…. 🙂\n(मूळ इंग्लिशमध्ये असणारी ही इ-मेल मी मराठीत भाषांतरीत केली आहे.)\n2 प्रतिक्रिया Posted in जीवनमूल्ये, नविन काहीतरी Tagged प्रतिसाद, स्टीफन कोवे, controlling reactions\nहोतं असं कधी कधी….\nअसं कधी कधी होतं नां की एखादा दिवस हा खूप दगदगीचा, वैतागाचा जातो. माझा परवाचा शनिवार असाच होता. सकाळी चक्क सगळी कामं लवकर आवरून झाली. मग छान मूडमध्ये विचार आला की बरेच दिवसांपासून जी काही छोटी मोठी खरेदी करायची राहिली आहे, ती आज ऑफिसमधून लवकर निघून करून टाकू. हाच हाच तो क्षण ज्याने सुरवातीचा आनंदी मूड हा वैतागात बदलला ( आता असं वाटतंय्‌ तेव्हा मात्र वाटलं होतं की वा काय मस्त प्लॅनिंग केलं आहे. ) झालं मग मेन रोडला जाऊन खरेदी करायची तर माझी स्कूटी घेऊन जाणं जरूरी होतं. आजकाल मी बसनंच ऑफिसला जाते, अगदीच काही कारण असेल तरच स्कूटी नेते. कारणइथे वाचा . त्यामुळे गाडीत पेट्रोल संपत आलंय्‌ हे लक्षात नव्हतं.\nठरवल्याप्रमाणे ऑफिसमधून लवकर बाहेर पडले, मेन रोडला गेले. आमच्या भागात ज्या झाडूची किंमत ७० रू. सांगितली होती, त्यापेक्षा जास्त चांगला झाडू ५० रू. ला मिळाला. लगेच स्वतःची पाठ थोपाटून घेतली. खरेदी करायचा उत्साह अजून वाढला. नवीन टेबलक्लॉथ घ्यायचाय्‌ असं बरेच दिवसांपासून घोकत होते. मेनरोडला सर्व प्रकारचे कव्हर्स मिळणारे एक नवीनच झालेले दुकान दिसले. मग माझा मोर्चा तिकडे वळवला…. वेगवेगळ्या प्रकारची कव्हर्स, टेबलक्लॉथ वगैरे पहात होते, तेवढ्यात काय झाले माहीत नाही पण डोळ्यांसमोर हळूहळू अंधारी यायला लागली, सगळं दुकान माझ्याभोवती गरगर फिरायला लागलं, मला चक्कर येतेय हे लक्षात आल्यावर मी तिथल्या सेल्समनला म्हंटलं, “भैया कुछ बैठने के लिए है क्या मुझे चक्कर आ रहा है”. आता नवल वाटतंय्‌ की मला हे म्हणायला कसं सुचलं मुझे चक्कर आ रहा है”. आता नवल वाटतंय्‌ की मला हे म्हणायला कसं सुचलं सिनेमात दाखवतात तसं मी धाडकन्‌ पडले कशी नाही सिनेमात दाखवतात तसं मी धाडकन्‌ पडले कशी नाही तसा मला चक्कर येण्याचा फार अनुभव नाही. आणि काल चक्कर यायला काही कारण पण नव्हतं. नाष्टा, जेवण सर्व वेळेवर करून मग मी बाहेर पडले होते. कदाचित उन्हामुळे असेल… असो. आत्ता जे इथे लिहलंय्‌ ते सगळे विचार मी थोडीशी सावरल्यावर मनात आले. थोडं पाणी पिल्यावर बरं वाटायला लागलं. मग तिथून टेबलक्लॉथ घेतला , अजून थोडी खरेदी केली आणि तिथून निघाले. त्या दुकानदाराने विचारले, ” आप ठीक तो है नां , इस्कूटी पे जाओगे कैसे तसा मला चक्कर येण्याचा फार अनुभव नाही. आणि काल चक्कर यायला काही कारण पण नव्हतं. नाष्टा, जेवण सर्व वेळेवर करून मग मी बाहेर पडले होते. कदाचित उन्हामुळे असेल… असो. आत्ता जे इथे लिहलंय्‌ ते सगळे विचार मी थोडीशी सावरल्यावर मनात आले. थोडं पाणी पिल्यावर बरं वाटायला लागलं. मग तिथून टेबलक्लॉथ घेतला , अजून थोडी खरेदी केली आणि तिथून निघाले. त्या दुकानदाराने विचारले, ” आप ठीक तो है नां , इस्कूटी पे जाओगे कैसे” श्रृती यायच्या आत मला घरी पोचायचं होतं त्यामुळे तशीच निघाले. तसा अजून १५ मि. अवकाश होता. तसं बरंच जड सामान , एका साईडला झाडू अशी माझी वरात निघाली स्कूटीवरून…\nओव्हरब्रिजवरून खाली उतरले आणि स्कूटी आचके द्यायला लागली. गाडी रिझर्व्हला आलीय वाटतं असा विचार करून गाडी साईडला घेतली आणि पेट्रोलकॉक पाहीला तर तो ऑलरेडी रिझर्व्ह वर होता. माझ्या गाडीतले पेट्रोल संपले होते. चक्कर आल्याने आधीच थोड्ं अस्वस्थ वाटत होतं त्यात गाडीतलं पेट्रोल संपलेलं, जवळपास पेट्रोलपंप नाही, घड्याळाचे काटे पुढे सरकायला लागलेले, श्रृती आता पाच मिनिटांत घरी येईल, काय करायचं. मग लगेच डिसिजन घेतला की गाडी इथेच लावून रिक्षाने घरी जायचे. त्यातल्यात्यात थोडं डोकं चालवून, जवळच असणार्‍या मोठं हॉस्पिटलच्या जवळ स्कूटी लावली. हातात झाडू, जड पिशव्या, मनात वैताग,चरफड आणि मी पहातेय्‌ रिक्षाची वाट… मेली एक रिक्षा रिकामी दिसेना आणि जवळच्या रिक्षास्टॉपवरच्या रिक्षावाले कमी अंतर आहे म्हणून घरापर्यंत यायला तयार नाहीत. टेंशन वाढत चालले होते. तेवढ्यात समोरून एक रिक्षा येताना दिसली. पण ती शेअर-रिक्षा होती, ती काही घरापर्यंत आली नसती, जवळच्या स्टॉपपासून मला घरी चालत जायला लागणार होतं पण अजून वाट पहाणं परवडणार नव्हतं. हातात झाडू, जड पिशव्या, मनात वैताग,चरफड, रणरणणारे ऊन ,जवळचे पाणीही संपलेलं, त्यात अजून वैताग की घरी जाण्यासाठी तीन मजले चढून जायचेय्‌ (आमच्या अपार्ट्मेंटला लिफ्ट नाहीय्‌) … चालत चालत चालत मी घरी पोचले, दुसर्‍या मजल्यापर्यंत पोचतेय्‌ तेवढ्यात श्रुतीचा आवाज ऐकू आला. हुश्श…. केलेली खरेदी बघायचाही उत्साह उरला नव्हता. अजून परत जाऊन स्कूटी घेऊन यायची होती. तासाभरात निघू असा विचार करून थोडी झोप काढली.\nउठल्यावर बघते तर पावसाला सुरवात झाली होती…. अरे मगाशी थोड्यावेळापूर्वी ऊन मी म्हणत होतं आणि आत्ता मुसळधार पाऊस श्या काय चाललंय्‌ हे श्या काय चाललंय्‌ हे जसजसा वेळ जाऊ लागला तसतसे मनात काहीबाही विचार येऊ लागले.मी हॉस्पिटलजवळ गाडी लावून आता चार-पाच तास होऊन गेलेत…. सध्याचे दिवस किती वाईट आहेत…. कुणी गाडीला काही केलं तर जसजसा वेळ जाऊ लागला तसतसे मनात काहीबाही विचार येऊ लागले.मी हॉस्पिटलजवळ गाडी लावून आता चार-पाच तास होऊन गेलेत…. सध्याचे दिवस किती वाईट आहेत…. कुणी गाडीला काही केलं तर बेवारस गाडीतच बॉम्ब वगैरे असतात नां बेवारस गाडीतच बॉम्ब वगैरे असतात नां ती माझी गाडी आहे हे मला माहीत आहे पण त्या एरियाला ती गाडी अनोळखी आहे, बराच वेळापासून ती गाडी तिथेच आहे, बेवारस गाडी म्हणून कुणा तत्पर नागरिकाने पोलिंसांना कळवले तर ती माझी गाडी आहे हे मला माहीत आहे पण त्या एरियाला ती गाडी अनोळखी आहे, बराच वेळापासून ती गाडी तिथेच आहे, बेवारस गाडी म्हणून कुणा तत्पर नागरिकाने पोलिंसांना कळवले तर मनात शंकाकुशंकांनी थैमान घातले. मी चक्क टी व्ही लावून लोकल न्यूज चॅनलवर पाहिले अशी काही बातमी दिसतेय्‌ कां ते मनात शंकाकुशंकांनी थैमान घातले. मी चक्क टी व्ही लावून लोकल न्यूज चॅनलवर पाहिले अशी काही बातमी दिसतेय्‌ कां ते पावसाचा जोर जरासा कमी होताच रिकामी बाटली घेऊन श्रृती आणि मी पहिल्यांदा पेट्रोलपंपापर्यंत गेलो, पेट्रोल घेतले, मग उलट दिशेने जाणारी रिक्षा शोधायला लागले. नशिबाने रिक्षा लवकर मिळाली. परत त्या हॉस्पिटलजवळ पोचेपर्यंत धीर निघत नव्हता…. गाडी मी जशी लावली होती, तशीच ती आहे हे बघून जिवात जीव आला. पेट्रोल टाकून गाडी चालू झाल्यावर एक सुटकेचा निश्वास सोडला…. आता घरी जाऊन संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करणे शक्यच नव्हते. नवर्‍याला फोन करून एका नेहमीच्या ठिकाणी यायला सांगितले. नवर्‍याला भेटल्यावर सकाळपासून काय काय झालं ते बोलून टाकलं…. खरंतर चक्कर आलीय हे सांगायला नको होतं कारण तो उगाच काळजी करत बसतो. आता डॉक्टरकडे जाऊन सगळं चेकअप करू म्हणून मागे लागलाय्‌. असो. सगळं ऎकून झाल्यावर तो म्हणाला “मग कुठे जाऊया जेवायला पावसाचा जोर जरासा कमी होताच रिकामी बाटली घेऊन श्रृती आणि मी पहिल्यांदा पेट्रोलपंपापर्यंत गेलो, पेट्रोल घेतले, मग उलट दिशेने जाणारी रिक्षा शोधायला लागले. नशिबाने रिक्षा लवकर मिळाली. परत त्या हॉस्पिटलजवळ पोचेपर्यंत धीर निघत नव्हता…. गाडी मी जशी लावली होती, तशीच ती आहे हे बघून जिवात जीव आला. पेट्रोल टाकून गाडी चालू झाल्यावर एक सुटकेचा निश्वास सोडला…. आता घरी जाऊन संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करणे शक्यच नव्हते. नवर्‍याला फोन करून एका नेहमीच्या ठिकाणी यायला सांगितले. नवर्‍याला भेटल्यावर सकाळपासून काय काय झालं ते बोलून टाकलं…. खरंतर चक्कर आलीय हे सांगायला नको होतं कारण तो उगाच काळजी करत बसतो. आता डॉक्टरकडे जाऊन सगळं चेकअप करू म्हणून मागे लागलाय्‌. असो. सगळं ऎकून झाल्यावर तो म्हणाला “मग कुठे जाऊया जेवायला” बस्स आवडत्या हॉटेलात मनासारखं जेवण झाल्यावर (मनासारखी खरेदी झाली होतीच ती आत्ता जाणवली) दिवसभराचा वैताग , शीण , मानसिक / शारिरिक थकवा कुठल्या कुठे पळून गेला…..\n6 प्रतिक्रिया Posted in असंच काहीही, दैनंदिन घडामोडी Tagged ऊन, चक्कर, दगदग, वैताग\nमाझा ब्लॉग सुरू करून सव्वा वर्ष झालं…. वेळेअभावी ( उर्फ प्रतिभेअभावी )फार काही लेख लिहून झाले नाहीयेत… आज मी माझा ब्लॉग पाहिला आणि लक्षात आलं की अरे, आपल्या ब्लॉगला दहा हजाराहून जास्त लोकांनी भेट दिली आहे. तर माझ्या सर्व वाचकांना धन्यवाद देण्यासाठी ही आजची पोस्ट ….तन्वी, महेंद्रकाका, देवेन, सौरभ, हेरंब, हेमंत, सुहास अशा ब्लॉगर्सनी सातत्याने कौतुकाची शाबासकी दिली. याशिवाय कितीतरी अनोळखी वाचकांनी पोस्ट आवडल्याचे आवर्जून सांगितले आणि प्रतिकिया देऊन, पोस्टला सबस्क्रिप्शन देऊन माझा लिहण्याचा उत्साह वाढवला.. 🙂 🙂\nसर्वात महत्वाचे आभार ‘मराठी ब्लॉग विश्व’ चे ज्यांनी माझ्यापर्य़ंत १६५९ वाचक (आतापर्यंत) पोचवले आहेत 🙂 आणि अर्थात गुगलदादाचे 🙂 ज्याचा वापर करून वेगवेगळ्या शब्दांनी शोध घेत वाचक ‘जीवनतरंग’ वर आले. कोणकोणत्या शब्दांनी शोध घेत लोकं या साईटवर पोचले हे पाहिलं तर आश्चर्य वाटतं. कॉम्प्युटर, व्यसन, रंगकाम, सासू, प्रोत्साहन, अल्बम,नेटवर्किंग, हलवा, लग्न विश्वास, मोटीव्हेशन यासारखे शोध घेत येणार्‍यांना त्यांच्या शोधपूर्तीचे समाधान मिळाले असेल. मात्र ‘ताईला शू आली’ या व अशासारख्या शब्दांची लिंक या साईट्पर्यंत कशी काय पोचते हे मलाच शोधावे लागेल. ( आणि हे वाक्य कशाला कोण सर्च करेल)असो. तर ‘जीवनतरंग’ ला भेट देणार्‍या, प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे मनापासून आभार… असाच लोभ ठेवून माझा लिहण्याचा उत्साह वाढ्वाल अशी विनंतीवजा अपेक्षा….. 🙂\nतशी मी फार बडबडी नाहीय्‌ आणि बोलून मोकळं होणं हे मला फार जमत नाही. मला असं वाटतं की माझे हे गुण (/अवगुण) माझ्या लिखाणातही येतात. त्यामुळे माझ्या सुरवातीच्या काही पोस्ट वाचताना मला असं वाटलं की विषय चांगला आहे पण मी जे काही लिहलंय्‌ ते अजून फुलवता, खुलवता आलं असतं… ब्लॉग लिहण्याचा माझा व्यक्तीगत फायदा असा झाला की विचारात आणि पर्यायाने लिहण्यात अधिक सुसुत्रता येत गेली. आपण जसा विचार करतो तसं आपण लिहतो असं मला वाटतं. माझ्या लिहण्यातून मला समोरच्या व्यक्तीपर्यंत काही मत, विचार, अनुभव, वास्तव, निरीक्षणें पोचवायची असतील तर ते लिखाण समजायला सोपे हवे आणि ते सोपे करण्यासाठी जास्त सलग, सुसुत्र आणि स्पष्ट हवे. म्हणजेच माझे विचार सलग, सुसुत्र आणि स्पष्ट हवेत. आणि जसंजसं जास्त लिहू तसतसं विचार करण्याची पद्धतही परिपक्व होत जाते असं माझ्या लक्षात आलंय्‌. अर्थात विचार करण्याची योग्य पद्धत आणि योग्य विचार यांत बरेच अंतर आहे. मात्र योग्य विचारांपर्यंत पोचण्याची ही पहिली पायरी आहे असे म्हणता येईल. लिहण्यातला आनंद घ्यायला मी शिकतेय्‌. So Happy Writing to myself…\n6 प्रतिक्रिया Posted in दैनंदिन घडामोडी Tagged आभार, उत्साह, शोध\n“अगं हे काय प्रज्ञा, आज चालत गाडी (पक्षी : स्कूटी) सर्व्हींसिंगला दिलीय कां गाडी (पक्षी : स्कूटी) सर्व्हींसिंगला दिलीय कां” किमान १५ जणांनी तरी हा प्रश्न गेल्या महिन्याभरात मला विचारला असेल…\nत्याचं काय झालं की मागच्या महिन्यापासून ऑफिसला जाताना मी स्कूटी न नेता बसने जायला लागले. जेव्हा सुरवात केली तेव्हा सकाळी सकाळी माझ्या स्कूटीचे मागचे चाक पंक्चर झाले होते. ऑफिसला उशिर होत होता म्हणून मी मेनरोडपासून शेअर-रिक्षा पकडू असे ठरवले. आणि चक्क मेनरोडला पोचल्यापोचल्या २ मिनिटात सिटी बस आली…. अजून एक सांगायचे म्हणजे नाशिकला साधारण वर्षभरापूर्वी नविन सिटी बस आणल्यात. छान चकाचक, उभे राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी ऎसपैस जागा आणि महत्वाचे म्हणजे बसमध्ये संयत आवाजात वाजणारा FM रेडीओ….अशा छान छान बस काही ठराविक रूटवर चालू केल्या आहेत…ऑफिसमधल्या बहुतेकजणींनी अशा बसने प्रवास करून काय मस्त बस आहे, बसमध्ये किती छान वाटतं, मस्त गाणी ऎकत आपला स्टॉप कधी येतो ते कळतच नाही… असं सांगून सांगून मला जळवलं होतं… आणि तशातलीच एक छान बस माझ्यासमोर आल्यावर मी संधी दवडली नाही आणि बसने ऑफिसला जायचे ठरवले…मग तिकिट काढताना कळले की बसचा प्रवास किती economical आहे ते…..उतरताना कळाले की अरे, आपल्या ऑफिसच्या दारात तर बसचा स्टॉप आहे … त्यादिवसापासून ठरवूनच टाकले की आता रोज बसनेच ऑफिसला जायचे….\nइतकी वर्षे बाहेर कुठेही जायचं असलं तरी स्कूटीशिवाय माझं प्रस्थान व्हायचं नाही… साधं कोपर्‍यापर्यंत जायचं असलं तरी स्कूटी… ही सवय मला मोडायचीच होती. मग मी घेतलेला, किमान ऑफिसला तरी बसनं जायचं हा निर्णय योग्य कसा आहे ते मलाच पटवणारी काही कारणं मी शोधलीयत्….\n१. पेट्रोलचे भाव किती वाढलेत… आता एकट्याला जाण्यासाठी स्कूटी परवडत नाही.\n२. बसचा स्टॉप ऑफिसच्या अगदी दारातच आहे.\n३. घरून जाताना बसच्या स्टॉपपर्यंत जरी चालावे लागले तरी फक्त ५ ते ७ मिनिटेच चालावे लागते. चालणं आरोग्यासाठी, फिटनेससाठी चांगलंच…\n४. ‘परिघ’ हळूहळू आकुंचन पावतोय हे लक्षात येतंय्…. ५ ते ७ मिनिटे चालल्यावर एवढा परिणाम मग ऑफिसला चालतच जाऊ कां\n५. स्कूटीने जायला १० मिनिटे लागतात तर बसने १५ …. ठीक आहे … फार काही फरक नाही…. इतर मोठ्या शहरातल्या लोकांना तर ३० ते ४५ मिनिटांचा ट्रॅव्हल करून ऑफिसला जावे लागते… त्यामानाने मी किती सुखी आहे…\n६. परत येताना बहुतेकदा बस उशिरा येते. पण स्टॉपवर नुसतं थांबलं तरी इतरांच्या गप्पा ऎकण्यात छान वेळ जातो… आणि माझ्या ऑफिसच्या जवळच्या स्टॉपवर खूप कॉलेजचे , शाळेचे विद्यार्थी असतात, त्यांच्या गप्पा ऎकणं हा मस्त टाईमपास आहे.\n७. जरी कुणाच्या गप्पा नाही ऎकू आल्या तरी येणार्‍याजाणार्‍यांचं निरिक्षण करण्यात , त्यावरून काही तर्क बांधण्यात छान वेळ जातो… (सध्या मी ‘संपूर्ण शेरलॉक होम्स’ वाचतेय्… त्यामुळे असं निरिक्षण करण्याची , त्यावरून तर्क करण्याची खोड लागलीय…)\n८. येताजाताना वाटेतली काही कामं करायची असतील तर स्कूटी बरी पडते. असा विचार मनात आल्याक्षणीच कायकाय कामं करायची असतात याची लिस्टच काढली. पेट्रोल भरणे, भाजी / फळं / वाणसामान आणणे, श्रृतीच्या शाळेत टीचरला भेटायला जाणे, वगैरे…नंतर लक्षात आलं की यातली बरीचशी कामं ऑकेजनली करावी लागतात…काही कामं घरी येऊन नंतर केली तरी चालतात. त्यामुळे या कारणासाठी बसने जाणं रद्द करायची गरज नाही. फारतर अशा एखाद्या वेळेस स्कूटीनं जाऊ…\n९. आता पावसाळ्यात तर स्कूटीपेक्षा बसने जाणं केव्हाही चांगलं…. एकतर नव्या बसेस गळक्या नाहीयेत्‌… स्कूटीवरून पावसात जायचं म्हणजे गाडी स्लो चालवावी लागते नाहीतर गाडी स्लीप होण्याचे चान्सेस जास्त… तो रेनकोट घाला , काढा हा वैताग …घरून निघताना पाऊस नाही म्हणून रेनकोट घातला नाही आणि थोड्ं पुढे गेल्यावर पाऊस लागला तर वाटेत कुठेतरी गाडी थांबवून रेनकोट घालावाच लागतो…हा प्रकार मलातरी वैतागवाणा वाटतो… (आता जरा जास्तच असं वाटू लागलंय्…)\n१०. जरा चार लोकांमध्ये मिसळता येतं.. बसमधून ये-जा करताना तर काही काही नमुने भेटतात… मग परत माझ्यातला शेरलॉक होम्स जागा होतो….\n११. बसची वाट पहाण्यामुळे पेशन्स वाढतो… पेशन्स इज अ ग्रॆट स्ट्रेंग्थ यु नो… माझी चिडचिड हल्ली कमी झालीय् वाटतं….\n१२. आणि सर्वात महत्वाचे कारण – होता होईल तितका पर्यावरण रक्षणाला हातभार लावता येतो. माझ्या स्कूटीचं PUC आहे हो पण स्कूटी न नेता बसने गेले तर तेवढीच पेट्रोल बचत पर्यायाने उर्जा बचत आणि ०.००००००१% ने का असेना , प्रदुषण कमी….आणि तेवढाच पर्यावरण रक्षणाला हातभार…. आपण काही ‘Go Green’, ‘Green India’ , ‘Save Trees’ असा जागतिक संदेश देणारे टि-शर्टस्‌ घालून पर्यावरणाचे रक्षण करा असे सांगायला डोल्लेशोल्ले असणार्‍या अभिनेत्यासोबत रॅम्पवर नाही चालणारोत… तेव्हा कृतीतून पर्यावरणचे रक्षण केलेले चांगलें … कसें पण स्कूटी न नेता बसने गेले तर तेवढीच पेट्रोल बचत पर्यायाने उर्जा बचत आणि ०.००००००१% ने का असेना , प्रदुषण कमी….आणि तेवढाच पर्यावरण रक्षणाला हातभार…. आपण काही ‘Go Green’, ‘Green India’ , ‘Save Trees’ असा जागतिक संदेश देणारे टि-शर्टस्‌ घालून पर्यावरणाचे रक्षण करा असे सांगायला डोल्लेशोल्ले असणार्‍या अभिनेत्यासोबत रॅम्पवर नाही चालणारोत… तेव्हा कृतीतून पर्यावरणचे रक्षण केलेले चांगलें … कसें (पुणेरी स्टाईलमध्ये अनिनासिक स्वरात ‘कसें’ हा शब्द वाचला तर या मुद्याचे महत्त्व जास्त कळेल…)\nबघा एवढे सारे फायदे मला जाणवले… ते ही एका महिन्यांत…. मग योग्यच आहे बसनं जाणं येणं…\nचला बाय् बाय्… बसची वेळ झालीय्…\n4 प्रतिक्रिया Posted in असंच काहीही, दैनंदिन घडामोडी, नविन काहीतरी Tagged निर्णय, बस, स्कूटी\nस्टीफन कोवेचे ९०-१० तत्त्व\nहोतं असं कधी कधी….\nसर्वाधिक वाचल्या गेलेल्या पोस्टस्‌\n मग पुढचे लिखाण तुमच्या ई-मेल वर मिळवा.... इथे तुमचा ई-मेल पत्ता द्या.....\nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-04-24T06:33:35Z", "digest": "sha1:6C7YPXFZXPUXXT3SOPQISDISHU2K5VVS", "length": 5528, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राहुल वैद्य - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nराहुल वैद्य (इ.स. २००८च्या सुमारास)\n२३ सप्टेंबर, इ.स. १९८७\nपार्श्वगायन, पॉप (मराठी, हिंदी चित्रपट)\nइ.स. २००५ - चालू\nराहुल वैद्य (२३ सप्टेंबर, इ.स. १९८७, नागपूर, महाराष्ट्र - हयात) हा मराठी गायक आहे.\nएम.एस.ई.बी मध्ये अभियंता असलेल्या वडिलांच्या पोटी जन्मलेल्या राहुलचे बालपण मुंबईमध्ये गेले. येथेच त्याने सुरेश वाडकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. लहान असतानाच त्याने विविध संगीतस्पर्धांमध्ये भाग घेतला. मिठीबाई महाविद्यालयात बारावीत शिकत असताना त्याने इंडिअन आयडॉल या स्पर्धेत भाग घेतला होता.\n\"अधिकृत संकेतस्थळ\" (मराठी मजकूर).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०१४ रोजी ०१:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T06:36:30Z", "digest": "sha1:FYKHKM7PU7KK2357YRB657AW6GVCJEC5", "length": 15376, "nlines": 303, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मराठी शब्द सुचवा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविकिपीडिया:भाषांतर प्रकल्प सूचना: या वर्गात वर्गीकृत झालेल्या लेखांमधील इंग्रजी शब्द शोधून योग्य असे प्रतिशब्द द्या. प्रतिशब्द दिल्यानंतर {{मराठी शब्द सुचवा}} हा साचा काढून टाका म्हणजे लेख या वर्गात राहणार नाही.\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► मराठीशब्दांची आवश्यकता असलेले वनस्पती लेख‎ (१ क, ४ प)\n► संस्था‎ (११ क, २३ प)\n\"मराठी शब्द सुचवा\" वर्गातील लेख\nएकूण ४९१ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\n२०१० पोलंड टीयू-१५४ दुर्घटना\nसदस्य चर्चा:Prasannakumar/जुनी चर्चा ३\nसदस्य चर्चा:V.narsikar/जुनी चर्चा ४\nअखिल भारतीय कर्मचारी महासंघ\nअखिल भारतीय मराठा महासंघ\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा १६\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २३\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २९\nसदस्य चर्चा:अभय नातू/टर्म्स ऑफ यूझ (२०१२)\nसदस्य चर्चा:अभय नातू/नो ओपन प्रॉक्सीझ\nसदस्य चर्चा:अभय नातू/विसंवाद कौलप्रस्ताव\nआंतरराष्ट्रीय नागरी विमानन संघटना\nआदर्श कोऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी,कुलाबा मुंबई\nआनंद व क्रॅमनिक यांच्यात झालेल्या डावांची यादी\nआय.एन.एस. विक्रांत (आर ११)\nइ लर्निंग चा शिक्षण क्षेत्रात वापर\nउच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन\nएअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\nऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस\nकोषटवार दौलतखान विद्यालय, पुसद\nक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र\nक्रिकेट विश्वचषक, २०११ - अंतिम सामना\nविकिपीडिया:चावडी/इतर चर्चा/जुनी चर्चा १\nविकिपीडिया:चावडी/इतर चर्चा/जुनी चर्चा ६\nविकिपीडिया:चावडी/उपचर्चा/असा वर्ग, खूनाचे आरोपी\nविकिपीडिया चर्चा:चावडी/चालू चर्चा १\nविकिपीडिया चर्चा:चावडी/जुनी चर्चा १\nविकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न/जुनी चर्चा १\nविकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुने प्रस्ताव\nविकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/जुनी चर्चा ३\nछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nजवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना\nटाइम मशीन (२००२ चित्रपट)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\n(मागील पान) (पुढील पान)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २००९ रोजी १७:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/hot-gossip/shraddha-kapoors-latest-poster-of-haseena-parkar-with-family/22600", "date_download": "2018-04-24T06:57:56Z", "digest": "sha1:3PM4GO7LSAKMTQ7VMC3BFCRVZBDTUVG5", "length": 24737, "nlines": 244, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "shraddha kapoors latest poster of haseena parkar with family | पहिल्यांदा पती आणि मुलांसोबत दिसली श्रद्धा कपूर उर्फ हसीना पारकर! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nपहिल्यांदा पती आणि मुलांसोबत दिसली श्रद्धा कपूर उर्फ हसीना पारकर\n​श्रद्धा कपूर हिच्या आगामी ‘हसीना पारकर’ या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले असून, त्यामध्ये ती आपल्या परिवारासोबत दिसत आहे.\nश्रद्धा कपूर हिच्या आगामी ‘हसीना पारकर’ या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले असून, त्यामध्ये ती आपल्या परिवारासोबत दिसत आहे. वास्तविक आतापर्यंत चित्रपटाचा ट्रेलर आणि बरेचसे पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत, परंतु पहिल्यांदाच या फोटोमध्ये श्रद्धा उर्फ हसीना पारकर पूर्ण परिवारानिशी दिसत आहे. पती आणि चार मुलांसोबत हसीना फोटोत दिसत आहे.\nवास्तविक श्रद्धाच एखाद्या लहान मुलीसारखी दिसते. परंतु पोस्टरमध्ये ती तब्बल चार मुलांची आई असल्याचे दाखविण्यात आले आहे, तर तिच्या पतीच्या भूमिकेत असलेला अंकुर भाटिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. या चित्रपटाचे आणखी काही ट्रेलर रिलीज केले जाण्याची शक्यता आहे. परंतु चाहत्यांना मुख्य ट्रेलरची प्रतीक्षा आहे. रोमॅण्टिक चित्रपटांमध्ये बघावयास मिळत असलेली श्रद्धा पहिल्यांदाच अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या भूमिकेत बघावयास मिळत आहे. त्यामुळे हसीनाचा हा अंदाज प्रेक्षकांना भावणार काय हे येत्या काळात स्पष्ट होईलच.\nदरम्यान, या चित्रपटाची कथा त्याकाळातील आहे, ज्यावेळी मुंबईवर अंडरवर्ल्डचा बोलबाला होता. हसीना पारकर अंडरवर्ल्ड जगतात एक राणी होती. मुंबईच्या नागपाडा परिसरात फक्त हसीनाचाच बोलबाला होता. हसीना पारकर मोस्ट वॉँटेड दाऊद इब्राहीमची बहीण असून, त्याच्या डी कंपनीचे सूत्र ती चालवित असे. साधारणत: दोन वर्षांपूर्वी तिचा मृत्यू झाला.\nहसीना पारकर वास्तविक जीवनात एक पत्नी, आई आणि मुलगी होती. मात्र एका नात्यामुळे तिचे आयुष्यच बदलून गेले. पतीच्या मृत्यूनंतर हसीनाने भावाच्या गुन्हेगारी जगताचे सूत्र आपल्याकडे घेतले. त्यामुळे तिला हसीना या नावापेक्षा ‘आपा’ या नावानेच अधिक ओळखले जाऊ लागले. पुढे तर हसीनाला ‘मुंबई की क्वीन’ असेही संबोधले जाऊ लागले. चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धार्थ कपूरदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. सिद्धार्थ दाउदची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट अपूर्व लाखिया यांनी दिग्दर्शित केला असून, ८ आॅगस्ट रोजी रिलीज होणार आहे.\nअबब... प्रियांका चोप्राच्या ‘या’ ड्...\nफक्त पाचवीपर्यंत शिकली बॉलिवूडची ‘ह...\nशिल्पा शेट्टीचे शिर्डीतील फेव्हरेट...\nअर्धनग्न आंदोलन करणाऱ्या अभिनेत्रील...\nएकेकाळी बार डान्सर असलेल्या ‘या’ तर...\nअसे काय घडले असेल की ‘या’ अभिनेत्या...\nसेल्फीवेड्या चाहत्यांमुळे ‘या’ अभिन...\nगर्दीचा फायदा घेत चाहत्याने ‘या’ अभ...\nबिग बीच्या नातवासोबत डिनर डेटला गेल...\nश्रीदेवी यांच्या लहान मुलीने केले ग...\n‘या’ कारणामुळे हेलिकॉप्टरने सेटवर ज...\nचंकी पांडेने गायले लेकीचे गोडवे; म्...\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला...\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या...\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बि...\nअट्टल गुन्हेगारांच्या यादीत सलमान ख...\nदिशा पाटनी-विजे बानीची जमली जोडी; ए...\nइंटरनेट सनसनी प्रिया प्रकाशचा पुन्ह...\nआपल्या आजीसोबत थिरकणाऱ्या ‘या’ अभिन...\nअक्षयकुमारने म्हटले, ‘ट्विंकलसमोर म...\nट्रोलरने म्हटले, ‘तू पैशांसाठी नाचत...\nWatch Video : कॅटरिना कैफचे अश्रू स...\nबहीण जान्हवी कपूरच्या कपड्यांवर भाष...\nईशा गुप्ताने टरबूज खातानाचा फोटो के...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://jeevantarang.wordpress.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-04-24T06:44:36Z", "digest": "sha1:WM4FHUMEBDMXUCH555EGABZMMSCYS4JE", "length": 8604, "nlines": 92, "source_domain": "jeevantarang.wordpress.com", "title": "उत्साह « जीवनतरंग....", "raw_content": "\nविचार… मत… अनुभव… वास्तव….निरीक्षणें….\nमाझा ब्लॉग सुरू करून सव्वा वर्ष झालं…. वेळेअभावी ( उर्फ प्रतिभेअभावी )फार काही लेख लिहून झाले नाहीयेत… आज मी माझा ब्लॉग पाहिला आणि लक्षात आलं की अरे, आपल्या ब्लॉगला दहा हजाराहून जास्त लोकांनी भेट दिली आहे. तर माझ्या सर्व वाचकांना धन्यवाद देण्यासाठी ही आजची पोस्ट ….तन्वी, महेंद्रकाका, देवेन, सौरभ, हेरंब, हेमंत, सुहास अशा ब्लॉगर्सनी सातत्याने कौतुकाची शाबासकी दिली. याशिवाय कितीतरी अनोळखी वाचकांनी पोस्ट आवडल्याचे आवर्जून सांगितले आणि प्रतिकिया देऊन, पोस्टला सबस्क्रिप्शन देऊन माझा लिहण्याचा उत्साह वाढवला.. 🙂 🙂\nसर्वात महत्वाचे आभार ‘मराठी ब्लॉग विश्व’ चे ज्यांनी माझ्यापर्य़ंत १६५९ वाचक (आतापर्यंत) पोचवले आहेत 🙂 आणि अर्थात गुगलदादाचे 🙂 ज्याचा वापर करून वेगवेगळ्या शब्दांनी शोध घेत वाचक ‘जीवनतरंग’ वर आले. कोणकोणत्या शब्दांनी शोध घेत लोकं या साईटवर पोचले हे पाहिलं तर आश्चर्य वाटतं. कॉम्प्युटर, व्यसन, रंगकाम, सासू, प्रोत्साहन, अल्बम,नेटवर्किंग, हलवा, लग्न विश्वास, मोटीव्हेशन यासारखे शोध घेत येणार्‍यांना त्यांच्या शोधपूर्तीचे समाधान मिळाले असेल. मात्र ‘ताईला शू आली’ या व अशासारख्या शब्दांची लिंक या साईट्पर्यंत कशी काय पोचते हे मलाच शोधावे लागेल. ( आणि हे वाक्य कशाला कोण सर्च करेल)असो. तर ‘जीवनतरंग’ ला भेट देणार्‍या, प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे मनापासून आभार… असाच लोभ ठेवून माझा लिहण्याचा उत्साह वाढ्वाल अशी विनंतीवजा अपेक्षा….. 🙂\nतशी मी फार बडबडी नाहीय्‌ आणि बोलून मोकळं होणं हे मला फार जमत नाही. मला असं वाटतं की माझे हे गुण (/अवगुण) माझ्या लिखाणातही येतात. त्यामुळे माझ्या सुरवातीच्या काही पोस्ट वाचताना मला असं वाटलं की विषय चांगला आहे पण मी जे काही लिहलंय्‌ ते अजून फुलवता, खुलवता आलं असतं… ब्लॉग लिहण्याचा माझा व्यक्तीगत फायदा असा झाला की विचारात आणि पर्यायाने लिहण्यात अधिक सुसुत्रता येत गेली. आपण जसा विचार करतो तसं आपण लिहतो असं मला वाटतं. माझ्या लिहण्यातून मला समोरच्या व्यक्तीपर्यंत काही मत, विचार, अनुभव, वास्तव, निरीक्षणें पोचवायची असतील तर ते लिखाण समजायला सोपे हवे आणि ते सोपे करण्यासाठी जास्त सलग, सुसुत्र आणि स्पष्ट हवे. म्हणजेच माझे विचार सलग, सुसुत्र आणि स्पष्ट हवेत. आणि जसंजसं जास्त लिहू तसतसं विचार करण्याची पद्धतही परिपक्व होत जाते असं माझ्या लक्षात आलंय्‌. अर्थात विचार करण्याची योग्य पद्धत आणि योग्य विचार यांत बरेच अंतर आहे. मात्र योग्य विचारांपर्यंत पोचण्याची ही पहिली पायरी आहे असे म्हणता येईल. लिहण्यातला आनंद घ्यायला मी शिकतेय्‌. So Happy Writing to myself…\n6 प्रतिक्रिया Posted in दैनंदिन घडामोडी Tagged आभार, उत्साह, शोध\nस्टीफन कोवेचे ९०-१० तत्त्व\nहोतं असं कधी कधी….\nसर्वाधिक वाचल्या गेलेल्या पोस्टस्‌\n मग पुढचे लिखाण तुमच्या ई-मेल वर मिळवा.... इथे तुमचा ई-मेल पत्ता द्या.....\nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/05/blog-post_94.html", "date_download": "2018-04-24T06:27:27Z", "digest": "sha1:AZVBXCFJQA6VZJLB2EBQREIZVG35SRNH", "length": 17058, "nlines": 265, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: अशी असेल १ रूपयाची नवी नोट", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nअशी असेल १ रूपयाची नवी नोट\nभारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरच एक रूपये मुल्याची नवी नोट चलनात आणली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने 30 मे रोजी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले. या पत्रकात म्हटल्याप्रमाणे भारत सरकारकडून एका रूपयाच्या नव्या नोटेची छपाई पूर्ण झाली आहे. नव्या नोटा चलनात आल्यानंतरही सध्या चलनात असलेल्या एक रूपयाच्या जुन्या नोटा वैधच राहणार आहेत. नवीन नोट पुढच्या आणि पाठच्या दोन्ही बाजुंनी गुलाबी आणि हिरव्या रंगाची असेल. या नोटेच्या दोन्ही बाजुंना केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांची स्वाक्षरी असेल. या नोटेवर ‘भारत सरकार’ या शब्दांबरोबरच एक रूपयाच्या नव्या नाण्याची प्रतिकृतीही असेल. तसेच भारतातील सर्व चलनी नोटांवरील ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य नोटेवर छापण्यात आले आहे.\nनोटेच्या अन्य भागावर महाराष्ट्रातील ‘सागर सम्राट’ या तेल उत्खनन केंद्राची प्रतिमा आहे. याशिवाय, नोटेवर ‘L’ हे अक्षर कॅपिटलमध्ये छापण्यात आले आहे. तसेच नोटेवर अशोक स्तंभाच्या प्रतिमेबरोबर ‘1’ ही संख्या आणि ‘भारत’ हा शब्द अदृश्य स्वरूपात छापण्यात आला आहे.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nआधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करणे\nआंतरजिल्हा बदली Incoming व Outgoing याद्या\n२१ जून : योगदिन स्पेशल\nआंतरजिल्हा बदली आवश्यक दाखले\nशालेय पोषण आहार करारनामा\nइयत्ता 10 वी निकाल\nआंतरजिल्हा बदली यादी सर्वजिल्हे\nजिल्ह्यांची नावे लक्षात ठेवण्याची ट्रिक\n25 मुद्दे - निकष आणि गुण\nमराठी माध्यमातील मुलांनी “इंग्रजी भीती” वर विजय मि...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर -3\nकाही आयुर्वेदिक आरोग्यदायी टिप्स\nशेवगा खा, सांधेदुखी पळवा \nतांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने होणारे फायदे\n30 मिनीट चालण्याचे ३० फायदे\nदेशात प्रथमच नदीखालून बोगदा\nअशी असेल १ रूपयाची नवी नोट\nखासगी शाळेतही परीक्षेद्वारे भरती\nअहिल्याबाई होळकर - भाग 1\n‘बीएसएनएल’देणार उपग्रह फोन सेवा\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/shashank-manohar_resignation/", "date_download": "2018-04-24T06:21:30Z", "digest": "sha1:4FPWEPBH7NFAPCQHW2BRXHFUFXN7ZP2N", "length": 5327, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "शशांक मनोहरांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा...!! - Maha Sports", "raw_content": "\nशशांक मनोहरांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…\nशशांक मनोहरांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…\nआयसीसीचे विद्यमान अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आज त्यांचा राजीनामा जाहीर केला व काही वयक्तिक कारणांमुळे तो देत आहे असे सांगितले. गेल्यावर्षी मे २०१६ मध्ये त्यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती.\nत्यांचा कार्यकाळ हा २ वर्षांचा असणार होता पण केवळ १० महिन्यांमध्येच त्यांनी आपला राजीनामा दिला. अध्यक्षपदाचा कार्यभार सुरु केल्या पासुन ते क्रिकेट मधल्या मुख्य तीन संघ (भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया) यांचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होते. आता कोणाला हा कार्यभार सांभाळायला मिळतोय ते मात्र बघावे लागेल.\nशशांक मनोहरांनी भूषवलेली पदे:\n२ वेळा बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले\n१ वेळा (१० महिने) आयसीसीचे अध्यक्षपद\nविलिअमसनने टाकले कोहली रूटला मागे…\nकसोटी क्रिकेट १४० वर्षांचं…\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t17896/", "date_download": "2018-04-24T06:57:49Z", "digest": "sha1:KX22WUI4YSVGZXXKL2QBBBIYQYQJAPPT", "length": 3287, "nlines": 67, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-जाणिवांच्या जाळ्यात...", "raw_content": "\nअनुभवातून सर्व कही शिकता येते...\nजाणिवांच्या जाळ्यात मन अलगद गुंतते,\nस्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते,\nविरहाच्या रेतीत हृदय अधिकच धसते,\nपुढे चालणारे पाउल नकळत अडखळते,\nविरलेल्या क्षणांचे काटे पायी रुततात,\nआठवणींची ठेच लागता डोळे पानवतात्,\nओघळणारे अश्रू ओठांवर आटतात,\nखूप काही बोलायचे असते;\nपण शब्द पुन्हा एकदा मूके होतात्,\nमग वाऱयाचि मंद झुळुक वाहते,\nप्रेमाच्या गारव्याने मन शहारते,\nस्वप्नरूपी ढग गगणि दाटून येतात,\nओसाड रानी वर्षा सरी बरसावतात,\nवाळलेल्या पींपळ् पानी पुन्हा पालवी फूटते,\nकाटेरी वनात एक फूल गवसते,\nप्रेम फुलांचा गंध जीवनी दरवळतो,\nतुझ्या माझ्या प्रेमाचा इन्द्रधनु आकाशी उमटतो,\nसप्त रंगात मन नव्याने रंगते,\nजानीवांचे जाळे अता नाहीसे होउ लागते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t18806/", "date_download": "2018-04-24T06:47:32Z", "digest": "sha1:5T5F3FT37TX6Z75UBEEFXYGOVUWGZNSO", "length": 4656, "nlines": 110, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-का असं कधी वागला नाही तो…….?", "raw_content": "\nका असं कधी वागला नाही तो…….\nAuthor Topic: का असं कधी वागला नाही तो…….\nहळुवार जपल्या त्या भावना….\nका असं कधी वागला नाही तो…….\nका असं कधी वागला नाही तो…….\nप्रेमाने एक नझर पाहिलंच नाही\nलाजुन नजर झुकावी असं काही बोल्लाच नाही\nमीच देऊन बसले हृदय त्याला\nधडकाव ह्रदय त्याचही असं कधी वागलाच नाही तो…….\nस्वप्नांच्या जगात कधी शिरला नाही\nमला घेऊन सोबत कधी जगला नाही\nमीच बेहोश राहीली स्वप्नात त्याच्या\nपडावीत माझीही स्वप्नं त्याला असं कधी वागलाच नाही तो…….\nप्रेमाच्या या रंगात कधी रंगलाच नाही\nहद्द पार करून प्रेमात कधी पडलाच नाही\nमीच तडपली प्रेमाला त्याच्या\nगच्च मीठी मारावी त्याला असं कधी वागलाच नाही तो……\nविरहाच्या भितीने रात्र-रात्र जागला नाही\nप्रितीची प्रीत कधी समजलाच नाही\nमीच हरवून बसले त्याच्यात स्वताला\nविसरता येईल त्याला असही कधी वागला नाही तो……\nका असं कधी वागला नाही तो…….\nRe: का असं कधी वागला नाही तो…….\nRe: का असं कधी वागला नाही तो…….\nRe: का असं कधी वागला नाही तो…….\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: का असं कधी वागला नाही तो…….\nविसरता येईल त्याला असही कधी वागला नाही तो…… छान...\nहळुवार जपल्या त्या भावना….\nRe: का असं कधी वागला नाही तो…….\nका असं कधी वागला नाही तो…….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2018-04-24T06:22:05Z", "digest": "sha1:AKDWPXFKR7WY3RYFO3L6EKBYNW6I2HFJ", "length": 4079, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "होजे सॉक्रेटिस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपेद्रो संताना लोपेस हा पोर्तुगालचा पंतप्रधान होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%AB", "date_download": "2018-04-24T06:29:28Z", "digest": "sha1:MZOS4YR6PNQV7Z5TVXFXX73LWUPOHAME", "length": 7384, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोहम्मद कैफ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजन्म १ डिसेंबर, १९८० (1980-12-01) (वय: ३७)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक\nक.सा. पदार्पण २ मार्च २०००: वि दक्षिण आफ्रिका\nशेवटचा क.सा. ३० जून २००६: वि वेस्ट ईंडीझ\nआं.ए.सा. पदार्पण २८ जानेवारी २००२: वि इंग्लंड\nशेवटचा आं.ए.सा. २९ नोव्हेंबर २००६: वि दक्षिण आफ्रिका\n२०१० किंग्स XI पंजाब\n२०११–सद्य बंगलोर रॉयल चॅलेंजर्स\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. टि२०\nसामने १३ १२५ १२९ ४९\nधावा ६२४ २७५३ ७५८१ ७२३\nफलंदाजीची सरासरी ३२.८४ ३२.०१ ४१.८८ २०.६५\nशतके/अर्धशतके १/३ २/१७ १५/४५ ०/४\nसर्वोच्च धावसंख्या १४८* १११* २०२* ६८\nचेंडू १८ – १४७२ –\nबळी – – २० –\nगोलंदाजीची सरासरी – – ३५.४५ –\nएका डावात ५ बळी – – – –\nएका सामन्यात १० बळी – n/a – –\nसर्वोत्तम गोलंदाजी – – ३/४ –\nझेल/यष्टीचीत १४/० ५५/० ११६/० २३/०\n९ ऑक्टोबर, इ.स. २०११\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nबंगलोर रॉयल चॅलेंजर्स – सद्य संघ\n२ कैफ • ३ पुजारा • ९ कार्थिक • १२ पोमर्सबाच • १४ अगरवाल • १८ कोहली • ३२ तिवारी • -- रोसोव • -- झोल • ११ व्हेट्टोरी • ४ मॅकडोनाल्ड • ७ पठा • २३ दिलशान • ३३३ गेल • -- भटकल • -- नायर • -- थिगराजन • १७ डी व्हिलियर्स • -- गौतम • १ पटेल • ५ रहमान • ८ मोहम्मद • २५ मिथुन • ३४ खान • ३७ अरविंद • ६३ नेन्स • ६७ लँगेवेल्ड्ट • ८०० मुरलीधरन • -- अपन्ना • -- काझि • -- निनान • -- मोरे • प्रशिक्षक जेनिंग्स\nइ.स. १९८० मधील जन्म\nइ.स. १९८० मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१ डिसेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nबंगलोर रॉयल चॅलेंजर्स सद्य खेळाडू\nराजस्थान रॉयल्स माजी खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/news/salman-khan-has-appreciated-the-marathi-film/17680", "date_download": "2018-04-24T06:46:34Z", "digest": "sha1:LNZNOGS2SRXGQCSQFFJQ52MF6IBVPSN2", "length": 23878, "nlines": 245, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Salman Khan has appreciated the Marathi film | सलमान खानने केले या मराठी चित्रपटाचे कौतुक | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nसलमान खानने केले या मराठी चित्रपटाचे कौतुक\nबॉलिवुडचा तगडा कलाकार सलमान खान याने पुन्हा महेश मांजरेकर यांचे सोशलमीडियावर कौतुक केले आहे\nबॉलिवुडचा तगडा कलाकार सलमान खान याने पुन्हा महेश मांजरेकर यांचे सोशलमीडियावर कौतुक केले आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या कलाकाराने यंदा मराठी चित्रपटसृष्टीच्या या दिग्गज दिग्दर्शकांच्या एफयू चित्रपटाविषयी कौतुक केले आहे. त्याने या चित्रपटातील एफयू या चित्रपटातील गाण्याविषयी ट्वििट केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ध्यानीमनी या चित्रपटाबरोबरच एफयू या चित्रपटाविषयीदेखील उत्सुकता निर्माण झाली आहे.\nयापूर्वीदेखील महेश मांजरेकर यांच्या ध्यानीमनी या चित्रपटाला बॉलिवुडचे बिग बी आणि सलमान खान यांनी सोशलमीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. हा चित्रपट प्रेक्षकांना १० फ्रेबुवारीला प्रदर्शित होणार आहे. यानंतर लगेच त्यांच्या एफयू हा चित्रपटदेखील प्रदर्शनास सज्ज झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या चित्रपटाच्या टायटल सॉन्गचा नुकताच व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. या टायटल सॉन्गवर प्रेक्षकांचा लाडका कलाकार आकाश ठोसर थिरकताना दिसत आहे. या गाण्याला फार कमी कालावधीत प्रचंड पसंती मिळाली असल्याचे पाहायला मिळत आहे.\nएफयू या चित्रपटाकडे सगळेच लक्ष लावून बसले आहेत. तसेच कॉलेज जीवनावर आधारित चित्रपट असल्याने खास तर या चित्रपटाची चर्चा तरूणांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या चित्रपटात सैराटचा हिरो आकाश ठोसर आहे. त्यामुळे त्याची पुन्हा झलक पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्साही आहे. आकाशसोबतच या चित्रपटात सत्या मांजरेकर, संस्कृती बालगुडे, मधुरा देशपांडे, मयुरेश पेम, माधव देवचक्के असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक तरूण कलाकार दिसणार आहे.\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार...\nबिग बॉस मराठीच्या Weekend चा डावमध्...\nट्विंकल खन्नाने विमानात मारले सात ड...\nSEE PICS : ​सलमान खान मैत्रीला जागल...\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केले...\nअखेर सलमान खानच्या 'दबंग ३'बाबत बोल...\n​‘भारत’मधून बॉबी देओल ‘आऊट’\nझी सिनेमावर प्रेक्षकांना या दिवशी प...\nझी टॉकीजवर लवकरच ‘सैराटच्या नावानं...\n​या दिवशी प्रेक्षकांना पाहायला मिळण...\nबहुप्रतीक्षित ‘शिकारी’ चित्रपट लवकर...\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरे...\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्...\n​'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये स्पृहा...\n​ऋत्विक केंद्र दिसणार 'सरगम' मध्ये\nसंगीत देवबाभळी नाटक पाहून भारावले न...\n​माधुरी दिक्षीतने केली सुमेध मदगलकर...\nरणांगण चित्रपटाचं आगळं – वेगळं पोस्...\nमाधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या...\n“सायकलच्या” प्रमोशनसाठी मुंबईत व्हि...\nअस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गु...\nचिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम क...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t19846/", "date_download": "2018-04-24T06:53:55Z", "digest": "sha1:NKU35L5L3EFKFGLRRS7GOHDWJEOTVRMI", "length": 2871, "nlines": 68, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-अरे पागल का लिहीतो कविता ?", "raw_content": "\nअरे पागल का लिहीतो कविता \nAuthor Topic: अरे पागल का लिहीतो कविता \nअरे पागल का लिहीतो कविता \nअरे पागल का लिहीतो कविता \nमैत्री होती म्हणुन लिहीली\nह्रदयात उतरली म्ह्णुन लिहीली\nआठवनीत आली म्हणुन लिहीली\nमग सांग मुर्खा का लिहीतो कविता \nचंद्रात दिसली म्हणुन लिहीली\nचांदनीत चमकली म्हणुन लिहीली\nनाही दिसला ना तु\nमग सांग येडपट का लिहीतो कविता \nरस्त्यावर दिसली म्हणुन लिहीली\nहळुच हसली म्हणुन लिहीली\nनजरेला नजर भिडली म्हणुन लिहीली\nमग सांग सटकेल का लिहीतो कविता \nअरे पागल का लिहीतो कविता \nअरे पागल का लिहीतो कविता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/news/ittefaq-poster-releases/25158", "date_download": "2018-04-24T06:47:27Z", "digest": "sha1:EUF4KTI6ZAMBRV4BMX7YAS4EMWPZPRUR", "length": 24240, "nlines": 246, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "ittefaq poster releases | #Ittefaq Poster out : सिद्धार्थ मल्होत्रा वा सोनाक्षी सिन्हा? ‘इत्तेफाक’चा दोषी कोण? | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\n#Ittefaq Poster out : सिद्धार्थ मल्होत्रा वा सोनाक्षी सिन्हा\nसोशल मीडियावर #Ittefaq ट्रेंड करतेयं. आता #Ittefaq काय हे तुम्हाला ठाऊक नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.\nसोशल मीडियावर #Ittefaq ट्रेंड करतेयं. आता #Ittefaq काय हे तुम्हाला ठाऊक नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. ‘इत्तेफाक’ हे धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. आजच ‘इत्तेफाक’चे तीन पोस्टर्स जारी करण्यात आले. सध्या या पोस्टर्सचीच चर्चा सुरु आहे. सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्राची जोडी पहिल्यांदा या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहे. आज करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने एका पाठोपाठ एक असे ‘इत्तेफाक’चे तीन पोस्टर जारी केलेत.\nपहिल्या पोस्टरमध्ये दिसला तो सिद्धार्थ मल्होत्रा. ‘Accused & innocent’ या कॅप्शनसह त्याचे हे पोस्टर जारी करण्यात आले. सिद्धार्थनेही त्याच्या twitter हँडलवरून हे पोस्टर जारी केले. ‘मी त्या गुन्ह्याचा दोषी आहे, जो मी केलाच नाही. माझ्या कथेची प्रतीक्षा करा,’असे त्याने हे पोस्टर जारी करताना लिहिले.\nसोनाक्षी सिन्हाने ‘The second suspect’ या कॅप्शनसह या चित्रपटाचे स्वत:चे पोस्टर जारी केले. ‘मी एक पीडित आहे. मला गुन्हेगार ठरवले जातेय. माझी कथा ऐकायला तुम्हाला आवडेल’ असा सवाल तिने केला आहे.\nतिस-या पोस्टरमध्ये अभिनेता अक्षय खन्ना दिसणार आहे. ‘He trusts no one and suspects everyone He only wants the TRUTH’, असे त्याच्या या पोस्टरवर लिहिले आहे. अक्षयचे हे पोस्टर पाहून या चित्रपटात तो एका रोमांचक भूमिकेत दिसणार असे वाटतेय. येत्या ५ आॅक्टोबरला ‘इत्तेफाक’चे ट्रेलर लॉन्च होणार आहे.\nALSO READ : सिद्धार्थ म्हणतो, ‘नो रोमान्स विद सोना’\nनोव्हेंबरमध्ये रिलीज होऊ घातलेला ‘इत्तेफाक’ हा यश चोप्रा यांच्या ७० च्या दशकात आलेल्या ‘इत्तेफाक’ या चित्रपटाचा आॅफिशिअल रिमेक आहे. यश चोप्रा यांच्या या चित्रपटात एकही गाणे नव्हते. राजेश खन्ना व नंदा यांनी यात मुख्य भूमिका साकारली होती. रिमेकमध्ये मात्र ही जागा सिद्धार्थ मल्होत्रा व सोनाक्षी सिन्हा या दोघांनी घेतलीय. अभय चोप्रा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. आधी या रिमेकचे नाव ‘इट हॅपन्ड वन नाईट’ असे होते. पण नंतर या चित्रपटाला ‘इत्तेफाक’ हेच नाव देण्याचे ठरले.\n​करण जोहरची चाहती धरून बसली वेगळाच...\nसोनम कपूरने का मागितली सोनाक्षी सिन...\n​‘पद्मावत’ नंतर ‘अय्यारी’ वादात\n​‘पॅडमॅन’ने आणला सिद्धार्थ मल्होत्र...\n ​करण जोहरला नोटीस, होऊ श...\n​अभिनेत्री नीतू चंद्रा संतापली...सि...\n​ सलमान खानने ‘दबंग3’बद्दल केले हे...\n​शाहरूखच्या बर्थ डे पार्टीत दिसला अ...\n​शाहरूख खानला हवी होती अक्षय खन्नाच...\n​हे फोटो पाहिल्यानंतर आलिया भट्ट अन...\nबॉयफ्रेन्डच्या बहिणीनेही तोडले सोना...\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्...\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या...\n​‘पद्मावत’वर भारी पडतोय महेशबाबूचा...\n'कलंक'नंतर म्युझिकल चित्रपटात दिसणा...\n​‘पल्लू लटके...’ गाण्यावर अशी थिरकल...\nअर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राच्या...\nलवकरच सनी लिओनी सुरु करणार आपल्या ब...\n‘बेगम खान’ वाचवणार का सिद्धार्थ मल्...\n​यशराज कंपूत होतेयं शाहरूखची वापसी;...\nSEE PICS : ​सलमान खान मैत्रीला जागल...\n​मिलिंद सोमण चढणार बोहल्यावर, बघा...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://jeevantarang.wordpress.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E2%80%8C/", "date_download": "2018-04-24T06:47:11Z", "digest": "sha1:2XSX5RXIJCIGO6DVJCHAZMQCRC5F5XDV", "length": 9821, "nlines": 97, "source_domain": "jeevantarang.wordpress.com", "title": "महाबलीपुरम्‌ « जीवनतरंग....", "raw_content": "\nविचार… मत… अनुभव… वास्तव….निरीक्षणें….\nईकडे चेन्नईला बदली झाल्यापासून आमचे दर वीकेंडला कुठे ना कुठे भटकणे चालू आहे. पॉंडेचेरी (खरा उच्चार पुडुचेरी) , क्वीन्सलॅंड थीम पार्क , वेल्लोरचे गोल्डन टेंपल अशी काही चेन्नईच्या आसपासची ठिकाणे पाहून झाली आणि एका रविवारी महाबलीपुरम्‌ पाहून आलो. आपण जरी महाबलीपुरम्‌ असे म्हणत असलो तरी याचा स्थानिक उच्चार ममलापुरम्‌ असा आहे.\nमहाबलीपुरम्‌ म्हणजे शिल्पकृतींचे गाव आहे. बघावे तिकडे देवदेवतांच्या मोठमोठाल्या शिल्पकृती दिसतात. तिथे कृष्णकुंज म्हणून एक स्थान पल्लवाने तयार केले आहे. कृष्ण जन्मापासून कृष्णाच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग जसे की कालिया मर्दन , गोवर्धन पर्वत हातावर उचलून घेणे, पांडवांच्या गुंफा हे सर्व प्रसंग तेथे अखंड अशा दगडामधून कोरून काढले आहेत. त्या अखंड अशा दगडावर एकूण १५३ शिल्पे कोरलेली आहेत. आणि प्रत्येक शिल्प हे कलाकु सरीचा उत्तम नमुना आहे.\nकृष्ण याठिकाणी कधीच आला नव्हता पण चित्ररूपाने इकडच्या लोकांना महाभारत समजावण्यासाठी पल्लवाने हे सारे कोरीव काम सुमारे १४०० वर्षांपूर्वी केले आहे. पण पल्लव कोण होते आणि त्यांनी कृष्णकुंज करण्यासाठी याच ठिकाणाची निवड कां केली हे मात्र समजू शकले नाही. ( आमचा गाईड पल्लवाज्‌ म्हणून उल्लेख करत होता, म्हणजे मला तरी असं वाटतंय्‌ की पल्ल्वांच्या अनेक पिढ्यांनी येथे काम केले असावे.) तिथून थोडं पुढे गेल्यावर एक प्रचंड मोठी शिळा आहे , नैसर्गिकरित्या स्वतःला तोलून धरणारी ती शिळा अशा एका टोकावर उभी आहे की जरासा धक्का लागला तर ती कधीही खाली कलंडू शकेल असे वाटते. पण आमच्या गाईडच्या सांगण्यानुसार सात हत्तींनी धक्का मारूनसुध्दा ती शिळा जागची हलली नाही. Balancing चा हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. या शिळेला म्हणतात ’Krishnas Butter Ball’ \nतिथेच थोडं पुढे गेलं की दोन शिळा एकमेकांना टेकून तयार झालेली नैसर्गिक गुंफा दिसते. ही होती फॅक्टरी जिथे पल्लवाने कोरीव काम करण्यासाठी हत्यारे तयार केली. मोठमोठाल्या शिळा फोडण्यासाठी डायनॅमो वगैरे न वापरता एक वेगळेच तत्त्व येथे वापरले होते. जो दगड फोडायचा आहे, त्यावर छोटे छोटे छेद करून घ्यायचे, त्यामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या लाकडाचे तुकडे टाकून त्यामध्ये गरम पाणी ओतायचे, त्या गरम पाण्याने लाकूड प्रसरण पावते आणि १५-२० दिवसांत तो दगड फुटतो. हे ऎकतानाच अंगावर काटा आला. आपले पूर्वज काय अफाट बुध्दीमत्तेचे होते नं हातात फारशी काही साधने नसताना १४०० वर्षापूर्वी केवळ आम जनतेला माहिती व्हावे म्हणून एवढे कष्ट करून पल्लवांनी या शिल्पकृती तयार केल्या आहेत. मनातून खूप भरून आलं होतं. याच ठिकाणी गंगा नदी आणि शिवशंकराचाही देखावा तयार केला आहे. इंदिरा गांधी महाबलीपुरम्‌ला बर्‍याचदा यायच्या म्हणे हातात फारशी काही साधने नसताना १४०० वर्षापूर्वी केवळ आम जनतेला माहिती व्हावे म्हणून एवढे कष्ट करून पल्लवांनी या शिल्पकृती तयार केल्या आहेत. मनातून खूप भरून आलं होतं. याच ठिकाणी गंगा नदी आणि शिवशंकराचाही देखावा तयार केला आहे. इंदिरा गांधी महाबलीपुरम्‌ला बर्‍याचदा यायच्या म्हणे येथे बकरी आणि हरीण बसलेले एक शिल्प आहे, जे आपल्या पूर्वीच्या १० रु.च्या नोटेवर छापले\nहोते, याठिकाणाची स्मृती म्हणून \nयाच भागात वेगवेगळया छोट्या गुंफा आहेत, त्यामध्ये विष्णूचे जे दहा अवतार आहेत, त्यापैकी वराह अवतार आणि वामनावतार यामधील काही शिल्पे कोरलेली आहेत. कृष्णकुंज बघून बाहेर पडताना आपण एका भारलेल्या अवस्थेतच असतो.\n4 प्रतिक्रिया Posted in असंच काहीही, नविन काहीतरी Tagged चेन्नई, महाबलीपुरम्‌\nस्टीफन कोवेचे ९०-१० तत्त्व\nहोतं असं कधी कधी….\nसर्वाधिक वाचल्या गेलेल्या पोस्टस्‌\n मग पुढचे लिखाण तुमच्या ई-मेल वर मिळवा.... इथे तुमचा ई-मेल पत्ता द्या.....\nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2018-04-24T06:24:06Z", "digest": "sha1:RF5FFSS6EYR4OWBVVLFK5O4HAN4E27HE", "length": 3802, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कृषिपर्यटन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ नोव्हेंबर २०१४ रोजी ०४:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/news/abbas-mustans-team-helping-vikram-phadnis-for-hrudayantar-marathi-movie/16967", "date_download": "2018-04-24T07:07:17Z", "digest": "sha1:NTZQXVP764YVLFVC4AMHQZ6MGOTJ6D6T", "length": 24699, "nlines": 245, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "abbas mustan's team helping vikram phadnis for Hrudayantar marathi movie | विक्रम फडनीसच्या हृद्यांतरचे काम करतेय अब्बास-मस्तानची टीम | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nविक्रम फडनीसच्या हृद्यांतरचे काम करतेय अब्बास-मस्तानची टीम\nविक्रम फडनीसच्या हृद्यांतर या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू असून या चित्रपटासाठी अब्बास-मस्तानची यांची टीम मेहनत घेत आहे. मुक्ता बर्वे, सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या मुहूर्ताला बॉलिवूडमधील शाहरुख खान, अब्बास-मस्तान, अर्जुन कपूर यांसारखे सेलिब्रिटीज उपस्थित राहिल्याने या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.\nकोणत्याही मराठी सिनेमाचे काम बॉलिवूडमधील एखाद्या प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्याची टीम करत आहे असे आपल्याला कधीच ऐकावयास मिळत नाही. पण चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी एक गोष्ट घडली आहे. एका मराठी चित्रपटाचे काम बॉलिवूडचे क्रू मेंबर करत आहेत.\nफॅशन डिझायनर विक्रम फडनीस याची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या हृदयांतर या चित्रपटाचे सध्या जोरात चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटाचा मुहूर्त काहीच दिवसांपूर्वी करण्यात आला होता. या मुहूर्ताला बॉलिवूडमधील शाहरुख खान, अब्बास-मस्तान, अर्जुन कपूर यांसारखे सेलिब्रिटीज उपस्थित होते. हा एक भावनिक चित्रपट असून यात मुक्ता बर्वे, सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच झलक दिखला जा, डान्स इंडिया डान्स या शोचा सूत्रसंचालक मनिष पॉलदेखील या चित्रपटात झळकणार आहे. मराठी चित्रपटात काम करण्याची मनिषची ही पहिलीच वेळ आहे.\nविक्रम फडनीसने निर्माता-दिग्दर्शन अब्बस-मस्ताच्या अनेक चित्रपटामध्ये कॉस्च्युम डिझायनरची भूमिका बजावली आहे. त्यामुळे अब्बास-मस्तान आणि विक्रम यांचे व्यवसायिक तसेच वैयक्तिक नाते खूपच चांगले आहे. त्यामुळे अब्बास-मस्तान यांची टीम सध्या हद्यांतर या चित्रपटावर काम करत आहे. अब्बास-मस्तान यांच्या टीममधील डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, असिस्टंट्स, तंत्रज्ञ सगळेच हद्यांतर चित्रपट अधिकाधिक चांगला व्हावा यासाठी मेहतन घेत आहेत.\nअब्बास-मस्तान आणि विक्रम फडणीस यांच्यात अतिशय घट्ट नाते असल्याने हद्यांतर या चित्रपटाच्या मुहूर्ताच्यावेळीदेखील ते दोघेही शुभेच्छा देण्यासाठी जातीने हजर राहिले होते आणि आता त्यांनी त्यांची टीम विक्रमच्या मदतीसाठी दिली आहे.\nहद्यांतर या चित्रपटाची निर्मिती विक्रम फडनीस प्रॉडक्शन्स आणि यंग बैरी एंटरटेनमेंटचे प्रताप सरनाईक आणि पुर्वेश सरनाईक यांची आहे.\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरे...\n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करण...\n​शाहरुख खानची पहिली कमाई होती केवळ...\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्...\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का...\nअर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राच्या...\nसंगीत देवबाभळी नाटक पाहून भारावले न...\nऋषिकेश जोशीच्या या फोटो मागचं गुपित...\nमाधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या...\nचिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम क...\nवंटास या चित्रपटाच्या ट्रेलरची सोशल...\n​'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये स्पृहा...\n​ऋत्विक केंद्र दिसणार 'सरगम' मध्ये\n​माधुरी दिक्षीतने केली सुमेध मदगलकर...\nरणांगण चित्रपटाचं आगळं – वेगळं पोस्...\n“सायकलच्या” प्रमोशनसाठी मुंबईत व्हि...\nअस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गु...\nहिंदी सिनेमात मुख्य भूमिकेत सोनाली...\nवैभव तत्ववादीला दादासाहेब फाळके सर्...\nबहुप्रतीक्षित ‘शिकारी’ चित्रपट लवकर...\nहॅम्लेटची भूमिका साकारणार सुमित राघ...\n'लव्ह लफडे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2010/10/blog-post_21.html", "date_download": "2018-04-24T07:01:51Z", "digest": "sha1:MP6VD6MDLA2F3VYTLPBCMLAJIFJTMJ2F", "length": 13269, "nlines": 324, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: आघाडीला वेध मनसेच्या वचकनाम्याचे?", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nगुरुवार, 21 अक्तूबर 2010\nआघाडीला वेध मनसेच्या वचकनाम्याचे\nआघाडीला वेध मनसेच्या वचकनाम्याचे\nडोंबिवली - शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध झाल्यानंतर आता कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातून कोणत्या आश्‍वासनांची खैरात होणार आहे, याची जनतेला उत्सुकता लागली आहे. परंतु आघाडीचे नेते जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबाबत चालढकल करीत असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. एकीकडे शिवसेनेच्या जाहीरनाम्यात राहून गेलेल्या मुद्द्यांचा समावेश आपल्या वचननाम्यात करण्याची तयारी आघाडीने सुरू केलेली असतानाच दुसरीकडे मनसेच्या \"वचक'नाम्याचे वेध आघाडीला लागले असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे.\nबुधवारी झालेल्या आघाडीच्या संयुक्‍त बैठकीत जाहीरनामा प्रसिद्ध होईल, अशी शक्‍यता आघाडीच्या स्थानिक नेत्यांना वाटत होती. आघाडीच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनांवर महिन्याभरापासून चर्चा सुरू असून, दोन आठवड्यांपूर्वीच जाहीरनामा तयार असल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र युतीने वचननामा प्रसिद्ध केल्यानंतर त्यातील आश्‍वासनांपैकी कोणते मुद्दे राहून गेले आहेत, याची चाचपणी करत आघाडीच्या नेत्यांनी आपल्या जाहीरनाम्यात पुन्हा बदल केला असल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळाली.\nआघाडीच्या नेत्यांनी सुरुवातीपासून मनसेची धास्ती घेतली असून, मनसे आपल्या वचकनाम्यात कोणत्या वचनांना प्राधान्य देते, याकडे आघाडीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. यामुळे जोपर्यंत मनसेचा वचकनामा जाहीर होणार नाही तोपर्यंत आघाडीचे नेते आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबाबत चालढकल करणार असल्याची शक्‍यता राजकीय गोटातून व्यक्‍त होत आहे. मनसेने आपल्या वचकनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांनुसार आपल्या जाहीरनाम्यात बदल करून परिपूर्ण जाहीरनामा जनतेसमोर ठेवून त्याद्वारे जनतेला इम्प्रेस करण्याचा डाव आघाडीचे नेते टाकत आहेत.\nप्रत्यक्षात जाहीरनाम्यातील वचनांची वीस टक्‍केही पूर्तता होत नाही. तरीही पालिका निवडणुकीत आघाडी कोणती नवी आश्‍वासने देणार याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे.\nस्थानिक नेते 24 ऑक्‍टोबर रोजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याचे सांगत आहेत. असे असले तरीही जोपर्यंत मनसेचा वचकनामा प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध होण्यात टाळाटाळ होण्याची शक्‍यता आहे. प्रत्यक्ष निवडणुकीला अवघे आठ दिवस शिल्लक असतानाही आघाडीची भूमिकाच जनतेसमोर मांडली न गेल्याची भावना जनतेतून व्यक्‍त होत आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nआघाडीला वेध मनसेच्या वचकनाम्याचे\nराज ठाकरे यांच्या 'राजगड'वर दरोडा\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/i-am-vying-to-be-a-part-of-india-icc-world-cup-2019-squad-says-wriddhiman-saha/", "date_download": "2018-04-24T06:44:29Z", "digest": "sha1:MJR43WXIMCLRMBBKWYDCHBKC44YT2ECJ", "length": 6458, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वृद्धिमान सहाला खेळायचा आहे २०१९चा विश्वचषक - Maha Sports", "raw_content": "\nवृद्धिमान सहाला खेळायचा आहे २०१९चा विश्वचषक\nवृद्धिमान सहाला खेळायचा आहे २०१९चा विश्वचषक\n भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कसोटी यष्टीरक्षक वृद्दीमान सहाने २०१९चा विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी तो मोठ्या प्रमाणावर कष्टही घेत आहे असेही तो म्हणाला.\nसहा म्हणतो, ” माझ्या पत्नीला मी विश्वचषक २०१९ चा भाग असावे असे मनापासून वाटते. त्यामुळे ती मला सतत कठोर मेहनत घ्यायला सांगते. मी माझ्या परीने रोज अथक परिश्रम करतो. परंतु याचा निर्णय पूर्णपणे निवड समिती घेईल. ”\nवृद्धिमान सहाने आजपर्यंत भारताकडून २८ कसोटी सामने खेळले आहेत. वृद्धिमान सहा कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असून एमएस धोनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे.\n२०१० मध्ये सहाने आपला पहिला वनडे सामना खेळला होता. त्यानंतर आजपर्यंत ७ वर्षात तो केवळ ९ सामने खेळला आहे. त्याने २०१४ साली श्रीलंका संघाविरुद्ध आपला शेवटचा वनडे सामना हैद्राबाद येथे खेळला आहे.\n“प्रत्येक खेळाडूला सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळायला आवडते. परंतु ते सर्वकाही निवड समितीवर अवलंबून असते. चांगली कामगिरी करणे हे माझे कर्तव्य आहे. बाकी सर्व निवड समितीवर अवलंबून आहे. ” सहा पुढे म्हणाला.\n२०१९एमएस धोनीकोलकातानियमित कसोटी यष्टीरक्षकभारतीय क्रिकेट संघविश्वचषकवृद्दीमान सहा\nविराट-अनुष्का हे जाहिरात शूट’साठी पुन्हा एकत्र\nहरयाणा स्टीलर्स आणि पुणेरी पलटण प्रथमच आमनेसामने\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.in/2012/07/blog-post.html", "date_download": "2018-04-24T06:15:49Z", "digest": "sha1:WSSKXVE22WSEFKRSIB6WJFRZ5EFV2I5D", "length": 14681, "nlines": 146, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.in", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: कृष्णभूमीत १ : नागपूर ते नवी दिल्ली", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nकृष्णभूमीत १ : नागपूर ते नवी दिल्ली\nआग्रा मथुरा, वृंदावन करायचं म्हटलं तर सुरूवात दिल्लीपासूनच करावी लागते. आमचा ४५ जणांचा ग्रुप भर उन्हाळ्यात अश्या सहलीला निघाला. रेल्वे रिझर्वेशन्स अगदी ९० दिवस आधीपासूनच केलेली होती त्यामुळे मजा होती. २००६ च्या दिल्ली-कटरा-वैष्णोदेवी-हरिद्वार सहलीत जे निसटलं ते कवेत घेण्यासाठी मी सज्ज होतो.\nनागपूर स्थानक. फ़लाट क्र. २. २२२६९ WAP 4. १२६२२ तामिळनाडू एक्सप्रेसला घेऊन येताना.\nलालागुडा शेड चे ३०२८६ WAP 7आमच्या अगोदर जाणा-या १२४९३ बंगलोर-निजामुद्दीन राजधानीला घेऊन आमच्याच फ़लाटावर (फ़लाट क्र. १) येताना.\n१२४९३ बंगलोर-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस.या गाडीची आरक्षणं मिळाली असती तर बहार आली असती.\nनागपूर ते नवी दिल्ली\n१२७२१ डाउन हैद्राबाद नवी- दिल्ली आंध्र प्रदेश एक्सप्रेस\nनागपूरवरून घेतलेली साल्पेकरांची \"शेगाव कचोरी\". प्रवासात सुरूवात तर मोठी झकास झाली.\nसकाळ आग्रा स्टेशनात झाली. WAP 5 व WAP 1. भारतीय रेल्वेचे दोन खंदे योद्धे.\nहे महाशय ह्या कपड्यांमध्ये फ़ार कमी आढळतात (Agra shed WDM in distinct livery)\nपलवल ते नवी दिल्ली या स्थानकांदरम्यान चार रेल्वे मार्ग असल्याने असे ओव्हरटेक फ़ार बघायला मिळतात. आत्ता आम्ही या बिचा-या मालगाडीला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक केलाय खरा पण नंतर मुंबई वरून येणा-या राजधानीनेही आम्हाला धावता धावता ओव्हरटेक केला. कॆमेरा काढून चित्रीकरण करतोय न करतोय तोच राजधानी पसारपण झाली होती.\nउत्तरेकडील मैदानी प्रदेशात आढळणारे हे सर्वसामान्य दृश्य. या विशिष्ट आकाराच्या झोपड्या छान वाटतात.\nगाडीतली आळसावलेली सकाळ. स्टेशन आता जवळच आहे. आत्ता अगदी तासाभरात उतरायचच आहे ही भावना आली की सकाळ अधिकच आळसावलेली होत असावी बहुधा.\nमुंबईतल्या लोकल्स सारख्याच पण चित्रविचित्र रंगांच्या या मेमू नी आमच दिल्ली परिसरात स्वागत केलं.\nअरे ही तर आपली अमृतसर-बिलासपूर छत्तीसगढ एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस सारखीच बिचारी सावत्र वागणूक सहन करते. नागपूर ते दिल्ली हा प्रवास खूप सगळे थांबे घेत घेत लेकुरवाळी गाडी जवळपास २२ तासात पूर्ण करते.\nकाय नंबर आहे या मालगाडीच्या एंजिनाचा वा आणि शेजारचे १५१४ हे मुंबई पासूनचे किलोमीटर्स बरं का.\nनिजामुद्दीन स्थानकात सायडिंगला उभे असलेले राजधानी आणि दुरांतो एक्सप्रेसचे रेक्स.\nहे महाशय (WDP 3 A) फ़क्त दिल्ली आणि परिसरातच दिसतात बर का. यांचे धाकटे बंधू (WDP 3) लांब तिकडे तामिळनाडू आणि केरळात दिसतात. पनवेल पर्यंत तिरूवनंतपुरम राजधानीसोबत ब-याचदा येतात.\nनवी दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच हे वळण. वळणावर पूर्ण दिसणारी आमची गाडी. जरा विसावू या वळणावर. (की वळणानंतर \nनवी दिल्लीतल्या आमच्या तात्पुरत्या वसतीस्थानापर्यंत घेउन जाणारी बस\nनवी दिल्लीतल्या नुकत्याच राष्ट्रकूल खेळांसाठी आलेल्या सुंदरी. पूर्वीच्या डी. टी. सी. बसेस पेक्षा कितीतरी पट सरस. (त्याच बरोबर मुंबईत किंवा महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ही प्रगती का नाही झाली ही खंत. २००६ मधली दिल्लीतली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि आत्त्ताची व्यवस्था यात खरोखर जमीन अस्मानाचा फ़रक जाणवत होता.)\nया लेखातल्या रेल्वे विषयक तांत्रिक बाबींची (WAP, WAM, WDM etc .) उत्सुकता असेल तर इथे बघा.\nते तुम्हाला विचित्र नाव वाटलेलं WAG 7 आणि बंगलोर निझामुद्दीन राजधानीचं WAP 7 ह्यांचा प्लॅटफॉर्म एकच आहे. वॅगमधे पॅसेन्जर्स न्यायच्या दृष्टीने थोडेफार बदल करून वॅप झालं. रच्याकने ही दोन्ही इंजिन्स मला वाटतं पूर्णपणे भारतीय बनावटीची असून तूर्तास सर्वा वेगवान आणि शक्तीशाली आहेत. त्यामुळे राजधानीच्या जर्मन कोचेस न्या फुलस्पीडमधे पळवत नेतात... :)\nकृष्णभूमीत ३ : आग्रा\nकृष्णभूमीत २ : नवी दिल्लीत\nझी मराठीचे डोके ठिकाणावर आहे काय \nकृष्णभूमीत १ : नागपूर ते नवी दिल्ली\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-vatratika/t18728/", "date_download": "2018-04-24T06:51:30Z", "digest": "sha1:LDBNVGJ4GOKN2PW3J2MNBJVCA6AHOAHO", "length": 2188, "nlines": 59, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika-तडका - ना हिट,ना रन", "raw_content": "\nतडका - ना हिट,ना रन\nतडका - ना हिट,ना रन\nबोला कीतीही खोटे कुणीही\nसत्यापुढे ते ना भावते आहे\nसांगा असत्य टिकेलच कसे\nइथे \"सत्यमेव जयते\" आहे\nकुणी ना थोरले,ना कुणी बारके\nसर्वांसाठीच कायदा सम आहे\nअसुद्या कितीही \"हिट\" कुणीही\nकायद्यापुढे ना त्याची \"रन\" आहे\nव्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783\nतडका - ना हिट,ना रन\nतडका - ना हिट,ना रन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2016/09/blog-post.html", "date_download": "2018-04-24T07:01:27Z", "digest": "sha1:S3KXL7PVR3UUWYKHAVFE5CQJC7SKDYUN", "length": 12731, "nlines": 319, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: ...तर राज यांनी निवडणूक लढवावी:आशीष देशमुख", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nबुधवार, 14 सितंबर 2016\n...तर राज यांनी निवडणूक लढवावी:आशीष देशमुख\nनागपूर - मुंबईतील प्रेस क्‍लबमध्ये विदर्भवाद्यांच्या पत्रकार परिषदेत धुडगूस घालणारे मनसेचे कार्यकर्ते लोकशाहीचे विरोधक आहेत. वेगळ्या विदर्भाला सामान्य लोकांचा विरोध आहे, असा त्यांचा ग्रह असल्यास मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी माझ्या काटोल मतदारसंघातून निवडणूक लढवावी व निवडून यावे, असे आव्हान काटोलचे भाजप आमदार आशीष देशमुख यांनी दिले आहे. ही निवडणूक राज ठाकरेंना लढविता यावी यासाठी आपण काटोलच्या आमदारकीचा राजीनामा देण्यास व स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास तयार आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.\nआज मुंबईत घडलेल्या घटनेवर देशमुखांनी तीव्र आक्षेप घेतला. लोकशाहीत आपले मत मांडण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीचे विरोधक नागपुरात किंवा विदर्भात अन्यत्र येऊन वक्तव्ये करतात. त्यांचे अभिव्यक्तीचे व मताचे स्वातंत्र्य आम्ही मान्य करतो. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये असले प्रकार घडत नाहीत. तोच सभ्यपणा मनसेने मुंबईत दाखवायला हवा. धुडगूस घालणे हे सर्वांत सोपे काम आहे. त्यात कोणताही पराक्रम नाही. पराक्रम गाजवायचाच असेल, तर लोकशाही मार्गाचा अवलंब करून आपले मत मांडावे. गुंडगिरी करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मनसे आणि अन्य विदर्भविरोधकांकडून अखंड महाराष्ट्रासाठी दिले जाणारे तर्क निराधार आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा किंवा त्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांचा विदर्भाच्या मागणीशी काहीही संबंध नाही. विदर्भ जबरीने महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला, हेच ऐतिहासिक वास्तव आहे. नव्या पिढीला हे वास्तव कळून चुकले आहे. त्यामुळे अखंड महाराष्ट्राच्या नावाखाली सुरू असलेला भूलभुलैया यापुढे खपणार नाही, असे मतही आशीष देशमुख यांनी नोंदविले आहे.\nविधानसभेत केवळ एक आमदार असलेला मनसे. विदर्भात कुठेही विशेष अस्तित्व नाही. आता यांना कामे नाहीत. त्यामुळे हे बावरलेत. समोर आणखी वाईट दिवस आहेत त्यांच्या नशिबी. म्हणून राडा करून चमकोगिरी करत आहेत. स्वतः संयुक्त कुटुंबात राहिले नाहीत. बाळासाहेब ठाकरे या आपल्या नेत्याला दुःख देऊन स्वतः का वेगळा पक्ष काढला, याचे उत्तर आधी द्यावे. बाता करतात संयुक्त महाराष्ट्राच्या\n- नितीन रोंघे, संयोजक, महाविदर्भ जनजागरण\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\n...तर राज यांनी निवडणूक लढवावी:आशीष देशमुख\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/hot-gossip/pooja-hegde-approached-for-prabhas-saaho/20846", "date_download": "2018-04-24T06:56:45Z", "digest": "sha1:KH7YW7MMTI7ZONUB2RZQSLVWEC7CEOJE", "length": 24704, "nlines": 244, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "pooja hegde approached for prabhas saaho | श्रद्धा, कॅटरिना नव्हे तर पूजा हेगडे असेल ‘बाहुबली’ प्रभासची हिरोईन? | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nश्रद्धा, कॅटरिना नव्हे तर पूजा हेगडे असेल ‘बाहुबली’ प्रभासची हिरोईन\nसुरुवातीला कॅटरिना कैफ या चित्रपटात प्रभासची हिरोइन असल्याची चर्चा समोर आली होती. त्यानंतर श्रद्धा कपूर हिचे नाव पुढे आले, मात्र आता आलेल्या माहितीनुसार पूजा हेगडे या चित्रपटात प्रभासची हिरोइन असणार आहे.\n‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’चा टीजर प्रेक्षकांना एवढा पसंत आला की, प्रत्येकजण या चित्रपटातील प्रभासच्या हिरोइनविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून दर दिवसाला वेगवेगळ्या अभिनेत्रींची नावे प्रभाससोबत जोडली जात आहेत. सुरुवातीला कॅटरिना कैफ या चित्रपटात प्रभासची हिरोइन असल्याची चर्चा समोर आली होती. त्यानंतर श्रद्धा कपूर हिचे नाव पुढे आले, मात्र आता आलेल्या माहितीनुसार पूजा हेगडे या चित्रपटात प्रभासची हिरोइन असणार आहे.\nसाउथ स्टार बाहुबली प्रभास याच्यासोबत काम करण्यास प्रत्येक अभिनेत्री उत्सुक आहे. ‘बाहुबली’च्या प्रचंड यशानंतर आज प्रभाससोबत काम करण्यास उत्सुक असलेल्या अभिनेत्रींची यादी दरदिवसाला वाढतच आहे. प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास, चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला असून, प्रेक्षकांना तो प्रचंड भावत आहे.\nसध्या या चित्रपटासाठी अभिनेत्रीची निवड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत कॅटरिना कैफ आणि श्रद्धा कपूर हिच्या नावाची चर्चा होती, पण आता अचानकच एक सुखद धक्का देणारी बातमी समोर आली आहे. कारण कॅटरिना, श्रद्धाला मागे टाकत आता पूजा हेगडे हिच्या नावावर विचार केला जात आहे. वृत्तानुसार सध्या पूजा हेगडे हिला साइन करण्याविषयीची बोलणी सुुरू आहे.\nपूजाने हृतिक रोशन याच्या ‘मोहनजोदडो’ या चित्रपटातून डेब्यू केला आहे. मात्र अद्यापपर्यंत पूजाने किंवा तिच्या वतीने कोणताही याविषयी दुजोरा दिला नसल्याने तिच्या नावावर शिक्कामोर्तब होणे अजून बाकी आहे, असेच म्हणावे लागेल. सुरुवातीला श्रद्धाचे नाव निश्चित समजले जात होते. तिला चित्रपटाची कथा खूपच आवडली होती. मात्र बजेटमुळे तिचे नाव मागे सारले गेले. या चित्रपटासाठी श्रद्धाने आठ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र तामिळ चित्रपटांनुसार अभिनेत्रींना एवढे मानधन दिले जात नाही. अशीच काहीसी स्थिती कॅटरिनाबाबतही झाल्याचे समजते.\nअबब... प्रियांका चोप्राच्या ‘या’ ड्...\nफक्त पाचवीपर्यंत शिकली बॉलिवूडची ‘ह...\nशिल्पा शेट्टीचे शिर्डीतील फेव्हरेट...\nअर्धनग्न आंदोलन करणाऱ्या अभिनेत्रील...\nएकेकाळी बार डान्सर असलेल्या ‘या’ तर...\nअसे काय घडले असेल की ‘या’ अभिनेत्या...\nसेल्फीवेड्या चाहत्यांमुळे ‘या’ अभिन...\nगर्दीचा फायदा घेत चाहत्याने ‘या’ अभ...\nबिग बीच्या नातवासोबत डिनर डेटला गेल...\nश्रीदेवी यांच्या लहान मुलीने केले ग...\n‘या’ कारणामुळे हेलिकॉप्टरने सेटवर ज...\nचंकी पांडेने गायले लेकीचे गोडवे; म्...\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला...\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या...\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बि...\nअट्टल गुन्हेगारांच्या यादीत सलमान ख...\nदिशा पाटनी-विजे बानीची जमली जोडी; ए...\nइंटरनेट सनसनी प्रिया प्रकाशचा पुन्ह...\nआपल्या आजीसोबत थिरकणाऱ्या ‘या’ अभिन...\nअक्षयकुमारने म्हटले, ‘ट्विंकलसमोर म...\nट्रोलरने म्हटले, ‘तू पैशांसाठी नाचत...\nWatch Video : कॅटरिना कैफचे अश्रू स...\nबहीण जान्हवी कपूरच्या कपड्यांवर भाष...\nईशा गुप्ताने टरबूज खातानाचा फोटो के...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://jeevantarang.wordpress.com/2010/05/", "date_download": "2018-04-24T06:42:00Z", "digest": "sha1:FICLAXXAFSPKH6NQSE7PFOB3VAWDISHF", "length": 12285, "nlines": 108, "source_domain": "jeevantarang.wordpress.com", "title": "मे « 2010 « जीवनतरंग....", "raw_content": "\nविचार… मत… अनुभव… वास्तव….निरीक्षणें….\nएक गोष्ट ….काही comments…..\nमाझ्या मुलीला – श्रृतीला (वय वर्षे ६) रात्री झोपवताना एक गोष्ट सांगत होते. खूप नाजूक , सात गाद्यांच्या पलंगावर झोपणार्‍या राजकन्येची आपल्यापैकी खूप जणांनी ही गोष्ट ऎकली असेल. तर या राजकन्येच्या पाठीवर वळ उठतो तो कशामुळे तर सात गाद्यांच्याखाली असणार्‍या एका केसामुळे…..इतकी ती नाजूक आपल्यापैकी खूप जणांनी ही गोष्ट ऎकली असेल. तर या राजकन्येच्या पाठीवर वळ उठतो तो कशामुळे तर सात गाद्यांच्याखाली असणार्‍या एका केसामुळे…..इतकी ती नाजूक ही गोष्ट श्रृतीला सांगितल्‍यानंतर अपेक्षित comments मिळाल्या नाहीत ….. त्‍यावरूनच या पोस्टचा विषय सुचला….. या गोष्टीवर कोणत्‍या वयोगटातल्‍या व्‍यक्‍तींच्या, काय comments असतील ही गोष्ट श्रृतीला सांगितल्‍यानंतर अपेक्षित comments मिळाल्या नाहीत ….. त्‍यावरूनच या पोस्टचा विषय सुचला….. या गोष्टीवर कोणत्‍या वयोगटातल्‍या व्‍यक्‍तींच्या, काय comments असतील(comments = प्रतिक्रीया() Actually मला वाटते की प्रतिक्रीया म्हणजे reaction …… comments साठी योग्‍य मराठी प्रतिशब्द शोधायला हवा…….असो. अभिप्राय हा शब्द योग्य होईल कां\nमाझी पिढी – वय ६ ते ७ – हो खर्रर्रर्रर्रच\nआताची पिढी – वय ६ ते ७ – ती राजकन्या सात गाद्यांच्यावर कां झोपायची ती एवढ्या उंचावर कशी चढायची ती एवढ्या उंचावर कशी चढायची (जिज्ञासू….स्वत:च्या बुद्धिला पटेल तेच करणार) वय १६ ते १८ – वॉव….. So cute…… (स्वप्नाळू वय….)\nवय २३ ते २७ – हूं………अस्सं (या लोकांना अशा फॅण्टसीज्‌ कडे लक्ष द्यायला वेळ नसतो)\nवय ३६ ते ४० – अग पोरी , वडीलांकडे चालतात असे नखरे…पण नवर्‍याकडे नाही चालायचे. आणि इतकं नाजूक राहून कसं चालेल, या वयातच हे हाल… तर पुढे कसं होणार\nअशीच एक दुसरी गोष्ट … ‘बाजीराव – मस्तानी’तल्या मस्तानीची.. मस्तानी इतकी गोरी व नाजूक कि तिने विड्याचे पान खाल्ले तर त्याचा रस तिच्या गळ्यातून उतरतानां दिसायचा….\nमाझी पिढी – वय ६ ते ७ – हो\nआताची पिढी – वय ६ ते ७ – ई…. ते किती dirty दिसत असेल….(Very Practicle) वय १६ ते १८ – Wowwwww….. So cute…… काय करत असेल ती अशा गोरेपणासाठी….. So cute…… काय करत असेल ती अशा गोरेपणासाठी\nवय २३ ते २७ – हूं………अस्सं\nवय ३६ ते ४० – मुलांवर ओरडून आमच्याही घशाच्या शिरा ताणतात… त्या बघायला असतो कां कुणाला वेळ करतांयत्‌ मारे मस्तानीचं कौतुक…..\nअर्थात्‌ ‘स्त्रीवर्ग’ कशाप्रकारे प्रतिक्रीया देईल त्याचा विचार करून वरील प्रतिक्रीया लिहल्या आहेत. पुरूषवर्ग अशा फॅण्टसीज्‌वर comments करतो कां माहीत नाही , अंदाजसुद्धा करता येत नाही…. जाणकारांनी अवश्य मार्गदर्शन करावे…..\n(मिळालेला धडा – आताच्या मुलांना सांगायच्या गोष्टींची निवड खूप काळजीपूर्वक करावी लागते….)\n4 प्रतिक्रिया Posted in दैनंदिन घडामोडी, मिश्कीली, श्रृति-श्रृति Tagged गोष्ट, फॅण्टसी, comments\nबर्‍याच जणांचे खाण्याबाबत बरेच नखरे असतात . म्‍हणजे अमुक भाजी आवडते ,तमुक भाजी पानातसुद्धा पडू देत नाही. कोबी,गवार,शेपू या काय भाज्या आहेत कांवगैरे वगैरे ….आमच्या घरी भाजी कशी दिसावी याचे फंडे ठरलेले आहेत . सर्वांना झणझणीत तिखट आवडते, त्यामुळे कलर पाहून भाजी खायची कि नाही ते ठरवतात. छान लाल रंग असेल तर भाजी उत्तम झाली असणार नाहीतर आहेच हॉटेल झिंदाबाद\nमाझ्या नवर्‍याला भाजीबाबत फारसे नखरे नाहीत..त्यामुळे मला सर्वांकडून ऎकावे लागते कि “प्र‍ज्ञाचं बरं आहे बुवा, भाजी कोणती करावी याची चिंता फारशी चिंता तिला नसते, रवीला काय सगळ्या()भाज्या आवडतात”.पण माझ्या नवर्‍याचा मात्र वेगळाच फंडा आहे. पोळी कशी असावी याबाबत त्याची मते firm आहेत. पोळी कडेपर्यंत व्यवस्थित भाजलेली असावी , ती इतकी लुसलुशीत असावी कि फक्‍त तीन बोटांनी तुटायला हवी… अशा पोळीबरोबर मग भाजी कोणतीही चालते. पण पोळी जर कच्ची असेल तर मात्र चविष्ट भाजी असुनसुद्धा त्याचे जेवण अपूर्ण रहाते. माझी लेक पण बाबांवर गेली आहे . शेपूची भाजी तर तिला अत्यंत प्रिय…. तिला मंड‍ईत घेऊन गेले कि तिचा एकच हट्ट …‘आई शेपू घे नां…’\nमाझ्या काही मैत्रिंणींचे ऎकते नां घरात रोज तीन तीन भाज्या बनवतात …कां तर एकाला वांगी आवडतात तर दुसर्‍याला वांग्याची अ‍ॅलर्जी…तर तिसर्‍याला बटाटयाशिवाय इतर काही चालत नाही.काहीजण म्हणतात कि अमुक भाजी मी आयुष्यात खाल्ली नाही ,खाणार नाही…\nएका विशिष्ट मर्यादेपर्यंत खाण्याबाबतच्या आवडीनिवडी ठीक आहेत. पण परदेशात जिथे घरच्यासारखे खाणे मिळणे कठीण असते, तिथे जे मिळेल ते खावेच लागते… आपल्या देशात अशी बरीच लोकं आहेत ज्यांना एकावेळचे खाणे मुश्किलीने मिळते, त्यांना खाण्याबाबतचे नखरे परवडतच नाहीत….अशांचा विचार आपण जेवताना केला तर समोरची नावडती भाजी पण आनंदाने खाल्ली जाईल. मग ते केवळ ‘उदरभरण’ न रहाता ‘यज्ञकर्म’ हो‍ऊन जाईल……\nस्टीफन कोवेचे ९०-१० तत्त्व\nहोतं असं कधी कधी….\nसर्वाधिक वाचल्या गेलेल्या पोस्टस्‌\n मग पुढचे लिखाण तुमच्या ई-मेल वर मिळवा.... इथे तुमचा ई-मेल पत्ता द्या.....\nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t17450/", "date_download": "2018-04-24T06:49:19Z", "digest": "sha1:AZJB5XKCWCL4LAGQM2RRBGLOCESRM45R", "length": 2567, "nlines": 70, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-जगणं", "raw_content": "\nकवितेचे नाव :- ' जगणं '....\nकवी :- वैभव यशवंत जाधव.\nआहे तुझविन कठिण जगणं\nकसं येणार मला मरणं,\nजीवनात नाही रस तुझविन\nतुझ्यासाठी जगणं हेच एक कारणं..\nनसते काम माझे स्वार्थासाठी\nभरते मन माझे प्रेमापोटी,\nजगलो फक्त त्या क्षणासाठी\nजगणं माझं फक्त तुझ्यासाठी..\nउठतो तुझं स्वप्न घेऊन\nजातो दिवस तुला पाहून,\nआवडतं मला तुझं हसणं\nत्यातच आहे माझं जगणं..\nतुझविन कसं असणार ते 'जगणं'\nजणू काळे नभ नसता पाणी पडणं\nजणू चार भिंतीत कोंडून मरणं\nनाही आत्मा म्हणूनि शरीर पंगू होणं\nसुख-दु:ख नसता अश्रू गळणं\nन बोलता,न ऐकता,दगडमूर्ती बनणं\nन बघता स्वप्न रंगवणं......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t18341/", "date_download": "2018-04-24T06:49:28Z", "digest": "sha1:R623OA6UHOYDNEOSGVSIYPXICVE44IZK", "length": 4631, "nlines": 104, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-सुंदर परी", "raw_content": "\nएक होती सुंदर परी तिला मी शोना म्हणायचो....\nतिच्यासाठी खुप वेड होयचो...\nतिला ही मी खुप आवडायचो...\nति ही प्रेम करते हे तिच्या डोळ्यांने समझुन जायचो...\nएक होती सुंदर परी तिला मी शोना म्हणायचो....\nरात्रांन दिवस तिलाच आठवायचो.\nमित्रांन समोर सतत तिझच नाव घेयाचो..मग ती आली की लगेच शांत होयचो..\nएक होती सुंदर परी तिला मी शोना म्हणायचो....\nआता तासंतास तिच्याशी गप्पा मारत बसायचो.. ती ही माझी खुप काळजी करायची.. मग मी ही दोन चार प्रेमाच्या गोष्टी बोलायचो...\nएक होती सुंदर परी तिला मी शोना म्हणायचो....\nखुप प्रयत्ना नंरत ती माझ्या आयुष्यात आली.. मग रोज तिचा चेहरा पाहुन मी खुश होयचो..\nएक होती सुंदर परी तिला मी शोना म्हणायचो....\nनेहमीच आम्ही भांडन करायचो..\nमग परत एकमेकांशी प्रेमाने बोलायचो..\nएक होती सुंदर परी तिला मी शोना म्हणायचो.....\nरागामध्ये मी ही तिला खुप काही बोलायचो.. मग राग विसरून पुन्हा तिला हसवायचा प्रयत्न करायचो...\nएक होती सुंदर परी तिला मी शोना म्हणायचो....\nअचानक घडलेल्या प्रसंगा मुळे एकमेकांपासुन दुर राहयला लागलो आहे.. तिच्या भेटीच्या ओढी मध्ये जगायला लागलो आहे....\nमाहीत नाही मला आठवण येते की नाही माझी तिला.. पण तिझ्याच आठवणीत जगतोय..\nएकदा तरी भेट ना ग शोना फक्त एवढच बोलतोय......\nएकदा तरी भेट ना ग शोना फक्त एवढच बोलतोय......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/jayant-yadav-s-father-passed-away-due-to-cardiac-arrest/", "date_download": "2018-04-24T06:38:57Z", "digest": "sha1:W35E3Y7HTZWRREJ3ZBF4TX7MUHD3PHRI", "length": 6038, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताचा अष्टपैलू खेळाडू जयंत यादवला पितृशोक - Maha Sports", "raw_content": "\nभारताचा अष्टपैलू खेळाडू जयंत यादवला पितृशोक\nभारताचा अष्टपैलू खेळाडू जयंत यादवला पितृशोक\nभारताचा अष्टपैलू क्रिकेटर जयंत यादवच्या वडीलांनी आज दिल्लीच्या एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. किडनी आणि लीव्हरच्या आजाराने जयसिंह यादव हे बरेच दिवस आजारी होते.\nत्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा ही आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि जयसिंह यांचे भाऊ योगेंद्र यादव यांनी दिली. जयसिंह यादव हे एक प्रथम श्रेणी क्रिकेटर होते.\nजयंत यादवने १७ नोव्हेंबर २०१६ रोजी विशाखापट्टणम येथे कसोटी क्रिकेटमधून भारतीय संघात पदार्पण केले आहे. मुंबई कसोटीमध्ये इंग्लंड संघाविरुद्ध खेळताना त्याने शतकी खेळी केली होती.\nजयंतने आतापर्यंत ४ कसोटी सामनेआणि १ एकदिवसीय सामना ही खेळ आहे. वानखेडे मैदानावर ९व्या क्रमांकावर भारताकडून फलंदाजी करताना त्याने जे शतक केले होते ते नवव्या क्रमांकावर एखाद्या खेळाडूने शतक करण्याची केवळ दुसरी वेळ होती.\nसध्या संघाबाहेर असलेल्या यादवने ४ कसोटी सामन्यात ४५च्या सरासरीने २२८ धावा आणि ११ बळी घेतले आहेत.\nfather passed awayJayant Yadavअष्टपैलूआम आदमी पार्टीजयंत यादवपितृशोकभारतीय कसोटी संघमहा स्पोर्ट्स\nवाचा कोणत्या भारतीय कर्णधाराने किती वेळा दिला फॉलो ऑन \nपुणेरी पलटण विजयासह ‘झोन ए’मध्ये पहिल्या क्रमांकावर\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/more-than-rahane-its-captain-kohli-enjoys-this-innings-from-number-four-because-it-was-biggest-worry-for-indian-odi-team/", "date_download": "2018-04-24T06:48:12Z", "digest": "sha1:LVVA2BXQRJZQON26ZPJ6P2SQHG5EGQUS", "length": 9868, "nlines": 109, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अजिंक्य रहाणेची खेळी विराटच्या शतकी खेळीपेक्षा सरस? - Maha Sports", "raw_content": "\nअजिंक्य रहाणेची खेळी विराटच्या शतकी खेळीपेक्षा सरस\nअजिंक्य रहाणेची खेळी विराटच्या शतकी खेळीपेक्षा सरस\n भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडे सामन्यात भारताने ६ विकेट्सने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी अफलातून खेळी केल्या. आफ्रिकेकडूनही फाफ डुप्लेसीने शतकी खेळी केली.\nतरीही अजिंक्य रहाणेची खेळी ही अनेक अर्थांनी लक्षात राहणारी ठरली. अजिंक्य रहाणेने काल ८६ चेंडूत ७९ धावा करताना २ षटकार आणि ५ चौकार खेचले.\nचांगली कामगिरी करूनही सतत कसोटी आणि वनडे संघाचा नियमित सदस्य नसलेल्या रहाणेने आपणच चौथ्या क्रमांकाचे प्रबळ दावेदार आहोत हे काल पुन्हा एकदा दाखवून दिले. वनडेत चौथ्या क्रमांकावर येत गेल्या चार डावात त्याने ८७, ८९, ५० आणि ७९ धावांच्या खेळी केल्या आहेत तर गेल्या ५ डावात त्याने (५५, ७०, ५३, ६१ आणि ७९) अर्धशतकी खेळी केल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहलीनंतर अशी कामगिरी करताना तो केवळ तिसरा भारतीय आहे.\nगेल्या ६ वनडे मालिकेत सतत संधी मिळेल तेव्हा चांगली कामगिरी करूनही त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. विंडीज मालिकेत त्याला संघात स्थान देण्यात आल्यावर पुन्हा श्रीलंका संघाविरुद्ध खेळवण्यात आले नाही. त्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या रहाणेला न्यूझीलँड आणि श्रीलंका विरुद्ध संघात स्थान देण्यात आले नाही. विशेष म्हणजे रहाणेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग ४ अर्धशतकी खेळी केल्या होत्या.\nभारतीय संघाला चौथ्या क्रमांकावरील खेळाडूची वनडेत नितांत गरज असतानाही आणि रहाणे चांगली कामगिरी करत असतानाही त्याला संघाच्या बाहेर ठेवले जाते. आजच्या खेळीने त्याने या मालिकेपुरता तरी हा प्रश्न निकाली काढला आहे.\nविशेष म्हणजे ही खेळी करताना कर्णधार विराट कोहली हा मैदानावर होता आणि तो त्याच्या ह्या जबरदस्त खेळीचा दुसऱ्या बाजूने आनंद घेत होता. रहाणेच्या एका फटक्याला तर कोहलीने खास दाद दिली. मिड ऑनकडे षटकार खेचणाऱ्या रहाणेने दुसऱ्याच चेंडूवर बाउन्सरला यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेपार धाडला, हा क्षण क्रिकेटप्रेमी विसरणे अवघडंच.\nआजपर्यंत याच डर्बनच्या मैदानावर भारतीय संघ कधीही विजयी झाला नाही. पराभूत झालेल्या गेल्या ३ सामन्यात भारतीय संघाने कमीतकमी १३० धावांनी हार पत्करली आहे. हे करताना त्यांना २७० ते २८० धावांचेही आव्हान पेलले नाही. म्हणजे भारताने त्या तीन सामन्यात जेमेतेम १५० धावांचा टप्पा पार केला आहे.\nआजही लक्ष काहीसे तसेच होते. आणि कर्णधार चांगला खेळत असताना त्याला साथ देणाऱ्या एका चांगल्या खेळाडूची गरज होती आणि ती गरज काल रहाणेने जबाबदारी घेऊन पूर्ण केली. तो बाद झाला तेव्हा संघाला ४४ चेंडूत १७ धावांची गरज होती. याचकारणामुळे रहाणेची खेळी अनेक अर्थांनी खास ठरली.\nISL 2018: पुण्याविरुद्ध ब्लास्टर्सची महत्वाची लढत\nएकाचवेळी दोन खेळाडू करतायत भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/blogs/who-kills-mumbai/386169", "date_download": "2018-04-24T07:07:10Z", "digest": "sha1:KZEL2ZW7XSVTE23N5AC5IOWYPXTI4IET", "length": 23688, "nlines": 104, "source_domain": "zeenews.india.com", "title": "मुंबईच्या गर्दीततच आहे मुंबईचा मारेकरी! | 24taas.com", "raw_content": "\nमुंबईच्या गर्दीततच आहे मुंबईचा मारेकरी\nशहर-मुंबई. स्थळ-एलफिस्टन स्टेशन. ती बातमी आली आणि मन सर्द झालं. अफवा पसरते काय आणि काही मिनिटांत २०-२३ जणांचे बळी जातात काय. कारण काय तर म्हणे चेंगराचेंगरी. खरं म्हणजे या स्टेशनशी माझा रोजचा परिचय. दादर स्टेशनपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेले हे स्टेशन. माझ्या करी रोडच्या ऑफिसच्या २०व्या मजल्यावरून हे स्टेशन स्पष्ट दिसते. आपल्या परिचयाच्या ठिकाणावर असं अघटीत काही घडावं हे मनाला पार उदध्वस्त करून टाकणारं. अनेकांच्या स्वप्नांना आकार देणारी हीच मुंबई अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारी ठरत आहे.\nअण्णासाहेब चवरे, झी मीडिया मुंबई : शहर-मुंबई. स्थळ-एलफिस्टन स्टेशन. ती बातमी आली आणि मन सर्द झालं. अफवा पसरते काय आणि काही मिनिटांत २०-२३ जणांचे बळी जातात काय. कारण काय तर म्हणे चेंगराचेंगरी. खरं म्हणजे या स्टेशनशी माझा रोजचा परिचय. दादर स्टेशनपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेले हे स्टेशन. माझ्या करी रोडच्या ऑफिसच्या २०व्या मजल्यावरून हे स्टेशन स्पष्ट दिसते. आपल्या परिचयाच्या ठिकाणावर असं अघटीत काही घडावं हे मनाला पार उदध्वस्त करून टाकणारं. अनेकांच्या स्वप्नांना आकार देणारी हीच मुंबई अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारी ठरत आहे.\nकोणतेही संकट हे अचानक येत नाही. मग ते नैसर्गिक असो किंवा मानव निर्मीत. ते संकट अगोदर काही संकेत देते. ज्यांना हे संकेत कळतात ते या संकटातून वाचण्याच्या शक्यता कैक पटीने वाढतात. मुंबईसारख्या अतिमहाकाय आणि भौगोलीकदृष्ट्याही अपवाद असलेल्या शहराबाबत तर हे अनेक पटीने खरे आहे. काही महिन्यांपूर्वीचाच किस्सा. मी आणि माझे मित्र डॉ. गजानन अपीने लोकलने प्रवास करत होते. डॉ. गजानन हा खरं म्हणजे सामाजिक भाष्यकार माणूस. सतत काही ना काही चिंतन करत असणारा. सहज बोलता बोलता आमची गाडी मुंबई, विकास, गर्दी आणि जीवनशैली यावर आली. गजानन म्हणाला मुंबईच्या गर्दीवर काही पर्याय असू शकत नाही मुंबईतील लाखो लोकांच्या मनात हाच प्रश्न आहे. पण, मुंबईतील लोकल ट्रेन मर्यादित करा. सर्व गोष्टी बऱ्यापैकी आटोक्यात येतील.\nशहर व्यवस्थापन नावाचा प्रकारच नाही.\nप्रत्येक शहराची स्वत:ची म्हणून एक मर्यादा असते. मुंबईही याला अपवाद नाही. त्यात नैसर्गिक रचनेमुळे मुंबईच्या मर्यादा अधिक वाढल्या आहेत. मुंबईचा जमीनीवरील विस्तार १०० टक्के संपला आहे. आता मुंबई आढवी वाढू शकत नाही. म्हणून मुंबईचे बकालीकरण करून टॉवर उभे केले जात आहेत. टॉवर उभा करणे आणि मेट्र, बुलेट ट्रेन, विमानतळ या गोष्टी शहरात आणणे म्हणजे विकास नाही. कोणतेही शहर ज्या गतीने धावते त्या गतीने त्या शहरातील गर्दीही वाढत असते. शहरांचा विकास करताना शहरातील नागरीकरण (लोकसंख्या या अर्थाने) नियंत्रीत ठेवावे लागते. हे आव्हान म्हणून स्वीकारावे लागते. मुंबईच्या बाबतीत हे होत नाही. आज आम्हाला बुलेट ट्रेन, विमानसेवा जितकी महत्त्वाची वाटते तितके शहरातील मैदाने, आरोग्यसेवा, जीवनशैली महत्त्वाची वाटत नाही. सरकारही याबाबत गाफील आहे. खरे म्हणजे कोणत्याच सरकारला शहरीकरणाबाबत दृष्टीकोन नाही. चंडीगढ शहर विचारात घेता यात पं. नेहरूंचा अपवाद म्हणावा लागेल.\nमुंबईचा विकास राष्ट्रीय पक्ष करू शकत नाहीत\nमुंबईच काय देशातील कोणत्याही शहराचा विकास राष्ट्रीय पक्ष करू शकत नाहीत. त्यासाठी प्रादेशिक पक्षांना सत्तेत वाटा मिळणे आणि तो मिळाल्यावर प्रादेशिक पक्षांनी प्रामाणिकपणे कामं करणे हा पर्याय ठरू शकतो. आजची स्थिती पाहत दिल्ली दरबारी असलेल्या केंद्र सरकारला देशातील शहरांचे प्रश्न कळत नाहीत. त्यातही मुंबईतील प्रश्नांची त्यांना जाण नाही. त्यासाठी धोरण ठरविण्यासाठी प्रादेशिक पक्ष आणि ते राबविण्यासाठी केंद्र सरकार असा पर्याय निर्माण केल्यास प्रश्न सुटण्याची शक्यता अधिक. पण, अलिकडच्या सत्तापिपासू राजकारणात हे होणे कठीणच.\nशहरांना पोसणारी खेडी आज बकाल होत चालली आहेत. खेड्यातली बहुसंख्य जनता शहरांकडे स्तलांतरीत झाली आहे. त्याच परिणाम लोकांच्या कार्यक्षमतेवर झाला आहे. खेड्याकडे कुशल असणारा घटक शहरात येऊन अकुशल कामगार वर्ग बनत आहे. मुळच्या शहरात राहणाऱ्या व्यक्तिला खेड्याबाबत फार आत्मियता दिसत नाही. समाज म्हणून आपण अराजकतेकडे चालल्याचे हे लक्षण आहे. यात पुन्हा एकदा नव्या दृष्टिकोनातून खेड्यांकडे पाहिले पाहिजे. खेडी स्वयंभू झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. खेडी बकाल ठेऊन आपण कितीही बुलेट ट्रेन, स्मार्ट सिटींच्या कॅशलेस डिजिटल गप्पा मारल्या तरी शहरं सुधारणार नाहीत. उलट ती अधिक बकाल होत जातील. हे नक्की.\nचेहरा हरवलेल्या गर्दीचा मुंबईवर बलात्कार\nबलात्कार हा केवळ लैंगिक असू शकत नाही. तो व्यवस्थेने व्यवस्थेवर केलेला सामाजिकही असू शकतो. आज चेहरा हरवलेल्या गर्दीत मुंबई धावत आहे. मुंबईचे स्पिरीट या गोंडस नावाखाली मुंबईवर होणारे बलात्कार खपवले जात आहेत. लोकांची विस्कळीत जिवनशैली, खालावत चाललेला राहणीमानाचा दर्जा, अतिप्रमाणात बाहेरून मुंबईवर आदळणारे लोंढे, त्यातून वाढणारी गुन्हेगारी, अपघात, विदीर्ण होत चाललेले कल्चर आणि गरीब श्रीमंत वाढत चाललेली दरी हा सगळा शहरावर होणाऱ्या बलात्काराचाच प्रकार आहे. राजकारणी या बलात्काराचा वापर करून मतांचा जोगवा मागत राहतात. हे विद्रुपीकरण जोवर सुरू आहे तोवर मुंबईत मरण स्वस्तच राहील. त्यात परिवर्तन होणे नाही. ज्या दिवशी हे परिवर्तन होईल ती मुंबईचीच नव्हे देशातील प्रत्येक शहराची सुवर्ण सुरूवात असेल.\n'इंग्रजी'च्या नावाखाली शिक्षणाचं दुकान\nघामोळ्यांंचा त्रास आटोक्यात ठेवायला मदत करतील हे '3...\n पहिल्यांदा कोणी दिला होता 'सचिन-सचिन'चा आ...\nगडचिरोलीत ३ दिवसात ३३ नक्षलवाद्यांचा खात्मा\nभारताचं जोरदार उत्तर, 4 पाकिस्तानी सैनिक ठार\nमाझ्या खात्यात १५ लाख कधी येणार\nतेजश्री प्रधान आपल्या Ex नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काय...\nफाटलेल्या दूधाच्या पाण्याचे '5' भन्नाट फायदे\nबॅक मित्र बनून तुम्ही कमवू शकता पैसे, दर महिन्याला मिळेल पग...\n६००० रुपयांपर्यंत स्वस्त झालाय सॅमसंगचा हा स्मार्टफोन...जाण...\nसचिन तेंडुलकरचे हे 5 रेकॉर्ड कोहलीच काय कुणीच तोडू शकत नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://amrutmanthan.wordpress.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-24T06:23:28Z", "digest": "sha1:LSSXCYYZV7MBS6XIH2SARDTB3XWA74IQ", "length": 60912, "nlines": 307, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "राज्यभाषा – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nरविवार, 7 मे 2017 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदीय राजभाषा समितीच्या नवव्या अहवालातील शिफारशी स्वीकाल्यानंतर हिंदी भाषा लादली जाण्याच्या भीतीने आपल्या मातृभाषेविषयी कमालीच्या संवेदनशील असलेल्या अनेक अहिंदी राज्यांतील, विशेषत: दक्षिणेकडील राज्यांतील जनतेत अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थतेची दखल तेथील राज्य सरकारांनी न घेतल्यास १९६५ नंतर पुन्हा एकदा भारतात हिंदी विरोधी लाट निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोचण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील जनता तेवढी जागरुक नसल्यामुळे व सध्याच्या राजकर्त्यांच्या हिंदी-शरण वृत्तीमुळे या शिफारसींचे सर्वाधिक विपरित परिणाम महाराष्ट्रालाच भोगावे लागतील.\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nबुधवार, 1 मार्च 2017 बुधवार, 1 मार्च 2017 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nदरवर्षी मराठी-भाषा-दिन ह्या एकाच दिवशी अचानक मराठी माणसाचा मायबोलीबद्दलचा अभिमान उफाळून येतो...\nपण माझ्याच राज्यात, माझ्याच गावात, मी आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये साधे दैनंदिन व्यवहारही करू शकत नाही, घराबाहेर मला माझी भाषा फारशी ऐकूच येत नाही, फारशी कुठे वाचायला मिळत नाही, उलट कुठे मराठीमध्ये बोलल्यास बाहेरील फालतू उपरे टॅक्सी-रिक्षावाले किंवा फेरीवाले- दुकानदारसुद्धा माझ्याकडे तुच्छतेने पाहून “मराठी नही समझता. हिंदीमे बोलो ” असे फर्मावतात, ह्याबद्दल मराठी माणसाला कसलीच खंत वाटत नाही.\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nरविवार, 26 फेब्रुवारी 2017 बुधवार, 1 मार्च 2017 अमृतयात्री१ प्रतिक्रिया\nमराठी भाषेवर चालून आलेली कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. खरं तर मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं. उद्याच्या ‘मराठी राजभाषा दिना’ निमित्त विशेष लेख.\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nसोमवार, 5 ऑक्टोबर 2015 रविवार, 16 जुलै 2017 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nजिनांनी पाकिस्तानच्या राष्ट्रभाषेसाठी उर्दूची शिफारस केली आणि भावनेच्या भरात ती तेव्हा स्वीकारली गेली. हा निर्णय झाल्यापासून पूर्व पाकिस्तान, सिंध, बलुचिस्तान, वायव्य-सरहद्द-प्रांत या भागात जो भाषिक संघर्ष पेटला, तो अजूनही चालूच आहे. याच संघर्षातून स्वातंत्र्यानंतर केवळ २४ वर्षात पाकिस्तानची भाषिक तत्वावर फाळणी झाली. या फाळणीच्या मुळाशी केवळ बांगला भाषिक आणि सांस्कृतिक अस्मिता असल्याने नव्या देशाचे नाव पूर्व पाकिस्तान न ठेवता देशाला बांगला हे भाषेचे/संस्कृतीचे नाव दिले गेले.\nएकच राष्ट्रभाषा असावी असा हट्ट धरून भारताचे विभाजनाची बीजे रोवण्याऐवजी सर्व भारतीय भाषांचा परस्पर-समन्वय वाढवून एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.\nराष्ट्रभाषेचे खूळ देशाच्या विभाजनाचे कारण ठरेल म्हणून ते खूळ सोडून आपला देश बहुभाषिक असल्याचे वास्तव मोकळेपणाने स्वीकारणे भारताच्या एकात्मतेसाठी आवश्यक आहे.\nगोव्यात शाळांमध्ये मराठी किंवा कोकणी सक्तीची, महाराष्ट्राचे काय\nरविवार, 9 फेब्रुवारी 2014 रविवार, 9 फेब्रुवारी 2014 अमृतयात्री3 प्रतिक्रिया\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ह्यांच्या नेतृत्वाखालील राज्यशासनाने तेथील सर्व शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी किंवा कोकणी सक्तीची केल्याचे जाहीर केले आहे. त्याबद्दल गोवे सरकारचे अभिनंदन बिल्डर, उद्योजक आणि दिल्लीश्वर यांच्याकडे स्वाभिमान गहाण ठेवणार्‍या महाराष्ट्र सरकारला हे धाडस जमणारच नाही काय\nदैनिक सकाळ, दिनांक २३ जानेवारी २०१४ च्या अंकातील बातमी पाहा.\nसेमी-इंग्रजी ही दिशाभूलच (ले० उन्मेष इनामदार, दै० लोकसत्ता)\nगुरूवार, 6 सप्टेंबर 2012 अमृतयात्री15 प्रतिक्रिया\nआईचे दूध हा नवजात बाळासाठी नैसर्गिक व सर्वोत्तम आहार आहे हे त्रिकालाबाधित सत्य असताना शिशुआहार बनवणाऱ्या कंपन्या आपले उत्पादन हे बाळासाठी मातेच्या दुधापेक्षाही जास्त पोषक असल्याच्या जाहिराती करीत होत्या.बालहक्कांसाठी लढणारे याविरुद्ध न्यायालयात गेले. आईच्या दुधाला दुसरा कोणताही पर्याय नाही हे शास्त्रीय सत्य न्यायालयाने मान्य केले. कंपन्यांचे संशोधन अहवाल फेटाळले गेले. आईचे दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम असून, आमचे उत्पादन हे त्याखालोखाल असल्याच्या पुनर्जाहिराती सदर कंपन्यांना करणे भाग पाडले.\nपरराज्यांतून येणार्‍या विद्यार्थ्यांना ‘तमिळ’ शिकावीच लागेल\nरविवार, 5 फेब्रुवारी 2012 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nपरराज्यांतून आलेल्या आणि वेगळी मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीपर्यंत ‘तमिळ’ भाषा शिकावीच लागेल असे तामीळनाडू अण्णा द्रमुक सरकारने आज विधानसभेत ठणकावले. या धोरणात किंचितसाही बदल अजिबात होणार नाही, असे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री जयललिता यांनी निक्षून सांगितले.\nफॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये – डॉ. अनिल काकोडकर\nमंगळवार, 31 जानेवारी 2012 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषेचे महत्त्व कितीही असले तरी प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या मातृभाषेतूनच झाले पाहिजे. फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये. कारण मातृभाषा हे हेच शिक्षणाचे स्वाभाविक माध्यम असून त्याच भाषेतून मुलांचा सर्वागीण विकास होऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.\nन्या. चपळगावकर यांचा समिती अध्यक्षपदाचा राजीनामा (दै० लोकसत्ता)\nशुक्रवार, 8 जुलै 2011 शुक्रवार, 8 जुलै 2011 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nराज्यशासन एका बाजूने विविध क्षेत्रांत राज्यभाषा मराठीची कोंडी करीत असतानाच महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात केवळ मराठीप्रेमाचा देखावा म्हणून तात्कालिन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मराठीसाठी स्वतंत्र विभाग (खाते) निर्माण करण्याचे जाहीर केले आणि नंतर शासनाला मराठीविषयक बाबींसाठी सल्ला देण्यासाठी न्या० चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ’मराठीभाषा सल्लागार समिती’ची स्थापना केली. पण शासनाचे मराठीविषयीचे प्रेम मुळातच बेगडी आणि दिखाऊ असल्यामुळे सल्लागार समितीचे कार्य योग्य रीतीने चालावे यासाठी शासनाने काहीही कृती केली नाही, कर्मचारी नेमले नाहीत, पायाभूत सुविधा दिल्या नाहीत, काही आर्थिक तरतूदीही केल्या नाहीत किंवा त्यांच्या सूचनांना कवडीचीही किंमत दिली नाही.\nभाषा संचालनालय – काल आणि आज (ले० अनुराधा मोहनी, भाषा आणि जीवन)\nरविवार, 3 जुलै 2011 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nमहाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाच्या स्थापनेमागची उद्दिष्टे, एकेकाळी त्यांनी केलेले उत्तम काम आणि आज शासनाच्या अनास्थेमुळे त्याला आलेली अवकळा यांच्याबद्दलचा एक अभ्यासपूर्ण आणि अनुभवावर आधारित असा लेख.\nबेळगावात मराठी भाषिकांना वाकुल्या, भाजपचे शक्तिप्रदर्शन\nशुक्रवार, 11 मार्च 2011 शुक्रवार, 8 जुलै 2011 अमृतयात्री१ प्रतिक्रिया\nमहाराष्ट्रात स्वभाषा आणि स्वसंस्कृतीबद्दल अभिमान म्हणजे संकुचित वृत्ती असा अपप्रचार करणारे कॉंग्रेस, कम्युनिस्ट, भाजप इत्यादी पक्ष महाराष्ट्रातील स्थानिकांच्या स्वाभिमानाच्या आणि अस्मितेच्या बाबतीत नेहमीच कचखाऊ धोरण स्वीकारतात मात्र त्याच मंडळींची इतर राज्यांत मात्र स्थानिक भाषा व संस्कृती यांच्याबद्दलचे प्रेम दाखवण्यात अहमहमिका लागलेली असते. इतर राज्यांत कितीही वेळा सत्तांतर झाले आणि कोणाचीही सत्ता आली तरी त्यांच्या स्थानिक भाषा आणि स्थानिक संस्कृतीविषयक धोरणात बदल घडत नाही. बंगालात कॉंग्रेस-कम्युनिस्ट-तृणमूल-फॉर्वर्डब्लॉक, तमिळनाडूमध्ये द्रमुक-अद्रमुक, केरळात कॉंग्रेस-कम्युनिस्ट, कर्नाटकात कॉंग्रेस-भाजप, आंध्र प्रदेशात कॉंग्रेस-तेलुगूदेशम्‌ असे सर्वच पक्ष सातत्याने आणि अखंडपणे स्वजनधार्जिण्या धोरणाचा पाठपुरावा करतात; तर महाराष्ट्रात अगदी त्याउलट परिस्थिती असते. या सर्वास, स्वतःच्या राज्यात अशी विपरित परिस्थिती गपगुमान खपवून घेणारी महाराष्ट्रीय जनता स्वतःच नाही, तर इतर कोण कारणीभूत असू शकते\nमहाराष्ट्रातील सीमाभागात मराठी शाळांवर बंदी, कानडी शाळांना मुक्तहस्ते परवानगी\nमंगळवार, 14 डिसेंबर 2010 शुक्रवार, 11 मार्च 2011 अमृतयात्री3 प्रतिक्रिया\nआमच्या राज्यशासनाच्या नाकर्तेपणाचे, स्वाभिमानशून्यतेचे नवनवीन किस्से उघडकीला येताहेत. गेली पाच वर्षे सर्व महाराष्ट्रभर राज्यभाषा मराठीमध्ये नवीन शाळा उघडण्यावर किंवा अस्तित्वातील शाळांमध्ये पुढील वर्ग चालू करण्यावर बंदी घालणारे आमचे राज्यशासन इतर भाषांतील शाळांना मात्र कुठलीही तपासणी न करता मुक्तहस्ताने परवानगी देत आहे. त्यामुळे राज्यातील सीमावर्ती ग्रामीण भागातील मराठी जनतेलाही आपल्या मुलांना कानडी शाळेतच शिकवणे भाग पडते आहे. पण आमचे सरकार मात्र चटईक्षेत्र निर्देशांक व हजारो कोटी रुपये यांची त्रैराशिके सोडवण्यातच गर्क आहे. अशा या आमच्या शासनकर्त्यांना जिथे महाराष्ट्राच्या सीमाभागातील मराठी माणसांचीही पर्वा नाही; तिथे कर्नाटकव्याप्त बेळगाव सारख्या सीमाभागातील मराठी माणसांबद्दल काय आत्मीयता असणार\nशुक्रवार, 3 डिसेंबर 2010 शुक्रवार, 3 डिसेंबर 2010 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nमहाराष्ट्रात न्यायालयीन कामकाज मराठीतूनच (दै० सामना, २८ जुलै २००९)\nगुरूवार, 2 डिसेंबर 2010 अमृतयात्री१ प्रतिक्रिया\nभारतातील इतर कुठल्याही राज्यात किंवा देशात स्थानिक भाषेच्या सार्वभौमत्त्वाबद्दल कोणीही शंका घेत नाहीत किंवा त्याबद्दल आक्षेपही घेत नाहीत. पण महाराष्ट्रात मात्र मराठीचे महत्त्व इतरांना खपत नाही. म्हणूनच महाराष्ट्रातील न्यायालयांच्या मराठीकरणाच्या दृष्टीने उच्च न्यायालयाचा हा निर्णय फारच महत्त्वाचा आहे.\nराज्य मराठीचे.. इंग्रजी शाळांचे (ले० डॉ० प्रकाश परब, दै० लोकसत्ता, २२ नोव्हें० २०१०)\nशनिवार, 27 नोव्हेंबर 2010 शनिवार, 27 नोव्हेंबर 2010 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nमराठी शाळांना परवानगी नाकारून आणि शासनमान्य नसलेल्या प्रयोगशील मराठी शाळांना टाळे लावण्याची धमकी देऊन महाराष्ट्र शासनाने सुवर्णमहोत्सवी वर्षांत मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती देणार्‍या हुतात्म्यांना अभूतपूर्व अशी आदरांजली वाहिली आहे. सीमा भागातील मराठी भाषिक जनतेसाठी वेळोवेळी गळा काढणारे सरकार स्वत:च्या राज्यात काय प्रकारचे भाषाधोरण राबवते आहे हे सीमावासियांनीही लक्षात घेतलेले बरे. मराठी शाळांबाबत पारतंत्र्याच्या काळातील ब्रिटिश सरकारलाही लाजवणारे धोरण स्वीकारून राज्य सरकारने साडेदहा कोटी महाराष्ट्रीय जनतेचा अपमान केला आहे.\nमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद यापुढे फक्त मराठीतून\nरविवार, 21 नोव्हेंबर 2010 रविवार, 21 नोव्हेंबर 2010 अमृतयात्री4 प्रतिक्रिया\nया आधीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यभाषेच्या ऐवजी परराज्याच्या व परदेशाच्या भाषेतूनच चर्चा, निवेदने, पत्रकार परिषदा वगैरे घेत असत. आणि त्यामुळे केवळ महाराष्ट्रीय लोकांनाच स्वभाषा, स्वसंस्कृतीबद्दल अभिमान नाही हे वारंवार अधोरेखित होत असे. इतर ’तथाकथित’ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यमांना व वाहिन्यांना करुणानिधींचे तमिळ वक्तव्य समजते, बुद्धदेबांचे बंगाली निवेदन समजते, तसेच इतर मलयाळम्‌, कानडी, ओडिस्सी, पंजाबी नेत्यांची त्यांच्यात्यांच्या राज्यभाषेतील भाषणे नीट समजतात. एवढेच काय पण अमेरिकी माध्यमांना फ्रेंच, रशियन, जपानी, हिब्रू, स्वाहिली, स्पॅनिश भाषा देखील समजतात. त्याबद्दल जगात कुठेही, कधीही, काहीही वावगे समजले जात नाही. पण केवळ महाराष्ट्रातच माध्यमांना, विशेषतः भारतीय माध्यमांना मराठी समजून घेण्यात कमीपणा वाटतो. आणि याला कारण म्हणजे आपले नेते व त्यांना पाठिंबा देणारे आपण सर्वच जण इतरांची तशी समजूत करून देतो.\nविद्यापीठांच्या प्रशासनात मराठी अनिवार्य – पण विद्यापीठांचे दुर्लक्ष\nशुक्रवार, 19 नोव्हेंबर 2010 शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2010 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nजुनाच असललेला हा कायदा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षा-दोन-वर्षांत अनेकदा यासंबंधी बातम्या विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्या. महाराष्ट्रातील विद्यापीठांत केवळ नामफलक, परिपत्रके, माहितीपुस्तिका एवढ्याच बाबतीत नव्हे तर सर्वच प्रशासकीय बाबींमध्ये राज्यभाषा मराठीला सर्वोच्च स्थान देणे हे कायद्याने अनिवार्य आहे. अध्यापनाच्या मूळ विषयाशी थेट निगडित अशा बाबींशी संबंधित असलेली भाषा वगळता इतर सर्वच बाबतीत मराठीला सर्वोच्च प्राधान्य मिळाले पाहिजे. विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांना देखील मराठीचे यथोचित ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्थात अशा प्रकारचे नियम व कायदे सर्वच राज्यांत व सर्वच देशांत असतात. फरक एवढाच की इतर ठिकाणी त्यांचे सहसा बर्‍याच प्रमाणात पालन केले जाते आणि महाराष्ट्रात मात्र मुळीच केले जात नाही.\nसाहित्य मंडळास मराठीतून शिक्षणाबद्दल प्रस्ताव पाठवण्यासाठी आवाहन (ले० उन्मेष इनामदार)\nगुरूवार, 11 नोव्हेंबर 2010 गुरूवार, 6 सप्टेंबर 2012 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nठाणे येथे होणार्‍या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात मांडण्यासाठी ’मराठी भाषा आणि साहित्य’ या संदर्भात ठराव सुचवावेत, असे आवाहन मराठी साहित्य महामंडळाने केले आहे. हे ठराव दि. १ डिसेंबर २०१० पर्यंत पाठवावयाचे आहेत.\nमहाराष्ट्र सरकारचे शैक्षणिकच नव्हे तर सर्वच क्षेत्रांत राज्यभाषेला खाली दाबून टाकण्याचे धोरण बेकायदेशीरच नव्हे तर राज्यघटनेची पायमल्ली करणारा आहे. त्यामुळे सर्व मराठी भाषिकांनी मिळेल त्या सर्व माध्यमांतून यासाठी शासनावर दडपण आणणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने साहित्य संमेलन हे एक प्रभावी माध्यम आहे. साहित्य महामंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने वरीलप्रमाणे प्रस्ताव साहित्य संमेलनाकडे पाठवावेत अशी कळकळीचे आवाहन.\nसमांतर अर्थव्यवस्थासुद्धा चालेल का\nसोमवार, 25 ऑक्टोबर 2010 सोमवार, 25 ऑक्टोबर 2010 अमृतयात्री9 प्रतिक्रिया\n‘शिक्षणाचे माध्यम’ या निकषावरून समाज दुभंगला आहे. नवा शैक्षणिक जातीयवाद व उच्चनीचता निर्माण झाली आहे. इंग्रजी माध्यमातून शिकणार्‍यांचा एक ’देशांतर्गत देश’ तयार झाला आहे. ’राष्ट्रभावना’ ही कुचेष्टा-टवाळी करण्याची गोष्ट बनली आहे. ’गुलामगिरी’ भूषणावह मानली जात आहे. या देशाबद्दलची निष्ठा, प्रेम, बंधुत्व यांची तसेच इथल्या समृद्ध परंपरांशी इमान राखण्याची प्रतिज्ञा इथली बालके एका परभाषेतून घेतात. व ही गोष्ट कोणालाही हास्यास्पद व लाजिरवाणी न वाटणे हे राष्ट्रीय अस्मितेचा सार्वत्रिक लोप झाल्याचे अत्यंत दुर्दैवी ठळक लक्षण आहे.\nभारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली राज्यशासनाची शिक्षणविषयक कर्तव्ये (ले० सलील कुळकर्णी)\nशनिवार, 23 ऑक्टोबर 2010 रविवार, 2 ऑक्टोबर 2011 अमृतयात्री4 प्रतिक्रिया\n“भारताच्या राज्यघटनेप्रमाणे केंद्र सरकार किंवा कुठलेही राज्य सरकार इंग्रजी भाषेच्या जोपासनेस, संवर्धनास किंवा प्रसारास मुळीच बांधील नाहीत. घटनेच्या तत्त्वाप्रमाणे कुठल्याही राज्याने प्रामुख्याने आपल्या राज्यभाषेच्या माध्यमातूनच आपल्या जनतेची शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.”\n“नुसतेच स्थानिक भाषेतून शिक्षण देणे याबरोबर राज्यशासनाची कर्तव्यपूर्ती होत नाही; तर त्या भाषेतूनच जनतेची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती होईल या दृष्टीने सतत प्रयत्न करणे हेदेखील शासनाचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यादृष्टीने शासनाने कायदे केले पाहिजेत व धोरणे आखली पाहिजेत.”\n“वरील विवेचनावरून असे स्पष्टपणे समजून येते की प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यभाषेतील शिक्षणासच सर्वाधिक महत्त्व देणे हेच शासनाचे कर्तव्य आहे. इंग्रजी ह्या परकीय व घटनेच्या परिशिष्ट-८ मध्येही समाविष्ट नसलेल्या भाषेला अनाठायी महत्त्व देऊन इंग्रजी माध्यमातील शाळांवर जनतेचा पैसा खर्च करण्याचे तर मुळीच कारण नाही. मराठी शाळांत इंग्रजीचे उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्न नक्की व्हावा. मात्र स्थानिक भाषेला शिक्षणक्षेत्रात सर्वाधिक महत्त्व मिळालेच पाहिजे. ज्या पालकांना आपल्या मुलांना इंग्रजी किंवा इतर माध्यमांतून शिक्षण द्यायचे असेल त्यांनी ती हौस स्वतःच्या कुवतीवर भागवावी, सरकारी पैशावर नव्हे.“\nशुक्रवार, 8 ऑक्टोबर 2010 मंगळवार, 21 फेब्रुवारी 2012 अमृतयात्री5 प्रतिक्रिया\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nगुरूवार, 30 सप्टेंबर 2010 गुरूवार, 14 नोव्हेंबर 2013 अमृतयात्री19 प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र टाइम्सची “या नियमामुळे मराठी-भाषिक जनतेला फायदा होणार आहे” आणि “मराठीचं ज्ञान असणं तुम्हाला बाकी कोणत्याही मुद्यापेक्षा फायदेशीर ठरु शकतं” ही विधाने तसेच टाइम्सची “rule is likely to benefit lakhs of the Marathi- speaking community” आणि “knowledge of Marathi may prove more crucial than any single other factor” ही विधाने म्हणजे कहर आहे. महाराष्ट्रात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी राज्यभाषा मराठीच असते हे लक्षात घेतले पाहिजे. एखाद्या देशातील किंवा राज्यातील विविध सोयींचा फायदा घेताना तेथील भाषेचा व संस्कृतीचा मान न राखणे हे जगात कुठेच खपवून घेतले जाणार नाही.\nउच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र शासनास आणखी एक थप्पड (७ सप्टेंबर २०१०)\nशुक्रवार, 24 सप्टेंबर 2010 मंगळवार, 21 फेब्रुवारी 2012 अमृतयात्री8 प्रतिक्रिया\nकाहीही कारण न देता केवळ मराठी माध्यमाच्या नवीन शाळा किंवा पुढील इयत्ता उघडण्यास बंदी घालणार्‍या मात्र त्याचबरोबर इंग्रजी, हिंदी, गुजराथी, कानडी शाळांना मात्र तत्परतेने मान्यता देणार्‍या महाराष्ट्र शासनाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आणखी एक थप्पड लगावली आहे. “राज्य शासनाचा २० जुलै २००९ चा आक्षेप घेतला गेलेला निर्णय अवैध, भेदभाव करणारा असल्यामुळे घटनाबाह्य आणि मनमानी तसेच अविचारीपणाने केलेला आहे.” (८ एप्रिल २०१०)\nमराठी शाळा बचाव आंदोलनानंतर… (ले० रमेश पानसे, दै० लोकसत्ता, २० सप्टें० २०१०)\nसोमवार, 20 सप्टेंबर 2010 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nआता खरी कायद्याची लढाई सुरू होत आहे. हे आंदोलन आता पसरत चालले आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठी शाळा आपले पालक-शिक्षक-संस्थाचालक, विद्यार्थी घेऊन रस्त्यांवर येतील. आपल्या अधिकारांसाठी, अस्तित्वासाठी आणि महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी पुढील काळांत सातत्याने कार्यरत राहतील. अनेक ठिकाणी ‘शिक्षण हक्क समन्वय समित्या’ स्थापन होत आहेत. त्यांचे संघटन होत आहे आणि पुढील नजीकच्या काळातील, सरकारविरोधी व्यापक आंदोलनाची नांदी होत आहे.\nनिदर्शने यशस्वी केल्याबद्दल जनतेचे आभार (शिक्षण अधिकार समन्वय समिती)\nसोमवार, 20 सप्टेंबर 2010 मंगळवार, 21 फेब्रुवारी 2012 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nमहाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच राज्यातील शेकडो मराठी शाळा अनधिकृत ठरवून त्या बंद करण्याचा फतवा सरकारने जारी केल्यानंतर सर्वत्र संतापाचा भडका उडाला. पुणे, नाशकात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. ‘मराठी शाळा टिकू द्या’, ‘मराठीतून आम्हाला शिकू द्या…’, ‘राज्य सरकार हाय हाय…’ अशा गगनभेदी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयांवर त्यांनी धडक मोर्चे काढले. मराठीचा अवमान करणार्‍या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असा जळजळीत सवाल करीत विद्यार्थी आणि शिक्षकांनी सरकारच्या अध्यादेशाची होळी केली. (दैनिक सामना)\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर\nराईट बंधूंच्या आधी विमानोड्डाण करणारा भारतीय \n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n\"हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही\" - केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nविचारमंथन - तिन्ही सांजा सखे मिळाल्या (प्रश्नकर्ता: सुशांत देवळेकर)\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/07/3.html", "date_download": "2018-04-24T06:24:50Z", "digest": "sha1:VIRIKFPSUFZ66UAZH3JPXTRDYTGFLW7W", "length": 15982, "nlines": 264, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: शालेय पोषण आहार एक्सेल शिट अपडेट - 3", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट अपडेट - 3\nशालेय पोषण आहार वार्षिक व मासिक शीटमध्ये काही महत्त्वाचे अपडेट केले असून, काही त्रुटी काढून टाकल्या आहेत. नवीन वार्षिक शीटची वैशिष्ट्ये -\n1. पूर्णपणे युनिकोड मध्ये\n2. मोबाईल वर वापरता येते\n3. अत्यंत सोपी रचना\n4. background कलर काढला आहे, त्यामुळे प्रिंट काळपट येत नाही\n5. नंबर फॉरमॅट बदलला आहे, त्यामुळे ## एरर येत नाही\n6. फक्त रोजची उपस्थिती भरली, की मासिक उपयोगिता तयार होते\n7. साठा नोंदवही आपोआप तयार होते\n8. वार्षिक उपयोगिता प्रमाणपत्र आपोआप तयार होते\n9. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमाण वेगळे असल्यामुळे आपल्या सोईनुसार बदलता येते.\n10. कंडिशनल फॉरमॅटिंग वापरले आहे, त्यामुळे कोणता धान्यादी माल वापरला आहे ते चटकन ओळखते.\nचला तर मग, आत्ताच डाउनलोड करूया. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.\n1. शा.पो.आ. वार्षिक शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\n2. शा.पो.आ. मासिक शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nयु डायस म्हणजे काय \nशालेय पोषण आहार एक्सेल शिट अपडेट - 3\nकसा भरावा कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज \nजिल्हाअंतर्गत बदली संवर्ग 2 बाबत महत्वाच्या सूचना\nसातत्यपूर्ण सर्वंकष नोंदी एक्सेल सॉफ्टवेअर\nशा.पो.आ. App डाऊनलोड व App सेटींग\nशालेय पोषण आहार शीटस युनिकोड\nशालेय पोषण आहार एक्सेल शीट पूर्ण वर्षासाठी\nशालेय पोषण आहार एक्सेल शीट एक महिन्यासाठी\nशालेय पोषण आहार केंद्र एकवट\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9", "date_download": "2018-04-24T06:44:10Z", "digest": "sha1:66LQZDPUEKCL5O74XI3VR4GUSKUECLCX", "length": 16788, "nlines": 265, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काळाराम मंदिर सत्याग्रह - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकाळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च इ.स. १९३१ रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता.\n२ हे सुद्धा पहा\n१७८२ साली सरदार रंगाराव ओढेकरांनी सुमारे तीस लाख रुपये खर्च करुन नाशिकात हे मंदिर बांधून घेतले. दरवर्षी रामनवमीला या मंदिरातून रथयात्रा निघत असे. मंदिरातील हे रथ स्पृश्य व अस्पृश्य दोघांनी मिळून ओढण्याची प्रथा सुरुवातीपासूनच चालत आलेली होती. पुण्यातील पेशवे माधवराव यांच्या मातोश्री गोपिकाबाई या मुळच्या नाशिकच्या. त्यांच्या माहेरचे आडनाव रास्ते. त्यानी या मंदिराला दोन रथ भेट दिले होते. पुढे त्या दोन्ही रथाची देखभाल व इतर खर्च याची जबाबदारी रास्त्यांवरच होती. असे असले तरी अस्पृश्यांना या देवळात प्रवेश नव्हता. त्यासाठी आंबेडकरांना सत्याग्रह करावा लागला.\n२ मार्च १९३० ला बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला, अन तिकडे १२ मार्च १९३० ला महात्मा गांधी यानी दांडीयात्रा सुरू केली. गांधीचा लढा राजकीय होता, तर बाबासाहेबांचा सामाजिक होता.\nभारतातील मंदिर प्रवेश सत्याग्रह\nसत्याग्रही आंबेडकर: भाग २ - काळाराम मंदिर सत्याग्रह\nपक्ष, संघटना व संस्था\nडिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी\nदी बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट\nस्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज(१९१८)\nद प्रॉब्लम् ऑफ द रूपी(१९२३)\nदि इव्हॉलुशन ऑफ द प्रव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया(१९२४)\nवेटिंग फॉर अ व्हिझा(१९३६)\nमीस्टर गांधी अँड दि इमॅन्सिपेइशन ऑफ दि अनटचेबल्स(१९४५)\nरानडे, गांधी आणि जीना(१९४३)\nव्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स(१९४५)\nमहाराष्ट्र अॅझ् अ लिंग्विस्टिक्स स्टेट(१९४६)\nहू वर दि शुद्राज\nद अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स(१९४८)\nथॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स(१९५५)\nबुद्ध आणि त्यांचा धम्म(१९५७)\nप्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती\nयुगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nरमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)\nबोले इंडिया जय भीम\nभारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर\nतमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार\nशाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार\nआंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार\nआंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार\nमातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लंडन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दिल्ली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्तूप, चैत्यभूमी\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महू\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जपान\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१८ रोजी ११:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-24T06:56:12Z", "digest": "sha1:HP3BRE2IP2UQ7G5PWURGYRO6NLYE726S", "length": 5824, "nlines": 143, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कोहळा | मराठीमाती", "raw_content": "\nकोहळा किसून घ्यावा. कोहळ्यात फार पाणी असते, म्हणून तो पिळून घ्यावा व थोड्या तुपावर त्याचा किस टाकून परतावा.\nनंतर झाकण ठेवून वाफवून घ्यावा. नंतर हा किस एखाद्या पातेलीने मोजून घ्यावा.\nजेवढा किस असेल त्याच्या दुप्पट साखर घ्यावी. १ पातेली कोहळ्याचा किस, २ पातेल्या साखर व १/४ पातेली खवा असे प्रमाण आहे.\nवाफवलेल्या कोहळ्याचा कीस, साखर, खवा, वेलचीपूड व बदामाचे काप एकत्र करुन गॅसवर ठेवावे.\nघट्ट गोळा होत आला की, तूप लावलेल्या थाळीत थापावे व वड्या पाडाव्यात.\nह्या वड्या थंडीच्या दिवसात करतात.\nअशाच वड्या दुध्या भोपळ्याच्या कराव्या.\nThis entry was posted in गोड पदार्थ and tagged कोहळा, गोड पदार्थ, पाककला, बदाम, वडी, वड्या on फेब्रुवारी 21, 2011 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://zeemarathijagruti.com/blog/Amazing-ways-to-reuse-old--sarees/", "date_download": "2018-04-24T06:43:29Z", "digest": "sha1:WQWXXG32WW5QKFSHK5SK3RD7E5FJDTW3", "length": 16441, "nlines": 249, "source_domain": "zeemarathijagruti.com", "title": "जुन्या साड्यांचा फॅशनेबल उपयोग!! - Zee Marathi Jagruti", "raw_content": "\nजुन्या साड्यांचा फॅशनेबल उपयोग\nजुन्या साड्या बोहारणीला देऊन त्या बदल्यात एखादी कढई, कॉपर बॉटमचं भांडं किंवा प्लॅस्टिक टब घेण्याचा व्यवहार तुम्हाला नक्कीच ठाऊक असले. पण, या बोहारणीच्या अटीही फार किमान सात ते आठ साड्यांच्या बदल्यात एक लहानस भांडं मिळतं. त्यातही साडीला कुठेही छिद्र नसावे, ती विटलेली व अस्वच्छ नसावी हे त्या स्वत: तपासून घेतात. आता, अशी नेसण्याजोगी असलेली साडी कुणाला देऊन टाकण्यापेक्षा, तिचा जरा निराळा वापर केला तर किमान सात ते आठ साड्यांच्या बदल्यात एक लहानस भांडं मिळतं. त्यातही साडीला कुठेही छिद्र नसावे, ती विटलेली व अस्वच्छ नसावी हे त्या स्वत: तपासून घेतात. आता, अशी नेसण्याजोगी असलेली साडी कुणाला देऊन टाकण्यापेक्षा, तिचा जरा निराळा वापर केला तर जसं टाकाऊतून टिकाऊ, तसं जुन्या साड्यांची कलाकुसर करु\nधोती – नव्या जुन्याच्या ट्रेंडमध्ये फॅशन जगतातील धोतीचे क्रेझ आणखी काही वर्षे असेच कायम राहीलसे वाटते. प्लेन रंगातील धोतीपेक्षा तरुणाईची पसंती प्रिंटेड धोतीजना आहे. तेव्हा एखादी जुनी प्रिंटेड साडी असेल, तर तिच्याकडे थोडं ‘धोती’ नजरेने पाहा व तुमच्या कलेक्शनमध्ये या धोती फॅशनला समाविष्ट करा.\nवन पीस – प्रोफेशनल लूकसाठी प्रसिद्ध असणारा वनपीस, शक्यतो गडद व नेमक्या रंगांत ब-याचदा पाहायला मिळतो. इथे काठापदराच्या साडीचा वापर करुन दिलेल्या फ्युजन लूकमध्ये वनपीस अधिक उठावदार दिसेल. या वनपीसने पांरपारिक लूक धारण केला असला, तरी त्याचे पाश्चात्य ढब कायम आहे.\nजॅकेट्स – कुर्ता, टॉप – टिशर्ट यावर शॉर्ट जॅकेट घालण्याचा फंडा आजमावू शकता जुन्या साड्यांच्या मदतीने कोटचा पर्यायही उपलब्ध असून सिल्क किंवा कॉटन साडीचा वापर करता येईल.\nउश्यांची अब्रे – उशांचा आकार चौकोनी, गोल, आयताकृती कसाही असतो. पण, घरच्याघरी उशांची कव्हरे शिवताना आकाराचे कुठलेही बंधन नसते. साडीवरील बुट्टे, बॉर्डरचा वापर करुन मस्त डिझाईन्स बनवता येतील. उश्यांच्या सेट मधील एखाद्या उशीस पदरावरील भरगच्च डिझाईनचे कव्हर शिवून हायलाईट करता येईल.\nशेड लॅम्प – अगदी सर्वसाधारण लंबगोल आकाराच्या लॅम्पशेडवर इरकली साडी किंवा नारायण पेठ साडीची प्रिंट छान शोभून दिसते. लॅम्पशेडचा हा पारंपारिक लूक तुम्हाला नक्की आवडेल.\nपडदे – खिडक्यांचे पडदे बदलताच, संपूर्ण खोलीची रंगसंगीत निराळी वाटू लागते. कारण, सूर्यप्रकाश पडद्यांवर पडला, की खोलीभर त्याच पडद्यांचा रंग पसरतो. घरात असे पडद्यांचे दोन तीन जोड असतात. आता त्यात, वेगवेगळ्या सांड्याचे चौकोन जोडून तयार केलेल्या पडद्यांचाही समावेश करा. एकाचवेळी भरपूर रंग व नक्षीकाम सूर्यप्रकाशात सुरेख दिसेल.\nटेबल क्लॉथ – पाश्चात्यांचं डायनिंग टेबल आपण आपलसं केल, मात्र त्यास सजवताना थोडा भारतीय टच देऊया. टेबल क्लॉथ, प्लेट मॅट्स, टेबल रनर हे सारं जुन्या साडंयाच्या रंगाचा अचूक ताळमेळ साधून बनवता येतील.\nमैत्रिणींनो, तुम्ही कमेन्टद्वारे सांगितलेले जुन्या साड्यांच्या पुनर्वापराचे पर्याय खरेच कल्पक असून, जुन्या साड्या गरजू व्यक्तिंना देण्याची सवयही प्रशंसनीय आहे. या साड्यांच्या पसा-यातील निवडक साड्या आपल्याला प्रचंड आवडणा-या असतात, ज्या काहीकेल्या टाकून द्याव्याशा वाटत नाहीत. अशा साड्यांतून नक्कीच काहितरी नवं करता येईल. ज्यामुळे, त्या योग्यरित्या वापरल्या जातील व जास्त काळ नजरेसमोरही राहतील.\nबलात्कारास कपडे जबाबदार नसतात\nमनमोकळं बोल म्हणतेय, ‘मी टू’ मोहिम\nपिकल्या पानांच्या छायेतलं घरकुल\nरेसिपी – कुरकुरे लॉलीपॉप्स\nरेसिपी – व्हेज चीज पराठा\n१४ फेब्रुवारी ‘मोहिम स्त्रियांच्या सुरक्षेची’\nरेसिपी – लेमन पुडींग\nइनडोअर बागेत लावावीत ‘ही’ झाडे\nसाड्यांचे आयुष्य वाढवतील ‘हे’ उपाय\nमेकअप करताना होतात ‘या’ चुका\nरेसिपी – गार्लिक ब्रेड\nशिळ्या भाताच्या चवदार रेसिपीज\nझटपट होणा-या ‘नेल आर्ट’ डिझाईन्स\nरेसिपी – साबुदाणा पुरी\nया १० कल्पक छंदांपैकी एकाशी तरी मैत्री कराच\nवर्ष २०१७ मधील ८ जगजेत्या भारतीय महिला\nअसे बनवता येईल ‘किचन गार्डन’\nरेसिपी – मिरीयुक्त रस्सम\nनववर्षी करु असे ‘भन्नाट संकल्प’\nरेसिपी – बिनअंड्याचा केक\nहिवाळ्यात या ठिकाणांना भेट द्यावीच\nजुन्या साड्यांचा फॅशनेबल उपयोग\nरेसिपी – चना चिली\nरेसिपी – पोह्यांचा ढोकळा\nलग्नझालेल्या ‘ती’ समोरील प्रश्न\nतुम्ही पाहिल्या नसतील अशा मेहंदी डिझाईन्स\nरेसिपी – सोया नगेट्स\nरेसिपी – काश्मिरी मटण चॉप्स\nरेसिपी – बटर मुरुक्कु\nदिवाळीची सुट्टी मिळत नसेल, तर हे वाचा\nरेसिपी – बंगाली मिठाई ‘संदेश’\nया ५ गोष्टींमुळे महिलांना आवडतो ‘श्रावण’\nलहान मुलांना स्मार्टफोन देताय की आजार…\nअशी असते माझी ‘दुपार’\nइथे नाही गेलात, मग पावसाळा काय अनुभवलात\nअसा दम द्याल, तर नावडते पालक व्हाल\nविश्वविक्रमी एक्स्प्रेस झुलन गोस्वामी\nरेसिपी – सोयाबीन कटलेट\nब्युटीपार्लरची किमया साधणारे घरगुती फेसपॅक\nऑक्टोबर हिट, आईस्क्रीमची ट्रिट\nतुला साजेचा ‘हेअर कट’\nपालक म्हणून मोठे होताना\nफळांच्या स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी\nअंतराळी झेप घेई ‘भारतकन्या’\n‘नाताळ’ होईल अधिक चविष्ट\nदिवाळी रंगे, फराळा संगे\nझटपट बनणारे पौष्टिक पदार्थ\nसणांचे क्षण करा आणखी गोड\nजाणून घ्या महत्त्वपूर्ण कायदे\nआकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी द्या साथ स्वतःला स्वतःची \nझटपट होणारे काही गोडाचे पदार्थ\nस्वत:तील ‘स्व’चा शोध घ्यायचायं\nजागृतीची साथ मिळणार आणि सुंदर मी होणार \nस्त्री मनातील स्वसंरक्षणाचा ‘संकल्प’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/players-to-achieve-triple-10000-runs-100-wickets-and-100-catches-in-odi/", "date_download": "2018-04-24T06:36:55Z", "digest": "sha1:YOAGRNW7NC4XBWYGNKJX34XQLUIN5WIS", "length": 7338, "nlines": 111, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एकदिवसीय सामन्यांत १० हजार धावा, १०० बळी आणि १०० झेल घेणारे पाच खेळाडू - Maha Sports", "raw_content": "\nएकदिवसीय सामन्यांत १० हजार धावा, १०० बळी आणि १०० झेल घेणारे पाच खेळाडू\nएकदिवसीय सामन्यांत १० हजार धावा, १०० बळी आणि १०० झेल घेणारे पाच खेळाडू\nएकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आजवर नोंदवले गेले आहे. परंतु १० हजार धावा, १०० बळी आणि १०० झेल असा विक्रम केवळ पाच खेळाडूंना करता आला आहे. अष्टपैलू खेळाडूंसाठी ही पात्रता ठेवली तर आपल्याला यात आणखी दोन जर अष्टपैलू खेळाडू मिळतील.\nसचिनने एकदिवसीय सामन्यांत १५९२१ धावा, १५४ बळी आणि १४० झेल घेतले आहेत. या कामगिरीसाठी सचिन ४६३ एकदिवसीय सामने खेळला आहे.\nगांगुली भारताकडून ३११ एकदिवसीय सामने खेळला असून त्याने बरोबर १०० झेल एकदिवसीय क्रिकेटमध्ये घेतले आहे. विशेष म्हणजे मध्यमगती गोलंदाज असणाऱ्या या खेळाडूने बळी देखील बरोबर १०० घेतले आहेत. तर फलंदाजी करताना ११३६३ धावा केल्या आहेत.\nज्या खेळाडूला खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू म्हणता येईल तो म्हणजे आफ्रिकेचा जॅक कॅलिस. ३२८ सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना या खेळाडूने ११५७९ धावा करताना २७३ विकेट्स सुद्धा घेतल्या आहेत, तर क्षेत्ररक्षण करताना १३१ झेल घेतले आहेत.\nश्रीलंका संघाचा माजी कर्णधार असणाऱ्या सनथ जयसूर्याने ४४५ सामन्यांत १३४३० धावा करत असताना गोलंदाजी विभागातही तब्बल ३२३ बळी मिळवले आहेत. १२३ झेल घेताना जागतिक क्रिकेटमध्ये जर कधी सर्वश्रेष्ठ अष्टपैलू कोण अशी यादी बनवली तर आपण त्यात अव्वल का असू याची झलकच दिली आहे.\nश्रीलंका संघाचा सलामीवीर आणि अष्टपैलू खेळाडू तिलकरत्ने दिलशान ३३० एकदिवसीय सामन्यांत ११८ झेल घेतले असून १०२९० धावा करताना १०६ बळी देखील घेतले आहे.\nभारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक\nझिम्बाब्वेने मालिकेत साधली २-२ अशी बरोबरी\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/world-championships-pv-sindhu-saina-nehwal-get-first-round-byes/", "date_download": "2018-04-24T06:37:16Z", "digest": "sha1:FVID23YRUBG6CGHDN2O3FOVUPLFACFN3", "length": 5491, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जागतिक बॅडमिंटन स्पर्धा: साईना नेहवाल, पीव्ही सिंधू दुसऱ्या फेरीत - Maha Sports", "raw_content": "\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धा: साईना नेहवाल, पीव्ही सिंधू दुसऱ्या फेरीत\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धा: साईना नेहवाल, पीव्ही सिंधू दुसऱ्या फेरीत\nऑगस्ट २१ पासून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे. भारताच्या दृष्टीने एक चांगली बातमी अशी आहे की भारताच्या दोनही दिग्गज खेळाडू साईना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांना स्पर्धेत पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.\nबाय मिळाल्यामुळे सायनाला दुसऱ्या फेरीत स्वित्झर्लंडची साब्रिना जॅकेट आणि युक्रेनची नताल्या व्होल्तसेख यांच्यातील विजेत्या खेळाडूंशी तर सिंधूला कोरियाची किम हो मिन्ह आणि इजिप्तची हादिया होस्नी यांच्यातील विजेत्या खेळाडूचा सामना करावा लागेल.\nही स्पर्धा पुढच्या आठवड्यात स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे होणार आहे.\nकेरळ क्रिकेट असोशिएशनचे बीसीसीआयला पत्र, श्रीशांतचा निर्णय लवकर घ्यावा \nवाचा एकाच ट्विटमध्ये रोहित शर्माने केलं कोहली, धवन, पंड्याला ट्रोल\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2018-04-24T06:17:49Z", "digest": "sha1:2LXLU3RE7XUNWGOBN6KAKZWFP3QRTZP2", "length": 3668, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्यार्नी बेनेडिक्ट्सन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१४ रोजी २२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-tour-of-south-africa-2017-18/", "date_download": "2018-04-24T06:39:34Z", "digest": "sha1:W5L7STXXGGGUSJEYQAWP5WGZHS2ASVTY", "length": 7708, "nlines": 115, "source_domain": "mahasports.co.in", "title": "संपूर्ण वेळापत्रक: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेचे वेळापत्रक - Maha Sports", "raw_content": "\nसंपूर्ण वेळापत्रक: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेचे वेळापत्रक\nसंपूर्ण वेळापत्रक: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेचे वेळापत्रक\n कसोटी मालिकेतील १-२ अशा पराभवानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ वनडे मालिकेत एकूण ६ सामने होणार आहे.\n१ फेब्रुवारी रोजी पहिला वनडे सामना होणार असून १६ फेब्रुवारी रोजी सहावा आणि शेवटचा वनडे सामना सेंच्युरियनवर होणार आहे. त्यानंतर ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.\nभारतीय संघाची टी२० मालिका ही डबल हेडर असून भारतीय पुरुष संघाच्या तीन टी२० सामन्यांबरोबर महिलांच्या टी२० मालिकेतील ५ पैकी शेवटचे तीन सामने होतील. महिला संघ या दौऱ्यात तीन वनडे आणि ५ टी२० सामने खेळणार आहे. हा दौरा २ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी असा असेल.\nभारतीय पुरुष संघाचा दुसरा वनडे सामना आणि पहिला टी२० सामना हा फक्त दिवस रात्र होणार नसून बाकी संपूर्ण वनडे आणि टी२० मालिका दिवस-रात्र सामन्यांची असेल.\nवनडे मालिका (पुरुष संघ)-\n१ फेब्रुवारी – पहिला वन-डे सामना, किंग्समेड (दिवस-रात्र) (दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी)\n४ फेब्रुवारी – दुसरा वन-डे सामना, सेंच्युरियन (दिवस) (दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी)\n७ फेब्रुवारी – तिसरा वन-डे सामना, केप टाऊन (दिवस-रात्र) (दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी)\n१० फेब्रुवारी – चौथा वन-डे सामना, जोहान्सबर्ग (दिवस-रात्र) (दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी)\n१३ फेब्रुवारी – पाचवा वन-डे सामना, पोर्ट एलिजाबेथ (दिवस-रात्र) (दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी)\n१६ फेब्रुवारी – सहावा वन-डे सामना, सेंच्युरियन (दिवस-रात्र) (दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी)\nवनडे मालिका (महिला संघ)-\n५ फेब्रुवारी – पहिला वन-डे सामना, किंबेरली\n७ फेब्रुवारी – दुसरा वन-डे सामना, किंबेरली\n१०फेब्रुवारी – तिसरा वन-डे सामना, पॉटचेस्टरूम\nहा १६ वर्षीय क्रिकेटपटू खेळणार २०१८च्या आयपीएलमध्ये\nISL 2018: जमशेदपूर एफसीकडून एटीके पुन्हा पराभूत\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://avalentinesdayideas.com/mr/happy-propose-day-2018-images-pics-wallpapers-sms-messages/", "date_download": "2018-04-24T06:58:55Z", "digest": "sha1:YAV2HJGLHF5H2O4MORHTIJME4BYV35XY", "length": 73805, "nlines": 110, "source_domain": "avalentinesdayideas.com", "title": "खूप आनंद झाला दिवस प्रस्तावित 2018 प्रतिमा, चित्रांवर, वॉलपेपर, एसएमएस, संदेश", "raw_content": "\nखूप आनंद झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे 2018 बाजारभाव,शुभेच्छा & ग्रीटिंग्ज\nखूप आनंद झाला दिवस प्रस्तावित 2018 प्रतिमा, चित्रांवर, वॉलपेपर, एसएमएस, संदेश\nखूप आनंद झाला दिवस एचडी प्रतिमा प्रस्तावित, आनंदी दिवस प्रतिमा मांडणे 2018, आनंदी FB दिवस चित्रांवर विचारायची, आनंदी दिवस वॉलपेपर विचारायची 2018, आनंदी दिवस मोफत डाउनलोड वॉलपेपर विचारायची, दिवस मांडणे 2018, दिवस तारीख मांडणे\n1 खूप आनंद झाला दिवस प्रस्तावित 2018 प्रतिमा, चित्रांवर, वॉलपेपर, एसएमएस, संदेश\n1.0.1 दिवस छायाचित्रे प्रस्तावित 2018, पूर्णपणे समाधानी जोडीदार दिवस वॉलपेपर सूचित, दिवस प्रेम छायाचित्रे सूचित, खूप आनंद झाला दिवस एचडी प्रतिमा प्रस्तावित, खूप आनंद झाला प्रस्तावित दिवस चित्रे प्राप्त, पूर्णपणे समाधानी FB दिवस चित्रांवर सूचित, पूर्णपणे समाधानी दिवस वॉलपेपर सूचित, पूर्णपणे समाधानी दिवस वॉलपेपर प्राप्त मुक्त सूचित, प्रियकर साठी दिवस प्रतिमा प्रस्तावित, मैत्रीण दिवस छायाचित्रे सूचित, दिवस प्रेम छायाचित्रे सूचित.\n1.1 दिवस छायाचित्रे प्रस्तावित 2018\n1.2 खूप आनंद झाला जोडीदार दिवस वॉलपेपर सूचित\n1.3 दिवस प्रेम छायाचित्रे प्रस्तावित\n1.4 खूप आनंद झाला दिवस एचडी प्रतिमा प्रस्तावित\n1.5 खूप आनंद झाला प्रस्तावित दिवस चित्रे प्राप्त\n1.6 खूप आनंद झाला आहे FB दिवस चित्रांवर सूचित\n1.7 आनंदी दिवस वॉलपेपर सूचित\n1.8 खूप आनंद झाला चॉकलेट दिवस प्रतिमा खूप आनंद झाला चॉकलेट दिवस बाजारभाव खूप आनंद झाला दिवस प्रतिमा प्रस्तावित\n1.9 आनंदी दिवस वॉलपेपर प्राप्त मुक्त सूचित\n1.10 मैत्रीण दिवस प्रतिमा प्रस्तावित\n1.11 प्रियकर दिवस छायाचित्रे प्रस्तावित\n1.12 खूप आनंद झाला दिवस बाजारभाव प्रस्तावित खूप आनंद झाला गुलाब दिवस प्रतिमा आनंद झाला गुलाब दिवस बाजारभाव व्हॅलेंटाईन आठवड्यात दिवस सूची\n1.13 दिवस प्रेम छायाचित्रे प्रस्तावित\n1.14 आनंदी दिवस वॉलपेपर प्राप्त मुक्त सूचित\nखूप आनंद झाला दिवस प्रस्तावित 2018 प्रतिमा, चित्रांवर, वॉलपेपर, एसएमएस, संदेश\nदिवस प्रस्तावित दुसऱ्या दिवशी आहे व्हॅलेंटाईन्स आठवड्यात. सध्या मुले कदाचित सर्वात विशिष्ट पद्धतीने संभाव्य मध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्य सूचित. ही भेट आज पूर्णपणे मुले अभिप्रेत आहे, हे सर्व विश्व व्यापी जाताना वाटेत कोणीतरी प्रेमात आहोत कोण साजरा केला आहे. कदाचित सूचित सर्वात गोड पर्याय प्रत्येक आपल्या कुटुंबातील सदस्य आपल्या हृदय लपलेले भावना सांगत आहे.\nदिवस छायाचित्रे प्रस्तावित 2018, पूर्णपणे समाधानी जोडीदार दिवस वॉलपेपर सूचित, दिवस प्रेम छायाचित्रे सूचित, खूप आनंद झाला दिवस एचडी प्रतिमा प्रस्तावित, खूप आनंद झाला प्रस्तावित दिवस चित्रे प्राप्त, पूर्णपणे समाधानी FB दिवस चित्रांवर सूचित, पूर्णपणे समाधानी दिवस वॉलपेपर सूचित, पूर्णपणे समाधानी दिवस वॉलपेपर प्राप्त मुक्त सूचित, प्रियकर साठी दिवस प्रतिमा प्रस्तावित, मैत्रीण दिवस छायाचित्रे सूचित, दिवस प्रेम छायाचित्रे सूचित.\nया सर्व छायाचित्रे प्रयत्न करा आणि त्यांना पूर्णपणे समाधानी करण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्य त्यांना जहाज.\nदिवस छायाचित्रे प्रस्तावित 2018\nखूप आनंद झाला जोडीदार दिवस वॉलपेपर सूचित\nअतिरिक्त जाणून घ्या >>>\nदिवस प्रेम छायाचित्रे प्रस्तावित\nखूप आनंद झाला दिवस एचडी प्रतिमा प्रस्तावित\nखूप आनंद झाला प्रस्तावित दिवस चित्रे प्राप्त\nखूप आनंद झाला आहे FB दिवस चित्रांवर सूचित\nआनंदी दिवस वॉलपेपर सूचित\nआपल्याला आवडू शकते –>\nखूप आनंद झाला चॉकलेट दिवस प्रतिमा\nखूप आनंद झाला चॉकलेट दिवस बाजारभाव\nखूप आनंद झाला दिवस प्रतिमा प्रस्तावित\nआनंदी दिवस वॉलपेपर प्राप्त मुक्त सूचित\nदिवस प्रतिमा प्रस्तावित मैत्रीण\nप्रियकर दिवस छायाचित्रे प्रस्तावित\nआपल्याला आवडू शकते –>\nखूप आनंद झाला दिवस बाजारभाव प्रस्तावित\nखूप आनंद झाला गुलाब दिवस प्रतिमा\nआनंद झाला गुलाब दिवस बाजारभाव\nव्हॅलेंटाईन आठवड्यात दिवस सूची\nदिवस प्रेम छायाचित्रे प्रस्तावित\nआनंदी दिवस वॉलपेपर प्राप्त मुक्त सूचित\nआपण सर्व इच्छिता आनंदी दिवस प्रस्तावित. आपण आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना सर्व वेळ एकत्रितपणे असू शकते. हृदय सत्य व्हा, नाही, याचा अर्थ लाटणे. आपल्या कुटुंबातील सदस्यांना या जहाज. मी ते आपल्या प्रस्ताव ठरविणे अशी आशा आहे. आपण नशीब इच्छिता. खूप आनंद झाला प्रेमळ.\nआमच्या विविध सबमिट प्रयत्न करा\nखूप आनंद झाला दिवस कोट प्रस्तावित, गरजा आणि संदेश,\nखूप आनंद झाला चॉकलेट दिवस 2018 गरजा, कोट आणि संदेश.\nखूप आनंद झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे 2018 बाजारभाव\nखूप आनंद झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे वडिलांच्या कार्ड –…\nखूप आनंद झाला आहे दिवस प्रेम कार्ड…\nएक लांब आणि आनंदी संबंध कसे आहेत | खूप आनंद झाला…\nखूप आनंद झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे 2018 प्रतिमा, वॉलपेपर,…\n#50+ लवली शुभेच्छा व्हॅलेंटाईन्स डे 2017 प्रतिमा,…\nअद्यतनित: जानेवारी 21, 2018 — 3:23 दुपारी\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nई-मेल द्वारे पाठपुरावा टिप्पण्या मला सूचना द्या.\nईमेलद्वारे नवीन पोस्ट मला सूचना द्या.\nश्रेणी श्रेणी निवडा .सेट करा 1 {प्रणयरम्य} खूप आनंद झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे 12 'व्हॅलेंटाईन डे' 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे 'वॉलपेपर सर्व नेहमी तिच्या प्रेमात मी आहे विरोधी व्हॅलेंटाईन आठवडा विरोधी दिवस आहेत जोपर्यंत आपण मला backstreet मुलावर प्रेम म्हणून जोपर्यंत आपण मला backstreet मुले mp3 प्रेम म्हणून जोपर्यंत आपण मला जस्टीन Bieber प्रेम म्हणून वडील मानसशास्त्र आकर्षित पत्नीचे अप्रतिम कार्ड सोप्प एसएमएस बांगला माझा वेलेंटाइन हो सुंदर कार्ड कोट सुंदर गुलाब प्रतिमा प्रेम कोट सुंदर गुलाब एक संबंध चिंता सुरुवात सर्वोत्तम सर्वोत्तम चॉकलेट दिवस एसएमएस संदेश पहिल्या तारखेला मैत्रीण सर्वोत्तम भेट सर्वोत्तम कविता दिवस प्रस्तावित सर्वोत्तम प्रस्ताव कल्पना मैत्रीण सर्वोत्तम सोपे भेट हिंदी सर्वोत्तम 'व्हॅलेंटाईन डे' कोट सर्वोत्तम व्हॅलेंटाईन एसएमएस मैत्रीण सर्वोत्तम व्हॅलेंटाईन एसएमएस तिच्या साठी सर्वोत्तम दिवस कोट सर्वोत्तम दिवस होते पतीचे साठी कोट 2017 ब्लॉग तुटलेली मैत्री संदेश तुटलेली मैत्री प्रतिमा कोट्स आपण रडणे करा की तुटलेली मैत्री कोट WhatsApp तुटलेली मैत्री स्थिती टेडी बेअर खरेदी कार्ड पती कार्ड संकलन प्रियकर कार्ड चॉकलेट दिवस चॉकलेट दिवस 2018 चॉकलेट दिवस तारीख चॉकलेट दिवस हिंदी एसएमएस चॉकलेट दिवस प्रतिमा प्रेम चॉकलेट दिवस प्रतिमा चॉकलेट दिवस प्रतिमा एचडी प्रियकर चॉकलेट दिवस संदेश मैत्रीण चॉकलेट दिवस संदेश माझे प्रेम चॉकलेट दिवस संदेश चॉकलेट दिवस चित्र चॉकलेट दिवस कोट चॉकलेट दिवस बाजारभाव 2018 चॉकलेट दिवस प्रियकर साठी कोट चॉकलेट दिवस मैत्रीण कोट्स चॉकलेट दिवस प्रेम कोट्स चॉकलेट दिवस एसएमएस चॉकलेट दिवस एसएमएस 2018 चॉकलेट दिवस एसएमएस संदेश चॉकलेट दिवस एसएमएस संदेश 2016 प्रियकर चॉकलेट दिवस एसएमएस संदेश मैत्रीण चॉकलेट दिवस एसएमएस संदेश चॉकलेट दिवस वॉलपेपर cnblue प्रेम mp3 मोफत डाउनलोड संकलन संग्रह मैत्रीण सर्जनशील वाढदिवस भेटी तिच्या साठी सर्जनशील व्हॅलेंटाईन भेटी दिवस प्रस्तावित वर प्रस्तावित क्रिएटिव्ह मार्ग सुंदर मिठी दिवस तारीख चुंबन दिवस तारीख गुलाब दिवस तारीख एक माणूस डेटिंग 10 वर्षे जुन्या एक माणूस डेटिंग 15 वर्षे जुन्या एक माणूस डेटिंग 20 मला पेक्षा वर्षांनी मोठा एक माणूस डेटिंग 30 वर्षे जुन्या आपल्या 20s मध्ये एक वृद्ध माणूस डेटिंग दिवस जे वचन दिले आहे दिवशी आपल्या आदर्श भागीदार वर्णन अंतर संबंध संदेश करू शकत नाही टेडी बेअर प्रतिमा डाउनलोड एक संबंध लवकर पायऱ्यांमध्ये कसे कार्य करण्यासाठी प्रतिबद्धता अंगठी बोट प्रतिबद्धता अंगठी शैली पुरुष प्रतिबद्धता गोल कड्या प्रतिबद्धता गोल कड्या सोने प्रतिबद्धता गोल कड्या असं इंग्रजी प्रचंड फेसबुक कौटुंबिक प्रसिद्ध माता दिवस वचने उद्धृत वडील कोट पूर्वजांना फेब्रुवारी विशेष दिवस फेब्रुवारी विशेष दिवस फेब्रुवारी विशेष दिवस आवडणार्यांसाठी फेब्रुवारी विशेष दिवस यादी भावना घटस्फोट अंतिम आहे नंतर एक भागीदार ऑनलाइन शोधण्यासाठी जन्म तारीख करून जोडीदार शोधण्यासाठी जोडीदार फेसबुक शोधण्यासाठी लग्नाला भागीदार शोधण्याची योग्य माणूस कोट शोधत प्रथम संबंध टिपा वरवर विचार करणे प्रवास स्पर्श सिग्नल फ्लर्टिंग च्या साठी प्रियकर साठी boyfriends साठी कार्ड सहाध्यायी साठी पिता मैत्रीण Grilfriend साठी तिच्या साठी त्यांच्यासाठी पती आई साठी पालकांसाठी बहिणीची मेव्हणी साठी पुत्र पत्नी मोफत दिवस डोळे पृष्ठे फ्रेंच मुलगी मजेदार मुलगा नवीन संबंध काय मजा गोष्टी मजेदार मजेदार लग्न वचन दिले मजेदार उद्धट व्हॅलेंटाईन्स कार्ड मजेदार 'व्हॅलेंटाईन डे' हिंदी कोट्स मजेदार व्हॅलेंटाईन jojo meme मित्र मजेदार व्हॅलेंटाईन संदेश मजेदार व्हॅलेंटाईन्स कार्ड मित्र मजेदार दिवस कार्ड मजेदार दिवस Meme मजेदार दिवस मीमीज पत्नी मजेदार दिवस कोट तिच्या साठी मजेदार दिवस कोट भेटी जा एकेरी चांगला सुट्ट्या खूप आनंद झाला आनंदी चॉकलेट दिवस खूप आनंद झाला चॉकलेट दिवस 2017 खूप आनंद झाला चॉकलेट दिवस 2017 प्रतिमा आनंदी चॉकलेट दिवस 2018 खूप आनंद झाला चॉकलेट दिवस 2018 एचडी वॉलपेपर खूप आनंद झाला चॉकलेट दिवस 2018 प्रतिमा खूप आनंद झाला चॉकलेट दिवस सजीव केलेल्या GIF चित्रे खूप आनंद झाला चॉकलेट दिवस फेसबुक कव्हर फोटो खूप आनंद झाला चॉकलेट दिवस GIF प्रतिमा खूप आनंद झाला चॉकलेट दिवस प्रतिमा खूप आनंद झाला चॉकलेट दिवस संदेश आनंदी चॉकलेट दिवस चित्र खूप आनंद झाला चॉकलेट दिवस चित्रे आनंदी चॉकलेट दिवस कोट खूप आनंद झाला चॉकलेट दिवस कोट प्रेम 2018 इंग्रजी खूप आनंद झाला चॉकलेट दिवस कविता हिंदी खूप आनंद झाला चॉकलेट दिवस कविता आनंदी चॉकलेट दिवस एसएमएस खूप आनंद झाला चॉकलेट दिवस एसएमएस 2018 आनंदी चॉकलेट दिवस एसएमएस संदेश खूप आनंद झाला चॉकलेट दिवस वॉट्स डीपी खूप आनंद झाला चॉकलेट दिवस हार्दिक शुभेच्छा होळीच्या शुभेच्छा बाजारभाव / हिंदी भाषा मध्ये शुभेच्छा इंग्रजी होळीच्या शुभेच्छा एसएमएस संदेश शुभेच्छा हिंदी होळीच्या शुभेच्छा एसएमएस संदेश शुभेच्छा होळीच्या शुभेच्छा एसएमएस textMessages इंग्रजी इच्छा होळीच्या शुभेच्छा शुभेच्छा 2018 प्रतिमा होळीच्या शुभेच्छा शुभेच्छा 2018 कोट हिंदी मध्ये प्रतिमा होळीच्या शुभेच्छा इंग्रजी मध्ये शुभेच्छा होळीच्या शुभेच्छा हिंदी मध्ये शुभेच्छा आनंदी मिठी दिवस 2018 खूप आनंद झाला आहे Hug दिवस 2018 सजीव केलेल्या GIF वॉलपेपर खूप आनंद झाला आहे Hug दिवस 2018 कविता खूप आनंद झाला आहे Hug दिवस फेसबुक कव्हर फोटो खूप आनंद झाला आहे Hug दिवस GIF प्रतिमा आनंदी मिठी दिवस प्रतिमा खूप आनंद झाला आहे Hug दिवस संदेश हो आनंदी मिठी दिवस संदेश आनंदी मिठी दिवस फोटो आनंदी मिठी दिवस चित्र खूप आनंद झाला आहे Hug दिवस चित्रे आनंदी मिठी दिवस कोट खूप आनंद झाला आहे Hug दिवस एसएमएस खूप आनंद झाला आहे Hug दिवस वॉट्स डीपी खूप आनंद झाला आहे Hug दिवस शुभेच्छा धन्य, चुंबन दिवस 2018 सजीव केलेल्या GIF चित्रे खूप आनंद झाला आहे चुंबन दिवस फेसबुक कव्हर फोटो धन्य, चुंबन दिवस GIF प्रतिमा 2018 आनंदी चुंबन दिवस प्रतिमा धन्य, चुंबन दिवस शायरी 2018 धन्य, चुंबन दिवस वॉट्स डीपी घटस्फोट नंतर आनंदी जीवन खूप आनंद झाला माता दिवस मुलगी बाजारभाव खूप आनंद झाला माता दिवस पती पासून कोट खूप आनंद झाला माता दिवस मुला बाजारभाव आनंदी वचन दिले आहे दिवशी आनंदी वचन दिले आहे दिवशी 2018 खूप आनंद झाला वचन दिवस 2018 GIF प्रतिमा खूप आनंद झाला वचन दिवस 2018 कविता खूप आनंद झाला वचन दिवस सजीव केलेल्या GIF प्रतिमा खूप आनंद झाला वचन दिवस फेसबुक कव्हर आनंदी वचन दिले आहे दिवशी प्रतिमा खूप आनंद झाला वचन दिवस प्रतिमा आनंदी वचन दिले आहे दिवशी कोट आनंदी वचन दिवस प्रियकर साठी कोट आनंदी वचन दिले आहे दिवशी GF कोट आनंदी वचन दिले आहे दिवशी शायरी खूप आनंद झाला वचन दिवस कविता 2018 खूप आनंद झाला वचन दिवस वॉट्स डीपी खूप आनंद झाला वचन दिवस वॉट्स स्थिती खूप आनंद झाला दिवस प्रस्तावित खूप आनंद झाला दिवस प्रस्तावित 2017 प्रतिमा खूप आनंद झाला दिवस प्रस्तावित 2017 फोटो खूप आनंद झाला दिवस प्रस्तावित 2017 चित्र खूप आनंद झाला दिवस प्रस्तावित 2017 वॉलपेपर आनंदी दिवस मांडणे 2018 खूप आनंद झाला दिवस प्रस्तावित 2018 बाजारभाव खूप आनंद झाला दिवस प्रस्तावित 2018 शुभेच्छा खूप आनंद झाला दिवस Ecards प्रस्तावित खूप आनंद झाला दिवस GIF प्रतिमा प्रस्तावित खूप आनंद झाला दिवस ग्रीटिंग कार्ड्स प्रस्तावित खूप आनंद झाला दिवस एचडी प्रतिमा प्रस्तावित खूप आनंद झाला दिवस प्रतिमा प्रस्तावित आनंदी दिवस प्रतिमा मांडणे 2018 खूप आनंद झाला दिवस प्रतिमा प्रस्तावित 2018 डाउनलोड खूप आनंद झाला प्रस्तावित दिवस प्रतिमा एचडी खूप आनंद झाला दिवस संदेश प्रस्तावित खूप आनंद झाला दिवस फोटो प्रस्तावित खूप आनंद झाला दिवस चित्रांवर प्रस्तावित आनंदी FB दिवस चित्रांवर विचारायची खूप आनंद झाला प्रस्तावित दिवस चित्रे खूप आनंद झाला दिवस कविता प्रस्तावित खूप आनंद झाला दिवस बाजारभाव प्रस्तावित शुभेच्छा हिंदी मध्ये दिवस कविता प्रस्तावित आनंदी दिवस एसएमएस विचारायची खूप आनंद झाला दिवस एसएमएस प्रस्तावित & संदेश आनंदी प्रियकर दिवस एसएमएस विचारायची आनंदी मैत्रीण दिवस एसएमएस विचारायची खूप आनंद झाला प्रस्तावित दिवस वॉलपेपर खूप आनंद झाला प्रस्तावित दिवस वॉलपेपर आनंदी दिवस वॉलपेपर विचारायची 2018 आनंदी दिवस मोफत डाउनलोड वॉलपेपर विचारायची खूप आनंद झाला प्रस्तावित दिवस वॉट्स डीपी खूप आनंद झाला दिवस वॉट्स प्रोफाइल चित्रांवर प्रस्तावित प्रस्तावित खूप आनंद झाला दिवस वॉट्स स्थिती खूप आनंद झाला दिवस शुभेच्छा प्रस्तावित आनंदी संबंध दिवस आनंदी संबंध संदेश आनंदी संबंध सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे आनंदी संबंध प्रेम बद्दल कोट्स आनंदी दिवस गुलाब आनंदी दिवस गुलाब 2018 आनंद झाला गुलाब दिवस GIF प्रतिमा 2018 आनंदी दिवस प्रतिमा गुलाब खूप आनंद झाला गुलाब दिवस संदेश आनंद झाला गुलाब दिवस चित्रे 2018 आनंद झाला गुलाब दिवस बाजारभाव खूप आनंद झाला गुलाब दिवस कविता आनंद झाला गुलाब दिवस एसएमएस आनंदी दिवस वॉलपेपर गुलाब 2018 आनंद झाला गुलाब दिवस वॉट्स डीपी आनंद झाला गुलाब दिवस वॉट्स स्थिती आनंद झाला गुलाब दिवस शुभेच्छा आनंदी टेडी बेअर दिवस खूप आनंद झाला आहे मुलाचे खेळातील दिवस 2018 सजीव केलेल्या GIF चित्रे खूप आनंद झाला आहे मुलाचे खेळातील दिवस 2018 GIF प्रतिमा खूप आनंद झाला आहे मुलाचे खेळातील दिवस 2018 संदेश – एसएमएस खूप आनंद झाला आहे मुलाचे खेळातील दिवस 2018 बाजारभाव खूप आनंद झाला आहे मुलाचे खेळातील दिवस 2018 शुभेच्छा खूप आनंद झाला आहे मुलाचे खेळातील दिवस फेसबुक कव्हर सगळी गोची खूप आनंद झाला आहे मुलाचे खेळातील दिवस प्रतिमा खूप आनंद झाला आहे मुलाचे खेळातील दिवस संदेश खूप आनंद झाला आहे मुलाचे खेळातील दिवस चित्रे खूप आनंद झाला आहे मुलाचे खेळातील दिवस कविता खूप आनंद झाला आहे मुलाचे खेळातील दिवस बाजारभाव खूप आनंद झाला आहे मुलाचे खेळातील दिवस शायरी खूप आनंद झाला आहे मुलाचे खेळातील दिवस एसएमएस खूप आनंद झाला आहे मुलाचे खेळातील दिवस वॉट्स डीपी खूप आनंद झाला आहे मुलाचे खेळातील दिवस शुभेच्छा आनंदी 'व्हॅलेंटाईन डे आनंदी 'व्हॅलेंटाईन डे 2018 आनंदी 'व्हॅलेंटाईन डे प्रतिमा पत्नी खूप आनंद झाला दिवस संदेश आनंदी 'व्हॅलेंटाईन डे मित्र कोट्स आनंदी 'व्हॅलेंटाईन डे हिंदी कोट्स प्रियकर खूप आनंद झाला संदेश मैत्रीण खूप आनंद झाला संदेश पती व्हॅलेंटाईन संदेश खूप आनंद झाला आठवडा व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा Google व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा बाजारभाव प्रेमदिनाच्या हार्दिक शुभेच्छा खूप आनंद झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे खूप आनंद झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे 2016 खूप आनंद झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे 2017 प्रतिमा खूप आनंद झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे 2017 फोटो खूप आनंद झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे 2017 चित्र खूप आनंद झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे 2018 खूप आनंद झाला दिवस होते अॅपॉस्ट्रॉफी आनंदी दिवस कार्ड मैत्रीण खूप आनंद झाला दिवस होते कार्ड खूप आनंद झाला दिवस होते Clipart खूप आनंद झाला दिवस होते डोळे पृष्ठे आनंदी दिवस बाबा खूप आनंद झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे कल्पना खूप आनंद झाला दिवस होते प्रतिमा आनंदी दिवस प्रतिमा 2017 खूप आनंद झाला दिवस होते प्रतिमा 2018 खूप आनंद झाला दिवस संदेश आनंदी दिवस चित्रपट आनंदी दिवस माझे मित्र खूप आनंद झाला दिवस माझे प्रेम खूप आनंद झाला दिवस फोटो खूप आनंद झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे चित्रे खूप आनंद झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे चित्रे 2018 आनंदी दिवस png आनंदी दिवस कोट तिच्या आनंदी दिवस कोट त्याला आनंदी दिवस कोट माझे मित्र आनंदी दिवस कोट आनंदी दिवस पत्नी कोट खूप आनंद झाला दिवस होते म्हणाला आनंदी दिवस गाणे खूप आनंद झाला दिवस होते स्थिती खूप आनंद झाला दिवस वॉलपेपर खूप आनंद झाला दिवस होते वॉट्स डीपी खूप आनंद झाला दिवस होते वॉट्स स्थिती खूप आनंद झाला दिवस होते शुभेच्छा खूप आनंद झाला दिवस होते प्रेमात आनंदी दिवस. मुलगा मित्र कार्ड खूप आनंद झाला झाला प्रेम तिच्या साठी शुभेच्छा झाला संदेश आहे हिंदी मित्र होळी बाजारभाव कसे मी मला मुका एक मुलगी मिळेल आपण तो आपण प्रेम करतो कसे माहित कोणीतरी आपण प्रेम करतो तेव्हा तुला कसे माहित तुला कसे माहित तेव्हा आपल्या मध्ये प्रेम क्विझ पैसे नाते कसा परिणाम होतो एक माणूस तो प्रेम करतो एक स्त्री कसे वागले पाहिजे एक लढा नंतर एक मैत्रीण कसे दिलगीर आहोत कसे आपल्या मैत्रीण दिलगीर आहोत आणि तिला परत मिळविण्यासाठी कसे एक गोंडस प्रकारे एक मुलगी बाहेर विचारू कसे हायस्कूल मध्ये एक मुलगी बाहेर विचारू कसे WhatsApp वर एक मुलगी बाहेर विचारू ऑनलाइन एक मुलगी बाहेर विचारू कसे मजकूर एक मुलगी बाहेर विचारू कसे आपल्या मैत्रीण असल्याचे एक मुलगी बाहेर विचारू शाळेत एक मुलगा कसे आकर्षित करण्यासाठी न बोलता शाळेत एक मुलगा कसे आकर्षित करण्यासाठी कसे त्याला न बोलता एक मुलगा आकर्षित करण्यासाठी कामावर एक माणूस कसे आकर्षित करण्यासाठी शरीर भाषा एक माणूस कसे आकर्षित करण्यासाठी कसे पती आकर्षित करण्यासाठी भावनिक एखाद्याला आकर्षित करण्यासाठी बेड मध्ये एक मनुष्य कसे आकर्षित करण्यासाठी शारीरिक एखाद्याला आकर्षित करण्यासाठी एक मनुष्य तुम्हांला दुर्लक्ष कोण कसे आकर्षित करण्यासाठी त्यांना न बोलता अगं आकर्षित करण्यासाठी कसे आपल्या क्रश मुलगी कसे आकर्षित करण्यासाठी शाळेत आपल्या क्रश कसे आकर्षित करण्यासाठी कसे लांबचे नाते आनंद करण्यासाठी कसे पुन्हा एक संबंध आनंदी होण्यासाठी कसे संबंध टिपा आनंदी होण्यासाठी गुलाब विकत कसे एक संबंध पैसा समस्या सामोरे कसे नाते पैसे समस्या सामोरे कसे जोडीदार नाव कसे योग्य ऑनलाइन श्री कसे हायस्कूल मध्ये योग्य माणूस कसे योग्य माणूस क्विझ कसे लग्न योग्य माणूस कसे फ्रेंच चुंबन एक माणूस कसे एक मुलगा आपण विचारू मिळविण्यासाठी कसे परत आपल्याला आवडत एक मुलगा मिळविण्यासाठी कसे आपण क्विझ आवडत एक मुलगा मिळविण्यासाठी कसे चर्चा न करता एक मुलगी लक्ष मिळविण्यासाठी कसे परत आपल्याला आवडत एक मुलगी मिळविण्यासाठी कसे तिला परत लक्ष मिळविण्यासाठी कसे मजकूर माध्यमातून तिच्या लक्ष मिळविण्यासाठी कसे एकत्र हलवून तेव्हा आर्थिक हाताळण्यासाठी कसे आपल्या प्रियकर आनंदी संबंध कसे आहेत एक यशस्वी लांबचे नाते कसे कसे एक मुलगी चुंबन मान वर एक माणूस चुंबन कसे प्रथमच चुंबन कसे ओठ वर चुंबन कसे क्रमाक्रमाने चुंबन कसे व्हिडिओ कसा चुंबन शाळेत एक मुलगी प्रेम कसे करावे कसे एक मैत्रीण प्रेम करा आपल्या प्रियकर एक लांबचे नाते कसे राखण्यासाठी शाळेत आपण जसे एक मुलगी कसे कसे एक मुलगी विचारायची कसे आपल्या मैत्रीण करण्याचे योजिले आहे जे गुडघा कसे प्रपोज प्रथमच एक मुलगी कसे बोलावे ते प्रथमच चेहरा एक मुलगी कसे बोलावे ते फोनवर एक मुलगी कसे बोलावे ते कसे मजकूर एक मुलगी बोलू कसे मैत्रीण बोलणे Facebook वर मुली कसे बोलावे ते Snapchat वर मुली कसे बोलावे ते ऑनलाइन मुली बोलू मिठी दिवस मिठी दिवस 2018 मिठी दिवस 2018 प्रतिमा मिठी दिवस तारीख मिठी दिवस तारीख 2018 प्रेम मिठी दिवस प्रतिमा मिठी दिवस संदेश मिठी दिवस प्रियकर संदेश मिठी दिवस हो संदेश मिठी दिवस फोटो मिठी दिवस चित्र मिठी दिवस चित्रे मिठी दिवस बाजारभाव मी आदर्श भागीदार वर्णन आदर्श भागीदार निबंध आदर्श भागीदार अर्थ आदर्श भागीदार गुण आदर्श भागीदार क्विझ आदर्श भागीदार कोट प्रतिमा माहिती प्रेरणादायी कोट घटस्फोट नंतर जीवन चांगले आहे किशोरवयीन प्रेम वास्तव आहे तो हे Kay ज्वेलर्स लग्न रिंग ठेवते kiesza प्रेम काय आहे दिवस चुंबन दिवस चुंबन 2018 चुंबन दिवस 2018 तारीख चुंबन दिवस 2018 प्रतिमा दिवस प्रतिमा चुंबन दिवस प्रतिमा चुंबन 2018 चुंबन दिवस प्रतिमा एचडी दिवस संदेश चुंबन प्रियकर दिवस संदेश चुंबन मैत्रीण दिवस संदेश चुंबन पती दिवस संदेश चुंबन पत्नी दिवस संदेश चुंबन दिवस फोटो चुंबन दिवस चित्रांवर चुंबन दिवस कोट चुंबन चुंबन दिवस एसएमएस दिवस वॉलपेपर चुंबन मला माहीत आहे जीवन पुरुष घटस्फोट नंतर जीवन घटस्फोट मंच नंतर जीवन लांबचे नाते उपक्रम लांबचे नाते समस्या लांबचे नाते प्रश्न लांबचे नाते चाचणी लांब अंतर संबंध कोट लांब चिरस्थायी संबंध अर्थ लांब चिरस्थायी संबंध कोट लांब चिरस्थायी संबंध टिपा लग्नाला भागीदार शोधत गमावले मैत्री कोट आणि वचने प्रेम मैत्री आणि प्रेम जेन ऑस्टिन मैत्री आणि प्रेम मूव्ही ऑनलाइन मैत्री आणि प्रेम पुनरावलोकन मुलगी डाउनलोड प्रेम मुलगी खेळ प्रेम मुलगा मित्र प्रस्ताव प्रेम प्रेम कोट कविता प्रेम एसएमएस त्याच्यावर प्रेम आपण करा बेड मध्ये प्रेम माणूस आणि स्त्री स्त्री कोट प्रेम मराठी लग्न प्रस्ताव कल्पना लग्न प्रस्ताव ओळी लग्न प्रस्ताव कोट लग्न प्रस्ताव व्हिडिओ लग्न त्याला वस्तू देण्याचे वचन दिले लग्न बायबल मध्ये वस्तू देण्याचे वचन दिले मला meme संदेश आधुनिक लग्न वचन दिले पैसा आणि संबंध सल्ला पैसा आणि बायबल संबंध नाते कोट पैसे समस्या एक मित्र अर्थ पेक्षा अधिक मैत्री पेक्षा अधिक (2013) मैत्री कोट पेक्षा अधिक आईचा माता दिवस मुलगी कोट्स माता दिवस शब्द अवतरण माझे राष्ट्रीय चॉकलेट दिवस राष्ट्रीय मिठी दिवस राष्ट्रीय चुंबन दिवस तिच्या साठी नवीन संबंध सल्ला अगं नवीन संबंध टिपा न्यू यॉर्क व्हॅलेंटाईन डे 2018 रात्री नॉन धार्मिक लग्न वचन दिले होते नॉन पारंपारिक लग्न वचन दिले होते नर्स भेटी वर शांतपणे शारीरिक फ्लर्टिंग चिन्हे चित्र कविता कविता भेटी प्रिंट दिवस डोळे पृष्ठे वचन दिवस वचन दिवस 2018 वचन दिले आहे दिवशी तारीख वचन दिले आहे दिवशी तारीख 2018 कोट दिवशी प्रतिमा वचन दिवस संदेश वचन GF दिवस संदेश वचन वचन दिले आहे दिवशी संदेश वचन दिले आहे दिवशी फोटो वचन दिले आहे दिवशी चित्र वचन दिले आहे दिवस बाजारभाव दिवस शायरी वचन वचन दिले आहे दिवशी एसएमएस वचन दिले आहे दिवशी एसएमएस 2018 मित्र वचन दिवस एसएमएस हिंदी मध्ये दिवस एसएमएस वचन वचन दिले आहे दिवशी वॉलपेपर वचन कोट वचन अनामिका जोडप्यांना वचन रिंग पुरुष वचन रिंग एक मैत्रीण अर्थ वचन रिंग वचन रिंग Pandora वचन रिंग असं प्रस्ताव टिपा दिवस प्रस्तावित दिवस मांडणे 2015 दिवस मांडणे 2017 दिवस प्रस्तावित 2017 कार्ड दिवस प्रस्तावित 2017 तारीख दिवस मांडणे 2018 दिवस साजरा प्रस्तावित दिवस तारीख मांडणे दिवस हिंदी शायरी विचारायची दिवस प्रतिमा प्रस्तावित BF दिवस प्रतिमा प्रस्तावित प्रियकर दिवस संदेश विचारायची मैत्रीण दिवस संदेश विचारायची प्रस्तावित दिवस संदेश पती कोट्स दिवस चित्र प्रस्तावित प्रस्तावित दिवस चित्रे दिवस कोट मांडणे प्रियकर दिवस कोट विचारायची मैत्रीण दिवस कोट विचारायची पती दिवस कोट विचारायची दिवस शायरी मांडणे दिवस एसएमएस मांडणे प्रियकर दिवस एसएमएस विचारायची मैत्रीण दिवस एसएमएस विचारायची पती दिवस एसएमएस विचारायची हिंदी मध्ये दिवस एसएमएस विचारायची दिवस वॉलपेपर प्रस्तावित प्रस्तावित दिवस whatsapp स्थिती कोट एसएमएस इच्छा बाजारभाव एक चांगला मित्र मैत्री गमावण्याची कोट्स मित्र तोट्याचा आणि हलवून कोट्स वडील कोट तिच्या साठी बाजारभाव त्याला बाजारभाव कारण लाल गुलाब कोट अर्थ लाल गुलाब तारे अंतर्गत प्रणय मैत्रीण रोमँटिक वाढदिवस भेटी रोमँटिक संदेश पती रोमँटिक लग्न वचन दिले रंग अर्थ गुलाब गुलाब दिवस गुलाब दिवस 2018 गुलाब दिवस सजीव केलेल्या GIF प्रतिमा दिवस तारीख गुलाब गुलाब दिवस तारीख 2018 गुलाब दिवस फेसबुक कव्हर फोटो गुलाब दिवस हिंदी शायरी दिवस प्रतिमा गुलाब दिवस प्रतिमा गुलाब 2018 गुलाब दिवस प्रतिमा डाउनलोड गुलाब दिवस प्रतिमा गुलाब दिवस प्रतिमा 2018 कोट दिवशी प्रतिमा गुलाब दिवस अर्थ गुलाब दिवस संदेश गुलाब दिवस संदेश गुलाब गुलाब दिवस कविता दिवस कोट गुलाब हिंदी प्रियकर दिवस कोट गुलाब गुलाब दिवस पती बाजारभाव इंग्रजी पती दिवस कोट गुलाब हिंदी पती दिवस कोट गुलाब गुलाब दिवस एसएमएस दिवस वॉलपेपर गुलाब 2018 गुलाब दिवस Whatsapp प्रोफाइल चित्र दिवस शुभेच्छा गुलाब दिवस शुभेच्छा गुलाब 2018 प्रतिमा गुलाब गुलाब प्रतिमा hd प्रेम संदेश प्रतिमा गुलाब प्रेम कोट गुलाब गुलाब कोट गुलाब खरेदी दु: खी तुटलेली मैत्री कोट सेंट व्हॅलेंटाईन कथा म्हणू शुभेच्छा द्या शब्द जोडप्यांना आनंदी संबंध गुप्त कविता लहान प्रस्तावित दिवस कविता चिन्हे प्रेमात घसरण आहात महिलांची एकच अनुकरण अगं एकच अनुकरण एसएमएस मित्र एसएमएस मैत्रीण एसएमएस एसएमएस उर्दू काही विशेष फेब्रुवारी मध्ये प्रेमी विशेष दिवस विशेष प्रस्तावित दिवस एसएमएस 2018 पुरस्कृत एक लांबचे नाते सुरू एक माणूस एक नवीन संबंध सुरू येथे घटस्फोट नंतर सुरू 40 येथे घटस्फोट नंतर सुरू 50 स्थिती सूक्ष्म स्पर्श फ्लर्टिंग गोड प्रेम एसएमएस प्रिये गोष्टी मंद नवीन संबंध घेणे खेळातील Baer टेडी बेअर दिवस प्रेम कोट सह टेडी बेअर प्रतिमा खेळातील दिवस देतो मुलाचे खेळातील दिवस खेळातील दिवस 2018 खेळातील दिवस तारीख 2018 खेळातील दिवस प्रतिमा मुलाचे खेळातील दिवस प्रतिमा मुलाचे खेळातील दिवस संदेश प्रियकर खेळातील दिवस संदेश वागदत्त पुरुष साठी खेळातील दिवस संदेश मैत्रीण खेळातील दिवस संदेश खेळातील दिवस कोट किशोरवयीन प्रेम लेख किशोरवयीन नाते तथ्य की अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मैत्रीण विवेकी वाढदिवस भेटी ते वरच्या 10 एकेरी सर्व समावेशक रिसॉर्ट्स वरच्या 10 मैत्रीण वाढदिवस भेट टॉप टेन तिच्या साठी व्हॅलेंटाईन भेटी पारंपारिक लग्न वचन दिले Uncategorized अद्वितीय अद्वितीय वाढदिवस भेट मैत्रीण अद्वितीय भेटी मैत्रीण अद्वितीय लग्न प्रस्ताव वर प्रती एकेरी सुट्टीतील 30 सुट्टीतील hookups व्हॅलेंटाईन 'व्हॅलेंटाईन डे' 'व्हॅलेंटाईन डे' 2018 'व्हॅलेंटाईन डे' तारीख पत्रक 'व्हॅलेंटाईन डे' फेसबुक स्थिती 'व्हॅलेंटाईन डे' अन्न 'व्हॅलेंटाईन डे' HD वॉलपेपर 'व्हॅलेंटाईन डे' प्रतिमा 'व्हॅलेंटाईन डे' प्रतिमा 2018 'व्हॅलेंटाईन डे' यादी 'व्हॅलेंटाईन डे' यादी 2018 'व्हॅलेंटाईन डे' प्रियकर साठी संदेश 'व्हॅलेंटाईन डे' हो संदेश तिच्या साठी व्हॅलेंटाईन डे संदेश त्याला 'व्हॅलेंटाईन डे' संदेश 'व्हॅलेंटाईन डे' पती संदेश पत्नी व्हॅलेंटाईन डे संदेश 'व्हॅलेंटाईन डे' चित्रपट 'व्हॅलेंटाईन डे' फोटो 'व्हॅलेंटाईन डे' चित्रांवर 'व्हॅलेंटाईन डे' मित्र बाजारभाव 'व्हॅलेंटाईन डे' इंग्रजी मध्ये पती कोट 'व्हॅलेंटाईन डे' हिंदी मध्ये पती कोट 'व्हॅलेंटाईन डे' पाककृती 'व्हॅलेंटाईन डे' गाणे 'व्हॅलेंटाईन डे' वॉलपेपर 2018 'व्हॅलेंटाईन डे' वॉलपेपर डाउनलोड व्हॅलेंटाईन कल्पना प्रेम व्हॅलेंटाईन प्रतिमा इंग्रजी मध्ये प्रियकर व्हॅलेंटाईन संदेश हिंदी मध्ये प्रियकर व्हॅलेंटाईन संदेश मैत्रीण इंग्रजी व्हॅलेंटाईन संदेश हिंदी मध्ये मैत्रीण व्हॅलेंटाईन संदेश हिंदी मध्ये पती व्हॅलेंटाईन संदेश व्हॅलेंटाईन इंग्रजी पत्नी संदेश हिंदी मध्ये पत्नी व्हॅलेंटाईन संदेश व्हॅलेंटाईन पाककृती व्हॅलेंटाईन आठवड्यात व्हॅलेंटाईन आठवडा 2018 व्हॅलेंटाईन आठवड्यात दिवस व्हॅलेंटाईन आठवडा प्रतिमा व्हॅलेंटाईन आठवड्यात प्रतिमा डाउनलोड व्हॅलेंटाईन आठवड्यात यादी व्हॅलेंटाईन आठवडा यादी 2018 व्हॅलेंटाईन आठवड्यात यादी प्रतिमा व्हॅलेंटाईन पती शुभेच्छा व्हॅलेंटाईन पत्नी शुभेच्छा व्हॅलेंटाईन डे 2016 प्रतिमा व्हॅलेंटाईन डे 'साजरा बाबा व्हॅलेंटाईन डे डोळे पृष्ठे व्हॅलेंटाईन डे तथ्य व्हॅलेंटाईन डे भेटी व्हॅलेंटाईन डे भेटी कल्पना व्हॅलेंटाईन डे इतिहास व्हॅलेंटाईन डे प्रतिमा व्हॅलेंटाईन डे चित्रपट व्हॅलेंटाईन डे NYC व्हॅलेंटाईन डे रेस्टॉरंट्स NYC व्हॅलेंटाईन डे टिपा त्याला व्हॅलेंटाईन डे कल्पना व्हॅलेंटाईन्स दिवस व्हॅलेंटाईन्स डे 2016 दिवस 2016 एसएमएस दिवस 2017 कोट दिवस 2017 एसएमएस दिवस 2018 व्हॅलेंटाईन्स डे Alyce गीत दिवस कार्ड व्हॅलेंटाईन्स पिता दिवस कार्ड दिवस कार्ड मजेदार शिक्षकांसाठी दिवस clipart व्हॅलेंटाईन्स व्हॅलेंटाईन्स डे Clipart प्रतिमा डाउनलोड करण्यासाठी दिवस clipart व्हॅलेंटाईन्स प्रौढांसाठी दिवस डोळे पृष्ठे व्हॅलेंटाईन्स व्हॅलेंटाईन्स डे कलाकुसर व्हॅलेंटाईन्स डे कलाकुसर आयडिया दिवशी बाबा व्हॅलेंटाईन्स मैत्रीण दिवस Dards दिवस तारीख व्हॅलेंटाईन्स डे प्रियकर साठी Ecards व्हॅलेंटाईन्स डे फेसबुक कव्हर फोटो व्हॅलेंटाईन्स डे फेसबुक डीपी व्हॅलेंटाईन्स डे FB कव्हर फोटो दिवस खेळ व्हॅलेंटाईन्स व्हॅलेंटाईन्स डे GIF प्रतिमा व्हॅलेंटाईन्स डे भेटी व्हॅलेंटाईन्स डे ग्रीटिंग्ज व्हॅलेंटाईन्स डे ग्रीटिंग्ज संदेश व्हॅलेंटाईन्स डे कल्पना तिच्या साठी व्हॅलेंटाईन्स डे कल्पना व्हॅलेंटाईन्स डे प्रतिमा व्हॅलेंटाईन्स डे प्रतिमा 2017 दिवस प्रतिमा व्हॅलेंटाईन्स 2018 कोट सह दिवस प्रतिमा व्हॅलेंटाईन्स डे विनोद प्रौढांसाठी दिवस विनोद व्हॅलेंटाईन्स दिवस एक liners jokes दिवस कविता jokes व्हॅलेंटाईन्स डे प्रेम एसएमएस दिवस अर्थ व्हॅलेंटाईन्स व्हॅलेंटाईन्स डे मीमीज व्हॅलेंटाईन्स डे संदेश व्हॅलेंटाईन्स डे फोटो व्हॅलेंटाईन्स डे चित्र कोट wtih व्हॅलेंटाईन्स डे चित्रे व्हॅलेंटाईन्स डे कविता व्हॅलेंटाईन्स डे puns व्हॅलेंटाईन्स डे puns मित्र व्हॅलेंटाईन्स डे puns GF साठी व्हॅलेंटाईन्स डे puns आई साठी व्हॅलेंटाईन्स डे puns teaher साठी व्हॅलेंटाईन्स डे बाजारभाव मित्र दिवस कोट व्हॅलेंटाईन्स व्हॅलेंटाईन्स डे तिचे कोट त्याला दिवस कोट व्हॅलेंटाईन्स व्हॅलेंटाईन्स डे पती बाजारभाव दिवस मजेदार पती कोट्स व्हॅलेंटाईन्स डे हिंदी कोट व्हॅलेंटाईन्स डे कार्ड साठी म्हणाला व्हॅलेंटाईन्स डे शब्द व्हॅलेंटाईन्स डे कविता दिवस होते एसएमएस व्हॅलेंटाईन्स डे टिपा व्हॅलेंटाईन्स डे वॉलपेपर व्हॅलेंटाईन्स डे शुभेच्छा व्हॅलेंटाईन्स उप तिच्या साठी व्हॅलेंटाईन्स भेट कल्पना व्हॅलेंटाईन्स प्रेम व्हॅलेंटाईन्स आठवडा valentines.card वाट पाहत वॉलपेपर लग्न रिंग संच काय दिवस व्हॅलेंटाईन आहे काय एक वचन अंगठी दिसत नाही एक वचन रिंग एक प्रियकर याचा अर्थ काय आहे प्रेम सर्व काय आहे प्रेम haddaway काय आहे प्रेम म्हणजे काय आहे प्रेम meme काय आहे किशोरवयीन प्रेम काय असते व्हॅलेंटाईन डे 'काय आहे काय एक माणूस गंभीरपणे एक स्त्री प्रेम करते काय एक स्त्री खूप मनुष्य प्रेम करते आपल्या मैत्रीण प्रस्ताव तेव्हा काय म्हणायचे वॉट्स तेव्हा चुंबन दिवस आहे तेव्हा दिवस प्रस्तावित आहे 2017 तेव्हा एक मुलगी बाहेर विचारू योग्य वेळ आहे तेव्हा व्हॅलेंटाईन डे आहे गुलाब खरेदी कुठे आपण चुंबन तेव्हा आपल्या ओठ जेथे ठेवले फ्लर्टिंग तेव्हा एक स्त्री तेथे स्पर्श आज गुलाबाची दिवस आहे का का मी लैंगिक जुन्या लोकांना आकर्षित आहे का फेब्रुवारी 14 'व्हॅलेंटाईन डे' म्हणतात का फेब्रुवारी 14 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो 'व्हॅलेंटाईन डे' फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो का 14 नाम माझ्या मैत्रीण कोट असेल तू माझी प्रेयसी भेटी होईल तू माझी प्रेयसी संदेश असेल तू माझी प्रेयसी पोस्टर कल्पना असेल तू माझी प्रेयसी प्रस्ताव कोट असेल तू माझी प्रेयसी गाणे होईल तू माझी प्रेयसी मजकूर संदेश असेल y 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला जातो आपण आपण तरुण स्त्री वृद्ध माणूस डेटिंगचा साइट zales लग्न रिंग\nखूप आनंद झाला दिवस होते GIF प्रतिमा\nगुलाब दिवस पती शुभेच्छा\nगुलाब दिवस चांगला मित्र कोट\nगुलाब दिवस त्याला कोट\nगुलाब दिवस मराठी मध्ये बाजारभाव\nगुलाब दिवस पत्नी कोट\nव्हॅलेंटाईन्स डे कल्पना तिचे मैत्रीण , प्रियकर\nगुलाब लाल violets आहेत ब्लू Meme मजेदार विनोद आहेत & कविता संग्रह\nइंग्रजी लहान दिवस कविता & हिंदी भाषा\nचुंबन दिवस हो साठी कोट,पत्नी,नवरा, प्रियकर\nवॉट्स साठी गुलाब दिवस स्थिती , हिंदी फेसबुक & इंग्रजी\nमिठी दिवस 2018 हो साठी प्रतिमा, प्रियकर, पत्नी, नवरा\nहिंदी मध्ये सर्वोत्तम गुलाब दिवस बाजारभाव प्रियकर\nगुलाब दिवस बंगाली कोट शीर्ष यादी 2018\nसर्व वेळ सर्वोत्तम गुलाब दिवस हो साठी कोट (बिग यादी)\nगुलाब दिवस मोठ्या यादी प्रियकर साठी कोट\nगुलाब दिवस मोठ्या संकलन 2018 प्रतिमा\nगुलाब दिवस 2018 बाजारभाव ,संदेश,शुभेच्छा & ग्रीटिंग्ज\nदिवस © 2018 फ्रंटियर थीम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/news/dhyanimani-marathi-movie-trailer-release/17487", "date_download": "2018-04-24T06:44:00Z", "digest": "sha1:PK5OOFIRJQPOA4IM7HOPNSK46KKWA43R", "length": 24478, "nlines": 243, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Dhyanimani marathi movie Trailer release | Trailer release : आई-मुलाच्या नात्याला स्पर्श करणाºया ‘ध्यानी-मनी’ची पहा झलक | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nTrailer release : आई-मुलाच्या नात्याला स्पर्श करणाºया ‘ध्यानी-मनी’ची पहा झलक\nसध्या मराठी चित्रपटसृष्टीत नवीन प्रयोग करण्यास प्राधान्य दिले जात असून, नवीन आशयाला अधिक महत्त्व देण्याचा प्रत्येकवेळी प्रयत्न करण्यात येत आहे. असाच काहीसा प्रयोग प्रसिद्ध अभिनेता महेश मांजरेकर अभिनीत ‘ध्यानी-मनी’ या चित्रपटात करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.\nसध्या मराठी चित्रपटसृष्टीत नवीन प्रयोग करण्यास प्राधान्य दिले जात असून, नवीन आशयाला अधिक महत्त्व देण्याचा प्रत्येकवेळी प्रयत्न करण्यात येत आहे. असाच काहीसा प्रयोग प्रसिद्ध अभिनेता महेश मांजरेकर अभिनीत ‘ध्यानी-मनी’ या चित्रपटात करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलिज करण्यात आला असून, हा सिनेमा भावनिक आशयावर आधारित असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.\nदोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये महेश मांजरेकर आणि चित्रपटातील त्याची पत्नी अश्विनी भावे दिसत आहे. या दाम्पत्यांचा मोहित नावाचा मुलगा अचानक गायब होतो. मोहित आणि त्याची आई यांच्यातील नाते सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आईला आपला मुलगा कशाप्रकारे सर्व काही असतो, हे दाखिवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मोहित गायब झाला, की त्याचा मृत्यू झाला याचाच शोध संपूर्ण चित्रपटामध्ये घेतला जातो. हा चित्रपट पूर्णत: भावनिक विषयावर आधारित असल्याचे ट्रेलरमध्ये स्पष्टपणे बघावयास मिळत आहे.\nट्रेलरमधील दमदारपणा पाहता महेश मांजरेकर यांना दस्तुरखुद्द त्यांचा प्रिय मित्र सलमान खान याने सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटाची निर्मिती अनिरुद्ध देशपांडे आणि मेधा मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटात महेश मांजरेकर आणि अश्विनी भावे ही जोडी बºयाच काळानंतर प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. प्रसिद्ध समीक्षक तरण आदर्श यांनी नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले होते. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट पूर्णत: एका कुटुंबाभोवती फिरतोय. प्रशांत दळवी लिखित या कथानकात मृण्मयी देशपांडे आणि अभिजित खांडेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा १० फेब्रुवारी रोजी रिलिज होणार आहे.\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरे...\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या...\n​ भोजपुरी इंडस्ट्रीवर आम्रपाली दुबे...\nचित्रपटातील भूमिकेसाठी मला सुजयदांक...\nऋषिकेश जोशीच्या या फोटो मागचं गुपित...\nअस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गु...\nअस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गु...\nचिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम क...\nवंटास या चित्रपटाच्या ट्रेलरची सोशल...\nअक्षय तृतीयाच्या शुभमूहुर्तावर ‘Onc...\nअक्षय तृतीयाच्या शुभमूहुर्तावर बोनस...\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्...\n​'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये स्पृहा...\n​ऋत्विक केंद्र दिसणार 'सरगम' मध्ये\nसंगीत देवबाभळी नाटक पाहून भारावले न...\n​माधुरी दिक्षीतने केली सुमेध मदगलकर...\nरणांगण चित्रपटाचं आगळं – वेगळं पोस्...\nमाधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या...\n“सायकलच्या” प्रमोशनसाठी मुंबईत व्हि...\nहिंदी सिनेमात मुख्य भूमिकेत सोनाली...\nवैभव तत्ववादीला दादासाहेब फाळके सर्...\nबहुप्रतीक्षित ‘शिकारी’ चित्रपट लवकर...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/whos-keeping-a-check-on-their-eating-habits-the-indian-skippers-meal-to-beat-the-humidity-and-the-chefs-food-for-thought-while-preparing-the-meals-find-it-all-in-this-lunch-date-with-teamindi/", "date_download": "2018-04-24T06:31:53Z", "digest": "sha1:UIHDOSL74VMANQSN6Q3CREQFHL4TZVJ7", "length": 7703, "nlines": 106, "source_domain": "mahasports.co.in", "title": "श्रीलंका दौरा: भारतीय संघाचा श्रीलंकेतील लंचमधील खास मेनू - Maha Sports", "raw_content": "\nश्रीलंका दौरा: भारतीय संघाचा श्रीलंकेतील लंचमधील खास मेनू\nश्रीलंका दौरा: भारतीय संघाचा श्रीलंकेतील लंचमधील खास मेनू\nआजपासून भारत विरुद्ध श्रीलंका दौरा सुरु होत आहे. हा सामना गॉल मैदानावर होत आहे. खेळाबरोबरच या दौऱ्यात आपण भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटरवर काही हटके विडिओ पहिले आहेत.\nआजकाल चाहत्यांना खेळाडूंच्या प्रेस कॉन्फरेन्सपासून ते त्यांच्या ब्रेकफास्ट किंवा लंच बद्दल बरेच विडिओ किंवा माहिती ही अधिकृत सोशल अकाउंट्सवरून मिळते. काल असाच एक खास विडिओ भारतीय संघाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आला आहे.\nकोणत्याही दौऱ्याला प्रारंभ करण्यापूर्वी खेळाडूंच्या जेवणातील मेनूची यादी पाहुणा संघ यजमान संघाला आधीच पाठवत असतो. जेणेकरून त्याप्रमाणे त्याच नियोजन यजमान क्रिकेट बोर्ड करेल. ही पद्धत अगदी रणजी सामान्यांना देखील अवलंबली जाते.\nविशेषतः परदेश दौऱ्यात तुम्हाला फक्त १५ खेळाडू बरोबर घेऊन जावे लागत असल्यामुळे अन्नातून कोणतीही बाधा होऊ नये तसेच खेळाडू आजारी पडू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते. आजकाल खेळाडूसुद्धा आपल्या आहाराबद्दल विशेष काळजी घेताना दिसतात.\nयाचाच एक खास विडिओ जो काल शेअर करण्यात आला. पहिला सामना सुरु होण्यापूर्वी जेथे भारत सराव करत आहे तेथे हॉटेल ताज समुद्रमधून भारतीय संघासाठी खास जेवण मागवण्यात आले आहे. श्रीलंकेतील वातावरणाला अनुसरूनच हे जेवण बनवलं आहे. त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर चिकन करी सारख्या पदार्थांचा समावेश आहे.\nभारतीय संघातील उमेश यादव आणि विराट कोहली यांनी चिकन करी, हार्दिक पंड्या आणि वरिद्धिमान सहा यांनी डाळ आणि भात, रवींद्र जडेजा पारंपरिक श्रीलंकन सूप तर चेतेश्वर पुजारा नारळ पाणी पिताना या विडिओमध्ये दिसत आहे.\nश्रीलंका दौरा: हार्दिक पंड्याला मिळू शकते आज कसोटी पदार्पणाची संधी, विराटने दिले संकेत\nश्रीलंका दौरा: हार्दिक पंड्याच बालपणीच स्वप्न पूर्ण\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/!-19328/", "date_download": "2018-04-24T06:54:52Z", "digest": "sha1:3OIEV6G2RDZYPKRQZC7V5FI2RRIPFYBM", "length": 6745, "nlines": 149, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आठवणींची फुले...!-1", "raw_content": "\nAuthor Topic: आठवणींची फुले...\nअल्लड मी... अवखळ मी...होते स्वत:च्याच धुंदीत मी...\nज्याची नव्हती जाण मला...\nअशा प्रेमाच्या जगात घेऊन गेलास तू...\nआठवणींची फुले माझ्या ओंजळीत देऊन गेलास तू...\nगंध त्या फुलांचा आता नेहमीच दरवळत असतो...\nसगळं असतं सोबत, तू कुठेच नसतोस...\nनकळतच पण माझा श्वास होऊन गेलास तू...\nआठवणींची फुले माझ्या ओंजळीत देऊन गेलास तू...\nपायवाट ती नेहमीची चालत असते मी एकटीच...\nसाथ असते माझ्या सावलीची... तीही सूर्य मावळण्या पुरतीच...\nभास तुझ्या सहवासाचे मला देऊन गेलास तू...\nआठवणींची फुले माझ्या ओंजळीत देऊन गेलास तू...\nगुपित या नात्याचे न कळू दिले मी कुणास...\nजपून ठेवलयं ते प्रेम, माझ्या मनाच्या कोंदणात...\nकधीही न उलगडणारे एक रहस्य होऊन गेलास तू...\nआठवणींची फुले माझ्या ओंजळीत देऊन गेलास तू...\nडोळ्यांतून बरसणारा आसवांचा पाऊस... कशी मी आवरू...\nदूरावतो आहेस तू प्रत्येक क्षणाला...\nसांग ना, त्या क्षणांना कशी मी सावरू...\nएकांतात ओघळणारा अश्रू होऊन गेलास तू...\nआठवणींची फुले माझ्या ओंजळीत देऊन गेलास तू...\nचंद्र तो नभीचा, कधी भेटतो जेव्हा मला...\nयेते का रे त्याला आठवण माझी, की विसरला, विचारते मी त्याला...\nअनुत्तरीत चंद्रही, जणू त्यालाही तुझ्यात सामिल करून गेलास तू...\nआठवणींची फुले ओंजळीत माझ्या देऊन गेलास तू...\nस्वप्नांच्या जगात रमणारी मी... स्वप्नातच जगणारी मी...\nपरीकथेतील राजकुमाराची स्वप्न पाहणारी मी...\nस्वप्नातील त्या राजकुमाराचा चेहरा होऊन गेलास तू...\nआठवणींची फुले मात्र माझ्या ओंजळीत देऊन गेलास तू...\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nकधीही न उलगडणारे एक रहस्य होऊन गेलास तू...\nक्या बात .....अर्चनाजी मस्तच .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/hollywood/news/next-time-you-watch-harry-potter-watch-little-hermiones-lips-closely/18807", "date_download": "2018-04-24T07:06:10Z", "digest": "sha1:2IA57HNBYPM7VED33BLLDEEKDLXW7YSB", "length": 24451, "nlines": 231, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "next time you watch harry potter watch little hermiones lips closely | जर तुम्ही कधी ‘हॅरी पॉटर’ बघाल तर हरमायनीचे ओठ नक्की बघा ! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nजर तुम्ही कधी ‘हॅरी पॉटर’ बघाल तर हरमायनीचे ओठ नक्की बघा \n‘हॅरी पॉटर’ या सुपरहिट सिनेमांच्या सिरिजमधील हॅरी, रॉन आणि हरमायनी तुम्हाला आठवत असेलच. हॅरी पॉटरची भूमिका साकारणारा डेनियल रेडक्लिफ, रॉन वीसलीची भूमिका साकारणारा रूपर्ट ग्रिंट आणि हरमायनीच्या भूमिकेत असलेली एमा वॉटसन आता हॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांमध्ये ओळखले जात आहेत.\n‘हॅरी पॉटर’ या सुपरहिट सिनेमांच्या सिरिजमधील हॅरी, रॉन आणि हरमायनी तुम्हाला आठवत असेलच. हॅरी पॉटरची भूमिका साकारणारा डेनियल रेडक्लिफ, रॉन वीसलीची भूमिका साकारणारा रूपर्ट ग्रिंट आणि हरमायनीच्या भूमिकेत असलेली एमा वॉटसन आता हॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांमध्ये ओळखले जात आहेत. मात्र अशातही या सिनेमाची जादू तसूभरही कमी झालेली नाही. त्यामुळे तुम्हाला कधी या सीरिजचा ‘हॅरी पॉटर आणि पारस पत्थर’ हा पहिला सिनेमा बघण्याची संधी मिळाल्यास हरमायनीचे ओठ जरा काळजीपूर्वक बघा. तुमच्या लक्षात येईल की, शूटिंग दरम्यान हरमायनी म्हणजे एमा वॉटसन हॅरी आणि रॉनबरोबर त्यांचे डायलॉग बोलत आहे.\nएमा तिच्या आगामी ‘ब्यूटी अ‍ॅण्ड द बीस्ट’च्या प्रचारासाठी एबीसी चॅनेलच्या ‘जिमी किमेल’ लाइव्ह शोमध्ये पोहचली होती. तेव्हा तिला हॅरी पॉटर सीरिजच्या पहिल्या सिनेमाचे काही दृश्य दाखविण्यात आले. या दृश्यांमध्ये एमा तिचे सहकारी डेनियल आणि रूपर्टचे डायलॉग्स बोलताना दिसत आहे. ही क्लिप दाखविताना जिमीने म्हटले की, मला असे वाटतेय की, तुम्ही एमाच्या ओठांकडे लक्ष द्यायला हवे. ती आपल्याला याविषयी डिटेलमध्ये सांगणारच, परंतु तुम्ही अगोदर तिचा हा प्रताप काळजीपूर्वक बघाच. जेव्हा ही क्लिप दाखविण्यात आली, तेव्हा आम्हाला हसू आवरता आले नाही.\nएमाने या आठवणी सांगताना म्हटले की, तुम्हाला हसायला येते, परंतु माझ्यासाठी हे खूपच दुखदायक होते. क्रिस (दिग्दर्शक क्रिस कोलंबस) मला वारंवार सांगत होते, कट. एमा तू पुन्हा तेच करत आहेस, तू डॅनचे डायलॉग बोलत आहेस. क्रिसचे हे शब्द ऐकून मी त्याला माफी मागायची, परंतु स्वत:वर नियंत्रण ठेवणे मला अजिबात जमत नव्हते. माझ्या या चुकांमागे एकमेव कारण होते, ते म्हणजे मला हॅरी पॉटरचे सर्व पुस्तके खूपच आवडत असत. मी त्याचे वाचन केलेले असल्याने त्यातील लाइन अन् लाइन माझ्या मुखपाठ होती. त्यामुळे मी चांगले काम करणे हा एकच विचार करीत असे. मात्र कदाचित त्यात माझ्याकडून जरा जास्तच बोलले जात होते.\nएमाने केलेला हा खुलासा तिच्या फॅन्ससाठी नक्कीच मजेशीर ठरत असला, तरी त्यामागे तिची भावनाही समजण्यासारखीच आहे. आता हे सर्व कलाकार मोठे झाले असून, त्यांना पुन्हा या भूमिकेत प्रेक्षकांना बघणे जवळपास अशक्य आहे. परंतु तुम्ही जेव्हा केव्हा हॅरी पॉटर बघाल तेव्हा आवर्जून एमाच्या ओठांचे निरीक्षण करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की, या सिनेमात एमा काय प्रताप करीत आहे\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर...\nएक्समॅन ह्यू जॅकमॅनने केले चाहत्या...\n#MeToo : प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलास...\n‘हॅरी पॉटर’च्या चाहत्यांसाठी गुड न्...\nBox Office : या चित्रपटाने महिनाभरा...\nOscars 2018 : आॅस्कर सोहळ्यात ‘या’...\nOscars 2018 : आॅस्कर सोहळ्यापूर्वीच...\nकिम कर्दाशियांला भारतीयांच्या या दो...\nरॅम्बोच्या निधनाची अफवा पसरविणारे म...\nजेनिफर लॉरेंसच्या ‘रेड स्पॅरो’चा ट्...\nTime's Up : लैंगिक शोषणाविरोधात ‘या...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/g-n-deshpande-on-ntp/", "date_download": "2018-04-24T07:05:19Z", "digest": "sha1:XI7UXMHWR5S7R452QCKQOSONCFZZXTLK", "length": 11750, "nlines": 141, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "श्री देशपांडे यांचा प्रेमयात्रा - न्हाऊ तुझिया प्रेमेबद्दलचा अभिप्राय", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nHome / Marathi / श्री जी.एन्‌. .देशपांडे ( G N Deshpande )यांचा प्रेमयात्रा – न्हाऊ तुझिया प्रेमेबद्दलचा अभिप्राय\nश्री जी.एन्‌. .देशपांडे ( G N Deshpande )यांचा प्रेमयात्रा – न्हाऊ तुझिया प्रेमेबद्दलचा अभिप्राय\n॥ हरि ॐ ॥\nआपला २६ तारखेचा कार्यक्रम अगदी अप्रतिम होता. सहा तास कसे गेले कळलेही नाही. उकाडा, ऊन कशाचा काही त्रास होण्यासारखी अवस्था कधी आलीच नाही. कार्यक्रम सुरु होईपर्यंत बाहेरचे वातावरण थोडेसे गरम जाणवत होते. पण कार्यक्रम सुरु करुन देण्यासाठी परमपूज्य बापू गमंचावर आले आणि मग आजूबाजूला काहीच नव्हते. लोक नव्हते, स्टेडीयम नव्हते, ऊन नव्हते – काहीच नव्हते. सगळीकडे फक्त सद्‌गुरुच सद्‌गुरु भरुन राहिले होते. एक अनोखा आणि क्वचितच मिळणारा अनुभव होत तो. या अनुभवातून जाणे हेच भाग्य – महाभाग्य हा अनुभव आम्हाला द्यायल तुम्ही, तुमचे इतर सहकारी आणि जे कलाकार कारणीभूत झाले त्यांना धन्यवाद द्यायला माझ्याकडे शद्बच नाहीत. या अनुभवातून बाहेर यायची कुणाची इच्छाही नसेल. पण आम्ही अगदी पूर्णपणे अंबज्ञ आहोत हे निर्विवाद\nदादा, या संदर्भात एक विनंती करावीशी वाटते. तुम्ही दोन आठवड्यांपूर्वी हरिगुरुग्राममध्ये या कार्यक्रमाबद्दल बोलताना म्हणाला होतात कि यथावकाश या कार्यक्रमाची सीडी उपलब्ध होईल. खरे तर कार्यक्रम गायली गेलेली बरीच गाणी वेगवेगळ्या सीडींमध्ये उपलब्ध आहेतच. झालेल्या कार्यक्रमाची सीडी हवी आहे ती पुन्हा, पूर्णपणे नाही तरी, त्या अनुभवातून जाता यावे यासाठी. त्यामुळे जेव्हा केव्हा ही सीडी उपलब्ध होईल तेव्हा, कोणत्या ना कोणत्या कारणाने ज्यांना कार्यक्रमाला प्रत्यक्ष येता आले नाही त्यांना हे परमपूज्य बापूंचे वरदानच असेल, पण कार्यक्रम अनुभवलेल्यानांही ती अनमोल असेल. त्यामुळेच ती पूर्णपणे समजता यावी आणि मनात एक सलग अनुभव म्हणून रुजली जावी अशी माझी फार फार इच्छा आहे. त्यामुळेच या सीडीची एक वेगळी “Collectors’ edition” तयार केली जावी असे मला वाटते. या Collectors’ edition ची किंमत साधारण सीडीपेक्षा थोडी जास्त असायलाही हरकत नाही. पण या Collectors’ edition मध्ये सीडीबरोबर एक पुस्तिका असावी असे मला वाटते आहे. या पुस्तिकेत सर्व अभंगांचे मूळ शब्द देता येतील आणि आवश्यकतेनुसार काही ठिकाणी समजण्याच्या सोयीसाठी काही शब्दार्थ, काही टीपा देता येतील. सर्व किंवा काही अभंगांवर थोडी उपोद्धातासारखी माहिती देता येईल. मुख्य म्हणजे सर्व अभंगांच्या लेखकांचा थोडक्यात परिचय द्यावा असे मला वाटते. अभंग पूर्णपणे समजून घेणे ही तो तसाच्या तसा मनात रुजण्याची पहिली पायरी असेल असे मला स्वत:च्या अनुभवावरुन वाटते, म्हणून ही सूचनावजा विनंती करावीशी वाटली. पुस्तिका लिहिण्यासाठी हवी असेल ती कोणतीही मदत करायला मी कधीही तयार आहेच. कृपया विचार करावा.\nसर्व श्रद्धावानांसाठी आई जगदंबेचा आशीर्वाद\nभगवान त्रिविक्रम का स्वरूप\nअमळनेर येथील श्रीदत्तजयंती उत्सव – प्रथम दिन\nदेशपांडेंनी म्हटल्या प्रमाणे खरच कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि त्याची आठवण म्हणून CD निघायला हवी. त्यांची विनंती खूपच छान आहे, CD बरोबर पुस्तिका आणि त्यात अभंग आणि त्याची थोडक्यात माहिती. कृपया हि विनंती मान्य करावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-is-averaging-303-in-the-last-five-t20is-against-australia/", "date_download": "2018-04-24T06:42:28Z", "digest": "sha1:VWQRSWSCPN3EXBW6H6E4OIIFHY7G2K2H", "length": 7573, "nlines": 104, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराटची ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील ५ टी२० मधील सरासरी पाहून तुम्ही थक्क व्हाल ! - Maha Sports", "raw_content": "\nविराटची ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील ५ टी२० मधील सरासरी पाहून तुम्ही थक्क व्हाल \nविराटची ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील ५ टी२० मधील सरासरी पाहून तुम्ही थक्क व्हाल \nभारताचा कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवून देण्यात सिहांचा वाटा उचलला. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताला ६ षटकात ४८ धावा करायच्या होता. त्यातील २२ धावा एकट्या विराट कोहलीने केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. भारताकडून त्याने या सामन्यात सर्वाधिक धावा केल्या.\nविराट कोहली हा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूपैकी एक आहे. विराट एका फॉरमॅटमध्ये नाही तर सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करतो आणि भारताला विजयी पथावर नेतो. बाकी फॉरमॅटमध्ये कदाचित विराटपेक्षा स्मिथ किंवा रूट चांगले खेळत असतील पण टी२० मध्ये विराट कोहलीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. मागील दोन्ही टी२० विश्वचषकामध्ये विराट मालिकावीर होता, यावरून हे दिसून येते की विराटने या फॉरमॅटमध्ये नियमितपणे चांगला खेळ केला आहे.\nविराटने टी२० मध्ये ५१ सामन्यात ५४ च्या सरासरीने १८५२ धावा केल्या आहेत, ज्यात त्याने १७ अर्धशतके ही केली आहेत. आपल्या सर्वांनाच माहित आहे की विराट वनडेमध्ये श्रीलंके विरुद्ध चांगली कामगिरी करतो, पण टी२० मध्ये विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत.\nऑस्ट्रेलिया विरुद्ध विराटने १० सामने खेळले आहेत ज्यात त्याने ७० च्या सरासरीने ४४३ धावा केल्या आहेत ज्यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागील ५ टी२० सामन्यात त्याची सरासरी ३००ची आहे. त्यातील ३ सामन्यात त्याला सामनावीराचा किताब मिळाला आहे.\n1st T20india vs australiavirat kohliऑस्ट्रेलियाटी२०भारताचा कर्णधारविराट कोहलीसर्वोत्तम क्रिकेटपटू\nबॅलोन दोर पुरस्कारासाठी ३० नामांकित खेळाडूंची यादी जाहीर\nगुहाटीमध्ये रोहित शर्माने पारंपरिक पगडी घालण्यास दिला नकार \nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%2C_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87_-_%E0%A4%A6%E0%A4%BF.%E0%A5%A8%E0%A5%AA_%E0%A4%B5_%E0%A5%A8%E0%A5%AB_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE", "date_download": "2018-04-24T06:49:48Z", "digest": "sha1:A2MJQFMTYXGZZHN3IFGF7A5E6SIVXU25", "length": 13411, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा, पुणे - दि.२४ व २५ फेब्रुवारी २०१८ - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा, पुणे - दि.२४ व २५ फेब्रुवारी २०१८\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१ प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा, पुणे - दि.२४ व २५ फेब्रुवारी २०१८\n२ उपस्थित सदस्य:२४ फेब्रुवारी\n३ उपस्थित सदस्य:२५ फेब्रुवारी\nप्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा, पुणे - दि.२४ व २५ फेब्रुवारी २०१८[संपादन]\nसेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी संस्थेतर्फे दरवर्षी विविध भाषांसाठी अखिल भारतीय पातळीवर प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा - ट्रेन द ट्रेनर (TTT) आयोजित केली जाते. प्रत्येक भाषेसाठी २-३ संपादक निवडले जातात. यावर्षी अनेकांनी संपर्क करून तसेच चावडीवर निवेदन देऊन अशा प्रकारचे प्रशिक्षण महाराष्ट्रात घेण्याविषयी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे संस्थेने अशी कार्यशाळा दि.२४ व २५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे घेण्याचे योजले आहे. अधिक तपशील निवड झालेल्या सदस्यांना लवकरच कळविले जातील.\nही कार्यशाळा अनुभवी व सक्रीय संपादकांसाठी असून प्रशिक्षण विस्तारासाठी लागणारी विविध कौशल्ये विकसित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. इच्छुक सदस्यांनी subodhkiran@gmail.com वर विपत्र पाठवावे. तसेच खाली सदस्य नाव नोंदवावे. काही शंका अथवा स्पष्टीकरण हवे असल्यास जरूर संपर्क साधावा.\nया कार्यशाळेसाठीची नोंदणी आता थांबविण्यात आलेली आहे. निवड झालेल्या सदस्यांना पुढील तपशील लवकरच कळविले जातील. प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार\n--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:४७, २१ फेब्रुवारी २०१८ (IST)\nज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १७:०८, ८ फेब्रुवारी २०१८ (IST)\nकल्याणी कोतकर (चर्चा) १६:४४, १७ फेब्रुवारी २०१८ (IST)\nश्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी (चर्चा) १६:५६, १८ फेब्रुवारी २०१८ (IST)\nसुबोध पाठक (चर्चा) १५:०७, १२ फेब्रुवारी २०१८\nअरविंद धरेप्पा बगले ( चर्चा ) १३:५७, १३ फेब्रुवारी २०१८ (IST)\nसुवर्णा गोखले (चर्चा) १८:५२, १७ फेब्रुवारी २०१८ (IST)\nराजेंद्र प्रभुणे (चर्चा) Rajendra prabhune १६:३२, १७ फेब्रुवारी २०१८ (IST)\nउज्ज्वला संजय पवार (चर्चा)\nरोहिणी भगत (चर्चा) ११:२०, २० फेब्रुवारी २०१८ (IST)\nअनुराधा खंदारे (चर्चा) ११:२४, २० फेब्रुवारी २०१८ (IST)\n--Abhinavgarule (चर्चा) २३:५६, २० फेब्रुवारी २०१८ (IST)\n--सुबोध पाठक (चर्चा) १४:१२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\n--अरविंद धरेप्पा बगले(चर्चा) १४:४८, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\n--श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी १४:२२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\n--बाळकृष्ण माळी १४:२९, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\nज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १४:३२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\n--विवेक गिरिधारी (चर्चा) १४:३३, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\nरोहिणी भगत (चर्चा) १४:३९, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\n----सुवर्णा गोखले (चर्चा) १४:४६, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\n--Mohan Babhulgavkar (चर्चा) १४:४७, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\n--कल्याणी कोतकर (चर्चा) १४:५०, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\n--अनुराधा खंदारे (चर्चा) १४:५५, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\n--कैलास अंभुरे (चर्चा) १६:१२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\n--उज्ज्वला संजय पवार (चर्चा) १६:४२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\n--Pooja Jadhav (चर्चा) १६:४६, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\n--पोखरकर अनु (चर्चा) १६:४९, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\n--Sureshkhole (चर्चा) १६:५२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\n--Pushkar Ekbote (चर्चा) १६:५३, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\n--आर्या जोशी (चर्चा) १६:५३, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\nAishwarya Kulkarni 08 (चर्चा) १७:०४, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\nज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०९:३९, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)\nअरविंद धरेप्पा बगले (चर्चा) ०९:३९, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)\nPooja Jadhav (चर्चा) ०९:४०, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)\nपोखरकर अनु (चर्चा) ०९:४३, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)\nRajendra prabhune (चर्चा) ०९:४३, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)\nउज्ज्वला संजय पवार (चर्चा) १०:११, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)\nकैलास अंभुरे (चर्चा) १०:२८, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)\nMohan Babhulgavkar (चर्चा) १०:३०, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)\nकल्याणी कोतकर (चर्चा) १०:३३, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)\nसुवर्णा गोखले (चर्चा) ११:००, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)\nआर्या जोशी (चर्चा) ११:०६, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)\nPushkar Ekbote (चर्चा) १३:३१, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)\nअनुराधा खंदारे (चर्चा) १५:१६, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)\nAishwarya Kulkarni 08 (चर्चा) १६:१९, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)\nसुबोध पाठक (चर्चा) १६:२१, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)\nश्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी (चर्चा) १६:२१, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)\nअश्विन बैंदूर यांचे अनुभव\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१८ रोजी ११:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/news/kangana-ranaut-sister-rangoli-bashes-hrithik-roshan-on-twitter-again/25244", "date_download": "2018-04-24T06:50:21Z", "digest": "sha1:HQ6VN2WOETHLTANHNUDHUNJM6NDN4I27", "length": 25044, "nlines": 241, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Kangana Ranaut sister rangoli bashes hrithik roshan on twitter again | ​इथे पाहा, हृतिक रोशनने कंगना राणौतला पाठवलेल्या ईमेलचा स्क्रिनशॉट ! रंगोली पुन्हा बरसली!! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\n​इथे पाहा, हृतिक रोशनने कंगना राणौतला पाठवलेल्या ईमेलचा स्क्रिनशॉट \nकाल हृतिकने अडीच पानाचे स्टेटमेंट जारी करून कंगनाचे सगळे आरोप फेटाळून लावले. हृतिकच्या या स्टेटमेंटवर कंगना अद्याप काही बोललेली नाही. पण कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने मात्र यावरून हृतिकवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे.\nअभिनेत्री कंगना राणौतसोबतच्या कथित अफेअरच्या चर्चेवर हृतिक रोशनने पहिल्यांदा आपले तोंड उघडले आहे. काल हृतिकने अडीच पानाचे स्टेटमेंट जारी करून कंगनाचे सगळे आरोप फेटाळून लावले. मी कंगनाला कधीच खासगीत भेटलेलो नाही. ती असा दावा करत असेल तर ते खोटे आहे. तिच्या व माझ्या अफेअरचे पुरावे म्हणून जे फोटो दाखवले जात आहेत, ते सगळे फोटोशॉप्ड आहेत, असे हृतिकने या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.\nहृतिकच्या या स्टेटमेंटवर कंगना अद्याप काही बोललेली नाही. पण कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने मात्र यावरून हृतिकवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. केवळ हल्लाच नाही तर तिने हृतिकने कंगनाला पाठवलेला एक कथित ई-मेल सार्वजनिक केला आहे. ‘तू आणि मी सर्वसामान्य कपल्ससारखे नसूनआपले आयुष्य त्यांच्यापेक्षा वेगळे आहे,’असे हृतिकने कथितरित्या या मेलमध्ये म्हटले आहे.\n‘तुझ्या ई-मेल्सचा पूर पाहिला. मी तुला अजिबात दोष देणार नाही. मी थोडा बिझी होतो. त्यामुळे उत्तर देऊ शकलो नाही. आपले आयुष्य इतर कपल्सपेक्षा वेगळे आहे. काश, असे नसते. पण हेच वास्तव आहे. मी यातून बाहेर पडू शकेल, यासाठी माझी सोबत दे. जेणेकरून आपण एक नवी सुरुवात करू शकू, नव्या आठवणी निर्माण करू शकू. तुझा तो व्हिडिओ पाहिला. फारच टीजिंग होता. मला आणखी बघायचे होते. पण काही बोललो नाही. कारण तुझी प्रकृती ठीक नव्हती,’ असे या मेलमध्ये म्हटले आहे.\nया ईमेलचा स्क्रिनशॉट रंगोलीने शेअर केला आहे.‘ हा स्क्रिनशॉट कुठलेही गॉसिप्स उभे करण्यासाठी नाही. हे ईमेल्स लॅपटॉपवरून नाही तर आयपॅडवरून लिहलेआहेत, हे मला सांगायचेय. हृतिकने आपला लॅपटॉप फॉरेन्सिक इनव्हेस्टिगेशनसाठी दिलाय. आयपॅड दिलेला नाही. विचार करा का ’असे टिष्ट्वट रंगोलीने केले आहे. पुढचा वार करताना रंगोलीने कंगना व हृतिकचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ‘कंगनाने फोटोशॉप्ड फोटो पब्लिक केला,असा तुझा आरोपआहे. तू याच फोटोबद्दल बोलत असशील तर तो कुणी रिलीज केला, ठाऊक नाही.\nALSO READ : अखेर हृतिक रोशन बोलला कंगना राणौतच्या आरोपांना दिले ‘आॅफिशिअल’ उत्तर\nपण फोटोशॉप्डचा काय अर्थ आहे कंगनाच्या कमरेत हात टाकून उभा असलेला तू नाहीस का कंगनाच्या कमरेत हात टाकून उभा असलेला तू नाहीस का तू तिच्या कमरेत हात घालून तिचा कवटाळले आहेस. याऊलट कंगना अजिबात इंटरेस्टेड दिसत नाहीय,’ असे रंगोलीने लिहिले आहे.\nएकंदर काय तर हृतिक व कंगनाचीलढाईआता वेगळ्याच स्तराला पोहोचले आहे. आता पुढे काय होते, ते बघूच.\n​कंगना राणौत झाली ‘कंगाल’\n​कंगना राणौतची बहीण रंगोलीचा चढला प...\nबॉलिवूड सोडण्याच्या तयारीत तर नाही...\n​ कंगना राणौतला करण जोहरने केले साव...\n​कंगना राणौत होणार मावशी; बहीण रंगो...\n​ हृतिक रोशन जर्मनीत शोधतोय डिप्रे...\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्...\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या...\n​‘पद्मावत’वर भारी पडतोय महेशबाबूचा...\n'कलंक'नंतर म्युझिकल चित्रपटात दिसणा...\n​‘पल्लू लटके...’ गाण्यावर अशी थिरकल...\nअर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राच्या...\nलवकरच सनी लिओनी सुरु करणार आपल्या ब...\n‘बेगम खान’ वाचवणार का सिद्धार्थ मल्...\n​यशराज कंपूत होतेयं शाहरूखची वापसी;...\nSEE PICS : ​सलमान खान मैत्रीला जागल...\n​मिलिंद सोमण चढणार बोहल्यावर, बघा...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathiecards.com/ukhane/ukhane27.htm", "date_download": "2018-04-24T06:23:15Z", "digest": "sha1:3MAEMED6SC3ADL3B76TMNOMQSL22BZM6", "length": 5033, "nlines": 99, "source_domain": "marathiecards.com", "title": "पती, पत्निने घ्यावयाचे उखाणे, ukhane - Welcome to shreeyoginfo.com", "raw_content": "पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे\nपतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे\nपत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे\n५२० नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा\n------- रावांचे नाव आहे लाख रुपये तोळा\nपौर्णिमेच्या दिवशी प्रुथ्वीवर पडतो चंद्राचा प्रकाश\nग्रुहलक्ष्मी सहभाग्यलक्ष्मी येवो ------- रावांच्या घरात\n५२२ जीवनासाठी कला म्हणून कलेवर केली मात\nकलात्मक जीवन जगण्यासाठी ------- रावांच्या हाती दिला हात\n५२३ सूर छेडिता शब्द उमटले नवे\n-------- रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य मला हवे\n५२४ नभी उमटते सप्तरंगी इंद्रधनुष्य\n------- रावांचे नाव घेते त्यांना मिळो दीर्घायुष्य\n५२५ नवीन निघाल्या वाचून घ्यावा बोध\n------- रावांच्या जीवनात लागला सुखाचा शोध\n५२६ सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा\n------- रावांचा आणि माझा साता जन्मांचा जोडा\n५२७ जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा\n------- रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा\n५२८ लग्नानंतर प्रत्येक स्त्री होते जबाबदार\n------- राव माझे दिसतात फारच रुबाबदार\n५२९ राजहंस पक्षी खातो मोत्यांचा चारा\n------- रावांच्या संसारात नाही दुःखाचा वारा\n५३० काचेच्य़ा बशीत संत्र्याची फोड\n------- रावांचे बोल अम्रुताहूनी गोड\n५३१ चांदीच्या सुपात फणसाचे गरे\n------- राव दिसतात बरे, पण वागवतील तेव्हा खरे\n५३२ कौतुकी सासुसासरे, हौशी नणंद\n------- रावांचे नाव घेताना होतो खुप आनंद\n५३३ पाँलीस्टरचा कपडा कातरीने कापला\n------- रावांच्या जीवनात मला आनंद वाटला\n५३४ रोज माझ्या अंगणात रांगोळी सजते\n-------- रावांच्या डोळयात माझेच प्रतिबिंब दिसते\n५३५ विद्येचा नसावा आभिमान पैशाचा नसावा गर्व\n------- रावांचे नाव घेते ऐकत राहा सर्व\n५३६ भुंग्याच्या सहवासात विकसते कळी\n------- रावांच्या साक्षीने लिहिते सौभाग्याच्या ओळी\n५३७ असावे नेहमी हसतमुख बोलावे नेहमी गोड\n------- रावांच्या संसाराला ------- ची लाभली जोड\n५३८ मंगळ्सुत्राच्या दोन वाटया म्हणजे सासर माहेरचा संगम\n------- रावांच्या सहवासाने झाला सौभाग्याचा उगम\n५३९ बरेच दिवसांची आकांक्षा आज झाली साकार\n------- रावांनी केलाय माझा पत्नी म्हणून स्वीकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-vs-australia-this-will-be-indias-probable-playing-11-in-the-first-odi/", "date_download": "2018-04-24T06:25:49Z", "digest": "sha1:G4QIB3OIWWELM4VZFL6Z7KRXLJ6VVIAC", "length": 14357, "nlines": 117, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: पहिल्या वनडेत असा असेल संभाव्य भारतीय संघ ! - Maha Sports", "raw_content": "\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: पहिल्या वनडेत असा असेल संभाव्य भारतीय संघ \nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: पहिल्या वनडेत असा असेल संभाव्य भारतीय संघ \nभारताला श्रीलंका दौऱ्यात मिळालेल्या निर्भेळ यशानंतर, आता ऑस्ट्रलियाचा भारत दौरा १७ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया ५ वनडे सामने आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.\n२००९ पासून ऑस्ट्रेलियाने भारत एकही वनडे मालिका जिंकलेली नाही. बांगलादेश विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रलियाने १ सामना जिंकला आहे तर एक हरला आहे. त्याच बरोबर मिशेल स्टार्क, जॉश हेझलवूड आणि ऍरोन फिंच यासारख्या अनुभवी खेळाडूंची कमी ही संघाला जाणवणार आहे.\nतर दुसऱ्या बाजूला भारताचे दोन दिगज्ज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना ही मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे तर शिखर धवनला ३ सामन्यांसाठी सुट्टी देण्यात आली आहे.\nपाहुयात काय असेल पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ.\nसलामीवीर ( रोहित शर्मा आणि के एल राहुल )\nभारताची सलामीची जोडी आता तरी अफलातून फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहित शर्माने मागील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये २ अर्धशतके तर १ शतक लगावले होते. त्यामुळे त्याची सलामीची जागा तर नक्कीच निश्चित आहे. पण त्याचा जोडीदार शिखर धवन पहिल्या तीन सामन्यांना मुकणार आहे, त्यामुळे भारता पुढे मोठा प्रश्न असा आहे की त्याच्या जागे संधी कोणाला द्यायची.राहुलला सलामीला फलंदाजी करण्याच्याची जास्त संधी मिळाली नाही त्यामुळे त्याला संधी मिळू शकते. त्याच बरोबर पर्याय म्हणून अजिंक्य रहाणे सलामीला येऊ शकतो आणि तो ही फॉर्ममध्ये आहे. त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने ३ अर्धशतके तर १ शतक लगावले होते. पण त्याला श्रीलंका दौऱ्यात म्हणावी तशी संधी मिळाली नाही.\nमधली फळी (विराट कोहली, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी)\nविराटचा सध्याचा फॉर्म बघता तो किमान भारतासाठी अजून ५ वर्ष तरी नंबर ३ राहील असे दिसून येते. विराटने २००८ मध्ये याच श्रीलंकेतील दौऱ्यात आपले पदार्पण केले होते, आता त्या गोष्टीला ९ वर्ष झाले आहेत. तेव्हा एक युवा खेळाडू म्हणून श्रीलंकेत गेलेल्या विराट कोहली आता भारताचा सर्वोत्तम फलंदाज आणि कर्णधार म्हणून श्रीलंकेत गेला आहे. श्रीलंका संघ विराटला थोडा जास्तच आवडतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो ५व्या क्रमांकावर आहे.\nलोकेश राहुल या युवा खेळाडूने आतापर्यंत १४ एकदिवसीय सामने खेळे आहे ज्यात त्याने १ शतक आणि २ अर्धशकत लगावले आहे. २०१५ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध त्याने आपल्या पाहिल्या सामन्या खेळाला होता. त्यानंतर त्याला एकदिवसीय सामन्यात जास्त संधी देण्यात आली नव्हती.\nभारताचा दिग्गज फलंदाज आणि मागील एक वर्षांपासून फिनिशरचा रोल सोडून मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीकडून भारताला अपेक्षा असतील. मागील काही सामन्यात धोनी जरी फॉर्ममध्ये दिसला नसला तरी धोनी अजूनही एकहाती सामना फिरवू शकतो हे सर्वांना माहित आहे. श्रीलंके विरुद्धच्या दौऱ्यात तो एकदाही बाद झाला नव्हता.\nअष्टपैलू खेळाडू (हार्दिक पंड्या आणि केदार जाधव)\nविराट कोहली जेव्हा पासून कर्णधार झाला आहे तेव्हापासून या दोन खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पंड्या गोलंदाजीमध्ये प्रत्येक सामन्यात एक दोन विकेट्स मिळवतो व फलंदाजीमध्ये आल्याबरोबर मोठे फटके मारून धावगती वाढवतो. तर केदार ही त्याच्या सारखाच फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगले योगदान देत आहे. केदारची इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील शतकी खेळी अजून क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत आहे. केदारची कामगिरी श्रीलंकेत एवढी काही खास नव्हती पण तरी सुद्धा कर्णधार कोहलीला त्याच्यावर विश्वास आहे.\nफिरकी गोलंदाज (कुलदीप यादव आणि युझर्वेंद्र चहल)\nसध्या जगातील सर्वात चांगले फिरकी गोलंदाज भारतीय संघाकडे आहेत. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे ते दोन प्रतिभावान खेळाडू. यांना या ही मालिकेत विश्रांती देऊन अक्सर पटेल, युझर्वेंद्र चहल आणि कुलदीप यादव या नव्या दमाच्या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. जडेजा आणि अश्विन हे गेल्या काही एकदिवसीय मालिकेत मोठ्या प्रमाणावर चमक दाखवू शकले नसल्या कारणाने २०१९च्या विश्वचषकाला आपला विचार व्हावा असे जर सध्या स्थान दिलेल्या खेळाडूंना वाटत असेल तर त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल.\nवेगवान गोलंदाज (जसप्रीत बुमराह आणि महंमद शमी )\nयॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून भारतभर प्रसिद्ध झालेल्या जसप्रीत बुमरा आणि दुखापतीतून संघात पुनरागमन करत असलेल्या महंमद शमीवर संघाच्या वेगवान गोलंदाजीची भिस्त असेल. संघात आणखीन २ वेगवान गोलंदाज आहेत ते म्हणजे भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव. उमेशला कसोटी प्रमाणे वनडे मध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही तर भुवनेश्वरला जास्त संधीच मिळाली नाही.\nएफसी पुणे सिटी व प्रशिक्षक अँटोनिओ हब्बास यांच्यातील करार संपुष्टात\nपीव्ही सिंधू कोरिया ओपनच्या उपांत्यफेरीत\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/hollywood/news/oscar-winning-film-the-salesman-to-release-on-march-31-in-india/18766", "date_download": "2018-04-24T07:03:46Z", "digest": "sha1:UDN5Z4G6QQAV4S7MCUH3F7J2YZGPUQ4P", "length": 23761, "nlines": 232, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Oscar winning film The Salesman to release on march 31 in india | आॅस्कर विजेता ‘द सेल्समॅन’ सिनेमा भारतात ३१ मार्च रोजी होणार रिलीज | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nआॅस्कर विजेता ‘द सेल्समॅन’ सिनेमा भारतात ३१ मार्च रोजी होणार रिलीज\n​इराणी निर्माता असगर फरहदी याचा ‘द सेल्समॅन’ हा सिनेमा भारतात ३१ मार्च रोजी रिलीज केला जाणार आहे. सिनेमात तरानेह अलिदुस्ती आणि शाहब हौसॅनी यांच्या मुख्य भूमिका आहेत.\nइराणी निर्माता असगर फरहदी याचा ‘द सेल्समॅन’ हा सिनेमा भारतात ३१ मार्च रोजी रिलीज केला जाणार आहे. सिनेमात तरानेह अलिदुस्ती आणि शाहब हौसॅनी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाने बेस्ट फॉरेन कॅटेगिरीत आॅस्कर पटकावले असून, जगभरात या सिनेमाची प्रेक्षकांना अक्षरश: आतुरता लागलेली आहे.\n‘द सेल्समॅन’ला भारतात रिलीज करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सुनील दोषीने आयएएनएसशी बोलताना म्हटले की, भारतात चांगले सिनेमे घेऊन येणे हा आमचा फोकस आहे. ‘द सेल्समॅन’सोबत आमची सुरुवात खूपच चांगली झाली आहे. पुढच्या काळातदेखील आम्ही चांगले सिनेमे आणण्यासाठी उत्सुक आहोत, त्यामध्ये ‘मस्तंग’ आणि ‘विंटर स्लीप’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांचा सहभाग आहे. दरम्यान, या सिनेमाचे डिस्ट्रीब्यूशन पीव्हीआर करणार आहे.\n‘द सेल्समॅन’ या सिनेमाला सर्वात अगोदर २०१६ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखविण्यात आले होते. तिथे या सिनेमास बेस्ट स्क्रीनप्ले आणि हौसॅनी याला बेस्ट अभिनेता म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. शिवाय निर्माता असगर फरहादी यांना त्यांच्या २०११ मध्ये आलेल्या ‘अ‍ॅस्परेशन’ या सिनेमास गोल्डन ग्लोब अवॉर्ड आणि बेस्ट फॉरेन लॅँग्वेज सिनेमासाठी दोन अकॅडमी अवॉर्ड मिळाले होते. या सिनेमात लीला हातमी, पेमॅन मोआदी, शाहब हौसेनी, सरेह बेयत आणि सरिना फरहादी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.\nत्याचबरोबर या सिनेमास बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्येही बेस्ट फिल्मसाठी गोल्डन बियर आणि बेस्ट अ‍ॅक्टर, अ‍ॅक्ट्रेससाठी सिल्वर बियर अवॉर्ड मिळाले होते. गोल्डन बियर अवॉर्ड जिंकणारा हा पहिला इरानियन सिनेमा ठरला होता. शिवाय २०१२ मध्ये असगर फरहादी यांना टाइम्स मॅग्झीनच्या जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान दिले होते.\nएकंदरीत असगर फरहादी यांच्या सिनेमांचा प्रभाव अजूनही कायम असून, त्यांच्या ‘द सेल्समॅन’ने आॅस्करसारख्या प्रतिष्ठेच्या अवॉर्ड सोहळ्यात दबदबा निर्माण केला होता. या सिनेमास बेस्ट फॉरेन कॅटेगिरीसाठी गौरविण्यात आले होते. आता हा सिनेमा भारतात रिलीज केला जाणार असून, प्रेक्षक त्यास कशा पद्धतीने स्वीकारणार आहेत, हे बघणे मजेशीर ठरेल.\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरे...\n‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या तिसऱ्...\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या...\n​‘डीआयडी लिटिल मास्टर्स’मध्ये ‘लुंग...\n​ भोजपुरी इंडस्ट्रीवर आम्रपाली दुबे...\nऋषिकेश जोशीच्या या फोटो मागचं गुपित...\nअस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गु...\nअस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गु...\nचिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम क...\nवंटास या चित्रपटाच्या ट्रेलरची सोशल...\nअक्षय तृतीयाच्या शुभमूहुर्तावर ‘Onc...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://amrutmanthan.wordpress.com/tag/schedule-8/", "date_download": "2018-04-24T06:23:07Z", "digest": "sha1:MXVU6X7MJTMQ4SPUTBMDPKPZTDYZQF53", "length": 35720, "nlines": 250, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "Schedule 8 – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nसोमवार, 5 ऑक्टोबर 2015 रविवार, 16 जुलै 2017 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nजिनांनी पाकिस्तानच्या राष्ट्रभाषेसाठी उर्दूची शिफारस केली आणि भावनेच्या भरात ती तेव्हा स्वीकारली गेली. हा निर्णय झाल्यापासून पूर्व पाकिस्तान, सिंध, बलुचिस्तान, वायव्य-सरहद्द-प्रांत या भागात जो भाषिक संघर्ष पेटला, तो अजूनही चालूच आहे. याच संघर्षातून स्वातंत्र्यानंतर केवळ २४ वर्षात पाकिस्तानची भाषिक तत्वावर फाळणी झाली. या फाळणीच्या मुळाशी केवळ बांगला भाषिक आणि सांस्कृतिक अस्मिता असल्याने नव्या देशाचे नाव पूर्व पाकिस्तान न ठेवता देशाला बांगला हे भाषेचे/संस्कृतीचे नाव दिले गेले.\nएकच राष्ट्रभाषा असावी असा हट्ट धरून भारताचे विभाजनाची बीजे रोवण्याऐवजी सर्व भारतीय भाषांचा परस्पर-समन्वय वाढवून एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.\nराष्ट्रभाषेचे खूळ देशाच्या विभाजनाचे कारण ठरेल म्हणून ते खूळ सोडून आपला देश बहुभाषिक असल्याचे वास्तव मोकळेपणाने स्वीकारणे भारताच्या एकात्मतेसाठी आवश्यक आहे.\nहिंदीवाल्यांचे उघडे पडलेले दबावतंत्र (ले० वि० भि० कोलते)\nरविवार, 15 ऑगस्ट 2010 अमृतयात्री6 प्रतिक्रिया\n“…… हा युक्तिवाद म्हणजे हिंदी भाषिक गटाच्या बहुमताच्या जोरावर इतर सर्व भाषिकांवर हिंदी सक्तीने लादण्याचा प्रयत्न आहे, याचीही स्पष्ट कल्पना इतर भाषिकांना आली. त्यामुळे झाले काय की, एरवी हिंदीच्या बाजूने असणारे अन्यभाषिक सभासदही विरोधी पक्षाला जाऊन मिळाले. या व अशा भूमिकेमुळेच हिंदीला राष्ट्रभाषेचे स्थान गमवावे लागले आणि केवळ official language – कामकाजाची भाषा या बिरुदावर समाधान मानावे लागले.”\nमंगळवार, 13 एप्रिल 2010 सोमवार, 27 सप्टेंबर 2010 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nबॅंकिंग क्षेत्रामधील भाषाविषयक धोरणाकडे महाराष्ट्रात पूर्ण दुर्लक्ष (सुधारित लेख-२२.०५.२०१०)\nरविवार, 4 एप्रिल 2010 रविवार, 2 ऑक्टोबर 2011 अमृतयात्री21 प्रतिक्रिया\nग्राहकांना सक्षम व पारदर्शी पद्धतीने सेवा पुरविण्याच्या दृष्टीने इतर कुठल्याही उद्योगाप्रमाणे बँकांनीसुद्धा स्थानिक भाषा, संस्कृती, रीतिरिवाज इत्यादींचा अभ्यास करून लोकांशी संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताची राज्यघटना, भाषाविषयक धोरण आणि त्यासंबंधातील विविध कायदे यांच्या आधारावर रिझर्व्ह बॅंक वेळोवेळी सर्व अनुसूचित (शेड्यूल्ड) बॅंकांना मार्गदर्शनपर सूचना देत असते. परंतु रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शनपर तत्त्वांची अंमलबजावणी सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात होत असते आणि विशेषत: महाराष्ट्रात स्थानिक भाषेविषयीच्या नियमांची अंमलबजावणी फारशा गंभीरपणे केलेली आढळत नाही.\nहिंदी आणि मराठीचे महाभारत (ले० अब्दुल कादिर मुकादम, लोकसत्ता, १४ मार्च २०१०)\nरविवार, 14 मार्च 2010 रविवार, 14 मार्च 2010 अमृतयात्री3 प्रतिक्रिया\n“सलील कुलकर्णी यांच्या १५ नोव्हेंबरच्या लेखात हिंदी ही राष्ट्रभाषा नसून ती केंद्र सरकारच्या व्यवहाराची राजभाषा आहे आणि तरीही ती राष्ट्रभाषा असल्याचा आभास जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आल्याचे आग्रही प्रतिपादन करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रतिपादनाला पाठिंबा देणारी वाचकांची पत्रेही प्रसिद्ध झाली. कुलकर्णी यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज करून केंद्र सरकारकडून तसे कबुलीपत्रही मिळविले. याबरोबरच मराठी शिवाय इतर कुठल्याही भाषेला महाराष्ट्रात स्थान मिळणार नाही. तेव्हा अमराठी लोकांनी मराठी शिकले पाहिजे, असा आणखी एक मुद्दा या वादाला जोडण्यात आला आहे.”\nसोमवार, 25 जानेवारी 2010 मंगळवार, 4 जुलै 2017 अमृतयात्री13 प्रतिक्रिया\n’ – वाचकांच्या प्रतिक्रिया (दै० लोकसत्ता, २९ नोव्हें० २००९)\nमंगळवार, 15 डिसेंबर 2009 बुधवार, 16 डिसेंबर 2009 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\n“कायद्याने नेमून दिलेले आणि इतर राज्यभाषांना दिले जाणारे सर्व कायदेशीर अधिकार, मान, महत्त्व आमच्या मराठी भाषेला द्यायलाच पाहिजेत-त्याहून जास्त नको; पण किंचितही कमी नको. हे म्हणणं अयोग्य, बेकायदेशीर, अनैतिक म्हणता येईल का\nया संबंधी एक अभ्यासपूर्ण लेख १५ नोव्हेंबरच्या लोकमुद्रामध्ये सलील कुलकर्णी यांनी लिहिला होता. या लेखावर देशा-परदेशातून अनेक प्रतिक्रिया आल्या. जागेअभावी या सगळ्या प्रतिक्रिया छापता येणं तर अशक्यच आहे, पण सर्व पत्रलेखकांची नावंही छापणं अशक्य आहे. त्यामुळे काही निवडक प्रतिक्रियाच येथे देत आहोत. (लोकसत्ता, लोकमुद्रा, २९ नोव्हेंबर २००९)\nद्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित (प्रेषक: राजेश पालशेतकर – वाचकमित्र)\nमंगळवार, 1 डिसेंबर 2009 रविवार, 25 जून 2017 अमृतयात्री6 प्रतिक्रिया\nभारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विविध भाषांची भाषिक वर्चस्वासाठी साठमारी सुरू झाली होती. लोकसंख्येमुळे हिंदी भाषेला संसदेमध्ये इतरांहून अधिक सदस्यसंख्याबल लाभलं होतं. अशा वेळी पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री असलेले आणि देशाची राज्यघटना तयार करण्यात सिंहाचा वाटा असणारे डॉ० बाबासाहेब आंबेडकर यांनी पन्नासाहून अधिक वर्षांपूर्वी केलेला वास्तव्याचा अभ्यास आणि त्यावरून आराखडे बांधून दूरदृष्टीने केलेले भाकित किती अचूक ठरले हे आपण सर्वच पडताळून पाहू शकतो. त्यांच्या ह्या अचूक भविष्यकथनासाठी ज्योतिषशास्त्राचे ज्ञान नव्हे तर राज्यशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, कायदा, भाषाविज्ञान अशा विविध विषयांचा त्यांचा केवळ अभ्यासच नव्हे तर त्यांवरील प्रभुत्व हेच आधारभूत होते हे सहजच समजून चुकते.\n (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)\nरविवार, 15 नोव्हेंबर 2009 मंगळवार, 4 जुलै 2017 अमृतयात्री40 प्रतिक्रिया\n“मराठी भाषेला आणि मराठी माणसाला स्वत:च्या राज्यात न्याय्य अधिकाराचे व सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाला देशाच्या भाषिक धोरणांसंबंधीची कायदेशीर पार्श्वभूमी माहित असावी, या उद्देशाने मी हा लेख लिहीत आहे.\nभारताच्या घटनेमध्ये कुठल्याही भाषेचा उल्लेख ‘राष्ट्रभाषा’ असा केलेला नाही. उलट घटनेच्या अनुसूची-८ मधील सर्वच भाषा या राष्ट्रभाषेच्या दर्जाच्या मानल्या जाव्यात असा अप्रत्यक्ष संकेत दिला आहे.”\nहिंदीच्या वर्चस्वाविरुद्ध लढा (ले० आर० जगन्नाथन – डी०एन०ए०)\nशनिवार, 14 नोव्हेंबर 2009 अमृतयात्री3 प्रतिक्रिया\nस्वातंत्र्यपूर्व अखंड हिंदुस्थानची राष्ट्रभाषा म्हणून संस्कृताधारित हिंदी भाषा निवडली होती. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात संपूर्ण देशात हिंदीबद्दल राष्ट्रभाषा म्हणून ममत्वाची व आपुलकीची भावनाच होती. माझ्या ऐकीवाप्रमाणे अगदी मद्रास प्रांतातही काही हजार शाळांनी हिंदी विषय शिकवणे सुरू केले होते. पण स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी राजकारण्यांनी जेव्हा जबरदस्तीने हिंदीचे वर्चस्व गाजवणे सुरू केले तेव्हा इतर हिंदीतर भाषक राज्ये बिथरली. आपल्या भाषेची पीछेहाट करून आपल्या डोक्यावर हिंदी लादायचा हा प्रयत्न आहे; अशी त्यांची भावना झाली. आणि या भावनेमुळे निर्माण झालेल्या त्यांच्या प्रतिक्रियेमुळे दक्षिणी, बंगाली व इतर भाषाभिमानी राज्यांनी हिंदीला विरोध करून तिला राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्याची योजना हाणून पाडली.\nराज्यात सर्व भाषा खरोखरच सारख्या आहेत काय (मराठी अभ्यास केंद्राचे निवेदन)\nमंगळवार, 13 ऑक्टोबर 2009 गुरूवार, 26 नोव्हेंबर 2009 अमृतयात्री4 प्रतिक्रिया\nनिवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान हल्लीच पंतप्रधान मनमोहन सिंग व कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील मराठीविषयक आग्रही भूमिकेबद्दल केलेल्या दिशाभूल करणार्‍या विधानांचा प्रतिवाद करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राने प्रकाशित केलेले निवेदन.\n – एक गैरसमज आणि त्याचे मराठीवर अनिष्ट परिणाम\nमंगळवार, 21 जुलै 2009 मंगळवार, 17 नोव्हेंबर 2009 अमृतयात्री56 प्रतिक्रिया\nप्रस्तुत लेख या अनुदिनीवरून मागे घेतला असून त्याऐवजी याच विषयावरील लोकसत्तेत दिनांक १५ नोव्हेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झालेला ’हिंदी ही राष्ट्रभाषा एक चकवा ’ हा अधिक सविस्तर लेख या अनुदिनीवर प्रसिद्ध केला आहे. तो खालील दुव्यावर उपलब्ध आहे.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर\nराईट बंधूंच्या आधी विमानोड्डाण करणारा भारतीय \n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n\"हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही\" - केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nविचारमंथन - तिन्ही सांजा सखे मिळाल्या (प्रश्नकर्ता: सुशांत देवळेकर)\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A5%AB-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-24T06:30:43Z", "digest": "sha1:3A3CFLZ7Y6ZQEQSQKKJVA72S5XMP3AHV", "length": 5595, "nlines": 138, "source_domain": "www.marathimati.net", "title": "५ नोव्हेंबर | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: ५ नोव्हेंबर\n१८४३ : मराठी रंगभूमी दिन\n१९६२ : भारतात प्रथमच आणीबाणी जाहीर करण्यात आली.\n१९२९ : मुंबई–पुणे महामार्गावर विजेवर चालणार्‍या आगगाड्या सुरु झाल्या.\n१८७० : बाळू चित्तरंजन दास\n१९३२ : पक्षी वन्यजीवनविषयक ग्रंथकार मारुती चितमपल्ली\n१९९५ : पंतप्रधान यित्झॅक रॅबीन यांची एका धर्मवेड्या विद्यार्थ्याने मेळावा संपल्यावर गोळ्या झाडून हत्या\n१९१५ : फिरोजशहा मेहता\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, फिरोजशहा मेहता, बाळू चित्तरंजनदास, मराठी रंगभूमी दिन, मारुती चितमपल्ली, मृत्यू, यित्झॅक रॅबीन, ५ नोव्हेंबर on नोव्हेंबर 5, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/first-odi-hat-trick-by-an-indian-bowler/", "date_download": "2018-04-24T06:40:52Z", "digest": "sha1:5P67MIBLVDXTCEGCTPORALZRCPWC6O37", "length": 8821, "nlines": 111, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा: जेव्हा चेतन शर्माने घेतली होती हॅट्रिक; तेही ३ क्लीन बोल्ड ! - Maha Sports", "raw_content": "\nपहा: जेव्हा चेतन शर्माने घेतली होती हॅट्रिक; तेही ३ क्लीन बोल्ड \nपहा: जेव्हा चेतन शर्माने घेतली होती हॅट्रिक; तेही ३ क्लीन बोल्ड \n काल वनडेमध्ये हॅट्रिक घेणारा कुलदीप यादव हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कपिल देव आणि चेतन शर्मा यांनी हॅट्रिक घेतली आहे. कुलदीपची ही आंतरराष्ट्रीय वनडेमधील पहिली हॅट्रिक नाही, त्याने २०१४ साली स्कॉटलँड विरुद्ध अंडर-१९ वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट घेतली होती.\nयाबरोबरच चेतन शर्माच्या त्या खास हॅट्रिकचीही आठवण होणे ओघानेच आले. १९८६ मध्ये काही काळासाठी, चेतन शर्मा हा भारतातील सर्वात नावडत्या क्रिकेटपटू मधील एक होता, कारण १९८६ च्या ऑस्ट्रेलिया-आशिया कपच्या अंतिम सामन्यत त्याने शेवटच्या चेंडूत जावेद मियांदादकडून षटकार खाला होता आणि भारताने तो सामना हरला होता.\nपण, त्यानंतर त्याने दोन सनसनाट्या कामगिरीसह संघात पुनरागमन केले, त्यातील पहिली कामगिरी इंग्लंडमधील मालिकेत १६ बळी आणि दुसरी भारताच्या विश्वचषकच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित क्षणांपैकी एक आहे म्हणजेच विश्वचषकातील पहिली हॅट्रिक.\n१९८७ मध्ये भारताने चांगली कामगिरी करत विश्वचषकाची सुरुवात केली होती. जेव्हा भारतीय संघ साखळी फेरीतील अंतिम सामना खेळायला उतरला तेव्हा भारताची जागा उपांत्य सामन्यात निश्चित होती. सामना नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता आणि न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करत होता.\nदीपक पटेल यांच्या ४० आणि जॉन राइट यांच्या ३५ धावांच्या जोरावर न्यूझीलंड संघाची स्तिथी १८१-५ अशी होती. या टप्प्यावर चेतन शर्मा गोलंदाजीस आला. त्याने रदरफोर्ड, इयान स्मिथ आणि ईवान चॅटफिल्ड या तीन न्यूझीलंडच्या फलंदाजांना तीन चेंडूत बाद केले व तेही त्रिफळाचित.\nअसे करत तो जगातील तिसरा तर भारताचा पहिला गोलंदाज बनला ज्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅट्रिक घेतली होती. त्याच बरोबर विश्वचषकात हॅट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज बनला.\nन्यूझीलंडने २२१ धावा केल्या आणि भारताने सुनील गावसकरच्या ८८ चेंडूत १०३ आणि कृष्णा श्रीकांतच्या ५८ चेंडूत ७५ धावांच्या जोरावर सामना जिंकला. या सामन्याचा मानकरी शतकवीर सुनील गावस्कर आणि हॅट्रिक मॅन चेतन शर्मा हे दोघेही होते.\nपुण्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ४ वेगेवेगळ्या खेळांच्या ४ मोठ्या स्पर्धा\nमी प्रदर्शनीय सामन्यांसाठी सकाळी ६ वाजता झोपमोड करत नाही: नदाल\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-equals-sanath-jaysurya-s-record-to-score-28-hundred-in-international-odi/", "date_download": "2018-04-24T06:41:29Z", "digest": "sha1:7UMJMBQ47R34VR4SY4K7F2LII7P2GQ6J", "length": 6866, "nlines": 112, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराटची जयसूर्याच्या विक्रमाशी बरोबरी - Maha Sports", "raw_content": "\nविराटची जयसूर्याच्या विक्रमाशी बरोबरी\nविराटची जयसूर्याच्या विक्रमाशी बरोबरी\nनिर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून मात केली. त्याचबरोबर भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली.\nया सामन्यात सामनावीर ठरलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने आणखी एका विश्वविक्रमाला गवसणी घातली. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता विराट कोहली संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. काल विराटने एकदिवसीय सामन्यातील कारकिर्दीतील २८वे शतक झळकावले.\nश्रीलंकेचा महान अष्टपैलू सनथ जयसूर्याने ४४५ सामन्यांत २८ शतके केली आहे तर हीच कामगिरी करायला भारतीय कर्णधाराला १८९ सामने लागले आहे. हे सामने जयसूर्या पेक्षा २५६ने कमी आहेत.\nया यादीत कोहलीच्या पुढे आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे दोन खेळाडू आहेत. पॉन्टिंगच्या नावावर ३७५ सामन्यात ३० शतके तर सचिनच्या नावावर ४६३ सामन्यात ४९ शतके आहेत.\nभारत ऑगस्ट महिन्यात श्रीलंका संघाविरुद्ध ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत असून विराट कोहलीला पॉन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.\nएकदिवसीय सामन्यात सार्वधिक शतके करणारे खेळाडू\n४९ सचिन तेंडुलकर, सामने- ४६३\n३० रिकी पॉन्टिंग, सामने- ३७५\n२८ विराट कोहली, सामने- १८९\n२८ सनथ जयसूर्या, समाने- ४४५\n२५ हाशिम अमला, सामने- १५६\nआणि कर्णधार विराट कोहली सलग ५ सामन्यात नाणेफेक हरला\nविराट कोहलीने सचिनचा तो विक्रम मोडला\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A5%A8%E0%A5%AB-%E0%A4%AE%E0%A5%87/", "date_download": "2018-04-24T06:32:35Z", "digest": "sha1:CRLRGL7PLW5JLYBKLYYPLZK7FXMVTTS6", "length": 4940, "nlines": 135, "source_domain": "www.marathimati.net", "title": "२५ मे | मराठीमाती", "raw_content": "\n१९९८-शि. फ. परांजपे यांच्या काळ या साप्ताहिकाचा पहिला अंअक प्रसिध्द झाला.\n१९१५-महात्मा गांढी यांनी अहमदाबादजवळ साबरमती येथे आश्रमाची स्थाप्ना केली.\n१९३३-अंतराळ शंशोधक वसंतराव गोवारीकर यांचा जन्म.\n१८८६-रासबिहारी बोस यांचा जन्म.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, २५ मे on मे 25, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t17577/", "date_download": "2018-04-24T06:50:15Z", "digest": "sha1:YUSMYAMVKY5F5ZH7FHYXEC3YD53YEKME", "length": 6476, "nlines": 68, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-खरी भूक", "raw_content": "\nएका गरीबाच्या झोपडीत सायंकाळचे सात वाजले की एका छोट्याशा देवळीत एक रॉकेलच्या तेलाचा दिवा पेटतो.\nदिवसभर काबाड़ कष्ट करणारे, उन्हा तान्हात कधी भाकरीविना कधी पाण्याविना राब राब राबणारे ते दोन जीव त्या छोट्याशा दिव्याच्या मंद प्रकाशात विसावा घेतात. दिवसभर घामाने,मातीने माखलेले ते त्यांचे शरीर त्या झोपडीत दिव्याच्या प्रकाशात मंत्रमुग्ध होउन दगडाच्या भिंतीला टेका देऊन शांत पणे पडते.\nदिवसभर भर उन्हात लोखंडाच्या तिकासी,पहारीने दगड मातीचे काम करणाऱ्या त्या पोटाची भूक आपल्या पेक्षा न्यारीच. खरी भूक म्हणजे काय त्या पोटाला विचारावी \nदिवसभर AC च्या थंड्या हवेखाली व नरम गादीच्या खुर्चीखाली बसून चार वेळा चहा पिऊन दुपारचे भरपेट जेवण व मधेच मनात आले त्याची चव चाखणारे आपले पोट, जेंव्हा रात्री DINNER ला डाइनिंग टेबलवर बसतो, तेंव्हा मनाला एक प्रश्न पडतो आज आपण काय खायायचे अन् का खायायचे \nकारण ज्या पोटाला भूक या शब्दाचा अर्थच कळत नाही ते पोट फक्त DINNER या नावासाठी पोटात काहीतरी घालण्याचा प्रयत्न करतो. दहा दहा ट्यूब लाइट असणाऱ्या त्या घरातल्या वेक्तीला काय माहीत अंधार म्हणजे काय खरतर त्या वेक्तीचे घर कितीही प्रकाशमय असले तरी त्यांच्या जीवनात अंधारच असतो. व त्या अंधाराला डावलन्यासाठी तो सतत पळत असतो खरा प्रकाश शोधायला, खरे जीवन शोधायला \nत्या झोपडीतील ते दोन जीव मात्र आपली पोटाची आग विझवन्यासाठी चुलीत लाकडे टाकून आग लावतात व त्याच्यात आपल्या पोटाला विसावा देणारे अन्न, वरण भात बनवून जर्मनच्या ताटात आनंदात वरपतात. आणि रात्रीचे 8: 30/9: 00 वाजता आपल्या झोपडीचे ते तुटके मूटके कवाड (दरवाजा )बंद करून ठिगळ्याच्या गोदड्यावर निवांत झोपतात शांतपणे बिना पंखा बिना AC अगदी गाढ झोपी गेलेले ते दोन जीव. आणि त्या देवळीतला दिवा अगदी शांतपणे डोलत डोलत त्यांना प्रकाश देत राहतो \nइकडे आलीशान घरामध्ये AC च्या थंडगार हवेत नरम आलीशान बेडवर मात्र दुसऱ्या दोन जीवाला झोप येत नव्हती .\nरात्रीचे बारा वाजले होते तरी यांचे डोळे उघडेच होते. हे दोघे उद्याचा विचार करत होती, जो दिवस अजून उजेडलाच नाही.\nदोघापैकी एक मधेच बोललं \" डार्लिंग तुला काय वाटते उद्या कोणत्या कंपनीचे शेअर विकत घ्यावे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2018-04-24T06:48:47Z", "digest": "sha1:OZ45GGZGY4XIDZD5GKXGTDZZE2FMOB2F", "length": 11120, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया चर्चा:विकिपीडिया आशियाई महिना २०१७ - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया चर्चा:विकिपीडिया आशियाई महिना २०१७\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविकिपीडिया आशियाई महिना २०१७ संबंधीत प्रश्न खाली नोंदवे --Tiven2240 १४:२९, १ नोव्हेंबर २०१७ (IST)\n१ हॅरी पॉटर अॅन्ड द डेथली हॅलोज - भाग १ (चित्रपट)\n२ हे लेख चालणार नही\n३ प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव्स हा लेख परत सदर केला आहे\nहॅरी पॉटर अॅन्ड द डेथली हॅलोज - भाग १ (चित्रपट)[संपादन]\n@Koolkrazy: ह्यांनी विकिपीडिया आशियाई महिना २०१७ साठी हॅरी पॉटर अॅन्ड द डेथली हॅलोज - भाग १ (चित्रपट) लेखाचे योगदान सादर केले आहे जे @Tiven2240: ह्यांनी स्वीकार केले आहे. लक्ष वेधु इच्छीतो की ह्या लेखातील अधिकतर माहिती हॅरी पॉटर अॅन्ड द डेथली हॅलोज (चित्रपट) ह्या लेखात होतीच. \"सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा\" ह्या अटी साठी हा आधीपासुन असलेला मजकुर सोडुन उरलेल्या मजकुराचे मोजमाप होउन हा लेख स्वीकार आहे का धर्माध्यक्ष (चर्चा) १०:०९, १७ नोव्हेंबर २०१७ (IST)\n@Dharmadhyaksha: मी पहिले हॅरी पॉटर अॅन्ड द डेथली हॅलोज (चित्रपट) हा लेख बनवला, नंतर त्याला, हॅरी पॉटर अॅन्ड द डेथली हॅलोज - भाग १ (चित्रपट) लेखात टाकले, जर आपला विरोध असेल, तर मी माघर घेतो. --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला\n हे माझ्या लक्षात नही आले की दोन्ही लेख तुम्हीच लिहिले आहेत. माफ करा धर्माध्यक्ष (चर्चा) १०:४०, १७ नोव्हेंबर २०१७ (IST)\nहे लेख चालणार नही[संपादन]\n@Tiven2240: आपल्या लक्ष्यात आणू इच्छीतो कि ह्या स्पर्धेत आशियाई लेख हवे आहेत. बाकी कही नियमांमध्ये पण काही लेख बसत नही.\nहॅरी पॉटर अॅन्ड द डेथली हॅलोज - भाग १ (चित्रपट) - ब्रिटिश-अमेरिकेचा चित्रपट @Koolkrazy:\nग्रँड बुद्ध, लिंगशान - फक्त ९५ शब्द (किमान ३०० हवे) @संदेश हिवाळे:\nम्युनिच हत्याकांड - जर्मनीतील घडामोडी (माझाचं लेख)\nलुफ्तान्सा ६१५चे अपहरण - अनेक यूरोपी देशातील घडामोडी (माझाचं लेख)\nTiven, आपणास विनंती आहे की निष्काळजीपणे लेख तपासू नए. पुढे जर कुणी मराठी विकिपीडिया बाहेरील सदस्यावे लक्ष गेले तर ते लज्जास्पद होईल. नामांकन सादरकर्त्यांनी ह्याची नोंद घ्यावी जेणे करून आणखी लेख बनवायचे असतील तर ते लवकर बनवावे. स्पर्धा ३० नोव्हेंबरला संपणार आहे. Tiven, आपण त्वरीत उरलेले लेख तपासावे व कोणाचे चार लेख मान्य होत नसल्यास त्यांना कळवावे म्हणजे ते नवे लेख बनवू शकतील. धर्माध्यक्ष (चर्चा) १६:३०, २८ नोव्हेंबर २०१७ (IST)\nमी ग्रँड बुद्ध, लिंगशान ऐवजी दुसरा लेख निर्माण करतो.\n--संदेश हिवाळेचर्चा १६:५०, २८ नोव्हेंबर २०१७ (IST)\n@Dharmadhyaksha: नोंद घेतली आहे. संघाचे जे लेख मान्य केले आहे ते तात्पुरता मान्य केले आहे. २०१८ पर्यंत त्याचे मूल्यांकन करण्यास वेळ आहे.सद्या काही दिवसांनी मला वेळ भेटले नाही तर जे अंतिम निर्णय आहे ते इव्हेंट संपण्याच्या काही दिवसानंतर येणार. जर काही सदस्यांना आपले लेख सदर करायचे असेल तर यांच्यासाठी थांबायचे आहे. संदेश यांचे इतर लेखावर ते सद्या काम करत आहेत. ३० तारिक पर्यंत आपण थांबुया व अंतिम निर्णय देऊया.\nतुमच्या संदेश नंतर मी आज रात्र जे लेख सदर केले आहेत त्याचे मूल्यांकन करेल व उद्यापर्यंत त्यांच्या चर्चापानास संदेश देणार. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:५८, २८ नोव्हेंबर २०१७ (IST)\nप्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव्स हा लेख परत सदर केला आहे[संपादन]\nप्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव्स हा लेख ३०० हून कमी शब्द असल्यामुळे नाकारण्यात आला होता. त्यात मी शब्दात वाढ करून तो परत जमा केला आहे. कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद Abhilash Mhaisne (चर्चा) १८:४३, २९ नोव्हेंबर २०१७ (IST)\n@Dharmadhyaksha:@Abhilash Mhaisne:@संदेश हिवाळे: मी स्वतः आशियाई महिन्याला योगदान दिले आहे. जर माझे लेख मी स्वतः मूल्यांकन करेल तर काही तक्रार आहे का. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:०१, ३० नोव्हेंबर २०१७ (IST)\nतुम्ही स्वतः मुल्यांकन करू शकता, माझी काही तक्रार नाही.\n--संदेश हिवाळेचर्चा १०:४९, १ डिसेंबर २०१७ (IST)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ फेब्रुवारी २०१८ रोजी ०९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://saangatyeaika.blogspot.com/2015/04/blog-post_8.html", "date_download": "2018-04-24T06:20:19Z", "digest": "sha1:TLD3YUN2XLWO5TLQFCIBQOJFZVCUH5VK", "length": 9451, "nlines": 201, "source_domain": "saangatyeaika.blogspot.com", "title": "सांगत्ये ऐका...: इमॅजिनेशन अप्लाइड : भाग २", "raw_content": "\nइमॅजिनेशन अप्लाइड : भाग २\nया भागात न्यू यॉर्क सिटी आणि आसपास असलेल्या ऐतिहासिक इमारतींच्या प्रतिकृतींची प्रकाशचित्र आहेत.\nओलाना आणि मॉन्टगमरी पॅलेस\nबे यार्ड कन्डिक्ट बिल्डिंग\nक्रायस्लर बिल्डिंग आणि इतर स्कायस्क्रेपर्स\nजे एफ के एयरपोर्ट\nकाही जवळून घेतलेली छायाचित्र\nएक डॉक्युमेंटरी : ट्रेझर्स ऑफ न्यु यॉर्क\nद्वारा पोस्ट केलेले तृप्ती\nलेबले: . फोटु, . भटकंती, . मुलखावेगळी\nलाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी\nधर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी\n. इकडचं तिकडचं (20)\n. एक होती चिऊ (7)\n. मराठी पुस्तकं (2)\n. लेमनांसाठी हस्तकला (4)\n. वडाची साल पिंपळाला (5)\n. शिंडीबाय इन अमेरिका (2)\n. सगे सोयरे (5)\n. सामाजिक उपक्रम (4)\n. हसतील त्याचे दात दिसतील (1)\nजाणवले ते . . .\nकिआ ओरा न्यु झीलंड\nगीत रामायण, गदिमा आणि शेक्सपिअर\n‘द शेप ऑफ वॉटर’\nअकाली मोठेपण आलेली 'लिटील डॉटर'\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nशमा - ए - महफ़िल\nसिनेमा आणि संस्कृती:भाग-४ मुस्लिम सोशल्स\nदेवाणघेवाण: एल्विस प्रिस्ले टू पास्कल बाॅलिवूड\nवाचाळ प्रकाश बाळ आणि त्यांचा उतरता काळ\nसुगरण आईच्या साध्या,सोप्प्या पण चविष्ट पाककृती\nग्रीनवॉशिंग व ग्राहकांची जागरूकता\nसुवर्णकाळाची स्वप्न दाखवणारं कांस्य पदक\nही माझ्याकडील पुस्तकांची यादी. ह्यातली जवळ जवळ सगळीच पुस्तकं आवडती आहेत, (माझ्या मते) वाचनीय आहेत. ~ ललित ~ भावगंध :...\nमाझ्या चुलत आजी बद्दल थोडंसं. माझ्या वडिलांची काकू म्हणून ती आमची 'काकूआजी'. 'काकूआजी' मूळची सांगलीची. शिक्षणासाठी पुण्याला...\nजिंजरब्रेडपासून बनवलेले घर म्हणजे जिंजरब्रेड हाउस. फोटो प्रकाशित करायला घेतले तेव्हा जिंजरब्रेडविषयी थोडी शोधाशोध केली. आले, मध आणि काकवी ...\nइमॅजिनेशन अप्लाइड : भाग ३\nया भागात काही जगभरातल्या प्रसिद्ध इमारती आहेत आणि नंतर पॉल बसी आणि त्यांच्या टीमनं बनवलेले काही नमुने. आर्क द त्रिओम्फ, फ्रान्स ओसाका,...\n. स्नॉव्हेल: ऐकु आनंदे\n. आईला उद्योजिका व्हायचंय\n. आईला शाळेत जायचंय\n. इंटरनेटवरील महिला विश्व\n. आपले मराठी अलंकार\n. मायबोली दिवाळी अंक\nइमॅजिनेशन अप्लाइड : भाग ३\nइमॅजिनेशन अप्लाइड : भाग २\nइमॅजिनेशन अप्लाइड : भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/happy-birthday-dada-sourav-ganguly/", "date_download": "2018-04-24T06:36:13Z", "digest": "sha1:CSGI5UCHL77YC5ABCPO4ZK55TYSLTPAC", "length": 7257, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय क्रिकेटचा दादा... - Maha Sports", "raw_content": "\nभारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा आज वाढदिवस. जगातल्या आक्रमक कर्णधारपैकी गांगुली हा एक होता. खऱ्या अर्थाने भारतीय संघाला परदेशात जिंकण्याचा विश्वास निर्माण केला तो याच अवलीयाने. २००२ सालची इंग्लंड विरुध्द नटवेस्ट सिरीज जिंकल्यानंतर गांगुलीने ज्या पद्धतीने शर्ट काडून विजय साजरा केला होता तो क्षण आजही करोडो चाहत्यांच्या स्मरणात आहेे. गांगुलीला निवृत्त होऊन आता ९ वर्ष उलटत आलीत पण आजही गांगुली भारतीय क्रिकेटशी ह्या ना त्या कारणाने जोडलेला आहे.\nभारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारताकडून १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. भारताकडून १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारा गांगुली हा आठवा भारतीय खेळाडू आहे. गांगुली भारताकडून ३०० पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळलेला चौथा खेळाडू आहे .भारताच्या क्रिकेट इतिहासात एकदिवसीय सामन्यात सचिननंतर सर्वाधिक धावा गांगुलीच्या नावावर आहेत. त्याने ११३ कसोटी सामन्यात १५शतके आणि ३११ एकदिवसीय सामन्यांतली २२ शतके ठोकली आहेत. एकदिवसीय सामन्यांत १०,००० धावा काढणारा गांगुली जगातील सातवा तर भारतातला दुसरा फलंदाज आहे.\nगांगुलीने २०००-२००५ सालांदरम्यान ४९ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे कर्णधारपदी होता. ४९ सामन्यामधून २१ सामन्यांत भारताला गांगुलीने आपल्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत विजय मिळवुन दिलेत. २००३ च्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाचा धुरा हा गांगुलीच्या हाथी होता. या विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती.\nअशा या दादा खेळाडूला ४५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n– सचिन आमुणेकर (टीम महा स्पोर्टस )\nजेव्हा गांगुलीने ‘वॉटरबॉय’ बनण्यास दिला होता नकार…\nब्लाॅग: सामना जिंकण्याच्या नादात त्याचे आयुष्यही कुरतडले जाऊ नये\nब्लाॅग: सुनीत, तुला पुन्हा जिंकताना पाहायचेय…\nब्लाॅग: स्मिथ, तो खरंच तू आहेस का\nBlog: कोलकाता टेस्ट: अनेकांच्या लॅपटॉपमध्ये कायमची सेव्ह झालेली ती एक इनिंग\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t20223/", "date_download": "2018-04-24T06:53:37Z", "digest": "sha1:Y77L6PLBDHSHRXW3CTOZERIQLFBAADAK", "length": 2768, "nlines": 56, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आयुष्याच्या किनारयावर सोडून गेल", "raw_content": "\nआयुष्याच्या किनारयावर सोडून गेल\nAuthor Topic: आयुष्याच्या किनारयावर सोडून गेल (Read 1018 times)\nआयुष्याच्या किनारयावर सोडून गेल\nआयुष्यात नकळत तुझ्या Entry ने माझ्या मनात खळबळ माजली होती...\nमाझ्या प्रत्येक आसंव तुझ्या कडे पाहून चक्क लाजली होती...\nतुझ्यावर जिवापाड प्रेम करायच धाडस माझ्या मनान केल...\nते शेवटच्या टप्प्यावर न्हेउन ठेवायच काम तुझ्या Ego ने केल...\nतुला कधी जमलच नाही माझ्या प्रेमळ मनाला ओळखायला...\nम्हणून की का्य पावसान माझ प्रेम जाणून बुजून वाहून नेंल...\nपरत मला आयुष्याच्या किनारयावर सोडून गेल...\nआयुष्याच्या किनारयावर सोडून गेल\nआयुष्याच्या किनारयावर सोडून गेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/surinder-nada-may-equal-anup-kumar-and-rahul-chaudhary-s-record/", "date_download": "2018-04-24T06:40:32Z", "digest": "sha1:KPN52WMOSHKNZTXF6R2FNARZQ4ZKM4O7", "length": 6833, "nlines": 104, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सुरिंदर नाडा जाणार अनुप कुमार, राहुल चौधरीच्या या कर्णधारांच्या यादीत - Maha Sports", "raw_content": "\nसुरिंदर नाडा जाणार अनुप कुमार, राहुल चौधरीच्या या कर्णधारांच्या यादीत\nसुरिंदर नाडा जाणार अनुप कुमार, राहुल चौधरीच्या या कर्णधारांच्या यादीत\nप्रो कबड्डीमध्ये काल हरयाणा स्टीलर्स आणि तमील थालयइवाज यांचा सामना २५-२५ असा बरोबरीत सुटला. याच बरोबर प्रो कबड्डीमध्ये खेळलेल्या सर्व संघ बरोबरीत सुटलेल्या सामन्याचा भाग बनले आहेत. तमील थालयइवा, यु.पी.योद्धा, हरयाणा स्टीलर्स आणि गुजरात फॉरचूनजायन्टस या सर्व नवीन संघाचे सामने बरोबरीत सुटले आहेत.\nया मोसमात हरियाणा स्टीलर्स संघाने २ सामने बरोबरीत सोडवले आहेत. एका मोसमात सर्वाधिक ३ सामने बरोबरीत सुटले आहेत. पहिल्या मोसमात यु मुंबा आणि तेलुगू टायटन्स या दोन संघानी प्रत्येकी सामने बरोबरीत सोडवले होते. दुसऱ्या मोसमात देखील तेलुगू टायटन्सने ३ सामने बरोबरीत सोडवले आहेत. या मोसमात जर हरयाणा संघाने आणखी एक सामना बरोबरीत सोडवला तर हरियाणा संघ यु.मुंबा आणि तेलुगू टायटन्सच्या विक्रमाची बरोबरी करेल.\nसुरिंदर नाडाच्या हरयाणा स्टीलर्सने जर आणखी एक सामना बरोबरीत सोडवला तर सुरिंदर हा अनुप कुमार, राहुल चौधरी या कर्णधारांच्या नंतर एका मोसमात तीन सामने बरोबरीत सोडवणारा तिसरा कर्णधार बनेल.\nप्रो कबड्डीच्या इतिहासात आज पर्यंत १९ सामने बरोबरीत सुटले आहेत. त्यातील १३ सामने हे ऑगस्ट या महिन्यातच बरोबरीत सुटले आहेत.\nअनुप कुमारगुजरात फॉरचूनजायन्टसतमील थालयइवातमील थालयइवाजप्रो कबड्डीबरोबरीतयु.पी.योद्धाराहुल चौधरी\nएक आगळा वेगळा विक्रम तेलगू टायटन्सच्या नावावर\nक्रिकेटच्या जन्मदात्या देशात होतेय प्रथमच डे नाइट कसोटी\nएका मोठ्या कबड्डी प्रशिक्षकाची गच्छंती\nबोकडासाठी प्रभादेवीत घुमला कबड्डी… कबड्डीचा आवाज\nआयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम\nमुंबईमध्ये वाळूवरील कबड्डीचा थरार बुधवारपासून\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/news/kalki-koechlin-in-short-film-naked/18757", "date_download": "2018-04-24T06:51:26Z", "digest": "sha1:HUW5QQIGIKB4PK3VW55DU2S54KJA3NQD", "length": 22868, "nlines": 245, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Kalki Koechlin in short film Naked | ‘नेकेड’मध्ये कल्की कोच्लिन | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nबॉलिवूड अभिनेत्री कल्की कोच्लिन ही नेकेड या लघुपटात काम करीत आहे. यामध्ये ती एका सँडी नावाच्या अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे.\nबॉलिवूड अभिनेत्री कल्की कोच्लिन ही नेकेड या लघुपटात काम करीत आहे. यामध्ये ती एका सँडी नावाच्या अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे.\nसँडीच्या एका चित्रपटातील सेक्सी सीन लीक होतो आणि सर्वत्र व्हायरल होतो. पत्रकार रिया ही तिची या दृष्यासंदर्भात मुलाखत घेते. ‘पुरूषांनी तुला नग्न रुपात पाहिले आहे, आता ते तुला पुढील चित्रपटात स्वीकारतील का अशा आशयाचे प्रश्न ती विचारते. त्यावर सँडी म्हणते, तु सुद्धा अशा आशयाचे प्रश्न ती विचारते. त्यावर सँडी म्हणते, तु सुद्धा आंतरराष्टÑीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘नेकेड’ हा लघुपट प्रदर्शित होतो आहे.\nहा लघुपट अनेक प्रश्नांची उकल साधण्याचा प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत पत्रकार आणि माध्यमे कशा पद्धतीने वार्तांकन करतात, ही खासगी बाब लोक कशा पद्धतीने व्यक्त करतात, याविषयी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नेकेड हा चित्रपट राकेश कुमार दिग्दर्शित करीत आहे. या चित्रपटात कल्की कोच्लिनसोबत रिताभरी चक्रवर्ती देखील आहे.\nआपल्या भूमिकेबाबत रिताभरीने सांगितले, एके दिवशी मला माझ्या बॉसचा दूरध्वनी येतो. एका अभिनेत्रीची भूमिका असणाºया चित्रपटातील क्लिप (ज्यात सेक्स्युअल दृष्ये आहेत) व्हायरल होते, अशा अभिनेत्रीची मुलाखत घ्यायची आहे. त्यानंतर जे काही घडते, ते या चित्रपटात आहे.’\nकल्की कोच्लिनने यापूर्वी ट्विट करताना सांगितले, ‘आम्हा मुलींसाठी ही चांगली गोष्ट नाही. महिला दिवसाच्या निमित्ताने हा लघुपट येतो आहे.\nशॉकिंग अवस्थेत असलेल्या रणवीर सिंगच...\nआलिया भट्टने 'गली ब्वॉय'बाबत सोशल म...\nरणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या गली ब...\nकल्की कोचलीनला विचारले, ‘तरुणांचे त...\n​‘हा’ खान आहे कल्की कोच्लिनचा ‘चाईल...\nसणासुदीत सौंदर्य फुलवायचे असेल तर क...\nSEE PIC : किम कर्दाशियनने झाडावर चढ...\n​कल्की कोच्लिन पडली ‘नीरजा’तील ‘व्ह...\nMust Read : ​‘त्या’ न्यूड फोटोवर पु...\n ​इशा गुप्ताचं नाही तर कल्की क...\n​रणवीर सिंहचा ‘naked’ फोटो होतोय व्...\nन्यूयॉर्कमध्ये इंडियन फिल्म फेस्टिव...\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्...\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या...\n​‘पद्मावत’वर भारी पडतोय महेशबाबूचा...\n'कलंक'नंतर म्युझिकल चित्रपटात दिसणा...\n​‘पल्लू लटके...’ गाण्यावर अशी थिरकल...\nअर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राच्या...\nलवकरच सनी लिओनी सुरु करणार आपल्या ब...\n‘बेगम खान’ वाचवणार का सिद्धार्थ मल्...\n​यशराज कंपूत होतेयं शाहरूखची वापसी;...\nSEE PICS : ​सलमान खान मैत्रीला जागल...\n​मिलिंद सोमण चढणार बोहल्यावर, बघा...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/dubai-open-kidambi-shrikanth-second-match-today/", "date_download": "2018-04-24T06:30:31Z", "digest": "sha1:4O66OBJLGBOX7CFXFDMNEICM4BQ3KQ36", "length": 6391, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Dubai Open: पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या किदांबीचा दुसरा सामना चाउ टीएन चेनशी - Maha Sports", "raw_content": "\nDubai Open: पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या किदांबीचा दुसरा सामना चाउ टीएन चेनशी\nDubai Open: पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या किदांबीचा दुसरा सामना चाउ टीएन चेनशी\nकालपासून सुरु झालेल्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचा या स्पर्धेमधील दुसरा सामना ताइवानच्या चाउ टीएन चेनशी आहे.\nश्रीकांतचा काल पहिला सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या विक्टर एक्सेसनशी होता. या सामन्यात ०-२ अश्या फरकाने श्रीकांतला पराभव स्वीकारावा लागला. तर चाउ टीएन चेनचा पहिला सामना चायनाच्या यूकी शि या खेळाडूशी होता. या सामन्यात चाउ टीएन चेनला ०-२ अश्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.\nदोन्ही खेळाडूंनी या स्पर्धेतील पहिला सामना गमावलेला असल्यामुळे आजचा सामना जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. त्यामुळे हा सामना नक्की कोण जिंकेन याची उत्सुकता सर्वाना असेन.\nजागतिक क्रमवारीत श्रीकांत चौथ्या स्थानावर आहे तर टीएन चेन चोऊ सातव्या स्थानावर आहे.\nहा सामना दुपारी ४:३० वाजता सुरु होईल.\nDubai Open: किदांबी श्रीकांत पहिल्याच सामन्यात पराभूत\nऍलिस्टर कूकने केला मोठा विक्रम, द्रविडलाही टाकले मागे \nपुणे: तब्बल १६ देशांच्या बॅडमिंटनपटूंनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन\nजागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारत अ संघाची भारत ब संघावर मात\nजागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारत अ संघाने पटकावले उपविजेतेपद\nजागतिक शालेय बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघाची चीन, युएईवर मात\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/shoaib-akhtar-roasted-on-twitter-over-apple-iphone-x-iphone-8-plus-and-iphone-8-poll/", "date_download": "2018-04-24T06:46:10Z", "digest": "sha1:4FTYBJ6BVLPSWOWW6PA7NZTM5OX66TZ6", "length": 7543, "nlines": 136, "source_domain": "mahasports.co.in", "title": "म्हणून शोएब अख्तरला केलं जातंय ट्रोल ! - Maha Sports", "raw_content": "\nम्हणून शोएब अख्तरला केलं जातंय ट्रोल \nम्हणून शोएब अख्तरला केलं जातंय ट्रोल \n पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर क्रिकेटमधील निवृत्तीनंतर एक वेगळंच जीवन जगत आहे. अगदी कोणत्याही गोष्टींवर तो आपल्या हलक्या फुलक्या कंमेंट्स देत असतो.\nपरंतु याचमुळे त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. सोशल माध्यमातून हा खेळाडू वेगवेगळ्या प्रकारे आपल्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधतो.\nह्याच आठवड्यात शोएबला अशाच एका ट्रोल अभियानाला सामोरे जावे लागले. अँपल कंपनीने नवीन iPhone 8, iPhone 8 Plus आणि Phone X हे फोन बाजारात आणण्याची घोषणा केली. त्यावर अख्तरने एक खास ट्विट केला ज्यात अख्तर म्हणतो की माझ्याकडे सध्या iphone 7 आहे तो बदलून मी या तीनपैकी कोणता फोन घ्यावा\nत्याने चाहत्यांसाठी ट्विटर पोल तयार केला. त्याला तब्बल १० हजार लोकांनी उत्तर दिले. परंतु त्या ट्विटवर आलेले रिप्लाय मात्र नक्कीच शोएब अख्तरला समाधान देणारे नव्हते. ट्विपलने यावर शोएबचा चांगलाच समाचार घेतला.\niphone 7iPhone 8iPhone 8 PlusPhone Xकराचीट्रोलट्विटपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज\nतरच युवराज आणि रैनाला मिळणार भारतीय संघात स्थान \n भारतीय फूटबॉल संघाची जर्सी घ्यायला तुम्हाला मोजावी लागणार मोठी रक्कम \nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/08/blog-post.html", "date_download": "2018-04-24T06:37:44Z", "digest": "sha1:5TN4TW3E5PHCHYYFPVCXJOKVPIE5PQMV", "length": 13647, "nlines": 240, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: शालेय पोषण आहार अनुदान मागणी", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nशालेय पोषण आहार अनुदान मागणी\nआपल्याला माहितच आहे की नुकतेच शालेय पोषण आहार योजना अंतर्गत धान्यादी मालाचा पुरवठा होणार नसून पुढील आदेश येईपर्यंत त्याची अनुदान मागणी करायची आहे. त्यासाठी शाळास्तरावरील अनुदान मागणी आणि केंद्र एकवट खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन डाऊनलोड करुन घ्या.\nLabels: MDM, शालेय पोषण आहार एक्सेल शिट\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nआकारिक चाचणी क्र.1 - प्रश्नपत्रिका\nविद्यार्थी माहिती सरलमध्ये कशी भराल \nशालेय पोषण आहार अनुदान मागणी\nशालेय पोषण आहार-3 - केंद्र एकवट अपडेट\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://zeemarathijagruti.com/blog/chana-chilli-recipe-in-Marathi/", "date_download": "2018-04-24T06:44:10Z", "digest": "sha1:H54NE7KSHY2SJDN5FMGNOJR762DZYCDU", "length": 13266, "nlines": 242, "source_domain": "zeemarathijagruti.com", "title": "रेसिपी – चना चिली - Zee Marathi Jagruti", "raw_content": "\nरेसिपी – चना चिली\n१ कप चणे(रात्रभर भिजत घालावेत), १ लसूण गड्डा, १ मोठा कांदा, २ मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, २ कांद्याच्या पाती, ४ चमचे टॉमेटो सॉस, ४ चमचे रेड चिली सॉस, ३ चमचे सोया सॉस, ३ चमचे व्हिनेगर, २ चमचे काळीमिरी पावडर, ४ ते ५ चमचे कॉर्नफ्लॉवर, मीठ, तेल\nरात्रभर भिजवून घेतलेले चणे, कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. (चणे संपूर्ण मऊसूद शिजवू नयेत.) शिजवलेल्या चण्यातील पाणी निथळून द्यावे. त्यामध्ये एक लहान चमचा काळीमिरी व मीठ घालून नीट घलवून घ्यावे. आता, त्यात कॉर्नफ्लॉवर घालावा व सर्व चण्यांना कॉर्नफ्लॉवर समसमान लागेल याची काळजी घ्यावी.\nकढईत तेल गरम करुन थोडे थोडे चणे तळून घ्यावेत.(चणे फुटून तेल उडण्याची शक्यता असते, त्यामुळे मध्यम आचेवर चणे तळून घ्यावेत.) चणे तळून झाल्यावर गार होण्यास बाजूला सारुन ठेवावेत.\nआता, कढईत ३ ते ४ चमचे तेल गरम करुन बारीक चिरेलला लसून परतून घ्यावा.\nयामध्ये चिरलेला कांदा टाकून पुन्हा परतून घ्यावे. आता, त्यात चिरलेली शिमला मिरची व पातीकांदा (कांद्यासहित) टाकून छान परतून घ्यावा.\nनंतर, यात उभ्या चिरलेल्या मिरच्या व सोया सॉस, टॉमेटो सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर, जराशी मिरीपूड घालून सर्व मिश्रण नीट एकजीव होईस्तोवर परतावे.\nतयार मिश्रणात, तळून घेतलेले चणे घालावेत व मंद आचेवर सर्व मिश्रण नीट ढवळून घ्यावे. आता, चवीनुसार त्यामध्ये मीठ घालावे व कढईवर झाकण देईन गॅस बंद करावा.\nअशी तयार डीश गरमा गरम सर्व्ह करावी. फ्राईड राईस किंवा अगदी जिरा राईस सोबतही तोंडी लावायला उत्तम ठरणारी ‘चना चिली’ नक्की ट्राय करुन पाहा व आठवणीने कळवा प्रतिक्रिया खालील कमेन्टबॉक्समध्ये,\nबलात्कारास कपडे जबाबदार नसतात\nमनमोकळं बोल म्हणतेय, ‘मी टू’ मोहिम\nपिकल्या पानांच्या छायेतलं घरकुल\nरेसिपी – कुरकुरे लॉलीपॉप्स\nरेसिपी – व्हेज चीज पराठा\n१४ फेब्रुवारी ‘मोहिम स्त्रियांच्या सुरक्षेची’\nरेसिपी – लेमन पुडींग\nइनडोअर बागेत लावावीत ‘ही’ झाडे\nसाड्यांचे आयुष्य वाढवतील ‘हे’ उपाय\nमेकअप करताना होतात ‘या’ चुका\nरेसिपी – गार्लिक ब्रेड\nशिळ्या भाताच्या चवदार रेसिपीज\nझटपट होणा-या ‘नेल आर्ट’ डिझाईन्स\nरेसिपी – साबुदाणा पुरी\nया १० कल्पक छंदांपैकी एकाशी तरी मैत्री कराच\nवर्ष २०१७ मधील ८ जगजेत्या भारतीय महिला\nअसे बनवता येईल ‘किचन गार्डन’\nरेसिपी – मिरीयुक्त रस्सम\nनववर्षी करु असे ‘भन्नाट संकल्प’\nरेसिपी – बिनअंड्याचा केक\nहिवाळ्यात या ठिकाणांना भेट द्यावीच\nजुन्या साड्यांचा फॅशनेबल उपयोग\nरेसिपी – चना चिली\nरेसिपी – पोह्यांचा ढोकळा\nलग्नझालेल्या ‘ती’ समोरील प्रश्न\nतुम्ही पाहिल्या नसतील अशा मेहंदी डिझाईन्स\nरेसिपी – सोया नगेट्स\nरेसिपी – काश्मिरी मटण चॉप्स\nरेसिपी – बटर मुरुक्कु\nदिवाळीची सुट्टी मिळत नसेल, तर हे वाचा\nरेसिपी – बंगाली मिठाई ‘संदेश’\nया ५ गोष्टींमुळे महिलांना आवडतो ‘श्रावण’\nलहान मुलांना स्मार्टफोन देताय की आजार…\nअशी असते माझी ‘दुपार’\nइथे नाही गेलात, मग पावसाळा काय अनुभवलात\nअसा दम द्याल, तर नावडते पालक व्हाल\nविश्वविक्रमी एक्स्प्रेस झुलन गोस्वामी\nरेसिपी – सोयाबीन कटलेट\nब्युटीपार्लरची किमया साधणारे घरगुती फेसपॅक\nऑक्टोबर हिट, आईस्क्रीमची ट्रिट\nतुला साजेचा ‘हेअर कट’\nपालक म्हणून मोठे होताना\nफळांच्या स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी\nअंतराळी झेप घेई ‘भारतकन्या’\n‘नाताळ’ होईल अधिक चविष्ट\nदिवाळी रंगे, फराळा संगे\nझटपट बनणारे पौष्टिक पदार्थ\nसणांचे क्षण करा आणखी गोड\nजाणून घ्या महत्त्वपूर्ण कायदे\nआकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी द्या साथ स्वतःला स्वतःची \nझटपट होणारे काही गोडाचे पदार्थ\nस्वत:तील ‘स्व’चा शोध घ्यायचायं\nजागृतीची साथ मिळणार आणि सुंदर मी होणार \nस्त्री मनातील स्वसंरक्षणाचा ‘संकल्प’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-24T06:51:28Z", "digest": "sha1:27MSIJPESP5Q4FPDFOALUXD6ZEIMCUWK", "length": 6476, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चौथी बौद्ध संगीती - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nचौथी बौद्ध संगीती ही दोन वेगळ्या ठिकाणी बोलवण्यात आली. ही संगती इ.स.पू. ५७ बौद्ध संस्कृतीतील धम्म परिषद उत्तर-पश्चिम भारतात पांचाळ/पंजाब राज्यातील पुरूषपूर (पेशावर) या शहरामध्ये संपन्न झाली. ही धम्म संगीती ग्रीक साम्राज्याद्वारा संचलीत करण्यात आली. या संगीतीत समग्र भारतानेच नव्हे तर बृहन (विस्तारित) भारताने देखील सहभाग दिला. ग्रीक महाराजा विक्रम संवत हा या संगीतीचा मुख्य सुत्रधार होता. उद्ध्वस्त झालेल्या बळी राजाचे राज्य पुन्हा पूर्वीच्याच अविर्भावात परंतु पूर्वीपेक्षाही अधिक विस्तृत क्षेत्रामध्ये सुनिश्चित पद्धतीने पुनर्स्थापित करावे हा या संगीतीचा उद्देश होता. या परिषदेमुळे बौद्ध भारतीयांच्या राजकारणात एक नवे युग सुरू झाले.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मार्च २०१८ रोजी २०:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t19660/", "date_download": "2018-04-24T06:57:15Z", "digest": "sha1:3MMFHMXVX6OPCBF3LMSJV3WVJE5YSYWC", "length": 2669, "nlines": 68, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-मी तुला खुप मिस करणार", "raw_content": "\nमी तुला खुप मिस करणार\nमी तुला खुप मिस करणार\nएक दिवस आठवण असणार\nश्वास असणार, तुझे फोटो असणार\nपण फक्त तु नसणार\nमी तुला खुप मिस करणार\nएक दिवस तो रस्ता असणार\nतु हसली ते हसु असणार\nपण फक्त तु नसणार\nमी तुला खुप मिस करणार\nएक दिवस मोबाईल असणार\nMSG असणार, तुझा नंबर असणार\nपण फक्त बोलण्यासाठी तु नसणार\nमी तुला खुप मिस करणार\nएक दिवस तुझी आठवण असणार\nडोळ्यांत अश्रु असणार, शब्द असणार\nपण फक्त तु नसणार\nमी तुला खुप मिस करणार\nमी तुला खुप मिस करणार\nमी तुला खुप मिस करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t20064/", "date_download": "2018-04-24T06:55:24Z", "digest": "sha1:JGEJOQOXCJXTYL4G5ZW5PL66FJKUEEYP", "length": 4144, "nlines": 91, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-कलाम..", "raw_content": "\nलेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..\nभारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच दुःखद निधन झाले. त्यांना शब्दरूपी श्रध्दांजली वाहण्याचा केलेला प्रयत्न.....\nअनेकांचे आदर्श होता तुम्ही\nखूप काही शिकलो आम्ही\nनवीन क्रांती तुम्ही घडवली\nकोसळला जरी देह तुमचा\nतशाच आहेत आमच्या भावना\nतुमचा प्रत्येक शब्दही आज\nहेच आमचं ध्येय मानू ...\nकवी प्रविण रघुनाथ काळे\nकृपया कविता फाॅरवर्ड करायची असल्यास कवीच्या नावासह फाॅरवर्ड करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-04-24T06:37:49Z", "digest": "sha1:DGKAMTJYTFXIYM7NC6PWD3WWNDBTD326", "length": 4133, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बंदरे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► देशानुसार बंदरे‎ (३ क)\n► दीपगृहे‎ (२ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १९:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B5", "date_download": "2018-04-24T06:47:50Z", "digest": "sha1:AS5M32IFB4W4I5YJQ7RM3O36PCPGPVT6", "length": 4781, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनातोली कार्पोव - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजन्म २३ मे, १९५१ (1951-05-23) (वय: ६६)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९५१ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०४:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AE", "date_download": "2018-04-24T06:35:52Z", "digest": "sha1:R3BTY7RMNQ6B2V2O4OHZFNMFVLAA46NH", "length": 27140, "nlines": 251, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिक्किम - विकिपीडिया", "raw_content": "\n(सिक्कीम या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभारताच्या नकाशावर सिक्कीमचे स्थान\nस्थापना १६ मे १९७५\nसर्वात मोठे शहर गंगटोक\nक्षेत्रफळ ७,०९६ चौ. किमी (२,७४० चौ. मैल) (२७)\n- घनता ६,१०,५५७ (२८)\n- ७६.१७ /चौ. किमी (१९७.३ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)\nसिक्कीम हे भारतातील देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. हिमालय पर्वतरांगेमध्ये वसलेल्या सिक्कीमच्या दक्षिणेला भारताचे पश्चिम बंगाल हे राज्य, पूर्वेस भूतान, पश्चिमेस नेपाळ तर उत्तरेस चीन देशाचा तिबेट स्वायत्त प्रदेश आहेत. आकाराने गोव्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य असलेले सिक्कीम येथील निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वात उंच पर्वतशिखर सिक्कीम व नेपाळच्या सीमेवर आहे.\nसिक्कीममधील बहुसंख्य जनता नेपाळी वंशाची असून बौद्ध हा येथील प्रमुख धर्म आहे.\n७ दोंगमार आणि लातुंग\nगुरु रिनपोचे यांची ३५ मी. उंच मूर्ती सिक्किम\nएकीकडे कांचनगंगासारखी बर्फाच्छादित हिमशिखरे आणि दुसरीकडे वसंतात डोळ्यांचे पारणे फेडायला लावणारी फुलणारी विविध प्रकारची फुले अशा दोन्ही टोकाच्या गोष्टी सिक्कीममध्ये आहेत. नेपाळ, तिबेट, भूतान आणि बंगाल असे चारही दिशांनी बंदिस्त असे सिक्कीम हे हिमालयाच्या कुशीत असलेले एक छोटे राज्य आहे.\nसिक्कीममध्ये सतराव्या शतकापर्यंत नामग्याल राजघराण्याची एकसत्ताक पद्धत रूढ होती. राजा तेनसिंग नामग्यालने युकसोम येथून राजधानी हलवून रबदानसे येथे नेली. पण नेपाळ व भूतान यांच्याकडून सतत होणार्‍या स्वार्‍यांनी या छोट्या राज्याची व रबदानसेची वाताहात झाली. ब्रिटिश काळात सिक्कीमचे तत्कालीन हिंदुस्थानच्या मदतीने नेपाळशी युद्ध झाले. त्या वेळी सिक्कीमने ब्रिटिश इंडिया व नेपाळशी अनुक्रमे सुगौली, तितालीया करार करून हस्तगत केलेला भाग परत मिळवला. पुढे सिक्कीमने स्वतंत्र भारताशी मदतीसाठी आवाहन केले. दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. भारतातर्फे त्यांचे राजकीय व्यवहार पार पडू लागले, तर १९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींच्या राजवटीत सिक्कीम भारतीय संघराज्यात सामील झाले. तदनंतर सिक्कीम हे भारतातील एक राज्य म्हणून गणले जाऊ लागले. सिक्कीम हे तीन दिशांनी वेगवेगळ्या सीमांनी बंदिस्त असल्याने अतिसंवेदनशील आहे, त्यामुळे भारतीय लष्कराचे तेथे वर्चस्व आहे.\nडोंगराळ भाग असल्याने सतत दरड कोसळणे, पावसाने रस्ते वाहून जाणे, अलीकडेच झालेला भूकंप वगैरे आपत्तींना सिक्कीम येथील रहिवाशांना सामोरे जावे लागतेच. त्यातून मार्ग काढणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. त्यासाठी आपल्या सैन्याचीच शाखा, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आहेच. तेथील सर्व रस्त्यांची व्यवस्था पाहणे हे त्यांचेच काम. डोंगराळ भागामुळे सिक्कीममध्ये रेल्वेची सोय होणे दुरापास्त आहे.\nराजधानी गंगटोक येथे बागडोगराहून कारने किंवा हेलिकॉप्टरने जाता येते, पण हेलिकॉप्टरची सेवा दिवसातून एकदाच असते. शिवाय एका वेळेला फक्त चारच माणसे जाऊ शकतात. त्यामुळे प्रायव्हेट टॅक्सीज, बसेस यांची भरपूर वर्दळ असते. कोलकाता येथून सिलीगुडी किंवा जलपायगुडीपर्यंत रेल्वेने जाता येते. पुढे बस किंवा टॅक्सीने सिक्कीमला पोहोचता येते. मोठ्या अवजड वाहनांना, आणि दुसर्‍या राज्यातील टुरिस्ट वाहनांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गंगटोकमधे अजिबात प्रवेश नसतो.\nसिक्कीमच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भागातली अनुक्रमे गंगटोक, गेझिंग, मंगन, नामची ही प्रमुख शहरे आहेत. गंगटोक ही राजधानी असल्याने ते शहर प्रमुख कचेर्‍या, शाळा, कॉलेजेस, इत्यादींमुळे जास्त वहिवाटीचे व दाटीवाटीचे आहे. डोंगराळ भागामुळे रस्ते खूपच अरुंद आणि चढ-उताराचे, त्यामुळे ट्रॅफिकचे नियम अगदी कडक आहेत, ते कसोशीने पाळले जातात.\nउत्तर तिबेटमधील तिबेटी, शिवाय नेपाळी लोक फार पूर्वीपासून सिक्कीममध्ये वास्तव्य करून आहेत. इंग्लिश, हिंदी, लेपचा, लिंबू नेपाळी, भूतिया या भाषा प्रामुख्याने व्यवहारात वापरल्या जातात. व्यापाराची बहुतेक धुरा आपल्याकडील मारवाडी लोकांनी सांभाळली आहे. हिंदू व बौद्ध धर्म प्रामुख्याने अस्तित्वात आहे. ख्रिश्चन धर्म फारच थोड्या प्रमाणात आहे. रुमटेक ही सर्वात जुनी मॉनेस्ट्री आहे. नव्या रुमटेकला सोन्याचा स्तूप आहे. पश्चिमेस रुमटेकप्रमाणे पेमियांगत्से मोनेस्ट्री त्याच काळातली आहे. येथे झाडाच्या ढोलीतून कोरलेले धम्मचक्र नक्कीच पाहण्यासारखे आहे. लहान मुले लामा होण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी मोनेस्ट्रीमध्येच राहतात.\nज्याला आपण कांचनगंगा म्हणून ओळखतो ते जगप्रसिद्ध कांग चेन जुंगा हे हिमशिखर सिक्कीमच्या पश्चिम भागात आहे. ८४५० मी. उंचीचे हे शिखर जगातील तिसर्‍या क्रमांकाचे शिखर आहे. तिथले रहिवासी कांचनगंगाला सोने, चांदी, विविध रत्‍ने, शिवाय धान्य, पवित्र ग्रंथ यांचा खजिना असल्यासारखे पवित्र मानतात. येथे गिर्यारोहणाची क्वचितच परवानगी दिली जाते. गंगटोक येथून कांचनगंगाचे छानपैकी दर्शन होते, पण ती अवाढव्य बर्फाची भिंतच वाटते.\nपश्चिमेस पेलिंग गावापासून कांचनगंगा अवघ्या ५० किमी. अंतरावर असल्याने आपल्याला संपूर्ण पर्वताचे दर्शन दिवसभर होते. .जवळ जाऊन पाहिल्यास शिखरापर्यंत नजर ठरूच शकत नाही. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस बर्फाच्छादित पर्वतावर पडणारी कोवळी किरणे कांचनगंगा हे नाव सार्थ ठरवतात. दिवसभर आपल्याला कांचनगंगाचे सौंदर्य वेगवेगळ्या अंगाने अनुभवता येते. सूर्योदयावेळी कोवळ्या किरणांमुळे वेगळीच सोनेरी छटा संपूर्ण डोंगरच सोन्याचा करते, तर दुपारी धारदार तलवारीप्रमाणे संपूर्ण डोंगर चमकत असतो आणि रात्री लखलखत्या तार्‍यांच्या मंद प्रकाशात पांढर्‍याशुभ्र क्षीरसागरासारखा दिसतो. असे हे वेगवेगळे रूप दिवसभर पाहत राहिलो तरी मनाचे समाधान होत नाही. थोड्या उंच जागेवरून कांचनगंगाच्या आसपास असणारी काब्रू, सिमवो, कुंभकर्ण, पांडीम अशी काही शिखरेही नजरेस पडतात.\nपेलिंगपासून गंगटोकला जाताना वाटेत मार्तम हे छोटेसे गाव लागते. युनेस्कोने हे गाव दत्तक घेतले आहे. डोंगराळ भागामुळे उंच-सखल जमिनीवर टेरेस फार्मिंगची प्रथा आहे. गाईड आपल्याला संध्याकाळच्या वेळेस गावात फेरफटका मारण्यासाठी घेऊन जातात. येथे काही ठरावीक घरांमध्ये हेरिटेज म्हणून अजूनही पूर्वीचीच मांडणी असल्याचे दिसून येते. बटाटा, विविध प्रकारचे बांबू आणि आल्याच्या शेतीतून फिरताना बऱ्र्‍याच औषधी वनस्पतींचीही लागवड केलेली दिसते. गाीड आपल्याला त्याबद्दल माहिती करून देतात. वेलदोड्याच्या लागवडीसाठी सिक्कीम फार प्रसिद्ध आहे.\nपुढे उत्तरेकडे चुंगथान येथे रस्त्याचे दोन फाटे फुटतात. एक लाचेन येथे तर दुसरा लाचुंगला जातो. लाचेन येथूनच तिस्ता नदीचा उगम होतो.\nलाचेन येथे गुरू दोंगमार हे सरोवर आहे. कडक थंडीतही सरोवराचा विशिष्ट भाग मुळीच गोठत नाही. १२००० फूट उंचीवर हिमशिखरांनी वेढलेले आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या रंगीबेरंगी र्‍होडोडेंड्रान व पांढरे मॅग्नोलिया (कवठी चाफा) यामुळे लातुंग हे नेहमीच नटलेले असते. तेथूनच पुढे युमथान, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ येथे जाता येते.\nसिक्कीमच्या भौगोलिक स्थानामुळे उंचावर पांडा, जंगली मांजर, याक असे प्राणी, तर रॉबिन, फ्लाय कॅचर, सँडपायपर असे पक्षी दिसतात. झाडांच्या बाबत पाईन, जुनिपर, फर, सायप्रस वगैरे झाडे आढळतात. र्‍होडोडेंड्रान हा ‘राज्यवृक्ष’ मानला जातो.\nकॉटन ट्री, वेलची, विविध बांबू, बटाटे आलं यांच्या लागवडीबरोबर रंगीबेरंगी ऑर्किस्, गुलाब, झेंडू, हिरव्यागार भाज्यांचे मळे इथे पाहायला मिळतात. येथील तपमान २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा शून्य अंश सेल्सिअसच्या खाली उतरत नसल्याने हवा नेहमीच छान, त्यामुळे फळफळावळ, फुलांना तोटा नाही. दरवर्षी गंगटोक येथे ऑर्किडच्या फुलांचे प्रदर्शन भरते. परदेशाप्रमाणे आपल्याकडेही एवढ्या प्रकाराची ऑर्किड असतात याची सामान्यलोकांना कल्पना नसते. फळा-फुलांप्रमाणेच इथले लोक तब्येतीने चांगले दिसतात. तिस्ता नदी म्हणजे सिक्कीमची जीवनवाहिनी मानली जाते. डोंगराळ भागातल्या लहान लहान उपनद्या मिळून ‘रंगीत’ नदी बनते व तिस्तामध्ये सामावते.\nसिक्कीममध्ये दसरा, दिवाळीसारखे हिंदू सण, तर तिबेटियन लोसार, लुसांग शिवाय फेब्रुवारीत येणारे नवीन वर्ष जोमाने साजरे केले जाते. त्यादिवशी तिबेटी लोक रंगीत पोषाखात ‘ताशी डिलेक’ अशी आरोळी देत याक डान्स करतात. कांचनगंगाचीही पूजा केली जाते. जसे वेगवेगळे सण तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थासाठीदेखील सिक्कीम प्रसिद्ध आहे. तेथे मोमो, थेंटुक, ठुपकाशिवाय विविध लोणची, मासे यांची वेगळी चव असते. खास त्या भागातील जंगलात मिळणारे विशिष्ट प्रकारच्या फर्नचे कोवळे कोंब ‘फिड्ल हेडेड फर्न’ची याकचे चीज घालून केलेली भाजी अतिशय चवदार असते.\nसिक्कीममध्ये रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग, रॅपलिंग अशा वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांचा अनुभव घेता येतो.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nभारताची राज्ये आणि प्रदेश\nअरुणाचल प्रदेश • आंध्र प्रदेश • आसाम • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • ओरिसा • कर्नाटक • केरळ • गुजरात • गोवा • छत्तीसगढ • जम्मू आणि काश्मीर • झारखंड • तमिळनाडू • तेलंगणा • त्रिपुरा • नागालँड • पंजाब • पश्चिम बंगाल • बिहार • मणिपूर • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मिझोराम • मेघालय • राजस्थान • सिक्कीम • हरियाणा • हिमाचल प्रदेश\nअंदमान आणि निकोबार • चंदीगड • दीव आणि दमण • दादरा आणि नगर-हवेली • पाँडिचेरी • राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली) • लक्षद्वीप\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २४ मार्च २०१८ रोजी २३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/lifestyle/beauty-and-makeup/multiple-benefits-of-papaya/17358", "date_download": "2018-04-24T07:02:56Z", "digest": "sha1:6U6NFMVHUGHOML6IHQBH5YJPMOLQAH5R", "length": 22915, "nlines": 247, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "multiple benefits of papaya | ​कच्च्या पपईचे आश्चर्यकारक फायदे ! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\n​कच्च्या पपईचे आश्चर्यकारक फायदे \nकच्ची पपई यकृतसाठी खूपच फायदेशीर असून यकृताला मजबूती देते. काविळीच्या आजारात यकृत खूप खराब होते. अशावेळी कच्ची पपई किंवा तिची भाजी करून खाल्ल्याने कावीळ आजारग्रस्तांना खूपच फायदा होतो.\nकच्ची पपई यकृतसाठी खूपच फायदेशीर असून यकृताला मजबूती देते. काविळीच्या आजारात यकृत खूप खराब होते. अशावेळी कच्ची पपई किंवा तिची भाजी करून खाल्ल्याने कावीळ आजारग्रस्तांना खूपच फायदा होतो.\nकच्च्या पपईत आणि तिच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ‘ए’ आणि ‘ई’ आहे, ज्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.\nकच्ची पपई सर्दी आणि अ‍ॅलर्जीसोबतच संक्रमणापासूनही संरक्षण करते. याच्या सेवनाने मुत्रविकारांपासून आराम तर मिळतो. शिवाय बॅक्टेरियांचे प्रमाण कमी करते.\nशरीरावर नको असलेले केस विद्रुप वाटतात आणि त्यापासून सुटका मिळविणेदेखील कठीण असते. प्रत्येक महिन्यात त्यांना साफ करण्यासाठी वॅक्स किंवा शेविंग करणे अवघड होते. कच्च्या पपईने नको असलेले केस पुन्हा उगण्यास प्रतिबंध घातला जाऊ शकतो.\nकच्च्या पपईत एक शक्तिशाली एंजाइम असते, ज्याला पॅपिन म्हणतात. इंटरनॅशनल जर्नल आॅफ फार्मसुटिक्स मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार पॅपिन केसांच्या रोमला कमजोर करुन त्यांना पुन्हा वाढण्यास प्रतिबंध करते. आपल्याला नको असलेल्या केसांच्या समस्येपासून सुटका करण्यास मदत करते. यासाठी बाजारात उपलब्ध अन्य क्रीम पेक्षा कच्ची पपई जास्त प्रभावी ठरते. पिकलेल्या पपईपेक्षा कच्च्या पपईत पॅपिनचे प्रमाण अधिक असते.\nAlso Read : कच्ची पपई घालविते चेहऱ्यावरील डाग\nप्रियांका चोप्राच नव्हे तर ‘हे’ कला...\nकलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टा...\nमंदिरा बेदीचा खुलासा, ‘माझ्या हेअरस...\n‘काळभैरव रहस्य’मालिकेच्या वेळेत ‘मा...\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक न...\nबॉलिवूडच्या बादशाहची सुरक्षा करणाऱ्...\nघरगुती शॅम्पूने खुलवा केसांचे सौंदर...\nडागरहित उजळ त्वचेसाठी हळद उपयुक्त\nआॅईली स्कीनची अशी घ्या काळजी\nउन्हाळ्यात घ्या केसांची काळजी\nसनी लिओनी तरुणींना देणार मेकअप टिप्...\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nरिमुव्हर शिवाय काढा नेलपॉलिश\nBeauty : स्टोन मसाज थेरपीने असे खुल...\n​सेलिब्रिटींसारखे गुलाबी ओठ हवे आहे...\nआता बिनधास्त वापरा 'बॅकलेस ब्लाऊज'...\n​लग्नाच्या बांगड्या खरेदी करताना ‘ह...\n​Beauty : चुकीच्या मेकअपमुळे दिसता...\n​आपणही डार्क सर्कलच्या समस्येने त्र...\n​Beauty : चेहऱ्यावरील पिंपल्स दूर क...\nनेहमी तरुण दिसणे कोणाला आवडणार नाही...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/television/news/article/3774", "date_download": "2018-04-24T07:07:35Z", "digest": "sha1:PALV4NCWUFZGXB7DCXQJM3EYFRDXT6QD", "length": 21912, "nlines": 241, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "| मानिनी स्वप्निलचा फेवरेट सिनेमा | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nमानिनी स्वप्निलचा फेवरेट सिनेमा\nप्रत्येक कलाकारासाठी आपला सिनेमा हा जवळचाच असतो. कोणत्याही चित्रपटासाठी स्टार्स हे अपार मेहनत घेतात आणि त्यांचे काम पडद्यावर दिसुन येते. परंतू एखादा तरी चित्रपट या कलाकारांच्या जवळचा असतो\nप्रत्येक कलाकारासाठी आपला सिनेमा हा जवळचाच असतो. कोणत्याही चित्रपटासाठी स्टार्स हे अपार मेहनत घेतात आणि त्यांचे काम पडद्यावर दिसुन येते. परंतू एखादा तरी चित्रपट या कलाकारांच्या जवळचा असतो किंवा फेवरेट असतोच. दर्जेदार चित्रपटांमधुन अभिनयाची चुणुक देखविलेला अभिनेता स्वप्निल जोशी म्हणतोय त्याला त्याचा मानिनी हा चित्रपट फार आवडतो. नवरा बायकोच्या नात्यातील बंध उलगडणारा हा चित्रपट स्वप्निलच्या जवळचा आहे असे तो सांगतोय. एवढेच नाही तर गुलाम ए मुस्तफा हा हिंदी सिनेमा देखील त्याला आवडतो. नाना पाटेकर, शिवाजी साटम यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत स्वप्निलने या सिनेमात काम केले होते. आपल्या कारकिर्दीतील हे दोन सिनेमे स्वप्निल कधीच विसरणार नाही आणि त्याचे चाहते देखील पुन्हा पुन्हा हे सिनेमे पाहुन स्वप्निलचे वर्क नक्कीच एप्रिशिएट करतील यात शंका नाही.\nरणांगण चित्रपटाचं आगळं – वेगळं पोस्...\n'रणांगण'च्या निमित्ताने मराठी सिनेस...\nअवधूतच्या आवाजातलं 'रणांगण' चित्रपट...\nसुश्रुत भागवत आणि उमेश कामतची हॅट्र...\nवाट दाखवी आम्हा,गौरीनंदना...हे गजान...\n'लाडो - वीरपूर की मर्दानी' एक झेप घ...\n'या' सिनेमातून पहिल्यांदाच समोर येण...\nपारंपारिक कोल्हापुरी मेजवानीला सेलि...\nस्वप्नील जोशी साकारणार 'सचिन'ची भूम...\nस्वप्नील जोशी सोबत रंगणार यारी नंबर...\n​स्वप्निल जोशीचे NO. 1 यारी विथ​ स्...\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार...\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मि...\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील क...\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये अनिल थत्...\nया अभिनेत्याचे सुयज घोषमुळे झाले हे...\nसई आणि पुष्करमध्ये का झाला वाद \n​या कारणामुळे कुल्फी कुमार बाजेवाला...\n'ये प्यार नहीं तो क्या है'मधली पलक...\n​या कारणामुळे अशोक सराफ यांना म्हटल...\n'तू आशिकी' मध्ये 'कोळी डान्स' विशेष...\n​झी टीव्हीवरील इश्क सुभान अल्ला मध्...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2010/01/", "date_download": "2018-04-24T06:21:53Z", "digest": "sha1:XTKWKSGAV5JIEAX4WH466BZAODLJIVKR", "length": 25351, "nlines": 235, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "एफ वाय – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nमराठीचा उत्कर्ष – कसा करावा (ले० प्रा० मनोहर राईलकर)\nबुधवार, 27 जानेवारी 2010 रविवार, 2 ऑक्टोबर 2011 अमृतयात्री14 प्रतिक्रिया\n“अपत्यानं जगात झेंडा लावला की त्याचे आईवडील आपोआपच मोठे होतात. तसंच आपण मराठीचीं अपत्यं. आपल्या प्रयत्नांनीच आपली मायबोलीही मोठी होईल, अशी माझी भावना आहे. आणि ‘हिला बैसवू वैभवाच्या शिरी,’ ही माधव ज्यूलियनांची आसही सफळ होईल.”\nसोमवार, 25 जानेवारी 2010 मंगळवार, 4 जुलै 2017 अमृतयात्री13 प्रतिक्रिया\nमराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाचे आमंत्रण (संगीतकार कौशल इनामदार)\nशुक्रवार, 22 जानेवारी 2010 शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2010 अमृतयात्री17 प्रतिक्रिया\nमराठी+एकजुटीच्या सर्व बांधवांना प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार याच्या तर्फे मराठीच्या अभिमानगीताच्या प्रकाशनाचे आमंत्रण.\nगृहमंत्रालयही म्हणते हिदी राष्ट्रभाषा नव्हे (वृत्त: दै० लोकमत, १४ जाने० २०१०)\nगुरूवार, 21 जानेवारी 2010 शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2010 अमृतयात्री10 प्रतिक्रिया\nहिदी ही राष्ट्रभाषा असल्याची कोणतीही घटनात्मक तरतूद राज्यघटनेत नाही, असे स्पष्टीकरण खुद्द गृहमंत्रालयानेच दिले आहे. पुण्यातील मराठी अभ्यास केंद्राचे सलील कुलकर्णी यांनी गृहमंत्रालयाच्या राजभाषा भवनकडे माहिती अधिकारात अर्ज करून ही माहिती प्राप्त केली आहे.\nपन्नास वर्षानंतरही राज्यात शिक्षणविषयक धोरणाचा खो-खो चालूच \nशनिवार, 16 जानेवारी 2010 शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2010 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nपुढील तीन वृत्ते वाचा.\n१. वृत्त दि० १२ जानेवारी २०१०: मराठी शाळांसाठीचा मास्टर प्लॅन सहा महिन्यांत (दै० सकाळ – प्रेषक: श्री० विजय पाध्ये)\n(अमृतमंथन-मराठी शाळांचा मास्टर प्लॅन_Sakal_120110)\n२. वृत्त दि० १२ जानेवारी २०१०: मराठी माध्यमाच्या शाळांसाठी राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच मराठीची गळचेपी – रामनाथ मोते (दै० सकाळ)\n(अमृतमंथन-राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच मराठीची गळचेपी_Sakal_120110)\n३. वृत्त दि० ०८ जुलै २००६: उच्च न्यायालयाने वर्ष २००१ मध्ये दिलेल्या आदेशानुसार मास्टर प्लॅन अजुनही तयार नाही (दै० लोकसत्ता – प्रेषक श्री० विजय पाध्ये)\nतीनही वृत्ते नीट वाचा. त्यावरून खालील बाबी स्पष्ट होतात.\n“मराठी शाळा म्हणजे सरकारवर ओझे” आणि “शासकीय व्यवहारात १००% मराठी” (वृत्त: दै० सामना, ६ जाने० २०१०)\nरविवार, 10 जानेवारी 2010 शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2010 अमृतयात्री6 प्रतिक्रिया\n५ जानेवारी २०१० या दिवशी महाराष्ट्र शासनाने एकाच दिवशी दोन विधाने केली – एक कडू, दुसरे गोड. अर्थात सत्य सहसा कटु असण्याचीच शक्यता अधिक असल्यामुळे या दोन विधानांपैकी कडू विधान सत्य ठरण्याची व गोड विधान केवळ नावापुरते निघण्याची शक्यता अधिक वाटते.\nमर्द मराठ्यांची ऑनलाईन लढाई (ले० कीर्तिकुमार शिंदे, लोकप्रभा, ८ जाने० २०१०)\nसोमवार, 4 जानेवारी 2010 अमृतयात्री6 प्रतिक्रिया\nप्रचंड मोठय़ा संख्येने पण मुख्यत: तलवार आणि भाले घेऊन लढणाऱ्या भारतीय सैन्यांना बंदुका व तोफांसारख्या आधुनिक शस्त्रास्त्रांच्या बळावर मूठभर इंग्रजांनी सहज हरवलं होतं, हा आपला इतिहास आहे. आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचं झालं तर जगभरात संगणक व माहितीजालाचा उपयोग माहिती आणि संज्ञापनासाठी वाढत असताना मराठी नागरिक व ग्राहक म्हणून स्वत:चे अधिकार मिळवण्यासाठी आपणही संगणक व महाजालाचा प्रभावी वापर करायला शिकले पाहिजे. पत्रव्यवहार व दूरध्वनी या जुन्या साधनांवरच जर आपण अवलंबून राहिलो तर आधुनिक जगात मागे राहू.\n“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)\nशनिवार, 2 जानेवारी 2010 मंगळवार, 4 जुलै 2017 अमृतयात्री57 प्रतिक्रिया\n“महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी उत्तरेकडील अवकृपा होऊ नये म्हणून “हिंदी-राष्ट्रभाषा एके हिंदी-राष्ट्रभाषा” ह्याच पाढ्याची घोकंपट्टी करीत बसले आहेत. तेव्हा एकदा शेवटचाच “हा सूर्य आणि हा जयद्रथ” असा निवाडा करण्यासाठी सर्वश्रेष्ठ अस्त्राचा आपल्याला आता प्रयोग करायचा आहे आणि ते अस्त्र म्हणजे स्वतः केंद्र सरकारच्या अधिकृत भाषा विभागाने दिलेली कबुली.”\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर\nराईट बंधूंच्या आधी विमानोड्डाण करणारा भारतीय \n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n\"हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही\" - केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nविचारमंथन - तिन्ही सांजा सखे मिळाल्या (प्रश्नकर्ता: सुशांत देवळेकर)\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-24T06:26:52Z", "digest": "sha1:N5QSSNAOHMVH4BSPIXEUYCLW555HG6DE", "length": 3970, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"पॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जानेवारी २०१६ रोजी ११:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%98%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-24T06:53:40Z", "digest": "sha1:RS7Y2KDL2NFEERPPS2GYUQTDJAM42P7I", "length": 6752, "nlines": 135, "source_domain": "www.marathimati.net", "title": "घसा | मराठीमाती", "raw_content": "\nअपचन झाल्यास थोडीशी बडीशेप किंवा जिरे, ताजे आले आणि कडीपत्ता गरम पाण्यात घाला. थोडा वेळ पाणी तसेच ठेवा. नंतर या पाण्यात १ कप पाणी घालून गाळून घ्या.\nपोटात कृमी झाल्यास लसणाच्या ३-४ पाकळ्या काही दिवस सकाळी खाव्यात.\nघसा बसल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे हा उत्तम उपाय आहे.\nरात्री नाक चोंदल्यास नाकाच्या बाहेरील बाजूने राईचे तेल चोळल्याने श्वास घेणे सुलभ होते.\nघश्यात खवखवत असल्यास किंवा खोकल्याची उबळ येत असल्यास एखाद दुसरी काळी मिरी तोंडात ठेवावी.\nघामोळ्यामुळे कंड सुटल्यास शरीरावर दही चोळावं. १५ मिनीटानंतर धुवून टाकावं. हा उपचार काही दिवस चालू ठेवावा.\nउन्हाळ्यात खूप उष्मा वाढू लागल्यास शरीर थंड ठेवण्यासाठी २ ग्लास पाण्यात १ टीस्पून बडीशेप घालून उकळून हे पाणी सकाळ-संध्याकाळ काही दिवस घ्यावे.\nअतिसारावर घरगुती उपाय म्हणजे चमचाभर आल्याच्या रसात चिमूटभर मीठ घालून प्यावे. यामुळे वेदना थांबून अतिसार काबूत येतो.\nनागीण किंवा इतर त्वचारोगांवर प्रभावी घरगुती उपाय म्हणजे तुळस. तुळशीची पाने वाटून किंवा पानाचा रस बाधीत त्वचेवर चोळावे.\nThis entry was posted in घरचा वैद्य and tagged अतिसार, अपचन, उष्मा, कंड, कृमी, घसा, त्वचारोग, नागीन, श्वास on जानेवारी 1, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2011/01/", "date_download": "2018-04-24T06:20:07Z", "digest": "sha1:P37UXTQ7CUMENE7UDTM2CK6DUMDU7ZC6", "length": 19877, "nlines": 211, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "एफ वाय – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nशुक्रवार, 28 जानेवारी 2011 शनिवार, 30 जून 2012 अमृतयात्री61 प्रतिक्रिया\n“आपल्या मराठी भाषेत इतके उत्तम शब्द उपलब्ध असतानाही त्यांच्याऐवजी हिंदी पंडितांनी जन्माला घातलेला, विपर्यस्त अर्थाचा शब्द आपण विनाकारण का रूढ करतो, असे कोडे मला पडले.”\nआय०आय०एम० मध्ये महाराष्ट्राचा (व मराठी माध्यमाचा) झेंडा (दै० लोकसत्ता)\nशनिवार, 22 जानेवारी 2011 बुधवार, 26 जानेवारी 2011 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\n“मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याचा मला अभिमान आहे. मराठी माध्यमातून शिकल्यामुळेच कोणताही विषय समजावून घेण्याची सवय मला जडली. परकीय भाषेपेक्षा मातृभाषेतील शिक्षण अधिक महत्त्वाचे असल्याचा आमच्या कुटुंबियांचा विश्वास असून माझा लहान भाऊसुद्धा मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहे.”\nपानिपतयुद्धाचे युद्धशास्त्रीय विश्लेषण (ले० मेजर जनरल निवृत्त शशिकांत पित्रे)\nबुधवार, 12 जानेवारी 2011 बुधवार, 12 जानेवारी 2011 अमृतयात्री१ प्रतिक्रिया\nपानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन तीन शब्दांत करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल. मराठा सैन्य आपल्या आरंभीच्या यशाचा पाठपुरावा का करू शकले नाही, याचे हे लष्करी विश्लेषण\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nबुधवार, 5 जानेवारी 2011 अमृतयात्री5 प्रतिक्रिया\nशिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली ’शिवछत्रपतीचे चरित्र’ ही बखर. ह्या बखरीत केलेल्या उल्लेखानुसार हा ग्रंथ शालिवाहन शके १६१६ (इ०स० १६९४) या वर्षाच्या सुमारास (म्हणजे महाराजांच्या मृत्युनंतर केवळ १४ वर्षांनी) लिहिला गेला असे दिसते. याच्या सत्यासत्यतेबद्दल अर्थातच आम्ही काहीच सांगू शकत नाही. पण तरीही याचे वाचन सुरस ठरावे.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर\nराईट बंधूंच्या आधी विमानोड्डाण करणारा भारतीय \n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n\"हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही\" - केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nविचारमंथन - तिन्ही सांजा सखे मिळाल्या (प्रश्नकर्ता: सुशांत देवळेकर)\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://live.anandnagri.com/news/entertainment/2347/index.php", "date_download": "2018-04-24T06:57:19Z", "digest": "sha1:LVMUTGNYPM4Q22IKJAPIDSI4TPNAVUXR", "length": 6856, "nlines": 78, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " दीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nमुंबई - आपली मते मांडण्यासाठी सहज उपलब्ध होणारे साधन म्हणजे सोशल मीडिया. अनेकदा सेलिब्रिटींच्या फोटोंना, पोस्टना, मतांना नेटीझन्सकडून ट्रोल केले जाते. प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणला तिच्या कपड्यांवरून, रेणुका शहाणे यांना त्यांच्या अमरनाथ यात्रेवरील पोस्टवरून नेटीझन्सनी ट्रोल केल्याचे ताजे उदाहरण आहे. आता पुन्हा एकदा बॉलिवूडच्या मस्तानीला म्हणजेच दीपिका पदुकोणला ट्रोल केले गेले.\nदीपिकाने नुकतेच वॅनिटी फेअर नावाच्या मासिकेसाठी फोटोशूट केले. त्याचा फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये दीपिका खूपच बारीक दिसतेय. यामुळेच नेटीझन्सनी कुपोषित आणि चिकन म्हणत तिची थट्टा केली. इतकेच नाही तर यूझर्सनी तिला जास्त खाऊन वजन वाढवण्याचा सल्लाही दिलाय. काळ्या रंगाच्या ड्रेसमधील दीपिकाच्या या फोटोला एका दिवसात 4 लाख लाईक्स मिळाले असून अडीच हजारापेक्षाही जास्त लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.या फोटोमध्ये दीपिकाच्या गळ्यात सुरेख डायमंड नेकलेससुद्धा पाहायला मिळतोय. मासिकाच्या ज्वेलरी एडिशनसाठी तिने हे फोटोशूट केलेय. एका युझरने तर, आजारी चिकनला कोणी रुग्णालयात दाखल करा चीपिकाला चिकित्सेची गरज आहे अशी प्रतिक्रिया दिली तर दुसऱ्याने, दीपिका आजकाल जेवायचेच विसरत आहे असे वाटतेय, अशी उपरोधिक टीका केली. विशेष म्हणजे याच फोटोशूटमधील तिच्या इतर फोटोंची मात्र खूप स्तुती केली जातेय.\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nजिल्ह्यात 203 अंगणवाड्या आयएसओ\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/ss-!/", "date_download": "2018-04-24T06:56:46Z", "digest": "sha1:7LTGV3PUL6YPUACCJER7YP3XSLWGYLWJ", "length": 4558, "nlines": 97, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-शूss..!कुछ बोलने का नाय", "raw_content": "\nकुछ बोलने का नाय\nकुछ बोलने का नाय\n कुछ बोलने का नाय *****\nबया शिकाया भायेर पडली\nशेरडा करडा म्हागची पोरं\nशिकून करतील उद्धार कुळाचा\nछाती फुगवून बा सपान पाह्य..\nपोराईंच्या हे ध्यानात बी नाय-\n कुछ बोलने का नाय\nइथं सबकुछ अलबेल हाय....\nपोरीनं कापल्या लांब झिपऱ्या\nपोरानं घातली झक्कड येणी\nफ्यासन हाय म्हणत्यात बेणी...\nकरेनात का बापडी,करु दे\nफुलायचं ह्येच तर वय हाय\n'झुलत' नाय ह्येच बेस हाय-\n कुछ बोलने का नाय\nइथं सबकुछ अलबेल हाय....\nवह्या पुस्तकं नसतातच कधी\nकानात गोळं न् गळ्यात दावं\nचालणं बघ कसं ठेक्यामधी...\n'जगाला प्रेम अर्पावे' ह्ये शिकून\nनवं जग त्यास्नी बघायचं हाय\nतिच्या पायाखाली याचा पाय-\n कुछ बोलने का नाय\nइथं सबकुछ अलबेल हाय....\nएकांतांत असतो हातात हात\nकधी कधी व्हटांचीबी साथ\nलाजंसाठी हवंच असतं 'लॉज'\nअन् नकळत घडून जाते बात..\nइचारलंच कुणी संशयानं तर\nम्हणत्यात आमची मैत्री हाय\n'लफड्याचं' नाव द्यायचं नाय-\n कुछ बोलने का नाय\nइथं सबकुछ अलबेल हाय....\nमोबाईलनं बिघडून गेली पिढी\nबघेल तवा त्या मोबाईलवरनं\nलाईनीवर आणावं म्हटलं तर\nअॉनलाईन 'अभ्यास' चालू हाय-\n कुछ बोलने का नाय\nइथं सबकुछ अलबेल हाय....\nकुछ बोलने का नाय\nकुछ बोलने का नाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2018-04-24T06:31:18Z", "digest": "sha1:NOTCWVILR6EGMYSFF6MNBBH7JMVVNN2G", "length": 6097, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:झारखंडमधील जिल्हे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभारताच्या झारखंड राज्यातील जिल्ह्यांविषयीचे लेख.\nएकूण २१ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २१ उपवर्ग आहेत.\n► कोडर्मा जिल्हा‎ (३ प)\n► गढवा जिल्हा‎ (२ प)\n► गिरिडीह जिल्हा‎ (३ प)\n► गुमला जिल्हा‎ (२ प)\n► गोड्डा जिल्हा‎ (२ प)\n► चत्रा जिल्हा‎ (२ प)\n► डुम्का जिल्हा‎ (२ प)\n► देवघर जिल्हा‎ (२ प)\n► धनबाद जिल्हा‎ (१ क, २ प)\n► पलामु जिल्हा‎ (२ प)\n► पश्चिम सिंगभूम जिल्हा‎ (३ प)\n► पाकुर जिल्हा‎ (२ प)\n► पूर्व सिंगभूम जिल्हा‎ (२ प)\n► बोकारो जिल्हा‎ (२ प)\n► रांची जिल्हा‎ (१ क, ३ प)\n► लातेहार जिल्हा‎ (२ प)\n► लोहारडागा जिल्हा‎ (२ प)\n► सराइकेला खरसावां जिल्हा‎ (२ प)\n► साहिबगंज जिल्हा‎ (२ प)\n► सिमडेगा जिल्हा‎ (१ प)\n► हजारीबाग जिल्हा‎ (३ प)\n\"झारखंडमधील जिल्हे\" वर्गातील लेख\nएकूण २६ पैकी खालील २६ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१५ रोजी १२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/television/news/chahul-marathi-serial-will-get-new-twist/20363", "date_download": "2018-04-24T06:39:36Z", "digest": "sha1:DTEO2KLEVB25HD3D4YGSJ7527WINTA2E", "length": 24694, "nlines": 242, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "chahul marathi serial will get new twist | चाहुल मालिकेला मिळणार हे वळण | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nचाहुल मालिकेला मिळणार हे वळण\nचाहूल या मालिकेच्या कथानकाला आता चांगलेच वळण मिळणार असून मालिकेत अनेक नव्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तसेच अनेक रहस्य या मालिकेत आता उलगडली जाणार आहेत.\nचाहूल मालिकेमध्ये सध्या भोसले वाड्यावर असलेल्या भूताच्या शोधात शांभवी आहे. निर्मला शांभवीच्या मार्गात अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. शांभवीला वाड्यातील भूताबद्दल कळले तर ती सर्जापासून कायमची दूर होईल अशी भीती निर्मलाच्या मनात आहे. म्हणूनच निर्मलाने शांभवीला चकवा देण्यासाठी भोसले वाड्यामध्ये स्नेहा हे लहान भूत आणले होते. पण आता निर्मला तिनेच रचलेल्या खेळामध्ये पुरती अडकली आहे. कारण स्नेहा वाड्यातून बाहेर पडल्यामुळे निर्मलाच्या सगळ्या शक्ती निघून गेल्या आहेत आणि हे तिला वाड्यात आल्यावर कळले आहे. निर्मला आता चांगलीच संतापली आहे. तसेच, भानुमतीने तिला दिलेल्या नकारामुळे निर्मला वाईट शक्तींच्या मार्गावर गेली आहे. वाईट शक्तींच्या मदतीने तिच्या शक्ती तिने परत मिळाल्या आहेत. पण त्या बदल्यात आता तिला महादेवचा बळी द्यावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना स्नेहा शांभवीला वाड्यामध्ये कोणाचा तरी खून झाला आहे हे एका वेगळ्याच पद्धतीने सांगणार आहे. त्यामुळे आता शांभवी वाड्यामध्ये कोणाचा खून झाला आहे हे शोधणार आहे. आता शांभवी निर्मलाच्या खुनाचे सत्य सर्जाला कसे सांगणार सर्जाला ते कळणार का सर्जाला ते कळणार का की निर्मला कुठला नवा सापळा रचणार की निर्मला कुठला नवा सापळा रचणार हे बघणे रंजक असणार आहे.\nया सगळ्या अघटित घटना घडत असतानाच आता वाड्यावर बबन्या आल्याने नवे वळण आले आहे. बबन्याला शांभवी वाड्यावर घेऊन आली असून त्याला पाहून वाड्यातील सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. पण सर्जा मात्र खुश आहे. कारण आता निर्मला कुठे आहे हे नक्कीच कळेल अशी त्याला खात्री आहे. परंतु, लवकरच बबन्या निर्मलाचा खून झाला असल्याचे शांभवीला सांगणार आहे. निर्मलाच्या रचलेल्या सापळ्यात बबन्या आणि शांभवी पुरते अडकले असून सर्जासमोर शांभवी खोट्यात पडणार आहे का हे मालिकेत पाहायला मिळणार आहे. परंतु या सापळ्यामधूनदेखील शांभवी बाहेर पडून सर्जाला घेऊन जंगलामध्ये जाणार आहे. आता जंगलामध्ये काय होणार निर्मलाच्या मृत्यूचे रहस्य बबन्याद्वारे सर्जाला कळणार की सर्जा आणि शांभवीच्या मैत्रीत दुरावा येणार निर्मलाच्या मृत्यूचे रहस्य बबन्याद्वारे सर्जाला कळणार की सर्जा आणि शांभवीच्या मैत्रीत दुरावा येणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील क...\n'गुलमोहर' मालिकेत पाहायला मिळणार नव...\nग्रहण या मालिकेच्या विशेष भागात प्र...\n'शतदा प्रेम करावे' आणि 'नकळत सारे घ...\nसुनिधी चौहानने गायले मराठी गाणं\n​गोठच्या सेटवर झाले महिला दिनाचे से...\n​नसते उद्योगच्या मंचावर 'भय'ची टीम\nछोट्या पडद्यावरील या मालिकेत रंगणार...\n‘साम दाम दंड भेद’मध्ये लोकप्रिय मरा...\n​अमृता सुभाषच्या नवीन इनिंगबद्दल तु...\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मि...\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये अनिल थत्...\nया अभिनेत्याचे सुयज घोषमुळे झाले हे...\nसई आणि पुष्करमध्ये का झाला वाद \n​या कारणामुळे कुल्फी कुमार बाजेवाला...\n'ये प्यार नहीं तो क्या है'मधली पलक...\n​या कारणामुळे अशोक सराफ यांना म्हटल...\n'तू आशिकी' मध्ये 'कोळी डान्स' विशेष...\n​झी टीव्हीवरील इश्क सुभान अल्ला मध्...\n'अग्निफेरा'च्या सेटवर या कलाकारांमध...\n​‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेची अशी...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/(-)-17262/", "date_download": "2018-04-24T06:52:59Z", "digest": "sha1:JX63G3UW5MPJYNLONHNXPPYUVKCDPRIG", "length": 2567, "nlines": 64, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-बाबलो (मालवणी कविता)", "raw_content": "\nडॉ. सतीश अ. कानविंदे\n( ' अक्षरसंपदा ' दिवाळी अंक २००० मध्यें प्रकाशित)\nशाळेक मारता दांडयो आणि\nभोकाड पसरून रडता मेलो\nशाळेची येळ झाली तरी\nमारून मुटकून धाडलोच तर\nशाळेत अभ्यास करणाच नाय\nम्हणता \" माझ्या डोस्क्यात तुमचो\nअभ्यास मुळीच शिरणा नाय\"\nआवस् बोलली \"हेचा आता\nशाळेतला नाव काढू या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/hollywood/news/lion-film-special-screening-will-be-held-in-mumbai-for-sunny-pawars-family/18542", "date_download": "2018-04-24T07:02:29Z", "digest": "sha1:WYYQYXGSHQTUNEUCPC2QWN532RIMRIR3", "length": 23487, "nlines": 229, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Lion Film Special Screening will be held in mumbai For Sunny Pawar's Family | सनीच्या अदाकारीचा जलवा त्याचे कुटुंबीय अनुभवणार, 'लायन' सिनेमाचे मुंबईत होणार स्पेशल स्क्रीनिंग | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nसनीच्या अदाकारीचा जलवा त्याचे कुटुंबीय अनुभवणार, 'लायन' सिनेमाचे मुंबईत होणार स्पेशल स्क्रीनिंग\nसनीच्या 'लायन' या सिनेमाला ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळालं होतं. या सिनेमात सनीने अभिनेता देव पटेलची बालपणीची भूमिका साकारली होती.सनीच्या अभिनयाची जादू असलेल्या लायन सिनेमाचा विशेष प्रिमीयर सोहळा आयोजित करण्यात आला आहे.\nमुंबईच्या झोपडपट्टीतून थेट ऑस्कर सोहळ्यात आपली छाप पाडणारा मुंबईकर बालकलाकार सनी पवारवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. सनीनं भूमिका केलेल्या ‘लायन’ सिनेमाला ऑस्करचं नॉमिनेशन मिळालं होतं. सनीच्या अभिनयाची झलक जगभरातल्या रसिकांनी अनुभवली आहे. आता सनीच्या अदाकारीचा जलवा त्याचे कुटुंबीय तसंच मुंबईच्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचा-यांना पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासाठी सनीच्या अभिनयाची जादू असलेल्या लायन सिनेमाचा विशेष प्रिमीयर सोहळा आयोजित करण्यात आला आहे.मुंबईतल्या कलिना परिसरातील एका झोपडपट्टीत छोट्याशा घरात राहणारा सनी एअर इंडिया मॉर्डन स्कूलमध्ये शिकतोय.त्यामुळे या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासाठी हा क्षण तितकाच खास असणार आहे. कारण सनी हा या शाळेचा पहिला विद्यार्थी आहे ज्याने शाळेचे नाव देशातच नाही तर जगभरात उंचावलं आहे. या प्रिमीयरच्या माध्यमातून जगभरातील रसिकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या आपल्या लाडक्या सनीच्या अभिनयाची जादू या सा-यांना या प्रिमीयरच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.\nसनीच्या 'लायन' या सिनेमाला ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळालं होतं. या सिनेमात सनीने अभिनेता देव पटेलची बालपणीची भूमिका साकारली होती. ही भूमिका साकारत असताना सनी अवघ्या सहा वर्षाचा होता.या सिनेमाची कथा भितीदायक असूनही सनीने ती भूमिका मोठ्या खुबीने साकारल्याने तो कौतुकास पात्र ठरला होता.ऑस्करच्या रेड कार्पेटवर चिमुकल्या सनी पवारचा जलवा पाहायला मिळाला.हॉलीवुडच्या दिग्गज कलाकारांपासून ते हॉलीवुडचे रसिक आणि माध्यमांच्या नजरा सनीनं आपल्याकडे आकर्षित केल्या होत्या. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातल्या सनीच्या खोड्या सा-यांनीच पाहिल्या होत्या. आता जगभरातील रसिकांची मनं जिंकणारा सनी मुंबईत दाखल झाला असून आपले नातेवाईक आणि त्याचे मित्र, शाळेच्या शिक्षकांसह सा-यांना लहानग्या सनीच्या अभिनयाची जादू अनुभवता येणार आहे.\n​‘खिलाडी’वर भारी पडलेली राधिका आपटे...\nसनी पवार मुंईत परतला, विमानतळावर ये...\nOSCARS 2017: अकॅडमी अवॉर्ड्सच्या आय...\n​ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दिली गेली...\nOSCARS 2017: आॅस्कर पुरस्कारावर बॉल...\nOSCARS 2017: जिमी किमेलचा मराठमोळ्य...\nलायन या चित्रपटातील सनी पवारची हजार...\nOSCARS 2017: आॅस्कर पुरस्कारांमध्ये...\nOSCARS 2017: ‘मूनलाईट’ ठरला सर्वोत्...\n​ऑस्कर सोहळ्याला देव पटेलने लावली आ...\nOSCARS 2017: प्रियांका चोप्राचा रेड...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/spinner-harbhajan-singh-unhappy-with-pm-modis-gst/", "date_download": "2018-04-24T06:50:02Z", "digest": "sha1:VP4B6ZNNTKXQV7BIUNHBGB37KKS63BPJ", "length": 5495, "nlines": 106, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जीएसटीवरून हरभजन सिंग सरकारबद्दल काय म्हणाला? - Maha Sports", "raw_content": "\nजीएसटीवरून हरभजन सिंग सरकारबद्दल काय म्हणाला\nजीएसटीवरून हरभजन सिंग सरकारबद्दल काय म्हणाला\nभारताचा महान फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने जीएसटीवरून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला भराव्या लागणाऱ्या जीएसटीवरून त्याने ट्विटरच्या माध्यमातून हा हल्लाबोल केला आहे.\n“रात्री हॉटेलमध्ये जेवण केल्यावर जेव्हा बिल भरायची वेळ येते तेव्हा राज्य आणि केंद्रसरकार हे दोघेही आपल्याबरोबर जेवण करण्यासाठी होते असे वाटते. “ असे हरभजन सिंग आपल्या ट्विटमध्ये म्हणतो.\nहरभजन सिंग सध्या भारतीय संघाबाहेर असून या खेळाडूने भारताकडून १०३ कसोटी आणि २३० वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत ४१७ तर वनडेत २६९ विकेट्स हरभजनने घेतल्या आहेत.\nपुण्यात होणाऱ्या वनडे सामन्याच्या तिकिटाचे दर जाहीर\nपहा: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या हाणामारीचा विडिओ\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- १\nवाढदिवस विशेष: “सचिन मला उत्तरे हवी आहेत”\nवाढदिवस विशेष: सचिन आता तरी थांब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF.%E0%A4%8F%E0%A4%A8.%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-24T06:40:12Z", "digest": "sha1:J3OSLUALPQ2WBFZZ36KDAZPRCQIVQLJM", "length": 5298, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आय.एन.एस. चक्र - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआय.एन.एस. चक्र ही भारतीय आरमाराची अकुला वर्गातील अणुशक्ति चलित लढाऊ पाणबुडी आहे. रशियन बनावटीची ही पाणबुडी जानेवारी २३, इ.स. २०१२ रोजी सेवेत दाखल झाली. याचे पूर्वीचे नाव के-१५२ नेर्पा असे होते. ही पाणबुडी दहा वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेण्यात आली. ७३ नौसैनिकांसह पाण्याखाली सलग १०० दिवस राहण्याची तिची क्षमता आहे.\nआय.एन.एस. शिशुमार • आय.एन.एस. शंकुश • आय.एन.एस. शल्की • आय.एन.एस. शंकुल\nआय.एन.एस. सिंधुघोष • आय.एन.एस. सिंधुध्वज • आय.एन.एस. सिंधुराज • आय.एन.एस. सिंधुवीर • आय.एन.एस. सिंधुरत्न • आय.एन.एस. सिंधुकेसरी • आय.एन.एस. सिंधुकीर्ती • आय.एन.एस. सिंधुविजय • आय.एन.एस. सिंधुरक्षक • आय.एन.एस. सिंधुशस्त्र\nआय.एन.एस. कलवारी • आय.एन.एस. खांदेरी • आय.एन.एस. करंज\nआय.एन.एस. अरिहंत • आय.एन.एस. अरिदमन\nभारतीय आरमाराच्या निवृत्त पाणबुड्या\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१६ रोजी ११:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ipl-twitter_emojis/", "date_download": "2018-04-24T06:34:17Z", "digest": "sha1:5F2QTGQGH7GWCBKGF6EAOR6DOMSFEX26", "length": 6871, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ट्विटरही आयपीएलच्या प्रेमात.. - Maha Sports", "raw_content": "\nरोज नवीन कल्पना घेऊन सोशल मीडिया वेबसाइट तरुणाईला भुरळ घालत असतात. त्यात ट्विटर ही वेबसाइटतर सर्वात पुढे आहे. भारतीयांचं क्रिकेटवरील प्रेम संपूर्ण जगाला माहित आहे आणि तेच प्रेम ट्विटरने आपल्या नवीन ईमोजीच्या माध्यमातून व्यक्त करायची संधी क्रिकेटप्रेमींना दिली आहे. तब्बल ३० हुन अधिक खास आयपीएल ईमोजी बनवून ह्या हंगामात आयपीएल बरोबर ट्विटरही कुठे मागे राहणार नाही.\nयावेळी प्रत्येक आयपीएल संघातील ४-५ खेळाडूंच्या खास ईमोजी ट्विटरने बनविल्या आहेत. यासाठी ट्विटरचा वापर करणाऱ्यांना फक्त हॅशटॅग आणि त्याच्यापुढे त्या खेळाडूच नाव हे ट्विट मध्ये लिहायचं आहे. त्यांनंतर आपोआप त्या हॅशटॅग शब्दसमोर ईमोजी तयार होते. विराट कोहली, धोनी, रैना, स्मिथ, सुनील नारायण, गंभीर अश्या बऱ्याच खेळाडूंचे ईमोजी बनवण्यात आले आहेत. जेणेकरून त्यांचे चाहते या सोशल माध्यमातून त्यांच्याशी कनेक्ट होतील.\nयाबद्दल बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी म्हणाले. “आयपीलच हे खास दहावे पर्व असल्यामुळे हे आमच्या आयपील स्टारसाठी आहेत ज्यांच्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने नावारूपाला आली. आम्ही हे सर्व ईमोजी त्या स्टार्सला समर्पित करतो. आता पाहूया चाहते कश्या प्रकारे ह्या ईमोजी वापरून ट्विटरवर संभाषण करतात. ”\nयाबद्दलचा खास व्हिडिओ आयपीएलच्या ट्विटर अकाउंटवरून प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच ट्विटर इंडियाने हा ट्विट रिट्विट केला आहे. या ट्विटला तब्बल ६०० रिट्विट सुद्धा मिळाले आहे.\nपहा काय आहेत ह्या ईमोजी…\nआकडेवारी आयपीएलच्या पहिल्या ९ पर्वांची…\nमॅक्सवेल पंजाबचा १०वा कर्णधार..\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/today-prashant-chopra-celebrating-his-25th-birthday-and-scores-his-maiden-triple-century-in-first-class-cricket/", "date_download": "2018-04-24T06:45:10Z", "digest": "sha1:VBE3R7OSCADWZ6RNCTVZIOTX5OE6AKD7", "length": 6287, "nlines": 109, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वाढदिवसाच्या दिवशीच त्याने ठोकले त्रिशतक - Maha Sports", "raw_content": "\nवाढदिवसाच्या दिवशीच त्याने ठोकले त्रिशतक\nवाढदिवसाच्या दिवशीच त्याने ठोकले त्रिशतक\n येथे सुरु असलेल्या हिमाचल प्रदेश विरुद्ध पंजाब रणजी सामन्यात प्रशांत चोप्रा या खेळाडूने ३३८ धावांची दणदणीत खेळी केली. विशेष म्हणजे हा खेळाडू आज त्याचा २५वा वाढदिवस साजरा करत आहे.\nरणजी ट्रॉफी स्पर्धेतील १०वा सार्वधिक स्कोर करताना त्याच्या खेळीच्या जोरावर हिमाचल प्रदेशने दुपारच्या सत्रापर्यंत ५ बाद ६३१ धावा केल्या. हे त्याचे पहिलेच त्रिशतक आहे.\nहा खेळाडू काल २७१ धावांवर नाबाद होता. याबरोबर त्याने ६७ वर्षात जे कोणत्याही खेळाडूला जमले नाही ते केले. भाऊसाहेब निंबाळकर यांनी १९४८-४९ मध्ये एकाच दिवसात रणजी स्पर्धेत २७७ धावा केल्या होत्या. त्यांनतर अशी कामगिरी कुणालाही करता आली नव्हती.\nवाढदिवसाच्या दिवशीच त्रिशतक करणारा प्रशांत चोप्रा हा सर्वात लहान आणि केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कॉलिन कॉवद्रय यांनी १९६२ तर रमण लांबा यांनी १९९५ साली वाढदिवसाच्या दिवशीच त्रिशतक केले होते.\nवाढदिवसाच्या दिवशी त्रिशतक करणारे खेळाडू\nकॉलिन कॉवद्रय (वय- ३०),१९६२\nरमण लांबा (वय-३५), १९९५\nप्रशांत चोप्रा (वय-२५), २०१७\nसेहवागने काल क्रिकेटचा सार असा सांगितला \nअंडर-१७ फुटबॉल: पाच असे खेळाडू जे विश्वचषक स्पर्धा दणाणून सोडू शकतात\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-24T06:43:21Z", "digest": "sha1:TFL4UOUE7QM4BO56NW6TES3TEQQGV3TQ", "length": 10103, "nlines": 167, "source_domain": "www.marathimati.net", "title": "केसरी | मराठीमाती", "raw_content": "\nस्वातंत्र्य दिन : कोट दि आयव्होर.\nमुक्ती दिन : टर्क्स व कैकोस द्वीप.\n१७९४ : व्हिस्की क्रांती – अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील शेतकर्‍यांनी व्हिस्की व अन्य गाळीव मद्यावरील कराविरुद्ध आंदोलन सुरू केले.\n१८१९ : बॉयाकाची लढाई – सिमोन बॉलिव्हारच्या सैन्याने स्पेनच्या सैन्याचा पाडाव केला.\n१८८८ : लंडनमध्ये जॅक द रिपरने पहिला खून केला.\n१८९० : ‘केसरी’ च्या खालोखाल प्रसिध्द असणारे जहाल वृत्तपत्र ‘मोदवृत्त’ याचा पहिला अंक भाऊशास्त्री लेले यांनी प्रसिध्द केली.\n१९४२ : दुसरे महायुद्ध – ग्वादालकॅनालची लढाई सुरू.\n१९४५ : दुसरे महायुद्ध – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने जपानच्या हिरोशिमा शहरावरील परमाणुबॉम्ब हल्ला सफल झाल्याचे जाहीर केले.\n१९४७ : थॉर हायरडाल व त्याच्या चमूने बाल्सा लाकडाच्या तराफ्यातून १०१ दिवसात पॅसिफिक समुद्र पार केला.\n१९४७ : मुंबई महापालिकेने बेस्ट कंपनी आपल्या अधिकारात घेतली.\n१९६० : कोट दि आयव्होरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.\n१९६४ : व्हियेतनाम युद्ध – अमेरिकन काँग्रेसने टोंकिनच्या अखातातील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्राध्यक्षलिंडन बी. जॉन्सनला सर्वाधिकार दिले.\n१९६५ : सिंगापुरची मलेशियामधून हकालपट्टी.\n१९६७ : व्हियेतनाम युद्ध – चीनने उत्तर व्हियेतनामला मदत करण्याचे जाहीर केले.\n१९७६ : व्हायकिंग २ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले.\n१९९१ : सामान्य माणसांना वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध.\n१९९७ : फाइन एर फ्लाइट १०१ हे मालवाहू विमान फ्लोरिडातील मायामी शहरात कोसळले. ५ ठार.\n१९९८ : टांझानिया व केन्यामधील अमेरिकन वकिलातींवर दहशतवाद्यांचा बॉम्बहल्ला. २२४ ठार, ४,५०० जखमी.\n३१७ : कॉन्स्टेन्टियस दुसरा, रोमन सम्राट.\n१८१६ : माटा हारी, डच गुप्तहेर.\n१९२५ : एम.एस. स्वामीनाथन, भारतीय शेतीतज्ञ.\n१९३७ : डॉन विल्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९४० : ज्यॉँ-लुक डेहेन, बेल्जियमचा पंतप्रधान.\n१९४८ : ग्रेग चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू व मार्गदर्शक.\n१९५९ : अली शाह, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\n१९६६ : जिमी वेल्स, विकिपिडीयाचा स्थापक.\n१९७१ : डॉमिनिक कॉर्क, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n४६१ : माजोरियन, रोमन सम्राट.\n४७९ : युराकु, जपानी सम्राट.\n११०६ : हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट.\n१८५५ : मेरियानो अरिस्ता, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४१ : रवींद्रनाथ ठाकूर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेता.\n१९७३ : जॅक ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n२००४ : रेड अडेर, अमेरिकेचा अग्निशमनतज्ञ.\n२००५ : पीटर जेनिंग्स, अमेरिकेचा वार्ताहर.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged केसरी, ग्रेग चॅपल, जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, मुंबई महापालिका, मृत्यू, रवींद्रनाथ ठाकूर, ७ ऑगस्ट on ऑगस्ट 7, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-24T06:39:11Z", "digest": "sha1:VETTPID3IFS5KAJE3OVW367EVWNLLJJY", "length": 8370, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गंजिफा | मराठीमाती", "raw_content": "\nमहाराष्ट्राला पुरातन वस्तूंचा आणि पुरातन कला अवशेषांचा फार मोठा समृद्ध आणि वैभवशाली वारसा लाभला आहे. इतिहासपूर्व व त्यानंतरच्या काळातील आणि ऐतिहासिक कालांतील विविध संस्कृतीच्या उदयास्ताच्या खुणा आणि अवशेष या भूमीतील त्या त्या काळाच्या विविध स्तरांचे असल्याचे उत्खननात आणि संशोधनात आढळून आले आहे. संस्कृतीच्या या मूक साक्षीदारंनी येथील संस्कृतीचा इतिहास बोलका केला आहे.\nपैठण, तेर, इनामागांव अणि महुरझरी येथे केकेल्या उत्खननात आणि संशोधनात येथील संस्कृतीच्या व लोकजीवनाच्या विविध पैलूंचे घडविणाऱ्या अनेक वस्तू आणि कलावशेष सापडले आहेत. यामध्ये, फुटलेली मातीची भांडी आणि त्यांचे तुकडे, मणी बांगड्याचे तुकडे, कलावशेष , अवजारे, नेहमीच्या वापरातील, भांडी, टेराकोटाच्या मुद्रा त्याचप्रमाणे हस्तीदंती, हाडाच्या, धातूच्या आणि लाकडाच्या वस्तू आणि शिल्पे आहेत. समाध्या आणि इतर पवित्र ठिकाणॆ कोरलेले शिलालेख, ताम्रपट, तसेच इतर अनेक ठिकाणी कोरलेली बोधचिन्हे आणि लेख यांचाही इतिहासाच्या या अमोल साधनात समावेश आहे.\nप्राचीन काळातील स्त्री-पुरुषांचे जीवन कसे होते, त्यावेळचे लोक कसे राहात, काय खात, त्यांच्या संवयी कोणत्या होत्या. धर्म, तत्वज्ञान, कला आणि सौन्दर्य, विज्ञान आणि तंत्रविद्या तसेच ज्ञानाच्या इतर विविधा शाखा यांबाबत त्यांचे विचार आणि संकल्पना कोणत्या होत्या याची कल्पना उत्खननात व संशोधन सापडालेल्या या विविध वस्तूंवरून येते. प्राचीन काळातील हा धार्मिक वारसा नंतरच्या काळात बौद्ध , जैन आणि हिंदूंच्या निवासी गुफांत, लेणी गुंफा मंदिरे आणि विहार व त्यानंतरच्या काळात मंदिरे आणि वैभवशाली प्रासादांच्या रूपाने अधिक संपन्न झाला आणि संस्कृतीचा हा नंदादीप अखंड तेवत राहिला.\nThis entry was posted in कलाक्षेत्रातील परंपरा and tagged अंजली मुनशी, कला, गंजिफा, चित्रे, परंपरा, भांडी, महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य, मूर्ती, संग्रह on जानेवारी 18, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%AA_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2018-04-24T06:35:27Z", "digest": "sha1:QKNNNY4ZHL5HCLKA5BOWRRUW6IDJ7VZF", "length": 11254, "nlines": 270, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९३४ फिफा विश्वचषक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२७ मे – १० जून\n८ (८ यजमान शहरात)\n७० (४.१२ प्रति सामना)\n३,५८,००० (२१,०५९ प्रति सामना)\n१९३४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची दुसरी आवृत्ती इटली देशामध्ये २७ मे ते १० जून १९३४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ३२ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\nयजमान इटलीने अंतिम फेरीच्या सामन्यात चेकोस्लोव्हाकियाला २-१ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. १९३६ बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेप्रमाणे ही विश्वचषक स्पर्धादेखील राजकीय सामर्थ्य दाखवण्याकरिता वापरली गेली. इटलीचा तत्कालीन सर्वेसर्वा बेनितो मुसोलिनीने आपल्या फॅसिस्ट राजवटीचे मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन केले.\n४ बाद फेरी निकाल\nइटली देशामधील ८ शहरांमध्ये ह्या स्पर्धेचे सामने खेळवले गेले.\nमागील विश्वचषक स्पर्धेत वापरण्यात आलेली साखळी पद्धत रद्द करून ह्या स्पर्धेत केवळ बाद फेऱ्या खेळवण्यात आल्या.\n१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी\n२७ मे – रोम\n३१ मे – फ्लोरेन्स\n२७ मे – जेनोवा\n३ जून – मिलान\n२७ मे – तोरिनो\n३१ मे – बोलोन्या\n२७ मे – नापोली\n१० जून – रोम\n२७ मे – त्रिएस्ते\n३१ मे – तोरिनो\n२७ मे – मिलान\n३ जून – रोम\n२७ मे – फ्लोरेन्स\nजर्मनी 1 तिसरे स्थान\n३१ मे – मिलान ७ जून – नापोली\nजर्मनी 2 जर्मनी 3\n२७ मे – बोलोन्या\nस्वीडन 1 ऑस्ट्रिया 2\nउरुग्वे १९३० • इटली १९३४ • फ्रान्स १९३८ • ब्राझील १९५० • स्वित्झर्लंड १९५४ • स्वीडन १९५८ • चिली १९६२ • इंग्लंड १९६६ • मेक्सिको १९७० • पश्चिम जर्मनी १९७४ • आर्जेन्टिना १९७८ • स्पेन १९८२ • मेक्सिको १९८६ • इटली १९९० • अमेरिका १९९४ • फ्रान्स १९९८ • कोरीया/जपान २००२ • जर्मनी २००६ • दक्षिण आफ्रिका २०१० • ब्राझील २०१४ • रशिया २०१८ • कतार २०२२\n१९३० • १९३४ • १९३८ • १९५० • १९५४ • १९५८ • १९६२ • १९६६ • १९७० • १९७४ • १९७८ • १९८२ • १९८६ • १९९० • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४\nइ.स. १९३४ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/television/hot-gossip/teyana-ashnita-glamorous-look-viral-on-social-media/21830", "date_download": "2018-04-24T06:35:07Z", "digest": "sha1:BW4BNS5FP22UGYHECXHCGC5EH7YUWJFR", "length": 22998, "nlines": 232, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Teyana Ashnita Glamorous Look Viral On Social Media | ख-या आयुष्यात इतकी ग्लॅमरस दिसतेय 'सरला बहु'? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\n‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या तिसऱ्या सिझनमध्ये सोनाली बेंद्रे पुन्हा परीक्षकाच्या भूमिकेत\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nख-या आयुष्यात इतकी ग्लॅमरस दिसतेय 'सरला बहु' फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nसध्या शिव गौरी, आजी आणि सरला बहु या व्यक्तिरेखा रसिकांना फुल ऑन एंटरटेन करण्यात यशस्वी ठरत आहे.\n'काहे दिया परदेस' मालिकेत शिव आणि गौरीच्या रोमँटीक लव्हस्टोरीने अख्या महाराष्ट्राला वेड लावलेले असताना आणखी एक व्यक्तिरेखा शिव आणि गौरीप्रमाणेच रसिकांच्या मनात घर करत आहे. शिव, गौरी आणि आजी या तिन्ही व्यक्तिरेखा सोडल्या तर कोणती 'ती' व्यक्तिरेखा आहे जी रसिकांवर भुरळ घालतेय असा तुम्ही विचार करत असालच, नाही आठवत असा तुम्ही विचार करत असालच, नाही आठवत अहो ही आहे आपली सरला भाभी, आता नक्कीच तुमच्या चेह-यावर थोडे हसु उमटले असणारच. होय, कारण 'सरला भाभी' आहेच इतकी भोळी आणि सोज्वळ. मालिकेत छोट्या छोट्या गोष्टींमुळे का होईना हायलाईट होतेय हे मात्र नक्की. मालिकेत सरला भाभीच आहे जी बिघडणा-या गोष्टींना मार्गी लावत असते. मालिकेत सरला भाभी खोटा सिक्का जरी वाटत असली तरी हाच खोटा सिक्का कधी कधी अशी काही जादु करून जाते की, रसिकही म्हणतात सरला भाभी तुस्सी ग्रेट हो.तुम्हाला सरला भाभी ही व्यक्तिरेखा पाहात असताना या गोष्टी जाणवत असणारच. आता आणखी एक गोष्ट तुमच्या सगळ्यांना सांगणार आहोत. ज्या गोष्टी कदाचित आजपर्यंत तुम्हाला माहिती नसतील. बहुधा त्या कधी हायलाईटच झाल्या नसतील.अशाच काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. सरला बहु म्हणून छोट्या पडद्यावर झळकत असणारी या अभिनेत्रीचं नाव आहे 'तेयाना अष्निता'. मालिकेत आदर्श सूनेप्रमाणे अम्माजीचे सगळ्या गोष्टींवर हा हा मिळवत असते. साडीमध्ये ती जितकी सुंदर दिसते त्याहुनही ख-या आयुष्यात ती अधिक ग्लॅमरस आहे. स्क्रीनवर दिसणा-या लुकपेक्षा अधिक ग्लॅमरस आहे ही अभिनेत्री. सध्या शिव गौरी, आजी आणि सरला बहु या व्यक्तिरेखा रसिकांना फुल ऑन एंटरटेन करण्यात यशस्वी ठरत आहे.या सगळ्या व्यक्तिरेखांप्रमाणे सरला बहुला देखील रसिकांकडून अधिक पसंती मिळत आहे.\nAlso Read:हा पाहा सायली संजीवचा लहानपणीचा फोटो\n'काहे दिया परदेस'फेम ऋषी सक्सेनाही...\n'लागिरं झालं जी' मालिकेने गाठला 10...\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अ...\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार...\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\n‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या तिसऱ्...\n‘जीजी माँ’च्या सेटवर कलाकारांना झाल...\n​बापमाणूस या मालिकेच्या कथानकाला मि...\nघरातील रहिवाश्यांना मिळाले पहिले Lu...\n'गुलमोहर' मालिकेत पाहायला मिळणार नव...\n“फराह माझी प्रेरणा आहे” एंटरटेनमेंट...\n‘बिग बॉस’फेम पूजा मिश्रा इतरांना दे...\nचित्रपटातील भूमिकेसाठी मला सुजयदांक...\nम्हणून लारा दत्ताने केले आशिष पटेलच...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/05/1_31.html", "date_download": "2018-04-24T06:24:10Z", "digest": "sha1:47WSGK2KX26B3ZM77A35AQHFOXMKMVLB", "length": 52220, "nlines": 393, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: अहिल्याबाई होळकर - भाग 1", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nअहिल्याबाई होळकर - भाग 1\n*अधिकारकाळ- डिसेंबर ११, इ.स. १७६७ - ऑगस्ट १३, इ.स. १७९५\n*राज्याभिषेक- डिसेंबर ११, इ.स. १७६७\n*पूर्ण नाव- पुण्यश्लोक अहिल्याबाई खंडेराव होळकर\n*जन्म- मे ३१ , इ.स. १७२५\nचौंडीगाव , जामखेडतालुका , अहमदनगर , महाराष्ट्र , भारत\n*मृत्यू- ऑगस्ट १३, इ.स. १७९५\nअहिल्याबाई होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या उपाधीने संबोधले जाते.\nअहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते व धनगर होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते.\nबाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.\nमल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. अहिल्याबाईंनी आपल्या राज्याला तुंगांपासून वाचवले. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.\nएका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या \"कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट\" म्हटले आहे.[१] (इ.स. १७२५ - इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेससलेल्या महे श्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.\nअहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.\nराणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात.\nपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे तैलचित्र\nइ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते.\n\"चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा.\"\nपूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.\nपेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली., माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.\nभारतीय संस्कृती कोशात अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.\nअहिल्याबाईंनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी प्केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाई च्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाईंनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.\nत्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास अहिल्याबाई होळकर असे नाव दिलेले आहे.\nभिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) 'माल्कम' यांच्यानुसार, अहिल्याबाईंनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.\nमहेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.\nएकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही.\n\"अहिल्याबाई एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला.\"[२]\n\"ज्याप्रमाणे अकबर हा पुरुषांमधला उत्तम राजा तसेच अहिल्याबाई ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. जिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्याबाई ही एक महान स्त्री होती.\" [३] \"आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्याबाईंनी रयतेचे मन जिंकले. नाना फडणवीसांसकट अनेक उच्च धुरीण आणि माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वांत शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती.[४] अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्याबाईंना 'तत्त्वज्ञानी राणी' असे संबोधतात. याचा संदर्भ बहुतेक 'तत्त्वज्ञानी राजा' भोज याच्याशी असावा.[५]\nअहिल्याबाई होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन १७७२ मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्यांनी नोंदले आहे :\" वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहर्‍यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता, त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.[६]\n\"या इंदूरमधील शासकांनी, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्वांस चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले. व्यापाऱ्यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले, व्यापार वाढला, शेतकरी हे शांततेत व दबावरहित होते. कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. अहिल्याबाईंना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हिसकावून घेईल म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपर्यंत, रस्त्यांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते, विहिरी केल्या होत्या, पथिकांसाठी विश्रांतीगृहे. गरीब ,घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार, सर्व मिळत होते. बहुत काळापासून, भिल्ल लोक पहाडांतून सामानाची नेआण करत असतांना लूटमार करीत असत. अहिल्याबाईंनी त्यांना त्यातून मुक्ती मिळवून दिली व प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी त्यांना देऊ केली. सर्व समाजाला अहिल्याबाई आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करी. त्यांच्या कन्येने तिचा पती, यशवंतराव फानसे यांच्या मृत्यूनंतर सती जाणे हे अहिल्याबाईंच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते.[७]\nवयाच्या ७०व्या वर्षी अहिल्याबाई होळकरांची प्राणज्योत निमाली.\nभारत स्वतंत्र झाल्यावरही पुढील अनेक वर्षे शेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतीशील राहिले. याच्या मागे अहिल्याबाईंची दूरदृष्टी होती.\n*अहिल्याबाई होळकर यांचे टपाल तिकिट -\nअहिल्याबाईंच्या सन्मान व स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने ऑगस्ट २५ , इ.स. १९९६ या दिवशी एक डाक तिकिट जारी केले.[१]\nया अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव \"देवी अहिल्याबाई विमानतळ\" असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास \"देवी अहिल्या विश्ववि द्यालय\" असे नाव देण्यात आले आहे\".\n*त्यांची भारतभरातील कामे -\nअकोले तालुका- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर.\nअंबा गाव – दिवे.\nअमरकंटक (मप्र)- श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड\nअलमपूर (मप्र) – हरीहरेश्वर, बटुक, मल्हारीमार्तंड, सूर्य, रेणुका,राम, हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक\nआनंद कानन – श्री विघ्नेश्वर मंदिर.\nअयोध्या (उ.प्र.)– श्रीरामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.\nआमलेश्वर, त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार\nउज्जैन (म.प्र.)– चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ,गोपाल,चिटणीस,बालाजी,अंकपाल,शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट,विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.\nओझर (अहमदनगर) (महाराष्ट्र) – २ विहिरी व कुंड.\nइंदूर – अनेक मंदिरे व घाट\nओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,\nकर्मनाशिनी नदी – पूल\nकाशी (बनारस) – काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी, अहिल्या द्वारकेश्वर, गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे, मंदिरांचे घाट, मनकर्णिका, दशास्वमेघ, जनाना, अहिल्या घाट, उत्तरकाशी, रामेश्वर पंचक्रोशी, कपिलधारा धर्मशाळा, शीतल घाट.\nकेदारनाथ – धर्मशाळा व कुंड\nकोल्हापूर(महाराष्ट्र) – मंदिर-पूजेसाठी साहाय्य.\nकुम्हेर – विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.\nकुरुक्षेत्र (हरयाणा) - शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.\nगंगोत्री –विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा.\nगया (बिहार) – विष्णुपद मंदिर.\nगोकर्ण – रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.\nघृष्णेश्वर (वेरूळ) (महाराष्ट्र) – शिवालय तीर्थ.\nचांदवड वाफेगाव(महाराष्ट्र) – विष्णु व रेणुकेचे मंदिर.\nचित्रकूट (उ.प्र.) - श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nचौंडी – चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा व घाट\nजगन्नाथपुरी (ओरिसा) – श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा\nजळगांव(महाराष्ट्र) - राम मंदिर\nजांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान\nजेजुरी(महाराष्ट्र) – मल्हारगौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.\nटेहरी (बुंदेलखंड) – धर्मशाळा.\n – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.\nत्र्यंबकेश्वर (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पूल.\nद्वारका(गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजार्‍यांना काही गावे दान.\nश्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.\nनाथद्वार – अहिल्या कुंड, मंदिर, विहीर.\nनिमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.\nनीलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.\nनैमिषारण्य (उ.प्र.) – महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतीर्थ कुंड.\nनैम्बार (मप्र) – मंदिर\nपंचवटी (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.\nपंढरपूर(महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप ,धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली.\nपिंपलास (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.\nपुणतांबे(महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.\nपुणे (महाराष्ट्र) – घाट.\nपुष्कर – गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.\nप्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) - विष्णु मंदिर, घाट व धर्मशाळा, बगीचा, राजवाडा.\nबद्रीनारायण (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मंदिर, हरिमंदिर, अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठीकुरणे.\nबर्‍हाणपूर (मप्र) – घाट व कुंड.\nबीड (महाराष्ट्र)– घाटाचा जीर्णोद्धार.\nबेल्लूर (कर्नाटक) – गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अग्नि मंदिरे, कुंड\n' भरतपूर' – मंदिर, धर्म शाळा व कुंड.\nभानपुरा – नऊ मंदिरे व धर्मशाळा.\nभीमाशंकर (महाराष्ट्र) – गरीबखाना\nभुसावळ (महाराष्ट्र) - चांगदेव मंदिर\nमंडलेश्वर – शिवमंदिर घाट\nमनसा – सात मंदिरे.\nमहेश्वर - शंभरावर मंदिरे,घाट व धर्मशाळा व घरे.\nमामलेश्वर महादेव – दिवे.\nमिरी (अहमदनगर) (महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मंदिर\nरामपुरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.\nरामेश्वर (तामिळनाडु) – हनुमान, श्री राधाकृष्णमंदिरे, धर्मशाळा ,विहिर, बगीचा इत्यादी.\nरावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड\nवाफेगाव (नाशिक)(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहीर.\nश्री विघ्नेश्वर – दिवे\nवृंदावन (मथुरा) – चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.\nवेरूळ(महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.\n'अहिल्याबाई' : लेखक - श्री. हिरालाल शर्मा\n'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. पुरुषोत्तम\n'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. मुकुंद वामन बर्वे\nअहिल्याबाई होळकर - वैचारिक राणी (लेखक : म.ब. कामत व व्ही.बी.\nअहिल्याबाई होळकर : लेखक - म.श्री. दीक्षित\nअहिल्याबाई होळकर (चरित्र), लेखक : खडपेकर\n'कर्मयोगिनी' : लेखिका - विजया जहागीरदार\nमहाराष्‍ट्राचे शिल्‍पकार - तेजस्विनी अहिल्‍याबाई होळकर (लेखिका : विजया जहागीरदार; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)\n'ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई होळकर' लेखक - विनया खडपेकर\nदेवी अहिल्या बाई या नावाचा एक चित्रपट सन २००२ मध्ये आला होता. त्यात शबाना आझमी हिने हरकूबाई म्हणून (खांडा राणी, मल्हारराव होळकरांची एक पत्‍नी) भूमिका केली होती. चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांची मल्हारराव होळकर (अहिल्याबाईचे सासरे) म्हणून भूमिका होती. [२]\nअहिल्याबाईच्या जीवनकालावर, इ.एम.आर.सी.इंदूर तर्फे एक २० मिनिटांची डॉक्युमेंटरी चित्रफीत बनविली गेली होती.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nआधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करणे\nआंतरजिल्हा बदली Incoming व Outgoing याद्या\n२१ जून : योगदिन स्पेशल\nआंतरजिल्हा बदली आवश्यक दाखले\nशालेय पोषण आहार करारनामा\nइयत्ता 10 वी निकाल\nआंतरजिल्हा बदली यादी सर्वजिल्हे\nजिल्ह्यांची नावे लक्षात ठेवण्याची ट्रिक\n25 मुद्दे - निकष आणि गुण\nमराठी माध्यमातील मुलांनी “इंग्रजी भीती” वर विजय मि...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर -3\nकाही आयुर्वेदिक आरोग्यदायी टिप्स\nशेवगा खा, सांधेदुखी पळवा \nतांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने होणारे फायदे\n30 मिनीट चालण्याचे ३० फायदे\nदेशात प्रथमच नदीखालून बोगदा\nअशी असेल १ रूपयाची नवी नोट\nखासगी शाळेतही परीक्षेद्वारे भरती\nअहिल्याबाई होळकर - भाग 1\n‘बीएसएनएल’देणार उपग्रह फोन सेवा\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHR/MRHR012.HTM", "date_download": "2018-04-24T07:30:22Z", "digest": "sha1:YTPORFS4MAP5FFNDED7GF7ZPGVUWBJO3", "length": 7087, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - क्रोएशियन नवशिक्यांसाठी | काल – आज – उद्या = Jučer – danas – sutra |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > क्रोएशियन > अनुक्रमणिका\nकाल – आज – उद्या\nकाल मी चित्रपट बघायला गेलो होतो. / गेले होते.\nआज मी कामाला / नोकरीवर जाणार नाही.\nउद्यापासून मी पुन्हा कामाला जाणार.\nमी एका कार्यालयात काम करतो. / करते.\nपीटर आणि मार्था मित्र आहेत.\nपीटर मार्थाचा मित्र आहे.\nमार्था पीटरची मैत्रिण आहे.\nसध्या, परकीय भाषा या रोजच्या शिक्षणाचा भाग बनल्या आहेत. फक्त त्यांना शिकत असल्यास रटाळपणा येणार नाही ज्यांना त्या भाषांबरोबर शिकण्यात अडथळे वाटत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण झोपेत अधिक चांगल्या रीतीने शिकू शकतो. वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधन या निष्कर्ष पर्यंत पोहोचले आहेत. आणि जेव्हा भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा आपण हे वापरू शकतो. आपण दिवसातील घटनांवर झोपेत प्रक्रिया करतो. आपला मेंदू नवीन अनुभवाबाबत छाननी करत असतो. जे काही आपण अनुभवतो, त्यावर पुन्हा एकदा विचार होतो आणि नवीन आशय आपल्या मेंदूत टाकला जातो. झोपण्या अगोदर शिकलेल्या अथवा अनुभवलेल्या गोष्टी विशेषतः अगदी चांगल्या रीतीने लक्षात राहतात. म्हणून, महत्वाच्या गोष्टींची संध्याकाळी उजळणी केली तर ते आधी चांगलेच लक्षात राहते. वेगवेगळ्या झोपेच्या अवस्था वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास कारणीभूत असतात. REM झोप मानसोपचार गोष्टी शिकण्यास मदत करतात. गाणे किंवा खेळणे या प्रकारात मोडतात. याच्या उलट अस्सल ज्ञान हे तीव्र झोपेत शिकले जाते. इथेच आपण जे काही शिकलो त्याची उजळणी होते. शब्दसंग्रह आणि व्याकरण सुद्धा ज्यांना त्या भाषांबरोबर शिकण्यात अडथळे वाटत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण झोपेत अधिक चांगल्या रीतीने शिकू शकतो. वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधन या निष्कर्ष पर्यंत पोहोचले आहेत. आणि जेव्हा भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा आपण हे वापरू शकतो. आपण दिवसातील घटनांवर झोपेत प्रक्रिया करतो. आपला मेंदू नवीन अनुभवाबाबत छाननी करत असतो. जे काही आपण अनुभवतो, त्यावर पुन्हा एकदा विचार होतो आणि नवीन आशय आपल्या मेंदूत टाकला जातो. झोपण्या अगोदर शिकलेल्या अथवा अनुभवलेल्या गोष्टी विशेषतः अगदी चांगल्या रीतीने लक्षात राहतात. म्हणून, महत्वाच्या गोष्टींची संध्याकाळी उजळणी केली तर ते आधी चांगलेच लक्षात राहते. वेगवेगळ्या झोपेच्या अवस्था वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास कारणीभूत असतात. REM झोप मानसोपचार गोष्टी शिकण्यास मदत करतात. गाणे किंवा खेळणे या प्रकारात मोडतात. याच्या उलट अस्सल ज्ञान हे तीव्र झोपेत शिकले जाते. इथेच आपण जे काही शिकलो त्याची उजळणी होते. शब्दसंग्रह आणि व्याकरण सुद्धा जेव्हा आपण एखादी नवीन भाषा शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूने कष्ट घेतले पाहिजे. त्याने नवीन शब्द आणि नियम लक्षात ठेवले पाहिजे. झोपेत देखील याची एकदा उजळणी झाली पाहिजे. संशोधक यास रिप्ले/पुनर्बिंबण तत्व असे म्हणतात परंतु, तुम्ही चांगले झोपणे महत्वाचे आहे. शरीर आणि मन यांमध्ये पुनर्योजन व्यवस्थितपणे होणे महत्वाचे आहे. त्यानंतरच, मेंदू अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकेल. तुम्ही म्हणू शकता: छान झोप, चांगली मानसिक कार्यक्षमता. जेव्हा आपण विश्रांती घेतो, तेव्हा देखील आपला मेंदू कार्य करत असतो. म्हणून: शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री \nContact book2 मराठी - क्रोएशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC.html", "date_download": "2018-04-24T07:03:55Z", "digest": "sha1:FB7VEKKBJ2DACSZAHI2QYEVJR6AAR7DZ", "length": 4051, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "नाईटक्लब - Latest News on नाईटक्लब | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\n‘किस क्लब’ जळून खाक; २४५ जण होरपळले\nदक्षिण ब्राझिलमध्ये एका नाईटक्लबला लागलेल्या आगीत अडीचशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत २४५ जणांचे मृतदेह हाती लागलेत आत्तापर्यंत ४८ जणांना हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलंय.\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nनवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा\nपेट्रोलने गाठला 55 महिन्यांचा उच्चांक, डिझेलच्या ही दरात मोठी वाढ\nआयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर\nअभिनेता राजपाल यादवला ६ महिन्याची जेल\nलग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये येतात या समस्या\nसांंधेदुखीचा त्रास आटोक्यात आणायला मदत करेल 'हे' घरगुती पेय\nराजस्थानला सनसनाटी विजय मिळवून देणारा गौतम, लिलावात मिळालेली किंमत ऐकून थक्क व्हाल\nकर्नाटक : भाजपने कापले येडियुरप्पांचे दोर, मुलाला नाकारली उमेदवारी\nनाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/bcci-slammed-over-anil-kumble-birthday-post/", "date_download": "2018-04-24T06:26:34Z", "digest": "sha1:HONCGXGFTB5FYC7DA52NT72YVYLP6CVW", "length": 10110, "nlines": 130, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कुंबळेच्या वाढदिवसाच्या पोस्टवरून वाद, बीसीसीआयने काढून टाकली पोस्ट - Maha Sports", "raw_content": "\nकुंबळेच्या वाढदिवसाच्या पोस्टवरून वाद, बीसीसीआयने काढून टाकली पोस्ट\nकुंबळेच्या वाढदिवसाच्या पोस्टवरून वाद, बीसीसीआयने काढून टाकली पोस्ट\n भारताचा दिग्गज गोलंदाज आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट बीसीसीआयच्या ट्विटर हॅन्डल वरून आज सकाळी करण्यात आली होती पण आता ती पोस्ट काढण्यात आली आहे.\nभारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. जगातील सर्वोत्तम लेग स्पिनरपैकी एक असलेल्या अनिल कुंबळेसाठी बीसीसीआयने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘भारताचा माजी गोलंदाज’ असा उल्लेख केला. क्रिकेटप्रेमींना वर्गाला ही गोष्ट आवडली नाही आणि त्यांनी बीसीसीआयला ट्विटरवर जाब विचारला.\nयाचाच परिणाम की काय बीसीसीआयने सकाळी १० वाजून ५६ मिनिटाने टाकलेली पोस्ट काढून टाकली आणि एक नवीन पोस्ट लिहिली ज्यात कुंबळेचा उल्लेख माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू म्हणून करण्यात आला आहे.\nनवीन ट्विटमध्ये देखील कुंबळेला फक्त माजी कर्णधार म्हटले आहे. त्यात त्याला माजी प्रशिक्षक न म्हटल्यामुळे पुन्हा चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.\nबीसीसीआयला अनेक ट्विट्स आले ज्यात कुंबळेला दिलेल्या शुभेच्छांवरून क्रिकेटप्रेमींनी हल्लबोल केला. नंतर जेव्हा बीसीसीआयने आधीचा ट्विट डिलीट करून पुन्हा नवीन शुभेच्छांचा ट्विट केला तेव्हा चाहत्यांचे आलेले हे रिप्लाय…\nलॉर्डस क्रिकेट मैदानाच्या ट्विटर अकाउंटवरूनही कुंबळेला खास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यात कुंबळेचा लॉर्ड्सवरील एक खास विडिओ शेअर करण्यात आला आहे.\nअनिल कुंबळेने १३२ सामन्यात ६१९ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १४ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. अनिल कुंबळे हा कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या २ गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच बरोबर निवृत्ती नंतर त्याने जवळजवळ १ वर्ष भारताचे प्रशिक्षक पदही सांभाळले.\nएवढे सर्व विक्रम करणाऱ्या खेळाडूचा उल्लेख बीसीसीआय भारताचा माजी गोलंदाज असे कसे करू शकते याचे प्रमुख कारण बीसीसीआय, विराट कोहली आणि प्रशिक्षक पदाचा झालेला वाद आहे का \nAnil KumbleBCCIBirthday PostTwitterअनिल कुंबळेट्विटरबीसीसीआयवाढदिवसाच्या शुभेच्छा\nVideo: असा झाला हार्दिक पंड्याचा वाढदिवस साजरा\nन्यूजीलँड विरुद्धच्या सराव सामन्यात भारताचे हे फलंदाज चमकले\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://saangatyeaika.blogspot.com/2010/04/blog-post_23.html?showComment=1272558887063", "date_download": "2018-04-24T06:18:47Z", "digest": "sha1:QWTRZFV2IAVORV5O2M2FR42SGTMAIOD4", "length": 13783, "nlines": 187, "source_domain": "saangatyeaika.blogspot.com", "title": "सांगत्ये ऐका...: इंस्टंट माहेर", "raw_content": "\nगेल्या आठवड्यात अचानकच हार्टफर्डला भावाकडे जायचा योग आला. माझा अमेरिकेतला सर्वात जवळचा- अंतराने आणि मनाने- नातेवाईक. त्याने लग्नानंतर यंदा प्रथमच गणपती बसवला आहे. माझ्या वहिनीने अगदी दगडुशेठचे चित्र समोर ठेऊन घरी मूर्ती बनवली आहे. त्यांच्या गणपतीचे दर्शन घ्यायचेच होते. शिवाय माझा किडक्या दातांच्या बाईबरोबर सकाळी-सकाळी interview होता. मग आम्ही सगळेच आदल्या दिवशी हार्टफर्डला गेलो. संध्याकाळी निघतो म्हणेतो आठ वाजले निघायला. ९५ ची डागडुजी काढलीये, रात्रीचं काम सुरु होतं त्यामूळे दोन-तीन वेळा रहदारीत अडकलो. पोचायला बराच उशीर झाला. भावाला आणि वहिनीला जेऊन घ्या सांगितले होते. तरी ते वाट बघत थांबलेच.\nभावाचे लग्न झाल्यापासून सगळेच कसे बदलले आहे. त्याच्या लग्नाआधी आम्ही जायचो तेव्हा इशानचे खाण्या-पिण्याचे तर न्यावे लागायचेच पण भावासाठी पण काहीतरी करुन न्यायचे. त्याबरोबर डिस्पोजेबल ताटं/वाट्या/चमचे/पेले आणि अगदी पेपरटावेल्स पण न्यायचे. ह्यावेळेस जायचे ठरले तेव्हा मी सवयीने सर्व तयारी केली. रहायला जायचे म्हणून उशा/चादरी पण नेल्या. पण तिथे पोचल्यापासून कसा अगदी 'पाट बसायला..ताट जेवायला' असा थाट होता. वहिनी माझी पोलिश आहे. पण तिने खपून छोले, नारळाची चटणी, जीरा राइस, मलई बर्फी कृतीने पेढे असा बेत केला होता. स्वच्छ बाथरुममधे स्वच्छ धुतलेले टावेल्स घडी करुन ठेवले होते. आमच्यासाठी गादी घालुन तयार होती. सकाळी आवरुन येईपर्यंत नाष्टा टेबलवर वाट बघत होता.\nएरवी इशानला पाळणाघरात सोडुन माझी मी कुठे जायचे ते गेले असते. आज मात्र डाउनटाउनमधे सकाळी कुठे पार्किंग मिळणार, आता मला हार्टफर्ड सवयीचं नाही इ. म्हणून वहिनी मला सोडवायला आली. त्यांच्या घरापासून अर्ध्या तासाचं तरी ड्राइव्ह आहे. इंटरव्यु अपेक्षेपेक्षा लवकरच संपला (किडक्या दातांच्या बाईशी कितीवेळ बोलणार). मग घाई घाई घ्यायला आली.\nवहिनीला माझ्या वेगवेगळे फ्रूट स्प्रेड्स बनवायची फार आवड आहे. सारखे काही न काही विणकाम पण सुरु असते. माझ्या गाडीतल्या गणपतीसाठी आसन विणले आहे. निघताना ते आसन, २-३ प्रकारचे स्प्रेड्स, पेढे असे काय काय बांधुन दिले. आईची आठवण झाली. आईकडे गेले की काही हवे आहे म्हणावे लागत नाही. मी भारतात पोचायच्या २-३ दिवस आधीच ताजे मसाले, भाजणी असे काय काय तयार असते. आता आईकडे माहेरपणाला जायचे झाले तर अजून वर्षभर तरी वाट बघावी लागेल. पण काल अगदीच ध्यानी मनी नसता भावाकडे माहेरपणाचे सूख अनुभवुन आले. परत येताना विचार करत होते, 'हे बरंय, आता माहेरी जावसं वाटलं की हे आहेच माझं इंस्टंट माहेर' :)\nद्वारा पोस्ट केलेले तृप्ती\nलेबले: . इकडचं तिकडचं\nअरे वा, चांगले आहे ’इंस्टंट माहेर’ :)\nधन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत :)\nलाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी\nधर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी\n. इकडचं तिकडचं (20)\n. एक होती चिऊ (7)\n. मराठी पुस्तकं (2)\n. लेमनांसाठी हस्तकला (4)\n. वडाची साल पिंपळाला (5)\n. शिंडीबाय इन अमेरिका (2)\n. सगे सोयरे (5)\n. सामाजिक उपक्रम (4)\n. हसतील त्याचे दात दिसतील (1)\nजाणवले ते . . .\nकिआ ओरा न्यु झीलंड\nगीत रामायण, गदिमा आणि शेक्सपिअर\n‘द शेप ऑफ वॉटर’\nअकाली मोठेपण आलेली 'लिटील डॉटर'\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nशमा - ए - महफ़िल\nसिनेमा आणि संस्कृती:भाग-४ मुस्लिम सोशल्स\nदेवाणघेवाण: एल्विस प्रिस्ले टू पास्कल बाॅलिवूड\nवाचाळ प्रकाश बाळ आणि त्यांचा उतरता काळ\nसुगरण आईच्या साध्या,सोप्प्या पण चविष्ट पाककृती\nग्रीनवॉशिंग व ग्राहकांची जागरूकता\nसुवर्णकाळाची स्वप्न दाखवणारं कांस्य पदक\nही माझ्याकडील पुस्तकांची यादी. ह्यातली जवळ जवळ सगळीच पुस्तकं आवडती आहेत, (माझ्या मते) वाचनीय आहेत. ~ ललित ~ भावगंध :...\nमाझ्या चुलत आजी बद्दल थोडंसं. माझ्या वडिलांची काकू म्हणून ती आमची 'काकूआजी'. 'काकूआजी' मूळची सांगलीची. शिक्षणासाठी पुण्याला...\nजिंजरब्रेडपासून बनवलेले घर म्हणजे जिंजरब्रेड हाउस. फोटो प्रकाशित करायला घेतले तेव्हा जिंजरब्रेडविषयी थोडी शोधाशोध केली. आले, मध आणि काकवी ...\nइमॅजिनेशन अप्लाइड : भाग ३\nया भागात काही जगभरातल्या प्रसिद्ध इमारती आहेत आणि नंतर पॉल बसी आणि त्यांच्या टीमनं बनवलेले काही नमुने. आर्क द त्रिओम्फ, फ्रान्स ओसाका,...\n. स्नॉव्हेल: ऐकु आनंदे\n. आईला उद्योजिका व्हायचंय\n. आईला शाळेत जायचंय\n. इंटरनेटवरील महिला विश्व\n. आपले मराठी अलंकार\n. मायबोली दिवाळी अंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2018-04-24T06:26:25Z", "digest": "sha1:TRWXNK2AHGMS4WRZU3PJQA4P56GUXOBB", "length": 5588, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दीनदयाळ उपाध्याय - विकिपीडिया", "raw_content": "\n(दीनदयाल उपाध्याय या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपंडित दीनदयाळ उपाध्याय (२५ सप्टेंबर, इ.स. १९१६ - ११ फेब्रुवारी, इ.स. १९६८) हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.\nपं. दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांचे चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला.\n११ फेब्रुवारी इ.स. १९६८ रोजी दीनदयाळांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. बेगुसराय स्टेशनच्या रुळांजवळ त्यांचे शव आढळले होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहत्या झालेले भारतीय राजकारणी\nइ.स. १९१६ मधील जन्म\nइ.स. १९६८ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१६ रोजी १८:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/lifestyle/trends/fathers-day-special-2017/21809", "date_download": "2018-04-24T06:34:35Z", "digest": "sha1:PT26YAMV7XXBJVCW3KQ6BV4XO7GGMGWX", "length": 25702, "nlines": 251, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "​Father's Day Special 2017 | ​Father's Day Special : आयुष्यात वडिलांचे स्थान वेगळेच ! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\n‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या तिसऱ्या सिझनमध्ये सोनाली बेंद्रे पुन्हा परीक्षकाच्या भूमिकेत\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\n​Father's Day Special : आयुष्यात वडिलांचे स्थान वेगळेच \nअसे म्हटले जाते की, १६ व्या शतकात ‘पिता’ शब्द अस्तित्वात आला होता. वडिलांबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस प्रत्येकासाठी एक विशेष दिवस असतो.\nफादर्स डे संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काही जर घरात तर काही चित्रपट किंवा डिनरचे आयेजन करुन बाहेर साजरा करतात. असे म्हटले जाते की, १६ व्या शतकात ‘पिता’ शब्द अस्तित्वात आला होता. वडिलांबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस प्रत्येकासाठी एक विशेष दिवस असतो.\nखरं पाहिले तर आपल्या आयुष्यात वडिलांचे स्थान आगळेवेगळेच असते. त्यांच्या छत्रछायेत आपण लहानाचे मोठे होतो. या जगात वावरण्या इतकं बळ मिळतं ते वडिलांनी दिलेले प्रेम, शिकवण, संस्कारामुळेच. एखाद्या वेळी वेळात वेळ काढून वडिलांसोबत बसा आणि त्यांच्या गोष्टी, त्यांचे विचार, अनुभव, व्यतित केलेले आयुष्य, त्यासंबंधी जुडलेल्या घटना हे सर्व ऐका. यावरुन समजेल की, वडिलांची भूमिका किती कठीण असते. त्यांच्या या अनुभवातून आपणासही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील.\nफादर्स डे वडिलांबद्दल आदर व प्रेम व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगात साजरा केला जातो. काही देशांमध्ये हा दिवस जूनच्या तिसऱ्या रविवारी, तर काही देशांमध्ये इतर दिवशी साजरा केला जातो.\nफादर्स डेची सुरुवात विसाव्या शतकात झाली. या दिवसाची सुरुवात करण्याचा उद्देश म्हणजे वडिलांनी आपले जे पालनपोषण केले त्याप्रति आदर-सन्मान करणे होय. यादिवशी मुले वडिलांना गिफ्ट देतात, वडिलांसाठी स्पेशल जेवणाची व्यवस्था करतात शिवाय काही कौटुंबिक कार्यक्रमाचेही आयोजन करतात.\nजगात सर्वप्रथम फादर्स डे पश्चिम वर्जिनियाच्या फेयरमोंटमध्ये ५ जुलै १९०८ मध्ये साजरा करण्यात आला होता. त्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पहिली फादर्स चर्च आजदेखील सेन्ट्रल यूनाइटेड मेथोडिस्ट चर्चच्या नावाने फेयरमोंट मध्ये स्थित आहे.\n६ डिसेंबर १९०७ मध्ये पश्चिम वर्जिनियामध्ये एका अपघातात सुमारे २१० वडील मृत्यू झाले होते. त्यांच्या सन्मानार्थ फादर्स डेचे आयोजन ग्रेस गोल्डन क्लेटन नावाच्या महिलेने केले होते.\nआजच्या फादर्स डे निमित्त आपण वडिलांसाठी काहीतरी नवीन बनविण्याचे आयोजन करु शकता. त्यात आपण त्यांना न कळत त्यांच्या सर्व मित्रांना लंच किंवा डिनरसाठी घरी बोलवू सरप्राईज देऊ शकता. तुमचे वडिल आॅफिसमधून घरी आल्यानंतर त्यांना फादर्स डे विश करुन चकित करु शकता.\nएक वडील आणि मुलांचे नाते खरच वेगळे असते.\nवडिलांच्या सन्मानार्थ जगातील सर्वात वृद्ध वडील म्हणून एका शेतकऱ्याला गौरविण्यात आले आहे, ज्यांचे नाव नानू राम जोगी आहे. ९० वर्षीय जोगी २००७ मध्ये आपल्या २१ व्या मुलांचे वडील बनले होते.\nAlso Read : ​Father's Day Special : वडिलांना द्या जगातला परमोच्च आनंद \n​ साजिद नाडियाडवालाने साजरा केला दि...\nचंकी पांडेने गायले लेकीचे गोडवे; म्...\n​वैभव मांगले प्रेक्षकांना दिसणार आत...\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘...\nमुलासमोर सिगारेट ओढताना दिसला अजय द...\n​नक्कश अझीझ कुल्फीकुमार बाजेवाला या...\nसहा वर्षांच्या वयात आरोपीने बेल्टने...\nआदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्य...\n​नेहा धूपियाला आजही आठवतात वडिलांचे...\n​या कारणामुळे आलिया भट्टच्या आईने ठ...\nविद्या बालनची ‘ही’ मुलगी आता अशी दि...\n​सैफ अली खानच्या हातात असलेल्या चिम...\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्ट...\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प...\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड...\n​मल्टिपल थीमने रंगले अमेझॉन फॅशन वी...\nजागतिक महिला दिन विशेष, पुरुषप्रधान...\n​स्मिता गोंदकरने आईटीएम फूड फेस्टिव...\nथंडीच्या मौसमात ट्रेंडी जॅकेट्सची \"...\nFashion : ​स्टायलिश स्कर्टची तरुणीं...\n​‘या’ टिप्सने सडपातळ तरुणीही दिसू श...\n तत्पूर्वी करा ही तया...\n​सजावटीने घराला येईल घरपण \nराणीच्या ‘या’ जॅकेटची किंमत ऐकून व्...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/stats-india-vs-australia-second-odi-virat-kohli-is-now-the-2nd-captain-to-register-8-consecutive-wins-in-odis/", "date_download": "2018-04-24T06:43:14Z", "digest": "sha1:KNP3EO65NVAEJFMAIECGTA6O6VXCMN5E", "length": 14250, "nlines": 160, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय संघाने केले तब्बल २९ विश्वविक्रम - Maha Sports", "raw_content": "\nभारतीय संघाने केले तब्बल २९ विश्वविक्रम\nभारतीय संघाने केले तब्बल २९ विश्वविक्रम\n भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना हा भारतीय संघाने ५० धावांनी जिंकला. हा सामना अनेक अर्थांनी भारतीय संघासाठी खास ठरला. कर्णधार विराट कोहलीला या सामन्यात सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले तर कुलदीप यादवने या सामन्यात हॅट्रिक विकेट घेतली.\nत्यामुळे या सामन्यात ओघानेच अनेक विक्रम झाले. ते सर्व विक्रम असे-\n१० किंवा त्यापेक्षा कमी धावा देऊन ३ विकेट्स २ वेळा घेणारा भुवनेश्वर कुमार पहिला गोलंदाज बनला.\nसर्वाधिक सामनावीर पुरस्कार वनडेमध्ये मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट कोहली ४था. सचिन(६२), गांगुली(३१), युवराज(२७) आणि कोहली(२५) यांनी सर्वाधीक सामनावीर पुरस्कार पटकावले आहेत .\nकुलदीप यादव आणि श्रीलंकेचा वनिंदूं हंसरंगा हे दोनच रिस्ट स्पिनर आहेत ज्यांनी वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट घेतली आहे.\nकर्णधार म्हणून विराटचा हा सलग १२ वा आतंरराष्ट्रीय विजय होता. भारत गेले १२ आंतरराष्ट्रीय सामने जिंकला आहे.\nऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदाच इडन गार्डनवर पराभूत झाला आहे. आधीच्या २ वनडे पैकी दोनही वनडे हा संघ जिंकला आहे.\nऑस्ट्रेलिया परदेशात खेळलेल्या गेल्या १२ वनडे सामन्यात एकही सामना जिंकली नाही. १२ पैकी २ सामन्यात कोणताही निकाल लागला नाही तर १० सामने पराभूत झाली आहे.\nकर्णधार विराट कोहलीने सलग ८ वनडे जिंकण्याचा पराक्रम तिसऱ्यांदा केला आहे. (२०१३-१४, २०१४-१७ आणि २०१७ या काळात त्याने हा पराक्रम केला आहे. गांगुली, धोनी आणि द्रविड यांनी एकदा अशी कामगिरी केली आहे तर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंगने ५वेळा अशी कामगिरी केली आहे.\nकुलदीप यादव हा अंडर-१९ वनडे सामन्यात आणि आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज आहे. त्याने २०१४ साली स्कॉटलँड विरुद्ध अंडर-१९ वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट घेतली होती.\nइडन गार्डनवर हॅट्रिक घेणारा कुलदीप तिसरा खेळाडू ठरला. यापूर्वी कपिल देव यांनी १९९१ साली श्रीलंका संघाविरुद्ध वनडेत तर २००१ साली हरभजन सिंगने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात हॅट्रिक विकेट घेतली होती.\nवनडे मध्ये हॅट्रिक घेणारा कुलदीप यादव केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी कपिल देव आणि चेतन शर्मा यांनी हॅट्रिक विकेट घेतली आहे.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा कुलदीप यादव ५वा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कपिल देव आणि चेतन शर्मा यांनी वनडेत तर हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी कसोटीत हॅट्रिक विकेट्स घेतल्या आहेत.\nवनडेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध हॅट्रिक विकेट घेणारा कुलदीप यादव पहिला फिरकी गोलंदाज बनला आहे.\nवनडेत हॅट्रिक विकेट घेणारा कुलदीप यादव ७वा फिरकी गोलंदाज आहे.\nकुलदीप यादवला चेन्नई वनडेत हॅट्रिक षटकार मारले गेले होते तर कोलकाता वनडेत त्याने हॅट्रिक विकेट्स घेतल्या आहेत.\nया वर्षी श्रीलंकेचा वनिंदूं हंसरंगा आणि कुलदीप यादव या दोन गोलंदाजांनी हॅट्रिक विकेट्स घेतल्या आहेत.\nजडेजा ह्या मालिकेत अजून एकही सामना खेळला नाही परंतु बदली खेळाडू म्हणून दोन झेल घेतले आहेत.\nआपल्या १००व्या वनडेत ५०+ धावा करणारा स्मिथ हा ५वा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे.\nप्रथम फलंदाजी करताना प्रथमच भारतीय संघ भारतात गेल्या ४ वर्षात सर्वबाद झाला आहे.\nयापूर्वी भारतात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध भारतीय संघ २००९ साली गुवाहाटी वनडेत सर्वबाद झाला होता.\nगांगुली धोनी आणि कोहलीचा वनडेत सर्वोत्तम स्कोर हा १८३ आहे तर हे नर्व्हस ९०चे शिकार देखील प्रत्येकी ६वेळा झाले आहेत.\nबुमराह यापूर्वी ४८ आंतरराष्ट्रीय सामन्यात एकही चौकार मारला नव्हता. आज एकाच सामन्यात २ चौकार मारले आहेत.\nविराट कोहली ५व्यांदा ९०-९९ धावांत बाद झाला आहे. तर तो एकदा ९६ धावांवर नाबाद राहिला आहे.\nभारताकडून सर्वाधिक वेळा ९०ते ९९ धावांत बाद किंवा नाबाद राहायचा विक्रम मास्टर ब्लास्टरच्या नावावर आहे. सचिन(१८), मोहम्मद अझरुद्दीन(७), वीरेंद्र सेहवाग(६), गांगुली(६), धोनी(६) आणि विराटही(६) हे फलंदाज ९० ते ९९ मध्ये बाद झाले आहेत किंवा नाबाद राहिले आहेत.\nविराट कोहली गेल्या ५वेळा जेव्हा ० धावेवर बाद झाला आहे त्याच्या पुढच्या सामन्यात त्याने ९२, ७६*, ४०, १२३ आणि ८६ अशा धावा केल्या आहेत.\nविराट कोहली आणि साथीदार यात ११ वेळा विराट धावबाद झाला आहे तर त्याचा साथीदार १२ वेळा धावबाद झाला आहे.\nभारतीय कर्णधाराने एका वर्षात सर्वाधिक अर्धशतके करायचा विक्रमाची विराटकडून बरोबरी. अझहर १९९८ आणि धोनी २००९ यांनी ११ अर्धशतके केली होती.\nविराट कोहलीने गेल्या ३० वनडेत १२व्यांदा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.\nअजिंक्य रहाणेने गेल्या ८ सामन्यात ५व्यांदा अर्धशतक केले आहे.\nगेल्या ७ वनडे सामन्यात ५व्यांदा विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.\nआज हरयाणा स्टीलर्स भिडणार जयपूर पिंक पँथर्सशी\nकोलकाता वनडेत भारतीय संघाकडून २९ विश्वविक्रम\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathiecards.com/ukhane/ukhane45.htm", "date_download": "2018-04-24T06:23:36Z", "digest": "sha1:S3QHIC6TPBDHC2QDZSQBKICCIOBJAWJW", "length": 4173, "nlines": 97, "source_domain": "marathiecards.com", "title": "पती, पत्निने घ्यावयाचे उखाणे, ukhane - Welcome to shreeyoginfo.com", "raw_content": "पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे\nपतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे\nपत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे\n८८० वडिलांना पडली होती काळजी कसे मिळेल घर\n------- रावांसारखे शांत मिळाले वर\nशुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी\n------- राव आहेत माझे जीवन साथी\n८८२ दारी होती विहीर, विहीरीवर होते बारा हंडे\nबाराहंडयावर बाराकरंडे, बाराकरंडयावर बारा वाती\n------- राव माझे शंकर आणि मी त्यांची पार्वती\n८८४ झुन झुन झुन्यात, बसली मेण्यात\nकंचोळी अंगात गुलाल भांगात\nजायफळ वटीत लवंगा दोळे मुठीत\nहंडयावर परात, परातीत भात\nभातावर तुप, तुपासारखे रुप\nरुपासारखा जोडा ------- रावांना म्हणते\nसारीकामे सोडा अन माहेरी चला\n८८५ साखरेचे खाणार त्याला देव देणार\n-------- रावांसाठी आज मी गौरीहर पुजणार\n८८६ घरोघरी मातीच्या चुली\n-------- रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली\n८८७ नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा\n-------- रावांसह मी बसते जेवायला\n८८८ वडयाचं तेल वांग्यावर\n-------- रावांचे नाव आहे माझ्या ओठांवर\n८८९ ऐकावे जनाचे करावे मनाचे\n-------- राव आहेत मोठया उदार मनाचे\n९०० चंदनाचा पाट आणि चांदीचे ताट\n-------- रावांसंगे राहण्यात आहे मोठा थाट\n९०१ वासरात लंगडी गाय शहाणी\n-------- रावांची झाले आज अर्धांगिनी\n९०२ चार दिवस सासुचे, चार दिवस सुनेचे\n-------- रावांचे नी माझे बंधन आहे सात जन्माचे\n९०३ संसारातील रेशमी शालूवर प्रीतीची लावते फुलवात\n-------- राव देतात मला सुखदुःखात आधार\n९०४ तिरंगी ध्वजाला चंदनाची काठी\n-------- रावांचे नाव घेते अखंड सौभाग्यवती\nह्रदयात असावे प्रेम, प्रेमात असावा त्याग\nत्यागात असावी निष्ठा, निष्ठेत असावी क्रुती\nक्रुतीत असावी कला -------- च्या संसारात काय उणे मला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2010/02/", "date_download": "2018-04-24T06:28:11Z", "digest": "sha1:LCQJ755J5CQJYKBMTPRQDKMNKI6GBYIM", "length": 30735, "nlines": 235, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "एफ वाय – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nमायबोली मराठी भाषा दिन – नैमित्तिक नव्हे, नित्यच पाळावा\nरविवार, 28 फेब्रुवारी 2010 सोमवार, 29 फेब्रुवारी 2016 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nआपल्या प्रत्येक कृतीच्या मागे आपल्या मायबोली मातेचा विचार असायला हवा. त्यासाठी जिथे-जिथे, जेव्हा-जेव्हा, जितके काही शक्य असेल ते सतत करीत राहिले पाहिजे. त्यातूनच एक मोठी चळवळ उभी राहू शकेल, एक मोठी क्रांती घडू शकेल.त्यात आपल्याला आपल्या मातेचे ऋण फेडल्याचे समाधान मिळेल व शांतपणे शेवटचा श्वास घेण्याच्या वेळी आपली सदसद्विवेकबुद्धी आड येणार नाही. संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे मग आपणही म्हणू शकू, “याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा”.\nपोलिसांची ‘भाषा’ (दै० सकाळ, मुक्तपीठ, १५ फेब्रु० २०१०)\nशुक्रवार, 26 फेब्रुवारी 2010 शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2010 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nवाटले, यात बिचार्‍या कानडी पोलिसांची काय चूक, त्यांना हिंदी येत नसेल तर ते काय करणार पण आम्हीच वेडे ठरलो. त्यातील एक हवालदार चौकीबाहेर आल्यावर आमच्याशी हिंदीतून बोलला आणि त्याने सांगितले, “इथे सर्वांना हिंदी येते, पण कोणीही बोलणार नाही. आम्हाला आमच्या भाषेचा अभिमान आहे.”\n’मायबोली मराठी भाषा दिन’ व ’मायबोली मराठी सप्ताह’ साजरा करण्यासाठी कार्यक्रम (वृत्त व आवाहन)\nरविवार, 21 फेब्रुवारी 2010 सोमवार, 29 फेब्रुवारी 2016 अमृतयात्री24 प्रतिक्रिया\nज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि० वा० शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मायबोली मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांनी २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे य़ोजले आहे. हा आठवडा ज्या दोन महत्त्वाच्या दिवसांना जोडतो ते दोन्ही दिवस आपल्या प्रिय मायबोलीच्या सन्मानाचे दिवस आहेत हा दुग्धशर्करा योगच नव्हे काय\nतेलुगूमधील सहीविणा पगारवाढ रोखली (प्रेषक: श्री० आरोलकर)\nशुक्रवार, 19 फेब्रुवारी 2010 मंगळवार, 6 एप्रिल 2010 अमृतयात्री12 प्रतिक्रिया\nलोकसत्तेत २० डिसेंबर २००९ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या ’एकच अमोघ उपाय – मराठी+एकजूट’ या लेखात केलेल्या आवाहनाला मराठीप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. पत्राद्वारे व ई-मेलद्वारे अनेक मराठी+एकजुटीचे पाईक आपली विविध मते, अनुभव मांडले आहेत व सूचनाही कळवीत आहेत. त्यापैकीच एक सुरस पत्र ’मराठी+एकजूट’ उपक्रमाने आमच्याकडे प्रसिद्धीस पाठवले, ते सोबत टाचले आहे.\nमहाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुद्यासंबंधी सूचनांसाठी ’मराठी+एकजूट’ द्वारा आवाहन\nमंगळवार, 16 फेब्रुवारी 2010 शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2010 अमृतयात्री27 प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र शासनाने डॉ० आ०ह० साळुंखे ह्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा सादर केला आहे आणि त्या समितीने – म्हणजेच पर्यायाने शासनाने – जनतेला दि० २८ फेब्रुवारी २०१०पर्यंत सदर मसुद्यावरील सूचना पाठविण्यास सांगितले आहे. आपण ह्या मसुद्याच्या अनुषंगाने, त्यात आपण सुचवू इच्छित असलेल्या सर्व सूचना आमच्याकडे विरोपाने (ई-मेलने) पाठवून द्याव्यात अशी ’मराठी+एकजूट’ द्वारा आम्ही विनंती करतो. ’मराठी+एकजूट’कडे आलेल्या सूचनांचे मान्यवरांच्या सहाय्याने एकत्रित संकलन करून, त्यात आवश्यक तिथे मान्यवरांचे स्पष्टीकरण/भाष्य जोडून, ते ’मराठी+एकजूट’च्या सूचना करणार्‍या सहकार्‍यांच्या नामनिर्देशासह शासनाच्या सांस्कृतिक धोरणासाठी नेमलेल्या समितीला सादर केले जाईल.\nसंगणकावर युनिकोडाधारित मराठी टंक वापरण्याविषयी (ले० नितीन निमकर)\nरविवार, 14 फेब्रुवारी 2010 रविवार, 14 फेब्रुवारी 2010 अमृतयात्री16 प्रतिक्रिया\nफेसबुक, ऑरकुट, महाजालावरील विविध गट अशा वेगवेगळ्या व्यासपीठावरुन अनेकवेळा मराठीतून संगणकावर मजकूर कसा लिहावा (टंकावा) याबद्दल अनेक सल्ले दिले जातात. वेगवेगळ्या साधनांचा वापर करावे असे सुचवले जाते. यात बरहा, जीमेलची लिप्यंतराची (Use of Transliteration or Phonetic keyboard) सुविधा वापरावी असा सल्ला दिला जातो. या सर्व सुविधा वेगवेगळ्या कारणांमुळे उपलब्ध झाल्या. त्यांचे स्वत:चे असे एक महत्व आहेच मात्र या सुविधा वापरणे म्हणजे तसे द्राविडी प्राणायमच आहेत. मायक्रोसॉफ्टच्या विंडोजवरती मराठी वापरणे अतिशय सुलभ आहे. फक्त याची माहिती संगणक मराठीसाठी वापरणार्‍यांना नसते. मायक्रोसॉफ्टसुद्धा ही माहिती स्वत:हून आवर्जून देत नाही. ही सर्व माहिती देण्यासाठीच या छोट्या लेखाचे प्रयोजन.\nखासगी शिक्षण संस्थाही माहिती अधिकाराच्या कक्षेत (वृत्त: दै० सकाळ, १२ फेब्रु० २०१०)\nशुक्रवार, 12 फेब्रुवारी 2010 शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2010 अमृतयात्री45 प्रतिक्रिया\nआज उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम राबवणार्‍या महाराष्ट्रातील कुठल्याही खासगी शिक्षणसंस्थेच्या विद्यार्थ्यांच्या यादीवर दृष्टी टाकल्यास त्यात बेकायदेशीरपणे ५० ते ८० टक्क्यांपर्यंतच्या प्रमाणातील मुले महाराष्ट्राबाहेरील आहेत हे सहजच समजून येते. यावर कदाचित आता अंकुश ठेवता येईल.\nसर्वप्रथम मातृभाषेत शिकणे हीच सर्वोत्तम पद्धत (ले० स्वामीनाथन एस० अंकलेसरिया अय्यर, टाईम्स ऑफ इंडिया)\nबुधवार, 10 फेब्रुवारी 2010 रविवार, 14 ऑगस्ट 2011 अमृतयात्री22 प्रतिक्रिया\nमायबोलीप्रेम प्रथम, धंदा दुय्यम (पत्र: दै० लोकसत्ता, १ फेब्रुवारी २०१०)\nसोमवार, 8 फेब्रुवारी 2010 अमृतयात्री23 प्रतिक्रिया\nआपल्या स्वार्थासाठी आपल्या स्वाभिमानाचा बळी देण्याबद्दलची उदाहरणे आज आपण महाराष्ट्रात सतत पाहत असतो. राजकीय स्वार्थापुढे परक्याचे जोडेही शिरसावंद्य मानण्याची काही तथाकथित नेत्यांची हुजुरेगिरीची संस्कृतीही आपल्याला आता फार नवीन राहिलेली नाही. पण स्वभाषाभिमानापुढे व्यावसायिक फायद्यालाही दुय्यम स्थान देणे अशी उदाहरणे महाराष्ट्रात घडतील काय आणि घडलीच तर त्याचे इतर मराठी माणसे कौतुक करतील की संकुचितपणा म्हणून हेटाळणी करतील\nविद्येच्या माहेरघरात रोवली मराठी एकजुटीची मुहूर्तमेढ (वृत्त: दै० लोकसत्ता, ०१ फेब्रु० २०१०)\nबुधवार, 3 फेब्रुवारी 2010 मंगळवार, 16 फेब्रुवारी 2010 अमृतयात्री3 प्रतिक्रिया\n“मराठीच्या नावाने राजकीय घटक सरसावून पुढे येत असले तरी जोपर्यंत नागरिकांची समर्थशक्ती उभी राहत नाही, तोपर्यंत मराठीच्या बाजूने न्यायाचा कौल पडणार नाही. त्यासाठीच अशा चळवळींची गरज आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.”\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर\nराईट बंधूंच्या आधी विमानोड्डाण करणारा भारतीय \n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n\"हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही\" - केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nविचारमंथन - तिन्ही सांजा सखे मिळाल्या (प्रश्नकर्ता: सुशांत देवळेकर)\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95/%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE/8", "date_download": "2018-04-24T06:43:05Z", "digest": "sha1:PXLQ25XM2CSD6D4G3G3H2X3MDAACYT2E", "length": 4034, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/8 - विकिपीडिया", "raw_content": "\n< विकिपीडिया:यथादृश्यसंपादक‎ | सजगता\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.\n'दृश्य संपादन' कडून 'स्रोत संपादन' अथवा 'स्रोत संपादन' कडून दृश्य संपादकाकडे जाणे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१६ रोजी ११:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.in/2012/02/ii-ii.html", "date_download": "2018-04-24T06:18:43Z", "digest": "sha1:22O5WJUVFATWBVY34VFLITTG3CFU2KKL", "length": 13746, "nlines": 200, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.in", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: II ॐ नमो भगवते वासुदेवाय II", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nII ॐ नमो भगवते वासुदेवाय II\nपं. जसराज यांनी गायलेली ही ईश्वरस्तुती काही वर्षांपूर्वी माझ्या ऐकण्यात आली. चिकाटीने ती मी लिहून घेतली आणि रोज सकाळी श्रीमदभागवताच्या पाठापूर्वी त्यातले काही कडवे रोज नेमाने म्हणतोय.\nगतवर्षी प.पू. बापुराव महाराजांकडे झालेल्या भागवत सप्ताहात आमचे उत्साही मित्र श्री. शार्दूल तेलंग यांनी भागवतकार श्री. विवेकजी घळसासींना याबद्दल सांगितले. विवेकजींच्या आग्रहामुळे व सेवा म्हणून ही स्तुती मी त्या श्रीमदभागवतसप्ताहात म्हटली सुद्धा.\nनंतर विवेकजींनीच ही गोष्ट कौतुक म्हणून पश्चिम नागपूर नागरीक संघाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब देशपांडे यांना सांगितली. त्यांनी लगेचच प.पू. स्वामी स्वरूपानंद यांच्या प्रवचनाआधी हा गीत गायनाचा कार्यक्रम होईल असे जाहीर केले आणि गतवर्षी व ह्यावर्षीही हा कार्यक्रम पार पडला.\nमी जेव्हा या गोष्टीचा विचार करतो तेव्हा यामागे ईश्वरी योजनेशिवाय काहीच आढळत नाही. मी फ़ार चांगला गाणारा वगैरे नाही. पश्चिम नागपूर नागरीक संघ पं. जसराजांची ध्वनीमुद्रिका लावून सुद्धा हा कार्यक्रम पार पाडू शकले असते पण माझ्या देहाने ही सेवा स्वीकारावी अशी ईश्वरी इच्छा असावी.\nकार्यक्रमानंतर बरीच मंडळी येवून भेटायची व ह्या गीताची मागणी व्हायची. शेवटी हे गीत आंतर्जालावर\nब-याच ठिकाणी टाकले आणि आज या व्यासपीठावरपण टाकतोय.\nII ॐ नमो भगवते वासुदेवाय II\nतं वंदे गोमतीप्रियम II धृ II\nतं वंदे नरकांतकम II धृ II\nतं वंदे परमेश्वरम II धृ II\nतं वंदे रघुनंदनम II धृ II\nतम वंदे वेदवल्लभम II धृ II\nतं वंदे देवकीसुतम II धृ II\nतं वंदे मधुसूदनम II धृ II\nतं वंदे कौरवांतकम II धृ II\nतं वंदे भवनाशनम II धृ II\nतं वंदे जलशायिनम II धृ II\nतं वंदे चक्रपाणिनम II धृ II\nतं वंदे श्रीसुरेश्वरम II धृ II\nतं वंदे यदुनायकम II धृ II\nतं वंदे साधुवल्लभम II धृ II\nतं वंदे तुलसीप्रियम II धृ II\nतं वंदे अघनाशनम II धृ II\nतं वंदे लक्ष्मणप्रियम II धृ II\nतं वंदे हनुमत्पतिम II धृ II\nLabels: श्री. बाबासाहेब देशपांडे, श्री. विवेकजी घळसासीं, श्री. शार्दूल तेलंग\nजे गुणी असतात त्यांचे गुण लपता लपत नाही. सूर्यापुढे कितीही ढग आले तरी त्याची प्रखरता आणि त्याचा प्रकाश कधीच लपत नसतो. तुम्हाला सेवेची संधी मिळणे हीतो श्रींची ईच्छा. बाकी सर्व निमित्तमात्र आहेत.\n\"मी एक प्रवासी पक्षी\" विषयी\nII ॐ नमो भगवते वासुदेवाय II\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.asm.ac.in/avpp/about-us-2/", "date_download": "2018-04-24T06:57:21Z", "digest": "sha1:4NB33XS2WFAHHEJ5UT5MS6HDR273WLHT", "length": 9333, "nlines": 142, "source_domain": "www.asm.ac.in", "title": "AVPP – Academics – Adarsha Shikshan Mandali", "raw_content": "\nपालखी, वृक्षारोपण, निसर्गपूजा, ओला-सुका कचरा वर्गीकरण, स्वावलंबन-बटाटा भाजी करणे, श्रावणी शुक्रवार, गुरुपूजन, कथाकथन, दीपपूजन, प्राणी-पक्षी, कृतज्ञता दिन, राखी पौर्णिमा, चित्रहंडी,माँटेसरी डे, मातृदिन कृतज्ञता संस्कार, शिक्षकदिन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पालकप्रबोधनासाठी तज्ञ व्यक्तींना बोलावून त्यांची भाषणे आयोजित, गांधी जयंती निमित्त-स्वच्छता दिन, भोंडला, पाटीपूजन, कोजागिरी पौर्णिमा, रांगोळी काढणे नातवंडाची शाळा बघण्यासाठी आजी-आजोबा संमेलन, संग्रहवही प्रदर्शन, बालदिन, भातुकली, संतेलन, शेकोटी क्रीडा\nमहोत्सव, पालकसभा, तिळगुळ समारंभ, स्वातंत्र्यदिन, विज्ञान दिंडी, प्रयोगशाळा, प्रयोग करणे,\nअशा तऱ्हेने विज्ञान त्रिदल, पालेभाजी भाकरी, भाजी निवडणे, बेकरी सहल, मंदिर-मशीद-चर्च देवालयांना भेटी, डॉक्टर वकील, पोलीस, नर्स बुरुड, चांभार, इ. विविध व्यवसायिकांची प्रत्यक्ष भेट, मराठी दिन, चवींचा परिचय, रंगपंचमी, नवीन वर्ष, गुढीपाडवा.\nत्रिपद पद्धतीचा अवलंब करून मुलांना कोणत्याही विषयाची ओळख करून दिली जाते. महिना अखेरीस सर्व विषय खेळाच्या माध्यमातून उजळणी घेतली जाते.\nमोठ्या स्क्रीनवर गाणी गोष्टी, अंक, अक्षरे, नारळ, कल्पवृक्ष, इंग्रजी, घरांचे प्रकार, दागिने, अशा अभ्यासाला अनुसरून विविध सी.डी. दाखवल्या जातात.\nशालेय सहशालेय आणि अभ्यासेतर उपक्रम\nरानडे बालक मंदिर येथे घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत छान सहभाग.\nनारद बालक मंदिर येथे भरवण्यात आलेल्या पसायदान, मनाचे श्लोक स्पर्धेत सलग दोन वर्षे\nबँक, एटीम, ची मुलांना ओळख.\nक्रीडास्पर्धेच्या वेळी पालकांसाठी स्पर्धा.\nपाककला, रांगोळी, संगीत खुर्ची, शै. साधने बनविणे.\nवर्षातून दोनदा जीवन – व्यवहार ( दळणे, कुटणे, वाटाणे, पाखडणे, निवडणे, सोलणे, भरणे, वजन करणे, शिवणे, ओवणे इ. सर्व साहित्य आहे)\nश्रावण महिन्यात शेकोटीला कार्यक्रम\nसाजरे केले जाणारे सण / महत्वाचे दिवस\nविशेष उल्लेखनीय यश / कामगिरी\nविद्यार्थी – शिक्षक- शाळासंबंधित\nसर्व शिक्षिका या माँटेसरी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत.\nअनुभवी आहेत नाविन्यांची त्यांना आवड आहे. विद्यार्थी संख्या मर्यादित असल्यामुळे प्रत्येक\nमुलाकडे जातीने लक्ष दिले जाते. त्यांची सर्वतोपरी १ लीत जाण्यासाठी योग्य ती तयारी घेतली जाते.\nदरवर्षी दिव्यांग २-३ मुलांना इतर मुलांबरोबर सामावून घेतली जाते.\nनारद बालक मंदिर या शाळेने भरवलेल्या सुदृढ बालक स्पर्धेत सतत तीन वर्षे आपल्या शाळेचा १ ला २ रा नंबर येत आहे.\nअभिनय गीत स्पर्धेत २५-३० शाळांमध्ये कित्येक वर्ष आदर्श पूर्व प्राथमिक शाळेचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक येतो.\nबाल्शिक्ष्ण परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या अभिनय गीत नृत्य स्पर्धेत सर्व शिक्षकांचा प्रथम क्रमांक आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.truluv.com/mr/", "date_download": "2018-04-24T06:45:28Z", "digest": "sha1:SDVW3ROCMQRMME6YNT5ENZQ6KZ6D7TU7", "length": 5139, "nlines": 124, "source_domain": "www.truluv.com", "title": "मोफत ऑनलाईन डेटिंग आणि अधिक! | प्रेम जगतात. जीवन साठी प्रेम.", "raw_content": "\nBasa Jawa (जावातील लोक किंवा त्यांची भाषा)\nCymraeg (वेल्समधील लोकांची भाषा)\nEsperanto (मुद्दाम तयार केलेली भाषा)\nEuskara (स्त्रियांची घट्ट चोळी)\nSvenska (स्वीडन देशाची भाषा)\nTürkçe (तुर्क लोकांची भाषा)\nΕλληνικά (ग्रीस देशांचा रहिवासी)\nייִדיש (ज्यूंची जागतिक भाषा)\n मोफत, आता सामील व्हा | आपले वापरकर्तानाव किंवा संकेतशब्द विसरलात\nऑनलाईन (1) | पण आपण पाहिलेला | मला दर | चरणे | साइन अप करा\n© 2007-2018 TruLuv.com | गुप्तता | वापर अटी भाषा | देश | विषयी | संबंध | मदत करणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.in/2013/", "date_download": "2018-04-24T06:33:55Z", "digest": "sha1:BD3IMHRQSBGKE5YLYPJU3MZJF5ASV7KS", "length": 82077, "nlines": 276, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.in", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: 2013", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nआज अचानक लिखाणाची स्फ़ूर्ती झाली आणि झरझर लिखाण व्हायला लागले. तसे २०१३ मध्ये इथे लिखाण कमीच झाले.\nएका चांगल्या लेखिका मैत्रीणीच्या सल्ल्यानुसार मी माझ्या मनात स्फ़ुरलेले विषय आणि विचार लगेच एका छोट्या डायरीत टिपून ठेवत असतो. पण मग वेळेअभावी त्याचा विस्तार आणि मांडणी राहूनच जाते. या वर्षी लिहीण्यासाठी खालील विषय तयार होते पण विस्ताराला वेळ मिळालाच नाही. आता उरलेल्या २०१३ मध्ये किंवा २०१४ मध्ये हे विषय या ठिकाणी नक्की मांडेन. (हे तुम्हा सगळ्यांना आमीष समजा किंवा धोक्याची घंटा समजा.)\n१. कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही.\n२. सांग सांग भोलानाथ\n३. माझी दक्षिणस्वारी (दक्षिण भारतातल्या माझ्या प्रवासाविषयी लेखमाला)\n४. उत्तररंग (उत्तर भारतातल्या प्रवासाविषयी लेखमाला)\n५. एस. टी. दशा आणि दिशा (माझा आवडता विषय)\n६. नागपूर शहर वाहतूक- एक चिंतन (१९८३ पासून माझ्या चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय)\n७. २०१३ मधील माझी कार-गिरी (कार ने केलेले लांब लांब पल्ल्याचे प्रवास)\nबघूयात आता. २०१४ तरी लिखाणाच्या दृष्टीने चांगले जातेय का ते \nहे वाक्य मी जेव्हा पहिल्यांदा वाचले तेव्हा मला ते मनापासून पटले. जगण्याची किती छान रीत आहे न ही खरं म्हणजे टिपीकल मध्यमवर्गीयात जन्मून वाढलेल्या मुलांसाठी असल काही म्हणजे त्यावेळी दिव्यच होते. थ्री इडीयटस सिनेमात दाखवल्याप्रमाणे बालपणापासूनच ध्येय आणि ते गाठण्यासाठी करावे लागणारे परिश्रम याचच महत्व मनात बिंबवल जायच. ते चूक होत अस मी तरी आज का म्हणू खरं म्हणजे टिपीकल मध्यमवर्गीयात जन्मून वाढलेल्या मुलांसाठी असल काही म्हणजे त्यावेळी दिव्यच होते. थ्री इडीयटस सिनेमात दाखवल्याप्रमाणे बालपणापासूनच ध्येय आणि ते गाठण्यासाठी करावे लागणारे परिश्रम याचच महत्व मनात बिंबवल जायच. ते चूक होत अस मी तरी आज का म्हणू ध्येयाच्या मागे लागलो नसतो तर आज जीवनात जे काही मिळालय ते प्राप्त झालच नसत. पण एका क्षणी वरील वाक्य फ़ारच पटल. प्रवास एन्जॊय करत जगूयात ना. ध्येय तर येइलच. जातय कुठे \nसाध उदाहरण आहे. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जायचय. बसमध्ये बसल्या बसल्या झोपलात तरी पोहोचणार आणि आजुबाजुचा, कधी रखरखीत तर कधी मनमोहक, निसर्ग पाहत गेलात तरी पोहोचणारच. मग ही मजा अनुभवत का जाउ नये ही प्रवृत्ती मला आवडली. मी स्वतः प्रवास करताना जर नवीन प्रदेशांमधून प्रवास करायचा असेल तर दिवसा तिथून जाणारी बस किंवा रेल्वे निवडतो. रात्रीच्या अंधारात काय पहायच राहून गेलय याची चुटपुट मला सतत लागून राहते.\nरामदेवबाबा महाविद्यालय, नागपूर येथे प्राध्यापकी करताना मला एक विचित्रच गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे इथले आठव्या सेमीस्टरचे विद्यार्थी \"गेट, जी आर ई\" वगैरे परिक्षांचे निमित्त सांगून महाविद्यालयात जवळपास दोन एक महिने अनुपस्थित राहतात. ध्येयासाठी प्रवासाच्या आनंदाला मुकण्याचेच हे उदाहरण झाले. शेवटच्या एक दोन आठवड्यात त्यांना ही जाणीव होते आणि महाविद्यालयीन जीवनाचे उरलेले काही दिवस उपभोगण्यासाठी ते महाविद्यालयात येतात.\nआमचे फ़ायनल इयर संपल्यानंतर वसतीगृह सोडून घरी परतायची जेव्हा वेळ झाली तेव्हा कुणीही घरी जायला तयार नव्हते. आमच्या रेक्टरना सांगून आम्ही आमच्या वास्तव्यासाठी एक दोन जादा दिवस मागून घेतलेले होते. त्यांनीही आमच्या भावना ओळखून तशी परवानगी दिलेली होती. शेवटी परत निघण्याच्या वेळेला जी अभूतपूर्व रडारड झाली होती ती मी तर विसरूच शकत नाही. पुन्हा दरवर्षी भेटू वगैरे गोष्टी ठरल्यात. (त्यानंतर सगळेच जण आपापली नोकरी, धंदा, व्यवसायात गुंतल्याने त्या प्रत्यक्षात आल्या नाहीत हा भाग अलहिदा) पण त्या प्रवासाचा हे बंध निर्माण आमच्यात निर्माण झाले होते.\nपण ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे साधनाचा मोह पडून साध्याचा विसर पडू देता कामा नये. आपले स्टेशन आले की गाडीची बोगी कितीही मनमोहक असली तरी सोडून उतरावे लागते नाहीतर हा जन्म जन्मांतरीचा प्रवास तसाच सुरू राहील. पण प्रवासाअंती उतरताना मात्र प्रवास केल्याचे समाधान मिळाले की दगदग झाली याचा हिशेब महत्वाचा ठरतो. आता हे समाधान किंवा ही दगदग आपल्या मनोवृत्तीवरच अवलंबून असते. ए.सी. कोच मध्येही दगदगीचा प्रवास आणि आनंदी माणसाला जनरल कोचमध्येही समाधानाचा प्रवास होऊ शकतो.\nमंद सुगंधी असा फ़ुलोरा\nथकले पाऊल सहज पडावे\nआणि सरावा प्रवास सारा\"\nप्रवास आनंदात केला असेल, डोळे उघडे ठेऊन, जाणतेपणाने केला असेल तर अखेरच्या वळणावरचा सुगंधित फ़ुलोरा दृष्टीपथात येईल. आणि म्हणूनच ध्येयाकडे वाटचाल करताना प्रवासाचा आनंद घेतलाच पाहिजे.\nएका अनोख्या शोधाची चित्तरकथा.\n१९९० च्या दशकात गाड्यांचे रेक्स शेअरींग होत असे. माधवराव शिंदे रेल्वेमंत्री असताना त्यांनी गाड्यांच्या महत्तम वापरासाठी हा निर्णय घेतला होता.\n१९८९ मध्ये कराडला गेल्यानंतर कोल्हापूर आणि दादर येथे गाड्यांचे असे शेअरींग होत असेल अशी मला पुसटशी कल्पना यायला सुरूवात झाली होती. तत्पूर्वी नागपूरला येणारी कोल्हापूर-नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही रात्री नागपूर-दादर सेवाग्राम एक्सप्रेस म्हणून जाते आणि पहाटे येणारी दादर-नागपूर सकाळी नागपूर-कोल्हापूर म्हणून जाते याची कल्पना होती.\nसंध्याकाळी आलेली गाडी यार्डात गेली की त्यावर \"नागपूर-कोल्हापूर-नागपूर\" या बोर्डावरचे \"कोल्हापूर\" पुसून त्यावरच स्टेन्सीलने \"दादर\" लिहीले जायचे. हा सगळा प्रकार प्रत्येक डब्यांवर तैल रंगात व्हायचा. तैल रंगांचे ओघळ डब्यांवर अव्यवस्थित दिसत. हे रेक्सपण तसे अव्यवस्थित आणि गचाळ असत. जुने डबे. कुशन्स नसलेली शयनयान आसने. (शयनयान आसनांना कुशन्स लावायला सुरूवात १९७९ पासून झाली. मधु दंडवते रेल्वेमंत्री असताना त्यांनी हा क्रांतीकारी निर्णय घेतला होता. त्याआधी बाकडीच असायचीत.) मला आठवतय एकदा १९६९ चा डबा दक्षिण मध्य रेल्वेने या गाडीला जोडला होता. अवातानुकूलीत द्विस्तरीय शयनयान डबा पण गाडीला असायचा. (तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्याविषयी आणि त्यातील माझ्या प्रवासाविषयी नंतर कधीतरी लिहीन.)\nहा रेक संपूर्ण दक्षिण मध्य रेल्वेचा असे. त्यावेळी पुणे ते कोल्हापूर हा विभाग द.म. रेल्वेच्या अखत्यारीत होता आणि त्यातील अमराठी अधिकारी या गाडीला सावत्र वागणूक द्यायचेत. दादर ते नागपूर एकही किलोमीटर द.म. रेल्वेत न धावता ही गाडी द.म. रेल्वेची होती. त्यामुळे ह्या गाडीकडे लक्षच नव्हते. १९९१ मध्ये इराक युद्ध सुरू झाल्यानंतर इंधन वाचवण्यासाठी भारतीय रेल्वेने काही गाड्या तात्पुरत्या बंद ठेवल्या होत्या. त्यात दादर-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसचा समावेश होता.\nमग ह्या गाड्यांचे नक्की भ्रमण कसे शोधून काढायचे हा मला पडलेला प्रश्न होता. १९९१ पर्यंत कराडमध्ये ब-यापैकी स्थिरावलेला होतो. मित्रांना माझे हे गाड्या बघण्याचे उद्योग माहिती झालेले होते आणि त्यातले काही समानधर्मी मित्रही माझ्या या छंदात सामील झालेले होते. कराडला पी.एल. सोडली तर अभ्यास वगैरे करण्याच्या भानगडीत कुणीही पडत नसे. त्यामुळे जुलैमधल्या एका शुभदिवशी मी हा रिसर्च करण्याचे ठरवले.\nत्यासाठी निरीक्षणे म्हणजे गाड्यांचे रेक्स बघून त्यातल्या कोचेसचे नंबर लिहून ठेवायचे. त्यात महाराष्ट्र, सह्याद्री आणि महालक्ष्मी एक्सप्रेस चे निरीक्षण आले. महाराष्ट्रचा प्रश्न नव्हता कारण कोल्हापूरकडे जाताना ही गाडी सकाळी ११.०० वाजता आणि परत नागपूरकडे जाताना सायंकाळी ४.३० वाजता जायची. पण कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी पहाटे ५.०० वाजता, सह्याद्री भल्या पहाटे ३.०० वाजता तर मुंबईकडे जाणा-या गाड्या अनुक्रमे रात्री ११.०० व १.०० वाजता जायच्या. आणि निरीक्षणांसाठी किमान तीन दिवस आणि तीन रात्री तरी ह्या गाड्यांचे रेक्स बघायला हवे होते.\nएका दिवशी दुपारी कराड स्टेशनवर गेलो. महाराष्ट्र एक्सप्रेसचे डबे बघितले. लिहून ठेवले. कराड स्टेशन तेव्हा फ़ार आडबाजुला वाटायचे. महाविद्यालयापासून सहा किमी अंतरावर आणि मध्ये फ़क्त उसाची शेती. मनुष्यवस्ती तुरळक. ओगलेवाडी गावाजवळ हे स्टेशन होते. (तेच काच कारखान्यासाठी प्रसिद्ध असणारे ओगलेवाडी. एकेकाळी स्टेशनचे नाव पण ओगलेवाडीच होते.) दुपारी तर मित्रांची सायकल घेवून मस्त फ़ेरफ़टका मारत गेलो होतो. रात्री मात्र हे शक्य नव्हते.\nत्यातल्या त्यात सोय म्हणजे कराड वरून स्टेशनला जाणारी रात्री शेवटची शहर बस, महालक्ष्मी एक्सप्रेसच्या अगदी आधी, आमच्या महाविद्यालयावरून जायची. मग त्या बसने प्रवास करीत स्टेशन गाठले. महालक्ष्मी एक्सप्रेसचा रेक नोंदवून ठेवला. महालक्ष्मी एक्सप्रेस रात्री मुंबईकडे रवाना झाल्यानंतर शहरबस पण कराडला रवाना झाली. कराड स्टेशन तसे दिवसभरही सामसूम असायचे. (पु. लं. चा \"काही अप्स काही डाउन्स\" वाचल्यानंतर तो लेख पुणे-मिरज मार्गामधल्या स्टेशनांना चपखल लागू पडतो याची मला जाणिव झाली.) आता तर मी एकटाच आणि सोबत रेल्वेची काही मोजकी रात्रपाळीची मंडळी होती. सिग्नल्स आता अधिकच गूढ भासायला लागले होते.\nतेव्हा कराडचे स्टेशन मास्तर आगस्टीन जोसेफ़ (भला माणूस) सहज फ़ेरेफ़टका मारता मारता माझ्याकडे आले आणि मला विचारले की एव्हढ्या रात्री फ़लाटावर मी का थांबलोय मी माझा छंद आणि आजचे थांबण्याचे कारण खरे सांगितले. ते अवाक झाले आणि माझ्या छंदात मदत करण्याचे त्यांनी कबूल केले. मग रात्री मुंबईकडे जाणारी सह्याद्री एक्सप्रेस येइपर्यंत त्यांनी मला \"टोकन एक्स्चेंज\" ही रेल्वेची अतिशय सुरक्षित सिग्नलींग सिस्टीम समजावून दिली. मध्ये एक मालगाडी गेली तेव्हा प्रात्यक्षिकासहित.\nरात्री सह्याद्री एक्सप्रेस मुंबई कडे गेली त्याचेही डबे नोंदवून ठेवले आणि आता मात्र झोप अनावर झाली होती. (तसेही आम्ही लवकर झोपून लवकर उठणा-यांच्या पंथातले. पु.लं.च्या उपदेशानुसार रात्रभर जागून पहाट बघण्याचा अनुभव नाहीच. रेडीमेडच पहाट कायम बघितलेली.) आगस्टीन जोसेफ़ साहेबांना कळले. त्यांनी माझ्यासाठी फ़लाटावरची प्रथम वर्ग प्रवाशांसाठीची खोली उघडून द्यायला लावली. रेल्वेचे इतर कर्मचारी मला मिळणारी व्ही आय पी ट्रीटमेण्ट पाहून जरा चक्रावूनच गेले होते. हातात वही, पेन, गबाळा वेष, झोपाळलेला हा किडकिडीत तरूण कोण एव्हढा टिकोंजीराव लागून गेलाय हे त्यांना कळेचना. पण साहेबाची आज्ञा म्हणून त्यांनी त्याचे पालन केले.\nपहाटे तीन वाजता कोल्हापूरकडे येणारी सह्याद्री येण्याची घंटा झाल्यावर एक कर्मचारी मला उठवायला आला. पावसाला सुरूवात झाली होती. मस्त पहाट, माझी आवडती गाडी. फ़क्त चहाचा वाफ़ाळता कप नव्हता. (पुढे खूप वर्षांनी \"दिल से\" त ला शाहरूख खान अश्याच एका पावसाळी रात्री स्टेशनवर वाट पहाताना दिसल्यावर मला त्या रात्री आठवल्यात.)\nमग पुन्हा जोसेफ़ साहेबांसोबत गप्पा. ते कुठले तरी केरळ वरून आलेले होते. (त्यावेळी कराडला कार्यरत असलेले सगळेच स्टेशन मास्तर केरळी होते.) त्यांची, त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस वगैरे झाली तोवर पहाटे ५ वाजता कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस हजर. तिचाही रेक बघून लिहून घेतला आणि गावातून येणा-या पहिल्या यष्टी ने महाविद्यालयात रवाना झालो. दुपारी मेस मध्ये दोन घास ढकलून महाराष्ट्र एक्सप्रेस बघायला स्टेशनवर. जुलै महिन्यात लेक्चर वगैरे करणे बहुतांशी जनतेला नामंजूर होते. त्यामुळे दिवसभर स्टेशनवर थांबून जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस बघून पुन्हा वसतीगृहात. रात्री पुन्हा जेवण आटोपून शेवटच्या बसने स्टेशनवर.\n३ दिवस आणि ३ रात्री हे व्रत केल्यानंतर जी माहिती जमा झाली त्याचे विश्लेषण केल्यानंतर या गाड्यांचे रेक्स कसे शेअर होतात त्याचा उलगडा झाला. तो मी डायरीत नोंदवून ठेवला.\nआता ही माहिती मला रेल्वेतला कुणीही मोठा अधिकारी देवू शकला असता पण मग स्वतः केलेल्या संशोधनाचे आणि त्यातल्या आनंदाचे मोल राहिले नसते. तसही जीवनाच्या प्रवासात \"ध्येयापेक्षा प्रवासच जास्त मजेत जगायचा असतो\" हे मला पटलेलेच होते.\nआश्विन पोर्णिमेला विदर्भात आसनीचा सण साजरा करतात. या दिवशी संध्याकाळी प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठ अपत्याला वाढदिवसाप्रमाणे ओवाळतात. त्या अपत्याला नवीन कपडे भेट म्हणून देतात.\nसाधारणतः ८० च्या दशकात या दिवशी संध्याकाळी प्रत्येक घरा-वाड्यांमध्ये भुलाबाइ चा खेळ रंगायचा. एका ठिकाणी शंकर-पार्वतीची (भुलोजी आणि भुलाबाई) च्या पार्थिव मूर्तीची स्थापना व्हायची. (सोवळे वगैरे नाही. गणपतीच्या पार्थिव मूर्तीची होते त्याप्रमाणे साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा पण नाही.) संध्याकाळी लहान मुले आणि आसपासच्या मुली एकत्र येउन भुलाबाईची गाणी म्हणत.\nगाणी मजेदार असत. तत्कालीन किंवा थोड पूर्वकालीन स्त्री जीवनाचे प्रतिबिंब त्या गाण्यात पडलेले दिसायचे. महत्वाची गाणी थोडी आठवतात\n\" या या भुलाबाई, आमच्या आई, तुमच्या आई, तुमच्या अंगात लाल चोळी, लाल चोळीवर बसला मोर, बसला मोर. बसल्या मोरावर सांडले अत्तर, भुलोजी डॊक्टर घरी नाही, घरी नाही \"\n\" यादवराया राणी रुसूनी बैसली कैसी, सासूरवाशि सून घरात येना कैसी \"\n\" अडकीत जाउ खिडकीत जाउ, खिडकीत होता बत्ता, भुलोजीला मुलगा झाला, नाव ठेवा दत्ता \"\n\" आला माझ्या माहेरचा वैद्य, डोक्याला टोपी जरीकाठी, अंगातला सदरा मखमली \"\nत्यानंतर प्रत्येक घरातून खिरापत यायची. ही खिरापतही रहस्य असायची आणि कुठल्या डब्यात काय हे ओळखण्याचा आणि त्यासाठी क्ल्यु म्हणून तो खाद्यपदार्थ असलेला डब्बा वाजवून त्या घरातील सदस्य इतर सगळ्यांना तो पदार्थ ओळखायला लावायचा. त्यासाठी दुपार पासूनच मोर्चे बांधणी सुरू व्हायची. आपल्या घरातल्या स्वयंपाकघरापर्यंत कुणी पोहोचू नये मात्र आपण काही ना काही कारण काढून दुस-यांच्या स्वयंपाकघरातले गुपीत माहिती करून घ्यायची धडपड चालायची. खूप मजा यायची आणि त्यातच रात्री ती खिरापत आणि आटवलेले दूध पिउन कोजागिरीची सांगता व्हायची.\nत्या वेळी दूध एव्हढ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नसायचे. सकाळी उठून दूध केंद्रावर रांगा लावाव्या लागयच्या. कोजागिरीच्या आधी दोन तीन दिवस शासकीय दूध योजनेतून कोजागिरी निमित्त ज्यादा दूध उपलब्ध होणार असल्याची बातमी चक्क वर्तमानपत्रांमध्ये यायची आणि आपल्याला जर त्यादिवशी ज्यादा दूध लागणार असेल तर त्या केंद्र प्रमुखाला तशी दोन दिवस आधी सूचना आणि आदल्या दिवशी आठवण करून द्यावी लागायची.\nपण एव्हढ करून जी मजा यायची ती आज मुबलक दूध उपलब्ध असताना, भरपूर साधनं असताना येत नाही हे खरंय. माणसं हरवलीयत. माणसा माणसातल्या नातेसंबंधांची, त्यातल्या अकृत्रिम बंधांची मजा हरवलीय अस प्रामाणिकपणे वाटतय.\nLabels: आसनी (आश्विनी) पोर्णिमा, भुलाबाई\nचारधाम यात्रा. नक्की काय \nमला आठवतय आमच्या बालपणी चारधाम यात्रा म्हणजे बद्रीनाथ-जगन्नाथ पुरी-रामेश्वर-व्दारका अशी कल्पना होती. आद्य शंकराचार्यांनी भारतीय एकात्मतेसाठी देशाच्या चारही कोप-यांमध्ये चार धामांची प्रतिष्ठापना केलेली होती. ही यात्रा करायला गेल्यावर आपोआप आपले भारत भ्रमण होउन भारताची खरी ओळख आपल्याला होत असावी.\nप्रभू रामचंद्रांच चरित्र आपण लक्षात घेतल तर त्यांनी भारताची बांधणी उत्तर-दक्षिण केलेली आपल्याला दिसते. अयोध्या ते रामेश्वर असा हा दक्षिणोतर विभाग रामांच्या प्रभावाखाली आजही आहे. तर भगवान गोपालकृष्णांनी भारत पूर्व पश्चिम बांधला. व्दारका ते प्रागज्योतिषपूर (गुवाहाटी) असा त्यांचा प्रभाव आहे.\n१९९० च्या दशकात पर्यटन उद्योगाचा जो विकास झाला आणि त्यातूनच अचानक चार धाम म्हणजे बद्रीनाथ-केदारनाथ-गंगोत्री आणि जमनोत्री अशी एक सुपीक कल्पना बाहेर पडली. चार धाम यात्रा करण्यामागचा खरा हेतू मागे पडला.\nआत्ता उत्तराखंडात जो विनाश झाला त्यानंतर \"चार धाम यात्रा आता कमीत कमी ३ वर्षे तरी होणार नाही\" असले मथळे प्रकाशित व्हायला लागल्यानंतर सहजच मन मागे गेले आणि मूळ कल्पना काय हे तपासून पहायला लागलो.\nभारतीय रेल्वे ओखा (व्दारका)- रामेश्वर अशी एक व्दिसाप्ताहिक गाडी चालवतेय आणि ओखा - पुरी ही आठवड्यातून ५ दिवस जाणारी गाडी. पण इतर ठिकाणांसाठी गाड्या नाहीत. रामेश्वर-वाराणसी ही एक साप्ताहिक गाडी आहे पण ती रामेश्वर-ऋषीकेश अशी असायला हवी होती. खरंतर ऋषीकेश-पुरी, ऋषीकेश-ओखा आणि पुरी- रामेश्वर गाड्या चार धाम एक्सप्रेस म्हणून सुरू व्हायला हव्यात.\nLabels: जगन्नाथ पुरी, बद्रीनाथ, रामेश्वर, व्दारका\nयापूर्वीचा प्रवास येथे वाचा.\nनागपूरला ३ दिवस कसे भुर्र्कन उडून गेले कळलच नाही. अखेरच्या दिवशी संध्याकाळीच प.पू. महाराजांकडे आणि भालेकरांकडे सर्वांचा निरोप घेतला. परतताना औरंगाबादला श्री. रवीदादा व सौ. अनुवहिनी पिंगळीकरांकडे मुक्काम करायचा ठरला होता त्यामुळे नागपूर ते सांगोला हा थेट प्रवास नव्हता. आम्ही नागपूरात एक मुक्काम जोशींकडे करावा अशी श्री. प्रमोदराव व सौ. मनिषाताईची इच्छा होती. धामणगावला माझ्या आयुष्यातली पहिली नौकरी करताना मी प्रमोदरावांकडेच रहायला होतो. त्यांच्या अकृत्रिम आणि परम स्नेहपूर्ण वागण्याने जावई-शालक संबंध मैत्रीत बदलले होते. त्यांचा आग्रह मोडवेना. आणि मनिषाताई व प्रमोदरावांच्या आग्रहाखातर त्यांच्याकडे एक मुक्काम करायचे ठरले.\nसकाळी उठायला ५ वाजलेत. काल रात्री गप्पा मारत झोपायला तब्बल साडेबारा झालेले होते. तस लवकर निघायच टेन्शन नव्हत पण पहाटे लवकर निघाल तर झपझप अंतर कापल्या जात हा माझा अनुभव असल्याने मी पहाटे निघायला उत्सुक होतो. आम्ही आवरेपर्यंत प्रमोदराव अगदी सकाळी सकाळी आमच्यासाठी बालाजीनगरची दुकाने धुंडाळून ब्रेड घेउन आले. आईच्या मायेने मनिषाताईने जबरदस्तीनेच सॆंडविचेस करून बांधून दिलीत. आवराआवर करून निघायला सात वाजलेत.\nनागपूरला आणखी एका ठिकाणी थांबायचा निर्णय आम्ही कालच घेतला होता. माझ्या गुरूमाउली परम पूजनीय मायबाई महाराजांच्या नित्य पूजनीय पादुका बालाजी नगरलाच श्री. श्रीपाददादा तेलंगांकडे असल्याचे कालच कळले होते. नागपूर सोडताना महाराजांच्या घरून तर निघालो नाही पण नागपूरबाहेर पडताना मायबाईंचा निरोप घेउन निघू म्हणून आम्ही सरळ जवळच राहणा-या श्रीपाददादांकडे गेलोत.\nआधी वंदू सदगुरू मायबापा\nश्रीपाददादांकडून निघायला सकाळचे ०७.२३ झालेत. परतताना नागपूर-अमरावती-अकोला-खामगाव-चिखली-जालना-औरंगाबाद हा पारंपारिक मार्ग घेण्याचे ठरले होते. दिवाळी २०११ मध्ये परतताना जालना ते खामगाव या मार्गाने वैताग आणला होता. पण नुकतेच या मार्गाचे नूतनीकरण झाल्याची वार्ता श्री. नानासाहेब खातखेडकरांनी दिली. मग त्या मार्गानेच जाण्याचा निर्णय घेतला.\nअमरावती रोड नेहेमीप्रमाणे छान होता. नागपूर-अकोला जलद बस. आम्ही लगेच ओव्हरटेक केला.\nनागपूर ते अमरावती सुंदर रोड\nआता मला सांगा, अशा रस्त्यांवरून प्रवास करायला कुणाला आवडणार नाही (१५० किमी साठी एक १०० रूपयांच्या आसपास टोल भरून.)\nएस.टी. बस ने खाजगी बसला केलेला ओव्हरटेक ही सर्व एस. टी. प्रेमींसाठी अभिमानाचीच बाब असेल नाही कां शिव ट्रॆवल्स कंपनीच्या बसला आपल्या लाल बसने केलेला ओ्व्हरटेक.\nनागपूरची एस. टी. मध्यवर्ती कार्यशाळा मधल्या काळात लेलॆण्ड गाड्यांच्या बांधणीत गर्क होती. त्या ५०० गाड्यांपैकी ब-याच गाड्या विदर्भाच्या विविध डेपोंमध्ये अजूनही सुखाने नांदत आहेत. वास्तवीक विदर्भ म्हणजे टाटा गाड्यांचे माहेरघर पण वैदर्भीय उदारतेमुळे लेलॆण्ड गाड्यांनाही त्यांनी उदार आश्रय दिला. त्यातलीच ही एक गाडी. दर्यापूर डेपो. अमरावती विभाग. नागपूर जलद दर्यापूर.\nफ़ार जुना रूट. अकोट-रामटेक. रामटेक डेपोची बस.\nतळेगाव (शामजीपंत) पर्यंत झकास प्रवास झाला. तळेगावला नवीनच सुरू झालेल्या श्रीसूर्या ग्रूपच्या रेस्तरॊच्या बाहेर आम्ही थांबलो. निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी. नागपूर ते तळेगाव १०२ किमी अंतर (शहरातली वाहतूक, टोल नाके वगैरे धरून) आम्ही अवघ्या १०० मिनीटांत पार केले होते. सौ. मनीषाताईने न्याहारी बांधून दिलेली असल्याने खाण्यापिण्याचा प्रश्न नव्हता. लगेच निघालोत. (तळेगाव : ०९.०३ -- ०९.०७)\nनागपूरवरून निघालेली सकाळची पहिली बस. नागपूर-मेहेकर.\nतळेगाव सोडल्यावर मात्र आपण टोल का भरलाय अस राहून राहून वाटायला लागल. चौपदरी रस्त्याचे दोन पदर दुरूस्तीचे निमीत्त दाखवून बंद करण्याची रस्ता बांधणी कंपनीची चलाखी कळायला लागली. अमरावती पर्यंत हाच त्रास. कधी उजवीकडला तर कधी डावीकडला रस्ता धरून आम्ही अमरावती गाठले. अमरावती शहराचा बायपास खूप मोठ्ठा आणि खूप कंटाळवाणा आहे म्हणून शहारातूनच जाण्याचा निर्णय घेतला.\nएम.एच. ४० / वाय सिरीजची दिसलेली सकाळची पहिली बस. अकोला-वरूड. अमरावती शहरात.\nखरंतर ही औरंगाबाद-अमरावती बस. पण अमरावती शहरात दाखल होण्यापूर्वीच ड्रायव्हरने मार्ग फ़लकाची बाजू बदललेली होती. ही बस लगेच निघणार यात शंका नव्हती.\nअमरावती महापालिकेची स्वतःची वाहतूक व्यवस्था आहे. काही निवडक मार्गांवर त्यांना चांगला प्रतिसाद आहे. एकंदर नागपूर महापालिकेच्या गलथान आणी घाणेरड्या वाहतूक व्यवस्थेपेक्षा खूप बरी.\nदारव्हा अमरावती. साधारण सेवेची बस. एकेकाळी लाल पिवळ्या रंगात असणा-या ब-याच बसेस प्रत्येक डेपोने परिवर्तन बसेसच्या पूर्ण लाल रंगात रंगवल्या आहेत. त्यातलीच ही एक.\nअंबड-अमरावती. हा रूट मात्र मी पहिल्यांदाच पाहिला. अमरावती शहरात सकाळी १०च्या सुमारास दाखल होणारी ही बस अंबडवरून भल्या पहाटे निघाली असणार.\nबडनेरा रेल्वे स्टेशन ते अमरावती मार्गावर धावणारी अमरावती महापालिका सेवेतली ही बस. ह्या मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे.\nयवतमाळ-अमरावती. १०० किमीच्या ह्या मार्गावर भरपूर बसेस धावतात.\nअकोला-तुमसर. खूप जुना रूट. अकोल्यावरून नागपूरकडे येणारी सकाळची पहिली बस.\n बुलढाणा डेपोची नवीन बस. वाय ५०४७. बुलढाणा डेपोच्या बसेसचे दर्शनीय भाग असे पोपटी रंगाने रंगविले असतात. नवीन अमरावती रेल्वे स्टेशनजवळ.\nनागपूरला तीन दिवसात खूप धावपळ झाली होती. मित्र, नातेवाईक या सगळ्यांना भेटण्याचा आनंद तर होताच शिवाय माझ्या जुन्या महाविद्यालयातील कामांसाठीही बराच वेळ द्यावा लागला होता. रोज रात्री गप्पांनी रंगवताना झोपायला साडेबारा एक तर ठरलेलाच. त्यातही प्रसाद भालेकर सारखा गप्पिष्ट असेल तर मग दीड काय आणि दोन काय .\nसौ. वैभवीला या धावपळीची जाणीव झाली. निघण्याआधी सौ. वैभवी मला म्हणालीदेखील की राम, तुला खूप श्रम झालेले आहेत. त्यात उद्या आता ड्रायव्हिंग. मी तिला मोठ्या आत्मविश्वासाने सांगितल की ड्रायव्हिंगमध्ये सगळा श्रमपरिहार होउन जाइल. आणि खरच तस झाल. नागपूर ते अमरावती तीन तासात थकल्याची वगैरे भावना अजिबात नव्हती. मजेत गप्पा मारत न्याहारी करत प्रवास चालला होता.\nबडनेरा मागे पडल्यानंतर रस्त्याच्या कडेला संत्री विकणारी मंडळी बघून गाडी थांबवली. सांगोल्यात आणि औरंगाबादेत द्यायला भरपूर संत्री घेतलीत. तिथे संत्र्यांचा रस प्यायलोत आणि अर्धा ड्झन संत्री आम्हीच फ़स्त केलीत. (बडनेरा : १०.३४ -- १०.४४)\nपुन्हा नवीन उत्साहाने निघालो. संत्री गोड होतीच. चि. मृण्मयी संत्री खाण्यात दंग झाली. अर्थात आम्हीही त्यात सामील होतोच.\n वाशिम-नागपूर जलद बस आणि नवी कोरी. डोळ्यांचे पारणे फ़िटले.\nयवतमाळ-अमरावती निम आराम सेवा. ऎण्टोनी, मुंबई येथे बनवल्या गेलेली बस. स्वतःच्या कार्यशाळा उत्तम बस बांधू शकत असताना एस. टी. काही बसेस ए.सी.जी.एल, गोवा आणि काही बसेस ऎण्टोनी, मुंबई यांच्याकडून बांधून घेण्यामागे काय \"अर्थ\" दडलाय हे एस. टी.चे उच्च अधिकारीच जाणे.\nअकोल्याला आलो तेव्हा दुपारचे सव्वा बारा वाजले होते. पाच तासांपेक्षाही कमी वेळात २५० किमी अंतर आम्ही कापलेले होते.\nखेर्डा फ़ाट्यानंतर अकोल्यापर्यंत रस्ता दुपदरीच आहे आणि वाहनांची संख्या मात्र भरमसाठ. ओव्हरटेकींग करताना खूप कौशल्य दाखवाव लागत. मनःशांती ठेवावी लागते. त्यामुळे अकोला बासपास घेण्याचा आम्ही निर्णय घेतला. लांबचा असला तरी शहरातली वाहतूक त्यामुळे टाळली जाणार होती.\nअकोला ते खामगाव रस्ता हा तर अपघातांचा बादशहाच. त्यामुळे अगदी सावधपणे गाडी चालवत खामगाव गाठले. मध्येच बाळापूरनंतर शेगाव फ़ाटा लागला तेव्हा आपोआप शेगावकडे पाहून गजानन माउलीला वंदन केले आणि लगेच मार्गस्थ झालोत.\nजळगाव जामोद-अकोला. जळगाव डेपोने फ़ार जुनी बस पाठवलीय हा विचार माझ्या मनात डोकावून गेला एव्हढच.\nआधीच अरूंद रस्ता. त्यात अवजड यंत्रसामुग्री वाहून नेणार वाहन. पुढून येणारे वाहन. आणि भरीस भर म्हणून रस्त्यातच जाणा-या मेंढ्या. ड्रायव्हिंग कौशल्याची कसोटी.\nबुलढाणा-अमरावती. पुन्हा जुनी बस.\nखामगावला आलो तेव्हा दुपारचा पाउण वाजला होता. थोडेसे धास्तावतच आम्ही खामगाव-चिखली-जालना रस्त्याकडे वळलोत. पहिला १०-१५ किमी चा रस्ता पश्चात्तापाचा होता. कुठून या रस्त्यावर आलो असे वाटेवाटे पर्यंत चांगला रस्ता लागला. अगदी जालना-मेहेकर-कारंजा इतका चांगला नसला तरी ब-यापैकी होता. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे टोल कुठेच नव्हता. खरे-तारकुंडे आणि कंपनीकडे या रस्त्याचे बांधकाम आहे. गेली काही वर्षे हा इतका का रखडावा असे वाटेवाटे पर्यंत चांगला रस्ता लागला. अगदी जालना-मेहेकर-कारंजा इतका चांगला नसला तरी ब-यापैकी होता. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे टोल कुठेच नव्हता. खरे-तारकुंडे आणि कंपनीकडे या रस्त्याचे बांधकाम आहे. गेली काही वर्षे हा इतका का रखडावा हे नकळे. अमडापूरला आलो तेव्हा दुपारचे १३.५२ झालेले होते. थोडा वेळ उगाचच थांबलोत व ५ मिनीटांनी १३.५७ ला निघालोत. ३४२ किमी कापले होते आणि ताण कुठेच नव्हता.\nऔरंगाबाद-यवतमाळ बस. ह्या बसच्या निमित्ताने इ.स. २००१ च्या मार्च मध्ये सौ. वैभवीच्या कायद्याच्या अंतिम परीक्षेसाठी केलेला मुंबई नागपूर प्रवास आठवला आणि अंगावर काटाच आला.\nअगदी ऐनवेळी आम्ही निघालो होतो. मुंबई-यवतमाळ चिंतामणी ट्रॆवल्सची बस बंद पडल्याने येवल्यालाच रात्री उतरून रस्त्यातल्या मुंबई-औरंगाबाद या रॊयलच्या बसने सकाळी औरंगाबाद. तिथे अजिबात न थांबता एस. टी. च्या औरंगाबाद-यवतमाळ बसने अकोला. तिथून दुपारी आणखी एका खाजगी बसने नागपूर आणि रात्रभर नागपूरात मुक्काम करून धुळवडीच्या दिवशी सकाळी मोठ्या जिकीरीने एक खाजगी बस मिळवून गाठलेले चंद्रपूर. हे सगळ सगळ आम्हा दोघांनाही आठवल. आत्ता हसू आल. पण त्यादिवशी तंतरलेली होती.\nनागपूरवरून निघतानाच आम्ही दोघांनीही जेवण चैत्रबन ढाब्यावर करायच ठरवल होत. त्याविषयी मी खूप ऐकल होत. गेल्या २०,२२ वर्षांपासून औरंगाबाद-नागपूर, पुणे-नागपूर हा प्रवास होतो आहे. पण सर्व खाजगी बसेस आणि एस. टी., चैत्रबनच्या अगदी शेजारीच असलेल्या मधुबन ढाब्यावर थांबायच्यात. चैत्रबनला कधीच नाही. २०११ च्या दिवाळीनंतर औरंगाबाद नागपूर हा प्रवास स्वतःच्या गाडीने करायचे ठरवल्यावर चैत्रबनचा थांबा घ्यायच आम्ही ठरवलंही होत पण जालना-राजुर-देउळगाव मार्गाने आल्यामुळे ते थोडक्यात हुकल. आज मात्र अगदी पक्कच होत.\nचिखली नंतर रस्ता अधिकच छान झाला आणि नागपूरपासून ४१७ किमी अंतर कापून आम्ही देउळगाव राजा गावाबाहेरच्या चैत्रबनला थांबलो तेव्हा दुपारचे १५.३१ झाले होते. जवळपास ८ तासांहून अधिकचा प्रवास. कुठेही मोठा थांबा न घेता.\nचैत्रबनविषयी एक विशेष लेखच लिहावा लागेल. तसा एक लेख लोकसत्तेत आलेला आहे आणि श्री. विवेकजी घळसासींनीही एक लेख लिहीलेला आहे. हे दोन्ही लेख लॆमिनेट करून काउंटर जवळ लावलेले आहेत. अत्यंत कल्पकतेने इथली अंतर्गत सजावट केलेली आहे आणि एक विशिष्ट दृष्टीकोन ठेउन हा धाबा चालवला जातोय, गेली कित्येक वर्षे. इथे मद्यपान व धूम्रपानाला बंदी आहे. अतिशय सात्विक वातावरण. (म्हणूनच इथे अनेक खाजगी बसेस आणि एस.टी. थांबत नसाव्यात.) नम्र सेवक वर्ग आणि तत्पर सेवा. इथे आल्यावरच माणूस तृप्त होउन जातो. आणि अन्नाची चव तर अतिशय सात्विक. यापुढे प्रत्येक वेळी नागपूरला गाडीने जाताना आणि येताना इथेच थांबण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी एकमताने घेतला.\nबसण्यासाठी केलेली कल्पक व्यवस्था.\nया भिंतीवर लावलेल्या वचनांमधून ढाबा मालकांचा दृष्टीकोन आणि रसिकता प्रगट होते.\nअसल्या एखाद्या झोपडीवजा जागेत बसून अस्सल गावठी मेन्यू (भाकरी पिठले, किंवा भाकरी भरीत) हाणायला काय मजा येइल नाही \nहा दृष्टीकोन त्या धाबामालकांचा खरोखरच आहे.\nजेवण झाल्यानंतर बाहेर बागेत असलेल्या झोपाळ्यावर आम्ही सगळेच रंगून गेलो. इथून निघूच नये अस वाटाव इतक सुंदर वातावरण. व्यावसायिकता जपताना कुठेही कौटुंबिक टच हरवू नये ही काळजी घेतल्याचे जाणवत होते.\nनिघावस वाटत नव्हत पण निघण तर भाग होत. बरोबर १ तासांचा विश्राम करून आम्ही १६.३१ ला चैत्रबनमधून निघालो तो पुन्हा इथे येण्याची खूणगाठ बांधूनच.\nपुन्हा जालना मार्गे निघालोत. यावेळी मात्र जालना बायपास घेतला. संध्याकाळ जशी जवळ येत होती तसे जालना-औरंगाबाद रस्त्याच्या कडेला असणा-या रसवंत्या खुणावत होत्या. मग एका ठिकाणी उसाचा रस प्यायला थांबलोत. (बदनापूर : १७.२५ --- १७.३६)\nएव्हाना औरंगाबादवरून श्री रवीदादा व सौ. अनुवहिनींचे फोन्स यायला सुरूवात झाली होती. श्री रवीदादांकडे पोहोचलो तेव्हा ५०२ किमी झाले होते आणि घड्याळ १८.२८ झाले होते.\nनागपूर ते औरंगाबाद प्रवासाच आधल्या दिवशी केलेलं नियोजन. बदल ऐनवेळी झालेत.\nऔरंगाबादला दादा आणि वहिनींसोबत गप्पा नेहेमीप्रमाणे गप्पा रंगल्यात. दादांचे \"लवकर झोपा रे. उद्या पुन्हा प्रवास आहे. आजच्या प्रवासाने थकला असाल.\" हे मध्येमध्ये सुरू होतच. काही काही नाती ही अशीच अकृत्रिम जिव्हाळ्याची असतात त्यातलच माझ हे एक नातं. शेवटी लवकरच म्हणजे रात्री १० वाजता झोपलोत.\nआज लवकर उठलोत खरे पण आवरून निघायला ८.३० झालेच. वहिनींचा जेवणाचा, हुरडा पार्टीचा आग्रह मोडून आम्ही निघालो. निघण्यापूर्वी त्यांच्या हातचे नवीन प्रकारचे मस्त मेथीचे पराठे खाल्लेत. गप्पा मारता मारता निघायला चक्क ०९.३२ झालेत की.\nआज काय, उरलेलं ३५० किमी अंतरच पार करायचं होतं आणि संध्याकाळपूर्वी सांगोल्यात पोहोचायच होत त्यामुळे निवांत होतो. औरंगाबाद-नगर रस्त्याला लागलो. रविवारमुळे की काय रस्त्यावर गर्दी तशी कमी होती.\nऔरंगाबाद शहर बस सेवेची विशेष बांधलेली एस. टी. ही शहर बस सेवा महापालिकेकडे होती. अकोला इथल्या कुठल्या तरी ऒपरेटरला ती चालवायला दिलेली होती पण ते आव्हान त्याला पेलल नाही. अर्धवट सेवा टाकून आणि बरेच प्रश्न (कामगारांचा वगैरे) तो चालता झाला मग एस. टी. ने ही सेवा चालवायला घेतली. नागपूर शहरही त्याच मार्गाने जाणार अस दिसतय.\nबाबा पेट्रोल पंपाच्या चौकात दिसलेली हंस ट्रॆव्हल्सची ए.सी. स्लीपर कोच. बहुतेक औरंगाबाद-इंदोर असावी.\nनेवासा डेपोची औरंगाबाद-शिर्डी बस.\nएम.एच. ४० / वाय ५१३५. नागपूरला बनलेली नवीन बस. पुणे जलद अकोट. १० वाजता औरंगाबादला असलेली बस पुण्यावरून नक्कीच पहाटे ५.०० किंवा ०५.३० ला निघाली असली पाहिजे. ह्या मार्गावर मी पाहिलेली ही पहिलीच बस.\nत्यापाठोपाठच पुणे-अमरावती निम आराम. ही सुद्धा पहाटराणीच असली पाहिजे.\nपुणे-जामनेर-बोदवड. पहाटे पहाटे पुण्यावरून निघणारी,खान्देशाशी संपर्क साधणारी बस.\nश्रीरामपूर-गंगापूर बस. गंगापूर डेपोची जुनी पण छान बस. ओल्ड इज गोल्ड म्हणतात ते उगाच नाही.\nगोदावरी नदी ओलांडली आणि \"गोदावर्याः दक्षिणे तीरे\" आलोत. एका मानववंश शास्त्रज्ञाच्या मतानुसार महाराष्ट्रीयन देशस्थ संस्कृती ही गोदावरीच्या उत्तर आणि दक्षिण तीरावर जन्माला आलेली आहे. आर्यांहूनही ती प्राचीन आहे. म्हणूनच महाराष्ट्रात गोदावरी नदीला सर्वत्र फ़ार महत्व आहे अगदी गंगे इतकच. नाशिक मध्ये तर गोदावरीचा उल्लेख \"गंगा\" म्हणूनच होतो. \"गंगेवर गेलो होतो.\" किंवा \"गंगाघाटावर पाणीपुरी खाल्ली.\" असा उल्लेख सर्वसामान्यही करतात. महाराष्ट्रीय आणि काही तैलंगी पूजा विधानांमध्ये \"गोदावर्याः उत्तरे/दक्षिणे तीरे, रेवा: दक्षिणे तीरे\" असा उल्लेख संकल्पात असतोच. तो उत्तर भारतात दिसत नाही. म्हणजे विंध्य पर्वताच्या दक्षिणेला (नर्मदा नदीच्या दक्षिणेला) गोदावरी नदीच्या उत्तर आणि दक्षिण तटावर आर्यांपेक्षा एक वेगळी संस्कृती नांदत होती असे समजले पाहिजे. गोदावरीने अनेक हजार वर्षे आपल्याला जगवले आहे या कृतज्ञ भावनेने तिच्यात पाहिले. मौनानेच नमस्कार केला आणि येताना ठरवल्याप्रमाणे श्रीक्षेत्र दत्त देवगड चा फ़ाटा घेतला.\nऔरंगाबाद-नगर हमरस्त्यापासून ५ किमी आत हे अतीव सुंदर देवस्थान आहे. प्रवरा नदीचा रमणीय काठ या देवस्थानाला लाभला आहे. औरंगाबाद ते देवगड ६२ किमी.\nतिथे उतरताना आम्ही कॆमेरा घेउन उतरलो खरे पण तिथली नितांत रमणीयता आणि त्या पवित्र सात्विक वातावरण अनुभवण्यात आम्ही गर्क झालोत. निसर्गाचा फोटो काढता येइल पण त्यातल्या निरवतेचा मात्र स्वानुभवच घ्यायला हवा. खूप छान ठेवलेल देवस्थान आणि खूप उदात्त वातावरणात जवळपास ५५ मिनीटे आम्ही होतोच. इथले वर्णन केवळ अशक्यच. प्रत्येकाने स्वतः येउन अनुभवण्याजोगेच हे ठिकाण आहे. (श्रीक्षेत्र दत्त देवगड : १०.४४ --- ११.३७)\nपुणे-औरंगाबाद एस.टी.ची शिवनेरी वोल्व्हो.\nपुन्हा औरंगाबाद-नगर हमरस्त्यावरून वाटचाल सुरू झाली. येताना वेळ कमी असल्याने फ़ूडमॊल २४ x ७ मध्ये चि. मृण्मयीला कॆलिडोस्कोप व इतर काही खरेदी करता आली नव्हती ती यावेळी झाली. वडाळ्याच्या फ़ुड मॊल मध्ये पुन्हा १५ मिनीटे थांबलोत. (अंतर ८२ किमी. १२.०० --- १२.१५). चि. मृण्मयीची खरेदी होइपर्यंत तिथे थांबलेल्या काही सुंद-यांनी माझ्यासाठी मॊडेलिंग केले.\nदापोडी कार्यशाळेने बांधलेली नवीन गाडी. परतूर-पुणे.\nसकाळी सकाळी एरंडोलवरून निघालेली एरंडोल-पुणे.\nपुणे औरंगाबाद निम आराम\nपरतूर-पुणे, पुणे-औरंगाबाद परिवर्तन आणि एरंडोल-पुणे. रॆम्पवॊक साठी.\nआता म्हणावी तशी भूक जरी लागली नव्हती तरी नगर नंतर सांगोल्या पर्यंत २२५ किमी काही खास ढाबा नाही हे माहिती होत. म्हणून नगरच्या आधीच जेवण करून घेउ अशी टूम निघाली.नगरआधी एका छान ढाब्यावर थांबलो. खेडेगावचा फ़ील देणार वातावरण इथेही होत. इथेही आम्ही जेवण आणि मुख्यत्वे वातावरण एन्जॊय केल. औरंगाबाद सोडल्यापासून बरोबर १०० किमी झाले होते. निघण्याची इतकीशी घाई नव्हती. निवांत जेवण झाले. (१२.३३ --- १३.३५)\nढाब्यावर बागडत असलेले ससे. चि. मृण्मयीला हे जनावर सहसा पहायला मिळत नाही त्यामुळे ती हरखून गेली.\nबसण्यासाठी असलेली ही राजेशाही व्यवस्था.\nसुंदर व शांत परिसर.\nजेवण झाले मात्र मग एका अनामिक ओढीने निघालो. संध्याकाळ होण्याआधी सांगोला गाठायच होत.\nनगरला मिलीटरी भागातून जाताना दर्शनी भागात ठेवलेला एक रणगाडा.\nकरमाळा-टेंभूर्णी रस्त्याने मात्र परतताना अंत पाहिला. साखर कारखान्यात जाणा-या, ऊस वाहून नेणा-या, शंभरएक बैलगाड्या रस्त्याची एक बाजू अडवून संथपणे चालल्या होत्या. समोरून आणि आमच्याही बाजूने वाहनांची रांग लागली होती. थांबलो असतो तर नक्कीच तास दीडतास मोडला असता. मग शेजारच्याच कच्च्या रस्त्यावरून खडकांमधून गाडी घातली. निघालो खरे पण सांगोल्याला पोहोचेपर्यंत गाडी पंक्चर तर होणार नाही ना याची मनात सतत धास्ती बाळगावी लागली.\nटेंभूर्णी, पंढरपूर रस्ताने सांगोल्याजवळ येतोय न येतोय तोच सतीशचा फ़ोन आला. आपण एखाद्या गावी जातोय तिथे कुणीतरी आपण येण्याची वाट बघतय याची जाणीव किती सुखद असते नाही त्या आनंदातच आपण गेले पावणेचार तास सतत ड्रायव्हिंग करतोय आणि गेले २४६ किमी थांबलोच नाही याची जाणीव होत नाही.\nपरतताना ५० किमी जास्त लागलेत. एकूण छान प्रवास. गाडी घेऊन आपण जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ शकतो हा आत्मविश्वास देणारा.\nएका अनोख्या शोधाची चित्तरकथा.\nचारधाम यात्रा. नक्की काय \nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2009/09/blog-post.html", "date_download": "2018-04-24T07:03:10Z", "digest": "sha1:QKS5AVGQOQDVLB2XL627ZWSLBR6WANJ4", "length": 13419, "nlines": 327, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: मराठी उमेदवाराचा आग्रह धरा - राज ठाकरे", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nबुधवार, 16 सितंबर 2009\nमराठी उमेदवाराचा आग्रह धरा - राज ठाकरे\nमराठी उमेदवाराचा आग्रह धरा - राज ठाकरे\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे\nमुंबई - मुंबई, ठाण्यात उत्तर भारतीयांना उमेदवारी द्या, अशी मागणी संजय निरुपम यांच्यासारखे नेते करीत आहेत; पण त्यांच्यासारखी भाषा कोणत्याही पक्षातील राजकारण्यांनी केली, तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा सणसणीत इशारा देतानाच कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या सर्व पक्षांनी महाराष्ट्रातील मतदारसंघांत मराठी उमेदवारांचा आग्रह धरावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केले.\nमनसेच्या शिवडी-भायखळा विभागातर्फे राजनिष्ठ प्रतिनिधींची घोषणा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा परळ येथील दामोदर हॉलमध्ये आयोजित केला होता. या वेळी महागायिका वैशाली माडे यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.\nया वेळी राज ठाकरे यांनी निरुपम यांच्यावर टीकेची झोड उठविली. विधानसभा निवडणूक जवळ येताच त्यांना आता कंठ फुटू लागले आहेत. उत्तर प्रदेश, बिहारींची संख्या महाराष्ट्रात वाढली असल्यामुळे 40 उत्तर भारतीयांना उमेदवारी द्या, अशी मागणी ते करीत आहेत. निरुपम यांच्यासारख्यांना कोणी वाढविलं, असा अप्रत्यक्ष सवाल त्यांनी शिवसेनेचे नाव घेता केला. अशा प्रवृत्तींना विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या अस्मितेचे पाणी दाखवा आणि त्यांचे अस्तित्व नष्ट करा, असेही राज म्हणाले.\nआमचा हा; तर तुमचा हा... तुमचा तो; तर आमचा हा... अशी स्पर्धा राजकीय पक्षांत सुरू आहे, अशी अप्रत्यक्ष टीका शिवसेनेवर करताना राज म्हणाले, की आम्ही कोणावरही जाळे टाकलेले नाही, तर वैशाली माडे मनापासून मनसेमध्ये आली आहे. काही राजकीय पक्षांत कोणी सुनेला; तर कोणी मुलाला तिकीट देण्याचे उद्योग सुरू आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षात राहून काम केले, त्यांना संधी कधी मिळणार माझा मुलगा समोर बसला आहे. मी त्याला व्यासपीठावर बोलावले असते. त्याच्या हस्ते बुके देऊन यांचा सत्कारही केला असता, असा टोला त्यांनी शिवसेनेला मारला. काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांना व्यासपीठावर बसवून, त्यांच्या हस्ते आदेश बांदेकर यांचा सत्कार करण्यात आला होता याकडे राज यांचा रोख होता.\nकोणी कुठे बसून प्रवास करतो याची चर्चा कशाला करता, तुम्ही इकॉनॉमी क्‍लासमधून प्रवास करा, नाही तर बैलगाडीतून प्रवास करा. लोकांना त्याचे काहीही देणे-घेणे नाही, हा काही जणांचा लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रकार आहे, अशी टीका करतानाच तत्कालीन अर्थमंत्री मधू दंडवते यांच्या स्वावलंबनाची खिल्लीही त्यांनी उडविली\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nमराठी उमेदवाराचा आग्रह धरा - राज ठाकरे\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2018-04-24T06:50:25Z", "digest": "sha1:VQWTWKUOGJLB6CP6LCH4MKD4CHW6KTSC", "length": 5841, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाचेगाव - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n• उंची १.२८८ चौ. किमी\n• स्त्री २,२४८ (२०११)\nहे गेवराई तालुक्यातील गाव असून येथील गुरुवार या दिवशी भरणारा आठवडी बाजार प्रसिद्ध आहे. पाडळशिंगी या गाव पासून पूर्वेला ७ किमी अंतरावर वसलेले हे गाव आहे.या गाव भोवती बारा बंजारा समाजाची लोकवस्ती असलेले तांडे आहेत. त्यात प्रामुख्याने सडकी तांडा, पवारवाडी तांडा ,दामू नाईक तांडा. इत्यादी आहेत. या गावाच्या पूर्वेला तळवट बोरगाव,आहेर धानोरा ही गावे आहेत.\nगावात शिक्षण व्यवस्था उपलब्ध आहे. गावातील शाळा\n१.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचेगाव(केंद्र शाळा).\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मे २०१७ रोजी १६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vadervg.blogspot.com/", "date_download": "2018-04-24T06:47:44Z", "digest": "sha1:2S7TNDHJZRYEUFYF44TYV2UNH5J6NJXL", "length": 46479, "nlines": 162, "source_domain": "vadervg.blogspot.com", "title": "कपिल", "raw_content": "\nआपण कथा-कविता लिहाव्यात आणि त्या निमित्ताने आपले नाव वर्तमानपत्रात छापून यावे, असे कपिलला फार वाटायचे. पण ते जमले नाही. अर्थात वर्तमानपत्रात त्याने लिहिलेले जरी छापून आले नसले तरी त्याच्याबद्दल लिहिलेले मात्र जरूर छापून आले. आणि आता तर तो ब्लाँगच्या रूपाने इंटरनेटवर येतो आहे.कपिल भाग्यवान खराच.. सुमारे सत्तावीस वर्षांपूर्वी(१९८४) ‘दै. तरुण भारत, बेळगाव’ च्या दिवाळी अंकातील हा लेख, आपल्याला आवडेल- आवडेल.. सुमारे सत्तावीस वर्षांपूर्वी(१९८४) ‘दै. तरुण भारत, बेळगाव’ च्या दिवाळी अंकातील हा लेख, आपल्याला आवडेल- आवडेल\nसोमवार, २८ नोव्हेंबर, २०११\nसकाळी नऊ-दहाच्या सुमारास बिच्चू गल्लीतून एखादी मिरवणूक जात असताना त्या मिरवणुकीपुढे वाजणा~या बँडच्या तालावर, अंगाला नखशिखांत साबण फासलेल्या व घरापुढच्या पायरीवर तन्मयतेने नाचणा~या नागडया छोटया मुलाने कधीकाळी तुमचे डोळे खेचून घेतल्याचे जर तुम्हाला आठवत असेल, तर तुम्ही खुशाल समजा- तो मुलगा म्हणजे कपिलच\nकाही काही माणसे जन्माला येताना आपल्या तोंडातून चांदीचे चमचे वगैरे वगैरे अशा कितीतरी वस्तू घेऊन येतात परंतु अगदी लहानपणापासूनचे कपिलचे बँड-प्रेम पाहिले, की माझ्या मनात विचार येतो- क्लँरोनेट वाजवीतच त्याने या जगात ‘एंट्री’ घेतली असावी परंतु अगदी लहानपणापासूनचे कपिलचे बँड-प्रेम पाहिले, की माझ्या मनात विचार येतो- क्लँरोनेट वाजवीतच त्याने या जगात ‘एंट्री’ घेतली असावी... कारण बँडचा आवाज कानावर पडला रे पडला, की अजूनही त्याची, आईचा आवाज ऎकताच हलक्या झोपेतून हडबडून उठणा~या व कान ताठ करून इवल्या इवल्या डोळ्यांनी काव~याबाव~या नजरेने टुकूटुकू पाहणा~या मांजरीच्या पिलासारखी स्थिती होते. भातुकलीच्या बाहुला-बाहुलीच्या लग्न-खेळातील त्याची ‘बँड’ वाल्याची ‘सीट’ सतत रीझर्व असते ती त्यामुळेच... कारण बँडचा आवाज कानावर पडला रे पडला, की अजूनही त्याची, आईचा आवाज ऎकताच हलक्या झोपेतून हडबडून उठणा~या व कान ताठ करून इवल्या इवल्या डोळ्यांनी काव~याबाव~या नजरेने टुकूटुकू पाहणा~या मांजरीच्या पिलासारखी स्थिती होते. भातुकलीच्या बाहुला-बाहुलीच्या लग्न-खेळातील त्याची ‘बँड’ वाल्याची ‘सीट’ सतत रीझर्व असते ती त्यामुळेच आणि एखादा इच्छुक बँडवाला आलाच तर तो त्याला सुनावतो, ‘ बँड वाजवायचा म्हणजे ते काही सोप्पं नाही बाबा आणि एखादा इच्छुक बँडवाला आलाच तर तो त्याला सुनावतो, ‘ बँड वाजवायचा म्हणजे ते काही सोप्पं नाही बाबा होय की नाही हो होय की नाही हो’ शेवटचा प्रश्न अर्थातच तेथे जे कोणी मोठे माणूस असेल, त्याला उद्देशून असतो\nएकदा एक ‘पाहुणा’ बँडवाला अनपेक्षितपणे लग्नमंडपात दाखल झाला होता. त्यावेळी कपिलची आणि त्या नव्या बँडवाल्याची अशी काही जुगुलबंदी रंगली होती, की हां-हां म्हणता लग्नमंडपाचे युद्धभूमीत रूपांतर झाले होते\nलग्न, लग्नातील नवरा-नवरी, लग्नघरातला फराळ, नवे कपडे, पक्वान्ने, विजेची रोषणाई या सर्वांपेक्षा त्याला कशात अधिक ‘इंटरेस्ट’ वाटत असेल तर लग्नात वाजवायला आलेल्या ‘बाँड-मंडळीं’ मध्ये... नाहीतर एकेक मुले अशा समारंभात कशी खा-खा-खात असतात कधी न मिळाल्यासारखी... नाहीतर एकेक मुले अशा समारंभात कशी खा-खा-खात असतात कधी न मिळाल्यासारखी पण या बाबाचे निराळेच पण या बाबाचे निराळेच लग्नाला आलेली त्याच्या वयाची मुले इकडे खात असतात, नाचत असतात, दंगा करीत असतात आणि हा मात्र तिकडे दूर कोप~यात अंथरलेल्या जाजमावर चिवडालाडू खात बसलेल्या बँडवाल्यांचे, त्यांच्या वाद्द्यांचे, त्यांच्या अंगावरील लालभडक पोषाखाचे निरीक्षण करण्यात हरवलेला\nकपिलच्या या बँडप्रेमाचा त्याच्या आईला एक फार मोठा फायदा होतो इतर मुलांच्या आयांची अशा समारंभातील गर्दीमध्ये आपली हरवलेली मुले शोधताना जशी दमछाक होते तशी कपिलच्या आईची होत नाही. याचा अर्थ तो कधीच हरवत नाही, असा नव्हे, तर अशा समारंभात तो चुकतो-हरवतो, जरी चुकला-हरवला तरी न चुकता हरवलेल्या ठिकाणी अचूक सापडतो\nद्वारा पोस्ट केलेले Vishnu Gopal Vader येथे ११/२८/२०११ ०६:५६:०० म.उ.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nतर असा हा कपिल म्हणजे माझा भाचा – म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा गोरा,गोरापान. तरतरीत. टपोरे डोळे. वेधक चेहरा. संपूर्ण नाव कपिल धुंडीराज कुलकर्णी. वय वर्षे आठ. इयत्ता तिसरी. हुषार. लाघवी. जिज्ञासू. विचक्षण. वगैरे. वगैरे.\nकपिलला गाण्याची मनस्वी आवड आहे. सुरुवाती-सुरुवातीला तो हिंदी सिनेमातील उडत्या आणि भडक चालीतील गाणी आपली पिटुकली कंबर हलवीत तल्लीन होऊन म्हणत असे. पण जेव्हा तो जिल्ह्याचे गाव सोडून माझ्याकडे राहायला आला- म्हणजे मीच त्याला माझ्या गावाकडे घेऊन आलो- तेव्हापासून त्याची ‘टेस्ट’ बदलली. कदाचित माझ्या धाकामुळे असेल, कदाचित हिच्या, अथवा दोघांच्याही... पण आता त्याला मराठी भावगीते, भक्तिगीते, बालगीते, आवडू लागली आहेत. म्हणतोही छान. म्हणजे ‘षडज’ न सोडता. सुरात. लयीत. तालात. आणि हा ताल तो कधी अँल्युमिनियमच्या डब्यावर, डब्याच्या झाकणावर धरतो तर कधी आपल्या गुडघ्यांवर धरतो...आवाज खणखणीत. उच्चार स्पष्ट. स्वच्छ.\nपंचांग आणि ‘वैद्या’ प्रमाणे हार्मोनियमही घरचाच....पण तरीही आमच्या गाणे म्हणण्याच्या व त्याला गाणे शिकविण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. रात्री झोपण्यापूर्वी तासभर. आणि सुटीच्या दिवशी तर जवळजवळ दिवसभरच... परंतु लहर लागली, की तो माझ्या माडीवरच्या खोलीत येतो, आणि आपल्याच तंद्रीत गाणे सुरू करतो.\nमी कामात असेन तर त्याला रागावून चूप करतो. माझा मूड असेल तर क्वचित माझ्यातला ‘केशवकुमार’ जागा होतो....\nएकदा रात्रीच्या वेळी आमची मैफिल रंगली होती. मधल्या वाडयातले सुरेशराव पंतांची भजने म्हणत होते. त्यांच्या शेजारीच मांडी घालून बसलेला कपिल देहाचा कान आणि मांडीचा तबला करून ऎकत होता....\nसुरेशरावांनी मध्यंतर घेतला आणि तेवढयात कपिलने त्यांना ‘आपली आवड’ बोलून दाखवली. माझ्याकडे मान वर करून बघत म्हणाला, ‘ मामा, ते हे गाणे म्हणायला सांग की रे सुरेशमामांना...’\n’ पेटी थांबवून मी प्रश्न केला.\n‘ ते, हे रे-’\nत्याला ते नेमके गाणे सांगता येईना. ‘अं ssss’ असे करीत, डोळे बारीक करून तो गाण्याचे शब्द आठवू लागला....\nमग मी त्याला, त्याला येत असलेली, माहीत असलेली, आवडत असलेली काही गाणी विचारली. पण प्रत्येक गाण्याला त्याने ‘ते नव्हे रे-’, ‘अंह-’ अशी उत्तरे दिली...\nआम्ही सगळे विचार करू लागलो. परंतु त्याला नेमके कोणते गाणे अभिप्रेत होते, ते काही समजेना. मी त्याला विचारले, ‘ शब्द कोणते आहेत, ते तरी सांग बघू त्या गाण्यातले\n‘ते हे रे-’ चेहरा गंभीर करून तो सांगू लागला, ‘ आरशावरती रावण उडला-’\n‘आरशावरती रावण उडला’ असे त्याने म्हटल्याबरोबर मी, ही, सुरेशराव, पलीकडच्या घरातला विजू, मेधा - आम्ही सर्वजन खळ्ळ्कन हंसू लागलो...\nआमचे ते हसणे त्याला आपला अपमान वाटला. तो चिडला. रागाला आला. रागाने चेहरा-डोळे चित्रचिचित्र करू लागला....\n-शेवटी खूप मंथन केल्यानंतर समजले ते हे, की त्याला हवे असलेले गाणे म्हणजे अरुण दाते यांचे ‘भातुकलीच्या खेळामधली, राजा आणिक राणी’ हे होते आणि ‘अर्ध्यावरती डाव मोडिला’ चे त्याने ‘आरशावरती रावण उडला’ असे केले होते\nद्वारा पोस्ट केलेले Vishnu Gopal Vader येथे ११/२८/२०११ ०९:४४:०० म.पू.\n1 टिप्पणी: या पोस्टचे दुवे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nअलीकडे ही मोडक्या-तोडक्या कविता करू लागली आहे. कसे काय कुणास ठाऊक-पण मीही तशाच कविता करू लागलो आहे. कविता म्हणजे तशा कविता नव्हेत, उगीच आपले ट’ ला ‘ट’ आणि ‘री’ ला ‘र्री’ जुळवायचे. आपली एक गंमत म्हणून आणि तेही लहर लागली तर परंतु याचा परिणाम असा होऊ लागला आहे, की आम्हा उभयतांचे व्यावहारिक संभाषणही प्रास-यमक-वृत्तबद्ध होत आहे. म्हणजे असे:\nसर्व वारांमध्ये मला रविवारच अधिक आवडतो. कारण त्यादिवशी सकाळी खूप उशिरापर्यंत झोपायला मिळते. प्रत्यक्ष प्रेम करायला फार कमी मिळते, हा भाग वेगळा, पण माझे सर्वात जास्त प्रेमा कुणावर असेल तर ते झोपेवरच रविवारी किंवा सुटीच्या दिवशी खूप खूप झोपायला मिळावे म्हणून मी आदल्या रात्री अर्धा-पाऊण पिंट राँकेल जाळतो. परंतु अजून तरी रविवारसकट सगळ्या सुटयांची स्थिती ना.सी.फडके यांच्या ‘रविवार’ सारखीच झालेली आहे. पुढचा जन्म जर असेल, व तो जर मिळाला, आणि तशी ‘अनुकूल’ परिस्थिती सुदैवाने लाभलीच, तर उभे आयुष्य झोपून काढण्याचा माझा मानस आहे...\nतर काय सांगत होतो मी हां-तर सुटीच्या दिवशी मला उठायला किंचित उशीर होतो आहे, असे हिला वाटायला लागले, की ही सावकाश माडीवर येते, आणि माझ्या तोंडावरची चादर हलक्या हाताने काढत म्हणते-\n‘उठा, उठा हो मालक\n(‘भिंती’ वरचे वाँलक्लाँक’ हं\nकाय कथिते परिसा तरी॥’\nतिकडे रेडियोवर ‘मालवून टाक दीप’ लागले, की तो दीप मालवायच्या आत माझ्या इकडे ओळी तयार असत-\n‘मालवून टाक लाईट, आँफ करून स्विच स्विच\nराजसा किती दिसात, जाहला तुला न लेट’\nतिकडे ‘का हासला किनारा, पाहून धुंद लाट’ संपले की माझे इकडे तयार असते- ‘पाहुनिया विहिरीला, का हासला रहाट\nया सा~याचा कपिलच्या टाळक्यावर एक वाईट्ट परिणाम असा होऊ लागला आहे, की आम्हाला हवे असलेले शब्द, यमक वगैरे आपल्या बालबुद्धीप्रमाणे तो आम्हाला पुरवू लागला आहे. ...\nएकदा असेच झाले. सुटीच्या दिवशी मी माडीवर काहीतरी लिहीत बसलो होतो. दुपारचा एकचा सुमार असावा. स्वयंपाक करून ठेवून ही मला वरंवार ‘उठताय ना जेवायला’, ‘येताय ना जेवायला’, ‘येताय ना जेवायला’ असे खालून विचारीत होती. मीही मान वर न करता तिच्या प्रत्येक प्रश्नाला ‘झालेच-’, ‘आलोच-’ असे उत्तर देत होतो.\nपण माझे ते ‘झालेच-’ काही लवकर होत नव्हते, आणि ती दर सेकंदाला चिडत होती.....\nकाही वेळाने टपालवाल्याने तिचे नाव पुकारून पत्र टाकले. ती आनंदली. कारण पत्र माहेरचे होते. माडीच्या पाय~या चढत, ‘ओवी’ टोन मध्ये शब्द गुंफत ती म्हणाली-\n‘उठा, उठा हो साहेब\nपण गाडीचे चाक रुतले. पुढची ओळ काय टाकायची, ते तिला सुचेना. मात्र तिच्या पदराचे टोक धरून तिच्या मागून येणा~या कपिलने आपल्या बालबुद्धीने तिची अडलेली गाडी पुढे ढकलली. म्हणाला-\n‘उठा, उठा हो साहेब\nद्वारा पोस्ट केलेले Vishnu Gopal Vader येथे ११/२८/२०११ ०९:४३:०० म.पू.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n‘माझे माहेर पंढरी’ हा कपिलचा परमप्रिय अभंग. ‘पंढरी ssss ’ असा त्याने तार षडजावर अभंग संपवला, आणि तेव्हा जर ‘ही’ समोर असेल तर मला तिची चेष्टा करण्याची लहर येते... मग मी माझा अभंग सुरू करतो. तो लगेच मांडी घालून, मानेला हिसके देत ताल धरतो. अभंगाची पहिली ओळ उत्स्फूर्त येते. मग मात्र दरेक चरणाला पाच-एक सेकंद विचार करून माझा अभंग तयार होतो... अभंग तयार होतो म्हणजे फक्त यमकांची खटपट-शब्दांची जुळवाजुळव\nतबला वजवता वाजवता तोही रंगून जातो. अभंग गाता गाता मीही तल्लीन होऊन जातो\n तिची सदा गडबड घाई॥२॥\n त्याची छाती काय सांगू॥३\nअभंग संपतो. कपिलला तो फार आवडतो. कारण त्यात त्याच्या मामीची चेष्टा असते ना टाळ्या पिटून, ‘होssss’ असा आवाज काढून, मामीकडे पाहत तो आपला आनंद व्यक्त करतो. मला पुन्ह:पुन्हा तोच अभंग म्हणायचा आग्रह करतो. मीही त्याचा आग्रह मान्य करतो. ‘मलाही हा अभंग शिकव की रे मामा’ म्हणतो. मग मी त्याला अभंग शिकवू लागतो...त्याची मामी माझ्याकडे पाहत डोळे वटारते. पण मी तिकडे लक्ष न दिल्यासारखे करतो. मग तो माझा अभंग जोराने म्हणू लागतो...त्याची मामी त्याला रागे भरू लागते. हलकीशी एक चापट-पोळीही देते...तो हिरसमुसला होतो. कधीकधी रडतोही. माझ्याकडे रागाने पाहत कोप~यात उभा राहतो. तूच मामीकडून मला मार खायला लावलास, ही त्याच्या नजरेतली जळजळीत भावना टाळ्या पिटून, ‘होssss’ असा आवाज काढून, मामीकडे पाहत तो आपला आनंद व्यक्त करतो. मला पुन्ह:पुन्हा तोच अभंग म्हणायचा आग्रह करतो. मीही त्याचा आग्रह मान्य करतो. ‘मलाही हा अभंग शिकव की रे मामा’ म्हणतो. मग मी त्याला अभंग शिकवू लागतो...त्याची मामी माझ्याकडे पाहत डोळे वटारते. पण मी तिकडे लक्ष न दिल्यासारखे करतो. मग तो माझा अभंग जोराने म्हणू लागतो...त्याची मामी त्याला रागे भरू लागते. हलकीशी एक चापट-पोळीही देते...तो हिरसमुसला होतो. कधीकधी रडतोही. माझ्याकडे रागाने पाहत कोप~यात उभा राहतो. तूच मामीकडून मला मार खायला लावलास, ही त्याच्या नजरेतली जळजळीत भावना मी दुष्ट. मनातल्या मनात हसत राहतो. माझ्यावर रागावलेल्या कपिलला पाहून, त्याच्यावर रागावलेल्या त्याच्या मामीलाही पाहून...\nपण अभ्र पांगून प्रकाश बरसायला फार वेळ लागत नाही.‘आता तुला एक मस्तपैकी कथा सांगतो हं, सांगू की नको’ असं विचारलं की झालं\nद्वारा पोस्ट केलेले Vishnu Gopal Vader येथे ११/२८/२०११ ०९:४३:०० म.पू.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजेव्हा तो राहायला म्हणून माझ्याकडे प्रथमच आला तेव्हा माझ्या काँलेजची मे महिन्याची सुटी अजून संपायची होती. त्यामुळे त्यची शाळा सुटल्यानंतर मी त्याला रोज संध्याकाळी फिरायला म्हणून माळावर नेत असे. मधल्या वाटेने. अंगावर हिरवे , पिवळे पीक खेळवीत पहुडलेल्या शेताच्या बांधावरील पायवाटेवरून\nपहिल्याच दिवशी त्याने मला हे झाड कशाचे, ते झाड कशाचे, या फुलाचे नाव काय, त्या फुलाचे नाव काय, या पानाचा असाच का रंग आहे,, त्या पानाचा तसाच का रंग, या शेताचे मालक कोण आहेत, तुझे शेत आहे की नाही- असे हज्जार प्रश्न करून हैराण हैरण करून सोडले...\nsजेव्हा आम्ही शेताची सीमा ओलांडून माळाच्या सीमेत प्रवेश केला तेव्हा तर तो कपाळाला डावा आत लावून आश्चर्याने जवळजवळ ओरडलाच. म्हणाला,\n‘केवढा मोठ्ठा रे हा माळ, मामा’ त्या माळापेक्षाही आपले डोळे मोठे करीत तो म्हणाला, ‘वाट्टेल तेवढया लांब दगड टाकावा बघ, कुणाच्याच घरावर पडणार नाही...होय की नाही’ त्या माळापेक्षाही आपले डोळे मोठे करीत तो म्हणाला, ‘वाट्टेल तेवढया लांब दगड टाकावा बघ, कुणाच्याच घरावर पडणार नाही...होय की नाही\nआता मात्र कपाळाला हात लावण्याची पाळी माझ्यावरच आली\nपण मी कपाळाला हात लावण्याआधीच त्याने माझ्याकडे आणखी एक प्रश्न टाकला, म्हणाला,\n‘मामा, मी एक दगड फेकू\n’ मी त्याच्या बालसुलभ प्रवृत्तीला हिरवा कंदिल दाखवला.\n‘तसं नव्हे, नक्की फेकू काय\nकारण इतकी मोठठी रिकामी जागा, त्यातही जनवस्ती नसलेली, तो पहिल्यांदाच पाहत होता ना\n‘पण मामा,’ त्याने ‘शहरी’ भीती व्यक्त केली, ‘मी जर दगड मारला आणि तो जर कुणाच्या घरावर जाऊन पडला - तर\n‘पण इथं कुठं आहे घर जवळ दगड पडायला\n‘ते बघ, ते बघ ते घर-’\nत्याने एक फर्लांग अंतरावरची काळी कौलारू खोप दाखवली. मी म्हटले, ‘काही होत नाही, तू खुश्शाल फेक दगड हवे तितके-’\nमी त्याला धैर्य दिले.\n‘पण त्या घरावर जर दगड पडला आणि कौलं फुटली तर जबाबदार तू\nगुन्ह्याअगोदरच त्याने मला कैद केले...\nत्या संध्याकाळी त्याने कितीतरी दगड, लहान मोठे खडॆ असे समोर लांब आणि वर आकाशात मनसोक्त भिरकावले.. मी शेजारच्या बांधावरचे खडे-लहानलहान दगड त्याच्या पायाजवळ आणून ठेवत होतो आणि अंगातली सारी शक्ती एकवटून तो ते फेकत होता- एखाध्या धनुर्धारीने स्पर्धेचा सराव करावा, त्या असल्याप्रमाणे\nतरी पण त्याचा दगड फेकण्याचा खेळ संपेना.\nसूर्य बुडाला. दिशा अंधारून आल्या. तरीही-\nªÀmमग मीच त्याचा मोठठा खडा फेकण्यासाठी वर केलेला हात वरच्यावर घट्ट पकडला आणि रागाने म्हणालो,\n अंधार झाला, घराकडे परतूया-’\n‘आता फक्त एकच मामा, फक्त एकच खडा-’\n‘एक नाही आणि दोन नाही,’ मी थोडेसे उग्र रूप धारण केले, म्हणालो, ‘तिकडे मामी घरात दोघांच्याही नावाने खडे फोडत बसली असेल..’\nत्या संध्याकाळी मी जवळ जवळ त्याला माळावरून ओढतच घरी नेले...\nद्वारा पोस्ट केलेले Vishnu Gopal Vader येथे ११/२८/२०११ ०९:४२:०० म.पू.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआता या दुनियेमधे जबाब देणा~या माणसांच्या संखेपेक्षा सवाल करणा~या माणसांचीच संख्या अधिक आहे, हे तर खरेच, शिवाय मोठया माणसांच्या तुलनेने ‘लहान माणसां’ चे सवाल अनंत आणि कधीही न संपणारे असतात, हेही खरे आहे. परंतु कपिलचे प्रश्न म्हणजे याच्याही पुढची एक पायरी एक वेळ द्रौपदीची थाळी रिकामी होईल, पण त्याच्या मनातील प्रश्न संपणार नाहीत. एकेकदा तो असले विचित्र प्रश्न करतो- साक्षात यक्षाचाही चेहराही प्रश्चिन्हांकित व्हावा\nआता हेच पहा ना चंद्राला चंद्रच का म्हणतात आणि सूर्याला सूर्यच का म्हणतात चंद्राला चंद्रच का म्हणतात आणि सूर्याला सूर्यच का म्हणतात चांदणे म्हणजे ऊन नव्हे आणि ऊन म्हणजे चांदणे नव्हे- असे का चांदणे म्हणजे ऊन नव्हे आणि ऊन म्हणजे चांदणे नव्हे- असे का गाय म्हणजे म्हैस का नाही आणि म्हैस म्हणजे गाय का नाही गाय म्हणजे म्हैस का नाही आणि म्हैस म्हणजे गाय का नाही....काय डोंबल उत्तर द्यायचे अशा प्रश्नांना\n...वास्तविक चंद्राला चंद्र म्हणतात, म्हणून चंद्रालाच चंद्र म्हणतात किंवा म्हैशीला गाय म्हणत नाहीत म्हणूनच म्हैशीला म्हैस म्हणतात- हेच अशा प्रश्नांचे उत्तर\nपण नाही. त्याचे एवढया उत्तरावर समाधान होत नाही. त्याच्या प्रश्नरूपी चेह~याला आणखी काही तरी पाहिजे असते...\nत्याची जिज्ञासूवृत्तीही तितकीच भयानक आहे. अगदी सुरुवातीला मला त्याच्या या जिज्ञासूवृत्तीचे आणि प्रश्नप्रवृत्तीचे कौतुक वाटायचे. कारण आजकाल, विशेषत: त्याच्या वयोगटातील मुलांमध्ये, अभावानेच आढळणा~या या वृत्ती आहेत, असे माझे प्रामाणिक मत आहे. आणि त्याच्या त्या वृत्तीला जोपासण्याच्या आणि वाढविण्याच्या हेतूने मी त्याच्या प्रत्येक शंकेला, प्रश्नाला तो समाधानी होईल, अशा पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असतो....कधी त्याचे समाधान होते, कधी होत नाही, कधी कधी तर मीच थिटा पडतो त्याला उत्तर देताना\nबरे, एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला येत नाही, माहीत नाही, असे म्हणण्याचीही सोय नाही. करण लगेच त्याचा प्रश्न तयार असतो-‘या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही म्हणजे असला कसला रे तू एम. ए. झालास’ एम. ए. झालेला माणूस आणि सर्वज्ञानी परमेश्वर या दोहोंमध्ये त्याच्या दृष्टीने काहीच फरक नव्ह्ता\nएकदा त्याने मला विचारले, ‘मामा, क~हाड म्हणजे काय\nमी उत्तर दिले, ‘ते एका गावाचे नाव आहे, का\n‘पण कहाडच का नाव आहे\n“ मला माहित नाही.”\n‘एवढं सोप्प्प्प्पं आहे आणि तुला माहित नाही\n“ होय.” मी शरणागतीचे हात वर केले.\n“ अरे, तिथे सगळ्या कु~हाडीच आहेत रे\nमला ‘क~हाड’ या शब्दाची व्युत्पत्ती माहीत नाही. पण ‘क~हाड’ या शब्दाचे मूळ ‘कु~हाडी’ त शोधणा~या त्याच्या कल्पकतेकडे मी पाहातच राहिलो.\nतर असा हा कपिल. एकामागून एक नारळ वाढवावेत त्याप्रमाणे कुठल्याही शब्दाची ‘इटिमाँलाँजी’ तो अशी फटाफट फोडतो...\nद्वारा पोस्ट केलेले Vishnu Gopal Vader येथे ११/२८/२०११ ०९:४१:०० म.पू.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकोणत्याही लहान मुलाप्रमाणे कपिललाही कथा ऎकायला फार आवडतात. पण यात काही विशेष नाही. ‘कथा’ या सदराखाली काय वाट्टेल ते जुळवून सांगितले,ठोकले, तरी तिचा तो आनंदाने स्वीकार करतो...\nपण आंधळा स्वीकार करत नाही. मुख्य म्हणजे तो कथा लक्ष देवून नीट ऎकत असतो. कथाकथनकाराने विसरलेला एखादा संदर्भ, दुवा तो ‘आँन दी स्पाँट’ कथाकथनकाराच्या ध्यानात आणून देतो. कथानकात राहिलेले ‘कच्चे धागे’ तो अचूक पकडतो आणि निदर्शनास आणून देतो. एखादी अवघड कविता शिस्तीत, व्यवस्थित समजावून घ्यावी त्याप्रमाणे तो कथा समजावून घेतो. कथा सांगणा~याची तो कोणतीही हातचलाखी वा लपवाछपवी खपवून घेत नाही. मग त्या ‘कथे’ त काही तथ्य असो वा नसो\nत्याच्या मनावर काही संस्कार व्हावेत, कथा ऎकण्याची गोडी आहेच, पण कथा सांगण्याचीही गोडी त्याच्या मनात निर्माण व्हावी, म्हणून गाण्याप्रमाणेच आमचा ‘कथाकथना’ चाही कार्यक्रम ठरून गेला आहे.\nस्थळ: स्वयंपाकघराचा ‘वरचा कट्टा’.\nकथाकथनकाराची भूमिका कधी माझ्याकडे तर कधी त्याच्या मामीकडे. कधी कधी आम्ही सांगितलेली कथा त्यालाच पुनश्च सांगायला लावतो. पण त्यात काही त्याने अजून विशेष रस घेतलेला दिसत नाही. पण श्रवणभक्ती मात्र अगदी दृष्ट लागण्यासारखी, काढण्यासारखीही\nकपिलच्या मामीने सांगितलेला जी.एं. चा ‘खुळा बाळ्या’ त्याला जाम आवडला. त्यांचीच ‘शेपटी’ची कथाही त्याला खूप आवडली. परंतु त्याची हंसून हंसून खरी मुरकुंडी वळली ती त्यांच्याच ‘लांब नाकाच्या गोष्टी’ ने त्या कथेतल्या राजकन्येचे नाक वाढत वाढत जावून दूरवरच्या एका डोंगरावर टेकते किंवा राजकन्या ‘नाही’, ‘नाही’ अशा अर्थाने मान हलविते व तिचे नाक पाहावयास आलेल्या दरबारी मंडळींतील काही मंडळी पायात जाड दोरी अडकल्याप्रमाणे तिचे वाढलेले, वाढत जाणारे नाक अडकून एकमेकांच्या अंगावर धपाधपा पडतात- हा प्रसंग ऎकताना तर त्याचे हंसणे इतके अनावर झाले, की तो पानावरूनच उठला\nकितीतरी वेळा त्याने मला हीच कथा सांगायला लावली आहे आणि मीही ती सांगितली आहे...\nपण एकदा मात्र त्याने मला त्या कथेवरची आपली एक शंका विचारली आणि हाता-पायाची मिळून अख्खी वीसच्या वीस बोटे तोंडात घालण्याची पाळी माझ्यावर कोसळली आपले गळके नाक पुसत पुसत त्याने प्रश्न केला होता- ‘ मामा, त्या राजकन्येचे नाक इतके लांब होते म्हणतोस, तर ती शेंबूड कसा काढत होती रे आपले गळके नाक पुसत पुसत त्याने प्रश्न केला होता- ‘ मामा, त्या राजकन्येचे नाक इतके लांब होते म्हणतोस, तर ती शेंबूड कसा काढत होती रे\nमी मनोमनीं त्याच दिवशी ठरवून टाकले:\nकपिलला घेऊन मुद्दाम धारवाडला जायचे. तेही लवकरात लवकर तो मोठा व्हायच्या आत तो मोठा व्हायच्या आत कारण त्याच्या प्रश्नाचे उत्तर फक्त जी.ए. च देवू शकतील...\nद्वारा पोस्ट केलेले Vishnu Gopal Vader येथे ११/२८/२०११ ०९:४०:०० म.पू.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसकाळी नऊ-दहाच्या सुमारास बिच्चू गल्लीतून एखादी मिर...\nतर असा हा कपिल म्हणजे माझा भाचा – म्हणजे माझ्या बह...\nअलीकडे ही मोडक्या-तोडक्या कविता करू लागली आहे. कसे...\n‘माझे माहेर पंढरी’ हा कपिलचा परमप्रिय अभंग. ‘पंढरी...\nजेव्हा तो राहायला म्हणून माझ्याकडे प्रथमच आला तेव्...\nआता या दुनियेमधे जबाब देणा~या माणसांच्या संखेपेक्ष...\nकोणत्याही लहान मुलाप्रमाणे कपिललाही कथा ऎकायला फार...\nएकदा काय झाले, माडीवर मी कोणतेसे पुस्तक वाचीत बसल...\nकपिलचे डोके जसे गाण्यात चालते तसे चित्रकलेत मात्र ...\nएकदा तिन्हीसांजेला जुन्या वाडयातल्या मालूकाकी घरी ...\nरोज माझे काँलेज दुपारी दीड वाजता सुटते आणि शेतातून...\nकपिलला चुटकी सुंदर वाजविता येते, आणि दहा वजा चार स...\nआपलेही नाव वर्तमानपत्रात, मासिकात छापून यावे, असे ...\nनशिब माझे की, कपिलने ‘मामा, मामीप्रमाणे तू का गळ्य...\nतर असा हा कपिल\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-04-24T06:43:53Z", "digest": "sha1:L22L2MTMYFTCKP4UPLNFKDBHJG74EYHF", "length": 8179, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलेक्झांडर फ्लेमिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n६ ऑगस्ट इ.स. १८८१\n११ मार्च इ.स. १९५५\nनोबेल पारितोषिक इ.स. १९४५\nसर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ होते. (जन्म ६ ऑगस्ट १८८१ - म्रुत्यु ११ मार्च १९५५). त्यांनी केलेल्या पेनिसिलीन च्या शोधाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.[१] त्यांच्या या शोधाने वैद्यकक्षेत्रात प्रतिजैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणे शक्य झाले. त्यांच्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांनी जीवाणूंचे ताटलीमध्ये कल्चर तयार केले होते. या कल्चरमध्ये चूकून पेनिसिलिन नामक बुरशी येउन पडली व त्यामुळे जीवाणूंचे संपूर्ण कल्चर मृत झाले. आपले श्रम वाया गेले म्हणून फ्लेमिंग ती ताटली फेकून देणार होते. परंतु त्याचवेळेस हे कल्चर का मृत झाले याबद्दल जीज्ञासा निर्माण झाली व पेनिसिलीन ही बुरशी जीवाणूंसाठी मरण आहे हे लक्षात आले व प्रतिजैविकांचा शोध लागला.\nफ्लेमिंग यांनी जीवाणूशास्त्र, केमोथेरेपी यांवरती अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.\n↑ \"The Nobel Prize in Physiology or Medicine 1945\" [वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक १९४५] (इंग्रजी मजकूर). Nobelprize.org. १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.\nइ.स. १८८१ मधील जन्म\nइ.स. १९५५ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://live.anandnagri.com/news/editorial/1639/Parliamentary_Assembly_work_better.html", "date_download": "2018-04-24T06:51:48Z", "digest": "sha1:EJDZMQOQHGW4LZEFYM4DPMEXATGH2V2Z", "length": 10635, "nlines": 76, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " लोकसभेपेक्षा विधानसभेत सरस कामकाज - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nलोकसभेपेक्षा विधानसभेत सरस कामकाज\nनुकतेच संसदेचे हिवाळी अधिवशेन दिल्लीत पार पडले. त्याच काळात महाराष्ट्रात नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशनही सुरू होते. या दोन्ही अधिवेशनाचा सारासार विचार केल्यास देशासमोर अनेक महत्वाचे प्रश्न नोटाबंदीनंतर निर्माण झाले होते. त्या मुद्यावर संसदेत विरोधक सरकारवर तुटून पडले खरे परंतु या विरोधकांमध्ये एकी नसल्याने केंद्र सरकारवर त्याचा कुठलाच परिणाम झालेला नाही. त्यांनी विरोधकांना गोंधळ करू देऊन वेळ मारून नेली. या अधिवशेनावर जवळपास दोनशे कोटी रूपयांचा खर्च झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच संसदेच्या हिवाळी अविधशात अनेक महत्वाची विधयेक होती ती मंजूरी आणि चर्चेविना अपूरी राहीली आहेत.यावेळी संसदेच्या वरिष्ठ कार्यालयात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीवर टीका केली मात्र ती केवळ सात मिनिटे त्यातून त्यांनी नेमके काय सांगितले हे लोकांपर्यंत गेलेले नाही. त्यातच कॉंग्रेसचे नेते तथा खासदार राहूल गांधी यांनी संसदेच्या अधिवशेनापासूनच आपण नोटाबंदीवरून सरकारला चांगलेच कात्रीत पकडू असा इशारा दिला होता. मात्र त्यांनी देखिल या विषयावर सविस्तर विवेचन करण्याएैजवी मीडियाजवळच प्रतिक्रिया देणे पसंद केले. लोकसभेत विरोधक मोठा गांेंधळ करत असल्याने आपल्याला संसदेत बोलता येत नसल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयिस्कर अंग काढून घेतले. संसदे एैवजी आपण जनतेसमोर बोलणे उचित मानतो असे सांगून ते संपूर्ण अविधशनात ब्र देखिल बोलले नाहीत. नोटाबंदीला प्रखर विरोध केला तो बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांनी सर्व विरोधकांना एक करून या मुद्यावर थेट राष्ट्रपतींनीच निर्णय द्यावा अशी मागणी शिष्टमंडळाच्या भेटी दरम्यान केली. तसेच संसदेसमोर उपोषण केले. भारत बंदची हाक दिली. मात्र त्यातून काही ठोस हाती आले नाही. बिहारचे मुख्यमंत्री जे की भाजप विरोधी म्हणून ओळखले जात त्यांनी देखिल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत केल्याने विरोधकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले गेले. नोटाबंदीसह या संसद अधिवेशनात भारत आणि पाक संदर्भात जो काही वाद सुरू आहे त्यावरही पाहिजे तेवढी चर्चा झालेली नाही. तेसच सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्यावरून विरोधकांना केंद्र सरकारला कात्रीत पकडता आलेले नाही. त्यातच इटालीकडून हॅलकॉप्टर खरेदी घोटाळ्यात जो गैरव्यवहार झाला आणि त्यात माजी नौदलप्रमुख त्यागी यांना अटक झाली त्यामुळे देखिल कॉंग्रेसने गप्प राहणेच पंसद केले. कारण ही हॅलीकॉप्टर खरेदी ही युपीएच्या काळातच झालेली होती हे विसरून चालणार नाही. संसदेच्या अधिवशेनापेक्षा राज्याचे नागपूर येथे जे विधिमंडळाचे अधिवशेन झाले त्यात निश्चितच चांगले कामकाज झाले. मराठा आरक्षण, नोटबंदी, यासह राज्यातील गुन्हेगारी यासह नूतन नगराध्यक्षांना जादा अधिकार देणे हे महत्वाचे विधेयक संमत करण्यात आले. तर अशी एकूण 27 पैकी 23 वेगवेगळ्या विषयांची विधेयकांना मंजूरी देण्यात आली. नागपूर करारा प्रमाणे हे अधिवेशन झाले. त्यामुळे संसदेपेक्षा राज्य विधानसभेत जे काही कामकाज झाले ते निश्चितच महाराष्ट्रासाठी दिशादायक ठरले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nजिल्ह्यात 203 अंगणवाड्या आयएसओ\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/05/blog-post_78.html", "date_download": "2018-04-24T06:31:11Z", "digest": "sha1:HALAJYURFVU3BP322XOKLRYY5WRRPUSL", "length": 18705, "nlines": 268, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: अँड्रॉइड फोनवर‘ज्युडी’चा हल्ला", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nतुमच्याकडे अँड्रॉइड प्रणाली आधारित स्मार्टफोन असेल आणि तुम्ही एखादे अॅप सुरू केल्यावर स्क्रीनवर आलेली जाहिराती पाहण्याच्या मोहात पडला असाल तर सावधान तुमच्या मोबाइलला ज्युडी या मालवेअरची लागण होण्याचा धोका आहे. कम्प्युटरना ग्रासलेल्या ‘वॉनाक्राय’ या मालवेअरच्या धक्क्यातून जग नुकते सावरत असतानाच या नव्या मालवेअरचा धुमाकूळ सुरू झाला आहे.\nज्युडीची लागण आतापर्यंत ८.५ ते ३६.५ दशलक्ष वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनना झाल्याची भीती चेकपॉइंट या सायबर सुरक्षा सोल्युशन्स एजन्सीने व्यक्त केली आहे. या मालवेअरने गुगलचे अधिकृत अॅप स्टोअर असलेल्या ‘गुगल-प्ले’लाच आपले लक्ष्य बनवले आहे. ज्युडी हे मालवेअर जाहिरातींना चिकटत असल्याने त्याला अॅडवेअर असे म्हणण्यात येत आहे. ज्युडीची लागण एका कोरियन कंपनीने विकसित केलेल्या ४१ अॅपना झाल्यामुळे ज्युडीचे प्रताप उघड होऊ लागले. मात्र, ज्युडीमुळे किती देशांना फटका बसला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nगुगलप्लेवर उपलब्ध अॅपपैकी अनेक अॅप या मंचावर वर्षानुवर्षे उपलब्ध आहेत. यातील अनेक अॅप्स अद्ययावत केले गेले आहेत. त्यामुळेच नेमक्या कोणकोणत्या अॅपना ‘ज्युडी’ची लागण झाली आहे, अर्थात कोणकोणत्या अॅपच्या आज्ञावलीमध्ये ज्युडीने स्वतःचे कोड घुसवले आहेत, हे कळण्यास वाव नाही. चेक पॉइंटने ज्युडीविषयी माहिती जाहीर केल्यावर गुगलप्लेने तत्काळ असे बाधित अॅप काढून टाकले आहेत.\nअँड्रॉइड प्रणालीवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर पॉपअप होणाऱ्या जाहिरातींतून ज्युडी त्या मोबाइल फोनमध्ये प्रवेश करतो. मग वारंवार जाहिराती पॉपअप करून त्यावर क्लिक करण्यासाठी मोबाइल वापरकर्त्याला उद्युक्त करतो. अशा प्रत्येक क्लिकबरोबर या मालवेअरच्या निर्मात्यांसाठी ज्युडी महसूल मिळवतो.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nआधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करणे\nआंतरजिल्हा बदली Incoming व Outgoing याद्या\n२१ जून : योगदिन स्पेशल\nआंतरजिल्हा बदली आवश्यक दाखले\nशालेय पोषण आहार करारनामा\nइयत्ता 10 वी निकाल\nआंतरजिल्हा बदली यादी सर्वजिल्हे\nजिल्ह्यांची नावे लक्षात ठेवण्याची ट्रिक\n25 मुद्दे - निकष आणि गुण\nमराठी माध्यमातील मुलांनी “इंग्रजी भीती” वर विजय मि...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर -3\nकाही आयुर्वेदिक आरोग्यदायी टिप्स\nशेवगा खा, सांधेदुखी पळवा \nतांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने होणारे फायदे\n30 मिनीट चालण्याचे ३० फायदे\nदेशात प्रथमच नदीखालून बोगदा\nअशी असेल १ रूपयाची नवी नोट\nखासगी शाळेतही परीक्षेद्वारे भरती\nअहिल्याबाई होळकर - भाग 1\n‘बीएसएनएल’देणार उपग्रह फोन सेवा\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/05/blog-post_54.html", "date_download": "2018-04-24T06:46:02Z", "digest": "sha1:7AWK4E2AESCO75UVE2DNYNW4WRFRHEMO", "length": 16534, "nlines": 262, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: फेव्हरेटीझ्", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nदैनंदिन कामासाठी किंवा गेम खेळण्यासाठी इंटरनेटवरील अनेक साईट्सचा वापर आपण करत असतो. यापैकी बऱ्याच साईट्सना आपल्याला वारंवार भेट द्यावी लागते. अशा वेळी प्रत्येक वेळेस साईटचं नाव (अड्रेस) टाईप करणं आणि ओपन करणं यामध्ये बराच वेळ जातो.यासाठी अशा काही ठराविक साईट्सचे पत्ते आपण स्टोअर करून ठेवू शकतो.यासाठी इंटरनेट एक्सप्लोअररमधील फेवरेटीज या पर्यायाचा वापर होतो. एखादी साईट ओपन केल्यानंतर फेवरेटीजमधील _'ऍड टू फेवरेटीज'_या पर्यायावर क्लीक करा. त्यामुळे तुम्ही ओपन केलेल्या साईटवरील वेबपेजची लिंक त्यामध्ये सेव्ह होते. त्यानंतर तुम्ही पुन्हा काम करण्यासाठी बसाल त्यावेळी त्या साईटचा अड्रेस टाईप करण्याची आवश्यकता नाही. फेवरेटीजमध्ये गेल्यास तिथे याचा अड्रेस सापडेल.अनेक साईट्स स्टोअर करायच्या असतील तर त्यासाठी यामध्ये नावानुसार फोल्डरही बनवता येतात,त्यामुळे शोधायलाही सोपं जातं.\nश्री. दिनेश म्हस्के, औरंगाबाद\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nपालकांनी नक्की वाचावा असा लेख\nसचिन तेंडुलकर यांना पत्र..\nआपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु क...\nनवीन नियमाने तासिका नियोजन व संचमान्यता\nअतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे\nध्यान : उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली\nवाडगेभर निर्जीव अन्न :\nकंबर दुखी व मान दुखीपासून कायमची सुटका\nशरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी\nस्वतः साठी एवढं तरी करा...\nशाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड\nनवीन 9 तासांचे वेळापत्रक\n'हॅकर्स' पासून वाचण्यासाठी हे नियम पाळा.\nघन आकृती महत्त्वाची सूत्रे\nसामान्यज्ञान प्रश्नसंच क्रमांक 1\nफास्ट वर्गमूळ कसे काढावे \nसंगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करणे....\nYou tube वरील videos कसे डाउनलोड करावेत \nविद्यार्थी प्रमोट करणे विषयी\nपे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु\nशासनाची ई - नाम योजना\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%A8", "date_download": "2018-04-24T06:28:21Z", "digest": "sha1:VKFTGTYQGAORDYKJ6UZHPNNMADII4VMZ", "length": 4445, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ७३२ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► इ.स. ७३२ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. ७३२ मधील निर्मिती‎ (रिकामे)\n► इ.स. ७३२ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n► इ.स. ७३२ मधील शोध‎ (रिकामे)\n► इ.स. ७३२ मधील समाप्ती‎ (रिकामे)\n\"इ.स. ७३२\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ७३० चे दशक\nइ.स.चे ८ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/hot-gossip/actress-sakhi-gokhale-reveals-why-she-loves-wearing-sarees/20725", "date_download": "2018-04-24T06:53:34Z", "digest": "sha1:OB2RIN54MCERSPJFJFNANR7CUA3ZXJMR", "length": 24303, "nlines": 244, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Actress Sakhi Gokhale Reveals Why She Loves Wearing Sarees | का म्हणतेय सखी ''सारी का फॉल सा मॅच किया रे''? | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nका म्हणतेय सखी ''सारी का फॉल सा मॅच किया रे''\nब-याचदा सखी वेस्टर्न आऊटफिटमध्ये नाहीतर पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळते. तिला वेस्टर्नपेक्षा पारंपरिक ड्रेसिंग जास्त भावते असे तिच्त्याया फोटोवरून समजते.\n''सारी का फॉल सा मॅच किया रे''..... असे आम्ही नाही तर चक्क अभिनेत्री सखी गोखले बोलतेय,त्याचे झाले असे की,आपल्या अभिनयानं मनं जिंकणारी सखी गोखले सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते.सध्या तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर नेटिझन्सला चांगलाच भावतोय. यांत तिचा लूक एकदम वेगळा आणि हटके असल्याने तो रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतो आहे.फोटोत सखीचा साडीतला हटके अंदाज तितकाच खास वाटतो आहे.एरव्ही ग्लॅमर दुनियेत कलाकारांना त्यांच्या अभिनयाइतकेच त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलही खूप महत्त्वाची असते.ब-याचदा अभिनेत्री स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी वेस्टर्न लूक असलेले ड्रेसिंग करत असल्याचे पाहायला मिळतं.मात्र सखी या सगळ्या गोष्टींना अपवाद ठरल्याचे पाहायला मिळत आहे.ब-याचदा सखी वेस्टर्न आऊटफिटमध्ये नाहीतर पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळते. तिला वेस्टर्नपेक्षा पारंपरिक ड्रेसिंग जास्त भावते असे तिच्या फोटोवरून समजते.ब-याचवेळी सखी सोशल मीडियावर तिचे साडीमध्ये असलेले नवनवीन फोटो अपलोड करत असते. तिच्या या फोटोंनाही तिच्या चाहत्यांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली वेगळी स्टाइल असते.अगदी त्याचप्रमाणे सखी गोखलेची एक वेगळी स्टाइल आहे.त्यामुळे सखीच्या या फॅशनेबल साडी लूकची रसिकांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळतंय.छोट्या पडद्यावर 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत सखी गोखलेचे 'रेश्मा' ही भूमिका रसिकांच्या पसंती उतरली होती.त्यानंतर रसिकांच्या पुन्हा एकदा दिल दोस्ती दोबारा या मालिकेत सखी परी ही भूमिका साकारत आहे. याशिवाय सखी गोखले अमेय वाघ, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे या कलाकारांचा समावेश असलेल्या 'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकालाही रसिकांकडून खूप कौतुक होत आहे.\nशिकारी वृत्तीवर बोट ठेवणारा 'शिकारी...\nअमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी दिसण...\n​या गोष्टीसाठी केले जातेय अमेय वाघच...\nसुव्रत जोशी ‘शिकारी’ चित्रपटातून मो...\nआगामी चित्रपटासाठी अमेय वाघ घेतोय '...\nही तरूणी आहे अमेय वाघची जबरा फॅन\n​डान्स महाराष्ट्र डान्सच्या व्यासपी...\nदो दिल मिल रहें है चुपके चुपके,दिल...\n‘फास्टर फेणे’ ठरला महाराष्ट्राचा फे...\n​सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यां...\nया कलाकारांनी हजेरी लावली महाराष्ट्...\n‘अमर फोटो स्टुडीओ’ची विदर्भवारी\n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करण...\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात...\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्या...\nऋषिकेश जोशीच्या या फोटो मागचं गुपित...\nअक्षय तृतीयाच्या शुभमूहुर्तावर बोनस...\n'रणांगण'च्या निमित्ताने मराठी सिनेस...\n‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांच...\nसौंदर्याचं मर्म उलगडणारा ‘जश्न-ए-हु...\nगायिका सावनी रविंद्रचं भावी पतीसह प...\nअवधूतच्या आवाजातलं 'रणांगण' चित्रपट...\nवयाची चाळीशी ओलांडूनही इतकी दिसते स...\n​प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली... या...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://zeemarathijagruti.com/knowledge-hub/finance/home-buying-tips", "date_download": "2018-04-24T06:53:58Z", "digest": "sha1:WXX2YTRTOKNRLAAAIK3HBIDSUC3T56EC", "length": 20245, "nlines": 389, "source_domain": "zeemarathijagruti.com", "title": "स्वत:चं पहिलं घर विकत घेताना...How to Buy a House, Home Buying Tips | Zee Marathi Jagruti", "raw_content": "\nस्वत:चं पहिलं घर विकत घेताना…\nस्वतःच घर असावं हे प्रत्येक गृहिणीच स्वप्न असतं.घराबद्दलचं स्वप्नं प्रत्यक्षात उतरवताना तारेवरची कसरत करावीच लागते. घर खरेदी करताना काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.\nघराचं ठिकाण, आपलं बजेट, कर्जाची रक्कम आणि त्यानुसार येणारं नियोजन या सगळ्या गोष्टी ओघाने आल्याच. अर्थात पैशांची जुळवाजुळव म्हणजे स्त्रियांची महत्त्वाची भूमिका आलीच, नाही का पण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत असताना प्रत्यक्ष व्यवहाराची प्रक्रिया देखील जाणून घेणे आवश्यक आहे.\nघराच्या बाबतीत स्त्रिया जरा जास्तच स्वप्नाळू असतात, पण आपले घर भविष्यात कोणत्याही कायदेशीर भोवऱ्यात येणार नाही यासाठी सुरुवातीपासून कागदोपत्री प्रक्रियांच्या बाबतीत खबरदारी अतिशय आवश्यक आहे.\nघर खरेदी करताना इस्टेट एजंट महत्वाची भूमिका बजावतात हे जरी खरे असले तरी कायदेशीर प्रक्रियांच्या बाबतीत कधीही इस्टेट एजंटवर संपूर्णतः अवलंबून राहणे चुकीचे आहे. कागदपत्रांच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतः खात्री करून घ्यायला हवी\nघर खरेदीचे साधारण ३ प्रकार असू शकतात :\n१) स्वतःची जागा खरेदी करून त्यानंतर घर बांधणे\n२) बिल्डरकडून जागा खरेदी\n३) पुनःविक्रीतील खरेदी ( रिसेल )\nयानुसार कायदेशीर प्रक्रिया जाणून घ्यायला हवी. त्यासाठी योग्य सल्ला आवश्यक आहे.\nआर्थिक बाजू सांभळण्यात स्त्रीयांचा देखील हातभार असतो. त्याचप्रमाणे अशा महत्त्वपूर्ण व्यावहारिक गोष्टींची माहिती देखील असणे आवश्यक आहे.\nअट एकच : घरकामात मदत करावी\n‘कांदे पोहे’ शिजले, ‘लग्न’ ठरले\nतुम्हाला आवडतील या हटके नोजपिन्स\n‘या’ वस्तू ठरतील अचूक हळदी कुंकवाचे ‘वाण’\nतुम्हालाही या ५ कारणांमुळे दिवाळी आवडते का\nलग्नानंतर मुलीचं नाव बदलतं तेव्हा….\nनवरात्रीत या ५ ठिकाणांना भेट द्यावीच\nयेणार बाप्पाची स्वारी, तर सजावट हवी भारी\nअक्षय तृतीयेच्या दिवशी करावे हे ‘शुभकार्य’\nगगनी सजली संस्कृतीची ‘गुढी’\nकाळ्या मातीतली डौलदार मराठी\nएकोप्याचे ‘वाण’ हळदी कुंकू\nनिसर्गाला दिवाळी सप्रेम भेट \nसण वटपौर्णिमेचा, आनंद पतीप्रेमाचा आणि निसर्गाच्या जागृतीचा\nहोळी-रंगपंचमीच्या निमित्ताने ‘जागृतीची नवी प्रेरणा’ \nसंस्कृतीतील नवा पायंडा : कुटुंबाची कर्ती आता ‘ती ‘ \nजाणून घ्या महिला दिनाची पार्श्वभूमी\nमकरसंक्रांतीच्या माहितीचा खरा गोडवा\nमुलांना पैशाची किंमत कळावी म्हणून\nस्त्री पुरुष समान वेतन आईसलॅंडमध्ये\nसेकंड होमचा विचार करण्याआधी हे वाचा\nबॅंकलॉकर घेताना असे सतर्क रहावे\nघरगुती व्यवसायासाठी भांडवल उभारताना\nलहान मुलांसाठी बॅंकेचे व्यवहार\nव्यवहारात सुरक्षित ‘प्लॅस्टिक मनी’\nशेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना\nस्वत:चं पहिलं घर विकत घेताना…\nगुंतवणुकीने करा भविष्य सुरक्षित\n“प्लॅस्टिकची पिशवी नको म्हणजे नको\nसार्वजनिक ठिकाणी स्तनपान देताना…\nकेस गळणे थांबवतील ‘हे’ पदार्थ\nउन्हामुळे टॅन होणा-या त्वचेसाठी\nब्रेकफास्ट करावा तर हा ‘असा’\nवयात येणा-या मुलीशी आईने ‘असे’ बोलावे\nऑफिसमध्ये कंटाळवाणे वाटल्यास, ‘हे’ ५ उपाय करा\n‘गर्भसंस्कार’ व्हावेत तर असे\nपोटाचा घेर कमी करणारी ५ योगासने\nडाएटमध्ये फक्त ‘सॅलेड’ खाणे घातक, कारण…\n‘या’ ५ सवयी तुम्हाला ठेवतील फिट\nत्वचा व केसांच्या आरोग्यासाठी ‘हे’ पदार्थ खावेत\nटूथब्रशच्या स्वच्छतेसाठी इतके कराच\nरजोनिवृत्तीच्या काळात तब्येत साभांळावी अशी\nनखांचं सौंदर्य खुलवणं स्वस्त व मस्त\nपेट्रोलियम जेलीचे हे ५ उपयोग माहित आहेत\nकेसांचे आरोग्य जपणारे ५ हिवाळी उपाय\nऑफीसमध्ये बसल्याजागी करावेत हे व्यायाम\nलहान मुलांचा हिवाळी आहार असा हवा\nपांढ-या केसांची समस्या पळवा दूर\nग्रीन टी घेण्याआधी ‘हे’ वाचा\nतुम्ही अन्न घटक वाचवता का\nहेअर ड्रायर वापरता, मग आधी हे वाचा\nतर, केस गळण्याची समस्या होईल दूर\nस्तनपान करताना या ५ चुका करु नयेत\n‘त्या’ पहिल्या दिवशी कशी जाऊ ऑफिसला\nजॉगिंगचे आहेत हे काही नियम….\nशांत झोप हवी असेल, तर हे वाचाच\nपावसाळ्यात कपड्यांची अशी काळजी घेताय ना\nगरोदरपणात ‘असा’ आहार घेणे आवश्यक\nप्रवासात स्वास्थ्य सांभाळावे असे..\nथंडीत कुरळ्या केसांना जपावे असे\nत्वचेची अशी काळजी घेताय ना\n‘योगा’ की ‘व्यायाम’ काय निवडावे घ्या जाणून\nतब्येत सांभाळ, आता उकडतयं फार\nआईची तान्ह्यासाठी ‘मातृत्व रजा’\nसूर्यनमस्कार – एक संपूर्ण व्यायाम प्रकार\nनिरोगी आरोग्यासाठी आहाराची पंचसूत्र\nपौष्टिक अन्न हे पूर्णब्रह्म \n…. तर आजार जाईल पळून\nऑनलाईन हॉटेल बुक करताना ‘हे’ लक्षात ठेवा\nअनोळखी शहरात एकटीने प्रवास केलाय\nएक्सपायरी डेट पाहा, तक्रार ‘इथे’ करा\nकरिअरसाठी घरापासून दूर रहाणा-या मुली\nतुमच्या पर्समध्ये काय असतं\nलहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी, हे नक्की करा\nआता मुलेच फटाके नको म्हणतील\nकॅबमधून एकटीने प्रवास करताना…\nदागिने चमकविणारे ‘हे’ ५ उपाय\nवॅक्स करताय… मग हे वाचाच\nउन्हाच्या झळा न लागो घराला\nसुगरणीस ठाऊक हव्यात या युक्त्या\n‘जागृक ग्राहक’ घडविणारा ‘कायदा’\nकरार मालक व भाडेकरुचा\nचेक भरताना घ्यायची काळजी\nपर्यटनाला जाताना घ्यायची काळजी :\nऑनलाइन शॉपिंग करताना हे लक्षात ठेवा\nचांगले मार्क्स मिळवलेस, तर देईन\nमातृत्व रजेनंतर कामावर रुजू होताना\nस्वत:चा ऑनलाईन ब्रॅण्ड तयार करताना\nनोकरी व घर : दोन्हीचे संतुलन\n‘परिक्षा’ मुलांहून अधिक पालकांची\nमुलांशी करिअरविषयी बोलावे असे\nऑफिसमध्ये वागाव असं, नाहीतर होतं हसं\nलग्नानंतरही शिक्षण पूर्ण करता येईल\nनोकरी शोधताय, तर आधी हे वाचा\nसंधी मिळत नाही तर ती मिळवावी लागते \nपेनड्राईव्ह विकत घेताय, मग आधी ‘हे’ वाचा\nमोबाईल विकत घेताय, मग आधी हे वाचा\nमायक्रोव्हेवचा असा वापर केलायेत कधी\nतुमचे इअरफोन्स लवकर खराब होतात, कारण\nमनोरंजनात नको ‘गॅप’, आलयं झी मराठी ‘अॅप’\nमोबाईल ‘अॅप्स’ सोडवतील प्रश्न\nतंत्रज्ञान मातृत्त्वासाठी आशेचा किरण\nमोबाईल बॅंकींग या महत्त्वाच्या सुविधा देते\nइंटरनेट वापरताना बाळगा सावधगिरी\nआपल्याला मिळणार अॅपची साथ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRID/MRID073.HTM", "date_download": "2018-04-24T07:27:13Z", "digest": "sha1:XXYYH7XNMGAN2FPBSMYYLW73Q5QXQNLX", "length": 7195, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी | काही इच्छा करणे = mau sesuatu |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंडोनेशियन > अनुक्रमणिका\nतुम्हांला काय करायचे आहे\nतुम्हाला फुटबॉल खेळायचा आहे का\nतुम्हांला मित्रांना भेटायचे आहे का\nमला उशिरा यायचे नाही.\nमला तिथे जायचे नाही.\nमला घरी जायचे आहे.\nमला घरी राहायचे आहे.\nमला एकटे राहायचे आहे.\nतुला इथे राहायचे आहे का\nतुला इथे जेवायचे आहे का\nतुला इथे झोपायचे आहे का\nआपल्याला उद्या जायचे आहे का\nआपल्याला उद्यापर्यंत राहायचे आहे का\nआपल्याला उद्याच बील फेडायचे आहे का\nतुम्हांला डिस्कोत जायचे आहे का\nतुम्हांला चित्रपटाला / सिनेमाला जायचे आहे का\nतुम्हांला कॅफेत जायचे आहे का\nइंडोनेशिया, खूप भाषांची भूमी\nइंडोनेशियाचे लोकतंत्र हे पृथ्वीवरच्या मोठ्या देशांपैकी एक आहे. जवळपास 240 कोटी लोक हे बेटावर राहतात. खूपसे लोक हे टोळीतून येतात. असा अंदाज आहे कि जवळपास 500 टोळ्या इंडोनेशियात आहेत. या टोळ्यांना खूप वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपरा आहेत. आणि ते सुद्धा अनेक वेगवेगळ्या भाषा बोलतात. इंडोनेशियात जवळपास 250 भाषा बोलल्या जातात. त्यांच्या अनेक वाक्यरचनाही आहेत. पारंपारिक गटांतर्गत इंडोनेशियन भाषांचे वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ तेथे जावानीज किंवा बालीनीज भाषा आहे. हा भाषांचा गोंधळ नैसर्गिकपणे अडचण ठरू शकतो. त्यांनी एक कार्यक्षम अर्थव्यवस्था आणि कारभार अडवला आहे. म्हणूनच इंडोनेशिया मध्ये राष्ट्रीय भाषा अस्तित्वात आली. त्यांचे स्वातंत्र्य 1945 पासून आहे, बहासा ही त्यांची कामकाजाची भाषा आहे. ही भाषा मूळ भाषेबरोबर शाळांमध्ये शिकवली जाते. हे टाळण्यासाठी इंडोनेशियाचे सगळेच रहिवासी ही भाषा बोलत नाहीत. फक्त 70 टक्के लोक हे इंडोनेशियात बहासा भाषेत पारंगत आहेत. बहासा इंडोनेशिया ही फक्त 20 कोटी लोकांची मूळ भाषा आहे. तरीही खूप प्रांतीय भाषांचे अजूनही महत्व आहे. विशेषतः इंडोनेशिया ही भाषेच्या चाहत्यांसाठी मनोरंजक आहे. कारण इंडोनेशियन लोकांना हे शिकण्यात खूप फायदे आहेत. भाषा ही तुलनात्मकरीत्या सोपी समजली जाते. व्याकरणाचे नियम पटकन शिकले जाऊ शकतात. तुम्ही शब्दांच्या उच्चारांवर विश्वास ठेऊ शकता. भाषेची शुद्धलेखन पद्धती ही अवघड नाही. खूप इंडोनेशियन शब्द हे दुसर्‍या भाषेतून आले आहेत. आणि लवकरच इंडोनेशियन ही महत्वाची भाषा होऊ शकते. ही कारणे शिकणे सुरु करण्यासाठी पुरेशी आहेत, बरोबर\nContact book2 मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-24T06:36:55Z", "digest": "sha1:KIISZIGNRT53NRLVLBS46IK2YS3BRQ63", "length": 5424, "nlines": 143, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सांबार मसाला | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: सांबार मसाला\n१/४ वाटी मसुराची डाळ\n२ चमचे सांबार मसाला\nकांदा व टोमॅटो बारीक चिरावेत. नंतर मसुराची डाळ, कांदा व टोमॅटो एकत्र करुन शिजवून घ्यावेत.\nनंतर त्यात थोडे पाणी घालून पुरणयंत्रातून काढावे.\nत्यात तिखट, मीठ, साखर व सांबार मसाला घालावा.\nहिंग, मोहरी, हळ्द घालून तेलाची फोडणी द्यावी.\nफोडणीत मिरच्यांचे तुकडे व कडीपत्ता घालावा.\nThis entry was posted in आमट्या,सार,कढी and tagged टोमॅटो, पाककला, मसुरडाळ, सांबार, सांबार मसाला on फेब्रुवारी 7, 2011 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/did-you-know/sussanne-khan-advise-ex-husband-hrithik-roshan-to-speak-against-kangana-ranaut/25318", "date_download": "2018-04-24T06:50:41Z", "digest": "sha1:NOLC7UYZTM5NGT7J65QSJYRFP34R4ZVU", "length": 25601, "nlines": 244, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Sussanne Khan Advise Ex-Husband Hrithik Roshan To Speak Against Kangana Ranaut? | ​ एक्स-वाईफ सुजैन खान हिच्यामुळे उघडले हृतिक रोशनने तोंड! वाचा सविस्तर !! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\n​ एक्स-वाईफ सुजैन खान हिच्यामुळे उघडले हृतिक रोशनने तोंड\nहृतिकच्या कंगनाविरोधात जाहिरपणे बोलण्याच्या निर्णयामागे सुजैन असल्याची बातमी आहे. होय, चर्चा खरी मानाल तर, सुजैन हिनेच हृतिकला आपली बाजू मांडण्याचा सल्ला दिला.\nहृतिक रोशन व सुजैन खान या दोघांचा घटस्फोट झाल्याय पण दोघांमधीलही मैत्री अद्याप संपलेली नाही. घटस्फोटानंतरही दोघेही अनेकदा एकत्र दिसतात, हा त्याचाच पुरावा आहे. हृतिकच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमात सुजैन आवर्जून हजेरी लावली. दोघेही मुलांसोबत हॉली डे एन्जॉय करतात. खरे तर हृतिक व सुजैन यांच्या घटस्फोटानंतर अनेक चर्चा रंगल्या. या घटस्फोटामागचे कारण काय, यानिमित्ताने नाही नाही ते बोलले गेले. पण याऊपरही अटीतटीच्या वेळी एक्स वाईफ सुजैन हृतिकच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहिली. कदाचित या प्रकरणातही. आम्ही कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुम्हाला कळलेच असेल. होय, आम्ही बोलतोय ते हृतिक व कंगना राणौत या दोघांच्या ‘अजब प्रेम की गजब कहानी’बद्दल.\nकाल-परवा हृतिकने कंगनाच्या आरोपांना उत्तर देणारे एक आॅफिशिअल स्टेटमेंट जारी केले होते. मी कंगनाला खासगीरित्या कधीही भेटलेलो नाही, असा दावा त्याने यात केला होता. यानंतर या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हृतिकने अर्नब गोस्वामी यांना एक दीर्घ मुलाखत दिली. या मुलाखतीत हृतिकने प्रथमच जाहिरपणे आपली बाजू मांडली. कंगनाच्या आरोपांचा माझ्या आजूबाजूच्या लोकांवर वाईट परिणाम होऊ लागला होता. माझ्यामुळे माझ्या जवळची माणसं प्रभावित व्हावीत, असे मला वाटत नाही आणि त्यामुळेच मी आता या सगळ्या प्रकरणावर बोलणार आहे, असे हृतिक यावेळी म्हणाला. हृतिकच्या या कंगनाविरोधात जाहिरपणे बोलण्याच्या निर्णयामागे सुजैन असल्याची बातमी आहे.\n कंगना राणौतच्या आरोपांना हृतिक रोशनने अशी दिली उत्तरे\nहोय, चर्चा खरी मानाल तर, सुजैन हिनेच हृतिकला आपली बाजू मांडण्याचा सल्ला दिला. कंगनाचे सगळे आरोप खोटे आहेत, यावर सुजैनचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे तिनेच आपल्या एक्स-हसबण्डला याप्रकरणी लोकांसमोर येण्यासाठी राजी दिले. मी तुझ्या पाठीशी आहे. सगळ्या आरोपांना खंबीरपणे सामोरे जा, असे सुजैनने हृतिकला सांगितल्याचे कळते. आता ही चर्चा खरी असेल तर सुजैनने आता राहिले नसलेल्या नात्याचा धर्मचं निभावला, असे म्हणता येईल.मध्यंतरी कंगनाच्याआरोपांच्या पार्श्वभूमीवर सुजैनने एक टिष्ट्वट करत, हृतिकला पूर्ण पाठींबा दिला होता. माझा हृतिकवर पूर्ण विश्वास आहे. भविष्यातही त्याच्यावरचा विश्वास कमी होणार नाही, असे तिने म्हटले होते. कोणत्याही आरोपांमध्ये आणि कटकारस्थानांमध्ये एवढी शक्ती नाहीये की, ती एका चांगल्या व्यक्तीवर विजय मिळवू शकेल,असे टिष्ट्वट तिने केले होते.\nCdr case :​ हृतिक रोशनचा नंबर शेअर...\n​सीडीआर प्रकरणात कंगना राणौतचे नाव\n​‘या’ अंदाजात पंतप्रधान नरेंद्र मोद...\n ​ हृतिक रोशनच्या आईचे ‘हे’ व्...\n​कंगना राणौत म्हणते, लोक मला ‘सायको...\n​श्रीदेवीच्या निधनाच्या धक्क्याने क...\nDon't miss : मणिकर्णिका’च्या सेटवरच...\nबोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल कंगना राणौत...\n​ कंगना राणौतने अचानक घेतला मोठा नि...\n​ टीव्ही स्टार सुमीत व्यासचे नशीब फ...\n​कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका : द क्...\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टी...\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री...\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले...\n होय, हुमा कुरेशीला ओळ...\n​शाहरुख खानची पहिली कमाई होती केवळ...\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का...\n​‘अल्कोहोलिक’ म्हणताच भडकली पूजा भट...\nसोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या लग्नाच...\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर...\n​सारा अली खानचे आई अमृता सिंग व डिम...\nपाहा, मिलिंद सोमण आणि अंकिता कंवर य...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/off-colour-blasters-take-on-bengaluru/", "date_download": "2018-04-24T06:47:54Z", "digest": "sha1:PEGNJZGYH6PPAYPELZ2PJTTZLKJYKWDU", "length": 9719, "nlines": 106, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL: फॉर्म हरपलेल्या केरला ब्लास्टर्सची घरच्या मैदानावर बेंगळुरुशी लढत ! - Maha Sports", "raw_content": "\nISL: फॉर्म हरपलेल्या केरला ब्लास्टर्सची घरच्या मैदानावर बेंगळुरुशी लढत \nISL: फॉर्म हरपलेल्या केरला ब्लास्टर्सची घरच्या मैदानावर बेंगळुरुशी लढत \nकोची | हिरो इंडियन सुपर लिगमधील (आयएसएल) दक्षिण डर्बीत रविवारी केरळा ब्लास्टर्स आणि बेंगळुरू एफसी यांच्यात मुकाबला होत आहे. यंदा लिगमध्ये बेंगळुरूमुळे दक्षिणेतील तिसऱ्या संघाची भर पडली आहे. बेंगळुरू, चेन्नईयीन आणि ब्लास्टर्स यांच्यातील लढतींना डर्बी असे संबोधले जाते. ब्लास्टर्स फॉर्मसाठी झगडत आहे. बेंगळुरूविरुद्ध त्यांना खेळ उंचावणे अनिवार्य आहे.\nलिगमधील चुरस पाहता प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील असतील. डर्बीमुळे त्यांची जिद्द वाढलेली असेल. ब्लास्टर्सचे प्रशिक्षक रेने म्युलेस्टीन म्हणाले की, आणखी खास महत्त्वाचा सामना अशा दृष्टीने आम्हाला पाहावे लागेल. यास डर्बीची किनार आहे. ही स्थिती चांगली आहे. चाहत्यांची डर्बीची चर्चा आम्ही ऐकली आहे. त्यामुळे आम्ही आतुर झालो आहोत.\nबेंगळुरूला विजय मिळाल्यास गुणतक्‍त्यात 15 गुणांसह दुसरे स्थान गाठता येईल. दुसरीकडे ब्लास्टर्सला दुसऱ्याच विजयाची प्रतीक्षा असेल. गतउपविजेता ब्लास्टर्स यंदा झगडतो आहे. सहा सामन्यांत एकमेव विजय, चार बरोबरी आणि एक पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. सात गुणांसह हा संघ आठव्या स्थानावर आहे. प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्यांची वाटचाल आणखी बिकट झाली आहे. स्टार स्ट्रायकर दिमीतार बेर्बातोव याचा सहभाग अद्याप अनिश्‍चित आहे.\nत्याच्या तंदुरुस्तीविषयी म्युलेस्टीन म्हणाले की, त्याने आज एक दिवस चांगला सराव केला आहे, पण आम्हाला त्याच्या तंदुरुस्तीचा आढावा घ्यावा लागेल. आपल्याला वाट पाहावी लागेल.\nअल्बर्ट रोका यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगळुरूने हिरो आयएसएलमध्ये पदार्पणात प्रभावी प्रारंभ केला, पण त्यानंतर त्यांची कामगिरी खालावली आहे. सलग दोन पराभव पत्करल्यानंतर बेंगळुरूसमोर नेहरू स्टेडियमवर ब्लास्टर्सला गगनभेदी जयघोषात पाठिंबा देणाऱ्या यलो आर्मीसमोर खेळण्याचे आव्हान आहे.\nपत्रकार परिषदेला रोका यांच्याऐवजी सहाय्यक प्रशिक्षक नौशाद मुसा उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, स्पर्धा खडतर झाल्यामुळे आम्ही दोन सामने गमावले. आम्ही मोसमाचा प्रारंभ फार लवकर केला. जुलैमध्येच आम्ही सुरवात केली. एएफसी करंडक आणि इतर स्पर्धांत आम्ही खेळलो. हे आमच्यासाठी चांगले होते. इतर संघांमध्ये आता समन्वय निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे वाटचाल खडतर झाली आहे. आम्ही बरेच सामने बाहेरील मैदानांवर खेळत आहोत.\nब्लास्टर्सविरुद्धचा सामना बराच खडतर असेल. त्यांचा खेळ चांगला होत आहे. याशिवाय प्रेक्षकांचा पाठिंबा सुद्धा त्यांना मिळेल, असेही मुसा यांनी नमूद केले.\nISL: पुण्याकडून घरच्या मैदानावर नॉर्थईस्ट युनायटेडचा धुव्वा \nत्याने एकाच सामन्यात केली दोन प्रकारे गोलंदाजी\nकोपा डेलरेच्या विजेतेपदावर बार्सेलोनाचा सलग चौथ्यांदा शिक्कामोर्तब\nमॅनचेस्टर सिटीला मिळाले प्रिमियर लीगचे विजेतेपद\nबार्सेलोनाला पराभवाचा धक्का, रोमाचा पुढील फेरीत प्रवेश\nएफसी पुणे सिटी संघाचा दिल्ली डायनॅमोस एफसी संघावर विजय\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T06:28:34Z", "digest": "sha1:U4IXUTT37ZRFSAW3UEMRHI47YAZPSERF", "length": 10883, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उल्का - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nअवकाशात फिरणाऱ्या छोट्या छोट्या खगोलीय वस्तू जेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येतात आणि जळून जातात तेव्हा त्यांना उल्का किंवा अशनी या नावांनी ओळखले जाते. कोसळल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्याआधीच त्यांचे एकसंध घनअस्तित्व संपुष्टात येते. उल्कांपैकी फारच थोड्यांचे पाषाण पृथ्वीतलावर आदळतात. पडलेल्यांचा आकार लहानमोठा असू शकतो.\nऑस्ट्रेलिया येथे आढळलेली उल्का - विज्ञान प्रदर्शनात मांडलेली असतांना घेतलेले चित्र\nपृथ्वीच्या वातावरणात दररोज निदान अडीच कोटी उल्का घुसत असाव्यात असा अंदाज आहे. उल्कांचा मोठा जमाव पृथ्वी-कक्षेतून जाऊ लागला की उल्कांचा वर्षाव झाल्यासारखे वाटते. पृथ्वीची कक्षा आणि उल्कांची कक्षा निश्चित आहेत. त्यामुळे आकाशातील ठरावीक विभागात, ठरावीक काळात उल्कावर्षाव होतात. ज्या नक्षत्रातून उल्कावर्षाव झाल्यासारखे वाटते त्या नक्षत्राला त्या उल्कावर्षावाचे उगमस्थान असे म्हणतात. पृथ्वीवर मोठ्या आकारमानात पडणाऱ्या उल्केला उल्कापात म्हणतात.\nययाती(Pereus) नक्षत्रातून होणाऱ्या उल्का वर्षावाला Perseids (पर्सीड्‌ज) म्हणतात. दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील १ ते २० तारखांमध्ये हे वर्षाव होतात. जोराचा वर्षाव १२ ऑगस्टला होतो.\nसिंह राशीतून होणाऱ्या उल्का वर्षावाला लिओनिड्‌ज(Leonids) म्हणतात. काळ दरवर्षी ११ ते २० नोव्हेंबर. जोराचा वर्षाव १२ तारखेचा.\nस्वरमंडळ (Lyra) तारकापुंजातून होणाऱ्या उल्का वर्षावाला लिरिड्ज(Lyrids) म्हणतात. दरवर्षी १६ एप्रिल ते २६ एप्रिल काळात हे उत्‌-स्वरंडळ उल्कावर्षाव होतात. यांचा जोर २१-२२ एप्रिलच्या रात्री असतो.\nदेवयानीतून (Andromeda) होणाऱ्या उल्कावर्षावाला ॲन्ड्रोमीडस (Andromedus) म्हणतात. काळ दरवर्षी २४ ते २७नोव्हेंबर.\nमिथुन (Gemini) राशीमधून होंणाऱ्या उल्कावर्षावाला जेमिनिड्ज म्हणतात. काळ दरवर्षी ९ ते१४ डिसेंबर, कमाल वर्षाव १२ तारखेला.\nमेष (Aries) राशीतून होणाऱ्या उल्कावर्षावाला एरिड्‌ज म्हणतात. कालमर्यादा दरसाल ३० मे ते १४ जून. महत्तम ७ जूनला.\nडेल्टा ॲक्वेरी या ताऱ्याच्या जवळून होणारा उल्कावर्षाव : Delta Acqarids\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ फेब्रुवारी २०१८ रोजी १४:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://chrome.google.com/webstore/detail/world-clock/noehnbmkgmjmlpdhafhcijdhmhhdkddp?hl=mr", "date_download": "2018-04-24T07:24:26Z", "digest": "sha1:ICVYJCTZMQEHOF7JJXLALQPDI4UYI2Q4", "length": 7196, "nlines": 27, "source_domain": "chrome.google.com", "title": "जागतिक घड्याळ - Chrome वेब स्टोअर", "raw_content": "\nजगभरातील शहरांमध्ये वर्तमान स्थानिक वेळेचा मागोवा ठेवा\nआपण जगभरातील विविध शहरांचे वर्तमान स्थानिक वेळ जाणून घेऊ इच्छिता मग, आपण योग्य ठिकाणी आहात आम्ही आपल्याला जागतिक घड्याळ दर्शविल्या जाईल आपण कदाचित काय असा प्रश्न विचारला असेल परंतु मी हे साधे ठेवू शकेन, हे मूलतः घड्याळेचे एक समूह किंवा शहर आणि त्यांचे वर्तमान वेळ दर्शविणारा एक ऑनलाइन जागतिक नकाशा किंवा वेळ आणि तारीख दर्शविणार्या विविध शहरांची सूची आहे.\nअनेक शहरांच्या सध्याच्या स्थानिक वेळेचा मागोवा घेणे जगाच्या घड्याळाचा वापर करणे अधिक सोपे झाले आहे. पूर्वीच्या उलट, आपल्याला आपल्या वर्तमान वेळेपासून काही नंबर जोडणे किंवा कमी करणे आवश्यक आहे. पण आता, हे त्रासदायक ठरले आहे\nआपण दररोज हलविण्याच्या मार्गावर असल्यास, एका देशातून दुसऱ्या देशात जात असल्यास, कदाचित आपण जागतिक घड्याळ तपासण्यासाठी इंटरनेट हा सर्वोत्तम मार्ग आहे. एक सोपी क्लिक शहरातून दरम्यान वेळ फरक दर्शवेल. उदाहरणार्थ, आपण दुसऱ्या देशासाठी वेगळ्या टाइम झोनसह आठ वाजता आपला देश सोडला होता. निश्चितपणे, आपण वेळेतील फरकाने गोंधळ होईल, त्यामुळे या ऑनलाइन साधनने वेळोवेळी आपला गोंधळ कमी होईल आणि आपला प्रवास अधिक सोपा होईल.\nयेथे आमच्या वेबसाइटवर वापरून पहा आणि खात्री करा की ते प्रदान करणारे फायदे आपण आश्चर्यचकित होतील. हे खरंच एक शहर पासून दुसर्या शहर करण्यासाठी योग्य वेळ ट्रॅक एक साधी पण प्रभावी मार्ग आहे आणि जगभरातील वापरले गेले आहे.\nआम्ही वारंवार वेगवेगळ्या वेळी घड्याळांचा एक संच आणि विमानतळ, ट्रॅव्हल एजन्सी, बँका आणि इतर अनेक ठिकाणी त्यांच्या खालील शहराचे संबंधित नाव पाहतो. यास जागतिक घड्याळ म्हणून ओळखले जाते.\nअशी वस्तू प्रदर्शित करण्याची गरज का आहे याचे प्रमुख कारण म्हणजे आपण वेगवेगळ्या कालावधीत जगत आहोत. उदाहरणार्थ, या क्षणी, फिलिपिन्समध्ये ती वेळ कॅनडामध्ये नसून तीच जपानमध्ये आहे. हे आपल्याला जगभरातील विविध क्षेत्रांची योग्यरिती ओळखण्यास मदत करेल.\nजागतिक घड्याळ निश्चितपणे प्रवाश्यांना फारच मदत करतात. प्रायोगिक कारणास्तव आपल्यापैकी बहुतेकांना फक्त एक घड्याळ म्हणून प्रायोगिकतेच्या कारणास्तव, विमानतळासारख्या महत्वाच्या क्षेत्रांमधे तत्सम उपलब्ध असलेली एक जागतिक घड्याळ अतिशय महत्वाची आहे. तथापि, एकतर बाजूला, कारण आम्ही आधीच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आहोत, हे ऑनलाइन सर्वत्र उपलब्ध आहे फक्त इंटरनेटवर शोध घ्या आणि नंतर आपण जगभरातील विविध शहरांमधील वेळ फरक पाहू शकाल.\nअशा उपकरणांचे महत्त्व समजून घेण्यासाठी वेळोवेळी विविध वेळ क्षेत्राबद्दल अधिक जाणून घेणे महत्वाचे आहे. अशा वेळी फरक ओळखून आपण आपला वेळ योग्य पद्धतीने वापरण्यास सक्षम होऊ शकाल विशेषतः जेव्हा आपण वारंवार प्रवासी असता आपल्या दैनंदिन कामकाजाची योग्य प्रकारे योजना आम्हाला करण्यात मदत होते जेणेकरुन आपण आपला प्रवास जास्तीत जास्त वाढवू आणि आमच्या प्रवासा दरम्यान आवश्यक असलेली सर्व महत्त्वाच्या गोष्टी करू शकू.\nअपडेट: ६ सप्टेंबर, २०१७\nभाषा: सर्व 54 पहा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/lifestyle/beauty-and-makeup/black-skin-not-a-big-problem-of-women/17143", "date_download": "2018-04-24T06:59:53Z", "digest": "sha1:KYXTSK6LPJ4A2U5OKPNJHYU5CIFUY7IH", "length": 24928, "nlines": 249, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "black skin not a big problem of women | त्वचा काळी असणे ही महिलांच्या दृष्टीने खूप मोठी समस्या नव्हे ! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nत्वचा काळी असणे ही महिलांच्या दृष्टीने खूप मोठी समस्या नव्हे \nआजच्या काळातील महिलांच्या दृष्टीने काळी त्वचा असणे हे चिंतेचे कारण नाही. याउलट ३६ टक्के महिलांनी सांगितले की त्यांचा फेअर किंवा लाईट स्कीन टोन आहे. तर ६० टक्के महिलांनी सांगितले की त्यांचा मिडियम स्कीन टोन आहे.\nआघाडीच्या सौंदर्य सेवा पुरविणाऱ्या व इंटरनेट सलून असलेल्या एका वेबसाइटतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार असे दिसून आले आहे की, आजच्या काळातील महिलांच्या दृष्टीने काळी त्वचा असणे हे चिंतेचे कारण नाही. या सर्वेक्षणात मुंबई, पुण्यातील १७ ते ३५ वयोगटातील ५१२ महिलांनी सहभाग घेतला होता. त्यातील केवळ ३ टक्के महिलांनी काळी त्वचा असल्याचे मान्य करत यावर काहीतरी उपाय करण्याची आवश्यकता असे सांगितले.\nखरंतरं यापैकी २ टक्के महिलांनी याबाबत काळजी वाटते असे सांगितले. याउलट ३६ टक्के महिलांनी सांगितले की त्यांचा फेअर किंवा लाईट स्कीन टोन आहे. तर ६० टक्के महिलांनी सांगितले की त्यांचा मिडियम स्कीन टोन आहे.\nया सर्वेक्षणाचे निष्कर्ष आश्चर्यकारक असून भारतीय महिला त्यांच्या त्वचेकडे कशा पाहतात याचा पारंपरिक समज या सर्वेक्षणातून बदललेला दिसतो.\nगेल्या काही वर्षात फेअरनेस क्रीमचा व्यवसाय कमी होत असून याबाबतच्या बातम्यांशी सुसंगत असा हा निष्कर्ष आहे.\nया सर्वेक्षणात असमान स्कीन टोन हा त्वचेशी निगडीत सर्वांत मोठा काळजीचा विषय २८ टक्के महिलांना वाटतो. तर पुरळ आणि डाग हे २७ टक्के महिलांना काळजीचे कारण वाटते. सूर्यप्रकाशामुळे होणारे त्वचेला झालेले नुकसान, काळी वर्तुळे, त्वचेची संवेदनशीलता व कोरडेपणा हे देखील काळजीचे कारण असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होते.\nAlso Read : घरगुती उपाय करा अन् स्किन उजाळा \n: सावळा रंग उजाळण्यासाठी \nया सर्वेक्षणात भाग घेतलेल्या १२ टक्के महिलांनी फेअरनेस क्रीम वापरल्याचे मान्य केले तर लक्षणीय म्हणजे ४३ टक्के महिलांनी स्कीन टोन सुधारण्याकरिता काहीही केले नसल्याचे सांगितले. तुमचा स्कीन प्रकार कोणता हे विचारले असता ४ पैकी एकहून अधिक महिला म्हणाल्या की, त्यांची त्वचा टीझोन मध्ये तेलकट आहे तर उर्वरित त्वचा कोरडी आहे. २३ टक्के महिला म्हणाल्या त्यांची त्वचा फक्त तेलकट आहे, तर १२ टक्के महिला म्हणाल्या की त्यांची त्वचा संवेदनशील आहे. त्वचा प्रकारानुसार चुकीचे त्वचा उपचार बरेचदा महिला घेत असतात ज्यामुळे सौंदर्य उपचाराबाबत त्यांच्यात असंतोष निर्माण होऊ शकतो.\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप क...\n​अतुल कुलकर्णी करतोय इतका बोल्ड चित...\n​सलमान खान पुन्हा कोर्टात\nअसे काय घडले असेल की ‘या’ अभिनेत्या...\nअट्टल गुन्हेगारांच्या यादीत सलमान ख...\nप्रियांका चोप्राच नव्हे तर ‘हे’ कला...\n​न्यायालयाच्या फे-यातून सुटका नाहीच...\n​सलमान खानच्या समर्थनार्थ अशी काय ब...\nकलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टा...\n​महेश मांजरेकर म्हणाले, कोण चुकत ना...\n​सलमान खानने तुरुंगात मानला आसारामब...\nसलमान खानची जामिनावर सुटका होताच चा...\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक न...\nघरगुती शॅम्पूने खुलवा केसांचे सौंदर...\nरिमुव्हर शिवाय काढा नेलपॉलिश\nडागरहित उजळ त्वचेसाठी हळद उपयुक्त\nआॅईली स्कीनची अशी घ्या काळजी\nउन्हाळ्यात घ्या केसांची काळजी\nBeauty : स्टोन मसाज थेरपीने असे खुल...\n​सेलिब्रिटींसारखे गुलाबी ओठ हवे आहे...\nआता बिनधास्त वापरा 'बॅकलेस ब्लाऊज'...\n​लग्नाच्या बांगड्या खरेदी करताना ‘ह...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/05/plickers-card.html", "date_download": "2018-04-24T06:19:45Z", "digest": "sha1:ENPT4DBL6AYQAXLXZH6NWRMI5VIWMOKO", "length": 17044, "nlines": 291, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: Plicker's card", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nमित्रांनो आज मी तुम्हांला छान App बद्दल माहिती देणार आहे.\nत्या अगोदर आपण plickers वेबसाईटला भेट द्या.\nआपल्या Email ने login करा.\nplickers dashboard वर आपल्याला अनेक टँब दिसतील.\nलायब्ररी: मधून विद्यार्थी मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करु शकता save ठेवू शकता.\nclass -: विद्यार्थी संख्येनुसार विद्यार्थ्यांची नावे plicker कार्ड क्र. विद्यार्थ्यांना Assign करु शकता.\ncards tab-: चा वापर करून आपण कार्ड डाऊनलोड करुन विद्यार्थी संख्येइतके print घेऊ शकता.(print शक्यतो white पेपरवर घ्या व लँमिनेशन करणे टाळा.)\nॲप वापरण्याची पद्धत -:\nप्रथम मोबाईल वरुन plicker App open करा.\nॲप मधील *लायब्ररी टँब* वरून प्रश्न सेट करा.\nविद्यार्थी automatically प्रश्नाप्रमाणे update होतात.\nआपल्याला त्वरीत विद्यार्थी निहाय निकाल मिळतो.\nविद्यार्थ्यांचे response सुद्धा नोंदवले जातात.\nकार्ड डाऊनलोड करण्यासाठी टच करा.\nPlickers संदर्भात व्हीडीओ पाहण्यासाठी टच करा.\nटिप-: विद्यार्थी रोस्टरची pdf बनवून print घेता येते. विद्यार्थी Response internet data बंद असतानाही नोंदवला जाऊ शकतो.\nहे ॲप खूप छान आहे वेळेची बचत व अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञान वापर व मनोरंजकता येते.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nपालकांनी नक्की वाचावा असा लेख\nसचिन तेंडुलकर यांना पत्र..\nआपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु क...\nनवीन नियमाने तासिका नियोजन व संचमान्यता\nअतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे\nध्यान : उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली\nवाडगेभर निर्जीव अन्न :\nकंबर दुखी व मान दुखीपासून कायमची सुटका\nशरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी\nस्वतः साठी एवढं तरी करा...\nशाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड\nनवीन 9 तासांचे वेळापत्रक\n'हॅकर्स' पासून वाचण्यासाठी हे नियम पाळा.\nघन आकृती महत्त्वाची सूत्रे\nसामान्यज्ञान प्रश्नसंच क्रमांक 1\nफास्ट वर्गमूळ कसे काढावे \nसंगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करणे....\nYou tube वरील videos कसे डाउनलोड करावेत \nविद्यार्थी प्रमोट करणे विषयी\nपे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु\nशासनाची ई - नाम योजना\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t20146/", "date_download": "2018-04-24T06:48:31Z", "digest": "sha1:WOBQPH764WIDOSIZVYXK3HAB3JZ5LFQI", "length": 2786, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेम प्रेम...प्रेमच झाले.", "raw_content": "\nहासत हासत हे काय झाल.\nमाझ मन हे हरवून गेल.\nका ते तुझवर आल.\nमाझे जग हे फुलू लागल.\nनजरेस नजर तुझी मिळाली.\nका हि रात काजवी उडाली.\nरात राणी ही फुलू लागली.\nसुगंध प्रेमाचे देवु लागली.\nहासत हासत हे प्रेम रंगले.\nवैराना हे टोचु लागले.\nत्यानीच दूर आम्हास केले.\nशेवट आमचे तिथेच झाले.\nआयुष्य आमचे असे संपवले.\nवैर हि ते रडू लागले.\nचिता आमची सजवू लागले.\nदोघांना हि तिथेच जाळले.\nअर्धावरती हे डाव संपले.\nजे होते ते हरवून गेले.\nडोळ्यातले पाणी आटू लागले.\nमजला प्रेम प्रेम प्रेमच झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1209/", "date_download": "2018-04-24T06:54:27Z", "digest": "sha1:KHFHCP3KN6MDMFDHD2VLRSGE3RZS2LVP", "length": 6028, "nlines": 185, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेमाचे गीत......", "raw_content": "\nकवी : हितेश राणे ( myself )\nकाव्यसंग्रह: प्रेम कल्पिता मानसी\nकविता : गीत प्रेमाचे\nधीर धर पकडू नको\nहे तूच मान्य कर\nअरे अरे थांब ज़रा\nछेडू नको असं मला\nजवळ का गं येत नाहीस\nमिठीत माझ्या आलीस की\nचंद्राला तू दिसणार नाहीस...\nतुझं माझं प्रेम पाहून\nछळ त्याने सुरु केला\nमला ओलं करून गेला\nमीच तो ढग ज्याने\nओले झाले अंग तर\nचांदणी घरी चुघली लावेल\nतूच तर म्हटलं होतं\nढगाला उत आला आहे\nप्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला\nकसं काय रे मिळतं\nगोड बोलणं शिकलो मी\nप्रेमाच्या मग लहरी माझ्या\nनिघतात शब्द होउन.... निघतात शब्द होउन....\nगोड बोलणं शिकलो मी\nप्रेमाच्या मग लहरी माझ्या\nनिघतात शब्द होउन.... निघतात शब्द होउन....\nओले झाले अंग तर\nचांदणी घरी चुघली लावेल\nप्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला\nकसं काय रे मिळतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2011/11/blog-post_26.html", "date_download": "2018-04-24T06:56:58Z", "digest": "sha1:UT3LTUIW2KSQEGQKD2T36OGQBWZNKXP6", "length": 21417, "nlines": 328, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: उमेदवारीच्या \"इंजिन'ला परीक्षेचा सिग्नल", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nशनिवार, 26 नवंबर 2011\nउमेदवारीच्या \"इंजिन'ला परीक्षेचा सिग्नल\nउमेदवारीच्या \"इंजिन'ला परीक्षेचा सिग्नल\nनवनव्या कल्पना मांडून स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची शैली आहे. परीक्षा घेऊन उमेदवारी देण्याची त्यांची घोषणा त्या शैलीला साजेशीच आहे; पण मनसेच्या कार्यकर्त्यांच्या गळी ती उतरवण्यात राज ठाकरे यशस्वी होणार का, हा खरा प्रश्‍न आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मतपेटीने दिलेल्या नेत्रदीपक यशापूर्वी राज ठाकरे यांची ओळख होती ती अत्युत्कृष्ट दर्जाचे इव्हेन्ट मॅनेजर अशी. घटना, कार्यक्रम, विषय कोणताही असो, राज ठाकरे त्यांच्या कल्पक, कलात्मक आयोजनाने तो प्रसंग एका उंचीवर नेऊन ठेवतात. एखाद्या विषयाची पार्श्‍वभूमी तयार करण्यासाठी ते जे नेपथ्य उभे करतात, ते अजोड असते, हा आजवरचा अनुभव. निवडणूक अगदी तोंडावर आली असताना त्यांनी या पोतडीतून परीक्षा बाहेर काढल्या आहेत. परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांचाच उमेदवारीसाठी विचार केला जाईल, अशी घोषणा करून राज यांनी तमाम पब्लिकला खूष करून टाकले आहे. किमान पात्रता असलेला नेताच आपला प्रतिनिधी असावा, हा फंडा जनतेला भलताच भावल्याने, मनसेची पूर्वप्रसिद्धी काहीही न करता झाली आहे.\nराजकारणात अशा परीक्षांना स्थान असू शकते काय, या प्रश्‍नाने राजकारण्यांना घेरले असतानाच आपला प्रतिनिधी किमान पात्रतेचा तर असेल, या भावनेने मतदार सुखावले आहेत. संभाव्य महाआघाडीला आणि मजबूत महायुतीला जी प्रसिद्धी महत्प्रयासाने मिळणार नाही, ती परीक्षेच्या एका छोट्याशा निर्णयाने मनसने मिळवली आहे. काही वॉर्डांपुरती मर्यादित शक्‍ती असलेली राज ठाकरेंची नवनिर्माण सेना मुंबई महापलिका निवडणुकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे...निदान सध्या तरी.\nपदार्पणातच मिळालेल्या लोकप्रियतेची कमान अधिकाधिक वर नेणे राज ठाकरे यांच्यासमोरचे आव्हान आहे. त्यातच हा संपूर्ण पक्ष त्यांच्या व्यक्‍तिगत करिष्म्याभोवती विणला गेला असल्याने, यशापयश कमालीचे व्यक्‍तिगत ठरणारे आहे. शिवसेनेला आव्हान देत बाहेर पडलेले बंडखोर राज ठाकरे एकीकडे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उत्तम संघटनात्मक बांधणी अशी दुहेरी ताकद असलेले उद्धव दुसरीकडे, असा हा सामना आहे. तो मुळातच विषम आहे. मात्र घराबाहेर पडणाऱ्याला संघर्ष करावा लागतो. अवतीभवतीचे लोक त्याच्या बंडाकडे फार अपेक्षेने बघतात. बंडखोराची सरशी झालीच तर बाजू बदलायची काय, याचे अंदाज आडाखे कार्यकर्ते मनातल्या मनात बांधत असतात. त्यातच प्रस्थापित राजकीय पक्षांना कंटाळलेल्या जनतेने राज यांना लगेचच उचलून धरले. महिला- तरुणांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने, या नव्या पक्षाला मतपेढीच मिळाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अशा चार कोनांत विभागलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात पाचवा भिडू समोर आला. आंबेडकरी जनतेनेही या नव्या भिडूला कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वीकारले. मनसेचा टीआरपी एकदम वाढला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेसमोर मनसेने पेच उभा केला. मात्र मुंबई- ठाणे राखत मोठ्या भावाने खिंड लढवली. कल्याण- डोंबिवली महापालिकेत दोन्ही बंधूंचे पक्ष जनतेच्या पसंतीस उतरल्याने भाजपचा धुरळा उडाला. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस दोघेही गोंधळले. मुळात कल्याण- डोंबिवलीत आघाडीला फारसे गमावण्यासारखे काही नव्हतेच. पण ठाकरे बंधूंच्या कामगिरीची पुनरावृत्ती अन्यत्र घडली तर कठीण पडेल, हे कॉंग्रेस- राष्ट्रवादीने ताडले आहे. भाउबंदकीच्या या खेळात राज्य राखता आले; पण महापालिकेत हाती काहीच न लागल्याने सत्ताधारी आघाडी अस्वस्थ झाली. या धड्यामुळेच ठाणे-मुंबईत ते एक होऊ पाहत आहेत.\nदोन्ही कॉंग्रेस एकत्र आल्या तर ती उद्धव ठाकरे यांच्यासाठी सत्ता राखण्याची कसोटी ठरेल, तर राज यांची शक्‍ती जोखणारे आव्हान. महाआघाडीचे आव्हान पेलण्यासाठी शिवसेनेने संघटनात्मक तयारीचे शस्त्र परजले आहे. शाखा गेल्या महापालिका निवडणुकांपासूनच सक्रिय आहेत. रामदास आठवले यांच्यामुळे वॉर्डगणिक दोनशे ते पाच हजारांपर्यंत जाणाऱ्या मतांची नवी कुमकही उद्धव ठाकरेंच्या दिमतीला आहे. आघाडीच्या छत्राखाली अमराठी उत्तर भारतीय, बिहारी, दलित, मुसलमान एकत्र आलेच तर त्यावर मात करण्यासाठी मराठी माणसाच्या घरात थेट चुलीपर्यंत पोहोच असलेल्या संघटनात्मक ताकदीचे उत्तर शिवसेनकडे आहे. मनसेकडे ही ताकद पूर्णत: वळलेली नाही. त्यांचे बहुतांश आमदार अद्याप चाचपडताहेत. शाखाप्रमुख कमालीचे नवखे आहेत. महापलिकेच्या महाभारतात ही कुमक पुरेशी नाही, याची जाणीव असल्याने राज यांनी त्यांचे बुद्धिकौशल्य पणाला लावलेले दिसते. आज बोरीवली, शिवडी, दादर आणि भांडूप या भागांत मर्यादित असलेली ताकद वाढवण्यासाठी राज यांनी कल्पकतेचा आसरा घेतलेला आहे. बदललेल्या राजकीय वातावरणावर स्वार होत उच्च आणि मध्यमवर्गीय मतदारांची ते मोट बांधू बघतात. शिकल्या-सवरलेल्या लोकप्रतिनिधींचे मतदाराला आकर्षण असते. निवडणूक जिंकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या निष्ठूर कसरतींची कल्पना नसलेली जनता अशा प्रतिकात्मकतेने खूष होते. लोकलमधील गर्दी, ऑटोरिक्षांचा मनमानी कारभार अशा कित्येक गोष्टींमुळे मुंबईकर दररोज वैतागतो. सगळ्या ताणाचे मूळ अकार्यक्षम नेतृत्वात असल्याचे तो दररोज स्वत:लाच पटवून देतो. परीक्षा उत्तीर्ण करणारे अशा रूढ चेहऱ्यांपेक्षा वेगळे असतील, ही अपेक्षा जागवण्यासाठी राज सरसावले आहेत. परीक्षा पास झालेल्यांनाच उमेदवारी दिली काय, याच्या कहाण्या यथावकाश समोर येतीलच. राज \"खळ्‌ळ खटाक...'ची भाषा जाणणाऱ्या त्यांच्या अनुयायांना अशा निर्णयासाठी राजी करू शकतात का परीक्षेत तावूनसुलाखून बाहेर पडलेला किमान क्षमतेचा उमेदवार स्वीकारणे मतदाराला आवडेल. पण हा वर्ग मराठी-अमराठी वादावर होणाऱ्या राड्यांना मान्यता देईल काय, हे राज यांनी स्वत:लाच विचारावे. क्‍लास आणि मास यांना एकाच वेळी बरोबर ठेवण्याचे कसब राज यांना साधावे लागणार आहे. दगड मारणारी सेना चर्चेच्या टेबलपर्यंत नेण्याचे काम कार्याध्यक्ष उद्धव यांनी केले. मनसे त्याच मार्गावर जाणार असेल तर ते दिलासादायक ठरेल.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nउमेदवारीच्या \"इंजिन'ला परीक्षेचा सिग्नल\nमनसेच्या तिकिटासाठी परप्रांतीयही इच्छुक\nपरीक्षेनंतर उमेदवारांच्या मुलाखती घेणार- राज\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/wayne-rooney-england-striker-retires-from-international-football/", "date_download": "2018-04-24T06:53:19Z", "digest": "sha1:QDF34TWG4XRM4LFDUZK7OU375M24GJNK", "length": 6455, "nlines": 109, "source_domain": "mahasports.co.in", "title": "इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू वेन रुनीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त - Maha Sports", "raw_content": "\nइंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू वेन रुनीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त\nइंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू वेन रुनीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त\nइंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू वेन रुनीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मँचेस्टर युनाइटेडचा हा माजी खेळाडू या मोसमपासून एव्हरटन क्लबसाठी खेळत आहे. इंग्लंडसाठी ११९ सामन्यात खेळताना रुनीने ५३ गोल केले आहेत.\nयावेळी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात रूनी म्हणतो, ” देशासाठी खेळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. निवृत्ती घेणे हा माझ्यासाठी कठीण क्षण आहे. मी माझे कुटुंब, मॅनेजर, यांच्याशी याबद्दल चर्चा केली आहे. ”\nवेन रुनीहा इंग्लंडचा आजपर्यंत सार्वधिक गोल केलेला खेळाडू आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या विश्वकप पात्रता फेरीच्या सामन्यात यामुळे रूनी खेळताना दिसणार नाही. रूनी सध्या ३१ वर्षांचा आहे. तो इंग्लिश प्रीमियर लीगमधील दिग्गज संघ असणाऱ्या मँचेस्टर युनायटेड संघाचाही कर्णधार राहिलेला आहे.\nEngland strikerinternational footballWayne Rooneyआंतरराष्ट्रीय फुटबॉलइंग्लंडचा स्टार फुटबॉलपटूवेन रुनी\nयू पी योद्धाजला मिळणार का घरच्या मैदानावरील पहिला विजय \nभारत विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना आजपासून\nकोपा डेलरेच्या विजेतेपदावर बार्सेलोनाचा सलग चौथ्यांदा शिक्कामोर्तब\nमॅनचेस्टर सिटीला मिळाले प्रिमियर लीगचे विजेतेपद\nबार्सेलोनाला पराभवाचा धक्का, रोमाचा पुढील फेरीत प्रवेश\nएफसी पुणे सिटी संघाचा दिल्ली डायनॅमोस एफसी संघावर विजय\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%9C%E0%A4%B0_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B8", "date_download": "2018-04-24T06:42:37Z", "digest": "sha1:V2OVVP3UB6HSZRRYLWPG674S6JFLC5H3", "length": 4129, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉजर टेलिमाकस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nदक्षिण आफ्रिका संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७\n१ बोस्मान • २ बाउचर • ३ डी व्हिलियर्स • ४ गिब्स • ५ हॉल • ६ कॅलीस • ७ केंप • ८ लँगेवेल्ड्ट • ९ नेल • १० न्तिनी • ११ पीटरसन • १२ पोलॉक • १३ प्रिन्स • १४ स्मिथ (क) • १५ टेलीमाकस • प्रशिक्षक: आर्थर\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१७ रोजी ०२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/hot-gossip/iifa-2017-day-2-bollywood-celebs-at-green-carpet/22596", "date_download": "2018-04-24T06:58:40Z", "digest": "sha1:4UEPBKMXTER2WY7MZLDSJFHNZT25EINW", "length": 22328, "nlines": 243, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "iifa 2017 day 2 bollywood celebs at green carpet | IIFA 2017 : ग्रीन कार्पेटवर पहा सेलेब्सचा जलवा!! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nIIFA 2017 : ग्रीन कार्पेटवर पहा सेलेब्सचा जलवा\n​न्यू यॉर्कमध्ये सुरू असलेल्या १८व्या आयफा अवॉर्डसच्या दुसºया दिवशी सेलेब्सचा ग्रीन कार्पेटवर जलवा बघावयास मिळाला.\nन्यू यॉर्कमध्ये सुरू असलेल्या १८व्या आयफा अवॉर्डसच्या दुसºया दिवशी सेलेब्सचा ग्रीन कार्पेटवर जलवा बघावयास मिळाला. बॉलिवूडचा दबंग सलमान खान त्याच्या सो-कॉल्ड गर्लफ्रेंड यूलिया वंतूर, एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ, नीतू चंद्रा, करण जोहर, तापसी पन्नू, सैफ अली खान, टायगर श्रॉफ, दिशा पाटनी, दीया मिर्झा, तिचा पती साहिल संघा आणि शबाना आजमी यांच्यासह अनेक सेलेब्सने ग्रीन कार्पेटवर अवतरत आपल्या अदा दाखविल्या.\nआयफाच्या तिसºया दिवशी म्हणजेच शनिवारी मेटलाइफ स्टेडियममध्ये अवॉर्ड्स समारंभाचे आयोजन केले जाणार आहे. अशात दुसºयाच दिवशी सेलेब्सनी दाखविलेला जलवा आकर्षणाचा विषय ठरला. प्रत्येक सेलेब्सचा अंदाज बघण्यासारखा होता. काहींनी पारंपरिक तर काही वेस्टर्न पोशाख परिधान करून आपल्या सौंदर्याने उपस्थितांना घायाळ केले.\n१६ जुलै रोजी आयफा क्लोजिंग पार्टी होणार असून, यामध्ये बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध सेलेब्स बघावयास मिळू शकतात. सध्या न्यू यॉर्क शहर आयफाच्या रंगात रंगले असून, बॉलिवूडकरांनी आपल्या छाप पाडल्याचे दिसून येत आहे.\nअबब... प्रियांका चोप्राच्या ‘या’ ड्...\nफक्त पाचवीपर्यंत शिकली बॉलिवूडची ‘ह...\nशिल्पा शेट्टीचे शिर्डीतील फेव्हरेट...\nअर्धनग्न आंदोलन करणाऱ्या अभिनेत्रील...\nएकेकाळी बार डान्सर असलेल्या ‘या’ तर...\nअसे काय घडले असेल की ‘या’ अभिनेत्या...\nसेल्फीवेड्या चाहत्यांमुळे ‘या’ अभिन...\nगर्दीचा फायदा घेत चाहत्याने ‘या’ अभ...\nबिग बीच्या नातवासोबत डिनर डेटला गेल...\nश्रीदेवी यांच्या लहान मुलीने केले ग...\n‘या’ कारणामुळे हेलिकॉप्टरने सेटवर ज...\nचंकी पांडेने गायले लेकीचे गोडवे; म्...\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला...\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या...\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बि...\nअट्टल गुन्हेगारांच्या यादीत सलमान ख...\nदिशा पाटनी-विजे बानीची जमली जोडी; ए...\nइंटरनेट सनसनी प्रिया प्रकाशचा पुन्ह...\nआपल्या आजीसोबत थिरकणाऱ्या ‘या’ अभिन...\nअक्षयकुमारने म्हटले, ‘ट्विंकलसमोर म...\nट्रोलरने म्हटले, ‘तू पैशांसाठी नाचत...\nWatch Video : कॅटरिना कैफचे अश्रू स...\nबहीण जान्हवी कपूरच्या कपड्यांवर भाष...\nईशा गुप्ताने टरबूज खातानाचा फोटो के...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/hot-gossip/post-pregnancy-kareena-kapoor-khan-loses-12-kgs-in-5-months/20843", "date_download": "2018-04-24T06:57:07Z", "digest": "sha1:AOHBCGXNJWSA4QLYL6B6BUNONOT7FTAY", "length": 23853, "nlines": 244, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Post pregnancy Kareena Kapoor Khan loses 12 kgs in 5 months | करिना कपूरने तैमूरच्या जन्मानंतर पाचच महिन्यांत कमी केले १२ किलो वजन! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nकरिना कपूरने तैमूरच्या जन्मानंतर पाचच महिन्यांत कमी केले १२ किलो वजन\n​अभिनेत्री करिना कपूर-खान महिलांसाठी रोल मॉडेल बनत आहे. होय, तैमूरच्या जन्मानंतर केवळ पाचच महिन्यांत तिने तब्बल १२ किलो वजन कमी केले आहे.\nअभिनेत्री करिना कपूर-खान महिलांसाठी रोल मॉडेल बनत आहे. होय, तैमूरच्या जन्मानंतर केवळ पाचच महिन्यांत तिने तब्बल १२ किलो वजन कमी केले आहे. ही बातमी करिनाच्या फॅन्ससाठी सुखद धक्का देणारी असून, करिनाच्या या डेडीकेशनला बघून तिच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होत आहे.\nखरं तर करिनाला बॉलिवूडमधील अतिशय फिट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. मात्र प्रेग्नेंसीदरम्यान तिचे वजन वाढल्याने, ती प्रचंड अस्वस्थ असल्याचे दिसून आले. त्यातच परफेक्ट फिगर असलेल्या अ‍ॅक्ट्रेसमध्ये बेबोचे नाव घेतले जात असल्याने तिच्यावर वाढत्या वजनाचे जणू काही दडपण आले होते. त्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेत केवळ पाचच महिन्यांत १२ किलो वजन कमी केले आहे. वास्तविक एवढे वजन कमी करणे हे एखादे चॅलेंज स्वीकारण्याप्रमाणे आहे.\nकरिनाचे प्रेग्नेंसीदरम्यान १८ किलो वजन वाढले होते. त्यामुळे एवढ्या कमी वयात बारा किलो वजन कमी करणे म्हणावे तेवढे नक्कीच सोपे नाही. खरं तर करिनाने अतिशय प्लॅनिंग करून वजन कमी केले आहे. सुरुवातीला तिने यासाठी योगाचा आधार घेतला होता. पुढे तिने एक्सरसाइज करण्यास सुरुवात केली. शिवाय डायटीशियन रुजुता दिवेकर हिने दिलेला डायट चार्टही ती नियमितपणे फॉलो करत होती.\nकरिना लवकरच ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात करिनासोबत सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एकता कपूर आणि रेहा कपूर एकत्र प्रोड्यूस करणार आहेत. टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार करिना लवकरच तिचा बेस्ट फ्रेण्ड करण जोहर याच्यासोबत एका रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे. यासाठी सध्या बोलणी सुरू आहे.\n‘बेगम खान’ वाचवणार का सिद्धार्थ मल्...\nसोनम कपूरच्या लग्नाची डेट झाली कन्फ...\nअबब... प्रियांका चोप्राच्या ‘या’ ड्...\nफक्त पाचवीपर्यंत शिकली बॉलिवूडची ‘ह...\nशिल्पा शेट्टीचे शिर्डीतील फेव्हरेट...\nअर्धनग्न आंदोलन करणाऱ्या अभिनेत्रील...\nएकेकाळी बार डान्सर असलेल्या ‘या’ तर...\nअसे काय घडले असेल की ‘या’ अभिनेत्या...\nसेल्फीवेड्या चाहत्यांमुळे ‘या’ अभिन...\nगर्दीचा फायदा घेत चाहत्याने ‘या’ अभ...\nबिग बीच्या नातवासोबत डिनर डेटला गेल...\nश्रीदेवी यांच्या लहान मुलीने केले ग...\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला...\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या...\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बि...\n‘या’ कारणामुळे हेलिकॉप्टरने सेटवर ज...\nचंकी पांडेने गायले लेकीचे गोडवे; म्...\nअट्टल गुन्हेगारांच्या यादीत सलमान ख...\nदिशा पाटनी-विजे बानीची जमली जोडी; ए...\nइंटरनेट सनसनी प्रिया प्रकाशचा पुन्ह...\nआपल्या आजीसोबत थिरकणाऱ्या ‘या’ अभिन...\nअक्षयकुमारने म्हटले, ‘ट्विंकलसमोर म...\nट्रोलरने म्हटले, ‘तू पैशांसाठी नाचत...\nWatch Video : कॅटरिना कैफचे अश्रू स...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sri-lanka-vs-india-2017-ms-dhoni-is-not-an-automatic-choice-concedes-msk-prasad/", "date_download": "2018-04-24T06:15:07Z", "digest": "sha1:TN6ZGZQJC5YN6LUN7OXZWBUMDEHUUJMP", "length": 6512, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनीला काही अशीच संघात संधी दिली नाही- एमएसके प्रसाद - Maha Sports", "raw_content": "\nधोनीला काही अशीच संघात संधी दिली नाही- एमएसके प्रसाद\nधोनीला काही अशीच संघात संधी दिली नाही- एमएसके प्रसाद\nश्रीलंकेविरुद्ध २० ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. या संघात भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीचाही समावेश आहे.\nकाल धोनीच्या निवडीवर बोलताना एमएसके प्रसाद म्हणाले, ” आंद्रे आगाशीची खरी कारकीर्द ही ३० वयानंतर सुरु झाली. त्यानंतर त्याने अनेक विजेतेपदं जिंकली. धोनी काही असाच संघात आलेला नाही. परंतु तो कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल. ”\nधोनीचा एकमेव स्पर्धेक असलेला रिषभ पंतवर बोलताना एमएसके प्रसाद म्हणाले, ” रिषभ पंतवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चांगली कामगिरी केली नाही. आम्ही त्याला टी२० सामन्यात आणखी संधी देऊ इच्छितो. आम्ही टी२० सामन्यातील त्याची कामगिरी पाहून त्याला पुढे संधी देण्याचा विचार करू. ”\nएमएसके प्रसाद हे आजपर्यंतच्या भारतीय निवड समितीच्या अध्यक्षांपैकी एकमेव अध्यक्ष असतील जे प्रत्येक निवडीबद्दल स्पष्टीकरण देतात. त्यामुळे खेळाडूंना तसेच चाहत्यांना एखाद्या खेळाडूची का निवड झाली किंवा झाली नाही याबद्दल समजते.\nयातून खेळाडूंमध्येही योग्य संदेश जातो की आपली निवड ही कोणत्या निकषांवर झाली आहे आणि जर आपण चांगली कामगिरी केली नाही तर याचे काय परिणाम होतील.\nIndia tour of Srilanka 2017ms dhoniyuvraj Singhएकदिवसीय मालिकाएमएस धोनीएमएसके प्रसादक्रिकेटनिवड\nपहा शिखर धवनचा डान्स \nकेएल राहुल खेळणार ४थ्या क्रमांकावर\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- १\nवाढदिवस विशेष: “सचिन मला उत्तरे हवी आहेत”\nवाढदिवस विशेष: सचिन आता तरी थांब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://sonalmm.blogspot.com/2008/12/blog-post_7536.html", "date_download": "2018-04-24T06:29:32Z", "digest": "sha1:BI46575PYMLA5JDW3E3N3FYL5Z66WZH2", "length": 7607, "nlines": 116, "source_domain": "sonalmm.blogspot.com", "title": "Silence Speaks..: मुंबई मेरी जान", "raw_content": "\nपरवा मुंबई मेरी जान नावाचा एक सिनेमा पाहण्‍‍यात आला. जुलै २००६ च्‍या घटनेचा परीणाम वेगवेगळ्‍या स्‍‍तरातील लोकांवर कसा झाला ह्‍याचे परिणामकारक चित्रण सिनेमात केले आहे. सिनेमा थोडा documentry च्या ढंगाने गेला आहे पण तुम्हाला तो विचार करायला लावल्‍‍याशिवाय राहत नाही.\nएक टीव्ही जर्नालिस्‍‍ट, एक मोठ्‍या इंटरनँशनल फर्म मधे काम करणारा सजग नागरीक, आठवड्‍याभरात रिटायर होणार असलेला पोलिस हवालदार, त्याच्‍याच हाताखाली काम करणारा त्याचा sub-ordinate, एक चहा-काँफि vendor, हातात काही काम नसणारा हिंदुत्ववादी तरुण ह्‍यांच्याभोवती कथा फिरते.\nप्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ती एक घटना ह्‍यासर्व पात्रांमधल्या काही चांगल्या काही वाईट प्रवृत्ती समोर आणते.\n११ जुलै २००६ च्‍या संध्याकाळी, लोकल ची वाट पाहत असतांना अचानक भेटलेल्या एका मित्राच्‍या सांगण्यावरुन त्‍याच्या बरोबर सेकण्ड क्‍‍लास चा डबा पकडतो. आणि काही मिनिटातच त्याच्‍या नेहमीच्या फर्स्ट क्‍‍लास च्‍या डब्‍यात बाँब ब्लास्‍‍ट होतो.\nपरिणाम सगळ्‍यांनाच उध्‍‍वस्‍‍त करुन टाकणारे असतात. निखिल आतून हादरलेला, त्‍‍याची देशभक्‍ती डळमळीत झालेली. system वरचा विश्‍‍वास पुर्णपणे घालवून बसतो.\nसुरेश, हिंदुत्‍‍ववादी, हातात काम नसलेला तरुण. ज्याच्‍या मनात तसेही मुसलमानांविरोधी विचार असतात, तो त्यांचा अजुनच द्‍वेष करायला लागतो.\nतुकाराम पाटील, पोलिस हवालदार, भोवतालचे संपूर्ण भान असलेला, हतबल, सामान्‍‍य माणूस. इतकी वर्ष पोलिसात काम करुनही, हातून एकही मोठे काम घडू शकले नाही हा सल मनात बाळगुनच आठवड्‍याभरात रिटायर होणार असतो. तिरकस विनोदांतून आपली अस्वस्‍‍थता बाहेर काढतो राहतो.\nनव्याने लग्‍‍नं झालेला तुकारामचा subordinate, सुनील कदम. निराशा अशी की एक दिवस तो आत्म‍हत्‍येचा प्रयत्‍न करतो. समाजात मिळालेलं दुय्‍यम स्‍थान, हलकी वागणूक या सगळ्‍याचा खुन्‍नस म्‍हणूनच की काय, थाँमस परिस्‍थितीचा फायदा उठवतो. आसूरी आनंदात समाधान शोधतो.\nरुपाली जोशी, तडफदार टीवी पत्रकार. घडलेल्‍या घटना तिला तिच्‍या तत्‍वांचीच फेरतपासणी करायला भाग पाडतात.\nपरेश रावलचा हवालदार फार अस्‍वस्‍थ करुन जातो. आपल्‍या संवेदना ढवळून काढणारा हा सिनेमा प्रत्‍येकाने बघावाच असा.\nहोना, जरुर पहायला हवा, आपण चित्रपट डोळ्यासमोर जो उभाकेला आहेत.\nअ ब क ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/car-stops-ranji-trophy-game-in-delhi-between-delhi-and-up/", "date_download": "2018-04-24T06:25:02Z", "digest": "sha1:EH6C2P5O53JONHHZXHKPLMWS2OHFLOZB", "length": 7983, "nlines": 110, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कार थेट मैदानात, दिल्ली वि. उत्तर प्रदेश रणजी सामन्यात घडली घटना ! - Maha Sports", "raw_content": "\nकार थेट मैदानात, दिल्ली वि. उत्तर प्रदेश रणजी सामन्यात घडली घटना \nकार थेट मैदानात, दिल्ली वि. उत्तर प्रदेश रणजी सामन्यात घडली घटना \n आज दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश संघात चालू असलेल्या रणजी सामन्यात एक राखाडी रंगाची वॅगनआर कार मैदानात आली आणि त्यामुळे सामना थांबवावा लागला.\nलांब केसाचा आणि लाल कुर्ता घातलेला एक व्यक्ती ही कार चालवत होता. त्याने जेव्हा कार मैदानात आणली तेव्हा अंपायर तिसरा दिवसाचा खेळ संपवण्याच्या दृष्टीने मैदानातील सूर्यप्रकाश तपासत होते.\nहा माणूस मल्टिनॅशनल कंपनीत कर्मचारी आहे. तो म्हणाला गेटवर कोणतीही सुरक्षा नव्हती. याबद्दल एअर फोर्स तपास करत आहे. या कारमुळे खेळपट्टीचे कोणतेही नुकसान झाले नाही.\nESPNCricinfo मधील रिपोर्टप्रमाणे त्या व्यक्तीचे नाव गिरीश शर्मा असे असून त्याने आपण रस्ता विसरल्याने सांगितले आहे. तसेच मैदानात येताना आपल्याला कुणीही न आडवल्याचे सांगितले आहे. त्या व्यक्तीने दोन वेळा खेळपट्टीवरून गाडी चालवली. त्याला पंच आणि खेळाडूंनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व व्यर्थ गेले.\nखेळ संपायला २० मिनिटे बाकी असताना हा प्रकार घडला. त्यावेळी पंचांनी खेळपट्टीचा निरीक्षण करून पुन्हा खेळ सुरु केला. त्यामुळे दिवसाचा खेळ पुन्हा २०मिनिटे लांबवण्यात आला.\nया सामन्यात सुरेश रैना, इशांत शर्मा, गौतम गंभीर, उन्मुक्त चंद आणि रिषभ पंत सारखे भारतीय संघाबाहेर असलेले मोठे खेळाडू खेळत आहेत. इशांत शर्माने दोन्ही डावात चमक दाखवताना प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या आहेत तर गौतम गंभीरने पहिल्या डावात ८६ धावा केल्या आहेत. सुरेश रैना दोन्ही डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे.\nतत्पूर्वी दिल्ली विरुद्ध उत्तरप्रदेश सामन्यात उत्तरप्रदेश संघाने २४६ धावांची आघाडी घेतली असून सामन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.\ndelhiRanji Trophy matchदिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेशरणजी ट्रॉफीवॉग्नर कार\nविराटसारखे वागणे संघसहकाऱ्यांसाठी चुकीचे ठरेल – ऍडम गिलग्रिस्ट\nआंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यपालांकडून किदांबी श्रीकांतआणि प्रणॉयला शुभेच्छा\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/face-of-indian-football/", "date_download": "2018-04-24T06:52:21Z", "digest": "sha1:FZLHJFWDLT6OL4SNNFV74QGJFWPWUKGY", "length": 8730, "nlines": 106, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय फुटबॉलचा चेहरा..!! - Maha Sports", "raw_content": "\n३ ऑग, १९८४ रोजी एका मुलाचा जन्म फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या कुटुंबात झाला जो पुढे जाऊन भारतीय फुटबॉलचा नवा चेहरा बनणार होता. भारत सामने तर जिंकत होता पण ज्याच्या येण्याने भारतीय संघ ट्रॉफी जिंकू लागला. हो आम्ही बोलतोय सुनील छेत्री विषयी. ज्याची तुलना सरळ सरळ या काळातील महान खेळाडू लियोनेल मेस्सीशी करायला भारतीय फुटबॉल चाहते घाबरत नाहीत. सुनील छेत्री एक आर्मी कुटुंबातील आहे हे सर्व जण जाणतात पण हे खूप थोड्या क्रीडाप्रेमींना माहिती असेंल की सुनील छेत्रीचे वडील स्वतः आर्मीच्या टीम मध्ये खेळायचे इतकेच नाही तर त्याची आई व जुळी बहीण दोघीही नेपाळच्या राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी खेळल्या आहेत.\nअनेक रेकॉर्ड्स सुनील छेत्रीच्या नावावर जमा झाले आहेत. पण राष्ट्रीय संघासाठी खेळताना जो बहर त्याचा खेळाला येतो तो काही जादुई आहे. ९३ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करताना त्याने ५३ गोल केले आहेत. छेत्री २०११ पासून भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्याने आपल्या खेळाची सुरुवात मोहन बगान संघाकडून कडून केली जेव्हा तो १८ वर्षाचा पण नव्हता .\nभारतीय संघाला २००७, २००९, २०१२ मध्ये नेहरू कप तर २०११ मध्ये साफ चॅम्पियन्सशिप जिंकून देण्यात महत्वाचा भाग होता. त्या अगोदर भारतीय संघाने कोणतीही मोठी स्पर्धा जिंकली नव्हती. २०११ मध्ये AFC आशियाई कप फायनल मध्ये २ गोल करून तो कप जिंकून दिला.\nमहम्मद सलीम व बायचुंग भुतिया यांच्या नंतर आंतरराष्ट्रीय लीग कडून खेळणारा तो ३ रा खेळाडू ठरला. अनेक लीग्ज मधून खेळण्याच्या ऑफर्स त्याला मिळत होत्या. सपोर्टींग क्लब पोर्तुगाल व सेल्टिक खूप जवळ होते करार करण्याच्या पण बाजी मारली कॅन्सस सिटी विझार्ड ने. पण तो काळ काही ठीक नसल्याने शेवटी तो क्लब सोडून मायदेशी परतला.\nजेव्हा इंडियन सुपर लीगची सुरुवात झाली तेव्हा दुसऱ्या मोसमामध्ये मुंबई सिटी एफसीने सर्वाधीक बोली लावत १.२ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. तो सर्वाधिक बोली लावेला भारतीय फुटबॉलपटू ठरला. त्याने आयएसएलमध्ये आपली छाप पडत हॅट्ट्रिक करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला.\nसुनील छेत्रीला २००७, २०११, २०१३, २०१४ ला AIFF प्लेयर ऑफ द इयरचा हा किताब ४ वेळा पटकावला. हा किताब चारवेळा पटकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. आशा करू की त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर करावेत व भारतीय संघाला यशाच्या शिखरावर घेऊन जावे.\n२००८ पासून हे आयपीएल रेकॉर्ड अजूनही मोडले नाहीत\nजागतिक गटात डेव्हिस कपमध्ये भारताची लढत कोणाशी\nकोपा डेलरेच्या विजेतेपदावर बार्सेलोनाचा सलग चौथ्यांदा शिक्कामोर्तब\nमॅनचेस्टर सिटीला मिळाले प्रिमियर लीगचे विजेतेपद\nबार्सेलोनाला पराभवाचा धक्का, रोमाचा पुढील फेरीत प्रवेश\nएफसी पुणे सिटी संघाचा दिल्ली डायनॅमोस एफसी संघावर विजय\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- १\nवाढदिवस विशेष: “सचिन मला उत्तरे हवी आहेत”\nवाढदिवस विशेष: सचिन आता तरी थांब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/most-600-totals-under-a-captain-6-virat-kohli-28-tests-5-s-ganguly-49-ms-dhoni-60-a-border-93-g-smith-109/", "date_download": "2018-04-24T06:51:43Z", "digest": "sha1:NLMXUPEUOJ6NDE55R7FGATTBJOCAKEB4", "length": 6552, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट कोहलीचा बोलबाला; गांगुली, धोनी, बॉर्डर आणि स्मिथचा कर्णधार म्हणून हा विक्रम मोडला ! - Maha Sports", "raw_content": "\nविराट कोहलीचा बोलबाला; गांगुली, धोनी, बॉर्डर आणि स्मिथचा कर्णधार म्हणून हा विक्रम मोडला \nविराट कोहलीचा बोलबाला; गांगुली, धोनी, बॉर्डर आणि स्मिथचा कर्णधार म्हणून हा विक्रम मोडला \nकोलंबो: येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव ९ बाद ६२२वर घोषित केला आहे. दुसऱ्या दिवशी आर अश्विन, वृद्धिमान सहा आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकी खेळी केल्या तर श्रीलंकेकडून रंगाना हेराथने ४ तर कसोटी पदार्पण केलेल्या पुष्पाकुमाराने २ विकेट्स घेतल्या आहेत.\nविराट कोहली जरी पहिल्या डावात अपयशी ठरला असला तरी एक कर्णधार म्हणून विराट कोहलीने जबदस्त कामगिरी केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने डावात तब्बल ६ वेळा ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी विराटपेक्षा दुप्पट सामने नेतृत्व केलेल्या कर्णधारांसुद्धा जमलेले नाही.\n६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा डावात करण्याचा विक्रम ५ वेळा करण्यासाठी गांगुली (४९ कसोटी), एमएस धोनी (६० कसोटी), बॉर्डर (९३ कसोटी) आणि ग्रॅमी स्मिथ (१०९ कसोटी ) एवढे सामने नेतृत्व करावे लागले आहेत. तर विराट कोहलीने केवळ २८ कसोटीमध्ये ६वेळा हा विक्रम केला आहे.\nIndia tour of Srilanka 2017कर्णधारकोलंबोधोनीबॉर्डरविक्रम मोडलाविराट कोहलीगांगुलीश्रीलंका विरुद्ध भारत कसोटी\nदुसरी कसोटी: दिवसाखेर श्रीलंका ५० वर २\nकसोटी कारकिर्दीत अश्विनची ५०० तर जडेजाची ४०० निर्धाव षटके\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rajiv-shukla-will-remain-as-indian-premier-league-chairman/", "date_download": "2018-04-24T06:52:03Z", "digest": "sha1:GCUFKN6AXPBPBZDK5II6PNABKYERECCS", "length": 5839, "nlines": 104, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राजीव शुक्लाच राहणार आयपीएलचे अध्यक्ष - Maha Sports", "raw_content": "\nराजीव शुक्लाच राहणार आयपीएलचे अध्यक्ष\nराजीव शुक्लाच राहणार आयपीएलचे अध्यक्ष\nपुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या आयपीएलच्या १०व्या पर्वाचे राजीव शुक्ला हेच अध्यक्ष राहणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने याबद्दलचा निर्णय घेतला आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने मंजुरी दिली.\n५७ वर्षीय शुक्ला यांना कार्यकाळ वाढवून मिळण्याची कोणतीही शक्यता नसता त्यांना तो वाढवून मिळाला. शुक्ला हे एक जेष्ठ क्रिकेट प्रशासक असून त्यांनी ९ वर्षांपेक्षा जास्त काळ बीसीसीआय या संस्थेत काम केले आहे.\nसुरुवातीच्या काळात आयपीएल लिलावाला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यापासून कोर्टाने नियुक्त केलेल्या कमिटीने बंदी घातली होती. तरीही शुक्ला यांनी बेंगलोर येथे जाऊन आयपीएल संघ मालकांसमोर भाषण केले होते. आता त्याच कमिटीने शुक्ला यांच्या परत केलेल्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.\nआयपीलचा यंदाचा दहावा मोसम असून तो ५ एप्रिल पासून सुरु होणार आहे. पहिला सामना गतविजेता सनरायसर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चैलेंजर बेंगलोर यांच्यात होणार आहे.\nसचिनचा 100 एमबी अँप लवकरच येणार तुमच्या स्मार्ट फोनवर…\nआयपीएल उदघाटन प्रसंगी फॅब ५ चा होणार सन्मान\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- १\nवाढदिवस विशेष: “सचिन मला उत्तरे हवी आहेत”\nवाढदिवस विशेष: सचिन आता तरी थांब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/aamche-bapu-marathi/", "date_download": "2018-04-24T07:03:36Z", "digest": "sha1:6F3HTUGNTSUNX57YXF5CZPF3ZH2CSULV", "length": 11691, "nlines": 121, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "आमचे बापू", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\n१ जानेवारी २०१२ रोजी दैनिक प्रत्यक्षमध्ये ‘मी पाहिलेला बापू’ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला लेख\n‘दादाचे सर’ ही बापूंची माझी १९८५ मध्ये झालेली प्रत्यक्ष ओळख.\nसुचितदादा जनरल मेडिसिनमध्ये एम.डी. करण्यासाठी डॉ. व्ही. आर. जोशी ह्यांच्या युनिटमध्ये जॉईन झाले. त्यावेळी आपले बापू म्हणजेच डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी हे त्याच युनिटमध्ये सिनिअर लेक्चरर होते. ते माझ्या दादाला अगदी फर्स्ट एम.बी.बी.एस. पासून वेळोवेळी मार्गदर्शन करीत असत. दादा रेसिडन्ट डॉक्टर म्हणून काम करू लागल्यावर बापू त्याला नियमितपणे शिकवू लागले होते. त्यामुळे त्यांचे संबंध अधिक दृढ होत चालले. ह्यानंतर हळूहळू दोन घरे कशी एकत्र आली व एकरूप झाली हे कोणालाच कळले नाही.\nलहानपणापासून दादाच्या शब्दाबाहेर जायचे नाही, हा आई-काकांनी मला घालून दिलेला नियम माझ्याकडून सदैव पाळला गेला, ही बापूंचीच कृपा. त्याचबरोबर बापूंच्या शब्दाबाहेर कधी जायचे नाही हा माझ्या दादाचा दृढनिश्चय, म्हणून मग माझ्याकडूनही आपोआपच बापूंच्या शब्दांचे पालन होऊ लागले, ही माझ्या दादाची कृपा.\n​बापूंच्या ​बरोबर काम करण्यास सुरुवात करून आतापावेतो अठरा वर्षे झाली आहेत. ह्या अवधीत व त्याच्या आधीही बापू व दादांनी मला भरपूर शिकवले व ह्यांनी मला भरपूर काही दिले. हे सर्व घेत असताना व इतर सर्व पाहत असताना बापूंच्या संपर्कातील अनेक जुन्या व्यक्तींच्या भेटी झाल्या व त्यांच्याशी बोलण्यातूनच आजच्या विशेषांकाचा जन्म झाला.\nसुचितदादांची संमती मिळताच बापूंशी संबंधित वेगवेगळ्या व्यक्तींशी संपर्क केला असता व गुरुवारी सूचना केली असता २००५ सालीच अक्षरशः छोट्यामोठ्या लेखांचा पाऊस पडला आणि नंतरही अनेकजण लेख देतच राहिले. ह्यांतील काही मोजके अपवाद वगळता सर्वच लेख खूप सुंदर आहेत. फक्त मोजक्या काही लेखांमधून बापूंचे नाव फक्त घेऊन लेखकांना स्वतःचेच डांगोरे पिटायचे होते. हे लक्षात येताच सर्व लेख सुचितदादांकडे दिले. त्यांनीही शब्द न शब्द वाचून काढला व असे दांभिक लेख बाजूला केले. (जास्तीत जास्त चार किंवा पाच).\nह्या विशेषांकामध्ये ह्या शेकडो चांगल्या लेखांमधून काही मोजकेच लेख व थोड्याशाच मुलाखती घेऊ शकलो. ह्या व इतर सर्व लेखांचे मिळून ‘आठवणींची पाने चाळताना’ हे पुस्तक काढायची सर्वांचीच इच्छा आहे. मात्र दादा त्यासाठी परवानगी देतील तेव्हाच.\nबापूंच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची व सत्यम् शिवम् सुंदरम् असणार्‍या जीवनशैलीची आणि कार्यप्रणालीची साधी नोंद करणेसुद्धा खूप कठीण आहे. त्यामुळे हा विशेषांक किंवा पुढे येणारे पुस्तक बापूंच्या सर्व पैलूंना स्पर्श करू शकेल असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल.\nमला हे लेख वाचताना जाणवलेली सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या विविध क्षेत्रातील लोकांचे बापूंवर असणारे वर्षानुवर्षांचे प्रेम.\nपण त्याचबरोबर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की स्वतः बापूसुद्धा आपल्या जुन्या मित्र-आप्तांविषयी अत्यंत जिव्हाळ्याने बोलत असतात. ह्या विशेषांकातील जवळपास प्रत्येक लेखकाचे नाव मी बापूंच्या तोंडून ऐकलेले आहे. बापू अत्यंत आत्मीयतेने ह्या सर्वांविषयी बोलत असताना अत्यंत सुखावलेले असतात. बापूंना मी कधीच कटू आठवणींना उच्चारतानासुद्धा ऐकलेले नाही. त्यांच्याकडे असतात, त्या कुणाच्याही फक्त चांगल्याच आठवणी, स्मृती. खरं तर काका (आद्यपिपा) म्हणायचे त्याप्रमाणे ‘ह्याला कुणाचेही दोष कधी बोचतच नाहीत व ह्याच्या मेमरी बँकेमध्ये प्रत्येकाचे जेवढे चांगले तेवढेच साठवलेले असते.’\nह्या विशेषांकाचा कार्यकारी संपादक बनण्याचे भाग्य मला लाभले, हीदेखील बापूंच्या आईचीच कृपा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/this-kid-kayvann-shah-walked-into-the-hotel-hoping-for-a-selfie-with-rohit-kumar-he-ended-up-celebrating-his-birthday-with-him/", "date_download": "2018-04-24T06:23:27Z", "digest": "sha1:VS5BZF6GRAG5LG3T6YS3ZSYV34TP7NVM", "length": 6564, "nlines": 106, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: जेव्हा छोट्या चाहत्याला मिळतो वाढदिवसाचा खास केक - Maha Sports", "raw_content": "\nप्रो कबड्डी: जेव्हा छोट्या चाहत्याला मिळतो वाढदिवसाचा खास केक\nप्रो कबड्डी: जेव्हा छोट्या चाहत्याला मिळतो वाढदिवसाचा खास केक\nरोहित कुमार आणि बंगळुरू बुल्स संघाचे चाहते तुम्हाला भारतभर मिळतील. रोहित हा प्रो कबड्डीमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच जात आहे. लहान मुलांपासून ते थोरामोठयांपर्यंत सर्व रोहितच्या कबड्डीमधील कौशल्याचे दिवाने आहे.\nअसाच एक चाहता लहान मुलगा आहे केवन्न शाह. हा मुलगा रोहितचा खूप मोठा फॅन आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आवडत्या खेळाडू सोबत सेल्फी काढावा म्हणून तो बंगळुरू बुल्स राहत असलेल्या हॉटेलात गेला आणि सांगितले की, ” माझा जन्मदिवस आहे आणि मला तुझ्यासासोबत सेल्फी काढायचा आहे.”\nतेव्हा कर्णधार रोहितने लगेच केक मागविण्यास सांगितला आणि केवन्न सोबत केक कापून त्याचा जन्मदिवस साजरा केला. फक्त सेल्फी काढायला गेलेल्या फॅनला आवडत्या खेळाडू सोबत केक कापण्यास मिळावा म्हणजे दूध शर्करा योगच\nरोहित कुमार सुद्धा असाच अक्षय कुमारचा मोठा फॅन आहे त्यामुळे चाहत्यांच्या भावना आणि प्रेम काय असत हे रोहितला चांगलंच माहित आहे.\nPro Kabaddi League 2017Rohit Kumarअक्षय कुमारकेककेवन्न शाहजन्मदिवसबंगळुरू बुल्सरोहित कुमार\nप्रो कबड्डी: आजपासून मुक्कामपोस्ट नागपूर\nप्रो कबड्डी: घरच्या मैदानावर तेलुगू टायटन्सवर आली सलग पाच सामने हरण्याची नामुष्की\nचहल म्हणतो असे काही नाहीच\nएका मोठ्या कबड्डी प्रशिक्षकाची गच्छंती\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घरी हलणार पाळणा\nबोकडासाठी प्रभादेवीत घुमला कबड्डी… कबड्डीचा आवाज\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82/", "date_download": "2018-04-24T06:54:28Z", "digest": "sha1:Z6H2KSJGBTVBSRZYBQ4GX37UCEIW7MMR", "length": 5710, "nlines": 127, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कासाळू | मराठीमाती", "raw_content": "\nकोकणात नारळी-पोफळीच्या बागांत कासाळू सर्रास सापडते. भाजीच्या किंवा वडीच्या अळूपेक्षा हे वेगळे असून त्याची पाने तीन-चार फूट लांब, रुंद वाढतात. या कासाळूच्या मुळाशी जमिनीलगत दोन-तीन फूट लांब, पाइपसारखा कंद वाढतो त्याचा सांडगा करतात. कंद काढल्यानंतर खाज जाण्यासाठी महिनाभर घरात तसाच ठेवावा लागतो. नंतर त्याची साले काढून जाडय़ा किसणीवर किसावा. आंबट ताकात चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, हिंग व पापडखार घालून ते ताक त्या किसाला चोळावे. नंतर तो कीस मोकळा मोकळा प्लॅस्टिकवर पसरून उन्हात वाळवावा. पूर्ण वाळल्यानंतर पाहिजे तेव्हा तेलात तळून घ्यावा.\nThis entry was posted in वाळवणाचे पदार्थ and tagged कासाळू, पाककला, पाककृती, वाळवणाचे पदार्थ, सांडगा on जानेवारी 13, 2011 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A5%A8%E0%A5%AE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88/", "date_download": "2018-04-24T06:33:28Z", "digest": "sha1:TWSGHLYKMUZWIN7ZO7PCFQVMJWVKPIVY", "length": 10925, "nlines": 169, "source_domain": "www.marathimati.net", "title": "२८ जुलै | मराठीमाती", "raw_content": "\nस्वातंत्र्य दिन : पेरू\n१४९३ : मॉस्को शहराचा मोठा भाग आगीत भस्मसात.\n१५४० : दरबारी राजकारणात इंग्लंडचा राजा हेन्री आठव्याने थॉमस क्रॉमवेलला मृत्युदंड दिला.\n१७९४ : फ्रेंच क्रांती – मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरेला गिलोटिनवर मृत्युदंड.\n१८२१ : पेरूने स्वतःला स्पेनपासून स्वतंत्र जाहीर केले\n१९१४ : पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले.\n१९३० : रिचर्ड बेडफोर्ड बेनेट कॅनडाच्या पंतप्रधानपदी.\n१९४२ : दुसरे महायुद्ध – सोवियेत संघाच्या अध्यक्ष जोसेफ स्टालिनने हुकुम काढला ज्यानुसार कोणत्याही परिस्थितीत लढाईतून माघार घेणार्‍या सोवियेत सैनिकांना तत्काळ मृत्यूची शिक्षा लागू झाली.\n१९४३ : दुसरे महायुद्ध – रॉयल एर फोर्सच्या जर्मनीतील हांबुर्ग शहरावरील बॉम्बफेकीत ४२,००० नागरिक ठार.\n१९४५ : होजे बुस्टामांटे इ रिव्हेरो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n१९४५ : अमेरिकेचे बी.२५ प्रकारचे विमान न्यू यॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डींगच्या ७९व्या मजल्यावर आदळले. १४ ठार.\n१९५० : मनुएल ओड्रिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n१९५६ : मनुएल प्राडो उगार्तेशे पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n१९६३ : फर्नान्डो बेलॉँडे टेरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n१९७६ : चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ ते ८.२च्या दरम्यान तीव्रता असलेला भूकंप. २,४२,७६९ ठार, १,६४,८५१ जखमी.\n१९८० : फर्नान्डो बेलॉँडे टेरी परत पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n१९८५ : ऍलन गार्शिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n१९९० : आल्बेर्तो फुजिमोरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n१९९५ : आल्बेर्तो फुजिमोरी दुसर्‍यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n२००० : आल्बेर्तो फुजिमोरी तिसर्‍यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n२००१ : अलेहांद्रो टोलेडो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n१९३४ : पंडित मदन मोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.\n१९६४ : कटक जवळ बांधण्यात आलेल्या भारतीय सर्वात लांब पुलाचे उदघाटन.\n१८९१ ; रॉन ऑक्सनहॅम, ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९०७ : अर्ल टपर, टपरवेरचा इंग्लिश शोधक.\n१९२९ : जॅकलीन केनेडी-ओनासिस, जॉन एफ. केनेडीची पत्नी.\n१९३१ : जॉनी मार्टिन, ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९३६ : सर गारफील्ड सोबर्स, वेस्ट इंडियन क्रिकेट खेळाडू.\n१९३८ : आल्बेर्तो फुजिमोरी, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४५ : जिम डेव्हिस, अमेरिकन व्यंगचित्रकार.\n१९५४ : ह्युगो चावेझ, व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९७० : पॉल स्ट्रँग, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\n४५० : थियोडॉसियस, पवित्र रोमन सम्राट.\n१०५७ : पोप व्हिक्टर दुसरा.\n१७९४ : मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे, फ्रेंच क्रांतीकारी.\n१८४९ ; चार्ल्स आल्बर्ट, सार्डिनियाचा राजा.\n१९३४ : लुइस टँक्रेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९६८ : ऑट्टो हान, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.\n१९७७ : पंडितराव नगरकर, अमर – भूपाळी या चित्रपटातील ‘घन:श्याम सुंदरा’ ही भूपाळी गाणारे प्रसिद्ध गायक, नट.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged अमर - भूपाळी, जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, पंडितराव नगरकर, मृत्यू, २८ जुलै on जुलै 28, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/news/film-producer-atul-tapkir-commit-suicide/20769", "date_download": "2018-04-24T06:53:12Z", "digest": "sha1:BIWQATZOQ7JVZTCOBXGI5W25X4PRECSL", "length": 22123, "nlines": 243, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "film producer atul tapkir commit suicide | ​‘ढोल ताशा’चे निर्माते अतुल तापकीर यांची पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\n​‘ढोल ताशा’चे निर्माते अतुल तापकीर यांची पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या\n‘ढोल ताशा ’ या चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री पुण्यातील हॉटेल प्रेसिंडेटमध्ये विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली.\n‘ढोल ताशा ’ या चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री पुण्यातील हॉटेल प्रेसिंडेटमध्ये विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली.\nअतुल तापकीर यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर एक मोठी सुसाईड नोट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनीपत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. ‘ढोल ताशा ’ सिनेमाच्या अपयशानंतर कर्जबाजारीपणा आला. यातून सावरण्यासाठी वडिलांनी, बहिणींनी मदत केली. मात्र पत्नी प्रियंकाने आपल्याला सतत त्रास द्यायला सुरुवात केली. वडिलांना आणि मला माणसिक त्रास दिला, याच उद्विग्नतेतून मी जीवन संपवत आहे, अशी फेसबुक पोस्ट अतुल तापकीर यांनी लिहिली आहे. पुण्यातील डेक्कन पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.\nअतुल तापकीर यांची फेसबुक पोस्ट :\nLMOTY 2018 : सोनाली कुलकर्णी अन् सु...\n​सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटम...\n​लिपोसक्शन सर्जरीमुळे या अभिनेत्रीच...\nबडीशेप विक्रेता झाला चित्रपट निर्मा...\n‘पद्मावत’वरून नाना पाटेकर यांचा भडक...\n‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील ‘त्या...\n​‘पद्मावत’ रिलीज झाला तर फेसबुक लाई...\nप्रियंका चोपडाच्या दुसºया मराठी ‘फा...\nस्वत:चे हुबेहूब पोट्रेट बघून हरकून...\n‘न्यूड’साठीचा संघर्ष खऱ्या अर्थाने...\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरे...\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्...\n​'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये स्पृहा...\n​ऋत्विक केंद्र दिसणार 'सरगम' मध्ये\nसंगीत देवबाभळी नाटक पाहून भारावले न...\n​माधुरी दिक्षीतने केली सुमेध मदगलकर...\nरणांगण चित्रपटाचं आगळं – वेगळं पोस्...\nमाधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या...\n“सायकलच्या” प्रमोशनसाठी मुंबईत व्हि...\nअस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गु...\nचिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम क...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A5%87", "date_download": "2018-04-24T06:51:33Z", "digest": "sha1:TXYIGTSBJQJGTKSGHWDGEITX3F4ZFCRQ", "length": 12345, "nlines": 674, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मे २० - विकिपीडिया", "raw_content": "\n(२० मे या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमे २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४० वा किंवा लीप वर्षात १४१ वा दिवस असतो.\n<< मे २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४ ५ ६ ७\n८ ९ १० ११ १२ १३ १४\n१५ १६ १७ १८ १९ २० २१\n२२ २३ २४ २५ २६ २७ २८\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n२०१४ - लोकसभा निवडणुकांत बहुमत मिळवून भारतीय जनता पक्ष भारतात सत्तेवर. नरेन्द्र मोदीची पंतप्रधानपदी नेमणूक.\n१८२२ - फ्रेडेरिक पॅसी, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ.\n१८५० - विष्णुशास्त्री चिपळूणकर, आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार.\n१८६० - एडुआर्ड बुखनेर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.\n१८८२ - सिग्रिड उंडसेट, नोबेल पारितोषिक विजेता नॉर्वेजियन लेखिका.\n१८८३ - फैसल पहिला, इराकचा राजा.\n१९४६ - शेर बोनो, अमेरिकन गायिका.\n१९६७ - राम्झी युसेफ, पाकिस्तानी दहशतवादी.\n१९८२ - इमरान फरहात, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१२७७ - पोप जॉन एकविसावा.\n१२८५ - जॉन दुसरा, जेरुसलेमचा राजा.\n१५०३ - लॉरेंझो दि मेदिची, इटलीतील राज्यकर्ता.\n१५०६ - क्रिस्टोफर कोलंबस, इटलीचा शोधक.\n१६२२ - उस्मान दुसरा, ऑट्टोमन सम्राट.\n१६४८ - व्लादिस्लॉस चौथा, पोलंडचा राजा.\n१७२२ - सेबास्टियें व्हैलां, फ्रेंच वनस्पतीशास्त्रज्ञ.\n१९३२ - बिपिनचंद्र पाल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.\n१९४० - व्हर्नर फॉन हायडेनस्टाम, नोबेल पारितोषिकविजेता स्विडिश लेखक.\n१९४७ - फिलिप लेनार्ड, नोबेल पारितोषिकविजेता ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ.\n१९९४ - कासू ब्रह्मानंद रेड्डी, महाराष्ट्राचे राज्यपाल.\n२००० - एस.पी. गोदरेज, भारतीय उद्योगपती.\nबीबीसी न्यूजवर मे २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nमे १८ - मे १९ - मे २० - मे २१ - मे २२ - (मे महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: एप्रिल २४, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०१४ रोजी १८:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/news/gashmir-mhajani-and-spruha-joshi-came-together-on-screen-for-fist-time/20508", "date_download": "2018-04-24T06:36:51Z", "digest": "sha1:YQVZVFCAFKEN5FGOJX4NB3K4UK4MAJJD", "length": 24477, "nlines": 241, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Gashmir Mhajani And Spruha Joshi came together on screen for fist time | का म्हणतायेत गश्मिर आणि स्पृहा 'मला काहीच प्रॉब्लेम नाही'? | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nका म्हणतायेत गश्मिर आणि स्पृहा 'मला काहीच प्रॉब्लेम नाही'\nया चित्रपटासाठी गश्मिर महाजनी– स्पृहा जोशी ही आगळी – वेगळी जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.समीर विद्वांस यांनी या युगाचा प्रॉब्लेम दिग्दर्शित केला असून पी. एस छतवाल, रीचा सिन्हा आणि रवी सिंह ह्यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.\nमला काहीच प्रॉब्लेम नाही... अचानक हे असं वाक्य एखाद्याच्या तोंडून ऐकणं हेच किती प्रॉब्लेमेटीक असतं नाही हाच प्रॉब्लेम काही दिवसांपूर्वी गश्मीर आणि स्पृहाच्या चाहत्यांनी अनुभवला जेव्हा या जोडीने सोशल मिडियावर मला काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हटलं... हे असं म्हणणाऱ्या आपल्या लाडक्या कलाकाराच्या आयुष्यात खरंच काही प्रॉब्लेम नाही की आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स लपवण्यासाठीचा हा अट्टहास केला जातोय हाच प्रॉब्लेम काही दिवसांपूर्वी गश्मीर आणि स्पृहाच्या चाहत्यांनी अनुभवला जेव्हा या जोडीने सोशल मिडियावर मला काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हटलं... हे असं म्हणणाऱ्या आपल्या लाडक्या कलाकाराच्या आयुष्यात खरंच काही प्रॉब्लेम नाही की आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स लपवण्यासाठीचा हा अट्टहास केला जातोय या कोड्यात अडकलेल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आले आहे गश्मीर – स्पृहाच्या नव्या चित्रपटाचं नवं कोरं टीझर पोस्टर... फिल्मी किडा निर्मित या चित्रपटाच्या पोस्टरवर मला काहीच प्रॉब्लेम नाही असा आव ही जोडी आणते आहे.मात्र हे म्हणण्या इतपत कोणता प्रॉब्लेम या जोडीच्या आयुष्यात झाला आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटासाठी गश्मीर महाजनी– स्पृहा जोशी ही आगळी – वेगळी जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.समीर विद्वांस यांनी या युगाचा प्रॉब्लेम दिग्दर्शित केला असून पी. एस छतवाल, रीचा सिन्हा आणि रवी सिंह ह्यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील इतर कलाकार आणि त्यांचे प्रॉब्लेम्स लवकरच आपल्यासमोर येतील. हे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स सोडवतील का या कोड्यात अडकलेल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आले आहे गश्मीर – स्पृहाच्या नव्या चित्रपटाचं नवं कोरं टीझर पोस्टर... फिल्मी किडा निर्मित या चित्रपटाच्या पोस्टरवर मला काहीच प्रॉब्लेम नाही असा आव ही जोडी आणते आहे.मात्र हे म्हणण्या इतपत कोणता प्रॉब्लेम या जोडीच्या आयुष्यात झाला आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटासाठी गश्मीर महाजनी– स्पृहा जोशी ही आगळी – वेगळी जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.समीर विद्वांस यांनी या युगाचा प्रॉब्लेम दिग्दर्शित केला असून पी. एस छतवाल, रीचा सिन्हा आणि रवी सिंह ह्यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील इतर कलाकार आणि त्यांचे प्रॉब्लेम्स लवकरच आपल्यासमोर येतील. हे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स सोडवतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.अभिनयासोबतच गश्मिर महाजनी एक उत्तम नृत्य दिग्दर्शकही आहे.गेली 15 वर्षं तो नृत्य शिकवत असून त्याची स्वत:ची डान्स अॅकेडमीही आहे.गश्मिरला लहानपणापासूनच डान्सची आवड आहे.तसेच गश्मिरच्या डान्स अकॅडमीमध्ये शास्त्रीय नृत्यापासून ते सालसा आणि झुंबापर्यंत अनेक नृत्यप्रकार माझ्या अॅकेडमीत शिकवले जातात. तीन वर्षांपासून ते 60 वर्षांपर्यंतचे विद्यार्थी या डान्स अॅकेडमीमध्ये शिकायला येतात.\n​'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये स्पृहा...\n​'डोण्ट वरी बी हॅप्पी' मध्ये होणार...\n‘देवा...एक अतरंगी’ येत्या शुक्रवारी...\n“तुमच्यासाठी काय पन”च्या मंचावर अंक...\n'देवा' च्या घरात 'अफलातून' स्वागत\nवेलकम होम या चित्रपटात ​सिद्धार्थ म...\n‘वेलकम होम’ या चित्रपटाचा मुहूर्त स...\n​स्पृहा जोशीचा नवरा वरद लघाटे होता...\n​​“मला काहीच प्रॉब्लेम नाही”मधील प्...\nयंदा गश्मीर महाजनी बहिणीसोबत रक्षाब...\nआता सनी लिऑन सुद्धा म्हणतेय 'मला का...\n'डबल सीट'च्या प्रवासानंतर आता समीर...\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरे...\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्...\n​ऋत्विक केंद्र दिसणार 'सरगम' मध्ये\nसंगीत देवबाभळी नाटक पाहून भारावले न...\n​माधुरी दिक्षीतने केली सुमेध मदगलकर...\nरणांगण चित्रपटाचं आगळं – वेगळं पोस्...\nमाधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या...\n“सायकलच्या” प्रमोशनसाठी मुंबईत व्हि...\nअस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गु...\nचिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम क...\nवंटास या चित्रपटाच्या ट्रेलरची सोशल...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/punjab-vs-bengaluru/", "date_download": "2018-04-24T06:33:12Z", "digest": "sha1:EFCJ65JP6PLJQOBZIQ2AQK6NRFA6U2UB", "length": 6199, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा पंजाबला होणार का ? - Maha Sports", "raw_content": "\nघरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा पंजाबला होणार का \nघरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा पंजाबला होणार का \nआज रॉयल चॅलेंन्जर बेंगलोरचा तिसरा सामना किंग्स ११ पंजाबशी इंदोरच्या होळकर स्टेडियमवर होणार असून दोन्ही संघानी आपल्या मागील सामन्यात विजय मिळविला आहे. दोनही संघ चांगले लयीत असून दोनही संघांचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. पंजाबला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होईल असे दिसून येते कारण मागील शनिवारी त्यानी याच मैदानावर चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या पुण्याच्या संघालाही मात दिली आहे.\nबेंगलोरचा संघ आपल्या प्रमुख खेळाडूनशिवाय खेळात आहे, भारताचा कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली जो की बंगलोरचा कर्णधारही आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा ए बी डीव्हिलर्स हे दोनही खेळाडू याही सामन्याला मुकणार आहे असे दिसून येत आहे . आपल्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मागील सामन्यात चांगला खेळ करून बेंगलोरच्या संघाने दिल्लीच्या संघाला १५ धावांनी मात दिली होती. तसेच पुण्याविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेल-मिलर या जोडीने चांगली खेळी करत पंजाबला विजय मिळवून दिला होता.\nआता पर्यंतच्या झालेल्या १८ सामन्यात १० वेळा पंजाबने तर ८ वेळा बेंगलोरने विजय मिळवला आहे .\nदुखापतग्रस्त बेंगलोर पुढे दिल्लीचे आवाहन\nपुण्यात आयपीएलचा चाहतावर्ग कमी झालाय का ..\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T06:45:08Z", "digest": "sha1:LGSF54AJUK7EIDAMPLEYCQDISSRVYOJX", "length": 7571, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एअर कोस्टा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nचेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ (चेन्नई)\nएअर कोस्टा ही एक भारतीय प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. ऑक्टोबर २०१३ पासून सेवा पुरवत असलेल्या एअर कोस्टाचे मुख्यालय विजयवाडा येथे तर प्रमुख वाहतूकतळ चेन्नईच्या चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. भारतामधील दुय्यम क्ष्रेणीच्या शहरांना विमानसेवा पुरवणे हे एअर कोस्टाचे उद्दिष्ट आहे.\nअहमदाबाद गुजरात AMD VAAH सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ\nबंगळूर कर्नाटक BLR VOBL केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ\nचेन्नई तामिळ नाडू MAA VOMM चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळहब\nकोइंबतूर तामिळ नाडू CJB VOCB कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nहैदराबाद तेलंगणा HYD VOHS हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ\nजयपूर राजस्थान JAI VIJP जयपूर विमानतळ\nविजयवाडा आंध्र प्रदेश VGA VOBZ विजयवाडा विमानतळ\nविशाखापट्टणम आंध्र प्रदेश VTZ VOVZ विशाखापट्टणम विमानतळ\nतिरुपती आंध्र प्रदेश TIR VOTP तिरुपती विमानतळ\nभारतातील विमानवाहतूक कंपन्यांची यादी\nनागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)\nएअरएशिया इंडिया • एअर इंडिया • एअर इंडिया एक्सप्रेस • एअर इंडिया रीजनल • गोएअर • इंडिगो • जल हंस • जेट एअरवेज • जेटकनेक्ट • स्पाइसजेट • व्हिस्टारा\nक्लब वन एर • डेक्कन एव्हियेशन • जॅगसन एअरलाइन्स • पवन हंस\nएअर इंडिया कार्गो • एअर कोस्टा • अर्चना एअरवेज • क्रेसेंट एर कार्गो • ईस्ट-वेस्ट एरलाइन्स • इंडियन • इंडस एअर • जेटलाइट • किंगफिशर एअरलाइन्स • किंगफिशर रेड • एमडीएलआर एअरलाइन्स • मोदीलुफ्त • पॅरामाउंट एरवेझ • वायुदूत\nबंद पडलेल्या विमानवाहतूक कंपन्या\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी १५:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/news/baahubali-actor-prabhas-said-i-dont-know-how-to-handle-stardom/25338", "date_download": "2018-04-24T06:40:40Z", "digest": "sha1:B7PV34ANS3ZJULVKNE3PSQMLLVWOR3U7", "length": 25943, "nlines": 248, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "baahubali actor prabhas said i dont know how to handle stardom | ​प्रभासने स्वत:बद्दल सांगितल्या अनेक गोष्टी! वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\n​प्रभासने स्वत:बद्दल सांगितल्या अनेक गोष्टी वाचून बसेल आश्चर्याचा धक्का\n‘बाहुबली2’नंतर चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता प्रभास आज सुपरस्टार आहे. पण हे स्टारपण मिरवायचे कसे, हे जर तुम्ही प्रभासला विचारले तर त्याच्याकडे याचे उत्तर नाही. कारण प्रभास स्वभावाने अतिशय लाजरा आहे.\n‘बाहुबली2’नंतर चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता प्रभास आज सुपरस्टार आहे. पण हे स्टारपण मिरवायचे कसे, हे जर तुम्ही प्रभासला विचारले तर त्याच्याकडे याचे उत्तर नाही. कारण प्रभास स्वभावाने अतिशय लाजरा आहे.\nपडद्यावर आत्मविश्वासाने वावरताना दिसणारा प्रभास ख-या आयुष्यात अगदीच साधा, सरळ आणि भोळा आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कॅमे-यासमोर प्रभास जराही कम्फर्टेबल नसतो. कॅमे-यासमोर त्याला लाजायला होते.\nआज प्रभास सुपरस्टार असला तरी काही वर्षांपूर्वी त्याने याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. मनोरंजन दुनियेत येण्याचा त्याचा कुठलाही इरादा नव्हता. सुरुवातीपासून प्रभासला बिझनेसमॅन बनायचे होते. पण आज ‘बाहुबली’नंतर प्रभास जगात लोकप्रीय झाला आहे. एका मुलाखतीत प्रभासने अशा काही गोष्टी सांगितल्यात की, त्या ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.\nप्रभास म्हणाला, मी सार्वजनिक कार्यक्रमात कमालीचा दक्ष असतो. स्टारडम सांभाळणे आत्ता कुठे मी श्कितो आहे. अजूनही लोकांसमोर मला अवघडल्यासारखे होते. लोकांनी माझा चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा असते.पण मला लोकांना सामना करावा लागू नये, असे मला वाटते.\nतो म्हणाला, गेल्या १३ ते १४ वर्षांपासून मी अभिनय क्षेत्रात आहे. पण स्टारडम कसे सांभाळायचे हे मला अजूनही कळलेले नाही. आपला हिरो बाहेर येत नाही, म्हणून चाहते नाराज होता. अर्थात आता माझ्या या स्वभावावर मात करण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत.\nप्रभासने सांगितले की, माझे वडील अप्पलपती सूर्य नारायण राजू प्रसिद्ध निर्माते आहेत. माझे काका कृष्णम राजू अप्पलपति यांनीही तेलगू सिनेमात मोठे नाव कमावले आहे. त्यामुळे मी ही स्वाभाविकपणे अभिनयक्षेत्रातच येईल, याची अनेकांना खात्री होती. पण आधी मी या क्षेत्रात येण्यास नकार दिला होता. मी इतका लाजाळू आहे. मी अभिनय कसा करू शकतो असा विचार करून मी दोन-तीनदा पप्पांना नकार दिला होता. पण अचानक माझे मन बदलले आणि मी या क्षेत्रात आलो.\nALSO READ : ​प्रभास अन् अनुष्का शेट्टी डिसेंबरमध्ये करणार साखरपुडा\nप्रभासने सांगितले की, मी लाजाळू आहे तितकाच आळशीही. नोकरी मला झेपणारी नव्हतीच. त्यामुळे हॉटेल व्यवसायात करिअर करण्याचे मी ठरवले होते. पण एक दिवस काकांचा चित्रपट बघत होतो. अचानक काकांच्या जागी मी स्वत:ला पाहू लागलो व मग हळूहळू माझे मन बदलले. मला हिरो बनायचेयं, असे मी एकदिवस माझ्या मित्राला म्हटल्यावर तो हसायला लागला होता. त्याला १० दिवसांनंतर माझ्यावर विश्वास बसला. माझा हाच मित्र आज ‘साहो’चा निर्माता आहे.\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉल...\n​चिरंजीवीची पुतणी निहारिका होणार का...\n​‘साहो’मध्ये अशी दिसेल श्रद्धा कपूर...\n​करण जोहरला नकार देणे प्रभासला पडले...\n​‘अवाम्’ने घेतली अर्शी खानची फिरकी\n​‘बाहुबली’ प्रभास कधी करणार लग्न\n‘अवाम की जान’ अर्शी खानला लागली लॉट...\n​पुन्हा एकदा प्रभास आणि अनुष्का शेट...\n ​प्रभासबद्दल पसेसिव्ह झालीयं अ...\n ​करण जोहरने लाख मनधरणी करूनह...\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्...\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या...\n​‘पद्मावत’वर भारी पडतोय महेशबाबूचा...\n'कलंक'नंतर म्युझिकल चित्रपटात दिसणा...\n​‘पल्लू लटके...’ गाण्यावर अशी थिरकल...\nअर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राच्या...\nलवकरच सनी लिओनी सुरु करणार आपल्या ब...\n‘बेगम खान’ वाचवणार का सिद्धार्थ मल्...\n​यशराज कंपूत होतेयं शाहरूखची वापसी;...\nSEE PICS : ​सलमान खान मैत्रीला जागल...\n​मिलिंद सोमण चढणार बोहल्यावर, बघा...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/news/article/10673", "date_download": "2018-04-24T06:33:16Z", "digest": "sha1:TSVU5D5DRPNEDUCGV3KVYEEWC22LVYMB", "length": 20776, "nlines": 243, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "| VIDEO : राधिकाचा न्यूड सीन व्हिडीओ व्हायरल ! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\n‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या तिसऱ्या सिझनमध्ये सोनाली बेंद्रे पुन्हा परीक्षकाच्या भूमिकेत\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nVIDEO : राधिकाचा न्यूड सीन व्हिडीओ व्हायरल \nराधिका आपटे नेहमी आपल्या बोल्डनेसने चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.\nराधिका आपटे नेहमी आपल्या बोल्डनेसने चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. बॉलिवूड तसेच मराठी इंडस्ट्रीमधील बोल्ड हिरोईन म्हणून तिची ओळख आहे.\nसध्या सोशल मीडियावर तिच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. अजय देवगणची निर्मिती असलेल्या 'पार्च्ड' या सिनेमातले काही न्यूड सीन्स नुकतेच सोशल साईट्सवर वायरल झालेत.\nटॉपलेस राधिका आणि अभिनेता अदिल हुसेन यांच्यातील काही बोल्ड सीन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.\nराधिका आणि गुरुनाथ येणार का एकत्र...\n​टीव्हीची ‘बहू’ राधिका मदान बनणार व...\n'माझ्या नव-याची बायको'मधली राधिका...\nबिकिनी फोटोवरून ट्रोल होणाºया राधिक...\n​माझे तुझ्या भावाशी कुठलेही नाते ना...\nराधिका आपटेने ‘या’ अभिनेत्यावरून भा...\nअंगलटपणा करणाºया साउथ स्टारची राधिक...\nराधिका आपटेने ट्रोलर्सला दिले उत्तर...\nपॅडमॅन रिलीज झाल्यानंतर सोनम कपूरने...\n​‘खिलाडी’वर भारी पडलेली राधिका आपटे...\nपाचशे लोकांमधून निवडण्यात आली अक्षय...\nPadman review : गंभीर विषयावर हलक...\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्...\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या...\n​‘पद्मावत’वर भारी पडतोय महेशबाबूचा...\n'कलंक'नंतर म्युझिकल चित्रपटात दिसणा...\n​‘पल्लू लटके...’ गाण्यावर अशी थिरकल...\nअर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राच्या...\nलवकरच सनी लिओनी सुरु करणार आपल्या ब...\n‘बेगम खान’ वाचवणार का सिद्धार्थ मल्...\n​यशराज कंपूत होतेयं शाहरूखची वापसी;...\nSEE PICS : ​सलमान खान मैत्रीला जागल...\n​मिलिंद सोमण चढणार बोहल्यावर, बघा...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://exactspy.com/mr/how-to-spy-on-a-cell-phone-of-my-daughter/", "date_download": "2018-04-24T06:41:27Z", "digest": "sha1:EO23UBSIEVRURK32BQXRIZDI5P2XQLVC", "length": 24408, "nlines": 133, "source_domain": "exactspy.com", "title": "कसे माझी मुलगी एक सेल फोन वर शोधणे ?", "raw_content": "\nकसे माझी मुलगी एक सेल फोन वर शोधणे \nOn: ऑक्टोबर 07Author: प्रशासनकॅटेगरीज: Android, सेल फोन Spy, सेल फोन ट्रॅकिंग, कर्मचारी देखरेख, मोबाइल Spy स्थापित, आयफोन, आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर, मोबाइल फोन नियंत्रण, मोबाइल Spy, मोबाइल Spy ऑनलाईन, इंटरनेट वापर निरीक्षण, पालकांचा नियंत्रण, पाहणे फेसबुक मेसेंजर, Android साठी पाहणे, IPhone साठी पाहणे, गुप्तचर iMessage, पाहणे मोबाइल स्मार्टफोन, कॉल वर शोधणे, एसएमएस वर शोधणे, गुप्तचर स्काईप, गुप्तचर Viber, गुप्तचर WhatsApp,, ट्रक GPS स्थान कोणत्याही टिप्पण्या नाहीत\nकसे माझी मुलगी एक सेल फोन वर शोधणे \nकसे एक सेल फोन वर शोधणे\nकसे मी माझी मुलगी च्या सेल फोन शोधणे शक्य\nकोणी तरी ते त्यांच्या मुलीच्या सेल फोन निरीक्षण कसे विचारत इतर दिवशी मला लिहिले. ती तरूण होते आणि पालक ती अयोग्य संदेश आणि फोटो पाठविणे आणि प्राप्त केले होते की, वाटत होती. मी अनेकदा त्यांच्या मुलाच्या किंवा किशोरवयीन मुलाच्या ऑनलाइन किंवा \"फोन\" कल्याण वर बद्दल काळजी पालक ईमेल मिळत आहे. अनेक मूलत: त्यांच्या मुलांना हेरगिरी आहे काय वकील नाही तर, दिवस ओवरनंतर, त्यांच्या कल्याण खात्री करण्यासाठी पालक म्हणून आम्ही त्यांच्या वर्तन नियंत्रित करणे आवश्यक आहे आणि ते आम्हाला खाली आहे. या फोन कॉल किंवा मजकूर संदेश निरीक्षण समावेश असेल, तर, खरंच, त्यांना त्यांच्या फोन माध्यमातून ऑनलाइन मिळवू शकतो की काहीही, तेव्हा ती असेल.\nआपण गुप्त एक सेल फोन निरीक्षण करण्याची परवानगी आणि आपण फोन असू शकतात डेटा सर्व प्रकारच्या दूरस्थ प्रवेश देते सेवांचा ऑनलाइन अनेक आहेत. या प्रकारे आपण ते पाठवू ईमेल कोणत्या प्रकारचे वर टॅब ठेवू शकता आणि त्यांचे फोन द्वारे ऑनलाइन प्राप्त. आपण सर्व मजकूर संदेश आणि एसएमएस प्रसारित आणि प्राप्त पाहू शकता. आपण फोटो आणि शेअर केले आहेत की चित्रे आणि इंटरनेट सर्फ इतिहास पाहू शकता.\nकसे एक सेल फोन वर शोधणे – सेल देखरेख सॉफ्टवेअर फायदे\nकदाचित सॉफ्टवेअर या प्रकारची आहे की सर्वात शक्तिशाली वैशिष्ट्ये एक फोन कॉल मध्ये ऐकण्यासाठी क्षमता जीवन जगावे आहे - आल्यावर. अशा मजकूर संदेश देखरेख म्हणून मूलभूत सॉफ्टवेअर वैशिष्ट्ये सौंदर्य ते हटविले गेले आहेत तेव्हा आपण त्यांना पाहू शकणार की आहे. सॉफ्टवेअर आणखी एक फायदा वापरकर्ता तो तेथे आहे हे सांगण्यासाठी ते अशक्य आहे की स्मार्ट फोन मध्ये म्हणून गंभीरपणे आणि गुप्तपणे स्वतः स्थापित आहे. आपण एक काळजी आई किंवा वडील असल्यास त्यामुळे, तुमची मुलगी inappropriately वर्तन आहे की संबंधित किंवा अनुचित संदेश प्राप्त आहेत की, सॉफ्टवेअर या प्रकारची पण तरी देखील तुम्ही त्यांना निरीक्षण केले आहे की त्यांना सतर्क न काय चालले आहे ते मागे सत्य पहाण्याची अनुमती देईल - कदाचित आपण विश्वास ठेवू शकत नाही की एक मोठा मुलगा किंवा कोणीतरी पासून. आपण कुठे फोन पाहू शकता जेथे ट्रॅकिंग वैशिष्ट्य अगदी आहे (आणि म्हणून तुमची मुलगी) फोन चालू आहे की सर्व काही वेळा आहे. तसेच वरील फायदे सॉफ्टवेअर आपण कॉल इतिहास पाहण्याची परवानगी देतो, कॉल वेळ, कोण म्हणतात आणि जो फोनवर कॉल करण्यासाठी वापरला गेला आहे. संख्या फोन संपर्क यादीत नावे जुळल्यास, आपण देखील त्या नावे पाहण्यास सक्षम असेल.\nमजकूर संदेश वर पाहणे कसे\nकसे एक सेल फोन वर शोधणे – आपल्या मुलाच्या सेल फोन वर देखरेख सॉफ्टवेअर प्रतिष्ठापित करणे\nथोडा मेख आहे, जरी. आपण प्रथम ठिकाणी फोन सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. आता अनेक पालक फक्त ते हे करत आहेत ते मूल सांगू होईल आणि तो एक समस्या होणार नाही. विहीर, कदाचित तो, पण त्या आपल्या विशेष हक्क आहे. इतर प्रकरणांमध्ये आणि विशेषत: वृद्ध किशोरवयीनांसह हे एक trickier विधान असू शकते आणि आपण गुप्त सॉफ्टवेअर प्रतिष्ठापीत करू शकता.\nआपण या सूचना लागू केले एकदा आपल्या मुलीला आपण टॅब ठेवू शकता, याची कल्पना आहे म्हणून निरीक्षण अनुप्रयोग यापुढे फोनवर कुठेही दृश्यमान होईल तिला. आपण परवाना की सांगितले जाते तेव्हा हे लक्षात घेणे महत्वाचे आहे, आपण साइन अप करा आणि सॉफ्टवेअर जमा करताना पूर्वीच या मिळविलेला असेल\nइतका, सॉफ्टवेअर दिले आहेत (माझे सवलतीच्या दुवे या पृष्ठावरील पहा) आणि आपण आपल्या परवाना की आहे आणि आपण लक्ष्य फोनवर अनुप्रयोग स्थापित केले आहे. आता काय\nकसे एक सेल फोन वर शोधणे – सेल Spying सॉफ्टवेअर वापरून आपल्या मुलीचे कॉल निरीक्षण\nआपण वरील सर्व पायऱ्या कामगिरी केली आहे, तर, आपण आता निर्माता ऑनलाइन आपण दिलेली सुरक्षित खाजगी क्षेत्र लॉग इन करू शकता, सॉफ्टवेअर अदा तेव्हा प्रदान ईमेल आणि पासवर्ड वापरून. आपण फोन जातो सर्व माहिती प्रवेश असेल (अगदी सर्व त्वरित हटविले नाही, जे\nआपण आता आपल्या मुलीच्या सेल फोन निरीक्षण कसे एक उपाय आहे आणि तो आपण खर्च येईल $15.99 अनुप्रयोग करीता. सॉफ्टवेअर शो अगणित आढावा म्हणून - या मन: शांती किंवा आपल्या मुलगी एक विश्वास समस्या किंवा समस्या तळाशी मिळवण्यासाठी गरज पैसे वाचतो आहे. तरी $50 पहिल्या दृष्टीक्षेपात मोठ्या विचारू दिसते, आपण हे सॉफ्टवेअर कदाचित सर्वात विश्वासार्ह ऑनलाइन आहे सापडतील की आणि आपण कार्य करत नाही किंवा आपण एक हात आणि मासिक हप्त्यांमध्ये एक चेंडू खर्च येईल, असे सॉफ्टवेअर प्रदान करेल घोटाळा साइट टाळण्यासाठी आवश्यक.\nया विशिष्ट सॉफ्टवेअर बद्दल गोष्ट ग्राहक सेवा उत्कृष्ट आहे की आहे, आणि देयक पद्धती अनेक आणि विभिन्न आहेत. देखील, सॉफ्टवेअर नक्की काम करीत नाही अशी शोधत आहेत तर कसे आपण ते अपेक्षा होती, आपण निश्चितपणे युचा संपूर्ण परतावा मिळवू शकता. या ऑनलाइन सर्वात विश्वसनीय ब्रँड आणि आपण अशा लहान किंमत करा वैशिष्ट्ये अविश्वसनीय आहे. या दिवसरात्र आपण काम गुप्त पोलिस येत शब्दशः आहे. तुम्ही कोटीच्या अप समाप्त होईल की किती पैसे याची कल्पना करा आज सत्य बाहेर शोधा आणि इतर आपला विचार ठेवले, अखेरीस.\nआपण डाउनलोड करू शकता: कसे माझी मुलगी एक सेल फोन वर शोधणे \nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nAndroid सेल फोन Spy सेल फोन Spy कुपन सेल फोन ट्रॅकिंग कर्मचारी देखरेख मोबाइल Spy स्थापित आयफोन आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर मोबाइल फोन नियंत्रण मोबाइल Spy मोबाइल Spy ऑनलाईन इंटरनेट वापर निरीक्षण पालकांचा नियंत्रण पाहणे फेसबुक मेसेंजर Android साठी पाहणे IPhone साठी पाहणे गुप्तचर iMessage पाहणे मोबाइल स्मार्टफोन कॉल वर शोधणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर स्काईप गुप्तचर Viber गुप्तचर WhatsApp, ट्रक GPS स्थान अश्रेणीबद्ध\nअनुप्रयोग दुसर्या फोनवर मजकूर संदेश ट्रॅक करण्यास सर्वोत्कृष्ट सेल फोन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मुक्त सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन बेस्ट मोफत सेल फोन Spy अनुप्रयोग मोफत iPhone साठी सेल फोन पाहणे अनुप्रयोग सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर मुक्त सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन सेल फोन स्पायवेअर सेल फोन ट्रॅकर सेल फोन ट्रॅकिंग अनुप्रयोग सेल फोन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मोफत सेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर Android साठी मोफत सेल फोन गुप्तचर अनुप्रयोग Free cell phone spy applications for android मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड मोफत सेल फोन ट्रॅकर अनुप्रयोग मोफत सेल फोन ट्रॅकर ऑनलाइन मोफत आयफोन गुप्तचर सॉफ्टवेअर मोफत मोबाइल पाहणे अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाईल Spy अनुप्रयोग IPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य ऑनलाइन मजकूर संदेश वर टेहळणे कसे मजकूर संदेश मोफत डाउनलोड वर टेहळणे कसे How to spy on text messages free without target phone सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मजकूर संदेश वर टेहळणे कसे Mobile spy app free download मोफत अनुप्रयोग सेल फोनवर गुप्तचर सेल फोन मोफत अनुप्रयोगावरील पाहणे सेल फोन मोफत डाउनलोड वर गुप्तचर सेल फोन मुक्त ऑनलाइन वर गुप्तचर मोफत डाउनलोड सेल फोन मजकूर संदेश वर शोधणे मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone वर गुप्तचर मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर मजकूर संदेश वर गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मोफत फोन न करता मोफत पाहणे मजकूर संदेश Whatsapp मेसेंजरवर पाहणे Someones मजकूर संदेश मोफत गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5/", "date_download": "2018-04-24T07:03:19Z", "digest": "sha1:BVTCAXGSYXNL42YAUKE5GMFWRUSDC63H", "length": 18551, "nlines": 138, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "साईनाथ - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant’s Journey\nअनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ...\tRead More »\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – ३)\nहेमाडपंतांच्या (Hemadpant) मित्राच्या मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो आणि हेमाडपंतांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. हेमाडपंतांच्या मित्राचं पुढे काय झालं हे आपल्याला माहित नाही. जी परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राची आहे तीच परिस्थिती सपटणेकरांची आहे. सपटणेकरांच्याही मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो. हेमाडपंतांच्या मित्राला आयुष्यात पुढे शांती मिळाली किंवा नाही ह्या विषयी हेमाडपंत काही सांगत नाहीत. पण साईनाथांकडे येण्यापूर्वी जी परिस्थिती सपटणेकरांची आहे तीच परिस्थिती हेमाडपंतांच्या ...\tRead More »\nनव्या फोरमची सुरुवात : साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंत – २ (Hemadpant)\nहेमाडपंतांविषयी (Hemadpant) आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. (१) हेमाडपंत(Hemadpant) ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते. (२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित(Kakasaheb Dixit) व नानासाहेब चांदोरकर (Nanasaheb Chandorkar) यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१) (३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे(Sai) येण्याच्या वेळेस कशी होती तर अतिशय उद्विग्न. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा(Saibaba) ...\tRead More »\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – २)\nअनेक जणांनी माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रामवरती “श्री साई सच्चरित Discussion” हा श्रीसाईसच्चरितावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे ...\tRead More »\nश्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा – पारितोषिक वितरण समारोह (Shree Saisatcharit Panchshil Exam)\nगत इतवार अनेक श्रध्दावानों को एक बहुत ही अनोखे समारोह में शामिल होने अवसर मिला मैं भी उस में शामिल था मैं भी उस में शामिल था यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया इस समारोह में इन परिक्षार्थियों ...\tRead More »\nकहे साई वही हुआ धन्य धन्य| हुआ जो मेरे चरणों में अनन्य || (Sai the Guiding Spirit Saisatcharit)\nपिछले ड़ेढ दो साल से सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ‘श्रीसाईसच्चरित’ (Shree Saisatcharit) पर हिन्दी में प्रवचन कर रहे हैं इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों ...\tRead More »\nहा प्रसंग हेमाडपंताच्या आयुष्याला वळण देणारा आहे. हेमाडपंतांनी साईनाथांना बघितलेलं ही नाही, फोटो ही पाहिलेला नाही. उलट काकासाहेब दिक्षीतांनी त्यांना सांगितल्यानंतरही शिर्डीला जायचा विचार हेमाडपंत सोडून देतात. कारण मनात प्रश्‍न उद्‍भवलेला असतो की ’सद्‍गुरूचा उपयोग काय’ पण त्यानंतर नानासाहेब चांदोरकरांच्या विनंतीनंतर हेमाडपंत शिर्डीस जायला निघतात. हेमाडपंतांची शिर्डीला जाणारी गाडी सुटू शकते हे जाणून, तसेच साईनाथ त्यांच्या भक्ताचा म्हणजेच नानासाहेब चांदोरकरांचा ...\tRead More »\nसाईंनिवास – डाक्यूमेंट्री अब हिंदी में भी उपलब्ध (डबींग की हुई) (Sainiwas Documentary)\nSainiwas Documentary हरी ॐ मित्रों, पिछले गुरूवार को, अर्थात ३१ जनवरी २०१३ को श्रद्धावनों के लिए स्वस्तिक्षेम संवाद के बाद, जो बापूजी के हिंदी प्रवचन के लिए बैठते हैं उनके लिए साईंनिवास डाक्यूमेंट्री (हिन्दी में डबींग की हुई) लगाई गयी थी चूंकि मूल प्रति की अवधि २ घंटों की है, इसका संक्षिप्त प्रारूप, जिसकी अवधि ४५ मिनटों की है, वह दिखाई गई चूंकि मूल प्रति की अवधि २ घंटों की है, इसका संक्षिप्त प्रारूप, जिसकी अवधि ४५ मिनटों की है, वह दिखाई गई\nll हरि ॐ ll श्री साईसच्चूरित में कई भक्तों की बातें आती हैं जिसकी वजह से भक्तों की श्रद्धा दृढ होती जाती है और सदगुरुचरणों में भक्ति भी दृढ होने लगती है सदगुरु श्री अनिरुद्ध बापूजी के भक्तों को ऐसे कई अनुभव हुए हैं सदगुरु श्री अनिरुद्ध बापूजी के भक्तों को ऐसे कई अनुभव हुए हैं कई अनुभव विशेषांक में छपे हैं और कई अनुभव कृपासिंधु में भी छपते रहते हैं कई अनुभव विशेषांक में छपे हैं और कई अनुभव कृपासिंधु में भी छपते रहते हैं \nll हरि ॐll Sadguru Shree Aniruddha Bapu श्री साईसच्‍चरितामध्ये अनेक भक्तांच्या गोष्टी येतात ज्यामुळे भक्तांची श्रध्दा दृढ होत जाते आणि सद्‌गुरुचरणी भक्तीहीदृढ व्हायला लागते. सद्‌गुरु श्रीअनिरुध्द बापूंच्या भक्तांना असे अनेक अनुभव आलेले आहेत.अनेक अनुभव विशेषांकामधून आले आहेत आणि अनेकअनुभव कृपासिंधुमध्येही येतात.त्याशिवाय हे अनुभव आपल्या “अनिरुध्द बापू व्हिडीयोज” युट्युब चॅनलवर (http://www.youtube.com/user/manasamarthyadatavid/videosflow=grid&view=1) देखील पहायला मिळतात.हे अनुभव प्रत्येक श्रध्दावानाला मार्गदर्शक तर ...\tRead More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://yunikodatunmarathi.blogspot.com/2010/12/blog-post.html", "date_download": "2018-04-24T06:53:46Z", "digest": "sha1:FMUYULQMPYQRXS6DV4GIQHZE5RFOU4F3", "length": 4707, "nlines": 53, "source_domain": "yunikodatunmarathi.blogspot.com", "title": "युनिकोडातून मराठी: इन्स्क्रिप्टाच्या कळपाटाची ओळख", "raw_content": "\nह्या अनुदिनीत संगणकावर युनिकोड वापरून मराठीत काम करण्यासाठी आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देत आहोत. सामान्य व्यक्तीला आवश्यक ती माहिती तर आम्ही देऊच पण अधिक जिज्ञासा असणार्‍या व्यक्तींनाही इथली माहिती उपयोगी पडेल. युनिकोड वापरून मराठीत काम करताना आलेल्या अडचणी, लोकोपयोगी माहिती तसेच अनुभव आपण इथे प्रतिक्रिया म्हणून नोंदवू शकाल. त्यातून माहितीची अधिक देवाणघेवाण होऊन संगणकावर मराठी वापरण्यासाठीची अधिक माहिती सर्वांना उपलब्ध होऊ शकेल.\nमाहितीपुस्तिका खाली उजवीकडच्या चौकटीत दिली आहे.\nशुक्रवार, १० डिसेंबर, २०१०\nसंगणकावर मराठी टंकलेखन करण्यासाठी इन्स्क्रिप्ट हा कळपाटाचा आराखडा वापरतात. त्याची ओळख करून देणारी दृक्-श्राव्य शिकवणी\nद्वारा पोस्ट केलेले सुशान्त येथे ४:५५ म.उ.\nलेबल: इनस्क्रिप्ट, कळपाट, कळफलक, टंकलेखन, मराठी, युनिकोड, Inscript, Marathi, typing, Unicode\n१० फेब्रुवारी, २०१२ रोजी ८:४० म.पू.\n८ फेब्रुवारी, २०१३ रोजी ६:४३ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nयुनिकोडाविषयीची माहितीपुस्तिका (ऑक्टो २००८)\nनवी माहितीपुस्तिका : युनिकोडाच्या साहाय्याने संगणकावर मराठी कसे वापरावे\nमाहितीपुस्तिका : युनिकोडातून मराठी (पीडीएफ्)\nभेटसंख्या (10 एप्रिल 2009पासून)\nइन्स्क्रिप्टच्या मराठी कळपाटाची शिकवणी\nइनस्क्रिप्टचा कळपाटाचा आराखडा वापरून मराठी लिहिताना ', ' इ. चिन्हं लिहिता येत नाहीत, ती लिहिता येण्यासाठी काय करावं\nसंगणकावर युनिकोड आहे की नाही हे कसं ओळखावं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2018-04-24T06:40:53Z", "digest": "sha1:HXVTNLWSJEE2JMIQXB5XN6K7R57L3PGC", "length": 4388, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "घाट - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nडोंगर ओलांडण्यासाठी बनविलेल्या वळणावळणाच्या रस्त्याला घाट म्हणतात.\nपहा : महाराष्ट्रातील घाट रस्ते\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जून २०१५ रोजी २३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-04-24T06:40:26Z", "digest": "sha1:UKPALR33EALUWPOBHEFZ4ZVTWJ662BET", "length": 11292, "nlines": 431, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण ३८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३८ उपवर्ग आहेत.\n► कालखंडानुसार इतिहास‎ (२ क)\n► खंडानुसार इतिहास‎ (५ क)\n► इतिहास दालने‎ (१ क, ७ प)\n► देशानुसार इतिहास‎ (८३ क, ४ प)\n► विषयागणिक इतिहास‎ (४ क)\n► इतिहासावरील अपूर्ण लेख‎ (१ क, २ प)\n► इ.स. ११७‎ (१ क, १ प)\n► इ.स. १२६‎ (१ क, १ प)\n► इ.स. ७०६‎ (१ प)\n► इतिहासकार‎ (५ क, २० प)\n► ऐतिहासिक मार्ग‎ (३ प)\n► ऐतिहासिक व्यक्ती‎ (३ क, ५९ प)\n► घटना‎ (२ क)\n► जगातील विविध संस्कृती‎ (१ क)\n► दलित इतिहास‎ (१२ प)\n► देशानुसार ऐतिहासिक वास्तू‎ (२ क)\n► देशानुसार राज्यकर्ते‎ (९ क)\n► पुरातत्वशास्त्र‎ (३ प)\n► पोलंडचा इतिहास‎ (१ क, ६ प)\n► प्रदेशानुसार इतिहास‎ (१ क)\n► प्राचीन घटना‎ (८ क, ४ प)\n► प्राचीन राज्ये‎ (८ क, ९ प)\n► प्राचीन शहरे‎ (२ क, ६ प)\n► प्राचीन संस्कृती‎ (१ क, १२ प)\n► बौद्ध धर्माचा इतिहास‎ (२ क, ७ प)\n► भारताचा इतिहास‎ (३२ क, १११ प)\n► भूतपूर्व साम्राज्ये‎ (२ क, २ प)\n► मराठा इतिहास‎ (२ प)\n► मानवी स्थलांतर‎ (१ क)\n► रोमन इतिहास‎ (१ क, ५ प)\n► लष्कर‎ (३ क, २ प)\n► विकिपीडियाचा इतिहास‎ (२ प)\n► विकिप्रकल्प इतिहास‎ (१२ प)\n► शिलालेख‎ (७ प, ३ सं.)\n► इतिहासविषयक साचे‎ (३ क, १ प)\n► ऐतिहासिक मार्गक्रमण साचे‎ (७ प)\n► साम्राज्ये‎ (४ क, ९८ प)\n► हस्तलिखिते‎ (३ प)\nएकूण ६२ पैकी खालील ६२ पाने या वर्गात आहेत.\nचौसष्ट प्राचीन भारतीय लिपि\nप्राचीन जगतातील सात आश्चर्ये\nभारतीय नाणेशास्त्र शोधसंस्था, अंजनेरी, नाशिक\nलिओ पहिला, बायझेन्टाईन सम्राट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://sanketpatekar.blogspot.com/2017/01/blog-post_28.html", "date_download": "2018-04-24T06:17:10Z", "digest": "sha1:65GYB4ELDMHYQV3BJUZRVQCVRK7VFDCH", "length": 18311, "nlines": 197, "source_domain": "sanketpatekar.blogspot.com", "title": "माझे ट्रेक अनुभवं ( वेड सह्याद्रीचे ): रोह्यातील मुसाफिरी - किल्ले घोसाळगड आणि कुडा लेणे", "raw_content": "माझे ट्रेक अनुभवं ( वेड सह्याद्रीचे )\nसोमवार, ९ जानेवारी, २०१७\nरोह्यातील मुसाफिरी - किल्ले घोसाळगड आणि कुडा लेणे\nकिल्ले घोसाळगड - तटबंदीयुक्त माची\nसालाबादप्रमाणे , म्हणजेच नित्य नेहेमीच्या आमच्याच नियमावली प्रमाणे , इंगजी नव्या वर्षाची सुरवात , नवं वर्ष स्वागत हे आपल्या सह्याद्रीतल्या कड्या कपारीत , निवांत रमणीय अश्या निसर्गदत्त वलयात , भौगलिक अन ऐतिहासिक वारसा किंव्हा वैभव लाभलेल्या आपल्याच दुर्ग मंदिरात , सह्य माथ्याशीच , त्याच्या सहवासात रंगून मिसळूनच होते.\nनवी ऊर्जा , जगण्याची नवी प्रेरणा ,नवी उमेद हि ह्या गतवैभवातूनच सहजी अशी मिळून जाते.\nयंदाचं म्हणावं तर हे वर्ष देखील असंच , २०१६ च्या डिसेंबर महिन्याच्या एक आठवडाभर आधीच एक दोन दिवसाची मोहीम आम्ही उरकली होती . रवळ्या जवळ्या आणि मार्कंड्या ... त्यानंतर आठवड्या भरानंतर लगेचच हि ..आमची पुढील मोहीम....\nकिल्ले घोसाळगड आणि कुडा लेणी ...\nरायगड जिल्ह्यातील , निसर्ग संपन्न अश्या , कुंडलिका नदीच्या सानिध्यात नितळपणे खळखळत हसत असलेलं रोहा , त्या जवळील हि मुशाफिरी ...\nदिवा - सावंतवाडी :\nदिवा-सावंत वाडीच्या नेहमीच्याच वर्दळ असणाऱ्या गाडीने प्रवास करणं म्हणजे दिव्यत्वेचा साक्षात्कार जणू , ह्याचा प्रत्यय तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलाच असेल एकदा....\nअफाट गर्दी , आणि त्या दिव्य अफाट गर्दीतून मार्ग काढत , सुरू असलेली विक्रेत्यांच्या सामानांची खरेदी विक्री,गोंगाट जणू आक्खी ट्रेन हि एक स्वतंत्र चालतं बोलतं मार्केटच आहे जणू ,असा भास नाही तर प्रत्यक्षदर्शी जाणीव आपल्याला तिथे होते .\nवेगवेगळ्या स्तरातील , आवाजातील लयबद्द ,अभिनय अश्या शैलींनी सादर केलेली विक्रेत्यांची ती 'आरोळी' ...मनाला वेगळ्याच तंद्रीत, भावनगरीत खेचून घेते .\nकरमणूक तर होतेच पण त्या शब्दांची जादू , चेहर्यावरचे विविध रंगभाव ह्याकडे आपलं बारीकशी लक्ष लागून राहतं.\nकुणी 'शिरा उपमा कांदा पोहे' घ्या असं म्हणता म्हणता ..\n''घाऊन घ्या ताई मी परत येणार नाही ..'' हे पुढचं वाक्य शक्कल लढवून सहज बोलून जातं. (आणि खरंच पुन्हा येत नाही )\nकुणी , मामीने बनविलेले , चुलीवरचे वडापाव , १० ला दोन असं म्हणतं , भाव खाऊन जातं .\nकुणी बोरं घ्या, चमेली बोरं म्हणतं,\nकुणी कारली , मेथी पावटा , पासून , कचोरी भाकरवाडी , वेफर्स , ते गावठी केळी पर्यंत येऊन पोहोचतं.\nकुणी 'माझ्या तर्फे खाऊन घ्या, पैसे अजिबात देऊ नका' इथपर्यंत मजल मारतं.\nतर कुणी आप आपसात 'आजचा दिवस जाऊ देत सोन्याचा , उद्याचा दिवस जाऊ देत चांदीचा' ...असं\nगमतीनं, पण आपलेपणान म्हणतं ..एकमेकांनच्या व्यवसायाला हातभार लावतं.\nइतक्या भाव छटा , इतके भावतरंग , शब्दोली सहज आपल्याला ह्या दिवा सावंतवाडी प्रवासात मिळून जातात.\nअसाच प्रवास करत आम्ही रोह्याला पोहचलो .\nतेंव्हा साधारण पावणे दहा झाले होते. नित्य नेहेमीच्या दिनक्रमानुसार आजही अर्धा पाऊण तासाचा फरक पडला होता. दिवा सावंतवाडी उशिरा पोहोचली होती .\nत्यामुळे आता घाई करणं आम्हाला भाग होतं. पुढची मोहीम वेळेवर अवलंबून होती.\nरोह्याला उतरून , लगेचच पायीच आम्ही एसटी डेपो गाठलं .\nत्यात कुंडलिका नदीचं सुंदर पात्र अन गावाच्या वळणवाटेतून येता येता , चकचकीत अशी नवी कोरी भांडी दिसली ती कॅमेरात बंदिस्त करून घेतली.\nआणि एकमेकांकशी चालता बोलता पंधरा ते वीसेक मिनिटात , आम्ही एसटी स्थानकात दाखल झालो . पुढील पाच एक मिनिटात घोसाळगड मार्गी (मुरुड - भालेगाव ) जाणाऱ्या एसटीने ,\nवळणावळणाच्या त्या हिरवाईने घेरलेल्या दाट घाटवाटातून, (आंब्यांचे कलम , तंटामुक्त गाव पाहत ) आम्ही अर्धा तासात घोसाळगड च्या पायथ्याशी पोहोचलो . समोरच हिरवाईने वेढलेला सुंदरसा छोटेखानी किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आम्हाला साद देत होता.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: रोह्यातील मुसाफिरी - किल्ले घोसाळगड आणि कुडा लेणे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n'सह्याद्रीतली माणसं ' (1)\nकावल्या बावल्या खिंड - ऐतिहासिक रणभूमी (1)\nकिल्ले द्रोणागिरी - एक धावती भेट... (1)\nकुलाबा - सर्जेकोट (1)\nकोरीगड - कोराईगड (1)\nगर्द वनातील त्रिकुट _ महिपतगड _सुमारगड आणि रसाळगड (1)\nपद्‌मदूर्ग (कासा किल्ला) (1)\nपावसाळी 'सोंडाई' दर्शन (1)\nरवळ्या जवळ्या - मार्कंड्या अन... (1)\nरोह्यातील मुसाफिरी - किल्ले घोसाळगड आणि कुडा लेणे (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nरवळ्या जवळ्या - मार्कंड्या अन...\nरोह्यातील मुसाफिरी - किल्ले घोसाळगड आणि कुडा लेणे\nप्रबळगड आणि पाउस - १७.०६.२०१२ रविवार\nप्रबळगड आणि पाउस - १७.०६.२०१२ रविवार पाउस - जेंव्हा हवा तेंव्हा येत नाही ...जेंव्हा नको हवा असतो तेंव्हा मुद्दाम जाणून बुजून पडतो ..आण...\nहरिहर / हर्षगड + त्र्यंबकेश्वर\nनाशिक म्हटलं कि सर्वप्रथम डोळ्यासमोर काय येत असेल तर' सह्याद्रीच्या ह्या' मनाला भुरळ पाडणाऱ्या विलोभनीय पण अजस्त्र अशा रांगा ....\nखांदेरी - दुर्गदर्शन मोहीम\nकधी कधी अनपेक्षितपणाच्या सौम्य सुखद क्षणांनी हि मनात चैतन्याचा निर्मळ झरा खळखळून वाहू लागतो . मुक्त कंठा निशी तन - मनं अ...\nगर्द वनातील त्रिकुट _ महिपतगड _सुमारगड आणि रसाळगड\nनभा नभातुनी दऱ्या खोऱ्यांतुनि गर्जितो माझा सह्याद्री ... दिशा दिशांना साद घालूनी पुलकित होतो सह्याद्री ... दिशा दिशांना साद घालूनी पुलकित होतो सह्याद्री ...\nमल्हारगड .. समुद्रसपाटीपासूनची साधरण ११०० मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला ... अगदी छोटेखानी पण देखणा अन पाहण्यासारखा आहे....\nकळसुबाई ट्रेक - माझ्या शब्दात\n\"मनात केंव्हा पासून इच्छा होती' महाराष्ट्रातील सर्वात उंच , महाराष्टाची शान असलेला ''कळसुबाई शिखर सर करायचा. आणि ती मा...\nस्वप्नं ...... जेव्हा सत्यात उतरते\nसफर वनदुर्ग वासोट्याची अन मकरंदगड-प्रतापगडाची..... जीवन हे अनेक स्वप्नांनी, इच्छा आकांक्षांनी रंगलं आ...\nनाणेघाट - जीवधन ...क्षण चित्रे..\nआयुष्यात असे हि काही प्रसंग घडतात कि ज्या वेळेस , आपण यशाच्या अगदी समीप असतो . अगदी हाकेच्या अंतरावर . अस असता हि काही वेळा मनाशी सम...\nसह्याद्रीतलं स्वप्नं : साल्हेर -सालोटा -मुल्हेर- मोरा- भाग -१\n1 साल्हेरं - नाव उच्चारलं कि सर्वप्रथम डोळ्यासमोर काय येत असले तर ती साल्हेर ची लढाई , तो झुंजार रणसंग्राम, , मराठ्यांनी फोडलेल...\nधोडप - इच्छा शक्ती - योगायोग अन स्वप्नपूर्ती\nजग कितीही पुढे गेलं अन विज्ञानाने किती हि प्रगती साधली तरीही निर्सगनिर्मित अद्भुत गोष्टींचा अर्थ लावणे ,तो शोधून काढणे अजूनही तसं मानवाला...\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nछत्रपतींचा मान हाच आमचा स्वाभिमान......\nऑसम इंक. थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80.%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80.%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3", "date_download": "2018-04-24T06:23:48Z", "digest": "sha1:GMGLFKDI2BP37OLMK4I4E5U5WKSB63HR", "length": 7926, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्ही.व्ही.एस. लक्ष्मण - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपूर्ण नाव वंगीपुरप्पू वेंकटा साई लक्ष्मण\nजन्म १ नोव्हेंबर, १९७४ (1974-11-01) (वय: ४३)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ स्पिन\nक.सा. पदार्पण (२०९) २० नोव्हेंबर १९९६: वि दक्षिण आफ्रिका\nशेवटचा क.सा. ३ ऑगस्ट २०१०: वि श्रीलंका\nआं.ए.सा. पदार्पण (११२) ९ एप्रिल १९९८: वि झिम्बाब्वे\n२००७, २००९ लँकशायर काउंटी क्रिकेट क्लब|लँकशायर (संघ क्र. ५, २६)\n२००८ – २०१० डेक्कन चार्जर्स\nक ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nसामने ११३ ८६ २४४ १७३\nधावा ७,४१५ २,३३८ १८,१५४ ५,०७८\nफलंदाजीची सरासरी ४७.२२ ३०.७६ ५२.६२ ३४.५४\nशतके/अर्धशतके १६/४५ ६/१० ५३/८६ ९/२८\nसर्वोच्च धावसंख्या २८१ १३१ ३५३ १३१\nचेंडू ३२४ ४२ १,८३५ ६९८\nबळी २ ० २२ ८\nगोलंदाजीची सरासरी ६३.०० – ३४.२७ ६८.५०\nएका डावात ५ बळी ० ० ० ०\nएका सामन्यात १० बळी ० n/a ० n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी १/२ ०/५ ३/११ २/४२\nझेल/यष्टीचीत ११८/– ३९/– २६०/१ ७४/–\n७ ऑगस्ट, इ.स. २०१०\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nवांगिपुरप्पू वेंकट साई लक्ष्मण ऊर्फ व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (तेलुगू: వంగివరపు వెంకట సాయి లక్ష్మణ్ ; रोमन लिपी: Vangipurappu Venkata Sai Laxman) (नोव्हेंबर १, इ.स. १९७४ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो. भारतातील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये त्याने हैदराबाद संघाचे, तर इंग्लिश काउंटी क्रिकेट साखळीत लँकेशायर संघाचे प्रतिनिधित्व केले.\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकइन्फो संकेतस्थळावरील प्रोफाइल व आकडेवारी (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९७४ मधील जन्म\nइ.स. १९७४ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१ नोव्हेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nडेक्कन चार्जर्स माजी खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१४ रोजी २१:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/hollywood/news/lion-star-sunny-pawar-got-selected-after-2000-childrens-auditions/18460", "date_download": "2018-04-24T07:04:54Z", "digest": "sha1:NKCB2YMGF6GIFGFMSSYI4V5V3HKYVKTV", "length": 24950, "nlines": 232, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "lion star sunny pawar got selected after 2000 children's auditions | लायन या चित्रपटातील सनी पवारची हजारो मुलांमधून केली गेली निवड | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nलायन या चित्रपटातील सनी पवारची हजारो मुलांमधून केली गेली निवड\nलायन या चित्रपटातील देव पटेल आणि सनी पवार यांनी नुकतेच ऑस्कर सोहळ्याला हजेरी लावली. लायन या चित्रपटातील बालकलाकार सनी पवार एका चित्रपटामुळे स्टार बनला आहे. 2000 मुलांचे ऑडिशन घेतल्यानंतर दिग्दर्शन ग्रॅथ डॅव्हिस यांनी त्याची निवड केली आहे असे ते सांगतात.\nलायन या चित्रपटातील सनी पवारने नुकतीच ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे. काळ्या रंगाच्या टक्सिकोमध्ये तो उठून दिसत होता तसेच त्यावर त्याने हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे छान शूज घातले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन ग्रॅथ डॅव्हिस यांनी केले असून सरू ब्रिले यांच्या खऱ्या आयुष्यावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. गुगल मॅपच्या मदतीने नायक आपल्या कुटुंबांचा कशाप्रकारे शोध घेतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात सरूच्या लहानपणीची भूमिका सनी पवार या बालकलाकाराने साकारली आहे. या चित्रपटाला अनेक पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार मिळाले असून ऑस्करमध्येदेखील या चित्रपटाला अनेक नामांकने मिळाली आहेत.\nसरू मुंबईतील एका ट्रेनमधून नकळत अनेक किलोमीटर त्याच्या घरापासून दूर कोलकात्याला गेला होता आणि तेथील रस्त्यावर राहायला लागला होता आणि काही वर्षांनंतर एका ऑस्ट्रेलियातील जोडप्याने त्याला दत्तक घेतले होते.\nया चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले त्यावेळी केवळ सनी पाच वर्षांचा होता. त्यावेळी या चित्रपटातल्या भावना त्याला कळत नव्हत्या. पण आता या भावना चांगल्याप्रकारे तो समजून घेऊ शकतो असे तो सांगतो.\nसरू या भूमिकेसाठी दिग्दर्शक ग्रॅथ डॅव्हिस एका मुलाच्या शोधात होते. त्यांनी अनेक शाळांमधून दोन हजारांपेक्षाही अधिक मुलांचे ऑडिशन घेतले होते. पण या ऑडिशनमधून त्यांना कोणीच मुलगा ही भूमिका साकारण्यासाठी योग्य वाटत नव्हता. पण सनीला पाहाताच क्षणी त्यांनी त्याची या भूमिकेसाठी निवड केली. सनीचे ऑडिशन घेत असताना मी हा चित्रपटच पाहात होतो असे मला वाटत होते असे या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने एका मुलाखतीत सांगितले आहे.\nसनी हा एका इंग्रजी चित्रपटात काम करत असला तरी त्याला इंग्रजी भाषा अजिबातच बोलता येत नाही. या चित्रपटात ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर सनी इंग्रजी बोलतो असे दाखवण्यात आले आहे. पण सनीला खऱ्या आयुष्यात केवळ हिंदी बोलता येते. त्यामुळे मुलाखतीच्या दरम्यान एक ट्रान्सलेटर सतत त्याच्यासोबत असतो. सनीला त्याची वाक्य पाठ करणे आणि डेव्हिड यांनी सांगितलेले समजून घेणे खूपच कठीण जात असे. या चित्रपटासाठी जगभर लोकांना भेटायला मिळत असल्याचा त्याला सध्या खूप आनंद होत आहे. सनीने अद्याप तरी कोणताही चित्रपट स्वीकारलेला नाही. पण पुढील काळात एखाद्या सुपरमॅनच्या चित्रपटात काम करण्याची त्याची इच्छा आहे. हृतिक रोशनच्या क्रिश या चित्रपटाचा तो फॅन आहे. सनी एक हुशार विद्यार्थी असून त्याला त्याच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. त्याला गणित हा विषय खूप आवडतो. मी अभिनयात नाही आलो तर मी पोलिस बनेन असेही तो सांगतो.\nअ. ब. क चित्रपटाला पंतप्रधान नरेंद्...\nOscars 2018 : ९० व्या आॅस्कर पुरस्क...\nOscars 2018 : आॅस्कर सोहळ्यात ‘या’...\nOscars 2018 : या चित्रपटांना मिळाले...\n​‘खिलाडी’वर भारी पडलेली राधिका आपटे...\nआॅस्करसाठी निवडला जाणारा ‘न्यूटन’ ठ...\n​IIFA2017 : बॉलिवूडप्रेमींच्या प्रे...\n​लायन फेम सनी पवार' अ ब क या चित्रप...\n'अ ब क' मध्ये दिसणार बॉलिवूडचे कलाक...\nऑस्कर बॉय सनी पवार झळकणार मराठी सिन...\nसनीच्या अदाकारीचा जलवा त्याचे कुटुं...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/", "date_download": "2018-04-24T06:25:19Z", "digest": "sha1:FFEA7ZEE6Q6HJZDK2IZXSADGLLODY6QW", "length": 26069, "nlines": 227, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "एफ वाय – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nमहाराष्ट्रात निपाणी नाही, परंतु निपाणीत महाराष्ट्र (वृत्त: दै० लोकसत्ता १९ एप्रिल २०१०)\nगुरूवार, 29 एप्रिल 2010 अमृतयात्री4 प्रतिक्रिया\n“येथील मराठी माणसांच्या बोलण्यात, व्यवहारात, शिक्षण क्षेत्रात मराठी भाषेला अव्वल स्थान दिल्याने येथे कन्नडची भेसळ नाही. अगदी शंभर टक्के मराठी अस्मिता आणि मराठी बाणा.”\nखरंच आपण स्वतंत्र झालो आहोत का (ले० प्रा० मनोहर राईलकर)\nसोमवार, 19 एप्रिल 2010 रविवार, 2 ऑक्टोबर 2011 अमृतयात्री22 प्रतिक्रिया\nस्वातंत्र्यापूर्वी जेवढा तीव्र स्वाभिमान आपल्यात होता, त्याच्या शतांशानंही तो आज उरला नाही, हे कारण आहे का इंग्रजी बोलण्यात, घरांची नावं इंग्रजी ठेवण्यात, हवामान प्रतिकूल असूनही इंग्रजांसारखी वेषभूषा करण्यात, निमंत्रणं इंग्रजीतून काढण्यात, अंतर्गत पत्रव्यवहार इंग्रजीतून करण्यात, समिति-वृत्तांत इंग्रजीत देण्यात, नाना प्रकारांनी दास्यवृत्ती टिकवण्याचा, वाढवण्याचा, पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचा, संक्रामित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचं पाहणं, आमच्यासारख्या वृद्धांना खंतावून जातं.\nस्वातंत्र्यदेवीची विनवणी आणि समजावणी\nसोमवार, 19 एप्रिल 2010 अमृतयात्री4 प्रतिक्रिया\nसुमारे १४ वर्षांपूर्वी कविवर्य कुसुमाग्रजांची ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविता प्रसिद्ध झाली होती. सर्व मराठीजनांच्या पुनर्स्मरणार्थ ती ह्या अनुदिनीवर पुन्हा सर्वांसमोर ठेवावी असा विचार करीत असतानाच आपले आणखी एक अत्यंत स्वाभिमानी मराठीप्रेमी मित्र सुशांत देवळेकर ह्यांनी कुसुमाग्रजांच्या त्याच कवितेचे सद्यकालानुरूप केलेले ‘स्वातंत्र्यदेवीची समजावणी’ हे पुनर्लेखन वाचनात आले. आता दोन्ही कविता समांतरच प्रसिद्ध करीत आहोत.\nकाळ्यांची पांढर्‍यांवर मात (लोकमान्यांचा किस्सा)\nशनिवार, 17 एप्रिल 2010 शनिवार, 17 एप्रिल 2010 अमृतयात्री4 प्रतिक्रिया\nएके दिवशी मी टिळकांकडे बसलो असता ‘केसरी’त प्रसिद्ध करण्याकरिता बुद्धिबळांचा एक डाव त्यांचेकडे आला. तो त्यांनी भूमितीच्या प्रश्नाप्रमाणे कागदावर पाहूनच तोंडाने सोडविला.\nमंगळवार, 13 एप्रिल 2010 सोमवार, 27 सप्टेंबर 2010 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nबॅंकिंग क्षेत्रामधील भाषाविषयक धोरणाकडे महाराष्ट्रात पूर्ण दुर्लक्ष (सुधारित लेख-२२.०५.२०१०)\nरविवार, 4 एप्रिल 2010 रविवार, 2 ऑक्टोबर 2011 अमृतयात्री21 प्रतिक्रिया\nग्राहकांना सक्षम व पारदर्शी पद्धतीने सेवा पुरविण्याच्या दृष्टीने इतर कुठल्याही उद्योगाप्रमाणे बँकांनीसुद्धा स्थानिक भाषा, संस्कृती, रीतिरिवाज इत्यादींचा अभ्यास करून लोकांशी संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताची राज्यघटना, भाषाविषयक धोरण आणि त्यासंबंधातील विविध कायदे यांच्या आधारावर रिझर्व्ह बॅंक वेळोवेळी सर्व अनुसूचित (शेड्यूल्ड) बॅंकांना मार्गदर्शनपर सूचना देत असते. परंतु रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शनपर तत्त्वांची अंमलबजावणी सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात होत असते आणि विशेषत: महाराष्ट्रात स्थानिक भाषेविषयीच्या नियमांची अंमलबजावणी फारशा गंभीरपणे केलेली आढळत नाही.\n’स्व-तंत्र’ शब्दाविषयीची जपानी संकल्पना – एक छोटासा किस्सा (प्रेषक: अनय जोगळेकर)\nशनिवार, 3 एप्रिल 2010 रविवार, 4 एप्रिल 2010 अमृतयात्री12 प्रतिक्रिया\nजगभरात स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ केवळ आपले शासन आपण निवडणे एवढा संकुचित नसून आपल्या देशात सर्वत्र आपले शासनव्यवहार, समाजव्यवहार, न्यायसंस्था, संसदव्यवस्था, ज्ञान, विज्ञान, संज्ञापन, साहित्य, कला, छंद, व्यवसाय, उद्योग, रोजगार अशा मानवीजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ’स्व’-तंत्र प्रस्थापित करणे म्हणजेच प्रामुख्याने आपली संस्कृती, आपली भाषा, आपली परंपरा, आपले विचार (तत्त्वज्ञान), आपल्या रूढी ह्यांचे जतन, प्रस्थापन, संवर्धन व प्रसार करणे इतका विस्तृत असतो.\nशहाणा भारत आणि वेडा जपान (ले० प्रा० मनोहर राईलकर)\nशनिवार, 3 एप्रिल 2010 रविवार, 2 ऑक्टोबर 2011 अमृतयात्री35 प्रतिक्रिया\nदि० ११-३-१०च्या लोकसत्तेच्या पुणे वृत्तांतामध्ये आलेली माहिती वाचून मी थक्क झालो. आणि खिन्नही झालो. तुम्हीही व्हाल. पण का ते सांगण्याआधी आपल्याकडे मुरलेल्या काही पक्क्या पण निराधार आणि आंधळया किंवा मेषसिद्धांतांची हजेरी घेऊ.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर\nराईट बंधूंच्या आधी विमानोड्डाण करणारा भारतीय \n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n\"हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही\" - केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nविचारमंथन - तिन्ही सांजा सखे मिळाल्या (प्रश्नकर्ता: सुशांत देवळेकर)\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2011/04/", "date_download": "2018-04-24T06:22:41Z", "digest": "sha1:2C54AH3KBNIP6LAN5ZLUQNSKGD5MKCBC", "length": 18718, "nlines": 203, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "एफ वाय – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nउत्सवी मग्न राजा.. आणि प्रजाही (ले० गिरीश कुबेर, दै० लोकसत्ता)\nमंगळवार, 19 एप्रिल 2011 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nप्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात एक काळ असा येतो की, त्यावेळी जनतेचं वास्तवाचं भान सुटतं आणि ती गुलाबी आभासालाच वास्तव मानू लागते. समाजमनाला एकूणच ग्लानी येते. जनतेचं हे असं वास्तवाचं भान सुटावं अशी प्रत्येक राज्यकर्त्यांचीच इच्छा असते. अशा काळात करमणुकीला अतोनात महत्त्व येतं. कला आणि करमणूक यातील भेद कळायची कुवतही समाज हरवून बसतो.\nक्रेडिट कार्डच्या व्यवहारावर अधिशुल्क वसूल करणे बेकायदा (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, ४ एप्रिल २०११)\nसोमवार, 4 एप्रिल 2011 शनिवार, 27 मे 2017 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\n४ एप्रिल २०११. आज गुढी पाडवा. मराठीजनांचा नववर्षारंभ. साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त. या शुभदिनी आपल्यापैकी काही जण सोने-दागिने खरेदी करतील किंवा घरात काही मौल्यवान चीजवस्तू खरेदी करतील. अशा वेळी मोठी रक्कम तर आपण खिशात घेऊन फिरत नाही. आणि त्यामुळे पैसे भरताना जर आपण क्रेडिट कार्डाचा (पतपत्रिकेचा) वापर केला तर तो व्यापारी बेकायदेशीररीत्या आपल्याकडून व्यवहाराच्या किंमतीच्या दोन-चार टक्के अधिशुल्क वसूल करण्याची शक्यता आहे. त्या संबंधात खालील लेख अवश्य वाचा.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर\nराईट बंधूंच्या आधी विमानोड्डाण करणारा भारतीय \n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n\"हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही\" - केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nविचारमंथन - तिन्ही सांजा सखे मिळाल्या (प्रश्नकर्ता: सुशांत देवळेकर)\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/news/irrfan-khan-have-been-asked-to-compromise-during-struggle-days/25861", "date_download": "2018-04-24T06:33:43Z", "digest": "sha1:JUI5YG4FJF5DMPYARITCLX634BUGUBFG", "length": 25672, "nlines": 243, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "irrfan khan have been asked to compromise during struggle days | ​#MeToo: महिलाच नाही तर पुरूषांनीही दिली होती ‘सेक्स’ची आॅफर ; इरफान खानचा धक्कादायक खुलासा!! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\n​झी युवावरील कट्टीबट्टी मालिकेतील कलाकारांची 'कलिंगड पार्टी'\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\n‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या तिसऱ्या सिझनमध्ये सोनाली बेंद्रे पुन्हा परीक्षकाच्या भूमिकेत\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\n​#MeToo: महिलाच नाही तर पुरूषांनीही दिली होती ‘सेक्स’ची आॅफर ; इरफान खानचा धक्कादायक खुलासा\nहोय, अभिनेता इरफान खान याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. इरफानच्या मते, ‘बिग बॉयज क्लब’ बॉलिवूड आणि भारतात सर्वत्र आहे.\nलैंगिक शोषणाविरोधात सोशल मीडियावर ‘मी टू’ या हॅशटॅगसह सुरू करण्यात आलेल्या मोहिमेनंतर जगभरातील सिनेकलाकार लैंगिक शोषणाच्या घटनेविरोधात उघडपणे बोलत आहेत. कल्की कोच्लिन, रिचा चड्ढा, विद्या बालन, मल्किाक्का दुआ या सगळ्या अभिनेत्रींसह आता अभिनेतेही या मुद्यावर उघडपणे बोलताना दिसत आहेत. होय, अभिनेता इरफान खान याने यासंदर्भात एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘करीब करीब सिंगल’ या आपल्या आगामी सिनेमाच्या म्युझिक लॉन्चप्रसंगी इरफान यावर बेधडक बोलला. इरफानच्या मते, ‘बिग बॉयज क्लब’ बॉलिवूड आणि भारतात सर्वत्र आहे. तुझ्या लैंगिक शोषणाचा प्रयत्न कधी झाला का असा प्रश्न इरफानला विचारला गेला. यावर इरफानने ‘हो’ असे उत्तर दिले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ‘होय, आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये वासनांध लोक आहेत. सुरूवातीच्या दिवसांत मलाही अनेकांकडून ‘कॉम्प्रोमाईज’ची आॅफर मिळाली होती. पण माझा या गोष्टीला ठाम नकार होता. मला सेक्ससाठी अनेकदा विचारणा झाली. महिलांच नाहीत तर पुरूषांनीही मला आॅफर दिली. हा माझा एकट्याचा अनुभव नाही. हा इथल्या अनेकांचा अनुभव आहे. माझ्या मते, ही गोष्ट प्रत्येक इंडस्ट्रीत होते. केवळ बॉलिवूड वा हॉलिवूडचं नाही तर प्रत्येक इंडस्ट्रीत. ज्यांना तुम्ही ओळखता, ज्यांचा तुम्ही आदर करता अशा लोकांकडून अशी आॅफर मिळणे खरेच विचित्र होते. पण याला नकार देणे केवळ आणि केवळ माझ्या हातात होते,’ असे इरफान यावेळी म्हणाला. पुरूषांपेक्षा महिलांना ‘कॉम्प्रोमाईज’साठी अधिक विचारणा होते, असे एक निरीक्षणही त्याने यावेळी नोंदवले.\nALSO READ; #MeToo : ‘मी १४ वर्षांची होती अन् तो ३६ वर्षांचा होता’, प्रियंका चोपडाच्या को-अ‍ॅक्ट्रेसनी केला लैंगिक शोषणाचा खुलासा\nगेल्या काही दिवसांपासून जगभरातील माध्यमांमध्ये हॉलिवूड निर्माते हार्वी वीनस्टीन यांचे प्रकरण गाजतेय. हॉलिवूडमधल्या अनेक बड्या अभिनेत्रींनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. महिलांवर होणा-या लैंगिक अत्याचाराकडे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर #MeToo हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.अनेक महिला आहेत ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले आहे पण याविषयी ते खुलेपणाने बोलू शकत किंवा न्याय मागू शकत नाही. अशा महिलांनी सोशल मीडियावर #MeToo हॅशटॅग वापरून ट्विट वा फेसबुकवर स्टेटस अपलोड करावं असे आव्हान हॉलिवूड अभिनेत्रींनी केले आहे. त्यांच्या या मोहिमेला जगभरातून तुफान प्रतिसाद लाभला आहे. भारतातही ट्विटवर #MeToo हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.\nलंडनमध्ये उपचार घेत असलेल्या इरफान...\n​काय या आजाराने पीडित आहे इरफान खान...\n​मला गंभीर आजार; माझ्यासाठी प्रार्थ...\n​स्वत:च्याच जाळ्यात अडकतो इरफान खान...\n​ इरफान खान अन् किर्ती कुल्हारीला ‘...\n​ होय, इरफान खान ‘करीब करीब सिंगल’\n​बत्रा साहेब पुन्हा येणार प्रेक्षका...\nपुन्हा दिसणार दीपिका पादुकोण व इरफा...\n​सबा कामरने मारला चांदनी चौकातील जि...\n एका ज्वलंत विषयाला वाहिल...\n​इरफान खान म्हणाला, विनोद खन्नांसाठ...\nइरफान खान साडीत दिसतो असा\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्...\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या...\n​‘पद्मावत’वर भारी पडतोय महेशबाबूचा...\n'कलंक'नंतर म्युझिकल चित्रपटात दिसणा...\n​‘पल्लू लटके...’ गाण्यावर अशी थिरकल...\nअर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राच्या...\nलवकरच सनी लिओनी सुरु करणार आपल्या ब...\n‘बेगम खान’ वाचवणार का सिद्धार्थ मल्...\n​यशराज कंपूत होतेयं शाहरूखची वापसी;...\nSEE PICS : ​सलमान खान मैत्रीला जागल...\n​मिलिंद सोमण चढणार बोहल्यावर, बघा...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\n​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://jeevantarang.wordpress.com/category/%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-04-24T06:43:57Z", "digest": "sha1:M6PKKTTYJYUPM6EJUMNXQKDMDWBGJPZD", "length": 70568, "nlines": 168, "source_domain": "jeevantarang.wordpress.com", "title": "दैनंदिन घडामोडी « जीवनतरंग....", "raw_content": "\nविचार… मत… अनुभव… वास्तव….निरीक्षणें….\nCategory Archives: दैनंदिन घडामोडी\nथांबा , ई-मेल नावावरून मी तुम्हाला बोगस ई-मेल कशा येतात, या फॉरवर्डेड ई-मेल्सनी कसा वैताग आणलाय किंवा दिलेल्या सेरीजच्या पुढचा नंबर ओळखून अ‍ॅटॅच केलेल्या फाईलमध्ये तुमचे नांव टाका अशा प्रकारच्या कथा सांगून बोअर करणार नाहीय्‌. माझा एक वेगळाच प्रश्न आहे, “I have sent you an e-mail” या वाक्याचं मराठीत भाषांतर तुम्ही काय करता मी तुला एक मेल पाठवलीय्‌ , मी तुला एक मेल पाठवलाय्‌ की मी तुला एक मेल पाठवलंय्‌ मी तुला एक मेल पाठवलीय्‌ , मी तुला एक मेल पाठवलाय्‌ की मी तुला एक मेल पाठवलंय्‌ आता कसं आहे की कुणी आजकाल ई-मेल असं म्हणत नाही तर फक्त मेल असं म्हणतात कारण मेल म्हणजेच ई-मेल हे आपण गृहीत धरलंय्‌. अगदीच बाय पोस्ट काही पाठवायचं असेल तर आपण कुरिअर करतो नाही कां आता कसं आहे की कुणी आजकाल ई-मेल असं म्हणत नाही तर फक्त मेल असं म्हणतात कारण मेल म्हणजेच ई-मेल हे आपण गृहीत धरलंय्‌. अगदीच बाय पोस्ट काही पाठवायचं असेल तर आपण कुरिअर करतो नाही कां\nतर माझा प्रश्न असा आहे की ती मेल, तो मेल की ते मेल झालं कन्फ्यूजन पूर्वी माझं याबाबतीत नेहमी कन्फ्यूजन व्हायचं. आम्ही इंजिनियरिंगला असताना मुळात इंटरनेट ही नवीन गोष्ट होती आणि त्यात ई-मेल म्हणजे तर खूपच नवीन. त्यामुळे त्याकाळात ( अगदी सोपं सांगायचं तर १२/१५ वर्षापूर्वी ) ई-मेल अकाउंट असणे ही अभिमानाची बाब होती. (आम्ही तेव्हा ई-मेल अकाउंट म्हणायचो , मेल आय्‌डी नाही) “अय्या, तुझं ई-मेल अकाउंट नाहीय्‌ अगं मग काढ नां, मी तुला ई-मेल पाठवते.” असं कॉलेजात रोज भेटणार्‍या मैत्रिणीला सांगायचो. अर्थात तेव्हा ई-मेल पाठवणं ही फार सोपी गोष्ट नव्हती. कारण तेव्हा घरोघरी इंटरनेट नव्हतं. कॉलेजात फक्त काही वेळापुरतेच इंटरनेट वापरायला परवानगी असायची. मग नेट सर्फिंग करायचे किंवा ई-मेल पाठवायचा ( तेव्हा मी ते पत्र सारखं तो मेल असं म्हणायची, मेल हा ती किंवा ते कसं असेल, तो ‘तो’ च असणार असा मे बी यामागे विचार असेल) तर सायबर कॅफेत जाऊन ताशी ४० रू. द्यावे लागायचे. आजकाल कसे गल्लोगल्ली सायबर कॅफे दिसतात तसे तेव्हा नसायचे. हळूहळू ई-मेल असं म्हणणं मागासलेपणाचं वाटायला लागला त्यापेक्षा नुसतं मेल असं म्हणायला आवडायला लागलं. जर कुणी चुकून ई-मेल असं म्हंट्लं तर कळायचं की ये अभी बच्चा है. तर आम्ही कोल्हापुरात तो मेल असं म्हणायचो. त्यावेळी पुण्यात राहणारी माझी मैत्रिण मला म्हणाली, “वैशाली , मी तुला एक मेल पाठवली होती, मिळाली कां अगं मग काढ नां, मी तुला ई-मेल पाठवते.” असं कॉलेजात रोज भेटणार्‍या मैत्रिणीला सांगायचो. अर्थात तेव्हा ई-मेल पाठवणं ही फार सोपी गोष्ट नव्हती. कारण तेव्हा घरोघरी इंटरनेट नव्हतं. कॉलेजात फक्त काही वेळापुरतेच इंटरनेट वापरायला परवानगी असायची. मग नेट सर्फिंग करायचे किंवा ई-मेल पाठवायचा ( तेव्हा मी ते पत्र सारखं तो मेल असं म्हणायची, मेल हा ती किंवा ते कसं असेल, तो ‘तो’ च असणार असा मे बी यामागे विचार असेल) तर सायबर कॅफेत जाऊन ताशी ४० रू. द्यावे लागायचे. आजकाल कसे गल्लोगल्ली सायबर कॅफे दिसतात तसे तेव्हा नसायचे. हळूहळू ई-मेल असं म्हणणं मागासलेपणाचं वाटायला लागला त्यापेक्षा नुसतं मेल असं म्हणायला आवडायला लागलं. जर कुणी चुकून ई-मेल असं म्हंट्लं तर कळायचं की ये अभी बच्चा है. तर आम्ही कोल्हापुरात तो मेल असं म्हणायचो. त्यावेळी पुण्यात राहणारी माझी मैत्रिण मला म्हणाली, “वैशाली , मी तुला एक मेल पाठवली होती, मिळाली कां” बाकी कशाकडे माझं लक्ष न जाता, मैत्रिण ती मेल म्हणाली याकडे जास्त लक्ष गेलं आणि ती ‘पुण्यातली’ मैत्रिण होती. नंतर माझा चाळाच होऊन बसला की बोलताना बाकी सगळे काय म्हणतायत्‌ ती मेल, तो मेल की ते मेल” बाकी कशाकडे माझं लक्ष न जाता, मैत्रिण ती मेल म्हणाली याकडे जास्त लक्ष गेलं आणि ती ‘पुण्यातली’ मैत्रिण होती. नंतर माझा चाळाच होऊन बसला की बोलताना बाकी सगळे काय म्हणतायत्‌ ती मेल, तो मेल की ते मेल त्यावेळेस जास्तीत जास्त रेटींग ती मेल ला मिळालं होतं.\nत्यावेळेस बहुतेकांची ई-मेल अकाउंटस्‌ ही हॉट्मेल नाहीतर याहूवर असायची. कोणत्या वेबसाईटवर किती जास्त स्पेस मिळते हे पाहून तिथे इ-मेल अकाउंट उघडले जायचे. इंटरनेट सिक्युरिटी किंवा इतर फॅसिलीटीज्‌ जसं की चॅटींग, व्हिडिओ कॉलिंग वगैरे गोष्टी तर कोसों दूर होत्या. माझें सर्वात पहिलं अकाउंट हे युएस्‌ए.नेट वर होते कारण जेव्हा त्यावर ७ जीबी स्पेस मिळत होती, तेव्हा याहू, हॉटमेल वगैरे ५० ते ७० एम्‌बी स्पेस देत होते. आता ते अकाउंट बंद केलंय्‌. आजकाल ई-मेल अकाउंट ओपन करताना स्पेस हा क्रायटेरियाच लागू होत नाही कारण बहुतेक वेबसाईटस्‌वर अमर्यादीत जागा उपलब्ध करून दिलेली असते. सध्या मला तर वाटतंय्‌ की जीमेल आय्‌डी नाही अशी व्यक्ती (अर्थात नेट वापरणार्‍यांपैकी) शोधावी लागेल.\nसंवाद साधण्याचे साधन म्हणून राजेमहाराजेंच्या काळात कबुतरांना प्रशिक्षण देऊन संदेशाची देवाणघेवाण व्हायची. ब्रिटीशांच्या काळात संदेशाची देवाणघेवाण जलद होण्यासाठी पोस्ट ऑफिस ही संकल्पना आली. मला आठवतंय्‌ माझे आजोबा तर सकाळचा काही वेळ हा पत्र लिहण्यासाठी राखून ठेवायचे. या पोस्ट ऑफिसची जागा कुरियरने कधी घेतली हे कळालेच नाही. १०/१५ वर्षापूर्वी जर काही वस्तू सुरक्षितरित्या आणि जलद पाठवायची असेल तरच कुरियर केले जायचे. नंतर हळूहळू पत्रं, लग्नाची निमंत्रणं ही सुध्दा कुरियर केली जाऊ लागली. इंटरनेट्चा जसा प्रसार झाला आणि लोकांना याची उपयुक्तता पटली तेव्हा तर संदेशाची देवाणघेवाण अतिजलद होण्यासाठी ई-मेल , चॅटींग या गोष्टी वापरल्या जाऊ लागल्या. आजकालच्या लहान मुलांना पोस्ट ऑफिस काय असतं हे माहितच नाहिय्‌. शाळेत EVEच्या फिल्ड व्हिजीट मध्ये त्यांना पोस्ट ऑफिस दाखवले जाते. आता तर सोशल नेटवर्किंग साईट्स्‌ मुळे लोकांना ई-मेल वापरही कमी झालाय्‌. मध्यंतरी मी एका पेपरला वाचलं होतं की जसं पोस्ट हे कालबाह्य झालं आहे तसं येत्या काही वर्षात ई-मेल करणं हे ही कालबाह्य होईल. ऑफिशियल काही कामासाठी मेल वापरले जातील पण व्यक्तिगत संपर्काचे माध्यम म्हणून ई-मेलचा वापर खूपच कमी होईल. याची प्रचिती आत्ताच येऊ लागली आहे. ८/१० वर्षापूर्वी नवरा कामानिमित्त जेव्हा परदेशात जायचा तेव्हा संपर्कात राहण्याचे सर्वात स्वस्त माध्यम ई-मेल हेच होते. नंतर स्काईप आलं आणि सगळं चित्रच बदलून गेलं. नेटवर्किंग साईट्स्‌, ब्लॉग्ज, व्हिडीओ चॅटिंग यासारख्या सुविधा असताना ई-मेल चा वापर केवळ आलेल्या ई-मेल फॉरवर्ड करण्यासाठीच होतो. या सगळ्या बदलाचे आपण साक्षीदार आहोत हे काय कमी आहे\n2 प्रतिक्रिया Posted in असंच काहीही, दैनंदिन घडामोडी Tagged ई-मेल, चॅटिंग, पोस्ट, वेबसाईट\nहोतं असं कधी कधी….\nअसं कधी कधी होतं नां की एखादा दिवस हा खूप दगदगीचा, वैतागाचा जातो. माझा परवाचा शनिवार असाच होता. सकाळी चक्क सगळी कामं लवकर आवरून झाली. मग छान मूडमध्ये विचार आला की बरेच दिवसांपासून जी काही छोटी मोठी खरेदी करायची राहिली आहे, ती आज ऑफिसमधून लवकर निघून करून टाकू. हाच हाच तो क्षण ज्याने सुरवातीचा आनंदी मूड हा वैतागात बदलला ( आता असं वाटतंय्‌ तेव्हा मात्र वाटलं होतं की वा काय मस्त प्लॅनिंग केलं आहे. ) झालं मग मेन रोडला जाऊन खरेदी करायची तर माझी स्कूटी घेऊन जाणं जरूरी होतं. आजकाल मी बसनंच ऑफिसला जाते, अगदीच काही कारण असेल तरच स्कूटी नेते. कारणइथे वाचा . त्यामुळे गाडीत पेट्रोल संपत आलंय्‌ हे लक्षात नव्हतं.\nठरवल्याप्रमाणे ऑफिसमधून लवकर बाहेर पडले, मेन रोडला गेले. आमच्या भागात ज्या झाडूची किंमत ७० रू. सांगितली होती, त्यापेक्षा जास्त चांगला झाडू ५० रू. ला मिळाला. लगेच स्वतःची पाठ थोपाटून घेतली. खरेदी करायचा उत्साह अजून वाढला. नवीन टेबलक्लॉथ घ्यायचाय्‌ असं बरेच दिवसांपासून घोकत होते. मेनरोडला सर्व प्रकारचे कव्हर्स मिळणारे एक नवीनच झालेले दुकान दिसले. मग माझा मोर्चा तिकडे वळवला…. वेगवेगळ्या प्रकारची कव्हर्स, टेबलक्लॉथ वगैरे पहात होते, तेवढ्यात काय झाले माहीत नाही पण डोळ्यांसमोर हळूहळू अंधारी यायला लागली, सगळं दुकान माझ्याभोवती गरगर फिरायला लागलं, मला चक्कर येतेय हे लक्षात आल्यावर मी तिथल्या सेल्समनला म्हंटलं, “भैया कुछ बैठने के लिए है क्या मुझे चक्कर आ रहा है”. आता नवल वाटतंय्‌ की मला हे म्हणायला कसं सुचलं मुझे चक्कर आ रहा है”. आता नवल वाटतंय्‌ की मला हे म्हणायला कसं सुचलं सिनेमात दाखवतात तसं मी धाडकन्‌ पडले कशी नाही सिनेमात दाखवतात तसं मी धाडकन्‌ पडले कशी नाही तसा मला चक्कर येण्याचा फार अनुभव नाही. आणि काल चक्कर यायला काही कारण पण नव्हतं. नाष्टा, जेवण सर्व वेळेवर करून मग मी बाहेर पडले होते. कदाचित उन्हामुळे असेल… असो. आत्ता जे इथे लिहलंय्‌ ते सगळे विचार मी थोडीशी सावरल्यावर मनात आले. थोडं पाणी पिल्यावर बरं वाटायला लागलं. मग तिथून टेबलक्लॉथ घेतला , अजून थोडी खरेदी केली आणि तिथून निघाले. त्या दुकानदाराने विचारले, ” आप ठीक तो है नां , इस्कूटी पे जाओगे कैसे तसा मला चक्कर येण्याचा फार अनुभव नाही. आणि काल चक्कर यायला काही कारण पण नव्हतं. नाष्टा, जेवण सर्व वेळेवर करून मग मी बाहेर पडले होते. कदाचित उन्हामुळे असेल… असो. आत्ता जे इथे लिहलंय्‌ ते सगळे विचार मी थोडीशी सावरल्यावर मनात आले. थोडं पाणी पिल्यावर बरं वाटायला लागलं. मग तिथून टेबलक्लॉथ घेतला , अजून थोडी खरेदी केली आणि तिथून निघाले. त्या दुकानदाराने विचारले, ” आप ठीक तो है नां , इस्कूटी पे जाओगे कैसे” श्रृती यायच्या आत मला घरी पोचायचं होतं त्यामुळे तशीच निघाले. तसा अजून १५ मि. अवकाश होता. तसं बरंच जड सामान , एका साईडला झाडू अशी माझी वरात निघाली स्कूटीवरून…\nओव्हरब्रिजवरून खाली उतरले आणि स्कूटी आचके द्यायला लागली. गाडी रिझर्व्हला आलीय वाटतं असा विचार करून गाडी साईडला घेतली आणि पेट्रोलकॉक पाहीला तर तो ऑलरेडी रिझर्व्ह वर होता. माझ्या गाडीतले पेट्रोल संपले होते. चक्कर आल्याने आधीच थोड्ं अस्वस्थ वाटत होतं त्यात गाडीतलं पेट्रोल संपलेलं, जवळपास पेट्रोलपंप नाही, घड्याळाचे काटे पुढे सरकायला लागलेले, श्रृती आता पाच मिनिटांत घरी येईल, काय करायचं. मग लगेच डिसिजन घेतला की गाडी इथेच लावून रिक्षाने घरी जायचे. त्यातल्यात्यात थोडं डोकं चालवून, जवळच असणार्‍या मोठं हॉस्पिटलच्या जवळ स्कूटी लावली. हातात झाडू, जड पिशव्या, मनात वैताग,चरफड आणि मी पहातेय्‌ रिक्षाची वाट… मेली एक रिक्षा रिकामी दिसेना आणि जवळच्या रिक्षास्टॉपवरच्या रिक्षावाले कमी अंतर आहे म्हणून घरापर्यंत यायला तयार नाहीत. टेंशन वाढत चालले होते. तेवढ्यात समोरून एक रिक्षा येताना दिसली. पण ती शेअर-रिक्षा होती, ती काही घरापर्यंत आली नसती, जवळच्या स्टॉपपासून मला घरी चालत जायला लागणार होतं पण अजून वाट पहाणं परवडणार नव्हतं. हातात झाडू, जड पिशव्या, मनात वैताग,चरफड, रणरणणारे ऊन ,जवळचे पाणीही संपलेलं, त्यात अजून वैताग की घरी जाण्यासाठी तीन मजले चढून जायचेय्‌ (आमच्या अपार्ट्मेंटला लिफ्ट नाहीय्‌) … चालत चालत चालत मी घरी पोचले, दुसर्‍या मजल्यापर्यंत पोचतेय्‌ तेवढ्यात श्रुतीचा आवाज ऐकू आला. हुश्श…. केलेली खरेदी बघायचाही उत्साह उरला नव्हता. अजून परत जाऊन स्कूटी घेऊन यायची होती. तासाभरात निघू असा विचार करून थोडी झोप काढली.\nउठल्यावर बघते तर पावसाला सुरवात झाली होती…. अरे मगाशी थोड्यावेळापूर्वी ऊन मी म्हणत होतं आणि आत्ता मुसळधार पाऊस श्या काय चाललंय्‌ हे श्या काय चाललंय्‌ हे जसजसा वेळ जाऊ लागला तसतसे मनात काहीबाही विचार येऊ लागले.मी हॉस्पिटलजवळ गाडी लावून आता चार-पाच तास होऊन गेलेत…. सध्याचे दिवस किती वाईट आहेत…. कुणी गाडीला काही केलं तर जसजसा वेळ जाऊ लागला तसतसे मनात काहीबाही विचार येऊ लागले.मी हॉस्पिटलजवळ गाडी लावून आता चार-पाच तास होऊन गेलेत…. सध्याचे दिवस किती वाईट आहेत…. कुणी गाडीला काही केलं तर बेवारस गाडीतच बॉम्ब वगैरे असतात नां बेवारस गाडीतच बॉम्ब वगैरे असतात नां ती माझी गाडी आहे हे मला माहीत आहे पण त्या एरियाला ती गाडी अनोळखी आहे, बराच वेळापासून ती गाडी तिथेच आहे, बेवारस गाडी म्हणून कुणा तत्पर नागरिकाने पोलिंसांना कळवले तर ती माझी गाडी आहे हे मला माहीत आहे पण त्या एरियाला ती गाडी अनोळखी आहे, बराच वेळापासून ती गाडी तिथेच आहे, बेवारस गाडी म्हणून कुणा तत्पर नागरिकाने पोलिंसांना कळवले तर मनात शंकाकुशंकांनी थैमान घातले. मी चक्क टी व्ही लावून लोकल न्यूज चॅनलवर पाहिले अशी काही बातमी दिसतेय्‌ कां ते मनात शंकाकुशंकांनी थैमान घातले. मी चक्क टी व्ही लावून लोकल न्यूज चॅनलवर पाहिले अशी काही बातमी दिसतेय्‌ कां ते पावसाचा जोर जरासा कमी होताच रिकामी बाटली घेऊन श्रृती आणि मी पहिल्यांदा पेट्रोलपंपापर्यंत गेलो, पेट्रोल घेतले, मग उलट दिशेने जाणारी रिक्षा शोधायला लागले. नशिबाने रिक्षा लवकर मिळाली. परत त्या हॉस्पिटलजवळ पोचेपर्यंत धीर निघत नव्हता…. गाडी मी जशी लावली होती, तशीच ती आहे हे बघून जिवात जीव आला. पेट्रोल टाकून गाडी चालू झाल्यावर एक सुटकेचा निश्वास सोडला…. आता घरी जाऊन संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करणे शक्यच नव्हते. नवर्‍याला फोन करून एका नेहमीच्या ठिकाणी यायला सांगितले. नवर्‍याला भेटल्यावर सकाळपासून काय काय झालं ते बोलून टाकलं…. खरंतर चक्कर आलीय हे सांगायला नको होतं कारण तो उगाच काळजी करत बसतो. आता डॉक्टरकडे जाऊन सगळं चेकअप करू म्हणून मागे लागलाय्‌. असो. सगळं ऎकून झाल्यावर तो म्हणाला “मग कुठे जाऊया जेवायला पावसाचा जोर जरासा कमी होताच रिकामी बाटली घेऊन श्रृती आणि मी पहिल्यांदा पेट्रोलपंपापर्यंत गेलो, पेट्रोल घेतले, मग उलट दिशेने जाणारी रिक्षा शोधायला लागले. नशिबाने रिक्षा लवकर मिळाली. परत त्या हॉस्पिटलजवळ पोचेपर्यंत धीर निघत नव्हता…. गाडी मी जशी लावली होती, तशीच ती आहे हे बघून जिवात जीव आला. पेट्रोल टाकून गाडी चालू झाल्यावर एक सुटकेचा निश्वास सोडला…. आता घरी जाऊन संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करणे शक्यच नव्हते. नवर्‍याला फोन करून एका नेहमीच्या ठिकाणी यायला सांगितले. नवर्‍याला भेटल्यावर सकाळपासून काय काय झालं ते बोलून टाकलं…. खरंतर चक्कर आलीय हे सांगायला नको होतं कारण तो उगाच काळजी करत बसतो. आता डॉक्टरकडे जाऊन सगळं चेकअप करू म्हणून मागे लागलाय्‌. असो. सगळं ऎकून झाल्यावर तो म्हणाला “मग कुठे जाऊया जेवायला” बस्स आवडत्या हॉटेलात मनासारखं जेवण झाल्यावर (मनासारखी खरेदी झाली होतीच ती आत्ता जाणवली) दिवसभराचा वैताग , शीण , मानसिक / शारिरिक थकवा कुठल्या कुठे पळून गेला…..\n6 प्रतिक्रिया Posted in असंच काहीही, दैनंदिन घडामोडी Tagged ऊन, चक्कर, दगदग, वैताग\nमाझा ब्लॉग सुरू करून सव्वा वर्ष झालं…. वेळेअभावी ( उर्फ प्रतिभेअभावी )फार काही लेख लिहून झाले नाहीयेत… आज मी माझा ब्लॉग पाहिला आणि लक्षात आलं की अरे, आपल्या ब्लॉगला दहा हजाराहून जास्त लोकांनी भेट दिली आहे. तर माझ्या सर्व वाचकांना धन्यवाद देण्यासाठी ही आजची पोस्ट ….तन्वी, महेंद्रकाका, देवेन, सौरभ, हेरंब, हेमंत, सुहास अशा ब्लॉगर्सनी सातत्याने कौतुकाची शाबासकी दिली. याशिवाय कितीतरी अनोळखी वाचकांनी पोस्ट आवडल्याचे आवर्जून सांगितले आणि प्रतिकिया देऊन, पोस्टला सबस्क्रिप्शन देऊन माझा लिहण्याचा उत्साह वाढवला.. 🙂 🙂\nसर्वात महत्वाचे आभार ‘मराठी ब्लॉग विश्व’ चे ज्यांनी माझ्यापर्य़ंत १६५९ वाचक (आतापर्यंत) पोचवले आहेत 🙂 आणि अर्थात गुगलदादाचे 🙂 ज्याचा वापर करून वेगवेगळ्या शब्दांनी शोध घेत वाचक ‘जीवनतरंग’ वर आले. कोणकोणत्या शब्दांनी शोध घेत लोकं या साईटवर पोचले हे पाहिलं तर आश्चर्य वाटतं. कॉम्प्युटर, व्यसन, रंगकाम, सासू, प्रोत्साहन, अल्बम,नेटवर्किंग, हलवा, लग्न विश्वास, मोटीव्हेशन यासारखे शोध घेत येणार्‍यांना त्यांच्या शोधपूर्तीचे समाधान मिळाले असेल. मात्र ‘ताईला शू आली’ या व अशासारख्या शब्दांची लिंक या साईट्पर्यंत कशी काय पोचते हे मलाच शोधावे लागेल. ( आणि हे वाक्य कशाला कोण सर्च करेल)असो. तर ‘जीवनतरंग’ ला भेट देणार्‍या, प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे मनापासून आभार… असाच लोभ ठेवून माझा लिहण्याचा उत्साह वाढ्वाल अशी विनंतीवजा अपेक्षा….. 🙂\nतशी मी फार बडबडी नाहीय्‌ आणि बोलून मोकळं होणं हे मला फार जमत नाही. मला असं वाटतं की माझे हे गुण (/अवगुण) माझ्या लिखाणातही येतात. त्यामुळे माझ्या सुरवातीच्या काही पोस्ट वाचताना मला असं वाटलं की विषय चांगला आहे पण मी जे काही लिहलंय्‌ ते अजून फुलवता, खुलवता आलं असतं… ब्लॉग लिहण्याचा माझा व्यक्तीगत फायदा असा झाला की विचारात आणि पर्यायाने लिहण्यात अधिक सुसुत्रता येत गेली. आपण जसा विचार करतो तसं आपण लिहतो असं मला वाटतं. माझ्या लिहण्यातून मला समोरच्या व्यक्तीपर्यंत काही मत, विचार, अनुभव, वास्तव, निरीक्षणें पोचवायची असतील तर ते लिखाण समजायला सोपे हवे आणि ते सोपे करण्यासाठी जास्त सलग, सुसुत्र आणि स्पष्ट हवे. म्हणजेच माझे विचार सलग, सुसुत्र आणि स्पष्ट हवेत. आणि जसंजसं जास्त लिहू तसतसं विचार करण्याची पद्धतही परिपक्व होत जाते असं माझ्या लक्षात आलंय्‌. अर्थात विचार करण्याची योग्य पद्धत आणि योग्य विचार यांत बरेच अंतर आहे. मात्र योग्य विचारांपर्यंत पोचण्याची ही पहिली पायरी आहे असे म्हणता येईल. लिहण्यातला आनंद घ्यायला मी शिकतेय्‌. So Happy Writing to myself…\n6 प्रतिक्रिया Posted in दैनंदिन घडामोडी Tagged आभार, उत्साह, शोध\n“अगं हे काय प्रज्ञा, आज चालत गाडी (पक्षी : स्कूटी) सर्व्हींसिंगला दिलीय कां गाडी (पक्षी : स्कूटी) सर्व्हींसिंगला दिलीय कां” किमान १५ जणांनी तरी हा प्रश्न गेल्या महिन्याभरात मला विचारला असेल…\nत्याचं काय झालं की मागच्या महिन्यापासून ऑफिसला जाताना मी स्कूटी न नेता बसने जायला लागले. जेव्हा सुरवात केली तेव्हा सकाळी सकाळी माझ्या स्कूटीचे मागचे चाक पंक्चर झाले होते. ऑफिसला उशिर होत होता म्हणून मी मेनरोडपासून शेअर-रिक्षा पकडू असे ठरवले. आणि चक्क मेनरोडला पोचल्यापोचल्या २ मिनिटात सिटी बस आली…. अजून एक सांगायचे म्हणजे नाशिकला साधारण वर्षभरापूर्वी नविन सिटी बस आणल्यात. छान चकाचक, उभे राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी ऎसपैस जागा आणि महत्वाचे म्हणजे बसमध्ये संयत आवाजात वाजणारा FM रेडीओ….अशा छान छान बस काही ठराविक रूटवर चालू केल्या आहेत…ऑफिसमधल्या बहुतेकजणींनी अशा बसने प्रवास करून काय मस्त बस आहे, बसमध्ये किती छान वाटतं, मस्त गाणी ऎकत आपला स्टॉप कधी येतो ते कळतच नाही… असं सांगून सांगून मला जळवलं होतं… आणि तशातलीच एक छान बस माझ्यासमोर आल्यावर मी संधी दवडली नाही आणि बसने ऑफिसला जायचे ठरवले…मग तिकिट काढताना कळले की बसचा प्रवास किती economical आहे ते…..उतरताना कळाले की अरे, आपल्या ऑफिसच्या दारात तर बसचा स्टॉप आहे … त्यादिवसापासून ठरवूनच टाकले की आता रोज बसनेच ऑफिसला जायचे….\nइतकी वर्षे बाहेर कुठेही जायचं असलं तरी स्कूटीशिवाय माझं प्रस्थान व्हायचं नाही… साधं कोपर्‍यापर्यंत जायचं असलं तरी स्कूटी… ही सवय मला मोडायचीच होती. मग मी घेतलेला, किमान ऑफिसला तरी बसनं जायचं हा निर्णय योग्य कसा आहे ते मलाच पटवणारी काही कारणं मी शोधलीयत्….\n१. पेट्रोलचे भाव किती वाढलेत… आता एकट्याला जाण्यासाठी स्कूटी परवडत नाही.\n२. बसचा स्टॉप ऑफिसच्या अगदी दारातच आहे.\n३. घरून जाताना बसच्या स्टॉपपर्यंत जरी चालावे लागले तरी फक्त ५ ते ७ मिनिटेच चालावे लागते. चालणं आरोग्यासाठी, फिटनेससाठी चांगलंच…\n४. ‘परिघ’ हळूहळू आकुंचन पावतोय हे लक्षात येतंय्…. ५ ते ७ मिनिटे चालल्यावर एवढा परिणाम मग ऑफिसला चालतच जाऊ कां\n५. स्कूटीने जायला १० मिनिटे लागतात तर बसने १५ …. ठीक आहे … फार काही फरक नाही…. इतर मोठ्या शहरातल्या लोकांना तर ३० ते ४५ मिनिटांचा ट्रॅव्हल करून ऑफिसला जावे लागते… त्यामानाने मी किती सुखी आहे…\n६. परत येताना बहुतेकदा बस उशिरा येते. पण स्टॉपवर नुसतं थांबलं तरी इतरांच्या गप्पा ऎकण्यात छान वेळ जातो… आणि माझ्या ऑफिसच्या जवळच्या स्टॉपवर खूप कॉलेजचे , शाळेचे विद्यार्थी असतात, त्यांच्या गप्पा ऎकणं हा मस्त टाईमपास आहे.\n७. जरी कुणाच्या गप्पा नाही ऎकू आल्या तरी येणार्‍याजाणार्‍यांचं निरिक्षण करण्यात , त्यावरून काही तर्क बांधण्यात छान वेळ जातो… (सध्या मी ‘संपूर्ण शेरलॉक होम्स’ वाचतेय्… त्यामुळे असं निरिक्षण करण्याची , त्यावरून तर्क करण्याची खोड लागलीय…)\n८. येताजाताना वाटेतली काही कामं करायची असतील तर स्कूटी बरी पडते. असा विचार मनात आल्याक्षणीच कायकाय कामं करायची असतात याची लिस्टच काढली. पेट्रोल भरणे, भाजी / फळं / वाणसामान आणणे, श्रृतीच्या शाळेत टीचरला भेटायला जाणे, वगैरे…नंतर लक्षात आलं की यातली बरीचशी कामं ऑकेजनली करावी लागतात…काही कामं घरी येऊन नंतर केली तरी चालतात. त्यामुळे या कारणासाठी बसने जाणं रद्द करायची गरज नाही. फारतर अशा एखाद्या वेळेस स्कूटीनं जाऊ…\n९. आता पावसाळ्यात तर स्कूटीपेक्षा बसने जाणं केव्हाही चांगलं…. एकतर नव्या बसेस गळक्या नाहीयेत्‌… स्कूटीवरून पावसात जायचं म्हणजे गाडी स्लो चालवावी लागते नाहीतर गाडी स्लीप होण्याचे चान्सेस जास्त… तो रेनकोट घाला , काढा हा वैताग …घरून निघताना पाऊस नाही म्हणून रेनकोट घातला नाही आणि थोड्ं पुढे गेल्यावर पाऊस लागला तर वाटेत कुठेतरी गाडी थांबवून रेनकोट घालावाच लागतो…हा प्रकार मलातरी वैतागवाणा वाटतो… (आता जरा जास्तच असं वाटू लागलंय्…)\n१०. जरा चार लोकांमध्ये मिसळता येतं.. बसमधून ये-जा करताना तर काही काही नमुने भेटतात… मग परत माझ्यातला शेरलॉक होम्स जागा होतो….\n११. बसची वाट पहाण्यामुळे पेशन्स वाढतो… पेशन्स इज अ ग्रॆट स्ट्रेंग्थ यु नो… माझी चिडचिड हल्ली कमी झालीय् वाटतं….\n१२. आणि सर्वात महत्वाचे कारण – होता होईल तितका पर्यावरण रक्षणाला हातभार लावता येतो. माझ्या स्कूटीचं PUC आहे हो पण स्कूटी न नेता बसने गेले तर तेवढीच पेट्रोल बचत पर्यायाने उर्जा बचत आणि ०.००००००१% ने का असेना , प्रदुषण कमी….आणि तेवढाच पर्यावरण रक्षणाला हातभार…. आपण काही ‘Go Green’, ‘Green India’ , ‘Save Trees’ असा जागतिक संदेश देणारे टि-शर्टस्‌ घालून पर्यावरणाचे रक्षण करा असे सांगायला डोल्लेशोल्ले असणार्‍या अभिनेत्यासोबत रॅम्पवर नाही चालणारोत… तेव्हा कृतीतून पर्यावरणचे रक्षण केलेले चांगलें … कसें पण स्कूटी न नेता बसने गेले तर तेवढीच पेट्रोल बचत पर्यायाने उर्जा बचत आणि ०.००००००१% ने का असेना , प्रदुषण कमी….आणि तेवढाच पर्यावरण रक्षणाला हातभार…. आपण काही ‘Go Green’, ‘Green India’ , ‘Save Trees’ असा जागतिक संदेश देणारे टि-शर्टस्‌ घालून पर्यावरणाचे रक्षण करा असे सांगायला डोल्लेशोल्ले असणार्‍या अभिनेत्यासोबत रॅम्पवर नाही चालणारोत… तेव्हा कृतीतून पर्यावरणचे रक्षण केलेले चांगलें … कसें (पुणेरी स्टाईलमध्ये अनिनासिक स्वरात ‘कसें’ हा शब्द वाचला तर या मुद्याचे महत्त्व जास्त कळेल…)\nबघा एवढे सारे फायदे मला जाणवले… ते ही एका महिन्यांत…. मग योग्यच आहे बसनं जाणं येणं…\nचला बाय् बाय्… बसची वेळ झालीय्…\n4 प्रतिक्रिया Posted in असंच काहीही, दैनंदिन घडामोडी, नविन काहीतरी Tagged निर्णय, बस, स्कूटी\nई-मेल्स्‌, एसेमेस्‌ या गोष्टी फॉरवर्ड करण्याच्या असतात. अगदी काही महत्वाचे , घरगुती किंवा ऑफिशियल असणारे ई-मेल्स्‌, एसेमेस्‌ सोडले तर आपण बहुतेकदा आलेले ई-मेल्स्‌, एसेमेस्‌ फॉरवर्ड करत असतो. किंवा मी तर असेच करते. मला कधीकधी प्रश्न पडतो हा जो ई-मेल्‌, एसेमेस्‌ मला कुणीतरी फॉरवर्ड केला आहे, तो सर्वात पहिल्यांदा कुणी बरं लिहला असेल बहुतेक ई-मेल्स्‌, एसेमेस्‌ हे कोणत्यातरी वेबसाईटवरून उचलेले असतात…. वॉलपेपर्स, चित्रं, काही इल्यूजन्स , पेंटींग्ज, काही डिस्काऊंट ऑफर्स, काही नीतिकथा आणि “ओळखा पाहू या सेरीज पुढचा नंबर कोणता बहुतेक ई-मेल्स्‌, एसेमेस्‌ हे कोणत्यातरी वेबसाईटवरून उचलेले असतात…. वॉलपेपर्स, चित्रं, काही इल्यूजन्स , पेंटींग्ज, काही डिस्काऊंट ऑफर्स, काही नीतिकथा आणि “ओळखा पाहू या सेरीज पुढचा नंबर कोणता” या प्रकांरांमधले हे फॉरवर्डेड ई-मेल्स असतात. असं बर्‍याचदा होतं की मला आलेला छानसा ई-मेल मी कोणालातरी फॉरवर्ड करते आणि काही दिवसांनंतर घुमून-फिरून तोच ई-मेल मला परत येतो.\nएसेमेस्‌चंही तसंच असतं पण ई-मेलसारखे एसेमेस्‌ फुकट नसतात. काही मोबाईल कंपन्या एसेमेस्‌ पॅकेज देऊन दिवसाला २० पासून महिन्याला ५००० पर्यंत एसेमेस फुकट किंवा १० पैसे, २० पैसे पर एसेमेस अशा किंमतीत देऊ करतात. काही दिवसांपूर्वी मला या GM , GN SD TC च्या एसेमेस्‌नी वैताग आणला होता. सुरवातीला मजा म्हणून किंवा फुकटच आहे म्हणून मी सुद्धा हे GM , GN SD TC चे मेसेजेस फॉरवर्ड केले पण नंतर कंटाळा आला. रोज काय चंद्र , तारे, चांदण्या, सुगंध , जाई-जुई, रातराणी असल्या गोष्टींना वेठीला धरायचं आणि कुणालातरी ‘गुड नाईट’ विश करायचं…. बोअर…. आणि मी GM , GN SD TC चे मेसेजेस फॉरवर्ड करणं बंद केल्यावर आपोआप मलाही असे मेसेज येणं बंद झालं. (कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है , करोगे तो भरोगे असं काही…)पण काही मेसेज मात्र खरंच खूप सुंदर असतात, खूप निराश झालेली असताना मैत्रींणीने पाठवेला छानसा ‘मोटीव्हेशल’ मेसेज काळ्या ढगाला असणार्‍या सोनेरी कडेची आठवण करून देतो. (खूप साहित्यिक झालेय हे वाक्य पण दुसरी उपमा आठवेना…) काही मेसेज वाचून खुदकन्‌ हसू येते (यांत सँटा-बँटा किंवा तत्सम लोकांचा सहभाग नाही…या कृ. नों. घे.). मी तर अशा छान छान मेसेजेस्‌चं कलेक्शन करून ठेवलंय्‌….\nयावरून लहानपणीची एक आठवण झाली. तेव्हा रोज वर्गात फळ्यावर सुविचार लिहायचा असायचा. मग आम्ही एक सुविचाराची वही केली होती आणि त्यात वेगवेगळे सुविचार, संतवचने वगैरे लिहलेली असायची, शिवाय शाळा सुटल्यावर सर्व वर्गात फिरून प्रत्येक वर्गातले सुविचार त्यात लिहायचे, दुसर्‍या शाळांमधल्या मैत्रीणींबरोबर या सुविचारांची देवाणघेवाण चालायची आणि आपल्यालाच सुविचार लिहता यावा म्हणून रोज शाळेत लवकर जायची… सगळ्यात पहिल्य़ांदा वर्गात पोचायची घाई असायची… कारण जो कुणी पहिल्यांदा येईल त्यालाच सुविचार लिहण्याचा ’मान’ मिळायचा\nतर मी अशा छान छान मेसेजेस्‌चं कलेक्शन करून ठेवलंय्‌. त्यातले काही मला जाम आवडलेले मेसेजेस मी इथे लिहीत आहे. अर्थात यातले काही, बरेचसे किंवा सगळे मेसेज तुमच्याकडे असतील.. सगळे मेसेजेस हे इंग्रजीमधून आहेत आणि त्याच भाषेत त्यातला खराखुरा मेसेज… अर्थ मनापर्यंत भिडतो म्हणून ते तसेच देत आहे.\n Patience makes you mentally strong while silence makes you emotionally strong. (हा मेसेज माझ्या नवर्‍याने पाठवलाय्‌ आणि तो फॉरवर्डेड नाहीय्‌… त्यानेच लिहलाय तो… अशाच एका घरगुती Patience आणि silence ची कसोटी पाहणार्‍या काळात हा मेसेज त्याने पाठवला आणि झालेल्या घटनांकडे मी शांतपणे, त्रयस्थाच्या नजरेतून पाहू शकले… )\nअसाच एक जबर्‍या मेसेज\n4 प्रतिक्रिया Posted in दैनंदिन घडामोडी Tagged अर्थ, मेसेज, सुविचार\nकु. वैशाली दुष्यंत कुलकर्णी आणि सौ. प्रज्ञा रविंद्र महाजन…. यात साम्य काय आहे तर ती अस्मादिकांची नावें आहेत. माझं बॅंकेत खातं चालू करायचं होतं तेव्हा पुराव्यासाठी जी कागदपत्रे जमा केली होती, त्यात काही कागदपत्रे कु. वैशाली दुष्यंत कुलकर्णी या नांवाची होती. मग दोन्ही नावांची व्यक्ती एकच आहे हे दाखवण्यासाठी मॅरेज सर्टीफिकेट, पॅन कार्ड पुरावा म्हणून द्यावे लागले….लग्नानंतर मधलं नांव बदलणार हे मुलींच्या बाबतीत होत असतं….काही भाग्यवान अशा असतात की त्यांना सासरपण माहेरच्या आडनावांचं मिळतं…. एखादी थ्री ईडीयट्स मधली करीना सांगते – वांगडू…. तर ती अस्मादिकांची नावें आहेत. माझं बॅंकेत खातं चालू करायचं होतं तेव्हा पुराव्यासाठी जी कागदपत्रे जमा केली होती, त्यात काही कागदपत्रे कु. वैशाली दुष्यंत कुलकर्णी या नांवाची होती. मग दोन्ही नावांची व्यक्ती एकच आहे हे दाखवण्यासाठी मॅरेज सर्टीफिकेट, पॅन कार्ड पुरावा म्हणून द्यावे लागले….लग्नानंतर मधलं नांव बदलणार हे मुलींच्या बाबतीत होत असतं….काही भाग्यवान अशा असतात की त्यांना सासरपण माहेरच्या आडनावांचं मिळतं…. एखादी थ्री ईडीयट्स मधली करीना सांगते – वांगडू…. नहीं नहीं, मै शादी के बाद अपना सरनेम चेंज नही करूंगी….. 🙂 अशांचं प्रमाण हळूहळू वाढतंय्‌ असं म्हणतात बुवा…. 🙂 (आजचा मुद्दा हा नाहीय्‌.)\nमाझ्याबाबतीत नांव, मधलं नांव, आडनांव सगळंच बदललं…. माझ्या नणंदेचं नांवही वैशाली त्यामुळे माझं नांव बदलावंच लागलं. तेव्हा नवरा म्हणाला होता- तुला वैशाली म्हणून हाक मारली तर बहिणीला हाक मारतोय असं वाटेल. 🙂 (शेक्सपियर बाबा ऎकतोयस्‌ नां, नावांत काय आहे, कळालं कां…..) मग नवर्‍याने सांगितलं की आता तुला तुझ्या आवडीचं नांव मिळेल. तुला आवडणारी नावं सांग. मी त्यातलं एखादं निवडतो . कारण ते नांव तुझं असलं तरी शेवटी ते जास्त वेळा मी म्हणणार आहे… 🙂 वॉव … हा दृष्टीकोन आवडला मला. मी नाही माझं नांव बदलणार यापेक्षा बदलावंच लागणार आहे तर आपल्या आवडीचं नांव कां निवडू नये) मग नवर्‍याने सांगितलं की आता तुला तुझ्या आवडीचं नांव मिळेल. तुला आवडणारी नावं सांग. मी त्यातलं एखादं निवडतो . कारण ते नांव तुझं असलं तरी शेवटी ते जास्त वेळा मी म्हणणार आहे… 🙂 वॉव … हा दृष्टीकोन आवडला मला. मी नाही माझं नांव बदलणार यापेक्षा बदलावंच लागणार आहे तर आपल्या आवडीचं नांव कां निवडू नये बारशाला जेव्हा आई, बाबा, आत्या किंवा घरातील कोणी वडीलधारे नांव ठरवतांत तेव्हा आपल्याला चॉईस नसतो. ते त्यांच्या आवडीचं नांव ठेवतात. मग मला संधी मिळतेय्‌ तर चांगलं मनासारखं नांव ठेवून घेऊ. 🙂 असा विचार मी तेव्हा केला…. या गोष्टीला १० वर्ष झाली असली तरी आत्ता कालपरवा घडल्याप्रमाणे सगळं लख्ख आठवतंय्‌….. 🙂 त्यावेळी मला ‘ई’ कारान्त नावं आवडायची नाहीत, माझं नांव मोठ्ठं आहे असं वाटायचं. माझं स्वतःचं नांव ‘ई’ कारान्त- वैशाली होतं म्हणून असेल कदाचित… म्हणजे कसं आपले केस सरळ असतील तर कुरळे केस आवडतात, किंवा डोळे काळे असतील तर घारे डोळे आवडतात तसं….. 🙂 मला ‘आ’ कारान्त नावं आवडायची म्हणजे श्रध्दा, आकांक्षा, शलाका, विशाखा वगैरे…. त्याप्रमाणं मी काही नावं नवर्‍याला सुचवली… त्यानं ‘प्रज्ञा’ नांव सुचवलं म्हणाला तुला आवडतंय्‌ कां बघ…. बारशाला जेव्हा आई, बाबा, आत्या किंवा घरातील कोणी वडीलधारे नांव ठरवतांत तेव्हा आपल्याला चॉईस नसतो. ते त्यांच्या आवडीचं नांव ठेवतात. मग मला संधी मिळतेय्‌ तर चांगलं मनासारखं नांव ठेवून घेऊ. 🙂 असा विचार मी तेव्हा केला…. या गोष्टीला १० वर्ष झाली असली तरी आत्ता कालपरवा घडल्याप्रमाणे सगळं लख्ख आठवतंय्‌….. 🙂 त्यावेळी मला ‘ई’ कारान्त नावं आवडायची नाहीत, माझं नांव मोठ्ठं आहे असं वाटायचं. माझं स्वतःचं नांव ‘ई’ कारान्त- वैशाली होतं म्हणून असेल कदाचित… म्हणजे कसं आपले केस सरळ असतील तर कुरळे केस आवडतात, किंवा डोळे काळे असतील तर घारे डोळे आवडतात तसं….. 🙂 मला ‘आ’ कारान्त नावं आवडायची म्हणजे श्रध्दा, आकांक्षा, शलाका, विशाखा वगैरे…. त्याप्रमाणं मी काही नावं नवर्‍याला सुचवली… त्यानं ‘प्रज्ञा’ नांव सुचवलं म्हणाला तुला आवडतंय्‌ कां बघ…. हाय्‌….तेव्हाचे काय मोरपंखी दिवस होते की तो जे म्हणेल ते आवडायचंच….. 🙂 ( असो, हाही आजचा मुद्दा नाहीय्‌) तर मला नांव आवडलं – माझ्या सगळ्या अटींमधे बसणारं… ‘आ’ कारान्त , छोटं आणि सहजासहजी अपभ्रंश न करता येणारं….\nआमचं लग्न ठरल्याठरल्या माझं नांव काय ठेवायचं हे ठरवलं गेलं. त्यावेळी जेव्हा ‘तिकडून’ फोन यायचा आणि चुकुन माझ्याऎवजी माझ्या आई-बाबांनी फोन उचलला तर ‘प्रज्ञा आहे कां, तिच्याकडे फोन देता कां’ अशी विचारणा झाली की त्यांना थोडं गोंधळायला व्हायचं. हळूहळू त्यांनाही मला ‘प्रज्ञा’ म्हणून बोलावलेलं ऎकायची सवय झाली. माझं मन तर आता असं तयार झालं आहे की नाशिकला कुणी मला वैशाली म्हणून हाक मारली तर पटकन्‌ ‘ओ’ दिली जात नाही. माहेरी गेले की तिकडे सगळे ओळखीचे, नातेवाईक, मैत्रिणी, शेजार-पाजारचे मला ‘वैशाली’ म्हणूनच बोलावतात आणि इकडे सासरी सगळे ‘प्रज्ञा’ म्हणूनच बोलावतात…..‘वैशाली’ अशी हाक ऎकली की “काय गं’ अशी विचारणा झाली की त्यांना थोडं गोंधळायला व्हायचं. हळूहळू त्यांनाही मला ‘प्रज्ञा’ म्हणून बोलावलेलं ऎकायची सवय झाली. माझं मन तर आता असं तयार झालं आहे की नाशिकला कुणी मला वैशाली म्हणून हाक मारली तर पटकन्‌ ‘ओ’ दिली जात नाही. माहेरी गेले की तिकडे सगळे ओळखीचे, नातेवाईक, मैत्रिणी, शेजार-पाजारचे मला ‘वैशाली’ म्हणूनच बोलावतात आणि इकडे सासरी सगळे ‘प्रज्ञा’ म्हणूनच बोलावतात…..‘वैशाली’ अशी हाक ऎकली की “काय गं थांब गं थोडी, येतेय नां मी…. थांब गं थोडी, येतेय नां मी….” असं म्हंटलं तरी चालतं पण ‘प्रज्ञा’ अशी हाक ऎकली की “ओ, आले हं….”(एकदम नाजूक, गोड आवाजात वाचा म्हणजे तसा फिल येईल…) असं आपसूकच उत्तर येतं आणि हा स्वीचओव्हर इतका नकळत होतो…..\nखरंच आपण बायकाच एवढं ‘अ‍ॅडजेस्ट’ करून घेऊ शकतो… 🙂 (हा तर सर्वकाळचा मुद्दा आहे नां\n2 प्रतिक्रिया Posted in दैनंदिन घडामोडी, मिश्कीली Tagged नांव, वैशाली, शेक्सपियर\nट्रॅफिकचे नियमांचं पालन करायचं असतं कां\nकाल मी एका ट्रॅफिक सिग्नलवर तो सिग्नल हिरवा व्हायची वाट पहात होते त्या ३०-३५ सेकंदात जे घडलं ते पाहून वरचा प्रश्न माझ्या मनात आला. तर काल घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा नाशिकच्या अगदी मेन रोडवर सिग्नलसाठी थांबावे लागले. आता या सिग्नलवर (चक्क ) चालू असलेल्या ‘टायमर’ मुळे कळाले की सिग्नल सुटायला अजून ५१ सेकंद बाकी आहेत. मग स्कूटीचे इंजिन बंद करून सिग्नल सुटायची वाट पहात थांबले. हळूहळू वाहनांची गर्दी वाढायला लागली. सिग्नल सुटायला ३१ सेकंद बाकी असताना तीन बाईकस्वार आले. म्हणजे एकाच बाईकवर तिघेजण होते आणि जोरजोरात , कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत , बाकीच्या वाहनांना सरकून जागा द्यायला लावत ते पुढे आले. सिग्नल सुटायला अजून २७ सेकंद बाकी होते. मग “च्याxxx, एवढा वेळ वेट कोण करणार) चालू असलेल्या ‘टायमर’ मुळे कळाले की सिग्नल सुटायला अजून ५१ सेकंद बाकी आहेत. मग स्कूटीचे इंजिन बंद करून सिग्नल सुटायची वाट पहात थांबले. हळूहळू वाहनांची गर्दी वाढायला लागली. सिग्नल सुटायला ३१ सेकंद बाकी असताना तीन बाईकस्वार आले. म्हणजे एकाच बाईकवर तिघेजण होते आणि जोरजोरात , कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत , बाकीच्या वाहनांना सरकून जागा द्यायला लावत ते पुढे आले. सिग्नल सुटायला अजून २७ सेकंद बाकी होते. मग “च्याxxx, एवढा वेळ वेट कोण करणार” असं म्हणत तो सिग्नल तोडून पुढे निघाले, जात असताना मागच्यांना मूर्खात काढायला विसरले नाहीत. आता परिस्थिती अशी होती की आमच्या उजव्या बाजूचा सिग्नल संपून ३ सेकंद झाले होते तरीही तिकडची वाहने जाण्याचे थांबले नव्हते, आमच्या समोरचा सिग्नल चालू होता आणि तिकडूनही वाहने जाणे चालू होते, तशात हे ‘सिग्नल तोडे’ मधे घुसलेले…..त्या तिघांनी जोरजोरात , कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत वाजवत पुढे जाणे चालू ठेवले, बाकिच्यांनी त्यांचा उद्धार चालू केला तरी त्यांना काही फरक पडत नव्हता , कारण त्यांना असं किती अंतर पार करायचं होतं ” असं म्हणत तो सिग्नल तोडून पुढे निघाले, जात असताना मागच्यांना मूर्खात काढायला विसरले नाहीत. आता परिस्थिती अशी होती की आमच्या उजव्या बाजूचा सिग्नल संपून ३ सेकंद झाले होते तरीही तिकडची वाहने जाण्याचे थांबले नव्हते, आमच्या समोरचा सिग्नल चालू होता आणि तिकडूनही वाहने जाणे चालू होते, तशात हे ‘सिग्नल तोडे’ मधे घुसलेले…..त्या तिघांनी जोरजोरात , कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत वाजवत पुढे जाणे चालू ठेवले, बाकिच्यांनी त्यांचा उद्धार चालू केला तरी त्यांना काही फरक पडत नव्हता , कारण त्यांना असं किती अंतर पार करायचं होतं (आणि महत्वाचं म्हणजे भारत-पाकिस्तान मॅच थोड्याच वेळात चालू होणार होती नां (आणि महत्वाचं म्हणजे भारत-पाकिस्तान मॅच थोड्याच वेळात चालू होणार होती नां) इतर कुणाच्या लक्षात येईपर्यंत ते दुसर्‍या टोकाला पोचले सुध्दा आणि निघूनही गेले. मग आमच्यासारखे जे अजूनही सिग्नल सुटायची वाट पहात होते, त्यांच्यात आपापसात बोलणं चालू झालं ,”पाहिलंत, काय ती पोरं”, “च्याxxx, आपण काय वेडे म्हणून सिग्नल सुटायची वाट पहात थांबलोय कां) इतर कुणाच्या लक्षात येईपर्यंत ते दुसर्‍या टोकाला पोचले सुध्दा आणि निघूनही गेले. मग आमच्यासारखे जे अजूनही सिग्नल सुटायची वाट पहात होते, त्यांच्यात आपापसात बोलणं चालू झालं ,”पाहिलंत, काय ती पोरं”, “च्याxxx, आपण काय वेडे म्हणून सिग्नल सुटायची वाट पहात थांबलोय कां” , “कानाला धरून एकेकाला ट्रॅफिकचे नियम शिकवायला पाहिजेत”, “बापाकडे पैसा असेल चिक्कार , मग सुचतात असले धंदे. “……\nखरंच रहदारीचे नियम हे प्रत्येकाला माहिती असतात पण त्याचं पालन मात्र आपल्या सोईनुसार, स्वभावानुसार, सव‌यीनुसार केलं जातं. आमच्या ऑफिसच्या उजव्या बाजूचा रस्ता हा फक्त जाण्यासाठी वन-वे आहे आणि डाव्या बाजूचा रस्ता मागच्या रस्त्यावरून येण्यासाठे वन-वे आहे. पण प्रत्येकालाच घाई एवढी असते की तो वन-वे चा बोर्ड पहाण्याइतकाही कुणाला वेळ नसतो. थोडंसंच अंतर जायचं म्हणून चुकिच्या दिशेने वाहने चालवली जातात. जोराजोरात हॉर्न वाजवत १००-१२० च्या वेगात वाहन चालवणं, पुढे जाताना मागच्या वाहनाला ‘कट’ मारून पुढे जाणं हे तर खूप कॉमन झालंय्‌…आपल्याला पुढे उजव्या/डाव्या बाजूला वळायचं आहे, तर आपले वाहन थोडं आधीपासूनच त्या दिशेला चालवणं हे योग्य असतं. कळतंय्‌ पण वळत नाही. अर्थात या नियमांचं पालन हे आवर्जून केलं जातं पण कधी तर ‘मामा’ आपल्या नजरेच्या टप्प्यात असेल तर एरवी चलने दो. मग जे प्रामाणिकपणे नियम पाळतात, त्यांनाही कधीतरी वाटतंच की “अरे,आपणच काय घोडं मारलंय्‌ म्हणून आपण शिस्तीत वागायचं तर ‘मामा’ आपल्या नजरेच्या टप्प्यात असेल तर एरवी चलने दो. मग जे प्रामाणिकपणे नियम पाळतात, त्यांनाही कधीतरी वाटतंच की “अरे,आपणच काय घोडं मारलंय्‌ म्हणून आपण शिस्तीत वागायचं” मग तेही ह्ळूहळू नियमांचं उल्लंघन करू लागतात. (सगळेच असं करत नाहीत. याची कृ. नों. घ्या.)\nशेवटी शिस्त पाळणं हे आपल्याच फायद्याचं असतं. वरच्या प्रसंगात जर काही अपघात झाला असता तर गाडीचं झालेलं नुकसान भरून येऊ शकेल, पण त्या व्यक्तीला काही दुखापत झाली तर त्याच्या आयुष्यातले काही महत्वाचे तास, दिवस, वर्षे वाया जातात, त्याची मोजदाद कशातही करता येत नाही. आपल्याला स्वत:ला काही झालं तर ठिक आहे, आपल्याच चुकीनं हे घडलं म्हणून पश्चाताप तरी करता येईल पण जर आपल्या चुकीची सजा दुसर्‍या कुणाला भोगावी लागली तर आयुष्यभर ही गोष्ट पोखरत राहते. तेव्हा कृपया रहदारीचे नियम पाळा, जे पाळत आहेत त्यांनी तसंच चांगलं वागणं चालू ठेवा आणि इतरांनाही रहदारीच्या नियमांचं पालन करण्यासाठी प्रवृत्त करा……\n(कोणाला सल्ला देण्याएवढी मी मोठी नाहीय्‌, पण कळकळीनं जे सांगावसं वाटलं ते इथं सांगितलेय्‌….)\n१ प्रतिक्रिया Posted in दैनंदिन घडामोडी, नविन काहीतरी Tagged ट्रॅफिकचे नियम, फायदा, रहदारीचे नियम, सिग्नल\nस्टीफन कोवेचे ९०-१० तत्त्व\nहोतं असं कधी कधी….\nसर्वाधिक वाचल्या गेलेल्या पोस्टस्‌\n मग पुढचे लिखाण तुमच्या ई-मेल वर मिळवा.... इथे तुमचा ई-मेल पत्ता द्या.....\nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sunil-ambris-creates-history-with-rare-debut-dismissal/", "date_download": "2018-04-24T06:27:40Z", "digest": "sha1:FFIPCLJQAMKK3MO75VRE46J65CKRSUVR", "length": 7779, "nlines": 114, "source_domain": "mahasports.co.in", "title": "असा बाद होणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ! - Maha Sports", "raw_content": "\nअसा बाद होणारा तो जगातील पहिलाच खेळाडू \nअसा बाद होणारा तो जगातील पहिलाच खेळाडू \nकसोटी कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर हिट विकेट बाद होणारा सुनील अम्बरीस हा पहिलाच खेळाडू बनला आहे. तो गोल्डन डक अर्थात एकही धाव न करता बाद झाला आहे.\nआज विंडीज विरुद्ध न्यूझीलँड यांच्यातील पहिला कसोटी सामना येथील वेलिंग्टन येथे सुरु झाला. यावेळी न्यूझीलँडचा कर्णधार केन विलियम्सन ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.\nआजच्या सामन्यात न्यूझीलँड कडून टॉम ब्लुन्डेल तर विंडीजकडून सुनील अम्बरीस यांनी कसोटी पदार्पण केले. १ वनडे सामना खेळलेल्या सुनील अम्बरीससाठी हे पदार्पण नक्कीच कायम स्मरणात राहणारे ठरले. कारण जेव्हा तो ३०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हिट विकेट झाला तेव्हा त्याच्या नावावर एक नकोसा विक्रमही जमा झाला.\nया चेंडूचा सामना करताना त्याचा पाय स्टंपला लागला आणि बेल्स खाली पडल्या. यामुळे त्याला बाद देण्यात आले.\nकसोटी पदार्पणात ० धावा अर्थात गोल्डन डकवर हिट विकेट होणारा तो पहिला फलंदाज ठरला. २००३ नंतर पदार्पणात हिट विकेट ठरणारा तो पहिला खेळाडूही ठरला.\nआजपर्यंत ११ खेळाडू कसोटी पदार्पणात हिट विकेट ठरले आहेत. तर ६३ खेळाडू हे पदार्पणातच गोल्डन डकवर बाद होणारा तो ६३वा खेळाडू ठरला.\nगोल्डन डक म्हणजे काय\nएखादा खेळाडू जेव्हा तो खेळलेल्या पहिल्याच चेंडूवर बाद होतो त्याला गोल्डन डक असे म्हटले जाते.\nहिट विकेट म्हणजे काय\nजेव्हा गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर फलंदाज त्याला सामोरा जातो त्यावेळी त्याच्याकडून स्टंपवरील बेल्स बॅट किंवा शरीराचा अन्य भाग किंवा कपडे/ हेल्मेट या वस्तू लागल्यामुळे पडते तेव्हा फलंदाजाला बाद दिले जाते.\nएशियन कबड्डी चॅम्पिअनशिप सामन्यांचे प्रक्षेपण व्हायला पाहिजे होते- दीपक हुडा \nतिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी येथे फिरोजशाह कोटलावरील ही आकडेवारी आपल्याला माहित आहे का\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t15983/", "date_download": "2018-04-24T06:46:39Z", "digest": "sha1:AG65YAZPXFOM3WIACCZ5T76CXRTCLA6Y", "length": 3212, "nlines": 74, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Bhakti Kavita-आला वाजत गाजत गणेशा आला", "raw_content": "\nआला वाजत गाजत गणेशा आला\nआला वाजत गाजत गणेशा आला\nआला वाजत गाजत गणेशा आला\nआला , वाजत गाजत , नाचत आला\nचैतन्याने उजळले साऱ्या मनाला\nमना मनांवर जनांच्या स्वार रे झाला\nतुझ्या रूपाने सर्वांना मोहवण्या आला\nआला , गर्जत नादात , घरात आला\nतुझ्या येण्याने घराचा कायापालट झाला\nउत्साहाचा झरा साऱ्या मनांत वाहिला\nतुझ्या अस्तित्वाने वास्तूचा कोपरा सुखावला\nतुझ्या ६४ विद्येवर जो तो रे भाळला\nप्रत्येकाने तुला भक्ती भावाने पूजिला\nतुला प्रत्येक रूपांत माणसाने घडविला\nतू प्रत्येक रूपांत तेवढाच आवडला\nतुझ्या भक्तीत जो तो लीन रे झाला\nभेदभाव सारे माणूस विसरून गेला\nफक्त तूच हृदयाचा राजा रे झाला\nतूच गणेशा माणसाचा देव रे झाला\nसंजय एम निकुभ , वसई\nदि. २९. ८. १४ वेळ : १०. ३० स .\nआला वाजत गाजत गणेशा आला\nRe: आला वाजत गाजत गणेशा आला\nआला वाजत गाजत गणेशा आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2012/02/blog-post_4594.html", "date_download": "2018-04-24T06:58:56Z", "digest": "sha1:SDLQK7CBYINPD2V5U7QQ34PWGLRVOALH", "length": 17890, "nlines": 331, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: आवाज कुणाचा... मराठी माणसाचाच", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nशनिवार, 18 फ़रवरी 2012\nआवाज कुणाचा... मराठी माणसाचाच\nआवाज कुणाचा... मराठी माणसाचाच\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घसरलेली पत सावरण्यात शिवसेना अखेर यशस्वी ठरली. शिवसेनाप्रमुखांना निष्प्रभ करण्याची किमया ना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साधू शकले, ना कॉंग्रेसआघाडी. राज ठाकरेंनी मांडलेल्या वेगळ्या चुलीमुळे होणारे मतविभाजनही निकालाने फोल ठरवले. मुंबईची राखण करणाऱ्या ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तरण्याबांड नेतृत्वाने काहीसा धक्‍का दिला खरा; पण मराठी माणसाच्या एकगठठा मतदानाने हा अनपेक्षित प्रकारही सावरून नेला. मुंबई-ठाण्याच्या चाव्या पुन्हा एकवार हाती आल्याने \"करून दाखवलं'चा जयजयकार करायला कार्यप्रमुख उद्धव ठाकरे मोकळे झाले आहेत. ही सत्ता त्यांना देतानाच त्यांनी \"उतू नये, मातू नये', अशी मतदारांची अपेक्षा तर आहे. मुंबईकराच्या मदतीला धावून जाणाऱ्या \"शिवसेना शाखे'ने खेचून आणलेला हा विजय आहे. या विजयाचा खरा शिल्पकार सामान्य शिवसैनिक आहे. घरचे आणि बाहेरचे शत्रू वार करत असतानाही 16 वर्षांची सत्ता कोणतीही लक्षणीय कामगिरी खात्यावर जमा नसताना सेनेने राखली, हा कौतुकाचा विषय आहे आणि चिंतनाचाही.\nमराठी माणसाच्या वैभवाची एकमेव खूण म्हणजे मुंबई. अठरापगड भाषकांनी कर्मभूमी केलेल्या मुंबईतला मराठी टक्‍का कमी झाला; तो उपनगरात ढकलला गेला. मात्र अल्पसंख्येतल्या, जेमतेम 40 टक्‍के भरणाऱ्या मराठी माणसाला हे महानगर आजही आपले वाटते. महानगराचे अर्थकारण हातात नाही, उच्चभ्रू श्रीमान वस्त्यांमध्ये भूखंड तर सोडाच, साधी सदनिका घेण्याचे बळ नाही, अशा दारुण स्थितीत मराठी माणूस \"मुंबईत आमची सत्ता आहे, येथला आवाज आमचा आहे,' या रुबाबात जगत असतो. पानिपतात पराभव झाला तरी अटकेपार झेंडे फडकावले होते ना बच्चमजी हा इतिहास मराठी माणसाला मुंबईसारख्या अफाट आणि कराल महानगरात जगण्याची झिंग मिळवून देतो. या मानसिकतेची नस सापडलेल्या बाळासाहेबांनी या महानगरावर सत्ता गाजवली. कॉंग्रेसमधील नेतृत्वाच्या बेदिलीमुळे स. का. पाटील, वसंतराव नाईकांपासून ते वसंतदादा पाटील यांच्यापर्यंत सर्वांनाच शिवसेनेच्या या यशाचे श्रेय दिले जाते. या अपश्रेयापासून दूर होण्यासाठी या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसशी आघाडी केली. मतांची बेरीज आपल्याला तारून नेईल,अशा फाजील विश्‍वासात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मोठाली विधानेही करून टाकली. मात्र शिवसेनेच्या हातून मुंबई जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आपण कफल्लक होणे आहे, हे मुंबईकरांनी ताडले. कॉंग्रेसप्रणीत आघाडीकडे चाणाक्ष नेते नसल्याने, मराठी माणसाचा हा भयगंड कुणाच्या लक्षातच आला नाही. दुसरीकडे शिवसेना चाणाक्षपणे निवडणुकांना सामोरी गेली. मतांच्या गलबल्यात मराठी टक्‍का मोठा नाही. त्यामुळे शिवसेनेने मराठी माणसाने एक होण्याचे भावनिक आवाहन उघडपणे केले नाही. चतुर राज ठाकरेंनीही मराठीचे नाणे उघडपणे चालवले नाही. प्रत्यक्षात महापलिकेची निवडणूक मराठी विरुद्ध अमराठी धृवीकरणाभोवतीच फिरली. शिवसेना- मनसेने कुशल खेळी केली.भाजपचे गुजराती वोटही दिमतीला होते. कृपाशंकरसिंह, संजय निरूपम, प्रिया दत्त, नरेंद्र वर्मा असे अमराठी चेहरे हाच आघाडीचा आधार. मात्र जनतेला मतदानाला बाहेर काढण्याची जबाबदारी आघाडीने नेमक्‍या एका खांद्यावर टाकली नाही. त्यामुळे झोपडीत राहणारा मुंबईतला कॉंग्रेसचा परप्रांतीय मतदार या वेळी बाहेर पडलाच नाही. मराठी माणूस स्वत:हून बाहेर पडला. त्यासाठी उपाययोजना करण्याचे श्रेय उद्धव ठाकरे यांचे.ठाकरेंच्या दोन्ही कुळशाखांना मुंबई-ठाणेकरांनी स्वीकारले. संघटनेच्या बाहेर पडून राज यांनी मिळवलेले यश लक्षणीय ठरले आणि शिवशक्‍तीला भीमशक्‍तीची जोड देणारी उद्धव यांची कूटनीतीही. दोघांनाही मिळालेली मते हा मराठी माणसाचा आवाज आहे. लगतच्या ठाण्यात शिवसेना सत्तेत परतत असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसने जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात मिळवलेले यश म्हणजे नव्या मराठी चेहऱ्याला मिळालेली पसंती तर नाही ना, हे तपासून पाहायला हवे.\nया कौतुकातच काही प्रश्‍नही दडले आहेत. पाणी नाही, जागा नाही, स्वच्छता नाही अशा नरकयातनांतील मुंबई जागतिक दर्जाचे महानगर होण्याची भाषा करते आहे. शिवसेनेला हे आव्हान पेलायचे असेल, तर उघड किंवा छुप्या अस्मितेने भागायचे नाही. खरी गरज कृतीची आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nआवाज कुणाचा... मराठी माणसाचाच\nसत्तेसाठी लाचारी नाही - राज ठाकरे\nकिंग’ नाही; पण ‘हिरो’ नक्की\nशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात \"मनसे'चा शिरकाव\nमुंबईतील मराठी मतदार कोणाला साथ देणार\nराज ठाकरेंसह वृत्तवाहिनीविरुद्ध गुन्हा दाखल\nनादान लोकांसाठी एक पाऊलही पुढे येणार नाही -राज\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.typingstudy.com/mr-marathi-3/lesson/5", "date_download": "2018-04-24T06:32:44Z", "digest": "sha1:OLYSDAHGR25HO6PSJIE6AXCN5JYP455P", "length": 2255, "nlines": 149, "source_domain": "www.typingstudy.com", "title": "टच टायपिंग ऑनलाईन धडे", "raw_content": "\nनवीन कळा: ै, ू, ब, द आणि .\nनवीन कि ड्रिल 1\nनवीन कि ड्रिल 2\nब्लाइंड वर्ड ड्रिल 1\nब्लाइंड वर्ड ड्रिल 2\nब्लाइंड वर्ड ड्रिल 3\nवारंवार विचारण्यात येणारे प्रश्न\nआपण वापरकर्तानाव किंवा परवलीचा शब्द विसरला आहात\nनवीन कळा: ै, ू, ब, द आणि .\nसंदर्भ वापरुन नवीन शब्द जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/hollywood/news/beauty-and-the-beast-and-harry-potter-star-emma-watson-holi-wish/18866", "date_download": "2018-04-24T06:59:30Z", "digest": "sha1:3WEXJKKHRR6WDH4W5ZBLZPHQ23HBNC5G", "length": 22657, "nlines": 231, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Beauty and the Beast and harry potter star Emma Watson holi wish | Watch Video : ‘या’ हॉलिवूड अभिनेत्रीने दिल्या होळीच्या शुभेच्छा ! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nWatch Video : ‘या’ हॉलिवूड अभिनेत्रीने दिल्या होळीच्या शुभेच्छा \n​सध्या संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगताना दिसून येत असून, हा रंग सातासमुद्रापारही पोहचल्याचे बघावयास मिळत आहे. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एमा वॉटसन हिने तिच्या भारतीय फॅन्ससाठी खास तिच्या शैलीत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nसध्या संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगताना दिसून येत असून, हा रंग सातासमुद्रापारही पोहचल्याचे बघावयास मिळत आहे. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एमा वॉटसन हिने तिच्या भारतीय फॅन्ससाठी खास तिच्या शैलीत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एमाने एका व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश दिला असून, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे.\nएमा सध्या तिच्या ‘ब्यूटी अ‍ॅण्ड द बीस्ट’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, तिचा हा सिनेमा याच महिन्यात रिलिज होणार आहे. यावेळी एमाने तिच्या सिनेमाचे प्रमोशन करताना खास तिच्या शैलीत भारतीय फॅन्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये एमा, ‘नमस्ते इंडिया, तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ‘ब्यूटी अ‍ॅण्ड द बीस्ट’ हा सिनेमा बघायला विसरू नका’ असे म्हणताना दिसत आहे.\n१९९१ मध्ये ‘ब्यूटी अ‍ॅण्ड द बीस्ट’ या नावाने अ‍ॅनिमेटेड सिनेमा आला होता. याचाच सीक्वल नव्या रूपात प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे. या सिनेमात एमाची मुख्य भूमिका असून, ही एक प्रेम कहाणी आहे. सध्या एमा या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जगातील विविध देशांमध्ये फिरत असून, आपल्या फॅन्सना आकर्षित करण्याची एकही संधी ती दवडत नसल्याचे दिसून येत आहे.\nभारतीय फॅन्ससाठी तर एमाने खास होळीचे निमित्त साधल्याने भारतीय प्रेक्षक तिच्यावर फिदा झाले नसतील तरच नवल. दरम्यान, एमाच्या या शुभेच्छांना यू-ट्यूबवर धूम उडवून दिली असून, लाखोंच्या संख्येने हा व्हिडिओ बघितला जात आहे. व्हिडिओमध्ये एमाचा अंदाज बघण्यासारखा असून, तिच्या या शुभेच्छा भारतीय प्रेक्षकांना भावणार का हे सिनेमाच्या कलेक्शनवरून स्पष्ट होईलच.\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर...\nएक्समॅन ह्यू जॅकमॅनने केले चाहत्या...\n#MeToo : प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलास...\n‘हॅरी पॉटर’च्या चाहत्यांसाठी गुड न्...\nBox Office : या चित्रपटाने महिनाभरा...\nOscars 2018 : आॅस्कर सोहळ्यात ‘या’...\nOscars 2018 : आॅस्कर सोहळ्यापूर्वीच...\nकिम कर्दाशियांला भारतीयांच्या या दो...\nरॅम्बोच्या निधनाची अफवा पसरविणारे म...\nजेनिफर लॉरेंसच्या ‘रेड स्पॅरो’चा ट्...\nTime's Up : लैंगिक शोषणाविरोधात ‘या...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/hot-gossip/rajinikanth-to-romance-huma-next-20/20810", "date_download": "2018-04-24T06:56:25Z", "digest": "sha1:ENF4BPOG72SGIWJ4TEPAGR2CPE75BP7L", "length": 23962, "nlines": 244, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Rajinikanth to romance Huma next 2.0 | ​पडद्यावर रंगणार रजनीकांत अन् हुमा कुरेशीचा रोमान्स! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\n​पडद्यावर रंगणार रजनीकांत अन् हुमा कुरेशीचा रोमान्स\nहोय, ऐश्वर्या राय, दीपिका पादुकोण, सोनाक्षी सिन्हा, राधिका आपटे यांच्यासोबत रोमान्स केल्यानंतर रजनीकांत या चित्रपटात हुमा कुरेशीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.\n‘कबाली’च्या ब्लॉकबस्टर यशानंतर मेगास्टार रजनीकांतचा ‘काला करिकलन’ हा सिनेमा येतो आहे. रजनीकांत आता आपल्या या नव्या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. ‘कबाली’चे दिग्दर्शक पा रंजीथ हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. येत्या २८ तारखेपासून या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल, असे कळतेय. पण खरी बातमी ही नाही तर वेगळीच आहे. होय, ऐश्वर्या राय, दीपिका पादुकोण, सोनाक्षी सिन्हा, राधिका आपटे यांच्यासोबत रोमान्स केल्यानंतर रजनीकांत या चित्रपटात हुमा कुरेशीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.\nALSO READ : तब्बल आठ वर्षांनंतर चाहत्यांना भेटले रजनीकांत...\nया चित्रपटात रजनीकांत आणि हुमाचा आॅनस्क्रीन रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चित्रपटाच्या मेकर्सला या चित्रपटासाठी एका दमदार अभिनेत्रीचा शोध होता. मेकर्सचा हा शोध हुमाजवळ येऊन थांबला. हुमाला ही आॅफर मिळाली आणि तिनेही लगेच ती स्वीकार केली. निश्चितपणे या आॅफरमुळे हुमा कमालीची सुखावली आहे. रजनीकांतसारख्या मेगास्टारसोबत काम करण्यास हुमा उत्सूक आहे. मुंबईत ‘काला करिकलन’चे शूटींग सुरु होणार आहे. हुमा सध्या या चित्रपटाच्या तयारीत गुंतली आहे. रजनीकांतचा जावई धनुष हा ‘काला करिकलन’ चित्रपट प्रोड्यूस करणार असल्याचे कळतेय. खरे तर ‘काला करिकलन’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर येणार होता. पण काही तांत्रिक कारणामुळे हा चित्रपट आता दिवाळीनंतर रिलीज होणार आहे. या चित्रपटात रजनीकांतसोबत बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारही दिसणार आहे. यात तो खलनायकाची भूमिका साकारताना दिसेल.\nसध्या रजनीकांत आपल्या चाहत्यांना भेटतो आहे. तब्बल आठ वर्षांनंतर कालपासून सलग चार दिवस रजनीकांत आपल्या चाहत्यांना भेटणार आहे.\n​विन डिझेल दीपिका पादुकोणला पुन्हा...\n​अनुष्का व प्रियांकानंतर दीपिका पाद...\n​दीपिका पादुकोणच्या तालावर कॅप्टन क...\n​ लग्नाच्या बातम्यांवर अखेर दीपिका...\n ...​ तर काय लग्नानंतर दीपिका प...\n​प्रियांका चोप्राला मागे टाकत दीपिक...\nVideo : ​‘पद्मावत’चे पडद्यावर न दिस...\n​ ‘सलमान खान विरूद्ध ऐश्वर्या राय’...\nअभिनेत्री नसती तर दीपिका पादुकोण अस...\n​करण जोहरची चाहती धरून बसली वेगळाच...\n​एकदा तरी नक्कीच पाहा, रणवीर सिंगच्...\n​अमिताभ बच्चन यांना हवे काम\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला...\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या...\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बि...\nअबब... प्रियांका चोप्राच्या ‘या’ ड्...\nफक्त पाचवीपर्यंत शिकली बॉलिवूडची ‘ह...\nशिल्पा शेट्टीचे शिर्डीतील फेव्हरेट...\nअर्धनग्न आंदोलन करणाऱ्या अभिनेत्रील...\nएकेकाळी बार डान्सर असलेल्या ‘या’ तर...\nअसे काय घडले असेल की ‘या’ अभिनेत्या...\nसेल्फीवेड्या चाहत्यांमुळे ‘या’ अभिन...\nगर्दीचा फायदा घेत चाहत्याने ‘या’ अभ...\nबिग बीच्या नातवासोबत डिनर डेटला गेल...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://raigad.wordpress.com/2017/03/04/gaziuddin-blinded/", "date_download": "2018-04-24T06:35:22Z", "digest": "sha1:72AZEZTZXXSJQU23MH2CTHVNOBSCDT7K", "length": 21381, "nlines": 190, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "खुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन | इतिहासातील सत्याच्या मागावर...", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \n… आम्ही केवळ निमित्य \n← थोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम →\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन\nमार्च 4, 2017 by raigad 5 प्रतिक्रिया\nरामशेजच्या किल्ल्यावर चालून येणारा गाझीउद्दिन खान बहादूर हा मराठ्यांच्या इतिहासाला चांगलाच परिचित आहे. ह्यानेच दिल्लीला पूर्वी मदरसा सुरु केला होता. रामशेजला मराठ्यांकडून धोंडे खाऊन त्रस्त झालेला हा सरदार पुढे हैदराबाद, अथणी, बंगलोर, असा फिरत फिरत साताऱ्याला नामजद झाला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी त्याची छावणी होती. साताऱ्याचा किल्ला घेण्याकरता तो दिवसेंदिवस पुढे सरकत होता. ह्या दरम्यान एक घटना घडली जी तत्कालीन मुघल इतिहासकार ईश्वरदास नागर याने नमूद करून ठेवली आहे.\nएक दिवस गज़िउद्दिन आपल्या तंबू मध्ये पोशाख चढवून बसला होता. त्याच्या हातात आरसा होता. आपले सुंदर रुपडे तो न्याहाळत होता. त्याच्या आजू बाजूला त्याचे खुशमस्करे होते जे त्याची स्तुती करत होते. स्तुती करताना त्यातील एक जण अनावधानाने म्हणाला –\nसरदार आपले सौंदर्य आणि आपला पराक्रम इतका उजवा आहे की आपणच खरे सिंहासनाची शोभा आहात. आपणच ते सजवायला हवे (त्यावर बसून). त्यावर खान फ़क़्त ईश्वरइच्छा असेल तर तसे होईल इतकेच हसत म्हणाला.\nतिथे त्याची आई देखील होती. तिने सारवासाराव करण्यासाठी – सिंहासन केवळ तैमुर वंशासाठी आहे आणि आपण त्याचे सेवक आहोत तेव्हा असे विचार करू नये असे प्रगटपणे सांगितले.\nतिथे उभे असलेल्या एका हरकाऱ्याने हे ऐकले आणि बादशह औरंगजेबाला कळवले. औरंगजेबाला राग आला होता पण तूर्त त्याने तो गिळला. काही महिने गेले. एके दिवशी गज़िउद्दिन आजारी पडला. त्याचे डोके भयंकर दुखत होते. त्याच्या ह्या डोकेदुखीची बातमी औरंगजेबाला समजली. औरंगजेबचा खास हकीम फात खान याला पाचारण करण्यात आले. बादशाहने त्याला निरोप दिला की –\nआमच्यावतीने आपण जाऊन गज़िउद्दिनची ख्याली खुशाली विचारावी आणि त्याचा योग्य तो इलाज करावा. त्याचे रूप तसेच राहो याची काळजी घ्यावी.\nहकीम जे समजायचे ते समजला आणि गज़िउद्दिनच्या छावणीत पोचला. ख्याली खुशाली विचारून त्याने गज़िउद्दिनला औषध दिले. औषधाने गुण काही येईना म्हणून गज़िउद्दिन पुन्हा हकीमाची मदत मागू लागला. अखेर हकीमाने आपला डाव साधला.\nगज़िउद्दिनखान फिरोजजंग याची कबर\nअत्यंत क्रूरतेने त्याने गज़िउद्दिनच्या कपाळातील सगळे रक्त शोषून काढले. हा एकाच आपल्या डोकेदुखीवर जालीम उपाय आहे असे सांगून त्याने आपले काम सुरु ठेवले. ह्या उद्योगात गज़िउद्दिनची दृष्टी गेली आणि तो कायमचा अंधळा झाला. त्याची तब्येत ढासळू लागली. हकीम त्वरेने तिथून निसटला आणि बादशाहकडे आला. झाला वृत्तांत त्याने औरंगजेबाला सांगितला. पुढे औरंगजेबाने हेर पाठवून बातमीची खात्री करवून घेतली. खात्री पटल्यावर त्याने शाहजादा आझम याला पाठवून गज़िउद्दिनची मुद्दाम विचारपूस करवली आणि त्याचा मुलगा चीन किलीज खान याची बापाच्या जागी नियुक्ती केली. पुढे अंधत्व आलेला गज़िउद्दिन रोगराईत मारला गेला.\nऔरंगजेब किती धूर्त आणि खुनशी होता हे असल्या अनेक बारीक सारीक उदाहरणातून इतिहासातून डोकावते.\n5 Responses to खुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन\nमार्च 7, 2017 येथे 7:22 म.पू.\nनमस्कार, प्रणव वर एक चित्र आहे. ते गाझीच्या मजार चे आहे असे मानले तर गाझी जो अंधळा, सत्ताहीन व रोगराई ग्रस्त होता त्याच्याकडे मृत्यू नंतर इतकी संपत्ती आणि सत्ता कशी\nमार्च 7, 2017 येथे 7:38 म.पू.\nत्याचा मुलगा चिन किलीज खान याने पुढे दिल्लीला ही बांधली. उत्तर मुघलाईत हा महत्वाचा माणुस ठरला. ह्यानेच असफजाही सुरु केली ज्याचे पुढे हैदराबाद संस्थान झाले.\nधन्यवाद… आपल्याला गड किल्ले यांच्या संवर्धनावरील पीपीटी पाठवली तर आपण आपली प्रतिक्रिया द्यावी…\nवरील लिखाणाला पुरावा काय \nआपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा - उत्तर रद्द करा.\nFollow इतिहासातील सत्याच्या मागावर… on WordPress.com\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nताज्या ऐतिहासिक नोंदी –\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nखटासी पाहिजे खट फेब्रुवारी 8, 2017\nमहाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज फेब्रुवारी 3, 2017\n‘समरधुरंधर’ वाचकांच्या चरणी अर्पण फेब्रुवारी 1, 2017\nफिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो फेब्रुवारी 1, 2017\nप्रतापसूर्य बाजीराव – श्री निनाद बेडेकर यांचे दुर्मिळ व्याख्यान जानेवारी 30, 2017\nशिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र जानेवारी 24, 2017\nआमची नवीन पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा : भाग २ – शौर्य – पुरंदरे – रणझुंजार जानेवारी 18, 2017\nअपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया ऑक्टोबर 6, 2016\nछत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण सप्टेंबर 28, 2016\nशिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र ऑगस्ट 23, 2016\nअपरिचित इतिहास – भाग ४ – छत्रपतींचे पेशवे – पूर्वार्ध ऑगस्ट 17, 2016\nवीर खुदिराम बोस ऑगस्ट 11, 2016\nअपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र ऑगस्ट 11, 2016\nगुलाम कादर जेरबंद ऑगस्ट 9, 2016\nभगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\nबटुकेश्वर दत्त यांचे किशनसिंग यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\n“वासुदेव बळवंत फडके यांना अटक…….” ऑगस्ट 3, 2016\nआम्ही कशासाठी लढत आहोत\nसमस्या समाधान – १ – शंभूराजे आणि तारापूर ऑगस्ट 1, 2016\nअपरिचित इतिहास – भाग दोन – १० महत्वाच्या घडामोडी – पेशवा माधवराव जुलै 27, 2016\nअपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज जून 16, 2016\nखरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली जून 9, 2016\nमलिक-ए-मैदान तोफेतून नाण्यांचा बार मे 20, 2016\nइतिहासाच्या पाऊलखुणा मराठी Podcast – भाग १ – “पालखेडची मोहीम” – १७२८ मे 16, 2016\nश्री. निनाद बेडेकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मे 12, 2016\nशिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण मे 10, 2016\nअभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे” मे 4, 2016\nतैसा शिवाजी नृप जिंकवेना मे 3, 2016\nब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी … मे 1, 2016\nमुहंमद कुली खान / नेतोजी पालकर याचा औरंगजेबाला अर्ज एप्रिल 29, 2016\nछत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा एप्रिल 7, 2016\nशिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर मार्च 18, 2016\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nइतर अभ्यासकांची उपयुक्त संकेतस्थळे\nआमची ऐतिहासिक टिव-टिव s s \nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही समस्या समाधान … आम्ही केवळ निमित्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/lord-ram/", "date_download": "2018-04-24T07:06:55Z", "digest": "sha1:UJ47YK5H55QU53FTFJKE5MRTLIBKWX62", "length": 21525, "nlines": 134, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Lord Ram - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nमानवी जीवनात सर्वांत महत्त्वाचा यज्ञ अव्याहतपणे, अगदी मानवाच्याही नकळत चालू असतो आणि तो यज्ञ आहे, मानवाची श्वासोच्छ्वासाची क्रिया. ही श्वासोच्छ्वासाची क्रिया नाकाद्वारे चालत असते आणि म्हणूनच बुधकौशिक ऋषि येथे म्हणत आहेत – यज्ञाचे रक्षण करणारा राम माझ्या नाकाचे रक्षण करो. घ्राणं पातु मखत्राता या रामरक्षेतील प्रार्थनेबद्द्ल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या ...\tRead More »\nमानवाच्या प्रारब्धामुळे त्याच्या जीवनात राम वनवासाला गेला, तरी जर त्याच्या जीवनात सगुण भक्ती करणारा, भक्ति-अधिष्ठित सेवा करणारा भरत सक्रिय असेल, तर त्याच्या जीवनात रामराज्य येऊ शकते. भरताच्या भक्तीचा महिमा आणि या विश्वातील पहिले पादुकापूजन भरताने केले, याबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ...\tRead More »\nमानवाच्या भालस्थानी आज्ञाचक्र आहे आणि या आज्ञाचक्राचा स्वामी रामदूत महाप्राण हनुमंत आहे. ज्या मानवाच्या जीवनात राम राजा असतो, त्याच्या जीवनात हनुमंत सक्रिय असतो आणि तो श्रद्धावानाच्या आज्ञाचक्राचे संरक्षण करतो. स्वत: राम त्याचा आज्ञांकित असणार्‍या दासाची कधीही उपेक्षा न करता त्याचे संरक्षण करतोच. भालप्रदेशाचे संरक्षण रामाने करावे या रामरक्षेतील प्रार्थनेबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या ...\tRead More »\nमानवाची अधोगती होऊ नये म्हणून सद्‍गुरुतत्त्वाची आज्ञा पाळणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी श्रवणभक्ती करणे आवश्यक आहे. विश्वाचे अमित्र बनणे म्हणजे भगवंताच्या आणि माझ्या आड माझा अहंकार, आसक्ती आदिंना येऊ न देणे आणि भगवंताशी सख्य करणे. जो अशा प्रकारे आचरण करतो, त्या श्रद्धावानाच्या जीवनात विश्वामित्रप्रिय राम त्याच्या श्रुतीचे रक्षण कसे करतो, याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च ...\tRead More »\nअनुष्टुभ् छन्द (Anushtubh Chhand) हा कुठल्याही शब्दविस्फोटाशिवाय उत्पन्न झालेला ध्वनि आहे. आघाताशिवाय उत्पन्न झालेला असा परावाणीचा छन्द आहे – अनुष्टुभ् छन्द. रामरक्षा स्तोत्रमन्त्राचा छन्द अनुष्टुभ् छन्द आहे, असे सुरुवातीसच म्हटले आहे. अनुष्टुभ् छन्दाची महती सांगताना पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या गुरूवार दिनांक २८ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मौलिक मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ...\tRead More »\nRamraksha – रामरक्षाचे स्वरूप स्तोत्राचे असले तरी त्याचा आत्मा मन्त्राचा आहे. पहिल्या अक्षरापासून रामरक्षा स्तोत्र-मन्त्रच आहे. जेव्हा मानव प्रेमभावाने रामरक्षा म्हणायला सुरुवात करतो, तेव्हा सीता त्याला जागृत करते आणि सीतेसहित राम म्हणजेच रामचन्द्र त्या श्रद्धावानासाठी खजिना खुला करतो. रामरक्षा स्तोत्र-मन्त्राचे बुधकौशिक ऋषिंना अभिप्रेत असलेले महत्त्व आणि रामरक्षा स्तोत्र-मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील कार्य याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ...\tRead More »\nरामरक्षा हे केवळ एक स्तोत्र नसून स्तोत्र-मन्त्र आहे. स्तोत्र मानवाला जागृत करते आणि मन्त्र हा तर खजिना आहे.( Sita ) सीता ही या रामरक्षेची मन्त्रशक्ती आहे आणि सीतेसहित राम म्हणजेच रामचन्द्र हा या रामरक्षेचा अधिष्ठाता आहे. श्रीसीतारामचन्द्र म्हणजेच सीतेसहित राम ही या स्तोत्रमन्त्राची देवता (श्रीसीतारामचन्द्रो देवता) आहे, हे सांगण्यात बुधकौशिक ऋषिंचा काय भाव आहे, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध ...\tRead More »\nShri Sita Ramchandro Devata – रामरक्षास्तोत्राच्या आरंभी आपण ‘ श्रीसीतारामचन्द्रो देवता ’ हे शब्द वाचतो. सीता हिच श्रीरामांचे चरण प्रदान करणारी आहे. सूर्यवंशी श्रीराम सीते सोबतच ‘रामचंद्र’ म्हणून संबोधले जातात, असे हे सीतापती श्रीराम या स्तोत्राचे देवता आहेत. याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २१ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ...\tRead More »\nबुधकौशिक ऋषि (Budhakaushik Rishi) हे रामरक्षेचे विरचनाकार आहेत. त्यांच्याकडे असणारे रामनाम, रामाचे प्रेम, शुध्दता, पावित्र्य आणि भक्तिचे ज्ञान बरसणारे जणू ते मेघच आहेत. बुधकौशिक ऋषिंनी अतुलनीय तपश्चर्या करुन जो भक्तिचा खजिना रामाकडून प्राप्त केला, तो रामरक्षेद्वारे त्यांनी सर्वांसाठी खुला केला, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत ...\tRead More »\nबुधकौशिक ऋषिंनी रामरक्षा (Ram-Raksha) स्तोत्राची विरचना केली. बुधकौशिक ऋषिंकडे असणारा हा रामरक्षारूपी खजिना त्यांनी खुला केला आहे. बुधकौशिक या नामाचा अर्थ सांगून परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंनी याबाबत गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन) ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\tRead More »\nरामरक्षेवरील प्रवचनांमध्ये श्रीअनिरुद्ध बापुंनी सहजसोप्या भाषेत रामरक्षेची गरिमा सांगितली. रामरक्षेच्या सुरुवातीसच ’अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य’ हे शब्द येतात. बुधकौशिक ऋषिंद्वारे विरचित अशा या रामरक्षेला `स्तोत्रमन्त्र’ (Ram-Raksha-Stotra-Mantra) असे का म्हणतात, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन) ॥ हरि ...\tRead More »\nसहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने\n‘सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने’ (SahasraNaam Tattulyam RamNaam Varaanane) या शब्दांमध्ये रामरक्षा स्तोत्रामध्ये रामनामाची महती शिवाने पार्वतीला सांगितली आहे. रामनामाने नष्ट झालं नाही असं पाप नाही आणि रामनामाने उद्धरला नाही असा पापी झाला नाही, होणार नाही. परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात रामनामाचा महिमा सोप्या शब्दांत सांगितला, जो आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ ...\tRead More »\nॐ रां राधायै राधिकायै रमादेव्यै नम: \nमहाभाव-स्वरूपा राधाजी के सहस्र नामों में से प्रत्येक नाम की महिमा स्पष्ट करते हुए सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापु अपने प्रत्येक प्रवचन में ’भक्तिमार्ग पर भक्तमाता राधाजी अपने बच्चों के लिए यानी श्रद्धावानों के लिए किस तरह सक्रिय रहती हैं’, यह भी विशद करते थे ’ॐ रां राधायै राधिकायै रमादेव्यै नम:’ इस मन्त्र का जप ’राधासहस्रनाम’ पर आधारित प्रत्येक हिन्दी प्रवचन ...\tRead More »\nसुन्दरकाण्डामध्ये संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की श्रीरामचन्द्रांना हृदयात धारण करण्याने विषही अमृत होते, शत्रुने केलेल्या अहितकारक गोष्टीसुद्धा हितकारक ठरतात, अशक्य गोष्टीसुद्धा सहज शक्य होतात. परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्या दिनांक ०५ नोव्हेंबर २००९ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे या दोह्यांचे सोदाहरण स्पष्टीकरण केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (Keep Kosalpur’s King ShreeRaam in your heart – ...\tRead More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/09/blog-post_28.html", "date_download": "2018-04-24T06:28:55Z", "digest": "sha1:ZN7S2O4TWEZHAM6EB6UM5MXLPXO3RFLX", "length": 13678, "nlines": 242, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: माहात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती विशेष", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nमाहात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती विशेष\n1. महात्मा गांधी यांच्याबद्दल भाषणे\n2. लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल भाषणे\n3. पहिली दुसरीच्या मुलांसाठी भाषणे\n4 .श्री.आशिष देशपांडे सर यांची सूत्रसंचालन पीडीएफ\nवरील सर्व माहिती मिळवण्यासाठी खली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nLabels: महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nअंशदान पेन्शन कपात बंद करणेविषयी सहमती पत्र\nवाचन प्रेरणा दिन विशेष\nपायाभूत चाचणी गुण सरलवर कसे भरावेत \nमराठी व हिंदी भाषा परिक्षा सूट नविन प्रस्ताव\nमाहात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती विशेष\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/nba-kobe-bryant-gets-8-24-retired-close-warriors-lakers-matchup/", "date_download": "2018-04-24T06:20:57Z", "digest": "sha1:TLARVYEQCCXO3323F2EDQTSAZOSCPFOF", "length": 6637, "nlines": 106, "source_domain": "mahasports.co.in", "title": "NBA: सर्वोत्कृष्ट खेळाडू कोबे ब्रायंटच्या ८ आणि २४ क्रमांकाच्या जर्सीला केले निवृत्त - Maha Sports", "raw_content": "\nNBA: सर्वोत्कृष्ट खेळाडू कोबे ब्रायंटच्या ८ आणि २४ क्रमांकाच्या जर्सीला केले निवृत्त\nNBA: सर्वोत्कृष्ट खेळाडू कोबे ब्रायंटच्या ८ आणि २४ क्रमांकाच्या जर्सीला केले निवृत्त\nएनबीएमधील लॉस एंजिल्स लेकर्स संघातील दिग्गज खेळाडू कोबे ब्रायंट वापरत असलेला जर्सी क्रमांक ८ आणि २४ यांना काल निवृत्त करण्यात आले. या जर्सीचा निवृत्तीचा कार्यक्रम सोमवारी रात्री पार पडला.\nकोबे ब्रायंटने १९९६ मध्ये एनबीएमध्ये प्रदार्पण केले. २०१६ मध्ये त्याने निवृत्ती घेतली. एकूण २० वर्ष तो एनबीएमध्ये लॉस एंजिल्स लेकर्स संघाकडून खेळत होता.\nया २० वर्षाच्या कारकिर्दीत एनबीएमधील अनेक पुरस्कार त्याने आपल्या नावे केले. एनबीए चॅम्पियनशिप, एनबीए ऑल स्टार, एनबीए सर्वात्कृष्ट खेळाडू पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्याने मिळवले.\nलॉस एंजिल्स लेकर्स संघाने त्याने वापरलेल्या या जर्सीला निवृत्त करून त्याला दिलेल्या आदराचे सगळ्याच खेळाडूंनी कौतुक केले. तेसच लेब्रॉन जेम्स व अन्य खेळाडूंनी ब्रायंटला ट्विटरवरूनही शुभेच्छा दिल्या.\nमहाराष्ट्र केसरी चा थरार आजपासून रंगणार\nयुएस किडस्‌ जागतिक गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत आर्यमान सिंगची लक्षवेधी कामगिरी\n2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेतुन नेमबाजी वगळणे भारतासाठी मोठा धक्का – अभिनव…\nरौप्यपदक आणि सुवर्णपदक यातील अंतर आता लक्षात आले – आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू…\nमुंबई शरीरसौष्ठव संघटनेकडून भारत श्री विजेते आणि कुटुंबियांचा गौरव\nएप्रिल हिट राईड : नाईट बीआरएम राईड 38 सायकलिस्टने केली पूर्ण\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/05/blog-post_32.html", "date_download": "2018-04-24T06:23:49Z", "digest": "sha1:W3E3WPO5MYESUYFCAJUTSUMGAS2BY75G", "length": 16406, "nlines": 298, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: फास्ट वर्गमूळ कसे काढावे ?", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nफास्ट वर्गमूळ कसे काढावे \n1 मिनीटात वर्गमुळ काढण्यासाठी पुढील दोन Chart फक्त एकदा वाचा सहज पाठ होवून जातील..\nएक मिनीटात वर्ग शोधा....\nएक मिनीटात वर्गमुळ कसे शोधायचे....\n2116 या संख्या चे वर्गमुळ काढायचे आहे....\n*एकक स्थानचा अंक आधी शोधा\n16 च्या एकक स्थानी 6 हा अंक आहे म्हणून ....chart -1 पहा.\n*वर्गमुळात एकक स्थानी 4 किंवा 6 असेल\n*दशक स्थानचा अंक शोधने\n2116 ही संख्या कोणत्या संख्या च्या दरम्यान येते....\n1600 - 2500 च्या दरम्यान येते.\nम्हणजे ... दशक स्थानी 4 असेल .\nम्हणजे वर्गमुळ - 44 किंवा 46 असेल .\nआता ....2116 ही संख्या ....\n1600 व 2500 पैकी कोणाच्या जवळ आहे ठरवा....\nतर 2116 ही संख्या 2500 च्या जवळ आहे\nम्हणजे ....44 वा 46 पैकी वर्ग 2500 च्या जवळ 46 चा असेल .\nश्री .प्रविण बनकर मो.8856046142\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nपालकांनी नक्की वाचावा असा लेख\nसचिन तेंडुलकर यांना पत्र..\nआपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु क...\nनवीन नियमाने तासिका नियोजन व संचमान्यता\nअतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे\nध्यान : उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली\nवाडगेभर निर्जीव अन्न :\nकंबर दुखी व मान दुखीपासून कायमची सुटका\nशरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी\nस्वतः साठी एवढं तरी करा...\nशाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड\nनवीन 9 तासांचे वेळापत्रक\n'हॅकर्स' पासून वाचण्यासाठी हे नियम पाळा.\nघन आकृती महत्त्वाची सूत्रे\nसामान्यज्ञान प्रश्नसंच क्रमांक 1\nफास्ट वर्गमूळ कसे काढावे \nसंगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करणे....\nYou tube वरील videos कसे डाउनलोड करावेत \nविद्यार्थी प्रमोट करणे विषयी\nपे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु\nशासनाची ई - नाम योजना\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://jeevantarang.wordpress.com/2012/12/29/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E2%80%8C/", "date_download": "2018-04-24T06:47:50Z", "digest": "sha1:TAMM46DBXGUGKADLGGDY6VEJJP5S3Z2T", "length": 13619, "nlines": 138, "source_domain": "jeevantarang.wordpress.com", "title": "महाबलीपुरम्‌ « जीवनतरंग....", "raw_content": "\nविचार… मत… अनुभव… वास्तव….निरीक्षणें….\nईकडे चेन्नईला बदली झाल्यापासून आमचे दर वीकेंडला कुठे ना कुठे भटकणे चालू आहे. पॉंडेचेरी (खरा उच्चार पुडुचेरी) , क्वीन्सलॅंड थीम पार्क , वेल्लोरचे गोल्डन टेंपल अशी काही चेन्नईच्या आसपासची ठिकाणे पाहून झाली आणि एका रविवारी महाबलीपुरम्‌ पाहून आलो. आपण जरी महाबलीपुरम्‌ असे म्हणत असलो तरी याचा स्थानिक उच्चार ममलापुरम्‌ असा आहे.\nमहाबलीपुरम्‌ म्हणजे शिल्पकृतींचे गाव आहे. बघावे तिकडे देवदेवतांच्या मोठमोठाल्या शिल्पकृती दिसतात. तिथे कृष्णकुंज म्हणून एक स्थान पल्लवाने तयार केले आहे. कृष्ण जन्मापासून कृष्णाच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग जसे की कालिया मर्दन , गोवर्धन पर्वत हातावर उचलून घेणे, पांडवांच्या गुंफा हे सर्व प्रसंग तेथे अखंड अशा दगडामधून कोरून काढले आहेत. त्या अखंड अशा दगडावर एकूण १५३ शिल्पे कोरलेली आहेत. आणि प्रत्येक शिल्प हे कलाकु सरीचा उत्तम नमुना आहे.\nकृष्ण याठिकाणी कधीच आला नव्हता पण चित्ररूपाने इकडच्या लोकांना महाभारत समजावण्यासाठी पल्लवाने हे सारे कोरीव काम सुमारे १४०० वर्षांपूर्वी केले आहे. पण पल्लव कोण होते आणि त्यांनी कृष्णकुंज करण्यासाठी याच ठिकाणाची निवड कां केली हे मात्र समजू शकले नाही. ( आमचा गाईड पल्लवाज्‌ म्हणून उल्लेख करत होता, म्हणजे मला तरी असं वाटतंय्‌ की पल्ल्वांच्या अनेक पिढ्यांनी येथे काम केले असावे.) तिथून थोडं पुढे गेल्यावर एक प्रचंड मोठी शिळा आहे , नैसर्गिकरित्या स्वतःला तोलून धरणारी ती शिळा अशा एका टोकावर उभी आहे की जरासा धक्का लागला तर ती कधीही खाली कलंडू शकेल असे वाटते. पण आमच्या गाईडच्या सांगण्यानुसार सात हत्तींनी धक्का मारूनसुध्दा ती शिळा जागची हलली नाही. Balancing चा हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. या शिळेला म्हणतात ’Krishnas Butter Ball’ \nतिथेच थोडं पुढे गेलं की दोन शिळा एकमेकांना टेकून तयार झालेली नैसर्गिक गुंफा दिसते. ही होती फॅक्टरी जिथे पल्लवाने कोरीव काम करण्यासाठी हत्यारे तयार केली. मोठमोठाल्या शिळा फोडण्यासाठी डायनॅमो वगैरे न वापरता एक वेगळेच तत्त्व येथे वापरले होते. जो दगड फोडायचा आहे, त्यावर छोटे छोटे छेद करून घ्यायचे, त्यामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या लाकडाचे तुकडे टाकून त्यामध्ये गरम पाणी ओतायचे, त्या गरम पाण्याने लाकूड प्रसरण पावते आणि १५-२० दिवसांत तो दगड फुटतो. हे ऎकतानाच अंगावर काटा आला. आपले पूर्वज काय अफाट बुध्दीमत्तेचे होते नं हातात फारशी काही साधने नसताना १४०० वर्षापूर्वी केवळ आम जनतेला माहिती व्हावे म्हणून एवढे कष्ट करून पल्लवांनी या शिल्पकृती तयार केल्या आहेत. मनातून खूप भरून आलं होतं. याच ठिकाणी गंगा नदी आणि शिवशंकराचाही देखावा तयार केला आहे. इंदिरा गांधी महाबलीपुरम्‌ला बर्‍याचदा यायच्या म्हणे हातात फारशी काही साधने नसताना १४०० वर्षापूर्वी केवळ आम जनतेला माहिती व्हावे म्हणून एवढे कष्ट करून पल्लवांनी या शिल्पकृती तयार केल्या आहेत. मनातून खूप भरून आलं होतं. याच ठिकाणी गंगा नदी आणि शिवशंकराचाही देखावा तयार केला आहे. इंदिरा गांधी महाबलीपुरम्‌ला बर्‍याचदा यायच्या म्हणे येथे बकरी आणि हरीण बसलेले एक शिल्प आहे, जे आपल्या पूर्वीच्या १० रु.च्या नोटेवर छापले\nहोते, याठिकाणाची स्मृती म्हणून \nयाच भागात वेगवेगळया छोट्या गुंफा आहेत, त्यामध्ये विष्णूचे जे दहा अवतार आहेत, त्यापैकी वराह अवतार आणि वामनावतार यामधील काही शिल्पे कोरलेली आहेत. कृष्णकुंज बघून बाहेर पडताना आपण एका भारलेल्या अवस्थेतच असतो.\nThis entry was posted in असंच काहीही, नविन काहीतरी and tagged चेन्नई, महाबलीपुरम्‌.\n← सुपारीशिवाय – सुपारी\nडिसेंबर 30, 2012 येथे 3:25 सकाळी\nफारच सुंदर जागा आहे , भारतात आपल्यावर येथे भ्रमंती करावयास आवडेल.\nजानेवारी 1, 2013 येथे 12:33 pm\nसर्वात प्रथम नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nप्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद….. आपल्याला जर पुरातन लेणी, शिल्पकला यांची आवड असेल तर महाबलीपूरम्‌ बघणं हे मस्ट आहे. 🙂\nदेविदास देशपांडे म्हणतो आहे:\nछान वर्णन आहे. पल्लव हे तमिळ राजे होत. चोळ, चेर आणि पांड्य या तीन घराण्यांप्रमाणेच पल्लव राजांनीही आंध्र-तमिळमधील संस्कृतीला आकार दिला.\nजानेवारी 1, 2013 येथे 12:30 pm\nसर्वात प्रथम नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nआपल्या माहितीपूर्ण प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद…..\nआमच्या गाईडला आम्ही पल्लवाज्‌ कोण असे विचारले होते, पण त्याच्याकडून उत्तर आले नाही. बहुदा त्यालाही माहित नसावे किंवा त्याला आम्ही काय विचारले हे कळाले नसावे. तो जरी इंग्लीशमध्ये माहिती देत असला तरी ते इंग्लीश मिक्स तमिळ होतं आणि मला तरी असं वाटत होतं की त्याने ती सगळी माहिती पाठ केली असावी. कारण साध्या इंग्लीशमधून विचारलेल्या साध्या प्रश्नांची उत्तरे त्याला देता आली नाहीत. तसाही इकडे साउथमध्ये भाषेचा बर्‍यापैकी अडसर येतो. 😦\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nस्टीफन कोवेचे ९०-१० तत्त्व\nहोतं असं कधी कधी….\nसर्वाधिक वाचल्या गेलेल्या पोस्टस्‌\n मग पुढचे लिखाण तुमच्या ई-मेल वर मिळवा.... इथे तुमचा ई-मेल पत्ता द्या.....\nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rtimassawareness.blogspot.com/", "date_download": "2018-04-24T06:36:21Z", "digest": "sha1:DDE6KLWETVPCHV2R3EAONHVGHMFGRFDL", "length": 54895, "nlines": 151, "source_domain": "rtimassawareness.blogspot.com", "title": "माहितीचा अधिकार जन-जागृती", "raw_content": "\nमराठीतून सर्वाना माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा सहजपणे शिकता यावा यासाठी...\nसोमवार, ५ सप्टेंबर, २०११\nमाहिती अधिकार अधिनियम 2005 चा वापर - अनुभव लेखन स्पर्धा – 2011.\nमाहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी दि. 12 ऑक्टोबर 2005 पासून सुरु झाली. या कायद्याबाबत व्यापक जनजागृती व्हावी, शासन व्यवस्थेत माहितगार नागरिकांचा सहभाग वाढावा तसेच पारदर्शकता व उत्तरदायित्वाची प्रक्रिया सुरु व्हावी यासाठी केंद्र शासनाने दरवर्षी दि.6 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत माहिती अधिकार सप्ताह साजरा करावा अशा सुचना दिलेल्या आहेत.\nमाहिती अधिकार वापर अनुभव लेखन स्पर्धा :- ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून माहिती अधिकार कायद्याच्या वापर/अंमलबजावणी करतांना आलेले अनुभव पुराव्यासह लिहून पाठवावयाचे आहेत.\nRegional Workshop on Best Practices & Success Stories in RTI:- ही कार्यशाळा दि. 8 ऑक्टोबर 2011 रोजी यशदा येथे घेण्यात येणार आहे. यामध्ये भाग घेण्यासाठी अधिकारी/ कर्मचारी, नागरीक, स्वयंसेवी संस्था व माध्यमे इ. पैकी कोणालीही आपले Best Practice व Success Stories पेपरच्या स्वरुपात लिहून प्रथम सादर करावे लागतील. सोबत उजव्या बाजूला लिक्स पहा.\nया दोनही स्पर्धांसाठी आपले अनुभव अथवा पेपर्स सादर करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2011 अशी आहे.\nया बाबतचा सविस्तर तपशिल सोबतच्या दोन प्रसिध्दी पत्रकात दिलेला आहे. तसेच तो यशदाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी कृपया वरील दोनही प्रसिध्दी पत्रके आपल्या सुचना फलकावर लावून प्रसिध्द करावीत. तसेच आपले कार्यालयातील व आपले आसपासचे अधिकारी/कर्मचारी, नागरीक यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध करुन द्यावी ही विनंती.\nयशदा संकेतस्थळ - www.yashada.org\nपत्ता:- प्रकल्प अधिकारी तथा संशोधन अधिकारी\nसार्वजनिक धोरण केंद्र, यशदा,\nराजभवन आवार, बाणेर रोड,\nद्वारा पोस्ट केलेले RTI Mass Awareness येथे १०:२७ म.उ.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १७ जून, २०११\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005’ या कायद्याचे प्रशिक्षण देणारा दूरशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम\nयशदा पुणे: यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) मार्फत माहितीचा अधिकार\nअधिनियम 2005’ या कायद्याचे प्रशिक्षण देणारा दूरशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. हा केंद्रीय कायदा दि. 12 ऑक्टोबर 2005 पासून (जम्मू काश्मीर वगळता) देशभर लागू झाला. या कायद्याविषयी अधिक माहिती व ज्ञान प्राप्त करुन घेऊ इच्छिणा-या व ज्यांना प्रशिक्षण\nसंस्थेमध्ये जाऊन प्रशिक्षण घेणे शक्य नाही अशा जाणत्या समाज घटकांसाठी दूर शिक्षणाच्या माध्यमातून हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.\nहा अभ्यासक्रम नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, गृहिणी, समाज संशोधक, स्वयंसेवी संस्था, माध्यमातील व्यक्ती, सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी या सर्वांना उपयुक्त ठरु शकेल. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाव्दारे या विषयाबाबत समाजामध्ये जागरुती निर्माण करणे, अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्याचा असून मराठी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांमध्ये तो उपलब्ध आहे. या दूरशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या दिनांक 3 जुलै 2011 पासून सुरु होणा-या पुढील बॅचची नावनोंदणी 28 जून 2011 पर्यंत होणार आहे.\nनावनोंदणी करावयाचा अर्ज व अभ्यासक्रमाचा तपशील यशदाच्या संकेतस्थळावर\nउपलब्ध आहे. संकेतस्थळ - www.yashada.org (Education मध्ये पहावे)\nअधिक माहितीसाठी संपर्क : कार्यक्रम समन्वयक\nयशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)\nराजभवन आवार, बाणेर रोड, पुणे - 411 007\nद्वारा पोस्ट केलेले RTI Mass Awareness येथे ५:२० म.पू.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १० जून, २०११\nलाल फितीत अडकला माहितीचा अधिकार\nपळवाटा काढण्यात पटाईत असलेल्या नोकरशाहीतील कारकुनी करामतींमुळे माहितीचा अधिकार कायद्याची सध्या थट्टा सुरू असून तो परिणामशून्य बनत आहे. 'शिक्षेच्या बाबतीत कायदा अधिक कडक करा अन्यथा त्याला जलसमाधी द्या,' अशी मागणी भाजपचे माजी राष्ट्रीय सदस्य ओमप्रकाश शर्मा यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.\nराज्यात सुमारे अडीच लाख, तर देशपातळीवर १५ लाखांहून अधिक तक्रार अर्ज प्रलंबित राहणं, ही त्या कायद्याची क्रूर थट्टा असून त्यामुळे हा कायदा कुचकामी ठरत असल्याचं द्योतक आहे, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.\nप्रजासत्ताक भारताच्या ५६ वर्षांनंतर नागरिकांना कायद्याने मिळालेल्या या अधिकाराची कारकुनी करामतीमुळे पायपल्ली होऊन तो अधिकाधिक बोथट बनत आहे. त्यामुळे नोकरीतून निलंबन अथवा नोकरीतून बडतर्फ अशा तरतूदी करून कायदा अधिक कडक करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.\nअर्जात मागितल्यानुसार मुद्देसूद माहिती न देऊन वेळकाढूपणा करणं, अर्ज निकाली काढण्याऐवजी त्याचा 'निकाल' कसा लागेल हे पाहणं, गोपनीय माहितीची ढाल वापरून जबाबदारी झटकणं, तरतूदीत बसत नसल्याचं नमूद करणं, समाधान न झाल्यास अॅपीलेट अधिकाऱ्याकडे अपील करण्याची सूचना करणं, कागदी घोडे नाचवून उत्तरं देण्यास टाळाटाळ करणं, गेंड्याची कातडी पांघरून उत्तरं न देण्याचा निर्लज्जपणा करणं अशा अनेक तऱ्हेच्या कारकुनी करामतींमुळे या कायद्याची सध्या थट्टा सुरू असल्याचं शर्मा यांनी सांगितलं.\nमाहिती न देण्याचा निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्याला २५ हजार रुपये दंडाची शिक्षा पुरेशी नसून त्यामुळेच हा कायदा परिणामशून्य ठरत आहे. हा विषय ट्रिब्युनल कायद्याच्या अखत्यारीत आणावा, कायद्याची बूज न राखणाऱ्या अधिकाऱ्यांना सक्तीची रजा, निलंबन, नोकरीतून बडतर्फ अशा शिक्षांची तरतूद करून हा कायदा अधिक कडक करावा, अशा मागण्या त्यांनी पत्रातून केल्या आहेत.\nमाहितीचा अधिकार कायद्याखाली मागितलेल्या माहितीबद्दल उत्तरं न देऊन महाराष्ट्र वीज मंडळाने आपल्याला कसा शॉक दिला याचं उदाहरण शर्मा यांनी पत्रात नमूद केलं आहे. सुपरिटेण्डण्ट इंजिनीअर वसईकडे केलेल्या अर्जाला तब्बल दीड वर्षं उत्तरच मिळालं नाही. चिकाटीने पाठपुरावा करून असंख्य रिमायण्डर्स धाडल्यानंतर चीफ इंजिनीअरने दिलेली माहिती मोघम आणि सत्यापासून दूर अशी होती. सामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून हा कायदा करण्यात आला. त्याची कारकुनी करामतींमुळे अशी थट्टा होणार असेल, तर त्याचा उपयोग काय असा सवाल त्यांनी केला आहे.\nमुंबई टाइम्स टीम, ठाणे\nद्वारा पोस्ट केलेले RTI Mass Awareness येथे ३:२० म.पू.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमाहिती अधिकार वापरा, पण दमानं\nमाहितीच्या अधिकाराचा वापर करताना लोकांनी आपल्या प्रश्नांच्या संख्येबद्दल मर्यादा सांभाळायला हवी. तसेच याचिकाकर्त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर टाळावा अशा कठोर शब्दात केंद्रीय माहिती आयोगाने दिली आहे. एका याचिकाकर्त्यांने सोळा पानांवर विचारलेल्या १०० प्रश्नांच्या प्रकरणात आयोगाने हे विधान केले आहे.\nकन्हैया लाल या याचिकाकर्त्याने दिल्लीतील एका सरकारी शाळेसंदर्भात माहिती मागितली होती. त्यावर शिक्षण मंडळाकडून मिळालेली माहितीने आपण असंतुष्ट असल्याची तक्रार कन्हैया लाल यांनी केद्रींय माहिती आयोगाकडे केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी शंभराहूनही अधिक प्रश्न सोळा पानांवर लिहून पाठवले होते. अशाप्रकारे शंभराहूनही अधिक प्रश्न सोळा पानांवर लिहून पाठवणे म्हणजे माहितीचा अधिकार बेजबाबदारपणे वापर करणे होय असं मत माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी व्यक्त केले आहे.\nया प्रकरणी याचिकाकर्त्याला आपल्याला कोणती माहिती मिळाली नाही असे विचारले असता , त्याला त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे नागरिकांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की सरकारी यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत असताना , त्यांवर अशाप्रकारे अयोग्य भार टाकणे चुकीचे आहे. तरीही योग्य माहिती देण्याचे काम अधिकारी प्रामाणिकपणे करत असल्याचा दावा मुख्य माहिती अधिका-यांनी केला आहे.\nसरकार हे फक्त एकाच नागरिकाला जबाबदार नसून त्यावर संपूर्ण जनतेची जबाबदारी आहे , त्यामुळे कोणतीही माहिती विचारताना याचिकाकर्त्याला आपल्या जबाबदारीचे भान असायला हवे. त्याचप्रमाणे याचिकाकर्त्यांनी आपल्या प्रश्नांच्या संख्येवर नियंत्रण राखायला हवे , असेही आयोगातर्फे सांगण्यात आले आहे.\nमाहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते असलेले बिभव कुमार यांच्या मते , कोणत्याही माणसाला कितीही प्रश्न विचारायचा अधिकार आहे. त्यामुळे अशाप्रकारे सामान्य जनतेला खडसावून केद्रींय माहिती आयोग सरकारी कर्मचा-यांना पाठीशी घालत आहे. याउलट भारतात अधिक माहिती विचारण्याचे प्रमाण खूपच कमी आहे , त्यामुळे अशा याचिकाकर्त्यांना खर तर प्रोत्साहन देण्याची गरज आहे.\nद्वारा पोस्ट केलेले RTI Mass Awareness येथे ३:१६ म.पू.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवी मुंबईतही असे अनेक घोटाळे आहेत, जे माहितीच्या अधिकार कायद्यामुळे चव्हाट्यावर आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी माहितीचा अधिकार कायद्याचा वापर केल्यामुळे 'सिडको' आणि महापालिकेसारख्या संस्थांमधल्या घोटाळ्यांना ब्रेक लागला आहे.\nआदर्श सोसायटी, कॉमनवेल्थ गेम्स आणि टूजी स्पेक्ट्रमसारखी भ्रष्टाचाराची प्रकरणं उजेडात आली आणि एक मुख्यमंत्री, एक केंदीय मंत्री आणि एका क्रीडासम्राटाला खुर्च्या सोडाव्या लागल्या. पण तुम्हाला हे माहीत आहे का की हे घोटाळे बाहेर काढण्यासाठी माहितीचा अधिकार कायद्याचा वापर प्रभावीपणे करण्यात आलेला आहे. नवी मुंबईतही असे अनेक घोटाळे आहेत, जे माहितीच्या अधिकार कायद्यामुळे चव्हाट्यावर आले आहेत. सामाजिक कार्यकतेर् संदीप ठाकूर यांनी माहितीचा अधिकार कायद्याचा वापर केल्यामुळे सिडको आणि महापालिकेसारख्या संस्थांमधल्या घोटाळ्यांना ब्रेक लागला आहे.\nतसं पाहिलं तर संदीप ठाकूर हे साठीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. एका ब्रिटिश कंपनीत ते मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा पगारही चांगला आहे. मग सरकारी ऑफिसेसमधले घोटाळे बाहेर काढण्याचा उद्योग करायची त्यांना काय गरज पण लहानपणापासूनच ठाकूर यांना समाजसेवेची आवड होती. त्यांची आत्या म्हणजे पु.ल.देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई. लहानपणी दरवषीर् ते सुट्ट्यांमध्ये रत्नागिरीला पु.ल. आणि सुनीताबाईंना भेटत. त्यांचेच संस्कार ठाकूर यांच्यावर झालेत. म्हणूनच ते स्वखर्चाने कुणाच्याही मदतीविना सार्वजनिक हितासाठी भ्रष्ट व्यवस्थेशी लढा देत आहेत.\n१९८३ मध्ये नवी मुंबईतल्या एलिवेटेड सव्हिर्स रिर्झव्हायर प्रश्नी ठाकूर यांनी कोर्टात अपील केलं होतं. ठाणे खाडीवरचा जुना पूल मोडकळीस आला होता. तेव्हाही ठाकूर यांनी कोर्टात धाव घेतली. त्यावर कोर्टाने बोधे कमिटी नेमली. पुढे १९८६-८७च्या सुमारास नवा खाडी ब्रीज बांधण्यात आला. नवी मुंबईतल्या पाकिर्ंगबाबतही ठाकूर यांनी दाखल केलेली जनहित याचिका अशीच गाजली होती.\n' सिडको'ने नवी मुंबईतल्या सोशल फॅसिलिटी प्लॉट्सचा वापर समाजहितासाठीच करावा, असं बंधन आहे. पण मध्यंतरी 'सिडको'नेच या प्लॉट्सच्या एफएसआयपैकी पंधरा टक्के जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्याबाबत नोटीस काढली होती. असा निर्णय हा पूर्णत: संबंधित ट्रस्ट आणि त्यांच्या मालकांच्या हिताचा होता. म्हणून ठाकूर यांनी त्या नोटिशीवर आक्षेप घेतला. त्यावर या प्रकरणाची सुनावणी झाली आणि ही नोटीस 'सिडको'ला मागे घ्यावी लागली.\nत्यानंतर सिडकोने पुन्हा एकदा १० हजार चौ.फूट कमशिर्यल वापरास परवानगी देण्यासंदर्भात नोटीस काढली होती. तीही ठाकूर यांच्या आक्षेपामुळेच डब्यात टाकावी लागली. वाशी सेक्टर १०-ए मधला होल्डिंग पॉण्ड बुजवून त्यावर गार्डन तयार करण्यात आलं होतं. त्यामुळे संदीप ठाकूर यांनी जनहित याचिका दाखल केली. होल्डिंग पॉण्ड नसेल तर पूरपरिस्थिती निर्माण होईल, ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर कोर्टाने नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना बोलावून ते गार्डन तात्काळ हटवण्याचे आदेश दिलेे. अशा प्रकारे अनेक ठिकाणी सार्वजनिक हिताला सुरूंग लावणाऱ्या मुद्यांवर आवाज उठवून ठाकूर यांनी सार्वजनिक मालमत्तेची लूट थांबवण्याचा प्रयत्न केला आहे.\nनवी मुंबईत सार्वजनिक हिताविरूद्ध अनेक गोष्टी घडत आहेत. त्याबाबत जनता अनभिज्ञ आहे. पण संदीप ठाकूर यांच्यासारखा एखादाच त्याविरूद्ध लढा देत आहेत. यासंदर्भात ठाकूर सांगतात की, एखाद्या निर्णयाबद्दल किंवा कामाबद्दल संशय आला की माहितीचा अधिकार कायद्याचा वापर करून माहिती मिळवायची. त्या माहितीचा अभ्यास आणि निरीक्षण करायचं. एकदा का त्यातली लबाडी तुम्हाला कळली की तुमची केस स्ट्राँग होते. मग तुमच्यासमोर कुणीच काही बोलू शकत नाही. पण सार्वजनिक हिताचं लोकांना काहीच पडलं नाही. माझ्या मते, नव्वद टक्के लोक बघे असतात. आपण सरकारी यंत्रणा भ्रष्ट आहे, अशी नुसती बोंब मारतो. पण करत काहीच नाही.\nखरंतर सुशिक्षित लोकांनी भ्रष्टाचाराविरूद्ध उभं राहिलं पाहिजे. चिकाटीने आणि नि:स्वाथीर् भावनेने काम केलं पाहिजे. आपण चांगलं काम करत आहोत, असा आत्मविश्वास पाहिजे. त्यात एक वेगळंच मानसिक समाधान मिळतं, असंही ठाकूर आवर्जून सांगतात. चांगलं शिका, पण आपण ज्या शहरात राहतो त्यासाठीही थोडा वेळ द्या, असा संदेशही ते तरुणांना देतात.\nसंदीप ठाकूर यांच्यासारखं काम करणारे काहीजण तयार झाले तरी नवी मुंबईकरांचं सार्वजनिक नुकसान होणार नाही. पण सध्या तरी ठाकूर हे एकटेच लढत आहेत.\nउच्चशिक्षित संदीप ठाकूर हे मूळचे रत्नागिरीचे. जन्म मुंबईत परळचा. वडिल न्यायाधीश असल्याने कोल्हापूर, सातारा, डहाणू, रत्नागिरी, ठाणे, पुणे आणि मुंबई अशा बदलीच्या ठिकाणी त्यांचं शालेय शिक्षण झालं. बी.कॉम. ऑनर्स झाल्यावर त्यांनी पुण्यात एमबीए केलं. पुढे नोकरी करता-करता मुंबई विद्यापीठातून एलएलबी केलं. आज संदीप ठाकूर एका ब्रिटिश कंपनीत व्हाइस प्रेसिडेण्ट (एक्साइज अॅण्ड लिगल) पदावर काम करत आहेत. वास्तविक पाहता ते पंचावन्नाव्या वषीर्च सेवानिवृत्त व्हायला हवे होते. तसा कंपनीचाच नियम आहे. पण विशेष बाब म्हणून ५९व्या वर्षातही त्यांची सेवा नियमित करण्यात आलेली आहे.\nद्वारा पोस्ट केलेले RTI Mass Awareness येथे ३:११ म.पू.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमाहिती अधिकार वापरा, पण दमानं\nमाहितीच्या अधिकाराचा वापर करताना लोकांनी आपल्या प्रश्नांच्या संख्येबद्दल मर्यादा सांभाळायला हवी. तसेच याचिकाकर्त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर टाळावा अशा कठोर शब्दात केंद्रीय माहिती आयोगाने दिली आहे. एका याचिकाकर्त्यांने सोळा पानांवर विचारलेल्या १०० प्रश्नांच्या प्रकरणात आयोगाने हे विधान केले आहे.\nकन्हैया लाल या याचिकाकर्त्याने दिल्लीतील एका सरकारी शाळेसंदर्भात माहिती मागितली होती. त्यावर शिक्षण मंडळाकडून मिळालेली माहितीने आपण असंतुष्ट असल्याची तक्रार कन्हैया लाल यांनी केद्रींय माहिती आयोगाकडे केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी शंभराहूनही अधिक प्रश्न सोळा पानांवर लिहून पाठवले होते. अशाप्रकारे शंभराहूनही अधिक प्रश्न सोळा पानांवर लिहून पाठवणे म्हणजे माहितीचा अधिकार बेजबाबदारपणे वापर करणे होय असं मत माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी व्यक्त केले आहे.\nया प्रकरणी याचिकाकर्त्याला आपल्याला कोणती माहिती मिळाली नाही असे विचारले असता , त्याला त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे नागरिकांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की सरकारी यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत असताना , त्यांवर अशाप्रकारे अयोग्य भार टाकणे चुकीचे आहे. तरीही योग्य माहिती देण्याचे काम अधिकारी प्रामाणिकपणे करत असल्याचा दावा मुख्य माहिती अधिका-यांनी केला आहे.\nसरकार हे फक्त एकाच नागरिकाला जबाबदार नसून त्यावर संपूर्ण जनतेची जबाबदारी आहे , त्यामुळे कोणतीही माहिती विचारताना याचिकाकर्त्याला आपल्या जबाबदारीचे भान असायला हवे. त्याचप्रमाणे याचिकाकर्त्यांनी आपल्या प्रश्नांच्या संख्येवर नियंत्रण राखायला हवे , असेही आयोगातर्फे सांगण्यात आले आहे.\nमाहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते असलेले बिभव कुमार यांच्या मते , कोणत्याही माणसाला कितीही प्रश्न विचारायचा अधिकार आहे. त्यामुळे अशाप्रकारे सामान्य जनतेला खडसावून केद्रींय माहिती आयोग सरकारी कर्मचा-यांना पाठीशी घालत आहे. याउलट भारतात अधिक माहिती विचारण्याचे प्रमाण खूपच कमी आहे , त्यामुळे अशा याचिकाकर्त्यांना खर तर प्रोत्साहन देण्याची गरज आहे.\nद्वारा पोस्ट केलेले RTI Mass Awareness येथे ३:०६ म.पू.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, ३ मार्च, २०११\nमहान्युज : कायदा माहितीचा अन् अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा\n२२ तारखेलाच दुपारीच संचालकांच्या कार्यालयातून मनोज एक ऑर्डर घेऊन माझ्याकडे आला. ती वाचली आणि माझ्या आनंदाला पारावार उरलानाही. बर्‍याच दिवसांपासून जी इच्छा पूर्ण व्हावी याची वाट पाहत होतो ती इच्छा पूर्णहोणार म्हणून मी मनापासून खूष झालो. यशदा च्या माहिती अधिकारावरील प्रशिक्षणासाठी माझे नाव नॉमिनेट करण्यात आले होते. त्याचे ते आदेश होते. सहाजिकच ओठांवर वाक्य आले ... थॅक्स् टू प्रशासन \nदि. १ मार्च, सकाळी १०:०० वाजता मंत्रालयातील ६ व्या मजल्यावरील परिषद सभागृहात हजर झालो. बाहेर यशदाचे दीपक येणार्‍या प्रशिक्षणार्थींचे नाव नोंदणी करुन घेत होते. आत सभागृहात मंद आवाजात संतूरचे सूर कानावर पडत होते. हळूहळू सर्व प्रशिक्षणार्थी जमू लागले अन् बरोबर १०:१५ वाजता महेश यांनी प्रशिक्षणाच्या प्रास्ताविकास सुरुवात केली. तत्पूर्वी सर्वांना फाईल फोल्डर, यशदा ने प्रकाशित केलेले पुस्तक कायदा माहितीचा अन् अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा, डायरी, पेन देण्यात आले.\nसभागृहातील पहिल्या रांगेतील खुर्चीत एक हसरे व्यक्तिमत्व बसले होते. अन् त्यांचे नाव पहिल्या सत्राचे व्याख्याते म्हण्नू पुकारण्यात आले. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या त्या व्यक्तीचे नाव होते रविकांत गौतमी. यशदामार्फत माहितीचा अधिकार या विषयावर ते व्याख्यान देतात. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात त्यांचे पहिले सत्र सुरु झाले.\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे सविस्तर विश्लेषण अगदी सोप्या भाषेत विविध उदाहरणांसहित कानावर पडू लागले. आणि सभागृहातील उपस्थित अधिकार्‍यांच्या मनातील या कायद्याविषयी वाटणारी अनामिक भीतीही नाहीशी होवू लागली. सुरुवातीच्या चिंताग्रस्त, गंभीर चेहर्‍यांची जागा आता हसर्‍या चेहर्‍यांनी घेतली होती. माहिती अधिकाराच्या निर्मितीपासून व्याप्तीविषयीची इत्यंभूत माहिती रविकांत गौतमी सर देत होते. एक एक कलम समजावून सांगत होते. सार्वजनिक प्राधिकरण, साहित्य, त्रयस्त पक्ष, proactive disclosure, जनमाहिती अधिकारी, माहिती अर्जाचा नमुना, कालमर्यादा, अपवाद, अशा विविध विषयांची माहिती कलम निहाय रविकांत सरांनी अत्यंत खुबीने सांगितली. काहीवेळाने मस्तपैकी चहाही आला अन् चहापिल्यानंतर अधिक तरतरीने दुसर्‍या सत्रासाठी आम्ही तयार झालो.\nदुसरे सत्र होते ऍडव्होकेट गणेश हलकारे सरांचे. आपल्या सुमधुर आणि खुशखुशीत वक्तव्याने ऍड.हलकारे सरांनी काही क्षणातच आम्हा सर्वाच्या मनावर पकड घेतली. एरवी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ विषयी वाटणारी भीती एव्हाना कुठल्या कुठे गायब झाली होती. आम्हीही अधिक एकाग्रतेने हलकारे सरांचे व्याख्यान ऐकत होतो. मधूनमधून बोलकी उदाहरणे सांगून या सत्राची रंगत आणखीनच वाढत होती. माहिती आयोगाची रचना, कार्य, केंद्रीय माहिती आयोग, अपील, शास्ती, माहितीचे पृथ्थ:करण, न्यायालयाची भूमिका अशा विविध विषयांची माहिती अगदी सहजपणे आम्हाला सांगण्यात येत होती.\nहे सत्र संपले अन् जेवण करण्यासाठी ४५ मिनिटांचा ब्रेक देण्यात आला. बरोबर २:१५ वाजता पुढील सत्र सुरु झाले. जेवण अतिशय स्वादिष्ट होते त्यामुळे आम्ही निद्रादेवीच्या अधीन होवू नये याची हलकारे सर अत्यंत खुबीने काळजी घेत होते आणि माहितीच्या अधिकाराच्या पुढील कलमांचा अभ्यासही अगदी सुरळित पार पडत होता.\nत्यानंतर गौतमी सरांनी अभिलेख व्यवस्थापनाबद्दलची माहिती दिली. साधारणत: एक दीड तासाने पुन्हा एकदा चहा आला, मागोमाग गौतमी सर आणि डॉ.पुलकुंडवार सरही हजर झाले.\nमग सुरु झाले सवाल जवाब .. ...\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या अभ्यासात माहीर असलेले रविकांत गौतमी, ऍड. गणेश हलकारे सर आणि डॉ.पुलकुंडवार (साक्षात् ब्रम्हा विष्णू महेश) आम्हा प्रशिक्षणार्थ्याकडून विचारल्या जाणार्‍या प्रश्नांना अत्यंत अभ्यासपूर्वक उत्तरे देत होते. त्यांच्या उत्तरातूनच त्यांच्या अनुभवाचा अन् अभ्यासाचा आवाका सहजच लक्षात येत होता.\nखरं सांगायचं तर आम्हा प्रशिक्षणार्थ्याना हा विषय इतका सविस्तर, सहजपणे माहित करुन घेण्यात आला होता की, कुणालाच कोणतीही शंका उरली नाही. त्यामुळे जेव्हा आम्ही फीडबॅक फॉर्म भरायला घेतला तेव्हा नकळतच या सर्वांच्या शिकविण्याबाबतच्या अभिप्रायाला अत्यकृष्ट म्हणून नोंद झाली. या सर्व प्रशिक्षणासाठी विवेक वेलणकर यांनी प्रकल्प संचालक, महेश आलमले यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून तर दत्तात्रय रोकडे आणि दीपक राऊत यांनी प्रकल्प सहायक म्हणून जबाबदारी पार पाडली. आम्हा सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतची प्रमाणपत्रही देण्यात आली.\nया प्रशिक्षण कार्यशाळेत आम्हा सर्वांना काही पुस्तकेही देण्यात आली. त्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे यांनी प्रकाशित केलेले, प्रल्हाद कचरे आणि शेखर गायकवाड लिखित कायदा माहितीचा अन् अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा या पुस्तकास तर माहिती अधिकाराची गीता म्हटले तर निश्चितच काहीही वावगं ठरणार नाही. इतकं ते पुस्तक अप्रतिम आहे. या कार्यशाळेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे वेळेचे व्यवस्थापन. अगदी वेळेवर सुरुवात, वेळेवर चहा, वेळेवर जेवण, व्याख्यात्यांचं वेळेवर आगमन, सर्व काही अगदी काटेकोरपणे. व्यवस्थापनाच्या बाबतीत यशदा ही संस्था नेहमीच यशस्वी ठरली आहे. आपल्यालाही त्यांचा अनुभव आला असेलच किंवा भविष्यात येईलही.\nभारताच्या इतिहासाचा अभ्यास केला असता ब्रिटीशांनी रुढ केलेल्या चुकीच्या पद्धतीचे, नियमांचे विश्लेषणही या कार्यशाळेत करण्यात आले. आणि भारत देश नेहमीच प्रगतीशील राष्ट्र राहील, तो कधीच प्रगत राष्ट्र होणार नाही याची व्यवस्था ब्रिटीशांनी कशी करुन ठेवली आहे याचे जेव्हा ऍड. हलकारे आणि रविकांत सर यांनी विवेचन केले तेव्हा मन खरोखरीच सुन्न झाले. परंतु माहितीचा अधिकार अधिनियम २००५ ने मात्र उद्याचा भारत हा निश्चितच नुसते प्रगत राष्ट्रच नव्हेतर जागतिक महासत्तेत सर्वात प्रबळ राष्ट्र बनणारच याची खात्री दिली आहे. फक्त यासाठी गरज आहे ती आपण सर्वांनी या कायद्याविषयी सकारात्मक आणि विकासात्मक दृष्टीने पाहण्याची \nएकूणच ही कार्यशाळा सुरु होण्यापूर्वी जी मानसिकता होती की, हम तो डुबेंगे सनम, मगर...या मानसिकतेचे कार्यशाळा संपताना मात्र हम तो बचेंगे सनम मगर आपको भी बचाके रहेंगे यात परिवर्तन झालेले दिसले. आणि मग सर्वजण एकत्रितपणे म्हणतात... माहितीचा अधिकार अधिनियम २००५ .. जय हो \n'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\nद्वारा पोस्ट केलेले RTI Mass Awareness येथे ८:५९ म.उ.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nब्लॉगवर सर्वांचे स्वागत आहे\nमाहिती अधिकार वापर अनुभव लेखन स्पर्धा\nमाहिती अधिकार यशोगाथा प्रादेशिक कार्यशाळा 2011\nदूरशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम-माहिती पत्रक क्लिक करा\nअभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचाय - अर्ज करा\nआर टी आय गेटवे\nदूरशिक्षण प्रमाणपत्र प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी\nमाहिती अधिकार अधिनियम 2005 चा वापर - अनुभव लेखन स्...\nसाधेसुधे थीम. dem10 द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-vs-sri-lanka-2017-indias-probable-playing-11-for-first-odi/", "date_download": "2018-04-24T06:29:04Z", "digest": "sha1:5LMBJZIKUUJD74KWYTTP3XDLL5JPHR7H", "length": 14189, "nlines": 115, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहिल्या वनडेसाठी असा असेल भारतीय संघ ! - Maha Sports", "raw_content": "\nपहिल्या वनडेसाठी असा असेल भारतीय संघ \nपहिल्या वनडेसाठी असा असेल भारतीय संघ \nकसोटी मालिकेत श्रीलंकेचा ३-० असा धुव्वा उडवल्यानंतर आता भारतीय संघ श्रीलंकेबरोबर ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरतर श्रीलंका आठव्या क्रमांकावर आहे.\nनिवड समिती भारतीय संघाची निवड २०१९चा विश्वचषक लक्षात घेऊन करत आहे. या मालिकेतील खेळाडूंची निवड हा नवीन संघ बांधणीचा प्रयत्न आहे. भारताकडे तसे सलामीपासून ते मधल्या फळीपर्यंत खूप पर्याय आहेत. तरी सुद्धा विश्रांती दिलेल्या खेळाडूंना सोडून जो संघ आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला होता तोच संघ उद्या खेळण्याची शक्यता आहे.\nसलामीवीर (शिखर धवन आणि रोहित शर्मा )\nभारताची सलामीची जोडी आता तरी अफलातून फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहित शर्माने मागील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये २ अर्धशतके तर १ शतक लगावले होते. त्यामुळे त्याची सलामीची जागा तर नक्कीच निश्चित आहे. त्याच बरोबर शिखर धवनने ही वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत २ अर्धशतके लगावली आहेत आणि तो ही फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याच बरोबर पर्याय म्हणून अजिंक्य रहाणे सलामीला येऊ शकतो आणि तो ही फॉर्ममध्ये आहे. त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने ३ अर्धशतके तर १ शतक लगावले होते.\nमधली फळी (विराट कोहली, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी )\nविराटचा आताच फॉर्म बघता तो किमान भारतासाठी अजून ५ वर्ष तरी नंबर ३ राहील असे दिसून येते. विराटने २००८मध्ये याच श्रीलंकेतील दौऱ्यात त्याने आपले पदार्पण केले होते, आता त्या गोष्टीला ९ वर्ष झाले आहेत. तेव्हा एक युवा खेळाडू म्हणून श्रीलंकेत गेलेल्या विराट कोहली आता भारताचा सर्वोत्तम फलंदाज आणि कर्णधार म्हणून श्रीलंकेत गेला आहे. श्रीलंका संघ विराटला थोडा जास्तच आवडतो हे आपल्या सर्वाना माहित आहे. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो ५व्या क्रमांकावर आहे.\nलोकेश राहुल या युवा खेळाडूने आतापर्यंत ६ एकदिवसीय सामने खेळे आहे ज्यात त्याने १ शतक आणि १ अर्धशकत लगावले आहे. २०१६मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध त्याने आपल्या पाहिल्या सामन्यातच शतक केले होते. त्यानंतर त्याला एकदिवसीय सामन्यात जास्त संधी देण्यात आली नव्हती. आता कर्णधार विराट कोहली त्याला नवीन पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न करेल आतापर्यंत सलामीला येणारा राहुल आता चौथ्या क्रमांकावर येईल.\nभारताचा दिग्गज फलंदाज आणि मागील एक वर्षांपासून फिनिशरचा रोल सोडून मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीकडून भारताला अपेक्षा असतील. मागील काही सामन्यात धोनी जरी फॉर्ममध्ये दिसला नसला तरी धोनी अजूनही एकहाती सामना फिरवू शकतो हे सर्वाना माहित आहे.\nअष्टपैलू खेळाडू (हार्दिक पंड्या आणि केदार जाधव)\nविराट कोहली जेव्हा पासून कर्णधार झाला आहे तेव्हापासून या दोन खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पंड्या गोलंदाजीमध्ये प्रत्येक सामन्यात एक दोन विकेट्स मिळवतो व फलंदाजीमध्ये आल्याबरोबर मोठे फटके मारून धावगती वाढवतो. तर केदार ही त्याच्या सारखाच फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगले योगदान देत आहे. केदारची इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील शतकी खेळी अजून क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत आहे.\nफिरकी गोलंदाज (कुलदीप यादव आणि यजुर्वेंद्र चहल)\nसध्या जगातील सर्वात चांगले फिरकी गोलंदाज भारतीय संघाकडे आहेत. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे ते दोन प्रतिभावान खेळाडू. यांना या मालिकेत विश्रांती देऊन अक्सर पटेल, युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव या नव्या दमाच्या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. जडेजा आणि अश्विन हे गेल्या काही एकदिवसीय मालिकेत मोठ्या प्रमाणावर चमक दाखवू शकले नसल्या कारणाने २०१९च्या विश्वचषकाला आपला विचार व्हावा असे जर सध्या स्थान दिलेल्या खेळाडूंना वाटत असेल तर त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल.\nवेगवान गोलंदाज (जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार )\nकसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारे उमेश यादव आणि मोहम्मद शमी या दोन गोलंदाजांना या मालिकेत विश्रांती देऊन जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. २०१६च्या विंडीज दौऱ्यात शार्दूल ठाकूरची निवड होऊनही त्याला संधी देण्यात आली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या या २६ वर्षीय खेळाडूला आजही भारतीय संघातून संधी देण्यात आली नाही. यावेळी मात्र या गोलंदाजाला राखीव खेळाडूंमध्ये ठेवून चालणार नाही. भुवनेश्वर कुमारला भारतीय संघात स्थान मिळवून आता बरेच दिवस झाले आहेत. आता त्याला आपली उपयुक्तता सिद्ध करताना या दौऱ्यात वरिष्ठ खेळाडूचीही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.\nODISrilnkateam indiavirat kohliएकदिवसीय मालिकाक्रिकेटभारतीय संघवनडे\n२०१७-१८ मोसमासाठी दुलीप ट्रॉफीला बाय-बाय\nप्रो कबड्डी: हा आहे कबड्डीप्रेमींची मने जिंकणारा क्षण \nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://khattamitha.blogspot.com/2008/03/blog-post_09.html?showComment=1353065777185", "date_download": "2018-04-24T06:19:35Z", "digest": "sha1:BUIR3QPBZQ6ZZKSUQLXYQCIBRQHRPVBH", "length": 28085, "nlines": 145, "source_domain": "khattamitha.blogspot.com", "title": "खट्टा मिठा: रामायणाविषयी आणखी काही...", "raw_content": "\n'खट्टामिठा'मध्ये रामायणासंबंधीच्या एकूण चार पोस्ट आल्या आहेत. त्यातील पहिल्या पोस्टमध्ये वाल्मीकींनी वर्णिलेला राम आणि लोकमानसात असलेली रामाची प्रतिमा यांत असलेला फरक नोंदविला आहे. त्यानंतर ब-याच काळाने 'मी राम कोण देशीचा' या तीन पोस्ट लिहिल्या. रा. रा. भास्करराव जाधव यांच्या 'रामायणावर नवा प्रकाश' या पुस्तकातील माहिती त्यात आहे. हे भास्करराव जाधव कोण असा प्रश्न अनेक वाचकांना पडला असणार. तेव्हा ते आधी सांगतो. महात्मा फुल्यांच्या स‌त्यशोधक स‌माजाचे अनुयायी असलेल्या भास्कररावांनी एलएलबी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. 1895 ते 1921 या काळात त्यांनी करवीर दरबारात सेवा केली. पहिल्या व दुस-या गोलमेज परिषदेस प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते. ब्राह्मणेतर पक्षाचे ते संस्थापक होत. स‌र्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी वेदांसकट स‌र्व महत्त्वाच्या स‌ंस्कृत ग्रंथांचे परिशिलन केले होते. त्यांचा पिंड ज्ञानोपासकाचा होता.\nत्या काळात रामायणाविषयी पंडित, अभ्यासकांमध्ये चाललेल्या वादात भास्करराव जाधव यांनी भाग घेतला. 1934 ते 1936 या कालखंडात त्यांनी ज्ञानमंदिर, महाराष्ट्र शारदा या नियतकालिकांमध्ये लेख लिहून टीकेचे मोहोळ उठविले. रामायणावर नवा प्रकाशमध्ये त्यांच्या या लेखांचेच स‌ंकलन केलेले आहे.\nराम हा मूळचा इतिप्तमधला हा निष्कर्ष मल्लादि वेंकटरत्नम यांचा. त्यांच्या ग्रंथाधारे भास्कररावांनी काही लेख लिहिले. ते या ब्लॉगमध्ये अतिशय स‌ंक्षेपाने मांडले आहेत. राम हा मूळचा इजिप्तचा म्हटल्यावर आणि रामेसिसच्या कथेवरूनच रामकथा रचली असे म्हटल्यावर, साहजिकच एक प्रश्न येतो, की मग वाल्मिकी रामायणात जी अन्य पात्रे येतात, उदाहरणार्थ स‌ीता, रावण, हनुमानादि यांचे मूळ कुठले भास्कररावांनी त्याबाबत त्यांच्या लेखांमध्ये काहीही माहिती दिलेली नाही. त्यासाठी आपणांस मल्लादि वेंकटरत्नम यांच्याकडेच जावे लागेल. (खंत याचीच की अद्याप त्यांचा ग्रंथ काही मला मिळू शकलेला नाही.)\nमात्र भास्कररावांनी त्यांच्या लेखांमध्ये रामायणातील वाल्मिकींपासून स‌र्व महत्त्वाच्या पात्रांविषयी स‌ंशोधनात्मक लिहिलेले आहे. तेव्हा त्यांचा ग्रंथ मुळातूनच वाचावयास हवा.\nमूळात रामायण या महाकाव्याचेच अनेक पाठभेद, रामाच्या वेगवेगळ्या कथा आपल्याकडे आहेत. म्हणजे वाल्मीकींचे रामायण हे तर झालेच. पण स‌ंस्कृतमध्ये आनंद रामायण, अद् भुत रामायण, अध्यात्म रामायण इत्यादि रामायणे आहेत. रघुवंश, प्रसन्नराघव, उत्तर रामचरित अशी काव्ये आहेत. महाभारतात रामकथा आहे. हरिवंश, भागवत यामध्येही काहीशा फरकाने ती आहे. तुलसीदासाचे रामायण आहेच. जैन आणि बौद्धांचीही वेगळी रामायणे आहेत.\nया स‌र्व रामकथा आहेत, त्यांचा आशय जरी सारखा असला, तरी तपशीलांत मात्र त्या खूप वेगवेगळ्या असल्याचे दिसते. त्यातही स‌ीता आणि रावण यांच्या स‌ंबंधांबाबत खूपच भिन्न माहिती मिळते. वाल्मीकी रामायणानुसार स‌ीता ही जनकाची कन्या. जनकाला ती जमीन नांगरत असताना सापडली. परंतु महाभारतातल्या रामकथेत ती जनकात्मजा म्हणजे जनकाची औरस कन्या असे म्हटले आहे. काश्मीरी रामायण, खोतानी रामायण या ग्रंथात ती रावणाची कन्या आहे. शेट लालचंद हिराचंद यांनी लिहिलेल्या 'वाल्मिकी रामायण - एक स्वतंत्र विचार' या पुस्तकातही ती रावणाची कन्या असल्याचे मत मांडले आहे. आनंद रामायण व भावार्थ रामायणात ती अग्निसंभवा असल्याचे म्हटले आहे. तर दशरथजातक आणि जावा-सुमात्रामधील रामायणे ती दशरथकन्या असल्याचे सांगतात.\nभास्कररावांनी त्यांच्या स‌ंशोधनासाठी वाल्मिकी रामायण हा ग्रंथ आधारभूत मानलेला आहे. मात्र आधुनिक विद्वानांच्या मते वाल्मीकी रामायण प्रथम पाच कांडांचे म्हणजे अयोध्याकांडापासून युद्धकांडापर्यंतचे होते. बालकांड व उत्तरकांड ही नंतरची भर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या रिडल्स ऑफ राम वरून मोठा वाद झाला होता. वास्तविक त्यावरून वाद होण्याचे काही कारण नव्हते. कारण त्यात त्यांनी रामाबद्दल जे काही लिहिले होते, त्याचा आधार बहुतांशी उत्तरकांडच होते. पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचे 'द रामायण - ए ट्रू रिडिंग' हे अतिशय वादग्रस्त पुस्तक. त्याचा आधारही वाल्मीकी रामायणच आहे. यातून त्यांनी काढलेले निष्कर्ष भाविक, श्रद्धाळू मनास निश्चितच धक्कादायक आहेत. कारण वाल्मीकी रामायणच धक्कादायक आहे.\nज्यांना असा धक्का स‌हन होणार नाही, त्यांच्यासाठी मग 'श्री वाल्मीकि रामायण दर्शन' सारखी पुस्तके आहेतच. 'श्री वाल्मीकि रामायण दर्शन'मध्ये पांडुरंगशास्त्री आठवलेंनी वाल्मीकींनाही अभिप्रेत नसलेला राम आपल्यासमोर ठेवलेला आहे. त्यांच्या रामायणाच्या वाचनानुसार -\n\"रामकाळात प्रजेला मत द्यावयाचा अधिकार होता.... अर्थव्यवस्थेत अत्यंत आवश्यक अशी जातीव्यवस्था रामराज्याने मान्य केली होती.... स‌र्व लोक देवासमान होते. स‌र्व लोक स‌ज्जन होते... रामायणात स्त्रियांची अवस्था उत्कृष्ट होती... ब्राह्मण रामराज्याचे आधारस्तंभ होते... \" खरंतर पांडुरंगशास्त्रींच्या मते रामायणात वाईट असे काही व कोणी नव्हतेच. अगदी कौसल्यासुद्धा. (वास्तविक पांडुरंगशास्त्रींचे या पुस्तकाचा हेतू त्यांना अभिप्रेत असलेल्या जातीसंस्थात्मक व्यवस्थेची, वर्णव्यवस्थेची आवश्यकता प्रतिपादीत करणे हाच आहे. पण तो मुद्दा वेगळा.)\nतर हे म्हणजे एकदम भास्कररावांच्या उलट झाले.\nएकंदरच रामकथेची अशी अवघीच गंमत आहे. पुढे मागे त्याबाबत लिहिणे होईलच...\n- रामायणावर नवा प्रकाश - भास्करराव जाधव, महाराष्ट्र राज्य साहित्य स‌ंस्कृती मंडळ, मुंबई, पाने - 340, किं. 145 रू.\n- वाल्मीकी रामायण - एक स्वतंत्र विचार - लालचंद हिराचंद, मँजेस्टिक प्रकाशन, गिरगाव, मुंबई, पाने 72, किं. 45 रु.\n- महात्मा रावण - डॉ. वि. भि. कोलते, स‌ुगावा प्रकाशन, पुणे, पाने - 16, किं. 10 रू.\n- श्री वाल्मीकी रामायण-दर्शन - पांडुरंगशास्त्री आठवले, स‌द्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई, पाने - 218, किं. 10 रु.\nमी तुमच्या अनुदिनी मधील सगळे मजकूर वाचून काढले. मला सांगा हे सगळे ऐतिहासिक कथा, गोष्टी याला काही पुरावा आहे काय तसेच आपण जे म्हणतो ते स्कंद पुरण , भागवत, हरिपाठ, वेद, संतांच्या ओव्या अभंग, लीळाचरित्र म्हणजे सगळेच आता या क्षणाला कोठे उपलब्ध आहे काय तसेच आपण जे म्हणतो ते स्कंद पुरण , भागवत, हरिपाठ, वेद, संतांच्या ओव्या अभंग, लीळाचरित्र म्हणजे सगळेच आता या क्षणाला कोठे उपलब्ध आहे काय म्हणजे ते शाषनाने जतन करून ठेवले आहे काय म्हणजे ते शाषनाने जतन करून ठेवले आहे काय तसेच तुम्ही अनिता पाटील (http://anita-patil.blogspot.in/) यांची अनुदिनी तुम्ही तिघांनी वाचल काय तसेच तुम्ही अनिता पाटील (http://anita-patil.blogspot.in/) यांची अनुदिनी तुम्ही तिघांनी वाचल काय तुम्ही जे लिहिता त्याच्या बरोबर उलट ती लिहून सर्व ब्राह्मण लोकांवर खूप घाणेरडे आरोप करीत आहे.\nरामायणाबद्दल थोडा वेगळा विचार करायला हरकत नाही. विंध्य पर्वताच्या उत्तरेस आर्य व दक्षिणेस रावणाचे म्हणजे मूळ भारतीयांचे राज्य अशी विभागणी असल्याने आर्यांनी विंध्य ओलांडून दंडकारण्यात यायला प्रारंभ केला. दक्षिणेस यज्ञ मुळातच नवा असल्याने रावणाच्या राज्यातील दंडकारण्यातील आदिवासीनी यज्ञात विघ्न आणण्यास प्रारंभ केला. वाली व सुग्रीव यासारख्या बलाढ्य राजांचे राज्य दंडकारण्यात होतेच. अशा वेळी वनवासात जाण्यासाठी राम विंध्य ओलांडून दंडकारण्यात आला. त्याचा हेतू यज्ञ करणा-याना संरक्षण द्यावे असा असावा. त्याला त्याच्या राज्यात परत पाठवावे या हेतूने रावणाने त्यवेळी असलेल्या पद्धतीप्रमाणे सीतेस आपल्या ताब्यात ठेवले. सीतेवर रावणाने अत्याचार कधीच केले नाहीत. रावणाच्या विरोधकाना सुद्धा हे मान्य आहे. रामाने दंडकारण्यातील सुग्रीवाच्या मदतीने रावणावर आक्रमण केले. वाली सुग्रीव ही माकडे नव्हती. काहीं आदिवासीमध्ये तोंडावर मुखवटा घालून युद्ध करण्याची पद्धत अजूनही आहे. त्याप्रमाणे माकडासारखा मुखवटा घालून त्यांच्या सहाय्याने बिभिषणास मदतीस घेऊन रावणाचा पराभव झाला. रामायणाचा काळ सात हजार वर्षापूर्वीचा आहे. त्याकाळी ओहोटीस सध्याचा अ‍ॅडम्स ब्रिज उघडा पडत असावा. त्यावरून श्रीलंकेस सैन्य गेल्याने रावणाचा पराभव झाला असल्याची शक्यता आहे. हनुमान हा वाटाड्या अत्यंत हुषार व दोन्ही भाषा बोलणारा वकील या नात्याने रामास मदत करीत होता. आकाशमार्ग, संजीवनी अशा बाबी वजा केल्या तर एका समूहाने दुस-या समूहाबरोबर केलेले सांस्कृतिक युद्ध एवढा अर्थ रामायणातून निघतो.\nपुस्तकं फार क्रूर असतात.\nअनेकदा आपल्यासमोर अशा काही गोष्टी ठेवतात, की आपण अगदी हेलपाटूनच जातो.\nअखेर आपण माणूस‌ म्हटल्यावर आपली काही श्रद्धास्थानं असतातच.\nकुणाच्या तरी खांद्यावर आपणही श्रद्धेने मान ठेवलेली असतेच.\nसंस्कृतीबिंस्कृतीची कदर आपल्यालाही असतेच.\nपण ही ही पुस्तकं ते स‌र्व काही तहेसनहेस करून टाकतात अनेकदा.\nअर्थात कधी कधी तसं होणंही आवश्यकच असतं म्हणा...\nमाणूस म्हणून जगण्यासाठी... माणुसकी नावाचं स‌त्य जपण्यासाठी.\nत्यासाठीच हा एक उपद्व्याप.\nमला पुस्तकांतून सापडलेलं हे उघडं नागडं स‌त्य\nते आजचं स‌त्य आहे. कोण जाणे ते उद्या खोटंही ठरेल.\nपण म्हणून ते आजच नाकारण्यात काय हशील आहे\nतुका लोकी निराळा - तुलसी आंबिले\nअधिक वाचले गेलेले लेख\nअठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे, असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे दैवत. संतां...\nसूर्याजी पिसाळ फितूर नव्हता\nएखादे असत्य वारंवार सांगितले, की ते सत्यच वाटू लागते. इतिहास वाचताना हे अनेकदा दिसून येतं. मराठ्यांच्या इतिहासातलं असं एक प्रकरण म्हणजे सूर्...\nसंभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी\nसंभाजी महाराजांबद्दल बखरी जे म्हणतात ते खरे मानले, तर मराठ्यांचा हा युवराज बलात्कारी होता. आपला पिता शिक्षा करील या भयाने दिलेरखानाकडे जाऊन ...\n'खट्टामिठा'मध्ये रामायणासंबंधीच्या एकूण चार पोस्ट आल्या आहेत. त्यातील पहिल्या पोस्टमध्ये वाल्मीकींनी वर्णिलेला राम आणि लोकमानसात असल...\nताईमहाराज प्रकरण व टिळकांवरील बलात्काराचा (खोटा) आरोप\nआपल्या संस्कृतीत काम हा पुरुषार्थ मानला गेलेला असला, तरी त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी भल्तीच विचित्र, विकृत असते. त्यात पुन्हा एकपत्नीव्रत ...\n'गोब्राह्मण प्रतिपालक' हे कोठून आलं\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामागे ज्या बिरूदावल्या लावल्या जातात त्यात \"गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवतंस' ही खूपच प्रसिद्ध ...\nस‌मर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू होते काय, हा गेल्या अनेक वर्षांपासून वादाचा विषय राहिलेला आहे. या वादात स्वाभाविकच दोन पक्ष आहेत. प...\nछत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार कुठे आहे, हा एक मोठा गूढ प्रश्‍न आहे. लोकमान्य टिळकांच्या काळापासून हा प्रश्‍न अधूनमधून चर्चेत येतोच, ...\nसंभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी\nहे वर्णन पाहा - \"...हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्...\nछत्रपती शिवाजी महाराजांचा कृष्णा घोडी आणि वाघ्या कुत्र्यावर फार जीव होता. ही दोन्ही जीवाला जीव देणारी इमानी जनावरं. त्यातही वाघ्याच्या स्वाम...\nतुकारामांनी शिवरायांना रामदासांकडे पाठविले हे खरे ...\nस‌ंभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी\nसंभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी\nसंभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी\nमहाराष्ट्रातले खलपुरूष 2 - राघोबादादा\nमहाराष्ट्रातले खलपुरूष - 1 : घाशीराम कोतवाल\nरामदास खरेच बोहल्यावरून पळाले होते\nआपले पूर्वज काय खात असत\nख्राईस्ट म्हणजे कृष्ण आणि मुसलमान हे सामवेदी \nइतिहास संशोधनाचं 'पुना' स्कूल\nसूर्याजी पिसाळ फितूर नव्हता\nवाद पहिलेपणाचा - मराठीतील पहिला शिलालेख कोणता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/mothi-aai/", "date_download": "2018-04-24T06:54:03Z", "digest": "sha1:RKKBGI3O6XFPR33B3PVHN35VVYEY4QFH", "length": 17491, "nlines": 137, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "mothi aai - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nआरती- दुर्गे दुर्घट भारी (प्रत्येक शब्द का अर्थ एवं सरलार्थ सहित) (Aarti Durge Durghat Bhari\nदुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारी जन्ममरणांतें वारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारी जन्ममरणांतें वारी हारी पडलो आता संकट निवारी ॥ 1 ॥ जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी हारी पडलो आता संकट निवारी ॥ 1 ॥ जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥ त्रिभुवनभुवनी पाहता तुजऐसी नाही सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥ त्रिभुवनभुवनी पाहता तुजऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे कांही ॥ साही विवाद करिता पडिले प्रवाही चारी श्रमले परंतु न बोलवे कांही ॥ साही विवाद करिता पडिले प्रवाही ते तूं भक्तांलागी पावसि लवलाही॥ ...\tRead More »\nमंगलचण्डिकाप्रपत्तीचे महत्त्व (Importance Of Shree Mangal-Chandika-Prapatti) सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी ०८-०१-२०१५ रोजीच्या आपल्या प्रवचनात श्रीमंगलचण्डिकाप्रपत्तीसंदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना बापू म्हणाले की प्रपत्ती करताना ते कर्मकाण्ड म्हणून करू नका, तर प्रेमाने करा. शिस्तपालन आवश्यक आहे, पण भाव हा सर्वांत महत्त्वाचा आहे, हे विसरता कामा नये. स्त्रियांच्या द्वारे मकरसंक्रान्तीच्या पर्वावर केल्या जाणार्‍या या श्रीमंगलचण्डिकाप्रपत्तीचे महत्त्वसुद्धा बापुंनी या वेळी सांगितले, जे ...\tRead More »\nचण्डिकाकुलाच्या तसबिरीचे आम्ही श्रध्देने व विश्वासाने दर्शन घेत असतो, ही चांगलीच गोष्ट आहे पण जेवढे जमेल तेवढे चण्डिकाकुलास प्रेमाने न्याहाळण्याने काय लाभ मिळतो याबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १७ एप्रिल २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे स्पष्ट केले. Chandikakul ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\tRead More »\nचण्डिकाकुलाच्या तसबिरीचे आम्ही श्रध्देने व विश्वासाने दर्शन घेत असतो, ही चांगलीच गोष्ट आहे पण जेवढे जमेल तेवढे चण्डिकाकुलास प्रेमाने न्याहाळण्याने काय लाभ मिळतो याबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १७ एप्रिल २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे स्पष्ट केले. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\tRead More »\nत्रिविक्रमाचा गुणधर्म – जशास तसा ( Characteristics of Trivikram )\nपरम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १३ फ़ेब्रुवारी २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिविक्रमाच्या ‘जशास तसा’ ह्या गुणधर्माबद्द्ल सांगितले. हा मुद्दा बापूंनी पुढील व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. Read More »\nस्वस्तिक्षेम संवादम्‌ (Swastikshem Sanwad)\nकल परमपूज्य बापूजी ने प्रवचन में स्वस्तिक्षेम संवादम्‌ की संकल्पना सारे श्रद्धावानों के समक्ष रखी; सभी श्रद्धावानों के हित के लिए इस में प्रत्येक श्रद्धावान को चण्डिकाकुल के किसी भी सदस्य के साथ संवाद करना है इस में प्रत्येक श्रद्धावान को चण्डिकाकुल के किसी भी सदस्य के साथ संवाद करना है श्रद्धावान के मन की भावना, विचार या वो जो कुछ कहना चाहता है वो उस सदस्य के समक्ष कह सकता है श्रद्धावान के मन की भावना, विचार या वो जो कुछ कहना चाहता है वो उस सदस्य के समक्ष कह सकता है पहले बापू श्रीहरिगुरुग्राम में ...\tRead More »\nकाल परमपूज्य बापूंनी प्रवचनामध्ये स्वस्तिक्षेम संवादम्‌ची संकल्पना सर्व श्रद्धावानांसमोर मांडली; सर्व श्रद्धावानांच्या हितासाठी. यामध्ये प्रत्येक श्रद्धावानाने चण्डिकाकुलातील कुठल्याही सदस्याशी संवाद साधावयाचा आहे. श्रद्धावानाच्या मनातील भावना, विचार किंवा तो जे काही सांगू इच्छितो ते त्या त्या सदस्यासमोर त्याने मांडावयाचे आहे. प्रथम बापू श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचना आधी, “सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते’ हा श्‍लोक म्हणतील. त्यानंतर कमीतकमी ५ मिनिटांचा काळ ...\tRead More »\nश्रीमंगलचंडिका प्रपत्ती – महत्वाची सूचना(Shreemangalachandika Prapatti)\nll हरि ॐ ll मागील वर्षी श्रीमंगलचंडिका प्रपत्ती पूजनाच्या तयारीचा व्हिडीओ अपलोड केला होता. अनेक स्त्री भक्तांना मांडणीसाठी या व्हिडीओचा उपयोग झाला. या प्रपत्तीच्या तयारीसाठी ज्या सामग्रीची आवश्‍यकता असते त्यात शेवग्याच्या शेंगांचा प्रामुख्याने समावेश आहे. पण अनेक ठिकाणी शेवग्याच्या शेंगा उपलब्ध होत नसल्याने ओला हरबर्‍याच्या वापरास परम पूज्य बापूंनी परवानगी दिली होती. अनेक ठिकाणी शेवग्याच्या शेंगां करता भक्तांची अडवणूक झाली ...\tRead More »\nबापूजी द्वारा श्रद्धावानानों के लिए नववर्ष की सौगात – मातृवात्सल्य उपनिषद (New year gift to Shraddhavan-Matruvatsalya Upanishad)\nNew year gift to Shraddhavan-Matruvatsalya Upanishad ॥ हरि ॐ ॥ दीवाली से पहलेवाले गुरूवार के प्रवचन में बापूजी ने कहा था कि दत्तजयंतीके दिन मातृवात्सल्य उपनिषद उपलब्ध होगा तब बापूजी ने उपनिषद के बारेमें कहा था कि, “यह उपनिषद हर एक के लिए उस के जीवन की, मन की कमतरता के लिए उसके दुर्गुणोंके लिए, प्रत्येक पुण्य के लिए, ...\tRead More »\nबापूंकडून नव्या वर्षाची श्रध्दावानांना भेट – मातृवात्सल्य उपनिषद(Gift to Shraddhavans-Matruvatsalya Upanishad)\n॥ हरि ॐ ॥ दिवाळीच्या आधीच्या गुरुवारी प्रवचनामध्ये बापूंनी मातृवात्सल्य उपनिषद दत्तजयंतीला सर्वांना उपलब्ध होईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे दत्तजयंतीला हे उपनिषद सर्वांना मिळणार आहे. तेव्हा बापूंनी या उपनिषदाबद्दल सांगितले होते की, “हे उपनिषद म्हणजे अगदी प्रत्येकासाठी त्याच्या जीवनाच्या, मनाच्या प्रत्येक कमतरतेसाठी त्याच्या प्रत्येक दुर्गुणासाठी, प्रत्येक पुण्यासाठी, प्रत्येक पापासाठी, त्याच्या आधीच्या व ह्या जन्माच्या पुढे येणार्‍या प्रत्येक जन्मांसाठी, त्याच्या स्वभावासाठी, ...\tRead More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t13664/", "date_download": "2018-04-24T06:56:24Z", "digest": "sha1:VHXV3TKWOM6DOWRA52AEOD2PP2KT6FJJ", "length": 3120, "nlines": 79, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तुला आठवू पाहतो मी", "raw_content": "\nतुला आठवू पाहतो मी\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nतुला आठवू पाहतो मी\nतुला आठवू पाहतो मी\nकधी बंध तुटले, कधी स्वप्न विरले\nनिसटले कसे क्षण सुखाचे, कळेना ….\nकधी पाश सुटली, कशी प्रीत विटली\nहरवले कुठे दिस गुलाबी, कळेना ……\nकितीदा तुला रोखले, साहले मी\nतरीही तुझी पावले का वळेना\nकितीही मनाशी ठरवले जरी मी\nतुला विसरण्याचे मला का जमेना\nजरीही बदलली दिशा तू स्वत:ची\nतरी का मला आठवे तू\nतुला आठवू पाहतो मी\nहळुवार जपल्या त्या भावना….\nRe: तुला आठवू पाहतो मी\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: तुला आठवू पाहतो मी\nतुला आठवू पाहतो मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t16198/", "date_download": "2018-04-24T07:00:38Z", "digest": "sha1:EARZGKFWDLGIQJO5J2ZIXWZ76Y5XW6CZ", "length": 4353, "nlines": 111, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-चिकन फळे", "raw_content": "\nबाबा तुम्ही चिकन का खात नाही \nअरे मी शाकाहारी आहे\nपशुपक्षी मारून खाणे मला आवडत नाही\nमाझ्या या उत्तरावर तो म्हणाला\nतेच तर सांगतोय मी बाबा मी\nचिकन शाकाहारी आहे .\nमी चकित होवून त्याला विचारले\nतो म्हणाला , तुम्हाला माहित आहे \nतिथे अंडी एका मोठ्या कपाटात उबवतात\nमग त्यातून चिकन पिल्लू उगवते\nहो बाहेर येते ना उगवल्या सारखे ,\nमग हळू हळू वाढते\nत्यांना अन्न पाणी टॉनिक\nसेम झाडा सारखे देतात\nते पूर्ण वाढले म्हणजे पिकले\nमग आपल्याला खायला मिळते\nम्हणून सांगतो चिकनच्या बागेतील\nचिकन हे फळ असते\nमी विचारले , अरे तुला कुणी सांगितले हे \nतो म्हणाला ,मला कळले, आपोआप\nटीवी वर पोल्रीमल फार्म बघितला\nअन मला नॉलेज आले .\nत्याच्या ज्ञानाने चकाकणाऱ्या चेहऱ्याने\nअन आत्म विश्वासाने भरलेल्या डोळ्याकडे\nमला त्याचे म्हणणे पटून गेले\nअन मी बायकोला मोठ्याने म्हणालो\nअगं आपल्याला आज संध्याकाळी\nचिकन फळे घेवून ये\nखूप वर्ष झाली खाल्ली नाहीत \nडॉ. सतीश अ. कानविंदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/t18575/", "date_download": "2018-04-24T07:00:13Z", "digest": "sha1:3IWKXWWC23WOS6DRR2BCWNRGRJCK6NRK", "length": 2782, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-आमच्या व्यथा", "raw_content": "\nकोणा कोणाला आरक्षण देणार\nकोणा कोणाला आरक्षण पुरणार\nअरे प्रश्न नाही इथे जातीचा\nप्रश्न आहे इथे आमच्या व्यवस्थेचा\nकोणा कोणाचे स्मारक उभारणार\nकोणा कोणाचे सृष्टी साकारणार\nअरे प्रश्न नाही इथे आदर्श ठेवण्याचा वा प्रेरणेचा\nप्रश्न आहे इथे आमच्या बेरोजगारिचा\nकोणा कोणाचे नुकसान भरणार\nकोणा कोणाचे आत्महत्या रोखणार\nअरे प्रश्न नाही इथे अवकाळी पावसाचा\nप्रश्न आहे इथे आमच्यावरल्या सावकारिचा\nकोणा कोणाला तुम्ही अजुन मारणार\nकोणा कोणाला मारून किती संपवणार\nअरे प्रश्न नाही इथे मरणाऱ्याचा\nप्रश्न आहे इथे आमच्या पुरोगामी महाराष्ट्राचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T06:29:01Z", "digest": "sha1:SBXSUHTNJFFLLTX72E4TSNO7DOVJ2NSD", "length": 6306, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हेनेशियन भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nरियो ग्रांदे दो सुल\nvec (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nव्हेनेशियन ही इटलीच्या व्हेनेतो प्रदेशामध्ये उगम पावलेली रोमान्स भाषासमूहामधील एक भाषा आहे. सध्या ह्या भाषेचे सुमारे २२ लाख वापरकर्ते आहेत. ही भाषा इटालियन पासून पूर्णपणे भिन्न आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ नोव्हेंबर २०१६ रोजी २३:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/mahishasurmardini/", "date_download": "2018-04-24T07:06:43Z", "digest": "sha1:J4XRVMPK5ETUFL6TIHEKLU5KZKCZHQWD", "length": 19237, "nlines": 138, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Mahishasurmardini - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nगत ५ वर्षों से श्रद्धावान महिलाएँ परमपूज्य सद्गुरु श्री (अनिरुद्ध) बापू के मार्गदर्शन में हर्षोल्लास के साथ ‘श्रीमंगलचण्डिका प्रपत्ती’ कर रही हैं ‘प्रपत्ती’ यानी आपत्तिनिवारण करनेवाली शरणागति ‘प्रपत्ती’ यानी आपत्तिनिवारण करनेवाली शरणागति जैसा कि बापू ने कहा है, ‘श्रीचण्डिका उपासना’ यह रामराज्य के लिए सबसे महत्वपूर्ण है जैसा कि बापू ने कहा है, ‘श्रीचण्डिका उपासना’ यह रामराज्य के लिए सबसे महत्वपूर्ण है बापू के कहेनुसार, माँ जगदम्बा की, महिषासुरमर्दिनी की उपासना करने पर ही अशुभ का नाश हो जाता है, ...\tRead More »\nपरमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘आईला आपले बाळ प्रिय असतेच’ याबाबत सांगितले. मानवाने स्वत:ची बुद्धी बाजूला ठेवायची नसते तर ती वापरायची असते, पण कशी, तर हृदयाला धरून. जशी आई आपल्या बाळावर प्रेम करते त्याप्रमाणे. बुद्धी असतेच तिला, तिला कळत असते की आपलं बाळ इतरांपेकक्षा दिसायला, बुद्धीने कमी आहे. तिच्या बुद्धीला कळत असतेच पण ...\tRead More »\nपरम पूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २५ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘मोठी आई (आदिमाता चण्डिका) शंखाच्या माध्यमातून आमच्या प्रार्थना ऐकते’ याबाबत सांगितले. शंख (conch) लहानशा आवाचाचे रूपांतर मोठ्या आवाजात करतो. दिवसातून एकदा तरी शंख(conch) वाजविला तरी चांगले आहे त्यामुळे दूषित स्पन्दने (वायब्रेशन्स्‌) निघून जातील; कारण पवित्र स्पंदने निर्माण करून अपवित्र स्पंदनांचा नाश करणे हे शंखाचे मूळ कार्य आहे. ...\tRead More »\n करुणा का विस्तार करो (Mother Durga\n करुणा का विस्तार करो (Mother Durga Expand Your Compassion) ‘दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी’ इस मॉं दुर्गाकी आरती में माता दुर्गा पर सर्वप्रथम विश्वास प्रकट करके फिर दुर्गामाता(मॉं दुर्गा) से प्रार्थना की है कि हे मॉं, मैं जहां भी हूं वहां तक तुम अपनी करुणा का विस्तार करो; मैं अक्षम हूं परंतु तुम अपनी ...\tRead More »\nसद्‌गुरू श्री अनिरुद्ध बापूंचे श्रीश्वासम्‌वरील प्रवचन ( Shreeshwasam)\nहरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ. पहिल्यांदा आपल्याला आता श्रीसूक्त ऐकायचं आहे. श्रीसूक्त…वेदांमधील एक अशी अनोखी देणगी आहे की जी ह्या…आपण उपनिषदामध्ये आणि मातृवात्सल्यविंदानम् मध्ये बघितलंय की लोपामुद्रेमुळे आपल्याला मिळाली…महालक्ष्मी आणि तिची कन्या लक्ष्मी…ह्या मायलेकींचं एकत्र असणारं पूजन, अर्चन, स्तोत्र, स्तवन…सगळं काही…म्हणजे हे ‘श्रीसूक्तम्’. तर आज पहिल्यांदा…फक्त आजपासून सुरु करायचं आहे आपल्याला ‘श्रीसूक्तम्’. आपले महाधर्मवर्मन म्हणणार आहेत. हरि ॐ. अर्थ ...\tRead More »\nआदिमाता चण्डिकेवरील आणि तिच्या पुत्रावरील म्हणजेच त्रिविक्रमावरील प्रेम वाढवत रहा (Increase The love For Aadimata Chandika And Her Son Trivikram) प्रेम वाढवत नेण्याचा संकल्प या वर्षी (२०१५) प्रत्येक श्रद्धावानाने करावा. या संकल्पात ज्याप्रमाणे स्वत:चे आप्तस्वकीय, मित्रमंडळी यांच्यावर प्रेम वाढवत राहणे अभिप्रेत आहे, त्याचप्रमाणे आदिमाता चण्डिकेवर आणि तिच्या पुत्रावर म्हणजेच त्रिविक्रमावर(Trivikram) अधिकाधिक प्रेम करणेसुद्धा अभिप्रेत आहे. आदिमाता चण्डिका आणि तिचा पुत्र ...\tRead More »\nसत्‌ – चित्‌ -आनन्द क्या हैं (What is Sat – Chit – Anand \nसत्‌ – चित्‌ -आनन्द क्या हैं ( What is Sat – Chit – Anand ) भगवान हैं यह जानने से, महसूस करने से, पहचानने से जो आनन्द होता हैं वहीं भगवान का सहीं स्वरुप हैं इसके बारे में परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूनें अपने २८ नवंबर २०१४ के हिंदी प्रवचन में बताया, जो आप इस व्हिडिओ में देख सकते ...\tRead More »\nमनुष्याच्या जीवनातील दुःखाची व्याख्या, त्यावर कशाप्रकारे मात करावी आणि पुरुषार्थाने समग्र जीवनविकास कसा साधावा. हे बापूंनी ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. (How to overcome sorrows and fullfil your life by doing purushartha Aniruddha Bapu Marathi Discourse 23-Jan-2014) ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll मी अंबज्ञ आहे ll\tRead More »\nImportants, Modus Operendi of Chandika Kul, meaning of Kul explane by Bapu in his Pravachan (परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २३ जानेवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे श्रध्दावानांच्या जीवनात चण्डिका कुलाचे महत्व व कार्यपध्दती, तसेच कुल म्हणजे काय हे समजावले. जो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो. ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll ...\tRead More »\nदुर्गा मंत्र यह Algorithm संबंधी बापू ने दिया हुआ प्रवचन – भाग १\nॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम: इस महिषासुरमर्दिनी ने ही, इस चण्डिका ने ही, इस दुर्गा ने ही सब कुछ उत्पन्न किया इस महिषासुरमर्दिनी ने ही, इस चण्डिका ने ही, इस दुर्गा ने ही सब कुछ उत्पन्न किया प्रथम उत्पन्न होनेवाली या सर्वप्रथम अभिव्यक्त होनेवाली वह एक ही है प्रथम उत्पन्न होनेवाली या सर्वप्रथम अभिव्यक्त होनेवाली वह एक ही है फिर वह उन तीन पुत्रों को जन्म देती है और फिर सबकुछ शुरू होता है फिर वह उन तीन पुत्रों को जन्म देती है और फिर सबकुछ शुरू होता है हमने बहुत बार देखा, हमें यह भी समझ में आया की यह ...\tRead More »\nAniruddha Bapu’s Marathi Discourse 23 Jan 2014 – Explaning the Meaning of Mahishasur (परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनंक २३ जानेवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे” महिषासुर शब्दाचा अर्थ सांगितला,” जो येथे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो.) ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll मी अंबज्ञ आहे ll [btn link=”http://www.aniruddhafriend-samirsinh.com/durga-mantra-yeh-algoritham-bapu-pravachan/” color=”orange”] हिंदी[/btn]\tRead More »\nश्रीमंगलचंडिका प्रपत्ती – महत्वाची सूचना(Shreemangalachandika Prapatti)\nll हरि ॐ ll मागील वर्षी श्रीमंगलचंडिका प्रपत्ती पूजनाच्या तयारीचा व्हिडीओ अपलोड केला होता. अनेक स्त्री भक्तांना मांडणीसाठी या व्हिडीओचा उपयोग झाला. या प्रपत्तीच्या तयारीसाठी ज्या सामग्रीची आवश्‍यकता असते त्यात शेवग्याच्या शेंगांचा प्रामुख्याने समावेश आहे. पण अनेक ठिकाणी शेवग्याच्या शेंगा उपलब्ध होत नसल्याने ओला हरबर्‍याच्या वापरास परम पूज्य बापूंनी परवानगी दिली होती. अनेक ठिकाणी शेवग्याच्या शेंगां करता भक्तांची अडवणूक झाली ...\tRead More »\nबापूंकडून नव्या वर्षाची श्रध्दावानांना भेट – मातृवात्सल्य उपनिषद(Gift to Shraddhavans-Matruvatsalya Upanishad)\n॥ हरि ॐ ॥ दिवाळीच्या आधीच्या गुरुवारी प्रवचनामध्ये बापूंनी मातृवात्सल्य उपनिषद दत्तजयंतीला सर्वांना उपलब्ध होईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे दत्तजयंतीला हे उपनिषद सर्वांना मिळणार आहे. तेव्हा बापूंनी या उपनिषदाबद्दल सांगितले होते की, “हे उपनिषद म्हणजे अगदी प्रत्येकासाठी त्याच्या जीवनाच्या, मनाच्या प्रत्येक कमतरतेसाठी त्याच्या प्रत्येक दुर्गुणासाठी, प्रत्येक पुण्यासाठी, प्रत्येक पापासाठी, त्याच्या आधीच्या व ह्या जन्माच्या पुढे येणार्‍या प्रत्येक जन्मांसाठी, त्याच्या स्वभावासाठी, ...\tRead More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.vidyawarta.com/04/?page_id=5108", "date_download": "2018-04-24T06:32:39Z", "digest": "sha1:43J3NY3WU7GYMMWWKB4PLDJ3TT7ORFZF", "length": 3477, "nlines": 101, "source_domain": "www.vidyawarta.com", "title": " मोफत वाचा मराठी पुस्तकं | Vidyawarta", "raw_content": "\nHome मोफत वाचा मराठी पुस्तकं\nमोफत वाचा मराठी पुस्तकं\nज्यानां मराठी पुस्तकं वाचायला आवडतात त्यांच्यासाठी एक लिंक\nया वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिक करा. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. फ़्री आणि ईझी.\nबेसुमार मराठी पुस्तकं वाचा. All Free Marathi books उत्तम दर्जेदार पुस्तकं. कोणताही विषय घ्या. कितीही वाचा. कुठेही पैशाची मागणी नाही. जाहिराती नाहीत. भलत्यासलत्या हायटेक लिंक्स नाहीत, व्हायरस नाही. ब्रेक्स नाहीत. तुम्ही जर खरे मराठी वाचनाचे भक्त असाल तर याहून मोठा सुखाचा खजिना तुम्हाला इतक्या सहजपणे कुठेही मिळणार नाही.\n» शोध पत्र कैसे लिखे \n» कृती देव ०५५ फॉन्ट\nआपल्या सगळ्यांना आवडणारी मराठी संकेतस्थळे. बक्कळ माहिती\nस्पर्धा परीक्षा पुस्तके PDF मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/hot-gossip/shahrukh-khan-relishes-rajasthani-thali-in-jaipur/22602", "date_download": "2018-04-24T06:54:43Z", "digest": "sha1:MRIPO26QOGJLMTDPWJO7HJODQF65BK2N", "length": 25811, "nlines": 245, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "shahrukh khan relishes rajasthani thali in jaipur | SEE PICS : अबब... शाहरूख खानने चक्क सोन्याच्या ताट्यात घेतला महाराजा थाळीचा आस्वाद! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेंडल्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\nया कारणामुळे मराठी बिग बॉसमध्ये झळकली नाही ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणणारी अभिनेत्री, साकारणार २८ भूमिका\nया ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nसचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला\n​या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nसोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक\n​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही\nथॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’\n​प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम\n​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nमिलिंद सोमणच्या लग्नाचे नवीन फोटो आले समोर,असा होता दोघांचा अंदाज\n'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का\nब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज\nSEE PICS : अबब... शाहरूख खानने चक्क सोन्याच्या ताट्यात घेतला महाराजा थाळीचा आस्वाद\nशाहरूखचा अंदाज बघण्यासारखा असून, त्यात तो चक्क सोन्याच्या ताटात महाराजा थाळीचा आस्वाद घेताना बघावयास मिळत आहे.\nबॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याव्यतिरिक्त शाहरूख सध्या जोधपूर आणि जयपूरच्या दौºयावर असून, त्याच्या दौºयातील काही फोटोंनी सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. कधी स्थानिक पोशाखात तर कधी राजस्थानी अंदाजात तो लोकांना आपलेसे करीत आहे. परंतु आता समोर आलेल्या फोटोंमध्ये शाहरूखचा अंदाज बघण्यासारखा असून, त्यात तो चक्क सोन्याच्या ताटात राजस्थानी जेवणाचा आस्वाद घेताना बघावयास मिळत आहे.\nशाहरूखच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाचे आतापर्यंत चार गाणी आणि बरेचसे मिनी ट्रेलर रिलीज झाले आहेत. हे सर्व गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्याने सगळ्यांना त्याच्या या चित्रपटाची आतुरता लागली आहे. दरम्यान, शाहरूखच्या राजस्थानी दौºयातील काही फोटोज् सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. एका फोटोमध्ये तो राजस्थानी पगडीमध्ये, तर दुसºया फोटोत चक्क सोन्याच्या ताटात जेवण करताना दिसत आहे. शाहरूखने पहिल्यांदाच राजस्थानी फूड रेस्टॉरंटमध्ये सोन्याच्या ताटात दाल-बाटी आणि चुरमाची चव चाखली आहे.\nखरं तर राजस्थानी जेवणाबद्दल लोक नेहमीच असे म्हणतात की, जो कोणी राजस्थानी जेवणाची चव चाखतो तो या जेवणाचा चाहता बनतो. शाहरूखला बघून याची जाणीवही होते. कारण ताटभर असलेल्या जेवणाला शाहरूख ज्या पद्धतीने एक टक बघून न्याहाळत आहे, त्यावरून तो राजस्थानी जेवणाच्या प्रेमात पडला असेल यात शंका नाही. शाहरूखला तब्बल १४ वाट्यांमध्ये राजस्थानी खाद्यपदार्थ वाढले होते. शाहरूखनेही मोठ्या चवीने दोन वाट्यांमधील पदार्थांची चव चाखली. याव्यतिरिक्त त्याने जोधपुरी गट्टेची भाजी, कॅर सांगरी, बेसनचा चुरमा, प्लेन चुरमा कढी, घेवर, मालपुुवा, केसरची खीर आणि राजस्थानी पापडाचीही चव चाखली.\nजेवणाअगोदर शाहरूखला पिवळ्या रंगाचा फेटा घातला होता. यावर त्याने काही फोटोही शूट केले. यावेळी त्याच्या हातात तलवारही देण्यात आली. अगदी महाराजा अंदाजात त्याचे स्वागत करण्यात आले. पाहुणचार म्हणून त्याला महाराजा थाळी वाढण्यात आली होती. या थाळीची जर तुम्ही किंमत ऐकाल तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, सोन्याच्या या थाळीची किंमत दहा हजार रुपये इतकी आहे.\nशाहरूखने या दौºयादरम्यान त्याच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाचे प्रमोशनही केले. चित्रपटात तो एक इंटरनॅशनल टूरिस्ट गाइडची भूमिका साकारत आहे. परंतु जोधपूर पोहचल्यानंतर त्याला खराखुरा गाइड बनविले. होय, तेथील टूरिस्ट गाइड असोसिएशनने त्याला आॅनररी सदस्य बनविले. त्यामुळे आता शाहरूख खराखुरा गाइड झाला आहे.\n​शाहरुख खानची पहिली कमाई होती केवळ...\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का...\nअबब... प्रियांका चोप्राच्या ‘या’ ड्...\nफक्त पाचवीपर्यंत शिकली बॉलिवूडची ‘ह...\nशिल्पा शेट्टीचे शिर्डीतील फेव्हरेट...\nअर्धनग्न आंदोलन करणाऱ्या अभिनेत्रील...\nएकेकाळी बार डान्सर असलेल्या ‘या’ तर...\nअसे काय घडले असेल की ‘या’ अभिनेत्या...\nसेल्फीवेड्या चाहत्यांमुळे ‘या’ अभिन...\nगर्दीचा फायदा घेत चाहत्याने ‘या’ अभ...\nबिग बीच्या नातवासोबत डिनर डेटला गेल...\nश्रीदेवी यांच्या लहान मुलीने केले ग...\nएली अवराम नाही तर 'या' अभिनेत्रीला...\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या...\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बि...\n‘या’ कारणामुळे हेलिकॉप्टरने सेटवर ज...\nचंकी पांडेने गायले लेकीचे गोडवे; म्...\nअट्टल गुन्हेगारांच्या यादीत सलमान ख...\nदिशा पाटनी-विजे बानीची जमली जोडी; ए...\nइंटरनेट सनसनी प्रिया प्रकाशचा पुन्ह...\nआपल्या आजीसोबत थिरकणाऱ्या ‘या’ अभिन...\nअक्षयकुमारने म्हटले, ‘ट्विंकलसमोर म...\nट्रोलरने म्हटले, ‘तू पैशांसाठी नाचत...\nWatch Video : कॅटरिना कैफचे अश्रू स...\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर\nIt's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’ सलमान खानसोबत जमणार जोडी\nहिनाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t19218/", "date_download": "2018-04-24T06:54:45Z", "digest": "sha1:X3HMUDFZ3EYH76KQE7DKT2JYBIZMSJD5", "length": 5935, "nlines": 132, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मेघश्यामल रिमझिमले", "raw_content": "\nवाढला उष्मा ग्रीष्माचा, सरला मास ज्येष्ठाचा\nऊन मध्यान्हाचे, माथ्यावर शिरवळले\nपाऊल चार, नकळत तिकडे वळले\nमोकळ्या नभात घन अचानक गजबजले\nश्यामल मेघांना वारे गार कुजबुजले\nपहिली वहिली सर, धरणीवर बरसली\nनि:श्वास तृप्तीचा घेऊन, मृदगंधित झुळूक दरवळली\nआसुसलेली झाडे वेली, पानेफुलेही चिंब न्हाली\nमाथ्यावरचे रान भिजले, शिवार सारे झाले ओले\nभिजलेले दोन पक्षी, एका फांदीवर विसावले\nपंखावरची ओली नक्षी, एकमेकां पाहून सुखावले\nपहिल्या सरीचे पहिलेच थेंब, गालावर तिच्या ओथंबले\nबनुनी मोती काही त्यातले, स्पर्शाने तिच्या ओघळले\nवाटले टिपावे सगळे, प्राशावे अमृत सगळे\nपाहुनी अंग भिजलेले, मन माझे मोहुनी गेले\nमोकळ्या केसांना अलगद, हळुवार तिने झटकले\nमिटुनी डोळे घेउनि श्वास, रोमरोमांनी माझ्या प्यायले\nलाजलेल्या नजरेने, हळूच तिने मज पाहिले\nगुपित सगळे मनातले, सहज मला उमगले\nश्यामल चंचल मेघ फिरुनी पुन्हा रिमझिमले\nदाट घनांच्या गर्दीतून रविराजे डोकावले\nसाक्ष प्रीतीची द्यावया इंद्रधनु प्रगटले .\nकवी : सचिन निकम\nश्यामल चंचल मेघ फिरुनी पुन्हा रिमझिमले\nदाट घनांच्या गर्दीतून रविराजे डोकावले\nसाक्ष प्रीतीची द्यावया इंद्रधनु प्रगटले .\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nभिजलेले दोन पक्षी, एका फांदीवर विसावले\nपंखावरची ओली नक्षी, एकमेकां पाहून सुखावले\nकविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...\n[ कविता म्हणजे कागद,\nलेखणी अन् तू... ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/shikhar-dhawan-playing-with-son/", "date_download": "2018-04-24T06:34:58Z", "digest": "sha1:J3FHS2ELZRG4NGZNWYGNOM4KSZSWF7TN", "length": 5393, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "शिखर धवनचा मुलाबरोबर पकडापकडी खेळतानाचा एक खास व्हिडिओ - Maha Sports", "raw_content": "\nशिखर धवनचा मुलाबरोबर पकडापकडी खेळतानाचा एक खास व्हिडिओ\nशिखर धवनचा मुलाबरोबर पकडापकडी खेळतानाचा एक खास व्हिडिओ\nभारताचा सलामीवीर आणि गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदामधील स्टार शिखर धवनने आपल्या मुलाबरोबर खेळतानाचा एक खास व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला शिखरने एक खास कॅप्शन सुद्धा दिले आहे.\nज्यात शिखर म्हणतो , ” झोरावरबरोबर पकडा पकडी हा खेळ खेळतोय. गवतावर अनवाणी पायांनी फिरणे शरीरासाठी चांगले असते.”\nसध्या भारतीय संघ इंग्लंड मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याची तयारी करत असून भारताने पहिले दोन्ही सराव सामने जिंकले आहेत. भारताचा पहिला सामना ४ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर बर्मिंघम येथे होत आहे.\nआर्सेनलने दाखवला वेंगरवर पुन्हा विश्वास\nबार्सिलोनाच्या नवीन प्रशिक्षकाच्या चर्चेला पूर्णविराम\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२\nवाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…\nवाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २\nवाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946565.64/wet/CC-MAIN-20180424061343-20180424081343-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}