{"url": "http://www.eshodhan.com/2018/05/blog-post_54.html", "date_download": "2022-10-07T21:31:31Z", "digest": "sha1:J3OSSA5XEBLN2KMUTANZL2SSA33XE5KI", "length": 20082, "nlines": 216, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "आलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n(१५) सांगा, यापेक्षा अधिक चांगली वस्तू काय आहे, ते मी सांगू जे लोक अल्लाहचे भय बाळगून वागतील, त्यांच्यासाठी त्यांच्या पालनकर्त्याजवळ उद्याने आहेत ज्यांच्याखालून कालवे वाहत असतील, तेथे त्यांना चिरकालीन जीवन प्राप्त होईल. पवित्र पत्नीं त्यांच्या सोबती असतील११ आणि ते अल्लाहच्या प्रसन्नतेने मान्यवर होतील. अल्लाह आपल्या दासांच्या वागणुकीवर कडक देखरेख ठेवतो.१२\n(१६) हे ते लोक आहेत जे म्हणतात, ‘‘हे स्वामी, आम्ही श्रद्धा ठेवतो. आमच्या अपराधांबद्दल क्षमा कर आणि आम्हाला नरकाग्नीपासून वाचव.’’\n(१७) हे लोक संयमी आहेत,१३ सत्यनिष्ठ आहेत, आज्ञाधारक व दानशूर आहेत, आणि रात्रीच्या अंतिम प्रहरी अल्लाहजवळ क्षमायाचना करीत असतात.\n(१८) अल्लाहने स्वत: या गोष्टीची ग्वाही दिली आहे की त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही,१४ आणि फरिश्ते व सर्व ज्ञान राखणारेसुद्धा रास्त व न्यायनीतीने याची ग्वाही देतात की,१५ त्या प्रभावशाली बुद्धीमंताशिवाय खरे पाहता कोणीही ईश्वर नाही.\n(१९) अल्लाहजवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच१६ आहे. या ‘दीन’पासून दूर जाऊन जे विभिन्न मार्ग अशा लोकांनी अवलंबिले, ज्यांना ग्रंथ दिले गेले होते, त्यांच्या आचरणाचे कारण याशिवाय अन्य काही नव्हते, की त्यांनी ज्ञान पोहचल्यानंतर, आपापसात एकमेकांशी अतिरेक करण्यासाठी असे केले१७ आणि जो कोणी अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देईल, त्याचा हिशेब घेण्यास अल्लाहला विलंब लागत नाही.\n११) तपशीलासाठी पाहा सूरह २ (अल्बकरा) टीप - २७\n१२) अल्लाह अनुचित बक्षीस देणारा नाही आणि वरकरनी न्याय करणारा नाही. तो दासांच्या कर्मांना आणि संकल्पांना पूर्ण ओळखून आहे. अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो की दासांपैकी कोण बक्षिसपात्र आहे व कोण नाही.\n१३) म्हणजे हे सत्यमार्गात पूर्ण दृढता दाखविणारे आहेत. हे एखाद्या संकटाने अथवा नुकसानीमुळे हिंमत सोडून देणारे नाहीत. अपयशाने यांचे मन कधीच खचत नाही की लालसेत पडून त्यांचे पाय डगमगत नाही. सफलतेची शक्यता वरकरनी दिसत नसतांनाही ते सत्यावर दृढ राहतात. (पाहा सूरह २ (अल्बकरा) टीप. ६०)\n१४) म्हणजे अल्लाह जो सृष्टीच्या सर्व तथ्यांचे पूर्ण ज्ञान ठेवून आहे. त्याची ही साक्ष आहे. त्याच्या साक्षीपेक्षा विश्वसनीय व चश्मदीद (उघड) साक्ष कोणाची असू शकते की पूर्ण सृष्टीत अल्लाहशिवाय दुसरी अशी कोणतीच शक्ती अशी नाही की सत्ता नाही जी ईशत्वाच्या गुणांनी संपन्न असावी, जी ईशसत्तेचा मालक असावी आणि ईशाधिकारांसाठी पात्र असावी.\n१५) अल्लाहनंतर सर्वाधिक विश्वसनीय साक्ष फरिश्त्यांची आहे. कारण ते सर्व सृष्टी व्यवस्थापनाचे कार्यकर्ते आहेत आणि ते आपल्या स्वत:च्या ज्ञानावरून ग्वाही देत आहेत की सृष्टी साम्राज्यात अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणाचाच आदेश चालत नाही आणि त्याच्याशिवाय दुसरे कोणतेच अस्तित्व असे नाही ज्याच्याशी धरती व आकाशांच्या व्यवस्थापनासंबंधी ते रूजू करतात. यानंतर निर्मितीपैकी ज्या कुणाला तथ्याचे कमी अधिक ज्ञान प्राप्त् आहे, त्या सर्वांची प्रारंभापासून ते आजतागायत सर्वसंमत साक्ष आहे की एकमेव अल्लाह या सृष्टीचा मालक, पालक व शासक आहे.\n१६) म्हणजे अल्लाहजवळ मनुष्यासाठी केवळ एकच जीवनप्रणाली आहे आणि हीच एकमेव जीवनपद्धती योग्य आणि सत्य आहे. या जीवनप्रणालीचा मूळाधार एकेश्वरत्व आहे. एकमेव अल्लाहची भक्ती उपासना केली जावी व त्याच्या दास्यत्वात आणि आज्ञापालनात मनुष्याने स्वत:ला पूर्णत: समर्पित करावे. अल्लाहच्या उपासनेच्या आणि आज्ञापालनाच्या पद्धतीला स्वत:च्या मनाने शोधून काढू नये. अल्लाहने आपल्या पैगंबरांकरवी जे मार्गदर्शन पाठविले आहे, त्याला तसुभर कमीजास्त न करता अनुसरण करावे. याच चिंतन व कार्यप्रणालीचे नाव `इस्लाम'आहे. हे अगदी उचित आहे की सृष्टीनिर्माता अल्लाह आपल्या सृष्टीतील निर्मित मानवांसाठी `इस्लाम'व्यतिरिक्त दुसरी एखादी जीवनप्रणाली रद्दबातल ठरवितो. मनुष्य आपल्या मूर्खपणामुळे आपल्या स्वत:ला नास्तिकतेपासून ते अनेकेश्वरवादी तसेच मूर्तीपूजकांपर्यंत प्रत्येक विचारसरणीला आणि अनेक धारणांवर आचरण करण्यास वैध समजतो, परंतु सृष्टीसम्राट अल्लाहच्या दृष्टीने हा स्पष्ट विद्रोह आहे.\n२५ मे ते ३१ मे २०१८\nसाहित्य संमेलनासारख्या उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्य...\nआपण जितके मानवतावादी तितकेच आपले प्रबोधन सत्यनिष्ठ...\nकुरआनचे पठण : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n१८ मे ते २४ मे २०१८\nडील करण्याची खरी वेळ\nजगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी (भाग ३) : प्रेषित...\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nजगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी (भाग २) : प्रेषित...\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\nबलात्काऱ्यांना फाशी देऊन उपयोग नाही व्यवस्था बदलाव...\nउस्मान शेख यांना पोलीस महासंचालकांचे मानचिन्ह\nकाँग्रेस एक मुस्लिम पक्ष आहे का\n११ मे ते १७ मे २०१८\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०४ मे ते १० मे २०१८\nहे तर अपेक्षितच होतं\nमोदींनी आता बोलकं व्हाव - डॉ. मनमोहन सिंग\nखिर्द ने कह भी दिया तो क्या हासिल\n‘आरोपी बचाव’ भाजपची नवी घोषणा\nराजर्षी शाहू, कर्मवीरांचे विचार प्रभावीपणे पुढे यावेत\nदेशातील प्रसारमाध्यमे ही लोकशाहीची खरी शक्ती - डॉ....\nजगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/woman-gets-pregnant-with-her-step-son-she-raised-from-the-age-of-7-see-the-weird-relationship-story/articleshow/93591748.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article13", "date_download": "2022-10-07T21:11:05Z", "digest": "sha1:B7UFSWNIERG6KMIRVLA55EDGHQ5PVJS7", "length": 13999, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " पाहा ही महिला काय करुन बसलीये...\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nबाळाने 'त्याला' पप्पा म्हणावं की दादा पाहा ही महिला काय करुन बसलीये...\nWoman Gets Pregnant with Step Son: मरिना बालमाशेवा नावाच्या या ३७ वर्षीय महिलेने तिच्या सावत्र मुलासह एका मुलीला जन्म दिला आणि आता ती पुन्हा गर्भवती आहे. ती ज्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे तो तिचा सावत्र मुलगा आहे. त्याचं नाव व्लादिमीर आहे. ज्या मुलाला या महिलेने वाढवले ​​आणि ज्याने तिला आई म्हणून हाक मारली, तेच मूल मोठे झाल्यानंतर ती त्याच्या मुलाची आई झाली आहे.\nबाळाने त्याला पप्पा म्हणावं की दादा पाहा ही महिला काय करुन बसलीये\nज्या मुलाला ७ वर्षाचा असतानापासून वाढवलं\nत्याच्यावरच प्रेम जडलं, मग लग्नही केलं\nआता त्या सावत्र मुलाच्या बाळाची आई होणार\nनवी दिल्ली: जगात आपल्याला अनेक गुंतागुंतीची नाती पाहायला मिळतात. असंच एक नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. येथे एका महिलेने ज्या मुलाला वयाच्या ७ व्या वर्षापासून मुलासारखं सांभाळलं, त्याच्यासोबतच एका बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे या दोघांना झालेल्या बाळाने त्या व्यक्तीला आता बाबा म्हणावं की दादा असा प्रश्न आहे.\nमरिना बालमाशेवा नावाच्या या ३७ वर्षीय महिलेने तिच्या सावत्र मुलासह एका मुलीला जन्म दिला आणि आता ती पुन्हा गर्भवती आहे. ती ज्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे तो तिचा सावत्र मुलगा आहे. त्याचं नाव व्लादिमीर आहे. ज्या मुलाला या महिलेने वाढवले आणि ज्याने तिला आई म्हणून हाक मारली, तेच मूल मोठे झाल्यानंतर ती त्याच्या मुलाची आई झाली आहे. सध्या ही कहाणी जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे.\nहेही वाचा -समुद्रात वाहून गेलेल्या पत्नीचा आला व्हॉइस मेसेज; 'मी रवीसोबत आनंदी आहे'...\nमुलाला वाढवलं, नंतर त्याच्याच बाळाची आई झाली\nमरीनाने अलेक्सी शाविरिनशी लग्न केले होते आणि ती त्याच्या घरात राहायची आणि तिने त्याच्या मुलाचा वयाच्या ७ व्या वर्षापासून सांभाळही केला. मुलाच्या वडिलांसोबत वैवाहिक जीवन जगत असताना, मरिनाने एकूण ४ मुले दत्तक घेतली होती, जी आता अलेक्सीसोबत राहतात. लग्नादरम्यानच मरीनाचं तिच्या सावत्र मुलावर प्रेम जडलं.\nमिररच्या रिपोर्टनुसार, विद्यापीठाच्या सुट्टीसाठी घरी आल्यावर त्यांचं नातं सुरू झालं आणि मरीना आपल्या सावत्र मुलाशी लग्न करण्यासाठी नवऱ्यापासून विभक्त झाली. त्यावेळी या जोडप्याला २० महिन्यांची एक मुलगी होती.\nहेही वाचा -आयकियाचे दरवाजे अचानक बंद, कर्मचाऱ्यांनी शेकडो ग्राहकांना जबरदस्ती रोखलं; नेमकं काय घडलं\nआता दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे\nरशियात सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळवलेल्या मरीनाने आपल्या सावत्र मुलासोबत लग्नही केलं आहे. आता ती आणखी एका बाळाला जन्म देणार आहे. त्यांनी ही बातमी त्यांच्या ६ लाख २० हजार फॉलोअर्ससोबत शेअर केली असून त्यापैकी अनेकांनी त्यांचे अभिनंदनही केले आहे.\nव्लादिमीरचे वडील आणि मरीनाच्या माजी पतीला हे नाते अजिबात आवडत नाही. फम, ते काहीही करु शकत नाहीत. व्लादिमीर युक्रेनजवळ काम करत होता, परंतु युद्धानंतर मरीनाही त्याची मदत करते. सोशल मीडियावर ती अनेकदा त्यांचे फोटो पोस्ट करत असते.\nहेही वाचा -लग्नाची स्वप्नं रंगवली, डेस्टिनेशन वेडिंगसाठी दोघे निघाले; विमानतळावर स्वप्नांचा चुराडा\nज्या हातावर बहिणीनं बांधली राखी, त्याच हातांनी घेतला तिचा आणि तिच्या प्रियकराचा जीव\nमहत्वाचे लेखआयकियाचे दरवाजे अचानक बंद, कर्मचाऱ्यांनी शेकडो ग्राहकांना जबरदस्ती रोखलं; नेमकं काय घडलं\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमटा ओरिजनल मुंढेंच्या धाडसत्राने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, रात्री डॉक्टर नसल्यास थेट घरचा आहेर\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nमुंबई शकील, छोटा राजनला माझी सुपारी दिली; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप\nपुणे सरकार बदललं अन् रश्मी शुक्लांना क्लीनचिट मिळाली, मविआ नेत्यांना जी भीती होती तेच घडलं\nक्रिकेट न्यूज उभारायला गेले MS Dhoni चा मेणाचा पुतळा, पण धोनीची झाली अनहोनी, पाहा भन्नाट memes\nमुंबई ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा ते दिघेंच्या मृत्यूचं ठाकरे कनेक्शन, मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज\nदेश काँग्रेस नेत्यानं हॉटेलमध्ये नेलं, मग सामूहिक अत्याचार केले, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर तिघांना अटक\nLive Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी\nक्रिकेट न्यूज कमजोर पाकिस्तानने रोखला भारतीय संघाचा विजयरथ, आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला हरवलं\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nसिनेन्यूज चंद्रमुखी झाली सोनाबाई देशपांडे,अमृता खानविलकर पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत,लूक आला समोर\nसिनेन्यूज मराठी सिनेसृष्टीतील या जोडप्याने खरेदी केली महागडी कार, किंमत आहे तब्बल...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2022-10-07T22:32:15Z", "digest": "sha1:EKIQM5AGWN2ALHZACXQXSM3EVFNYTTBY", "length": 4835, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "खाते उतारा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nखाते उतारा ही बँकग्राहकाच्या चालू खात्यातील सर्व व्यवहारांची नोंद होय. साधारणतः खाते उतारा एक महिन्यासाठी दिला जातो.\nखाते उताऱ्यात बहुधा खालील गोष्टींचा समावेश असतो.\n१) खातेदाराचे नाव सुदाम मुराडे\n२) खात्याचा क्रमांक 747\n३) खाते उताऱ्याचा कालावधी (कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत)\n४) महिन्याच्या सुरुवातीला असणारी खात्यातील जमा रक्कम\n५) संपूर्ण महिन्यात जमा आणि नावे झालेले सर्व व्यवहार\n६) प्रत्येक व्यवहाराची तारीख\n७) जमा किंवा नावे व्यवहाराची रक्कम\n९) प्रत्येक व्यवहारानंतर खात्याच्या शिलकीत झालेला बदल\n१०) महिनाअखेरीस खात्यामध्ये शिल्लक असणारी रक्कम.\nभारतातील बँकांमध्ये ग्राहकाला दरमहा एक खाते उतारा मोफत दिला जातो. पण काही कारणाने एकापेक्षा जास्त प्रती हव्या असतील तर त्याबद्दल सेवा शुल्क द्यावे लागते.सध्या, नेट बँकिंग वापरणारे ग्राहक, संबंधीत बँकेच्या संकेतस्थळावरून आपणास हव्या त्या कालावधीचा उतारा अधिभारण करून घेऊ शकतात. यासाठी कोणतेही शुल्क देय नाही.पण, वेगवेगळ्या बँकामध्ये वेगवेगळी प्रथा प्रचलित आहे.\nमालकीच्या जमिनीच्या बाबतीतील खाते उतारेसंपादन करा\nसात बाराचा उतारासंपादन करा\nहा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजून घेण्यासाठी महसूल विभागातर्फे दिलेला शासकीय अभिलेख आहे. क्रमांक ७ व क्रमांक १२ ही जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीच्या कायद्यातली विशेष कलमे आहेत. पहा: सात बाराचा उतारा\nगाव नमुना नं. ८अ म्हणजे खातेदारांची नोंदवही.\nशेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ तारखेला २२:३२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ रोजी २२:३२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18009/", "date_download": "2022-10-07T23:16:47Z", "digest": "sha1:AEK2DFDHHZ62RVFYIRFBKH2KFMI6M545", "length": 16593, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "चँपियन पट्टिताश्म – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nचॅंपियन पट्टिताश्म : ⇨ धारवाड संघानंतर तयार झालेल्या व ⇨ द्वीपकल्पी पट्टिताश्मांपेक्षा जुन्या अशा कर्नाटकातील पट्टिताश्मांना (रूपांतरित खडकांना) दिलेले नाव. कोलारजवळच्या सुभाजांमध्ये (सहज भंग पावणाऱ्या रूपांतरित खडकांमध्ये) ते प्रथम आढळले, त्यामुळे तेथील चॅंपियन नावाच्या सोन्याच्या धातुकाच्या (कच्च्या धातूच्या) शिरेवरून हे नाव पडले. अतिशय भरडले गेलेले सूक्ष्मकणी अभ्रकयुक्त ग्रॅनाइट पट्टिताश्म, त्यांच्याबरोबर आढळणारे इतर खडकांचे पट्टे व भरडकणी ग्रॅनाईट, पेग्मटाईट व क्वार्ट्‌झ यांच्या शिरा या सर्वांना मिळून प्रथम हे नाव दिले होते. यांतील ग्रॅनाइट मंद करड्या ते गुलाबी रंगाचा, मध्यम ते सूक्ष्मकणी, अभ्रकयुक्त व भरडलेला असून तो ग्रीजासारखा दिसतो. ओपल या खनिजासारखी चमक असणारे क्वार्ट्‌झाचे कण हे या ग्रॅनाइटाचे वैशिष्ट्ये असून फेल्स्पार, ॲपेटाईट, मॅग्नेटाइट आणि झिरकॉन ही खनिजेही त्यात असतात. क्वॉर्ट्‌झाचे असेच कण असलेले केरॅटोफायर, रायोलाइट, क्वॉर्ट्‌झ पॉर्फिरी व काही ग्रॅनाइट यांसारख्या सिकत (विपुल सिलिका असणाऱ्या) अग्निज खडकांचा चॅंपियन पट्टिताश्मात समावेश करतात.\nबाबाबुदन टेकड्या, शिमोगा पट्ट्याजवळ आणि धारवाड व बल्लारी जिल्ह्यांच्या दक्षिण भागात यांचे पट्टे आढळतात. आद्य जटिल राशींमध्ये खडकांचे अंतर्वेशन झाल्याने (घुसल्याने) चॅंपियन पट्टिताश्म निर्माण झाले आहेत. त्यांच्या जिभा धारवाडी सुभजांमध्ये घुसलेल्या असल्याने ते धारवाड कालानंतरचे आणि द्वीपकल्पी पट्टिताश्मांच्या अंतर्वेशनाने त्यांच्यात खंड पडला असल्याने ते द्वीपकल्पी पट्टिताश्मांहून जुने ठरतात. ऱ्होडेशियातील माँटॉर ग्रॅनाइटाचे त्यांच्याशी साम्य आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postचर्च, आर्थर हॅरी\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/peasant-protesters-hit-the-red-fort-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-07T22:46:01Z", "digest": "sha1:ESK7FWRDES6L2J7MONMJ5X67PNMQU6YW", "length": 8469, "nlines": 109, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "दिल्लीत शेतकरी आक्रमक, शेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर धडकले!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nदिल्लीत शेतकरी आक्रमक, शेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर धडकले\nदिल्लीत शेतकरी आक्रमक, शेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर धडकले\nनवी दिल्ली | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान पोलीस आणि शेतकरी यांच्यात वाद झाला आणि शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला.\nशेतकरी आंदोलकांची संख्या जास्त असल्याने ते पोलिसांवरच धावून जाताना दिसत होते. शेतकरी नेमके कुठे जात आहेत हे माहित नव्हतं. मात्र आता शेतकरी लाल किल्ल्यावर पोहोचले आहेत.\nशेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर जाऊन तेथे ध्वज फडकावला. दिल्ली पोलिसांच्या हाताच्या ही परिस्थिती बाहेर गेली आहे. राजपथावर मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आणि आंदोलक शेतकरी जाताना दिसले.\nदरम्यान, दिल्लीतील काही मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. शेतकरी ट्रॅक्टर घेऊन ते पोलिसांच्या अंगावर नेताना दिसत आहेत.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\nदिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज\n‘राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा’; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nप्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण\nशरद पवारांनंतर अजित पवारांनीही साधला राज्यपालांवर निशाणा; म्हणाले…\nबुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार- संजय राऊत\n“मोदी सरकारकडून घटनेवर हल्ला, राज्यघटनेचं संरक्षण करावं लागेल”\n“विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार देेऊ”\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/2369", "date_download": "2022-10-07T21:34:08Z", "digest": "sha1:Y6XLPXLDJ4F3EDQ3RVS4HP4PLVC4OKQ7", "length": 13574, "nlines": 108, "source_domain": "bollyreport.org", "title": "रातोरात महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या मनावर राज करणारा RJ राघव आहे तरी कोण, जाणून घ्या ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome Other News रातोरात महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या मनावर राज करणारा RJ राघव आहे तरी कोण, जाणून...\nरातोरात महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या मनावर राज करणारा RJ राघव आहे तरी कोण, जाणून घ्या \nकाही दिवसांपासुन अनेकांच्या व्हॉटस्अप स्टेटसला एका मुलाचा व्हिडीओ पाहायला मिळतो. त्याचे मोटीव्हेश्नल बोलणे अनेकांच्या मनाला भावणारे आहे. अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेला तो तरुण म्हणजे आरजे राघव. आज आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला त्याच्याबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत.\nआरजे राघव हा हॅलो एफएम चॅनलमध्ये काम करतो. या चॅनलवरील त्याचा आरजे राघवस् हा शो खुप प्रसिद्ध आहे. या शोमध्ये तो नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांना नेहमी खुष रहा…जगा आणि जगु दा असा जगण्याचा मंत्र देत असतो. त्याला बेस्ट इव्हनिंग जॉक अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. ९४.३ माय एफ एम वर तो २०१७ पासुन काम करतो.\nत्याचे पुर्ण नाव राघव दिवेदी आहे. राघवचा जन्म ५ जुनला कामपुरमध्ये झाला. तिथेच त्याचे शालेय शिक्षण पुर्ण झाले. त्यानंतर त्याने कॉमर्स मध्ये मोहनलाल सुखादिया युनिव्हर्सिटीमधुन शिक्षण घेतले आहे. सध्या तो छत्तीसगढमध्ये बिलासपुर येथे राहतो. राघवने वयाच्या केवळ २५ व्या वर्षी एवढी प्रसिद्धी मिळावली आहे. त्याची रास मिथुन रास आहे.\nराघवने ‘जोश talks’ या प्रसिद्ध चॅनेल सोबत एका कार्यक्रमात बोलताना त्याच्या आयुष्यातील खडतर प्रवासाबद्दल सांगितले होते. त्याने सांगितले कि, त्याच्या भाड्याच्या घरात तो त्याचे आईवडिल, व बहिण राहायचे. अचानक एके दिवशी त्याचे वडिल गायब झाले. त्यांना शोधण्याचा त्याच्या कुटुंबाने खुप प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शिवाय वडिल अचानक नाहीसे झाल्यामुळे त्याला घरातल्या विमा, उधारी, येणी यांसारख्या काहीच गोष्टी त्याला माहित नव्हत्या.\nशिवाय त्यावेळी त्यांच्या घरात केवळ २ हजार रुपयेच होते. त्यात त्याला चांगली नोकरीपण नव्हती. त्यामुळे घर कसे चालावायचे.. बाबा पण सापडत नाही यांसारख्या संकटांमुळे त्याच्या मनात आ*त्म*ह*त्ये*सारखे विचारपण येऊन गेले. पण अचानक त्याच्या एका दुरच्या नातेवाईकाने त्याला १० हजार रुपयांची मदत केली. व यापुढे मीच काय इतर कोणीही तुला मदत करत बसणार नाही.\nत्यामुळे तुला हे १० हजार रुपये आणि तुझ्याकडे असलेले २ हजर रुपये खुप विचार करुन खर्च करावे लागतील असे सांगितले. पैसे मिळाल्यावर राघव ने घर मालकाचे पैसे दिले पण त्या घरमालकाने सुद्धा वीजेच्या बीलाचे एक्सट्रा पैसे कापुन घेतले. त्याच्या बहिणीनेपण मेहनतीने काम करायला सुरुवात केली. राघव सुरुवातीपासुन रेडीओसाठी काम करायचा.\nअशातच त्याला अजुन एका रेडीओची ऑफर आली. तो शो त्याने स्विकारला आणि एका वर्षातच त्याने त्या शोसाठी बेस्ट इव्हनिंग जॉक अवॉर्डसुद्धा मिळाला. सलग दुसऱ्या वर्षीसुद्धा त्याला तो पुरस्कार मिळाला. त्यानंतर तो कानपुरला परत आला. या दोन वर्षात तो आ*त्म*ह*त्या करण्याच्या विचाराला पुर्णपणे विसरुन गेलेला. या सर्व परिस्थितीत त्याने कामावर फोकस केल्यास घरातील कोणताही प्रोब्लेम लक्षात येत नाही.\nसततच्या मेहनतीने व कामाच्या फोकस मुळे त्याने स्वत:चे घर सुद्धा खरेदी केले. एके काळी त्याच्याकडे केवळ 2 हजार रुपये होते. पण मेहनतीने त्याने घर सुद्धा खरेदी केले. या सर्व परिस्थितीत त्याला त्याच्या बहिणीने खुप सपोर्ट केला. त्याच्या खडतर प्रवासाने त्याला खुप काही शिकवले आहे. त्यामुळे परिस्थितीवर मात करत त्याने आजचे त्याचे जनमानसातले त्याचे स्थान पक्के केले आहे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleऐश्वर्याने तिच्या मोबाईल कव्हर वरती लिहले आहे असे काही, फोटो झूम करा वाचून हैराण व्हाल \nNext articleप्रेमाच्या बाबतीत या राशीचे लोक असतात फारच हळवे, कोणाच्याही लगेचच पडतात प्रेमात, जाणून घ्या राशी \nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले प्रसिद्ध कुत्र्यांच्या प्रजाती \n१ मिनिटात रद्दीमध्ये लपलेली मांजर शोधा, ९९ टक्के लोक अयशस्वी, फोटो Zoom करा उत्तर सापडेल \nकदाचित माझा प्रायव्हेट पा’र्ट पाहिला असेल’, रिअॅलिटी शोमध्ये किम कार्दशियनने केलं अजबच वक्तव्य \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/demolition-of-bridges-in-pune-postponed/", "date_download": "2022-10-07T23:02:12Z", "digest": "sha1:W6I2IKWTUX4ZNNO443R3XIASDXRRQPRN", "length": 13817, "nlines": 225, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुण्यातील पूल पाडण्याचे काम पुढे ढकलले", "raw_content": "\nपुण्यातील पूल पाडण्याचे काम पुढे ढकलले\nचांदणी चौकातील तयारी गुरुवारपर्यंत; तातडीच्या आदेशामुळे वेळ मिळाला कमी\nकोथरूड, दि. 17 (प्रतिनिधी) -पुणे-बंगळुरू महामार्गावर चांदणी चौकात नवीन उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पाषाण आणि एनडीएला जोडणारा चांदणी चौक येथील जुना पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहतूक कोंडीचा प्रश्‍न तातडीने सोडविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर चांदणी चौक येथील पूल पाडण्याचे आदेश देण्यात आले, याची तयारी गेली आठवडाभर वेगाने सुरू होती. हा पूल रविवारी (दि.18) पाडण्यात येणार होता. परंतु, काही कारणास्तव हा पूल पाडण्याचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. पूल पाडण्यासाठी विलंब का लागत आहे आणि हा पूल नक्की कधी पाडला जाणार, याबाबतचे आदेश मात्र अद्याप आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nचांदणी चौकातील कोंडीत मुख्यमंत्री शिंदे अडकल्यानंतर राज्यभरात या विषयाची मोठी चर्चा झाली. त्यानंतर हा प्रश्‍न गांभीर्याने घेत चांदणी चौकातील पूल पाडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, त्यांच्याकडून पूल पाडण्याचे आदेश अतिशय तातडीने दिल्या गेल्यामुळे पूर्वतयारी करण्याचा अवधी देखील प्रशासनाला मिळाला नाही. कमी वेळेत हा पूल पाडण्याच्या कामाला गती आली मात्र, कमी अवधीमुळे योग्य नियोजन करता आले नसल्याने काम पुढे ढकलण्यात आले आहे.\nगुरुवारपर्यंत पूर्वतयारी केली जाणार…\nचांदणी चौकातील पूल पाडण्याबाबचे काम रात्रीच्यावेळी सुरू आहे. शक्‍य त्या ठिकाणी रात्री 12: 00 ते सकाळी 6:00 वाजेपर्यंत काम केले जात आहे. दिवसभर वाहतुकीमुळे तसेच, सततच्या पावसामुळे देखील कामात अडथळा येत आहेत, अशाही स्थितीत पूल पाडण्याचे काम 50 टक्के काम पूर्ण झाले असून गुरूवार (दि.22) पर्यंत पूल पाडण्याच्या पूर्व तयारीचे काम पूर्ण केले जाणार आहे, खूप कमी कालावधीमध्ये हे काम पूर्ण करावे लागत असल्याने याचा देखील ताण अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आहे.\nशहर तसेच उपनगरांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे देखील पूल पाडण्याच्या कामांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये याची देखील काळजी प्रशासनाकडून घ्यावी लागत असून पाऊस थांबल्यानंतर पूर्ण नियोजन करूनच पूल पाडण्याचे काम करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.\nपाणी येणार नाही; पालिका कळवतच नाही राष्ट्रवादी अर्बन सेलची पुणे आयुक्‍तांकडे तक्रार\nपुण्यात हनुमान चालीसाचे पठण करून मनसेकडून रावण दहन\nराष्ट्रवादीचे चिन्ह ‘घड्याळ’ काढून ठेवतो पुण्यातील कात्रजच्या नमेश बाबर यांनी पक्ष सोडला; कात्रज विकास आघाडीची घोषणा\nराज्यात 25 लाख हेक्‍टरवर नैसर्गिक शेती राज्यस्तरीय परिषदेत उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांची माहिती\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/campaign-ban/", "date_download": "2022-10-07T22:06:35Z", "digest": "sha1:55FQSZUCOJSSB7N2BQ7BS7W2BQVHKQU2", "length": 7639, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "campaign ban Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nभाजप प्रदेशाध्यक्षावर 24 तासांची प्रचारबंदी\nनवी दिल्ली - निवडणूक आयोगाने गुरुवारी पश्‍चिम बंगालमधील भाजपच्या आणखी एका नेत्यावर आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल कारवाई केली. त्यानुसार, थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.mensxp.com/marathi/entertainment/bollywood/95569-ranbir-kapoor-alia-bhatt-love-story-in-marathi.html", "date_download": "2022-10-07T22:28:18Z", "digest": "sha1:2QX63DWITMWWIL5FSSDOPSDT7DBRQJFP", "length": 21726, "nlines": 108, "source_domain": "www.mensxp.com", "title": "आलिया-रणबीरची ‘ही’ इश्कवाली लव्हस्टोरी | ranbir kapoor alia bhatt love story in marathi", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nजाहिरात द्याMensXP वर सेलआमच्याबद्दलसंपर्क साधा\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nआलिया-रणबीरची ‘ही’ इश्कवाली लव्हस्टोरी\n· 10 मिनिटांमध्ये वाचा\nआलिया-रणबीरची ‘ही’ इश्कवाली लव्हस्टोरी\nबी टाऊनमध्ये कोणतेही सेलिब्रेटी कपल एकत्र स्पॉट झाले की सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत तर्कवितर्क लावले जातात. आजकाल हे प्रमाण खूपच वाढले आहे. यातील काही सेलिब्रेटी त्यांचे नाते लपवण्याचा प्रयत्न करतात तर काही जण जाहीरपणे त्याची कबुली ही देतात. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या अशाच एका क्युट कपलच्या लग्नाची जोरदार चर्चा सूरू आहे. हे कपल कोणतं हे एव्हाना तुम्ही ओळखले असेलच.\nहोयं, तुम्ही बरोबर ओळखलत, मी हे सर्व बोलतेय ते ‘चॉकलेट हिरो’ अभिनेता रणबीर कपूर आणि ‘पटाखा गुड्डी’ अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या नात्याबद्दल. या क्युट कपलची जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. ही जोडी रिललाईफमध्ये लवकरच एकत्र दिसणार असली तरी रिअल लाईफमध्ये ते केव्हाच एकत्र आले आहेत.\nदोघांनी ही त्यांच्या नात्याबाबत कधीच काही लपवले नाही. त्यांनी जाहिररीत्या त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. 2018 मध्ये अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात हे कपल पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचे नाते ऑफिशिअल बनवले होते. या क्युट कपलची जोडी जितकी क्युट आणि खास आहे, तितकीच त्यांची लव्हस्टोरी देखील क्युट आणि खास आहे.\nआजच्या या आर्टिकलमध्ये आपण आलिया-रणबीरच्या इश्कवाल्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत.\nआधीपासूनच रणबीर आहे आलियाचा क्रश\nफेब्रुवारी 2018 मध्ये सुरु झाली लव्हस्टोरी\nपहिल्यांदाच कपल म्हणून समोर आले रणबीर-आलिया\nरणबीर कपूरने जगजाहीर केले होते त्यांचे नाते\nआलिया आणि रणबीर झाले कपल\nअनेकदा सोबत सुट्ट्या एंजॉय केल्यात\nलवकरच दोघे अडकणार विवाहबंधनात \nआधीपासूनच रणबीर आहे आलियाचा क्रश\nअभिनेत्री आलिया भट्टने 2013 मध्ये ‘कॉफी विद करण’ च्या शोमध्ये एका एपिसोडमध्ये सांगितले होते की, जेव्हा ती अवघ्या 11 वर्षांची होती तेव्हापासूनच तिचा रणबीर कपूर हा क्रश आहे. तिने पहिल्यांदा रणबीरला ‘ब्लॅक’ चित्रपटाच्या सेटवर पाहिल होतं, तेव्हाच तिला पहिल्याच नजरेत तिचा क्रश दिसला होता. रणबीर तेव्हा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता.\nफेब्रुवारी 2018 मध्ये सुरु झाली लव्हस्टोरी\nआलिया आणि रणबीरची लव्हस्टोरी 2018 मध्ये 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटवरुन सुरू झाली होती. याच सिनेमाच्या सेटवरुन त्यांची क्युटवाली लव्हस्टोरी खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. फेब्रुवारी 2018 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.\nHappy B’Day : अजय देवगणची लव स्टोरी, ना तब्बू ना काजोल, मग कोण होती पहिली गर्लफ्रेंड\nपहिल्यांदाच कपल म्हणून समोर आले रणबीर-आलिया\nरणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांनी पहिल्यांदाच एक कपल प्रमाणे अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाला हजेरी लावली होती. मे 2018 मध्ये झालेल्या सोनमच्या या विवाहसोहळ्याला आलियाने लाईम ग्रीन रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला होता. त्यावेळी रणबीरने बंदगळ्याचा आकर्षक कुर्ता आणि पैजामा परिधान केला होता. रणबीर ही या लूकमध्ये स्मार्ट दिसत होता. या दोघांच्या लूकला चाहत्यांकडून भरपूर प्रसिद्धी आण प्रेम मिळाले होते.\nरणबीर कपूरने जगजाहीर केले होते त्यांचे नाते\nआलिया भट्ट आणि रणबीर कपूरने त्यांचे नाते अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात पहिल्यांदाच सार्वजनिक केले होते. दोघे ही त्यावळी एकत्र नजरेस आले होते. दोघांची ही केमिस्ट्री अनेकांच्या पसंतीस पडली होती.\nरणबीरने त्यावेळी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तो आलिया भट्टला डेट करत आहे. शिवाय आमचे नाते आता नवे आहे. त्यामुळे मी आताच जास्त काही बोलू शकत नाही. तो असे ही म्हणाला होता की, माझी इच्छा आहे की, आमचे नाते आणखी मजबूत व्हावे.\nत्यांच्या नात्याबद्दल आलिया म्हणाली होती की..\nआलियाने ही रणबीर कपूरसोबत असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल म्हटले होते की, हे एक नाते नसून एक मैत्री आहे, कारण आम्ही दोघे ही खूप प्रामाणिक आहोत. हे नाते खूप सुंदर आहे. मी सातव्या शिखरावर आहे. तो सतत शूटिंगमध्ये काम करत आहे, त्यामुळे आम्ही सध्या तरी आमच्या कामामुळे व्यस्त आहोत. त्यामुळे आम्ही एकमेकांना जास्त वेळ देऊ शकत नाही. माझी इच्छा आहे की, आमच्या या नात्याला कुणाची ही नजर ना लागो.\nअभिनेते ऋषी कपूर यांना भेटायला आलिया गेली होती न्यूयॉर्कला\nदिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे मागील वर्षी कॅन्सरने निधन झाले होते. त्यापूर्वी 2018 मध्ये ते कॅन्सरवरील उपचारांसाठी सप्टेंबर 2018 ला न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी आलिया न्यूयॉर्कला देखील गेली होती. त्यावेळी त्यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाले होते.\nआलिया आणि रणबीर झाले कपल\n2019 मध्ये पार पडलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळ्यामध्ये आलिया आणि रणबीरने जाहीररीत्या हे मान्य केले की, दोघे ही एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्या पुरस्कार सोहळ्यात आलियाला अवॉर्ड मिळाला होता. त्यावेळी अवॉर्ड स्विकारल्यावर तिने भाषणात रणबीरचा उल्लेख करत त्याला 'आय लव्ह यू' असे म्हटले होते.\nचिरतरुण अभिनेते अनिल कपूर आणि सुनिता यांची ‘ही’ झक्कास लव्हस्टोरी\nअनेकदा आलिया आणि रणबीर यांच्या लग्नासंदर्भात अनेक चर्चा होताना पहायला मिळाल्या होत्या. मात्र, अद्याप यावर अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, 2020 च्या सुरुवातीलाच असे सांगण्यात आले होते की, हे दोघे ही डिसेंबर 2020 मध्ये लग्न करतील. याबद्ददल रणबीरने ही एका मुलाखतीमध्ये भाष्य केले होते.\nअनेकदा सोबत सुट्ट्या एंजॉय केल्यात\nहे दोघे ही कपल म्हणून जेव्हा समोर आले आहेत. त्यानंतर या दोघांना अनेकदा सुट्ट्या एंजॉय करताना स्पॉट करण्यात आले आहे. याच फोटो दोघांनी ही एकत्र शेअर केले होते. आफ्रिकेतील केनियामध्ये ते एकत्र फिरायला गेले होते.\nकेनियामधील मसाई मारा या राष्ट्रीय अभयारण्यात ते फिरायला गेले होते. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.\nत्यानंतर 2020 मध्ये दोघे ही दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत सुट्ट्या घालवताना दिसले होते. आलियाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही शेअर केले होते. त्यानंतर 2020 च्या डिसेंबर महिन्यात त्यांना जोधपूरला एकत्र फॅमिलीसोबत नववर्षाचे सेलिब्रेशन करताना स्पॉट करण्यात आले होते. तसेच रणवीरच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करायला ही दोघे जोधपूरमध्ये गेले होते. याचे फोटो ही आलियाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते.\nलवकरच दोघे अडकणार विवाहबंधनात \nआलिया आणि रणवीर कपूरच्या लग्नावरुन अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, या दोघांनी लग्नासंदर्भात अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. लॉकडाऊनच्या काळातही आलिया-रणवीर एकत्र राहिले आहेत. याचा एक व्हिडिओ ही व्हायरल झाला होता.\nएवढच काय तर रणवीर ज्या टॉवरमध्ये राहतो तिथेच आलियाने तब्बल 32 कोटींचा एक फ्लॅट खरेदी केला असल्याची माहिती काही रिपोर्ट्सकडून मिळाली होती. बांद्रामध्ये ही अपार्टमेंट असून, आता हे आलियाचे नवीन घर असणार आहे. रणबीर कपूर याच बिल्डिंगमध्ये सातव्या मजल्यावर राहतोय. आलियाने तिचे हे नवीन घर याच बिल्डिंगमध्ये 5 व्या मजल्यावर खरेदी केले आहे.\nहो दोघे ही डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. या दोघांनी त्यांच्या लग्नाची तयारी देखील सुरू केली असून ते डिसेंबरमध्ये बोहल्यावर चढतील. तसेल लग्नामुळे दोघांनी ही त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगच्य तारखा पुढे ढकलल्या असल्याचे बोलले जात आहे.\nदरम्यान, त्यांच्या लग्नासंदर्भात आलिया भट्टची आई सोनी राजदान (soni razdan) यांनी माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे की, ‘आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नासाठी मीदेखील उत्सुक आहे. पण त्याला अजून बराच वेळ आहे. भविष्यात दोघांचे लग्न होणारच आहे. पण अजून लग्नाची तारिख ठरलेली नाही’ अशी प्रतिक्रिया आलियाच्या आईने दिली आहे.\nरितेश आणि जेनेलियाबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का \nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/videos/bjp-sanjay-rathod-should-aplogise-to-banjara-community-au137-779217.html", "date_download": "2022-10-07T22:07:44Z", "digest": "sha1:54QGD3QQM4D24AAWT42G6QL6SI4R4IUQ", "length": 8324, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nBJP आणि Sanjay Rathod यांनी Banjara समाजाची माफी मागितली पाहिजे\n\"शपथविधीकडे मी तीन पद्धतीने बघते. देर आये दुरुस्त आये. नवीन मंत्र्यांनी चांगलं काम करावं, यासाठी त्यांना शुभेच्छा. 18 मंत्र्यांमध्ये एकही महिला मंत्र्याला संधी दिली नाही\"\nदीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल |\nमुंबई: “शपथविधीकडे मी तीन पद्धतीने बघते. देर आये दुरुस्त आये. नवीन मंत्र्यांनी चांगलं काम करावं, यासाठी त्यांना शुभेच्छा. 18 मंत्र्यांमध्ये एकही महिला मंत्र्याला संधी दिली नाही. आपल्या लोकसंख्येत 50 टक्के महिला आहेत. भाजपा संघटनेत अनेक चांगल्या महिला आहेत. आज कमीत कमी दोन महिलांना तरी शपथ द्यायला पाहिजे होती” असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.\nटू पीसमध्ये इलियाना डिक्रूझची हवा हवाई\n‘संस्कारी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीचे संस्कारी रूप\nनोरा फतेहीची रिवीलिंग जादू पाहिली का\nमौनी रॉयचा केसरिया रंग…. फोटोशूटसाठी पहा काय केलं\nसादर करण्यात आलेल्या कागद पत्रांवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार यासह पहा इतर अपडेट महाफास्ट न्यूज 100 मध्ये\nअंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेचा प्रचाराचा काय आहे प्लॅन पहा यासह 4 मिनिट 24 हेडलाईन्स\nउद्धव ठाकरेंनी का मागितले आणखीन काही दिवस यासह इतर बातम्यांच्या अपडेटसाठी पहा महाफास्ट न्यूज 100\nशेतकऱ्यांना 12 तास वीज देणार यासह पहा राज्यभरातील अपडेट 36 जिल्हे 72 बातम्यामधून\nफेसबुक युजर्सना धोक्याचा इशारा, आजच आपला पासवर्ड बदला अन्यथा...\nपावसाचं पुन्हा धुमाशान; पुढील 48 तासात \"या' भागात जोरदार बरसणार...\nMarathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nMLA Marriage : 28 वर्षाच्या महिला आमदाराचं कार्यकर्त्यांशी लग्न, अशी जुळून आली लग्नगाठ\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/crime-news/passenger-from-bangkok-held-at-chennai-airport-with-live-animals-including-a-monkey-pythons-and-king-snakes/articleshow/93544825.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2022-10-07T21:44:50Z", "digest": "sha1:ETF4T5A77E5X3XFQ5TRSXCDNMLUE6MSR", "length": 11487, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\n१५ साप, ५ अजगर, २ कासवं, १ माकड एअरपोर्टवर प्रवाशाला अडवले; बॅगेत दुर्मीळ प्राणी सापडले\npassenger from bangkok held at chennai airport with live animals: चेन्नई विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाच्या बॅगेतून दुर्मीळ प्रजातीचे २३ प्राणी जप्त केले आहेत. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. हा प्रवासी ११ ऑगस्टला बँकॉकहून आला होता. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी प्रवाशाला रोखलं.\nविमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडले जिवंत प्राणी\nचेन्नई: चेन्नई विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाच्या बॅगेतून दुर्मीळ प्रजातीचे २३ प्राणी जप्त केले आहेत. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. हा प्रवासी ११ ऑगस्टला बँकॉकहून आला होता. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी प्रवाशाला रोखलं. त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आली. त्या बॅगेत अनेक प्राणी आढळून आले.\nसीमाशुल्क अधिकाऱ्यांना बॅगमध्ये १ डिब्रेजा माकड, १५ किंग साप, ५ बॉल अजगर आणि २ एल्डब्रा कासवं सापडली. या जिवंत प्राण्यांना अवैधरित्या आयात करण्यात आलं होतं. त्यामुळे या प्राण्यांना एक्यूसीएसच्या सल्ल्यानं थाय एअरवेजनं त्यांच्या मूळ देशात पाठवण्यात आलं. प्राण्यांना अवैधरित्या घेऊन आलेल्या प्रवाशाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.\nकार तुझ्या बापाची आहे का महिलेनं ९० सेकंदांत रिक्षावाल्याला १७ वेळा थोबाडीत मारली\nबँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर २९ जूनला दोन भारतीय महिलांना १०९ जिवंत प्राण्यांची तस्करी करताना अटक झाली होती. थायलंडच्या राष्ट्रीय उद्यान वन्यजीव आणि वनस्पती संरक्षण विभागाला दोन सुटकेसमध्ये २ पांढरी साळींदरं, २ खवले मांजर, ३५ कासवं, ५० पाली आणि २० साप सापडले होते.\nपतीची हत्या करून पत्नीनं घरातच मृतदेह गाडला; शेजाऱ्यांना संशय अन् चार दिवसांनंतर अचानक...\nवन्यजीव व्यापाराची देखरेख करणाऱ्या TRAFFIC एजन्सीनं दिलेल्या अहवालानुसार, २०११ ते २०२० दरम्यान भारतातील विमानतळांवर प्राणी जप्त करण्यात आल्याच्या १४० कारवाया झाल्या. या कारवायांमध्ये ७० हजारांहून अधिक देशी आणि परदेशी प्राणी जप्त करण्यात आले.\nमहत्वाचे लेखप्रेमात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला संपवलं; २२ महिने कोणाला शंकाही आली नाही; एक दिवस अचानक...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nदेश ​देश हादरला... लग्न करण्यास नकार दिला, त्याने १९ वर्षीय मारुतीला पेट्रोल ओतून पेटवलं...​\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nसोलापूर Breaking : भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआयची जीवे मारण्याची धमकी; क्राईम ब्रँचकडे तपास\nमुंबई आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन\nसिंधुदुर्ग उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे राहणारा आमदार चौकशीच्या फेऱ्यात, कोकणातल्या नेत्याला एसीबीची नोटीस\nमुंबई धाकधूक वाढली, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या हालचाली\nदेश काँग्रेस नेत्यानं हॉटेलमध्ये नेलं, मग सामूहिक अत्याचार केले, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर तिघांना अटक\nक्रिकेट न्यूज उभारायला गेले MS Dhoni चा मेणाचा पुतळा, पण धोनीची झाली अनहोनी, पाहा भन्नाट memes\nदेश वंदे भारत एक्स्प्रेस दुसऱ्यांदा दुर्घटनाग्रस्त, सलग दुसऱ्या दिवशी वेगवान ट्रेनचा खोळंबा\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/job-cuts-to-aliens-5-things-elon-musk-discussed-with-twitter-employees/articleshow/92271445.cms?utm_source=hyperlink&utm_medium=tips-tricks-articleshow&utm_campaign=article-1", "date_download": "2022-10-07T21:56:44Z", "digest": "sha1:NCKH7BRMAKVDLWRQIDQIMIEJAOOT5XVZ", "length": 13778, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nवर्क फ्रॉम होम ते कर्मचाऱ्यांची कपात... Twitter च्या कर्मचाऱ्यांसमोर Elon Musk यांनी ‘या’ मुद्यांवर मांडले मत\nElon Musk interacted with Twitter employees: एलन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरला खरेदी करण्याची ४४ बिलियन डॉलर्सची डील लाइन केल्यानंतर पहिल्यांदाच कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले.\nमस्क यांनी केली ट्विटरच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा.\nजाहिरात मॉडेलवर मस्क यांनी मांडले मत.\nकर्मचाऱ्यांच्या कपातीवर देखील केले भाष्य.\nनवी दिल्ली: Elon Musk interacted with Twitter employees: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे गेल्या काही महिन्यात सातत्याने चर्चेत आहेत. आपल्या ट्विट्समुळे व ट्विटरला खरेदी केल्याने मस्क यांची जगभरात विशेष चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा केली. मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्यासाठी एप्रिलमध्ये ४४ बिलियन डॉलर्सची डील लाइन केली होती. यानंतर त्यांनी पहिल्यांदाच कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आहे. मस्क यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना बोलण्याचे स्वातंत्र्य ते एलियन्सचे अस्तित्व अशा वेगवेगळ्या मुद्यांवर आपले मत व्यक्त केले.\nवाचा: Jio-Airtel-Vi ला ग्राहकांनी दिला मोठा झटका, लाखो यूजर्सनी सोडली साथ; पाहा डिटेल्स\nएलन मस्क कर्मचाऱ्यांना म्हणाले की, लोकांना कायद्याच्या कक्षेत राहून मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर बोलण्याची परवानगी दिली जाईल. तसेच, लोकांना ही सर्विस वापरताना 'कंफर्टेबल फील' होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कारण, असे न झाल्यास ते याचा उपयोग करणार नाही.\nकर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार\nकर्मचाऱ्यांना कंपनीतून काढणार का याविषयी विचारले असता मस्क म्हणाले की, जे कोणी चांगल्याप्रकारे योगदान देत असेल त्यांना काम करण्याची गरज नाही. कोणाला काढायचे हे त्याच्या परफॉर्मेंसवरून ठरेल. तसेच, कंपनीचे लक्ष्य नफा कमवणे आणि उत्पादनात सुधारणा करण्यावर असेल.\nवाचा: Father's Day: ‘हे’ कूल गॅजेट्स फादर्स डे बनवतील खास, वडिलांना गिफ्ट देण्यासाठी आहे बेस्ट पर्याय\nमस्क म्हणाले की, जाहिरात मॉडेलच्या विरोधात नाही. कारण, ट्विटरच्या बिझनेस मॉडेलसाठी हे महत्त्वाचे आहे. ट्विटरसाठी जाहिरात महत्त्वाची आहे. जाहिरातींच्या विरोधात नसून, जाहिरातदारांशी बोलेल, असेही ते म्हणाले.\nवर्क फ्रॉम होमवर बोलताना ते म्हणाले की, केवळ चांगले काम करणाऱ्या व जे लोक लांब राहतात त्यांनाच केवळ याची परवानगी देण्यात यावी.\nकर्मचाऱ्यांशी संवाद साधताना मस्क यांनी एलियन आणि अन्य अंतराळातील शक्यतांविषयी देखील चर्चा केली. मस्क म्हणाले की, त्यांनी एलियनबाबत ठोस पुरावे पाहिलेले नाहीत.\nवाचा: Vivo च्या 'या' स्मार्टफोनवर मिळतेय बंपर सूट, फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर पाहा किंमत\nमहत्वाचे लेखथिएटरची मजा घरीच महागड्या टीव्हीचे बजेट नसेल तर, स्वस्तात घरी न्या ३२ इंचाचे 'हे' Smart TV, पाहा ऑफर्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nसिनेन्यूज विजय देवरकोंडा आणि रश्मिका लपत-छपत कुठे निघाले Video पाहून नेटकऱ्यांनी लावायचा तो अंदाज लावलाच\nइलेक्ट्रॉनिक्स 8GB रॅम आणि 10,090 mAh बॅटरी पावर असणाऱ्या या Samsung Tabs खरेदी करा आणि मिळवा ₹18000 इतका जबरदस्त डिस्काउंट\nआर्थिक राशीभविष्य आर्थिक राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२२ : जाणून घ्या उद्याचा दिवस कोणासाठी ठरेल धनप्राप्तीचा\nमुंबई ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा ते दिघेंच्या मृत्यूचं ठाकरे कनेक्शन, मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज\nक्रिकेट न्यूज कमजोर पाकिस्तानने रोखला भारतीय संघाचा विजयरथ, आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला हरवलं\n जे लॉटरीचं तिकीट कचऱ्यात टाकलं, त्यानेच बनवले या महिलेला करोडोंची मालकीण\nसिंधुदुर्ग उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे राहणारा आमदार चौकशीच्या फेऱ्यात, कोकणातल्या नेत्याला एसीबीची नोटीस\nदेश वंदे भारत एक्स्प्रेस दुसऱ्यांदा दुर्घटनाग्रस्त, सलग दुसऱ्या दिवशी वेगवान ट्रेनचा खोळंबा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/tips-tricks/follow-these-tips-to-save-accounts-password-in-google-chrome/articleshow/92454735.cms", "date_download": "2022-10-07T21:36:17Z", "digest": "sha1:PYLBOTMTMEILK5VVMPLGOCQL6C7SISV6", "length": 12261, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nPassword Tricks: महत्त्वाच्या अकाउंट्सचे पासवर्ड लक्षात राहत नसतील तर, घ्या Google ची मदत ,पाहा ट्रिक्स\nGoogle Password saving: पासवर्ड लक्षात ठेवणे जर तुम्हाला कठीण जात असेल तर, ही विशेष माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. काही सोप्प्या टिप्स वापरून तुम्ही हे सहज करू शकता. जाणून घ्या सविस्तर.\nपासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी घ्या Google ची मदत\nकाही टिप्स येतील कामी\nसहज लक्षात राहतील पासवर्ड्स\nनवी दिल्ली: Forget Password: आजकाल Online Payments पासून ते प्रत्येक अकाउंटसाठी पासवर्ड वापरवा लागतो. पासवर्डमुळे स्मार्टफोन तर सेफ राहतो. पण, प्रत्येक अकाउंटचा पासवर्ड लक्षात ठेवणे जवळ-जवळ प्रत्येकालाच कठीण जाते. तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर, तुम्ही Google ची मदत घेऊ शकता. पासवर्ड मॅनेजर तुमचे सर्व पासवर्ड ट्रॅक करतात. शिवाय, तुम्ही हे पासवर्ड कधीही पाहू शकता. याव्यतिरिक्त, ते तुम्हाला पासवर्ड टाइप न करता बहुतेक वेबसाइटवर साइन इन करण्याची परवानगी देतात. तुमच्याकडे Android फोन असल्यास आणि लिंक केलेले Google Account असल्यास, तुम्ही Google चे Password Manager वापरू शकता. अँड्रॉईड फोनमध्ये पासवर्ड सेव्ह कसे करायचे पाहुया.\nवाचा: राहा तयार, लवकरच लाँच होणार Apple AirPods Pro 2, चार्जिंग केसमध्ये मिळेल Speaker\nफोनवर सेव्ह केलेला पासवर्ड कसा शोधायचा \nसर्वप्रथम, तुमच्या Android फोनवर Google Chrome ब्राउझर सुरू करा आणि वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. काही डिव्हाइसेसवर, हे ३ डॉट्स तळाच्या कोपर्यात देखील असू शकतात. . नंतर पॉप-अप मेनूमधील सेटिंग्ज वर टॅप करा. आता तुम्हाला पुढील मेनूमध्ये पासवर्डवर टॅप करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा पासवर्ड किंवा फेस किंवा टच स्कॅन टाकावा लागेल. आता तुमच्यासमोर वेबसाइट्सची एक लांबलचक यादी दिसेल, ज्यामध्ये युजरनेम किंवा पासवर्ड सेव्ह केला जाईल.\nवाचा: Best Plans: Jio चा 'हा' प्लान देतो Airtel-VI ला टक्कर, ४०० रुपयांपेक्षा कमीमध्ये मिळते डेटा-कॉलिंगसह ९० दिवसांपर्यंत व्हॅलिडिटी\nज्या साइटसाठी तुम्हाला तुमचा पासवर्ड हवा आहे त्यावर टॅप करा, त्यानंतर पासवर्ड विचारण्यासाठी डोळ्याच्या चिन्हावर टॅप करा. तुम्हाला हा पासवर्ड इतरत्र कॉपी आणि पेस्ट करायचा असल्यास (ईमेल किंवा नोटमध्ये), त्याच्या शेजारी दोन स्टॅक केलेल्या चौकोनी icon वर टॅप करा. हे तुमच्या फोनच्या क्लिपबोर्डवर पासवर्ड कॉपी करेल.\nवाचा: अधिक Virtual RAM ऑफर करणारा फोन चांगला की, जास्त Physical RAM देणारा, तुमच्यासाठी काय बेस्ट\nमहत्वाचे लेखNetwork Signal: कॉल सतत ड्रॉप होतोय फोनमध्ये अशी चेक करा नेटवर्क स्ट्रेंथ, पाहा सोपी टिप्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nइलेक्ट्रॉनिक्स 8GB रॅम आणि 10,090 mAh बॅटरी पावर असणाऱ्या या Samsung Tabs खरेदी करा आणि मिळवा ₹18000 इतका जबरदस्त डिस्काउंट\nहेल्थ पुरुषहो सावधान, आधी लठ्ठपणा मग डायबिटीज आणि नंतर येते नपुंसकता, ताबडतोब करा हे उपाय\nआर्थिक राशीभविष्य आर्थिक राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२२ : जाणून घ्या उद्याचा दिवस कोणासाठी ठरेल धनप्राप्तीचा\nसिनेन्यूज हर्षद मेहता फेम प्रतीक गांधी आणि सई ताम्हणकर काय करतायत एकत्र\nकार-बाइक आनंद महिंद्रांचा स्वॅग, नवीन Scorpio N घेऊन शेअर केला फोटो, लोक म्हणतायत, 'ये तोहफा मैंने खुद को दिया है'\nसिनेन्यूज मला त्यासाठी कर्ज काढायचं नव्हतं, माझ्या बॅंक अकाऊंटमध्ये आजही...आलियाचा मोठा खुलासा\nमटा ओरिजनल मुंढेंच्या धाडसत्राने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, रात्री डॉक्टर नसल्यास थेट घरचा आहेर\nमुंबई ठाकरेंनी मला मारण्याची सुपारी दिली होती, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप\n शिंदे गट आणि शिवसैनिक आमने सामने, पोलिसांनीच काढला तोडगा\nक्रीडा World Smile Day: यांच्या एका स्माईलवर क्लीन बोल्ड होतात चाहते, यातल्या कितीजणी तुम्हाला माहीत आहेत\nमुंबई धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळायला हवं मटा ऑनलाईन पोलमध्ये ७५ टक्के नेटिझन्स म्हणतात...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/6-hours-interrogation-of-nora-fatehi-in-sukesh-chandrasekhar-fraud-case/", "date_download": "2022-10-07T23:11:53Z", "digest": "sha1:ZJZVPPQPOR5B6R76ZXMZLCV5Z6UDLZBC", "length": 4380, "nlines": 38, "source_domain": "mahaupdate.in", "title": "सुकेश चंद्रशेखर फसवणूक प्रकरणात नोरा फतेहीची 6 तास चौकशी - Maha Update", "raw_content": "\nHome » सुकेश चंद्रशेखर फसवणूक प्रकरणात नोरा फतेहीची 6 तास चौकशी\nसुकेश चंद्रशेखर फसवणूक प्रकरणात नोरा फतेहीची 6 तास चौकशी\nमुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणात अडकलेला सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आता चित्रपट अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सुकेश चंद्रशेखर फसवणूक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शुक्रवारी नोरा फतेहीची सुमारे 6 तास चौकशी केली आहे.\nयाप्रकरणी नोरा फतेहीला गेल्या दिवशी मंदिर मार्गावरील आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. नोरा काल सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथे हजर होती. याप्रकरणी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवून घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गरज पडल्यास नोरा फतेहीला पुन्हा बोलावले जाऊ शकते.\nकाय आहे संपूर्ण प्रकरण\nसुकेश चंद्रशेखर नावाच्या व्यक्तीने अनेकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटी रुपयांचे खंडणी रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसचेही आले आहे, जेव्हा तिच्या आणि सुकेशच्या लिंक अपची बातमी समोर आली. स्वत: जॅकलिन फर्नांडिसने सांगितले होते की सुकेशने तिला महागडे गिफ्ट्स दिले होते. तेव्हापासून ही अभिनेत्री ईडीच्या निशाण्यावर आहे. जॅकलीन शिवाय नोरा फतेही देखील या प्रकरणात अडकली आहे.\nसुकेश चंद्रशेखर प्रकरणात आज पुन्हा होणार नोरा फतेहीची चौकशी; ‘थँक गॉड’ही कायदेशीर अडचणीत\n‘मी पीडित आहे, कट रचणारी नाही’, नोरा फतेहीचे सुकेश फसवणूक प्रकरणावर स्पष्टीकरण\nसुकेश चंद्रशेखर प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची आज होणार चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1030854", "date_download": "2022-10-07T23:39:12Z", "digest": "sha1:X5JEG6MH7WOIDQDHJXGKHFAGYULWLRMH", "length": 2918, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"जोसेफ स्टॅलिन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"जोसेफ स्टॅलिन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:२९, १ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१२:१६, २५ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\n१६:२९, १ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJYBot (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://parbhani.gov.in/mr/public-utility-category/%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2022-10-07T22:49:56Z", "digest": "sha1:RTOHEWYM7UYGVT35U5WXACR334G6POD3", "length": 7528, "nlines": 126, "source_domain": "parbhani.gov.in", "title": "टपाल | परभणी | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nडॉ.प्रफुल्ल पाटील मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल\nसरस्वती – धन्वंतरी डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल\nमहसुल / दंडाधिकार शाखा\nस्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nउप प्रादेशिक परिवहन कार्यालय\nजिल्हा परिषद, पंचायत समिती तालुका निहाय प्रारुप व अंतिम प्रभाग रचना\nमाहे ऑक्टोबर-नोव्हेंंबर २०१९ मधे झालेल्या अवेळी पावसामुळे बाधित शेतकरी यांंच्या मदत वाटप याद्या\nपरभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची विधान परिषद निवडणुक – २०१८\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या (दुसरा टप्पा)\nप्रधानमंत्री पिक विमा योजना २०१७ लाभार्थी यादी\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ पात्र लाभार्थी याद्या\nखरीप २०१८ दुष्काळी अनुदान पहिला व दुसरा टप्पा\nखासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंंतर्गत २०१४-१५ ते २०१८-१९ या कालावधीमधील मंजुर कामांंची यादी\nऔरंंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२०\nपरभणी जिल्ह्यातील कब्जेहक्काने व भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमीनीचे आदेश\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)\nडाक विभाग, गंगाखेड उपकार्यालय\nडाक प्रमुख़, गंगाखेड उपकार्यालय डाक विभाग, गंगाखेड, गंगाखेड, परभणी, महाराष्ट्र, ४३१५१४\nडाक विभाग, पाथरी उपकार्यालय\nडाक प्रमुख, पाथरी उपकार्यालय डाक विभाग, पाथरी, पाथरी, परभणी, महाराष्ट्र, ४३१५०६\nडाक विभाग, मुख्यालय परभणी\nपोस्ट मास्टर, परभणी मुख्यालय डाक कार्यालय, परभणी, परभणी, परभणी, महाराष्ट्र, ४३१४०१\nडाक विभाग, सेलु उपकार्यालय\nडाक प्रमुख, सेलु उपकार्यालय डाक विभाग, सेलु, सेलु, परभणी, महाराष्ट्र, ४३१५०३\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 23, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1860518", "date_download": "2022-10-07T23:19:37Z", "digest": "sha1:VI67BMJZVRWTILROQLCR32EPLGRDBEXF", "length": 9980, "nlines": 142, "source_domain": "pib.gov.in", "title": "आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय", "raw_content": "भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 216.70 कोटी मात्रांचा टप्पा केला पार\n12 ते 14 वयोगटातील 4.08 कोटींपेक्षा अधिक किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली\nभारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 48,027\nगेल्या 24 तासांत देशात 4,858 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nरुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.71%\nसध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.78%\nनवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2022\nआज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 216.70 (2,16,70,14,127) कोटींचा टप्पा पार केला आहे.\n16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4.08 लाखांहून अधिक (4,08,14,780) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.\nआज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:\nभारतातील रुग्णसंख्या सध्या 48,027 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.11% इतकी आहे.\nपरिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.71%. झाला आहे. गेल्या 24 तासांत 5,618 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,39,62,664. झाली आहे.\nगेल्या 24 तासात 4,858 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.\nगेल्या 24 तासात एकूण 1,75,935 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.17 (89,17,53,120) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.\nसाप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.78% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.76% आहे.\nआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय\nभारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 216.70 कोटी मात्रांचा टप्पा केला पार\n12 ते 14 वयोगटातील 4.08 कोटींपेक्षा अधिक किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली\nभारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 48,027\nगेल्या 24 तासांत देशात 4,858 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nरुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.71%\nसध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.78%\nनवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2022\nआज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 216.70 (2,16,70,14,127) कोटींचा टप्पा पार केला आहे.\n16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4.08 लाखांहून अधिक (4,08,14,780) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.\nआज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:\nभारतातील रुग्णसंख्या सध्या 48,027 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.11% इतकी आहे.\nपरिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.71%. झाला आहे. गेल्या 24 तासांत 5,618 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,39,62,664. झाली आहे.\nगेल्या 24 तासात 4,858 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.\nगेल्या 24 तासात एकूण 1,75,935 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.17 (89,17,53,120) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.\nसाप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.78% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.76% आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/rupa-gangule-ne-kela-hota-prytn/", "date_download": "2022-10-07T22:23:12Z", "digest": "sha1:EGR5JW6AUGDLV5KINZHO6VFYFFXYCYAR", "length": 11756, "nlines": 89, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "एकदा नव्हे 'तीनदा' महाभारतातील द्रोपदीने केला होता खऱ्या आयुष्यात आत्महत्येचा प्रयत्न..! - Themaharashtrian", "raw_content": "\nएकदा नव्हे ‘तीनदा’ महाभारतातील द्रोपदीने केला होता खऱ्या आयुष्यात आत्महत्येचा प्रयत्न..\nएकदा नव्हे ‘तीनदा’ महाभारतातील द्रोपदीने केला होता खऱ्या आयुष्यात आत्महत्येचा प्रयत्न..\nसध्या कोरोना महामारीमुळे देशात लोक डाऊन सुरू आहे. यावर उपाय म्हणून सरकारी न्यूज चॅनेल असलेल्या दूरदर्शनने जुन्या मालिका पुन्हा एकदा नव्याने सुरू केल्या आहेत. यामध्ये रामायण-महाभारत, शक्तिमान, चाणक्य यासारख्या मालिकांचा समावेश आहे.\nत्यातल्या त्यात रामायण आणि महाभारत सध्या मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा पाहिले जात आहे. महाभारतामध्ये द्रोपदीची भूमिका साकारणाऱ्या रूपा गांगुली यांनी त्यांच्या खर्‍या आयुष्यामध्ये एक नव्हे तब्बल तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याचे कारणही तसेच होते.\nकाही वर्षापूर्वी दूरदर्शनवर महाभारत ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. त्यावेळी या मालिकेतील एक एक पात्र प्रचंड गाजले होते. यामध्ये विशेष म्हणजे द्रौपदीचे पात्र खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना आवडले होते.\nत्यानंतर रुपा गांगुली यांची ओळख सर्वांना झाली होती. या मालिकेनंतर रुपा गांगुली यांनी अनेक चित्रपटात देखील काम केले होते. त्यानंतर रूपा यांनी धुब्रो मुखर्जी याच्यासोबत लग्न केले. त्यामुळे त्या कोलकाता येथे रहाण्यास गेल्या. सुरूवातीला काही वर्ष त्यांचा गुण्यागोविंदाने संसार सुरू होता.\nमात्र, त्यांच्यामध्ये त्यानंतर कुरबुरी सुरू झाल्या. लग्नानंतर रूपा घरातच राहू लागल्या होत्या. मात्र, अभिनेत्री असल्यामुळे त्यांना घरात राहणे अस्वस्थ वाटत होते. तसेच पैशाची चणचण असल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा काम सुरू केले. मात्र, पतीला हे काम आवडत नव्हते. तरीदेखील त्या काम करू लागल्या आणि सकाळी 9 च्या आधी आणि रात्री दहा नंतर त्यांनी कामकाजाचे फोन घेणेसुद्धा टाळले होते.\nतसेच घरातील धुणीभांडी सुद्धा त्यांनी केले. मात्र, पतीची कुरबुर सुरू होती. त्यानंतर त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. अशा वेळेस पतीने त्यांना आर्थिक मदत देखील केली नाही. त्यामुळे त्या नैराश्याच्या गर्तेत गेल्या.\nकाही वर्षानंतर त्यांना आकाश नावाचा मुलगा झाला. आकाशचा जन्म आधी रूपा यांनी नैराश्यातून झोपीच्या गोळ्या खात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यातून त्या बचावल्या.\nआकाशच्या जन्मानंतर देखिल रूपा यांनी दोन वेळेस आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे त्यांनी 2009 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते. आता नव्याने महाभारत सुरू झाल्याने ही पोस्ट व्हायरल होत आहे. आता सुखाने आयुष्य जगत असल्याचे सांगण्यात आले आहे.\nमहाभारतातील भूमिका आपल्या आयुष्याची शिदोरी असल्याचे त्यांनी नुकतेच सांगितले आहे. पुन्हा नव्याने ही मालिका सुरू झाल्याने आपण पुन्हा एकदा जुन्या आठवणीत गेल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nसुरेश रैनाच पहिलं क्रश होती ‘ही’ मराठीमोळी अभिनेत्री, डेट करण्याची होती इच्छा…\nBig Boss Marathi Season 4 मध्ये पहिल्याच दिवशी पडली वादाची ठीणगी, अपूर्वा प्रसादला म्हणाली की तुझ्या सारख्या उद्धट…\nमहेश मांजरेकर यांच्या दुसऱ्या पत्नीची पहिल्या पतीपासून असलेली मुलगीही आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री..पहा दिसते अतिशय सुंदर…\nसई ताम्हाणकरच्या ‘या’ कि’सिंग सीनने तोडल्या होत्या सर्व मर्यादा, दिला असा बो’ल्ड सीन की बॉलीवूडमध्येही आपण कधी पाहिला नसेल…\n‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री आहे ‘मकरंद अनासपुरे’ यांची पत्नी, दोघांनी अनेक चित्रपटात केलंय काम, पहा फोटो…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/byline/news18-lokmat-trending-133/videos/", "date_download": "2022-10-07T22:25:17Z", "digest": "sha1:7WC7IEUGV2HG3NRSV3KSHH3KPTKSRYJO", "length": 13144, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat Trending : Exclusive News Stories by News18 Lokmat Trending Current Affairs, Events at News18 Lokmat", "raw_content": "\nMoney Mantra - ही रास असेल तर गुंतवणूक करताना सावधान\nचांगली संधी मिळणार, नशिबाचीही साथ लाभणार; आज काय घडणार पाहा राशिभविष्य\n'या' कालावधीत संबंध ठेवताय 'ही' महत्त्वाची माहिती नक्की वाचा\nरोमान्समध्ये ब्रेक; शारीरिक संबंध थांबवल्यावर नेमकं काय होतं\n उद्धव ठाकरेंचा जवळचा आणखी एक बडा नेता अडचणीत\nबुलढाण्यात विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, कृषी महाविद्यालयाच्या आडमुठेपणाचा बळी\nनालासोपाऱ्यात खळबळजनक घटना, घरकाम करणाऱ्या महिलेसोबत भयानक प्रकार\nबीडमध्ये टीशर्ट आणि जीन्स वापरण्यावर बंदी, अधिकाऱ्याचा महत्त्वाचा आदेश\nरात्री गुपचूप भेटत होते GF-BF; ग्रामस्थांनी मिळून लव्ह स्टोरीचा केला The End\nInstagram च्या फॉलोअर्सवरुन घडला भयानक प्रकार, तरुणीने दिले चॅलेंज अन् दोघांचा..\nवंदे भारत एक्स्प्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात काल 'नाक' तुटलं अन् आज..\nकाँग्रेसच्या 2 आमदारांचं धावत्या ट्रेनमध्ये महिलेसोबत धक्कादायक कृत्य, दारू पिऊन\nMoney Mantra - ही रास असेल तर गुंतवणूक करताना सावधान\nचांगली संधी मिळणार, नशिबाचीही साथ लाभणार; आज काय घडणार पाहा राशिभविष्य\n'या' कालावधीत संबंध ठेवताय 'ही' महत्त्वाची माहिती नक्की वाचा\nरोमान्समध्ये ब्रेक; शारीरिक संबंध थांबवल्यावर नेमकं काय होतं\nप्रेम, कॉमेडी की थ्रीलर; या विकेंडला तुम्ही कोणतं नाटक पाहणार\n अभिनेत्रीच्या हॉटनेसवर ज्येष्ठ अभिनेतेही फिदा\nतेजस्वी प्रकाशच्या मराठी सिनेमाचं गाणं रिलीज; दणकून नाचली अभिनेत्री\nअमृता पहिल्यांदा ऐतिहासिक भूमिकेत; \"हर हर महादेव\"मधील पहिला लुक आला समोर\nमहामुकाबल्यात हा खेळाडू पुन्हा डोकेदुखी ठरणार 12 मॅचमध्ये ठोकल्या 8 फिफ्टी\nकरोडो फुटबॉल चाहते हळहळले... 'या' खेळाडूची मोठी घोषणा, खेळणार शेवटचा वर्ल्ड कप\nटीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात, BCCI ने शेअर केला हा खास फोटो\nमुंबई इंडियन्सला मिळाला फ्यूचर कायरन पोलार्ड वर्ल्ड कपआधी करतोय जोरदार फटकेबाजी\nलीज-रेंट अ‍ॅग्रीमेंटमधला फरक माहिती आहे का सही करण्यापूर्वी घ्या पुरेशी काळजी\nदीर्घकालीन गुंतवणुकीसाठी VPF बेस्ट पर्याय; 8 टक्क्यांपर्यंत मिळतंय व्याज\nफक्त 10 हजार रुपये गुंतवून लाखोंची कमाई करा; लखपती बनवणाऱ्या 5 बिझनेस आयडीया\nDigital Currency च्या दिशेन RBI ची वाटचाल, तुम्हाला घेता येणार की नाही\nMoney Mantra - ही रास असेल तर गुंतवणूक करताना सावधान\nचांगली संधी मिळणार, नशिबाचीही साथ लाभणार; आज काय घडणार पाहा राशिभविष्य\n'या' कालावधीत संबंध ठेवताय 'ही' महत्त्वाची माहिती नक्की वाचा\nरोमान्समध्ये ब्रेक; शारीरिक संबंध थांबवल्यावर नेमकं काय होतं\nहरपलं देहभान... विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन वारकरी; पहा वारीचे सुंदर PHOTO\nया आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nरात्री गुपचूप भेटत होते GF-BF; ग्रामस्थांनी मिळून लव्ह स्टोरीचा केला The End\nनजर, बुद्धिमत्तेची घ्या चाचणी चित्रातील वृद्धाच्या पत्नीला शोधा 11 सेकंदात\nVIDEO- मोठ्याने पिपाणी वाजवणाऱ्यांची वाजली पुंगी; आता तोंडानेही आवाज निघणार नाही\n वाघासोबत सेल्फी घ्यायला गेले तरुण आणि...; काय झाला शेवट पाहा VIDEO\nतळहातावरील ही दोन उंच स्थाने नशीब बदलून टाकतात, राहतो लक्ष्मीचा आशीर्वाद\nवास्‍तुदोष घालवण्यासाठी अक्षतांचा करा असा उपाय, कायम राहील घरात सुख-शांती\nशेवटचे सूर्यग्रहण या राशीच्या लोकांच्या वाढवणार अडचणी; वेळीच रहा सावध\nशास्त्रानुसार 'या' तिथींना शारीरिक संबंध ठेवणं अशुभ; नात्यावर होतो वाईट परिणाम\nMoney Mantra - ही रास असेल तर गुंतवणूक करताना सावधान\nचांगली संधी मिळणार, नशिबाचीही साथ लाभणार; आज काय घडणार पाहा राशिभविष्य\n'या' कालावधीत संबंध ठेवताय 'ही' महत्त्वाची माहिती नक्की वाचा\nआता पोस्टातही मिळणार अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टसारख्या सुविधा, करता येणार ऑनलाइन खरेदी\n70 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही या 5 मस्त स्कूटर खरेदी करू शकता\nखात्यात चुकून आले 11 हजार कोटी, बँकेत न जाता खेळला असा गेम, पाहूण सगळेच हैराण\nIPL मध्ये आता खेळू शकेल इम्पॅक्ट प्लेअर, नव्या नियमामुळे प्लेअर्सची होणार चांदी\nतुमच्यासाठी क्रेडिट कार्डची निवड कशी कराल तज्ज्ञांचं सल्ला समजून घ्या\nक्रिती सेनन 'बाहुबली' स्टार प्रभासला करतेय डेट 'या' कारणामुळे चर्चेला उधाण\nअमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचं नाव 'प्रतीक्षा' का बिग बीनी सांगितलं कारण\nमदतच नव्हे तर रक्तदान आपल्या आरोग्यासाठीही उत्तम, जाणून घ्या 5 मोठे फायदे\nसरकारच्या या योजनेत गुंतवणूक करा आणि 21000 दरमाह मिळवा, काय आहे योजना\nशाहरुख खानच्या लेकीला भेटली आपलीच कार्बन कॉपी; दुबई व्हेकेशनचे फोटो आले समोर\nमहागड्या तेलांची नाही गरज, भारदस्त दाढी-मिशांसाठी घरच्या-घरी असे बनवा तेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/india-news/madhya-pradesh-crime-news-homosexual-case-sweet-merchant-murdered-by-his-lover-because-he-wants-to-live-as-wife/articleshow/93436435.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2022-10-07T23:24:24Z", "digest": "sha1:5VJGMEJXDA7EJY2SWOQTHK33UVJTIVLE", "length": 14716, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nत्याला बायको सारखं राहायचं होतं; जोडीदारानं मृत्यूचं दार दाखवलं, समलैंगिक संबंधाचा थरारक शेवट\nMadhya Pradesh Crime Homosexual Case: मिठाई व्यापारी छत्रपाल सिंह बघेल यांची ग्वाल्हेरमध्ये ५ ऑगस्टला सकाळी हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा आता छडा लावला आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी यदुनाथ सिंह भदौरिया याला पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपाल यांच्या हत्येमागे समलैंगिकतेचं कारण असल्याचं पुढे आलं आहे.\nत्या मिठाईवाल्याच्या हत्येचं धक्कादायक कारण पुढे आलं, जे घडलं ते भलतंच\nजोडीदारासोबत बायको म्हणून राहायचं होतं\nपण, जोडीदाराला बदनामीची होती भीती\nघरी बोलावलं आणि थेट गोळ्या झाडल्या\nग्वाल्हेर: ग्वाल्हेरमधील मिठाई व्यावसायिक छत्रपाल याची हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणात आता मोठा खळबळजनक खुलासा पुढे आला आहे. यदुनाथ नावाच्या व्यक्तीशी छत्रपालच समलैंगिक संबंध होते (Homosexual Case). छत्रपालला यदुनाथसोबत बायको म्हणून राहायचे होते. मात्र, यदुनाथला यातून सुटका करुन घ्यायची होती, म्हणून त्याने छत्रपालची हत्या केली.\nमिठाई व्यापारी छत्रपाल सिंह बघेल यांची ग्वाल्हेरमध्ये (Gwalior) ५ ऑगस्टला सकाळी हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा आता छडा लावला आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी यदुनाथ सिंह भदौरिया याला पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपाल यांच्या हत्येमागे समलैंगिकतेचं कारण असल्याचं पुढे आलं आहे.\nहेही वाचा -तो म्हणाला बिअर आण, मित्र म्हणाला पैसे नाही, पुढे जे घडलं ते धक्कादायक...\nमिठाई व्यापारी छत्रपाल सिंह बघेल यांची ५ ऑगस्ट रोजी सकाळी हुरावली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. छत्रपाल यांचा मृतदेह त्यांचा मित्र यदुनाथ सिंह भदौरिया याच्या घरी सापडला होता. पोलिसांनी यदुनाथला ६ ऑगस्ट रोजी अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता हत्येमागील खळबळजनक कारण पुढे आलं.\nयदुनाथ आणि छत्रपाल यांच्यात समलैंगिक संबंध होते. मात्र काही दिवसांपासून छत्रपाल आपल्या घरात पत्नीप्रमाणे राहण्याचा हट्ट करत होता. त्याचवेळी घर नावावर करण्यासाठीही वाद सुरू होता. खूप समजवूही छत्रपाल ऐकत नव्हता, अशी माहिती यदुनाथने चौकशीत दिली.\nहेही वाचा -पत्नीचं कापलेलं शीर हातात घेऊन सासर गाठलं, डोक्याखाली सापडली चिठ्ठी अन्\nयदुनाथने छत्रपालला बायकोसारखं ठेवण्यास नकार दिला. छत्रपालच्या कृत्यांमुळे त्याची बदनामी होईल अशी भीती यदुनाथला होती. समजावूनही छत्रपाल ऐकत नव्हता म्हणून यदुनाथने त्याला मारण्याचा कट रचला. ५ ऑगस्ट रोजी यदुनाथने छत्रपालला घरी बोलावले. पुन्हा एकदा अखेरचं छत्रपालला सामजावण्याचा प्रयत्न केला. तरीही तो ऐकला नाही. अखेर यदुनाथने छत्रपालवर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर छत्रपालच्या कुटुंबीयांनी एफआयआरमध्ये यदुनाथसह अन्य दोन जणांची नावे नोंदवली होती. पोलिसांनी आता यदुनाथची चौकशी सुरू केली असून इतर दोन आरोपींचा शोध सुरु आहे.\nहेही वाचा -नवरा-बायकोच्या वादाचा भयानक अंत, पतीच्या कृत्याने चंद्रपूर हादरलं\nछत्रपालच्या कुटुंबीयांनी चार जणांवर हत्येचा आरोप केला आहे. यदुनाथसह चौघांनी छत्रपालला घरातून नेले आणि नंतर घरी नेऊन गोळ्या झाडल्या, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यामुळे छत्रपाल हत्या प्रकरणाचा संबंध गेल्या वर्षी झालेल्या पारस जोहरी या विद्यार्थ्याशी जोडला गेला होता. पारस खून प्रकरणात मृत छत्रपालच्या लहान भावाचे नाव होते. हल्लेखोरांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.\nतुरुंगातून सुटकेचा जल्लोष भोवला; सहा जणांवर गुन्हा दाखल\nमहत्वाचे लेखफडणवीसांसोबत जे घडलं तेच तेजस्वीबरोबर घडणार, विरोधी पक्षनेते पदावरुन थेट उपमुख्यमंत्रिपद\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nकोल्हापूर एकनाथ शिंदे गर्दी दिसली म्हणून काहीही बोलत सुटले, उद्धव ठाकरेंच्या भाषणालाच प्रतिसाद: अजित पवार\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nमुंबई धाकधूक वाढली, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या हालचाली\nसातारा माझ्या भावाचं माझ्यावर खूपच प्रेम, मी माझा जितका प्रचार करत नाही, तितका...: उदयनराजे\nसिंधुदुर्ग उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे राहणारा आमदार चौकशीच्या फेऱ्यात, कोकणातल्या नेत्याला एसीबीची नोटीस\nदेश वंदे भारत एक्स्प्रेस दुसऱ्यांदा दुर्घटनाग्रस्त, सलग दुसऱ्या दिवशी वेगवान ट्रेनचा खोळंबा\nमुंबई आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन\nदेश काँग्रेस नेत्यानं हॉटेलमध्ये नेलं, मग सामूहिक अत्याचार केले, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर तिघांना अटक\nक्रिकेट न्यूज उभारायला गेले MS Dhoni चा मेणाचा पुतळा, पण धोनीची झाली अनहोनी, पाहा भन्नाट memes\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1064318", "date_download": "2022-10-07T22:30:14Z", "digest": "sha1:4KTACH6D4JYERSZGBTTT2C6RFOSISSW5", "length": 2087, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"लॉरेंझ बल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"लॉरेंझ बल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:४९, ११ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती\n२१ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: en:Lorentz force\n१५:४१, ११ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\n१९:४९, ११ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: en:Lorentz force)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00009709-WM-172-PK.html", "date_download": "2022-10-07T23:01:56Z", "digest": "sha1:OYJXUAPG6U3WYMFPPWO4EL4WJYF4L2O3", "length": 13197, "nlines": 274, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "WM-172-PK | Brady Corporation | अवर्गीकृत | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर WM-172-PK Brady Corporation खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये WM-172-PK चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. WM-172-PK साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00018947-MTKMA-0600-0300.html", "date_download": "2022-10-07T21:57:12Z", "digest": "sha1:GMUWLIUMNIMCQGY4HPQJN45BHKBPVAJT", "length": 13305, "nlines": 274, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "MTKMA-0600-0300 | Omron Automation & Safety Services | अवर्गीकृत | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर MTKMA-0600-0300 Omron Automation & Safety Services खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये MTKMA-0600-0300 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. MTKMA-0600-0300 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2019/09/blog-post_64.html", "date_download": "2022-10-07T21:57:08Z", "digest": "sha1:IDC4XCWZPAJVZRL6CJ4XKMFG5D2JEAVY", "length": 30181, "nlines": 223, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "उत्सव आनंदाचा साजरा करायचा असतो विध्वंसाचा नव्हे ! | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nउत्सव आनंदाचा साजरा करायचा असतो विध्वंसाचा नव्हे \nभारतीय स्वातंत्र्य अधिनियमात स्वातंत्र्याबरोबरच पंजाब आणि बंगालच्या फाळणीसह विविध संस्थानांच्याबाबतही तरतूद करण्यात आली होती. तत्कालीन संस्थानांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याची किंवा स्वतंत्र राहण्याची मुभा होती. शेकडों संस्थानांपैकी जुनागढ़, हैदराबाद व काश्मीर वगळता सर्व संस्थाने भारत / पाकिस्तानमध्ये विलीन झाली. जुनागढ़च्या नवाबने पाकिस्तानात सामील होण्याचा आणि हैदराबाद, काश्मीरच्या नि़जाम, राजाने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला जो नियमानुसारच होता. परंतु भारताने जुनागढ़ व हैदराबाद संस्थामधील बहुसंख्याक ‘हिंदूं'च्या भावना लक्षात घेऊन जुनागढ़मध्ये ‘सार्वमत' घेऊन त्याचा ताबा घेतला तर हैदराबाद संस्थानवर ‘ऑपरेशन पोलो' नावाने बेकायदेशी सैन्य चढ़ाई केली. जगाला अंधारात ठेवण्यासाठी या कारवाईला ‘पोलीस एक्शन' नाव दिले कारण हैदराबाद संस्थानात दखल देण्याचा भारताला काही एक अधिकार नव्हता. या कारवाईमुळे प्रस्थापित समाजकंटकांना रजाकारांच्या मुस्लिमांचा नरसंहार करण्याचे जणू लायसेंसच मिळाले कारण हैदराबाद संस्थानात दखल देण्याचा भारताला काही एक अधिकार नव्हता. या कारवाईमुळे प्रस्थापित समाजकंटकांना रजाकारांच्या मुस्लिमांचा नरसंहार करण्याचे जणू लायसेंसच मिळाले हजारो गावे ‘मुस्लिम मुक्त' झाली. मुस्लिमांच्या जंगम मालमत्ता लुटल्या गेल्या आणि स्थावर मालमत्तेवर कब्जे करण्यात आले. दावणीला बांधून जनावरे कापल्यासारखे मुस्लिमांना कापण्यात आले. फक्त अंगावरच्या कपड्यावर लाखों लोकांनी गावे सोडली व आजच्या आंधप्रदेश-तेलंगानात असणाऱ्या शहरांकडे, विशेषत: हैदराबाद शहराकडे पलायन केले. कारण शेकडों वर्षापासून त्यांना अदबीने ‘आदाब' करणारे हातच त्यांच्या जिवावर उठले होते...\nमहिलांवरही अत्याचार झाले. अब्रू वाचविण्यासाठी शेकडो महिलांनी विहिरी भरल्या. पाहता पाहता हैदराबाद शहर जगातली सर्वात मोठी निर्वासित छावणी बनले... शेवटी हैदराबादचे विलिनीकरण झाले ऑपरेशन पोलो कारवाई दरम्यान झालेल्या मुस्लिमविरोधी अत्याचारांच्या घटनांची चर्चा सुरू झाल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ‘पंडित सुंदरलाल आयोग' नेमला होता. त्या आयोगाने आपल्या अहवालात ४० हजार लोक मारले गेल्याचे नमूद केले असले तरी प्रत्यक्षात हा आकडा २ लाखांच्या वर आहे. अहवाल सादर झाला पण बरीच वर्षे सार्वजनिक केला गेला नाही आणि पुढे सार्वजनिक झाला तरी त्याचेही तेच झाले जे मागील ७० वर्षांत मुस्लिमविरोधी दंगलींनंतर नेमलेल्या आयोगांच्या अहवालांचे झाले\nऑपरेशन पोलो दरम्यान निर्वासित झालेल्या लाखों मुस्लिमांपैकी २०-२५ टक्के लोकच आपल्या मूळगावी परतू शकले किंवा परतले, तेही २०-२५ वर्षानंतर जंगम मालमत्ता तर परत मिळणे शक्य नव्हतेच, काही जणांनी न्यायालयाच्या माध्यमातून स्थावर मालमत्ता परत मिलविल्या. परंतु जे लोक दहशतीमुळे परत आले नाहीत, त्यांच्या लाखों एकर जमिनी आणि विविध इतर मालमत्ता आजही त्या दंगलखोर, लुटारुंच्या वारसांच्या ताब्यात आहेत...\nपंडित सुंदरलाल आयोगच्या अहवालानंतरही कुणाही दंगलखोराविरुद्ध कार्रवाई झाली नाही. उलट शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात ऑपरेशन पोलो दरम्यान हैदराबाद संस्थानाविरुद्ध लढणाऱ्या लोकांना स्वातंत्र्यसैनिकचा दर्जा देण्यात आला (यात त्याही लोकांचा समावेश होता ज्यांनी मुस्लिमविरोधी दंगलीत ‘योगदान' दिले होते (यात त्याही लोकांचा समावेश होता ज्यांनी मुस्लिमविरोधी दंगलीत ‘योगदान' दिले होते) तसेच १७ सप्टेंबर हा ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिन' म्हणून राज्यभर साजरा करण्यास सुरुवात झाली. पुढे कांग्रेसराष्ट्रवादी सरकारने १७ सप्टेंबरचा ‘उत्सव' मराठवाड्यापुरता मर्यादित केला.\n‘फक्त' रजाकारांविरुद्ध कारवाई म्हणून ऑपरेशन पोलोचे समर्थन केले जाते. परंतु मूठभर रजाकारांना आवरण्यासाठी सैन्य कारवाईची का गरज पडली याचे उत्तर कुणाकडे नाही. त्या वेळी हैदराबाद संस्थानात मुस्लिमांची संख्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक नव्हती आणि ‘रजाकार' हे काही अधिकृत पोलीस किंवा सैनिक नव्हते, तर त्यांची एक खाजगी संघटना होती, अगदी आरएसएससारखी याचे उत्तर कुणाकडे नाही. त्या वेळी हैदराबाद संस्थानात मुस्लिमांची संख्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक नव्हती आणि ‘रजाकार' हे काही अधिकृत पोलीस किंवा सैनिक नव्हते, तर त्यांची एक खाजगी संघटना होती, अगदी आरएसएससारखी रजाकार शब्दाचे हिंदी/मराठी भाषांतर ‘स्वयंसेवक' असे होते रजाकार शब्दाचे हिंदी/मराठी भाषांतर ‘स्वयंसेवक' असे होते मूठभर मुस्लिमांमधील मूठभर लोकांची ती संघटना आणि त्यातही सर्वच स्वयंसेवक (रजाकार) हिंसक असतील असे नाही. म्हणून भारतासारख्या विशाल देशाच्या नजरेत रजाकारांची संख्या बोटावर मोजण्याइतपतच गृहीत धरायला हवी मूठभर मुस्लिमांमधील मूठभर लोकांची ती संघटना आणि त्यातही सर्वच स्वयंसेवक (रजाकार) हिंसक असतील असे नाही. म्हणून भारतासारख्या विशाल देशाच्या नजरेत रजाकारांची संख्या बोटावर मोजण्याइतपतच गृहीत धरायला हवी म्हणून त्या मूठभर लोकांना आवरण्यासाठी हैदराबाद संस्थानावर लष्करी कारवाई करून लाखों लोकांचे शिरकाण, लाखों लोकांना निर्वासित करणे असमर्थनीय नव्हे तर निंदनीय आहे म्हणून त्या मूठभर लोकांना आवरण्यासाठी हैदराबाद संस्थानावर लष्करी कारवाई करून लाखों लोकांचे शिरकाण, लाखों लोकांना निर्वासित करणे असमर्थनीय नव्हे तर निंदनीय आहे हैदराबाद विलीन झाले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिताना सर्वच जाती-धर्मातील नागरिकांना धर्म व व्यक्तीस्वतंत्र्याची पक्की हमी दिल्याने सर्वांनी ती आनंदाने स्वीकारली, सर्व जण देशाशी एकरूप झाले. कधी काश्मीरसारखी स्वातंत्र्याची मागणी झाली नाही, हिंदूराष्ट्राच्या मागणीसारखी ‘फिर एक बार, निजाम सरकार' अशी घोषणा झाली नाही, पूर्वोत्तर राज्यांसारखी काही विशेष मागणी झाली नाही... हैदराबाद विलीन झाले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिताना सर्वच जाती-धर्मातील नागरिकांना धर्म व व्यक्तीस्वतंत्र्याची पक्की हमी दिल्याने सर्वांनी ती आनंदाने स्वीकारली, सर्व जण देशाशी एकरूप झाले. कधी काश्मीरसारखी स्वातंत्र्याची मागणी झाली नाही, हिंदूराष्ट्राच्या मागणीसारखी ‘फिर एक बार, निजाम सरकार' अशी घोषणा झाली नाही, पूर्वोत्तर राज्यांसारखी काही विशेष मागणी झाली नाही... तत्कालीन हैदराबाद संस्थानातील मुस्लिमांचे भारतीयत्व निर्विवाद आहे. याविषयी त्यांना शंका नाही आणि त्यांच्याविषयी इतर कुणालाही शंका नाही... (जी 'पारंपरिक' शंका आहे, ती तर सबंध भारतीय मुस्लिमांबाबत आहे, त्याला इलाज नाही, कारण ती शंका नव्हे विकृती आहे तत्कालीन हैदराबाद संस्थानातील मुस्लिमांचे भारतीयत्व निर्विवाद आहे. याविषयी त्यांना शंका नाही आणि त्यांच्याविषयी इतर कुणालाही शंका नाही... (जी 'पारंपरिक' शंका आहे, ती तर सबंध भारतीय मुस्लिमांबाबत आहे, त्याला इलाज नाही, कारण ती शंका नव्हे विकृती आहे\nआता राहतो विषय १७ सप्टेबर साजरा करण्याबाबतचा, तर हैदराबाद मुक्ती संग्राम दिन भारतात कोठेही साजरा होत नाही. आपल्या राज्यातही तो मराठवाडा विभागापुरता मर्यादित आहे आणि त्याची सुरुवातही तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारने मुस्लिमविरोधी भावना ‘सुखावण्या'साठी या ‘उत्सवा'ची सुरुवात केली होती निजाम सरकार जुलमी वगैरे होते, हे सबकुछ बकवास आहे निजाम सरकार जुलमी वगैरे होते, हे सबकुछ बकवास आहे त्या वेळी भारतात हैदराबादसारखे समृद्ध आणि संपन्न राज्य कोणतेही नव्हते. स्वत:ची रेल्वे, टपाल आणि टेलीफोन सेवा होती. अगदी दिल्लीतही नसलेल्या सुविधा हैदराबादमध्ये होत्या. रजाकारांच्या रूपात मूठभर लोकांची कट्टर संघटना होती म्हणून संपूर्ण राज्य आणि त्याची व्यवस्था जुलमी म्हणायची तर आज सरकार समर्थित/समर्थक आरएसएस आणि त्या त्याच्या सहकारी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभा, हिंदू वाहिनीसारख्या संघटना दलित व अल्पसंख्याकांवर काय कमी अत्याचार करीत आहेत का त्या वेळी भारतात हैदराबादसारखे समृद्ध आणि संपन्न राज्य कोणतेही नव्हते. स्वत:ची रेल्वे, टपाल आणि टेलीफोन सेवा होती. अगदी दिल्लीतही नसलेल्या सुविधा हैदराबादमध्ये होत्या. रजाकारांच्या रूपात मूठभर लोकांची कट्टर संघटना होती म्हणून संपूर्ण राज्य आणि त्याची व्यवस्था जुलमी म्हणायची तर आज सरकार समर्थित/समर्थक आरएसएस आणि त्या त्याच्या सहकारी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभा, हिंदू वाहिनीसारख्या संघटना दलित व अल्पसंख्याकांवर काय कमी अत्याचार करीत आहेत का म्हणून संपूर्ण देशाला ‘मुस्लिमविरोधी' मानायचे का म्हणून संपूर्ण देशाला ‘मुस्लिमविरोधी' मानायचे का हे काहीही असले तरी, रजाकारांच्या कृष्णकृत्यांचे कुणीही समर्थन करणार नाही. अत्याचार हा अत्याचार असतो; मग अत्याचारी व अत्याचारपीडित कुणीही असो\nदुसरे असे की, आपल्या देशात हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या कुठल्याही हिंसक, संविधान, कायद्याविरोधी घटनेला ‘साजरा' करण्याची कुप्रथा पडलेली आहे. म. गांधींचा मारेकारी नथुराम गोडसेच्या फाशीला ‘बलिदान दिवस' म्हणून साजरा करतात, बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याच्या दिवसाला ‘शौर्य दिवस' म्हणून साजरा करतात आणि सरकार काहीही कारवाई करत नाही हैदराबाद संस्थानाविरुद्धची कारवाई ‘ऑपरेशन पोलो’ हीसुद्धा मुस्लिमविरोधी मानसिकतेने करण्यात आली होती ज्यात २ लाखांपेक्षा अधिक मुसलमान मारले गेले, लाखोंच्या संख्येने कायमचे निर्वासित झाले, मालमत्ता आणि अब्रू लुटल्या गेल्या... अशा मानवतेविरुद्ध घटनेचा स्मृतिदिन उत्सव म्हणून साजरा करावा, हे कुठल्याही सभ्य आणि न्यायप्रिय समाजाला शोभणारे नाही.\nफेसबूकवर एका नेटकऱ्याने औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना उद्देशून एक पोस्ट केली होती की, ‘आपण आमदार असताना १७ सप्टेंबरच्या उत्सवाच्या कार्यक्रमाला हजर राहिला नाहीत. आता तुम्ही खासदार आहात. आता तरी कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या वेळची (रजाकारांची) एमआयएम आणि आताची एमआयएम वेगळी आहे, हे दाखवून द्या' म्हणत आव्हान दिले होते, त्यावरून ‘ऑपरेशन पोलो' ऊर्फ हैदराबाद/मराठवाडा मुक्ती संग्रामाबाबत लिहिते झालो आता इम्तियाज जलील, त्यांचा पक्ष एमआयएम किंवा इतर कुणीही १७ सप्टेंबर साजरा करावा, न करावा, हा ज्याचा-त्याचा विषय आहे. परंतु एखाद्याला मुस्लिमविरोधी मानसिकतेतून हा दिवस आनंदाने साजरा करण्याचा अधिकार आहे, तर एखाद्याला आपल्या बापजाद्यांवर, समाजावर झालेल्या अत्याचारामुळे, आपले वैभव, सर्वस्व गमावल्यामुळे हा दिवस दु:खद वाटतो, तर हाही त्याचा अधिकार आहे. या दोन्ही भावनांचा देशप्रेमाशी किंवा द्रोहाशी कुठलाही संबंध नाही. जो कुणी असे मानत असेल, ती त्याची विकृती आहे...\nसत्याची साक्ष - भाग-6\nमानवतेच्या कल्याणास्तव जमाअतचे प्रशिक्षण शिबीर\nडोळ्यात खुपणार्‍या कोणत्याही राज्याची भविष्यात हीच...\nशरद पवारांच्या सक्रीयतेने राज्यात भाकरी फिरणार\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nउत्सव आनंदाचा साजरा करायचा असतो विध्वंसाचा नव्हे \nहैदराबाद मुक्तीचा दुर्लक्षित इतिहास\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nशहादत-ए-हुसैन दु:खाचे नव्हे तर प्रेरणेचे स्त्रोत आहेत\nपूरग्रस्तांसाठी पाठविली 40 हजारांची औषधे\nआपल्या अस्तित्वाला उपयोगी सिद्ध करा\nकाश्मीर : स्वर्गाचा घात आणि फाळणीच्या नरकाचा ध्यास\nमहापूर ओसरला; अडचणी कायम\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०१९\nभाग्यावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशापुढे आर्थिक मंदीचे आव्हान\nमुस्लिम समाजाविषयीचा अहवाल आणि पोलिसांची मानसिकता\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nडिजिटल लोकशाही बदलते आयाम\nमहानगरी स्त्रियांना येणारे जातिभेदाचे अनुभव\nसत्याची साक्ष - भाग-5\nएकमेकांना भेटण्याचे इस्लामी शिष्टाचार\nएनआरसी : डोंगर पोखरून निघाला उंदीर\nद्वेषाने गाठला परमोच्च बिंदू\nजमीयत उलेमा ए हिंदतर्फे मुस्लिम बोर्डिंग येथे पूरग...\nसावित्रीबाई फुले रुग्णालयाला औषधांचा साठा प्रदान\nआजची युवापिढी व्यसनाच्या आहारी\nपवित्र कुरआनवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nविकासासाठी शाश्वत उपायांची गरज\nभारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पोहोचवलाय काय\nश्रद्धा - अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकेाण\nकाश्मीर : आयएएस अधिकार्‍याचा राजीनामा\n०६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2021/05/blog-post_7.html", "date_download": "2022-10-07T22:20:19Z", "digest": "sha1:BNLN5NNBLZGFRBADTMWHADBAESNON6RW", "length": 53836, "nlines": 247, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "| Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\n(७३) आणि जे सत्याचा इन्कार करणारे आहेत ते एकमेकांचे सहाय्य करीत असतात. जर तुम्ही हे केले नाही तर पृथ्वीवर उपद्रव आणि भयंकर बिघाड उद्भवेल.५१अ (७४,७५) ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आणि ज्यांनी अल्लाहच्या मार्गात घरदारांचा त्याग केला, संघर्ष केला व ज्यांनी आश्रय दिला व मदत केली तेच खरे श्रद्धावंत आहेत. त्यांच्यासाठी अपराधांची क्षमा व सर्वोत्तम उपजीविका आहे. आणि ज्या लोकांनी नंतर श्रद्धा ठेवली आणि स्थलांतर करून आले व तुमच्याशी मिळून संघर्ष तथा प्रयत्न करू लागले, त्यांचासुद्धा तुमच्यात समावेश आहे. पण अल्लाहच्या ग्रंथात रक्ताचे नातेवाईक आपापसांत एक दुसऱ्याचे अधिक हक्कदार आहेत.५२ नि:संशय अल्लाह प्रत्येक गोष्टीला जाणतो.\n(मदीनाकालीन, एकूण १२९ आयती)\n(१) मुक्तीची (करार समाप्त करण्याची) घोषणा आहे,१ अल्लाह व त्याचे पैगंबर (स.) कडून त्या अनेकेश्वरवादी लोकांसाठी ज्यांच्याशी तुम्ही करार केले होते.२\n(२) तर तुम्ही देशात आणखी चार महिने संचार करून घ्या३ आणि जाणून असा की तुम्ही अल्लाहला असफल करणारे नाहीत, आणि अल्लाह सत्याचा इन्कार करणाऱ्यांना अपमानित करणारा आहे.\n(३,४) आम सूचना आहे, अल्लाह व त्याचे पैगंबर (स.) कडून हज्जे अकबर३ च्या दिवशी,४ तमाम लोकांच्यासाठी, की अल्लाह अनेकेश्वरवादी लोकांकडून जबाबदारीपासून मुक्त आहे, आणि त्याचा पैगंबरसुद्धा. आताही जर तुम्ही पश्चात्ताप केला तर ते तुमच्यासाठीच उत्तम आहे आणि जर तोंड फिरवीत आहात तर चांगले लक्षात ठेवा की तुम्ही अल्लाहला असफल करणारे नाहीत, आणि हे पैगंबर (स.) सत्याचा इन्कार करणाऱ्यांना कठोर यातनेची खुशखबरी ऐकवा त्या अनेकेश्वरवादींखेरीज ज्यांच्याशी तुम्ही करार केले. आणि त्यांनी तुमच्याशी आपला करार पाळण्यात कोणतीही कसूर केली नाही व तुमच्याविरूद्ध कुणाला मदतही केली नाही, तेव्हा अशा लोकांशी तुम्हीदेखील कराराची मुदत पूर्ण होईपर्यंत प्रामाणिक राहा; कारण अल्लाह ईशपरायण लोकांनाच पसंत करतो.५\n(५) मग जेव्हा निषिद्ध महिने लोटतील६ तेव्हा त्या अनेकेश्वरवादींना ठार करा, जेथे सापडतील तेथे त्यांची नाकेबंदी करा व प्रत्येक पातळीवर त्यांचा समाचार घेण्यासाठी सज्ज राहा. मग जर त्यांनी पश्चात्ताप केला व नमाज कायम केली आणि जकात दिली तर त्यांना सोडून द्या.७ अल्लाह क्षमाशील आणि दया दाखविणारा आहे.\n५१अ) म्हणजे `दारूल इस्लाम'चे मुस्लिम एक-दुसऱ्यांचे मित्र (वली) बनले नाहीत आणि घरेदारे सोडून (हिजरत) `दारूल इस्लाम' मध्ये न येणारे तसेच `दारूल कुफ्र’ मध्ये निवास करणारे मुस्लिमांना `दारूल इस्लाम'च्या मुस्लिमांनी आपल्या राजनैतिक विलायती पासून त्यांना वेगळे समजू नये. बाहेरच्या पीडित मुस्लिमांची मदत मागितल्यावर त्यांची मदत केली गेली नाही आणि या नियमांचे पालनसुद्धा केले जाऊ नये की ज्या देशाशी इस्लामी राज्याचा समझौता आहे त्याच्याविरुद्ध मुस्लिमांची मदत केली जाणार नाही आणि जगात मुस्लिमांनी काफिरांशी (ईशद्रोही) `मवालात'चा (संरक्षक मित्राचा) संंबंध समाप्त् केला नाही तर धरतीवर उपद्रव आणि मोठा बिघाड माजेल.\n५२) म्हणजे इस्लामी बिरादरीच्या आधारावर वारस संपत्तीचे वाटप होणार नाही आणि ते हक्क जे वंश आणि सासरच्या नातेसंबंधावर आधारित आहेत, धार्मिक बंधुना एक दुसऱ्यांच्या मामल्यात प्राप्त् होतील. या मामल्यांत इस्लामी संबंधाऐवजी नातेदारी संबंधच कायदेशीर अधिकारांचा आधार असेल. हे यासाठी सांगितले गेले आहे की हिजरतनंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मुहाजिर आणि अंसार लोकांच्यामध्ये जे बंधुभाव निर्माण केले होते, त्यावरून काही लोक विचार करून होते की हे धार्मिक बंधु एक-दुसऱ्याचे वारससुद्धा होतील. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यानुसार फक्त मुस्लिम नातेवाईक (रक्तसंबंधी) एक-दुसऱ्याचे वारस बनतील. मुस्लिम एखाद्या मुस्लिमेतरांचा िंकवा मुस्लिमेतर मुस्लिमाचा वारसा बनू शकणार नाही.\n१) हे व्याख्यान आयत १ पासून आयत ३७ पर्यंतचे आहे आणि हि. सन ०९ मध्ये त्या वेळी अवतरित झाले जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माननीय अबू बकर (रजि.) यांना हजसाठी पाठविले होते. त्यांच्या पश्चात जेव्हा हे व्याख्यान अवतरित झाले तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माननीय अली (रजि.) यांना मक्का येथे पाठविले जेणेकरून हजयात्रींच्या जनसभेमध्ये त्यास ऐकवावे आणि निम्नलिखित चार गोष्टींची जाहीर घोषणा करावी.\n(१) स्वर्गात कोणी असा मनुष्य दाखल होणार नाही जो इस्लामचा स्वीकार करणार नाही. (२) या वर्षांनंतर कोणी अनेकेश्वरवादी हजसाठी येणार नाही. (३) अल्लाहच्या घराजवळ नग्न होऊन परिक्रमा (तवाफ) करू नये. (४) ज्या लोकांशी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांचा करार बाकी आहे. म्हणून ज्यांनी करार तोडला नाही त्यांच्याशी करारअवधीपर्यंत पालन केले जावे.\nपैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आदेशानुसार माननीय अली (रजि.) यांनी ही घोषणा १० जिल हज्जला केली. या ठिकाणी हे जाणून घेणे लाभप्रद होईल की मक्का विजयानंतर इस्लामी काळाचा पहिला हज हि. सन. ०८ मध्ये प्राचीन पद्धतीने झाले, नंतर हि. सन ०९ दुसरा हज मुस्लिमांनी आपल्या पद्धतीने केला आणि अनेकेश्वरवादींनी आपल्या पद्धतीने केला. यानंतर तिसरा हज हि. सन १० मध्ये विशुद्ध इस्लामी पद्धतीने झाला आणि हाच प्रसिद्ध हज आहे ज्याला ``हिज्जतुल विदाह'' (निरोपाचा हज) म्हटले जाते. पैगंबर मुहम्मद (स.) पहिल्या दोन वर्षी हजसाठी गेले नव्हते. तिसऱ्या वर्षी जेव्हा पूर्ण शिर्क (अनेकेश्वरत्व) नष्ट झाले तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी हज अदा केला.\n२) सूरह ८ (अन्फाल) आयत ५८ मध्ये आले आहे की जेव्हा एखाद्या राष्ट्राशी विश्वासघात (करारभंग) करण्याची आशंका असेल तर जाहीरपणे त्यांचे करार त्यांच्याकडे फेकून द्या आणि त्याला सचेत करा की आता आपल्या दोघांत करार बाकी राहिला नाही. याच आचारसंहितेनुसार करारभंगाची ही घोषणा त्या सर्व कबिल्याविरुद्ध केली जे प्रतिज्ञा व वचनबद्ध झाल्यानंतरसुद्धा इस्लामविरुद्ध षड्यंत्र करीत होते. वेळ मिळाल्यास त्वरित शत्रुत्वावर येत होते. बराअत (करारभगाच्या) या घोषणेमुळे अरबमध्ये अनेकेश्वरवाद्यांचे आणि विद्रोहींचे अस्तित्व कायद्यानुसार संपुष्टात आले आणि त्यांच्यासाठी पूर्ण देशात शरणस्थळे राहिली नाहीत. कारण देशाचा मोठा भाग इस्लामच्या शासनाधिकारात आला होता. या घोषणेनंतर अरबातील अनेकेश्वरवादींसाठी कोणताच उपाय बाकी राहिला नाही. एकतर ते लढण्यासाठी तयार व्हावेत आणि इस्लामी शक्तीशी सामना करून नष्ट होऊन जावे किंवा त्यांनी देश सोडून निघून जावे. तसेच इस्लामचा स्वीकार करून आपल्या स्वत:ला आणि आपल्या क्षेत्राला इस्लामी जीवनव्यवस्थेच्या स्वाधीन करावे. ज्यास देशाच्या बहुतांश भागास पूर्वीच इस्लामी राजवटीच्या आधीन केले होते.\nया उत्तम उपायाची सार्थकता तेव्हाच समजू शकते जेव्हा आम्ही इस्लामी विमुखतेच्या त्या उपद्रवाला डोळयांसमोर ठेवावे जो या घटनेनंतर दीड वर्षाने (माननीय अबू बकर यांच्या खिलाफतच्या आरंभकाळात) घटित झाला. हि. सन ०९ मधील बराअत (करारभंग) च्या या घोषणेमुळे शिर्कची (अनेकेश्वरत्वाची) ही संघटित शक्ती नष्ट केली गेली नसती तर या उपद्रवाने गृहयुद्धाचे भयानक रूप धारण केले असते आणि मग इस्लामचा इतिहास कसा झाला असता पण यापूर्वीच इस्लामची वैधानिक शक्ती संपूर्ण देशावर प्रभावी झालेली होती.\n३) ही घोषणा १० जिल हज्ज हि. सन ०९ मध्ये झाली होती त्या वेळेपासून १० रब्बी उस्सानी हि. सन १० पर्यंत चार महिन्याचा अवधी त्या लोकांना दिला गेला होता जेणेकरून त्यांनी चांगला विचार करून निर्णय घ्यावा.\n४) म्हणजे १० जिल हज्ज ज्याला ``यौमुल नहर'' म्हणतात. सहीह हदीसमध्ये आले आहे की `हिज्जतुल विदाअ'मध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांनी प्रवचन देताना उपस्थितांशी विचारले, ``आज कोणता दिवस आहे'' लोक म्हणाले, ``आज कुर्बानीचा दिवस आहे.'' पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``हा मोठ्या हजचा (हज्जे अकबर) दिवस आहे.'' हज्जे अकबरचा शब्द `हज्जे असगर' (छोटा हज) च्या विरोधी येतो. अरबचे लोक `उमरा'ला छोटा हज म्हणतात. याविरुद्ध तो हज जो जिल हज्जच्या निश्चित तारखांत केला जातो `हज्जे अकबर' म्हटले जाते.\n५) म्हणजे हे ईशपरायणतेच्या विरुद्ध होईल की ज्यांनी करारभंग केला नाही, परंतु तुम्ही स्वत:हून करार तोडता आहात. अल्लाहजवळ प्रिय तेच लोक आहे जे प्रत्येक स्थितीत धर्मपरायणतेला स्वीकारून असतात.\n६) येथे हराम महिन्यांनी अपेक्षित पारिभाषिक हराम महिने नाहीत जे हज व उमरासाठी हराम ठरविले गेले आहेत. तर तेथे चारही महिन्यांशी तात्पर्य आहे ज्याची सवलत अनेकेश्वरवादींना दिली होती. या सवलतीच्या काळात मुस्लिमांसाठी अवैध होते की अनेकेश्वरवादींवर हल्ला करावा म्हणून यांना हराम महिने म्हटले गेले आहे.\n७) म्हणजे कुफ्र आणि शिर्क (द्रोह आणि अनेकेश्वरत्व) पासून पश्चात्ताप (तौबा) करून मामला समाप्त् होत नाही तर त्यांना नमाज कायम करावी लागणार आणि जकात द्यावी लागणार. अन्यथा हे मानले जात नाही की त्यांनी कुफ्र त्यागून इस्लामचा स्वीकार केला आहे. याच आयतीला माननीय अबू बकर (रजि.) यांनी इस्लाम विमुखतेच्या उपद्रवासमयी प्रमाणाच्या रूपात ठेवले होते. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मृत्यूपश्चात ज्यांनी उपद्रव माजविला होता, त्यांच्यापैकी एका गटाने सांगितले की आम्ही इस्लामचे द्रोही नाहीत. नमाज पढण्यास तयार आहोत परंतु जकात मात्र देणार नाहीत. सहाबांना सामान्यता ही परेशानी होत होती की अशा लोकांविरुद्ध युद्ध कसे केले जाऊ शकते परंतु माननीय अबू बकर (रजि.) यांनी याच आयतीचा दाखला देऊन सांगितले की आम्हाला या लोकांना सोडून देण्याचा आदेश या स्थितीत देण्यात आला होता की हे अनेकेश्वरत्वापासून पश्चात्ताप करतील व नमाज कायम करतील, जकात देतील. परंतु हे तर या तिन्ही अटींपैकी एक अट उडवून देतात तर आम्ही यांना कसे सोडून द्यावे.\n८) म्हणजे युद्धासमयी शत्रू तुम्हाला सांगू लागला की मी इस्लामला समजून घेऊ इच्छितो तर मुस्लिमांनी त्याला शरण देऊन आपल्या येथे येण्याची संधी द्यावी आणि त्याला इस्लाम समजावून द्यावा. जर त्याने इस्लाम स्वीकारला नाही तर त्याला संरक्षण देऊन त्याच्या घरी त्याला पोहचवून द्यावे.\n९) म्हणजे बनीकिनाना आणि बनीखुजाआ आणि बनीजमरा.\n१०) म्हणजे ते तर कराराच्या अटी घालतात, परंतु मनात उल्लंघनाची इच्छा ठेवूनच. याचे प्रमाण अनुभवाने मिळते. त्यांनी जेव्हा कधी करार केला तो मात्र तोडण्यासाठीच.\n११) म्हणजे असे लोक आहेत ज्यांना नैतिक दायित्वाची जाणीव नाही की चारित्र्याच्या बंधनांना तोडण्याची पर्वा.\n१२) म्हणजे एकीकडे अल्लाहच्या आयती त्यांना भलाई आणि सच्चई आणि त्यावर आधारित नियमांचे पालन करण्याचे आमंत्रण देत होत्या. तर दुसरीकडे जगाच्या क्षणिक फायद्याचे आकर्षण होते जे मनेच्छांचे बेलगाम पालन करुन प्राप्त् होत होते. या लोकांनी या दोन्हींची तुलना केली आणि नंतर पहिलीला त्यागून दुसऱ्याला आपल्यासाठी निवडले.\n१३) म्हणजे या अत्याचारींनी येथे थांबून घेतले नाही तर मार्गदर्शनाऐवजी मार्गभ्रष्टतेला आपल्यासाठी पसंत केले आणि यापेक्षा पुढे जाऊन त्यांनी प्रयत्न केले की सत्य संदेशाचे काम पुढे न चालले पाहिजे. भलाई आणि सुधाराच्या पुकारला कोणीही ऐकू नये किंबहुना ते तोंडच बंद करावे ज्याकरवी हा सत्यसंदेश बुलंद होत आहे. ज्या आदर्श व मंगल जीवनव्यवस्थेला अल्लाह पृथ्वीवर स्थापित करू इच्छितो, त्या स्थापनेला रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्या लोकांचे जगणे अवघड केले जे सत्याचे अनुयायी बनले होते.\n१४) ``जाणणारे''म्हणजे ते लोक जे अल्लाहच्या अवज्ञेचे परिणाम जाणून आहे आणि अल्लाहच्या कोपचे भय आपल्या मनात ठेवून असतात आणि हे जे सांगितले गेले की जर असे केले तर ``ते तुमचे धर्म (दीनी) बंधु आहेत.'' तर याचा अर्थ असा आहे की या अटींना पूर्ण करण्याचा परिणाम केवळ हाच होणार नाही की तुमच्यासाठी त्यांच्यावर हात उठविणे आणि त्यांच्या जीव आणि वित्ताला नुकसान करणे अवैध होईल तर याचा लाभ म्हणजे त्यांना इस्लामी समाजात समान अधिकार प्राप्त् होतात. सामाजिक, सांस्कृतिक आणि कायदे संदर्भात ते इतर मुस्लिमांसारखेच होतील. काही एक भेदभाव त्यांच्या विकासाच्या मार्गात येणार नाही.\n१५) या आयतच्या शब्दांनी प्रत्यक्ष असे वाटते की जर त्यांनी आपल्या प्रतिज्ञेला तोडले तर त्यांच्याशी युद्ध करा. परंतु संदर्भावर विचार केल्यावर स्पष्ट होते की येथे प्रतिज्ञा म्हणजे इस्लाम आणि आदेशाचे पालन करण्याची प्रतिज्ञा आहे. कारण करारभंग अगोदरच झालेला होता आणि पुढे त्यांच्याशी करार करणे संभव नव्हते. म्हणून येथे कराराविरुद्ध काम करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही आयत वरच्या आयत नंतर त्वरित आलेली आहे. त्यात सांगितले आहे की जर त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला आणि नमाज आणि जकातची पाबंदी स्वीकार केली तर ते तुमचे दिनी (धर्म) बंधु आहेत. यानंतर असे म्हणणे, ``जर ते आपला करारभंग करतील'' याचा स्पष्ट अर्थ होतो की याने तात्पर्य त्यांनी इस्लामचा स्वीकार करणे आणि इस्लामच्या सामुदायिक व्यवस्थेचे पालन करण्याची प्रतिज्ञा करून ती तोडणे आहे. खरे तर या आयतीत इस्लामविरुद्ध त्या उपद्रवाकडे संकेत आहे जो दीढ वर्षानंतर माननीय अबू बकर (रजि.) यांच्या खिलाफतीच्या आरंभी निर्माण झाला होता. माननीय अबू बकर (रजि.) यांनी या वेळी जी कर्यपद्धती स्वीकारली ती ठीक या आदेशानुसार जो या आयतीत दिला गेला होता. (तपशीलासाठी पाहा माझा उर्दूग्रंथ ``मुरतद की सजा इस्लामी कानून मे'')\n१६) आता व्याख्यानाचे संबोधन मुस्लिमांकडे वळते. त्यांना युद्धासाठी उभारणे तसेच धर्माविषयी नातेसंबंध आणि भौतिक लाभाचा विचार न करण्याची ताकीद दिली आहे. व्याख्यानाच्या या भागाची पूर्ण भावना समजण्यासाठी पुन्हा एकदा त्या स्थितीला डोळयांपुढे ठेवणे आवश्यक आहे जी त्या वेळी निर्माण झाली होती. यात शंका नाही की इस्लामचा प्रभाव देशाच्या मोठ्या भागावर होता. अरबमध्ये आता अशी एखादी मोठी शक्ती उरली नव्हती जी इस्लामला आव्हान देऊ शकेल. तरीपण निर्णायक पाऊल आणि अतिक्रांतीकारक पाऊल यावेळी उचलले जात होते त्याच्यात अनेक धोके प्रत्यक्षदर्शी लोकांना दिसत होते.\n(१) सर्व अनेकेश्वरवादी कबिल्यांना एकाच वेळी सर्व करार रद्द करण्याचे आव्हान देणे, नंतर अनेकेश्वरवाद्यांच्या हज करण्यावर बंदी आणणे, तसेच काबागृहाच्या प्रबंध व्यवस्थेत परिवर्तन करणे आणि अज्ञानतापूर्ण रूढी-परंपरांचा संपूर्ण नायनाट करणे म्हणजे सर्व देशाला पेटविण्यासारखे होते. अनेकेश्वरवादी आणि दांभिक आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपल्या दुराग्रहासाठी आणि स्वार्थासाठी लढण्यास व मरण्यास तयार होते.\n(२) हजला फक्त एकेश्वरवादी लोकांसाठी निश्चित करणे आणि अनेकेश्वरवादींसाठी काबागृहाचा रस्ता कायमचा बंद करणे म्हणजे देशाचा मोठा भाग जो अद्याप अनेकेश्वरवादी होता, त्यांना काबाकडे येण्या-जाण्यापासून रोखणे होते. ही फक्त धार्मिक दृष्टीनेच नव्हे तर आर्थिक दृष्टीनेसुद्धा अरब देशात महत्त्वपूर्ण घटना होती. अरब देशाच्या आर्थिक जीवनाचा तो महत्त्वाचा कणा होता.\n(३) जे लोक हुदैबियाच्या करार आणि मक्का विजयानंतर ईमान आणून मुस्लिम बनले होते अशा नुकत्याच मुस्लिम झालेल्या लोकांसाठी हे सर्व अत्यंत कठीण कार्य होते. कारण त्यांचे अनेक भाईबंद नातेसंबंधी अनेकेश्वरवादी होते. त्यांपैकी काही लोक असे होते ज्यांचे आर्थिक हित प्राचीन अज्ञानी व्यवस्थेशी जुडलेले होते. आता प्रत्यक्षात अरबच्या सर्व अनेकेश्वरवाद्यांना संपविण्याची तयारी केली जात होती. त्याचा अर्थ म्हणजे या नवमुस्लिमांनी आपल्या स्वत:च्या हाताने आपले परिवार आणि नातेवाईकांना संपविणे आणि त्यांची प्रतिष्ठा आणि पद आणि पूर्वस्थापित भेदभाव नष्ट करणे होते.\nयातील एखादा धोका व्यावहारिक रूपात समोर आला नाही. स्वत:ची त्यांच्यापासून सुटका करून घेण्याच्या घोषणेने देशात गृहयुद्ध भडकण्याऐवजी अरबांचे राहिलेले अनेकेश्वरवादी कबीले आणि सरदारांचे प्रतिनिधीमंडळ येऊ लागले. ते सर्व पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासमोर इस्लामचा स्वीकार करत गेले आणि आज्ञापालनाचे प्रण करत गेले. त्यांनी इस्लाम स्वीकारल्यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्यांना आपापल्या पदावरच ठेवले. परंतु ज्या वेळी या नवीन पद्धतीची घोषणा केली जात होती तेव्हा त्याच्या या परिणामांना कोणीही जाणू शकत नव्हता. या घोषणेबरोबरच मुस्लिम याला पूर्ण शक्तीनिशी लागू करण्यास तयार झाले नसते तर संभवता हा परिणामसुद्धा पुढे आला नसता. म्हणून अनिवार्य होते की मुस्लिमांना या समयी अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा (जिहाद) करण्यासाठी उभारले जाणे आवश्यक होते. त्यांच्या मनातून या प्रणाली विरुद्ध त्या सर्व आशंकांना दूर सारले गेले. मुस्लिमांना यावेळी आदेश देण्यात आला की अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी कोणत्याच गोष्टीची पर्वा करू नये. या व्याख्यानाचा हाच विषय आहे.\n१७) हा एक हलकासा संबंध आहे त्या संभावनेकडे जी पुढे घटनेच्या रूपात प्रकट झाली होती. मुस्लिम हे समजत होते की त्या घोषणेनंतर त्वरित देशात रक्ताचे पाट वाहू लागतील. त्यांच्या या भ्रमाला दूर करण्यासाठी संकेत रूपात त्यांना दाखविले गेले. ही प्रणाली स्वीकारल्यावर शक्यता आहे गृहयुद्ध सुरु होईल याची संभावना आहे आणि तशीच संभावना लोकांना पश्चाताप व्यक्त करण्याची संधी प्राप्त् होईल. परंतु या संकेताला अधिक स्पष्ट यासाठी केले नाही की एकीकडे युद्ध तयारी करण्याचे मुस्लिमांचे प्रयत्न हलके पडले असते. तसेच दुसरीकडे अनेकेश्वरवादींसाठी या धमकीचा परिणाम हलका-पुसटसा झाला असता ज्यामुळे त्यांना आपल्या कमजोर स्थितीवर गंभीरतापूर्ण विचार करण्यास आणि शेवटी स्वत:ला इस्लामी जीवनव्यवस्थेत एकरूप होण्यास तयार केले गेले.\n१८) हे संबोधन आहे त्या नव्या लोकांशी जे नुकतेच इस्लाममध्ये आले होते. त्यांच्याशी सांगितले जात आहे की जोपर्यंत तुम्ही या परीक्षेला सामोरे जाऊन प्रमाणित करत नाही की वास्तविकपणे तुम्ही आपले जीव व वित्त आणि सगेसोयरे यांच्यापेक्षा जास्त अल्लाह आणि इस्लामला प्रिय ठेवत आहात तोपर्यंत तुम्ही खरे ईमानधारक ठरू शकत नाही. अद्याप प्रत्यक्षाला पाहून तुमची स्थिती अशी आहे की इस्लाम सच्चे ईमानधारक आणि प्रारंभीच्या ईमानधारकांच्या बलिदानाने विजयी झाला आणि देशात प्रभावी ठरला. त्यामुळे तुम्ही आज मुस्लिम बनला आहात.\n१९) म्हणजे ज्या मस्जिदी एकमेव अल्लाहच्या उपासनेसाठी बनलेल्या आहेत त्यांचे प्रबंधक, मुजावर, सेवक आणि उपासक बनण्यासाठी ते लोक योग्य नाहीत जे अल्लाहबरोबर त्याच्या गुणात, हक्कात आणि अधिकारात इतरांना भागीदार बनवतात. त्यांनी स्वत: एकेश्वरत्वाचे आवाहन स्वीकारले नाही आणि स्पष्ट सांगितले की एक अल्लाहच्या उपासनेला आम्ही बांधील नाही. तेव्हा त्यांना काय अधिकार आहे की एखाद्या अशा उपासनागृहाचे प्रबंधक बनून राहावे की जे फक्त एक अल्लाहच्या उपासनेसाठी बनविले आहे. येथे सामान्यत: ही गोष्ट सांगितली आहे आणि आपल्या वास्तविकतेच्या दृष्टीने ती सामान्य आहे. परंतु मुख्यता येथे तिचा उल्लेख करण्याचा हेतू म्हणजे काबागृह आणि मस्जिदे हराम यावरील अनेकेश्वरवादींच्या व्यवस्थापन प्रबंधाला समाप्त् केले जावे. तसेच ते प्रबंधन नेहमीसाठी एकेश्वरवादींच्या हातात दिले जावे आणि एकेश्वरवादी काबागृहाचे नेहमीसाठी प्रबंधक बनावेत.\n२०) म्हणजे जी थोडी सेवा त्यांनी काबागृहाची केली होती तीसुद्धा निरर्थक ठरली कारण हे लोक त्याबरोबर अनेकेश्वरत्व आणि अज्ञानतापूर्ण रीतींची भेसळ करीत होते. त्यांच्या थोड्याशा पुण्याईला भल्या मोठ्या दुष्टतेने खाऊन टाकले.\n०४ जून ते १० जून २०२१\nतडफडणारी जनता आणि धडधडणाऱ्या चिता\nकोविडपासून जगाने कोणता बोध घ्यावा\nआरक्षण, मृत्युदंड आणि गंगाजल \nनिर्दोष पॅलेस्टाईन लोकांचे हत्याकांड आणि इस्त्राईल...\nखतांच्या किंमतीत अव्वाच्या सव्वा दरवाढ करून शेतकऱ्...\nसूरह अत् तौबा: ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआपल्या हक्कांसाठीचा संघर्ष की दहशतवाद\nखेडचे माजी नायब तहसीलदार बशीर अमीन मोडक यांचे दुःख...\nसूरह अत् तौबा: ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशाला सेवाभावी समुदायाची गरज\nइतर धर्मियांना मुस्लिमांच्या माहीत नसलेल्या बाबी\n...तर महाराष्ट्राची जनता कदापीही मान्य करणार नाही\nवारसासंबंधी पवित्र कुरआनचे मार्गदर्शक नियम\nमहामारीतील ‘अस्थायी वास्तविकते’च्या कालखंडातील ‘ईद’\n२८ मे ते ०३ जून २०२१\n२१ मे ते २७ मे २०२१\nबंगालमध्ये झालेला पराभव आणि त्याचे परिणाम\nकोरोनाचे विक्राळ रूप भीतीदायक\nगरीबांसाठी ‘राहत’ देणारा अवलिया हरपला\nसूरह अत् तौबा: ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदोन देवदूत - शाहनवाज़ शेख़ आणि प्यारे खान\nपोलिसांची गमावलेली प्रतिष्ठा लोकशाहीसाठी घातक\n१४ मे ते २० मे २०२१\nजमाअत-ए-इस्लामी हिंद ने नागपूर, दिल्लीत उभारले कोव...\nप्रश्न फक्त आरोग्य व्यवस्थेच्या कोसळण्याचा नाही\nरोजा शरीर अन् मनही शुद्ध करते\n(७३) आणि जे सत्याचा इन्कार करणारे आहेत ते एकमेकांच...\nनिवडणूक अधिकाऱ्यांवरच नाही तर सभा घेणाऱ्या दिग्गज ...\nटाळ्या, थाळ्या आणि टीका उत्सव\nसूरह अत् तौबा: ईशवाणी (सुबोध कुरआन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-set-to-move-swiftly-to-form-maharashtra-government/articleshow/92563115.cms?utm_source=liveblog&utm_medium=web&utm_campaign=hyperlink", "date_download": "2022-10-07T23:20:54Z", "digest": "sha1:6HLMBHW3SZDTPBLLHPPLLMUBKMPHYK5F", "length": 15257, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "maharashtra government formation, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर होणार पण सत्तास्थापनेचा फॉर्म्युला कसा असेल, शिंदे गटाला काय मिळणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर होणार पण सत्तास्थापनेचा फॉर्म्युला कसा असेल, शिंदे गटाला काय मिळणार\nMaharashtra Government Formation: शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला व पर्यायाने महाविकास आघाडीला खिंडार पडल्यानंतर संख्याबळाचे दावे-प्रतिदावे, रस्त्यांवरील शक्तिप्रदर्शन, तांत्रिक मुद्द्यांचा कीस, न्यायालयीन लढाई अशा सर्व स्तरांवर शिवसेना व बंडखोर यांच्यात जोरदार संघर्ष सुरू होता.\nमुंबईः गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्यातील पहिल्या अंकाचा शेवट बुधवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray resignation) यांच्या राजीनाम्याने झाला. या सत्तानाट्यातील पुढचा अंक आता भारतीय जनता पक्षाच्या सत्तास्थापनेच्या हालचालींनी सुरू झाला आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन होणार असून या सरकारात कोण- कोण सहभागी असेल याची चाचपणी भाजपकडून करण्यात येत आहे. येत्या दोन- तीन दिवसांत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. मात्र, त्यापूर्वी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपची रणनिती काय हे जाणून घेऊ. (Maharashtra Government Formation)\nसरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठावा लागतो. राज्याच्या विधानसभेत २८८ जागा आहेत. एका सदस्याच्या मृत्यूमुळं हा आकडा २८७ इतका झाला आहे. अशात बहुमतासाठी १४४ आमदारांचं पाठबळ असणं आवश्यक आहे. भाजपकडे सध्या १०६ आमदार आहेत. तर, शिंदे गटातील आमदारांची संख्या ३९ असून १२ अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर, बीवीएचे ३ आणि मनसेचा एक आमदारानेही समर्थन दिल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळं भाजपकडे सध्या १६१ आमदारांचे पाठबळ आहे. तर, एकीकडे शिवसेनेचे १६, राष्ट्रवादीचे ५३, काँग्रेसचे ४४ आणि समाजवादी पक्षाचे २ आमदार आहेत. त्याव्यतिरिक्त एमआयएमचे २ आणि २ अपक्ष आमदारांचा पाठिंबा महाविकास आघाडीला आहे. विधानसभेतील या संख्याबळाचा आढावा घेतल्यास भाजप सहज सत्ता स्थापनेचा दावा करु शकते. येत्या दोन दिवसांत भाजपकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.\nवाचाः 'भाजपकडून कोणती आणि किती मंत्रिपदं मिळणार'; एकनाथ शिंदेंचा महत्त्वाचा खुलासा\nभाजपची पुढील रणनीती काय\nउद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर विधीमंडळात होणारी आज बहुमत चाचणी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत फडणवीस राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राज्यपाल त्यांना सरकार बनवण्याचे आदेश देऊ शकतात. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मुहूर्त जवळ आला आहे.\nएकनाथ शिंदे यांना भाजपकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर मिळाल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर मंत्रीमंडळात शिंदे गटातील आमदारांना महत्त्वाची खाती दिली जाण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेल्या सर्व आमदारांना मंत्रीपदं दिली जाण्याची शक्यता आहे. त्यातबरोबर, शिंदे गटातील काही आमदारांनाही मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहेत.\n... महाराष्ट्रात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी असेच काहीसे घडले होते...\nशिंदे गटातील या नेत्यांना मंत्रीपदी वर्णी\n१. एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)\n२. दादा भूसे पाटील\nमहत्वाचे लेख'भाजपकडून कोणती आणि किती मंत्रिपदं मिळणार'; एकनाथ शिंदेंचा महत्त्वाचा खुलासा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमुंबई आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nदेश वंदे भारत एक्स्प्रेस दुसऱ्यांदा दुर्घटनाग्रस्त, सलग दुसऱ्या दिवशी वेगवान ट्रेनचा खोळंबा\n जे लॉटरीचं तिकीट कचऱ्यात टाकलं, त्यानेच बनवले या महिलेला करोडोंची मालकीण\nसिंधुदुर्ग उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे राहणारा आमदार चौकशीच्या फेऱ्यात, कोकणातल्या नेत्याला एसीबीची नोटीस\nमुंबई धाकधूक वाढली, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या हालचाली\nमुंबई ठाकरेंबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर विनायक राऊतांकडून राणेंची कोंडी करण्याचा प्रयत्न\nसातारा माझ्या भावाचं माझ्यावर खूपच प्रेम, मी माझा जितका प्रचार करत नाही, तितका...: उदयनराजे\nदेश काँग्रेस नेत्यानं हॉटेलमध्ये नेलं, मग सामूहिक अत्याचार केले, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर तिघांना अटक\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%88_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2022-10-07T22:48:28Z", "digest": "sha1:3FLIOZY5B5SAUFP5HBVQ4256DXMRR5LO", "length": 5116, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रि-भोई जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nरि-भोई हा भारताच्या मेघालय राज्यातील जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र नॉॅंगपोह येथे आहे.\nपूर्वीय पश्चिम खासी हिल्स\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०२२ रोजी ०९:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/rbi-shaktikanta-das-press-conference/", "date_download": "2022-10-07T21:32:07Z", "digest": "sha1:DS7OA6D73OUD6DDOMQ3ZZCAD7AMOWBVD", "length": 9691, "nlines": 111, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मार्च ते ऑगस्ट या 6 महिन्यांसाठी कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमार्च ते ऑगस्ट या 6 महिन्यांसाठी कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा\nमार्च ते ऑगस्ट या 6 महिन्यांसाठी कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा\nमुंबई | मार्च ते ऑगस्ट या 6 महिन्यांसाठी कर्जदारांना आरबीआय मोठा दिलासा दिलेला आहे. कर्ज न भरण्याची मुदत आरबीआयने आणखी तीन महिने वाढवली आहे. आरबीआयच्या या घोषणेचा फायदा कोट्यवधी लोकांना होणार आहे.\nकर्जाची सवलत आणखी तीन महिन्यांना वाढवली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत होता आणि सगळ्यांना हीच अपेक्षा लागून राहिलेली होती. याचसंदर्भातली चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चालू होती. तीच महत्त्वाची घोषणा आज आरबीआयने केली आहे.\nत्यामुळे ऑगस्टपर्यंत आता कर्ज भरलं नाही तरी चालणार आहे. सर्वसामान्यांच्या हातात पैसा रहावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसंच येणाऱ्या मान्सूनकडून खूप मोठ्या अपेक्षा असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी सांगितलं. आज पत्रकार परिषद घेऊन दास यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.\nकोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी आरबीआयने पुन्हा मोठे निर्णय घेतले आहेत. रेपो दरात आरबीआयने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 4.40 टक्कांवर असलेला रेपो रेट आता 4.0 टक्क्यांवर आला आहे. रेपो रेट कपातीमुळे कर्जावरचं व्याज आणखी कमी होणार आहे.\nतसंच रिव्हर्स रेपो दरात देखील आरबीआयने पुन्हा 40 बेसिस पॉइंटची कपात केली आहे. त्यामुळे आता रिव्हर्स रेपो दर कमी होऊन 3. 35 टक्के झाला आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने हे मोठं पाऊल उचललं आहे.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\nआनंदाची बातमी… पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी, पुणेकरांना दिलासा\nराज्यात कोरोनावर मात करण्याचा उच्चांक, एकाच दिवसात बरे झाले 1408 रूग्ण…\nआरबीआयचा पुन्हा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा\nमुलीचा विवाह सोहळा पार पडताच गँगस्टर अरूण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका\nउद्धव ठाकरे यांनी ग्लोज, पीपीई किट घालून ‘मातोश्री‘बाहेर पडावं- चंद्रकांत पाटील\nआरबीआयचा पुन्हा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा\nकोरोनाला हरवण्यासाठी खास नागपुरकरांसाठी तुकाराम मुंढेंनी काढला नवा आदेश\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/mahafast-100", "date_download": "2022-10-07T23:19:34Z", "digest": "sha1:F36Y6FPWRMVTBOVVYEL7OAEQDVWKKJMI", "length": 8372, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nमहाफास्ट 100: आताच्या घडीच्या सर्व महत्वाच्या बातम्या, पाहा एका क्लिकवर…\nMahafast | दहावीच्या परीक्षासंदर्भात राज्य सरकार लवकरच जीआर काढणार\nZaheer Khan : झहीर खानने अभिनेत्रीच्या कुटुंबाला अशा प्रकारे मनवलं होतं, जाणून घ्या लव्हस्टोरी\nफक्त प्रेम.. रणबीरने आलियाला केलं किस; बेबी शॉवरमधील खास क्षण\nदक्षिण आफ्रिकेवर भारी पडणार ‘हे’ दोन खेळाडू, जाणून घ्या….\nमौनी रॉयचा आऊटफिट पाहून नेटकरी घायाळ; फोटोंवर लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव\nRishabh Pant : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये ऋषभ पंतचा वाढदिवस साजरा, चाहते म्हणाले उर्वशीही…\nसादर करण्यात आलेल्या कागद पत्रांवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार यासह पहा इतर अपडेट महाफास्ट न्यूज 100 मध्ये\nअंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेचा प्रचाराचा काय आहे प्लॅन पहा यासह 4 मिनिट 24 हेडलाईन्स\nउद्धव ठाकरेंनी का मागितले आणखीन काही दिवस यासह इतर बातम्यांच्या अपडेटसाठी पहा महाफास्ट न्यूज 100\nशेतकऱ्यांना 12 तास वीज देणार यासह पहा राज्यभरातील अपडेट 36 जिल्हे 72 बातम्यामधून\n“उद्धव ठाकरेंच्या भाषणाला दर्जा नाही, बोलायला लागले की लोक निघून जातात”\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/12/nationalfilm-award.html", "date_download": "2022-10-07T22:46:02Z", "digest": "sha1:67RRWQMLVOOFGKRO4U5ZJ5IBTTTNG4D4", "length": 4274, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "राष्‍ट्रीय चित्रपट पुरस्‍कारांचे आज वितरण | Gosip4U Digital Wing Of India राष्‍ट्रीय चित्रपट पुरस्‍कारांचे आज वितरण - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome मनोरंजन राष्‍ट्रीय चित्रपट पुरस्‍कारांचे आज वितरण\nराष्‍ट्रीय चित्रपट पुरस्‍कारांचे आज वितरण\nदिल्लीतील शास्त्री भवन येथे काही दिवसांपूर्वीच 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. आज दिल्लीच्या विज्ञान भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.\n'भोंगा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला असून इतर भाषिक चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.\n'पाणी', 'नाळ', 'चुंबक', 'तेंडल्या', 'खरवस' आणि 'आई शप्पथ' या मराठी चित्रपटांचा विविध श्रेणींमध्ये सन्मान केला जाणार आहे.\nदरम्यान देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव केला जाणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री दिव्या दत्ता करणार आहेत.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.mukundbhalerao.com/blog/2021/03/15/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2022-10-07T22:56:42Z", "digest": "sha1:2DI2SH2G6NGD66D6HGP6B3JGWYJUGLIG", "length": 10638, "nlines": 261, "source_domain": "www.mukundbhalerao.com", "title": "रंगात रंगलेले किती रंग हे निराळे…. – Mukund Bhalerao", "raw_content": "\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\n हवामे, तैरना मुझे आता,\nप्रवीण बुरकुले on जनाचे श्लोक\nS B Joshi on जनाचे श्लोक\nTushar Shardul on अभिराम मुक्त ऐसा, आनंदकंद आहे……..\nरंगात रंगलेले किती रंग हे निराळे….\nना पाहीले कधी मी उन्मुक्त चित्त ऐसे,\nमन भावले सहजही हे चित्र मुक्त ऐसे….\nकधी रंग हे बहरले कळले मला न काही,\nस्वप्नात पाहीले जे दिसते इथेच काही…\nमनी साठवू किती हे स्वर्गीय रंग ऐसे,\nरंगात रंगलेले किती रंग हे निराळे….\nशब्दात सांगू कैसे मनरंग हे निराळे,\nचित्रात साठवेना हे शब्दची निराळे….\nकिती गूढ भावनांचे गहरेच रंग सारे,\nकिती सांगती निराळे स्वप्नील भाव ऐसे….\nस्वप्नी मनात माझ्या चित्रेच ती निराळी,\nसांगू आता कसे मी होतीच ती निराळी..\nजो शब्द मी दिलेला पक्का मनात आहे,\nशब्दास जागणारा मी मुक्त एक आहे….\nजे पाहीले न तू ही शब्दात मांडतो मी,\nहळव्या मनास माझ्या ऐसेच सांगतो मी….\nकित्येक शब्द माझे केव्हाच रिक्त झाले,\nअर्थास अर्थ आता नुरला न काही नाही….\nअर्थास शब्द आता नुरलेच काही नाही,\nका शोधू मी उगाच शब्दास अर्थ नाही….\nगेली निघून वेळ शब्दात सांगण्याची,\nसमजून का न घेशी माझी ही प्रीत ऐसी….\nहिंदोळ भावनांचे आहेत मुक्त अजुनी,\nते सांगतो प्रिये मी आहेच वेळ अजुनी..\nइतकेच सांगतो मी मी ही तसाच आहे,\nतू पाहिला मला जो तैसाच अजून आहे….\nदिसते तसेच नसते परी सत्य ते निराळे,\nमननेत्र पाहती जे असतेच ते निराळे….\nह्या भावना उमलल्या सुमने फुलूनी आली,\nहृदयात साठले जे नयनात तेच पाणी….\nरोखू नकोस आता ते बंध भावनांचे,\nहलकेच ते फुलू दे ते बंध रेशमाचे…\nकळले तुलाच सारे शब्दा विनाच आता,\nका मी उगाच पाहू शब्दास बांधण्याला….\nकळले तुझ्या मनाला सारे मनातले हे,\nस्वररंग पाहिले मी नयनात रंगलेले….\nनुरले न शब्द आता काहीच सांगण्याला,\nना राहिले आता तर काहीच चांगण्याला….\nहोते किती तराणे छंदात गायलेले,\nरंगात ही स्वरांचे सारे तुझे बहाणे….\nछंदात थिरकणारे सारेच शब्द होते,\nतालात नर्तनाच्या हसणे तुझेच होते….\nभावात रंगलेले किती मुक्त शब्द गावे,\nआळवून त्या स्वराना स्वप्नातही असावे….\nफिरूनी पहाट व्हावी उषासवे द्वयांची,\nआभास तारकांचे आपुल्या मनास व्हावे….\nउत्फुल्ल चांदण्यांचे स्वर्गीय नृत्य व्हावे,\nहसण्या प्रपात बघण्या जवळीच तू रहावे….\nवृक्षास बिलगणाऱ्य वेलीस किरणांची,\nअसतेच साथ जैसी तैसी तुझी रहावी….\nहसती नभात त्याही त्या चांदण्या जलात,\nउधळून सुमनांची जणू चालली वरात….\nशिर्षस्थ पर्वतांच्या फुलल्या अपूर्व बागा,\nसरीतेत वाहणाऱ्या दिसती अपूर्व साऱ्या….\nनभमंडपी फुलोरे दिव्यत्व दैवतांचे,\nअंतस्थ आपल्या ते आनंदसूक्त त्यांचे….\nपूर्वे रवी उमलता नभ व्यापले मनाचे,\nमनरंग रक्तिमेचे स्वर्गीय कांचनाचे….\nकैलासही प्रगटले आता इथे मनात,\nसस्मित ते हरीचे सान्निध्य अंतरात….\nशैवास भेटण्याला आतूर शक्ति झाली\nतैसी मनात शिरूनी हृदयस्थ तूच झाली….\n| मुकुंद भालेराव | १४-०३-२०२१ | /p>\nगरम गरम भजी, वाफाळलेला चहा आणि बरेच काही…………\nएक असावे नयनरम्य घर…..\nजंबुद्वीप मित्र असा अस्त पावला\nडोळ्यामध्ये स्मित तुझ्या अन\n|| दे सदबुद्धी त्यांना | सर्वदा ||\nकोसळेल जेंव्हा | वज्र देवेंद्राचे |\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-political-news-chandrashekhar-bawankule-elected-as-bjp-state-president-ashish-shelar-mumbai-bjp-unit-chief/articleshow/93520438.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2022-10-07T22:08:51Z", "digest": "sha1:RZCDAIPSMDQGXFW4L7JAOIBGO4IRWNXM", "length": 13323, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nभाजपात खांदेपालट, बावनकुळेंना भाजप प्रदेशाध्यक्षपद, तर मुंबई अध्यक्षपदी आक्रमक नेता\nBJP State President : बहुप्रतीक्षित विस्तारात चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागली नाही. परंतु भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ गळ्यात घालत बावनकुळेंचा सन्मान केला जात आहे.\nचंद्रशेखर बावनकुळे नवे भाजप प्रदेशाध्यक्ष\nचंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष\nचंद्रकांत पाटील यांच्या जागी नियुक्ती\nमुंबईची धुरा आशिष शेलारांकडे\nमुंबई : चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे पक्षात खांदेपालट करण्यात आले आहे. तर आशिष शेलार (Aashish Shelar) यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपने आक्रमक चेहऱ्याला बळ दिले आहे. विद्यमान भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचीही मंत्रिपदावर नियुक्ती झाल्याने शेलारांना अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे.\nकोण आहेत चंद्रशेखर बावनकुळे\nचंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा मंत्रिपदाची धुरा होती. डिसेंबर २०१४ मध्ये नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी नागपुरातील कामठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २००४, २००९, २०१४ असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते.\nहेही वाचा : सोलापुरात MIM ला खिंडार; सात माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nभ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपने २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले नाही, ते त्यांच्या पत्नी ज्योती यांना देण्यात आले, त्यांनी कामठी येथून निवडणुकीचा फॉर्म भरला, परंतु शेवटच्या क्षणी, फॉर्म भरल्यानंतर, ज्योती यांना भाजपने एबी फॉर्म नाकारला होता. त्यामुळे बावनकुळेंना पाठिंबा देणारा तेली समाज मोठ्या प्रमाणावर नाराज झाला होता.\nहेही वाचा : BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली; शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची सेनाभवनात बैठक\nत्यानंतर नागपूर विधानपरिषद निवडणुकीत बावनकुळेंना स्थान देण्यात आलं. बावनकुळेंनी महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेवारांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला होता. तूर्तास विधानपरिषदेवरील नेत्यांना भाजपने मंत्रिमंडळातून लांब ठेवले आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित विस्तारात त्यांची वर्णी लागली नाही. परंतु भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ गळ्यात घालत बावनकुळेंचा सन्मान केला जात आहे.\nहेही वाचा : मराठा नसून देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणासाठी एवढं केलं, पण तुम्ही काय केलंत; उदयनराजेंचा सवाल\nमहत्वाचे लेखBMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली; शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची सेनाभवनात बैठक\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसोलापूर Breaking : भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआयची जीवे मारण्याची धमकी; क्राईम ब्रँचकडे तपास\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nमुंबई आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन\nमुंबई ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा ते दिघेंच्या मृत्यूचं ठाकरे कनेक्शन, मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज\nक्रिकेट न्यूज उभारायला गेले MS Dhoni चा मेणाचा पुतळा, पण धोनीची झाली अनहोनी, पाहा भन्नाट memes\nपुणे ब्रेकअपच्या रागातून गर्लफ्रेंडच्या घरात २७ तोळे सोन्याची चोरी, पुण्यातील घटनेनं खळबळ\nपुणे सरकार बदललं अन् रश्मी शुक्लांना क्लीनचिट मिळाली, मविआ नेत्यांना जी भीती होती तेच घडलं\nदेश वंदे भारत एक्स्प्रेस दुसऱ्यांदा दुर्घटनाग्रस्त, सलग दुसऱ्या दिवशी वेगवान ट्रेनचा खोळंबा\nमुंबई ठाकरेंबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर विनायक राऊतांकडून राणेंची कोंडी करण्याचा प्रयत्न\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A9", "date_download": "2022-10-07T22:18:12Z", "digest": "sha1:PWUNEYEWZ73TV6BXELPV3ZVEXW45A6D6", "length": 10196, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३३ - विकिपीडिया", "raw_content": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३३\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३३\nतारीख २४ जून – १५ ऑगस्ट १९३३\nसंघनायक डग्लस जार्डिन (१ली,२री कसोटी)\nबॉब वायट (३री कसोटी) जॅकी ग्रांट\nनिकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३३ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली.\nमॅनी मार्टिनडेल ४/८५ (२४ षटके)\nवॉल्टर रॉबिन्स ६/३२ (११.५ षटके)\nहेडली व्हेरिटी ४/४५ (१८.१ षटके)\nइंग्लंड १ डाव आणि २७ धावांनी विजयी.\nसिरिल वॉल्टर्स (इं), सिरिल मेरी आणि मॅनी मार्टिनडेल (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.\nनॉबी क्लार्क ४/९९ (४० षटके)\nमॅनी मार्टिनडेल ५/७३ (२३.४ षटके)\nजेम्स लँगरिज ७/५६ (१७ षटके)\nनाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.\nजेम्स लँगरिज (इं), आर्ची वाईल्स आणि व्हिन्सेंट व्हॅलेन्टाईन (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.\nमॅनी मार्टिनडेल ५/९३ (२४.५ षटके)\nचार्ल्स मॅरियट ५/३७ (११.५ षटके)\nचार्ल्स मॅरियट ६/५९ (२९.२ षटके)\nइंग्लंड १ डाव आणि १७ धावांनी विजयी.\nचार्ली बार्नेट, चार्ल्स मॅरियट (इं) आणि बेन सिली (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे\n१८८० · १८८२ · १८८४ · १८८६ · १८८८ · १८९० · १८९३ · १८९६ · १८९९ · १९०२ · १९०५ · १९०९ · १९१२ · १९२१ · १९२६ · १९३० · १९३४ · १९३८ · १९४८ · १९५३ · १९५६ · १९६१ · १९६४ · १९६८ · १९७२ · १९७५ · १९७७ · १९८० · १९८१ · १९८५ · १९८९ · १९९३ ·\n१९३२ · १९३६ · १९४६ · १९५२ · १९५९ · १९६७ · १९७१ · १९७४ · १९७९ · १९८२ · १९८६ · १९९० ·\n१९३१ · १९३७ · १९४९ · १९५८ · १९६५ · १९६९ · १९७३ · १९७८ · १९८३ · १९८६ · १९९० ·\n१९५४ · १९६२ · १९६७ · १९७१ · १९७४ · १९७८ · १९८२ · १९८७ · १९९२ ·\n१९०७ · १९२४ · १९२९ · १९३५ · १९४७ · १९५१ · १९५५ · १९६० · १९६५ ·\n१९८४ · १९८८ · १९९१ ·\n१९२८ · १९३३ · १९३९ · १९५० · १९५७ · १९६३ · १९६६ · १९६९ · १९७३ · १९७६ · १९८० · १९८४ · १९८८ · १९९१ ·\n१९१२ · १९७५ · १९७९ · १९८० · १९८३\n१९७९ · १९८२ · १९८६ ·\nइ.स. १९३३ मधील क्रिकेट\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०२० रोजी १५:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00032051-CSC09A012K20GPA.html", "date_download": "2022-10-07T22:47:28Z", "digest": "sha1:NEHAU5AQCL6GKUD4A3VP7O3XJYCGMAKZ", "length": 14484, "nlines": 300, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "CSC09A012K20GPA | Vishay / Dale | अॅरे/नेटवर्क प्रतिरोधक | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर CSC09A012K20GPA Vishay / Dale खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये CSC09A012K20GPA चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. CSC09A012K20GPA साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/2913", "date_download": "2022-10-07T23:07:24Z", "digest": "sha1:BSS2EBHPTGCN3VWX5NO7LGG36342WZLF", "length": 10695, "nlines": 107, "source_domain": "bollyreport.org", "title": "टॉपलेस झाली प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, बाथरूम मधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News टॉपलेस झाली प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, बाथरूम मधील हॉट फोटो सोशल मीडियावर...\nटॉपलेस झाली प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, बाथरूम मधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nबॉलिवुड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस तिच्या चित्रपटांसोबत तिच्या सौंदर्यासाठीसुद्धा चर्चत असते. तिने तिच्या करियरमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. जॅकलिन तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या बोल्ड अंदाजासाठी सुद्धा ओळखली जाते. ती सोशल मीडियावर सुद्धा फार अॅक्टीव्ह असते व स्वताचे सुंदर आणि हॉट फोटो शेअर करत असते. काही दिवसांपुर्वीच जॅकलिनने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशा धुमाकुळ घातला आहे.\nजॅकलिनचे हे नवे फोटो बाथरुममध्ये क्लिक केलेले आहेत. शिवाय तिने या फोटोसोबत वाईट नजर ठेवणाऱ्या सोसायटीवर निशाणा साधणारे कॅप्शन सुद्धा दिले आहे. तिने लिहिले आहे कि तुम…….तुम गंदे नही….सोसायटी आहे. यासोबतच तिने #liveyourlifenow हा हॅशटॅगसुद्धा दिला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर अवघ्या काही तासांत व्हायरल झाला.\nफोटो व्हायरल होतोच तिच्या चाहत्यांनी फोटोंवर लाइक्स आणि कमेंटस् चा पाऊस पाडला आहे. तिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारच्या पोज देताना दिसते. काही दिवसांपुर्वी जॅकलिनने तिच्या अकाउंटवर टॉपलेस फोटो शेअर केले होते. त्या फोटोंमध्ये जॅकलीन विना कपड्यांची एका ऑरेंज रंगाच्या टॉवेलमध्ये पोज देताना दिसत आहे.\nजॅकलिनच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच अक्षय कुमार सोबत बच्चन पांडे या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि जॅकलिन व्यतिरिक्त कृति सेनन, पंकज त्रिपाठी आणि अरशद वारसी सुद्धा महत्वाच्या भुमिकेत दिसणार आहेत. याशिवाय ती रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस या चित्रपटात रणवीर सिंह सोबत दिसणार आहे.\nया दोन चित्रपटांसोबत जॅकलिन रामसेतु या चित्रपटात अक्षय कुमार आणि अभिनेत्री नुसरत भरुचा सोबत दिसणार आहे. तर त्यानंतर हॉरर कॉमेडी भुत पोलिस मध्ये सुद्धा जॅकलिन वेगळ्या रुपात अभिनेता अर्जुन कपुर आणि सैफ अलि खान सोबत दिसेल.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleपॉ*र्न व्हिडीओ मधून राज कुंद्रा एका मिनिटाला कमवत होते तब्बल एवढे रुपये, जाणून थक्क व्हाल \nNext article‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/byline/news18-lokmat-trending-133/page-3/", "date_download": "2022-10-07T23:02:41Z", "digest": "sha1:SFOKBEJS2VRNHH7DTUQ2AROZOLXSPCHL", "length": 16249, "nlines": 175, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat Trending : Exclusive News Stories by News18 Lokmat Trending Current Affairs, Events at News18 Lokmat", "raw_content": "\nMoney Mantra - ही रास असेल तर गुंतवणूक करताना सावधान\nचांगली संधी मिळणार, नशिबाचीही साथ लाभणार; आज काय घडणार पाहा राशिभविष्य\n'या' कालावधीत संबंध ठेवताय 'ही' महत्त्वाची माहिती नक्की वाचा\nरोमान्समध्ये ब्रेक; शारीरिक संबंध थांबवल्यावर नेमकं काय होतं\n उद्धव ठाकरेंचा जवळचा आणखी एक बडा नेता अडचणीत\nबुलढाण्यात विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, कृषी महाविद्यालयाच्या आडमुठेपणाचा बळी\nनालासोपाऱ्यात खळबळजनक घटना, घरकाम करणाऱ्या महिलेसोबत भयानक प्रकार\nबीडमध्ये टीशर्ट आणि जीन्स वापरण्यावर बंदी, अधिकाऱ्याचा महत्त्वाचा आदेश\nरात्री गुपचूप भेटत होते GF-BF; ग्रामस्थांनी मिळून लव्ह स्टोरीचा केला The End\nInstagram च्या फॉलोअर्सवरुन घडला भयानक प्रकार, तरुणीने दिले चॅलेंज अन् दोघांचा..\nवंदे भारत एक्स्प्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात काल 'नाक' तुटलं अन् आज..\nकाँग्रेसच्या 2 आमदारांचं धावत्या ट्रेनमध्ये महिलेसोबत धक्कादायक कृत्य, दारू पिऊन\nMoney Mantra - ही रास असेल तर गुंतवणूक करताना सावधान\nचांगली संधी मिळणार, नशिबाचीही साथ लाभणार; आज काय घडणार पाहा राशिभविष्य\n'या' कालावधीत संबंध ठेवताय 'ही' महत्त्वाची माहिती नक्की वाचा\nरोमान्समध्ये ब्रेक; शारीरिक संबंध थांबवल्यावर नेमकं काय होतं\nप्रेम, कॉमेडी की थ्रीलर; या विकेंडला तुम्ही कोणतं नाटक पाहणार\n अभिनेत्रीच्या हॉटनेसवर ज्येष्ठ अभिनेतेही फिदा\nतेजस्वी प्रकाशच्या मराठी सिनेमाचं गाणं रिलीज; दणकून नाचली अभिनेत्री\nअमृता पहिल्यांदा ऐतिहासिक भूमिकेत; \"हर हर महादेव\"मधील पहिला लुक आला समोर\nमहामुकाबल्यात हा खेळाडू पुन्हा डोकेदुखी ठरणार 12 मॅचमध्ये ठोकल्या 8 फिफ्टी\nकरोडो फुटबॉल चाहते हळहळले... 'या' खेळाडूची मोठी घोषणा, खेळणार शेवटचा वर्ल्ड कप\nटीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात, BCCI ने शेअर केला हा खास फोटो\nमुंबई इंडियन्सला मिळाला फ्यूचर कायरन पोलार्ड वर्ल्ड कपआधी करतोय जोरदार फटकेबाजी\nलीज-रेंट अ‍ॅग्रीमेंटमधला फरक माहिती आहे का सही करण्यापूर्वी घ्या पुरेशी काळजी\nदीर्घकालीन गुंतवणुकीसाठी VPF बेस्ट पर्याय; 8 टक्क्यांपर्यंत मिळतंय व्याज\nफक्त 10 हजार रुपये गुंतवून लाखोंची कमाई करा; लखपती बनवणाऱ्या 5 बिझनेस आयडीया\nDigital Currency च्या दिशेन RBI ची वाटचाल, तुम्हाला घेता येणार की नाही\nMoney Mantra - ही रास असेल तर गुंतवणूक करताना सावधान\nचांगली संधी मिळणार, नशिबाचीही साथ लाभणार; आज काय घडणार पाहा राशिभविष्य\n'या' कालावधीत संबंध ठेवताय 'ही' महत्त्वाची माहिती नक्की वाचा\nरोमान्समध्ये ब्रेक; शारीरिक संबंध थांबवल्यावर नेमकं काय होतं\nहरपलं देहभान... विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन वारकरी; पहा वारीचे सुंदर PHOTO\nया आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nरात्री गुपचूप भेटत होते GF-BF; ग्रामस्थांनी मिळून लव्ह स्टोरीचा केला The End\nनजर, बुद्धिमत्तेची घ्या चाचणी चित्रातील वृद्धाच्या पत्नीला शोधा 11 सेकंदात\nVIDEO- मोठ्याने पिपाणी वाजवणाऱ्यांची वाजली पुंगी; आता तोंडानेही आवाज निघणार नाही\n वाघासोबत सेल्फी घ्यायला गेले तरुण आणि...; काय झाला शेवट पाहा VIDEO\nतळहातावरील ही दोन उंच स्थाने नशीब बदलून टाकतात, राहतो लक्ष्मीचा आशीर्वाद\nवास्‍तुदोष घालवण्यासाठी अक्षतांचा करा असा उपाय, कायम राहील घरात सुख-शांती\nशेवटचे सूर्यग्रहण या राशीच्या लोकांच्या वाढवणार अडचणी; वेळीच रहा सावध\nशास्त्रानुसार 'या' तिथींना शारीरिक संबंध ठेवणं अशुभ; नात्यावर होतो वाईट परिणाम\nNetflix लॉन्च करणार क्लाउड गेमिंग सर्व्हिस; भरती प्रक्रिया सुरू\nबातम्या Loan Apps ठरतायत मृत्यूचा सापळा कर्ज घेताना ही खबरदारी नक्की घ्या\nबातम्या लॅपटॉप वापरत असाल तर आताच माहिती करून घ्या हे शॉर्टकट्स, काम होईल आणखी सोपं\nबातम्या तुमच्या फोनमध्ये Spyware तर नाही ना असं करा चेक, खूपच सोपी आहे पद्धत\nबातम्या कुत्र्याची मांजराशी अशी करून दिली ओळख, या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ\nबातम्या जीवनात यशस्वी होण्यासाठी करिअरची निवड कशी कराल आयएएस अधिकाऱ्याचं ट्वीट चर्चेत\nबातम्या 200 MP कॅमेरा, मिनिटांमध्येच होणार चार्ज, लवकरच लॉन्च होणार जबरदस्त Smartphone\nबातम्या Business Idea : OLA सोबत घरबसल्या कमावू शकता चांगला पैसा, अशी आहे प्रोसेस\nबातम्या कॉन्टॅक्ट लेन्सद्वारे होणार कॅन्सरचं निदान; शास्त्रज्ञांच्या संशोधनाला यश\nबातम्या डिजिटल गोल्डचा आहे जमाना या अ‍ॅपवर मिळत आहे बंपर कॅशबॅक, आजच खरेदी करा\n प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांसाठी...पुढच्या वर्षी वाढणार एवढा पगार\nबातम्या बीअर प्यायल्याने किडनी स्टोनचा त्रास खरंच कमी होतो\nबातम्या पहिला पगार होताच करा हे काम; 10 वर्षांमध्ये व्हाल करोडपती\nबातम्या नवीन Fridge विकत घेताना लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा होईल पस्तावा\nबातम्या Skoda भारतात लॉन्च करणार तीन नव्या कार, फिचर्स पाहून व्हाल हैराण\nMoney Mantra - ही रास असेल तर गुंतवणूक करताना सावधान\nचांगली संधी मिळणार, नशिबाचीही साथ लाभणार; आज काय घडणार पाहा राशिभविष्य\n'या' कालावधीत संबंध ठेवताय 'ही' महत्त्वाची माहिती नक्की वाचा\nआता पोस्टातही मिळणार अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टसारख्या सुविधा, करता येणार ऑनलाइन खरेदी\n70 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही या 5 मस्त स्कूटर खरेदी करू शकता\nखात्यात चुकून आले 11 हजार कोटी, बँकेत न जाता खेळला असा गेम, पाहूण सगळेच हैराण\nIPL मध्ये आता खेळू शकेल इम्पॅक्ट प्लेअर, नव्या नियमामुळे प्लेअर्सची होणार चांदी\nतुमच्यासाठी क्रेडिट कार्डची निवड कशी कराल तज्ज्ञांचं सल्ला समजून घ्या\nक्रिती सेनन 'बाहुबली' स्टार प्रभासला करतेय डेट 'या' कारणामुळे चर्चेला उधाण\nअमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचं नाव 'प्रतीक्षा' का बिग बीनी सांगितलं कारण\nमदतच नव्हे तर रक्तदान आपल्या आरोग्यासाठीही उत्तम, जाणून घ्या 5 मोठे फायदे\nसरकारच्या या योजनेत गुंतवणूक करा आणि 21000 दरमाह मिळवा, काय आहे योजना\nशाहरुख खानच्या लेकीला भेटली आपलीच कार्बन कॉपी; दुबई व्हेकेशनचे फोटो आले समोर\nमहागड्या तेलांची नाही गरज, भारदस्त दाढी-मिशांसाठी घरच्या-घरी असे बनवा तेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/aapla-bajar/appliances/get-59-of-discount-on-these-best-43-inch-smart-tv-price/articleshow/93591762.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2022-10-07T22:48:09Z", "digest": "sha1:CSZVUCOQOYQQTQC255WW3TSQUPI6KMXH", "length": 13323, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\n४३ इंची Smart TV वर मिळवा ५९% पर्यंतची जबरदस्त सूट\nतुम्हाला 43-इंचाचा स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल, तर येथे सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहेत. Amazon तुम्हाला यावर 59% पर्यंत सूट मिळत आहे.\nजर तुम्ही मोठ्या स्क्रीन साइजचा Smart tv घेण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. या स्मार्ट टीव्हीवर 59% पर्यंतची प्रचंड सूट मिळत आहे. तसेच या स्मार्ट टीवी मध्ये तुम्हाला 43-इंच स्क्रीन मिळत आहे आणि 4K अल्ट्रा HD रिझोल्यूशन देखील मिळत आहे.\nहे Smart TV फ्रेमलेस डिझाइनमध्येही येत आहेत. तुम्ही या टीव्हीला इंटरनेटशी कनेक्ट करून प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स सारखे OTT प्लॅटफॉर्म देखील ऑपरेट करू शकता. या Best Quality Smart TV च्या वैशिष्ट्यांबद्दल आम्ही तुम्हाला आजच्या लेखात सविस्तर माहिती देत आहोत.\nहा एक Smart LED TV आहे जो Android ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. या टीवी ची स्क्रीन साइज 43 इंच आहे. या टीव्हीला युजर्सने ४.५ स्टार रेटिंग दिलेलं आहे. यामध्ये फुल एचडी रिझोल्यूशन दिले जात आहे. 5000 पेक्षा जास्त प्लेस्टोअर एप्लीकेशंसला हा Smart LED TV सपोर्ट करतो. या टीवी मध्ये 1GB RAM आणि 8GB इंटरनल स्टोरेज आहे. GET THIS\nहा Full HD Smart Android TV, 108 सेमी म्हणजेच 43 इंच स्क्रीनसोबत येत आहे. हा टीव्ही फुल एचडी पिक्चर क्वालिटीसह येत आहे. बेझल-लेस डिझाइन वाल्या या Smart TV मध्ये कोणताही प्रोग्राम पाहण्याचा चांगला एक्सिपिरीयंस येईल. ही Smart TV नेटफ्लिक्स, यूट्यूब, प्राईम व्हिडिओ आणि हॉटस्टार सारख्या इतर अनेक अॅप्लिकेशन्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मला सपोर्ट करते. GET THIS\nहा 4K Ultra HD Smart LED Google TV आहे. ज्यामध्ये बेझल-लेस डिझाइन असून तो दिसण्यात अतिशय आकर्षक आहे. यात तीन HDMI पोर्ट आहेत, ज्यामध्ये गेमिंग कन्सोल आणि ब्ल्यूरे प्लेयर्स कनेक्ट केले जाऊ शकतात. हे 20 वॅट्सच्या साउंड आउटपुटसह येत आहे. हा क्रोमकास्ट, मिल सारख्या स्मार्ट फीचर्स सोबतच नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओ ओटीटी प्लॅटफॉर्मला सपोर्ट देखील करतो. GET THIS\nहा 4K अल्ट्रा HD रिझोल्युशन असलेला Smart LED TV आहे. या सोबत 60 हर्ट्ज चा रिफ्रेश रेट मिळत आहे. या टीव्हीमध्ये 2 यूएसबी पोर्ट दिले आहेत. तसेच यात वायर्ड इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी इथरनेट पोर्ट देखील दिलेला आहे. हा Smart TV 1.5 GB रॅम आणि 8 GB इंटरनल स्टोरेजसह सुसज्ज आहे. हा स्मार्ट टीव्ही वाय-फाय कनेक्टिव्हिटीसह देखील येत आहे. यासोबत A+ ग्रेड चा DLED सुद्धा मिळत आहे. GET THIS\nहा एक Smart LED Fire TV आहे ज्याची स्क्रीन साईज 43 इंच आहे. यात 4K व्हिडिओ रिझोल्यूशन मिळत आहे. यात तीन एचडीएमआय आणि एक यूएसबी पोर्ट देखील आहे. उत्तम साउंड क्वालिटी साठी या टीव्हीमध्ये पॉवरफुल डॉल्बी अॅटमॉस स्पीकर्स वापरण्यात आले आहेत. हा स्मार्ट टीव्ही सोबत HDR 10 +HLG देखील मिळत आहे. या टीव्हीमध्ये अल्ट्रा ब्राइट स्क्रीन आणि अॅडव्हान्स पिक्चर प्रोसेसिंग देखील मिळत आहे. GET THIS\nDisclaimer: हा लेख MT च्या लेखकांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही सर्व उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nसिनेन्यूज विजय देवरकोंडा आणि रश्मिका लपत-छपत कुठे निघाले Video पाहून नेटकऱ्यांनी लावायचा तो अंदाज लावलाच\nइलेक्ट्रॉनिक्स 8GB रॅम आणि 10,090 mAh बॅटरी पावर असणाऱ्या या Samsung Tabs खरेदी करा आणि मिळवा ₹18000 इतका जबरदस्त डिस्काउंट\nआर्थिक राशीभविष्य आर्थिक राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२२ : जाणून घ्या उद्याचा दिवस कोणासाठी ठरेल धनप्राप्तीचा\nक्रिकेट न्यूज कमजोर पाकिस्तानने रोखला भारतीय संघाचा विजयरथ, आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला हरवलं\nमटा ओरिजनल मुंढेंच्या धाडसत्राने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, रात्री डॉक्टर नसल्यास थेट घरचा आहेर\nकोल्हापूर एकनाथ शिंदे गर्दी दिसली म्हणून काहीही बोलत सुटले, उद्धव ठाकरेंच्या भाषणालाच प्रतिसाद: अजित पवार\nसातारा माझ्या भावाचं माझ्यावर खूपच प्रेम, मी माझा जितका प्रचार करत नाही, तितका...: उदयनराजे\nमुंबई शकील, छोटा राजनला माझी सुपारी दिली; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.economictimes.com/sambhaav-media-ltd/stocks/companyid-7037.cms", "date_download": "2022-10-07T23:05:49Z", "digest": "sha1:4JKJXF7IETZDBTLJWACEBMKEPV5LMZQR", "length": 3040, "nlines": 48, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न\n52 आठवड्यातील नीच -\n52 आठवड्यातील उंच -\nसंभव मीडिया लि., 1990 मध्ये निगमित केलेली স্মল ক্যাপ कंपनी आहे (Rs 86.00 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात काम करते |\n30-06-2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs 10.43 कोटी ची एकत्रित विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. 14.73 कोटी विक्री पेक्षा खाली -29.15 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. 10.78 कोटी विक्री पेक्षा खाली -3.17 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. -.11 चा करानंतर एकूण नफा नोंदविला आहे.\n30-06-2022 तारखेला कंपनीचे एकूण 19 शेयर शिल्लक आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18014/", "date_download": "2022-10-07T22:13:21Z", "digest": "sha1:OZNMRRDGS4CAS4V26LEWISZNBBOVKHV5", "length": 19822, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "चॅडविक, सर जेम्स – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nचॅडविक, सर जेम्स : (२० ऑक्टोबर १८९१– ) ब्रिटिश भौतिकीविज्ञ. न्यूट्रॉन या महत्त्वाच्या मूलकणाचा शोध लावल्याबद्दल १९३५ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म मॅंचेस्टर येथे झाला. त्यांचे शिक्षण मॅंचेस्टर व केंब्रिज येथील विद्यापीठांत आणि बर्लिनजवळील शार्‌लॉटनबुर्क इन्स्टिट्यूशन येथे झाले. केंब्रिज येथील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत रदरफर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून १९२१ मध्ये चॅडविक यांनी पीएच्‌.डी. पदवी मिळविली. तेथेच १९२३–३५ या काळात ते किरणोत्सर्गासंबंधीच्या (विशिष्ट मूलद्रव्यांमध्ये असणाऱ्या भेदक किरण वा कण बाहेर टाकण्याच्या गुणधर्मासंबंधीच्या) संशोधन विभागाचे संचालक होते. त्यानंतर १९३५–४८ या कालावधीत ते लिव्हरपूल विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी ब्रिटनच्या अणुबाँब योजनेचे संचालन केले व अमेरिकेच्या लॉस ॲलमोस (न्यू मेक्सिको) येथील आणवीय संशोधन प्रयोगशाळेतही काम केले. १९४७-४८ मध्ये ते संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा मंडळावर ब्रिटनचे प्रतिनिधी होते. ते केंब्रिज येथील कीझ अँड गॉनव्हिले कॉलेजाचे १९४८–५८ मध्ये मास्टर होते. त्यानंतर १९५७–६२ या काळात ब्रिटनच्या अणुऊर्जा मंडळाचे सदस्य होते.\nरदरफर्ड व चॅडविक यांनी निरनिराळ्या मूलद्रव्यांवर आल्फा कणांचा (किरणोत्सर्गी मूलद्रव्यांनी बाहेर टाकलेल्या हीलियम अणुकेंद्रांचा) भडिमार करून त्यामुळे होणाऱ्या मूलद्रव्यांतरणाचा (एका मूलद्रव्याचे दुसऱ्या मूलद्रव्यात रूपांतर होण्याच्या क्रियेचा) अभ्यास केला आणि अणुकेंद्रासंबंधीही संशोधन केले. मॉस्ली यांनी मूलद्रव्यांच्या क्ष-किरण वर्णपटांच्या अभ्यासावरून काढलेले निष्कर्ष चॅडविक यांनी प्रायोगिक रीत्या पडताळून पाहिले. जर्मन शास्त्रज्ञ व्हाल्टर बोटे व फ्रेंच शास्त्रज्ञ दांपत्य झॉल्यो-क्यूरी यांनी बेरिलियमावर आल्फा कणांचा भडिमार करून त्यासंबंधी संशोधन केले. या भडिमारामुळे एक अज्ञात प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) निर्माण होऊन त्यामुळे बेरिलियम अणुतून प्रोटॉन उत्सर्जित झाला. या आविष्काराचा चॅडविक यांनी असा अर्थ लावला की, हा आविष्कार प्रोटॉनाइतक्याच पण विद्युत्‌ भार नसलेल्या कणामुळे (न्यूट्रॉनामुळे) घडून आलेला असावा. या कणाचे १९२० मध्येच रदरफर्ड यांनी भाकित केले होते व त्याचे अस्तित्व चॅडविक यांनी अशाप्रकारे सिद्ध केले. हा शोध अणूचे विघटन करण्याच्या प्रयोगात फार महत्त्वाचा ठरला.\nचॅडविक यांची १९२७ मध्ये रॉयल सोसायटीच्या सदस्यत्वावर निवड झाली व सोसायटीतर्फे १९३२ मध्ये ह्यूझ पदक व १९५० मध्ये कॉप्ली पदक हे सन्मान त्यांना देण्यात आले. १९४५ मध्ये त्यांना नाईट हा किताब मिळाला. त्यांनी किरणोत्सर्ग व संबंधित विषयांवर अनेक संशोधनात्मक निबंध लिहिलेले असून रेडिओॲक्टिव्हिटी अँड रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस (१९२१) व रेडिएशन फ्रॉम रेडिओक्टिव्ह सबस्टन्सेस (रदरफर्ड व एलिस यांच्या समवेत, १९३०) हे त्यांचे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. याशिवाय रदरफर्ड यांचे संशोधन कार्य कलेक्टेड पेपर्स ऑफ लॉर्ड रदरफर्ड ऑफ नेल्सन (३ खंड, १९६२–६५) या शीर्षकाखाली चॅडविक यांनी संपादित केले आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postचर्च, आर्थर हॅरी\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2021/04/blog-post_5.html", "date_download": "2022-10-07T22:36:55Z", "digest": "sha1:QJE4WPKX52GT7DYKKJY4D6XT4SEBMD5D", "length": 34788, "nlines": 225, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "लोकशाही तत्त्वनिष्ठेचे दंभ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nगत सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय तपास संस्थेला महाराष्ट्राचे माजी ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी खंडणी वसूल करण्याचे आदेश दिल्याच्या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर नैतीकतेचा मुद्दा उपस्थित करून अनिल देशमुखांनी शरद पवारांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षाने वेगवेगळ्या पत्रकार परीषदा घेऊन न्यायालयीन निकालानंतर नैतीकता अचानक कशी आली अशा आशयाचे वेगवेगळे आरोप करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.\nराजकारणात हे नेहमीच होते. नव्हे तसे प्रघात पडलेले आहेत. या प्रकरणात दररोज नवनव्या बातम्या पुरवण्याचे काम विरोधी पक्ष सातत्याने करीत आला आहे.मुळात या प्रकरणाकडे अधिक डोळसपणे पहाण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.त्यासाठी हे नेमके प्रकरण काय आहे हे पहिल्यांदा समजावून घेतले पाहिजे. उद्योगपती अंबानी यांच्या घराच्या बाहेर एका बेवारस अवस्थेत सापडलेल्या मोटारीत काही स्फोटके ठेवून धमकीचे पत्र ठेवल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे पत्र अगदी दर्शनी भागात गाडीच्या समोरील सिटवर ठेवले होते.यात कोणत्यातरी दहशतवादी संघटनेचा हात असेल अशी शंका होती. मात्र कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी घेतलेली नाही.त्यामुळे या प्रकरणाचा तपास राज्य सरकारकडून सुरू झाल्यानंतर सचीन वाझे या पोलीस अधिकाऱ्याकडे याचा तपास देण्यात आला.तपास सुरू झाल्यानंतर एक एक खुलासे होत होते. ही बेवारस अवस्थेतील गाडी ठाण्यातील मनसुख हिरेन यांची होती. पुढे हिरेन बेपत्ता होऊन चार दिवस उलटल्यानंतर त्यांचा संशयास्पद रीत्या ठाण्याच्या खाडीत म्रतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.हा तपास राज्य सरकारकडून सुरू असतानाच यात केंद्रीय तपास संस्थेने हस्तक्षेप केला. मुळातूनच हा हस्तक्षेप करण्याची गरज केंद्रीय तपास संस्थेला का वाटली हा यातला खरा प्रश्न आहे.\nया अगोदरही असा प्रयत्न सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात केंद्रीय तपास संस्थाकरवी भाजपाने केला.सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी काय दिवे या तपास यंत्रणांनी लावले हे कळायला मार्ग नाही. पुढे बिहार विधानसभा निवडणूकीत याचा खूबीने राजकीय उपयोग करून घेतल्यानंतर हे प्रकरण विजनवासात गेले. याअगोदरही नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपासही याच संस्थेकडे देेेऊन गेली सात वर्ष झाली असून त्यातही एकाही आरोपीला पकडण्यात या यंत्रणेला यश आलेले आहे. आजपर्यंत एकाही प्रकरणात निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ तपास केल्याचा या संस्थेचा इतिहास नाही.केवळ राजकीय दबावाखाली कार्यवाही केल्याचा आव आणीत या संस्थेचा वापर विरोधी पक्षाला नमवण्यासाठी झाला आहे आणि होत आहे. हे वारंवार देशाने पाहिलेले आहे. मुळातच केंद्रीय तपास संस्थाची जनमानसात कितपत विश्वासार्हता टिकून आहे हा खरेतर संशोधनाचा मुद्दा आहे.\nमोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक स्वायत्त संस्थाची विश्वासार्हता संपल्यात जमा आहे हे वेगळे सांगायला नको. हे कमीअधिक प्रमाणात काँग्रेस कार्यकाळात होत होते म्हणून एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय ही संस्था सरकारी पिंजऱ्यातील पोपट असल्याचे निरीक्षण नोंदवले होते.सीबीआयच्या कामकाजावर न्यायालयाने अनेकदा ताशेरे ओढलेले आहेत. असे असतानाही उच्च न्यायालयाला हे संवेदनशील प्रकरण सीबीआयकडे का सोपवावे वाटले हे समजलेले नाही. मोदी सरकारच्या येण्यामुळे सीबीआयची विश्वासार्हता वाढलेली आहे असा समज न्यायालयाने करून घेतल्यास त्यात काही नवल नाही.तेव्हा सीबीआय जोपर्यत हे प्रकरण राजकीयदृष्ट्या तापवले जाईल तोपर्यंत नवनवीन खुलासे करण्यापलीकडे काहीही करेल अशी तुर्तास शक्यता नाही. हे प्रकरण सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असल्याने यातील सत्य लोकांसमोर येणे महाविकास आघाडी सरकारच्या द्रुष्टीने महत्वाचे आहे.\nज्या आक्रमकपणे फडणवीस सरकार आरोपांची राळ उठवीत आहे ते पहाता आपल्याकडे बहुमत असतानाही विरोधी बाकावर का बसावे लागले याचाही विचार यानिमीत्ताने केल्यास फडणवीसांचे राजकारण अधिक सुलभ होईल. आपल्या कार्यकाळात भीमा कोरेगावसारख्या जातीय दंगली करणाऱ्या धर्माध आरोपींना कुठलीही चौकशी न करता सभागृहात क्लिनचिट द्यायची, महाभरतीसाख्या नोकरभरतीत उघड घोटाळे होऊनही त्याबद्दल मिस्टर क्लिन प्रतिमा जपण्यासाठी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे, शेतकरी मंत्रालयात येऊन विष प्राशन करून आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीला भेट नाकारत उलट तिलाच जळगाव जिल्ह्याच्या दोऱ्यावर असताना नजरकैदेत ठेवायचे, आणि नैतीकतेचा आव आणीत आज ज्या राष्ट्रवादी पक्षावर भष्टाचारी पक्ष असल्याचा आरोप फडणवीस महोदय करीत आहेत त्याच पक्ष नेत्यांसोबत सगळी नैतीकता खुंटीला टांगून पहाटेचा शपथविधी करताना ही नैतीकता कुठे गेली होती हेही महाराष्ट्राला सांगावे.भाजपा सोडून इतर पक्ष नेते देशद्रोही, भष्टाचारी हे पुरेपूर ठसवण्याचा आटापिटा भाजपाने चालविलेला आहे.\nएकवेळ जे सुरेंद्र अधिकारी भष्टाचारी म्हणून भाजपा प्रचाराची राळ उठवित होती त्यांनाच पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यानंतर ते एकदम कसे पवित्र झाले ही नैतिकता कोणती याचाही विचार भाजपाने केला पाहिजे.जो पक्ष एवढी सत्यनिष्ठा जपतो त्या पक्षाच्या आसाममधल्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडलेल्या आहेत ही कोणती नैतीकता आणि देशप्रेमी निष्ठा आहेत याचेही सीबीआयतर्फ एकदा सत्य जनतेसमोर मांडावे. एकूणच काय तर महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे सरकार सत्तेवर आले हे भाजपाला रूचलेले नाही. मुख्यमंत्री पदावर बसण्याची फडणवीसांची मनीषा अजूनहि त्यांच्या मनातून गेलेली नाही.त्यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले आहेत.त्यामुळे महाराष्ट्रातील आघाडी सरकारला कसे बदनाम करून पायउतार करता येईल हाच एककलमी कार्यक्रम भाजपा आणि त्यांनी पुरस्कूत केलेली माध्यमे चालवीत आहेत.थोडेही कोण्या एका मंत्र्यांनी एक विधान केले की लागलीच त्याचा किस पाडून भाडोत्री राजकीय विश्लैषकांकरवी हे सरकार कसे खिळखिळे झाले आहे याचा बनाम करून सनसनाटी बातम्या दिल्या जात आहेत.\nखरेतर माध्यमे म्हणजे भाजपाचे भाडोत्री प्रवक्ते अशी अवस्था झाल्याने माध्यमांची विश्वासार्हता लोप पावली आहे.अशातच राज्य प्रशासनातील काही अधिकारीवर्ग आतून फडणवीसांना मदत करीत आहे.मनसुख हिरेन प्रकरणात ज्या तडफेने फडणवीसांनी निष्णांत कायदेपंडीताची भूमीका वठवीत सीडीआर सारखे पुरावे सभाग्रहात सादर केले जे खुद्द ग्रहमंत्री अनिल देशमुखांकडेही नव्हते हे सर्व पहाता इतके संवेदनशील पुरावे फडणवीसांच्या हाती कसे लागले हा कळीचा प्रश्न आहे. यामुळेच यात परमवीर सिंगासारख्या अधिकाऱ्यांवर याचा संशय बळावल्याने त्यांची तडकाफडकी बदली केल्यानंतरच त्यांनी हे.खंडणीचे प्रकरण पुढे आणले. राजकीय पाठींबा असल्याशिवाय परमवीरसिंग असे गंभीर आरोप करूच शकत नाहीत. आपण काय करीत आहोत आणि त्याचे काय परीणाम होऊ शकतात हे परमवीरसिंग पुरते जाणून आहेत असे असताना त्यांनी ही बाब मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना का जाहीर केली नाही. त्यांनी ही बाब शरद पवारांना सांगीतल्याचे खुलासे करताना आपण जबाबदार पदावर आहोत त्यामुळे या प्रकरणी पुरावे घेऊन पोलीस कार्यवाही त्यांना का करावी वाटली नाही.कदाचित त्यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवीले गेले नसते तर कदाचित त्यांनी ही बाब उघडही केली नसती. त्यामुळे या प्रकरणात नुसत्या अनिल देशमुखांचा राजीनामा घेऊन उपयोगी नाही तर परमवीर सिंगाचीही बडतर्फी करून स्वतंत्र चौकशी करणे महत्वाचे आहे. इतकी खंडणी हे कोणाच्या सांगण्यावरून उकळीत होते असा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षाने परमवीर सिंग कोणाच्या राजकीय आशिर्वादाने हे खुलासे करीत आहेत हेही स्पष्ट केल्यास त्यांची नैतीकता सिद्ध होईल.\nमुळात अनिल देशमुखांनाच का लक्ष्य करण्यात आले याच्याही खोलात जाणे यानिमीत्ताने महत्वाचे आहे. अनिल देशमुख यांनी फडणवीस कार्यकाळातील अनेक भाजपाला अडचणीत आणू शकतील असे प्रकरणे बाहेर काढायला सुरूवात केली होती.भिमा कोरेगाव प्रकरण हे त्याचे उत्तम उदाहरण होय.फडणवीस कार्यकाळात ह्या प्रकरणीचा तपास पुणे पोलीस करीत होती ठाकरे सरकार ह्या प्रकरणी लक्ष देण्यास सुरूवात केल्यांनतर हे प्रकरण केंद्रीय तपास संस्थेकडे देण्यात आले.त्यांंनंतर रिपब्लिकन टिव्हीचा संपादक अर्णव गोस्वामीचा टीआरपी घोटाळा उघड करण्यात देशमुखांचा मोठा वाटा होता.गोस्वामीवर केलेली कार्यवाही आणि मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण, वास्तुविशारद अन्वय नाईक प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने दाखवलेली चौकशीची तत्परता यामुळे काहीहीकरून देशमुखांना पायउतार करण्यासाठी फडणवीस आक्रमक झाले.त्याची हा राजीनामा परीणीती आहे.फडणवीस एवढे न्यायप्रिय असते तर अन्वय नाईक प्रकरण दडपले गेले नसते आणि सेवानिवृत्तीनंतर सत्यपाल सिंगाना भाजपाची खासदारकी मिळाली नसती.सत्यपाल सिंग असो की परमवीर सिंग हे सत्तेपुढे ,राजकीय दबावापुढे आपली कार्यनिष्ठा गमावून बसले त्यामुळे अनिल देशमुखांसारख्या नेत्यांचा राजकीय बळी गेला हे उघड सत्य आहे.\nसीबीआय चौकशीतले सत्य एथावकाश समोर येईलच परंतू तुर्तास अनिल देशमुखांची अवस्था खडसेंसारखी झाली आहे. आणि त्याचे कर्तुत्व फडणवीसांकडेच जाते.त्यामुळे फडणवीसांच्या बाणेदारपणाला सलामच केला पाहिजे. तो करतानाच हे लेखन वाचणाऱ्या काहींना मी महाविकास आघाडीचा हितचिंतक असल्याची शंका येऊ शकते तशी ती येणे स्वाभाविक आहे.कारण सध्याला सगळे जण कोणत्यातरी एका गटात टोळीने विभागले जात असतानाच्या काळात अशी शंका मनात येणे स्वाभाविक आहे. परंतू ते तसे नसून भाजपाचे राजकारण आणि निष्ठा कशा नैतीकतेच्या नावाखाली उखड होणारे दंभ आणि ढोंग आहे हे पटवून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.\nलोकशाहीत राजकीय सत्ता प्राप्त करणे हे एक ध्येय असून ते निवडणूकीच्या माध्यमातून साध्य होत असले तरी त्या निवडणुका ज्या खालच्या स्तरावर जाऊन लढवल्या जात आहेत आणि अगदी प्राणघातक हल्ले करून सत्ता प्राप्त केली जात आहे ते पाहता आपण सत्ताधारी पक्ष किती व्यापक लोकहिताला प्राधान्य देत आहोत हे उघड होत आहे.सध्याला भारतीय राजकारणात आणि पक्षसंस्कूतीत जी अत्यंतीक हिंसा आणि टोकाचा द्वैष पहायला मिळतो आहे त्यावरून आपण लोकशाहीचा आत्माच गमवला आहे की काय अशी शंका घ्यायला जागा आहे.\n(लेखक सामाजीक राजकीय प्रश्नांचे अभ्यासक व विश्लेषक आहेत)\n०७ मे ते १३ मे २०२१\nअमेरिकेचा अफगाणिस्तानला ‘खुदा हाफीज\nआजची परिस्थती अन जकात व्यवस्थेची गरज\nसंयुक्त समाजात राहण्याचे इस्लामी शिष्टाचार\nकोव्हीड लस : विज्ञान आणि राजकारण\nसूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nअल्लाहची उपासना आणि सर्वोत्तम मुस्लिम\n३० एप्रिल ते ०६ मे २०२१\nसंवाद हरला तरी चालेल पण मनं जिंकायला हवीत\nआज्ञाधारकतेसाठी ज्ञानाची व विश्वासाची गरज\nधर्मपरिवर्तन आणि दलित-मुस्लिम एकतेचे सूत्र\nगुजरात राज्यात महिलांची अवस्था\nरमजानचे रोजे आणि सामाजिक योगदान\nसूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nयुगांडाच्या राष्ट्राध्यक्षांचे जनतेला उद्देशून भाषण\n२३ एप्रिल ते २९ एप्रिल २०२१\nरमजान मनं, शरीर शुद्धीचाही महिना\n१६ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१\nपुन्हा संधी रमजान पाहण्याची...\nमुस्लिम समाजाला सामाजिक अभियांत्रिकीची गरज\nमौलाना वली रहेमानी यांचे निधन\nमुस्लिमांची ज्ञानविज्ञानाच्या जगतातही मक्तेदारी\nसूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nकोरोनाचा उद्रेक : लॉकडाऊन\nकायद्याच्या गैरवापरावर अंकुश लावण्याची हीच वेळ आहे\nकोरोना पसरवल्याचा आरोप असलेल्या तबलिगी जमाअतच्या ल...\nकुरआनचे पहिले आणि अंतिम उद्दिष्ट मानवकल्याण आहे\nसूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशात ९० टक्के सरकारी अधिकारी व राजकीय पुढारी भ्रष...\nह्या देशाच्या संपत्तीचा मालक कोण\n०९ एप्रिल ते १५ एप्रिल २०२१\n०२ एप्रिल ते ०८ एप्रिल २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mukundbhalerao.com/blog/2020/12/25/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2022-10-07T23:04:14Z", "digest": "sha1:T2PNTVAYGMFYJBFJVGQYUFL3IHZ356LX", "length": 34812, "nlines": 228, "source_domain": "www.mukundbhalerao.com", "title": "|| श्रीमद्भगवद्गीता : ज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार || – Mukund Bhalerao", "raw_content": "\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\n हवामे, तैरना मुझे आता,\nप्रवीण बुरकुले on जनाचे श्लोक\nS B Joshi on जनाचे श्लोक\nTushar Shardul on अभिराम मुक्त ऐसा, आनंदकंद आहे……..\n|| श्रीमद्भगवद्गीता : ज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार ||\nनारायणं नमस्क्रुत्य नरं चैव नरोत्तमम् | देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदिरयेत ||” (महाभारत आदिम श्लोक)\nगिताजयंती म्हणजे ज्यादिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारत युद्धात मार्गदर्शन केले. तो दिवस म्हणजे भारतीय कालगणनेनुसार मार्गशीर्ष शुक्ल एकादशी. ही घटना कुरुक्षेत्रावर घडली, जे आत्ताच्या हरियाणामध्ये आहे.\n“महाभारतात गीतेचा समावेश झाला तेव्हांइतकीच आजही ती नावीन्यपूर्ण व स्फूर्तिदायक प्रत्यक्ष अनुभवाने ठरते. गीतेच्या शिकवणीचा प्रभाव हा केवळ तात्विक किंवा विद्च् र्चेचा विषय नसून, आचारविचारांच्या क्षेत्रात जिवंत आणि लगेच जाणवणारा आहे. एका राष्ट्राचें आणि संस्कृतीचें पुनरुज्जीवन गीतेची शिकवण प्रत्यक्ष घडवीत आहे. जगांतील श्रेष्ठ शास्त्रग्रंथात तिचा एकमताने समावेश झाला आहे.” योगी अरविन्द घोष\n“माझ्या बालपणीच्या आयुष्यांत मोहाच्या आणि कसोटीच्या प्रसंगी अचूक मार्गदर्शन करणाऱ्या शास्त्र-ग्रंथाची गरज मला भासली. मी कोठें तरी वाचलें होतें कीं, अवघ्या सातशें श्लोकांच्या मर्यादेत गीतेनें साऱ्या शास्त्रांचें व उपनिषदांचे सार ग्रथित केलें आहे. माझ्या मनाचा निश्चय झाला. गीता वाचतां यावी म्हणून मी संस्कृत शिकलों. आज गीता माझें बायबल किंवा कुराण तर काय, परंतु त्यापेक्षांही अधिक, प्रत्यक्ष माताच झाली आहे. माझ्या लौकिक मातेस मी फार पूर्वीच अंतरलो; परंतु तेंव्हापासून या गीतामाऊलीने माझ्या जीवनांत तिची जागा पूर्णपणें भरून काढली. आपत्काली तिचाच मी आश्रय घेतों.” राष्ट्रपिता महात्मा गांधी (बनारस-कानपूरची भाषणें)\nआधुनिक भारताच्या जडणघडणीत ज्यांचे मौलिक योगदान आहे अशी हे दोन महान पुरुष. त्यांच्या ह्या विचारांकडे पाहिले किे, गीतेच्या महतत्तेवाचे दर्शन घडते आणि म्हणूनच गीताजयंतीच्या निमित्तानें श्रीमद्भगवद्गीतेबाबतच्या काही व महत्वपूर्ण गोष्टींचे पुनः एकदा एकदा स्मरण करणें हितावह ठरेल.\nसंत ज्ञानेश्वर माऊलीने अर्जुनाच्या असहाय्यतेचे, वैषम्यतेचे व नैराश्याचे खूपच प्रत्यवाही वर्णन सार्थ ज्ञानेश्वरीत विषादयोगात केले आहे, “येणें नावेंचि नेणों कायी| मज आपणपें सर्वथा नाहीं | मन बुद्धी ठायीं | स्थिर नोहे ||९५|| देखे देह कांपत | तोंड असे कोरडें होत | विकळता उपजत गात्रांसीही ||९६|| सर्वांगा कांटाला आला | अति संतापु उपनला | तेथ बेंबळ हातु गेला | गंडिवाचा ||९७|| तें न धरताचि निश्लेंोर | परि नेणेंचि हातोनि पडिलें | ऐसें हृदय असें व्यापिलें | मोहें येणें ||९८|| जे वज्रापासोनि कठीण | दुर्धर अतिदारूण | तयाहून असाधारण | हें स्नेह नवल ||९९||” (सार्थ ज्ञानेश्वरी: अध्याय:पहिला: अर्जुनविषादयोग) अशी गलीतगात्र अवस्था झाली अर्जुनाची आणि तो हताश होऊंन रथात खाली बसला.\nअवसान गळून पडलेल्या अर्जुनाच्या अंत:करणातील भाव त्याच्या व्याकुलतेची साक्ष देतात. “अवधारी मग तो अर्जुनु | देखोनि सकळ स्वजनु | विसरला अभिमानु | संग्रामींचा ||४|| कैसी नेणों सदयता | उपनली तेथें चित्ता | मग म्हणे कृष्णा आतां | नसिजे एथ ||५|| माझें अतिशय मन व्याकुळ | होतसे वाचा बरळ || जे वधावे हे सकळ | येणें नांवे ||६||” (सार्थ ज्ञानेश्वरी: अध्याय पहिला: अर्जुनविषादयोग)\nअर्जुनाची अशी अवस्थाच झाली नसती तर भगवान् श्रीकृष्णाला श्रीमद्भगवद्गीता सांगण्याची गरजच पडली नसती, पण नियतीचे ठरलेल होते, जसे अहिल्येची मुक्ती श्रीरामाच्या पदस्पर्शाने झाली.\nमहाभारतात येकुण अठरा पर्वे असुन, त्यात २,२०,००० ओळी आहेत. महाभारतात सहावे ‘भीष्मपर्व’ आहे. त्यात एकूण ११७ अध्याय आहेत, भीष्मपर्वात, श्रीमद्भगवद्गीता सांगितलेली आहे. [कंसात अध्यायाची नांवे व श्लोक संख्या नमूद केलेली आहे.] आदिपर्व (अध्याय-२२५,श्लोक-७,१९७), सभापर्व (अध्याय-७२,श्लोक-२,३९०), वनपर्व (अध्याय-२९९,श्लोक-१०,३३८), विराटपर्व (अध्याय-६७,श्लोक-१,८२४), उद्योगपर्व (अध्याय-१९७,श्लोक-६,०६३), भीष्मपर्व (अध्याय-११७,श्लोक-५,४०६), द्रोणपर्व (अध्याय-१७३,श्लोक-८,१९२), कर्णपर्व (अध्याय-६९, श्लोक-३,८७१), शल्यपर्व (अध्याय-६४,श्लोक-३,३१५), सौप्तीकपर्व (अध्याय-१८,श्लोक-७७२), स्त्रीपर्व (अध्याय-२७,श्लोक-७३०), शांतिपर्व (अध्याय-३५३, श्लोक-१२,९०२), अनुशासनपर्व (अध्याय-१५४,श्लोक-६,४३९), अशवमेधिकापर्व (अध्याय-९६,श्लोक-२,७४३), आश्रमवासिकापर्व (अध्याय-४७,श्लोक-,१०६२), मौसलापर्व (अध्याय-९,श्लोक-२७३), महाप्रस्थानिकापर्व (अध्याय-३,श्लोक-१०६), स्वर्गावरोहणपर्व (अध्याय-५,श्लोक-१९४).\nशास्त्रज्ञानी नुकत्याच केलेल्या कार्बन डेटिंगच्या तंत्रज्ञानानुसार केलेल्या संशोधनानुसार, द्वारका साधारणत: ३२,००० वर्षापूर्वी अस्तित्वात होती.\n[https://pparihar.com/2014/01/21/32000-year-old-lost-city-of-dwarika-krishna-indian-hinduism-is-not-mythology/] महाभारत त्याच्या किमान काही वर्षें आधी झाले असावे. अर्थातच, महाभारताचा काळही तितकाच जुना आहे. महाभारत हे जगातील दुसरे सर्वात मोठे महकाव्य आहे. वेद हे ‘श्रुती’ असून, महाभारत हे ‘स्मृति’ ग्रंथात मोडते.\nभारतीय संस्कृतीचा भगवद्गीता हा एक महान ग्रंथ आहे, ज्यात युद्ध व शांतता, मान व अपमान, प्रामाणिकपणा व द्रोह अशा विविध गोष्टींचे दर्शन घडते. इसवीसनाच्या ९व्या शतकापासून भगवदगीतेवर, शंकराचार्य, रामानुज, माधवाचाऱ्य, निंबार्क आणि अभिनवगुप्त यांनी वेगवेगळे टिकात्मक ग्रंथ लिहिलेत. १३ व्या शतकात मराठीमध्ये संत ज्ञानेश्वरानी सार्थ ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली आहे. इंडोनेशियामध्ये जुन्या जावा भाषेत भगवदगीतेचा अनुवाद झालेला आहे. राजाराम मोहनरॉय यांनी गीतेबाबत असे म्हटले आहे की, “गीता सर्व शास्त्राचे सार आहे.”\nश्रीमदभगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर सर्वप्रथम १७८५ मध्ये चार्ल्स विलकिन यांनी केले. [https://en.wikipedia.org/wiki/Charles_Wilkins] या भाषांतरचा परिणाम राल्फ वालडो इमर्सन यांच्यावर झाला व तो त्यांच्या ‘ब्रम्हा’ या कवितेत दिसुन येतो.\n[https://www.poetryfoundation.org/poems/45868/brahma-56d225936127b] अलीकडच्या काळात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे यांनी, १९१९ मध्ये महाभारताच्या संशोधित प्रतीवर काम करण्यास सुरुवात करून ते काम १९६६ मध्ये पूर्ण केले. त्यात श्री. व्हि एस सुखटणकर यांच्या शिवाय, इतर १० संस्कृत पंडितानी काम केले होते. ती प्रत आजही तेथे उपलब्ध असून त्यात एकूण १९ खंड व एकूण १३,००० पृष्ठे आहेत.\nभगवद्गीता आता पर्यन्त, चायनीज, स्पॅनिश, रशियन, अरेबिक, पोर्तुगीज, बंगाली, हिन्दी, मराठी, फ्रेंच, मलाय, जर्मन, स्वाहिली, जपनीज, फारसी, विएतनामीज, इंडोनेशियन, जावाणीज, तमिळ, कोरियन, टर्किश, तेलगू, इटालियन, थाई, कयानटोणीज, कन्नड, गुजराथी, पॉलिश, बरमिज, मोलडोवन, युक्रेनियन, उरिया, डच, तागलोग, योरुबा, आफ्रिकन, नेपाळी, सिंहली, हंगेरीयन, ग्रीक, अजरेबेजाणी, आकान, झेक, बुलगेरीयन, स्विडीश, श्लोवाक, लिथुयानियन, मकडोणीयन, श्लो वेणीयण, लॅटीवहीयन, सऱ्बो क्रोशीयन, आमहरीक, पापीआमेनटू, काटलान, फान्ति, बोसणीयन, एसपरनेतो, तुरकमेणियन, नेवारी, जॉर्जियन, कझाक, भोजपुरी इतक्या भाषेत, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉनशसनेस यांनी त्यांच्या “गीता जशी आहे तशी” या पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध केलेली आहे, व जवळपास अजून किमान ५० भाषामध्ये काम चालू आहे.\nसंजयाने ती जशी आणि जेव्हा प्रत्यक्षात घडत होती, त्याच वेळेस धृतराष्ट्राला सांगितली. संजय हा अंध धृतराष्ट्राचा सचिव होता. संजयाला त्याचे गुरु महर्षि व्यासानी असा आशिर्वाद दिला होता की, त्याला दुरून रणांगणावर सुरू असलेल्या घटना पाहता येतील.\nअनेक प्रयत्न व भगवान् श्रीकृष्णाची शिष्टाई निष्फल ठरल्यानंतर शेवटी महाभारताचे युद्ध अटळ झाले. अर्जुनाबद्दल सहानुभूति व मित्रप्रेम यामुळे भगवान् श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करण्याचे मान्य केले. युद्धाच्या ठरलेल्या दिवशी कौरव व पांडवाच्या सेना एकमेकसमोर येऊन उभ्या ठाकल्या. “सेनयोरूभयोर्ध्ये रथं स्थापय मेsच्युत ||१.२१||” युद्ध सुरू होण्याच्या आधी, अर्जुनाने श्रीकृष्णाला त्याचा रथ युद्ध भूमीच्या एकदम मध्यभागी नेण्यास सांगितले व त्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ मध्यभागी नेऊन उभा केला. त्याठिकाणी, अर्जुनाने, पितामह भीष्म व ज्यांनी त्याला धनुर्विद्येमध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनविले ते गुरु द्रोणाचार्य, यांना समोर कौरवाच्या सेनेमध्ये पाहिल्यानंतर त्याच्या हृदयाची धडधड वाढली, ती भीतीमुळे नाहीतर महान पितृतुल्य महर्षिना युद्धात सामोरे जाण्यामुळे.\n“दृष्टेमं स्वजनं कृष्ण यूयुत्सुं समुपस्थितम् ||१.२८|| सीदन्ती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति | वेपथुशचय शरीरे मे रोमहर्षशच्य जायते ||१.२९|| गांडीवं स्त्रंसते हस्तात्वकैव परिदह्यते| न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मन: || १.३० ||” [अध्याय १ ला] त्याच्या शरीराला कंप सुटला. त्याच्या अंत:कर्णाला अनेक शंकानी ग्रासून टाकले व अर्जुन त्याचे क्षत्रिय कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ झाला. अत्यंत निराश व हताश झालेले अर्जुनाने आपला प्रिय व विश्वासू मित्र श्रीकृष्णास आपली व्यथा सांगितली व मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यावेळी भवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केले मार्गदर्शन व बोध म्हणजेच अतिशय पवित्र भगवदगीता. भगवंताने सर्वात शेवटी भगवद्गीतेतील ज्ञान कुणास सांगावे याच्याकरिता एक अट सांगितलेली आहे.\n“इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन | न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योsभ्यसूयति ||१८.६७||” श्रीमद्भगवद्गीता अगाध व असिम आहे. भगवद्गीता प्रस्थानत्रयी पैकी एक आहे. मानवाच्या कल्याणाचे तिन मार्ग आहेत, “भगवद्गीता”, “उपनिषद”, व “ब्रम्हसूत्र”. उपनिषदामध्ये “मंत्र” आहेत. ब्रम्हसुत्रामध्ये “सूत्रे” आहेत आणि भगवदगीतेमध्ये “श्लोक” आहेत. कोणत्याही देशाचा, समुदायाचा, सांप्रदायाचा, वर्णाचा असला तरीही सर्वांच्या उपयोगाचा असा हा ग्रंथ आहे. भगवदगीतेमध्ये एकूण अठरा अध्याय असून ७१३ श्लोक आहेत. अध्याय, त्याचे नाव व त्यातील श्लोकांची संख्या खालील प्रमाणे आहे.\nपहिला अध्याय:अर्जुन विषाद योग (४७), दुसरा अध्याय:सांख्ययोग (७२), तीसरा अध्याय:कर्मयोग (४३), चौथा अध्याय:ज्ञानकर्मसन्यासयोग (४२), पाचवा अध्याय:कर्मसन्यासयोग (२९), सहावा अध्याय:आत्मसंयमयोग (४७), सातवा अध्याय:ज्ञानविज्ञानयोग (३०), आठवा अध्याय:अक्षरब्रम्हयोग (२८), नऊवा अध्याय:राजविद्याराजगुहययोग(३४),दहावा अध्याय:विभूतियोग (४२), अकरावा अध्याय:विश्वरूपदर्शनयोग (५५),बारावा अध्याय:भक्तियोग (२०), तेरावा अध्याय:क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग (३४), चौदावा अध्याय:गुणत्रयविभागयोग(२७), पंधरावा अध्याय:पुरुषोत्तमयोग (२०), सोळावा अध्याय:दैवासुरसंपद्विभागयोग (२४), सतरावा अध्याय:श्रद्धात्रयविभागयोग (२८),अठरावा अध्याय: मोक्षसंन्यासयोग (७८).\nजगात आज होत असलेली मूल्यांची घसरण ही होणारच होती व आहे, आणि ती तशी भारतात देखिल होणार आहे. तशा प्रकारची भविष्यवाणी फार पूर्वी श्रीमद्भागवतात (१२.२.१) केलेली आहे.\n“ततश्चनुदिनं धर्म: सत्यं शौचं क्षमा द्या | कालेन बलिना राजन् नङ्गक्षत्यायुरबलं स्मृति: ||\nयाचा अर्थ कलियुगात धर्म, सत्य, स्वच्छता, दया, आयुष्यमान, शारीरिक क्षमता, ताकद व स्मृति यांचा ऱ्हास होईल. खरे तर याच गोष्टीमुळे मनुष्य हा प्राण्यांपासून वेगळा आहे आणि ह्या शक्ति मानवाच्या कमी झाल्या तर मग मानवात व प्राण्यांत काय फरक राहिला, परंतु घाबरण्याचे काहीच कारण नाही; कारण भगवान् श्रीकृष्णांनी गीतेच्या ९ व्या अध्यायात सोपा उपाय सांगितलेला आहे.\n“अनन्याश्चिंतयंतोमां ये जना: पर्युपासते | तेशामंनित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ||\n(अध्याय-९, श्लोक-२२). जे अनन्यनिष्ट लोक माझें चिंतन करून मला भजतात, त्या नित्य योगयुक्त पुरुषांचा योगक्षेम मी चालवित असतो. न मिळालेली वस्तु मिळणे याचेंच नांव योग व मिळविलेल्या वस्तूचें संरक्षण करणें म्हणजे क्षेम, अशी योगक्षेम याची व्याख्या शाश्वतकोशातही (१०० व २९२ श्लोक) (गीतारहस्य: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक: पृष्ठ ३८३, आवृत्ती-पंधरावी-१९९०) केलेली असून, त्याचा एकंदर अर्थ ‘संसारातील नित्य निर्वाह’ असा आहे, आणि परमेश्वराची बहूत्वाने जें सेवा करितात त्यांचे पुढे काय होते. “येsप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विता:| तेsपि मामेव कौंतेय यजन्त्यविधिपूर्वकम् ||२३||” श्रद्धेनें युक्त होत्साते दुसऱ्या देवताचे भक्त बनून जे यजन करितात हे कौंतेया तेहि विधिपूर्वक नसलें तरी (पर्यायाने) माझेंच यजन करितात कारण, “अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च| न तु मामभिजानन्ति तत्वेनातश्चवन्ति ते ||२४||” सर्व यज्ञांचा भोक्ता व स्वामी मीच आहे, पण त्यांना माझें तत्वत: ज्ञान नाहीं म्हणून ते घसरत असतात. वास्तविकपणे, “एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यंग्निं यमं मातरिश्वावानमाहू:|” (ऋग्वेद-१६४.४६) परमेश्वर एक असून त्याला पंडित लोक अग्नि, यम, मातरिश्वा (वायु) अशी अनेक प्रकारची नांवे देत असतात असे म्हटले आहे आणि म्हणूनच “आकाशात पतितं तोयम यथा गच्ती१६ सागरमं | सर्व देव नमस्कार:, केशवमं प्रतिगच्ती |” (विष्णुसहस्त्रनाम)\nसारांशरूपाने असे म्हणता येईल कि, दोन श्लोक जर दररोज वाचले तर एक वर्षात संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता वाचून होऊ शकते, जे उपनिषद सार आहे. या पवित्र दिवशी सर्वाना गिताजयंतीच्या सर्व वाचकांना अनेक शुभेच्छा\n|| आशानाम् मनुष्यानामं ||\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअग्निमिळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् | होतारं रत्नधातमम्\nसृष्टीच्या या दिव्य रुपे दिसतसे अव्यक्त ही………..\nतत्वज्ञान – भारतीय तत्वज्ञान व षडदर्शने\nशब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्याकरण\nमनस्वी भटकणाऱ्या मेघाशी अभिन्नहृदय कालिदासाचा अपूर्व काव्यमय मनोहारी संवाद – मेघदूत\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/along-with-weight-control-green-coriander-is/", "date_download": "2022-10-07T22:33:37Z", "digest": "sha1:CWABPFHQGT56KXYMK7GE23ECAWWL3YW4", "length": 6525, "nlines": 47, "source_domain": "mahaupdate.in", "title": "वजन नियंत्रणासोबतच आरोग्यासाठी हिरवी धणे रामबाण उपाय, जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे - Maha Update", "raw_content": "\nHome » वजन नियंत्रणासोबतच आरोग्यासाठी हिरवी धणे रामबाण उपाय, जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे\nवजन नियंत्रणासोबतच आरोग्यासाठी हिरवी धणे रामबाण उपाय, जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे\nआपण पाहतो की आजकाल अनेक वनस्पतींच्या पानांचा उपयोग पौष्टिक आणि स्वादिष्ट अन्न बनवण्यासाठी केला जातो, त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे कोथिंबीरीचा वापर. हे सर्व खाद्यपदार्थ मसालेदार आणि चवदार बनवण्यासाठी वापरले जाते.\nअन्नाला चवदार बनवण्यासोबतच हिरवी धणे अन्नपदार्थांना पौष्टिक बनवण्याचे काम करते कारण त्यात प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सी सारखी आवश्यक जीवनसत्त्वे असतात. हिरवी धणे खाल्ल्याने वजन नियंत्रित राहते आणि अॅनिमिया आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव होतो.\nयामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहण्यास मदत करतात. चला जाणून घेऊया हिरवी धणे खाण्याचे फायदे.\nकोथिंबीरीच्या पानांचा नियमित वापर वेदना, जळजळ, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि डायबिटीजपासून मुक्त होण्यासाठी दीर्घ काळापासून केला जात आहे कारण ते हृदयाशी संबंधित समस्या तसेच रक्तदाब सारख्या आजारांपासून आराम देते.\nहिरव्या कोथिंबीरपासून शरीराला पोषक आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे मिळतात. ज्यामध्ये हाडे मजबूत करण्यासाठी आणि जखमा भरण्यासाठी व्हिटॅमिन के, त्याचप्रमाणे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी शरीरात खूप चांगले असतात.\nशरीराच्या पेशींना होणारे नुकसान वृद्धत्व आणि रोगांचा धोका देखील वाढवते.हिरव्या कोथिंबीरमध्ये अनेक अँटिऑक्सिडेंट असतात, ज्याच्या एका भागाला पॉलीफेलॉन म्हणतात आणि ते शरीराच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात तसेच जळजळ कमी करतात.\nजर तुमच्या शरीराचे वजन वाढले असेल तर कोथिंबीर उकळून रोज प्या. याचा परिणाम दररोज काही दिवसांत दिसून येईल.\nहिरव्या कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन ए पूर्ण प्रमाणात असते, जे दृष्टी वाढवण्यासाठी प्रभावी आहे.\nघरच्या घरी बनवा रेस्टॉरंटसारखा झणझणीत चिला, वजन कमी करण्यासाठी ठरेल वरदान, जाणून घ्या बनवण्याची पद्धत\nव्हिटॅमिन ए ची कमतरता जाणवत आहे मग आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश\nवजन कमी करण्यासाठी दररोज ‘या’ पदार्थांचे आहारात समावेश करा, झपाट्याने पोटाची चरबी कमी होईल; जाणून घ्या सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/akshay-ad-sathi-gheto-evdhe-mandhan/", "date_download": "2022-10-07T21:35:29Z", "digest": "sha1:VQCKOMMB7LYM4HNYZE5CS54DAB4XDIZA", "length": 11442, "nlines": 88, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "अक्षय कुमारला चित्रपट नाही तर जाहिरातींनी केले 'मालामाल', पहा एका जाहिरातीसाठी अक्षय घेतो 'इतके' कोटी रुपये... - Themaharashtrian", "raw_content": "\nअक्षय कुमारला चित्रपट नाही तर जाहिरातींनी केले ‘मालामाल’, पहा एका जाहिरातीसाठी अक्षय घेतो ‘इतके’ कोटी रुपये…\nअक्षय कुमारला चित्रपट नाही तर जाहिरातींनी केले ‘मालामाल’, पहा एका जाहिरातीसाठी अक्षय घेतो ‘इतके’ कोटी रुपये…\nबॉलीवूड मध्ये जेव्हा एखादा चित्रपट हिट होत तेव्हा त्या कलाकाराला अनेक प्रकारच्या ऑफर येऊ लागतात. त्यामध्ये टेलिव्हिजनवर दिसणाऱ्या ऍडचा देखील समावेश असतो. या ॲड करण्यासाठी ऍड कंपनी त्या कलाकाराला अतिशय दांडगे मानधन देत असते.\nपण हे सगळं त्या कलाकाराच्या प्रसिद्धी आणि लोकांमध्ये असणाऱ्या इमेजवर अवलंबून असते. त्यानुसार त्या कलाकाराला मानधन मिळते सध्याच्या घडीला रणवीर सिंग आणि अक्षय कुमार जास्त प्रमाणात टेलिव्हिजनच्या ॲड करताना दिसतात पण तुम्हाला माहित आहे का अक्षय कुमारला एक ॲड करण्यासाठी किती मानधन मिळते\nतेच आपण आज जाणून घेणार आहोत कारण फोबर्सने जाहीर केलेल्या यादीमध्ये अक्षय कुमार चा देखील समावेश करण्यात आला आहे. या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे.\nफोर्ब्स 2020 ची सर्वात जास्त मानधन घेणा-या अभिनेत्यांची यादी समोर आली आहे. या यादीची खास बाब म्हणजे या यादीत जागा मिळवणारा अक्षय कुमार हा एकुलता एक बॉलिवूड अभिनेता आहे. तो 48.5 मिलियन डॉलर म्हणजेच 362 कोटी रूपयांच्या कमाईसोबत या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.\nअक्षय वर्षाला चार-पाच सिनेमे करतो, यातून त्याने ही कमाई केली असेल, असे तुम्हाला वाटत असेल तर ते मात्र चूक आहे. होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण अक्षयच्या कमाईत चित्रपटांपेक्षा तो करत असलेल्या जाहिरातींचा वाटा मोठा आहे.\nसध्या अक्षय कुमार 30 ब्रँडच्या जाहिराती करत आहे. यात कंज्युमर प्रॉडक्टपासून तर लक्झरी उत्पादनांचा समावेश आहे. एका जाहिरातीसाठी अक्षय प्रतिदिन 2 ते 3 कोटी रूपये घेतो. Duff & Phelpsचे मानात तर त्याची ब्रँड व्हॅल्यू 742 कोटींच्या घरात आहे.\nअक्षय कुमार बॉलिवूडचा सगळ्यांत बिझी अभिनेता आहे. 2019 मध्ये त्याचे चार सिनेमे रिलीज झाले होते आणि हे चारही सिनेमे हिट होते. यातील ‘केसरी’ने 153 कोटींची कमाई केली होती. ‘मिशन मंगल’ने 200 कोटींचा गल्ला जमवला होता. तिसरा सिनेमा ‘हाऊसफुल 4’ने 204 कोटी आणि ‘गुड न्यूज’ या पाचव्या सिनेमाने 201 कोटी रूपयांचा बिझनेस केला होता.\nचालू वर्षांतही अक्षयचे चार सिनेमे रिलीज होणार होते. मात्र कोरोना महामारीमुळे चित्रपटगृहे बंद असल्याने ते रिलीज होऊ शकले नाही. यापैकी काही सिनेमे लवकरच ओटीटीवर रिलीज होत आहेत. सध्या त्याचे अनेक सिनेमे पाइपलाईनमध्ये आहेत. तूर्तास अक्षय यूकेमध्ये त्याच्या ‘बेल बॉटम’ सिनेमाचे शूटींग करत आहे. तर त्याचे लक्ष्मी बॉम्ब , सूर्यवंशी , पृथ्वीराज , अतरंगी रे हे सिनेमे रिलीजच्या प्रतिक्षेत आहेत.\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nसुरेश रैनाच पहिलं क्रश होती ‘ही’ मराठीमोळी अभिनेत्री, डेट करण्याची होती इच्छा…\nBig Boss Marathi Season 4 मध्ये पहिल्याच दिवशी पडली वादाची ठीणगी, अपूर्वा प्रसादला म्हणाली की तुझ्या सारख्या उद्धट…\nमहेश मांजरेकर यांच्या दुसऱ्या पत्नीची पहिल्या पतीपासून असलेली मुलगीही आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री..पहा दिसते अतिशय सुंदर…\nसई ताम्हाणकरच्या ‘या’ कि’सिंग सीनने तोडल्या होत्या सर्व मर्यादा, दिला असा बो’ल्ड सीन की बॉलीवूडमध्येही आपण कधी पाहिला नसेल…\n‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री आहे ‘मकरंद अनासपुरे’ यांची पत्नी, दोघांनी अनेक चित्रपटात केलंय काम, पहा फोटो…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00020524-A22NL-BPM-TWA-P002-WD.html", "date_download": "2022-10-07T23:29:18Z", "digest": "sha1:XODQKZRRRMMVZJ6UWMQBVFVNGMBQD2NH", "length": 13480, "nlines": 274, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "A22NL-BPM-TWA-P002-WD | Omron Automation & Safety Services | अवर्गीकृत | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर A22NL-BPM-TWA-P002-WD Omron Automation & Safety Services खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये A22NL-BPM-TWA-P002-WD चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. A22NL-BPM-TWA-P002-WD साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00025799-04641-000.html", "date_download": "2022-10-07T22:14:08Z", "digest": "sha1:OIN2GHI56ZMA2TATJCLGNTHOWW6C2DUQ", "length": 13152, "nlines": 274, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "04641-000 | Omron Automation & Safety Services | अवर्गीकृत | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर 04641-000 Omron Automation & Safety Services खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 04641-000 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 04641-000 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/i-got-guwahati-offer-but-refused-as-he-follows-balasaheb-thackeray-sanjay-raut-claims-au29-750249.html", "date_download": "2022-10-07T21:59:04Z", "digest": "sha1:JFQAJCYIRXVQ45PBXBHCG5OH2NXM6WKJ", "length": 12208, "nlines": 191, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nSanjay Raut : मलाही गुवाहाटीला यायची ऑफर होती, पण मी गेलो नाही; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट\nSanjay Raut : स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि अशा पद्धतीने वागायचं हे आमच्या रक्तात नाही. प्राण जाये पर वचन न जाये, हे बाळासाहेबांनी शिकवलं आहे. मी याबाबतीत बेडर आहे.\nमलाही गुवाहाटीला यायची ऑफर होती, पण मी गेलो नाही; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट\nगिरीश गायकवाड | Edited By: भीमराव गवळी\nमुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांची ईडीने (ED) कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मलाही गुवाहाटीला येण्याची ऑफर होती. पण मी गेलो नाही. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक (shivsena) आहे, असं संजय राऊत म्हणाले. जेव्हा कारण नसताना चौकश्या होतात. तेव्हा आपण या चौकशांना सामोरे गेलं पाहिजे. अशावेळी तू काही केलं नाही, असं आपला अंतरात्मा सांगत असतो. निर्भिडपणे चौकशीला सामोरे जा, असंही अंतरात्मा सांगत असतो. त्याच आत्मविश्वासाने चौकशीला सामोरे गेलो. दहा तासाने बाहेर आलो. मलाही मार्ग होता गुवाहाटीला जाण्याचा. ऑफरही होते. मलाही बोलावण्याचे प्रयत्न झाले ना. पण आम्ही नाही गेलो. आम्ही ठाकरे शिवसेना यांच्यासोबत राहिलो, असं संजय राऊत म्हणाले.\nस्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि अशा पद्धतीने वागायचं हे आमच्या रक्तात नाही. प्राण जाये पर वचन न जाये, हे बाळासाहेबांनी शिकवलं आहे. मी याबाबतीत बेडर आहे. सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाबरण्याचे कारण नाही. हे मी इतरांना सांगत असतो, असं सांगतानाच शिवसेनेत डरना मना है, असं राऊत म्हणाले.\nअधिकाऱ्यांना सांगितलं बॅग भरून आलोय\nतुम्हीच ईडीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याची चर्चा आहे, असा सवाल त्यांना केला. त्यावर राऊत हसले. मी ईडीला प्रश्न केले नाही. त्यांचेही प्रश्न असतात. त्यांचा रिस्पेक्ट असतो. सरकारी कागद आहेत. त्यांनी काही प्रश्न केले. त्याला मी उत्तरे दिली, असं ते म्हणाले. काल अधिकाऱ्यांना सांगितलं मी बॅग भरून आलो आहे. मी घाबरणार नाही. तुम्हाला हवे ते प्रश्न विचारा. अडचण नाही. तुम्ही तुमची ड्युटी करा. मी माझं कर्तव्य पार पाडतो. अशा पद्धतीने कालचा दिवस गेला, असंही त्यांनी सांगितलं.\nSanjay Raut : फडणवीसांच्या मागे ‘उप’ हा शब्द लावायला मला जड जातंय; राऊतांचा खोचक टोला\nEknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे पुन्हा गोव्यात; श्रीकांत शिंदेही सोबतच ; आमदारांना घेऊनच आज मुंबईकडे रवाना होणार\nCM Eknath Shinde : उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला याची खंतच, आनंद नक्कीच नाही; उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंकडून उत्तर\nफडणवीसांचं कौतुक केलं पाहिजे\nयावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोले लगावले. फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या तयारीत होते. पक्षाच्या बैठकीत त्यांचं नाव जवळपास निश्चित झालं होते. पण त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे पद स्वीकारा असं सांगितलं गेलं. शिंदे आता मुख्यमंत्री आहेत. फडणवीसांच्या काळात शिंदे ज्युनिअर मंत्री होते. आता फडणवीस त्यांच्या मंत्रिमंडळात काम करणार आहेत. पण भाजपमध्ये शिस्त आणि आदेशाचं पालन केलं जातं. त्यानुसार ते वागले. त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यासाठी, असा टोलाही त्यांनी काढला.\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://crazymarathi.com/2022/06/22/4-collage-mulichaa-dance/", "date_download": "2022-10-07T22:37:11Z", "digest": "sha1:THYQCRUT7KVQPFCBT3D44AOHG57BK5QV", "length": 7650, "nlines": 57, "source_domain": "crazymarathi.com", "title": "४ कॉलेजच्या मुलींचा तुफान लुंगी डान्स… - Crazy Marathi", "raw_content": "\n४ कॉलेजच्या मुलींचा तुफान लुंगी डान्स…\nनमस्कार मंडळी, कसे आहात मजेत असणार आम्हाला विश्वास आहे….\nतुम्हा सर्वांना माहित आहे कि डान्स हा सर्वांचा आवडीचा विषय आहे. कारण डान्स करताना माणूस खूप आनंदित होऊन आपला आनंद व्यक्त करीत असतो. मग तो डान्स लग्नात केलेला असो व इतर कार्यक्रमात केलेला असो. माणूस आनंदित होऊन डान्स करत असतो. डान्स चे वेग वेगळे प्रकार देखील बघायला मिळतात.\nकोणी जोडीने डान्स करत असते तरी कोणी एकट्याने डान्स करत असते. तर कोणी ग्रुप करून डान्स करत असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या परीने डान्स करून कार्यक्रमाचा आनंद घेत असतो. लग्न कार्यात डिजे किंवा बँड च्या गाण्यावर व्यक्ती डान्स करत असते. डान्स करताना माणूस सर्व विचार आणि दुःख विसरून आनंदित होऊन मज्जा घेत असतो.\nजास्त करून भारत देशात लग्न कार्यात आणि हळदीच्या दिवशी डान्स केला जातो. डीजे तालावर माणूस बेभान होऊन डान्स करत असतो. हळदीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला वाटत असते कि ती हळदीची रात्र संपूच नये आणि रात्र भर नाचतच राहावे. दुस्र्या दिवशी लग्नाच्या वरातीत देखील लोक तुफान डान्स करीत असतात. खरंच तो प्रसंग खूप आनंदित असतो. सर्व लोक खूप खुश असतात.\nतसेच कधी कधी डान्स करण्यासाठी कोणत्या कार्यक्रमाची गरज देखील नसते. व्यक्तीचे मन झाले कि व्यक्ती डान्स करत असते. मग तो डान्स घरात असतो किंवा निसर्गाच्या सानिध्यात असतो. तसेच काही व्यक्ती आपली नाचण्याची कला दाखवण्यासाठी डान्स करत असते आणि त्याचे छायाचित्रण करून आपल्या पुढे मांडत असतात.\nसदर विडिओ हा देखील डान्सचा आहे, तुम्हाला विडिओ बघून दिसून येईल कि डान्स करण्यासाठी कोणत्या वयाची किंवा कोणत्या कार्यक्रमाची गरज नसते. डान्स करतांना चेहऱ्यावर किती आनंद असतो तो हा विडिओ बघून तुम्हाला दिसून येईल. हा विडिओ बघितल्यावर तुम्हाला देखील तुम्ही केलेल्या डान्सची आठवण होईल आणि पुन्हा तुम्हाला डान्स करूशी वाटेल, मग बघता काय सुरु होऊन जा….\nसादर विडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेयर करा, कारण विडिओ टाकण्यामागचे एकच उद्देश आहे डान्स करणारी व्यक्तीचा डान्स प्रसिद्ध होवो आणि त्या व्यक्तीला प्रसिद्धी प्राप्त होवो, व्हिडिओ टाकण्यात काही चूक झाली असेल तर माफी असावी, चला तर मग बघूया डान्सचा विडिओ –\nविडिओ नक्की बघा –\nमधु’चंद्राच्या रात्री नवरा रूममध्ये येतो…\nपिंकी छोटी पँ’ट घालून येते…\nनवऱ्याने बायकोला १० वर्षानंतर विचारलं…\nपप्पू पिंकीला प्रश्न विचारतो…\nलग्नात बायकांनी केला झकास डान्स…\nसाली बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…\nलग्नात वहिनीनीं केला भारी डान्स…\nसुहा’गरात्री बायकोला जोराची उचकी लागते….\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा वट पिंकी एका बस मध्ये चढली…\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा’वट बाई मेडिकल वर गेली…\nमुलीने सासरी जाताना सर्वांना रडवले\nटकला टी शर्ट घालून आला…\nनवरी ताईचा विडिओ बघून रडू येईल…\nबंड्याच्या बेडरूम मधून बायकोचा आवाज आला…\nलग्नात ताईने केला खुपच सुंदर डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nताईने केला खुपच सुंदर डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/a-time-that-should-not-come-to-any-father-bjp-leaders-son-dies-at-38/", "date_download": "2022-10-07T22:34:04Z", "digest": "sha1:D3B2PHA6PQK46E5MQNUI5H7DH3U6SAKJ", "length": 6556, "nlines": 42, "source_domain": "mahaupdate.in", "title": "कोणत्याही बापावर येऊ नये अशी वेळ ! भाजप नेत्याच्या मुलाचे निधन, 38 व्या वर्षीच... - Maha Update", "raw_content": "\nHome » कोणत्याही बापावर येऊ नये अशी वेळ भाजप नेत्याच्या मुलाचे निधन, 38 व्या वर्षीच…\nकोणत्याही बापावर येऊ नये अशी वेळ भाजप नेत्याच्या मुलाचे निधन, 38 व्या वर्षीच…\nमाजी आमदार पाशा पटेल यांना पुत्रशोक झाला आहे. आज सकाळी पाशा पटेल यांचे पुत्र अॅड. हसन पटेल यांचं यांचं निधन झालं आहे. वयाच्या 38 व्या वर्षी हसन पटेल यांचे निधन झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.\nमागील काही दिवसांपासून ते आजारी होते. लातूरच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची मूत्यूशी सुरु असलेली झुंज संपली आहे. आज दुपारी दोन वाजता लोदगा येथे त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nअॅड. हसन पटेल यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. हसन पाशा पटेल हे मागील काही वर्षांपासून मुंबई हायकोर्टात वकिली करत होते. लॉकडाऊनमध्ये ते लातूरमध्ये आले होते.\nत्यानंतर प्रकृती अस्वस्थतेमुळं ते लातूरमध्ये होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लातूमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.\nअ‍ॅड. पाशा पटेल यांचे पुत्र अ‍ॅड. हसन पटेल मात्र राजकारणापासून कायमच दूर राहिल्याचे दिसून आले. ते मागील काही वर्षांपासून मुंबई हायकोर्टात वकिली करत होते. लॉकडाऊनमध्ये ते लातूरमध्ये आले होते.\nत्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने ते लातूरमध्येच वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर लातूमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारांनंतर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.\nहसन पाशा पटेल यांचा दफनविधी आज दुपारी होणार आहे. दुपारी 2 वाजता औसा तालुक्यातील लोदगा येथील फिनीक्स शैक्षणिक संकुलाच्या शेजारी होणार आहे. त्यांच्या पश्चात आई-वडिल, दोन भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.\nपाशा पटेल हे शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत कार्यरत होते. या संघटनेचे अध्यक्षपद भूषविलेल्या पाशा पटेल यांना त्यावेळी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षात आणले.\nशेतकरी चळवळीतील भाजपचा मुस्लिम चेहरा दाखवण्यासाठी त्यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली. मात्र मुंडे यांच्या निधनानंतर बहुजन, अल्पसंख्यांक समाजात भाजपचे काम वाढवण्याचा प्रयत्न करणारे पाशा पटेल यांना भाजपने सध्या अडगळीत टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.\nब्रेकिंग: शिवसेना आमदाराचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन\n भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूचं निधन\nब्रेकिंग : पिंपरी चिंचवड शहरावर शोककळा ; शिवसेनेच्या माजी खासदाराचे कोरोनामुळे निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://nmk.org.in/current-affairs-11-november-2020/", "date_download": "2022-10-07T21:58:55Z", "digest": "sha1:HQKA7AZTE7UQWZAX6WO2XSM5PAXAEBYM", "length": 3445, "nlines": 55, "source_domain": "nmk.org.in", "title": "चालू घडामोडी ११ नोव्हेंबर २०२० - NMK.ORG.IN", "raw_content": "\nचालू घडामोडी ११ नोव्हेंबर २०२०\n*मुंबई इंडियन्स सांघान IPL स्पर्धेच विक्रमी पाचव विजेतेपद पटकावल.\n*आर्मेनिया आणि अझरबैजान यांनी, रशियाच्या मध्यस्थीन शांतता करार केला आहे.\n*भाजपाच्या शिष्ट मंडळान काल राज्यपाल भगतशिंह कोश्यारी यांची भेट घेतली.\n*राज्य विधिमंडळाच आगामी हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार.\n*कॉंग्रेस कडून जयंत आसगावकर यांना, पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातून उमेदवारी जाहीर.\n*व्होकल फॉर लोकलचा नारा दिल्यानंतर देशभरात स्थानिक उत्पादनांच्या मागणीत वाढ.\n*मुंबई : मिठी नदी पात्रातल्या बाधित झोपडपट्टी धारकांच त्वरित स्तलांतर करण्याचे निर्देश.\n*सणाचा जरूर आनंद घ्या, पण आरोग्याच्या जबाबदारीच भान ठेवा – मुख्यमंत्री.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/devendra-fadnaviss-big-secret-blast-about-sachin-waze-case-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-07T21:51:13Z", "digest": "sha1:LTIXDJQJVDCYWEJOI4F6DRB3FIBUT45V", "length": 10544, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "'मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या नेत्यांनी...'; देवेंद्र फडणवीसांचा सचिन वाझेंबाबत मोठा गौप्यस्फोट", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n‘मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या नेत्यांनी…’; देवेंद्र फडणवीसांचा सचिन वाझेंबाबत मोठा गौप्यस्फोट\n‘मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या नेत्यांनी…’; देवेंद्र फडणवीसांचा सचिन वाझेंबाबत मोठा गौप्यस्फोट\nमुंबई | तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या रडारवर होते. मात्र अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असतानाचा सचिन वाझेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.\nसचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निलंबित असतानाही त्यांना सेवेत घेण्यासाठी शिवसेनेच्या काही नेत्यांनी मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे आग्रह धरला होता. त्यावेळी मी वाझेंची फाईल अॅडव्होकेट जनरलना दाखवली होती. त्यावेळी त्यांनी मला वाझेंना सेवेत न घेण्याचा तोंडी सल्ला दिला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यात माध्यामांशी बोलताना त्यांनी सचिन वाझेंबाबतचा गौप्यस्फोट केला आहे.\nसचिन वाझे यांना उच्च न्यायालयाने निलंबित केलं आहे. त्यामुळे त्यांना सेवेत घेता येणार नाही. तो कोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल, असं मला वकील जनरलनी सांगितलं होतं. त्यामुळे मी वाझेंना सेवेत घेतलं नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनाी सांगितलं होतं.\nदरम्यान, राज्यात सत्तांतर झालं आणि कोरोनाचं संकट आलं म्हणून निवृत्त झालेले अधिकारी सेवेत हवेत असं कारण देत सचिन वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेतलं. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे क्राईम इंटेलिजन्स युनिट होतं. मात्र या विभागाचा प्रमुख हा पीआय असतो परंतू फक्त वाझेंसाठी पीआयची बदली करून एपीआय असलेल्या वाझेंना या विभागाचं प्रमुखरपद दिलं असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\nही तर फक्त सुरूवात आता महत्वाचा भाग बाहेर येणं बाकी- देवेंद्र फडणवीस\nझोमॅटो प्रकरणात खऱ्या-खोटाचा ‘हा’ व्हीडिओ आता होतोय प्रचंड व्हायरल, पाहा व्हिडीओ\n‘तो डिलिव्हरी बॉय दोषी आहे, असं मला वाटत नाही’; झोमॅटोच्या कामराजला परिणीतीचा मदतीचा हात\n“मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे”\nसोने इतक्या हजारांनी स्वस्त; जाणुन घ्या आजचा भाव\nही तर फक्त सुरूवात आता महत्वाचा भाग बाहेर येणं बाकी- देवेंद्र फडणवीस\n“शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत”\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://crazymarathi.com/2022/09/05/ratri-bayko-navara-sangte/", "date_download": "2022-10-07T22:27:19Z", "digest": "sha1:TYEYHNHSI25ZWLEJWA7TGYGSH2HIFV5Z", "length": 14828, "nlines": 116, "source_domain": "crazymarathi.com", "title": "रात्री बायको नवऱ्याला संतापात सांगते… - Crazy Marathi", "raw_content": "\nरात्री बायको नवऱ्याला संतापात सांगते…\nमाणूस दिवसभर आपल्या कामात व्यस्त राहतो जेव्हा त्याला थोडा वेळ मिळत असतो तेव्हा तो आपल्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवत असतो… जेव्हा त्याला थोडा वेळ मिळत असतो तेव्हा तो आपल्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवत असतो… परंतु अश्या वेळेस जेव्हा तो आतून म्हणजे मनापासून आनंदी असतो तेव्हाच तो आपल्या कुटुंबासह आनंदी राहण्यास सक्षम असतो परंतु अश्या वेळेस जेव्हा तो आतून म्हणजे मनापासून आनंदी असतो तेव्हाच तो आपल्या कुटुंबासह आनंदी राहण्यास सक्षम असतो आणि तो आनंद कश्यातून मिळतो ते तर तुम्हाला माहीतच आहे.. आणि तो आनंद कश्यातून मिळतो ते तर तुम्हाला माहीतच आहे.. विनोदातून.. विनोद हा असा प्रकार आहे ज्यातून माणूस सर्वात जास्त आनंदी होतो.. आणि पोट दुःखे पर्यंत हसतो…. त्यामुळे तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही जबरदस्त विनोद घेऊन आलो आहोत विनोदातून.. विनोद हा असा प्रकार आहे ज्यातून माणूस सर्वात जास्त आनंदी होतो.. आणि पोट दुःखे पर्यंत हसतो…. त्यामुळे तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही जबरदस्त विनोद घेऊन आलो आहोत हे वाचून आपले शरीर आणि मन आनंदित होईल हे वाचून आपले शरीर आणि मन आनंदित होईल मग चला तर मजा करण्याची म्हणजे हसण्याची प्रक्रिया सुरू करूया-\nविनोद 1 : एक वे_डा आरश्यात स्वतःला बघत होता\nस्वतःला बघून बघून विचार करत होता\nयार याला कुठेतरी पाहिलं आहे \nखूप वेळ टेन्शन मध्ये विचार करता करता बोलला\nअरे यार हा तर तोच आहे ना…. त्या दिवशी माझ्या बरोबर के_स का_पा_य_ला आला होता….😜😁😜😁😜😁\nविनोद 2 : गण्या त्याच्या बायकोला घेऊन डॉक्टर जवळ घेऊन गेला\nडॉक्टर बोलला : क_मरेवर इं_जेक्शन द्यावं लागेल \nगण्याच्या बायकोचा प_र_करचा ना_डा सुटत नसतो\nडॉक्टर हातात इं_जेक्शन घेऊन उभा असतो…\nहे बघून गण्या बोलला सा_ली हे रोजच आहे घरी पण हेच रडगाणं असत…. 😜😁😜😁😜😁😜😁\nविनोद 3 : बस मध्ये एक मुलगी चढते\nमुलगी : मी पो_टो_शी आहे, कृपया मला कोणीतरी जागा द्या\nमुलगा : पण माफ करा मॅडम तुम्ही पो_टो_शी दिसत नाही आहात\nमुलगी : कसं दिसणार लगेच, एक तासापूर्वीच तर काम करून आली आहे…😜😁😜😁😜😁😜😁\nविनोद 4 : सुहा गरात्रीच्या दिवशी नवऱ्याने बायकोचा एक पाय वरती केला\nनवरा : काय झालं\nबायको : ” काही नाही आमचा शेजारी दीपकची आठवण आली, त्याची पण अशीच स्टाईल होती ”\nविनोद 5 : लग्नानंतर पहिल्यांदा सून स्वयंपाक घरात गेली आणि रेसिपी बुक मध्ये वाचून जेवण बनवत होती\nसासू बाहेरून घरी आल्यावर\nफ्रीझ उघडते, आणि शॉक होते\nसासू : “हा मंदिरातला घं*टा फ्रीझ मध्ये काय करतो आहे\nसून : पुस्तकात लिहाल आहे “सब चिझो का मिश्रण कर ले और एक घं*टा फ्रीझ मैं रखे”🤣😛🤣😛🤣😛\nविनोद 6 : एकदा एका कॉलनी मधून एक केळे वाला जात असतो….\nतेव्हा तिसरया मजल्यावरून एक बाई त्या केळे वाल्याला आवाज देते….. बाई: काय रे केळे वाला\n केळेवाला: मॅडम, ६ के १२ केले ले जाओ…….\nबाई: (लगेच) ७ में १३ देता है तो उपर आ जा…. ज्याला समजला त्यांनीच हंसा🤣😛🤣😛🤣😛\nविनोद 7- बबड्या आणि त्याची होणारी बायको फोनवर गप्पा अमृत असतात….\n मला सांग ना तुझे घरचे आपल्याला लग्नाला कसे तयार झाले त्यांचा तर विरोध होता ना…\nहोणारी बायको: काही नाही रे मी फक्त त्यांच्या एका प्रश्नाचे उत्तर दिले आणि त्यांनी लग्नाला परवानगी दिली…\nबबड्या: असा काय उत्तर दिले कि ते तयार झाले होणारी बायको: त्यांनी विचारले मला सध्या पोरग काय करतेय\nबबड्या: मग तू काय उत्तर दिले.. होणारी बायको: मी बोलली काही नाही पोटात लाथा मारत आहे 😁😁😁😁😁 (विनोद ज्याला समजला त्यांनीच हसा)\nविनोद 8- एका पार्टी मध्ये सर्व जण उलटी करत असतात… हे बघून एक व्यक्ती ने विचार- काय झालं ह्या सर्वांना\nदुसरा व्यक्ती: कुणाचं ठाऊक काय माहित… सर्वात पहिले मला उलटी झाली….. ते बघून सर्वांना\nकिळस आली…. पहिला व्यक्ती: मग काय झालं दुसरा व्यक्ती: मग काही नाही मी परत माझी उलटी पियुन टाकली\nतेव्हा पासून हे सर्व उलट्या करता आहेत 😁😁😁😁😁😁😁😁\nविनोद 9- एका आज्जीला मंदिर बाहेर एक भिखारी भेटतो आणि तो बोलतो…..\nभिखारी: देवाच्या नावाने काही तरी द्या आज्जी बाई.. ३-४ दिवसापासून काही नाही खाल्लं आहे….\nआज्जीने ५०० रुपयाची नोट काढली आणि बोलली अरे माझ्या कडे सुटते नाही आहे… नाही तर तुला १०० रुपये असते….\nभिखारी: अहो थांबा माझ्या कडे ५०० चे सुटते आहेत… आज्जी: मग एक काम कर त्याच्यातून काही तरी खाऊन घे 😁😁😁\nविनोद १०- लग्नाच्या पहिल्या रात्री नंतर बायको माहेरी जाते\nआई: काय ग पोरी… कशी झाली सुहागरात्र मुलगी: काय सांगू ग…\nवाट लागली पूर्ण… बॉल इकडचे तिकडे झालेत…. आई: कस काय ग\nमुलगी: अग ते स्पिनर बॉलर बॉल कसे पण धरून फिरवतात 😁😁😁😁\nविनोद 11- एक चा’वट बा’ई सोनो’ग्राफी करण्यासाठी डॉक्टरकडे गेली\nडॉक्टर- बा’ई सर्व कपडे काढा आणि इथे झोपा…\nचा’वट बा’ई पटकन लाजली…..डॉक्टर – काय झालं बा’ई…\nबा’ई- अहो डॉक्टर मी काय बोलते आधी आपण सोनो’ग्राफी करून घेऊया ना…\nडॉक्टर जागेवर बे’शुद्ध 😂😂😂😂\nविनोद १२- बसमधे तिकीट काढतांना कंडक्टरचा धक्का मुलीच्या बॉलला लागतो…\nकंडक्टर- मॅडम बाजूला व्हा संत्रे दबत आहे…\nमुलगी लगेच भडकली… मुलगी- अरे मग… तुला काय प्रॉब्लेम आहे संत्रे तर माझे दबत आहे…\nकंडक्टर- अगं बाई संत्रे तुझे दबत आहे पण माझा इथे ज्यूस निघतोय त्याच काय करू… 😜😁😜😁\nविनोद १३- एकदा सु’नबाई अमेरिकेतून सासूबाईला फोन करते…\nसु’नबाई- आई तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे… सा’सूबाई- सांग ना सु’नबाई..\nसु’नबाई- आई आम्ही दोघांचे 3 झालो… सा’सूबाई – अरे वाह मुलगा झाला की मुलगी\nसु’नबाई – अहो आई नाही नाही, मी अजून एक दुसरं लग्न केले 🤣😂😂😂🤣 सा’सूबाई बेशुद्ध\nविनोद 14- एकदा रात्री बायको नवऱ्याला संतापात सांगते…\nबायको- अगं मला पण बाबु राव असायला पाहिजे होता…\nचा वट नवरा हसायला लागला… नवरा- तू काय केले असते जर तुला बाबु राव असता तर…\nबायको- अहो…. तुम्हाला दाखवले असते कि झ#वता कस…\nमराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा)- मी सर्व वस्तुंना उलटे करु शकतो,\nपण स्वताला मी हलवु ही शकत नाही, ओळखा पाहु मी कोण\nताईने केला कार्यक्रमात सुंदर डान्स…\nनवरी ताईला बघून खूप रडू येणार…\nपिंकी- खूप प्रेम करते…\nगण्या सुहा*गरातच्या ३ दिवसानंतर आपल्या रूमच्या बाहेर आला…..\nविनोद – एका आजीबाईनी सिग्नल तोडला आणि भुरकण स्कुटीवरून निघून गेल्या\nलग्नात बायकांनी केला झकास डान्स…\nसाली बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…\nलग्नात वहिनीनीं केला भारी डान्स…\nसुहा’गरात्री बायकोला जोराची उचकी लागते….\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा वट पिंकी एका बस मध्ये चढली…\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा’वट बाई मेडिकल वर गेली…\nमुलीने सासरी जाताना सर्वांना रडवले\nटकला टी शर्ट घालून आला…\nनवरी ताईचा विडिओ बघून रडू येईल…\nबंड्याच्या बेडरूम मधून बायकोचा आवाज आला…\nलग्नात ताईने केला खुपच सुंदर डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nताईने केला खुपच सुंदर डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.learningwithsmartness.com/2022/08/integrated-and-bilingual-textbook-2.html", "date_download": "2022-10-07T21:44:58Z", "digest": "sha1:52OTKRV237JIP6XGZAWACIQS5ILKF7X6", "length": 8665, "nlines": 162, "source_domain": "www.learningwithsmartness.com", "title": "Integrated and bilingual textbook training | 2nd class |एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण | इयत्ता दुसरी", "raw_content": "\nशिष्यवृत्ती परीक्षा 5वी भाषा\nशिष्यवृत्ती परीक्षा 5वी बुध्दिमत्ता\nशिष्यवृत्ती परीक्षा 5वी गणित\nशिष्यवृत्ती परीक्षा 5वी इंग्रजी\nIntegrated and bilingual textbook training | 2nd class |एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण | इयत्ता दुसरी\nIntegrated and bilingual textbook training |एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण | इयत्ता दुसरी\nविषय : एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित राहणेबाबत.......\nउपरोक्त विषयान्वये, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ( बालभारती ) मार्फत इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी तसेच ४८८ आदर्श शाळांमधील दुसरीच्या वर्गासाठी एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.\nत्या अनुषंगाने राज्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्याशिक्षकांना एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत दिनांक १७ ऑगस्ट व १८ ऑगस्ट २०२२ रोजी सोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आले आहे.\nतरी सदर प्रशिक्षण वर्गासाठी आपल्या जिल्ह्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना तसेच\n४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना (फक्त मराठी माध्यम)आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील कार्यरत आदर्श शाळा संपर्क अधिकारी यांना उपरोक्त नमूदकालावधीत उपस्थित राहण्यासाठी अवगत करण्यात यावे.\nसदर ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण तपशील आणि यूट्युबची लिंक खालीलप्रमाणे आहे :\nMDM Back Dated Information | शालेय पोषण आहार योजना बॅक डेटेड माहिती भरणे\nSanklit Mulyamapan | संकलित मूल्यमापन | प्रथम सत्र प्रश्नपत्रिका\nMahatma Gandhi | महात्मा गांधी जयंती | सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | लहान गट|पहिली ते पाचवी\n5वी ते 10वी अभ्यास\nMDM Back Dated Information | शालेय पोषण आहार योजना बॅक डेटेड माहिती भरणे\nSanklit Mulyamapan | संकलित मूल्यमापन | प्रथम सत्र प्रश्नपत्रिका\nMahatma Gandhi | महात्मा गांधी जयंती | सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | लहान गट|पहिली ते पाचवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/these-benefits-of-eating-cucumber-seeds/", "date_download": "2022-10-07T21:58:35Z", "digest": "sha1:DKCDDWCCWXVO4TO6OBLTJPWQOLQ2BR6G", "length": 6063, "nlines": 42, "source_domain": "mahaupdate.in", "title": "काकडीच्या बिया खाल्ल्याने होतात 'हे' फायदे, जाणून घ्या सविस्तर... - Maha Update", "raw_content": "\nHome » काकडीच्या बिया खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे, जाणून घ्या सविस्तर…\nकाकडीच्या बिया खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे, जाणून घ्या सविस्तर…\nबहुतेक लोकांना काकडीची कोशिंबीर खायला आवडते. प्रत्येक हंगामात काकडीला प्राधान्य दिले जाते. ते खाल्ल्याने शरीरात ताजेपणा येतो. पण तुम्हाला माहित आहे का काकडीच्या व्यतिरिक्त, त्याच्या बिया खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे देखील मिळतात\nकाकडीच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. काकडीच्या बियांचे सेवन आरोग्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. याविषयी जाणून घ्या.\nलोकांसाठी पहिली छाप म्हणजे त्यांच्या दात आणि तोंडातून येणारा वास. काकडीच्या बियांमध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात. याचा पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे ते खाल्ल्याने तोंड खराब होणे, दातांची पोकळी आणि हिरड्या सुजणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. काकडी खाण्यासोबतच त्याच्या बिया टाकण्याऐवजी तुम्ही ते खाऊ शकता. त्यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात.\nमुलगा असो वा मुलगी, प्रत्येकाचे सौंदर्य केसांतूनच दिसून येते. काकडीच्या बिया केसांना लांब, दाट आणि मजबूत बनवतात. काकडीच्या बियांमध्ये असलेले सल्फरचे प्रमाण केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे केस गळणे, कोंडा आणि कोरडेपणा यासारख्या समस्या दूर करते.\nकाकडीच्या बियांचे सेवन केल्याने तुमची त्वचा चमकदार आणि सुंदर बनते. यामुळे तुम्ही लोकांमध्ये कौतुकास पात्र ठरता. काकडीच्या बियांचे सेवन केल्याने त्वचेवरील डाग, सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर होण्यास मदत होते.\nएवढेच नाही तर काकडीच्या बिया खाल्ल्याने टॅनिंग आणि सनबर्नच्या समस्येपासूनही आराम मिळतो. काकडीच्या बिया लठ्ठपणासारख्या गंभीर समस्यांपासून तुमचे रक्षण करतात. ते कॅलरी मुक्त आहेत तसेच फायबरमध्ये भरपूर आहेत. अशा परिस्थितीत काकडीच्या बिया खाल्ल्याने भूक कमी होते आणि वजन झपाट्याने कमी होऊ लागते.\nकाकडीचे सेवन आरोग्यासाठी रामबाण उपाय, जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे\nकाकडी व त्याची साल शरीरासाठी फायदेशीर; जाणून घ्या, त्याचे आरोग्यदायी फायदे\nतुम्हीही भाजी बनवताना सिमला मिरचीच्या बिया फेकता का कधीच अशी चूक करू नका; जाणून घ्या फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19044/", "date_download": "2022-10-07T23:23:41Z", "digest": "sha1:TC2GQZO3STEBVJXZT7TBGSOLWM2C3G2N", "length": 38124, "nlines": 237, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "जहाजातील यंत्रसामग्री – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nजहाजातील यंत्रसामग्री : जहाजाचा प्रचालक (मळसूत्री पंखा) फिरविण्यासाठी बसविलेल्या मुख्य एंजिनाशिवाय इतर बरीच कामे करण्यासाठी जहाजात आणखी काही एंजिने, जनित्रे, चलित्रे (मोटर) व यांत्रिक उपकरणे वापरावी लागतात. त्यांना साहाय्यक यंत्रे म्हणतात.\nसुकाणू चालक : मोठ्या जहाजाचे सुकाणू फिरविण्यासाठी बरीच मोठी शक्ती लागते. त्यासाठी वाफ एंजिन किंवा विद्युत् चलित्र वापरता येते. जहाजाचे सुकाणू नेहमी पाण्यात बुडलेले असते. ते त्याच्या उभ्या अक्षाभोवती फिरवावे लागते. यासाठी त्याला एक उभा दंड जोडलेला असतो. या दंडाचे वरचे टोक जहाजाच्या वरेतून (मागच्या भागातून) वर नेऊन वरच्या गच्चीवर आणलेले असते. या टोकावर एक आडवा दांडा किंवा वर्तुळखंड बसवतात ते फिरविले म्हणजे खालचे सुकाणू फिरते. सुकाणू फिरविण्याचे काम नुसती यांत्रिक शृंखला वापरून वा द्रवीय माध्यम वापरून साधता येते. यांत्रिक शृंखलेला मोठी जागा लागते व तिचा बराच आवाज होतो. द्रवीय माध्यमाची यंत्रणा आटोपशीर असते, ती आवाज करीत नाही व तिची कार्यक्षमता यांत्रिक शृंखलेपेक्षा पुष्कळ जास्त असते. द्रवीय माध्यमाने सुकाणू फिरविण्याची यंत्रणा आ. १ मध्ये दाखविली आहे. सुकाणू फिरविण्याच्या यांत्रिक शृंखलेमध्ये स्क्रू आणि नट पद्धती किंवा दंतचक्रांची वेगबदल पेटी वापरून सुकाणूचा दंड उलट-सुलट फिरविता येतो आणि पाहिजे त्या जागी धरून ठेवता येतो. आ. १ मध्ये दाखविलेले १ हे सुकाणूच्या दंडाचे वरून दिसणारे टोक आहे आणि २ हे त्या दंडावर बसविलेले वर्तुळखंड आहे. वर्तुळखंड फिरविण्यासाठी त्याच्याभोवती बसविलेल्या साखळीची टोके ३ या दट्ट्याच्या दोन्हीकडील दांड्यांना जोडलेली आहे. ३ हा दट्ट्या ४ या मोठ्या सिलिंडरामध्ये दाब दिलेल्या तेलाच्या धक्क्याने पुढे-मागे सरकतो. तेलावर दाब देण्यासाठी विद्युत् चलित्राने चालणारा एक पंप असतो. त्या पंपातून बाहेर पडणारे दाबाखालचे तेल ७ या नळाने वरच्या लहान सिलिंडरात येते. या सिलिंडरामध्ये एक मार्गदर्शक झडप असते. ती सरकवण्यासाठी तिच्या दोन्हीकडे ६ या दांड्या जोडलेल्या आहेत. या दांड्या एंजिनाच्या शक्तीने सरकविल्या जातात. झडप मधल्या जागेपासून एका बाजूला सरकली म्हणजे दुसऱ्या बाजूकडचा तेलाचा मार्ग उघडतो व त्या मार्गाने दाबयुक्त तेल खालच्या मोठ्या सिलिंडरात जाते. या वेळी झडपेच्या दुसऱ्या टोकाशी असलेल्या मार्गाचे द्वारही मोकळे होते पण त्याचा संबंध झडपेच्या आतल्या भागाशी जोडला जातो आणि या मार्गाने खालच्या सिलिंडरातील दाबाखालचे तेल बाहेर पडू लागून तेथील दाब कमी होतो. ३ या दट्ट्याच्या एका बाजूवर दाबाखालील तेल व दुसऱ्या बाजूवर दाब नसलेले तेल असल्यामुळे दट्ट्या दाब नसलेल्या बाजूकडे सरकतो व २ या वर्तुळखंडाभोवती बसविलेल्या साखळीला ओढतो. त्यामुळे १ हा सुकाणूचा दंड आणि त्याला जोडलेले सुकाणूही फिरते. जहाजाचे चालन आणि नयन करणारा अधिकारी जहाजाच्या वरच्या मजल्यावरील सज्जात उभा राहून पुढील मार्ग पाहत असतो. जहाज वळविण्यासाठी त्याच्यासमोर एक उभे चाक बसविलेले असते. ते चाक हाताने फिरविले म्हणजे त्याला जोडलेले तारदोर ओढले जाऊन आ. १ मध्ये दाखविलेल्या ६ या दांड्या पुढे-मागे सरकविल्या जातात व त्यामुळे १ हा सुकाणूचा दंड फिरतो. जहाज सरळ पुढे नेण्यासाठी सज्जातील चाक त्याच्या मधल्या जागी धरून ठेवावे लागते. जहाजाच्या नयनाचे काम हाताने करता येते, परंतु लांब प्रवास करणाऱ्या जहाजात ते स्वयंचलित यंत्राच्या मदतीने करवून घेण्यात येते. या कामात सेलसिन (आपोआप समकालिक होणाऱ्या) विद्युत् चलित्रांचा [⟶ विद्युत् चलित्र] उपयोग करतात. मोठे जहाज भर वेगाने पुढे जात असताना १५ सेकंदांत सुकाणू कोणच्याही एका बाजूला ३५० तून फिरविता आले पाहिजे व ते पूर्ण वेगाने मागे जात असेल तेव्हा ३० सेकंदांत ते ३०० फिरविता आले पाहिजे.\nनांगर यंत्रणा : जहाज बंदरात आल्यावर किंवा उथळ समुद्रात असताना थांबवून एका जागी स्थिर ठेवण्यासाठी जहाजाच्या नाळेवर (पुढील टोकावर) दोन्ही बाजूंना लांब साखळीने टांगून ठेवलेले वजनदार पोलादी नांगर असतात ते वर ओढण्यासाठी यांत्रिक रहाटाचा उपयोग करतात. नांगर खाली सोडताना तो आपल्या वजनानेच खाली जातो. तो तळावर टेकला म्हणजे साखळी सैल सोडण्याचे काम एकदम थांबविता येते. साखळी ज्या रहाटावरून जाते त्याच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पट्ट्याचे गतिरोधक बसविलेले असतात. त्याशिवाय साखळी अडकवून ठेवण्यासाठी काही आकडेही बसवतात. नांगर टांगून ठेवण्याची जागा, नांगराची साखळी आणि साखळी ओढणारा रहाट आ. २ मध्ये दाखविला आहे व विद्युत् चलित्राने फिरणाऱ्या आडव्या रहाटाची वरून दिसणारी मांडणी आ. २ (आ) मध्ये दाखविली आहे. यामध्ये विद्युत् चलित्र १,५०० प्रमिफे. वेगाने फिरले, तरी साखळी ओढणारा रहाट १०० प्रमिफे. वेगाने फिरावा अशी यांत्रिक योजना केलेली असते. जहाजाच्या वरेवरही असाच एक नांगर राखीव म्हणून ठेवलेला असतो. जहाज उभे असताना वादळ झाले, तर त्या नांगराचाही उपयोग करतात [⟶ नांगर (जहाजाचा)].\nउभे रहाट : (कॅप्स्टन). धक्क्याजवळ आलेले जहाज धक्क्याला लावण्यासाठी यांचा मुख्यतः उपयोग करतात [⟶ कॅप्स्टन].\nजहाजाच्या गच्चीवरील (डेकवरील) यारी : धक्क्यावरचा अवजड माल उचलून तो जहाजाच्या कोठीत सोडण्यासाठी व कोठीतील माल वर काढून धक्क्यावर ठेवण्यासाठी प्रत्येक कोठीच्या तोंडाजवळ एक वा दोन याऱ्या उभ्या केलेल्या असतात. त्यांच्या मदतीने वर उचललेला माल डेकवरून आडव्या दिशेनेही नेता येतो. त्यामुळे मालाचा चढ-उतार झपाट्याने होऊ शकतो. अशा यारीने साधारणतः दोन टनांपर्यंत वजनाचा बोजा उचलता येतो. या यारीचे दोर ओढण्यासाठी यांत्रिक रहाट जोडलेले असतात व ते चालविण्यासाठी डीझेल एंजिन किंवा विद्युत् चलित्र वापरतात. या प्रकारची एक यारी आ. ३ मध्ये दाखविली आहे. या प्रकारात एक मध्यवर्ती खांब असतो व त्याच्या आधाराने चारी बाजूंना चार स्वतंत्र याऱ्या उभ्या करतात [⟶ यारी].\nपंप : जहाजामध्ये निरनिराळ्या कामांसाठी अनेक प्रकारचे पंप वापरावे लागतात. बाष्पित्रामध्ये (बॉयलरमध्ये) पाणी भरण्यासाठी जास्त दाब देणारा पश्चाग्र गतीचा (दट्ट्याची सरळ रेषेत पुढे-मागे हालचाल होणारा) पंप बसवितात. हा पंप वाफेच्या एंजिनाने चालवितात. बहुतेक पाण्याचे पंप केंद्रोत्सारी (केंद्रापासून अरीय दिशेने दूर ढकलणाऱ्या प्रेरणेचा उपयोग करणाऱ्या) जातीचे असतात व ते चालविण्यासाठी विद्युत् चलित्रांचा उपयोग करतात. इंधन तेलाचा पुरवठा करणारे पंपही केंद्रोत्सारी जातीचे असतात व तेही विद्युत् चलित्रांनी चालवितात. बाष्पित्राच्या भट्टीमध्ये लागणारी हवा पुरविण्यासाठी विद्युत् चलित्रावर फिरणारा केंद्रोत्सारी जातीचा पंखा वापरतात. वायुवीजनासाठी बसविलेले सर्व पंप विद्युत् चलित्राने चालणारे केंद्रोत्सारी जातीचे असतात. डीझेल एंजिनाच्या सिलिंडरांचे संमार्जन करण्यासाठी (जळालेले वायू बाहेर ढकलण्यासाठी) लागणारी थोड्या दाबाची हवा पुरविण्यासाठी दोन घूर्णकांचे (फिरणाऱ्या भागांचे) विद्युत् चलित्रावर फिरणारे पंखे वापरतात. डीझेल एंजिन सुरू करण्यासाठी लागणारी जास्त दाबाची हवा पुरविण्यासाठी हवा संपीडक (दाबयुक्त हवा पुरविणारे यंत्र) वापरतात. या संपीडकामध्ये दोन वा तीन पदे (टप्पे) असतात व प्रत्येक दोन पदांमध्ये गरम झालेली हवा थंड करण्याची व्यवस्था केलेली असते. हवा संपीडकाने तयार केलेली दाबाखालची हवा एका दाबपात्रामध्ये साठवून ठेवतात व जरूर पडेल तेव्हा तिचा उपयोग करतात.\nउष्णता विनिमयक : (अधिक तापमानाच्या द्रवातील वा वायूतील उष्णतेने कमी तापमानाचा द्रव किंवा वायू तापविणारे साधन). ज्या जहाजामध्ये जहाज चालविण्याचा पंखा फिरविण्यासाठी वाफ एंजिन किंवा वाफ टरबाइन वापरतात तेथे एंजिनातून बाहेर जाणाऱ्या वाफेचे संघनन (द्रवीभवन) करून निर्गम मार्गामध्ये निर्वात स्थिती उत्पन्न करण्यासाठी वाफ संघनक (वाफ द्रवीभूत करणारी उपकरणे) जोडलेले असतात. या संघनकांत येणारी वाफ संघनित करण्यासाठी जलमार्गातील थंड पाणी वापरतात व ते फिरविण्यासाठी केंद्रोत्सारी जातीचा पंप वापरतात. निर्गम मार्गातून येणारी हवा व संघटित न होणारे वायू बाहेर काढण्यासाठी वाफेच्या झोताने चालणारा वायु-बहिस्सारक किंवा विद्युत् चलित्राने चालणारा निर्वात पंप बसवतात.\nबाष्पित्रामध्ये भरण्याचे पाणी अगोदर तापवून भरले, तर इंधन खर्चात काटकसर करता येते. हे पाणी तापविण्यासाठी बाष्पित्राच्या भट्टीतून बाहेर पडणाऱ्या उष्ण वायूंचा उपयोग करतात. उष्ण वायूंची उष्णता थंड पाण्यामध्ये घेण्यासाठी उष्णता विनिमयकाचा उपयोग करतात. बाष्पित्राच्या भट्टीमध्ये जाळण्याचे तेल अगोदर तापवून ज्वालकात सोडले, तर ते लवकर पेट घेते व त्यामुळे ज्वालकाची कार्यक्षमता वाढते म्हणून उष्णता विनिमयक वापरून इंधन तेलाचे तापमान शक्य तितके वाढवितात. एंजिनामध्ये वापरलेले वंगण तेल तापून गरम होते, ते थंड करून व गाळून पुन्हा वापरता येते. गरम झालेले वंगण तेल थंड करण्यासाठी उष्णता विनिमयक वापरतात. यामध्ये तेलातील उष्णता काढून घेण्यासाठी थंड पाण्याचा उपयोग करतात. उष्णता विनिमयकामधील द्रव पदार्थ खेळविण्यासाठी केंद्रोत्सारी पंप वापरतात आणि ते विद्युत् चलित्राने फिरवितात [⟶ उष्णता विनिमयक].\nवातानुकूलन : जहाजातील पुष्कळ भागांत वातानुकूलन करावे लागते आणि त्यासाठी विशेष प्रकारची यंत्रसामग्री बसवावी लागते. ती चालविण्यासाठी विद्युत् चलित्राचा उपयोग करतात. जहाजावर खाद्यपदार्थ ठेवण्याच्या कोठारात थंड हवा खेळवावी लागते. हवा थंड करण्यासाठी शीतक यंत्रणा बसवावी लागते. ती चालविण्यासाठी बहुतेक ठिकाणी विद्युत् चलित्र वापरतात. थंड प्रदेशातून जाताना जहाजावरील पुष्कळ विभागांत हवा गरम ठेवण्याची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी वाफेने गरम होणारे नळ बसवितात. ही वाफ पुरविण्यासाठी स्वतंत्र बाष्पित्र बसवितात किंवा एंजिनातून बाहेर पडणाऱ्या वाफेचा उपयोग करतात. काही ठिकाणी उष्णता उत्पन्न करण्यासाठी विद्युत् प्रवाहाने गरम होणाऱ्या रोधक तारा बसवितात.\nऊर्ध्वपातक : समुद्रातून प्रवास करताना गोडे पाणी संपले म्हणजे खारे पाणी उकळून त्याच्या वाफेपासून गोडे पाणी तयार करण्यासाठी ऊर्ध्वपातक यंत्र बसवितात. खारे पाणी तापविण्यासाठी उष्णता विनिमयक जातीचे दाबपात्र वापरतात. यामध्ये खारे पाणी उकळण्यासाठी वाफेचा उपयोग करतात व खाऱ्या पाण्याच्या वाफेचे संघनन करून गोडे पाणी तयार करण्यासाठी वाफ संघनक वापरतात. या यंत्रणेत पाणी खेळविण्यासाठी विद्युत् चलित्राने फिरणारे केंद्रोत्सारी पंप वापरतात.\nविद्युत् जनित्र : जहाजावर दिवे लावण्यासाठी व विद्युत् चलित्रे चालविण्यासाठी विद्युत् शक्तीचा पुरवठा करावा लागतो. या दोन कामांशिवाय संदेशवहन, रेडिओ, रडार, मार्गणक यंत्रे, स्वयंपाकगृह व उपहारगृह, बोलपट, ध्वनिक्षेपक, संरक्षक साधने आणि नियंत्रक साहित्य अशा अनेक कामांसाठी विद्युत् शक्तीचा उपयोग करावा लागतो. विद्युत् शक्ती पुरविण्यासाठी काही जहाजांत मुख्य एंजिनालाच एक विद्युत् जनित्र जोडतात परंतु बहुतेक जहाजांत विद्युत् जनित्र फिरविण्यासाठी स्वतंत्र डीझेल एंजिन बसवितात. हे एंजिन बंद पडल्यास महत्त्वाच्या कामासाठी विजेचा पुरवठा नेहमी उपलब्ध असावा म्हणून एक विद्युत् घटमाला बसविलेली असते. दिवे लावण्यासाठी १२० किंवा २३० व्होल्टचा विद्युत् दाब वापरतात. पंखे आणि सुबाह्य विद्युत् उपकरणांसाठी १२० व्होल्टचा दाब वापरतात. चलित्रे चालविण्यासाठी २३० किंवा ४४० व्होल्टचा दाब वापरतात.\nओगले, कृ. ह. ओक, वा. रा.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nसद्दश – ते – अंकीय परिवर्तक\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/sanjay-raut-critisise-bhagatsinh-koshyari-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-07T22:52:51Z", "digest": "sha1:3PZS2QK6G4FGRADFYS6ZVLS56BNPN3XE", "length": 9714, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"सर्जिकल स्ट्राईकही 24 तासात झाला होता, पण राज्यपालांचं संशोधन सुरूच\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“सर्जिकल स्ट्राईकही 24 तासात झाला होता, पण राज्यपालांचं संशोधन सुरूच”\n“सर्जिकल स्ट्राईकही 24 तासात झाला होता, पण राज्यपालांचं संशोधन सुरूच”\nमुंबई | मोदींनी सर्जिकल स्ट्राईकही 24 तासांत केला होता. पण सहा महिने उलटले तरी राज्यपालांचं नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत संशोधन सुरूच आहे, असा खोचक टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना लगावला आहे.\n12 सदस्याचं सदस्यत्व रोखून ठेवणं हा घटनेचा भंग आहे. यात राजकारण असून हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. राजभवनात काही तुफान आलं असावं आणि त्या वादळात फाईल वाहून गेल्या असाव्यात. किंवा तिथे भूतप्रेत आलं असेल म्हणूनच त्या फायली गायब झाल्या, अशी टीका संजय राऊत यांनी केली.\nमुख्यमंत्री नुकसानग्रस्तांना मदत करतीलच. पण महाराष्ट्राला लुटायचं काम दिल्लीवाले करत आहेत. त्यांची काही जबाबदारी नाही का. तुम्ही गुजरातला एक हजार कोटी रुपये देऊ शकता. परंतु महाराष्ट्राचा आक्रोश आणि वेदना तुम्हाला कळत नाही का. तुम्ही गुजरातला एक हजार कोटी रुपये देऊ शकता. परंतु महाराष्ट्राचा आक्रोश आणि वेदना तुम्हाला कळत नाही का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.\nदरम्यान, राऊत यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातूनही राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. राज्यपालांनी करावीत अशी अनेक कामे आहेत. फायलींवर बसून राहण्यापेक्षा ही कामे केल्याने त्यांचा नावलौकिक वाढेल. महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे. याबाबत राज्यपालांनी केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे, असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\nबारावीच्या परिक्षेसंदर्भात ‘या’ राज्यानं केली मोठी घोषणा; विद्यार्थी घरबसल्या देणार पेपर\nइंडिया VS पाकिस्तान सामन्यावर यंदाही विर्जन; टीम इंडियाची आणखी एक स्पर्धा रद्द\nडोळ्यात मिरची पावडर फेकून 19 लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न; 40 CCTV तपासल्यानंतर आरोपी अटकेत\nपुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nलग्नाच्या वाढदिवसाला दिलेला एक किलो सोन्याचा हार निघाला नकली\nबारावीच्या परिक्षेसंदर्भात ‘या’ राज्यानं केली मोठी घोषणा; विद्यार्थी घरबसल्या देणार पेपर\nअल्पवयीन मुलीवर दोन महिने बलात्कार; पीडिता गरोदर राहिल्यानंतर समोर आला धक्कादायक प्रकार\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2022-10-07T21:36:50Z", "digest": "sha1:DZHR3WOLBOFLGAVBPT5SQBIJPHC6MGFI", "length": 4529, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भुमरी नदीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nभुमरी नदीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख भुमरी नदी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवैतरणा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nतानसा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nचोरणा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील नद्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nकामवारी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nखडवली नदी ‎ (← दुवे | संपादन)\nदहेरजा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nपिंजाळ नदी ‎ (← दुवे | संपादन)\nपेल्हार नदी ‎ (← दुवे | संपादन)\nभातसा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nमुरबाडी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nवारोळी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nसूर्या नदी ‎ (← दुवे | संपादन)\nबारबी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nवांदरी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nभारंगी ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:तानसा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:ठाणे जिल्ह्यातील नद्या ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18064/", "date_download": "2022-10-07T21:55:06Z", "digest": "sha1:SVKYRJCK52OKRDFAAMUWZJHTKKQUVS6U", "length": 18709, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "चार्ल्‌स (शार्ल), झाकआलेक्सांद्र सेझार – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nचार्ल्‌स (शार्ल), झाकआलेक्सांद्र सेझार\nचार्ल्‌स (शार्ल), झाकआलेक्सांद्र सेझार\nचार्ल्‌स (शार्ल), झाक आलेक्सांद्र सेझार : (१२ नोव्हेंबर १७४६–७ एप्रिल १८२३) फ्रेंच भौतिकीविज्ञ. वायूच्या आयतनाचा (घनफळाचा) त्याच्या तापमानाशी असणाऱ्या संबंधाविषयीच्या नियमाचे सहशोधक. त्यांचा जन्म बोझांसी येथे झाला. काही काळ पॅरिस येथे नोकरी केल्यावर त्यांनी सु. अठरा महिने अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी भौतिकीविषयी व्याख्याने देण्यास सुरुवात केली व तेव्हा ते प्रयोगही करून दाखवीत असत. १७८५ साली त्यांची फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसवर नेमणूक झाली व नंतर त्यांची प्रायोगिक भौतिकीच्या प्राध्यापकपदावर नेमणूक झाली व याच जागेवर त्यांनी मृत्यूपावेतो काम केले. या ॲकॅडेमीतील प्रायोगिक भौतिकीच्या वर्गाचे १८१६ पासून ते अध्यक्षही होते.\n‘वायुवरील दाब कायम ठेवला असता वायूचे आयतन त्याच्या निरपेक्ष तापमानाच्या सम प्रमाणात असते’ हा ⇨ऊष्मागतिकीतील नियम त्यांनी शोधून काढला, परंतु त्यांनी आपले निष्कर्ष प्रसिद्ध केले नाहीत. त्याचवेळी गे-ल्युसॅक या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञांनी ह्याच नियमाविषयी आपले निष्कर्ष प्रसिद्ध केले. त्यामुळे हा नियम ‘चार्ल्‌स नियम’ या नावाने किंवा ‘चार्ल्‌स-गे-ल्युसॅक नियम’ या नावानेही ओळखला जातो.\nत्यांनी १७८३ मध्ये सर्वप्रथम बलून फुगविण्यासाठी उष्ण हवेच्या ऐवजी हायड्रोजन वायूचा वापर केला. रॉबर्ट बंधूंच्या साहाय्याने त्यांनी एक पूर्णपणे विकसित असे बलून तयार केले. त्या बलूनमध्ये विशिष्ट झडपेची योजना करण्यात आली होती. बलून खाली उतरण्याच्या वेळी त्याच्यामधून वायू बाहेर सोडता येत असे. बलूनमधील वायू प्रसरण पावला, तर तो जादा वायू बाहेर सोडण्यासाठी एक नलिका बलूनला बसविली होती. त्यामुळे बलून फुटण्याची भीती नव्हती. बलूनवर विशिष्ट आवरणे दिलेली होती. त्यामुळे बलूनमधील हायड्रोजन वायू यत्किचिंतही बाहेर जाऊ शकत नसे. अशा रीतीने तयार केलेल्या बलूनच्या साहाय्याने रॉबर्ट व चार्ल्‌स यांनी १ डिसेंबर १७८३ रोजी पॅरिसमधून उड्डाण केले आणि ते पॅरिसपासून सु. ४३ किमी. वरील खेड्यात यशस्वीपणे उतरले. त्यांच्या ह्या महान प्रयत्नामुळे राजे सोळावे लुई यांजकडून त्यांना निवृत्तिवेतन देण्यात आले व सॉरबॉन येथे एक प्रयोगशाळा तयार करून देण्यात आली. त्यांच्या ह्या प्रसिद्धीमुळेच फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी त्यांना स्वतःचे प्राण वाचवता आले.\nचार्ल्‌स यांनी काही शास्त्रीय उपकरणे तयार केली होती. त्यातील उल्लेखनीय अशी उपकरणे म्हणजे एक प्रकारचा तरकाटा, छायाचित्रे मोठी करणारे उपकरण (मेगॅस्कोप) व स्फटिकांचे कोन मोजण्यासाठी उपयुक्त असणारा कोनमापक (गोनिओमीटर) ही होत.\nते पॅरिस येथे मृत्यू पावले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/daagdi-chawl-2-ankush-chaudhari-makrand-deshpande-comment-on-marathi-language-movie-not-get-show-time-nrp-97-3076854/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-07T22:46:13Z", "digest": "sha1:3VL5UWYXV6FQH65IDEW3JQTTI63KZKIK", "length": 23959, "nlines": 257, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Daagdi Chawl 2 Ankush Chaudhari Makrand Deshpande comment on Marathi Language Movie Not Get Show Time nrp 97 | \"एखादा हिंदी चित्रपट…\", मराठी चित्रपटाला शो आणि प्राईम टाईम न मिळण्याच्या मुद्द्यावर मकरंद देशपांडे संतापले | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\n“एखादा हिंदी चित्रपट…”, मराठी चित्रपटाला शो आणि प्राईम टाईम न मिळण्याच्या मुद्द्यावर मकरंद देशपांडे संतापले\n“आम्ही चांगलं काम केले तरच लोक ते पाहण्यासाठी येणार”\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nमराठी चित्रपटाला शो आणि प्राईम टाईम न मिळण्याच्या मुद्द्यावर मकरंद देशपांडे संतापले\nगेल्या काही दिवसांपासून विविध विषयांच्या धाटणीचे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. झिम्मा, झोंबिवली, टाइमपास ३, पावनखिंड, शेर शिवराज यासारखे विविध चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यानंतर आता येत्या शुक्रवारी १९ ऑगस्टला दगडी चाळ २ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘चुकीला माफी नाही’ यांसारखे अनेक सुपरहिट डायलॉग असलेला दगडी चाळ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग १९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘दगडी चाळ २’ च्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी अभिनेते मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत हे कलाकार उपस्थित होते. यावेळी त्यांना मराठी चित्रपट, प्राईम टाइम आणि शो याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी फार स्पष्टपणे भाष्य केले.\n“हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी…” मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नसल्याने सुमीत राघवन संतापला\nअभिनेता अंकुश चौधरी याला मराठी चित्रपटाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याला अचानक शो कमी करणे किंवा प्राईम टाईम न मिळणे याबाबत विचारण्यात आले. त्यावर अंकुश चौधरी म्हणाला, “प्रत्येक माणूस हा पुढच्या शुक्रवारी कोणता चित्रपट पाहायचा हे ठरवत असतो. ते आपल्या हातात नसतं. आपण त्याला तो चित्रपट पाहण्यासाठी कसे प्रवृत्त करु, त्याला आकर्षित कसे करु हे आपल्याकडे असते. आपल्या हातात फक्त चांगले काम करणे हे आहे. आम्ही चांगलं काम केले तरच लोक ते पाहण्यासाठी येणार. त्यामुळे आम्ही चांगलं काम करत राहू आणि त्यांचं काम ते करतील.”\n“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला\nShinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\n“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप\nत्यापुढे मकरंद देशपांडे यांनी या मुद्द्यावर भाष्य केले. “सर्वच संघटना, कलाकार यावर बोलत आहेत. चित्रपटगृहाच्या मालकांना याबाबत सांगत आहेत. मग त्यांचा उलटा वाद असतो, आम्ही पाटी लावतो, पण मग तितके प्रेक्षक आणून दाखवा. त्या वादावर काहीही बोलण्यासारखे नाही. पण जेव्हा एखादा चित्रपट चांगला चालत असतो. त्याला बंद पाडले जाते ते चुकीचे आहे. पण आता ते होईल, असे मला तरी आता वाटत नाही. ‘दगडी चाळ’ चालला आणि त्यावेळी एखादा हिंदी चित्रपट आला, तर त्याचे शो कमी होणार नाही”, असे मकरंद देशपांडे म्हणाले.\n“महाराष्ट्रात राहून मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत असेल तर…”, ‘डॅडी’चा जावई अभिनेता अक्षय वाघमारेची ‘ती’ पोस्ट चर्चेत\nदरम्यान चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ येत्या १९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर यांनी केली आहे. या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहे. तसेच या चित्रपटात आणखी कोण कलाकार असणार याची माहिती अद्याप समोरआलेली नाही. मात्र या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याची प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविश्लेषण : ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे चित्रपटांचं नुकसान मल्याळम चित्रपटसृष्टीत नेमकं घडतंय काय, जाणून घ्या\nमुख्यमंत्री शिंदे यांच्या बीकेसीतील दसरा मेळाव्याचा खर्चाचा स्रोत काय ; चौकशीच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका\nप्रो-कब्बडी लीग: प्रो-कब्बडी लीगच्या नवव्या हंगामात दबंग दिल्ली, बेंगलुरु बुल्स आणि युपी यौद्धाज यांची विजयी सलामी\nमुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\nबडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारचा कारभार…”\nपुन्हा चार दिवस पाऊस जोमात; मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास यंदाही उशिरा\n“हा चित्रपट…” ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर प्रिया मराठेची प्रतिक्रिया चर्चेत\nपुणे : प्रेमसंबंध तुटल्यानंतर प्रेयसीच्या घरात चोरी ; एकास अटक; १४ लाख ६७ हजारांचा ऐवज जप्त\nपुणे : पैगंबर जयंतीनिमित्त रविवारी वाहतुकीत बदल\nपुणे : खासगी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातील बेकायदा प्रवेशांना मान्यता नाही ; सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांचे स्पष्टीकरण\nMS Dhoni: म्हैसूरच्या चामुंडेश्वरी वॅक्स म्युजियमधील धोनीच्या पुतळ्यावर चाहत्यांचे ट्रोलिंग\nकाश्मीरमधील परिस्थितीला तीन घराणे जबाबदार, अमित शाह यांचा गंभीर आरोप\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\n“हा चित्रपट…” ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर प्रिया मराठेची प्रतिक्रिया चर्चेत\n‘झलक दिखला जा’च्या मंचावर लेकाच्या लग्नाची झलक पाहून नीतू सिंग भावुक, म्हणाल्या…\n‘हर हर महादेव’मध्ये अमृता खानविलकर साकारणार बाजीप्रभु देशपांडे यांच्या पत्नीची भूमिका, लूक व्हायरल\n‘हम आपके है कौन…’ चित्रपटतील रेणुका शहाणे यांचा ‘तो’ सीन शूट करताना ढसढसा रडल्या रीमा लागू\nMPSC च्या परीक्षेसाठी शुभेच्छा मागणाऱ्याला हेमांगी कवीचे स्पष्ट उत्तर, म्हणाली….\nएअरपोर्ट लूकमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले “कंगना…”\nबॉलिवूडमधील नकारात्मक विचारांच्या लोकांवर टीका करत करण जोहर म्हणाला, “मी प्रत्येकाच्या…”\n“माझ्यावर टीका केली जातेय हे…” सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल प्राजक्ता माळीने व्यक्त केलं स्पष्ट मत\n‘पुष्पा २’मध्ये होणार ‘या’ आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्याची एंट्री, साकारणार महत्वपूर्ण भूमिका\nमुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘झी टॉकीज’चा मानाचा मुजरा\n‘झलक दिखला जा’च्या मंचावर लेकाच्या लग्नाची झलक पाहून नीतू सिंग भावुक, म्हणाल्या…\n‘हर हर महादेव’मध्ये अमृता खानविलकर साकारणार बाजीप्रभु देशपांडे यांच्या पत्नीची भूमिका, लूक व्हायरल\n‘हम आपके है कौन…’ चित्रपटतील रेणुका शहाणे यांचा ‘तो’ सीन शूट करताना ढसढसा रडल्या रीमा लागू\nMPSC च्या परीक्षेसाठी शुभेच्छा मागणाऱ्याला हेमांगी कवीचे स्पष्ट उत्तर, म्हणाली….\nएअरपोर्ट लूकमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले “कंगना…”\nबॉलिवूडमधील नकारात्मक विचारांच्या लोकांवर टीका करत करण जोहर म्हणाला, “मी प्रत्येकाच्या…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95", "date_download": "2022-10-07T22:14:46Z", "digest": "sha1:YH3JKDMXFBPS4GYCGDUTAXFYQ5BQPONJ", "length": 2061, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रो-रो वाहतूक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरो-रो तथा रोल ऑन-रोल ऑफ या वाहतूक पद्धतीत मालाने भरलेले ट्रक मालगाडीवर चढवून लोहमार्गाने वाहून नेण्यात येतात. यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो तसेच ट्रकच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषणही कमी होते.\nभारतात रो-रो वाहतुकीची सुरुवात प्रथम कोकण रेल्वे मार्गावर झाली.\nशेवटचा बदल २७ मार्च २०२२ तारखेला २३:०२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०२२ रोजी २३:०२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/28271/", "date_download": "2022-10-07T23:08:27Z", "digest": "sha1:IQP4WKJWJGRYQGB43L7GZX4J373XYTIX", "length": 23512, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मंगलोर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमंगलोर : कर्नाटक राज्यातील दक्षिण कानडा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व भारतातील एक प्रमुख बंदर. लोकसंख्या १,९३,२३९ उपनगरांसह ३,०५,५१३ (१९८१). हे नेत्रावती आणि गुरुपूर या नद्यांच्या दुबेळक्यात वसले असून त्याच्या दक्षिण-पश्चिम बाजू नदीपात्रांनी वेढलेल्या आहेत. पाच किमी. लांबीच्या वाळूच्या दांड्यामुळे अरबी समुद्रावरील या बंदराला सुरक्षितता लाभली आहे. हा वाळूचा दांडा दक्षिणेस खंडित झाला असून तेथूनच अरबी समुद्रातील जाहाजे गुरुपूर नदीद्वारे बंदरात प्रवेश करतात. बंदरापासून ९ किमी. आतपर्यंत मोठी जहाजे येऊ शकतात. शहराच्या परिसरात नारळी-पोफळीच्या बागा आहेत. १९७१ पासून डेरेबेल, कंकनडी, सोमेश्वर व उल्लाल या नगरांचाही समावेश या शहरातच करण्यात आला असून हे एक औद्योगिक, व्यापारी व शैक्षणिक केंद्र बनले आहे. १८९६ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली.\nमंदेगोरा, मगनूर, मंगरौथ नित्रिअस ही मंगलोरची, यूरोपीय ग्रंथातील प्राचीन नावे होत. इ.स सातव्या शतकातील ‘मरतूरु’ ताम्रपटात या स्थळाचा ‘मंगलपुरा’ (मंगल-किल्ला) असा उल्लेख मिळतो. मंगलोर हे नाव मंगलादेवी मंदिरावरून पडले असावे आणि मंदिराचे नाव इ.स. दहाव्या शतकात येथे वास्तव्य असलेल्या राणी मंगलादेवीवरून पडले असावे. गुरुराज भट यांच्या मते हे ठिकाण राजकीय व सैनिकी दृष्ट्या महत्त्वाचे असल्यामुळे याला हे नाव पडले असावे. ‘कूडल’ (दोन नद्यांचे संगमस्थान) हे याचे स्थानिक नाव होय.\nतेराव्या शतकात ही आलूप वंशाची राजधानी होती. चौदाव्या शतकात इराणच्या आखातावरील बंदरांशी मंगलोरचा मोठा व्यापार चालत असे. १३४२ मध्ये इब्न बतूता, १४४८ मध्ये अब्दुररझ्झाक (इराणचा राजदूत), १४९८ मध्ये वास्को द गामा व १५१४ मध्ये दुआ बार्बोसा (पोर्तगीज प्रवासी) यांनी मंगलोरला भेटी दिल्या. विजयानगरच्या राजाने पोर्तुगीजांना येथील नदीच्या मुखाशी किल्ला बांधण्यास परवानगी दिली होती (१५०५). १५२६ मध्ये हे शहर पोर्तुगीजांनी घेतले व त्यांनीच १५४७ मध्ये उजाड करून टाकले. १५५५ मध्ये शहराची पुनर्रचना करण्यात आली व त्यानंतर पुन्हा ते जाळण्यात आले. १६७० मध्ये पोर्तुगीजांना मंगलोरमध्ये वखार उभारण्यास बिदनूरच्या नायकांनी परवानगी दिली. अरबी व्यापाऱ्यांना मंगलोरमध्ये व्यापार करण्यास बंधने घातल्याने १६९५ मध्ये अरबांनी मंगलोर जाळून टाकले. अठराव्या शतकाच्या पहिल्या दशकात बिदनूरच्या नायकांनी पोर्तुगीजांना मंगलोरबाहेर घालविले परंतु पुन्हा १७१४ मध्ये त्यांना कारखाना उभारण्यास परवानगी दिली. १७६३ मध्ये हैदर अलीने मंगलोर घेऊन तेथे गोदी व दारूगोळा कारखान्याची उभारणी केली. १७६८ मध्ये हे शहर ब्रिटिशांनी घेऊन लगेचच सोडून दिले व १७९१ मध्ये पुन्हा घेतले. १७९४ मध्ये टिपू सुलतानाने ते जिंकले. त्याच्या हुकमावरून तेथील किल्लाही पाडून शेवटी १७९९ मध्ये ते ब्रिटिशांच्या ताब्यात आले. कूर्ग बंडाच्या काळात (१८३७) मंगलोरमध्ये घुसलेल्य बंडखोरांनी ब्रिटीशांची शासकीय कार्यालये पेटवून दिली तथापि हे बंड त्वरित मोडून काढण्यात आले.\nमंगलोरच्या पश्चिमेस घाटमाथ्यापर्यंत लोह व मँगॅनीजचे साठे आहेत. औद्योगिक दृष्ट्या हे शहर महत्त्वाचे असून येथील ‘मंगलोरी कौले’ भारतभर प्रसिद्ध आहेत. याशिवाय हातमाग व सुती कापड उद्योग, मातीची भांडी, कॉफी आणि काजू, मत्स्योद्योग, जहाजनिर्मिती यांसाठीही मंगलोर प्रसिद्ध आहे. उल्लाल हे उपनगर तयार कपडे व काथ्याच्या वस्तुनिर्मितीसाठी विशेष महत्त्वाचे आहे. काजू निर्यातीच्या बाबतीत तर मंगलोर बंदराची जगात ख्याती आहे. यांशिवाय चंदनाचे लाकूड, मासे व माशांचे खत, कॉफी, मिरी, मातीची भांडी, कौले या येथील प्रमुख निर्यातवस्तू होत. या विभागातील रस्त्यांचे हे प्रमुख केंद्र असून पश्चिम घाटाच्या पायथ्याचे दक्षिण लोहमार्गावरील हे अंतिम स्थानक आहे. हसन-मंगलोर हा मीटरमापी लोहमार्ग तयार करण्यात आला आहे. मुंबई, बंगलोर, पणजी या ठिकाणांशी येथून हवाई वाहतूक चालते. येथे पाण्याची लहान–मोठी अनेक कुंडे व जवळच एक छोटासा धबधबा आहे. डीझेलवर चालणाऱ्या विद्युत् शक्ती उत्पादन केंद्राद्वारे शहराला वीजपुरवठा केला जातो. येथे नऊ तलाव असून त्यांना नैसर्गिक झऱ्यांपसून पाणीपुरवठा होतो. येथील खडकांमध्ये असलेल्या गुहा चुकीने पांडवकालीन समजल्या जातात.\nशहरात चार किल्ले, टिपू सुलतानाने वांघलेला टेहळणी बुरूज, अनेक मंदिरे मठ, चर्च, मशिदी, मैदाने व उद्याने आहेत. येथील नवीन मंगलोर विद्यापीठ १९८० मध्ये स्थापन झाले असून स्त्रीशिक्षणावर विशेष भर देण्यात आलेला आहे. शहारच्या मध्यभागी असलेल्या ‘बावटा गुड्डा’ टेकडीवर जुने दीपगृह असून १९०० मध्ये येथे नवीन दीपगृहाची बांधणी करण्यात आली. तेथील सेंट ॲलोइशस चर्च प्रेक्षणीय आहे. त्याच्या छतावर व भिंतींवर बायबलमधील कथाप्रसंग सुंदर रीतीने रेखाटले आहेत. मंगलोरमध्ये हिंदूंबरोबरच ख्रिश्चन व मुस्लिम लोकांची संख्याही बरीच आहे. येथे कोकणी भाषेचा बराच प्रभाव आढळतो. [⟶बंदरे].\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postमंडलिक, विश्वनाथ नारायण\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/entertainment/the-new-song-manike-from-the-movie-thank-god-has-been-released-today", "date_download": "2022-10-07T23:08:38Z", "digest": "sha1:PTCSEWSTJFO6DXAEILL3TYJBUMCDIIVU", "length": 6752, "nlines": 63, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Thank God Song | नोरा-सिद्धार्थच्या बोल्ड केमिस्ट्रीने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडिओ", "raw_content": "\nThank God Song : नोरा-सिद्धार्थच्या बोल्ड केमिस्ट्रीने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडिओ\n'थँक गॉड' चित्रपटातील 'माणिके' हे नवीन गाणे आज रिलीज झाले आहे.\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nमुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) , अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग यांचा मल्टीस्टार चित्रपट 'थँक गॉड' (Thank God) मधील 'माणिके' हे नवीन गाणे आज रिलीज झाले आहे, जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नोरा फतेही आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचा बोल्ड स्टाइल डान्स पाहायला मिळत आहे. हे गाणे रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.\nUpcoming Marathi Movies: आगामी वर्षात प्रेक्षकांसाठी खास भेट; वेगवेगळ्या धाटणीच्या सात चित्रपटांची घोषणा\nनुकतेच 'थँक गॉड' चित्रपटातील 'माणिके' हे गाणे रिलीज झाले आहे, हे गाणं टी-सीरीजने आपल्या यूट्यूब चॅनलवरून शेअर केले आहे. हे नवीन गाणे रिलीज होताच शोषल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्ह्यराल होतं आहे. नोरा फतेही (Nora Fatehi) आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या डान्स मूव्हने लोकांची मने जिंकली आहेत. नोराचा किलर डान्स आणि व्हिडीओमधला लूक पाहून तुम्हीही तिच्यासाठी वेडे व्हाल. नोरासोबत सिद्धार्थ मल्होत्राची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. नेहमीप्रमाणेच नोराने यावेळीही आपल्या स्टाईलने या गाण्यांमध्ये चारचांद लावले आहेत.\n\" लाजणाऱ्या फोटोग्राफरमुळे उर्फी जावेद का होतेय ट्रोल\nसुरिया रंगनाथन, योहानी आणि जुबिन नौटियाल यांनी 'माणिके' गाण्याला आपला आवाज दिला आहे. गाण्याचे बोल रश्मी विराग आणि दुलांजा आल्विस यांनी लिहिले आहेत. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​'अयान'ची भूमिका साकारत आहे, तर अजय देवगण 'चित्रगुप्त'च्या भूमिकेत दिसणार आहे.\nकाही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, हा ट्रेलर खूपच मनोरंजक असल्याचे प्रेक्षक सांगत आहेत. याशिवाय रकुल प्रीत सिंह सिद्धार्थ मल्होत्राची पत्नी आणि पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. 'थँक गॉड' पुढील महिन्यात म्हणजेच २५ ऑक्टोबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/amit-shah-wants-to-keep-control-of-bihar-government-in-his-hands-au29-778618.html", "date_download": "2022-10-07T23:06:14Z", "digest": "sha1:6SB62YZ4F7W5G34ONXE4RYRIFDEWKRQJ", "length": 18586, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nCM Nitish Kumar : अमित शहांना बिहारचा रिमोट कंट्रोल हवाय; नितीश कुमार आणि भाजपमधील बेबनाव समजून घ्या 10 मुद्द्यात\nCM Nitish Kumar : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांचा सर्व राग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आहे. अमित शहा यांना बिहार सरकारचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात हवा आहे. त्यामुळे नितीश कुमार नाराज आहेत.\nपाटणा: मुख्यमंत्री नितीश कुमार (nitish kumar) आणि भाजपमध्ये (BJP) तू तू मै मै सुरू झाल्याने बिहारमध्ये राजकीय संकट घोंघावत आहे. नितीश कुमार आता भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. आरजेडी, डावे आणि काँग्रेससोबत नवी आघाडी करण्याच्या त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. एवढेच नव्हे तर नितीश कुमार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने भाजपच्या तंबूत खळबळ उडाली आहे. उद्या 9 ऑगस्ट रोजी जेडीयूने (JDU) आपल्या खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. ही बैठक राजधानी पाटणा येथे होणार आहे. स्वत: मुख्यमंत्री नितीश कुमार या बैठकीला संबोधित करणार आहेत. यावेळी जेडीयू मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार भाजपशी जुळवून घ्यायला तयार नाहीत. उद्या ते आपला निर्णय जाहीर करतील. भाजपचे गृहमंत्री अमित शहा यांना बिहारचा संपूर्ण कंट्रोल आपल्या हाती हवा आहे. त्यामुळे जेडीयूत फूट पाडली जात आहे, असा आरोपही होऊ लागला आहे. मात्र, त्यात किती तथ्य आहे, यावर टाकलेला हा प्रकाश.\nBihar Politics : बिहारमध्ये एनडीएतून नितीशकुमार बाहेर पडले तर भाजपाकडे 2024 साठी काय आहे डॅमेज कंट्रोल प्लॅन\nCM Nitish Kumar: फारकतीपूर्वी फॉर्म्युला तयार, नितीशकुमारांकडे मुख्यमंत्रीपद, तर आरजेडीला विधानसभा अध्यक्ष, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद\nCM Nitish Kumar : महाराष्ट्र मिळवला, बिहार गमावणार नितीश कुमार भाजपची साथ सोडणार नितीश कुमार भाजपची साथ सोडणार; काँग्रेस-राजद आणि जेडीयू युतीची शक्यता\nमुख्यमंत्र्यांची पक्षावरील पकड कमी करण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप जेडीयूकडून करण्यात आला आहे. उद्या जेडीयूची महत्त्वाची बैठक होत आहे. ज्या आमदारांशी संपर्क साधून पक्ष बदण्याची ऑफर भाजपने दिली होती, अशा आमदारांना उद्याच्या बैठकीत जेडीयू सर्वांसमोर आणणार आहे.\nउपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तारकिशोर प्रसाद यांची नितीश कुमार यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी भाजप-जेडीयू संघर्षावर नितीश कुमार यांनी भाष्य केलं. यात काहीच गंभीर नाही, असं नितीश कुमार म्हणाले होते.\nमागच्या वर्षीच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप जेडीयूकडून भाजपवर केला जात आहे. तसेच भाजपने जेडीयू कार्यकर्त्यांचा अनादर केल्याचा आरोपही जेडीयूने केला आहे. तसेच येणाऱ्या काळात केवळ भाजपच राहील. प्रादेक्षिक पक्ष संपुष्टात येणार असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते. नड्डा यांच्या या विधानावरही जेडीयूने नाराजी व्यक्त केली आहे.\nमुख्यमंत्री आता शांत राहण्याच्या मूडमध्ये नाहीत, असं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. उद्या ते आपल्या आमदार आणि खासदारांसोबत बसून निर्णय घेणार आहेत. तर, आम्हाला मध्यावधी निवडणुका नकोत. त्यापेक्षा कुणाशी तरी आघाडी करून सरकार स्थापन करा, अशी मागणी जेडीयूच्या आमदारांनी नितीश कुमार यांच्याकडे केली आहे.\nतर, नितीश कुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यास तेजस्वी यादव नितीश कुमार यांना समर्थन देतील. राजद हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. राजद, जेडीयू, काँग्रेस आणि डाव्यांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केल्यास राज्याला नवं आणि मजबूत सरकार मिळणार आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांचा सर्व राग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आहे. अमित शहा यांना बिहार सरकारचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात हवा आहे. त्यामुळे नितीश कुमार नाराज आहेत. शहा यांच्या या कृतीचा विरोध दाखवण्यासाठीच नितीश कुमार यांनी पंतप्रधानांनी बोलावलेल्या अनेक बैठकांना गैरहजेरी लावली. काल नीती आयोगाची बैठक होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाचारण केलं होतं. पण नितीश कुमार या बैठकीला गेले नाही. त्यांनी पाटणा येथील सरकारी कार्यक्रमांना हजेरी लावली.\nबिहारमध्ये जे राजकीय संकट ओढवलं आहे, त्याला आरसीपी सिंह जबाबदार असल्याचं सांगितलं जाद आहे. आरसीपी सिंह यांनी शनिवारी जेडीयूला रामराम ठोकला. ते जेडीयूचे राज्यसभा खासदार होते. तसेच केंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्रीही होते. तिसऱ्यांदा त्यांना राज्यसभेवर पाठवलं गेलं नाही. त्यामुळे त्यांचे मंत्रिपदही गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा यांच्या इशाऱ्यावर आरसीपी सिंह हे जेडीयूमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याची कुणकुण नितीश कुमार यांना लागली होती.\nनितीश कुमार यांनी भाजपकडे काही मागण्या केल्या आहेत. केंद्रात अधिक मंत्रीपदे द्यावीत, गेल्यावेळी केवळ एकच मंत्रिपद दिलं होतं. बिहार विधानसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक एकत्रच व्हावी. लोकसभेनंतर बिहारची निवडणूक नको, तसेच बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार हेच भाजप-जेडीयू आघाडीचा चेहरा असावेत, आदी मागण्या नितीश कुमार यांनी भाजपला केल्या होत्या. त्यावर भाजपने कोणताही निर्णय घेतलेला नाही.\n2013पासून भाजप आणि नितीश कुमार यांची आघाडी आहे. परंतु, मधल्या काळात मोदींना भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपसोबतची आघाडी तोडली. त्यानंतर त्यांनी पुन्हा आरजेडी आणि काँग्रेसशी हातमिळवणी करून 2015ची निवडणूक जिंकली. मात्र, मधल्या काळात आरजेडीवर भ्रष्टाचाराचा आरोप करून नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडली. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपशी युती केली.\nउद्याच्या खासदार आणि आमदारांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत मोदींना कशी टक्कर द्यायची यावर चर्चा केली जाणार आहे. मोदींची लोकप्रियता अधिक आहे. त्यामुळे नितीश कुमार उद्या रणनीती तयार करण्याची शक्यता आहे. तसेच बिहारमध्ये भाजपने कुणाला मंत्रिपदे द्यावीत हे ठरवण्याचा अधिकारही आपल्याला मिळावा, असा नितीश कुमार यांचा आग्रह असल्याचं सांगितलं जातं.\nटू पीसमध्ये इलियाना डिक्रूझची हवा हवाई\n‘संस्कारी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीचे संस्कारी रूप\nनोरा फतेहीची रिवीलिंग जादू पाहिली का\nमौनी रॉयचा केसरिया रंग…. फोटोशूटसाठी पहा काय केलं\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mensxp.com/marathi/grooming/skin-care/93421-best-water-based-moisturizer-for-men-in-marathi.html", "date_download": "2022-10-07T22:23:46Z", "digest": "sha1:GARCT3NEIHHUGEJ7YIWJAZP3N2EECDNL", "length": 18911, "nlines": 106, "source_domain": "www.mensxp.com", "title": "5 वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर्स जे त्वचेचा तेलकटपणा करतील दूर | best water based moisturizer for men in marathi", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nजाहिरात द्याMensXP वर सेलआमच्याबद्दलसंपर्क साधा\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\n5 वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर्स जे त्वचेचा तेलकटपणा करतील दूर\n· 4 मिनिटांमध्ये वाचा\n5 वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर्स जे त्वचेचा तेलकटपणा करतील दूर\nआंघोळ केल्यानंतर तुम्ही काय लावता \nतेल, क्रीम, बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर. अर्थात, आंघोळीनंतर कोरडेपणा टाळण्यासाठी या सर्व गोष्टी तुम्ही वापरता. हिवाळ्याच्या काळात गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचे नैसर्गिक तेल म्हणजेच सीबम कमी होऊ लागते.\nकमी सीबममुळे त्वचेत कोरडेपणा किंवा ड्रायनेसची समस्या जाणवू लागते. ही समस्या टाळण्यासाठी मॉइश्चरायझर हा एक चांगला मार्ग आहे. पण हिवाळ्याचा हंगाम संपल्यानंतर उन्हाळा येताच त्वचेवरील मुरुमांची समस्या समोर येते.\nकाही लोकांना वयाच्या ३० व्या वर्षीही मुरुमे येतात. जास्त वय असलेल्या लोकांना आलेल्या मुरुमांच्या समस्यांना अडल्ट ऍक्ने म्हटले जाते. सामान्य मुरुमे किंवा अडल्ट ऍक्ने येण्याच्या समस्येमागे एक कारण तुमचे मॉइश्चरायझर पण असू शकते.\nहोय, त्वचेला कोरडे होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही ज्या मॉइश्चरायझरचा वापर करत होता, तेच मॉइश्चरायझर चुकीच्या पद्धतीने वापरल्यास मुरुमे देखील होऊ शकते. त्यामुळेच हिवाळ्यातील मॉइश्चरायझर वेगळे असण्याचे हेच कारण आहे. उन्हाळ्यातील मॉइश्चरायझर वेगळेच असावे.\nम्हणूनच, या लेखात, आम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या 5 पाण्यावर आधारित मॉइश्चरायझर्सची माहिती देणार आहोत. या मॉइश्चरायझर्सच्या वापरामुळे त्वचेला चिकटपणा आणि मुरुमांची समस्या जाणवत नाही.\nहेही वाचाः स्किन डिटॉक्स म्हणजे काय जाणून घ्या यासंबंधित महत्वाच्या गोष्टी\nवॉटर बेस्ड मॉइश्चरायझर्स म्हणजे काय (What Is Water Based Moisturizer\nउन्हाळ्यासाठी 5 बेस्ट वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर (Best Water Based Mens Moisturizers For Summer) :\nमामाअर्थ ऑइल फ्री मॉइश्चरायझर फॉर फेस (Mamaearth Oil-Free Moisturizer For Face)\nअर्बन बोटानिक्स ऑइल फ्री मॉइश्चरायझर फॉर फेस (Urban Botanicas Oil Free Moisturizer For Face)\nन्यूट्रोजेना ऑइल फ्री मॉइश्चर कॉम्बिनेशन स्किन मॉइश्चरायझर (Neutrogena Oil-Free Moisture Combination Skin Moisturizer)\nनीविया सॉफ्ट, लाइट मॉइश्चरायझिंग क्रीम (NIVEA Soft, Light Moisturizing Cream)\nवॉटर बेस्ड मॉइश्चरायझर्स म्हणजे काय (What Is Water Based Moisturizer\nपाण्यावर आधारित मॉइश्चरायझर्स मुळात तेलावर आधारित मॉइश्चरायझर्सचा पर्याय आहे. नावाप्रमाणेच या मॉइश्चरायझरचा बेस वॉटर आहे. याशिवाय, त्यात फक्त ओलावा शोषून घेणारी सामग्री वापरली जाते.\nपाण्यावर आधारित मॉइश्चरायझर्स त्वचेला बाहेरून ओलावा देण्याऐवजी आतून मॉइश्चराइझ करतात. या कारणामुळे, वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर लावल्यानंतर चेहऱ्यावर चिकटपणा येत नाही. हेच कारण आहे की, उन्हाळ्यात पाण्यावर आधारित मॉइश्चरायझर सर्वोत्तम मानले जातात.\nउन्हाळ्यासाठी 5 बेस्ट वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर (Best Water Based Men’s Moisturizers For Summer) :\nफाय इन द क्लियर सुपरलाइट मॉइश्चरायझर (PHY In The Clear Superlight Moisturizer) हे एक चांगले स्किन केअर प्रॉडक्ट आहे. हे पुरुषांच्या स्किनला अल्ट्रालाइट हायड्रेशन देते. हे लोशन असलेल्या मॉइश्चरायझरपेक्षा उत्कृष्ट आहे.\nत्याचा नियमित वापर मुरुमांची समस्या कमी करण्यास मदत करतो. त्याच्या वापरानंतर कमी घाम येतो. चेहऱ्यावर चिकटपणाची समस्या जाणवत नाही. याशिवाय, यामुळे त्वचा जास्त चमकदारही बनत नाही.\nया उत्पादनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते त्वचेमध्ये खोलवर शोषले जाते. ते त्वचेला चिकट न करता पोषण देते. हे रोमछिद्रे बंद करते आणि त्वचा बराच काळ ओलसर ठेवते.\nमामाअर्थ ऑयल फ्री मॉइश्चराइजर फॉर फेस (Mamaearth Oil-Free Moisturizer For Face) हे एक चांगले प्रॉडक्ट आहे. या प्रॉडक्टमध्ये ऍपल साइडर व्हिनेगरचे गुण आहेत. ऍपला साइडर व्हिनेगर स्किन स्वच्छ करण्याबरोबरच ओलावा देण्यासही मदत करते.\nहे प्रॉडक्ट नॉन कॉमेडोजेनिक आहे, त्यामुळे मुरुम येण्याची समस्याही मोठ्याप्रमाणात कमी होते. हे मुरुम कमी करते आणि त्वचेला खोलवर ओलावा देते. हे स्किनला चिकटपणा जाणवू देत नाही.\nहे उत्पादन पूर्णपणे नैसर्गिक साहित्याने बनवलेले आहे. हे टॉक्सिन फ्री असण्याबरोबरच सल्फेट्स, पॅराबेन, एलएलएस, मिनरल ऑइल, पेट्रोलियम आणि सुंगध मुक्त आहे. हे उत्पादन चांगले आणि किफायतशीर आहे\n3. अर्बन बोटानिक्स ऑइल फ्री मॉइश्चरायझर फॉर फेस (Urban Botanicas Oil Free Moisturizer For Face)\nअर्बन बोटानिक्स ऑयल फ्री मॉइश्चराइजर फॉर फेस (Urban Botanics Oil Free Moisturizer For Face) पूर्णपणे ऑइल फ्री मॉइश्चराइजर आहे. ऑइल फ्री सूत्रामुळे, ते त्वचेमध्ये त्वरीत शोषले जाते, ज्यामुळे त्वचा चमकदार दिसत नाही.\nहे उत्पादन नॉन कॉमेडोजेनिक देखील आहे, ज्यामुळे ते छिद्रांना चिकटत नाही. त्यामुळे रोमछिद्रे बंद होत नाहीत. मुरुमांची समस्या ही रोमछिद्रे बंद झाल्यामुळे निर्माण होते. हे स्किनला एक अद्भुत मॅट फिनिश शाइन देते.\nहेही वाचाः रेड क्ले म्हणजे काय आणि स्किनसाठी ते कसे आहे फायदेशीर\nहे उत्पादन हलके आणि चिकटविरहित आहे. हे त्वचेला 12 तास मॉइस्चराइज ठेवते. ते लावल्यानंतर ते त्वचेवर सहज सुकते. यामुळे सुरकुत्या कमी होतात. या उत्पादनात कडुनिंब आणि तुळशीचे गुणधर्म देखील आहेत जे त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.\n4. न्यूट्रोजेना ऑइल फ्री मॉइश्चर कॉम्बिनेशन स्किन मॉइश्चरायझर (Neutrogena Oil-Free Moisture Combination Skin Moisturizer)\nन्यूट्रोजेना ऑयल फ्री मॉइश्चर कॉम्बिनेशन स्किन मॉइश्चराइजर (Neutrogena Oil-Free Moisture Combination Skin Moisturizer) उत्कृष्ट स्किन केअर प्रॉडक्ट आहे. हे उत्पादन विशेषतः कॉम्बिनेशन स्किनसाठी डिझाइन केलेले आहे. पण ते तेलकट आणि कोरडी त्वचा असलेल्यांनाही वापरता येते.\nहे उत्पादन तेलकट त्वचा असलेल्या भागात चमक नियंत्रित करते. कोरड्या त्वचेला लावल्यानंतर, ते त्वचेला भरपूर आर्द्रता देखील देते. हे कोरियन स्किन केअर उत्पादन आहे, जे संपूर्ण जगातील सर्वोत्तम स्किन केअर उत्पादन मानले जाते.\nहे उत्पादन त्वचेवर लावल्यानंतर चिकटपणा जाणवत नाही आणि त्वचेवर लावल्यानंतर जास्त घाम येण्याची समस्या निर्माण होत नाही.\n5. नीविया सॉफ्ट, लाइट मॉइश्चरायझिंग क्रीम (NIVEA Soft, Light Moisturizing Cream)\nनीविया सॉफ्ट, लाइट मॉइश्चरायझिंग क्रीम (NIVEA Soft, Light Moisturising Cream) एक चांगले मॉइश्चरायझर आहे. हे उत्पादन उन्हाळ्यात लावणे सर्वोत्तम आहे. ते लावल्यानंतर कोणतीही चिकटपणा किंवा अस्वस्थता जाणवत नाही.\nहे अल्ट्रालाईट सूत्रावर आधारित असल्याने, हे उत्पादन केवळ सूर्यप्रकाशापासून संरक्षण करत नाही तर त्वचेला हलका ओलावा देखील प्रदान करते. या उत्पादनामध्ये थोड्या प्रमाणात सनस्क्रीन गुणधर्म देखील आहेत. त्याचे यूव्हीए आणि यूव्हीबी फिल्टर दोन्ही त्वचेचे पोषण आणि संरक्षण करतात.\nहे उत्पादन त्वचा मऊ आणि गुळगुळीत करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. हे पूर्णपणे पॅराबेन्स मुक्त आहे. यामुळे, यामुळे त्वचेवर कोणताही हानिकारक परिणाम होत नाही.\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%87/word", "date_download": "2022-10-07T23:22:09Z", "digest": "sha1:CRRJXYOQ5L2AGVKWYJIJYYMQEZFD2EFI", "length": 14252, "nlines": 161, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कोणाचा तिरस्‍कार करूं नये, कोणाची निंदा करूं नये - Dictionary Definition - TransLiteral Foundation", "raw_content": "\nकोणाचा तिरस्‍कार करूं नये, कोणाची निंदा करूं नये\nमराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | |\nकोणाचा तिरस्‍कार अथवा निंदा केल्‍यास तो आपला विनाकारण शत्रु होतो.\nकोणाचें वर्म काढूं नये कोणाचा तिरस्‍कार करूं नये, कोणाची निंदा करूं नये जीभ आस म्‍हणु नाकाक लाव नये हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये भात सोडावा पण सांथ सोडूं नये अधमाला हातांनीं भरवावें त्याच्या तोंडी लागूं नये सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये कांटे वइल्‍यानि रिते पायानि चमकूं नये आधी गुंतूं नये, मग कुंथू नये ज्‍याला पानाचें भय वाटतें, त्‍यानें वनांत जाऊं नये कांहीं बोलों नये ऐसें भांडणांत काय बोललें आणि दुष्काळांत काय खाल्लें हें आठवूं नये बागलाक येवंचो रुकु खिळी हाळतानें कातरं नये एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये जेविल्‍लेकडे दोनि येवजूं नये दहांचा हात दुष्मानावरहि पडूं नये शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये जन्म जरा दुःखें, यांशीं होऊं नये पारखें शरण आलेल्यास मरण चिंतूं नये तुळशीचे मुळांत कांदा लावूं नये एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये नांव सांगावें पण गांव सांगूं नये आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार जळांत राहून माशांशीं वैर करूं नये लहानाची उपेक्षा करुं नये डोळा काणा असावा, मुलूख काणा असूं नये ठेंगे मारूं, फत्ते करूं निंदा ज्‍याचे जवळ अर्थ आहे, त्‍याशीं मत्‍सर करूं नये कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये द्रव्याचिया कोटी नये गांडीची लंगोटी॥ रानांत बाभळ मातुं नये व गांवांत कोळी मातुं नये आपल्या बळें बांधावी कासं आणि कोणाची धरुं नये आस करूं जातां एक, घडून येतें विपरीत उद्योग उघडा करूं जाती, त्यांत लवून विघ्ने राहतीं लोकाचे दोन पैसे देणें, फेड करूं कशानें दहाच्या तोंडांत असावें पण एकाच्या दांतांत असूं नये माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये हातचें सोडून देऊन पळत्याच्या पाठीस लागूं नये अवघें एक स्थानीं, ठेवूं नये कदां मानी रडत्याच्या डावीकडे व शिवत्याच्या उजवीकडे बसूं नये मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये भात सोडावा साथ सोडूं नये एकटाच वीर उरला, कोणी नये सामन्याला लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी मी वक्ता म्हणून बसूं नये तक्ता कोणाचा कोण आणि पितळेचा होन तमाखूकी निंदा करे होय इसका सत्‍यानाश कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी\nअध्याय सातवा - समास चवथा\nअध्याय सातवा - समास चवथा\nलघुभागवत - अध्याय ३ रा\nलघुभागवत - अध्याय ३ रा\nदशक दुसरा - मूर्खलक्षणांचा\nदशक दुसरा - मूर्खलक्षणांचा\nलघुभागवत - अध्याय ६ वा\nलघुभागवत - अध्याय ६ वा\nशेतकर्‍याचा असूड - पान १६\nशेतकर्‍याचा असूड - पान १६\nलक्षणे - ४ ते ६\nलक्षणे - ४ ते ६\nशिवभारत - अध्याय बारावा\nशिवभारत - अध्याय बारावा\nतिरस्कार अलंकार - लक्षण १\nतिरस्कार अलंकार - लक्षण १\nस्त्रीशिक्षा - प्रकरण ३ रें\nस्त्रीशिक्षा - प्रकरण ३ रें\nप्रसंग चवथा - अशिष्‍य लक्षणें\nप्रसंग चवथा - अशिष्‍य लक्षणें\nदशक चौदावा - अखंडध्याननाम\nदशक चौदावा - अखंडध्याननाम\nसाईसच्चरित - अध्याय ४५ वा\nसाईसच्चरित - अध्याय ४५ वा\nकरुणासागर - पदे १५५१ ते १६००\nकरुणासागर - पदे १५५१ ते १६००\nपंचीकरणादी अभंग - ६ ते १०\nपंचीकरणादी अभंग - ६ ते १०\nप्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २४ वे\nप्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २४ वे\nआनुवंशिक वर्णपद्धतीविरुद्ध आणखी पुरावा\nआनुवंशिक वर्णपद्धतीविरुद्ध आणखी पुरावा\nपंचीकरण - अभंग ६ ते १०\nपंचीकरण - अभंग ६ ते १०\nग्रामगीता - अध्याय सातवा\nग्रामगीता - अध्याय सातवा\nसंत निर्मळांचे अभंग - अभंग १६ ते २०\nसंत निर्मळांचे अभंग - अभंग १६ ते २०\nस्कंध ११ वा - अध्याय २८ वा\nस्कंध ११ वा - अध्याय २८ वा\nश्री दत्त - जन्म - चरित्र\nश्री दत्त - जन्म - चरित्र\nकरुणासागर - पदे ४५१ ते ५००\nकरुणासागर - पदे ४५१ ते ५००\nग्रामगीता - अध्याय एकोणीसावा\nग्रामगीता - अध्याय एकोणीसावा\nश्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ५० वा\nश्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ५० वा\nलेश अलंकार - लक्षण १\nलेश अलंकार - लक्षण १\nसाईसच्चरित - अध्याय ३२ वा\nसाईसच्चरित - अध्याय ३२ वा\nकरुणासागर - पदे ११०१ ते ११५०\nकरुणासागर - पदे ११०१ ते ११५०\nलावणी ४६ वी - रात्रींतुन चारदां करुं नक...\nलावणी ४६ वी - रात्रींतुन चारदां करुं नक...\nदशक आठवा - मायोद्भवाचा\nदशक आठवा - मायोद्भवाचा\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २, ३\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २, ३\nसाईसच्चरित - अध्याय १९ वा\nसाईसच्चरित - अध्याय १९ वा\nग्रामगीता - अध्याय छत्तिसावा\nग्रामगीता - अध्याय छत्तिसावा\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७८\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७८\nकेशवचैतन्यकथातरु - अध्याय दुसरा\nकेशवचैतन्यकथातरु - अध्याय दुसरा\nपरिसंख्या अलंकार - लक्षण २\nपरिसंख्या अलंकार - लक्षण २\nस्फुट प्रकरणें - अभंग ५ वा\nस्फुट प्रकरणें - अभंग ५ वा\nश्री शंकराचार्य वंदना - अध्याय अठरावा\nश्री शंकराचार्य वंदना - अध्याय अठरावा\nस्त्रीशिक्षा - प्रकरण १ लें\nस्त्रीशिक्षा - प्रकरण १ लें\nस्फुट अभंग - वैराग्यशतक\nस्फुट अभंग - वैराग्यशतक\nखंड ३ - अध्याय २८\nखंड ३ - अध्याय २८\nसाधन मुक्तावलि - अभ्यास\nसाधन मुक्तावलि - अभ्यास\nसेवकधर्म - समास १\nसेवकधर्म - समास १\nप्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ११३ वे\nप्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ११३ वे\nपु. शरायणी गज ; जमीन मोजण्याचें माप .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/tag/mpsc-recruitment-2022/", "date_download": "2022-10-07T22:33:13Z", "digest": "sha1:O437MF7CXRF2ZURGFUPIS4QCIXZ7Y42Q", "length": 7400, "nlines": 61, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "MPSC Recruitment 2022 - Bharti jahirat", "raw_content": "\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC Technical Services Recruitment 2022 MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 378 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून...\nMPSC Group C Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2021 | 1695 जागा\nMPSC Group C Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2021 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 1695 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र...\nMPSC State Service Pre 2022 | महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 161 जागा\nMPSC State Service Pre 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे \"महाराष्ट्र राज्य सेवापूर्व परीक्षा 2022 चे 21 ऑगस्ट 2022 रोजी आयोजन करण्यात आले असून विविध...\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/throw-away-the-water-after-boiling-eggs-t/", "date_download": "2022-10-07T23:09:36Z", "digest": "sha1:R2TXL4RUIELRLXSKJGLLFQUZQYF7KMUP", "length": 5247, "nlines": 42, "source_domain": "mahaupdate.in", "title": "अंडी उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकून देताय? मग 'या' गोष्टी जाणून घ्या, होतील अनेक फायदे - Maha Update", "raw_content": "\nHome » अंडी उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकून देताय मग ‘या’ गोष्टी जाणून घ्या, होतील अनेक फायदे\nअंडी उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकून देताय मग ‘या’ गोष्टी जाणून घ्या, होतील अनेक फायदे\nतुम्ही आजपर्यंत अंडी खाण्याचे अनेक फायदे ऐकले असतील, पण तुम्हाला माहित आहे का की फक्त अंडीच नाही तर त्यांना उकळण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी देखील खूप फायदेशीर आहे.\nऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. फक्त अंडीच नाही तर त्याची साल आणि ते उकळण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी वापरून तुम्ही तुमच्या अनेक समस्यांवर मात कशी करू शकता ते जाणून घ्या.\nउकडलेल्या अंड्यातील उरलेल्या पाण्याचे फायदे-\nअंड्याच्या कवचामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि सोडियमचे प्रमाण पुरेसे असते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही अंडे उकळता तेव्हा हे घटक पाण्यात मिसळतात. हे सर्व घटक वनस्पतींसाठी खूप फायदेशीर आहेत. वनस्पतींना त्यांच्या पेशींच्या विकासासाठी या सर्व घटकांची आवश्यकता असते.\nउकडलेले अंड्याचे पाणी किंवा अंड्याचे कवच झाडांसाठी खत म्हणून काम करतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात याची पुष्टी झाली आहे. हा अभ्यास हॅमिल्टनच्या मास्टर्स गार्डनर यांनी प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासाच्या अहवालानुसार, तुम्ही ज्या पाण्यात अंडी उकळता. त्या पाण्यात अंडी उकळल्यानंतर अंड्यातील काही पोषक घटक येतात, जे झाडांसाठी खत म्हणून काम करतात.\nअंडी उकडलेले पाणी अशा वनस्पतींसाठी खूप फायदेशीर आहे जे सूर्यप्रकाशाअभावी अनेकदा खराब होतात. हे पाणी विशेषतः टोमॅटो आणि मिरचीच्या झाडांसाठी उपयुक्त आहे.\nतांब्यापासून काचेपर्यंत भांड्यातील पाणी प्यायल्याने आरोग्याला होतात ‘हे’ फायदे; जाणून घ्या फायदे\nसकाळी रिकाम्यापोटी प्या काळ्या मनुक्याचे पाणी, रोजच्या सेवनाचे फायदे जाणून चकित व्हाल\nतांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00030441-EXB-S8V750J.html", "date_download": "2022-10-07T21:46:05Z", "digest": "sha1:XJGD6WI3OAY7UJCAH6XILM4ZPAMY5Y4H", "length": 14431, "nlines": 300, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "EXB-S8V750J | Panasonic | अॅरे/नेटवर्क प्रतिरोधक | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर EXB-S8V750J Panasonic खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये EXB-S8V750J चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. EXB-S8V750J साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/ajit-pawar-mocks-sanjay-bangar-on-slapping-mid-day-meal-maneger-pmw-88-3074494/", "date_download": "2022-10-07T23:02:53Z", "digest": "sha1:RCUZBG6DAAJDEEPZBNHRGDI4X5KP46JF", "length": 22405, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ajit pawar mocks sanjay bangar on slapping mid day meal maneger | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\n“आता त्यांच्या आमदारांसारखं कुणाला मारायला उठू का” पत्रकार परिषदेत अजित पवारांचा मिश्किल टोला\nअजित पवार म्हणतात, “सत्तेची मस्ती डोक्यात गेली आहे का\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nअजित पवारांची राज्य सरकारवर टीका\nराज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा मिश्किल आणि हजरजबाबी स्वभाव सर्वश्रुत आहे. काही वेळा अजित पवार आपल्या अशा हजरजबाबी विधानांमुळे अडचणीत देखील सापडल्याची उदाहरणं दिसून येतात. मात्र, बहुतेक वेळा अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकल्याचं पाहायला मिळतं. मग ती एखादी पत्रकार परिषद असो किंवा एखाद्या राजकीय कार्यक्रमाचा मंच असो. उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार बोलत असताना अशाच एका प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकवून गेलं\nअजित पवार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते या भूमिकेतून आज विरोधकांची बाजू पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर टीका केली. तसेच, त्यांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेताना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित शासकीय चहापानावर विरोधक बहिष्कार टाकत असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं.\n“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला\nShinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\n“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप\nसंतोष बांगर प्रकरणावरून अजित पवारांनी सुनावलं\nदरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी संतोष बांगर प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केलं. संतोष बांगर यांनी सोमवारी हिंगोलीतील एका मध्यान्न भोजन केंद्रावरील निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा मुद्दा उपस्थित करत संबंधित केंद्राच्या व्यवस्थापकालाच कानशिलात लगावली. तसेच, “मला टीकेची पर्वा नाही, लोकांसाठी कायदा हातात घ्यायला मी तयार आहे”, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर “सत्तेची मस्ती डोक्यात गेली आहे का” असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांनी राज्य सरकारचे कान टोचले. संजय बांगर यांना देखील सुनावलं.\nअजित पवार म्हणतात, “धन्य आहे सगळं”\nयावेळी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. “शेतीच्या नुकसानाचे पंचनामे अनेक ठिकाणी प्रलंबित आहेत. विरोधी पक्ष कमकुवत असल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी एवढी वाट पाहावी लागत आहे का” असा प्रश्न एका पत्रकाराने उपस्थित करताच अजित पवारांनी त्यावर टोला लगावला.\nVideo : व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावल्यानंतर आमदार संतोष बांगर यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “तर कायदा…\n“तुम्हाला कुणी सांगितलं विरोधी पक्ष कमकुवत आहे त्यांच्यावर प्रभाव पाडायला आम्ही आता काय केलं पाहिजे त्यांच्यावर प्रभाव पाडायला आम्ही आता काय केलं पाहिजे त्यांच्या आमदारांसारखं कुणाला मारायला उठू का काय त्यांच्या आमदारांसारखं कुणाला मारायला उठू का काय अवघडच काम आहे. आम्ही सगळे बसलोय. भूमिका मांडतोय. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलोय. त्यांना निवेदन दिलंय. धन्य आहे सगळ”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nVande Mataram : ‘वंदे मातरम्’ वादावर रावसाहेब दानवेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आमच्या…”\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मेधाली, वैभवला सुवर्ण\nप्रो कबड्डी लीग : दबंग दिल्लीसमोर यू मुम्बाची हाराकिरी\nराष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा -विनोद तोमर\nभारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा\nकाँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका\nधनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण\nमध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०८ ऑक्टोबर २०२२\nपुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\nLow Uric Acid: यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होणे देखील ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ ५ गंभीर आजार\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\nपावसामुळे भातपीक कापणी लांबणीवर पडणार; पावसाचा जोर वाढल्यास पिकाला धोका, शेतकरी चिंतेत\nशिवसेना आणि काँग्रेसशी युतीसाठी प्रकाश आंबेडकर तयार\nकास महोत्सवाकडे पर्यटकांची पाठ\nदोन वर्षांपासून सरकार पाडण्याची तयारी सुरू होती म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…\nबडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारचा कारभार…”\nसातारा : मी माझा इतका प्रचार करत नाही, तितका ‘ते’ माझा प्रचार करतात, उदयनराजे कोणाबद्दल म्हणाले\nमिलिंद एकबोटेंचा राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप, म्हणाले “कत्तलखान्यातून दहशतवाद्यांना…”\n“पण एकनाथ शिंदेंच्या काय मनात आलं अन् एकदम…” ‘५० खोके एकदम ओके’ म्हणत अजित पवारांची तुफान टोलेबाजी\n“आगामी निवडणुकीत मुंबईतील २४ हजार कष्टकरी…”, गुणरत्न सदावर्तेंची मुंबईत मोठी घोषणा\nMumbai Crime : मैत्रिणींच्या मदतीने पत्नीने पतीच्या प्रेयसीला संपवले, मृतदेहाची विल्हेवाट लावतानाचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद\nपावसामुळे भातपीक कापणी लांबणीवर पडणार; पावसाचा जोर वाढल्यास पिकाला धोका, शेतकरी चिंतेत\nशिवसेना आणि काँग्रेसशी युतीसाठी प्रकाश आंबेडकर तयार\nकास महोत्सवाकडे पर्यटकांची पाठ\nदोन वर्षांपासून सरकार पाडण्याची तयारी सुरू होती म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…\nबडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारचा कारभार…”\nसातारा : मी माझा इतका प्रचार करत नाही, तितका ‘ते’ माझा प्रचार करतात, उदयनराजे कोणाबद्दल म्हणाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B", "date_download": "2022-10-07T22:44:23Z", "digest": "sha1:3KRNG7QD4RJEMMMAIZ47ML4NH3YUXZJC", "length": 4593, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रफायेल त्रुहियो - विकिपीडिया", "raw_content": "\nरफायेल मोलिना-त्रुहियो (ऑक्टोबर २४, इ.स. १८९१ - मे २०, इ.स. १९६१)हा डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष होता.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nइ.स. १८९१ मधील जन्म\nइ.स. १९६१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०२० रोजी १८:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.insidemarathibooks.in/index.php/2020/04/08/tichi-katha-marathi-book-review/", "date_download": "2022-10-07T22:48:39Z", "digest": "sha1:DH7D37JZNPJ753TMLIKR4CCO5ITPFRSX", "length": 11583, "nlines": 173, "source_domain": "www.insidemarathibooks.in", "title": "तिची कथा - Tichi Katha Marathi Book Review - Inside Marathi Books", "raw_content": "\n|| माझिया मराठीची बोलू किती कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके ||\nसंपादन – मंगला आठलेकर\nप्रकाशन – राजहंस प्रकाशन\nमूल्यांकन – ४ | ५\n‘तिची कथा’ म्हणजे नक्की कोणा एकट्या स्त्री ची नव्हे तर जगभरात विविध रूपात, वेशात, क्षेत्रात वावरणाऱ्या त्या प्रत्येक स्त्री ची. मी ११-१२वी मध्ये असताना हे पुस्तक वाचलं आणि अशाही गोष्टी असू शकतात हे मला तेव्हा जाणवलं. ११ कथा, ११ वेगवेगळ्या स्त्रिया हे समीकरण असलेलं हे एक सुंदर पुस्तक. ११ लेखक माफ करा ‘लेखिका’ ह्यांनी ह्या कथा मांडल्या आहेत आणि एक स्त्री एका स्त्री च्या भावना समजू शकते हे यातून चांगलंच सिद्ध होत.\nएक स्त्री तिच्या कठीण काळात सर्वात शक्तिशाली असते याची काही पौराणिक उदाहरणं आपल्याकडे आहेतच दुर्गा माता, महिषासुरमर्दिनी इ. पण त्याची आधुनिक मांडणी या पुस्तकात आहे. शिकलेल्या वा अशिक्षित, लग्न झालेल्या वा विधवा, लहान किंवा मोठ्या अशा सर्व स्त्रियांचा संघर्षाच्या गोष्टी यात प्रखरतेने मांडल्या आहेत.\nसंघर्ष म्हणलं कि अगदी युद्ध वगैरे नाही तर रोजच्या जीवनातला संघर्ष जो प्रत्येक स्त्री ला आज २१ व्या शतकात सुद्धा करावा लागतो. कोणाला काही सिद्ध कारायच म्हणून नाही, तर नुसतं साधं जीवन जगायचं म्हणून देखील. कदाचित यातल्या काही गोष्टी “आणि शेवट गोड होतो” ह्या पठडीतल्या नाहीत. म्हणून देखील हे पुस्तक उमेद ढासळवणारं, नसून जिद्द वाढवणारं आहे. प्रत्येक गोष्टीची जमेची बाजू मुख्य पात्र साकारलेली स्त्री आहे आणि त्या प्रेत्येकीकडून आपण काहींना काही शिकतो.\nनेहेमीच आवाज चढवून आणि उठवून बोलनं किंवा कसे पुरुष कमकुवत आहेत किंवा आपण च कशा श्रेष्ठ म्हटल कि त्याला ‘स्त्री – स्वाभिमान’ म्हणत नाहीत. कित्येक वेळा न बोलता सुद्धा स्त्री ला आपली बाजू व्यवस्थीत मांडता येते, किंवा आपल्या कृतीतून ती जगासमोर येते. हा एक मोठा संदेश हे पुस्तक नकळत देऊन जातं. यात श्रीमंत स्त्री ची कथा आहे, गरीब मुलीची आहे, एका आईची आहे, एका बायकोची आहे, एका प्रेयसीची आहे, एका मैत्रिणीची आहे आणि म्हणूनच आपल्यातली प्रत्येक स्त्री कुठेना कुठे एखाद्या पात्राशी सहमत होते एकरूप होते. शिक्षण झालं, लग्न झालं, मुलं झाली, त्यांची लग्न झाली म्हणजे आयुष्य संपलं असं नसतं हे मी खूप छान प्रकारे यातून शिकले.\n“स्त्री ला स्त्रीच समजू शकते”, म्हणून इतर कोणी तिला समजूनच घेत नाही असं नाही. आणि म्हणूनच यात काही गोष्टींमध्ये एक मित्र, एक नवरा, एक वडील, एक भाऊ कसे त्या नायिकांची जमेची बाजू असतात, हे देखील तितकच छान दाखवलेलं आहे. मुलांनी सुद्धा हे पुस्तक वाचल्यास, आपण आपल्या आयुष्यातील अनेक स्त्रियांविषयी कसा विचार करतो तो योग्य आहे का तो योग्य आहे का ह्याची एक उजळणी होण्यासारखे आहे. खूप वेळा आपल्याला मनातलं बोलायचं असतं, पण परिस्थिती माणसाला तसं बोलू देत नाही. आणि म्हणूनच अश्याप्रकारच्या पुस्तांकांचा आधार घेऊन आमापण ते जगासमोर मांडू शकतो. मी वाचून माझ्या विचारात एक स्त्री म्हणून, एक माणूस खूप बदल झाले तुम्हीही वाचा म्हणजे तुमच्याही आयुष्यात एक सुखद बदल व्हायला, वेळ लागणार नाही. मी नक्की सांगू शकते\nऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:\nअक्षरधारा वरून विकत घ्या\nहाऊ टू बी अ बाउस\nमराठी पुस्तकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा\nछत्रपती संभाजी – एक चिकित्सा\nसोशल नेटवर्कवर आमच्याशी कनेक्टेड राहा.\nवेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/kavita/5766/", "date_download": "2022-10-07T21:09:43Z", "digest": "sha1:6HCVVQFDJ6CQK3TTQ324UXT3NFD5NEDE", "length": 3549, "nlines": 99, "source_domain": "www.snopty.com", "title": "मृत्यु पाहिलेला माणूस - Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nहो मीच आहे मृत्यू पाहिलेला माणूस\nमाणसे रोज कितीदा तरी मरतात\nविषाणूने दाखवलेलं मरण मी पाहून आलो\nविषाणूला सांगितले अजून मला जगायचंय\nअजून मला भरपूर लिहायचंय, वाचायचंय\nअजून मला पहायचंय मनांच सौंदर्य\nमला ऐकायचंय निसर्गाचे संगीत\nअजून मला संवाद साधायचा आहे\nआपल्या मनांशी, आपल्या माणसांशी\nओठापर्यंत आलेलं व्यक्त करायचं आहे\nतरी जीवन जगू दे\nजाणिवेतलं नेणिवेत जगायचे आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/love/5740/", "date_download": "2022-10-07T21:32:09Z", "digest": "sha1:3AW3PVNBFUQER4Y7LPTY7WVTX6EXDEGK", "length": 12876, "nlines": 107, "source_domain": "www.snopty.com", "title": "तुम न जाने किस जहाँ में खो गये... - Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nतुम न जाने किस जहाँ में खो गये…\nतुम न जाने किस जहाँ में खों गये\nहम अकेले तन्हा रहे गयें…\nसमोर असणारी माणसें हरवतात, काही तात्पुरती काही कायमचं जातात का\nजें जायला पाहिजे ते जात नाहीत. छळणारेंच छळतअसतात. तेच छळंतच राहतात. सगळ्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण होत नाही.\nमाणसे जातात म्हणजे आपल्याला आत्मनिर्भर करून जातात. अस्तित्वासाठी कात टाकल्या प्रमाणे माणसांना सोडावं लागतं.\nतेरा जना दिल कें अर्मानोंका लुट जानांच अस्तं.\nथांब माझ्या लेकराला न्हाऊं घालू दें म्हणंत अनेकांनी आपलं पोषण केलेलं असतं.\nमाणसें ठसा उमटवून जातात माणसे वसा देऊन जातात. माणसें पाऊल वाट निर्माण करतात.\nमाणसें प्रेम करतात, माणसें द्वेष करतात. माणसे जाळतात, माणसे जळतांत. माणसे अनंत असतात, अनंत स्वभावाची असतात, शेवटी अनंतातच विलीन होतात. एखाद्याचं काही जणांच्या असण्यानें जीवन समृद्ध होतं. भरलेलं वाटतं.त्यांच जाणं सहनंच होत नाही.\nमिनाकुमारी गेलीं की दर्द भरी दास्तां आठवतें. विजय तेंडुलकर गेले की जीवनातलं नाट्य आठवतं. दिवाकर गेले की नाट्यछटा आठवतात. पुलं की विनोद आठवतो. वपू गेले की वपुर्झा आठवतो. दुर्बोध कविता हल्ली दुर्मिळ झाली. त्यामुळे कवितेतच ग्रेस राहिला नाही.\nप्रत्येकाच्या एक पाऊस असतो, त्यांनी आपल्याला कधी ना कधी भिजवलेलं असतं. ज्या आठवणीत आपण भिजतों त्याच लक्षात राहतात. आठवणीच आपल्या लाला अंकुरित करतात, स्वतःतून उमलाला भाग पाडतात. माणसांचे फुलासारखं आहे़. उमललीं नाही की कोमेजून जातात. ऊमलण्याचे प्रसंग असतील तरच फुलें कोमेजत नाहीत. माणसांचेही असंच आहे. अनेकांच्या आठवणीनेच माणसें उमलतात,बहरतात.\nबाबा सारखा कल्पवृक्ष अनेकांनी आपल्या अंगणात लावलेला असतों. एखाद्याच्या जाण्याने जीवनातलं नाट्य संपतं, जीवनातलं संगीत सपतं, जीवनातला संवाद सपतो. ति येते आणिक जातें याच्यातच जीवनाचा सर्व आवाका असतो का समोर असणारी माणसें सापडत नाहीत.ओळखू येत नाहीत. ओळख दाखवत नाहीत. कुठे गेलीं लताची दर्द भरी गाणीं. तलत,के.एल सैगल दुःख देऊन हस्ते जखम देऊन गेले. जमा ईलाही हे सुगंधी जखमा देऊन गेले. सुरेश भटांनी जगण्यातलं छळणंअधोरेखित केलं. सरणावर सुटका होते हे जाणवून दिलं. कळतं सगळं पण वळण्यासाठी कुणीतरी\nहवं असतं. सगळेच हरवलें, हरवत चाललेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकायचे आहे. पावलावर पाऊल टाकले की रस्ता सुकर होतो. जाणाऱ्याने पाऊलवाट निर्माण करायची असतें. सामान्यांनी पाऊलवाटेवरून चालायच असतं. म्हणजे रस्ता चुकत नाही. गालीबचं दालन अजून आम्ही पूर्ण कुठें उघडलं आहे\nआपल्याकडे समृद्ध वारसा आहे याचा एक अभिमान असतो,तोच जगण्यासाठी पुरेसा असतो. कुणी न कुणी कोणासाठी तरी निमित्त असतं, जगण्यासाठी. माणसे गेली तरीही घडवून जातात.\nकाही पुस्तके नुस्तीच वाचायची काही नुसतिच करमणुकीसाठी, काही विरंगुळ्यासाठी काही, अभ्यासासाठी, काही निष्कर्षा साठी, काही चिंतन, मनन करण्यासाठी, काही पारायण करण्यासाठी. पुस्तकांची आणि माणसांची उपयुक्तता कधीच संपत नाही. पुस्तकें आणि माणसें सारखी सारखी वाचलीं पाहिजेत, नव्या संदर्भात. वाचाल तरंच घडांल\nएकलव्य व्हायची तयारी असली की द्रोणाचार्य भेटतांतच. अनुकरणानेच माणसें शिकतात. आपण निसर्गाचे अनुकरण करतों पैसे कुठे द्यावे लागतात\nदुसऱ्यांच्या विचारावर आचारांवर आपले पालनपोषण होते, पैसे कुठे द्यावे लागतात.\nमुळांसारखं गाभ्या पर्यंत जाता यायला हवं. खूप लोक गेलें. कुणी नक्षत्राचे चांदणं देऊन गेले, कुणी शरदाचे चांदणे देऊन गेले. प्रत्येकाचं देणंआपलं संचित असतं. वारसां नावाचा आरसांच आपल्याला जिवंत ठेवतो.\nआपला स्वयंमूल्यमापन करतो, आपल्याला प्रेरणा देतो.\nतुम्ही गेल्यावरच कळालें, आम्ही कुणाकडून शिकलो कसे शिकलो कोणी आम्हाला वाढविलें, आमचे अस्तित्व दखलपात्र तुम्हीच केलें, तुम्हीच आम्हालाओळख दिली. तुम्ही आणि तुमच्यासारखें दृष्य,अदृष्य ज्यांनी आम्हाला घडविलें. तुम्ही आज नसलां तरीही,\nसोहळा वैभव आहे, ते तुमचंच आहे. रक्तातून तर फार प्रचंड वाहतंच. अनुवंशिकतेचे झरे कधीच आटत नाहीत. त्यांना जिवंत ठेवणं आपलं काम आहे. निरीक्षणातूनही फार प्रचंड आपल्याला मिळतं.\nपूर्वजांचे हावभाव, हेवेदावें हातवारे, वागण्याची पद्धत, आवाज, विचार हे सगळं आपल्याला वारसा म्हणून मिळालेला असतं. वारसा समृद्ध असला तरीही आरसा प्रमाण मानायचा.सोडून गेलेल्यांच्या भांडवलावरंच आपण जगतों. अनेकांचा ठेवां आम्हाला अजून माहीतच नाही. समृद्ध संस्कृतीची अजून आमची ओळख तरी कुठें झाली आहे म्हणून तर miles to go before I sleep प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपली ही मूर्ती कोणाच्या तरी मन मंदिरात वास्तव्यं करावी अशी आपलीही इच्छा असते. हे सगळें ऋणानुबंधच तन्हां पासून आपल्या ला वाचतात.मग काळजी कशाला करायची\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशब्द….मुक्या भावनांना व्यक्त करणारे एक अस्त्र.\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82/word", "date_download": "2022-10-07T22:33:21Z", "digest": "sha1:L6RSQ4AIK5PNVBIVGW4HNT5EONIC2EPL", "length": 12216, "nlines": 161, "source_domain": "www.transliteral.org", "title": "एकावर एक अकरा होणें - Dictionary Definition - TransLiteral Foundation", "raw_content": "\nएकावर एक अकरा होणें\nमराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | |\n(गाडी इ.) अलथणें, पडणें.\nहोणें पाठ पोट सारखें होणें बभ्रा होणें ठिकर्‍या होणें अंगाची होळी होणें कानाचे कानवले होणें जघन्यता होणें दौलत होणें आसन जड होणें जीभ जड होणें नाकापेक्षां मोतीं जड होणें एक पायरी चुकणें, खालीं येऊन पडणें एक नन्ना म्हणती, आलें दुःख निवारती सरोसरोसर होणें ब्रह्मदेव होणें कडप होणें तडीवरचो एक मासो रांपणीच्या शंभर माशांपेक्षां बरो एकावर एक अकरा होणें एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये एक असतां बळी, शंभराचे कान पिळी मोरया होणें एक बाजी सबि पाजी, एक निजाम सब् हजाम पावणेबारा होणें एक वेळ गुवा माथँ मारच्या पैलीं, मागीर तांतू दोन आसात पिवळे होणें प्राण कंठांत गोळा होणें करळ होणें अंगाचें पाणीं होणें अन्नाचें पाणी होणें वाटोळें होणें पुर्वापाढा सुरु होणें एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो सो हाट एक ओटेका काठ एकल्याची एक वाट एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई शंभर काशीकर आणि एक नाशिककर एक डोसी ने सो जोशी शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं एक भय दोन जागा असतें वईवरुन अंबट होणें तांबडा होणें मुका मुलगा होणें मुका नातू होणें शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा तिळपापड होणें अंतडीकातडी एक असणें आगपाणी एक करणें एक कमावतो, दुसरा खातो अवघें एक स्थानीं, ठेवूं नये कदां मानी विनाशकाळीं विपरीत बुद्धि होणें\nसाधन मुक्तावलि - प्रकरण ४ थे\nसाधन मुक्तावलि - प्रकरण ४ थे\nलग्नाची गाणी - भानशी हात घालते\nलग्नाची गाणी - भानशी हात घालते\nप्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ८५ वे\nप्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ८५ वे\nसारस्वत चम्पू - सर्ग ६\nसारस्वत चम्पू - सर्ग ६\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - अथ ब्राम्हणलक्षण\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - अथ ब्राम्हणलक्षण\nतृतीय परिच्छेद - एकादशाहकृत्याचा निर्णय\nतृतीय परिच्छेद - एकादशाहकृत्याचा निर्णय\nलावणी ९७ वी - माशुक उभी रंगमहालीं, कधीं...\nलावणी ९७ वी - माशुक उभी रंगमहालीं, कधीं...\nलावणी ७४ वी - राजपुत्र अति चतुर आकाशीं ...\nलावणी ७४ वी - राजपुत्र अति चतुर आकाशीं ...\nरूपक अलंकार - लक्षण १३\nरूपक अलंकार - लक्षण १३\nकाशीखंड - अध्याय ६२ वा\nकाशीखंड - अध्याय ६२ वा\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nलावणी ८ वी - रूप जैसा ऐना, चकचकाट पाहु...\nलावणी ८ वी - रूप जैसा ऐना, चकचकाट पाहु...\nवानरी आणि तिची पोरे\nवानरी आणि तिची पोरे\nभगवंत - ऑक्टोबर १५\nभगवंत - ऑक्टोबर १५\nमूळस्तंभ - अध्याय २\nमूळस्तंभ - अध्याय २\nरूपक अलंकार - लक्षण १०\nरूपक अलंकार - लक्षण १०\nबृहत्संहिता - अध्याय २८\nबृहत्संहिता - अध्याय २८\nबृहत्संहिता - अध्याय ६\nबृहत्संहिता - अध्याय ६\nमध्यखंड - जीवसृष्टी युक्त मानी देह उत्पन्न\nमध्यखंड - जीवसृष्टी युक्त मानी देह उत्पन्न\nदत्तभक्त - ॐ श्रीदत्त, ठाकूर महाराज\nदत्तभक्त - ॐ श्रीदत्त, ठाकूर महाराज\nसंकेत कोश - संख्या ११\nसंकेत कोश - संख्या ११\nब्रम्हस्तुति - चरण ३ - भाग ३\nब्रम्हस्तुति - चरण ३ - भाग ३\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १६\nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\nतृतीयपरिच्छेद - ब्राह्मणांचें निमंत्रण\nतृतीयपरिच्छेद - ब्राह्मणांचें निमंत्रण\nकाशी खंड - अध्याय १६ वा\nकाशी खंड - अध्याय १६ वा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय दहावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय दहावा\nतिरस्कार अलंकार - लक्षण १\nतिरस्कार अलंकार - लक्षण १\nप्राणवहस्त्रोतस् - व्याधीचे स्वरूप\nप्राणवहस्त्रोतस् - व्याधीचे स्वरूप\nअध्याय ५२ वा - श्लोक ६ ते १०\nअध्याय ५२ वा - श्लोक ६ ते १०\nउपदेश - जनांस उपदेश २९\nउपदेश - जनांस उपदेश २९\nहरिविजय - अध्याय १२\nहरिविजय - अध्याय १२\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३५१ ते ४००\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३५१ ते ४००\nरक्तवहस्त्रोतस् - किलास कुष्ठ\nरक्तवहस्त्रोतस् - किलास कुष्ठ\nशेख महंमद चरित्र - भाग ३२\nशेख महंमद चरित्र - भाग ३२\nउल्लास अलंकार - लक्षण १\nउल्लास अलंकार - लक्षण १\nविरोधमूलक अलंकार - लक्षण १\nविरोधमूलक अलंकार - लक्षण १\n नजिकचा कुंभमेळा कोठे आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/11/blog-post_38.html", "date_download": "2022-10-07T21:33:16Z", "digest": "sha1:DSAOK2HIXTDYFISR7LYCCGRWFXVBWNNS", "length": 3873, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "वन प्लस म्युझिक फेस्टिव्हल | Gosip4U Digital Wing Of India वन प्लस म्युझिक फेस्टिव्हल - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome मनोरंजन वन प्लस म्युझिक फेस्टिव्हल\nवन प्लस म्युझिक फेस्टिव्हल\nआंतरराष्ट्रीय गायकांच्या मैफिलीचे आयोजन करण्यासाठी भारत नवीन आहे आणि मुंबईतील वन प्लस म्युझिक फेस्टिव्हलद्वारे टेक जायंट वन प्लस मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. जुलैमध्ये, त्यांनी महोत्सवाचा टीझर लाँच केला आणि तेव्हापासून प्रत्येकजण कलाकारांच्या यादीबद्दल उत्सुक आहे. दुआ लीपा आणि कॅटी पेरी ही दोन मोठी नावे त्यांनी शेवटी उघडली तेव्हा नेटिझन्स शांत होत आहेत.\nग्रॅमी-नामित गायिका, कॅटी पेरी यांनी ती तिच्या इंस्टाग्रामवर नेली आणि मोठी बातमी उघडकीस आली.\nतसेच दुआ लीपाची ही पहिली मैफिली आहे. तिने प्रवासी म्हणून यापूर्वीही भारत भेट दिली आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/tag/electrical-diploma-jobs/", "date_download": "2022-10-07T22:57:27Z", "digest": "sha1:BP7SIXDMY37CGLRQHTSBK37SJQ7DEBKO", "length": 8650, "nlines": 65, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "Electrical Diploma Jobs - Bharti jahirat", "raw_content": "\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nFCI Recruitment 2022 | भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती\nFCI Recruitment 2022 भारतीय अन्न महामंडळात विविध पदांच्या एकूण 5156 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 06...\nPCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे मध्ये 386 जागांसाठी भरती\nPCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे मध्ये विविध पदांच्या एकूण 386 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून...\nCochin Shipyard Recruitment 2022 | कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 13 जागांसाठी भरती\nCochin Shipyard Recruitment 2022| कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण 13 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक...\nNMDC Recruitment | नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 200 जागांसाठी भरती\nनॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये एकूण २०० रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 10 फेब्रुवारी 2022...\nइंडियन ऑईल मध्ये 137 जागांसाठी भरती\nइंडियन ऑईल तर्फे इंजिनिअरिंग असिस्टंट व टेक्निकल अटेंडंट पदाच्या एकूण १३७ रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार...\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/crime/young-married-couple-took-big-decision-in-himachal-pradesh-know-details-mhkd-764690.html", "date_download": "2022-10-07T23:25:21Z", "digest": "sha1:IX2I5ZWFERCBX6MSBUSGXWCGC7IPTTZ5", "length": 10238, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाराष्ट्रातील घटनेची हिमाचल प्रदेशमध्ये पुनरावृत्ती, युवा पती-पत्नीने उचललं टोकाचं पाऊल – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /क्राईम /\nमहाराष्ट्रातील घटनेची हिमाचल प्रदेशमध्ये पुनरावृत्ती, युवा पती-पत्नीने उचललं टोकाचं पाऊल\nमहाराष्ट्रातील घटनेची हिमाचल प्रदेशमध्ये पुनरावृत्ती, युवा पती-पत्नीने उचललं टोकाचं पाऊल\nविनोद आणि प्रितीच्या लग्नाला जेमतेम वर्ष झाले होते.\nविनोद आणि प्रितीच्या लग्नाला जेमतेम वर्ष झाले होते.\nघराबाहेर उभ्या असलेल्या बहिणींसमोर भावाला उडवलं; कार अपघाताचा थरारक Video\nInstagram च्या फॉलोअर्सवरुन घडला भयानक प्रकार, तरुणीने दिले चॅलेंज अन् दोघांचा..\nVIDEO- मोठ्याने पिपाणी वाजवणाऱ्यांची वाजली पुंगी; आता तोंडानेही आवाज निघणार नाही\nमहामुकाबल्यात हा खेळाडू पुन्हा डोकेदुखी ठरणार 12 मॅचमध्ये ठोकल्या 8 फिफ्टी\nहमीरपूर, 23 सप्टेंबर : महाराष्ट्रात एका दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. याठिकाणीही एका तरुण दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - मिळालेल्या माहितीनुसार, हमीरपूर जिल्ह्यातील भोरंज उपविभागातील बेहडविन गावात ही घटना घडली. पती-पत्नीने विषारी द्रव्य पित आत्महत्या केली. दोघे पती-पत्नी बेहडवी गावातीलच रहिवासी होते. प्रिती असे मृत पत्नीचे नाव आहे. तर विनोदकुमार विक्रम सिंह असे मृत तरुण पतीचे नाव आहे. विनोद कुमार हा राज्य विद्युत मंडळात सहकारी म्हणून कार्यरत होते. तसेच विनोद आणि प्रितीच्या लग्नाला जेमतेम वर्ष झाले होते. दोघांनी बुधवारी रात्री काही विषारी द्रव्य घेतले होते. यानंतर त्यांची प्रकृती खालावली. दोघांनीही विषारी द्रव्य घेतल्याचे नातेवाईकांच्या लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना भोरंज येथील शासकीय रुग्णालयात येथे दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचारानंतर त्यांना मेडिकल कॉलेज हमीरपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र, हमीरपूर वैद्यकीय महाविद्यालयातही त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी आयजीएमसी शिमला येथे पाठवण्यात आले. मात्र, तेथे गुरुवारी रात्री उशिरा रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन करून पती-पत्नीचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आत्महत्येमागील कारणांचा शोध सुरू केला आहे. तर दोघांनीही आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही, असे भोरंज पोलीस ठाण्याचे प्रभारी सूरम सिंह यांनी सांगितले. हेही वाचा - लग्नाच्या 6 महिन्यानंतर विवाहित तरुणीचं टोकाचं पाऊल, आईने मुलीच्या प्रियकरावर लावला हा आरोप महाराष्ट्रातही पती पत्नीची आत्महत्या - महाराष्ट्रात एका दाम्प्त्याने मूल होत नसल्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील वाई तालुक्यातील कणूर गावात घडली आहे. तानाजी राजपुरे आणि पत्नी पुजा राजपुरे अशी मृतांची नावं आहेत. या दोघांचा 10 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, 10 वर्षांच्या त्यांच्या संसाराचा अतिशय हृदयद्रावक अंत झाला आहे. लग्नाला दहा वर्ष होऊनही मूल होत नसल्याने दोघंही चिंतेत होते. मूल होत नसल्याने वैद्यकीय उपचारही सुरू होते. मात्र, त्यालाही यश आलं नाही. अखेर या दुःखातून त्यांनी हे पाऊल उचललं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/jio-plans-offer-31-days-validity-with-unlimited-calling-and-data-benefits/articleshow/93456841.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2022-10-07T22:02:11Z", "digest": "sha1:L4O6NQ7E3TGEPXMFWVT3VJX5HV2G7EWO", "length": 12916, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nValidity Plans: जिओच्या 'या' स्वस्त प्लान्समध्ये ३१ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग आणि 'हे' बेनिफिट्स मिळणार\nJio Plans: जिओने प्रीपेड टॅरिफ प्लॅनमध्ये काही स्वस्त रिचार्ज देखील समाविष्ट केले आहेत. जे ३१ दिवसांसाठी अधिक डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह अनेक सुविधा देतात. तुम्हीही Jio चे असेच प्लान शोधत असाल तर, ही विशेष माहिती तुमच्यासाठी.\nसोबत ३१ दिवसांची व्हॅलिडिटी सुद्धा\nनवी दिल्ली: Long validity Plans: भारतीय दूरसंचार बाजारपेठेतील सर्वात मोठी कंपनी Jio स्वस्त आणि बजेट रिचार्ज प्लान्सच्या बाबतीत इतर कंपन्यांच्या पुढे आहे. Jio ने आपल्या प्रीपेड टॅरिफ प्लानमध्ये युजर्सच्या गरजेनुसार काही स्वस्त रिचार्ज समाविष्ट केले आहेत. जे डेटा आणि ३१ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे देखील देतात. तुम्हीही Jio चे असेच प्लान शोधत असाल तर, ही विशेष माहिती तुमच्यासाठी आहे. आज आम्ही ३१ दिवसांची वैधता आणि अनलिमिटेड कॉलिंगसह येणार्‍या जिओच्या प्लाननबद्दल सविस्तर माहिती देणार आहो.\nवाचा: Top Smartphones : स्वस्तात मिळताहेत 6GB रॅमसह येणारे 'हे' स्मार्टफोन्स, फीचर्स महागड्या फोनसारखेच\nJio चा २९६ रुपयांचा प्लान :\nजर तुम्ही अनलिमिटेड कॉलिंगसह एका महिन्याच्या डेटा वैधतेचा प्लान शोधत असाल, तर Jio चा २९६ रुपयांचा प्रीपेड प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या प्लानमध्ये तुम्हाला एका महिन्याच्या वैधतेसह २५ GB डेटा मिळतो. यामध्ये एका महिन्यासाठी Jio वगळता सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० SMS मिळतात. यामध्ये सर्व जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे.\nवाचा: ऑनलाईन पेमेंटसाठी मोठ्या वापरले जाणारे QR Code नक्की आहे तरी काय कसे होते यावर काम, पाहा डिटेल्स\nJio चा २५९ रुपयांचा प्लान :\nजिओच्या या एका महिन्याच्या प्लानची किंमत २५९ रुपये आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज १.५ GB डेटा आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १०० SMS देखील मिळतात. या प्लानमध्येही इतर प्लॅनप्रमाणे जिओच्या सर्व अॅप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.\nतसेच, कंपनीकडे १५५ रुपयांचा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. ज्या लोकांना जास्त डेटाची गरज नाही व केवळ अनलिमिटेड कॉलिंग हवे असते , अशांसाठी हा प्लान चांगला आहे. परंतु, तुम्हाला जर जास्त डेटाची गरज पडत असेल तर, तुम्ही दुसऱ्या प्रीपेड प्लान्सचा विचार करू शकता. हा २८ दिवसांच्या वैधतेसह येणारा कंपनीचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान आहे.\n कोणती साईट देतेय स्मार्टफोनवर बेस्ट डील \nमहत्वाचे लेखWhatsApp मध्ये होणार मोठा बदल, या मेसेजचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nसिनेन्यूज विजय देवरकोंडा आणि रश्मिका लपत-छपत कुठे निघाले Video पाहून नेटकऱ्यांनी लावायचा तो अंदाज लावलाच\nइलेक्ट्रॉनिक्स 8GB रॅम आणि 10,090 mAh बॅटरी पावर असणाऱ्या या Samsung Tabs खरेदी करा आणि मिळवा ₹18000 इतका जबरदस्त डिस्काउंट\nआर्थिक राशीभविष्य आर्थिक राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२२ : जाणून घ्या उद्याचा दिवस कोणासाठी ठरेल धनप्राप्तीचा\nदेश काँग्रेस नेत्यानं हॉटेलमध्ये नेलं, मग सामूहिक अत्याचार केले, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर तिघांना अटक\nसिंधुदुर्ग उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे राहणारा आमदार चौकशीच्या फेऱ्यात, कोकणातल्या नेत्याला एसीबीची नोटीस\n जे लॉटरीचं तिकीट कचऱ्यात टाकलं, त्यानेच बनवले या महिलेला करोडोंची मालकीण\nमुंबई ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा ते दिघेंच्या मृत्यूचं ठाकरे कनेक्शन, मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज\nदेश ​देश हादरला... लग्न करण्यास नकार दिला, त्याने १९ वर्षीय मारुतीला पेट्रोल ओतून पेटवलं...​\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/leave-lok-sabha-expand-cabinet-ahead-of-it-manisha-kayande-slams-bjp-au124-777800.html", "date_download": "2022-10-07T23:15:16Z", "digest": "sha1:V4AJXDI4MVZ7IB4OSFAHOSAWT24P2JE7", "length": 13446, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nManisha Kayande : लोकसभा सोडा आगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार करा, मनीषा कायंदेंचा भाजपला टोला\nशिंदे गटातील आमदारांकडून रोज खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचे सांगितले जात आहे. अजून हे प्रकरण कोर्टात आहे. सध्या केवळ आमदारांच्या अपात्रतेबद्दल सुनावणी सुरु आहे. अजून शिवसेना कोणाची हा मुद्दाच समोर आलेला नाही. त्यामुळे शिंदे गटाला अजून शिवसेना पक्षाचा दर्जा मिळाला नसल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.\nशिवसेना नेत्या मनीषा कायंदे\nमुंबई : राज्यातील (Cabinet Expansion) मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न गेल्या 36 दिवसांपासून रखडलेला आहे. याबाबत (State Government) भाजप आणि शिंदे गटात एकमत होत नाहीत. त्यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. त्यामुळे (Lok Sabha Election) लोकसभेचे सोडा आगोदर मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न मार्गी लावा असा टोला शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी भाजपाला लगावलेला आहे. दुसरीकडे भाजप हे आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने पक्ष संघटनेवर भर देत आहे. त्याअनुशंगाने 9 केंद्रीय मंत्री हे राज्यात दाखल होणार असून 16 मतदार संघात ते वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहेत. त्या अनुशंगाने भाजपाची तयारी सुरु असतानाच कायंदे यांनी भाजपाला सुनावले आहे.\nशिंदे गट अजूनही एक गटच..\nशिंदे गटातील आमदारांकडून रोज खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचे सांगितले जात आहे. अजून हे प्रकरण कोर्टात आहे. सध्या केवळ आमदारांच्या अपात्रतेबद्दल सुनावणी सुरु आहे. अजून शिवसेना कोणाची हा मुद्दाच समोर आलेला नाही. त्यामुळे शिंदे गटाला अजून शिवसेना पक्षाचा दर्जा मिळाला नसल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. तर न्यायदेवतेवर आपला विश्वास असून सत्याचाच विजय होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.\nपिडीत महिलेचा पुनर्वसन व्हावे\nभंडारा – गोंदियातील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मेडिकल रुग्णालयात भेट घेतली. पीडितेवर नागपुरातील मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे प्रकरण फास्टक कोर्टात चालावावे शिवाय सदरील महिलेचे पूनर्वसन व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. मनीषा कायंदे म्हणाल्या, सामूहिक बलात्कार पीडितेला किंवा तिच्या नातेवाईकांना आम्ही भेटू नये अशा सूचना रुग्णालय प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या होत्या का अशी आम्हाला शंका वाटते. शिवसेनेतर्फे आम्हाला काही मदत निधी द्यायचे होती. तीसुद्धा आम्हाला पीडितेच्या कुटुंबीयांना देऊ दिली नाही. भेटीदरम्यान अनेक अडचणी आल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.\nMahadev Jankar : बारामतीवर भाजपचं लक्ष्य, 16 ते 18 ऑगस्टला अर्थमंत्री सीतारमण बारामतीत येणार, जानकरांनी सांगितली पवारांची स्ट्रॅटेजी\nAmit Thackeray : …तर मीही राजकारणात नसतो, नाशिकच्या दौऱ्यात अमित ठाकरे असं का म्हणाले\nCm Eknath Shinde : मोदींच्या मागे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत, फोटोवरून अमोल मिटकरींनी भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दिली\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत अपमान जयंत पाटील म्हणतात, दिल्लीचा दरबार मोदींचा; तर राष्ट्रपतींच्या शपथविधीला शिंदे मोदींच्या बाजुला, सामंतांचं उत्तर\nएकीकडे राज्यात सत्तापरिवर्तनामध्ये भाजप हा केंद्रबिंदू राहिलेला आहे. असे असतानाही दुसरीकडे पक्ष संघटनेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्याअनुशंगाने भाजपाचा मेगा प्लॅन सुरु असून पक्ष वाढीसाठी आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील 16 लोकसभा मतदार संघात 9 केंद्रीय मंत्री दाखल होणार आहेत.या दरम्यानच्या काळात धोरणात्मक बदल, स्थानिक पातळीवरील अडचणी, संघाटनात्मक कार्यक्रम, धार्मिक स्थळांना भेटी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असे कार्यक्रम नियोजित आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे 21 कार्यक्रम हे मंत्री मतदार संघात येणार आहेत.\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/astrology/daily-horoscope-of-17th-august-2022-rashibhavishya-in-marathi-horoscope-astrology-mhrashi-pch-747342.html", "date_download": "2022-10-07T21:19:37Z", "digest": "sha1:TPWJH5PUPYGNTK4QVLPAH4ZJ4JKMOR24", "length": 11934, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Daily Horoscope of 17th august 2022 rashibhavishya in marathi horoscope astrology mhrashi pch - Daily Horoscope: तुमच्या मौल्यवान गोष्टी आज ठेवा सांभाळून; दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /\nDaily Horoscope: तुमच्या मौल्यवान गोष्टी आज ठेवा सांभाळून; दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान\nDaily Horoscope: तुमच्या मौल्यवान गोष्टी आज ठेवा सांभाळून; दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान\nओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 17 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.\nओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 17 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.\nGold rate today : रुपया घसरला अन् सोनं महागलं; वाचा आजचे दर\nPetrol Diesel Rate : छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये बदलले पेट्रोल-डिझेलचे दर\nआर्थिक लाभ होतील पण प्रकृतीला जपा; सविस्तर वाचा आजचं राशिभविष्य\nदसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ; वाचा काय आहे आता नवीन भाव\nसितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 17 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)दुर्लक्ष तुम्हाला एखादं छोटंसं काम मिळेल; मात्र त्यातूनच पुढे मोठ्या संधी उपलब्ध होतील हे लक्षात घ्या. चांगल्या परफॉर्मन्सची चिंता सतावेल. आठवड्याच्या शेवटी कॅश फ्लो दिलासादायक असेल. LUCKY SIGN – A Canopy वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुम्ही एखाद्या गोष्टीशी सहमत नसाल, तर ती गोष्ट करू नका. एखादी नियोजित असाइनमेंट तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या आणखी जवळ नेईल. कामासाठी एखादी छोटीशी सहल होईल. LUCKY SIGN – A Jade Plant मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) एखाद्या नवीन व्यक्तीशी भेट होईल. त्या व्यक्तीवर तुमची छाप पडेल. तुम्ही योग्य खबरदारी घेतली नाही, तर एखादी मौल्यवान गोष्ट गमावून बसाल. सध्या अधिक सतर्क राहण्याची वेळ आहे. LUCKY SIGN – An Iron tower कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) एखादी आंतरराष्ट्रीय संधी चालून येईल किंवा एखाद्या क्लायंटकडून चांगली बातमी मिळेल. एखादं बहुप्रतीक्षित काम तुम्हाला मिळेल. प्रकृतीची एखादी समस्या उद्भवेल, ज्याकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे. LUCKY SIGN – A Cushion सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुम्ही ज्या गोष्टी पुढे ढकलत होतात, त्या आता वेळेपूर्वीच करण्याची गरज आहे. एखाद्या महत्त्वाच्या घरगुती गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं ठरेल. एखाद्या जवळच्या मित्राकडून चांगली बातमी मिळेल. LUCKY SIGN – Stripes कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) भरपूर अडथळ्यांमुळे तुमच्या कामाच्या गतीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे तुम्हाला एरव्हीपेक्षा अधिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. एखादं अडकलेलं पेमेंट मिळाल्यामुळे आनंदी असाल. LUCKY SIGN – A Coffee Outing तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकाऱ्याची तुमच्यापेक्षा अधिक चर्चा होईल; मात्र हे काही काळापुरतंच असेल. एखादा ऑनलाइन कोर्स किंवा ट्युटोरिअल कराल. आत्मविश्वास भरपूर राहील. LUCKY SIGN – A Rabbit वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) एखाद्या गुंतवणुकीमुळे चिंता वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची टीम तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगलं काम करील. घरातल्या एखाद्या व्यक्तीचा सल्ला गांभीर्याने घ्या. LUCKY SIGN – A football match धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) कामासाठी प्रवास घडेल. घरी काही अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्हाला सध्या दैनंदिन जीवनात ब्रेक घेणं गरजेचं आहे. त्यामुळे बाहेर फिरायचा जाण्याचा प्लॅन फायद्याचा ठरेल. LUCKY SIGN – A Solar Panel मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) एखाद्या गोष्टीसाठी तुमची तयारी अपूर्ण असेल, ज्यामुळे चिडचिड होईल. तुमच्या आवाक्याबाहेरचं उद्दिष्ट ठेवाल. तुमच्या इंडस्ट्रीमधली एखादी वरिष्ठ व्यक्ती अगदी मोलाचा सल्ला देईल. LUCKY SIGN – A Flower vase कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्हाला काही त्रासदायक व्यक्तींपासून दूर राहायचं असेल, तर त्यादृष्टीने प्रयत्न करा. तुमच्या मागे घडणाऱ्या काही गोष्टी त्रासदायक ठरू शकतात. तुमचं मन सांगेल ते ऐका. LUCKY SIGN – A Honeybee मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) एखादी व्यक्ती दूरवरून रोमँटिक पद्धतीने तुमचं कौतुक करत आहे. कामाच्या ठिकाणी वेगळा दृष्टिकोन ठेवल्यास प्रगती होईल. लवकरच भागीदारीची संधी प्राप्त होईल. LUCKY SIGN – A Turquoise Pottery\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.insidemarathibooks.in/index.php/2020/02/01/review-vaman-parat-na-aala-marathi-book/", "date_download": "2022-10-07T22:46:44Z", "digest": "sha1:PV2CI2JSUOUUP5SPUE6KN5HOZESXS2AA", "length": 10036, "nlines": 175, "source_domain": "www.insidemarathibooks.in", "title": "वामन परत न आला - Vaman Parat Na Aala Marathi Book Review", "raw_content": "\n|| माझिया मराठीची बोलू किती कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके ||\nवामन परत न आला\nby अक्षय सतीश गुधाटे\nलेखक – जयंत नारळीकर\nप्रकाशन – मौज प्रकाशन गृह\nमुल्यांकन – ४.३ | ५\nमराठी भाषा ही सर्व प्रकारे समृध्द आहे, यालाच एक पूरक अशी पावती देत एक अत्यंत हुशार आणि नावाजलेले वैज्ञानिक जयंत विष्णू नारळीकर यांनी मराठी भाषेला दिलेली काल्पनिक आणि विज्ञानासंबंधीची पुस्तके वाचणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. त्यांच्या या कार्याची मोल मराठी साहित्यात खूप अधिक आहे. मराठी साहित्यात अनेक प्रकार खूप मजबूत पणे हाताळले गेले आहेत त्यात विज्ञान आधारित लिखाण जरा कमीच पण ती कमी आपल्या मुक्त आणि विशिष्ट शैलीने डॉ. नारळीकर यांनी भरून काढली अस म्हणता येईल.\nपुस्तक काल्पनिक असल्यामुळे त्याचा आणि त्यातील पात्रांचा मेळ हे आजच्या वास्तववादी जगाशी मिळता जुळता असणे हा एक मोठा प्रश्न असतो, पण नारळीकरांनी मात्र त्यातील साऱ्या विविध गोष्टींची काळजी घेऊन हे काम उल्लेखनीय आणि उच्चप्रतीने पूर्ण केले आहे अस म्हणावं वाटतं.\nएकंदर बदलत्या कृत्रिम जगात वावरत असतानाची ही गोष्ट आहे. त्यातच मानवजातीच्या वाढत्या आशा अपेक्षा आणि त्यातच वावरत असताना एक कृत्रिम रोबोट ही गोष्ट पुढे नेतो. रोबोट सोबत पुढे जाणारी गोष्ट अनेक वळणं घेत पुस्तकातील अनेक रहस्यं उलघडत जाते त्याचसोबत त्यातली मजाही हळू हळू वाढत जाते. वाढत्या कृत्रिमतेचा भाव, आभाव, परिणाम, दुष्परिणाम या साऱ्यांनी तयार केलेले कुतूहल नक्कीच पुस्तकात गुंतवून ठेवते. विज्ञानाचा पाया आधीच भक्कम असल्यामुळे यातील अनेक गोष्टी काल्पनिक असूनदेखील खरच असल्याचा अनुभव देऊन जातात, त्यातील विनोदवादी विरंगुळा ही कायम राहतो. यामुळेच या पुस्तकातील थोडी अजून काहीतरी ची मजा टिकून राहते.\nमराठीतील हा एक वेगळा लिखाण प्रकार हाताळताना लेखकाची लेखणी वेगळी छाप सोडून जाते. नारळीकरांणी हाताळलेल्या पात्रांवर मानवाच्या स्वभावाचा तर आहेच परंतु, विज्ञानयुगात घडू शकतात अशा विविध घटांनाचा एक नकळत आणि अनपेक्षित असा प्रभाव आपल्याला मोहून टाकेल यात शंका नाही. हे सारं एका पुस्तकात जुळवून आणणं आणि त्यातील मूळ गाभा तसाच ठेऊन ते रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी लेखकाने घेतलेले कष्ट आणि त्याची मेहनत दिसून येते. सारी इत्यंभूत माहिती आपल्याला नारळीकरांचे अजून पुस्तक कोणते याचा शोध घ्यायला भाग पाडतील.\nऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:\nमराठी पुस्तकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा\nछत्रपती संभाजी – एक चिकित्सा\nसोशल नेटवर्कवर आमच्याशी कनेक्टेड राहा.\nवेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82/word", "date_download": "2022-10-07T22:44:43Z", "digest": "sha1:4FXI7OQMN5E4P4ARJO5R6JHIR35F3S2W", "length": 11314, "nlines": 161, "source_domain": "www.transliteral.org", "title": "तिळपापड होणें - Dictionary Definition - TransLiteral Foundation", "raw_content": "\nहोणें बभ्रा होणें पाठ पोट सारखें होणें फारकत होणें आगाजा होणें तंबी होणें ठिकर्‍या होणें नांव डहाळ होणें कडेलोट होणें कानाचे कानवले होणें अंगाची होळी होणें मट्टमाया होणें उजळ माथा (तोंड) होणें दौलत होणें जघन्यता होणें आसन जड होणें जीभ जड होणें नाकापेक्षां मोतीं जड होणें दारफळी होणें शहाणी होणें कणिक मऊ होणें रक्ष रक्ष होणें ब्रह्मदेव होणें कडप होणें सरोसरोसर होणें बावा होणें वारापाणी होणें पावणेबारा होणें मोरया होणें तिळपापड होणें रुई स्वस्त होणें अंगाचें पाणीं होणें अन्नाचें पाणी होणें करळ होणें पिवळे होणें प्राण कंठांत गोळा होणें पुर्वापाढा सुरु होणें वाटोळें होणें फूं होणें दांतांच्या कण्या, घुगर्‍या होणें हाडांचा चुरा होणें उखळ पांढरें होणें हाताचे लाडू होणें एकावर एक अकरा होणें विनाशकाळीं विपरीत बुद्धि होणें मुका मुलगा होणें मुका नातू होणें तांबडा होणें वईवरुन अंबट होणें गारद होणें\nतिरस्कार अलंकार - लक्षण १\nतिरस्कार अलंकार - लक्षण १\nरक्तवहस्त्रोतस् - किलास कुष्ठ\nरक्तवहस्त्रोतस् - किलास कुष्ठ\nविभावना अलंकार - लक्षण ४\nविभावना अलंकार - लक्षण ४\nविषम अलंकार - लक्षण ५\nविषम अलंकार - लक्षण ५\nरसवहस्त्रोतस् - लक्षणें व कारणें\nरसवहस्त्रोतस् - लक्षणें व कारणें\nविषम अलंकार - लक्षण ७\nविषम अलंकार - लक्षण ७\nउदाहरणालंकार - लक्षण ३\nउदाहरणालंकार - लक्षण ३\nविषम अलंकार - लक्षण ४\nविषम अलंकार - लक्षण ४\nअनोन्या अलंकार - लक्षण १\nअनोन्या अलंकार - लक्षण १\nपर्यायोक्त अलंकार - लक्षण ४\nपर्यायोक्त अलंकार - लक्षण ४\nमज्जवहस्त्रोतस - अपतंत्रक अपतानक\nमज्जवहस्त्रोतस - अपतंत्रक अपतानक\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३५१ ते ४००\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३५१ ते ४००\nशुक्रवह स्त्रोतस - परिचय\nशुक्रवह स्त्रोतस - परिचय\nपुरीषवह स्त्रोतस - मलावष्टंभ\nपुरीषवह स्त्रोतस - मलावष्टंभ\nविरोधमूलक अलंकार - लक्षण १\nविरोधमूलक अलंकार - लक्षण १\nउल्लास अलंकार - लक्षण १\nउल्लास अलंकार - लक्षण १\nराम गणेश गडकरी - “ साध्याही विषयांत आशय कध...\nराम गणेश गडकरी - “ साध्याही विषयांत आशय कध...\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १४\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १४\nअर्थान्तरन्यास अलंकार - लक्षण २\nअर्थान्तरन्यास अलंकार - लक्षण २\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ७५१ ते ८००\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ७५१ ते ८००\nविकल्प अलंकार - लक्षण १\nविकल्प अलंकार - लक्षण १\nअवज्ञा अलंकार - लक्षण १\nअवज्ञा अलंकार - लक्षण १\nप्रहर्षण अलंकार - लक्षण १\nप्रहर्षण अलंकार - लक्षण १\nमज्जवहस्त्रोतस - आवृत वात\nमज्जवहस्त्रोतस - आवृत वात\nरक्तवहस्त्रोतस् - रक्ताचें स्वरुप\nरक्तवहस्त्रोतस् - रक्ताचें स्वरुप\nउपमेयोपमा अलंकार - लक्षण ५\nउपमेयोपमा अलंकार - लक्षण ५\nप्रासंगिक पूजा म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2022-10-07T22:09:05Z", "digest": "sha1:DKTWT5CGXSZITGHFQTO672T4ST7QXRCB", "length": 2845, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फैसलाबाद - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nफैसलाबाद (उर्दू, पंजाबी: فیصل آباد ;) हे पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील एक शहर आहे. हे शहर कराची व लाहोर या शहरांपाठोपाठ पाकिस्तानातील तिसरे मोठे शहर आहे. फैसलाबाद पूर्वी ल्यालपूर नावाने ओळखले जात असे.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nक्षेत्रफळ १,२८० चौ. किमी (४९० चौ. मैल)\nअधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nशेवटचा बदल २१ मार्च २०१५ तारखेला २२:५८ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २०१५ रोजी २२:५८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/957/", "date_download": "2022-10-07T21:13:58Z", "digest": "sha1:DDETREBSY4OCPEVTKILNK4F35ZLOAJCG", "length": 9268, "nlines": 80, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "वंचितांच्या सुखी आयुष्यासाठी आरोग्य सुविधात दिरंगाई नको- सीईओ वर्षा ठाकूर- घुगे - Rayatsakshi", "raw_content": "\nवंचितांच्या सुखी आयुष्यासाठी आरोग्य सुविधात दिरंगाई नको- सीईओ वर्षा ठाकूर- घुगे\nवंचितांच्या सुखी आयुष्यासाठी आरोग्य सुविधात दिरंगाई नको- सीईओ वर्षा ठाकूर- घुगे\nआरोग्य अधिकाऱ्यांनी एक महिन्‍यात स्‍क्रीनिंग पूर्ण करून याद्या अद्ययावत कराव्यात\nनांदेड, रयतसाक्षी: मधुमेह, उच्चरक्तदाब व कॅन्सर सारखे गंभीर आजार आहेत. यावर वेळीच उपचार होणे आवश्यक असते. शहरी भागात उपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध असतात. परंतु ग्रामीण भागात या सुविधा नाहीत. कुठल्याही आजाराचा शिरकाव लोकांना कळत नाही.\nत्यामुळे ग्रामीण भागात प्राथमिक तपासण्‍या वाढवून त्याचा निरंतर पाठपुरावा करत अडगळीतील वंचित माणसांना सुखी आयुष्य देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एक महिन्‍यात स्‍क्रीनिंग पूर्ण करून याद्या अद्ययावत कराव्यात अशा सूचना नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज दिल्या.\nआरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त व थोडेसे मायबापासाठी पण या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी यांची मधूमेह, उच्चरक्तदाब व कर्करोग तपासणी, निदान व उपचार या विषयावर आज मंगळवार दिनांक 28 डिसेंबर रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्‍हाण जिल्‍हा नियोजन भवन येथे आढावा बैठक व कार्यशाळा घेण्यात आली, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या.\nयावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदेश जाधव, मधुमेह तज्ञ डॉ. विजय बरडे, औषधोपचार तज्ञ डॉ. मोहम्मद तज्जमुल पटेल, स्त्रीरोग तज्ञ डॉ. मनुरकर, योगतज्ञ मधुकर भारती, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, डॉ. उमेश मुंडे, डॉ. साईप्रसाद शिंदे यांची उपस्थिती होती.\nपुढे त्‍या म्‍हणल्‍या, मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे स्ट्रोक हृदयविकाराचा झटका किंवा मूत्रपिंड निकामी होण्यास कारणीभूत ठरतात. तसेच तंबाखू व मद्यपानाच्या सेवनाने मुख कर्करोगाचे प्रमाण वाढलेले आहेत. ग्रामीण भागात हे प्रमाण रोखण्यासाठी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि. १ जानेवारी २०२२ पासून ग्रामीण भागातील व्यक्तींचे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग या आजाराचे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर तपासणी व निदान करून उपचार केले जाणार आहेत.\nदरम्यानच्या कालावधीत स्क्रीनिंगची माहिती NCD अँपमध्ये अद्यावत करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी यावेळी दिल्‍या. या कार्यशाळेत मधुमेह तपासणी, निदान व उपचार, उच्च रक्तदाब, स्तनकर्करोग, गर्भाशयमुख कर्करोग, योगा आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.\nशालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण, सोमवारीच अधिवेशनात लावली होती हजेरी\nओमायक्रॉनचा भयावह वेग:देशात एका दिवसात सर्वात जास्त १३५ रुग्ण सापडले\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/agrowon/jalgaon-news-good-price-for-cotton-this-year-rds84", "date_download": "2022-10-07T22:10:42Z", "digest": "sha1:666HQ6CBPJK5UBXUNCFSDZMODUGNOQ52", "length": 10513, "nlines": 64, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Jalgaon: कापसाला यंदा चांगला भाव; आंतरराष्ट्रीय कापूस परिषदेत तज्ञांचा सूर", "raw_content": "\nCotton: कापसाला यंदा चांगला भाव; आंतरराष्ट्रीय कापूस परिषदेत तज्ञांचा सूर\nकापसाला यंदा चांगला भाव; आंतरराष्ट्रीय कापूस परिषदेत तज्ञांचा सूर\nजळगाव : चीन, पाकिस्तान, बांगलादेश येथे कापसाचे ४० ते ४५ टक्के नुकसान झाले आहे. त्याचा फायदा भारताला होणार असून कापसाची (Cotton) सर्वत्र निर्यात वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच सोन समजल्या जाणाऱ्या कापसाला यंदा चांगला भाव (Cotton Price) मिळेल. १५ टक्के कापसाचे उत्पादनही वाढेल. जिनिंगलाही चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा या आंतराष्ट्रीय परिषदेत सहभागी तज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून तोटा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच कापसावरील आधारीत टेक्टटाईल्स क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Jalgaon News Cotton Price)\nकोर्ट आवारात अस्‍वलाचा धुमाकूळ; लोकांनी केली तोबा गर्दी\nखानदेश जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी ओनर्स असोसिएशनच्यावतीने जळगावात (Jalgaon) जैन हिल्स आंतरराष्ट्रीय कापूस परिषद पार पडली. या परिषदेच्या शासनाचे प्रतिनिधी तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह (Farmer) देश विदेशातील सहाशे पेक्षा जास्त कापूस आयातदार तसेच निर्यातदार सहभागी झाल्याचं पहायला मिळाले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळावा. बदलत्या स्पर्धेत प्रत्येक शेतकऱ्याने टीकून रहावे, या उद्देशातून कापूस परिषदेत कापूस उत्पादक शेतकरी, तसेच कापसापासून विविध उत्पादन घेणारे उद्योजक व्यावसायिक यांना फायदा होईल. या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय या परिषदेत घेण्यात असून त्यावर विचारमंथन केले जात आहे.\nचांगल्‍या प्रतीचे बियाणे वापरावे\nप्री मान्सूनच्या आधारावर अल्पावधीची येणारी पिके लावावाती. मात्र येथील शेतकऱ्यांना ते माहितच नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानाला शेतकऱ्याला सामोरे जावे लागले. ही बाब शेतात पाहणी केल्यानंतर समोर आलेली आहे. शास्त्रज्ञ प्रत्येकापर्यंत पोहचू शकत नाही, म्हणून प्रत्येकाने आपल्याकडील ज्ञान हे इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले पाहिजे. तसेच ठीबक सिंचन वापर केला पाहिजे. तसेच चांगल्या प्रतीचे बियाणे लागवडीसाठी वापर केला पाहिजे. त्यामुळे पाण्याची बचत होते व उत्पादनही चांगली येईल, हाच शेतकऱ्यांची पिके पाहणीमागणचा उद्देश असल्याचे कॉटन टेक्सटाईल मिनिस्टी ऑफ इंडियाच्या डेप्युटी डायरेक्टर उषा पोड यांनी सांगितले.\nबीटीवर रोग, वेगळ्या वाणाची निर्मिती करावी\nजागतिक पातळीवर कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्‍या चीन, पाकिस्तान आणि अमेरिकेत कापूस पिकाचे मोठे नुकसान झाल्याने भारतीय कापसाला मोठी मागणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी चीन, पाकिस्तान तसेच बांगलादेशातून कापसासाठी मागणी होती. त्याठिकाणी भारतातून कापसाची निर्यात वाढेल. गेल्या काही वर्षांपासून कापसाचे जे बीटी वाण आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग आले असून त्याचा सामना शेतकऱ्यांना नुकसानाच्‍या स्वरुपात करावा लागत आहे. शासनाने नवीन वाणाची निर्मीती करावी, जेणेकरुन त्यावर रोग येणार नाही अशी विनंती परिषदेच्या माध्यमातून शासनाला करण्यात आली असून त्यामुळे शेतकऱ्याचे एकरी उत्पन्न वाढेल असा आशावाद खान्देश जिनिंग असोसिएशन अध्यक्ष प्रदीप जैन यांनी व्यक्त केला.\nदेशात केळीपाठोपाठ जळगाव जिल्हा हा कापूस उत्पादनातही तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कापूस निर्यात करण्यात अग्रेसर जिल्हा आहे. शेतकरी ते शेवटचा घटना उत्पादक यापर्यंत ती पोहचण्यास मदत होते. त्यामुळे उत्पादनासाठी, शेतीतील तोटे नुकसान कमी होतील. शास्वत विकास साधता येईल, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास या क्षेत्रातील धोके टाळता येतील. त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन वाढावा, त्याला फायदा व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कापूस परिषदेत महत्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती खान्देश जिनिंग असोसिएशनचे सचिव अतुल जैन यांनी दिली.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://navrangruperi.com/drama/drkashinathghanekar/", "date_download": "2022-10-07T21:51:04Z", "digest": "sha1:7SPEOECLRPLKKV47Q6NXTQVBHFPY3APG", "length": 12651, "nlines": 177, "source_domain": "navrangruperi.com", "title": "स्मृतिदिन विशेष.. डॉ काशिनाथ घाणेकरांबद्दल आपणास हे माहीत आहे का? - Navrang Ruperi", "raw_content": "\nस्मृतिदिन विशेष.. डॉ काशिनाथ घाणेकरांबद्दल आपणास हे माहीत आहे का\nकाशिनाथ बाळकृष्ण घाणेकर … नुसताच “एकदम कड्डक” अभिनय करणारा नव्हे तर रंगभूमीवर सुद्धा तितकेच “एकदम कड्डक” प्रेम करणारा अवलिया माणूस व अभिनेता… आजच्या दिवशी, ३५ वर्षांपूर्वी, म्हणजेच १९८६ साली, नाटकाच्या दौऱ्यावर असतांनाच त्याने अचानक एक्झिट घेतली. कायमची. अमरावती येथे ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकाच्या दौऱ्यावर असतांना काशिनाथ घाणेकरांचे निधन झाले. वय होते अवघे ५४. त्यांच्या या अकाली निधनाने अख्ख्या मराठी अभिनय सृष्टीला मोठा धक्का बसला होता. आज त्या घटनेला ३५ वर्षे झालीत. ३ वर्षांपूर्वी सुबोध भावे अभिनीत घाणेकरांवरील बायोपीक, ‘आणि डॉ काशिनाथ घाणेकर’ या सिनेमामुळे, त्यांच्या एकंदर प्रवासाविषयी अनभिज्ञ असलेल्या रसिकांनाही बरीच नवीन माहिती मिळाली.\nआज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्याविषयी काही रंजक माहिती जाणून घेऊ यात –\n१. १९३२ साली काशिनाथ यांच्या आत्या त्यांच्या जन्माच्या वेळी काशीयात्रा करून परतल्या होत्या त्यामुळे त्यांचे नाव ‘काशिनाथ’ ठेवण्यात आले.\n२. घाणेकरांना एम.डी. होऊन सर्जन व्हायचे होते परंतु थोडे मार्क्स कमी पडल्याने वडिलभावाच्या सल्ल्याने त्यांनी डेंटल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.\n३. काशिनाथ हे १९५७ साली बी.डी.एस. (दंतवैद्यकीय) च्या परीक्षेत मुंबई विद्यापीठात पहिले सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.\n४. ‘पाहू रे किती वाट’ हा काशिनाथ घाणेकरांचा पहिला चित्रपट परंतु त्यांना ओळख दिली भालजी पेंढारकर यांच्या ‘मराठा तितुका मेळवावा’ मधील शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती या गीताने.\n५. मराठीतील पहिला रहस्यपट समजला जाणारा, राजा परांजपे दिग्दर्शित, पाठलाग या सिनेमातील भूमिकेसाठी घाणेकरांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.\n६. घाणेकरांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये शितू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, रायगडाला जेंव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, गारंबीचा बापू, गुंतता हृदय हे इत्यादी काही नावांचा समावेश आहे.\n७. घाणेकरांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये सुखाची सावली, लक्ष्मी आली घरा, पडछाया, एकटी, मधुचंद्र, चंद्र आहे साक्षीला, देव माणूस, झेप, पाठलाग, गारंबीचा बापू, हा खेळ सावल्यांचा, अजब तुझे सरकार, अन्नपूर्णा, घर गंगेच्या काठी, मानला तर देव इत्यादी काही नावांचा समावेश आहे.\n८. जवळपास दोन दशके त्यांना मराठी रंगभूमीचा सुपरस्टार म्हणून ओळखले गेले व सोबतच त्याकाळी सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता.\n९. डॉ इरावती कर्णिक या काशिनाथ घाणेकरांच्या पहिल्या पत्नी. घटस्फोटानंतर त्यांनी सुलोचनाताईंची मुलगी कांचन लाटकर हिच्याशी दुसरा विवाह केला.\n१०. काशिनाथ घाणेकरांवर कांचन घाणेकर लिखित ‘नाथ हा माझा’ हे पुस्तक खूप लोकप्रिय ठरले आहे.\nआज त्यांच्या स्मृतिदिनी काशिनाथ घाणेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली.\nअभिजित मोहन वारंग दिग्दर्शित चित्रपट 'प्रेम प्रथा धुमशान' २८ ऑक्टोबरला\nजानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार बिगबजेट चित्रपट \"अंकुश\"\nप्रसाद खांडेकरची दिग्दर्शकीय इनिंग, ‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'सहेला रे' चा ट्रेलर प्रदर्शित\n‘प्लॅनेट मराठी’च्या हिंग, पुस्तक, तलवार या वेबसिरीजच्या शूटिंगचा श्री गणेशा\n‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चा १४ मार्चला ४००वा प्रयोग जाणून घ्या लग्नाळू आठवड्याचे वेळापत्रक.\nयश चोप्रांच्या सिलसिला ची चाळीशी\nसतीश कौशिक यांच्या ‘कागझ’ या चित्रपटातील कवितेला सलमान खानने दिला आवाज\nदिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये..\nराम कदम यांच्या संगीतातील ‘स्वराशा’\n“तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही” …शब्दांचा जादूगार ..गुलजार\nदिवाना मुझसा नही…शम्मी कपूर\nप्रतिभेला आलेला बहार…नृत्यांगना अभिनेत्री वैजयंतीमाला\nअभिजित मोहन वारंग दिग्दर्शित चित्रपट ‘प्रेम प्रथा धुमशान’ २८ ऑक्टोबरला\nजानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार बिगबजेट चित्रपट “अंकुश”\nप्रसाद खांडेकरची दिग्दर्शकीय इनिंग, ‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ चा ट्रेलर प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/kavita/5860/", "date_download": "2022-10-07T21:32:53Z", "digest": "sha1:LJITDLQZB7VLCA4QECFKVZIZ5ALLMSYG", "length": 4637, "nlines": 124, "source_domain": "www.snopty.com", "title": "लपा-छपी - Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nतुम्ही शेवटचे लपाछपी कधी खेळला होतात\nहे आत्ताच काही क्षणापूर्वी चालू होती माझी लपाछपी\nमाझे सारे सवंगडी माझ्यावर राज्य देऊन पसार झाले\nआणि मी या राज्याचा राजा\nमाझे सैन्य, सेनापती, आणि हो प्रजेला देखील\nआत्ता इथे एक सैनिक ओझरता दिसला होता मला\nपण जणू काय मी इथे नाहीच असा निघून गेला\nआपल्या राजाकडे न पाहताच\nमी खूप ओरडलो, अगदी घसा खरवडून\nपण विरून गेली माझी हाक\nआभाळापर्यंत जाऊन परत आली\nकोपरा नसलेल्या चौकोनी आंगणात\nमाझे सारे सवंगडी कुठे लपले आहेत कोण जाणे\nकोणीच कसं दिसत नाही\nका आता अंधार झाला म्हणून गेले सगळे आपापल्या घरी\nया आधी डाव असा अर्ध्यावर टाकून\nमी खरंच लपाछपी खेळतोय ना\nका मी एकटाच आहे\nमग ते माझे राज्य, तो सैनिक, माझा सेनापती, माझी प्रजा\nकुठे लपले आहेत कोण जाणे\nकोणीच कसं दिसत नाही\nतुम्ही शेवटचे लपाछपी कधी खेळला होतात\nहे आत्ताच काही क्षणापूर्वी\nकोपरा नसलेल्या चौकोनी आंगणात\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2018/10/blog-post_36.html", "date_download": "2022-10-07T22:14:50Z", "digest": "sha1:ZIDTIPY7VBNLPKABRQNP4K6YRXIPPGXO", "length": 20705, "nlines": 212, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "समजाचे सत्य परजूया | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nस्वतःचा आवाज हरवून, गुलामीची गोडी वाढलेल्या या समकालात जगण्याची उमेद बारगळत चालली आहे. दररोज बदलणारे इंधनाचे चढे दर, सणासुदीच्या मार्केटींग मधून पळवापळवीच्या हरामबाता, समर्थन संमोहनातून छोट्या मुलांपर्यंत पाजलेली कट्टरतेची लस यांचा अतिरेक झाला आहे.\nप्रश्नांचा ढीग समोर घेऊन, उत्तरांच्या शोधात भटकणारे बुद्धिजीवी फोल ठरताहेत. बोलघेवड्या, उतावीळ पोपटपंची प्रतिक्रियांनी वेळ मारून नेली जातेय. म्हातारी मरतच आहे, काळ सोकावतोच आहे. दुःख मांडण्याची आणि सुखासाठी भांडण्याची इच्छाशक्ती लुळीपांगळी करत व्यवस्था सुखरूप सर्वताबा घेत आहे.\nअशा व्यवस्थेत हस्तक्षेप न करता ’चांदण्यात रमणार्या’ कलेची निर्मिती होणं म्हणजे या फॅसिस्ट व्यवस्थेला पुरक असणं ही साधी गोष्ट आज एकूण साहित्य- संस्कृतिकतेला कळत नाही. याचाच अफसोस वाटतोय. मूळ मानवी मुल्यांना डावलून वेगळ्या चुली मांडून, वादांची नावे भांडून, केवळ आत्मसमाधानात रमणार्या या पुरक व्यवस्थांची किमान सकारात्मक चिकित्सा व्हायलाच हवी. माध्यमं आणि मेंदूला आलेली सूज यामुळे टेस्ट ट्युब बेबी किंवा प्रिमॅच्युअर डिलीव्हरी वा सरोगसीसारख्या टॅग्समधून प्रसवणारी कोणतीही कला ही पिढी बर्बाद -(उर्वरित लेख पान 7 वर)\nकरणारी ठरत आहे. कथा, कविता, साहित्य, नाट्य, संगीत नृत्य चित्र शिल्प या माध्यमांनी किमान पक्षी ’डिग्नीटी ऑफ ह्युमॅनिटी’ चे संगोपन करावं की केवळ कट्टरतावादी धर्मांध उजव्या-डाव्या मुल्यांच पोषण करावं सकाळी उठल्यापासून उशिरा निजेपर्यंत साथीचा मोबाईल पसरवत राहतो अफवांचा कचरा, पुराव्यापुरातन सनातन धार्मिक अंधश्रद्धांनी वाटोळं करत राहतात. चॅनल्समधून पुस्तकांच्या पानापानांतून विषारी शब्दांचा विखार ढासळवत जातोय. विवेकाची घरं... हंगामी संवेदना मांडून मिळवल्या जाताहेत टाळ्या आणि मृत्यूशोकावर रचलं जातयं नृत्य-संगीत आणि मुल्यमानाची ऐसीतैशी करून मिळवला जातोय बांडगळी मोठेपणा. जिथे-तिथे सर्वत्र मुल्यात्मक कलानिर्मिती हा मानवी बुद्धीचा आविष्कार पण मुल्यांचं अवमुल्यन केवळ जाणीवपूर्वक करण्याच्या वीडा बहुतेक सर्वत्र सर्वांनी उचललेला दिसतो. साहित्य, कला तत्वज्ञान, विज्ञान यातून मानवतेचं उन्नयन व्हावंच, पण यातला गोतावळा व्यवस्था समर्थक ठरला की सामान्य मानवी समुहाचे दारिद्रय, गुलामी, दुःख वेदना तशाच प्रभावी राहतील यात शंका नाही. कुठलीही कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, अभ्यूदयाची आशा प्रसवात असते. पाब्लो पिकासो आपल्या कृतीबद्दल सहज बोलून जातो. माझे कुठलेही चित्र केवळ सजावट, शोभेसाठी नाहीच तर ते साधन आहे, अविवेकाच्या विरोधातील शस्त्र आहे. अलिकडच्या काळात विशेषतः संमोहीसनातन संघी व्यवस्थेच्या काळात या कलांचे शस्त्र बोथट झाले आहे. ज्यांनी कुणी कलेचा वापर करून समाजाबद्दलाचा किंवा व्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचं थोडं धाडसं केल त्यांना पुसून टाकलं गेलं. आम्ही निषेध मोर्चा अनागोंदी यातच गुरफटून रहिलो. येणार्या पिढींची भाषा आणि वेदनेला नव्या लिपीत व्यक्त करण्यासाठी सुसज्ज होण्याची हीच वेळ आहे.\nटाळ्या मैफीली, धनाचे पुरस्कार, पेपरातील कात्रणी बातमी यापेक्षा येणार्या पिढीने कलावंत-कलाकाराला मुल्यस्थापना करणारा म्हणून ओळखावं, यासाठी हमी दिली पाहिजे. सभासंमेलने मेळावे कार्यक्रम सारखे इव्हेंट केवळ इव्हेंट्स न राहता मूल्यकेंद्रीत मुव्हमेंट कसे होतील याचा विचार करावयास हवा. प्रतिगामी, क्रुरतेचा काळ स्वतःहून ओढवून घेतला की बुद्धीचा गंज ’मी’ पणाने गडद होतो. मुठभर चांगलं काम करणार्यांच्या ’मी’चा ’आम्ही’ होणे आज गरजेचे आहे. आम्हीचा हा प्रवास बळकट करण्यासाठी मूलभूत दुव्यांची पायवाट तयार होतेय आता यावरचे प्रवासी वाढले पाहिजेत.\n’येरे माझ्या मागल्या’ चे माथी मारलेले पुराणगीत बाजूला सारून नवविवेकी मुल्यांची, मानवी प्रेमस्नेहाचे दृढीकरण करण्यासाठी... बहरून येण्यासाठी स्वतःप्रत गाडून घेणे, समर्पित होण्याची ताकद येत राहो...\n”मैं अकेला चला था” वगैरा ऐवजी आम्ही सारे निघालो सामूहिक बळाची नित्तांत गरज आहे.’\nकला ही क्रांतीच्या टप्प्यावर अर्थपूर्णता आणत असते. मर्यादेत हे सार मांडत असताना दाखल उदाहरणांची साखळी मी जोडणार नाही, पण अत्याचार, दारिद्रयाच्या भयानवास्तवाला करकचून बांधण्यासाठी निःसत्व होणार्या समुहासाठी ’मानव अस्मितेचा’ मुद्दा सहजसुंदर संपन्न होईल. यास्तव शब्दांची किमान मजबूत सांगड मांडत राहीन.\n”आम्ही घरीधन शब्दांचीच शस्त्रे’ म्हणत आता समजेच्या सत्याला परजत राहूया. एखादा पाब्लो, एखादे तुकोबा आणि डॉ. अल्लामाला अशावेळी किमान आठवूया.\n”फतवा है शेख का ये ़जमाना कलम का है\nदुनिया में अब रही नहीं तलवार कारगर”\nकुरूंदवाड (कोल्हापूर) - 8668691105\nनियतच (उद्देश) महत्त्वाची : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआदर्श युवतीं घडविणारी जीआयओ\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nइस्लाममध्ये धर्मस्वातंत्र्य व अल्पसंख्याकांचे अधिकार\nक्षमामूर्ती मुहम्मद (स.) : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान ; ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनशेचा नाश देशाचा विकास\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांबाबतचा दृष्टीकोण\nदेश नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू\nसुखी संसाराची गुरुकिल्ली : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nएक सकाळ कुष्ठरोगींच्या सानिध्यात\nआम्ही रझाकार होतो का\nमहसूल महत्त्वाचा की माणसं महत्त्वाची\nइंडिया - यू टू\n२६ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०१८\n१९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१८\n१२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०१८\nपाच राज्यांतील सोशल इंजिनीअरिंग\n०५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०१८\nजब मिलते हैं यार... नशेचे व्यसन हद्दपार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/tag/ccnp-jobs/", "date_download": "2022-10-07T22:27:14Z", "digest": "sha1:K7YJOBLCJZ3P3CJGWAAEOYVD6DNQV3LE", "length": 6870, "nlines": 60, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "CCNP Jobs - Bharti jahirat", "raw_content": "\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMSC Bank Recruitment | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांच्या 17 जागांची भरती\nThe Maharashtra State Co-operative Bank Ltd. | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांच्या 17 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत...\nCentral Bank of India | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 19 जागांसाठी भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये माहिती तंत्रज्ञान, वरिष्ठ व्यवस्थापक / Information Technology, Senior Manager पदाच्या एकूण 19 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने...\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.eturbonews.com/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9D-%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2022-10-07T22:40:23Z", "digest": "sha1:YJFXFJFHODWUWEIGDBXUPEVORKKTGKOP", "length": 24123, "nlines": 118, "source_domain": "mr.eturbonews.com", "title": "विझ एअर मालागा आणि डॉर्टमंड उड्डाणे बुडापेस्ट विमानतळावर परत येतात | विमानसेवा", "raw_content": "\nस्थान: होम पेज » पोस्टिंग » उड्डाण करणारे हवाई परिवहन » बुडापेस्ट विमानतळावर विज् एयर मालागा आणि डॉर्टमुंड उड्डाणे\nउड्डाण करणारे हवाई परिवहन • विमानतळ • एव्हिएशन • ब्रेकिंग प्रवासी न्यूज • व्यवसाय प्रवास • देश | प्रदेश • EU • जर्मनी • हंगेरी • बातम्या • पुनर्बांधणी • स्पेन • पर्यटन • वाहतूक • ट्रॅव्हल सिक्रेट्स • ट्रॅव्हल वायर न्यूज • विविध बातम्या\nबुडापेस्ट विमानतळावर विज् एयर मालागा आणि डॉर्टमुंड उड्डाणे\nबुडापेस्ट विमानतळावर विज् एयर मालागा आणि डॉर्टमुंड उड्डाणे\nयांनी लिहिलेले हॅरी जॉन्सन\nविझ एअरने मेच्या उर्वरित दिवसांसाठी दोन्ही ठिकाणी साप्ताहिक सेवा म्हणून ऑपरेशन्स सुरू केल्या आहेत. यापूर्वीच जूनमध्ये दुप्पट-साप्ताहिक दुवे जोडण्यासाठी जूनमध्ये वारंवारतेस चालना दिली गेली आहे.\nविझ एयरने मालागा आणि डॉर्टमंडला 21 आणि 23 मे रोजी पुन्हा उड्डाण केले\nविज्ड एयर स्पॅनिश दुव्यावर आपले ए 321neos चपळ वापरत आहे\nजर्मनीशी जोडण्यासाठी विझ एयर ए 320 चा वापर करत आहे\nबुडापेस्ट एअरपोर्टने अनुक्रमे 21 आणि 23 मे रोजी विझल एअरच्या मालागा आणि डॉर्टमुंडला जाणारी उड्डाणे परत दिली. त्याचा स्पॅनिश दुव्यावरील ए 321neos चा चपळ आणि जर्मनीशी जोडण्यासाठी ए 320 चा वापर करून, अत्यल्प-कमी किंमतीची वाहक हंगेरीच्या राजधानीतून त्याच्या पुन्हा विस्तारित नेटवर्कसाठी 838 साप्ताहिक जागा (जून) ला करेल.\nWizz Air मेच्या उर्वरित दिवसांसाठी दोन्ही ठिकाणी साप्ताहिक सेवा म्हणून ऑपरेशन सुरू केले आहे, जूनमध्ये वारंवारपणे दुप्पट-साप्ताहिक दुवे जोडण्यासाठी जूनमध्ये वारंवारतेची पुष्टी केली गेली आहे.\nबुडापेस्ट विमानतळ, एअरलाईन डेव्हलपमेंटचे प्रमुख बाल्ज बोगेट्स स्पष्ट करतात की, “दोन्ही मार्गांवर प्रवाशांना जाण्याची संधी उपलब्ध करून देऊन दोन्ही मार्गांवर सीटची क्षमता वाढत असल्याचे पाहून आम्हाला आनंद झाला आहे.”\n“विज्ड एअर पुन्हा एकदा आम्हाला विविध कनेक्शन ऑफर करण्यास अनुमती देईल, पहिली निवड ही गंतव्यस्थान आहे. दक्षिण स्पेनमधील एक लोकप्रिय प्रदेश म्हणून, मालागाने अंदलूसीय जीवनशैलीचे प्रतिबिंबित केले, तर डॉर्टमुंड हे जर्मनीत एक व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे - आमच्या विमानतळावरून मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या दोन्ही शक्यता, ”बोगेट्स जोडतात.\nहा लेख सामायिक करा\nयाची सदस्यता घ्याप्रिंटई-मेलप्रतट्विटरफेसबुकसंलग्नतारVKमेसेंजरWhatsAppएसएमएसपंचकर्मफ्लिपबोर्डकराच्या Tumblrझिंगशेअर करा\nअधिक यावर: बुडापेस्ट | विमानतळ | जर्मनी | एयरलाईन\nस्कायटीम अलायन्स नवीन सदस्य एअरलाइनचे स्वागत करते एयरलाईन|\nफेअरमॉंट मायाकोबा हे ILTM उत्तर अमेरिका 2022 चे होस्ट आहेत विमानतळ|\nबेलीझकडून जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा\nअनियंत्रित प्रवासी: विमान वाहतूक क्षेत्र एकत्र आहे एयरलाईन, विमानतळ|\nFIFA विश्वचषक कतार 2022 साठी कतार ड्यूटी फ्री अधिकृत स्टोअर विमानतळ|\nएयरलाईन विमानतळ बुडापेस्ट जर्मनी\nएमिरेट्सने जॉर्डनचा स्वातंत्र्य दिन आपल्या उड्डाणांमधून साजरा केला\nएटीएम व्हर्च्युअल 2021 मध्ये 2021 आणि त्याहून अधिक पर्यटन आकर्षणांचे भविष्य\nरिट्झ-कार्लटन, ग्रँड केमन यांनी कार्यक्रमांची घोषणा केली...\nमोरोक्कोने पर्यटन पुनर्प्राप्तीला चालना देण्यासाठी नवीन ई-व्हिसा जाहीर केला\nटांझानिया पर्यटन खेळाडू मार्ग चार्ट करण्यासाठी एकत्र जमतात...\nजागतिक पर्यटन दिन: पृथ्वी एक म्हणून\nप्रवास आणि पर्यटन कशामुळे शाश्वत होते\nपर्यटन नायक आता माणसांपेक्षाही मोठे झाले आहेत\nकॉमनवेल्थ हॉटेल्सच्या नवीन महाव्यवस्थापकांची नावे...\nदुसित इंटरनॅशनलने नवीन लक्झरी वेलनेस रिसॉर्ट उघडले...\nSKAL बदलांना नाही म्हणतो\nआश्चर्यकारक थायलंड देखील निसर्ग आणि पुरस्कार-विजेता आहे...\nफ्रँकफर्ट विमानतळाचा मध्यभागी धावपट्टी दोनसाठी बंद होणार...\nबुरुंडी 2022 पूर्व आफ्रिका प्रादेशिक पर्यटन EXPO चे आयोजन करते\nकिरिबाटी, मायक्रोनेशिया, नियू, टोंगा आणि सामोआ पुन्हा उघडतील...\nब्लॉसम हॉटेल ह्यूस्टनने मिशेलिन-तारांकित शेफची नियुक्ती केली\nकॅनडा जेटलाइन्स क्लॅरिटी ट्रॅव्हलसह भागीदारी करत आहेत...\nअवनी हॉटेल्स शाश्वत पर्यटनासाठी वचनबद्ध आहे\nजमैका पर्यटनासाठी शाश्वत पद्धतींना चालना देणे\nव्हर्जिनिया दरम्यान सर्व अलौकिक गोष्टींचा अनुभव घ्या...\nप्रिन्सेस क्रूझ फिटनेस प्रीमियम अनुभव\nजमैका आणि पॅराग्वे पर्यटन सुलभ करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार\nकॅनडातील सर्वोत्कृष्ट नवीन रेस्टॉरंट 2022 द्वारे घोषित...\nइंडोनेशियातील दक्षिणी सुमात्रा भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत\nखाली जमिनीत गेटवेचे स्वप्न\nमधमाशांच्या मेणाचा बाजार ५.६% सीएजीआरने वाढला, यामुळे वाढला...\nमाउ हवाई मधील कहलुई विमानतळ: कुत्र्यांना कोणी बाहेर सोडले\nवर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट लंडन येथे बोलण्यासाठी बर्नआउट तज्ञ\nशाश्वत विमान वाहतुकीवर लुफ्थांसा आणि शेल भागीदार...\nलाखो पर्यटक दीर्घ व्हिसासाठी अमेरिकेला 'नाही' म्हणतात...\nIMEX स्थिरतेची ठिकाणे उच्च सेट करते\nबीजिंगवर प्रेम करण्याची 100 कारणे\nहॅरी जॉन्सन हे असाइनमेंट एडिटर आहेत eTurboNews 20 वर्षांपेक्षा जास्त काळ. तो होनोलुलु, हवाई येथे राहतो आणि मूळचा युरोपचा आहे. त्याला बातम्या लिहिणे आणि कव्हर करणे आवडते.\nहॉलंड अमेरिका लाईनसह अलास्कामध्ये वाढती स्वारस्य | eTurboNews\nएरोमेक्सिको: सप्टेंबर २०२२ रहदारी परिणाम | eTurboNews\nब्रेमर हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सने 2022 च्या चौथ्या तिमाहीसाठी पसंतीचा लाभांश जाहीर केला - ठळक बातम्या\n2व्या ICAO असेंब्लीमध्ये नेट झिरो CO41 उत्सर्जन लक्ष्य शीर्षस्थानी | eTurboNews\nवेस्टजेट आणि कोरियन एअरने कोडशेअर करार वाढवला | eTurboNews\nदुसिट इंटरनॅशनलने हँगझोऊ मध्ये नवीन लक्झरी वेलनेस रिसॉर्ट उघडले | eTurboNews\nएम्पायर स्टेट बिल्डिंग वार्षिक रन-अप आयोजित करते | eTurboNews\nअलास्का एअरलाइन्सने अनेक राज्यांमध्ये अंतिम बिअर रन बंद केली | eTurboNews\nमालिबू, मियामी आणि न्यूपोर्ट बीच येथे पहिले NFT फिटनेस/वेलनेस लाउंज उघडले eTurboNews\n2041 पर्यंत व्यावसायिक विमान सेवा बाजार दुप्पट होईल | eTurboNews\nअवनी हॉटेल्स ग्रे गॅप इयर ग्लोब ट्रॉटर्सला प्रेरित करते | eTurboNews\nफ्लोरिडा हॉटेलियर्स गरजू असलेल्या फ्लोरिडा कुटुंबांसाठी राहण्याची सोय करतात - ब्रेकिंग न्यूज\n100 साठी जगभरातील टॉप 2022 सर्वात आवडत्या कामाच्या ठिकाणी मॅरियट सुट्ट्या | eTurboNews\nकॅम्ब्रिया हॉटेल्सने कनेक्टिकटमध्ये दुसरी मालमत्ता उघडली | eTurboNews\nFujita Kanko सह जपान प्रवास बकेट लिस्ट अपडेट करा - ठळक बातम्या\nअमन हॉटेल्ससह नवीन खाजगी जेट मोहीम - ब्रेकिंग न्यूज\nलॉस एंजेलिस ते सोल नवीन नॉनस्टॉप फ्लाइट | eTurboNews\nलाउडॉन ला भेट द्या वाइन कंट्री ब्रँड स्टडी | eTurboNews\nओकवुड हॉटेल आणि अपार्टमेंट्स सायगॉन उघडले | eTurboNews\nअफगाणिस्तान - अल्बेनिया - अल्जेरिया - अमेरिकन सामोआ - अँडोर - अंगोला - अँग्विला - अँटिगा बार्बुडा - अर्जेंटिना - अर्मेनिया - अरुबा - ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रिया - अझरबैजान - बहामाज - बहरैन - बांगलादेश - बार्बाडोस - बेलारूस - बेल्जियम - बेलिझ - बेनिन - बर्म्युडा - भूतान - बोलिव्हिया - बोस्निया हर्जेगोविना - बोत्सवाना - ब्राझील - ब्रिटिश व्हर्जिन बेटे - ब्रुनेई - बल्गेरिया - बुर्किना फासो - बुरुंडी - Cabo Verde - कंबोडिया - कॅमरून - कॅनडा - केमन द्वीपसमूह - सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक - चाड - चिली - चीन - कोलंबिया - कोमोरोस - कॉंगो - कांगो (डेम रिप) - कुक बेटे - कॉस्टा रिका - कोटे दिल्वोरे- क्रोएशिया - क्युबा - कुरकओ - सायप्रस - चेक प्रजासत्ताक - डेन्मार्क - जिबूती - डॉमिनिका - डोमिनिकन रिपब्लीक - पूर्व तिमोर - इक्वाडोर - इजिप्त - अल साल्वाडोर - इक्वेटोरीयल गिनी - इरिट्रिया - एस्टोनिया - इस्वातिनी - इथिओपिया - युरोपियन युनियन - फिजी - फ्रान्स - फ्रेंच पॉलिनेशिया - गॅबॉन - गॅम्बिया - जॉर्जिया - जर्मनी - घाना - ग्रीस - ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड - गुआम - ग्वाटेमाला - गिनी - गिनी बिसाउ - गयाना - हैती - हवाई - होंडुरास - हाँगकाँग - हंगेरी - आइसलँड - भारत - इंडोनेशिया - इराण - इराक - आयर्लंड - इस्राएल - इटली - जमैका - जपान - जॉर्डन - कझाकस्तान - केनिया - किरिबाटी - कोसोव्हा - कुवैत - किरगिझस्तान - लाओस - लाटविया - लेबनॉन - लेसोथो - लायबेरिया - लिबिया - लिंचेनस्टाइन - लिथुआनिया - लक्संबॉर्ग - मकाओ - मादागास्कर - मलावी - मलेशिया - मालदीव - माली - माल्टा - मार्शल बेटे - मार्टिनिक - मॉरिटानिया - मॉरिशस - मायोट्टे - मेक्सिको - मायक्रोनेशिया - मोल्दोव्हा - मोनॅको - मंगोलिया - माँटेनिग्रो - मोरोक्को - मोझांबिक - म्यानमार - नामिबिया - नऊरु - नेपाळ - नेदरलँड्स - न्यू कॅलेडोनिया - न्युझीलँड - निकाराग्वा - नायजर - नायजेरिया - नीयू - उत्तर कोरिया- उत्तर मॅसेडोनिया - नॉर्वे - ओमान - पाकिस्तान - पलाऊ - पॅलेस्टाईन - पनामा - पापुआ न्यू गिनी - पराग्वे - पेरू - फिलीपिन्स - पोलंड - पोर्तुगाल - पोर्तु रिको - कतार - रियुनियन - रोमेनिया - रशिया - रवांडा - सेंट किट्स आणि नेव्हिस - सेंट लुसिया - सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स - सामोआ - सॅन मरिनो - साओ टोमे व प्रिन्सिप - सौदी अरेबिया - स्कॉटलंड - सेनेगल - सर्बिया - सेशेल्स - सिएरा लिऑन - सिंगापूर - सिंट मार्टेन - स्लोवाकिया - स्लोव्हेनिया - सोलोमन आयलॅन्ड - सोमालिया - दक्षिण आफ्रिका - दक्षिण कोरिया - दक्षिण सुदान - स्पेन - श्रीलंका - सेंट युस्टेशियस - सेंट मार्टेन - सुदान - सुरिनाम - स्वीडन - स्वित्झर्लंड - सीरिया - तैवान - ताजिकिस्तान - टांझानिया - थायलंड - जाण्यासाठी - टोंगा - त्रिनिदाद आणि टोबॅगो - ट्युनिशिया - तुर्की - तुर्कमेनिस्तान - टर्क्स आणि केकोस - टुवालु - युगांडा - युक्रेन - युएई - UK - उरुग्वे - यूएस व्हर्जिन बेटे - यूएसए - उझबेकिस्तान - वानुआटु - व्हॅटिकन - व्हेनेझुएला - व्हिएतनाम - येमेन - झांबिया - झिम्बाब्वे -\nएव्हिएशन न्यूज पोस्टिंगसाठी क्लिक करा\nप्रवाशांच्या बातम्यांसाठी क्लिक करा\nब्रेकिंग न्यूज प्रेस रिलीज पोस्टिंगसाठी क्लिक करा\nआमचे ब्रेकिंग न्यूज शो पहा\nहवाई न्यूज Onine साठी येथे क्लिक करा\nमीटिंग्ज, इन्सेन्टिव्ह, अधिवेशने यावरील बातम्यांसाठी क्लिक करा\nप्रवास उद्योग बातम्या लेखांसाठी क्लिक करा\nओपन सोर्स प्रेस रिलीझसाठी क्लिक करा\nबफरप्रतई-मेलफेसबुकफ्लिपबोर्डहॅकर बातम्याओळसंलग्नमेसेंजरमिक्स करावेकराखिसाप्रिंटपंचकर्मएसएमएसयाची सदस्यता घ्यातारच्या Tumblrट्विटरVKWhatsAppझिंगYummly", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2022-10-07T22:34:01Z", "digest": "sha1:6OK7QJVUSTHHWXPBJAOXNIYPMKCSCLGP", "length": 5230, "nlines": 185, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: be:Кідані\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: az:Xitaylar\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ar:شعب الخيتان\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: la:Cathaini\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hi:ख़ितानी लोग\nr2.5.1) (सांगकाम्याने वाढविले: an:Khitans\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: it:Kitai\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fa:ختای\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:Kidan (narod)\nr2.5.2) (सांगकाम्याने बदलले: zh:契丹族\nNew page: चीनच्या पश्चिमेकडील एक प्रबळ राजघराणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://nmk.org.in/current-affairs-23-june-2021/", "date_download": "2022-10-07T22:33:10Z", "digest": "sha1:TMUNVN36M4YOL6AWPWIHWLNFQTQ653ZS", "length": 3345, "nlines": 51, "source_domain": "nmk.org.in", "title": "[Current Affairs] चालू घडामोडी 23 जून 2021 - NMK.ORG.IN", "raw_content": "\nपुण्यात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसियेशन तर्फे ‘ऑलिम्पिक डे २०२१’ कार्यक्रमाचे आयोजन – अजित पवार.\nरॉयल इन्स्टिट्यूटच्या डिजिटल न्यूज रिपोर्ट २०२१, दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या वृत्तवाहिन्या विश्वासार्ह.\nनाशिक जिल्ह्यातील शेतकरी विलास जाधव यांनी लाल भोपळा म्हणजेच दंगराचे विक्रमी उत्पादन घेतले.\n“माझी वासंधारा अभियाना” च्या पुढील अंमल बजावणी साठी आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली चर्चा.\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या, OBC समाजाचा विश्वासघात – देवेंद्र फडणवीस.\nआशा कार्यकर्त्यांच्या संपाबाबत राजेश टोपे यानिई कृती समितीच्या पादिकार्यांची घेतली बैठक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00046928-YC124-FR-0751RL.html", "date_download": "2022-10-07T22:23:06Z", "digest": "sha1:FUKWLBHC4M3J62D764SNRX32QGQ6NYOC", "length": 14514, "nlines": 300, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "YC124-FR-0751RL | Yageo | अॅरे/नेटवर्क प्रतिरोधक | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर YC124-FR-0751RL Yageo खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये YC124-FR-0751RL चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. YC124-FR-0751RL साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/indvaus-where-have-the-budding-players-disappeared-asks-ravi-shastri/", "date_download": "2022-10-07T23:12:02Z", "digest": "sha1:WINNOSQGGPZ62DWX3MS3IDWPFZC37NK7", "length": 12895, "nlines": 223, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#INDvAUS : नवोदित खेळाडू कुठे गायब झाले ,रवी शास्त्रींचा सवाल", "raw_content": "\n#INDvAUS : नवोदित खेळाडू कुठे गायब झाले ,रवी शास्त्रींचा सवाल\nमुंबई – आशिया करंडक स्पर्धेतील पराभवानंतरही भारतीय संघातील खेळाडू काहीही शिकले नाहीत. संघात अनुभवी व नवोदितांचा समतोल असायला हवा होता कारण पुढील महिन्यात भारतीय संघाला टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा खेळायची आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील संघ निवड पाहिली तर नवोदित कुठे गायब झाले असा प्रश्‍न पडतो, अशा शब्दात भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक व माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी ताशेरे ओढले आहेत.\nमोहालीतील पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. भारताने दिलेले 209 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहज पार केले. भारतीय संघाची फलंदाजी, गोलंदाजी व मुख्य म्हणजे क्षेत्ररक्षण अत्यंत ढिसाळ झाले. रवींद्र जडेजा मैदानावर असेल तर क्षेत्ररक्षण अफलातून होत होते. आता त्याला दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घ्यावी लागल्याने त्याच्या जागी अक्‍सर पटेलचा समावेश झाला. मात्र, जडेजा नसल्याने क्षेत्ररक्षणाचा दर्जा किती घसरला आहे हेच या सामन्यात दिसले, असेही शास्त्री म्हणाले.\nअंतिम संघ निवडला जातो तेव्हा त्यात एखादाच बदल झालेला दिसतो. जर त्याच त्या खेळाडूंना खेळवायचे असेल तर नवोदितांना संधी कधी मिळणार. आगामी काळात होत असलेल्या नहत्त्वाच्या मालिकांसाठी नवोदितांना संधी देत त्यांची क्षमता आजमावून पाहणे गरजेचे असते. मात्र, सध्या भारतीय संघात हे दिसत नाही मग सेकंड बेच म्हणता ते नवोदित खेळाडू कुठे गायब झाले, असा सवालही शास्त्री यांनी केला आहे.\nबुमराह व चहर पर्यटक आहेत का\nजसप्रीत बुमराहला कसे खेळवले गेले नाही तसेच त्याच्या जागी हर्षल पटेलची निवड कशी केली गेली. जर बुमराह तंदुरुस्त ठरला आहे तर त्यालाच खेळवले गेले पाहिजे. मात्र, काही कारणांनी बुमराह खेळणार नसेल तर मग दीपक चहरला संघात स्थान देणे गरजेचे होते. उमेश यादवपेक्षा तो जास्त उपयुक्त ठरला असता. भारतीय संघाने या पराभवातून बोध घेत आगामी सामन्यांत यश मिळवण्यासाठी क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करणे आवश्‍यक आहे, असेही शास्त्री म्हणाले.\nTags: #AUSvIND#RaviShastri#TeamIndiaआशिया करंडकबुमराह व चहररवी शास्त्री\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\n#INDvSA 3rd T20I : भारताचा गोलंदाजीचा निर्णय, संघात 3 बदल; जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11\n#TeamIndia : बुमराहच्या जागी ‘या’ वेगवान गोलंदाजाची निवड\n#INDvSA 1st T20I : भारताने Toss जिंकला, कर्णधार रोहितने घेतला ‘हा’ निर्णय\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \nTags: #AUSvIND#RaviShastri#TeamIndiaआशिया करंडकबुमराह व चहररवी शास्त्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/called/", "date_download": "2022-10-07T21:57:08Z", "digest": "sha1:2NMV7FNSDYRJTQ5KCYKBR4ITLK5CEQCR", "length": 12726, "nlines": 225, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "called Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nकतारचे नवे वाणिज्यदूत राज्यपालांना भेटले; वर्ल्ड कप फूटबॉल पाहण्यास येण्याचं दिलं निमंत्रण\nमुंबई : कतारचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत अहमद साद अल-सुलैती यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट ...\n“…म्हणून महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’चा पुकार केलाय”; शिवसेनेने सांगितले ‘बंद’ पुकारण्याचे कारण\nमुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या विरोधात राज्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज 'महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या ...\nसैनिक फेडरेशन प्रतिनिधी मंडळाने घेतली राज्यपालांची भेट\nवाघोली : माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिक फेडरेशन प्रतिनिधी मंडळाने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल ...\n कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी घेणार मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक\nनवी दिल्ली : देशातील करोना परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत चिंताजनक होत आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. दररोज बेड, ऑक्सिजन ...\nशेतकऱ्यांच्या 26 मार्चच्या ‘भारत बंद’ला राष्ट्रवादीचा पाठिंबा\nमुंबई - केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 26 मार्च रोजी 4 महिने पूर्ण ...\nदेशाच्या गृहमंत्र्यांना खुश करण्यासाठी ‘त्यांनी’ मुख्यमंत्र्यांना शिव्या घातल्या ; राऊतांचा घणाघात\nसिंधुदुर्ग : नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद हा काही नवा नाही. नुकतेच नारायण राणे यांनी आपण मुख्यमंत्र्यांना केलेल्या फोन ...\nसंयुक्त अरब अमिराती दूतावासाच्या प्रभारी प्रमुखांनी घेतली राज्यपालांची भेट\nमुंबई : संयुक्त अरब अमिरातीच्या मुंबई येथील दूतावासाचे प्रभारी प्रमुख सौद अब्देलअझीझ अलझरुनी यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची ...\nभारत-चीन सीमेवरील हिंसक घडामोड; पंतप्रधानांनी बोलावली सर्वपक्षीय व्हर्च्युअल बैठक\nनवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरील हिंसक घडामोडीनंतर सीमारेषेवर चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ...\nमुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे\nमुंबई : लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा बजावत असतानाही कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/perfect-planning/", "date_download": "2022-10-07T21:16:37Z", "digest": "sha1:EXWYYMFWIZHO6WJRCGCYXNHDWT5QWWOK", "length": 7792, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Perfect planning Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nसरस प्रदर्शनासह अजिंठा महोत्सवाचे परिपूर्ण नियोजन करावे – राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nऔरंगाबाद :- ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत बचतगट समूहाच्या उत्पादनांची विक्री आणि प्रदर्शन करणाऱ्या ‘सरस प्रदर्शनाचे’ आयोजन मे महिन्यात अजिंठा येथे होणार ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://mr.rdflexitank.com/swimming-pool/", "date_download": "2022-10-07T22:16:05Z", "digest": "sha1:ZHVX27WDFG2JVT7KA34YXHPTDHVLNPQJ", "length": 6168, "nlines": 165, "source_domain": "mr.rdflexitank.com", "title": "जलतरण तलाव उत्पादक आणि पुरवठादार - चीन जलतरण तलाव फॅक्टरी", "raw_content": "आमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये आपले स्वागत आहे\nवरील ग्राउंड स्विमिंग पूल / कोलसेसिबल स्विमिंग पूल इतर नाव मेटल फ्रेम वॉटर पूल, मोठ्या मैदानी जलतरण तलाव सामग्री नॉन विषारी पीव्हीसी तिरपाल जाडी 1.0 मिमी – 1.5 मिमी आकार आयताकृती / चौरस; गोल / मंडल सामान्य रंग राखाडी, केशरी, निळा, हिरवा, पांढरा किंवा इतर रंग क्षमता 1000L 5000L 100LL 20000L 50000L 100000L किंवा मोठा फ्रेम मटेरियल गॅल्वनाइज्ड स्टील पाईप “I” ”U” प्रकार Accessक्सेसरीज (पर्यायी) वॉटर फिल्टर पंप, पूल कोव्ह .. .\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा आमच्या जाहिराती, सवलत, विक्री आणि विशेष ऑफरसह अद्ययावत रहाण्यासाठी\nलवचिक स्टोरेज उशा टाकी\nपत्ताः क्रमांक नाही .988 शूंगफेंग रोड, झिंगन डिस्ट्रिक्ट, एएनक्यूआयटी सिटी, वेफांग. शेडोंग, चीन\nसोम - शुक्र: सकाळी 10 ते संध्याकाळी 7\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1922/", "date_download": "2022-10-07T21:18:33Z", "digest": "sha1:L7PFRUTUNYFGZF663WHJXK5FGTINTJHH", "length": 5134, "nlines": 76, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "प्रकाश चव्हाण यांची गोरक्षा मंच जिल्हाध्यक्षपदी निवड - Rayatsakshi", "raw_content": "\nप्रकाश चव्हाण यांची गोरक्षा मंच जिल्हाध्यक्षपदी निवड\nप्रकाश चव्हाण यांची गोरक्षा मंच जिल्हाध्यक्षपदी निवड\nप्रकाश चव्हाण यांना नियुक्तपत्र देवून शुभेच्छा देण्यात आल्या\nमाजलगाव, रयतसाक्षी: राष्ट्रीय गोरक्षामंच च्या जिल्हाध्यक्षपदी व्यापारी प्रकाश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या पादाधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत श्री प्रकाश चव्हाण यांना नियुक्तपत्र देउन शुभेच्छा देण्यात आल्या.\nतालुक्यातील शुक्लतीर्थ लिमगाव येथील व्यापारी प्रकाश चव्हाण यांची राष्ट्रीय गोरक्षा मंच जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मोहन जगताप, अध्यक्ष राष्ट्रीय गोरक्षा मंच मुरली लव्हाळे, युवा तालुकाध्यक्ष रोहित नावंदर, वैभव कदम, राजाभाऊ बिडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देवून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.\nधुलीवंदन, रंगपंचमीचा सदोदित आनंद मिळो – आमदार श्वेता महाले\nमाजलगाव – तेलगांव रोडवर कार दुचाकीचा भिषण अपघात\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/read/marathi/story/pnhaalaa/kyap17ax", "date_download": "2022-10-07T22:16:15Z", "digest": "sha1:ANHKIAZZMV6HLYLFABDWETJHVVM545XZ", "length": 79303, "nlines": 320, "source_domain": "storymirror.com", "title": "पन्हाळा | Marathi Tragedy Story | Kakade Tejas", "raw_content": "\nत्रास बदली निरोप अस्वस्थ निश्चय हवालदार सहकुटूंब\nसन १९७५ च्या आसपासचा तो काळ असेल. माझ्या आजोबांची पन्हाळ्याला बदली झाली होती. किशोर काकडे म्हणजे त्याकाळी एका मोठ्या हुद्द्यावर असलेले पोलीस अधिकारी त्यांच्या प्रामाणिकपणाने केलेल्या कामामुळे त्यांची अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी बदली व्हायची. आता यावेळेस त्यांची बदली पन्हाळ्याला झाली होती. कांचन(माझी आजी) सोबत नुकतंच नवीन लग्न झालं होतं. लग्नानंतर अवघ्या १५ दिवसात पन्हाळा गाठायचा होता तर आजोबांचे वडील त्यांना म्हणाले, अरे बायकोला सोबत घेऊन जा आता लग्न झालं आहे तुझं अजून किती दिवस खानावळीत जेवण करणार. वडिलांचा शब्द डावलायचा कसा म्हणून त्यांनी आजीला सोबत घेत पन्हाळा गाठला. जुलै महिना उजाडला होता पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता त्यात पन्हाळा तर अगदी हिरवागार दिसत होता. आजी तर पन्हाळ्याच्या प्रेमात च पडली होती. खरंच सांगतो तिथल्या निसर्गसौंदर्यात काय जादु आहे काय माहिती जो पण तिथे जातो तो त्या जागेच्या अगदी प्रेमात पडतो. ते दोघे पन्हाळ्यावर पोचलो. त्यांना पोलीस क्वार्टर मध्ये खोली मिळाली होती त्यामध्ये त्यांनी संसार मांडला. आणि त्यांचा सुखी संसार सुरू झाला. एकदिवस आजोबांना सुट्टी होती आणि त्यांच्या मनात विचार आला लग्न झाल्यापासून हिला कुठे बाहेर फिरायला घेऊन गेलो नाही. तिला इकडे आणलं आणि कामात गुंतवून ठेवलं. त्या दिवशी त्यांनी आजीला surprise द्यायच्या हेतूने पन्हाळगड फिरायला नेले.\nगडावरून फेरफटका मारताना आजीला खाली दरीमध्ये एक घर दिसले, घर कसलं लांबून तर तो चांगला प्रशस्त बंगला वाटत होता, एकदम जंगलाच्या मधोमध आणि चारही बाजूने हिरवीगार झाडी. झालं आजीला ती जागा आवडली तिने लगेच आजोबांना तिच्या मनातली ईच्छा बोलून दाखवली.की आपण इथलं घर सोडून त्या बंगल्यावर राहायला जाऊया किती एकांत मिळेल तिथे' पण आजोबांनी कठोर शब्दात नकार दिला. आजी हिरमुसली आणि गुपचूप गाडीमध्ये जाऊन बसली आजोबा तिच्या मागोमाग गेले.आजीला त्या बंगल्याने एवढं जाळ्यात ओढलं होत स्वप्नात तो बंगला तिला दिसे. तिने अनेकदा आजोबांना सांगितले पण आजोबा ऐकायला तयार नव्हते कारण पोलीस चौकी त्यांना क्वार्टर पासून जवळ होती. आजी खूप नाराज झाली आणि तिने खाणंपिणं सोडलं आजोबा खा बोलले तरी खायची नाही आजोबांना काळजी वाटू लागली मग त्यांनी आजीला शब्द दिला की आपण लवकरच त्या बंगल्यात जाऊया. आजोबांनी माहिती काढायला सुरुवात केली कोणाचा बंगला आहे, कशी जागा आहे असं. लोकांकडून काही सकारात्मक प्रतिसाद आला नाही. एके दिवशी घरी येताना आजोबांनी त्यांच्या चालकाला विचारले कसा आहे तो बंगला कशी आहे ती जागा, त्यावर तो चालक गडबडला आणि म्हणाला, \"सायेब मलाबी ठाऊक नाय पर लोक म्हणत्यात की ती जागा भुताची हाय भूत राहत्यात तिथं\", आमचे आजोबा मुंबईत राहिलेले त्यांना या गोष्टीच हसू आलं आणि ते म्हणाले हे बघ रघुनाथ(चालकाचे नाव) आपण येत्या दोन दिवसात तिथे राहायला जातोय. रघुनाथ उचकला म्हणाला, \"सायेब तुम्हाला जायचं तर जावा म्या नाय येत वाटल्यास मला नोकरी सोडावी लागली तरीबी चालण\" आजोबा हसले आणि म्हणाले चल घरी सोड. त्या रात्री नंतर रघुनाथ परत गावात दिसलाच नाही.आजोबांनी आजीला सांगितले नव्हते की गावकरी त्या जागेला भुताची जागा म्हणतात ते कारण आजी भलतीच खुश होती तिला बंगल्यात जायला मिळणार होत.आजोबांनी सगळा बंगला दोन गडी घेऊन व स्वतः तिथे उपस्थित राहून साफ करून घेतला कारण पोलीस ते होते त्यांच्या नकार देणं कोणाला खपणार होत. ततपप करत त्यांनी घर साफ करून घेतलं.आणि दोन दिवसात आजी आणि आजोबा बंगल्यात राहायला गेले......कोणाला ठाऊक होतं इथं खरंच भूत आहे का की लोक अफवा पसरवतात. दिवस चांगले जात होते चालक पळून गेला होता त्यामुळे आजोबांना रात्री एकट्याला गाडी चालवत यावं लागत असे. आजोबांना किती पण उशीर होऊदेत आजी त्यांची वाट पाहत बसायची. रात्रीचे बारा वाजतील एक वाजेल पण ते आल्याशिवाय काही ती घास खायची नाही. आता या त्या काळच्या प्रथा किंवा त्या काळची प्रेम व्यक्त करायची पद्धत. ते काहीही असो. पण मात्र आजी वाट पहायची. आणि एक दिवस अचानक आजोबांना एका गुन्ह्याच्या तपासासाठी चंदगड (महाराष्ट्र व कर्नाटक च्या सीमेवरील गाव) या ठिकाणी जायचं होतं. आजोबा काळजी मध्ये पडले. एवढ्या मोठ्या घरात हिला एकटीला कस ठेवायचे.. पण आजी आमची धीट म्हणाली या जाऊन राहते मी एकटी काही काळजी करू नका. आजीने बोललेल्या या शब्दांनी आजोबांना धीर आला आणि म्हणाले काळजी करू नकोस चार दिवसांत मि परत येईल अस म्हणत आजोबा निघून गेले.\nआजी चा नंतरचा दिवस कामातच गेला. कारण बंगला फार प्रशस्त अगदी चित्रपटात दाखवतात तसा. आत प्रवेश केल्यावर मोठा हॉल, डाव्या बाजूला किचन, हॉल मधून उजव्या बाजूला गेलं वरच्या खोल्यांमध्ये जायला जिना वरती तीन खोल्या होत्या पण आजीने त्यांच्यासाठी एकच खोली उघडली होती. बाकी दोन खोल्यांची दार बंद च होती. सूर्य मावळला अंधार पडला आजी घरात एकटी नशीब तेव्हा विजेची सोया तिकडं झाली होती एक मिणमिणता बल्ब चालू केला. पण रात्र झाली आणि आजीला ते घर खायला उठू लागलं तिला भीती वाटू लागली.ती अस्वस्थ झाली आणि त्या दिवशी ती जेवली देखील नाही. पाणी पिऊन झोपायला गेली. त्या दिवशी तिला शांत झोप लागली नाही सतत आजोबांची काळजी लागून राहत होती. सकाळ झाली आणि ती खोलीच्या बाहेर आली तर खोलीबाहेर तिला तिच्या डाव्या पायातली एक चप्पल दिसली. मुख्य दरवाजाबाहेर काढलेली चप्पल अक्खा एक जिना चढून तिच्या खोलीपर्यंत आली कशी हा प्रश्न तिला पडला. तिला वाटलं कोणी मांजर वैगैरे असेल त्याने ठेवली असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं.आणि ती चप्पल घेऊन खाली आली. आजीला आजोबांची काळजी वाटत होती त्यावेळी आत्ताच्या सारखे मोबाईल नव्हते त्यामुळे संपर्क व्हायचा काही संबंध च नव्हता. तो ही दिवस कामात गेला आजीचा रात्री आजी झोपायला गेली. दुसरा दिवस उजाडला आजी उठून खाली यायला लागली तर जिन्याच्या सुरुवातीला पुन्हा ती चप्पल तिला दिसली आणि तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कोणी चोर वैगरे घुसला की काय घरात अस तिला वाटलं म्हणुन तिने सगळं घर तपासलं पण काही नव्हतं सगळं व्यवस्थित आणि जागच्या जागी होत. पण ती चप्पल आली कुठून परत एकदा ते तिला समजलं नाही. तो ही दिवस गेला रात्र झाली आजी झोपायला गेली पण आजीला शांत झोप लागेना. रात्रीचा दीड वाजत आला असेल ती या कुशिवरून त्या कुशीवर होत होती. थोडीशी अस्वस्थ होती तिला तहान लागली होती ती पाणी प्यायला खाली निघाली. खोलीचा दरवाजा तिने उघडला आणि तिला धक्का च बसला पुन्हा तिची चप्पल दरवाजात आली होती. ती हादरून च गेली कारण आता रोज रोज हे अस होत होत. तिने चप्पल हातात उचलून घेतली आणि तिला खूप मोठ्यामोठ्याने समोरच्या बंद असलेल्या खोलीतून रडायचा,किंकाळी फोडल्याचा आवाज येऊ लागला. आजी पुरती घामाघूम झाली होती. तिकडून आवाज येत होता आणि आवाज मुलीचा वाटत होता. ती ओरडत होती 'वाचवा वाचवा कोणीतरी वाचवा'. हे सगळं ऐकून आजी धाडकन चक्कर येऊन पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबा आले दरवाजा वाजवून देखील दरवाजा उघडला जात नाही म्हटल्यावर काहीतरी काळबेर असेल याची जाणीव त्यांना झाली दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि थेट त्यांच्या खोलीकडे धावले आणि खोलीच्या दरवाज्यातच आजी पडली होती. ते फार घाबरले त्यांनी तिला उठवायचा प्रयत्न केला पण ती काही उठली नाही शेवटी त्यांनी खाली जाऊन पाणी आणून तोंडावर मारले तेव्हा आजी थोडीशी शुद्धीवर आली. त्यांनी तिला हळूच खोलीमध्ये नेले आणि आराम करायला सांगितला. पण आजीच्या डोक्यात तोच रात्रीचा रडलेला आवाज ऐकू येत होत्या तेच तेच विचार करून तिच्या डोक्यात मुंग्या येत होत्या. तेवढ्यात आजोबा चहा घेऊन आले. आजीची विचारपूस केली. तेव्हा आजीने रात्री घडलेली सगळी हकीकत सांगितली तो चप्पलचा किस्सा ते रडणं वैगैरे सगळं काही. आजोबा बोलले छे काही पण नको बोलूस भूत वैगैरे काही नसत एखादं जनावर असेल आणि रडायचं म्हणत असशील तर तुला कदाचित एकटी असल्याने भास झाला असेल. पण आजी म्हणाली तो भास नव्हता अहो खरंच मला त्या समोरच्या खोलीतून तो रडलेला आवाज ऐकू आला. आजोबा त्यावर फक्त हसले आणि म्हणाले देवावर विश्वास आहे ना तुझा मग झालं तर नको चिंता करुस. कोणी भूत वैगैरे नाही येणार तुला घ्यायला. आजोबांच्या येण्याने आजीला जरा हायस वाटलं तेवढ्यात नेमके आजोबा म्हणाले माझ्याकडे आलेली केस अजून सुटली नाहीये कदाचित आणखी एक चंदगड चा दौरा होऊ शकतो. आजी त्यांना थांबवत म्हणाली, 'तुम्ही जाता मला एकटं ठेऊन रात्रीच घर खायला उठत मला आणि त्यात तो घडलेला प्रसंग एकटी कशी राहू मी या घरात'. आजोबा म्हणाले नको काळजी करुस स्टेशन वरून एक हवालदार पाठवेल मी इथे लक्ष्य ठेवायला अस म्हणून आजोबा त्याच संध्याकाळी पुन्हा चंदगड कडे रवाना झाले आणि आजी पुन्हा एकटी पडली रात्री सुमारे साडे आठ च्या सुमारास दारावरची बेल वाजली दारात हवालदार उभा होता म्हणाला साहेबांनी पाठवलं आहे मला इथे तुमच्या सुरक्षिततेसाठी. आजीला बर वाटलं ती म्हणाली तुम्ही कुठे थांबताय त्यावर हवालदार उत्तरला,गेट पाशी आहे ना छोटी केबिन तिथे बसतो माझा रेडिओ ऐकत काही वाटलं तर वरच्या खिडकीतून आवाज द्या. आजी ठीक आहे म्हणाली आणि सगळं आवरून ती झोपायला गेली. रात्रीचे साडेबारा एक वाजला असेल कसलातरी आवाज झाला त्या आवाजाने आजीला जाग आली. ठक....ठक....ठक......ठक.... असा आवाज येत होता. अस वाटत होत की कोणीतरी काठी आपटत चालत आहे पण एवढ्या रात्री कोण असणारे इथे अस तिला वाटलं म्हणून ती वरच्या खिडकीकडे गेली गेटकडे पाहिलं तिथे केबिन पाशी रेडिओ चालू होता त्याचा आवाज येत होता पण दरवाजा बंद होता आणि अंधार पण होता त्यामळे हवालदार आजीला दिसला नाही. तिला वाटले हवालदार काठी आपटत चालत आहे. याची शहानिशा करावी म्हणून ती खाली जायला निघाली आणि तिने खोलीचा दरवाजा उघडला पण दरवाज्यात चप्पल नव्हती. तिच्या जीवात जीव आला. पुढे ती जस जसा जिना उतरुण खाली आली तिला समोर जे दिसलं ते फार भयंकर होत. तिला समोर एक मुलगी दिसली जिच्या एका पायात तिची एक चप्पल आणि डाव्या खांद्याला कुबड्या होत्या तिला एकच पाय होता. ती एक अपंग मुलगी होती काळेभोर केस,निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता तिने. आजी फार घाबरली आजीला फक्त भोवळ यायची बाकी होती. तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली पण तिथे कोणी नव्हतं कदाचित गेटवरच्या हवालदाराचा पण डोळा लागला होता पण गाण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता त्यात रातकिड्यांची किरकिर होतीच आणि या मुलीचं ठक ठक चालणं सुरू होत. आजीने आरडाओरडा करताच त्या मुलीने आजीकडे वळून पाहिलं आणि तिला पाहताच आजी भोवळ पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली सतत वाजणाऱ्या बेल ने आजीला जाग आली. पाहते तर समोर हवालदार उभा पण रात्री जो हवालदार होता तो हा नव्हता हा वेगळाच कोणीतरी होता. आजीने त्याला विचारले, 'काय हो ते रात्रीचे दादा कुठे गेलेत त्यावर हवालदार चपापला आणि म्हणाला, रात्रीचे हवालदार त्यावर हवालदार चपापला आणि म्हणाला, रात्रीचे हवालदार अहो मॅडम साहेबांनी मला काल रात्री इथली ड्युटी लावली पण गावात जुन्या जाणत्या लोकांच्या कडून बरच काही वाईट ऐकलंय या बंगल्याबद्दल म्हणून मी रात्रीचा आलो नाही मला भीती वाटत होती. पण इथे रात्री दुसरा कोणी कसा येणार ही गोष्ट फक्त साहेब आणि माझ्यामधली आहे. आजीला हे सगळं ऐकून पुन्हा भोवळ आली ती पडली. आणि तिने डोळे उघडले ते दवाखान्यातच. समोर आजोबा उभे होते तो सकाळचा हवालदार उभा होता डॉक्टर उभे होते. शुद्ध येताच डॉक्टर म्हणाले, गुड न्यूज आहे तुम्ही आई होणार आहात....हे ऐकताच आजीचा चेहरा खुलला आणि आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. पण आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद फार काळ टिकला नाही. तिला ती रात्रीची मुलगी आठवली तिचा चेहरा आठवला. तिने ती सगळी हकीकत आजोबांना सांगितली,एका बाजूने पूर्ण भाजलेला होता त्या मुलीचा चेहरा आणि ती हसत हसत माझ्या कडे पाहत होती. पण आजोबांनी हे देखील हसण्यावारी नेलं आणि म्हणाले स्वप्न बघितलं असशील तू हे असलं सगळ्या गोष्टी फक्त चित्रपटात होतात खऱ्या आयुष्यात नाही. आजी त्यांना कस समजावणार होती तिच्या च हट्टापायी त्यांनी ते घर घेतलं होतं. संध्याकाळी ते घरी आले डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितले होते. म्हणून आजोबांनी त्यांच्या आईला पत्र लिहिले. पण त्यांची म्हणाली, अरे आठ दिवसांनी येते शेतात लगबग चालू आहे.\nआजोबांनी मनाशी पक्के केले या अवस्थेत आजीला सोडून कुठेही जायचं नाही. आजोबांनी त्यांची आई येत नाही तोवर आजीची पुरेपूर काळजी घेतली आजीला काही कमी पडू दिलं नाही. आठ दिवसांनी आजीची सासू आली सासूबाई जाम खुश घरात पाळणा हलणार या बातमीने. आता आजोबा मोकळे झाले त्यांनी त्यांच्या आईवर आजीची सगळी जबाबदारी टाकली आणि ते आपली काम करायला मोकळे झाले. त्या दिवशी अमावस्या होती आजोबा कामानिमित्त मुंबई ला गेले होते घरात आजी आणि त्यांची सासू दोघीच. काम आवरली आणि दोघी जणी वरती झोपायला गेल्या दोघी एकाच खोलीत झोपल्या. तेव्हा आजीचा पाचवा महिना चालु होता. आणि मध्यरात्र झाली होती एकाएकी आजीला काहीतरी पडल्याचा आवाज आला. ती दचकून जागी झाली तिने शेजारी पाहिलं सासूबाई गाढ झोपल्या होत्या. तेव्हढ्यात बाहेरून जोरात रडण्याचा आवाज येऊ लागला. हा तोच आवाज होता जो त्या दिवशी आजीला ऐकू आला होता. आजी फार घाबरली तिने सासूबाई ना उठवायचा प्रयत्न केला सासूबाई गाढ निद्रेत होत्या. त्या जाग होत म्हणाल्या, 'काय झालं बाई झोप ना गप धड स्वतः झोपत नाही आणि दुसऱ्याला झोपू देत नाही'. आजीला माहिती होत सासूबाईंना झोप फार प्रिय होती. आजी त्यांना म्हणाली अहो कोणीतरी रडल्याचा आवाज येतोय मोठमोठ्याने सासूबाई दचकून जाग्या झाल्या. उठून बसल्या त्यांनी कानोसा घेतला आणि म्हणाल्या, झोप गपचुप काही आवाज वैगैरे येत नाहीये पण आजीला मात्र आवाज ऐकू येत होता, आणि आजीला दाट संशय होता ही तीच मुलगी असणार आहे जी त्या दिवशी खाली तिला दिसली होती. आजीला घाम फुटला होता बाहेर उठून जायची हिम्मत होत नव्हती शेवटी तिने कानावर हात ठेवला आणि झोपी गेली. तास दीड तासानंतर तो आवाज पूर्ण शांत झाला आणि आजी झोपी गेली. दिवस उजाडला १० वाजत आले असतील. आजीला रात्रीच्या उशिरा झोपण्याने तिल सकाळी जाग आली नाही सकाळी पण शेजारी ती पाहते तर सासूबाई नव्हत्या. आजी खाली उठून गेली तर सासूबाई खाली किचन मध्ये होत्या. त्या म्हणाल्या, उठलात का सुनबाई बर झालं....सकाळी नाही उठवलं तुम्हाला शांत झोप लागली होती तुमची, पण मला एक सांगा सुनबाई तुमची एक चप्पल आपल्या खोलीबाहेर कशी काय आली बर झालं....सकाळी नाही उठवलं तुम्हाला शांत झोप लागली होती तुमची, पण मला एक सांगा सुनबाई तुमची एक चप्पल आपल्या खोलीबाहेर कशी काय आली आजी निरुत्तर झाली. सांगणार तर काय आणि कोणाला आजी निरुत्तर झाली. सांगणार तर काय आणि कोणाला सांगितलं असत तर तिलाच येड्यात काढलं असत या लोकांनी म्हणून ती गप्प बसली. त्या दिवशी तिने दिवसभर आराम च केला. रात्री झोपण्यापूर्वी सासूबाई तिला म्हणाल्या, मी खालीच झोपते तुझ्या खोलीत मला काही बाई झोप येत नाही. आजी म्हणली मला भीती वाटते हो त्यावर त्या म्हणाल्या अग कोणी नाही येत नको काळजी करुस. मी आहे की खालीच झोपलेली. आणि भीती वाटते तर खोलीचा दरवाजा उघडा ठेव बंद नको करुस.आजीला हा पर्याय आवडला तिने दरवाजा उघडा ठेवला आणि झोपायला गेली. मध्यरात्र झाली होती अचानक आजीला ठक ठक....त्या दिवशी आला तसा आवाज येत होता. आणि तिला तो आवाज फार जवळून येत होता. आजी जागी झाली पण डोळे काही तिने उघडले नाहीत. आवाज शांत झाला तिने डोळे उघडले आणि पाहते समोर काय....ती उभी होती काळ्या रंगाचा कुर्ता, दोन्ही हातात कुबड्या, अर्धा चेहरा भाजलेला, डोळे रडून रडून सुजलेले,लाल भडक झालेले, ते सगळं पाहून आजीची दातखीळ बसली. ती मुलगी हळूच घोगऱ्या आवाजात आजीजवळ येऊन म्हणाली, तुम्ही माझ्या घरात राहायला आला आहात हे माझं घर आहे आणि आता तुला तेच ऐकावं लागेल जे मी सांगेल, आता ऐक मी काय म्हणते ते तुझ्या नवऱ्याचं आणि माझं लग्न लावून दे आपण दोघी या घरात बहिणीसारख्या राहू... बोल आहे का कबूल सांगितलं असत तर तिलाच येड्यात काढलं असत या लोकांनी म्हणून ती गप्प बसली. त्या दिवशी तिने दिवसभर आराम च केला. रात्री झोपण्यापूर्वी सासूबाई तिला म्हणाल्या, मी खालीच झोपते तुझ्या खोलीत मला काही बाई झोप येत नाही. आजी म्हणली मला भीती वाटते हो त्यावर त्या म्हणाल्या अग कोणी नाही येत नको काळजी करुस. मी आहे की खालीच झोपलेली. आणि भीती वाटते तर खोलीचा दरवाजा उघडा ठेव बंद नको करुस.आजीला हा पर्याय आवडला तिने दरवाजा उघडा ठेवला आणि झोपायला गेली. मध्यरात्र झाली होती अचानक आजीला ठक ठक....त्या दिवशी आला तसा आवाज येत होता. आणि तिला तो आवाज फार जवळून येत होता. आजी जागी झाली पण डोळे काही तिने उघडले नाहीत. आवाज शांत झाला तिने डोळे उघडले आणि पाहते समोर काय....ती उभी होती काळ्या रंगाचा कुर्ता, दोन्ही हातात कुबड्या, अर्धा चेहरा भाजलेला, डोळे रडून रडून सुजलेले,लाल भडक झालेले, ते सगळं पाहून आजीची दातखीळ बसली. ती मुलगी हळूच घोगऱ्या आवाजात आजीजवळ येऊन म्हणाली, तुम्ही माझ्या घरात राहायला आला आहात हे माझं घर आहे आणि आता तुला तेच ऐकावं लागेल जे मी सांगेल, आता ऐक मी काय म्हणते ते तुझ्या नवऱ्याचं आणि माझं लग्न लावून दे आपण दोघी या घरात बहिणीसारख्या राहू... बोल आहे का कबूल आजी गप्प च होती. तिचा जीव जायचा बाकी होता फक्त. ती मुलगी म्हणाली तुझा नवरा आला की त्याला सांग सगळं मी काय म्हणाले ते आणि माझं लग्न लावून दे नाहीतर तुझं बाळ आहे आणि मी आहे ध्यानात ठेव. अस म्हणून ती मुलगी मागे वळाली. आणि इकडे आजीने मान टाकली...सकाळी सासूबाई उठून आजीच्या खोलीत आल्या पण खोलीच्या बाहेर त्यांना ती आजीची चप्पल दिसली. त्यांनी दुर्लक्ष करत खोलीत आल्या आणि आजीची ती अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला.आजी आडवी पडली होती बेडवर तीच डोकं बेडच्या बाहेरील बाजूस लटकत होतं. त्यांनी पळत जाऊन आजीला नीट केलं आणि त्यांच्या हाताला चटका बसला आजी तापाने फनफनत होती. सासूबाई ना काय करावे सुचेना त्यांनी मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या आणून ठेवल्या. थोड्यावेळाने आजोबा आले त्यांनी आजीला हात लावला अंग फार गरम होत तीच. ते ताबडतोब जाऊन डॉक्टर ला घेऊन आले. डॉक्टर हो नाही हो नाही करत शेवटी आले. त्यांनी आजीला तपासलं. इंजेक्शन दिलं. डॉक्टर म्हणाले, साहेब तुमच्या मिसेस ने खुप काहीतरी मोठा मानसिक ताण घेतला आहे आणि त्याचा परिणाम शरीरावर फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. या अवस्थेत ताण तणाव नाही घ्यायला पाहिजे त्यांनी. बाळावर परिणाम होतात, मी त्यांना इंजेक्शन दिल आहे त्यांना वाटेल बर काळजी नसावी. आजी हळूहळू शुद्धीवर येत होती ताप पण कमी झाला होता. आजोबा तिच्या समोर गेले आणि ती लग्न,लग्न...अस म्हणाली आणि परत तिची शुद्ध हरपली. आजोबांना वाटले हा सगळा डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शन चा प्रकार आहे पण तसं नव्हतं आजीने जेव्हा डोळे उघडले तेव्हा ती आजोबांच्या शेजारीच हसत हसत उभी होती.पण आजी सोडून ती कोणालाच दिसत नव्हती. अस का आजी गप्प च होती. तिचा जीव जायचा बाकी होता फक्त. ती मुलगी म्हणाली तुझा नवरा आला की त्याला सांग सगळं मी काय म्हणाले ते आणि माझं लग्न लावून दे नाहीतर तुझं बाळ आहे आणि मी आहे ध्यानात ठेव. अस म्हणून ती मुलगी मागे वळाली. आणि इकडे आजीने मान टाकली...सकाळी सासूबाई उठून आजीच्या खोलीत आल्या पण खोलीच्या बाहेर त्यांना ती आजीची चप्पल दिसली. त्यांनी दुर्लक्ष करत खोलीत आल्या आणि आजीची ती अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला.आजी आडवी पडली होती बेडवर तीच डोकं बेडच्या बाहेरील बाजूस लटकत होतं. त्यांनी पळत जाऊन आजीला नीट केलं आणि त्यांच्या हाताला चटका बसला आजी तापाने फनफनत होती. सासूबाई ना काय करावे सुचेना त्यांनी मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या आणून ठेवल्या. थोड्यावेळाने आजोबा आले त्यांनी आजीला हात लावला अंग फार गरम होत तीच. ते ताबडतोब जाऊन डॉक्टर ला घेऊन आले. डॉक्टर हो नाही हो नाही करत शेवटी आले. त्यांनी आजीला तपासलं. इंजेक्शन दिलं. डॉक्टर म्हणाले, साहेब तुमच्या मिसेस ने खुप काहीतरी मोठा मानसिक ताण घेतला आहे आणि त्याचा परिणाम शरीरावर फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. या अवस्थेत ताण तणाव नाही घ्यायला पाहिजे त्यांनी. बाळावर परिणाम होतात, मी त्यांना इंजेक्शन दिल आहे त्यांना वाटेल बर काळजी नसावी. आजी हळूहळू शुद्धीवर येत होती ताप पण कमी झाला होता. आजोबा तिच्या समोर गेले आणि ती लग्न,लग्न...अस म्हणाली आणि परत तिची शुद्ध हरपली. आजोबांना वाटले हा सगळा डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शन चा प्रकार आहे पण तसं नव्हतं आजीने जेव्हा डोळे उघडले तेव्हा ती आजोबांच्या शेजारीच हसत हसत उभी होती.पण आजी सोडून ती कोणालाच दिसत नव्हती. अस काअस का होतंय ती मुलगी फक्त आजीला च का दिसत होती इतरांना का दिसत नव्हती हा प्रश्न आजीला भेडसावत होता. तिथे आजोबांच्या शेजारी दात विचकत उभी होती.आजी त्या दिवशी दिवसभर झोपून होती. रात्र झाली आजोबांनी पण त्या दिवशी सुट्टी घेतली होती ते आजीच्या उशाला बसून तिची काळजी घेत होते. घरातली काम करायला सासूबाई होत्याच ना....आजीला जाग आणि आजोबांनी तिला पाणी दिलं. आजोबांना समोर पाहून तिला बरं वाटलं तिने खोलीतून चौफेर नजर फिरवली आणि ती कुठे दिसतेय का बघितलं पण ती त्या खोलीत नव्हती. आजीला वाटलं हीच योग्य वेळ आहे आजोबांना विश्वासात घेऊन सगळं काही सांगायची. आजी त्यांना म्हणाली, अहो मला तुमच्यासोबत महत्वाचं बोलायचं आहे. ते म्हणाले अग थेट बोल ना काय असेल ते. मग आजीने चप्पलच्या गोष्टीपासून ते काल शेजारी येऊन त्या मुलीने लग्न लावून दे म्हणेपर्यंत सगळा घटनाक्रम सांगितला. हे सगळं ऐकून आजोबांचा चेहरा गंभीर झाला. आणि त्यांच्या डोक्यात विचार आला,सगळं गाव ह्या घराला भुताच घर म्हणत, जागा झपाटलेली आहे असं म्हणत पण मला इथे काही जाणवलं नाही कारण मी जास्त वेळ घरी नसायचो,ही जास्तवेळ घरी होती आणि खरचं घरात अस काही असेल तर मग लवकरात लवकर हे घर सोडावं लागेल. आजोबांनी त्या जागेचा इतिहास शोधायचं ठरवलं.\nत्यांनी गावात चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यात त्यांना यश आले. गावातल्या एका जुन्या जाणकाराने त्यांना त्यांच्या आधी जे कुटुंब तिथे राहायचे तेव्हा तिथे एक नोकर काम करीत होता त्याचं नाव व पत्ता सांगितला. धनाजी यादव त्या नोकराच नाव पण तो नोकर पन्हाळ्यात राहत नव्हता तो मुळगाव त्याच होत गडहिंग्लज. आजोबांच्या हातात पत्ता तर होता फक्त त्यांना गडहिंग्लज ला जायचं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांनी गडहिंग्लज ला जायचं ठरवलं आणि एका दिवसात परत यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी गाडी आणि सोबत तो गावातला गडी घेऊन आजोबा गडहिंग्लज ला निघाले. जवळपास दोन तासांच्या प्रवासानंतर ते गड ला पोहोचले. पत्ता होता त्यामुळे इकडेतिकडे कोणाला विचारायची गरज त्यांना पडली नाही. त्यांची गाडी थेट धनाजी च्या दारात जाऊन थांबली. गाडीचा आवाज ऐकून एक म्हातारी आजी बाहेर आली. आजोबा गाडीतून उतरुन त्या म्हातारीपाशी गेले आणि म्हणाले, आजी धनाजीराव आहेत का घरात म्हातारी काही न बोलता घरात निघून गेली आणि जाता जाता दरवाजात थांबून तिने आजोबांना आत येण्याचा इशारा केला. आजोबांनी त्या गड्याला खुणावलं गडी पण गाडीतून उतरून त्यांच्या मागे चालू लागला. आजोबा त्या घरात आले घर तस छोटेखानी होत घर कसलं झोपडी म्हणा हवं तर. शेणाने सारवलेली जमीन, मातीच्या भिंती त्यांचे जागोजागी पोपडे निघाले होते तशी आत मधून पार च घराची अवस्था बिकट होती. आजोबा खालीच जमिनीवर बसले. तेवढ्यात आतल्या खोलीतून एक माणूस खोकत दमखात बाहेर आला आणि आजोबांकडे पाहून म्हणाला, साहेब काय काम काढलत गरिबांकड काय चुकलं माकल का आमचं म्हातारी काही न बोलता घरात निघून गेली आणि जाता जाता दरवाजात थांबून तिने आजोबांना आत येण्याचा इशारा केला. आजोबांनी त्या गड्याला खुणावलं गडी पण गाडीतून उतरून त्यांच्या मागे चालू लागला. आजोबा त्या घरात आले घर तस छोटेखानी होत घर कसलं झोपडी म्हणा हवं तर. शेणाने सारवलेली जमीन, मातीच्या भिंती त्यांचे जागोजागी पोपडे निघाले होते तशी आत मधून पार च घराची अवस्था बिकट होती. आजोबा खालीच जमिनीवर बसले. तेवढ्यात आतल्या खोलीतून एक माणूस खोकत दमखात बाहेर आला आणि आजोबांकडे पाहून म्हणाला, साहेब काय काम काढलत गरिबांकड काय चुकलं माकल का आमचं हात जोडत तो म्हणत होता. आजोबा हसत म्हणाले, अस काही नाही मला जरा माहिती हवी आहे बस्स बाकी काही नाही. धनाजीला जरा हायस वाटलं तो म्हणाला, कसली माहिती साहेब हात जोडत तो म्हणत होता. आजोबा हसत म्हणाले, अस काही नाही मला जरा माहिती हवी आहे बस्स बाकी काही नाही. धनाजीला जरा हायस वाटलं तो म्हणाला, कसली माहिती साहेब आजोबांनी त्याला विचारलं, तुम्ही पन्हाळ्याला होतात ना आजोबांनी त्याला विचारलं, तुम्ही पन्हाळ्याला होतात ना त्यावर धनाजी हो उत्तरला. तेव्हा तुम्ही 'स्मिता' बंगल्यात नोकर होता अस ऐकलं आहे मी मला त्या बंगल्याबद्दल माहिती हवी आहे,जेव्हा तुम्ही तेथे कामास होता तेव्हा तिथे कोण कोण राहत होत त्याची माहिती हवीये. धनाजीला त्या बंगल्याच नाव काढताच दरदरून घाम फुटला..तो म्हणाला,साहेब त्या घरापायी मी बरच काही गमावलं आहे मला आता तो विषय नकोय बास. आजोबा थक्क झाले ते म्हणाले अहो मी त्या घरात आता राहत आहे आणि माझी पत्नीला दिवस गेले आहेत तेव्हापासून की त्याच्या आधीपासून तिला कसले कसले भास होतात. ती म्हणते, तिला कोणी मुलगी दिसते. धनाजी आजोबांना थांबवत म्हणाला, म्हंजी ती हायच का तिथं आजूक त्यावर धनाजी हो उत्तरला. तेव्हा तुम्ही 'स्मिता' बंगल्यात नोकर होता अस ऐकलं आहे मी मला त्या बंगल्याबद्दल माहिती हवी आहे,जेव्हा तुम्ही तेथे कामास होता तेव्हा तिथे कोण कोण राहत होत त्याची माहिती हवीये. धनाजीला त्या बंगल्याच नाव काढताच दरदरून घाम फुटला..तो म्हणाला,साहेब त्या घरापायी मी बरच काही गमावलं आहे मला आता तो विषय नकोय बास. आजोबा थक्क झाले ते म्हणाले अहो मी त्या घरात आता राहत आहे आणि माझी पत्नीला दिवस गेले आहेत तेव्हापासून की त्याच्या आधीपासून तिला कसले कसले भास होतात. ती म्हणते, तिला कोणी मुलगी दिसते. धनाजी आजोबांना थांबवत म्हणाला, म्हंजी ती हायच का तिथं आजूक आजोबा अवाक् झाले आणि म्हणाले ती म्हणजे कोण आजोबा अवाक् झाले आणि म्हणाले ती म्हणजे कोण धनाजी उत्तरला,स्मिता धनाजी पुढे सांगू लागला, १९६५ साली म्हणजे दहा वर्ष झाली बर या गोष्टीला. गौतम मोहिते नावाचे तुमच्यासारखेच एक सरकारी साहेब पन्हाळ्याला आले. त्यांच्या दिमतीला मी होतोच. त्यांला सरकारी घरात जागा भेटली होती. सोबत त्यांच्याबर त्यांची बायको,पोरगी आणि एक पोरग . पण पोरगी एका पायानी अधू होती. तिला एक पाय नव्हता. लहानपणी तिचा म्हणे अपघात झालता आणि त्यात ती पाय गमावून बसली अस बाईसाहेब मला म्हणाल्या होत्या, जेव्हा मी त्यांना तिच्याबद्दल विचारलं होतं. तिच्यापायीच त्यांनी पुणे सोडून इथं बदली करून घेतली होती वाटतं. तिथं तिला त्रास होयचा माणसं काहीबाही बोलायची तिला. लग्नाचं वय झालं होत तिचं पोरगी २१ वर्षाची तर असल ती. दिसायला तर लय देखणी, मनमिळाऊ स्वभाव होता पर एक गोम होती तिच्यात तिला जी आवडल ना ती ते करायची मग ते चांगलं असलं काय आणि वाईट असलं काय...साहेबाची लाडकी लेक त्यामुळं कोणीबी काय बोलत नव्हतं तिला. एक दिवस तिला गच्चीवरून फिरताना खाली जंगल दिसलं एकदम सुंदर हिरवंगार पाहताच क्षणी कोणीही त्या जागेच्या प्रेमात पडावं अस. आणि आता जिथं बंगला आहे ना ती जागा तिला लय आवडली. तेव्हा ती जागा भुताची नव्हती. आणि एवढी जास्त दाट पण नव्हती. गावातली माणसं गुरेढोरे घेऊन त्या वाटेने चरायला डोंगरावर आणायची. त्यामुळं तिथं काय बी भय नव्हतं. तिनं त्या रात्रीला त्या जागेबद्दल साहेबांसोबत चर्चा केली वाटतं. स्मिता तेव्हा साहेबाना म्हणली होती की मला तिथं आपलं घर पाहिजे आपण इथल्या गर्दीतून तिथे जाऊ. आणि त्याचवेळी आजोबांना आजी त्यावेळी पहिल्यांदा त्या जागेबद्दल काय बोलली होती ते आठवलं. धनाजी पूढे म्हणाला, साहेब तिच्यावर जाम चिडले आणि तिथून निघून गेले. हिकडं पोरीन खाणंपिन सोडलं. कोणासोबत बोलत नव्हती काही खात नव्हती. सायेब आणि बाईसाहेब काळजीत पडल्या, हिला नेमकं झालं काय आणि त्यांच्या ध्यानात आलं की तिला त्या जागेवर घर हवंय. साहेब एक दिस कामावरून घरी आल्यावर थेट स्मिता जवळ गेले आणि त्यांनी कसलातरी कागद तिला दावला. जागेचा कागद होता वाटत त्यो. त्यो कागद बघून पोरगी बापाच्या गळ्यात च पडली का नाही पडणार हो, बापाने तिच्या नावाने ती जमीन खरेदी केली होती. १९६५ ते १९६७ बंगल्याच काम सुरू होतं. बंगला एकदम प्रशस्त बांधला होता. साहेबांनी स्वतः जातीने लक्ष्य देऊन काम करून घेतलं होतं. साहेबांनी बंगल्याची मोठी पूजा घालायची ठरवली. पूजेचा दिवस ठरला साहेबांनी सगळे त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळ सगळे जण बोलावले होते. सगळी मित्र मंडळी आली. त्यांच्या ऑफिसातली लोक आली होती. मोहितेंनी बंगल्याचा नाव पण स्मिता ठेवलं. पूजेचा दिवस ठरला साहेबानी सगळे त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळ सगळे जण बोलावले होते. सगळी मित्र मंडळी आली. त्यांच्या ऑफिसातली लोक आली होती. जेवण वैगैरे चालू होती. स्मिता कुबड्यांच्या आधारे का होईना सगळीकडे मिरवत होती. पूजा थाटात संपन्न झाली. सगळे नातेवाईक निघून गेले. काही जवळचे होते तेवढे राहिले होते त्यात साहेबांची एक लांबची बहीण होती. पूजेच्या दुसऱ्या सगळे खाली नाष्टा करत बसले होते. स्मिता खाली येत होती. त्याचवेळी ती बहीण म्हणाली, काय म्हणावं पोरीला दया येते तिची एवढं सहन करतेय ती, पण आता मोठी झाली पण तिचं लग्न कस होणार एवढी देखणी पोरगी आणि बिनलग्नाची राहणार. फक्त पायामुळेच ना आणि त्यांच्या ध्यानात आलं की तिला त्या जागेवर घर हवंय. साहेब एक दिस कामावरून घरी आल्यावर थेट स्मिता जवळ गेले आणि त्यांनी कसलातरी कागद तिला दावला. जागेचा कागद होता वाटत त्यो. त्यो कागद बघून पोरगी बापाच्या गळ्यात च पडली का नाही पडणार हो, बापाने तिच्या नावाने ती जमीन खरेदी केली होती. १९६५ ते १९६७ बंगल्याच काम सुरू होतं. बंगला एकदम प्रशस्त बांधला होता. साहेबांनी स्वतः जातीने लक्ष्य देऊन काम करून घेतलं होतं. साहेबांनी बंगल्याची मोठी पूजा घालायची ठरवली. पूजेचा दिवस ठरला साहेबांनी सगळे त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळ सगळे जण बोलावले होते. सगळी मित्र मंडळी आली. त्यांच्या ऑफिसातली लोक आली होती. मोहितेंनी बंगल्याचा नाव पण स्मिता ठेवलं. पूजेचा दिवस ठरला साहेबानी सगळे त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळ सगळे जण बोलावले होते. सगळी मित्र मंडळी आली. त्यांच्या ऑफिसातली लोक आली होती. जेवण वैगैरे चालू होती. स्मिता कुबड्यांच्या आधारे का होईना सगळीकडे मिरवत होती. पूजा थाटात संपन्न झाली. सगळे नातेवाईक निघून गेले. काही जवळचे होते तेवढे राहिले होते त्यात साहेबांची एक लांबची बहीण होती. पूजेच्या दुसऱ्या सगळे खाली नाष्टा करत बसले होते. स्मिता खाली येत होती. त्याचवेळी ती बहीण म्हणाली, काय म्हणावं पोरीला दया येते तिची एवढं सहन करतेय ती, पण आता मोठी झाली पण तिचं लग्न कस होणार एवढी देखणी पोरगी आणि बिनलग्नाची राहणार. फक्त पायामुळेच ना. तिने ते ऐकलं आणि ती आल्यापाऊली मागे फिरली आणि खोलीत जाऊन रडत बसली. आधीच अपघाताने तीच बालपण हिरावून घेतलं होतं. तिला पण वाटायचं आपण मनसोक्त जगावं, इतर मित्रमैत्रिणी प्रमाणे फिरावं आपलं पण लग्न व्हावं पण अस काही होणार नव्हतं हर तिला माहिती होतं आणि ती नशिबाला दोष देत तिथेच रडत बसली. तिला फक्त तिच्यावर प्रेम करणारा हवा होता तिला हवं तसं कबूल करणारा. पण तसा कधी तिला भेटणार होता का. तिने ते ऐकलं आणि ती आल्यापाऊली मागे फिरली आणि खोलीत जाऊन रडत बसली. आधीच अपघाताने तीच बालपण हिरावून घेतलं होतं. तिला पण वाटायचं आपण मनसोक्त जगावं, इतर मित्रमैत्रिणी प्रमाणे फिरावं आपलं पण लग्न व्हावं पण अस काही होणार नव्हतं हर तिला माहिती होतं आणि ती नशिबाला दोष देत तिथेच रडत बसली. तिला फक्त तिच्यावर प्रेम करणारा हवा होता तिला हवं तसं कबूल करणारा. पण तसा कधी तिला भेटणार होता का झाले आता सगळे नातेवाईक निघून गेले. मोहिते कुटुंब तिथं स्थायिक झालं होतं. ,मुलगा छोटा होता त्याला शाळेला कोल्हापुरात ठेवलं होतं. हिच्या मनातून लग्नाचा विचार काही जात नव्हता. एक पाय अधू असल्याने कोणी तिला आपल्या घरची सून करून घ्यायला तयार नव्हत. अशातच साहेबांना एक वॉचमन पाहिजे होता. मी माझ्या पोराला साहेबांकडे विनंती करून बंगल्याच्या राखणीसाठी ठेवला. २६ वर्षाचा माझा तो मुलगा . नोकरी लागत नव्हती शिक्षणाभावी. स्मिता ची आणि त्याची नजरानजर होयची. ते बोलू लागले. आणि अश्यातच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. स्मिता दिसायला सुंदर होती. पण अधू होती तरी त्याला मंजूर होतं. पण हे फारकाळ टिकणार नव्हतं. दोघांच नात फार पुढे गेल होत. ही त्याला तिच्या खोलीतून इशारे करत असताना साहेबांनी त्यांना पकडलं आणि त्यांना सारं काही समजलं. त्यांनी त्या पोराला कामावरून हाकलून लावलं. त्याच्यावर आपल्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी गुन्हा पण नोंदवला. पोलिसांनी मारून मारून पार माझ्या पोराची हाड खिळखिळी केली. आणि त्याला सोडून दिला. तो पोलीस स्टेशन मधून थेट त्या बंगल्याकडे गेला. मोहिते..... ओ..... मोहिते असा आवाज दिला. साहेब धावत बाहेर आले. पण तोवर माझ्या काळजाच्या तुकड्याने बाहेरच झाडाला फाशी घेतली होती. त्याच्या पाय आणि हातात तडफड दिसत होती. साहेब जवळ जाई पर्यँत ती पण थांबली. हे सगळं स्मिता ने वरून पाहिलं होतं. साहेबांनी स्मिता कडे पाहिलं स्मिता लगेच आत वळली. ते थक्क होऊन त्या लटकलेल्या पोराकडे च पाहत होते की तेवढ्यात त्यांना त्यांच्या मुलीचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला त्यांनी खोलीकडे पाहिलं तर धूर येत होता स्मिताने स्वतःला पेटवून घेतले होते. वाचवा वाचवा अस ती ओरडत होती. मोहिते धावत तिच्यापाशी गेले. त्यांची पत्नी तिथेच उभी रडत रडत दार ठोठावत होती. पण दरवाजा आतून बंद. ते दरवाजा ला धक्के देत होते पण दरवाजा उघडत नव्हता आतून फार जोरजोरात आवाज ऐकू येत होता...दहा मिनिटांनी तो आवाज बंद झाला. मोहितेंनी दरवाजा धक्का देऊन तोडला पण तोवर उशीर झाला होता. स्मिता आणि तिची खोली दोन्हीची राख झाली होती. साहेबांना एवढा जबर धक्का बसला होता की बस्स. कारण त्यांच्या समोर दोन जीव गेले होते आणि त्यात एक त्यांची पोटची मुलगी होती. मी मागच्या बाजूला होतो बाहेर पळत आलो तर माझं पोरग पुढं लकटलेलं दिसलं. मला पण काही सुधारत नव्हतं की बाईसाहेबांचा रडण्याचा आवाज ऐकू आला. मला तिकडे पण जाऊ वाटत नव्हतं. मी माझ्या पोराच्या तिथेच बसलो. पुढे काय पोलीस आले. काय क्रियाकर्म झालं माझ्या पोराची बॉडी दोन दिवसांनी हातात दिली. याच हातानी मी त्याच्या पार्थिवाला अग्नी दिला. आजोबा हे सगळं थक्क होऊन ऐकत होते. नंतर वाटत त्यांनी बंगला पण सोडला आणि पुढे काय झालं काही माहिती नाही मला. आजोबा त्यावर त्याला काहीच बोलले नाहीत.थोडेसे पैसे त्यांनी त्याच्या हातावर ठेवले आणि त्यांनी धनाजी चा निरोप घेतला.\nमध्यरात्र उलटून गेली होती आजोबांना पन्हाळ्यावर पोहोचायला. संपूर्ण प्रवासात तोच विचार आजोबांच्या मनात की खरच हिला स्मिता दिसत असेल का आजोबा घरात गेले खालच्या खोलीत त्यांची आई झोपली होती तिनेच आत्ता दरवाजा उघडला होता. वरती खोलीत गेले आजी शांतपणे झोपली होती. ते देखील थकले होते त्यामुळे ते लगेच झोपी गेले. झोपता झोपता त्यांनी मनाशी ठरवलं जो पर्यंत आपल्या समोर काही येत नाही तोपर्यंत याच बंगल्यात राहायचं.....आजोबांची ही एक चुक त्यांना खूप महागात पडणार होती याची त्यांना मुळीच कल्पना नव्हती.....आजोबांनी मनाशी चंग बांधला होता की स्वतःला काही अनुभव आल्याशिवाय कोणताही निर्णय घेयचा नाही. हा विचारांमध्ये त्यांना आजीचा विचार आला नाही. तिला या अवस्थेत होणाऱ्या त्रासाचा विचार आला नाही. त्या रात्री सगळे शांत झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबा खोलीबाहेर पडले तर त्यांना आजीची चप्पल दाराबाहेर दिसली. ते जरा अचंबित झाले हे इथं कस आलं हा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी ती चप्पल उचलून दाराबाहेर नेऊन ठेवली. आजीला त्यांनी उठवलं आणि घडलेला प्रकार सांगितला. आजीला माहिती होत हे विश्वास ठेवणार नाहीत त्यामुळे तिने तो विषय टाळला. त्या दिवशी आजोबांनी सुट्टी घेतली आजीची तब्येत बरी नसल्याने घरची काम करायला त्यांची आई होतीच की आजोबा घरात गेले खालच्या खोलीत त्यांची आई झोपली होती तिनेच आत्ता दरवाजा उघडला होता. वरती खोलीत गेले आजी शांतपणे झोपली होती. ते देखील थकले होते त्यामुळे ते लगेच झोपी गेले. झोपता झोपता त्यांनी मनाशी ठरवलं जो पर्यंत आपल्या समोर काही येत नाही तोपर्यंत याच बंगल्यात राहायचं.....आजोबांची ही एक चुक त्यांना खूप महागात पडणार होती याची त्यांना मुळीच कल्पना नव्हती.....आजोबांनी मनाशी चंग बांधला होता की स्वतःला काही अनुभव आल्याशिवाय कोणताही निर्णय घेयचा नाही. हा विचारांमध्ये त्यांना आजीचा विचार आला नाही. तिला या अवस्थेत होणाऱ्या त्रासाचा विचार आला नाही. त्या रात्री सगळे शांत झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबा खोलीबाहेर पडले तर त्यांना आजीची चप्पल दाराबाहेर दिसली. ते जरा अचंबित झाले हे इथं कस आलं हा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी ती चप्पल उचलून दाराबाहेर नेऊन ठेवली. आजीला त्यांनी उठवलं आणि घडलेला प्रकार सांगितला. आजीला माहिती होत हे विश्वास ठेवणार नाहीत त्यामुळे तिने तो विषय टाळला. त्या दिवशी आजोबांनी सुट्टी घेतली आजीची तब्येत बरी नसल्याने घरची काम करायला त्यांची आई होतीच की रात्र झाली सगळे झोपायला गेले. आणि मध्यरात्र झाली असता आजोबांना रडण्याचा आवाज ऐकू आला. ते दचकून उठले तर शेजारी आजी शांत झोपली होती. तिला उठवणे योग्य नाही असे म्हणत आजोबा त्या आवाजाच्या दिशेने चालत गेले. खोलीबाहेर आले आणि समोरच्या बंद खोलीतून त्यांना आवाज येत होता. त्यांनी दरवाजा ठोठावला आणि त्याचवेळी आवाज शांत झाला. आजोबा जरा घाबरले पण भास असेल असं म्हणत दुर्लक्ष करीत आपल्या खोलीकडे वळाले आणि इतक्यात त्यांच्या पायामध्ये काहीतरी आलं ते खाली पडले. काय आलं पायात हे पाहायला त्यांनी मागे मान केली तर ते दृश्य पाहून आजोबा पुरते हादरले. त्यांच्या समोर दात विचकत स्मिता उभी होती. हो हो स्मिता च उभी होती. जीच्याबद्दल एवढं ऐकून देखील त्यांनी दुर्लक्ष केलं होतं स्वतःच्या बायकोवर विश्वास त्यांनी ठेवला नव्हता आता ती स्मिता आजोबांच्या समोर उभी होती. तिथे उभी राहून आजोबांकडे पाहत म्हणाली, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय तुझी बायको आणि मी यावर बोललोय. आम्ही दोघी बहिणीसारख्या राहू तुझा जर नकार असेल ना तर हे सगळं तुझ्या बाळाच्या जीवावर बेतेल लक्ष्यात ठेव.....आजोबा तिथेच बेशुद्ध होऊन पडले. सकाळी त्यांच्या आईने त्यांना जाग केलं आणि उठताक्षणी ते म्हणाले, आपण हे घर आजच्या आज खाली करतोय खूप झालं इथं या जंगलात राहण. त्यांच्या आईला काही समजेना हे अस का बोलत आहेत त्यांनी आजीला पण सांगितले तू तुला लागेल ते वर काढून ठेव आपण हे घर सोडतोय.... आजी हळूच जवळ जाऊन म्हणाली, दिसली वाटतं तुम्हाला पण ती रात्र झाली सगळे झोपायला गेले. आणि मध्यरात्र झाली असता आजोबांना रडण्याचा आवाज ऐकू आला. ते दचकून उठले तर शेजारी आजी शांत झोपली होती. तिला उठवणे योग्य नाही असे म्हणत आजोबा त्या आवाजाच्या दिशेने चालत गेले. खोलीबाहेर आले आणि समोरच्या बंद खोलीतून त्यांना आवाज येत होता. त्यांनी दरवाजा ठोठावला आणि त्याचवेळी आवाज शांत झाला. आजोबा जरा घाबरले पण भास असेल असं म्हणत दुर्लक्ष करीत आपल्या खोलीकडे वळाले आणि इतक्यात त्यांच्या पायामध्ये काहीतरी आलं ते खाली पडले. काय आलं पायात हे पाहायला त्यांनी मागे मान केली तर ते दृश्य पाहून आजोबा पुरते हादरले. त्यांच्या समोर दात विचकत स्मिता उभी होती. हो हो स्मिता च उभी होती. जीच्याबद्दल एवढं ऐकून देखील त्यांनी दुर्लक्ष केलं होतं स्वतःच्या बायकोवर विश्वास त्यांनी ठेवला नव्हता आता ती स्मिता आजोबांच्या समोर उभी होती. तिथे उभी राहून आजोबांकडे पाहत म्हणाली, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय तुझी बायको आणि मी यावर बोललोय. आम्ही दोघी बहिणीसारख्या राहू तुझा जर नकार असेल ना तर हे सगळं तुझ्या बाळाच्या जीवावर बेतेल लक्ष्यात ठेव.....आजोबा तिथेच बेशुद्ध होऊन पडले. सकाळी त्यांच्या आईने त्यांना जाग केलं आणि उठताक्षणी ते म्हणाले, आपण हे घर आजच्या आज खाली करतोय खूप झालं इथं या जंगलात राहण. त्यांच्या आईला काही समजेना हे अस का बोलत आहेत त्यांनी आजीला पण सांगितले तू तुला लागेल ते वर काढून ठेव आपण हे घर सोडतोय.... आजी हळूच जवळ जाऊन म्हणाली, दिसली वाटतं तुम्हाला पण ती आजोबा निःशब्द झाले त्यांनी दोन गडी बोलावून घेतले सगळं सामान पोचवायला. आणि हे सगळं इतकं गडबडीत झालं होतं की कोणाला काहीच समजत नव्हतं काय होतंय ते. पण आजोबांना एवढं नक्की समजलं होत की या घरात धोका आहेच. संध्याकाळ पर्यंत ते घर खाली करून आजोबा सहकुटूंब क्वार्टर वर परत राहायला आले. पुन्हा त्या बंगल्याकडे चुकून सुद्धा पाहणार नाही असा त्या दोघांनी निश्चय केला. पुढे त्या स्मिता च आणि त्या बंगल्याच काय झालं कोणास ठाऊक आजोबा निःशब्द झाले त्यांनी दोन गडी बोलावून घेतले सगळं सामान पोचवायला. आणि हे सगळं इतकं गडबडीत झालं होतं की कोणाला काहीच समजत नव्हतं काय होतंय ते. पण आजोबांना एवढं नक्की समजलं होत की या घरात धोका आहेच. संध्याकाळ पर्यंत ते घर खाली करून आजोबा सहकुटूंब क्वार्टर वर परत राहायला आले. पुन्हा त्या बंगल्याकडे चुकून सुद्धा पाहणार नाही असा त्या दोघांनी निश्चय केला. पुढे त्या स्मिता च आणि त्या बंगल्याच काय झालं कोणास ठाऊक पण इकडे येऊन आजी जरा खुलली होती. आनंदी वाटत होती. आजीला जरा बर वाटलं तिचा शेवटचा महिना होता दोन दिवस झाले होते त्यांना घर बदली करून की आजीला त्रास होयला लागला पोटात कळा येऊ लागल्या आजीला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेलं आजोबा सोबत होतेच. OT च्या बाहेर सगळे थांबले होते आणि डॉक्टर बाहेर आणि म्हणाले, मला माफ करा साहेब पण मी आपल्या बाळाला नाही वाचवू शकलो ते फार अशक्त होतं आणि विचित्र गोष्ट अशी की जन्मलेल्या मुलाला एक पाय नव्हता.............\nमुसळधार पावसातील हृदयद्रावक घटनेची कथा मुसळधार पावसातील हृदयद्रावक घटनेची कथा\nपतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद... पतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद...\nएका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी कथा एका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी ...\nआजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा आजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा\nकोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा कोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा\nसरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय सरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय\nवैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा वैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा\nआयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे आयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे\nअत्यंत कमी शब्दांत अंतर्मुख करणारी रचना अत्यंत कमी शब्दांत अंतर्मुख करणारी रचना\nथेट काळजाला भिडणारी उत्तम अतिलघुकथा थेट काळजाला भिडणारी उत्तम अतिलघुकथा\nशाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा शाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा\nपत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण पत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण\nएकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हणा\" एकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हण...\nथांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी. थांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी.\nलहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी लहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी\nएका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र एका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र\nनैना अश्क़ ना हो...\nआज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पहाटेच उठली. अंगण रांग... आज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पह...\nएका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र एका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र\nअत्यंत गहिरा आशय असलेली अतिलघुकथा अत्यंत गहिरा आशय असलेली अतिलघुकथा\nअन् ती निबंधात नापास झाली...\nएका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते एका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-5-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-07T23:23:29Z", "digest": "sha1:X5AOQABBTR5J3RPGNEM2KWOA7VCRMXSB", "length": 15257, "nlines": 92, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "'या 5' गोष्टींचे सेवन केल्यास नसर्गिकरित्या, प्रतिकारक शक्तीसोबतच वाढेल तुमची लैंगिक शक्ती... - Themaharashtrian", "raw_content": "\n‘या 5’ गोष्टींचे सेवन केल्यास नसर्गिकरित्या, प्रतिकारक शक्तीसोबतच वाढेल तुमची लैंगिक शक्ती…\n‘या 5’ गोष्टींचे सेवन केल्यास नसर्गिकरित्या, प्रतिकारक शक्तीसोबतच वाढेल तुमची लैंगिक शक्ती…\nहल्लीचे दिवस कोरोनाचे आहेत. या दिवसात बरेच लोक गुणकारी उपाय म्हणून आयुर्वेदिक उपाय योजना करत असतात. सर्वांना माहीतच आहे की संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा हाहाकार दिसून येत आहे. हिंदुस्थानमध्येही कोरोना वेगाने फैलावत असताना दिसून येत आहे. सुरुवातीचे काळात लॉक डाऊन देखील करण्यात आले होते.\nयाचदरम्यान लॉकडाऊनमध्ये शिथिलता देखील देण्यात आली असल्याने कामानिमित्त बाहेर जात असाल तर प्रत्येकाची रोग प्रतिकार शक्ती चांगली असायला हवी हे काय सांगावे लागणार नाही. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात देखील अनेक गोष्टींचे सेवन करण्यास सांगितले गेले आहे. आयुर्वेदात सांगितलेले औषध आणि वनस्पती सर्वानाच सहज उपलब्ध होत असतात.\nया गोष्टी सहज उपलब्ध होणाऱ्या असून यातील बऱ्याच अशा गोष्टी आणि पदार्थ असतात की त्यांचा वापर आपण सर्व रोजच्या आहारात करत असतो. काहींचा वापर आपण रोज आपल्या जेवणातही करतो. सर्व रोगांवर आयुर्वेदात उपचार होय असल्याचे सर्वानाच माहीत आहे. आणि संपूर्ण जगाला हिंदुस्थानने ही देणगी दिली आहे. आज आपण अशाच पाच प्रतिकारशक्ती वाढणाऱ्या गोष्टींची माहिती करून आहोत.\n1. हळद :- आपल्याकडे हळदीचे बाहेर देशातून आयात करावे लागत नाही. कारण आपला शेतीप्रधान देश असून हळद आपल्या शेतातच पिकते. आपल्या प्रत्येकाच्या घरात हळद नेहमीच उपलब्ध होत असते. हळद आपल्याकडे रोज जेवणात वापरली जाते. हळद खूपच गुणकारी अशी आहे. हळदीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारे गुणतत्व भरपूर प्रमाणात असतात.\nहळदीमध्ये एंटी ऑक्सीडेंट्स आणि एंटी इंफ्लेमेट्री गुण असल्याने शरीरासाठी हळद फायदेशीर ठरते. दुधासोबत किंवा मध आणि थोडे गरम पाण्यासोबत हळदीचे सेवन केल्यास शरीरास फायदा होतो. यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती तर वाढतेच वाढते त्यासोबतच बरेच आजार देखील आपल्यापासून दूर राहतात. रोगप्रतिकारक शक्ती देखील खूप प्रमाणात वाढते.\n2. तुळस :- आपल्या देशात घरोघरी प्रत्येकाचे घरासमोर तुळस असतेच असते. घरासमोर तुळस असणे याला शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण देखील आहे. तुळसीच्या पानांमध्ये एंटी ऑक्सीडेंट्सचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. रोज तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मध्ये वाढ होते. तुळशीच्या पानाचा रस काढून त्याचे सेवन मधासोबत केल्यास प्रतिकारशक्ती वाढण्याचा वेग जास्त असतो. तसेच अनेक प्रकारच्या काढ्यात तुळशीच्या पानाचा वापर करण्यास कोणीही विसरत नाही.\n3. गुळवेल :- गुळवेलाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. शरीराची प्रतिकारक शक्ती वाढविण्यात गुळवेल सर्वात पुढे आहेत. कोरोना च्या या काळात गुळवेलाला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या गुळवेल शोधण्यास भरपूर लोकही जीवाचा आटापिटा करत आहे. गुणकारी असा हा वेळ अधिक चर्चेत आला आहे.\nगुळवेल प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असल्याचे सिद्ध झाल्यामुळे याची मागणी अधिकच वाढली आहे. बाजारात गुळवेलाच्या कॅप्सूल स्वरूपात गोळ्या किंवा ज्यूस स्वरूपातही उपलब्ध आहे. घरगुती उपाय म्हणून बऱ्याच घरांमध्ये याच्या पानांचा रस काढून त्याचे सेवन केले जात आहे.\n4. आलं :- आल देखील आपल्या मायभूमीत पिकवले जाणारे कंदमुळं आहेत. रोजचा चहा, आणि भाज्या बनविताना विशेषतः यांची चव वाढवण्यासाठी आलं (अद्रक) याचा प्रतेक घरात रोज वापर केला जातो. सर्दी, खोकला किंवा हलका ताप असल्यास जुनी लोक तोंडात आलं ठेवून चघळण्यास सांगत असत.\nयाच्या तिखट उग्र रसामुळे कंठ सुखावतो व लवकर आराम मिळतो. आल्याचा वापर नियमित केल्यास प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. यात एंटी बैक्टीरियल, एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी ऑक्सीडेंट गुण असल्याने याचे रोज सेवन करने फायदेशीर ठरते. मधासोबत आले खाल्ल्यास प्रतिकारशक्ती वेगाने वाढते.\n5. अश्वगंधा :- सर्व जगात सध्या कोरोना चा कहर सुरू आहे. या काळात अश्वगंधा या औषधी वनस्पतीचे नाव बऱ्याच जणांचे तोंडून तुम्ही ऐकलेही असेल. आयुर्वेदात अश्वगंधा अनेक रोगांवर जालीम उपाय म्हणून वापरले जाते. दुधासोबत अश्वगंधा वनस्पतीचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते. रात्री झोपताना हा प्रयोग केल्यास झोप चांगली लागते आणि पुरेशी झोप झाल्याने प्रतिकारशक्ती वाढते.\n(असे असले तरी आपल्या कौटुंबिक डॉक्टरांचे सल्ले घेऊनच औषधांचे सेवन करा)\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2020/12/blog-post_24.html", "date_download": "2022-10-07T22:35:17Z", "digest": "sha1:2OZYPPMFM7BSQUQKWCDFNU7K2DBH6YSC", "length": 6500, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "गिरगाव येथे वडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्याने युवकाची आत्महत्या", "raw_content": "\nHomeजतवार्तागिरगाव येथे वडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्याने युवकाची आत्महत्या\nगिरगाव येथे वडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्याने युवकाची आत्महत्या\nजत/प्रतिनिधी: वडिलांनी नवीन मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने शंकर निंगप्पा मांग (वय २२ रा. गिरगाव ता. जत) येथील तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.\nशंकर मांग हा गिरगाव येथे आपल्या आई-वडिलांना शेतीकामात मदत करत होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो वडिलांकडे नवीन मोबाईल घेऊन देण्याची मागणी करत होता. गुरुवारी सकाळी पुन्हा वडिलांना त्याने मोबाईल घेऊन देण्यास सांगितले. मात्र वडिलांनी नकार दिला व ते कामानिमित्त घरातून बाहेर पडले. त्यानंतर सकाळी ९ च्या दरम्यान शंकरने घरात कोणी नसताना, गळफास घेऊन आत्महत्या केली.\nघटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. मृताचे वडील निंगप्पा लकाप्पा मांग यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\nमनसेकडून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.transliteral.org/pages/z110402115341/view", "date_download": "2022-10-07T22:45:41Z", "digest": "sha1:7FLE5DFAWBVDOTUR5DP3BZAFRFMC3MCV", "length": 12190, "nlines": 124, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीज्ञानेश्वरांची समाधी - अभंग ५१ ते ६० - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीज्ञानेश्वरांची समाधी|\nअभंग ५१ ते ६०\nअभंग १ ते १०\nअभंग ११ ते २०\nअभंग २१ ते ३०\nअभंग ३१ ते ४०\nअभंग ४१ ते ५०\nअभंग ५१ ते ६०\nअभंग ६१ ते ७२\nश्रीज्ञानेश्वरांची समाधी - अभंग ५१ ते ६०\nश्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले.\nअभंग ५१ ते ६०\nमुगुट मनोहर कुंडलें मकाराकार कांसे पीतांबर कसियेला ॥१॥\nखोविले गोशे स्वार गरुडावर उठविले भार वैष्णवांचे ॥२॥\nकेलें आचमन तीर्थीं त्या तांतडी आले उठाउठी सिद्धेश्वरीं ॥३॥\nपरमार्थ स्वार्थ जाल्या गुह्य गोष्टी होताती भेटी ज्ञानेदेवा ॥४॥\nनामा म्हणे भेटा लहान थोर सारे जातो ज्ञानेश्वर समाधीसी ॥५॥\nब्रह्मादिक तेथेम करिताती पूजा घालिताती सेजा समाधीसी ॥१॥\nचिद्रत्न आसन उन्मनीची धुनी समाधि सज्जनीं पाहियेली ॥२॥\nधुवट वस्त्राची घडी ते अमोल तुळसी आणि बेल आंथरिले ॥३॥\nदुर्वा दर्भ वरी टाकिले मोकळे पुष्पें तीं सकळें समर्पिलीं ॥४॥\nनामा म्हणे येथें छाया निरंतर सुखी ज्ञानेश्वर सुखावला ॥५॥\nलावियेला दीप निरंजन ज्योति प्रकाशल्या दीप्ती तन्मयाच्या ॥१॥\nपूजूनि समाधि निघाले बाहेर प्रेमें ज्ञानेश्वर डुल्लतसे ॥२॥\nअनुमानिलें स्थळ सभोंवतीं सारें धन्य ज्ञानेश्वरें कृपा केली ॥३॥\nदेव आणि नामा रुक्माई राही स्फुंदती ठायीं ठायीं संतजन ॥४॥\nनिवृत्ति सोपान पुढें मुक्ताबाई देवा सांगा कांहीं निजगुज ॥१॥\nदेव ज्ञानेश्वर बैसले जवळीं घेतियेली आळी सोपानानें ॥२॥\nज्ञानदेवें खूण सांगितली देवा पूर्ण तूं विसांवा सज्जनांचा ॥३॥\nसोपानाचे हात देवाचिये हातीं तेव्हां आपमूर्ति कासविस ॥४॥\nम्लान वदनें निवृत्ति सद्‌गुरु सागर येऊनि ज्ञानेश्वर चरणीं लागे ॥५॥\nनामा म्हणे याचे अंतर परिपूर्ण नाहीं देहीं भान निवृत्तीसी ॥६॥\nपांडुरंग निवृत्ति उभे दोघेजण आरंभिलें नमन ज्ञानदेवें ॥१॥\nनामा पुंडलिक उभे दोहोंकडे ज्ञानराजा पुढें उभे ठेले ॥२॥\nगंध आणि अक्षता पुष्प परिमळ आणियेले जळ भागिरथीचें ॥३॥\nअनंत स्वरुपाचीं अनंत हीं नावें नमन ज्ञानदेवें आरंभिलें ॥४॥\nनामा म्हणे देवा नमनाची रीती नमन सर्वांभूतीं मान्य जालें ॥५॥\nपुढें ज्ञानेश्वर जोडोनियां कर बोलतो उत्तर स्वामिसंगें ॥१॥\nपाळिलें पोसिलें चालविला लळा बा माझ्या कृपाळा निवृत्तिराजा ॥२॥\nस्वामीचिया योगें जालों स्वरुपाकार उतरलों पार मायानदी ॥३॥\nनिवृत्तीचें हात उतरिला वदना त्यागिलें निधाना आम्हालागीं ॥४॥\nनामा म्हणे देवा देखवेवा मज ब्रह्मीं ज्ञानराज मेळविला ॥५॥\nवोसंडोनि निवृत्ति आलिंगों लागला आणिकांच्या डोळां अश्रु येती ॥१॥\nअमर्यादा कधीं केली नाहीं येणें शिष्य गुरुपण सिद्धी नेलें ॥२॥\nगीतार्थाचा अवघा घेतला सोहळा \nफेडिलीं डोळ्याचीं अत्यंत पारणीं आतां ऐसें कोणी सखे नाहीं ॥४॥\nकाढोनियां गुह्य वेद केले फोल आठवती बोल मनामाजीं ॥५॥\nनामा म्हणे संत कासावीस सारे लाविती पदर डोळियांसी ॥६॥\nदेव म्हणे ऐसें आठवाल कोठवर होईल उशीर समाधीशी ॥१॥\nनिरंजनीं समाधि निरंतर तुम्हांसी व्यर्थ कासाविसी होऊं नये ॥२॥\nनिवृत्तीसी पोटीं धरिलें देवानें केलें समाधान अवघियांचें ॥३॥\nब्रह्माणि ही कळा पुढें मुक्ताबाई देवा सांगा कांहीं आम्हांलागीं ॥४॥\nदेव म्हणे तुज येणें जाणें नाहीं अनुभवोनि पाही जीवन्मुक्ती ॥५॥\nम्हणे मुक्ताई सख्या ज्ञानेश्वरा प्रार्थना तुम्ही करा देवालागीं ॥६॥\nज्ञानदेवें वचन घातलें देवांवर विश्वाचें मनोर पांडुरंग ॥७॥\nनामा म्हणे स्वामि प्रेमाचिया रंगें बोलावणें स्वांगें करुं आम्ही ॥८॥\nज्ञानदेवें देवा घातलें वचन करा समाधान सोपानाचें ॥१॥\nसमुद्रायेसीं तुम्हां करुं बोळवण ऐसाचि सोपान ब्रह्मकरु ॥२॥\nतीर्थावळी वेळें नेमियलें स्थान तेथें पोचविणें मजलागीं ॥३॥\nविठठल रुक्माई उभी समाधान दिधलें वचन ज्ञानदेवा ॥४॥\nनामा म्हणे देवा स्थिरावलें मन करितां समाधान अवघियांचें ॥५॥\nनिवृत्तिदेव म्हणे सांगतो या वाचे राहाणें चौघांचें एकरुप ॥१॥\nत्रिवेणीचा ओघ जैसा एके ठायी तैसी मुक्ताबाई आम्हांमध्यें ॥२॥\nब्रह्माविष्णुहर जैसे एके ठायीं तैसी मुक्ताबाई आम्हांमध्यें ॥३॥\nरज तम गुण सत्व गुणाठायी तैसी मुक्ताबाई आम्हांमध्यें ॥४॥\nभूचरी खेचरी चांचरी ते पाही अगोचरा ठायीं मुक्तगंगा ॥५॥\nप्रथम ज्ञानेश्वरें काढियेली वाट धरियेलें वैकुंठ आळंकापुरीं ॥६॥\nइंद्रनीळ पर्वत नेमिला सोपाना निवृत्तीसी जाणा त्रिंबकेश्वर ॥७॥\nचौथी मुक्ताबाई नेमियली तापी नामा म्हणे ख्याती केली यांनीं ॥८॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2022/06/21/internationalyogaday-2/", "date_download": "2022-10-07T23:17:23Z", "digest": "sha1:EZ7NRAEC5Y4SRZLPLQ45DZQMEP2CFN5Y", "length": 16946, "nlines": 110, "source_domain": "kokanmedia.in", "title": "आरोग्य आणि सक्षम आयुष्यासाठी योग आणि आयुर्वेदाला पर्याय नाही – संजय शिंदे - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nआरोग्य आणि सक्षम आयुष्यासाठी योग आणि आयुर्वेदाला पर्याय नाही – संजय शिंदे\nरत्नागिरी : उत्तम आरोग्य आणि सक्षम आयुष्यासाठी योग आणि आयुर्वेदाला पर्याय नाही, असे प्रतिपादन रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी व्यक्त केले.\nजिल्हा क्रीडा अधिकारी, नेहरू युवा केंद्र आणि जिल्हा प्रशासनातर्फे आज येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या बॅडमिंटन कोर्टवर आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. त्याच्या उद्घाटन समारंभात श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले, केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार नेहरू युवा केंद्राच्या विद्यमाने योग दिन साजरा होत आहे. योगामध्ये मोठी ताकद आहे. अलीकडेच जगभरात झालेल्या करोनावर कोणतेही औषध नव्हते. त्यात योगासने आणि अष्टांग आयुर्वेद या दोन गोष्टींना महत्त्व मिळाले. ज्यांनी योगाभ्यास केला आणि आयुर्वेदाचा वापर केला, योगसने चालू ठेवला, त्यांच्यापैकी ९० टक्के लोकांना करोना झाला नाही. काही जणांना करोना झाला तरी त्यांना फारसा त्रास झाला नाही. युवा पिढीने हे लक्षात ठेवले पाहिजे. योग आणि आयुर्वेद हा जीवनाचा भाग करावा, जेणेकरून भविष्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. मानसिक, शारीरिक आजार होणार नाहीत. आतापर्यंत करोना आपल्याला माहीत नव्हता. भविष्यात आणखी कोणते रोग निर्माण होतील, हे माहीत नाही. त्यांना सक्षमपणे सामोरे जायचे असेल, तर योग आणि आयुर्वेदाला पर्याय नाही.\nनेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी म्हणाले की, योगदिन जगात साजरा केला जात आहे. आजची प्रत्येकाची जीवनशैली धावपळीची झाली आहे. ताणतणाव वाढले आहेत. त्यावर योग उपयुक्त आहे. अनेक प्रकारची आयात-निर्यात चालते. पण योगासने ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. इंग्लंड, अमेरिकेत योग लोकप्रिय झाला आहे. स्वास्थ्यपूर्ण आणि आनंदी जीवनासाठी योगाचा दैनंदिन जीवनात वापर प्रत्येकाने करावा.\nसमारंभाचे सूत्रसंचालन योगशिक्षक राजेश आयरे यांनी केले. सूर्यनमस्कार म्हणजे विविध आसने, प्राणायाम आणि योगासनांचा तिहेरी संगम आहे. जलद गतीने सूर्यनमस्कार घातल्यास व्यायाम साधला साधला जातो.\nउद्घाटन समारंभानंतर योगगीत सादर करण्यात आले. शिर्के प्रशालेच्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी योगाची आणि दहा आणि बारा आसनांच्या सूर्यनमस्कारंची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर झालेल्या योगाच्या प्रात्यक्षिकांमध्ये एनसीसी आणि इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.\nजिल्हा नियोजन अधिकारी सत्यविजय मुळ्ये यावेळी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी आभार मानले.\nयोग दिन कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ आणि प्रात्यक्षिके सोबतच्या व्हिडीओमध्ये\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nरत्नागिरीच्या ‘आविष्कार’चे दिवाळी गिफ्ट बॉक्स सज्ज\nमहाराष्ट्र राज्य फिडे मानांकन बुद्धिबळ निवड स्पर्धेस दिमाखात प्रारंभ\nस्वरूपानंद पतसंस्थेच्या आर्थिक भक्कमतेची ग्वाही देणारा निर्देशांक\nवाशिष्ठीच्या दूध संकलन केंद्राचा मालघरमध्ये शुभारंभ\nमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समुळे कोकणातील उद्योजकांना पाठबळ – संतोष तावडे\nदसरा मेळावे : विचारांचे (\nआंतरराष्ट्रीय योग दिन रत्नागिरीकोकणकोकण बातम्याकोकण मीडियारत्नागिरीरत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयरत्नागिरी बातम्याKokanKokan MediaKokan NewsKonkanRatnagiriRatnagiri News\nPrevious Post: रत्नागिरीचे तरुण न्यूरोसर्जन डॉ. श्रीविजय फडके यांना न्यूरोसर्जरीतील सुवर्णपदक प्रदान\nNext Post: हठयोग प्रशिक्षणार्थी पाचवीतील शाल्व कारेकरची योगासन प्रात्यक्षिके लक्षवेधी\nरत्नागिरी येथील आविष्कार संस्थेच्या श्री शामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले दिवाळी गिफ्ट बॉक्स विक्रीसाठी सज्ज झाले आहेत. शामराव भिडे कार्यशाळेत बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्याद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याचा उद्देश डोळ्यांसमोर असतो.\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (17) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (17) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (58) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,089) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,596) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (281) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (27) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (305) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (236) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (352)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.essaymarathi.com/2022/02/art-of-advertising-essay-marathi.html", "date_download": "2022-10-07T21:13:27Z", "digest": "sha1:BDDYGREBD6OJVOOPNKRQ7BTXRYBHFVCU", "length": 20974, "nlines": 70, "source_domain": "www.essaymarathi.com", "title": "जाहिरातीची कला मराठी निबंध | The Art Of Advertising Essay Marathi - ESSAY MARATHI मराठी निबंध", "raw_content": "\nपरीक्षेत सर्वोत्तम गुणांसह भरघोस यश मिळवुन देणारे सर्व प्रकारचे मराठी निबंध.\nHome चिंतनात्मक जाहिरातीची कला मराठी निबंध | The Art Of Advertising Essay Marathi\nBy ADMIN सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२\nनमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जाहिरातीची कला मराठी निबंध बघणार आहोत. गाडी बराच वेळ बंद पडली होती. हातातले वर्तमानपत्र जवळजवळ वाचून संपले होते आणि अशा वेळी माझे लक्ष वेधले गेले ते वृत्तपत्रातील जाहिरातींकडे. अगदी मन लावून मी जाहिराती वाचू लागलो आणि त्यांतील लालित्य लक्षात येऊ लागले.\nमानवी स्वभावाचे सारे कंगोरे लक्षात घेऊनच त्या विविध जाहिराती तयार केल्या होत्या आणि यापूर्वी लक्षात न आलेले जाहिरातीतील कलागुण मला जाणवले. भारावून जाऊन मी बाहेर पाहिले; आणि काय गंमत खिडकीतून समोर पाहिले तर तेथेही एक जाहिरात मला खुणावत होती.\nउंच कड्यावरील प्रभावी अंजनाची' जाहिरात पाहून मनात आले, जणू ही जाहिरात मानवाला त्याच्यातील त्रुटींची जाणीवच करून देत आहे. भव्य, दिव्य निसर्गाच्या सान्निध्यात तुला अमृतांजनाची गरज आहे. डोकेदुखीने हैराण झालास तर... तू या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेऊ शकणार नाहीस-असे जणू त्या जाहिरातीतून सूचवावयाचे होते.\nजाहिरात ही आता आपल्या रोमारोमात भिनली आहे. नभोवाणी, दूरचित्रवाणी यांच्या माध्यमांतून ती घराघरातून मुक्काम ठोकत आहे. मला वाटतं, या जाहिरातीला आता कोणतीही जागा अप्राप्य नाही. ऑलिम्पिकचे मैदान असो, विशाल आकाशाचे प्रांगण असो वा गर्दीने गजबजलेला रहदारीचा रस्ता असो, सर्वत्र हिचे अस्तित्व आहेच.\nमुंबईत तर स्मशानाच्या भितींवरही जाहिराती रंगीबेरंगी रूपे घेऊन हजर आहेत. या जाहिरातीचे कार्य जसे महान तशी तिची रूपेही अनंत. तिला देक्श्राव्य शक्ती प्राप्त झाल्याने तर ती अधिकच आकर्षक झाली आहे. अशा या जाहिरातीचेही शास्त्र आहे. अनेक शास्त्रांच्या साहाय्यानेच ही कला विकसित होते.\nजाहिरातीच्या कलेला भक्कम आधार आहे तो मानसशास्त्राचा. मानवी मनाची नाडी तिने अचूक जाणली आहे. एखादी गोष्ट पुनः पुन्हा ऐकविली की ती माणसाला खरी वाटू लागते हे जाणून तीच तीच जाहिरात चित्रपट, दूरचित्रवाणी, नभोवाणी या माध्यमांतून अवतरते आणि मग ग्राहकाला ते खरेच वाटू लागते.\nएका साबणाच्या पावडरची विक्री जाहिरातीमुळे काही हजारांवरून कित्येक लाखांवर गेली असल्याचे नुकतेच वाचनात आले. माणसाच्या मनातील चिंता, व्यथा जाहिरात ओळखते. तरुण वयातील मुली चेहऱ्यावरील मुरमांनी बेचैन असतात, तर चेहरा गुळगुळीत ठेवण्यासाठी चांगल्या ब्लेडच्या शोधात तरुण असतात.\nजाहिरात त्यांच्या समस्या मांडून त्यांचे मन जिंकते आणि जाहिरातीतील मालाचा खप वाढविते. आजच्या जाहिरातीचे विशाल क्षेत्र आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, मानवी जीवनातील असे आता एकही क्षेत्र उरलेले नाही की ते या जाहिरातीने व्यापले नाही.\nविविध भेटींची आकर्षणे, आवडत्या अभिनेत्यांच्या नावांचा उपयोग आणि जीवनातील अवघड क्षण टिपून जाहिरात अवतरते आणि ग्राहकाचे मन जिकते. जाहिरात ही आज माणसाच्या जीवनाचा अपरिहार्य भाग झाली आहे. जाहिरातीची ही कला अनेक 'कलांची कला' आहे.\nजाहिरातीच्या कलेत चित्रकला, अभिनयकला, लेखनकला यांबरोबरच आज संगीतकलेलाही स्थान लाभले आहे. दूरचित्रवाणी व नभोवाणीवर अवतरणाऱ्या या जाहिराती गाण्यांसह अवतरतात. जाहिरातीत स्वतःला 'मॉडेल' म्हणून सादर करण्याचा व्यवसाय आज प्रतिष्ठा व धन दोन्हीही मिळवून देतो.\nसरस्वती आणि लक्ष्मी या दोघींचा संयोग जाहिरातीत आहे. आज परमेश्वराला इहलोकात अवतार घ्यावासा वाटला तर त्यालाही जाहिरातीच्या या कलेचाच आधार घ्यावा लागेल, हे नक्कीच मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद\nसध्या जाहिरात युग चालू आहे असे म्हटले तरी हरकत नाही. जाहिरातीचे क्षेत्रही चित्रपटसृष्टीप्रमाणे स्वप्नांची भूल घालणारे असते. लहानथोर सर्वांनाच जाहिरातीचे प्रचंड आकर्षण असते. जाहिरात हे ग्राहकापर्यंत आपले उत्पादन पोचवण्याचे व्यापाऱ्यांचे साधन असते.\nआजकाल उत्पादन केवळ चांगले असून भागत नाही, ते चांगले आहे असे जाहिरातीद्वारा लोकांच्या मनावर ठसवावे लागते. 'ओरडणाऱ्यांची करवंदे खपतात पण गप्प बसणाऱ्यांची द्राक्षेसुद्धा खपत नाहीत' हे आजच्या युगातील फार खरे सत्य आहे.\nत्यामुळे जाहिरात ही प्रत्येक विषयाला व्यापून उरणारी आहे. जाहिरातीमध्ये रसिकता, संगीत, कलात्मकता अशा गोष्टींची मनोवेधक गुंफण असते. त्यामुळेच जाहिराती अधिकाधिक आकर्षक बनतात. म्हणूनच हल्ली जाहिरातीची कला ही 'पासष्टावी कला' मानली जात आहे.\nजाहिरात म्हणजे कल्पनाविलास. ज्या कल्पनेभोवती जाहिरात गुंफलेली असते, त्या कल्पनेशी आपले नाते जसे जुळेल, त्याप्रमाणे आपल्याला जाहिरात आवडते वा नावडते. आवडणाऱ्या मॉडेल्सबद्दल जोरदार चर्चा होतात, जिंगल्स ओठांवर रेंगाळतात.\nजाहिरातीच्या जगात असते झिंग आणणाऱ्या तारुण्याची उत्साही सळसळ प्रसन्नतेचा हलकेच शिडकावा करून शिणल्या मनाला ताजेतवाने करणारा नर्म विनोद प्रसन्नतेचा हलकेच शिडकावा करून शिणल्या मनाला ताजेतवाने करणारा नर्म विनोद रोजच्या जीवनाशी इमान राखतानाच डोळ्यांत फुलवलेली स्वप्ने रोजच्या जीवनाशी इमान राखतानाच डोळ्यांत फुलवलेली स्वप्ने भारतीय जीवनातील परंपरेचे महत्त्व जपतानाच बदलत्या जीवनशैलीचेही चित्रण भारतीय जीवनातील परंपरेचे महत्त्व जपतानाच बदलत्या जीवनशैलीचेही चित्रण प्रगत तंत्रज्ञानाचा अचूक उपयोग करून तयार केलेल्या तांत्रिक करामती\nया जगात दुःखाने पिचणे नाही, निराशेच्या भोवऱ्यात गरगरणे नाही. राग, असूया, द्वेष अशा वाईट प्रवृत्तींना येथे शिरकाव नाही. इथे सापडतो प्रचंड आशावाद खऱ्याखोट्याच्या सीमारेषा पुसून टाकणारा, नित्यनवीन स्वप्नांची उधळण करणारा.\n'कुछ बात है जिन्दगीमें' असा दिलासा देणारा, म्हणूनच मनाला भिडणारा या साऱ्यांमुळे जाहिराती नकळत आपल्या मनात घर करून बसतात. जाहिरात ही उत्पादक व ग्राहक यांच्यामधला दुवा असते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले उत्पादन पोहोचविणे हे जाहिरातीचे उद्दिष्ट असते.\nसुरुवातीच्या काळात अमुक उत्पादन अमुक कंपनीचे आहे व त्याचे अमुक गुणधर्म आहेत, एवढेच सांगणे असे जाहिरातीचे काम असे. आज जाहिरातीवर ग्राहकाला त्या उत्पादनाच्या खरेदीसाठी उद्युक्त करावयाची जबाबदारी येऊन पडली आहे आणि 'जाहिरात' हा कलाप्रकार न राहता तो एक शास्त्र बनू लागले आहे.\nजाहिरात संस्था अस्तित्वात आल्या आहेत. जाहिरात माध्यम हा प्रचंड व्याप्ती असलेला बिझनेस झाला आहे.\nजाहिरात तयार करण्याचे Attraction, Interest, Decision & Action असे चार टप्पे असतात. लोकांच्या मनात आपल्या उत्पादनाबद्दल आकर्षण निर्माण झाले पाहिजे. मग ते उत्पादन घेऊया असे ग्राहकाला वाटले पाहिजे व ग्राहकाला ते घेण्यासाठी जाहिरातीने उद्युक्त केले पाहिजे.\nजाहिराती या अनेक प्रकारच्या असतात. कही वेळा नवीन उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवायचे असते. उदा. केलॉग्जची जाहिरात. तर काही वेळा आपल्या उत्पादनाची मधून मधून आठवण करून देण्यासाठी जाहिराती असतात.\nपावसाळा आला की छत्र्यांच्या, व्हिक्स वेपोरबच्या जाहिराती यायला लागतात. दिवाळी आली की रंगांच्या जाहिराती, फर्निचरच्या जाहिराती येऊ लागतात. काही वेळा एखादा कार्यक्रम एखादी कंपनी प्रायोजित करते. अन् मग त्या कार्यक्रमाबरोबर त्या कंपनीची जाहिरातही आपल्या लक्षात राहून जाते. उदा. T.V.S सारेगामा, संतूर 'सारे सारे गाऊया', कोलगेट 'टॉपटेन', क्लोजअप 'अंताक्षरी'. त्याचप्रमाणे लोकप्रिय नट्या साबणांच्या जाहिरातीत असतात.\nक्रिकेटपटूंबद्दल लोकांना आकर्षण असते हे पाहून Boost is the secret of my Energy अशी कपिलदेवला जाहिरात करायला लावले जाते. जाहिराती कुठे कुठे असतात असे बघण्यापेक्षा कुठे नसतात असे विचारायला हवे. टी.व्ही., रेडिओ, वृत्तपत्रे, मासिके, इमारती, रेल्वे प्लॅटफॉर्म, भिंती, दुकाने, बसेस, रेल्वेचे डबे या साऱ्या ठिकाणी आपल्याला जाहिराती पाहायला मिळतात.\nआज जाहिरातींचा इतका महापूर आला आहे की काही वेळा नको या जाहिराती, असे वाटते. आवडता कार्यक्रम पाहायला टी.व्ही.समोर बसावे तर निम्म्याहून अधिक वेळा जाहिराती पाहाव्या लागतात. काही वेळा खोट्या\nजाहिरातींमुळे ग्राहकांची फसवणूक होते. उदा. वजन कमी करण्यासाठी औषधे, यांच्या जाहिराती फसव्या असतात. परंतु काही असले तरी जाहिरात ही कलांची कला आहे. आज जाहिरातीत चित्रकला, संगीत, छायाचित्रण, लेखन, अभिनय या साऱ्यांचा मिलाफ आढळतो.\nजाहिरातीतील 'मॉडेल'ना पैसा व प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे जाहिरात हा आजच्या युगाचा धर्मच बनला आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद\nतुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला जरूर कळवा तुमचे आमच्‍या ब्‍लॉग बद्दल अभिप्राय असल्‍यास किंंवा काही तक्रार असेल तर ती पण आम्हाला नक्की सांगा आपल्या अभिप्रायाचे आम्ही नेहमी स्वागत करू आणि आवश्‍यकते नुसार बदल घडवून आणू . आमच्या ब्लॉगला भेट देणारा प्रत्येक वाचक आमच्या करीता अतीशय महत्वाचा आहे. तसेच तुम्ही सुद्धा आमच्या ब्लॉगवर लेखन करू शकता आणि आपली ज्ञानरूपी माहिती इथं पर्यंत पोचू शकता. त्‍याकरीता पुढील लिंक वापरावी.\nसंपर्क करण्‍यासाठी येथे क्लीक करा\nDMCA Policy साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2019/10/blog-post_65.html", "date_download": "2022-10-07T21:59:30Z", "digest": "sha1:UITFHRFDTXLCOQJ7U5CJQQHKIVGUYG5S", "length": 16036, "nlines": 214, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "काश्मीरमधील बंदी उठवायला हवी | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nकाश्मीरमधील बंदी उठवायला हवी\nजमात-एइस्लामी हिंद ने काश्मीरच्या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जमात-एइस्लामी हिंद आयोजित मासिक पत्रकार परिषदेला संबोधित करतांना जमाअतचे अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसेनी म्हणाले की, सरकारने काश्मिरी जनतेवर लादलेले कठोर निर्बंध हटवावेत अशी आमची इच्छा आहे. लोक जवळजवळ दोन महिन्यांपासून इंटरनेट आणि दळणवळणाच्या सेवांपासून वंचित आहेत. राज्यातील राजकीय नेत्यांना बराच काळ नजरबंदीत ठेवणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. ऑर्गनाइजेशन फॉर ह्यूमन राइट्स एंड सिविल सोसाइटी या संघटनेच्या नेतृत्वात काश्मीर खोऱ्यात फॅक्ट फाइंडिंग टीमने सादर केलेले अहवाल गंभीर चिंतेचा विषय आहेत. ते म्हणाले की, काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने तरुणांना तुरूंगात डांबले जात आहे, आंदोलनकर्त्यांना नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधिक सैन्य तैनात केले गेले आहेत. वैद्यकीय आणि आरोग्य सुविधांवर याचा वाईट परिणाम झाला आहे.\nजम्मू-काश्मीरमधील ब्लॉक स्तरावरील निवडणुकांच्या घोषणेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमीरे जमात म्हणाले की निवडणुका घेण्यात याव्यात. परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे विधानसभा निवडणुका आणि राजकीय नेत्यांचे स्वातंत्र्य आहे. माहितीचा अधिकार आणि लोकांच्या हालचालीवरील निर्बंध यासारख्या इतर निर्बंधांनाही दूर केले पाहिजे, तरच लोकशाही प्रक्रिया अर्थपूर्ण होऊ शकते.\nपत्रकार परिषदेच्या सुरूवातीला जमात-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष इंजिनिअर मोहम्मद सलीम म्हणाले की, सरकारने जम्मूकाश्मीरमधील लोक आणि त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद व सल्लामसलत करून हे प्रश्न सोडवावेत अशी जमाअतची इच्छा आहे. यावेळी त्यांनी देशाच्या संथ अर्थव्यवस्थेबद्दलही चिंता व्यक्त केली.\nते म्हणाले की आमच्या गुंतवणूकीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आम्हाला व्याजआधारित वित्तपुरवठा करण्यापेक्षा इक्विटी-आधारित वित्तपुरवठा करण्याकडे जाणे आवश्यक आहे. पत्रपरिषदेस जमाअतचे पदाधिकारी उपस्थित होते.\n२५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१९\nनमाजचे महत्त्व : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनिकालाची नव्हे संयमाची आतुरता...\n‘सत्याची साक्ष देणे हाच जीवनाचा खरा उद्देश’\nमोबाईलवर तासनतास बोलणे बंद केली पाहिजे\nभारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत\nगांधी जयंतीनिमित्त आपली प्रतीमा उजळवण्याचा प्रयत्न\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर \nदेशबांधवांसाठी मीरा रोड येथे मस्जिदचे दरवाजे उघडे ...\n‘हजारो गोरगरीब, सर्वसामान्यांच्या प्रगतीत हातभार ल...\nनागरिकांनी मताधिकाराचा अवश्य वापर करावा\nमुहम्मद (सल्ल.) के शहर में\nउत्सव लोकशाहीचा: राजकीय बंडाळीचा, जनतेच्या विवेकाचा\n१८ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०१९\n‘एक ईश्वर एक मानव कुटूंब’\nवसमत येथे मस्जिद परिचय कार्यक्रम संपन्न\nसब से पहले सच्चे मुसलमान बनें : प्रा. अझहरअली वारसा\nमहाराष्ट्रातील बिनव्याजी सोसायट्या देशात अव्वल\nकाश्मीरमधील बंदी उठवायला हवी\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०१९\nईडी - पोपट ०.२\nमांसाहार लोकांना हिंसक बनवितो काय\nमराठवाडा मुक्तीसंग्राम : एमआयएम आणि वर्तमान\nरणांगण निवडणुकीचे, आश्‍वासनांचे भूलथापांचे\nमुस्लिम एकात्मतेचा ठोस पाया\nनशेच्या सर्वच पदार्थांवर बंदी हवी\n०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०१९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/2372", "date_download": "2022-10-07T21:14:49Z", "digest": "sha1:KCSWAZL4D73OE42XVQ7E2XASDITHTYVQ", "length": 13496, "nlines": 107, "source_domain": "bollyreport.org", "title": "प्रेमाच्या बाबतीत या राशीचे लोक असतात फारच हळवे, कोणाच्याही लगेचच पडतात प्रेमात, जाणून घ्या राशी ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome Astrology प्रेमाच्या बाबतीत या राशीचे लोक असतात फारच हळवे, कोणाच्याही लगेचच पडतात प्रेमात,...\nप्रेमाच्या बाबतीत या राशीचे लोक असतात फारच हळवे, कोणाच्याही लगेचच पडतात प्रेमात, जाणून घ्या राशी \nप्रेमाच्या बाबतीत सर्वांच्या संकल्पना या वेगवेगळ्या असतात. प्रेम व्यक्त करणे, वागणे, बोलणे सर्व काही वेगळे असते. काही जण फार हळवे असतात. तर काहीजण अगदी साधे, लाजाळू, प्रेमात पडल्यावर प्रत्येकामध्ये एक बदल झालेला दिसून येतो. प्रत्येकाचे त्याच्या राशीनुसार वागणे असते असं म्हणतात. राशीनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव ठरतो. राशीनुसार त्या व्यक्तीच्या आवडी-निवडी, सवयी, बोलणं, रागावणं, दुखावणं, समजून घेणं आलंच. आपल्या राशीचा प्रभाव हा आयुष्यात दिसून येत असतो. पाहुयात अशा कोणत्या ५ राशी आहेत ज्या राशी असलेले लोक प्रेमाच्या बाबतीत फार हळवे असतात.\nमेष – या राशीचे लोक आपल्या मनात काहीही ठेवत नाहीत. त्याच्या मनात जे येते ते पटकन बोलून मोकळे होतात. त्यांच्यात संयम फार कमी असतो. ते निसर्गातः अतिशय चंचल आणि उत्साही असतात. एकदा त्यांना एखादी व्यक्ती आवडली की त्या व्यक्तीवर ते मनापासून प्रेम करतात मग ते प्रेम एकतर्फी असले तरी चालते. एखाद्याला आवडले की ते त्यांचे प्रेम एका बाजूला असले तरीही ते त्यांच्यावर खूप प्रेम करू लागतात. ते आपली आंतरिक भावना मोकळेपणाने समोर ठेवतात. ते सहसा निष्ठावंत जोडीदार बनतात. त्यांच्या जोडीदारासंदर्भात देखील त्यांचा स्वभाव सकारात्मक असतो.\nकर्क – या राशीचे लोक अत्यंत भावनिक असतात. जर कोणती व्यक्ती त्यांच्या मनाला भावली तर ते त्या व्यक्तीसाठी जीव देखील देतील. ते नेहमी ज्या व्यक्तीवर प्रेम करत असतात त्या व्यक्तीचा विचार करतात. ते मनाने चांगले असतात आणि कोणालाही कोणत्या गोष्टीसाठी नाही बोलत नाहीत. त्यांच्या जवळच्या व्यक्तींविषयी त्यांना फार आपुलकी असते. नात्यांचे महत्त्व त्यांना समजते.\nसिंह – या राशीचे लोक आपल्या नात्याविषयी वेडे असतात. प्रेम मिळवण्यासाठी ते काहीही करू शकतात. जर त्यांना एखादी व्यक्ती आवडली तर त्या व्यक्तीला मिळवूनच शांत बसतात. ते फार रोमँटिक आणि फ्लर्ट करणारे असतात. ते निर्भयपणे आपले प्रेम व्यक्त करतात. लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.\nतूळ – प्रेमाच्या बाबतीत हे फार उतावीळ असतात. त्यांना धीर नसतो, म्हणजेच त्यांचा त्यांच्या आंतरिक भावनांवर नियंत्रण नसते. या लोकांच्या मनात जेव्हा जे येते तेव्हा ते ती गोष्ट करतात. या राशीचे लोक देखील फार रोमँटिक असतात. जर एखादी व्यक्ती त्यांना आवडली तर त्या व्यक्तीला आपले बनवण्यासाठी सर्व बंधन तोडतात.\nमीन – या राशीचे लोक आपल्या भावना उघडपणे दाखवत नाहीत. ते त्यांचे बोलणे आणि प्रेम करण्याचा मार्ग अतिशय व्यवस्थितपणे ठेवतात. पहिल्याच नजरेत ते एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. ते एकाच वेळी एकापेक्षा जास्त लोक आवडतात. त्याचे हृदय फार चंचल असते. ते उघडपणे दाखवत नाहीत पण वास्तविक जीवनात खूप रोमँटिक असतात.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nअस्वीकरण – भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.\nPrevious articleरातोरात महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या मनावर राज करणारा RJ राघव आहे तरी कोण, जाणून घ्या \nNext articleऑनलाईन मिटिंग दरम्यान बायको आली किस करायला नंतर जे घडलं ते बघा, आणि श्वेताचे झूम मीट प्रकरण काय आहे जाणून घ्या\nमहादेवाच्या कृपेने या ५ राशींवर होणार सुखाची बरसात, सर्व अडचणी होणार दूर, जाणून घ्या राशी \nशनिदेवाच्या कृपेने या ६ राशींना होणार मोठा धनलाभ, सरकारी नोकरीच्या पण संधी \nमकरसंक्रांतीच्या दिवशी या ६ गोष्टींचे करा दान, आयुष्यभर होणार नाही धनाची कमी \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/tips-tricks/follow-these-tips-to-keep-smartphone-and-smartphone-data-safe-from-hackers-while-downloading-any-app/articleshow/93522206.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2022-10-07T22:00:57Z", "digest": "sha1:Q3QSFXPFX6BCF4YFMJPL4Y2KKH7A3MRO", "length": 13395, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nSafety Tips: स्मार्टफोनमध्ये Apps डाउनलोड करताना घ्या काळजी, अन्यथा अकाउंट कधी रिकामे झाले कळणारही नाही\nAndroid Users : तुम्हीही तुमच्या मोबाईलमध्ये असे कोणतेही अॅप ठेवले असेल तर ते डिलीट करा. असे केल्याने तुमच्या फोनचा डेटाही चोरीला जाऊ शकतो आणि टम्च मोठे नुकसान देखील होऊ शकते.\nअॅप्स डाउनलोड करतांना घ्या काळजी\nदुर्लक्ष केल्यास होऊ शकते नुकसान\nकाही टिप्स करतील तुमची मदत\nनवी दिल्ली: Smartphone Apps: आजकाल काही धोकादायक Apps मुळे स्मार्टफोन युजर्सची सुरक्षा धोक्यात आली आहे. म्हणूनच, iPhone किंवा Android Users ना अॅप्स डाउनलोड करताना खूप काळजी घ्यावी लागते. स्मार्टफोन युजर्सना चांगलाच त्रास देणाऱ्या जोकर मालवेअरच्या पुनरागमनानंतर स्मार्टफोन युजर्ससाठी डोकेदुखी आणखी वाढली आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येक मोबाइल फोन युजर्सने खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेफ्टी टिप्सबद्दल सांगणार आहो, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे डिव्हाइस सुरक्षित ठेवू शकता. अॅप डाउनलोड करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.\nवाचा: PAN Card Fraud: मोबाईलवर तीन OTP आले आणि मिनिटांत महिलेच्या अकाऊंटमधून १ लाख रुपये गायब, पाहा डिटेल्स\nApp चा रिव्ह्यू वाचा :\nजर तुम्हाला कोणतेही अॅप डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. तुम्ही Play Store किंवा App Store वरून कोणतेही अॅप डाउनलोड करायचे असल्यास तुम्ही प्रथम त्याचा रिव्ह्यू वाचा अनेकजण त्यांचे अनुभव इथे शेअर करतात. ज्या अॅप्सबद्दल सतत वाईट आणि नकारात्मक रिव्यू येत आहेत ते डाउनलोड करतांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण, मालवेअरनंतर फोनमध्ये आणखी समस्या येऊ शकतात.\nवाचा: Home Inverter: घरातील इन्व्हर्टरकडे दुर्लक्ष बनू शकते स्फोटाचे कारण, अशी घ्या काळजी, राहा सुरक्षित, पाहा टिप्स\nAndroid युजर्सठी अशा अॅप्सपासून दूर राहणे खूप सोपे आहे. कारण, असे अनेक सॉफ्टवेअर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, जे असे मालवेअर काढून टाकू शकतात. या यादीमध्ये 'ऑप्टिमायझिंग' आणि 'क्लीनिंग'चा समावेश आहे, सुपर क्लीन, रॉकेट क्लीनर यासाठी सर्वोत्तम आहेत. तसेच, Google टीम देखील यावर काम करतच असते. यापूर्वीही अनेक अॅप अॅप स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहेत.\nपरमिशन देतांना विशेष सावध राहा:\nजेव्हा तुम्ही फोनवर एखादे अॅप डाऊनलोड करता तेव्हा ते त्याआधी परवानगी मागते. जर एखादे अॅप फोनमधील प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी मागत असेल, तर याचा अर्थ App थोडे संशयास्पद आहे. कारण, प्रत्येक अॅपला Permission देणे म्हणजे मोबाइल फोनमध्ये समाविष्ट असलेली प्रत्येक गोष्ट सहज वाचता येईल. अशी परवानगी देण्यापूर्वी ते टाळले पाहिजे. कारण, यानंतर ती प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवू शकते.\nवाचा: Jio Plans: वारंवार रिचार्जची नाही गरज 'या' प्लान्समध्ये वर्षभरापर्यंतच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग आणि भरपूर डेटा\nमहत्वाचे लेखHome Inverter: घरातील इन्व्हर्टरकडे दुर्लक्ष बनू शकते स्फोटाचे कारण, अशी घ्या काळजी, राहा सुरक्षित, पाहा टिप्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nइलेक्ट्रॉनिक्स 8GB रॅम आणि 10,090 mAh बॅटरी पावर असणाऱ्या या Samsung Tabs खरेदी करा आणि मिळवा ₹18000 इतका जबरदस्त डिस्काउंट\nहेल्थ पुरुषहो सावधान, आधी लठ्ठपणा मग डायबिटीज आणि नंतर येते नपुंसकता, ताबडतोब करा हे उपाय\nआर्थिक राशीभविष्य आर्थिक राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२२ : जाणून घ्या उद्याचा दिवस कोणासाठी ठरेल धनप्राप्तीचा\nसिनेन्यूज हर्षद मेहता फेम प्रतीक गांधी आणि सई ताम्हणकर काय करतायत एकत्र\nकार-बाइक आनंद महिंद्रांचा स्वॅग, नवीन Scorpio N घेऊन शेअर केला फोटो, लोक म्हणतायत, 'ये तोहफा मैंने खुद को दिया है'\nसिनेन्यूज मला त्यासाठी कर्ज काढायचं नव्हतं, माझ्या बॅंक अकाऊंटमध्ये आजही...आलियाचा मोठा खुलासा\n शिंदे गट आणि शिवसैनिक आमने सामने, पोलिसांनीच काढला तोडगा\nअर्थवृत्त सेबीकडून BSE ला मिळाली सोशल स्टॉक एक्सचेंजची मिळाली परवानगी, पाहा आहे तरी काय\nसोलापूर उद्धव काकांचा दसरा मेळावा पाहिला का, पुतण्या अमित ठाकरेंचं 'स्मार्ट' उत्तर\nमुंबई ठाकरेंनी मला मारण्याची सुपारी दिली होती, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप\nक्रिकेट न्यूज थायलंडकडून पराभव होणाऱ्या पाकिस्तानकडून टीम इंडियाचा पराभव; ऋचा घोषची वादळी फलंदाजी पण...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/it-is-possible-to-cut-upto-rs-25-per-litre-but-the-government-will-not-they-will-cheat-the-people-says-p-chidambaram-1684788/", "date_download": "2022-10-07T22:36:17Z", "digest": "sha1:Y76G7INVMNQWJJT32STTZG22W3SAQQIU", "length": 19408, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पेट्रोल २५ रूपयांनी स्वस्त होऊ शकते, पी. चिदंबरम यांचा दावा | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\nपेट्रोल २५ रूपयांनी स्वस्त होऊ शकते, पी. चिदंबरम यांचा दावा\nपेट्रोलचे दर १ किंवा २ रूपयांनी कमी करून केंद्र सरकार लोकांची फसवणूक करेल, अशी भविष्यवाणीही चिदंबरम यांनी केली.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nकाँग्रेसचे नेते पी. चिदंबरम.\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमतीवरून मोदीसरकारवर हल्लाबोल केला आहे. देशातील पेट्रोलचे दर हे २५ रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात, असा दावा चिदंबरम यांनी केले आहे. इतकी कपात करता येणे शक्य असले तरी सरकार या दिशेने पाऊल उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला. वाढत्या इंधन दरावर त्यांनी सलग ट्विट करत मोदीसरकारवर टीका केली. पेट्रोलचे दर २५ रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात. पण सरकार असे करणार नाही. ते पेट्रोलचे दर १ किंवा २ रूपयांनी कमी करून लोकांची दिशाभूल करतील, असे ट्विट त्यांनी केले.\n“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला\nShinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\n“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप\nगत नऊ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. चिदंबरम म्हणाले की, केंद्र सरकार प्रत्येक एक लिटरमागे २५ रूपये जास्त घेत आहे. हा थेट नागरिकांचा पैसा आहे. क्रूड ऑईलच्या किमतीवर सरकार एका लिटरमागे १५ रूपये वाचवत आहे. त्यानंतर ते १० रूपयांचा अतिरिक्त कर लावत असल्याचे ते म्हणाले.\nदरम्यान, बुधवारी देशभरातील पेट्रोलच्या किंमती सकाळी ६ वाजता ३० पैशांनी वाढले. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल प्रति लिटरला ७६.८७ रूपयांपर्यंत पोहोचले. तर मुंबईमध्ये सर्वांत महाग ८४.९९ रूपयांमध्ये ते विकले जात आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आज पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावण्यात आली आहे. लवकरच जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला जाऊ शकतो.\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nस्टरलाइट प्रकल्पाच्या विस्ताराला मद्रास हायकोर्टाची स्थगिती\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मेधाली, वैभवला सुवर्ण\nप्रो कबड्डी लीग : दबंग दिल्लीसमोर यू मुम्बाची हाराकिरी\nराष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा -विनोद तोमर\nभारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा\nकाँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका\nधनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण\nमध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०८ ऑक्टोबर २०२२\nपुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\nLow Uric Acid: यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होणे देखील ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ ५ गंभीर आजार\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\nभारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा\nमानवी हक्कांसाठी झगडणाऱ्यांना शांततेचे ‘नोबेल’; बेलारूसचे बियालयात्स्कींसह रशिया आणि युक्रेनमधील मानवाधिकार संस्थांचा सन्मान\n‘यूपीएससी’तर्फे परीक्षा, भरतीची माहिती देणारे ‘अ‍ॅप’ कार्यान्वित\nबंगळूरुमधील ओला, उबरच्या रिक्षासेवेवर बंदी\nप्रशासनात सर्वागीण दृष्टिकोनाची गरज : मोदी\nतोफा डागण्याच्या सरावादरम्यान स्फोट, दोन जवानांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील बाबिना येथील दुर्घटना\nहिमस्खलन दुर्घटनेतील मृतांची संख्या २६; तीन प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक अद्याप बेपत्ता\nजुनाट हेलिकॉप्टरचा ताफा कधी बदलणार; ‘लष्करी अधिकारी पत्नी संघटने’चा पंतप्रधानांना प्रश्न\nकर्नाटकात पदवी स्तरावर सायबर सुरक्षा शिक्षण अनिवार्य; पुढील शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी\nगौरी लंकेश यांची आई-बहीण ‘भारत जोडो’त सहभागी\nमानवी हक्कांसाठी झगडणाऱ्यांना शांततेचे ‘नोबेल’; बेलारूसचे बियालयात्स्कींसह रशिया आणि युक्रेनमधील मानवाधिकार संस्थांचा सन्मान\n‘यूपीएससी’तर्फे परीक्षा, भरतीची माहिती देणारे ‘अ‍ॅप’ कार्यान्वित\nबंगळूरुमधील ओला, उबरच्या रिक्षासेवेवर बंदी\nप्रशासनात सर्वागीण दृष्टिकोनाची गरज : मोदी\nतोफा डागण्याच्या सरावादरम्यान स्फोट, दोन जवानांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील बाबिना येथील दुर्घटना\nहिमस्खलन दुर्घटनेतील मृतांची संख्या २६; तीन प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक अद्याप बेपत्ता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/relations/friends/5690/", "date_download": "2022-10-07T21:35:12Z", "digest": "sha1:FHL6XWVMVT5SVQ6M34ZKLKJT6UUPF24X", "length": 12380, "nlines": 91, "source_domain": "www.snopty.com", "title": "मैत्री पर्यावरणाशी - Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nआपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री ही अगदी सहजतेने होत असते. मैत्रीत कोणतीही गोष्ट ओढून ताणून करावी लागत नाही. दृढ होत गेलेली मैत्री जीवनात कायमच आनंदाच आणि विश्वासाचं नाते निर्माण करते. म्हणूनच माणसाच्या आयुष्यात मैत्री एक सुगंधित फुला सारखी असते.एखाद्या फुलाला ज्या प्रमाणे आजूबाजूच्या वातावरणात जाणून-बुजून सुगंध पसरविण्याची आवश्यकता भासत नाही त्याच प्रमाणे आपला हा परिसर अगदी सहज ,साधा आणि सोपा आहे.त्यासाठी जाणून-बुजून वेगळं काही करण्याची आवश्यकता भासत नाही. निसर्गातील प्रत्येक गोष्ट अगदी सहजतेने घडत असते. जसे कालचक्राच्या गतीप्रमाणे चंद्र,सूर्य, तारे आपले कार्य सहजगत्या करत असतात. त्याच जमिनीत एखादे बीज रुजते आणि त्याचे रोपटे बनून त्याला आपोआपच पाने,फुले व फळे येतात.\nनिसर्गातील प्रत्येक घटकांनी हा परिसर तयार होतो आणि याच परिसरात ह्या सृष्टीतील प्रत्येक जीव फुलत असतो. ह्या संपूर्ण विश्वातील कुठल्याही घटकाला, जीविताला जगण्यासाठी जाणून-बुजून कोणतेही कार्य करावे लागत नाही.निसर्ग नियमाने तो घटक,तो जीव उत्पन्न होतो व तो आपले कार्य निर्विकारपणे करत राहतो. हाच सृष्टीचा साधा -सोपा नियम आहे आणि ह्या भूमंडळावर जो परिसर आहे, जो निसर्ग आहे ते म्हणजेच पर्यावरण. आपल्या ग्रह मालेतील एकमेव ग्रह ज्याच्यावर जीवन अस्तित्वात आहे. फक्त आणि फक्त पृथ्वीवरच जीव सृष्टीची निर्मिती होऊ शकते हे सत्य सर्वानाच ज्ञात आहे. निसर्ग जर सहज आहे आजूबाजूचा परिसर सहजतेने जर मार्गक्रमण करीत असतो तर मग आज पर्यावरणाच्या इतक्या समस्या का निर्माण झाल्या आहेत पृथ्वीवरील जे वातावरण आहे त्या वातावरणातील नैसर्गिक साधन सामग्री, हवामान,भौगोलिक सुगमता इत्यादी अनेक घटकांनी मिळून मनुष्यप्राण्याची\nजडणघडण सुलभतेने होत असते. मग पर्यावरणाचा प्रश्न का निर्माण होतो हवामानाचे कोडे का नाही उलगडता येत हवामानाचे कोडे का नाही उलगडता येत ह्या सृष्टीने इतके सुंदर आयुष्य जे बहाल केले आहे ते इतके जटिल आणि दिवसेंदिवस कटकटीचे का बनत चालले आह\nह्या प्रश्नांचे एकच मूळ आहे ते म्हणजे एकीकडे वरदहस्ताने भरभरून देणारा निसर्ग आहे आणि दुसरीकडे भरभरून आणि मुक्तहस्ताने निसर्गाला ओरबडणारा मनुष्यप्राणी आहे. मग सहजतेने चालणारे निसर्गचक्र ह्या मनुष्यामुळेच बिघडू लागते आणि असंतुलित पर्यावरणाच्या समस्या निर्माण होऊ लागतात मग ह्याच पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी पर्यावरणशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. ‘पर्यावरण संवर्धन’, ‘पर्यावरण संगोपन’ हे सारे अवघड शब्द आपल्याला पर्यावरण जागरूकते पासून दूर घेऊन जातात आणि सर्व सामान्य माणसाला हे सारं क्लिष्ट आणि आपल्या आवाक्याबाहेरचे वाटू लागते कारण साधी गोष्ट आहे जेंव्हा मनुष्य ह्या ज्या वातावरणात श्वास घेतो, जगतो,उठतो-बसतो.त्या पर्यावरणचा अभ्यास करावयाची वेळ त्याच्यावर येते तेंव्हा मात्र ते जीवन त्याला जटिल वाटू लागते मग मात्र ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता घेता मनुष्याची दमछाक होते आणि त्याला हे जीवन कटकटीचे वाटू लागते. म्हणजे उदा:एखाद्या माणसाला सामोसा खायला आवडतो. मग लहर आली की तो त्याच्या वर मनसोक्त ताव मारतो आणि आनंद घेतो कारण खाणं ही प्रक्रिया अगदी सहज आणि सोपी आहे पण तेच खाताना मनुष्य असा नाही विचार करत की आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन कसे होतेआपला जठराग्नी कसा काम करतोआपला जठराग्नी कसा काम करतोअन्नाचे रक्तात रूपांतर कसे होतेअन्नाचे रक्तात रूपांतर कसे होते पण मनुष्याने चुकीच्या पद्धतीने जर अन्न खाल्ले तर मात्र पचनसंस्थेत बिघाड होतो आणि मग त्याचा उपाय शोधण्यासाठी मग शरीरशास्त्राकडे त्याला वळावे लागते.मग त्या शरीरशास्त्राचा अभ्यास करताना जीवन जटिल आणि कटकटीचे वाटू लागते.\nसृष्टीवरील ह्या निसर्गाचे देखिल हेच तत्त्व आहे. निसर्गक्रमाने अगदी सहजतेने सर्व घटना घडत असताना त्या वातावरणात काही ढवळा-ढवळ केली तर काही समस्या उद्भवतात मग अश्या समस्या सोडवण्यासाठी मनुष्य आपल्या बुद्धीच्या जोरावर अजून लुडबूड करू लागतो आणि हळूहळू आपल्या लहरीप्रमाणे जीवन सुखकर बनविण्याचा अट्टाहास करत राहतो. खरतर आयुष्य हे खूप जटिल नसते तर मनुष्य आपल्या वर्तुवणुकीमुळे जास्त गुंतागुंतीचे करून ठेवतो व पचतावतो. म्हणूनच हा गुंता सोडवण्यासाठी निसर्गाशी मैत्री हा सर्वात सोपा उपाय आहे. सहजते जगूयात, सहजतेने निसर्गाला आपला सखा, जिवलग मानुयात आणि त्याच्या सानिध्यात आपले जीवन सुखकर करूयात.\n(10 वी व 12 वी च्या बोर्डाच्या मुलांसाठी काम)\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nदिल-विल,प्यार-व्यार मैं क्या जानूँ रे\nशब्द….मुक्या भावनांना व्यक्त करणारे एक अस्त्र.\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/a-song-on-corona-sung-by-women-in-the-farm/", "date_download": "2022-10-07T22:38:34Z", "digest": "sha1:PH45Q4DMHR3ODP64V33ZCKMKJUQOJ33E", "length": 10106, "nlines": 111, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मोदी सरकारनं लॉकडाऊन केला... उद्धव ठाकरेंनी आधार दिला...; ऐका थेट उसाच्या शेतातून कोरोनावरचं गीत", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमोदी सरकारनं लॉकडाऊन केला… उद्धव ठाकरेंनी आधार दिला…; ऐका थेट उसाच्या शेतातून कोरोनावरचं गीत\nमोदी सरकारनं लॉकडाऊन केला… उद्धव ठाकरेंनी आधार दिला…; ऐका थेट उसाच्या शेतातून कोरोनावरचं गीत\nकोल्हापूर | आपल्या मायबोलीतून, बोलीभाषेतून कोरोनापासून कसं वाचायचं, कोरोनाला हरवण्यासाठी काय केलं पाहिजे, या आणि अशा अनेक प्रश्नांची शाळा कोल्हापूरजवळच्या एका गावातील शेतात भरली. उसाच्या शेतात काम करत असताना चार ते पाच महिलांनी एकत्र येत कोरोनावर गीत गायलं. याच गीताचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.\nदेशात कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये, यासाठी मोदी सरकारने लॉकडाऊन केला. नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन केलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे वारंवार जनतेसमोर येऊन कोरोनाला आपण हरवणारच, अशी प्रतिज्ञा करत आहेत. तसंच तुमच्या साथीने आपण ही प्रतिज्ञा करतोय, असं म्हणत लोकांच्या मनात प्राण फुंकत आहेत, याच भावना गीताच्या माध्यमातून महिलांनी सर्वांसमोर मांडल्या आहेत.\nकसा कोरोना-कोरोना रोग ह्यो आला… मोदी सरकारने लॉकडाऊन केला…. उद्धव ठाकरेंनी आधार दिला… तुम्ही तोंडाला मास्क बांधा… सॅनिटायझरने हात धुवा… घरात सुरक्षित राव्हा… असे या गीताचे बोल आहेत. तसंच सरकारने केलेलं काम आणि प्रशासन करत असलेलं आवाहन आपल्या गीतामधून त्यांनी सोप्या शब्दात लोकांसमोर मांडलं आहे.\nनागरिकांनी कोरोनाला हरवण्यासाठी मास्क घालणं गरेजंच आहे. तसंच सॅनिटायझरने सतत हात धुणे गरजेचे आहे, असं त्या शेतातल्या बायका सांगत आहेत..एका छोट्याशा गीतातून किती मोठं प्रबोधन होऊ शकतं, याचा उत्तम नमुना महिलांनी दाखवून दिला आहे.\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात…\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nपाहा पुण्यात किती रूग्ण सापडले तर किती रूग्णांना ठणठणीत होऊन घरी सोडलं…\nराज्यातील सर्व दुकाने उघडण्यास मुभा; राज्य सरकारचा मोठा निर्णय\nकोरोनाला हरवायचंय, पाहा WHO ने काय सांगितलाय जालीम उपाय\nपुण्याचे गोल्डमॅन सम्राट मोझे यांचं निधन\nकोरोना नियंत्रणात येईपर्यंत आम्हाला एकही सुट्टी नको म्हणणाऱ्या 2 पोलिसांच्या पाठीवर गृहमंत्र्यांची कौतुकाची थाप\nकोरोनाला हरवायचंय, पाहा WHO ने काय सांगितलाय जालीम उपाय\n“महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रूग्ण; सरकार कुणाचं याचा विचार न करता केंद्राने मोठी आर्थिक मदत द्यावी”\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2020/02/doctor-suspension-cancel.html", "date_download": "2022-10-07T22:51:56Z", "digest": "sha1:MPF3UCHPXWCIJW7D3YZI534SMCQE3ES7", "length": 6310, "nlines": 57, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "निलंबित केलेल्या डॉक्टरचे निलंबन मागे | Gosip4U Digital Wing Of India निलंबित केलेल्या डॉक्टरचे निलंबन मागे - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या निलंबित केलेल्या डॉक्टरचे निलंबन मागे\nनिलंबित केलेल्या डॉक्टरचे निलंबन मागे\nनिलंबित केलेल्या डॉक्टरचे निलंबन मागे\nपालकमंत्री संजय राठोड यांनी रुग्णाच्या प्रकृतीबद्दल विचारणा करण्यासाठी केलेल्या संपर्काला प्रतिसाद न दिल्याने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरला एक आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी मंत्र्यांच्या सूचनेवरून ही कारवाई केली. दरम्यान संबंधित डॉक्टरने व डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने याबाबत माफी मागितल्याने आता ही कारवाई मागे घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.\nवैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण व अपघात विभागात दोन दिवसांपूर्वी एकाला दाखल करण्यात आले होते. या रुग्णाच्या एका परिचिताने वॉर्डात कार्यरत डॉक्टरला संपर्क साधला व 'भाऊ बोलणार आहेत..' असे सांगितले. वॉर्डात कार्यरत डॉक्टरने त्यावेळी 'भाऊ' म्हणजेच पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी बोलणे टाळले. व असभ्य वर्तन केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे राठोड यांनी संबंधित डॉक्टर रुग्णांशी कसे वागतात याची कल्पना आल्याचे नमूद करीत कारवाई करण्याचे आदेश अधिष्ठाता डॉ. कांबळे यांना दिलेत. डॉ. कांबळे यांनी तातडीने संबंधित डॉक्टरला आठ दिवसांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश बजावला. दरम्यान गुरुवारी संबंधित डॉक्टर व डॉक्टरांच्या संघटनेने डॉ. कांबळे यांची भेट घेतली. चूक झाल्याचे मान्य करीत डॉक्टर व संघटनेने माफी मागितली. त्यामुळे झाल्या प्रकारावर पडदा पडणार असल्याचे संकेत आहेत. रुग्ण, त्यांचे नातेवाईक, लोकप्रतिनिधी यांच्याशी सौजन्यानेच वागा, असे निर्देश यानिमित्ताने पुन्हा एकदा अधिष्ठाता डॉ. कांबळे यांनी सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आहेत.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://crazymarathi.com/page/2/", "date_download": "2022-10-07T23:14:39Z", "digest": "sha1:KHI2HXMRXUMNV4LWG7IM7HBVI4ZDPWX6", "length": 12760, "nlines": 89, "source_domain": "crazymarathi.com", "title": "Crazy Marathi - Page 2 of 118 - All about entertainment", "raw_content": "\nलग्नात बायकांनी केला झकास डान्स…\nसाली बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…\nलग्नात वहिनीनीं केला भारी डान्स…\nसुहा’गरात्री बायकोला जोराची उचकी लागते….\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nनवरी ताईचा विडिओ बघून रडू येईल…\n लग्न म्हटले कि सर्व घरात आनंदाचे वातावरण फसरते. सर्व लोक लग्नाच्या तयारीला लागतात. कोणी कपड्याची खरेदी करते तर कोणी सोन चांदीची तर कोणी खाण्याच्या वस्तू बनवतात. तसेच लग्नाची पूर्व तयारी म्हणून विडिओ ग्राफर तसेच फोटो ग्राफर ह्यांची बुकिंग करण्यात येते. लग्नाचा हॉल, डी.जे, बँड ह्याची बुकिंग केली जाते. लग्नाच्या आधी वेग वेगळे कार्यक्रम […]\nबंड्याच्या बेडरूम मधून बायकोचा आवाज आला…\nनमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले […]\nलग्नात ताईने केला खुपच सुंदर डान्स…\n सध्याचे जग हे इंटरनेटच जग आहे. ह्या इंटरनेटच्या जगात सध्या मानवाला नवीन नवीन गोष्टी शिकायला आणि पाहायला मिळत आहेत. पूर्वी एखादा संदेश किंवा बातमी समजायला भरपूर दिवस लागायचे आणि आता ह्या इंटरनेटमुळे आपल्याला देशातील सर्व बातम्या किंवा कोणताही संदेश अर्ध्या सेकंदाच्या आत माहित पडत असतो. आता सर्व व्यवहार तसेच सर्व माहिती इंटरनेट सहज […]\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nराम राम मंडळी, कसे आहात मजेत ना… आज आम्ही पुन्हा तुमच्यासाठी काही नवीन मराठी विनोद घेऊन आलोय जे वाचल्यानंतर तुम्ही खूप हसणार आहेत… हसणे हे आरोग्यासाठी खूपच चांगले असते म्हणून नेहमी हसत राहा आणि दुसऱ्यांना देखील हसवत रहा.. हसण्याचं एकमेव माध्यम म्हणजे विनोद … विनोद कसा हि असो आपल्याला थोडं तरी हसू येतच… विनोद १- […]\nताईने केला खुपच सुंदर डान्स…\nनमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना माहित आहे कि डान्स हा सर्वांचा आवडीचा विषय आहे. कारण डान्स करताना माणूस खूप आनंदित होऊन आपला आनंद व्यक्त करीत असतो. मग तो डान्स लग्नात केलेला असो व इतर कार्यक्रमात केलेला असो. माणूस आनंदित होऊन डान्स करत असतो. डान्स चे वेग वेगळे प्रकार देखील बघायला मिळतात. कोणी जोडीने डान्स करत असते […]\nसकाळी उठल्यावर बायको नवऱ्याला हसते…\nनमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले […]\nनवरीला बघून तुम्ही सुद्धा रडणार…\n लग्न म्हटले कि सर्व घरात आनंदाचे वातावरण फसरते. सर्व लोक लग्नाच्या तयारीला लागतात. कोणी कपड्याची खरेदी करते तर कोणी सोन चांदीची तर कोणी खाण्याच्या वस्तू बनवतात. तसेच लग्नाची पूर्व तयारी म्हणून विडिओ ग्राफर तसेच फोटो ग्राफर ह्यांची बुकिंग करण्यात येते. लग्नाचा हॉल, डी.जे, बँड ह्याची बुकिंग केली जाते. लग्नाच्या आधी वेग वेगळे कार्यक्रम […]\nबायको- डॉक्टर मुलगा दूध पीत नाही…\nनमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले […]\nनवरी ताईने रडून-रडून सर्वांना रडवले…\n लग्न म्हटले कि सर्व घरात आनंदाचे वातावरण फसरते. सर्व लोक लग्नाच्या तयारीला लागतात. कोणी कपड्याची खरेदी करते तर कोणी सोन चांदीची तर कोणी खाण्याच्या वस्तू बनवतात. तसेच लग्नाची पूर्व तयारी म्हणून विडिओ ग्राफर तसेच फोटो ग्राफर ह्यांची बुकिंग करण्यात येते. लग्नाचा हॉल, डी.जे, बँड ह्याची बुकिंग केली जाते. लग्नाच्या आधी वेग वेगळे कार्यक्रम […]\nबंड्या डॉक्टर कडे जातो…\nनमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले […]\nलग्नात बायकांनी केला झकास डान्स…\nसाली बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…\nलग्नात वहिनीनीं केला भारी डान्स…\nसुहा’गरात्री बायकोला जोराची उचकी लागते….\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा वट पिंकी एका बस मध्ये चढली…\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा’वट बाई मेडिकल वर गेली…\nमुलीने सासरी जाताना सर्वांना रडवले\nटकला टी शर्ट घालून आला…\nनवरी ताईचा विडिओ बघून रडू येईल…\nबंड्याच्या बेडरूम मधून बायकोचा आवाज आला…\nलग्नात ताईने केला खुपच सुंदर डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nताईने केला खुपच सुंदर डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/woman-paid-to-present-in-cm-eknath-shinde-meeting-in-paithan-audio-clip-viral-on-social-media-130306101.html", "date_download": "2022-10-07T22:51:20Z", "digest": "sha1:GPLZMRZDBVRYAWWBEZFY55VCEHZQF6IZ", "length": 9411, "nlines": 69, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी ऑडिओ क्लिप व्हायरल, पैसे देऊन गर्दी जमवण्याचा आरोप | Woman Paid To Present In CM Eknath Shinde Meeting In Paithan Audio Clip Viral On Social Media - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'भुमरे साहेब आता मंत्रिमंडळात, 300 रुपये तरी द्या':मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी ऑडिओ क्लिप व्हायरल, पैसे देऊन गर्दी जमवण्याचा आरोप\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये आज दुपारी जाहीर सभा होत आहे. मात्र, या सभेपूर्वीच एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये दोन कार्यकर्तांचा संवाद असून सभेला गर्दी जमवण्यासाठी महिलांना पैसे वाटप करण्याबाबत ते बोलत आहेत. दरम्यान, ही क्लिप नेमकी कुणाची आहे हे अद्याप समजू शकले नाही. तसेच, दिव्य मराठीही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.\nकाय संवाद आहे क्लिपमध्ये\nव्हायरल क्लिपमध्ये एक कार्यकर्ता अडीचशे रुपयांत सभेला येण्यास महिला नकार देत असल्याचे सांगत आहे. सभेला येण्यासाठी किमान 300 रुपये देण्याची मागणी महिलांनी केल्याचे हा कार्यकर्ता सांगत आहे.\nपहिला कार्यकर्ता : हॅलो, त्या महिलांच काय करायचं पाठवायच की नाही पाठवायच\nदुसरा कार्यकर्ता : पाठवायचय ना. त्या महिलांना अडीचशे रुपये घेऊन ठेवलेत. नही आले तर अवघड विषय होतो.\nपहिला कार्यकर्ता : किती जणींना पाठवायच\nदुसरा कार्यकर्ता : किती येतील जेवढी येतील तेवढे येतील.\nपहिला कार्यकर्ता : पण, त्या महिला 250 रुपयांत ऐकेनात. किमान 300 रुपये तरी द्या म्हणताय\nदुसरा कार्यकर्ता : आता काय खिशातून भरायचे का\nपहिला कार्यकर्ता : भाऊ, किमान 300 रुपये तरी द्या म्हणताय महिला. सभेसाठी पूर्ण दिवस जातो ना. औरंगाबादहून पैठणला घेऊन जायचे म्हणजे 300 रुपये जाताच ना. तसंच आता भुमरे साहेब मंत्रिमंडळात आहेत. 300 रुपये द्यायला पाहिजे, असं महिलांच म्हण्णं आहे.\nपहिला कार्यकर्ता : काय करायच मग की उद्या सकाळी फोन लावू\nदुसरा कार्यकर्ता : 250 रुपयेच सांग\nअंबड, घनसावंगीतही पैसे वाटले - खैरे\nसमाजमाध्यमांवर ही क्लिप व्हायरल होताच उद्धव ठाकरे गटाने रोहियो मंत्री संदिपान भुमरेंवर टीकेची झोड उठवली आहे. औरंगाबादचे माजी मुख्यमंत्री चंद्राकांत खैरे यांनी म्हटले आहे की, टेम्पररी मुख्यमंत्री आज पैठणला येत आहेत. बंडखोर आमदार आणि आता मंत्री असलेल्या भुमरेंनी त्यांची जाहीर सभा ठेवली आहे. यापूर्वी भुमरेंची पैठणला सभा झाली. त्यात खुर्च्या रिकाम्याच होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच त्यांना फटकारलय. पहिले बदनामी झाली असल्यामुळे ते आता पैसे देऊन गर्दी जमवत आहेत. मला याबाबत अंबड, घनसावंगी, पाथर्डीहूनदेखील फोन आला आहे. त्यात सभेसाठी पैसे वाटत असल्याच म्हटले आहे.\nप्रत्येकाला दीड हजार - दानवे\nविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीदेखील सभेसाठी पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला आहे. दानवे म्हणाले, अंगणवाडी सेविकांना सभेला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना अद्याप मदत दिली नाही. इगतपुरी येथे आदिवासींची मुलांची वेठबिगारीसाठी विक्री झाली. सरकारने याची साधी दखलही घेतली नाही. हे सरकार असंवेदनशील आहे.\nपैसे देण्याची गरज नाही - भुमरे\nआ. संदिपान भुमरे यांनी सभेसाठी पैसे वाटल्याचा आरोप फेटाळला आहे. भुमरे म्हणाले, पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा हाेणार हे ऐकूनच काहींच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे ते नको ती बडबड करत आहेत. सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. आमच्यावर पैठणच्या लोकांचे प्रेम असल्याने रेकॉर्डब्रेक गर्दी होईल. मी तीस वर्षांपासून लोकांमधून निवडून येताेय. दानवेंनी आधी लोकांमधून निवडून येऊन दाखवावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-sees-big-jump-in-swine-flu-cases-this-year/articleshow/93648678.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2022-10-07T22:15:01Z", "digest": "sha1:VMCFHRUVIPXROZ5XXGWKOMVHWMTD2HTU", "length": 12247, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nमहाराष्ट्रात स्वाइन फ्लूचा धोका वाढतोय; गेल्या आठ महिन्यातील धडकी भरवणारी रुग्णसंख्या\nकरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना, आता स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते. राज्यात १ जानेवारी ते १७ ऑगस्ट या कालावधीमध्ये स्वाइन फ्लूच्या १,६६८ रुग्णांची नोंद झाली असून, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ४९ इतकी आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः करोना संसर्ग नियंत्रणात आला असताना, आता स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते. राज्यात १ जानेवारी ते १७ ऑगस्ट या कालावधीमध्ये स्वाइन फ्लूच्या १,६६८ रुग्णांची नोंद झाली असून, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ४९ इतकी आहे. पुणे येथे स्वाइन फ्लूच्या सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली असून, ही संख्या ४३५ इतकी आहे; तर मुंबईत ३०० जणांना स्वाइनचा संसर्ग झाला आहे. नागपूरमध्ये १५५, नाशिकमध्ये १४८ जणांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते.\nस्वाइन फ्लूच्या संसर्गाचा प्रसार हा एक वर्ष सोडून अधिक होताना दिसतो. राज्यामध्येही मागील वर्षी ही रुग्णसंख्या कमी होती. यंदा त्यात वाढ झाल्याचे दिसून येते. आरोग्य विभागाकडून या आजाराच्या प्रतिबंधासाठी लसीकरण केले जात असले, तरीही आरोग्यकर्मचाऱ्यांकडून त्याला मिळणारा प्रतिसाद कमी असल्याचे दिसते. अतिजोखमीच्या रुग्णांना ऐच्छिक वा मोफत इन्फ्लुएंजा लस दिली जाते. ही साथ पावसाळ्यात बळावत असल्यामुळे लस एप्रिल किंवा मे महिन्यात दिली जाते. लसीकरण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने तीन महिन्यांचा कालावधी लागतो. राज्यात लसीकरण हे प्रामुख्याने तीन टप्प्यांत केले जाते. गर्भवती माता, मधुमेही, उच्चरक्तदाबाचा त्रास असलेल्यांची संख्या अधिक असल्याने त्यांना प्राधान्याने लस दिली जाते. लस घेण्याच्या दृष्टीने अधिक जनजागृती करण्याची गरज संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आर. एस. विश्वास यांनी व्यक्त केली.\nआठ महिन्यांतील 'स्वाइन'चे रुग्ण\nएकूण - १,६६८ (१ जानेवारी ते १७ ऑगस्ट)\nमहत्वाचे लेख'त्या' प्रकरणी मी दोषी नाही, माझ्यावरील आरोप निराधार व खोटे; संजय राऊतांचा बचाव\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\n जे लॉटरीचं तिकीट कचऱ्यात टाकलं, त्यानेच बनवले या महिलेला करोडोंची मालकीण\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nमटा ओरिजनल मुंढेंच्या धाडसत्राने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, रात्री डॉक्टर नसल्यास थेट घरचा आहेर\nमुंबई ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा ते दिघेंच्या मृत्यूचं ठाकरे कनेक्शन, मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज\nमुंबई धाकधूक वाढली, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या हालचाली\nमुंबई आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन\nपुणे सरकार बदललं अन् रश्मी शुक्लांना क्लीनचिट मिळाली, मविआ नेत्यांना जी भीती होती तेच घडलं\nसोलापूर Breaking : भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआयची जीवे मारण्याची धमकी; क्राईम ब्रँचकडे तपास\nक्रिकेट न्यूज उभारायला गेले MS Dhoni चा मेणाचा पुतळा, पण धोनीची झाली अनहोनी, पाहा भन्नाट memes\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1655/", "date_download": "2022-10-07T22:26:43Z", "digest": "sha1:FXD63NFMY5ZW26XEDPHCLYSAH6HDQGPX", "length": 6688, "nlines": 77, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "जिल्हा रूग्णालयातून फरार आरोपीस अटक - Rayatsakshi", "raw_content": "\nजिल्हा रूग्णालयातून फरार आरोपीस अटक\nजिल्हा रूग्णालयातून फरार आरोपीस अटक\nहिंगोली पोलीस पथकाची कारवाई\nहिंगोली, रयतसाक्षी : जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस वैद्यकीय तपासणीसाठी हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले होते. परंतु पोलिसांना चकमा देऊन आरोपी विजय रमेश भगत रा. कानडखेडा हा फरार झाला होता. अखेर हिंगोली पोलीसांच्या पथकाने फरार आरोपीस नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून ताब्यात घेत अटक केली आहे.\nगोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी विजय भगत यास वैद्यकिय तपासणीसाठी गोरेगाव पोलीसांनी हिंगोली जिल्हा रूग्णालयात दाखल केले . दरम्यान या वेळी आरोपी विजय भगत याने कर्तव्यावर रूजू गोरेगाव पोलीसांना चकमा देत जिल्हारूग्णालयातून पळ काढला.\nदरम्यान आरोपी पोलीसांना चकमा देत फरार होण्यात यशस्वी झाल्याने पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक येतिश देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी विविध पथक स्थापन केली. फरार आरोपीचा पथकाद्वारे शोध घेतला जात होता. तपासादरम्यान आरोपी विजय भगत यास नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून ताब्यात घेऊन हिंगोली शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. आरोपी शोध मोहिमेच्या कारवाईत गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील तसेच पोलिस कर्मचारी राहुल गोटरे, काशिनाथ शिंदे, शिवाजी शिंदे, नवनाथ शिंदे, अमोल जाधव आदींनी केली.\nहिंगोलीत सातव समर्थक विलास गोरे पक्षातून निलंबीत\nजिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांची आज निवड\nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७…\nवडवाडी दरोडा प्रकणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या\nआठ जणांना अटक:बनावट नोटा चलनात खपवू पाहणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश;…\nभंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/ase-hote-sushant-che-shevtche-3-divas/", "date_download": "2022-10-07T23:16:22Z", "digest": "sha1:Y4AR6BTPSSLGQCFKK7GGIBUHXEYMCY6P", "length": 9012, "nlines": 85, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "शेवटच्या 3 दिवसात 'असे' झाले होते 'सुशांतचे हाल ! हाऊस हेल्परने केले अनेक धक्कादायक ‘खुलासे’ ! - Themaharashtrian", "raw_content": "\nशेवटच्या 3 दिवसात ‘असे’ झाले होते ‘सुशांतचे हाल हाऊस हेल्परने केले अनेक धक्कादायक ‘खुलासे’ \nशेवटच्या 3 दिवसात ‘असे’ झाले होते ‘सुशांतचे हाल हाऊस हेल्परने केले अनेक धक्कादायक ‘खुलासे’ \nबॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत.\n34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर पोलीस त्याच्या मृत्यूचा तपास करत आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, सुशांतच्या हाऊस हेल्पनं त्याच्या अखेरच्या दिवसातील त्याच्या स्थितीचा खुलासा केला आहे.\nएका इंग्रजी वृत्तानुसार पोलिसांच्या चौकशीत सुशांतच्या हाऊस हेल्पनं चकित करणारे खुलासे केले आहेत. सुशांत गेल्या 10 दिवसांपासून खूप अपसेट होता. गेल्या 3 दिवसांपासून तो अजिबात ठिक नव्हता. ते कोणाशी बोलतही नव्हता अशी माहिती आहे.\nया रिपोर्टमध्ये असाही उल्लेख आहे की, सुशांतचा हाऊस हेल्प म्हणाला की, सुशांत यांनी आम्हाला सांगितलं होतं की, त्यांनी सर्व उधारी मिटवली आहे. परंतु ते आता आमची सॅलरी देऊ शकतील की नाही हे मात्र सांगू शकत नाही. रिपोर्टमध्ये असाही उल्लेख आहे की, दीर्घकाळापासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता.\nहिंदूजा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचारही सुरू होते. कथितपणे त्यानं शेवटचा फोन कॉल त्याच्या बहिणीला आणि पवित्र रिश्तामधील त्याचा कोस्टार महेश शेट्टीला केला होता.\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nसुरेश रैनाच पहिलं क्रश होती ‘ही’ मराठीमोळी अभिनेत्री, डेट करण्याची होती इच्छा…\nBig Boss Marathi Season 4 मध्ये पहिल्याच दिवशी पडली वादाची ठीणगी, अपूर्वा प्रसादला म्हणाली की तुझ्या सारख्या उद्धट…\nमहेश मांजरेकर यांच्या दुसऱ्या पत्नीची पहिल्या पतीपासून असलेली मुलगीही आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री..पहा दिसते अतिशय सुंदर…\nसई ताम्हाणकरच्या ‘या’ कि’सिंग सीनने तोडल्या होत्या सर्व मर्यादा, दिला असा बो’ल्ड सीन की बॉलीवूडमध्येही आपण कधी पाहिला नसेल…\n‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री आहे ‘मकरंद अनासपुरे’ यांची पत्नी, दोघांनी अनेक चित्रपटात केलंय काम, पहा फोटो…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mukundbhalerao.com/blog/2022/05/07/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%86/", "date_download": "2022-10-07T22:03:58Z", "digest": "sha1:X6CTK2RZMYRHRQSR3XSTOCNG4QSXQFBH", "length": 8941, "nlines": 236, "source_domain": "www.mukundbhalerao.com", "title": "काश ! आबा ! हवामे, तैरना मुझे आता, – Mukund Bhalerao", "raw_content": "\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\n हवामे, तैरना मुझे आता,\nप्रवीण बुरकुले on जनाचे श्लोक\nS B Joshi on जनाचे श्लोक\nTushar Shardul on अभिराम मुक्त ऐसा, आनंदकंद आहे……..\n हवामे, तैरना मुझे आता,\nआंखे निंदसे बोझल थी, सपानोकी बारात जोरोंमे थी,\nकि अचानक याद आ गयी, अभिरामकी धुंधलिसी छवि छा गयी |\nसागरके किनारोंपर, रेतोंके पहाडोंपर,\nछोटीसी पगदंडीपर, नाचता वो चला था,\nआसमांके तारोंको, बुलाता वो चला था,\nपौधोंके पत्तोंको, सहालाते वो चला था,\nपंछीकी आहटको, सुनता वो चला था,\nलहारोंकी रोशनीको, देखता वो चला था |\nअब दिन बहुत बित गये, नही सुनी ऊसकी अंगिनत बाते |\nबातोंकी अब बरसात नही, हंसीकी फुलझडी नही,\nनन्हे उसके आंखोकी, अब कोई मस्ती नही,\nधिरेसे पावोंकी आहट भी नही, चमकते आंखोकी\nअब वो बात भी नही |\nप्यारसे पुकारती अब वो आवाज कहां,\n“आबा” दो अल्फाजोंकी, खुशबहार कहां,\nबाहोंमे गलेंमे मस्तीका, आलम कहां |\nशतरंजकी बाजीकी, मैफील कहां,\nहसनेकी हसानेकी, मिठी मुस्कान कहां,\nराजाको घोडेंसे, तकरार कहां,\nहाथिकी प्यादोंसे, जंग भी कहां,\nजंगकी तैयारीमे, शतरंजकी बाजी कहां |\nसब खयालोंमे डुबा, मै उसे ढुंढ रहा था,\nसिनेसे लगानेको, दिल ललचा रहा था,\nख्वाबोंमे अपने, दुनियां ढुंढ रहा था,\nआलममे सारें, खोज उसे रहा था |\nउषाकी रक्तिमांसे, पर्दे नयनोसे हठ गये,\nइर्दगिर्द देखा तो, सपने सारे टूट गये,\nमानो फरिश्तासा, वो अचानक आ गया,\nदिलको हलकेसे, छूकर चला गया |\nफिर यकायक कहिंसे, मिठी एक आवाज आयी,\n मुझेभी तुम्हारी, बहुत याद आयी |\nजल्दि जल्दि गोवांमे, दौडकर तुम आजाओ,\nबहोत दिनोसे मै, मस्तीसे परे हो गया हूं,\nयाद तो बहोत आती है, बहोत मै परेशान हूं |\nअगर तमन्नाओंके बादलपर, बैठना मुमकिन होता,\nअगर ख्वाबोको हकीकतमे, बदलना संभव होता,\nअगर इरादोंको सच्चाईमे, लाना बसमे होता,\n हवामे, तैरना मुझे आता,\nपलभरमें हरदिन, मै मिलने तुम्हे आता |\nमुकुंद भालेराव | औरंगाबाद | महाराष्ट्र | दिनांक: ७ मे २०२२ | सुबह १०:३०\nकोसळेल जेंव्हा | वज्र देवेंद्राचे |\n हवामे, तैरना मुझे आता,”\nखूपच सुंदर,एका आजोबांचे नातवा साठी,नातवाच्या आठवणीत रमलेले अतिशय भावस्पर्शी शब्दांकन.\nआपल्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व साठी मनापासून दाद,खूपच छान.एका प्रतिभावान कवी सारखी कविता झालिये\nपरत एकदा आपले अभिनंदन व पुढील लिखाणासाठी शुभेच्छा\nराष्ट्रचिंतन – राष्ट्र प्रथम\nमक्केकी रोटी Pizza और कढी\nउम्मीदोके ख्वाबोके रंगिन गुब्बारे\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/realme-gt2-pro-and-realme-gt2-launched-read-details-see-features/articleshow/89914365.cms?utm_source=hyperlink&utm_medium=mobile-phones-articleshow&utm_campaign=article-4", "date_download": "2022-10-07T22:52:34Z", "digest": "sha1:MTS7PFE26AEJIYACPGY3JLWV4BZBDGKX", "length": 13537, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\n५० MP कॅमेरा आणि सुपरफास्ट चार्जिंगसह Realme GT2 Pro, Realme GT2 लाँच, मिळणार अनेक जबरदस्त फीचर्स\nRealme GT 2 Pro आणि Realme GT 2 ग्लोबली लाँच करण्यात आले आहे. Realme GT 2 Pro आणि Realme GT 2 मध्ये तुम्हाला कोणती वैशिष्ट्ये मिळतील त्याबद्दल जाणून घ्या सविस्तर.\nहॅंडसेट्स जागतिक स्तरावर लाँच\nदोन्ही फोनमध्ये भन्नाट फीचर्स\nनवी दिल्ली: स्मार्टफोन्स श्रेणीचा विस्तार करत Realme ने Realme GT 2 Pro आणि Realme GT 2 हे दोन नवीन हँडसेट जागतिक स्तरावर लाँच केले आहेत. कंपनीचे दोन्ही हँडसेट १२ GB पर्यंत रॅम आणि २५६ GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजमध्ये येतात. Realme GT2 Pro ची सुरुवातीची किंमत ७४९ युरो (सुमारे ६४,२०० रुपये) आहे आणि Reality GT2 ची सुरुवातीची किंमत ५४९ युरो (सुमारे ४६,३०० रुपये) आहे. लाँच ऑफर अंतर्गत, कंपनी या उपकरणांवर १०० युरोची सूट देखील देणार आहे. हे स्मार्टफोन पेपर व्हाइट, पेपर ग्रीन, स्टील ब्लॅक आणि टायटॅनियम ब्लू कलर पर्यायांमध्ये लाँच करण्यात आले असून कंपनीच्या या नवीन हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि ६५ डब्ल्यू फास्ट चार्जिंग सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.\nवाचा: युजर्सना झटका, या कंपनीने कमी केली फर्स्ट रिचार्ज प्लानची व्हॅलिडिटी, डेटामध्येही कपात, पाहा डिटेल्स\nRealme GT2 Pro ची वैशिष्ट्ये: कंपनीच्या फोनमध्ये १४४० x ३२१६ पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.७ -इंचाचा WQHD+ डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले १२० Hz चा रिफ्रेश दर आणि १४०० nits च्या ब्राइटनेससह येतो. कंपनीने १२ GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि २५६ GB पर्यंत UFS ३.१ अंतर्गत स्टोरेजसह फोन लाँच केला असून या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ८ Gen १ चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, ५०-मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेरासह फोनच्या मागील बाजूस ५०-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि ४० x मायक्रोस्कोपिक लेन्स देखील देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. Realme GT2 Pro फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे. जी ६५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.\nकंपनीचा दावा आहे की, या चार्जिंगच्या मदतीने फोन ३३ मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. Realme GT2 ची वैशिष्ट्ये : Realme GT2 Pro फोनमध्ये, कंपनी ६.६२ -इंचाचा फुल एचडी + AMOLED डिस्प्ले देत आहे, जो १२० Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. Snapdragon ८८८ प्रोसेसर या फोनमध्ये १२ GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि २५६ GB UFS 3.1 स्टोरेजसह देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी Realme GT2 Pro फोनमध्ये अल्ट्रा-वाइड अँगल आणि मॅक्रो लेन्ससह ५०-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. कंपनीने या फोनमध्ये ६५ W फास्ट चार्जिंगसह ५००० mAh बॅटरी देखील दिली आहे.\nवाचा: सार्वजनिक ठिकाणचा वाय फाय वापरण्यापूर्वी या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, मोठा फटका बसू शकतो\nवाचा: नवीन कूलर खरेदी करायची नाही गरज, ५०० रुपयांत जुनाच बनेल नव्यासारखा, घर ठेवणार सुपरकूल, पाहा टिप्स\nवाचा: स्मार्टफोनमधील खराब नेटवर्क त्रास देतय फॉलो करा 'या' टिप्स, मिळवा भन्नाट स्पीड\nमहत्वाचे लेखयुजर्सना झटका, या कंपनीने कमी केली फर्स्ट रिचार्ज प्लानची व्हॅलिडिटी, डेटामध्येही कपात, पाहा डिटेल्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nसिनेन्यूज विजय देवरकोंडा आणि रश्मिका लपत-छपत कुठे निघाले Video पाहून नेटकऱ्यांनी लावायचा तो अंदाज लावलाच\nइलेक्ट्रॉनिक्स 8GB रॅम आणि 10,090 mAh बॅटरी पावर असणाऱ्या या Samsung Tabs खरेदी करा आणि मिळवा ₹18000 इतका जबरदस्त डिस्काउंट\nआर्थिक राशीभविष्य आर्थिक राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२२ : जाणून घ्या उद्याचा दिवस कोणासाठी ठरेल धनप्राप्तीचा\nसिंधुदुर्ग उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे राहणारा आमदार चौकशीच्या फेऱ्यात, कोकणातल्या नेत्याला एसीबीची नोटीस\n जे लॉटरीचं तिकीट कचऱ्यात टाकलं, त्यानेच बनवले या महिलेला करोडोंची मालकीण\nमुंबई आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन\nकोल्हापूर एकनाथ शिंदे गर्दी दिसली म्हणून काहीही बोलत सुटले, उद्धव ठाकरेंच्या भाषणालाच प्रतिसाद: अजित पवार\nमटा ओरिजनल मुंढेंच्या धाडसत्राने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, रात्री डॉक्टर नसल्यास थेट घरचा आहेर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/tata-new-cars-tata-motors-launch-special-edition-suv-yadivi-special-things-about-it/", "date_download": "2022-10-07T21:20:31Z", "digest": "sha1:RPLN5SB2DFSQ3CU252ZSBCHMRQHAMGUV", "length": 7275, "nlines": 42, "source_domain": "mahaupdate.in", "title": "Tata New Cars: टाटा मोटर्स 'या' दिवशी लाँच करणार SUV च्या स्पेशल एडिशन, जाणून घ्या यातील खास गोष्टी… - Maha Update", "raw_content": "\nHome » Tata New Cars: टाटा मोटर्स ‘या’ दिवशी लाँच करणार SUV च्या स्पेशल एडिशन, जाणून घ्या यातील खास गोष्टी…\nTata New Cars: टाटा मोटर्स ‘या’ दिवशी लाँच करणार SUV च्या स्पेशल एडिशन, जाणून घ्या यातील खास गोष्टी…\nTata New Cars: तुम्ही जर नवीन कार खरेदी करणार असाल तर ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. कारण सणासुदीच्या आधी टाटा मोटर्स भारतीय बाजारात आपल्या SUV च्या स्पेशल एडिशन लाँच करणार आहे.\nटाटा मोटर्सने याबाबत फक्त पुष्टी केली आहे की आगामी मॉडेल स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल असेल. हे याच महिन्यात शनिवार म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे.\nयाबाबत टाटा मोटर्सने नुकताच आगामी एसयूव्हीचा एक छोटा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये वास्तविक कार संपूर्णपणे दिसत नाही. सोशल मीडिया पोस्टमध्ये एसयूव्हीच्या ‘न्यू फॉरएव्हर’ श्रेणीसाठी ‘लवकरच येत आहे’ असा उल्लेख आहे. टाटा कारच्या नवीन फॉरएव्हर रेंजचे श्रेय कारमेकरची इम्पॅक्ट २.० डिझाइन लँग्वेज असलेल्या मॉडेल्सना दिले जाते. यामध्ये सफारी, हॅरियर, पंच आणि नेक्सॉन सारख्या एसयूव्हीचा समावेश आहे.\nकंपनीने हॅरियर आणि सफारीचे अनेक प्रकार लॉन्च केले आहेत\nटाटा मोटर्सने याआधी जाहीर केले होते की ते त्यांच्या ‘न्यू फॉरएव्हर’ रेंज अंतर्गत वारंवार नवीन मॉडेल्स किंवा विद्यमान मॉडेल्सच्या विशेष आवृत्त्या लाँच करत राहतील. या धोरणानुसार, टाटा मोटर्सने आपल्या फ्लॅगशिप एसयूव्ही हॅरियर आणि सफारीचे अनेक प्रकार लॉन्च केले आहेत, ज्यात डार्क एडिशन आणि गोल्ड एडिशन यांचा समावेश आहे. टाटाच्या नवीन मॉडेल पंच SUV ला नेक्सॉन आणि इतर SUV सोबत या वर्षाच्या सुरुवातीला विशेष काझीरंगा एडिशन मिळाले.\nया वर्षी डार्क एडिशन लाँच करण्यात आले\nया वर्षी जानेवारीमध्ये, टाटा मोटर्सने हॅरियर एसयूव्हीचे नवीन डार्क एडिशन 19.05 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च केले. याआधी, टाटा मोटर्सने नेक्सॉन, नेक्सॉन ईव्ही, हॅरियर आणि अल्ट्रोज सारख्या मॉडेल्सच्या डार्क एडिशन मॉडेल्सचे डार्क संस्करण सादर केले होते. याशिवाय, अॅडव्हेंचर आणि गोल्ड एडिशननंतर टाटा सफारीची तिसरी स्पेशल एडिशन म्हणून डार्क एडिशन येते.\nटाटाने काझीरंगा एडिशन लाँच केले\nफेब्रुवारीमध्ये, टाटा मोटर्सने सफारी, हॅरियर, नेक्सॉन आणि पंच SUV च्या काझीरंगा आवृत्त्या सादर केल्या. पंच काझीरंगा ची किंमत 8.59 लाख रुपये एक्स-शोरूम आहे, तर नेक्सॉन पेट्रोल आणि डिझेल काझीरंगा व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 11,78,900 रुपये आणि 13,08,900 रुपये एक्स-शोरूम आहे. टाटा हॅरियर आणि सफारी काझीरंगा प्रकार अनुक्रमे 20,40,900 रुपये आणि 20,99,900 रुपये एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहेत.\nTata New Car: टाटा लवकरच लाँच करणार हॅरियर, सफारी आणि नेक्सॉनचे नवीन मॉडेल, असतील ‘या’ खास गोष्टी\nTata Electric Cars: टाटा ईव्ही मार्केटमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज, करणार ‘या’ १० नवीन इलेक्ट्रिक कार लाँच, पहा यादी\n टाटा मोटर्स पुढील वर्षात लाँच करणार अनेक स्वस्त इलेक्ट्रिक कार, यादी सविस्तर पाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2022-10-07T22:34:26Z", "digest": "sha1:VKKSQSNQIHTALL7V2TVHUTCFEQYI2IC3", "length": 3953, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बोर्ते - विकिपीडिया", "raw_content": "\nबोर्ते ही चंगीझ खानची प्रथम पत्नी होती. मंगोल टोळ्यांच्या रिवाजाप्रमाणे ती चंगीझखानपेक्षा वयाने मोठी होती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ फेब्रुवारी २०१७ रोजी २२:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2022-10-07T22:19:08Z", "digest": "sha1:TQAC7CW4WGW7OR3LSQGHZSN557EJCBB2", "length": 17297, "nlines": 229, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वंगारी मथाई - विकिपीडिया", "raw_content": "\nएप्रिल १, इ.स. १९४०\nसप्टेंबर २५, इ.स. २०११\nनोबेल शांति पुरस्कार ,जवाहर लाल नेहरू पुरस्कार\nवंगारी मुता मथाई , अर्थात वंगारी मथाई (एप्रिल १, इ.स. १९४० - सप्टेंबर २५, इ.स. २०११)एक केनियन पर्यावरणवादी आणि राजनीतिक कार्यकर्ता होत्या.त्यांनी अमेरिका आणि केन्या मधून उच्च शि़क्षण घेतले.१९७० च्या दशका मध्ये मथाईनी हरितपट्ट आंदोलनाची मुळे रोवून वृ़क्षारोपण,पर्यावरण संरक्षण आणि स्त्रियांचे अधिकारांकडे लक्ष दिले. २००४ मध्ये \"सतत विकास, लोकतंत्र आणि शांतिसाठी दिलेले योगदान\" या मुळे नोबेल शांति पुरस्कार मिळविणारी पहिली आफ्रिकन महिला आणि पहिली पर्यावरणवादी बनली. वर्ष २००५ मध्ये यांना जवाहर लाल नेहरू पुरस्काराने सन्मानित केले गेले.\nत्यांनी १९७७ मध्ये आपली पर्यावरण विषयक मोहिम सुरू केली.नैरौबी विद्यापीठातून त्यांनी 1971 साली डॉक्टरेट प्राप्त केली होती. ही पदवी प्राप्त करणाऱ्या पूर्व आफ्रिकेतील त्या पहिल्याच महिला होत्या. वंगारी मथाई यांचा जन्म केन्यातील नैरी येथे १९४० मध्ये झाला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येथील स्थानिक शाळेमध्येच झालं स्लोलास्टिका येथील महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण झालं त्यानंतर पिटसबर्ग विद्यापिठामध्येही त्यांनी काही धडे घेतले मात्र पुन्हा त्या केन्याच्या नैरोबी विद्यापिठात संशोधन सहाय्यक म्हणून आल्या. बायोलॉजी सायन्समध्ये पीएच.डी करणाऱ्या त्या आफिकेतल्या पहिल्याच महिला होत्या. यानंतर आपल्या कार्यक्षेत्रातील अनेक टप्पे गाठत त्या पर्यावरणमंत्री झाल्या. पण पर्यावरणमंत्री झाल्या म्हणून काही त्यांची वाट सुकर झाली असे नाही. पर्यावराण हा मुद्दा विकासाच्या विरोधी आहे. त्यामुळे पर्यावरणवादी म्हणजे विकासाला विरोध करणारे असे मानुन आजवर अनेकांना अनंत अंडचणींना सामोरे जावे लागले मथाई देखील त्यातून सुटल्या नाहीत, मात्र प्रसंगी विरोध सहन करून आपल्या भूमिकेवर त्या ठाम राहिल्या.\nकेन्याचा जागतिक ख्यातीचा चेहरा असलेल्या मथाई यांना विज्ञान व सामाजिक चळवळीमध्ये केलेल्या कामाबद्दल २००४ साली 'नोबेल' पुरस्कार देण्यात आला.\nमथाई यांनी पर्यावरण रक्षणासाठी सुरू केलेल्या 'ग्रीन बेल्ट' चळवळीमध्ये गेल्या ३० वर्षांत ३ कोटी वृक्षांचे रोपण करण्यात आले आणि हे मोठे कार्य त्यांनी गरीब महिलांमध्ये प्रबोधन करून घडवून आणले.\nग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्यांनाही केवळ विशिष्ट वर्गातील उच्चभ्रू चर्चांपुरते मर्यादित न ठेवता सामान्य माणसांना पर्यावरणवादी चळवळीत सक्रिय करण्याचे महान कार्य केले.\n१९७० च्या दशकात केन्यातील रेड क्रॉसचे नेतृत्व केले होते.\nकेन्याच्या बाहेर आफ्रिकेतील कांगो बेसिन जंगल वाचवण्यासाठी ही त्यांनी प्रयत्न केले होते.\nसामाजिक चळवळी सोबत त्यांचा राजकारणात सहभाग होता. २००२मध्ये त्या संसद सदस्य म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांना सहायक पर्यावरण मंत्री पद देण्यात आले होते. २००३ ते २००७ या कालावधीमध्ये त्या या पदावर होत्या.\nकेन्याच्या राष्ट्रिय आयोगातर्फे मानवाधिकारावर दिला जाणारा चषक स्विकारताना मथाई\nमथाई यांनी महिलांच्या अधिकारासाठी मोठी लढाई लढली होती.केन्याचा जागतिक ख्यातीचा चेहरा असलेल्या मथाई यांना विज्ञान व सामाजिक चळवळीमध्ये केलेल्या कामाबद्दल २००४ साली 'नोबेल' पुरस्कार देण्यात आला.\nमथाई यांना भारत सरकारने 2006 साली इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान केला होता.\nकर्करोगाच्या आजाराने ७१ व्या वर्षी नैरोबी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.\nमथाई आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा २००६ साली नैरोबी येथे\nशांततेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कांराचं स्वरूप एक कोटी स्वीडिश क्रोनर म्हणजे साधारणपणे १० लाख ३० हजार अमेरिकन डॉलर असते. असं अनेकांना कळल्यावर त्या एवढया पैशाचं काय करणार हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला मात्र मथाईना या पैशाचं काय करायचं हे माहिती होतं. त्या म्हणाल्या पहिल्यांदा या रकमेचं व्यवस्थापन करणार. त्यातील रक्कम पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या प्रकल्पावर खर्च केली जाईल. मात्र सर्वात अगोदर या रकमेतुन मक्याची पोती खरेदी केली जातील. कारण भूकेलेल्या पोटी या कार्यात साथ देणाऱ्या जनतेची ती आज गरज आहे.असे त्यांचे मत होते.\n— स्रोत-वंगारी मुता मथाई– 'Unbowed: A Memoir' या पुस्तकाती पृष्ठ क्रं १९२.\nखालील पुस्तके ही इंग्रजी भाषेत आहेत.\nसकाळच्या संकेतस्थळाची २८ सप्टेंबर २०११ची आवृत्ती.\nकृषीवलच्या संकेतस्थळाची २८ सप्टेंबर २०११ची आवृत्ती.\nवेबदुनियाच्या संकेतस्थळाची २८ सप्टेंबर २०११ची आवृत्ती.\nबालीच्या संकेतस्थळाची २८ सप्टेंबर २०११ची आवृत्ती.[मृत दुवा].\nइ.स. १९४० मधील जन्म\nइ.स. २०११ मधील मृत्यू\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०२२ रोजी ००:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Escarbot", "date_download": "2022-10-07T23:03:30Z", "digest": "sha1:U3HKIETRZUDZ45U7XXB6QF25EZTBWS5U", "length": 9785, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Escarbot - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वागत Escarbot, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन Escarbot, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८७,१८२ लेख आहे व २०७ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nनजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.\n'दृश्य संपादन' कडून 'स्रोत संपादन' अथवा 'स्रोत संपादन' कडून दृश्य संपादकाकडे जाणे\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१२ रोजी १८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/378/", "date_download": "2022-10-07T21:34:20Z", "digest": "sha1:NXU3EYTRLIW4O3YH53QAC6OR3MSPPNVG", "length": 11204, "nlines": 83, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "आंतरराष्ट्रीय प्रिंट प्रदर्शनातील विजेत्यांना राज्यपालांच्या हस्ते पारितोषिक प्रदान - Rayatsakshi", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय प्रिंट प्रदर्शनातील विजेत्यांना राज्यपालांच्या हस्ते पारितोषिक प्रदान\nआंतरराष्ट्रीय प्रिंट प्रदर्शनातील विजेत्यांना राज्यपालांच्या हस्ते पारितोषिक प्रदान\nकलेचा वारसा जोपासण्यासाठी कलाप्रेमींनी पुढाकार घ्यावा -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन\nमुंबई, रयतसाक्षी : देशात अनेक प्रकारच्या कला अस्तित्वात असून हा प्राचीन कलेचा मोठा वारसा या भूमीला लाभलेला आहे. हा वारसा आणि कला संस्कृती जोपासण्यासाठी कलाप्रेमींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे दिले.\nमुंबईच्या फोर्ट येथील जहांगीर कला दालनात ललित कला अकादमीतर्फे आयोजित द्वितीय ‘आंतरराष्ट्रीय प्रिंट द्विवार्षिकी भारत’ या प्रदर्शनातील विजेत्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.\nमानवी भाव-भावना कलेच्या माध्यमातून व्यक्त करणे ही दैवीशक्तीच आहे. कलाकारांची भावना समजून घेण्यासाठी कलेची आवड असणेही तितकेच गरजेचे आहे. देशाला अनेक युगांपासून कला-संस्कृती लाभलेली आहे. आजच्या घडीला ही कला,संस्कृती जोपासण्यासाठी अनेक कलाकार पुढे येत आहेत. संगीत ज्या प्रमाणे समजून घेता येते, त्याप्रमाणे कलेला समजून घेणे कठीण आहे.\nत्यासाठी कलेची आवड निर्माण होणे तितकेच आवश्यक आहे. देशात विविध कला आहेत. ही कला-संस्कृती पुढे चालत राहावी यासाठी कलाकारांनी नवनवीन कलांच्या माध्यमातून नवा समाज घडविण्याची गरजही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.\nयाप्रसंगी पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन करून खासदार गोपाल शेट्टी म्हणाले की, कलाकारांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. भविष्यात मोठे कलाकार निर्माण करण्यासाठी आणि कला संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येवून योगदान देण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nललित कला अकादमीचे अध्यक्ष डॅा. उत्तम पाचरणे म्हणाले की, या प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष असून यामध्ये एकूण ३१७ कलाकृती सादर करण्यात आल्या होत्या त्यापैकी १४९ मुद्राचित्रांची निवड करून त्या कला रसिकांसाठी प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.\nप्रसिद्ध चित्रकार सोमनाथ होर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या निवडक कलाकृतींसह देशविदेशातील कलाकृतींचाही यामध्ये समावेश आहे. या प्रदर्शनात अमेरिका, रशिया, जर्मनी, इस्रायल, नेपाळ, मेक्सिको, नेदरलँड, अर्जेंटिना, फ्रान्स, पेरू, पोलंड येथील कलावंतांची मुद्राचित्रे कला रसिकांना पाहण्यासाठी १३ डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहेत.\nहे प्रदर्शन मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयसह देशातील प्रमुख शहरांमध्येही प्रदर्शित केले जाणार आहे. ललित कला अकादमीकडे सुमारे २० हजार चित्र उपलब्ध असून त्यासाठी चित्र संग्रहालय उभारले जाणार असल्याची माहितीही डॉ. पाचरणे यांनी यावेळी दिली.\nयावेळी ज्येष्ठ कलाकार श्री. जयप्रकाश जगताप यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या आंतराष्ट्रीय प्रिंट प्रदर्शनात प्रत्येकी दोन लाख रुपयांची पाच परितोषिके दिली जातात, यावर्षी कलाकार जगदीश्वरराव तमिनेन्नी (रोप वे), चंद्रशेखर वाघमारे (अदृश्य ध्येय), सुषमा यादव (स्त्रीमित्र कथा), दुर्गादास गराई (कळत नकळत दुर्दैव), मोहम्मद मजुमदार (ब्रेथ लाईफ इन टू ब्युटी) या पाच पारितोषिक विजेत्यांना दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. ललित कला अकादमीचे सचिव रामकृष्ण वेदेला यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nएमआयएम ची तिरंगा रॅली मुंबई त दाखल\nगोपीनाथराव मुंडेंच्या तोडीचा एकही नेता आज भाजपात नाही, आज ते असते तर…; संजय राऊत रोखठोकच बोलले\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/maharashtra-municipal-corporation-election-2022-bmc-election-2022-ward-51-information-au138-2-au138-777441.html", "date_download": "2022-10-07T22:47:03Z", "digest": "sha1:ES2MTZOXCZ3KCZ32XBSCYZUJU6PP5KOU", "length": 10481, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nBMC election 2022 : मुंबईमहापालिकेची निवडणूक काही दिवसांवर, प्रभाग क्र. 51 मध्ये काय होणार\nप्रभाग 51 मधील सध्याची राजकीय स्थिती...\nमुंबई : मुंबई राज्याची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी… याच मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election 2022) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुंबईत शिवसेनेचं वर्चस्व आहे. राज्यात सत्तांतर झालंय. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत (Municipal Corporation Election 2022) काय होणार याकडे राज्यासह देशाचं लत्र लागलं आहे. मुंबईची लोकसंख्या 3,085,411 एवढी आहे. मुंबईतील एकूण मतदार संख्या 94 लाख 96 हजार 605 एवढी आहे. मुंबई महापालिकेची सदस्य संख्या 227 आहे. आता ही संख्या वाढून 236 करण्यात आली आहे. यात अनुसूचित जातीसाठी 15 वॉर्ड तर अनुसूचित जमातीसाठी 2 वॉर्ड राखीव ठेवण्यात आले आहेत. तर महिलांसाठी 109 वॉर्ड आरक्षित आहेत. सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या महापौर तर इक्बाल सिंह चहल हे महापालिकेचे आयुक्त आहेत. मात्र, सध्या महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आल्याने चहल हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. प्रभाग क्रमांक 51 मध्ये 2017 ला शिवसेनेच्या उर्मिला पांचाळ निवडून आल्या होत्या. आता काय स्थिती आहे. तिथली राजकीय गणितं काय आहेत\nआकाशवाणी, मालाड खाडी या भागात विस्तार आहे. आंबेडकर रोड, आरएससी रोड, अब्दुल हमीद मार्ग, एरंगल बीच, मढ-मार्वे, आंबेडकर रोड या ठिकाणांचा समावेश आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिकेअंतर्गत 4 मे 2022 रोजी आदेशानुसार निवडणूक आयोगाने आरक्षण जाहीर केलंय. महापालिकांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासंदर्भात कार्यक्रम दिला होता. त्याला अनुसरुन मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.\nप्रभाग 51 मधील 2017 निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी\nशिवसेना स्वप्नील टेंबवलकर 7802\nकाँग्रेस रेखा सिंह 3828\nमनसे घनश्याम परब 1374\nसंभाजी ब्रिगेड संदीप जाधव 416\nKDMC Election 2022: कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 36 मधील आरक्षणाची गणित बदल्याने कोण बाजी मारणार\n प्रभाग 43वर सर्वांच्याच नजरा\nKDMC Election 2022 Ward 18 | कल्याण डोंबिवलीत शिवसेना गडाला सुरुंग, आता भाजप-राष्ट्रवादीत काँटे की टक्कर, मनसेच्या भूमिकेकडेही लक्ष\nटू पीसमध्ये इलियाना डिक्रूझची हवा हवाई\n‘संस्कारी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीचे संस्कारी रूप\nनोरा फतेहीची रिवीलिंग जादू पाहिली का\nमौनी रॉयचा केसरिया रंग…. फोटोशूटसाठी पहा काय केलं\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/tag/bachelor-of-forestry/", "date_download": "2022-10-07T22:34:52Z", "digest": "sha1:BWYRFQANEGUCOFANT32MOKHZTRCO2HKD", "length": 6258, "nlines": 57, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "Bachelor of Forestry - Bharti jahirat", "raw_content": "\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nUPSC भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2022 | 151 जागा\nUPSC / केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आयोजित वन सेवा परीक्षा 2022 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 151 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात...\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/3310", "date_download": "2022-10-07T22:07:25Z", "digest": "sha1:AJVA5MP2SGKBGBEFPTUQBDTXL2AW7W3O", "length": 11862, "nlines": 106, "source_domain": "bollyreport.org", "title": "करोडो रुपयांचा मालक असूनही सलमान खान अजूनही का राहतो १ बी एच के फ्लॅट मध्ये ? जाणून घ्या ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News करोडो रुपयांचा मालक असूनही सलमान खान अजूनही का राहतो १ बी एच...\nकरोडो रुपयांचा मालक असूनही सलमान खान अजूनही का राहतो १ बी एच के फ्लॅट मध्ये \nबॉलिवुडचा सलमान खान गेली ३-४ दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या कालावधीत तो अनेकदा चर्चेत राहतो. काही दिवसांपुर्वीच तो अंतिम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा सोबत दिसत होता. यावेळी त्याने अनेक इव्हेंट आणि रियालिटी शो मध्ये सहभाग घेतला होता.\nयाचसाठी तो आणि आयुष ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये गेला होता. यावेळी त्यांच्यासोबत महिमा मकवाना आणि डायरेक्टर महेश मांजरेकरसुद्धा गेले होते. या शो दरम्यान सलमानने आता ही तो १ बीएचके मध्ये का राहतो या मागील कारण देखील सांगितले.\nशो दरम्यान कपिल शर्माने सलमानला विचारले कि तो त्याच्या खऱ्या आयुष्यात अजुनही १बीएचके मध्येच राहतो. तु यावर अधिक खर्च करु शकत नाहीस का. या वर सलमानने उत्तरले की, ज्या गोष्टींवर तुम्ही खर्च करु इच्छिता अशाच गोष्टींवर खर्च होता. पण आजकाल ती गोष्ट सुद्धा खुप कमी होत चालली आहे. सलमानचे हे उत्तर ऐकुन तेथे उपस्थित लोक हसु लागले. सलमानला जास्त पैसे खर्च करायला आवडत नसल्याचे त्याने सांगितले.\nसलमाननंतर कपिलने आयुशला प्रश्न विचारला. कि तुम्ही जेव्हा घरी भेटता तेव्हा तुम्ही परिवारातील सदस्यांप्रमाणे असता पण जेव्हा चित्रपटाच्या सेटवर भाईजानच्या समोर असता तेव्हा काय फरक असतो. यावर आय़ुषने सांगितले कि त्यात खुपच फरत असतो. चित्रिकरणाच्या प्रत्येक दोन तीन दिवसांनी आमची भेट होते. त्यानंतर मजा मस्ती करत आम्ही घरी परत जातो.\nअसेच एकदा अर्पिता बाहेर गेली असताना मी भाईला भेटण्यासाठी गेलो तेव्हा ते मला म्हणाले कि तु खुप अजीब माणुस आहेस. तु सारखा सारखा इथे का येतोस. हा किस्सा ऐकुन सलमान खान, कपिल शर्मा आणि अर्चना पूरन सिंह जोर-जोरात हसु लागले. त्यानंतर सलमानने अर्चना पूरन सिंह सोबत ‘पहला-पहला प्यार है’ गाण्यावर डान्स केला.\nसध्या सलमान त्याचा आगामी चित्रपटच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ सुद्धा शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सलमान खान एका सैनिकाच्या भुमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एका भारतीय जासुसावर आधारित आहे. टायगर सिरीजमधील ही पहिलीच रियल स्टोरी आहे. या चित्रपट म्हणजे एक भारतीय जासुसची कहाणी आहे जो देशासाठी त्याचा हिंदु धर्म सोडुन पाकिस्तानात जाऊन एका पाकिस्तानी मुलीशी लग्न करतो. त्याच गुप्तहेरामुळे भारत पाक युद्धावेळी भारताला जिंकण्सास कारण ठरलेली माहिती मिळाली होती. भारताच्या या गु’प्त’हेराने पाकिस्तानी मुली सोबत लग्न तर केलेच पण त्यासोबत पाकिस्तानी सेनेत सुद्धा भरती झाला होता.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleदेशातील सर्वात महागडी कार घेणारे व्यक्ती बनले मुकेश अंबानी, कारची किंमत जाणून थक्क व्हाल \nNext articleड्रायव्हिंग करत असताना फोन वर बोलणे आता गुन्हा नाही पण करावी लागेल फक्त ही गोष्ट \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.phoneky.com/android/?cat=18", "date_download": "2022-10-07T21:25:07Z", "digest": "sha1:DAH6H7YOIS4E665NNKZM7GLCKPYFTVQL", "length": 7572, "nlines": 235, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृष्ट धर्म Android अॅप्स", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली धर्म\nसर्वोत्तम धर्म Android अॅप्स दर्शवित आहे:\nसर्वोत्कृष्ट धर्म अनुप्रयोग »\nनवीन आणि लोकप्रिय »\nसर्वाधिक या महिन्यात डाउनलोड »\nया महिन्यात रेटेड »\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | जागतिक Top | सर्वाधिक मानांकित\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2022 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Al-Moazin Lite (Prayer Times) अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://nmk.org.in/nmdc-recruitment/", "date_download": "2022-10-07T21:11:43Z", "digest": "sha1:WBKZI2YDGE4OKSP3EGDWWHPP5ZOIDC46", "length": 6008, "nlines": 107, "source_domain": "nmk.org.in", "title": "(NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे भरती - NMK.ORG.IN", "raw_content": "\n(NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे भरती\nएकूण पदाच्या 21 जागा\n1 डेप्युटी जनरल मॅनेजर (माइनिंग) 01\n2 असिस्टंट जनरल मॅनेजर (माइनिंग) 01\n3 सिनियर मॅनेजर (माइनिंग) 01\n4 सिनियर मॅनेजर (फायनांस) 02\n5 मॅनेजर (फायनांस) 04\n6 मॅनेजर (माइनिंग) 05\n7 मॅनेजर (कमर्शियल) 02\n8 डेप्युटी मॅनेजर (माइनिंग) 01\n9 डेप्युटी मॅनेजर (सर्वे) 01\n10 ज्युनियर ऑफिसर (माइनिंग) 01\n11 शॉट फायर 02\nशैक्षणिक अटी: जाहिरात पहावी.\nवयोमर्यादा: [SC/ST 05 & OBC 03 वर्ष सूट]\n2 ते 9. 45 वर्ष\nअर्जाची शेवटची तारीख: 16 जून 2021\n[expand title=”नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 67 जागा”]\nएकूण पदाच्या 67 जागा\nपदाचे नाव: एक्झिक्युटिव ट्रेनी\n2 मटेरियल मॅनेजमेंट 25\nवयोमर्यादा: 27 वर्ष [OBC 03 & SC/ST 05 वर्ष सूट]\nB.E/B.Tech+GATE 2021+(शेवटच्या वर्षातील उमेदवार पात्र.)\nअर्जाची शेवटची तारीख: 23 मार्च 2021 (12:00 PM) (Online)\nअर्जाची शेवटची तारीख: 05 एप्रिल 2021 (Post)\n[expand title=”नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 63 जागा”]\nएकूण पदाच्या 63 जागा\nनौकरी ठिकाण: विविध NMDC प्रोजेक्ट्स\n1 ज्युनिअर ऑफिसर (माइनिंग) ट्रेनी 28\n2 ज्युनिअर ऑफिसर (मेकॅनिकल) ट्रेनी 17\n3 ज्युनिअर ऑफिसर (इलेक्ट्रिकल) ट्रेनी 13\n4 ज्युनिअर ऑफिसर (सिव्हिल) ट्रेनी 05\nमाइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+फोरमॅन प्रमाणपत्र.\nमेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी+05 वर्ष अनुभव.\nइलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा+इलेक्ट्रिकल सुपरवायझरी प्रमाणपत्र.\nसिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी+05 वर्ष अनुभव.\nवयोमर्यादा: 18 ते 32 वर्ष. [OBC 03 & SC/ST 05 वर्ष सूट]\nअर्जाची शेवटची तारीख: 23 मार्च 2021 (11:59 PM)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/pooja-chavan-suicide-letter-to-cm-by-lahu-chavan/", "date_download": "2022-10-07T22:24:11Z", "digest": "sha1:VEMUPHD7DLBEDUWQDZIRFHCP7KODX2H2", "length": 13254, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"आमचा कोणावरही आरोप नाही, संजय राठोड यांचा बळी घेऊ नका\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“आमचा कोणावरही आरोप नाही, संजय राठोड यांचा बळी घेऊ नका”\n“आमचा कोणावरही आरोप नाही, संजय राठोड यांचा बळी घेऊ नका”\nमुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी मोठ्या राजकीय नाट्यानंतर अखेर राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मला अडकवलं जात असून माझी राजकीय कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न होत असल्याची प्रतिक्रीया त्यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे.\nपूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी या सर्व प्रकरणात होणाऱ्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या बदनामीवरून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. त्या पत्राच्या शेवटी पूजाची बहीण, आई आणि वडीलांची स्वाक्षरी आहे. वाचा सविस्तर या पत्रात त्यांनी काय म्हटलं आहे.\nमाननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य\nविषयः पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी होणारी आमची व आमच्या समाजाची बदनामी थांबवणेबाबत\nमहोदय, आमची मुलगी पूजा चव्हाण हिचा दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला कुठल्याही माता-पितासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो. आमची ही वेदना आता कधीही भरून येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दुःखापेक्षा अधिक त्रासदायक आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे. तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून श्री संजय राठोड राज्य मंत्री यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत जे निराधार आहेत. आपण या संदर्भात पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या घटनेचा तपास वेगाने व्हावा जे दोषी असतील त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई कराल याची खात्री आहे.\nआमच्या मुलीचा बळी गेला पण फक्त संशयावरून कोणाचाही बळी जाऊ नये. श्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केली नाही. आमची राठोड हे समाजाचे नेते आहेत. ते खूप कष्ट करून इथपर्यंत पोहोचले आहे. फक्त संशयावरून त्यांचा बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषीवर कारवाई करावी राजकारणामुळे व दबावामुळे घाईत निर्णय घेऊ नये आमच्या आपल्यावर आमचा पूर्ण मुलगी गमावली परंतु या आड राजकारण करून दररोज होणाच्या आरोपाने तिचा रोज बळी जातोय. याचं राजकारण करून श्री संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेऊ नका. तपासामध्ये श्री राठोड किंवा अन्य कोणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई करून न्याय द्यावा. परंतु संशयावरून मुलीचर किंवा कोणावरही आरोप करू नयेत. श्री संजय विश्वास आहे आपण आम्हाला न्याय द्याल.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\nलहू चंदू चव्हाण (वडील), मंदोधरी लहू चव्हाण (आई). दिव्याणी लहू चव्हाण (बहीण)\nअशाप्रकारे पत्राद्वारे पूजाच्या कुटूंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे आपली आणि आपल्या समाजाची बदनामी थांबवण्याची विनंती केली आहे. तसेच संजय राठोड यांच्यावर आरोप सिद्ध होईपर्यंत कारवाई करू नये असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टींचा उलगडा होत आहे. तसेच संजय राठोड यांनी आता राजीनामा दिलेला असताना पूढे या प्रकरणाला काय वळण प्राप्त होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\n“मृत्यूनंतर माझ्या अस्थी बिअरमधून पबबाहेरील नाल्यात विसर्जित करा”\nसंजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधाण\nगळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन नंतर दगडाने ठेचलं; पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्याच्या हत्येने खळबळ\n“नटाचा मृत्यू झाल्यावर खळबळ माजते पण सात वेळा खासदार झालेला माणूस जातो तेव्हा सगळे शांत”\nलैंगिक शक्ती वाढवण्यासाठी कायपण… ‘या’ भागात सुरु आहे अत्यंत धक्कादायक प्रकार\n‘हिंमत असेल तर…’; अजित पवारांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज\n…अन् ‘या’ पत्रकाराने शेतकरी आंदोलनातच 12 लाखाच्या नोकरीचा दिला राजीनामा\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/695/", "date_download": "2022-10-07T21:20:21Z", "digest": "sha1:IBKVMNRX2TPTOZAYLHXYHBXAWO63SQX7", "length": 8041, "nlines": 82, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "जन्मोत्सवानिमित्त सर्पराज्ञीतील वन्यजीवांचे निसर्गार्पण - Rayatsakshi", "raw_content": "\nजन्मोत्सवानिमित्त सर्पराज्ञीतील वन्यजीवांचे निसर्गार्पण\nजन्मोत्सवानिमित्त सर्पराज्ञीतील वन्यजीवांचे निसर्गार्पण\nउपचारानंतर पूर्ण बरे झालेल्या कोल्हा, खोकड ,उदमांजर, काळवीट,अजगरास केले निसर्गात मुक्त\nशिरूर कासार, रयतसाक्षी : सर्पराज्ञीचे मार्गदर्शक आदरणीय क्षितिज हिर्लेकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्पराज्ञीतील उपचारांनंतर पूर्णपणे बरे झालेल्या पाच वन्यजीवांचे विभागीय वन अधिकारी सचिन कंद, वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गार्पण करण्यात आले.\nसर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र हे तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथे असून गेल्या दोन तपासून हा प्रकल्प सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे हे शासनाच्या मदतीशिवाय निस्वार्थ भावनेने लोकसहभागातून चालवतात.\nया दोन तपापासून चालू असलेल्या या प्रकल्पाने आजतागायत जवळपास १६,००० हजार जखमी, आजारी व मातृत्वापासून दुरावलेल्या वन्यजीवांना जीवदान दिलेले आहे.\nसर्पराज्ञीत गेल्या काही दिवसापासून उपचारासाठी दाखल असलेले व उपचारानंतर पूर्ण बरे झालेले निसर्गात जगण्यास समर्थ झालेले कोल्हा, खोकड, उदमांजर काळवीट व अजगर या प्राण्यांना दत्तजयंतीचे व सर्पराज्ञीचे मार्गदर्शक आदरणीय क्षितिज हिर्लेकर यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून दत्त जयंती दिनी विभागीय वन अधिकारी सचिन कंद व वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मूळ अधिवासात पशुधन विकास अधिकारी डॉक्टर …यांनी आरोग्य तपासणी करुन. त्यांच्या उपस्थितीत निसर्गात सोडून देण्यात आले.\nयावेळी सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे, वनपाल साधू धसे , वनरक्षक बद्रीनाथ परजने, वनमजूर शिवाजी आघाव, दिपक थोरात,सोनल थोरात ,दिक्षा वाकडे, आदी उपस्थित होते.\nसोडण्यात आलेल्या वन्यजीवांमध्ये झाडावरून खाली पडून जखमी झालेले उदमांजर, ऊस तोडणीच्या वेळी उसाच्या फडात आढळून आलेला एक अजगर व सहा महिनाभरापूर्वी जखमी अवस्थेत आढळला खोकड. विहिरी मध्ये पडलेला एक कोल्हा आणि कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले एक काळवीट उपचारानंतर पूर्ण बरे झाल्याने काल दत्त जयंतीचे औचित्य साधून त्यांना निसर्गात मुक्त केले.\n(संचालिका सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र)\nशेतकऱ्याच्या मुलाने तयार केले अल्बम साँग\nथोर संत गाडगे महाराज\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.insidemarathibooks.in/index.php/2020/05/06/pitamah-marathi-book-review/", "date_download": "2022-10-07T23:15:05Z", "digest": "sha1:SUVXW36KXK2TE45VVHP6LUQFMCHG4SOZ", "length": 10891, "nlines": 187, "source_domain": "www.insidemarathibooks.in", "title": "पितामह - Pitamah Marathi Book Review - Inside Marathi Books", "raw_content": "\n|| माझिया मराठीची बोलू किती कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके ||\nby ईनसाईड मराठी बुक्स\nलेखक – अनंत तिबिले\nसमीक्षण – अलोप गुधाटे\nप्रकाशन – रिया पब्लिकेशन्स\nमूल्यांकन – ४ | ५\nमहाभारत म्हणजे वर्षानुवर्षे, युगानुयुगे आपल्या आयुष्याला नेहमीच सलग्न अशी व्यासांची निर्मिती. महाभारत काल्पनिक का सत्यकथा स्वतंत्र चर्चेचा विषय. कित्येक वर्ष लोटली, कित्येक युगे लोटली तरी महाभारतातील प्रत्येक पात्र आपल्याला आपलंच आयुष्य वाटू लागतं. आपण त्याला आपल्यात पाहतो. आणि खरंच त्यातील प्रत्येक पात्र आजमितीला जगत आहोत असंच वाटायला लागतं. तसं पाहता आपण कोणत्याही पात्राला आपल्याशी सलग्न करून विचार केला तर प्रत्येक जण त्याच्या जागी बरोबरच आहे अशी आपली खात्री पटायला लागते आणि मानवी स्वभावांचं वैविध्य आश्चर्यचकित करून जातं.\nअसं असूनदेखील हे शिवधनुष्य पेलण्याचं काम अनंत तिबिले यांनी लीलया पार पडलं आहे आणि तेही धनुष्य न तुटू देता. कादंबरीतील पात्र छान प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांना यश आलं आहे. भिष्मांच्या बालपणातील काही दुर्घटना, सोशिक स्वभाव, सर्वांच्याच प्रेमापासून वंचित असूनदेखील न्याय आणि प्रेम यासाठी लढणारे हे भीष्म पितामह पाहून मन अस्थिर होतं. त्यांच्या हातून नकळत झालेल्या काही चुका किंवा कानाडोळा झालेल्या बाबी, महाभारताचा रूप कसं बदलून टाकतात हे या पुस्तकातून वाचायला मिळेल.\nया कथेतून महाभारताचा संपूर्ण कालखंड लक्षात येतो. प्रत्येक पिढीच्या जडणघडणीत भीष्माचार्यांचं योगदान जाणवतं. सरतेशेवटी त्यांना आपल्या भावना बाजूला ठेऊन कौरवांच्या बाजूने लढावं लागतं. त्यातही त्यांच्या जीवाची झालेली घालमेल, त्यांचा पदोपदी झालेला हिरमोड वाचताना त्यांची असह्याता घर करून जाते. तरीही, कुरुकुलाच्या वाढीतलं त्यांचं योगदान सर्वश्रेष्ठ ठरतं. कितीही बिकट परिस्थितीला आपले आदर्श न सोडता तोंड देता येतं, याचं एक अप्रतिम उदाहरण म्हणजे भीष्माचार्य. भीष्म म्हणजे कुरुकुल संवर्धन आणि विस्तार यासाठी निरिच्छ भावनेनं आजन्म जगलेल एकमेव दीर्घायुषी व्यक्तिमत्व.\nअनंत तिबिले यांनी पितामह या कादंबरीतून भीष्माचार्य या महान व्यक्तिमत्त्वाला आपल्या शब्दातून, रचनेतून न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय असं नक्कीच म्हणता येईल. अनंत तिबीले यांचं प्रसंगवर्णनातील कौशल्य इथे ठळक दिसून येतं. शब्दांची मांडणी आणि सुयोग्य शब्दप्रयोग हे या कादंबरीचं वैशिष्ट्य सांगता येईल. ही कादंबरी एखाद्या नवीन वाचकाला प्रेरणा देऊ शकेल याबद्दल जराही शंका वाटत नाही. भीष्माचार्यांच्या दृष्टिकनातून महाभारत अनुभवायचे असेल तर हे पुस्तक नक्की वाचा\nसमीक्षण – अलोप गुधाटे\nऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:\nमराठी पुस्तकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा\nछत्रपती संभाजी – एक चिकित्सा\nसोशल नेटवर्कवर आमच्याशी कनेक्टेड राहा.\nवेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/1981", "date_download": "2022-10-07T22:37:05Z", "digest": "sha1:WCKSPNAFSIGLPLIACPXJPNYKWZQKQYJ3", "length": 11351, "nlines": 106, "source_domain": "bollyreport.org", "title": "प्रियांकाने सांगितली निकची विचित्र सवय, सकाळी उठल्या उठल्या निक माझ्या .... - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News प्रियांकाने सांगितली निकची विचित्र सवय, सकाळी उठल्या उठल्या निक माझ्या ….\nप्रियांकाने सांगितली निकची विचित्र सवय, सकाळी उठल्या उठल्या निक माझ्या ….\nबॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये स्वतःच्या अभिनयाची छाप पाडत प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. मिस वर्ल्ड हा किताब पटकवणारी प्रियांका ही ५वी भारतीय महिला आहे. प्रियांकाने २०१८ मध्ये १ व २ तारिखला वेगवेगळ्या रितीरिवाजामध्ये अमेरिकन गायक व अभिनेता निक जोनस याचसोबत लग्न केले. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी हे लग्न केले. हे दोघे ही सोशल मीडियावर फार सक्रिय असतात.\nप्रियांका व निक त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत. प्रियांकाने पती निक जॉनसच्या काही सवयींचा खुलासा केला आहे. प्रियंकाने तिच्या लग्नानंतर दिलेल्या मुलाखतीत देखील निक जोनससंबंधी काही गोष्टींचा खुलासा केला आहे.\nनिक जोनस सकाळी उठल्यावर बेडरूममध्ये पहिली ही गोष्ट करतो, त्याची एक वेगळीच सवय असल्याचे प्रियांकाने सांगितले. निकची ही रोमँटिक सवय ऐकून तुम्ही ही थोडे चकित व्हाल. प्रियांका चोप्रा म्हणाली होती की तिचा नवरा तिच्याकडे नेहमीच खूप आकर्षित असतो आणि दररोज तो पहाटे उठून आधी तिचा चेहरा पाहतो.\nअभिनेत्री म्हणाली होती, “हे थोडे विचित्र असू शकते पण निक जोनास दररोज सकाळी उठून माझा चेहरा पाहतो, ” एका मजेदार पद्धतीने प्रियंका पुढे म्हणाली, “जेव्हा निक मला असं बघत असतो, तेव्हा मी म्हणते की एक मिनिट थांब, मी थोडा मेकअप करते.” यानंतर प्रियांका म्हणाली, ” जेव्हा मला निक बघत असतो मला थोडं वेगळंच वाटतं आणि मी इतकच बोलते की आता मला झोप येते आहे,\nआणि नेहमी निक माझ्या अर्धंझोपेत असणाऱ्या त्या डोळ्यांकडे पाहून बोलतो, फार अदभूत आणि सुंदर…. हे थोडं विचित्र वाटतं, पण जर त्याला आवडत आहे तर ठीक आहे. निक मला नेहमी म्हणतो की थांब मला तुला पाहू दे. मी मस्करी करत नाही आहे, पण खर्च हे फार अद्भुत वाटतं मला….” या व्यतिरिक्त प्रियांका निकचे अनेक खुलासे करत असते.\nप्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी २०१८ मध्ये जोधपूर मधील उमेड भवन पॅलेस येथे शाही लग्नसोहळा केला होता. पूर्ण उमेड भवन पॅलेस चार दिवसांसाठी बुक करण्यात आले होते. या ४ दिवसांमध्ये बाहेरील इतर कोणत्याही व्यक्तीस उमेड भवन पॅलेसमध्ये येण्यास परवानगी नव्हती. १ व २ डिसेम्बर भारतीय तसेच पाश्च्यात्य अशा दोन्ही लग्न पद्धतींमध्ये ते विवाह बंधनात अडकले.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleसोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेली ‘मेरे सैंय्या सुपरस्टार’ म्हणत नाचत मंडपात येणारी नववधू आहे तरी कोण\nNext articleअभिनेता ‘अनिल कपूर’ यांच्या कडून या कारणामुळे भारतीय वायुरक्षक दलाचा अपमान, प्रायश्चित्त म्ह्णून केले हे काम \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/follow-these-simple-methods-to-remove-b/", "date_download": "2022-10-07T21:35:20Z", "digest": "sha1:IFNDF544ZR46TT3YBOR4SCMSZAMRW56H", "length": 6552, "nlines": 44, "source_domain": "mahaupdate.in", "title": "कपड्यांवरील रक्ताचे डाग काढण्यासाठी अवलंबा 'या' सोप्या पद्धती, काही मिनिटांत गायब होतील - Maha Update", "raw_content": "\nHome » कपड्यांवरील रक्ताचे डाग काढण्यासाठी अवलंबा ‘या’ सोप्या पद्धती, काही मिनिटांत गायब होतील\nकपड्यांवरील रक्ताचे डाग काढण्यासाठी अवलंबा ‘या’ सोप्या पद्धती, काही मिनिटांत गायब होतील\nलोक कपडे स्वच्छ करण्यासाठी सर्वकाही करतात. असे असूनही, कपड्यांवरील काही हट्टी डाग काढणे खूप कठीण होते. रक्ताचे डाग देखील त्यापैकी एक आहे.\nकाही लोकांच्या कपड्यांवर अनेकदा रक्ताचे डाग दिसतात, जे साफ करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होतात. अशा परिस्थितीत, काही सोप्या पद्धतींच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत कपड्यांवरील रक्ताचे डाग दूर करू शकता.\nकाहीवेळा त्वचेवर कापून रक्तस्त्राव होतो. अशा परिस्थितीत रक्तामुळे तुमचे कपडे खराब होण्याची भीतीही असते. एवढेच नाही तर लाखो प्रयत्नांनंतरही अनेक वेळा कपड्यांवर रक्ताचे डाग राहतात. त्यामुळे तुमच्या ड्रेसचा लूकही कुरूप दिसू लागतो. मग कपडे स्वच्छ करण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही रक्ताच्या डागांपासून सहज सुटका मिळवू शकता.\nहायड्रोजन पेरोक्साइडने स्वच्छ करा\nकपड्यांवरील हट्टी रक्ताचे डाग काढून टाकण्यासाठी हायड्रोजन पेरोक्साइडचा वापर सर्वोत्तम असू शकतो. यासाठी 1-2 चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड कोमट पाण्यात मिसळा. आता हे द्रावण डागलेल्या भागावर ओतावे आणि काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे रक्ताचे डाग पूर्णपणे दूर होतील.\nलिंबू आणि अमोनिया वापरा\nलिंबू आणि अमोनियाचे मिश्रण कपड्यांवरील रक्ताचे डाग दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यासाठी 1-2 चमचे लिंबाचा रस अमोनियामध्ये मिसळा. आता ते रक्तावर लावा आणि 10 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. तुम्हाला दिसेल की डाग पूर्णपणे साफ होईल.\nअल्कोहोल चोळण्यात मदत मिळवा\nरबिंग अल्कोहोल वापरणे देखील कपड्यांमधून रक्ताचे अंश काढून टाकण्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. यासाठी कपड्यावरील डागावर रबिंग अल्कोहोलचे 4-5 थेंब लावा आणि काही वेळाने पाण्याने चोळा. यामुळे डाग सहज निघून जाईल.\nकपड्यांवरील रक्ताचे डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही ब्लीचचाही वापर करू शकता. यासाठी 1 कप कोमट पाण्यात 2 चमचे ब्लीच मिसळा. आता या द्रावणात डाग असलेले कापड भिजवा. काही वेळाने कापड घासल्याने डाग निघून जाईल. जर ब्लीच नसेल तर तुम्ही व्हाईट व्हिनेगर देखील वापरू शकता.\nकपड्यांवरील हट्टी डाग काही मिनिटांत दूर होतील, फक्त ‘हे’ काम करा\nकपड्यांवरचे चहाचे चिकट डाग निघता निघत नाहीत तर ‘हे’ घरगुती उपाय करा, सहज होतील डाग दूर\nकपड्यांवरील हट्टी डाग सहज निघून जातील, त्यासाठी अवलंबा ‘हे’ घरगुती उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/using-twitter-do-not-make-these-3-mistakes-tweeting-otherwise-in-jail/", "date_download": "2022-10-07T21:43:31Z", "digest": "sha1:UVABNC2DY2OBIUHBR4GH5WSBC5HOTSJ5", "length": 6288, "nlines": 42, "source_domain": "mahaupdate.in", "title": "ट्विटर वापरत असाल तर ट्विट करताना 'या' ३ चुका अजिबात करू नका, अन्यथा खावी लागेल जेलची हवा - Maha Update", "raw_content": "\nHome » ट्विटर वापरत असाल तर ट्विट करताना ‘या’ ३ चुका अजिबात करू नका, अन्यथा खावी लागेल जेलची हवा\nट्विटर वापरत असाल तर ट्विट करताना ‘या’ ३ चुका अजिबात करू नका, अन्यथा खावी लागेल जेलची हवा\nआजकाल बहुतेक लोक ट्विटरसारख्या सोशल मीडियाचा वापर करत आहेत. पण बरेचसे यूजर्स हे कोणतीही काळजी न घेता यावर ट्विट करत असतात. अनेकांना ट्विटरशी निगडित नियमांची माहिती नसते. मात्र काहीवेळा हे नियम माहित नसणे वापरकर्त्यांसाठी महागात पडते.\nयासाठी तुम्हाला ट्विटरचे काही नियम माहित असणे आवश्यक आहे. कारण ट्विट करताना तुम्ही निष्काळजी राहिल्यास त्याचा फटका तुम्हालाही सहन करावा लागू शकतो. एवढेच नाही तर तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला तुरुंगात टाकू शकतो आणि तुमच्यावर मोठी कायदेशीर कारवाईही होऊ शकते.\nट्विटरचा सुरक्षितपणे वापर करून हे टाळता येत असले तरी, ट्विट करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जेणेकरून तुम्ही कोणत्याही अडचणीत येऊ नये आणि ट्विटरचा सुरक्षितपणे वापर करू शकता.\nअपशब्दात ट्विट करू नका\nतुम्ही तुमच्या ट्विटमध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीविरुद्ध अपशब्द वापरल्यास, अशा ट्विटवर तुमच्यावर आयटी नियमांनुसार कारवाई केली जाऊ शकते. असे ट्विट केल्याने तुरुंगात जावे लागू शकते. त्यामुळे ट्विट करताना कोणतीही अपशब्द वापरणे टाळा.\nविशिष्ट जातीविरुद्ध टिप्पणी करणे टाळा\nतुम्ही तुमच्या ट्विटमध्ये एखाद्या विशिष्ट जाती किंवा समुदायाविरुद्ध टिप्पणी केल्यास किंवा जात-विशिष्ट शब्द वापरल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते. अशा परिस्थितीत ट्विट करताना कोणाच्याही विरोधात असे शब्द वापरणे टाळावे.\nआक्षेपार्ह फोटो शेअर करू नका\nट्विटरच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या व्यक्तीचे आक्षेपार्ह छायाचित्र शेअर केले तरीही तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते, किंवा तुम्हाला कोर्टात जावे लागू शकते. जरी, बहुतेक प्रकरणांमध्ये, ट्विटर स्वतः असे ट्विट अवरोधित करते, परंतु तसे न झाल्यास आणि एखाद्याला याबद्दल माहिती मिळाल्यास, ते या प्रकरणाची तक्रार देखील करू शकतात, ज्यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते.\nपहिल्यांदाच करताय योगा, तर मग ‘या’ गोष्टी लक्षात घ्या\n विसरुनही ‘या’ ठिकाणी फोन चार्ज करू नका, अन्यथा तुमचेही बँक खाते होऊ शकते रिकामे\nस्मार्टफोनवर ‘हे’ काम करणे पडू शकते महागात, जावे लागेल तुरुंगात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2022-10-07T23:20:46Z", "digest": "sha1:KVPGDAW7NCNBOUXABGL6Y6TRFOVZJPU6", "length": 9530, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेल्गोरोद ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nबेल्गोरोद ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान\nस्थापना जानेवारी ६, १९५४\nक्षेत्रफळ २७,१०० चौ. किमी (१०,५०० चौ. मैल)\nघनता ५६ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)\nबेल्गोरोद ओब्लास्त (रशियन: Белгородская область) हे रशियाच्या अतिपश्चिम भागातील व युक्रेन देशाच्या सीमेवरील एक ओब्लास्त आहे.\nअधिकृत संकेतस्थळ (रशियन मजकूर)\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०२२ रोजी ०८:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/has-pm-given-clean-chit-to-china-by-saying-no-intrusion-asks-p-chidambaram-scj-81-2192535/", "date_download": "2022-10-07T23:08:57Z", "digest": "sha1:WGN75QWG27NWEPJEFGAOJEE2CYPG3LW6", "length": 19598, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली का?-चिदंबरम | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली का\nचिदंबरम यांची खोचक शब्दांमध्ये टीका\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर एक वक्तव्य केलं. ते असं म्हणाले की भारतात कोणत्याही प्रकारची घुसखोरी चीनकडून झालेली नाही. मग ५ आणि ६ मे रोजी जे झालं ते काय होतं १६ आणि १७ जूनला काय झालं १६ आणि १७ जूनला काय झालं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली आहे का असा प्रश्न आता काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी विचारला आहे. जर घुसखोरी झालीच नाही असं पंतप्रधान म्हणत आहेत तर मग भारताचे २० जवान शहीद कसे झाले असा प्रश्न आता काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी विचारला आहे. जर घुसखोरी झालीच नाही असं पंतप्रधान म्हणत आहेत तर मग भारताचे २० जवान शहीद कसे झाले गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि चीन या दोन देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष कसा झाला गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि चीन या दोन देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष कसा झाला चकमकी कशा घडल्या हे प्रश्नही चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत.\nआणखी वाचा- “जर जमीन चीनची होती, तर आपल्या जवानांना का मारण्यात आलं”; राहुल गांधींकडून पंतप्रधानांची ‘प्रश्न’कोंडी\n“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला\nShinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\n“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप\nआणखी वाचा- नेपाळला सोबत घेतलं, आता बांगलादेशला आपल्या बाजूला वळवण्यासाठी चीनची मोठी खेळी\nसोमवारी गलवानमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. चिनी सैनिकांनी धोका देऊन केलेल्या हल्ल्यात ही घटना घडली. त्यानंतर चीनविरोधात देशभरात संताप व्यक्त होतो आहे. अशात शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सुमारे २० पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत शरद पवार, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासारख्या दिग्गजांनी मोदींना काही सल्ले दिले, सूचनाही दिल्या. तसंच देश एकजूट रहावा यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत अशीही ग्वाही दिली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर केलेल्या भाषणात भारतात घुसखोरी झालेली नाही असं म्हटलं होतं. यावरुनच माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nगलवान खोरे संघर्ष : अमित शाह यांनी राहुल गांधी यांना दिलं उत्तर; म्हणाले…\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मेधाली, वैभवला सुवर्ण\nप्रो कबड्डी लीग : दबंग दिल्लीसमोर यू मुम्बाची हाराकिरी\nराष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा -विनोद तोमर\nभारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा\nकाँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका\nधनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण\nमध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०८ ऑक्टोबर २०२२\nपुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\nLow Uric Acid: यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होणे देखील ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ ५ गंभीर आजार\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\nभारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा\nकर्नाटकात पदवी स्तरावर सायबर सुरक्षा शिक्षण अनिवार्य; पुढील शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी\nगौरी लंकेश यांची आई-बहीण ‘भारत जोडो’त सहभागी\nमानवी हक्कांसाठी झगडणाऱ्यांना शांततेचे ‘नोबेल’; बेलारूसचे बियालयात्स्कींसह रशिया आणि युक्रेनमधील मानवाधिकार संस्थांचा सन्मान\n‘यूपीएससी’तर्फे परीक्षा, भरतीची माहिती देणारे ‘अ‍ॅप’ कार्यान्वित\nबंगळूरुमधील ओला, उबरच्या रिक्षासेवेवर बंदी\nप्रशासनात सर्वागीण दृष्टिकोनाची गरज : मोदी\nतोफा डागण्याच्या सरावादरम्यान स्फोट, दोन जवानांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील बाबिना येथील दुर्घटना\nहिमस्खलन दुर्घटनेतील मृतांची संख्या २६; तीन प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक अद्याप बेपत्ता\nजुनाट हेलिकॉप्टरचा ताफा कधी बदलणार; ‘लष्करी अधिकारी पत्नी संघटने’चा पंतप्रधानांना प्रश्न\nमानवी हक्कांसाठी झगडणाऱ्यांना शांततेचे ‘नोबेल’; बेलारूसचे बियालयात्स्कींसह रशिया आणि युक्रेनमधील मानवाधिकार संस्थांचा सन्मान\n‘यूपीएससी’तर्फे परीक्षा, भरतीची माहिती देणारे ‘अ‍ॅप’ कार्यान्वित\nबंगळूरुमधील ओला, उबरच्या रिक्षासेवेवर बंदी\nप्रशासनात सर्वागीण दृष्टिकोनाची गरज : मोदी\nतोफा डागण्याच्या सरावादरम्यान स्फोट, दोन जवानांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील बाबिना येथील दुर्घटना\nहिमस्खलन दुर्घटनेतील मृतांची संख्या २६; तीन प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक अद्याप बेपत्ता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune/woman-raped-under-lure-of-marriage-14-lakh-fraud-pune-print-news-rmm-97-3062598/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-07T22:09:54Z", "digest": "sha1:E4TQL6Y6UQA5U7OB4RN3KUNPVQ64EV6J", "length": 19782, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; संकेतस्थळावरील ओळखीतून तरुणीची १४ लाखांची फसवणूक | woman raped under lure of marriage 14 lakh fraud pune print news rmm 97 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\nविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; संकेतस्थळावरील ओळखीतून तरुणीची १४ लाखांची फसवणूक\nविवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एकाने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nपुणे : विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एकाने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तरुणीची १४ लाख रुपयांची फसवणूक केली असून त्याच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nया प्रकरणी शंतनू गंगाधर महाजन (वय २८, रा. रिव्हरडेल सोसायटी, खराडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीने विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. आरोपी शंतुनने सुद्धा संकेतस्थळावर नोंदणी केली होती. शंतनूने तरुणीशी संपर्क साधून तिच्याशी विवाह करण्यासाठी उत्सुक असल्याचे आमिष दाखविले. त्यानंतर दोघांची ओळख झाली.\n“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला\nShinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\n“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप\nत्याने तरुणीला एका हॅाटेलमध्ये भेटण्यासाठी जून महिन्यात बोलाविले. त्यानंतर त्याने तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले. त्या वेळी त्याने तरुणीचा मोबाइल क्रमांकामधील बँक खात्याची गोपनीय माहिती, छायाचित्र तसेच अन्य माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन शंतनुने तरुणीच्या नावावर १४ लाख रुपयांचे कर्ज घेतले. तरुणीच्या खात्यात जमा झालेली कर्जाची रक्कम त्याने परस्पर स्वत:च्या खात्यात वर्ग करुन घेतली. तरुणीच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करत आहेत.\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nभाजपच्या सत्ताकाळातील महत्त्वपूर्ण प्रकल्प रखडले – पिंपरीतील भाजप नेत्यांची आयुक्तांकडे तक्रार\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मेधाली, वैभवला सुवर्ण\nप्रो कबड्डी लीग : दबंग दिल्लीसमोर यू मुम्बाची हाराकिरी\nराष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा -विनोद तोमर\nभारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा\nकाँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका\nधनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण\nमध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०८ ऑक्टोबर २०२२\nपुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\nLow Uric Acid: यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होणे देखील ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ ५ गंभीर आजार\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\nअन्न प्रक्रिया उद्योगात राज्यात सांगली अव्वल; पुणे दुसऱ्या, तर औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावर\nपुन्हा चार दिवस पाऊस जोमात; मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास यंदाही उशिरा\nपुणे : प्रेमसंबंध तुटल्यानंतर प्रेयसीच्या घरात चोरी ; एकास अटक; १४ लाख ६७ हजारांचा ऐवज जप्त\nपुणे : पैगंबर जयंतीनिमित्त रविवारी वाहतुकीत बदल\nपुणे : खासगी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातील बेकायदा प्रवेशांना मान्यता नाही ; सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांचे स्पष्टीकरण\nपिंपरी : रस्त्यांवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेचे पिंपरी पालिकेत आंदोलन\nडुलकी लागल्याच्या आरोपांवर दिपक केसरकरांचे स्पष्टीकरण; म्हणाले “मी झोपलो नव्हतो, तर….”\nपुणे : मुख्यमंत्र्यांच्या नातवावरील टीकेचे पुण्यातही पडसाद ; ‘एक दुखावलेला दीड वर्षाच्या मुलाचा बाप’ पत्राचे पुण्यात फलक\nपुणे : सिकलसेल ॲनिमिया आजारावर आयुर्वेदिक औषधाची निर्मिती ; विद्यापीठातील डॉ. पूजा दोशी यांचे विद्यार्थ्यांच्या सहाय्याने संशोधन\n‘विघ्नहर’कडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड ; दिवाळीपूर्वी उसाची रक्कम, कामगारांना १२ टक्के बोनस\nअन्न प्रक्रिया उद्योगात राज्यात सांगली अव्वल; पुणे दुसऱ्या, तर औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावर\nपुन्हा चार दिवस पाऊस जोमात; मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास यंदाही उशिरा\nपुणे : प्रेमसंबंध तुटल्यानंतर प्रेयसीच्या घरात चोरी ; एकास अटक; १४ लाख ६७ हजारांचा ऐवज जप्त\nपुणे : पैगंबर जयंतीनिमित्त रविवारी वाहतुकीत बदल\nपुणे : खासगी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातील बेकायदा प्रवेशांना मान्यता नाही ; सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांचे स्पष्टीकरण\nपिंपरी : रस्त्यांवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेचे पिंपरी पालिकेत आंदोलन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2019/11/blog-post_71.html", "date_download": "2022-10-07T21:52:08Z", "digest": "sha1:GAH652NHP6PHHDCJII6XQAMSJTQQVXYW", "length": 30398, "nlines": 226, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "झुंडबळी आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे आकडे गायब | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nझुंडबळी आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे आकडे गायब\nएनसीआरबीची आकडेवारी जाहीर : महिला अत्याचारात महाराष्ट्र दुसर्‍यास्थानी\nकुछ लोग दर्द बयां नहीं करते\nचुपचाप बिखर जाया करते हैं\nव्यक्ती असो की सरकार विश्‍वसनीयता ही प्रत्येकाची युएसपी असते. 22 ऑक्टोबर 2019 रोजी जाहीर झालेल्या एनसीआरबीच्या अहवालाने मात्र विश्‍वसनीयता गमावलेली आहे. एकतर हा अहवाल 2017 चा असून, जाहीर झाला 2019 संपायला आला तेव्हा. म्हणजे तब्बल दीड वर्षे उशीरा. त्यातही अनेक त्रुटी आहेत. दोन महत्वाच्या त्रुटीं ज्यांच्याबद्दल चर्चा करणे गरजेचे आहे, त्या म्हणजे या अहवालातून मॉबलिंचिंग आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची आकडेवारीच दिलेली नाही. नुकतेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी मॉबलिंचिंग हा विदेशी शब्द असून त्याचा या देशाशी काही संबंध नसल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. त्यांचे म्हणणे तत्वतः बरोबर आहे. मॉबलिंचिंग हा शब्द भारतीय असूच शकत नाही. परंतु झुंडबळी हा शब्द तर भारतीयच आहे ना मॉबलिंचिंग या शब्दाला विदेशी म्हटल्याने किंवा त्यांची आकडेवारी लपविल्याने झुंडीने केलेल्या शंभरपेक्षा जास्त लोकांच्या निर्घृण हत्या नजरेआड होत नाहीत. आकडेवारी लपविल्याने झुंडीला बळी पडणार्‍या लोकांच्या यातना कमी होणार नाहीत, त्यांच्या परिजनांचे दुःख हलके होत नाही, त्यामुळे देशाची जगात झालेली बदनामीही कमी होत नाही. 2015 साली प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची मानहानी करणार्‍या कमलेश तिवारींची हत्या नुकतीच लखनौमध्ये झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजित बिष्ट (योगी आदित्यनाथ) यांनी त्यांच्या कुटुंबाची जी मदत केली ती नजरेत भरेल एवढी होती. या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर दलित आणि मुस्लिमांच्या ज्या शंभराहून अधिक हत्या झुंडींनी केल्या, त्यांच्या परिजनांना भेटण्याची कुठल्याही वरिष्ठ भाजपा नेत्याला सद्बुद्धी झाली नाही, याचे आश्‍चर्य वाटते. लाजत-काजत का होईना लोकशाहीची बूज राखावी, असे त्यांना वाटले नाही, ज्या घटनेची शपथ आपण घेतली त्या शपथेचा अव्हेर करताना त्यांना जरासुद्धा वाईट वाटले नाही, याचेही नवल वाटते.\nजी परिस्थिती झुंडीला बळी पडलेल्या दुर्दैवी जीवांची तीच स्वाभिमानाने जगता येत नसल्याने, स्वतःच्या शेतातील, प्रिय झाडाला लटकणार्‍या दुर्दैवी शेतकर्‍यांची. या अहवालामध्ये 2017 मध्ये किती शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या याची आकडेवारी दिली गेलेली नाही. विशेष म्हणजे पूर्वी अशी आकडेवारी दिली जायची. समाजाला अलिकडे शेतकर्‍यांच्या आत्महत्येची एवढी सवय झालेली आहे की आता त्यात काही नवलाई राहिलेली नाही. माध्यमांच्या लेखीही या घटनांचे बातमी मुल्य सुद्धा राहिलेले नाही. नसता ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ’पुन्हा आणूया आपले सरकार’ असे छातीवर लिहिलेली, कमळाचे चिन्ह असलेली, भगवी जर्सी आणि ट्राऊजर घालून अवघ्या 35 वर्षाच्या शेतकर्‍याने विदर्भात केलेल्या आत्महत्येमुळे अवघ्या महाराष्ट्राला हादरा बसावयास पाहिजे होता तो बसलेला नाही म्हणजेच माध्यमांसह सामान्य लोकांनासुद्धा यात दखल घेण्यासारखे काही शिल्लक राहिलेली नाही. याबाबतीत समाज संवेदनशुन्य बनलेला आहे. यामुळेच सरकारने या दोन्ही वंचित घटकांवर होणार्‍या सामाजिक आणि आर्थिक अत्याचारांची दखल घेतलेली नाही. यात नवल ते काय\n2014 पासून अनेक राष्ट्रीय संस्थांनी सरकारच्या ’हो ’मध्ये ’हो’ मिसळत आपल्या मुलभूत कर्तव्याशी तडजोड सुरू केलेली आहे. एनसीआरबी अशीच एक संस्था आहे. या संस्थेचे पूर्ण नाव नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (राष्ट्रीय गुन्हें नोंदणी विभाग) असून याची स्थापना 1986 साली झाली. देशभरात होणार्‍या फौजदारी गुन्ह्यांचे वर्गीकरण करून ते देशासमोर मांडणे हे या संस्थेचे काम. यामुळे वेगवेगळ्या राज्यातील पोलिसांना तपास कामात मदत व्हावी, समाज शास्त्रज्ञांना, विद्यापीठांना देशातील गुन्हेगारीसंबंधी अभ्यास करता यावा, त्यातून काही ठोस असे निष्कर्ष काढता यावेत, त्यातून देशातील गुन्हेगारी कमी व्हावी व ती कमी करण्यासाठी सरकारला उपाययोजना करता याव्यात, एवढ्या उदात्त हेतूने या संस्थेची स्थापना करण्यात आली होती.\nएवढी महत्त्वाची संस्था जर मॉबलिंचिंग आणि शेतकरी आत्महत्या सारख्या महत्त्वाची आकडेवारी प्रकाशित करीत नसेल तर ही संस्था हवीच कशाला तिच्यावर होणारा कोट्यावधीचा खर्च करावाच कशाला तिच्यावर होणारा कोट्यावधीचा खर्च करावाच कशाला असे मुलभूत प्रश्‍न उभे राहतात.\nएक तर मागील वर्षाची आकडेवारी चालू वर्षाच्या सुरूवातीला जाहीर व्हावयास हवी होती. ते ही या संस्थेला करता आलेले नाही. 2017 ची माहिती दीड पावणेदोन वर्षे उशीराने का जाहीर केली जात आहे यासंबंधीचा काहीच खुलासा या अहवालामध्ये करण्यात आलेला नाही. जी जाहीर केलेली आकडेवारी आहे त्यातील काही महत्त्वाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.\n2017 मध्ये देशात महिलांविरूद्ध एकूण 3 लाख 59 हजार 849 गुन्हे घडले आहेत, ही चिंताजनक बाब आहे. 2015 मध्ये याच गुन्ह्यांची संख्या 3 लाख 29 हजार 243 एवढी तर 2016 मध्ये 3 लाख 38 हजार 954 एवढी होती. ’बेटी बवाच बेटी पढाव’ या सरकारी धोरणाला वाकुल्या दाखविणारी 2017 ची आकडेवारी आहे. याचा अर्थ पोलिसांचे लक्ष दुसरीकडेच जास्त आहे, म्हणून महिलांच्या विरूद्ध गुन्हे करणार्‍यांना मोकळे रान मिळाले आहे असा होतो. याशिवाय, दुसरी महत्त्वाची बाब अशी की, महिलांविषयी घडणारे सर्वच गुन्हे रिपोर्ट होतात असे नाही. लोक-लाजेखातर अनेक महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. ही बाब लक्षात घेतली तर प्रकाशित झालेल्या आकडेवारीपेक्षाही जास्त गुन्हे देशात घडले असावेत, असा वाजही वहीम घेण्यासाठी जागा आहे. यावरून देशात महिला किती असुरक्षित आहेत, याची कल्पना येते व संयुक्त राष्ट्राने भारताला महिलांसाठी असुरक्षित देश का घोषित केले आहे, याचाही अंदाज येतो.\nघराबाहेर वावरणार्‍या महिला व मुलींची तर गोष्ट सोडा; घरात राहणार्‍या महिला व मुलीसुद्धा गुन्ह्यांना बळी पडलेल्या आहेत, हे ही सदरची आकडेवारी पाहता लक्षात येते. घरेलू हिंसा, आत्महत्या, हत्या, अ‍ॅसिड अटॅक, विनयभंग, बलात्कार, झुंडीद्वारे बलात्कार असे महिलांविरूद्ध गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याची ही आकडेवारी सांगते.\nमहिलाविरोधी गुन्ह्यांसह एकूण सर्वच गुन्ह्यामध्ये उत्तर प्रदेशाने देशात पहिला क्रमांक मिळविलेला असून, महिला अत्याचारांच्या बाबतीत पुरोगामी महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे. शिवछत्रपती, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा असलेल्या आपल्या राज्याला हे मुळीच शोभण्यासारखे नाही. उत्तर प्रदेशामध्ये महिलांच्या विरोधात 2017 साली 56 हजार 011 गुन्हे घडलेले आहेत. तर महाराष्ट्रात 31 हजार 979 गुन्हे घडलेले आहेत.\n2017 मध्ये एकूण 50 लाख गुन्हे दाखल झालेले आहेत. 2016 च्या तुलनेत यामध्ये 3.6 टक्के एवढी वाढ झालेली आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे हत्येसारख्या गुन्ह्याचे प्रमाण 3.6 टक्क्यांनी कमी आहे. मात्र अपहरणासारखे आई-वडिलांचे हृदय पिळवटून टाकणार्‍या गुन्ह्यांमध्ये 9 टक्क्यांची वाढ आपल्या सर्वानांच अंतर्मुख होण्यासाठी भाग पाडणारी आहे. अपहरणातही उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रानेच आपला दुसरा क्रमांक अबाधित ठेवला आहे, हा काळजीचा विषय आहे. भ्रष्टाचारासंबंधी दाखल झालेल्या गुन्ह्यात महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकाविलेला आहे तर ओरिसा या ठिकाणी दुसर्‍या क्रमांकावर आहे.\nविशेष नोंद घेण्यासारखी बाब अशी की, देशद्रोहाच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यांची संख्या 30 टक्क्यांनी वाढलेली आहे. याचा अर्थ देशात देशद्रोह्यांची संख्या वाढलेली आहे, असा नसून सरकारविरूद्ध बोलणार्‍यांच्या विरूद्ध या श्रेणीखाली जास्त गुन्हे दाखल झालेले असावेत. मागच्याच महिन्यात 51 सेलेब्रिटींविरूद्ध पंतप्रधानांना लिहिलेल्या विनंती वजा नाराजी पत्रावरून देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे, हे विसरता येणार नाही. याच पार्श्‍वभूमीवर सरकारवर टीका करणार्‍यां विरूद्ध मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल करण्यात आले असावेत, असा वाजवी संशय येतो.\nएकंदरित आकडेवारीचे विश्‍लेषण करता एक गोष्ट लक्षात येते की, एनसीआरबी ही संस्था सरकारच्या प्रचंड दबावाखाली काम करत आहे. म्हणूनच सरकारला उत्तरे देण्यासाठी अडचणीचे जाईल, अशा श्रेणींमधील आकडेवारीच संस्थेने जाहीर केलेली नाही. हा सरकारी हस्तक्षेप या संस्थेच्याच नव्हे तर देशाच्याही हितामध्ये नाही. कारण खरी आकडेवारी पुढे न आल्याने समस्येचे खरे निदान होवू शकत नाही, त्यावर उपचार करणे तर लांबची गोष्ट रहिली. ही बाब लोकाला कमकुमवत करणारी आहे.\n- एम. आय. शेख\nसत्तेच्या मांडवलीत महाराष्ट्र होरपळतोय\nसरकारी प्रतिष्ठानांच्या विक्रीचा अथ\n२९ नोव्हेंबर ते ०५ डिसेंबर २०१९\n२२ ते २८ नोव्हेंबर २०१९\nभारतरत्न नाकारणारा अवलिया : मौलाना आझाद\nसंयम आणि सौहार्दाचा विजय\nमिलादुन्नबीनिमित्त 3 हजार 178 जणांनी केले रक्तदान\nअमीर (अध्यक्ष) - (भाग 10)\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि आपली जबाबदारी\nइस्लामोफोबिया : कारणे आणि उपाय\n१५ ते २१ नोव्हेंबर २०१९\nइमामत (नमाजचे नेतृत्व) : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसांप्रदायिक तणाव आणि राजकारण\nअयोध्येसंबंधीचा निर्णय सर्वांनी शांतपणे स्विकारावा\nजमाअत - ए - इस्लामीची आवश्यकता का भासली - (भाग-9)\nप्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या शिकवणीचा संक्षिप्त...\n‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’\nसामूहिक नमाज : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nजागतिक दहशतवाद : अमेरिकी पापांचे फलित\nडॉ. ईलाहीपाशा मासुमदार यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट...\nउर्दू सा. दावत, न्यूज पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅपचे विमोचन\nआमचं हे कर्तव्य वाटलं म्हणून आम्ही उभे राहिलो : (भ...\nफेसबुक व धार्मिक भावना\nमुली अन् पत्नी दोहोंच्या सुरक्षेची जबाबदारी पुरूषाची\nराज्यात पुन्हा तेच; विरोधक मात्र मजबूत\nझुंडबळी आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे आकडे गायब\n०८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०१९\nनमाजचे महत्त्व : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nगुन्हे अहवालात ‘मॉब लिंचिग’ गायब\n०१ नोव्हेंबर ते ०७ नोव्हेंबर २०१९\nतुमचं जीवन हेच इस्लामची साक्ष बनली पाहिजे\nइस्लामी राज्य आणि मुस्लिम देश यात काही फरक आहे काय\nआर्थिक मंदी म्हणजे काय\nउत्तरांचा शोध अन् शोधांचे प्रयोग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/tag/shorthand-jobs/", "date_download": "2022-10-07T22:07:28Z", "digest": "sha1:TPKFJPCTFH62WZNZP2IDFYAXGYFJ3DYT", "length": 7079, "nlines": 59, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "Shorthand Jobs - Bharti jahirat", "raw_content": "\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMUHS Recruitment 2022 | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 122 जागांसाठी भरती\nMUHS Recruitment 2022 | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांच्या एकूण 122 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक...\nकेंद्रीय इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट 14 जागा\nकेंद्रीय इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे विविध पदाच्या एकूण 14 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 14...\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nUPSC CAPF Recruitment 2022 | संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2022 [DAF]\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nUPSC CAPF Recruitment 2022 | संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2022 [DAF]\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nUPSC CAPF Recruitment 2022 | संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2022 [DAF]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://bt.17ckd.com/mr/Link/3045-www.sznal-logistics.com.html", "date_download": "2022-10-07T22:11:07Z", "digest": "sha1:QYJW2NVJ7L254EMAMELW42STJ6EVRVTD", "length": 24217, "nlines": 47, "source_domain": "bt.17ckd.com", "title": " [शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय रसद/ शेन्झेन नॅनलाँग इंटरनॅशनल एक्सप्रेस/ शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय मालवाहतूक/ SZNAL लॉजिस्टिक्स] लॉजिस्टिक पार्सल ट्रॅकिंग | [शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय रसद/ शेन्झेन नॅनलाँग इंटरनॅशनल एक्सप्रेस/ शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय मालवाहतूक/ SZNAL लॉजिस्टिक्स] पॅकेज ट्रॅकिंग नंबर | BT.17CKD.COM", "raw_content": "\nसाइटच्या मुख्यपृष्ठावर परत >> [शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय रसद/ शेन्झेन नॅनलाँग इंटरनॅशनल एक्सप्रेस/ शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय मालवाहतूक/ SZNAL लॉजिस्टिक्स] लॉजिस्टिक पार्सल ट्रॅकिंग\nलॉजिस्टिक ट्रॅकिंग नंबर नियमांची बुद्धिमान ओळख. >>\n[शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय रसद/ शेन्झेन नॅनलाँग इंटरनॅशनल एक्सप्रेस/ शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय मालवाहतूक/ SZNAL लॉजिस्टिक्स] अधिकृत लॉजिस्टिक वेबसाइट: 「www.sznal-logistics.com」\nआपण एका वेळी फक्त 100 [शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय रसद/ शेन्झेन नॅनलाँग इंटरनॅशनल एक्सप्रेस/ शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय मालवाहतूक/ SZNAL लॉजिस्टिक्स] लॉजिस्टिक ट्रॅकिंग नंबर ट्रॅक आणि शोधू शकता.\nतुम्ही एका वेळी फक्त 100 लॉजिस्टिक पॅकेजेसचा मागोवा घेऊ शकता आणि शोधू शकता. इनपुट बॉक्सची प्रत्येक ओळ फक्त एक लॉजिस्टिक ट्रॅकिंग नंबर प्रदर्शित करू शकते. जर एकूण संख्या 100 पेक्षा जास्त असेल, तर सिस्टम आपोआप कमाल संख्येपेक्षा जास्त असलेल्या लॉजिस्टिक ट्रॅकिंग नंबरकडे दुर्लक्ष करेल मर्यादा\n「 आपण प्रविष्ट केलेल्या लॉजिस्टिक पॅकेजची एकूण संख्या: 0 」\nसर्व सापडला नाही पॅकेज अद्याप ट्रान्झिटमध्ये आहे ... पॅकेज त्याच्या गंतव्यस्थानावर वितरित केले गेले आहे पॅकेज निघण्याच्या ठिकाणी परत केले गेले आहे पॅकेज निघण्याच्या ठिकाणी परत केले गेले आहे पॅकेज तात्पुरते ताब्यात घेण्यात आले आहे आणि सीमाशुल्काने तपासणी केली आहे पॅकेज तात्पुरते ताब्यात घेण्यात आले आहे आणि सीमाशुल्काने तपासणी केली आहे\nसंख्यात्मक क्रमाने लॉजिस्टिक ट्रॅकिंग नंबर पॅकेज शिपिंग स्थिती माहितीचा स्रोत नवीनतम लॉजिस्टिक ट्रॅकिंग माहितीशी संबंधित तारीख आणि वेळ प्रस्थानाची वेळ संचयी वाहतूक वेळ सेवा स्थान नवीनतम लॉजिस्टिक ट्रॅकिंग माहिती तपशील पहा\n「 हे बटण वापरून कॉपी केलेल्या आशयासाठी कोणतीही शब्द मर्यादा नाही. तुम्ही कॉपी केलेली सामग्री यावर लागू करू शकता: ईमेल, txt दस्तऐवज, ऑफिस वर्ड इ.\nपॅकेजची एकूण संख्या 15 पेक्षा जास्त असल्यास, कृपया कॉपी केलेली सामग्री सोशल सॉफ्टवेअरच्या चॅट डायलॉग विंडोवर लागू करू नका, कारण त्यापैकी बहुतेकांना कठोर शब्द मर्यादा असू शकतात. 」\n「जर पॅकेजची एकूण संख्या 15 पेक्षा जास्त नसेल, तुम्ही हे भाषांतर बटण वापरू शकता.कारण Google Translator ची शब्द संख्या 5000 वर्णांपर्यंत मर्यादित आहे. 」\n「कारण तुमच्या पार्सलची एकूण संख्या 15 पेक्षा जास्त झाली आहे, आपण निर्दिष्ट लॉजिस्टिक ट्रॅकिंग माहिती कॉपी करण्यासाठी किंवा अनुवादित करण्यासाठी खालील समर्पित फंक्शन बटणे वापरू शकता आणि भिन्न अनुक्रमांक श्रेणी वेगवेगळ्या समर्पित फंक्शन बटणांशी संबंधित आहेत. ↓」\n↓ लॉजिस्टिक ट्रॅकिंग माहिती शोधण्यासाठी कीवर्ड प्रविष्ट करा. ↓\nलॉजिस्टिक ट्रॅकिंग माहितीवरून जर सिस्टमला तुमचे कीवर्ड सापडले,\nकीवर्डचा बॅकग्राउंड रंग काळ्या रंगात बदलला जाईल\n「 कीवर्डशी जुळणारी लॉजिस्टिक पार्सलची एकूण संख्या: 0 」\n↓ आपल्या लॉजिस्टिक पॅकेजची शिपिंग विलंब वेळ प्रविष्ट करा ↓\nदिवस, / तास, / मिनिटे, / सेकंद.\nलॉजिस्टिक पॅकेजची संचयी वाहतूक वेळ तुम्ही प्रविष्ट केलेल्या वाहतूक विलंब वेळेपेक्षा जास्त असल्यास,\nसूचीचा पार्श्वभूमी रंग तपकिरी रंगात बदलला जाईल\nलॉजिस्टिक पॅकेजची वाहतूक स्थिती बदलली जाईल: * रसद वाहतूक विलंबित आहे.\nसूचीचा पार्श्वभूमी रंग त्याच्या मूळ रंगात पुनर्संचयित करण्यासाठी आपण [विलंब चिन्ह काढून टाका] बटणावर क्लिक करू शकता\n「 रसद वाहतुकीदरम्यान विलंब झालेल्या लॉजिस्टिक पॅकेजची एकूण संख्या: 0 」\n「 कंपनी प्रोफाइल 」: नॅनलाँग इंटरनॅशनल कार्गो कं, लिमिटेड ही चायना सदर्न एअरलाइन्स ग्रुप कं, लिमिटेड (चीनमधील सर्वात मोठी विमान कंपनी) ची परदेशी होल्डिंग उपकंपनी आहे. चायना सदर्न एअरलाइन्सच्या लॉजिस्टिक क्षेत्रातील ही एकमेव परदेशी आंतरराष्ट्रीय माल/मालवाहतूक कंपनी आहे. हे 19 वर्षांपासून स्थापित केले गेले आहे आणि त्याचे प्रमाणित व्यवस्थापन आहे. जलद विकास, स्थिर ऑपरेशन, एंटरप्राइझच्या मुख्य क्षमतेत जलद वाढ आणि एकात्मिक रसद सेवांची चांगली ब्रँड प्रतिमा. नॅनलॉन्ग इंटरनॅशनल लॉजिस्टिक्स (शेन्झेन) कं, लिमिटेड ही नानलॉन्ग इंटरनॅशनल फ्रेट कं, लिमिटेडची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे आणि शेन्झेनच्या आधुनिक लॉजिस्टिक उद्योग विकास धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये एक महत्त्वाचा सहभागी आहे. नॅलॉन्ग लॉजिस्टिक्स ऑर्गनायझ्ड लॉजिस्टिक्स सेवा प्रदान करण्यासाठी प्रगत माहिती नेटवर्क तंत्रज्ञान आणि आधुनिक लॉजिस्टिक्स तंत्रज्ञान एकत्र करते; पारंपारिक लॉजिस्टिक्स उद्योगाच्या अपग्रेडेशन आणि परिवर्तन द्वारे, लॉजिस्टिक नोड्स, क्षमता प्रणाली आणि समन्वय क्षमता इत्यादींपासून आधुनिक लॉजिस्टिक्स सप्लाय चेन किंवा सामरिक युतीची स्थापना. ., स्वतःची मुख्य क्षमता जोपासा आणि बहुसंख्य चिनी आणि परदेशी ग्राहकांना विचारशील आणि समाधानकारक सेवा प्रदान करा. नॅनलॉन्ग लॉजिस्टिक्समध्ये व्यवसायाच्या विकासासाठी व्यापक संभावना आहेत आणि एक स्थिर आणि वेगाने वाढणारा उपक्रम आहे. शेन्झेन आणि ग्वांगझो हे मुख्यतः सीए/सीझेड निर्यात हवाई वाहतुकीसाठी वापरले जातात; त्यात चायना सदर्न एअरलाइन्सच्या CAN-LAX/AMS/FRA/VIE डायरेक्ट मालवाहतुकीचा निश्चित समावेश आहे, आणि एअर चाइना PEK-IAD/SFO/IAH/JFK/ LAX/ LHR/ FRA दोन-मार्ग निश्चित स्थिती; कंपनी चायना सदर्न एअरलाइन्सच्या मजबूत आणि मुबलक संसाधने, उच्च-गुणवत्तेच्या सेवा आणि मजबूत हालचालींवर अवलंबून आहे. नानलॉन्ग इंटरनॅशनल लॉजिस्टिक्स हवाई वाहतुकीमध्ये तज्ञ आहेत. तेथे अनेक मध्यम ते उच्च- आहेत समकक्ष आणि आमच्या कंपनीने चांगली भागीदारी स्थापित केली आहे. चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व कंपन्यांसोबत काम करू.\n「 अधिकृत लॉजिस्टिक वेबसाइट 」: www.sznal-logistics.com\n「 या वेबसाइटच्या कार्यांचे वर्णन - 1 」: वेगवेगळ्या वाहतूक स्थिती वेगवेगळ्या पार्श्वभूमी रंगांसह चिन्हांकित केल्या आहेत. वाहतूक स्थितीच्या नावाखाली लॉजिस्टिक पॅकेजेसची संख्या प्रदर्शित केली जाते. जेव्हा तुम्ही नंबरवर क्लिक करता, त्यानुसार सूचीचा पार्श्वभूमी रंग बदलेल.\n(1) “सापडला नाही” -> पार्श्वभूमीचा रंग पांढरा आहे,\n(2) “पॅकेज अद्याप ट्रान्झिटमध्ये आहे ...” -> पार्श्वभूमीचा रंग केशरी आहे,\n(3) “पॅकेज निघण्याच्या ठिकाणी परत केले गेले आहे” -> पार्श्वभूमीचा रंग लाल आहे,\n(4) “पॅकेज त्याच्या गंतव्यस्थानावर वितरित केले गेले आहे” -> पार्श्वभूमीचा रंग हिरवा आहे,\n(5) “पॅकेज तात्पुरते ताब्यात घेण्यात आले आहे आणि सीमाशुल्काने तपासणी केली आहे” -> पार्श्वभूमीचा रंग जांभळा आहे,\n(6) “इतर असामान्य परिस्थिती” -> पार्श्वभूमीचा रंग निळा आहे.\n「 या वेबसाइटच्या कार्यांचे वर्णन - 2 」: जेव्हा तुम्ही एका दिवसात पहिल्यांदा तुमच्या लॉजिस्टिक पॅकेजचा मागोवा घेण्यासाठी आणि शोधण्यासाठी या वेबसाइटचा वापर करता, तेव्हा सिस्टम तुमच्या ब्राउझरवर सुरक्षा तपासणी करेल आणि तुम्हाला सुमारे 6 ते 10 सेकंद थांबावे लागेल.\n(1) सिस्टम ट्रॅकिंग शोध पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे चित्र दिसल्यास: \" \", याचा अर्थ असा की तुमचे ट्रॅकिंग वर्तन किंवा IP पत्ता संशयास्पद आहे, किंवा तुम्ही एकाच वेळी बरीच वेब पृष्ठे उघडून ती वारंवार वापरता, त्यामुळे या वेबसाइटची फायरवॉल तुमच्या डिव्हाइसला या वेबसाइटवर प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते.\n(2) सिस्टम ट्रॅकिंग शोध पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे चित्र दिसल्यास: \" \", याचा अर्थ असा की या वेबसाइटच्या सर्व्हरने देखभाल पूर्ण केली नाही. कृपया पृष्ठ रीफ्रेश करण्यापूर्वी सुमारे 1 मिनिट थांबा आणि पुन्हा प्रयत्न करा.\n「 या वेबसाइटच्या कार्यांचे वर्णन - 3 」: ट्रॅकिंग शोध संपल्यानंतर, जर किमान 1 लॉजिस्टिक्स पॅकेज असेल जे ट्रॅकिंग माहिती शोधू शकत नसेल, तर तुम्ही [सखोल मागोवा शोध] बटण वापरू शकता, परंतु तुम्हाला थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागेल.\n「 मदत आणि सूचना 」: [शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय रसद/ शेन्झेन नॅनलाँग इंटरनॅशनल एक्सप्रेस/ शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय मालवाहतूक/ SZNAL लॉजिस्टिक्स] वापरणाऱ्या लॉजिस्टिक्स कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला लॉजिस्टिक्स ट्रॅकिंग माहिती मिळू शकते, परंतु तुम्हाला या वेबसाइटचा वापर करून लॉजिस्टिक्स ट्रॅकिंग माहिती सापडत नाही, तर कृपया मला ही परिस्थिती सांगण्यासाठी ईमेल पाठवा: \"emmis@qq.com\".\nईमेलचे सामग्री स्वरूप: \"[शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय रसद/ शेन्झेन नॅनलाँग इंटरनॅशनल एक्सप्रेस/ शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय मालवाहतूक/ SZNAL लॉजिस्टिक्स] लॉजिस्टिक कंपनीची अधिकृत वेबसाइट\" + \"मला 3 [शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय रसद/ शेन्झेन नॅनलाँग इंटरनॅशनल एक्सप्रेस/ शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय मालवाहतूक/ SZNAL लॉजिस्टिक्स] ट्रॅकिंग नंबर द्या.\n(पॅकेज ट्रॅकिंग माहिती शोधण्यासाठी हे 3 लॉजिस्टिक्स ट्रॅकिंग नंबर कंपनीच्या अधिकृत वेबसाइट लॉजिस्टिक वेबसाइटचा वापर करण्यास सक्षम असले पाहिजेत आणि ते सर्व “गंतव्यस्थानावर” वाहतूक स्थिती असणे आवश्यक आहे\nआम्हाला तुमचा ईमेल मिळाल्यानंतर आम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्या प्रश्नांना सामोरे जाऊ आणि उत्तर देऊ आपल्या पाठिंब्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल धन्यवाद\n「 संबंधित कायदेशीर सूचना 」: ही वेबसाइट [शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय रसद/ शेन्झेन नॅनलाँग इंटरनॅशनल एक्सप्रेस/ शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय मालवाहतूक/ SZNAL लॉजिस्टिक्स] ची अधिकृत लॉजिस्टिक्स वेबसाइट नाही. आम्ही कंपनीच्या लॉजिस्टिक ऑपरेशन्समध्ये भाग घेत नाही. ही वेबसाइट फक्त लॉजिस्टिक पॅकेज ट्रॅकिंग आणि क्वेरी प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्हाला मोफत लॉजिस्टिक पॅकेज ट्रॅकिंग सेवा पुरवते.\nआपल्या [शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय रसद/ शेन्झेन नॅनलाँग इंटरनॅशनल एक्सप्रेस/ शेन्झेन नॅनलाँग आंतरराष्ट्रीय मालवाहतूक/ SZNAL लॉजिस्टिक्स] लॉजिस्टिक पॅकेजबद्दल आपल्याकडे इतर काही प्रश्न असल्यास, कृपया लॉजिस्टिक कंपनीच्या अधिकृत संपर्क माहितीशी थेट संपर्क साधा: 「www.sznal-logistics.com」.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.economictimes.com/orient-press-ltd/stocks/companyid-10444.cms", "date_download": "2022-10-07T22:36:27Z", "digest": "sha1:3SD77X2Q5MKROQFSHBR3UVFZ5QUDACMQ", "length": 3060, "nlines": 48, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रत्येक शेअर वरील उत्पन्न\n52 आठवड्यातील नीच 53.10\n52 आठवड्यातील उंच 101.00\nओरिएन्ट प्रेस लि., 1987 मध्ये निगमित केलेली স্মল ক্যাপ कंपनी आहे (Rs 67.10 कोटी मार्केट कॅप असलेली), आणि पॅकेजिंग क्षेत्रात काम करते |\n30-06-2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने Rs 41.89 कोटी ची स्टँडअलोन विक्री नोंदविली आहे, मागच्या तिमाहितल्या Rs. 49.86 कोटी विक्री पेक्षा खाली -15.99 % आणि मागच्या वर्षीच्या याच तिमाहितल्या Rs. 32.44 कोटी विक्री पेक्षा वर 29.12 %. नवीनतम तिमाहीत कंपनीने Rs. -1.21 चा करानंतर एकूण नफा नोंदविला आहे.\n30-06-2022 तारखेला कंपनीचे एकूण 1 शेयर शिल्लक आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2022-10-07T23:10:03Z", "digest": "sha1:CV2D332Q5VNNCQADKKN3GMFWS7MNYG57", "length": 3716, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "करिश्मा कपूर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(करिष्मा कपूर या पानावरून पुनर्निर्देशित)\nकरिश्मा कपूर (टोपणनाव: लोलो ; रोमन लिपी: Karisma Kapoor ;) ( २५ जून, इ.स. १९७४) ही हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री आहे. इ.स. १९९१ साली चित्रपटसॄष्टीत पदार्पण केलेल्या करिश्माने कारकिर्दीत अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटांतून कामे करत इ.स. १९९० च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले. तिने भूमिका साकारलेल्या चित्रपटांपैकी राजा हिंदुस्तानी (इ.स. १९९६), दिल तो पागल है (इ.स. १९९७), फिजा (इ.स. २०००), झुबैदा (इ.स. २००१) हे चित्रपट विशेष गाजले.\nहिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता रणधीर कपूर तिचे वडील, तर अभिनेत्री बबिता तिची आई आहे. तिची बहीण करीना कपूर हीदेखील हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे.\nशेवटचा बदल २४ ऑगस्ट २०२२ तारखेला २२:२३ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०२२ रोजी २२:२३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/ya-7-vitamin-chi-kami-purshuna-yete-kamjori/", "date_download": "2022-10-07T21:49:10Z", "digest": "sha1:7ZCKMLRIUHVRQBG6M3OL5CPRJ5KNHSNQ", "length": 11485, "nlines": 88, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "'या' सात व्हिटामिनची कमी असल्यास पुरुषांना येते कमजोरी.. वाचा सविस्तर - Themaharashtrian", "raw_content": "\n‘या’ सात व्हिटामिनची कमी असल्यास पुरुषांना येते कमजोरी.. वाचा सविस्तर\n‘या’ सात व्हिटामिनची कमी असल्यास पुरुषांना येते कमजोरी.. वाचा सविस्तर\nपूर्वीच्या पुरुषांमध्ये प्रतिकारशक्ती प्रचंड असे. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे अनेक पुरुषांना प्रतिकार शक्ती आणि इतर समस्यांचा सामना करावा लागतो. सध्या तर कोरोना महामारीच्या अनुषंगाने विटॅमिन असणे तर फार आवश्यक आहे. पुरुषांना दररोज आवश्यक असे सात व्हिटॅमिन्स लागत असतात. या लेखात आपण आवश्यक असणारे व्हिटामिन्स जाणून घेऊया.\n१. व्हिटॅमिन डी : हे व्हिटामिन पुरुषांमध्ये वाढत्या वयाचा प्रभाव कमी करते. मेंदू आणि हृदय विकारापासून आजारापासून बचाव करते. शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यासाठी आवश्यक दररोज 600 ग्राम नियमित हे व्हिटामिन गरजेचे असते. हे व्हिटामिन मिळविण्यासाठी सूर्यकिरणे उत्तम स्त्रोत आहे. मासे आणि दुग्धजन्य पदार्थासून व्हिटॅमिन मिळते. पनीर खावे.\n२. कॅल्शियम : पुरुषांची हाडे स्नायू नस आणि हृदयाचे कार्य समान ठेवण्यासाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक असते. रोज पुरुषांना कॅल्शिअमची गरज असते. जवळपास १हजार मिलीग्राम नियमित कॅल्शियम लागते. दूध, दुग्धजन्य पदार्थ, बदाम, सोयाबीन, संत्री, मासे यापासून कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळते. याचे सेवन रोज करावे.\n३ व्हिटॅमिन बी 12: रक्त आणि मेंदूचे कार्य सामान्य ठेवण्यासाठी गरजेचे आहे. यामुळे पचनक्रिया चांगली सुधारते. दररोज जवळपास 204 मिली ग्राम b12 शरीराला आवश्यक असते. मास, चिकन, दूध, दही, पनीर तस्तम पदार्थापासून विटामिन बी12 आपल्याला मिळते. याचे सेवन अवश्य करावे.\n४. मॅग्नेशियम : हे घेतल्यास उच्च रक्तदाबाची समस्या दूर होऊ शकते. हृदयविकार कमी करते. मॅग्नेशियम शोषून घेण्यास मदत होते. दररोज जवळपास 320 मिलीग्राम नियमित घेणे आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन यापासून मॅग्नेशियम आपल्या शरीराला मिळते.\n५. विटॅमिन बी 6: यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहते. आजारापासून बचाव होतो. लाल रक्तपेशींची संख्या वाढण्यास मदत होते. फंक्शन चांगले ठेवते. रोज 1.3 मिलीग्राम नियमित विटामिन बी 6 गरजेचे असते. बीट, अंडी, मासे, हॉल ग्रेन मास, बटाटे यापासून हे विटामिन मिळते.\n६. व्हिटॅमिन के : हे व्हिटॅमिन ब्लड क्लॉटिंग मध्ये मदत करून अंतर्गत आणि बाहेरही ब्लडिंग होऊ देत नाही. हाडांमध्ये कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. दररोज 122 ते 138 मायक्रो ग्रॅम नियमित घ्यावे. पालक, ब्रोकली अशा हिरव्या भाज्या सोयाबीन तेल यामधून विटामिन के मिळते.\n७. व्हिटॅमिन ए : डोळ्यांना निरोगी ठेवते. दृष्टी लवकर कमजोर होत नाही. हाडे मजबूत राहतात आणि आजारापासून बचाव करण्यास मदत करते. दररोज जरूर 700 ते 900 ग्राम नियमित यांचे सेवन करावे. दूध दुग्धजन्य पदार्थ, रताळी, ब्रोकली यापासून हे विटामिन मिळते\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/ya-mandirat-zoplyamule-mahila-hotat11/", "date_download": "2022-10-07T22:03:43Z", "digest": "sha1:SSQE2LWZI2PSWFZFE23KFWYUHAXLKWVC", "length": 12491, "nlines": 89, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "'या' मंदिरात झोपल्यामुळे महिला होतात प्रे'ग्नं'ट, यामागील रहस्य समजल्यावर तुम्हीही व्हाल चकित.... - Themaharashtrian", "raw_content": "\n‘या’ मंदिरात झोपल्यामुळे महिला होतात प्रे’ग्नं’ट, यामागील रहस्य समजल्यावर तुम्हीही व्हाल चकित….\n‘या’ मंदिरात झोपल्यामुळे महिला होतात प्रे’ग्नं’ट, यामागील रहस्य समजल्यावर तुम्हीही व्हाल चकित….\nविविधतांनी परिपूर्ण असलेल्या भारतात दररोज च’मत्कार पहायला आणि ऐकायला मिळत असतात. एकविसाव्या शतकात, जेथे जग चंद्राकडे जात आहे, तरी आजही आपण काही विश्वास आणि अं’धश्र’द्धा वाचून आ’श्चर्यच’कित होत असतो. भारतात अशी अनेक च’मत्कारी मंदिरे आहेत, ज्यांबद्दल विज्ञानही त्याचे र’हस्य जाणून घेण्यास उस्तुक नेहमीच असते.\nहा भारत आहे आणि इथे काहीही घ’डू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा मंदिराविषयी जेथे वि’वाहित स्त्रि’या ज्यांना मुल होत नाहीये अशा स्त्रि’या या मंदिराच्या फरशीवर रात्रभर झो’पल्या’मुळे ग’रो’दर राहू शकतात. हे ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु लोकांच्या आस्थेसमोर आपला युक्तिवा’द छोटा दिसेल.\nहिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात माता सिमसा हे मंदिर आहे. असे मानले जाते की ज्या स्त्रि’या मूल होऊ इच्छित आहेत, त्या स्त्रि’या या मंदिरात एक रात्र झो’पल्यानं’तर काही दिवसांतच ग’र्भव’ती होतात. असा विश्वास आहे की स्वत: देवी शारदा स्वत: मुलागा किंवा मु’लगी घे’वून म’हिलांना सूचित करण्यासाठी त्यांच्या स्वप्नात येते.\nया मंदिराच्या या वैशिष्ट्यामुळे हे मुलांना ज’न्माला घालणारे मंदिर म्हणूनही ओळखले जाते. नवरात्रीनिमित्त देवी सिमसा मंदिरात सलिंद्र उत्सव साजरा केला जातो. सलींद्र म्हणजे स्वप्न येणे. ही अशी वेळ आहे जेव्हा येथे झो’पत असलेल्या म’हिलां’ना देवी स्वप्नात येवून दर्शन देते आणि स्वप्नात त्यांना मु’ल किंवा मु’लगी देखील पदरात घा’लते.\nइथे रात्री नव्हे तर दिवसा देखील स्त्रि’या येथे झो’पलेल्या आढळतात. स्त्रि’या ज्या इच्छ्ने मनाने श्रद्धा घेवून आलेल्या असतात, देवी त्यांना मानवी स्वरूपात किंवा कोणत्याही चिन्हात दर्शन देते आणि आशीर्वाद देत असते. याशिवाय स्त्रि’या स्वप्नांमध्ये फळे किंवा धातूदेखील पाहतात.\nस्वप्नात पाहिलेल्या भिन्न गोष्टी वेगवेगळी संकेत दर्शवित असतात. जर एखाद्या स्त्री’ला तिच्या स्वप्नात फळ दिसले तर याचा अर्थ असा आहे की तिचे घर लवकरच बा’ळाच्या आवाजाने गुंजणार आहे. स्वप्नात पेरू चे फळ पाहणे म्हणजे मु’लगा होईल. जर स्वप्नात एक भेंडी दिसली तर याचा अर्थ मुलगी ज’न्माला येईल.\nजर स्वप्नात धातू किंवा लाकूड दिसले तर ते एक वाईट चिन्ह मानले जाते. असे म्हटले जाते की जर एखाद्या स्त्री’ने तिच्या स्वप्नात लाकूड, दगड किंवा कोणतीही धातू पाहिली तर याचा अर्थ असा की ती कधीही आई होऊ शकणार नाही.\nसंकेत मिळाल्यानंतरही, जर एखादी स्त्री मंदिरातून गेली नसेल आणि तेथे झो’पली असेल तर तिच्या शरीरावर लाल डाग दिसतील आणि तिला तिथून जावे लागते. अशी या मंदिराची ख्याती आहे. तसेच भारतात अजून एक असे मंदिरे आहेत त्यांबद्दल जाणून घेवू.\nछत्तीसगडची राजधानी रायपूर जवळ सरोना येथे सुमारे 250 वर्ष जुन्या पंचमुखी शिवलिं-गाचे मंदिर आहे. असे मानले जाते की संतती नसलेल्या जोडप्याने जर शिवलिंगाचे श्रृंगार केले तर त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होतात. या मंदिराची खास गोष्ट अशी आहे की कित्येक वर्षांपासून नाग-नागिन शिवलिं-गास भेट देण्यासाठी येत असतात.\nमुबंईत आलेल्या ‘या’ भ’यंकर अनुभवामुळे विदेशात शिकत आहे अजय-काजोलची मुलगी काजोल म्हणाली की मुंबईत तीला..\nफक्त १५ हजाराची गुंतवणूक करून औषधी वनस्पतीच्या शेतीतून करा तीन महिन्यांत 3 लाखांची कमाई..\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nयाला म्हणतात डोक्यालीटी ; डीग्री झालेले इंजिनियर देखील फिक्के पडतील ‘या’ लोकांचा घरगुती जुगाड पाहून,, तुम्हीच बघा\n8 फोटो जे पहिल्यांदा बघितल्यावर तुमच्या डोक्याचा भुगा होईल, पण विचार केला तरच समजेल\nकौन बनेगा करोडपतीमध्ये 5 कोटी जिंकणाऱ्या सुशील कुमारचे नंतर काय झाले\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/kanhe-railway-flyover-stuck-in-red-tape/", "date_download": "2022-10-07T22:12:56Z", "digest": "sha1:VQ5CLPVNBCIS2MIAUDZL4CSWRTLXXDGR", "length": 14558, "nlines": 225, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिंपरी चिंचवड - कान्हे रेल्वे उड्डाणपूल अडकला लालफितीत", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड – कान्हे रेल्वे उड्डाणपूल अडकला लालफितीत\nनागरिक हैराण : सतत रस्ता बंद असल्याने कंपन्यांचे स्थलांतर\nकान्हे, दि. 17 (वार्ताहर) – पुणे-मुंबई लोहमार्गावर कान्हे येथे रेल्वे उड्डाणपूल नसल्यामुळे कान्हे रेल्वे गेट जवळ दोन ते तीन किलोमीटर लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे कामगार वर्ग व उद्योजकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कामगारांना कामावर येताना होणारा विलंब व ये-जा करण्यात खर्ची पडणाऱ्या वेळेमुळे या भागातील अनेक उद्योगांनी स्थलांतर केले आहे. नागरिक व लोकप्रतिनिधींकडून वारंवार मागणी व पाठपुरावाकरूनही कान्हे येथील उड्डाणपूल लालफितीत अडकल्याचे वास्तव आहे.\nकान्हे-टाकवे येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या असल्याने येथे मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग ये- जा करत असतो. याठिकाणचे रेल्वे गेट अनेकदा बंद असते. त्यामुळे अंदर मावळ मधील 30 ते 40 गावांना 70 ते 60 किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. या सर्व अडचणी लक्षात घेऊन कान्हे येथे उड्डाणपूलाची नितांत गरज आहे.\nआंदर मावळमधील धबधबे व निसर्ग व पर्यटनस्थळांचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. पावसाळ्यात आंदर मावळात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. ही संख्या शनिवारी रविवारी हजारोंवर जाते. मात्र वारंवार रेल्वे गेट बंद असल्याने येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाल्याचे दिसून येते. त्यामुळे आता आंदर मावळात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होऊ लागला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायावरदेखील याचा देखील परिणाम झाल्याचे दिसते. तसेच कंपनीसाठी ट्रान्सपोर्ट करणाऱ्या गाड्या वेळेअभावी न पोहचल्यामुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक लहान-मोठ्या उद्योगांनी येथून आपला गाशा गुंडाळला आहे.\nकान्हे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने तेथे येणाऱ्या रूग्णांनादेखील त्याठिकाणी पोहचण्यासाठी बराच वेळ वाट पहावी लागते. याशिवाय या भागातील दुग्ध व्यावसायिक व कामगार यांनाही रेल्वे गेटमुळे अडचण होते. जांभूळ येथील रेल्वेगेट बंद असल्याने तेथील अंडरपासचे काम चालू असल्यामुळे तेथील नागरिकांना कान्हे फाटा येथूनच पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. कान्हे टाकवे औद्योगीकरण पाहता कान्हे रेल्वे उड्डाणपूल होणे आवश्‍यक आहे. त्याकरिता आता वेळोवेळी दिलेल्या निवेदनांवर कोणतीही कार्यवाही झाले नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ग्रामस्थ निराश झाले आहेत.\nकान्हे येथे उड्डाणपूल नसल्याने या भागातील कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. तर व्यावसायिक, नोकरदार, पर्यटक व रूग्णदेखील त्यामुळे कमालीचे हैराण झाले आहेत. उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या प्रयत्नांना यश आलेले नाही. त्यामुळे आता नागरिकांनीच रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.\n– सागर गायकवाड, ग्रामस्थ\nपिंपरी चिंचवड – वाहन, सोने खरेदीत कोट्यावधींची उलाढाल\nपिंपरी चिंचवड – राष्ट्रवादीचे सर्व स्थानिक नेते अखेर एका मंचावर\nभाजपमुळे सोसायटीधारकांचे प्रश्न प्रलंबित – अजित पवार\nफेलोज इनवॉर्डस प्रकल्प उपयुक्त – आयुक्‍त सिंह\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/27-lakh-household-consumers/", "date_download": "2022-10-07T23:07:06Z", "digest": "sha1:NU6NJIJHS37QL6FAUPIOVCOIQ376SRW2", "length": 7737, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "27 lakh household consumers Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nपश्‍चिम महाराष्ट्रात 27 लाख घरगुती वीजग्राहकांकडे 863 कोटींची थकबाकी\nकोल्हापूर - वीज ही अत्यावश्‍यक असताना घरगुती खर्चात मात्र वीजबिलांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची स्थिती असून पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये इतर थकबाकीदार ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/works-in-shirur-will-be-completed-collector-dr-testimony-of-deshmukh-adhalrao-patil/", "date_download": "2022-10-07T23:16:44Z", "digest": "sha1:LLWAF5G7NYBCJY45ROXSCGRCWUGKV4IN", "length": 12816, "nlines": 223, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिरूरमधील कामे मार्गी लागणार ; जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांची ग्वाही-आढळराव पाटील", "raw_content": "\nशिरूरमधील कामे मार्गी लागणार ; जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांची ग्वाही-आढळराव पाटील\nमंचर – शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या व लोकहिताची कामे मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्याची माहिती शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.\nपुण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीबाबत माहिती देताना माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, जनता दरबारच्या माध्यमातून, तसेच गावभेट दौऱ्यावेळी अनेक गावांच्या शिष्टमंडळांनी मागणी केल्यानुसार लोकहिताच्या महत्त्वाच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार झालेल्या बैठकीत प्रामुख्याने मरकळ (ता. खेड) येथील भामा आसखेड कालव्यासाठी जमिनीचे केलेले संपादन वगळण्याबाबत शेतकऱ्यांनी आग्रही भूमिका मांडली.\nयासह डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील गायरान क्षेत्रावरील पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी व्हावेत, हडपसरमधील मांजरी बुद्रुक या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये लोकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी “शासन आपल्या दारी’चे आयोजन व्हावे, कवठे यमाई येथील शेकडो एकर क्षेत्रावरील चुकीचे भोगवटादार शिक्के कमी व्हावेत यांसह विविध प्रश्‍न जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.\nविविध गावच्या शिष्टमंडळाचे म्हणणे जिल्हाधिकारी यांनी सविस्तरपणे ऐकून घेत लवकरात लवकर प्रश्‍न मार्गी लावणेबाबत संबंधित खाते प्रमुखांना आदेश दिले. या बैठकीबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आभार मानले.\nयावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, जिल्हा परिषद सदस्य शरदराव बुट्टे पाटील, जिल्हा परिषद गटनेते दे विदास दरेकर, पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे, मांजरीचे सरपंच शिवराज घुले पाटील, कारेगावचे माजी सरपंच अनिल नवले, धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके यांसह विविध गावांचे लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.\nपुणे जिल्हा : भोरच्या नगराध्यक्षा राष्ट्रवादीच्या वाटेवर\nपुणे जिल्हा : आवर्तन लांबल्याने पिके जळण्याच्या मार्गावर\nअहमदनगर : टाकळी रस्त्यावरील पूल कोसळण्याच्या मार्गावर\nसंत तुकोबांच्या पादुका मंगळवारी होणार पंढरीकडे मार्गस्थ\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/st-merger", "date_download": "2022-10-07T22:47:52Z", "digest": "sha1:E7XUD774GBACV5QHV3OP4XBOJRWDOTOX", "length": 9975, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nSpecial Report | गुणरत्न सदावर्ते, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर पुन्हा ST विलीनीकरणासाठी लढणार का\nGunratna Sadavarte | ‘एसटी कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी मी सांगितलं’\nकोणाचीही नोकरी जाणार नाही, ST कर्मचाऱ्यांनी कामावर यावे : Anil Parab\nST कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, Ajit Pawar यांचं आवाहन\nSpecial Report | ST विलीनीकरणाचा अहवाल बाजूनं की विरोधात \nSt Worker : एसटी अहवालावर कोर्टात काय झालं सदावर्ते आणि सरकारी वकिलांमध्ये काय युक्तीवाद\nएसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी, विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख\nसंपामुळे झालेले नुकसान कामगारांकडून वसूल नाही करणार, महामंडळ काय म्हणालं\nST Workers Strike : एसटी विलीनीकरणाबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी वेळ वाढवून द्या, राज्य सरकारचा हायकोर्टात अर्ज\nTanaji Sawant Letter : एसटी विलीनीकरणाबाबत योग्य निर्णय घ्या, शिवसेनेच्या आणखी एका आमदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र\nAjit Pawar|ST कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन चंद्रकांतदादा- अजित पवारांच्यात वार-पलटवार\nChandrakant Patil | एसटी विलीनीकरण शक्य नाही तर आश्वासन का दिलं\nGunratna Sadavarte | 22 डिसेंबरला विलिनीकरणाचा प्रस्ताव मान्य करावा हीच आमची अपेक्षा\nST Workers Strike: एसटीच्या विलीकरणाबाबत पुढील सुनावणी 22 डिसेंबरला, अनेकांचे निलंबन, बदल्या\nSpecial Report | मविआ सरकार VS 73 हजार एसटी संपकरी\nZaheer Khan : झहीर खानने अभिनेत्रीच्या कुटुंबाला अशा प्रकारे मनवलं होतं, जाणून घ्या लव्हस्टोरी\nफक्त प्रेम.. रणबीरने आलियाला केलं किस; बेबी शॉवरमधील खास क्षण\nदक्षिण आफ्रिकेवर भारी पडणार ‘हे’ दोन खेळाडू, जाणून घ्या….\nमौनी रॉयचा आऊटफिट पाहून नेटकरी घायाळ; फोटोंवर लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव\nRishabh Pant : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये ऋषभ पंतचा वाढदिवस साजरा, चाहते म्हणाले उर्वशीही…\nसादर करण्यात आलेल्या कागद पत्रांवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार यासह पहा इतर अपडेट महाफास्ट न्यूज 100 मध्ये\nअंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेचा प्रचाराचा काय आहे प्लॅन पहा यासह 4 मिनिट 24 हेडलाईन्स\nउद्धव ठाकरेंनी का मागितले आणखीन काही दिवस यासह इतर बातम्यांच्या अपडेटसाठी पहा महाफास्ट न्यूज 100\nशेतकऱ्यांना 12 तास वीज देणार यासह पहा राज्यभरातील अपडेट 36 जिल्हे 72 बातम्यामधून\n“उद्धव ठाकरेंच्या भाषणाला दर्जा नाही, बोलायला लागले की लोक निघून जातात”\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/2423", "date_download": "2022-10-07T21:45:44Z", "digest": "sha1:FYXX26E6GU6GTCI75CS6OCORZZIGCE7B", "length": 15740, "nlines": 109, "source_domain": "bollyreport.org", "title": "या कारणामुळे तब्बल २२ चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव होते 'विजय', कारण जाणून थक्क व्हाल ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News या कारणामुळे तब्बल २२ चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव होते ‘विजय’, कारण...\nया कारणामुळे तब्बल २२ चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव होते ‘विजय’, कारण जाणून थक्क व्हाल \nअमिताभ बच्चन यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये ५२ वर्षे पुर्ण झाली आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती त्यांच्या चाहात्यांना दिली. पोस्ट शेअऱ करत त्यांनी लिहीले कि, आजच्याच दिवशी मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. १५ फेब्रुवारी १९६९… ५२ वर्ष… त्यांच्या या ट्विटला बॉलिवुडच्या अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. बॉलिवुडमध्ये ५२ वर्षे पुर्ण झाल्यावर बिगबींनी एकामोगमोग एक असे बरेच ट्विट केले.\n१९६९ मध्ये करियरला सुरुवात करणाऱ्या अमिताभ यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. सुरुवातीला त्यांना इंजीनियर किंवा एअरफोर्स मध्ये जाण्याची इच्छा होती. पण नशीबाने त्यांना हिंदी सिनेमांच्या पडद्यावरच झळकवले. आज आम्ही तुम्हाला बिगबींसंबधी एक खास गोष्ट सांगणार आहोत. तब्बल २२ चित्रपटांमध्ये अमिताभ यांचे नाव विजयच होते. यामागे सुद्धा एक खास कारण आहे जे कदाचित खुप कमी लोकांना ठावुक आहे.\nअमिताभ बच्चन यांनी सात हिंदुस्तानी या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र त्यावेळी हा चित्रपट सुपर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटानंतर त्यांनी सलग १२ चित्रपट फ्लॉप दिले. पाठोपाठ एवढे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ते खुपच डगमगून गेले. त्यानंतर अचानक त्यांना प्रकाश मेहरा यांचा जंजीर हा चित्रपट ऑफर झाला. असे म्हटले जाते की या चित्रपटाला अनेक सुपरस्टार्सनी रिजेक्ट केले होते.\nप्रकाश मेहरा यांनी एका इंटरव्यू मध्ये सांगितले की, जंजीर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ खूपच नर्वस असायचे. ते खूप खचलेले दिसायचे. शॉट झाल्यावर ते एकटेच बसून कोकोकोला पीत राहायचे. अमिताभ यांच्या आधी अनेक नामांकित कलाकारांनी जंजीर नाकारला होता. मात्र अमिताभ यांनी या चित्रपटात त्यांचे संपूर्ण कौशल्य पणाला लावले आणि याचा निकाल तुम्ही पाहू शकता. या चित्रपटात अमिताभ यांच्या पात्राचे नाव विजय असे होते.\nअमिताभ बच्चन यांच्यावर पुस्तक लिहिलेली नामांकित लेखिका भावना सोमय्या यांनी एकदा सांगितलेले की, आपल्या इंडस्ट्रीची एक प्रथा आहे की ज्या नावाने कोणा फिल्म स्टार ची फिल्म यशस्वी होते तेव्हा त्याच्या पुढील चित्रपटात सुद्धा तेच नाव ठेवले जाते. मी हीच गोष्ट एकदा जावेद अख्तर यांना सुद्धा विचारली होती की ते प्रत्येक गोष्टीवर विजय कसे मिळवतात. कदाचित याच कारणामुळे त्यांचे नाव प्रत्येक चित्रपटांमध्ये विजय ठेवले गेले असावे.\nअमिताभ यांना मिळालेल्या यशामुळे तब्बल २२ चित्रपटांमध्ये त्यांच्या पात्राचे नाव विजय असे ठेवले होते. जंजीर, रोटी कपडा और मकान, हेराफेरी, त्रिशूल, डॉन, द ग्रेट गॅ*म्ब*ल*र, काला पत्थर, दो और दो पांच, दोस्ताना, शान, शक्ती, आखरी रास्ता, अकेला, आखे, राण, शहेनशहा, अ*ग्नि*पथ चित्रपटांमध्ये त्यांचे नाव विजय असे होते.\n१९६९ मध्ये अमिताभ यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात मृणाल सेन यांच्या बंगाली चित्रपटात आवाज देऊन केली होती. त्यांना सर्वात पहिले सुनील दत्त यांचा चित्रपट रेश्मा और शेर यासाठी साइन केले होते. त्यासाठी इंदिरा गांधी यांनी त्यांची मैत्रीण नर्गिस ला पत्र सुद्धा लिहिले होते. हा चित्रपट १९७१ मध्ये रिलीज झालेला. अमिताभ यांनी २०५ पेक्षा अधिक चित्रपटामध्ये काम केले आहे. यापैकी १२ चित्रपटांमध्ये त्यांनी डबल रोल केले होते. महान या चित्रपटात त्यांनी ट्रिपल रोल सुद्धा केला होता.\nअसे म्हटले जाते की महमूद यांना सात हिंदुस्तानी मधील अमिताभ यांचा अभिनय फार आवडला होता. त्यानंतर त्यांनी अमिताभ यांना तीन चित्रपटांमध्ये साईन केले. यासाठी त्यांनी अमिताभला पाच हजार ,सात हजार, दहा हजार रुपये दिले होते. अमिताभ यांनी चित्रपटात नशीब आजमावण्यापूर्वी कोलकत्याला रेडिओ अनाऊन्सर आणि एका शिपिंग कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले होते. त्याकाळी त्यांना ८०० रुपये सॅलरी मिळायची.\n१९६८ ला कोलकत्ता मधील नोकरी सोडल्यावर ते मुंबईला आले. ७८ व्या वर्षी सुध्दा अमिताभ चित्रपटांमध्ये खूप ॲक्टिव आहेत. झुं*ड, चेहरे, ब्र*ह्मा*स्त्र, तेरा यार हू मे, आँखे २, मई डे हे त्यांचे येणारे चित्रपट आहे. सध्या अमिताभ अजय देवगन च्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या मई डे या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleलोकांना इमोशनल करून लाखो रुपये कमवतात या अभिनेत्री, नंबर ४ ची अभिनेत्री तर एका दिवसाची घेते तब्बल एवढी फी \nNext articleअखेर अमिताभ बच्चन यांच्या २८०० करोड संपत्तीचा वारसदार ठरला, हे असतील अमिताभ यांच्या संपत्तीचे वारसदार \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/maharashtra/osmanabad/", "date_download": "2022-10-07T22:09:51Z", "digest": "sha1:DYMOJXGXGGUIQS2BDGTAZWPO7V5XAYOF", "length": 8141, "nlines": 138, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "उस्मानाबाद - थोडक्यात - Marathi News", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nअकोला अमरावती अहमदनगर औरंगाबाद कोल्हापूर गडचिरोली गोंदिया\nऔरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय\n“उद्धव ठाकरे यांनी स्वत: पक्ष चालवायला हवा, अजूनही वेळ गेलेली नाही”\n“केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची माहिती भाजपवाल्यांना कशी मिळते\n“आमदारांना घरे देण्याचा निर्णय झाला नाही”; ठाकरे सरकारचा यु-टर्न\n“फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात पडळकर तेवढंच काम करतात”\n“निकाला आधीच मी येणार, मी येणार सांगत होते, पण आम्ही काय येऊ देतो”\n“ईडीला राज्यात शेतकऱ्यांच्या बिडीऐवढी पण किंमत राहिली नाही”\n“कोणाला सांगताय म्हातारा झालोय, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत थकणार नाही”\n ‘या’ भागात 2 वर्षाच्या चिमुकल्याला Omicronची लागण\n‘…आम्ही थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू’; शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर\n‘4 दिवसाच्या वाळक्या भाकऱ्या खातोय साहेब’; पाहा एसटी कर्मचाऱ्याची दयनीय अवस्था\nउस्मानाबादच्या डान्स बारवरून अमोल मिटकरी आक्रमक, म्हणाले…\nअंधश्रद्धेचा बळी, सर्पदंश झाल्यावर 3 तास ठेवले मारूती मंदिरात\n“शरद पवार भिजल्याची बातमी झाली, पण…”; ‘या’ नेत्याचा पवारांवर हल्लाबोल\n“भाजपच्या घोटाळेबाज नेत्यावर धाडी का नाही, काही घोटाळेबाज भाजपमध्ये आले ते पवित्र झाले…\nटीम थोडक्यात Oct 10, 2021\n”उद्धव ठाकरेंना वाटेल तोपर्यंतच महाविकास आघाडी सरकार टिकेल”\nटीम थोडक्यात Sep 26, 2021\nलग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवविवाहितेने केलं असं काही की नवरदेवाने गाठलं थेट पोलीस स्टेशन\nटीम थोडक्यात Sep 22, 2021\nशुद्ध दुधासाठी 10 मित्रांनी सुरु केला गीर गायींचा गोठा…, पाहा व्हिडीओ\nटीम थोडक्यात Aug 24, 2021\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या गाडीवर दगडफेक\n“जनतेनं फेकून दिलं होतं, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळे तुम्ही आज सत्तेत आहात”\nटीम थोडक्यात Aug 15, 2021\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2018/05/blog-post_31.html", "date_download": "2022-10-07T21:21:32Z", "digest": "sha1:IICFMITDKPKTJAU5V47HWYYTJYSSVJ7Y", "length": 22194, "nlines": 207, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "मुद्द्यांचे विकृतीकरण | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nलोकशाही व्यवस्थेत निवडणुकीच्या कालावधीत राजकीय पक्षांद्वारे सर्वसामान्यपणे राष्ट्रहित व जनहिताशी संबंधित मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. सन २०१४ ची लोकसभा निवडणूकदेखील मागील यूपीए सरकारच्या तथाकथित निष्क्रियता, त्यांच्या कारकिर्दीतील भ्रष्टाचार, गुन्हे, महिला सुरक्षा, बेरोजगारी आणि महागाई यासारख्या मुद्द्यांवर लक्ष्य केंद्रित करून लढविण्यात आली होती. विरोधी पक्ष एनडीएद्वारा भाजपच्या नेतृत्वाखाली जनतेला अनेकानेक दिवास्वप्ने दाखविण्यात आली होती. जनतेने त्यांच्या आश्वासनांना बळी पडून त्यांच्या हातात सत्ता सोपविली होती. मात्र सत्ताधारी रालोआ सरकारचा चार वर्षांचा कालावधी लोटला तरी जनतेला देण्यात आलेल्या आश्वासनांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. या आश्वासनांबद्दल सरकारला विचारण्यात आले असता संभाषणाची दिशाच बदलण्यात येते. देशातील जनतेला देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे निवडणुकीतील मुद्द्यांना बगल देणे अथवा वास्तविक व जनसमस्यांशी संबंधित मुद्द्यांचे परिवतर्थन भावनात्मक मुद्द्यांमध्ये करणे हे स्वच्छ राजकारण होऊ शकते काय अथवा अशा प्रकारच्या भावनात्मक व जनसमस्यांशी संबंध नसलेल्या मुद्द्यांमुळे देशातील नागरिकांचे व राष्ट्राचे भले होऊ शकते काय अथवा अशा प्रकारच्या भावनात्मक व जनसमस्यांशी संबंध नसलेल्या मुद्द्यांमुळे देशातील नागरिकांचे व राष्ट्राचे भले होऊ शकते काय असा प्रश्न पडतो. गरीब जनता, कामगार अथवा शेतकऱ्यांच्या हितांचा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना अथवा एखाद्या समाजावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध बोलणाऱ्यांना उत्तर देण्याऐवजी किंवा त्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी व्यवस्थेकडून नक्षलवाद्यांचे अथवा दहशतवाद्यांचे समर्थक ठरविले जाते. जर एखाद्याने देशात वाढत्या असहिष्णुतेची गोष्ट केली, एखाद्या राजकीय पक्षाने अल्पसंख्यकांच्या हिताची गोष्ट केली अथवा त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत आपले विचार व्यक्त केले तर त्याला राष्ट्रविरोधी वा पाकधार्जिणे ठरविले जाते. जर एखाद्या संघटनेने अथवा नेत्याने सर्व धर्म व जातींना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या सेक्युलर विचारधारेला हिंदूविरोधी ठरविण्यात येते. सत्तेत येऊन चार वर्षे लोटली तरी देण्यात आलेल्या आश्वासनांचे काय झाले असा प्रश्न पडतो. गरीब जनता, कामगार अथवा शेतकऱ्यांच्या हितांचा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना अथवा एखाद्या समाजावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध बोलणाऱ्यांना उत्तर देण्याऐवजी किंवा त्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी व्यवस्थेकडून नक्षलवाद्यांचे अथवा दहशतवाद्यांचे समर्थक ठरविले जाते. जर एखाद्याने देशात वाढत्या असहिष्णुतेची गोष्ट केली, एखाद्या राजकीय पक्षाने अल्पसंख्यकांच्या हिताची गोष्ट केली अथवा त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत आपले विचार व्यक्त केले तर त्याला राष्ट्रविरोधी वा पाकधार्जिणे ठरविले जाते. जर एखाद्या संघटनेने अथवा नेत्याने सर्व धर्म व जातींना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या सेक्युलर विचारधारेला हिंदूविरोधी ठरविण्यात येते. सत्तेत येऊन चार वर्षे लोटली तरी देण्यात आलेल्या आश्वासनांचे काय झाले असा प्रश्न जर सत्ताधाऱ्यांना विचारण्यात आला तर उत्तर मिळेल की नेहरू-गांधी परिवाराने देशाला बरबाद केले आहे आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष जबाबदार आहे. सन २०१४ च्या निवडणुकीपूर्वी दोन कोटी प्रति वर्ष रोजगारनिर्मिती केली जाईल असे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना बेरोजगारीच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आला तर ते सल्ला देतात की सरकारी वा खासगी वंâपन्यांमध्ये नोकरी मिळविणे हाच फक्त रोजगार नसून तुम्ही भजी-चहा-पान विका, हादेखील रोजगारच आहे. दुसरीकडे त्याचबरोबर साधूसंत, प्रवचनकार, डेरा-आश्रम संचालकांना मंत्री, खासदार व आमदार बनविले जात आहे. उत्तर प्रदेशसारखे सर्वांत मोठे राज्य तर बाबाजींच्या हवाली करण्यात आले आहे. देशाच्या लोकसभेतदेखील सत्ताधारी पक्षाचे अनेक साधूसंत आपल्या धार्मिक वेशभूषेत दिसून येतात. निश्चितच असे वाटू लागले आहे की आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत अशा बुवाबाबांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी पाच बाबांना मंत्रीपदाचा दर्जा व मंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा देऊन त्यांना सन्मानित केले. घर-कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांना तिलांजली देऊन जे लोक त्यागी, तपस्वी, महात्मा वा धर्मोपदेशक बनतात ते किती शिकलेले असतात अथवा आपल्या जबाबदाऱ्या पार पाण्यात किती सक्षम असतात हे सांगण्याची गरज नाही. सध्या सुरू असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय पक्षांच्या नेत्यांद्वारे जनतेला भूलथापा ऐकवून दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे नेतेगणांचा वाचाळपणा अगदी चव्हाट्यावर आलेला आहे. निवडणुकच्या प्रचारादरम्यान भाषणबाजीचा स्तर दिवसेंदिवस घसरत चालला आहे. नेतागण एकमेकांवर खासगी प्रहार करू लागले आहेत. आपली निष्क्रियता लपविण्यासाठी दुसऱ्यांना अपमानित करणे आणि तुच्छ ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आजदेखील काँग्रेसचा विरोध करून आणि नेहरूंना अर्वाच्च बोलून मत मागण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावावरून विनाकारण वादविवाद सुरू केला जात आहे त्या जिन्नांच्या मजारचे दर्शन घेण्यासाठी भाजपचेच लोहपुरुष लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या लवाजम्यासह पोहोचले होते. त्या वेळी कोणीही अडवाणींच्या विरूद्ध धरना-निरदर्शने केली नव्हती. यांना गांधी, नेहरू, जिन्ना असे सर्व शत्रू वाटतात. त्यांचे संस्कार व त्यांचा आदर्श विभाजनकारी आहे, समाजाला धर्म व जातीच्या आधारावर दुफळी माजविणारा आहे. त्यांचे विचार व आचरण शेतकरी, कामगार व महिलाविरोधी आहेत. आजचे सत्ताधारी जनतेला तोंड दाखविण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत. म्हणून ते जनता व राष्ट्राच्या विकास व प्रगती आणि देशाची एकता व अखंडतेशी संलग्न मुद्द्यांना निवडणूक प्रचारातील मुद्दे न बनविता त्यांचे विकृतीकरण करण्यात मग्न आहेत.\n२५ मे ते ३१ मे २०१८\nसाहित्य संमेलनासारख्या उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्य...\nआपण जितके मानवतावादी तितकेच आपले प्रबोधन सत्यनिष्ठ...\nकुरआनचे पठण : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n१८ मे ते २४ मे २०१८\nडील करण्याची खरी वेळ\nजगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी (भाग ३) : प्रेषित...\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nजगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी (भाग २) : प्रेषित...\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\nबलात्काऱ्यांना फाशी देऊन उपयोग नाही व्यवस्था बदलाव...\nउस्मान शेख यांना पोलीस महासंचालकांचे मानचिन्ह\nकाँग्रेस एक मुस्लिम पक्ष आहे का\n११ मे ते १७ मे २०१८\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०४ मे ते १० मे २०१८\nहे तर अपेक्षितच होतं\nमोदींनी आता बोलकं व्हाव - डॉ. मनमोहन सिंग\nखिर्द ने कह भी दिया तो क्या हासिल\n‘आरोपी बचाव’ भाजपची नवी घोषणा\nराजर्षी शाहू, कर्मवीरांचे विचार प्रभावीपणे पुढे यावेत\nदेशातील प्रसारमाध्यमे ही लोकशाहीची खरी शक्ती - डॉ....\nजगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/benefits-of-eating-eggsssss/", "date_download": "2022-10-07T22:00:59Z", "digest": "sha1:GQCWZXKJUKHR5SLTKZZMT2365VAPEZ6B", "length": 11238, "nlines": 92, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "उत्तम दृष्टीपासून ते कोलेस्टेरॉल नियंत्रणापर्यंत… जाणून घ्या अंडी खाण्याचे पाच फायदे - Themaharashtrian", "raw_content": "\nउत्तम दृष्टीपासून ते कोलेस्टेरॉल नियंत्रणापर्यंत… जाणून घ्या अंडी खाण्याचे पाच फायदे\nउत्तम दृष्टीपासून ते कोलेस्टेरॉल नियंत्रणापर्यंत… जाणून घ्या अंडी खाण्याचे पाच फायदे\nअंड्यांमधील अनेक घटक हे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. अंड्यातील पोषणमुल्ये आणि त्याच्यापासून पटकन कोणताही पदार्थ तयार करता येणे शक्य असल्यामुळे डॉक्टरांकडून नेहमीच आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.\nकेवळ उत्तम चवीसाठीच नाही तर अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. याशिवाय, इतर पोषक खाद्यपदार्थांच्या तुलनेत अंडी स्वस्त असतात. आरोग्यासाठी अंडी कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकतात हे आपण पाहूयात…\nशरीर सुदृढ राहण्यासाठी आवश्यक असणारी अनेक जीवनसत्त्वे अंड्यातून मिळतात. अंड्यामध्ये फोलेट म्हणजेच अ, ब १२ ब ५ आणि ब २ ही जीवनसत्त्वे असतात. याबरोबरच फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम, ओमेगा ३ आणि इतर अनेक महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे तंदुरुस्तीसाठी दररोज एक अंडे खाणे अतिशय आवश्यक आहे.\nअंड्यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असले तरीही त्याचा शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. कोलेस्टेरॉलमधील अनेक घटक आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. आहारात अंड्याचा समावेश केला तरीही शरीरावर किंवा रक्तातील कोलेस्टेरॉलवर त्याचा परिणाम होत नाही. विशेष म्हणजे यामुळेच मधुमेह असणाऱ्यांनाही डॉक्टर अंडी खाण्याचा सल्ला देतात.\nअंड्यामध्ये ल्यूटीन आणि झिझेन्थिन ही दोन अँटी ऑक्सिडंटस असतात. हे दोन्हीही घटक उत्तम दृष्टीसाठी अतिशय आवश्यक असतात. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये हे घटक समाविष्ट असल्याने बलक खाणेही तितकेच गरजेचे असते. मोतीबिंदू आणि रेटिनाच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी हे दोन्हीही अँटी ऑक्सिडंटस आवश्यक असतात.\nहृदयरोग कमी होण्यास उपयुक्त\nअंडी खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. ज्यांना मधुमेह असतो त्यांना हृदयरोगाचा धोका जास्त असतो. मात्र, अंडी खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो, असे कोणत्याही निरीक्षणात आढळून आलेले नाही. त्यामुळेच हृदयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अंड्यांचा आहारातील समावेश उपयुक्त ठरतो.\nवजन कमी होण्यास मदत\nअंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने अंडी खाल्ल्यास बराच वेळ भूक लागत नाही. अंड्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि सातत्याने खाण्यावर नियंत्रण येते. त्यामुळे जास्त कॅलरीज निर्माण होत नाहीत तर त्या वापरल्या जातात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/3316", "date_download": "2022-10-07T23:15:26Z", "digest": "sha1:2AEHSV5RD5B6VKWE73FQRZMPS2J5LK3O", "length": 11182, "nlines": 105, "source_domain": "bollyreport.org", "title": "आपल्या मृत्यूनंतर गोल्ड मॅन बप्पी लहरी सोडून गेले तब्बल एवढी संपत्ती आणि सोने ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News आपल्या मृत्यूनंतर गोल्ड मॅन बप्पी लहरी सोडून गेले तब्बल एवढी संपत्ती आणि...\nआपल्या मृत्यूनंतर गोल्ड मॅन बप्पी लहरी सोडून गेले तब्बल एवढी संपत्ती आणि सोने \nइंडियन गोल्ड मॅन अशी ओळख असलेले बप्पी लहरी हे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक होते. बॉलिवुडमध्ये पॉप म्युझिक आणि डिस्को प्रकार आणणाऱ्या बप्पी लहरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ मध्ये पश्चिम बंगाल मधील जलपाईगुड़ी येथे झाला. पण दुर्दैवाने ते आज आपल्यात नाही. कोरोना मुळे त्यांचा मृत्यु झाल्याचे बोलले जाते.\nबप्पी दा हे त्यांच्या संगीतासोबतच सोन्यासाठी सुद्धा प्रसिद्ध होते. त्यांना नेहमी गॉगल लावुन फिरायला खुप आवडयचे. अनेकदा ते वेगवेगळ्या रियालिटी शो मध्ये सुद्धा हजेरी लावायचे त्यावेळी पण त्यांच्या डोळ्यांवर गोगल आणि हातात सोन्याच्या अंगठ्या महागडी घड्याळं आणि गळ्यात मोठ्या सोन्याच्या चैनी असा त्यांचा पेहराव असायचा. रियालिटी शो मध्ये गेल्यावर स्पर्धकांवर खुष होऊन ते त्यांना सोन्याच्या चैनी सुद्धा भेट द्यायचे. त्यांचा संपुर्ण परिवार संगीताशी निगडीत असल्यामुळे त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला वादन शिकले. आज त्यांच्या पाठी किती रुपयांची संपत्ती आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.\nबप्पी लहरी यांचे खरे नाव आलोकेश लहिरी असे आहे. २०१४ मध्ये ते बीजेपी कडुन पश्चिम बंगाल इथील सीरमपुरच्या लोकसभा निवडणुक लढवत होते. त्यावेळी त्यांचे इफिडेविट जमा केले होते. त्यानुसार त्यांच्याकडे ७५४ ग्राम सोने होते. ज्याची किंमत 17,67,451 लाख रुपये आहे.\nगोल्डचे शौकिन असलेल्या बप्पी दां कडे १२ करोड रुपयांची संपत्ती होती. तसेच त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू आणि ऑडीसुद्धा होती. त्यांच्याकडील टेस्ला X कार ची किंमत 55 लाख रुपये होती. बप्पी दां कडे ४.६२ किलोची चांदी देखील होती ज्याची किंमत साधारण 2,20,000 रुपये आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी हिट गाण्यांच्या आठवणींखातर गोल्ड प्लेटेड डिस्क लावली आहे.\nबप्पी लहरी यांनी त्यांच्या वयाच्या १९ व्या वर्षी त्यांच्या करियरची सुरुवात केली होती. मुंबआत आल्यानंतर त्यांना पहिला ब्रेक १९७२ मध्ये बंगाली चित्रपट दादु मध्ये मिळाला. त्यानंतर १९७३ मध्ये त्यांनी शिकारी चित्रपटासाठी गाणी कंपोज केली. ९० च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट साउंड ट्रॅक तयार केले होते. त्यात वारदात’, ‘डिस्को डांसर’, ‘नमक हलाल’, ‘डांस डांस’, ‘कमांडो’, ‘गैंग लीडर’, ‘शराबी’ या चित्रपटांचा सहभाग आहे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleड्रायव्हिंग करत असताना फोन वर बोलणे आता गुन्हा नाही पण करावी लागेल फक्त ही गोष्ट \nNext article‘आई कुठे काय करते’ मालिकेला मिळणार अनपेक्षित वळण, अनघा उचणार हे मोठे पाऊल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.economictimes.com/wealth/cheapest-car-loans-here-10-banks-and-lenders-to-offer-own-customer-in-marathi/articleshow/94294457.cms", "date_download": "2022-10-07T23:02:05Z", "digest": "sha1:7XR2ETWWBZH2LRJK6MQNIAAJAP72O2NX", "length": 7589, "nlines": 39, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCar Loan : सणासुदीच्या काळात कार घेण्याच्या विचारात असाल तर बँकांच्या कर्जाच्या हप्त्यांविषयी जाणून घ्या\nसणांचा हंगाम सुरू झाला आहे. जर तुम्ही नवरात्री किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर कार कर्ज (Car Loan) घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. यावेळी अनेक बँका त्यांच्या ग्राहकांसाठी विशेष कार कर्ज देत आहेत\nमुंबई : सणांचा हंगाम सुरू झाला आहे. जर तुम्ही नवरात्री किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर कार कर्ज (Car Loan) घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. यावेळी अनेक बँका त्यांच्या ग्राहकांसाठी विशेष कार कर्ज देत आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 7.65% व्याजदराने कार कर्ज देत आहे. दुसरीकडे, बँक ऑफ इंडिया 8.25% दराने कार कर्ज देत आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही येथे दहा बँकांच्या कार लोनची माहिती देणार आहोत. या आकडेवारीच्या मदतीने तुम्ही स्वत:साठी स्वस्त आणि परवडणारे कार कर्ज निवडू शकता.\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया (central bank of India)\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया सर्व बँकांपेक्षा कमी व्याजदरावर कार कर्ज देत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 7.65% व्याजदर कार कर्ज देत आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना सर्वात कमी व्याजदरात 10 लाख रुपयांपर्यंतचे कार कर्ज देत आहे. जर एखाद्या ग्राहकाला या दराने कार कर्जाचा हप्ता सात वर्षांत परत करायचा असेल, तर त्याला दरमहा 15,412 रुपयांचा हफ्ता म्हणून जमा करावे लागतील.\nदेशातील सर्वात मोठी बँक SBI आपल्या ग्राहकांना 7.9 टक्के व्याजदराने 10 लाख रुपयांपर्यंतचे कार कर्ज देत आहे. जर या कर्जाचा कालावधी सात वर्षांचा असेल.\nएचडीएफसी बँक (HDFC Bank)\nस्वस्त कार कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या या यादीतील पुढचे नाव एचडीएफसी बँकेचे आहे. (HDFC Bank) ही बँक आपल्या ग्राहकांना 7.95% व्याजदराने कार कर्ज देत आहे.\nही बँक नवीन कारसाठी 7.95 टक्के व्याजदराने कर्जही देत आहे. जर एखाद्या ग्राहकाने 10 लाख रुपयांचे कार कर्ज सात वर्षांसाठी घेतले, तर बँकेच्या कार लोन ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, संपूर्ण 84 महिन्यांसाठी 15,561 रुपये हप्ता भरावा लागेल.\nकरूर वैश्य बँक आपल्या ग्राहकांना 8% व्याजदराने कार कर्ज देत आहे. 7 वर्षांच्या कालावधीसह 10 लाखांपर्यंतच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी, ग्राहकांना दरमहा 15,586 रुपये हप्ता जमा करावा लागेल.\nही बँक आपल्या ग्राहकांना 8% व्याजदराने 10 लाखांपर्यंत कार कर्ज देखील देत आहे.\nपंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना 8.15% व्याजदराने कार कर्ज देत आहे. 7 वर्षांच्या कालावधीसह 10 लाख रुपयांपर्यंतच्या या कार कर्जाची परतफेड करण्यासाठी, कर्जदाराला 84 महिन्यांसाठी दरमहा 15,661 रुपये हप्ता म्हणून जमा करावे लागतील.\nतुम्ही टर्म इन्शुरन्स घेतला आहे का तुमच्यासाठी किती विमा आवश्यक आहे ते जाणून घ्यामहत्तवाचा लेख", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1031/", "date_download": "2022-10-07T21:50:05Z", "digest": "sha1:VXQBVJ65C5I5PR42JSVMDSAI25LSDADB", "length": 7086, "nlines": 79, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "केज मध्ये एकाच रात्रीत दोन धाडसी चोऱ्या - Rayatsakshi", "raw_content": "\nकेज मध्ये एकाच रात्रीत दोन धाडसी चोऱ्या\nकेज मध्ये एकाच रात्रीत दोन धाडसी चोऱ्या\nएक महिला गंभीर तर इतरांनाही मारहाण; नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांसमोर आव्हान\n, रयतसाक्षी: शहरांमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दोन ठिकाणी चोरांनी जबरी व धाडसी चोर्‍या केल्या असून केवळ रोख रक्कम व सोनेच चोरले नाही तर संबंधित लोकांना मोठ्याप्रमाणावर मारहाण केल्याचे चित्र पहावयास मिळाले.\nपहिल्या घटनेत केज शहरातील शिवाजीनगर भागातील भगवान जमाले यांच्या घरी रात्री दोनच्या दरम्यान लोखंडी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, श्री जमाले यांच्या पत्नी सरस्वती जमाले यांनी बाहेरील आवाज ऐकून दरवाजा उघडला असता त्यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण केली घरातील कपाटातील रोख रक्कम दागिने व इतर साहित्य घेउन पोबारा केला. सरस्वती जमाले यांच्या आरडाओरडा नंतर चोर अंधाराचा फायदा घेत पळून गेले.\nयानंतर चोर शिवाजीनगर भागापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडोबाचा माळ येथे गुंड वस्ती नावाच्या वस्तीवर गेले तेथे अशोक रामभाऊ गुंड यांच्या घराचा दरवाजा तोडून लोखंडी कपाटातील मंगळसूत्र, गंठण, झुंबर व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला\nश्रीमती सरस्वती जमाने या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी पाठवण्यात आले आहे तर श्री अशोक गुंड हे किरकोळ जखमी झाल्याचे समजते\nसदरील घटनेची माहिती मिळताच केज चे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत , सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष मिसळे यांनी घटनास्थळाला भेटी दिल्या व पुढील कार्यवाही करण्यासाठी सूचना करून चोरांचा माग काढण्यासाठी पोलिस पथके रवाना केले.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा\nनांदेड झेडपी कर्मचा-यांची सेवाजेष्ठता यादी तयार\nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७…\nवडवाडी दरोडा प्रकणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या\nआठ जणांना अटक:बनावट नोटा चलनात खपवू पाहणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश;…\nभंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/including-shakti-bill/", "date_download": "2022-10-07T22:30:17Z", "digest": "sha1:RBZ5N62LZM5BT53DH3KQ6S2ZBRRB2VTQ", "length": 7736, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "including Shakti Bill Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nहिवाळी अधिवेशन 2021 | शक्ती विधेयकासह अधिवेशनात 24 विधेयके मंजूर – उपमुख्यमंत्री पवार\nमुंबई (दि. 28) : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 24 विधेयके संमत करण्यात आली. यामध्ये ऐतिहासिक अशा शक्ती विधेयकाचा समावेश आहे, ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/increase-lockdown/", "date_download": "2022-10-07T22:27:25Z", "digest": "sha1:EZQGX24DRC77K5UIBYIAZNGZ72MBDHXD", "length": 7678, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "increase lockdown Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nतर पुन्हा लॉकडाउन वाढवावा लागणार नाही – अजित पवार\nमुंबई : करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि प्रसार रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा, ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/independent-agricultural-planning/", "date_download": "2022-10-07T23:14:38Z", "digest": "sha1:ZLWXSFPAJJBUXTOJU3NWZYCBMYLPT5OM", "length": 7661, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Independent Agricultural Planning Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nखारपाणपट्ट्यासाठी स्वतंत्र कृषी नियोजन – ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती - जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे 1 लाख 60 हजार 206 हेक्‍टर एवढे भौगोलिक क्षेत्र आहे. या क्षेत्राचे जमीन, सिंचनपद्धती व इतर ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.statusinmarathi.com/gudi-padwa-wishes-marathi-gudi-padwa/", "date_download": "2022-10-07T22:49:32Z", "digest": "sha1:2W2BH7JRNWAYRKKOM2QSOA7OH5VK7EK5", "length": 20434, "nlines": 299, "source_domain": "www.statusinmarathi.com", "title": "गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | gudi padwa wishes marathi | gudi padwa messages marathi | gudi padwa status marathi. - Status in Marathi", "raw_content": "\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\n⛳ गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / gudi padwa wishes marathi 2022.⛳\nगुढीपाडवा व नुतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.\nआनंदाचे तोरण लागो दारी\nसुंदर रांगोळी अवतरे अंगणी,\nआगामी वर्ष ही सदिच्छा..\nउभारून गुढी लावू विजय पताका\nसंस्कार संस्कृतीच्या विस्तारू शाखा\nनूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..\nउभारा गुढी आपल्या दारी\nसुख समृद्धी येवो घरी\nघेऊन येवो सुखाची लाट\nतुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना\nगुढीपाडवा व नुतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.\n⛳गुढीपाडवा स्टेटस मराठी २०२१/ gudi padwa status marathi.⛳\nवसंताची पहाट घेऊन आली,\nआपणांस व आपल्या परिवारास\n🚩हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🚩\n⛳गुढीपाडवा मेसेजेस मराठी / gudi messages marathi.⛳\nनव वर्ष जाओ छान..\nसुरु होत आहे नवीन वर्ष,\nमनात असू द्या नेहमी हर्ष..\nयेणारा नवीन दिवस करेल,\n🚩हिंदू नव वर्षाच्या आणि\nआतां उभारा रे गुढी\n🚩हिंदू नव वर्षाच्या आणि\nप्राप्तेsस्मिन संवस्सरे नित्यं मदगृहे मंगलं कुरू\nचैत्र शुध्द प्रतिपदा शालिवाहनशके\n1943 प्लवनाम संवस्सरे गुढीपाडवा.\nआपणांस आणि आपले कुटूंबियांस हे नुतन वर्ष सुखाचे/समृध्दीचे आणि भरभराटीचे जावो \n🚩 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछा🚩\nस्वातंत्रपूर्व काळातील उमेद जागु दे\nइंग्रजांच्या 31stला जरा लाजु दे,\nढोल ताशाचा गजर वाजू दे,\nआणि हिंदू नववर्षाचे स्वागत त्रिखंडात गाजू दे\nगुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या\nहे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,\nहीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..\nसमाधानाची आणि उत्तुंग यशाची,\n⛳गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी / gudi padwa sms marathi.⛳\nकरू सुरुवात नव वर्षाची..\nलाभो या शुभदिनी हिच\n🚩सर्वांना गुढी पाडवा व मराठी नूतन\nनक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,\nउभारुनी मराठी मनाची गुढी,\nसाजरा करूया हा गुढीपाडवा..\n🚩नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nसोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,\nसोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..\nसोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा\nकोकिळा गाई मंजुळ गाणी..\nनव वर्ष आज शुभ दिनी,\nसुख समृद्धी नांदो जीवनी..\nनूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nशिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी..\nकधी वळून पाहता आमची\nवेल गगनाला भिडू दे..\nआई भवानीच्या कृपेने तुमच्या\nजीवनात मनासारखे घडू दे..\nसर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..\nनवे नवे वर्ष आले,\nबेत मनीचे तसेच राहती,\nनव्या वर्षी नव्या भेटी,\nनव्या क्षणाशी नवी नाती,\nआशेची पालवी, सुखाचा मोहर,\nसमृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,\nशांत निवांत शिशिर सरला,\nसळसळता हिरवा वसंत आला,\nचैत्र “पाडवा” दारी आला…\n⛳गुढीपाडवा विनोदी शुभेच्छा मराठी / gudi padwa vinodi marathi.⛳\nतिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,\nपण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.\nहिंदू नव वर्षाच्या आणि\nनव्या स्वप्नांची नवी लाट,\nनवा आरंभ, नवा विश्वास,\nनव्या वर्षाची हीच तर\nगुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा\nउभारून आनंदाची गुढी दारी,\nजीवनात येवो रंगत न्यारी,\nपूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,\nनूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..\nनविन दिशा, खुप आशा,\nनविन सकाळ, सुंदर विचार,\nनविन आनंद, मन बेधुंद,\nआज सुरु होते, शुभ नविन वर्ष..\nनेसून साडी माळून गजरा\nही तर पारंपारिक रूढी,\nप्रफुल्लीत होवो तुमचे जीवन\nस्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..\nगुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा\nचला उभारू पुन्हा आता,\nपोचवू हा संदेश घरोघरी.\nदुःख सारे विसरुन जाऊ,\nसुख देवाच्या चरनी वाहू,\nस्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,\nनव्या नजरेने नव्याने पाहू..\nझाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी,\nपूर, दुष्काळ, वादळात सर्वस्व गमाविले…….\nथांबुवया हे सारे आपण,\nझाडे लावू, झाडे जगवू,\nपर्यावरणाच्या गुढीसंगे, करू नववर्षाचे स्वागत.\nशांत निवांत शिशिर सरला,\nसळसळता हिरवा वसंत आला,\nचैत्र “पाडवा” दारी आला..\nगुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा\nसुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष \nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nMahatma Jyotiba Phule Quotes in Marathi | महात्मा ज्योतिबा फुले जयंती शुभेच्छा | महात्मा ज्योतिबा फुले महान सुविचार 👌\nstatusinmarathi.com या वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठी माणसापर्यंत प्रेरणादायी कविता, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी कोट्स, प्रेरक विचार आणि वाढदिवस शुभेच्छा , मराठी स्टेटस पोचवण्याचा प्रयन्त करत आहोत. जेणे करून त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.👍\nकोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२२ | Kojagiri purnima wishes in marathi 2022,status,quotes, Messages,Images, greetings शेअर करून द्या कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा.\nकोजागरी पौर्णिमा माहिती,कथा,महत्त्व,पूजविधी मराठी | kojagiri purnima information in marathi 2022.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2018/07/blog-post_63.html", "date_download": "2022-10-07T22:13:19Z", "digest": "sha1:LCO2NRHT56XM6XU5ZFU6PTS6DNBJBVEQ", "length": 19748, "nlines": 228, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "मला मिळालेला परिपूर्ण धर्म- इस्लाम | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nमला मिळालेला परिपूर्ण धर्म- इस्लाम\n‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थ शांती असा होतो. पण ही शांती फक्त मर्यादित कुठल्याही एका व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी, किंवा घराण्यासाठी नाही तर संपूर्ण विश्वासाठी आहे. इस्लाम हा असा एकमेव धर्म आहे ज्यात अनेकेश्वरवादाला थारा नाही. जसे एक सुर्य, एक चंद्र, एक पृथ्वी तसेच एकच ईश्वर. इस्लाममध्ये जरी वेगवेगळ्या जाती, पंथ असल्या तरी सर्वांची शिकवण एकेश्वरवादाचीच आहे. ‘ला इलाह इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह’ म्हणजेच अल्लाह एक आहे व मुहम्मद सलअम् अल्लाहचे प्रेषित आहेत. हा इस्लामचा मुख्य पाया आहे.\nमनुष्य त्याची दैनंदिन जीवनशैली जगत असताना एका विशिष्ट चौकटीत जगत असतो. प्रत्येक गोष्टीत, कामात तो काही नियमांचे पालन करत असतो.\nत्याचप्रमाणे ज्याने मानवाला या सृष्टीला निर्माण केले त्या विधात्याने मनुष्याला एक जगण्याची कला शिकवली. काही नियम त्याच्या भल्या साठी लागू केले. त्या इस्लामी नियमानुसार जर मनुष्य जगत असेल तर खरोखरच त्याचे जीवन आनंदमयी व सुखकारक ठरेल. इस्लाम अत्यंत सोपा, सर्वांना पटेल, रूचेल आणि जीवनात आनंद आणणारा धर्म आहे. इस्लामची इमारत मूळ पाच स्तंभांवर आधारलेली आहे. हे स्तंभ म्हणजे एकेश्वरवाद, नमाज, रोजा, जकात आणि हज. या पाच स्तंभांपैकी एक जरी स्तंभ मनुष्याच्या आयुष्यातून ढासळत असेल तर त्या व्यक्तीचा धर्म अधुराच म्हणाव लागेल.\n‘तौहीद’ म्हणजे एकेश्वरवाद. फक्त एकच ईश्वराचा स्वीकार करणे. अल्लाहशिवाय कोणीही ईश्वर नाही व कोणीही पुजनीय नाही या गोष्टीवर मनपूर्वक श्रद्धा ठेवने यालाच तौहीद म्हणतात.\nदुसरा इस्लामी स्तंभ आहे ‘नमाज’. इस्लामचे शेवटचे पैगंबर मुहम्मद (स.) यांना नमाज अल्लाहकडून भेट म्हणुन मिळालेली आहे व प्रत्येक मुस्लिम व्यक्तीसाठी नमाज अनिवार्य आहे. आनंदाची बाब म्हणजे प्रत्येक मुस्लिम व्यक्ती आपल्या जीवनात नमाजला अनन्य साधारण महत्त्व देतो.\nतिसरे इस्लामी कर्तव्य आहे ‘रोजा’. रोजा म्हणजे उपवास. हा रोजा मनुष्याला त्यागाची शिकवण देतो. एक रोजेदार दिवसभर स्वत:ची तहान भूक विसरून पूर्णपणे स्वत:ला अल्लाहच्या स्वाधीन करतो. रमजान हा असा महिना आहे जो आपल्याला वारंवार अल्लाहविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाग पाडतो. असा हा मंगलमय महिना.\n‘जकात’ म्हणजे दान. समाजातील सक्षम लोकांना इस्लाम गरीब व गरजू लोकांना दान देण्याचा आदेश देतो. कोणीही व्यक्ती भुकेला, तहानलेला किंवा निर्वस्त्र राहू नये, निदान त्याच्या प्राथमिक गरजा तरी लाभाव्यात यासाठी जकात दिली जाते आणि गरजूच्या आयुष्यात एक छोटासा आनंदाचा क्षण देण्याचा प्रयत्न केला जातो.\nशेवटचे इस्लामी कर्तव्य आहे ‘हज’. पण जर कोणाची आर्थिक स्थिती नसेल हज करण्याची तर हज माफ आहे.. इस्लाम हा खूप सोपा धर्म आहे.. तुम्ही तुमच्या जन्मदात्या आईकडे पाहून स्मितहास्य केले तरी हजचे पुण्य पदरात पडले...\nएकंदरीत तथाकथित थोतांड बातम्यावरुन इस्लाम आणि मुसलमान यांची प्रतिमा मलीन झाली आहे. दुसऱ्या समाजांसमोर इस्लामचे चित्र खूप वाईट रितीने मांडले जात आहे. पण इस्लामचा व्यवस्थितपणे अभ्यास केल्यास लक्षात येते की इस्लाम हा तलवारीच्या जोरावर नव्हे तर सत्य व शांतीच्या जोरावर पसरला आहे. पैगंबर मुहम्मद सलअम् यांनी आयुष्यभर संपूर्ण मानवजातीला शांतीचा संदेश दिला. समाजात बंधुभाव टिकून राहण्यासाठी अतोनात यातना सहन केल्या. शेवटी असे म्हणावे वाटते,\n‘‘असे प्रेषित होउन गेले\nसमभावाची शिकवण देऊन गेले\nमानवजातीसाठी सर्व जीवन समर्पित केले\nमानवांवर कृपा : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमला मिळालेला परिपूर्ण धर्म- इस्लाम\nपेटवायची हौस असेल तर गरिबांच्या चुली पेटवा\n‘गुजरात फाईल्स’ कृष्णकृत्यांचा रहस्यभेद\nतंटामुक्ती स्वीकार्य तर शरई पंचायत का नाही\n२७ जुलै ते ०२ ऑगस्ट २०१८\nऔरंगजेबाचे कृषी धोरण विषयक फर्मान : भाग २\nपुण्यामध्ये समविचारी पुरोगामी संघटनांची “अघोषित आण...\nअनेक लोक निरूद्देश जीवन जगत आहेत\nअफवांचे आभाळ भाकरीचा चंद्र\nभ्रष्टाचार दबू शकतो पाणी कसे दबणार\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये कोण-को...\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणत...\nशिक्षणाची पद्धत : पेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nअस्तित्वहीन ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स’\n२० जुलै ते २६ जुलै २०१८\nनामोस्मरण , याचना आणि उपासना\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसमस्त मानवकल्याणाची चिंता करावी लागेल\nऔरंगजेबाचे कृषी धोरणविषयक दोन फर्मान\nखरंच मुसलमान संविधान मानत नाहीत का\nधर्म आणि दहशतवादाचा काही संबंध नाही\nनिकले किसी के गम में ....\n१३ जुलै ते १९ जुलै २०१८\nआणखी एक टंचाई - तांबे\nहिरे बाजारात घुसलेली लबाडी\nनामोस्मरण आणि याचना : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nचर्चने मोदी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आ...\nप्रलंबित कोर्ट केस खटल्यांची शोकांतिका\nतुर्कीचे तीन वेळेस पंतप्रधान, दुसर्‍यांदा राष्ट्रप...\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणत...\nईश्‍वर आपल्याला जाब विचारेल याची जाणीव लोप पावत आह...\nआपल्या देशात मुल्याधिष्ठीत शिक्षणाची गरज : डॉ. पार...\n०६ ते १२ जुलै २०१८\n२९ जून ते ०५ जुलै २०१८\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2019/09/blog-post_75.html", "date_download": "2022-10-07T23:15:27Z", "digest": "sha1:DXI3NQF573XAN2RL5NFTUSE7RNWMARXM", "length": 21899, "nlines": 222, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "हीच का मनधरणी | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nभारतीय मुसलमानांध्ये केल्या गेलेल्या सर्व्हेक्षणामध्ये निष्कर्ष हे दर्शवितात की वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी विविध आयोगाद्वारे दिल्या गेलेल्या सल्ला मसलतीवर एक तर कमी लक्ष दिले किंवा त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि त्यांनी या आयोगांना केवळ मते प्राप्त करण्याचा डाव म्हणून वापरले, जेणेकरून त्यांच्याद्वारे मुसलमानांना हा आभास देता यावा की ते मुसलमानांच्या मागासलेपणाबाबत किती गंभीर आहेत़ परंतु, खरे पाहता ते काहीच करत नाहीत़\nसर्व्हेक्षण दर्शविते की भारतीय मुसलमानांची आर्थिक अवस्था खरोखर दयनीय आहे़ अहवाल देणार्‍यांपैकी 30.4 टक्के लोकांनी आपले घरगुती उत्पन्न 10,000 पेक्षा कमी असल्याचे सांगितले, 24.4 टक्के लोकांनी 10001 ते 20,000 पर्यंत सांगितले़ 7.5 टक्के लोकांनी 20,001 ते 30,000 पर्यंत सांगितले, 3.8 टक्के लोक 30,001 ते 40,000 पर्यंतच्या उत्पन्न गटातील होते़ 1 टक्का लोक 40001 ते 50,000 पर्यंत आणि 5.6 टक्के लोक 50,000 हून अधिक उत्पन्न असलेले होते़ मुसलमानांची 27.6 टक्के लोकसंख्या झुग्गी-झोपड्यांमध्ये राहते आणि 46.1 टक्के लोक एक खोलीच्या घरांमध्ये राहतात़\nजर भारतीय मुसलमानांची वेगवेगळ्या शासनकर्त्यांनी मनधरणी केली आहे, त्यांचे सांत्वन - समाधान केले आहे तर मग त्यांची आर्थिक अवस्था इतकी दयनीय आहे याचे उत्तर हेच की त्यांचा अनुनय केला गेला नाही किंबहुना त्यांच्याविषयी असा प्रचार केला जातो़ आपला स्वार्थ साधणार्‍या लोकांची आपली गुप्त उद्दिष्टें आहेत़\nवोट बँकेचे राजकारण, भारतीय राजनीतित आढळून येणार्‍या उद्दिष्टांमधील मुख्य खलनायक आहे़ जेव्हा रिजर्वेशनच्या संदर्भात मंडल आयोगाच्या शिफारशींना लागू केले गेले, तेव्हा त्याचा हेतू हिंदूच्या मागासलेल्या जाती-जमातींना लाभ पोहोचविणे हा होता़ मुसलमानांना लाभ पोहोचविणे नव्हता़ मुसलमानांना मंडल आयोगाचे काहीच लाभले नाही़ त्याद्वारे फक्त हिंदूच्या मागास वर्गीयांचा अनुनय केला गेला़ उत्तर भारतातील 20 टक्के लोकसंख्या सवर्ण हिंदूंची आहे़ मंडल आयोगाने त्यांच्या हिताला हानी पोहोचली़ त्याच लोकांनी मंडल आयोगाच्या शिफारसी आणि आपल्याच धर्माच्या कनिष्ठ वर्गाविरूद्ध हिंसक प्रदर्शने केलीत़\nभारतातील मुस्लिम अल्पसंख्यांकांच्या स्थितीविषयी राजेंद्र सच्चर कमेटीचा जो अहवाल सादर केला गेला आहे़ त्यामधील भारतीय मुसलमानांची आकडेवारी आणि राष्ट्रीय अध्ययन अहवाल कोणालाही रागात आणू शकतो़ विशेषत: मुस्लिम अल्पसंख्यांकांची आजची सामाजिक आणि आर्थिक अवस्था ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार बरीच खाली गेली आहे़ नोकर्‍यांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व नगण्य आहे़ म्हणून त्यांच्यापैकी अधिकांश लोक दारिद्र रेषेहून खालच्या स्तराचे जीवन जगत आहेत आणि त्यातले अधिकांश निरक्षर आहेत़ ही आकडेवारी कोणाच्याही मनात शंका सोडत नाही की गंभीरतापूर्वक सकारात्मक कारवायींविना हा समुदाय सतत जास्तीत जास्त वंचित होत राहील़ .मुस्लिमांचे राजकीय प्रतिनिधीत्व मोठ्या वेगाने कमी होत चालले आहे़ सुरक्षेचा अभाव आणि समानतेच्या कमतरतेमुळे त्यांना धोका जाणवतो आणि ते प्रामुख्याने अल्पसंख्यांक ओळखीवर अवलंबित राहतात़ जातीय दंगलीनंतर निर्माण झालेल्या समस्या आणि मुस्लिमांद्वारे वेगळ्या वस्त्या उभारण्याच्या स्थितीने जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, कारण मुसलमानांचे वेगळ्या वस्तीतला जीवनस्तर खालावला जातो आणि भयपूर्ण मानसिकता निर्माण होते़ ज्यामुळे रूढीवादी विचारसरणीचा विकास होतो आणि दोन्ही समुदायांमध्ये भावनात्मक अडसर उभे राहतात़ प्रशासनात असलेल्या अधिकार्‍यांचा अल्पसंख्यांकाबद्दलचा दृष्टीकोन हळूहळू सावत्र नागरिकांसारखा होत चालला आहे़, जो त्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनविण्याचा मार्ग मोकळा करीत आहे़ हळूहळू दोन प्रकारचे परिमाण आणि वर्तन मूळ धरत चालले आहेत़ एक वागणूक बहुसंख्यांक समुदायाच्या सुखवस्तू आणि सामर्थ्यशाली लोकांबद्दल आहे आणि दुसर्‍या प्रकारची वागणूक अल्पसंख्यांक वर्गाबद्दलची आहे़ जातीयवादी शक्तीचे अल्पसंख्यांकांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनविण्याचे ध्येय-उद्दीष्ट साकार व्हायला सुरूवात झाली आहे़\nआज भारतात गरज या गोष्टीची आहे की, ”मुसलमानांचा अनुनय” सारखी बेजबाबदार विधाने वापरली जाऊ नयेत जेणेकरून हा जनसमूह प्रगतीपथावर पुढे जाऊ शकावा, राष्ट्रीय मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकावा आणि मुख्य प्रवाहाशी संलग्न असलेल्या अन्य जाती समुहांसोबत शांती आणि सद्भावपूर्वक राहू शकेल़\n- सय्यद हामीद मोहसीन\nसत्याची साक्ष - भाग-6\nमानवतेच्या कल्याणास्तव जमाअतचे प्रशिक्षण शिबीर\nडोळ्यात खुपणार्‍या कोणत्याही राज्याची भविष्यात हीच...\nशरद पवारांच्या सक्रीयतेने राज्यात भाकरी फिरणार\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nउत्सव आनंदाचा साजरा करायचा असतो विध्वंसाचा नव्हे \nहैदराबाद मुक्तीचा दुर्लक्षित इतिहास\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nशहादत-ए-हुसैन दु:खाचे नव्हे तर प्रेरणेचे स्त्रोत आहेत\nपूरग्रस्तांसाठी पाठविली 40 हजारांची औषधे\nआपल्या अस्तित्वाला उपयोगी सिद्ध करा\nकाश्मीर : स्वर्गाचा घात आणि फाळणीच्या नरकाचा ध्यास\nमहापूर ओसरला; अडचणी कायम\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०१९\nभाग्यावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशापुढे आर्थिक मंदीचे आव्हान\nमुस्लिम समाजाविषयीचा अहवाल आणि पोलिसांची मानसिकता\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nडिजिटल लोकशाही बदलते आयाम\nमहानगरी स्त्रियांना येणारे जातिभेदाचे अनुभव\nसत्याची साक्ष - भाग-5\nएकमेकांना भेटण्याचे इस्लामी शिष्टाचार\nएनआरसी : डोंगर पोखरून निघाला उंदीर\nद्वेषाने गाठला परमोच्च बिंदू\nजमीयत उलेमा ए हिंदतर्फे मुस्लिम बोर्डिंग येथे पूरग...\nसावित्रीबाई फुले रुग्णालयाला औषधांचा साठा प्रदान\nआजची युवापिढी व्यसनाच्या आहारी\nपवित्र कुरआनवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nविकासासाठी शाश्वत उपायांची गरज\nभारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पोहोचवलाय काय\nश्रद्धा - अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकेाण\nकाश्मीर : आयएएस अधिकार्‍याचा राजीनामा\n०६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/bhel-recruitment-2022-75-vacancies/", "date_download": "2022-10-07T22:58:08Z", "digest": "sha1:DUXR4FSQFLAKVK2MJXHDMO4BOQN462FE", "length": 7730, "nlines": 122, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नागपूर येथे 75 जागांसाठी भरती - Bharti jahirat", "raw_content": "\nBHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नागपूर येथे 75 जागांसाठी भरती\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नागपूर येथे वेल्डर पदाच्या एकूण 75 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 01 फेब्रुवारी 2022 ते 14 फेब्रुवारी 2022 दरम्यान अर्ज सादर करू शकता. व ऑनलाईन अर्जाची छापील प्रत पोस्टाद्वारे पाठविण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2022 आहे.\nपरीक्षेचे नाव / Exam Name : –\nपदाचे नाव व तपशील / Post Details\nपद क्रमांक पदाचे नाव पद संख्या\nपदाचे नाव शैक्षणिक पात्रता\nवयाची अट / Age Limit : 22 जानेवारी 2022 रोजी 34 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपरीक्षा शुल्क / Exam Fee\nइतर मागासवर्गीय / OBC 200/-\nअनुसूचित जमाती / Schedule Tribe फी नाही\nअनुसूचित जाती / Schedule Caste फी नाही\nमहिला / Women सामाजिक आरक्षण नुसार\nमाजी सैनिक / Ex- Servicemen फी नाही\nमहत्वाच्या तारखा / Important Dates\nअर्ज सुरु होण्याची तारीख /\nअर्ज करण्याची शेवटची तारीख /\nअर्जाची छापील प्रत पोस्टाद्वारे पाठविण्याची तारीख\nअधिकृत संकेतस्थळ बघा | Official Website\nऑनलाईन अर्ज करा | Apply Online\nहेल्पलाईन माहिती / Helpline Details :\nसंपर्क क्रमांक / Helpline No :\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMPSC Group C Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC Subordinate Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022\nAir Force Agnipath Recruitment 2022 | भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022\nMPSC State Service Pre 2022 | महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 161 जागा\nMPSC Recruitment | पशुधन विकास अधिकारी पदाच्या 212 जागांसाठी भरती\nIndian Army Recruitment | भारतीय सेना भारती 90 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur/maharashtra-political-news-western-maharashtra-in-cabinet-expansion-kolhapur-gets-no-minister-four-mlas-frown/articleshow/93458671.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2022-10-07T22:58:54Z", "digest": "sha1:F4O633UIDQN3I5MM2UGDMQUX37ZNEHSW", "length": 15584, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nटांगा पल्टी, मंत्रिपदं फरार, सांगली-साताऱ्याला विस्तारात संधी, कोल्हापूरच्या पदरी निराशा\nCabinet Expansion : तब्बल चाळीस दिवसानंतर मंगळवारी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यामध्ये १८ मंत्र्यांचा शपथविधी झाला. यामध्ये मुळचे कोल्हापूरचे पण कोथरूड मधून निवडून आलेले चंद्रकांत पाटील, सांगलीचे सुरेश खाडे आणि सातारा जिल्ह्यातील शंभूराज देसाई यांचा समावेश आहे\nबहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त\n१८ मंत्र्यांचा शपथविधी, प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न\nकोल्हापूर जिल्ह्यातील चार आमदारांच्या नशिबी पुन्हा प्रतिक्षाच\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : शपथविधीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चार आमदारांच्या नशिबी पुन्हा प्रतिक्षाच आली आहे. शेजारच्या सांगली आणि सातारा जिल्ह्याला पहिल्या टप्प्यातच संधी मिळाली असताना कोल्हापूरच्या पदरात निराशा पडली आहे. यामुळे मात्र आमदार विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आवाडे आणि प्रकाश आबिटकर यांच्यात आता दुसऱ्या टप्यात कुणाला संधी मिळणार याचीच उत्सुकता लागली आहे. मुळचे कोल्हापूरचे असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रिपदावरच आता समाधान मानावे लागणार आहे.\nतब्बल चाळीस दिवसानंतर मंगळवारी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यामध्ये १८ मंत्र्यांचा शपथविधी झाला. यामध्ये मुळचे कोल्हापूरचे पण कोथरूड मधून निवडून आलेले चंद्रकांत पाटील, सांगलीचे सुरेश खाडे आणि सातारा जिल्ह्यातील शंभूराज देसाई यांचा समावेश आहे. शिरोळचे आमदार राजेंद्र यड्रावकर यांना संधी मिळेल अशी शक्यता होती, पण तसे झाले नाही. अपक्षांना संधी न देण्याचा निर्णय न झाल्याने तूर्त तरी त्यांचा पत्ता कट झाला. या विस्तारात पुन्हा एकदा कोल्हापूरवर अन्याय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण शेजारच्या दोन्ही जिल्ह्यांना प्रतिनिधीत्व देताना कोल्हापूरला मात्र वगळण्यात आले आहे.\nहेही वाचा : VIDEO : आजोबा मंत्री झाले, काय गिफ्ट देणार नातीला विचारणा, गुलाबरावांची नात म्हणते...\nशिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन खासदार आणि दोन आमदार त्यांच्यासोबत गेले. यड्रावकर मंत्रीपद सोडून गेले होते. अबिटकर मंत्रीपदासाठी त्यांच्या सोबत गेले होते. त्यामुळे त्याचे बक्षीस त्यांना मिळेल असे वाटत होते. अडीच वर्षापूर्वी अपक्ष म्हणून निवडून आलेले आवाडे भाजपसोबत गेले. कोरे यांनी भाजपची सत्ता गेली तरी त्यांची साथ सोडली नाही. यामुळे त्याचे बक्षीस या दोघांपैकी कुणाला तरी मिळेल अशी शक्यता होती. पण तसेही झाले नाही. यामुळे मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या या चौघांच्या पदरी तुर्त तरी निराशा आली आहे.\nहेही वाचा : सत्तारांकडे अल्पसंख्याक, चंद्रकांतदादांना सार्वजनिक बांधकाम शिंदे सरकारचे संभाव्य खातेवाटप\nचौथ्यांदा आमदार झालेले मिरजेचे खाडे यांना मोठी संधी मिळाली आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील शंभूराज देसाईंची अपेक्षेप्रमाणे वर्णी लागली आहे. यामुळे या दोन जिल्ह्यात समाधानाचे वातावरण आहे. तरीही अनिल बाबर, गोपीचंद पडळकर, शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रीपदाची प्रतिक्षा आहे. दक्षिण महाराष्ट्रातील आणखी काहींना दुसऱ्या टप्प्यात मंत्रीपद निश्चितच मिळणार आहे. पण त्यासाठी किती काळ प्रतिक्षा करावी लागणार हे सध्या तरी सांगता येत नाही. दुसऱ्या टप्यात यड्रावकर, पडळकर यांची नावे मात्र निश्चित मानली जात आहेत.\nहेही वाचा : शेलारांचं नाव भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत, पण फडणवीसांच्या मनात वेगळीच जबाबदारी\nमहत्वाचे लेखKolhapur Flood News : कोल्हापुरला पुन्हा पुराचा धोका; राधानगरीचे दरवाजे उघडणार, पंचगंगा नदी पात्राबाहेर, वाचा अपडेट्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nपुणे सरकार बदललं अन् रश्मी शुक्लांना क्लीनचिट मिळाली, मविआ नेत्यांना जी भीती होती तेच घडलं\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nदेश ​देश हादरला... लग्न करण्यास नकार दिला, त्याने १९ वर्षीय मारुतीला पेट्रोल ओतून पेटवलं...​\nक्रिकेट न्यूज उभारायला गेले MS Dhoni चा मेणाचा पुतळा, पण धोनीची झाली अनहोनी, पाहा भन्नाट memes\nमुंबई धाकधूक वाढली, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या हालचाली\nदेश काँग्रेस नेत्यानं हॉटेलमध्ये नेलं, मग सामूहिक अत्याचार केले, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर तिघांना अटक\nमुंबई शकील, छोटा राजनला माझी सुपारी दिली; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप\nमुंबई ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा ते दिघेंच्या मृत्यूचं ठाकरे कनेक्शन, मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज\nपुणे ब्रेकअपच्या रागातून गर्लफ्रेंडच्या घरात २७ तोळे सोन्याची चोरी, पुण्यातील घटनेनं खळबळ\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.insidemarathibooks.in/index.php/2020/03/26/genius-marathi-book-review/", "date_download": "2022-10-07T22:16:05Z", "digest": "sha1:MHGQLSHN3TFKFFLX5NC5C6NTQKAUYDJL", "length": 16214, "nlines": 180, "source_domain": "www.insidemarathibooks.in", "title": "जिनियस : जग बदलणारे अणुविज्ञान - Inside Marathi Books", "raw_content": "\n|| माझिया मराठीची बोलू किती कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके ||\nजिनियस : जग बदलणारे अणुविज्ञान\nby ईनसाईड मराठी बुक्स\nलेखक -अच्युत गोडबोले, दीपा देशमुख\nसमीक्षक – अभिषेक गोडबोले\nप्रकाशन – मनोविकास प्रकाशन\nमुल्यांकन – ४.८ | ५\nअच्युत गोडबोलेंच मुसाफिर हे पुस्तकं वाचलं आणि ते इतकं आवडलं कि त्यानंतर कधीही पुस्तक प्रदर्शनात किंवा पुस्तकाच्या दुकानात गेलो कि ज्यावर त्यांचं नाव असेल ते पुस्तक घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी जी पुस्तकं घेतली त्यावेळीच हि जग बदलणाऱ्या जिनियस व्यक्तिमत्वांची रंजक,प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य मांडणारी अच्युत गोडबोले आणि त्यांच्या सहलेखिका दीपा देशमुख यांनी लिहिलेली ‘जिनियस’ हि सिरीज हाती लागली.\nअच्युत गोडबोलेंच्या लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणजे एखादा अवघड विषय सोप्या भाषेत समजावून सांगायची त्यांची हातोटी.त्यांचं कुठल्याही विषयावरचं पुस्तक म्हणजे ते आपल्याला शेजारी बसवून एकेक गोष्ट उलगडून सांगताहेत असं वाटावं इतकं सोपं ते लिहितात आणि त्यामुळं विज्ञान असेल, अर्थकारण असेल, हिंदुस्थानी आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीत असेल इथंपासून ते मानसशास्त्रावरची त्यांची पुस्तकं असतील अशी कुठल्याही विषयावरची त्यांची पुस्तकं आपल्याला त्या विषयाची गोडी लावल्याशिवाय राहत नाहीत.\nशाळेत असताना ज्या सरांचं किंवा मॅडमचं शिकवणं मला आवडायचं तो विषय मला आवडायचा आणि यात विज्ञान कधीच आलं नाही त्यामुळं तो विषय मला जास्त जवळचा कधी वाटला नाही पण हि पुस्तकं वाचताना आपण किती रंजक गोष्टींपासून एवढी वर्ष विनाकारण लांब होतो हे लक्षात आलं.\nसिरीजमधलं हे पुस्तकं आहे लीझ माइट्नर या ऑस्ट्रियामध्ये जन्मलेल्या आणि आपलं बरंचसं महत्वाचं कार्य जर्मनीमध्ये पार पाडणाऱ्या एका महान आणि तरीही एका अर्थानं उपेक्षित राहिलेल्या महिला शास्त्रज्ञावरचं “माझं काम हीच माझी ओळख आणि तेच माझं चरित्र” या लीझच्या वाक्यापासून सुरु होणारा या पुस्तकाचा प्रवास आपल्याला एका रोमांचकारी अनुभव देऊन जातो. या लेखकांच्या जोडीने लीझचं संपूर्ण आयुष्य मांडलेलंच आहे पण विशेष म्हणजे लीझनं भौतिकशात्रात केलेलं काम खूप सोप्या शब्दात सांगितलेल आहे.\nकुठल्याही व्यक्तीचं आयुष्य समजून घ्यायचं असेल तर त्या वेळची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती समजून घेणं गरजेचं असतं. लीझच्या आयुष्यावर परिणाम करणारी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धावेळी उध्दभवलेली दुर्दैवी परिस्थिती, हिटलरची मनमानी, तिनं स्वतः प्रोटेस्टंट धर्म स्वीकारलेला असूनही तिचे पूर्वज ज्यू असल्यामुळे तिला करावं लागलेलं स्थलांतर, तिचे आणि ऑटो हान या शास्त्रज्ञाचे अनेक चढउतार पाहिलेले निखळ मैत्रीपूर्ण संबंध, तिचे समकालीन आणि विज्ञान क्षेत्रात काम करणारे अर्नेस्ट रुदरफोर्ड, जेम्स फ्रॅंक, मॅक्स प्लॅन्क यांच्यासारखे शास्त्रज्ञ आणि त्यांचं आयुष्य यांची लीलया गुंफण यात केलेली आहे.\nलीझ माइट्नर हि ऑस्ट्रियाची. तिची शिकायची इच्छा असूनही कायद्याच्या धाकामुळे चौदाव्या वर्षी तिला शिक्षण सोडून घरी बसावं लागलं. वयाच्या तेविसाव्या वर्षी स्त्री-पुरुष समानतेचे वारे वाहायला लागल्यावर लीझनं विद्यापीठाची परीक्षा दिली आणि भौतिकशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. किरणोस्तर्ग आणि अणुगर्भ विज्ञान यात तिनं मूलभूत संशोधन केलं. तिला जेव्हा संशोधनातल्या कामगिरीसाठी पदक मिळालं तेव्हा ती केवळ एक स्त्री आहे म्हणून तिला पदक नं देता तिनं पदकाची प्रतिकृती स्वीकारावी असं सुचवण्यात आलं परंतु स्वाभिमानी लिट्झनं त्याला नकार दिला. तब्बल पंधरावेळा नामांकन मिळूनही केवळ स्त्री असल्याकारणाने तिला नोबेल पारितोषिक दिलं गेलं नाही.\nअच्युत गोडबोलेंच लिखाण त्यांच्या अनेकवर्षांच्या वाचनानं,त्यांच्या विविध क्षेत्रातील तज्ञांसोबत केलेल्या कामातून आलेल्या अनुभवानं समृद्ध असंच असतं. याही पुस्तकात त्यांनी आणि दीपा देशमुखांनी बरीच मेहनत घेत हे चरित्र मांडताना अनेकविध पुस्तकांचा संदर्भ घेतलेला आहे त्यामुळं ते वाचताना कमी वेळात खूप जास्त ज्ञान मिळवल्याचं. समाधान मिळतं.लीझचं आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेलं होतं आणि तिला कायम ती करत असलेल्या कामाचं श्रेय देण्यापासून अव्हेरलं गेलं. तिच्या आयुष्यात आलेले असे कठीण प्रसंग पुस्तकात जागोजागी आढळतात आणि त्या प्रसंगांच्या उत्तम मांडणीमुळे ते लक्षातही राहतात. लीझ माइट्नर आपल्याला या पुस्तकातून एक खंबीर व्यक्तिमत्व म्हणून भेटते.\nविज्ञानासारख्या तांत्रिक विषयात योगदान दिलेल्या एखाद्या व्यक्तीचं चरित्र कदाचित एखाद्या टेक्स्ट बुकसारखं झालं असतं पण विज्ञानामधील अणुरेणू, रेडिओऍक्टिव्हिटी, किरणोत्सर्ग आणि अणुगर्भविज्ञान यांसारख्या संकल्पनाही सोप्या भाषेत सांगून लीझचं काम किती अवघड आणि मोठं होतं किंवा आहे याची जाणीव लेखक जोडीने या पुस्तकातून आपल्याला करून दिलेली आहे. हे पुस्तक विज्ञानात रस असणाऱ्यांना तर नक्कीच आवडेल पण जे माझ्यासारखे आहेत ज्यांना विज्ञानाची अगदीच बेसिक माहिती आहे त्यांना हे पुस्तक विज्ञानावरची अशीच अनेक पुस्तकं हुडकून वाचायला लावेल यात शंका नाही\nसमीक्षक – अभिषेक गोडबोले\nऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:\nमराठी पुस्तकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा\nछत्रपती संभाजी – एक चिकित्सा\nसोशल नेटवर्कवर आमच्याशी कनेक्टेड राहा.\nवेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/the-murder-of-a-brother-by-a-famous-actress-because-extremely-shocking-reason/", "date_download": "2022-10-07T22:44:39Z", "digest": "sha1:L3M5VJMHISI2BZ72G225I7REAXZTNTRL", "length": 10185, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "प्रसिद्ध अभिनेत्रीने केली भावाची हत्या, कारण अत्यंत धक्कायदायक", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nप्रसिद्ध अभिनेत्रीने केली भावाची हत्या, कारण अत्यंत धक्कायदायक\nप्रसिद्ध अभिनेत्रीने केली भावाची हत्या, कारण अत्यंत धक्कायदायक\nबंगळुरू | आपल्याच भावाचा खून केल्याप्रकरणी प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीला धारवाड पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमाला विरोध केल्याने ही हत्या केली असल्याचं प्राथमिकरित्या स्पष्ट होत आहे. या अभिनेत्रीचे नाव शनाया काटवे असं असून तिने आपला सख्खा भाऊ राकेश काटवे याचा खून केल्याचं उघड झालं आहे.\n2018 मध्ये ‘इडम प्रेमम जीवनम्’ या कन्नड चित्रपटात काम करून प्रकाशझोतात आलेली कन्नड अभिनेत्री शनाया काटवे हीचे नियाज अहमद कटिगार या युवकाशी प्रेमसंबंध होते. शनायाचा भाऊ राकेश यानी या प्रेमसंबंधाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे प्रेमात आडव्या येणाऱ्या स्वतःच्याच भावाला तिने आपल्या प्रियकरासोबत मिळवून संपवलं.\nराकेशच्या मृतदेहाचे तुकडे हुबळी येथील गाडग रोड परिसरात आढळून आल्याने एकच खळबळ माजली. देवरगुडीहल वनपरिक्षेत्रात त्याचं डोकं आढळलं असून हुबळी येथे त्याच्या शरीराचे इतर भाग आढळून आले. त्यानंतर, धारवाड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार संशयितांना अटक केली आहे.\nपोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये नियाज अहमद कटिगार, तौसिफ चन्नापुर, अल्ताफ मुल्ला आणि अमन गिरणीवाले यांचा समावेश आहे. दरम्यान, शनाया आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना राकेशची हुबळी येथील त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली आणि त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आले. या प्रकरणात आता शनाया काटवेसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना पोलिसांनी अटकही केली आहे.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\nगृह विलगीकरणात असलेल्यांनी कोरोना चाचणी करावी की नाही; केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर\n गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने गाठला नवा उच्चांक\nखोट्या कारणाने ई-पास बनवणाऱ्यांनो सावधान; पुणे पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई\nकोरोना ओसरण्यास महाराष्ट्रातूनच सुरुवात होणार; तज्ज्ञांनी नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण\nभारतात असणाऱ्या अमेरिकन नागरिकांना जो बायडेन यांचा अलर्ट; तात्काळ मायदेशी परतण्याच्या सूचना\nरेमेडेसिविर इंजेक्शनचे दुष्परिणाम उघड; ‘या’ जिल्ह्यात इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश\n टिव्ही पाहायला गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर तरुणाने केला बलात्कार\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://ganeshwatch.co.in/70-foot-tower-clock-constructed-in-golf-club-at-nashik/", "date_download": "2022-10-07T21:43:22Z", "digest": "sha1:ETY2NXUVLUPASO3TY7UKFEW7I6WEDZWN", "length": 8334, "nlines": 118, "source_domain": "ganeshwatch.co.in", "title": "गोल्फ क्लबच्या वैभवात 'टॉवर क्लॉक'ने भर! - Ganesh Watch Co", "raw_content": "\nगोल्फ क्लबच्या वैभवात ‘टॉवर क्लॉक’ने भर\nगोल्फ क्लबच्या वैभवात ‘टॉवर क्लॉक’ने भर\nघड्याळाच्या काट्यानुसार वेळेचे नियोजन करणे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. अगदी मैदानांवरदेखील वेळेचा मेळ साधणे अपरिहार्य ठरत आहे.\nघड्याळाच्या काट्यानुसार वेळेचे नियोजन करणे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. अगदी मैदानांवरदेखील वेळेचा मेळ साधणे अपरिहार्य ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गोल्फ क्लबवर ७० फुटांचे ‘टॉवर क्लॉक‘ उभारण्यात आले असून, त्यामुळे क्रीडाप्रेमींची सोय होण्यासह गोल्फ क्लबच्या वैभवातही भर पडली आहे.\nमहापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत नाशिकच्या गणेश वॉच कंपनीने हे टॉवर क्लॉक उभारले आहे. व्यायाम, खेळ, विविध प्रदर्शने अशा विविध कारणांसाठी गोल्फ क्लब परिसरात कायमच वर्दळ दिसून येते. या भागात येणाऱ्या सर्वांनाच आता स्वतःकडे घड्याळ नसले, तरी वेळ जाणून घेण्यासाठी टॉवर क्लॉकची मदत होणार आहे. गणेश वॉच कंपनीचे संचालक विजय खडके आणि त्यांचे पुत्र अमोल यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्निशिअन राहुल चौधरी यांनी हे घड्याळ बसविले आहे. सहा फूट व्यासाचे असे चारही दिशेला एकाच मशिनवर चालणारी चार घड्याळे यात बसविण्यात आली आहेत.\nअंधारातही समजणार दुरून वेळ\nक्वार्टज टेक्नालॉजीचे हे घड्याळ इलेक्ट्रिक सप्लाय व बॅटरी बॅकअपवर चालणार आहे. या घड्याळाच्या डायलमागे बॅकलाइट असल्याने रात्रीच्या अंधारात घड्याळ दुरूनही स्पष्ट दिसू शकणार आहे. जमिनीपासून ७० फूट उंचीवर हे घड्याळ असून, पुढील तीन वर्षे गणेश वॉच कंपनी देखभाल करणार आहे. टॉवर क्लॉकला बाहेरून काच नसते. मात्र, सर्व प्रकारच्या वातावरणात हे घड्याळ तग धरू करू शकणार आहे. घड्याळातील दोन काट्यांचे वजन साधारण तीन किलो म्हणजे चार डायलचे मिळून १२ किलो आहे. त्याला चालवणारे मशिन तेवढ्याच ताकदीचे आहे.\nअशा प्रकारच्या घड्याळांची निर्मिती करून भारतभरात अनेक ठिकाणी आम्ही बसविली आहेत. नाशिक परिसरातील असे हे तेरावे घड्याळ आहे. गोल्फ क्ल भागात येणारे नागरिक, क्रीडापटू आदींसाठी हे घड्याळ उपयुक्त ठरेल.\n-विजय खडके, संचालक, गणेश वॉच कंपनी\n-७० फूट क्लॉक टॉवरची एकूण उंची\n-०६ फूट व्यासाची चारही दिशांना घड्याळे\n-०१ मशिनवर चालणार सर्व घड्याळे\n-०३ किलो घड्याळातील दोन काट्यांचे वजन\n-१२ किलो चार डायलचे मिळून वजन\n-०३ वर्षे तीन वॉच कंपनी करणार देखभाल\nगोल्फ क्लबच्या वैभवात ‘टॉवर क्लॉक’ने भर\nगोल्फ क्लबच्या वैभवात ‘टॉवर क्लॉक’ने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/kgf-bahubali-only-six-south-movies-were-superhit-says-r-madhvan-after-laal-singh-chaddha-flops-hrc-97-3077878/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-07T22:04:25Z", "digest": "sha1:2F7DBUIJ2Z2F6P64BS6S5VBE6LVR4BGA", "length": 20713, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "R Madhavan comment on Bollywood and south movies | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\nसाऊथच्या ‘या’ सहा चित्रपटांशिवाय कोणते चालले आर माधवनने उपस्थित केला सवाल\nबॉलिवूड आणि साऊथच्या तुलनेबद्दल माधवनने मांडलं मत\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nबॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांच्या तुलनेवर माधवनची प्रतिक्रिया..\nअभिनेता आर. माधवन अनेक विषयांवर स्पष्टपणे त्याचं मत मांडत असतो. नुकतंच त्याने लाल सिंग चड्ढा चित्रपट फ्लॉप झाला, त्याबद्दल प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होण्याचं आणि दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट होण्यामागची काही कारणंही माधवनने सांगितली. माधवन बुधवारी मुंबईत त्याच्या आगामी ‘धोखा – राऊंड डी कॉर्नर’ या चित्रपटाच्या टीझर लॉन्च प्रसंगी उपस्थित होता. यावेळी त्याने आतापर्यंत फक्त सहाच दाक्षिणात्य चित्रपटांनी चांगली कामगिरी केली असल्याचं वक्तव्य केलं.\nहेही वाचा – “आपण चुकीचा चित्रपट…”; बॉयकॉट ट्रेंडनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्याबद्दल आर. माधवनने मांडलं स्पष्ट मत\n“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला\nShinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\n“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप\nदाक्षिणात्य चित्रपट हिट होण्याबद्दल माधवन म्हणाला, “काही मोजक्याच दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशानंतर हिंदी चित्रपटांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपट चांगले काम करतात, असा विचार करणे चुकीचे आहे. साऊथ इंडस्ट्रीतील मोजकेच चित्रपट आतापर्यंत सुपरहिट ठरले आहेत. तसेच याला पॅटर्न देखील म्हणता येणार नाही. कारण बाहुबली १, बाहुबली २, आरआरआर, पुष्पा, केजीएफ: भाग १ आणि केजीएफ: भाग २ हे फक्त सहा सुपरहिट चित्रपट आहेत, त्यामुळे त्याला आपण ट्रेंड म्हणू शकत नाही. चांगले चित्रपट आले तर ते नक्कीच हिट होतील, मग ते कोणत्याही भाषेतले असो.” प्रेक्षकांना चांगला कंटेंट दिल्यास ते सिनेमागृहात जाऊन कोणत्याही भाषेची पर्वा न करता सिनेमा पाहतील, असा विश्वास माधवनने व्यक्त केला.\nहेही वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’च्या वितरकांना आमिर खान नुकसान भरपाई देणार, सत्य आलं समोर\nमाधवनने हिंदी चित्रपटांच्या फ्लॉपचे श्रेय करोना नंतरच्या काळात प्रेक्षकांच्या बदललेल्या पसंतींना दिले. “करोनानंतर, लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. त्यामुळे लोक ज्या प्रकारचे चित्रपट पाहतील, तसेच चित्रपट आपल्याला बनवावे लागतील. आपल्याला आणखी थोडे प्रगतीशील बनावे लागणार आहे,” असं तो म्हणाला.\nदरम्यान, माधवन कुकी गुलाटी दिग्दर्शित ‘धोखा – राऊंड डी कॉर्नर’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २३ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nकतरिना कैफशी लग्न केल्यानंतर कसं वाटतंय विकी कौशल म्हणतो “ती माझी पत्नी…”\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मेधाली, वैभवला सुवर्ण\nप्रो कबड्डी लीग : दबंग दिल्लीसमोर यू मुम्बाची हाराकिरी\nराष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा -विनोद तोमर\nभारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा\nकाँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका\nधनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण\nमध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०८ ऑक्टोबर २०२२\nपुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\nLow Uric Acid: यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होणे देखील ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ ५ गंभीर आजार\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\n“हा चित्रपट…” ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर प्रिया मराठेची प्रतिक्रिया चर्चेत\n‘झलक दिखला जा’च्या मंचावर लेकाच्या लग्नाची झलक पाहून नीतू सिंग भावुक, म्हणाल्या…\n‘हर हर महादेव’मध्ये अमृता खानविलकर साकारणार बाजीप्रभु देशपांडे यांच्या पत्नीची भूमिका, लूक व्हायरल\n‘हम आपके है कौन…’ चित्रपटतील रेणुका शहाणे यांचा ‘तो’ सीन शूट करताना ढसढसा रडल्या रीमा लागू\nMPSC च्या परीक्षेसाठी शुभेच्छा मागणाऱ्याला हेमांगी कवीचे स्पष्ट उत्तर, म्हणाली….\nएअरपोर्ट लूकमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले “कंगना…”\nबॉलिवूडमधील नकारात्मक विचारांच्या लोकांवर टीका करत करण जोहर म्हणाला, “मी प्रत्येकाच्या…”\n“माझ्यावर टीका केली जातेय हे…” सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल प्राजक्ता माळीने व्यक्त केलं स्पष्ट मत\n‘पुष्पा २’मध्ये होणार ‘या’ आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्याची एंट्री, साकारणार महत्वपूर्ण भूमिका\nमुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘झी टॉकीज’चा मानाचा मुजरा\n“हा चित्रपट…” ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर प्रिया मराठेची प्रतिक्रिया चर्चेत\n‘झलक दिखला जा’च्या मंचावर लेकाच्या लग्नाची झलक पाहून नीतू सिंग भावुक, म्हणाल्या…\n‘हर हर महादेव’मध्ये अमृता खानविलकर साकारणार बाजीप्रभु देशपांडे यांच्या पत्नीची भूमिका, लूक व्हायरल\n‘हम आपके है कौन…’ चित्रपटतील रेणुका शहाणे यांचा ‘तो’ सीन शूट करताना ढसढसा रडल्या रीमा लागू\nMPSC च्या परीक्षेसाठी शुभेच्छा मागणाऱ्याला हेमांगी कवीचे स्पष्ट उत्तर, म्हणाली….\nएअरपोर्ट लूकमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले “कंगना…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.statusinmarathi.com/love-status-in-marathi/", "date_download": "2022-10-07T21:57:21Z", "digest": "sha1:ATERYHEY2JAPDBII2EJWGENT6UZUCX3P", "length": 46206, "nlines": 683, "source_domain": "www.statusinmarathi.com", "title": "1000+ प्रेमाचे स्टेटस मराठी | Love Status in Marathi | love quotes in marathi. - Status in Marathi", "raw_content": "\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nLove status in marathi :- मित्रांनो, या जगात प्रेम ही देवाने निर्माण केलेली सर्वात सुंदर गोष्ट आहे. प्रेमाचं नातं कोणत्याही नात्यापेक्षा सर्वात सुंदर असतं. जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असता, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असता.\nतुम्ही तुमचे प्रेम हे व्यक्त करणे फार गरजेचे असते, म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या प्रेमाबद्दल कोणाला सांगायचे असेल, तर तुमच्या भावना आणि विचार love status in marathi / प्रेम स्टेटस, प्रेम शायरीद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुम्हाला तुमच्या दिल की बात थेट तुमच्या प्रिय व्यक्ती पर्यंत पोहोचण्यास मदत होईल. आजच्या पोस्टमध्ये दिलेले सुंदर love quotes in marathi तुम्ही तुमच्या व्हाट्सअप्प स्टेटस वर लावून तुमचे प्रेम अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकता.\nप्रेमावर स्टेटस मराठी / Marathi Love Status.\nजगातील सर्वात सुंदर गोष्ट….\nजि सहसा मिळत नाही 💕…..\nखूप काही नको आहे तुझ्याकडून\nफक्त एकदा मिठीत घे आणि म्हण\nमी तुझी साथ कधीच सोडणार नाही…\nगोड आठवणी आहेत तेथे,\nहळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,\nआणि जेथे 😍 अतूट प्रेम आहे,\nतेथे नक्कीच तू आहेस……\nभरपूर वेळ झाला तरी तू,\nतू येशील म्हणून मी,\nकुठे गेलो पण नाही 🌹.\nबरोबर आहे की नाही मला माहित नाही,\nपण तुझ्यावर 🥰 प्रेम करायला खूप आवडतं..\nकधी आपण सोबत असू किंवा नसू,\nपण हे स्वप्न पहायला खूप आवडतं.\nप्रेम काय आहे माहिती नाही मला…\nपण ते तुझ्या इतकच सुंदर असेल तर\nप्रत्येक जन्मी हवय मला \nजर खरं प्रेम असेल,\nआवडलाच तर ते खरं\nलहान होऊन जगावं लागतं,\nसागरात 🌊 पोहावं लागतं,\nमनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो,\nकारण ते ‘वेड’ समजून घेण्यासाठी,\nकधीतरी मनापासून ❤️ ‘प्रेम’ करावं लागतं.\nएक गोष्ट मला अजूनही समजली नाही,\n“त्रास” प्रेम केल्याने होतो की,\nकाही काळ प्रेम करणे हे केवळ\nकायम मरेपर्यंत आकर्षण असणे\nहे खरं प्रेम ❤️ असतं.\nReplace मला करशील का.\nआणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,\nस्वप्नपरी म्हणून अवतरशील का \nमाझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल\nमाझ्या बरोबर उभी असेल…\nमला तुझं हसणं हवं आहे,\nमला तुझं रुसणं हवं आहे,\nमला तुझं असणं हवं आहे……\nमाझा Topic असता ना,\nतर तुला कधीच Change\nपण तु माझी Life आहेस,\nआपले प्रेम हे एक फुल आहे,\nज्याला मी तोडू शकत नाही,\nआणि सोडूही शकत नाही,\nकारण तोडले तर सुकून जाईल,\nआणि सोडले तर, दुसरा कोणी घेऊन जाईल \nजो व्यक्ती खूप भांडणे करूनही\nतुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो.\nसमजून जा कि तोच व्यक्ती,\nतुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो…..\nप्रेमाच्या या प्रेमळ हृदयात…\nआज अचानक 💓 धडधड झाली….\nडोळे भरले पाण्यांनी आणि\nपुन्हा तुझी आठवण आली…\nकुठे जाणार सोडून तुला,\nजिव माझा तूच आहेस,\nकोणी काहीही म्हणू दे,\nमाझ्या ❤️ मनात तूच आहेस.\nदहा वेळा BYE बोलल्यानंतर ही,\nतुम्हाला कॉल Cut करू वाटत नसेल,\nतेव्हा समजून जा कि,\nतुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात\nतु आहे म्हणून तर,\nसगळं काही माझं आज आहे..\nहे जग जरी नसलं तरी,\nतुच माझ्या प्रेमाचा ताज आहे……\nप्रेम कधीच अशा माणसाला शोधत नाही,\nप्रेम अशा माणसाला शोधते ज्याच्यशिवाय,\nभेटणार म्हणून माहित असून सुद्धा,\nआणि भेटणार नाही म्हणून माहित असून,\nसुद्धा प्रेम करणे म्हणजे,\nआकाशाला टेकतील असे हात नाही माझे,\nसगळं काही साठून ठेवतील\nअसे डोळे नाही माझे,\nपण तुझे प्रेम साठून ठेवेन\nएवढे हृदय 💓 नक्कीच आहे माझे…\nतुझी वाट पाहतांना दिवस संपतात,\nपण माझं वाट पाहणं संपत नाही.\nआज डोळ्यांना रडावेसे वाटते,\nआठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,\nइतके 😘 प्रेम केलेस तु माझ्यावर,\nकी आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.\nकधी येईल तो दिवस तु एका\nक्षणात समोर ‪येशील आणि,\nतुझ्याशिवाय जगुच ‪शकत नाही 💕…..\nप्रेम म्हणजे brekup नंतर हि आपल्या\nजोडीदारयाला जाणूनबुजून कॉल करणं\nतुला चुकून Phone लागला\nमला सवय झाली होती ना …\nअजूनही जीवन जगत आहे,\nकारण माझा श्वास आहे तू,\nतू जरी माझी नसलीस तरी,\nमाझं पहिलं ❣️ प्रेम आहे तू.\nकाही माणसे तुमच्या आयुष्यात येतात,\nभविष्याचा भाग व्हायचे असते.\nतुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले…\nतर, मग दुसरं प्रेम निवडा,\nजर तुमचे पहिले प्रेम खरे असते तर..\nदुसरे प्रेम झालेच नसते \nजर आयुष्य असेल तर,\nतुझ्या सोबत असू दे.\nजर मृत्यू असेल तर,\nतुझ्या अगोदर असू दे.🥰\nमाझं प्रेम तुला कधी\nमी वाट पाहत राहिलो, पण\nतुझं पाऊल कधी वळलंच नाही.\nमाणूस मनापासून खुश फक्त,\nत्याच व्यक्तीसोबत राहु शकतो..\nज्याच्यावर तो प्रेम करत असतो.\nप्रेम 🌹 म्हणत नाहीत तर\nकोणाच्या तरी ❣️ मनात आपली\nजागा निर्माण करणे म्हणजेच\nनाही म्हणलं तर त्याला\nमंडपातून मी पळवून आणणार……\nमाहित नाही की तुझ्यात\nअसं काय वेगळं आहे..\nतू असलीस की वाटतं माझ्या\nसाथ तुझी हवी आहे,\nहात 💏 तुझा हवा आहे,\nविश्वास फक्त तुझा हवा आहे 💕…\nप्रेम 🥰 कमी होणार नाही….\nकुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,\nवाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,\nवाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,\nगेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.\nसुंदर 👸 दिसतेस म्हणून तुला सारखं\nगोड हसतेस म्हणून सोबत तुझ्या\nमधुर 😚 आवाज तुझा म्हणून सारखं\nवेड लावणारं वागणं तुझं\nम्हणून सोबत 😍 तुझ्या राहावंसं वाटतं.\nओढ म्हणजे काय ते,\nजीव लागल्याशिवाय समजत नाही.\nविरह म्हणजे काय ते,\nप्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.\nप्रेम म्हणजे काय ते,\nस्वतः केल्याशिवाय समजत नाही.\nतितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,\nअलगद पुसता आलं पाहीजे,\nमान अपमान प्रेमात काहीच नसतं,\nह्रदयात राहता आलं पाहिजे…..\nआयुष्य हे एकदाच असते,\nत्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,\nत्यालाच प्रेम समजायचे असते……\nतुला रडवणे, मला पसंत आहे..\nमिठीत घेऊन तुला समजावण्यात,\nएक वेगळाच आनंद आहे \nतुझ्यासाठी जीव देणारे तुला\nपण माझ्या सारखा जीव लावणारा\nएक पण नाही मिळणार 💯…\nमी नेहमीच तुझ्या बरोबर आहे,\nकधी तुझी सावली बनून,\nकधी तुझे हसू बनून,\nआणि कधी तुझा श्वास बनून.\nआयुष्यात एवढं Successful व्हायचंय\nजी आज नाही बोललीये..\nतिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…\nमी दुनिया बरोबर लढू शकतो पण,\nआपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,\nतुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,\nआता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,\nआता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू,\nकारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू,\nमाझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…..\nतुझी आठवण येणार नाही\nअसे कधीच होऊ शकणार नाही.\nकारण मी तुझ्याशिवाय कुणावर..\nया जगात फक्त दोनच माणसे\nपूर्णपणे सुखी राहू शकतात,\nज्याला त्याचे ✔️ खरे प्रेम मिळाले तो.\nआणि ज्याला प्रेम म्हणजे काय\nआहे हेच माहित नाही तो 🔥.\nतुझा होतो तुझा आहे,\nतु परत यायचं वचन दे,\nमी उभा जन्म वाट पाहीन.\nतुझा राग आहे ना,\nतो मला खूप आवडतो..\nतुला त्रास द्यायला मला खुप आवडतं.\nएकतर्फी प्रेम स्टेटस मराठी\nरोज रोज त्रास होतो\nकधी खेळ हा थांबेल\nमाझी आवड आहेस तू,\nमाझी निवड आहेस तू,\nकसं सांगू तुला पिल्लु,\nमाझं पहिलं प्रेम आहेस तू.\nगालावर 😘 खळी नको तिच्या,\nफक्त जरा हसरी मिळावी..\nचंद्राइतकी 🌛 सुंदर नकोच,\nफक्त परी 👸 लाजरी मिळावी.\nतुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे,\nमी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात,\nएवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे.\nतू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..\nदोन्ही माझ्याच पक्षात येईल..\nजर तू माझ्याशी प्रेम करशील\nतर मी तुझ्या हृदयात असेल..\nअणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील\nतर मी तुझ्या मनात असेल……\nआयुष्यभर हसवेन 😚 तुला\nपण मला कधी रडवून जाऊ नकोस,\nपण मला कधी सोडून जाऊ नकोस 🙏.\nएक गुलाब म्हणतो 🌹 I love You\nएक स्माईल म्हणते I like You\nएक रिंग – म्हणते I marry-You\nपण माझं एक छोटस Status म्हणतं.\nमला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू\nपण माझं जग भारी करणारी आहेस तू …\nगोपिका कितीही सुंदर असूदेत;\nमला मात्र माझी रुसणारी\nविसरून जा तिला जी तुला विसरेल,\nबघु नकोस तिला 😍 जी तुला रडवेल,\nपण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,\nजी स्वतः 😚 रडून तुला हसवेल…..\nप्रेयसी लोकल सारखी असावी\nपण तिच्याशिवाय option नसणारी…\nतुझं हे एक बरं असतं,\nभीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे..\nपण तुला चोरून पाहण्यात एक,\nसमजली तर भावना आहे,\nकेली तर मस्करी आहे,\nमांडला तर खेळ आहे,\nठेवला तर विश्वास आहे,\nघेतला तर श्वास आहे,\nरचला तर संसार आहे,\nनिभावले तर जीवन आहे.\nजर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर\nह्याचा अर्थ असा नाही की,\nमाझ्याकडे काहीच काम नाहीये..\nह्याचा अर्थ असा की,\nकाम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.\nवेळ लागला तरी चालेल,\nपण 😐 वाट तुझीच पाहीन,\nतू विसरली तरी चालेल,\nपण मी नेहमी तुझाच 😍 राहीन.\nतुझाच एक प्रेम वेडा \nकुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,\nवाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,\nवाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,\nगेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.\nप्रेम हे तेव्हाच टिकते\nजेव्हा ते दोघांनाही हवे असते\nहळुवार जपून ठेवलेले क्षण,\nतेच माझ्या जगण्याची आस आहे,\nएकेक साठवून ठेवलेली आठवण,\nतिच माझ्यासाठी खास आहे.\nप्रेम कधी पहिलं नसतं,\nआणि कधी शेवटचं नसतं,\nकारण प्रेम केव्हाही होउ शकतं,\nकारण प्रेम फक्त प्रेम असतं.\nमी जगेन अथवा मरेन,\nमी तुझ्यावरच प्रेम करेन.\nकधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,\nकधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,\nपहिल्यांदा कधी आवडलीस हे\nआता खरंच राहवत नाही.\nमी “तुझी” आहे का नाही..\n“हे मला नाही माहीत..”\n“तू” “फक्त” आणि “फक्त”\n“माझा” आहेस हे लक्षात ठेव 💯”.\nतुझ्या कुंकवाशी माझं नातं\nतुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालताना\nकितीही संकटे आली तरी\nतुझा हात माझ्या हातात असावा\nआणि मृत्यूला जवळ करताना माझा देह\nतुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा…\nमला इतकंच म्हणाच आहे तू लाख लोकांसी बोल\nपण मला दिवसातून एक\nmsg किव्हा एक 🙏 call जरी करशील\nमला पण बरं वाटेल\nआठवण 💕 काढणार कोणीतरी आहे.\nहाच राहिला एक ध्यास.\nदुसरा विचार नाही मी करत,\nतूच जीवन तूच आहेस श्वास.\nकोणीतरी सुखात असल्याचा आनंद\nकोणासाठी तरी रडणारे मन\nआणि कोणाशिवाय तरी मरणे\nतुला राग आला की\nपण एक टक पाहत राहिले की,\nएक दिवस असा येणार आहे..\nतुझी आई माझी सासू व\nमाझी आई तुझी सासू होणार आहे……\ntujya तुझ्या हृदयात रहायचंय मला,\ntu.. तुझ्या सुखात जोडीदार,\nतुझ्या दुःखात भागीदार व्हायचंय मला.\nप्रेमाला गोडी येणार नाही..\nआणि रागावून दूर गेल्याशिवाय,\nत्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही…..\nआपण उगाच आयुष्य घालवतो……\nतुला तुझं पहिले प्रेम विसरता\nयेईल कि नाही माहित नाही\nपण असे काही क्षण देऊन जाईल कि\nमाझ्याशियाय दुसरं कोणी आठवणारच नाही…\nप्रेम कधीच वाईट नसतं गं,\nतरी लोक त्याला नावे ठेवतात,\nआणि, 🔥 नावे ठेवणारी माणसेच,\nनकळत कधीतरी ❣️ प्रेमात पडतात.\nप्रेमात जीव द्यायचा नसतो,\nPremt प्रेमात जीव घ्यायचा नसतो,\nकुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,\nवाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,\nवाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,\nगेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.\nते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.\nते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.\nत्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.\nआणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.\nतुझ्यासोबत सजवलेले 🏠 स्वप्नांचे घर,\nमी कधीही तोडणार नाही,\nतु ये अथवा नको येऊ,\nमी तुझी वाट 💕 पाहणे सोडणार नाही….\nकाळजी घेत जा स्वतःची,\nआयुष्यभर साथ द्यायची कि नाही,\nहा निर्णय तुझा आहे.\nपण मरेपर्यंत तुझी साथ देईल,\nहा शब्द माझा आहे.\nमी नाही म्हणणार नाही,\nपण नको करू माझ्या प्रेमाची मस्करी,\nमी पुन्हा कधी मिळणार नाही.\nतुझ्या अगोदरही कोणी नव्हते,\nतुझ्या नंतरही कोणी नसेल,\nजो पर्यंत श्वासात श्वास आहे,\nमाझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल.\nतीच नकळत चोरून बघणं\nमनाला एकदम वेड लावून जात\nतुझ्या हातात हात घालून\nतुझ्या खांद्यावर डोके ठेवून\nतर दु:खातही साथ देणारे……\nअरे लाखो पाहीले आहेत GF ला\nपिल्लू, शोना, जानू बोलणारे.\nपण जो आपल्या GF ला “बायको”\nबोलतो तो लाखात एक असतो.\nतुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,\nसतत स्वतःला तुझ्यातच पाहते,\nतुझी ती प्रेमळ नजर,\nमाझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,\nआणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते.\nतुझ्या आयुष्यात माझी जागा,\nघेणारे लाखो तुला भेटतील..\nपण, माझ्या आयुष्यात तुझी जागा घेणारी,\nफक्त तू एकटीच असशील.\nकिती छान वाटतं ना,\nजेव्हा कोणी तरी म्हणतं,\nस्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी.\nकधी येईल तो दिवस तु एका\nक्षणात समोर ‪येशील आणि,\nतुझ्याशिवाय जगुच ‪शकत नाही…\nवेडा होतो तुझ्या मिठीत,\nयात माझा काय गुन्हा..\nतू आहेसच एवढी गोड म्हणून,\nओठांशी लावतो पुन्हा पुन्हा…..\nसवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,\nशेवटी ठरवले विसरून जायचं तुला,\nपण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…\nतिच्याच साठी मी, रोज एक कविता\nतिने ती माझ्याच समोर वाचावी,\nअन वाचून झाल्यावर, मला\nती असावी शांत निरागस,\nमी कितीही रागावलो तरी\nमाझ्यावर 💕 प्रेम करणारी,\nडोळ्यांतून 🥺 अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी,\nती असावी खळखळणाऱ्या 🌊 नदी सारखी,\nवाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी.\nमी काहीही बोलत नाही याचा अर्थ\nMi मी चुकलोय असा नाही,\nमी तुझ्यासाठी शांत आहे,\nकारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही.\nखरं तर मी तुला लहाणपणीच\nमागायला पाहीजे होतं गं \nकारण, थोडा वेळ रडलो की\nघरचे जे पाहीजे ते,\nआणून तरी देत होते.\nतुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,\nत्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,\nकधी संपतात हेच समजत नव्हते मला,\nतु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.\nनदीला या काठ दे..\nवाटेला माझ्या वाट दे..\nअडकलाय गं तुझ्यात जीव माझा,\nआता फक्त आयुष्यभराची साथ दे.\nप्रेम हे होत नसतं,\nप्रेम हे करावं लागतं,\nआपलं असं कुणी नसतं,\nजिवापाड प्रेम केल्यावर कळते कि\nप्रेम म्हणजे काय असते,\nतुम्ही प्रेम कोणावरही करा पण,\nज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,\nकारण प्रेम हे मौल्यवान असते……\nतू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं,\nतुला हसतांना पाहिलं ना कि\nबस पाहताच राहू वाटतं,\nकधी बेधुंद कधी बेभान वाटतं,\nअसतांना आयुष्य खूप छान वाटतं.\nए ऐकना माझ्या गुलाबाच्या फुला,\nएकही क्षण ही करमत नाही मला..\nजेव्हा आपली आवडती व्यक्ती,\nआपल्याशी न बोलता राहू शकते..\nया गोष्टीची जेव्हा आपल्याला जाणीव होते,\nतेव्हा अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटू लागतं.\nप्रेम तुझ्यावर खुप केलं,\nपण तुला सांगु शकलो नाही..\nतु एकटी असतांना सुद्धा,\nप्रेमाचा होकार मागु शकलो नाही.\nतुझी साथ आणि थोडा वेळ दे मला,\nमी आयुष्यात असे काही बनेन की\ncaste आडवीच नाही आली पाहिजे….\nप्रेम कविता मराठी स्टेटस / love poem in marathi\nतुझ्या अगोदरही कुणी नव्हतं.\nतुझ्या नंतरही कुणी नसेल,\nमाझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल…..\nमनापासून प्रेम करणारे हवे\nमनातले सारे गुज सांगण्यासाठी\nपण प्रेम करून फसवू नकोस,\nविचार करून प्रेम कर,\nपण प्रेम करून विचार करू नकोस,\nहृदय तोडून प्रेम कर,\nपण प्रेम करून हृदय तोडू नकोस…..”\nतिला वाटत असेल एवढा कसा बदलोय मी\nअग वेडे तुटलेल्या फुलाचा रंग बदलणारंच ना..\nकधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,\nकधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,\nपहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,\nपण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.\nतुझ्याशिवाय आता काही सुचतच नाही..\nतू, तू अन फक्त तूच,\nतुझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही..\nअबोल हि प्रीत माझी,\nतुला का कधीच कळत नाही..\nअन वेडे हे मन माझे,\nतुला पाहिल्याशिवाय काही राहवतच नाही.\nमग मीही अबोलाच राहतो\nतसं राहणं मला भाग आहे…..\nत्या वेडीनी प्रपोज़ पण असा केला की,\nमी तिला नाही म्हणूच शकलो नाही..\nमला म्हटली चल टॉस करूया,\nछापा पडला तर तु माझा आणि\nकाटा पडला तर मी तुझी.\nतो चंद्र नकोय गं मला,\nफक्त तुझी शीतल सावली दे..\nहे जग नकोय गं मला,\nफक्त तुझ्यातलं माझं जग दे..\nस्वप्नं माझी खूप नाहीत गं मोठी,\nपण तुझ्या स्वप्नात थोडी जागा दे..\nप्रेम करायचं म्हणाल तर,\nसंसारात मन रमत नाही.\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nजाणून घ्या पॅनकार्ड क्लब क्लेम फॉर्म कसा भरायचा | How to Fill Pancard Club Claim Form in marathi.\nstatusinmarathi.com या वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठी माणसापर्यंत प्रेरणादायी कविता, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी कोट्स, प्रेरक विचार आणि वाढदिवस शुभेच्छा , मराठी स्टेटस पोचवण्याचा प्रयन्त करत आहोत. जेणे करून त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.👍\nकोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२२ | Kojagiri purnima wishes in marathi 2022,status,quotes, Messages,Images, greetings शेअर करून द्या कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा.\nकोजागरी पौर्णिमा माहिती,कथा,महत्त्व,पूजविधी मराठी | kojagiri purnima information in marathi 2022.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/2924", "date_download": "2022-10-07T21:56:37Z", "digest": "sha1:DHT6EOKSE2X7JCXR444FPFJCWMOS5IFC", "length": 13598, "nlines": 108, "source_domain": "bollyreport.org", "title": "श्रद्धा कपूरची पर्सनल चॅट झाली लीक, त्या स्पेशल व्यक्तीसोबत असं सुरु होतं बोलणं ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News श्रद्धा कपूरची पर्सनल चॅट झाली लीक, त्या स्पेशल व्यक्तीसोबत असं सुरु होतं...\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट झाली लीक, त्या स्पेशल व्यक्तीसोबत असं सुरु होतं बोलणं \nबॉलीवूडमधील कलाकार हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असतात, मग ती वैयक्तिक बाब असो वा अभिनयासंबंधित, चांगली असो वा वाईट. तसाच सध्या सोशल मीडियावर हातातील मोबाईलवर चॅट ओपन असलेला फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे. हा फोटो बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या मोबाईलमधील चॅट चा आहे. तर दुसरा फोटो ती मोबाईलवर कोणाशी तरी बोलण्यात खूप दंग असल्याचा हा फोटो आहे.\nबॉलीवूडमधील अनेक कलाकार आपल्या जीवनातील काही गोष्टी या खाजगी ठेवतात. त्यापैकी श्रद्धा कपूर एक आहे. शुक्रवारी श्रद्धाला एका चित्रपटाच्या सेट वर पाहिले गेले होते. साध्या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये देखील ती तितकीच साधी व सुंदर दिसत होती. त्याचवेळेस श्रद्धा आपल्या मोबाईलमध्ये चॅट करण्यात मग्न दिसली. त्याचवेळी तिची चेहऱ्यावर असलेलं छोटंसं हसू हे ती त्या व्यक्तीशी बोलणं अधिक पसंत करत असल्याचे दिसत होते.\nतेवढ्यातच तिथे असलेल्या पैपराजीने (ख्यातनाम व्यक्तींची छायाचित्रे घेण्याचा छंद असलेला छायाचित्रकार) तिचे फोटो काढले आणि त्या फोटोमधील वेगळेपण हे की त्यापैकी एक फोटो श्रद्धा कपूरच्या चॅटचा होता. त्या चॅटचा फोटो बघून श्रद्धा कोणातरी खास व्यक्तीसोबत बोलत असल्याचे दिसत होते. त्या व्यक्तीचा नावाने तो नंबर मोबाईलमध्ये सेव न करता तीन हार्ट ईमोजीने सेव केला होता.\nत्या चॅटमध्ये श्रद्धा काय बोलत होती ते देखील स्पष्ट दिसत होतं. ती म्हणाली, “मी माझ्या जीवनामध्ये तुझ्या सारख्या व्यक्तीला कधी भेटलीच नाही, काहीही झालं तरी तुम्ही नेहमी माझ्यासोबत होतात.” श्रद्धाच्या या मेसेजवर समोरून उत्तर आलं की “मला आनंद आहे की तू असा विचार करतेस.” यामध्ये श्रद्धा पुढे लिहिते, “तुम्ही एक उत्तम श्रोते आहात, तुम्ही नेहमी मला ग्रेट फील करवता.” तिच्या या बोलण्याचा रिप्लाय, हार्ट ईमोजी मध्ये येतो. इथेच बोलणं थांबत नाही तर श्रद्धा पुढे म्हणते “माझी सर्व स्वप्न आणि इच्छा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद” समोरून रिप्लाय येतो, “माझे सौभाग्य आहे तुला कुठल्याही गोष्टीची गरज असेल तर मला कळवं.”\nया चॅटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या यावर प्रतिक्रिया आल्या. काही चाहते पैपराज़ीला कलाकारांच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप केल्याबद्दल ओरडत आहेत. श्रद्धाच्या चाहत्यांनी तर हा फोटो खोटा असल्याचे किंवा तो फोटोशॉप केल्याचे असल्याचे म्हटले आहे. अनेक जण म्हणत आहेत की हा फोटो कुठे आहे कारण स्क्रीनच्या बाजूने हा फोन iphone सारखा वाटत आहे तर मागच्या बाजूने वेगळा मोबाईल असल्याचे दिसत आहे.\nश्रद्धा कपूर ही फोटोग्राफर रोहन श्रेष्ठीसोबत फार काळापासून सिरीयस रिलेशनशिपमध्ये आहे. श्रद्धा आणि रोहन यांची लव्ह स्टोरी ओपन सिक्रेट असल्याचे बोलले जाते. फार काळापासून हे दोघे एकत्र आहेत आणि याबद्दल सर्वांनाच माहिती देखील आहे. अनेकदा या दोघांच्या लग्नाच्या बातम्या जोर धरू पाहत असतात. श्रद्धाच्या घरगुती कार्यक्रमांमध्ये देखील रोहनची उपस्थिती पाहायला मिळते. पण अद्याप तरी श्रद्धा किंवा रोहन हे आपल्या नात्याबद्दल कधीही खुलेपणाने बोलले नाहीत. शक्ती कपूर यांनी ते दोघे चांगले मित्र असल्याचे सांगितले. श्रद्धा आणि रोहनच्या नात्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious article‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nNext articleही आहेत ती गाणी जी, मुलं आपल्या आई वडिलांपासून लपून गुपचूप बघायचे, तुम्हीपण नक्कीच पाहिले असतील \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/utkal-bang-missing-from-national-anthem-in-schools-textbooks-latest-news-and-update-130299368.html", "date_download": "2022-10-07T23:06:48Z", "digest": "sha1:TTUHQHO7PSIC2RPUCAYOJGMVFXY4SCSF", "length": 10711, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "उत्तर प्रदेशातील प्रकार; अधिकारी म्हणतात- प्रिंटिंग मिस्टेक, काँग्रेस म्हणते - बंगालमधील पराभवाचा सूड | 'Utkal Bang' missing from national anthem in school's textbooks, latest news and update - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराष्ट्रगीतातून 'उत्कल बंग' गायब:उत्तर प्रदेशातील प्रकार; अधिकारी म्हणतात- प्रिंटिंग मिस्टेक, काँग्रेस म्हणते - बंगालमधील पराभवाचा सूड\nउत्तर प्रदेशातील तब्बल अडीच लाख सरकारी पुस्तकांतील राष्ट्रगीतात ‘उत्कल बंग’हे दोन शब्द नसल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. काँग्रेसने या प्रकरणी भाजपवर टीकेची झोड उठवत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर संबंधित अधिकाऱ्यांनी ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा दावा करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.\nकाँग्रेसचे कौशांबी जिल्हाध्यक्ष अरुण विद्यार्थी म्हणाले, भाजपला बंगालचा पराभव अद्याप सलत आहे. त्यामुळे त्यांनी जाणिवपूर्वक राष्ट्रगीतातून उत्कल व बंग हे दोन शब्द वगळलेत. काँग्रेस या प्रकरणी रस्त्यावर उतरेल. दुसरीकडे, या प्रकरणी वाद वाढल्यानंतर कौशांबीचे बीएसए प्रकाश सिंग यांनी हा प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा दावा केला.\nते म्हणाले - ''पुस्तक छापताना ही चूक झाली. पुस्तकातील राष्ट्रगीताच्या ओळीत चूक झाली. सामान्यतः अशी चूक प्रिंटिंगची मानली जाते. पण असे राष्ट्रगीताच्या बाबतीत घडल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली जाईल. याचा तपासाही केला जाईल. ही राज्य पातळीवरील गोष्ट आहे.''\nराज्य सरकारने ही पुस्तके कौशांबीच्या पालिका शाळांसाठी पाठवली आहे. एकट्या कौशांबी जिल्ह्याची गोष्ट केली, तर 1089 पालिका शाळा आहेत. त्यात पहिली ते 8 वीपर्यंतचे 1 लाख 82 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.\nवाटिका नामक पुस्तकात चुकीचे राष्ट्रगीत छापण्यात आले आहे. हे पुस्तक इयत्ता पाचवीचे आहे. या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर राष्ट्रगीत लिहिले आहे. त्यात पंजाब-सिंध-गुजरात-मराठी-द्राविड....नंतर उत्कल बंग शब्द नाही. त्यानंतर 5वी ओळ थेट विंध्य-हिमाचल-यमुना-गंगा या शब्दांनी सुरू होते. ही चूक पाचवीच्या एक-दोन नव्हे तर सर्वच पुस्तकांत झाली आहे. त्यामुळे प्रकरण गंभीर आहे.\nराष्ट्रगीताच्या ओळी अर्धवट आहेत. त्यात उत्कल बंग शब्दच छापण्यात आला नाही.\nपरिषदीय शाळा इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना वाटिका या हिंदी पुस्तकाचे वितरण केले गेले. पुस्तकाच्या मागील पानावर छापण्यात आलेल्या राष्ट्रगीतात चूक निदर्शनास आली. त्यात उत्कल व बंग प्रांताचा उल्लेख नाही. दिव्य मराठीने या प्रकरणी 6 शाळांच्या शिक्षकांशी चर्चा केली. त्यात शिक्षकांनी पुस्तक छापण्यात ही चूक झाली असेल, असा अंदाज व्यक्त केला. पण त्याचवेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी पुस्तक छापण्यावेळी त्यावर लक्ष दिले असते तर बरे झाले असते अशी पुस्तीही जोडली.\nविद्यार्थ्यांना मोफत देण्यात आलेल्या पुस्तकांत राष्ट्रगीत चुकीचे छापले गेले आहे. चिंतेची गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांचेही याकडे लक्ष गेले नाही.\nआतापर्यंत राज्यातील 4 शाळांत झाला खुलासा\nप्राथमिक शाळा, हिसामपूर परसखीमध्येही राष्ट्रगीतातूनही उत्कल व बंग शब्द गायब असणारी पुस्तके वितरित करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्याला आता ही गोष्ट समजल्याचे सांगितले.\nकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरुण विद्यार्थी.\nप्रमोद प्रिंटरने छापले मुखपृष्ठ\nइयत्ता 5 वी हिंदीचे वाटिका नावाचे हे पुस्तक मथुरा येथील प्रमोद प्रिंटरने प्रकाशित केले आहे. त्याची तपशील पुस्तकात आहे. दिव्य मराठीच्या टीमने या प्रिंटिंग प्रेसचा शोध घेतला असता ते मथुरेच्या मसानी भागात असलेल्या मोक्षधामजवळ सापडले. या प्रेसचे मालक प्रमोद गुप्ता यांनी सांगितले की, त्यांनी फक्त त्याचे कव्हर पेज प्रकाशित केले आहे.\nमुलांना शाळेत पुस्तके मिळाली. त्यांनी ती वाचण्यासही सुरुवात केली. त्यात एवढी मोठी चूक आढळून आली.\nप्रिंटरचा दावा -आम्हाला शिक्षण विभागाने ऑर्डर दिली नाही\nप्रमोद प्रिंटर्सचे मालक प्रमोद गुप्ता यांनी सांगितले की, त्यांनी हे संपूर्ण पुस्तक छापले नाही. केवळ मुखपृष्ठ छापले आहे. हे काम त्यांना शिक्षण विभागाने नव्हे तर मथुरेच्या हाय-टेक प्रिंटरने दिले. त्यानंतर तेथून प्लेट आली, जी आम्ही छापली.\nदरम्यान, दिव्य मराठीने हायटेक प्रिंटरला भेट दिली. पण, प्रिंटरचे मालक राम प्रकाश यांची भेट होऊ शकले नाही. त्यांनी आमच्या फोनलाही प्रतिसाद दिला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/23-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2022-10-07T22:21:16Z", "digest": "sha1:B5QKUBW5PH5AN5SH2IWWWFJDTSOPKH2S", "length": 7926, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nHome Tag 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन\nTag: 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन\n जागतिक पुस्तक दिन विशेष\nपियुषा अवचर 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. पुस्तके आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://mr.rdflexitank.com/fuel-oil-tank/", "date_download": "2022-10-07T21:51:43Z", "digest": "sha1:VQFW53B3NBGUMBHXTNGRSKTDHJN67QDR", "length": 7138, "nlines": 170, "source_domain": "mr.rdflexitank.com", "title": "इंधन तेल टाकी उत्पादक आणि पुरवठादार - चीन इंधन तेल टाकी फॅक्टरी", "raw_content": "आमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये आपले स्वागत आहे\nटीपीयू (पॉलीयुरेथेन) -कोटिंग फॅब्रिक\nटाक्या पीव्हीसी / टीपीयू लेपित असलेल्या प्रबलित फॅब्रिकद्वारे बनविल्या जातात आणि टाकी पूर्ण भरल्यावर उशाचा आकार दर्शवितात.\nयाचा वापर औद्योगिक पाणी, अग्नीचे पाणी, पावसाचे पाणी साठवण, सिंचन पाणी, काँक्रीट मिक्सिंग वॉटर, उतार हिरवे पाणी, सांडपाणी पाणी साठवण आणि तेल विहीर सिमेंटिंगसाठी केला जाऊ शकतो.\nत्याचे फायदे असे आहेत: रिक्त असताना दुमडलेला जाऊ शकतो, वजनाचा हलका आणि वाहतूक सुलभ, साइट स्थापित करणे सोपे आहे, दीर्घ आयुष्य आणि देखभाल कमी खर्च.\nटीपीयू (पॉलीयुरेथेन) -कोटिंग फॅब्रिक\nटीपीयूमध्ये अंतर्गत चिपकणारा स्तर, फॅब्रिक-प्रबलित स्तर आणि बाह्य चिकटलेला स्तर असतो. फॅब्रिक-प्रबलित थर पॉलिस्टर तंतुपासून तयार होतो, आतील आणि बाह्य चिकट थर फॅब्रिक-प्रबलित लेयरच्या दोन्ही बाजूंना पॉलिउरेथेनद्वारे तयार केले जाते.\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा आमच्या जाहिराती, सवलत, विक्री आणि विशेष ऑफरसह अद्ययावत रहाण्यासाठी\nलवचिक स्टोरेज उशा टाकी\nपत्ताः क्रमांक नाही .988 शूंगफेंग रोड, झिंगन डिस्ट्रिक्ट, एएनक्यूआयटी सिटी, वेफांग. शेडोंग, चीन\nसोम - शुक्र: सकाळी 10 ते संध्याकाळी 7\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/tag/bachelor-of-production/", "date_download": "2022-10-07T22:43:51Z", "digest": "sha1:MX726AGHMUMDXALCXND2YBFHCRPPYVZA", "length": 7025, "nlines": 59, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "Bachelor of Production - Bharti jahirat", "raw_content": "\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nHAL Recruitment 2022 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 633 जागांसाठी भरती\nHAL Recruitment 2022 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 633 जागांसाठी भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 10...\nMPSC Recruitment | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 588 जागांसाठी भरती\nMPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 (MPSC Technical Services) अंतर्गत विविध पदांच्या एकूण 588 रिक्त पदांच्या भरतीसाठी...\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17892/", "date_download": "2022-10-07T23:26:23Z", "digest": "sha1:RIJUA6E3FZMJRH7M5DIE7QY7PMBGDNF5", "length": 18643, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "घोगर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nघोगर : (गोगर्ली, पापुर, पांडरू हिं. पाप्रा क. कळकंबी इं. इंडियन बॉक्सवुड, गार्डेनिया लॅ.गार्डेनिया लॅटिफोलिया कुल रूबिएसी). हा सु. ३–५ मी. उंच व ०·९–१.२ मी. घेर असलेला लहान पानझडी वृक्ष श्रीलंकेत व भारतात सर्वत्र शुष्क जंगलात आढळतो. फांद्या ताठर व सरळ पसरलेल्या असून वृक्षाचा माथा गोलाकार असतो. साल गुळगुळीत व फिकट करडी असून तिचे गोलसर तुकडे निघून जातात. कोवळे भाग गुळगुळीत व राळेसारख्या पदार्थाने झाकलेले असतात. फांद्यांच्या टोकास गर्दीने वाढणारी बिनदेठाची साधी पाने १०—२० × ६·१५ सेंमी., टोकाशी गोलसर, दीर्घवृत्ताकृती किंवा अंडाकृती, वरून हिरवी पण खालून फिकट, संमुख (समोरासमोर) किंवा प्रत्येक पेऱ्यावर तीन असतात. उपपर्णे मोठी, तळाशी देठाबरोबर सांधलेली, नळीसारखी व कोवळ्या कळ्यांभोवती प्रथम वेढलेली दिसतात. फुले एकाकी, क्वचित जोडीने असून ती पाच ते सात सेंमी. लांबीची, प्रथम पांढरी, सुवासिक व नंतर पिवळी होतात. मार्च–मेमध्ये बहर असतो. संवर्तनलिका लवदार व तोंडाशी पसरट पुष्पमुकुटनलिका अधिक लांब, सरळ व बाहेर लवदार [⟶ फूल] दोन्ही मंडलांत दले पाच ते नऊ असून मृदुफळ फिकट हिरवे, गोलसर, खाद्य व लहान लिंबाएवढे असते त्याच्या टोकास सतत संवर्त असतो व बाह्यकवचावर खाचा असतात. बिया लहान, अनेक, चपट्या, फिकट तपकिरी व जांभळट मगजाने (गराने) वेढलेल्या असतात. इतर सामान्य लक्षणे ⇨ रूबिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. याचे लाकूड पिवळट तपकिरी, कठीण, बळकट, टिकाऊ व जड असून कोरीव व कातीव कामास उत्तम असते उदा., फण्या, खेळणी, आखण्या, धोटे, खाटा इत्यादि. ⇨ डिकेमालीसारखा पदार्थ अल्प प्रमाणात या वनस्पतीतही मिळतो. पाला गुरांना खाऊ घालतात झाडे कुंपणाच्या कडेने लावतात.\nखुरफेंद्रा : (लॅ. गार्डेनिया टर्जिडा). ह्या नावाचा लहान वृक्ष घोगरच्या वंशातील एक जाती असल्याने अनेक लक्षणांत दोहोंत साम्य आढळते. हा ब्रह्मदेशात व भारतात सर्वत्र आढळतो. फांद्यांवर कठीण व उभे, सरळ काटे असतात. पाने घोगरपेक्षा लहान, आयत, वरून गुळगुळीत पण खालून लवदार उपपर्णे त्रिकोनी व लवकर गळणारी फुले पांढरी असून कोवळ्या व पाने नसणाऱ्या फांद्यांवर एप्रिल-जूनमध्ये येतात. ती एकलिंगी असून पुं-पुष्पाचे गुच्छ असतात, परंतु स्त्रीपुष्पे एकाकी येतात. फळे अनेकबीजी, लांबट गोल, घोगरपेक्षा मोठी, करडी हिरवी व साधारण टोकदार असतात. लाकूड सर्वसाधारणपणे घोगरप्रमाणे असून त्याऐवजी वापरतात. मुळांपासून केलेले औषध अपचनावर लहान मुलांना देतात. कुटलेल्या मुळांचा फेस असह्य. डोकेदुखीत कपाळावर लावून हाताने हलकेच थापत राहिल्यास डोकेदुखी थांबते. फळे खाद्य असून स्तनाच्या विकारावर उपयुक्त असतात. या झाडांपासून सुवासिक गोंद मिळतो त्यात चाळीस टक्के मॅनिटॉल असते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bestigcaptions.com/marathi-caption-for-instagram/", "date_download": "2022-10-07T21:40:19Z", "digest": "sha1:Q3BDZGWWYV36OHODIDH4J362FQ6LZC55", "length": 31244, "nlines": 478, "source_domain": "bestigcaptions.com", "title": "TOP 100+ Marathi Caption for Instagram – Best IG Captions", "raw_content": "\nसध्य स्वतःच्या टार्गेट वर काम चालू आहे म्हणून टीका करणाऱ्या निर्लज्ज लोकांना उत्तर द्यायला time नाही.\nजे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये block_करतात_आम्ही त्यांना #आयुष्यातुन_block करतो …. ते पण कायमच………….\nभिडायची लायकी नसेल तर नडायची खाज पण ठेवू नका👊\nआपण पण पध्दत बदलली आता जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी👍\nडोकं गरम आहे कृपया distrub करू नका.\nकालच्या वेदना सहन करत\nजशास तस वागायला शिका\nनिस्वार्थ कर्म करत रहावं\nजे होईल चांगलच होईल..\nमनात खोड असणारी माणसं\nकधीही घात करू शकतात.\nहे फक्त एका माणसाला मारते,\nपण कानात गेलेले विष\nहे हजारो नाते संपवून टाकते…\nस्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा.\nरोज मनाचं एक पान\nस्वभाव दिलदार असला पाहिजे\nतर नुसता सल्ला देऊ नका\nकारण सल्ला चुकीचा असू शकतो.\nजगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात.\nपण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही\nहे कधीच विसरू नका..\nआयुष्य पूर्ण शून्य झालं\nतरी हार मानू नका…\nती ताकत तुमचा हातात आहे.\nठरवून काय करत नाय जे काय करतो ते “रिअल”..\nबाहेरच्या लोकांचं सोडून द्या इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात.\nलढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायच,दुनिया म्हणलं तस जगायचं नाय\nगुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.\nजे उंच उडायची स्वप्न बघतात ना, ते खाली पडायला घाबरत नाय.\nसंघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.\nबापाने जन्म गर्दीत राहायला नाही तर गर्दी जमवायला दिलाय\nRespect वयानुसार नाही तर वागण्यानूसार देतो.\n#Hawa आमची पण आहे आम्ही दाखवत नाय,, रक्त आम्ही सुद्धा पाहिलय पण ,,आम्ही गावं गोंधळ करत नाय..\n##जगावे तर वाघासारखे || लढावे तर शिवरायांसारखे##\nPrem कितीही गोड असलेना तरी त्याच्याने कधी पोट नाय भरत…\nया प्रेमळ हृदयात Aaj अचानक धडधड झाली, डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी आठवण Aali..\nलाख Mele तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे\nप्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात,जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात.\nनावाची Hawa नाय झाली तरी चालेल,पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज \nAttitude दाखवणारी पोरगी पाटवायची म्हणजे,,चिखलात बसलेली म्हैस हाकालण्यासारखे आहे\nमाझी बुद्धी Na सारखी माझ्या मनाशी भांडत असते,पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं..\nमैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श पण प्रपोज़, करायला तू लावणार आहेस किती वर्ष\nAaj ती मला म्हणाली, मी तुला Like करते,मी पण बोललो, “ज्या दिवशी Love करशील त्या दिवशी Msg कर.”\nAaj ताइ म्हणाली, ऐ ‘Bhava’ जास्त Handsome राहू नकोस हा नाही तर Line मारतील रे पोरी तुझ्यावर.\nBody तर कधीच बनवली असती पण अजून कुणी भेटलीच नाही जिम ला जा बोलनारी .\nजगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪”‎विशेष”‬ असते##\nप्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून आम्ही शांत आहे\n#माझे Status इतकं मन लाऊन वाचू नका; चुकून एखादं वाक्य मनाला भिडलं तर मला विसरणं अवघड होऊन जाईल@@\nजे घडत ते चांगल्यासाठीच फरक फ़क्त एवढाच असतो KI ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं\n##मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून\nदुसऱ्यांना साथ देणे म्हणजे त्यांना आपला सहकारी बनवण्या सारखे आहे.\nजो मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्यांच्यासाठी मन हे एक शत्रु सारखे आहे.\nपरोपकारी वृत्ती इतरांची सेवा आणि अहंकारा पासून स्वतःला दूर ठेवणे हेच खरे शिक्षण होय.\nकुणाचे उपकार कधीच विसरू आणि नका तुम्ही कुणावर केलेले उपकार कधी सांगू नका.\nस्वप्नांच्या शोधात माणूस जगभर भटकतो मात्र हा शोध कुटुंबाजवळ आल्यावरच पूर्ण होता.\nकुटुंबाच्या सहवासातील दिवस म्हणजे खरे जीवन आणि कुटुंबाशिवाय असते नुसतेच वय.\nज्ञान असूनही तुम्ही त्याचा वापर करत नसाल तर, तुमच्या ज्ञानाचा काहीच फायदा नाही.\nजगात चांगली माणसे कमी नाहीत, तुम्हाला ते दिसत नसतील तर तुम्हीच तसे व्हायचा प्रयत्न करा.\nज्या शिक्षणामुळे मुले जीवनभर सतत काही न काही शिकत राहतात तेच खरे शिक्षण होय.\nएक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एका लेखणीत संपूर्ण जगाला बदलण्याची शक्ती असते.\nशब्दांची शक्ती त्याच्या आकारावरून ठरत नाही, केवळ “हो”, “नाही” यातूनही जीवन बदलून शकते.\nअपेक्षांनी सुरू होणारा प्रत्येक दिवस कोणता ना कोणता अनुभव देऊन जातो.\nतुम्ही कधी योग्य होता हे, कुणीच लक्षात ठेवत नाही. तुम्ही कधी चुकला हेच सगळे स्मरणात ठेवतात.\nजेव्हा जेव्हा तुम्ही पर्याय निवडतात, तेव्हा तेव्हा तुम्ही भविष्य निवडतात.\nमाणूस आपल्या विचारांतून घडणारा प्राणी आहे,तो जो विचार करतो तसाच घडतो. – महात्मा गांधी\nदिशाभूल करण्यासाठी बरेच पर्याय मिळतील,मात्र लक्ष गाठण्यासाठी एकच संकल्प पुरेसा असतो.\nकाल कदाचित तुम्ही पडला होता… आज उठा आणि आगेकूच करा.\nप्रत्येक सकाळ आपल्यासोबत नवे विचार आणि नवी शक्ती घेऊन येते.\nजो माणूस आपल्यातील दोष आणि इतर यांमधील गुण पाहतो, तोच महान माणूस ठरतो.\nनकारात्मक विचारांसोबत तुम्ही सकारात्मक जीवन जगू शकत नाही.\nसंकल्प शक्ती आणि बुद्धीच्या एकत्रित वापरातून यश प्राप्त करता येऊ शकते.\nएखादे काम कितीही कठीण असो, जिद्द आणि दृढनिश्चयाने ते पूर्ण केली जाऊ शकते.\nआपण बाहेरच्या आव्हानांमुळे नव्हे, आपल्या मनातील न्यूनगंडामुळेच हरतो.\nज्या सत्याला तुम्ही विरोध करता, ते तुमच्यासाठी नेहमीच कुरुक्षेत्र बनते.\nजो नेहमी, येणार्या अडचणींवर सतत विचार करतो,तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही.\nतुम्ही पराभव मान्य कराल असे कुणाला वाटले तर,तुम्ही मैदानात पाय रोवून उभे राहिले पाहिजे.\nराग आल्यास ओरडण्यासाठी ताकदीची गरज नाही, पण गप्प बसण्यासाठी मात्र शक्ती लागते.\nकधीच कोणासोबत करू नका,\nआणि केलात तर ती तुमची\nवाट पाहत बसणे नाही\nतर योग्य संधी येई पर्यंत\nचांगली वेळ नेहमी त्याचीच येते\nवाईट विचार करत नाही.\nमैदान गाजवायची जिद्द ठेवा\nकारण जो पर्यंत तुमच्यावर\nतो पर्यंत तुम्ही यशस्वी होताय\nवेळ आहे तोपर्यंत घाम गाळून घ्या\nनंतर अश्रु गाळायची वेळ येणार नाही.\nआपल्या स्वप्राचा पाठलाग करताना\nकितीही अपमान झाला तरी चालेल\nकारण उद्या हाच अपमान\nआपल्या यशाचे कारण असेल.\nबोलून काही होणारच नसेल तर\nशेळी सारखे रहाल तर\nकोणी जगू देणार नाही म्हणून\nकोणी नादाला लागणार नाही.\nफक्त छोट्याशा अपमानाची गरज असते..\nजीवन अजून खूप सुखी, समाधानी आहे कारण\nअजून कुणाच्या प्रेमातच पडलो नाही.\nपण self respect नावाची गोष्ट\nकारण Block केलात तर\nते तुमची प्रगती कशे बघतील\nध्येय खुप मोठं आहे\nएक नंबर Status असतात तुझे\nअरे आपण दोन नंबरचे काम\nजे व्याजासह परत करायची संधी\nस्वतःच्या मनगटात ताकद ठेवा\nम्हणजे जगाची गरज भासणार नाही\nस्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणारेच\nमिरच्या कोणत्या Season मधे\nमी म्हटलं तुम्ही फक्त खरं बोला\nत्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते\nकाही वेगळीच मज्जा आहे.\nतिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ\nकधीच नाराज करु नका,\nज्याचा स्वतःचा Mood Off असताना सुध्दा\nकाही लोक त्याच गोष्टीसाठी\nरोज देवाकडे प्रार्थना करतात.\nआमच्याबद्दल अंदाज लावू नका\nकारण आम्ही शांत बसून पण\nजर जिंकायचे तर असे जिंकायचे कि\nजमलं तर आमच्याशी चांगले वागा\nतस पण तुमची गरज\nकाल पण नव्हती आणि\nअक्कल ही कधी बादाम खाल्याने नाही\nतर धोका खाल्याने वाढते\nफक्त जगण्याची पद्धत बदलते.\nहे खूप गरजेचं आहे….\nहसण्याचं खरं मोल काय आहे\nएक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा\nजो पर्यंत स्वतःच्या फोटोवर\nएखादा हार चढत नाही\nप्रेमात विश्वास फक्त एक जण तोडतो\nआणि भरोसा मात्र नेहमी\nस्वतःच्या मनगटावट जगायला शिका\nदुसऱ्याच्या जीवावट.किती दिवस उड्या मारणार\nतुमचा संघर्ष एवढा कडवा हवा की\nध्येय एवढं मोठं ठेवा की\nते पूर्ण झाल्यावर लोकांनी\nफक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे त्याग व परिश्रम केल्याशिवाय\nकोणतेही कार्य यशस्वी होत नाही\nतर नुसता सल्ला देऊ नका\nकारण सल्ला चुकीचा असू शकतो\nजी व्यक्ती आपल्या मनावर\nनियंत्रण ठेवू शकत नाही,\nहे एखाद्या शत्रू सारखेच आहे…..\nआता जे तुम्ही काम करत आहात\nत्या कामावर अवलंबून असत.\nDp कितीही चांगला ठेवा\nइमेजच जर चांगली नसेल तर\nतुमचा वाईट भूतकाळ विसरून\nस्वतःलाच स्वतः आव्हान करत जा….\nतुम्हाला तुमचं लक्ष गाठणं\nतर डोक्यावरचं ऊन झेलण्याची\nजर सर्वात मोठा शत्रू\nआयुष्यात एक गोष्ट तुम्ही\nआणि तुम्ही जर कोणावर\nतर ते कुणालाच सांगू नका.\nस्वतः कडून एवढ्या अपेक्षा ठेवा की\nइतरांकडून कोणतीही अपेक्षा ठेवायची\nगरज नाही भासली पाहिजे.\nकधी खचून जाऊ नका\nआणि चांगले दिवस आल्यावर\nकधी घमंड करु नका\nआयुष्य नेहमी आनंदात जगायचं\nते किती बाकी आहे\nहे कोणालाच माहिती नसतं…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/mongoose-fight-with-snake-video-viral-form-uttar-pradesh-mhkk-504979.html", "date_download": "2022-10-07T22:38:25Z", "digest": "sha1:SVGW5IXXLLTTSBS6ZBZIHPYLPSUKV6PE", "length": 8082, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "छोट्याशा मुंगसापुढे विषारी सापाला मानावी लागली हार, पाहा लढाईचा थरारक VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nछोट्याशा मुंगसापुढे विषारी सापाला मानावी लागली हार, पाहा लढाईचा थरारक VIDEO\nछोट्याशा मुंगसापुढे विषारी सापाला मानावी लागली हार, पाहा लढाईचा थरारक VIDEO\nनुकताच एक साप आणि मांजर यांच्यातील लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता\nनुकताच एक साप आणि मांजर यांच्यातील लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता\nरात्री गुपचूप भेटत होते GF-BF; ग्रामस्थांनी मिळून लव्ह स्टोरीचा केला The End\nVIDEO- मोठ्याने पिपाणी वाजवणाऱ्यांची वाजली पुंगी; आता तोंडानेही आवाज निघणार नाही\n वाघासोबत सेल्फी घ्यायला गेले तरुण आणि...; काय झाला शेवट पाहा VIDEO\n मृतदेहाच्या तपासणीसाठी शवगृहात गेले डॉक्टर; जे दिसलं ते पाहून हादरले\nहरदोई, 14 डिसेंबर : नुकताच एक साप आणि मांजर यांच्यातील लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मांजराला सापासमोर सपशेल हार मानावी लागली होती. तर मुंगुस आणि साप यांचं वैर तर जन्मोजन्मीच. साप दिसला तरी मुंगुस त्याच्यावर हल्ला करतं. साप कितीही मोठा आणि लांब असला तरी मुंगुंसासमोर सहजा सहजी हार मानत नाही मात्र मुंगुस छोटा असल्या तरी सापाला पळवून लावण्यात अपयशी ठरतो. साप आणि मुंगूस यांचे वैर खूप जुने आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई शहरातील कोतवाली परिसरातील बावन रोडवर अनेकांनी हे दृश्य पाहिले. रविवारी दुपारी साप-मुंगूस येथे जोरदार लढाई झाली. लांब आणि विषारी असणाऱ्या सापाला मुंगसाच्या पिल्लानं अगदी मेटाकुटीला आणलं. बराच वेळ चालेल्या या लढाईत अखेर मुंगूस जिंकलं ही लढाई पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. हे वाचा-2020 सालचे काही Viral Video, ज्यामुळे कोरोनाकाळातही आपल्या चेहऱ्यावर हसू आलं या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की साप मुंगसाच्या उंचीपेक्षा उंच उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यावर प्रतिवार करत आहे. मात्र मुंगूस सगळे हल्ले चुकवून पुन्हा सापावर हल्ला करतो. सापाच्या उंचीएवढं होण्याचा प्रयत्न करतो. त्याचं डोकं पकडून त्याला खाली आदळण्याचा प्रयत्न करतो आणि मुंगसाला यामध्ये यश येतं. साप आणि मुंगूस यांची ही लढाई पाहण्यासाठी लोक रस्त्यावर जमले होते. सर्प मुंगूसची लढाई ही लढाई पाहून काळजाचा ठोका एक क्षणासाठी चुकेल. असे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर अनेक पाहिले असतीलही पण हा व्हिडीओ खास आहे. कारण मुंगसाच्या पिल्लानं भल्यामोठ्या सापाला हरवलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/astrology/numerology-of-11th-august-2022-rashibhavishya-in-marathi-horoscope-astrology-mhrashi-pjn-744521.html", "date_download": "2022-10-07T21:51:39Z", "digest": "sha1:COWC7OABWC4X6P4YHIT7ECMRUL6KCNX6", "length": 22551, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Numerology of 11th august 2022 rashibhavishya in marathi horoscope astrology mhrashi pjn - Numerology: अंकशास्त्रानुसार तुमची जन्मतारीखही सांगते भविष्य; असा जाईल तुमचा आजचा दिवस – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /\nNumerology: अंकशास्त्रानुसार तुमची जन्मतारीखही सांगते भविष्य; असा जाईल तुमचा आजचा दिवस\nNumerology: अंकशास्त्रानुसार तुमची जन्मतारीखही सांगते भविष्य; असा जाईल तुमचा आजचा दिवस\nज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.\nज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.\nGold rate today : रुपया घसरला अन् सोनं महागलं; वाचा आजचे दर\nPetrol Diesel Rate : छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये बदलले पेट्रोल-डिझेलचे दर\nआर्थिक लाभ होतील पण प्रकृतीला जपा; सविस्तर वाचा आजचं राशिभविष्य\nदसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ; वाचा काय आहे आता नवीन भाव\nज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दिवसाची सुरुवात अगदी संथ गतीने होईल; मात्र उत्तरार्धात गती प्राप्त होईल. कायदेशीर सुनावणी, कंत्राट, मार्गदर्शन घेणं, नवीन योजना आखणं, नवीन नातेसंबंध तयार करणं किंवा मुलाखतीची तयारी करणं या सर्व गोष्टी आज पूर्ण होतील. आज तुमचं भरपूर कौतुक होईल; मात्र कमाई आणि कौतुक पाहून सहकाऱ्यांमध्ये मत्सर वाढेल. ऑफिसमध्ये यश मिळवण्यासाठी वरिष्ठांशी हातमिळवणी करणं फायद्याचं ठरेल. वैयक्तिक आयुष्यात डिप्लोमॅटिक राहणं उत्तम. एखाद्या नव्या गुंतवणुकीसाठी तुमची हुशारी कामी येईल. दिवसभरात सूर्यदेवाची पूजा करणं विसरू नका. शुभ रंग : Cream शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 1 दान : कृपया आश्रमांमध्ये गहू दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज विरुद्धलिंगी व्यक्तीशी वाद टाळा. सध्या तुमच्या योजनांनुसार गोष्टी होणार नाहीत. दिवसाची सुरुवात संगीताने केल्यास उत्तम. जोडीदारासोबत शॉपिंग करण्यासाठी चांगला दिवस. कंत्राट किंवा टेंडर मिळवण्यासाठी आज योग्य वेळ आहे. कामाच्या ठिकाणी विरोधकांवर मात करण्यासाठी डिप्लोमॅटिक संवादकौशल्य गरजेचं आहे. तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत भावनिक वेळ व्यतीत कराल. तुमची स्वप्नं सत्यात उतरण्यासाठी काही वेळ लागेल, तेव्हा संयम बाळगा. आज भगवान शंकर आणि चंद्र देवाची पूजा करा. दिवसभरात भरपूर पाणी प्या. शुभ रंग : White शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया गायींना किंवा भिक्षेकऱ्यांना दूध दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज लग्नासंबंधी वा बिझनेससंबंधी घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायद्याचे ठरतील. कृपया तुमच्या वस्तूंची काळजी घ्या आणि प्रॉपर्टीसंबंधी निर्णयांवर पुनर्विचार करा. तुमच्या गुरूसाठी आज दीपप्रज्ज्वलित करा. आज बोलण्याच्या किंवा लेखी माध्यमातून व्यक्त व्हाल. भूतकाळात झालेल्या गोष्टी विसरून खुल्या मनाने संवाद साधा. मित्रांवर छाप पाडण्यासाठी उत्तम दिवस आहे. डान्सिंग, कुकिंग, डिझायनिंग, अभिनय, शिक्षण किंवा ऑडिटिंग क्षेत्रातल्या व्यक्तींना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. फायनान्स आणि सरकारी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले गुण प्राप्त होतील. शुभ रंग : Peach शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 7 दान : कृपया मंदिरात कुंकू दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जोडप्यांमधले नातेसंबंध भरपूर सुधारतील. भरपूर प्रसिद्धी आणि पैसे कमावण्याचा दिवस आहे. आजचा बराचसा वेळ मार्केटिंगमध्ये व्यतीत करणं उत्तम. बिझनेस योजनांवर अंमलबजावणी करण्यासाठी चांगला दिवस आहे. मशीनसोबत काम करत असाल किंवा प्रवास करणार असाल तर खबरदारी घ्या. वैयक्तिक नातेसंबंध सुरळीत राहतील. केशरयुक्त मिठाई आणि संत्री खाणं फायद्याचं ठरेल. निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ व्यतीत केल्याने समाधान मिळेल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया एखाद्या मित्राला तुळशीचं रोप दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) घराच्या उत्तरेकडच्या भिंतीच्या लगत छोटं कारंजं ठेवल्याने फायदा होईल. तुमच्या पैशांचा वा स्वातंत्र्याचा अतिवापर टाळा. तुमच्या मनातल्या सर्वच गोष्टी बोलून दाखवणं गरजेचं नाही. काही गोष्टींमुळे इतरांना दुखावू शकता. तुमचा स्वभाव धाडसी आहे; मात्र विनाकारण रिस्क घेणं टाळा. गुंतवणूक करण्याबाबत तुम्ही रिस्क घेऊ शकता. मीटिंगमध्ये Sea Green रंगाचे कपडे घालणं फायद्याचं ठरेल. मुलाखत किंवा प्रपोझलला आनंदाने सामोरे जा. प्रॉपर्टीसंबंधी व्यवहार आरामात पार पडतील. प्रवास आवडणाऱ्या व्यक्तींना परदेशात जाण्याचा योग येऊ शकतो. आज खाण्या-पिण्याच्या बाबतीत शिस्त पाळणं गरजेचं आहे. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया अनाथांना हिरवी फळं दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज मोठ्या सभेपासून किंवा जनसमुदायापासून दूर राहणं उत्तम, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. तुमच्यात अफाट ऊर्जा आहे. ती एकाच दिशेने वापरणं फायद्याचं ठरेल. कमिटमेंट्स पूर्ण करण्यासाठी आज चांगला दिवस आहे. लहान मुलं आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. ग्लॅमर, ट्रेनिंग, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, कापड, रिअल इस्टेट आणि महागड्या वस्तूसंबंधी व्यवसायांमध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस. वाहन, घर, मशीन किंवा दागिने खरेदीसाठी उत्तम दिवस. डेकॉर, कॉस्मेटिक्स, गार्मेंट्स, फूड आणि स्टॉक मार्केट या क्षेत्रांमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. दिवसाच्या शेवटी एखादी रोमँटिक डेट तुम्हाला भरपूर आनंद देईल. शुभ रंग : Aqua and Peach शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया मंदिरात पांढरी मिठाई दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) ऑफिसच्या टेबलवर पाच कांड्या असलेलं बांबूचं रोप ठेवा. त्याने भाग्य उजळेल. पैशांच्या व्यवहारात तुमचे जुने कॉन्टॅक्ट आणि तुमची हुशारी कामी येईल. बिझनेसमध्ये व्यावहारिकपणे निर्णय घ्या. त्यामुळे जबाबदाऱ्या कमी होतील. पार्टनर किंवा क्लायंटसोबत कोणतीही तडजोड करू नका. वकिलांचा सल्ला स्वीकारा, फायदा होईल. आज येणाऱ्या विवाहाच्या प्रस्तावांबद्दल विचार करू शकता. भगवान शंकराच्या मंदिरात अभिषेक केल्याने नेपच्यूनची ताकद वाढेल. त्यामुळे मोठं यश मिळेल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया गरिबांना साखर दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज कायदेशीर सुनावणी आणि प्रवास या गोष्टी टाळा. लवचिक वृत्ती ठेवा आणि आवेग टाळा. गरजेच्या ठिकाणी सरकारी ओळखींचा वापर करा. कायदेशीर प्रकरणं तडजोड आणि पैशांच्या मदतीने सोडवता येतील. बिझनेस व्यवहारांमध्ये तुमच्या मनाचं ऐका. तुमच्या साधेपणाची छाप तुमच्या जोडीदारावर पडेल. विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रांत यश मिळेल. दिवसभर बऱ्याच व्यवहारांमध्ये वेळ व्यतीत होईल. त्यामुळे दिवसाच्या शेवटी समाधानी असाल. गायींसाठी दानधर्म करणं गरजेचं आहे. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरजूंना चपला दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्या खिशात लाल रंगाचं पेन ठेवल्याने भाग्य उजळेल. तुमच्या मनाचं ऐका, भरपूर प्रसिद्धी मिळेल. जुने वाद संपुष्टात आणण्यासाठी परस्पर विश्वासाची गरज भासेल. प्रेमात असलेल्यांनी आपल्या जोडीदाराला प्रपोज करण्यासाठी उत्तम दिवस. बिझनेस व्यवहारांमध्ये नशीब चांगलं राहील. राजकारण, लिक्विड, औषध, डिझायनिंग, मीडिया, फायनान्स किंवा शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींना भरपूर यश मिळेल. तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्ती कायमच्या दूर होतील. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी चर्चेतून वाद सोडवावेत. खेळाडूंच्या पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया मैत्रिणीला लाल कॉस्मेटिक्स दान करा. 11 ऑगस्ट रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : परवेझ मुशर्रफ, सुनील शेट्टी, श्री प्रकाश लोहिया, जॉन अब्राहम, यशपाल शर्मा\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0)", "date_download": "2022-10-07T22:28:00Z", "digest": "sha1:EEG4MKGON7GN4UG3HNV6SOI7N7BESV2N", "length": 3612, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:नायक (चित्रपट पात्र) - विकिपीडिया", "raw_content": "\nलेख नाव वाचून असे वाटते कि नायक नावाच्या चित्रपटाबद्दल लेख आहे. नायक हा एक चित्रपट देखील आहे. या ऐवजी नायक (चित्रपट पात्र) अथवा दुसरे एखादे उचित नाव द्यावे. - प्रबोध (चर्चा) १०:५२, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०११ रोजी १६:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mukundbhalerao.com/blog/2021/08/", "date_download": "2022-10-07T23:08:00Z", "digest": "sha1:HPMMDWZJKGER436XATRVB3DLBJRNLNCA", "length": 6763, "nlines": 151, "source_domain": "www.mukundbhalerao.com", "title": "August 2021 – Mukund Bhalerao", "raw_content": "\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\n हवामे, तैरना मुझे आता,\nप्रवीण बुरकुले on जनाचे श्लोक\nS B Joshi on जनाचे श्लोक\nTushar Shardul on अभिराम मुक्त ऐसा, आनंदकंद आहे……..\nमेघ बरसला हरी कृपेचा\nमाळावरती उभी साजरी, एक सानुली पर्णकुटी वेलीवेली मधुनी जातसे, वाट चिमुकली स्वप्न जशी…… हिरव्या वेली हिरवी पाने, चैतन्याचा दिव्य मळा, फुलाफुलांचा रंग बहरला, वनराणीचा गोड लळा……. माळावरती दूर पसरली, हिरवी पिवळी रम्य फुले, धुंद पाखरे वने विहरती, वनराणीचा स्नेह फुले………. लवलेल्या त्या प्रेमळ वेली, वृक्षावरती प्रेम दिसे, मंदगतीने विहरत ललना, वनात त्यांचे प्रेम वसे………. वाट […]\nशब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्याकरण\nअज्ञेभ्यो ग्र्न्थिन: श्रेष्ठा ग्रंथिभ्यो धारिणो वरा: | धारिभ्यो ज्ञनिन: श्रेष्ठा ज्ञानिभ्यो व्यवसायिन: ||मनुस्मृती.१०३|| अशिक्षित व्यक्तिपेक्षा शिक्षित मनुष्य श्रेष्ठ. ग्रंथातील ज्ञान हृदयस्थ करणारा केवळ वाचणार्‍यापेक्षा श्रेष्ठ. केवळ ग्रंथ हृदयस्थ करणार्‍यापेक्षा त्यातील खरे ज्ञान ज्याने आत्मसात केले तो अधिक श्रेष्ठ; आणि जो आत्मसात केलेय ज्ञानाप्रमाणे आपले आयुष्य जगतो तो सर्वात श्रेष्ठ.१ तर असे श्रेष्ठ ज्ञान मिळविण्याकरिता सर्वप्रथम […]\nमनस्वी भटकणाऱ्या मेघाशी अभिन्नहृदय कालिदासाचा अपूर्व काव्यमय मनोहारी संवाद – मेघदूत\nकालिदास हे एक अभिजात संस्कृत लेखक होते. त्यांना भारतीय संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून ओळखले जाते. त्यांची नाटके आणि कविता प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत आणि पुराणांवर आधारित आहेत. कालिदासाच्या सप्त साहित्यात तीन नाटके, दोन खंडकाव्ये आणि आणि दोन महाकाव्यांचा समावेश होतो. संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षापासून सर्वाना […]\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/fact-check/", "date_download": "2022-10-07T22:58:48Z", "digest": "sha1:3JXV6LQ4RFSAOHLMXDHLJF47IQC7TUB7", "length": 7704, "nlines": 137, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "FACT CHECK - थोडक्यात - Marathi News", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nTop News आरोग्य क्राईम खेळ तंत्रज्ञान देश फोटो फिचर\nमुलाचं अफेअर, सुनेचं डिप्रेशन, नातसूनेचे अर्धनग्न फोटो; राणीच्या घरातील 5 वादग्रस्त गोष्टी\nसरकारकडून तरुणांना 3400 रुपये मिळणार, सोशल मीडियावर मेसेज व्हायरल\nन्यूड फोटोशूट प्रकरणात रणवीर सिंग स्पष्टच बोलला\nगणेश भक्तांसाठी खुशखबर; मुख्यमंत्र्यांनी दिले नवीन आदेश\nनोएडातील ट्विन टॉवर पाडल्यानंतर मुंबईतही कारवाई\n“50 कोटी पचणार नाहीत, गुलाबरावचा जुलाबराव होईल”\n‘कोरोनासाठी एलियन्स जबाबदार’, किम जोंग उनचा विचित्र दावा\nसंजय राऊतांची चौकशी सुरू असलेलं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय, वाचा सविस्तर\n‘तोपर्यंत मला मुख्यमंत्री करा’; शेतकऱ्याचं राज्यपालांना पत्र\n‘वज़नदारने हल्के को…’; अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका\nभल्या भल्यांची दात तोडणाऱ्या टायसननं भर विमानात प्रवाशाला धु-धु धुतला; पाहा व्हिडीओ\nGold Rate: गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सोन्याच्या दरात घसरण, तपासा ताजे दर\n“तुमच्या भाईचं घर नाही, हे माझं जेल आहे”; कंगणानं घेतला थेट सलमानशी पंगा\n6 जानेवारीपासून ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामान खात्याचा अंदाज\n‘राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत आहे’\n“घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन…”\nवीजतोडणीचा प्रश्न पेटला, शेतकऱ्यांसाठी आमदाराचा गळफास घेण्याचा प्रयत्न\nपॅराशूट रायडिंग करताना घडलं असं काही… पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल\n ग्रामपंचायत निवडणुकीत बाप-लेक भिडले अन्…\nइम्रान खानवर स्वत:च्याच देशात चोरी करण्याची आली वेळ\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/saudi-arab", "date_download": "2022-10-07T23:14:20Z", "digest": "sha1:FOJF5TW5F5F2GZQOR776YBUDTQB3C7G6", "length": 7573, "nlines": 200, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\n नेहमी “अशा” बायकोच्या शोधात असायचा\nHajj : आले भक्ताच्या मना तिथे कुणाचे चालेना, हजला जाण्यासाठी तब्बल 6,500 किलोमीटर चालला, वाचा अपार भक्तीचा प्रवास\nभारताचे लष्कर प्रमुख सौदी अरब-यूएईत, पाकिस्तानमध्ये खळबळ\nसौदी अरेबियाला दिलेली धमकी पाकिस्तानला महागात, डॅमेज कंट्रोलसाठी लष्कर प्रमुखांना जाण्याची वेळ\nZaheer Khan : झहीर खानने अभिनेत्रीच्या कुटुंबाला अशा प्रकारे मनवलं होतं, जाणून घ्या लव्हस्टोरी\nफक्त प्रेम.. रणबीरने आलियाला केलं किस; बेबी शॉवरमधील खास क्षण\nदक्षिण आफ्रिकेवर भारी पडणार ‘हे’ दोन खेळाडू, जाणून घ्या….\nमौनी रॉयचा आऊटफिट पाहून नेटकरी घायाळ; फोटोंवर लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव\nRishabh Pant : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये ऋषभ पंतचा वाढदिवस साजरा, चाहते म्हणाले उर्वशीही…\nसादर करण्यात आलेल्या कागद पत्रांवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार यासह पहा इतर अपडेट महाफास्ट न्यूज 100 मध्ये\nअंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेचा प्रचाराचा काय आहे प्लॅन पहा यासह 4 मिनिट 24 हेडलाईन्स\nउद्धव ठाकरेंनी का मागितले आणखीन काही दिवस यासह इतर बातम्यांच्या अपडेटसाठी पहा महाफास्ट न्यूज 100\nशेतकऱ्यांना 12 तास वीज देणार यासह पहा राज्यभरातील अपडेट 36 जिल्हे 72 बातम्यामधून\n“उद्धव ठाकरेंच्या भाषणाला दर्जा नाही, बोलायला लागले की लोक निघून जातात”\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9F", "date_download": "2022-10-07T22:26:16Z", "digest": "sha1:CWUVKQIRPWFKZE3KCXFRQ3TUWQJ4AV3K", "length": 5503, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वीट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवीट (करमाळा तालुका) याच्याशी गल्लत करू नका.\nवीट हे इमारत बांधकामासाठी वापरायचे एक साहित्य आहे. तिचा वापर भिंतींच्या बांधकामात होतो. पारंपरिकरीत्या वीट म्हणजे लाल मातीपासून बनवून भट्टीत भाजलेला ९ इंच लांब, व ४ इंच रुंद व ३ इंच जाड मापाचा आयताकार घन ठोकळा. पण आजकाल सिमेंटच्या मसाल्याने बांधलेल्या कोणत्याही आयताकार ठोकळ्याला वीट म्हणतात. ही वीट माती, रेती, दगड, कॉक्रीट, औष्णिक विद्युत केंद्रातील राख अथवा चुना यांच्यापासून बनलेलीही असू शकते. विटा या अनेक पदार्थानी, अनेक वर्गीकरणांत, अनेक आकारमानांत व प्रकारांत बनविल्या जातात. या सर्व गोष्टींत स्थानांनुसार व कालावधीनुसार बदल संभवतो. विटांचे दोन मुख्य प्रकार म्हणजे भाजलेल्या व न-भाजलेल्या विटा होय.\nपारंपारिक वीट भट्टी परीसराचे दृश्य\nसाधारण विटेपेक्षा वेगळ्या साहित्याची व वेगळ्या आकारमानाची वीट थोडी वजनी असते. तिला हलकी करण्यास मधे एक पोकळी ठेवतात.\nभाजलेल्या विटा हे पुष्कळ काळ टिकणारे व मजबूत बांधकाम साहित्य आहे. त्यांचा उल्लेख 'कृत्रिम दगड' असाही कधीकधी करण्यात येतो. विटांचा उपयोग ५००० ख्रिस्तपूर्व या काळापासून करण्यात येत आहे. न-भाजलेल्या व नुसत्या हवेत वाळवलेल्या विटांचा इतिहास तर त्याहीमागे जातो. त्यांत एक जास्तीचे साहित्य म्हणून तणस अथवा गवत भरलेले असे. ते वापरून बनवलेली वीट एकसंध रहात असे व ती पाण्याने ओघळण्याची शक्यता अतिशय कमी रहात असे.\nबांधकामादरम्यान विटा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने रचण्यात येतात. त्यांना एकत्रितपणे सांधण्यासाठी वापरण्यात येणारा 'बंधक' (बांधणारा या अर्थाने) (अथवा स्थानिक भाषेत मसाला) हा वेगवेगळ्या पदार्थापासून बनविण्यात येतो. मसाल्यामुळे या विटांची बांधणी होते व एक बांधकाम उभे राहते.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nशेवटचा बदल १७ जानेवारी २०२१ तारखेला १७:३० वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०२१ रोजी १७:३० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%AF_%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2022-10-07T22:20:51Z", "digest": "sha1:JAIKNIW4NYEU42GJ6FZBISBM3WMBQOJU", "length": 13349, "nlines": 694, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जून ९ - विकिपीडिया", "raw_content": "\n(९ जून या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< जून २०२२ >>\nसो मं बु गु शु श र\n४ ५ ६ ७ ८ ९ १०\n११ १२ १३ १४ १५ १६ १७\n१८ १९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nजून ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६० वा किंवा लीप वर्षात १६१ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n६८ - रोमन सम्राट नीरोने आत्महत्या केली.\n१७३२ - जेम्स ओगलथॉर्पला अमेरिकेत जॉर्जिया येथे वसाहत करण्याची मुभा मिळाली.\n१८५६ - ५०० मॉर्मोन पंथीयांनी पंथीयांनी आपला धर्म अनिर्बंध पाळण्यासाठी आयोवा सिटी येथूनसॉल्ट लेक सिटीकरता प्रस्थान केले.\n१८६३ - अमेरिकन यादवी युद्ध - ब्रॅन्डी स्टेशनची लढाई.\n१९२३ - बल्गेरियात लश्करी उठाव.\n१९३४ - डोनाल्ड डकचे चित्रपटसृष्टीत चित्रपट द वाइज लिटल हेन या चित्रपटाद्वारे पदार्पण.\n१९३५ - चीनने ईशान्य चीन मधील जपानची घुसखोरी मान्य केली.\n१९७८ - मॉर्मोन चर्चने श्यामवर्णीय पुरूषांना पादरी होण्याची परवानगी दिली.\n१९९९ - युगोस्लाव्हिया व नाटोमध्ये संधी.\n२००६ - २००६ फिफा विश्वचषक जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू.\n१५९५ - व्लादिस्लॉस चौथा, पोलंडचा राजा.\n१६४० - लिओपोल्ड पहिला, पवित्र रोमन सम्राट.\n१६६१ - फियोदोर तिसरा, रशियाचा झार.\n१६७२ - पीटर पहिला, रशियाचा झार.\n१९४७ - किरण बेदी, भारतातील सर्वप्रथम स्त्री आय.पी.एस. अधिकारी.\n१९६१ - मायकेल जे. फॉक्स, अमेरिकन अभिनेता.\n१९६३ - जॉनी डेप, अमेरिकन अभिनेता.\n१९७५ - अँड्रु सिमन्ड्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९०० - बिरसा मुंडा\n६८ - नीरो, रोमन सम्राट.\n६३० - शहर्बराझ, पर्शियाचा राजा.\n१७१६ - बंदा बहादुर, शीख सेनापती.\n१९४६ - राम तिसरा, थायलंडचा राजा.\n१९७३ - एरिक फॉन मॅनस्टाईन, दुसऱ्या महायुद्धातील जर्मन सेनानी.\n१९९५ - प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू.\nबीबीसी न्यूजवर जून ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nजून ७ - जून ८ - जून ९ - जून १० - जून ११ (जून महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑक्टोबर ७, इ.स. २०२२\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ सप्टेंबर २०२२ रोजी १४:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://parbhani.gov.in/mr/notice/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-07T22:52:49Z", "digest": "sha1:JQVDST2HNAGSGOGTUDJRGL3IZ5GWKISG", "length": 7636, "nlines": 123, "source_domain": "parbhani.gov.in", "title": "परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक अंतिम मतदार यादी पुर्णा तालुका | परभणी | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nडॉ.प्रफुल्ल पाटील मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल\nसरस्वती – धन्वंतरी डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल\nमहसुल / दंडाधिकार शाखा\nस्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nउप प्रादेशिक परिवहन कार्यालय\nजिल्हा परिषद, पंचायत समिती तालुका निहाय प्रारुप व अंतिम प्रभाग रचना\nमाहे ऑक्टोबर-नोव्हेंंबर २०१९ मधे झालेल्या अवेळी पावसामुळे बाधित शेतकरी यांंच्या मदत वाटप याद्या\nपरभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची विधान परिषद निवडणुक – २०१८\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या (दुसरा टप्पा)\nप्रधानमंत्री पिक विमा योजना २०१७ लाभार्थी यादी\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ पात्र लाभार्थी याद्या\nखरीप २०१८ दुष्काळी अनुदान पहिला व दुसरा टप्पा\nखासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंंतर्गत २०१४-१५ ते २०१८-१९ या कालावधीमधील मंजुर कामांंची यादी\nऔरंंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२०\nपरभणी जिल्ह्यातील कब्जेहक्काने व भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमीनीचे आदेश\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)\nपरभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची विधान परिषद निवडणुक – २०१८\nपरभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक अंतिम मतदार यादी पुर्णा तालुका\nपरभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक अंतिम मतदार यादी पुर्णा तालुका\nपरभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक अंतिम मतदार यादी पुर्णा तालुका\nपरभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक अंतिम मतदार यादी पुर्णा तालुका\nपरभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक २०१८ साठी पुर्णा तालुका क्षेत्रातील मतदारांची अंतिम यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 28, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mensxp.com/marathi/health/weight-loss/95357-best-diet-plan-for-weight-loss-in-marathi.html", "date_download": "2022-10-07T22:47:31Z", "digest": "sha1:EAUYH7TGCZFTN64GMH26EHSQBCECVHMM", "length": 17696, "nlines": 100, "source_domain": "www.mensxp.com", "title": "वजन कमी करण्यासाठी वापरा हा सर्वोत्कृष्ट डाएट प्लॅन | Best diet plan for weight loss in marathi", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nजाहिरात द्याMensXP वर सेलआमच्याबद्दलसंपर्क साधा\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nवजन कमी करण्यासाठी वापरा हा सर्वोत्कृष्ट डाएट प्लॅन\n· 4 मिनिटांमध्ये वाचा\nवजन कमी करण्यासाठी वापरा हा सर्वोत्कृष्ट डाएट प्लॅन\nजंक फूड, फास्ट फूड यांमुळे लोकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहेत. घरी बनलेल्या जेवणाऐवजी बाहेरचे तेलकट आणि हानिकारक पदार्थ खाल्यामुळे वजन वाढत जाते. अयोग्य आहार पद्धती या कारणामुळे वजन वेगाने वाढत जाते. आजकाल लोकांकडे वेळ नसल्यामुळे त्यांना झटपट तयार होणारे पदार्थ खाण्याची सवय लागली आहे.\nवाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक डाएटिंग करतात. काहीजण तर जेवण सोडून देतात. वजन घटवण्यासाठी उपाशी राहतात. उपाशी राहिल्यामुळे वजन कमी करणे अशक्य आहे. सकस आणि संतुलित आहार घेतल्यामुळे वजन नियंत्रणामध्ये राहते. तुम्ही स्वतःच्या आहारामध्ये निवडक बदल करुन फिट राहू शकता.\nभारतीय खाद्यपदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. कार्ब्समुळे काही प्रमाणात वजन वाढू शकते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. शरीरामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असल्यास व्यायाम करताना फायदा होतो. आहारामध्ये कार्ब्स आणि फॅट्स कमी करुन वजन कमी करता येते.\nया आर्टिकलमध्ये दैनंदिन आहार कसा असावा याची माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारे डाएट प्लॅन तयार करुन वजन कमी करता येते.\nवजन कमी करण्यासाठी ‘फायबर डाएटचा’ आहारात करा समावेश\n1. सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यावे.\nसकाळी लवकर उठावे. उपाशी पोटी उकळलेले पाणी प्यायल्यामुळे वजन कमी करता येते. उकळलेल्या पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळणे अधिक फायदेशीर असते. गरम पाण्यामध्ये साखर टाकू नये. एक कप गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा मध टाकून प्यायल्यामुळे अपचनाच्या समस्येचे प्रमाण कमी होते. सकाळच्या प्रात:विधी उरकण्यासाठीही याची मदत होते.\nबर्‍याच जणांना सकाळी चहा किंवा काॅफी प्यायची सवय असते. चहा, काॅफी ही पेये काही प्रमाणात शरीरासाठी अपायकारक असतात. सकाळी चहा, काॅफी ऐवजी गरम पाणी प्यावे.\nरात्री जेवल्यानंतर थेट सकाळी ब्रेकफास्ट केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये पोषक तत्त्वे पोहचत असतात. सुमारे 7-8 तास शरीरामध्ये अन्नपदार्थ न गेल्याने शरीराला प्रोटीन, व्हिटॅमिन, कार्ब्स अशा घटकांची गरज भासते. ही गरज सकाळी हेवी ब्रेकफास्ट केल्यामुळे भागली जाते. पोटभर खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. ब्रेकफास्टमधील पदार्थ हाय प्रोटीन तत्वाने परिपूर्ण असावेत असे तज्ज्ञ सांगतात. या पदार्थांमध्ये काही प्रमाणात कार्ब्स आणि फॅट्स हे घटक असावेत.\n॰ एग व्हाइट्स सह ओटमील आणि फळे\n॰ अंडी आणि पालक यांपासून तयार केलेली भुर्जी\n॰ मुगाच्या दाळीपासून बनवलेला डोसा\n॰ अंड्याची भुर्जी /ऑमलेट /पनीर भुर्जी\nकिटो डाएटदरम्यान लोक करतात या 6 चुका, वेट लॉस करणं होतं कठीण\nसकाळच्या हेवी ब्रेकफास्टनंतर 12-2 च्या आसपास दुपारचा लंच घेतला जातो. लंच हलक्या स्वरुपाचा असावा. ब्रेकफास्टने पोट भरलेले असल्यामुळे लोक दुपारचे जेवण टाळतात. आहारतज्ज्ञांच्या मते, दुपारचा लंच कधीही स्किप करु नये. दुपारच्या जेवणामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असावा.\nलंचमध्ये सलाद खाणे फायदेशीर असते. सलादमध्ये काकडी, कोबी, गाजर, टोफू किंवा पनीर, चीज, ऑलिव्स, कांदा, बीट, पालक असेपदार्थ असावेत. मांसाहार करत असल्यास तुम्ही उकडलेल्या चिकनचे काही तुकडे सलादमध्ये मिक्स करु शकता. तुमच्या सोयीनुसार सलादमधील पदार्थ निवडू शकता.\nतुम्ही सलाद ऐवजी ब्राऊन राईस आणि हाय प्रोटीन डाळ खाऊ शकता. लंचमध्ये गव्हाची चपाती, सोयाबीनचा समावेश असलेली डाळ देखील खाल्ली जाते.\nअनेकांना संध्याकाळी 4-5 च्या आसपास चहा किंवा काॅफी प्यायला आवडते. भारतामधील बहुतांश लोकांना संध्याकाळी चहा/ कॉफी पिण्याची सवय लागलेली आहे. वजन कमी करायचे असल्यास ही सवय मोडावी लागेल. टी ब्रेकमध्ये चहासोबत वडापाव किंवा समोसा खाल्ला जातो. या तेलकट पदार्थांमुळे वजन वाढते.\nस्नॅक्समध्ये शेव, शेंगदाणे किंवा उकडलेले चणे खावेत. मीठ, टाॅमेटो, कांदा टाकून यांची पौष्टिक भेळ बनवून खावी.\nलंचप्रमाणे डिनरमध्ये ब्राऊन राईस आणि डाळ, पोळी-भाजी किंवा सलाद असे पदार्थ खावेत. दुपारच्या जेवणाच्या यादीमध्ये असलेले पदार्थ डिनरमध्ये तयार करुन खाता येतात. रात्री सुर्यास्तापूर्वी किंवा सूर्यास्त झाल्यानंतर लगेच जेवण करावे.\n6. झोपण्यापूर्वी दूध प्यावे.\nसंध्याकाळी 6-7 वाजता डिनर केल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी भूक लागल्यास दूध प्यावे. एक ग्लास लो फॅट दूध प्यायल्यामुळे भूक मिटते. दुधांमध्ये साखर टाकू नये. दुधामधील साखरेमुळे रक्तातील साखर वाढू शकते. परिणामी शरीराचे वजन वाढू शकते.\n5 पदार्थ तुम्हाला वजन वाढवण्यास करु शकतील मदत\nया महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवाव्यात.\nवजन घटण्याकरिता संतुलित आहार घेणे आवश्यक असते. काहीजण वजन कमी करण्यासाठी कडक डाएट पाळतात. हे लोक पथ्य पाळताना स्वतःचे नुकसान करुन घेतात. दिवसभर काम करण्यासाठी शरीराला पोषक घटकांची गरज असते. एकही अन्नपदार्थ न खाल्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. डाएट केल्यामुळे फॅट सेल्स बर्न होत असताना मसल्स लाॅस होऊ शकतो.\nआहारासोबतच व्यायाम हा मुद्दा देखील महत्त्वपूर्ण असतो. योग्य आहार घेत असताना व्यायाम न केल्याने शरीरामध्ये हवा तसा बदल होणार नाही. वजन घटवण्यासाठी 70 टक्के डाएट आणि 30 टक्के वर्कआऊट अशा समीकरणाचा वापर करावा लागतो. धावणे, पळणे, जाॅगिंग करणे, हेवी वेट्स उचलणे अशा काही व्यायाम प्रकारांमुळे कॅलरीज आणि फॅट सेल्स बर्न होतात. 'व्यायाम आणि डाएट' यांमुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.\nवजन हळूहळू वाढत जाते. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला देखील बराच कालावधी जावा लागतो. वजन घटवण्यासाठी कोणत्याही शाॅर्टकटचा वापर करु नये. बर्‍याच वेळा हे शाॅर्टकट्स शरीरासाठी अपायकारक असतात.\nवजन कमी व्हावे म्हणून वर्कआऊट प्लॅन तयार करण्यासाठी फिटनेस ट्रेनरसारख्या तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी. विशिष्ट व्यायाम करतानाही ट्रेनर सोबत असणे फायदेशीर असते.\nया आर्टिकलमधील माहितीमुळे तुम्हाला फायदा झाल्यास हे आर्टिकल इतरांना शेअर करा. तुमचे अनुभव कमेंट करुन आमच्यापर्यंत पोहचवा. एकूण कमेंट्सपैकी ठराविक कमेंट्स आमच्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येतील.\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/ind-vs-pak-india-and-pakistan-face-each-other-again-look-at-the-equation/", "date_download": "2022-10-07T22:21:44Z", "digest": "sha1:2TGRDNF6H2OGJQOV53KXPQQYFMVONDME", "length": 11494, "nlines": 53, "source_domain": "mahaupdate.in", "title": "IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने-समाने? पाहा समीकरण - Maha Update", "raw_content": "\nHome » IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने-समाने\nIND vs PAK : भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने-समाने\nनवी दिल्ली : या रविवारी आशिया चषक 2022 च्या सुपर-4 टप्प्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक शानदार सामना पाहायला मिळू शकतो. आशिया चषक 2022 च्या 28 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रुप ए मॅचमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला होता, त्यानंतर संपूर्ण जग पुन्हा एकदा या दोन देशांमधील शानदार सामन्याची वाट पाहत आहे.\nसुपर संडेला भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडतील का\nशुक्रवारी 2 सप्टेंबर रोजी आशिया चषकाच्या अ गटातील सामन्यात पाकिस्तान संघाने हाँगकाँग संघाचा पराभव केल्यास ते आशिया चषकाच्या सुपर-4 टप्प्यात प्रवेश करेल. सुपर-4 टप्प्यात पोहोचल्यानंतर, रविवारी, 4 सप्टेंबर रोजी पाकिस्तानचा सामना टीम इंडियाशी होणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करू शकते. पाकिस्तान सोबतचा जबरदस्त सामना झाल्यास टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल यावर एक नजर टाकूया.\nपाकिस्तानविरुद्धच्या शानदार सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत ऋषभ पंतला सलामीला संधी दिली जाऊ शकते. केएल राहुलचा फॉर्म चांगला नाही आणि अशा परिस्थितीत तो टीम इंडियाच्या ओपनिंगमध्ये कमकुवत ठरत आहे. ऋषभ पंतला ओपनिंगमध्ये संधी दिल्यास टीम इंडियाला डावा आणि उजवा हात ओपनिंग कॉम्बिनेशन मिळेल. केएल राहुलच्या तुलनेत, ऋषभ पंत तुफानी फलंदाजीत माहिर आहे आणि काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलतो.\nटीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली पाकिस्तानविरुद्धच्या शानदार सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला जाणार आहे. आशिया चषक स्पर्धेत बुधवारी हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने सर्वांची व्हा वाही.. लुटली. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने प्रथम फलंदाजीची ताकद दाखवली. विराट कोहलीने 59 धावांची खेळी केली, ज्यात 1 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. विराट कोहलीने 6 महिन्यांनंतर भारतासाठी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावले. यानंतर विराट कोहलीने प्रदीर्घ कालावधीनंतर गोलंदाजी करण्यासाठी उतरून सर्व चाहत्यांना आश्चर्यचकित केले. विराट कोहलीने हाँगकाँगच्या डावातील 17 वे षटक टाकले. विराट कोहलीने या षटकात केवळ 6 धावा खर्च केल्या. मात्र, त्याला एकही विकेट मिळाली नाही.\nपाकिस्तानविरुद्धच्या शानदार सामन्यात टीम इंडियासाठी सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळणार असल्याचे मानले जात आहे. सूर्यकुमार यादव हा सध्या जगातील सर्वात धोकादायक फलंदाज मानला जातो. आशिया चषक 2022 मध्ये बुधवारी हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने बॅटने असा नरसंहार घडवून आणला की संपूर्ण जग हादरले असेल. सूर्यकुमार यादवने आपल्या किलर बॅटिंगने हाँगकाँगच्या गोलंदाजांची धुलाई केली. सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत 68 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवच्या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. फलंदाजीदरम्यान सूर्यकुमार यादवचा स्ट्राइक रेट 261.54 आहे.\nपाकिस्तानविरुद्धच्या महान सामन्यात हार्दिक पंड्याचे पाचव्या क्रमांकावर उतरणे निश्चित मानले जात आहे. हार्दिक पांड्या शानदार फॉर्ममध्ये धावत आहे. आशिया चषक 2022 मध्ये 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करताना 3 विकेट घेतल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना 17 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. हार्दिक पंड्याला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले.\nदिनेश कार्तिक यष्टिरक्षक असेल\nयष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची मधल्या फळीत सहाव्या क्रमांकासाठी संघात निवड होण्याची खात्री आहे.\nगोलंदाजीसोबतच रवींद्र जडेजाही शानदार स्टाईलने फलंदाजी करतो. जडेजाही चेंडूने सामना फिरवू शकतो. रवींद्र जडेजा हा गेम चेंजर खेळाडू आहे.\nहे वेगवान गोलंदाज असतील\nवेगवान गोलंदाजांसाठी या प्लेइंग इलेव्हनमध्ये भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांना स्थान देण्यात येणार आहे. टीम इंडियाच्या एकमेव फिरकी गोलंदाजासाठी अनेक खेळाडूंमध्ये युद्ध रंगेल, पण युजवेंद्र चहलऐवजी रविचंद्रन अश्विनला स्थान देणे अधिक योग्य ठरेल.\nही असू शकते भारताची पाकिस्तान विरुद्ध प्लेइंग इलेव्हन:\nरोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), विराट कोहली,सूर्यकुमार यादव,हार्दिक पांड्या,दिनेश कार्तिक,रवींद्र जडेजा,आर अश्विन,आवेश खान,अर्शदीप सिंग,भुवनेश्वर कुमार\n भारत-पाकिस्तान ‘सुपर 4’ सामना बनला सर्वाधिक पाहिला जाणारा T20 सामना\nIND vs PAK : भारत-पाक सामना सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानच्या फलंदाजाचे धक्कादायक विधान\nAsia cup 2022 : पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने; “या” दिवशी रंगणार महामुकाबला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/jalgaon-news-lumpy-disease-122-animals-died-in-jalgaon-district-rds84", "date_download": "2022-10-07T22:40:22Z", "digest": "sha1:IY6EUCYMYBSO7HZDU7YHGP7PBQRKNL56", "length": 6275, "nlines": 66, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Lumpy: ‘लम्पी’चा उद्रेक; जळगाव जिल्‍ह्यात १२२ जनावरे मृत्यूमुखी", "raw_content": "\n‘लम्पी’चा उद्रेक; जळगाव जिल्‍ह्यात १२२ जनावरे मृत्यूमुखी\n‘लम्पी’चा उद्रेक; जळगाव जिल्‍ह्यात १२२ जनावरे मृत्यूमुखी\nजळगाव : जिल्ह्यातील आठ तालुक्यांत जनावरांमध्ये लम्पी स्किन डीसीज आढळला आहे. त्यामुळे एक हजार ८०० पशूधन बाधित झाले असून, आतापर्यंत १२२ जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत. लम्पी स्किन (Lumpy Disease) आजारामुळे राज्यात सर्वाधिक मृत्यू जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात झाले आहेत. पशूसंवर्धन विभागातर्फे प्रत्येक तालुक्यात लसीकरण मोहीम वेगात सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत दोन लाख २५ हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. (Jalgaon News Lumpy Disease)\nDhule: मोटरसायकल चोरी, घोरफोडी करणारे ताब्‍यात\nलम्पी आजाराचा प्रसार बाह्य कीटकांद्वारे (डास, माश्‍या, गोचीड आदी) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर, तसेच गोठ्यात बाह्य कीटकांच्या निर्मूलनासाठी ग्रामपंचायतींतर्फे पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने औषधांची फवारणी करण्यात येत आहे. विषाणुजन्य आणि सांसर्गिक असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ अंमलात आणण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. पशुधन एकत्र येतील, असे सार्वजनिक चराई व सार्वजनिक पाणी पिण्याचे सार्वजनिक हौद काही काळासाठी बंद ठेवले आहेत.\n– लम्पी आजाराने बाधित गुरे : ५,१८०\n– एकूण मृत गुरे : १२२\n– जिल्ह्यातील गुरे : ५ लाख ५० हजार\n– आतापर्यंत लसीकरण झालेली गुरे : २ लाख २५ हजार\n– प्रत्येक तालुक्यात कार्यरत टीम: ६\nआतापर्यंत जिल्ह्यात लम्पी आजाराने १२२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. २ लाख २५ हजार गुरांना लसीकरण झाले आहे. साडेपाच लाख गुरांना लसीकरणाचे उद्दिष्ठ आहे. ते लवकरच पूर्ण होईल. पशुपालकांनी गुरांना लम्पीची लागण झाल्याचे लक्षात येताच पशूसंवर्धपन विभागाला कळवून गुरांवर उपचार करून घ्यावेत.\n-डॉ. श्‍यामकांत पाटील, उपायुक्त, पशुसंर्वधन विभाग\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/student-passed-away-by-drown-in-water-in-bhandara-dead-body-search-operation-in-still-on-ab95", "date_download": "2022-10-07T21:20:38Z", "digest": "sha1:LVA3XYYMVWT7IM23KLBUHQ3NJ5G7Q5ZN", "length": 5444, "nlines": 58, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Bhandara News | पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू", "raw_content": "\nBhandara: पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू; मृतदेहाचा शोध अद्यापही सुरुच\nBhandara Accident News : आदित्य आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी चाना शेत शिवाराच्या नाल्यावरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता.\nभंडारा: मित्रांसोबत पोहायला गेलेल्या ११ वी च्या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू (Drowned In Water) झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara) लाखनी तालुक्यातील चाना येथे घडली आहे. आदित्य विजय वाघाये ( 17 ) रा. केसलवाडा - वाघ असे मृतक विद्यार्थ्यांचे नाव असून तो स्व. निर्धनराव पाटील वाघाये कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावीचा विद्यार्थी होता. (Bhandara Latest News)\nराज्याच्या सांस्कृतिक पुरस्कारांच्या वितरणाबाबत मुनगंटीवारांचं मोठं विधान, म्हणाले...\nआदित्य आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी चाना शेत शिवाराच्या नाल्यावरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता. नाल्याच्या पाळीवर कपडे आणि चपला काढून तो पाण्यात पोहण्यासाठी शिरला. मात्र बंधाऱ्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही बाब त्याच्यासोबत असलेल्या मित्राला लक्षात येताच त्याने मोबाईलद्वारे ही माहिती आदित्यच्या कुटुंबियांना दिली.\nCorona Update: जगातून कोरोना संपणार का\nकुटुंबियांनी ही माहिती लाखनी पोलिस स्टेशनला दिली. यानंतर केसलवाडा-वाघ येथील पोहणाऱ्या युवकांच्या मदतीने त्याच्या आदित्यचा शोध घेण्यात आला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध कार्यात बाधा निर्माण होत आहे, त्यामुळे अद्यापही आदित्यचा शोध सुरुच आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/love/5469/", "date_download": "2022-10-07T21:19:31Z", "digest": "sha1:RKI56HSVE5HH3RB4DGVV3JKEOJIJXTDO", "length": 4042, "nlines": 86, "source_domain": "www.snopty.com", "title": "प्रेम - Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nसुरवात झाली की किती उत्साह असतो , मग ती कसली का असू द्या..\nप्रेम खरे प्रत्येक माणसाच्या वाट्याला येते हे खरे आहे असे मानून आपण पुढे जात असतो. प्रेम म्हणजे तरी काय हो जिथे आपला एकटेपणा वाटला जातो आणि एक हक्काच माणूस भेटते, अशा वेळेस आपण हजारदा विचार करत करत त्या प्रेमात पडतो का जिथे आपला एकटेपणा वाटला जातो आणि एक हक्काच माणूस भेटते, अशा वेळेस आपण हजारदा विचार करत करत त्या प्रेमात पडतो का नाही ते शक्य नाही , मानवी स्वभाव आणि त्याच्या मानसिक आणि शारीरिक गरजा जिथे पुर्ण होतात कदाचित ते प्रेम आहे असेच आपण धरुन पुढे चालत राहतो.\nअसो प्रेम होने,करने आणि मिळवने सगळ्या निरनिराळ्या गोष्टी आहेत.\nमी सुखी आहे किंबहुना होणार आहे हा आत्मविश्वास प्रेमाने मिळतो हे जरी खरे असले तरी प्रेम मात्र प्रत्येक जोडप्याला हे वेगवेगळ्या कारणांमुळे बांधून ठेवते असे म्हटले तर गैर होईल का\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशब्द….मुक्या भावनांना व्यक्त करणारे एक अस्त्र.\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Sumit22", "date_download": "2022-10-07T22:29:56Z", "digest": "sha1:WE4EB6MKKZ4CAR2UBJUKCXF6M7XNXUA7", "length": 46926, "nlines": 139, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Sumit22 - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nस्वागत Sumit22, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन Sumit22, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८७,१८२ लेख आहे व २०७ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nदृश्यसंपादकाचे उपयूक्त कळफलक लघुपथ\nकळफलक लघुपथ विस्तृत यादी Ctrl+/\nदृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\n१ भीमरावमहावीरजोशीपाटील फॉर प्रचालक\n२ अलीकडे मराठी विकिपीडियातील चर्चापानावर केलेले लेखन\n२.२ मराठी विकिपीडिया हे एकमेव अथवा अंतीम स्थान नाही\n३ प्रचालकीय कृतींबद्दलच्या तक्रारी\n५ विकिपीडिया आशियाई महिना २०१७: सहभागी होण्यासाठी आमंत्रण\nभीमरावमहावीरजोशीपाटील फॉर प्रचालकसंपादन करा\nमैने मै दुबलो का मसिहा, जातियवाद के खिलाफ आंधी, चर्चा का तुफान , १,६०,००० से ज्यादा योगदान करनेवाला स्ंयमी महापुरूष भीमरावमहावीरजोशीपाटीलजी को प्रचालकपद के चुनाव के लिये नाम दिया है, क्रुप्या वोट दे विकिपीडिया:कौल/प्रचालक#भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा)\nएक् प्रचालक् डर् के भाग् गया - वा वा वा\nफ्रांस् मे बैठा कोइ या फ्रांस् कि कंपनी मे काम् कर्ने वाल कोइ हुब हु नकल् करन सीख् गय - वव् वा वा\nअभी मने देखा Balajeeजी भी उनकी तरह लिखना सिख गये.\nFan of Joker (चर्चा) २३:०८, २५ सप्टेंबर २०१२ (IST)\nअलीकडे मराठी विकिपीडियातील चर्चापानावर केलेले लेखनसंपादन करा\nआपण अलीकडे मराठी विकिपीडियातील चर्चापानावर केलेले लेखन विशिष्ट व्यक्ती अथवा समुदायास अनुलक्षून आरोप/ असभ्य अथवा असंसदीय भाषा या गटात मोडते असे मांडले गेले आणि वगळले गेले आहे अथवा कोणत्याही क्षणी वगळले जाऊ शकते. विशिष्ट विचार अथवा कृती बद्दल आपली मतांतरे अगदी टीकाही ऐकून घेण्यास मराठी विकिपीडिया समुदाय नेहमीच उत्सुक असतो आणि असेल. अर्थात प्रत्येक व्यक्तीची, समूहाची कृती अथवा विचार आपल्याला पटणारे असतीलच असे नाही, \"महात्मा गांधी\" म्हणतात त्याप्रमाणे आपली टीका त्या विशिष्ट कृती अथवा विचाराबद्दल आपले अभ्यासपूर्ण मुद्देसूद मतांतर व्यक्त करण्यापर्यंतच मर्यादित ठेवावी, आपण करत असलेल्या टिकेचे चारित्र्यहननात, व्यक्ती अथवा समूहद्वेषात रुपांतरण होणार नाही याची दक्षता घेणे जरूरी आहे. एखादा विचार मुद्दा/कृती पटत नसेल तर काय करावे याची माहिती खाली दिली आहे ती पुढे दिली आहे ती वाचावी.\nविकिपीडिया ज्ञानकोश सामूहिक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक वांशिक स्वरूपांचे आरोप करू नयेत.\n'विकिपीडिया रचनात्मक टिकेचे स्वागत करते', या सुचनेचा विस्तार\n...अनुमान आणि नकार या पद्धतीतून जाईल तेव्हाच सत्य जाणता येते. सत्य जाणायचे असेल, तर प्रत्येक प्रस्थापित सत्याला आपण नकार देणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण मनाने व बुद्धीने मुक्त असणे आवश्‍यक आहे. समाजव्यवस्थादेखील मुक्त असली पाहिजे.... [१];वादे वादे जायते तत्व(/शास्त्र) बोध ज्याचा अर्थ वाद विवादानेच सत्याचा बोध होतो. विकिपीडियातील लेखाचा आवाका त्याची निष्पक्षता आणि खोली चर्चापानांवरून सर्व बाजू लक्षात घेऊन होणाऱ्या चर्चेवर अवलंबून असते. त्यामुळे आपली मतांतरे मराठी विकिपीडियाच्या निष्पक्षतेच्या आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने बहूमुल्य असणार आहेत.\nपरस्परांशी चर्चा करताना फक्त भाषेत केवळ असभ्यता आणि निराधार आरोप टाळावेत एवढीच अभिलाषा सदस्यांकडून असते.आपण काही महत्त्वपूर्ण मुद्दा मांडू इच्छित असाल तर तो मुद्दा बाजूस पडून विषयांतर होऊन आपल्या मुद्द्याच्या काही महत्त्वपूर्ण बाजूंचे नुकसान होऊ शकते हे लक्षात घेऊन व्यक्तिगत अथवा भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांची टीका कटाक्षाने टाळावी.\nहि संसदीय भाषेची अपेक्षा, विकिपीडिया सदस्यांच्या आपापसातील संवादापुरती मर्यादीत आहे ; लेखातील लेखनाच्या संदर्भाने लागणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येत नाही आणि लेखातील लेखन करताना संदर्भासहीत असलेल्या विश्वकोशीय परिघात बसणाऱ्या लेखनाच्या लेखन शैलीचे संकेत वेगळे आहेत त्यांचा येथे संबंध नाही.\n'एखादा विचार मुद्दा कृती पटत नसेल तर काय करावे ', या सुचनेचा विस्तार\nविकिपीडिया हा ज्ञाकोश २००१ पासून तर मराठी विकिपीडिया २००३ पासून अस्तीत्वात आहे विकिमीडिया फाऊंडेशन, विवीध विकिप्रकल्प आणि मराठी विकिपीडिया सदस्यांच्या प्रदीर्घ चर्चातुन विवीध मुल्ये संकेत आणि नियमांची वेळोवेली आखणी होत आली आहे अगदी अनुभवी सदस्यांना सुद्धा सर्वच्या सर्व मुल्य आणि संकेताचे सर्व पैलू आणि कंगोरे माहितच असतील असे नाही . सर्व सहाय्य पानांचे वाचनही पूर्ण करणे आपल्या प्रमाणेच इतर सदस्यांनाही होतेच असे नाही.आपल्याला एखादी कृती विचार मुद्दा बद्दल आपले मतांतर असल्यास सर्व प्रथम संबधीत कृती विचार मुद्द्या बद्दल संबंधीत व्यक्ती तसेच इतर सदस्यांची भूमीका अशी का आहे या संबधी माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करावा त्या नंतरही आपल्याला आपले मतांतर होत आहे असे वाटल्यास नेमक्या कोणत्या कृती अथवा विचारा बद्दल मतांतर आहे आणि का आहे हे व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक वांशिक स्वरूपांचे आरोप न करता मांडावे. अगदी प्रचालकांच्या कृती सहीत कोणतीही गोष्ट पटत नसेल तर त्याची अभ्यासपुर्ण आणि मुद्देसूद मांडणीकरून कृती किंवा लेखन पलटवण्याबद्दल सदस्यांची सहमती संबंधीत लेखांच्या चर्चा पानावर / कौल पानांवर आजमावता येते.\nटिकेत कठोरपणा केवळ विशीष्ट शब्दांच्या निवडी पेक्षा, मांडल्या जाणार्‍या मुद्द्याच्या गुणात्मकतेवर अधीक अवलंबून असतो.[२].\nविशेषणांना पणाची असा प्रत्यव्यक्तीकडून कृतीकडे रोख वळवणे सोपे जावे म्हणून, विशेषणांना 'पणाची' हा प्रयत्न केल्यास \".... यांची ..... कृती ..... पणाची आहे\" अशा पद्धतीचे, अथवा \"....अशा वेळी ....असे म्हणणे/वागणे एखाद्याला .... पणाचे वाटण्याची शक्यता आहे .... \" सहाय्यकारी होऊ शकते का ते पहावे [३]\nमराठी विकिपीडिया हे एकमेव अथवा अंतीम स्थान नाहीसंपादन करा\nलेखन योगदान करण्याचे, आपली बाजू तपासण्याचे आणि मांडण्याचे मराठी विकिपीडिया हे आंतरजालावरील एकमेव स्थान नाही. आपण विकिपीडियाच्या विविध भाषेतील बंधूप्रकल्पांचा , मराठी भाषेतील इतर ज्ञानकोशांचा , तसेच इतर मराठी संकेतस्थळांवरून लेखनाच्या अनेक संधी उपलब्ध असतात या संधींचा उपयोग करण्याचाही विचार करावा.मराठी विकिपिडियावरील चर्चांमध्ये आपली मतांतरे मांडण्याचा प्रयत्न हतोत्साहीत न होता सभ्यपणे कायम चालू ठेवावा, मराठी विकिपीडियाच्या विश्वासार्हतेकरिता निष्पक्षता जरूरी आहे आणि निष्पक्षतेकरिता वेगवेगळ्या दृष्टीकोनांचे मांडणी आणि आकलन जरूरी असतेच.\nविकिपीडियाच्या परिघाला मर्यादा आहेत. विकिपीडियावरील निर्णय प्रक्रीया सहसा सहमतीने होते पण विकिपीडिया लोकशाही सुद्धा नाही. विकिपीडिया मुक्तस्रोत असला तरी तो सर्व समावेशक ज्ञानकोश आहे अमुक्तस्रोताबद्दल अथवा आपणास न पटणार्‍या दृष्टीकोनांचीही येथे मांडणी असू शकते. आपल्या सर्व आकांक्षाना इच्छा आणि विनंत्या मराठी विकिपीडियन समुदाय कदाचित स्विकारू शकणार नाही असेही होऊ शकेल, तरी सुद्धा येथे जे काही काम होते यात बराच मोठा भाग हा सामान्य मराठी जनांना उपयोगी पडणारा सकारात्मक आहे.त्यामुळे उत्साही रहा आग्रहही धरा पण त्याच वेळी आग्रहाचे टोक गाठण्याचे अथवा आपल्या आग्रहा खातर इतर कुणाही व्यक्तीस अथवा समुहास व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपाचे भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक वांशिक लक्ष्य करण्याचे टाळा.आपल्याकडे आधीच पुरेशा संपादकांची वानवा असताना आहे त्या संपादकांचे श्रम इतरत्र घालवून खच्ची करण्यात अवघ्या मराठी समाजाचे नुकसान होते हे आपण लक्षात घेऊन सहकार्य करावे. त्यामुळे काही गोष्टी रूचल्या नसल्या तरी सुद्धा सकारात्मकतेने आपण सहाकार्य करू शकाल असा विश्वास आहे.\nसर्वच मराठी बांधवांनी आजपर्यंत मराठी विकिपीडिया प्रकल्पाची सर्वसामान्य जनतेस उपयूक्त ठरणारी रचनात्मक ध्येये लक्षात घेऊन मराठी विकिपीडियन संपादकांना त्रस्त करण्याचे टाळले आहे आणि आपणही टाळाल याचा आम्हाला सार्थ अभिमान असेल.येथील संकेतांचा परिचय अभ्यास होण्यास तसेच मतांतरात शांतता प्रस्थापित काण्याच्या दृष्टीने आपल्या संपादनास काही अपवादात्मक परिस्थितीत बंधने घातली गेल्यास त्या बद्दल गैर समज करून घेऊ नये. सर्वांच्या सदसद विवेकबुद्धीवर श्रद्धा ठेवण्यावर विकिपीडियाचा पारंपारिक विश्वास आहे तसा तो तुमच्यावरही आहे.. आम्हाला तुमच्या विरोधात काही सिद्ध करावयाचे आहे,चढा ओढ आहे आकस आहे असेही नाही.मराठी भाषा व्यक्तिगत मत मतांतरापेक्षा खूप मोठी आहे तेव्हा काही वेळा व्यकिगत मतांना मराठी भाषेच्या संदर्भाने अधीक मोठ्या ध्येयाकडे पाहून वेळ प्रसंगी थोडी मुरड घालावी, जेव्हा परत याल तेव्हा नव्या उत्साहाने मराठी विकिपीडियात समरसून सकारात्मक लेखन योगदान कराल असा विश्वास आहे.\n'प्रचालकीय कृतींबद्दलच्या तक्रारी', या सुचनेचा विस्तार\nप्रचालकीय कृतींबद्दलच्या तक्रारीसंपादन करा\nप्रचालकच दुराग्रह करत असतील तर त्या बद्दल दाद मागणे आणि कार्यवाही काहीशी कठीण होते हे खरे असले तरी सर्वस्वी अशक्य नाही.अशा कारवाईत अधीक मोठ्या समुदायाची सहमती लागते, त्यामुळे अर्थात दाद मागताना असभ्य/असंसदीय भाषेचा वापर करण्याचा शॉर्टकट चुकूनही घेऊ नये तसे करण्याने सर्वसाधारण सदस्य तुमची बाजू न घेण्याची शक्यता असते व आपल्या स्वत:च्या बाजूचे अधीकच नुकसान होते हे लक्षात घ्यावे. प्रचालकांची यादी येथे उपलब्ध होते.प्रचालकीय कामाच्या नोंदी [[विशेष:नोंद/प्रचालकसदस्याचेनाव]] आणि [[विशेष:वगळलेली_योगदाने/प्रचालकसदस्याचेनाव]] तपासून न पटणाऱ्या मराठी विकिपीडिया प्रचालकांच्या कृतींची नोंद आणि चर्चा प्रचालकीय कामाचे मुल्यांकन येथे करावी. प्रचालकीय कृती मराठी विकिपीडियाच्या मुल्य संकेत आणि धोरणांशी सातत्याने जाणीवपूर्वक विसंगत असतील तर त्या संदर्भाने कारवाईचे स्वरूप काय असावे याची धोरण विषयक चर्चा प्रचालक/निलंबन आणि पदमुक्त करण्याचे धोरण येथे करावी.\n'इतर सदस्य आणि प्रचालकांनी काय काळजी घ्यावी', या सुचनेचा विस्तार\nइतर सदस्य आणि प्रचालकांनी काय काळजी घ्यावी\nभाषिक अभिव्यक्ती हि सब्जेक्टीव्ह/तौलनीक गोष्ट आहे. एका व्यक्तिस वाटणारा स्पष्टपणा दुसऱ्या व्यक्तीस अवहेलना अथवा उपहास वाटू शकते ,वाद विवादात प्रसंगी एखाद्दा व्यक्तीकडून चर्चां संबधित अभिप्रेत निकषांचे उल्लंघन होऊ शकते हे मानवी आणि नैसर्गीक म्हणून वास्तव स्विकारले पाहीजे.\nएखाद्या व्यकिगत टिका करणार्‍या सदस्याच्या व्यक्तिगत टिकेचा सामना झाल्यास त्यास व्यक्तिशहा घेण्याचे टाळावे. [४]\nविकिपीडियाच्या संकेतास धरून नसलेली टिका कुठेही आढळल्यास त्या बद्दल {{व्यक्तिगत आरोप }} हा साचा संबंधीत सदस्याच्या चर्चा पानावर लावावा आणि नंतर व्यक्तिगत टिका वगळून टाकाव्यात.\n{{व्यक्तिगत आरोप झाकला}} हा साचा वापरून खालील उदाहरणात दाखवल्या प्रमाणे व्यक्तिगत हल्ले झाकता येतात.\n|सदस्य= संबंधीत उत्पातक सदस्याचे सदस्यनाम\n|नोंद_करणारा= नोंदकरणाऱ्याचे नाव}} खालील प्रमाणे दिसते\nसंभाव्य व्यक्तिगत हल्ला झाकला आहे.\nव्यक्तिगत हल्ले करू नका, हा साचा चुकून लावला आहे असे वाटत असल्यास कृपया इथे चर्चा करा.\n{{साचा:व्यक्तिगत आरोप झाकला |मजकूर= |सदस्य= संबंधीत उत्पातक सदस्याचे सदस्यनाम |नोंद_करणारा= नोंदकरणाऱ्याचे नाव}}\nसदस्य:संबंधीत उत्पातक सदस्याचे सदस्यनाम चर्चा, योगदान\nही नोंद सदस्य:नोंदकरणाऱ्याचे नाव या सदस्याने केली आहे.\nमराठी भाषा व्यक्तिगत मत मतांतरापेक्षा खूप मोठी आहे हे लक्षात घेतल्यास आपणास आपल्या रागावर नियंत्रण मिळवण्यास सहाय्य होईल.\nलगेच उत्तर देण्याचे टाळावे , व्यक्तिगत टिकेस प्रत्यारोपाने अथवा कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिगत टिकेने उत्तर देण्याचा मोह प्रयत्नपुर्वक टाळावा.\nसमोरच्या व्यक्तिस आपण प्रतिसाद खेळाडूवृत्तीने आणि openminded पणे स्विकारू शकतो हे दाखवून देण्या बद्दल विचार करा, Feedbackबद्दलचे स्वत:करताचे फायदे आठवण्याचा प्रयत्न करा,समोरच्या व्यक्तिस न अडवता व्यक्त होऊन जाऊ द्या,फिडबॅक देणाऱ्या व्यक्तीस वेळ काढल्या बद्दल आभार प्रकट करा (याचा अर्थ आपण त्यांच्याशी सहमत होतो आहोत असे नाही, त्यांना नेमक काय म्हणायच आहे हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे प्रश्न आणि त्यांच्या दृष्टीने सोलूशन काय आहे हे शांत पणे विचारा (हे विचारतो म्हणजे आपण समोरच्या व्यक्तिशी सहमत होतो आहोत असे नाही) ,सहमती असलेले विषय आधी स्विकारा , असहमती असलेल्या विषयाबद्दल आपली काही बाजू अभ्यासावयाची राहीलेली आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा ,समोरच्या व्यक्तिच्या आणि आपल्या मांडणीतील तार्कीक उणीवा समजून घ्या मग आपल्या मुद्दांची तर्कसंगत मुद्देसूद मांडणी करण्याचा प्रयत्न करा.\nव्यक्तिगत टिका करणे उत्पात अथवा संत्रस्त करण्याचे प्रयत्न झाल्यास सदस्याची नोंद विकिपीडिया:पहारा आणि गस्त#यांच्या योगदानावर लक्ष ठेवा विभागात करावी व अग्राह्य लेखनाचे नमुने विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात अभ्यास आणि तोडगे पानावर संचीत करावेत.त्यामुळे नाव बदलून वारंवार उपद्रव देनार्‍या सदस्य संपादनाबद्दल अधिक यशस्वी नियंत्रण करण्यात सहाय्य होते.\nप्रचालकांनी सोशिओ पॉलिटीकली मजकुरातील विवादात प्रोअ‍ॅक्टीव्ह अ‍ॅक्शन घेण्याचे वाद विवादात सहभागी होण्याचे टाळावे. सहसा चर्चा आणि वाद विचवादांची जबाबदारी प्रचालकेतर सदस्यांनाच सांभाळू द्यावी आणि पुरेशी चर्चा आणि सहमती नंतर सुयोग्य निर्णयाची माहिती द्यावी.\nअ) या संबधीत मार्गदर्शन आणि प्रतिबंधने पूर्वग्रहरहीत आणि व्यक्तिसापेक्ष नव्हे कृती आणि वृत्ती सापेक्ष हवीत,कोणत्याही प्रतिबंधनांचा उद्देश शीक्षा करणे असा असू नये तर केवळ चूक पुन्हा होऊ नये हा असावा\nब) संबधीत सदस्यास विकिसमुदायात पुन्हा सामावून घेण्यास मोकळी जागा असावी या करता बंधने अतिरेकी अथवा आयूष्यभराकरता असू नयेत .विवादातील प्रचालकीय हस्तक्षेप/ बंधनांचा उद्देश काडीमोड देणारा असू नये. अशी बंधने एखाद्दा प्रचालकाने पूर्वग्रहांमुळे डूख ठेऊन लावली तर प्रकल्पाची मुक्तता आणि निष्प्क्षताही धोक्यात येण्याचा संभव असतो.\nक) मराठी विकिपीडियावर आजतागायत एकाही सदस्याने वर्षाभराचे प्रतिंबधन काळ संपल्या नंतर पुन्हा येऊन उत्पात केलेला नाही तेव्हा एक वर्षा पलिकडील खासकरून आयुष्यभराकरिताची बंधने अव्यवहार्य आणि पूर्वग्रहदुषीत ठरतात\nड) एखादे खाते उत्पाती म्हणून प्रतीबंधास युक्त ठरवले गेले तरी ते ज्या अंकपत्त्यांवरून काम करते तो अंकपत्ता एखाद्दा घरी एका पेक्षा अधिक व्यक्ती वापरत असू शकतात, एखादा कार्यालयाचा शैक्षणीक संस्थेचा सायबर कॅफेचा अंक पत्ता असू शकतो . अशा कुटूंबातील /कार्यालयातील व्यक्ति अंकपत्ता प्रतिबंधन सोडवण्याच्या विनंत्या करत बसण्याची शक्यता फार कमी असते ,त्यामुळे 'प्रत्येक व्यक्तिस मुक्त' या विकिपीडिया प्रकल्पाच्या ध्येयात अडथळा आणणारी अंकपत्त्याशीत प्रतीबंधने शक्यतोवर टाळले गेले पाहीजे. प्रचालकांनी डोळे झाकून खात्याखालील अंकपत्त्यांना प्रतिबंधीत करणे अथवा स्वत:ची चर्चापानावरही संधी न देता संवादास विनाकारण प्रतिबंध करणे हे विकिपिडिया मुक्तता मुल्याचे उल्लंघन आणि व्यक्तिस्वातंत्र्याचे अनावश्यक उल्लंघन ठरते.\nई) लेखन संकेतांचे/नियमांचे पालन न झाल्यास खात्यावर लावले जाणारे प्रतिबंध लावणे टप्प्या टप्प्याने, अंकप्त्त्यावर शक्य्तोवर निर्बंध न घालता , अधीकतम एकवर्ष करता वाढते असावे.\nप) या संदर्भाने अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या प्रचालकांवर निलंबनाचा अंकुश हवा.\n'कायदा आणि गोपनीयतेच्या मर्यादांविषयीची वरील माहिती', या सुचनेचा विस्तार\nकायदा आणि गोपनीयतेच्या मर्यादांविषयीची वरील माहिती कोणत्याही सदस्यावर दबाव तंत्राचा भाग नसून विकिमीडिया फाऊंडेशनच्या आणि विकिपीडियाच्या परिघास असलेल्या मर्यादांबद्दल सजगतेचा प्रामाणिक प्रयत्न आहे. विविध भारतीय कायदे सोबतच आयटी कायद्यानुसार त्याला मर्यादा आहेत.देशातील कायदे अशा व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक वांशिक पद्धतीच्या बोलण्यास, लिहिण्यास वा मांडणी वितरणास मान्यता अथवा संरक्षण देत असेलच असे नाही. विकिपीडिया कोणत्याही कायद्याच्या उल्लंघनास उत्तेजन देत नाही; आणि म्हणून जर तुम्ही कोणतेही अवैध लेखन या संकेतस्थलावर केले, या संकेतस्थळाचा (domain) दुवा दिलात, येथील उपलब्ध माहिती वापरली , पुनःप्रसारित किंवा पुनःप्रकाशित केली, आणि असे करताना नियमभंग झाला, तर अशा कोणत्याही रीतीने कायद्याच्या किंवा नियमाच्या उल्लंघनास विकिपीडिया किंवा विकिमिडिया जबाबदार नाही.इतर काही बंधू विकिप्रकल्पांप्रमाणेच मराठी विकिपीडियाची सदस्य माहिती विषयी गोपनीयता नीती परिघास सातत्याचा उपद्रव चारित्र्यहनन आणि कायदेविषयक संदर्भाने मर्यादा आहेत. अशी प्रावधाने खूप अपवादात्मक परिस्थितीत वापरली जातात पण वापरली जातच नाहीत असे नाही [गोपनीयता नीतीच्या परिघाच्या मर्यादांचा अभ्यास आपण येथे करू शकता]\n^ \"मराठी शब्द हवे आहेत - १४ | मनोगत\". www.manogat.com. 11 March 2018 रोजी पाहिले.\n^ \"मराठी शब्द हवे आहेत - १४ | मनोगत\". www.manogat.com. 11 March 2018 रोजी पाहिले.\nविकिपीडिया आशियाई महिना २०१७: सहभागी होण्यासाठी आमंत्रणसंपादन करा\n गेल्या तीन वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.\nमी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१७ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान ४ (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.\nआपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.\nविकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (आयोजक)\n--टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:२४, १ नोव्हेंबर २०१७ (IST)\nशेवटचा बदल १ नोव्हेंबर २०१७ तारखेला १५:२४ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १ नोव्हेंबर २०१७ रोजी १५:२४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2022-10-07T22:29:58Z", "digest": "sha1:DESFUIWEI7FCIX27PVLRKLTP4RLNQJCD", "length": 4780, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साल्फेल्डची लढाई - विकिपीडिया", "raw_content": "\nसाल्फेल्डची लढाई जर्मनीतील साल्फेल्ड गावाजवळ ऑक्टोबर १०, इ.स. १८०६ रोजी फ्रान्स व प्रशिया यांमध्ये झाली.\nयात फ्रांसच्या मार्शल ज्याँ लानेच्या १२,८०० सैनिकांनी प्रशियाच्या लुई फर्डिनांडच्या ८,३०० सैनिकांचा पराभव केला.\nश्लाइझ • साल्फेल्ड • जेना-ऑर्स्टेड • एर्फर्ट • हॅले • प्रेन्झ्लॉ • पेसवॉक • स्तेतिन • वारेन-नोसेन्तिन • ल्युबेक • पोलंडचा उठाव • माक्देबुर्ग • हामेल्न • झार्नोवो • गोलिमिन • पुल्तुस्क • स्ट्रालसुंड • मोहरुन्जेन • एयलाऊ • ओस्त्रोलेका • कोलबर्ग • डान्झिग • गुटश्टाट-डेपेन • हाइल्सबर्ग • फ्रीडलँड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mensxp.com/marathi/health/celebrity-fitness/90910-salman-khan-fitness-mantra-for-bodybuilding.html", "date_download": "2022-10-07T21:33:13Z", "digest": "sha1:P3RNFBBUGT2JCUCWGSRSB2L6P3G7NMXV", "length": 17972, "nlines": 97, "source_domain": "www.mensxp.com", "title": "जाणून घ्या काय आहे सलमान खानचा डाएट प्लॅन, ट्रेनरनी सांगितले दिवसाला १,००० पुश अप्स मारण्यामागचे रहस्य | Salman khan fitness mantra for bodybuilding", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nजाहिरात द्याMensXP वर सेलआमच्याबद्दलसंपर्क साधा\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nजाणून घ्या काय आहे सलमान खानचा डाएट प्लॅन, ट्रेनरनी सांगितले दिवसाला १,००० पुश अप्स मारण्यामागचे रहस्य\n· 4 मिनिटांमध्ये वाचा\nजाणून घ्या काय आहे सलमान खानचा डाएट प्लॅन, ट्रेनरनी सांगितले दिवसाला १,००० पुश अप्स मारण्यामागचे रहस्य\nसलमान खान हा युथ आयकॉन म्हणून ओळखला जातो. सलमानच्या फिट बाॅडीचे असंख्य चाहते आहेत.\nभाईच्या सिनेमातील शर्ट काढतानाच्या सीन्सची फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात. काहीजण तर फक्त त्या एका सीनसाठी पुन्हा-पुन्हा सिनेमा बघतात.\nतुमच्या मनातही सलमान भाई सारखी बाॅडी बनवावी असा विचार आला आहे का \nतुम्हांला हिरोसारखी फिट बाॅडी बनवून इतरांवर आपली छाप पाडायची आहे का \nह्या आर्टिकलमध्ये सलमान खान स्वतः फिट राहण्यासाठी काय करतो ह्या विषयी तुम्हांला माहिती मिळेल. ह्या एक्सरसाइज आणि डाएट टिप्सना फाॅलो करुन तुम्हीही फिट बाॅडी बनवू शकाल.\nसलमान जेव्हा सिनेसृष्टीमध्ये आले, तेव्हा सडपातळ होते. मग काही वर्षांनी भाईंनी स्वतःच्या फिटनेसवर काम करुन आपली वेगळी छाप हिंदी सिनेसृष्टीवर पाडली. अनेकांना जिम जाॅइन करण्याची आणि फिट राहायची प्रेरणा सलमान यांच्याकडून मिळाली आहे.\nसलमान खान यांनी होस्ट केलेल्या `दस का दम' या कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेल्या खुलाश्याप्रमाणे, १९८९ साली प्रदर्शित `मैंने प्यार किया' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान सडपातळ सलमान यांना पाहून चित्रपटाची हिरोइन असलेल्या भाग्यश्री सेट सोडून पळून गेल्या होत्या. हा झाला गंमतीचा भाग, परंतु तेव्हाचा सलमान आणि आताचा सलमान यामधील फरक तुम्ही स्वतः अनुभवू शकता.\nतुम्ही कधी जोशामध्ये, तर कधी सहज इंटरनेट वर\ni. सलमान खान प्रमाणे बाॅडी कशी फिट ठेवावी \nii. सलमान खान बाॅडीबिल्डींग टिप्स\niii. सलमान भाईसारखी बाॅडी बनवायच्या टिप्स\nअशा गोष्टी सर्च केल्या असतील. सलमान खानच्या फिजिकप्रमाणे आपले ही फिजिक आकर्षक असावे अशी इच्छा तुमच्या मनामध्येही एकदातरी आली असेल.\nसलमान खान यांच्या फिटनेस ट्रेनरनी त्यांच्या वर्कआउट, डाएट प्लॅन आणि फिटनेस मंत्र या गोष्टींबाबत खुलासा केला आहे.\nसंजय दत्तचा ऑनस्क्रिन मुलगा 'सत्यजित'ने ३ महिन्यात केले ८ किलो मसल्स गेन, जाणून घ्या फिटनेस सिक्रेट\nसलमान खान यांचा फिटनेस मंत्र :\nतब्बल सहा वर्ष सलमान यांना ट्रेनिंग देणारे `मनिष अडविळकर' यांनी सांगितल्या प्रमाणे, सलमान दिवसाला १,००० पुश-अप (Push-ups), २,००० सिट-अप (Sit-ups) आणि ५०० क्रंचेस (Crunches) असा व्यायाम करतात.\nसलमान खान यांच्या वयाचा विचार करता त्यांच्या फिट राहण्यामागे `फिटनेसबद्दल त्यांची निष्ठा, शिस्त आणि प्रेम' हे घटक कारणीभूत मानले जाऊ शकतात. चित्रपटांच्या बिझी शेड्यूलमध्येही सलमान स्वतःच्या वर्कआउटसाठी वेळ बाजूला काढून ठेवतात.\nआपल्या वर्कआउटबाबत सलमान प्रचंड संवेदनशील आहेत. जिममध्ये गेल्यावर किंवा वर्कआउट सुरु झाल्यावर ते आपला संपूर्ण फोकस फक्त एक्सरसाइज करण्यावर देतात. व्यायामाप्रति त्यांच्या निष्ठा दिसून येते.\nएक्सरसाइज करताना कोणी फॅन त्यांना भेटायला आला किंवा आॅटोग्राफ, सेल्फी घ्यायला आला तर थांबवून संपूर्ण वर्कआउट झाल्यानंतर त्या व्यक्तीला भेटतात. आपल्या ट्रेनिंगच्या वेळेत ते फक्त फिटनेस ट्रेनिंगवर भर देतात.\nफॅट लॉस आणि मसल्स गेनसाठी BMR गरजेचा, डिटेलमध्ये जाणून घ्या बीएमआरची हेल्दी रेंज\nरात्री २ वाजता करतात एक्सरसाइज\nसलमान खान अनेकदा फिल्म शूटिंगमध्ये किंवा अन्य कामांमध्ये व्यस्त असतात. एखाद्या सुपरस्टारला वेळ नेहमी अपुरा वाटत असतो. मग अशा वेळी वर्कआउट करायची संधी मिळत नाही. संपूर्ण दिवस शूटिंग वा अन्य कामांमधून फ्री झाल्यानंतर सलमान रात्री दोन वाजता एक्सरसाइज करतात. जिम मिस होऊ नये म्हणून इतक्या रात्री वर्कआउट करण्याच्या कृतीमधून फिटनेस या विषयीचा जिव्हाळा कळून येतो.\nसलमान खान यांचे एक ट्रेनर `डिसूजा' यांच्या म्हणण्यानुसार, सलमान खान दिवसातून कमीत कमी दोन तास एक्सरसाइज करतात. ह्या दोन तासांपैकी एक तास कार्डिओ एक्सरसाइज करण्यासाठी भाई वेळ काढतात.\nसलमान वर्कआउट करताना नेहमी शरीराच्या कोणत्याही दोन भागांची एक्सरसाइज एकत्र करतात. उदा. ट्राइसेप्स-लेग्स किंवा बॅक-बाइसेप्स. ह्याने कमी वेळामध्ये जास्त वर्कआउट केले जाते.\nसलमान खान यांचा डाएट प्लॅन\nप्रोटीन शेकसोबत दोन व्हाइट एग अशा गोष्टी भाई ब्रेकफास्टमध्ये समाविष्ट करतात. मग वर्कआउटनंतर पुन्हा तीन एग-व्हाइट्स, प्रोटीन शेक, ओटमील आणि लो-फॅट मिल्क असे पदार्थ घेतात. ह्यानंतर सकाळी ११-१२च्या दरम्यान फळे आणि ज्यूस घेतात.\nसलमान यांच्या लंचमध्ये चपाती, राइस, ग्रीन सलाड, फ्राइड फिश किंवा मटण हे पदार्थ असतात.\nसंध्याकाळी स्नेक्समध्ये एक फळ उदा. सफरचंद आणि काही ड्राय फ्रूट्स खातात.\nसलमान भाईंच्या रात्रीच्या जेवणाचा राइस, ग्रीन सलाड आणि चिकन असे पदार्थ भाग असतात. तसेच ते रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास लो फॅट मिल्क प्रोटीन असे पदार्थ घेतात.\nघराबाहेरदेखील घेतात फिटनेसची काळजी\nसिनेमाशी निगडीत असल्याने वेळी-अवेळी शूटिंग लागू शकते. अशा ठिकाणी अन्य सामान्य कामांप्रमाणे वेळा असतील असे नाही. मग वर्कआउटला पुरेसा वेळ देणेही कठीण होऊन बसते. या सर्व परिस्थितीमुळे सलमान खान चित्रपट निर्मात्यांकडे सर्वप्रथम जिमची डिमांड करतात. जेव्हाही बाहेर शूटिंग असते, तेव्हा तेथे जिम अरेंजमेंट आहे की नाही याची खात्री करतात. सलमान खान इंडियन, इटालियन आणि चायनीज खाद्यपदार्थांचे फार मोठे शौकीन आहेत. परंतु ट्रेनरच्या सांगण्यावरुन ते फिट राहण्यासाठी ह्यापैकी एकही जंक फूड खात नाही. अपल्या डाएट प्लॅनमधून अशा पदार्थांना त्यांनी कधीच बाहेर काढले आहे.\nतुम्हांला आता कळले असेलच की, सलमान खान सारखी बाॅडी हवी असल्यास किती मेहनत आणि डेडिकेशनची आवश्यकता आहे. तुम्ही देखील सलमान भाई प्रमाणेच, फिटनेसच्या बाबतीमध्ये डेडिकेशन दाखवाल आणि नियमितपणे सर्व प्लॅनस् फाॅलो कराल तर स्वतःची बाॅडी फिट करण्याच्या धेय्यामध्ये यशस्वी व्हाल.\nफिट बाॅडी बनवण्यासोबत वजन कमी करण्यासाठी ह्या ५ प्रोटीन पावडरचा वापर करणे ठरेल फायदेशीर\nजर तुम्हांला सदर आर्टिकलमधून फिटनेस, हेल्थशी संबंधित प्रेरणा मिळाली असल्यास तुमचे अनुभव, किस्से आम्हांला शेअर करा. तुम्ही पाठवलेल्या मॅसेजेसपैकी सिलेक्टेड मॅसेज आम्ही नक्की आमच्या सोशल मीडिया साइट्सवर पोस्ट किंवा शेअर करु.\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/new-photoshoot-of-bollywoods-dhakdhak-girl-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-07T22:32:02Z", "digest": "sha1:CEK4EGRVJJQ7M35AKFQUSXL2NNALFKZU", "length": 8128, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं नवं फोटोशूट; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nधकधक गर्ल माधुरी दीक्षितचं नवं फोटोशूट; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस\nधकधक गर्ल माधुरी दीक्षितचं नवं फोटोशूट; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस\nमुंबई | 52 वर्षानंतर सुद्धा आपल्या सौंदर्याने लोकांना आकर्षित करुन घेणारी बाॅलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीतने नृत्याच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये आपली छाप उमटवली आहे.\nनृत्य आणि अभिनयासोबतच माधूरीच्या सौंदर्याला सुद्धा कोणी टक्कर नाही देऊ शकत. यातच तिने आता काळ्या ड्रेसमध्ये एक फोटोशूट केला असून तिने ते फोटोज इंस्टावर आपलोड केले आहेत.\nया पोस्ट खाली माधुरी दिक्षीतने ‘शेड्स ऑफ ब्लॅक’ असं कॅपशन दिलं आहे.\nवयाच्या 52व्या वर्षी सुद्धा आपल्या अभिनयाने तसेच नृत्य व सौंदर्याने लोकांच्या मनावर माधुरी दिक्षित राज्य करत असून तिच्या या फोटोजना 2 लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\nअमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल- रामदास आठवले\nपुण्यात आता मास्क न घातल्यास ‘इतका’ दंड भरावा लागणार\nआम्ही दारुच नाही, गांजाही विकला असेल, पण…- सदाभाऊ खोत\nशर्मिला ठाकरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाल्या….\nशरद पवार यांच्या सूचनेनंतर पुण्यातील वशाटोत्सव रद्द\nराजकीय नेते कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत, खरं तर ही आमची मोठी चूक- विश्वजीत कदम\nकोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात नवी नियमावली लागू, जाणून घ्या नेमकी काय आहे\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/king-virat-kohlis-special-look-goes-viral-on-social-media-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-07T22:03:25Z", "digest": "sha1:I45FN4FZ5N5YLXEI7RT7WOW5J7OZWBF5", "length": 9808, "nlines": 112, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "किंग कोहलीचा 'हा' खास लूक सोशल मीडियावर व्हायरल", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nकिंग कोहलीचा ‘हा’ खास लूक सोशल मीडियावर व्हायरल\nकिंग कोहलीचा ‘हा’ खास लूक सोशल मीडियावर व्हायरल\nमुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या हटके लूक अनेकवेळा चर्चेत असतो. त्याचा फिटनेस, हेअरस्टाईल आणि बिअर्डचे फोटोे सर्वांना घायाळ करतात. आयपीएल स्थगित झाल्यावर भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला जाण्याअगोदर विराट कोहलीचा आपल्या नव्या लूकसोबतचा एक फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.\nविराटच्या या नवीन लूकची तुलना जगभरात गाजलेल्या ‘मनी हाइस्ट’ वेब सीरीजमधील मुख्य पात्र प्रोफेसरशी केली जात आहे. या लूकमध्ये विराटनं प्रोफेसरप्रमाणे हेअर स्टाईल आणि दाडी वाढवली आहे. यासोबत त्यानं प्रोफेसरप्रमाणे चष्माही परिधान केला आहे.\nविराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी कोरोना लस टोचून घेतली. त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लस घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. कृपया लस घ्या, सुरक्षित राहा, असं विराटने सांगितलं. येत्या त्या 2 जूनला भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.\nदरम्यान, इंग्लंडला गेल्यानंतरही त्यांना किमान तीन दिवस क्वारंटाइनमध्ये राहावं लागणार आहे. हा सामना भारत आणि इंग्लंड दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कसोटी विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न केलं.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\nरुग्णालयाची खिडकी तोडून अडाणी चोरट्यांनी कोरोना लस समजून नेले ‘हे’ 25 लसींचे डोस\n चेकपोस्ट टाळण्यासाठी केलेल्या स्टंटबाजीने एकाचा जागीच मृत्यू, पाहा व्हिडीओ\n“सगळा गाढवपणा हा सरकारनं केला आहे अन्…”; विनायक मेटेंचा राज्य सरकारवर घणाघात\nदहावी परीक्षेच्या निर्णयाबाबत राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम; लवकरच अंतिम निर्णय येण्याची शक्यता\n हॉस्पिटलमधील पगाराची नोकरी सोडून स्मशानात करते असं काम की तुम्हालाही वाटेल अभिमान\nमहाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला उकाड्यापासून दिलासा; संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पावसाला सुरुवात\nपोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे भररस्त्यात फाडले कपडे आणि नंतर घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82/word", "date_download": "2022-10-07T23:26:42Z", "digest": "sha1:TJ2P3TVKTUKSMYKGZZZNUYLDDJS6SJWD", "length": 11961, "nlines": 163, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कानाचे कानवले होणें - Dictionary Definition - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | |\nकान (पिळवटून पिळवटून) वाकडे होणें\nवारंवार उपदेश करूनहि उपयोग न होणें.\nकानाचे कानवले होणें होणें बभ्रा होणें पाठ पोट सारखें होणें फारकत होणें आगाजा होणें तंबी होणें ठिकर्‍या होणें नांव डहाळ होणें कडेलोट होणें अंगाची होळी होणें मट्टमाया होणें उजळ माथा (तोंड) होणें दौलत होणें जघन्यता होणें आसन जड होणें जीभ जड होणें नाकापेक्षां मोतीं जड होणें दारफळी होणें शहाणी होणें कणिक मऊ होणें रक्ष रक्ष होणें ब्रह्मदेव होणें कडप होणें सरोसरोसर होणें बावा होणें वारापाणी होणें पावणेबारा होणें मोरया होणें रुई स्वस्त होणें अन्नाचें पाणी होणें अंगाचें पाणीं होणें करळ होणें पिवळे होणें प्राण कंठांत गोळा होणें पुर्वापाढा सुरु होणें वाटोळें होणें फूं होणें दांतांच्या कण्या, घुगर्‍या होणें हाडांचा चुरा होणें उखळ पांढरें होणें हाताचे लाडू होणें एकावर एक अकरा होणें तिळपापड होणें विनाशकाळीं विपरीत बुद्धि होणें मुका मुलगा होणें मुका नातू होणें तांबडा होणें वईवरुन अंबट होणें गारद होणें\nमानसपूजा - प्रकरण ७\nमानसपूजा - प्रकरण ७\nशुकाख्यान - अभंग २२६ ते २५०\nशुकाख्यान - अभंग २२६ ते २५०\nस्वात्मप्रचीती - अध्याय दुसरा\nस्वात्मप्रचीती - अध्याय दुसरा\nमराठी पदें - पदे ३६ ते ४०\nमराठी पदें - पदे ३६ ते ४०\nसंत जनाबाई - या वैष्णवाच्या माता \nसंत जनाबाई - या वैष्णवाच्या माता \nज्ञानपर अभंग - २०१ ते २१०\nज्ञानपर अभंग - २०१ ते २१०\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - दहावे वर्ष\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - दहावे वर्ष\nउत्तरगीता - अध्याय दुसरा\nउत्तरगीता - अध्याय दुसरा\nसंत नामदेवांचे अभंग - संतस्तुति\nसंत नामदेवांचे अभंग - संतस्तुति\nसमओवी ज्ञानेश्वरी - अध्याय सातवा\nसमओवी ज्ञानेश्वरी - अध्याय सातवा\nतिरस्कार अलंकार - लक्षण १\nतिरस्कार अलंकार - लक्षण १\nरक्तवहस्त्रोतस् - किलास कुष्ठ\nरक्तवहस्त्रोतस् - किलास कुष्ठ\nविभावना अलंकार - लक्षण ४\nविभावना अलंकार - लक्षण ४\nविषम अलंकार - लक्षण ५\nविषम अलंकार - लक्षण ५\nरसवहस्त्रोतस् - लक्षणें व कारणें\nरसवहस्त्रोतस् - लक्षणें व कारणें\nविषम अलंकार - लक्षण ७\nविषम अलंकार - लक्षण ७\nविषम अलंकार - लक्षण ४\nविषम अलंकार - लक्षण ४\nउदाहरणालंकार - लक्षण ३\nउदाहरणालंकार - लक्षण ३\nमज्जवहस्त्रोतस - अपतंत्रक अपतानक\nमज्जवहस्त्रोतस - अपतंत्रक अपतानक\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३५१ ते ४००\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३५१ ते ४००\nपर्यायोक्त अलंकार - लक्षण ४\nपर्यायोक्त अलंकार - लक्षण ४\nअनोन्या अलंकार - लक्षण १\nअनोन्या अलंकार - लक्षण १\nउल्लास अलंकार - लक्षण १\nउल्लास अलंकार - लक्षण १\nविरोधमूलक अलंकार - लक्षण १\nविरोधमूलक अलंकार - लक्षण १\nशुक्रवह स्त्रोतस - परिचय\nशुक्रवह स्त्रोतस - परिचय\nपुरीषवह स्त्रोतस - मलावष्टंभ\nपुरीषवह स्त्रोतस - मलावष्टंभ\nराम गणेश गडकरी - “ साध्याही विषयांत आशय कध...\nराम गणेश गडकरी - “ साध्याही विषयांत आशय कध...\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १४\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १४\nअर्थान्तरन्यास अलंकार - लक्षण २\nअर्थान्तरन्यास अलंकार - लक्षण २\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ७५१ ते ८००\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ७५१ ते ८००\nगणपतीची पूजा आणि व्रत फक्त पुरूषच करतात, मग फक्त स्त्रियांसाठी गणेश व्रत आहे काय\nस्त्री. ( कडब्याप्रमाणें क्षुद्र किंवा कडबा वाहणारी ) स्वस्त रांडरू ; म्हातारी - जख्खड कुंटीण .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/agniveer-scheme", "date_download": "2022-10-07T21:59:39Z", "digest": "sha1:XKH64AN5G5QHPLX2BCJSQPQFYU5BVYBU", "length": 9838, "nlines": 215, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nअग्निवीरांची आजपासून भरती प्रक्रिया नागपुरात तब्बल 60 हजार उमेदवार भरतीप्रक्रियेसाठी हजर\nAgnipath Scheme: आर्मीमध्ये भरती होण्यासाठी इच्छुक युवकांसाठी मोठी बातमी\nAurangabad | धक्कादायक… औरंगाबादेत सैन्य भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू, कन्नडच्या विठ्ठलवाडी गावावर शोककळा\nAgniveer Recruitment: अग्निवीर भरती मेळाव्यासाठी जम्मूत नोंदणी सुरु, अधिक माहितीसाठी ‘या’ अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या\n प्रवेशपत्र जारी,अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध\nIndian Army | औरंगाबादेत अग्नीवीरांची भरती, 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरची मुदत, कुठे करणार अर्ज\nIAF अग्निवीर भरती: हवाई दल भरतीचे वेळापत्रक जाहीर; 24 जूनपासून नोंदणी आणि ‘या’ तारखेपासून होईल भरती प्रक्रीया सुरू जाणून घ्या, संपूर्ण माहिती\nAgneepath scheme: अग्नीपथ योजनेच्या विरोधात काँग्रेसचे जंतरमंतरवर सत्याग्रह आंदोलन ; प्रियांका,गांधी व राहुल गांधीही सहभागी\n‘अग्निपथ’ला तरुणांचा विरोध; जाळपोळीत रेल्वेचे सातशे कोटींचे नुकसान, तुम्हाला माहितीये का एक डबा तयार करण्यासाठी किती खर्च येतो\nWhat India Thinks Today : ‘अग्निपथ’ला देशभरातून विरोध; ‘टीव्ही 9’ च्या ग्लोबल समिटमध्ये काय म्हणाले मोदी सरकारमधील पाच मंत्री, वाचा सविस्तर\nAgneepath scheme : ‘अग्नीपथ’ योजनेंतर्गत निवड प्रक्रियेला ‘या’ दिवसापासून सुरुवात ; वायूसेने केली घोषणा\nZaheer Khan : झहीर खानने अभिनेत्रीच्या कुटुंबाला अशा प्रकारे मनवलं होतं, जाणून घ्या लव्हस्टोरी\nफक्त प्रेम.. रणबीरने आलियाला केलं किस; बेबी शॉवरमधील खास क्षण\nदक्षिण आफ्रिकेवर भारी पडणार ‘हे’ दोन खेळाडू, जाणून घ्या….\nमौनी रॉयचा आऊटफिट पाहून नेटकरी घायाळ; फोटोंवर लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव\nRishabh Pant : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये ऋषभ पंतचा वाढदिवस साजरा, चाहते म्हणाले उर्वशीही…\nसादर करण्यात आलेल्या कागद पत्रांवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार यासह पहा इतर अपडेट महाफास्ट न्यूज 100 मध्ये\nअंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेचा प्रचाराचा काय आहे प्लॅन पहा यासह 4 मिनिट 24 हेडलाईन्स\nउद्धव ठाकरेंनी का मागितले आणखीन काही दिवस यासह इतर बातम्यांच्या अपडेटसाठी पहा महाफास्ट न्यूज 100\nशेतकऱ्यांना 12 तास वीज देणार यासह पहा राज्यभरातील अपडेट 36 जिल्हे 72 बातम्यामधून\n“उद्धव ठाकरेंच्या भाषणाला दर्जा नाही, बोलायला लागले की लोक निघून जातात”\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.statusinmarathi.com/happy-new-year-wishes-marathi/", "date_download": "2022-10-07T22:48:53Z", "digest": "sha1:H5CVTPAPGO5WNFRXH5WCRHJQGQTCIBSS", "length": 33463, "nlines": 449, "source_domain": "www.statusinmarathi.com", "title": "नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Happy new year wishes marathi | happy new year status marathi - Status in Marathi", "raw_content": "\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\n🎉 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२२ / Happy new year wishes Marathi 2022🎉\n🎉नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,\nआनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..\nनवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,\nअशी श्री चरणी प्रार्थना…\n🎉सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,\nनवी उमेद व नाविन्याची कास धरत\nनवीन वर्षाचं स्वागत करू,\nआपली सर्व स्वप्नं, आशा,\nआकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nजसं नवं पान पलटू\nतसं नवं मिळत जातं..\nनवं पान, नवा दिवस,\nनवी स्वप्नं, नवी ध्येयं,\nनव्या आशा, नव्या दिशा,\nनवी माणसं, नवी नाती,\nनवं यश, नवा आनंद.\nकधी अपूर्ण, कधी संपूर्ण,\nनवा हर्ष, नवं वर्ष…\nतुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा\n🎉नव्या वर्षात नव्या उमेदीने\nपुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…\nआपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा\n🎉इंग्रजी नविनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा / english new year wishes in Marathi.🎉\n🎉मना मनातून आज उजळले\nघेऊन आले वर्ष नवे….\nआपणांस व आपल्या परीवारास\nनविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\n🎉जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,\nभाग्यवान या शब्दाचा अर्थ\nतुमच्याकडे पाहुन कळु दे,\nशिखरे यशाची सर तुम्ही करावी,\nपाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,\nतुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,\nआयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…\nसन २०२२ साठी हार्दीक शुभेच्छा…\nनव वर्षाच्या या शुभदिनी…\nघेवून आले २०२२ साल…\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\n🎉माणसं भेटत गेली, मला आवडली\nआणि मी ती जोडत गेलो \nया वर्षाचे हे अखेरचे काही दिवस\nमाझ्याकडून काही चुक झाली\nआणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..\n🎉पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,\nपुन्हा लाभो एक नवी दिशा,\nनवी स्वप्ने, नवी क्षितीजे,\nसोबत माझ्या नव्या शुभेच्छा…\nनवीन वर्ष शुभेच्छा संदेश / New year messages Marathi\nबघता बघता डिसेंबर महिना संपत आला..\nएक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,\nआपण या वर्षात माझ्या सुखात\nदुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,\nयाबद्दल मी तुमचा आभारी आहे..\nया वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,\nमला मोठ्या मनाने माफ करा..\nआणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…\nआपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या\nनवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा\n🎉अजून एक अद्भुत वर्ष संपुष्टात येणार आहे. पण काळजी करू नका, आणखी एक वर्ष आपल्या जीवनास अमर्याद आनंदांनी सजावटण्याच्या मार्गावर आहे\n🎉पाहता दिवस उडुन जातील तुझ्या\nकर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,\nआशा मागील दिवसांची करु नको,\nदिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \n🎉दु:ख सारी विसरून जाऊ…..\nसुख देवाच्या चरणी वाहू ..\nस्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी\nनव्या नजरेने नव्याने पाहू…..\nनव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉\n🎉दाखवून गत वर्षाला पाठ चाले\nभविष्याची वाट करुन नव्या\nनवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट \nनवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे,\nसमृद्धीचे, भरभराटीचे, सुरक्षित आणि\n🎉नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया\nक्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे,\nगगनाला घालूया गवसणी, हाती\nसुरवातीला मनासारखे घडेल सारे \n🎉दोन हजार २० मधे “जीवन”\n२०कळीत झाले आहे, त्यामुळे\nपण थोडा २०वा घ्या म्हणजे\nआणि कासा२० होऊ नका..\nचांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा\nनव्या आशा पुन्हा पल्लवित करूया\nनवीन वर्षाच्या आपणास हार्दिक\n🎉नवा बहार, नवा मोहोर, नवी आशा,\nनवी स्वप्नं घेऊन नवं वर्षांत चला,\nनव्या वर्षाचे स्वागत करूया.🎉\n🎉आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे,\nकाही जुन्या आठवणी मागे पडत आहेत.\nसुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी\n नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nउद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..\nत्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,\nआजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,\nतुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..\nनवीन वर्ष २०२२ हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,\nआणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…\n🎉२०२२ चला या नवीन वर्षाचं.\nस्वप्ने उरलेली.. या नव्या वर्षी\nनव्या नजरेने नव्याने पाहू\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nपूर्ण होवो तुमच्या इच्छा\nनव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..\nसुख दुःख सहन करत\nमात दिली त्या गत वर्षा\nस्वागत करू या नववर्षा….\nनवीन वर्षा च्या आपणास व आपल्या\nपरिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…\n🎉पाकळी पाकळी भिजावी अलवार\nत्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे\nअसे जावो वर्ष नवे…\n🎉ताज्या आशा, ताज्या योजना, नवीन ताज्या विचार, ताज्या भावना, नवीन बांधीलकी २०२२ च्या नवीन अटिट्यूड सह स्वागत आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.🎉\n🎉पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया\nचांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया\nनव्या आशा पुन्हा पल्लवित करूया\nनवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा..🎉\n🎉हे नवीन वर्ष आपल्याला खूप आनंद आणि मजा आणू शकेल. तुम्हाला शांती, प्रेम आणि यश मिळेल.नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमच्यासाठी पाठवत आहे\n🎉मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.\nआपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि\nआपल्या सर्व आशा पूर्ण होतील\n🎉मी आशा करतो की नवीन वर्ष सुरू होणार आहे तेव्हा आपले आयुष्य आश्चर्य आणि आनंदाने भरलेले असेल. आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आशीर्वाद मिळावा.🎉\n🎉२०२२हे वर्ष आपल्या जीवनाला नवीन आनंद, नवीन उद्दीष्टे, नवीन यश आणि नवीन प्रेरणा घेऊन येतील. वर्षभर तुम्हाला आनंदाने भरलेले शुभेच्छा.🎉\n🎉आपण केलेल्या सर्व चांगल्या आठवणी लक्षात ठेवा आणि हे जाणून घ्या की येत्या वर्षात आपले आयुष्य आश्चर्यकारांनी भरलेले असेल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022\n🎉तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आगामी वर्ष आपल्याला पवित्र आशीर्वाद आणि शांती देईल आगामी वर्ष आपल्याला पवित्र आशीर्वाद आणि शांती देईल\nNew year wishes for lovers/ नवीन वर्ष शुभेच्छा प्रेमी – प्रेमिकांसाठी .\n🎉लोक नवीन वर्षात देवाकडे\nखुप काही मागतील पण मी\n🎉काल मी ज्यांच्यावर प्रेम केले त्यापेक्षा आज मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. आणि आज मी तुझ्यावर प्रेम करतो त्यापेक्षा जास्त मी उद्या तुझ्यावर जास्त प्रेम करेन. नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022\n🎉मी तुमच्यावर प्रेम करण्यात इतका व्यस्त होतो की मला अजून एक वर्ष निघून गेल्याचे लक्षात आले. नवीन वर्षाच्या शुभेच्छा माझे प्रेम आपणास या जगातील सर्व आनंदाची शुभेच्छा आपणास या जगातील सर्व आनंदाची शुभेच्छा\n🎉या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे, तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घ्यावी आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुखी द्यावे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा\n🎉तुझ्या प्रेमामुळे माझे मन मला आनंदाने भरुन गेले जे मला कधीच अनुभवलेले नाही. तू मला आयुष्य दिलेस ते मला माहित नव्हते. माझे प्रेम, नवीन वर्षाच्या शुभेच्छा\n🎉माझ्या आयुष्यात तुमची उपस्थिती खुल्या दाराप्रमाणे आहे जी मुबलक प्रमाणात आनंद आणि आनंदाचे स्वागत करते. यापूर्वी इतके खास मला कधीच वाटले नव्हते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022\nHappy new year wishes to friends / नवीन वर्ष शुभेच्छा मित्रांनसाठी.\nआता आपण वर्षाच्या शेवटच्या\nआहे या वर्षा मध्ये मी जर चुकुन\nदुखवल असेल तर मला माफ करा तुमची\nसाथ ही नेहमी मला लाभली तशीच या येत्या\nवर्षातही लाभु द्या आयुष्याच्या या वळणावर\nतुमच्यासारखे मित्र मला मिळाले या पेक्षा\nजास्त मला काही नको आहे येणाऱ्या या वर्षात\nतुम्हाला सुख समृद्धि आरोग्य\nतुमच्यासाठी एक अत्यंत सुखाचे जावो हीच ईश्वर\nनवीन वर्ष संपत आलय\nतर येऊन माफी मागा\nकोणतीही गोष्ट आपली मैत्री कमकुवत करू शकत नाही. जितकी वर्षे आपण एकत्र घालवली तितकीच आपली मैत्री आणखी मजबूत झाली. नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022\nमला माहित आहे की हे वर्ष एक प्रकारचे शोषक होते, परंतु मला आशा आहे की 2022 एक उत्कृष्ट वर्ष असेल. आपण आणि आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या शुभेच्छा.\nआपली मैत्री कायमच आनंद देते. इतकी वर्षे माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. पुढचे वर्षात आपणास सर्व सुख आणि आनंदाच्या शुभेच्छा.\nमाझा खरा मित्र असल्याबद्दल मी तुझ्यावर माझ्या भावासारखं प्रेम करतो. जेव्हा मी माझा मार्ग गमावणार होतो तेव्हा तु मला योग्य मार्गाकडे नेले. नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022\nनवीन वर्ष आपण मित्रांसाठी एक पर्वणीच आहे. मागील वर्षाचे क्षण लक्षात ठेेवू आणि नवीन वर्षाचे एकत्र पार्टी करत स्वागत करु. नवीन वर्षाच्या शुभेच्छा\n🎉मग वर्षाचा शेवट असो की सुरुवात, तुमच्यासारखा मित्र नेहमीच एक आशीर्वाद असतो. मला आशा आहे की हे वर्ष आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी खूप आनंदाचे क्षण आणेल\n२०२२ नवीन वर्षाच्या शुभेच्छा\n🎉मागील वर्षांमध्ये आपण माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय मित्र आहात. मी आशा करतो की आपण जसे आहात तसेच नेहमी रहाल.\n🎉मागील वर्षी मी केलेली सर्वात चांगली\nगोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे.\nमला खरोखरच ही मैत्री\nआयुष्यभर कायम ठेवायची आहे\n🎉जेव्हा गोष्टी कठीण होतात आणि मी आयुष्यापासून कंटाळलो तेव्हा मला धरून ठेवल्याबद्दल धन्यवाद. देव आपल्याला कायम आणि सदैव आशीर्वाद देईल.\nनवीन वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा.🎉\n🎉आपल्यासारखा मित्र तिथ नवीन वर्षाचे स्वागत करण्यास नसल्यास आनंद कमी वाटेल.\nमैत्रीच्या सर्व चांगल्या क्षणांबद्दल धन्यवाद.\n२०२२ नवीन वर्षाच्या शुभेच्छा\n😂विनोदी नवीन वर्षाच्या शुभेच्छा / Funny new year wishes .😂\n2022 मधे जर कोणी बोलला\nतर तंगड तोडण्यात येईल त्यांच\nमला प्रश्न पडला आहे\nकरायची का 2021 जाण्याची\nसुधारतो तो मोठा माणूस,\nमान्य करतो तो देवमाणूस,\nपाणी पाजतो तो माणूस ,\nचहा पाजतो तो मोठा माणूस,\nपार्टी देतो तो “देवमाणूस”…\nग्रुप मधे कोण देव माणूस आहे\nदिसणार आहे आणि हे\nनको चंद्र तारे फुलांचे\nजिथे मी बसावे तिथे 4G\nफक्त एक वर्ष वापरलेलं\n🎉आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात\nकळत नकळत २०२१ मध्ये\nजर का मी तुमचे मन दुखावले असेल,\nकिव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,\n२०२१ मध्ये पण तय्यार रहा,\nकारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…🎉\n🎉इडा, पीडा टळू दे..\nकडक आयटम मिळू दे…\nमी देवाला म्हटलं की माझ्या मित्रांना येणाऱ्या २०२१ वर्षात सुखी ठेव.\nदेव म्हणाला – ठीक आहे पण फक्त ४ दिवस. ….\nते चार दिवस तू सांग …\nदेव confused झाले आणि म्हणाले – नाही फक्त ३ दिवस….\nमी म्हटलं ठीक आहे……\nदेव पुन्हा confused होऊन म्हणाल – फक्त २ दिवस……\nमी म्हटलं ठीक आहे……\nदेव पुन्हा confused होऊन म्हणाले- नाही फक्त एकच दिवस……\nदेव हसले आणि म्हणाले अरे बाबा माझा पिछा सोड- तुझे मित्र नेहमी खुश आणि सुखी राहतील.\n# हैप्पी न्यू इयर मराठी\n११ ते ६ संचारबंदी… म्हणजे\nरात्री ८ वाजता एकदा बार | हॉटेल\nआंघोळ करुनंच बाहेर पडायचं, चालतंय की…😂\nजास्त उड्या मारू नका\nफक्त कलेंडर बदलणार आहे\nया दिवशी मार्गशीर्ष गुरुवार\nखाता पिता येणार नाही.\nनसून 2021 ने जाता जाता\nकसला plan आणि काय\nझोपायचं, mobile वापरत बसायचं\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nstatusinmarathi.com या वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठी माणसापर्यंत प्रेरणादायी कविता, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी कोट्स, प्रेरक विचार आणि वाढदिवस शुभेच्छा , मराठी स्टेटस पोचवण्याचा प्रयन्त करत आहोत. जेणे करून त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.👍\nकोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२२ | Kojagiri purnima wishes in marathi 2022,status,quotes, Messages,Images, greetings शेअर करून द्या कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा.\nकोजागरी पौर्णिमा माहिती,कथा,महत्त्व,पूजविधी मराठी | kojagiri purnima information in marathi 2022.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/tdb_templates/footer-template-default-pro", "date_download": "2022-10-07T23:31:31Z", "digest": "sha1:7CKFE3OIO5S3HPUAISIN5JEW44QVKRID", "length": 9931, "nlines": 123, "source_domain": "bollyreport.org", "title": "Footer Template - Default PRO - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nअल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा २०२१ मध्ये आलेला पुष्पा चित्रपट चांगलाच गाजला. हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नडा, मल्याळम अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nबॉलिवूड अभिनेत्री आणि टीव्ही सेलिब्रिटी मलायका अरोरा हे नावं काही आपल्यासाठी नवीन नाही. ती नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. असाच मनमोहक आणि हॉट अवतार...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nअल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा २०२१ मध्ये आलेला पुष्पा चित्रपट चांगलाच गाजला. हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नडा, मल्याळम अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nबॉलिवूड अभिनेत्री आणि टीव्ही सेलिब्रिटी मलायका अरोरा हे नावं काही आपल्यासाठी नवीन नाही. ती नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. असाच मनमोहक आणि हॉट अवतार...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nअल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा २०२१ मध्ये आलेला पुष्पा चित्रपट चांगलाच गाजला. हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नडा, मल्याळम अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nबॉलिवूड अभिनेत्री आणि टीव्ही सेलिब्रिटी मलायका अरोरा हे नावं काही आपल्यासाठी नवीन नाही. ती नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. असाच मनमोहक आणि हॉट अवतार...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nअल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा २०२१ मध्ये आलेला पुष्पा चित्रपट चांगलाच गाजला. हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नडा, मल्याळम अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nबॉलिवूड अभिनेत्री आणि टीव्ही सेलिब्रिटी मलायका अरोरा हे नावं काही आपल्यासाठी नवीन नाही. ती नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. असाच मनमोहक आणि हॉट अवतार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://crazymarathi.com/2022/08/19/2-bai-train-jatat/", "date_download": "2022-10-07T22:54:35Z", "digest": "sha1:6HRGMEWKW5J2YSUWAGIK5CBG3CZXHYL3", "length": 17693, "nlines": 126, "source_domain": "crazymarathi.com", "title": "२ बाई सोबत ट्रेनने गावाला जात असता…. - Crazy Marathi", "raw_content": "\n२ बाई सोबत ट्रेनने गावाला जात असता….\nनेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….\nविनोद १ : गण्या त्याच्या गर्ल_फ्रेंडला प्रेमाने समजवत बोलला\nगण्या : “डा_र्लिंग आपल्या ल_फड्या बद्दल कोणालाच नको सांगू”\nमुलगी : “तुझ्या बहिणीला तर जरूर सांगेल”\nगण्या : अरे तिला कश्याला\nमुलगी : शहाणी बोलायची “कोणी ह_रा_मीच असेल जो तुझ्यावर प्रेम करेल”\nविनोद २ : एक माणूस महा कंजूस होता, त्याने एका काचेच्या बरणीत तूप बहरून ठेवलं होत\nजेव्हा तो आणि त्याचे मुलं जेवण करायचे तेव्ह ते त्या बाटलीला पोळ्यावर रगडून खायचे\nएक दिवस कंजूस काही कामासाठी बाहेर गेला होता रात्री घरी आल्यावर त्याने मुलांना विचारलं आज जेवण केलं होत का\nमुलं बोलले हो, मग तो म्हणाला मी तर तुपाची बाटली कपाटात लॉक करून गेलो होत….\nत्यावर मूलं म्हणाले आम्ही कपाटाच्या हॅन्डलला पोळ्या घासून खाल्या\nमहा कंजूस माणूस नाराज होऊन बोलला ना_लायकांनो तुम्ही एक दिवस बिना तुपाचे जेवण नाही करू शकत का…..\nविनोद ३ : एक पेशंट डॉक्टरकडे गेला, डॉक्टर माझ्या कमरेत खूप दुखत आहे\nडॉक्टर : Ohhh काय झालं\nपेशंट : डॉक्टर मी एका बिल्डिंग मध्ये तिसऱ्या माळ्यावर राहतो…\nमी ऑफिस मधून घरी आलो तर पाहिलं माझ्या घरात कोणीतरी इकडून तिकडे पळत होत\nमी पळत पळत घरात गेलो तर तिथे कोणी नव्हतं, मग मी बालकनीत आलो तर मी खाली एका माणसाला पाळताना पाहिलं तो पळता पळता पॅ_न्ट घालत होता आणि गाडीत जाऊन बसला\nमी लगेच बाजूला असलेलं फ्रीझ उचलून खाली फेकलं त्यातच हि चबक भरली\nतोच आजून एक पेशंट येतो त्याची हालत जास्तच खराब असते\nडॉक्टर : काय झालं\nपेशंट : मी आज ऑफिसला जायला लेट झालो होतो मी पळत पळत पॅ_न्ट घातली आणि यादीत बसलो तोच कोणीतरी फ्रीझ गाडीवर फेकलं….\nतोच तिसरा पेशंट येतो त्याची हालत तर दोघांपेक्षा जास्तच खराब असते\nडॉकटर : आता तुम्हाला काय झालं\nपेशंट : मी माझ्या प्रेमि_काला भेटायला गेलो होतो पण तिचा नवरा अचानक आला, मी फ्रीझ मध्ये जाऊन लपलो, पण माहित नाही कोणीतरी फ्रीझ तिसऱ्या मालीवरून खाली फेकलं…..\nविनोद ४ : छोटा मुलगा त्याच्या आईला : आई मला मु_तायला आली आहे लवकर पॅ_न्ट काढून दे\nआई : हे देवा हेच बाकी राहील आहे आयुष्यात हेच बाकी राहील आहे आयुष्यात दिवसा याची पॅ_न्ट काढा आणि रात्री याच्या बा_पाची \nविनोद ५ : गण्याच लग्न होत बिदाईचे वेळेस त्याच्या दुकानदार सासऱ्याने त्याला एक चिठ्ठी दिली\nत्यात लिहाल होत “एकदा विकलेला माल परत नाही घेतला जाणार”\nपण आपला गण्या त्याचा बा_प निघाला\nत्याने आजून एक चिट्ठी लिहली कि “सी_ल तुटलेला माल स्वीकारला जाणार नाही”\nविनोद 6- एकदा एका माणसाची बायको हरवते.. तो घाईत घाईत पोस्ट ऑफिसावे मध्ये जातो….\nमाणूस : साहेब माझी बायको हरवलीय……\nसाहेब : हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पो लीस स्टेशन नाही …तुम्ही तक्रार द्यायला पो लीस स्टेश नला जा……\nमाणूस : च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाही आहे……\nविनोद 7- आज बायकोची एक सुंदर मैत्रीण घरी आली होती… आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो……\nबायकोने कुक्कर लावले होते. १०-१२ शिट्ट्या झाल्या तरी ऊठायचे नाव घेत नव्हती….\nशेवटी मी म्हटल … अगं ती डाळ जळेल….\nती फटकन् म्हणाली… जळू देत जळली तर… पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही…\nविनोद 8- सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज ओरडून म्हणाले. . अगं या उटण्याचा उग्र वास येतोय… पत्नी:-अरे देवा..देवा…देवा….काय बाई तुमचा हा वेंधळेपणा….मी काल दोन पुड़्या आणल्या होत्या…. एक उटण्याची व दुसरी हिंगाची .. तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली….अन फासली सगळ्या अंगाला. .. काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..अरे देवा…कसं होईल या संसाराचं. . काय म्हणावं या वेंधळ्या माणसाला. … काय म्हणावं या वेंधळ्या माणसाला. … पती – अग अग…तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय……. तू कशाला एवढं टेंशन घेतेस पती – अग अग…तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय……. तू कशाला एवढं टेंशन घेतेस पत्नी- अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या हो….. इथं माझी भाजी उटण्याने बिघडली त्याचं काय पत्नी- अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या हो….. इथं माझी भाजी उटण्याने बिघडली त्याचं काय.. तात्पर्य….बायका स्वतःच्या चुका अगदी छान जिरवतात……बिच्चारा हिंगाळलेला नवरा…\nविनोद 9: नवरा बायकोच्या भांडणानंतर, सासू सुनेला…\nसासू : हे भांडे कोणी पाडले. सून : ते आमचं भांडण झालं होत, त्यात पडले. सासू : पलंगाकडे बघत, मग हा पलंग कसा तुटला.\nसून : आमचा समजोता पलंगावरच झाला, त्यातच तुटला 🤣😛🤣😛🤣😛.\nविनोद 10: एका सोसायटीत केळेवाला केळे विकत असतो….\nकेळेवाला- केले ले लो गां#ड फाडू केले ले लो…\nबाई- ये केळेवाल्या हे कसले केळे आहे किती रुपये डझन आहे \nकेळेवाला- २५० रुपये में १ डझन… बाई- साल्या इतके महाग \nकेळेवाला- देखा ना भाभीजी फट गयी ना गां###ड… 😛🤣😛🤣😛\nविनोद ११- 2 चा वट मैत्रिणी पिंकी आणि राणी खूप दिवसानंतर भेटतात…\nराणी- काय ग कस जुळलं तुमचं लग्न…\nपिंकी खूप लाजते… राणी – सांग ना ग…\nपिंकी – अगं तो रोज आमच्या वावरात हागायला यायचा 😂😂😂\nविनोद १२- सुहा गरात्रीच्या दिवशी बायको नवऱ्याशी भांडण करते…\nबायको- मला आताच्या आता त लाक हवा आहे….\nनवरा बेक्कार टेन्शनमध्ये येतो….नवरा- पण झालं तरी काय\nबायको- अरे मेल्या जेवढा तुझा सामान आहे त्या पेक्षा मोठी तर\nमाझ्या हाताची बोट आहेत 😂😂😂😂😂😂\nविनोद 13- एकदा आंधळा बंड्या खूप विचारात डॉक्टर कडे जातो…\nडॉक्टर- काय प्रॉब्लेम आहे बंड्या- डॉक्टर 3 बायका बदलल्या तरी पण मुलं होत नाही…\nडॉक्टर बंड्याला चेक करतो… बंड्या- काय झालं डॉक्टर\nडॉक्टर- अरे बंड्या बायको बदलवण्याची गरज नाही फक्त साईड चेंग कर माघून नाही पुढून कर 😂😂😂😂😂\nविनोद 14- एकदा चा_वट राणीचं लग्न एका मुलाशी जमत…\nराणी शेवटचं तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जाते…\nराणी- बाबू. माझं लग्न जमलं…आता मला विसरून जा…\nबॉयफ्रेंड- चल आधी चड्डी काढ राणी- का रे बाबू \nबॉयफ्रेंड- अगं पिल्लू आता मला शेवटचं तरी बिना कं_डम से क्स करू दे…\nविनोद 15- चा वट पिंकी एकदा मेडिकल वर गेली…मेडिकलवर खूप गर्दी होती\nम्हणून पिंकी शांत उभी राहिली…\nथोड्या वेळाने गर्दी कमी झाली…..दुकानदार – काय पाहिजे\nपिंकी- अहो भाऊ माझं लग्न जमलं आहे ते डॉक्टर आहेत, त्यांनी मला love letter पाठवलं आहे\nजरा वाचून देता का\nविनोद 16- एकदा शहरातील बाई आणि खेड्यातील बाई सोबत ट्रेनने गावाला जात असता….\nखेड्यातील बाई लहान बाळाचे लंगोट बदलत असते….\nशहरी बाई- अहो बाई हग्गीज नाही का\nखेड्यातील बाई हसायला लागते…\nखेड्यातील बाई- अहो नाही…. फक्त मुतीस….\nमराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – मी नेहमी तुमच्या पुढे असतो….तरीही तुम्ही मला पाहू शकत नाही…..सांगा पाहू मी कोण\nविदेशी बाईने केला सुंदर डान्स…\nनवरी ने सर्वांना बेक्कार रडवले…\nमंग्या- कशी होती सुहा’गरात्र \nटीचर बच्चोंसे “क्या तुम एक छे..द के अंदर दो छे..द डाल सकते हो \nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nलग्नात बायकांनी केला झकास डान्स…\nसाली बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…\nलग्नात वहिनीनीं केला भारी डान्स…\nसुहा’गरात्री बायकोला जोराची उचकी लागते….\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा वट पिंकी एका बस मध्ये चढली…\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा’वट बाई मेडिकल वर गेली…\nमुलीने सासरी जाताना सर्वांना रडवले\nटकला टी शर्ट घालून आला…\nनवरी ताईचा विडिओ बघून रडू येईल…\nबंड्याच्या बेडरूम मधून बायकोचा आवाज आला…\nलग्नात ताईने केला खुपच सुंदर डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nताईने केला खुपच सुंदर डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/malegaon/news/embezzlement-of-funds-sarpanch-of-khairgavan-disqualified-130300285.html", "date_download": "2022-10-07T21:55:51Z", "digest": "sha1:GHA2TOCS2EHCYWLFU7CWDQPISSHLPP7J", "length": 4225, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "याेजनांच्या निधीचा अपहार; खैरगव्हाणचे सरपंच अपात्र | embezzlement of funds; Sarpanch of Khairgavan disqualified| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअपात्र घोषित:याेजनांच्या निधीचा अपहार; खैरगव्हाणचे सरपंच अपात्र\nखैरगव्हाण येथील सरपंच माणिक चंद्रभान सावंत यांनी विविध योजनांचा निधी धनादेशाद्वारे स्वतःच्या नावाने काढल्याचे सिद्ध झाल्याने मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी मायादेवी पाटोळे यांनी सरपंच सावंत यांस उर्वरित कालावधीसाठी अपात्र घोषित केले आले आहे.सरपंच माणिक सावंत यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात मनमानीपणाने कामकाज करत ग्रामनिधी, चौदावा वित्त आयोग, ग्रामीण पाणीपुरवठा इत्यादी खात्यांतील ३८ हजारांच्या निधीची रक्कम इतरांना विश्वासात न घेता वेगवेगळ्या कामांचा खर्च दाखवून परस्पर ग्रामसेवकाशी संपर्क साधून स्वतःच्या नावे धनादेशाद्वारे काढून घेतली.\nहीच बाब विरोधी गटातील ग्रामपंचायत सदस्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे १५ सप्टेंबर २०२१ ला ग्रामपंचायत अधिनियम१९५८ चे कलम १४ (ग) अन्वये विवाद अर्ज दाखल केला होता, सरपंच सावंत यांच्यावर गटविकास अधिकारी यांनी देखील जिल्हा परिषद प्रशासनाकडे ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) नुसार कारवाई प्रस्तावित आहे. त्यातच सरपंच माणिक सावंत यांचे सदस्यपद उर्वरित कालावधीसाठी अपात्र घोषित केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/news/afg-asia-cup-2022-pakistan-beat-afghanistan-by-1-wickets-at-130288649.html", "date_download": "2022-10-07T23:08:51Z", "digest": "sha1:FH7GOSLPE5CMQHZO5JM2PDJUADJXF2XK", "length": 5238, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "थरारक सामन्यात पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर 1 विकेटने विजय, भारताची अंतिम फेरीची आशा संपली | Pak vs Afg asia cup 2022| pakistan beat afghanistan by 1 wickets at sharjah - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआशिया चषक:थरारक सामन्यात पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर 1 विकेटने विजय, भारताची अंतिम फेरीची आशा संपली\nआशिया चषक 2022 च्या सुपर-4 फेरीतील महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एका विकेटने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 20 षटकात 129 धावा केल्या. इब्राहिम झद्रानने सर्वाधिक 35 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर 9 गडी गमावून 131 धावा केल्या.\nशादाब खानने 36, इफ्तिखार अहमदने 30 आणि मोहम्मद रिझवानने 20 धावा केल्या. नसीम शाह चार चेंडूत 14 धावा करून नाबाद राहिला. गोलंदाजीत अफगाणिस्तानकडून फझहलक फारुकी आणि फरीद अहमद यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. याशिवाय राशिद खाननेही दोन विकेट घेतल्या.\nप्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या फलंदाजाना फार काही मोठी मजल मारता आली नव्हती. आक्रमक सलामीनंतर अफगाणिस्तानचा डाव अडखळला होता. मोहम्मद नवाझ आणि शादाब खान यांच्या फिरकीने अफगाणिस्तानला रोखले.\nपाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने शेवटच्या षटकात लागोपाठ दोन षटकार मारून संपूर्ण सामनाच फिरवला. पाकिस्तानला विजयासाठी सहा चेंडूत 11 धावांची गरज होती. त्याने फझहलहक फारुकीच्या पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकला आणि सामना संपवला.\nया विजयासह भारताचे आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न संपुष्टात आले आहे. आता टीम इंडिया गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध फक्त औपचारिक सामना खेळणार आहे. यासह आशिया चषकाचा अंतिम सामना आता 11 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/ask-this-4-important-questions-to-future-husband-before-marriage-for-happy-life-mhkp-gh-745222.html", "date_download": "2022-10-07T22:24:15Z", "digest": "sha1:SHQEFMNDWEQQCJIA7LRJHI72QJCET34C", "length": 14806, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ask this 4 important questions to future husband before marriage for happy life mhkp gh - मुलींनी लग्नाआधी जोडीदाराला ‘हे’ 4 प्रश्न विचारणं अत्यावश्यक; अन्यथा नंतर होईल पश्चाताप – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /\nमुलींनी लग्नाआधी जोडीदाराला ‘हे’ 4 प्रश्न विचारणं अत्यावश्यक; अन्यथा नंतर होईल पश्चाताप\nमुलींनी लग्नाआधी जोडीदाराला ‘हे’ 4 प्रश्न विचारणं अत्यावश्यक; अन्यथा नंतर होईल पश्चाताप\nलग्नाच्या बंधनात बांधलं जाण्याआधीच तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला काही प्रश्न विचारणं अगदी गरजेचं असतं. या प्रश्नांची उत्तरं वेळीच मिळाली नाहीत तर नंतर पश्चाताप होऊ शकतो. लग्नाच्या आधी तुमच्या जोडीदाराला हे प्रश्न नक्की विचारा (Marriage Tips)\nलग्नाच्या बंधनात बांधलं जाण्याआधीच तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला काही प्रश्न विचारणं अगदी गरजेचं असतं. या प्रश्नांची उत्तरं वेळीच मिळाली नाहीत तर नंतर पश्चाताप होऊ शकतो. लग्नाच्या आधी तुमच्या जोडीदाराला हे प्रश्न नक्की विचारा (Marriage Tips)\nIAS अधिकारी टीना डाबीनंतर EX पतीनेही उरकलं लग्न; दुसऱ्या पत्नीने घातल्या 3 अटी\nदेशात कोणत्या राज्यात मुलींचं लग्न कितव्या वर्षी होतं\nकोर्टमॅरेज करतानाच पळून गेला नवरा, Video Viral होताच लग्नाची रंगली देशभर चर्चा\nलग्नमंडपात एन्ट्री करताच मागितलं आधार कार्ड, अनेक वऱ्हाडी न जेवताच परतले\nमुंबई 12 ऑगस्ट : पती-पत्नीमधलं नातं (Husband-Wife Relation) म्हणजे अगदी नाजूक नातं असतं. हे नाजूक नातं निभावणं तितकंच कठीण असतं. अर्थात मुली आपल्या आयुष्याच्या या टप्प्यावर जास्त एक्सायटेड असतात. नवीन नातं कसं असेल याबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता असते. त्याचबरोबर त्यांच्या मनात सतत एक भीती असते. लग्नानंतर आपल्या पतीचं आपल्याबरोबरचं वागणं कसेल, असा प्रश्न सतत मुलींच्या मनात असतो. तुमचं लव्ह मॅरेज असो किंवा अ‍ॅरेंज मॅरेज, जीवनसाथीबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती असणं अत्यावश्यक आहे. लग्नाच्या बंधनात बांधलं जाण्याआधीच तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला काही प्रश्न विचारणं अगदी गरजेचं असतं. या प्रश्नांची उत्तरं वेळीच मिळाली नाहीत तर नंतर पश्चाताप होऊ शकतो. लग्नाच्या आधी तुमच्या जोडीदाराला हे प्रश्न नक्की विचारा- 1. करिअर बऱ्याच मुलींना लग्नानंतरही आपलं प्रोफेशनल करिअर (Professional Carrier after Marraige) सुरू ठेवण्याची इच्छा असते. लग्नानंतर आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावं असं अनेक मुलींना वाटतं; पण लग्नानंतर बऱ्याचदा नवरा किंवा सासरच्यांना मुलीनं नोकरी केलेली किंवा करिअर सुरू ठेवलेलं आवडत नाही. लग्नानंतर मुलीनं पूर्ण वेळ गृहिणी बनावं अशी अनेकांची इच्छा असते. तुम्हाला तुमचं करिअर लग्नानंतर सुरू ठेवायचं असेल तर त्याबद्दल लग्नाआधीच स्पष्ट बोलून घ्या. नोकरी आणि करिअरबद्दल तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला आधीच प्रश्न विचारून शंकानिरसन करून घ्या. तुमच्या करिअरमध्ये तुमचा होणारा पती तुम्हाला किती सहकार्य करणार आहे हेही माहिती करून घ्या. म्हणजे लग्नानंतर करिअर सोडण्याची किंवा करिअरवरून पती-पत्नीमध्ये मतभेद होण्याची शक्यता कमी होईल. Relationship: जर मनात भरलाच तर त्याच्याविषयी मुली करतात असा विचार; पाहतात मुलाच्या या गोष्टी 2. कुटुंब नियोजन/ फॅमिली प्लॅनिंग आपल्याकडे मुलींसाठी अजूनही हा प्रश्न थेट विचारणं थोडंसं अवघड आहे; पण हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कुटुंब नियोजनाबद्दल तुमच्या होणाऱ्या पार्टनरचे काय विचार आहेत हा प्रश्न लग्नाआधीच विचारणं खूप गरजेचं आहे. फॅमिली प्लॅनिंगबद्दल (Family Planing) जोडीदाराचं मत आधीच जाणून घ्या. तुमचे आणि त्याचे विचार जुळले तरच लग्नासाठी होकार द्या. फॅमिली प्लॅनिंगबद्दल जोडीदाराचे आणि तुमचे विचार जुळत नसतील, तर त्यामुळे प्रोफेशनल करिअरमध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कुटुंब नियोजनाचे विचार, किती मुलं हवी आहेत, मुलांसाठी चान्स कधी घ्यायचा या गोष्टी लग्नाआधीच स्पष्ट होणं आवश्यक आहे. 3. स्वभाव प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो. अनेकदा पती-पत्नीचा स्वभाव एकमेकांच्या पूर्ण विरुद्ध असतो. अशा परिस्थितीत वादविवाद, भांडणं आणि तक्रारीची शक्यता अर्थातच खूप जास्त असते. तुम्हाला तुमच्यातली मतभिन्नता म्हणजेच डिफरन्सेस ऑफ थॉटमुळे जास्त त्रास होत नसेल तर याचा तुमच्यावर जास्त परिणाम होणार नाही; पण हाच प्रश्न तुम्ही तुमच्या होणाऱ्या जोडीदारालाही विचारला पाहिजे. एकमेकांच्या विरुद्ध स्वभाव असताना, परस्पर मतभिन्नता असतानाही तो तुमच्याबरोबर खूश राहू शकेल का हा प्रश्न लग्नाच्या आधीच तुमच्या जोडीदाराला विचारा. त्याशिवाय तुमचा जोडीदार तुमच्याबद्दल जास्तच पझेसिव्ह असेल किंवा तो संशयी असेल, तर मात्र पुढे लग्न झाल्यावर तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे याचा वेळीच विचार करा. 4. क्वालिटी टाइम आजकाल मुलांना वर्कप्रेशर (Work pressure) भरपूर असतं. त्यामुळे ऑफिसमधलं काम, घरची जबाबदारी हे करता करता त्यांना कुटुंबासाठी जास्त वेळ देता येणं अनेकदा शक्य होत नाही. जोडीदार कमी वेळ देत असेल तर त्यामुळे वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण होतो. त्यातही पती-पत्नी दोघंही नोकरी करणारे किंवा व्यवसाय करणारे असतील तर दोघांचे वर्किंग अवर्स म्हणजेच कामाचे तास किती आहेत, त्यात किती अंतर आहे, पती-पत्नी दोघांनाही एकमेकांबरोबर किती वेळ घालवणं शक्य आहे हे सगळं लग्नाआधीच स्पष्ट करून घ्या. म्हणजे नंतर नात्यात कटुता येणार नाही. हे चार प्रश्न प्रत्येक मुलीच्या लग्नानंतरच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. याबद्दल लग्नाच्या आधीपासूनच जोडीदाराची मतं जाणून घेतली तर वैवाहिक आयुष्य नक्कीच सुखाचं, आनंदाचं होईल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2022-10-07T22:32:46Z", "digest": "sha1:MO3LXXM6QVZ55NOLUMPTZPTKZSWJZECZ", "length": 12232, "nlines": 178, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:प्रताधिकारमुक्त संचिका - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"प्रताधिकारमुक्त संचिका\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\n\"प्रताधिकारमुक्त संचिका\" वर्गातील माध्यमे\nएकूण १४५ पैकी खालील १४५ संचिका या वर्गात आहेत.\nGahu.JPEG ३,०७२ × २,३०४; २.७२ मे.बा.\nPath1.JPG २,३०४ × ३,०७२; २.९५ मे.बा.\nPath2.JPG २,३०४ × ३,०७२; ३.०५ मे.बा.\nPath3.JPG ३,०७२ × २,३०४; २.७१ मे.बा.\nPath4.JPG ३,०७२ × २,३०४; २.५५ मे.बा.\nPath5.JPG २,३०४ × ३,०७२; २.९५ मे.बा.\nPath6.JPG २,३०४ × ३,०७२; २.५१ मे.बा.\nRatale.JPG २,५७५ × १,८३५; २.७२ मे.बा.\nRose1.JPG २,८४६ × २,२१८; ३.१४ मे.बा.\nRose11.JPG १,४८४ × १,४९९; १,००० कि.बा.\nRose12.JPG १,६६१ × १,६१९; १.०८ मे.बा.\nRose13.JPG १,६४५ × २,११७; १.५३ मे.बा.\nRose14.JPG २,१०२ × २,१०४; १.९५ मे.बा.\nRose15.JPG १,६३५ × २,०९३; १.३६ मे.बा.\nRose16.JPG १,७८३ × १,७६८; १.६१ मे.बा.\nRose18.JPG ३,०७२ × २,३०४; ३.०२ मे.बा.\nRose19.JPG १,६१४ × १,९५०; १.६३ मे.बा.\nRose20.JPG १,४७० × २,०४५; १.४७ मे.बा.\nRose22.JPG २,२०५ × १,८८६; १.२२ मे.बा.\nRose25.JPG १,७०७ × १,९१४; १.४४ मे.बा.\nRose27.JPG १,५९१ × २,६०९; १.२९ मे.बा.\nRose30.JPG २,७१८ × २,३०४; २.७४ मे.बा.\nRose31.JPG १,६१५ × १,४६५; ८७१ कि.बा.\nRose5.JPG १,९८४ × २,०९३; १.७८ मे.बा.\nRose6.JPG २,३२८ × १,९६५; १.७९ मे.बा.\nRose7.JPG २,८४२ × २,२४२; २.६१ मे.बा.\nRose8.JPG ३,०७२ × २,३०४; २.८५ मे.बा.\nRose9.JPG ३,०७२ × २,३०४; २.८६ मे.बा.\nTarbuj.JPG ५४० × ३५७; १५७ कि.बा.\nTur.JPG ३,०७२ × २,३०४; २.७८ मे.बा.\nValley.JPG २,३०४ × ३,०७२; २.५८ मे.बा.\nVelu.jpg ६४० × ४८०; १०८ कि.बा.\nमलंगगड.JPG १,०२४ × ७६८; २३३ कि.बा.\nशेवटचा बदल १९ ऑक्टोबर २००९ तारखेला ०९:३२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २००९ रोजी ०९:३२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/profile/golij3su/shashikant-shandile", "date_download": "2022-10-07T23:12:09Z", "digest": "sha1:JVQCRCBZTPL2LFXR3YHOI4L26JIXYCJA", "length": 1395, "nlines": 45, "source_domain": "storymirror.com", "title": "Stories Submitted by Literary Colonel SHASHIKANT SHANDILE | StoryMirror", "raw_content": "\nकुछ नज्म कुछ कविताएं कुछ शेर अर्ज करता हूँ, अल्फाजो के जादूगरी से दिलों के मर्ज भरता हूँ\nइन व्हिट्रो फर्टिलायझेशन या विषयावरील लेख इन व्हिट्रो फर्टिलायझेशन या विषयावरील लेख\nकुणा दोष देणे ...........\nमाणूस मरतो मात्र त्याचे विचार संपवता येत नाहीत माणूस मरतो मात्र त्याचे विचार संपवता येत नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/bhandara/bhandara-accident-head-on-collision-with-truck-and-dumper-fire-broke-out-after-accident-in-which-driver-burn-alive-in-dumper-driver-cebine-watch-video-au136-752763.html", "date_download": "2022-10-07T21:44:46Z", "digest": "sha1:ZRIJJMVXX22O5JGKIFRXWHGPQSZONVZ5", "length": 11125, "nlines": 194, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nBhandara Accident : भीषण अपघातानंतर ट्रकला आग, आगीत ट्रक चालक जिवंत जळाला ट्रक-टिप्परची समोरासमोरच जोरदार धडक\nBhandara Accident News : या अपघातातील धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर स्पार्क होऊन कोळसा भरलेला ट्रकला आग लागली.\nतेजस मोहतुरे | Edited By: सिद्धेश सावंत\nभंडार : भंडारा-तुमसर राज्य मार्गावर दोन ट्रक मध्ये भीषण अपघात (Road Accident News) घडला. या पघातानंतर ट्रकला आग लागली. या आगीमध्ये ट्रकचा चालक जिवंत जळाल्याची (Burn Alive) दुर्दैवी घटना घडली. भंडारा-तुमसर राज्य मार्गावर दाबा गावात दोन ट्रकमध्ये हा भीषण अपघात (Bhandara Accident Video) झाला. दुसऱ्या ट्रकच्या ड्राइवर वेळीच बाहेर निघाल्याने त्याचे प्राण वाचले. दाबा गावाजवळ कोळसा भरून जात असलेला ट्रकला भरधाव येणाऱ्या टिप्पर ट्रकने आमरासमोर जबर धडक दिली. या अपघातातील धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर स्पार्क होऊन कोळसा भरलेला ट्रकला आग लागली. वेळीच कोळसा भरलेला ट्रकचा ड्राइवर बाहेर निघाला. मात्र टिप्पर ट्रक चे कॅबिन चेपल्याने ड्राइवर अडकून पडला. त्याला बाहेर निघण्याचा कोणताच मार्ग नव्हता.\nभंडाऱ्यात भीषण अपघात, ट्रक टिप्परची समोरासमोर धडक, अपघातानंतर दोन्ही ट्रकला आग, टिप्परचा चालक जिवंत जळाला #ACCIDENT VIDEO : तेजस मोहतुरे, प्रतिनिधी, टीव्ही 9 भंडारा pic.twitter.com/gCdyHfJQwc\nकोळसा भरलेल्या ट्रकला लागलेली आग टिप्पर ट्रकलाही लागली. बघता बघता आग प्रचंड भडकली. या आगीत टिप्परमध्ये अडकलेला ड्रायवर जळून खाक झाला. याची माहिती वरठी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला देण्यात आली असून घटनास्थळ गाठत अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलंय. वरठी पोलिसांकडून या अपघातप्रकरणी अधिक तपास केला जातोय.\nओव्हर टेक करण्याच्या नादात हा अपघात झाला असावा असा संशय व्यक्त केला जातोय. कोळशाने भरलेला ट्रक विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसला होता. तर समोरुन येणाऱ्या टिप्परलाही वळणावर अचानक ट्रक आल्यानं गाडी बाजूला घेण्यासाठी मार्ग उरला नव्हता. यामुळे एकाच लेनमध्ये समोरासमोर आल्यामुळे हा भीषण अपघात घडला.\nMira road Accident : खड्ड्यामुळे तोल गेला मागून येणाऱ्या एसटीच्या चाकाखाली येऊन बाईकस्वार तरुण जागीच ठार\nDahisar News : खदान तलावात पोहायला गेले, 7 मित्रांपैकी दोघे बुडाले 5 मित्र शॉकमध्ये, एक मृतदेह हाती\nNashik Murder : अफगाणिस्तानातून आलेल्या मुस्लिम मांत्रिकाचा येवल्यात गोळ्या घालून खून\nCrime : पती, पत्नी और वो त्याला घरात पाहून संशय वाढला, पारा चढताच पत्नीचा काटा काढला\nट्रकच्या चालकानं प्रसंगावनधान राखल्यानं त्याला लगेचच गाडीतून उडी मारुन स्वतःचा जीव वाचवता आला होता. मात्र टिप्परचा चालक या भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत होरपळला आणि त्यातच त्याचा जीव गेला.\nटू पीसमध्ये इलियाना डिक्रूझची हवा हवाई\n‘संस्कारी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीचे संस्कारी रूप\nनोरा फतेहीची रिवीलिंग जादू पाहिली का\nमौनी रॉयचा केसरिया रंग…. फोटोशूटसाठी पहा काय केलं\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/akola/akola-senior-journalist-prabhakar-virghat-committed-suicide-left-suicide-note-to-cm-eknath-shinde/articleshow/93598630.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2022-10-07T23:23:24Z", "digest": "sha1:CTUMBIS4MURFEIPGK5KBMKJQVVZEFHCD", "length": 15198, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nमुख्यमंत्री शिंदे मला मृत्यूनंतर न्याय द्या, सुसाईड नोट लिहून ज्येष्ठ पत्रकाराची आत्महत्या\nAkola News: प्रभाकर गंगाराव विरघट हे पत्रकार होते. मुलगा प्रतुल आणि वडील असे दोघे जण राहत होते. घटनेच्या दिवशी मुलगा प्रतुल काकाकडे रात्री झोपण्यासाठी गेला असता त्याच रात्री त्यांनी घरात गळफास घेत आत्महत्या केली. ११ ऑगस्ट रोजी सकाळी शेजारीच राहणारा दुसरा मुलगा अखिल याने वडिलांना चहा नाश्तासाठी फोन केला असता प्रतिसाद न मिळाल्याने त्याने घरी येऊन पाहिले.\nमुख्यमंत्री शिंदे मला मृत्यूनंतर न्याय द्या, सुसाईड नोट लिहून ज्येष्ठ पत्रकाराची आत्महत्या\nअकोल्यात ज्येष्ठ पत्रकाराची आत्महत्या\nसुसाईड नोटमध्ये आठ जणांची नावं\nअकोला: ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर विरघट यांनी १० ऑगस्टच्या रात्री आत्महत्या केली. त्यांच्या सुसाईड नोटनुसार अकोट फैल पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. प्रिंटींग प्रेसमध्ये फसगत केली आणि विश्वासघाताने आर्थिक अडचणीत आणले, त्यांना शिक्षा व्हावी, असा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये केलाय.\nप्रभाकर गंगाराव विरघट हे पत्रकार होते. मुलगा प्रतुल आणि वडील असे दोघे जण राहत होते. घटनेच्या दिवशी मुलगा प्रतुल काकाकडे रात्री झोपण्यासाठी गेला असता त्याच रात्री त्यांनी घरात गळफास घेत आत्महत्या केली. ११ ऑगस्ट रोजी सकाळी शेजारीच राहणारा दुसरा मुलगा अखिल याने वडिलांना चहा नाश्तासाठी फोन केला असता प्रतिसाद न मिळाल्याने त्याने घरी येऊन पाहिले. तेव्हा त्याला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.\nहेही वाचा-बापाकडून आईला सतत मारहाण, पोरानं मामाला बोलावलं, बापाला झाडाला बांधलं अन्...\nयानंतर अकोट फैल पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि पंचनामा केला. दरम्यान, प्रभाकर विरघट यांच्या खिशामध्ये तीन चिठ्ठ्या दिसून आल्या. त्यामध्ये शिवशक्ती प्रिंटींग प्रेस व्यवहार १९८८ मध्ये रमेश सरने, मोहन काजळे, मदन जोशी, प्रभाकर जोशी, रमेश गायकवाड, रमेश जैन, प्रेम कनोजीया, मोतीलालजी कनोजीया यांनी फसगत केली, विश्वासघात केला आर्थिक अडचणीत ठेवले, गुन्हेगार केले म्हणून आत्महत्या करीत आहे, असे नमूद केले आहे.\nहेही वाचा-पोलीस स्टेशनमध्येच ओढणीने गळफास, महिला पोलिसाचं धक्कादायक पाऊल\nसुसाईड नोटमध्ये काय आहे\nप्रभाकर विरघट यांच्या खिशामध्ये तीन सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागल्या. या सुसाईड नोटमध्ये नमूद आहे की, मुख्यमंत्री शिंदे सरकारने मला मरणोपरांत न्याय द्यावा. आठ जणांनी आपला विश्वासघात केला म्हणून आत्महत्या करीत आहे. सर्वांवार कारवाई व्हावी. प्रेस कामगार सुशीर वरघट (रा. ख्रिश्चन कॉलनी) याच्याकडून माहिती घ्यावी की, प्रेसमध्ये बसणारे आंबेडकरी चळवळीतील कोण कोण होते. तिसऱ्या चिठ्ठीवर लिहले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यापक चौकशीसाठी विशेष चौकशी अधिकारी नियुक्त करून सर्व आर्थिक जमानतदारांवर कारवाई करावी. या सर्वांनी सहकार्य केले नाही. मात्र गुन्हेगार केले हा अन्याय झाला म्हणून न्याय द्यावा, असेही नमूद केले आहे.\nहेही वाचा-प्रेमात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला संपवलं; २२ महिने कोणाला शंकाही आली नाही; एक दिवस अचानक...\nपवार साहेबांनी पक्ष सोडला तेव्हा...; त्या वक्तव्यावर फडणवीसांचं पवारांना सडेतोड उत्तर\nमहत्वाचे लेखAkola: शेती नाही, कागदपत्रे नाही तरी ४५ गुरे आली कुठून त्याला उत्तरच देता आले नाही, अखेर पोलिसांनी...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमुंबई आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nमटा ओरिजनल मुंढेंच्या धाडसत्राने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, रात्री डॉक्टर नसल्यास थेट घरचा आहेर\n जे लॉटरीचं तिकीट कचऱ्यात टाकलं, त्यानेच बनवले या महिलेला करोडोंची मालकीण\nसिंधुदुर्ग उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे राहणारा आमदार चौकशीच्या फेऱ्यात, कोकणातल्या नेत्याला एसीबीची नोटीस\nमुंबई धाकधूक वाढली, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या हालचाली\nमुंबई ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा ते दिघेंच्या मृत्यूचं ठाकरे कनेक्शन, मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज\nदेश काँग्रेस नेत्यानं हॉटेलमध्ये नेलं, मग सामूहिक अत्याचार केले, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर तिघांना अटक\nदेश वंदे भारत एक्स्प्रेस दुसऱ्यांदा दुर्घटनाग्रस्त, सलग दुसऱ्या दिवशी वेगवान ट्रेनचा खोळंबा\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/turmeric-has-many-benefits-but-these-peo/", "date_download": "2022-10-07T21:57:52Z", "digest": "sha1:2LKCDZDASK6L4XROYZQHLHCARGAQQHN7", "length": 5737, "nlines": 43, "source_domain": "mahaupdate.in", "title": "हळदीचे अनेक फायदे आहेत, पण चुकूनही 'या' लोकांनी त्याचे सेवन करू नका, अन्यथा... - Maha Update", "raw_content": "\nHome » हळदीचे अनेक फायदे आहेत, पण चुकूनही ‘या’ लोकांनी त्याचे सेवन करू नका, अन्यथा…\nहळदीचे अनेक फायदे आहेत, पण चुकूनही ‘या’ लोकांनी त्याचे सेवन करू नका, अन्यथा…\nहळद हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाच्या घरात सहज सापडणारी सामान्य गोष्ट आहे. अन्नामध्ये रंग आणि चव जोडण्यापासून ते घरगुती बनवलेल्या पदार्थासह आरोग्यास मदत करते. याचा वापर अनेक प्रकारे केला जातो.\nपिढ्यानपिढ्या आपल्याला हळदीचे अनेक फायदे सांगितले जातात. पण या फायदेशीर औषधाचे तोटेही असू शकतात असं म्हटलं तर विशेषतः, ते मूत्रपिंड आणि यकृताच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर…\nकर्क्यूमिन हानिकारक असू शकते\nहळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन हे एक सुपरफूड बनवते. वेदना बरे करण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि संक्रमण दूर ठेवण्यापर्यंत, हा मसाला सर्व प्रकारच्या समस्या दूर करू शकतो. मात्र, जर हळदीचे जास्त सेवन केले तर ते शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते.\nहळदीचा मूत्रपिंडावर कसा परिणाम होतो\nकर्क्युमिन जास्त प्रमाणात घेतल्यास नुकसान होऊ शकते. कारण त्यात ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो आणि या अवयवाच्या कार्यात व्यत्यय येऊ शकतो. याशिवाय, कर्क्यूमिनचा प्रभाव गरम असतो, ज्यामुळे डायरिया, पचनाच्या समस्यांसारख्या इतर समस्या उद्भवू शकतात. याशिवाय हळदीचे जास्त सेवन केल्याने रक्त पातळ होऊ शकते.\nजास्त हळदीचा यकृताच्या आरोग्यावर परिणाम होतो का\nहळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन दाह कमी करण्याचे काम करते आणि फायबरॉइड्सच्या वाढीस प्रतिबंध करते. हळदीतील कर्करोगविरोधी गुणधर्म यकृतासाठी फायदेशीर ठरतात, परंतु योग्य प्रमाणात सेवन केल्यावरच. जास्त हळद यकृताच्या कामात व्यत्यय आणते.\nएका दिवसात हळदीचे योग्य प्रमाण किती आहे\nआरोग्य तज्ञांच्या मते, हळदीचे दैनिक सेवन 2000 मिलीग्रामपेक्षा जास्त नसावे. दररोज किमान 500 मिलीग्रामचे निरोगी सेवन सुनिश्चित केले पाहिजे.\nप्रमाणापेक्षा जास्त हळदीचे सेवन करू नये, होतील ‘हे’ दुष्परिणाम\nपुरुषांनी दररोज करावे हळदीचे सेवन, होतील ‘हे’आश्चर्यकारक फायदे\n‘या’ लोकांनी चुकूनही टरबूज खाऊ नका, अन्यथा होईल गंभीर नुकसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00010457-123-91-432-41-001000.html", "date_download": "2022-10-07T23:03:43Z", "digest": "sha1:FIE22AVIWB3LD6EGQY56FMR5SQ2MICIB", "length": 13318, "nlines": 274, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "123-91-432-41-001000 | Mill-Max | अवर्गीकृत | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर 123-91-432-41-001000 Mill-Max खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 123-91-432-41-001000 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 123-91-432-41-001000 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00041560-YC324-JK-07470RL.html", "date_download": "2022-10-07T21:44:44Z", "digest": "sha1:5NL62YXPYWJM5SIAOCWZ6ZOYQYNQ3ICF", "length": 14515, "nlines": 300, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "YC324-JK-07470RL | Yageo | अॅरे/नेटवर्क प्रतिरोधक | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर Y024-JK-07470RL Yageo खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये Y024-JK-07470RL चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. Y024-JK-07470RL साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2019/10/blog-post_28.html", "date_download": "2022-10-07T21:09:45Z", "digest": "sha1:PCRF7MNYG7UN37YTG5JAXUCPDDFS76H6", "length": 18848, "nlines": 214, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "‘एक ईश्वर एक मानव कुटूंब’ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\n‘एक ईश्वर एक मानव कुटूंब’\nआम्ही सर्व एकाच आई-वडिलांची लेकरे : सलमान अहमद\nजगातील सर्व मानवजातीचा निमार्ताही एकच आहे आणि मानवजातीची सुरूवातही एकाच आई- वडीलांपासून झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्व देशवासी एकमेकांचे बांधव आहोत, एकाच कुटुंबातील आहोत. हा धागा आम्हाला एका नात्यात गुंफतो. एकमेकांचा आदर आणि सन्मान करण्यास शिकवितो, असे प्रतिपादन एस.आय. ओ. चे प्रदेशाध्यक्ष सलमान अहमद यांनी केले. लातूर येथील खोरी गल्ली स्थित स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते ‘एक ईश्वर , एक मानव कुटुंब’ या अभियानादरम्यान ते बोलत होते. यावेळी प्रदेश सचिव उजेर अहमद रंगरेज, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमैर अहमद सिद्दीकी, खिजर शिबीबी, शहराध्यक्ष अली हैदर पटेल, शहर सचिव अब्दुल्लाह मनियार, इंजिनिअर शादाब शेख उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, सर्व स्तरांतील, वर्गातील, व्यवस्थेतील लोकांचा ईश्वर एकच आहे. सध्या समाजात आपसात मनभेद वाढलेले असल्याचे दिसत आहेत. ज्या देशातील लोकांमध्ये जात, पात, धर्म आदींबद्दल मनभेद असतील त्या देशाची प्रगती खुंटते. विद्यार्थ्यांमध्ये ही दिवसेंदिवस वैमनस्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र आहे. इस्लामबद्दल जाणून बुजून पसरविल्या गेलेल्या गैरसमजामुळे मानवकल्याणाला एका नात्यात गुंफणाऱ्या तत्वापासून लोक दूर आहेत. लोकांची मने यामुळे दुभंगलेली आहेत. एसआयओ ‘एक ईश्वर एक कुटूंब’ या अभियानाद्वारे सर्व मनभेद, गैरसमज दूर करून सर्व स्तरातील, व्यवस्थेतील, वर्गातील लोकांना मानवतेच्या एका सूत्राचा संदेश समाजाच्या सर्व स्तरात पोहचवून देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी प्रयत्न करत आहे.\n21 ते 30 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अभियानांतर्गत शाळा, कॉलेज, महाविद्यालय, वैयक्तिक भेटीगाठींद्वारे एकात्मतेचा, एक ईश्वराचा, एक कुटुंबाचा समतेचा, न्यायाचा संदेश जवळपास साठ लाख लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अभियानादरम्यान एसआयओने एक कारवां (शिष्टमंडळ) बनवून दक्षिण महाराष्ट्राच्या 13 जिल्ह्यांतून तब्बल दोन हजार किमीचा प्रवास केला. हा कारवां मूंबई, ठाणे, पालघर, पूणे, पिंपरी चिंचवड , कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद मार्गे दक्षिण महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यांतून तब्बल 1500 किमी चा प्रवास करत लातूरला पोहचला होता. येथून पुढे उदगीर, नांदेड,परभणी, जालना असा प्रवास करत औरंगाबादला याचा समारोप झाला. लातूर येथे पत्रकार परिषद, स्ट्रीट दावत वर्क, विद्यार्थी संवाद कार्यक्रम, मस्जिद परिचय कार्यक्रम, मानवी साखळी आदी उपक्रमाद्वारे विद्यार्थी व लोकांपर्यत पोहचवून मानवतेला जोडण्याचे काम करण्याचा प्रयत्न केला गेला. आम्ही सर्व एका ईश्वराचे अनुयायी एकाच कुटुंबातील बंधू आहोत. आमच्या मुलभूत प्रश्न आणि गरजा एकच आहेत. आमचे विचार जेव्हा एका सुत्रांत बांधले जातील तर निश्चितच भेदभाव संपून प्रगतीकडे वाटचाल होईल.\nमानवकल्याणाचे हित डोळ्यासमोर ठेऊन, हा कारवां पुढेही काम करील. या अभियानात हजारो कार्यकर्त्यांनी काम केले. अभियान यशस्वी करण्यासाठी एसआयओच्या दक्षिण महाराष्ट्रातील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी मी अल्लाहकडे या अभियानाच्या यशस्वीतेकरीता तसेच समाजात, देशात समता, न्याय, एकात्मता व अखंडतेकरीता प्रार्थना करत असल्याचे यावेळी इंजि. सलमान अहमद म्हणाले\n२५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१९\nनमाजचे महत्त्व : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनिकालाची नव्हे संयमाची आतुरता...\n‘सत्याची साक्ष देणे हाच जीवनाचा खरा उद्देश’\nमोबाईलवर तासनतास बोलणे बंद केली पाहिजे\nभारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत\nगांधी जयंतीनिमित्त आपली प्रतीमा उजळवण्याचा प्रयत्न\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर \nदेशबांधवांसाठी मीरा रोड येथे मस्जिदचे दरवाजे उघडे ...\n‘हजारो गोरगरीब, सर्वसामान्यांच्या प्रगतीत हातभार ल...\nनागरिकांनी मताधिकाराचा अवश्य वापर करावा\nमुहम्मद (सल्ल.) के शहर में\nउत्सव लोकशाहीचा: राजकीय बंडाळीचा, जनतेच्या विवेकाचा\n१८ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०१९\n‘एक ईश्वर एक मानव कुटूंब’\nवसमत येथे मस्जिद परिचय कार्यक्रम संपन्न\nसब से पहले सच्चे मुसलमान बनें : प्रा. अझहरअली वारसा\nमहाराष्ट्रातील बिनव्याजी सोसायट्या देशात अव्वल\nकाश्मीरमधील बंदी उठवायला हवी\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०१९\nईडी - पोपट ०.२\nमांसाहार लोकांना हिंसक बनवितो काय\nमराठवाडा मुक्तीसंग्राम : एमआयएम आणि वर्तमान\nरणांगण निवडणुकीचे, आश्‍वासनांचे भूलथापांचे\nमुस्लिम एकात्मतेचा ठोस पाया\nनशेच्या सर्वच पदार्थांवर बंदी हवी\n०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०१९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2019/10/blog-post_8.html", "date_download": "2022-10-07T21:58:54Z", "digest": "sha1:K7NTXDRC6DVW2A7LZHHKOJOFAKHRKEDC", "length": 30635, "nlines": 244, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "दसरा,दिवाळी आणि जिहाद | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nमला माहीत आहे की माझ्या लेखाचे शीर्षक वाचूनच वाचकांच्या भुवया उंचावल्या असतील, पण मला विश्वास आहे की लेख पूर्ण वाचल्यानंतर आपल्या मनात डोकावलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आपणास मिळतील. भारत हा विविध धर्म व परंपरांनी नटलेला देश आहे. सर्व आबालवृद्धांमध्ये सणाच्या दिवशी आनंद व उत्साहाची लहर असते. हा एक भाग झाला. पण सण साजरे करण्यामागचा खरा उद्देश असतो की त्या सणाशी निगडीत इतिहास जाणून घेणे व त्यामधून मिळणारी शिकवण, बोध आत्मसात करणे.\n१. रामाने रावणाचा वध केला. या विजयास्तव दसरा सण साजरा केला जातो. म्हणजेच कुकर्मावर सत्याचा व हक्काचा विजय, हा बोध हा सण साजरा करण्यामागे असतो.\n२. मातृइच्छेला मान देऊन बारा वर्षांचा वनवास संपवून, रावणाचा पराजय करून राम स्वदेशी परतले. या आनंदास्तव दिवाळी साजरी केली जाते.\n३. श्रीकृष्णाने जुलमी राक्षस नरकासूराचा वध करून आपल्या बंदिवासात असलेल्या सोळा हजारांपेक्षा अधिक स्त्रियांना मुक्त केले. नरक चतुर्थी साजरी करण्यामागचा हा इतिहास आहे. म्हणजेच कृष्णाने स्त्रीसन्मान व स्त्रीहक्कांसाठी दिलेला लढा हा या सणामधून मिळणारा बोध आहे.\n४. कार्तिक आमावस्येच्या दिवशी पांडव बारा वर्षांच्या अज्ञातवासातून परतले होते आणि त्यांच्या स्वागतास्तव दिवे लावण्यात आले होते. त्यानंतर महाभारत घडले.\nआपल्याच लोकांना युद्धभूमीवर पाहून धनुष्य खाली ठेवलेल्या अर्जुनाला अन्यायाविरूद्ध लढणे का व कसे आवश्यक आहे हे कृष्णाने केलेले प्रबोधन हाच महाभारताचा गाभा आहे. म्हणजेच हक्कासाठी व सत्य स्थापनेसाठा rलढणे आवश्यक आहे. हा बोध या सणामधून मिळतो.\n५. लक्ष्मीपूजन या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतार धारण करून लक्ष्मीला बळी राजाच्या तावडीतून सोडविले होते. म्हणजे स्त्री अस्मितेसाठी तढा देणे हा बोध यामागे आहे.\n६. राजा विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक देखील याच दिवसांत झाला होता. विक्रमादित्य हे जनतेची काळजी घेणारे व शत्रूंशी लढणारे शूर राजा होते. म्हणजेच सामान्य जनतेसाठी शत्रूशी लढणे महान कार्य आहे हा बोध या उत्सवातून आम्हाला मिळाला.\nवरील सर्व इतिहास आणि आख्यायिका वाचल्यानंतर आम्हास समजते की दसरा व दिवाळी हे सण साजरे करण्यामागे ‘सत्याचा असत्यावर विजय’ हा मतितार्थ आहे. म्हणजे दसरा, दिवाळी साजरी करण्यामागचा उद्देश ‘जिहाद’ होता, असे जर का मी म्हटले तर ते कानांना ऐकण्यासाठी खूप जड जाते. पण हे योग्य आहे का अयोग्य आहे हे समजण्यासाठी आपण प्रथम ‘जिहाद’ या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊ या. कारण दुर्दैवाने आमच्यासमोर जिहादची खूप चुकीची प्रतिमा उभी करण्यात आली आहे. कुरआनच्या परिभाषेत जिहादचा अर्थ होतो ‘अन्यायाविदूद्ध लढा देणे, स्वत:मधील व समाजामधील वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे.’\nजिहाद हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. म्हणजे नैतिक जिहाद, आध्यात्मिक जिहाद, रक्षणात्मक जिहाद, वंशभेदविरोधी जिहाद, अन्यायाविरूद्ध जिहाद, सेवात्मक जिहाद इ. स्वत:पुरते मर्यादित न राहता सर्व समाजाचे भले व्हावे यासाठी पुढाकार घेणे याला ‘जिहाद’ म्हणतात.\nम्हणजे अन्यायाविरूद्ध लढा देणे हे स्वत: श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, तर इस्लामी व्याख्येत तो जिहादच झाला. किंवा परस्त्रीवर हात घालणाऱ्या रावणाचा जेव्हा राम अंत करतो, तर हाही जिहादच आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केले, स्पृश्यास्पृश्यतेचा भेद मिटविला, दारूला हराम केले, व्याजाला हराम केले, असत्याविरूद्ध युद्धे लढली, हा सर्व जिहादच होता.\nजवळच्या भूतकाळात जायचे झाले तर म. गांधी, मौ. आझाद यांच्यासह इतर भारतीयांनी इंग्रजांविरूद्ध दिलेला स्वातंत्र्य लढा हादेखील जिहादच आहे. सध्याच्या काळातील उदाहरण द्यायचे झाले तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण, मेधा पाटकर यांचे वंचितांसाठी लढा देणे हा जिहाद आहे. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची केलेली सेवा जिहाद आहे. दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेला प्रयत्न जिहाद आहे. अशी एक ना अनेक उदाहरणे आपणास अन्यायाविरूद्ध लढणाऱ्या महान व्यक्तींची देता येतील.\n‘जिहाद’ म्हणजेच अन्यायाविरूद्ध लढणे ही जर का चांगली गोष्ट आहे तर मग जिहादला तलवार व रक्तपात या व्याखेशी का जोडले गेले आहे याचे उत्तर आहे कुरआनचे अर्धवट ज्ञान याचे उत्तर आहे कुरआनचे अर्धवट ज्ञान म्हणजे बघा कुरआनमध्ये म्हंटले आहे, ‘‘युद्ध करणे जरी तुम्हाला नापसंत असले तरी ते तुमचे कर्तव्य आहे.’ (अध्याय २, श्लोक २१६)\nहा श्लोक वाचल्यानंतर वाचकाला शंका येते की शांतीचा संदेश देणाऱ्या कुरआनात लढायची गोष्ट का येते आणि मग वाचक याचा अभ्यास करण्याऐवजी इस्लाम धर्माला वाईट समजू लागतो. खरे पाहता कुरआनमध्ये जिहादचा आदेश तेव्हाच येतो जेव्हा सत्य व हक्काला दाबून असत्यावर चालणाऱ्या अत्याचारी लोकांचा बिमोड करणे आवश्यक असते. आता असाच एक श्लोक महाभारतात आहे, ‘‘कृष्ण अर्जुनाला म्हणतो की- अन्यायाविरूद्ध लढणे, शस्त्र उचलणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे.’’ आता या दोन्ही श्लोकांमध्ये केलेले संबोधन एकच आहे. म्हणजेच कोणाला उगाचच मारणे वा नुकसान पोहचविणे शंभर टक्के चुकीचे आहे. पण पोलिसांनी चोराला पकडणे, गुन्हेगाराला बंदुकीचा धाक देणे, गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावणे योग्य आहे की अयोग्य आणि मग वाचक याचा अभ्यास करण्याऐवजी इस्लाम धर्माला वाईट समजू लागतो. खरे पाहता कुरआनमध्ये जिहादचा आदेश तेव्हाच येतो जेव्हा सत्य व हक्काला दाबून असत्यावर चालणाऱ्या अत्याचारी लोकांचा बिमोड करणे आवश्यक असते. आता असाच एक श्लोक महाभारतात आहे, ‘‘कृष्ण अर्जुनाला म्हणतो की- अन्यायाविरूद्ध लढणे, शस्त्र उचलणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे.’’ आता या दोन्ही श्लोकांमध्ये केलेले संबोधन एकच आहे. म्हणजेच कोणाला उगाचच मारणे वा नुकसान पोहचविणे शंभर टक्के चुकीचे आहे. पण पोलिसांनी चोराला पकडणे, गुन्हेगाराला बंदुकीचा धाक देणे, गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावणे योग्य आहे की अयोग्य रस्त्यात एकट्या मुलीला छेडणाऱ्या टोळक्याला शक्तीचा वापर करून पळविणे योग्य की अयोग्य रस्त्यात एकट्या मुलीला छेडणाऱ्या टोळक्याला शक्तीचा वापर करून पळविणे योग्य की अयोग्य अर्थातच योग्य आहे. नाही तर वाईट प्रवृत्तींना समाजात आणखी बळ मिळेल आणि त्याचा परिणाम संपूर्ण समाजाला भोगावा लागेल. कुरआनमध्ये अशा वाईट गोष्टींना ‘फसाद’ असे संबोधले आहे आणि अशा फसादींना रोका म्हणजे जिहाद करा, असे सांगितले आहे. यासाठी तुमच्या वाणीचा उपयोग करा, समजवा, कायद्याचा उपयोग करा, तुमच्या हातांनी रोका, असे सांगितले आहे. या तुमच्या सर्व सामूहिक प्रयत्नांना ‘जिहाद’ असे म्हटले गेले आहे.\n१, प्रसारमाध्यमे- ‘इस्लाम व मुस्लिमांबद्दल शक्य तितके वाईट दाखवा आणि टी.आर.पी. वाढवा’ हे साधे समीकरण आज झाले आहे. कोणतेही चॅनेल उघडा हाच मुद्दा पुन्हा पुन्हा चघळून तुमच्यासमोर सादर केला जातो आणि त्या आधारे माध्मयांच्या तिजोऱ्या भरल्या जात आहेत.\n२. इस्लामोफोबिया- जगात सर्वाधिक जोमाने पसरणारा धर्म म्हणजे इस्लाम होय. याची पडताळणी आपण कोठेही करू शकता. मग या धर्माला रोखण्यासाठी विरोधकांकडून निर्माण केलेले वैचारिक षङ्यंत्र म्हणजे इस्लामोफोबिया. यामागे पूर्वग्रहावर आधारलेली इस्लामविषयी असुरक्षिततेची भावना असते. त्यामुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ‘इस्लामोफोबिया’ पसरत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. ‘फोबिया' या शब्दाचा अर्थ आहे अतिशयोक्त, नीटपणे मांडता न येणारी व तर्कशुद्ध नसणारी भीती. कोणत्याही बुद्धिनिष्ठ, तर्कसुसंगत कारणाशिवाय एखाद्या गोष्टीविषयी माणसाला सतत भीती वा संशय वाटत राहिला, तर त्याला 'फोबिया' म्हणतात.\n३. खनिज तेल साठे- तिसरे कारण म्हणजे मुस्लिम देशांकडे असलेले तेलसाठे. त्यावर कब्जा करण्यासाठी स्वत:ला महापॉवर म्हणविणाऱ्या देशांकडे कारण हवे होते. मग जिहादी टोळ्यांची उपज करून त्यांना जेरीस आणण्याचा बू करून, युद्धे लादून तेलसाठ्यांवर नियंत्रण मिळविणे हा या तथाकथित महाशक्तींनी उद्देश साध्य करून घेतला.\nदाढी व टोपी धारण केलेल्या दहशतवाद्यांनी सामान्य लोकांवर केलेला गोळीबार.\n‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊन गोरक्षेच्या नावाखाली सामान्य माणसांची केलेली हत्या.\nश्रीलंकेतील चर्चमध्ये खिश्चन बांधवांवर झालेला भ्याड हल्ला.\nन्यूझिलंडच्या मस्जिदीमध्ये नमाजींवर झालेला क्रूर हल्ला.\nही सर्व उदाहरणे जिहाद नव्हे. निरपराधांना मारणे जिहाद होऊच शकत नाही. कुरआनात स्पष्ट सांगितले आहे,\n‘‘ज्याने एका निष्पाप व्यक्तीची हत्या केली त्याने पूर्ण मानवजातीची हत्या केली आणि ज्याने एका निष्पाप व्यक्तीला वाचविले, त्याने संपूर्ण मानवजातीचे रक्षण केले. (मग ती व्यक्ती कोणत्याही जातीधर्माची असो)’’ (अध्याय ५, श्लोक ३२)\nपाचशे रुपयांचे जेवण व दारू मिळेल त्या राजकीय पक्षासाठी मोर्चे काढणे योग्य आहे का एका नि:शस्त्र माणसाला शंभर-दोनशे जणांच्या जमावाने काठ्यांनी, दगडांनी, लाथाबुक्क्यांनी जीव जाईपर्यंत मारणे वीरता आहे का एका नि:शस्त्र माणसाला शंभर-दोनशे जणांच्या जमावाने काठ्यांनी, दगडांनी, लाथाबुक्क्यांनी जीव जाईपर्यंत मारणे वीरता आहे का आजच्या तरुणपिढीला सांगावेसे वाटते की जिहाद करायचाच असेल तर खालील बाबतीत करा-\n१) व्यसनमुक्त राहा आणि इतरांनाही व्यसनमुक्त करा.\n२) शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना मदत करा.\n३) अन्यायाविरूद्ध उभे राहा आणि लढा द्या.\n४) गरीब, अनाथ, रुग्ण यांची शक्य तितकी मदत करा.\n५) सत्यासाठी उभे राहा, मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो.\nआज दसरा-दिवाळीच्या निमित्ताने ‘जिहाद’बद्दल असलेले आपले गैरसमज दूर झाले असतील असा मला विश्वास आहे.\n- -मिनाज शेख, पुणे\n२५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१९\nनमाजचे महत्त्व : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनिकालाची नव्हे संयमाची आतुरता...\n‘सत्याची साक्ष देणे हाच जीवनाचा खरा उद्देश’\nमोबाईलवर तासनतास बोलणे बंद केली पाहिजे\nभारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत\nगांधी जयंतीनिमित्त आपली प्रतीमा उजळवण्याचा प्रयत्न\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर \nदेशबांधवांसाठी मीरा रोड येथे मस्जिदचे दरवाजे उघडे ...\n‘हजारो गोरगरीब, सर्वसामान्यांच्या प्रगतीत हातभार ल...\nनागरिकांनी मताधिकाराचा अवश्य वापर करावा\nमुहम्मद (सल्ल.) के शहर में\nउत्सव लोकशाहीचा: राजकीय बंडाळीचा, जनतेच्या विवेकाचा\n१८ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०१९\n‘एक ईश्वर एक मानव कुटूंब’\nवसमत येथे मस्जिद परिचय कार्यक्रम संपन्न\nसब से पहले सच्चे मुसलमान बनें : प्रा. अझहरअली वारसा\nमहाराष्ट्रातील बिनव्याजी सोसायट्या देशात अव्वल\nकाश्मीरमधील बंदी उठवायला हवी\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०१९\nईडी - पोपट ०.२\nमांसाहार लोकांना हिंसक बनवितो काय\nमराठवाडा मुक्तीसंग्राम : एमआयएम आणि वर्तमान\nरणांगण निवडणुकीचे, आश्‍वासनांचे भूलथापांचे\nमुस्लिम एकात्मतेचा ठोस पाया\nनशेच्या सर्वच पदार्थांवर बंदी हवी\n०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०१९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/is-eknath-shinde-group-will-go-supreme-court-to-challenge-uddhav-thackeray-over-dasara-melava-permission-on-shivaji-park-mhcp-764680.html", "date_download": "2022-10-07T23:26:58Z", "digest": "sha1:F7O7ADX3EEYEYLBL6XS7US3KJGNCNU4S", "length": 14823, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर शिंदे गट आता थेट सुप्रीम कोर्टात जाणार? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nमुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर शिंदे गट आता थेट सुप्रीम कोर्टात जाणार\nमुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर शिंदे गट आता थेट सुप्रीम कोर्टात जाणार\nउद्धव ठाकरे यांच्या गटाला परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाईल, अशा चर्चांना उधाण आलंय. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी देखील याबाबतची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार, अशी चर्चा सुरु झाली. याबद्दल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली.\nउद्धव ठाकरे यांच्या गटाला परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाईल, अशा चर्चांना उधाण आलंय. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी देखील याबाबतची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार, अशी चर्चा सुरु झाली. याबद्दल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली.\nनाना पटोलेंचा उद्धव ठाकरेंना फोन, महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या घडामोडी\nसर्वात मोठी बातमी, निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची मागणी फेटाळली, आता पुढे काय\n ठाकरेंचा आणखी एक निर्णय मुख्यमंत्री शिंदे फिरवणार\n'उद्धव ठाकरेंसोबत 35 वर्षे राहिलो, पण..'; त्या वक्तव्यामुळे गुलाबराव पाटील नाराज\nमुंबई, 23 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील सेनेला आज मुंबई हायकोर्टात सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टात आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दसरा मेळाव्यासाठी नेमकी कुणाला परवानगी मिळावी या मुद्द्यासंबंधित याचिकांवर सुनावणी झाली. या सुनावणीत मुंबई महापालिकेचे वकील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे वकील आणि ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांच्या वकिलांनी आपापल्या पक्षकारांची भूमिका मांडली. तीनही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने शिंदे गटाची मध्यस्थी याचिका फेटाळली. कोर्टाने सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची हमी घेण्याच्या अटीवरुन उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाने ही लढाई जिंकली. उद्धव ठाकरे यांच्या गटाला परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाईल, अशा चर्चांना उधाण आलंय. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी देखील याबाबतची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार, अशी चर्चा सुरु झाली. याबद्दल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली. \"मी असं कुठे म्हटलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयात जाणार असं कोणी सांगितलेलं आहे हा निर्णय एकनाथ शिंदे घेऊ शकतात. ते आमच्या गटाचे मुख्य नेते आहेत. आणि सुप्रीम कोर्टात जाऊ नये असं हायकोर्टाने कुठे म्हटलं आहे हा निर्णय एकनाथ शिंदे घेऊ शकतात. ते आमच्या गटाचे मुख्य नेते आहेत. आणि सुप्रीम कोर्टात जाऊ नये असं हायकोर्टाने कुठे म्हटलं आहे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याबद्दल गांभीर्याने विचार करु, असं म्हटलं असेल तरी त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी वरिष्ठांची संमती घ्यावी लागेल. मुख्य नेत्यांची संमती मिळाली ते जातीलही. दसरा मेळाव्यासाठी आधी कुणी अर्ज केला याच मुद्द्यावरुन निकाल लागला आहे. शिवसेना मुळ कुठली आहे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याबद्दल गांभीर्याने विचार करु, असं म्हटलं असेल तरी त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी वरिष्ठांची संमती घ्यावी लागेल. मुख्य नेत्यांची संमती मिळाली ते जातीलही. दसरा मेळाव्यासाठी आधी कुणी अर्ज केला याच मुद्द्यावरुन निकाल लागला आहे. शिवसेना मुळ कुठली आहे हा वाद वेगळा आहे. त्याचा या याचिकेशी काहीच संबंध नाही. ठाकरे गटाने चांगल्या वर्तवणुकीची हमी दिलेली आहे. आम्हाला या याचिकेच्या निकालाचा काहीच धक्का बसलेला नाही. ते ज्याप्रकारे वागत आहेत ते पाहता हायकोर्ट कदाचित त्यांची परवानगी नाकारेल\", अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. मुंबई हायकोर्टाने नेमका काय निकाल दिला हा वाद वेगळा आहे. त्याचा या याचिकेशी काहीच संबंध नाही. ठाकरे गटाने चांगल्या वर्तवणुकीची हमी दिलेली आहे. आम्हाला या याचिकेच्या निकालाचा काहीच धक्का बसलेला नाही. ते ज्याप्रकारे वागत आहेत ते पाहता हायकोर्ट कदाचित त्यांची परवानगी नाकारेल\", अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. मुंबई हायकोर्टाने नेमका काय निकाल दिला तीनही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने निकाल वाचण्यास सुरुवात केली. मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची मध्यस्थी याचिका फेटाळली. अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्य होता. कायदा-सुव्यवस्थेचा विचार करुनच पालिकेने परवानगी नाकारली, असं निरीक्षण कोर्टाने नमूद केलं. यावेळी पालिकेने 2017 मध्ये कशी परवानगी दिली हे पाहवं लागेल, असं न्यायाधीश म्हणाले. 2016 च्या आधी शिवसेनेला परवानगी मिळाली होती. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्षांपासून होतोय. खरी शिवसेना कुणाचा यात आम्हाला जायचं नाही. 22 आणि 26 दोन्ही तारखेचे अर्ज पालिकेला आलेले होते. पालिकेकडून शिवसेनेला प्रतिसाद न मिळाल्याची याचिका आहे, असं न्यायाधीशांनी नमूद केलं. (उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा दिलासा, शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी) पोलिसांनी पालिकेला कायदा आणि सुव्यवस्थेचा २१ तारखेला अहवाल दिला. कायदा-सुव्यवस्थेमुळे परवानगी न देण्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता, असं कोर्टाने म्हटलं. यावेळी कोर्टाने पालिका प्रशासनालाही सुनावलं. पालिकेचा निर्णय अंतिम नाही. दुसऱ्या गटाच्या अर्जाबाबत पालिकेला माहिती होतं. मुंबई पालिकेचा निर्णय तथ्यात्मक नाही. मुंबई पालिकेने कायद्याचा दुरुपयोग केला, असं कोर्टाने स्पष्ट म्हटलं. गेल्या सात दशकांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय. दसरा मेळाव्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा कधीच प्रश्न निर्माण झालेला नाही. त्यामुळे यावर्षी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही ना तीनही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने निकाल वाचण्यास सुरुवात केली. मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची मध्यस्थी याचिका फेटाळली. अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्य होता. कायदा-सुव्यवस्थेचा विचार करुनच पालिकेने परवानगी नाकारली, असं निरीक्षण कोर्टाने नमूद केलं. यावेळी पालिकेने 2017 मध्ये कशी परवानगी दिली हे पाहवं लागेल, असं न्यायाधीश म्हणाले. 2016 च्या आधी शिवसेनेला परवानगी मिळाली होती. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्षांपासून होतोय. खरी शिवसेना कुणाचा यात आम्हाला जायचं नाही. 22 आणि 26 दोन्ही तारखेचे अर्ज पालिकेला आलेले होते. पालिकेकडून शिवसेनेला प्रतिसाद न मिळाल्याची याचिका आहे, असं न्यायाधीशांनी नमूद केलं. (उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा दिलासा, शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी) पोलिसांनी पालिकेला कायदा आणि सुव्यवस्थेचा २१ तारखेला अहवाल दिला. कायदा-सुव्यवस्थेमुळे परवानगी न देण्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता, असं कोर्टाने म्हटलं. यावेळी कोर्टाने पालिका प्रशासनालाही सुनावलं. पालिकेचा निर्णय अंतिम नाही. दुसऱ्या गटाच्या अर्जाबाबत पालिकेला माहिती होतं. मुंबई पालिकेचा निर्णय तथ्यात्मक नाही. मुंबई पालिकेने कायद्याचा दुरुपयोग केला, असं कोर्टाने स्पष्ट म्हटलं. गेल्या सात दशकांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय. दसरा मेळाव्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा कधीच प्रश्न निर्माण झालेला नाही. त्यामुळे यावर्षी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही ना अशी हमी कोर्टाने मागितली. त्यावर ठाकरे गटाने हमी दिली. त्यानंतर कोर्टाने ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.economictimes.com/markets/share-market/stock-in-news-today-23rd-sept-2022-tata-steel-aster-dm-healthcare-mahindra-and-mahindra-financial-services-airtel-hero-motocorp-share-market-news-in-marathi/articleshow/94387365.cms", "date_download": "2022-10-07T22:48:11Z", "digest": "sha1:CWIDCNIHPRIQ5AXRBKJXODFAMJNQJRSF", "length": 8766, "nlines": 38, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nStock in News today : बाजारातील घडामोडींमध्ये आज 'या' शेअर्सवर असेल गुंतवणूकदारांची नजर\nStock in watch today 23rd sept : अनेक घडामोडी आणि बातम्यांच्या आधारावर आज बाजारात कोणत्या शेअर्सकडे ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. अशा शेअर्सची माहिती आपण घेणार आहोत\nStock in watch today 23rd sept: अनेक घडामोडी आणि बातम्यांच्या आधारावर आज बाजारात कोणत्या शेअर्सकडे ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. अशा शेअर्सची माहिती आपण घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने विप्रो, टाटा स्टील, ट्रायडेंट, इंटरग्लोब एव्हिएशन, महिंद्रा ऍंड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस, हिरो मोटोकॉर्प, आदी शेअर्सचा सामावेश असणार आहे.\nअस्तर डीएम हेल्थकेअर (Aster DM Healthcare): अस्तर डीएम हेल्थकेअरने स्कीन III (Skin III Limited) मध्ये 60 टक्के भांडवल विकत घेतले. स्किन III लिमिटेड ही दुबईमध्ये स्थापन केलेली खाजगी कंपनी आहे आणि सौंदर्य प्रसादने तयार करण्यात आघाडीवर आहे.\nइंटरग्लोब एव्हिएशन (Interglobe Aviation): मीडिया रिपोर्ट्सनुसार इंडिगोने त्यांच्या फ्लाइट नेटवर्कमध्ये 100 वे गंतव्यस्थान जोडले आहे. कंपनीने मुंबई आणि रास अल खैमाह, UAE दरम्यान थेट उड्डाणे सुरू केली आहेत.\nमहिंद्रा आणि महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस (Mahindra and Mahindra Financial Services): आरबीआयने आपल्या अधिकारांचा वापर करून महिंद्रा ऍंड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेसला पुढील आदेशापर्यंत आउटसोर्सिंग व्यवस्थेद्वारे कोणतीही वसुली किंवा परत ताब्यात घेण्याच्या क्रिया त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. उक्त NBFC स्वतःच्या कर्मचार्‍यांमार्फत वसुली किंवा ताब्यात घेण्याच्या क्रियाकलाप सुरू ठेवू शकते.\nल्युपिन (Lupin): ल्युपिनच्या अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने डायक्लोफेनाक सोडियम टॉपिकल सोल्यूशनला मंजूरी दिली आहे.\nटाटा स्टील (Tata Steel): टाटा स्टीलच्या बोर्डाने त्यांच्या 7 उपकंपन्यांचे एकत्रीकरण मंजूर केले आहे.\n- टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स, टाटा मेटालिक्स, द टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया, टीआरएफ, इंडियन स्टील आणि वायर उत्पादने, टाटा स्टील मायनिंग आणि एस अँड टी मायनिंग टाटा स्टील.\nहिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp): कंपनीने माहिती दिली की, आपल्या मोटारसायकल आणि स्कूटरच्या एक्स-शोरूम किमतींमध्ये तत्काळ प्रभावाने म्हणजेच 22 सप्टेंबर 2022 पासून वाढ केली आहे. किंमतीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. खर्चाच्या चलनवाढीचा परिणाम अंशतः भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.\nभारती एअरटेल (Bharti Airtel): टेलको कंपनीने WhatsApp च्या सहकार्याने 'Airtel IQ Hackathon' लॉन्च केले आहे.\nसेंच्युरी टेक्सटाइल्स (Century Textiles): बिर्ला इस्टेट्स प्रा. लिमिटेडची उपकंपनी आणि रिअल इस्टेट शाखा सेंचुरी टेक्सटाइल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड (CTIL)ने, राजा राजेश्वरी नगर, दक्षिण बेंगळुरू येथे 10 एकर जमीन संपादन करण्याची घोषणा केली. या प्रकल्पाची 1 मिलियन चौरस फूट विकास क्षमता आहे ज्याची महसूल क्षमता 900 कोटी आहे.\nट्रायडेंट (Trident): कंपनीने बुधनी, मध्य प्रदेश येथे 8.87 MWp चा सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण केला आहे. ज्यापैकी 5.48 MWp सौर ऊर्जा प्रकल्प (फेज I) कॅप्टिव्ह वापरासाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. आणि उर्वरित 3.39MWp सौर ऊर्जा प्रकल्प (टप्पा II) पुढील 15 दिवसांत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.\nMega Merger : टाटा समूहाच्या 7 धातू कंपन्यांचे टाटा स्टीलमध्ये होणार विलीनीकरणमहत्तवाचा लेख", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A0%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2022-10-07T22:41:47Z", "digest": "sha1:HBHHPIYKG277S6EB2Y3UYLGQMUHBPOJO", "length": 2073, "nlines": 36, "source_domain": "marathilekh.com", "title": "उठि श्रीरामा पहाट झाली Archives - Marathi Lekh", "raw_content": "\nउठि श्रीरामा पहाट झाली\nउठि श्रीरामा पहाट झाली | Uthi Shrirama Pahat Zali Marathi Lyrics गीत – रवींद्र भट संगीत – सुधीर फडके स्वर …\nमुलांना काळ्या वर्णाच्या मुलींशी लग्न का करावे वाटत नाही\nब्रेकअप झाल्यावर तुम्ही स्वतःला कसे सावरले\nआपण स्वतःशी प्रेम कसे करू शकतो मला तर माझ्यात फक्त दोष दिसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/author/akshaymankani", "date_download": "2022-10-07T22:23:31Z", "digest": "sha1:IT6P574HV44TOL4RY2LRTCJVEV7TVLNM", "length": 20764, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nते मामा फडणवीसांनाच विचारा; राज ठाकरे असं का म्हणाले\nयावेळी त्यांना शेतकरी आत्महत्येबाबत विचारण्यात आलं. त्यावर शेतकरी आत्महत्येबाबत मामा फडणवीस यांना विचारा, असं राज यांनी सांगितलं.\nRaj Thackeray : राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यात नेमकं दडलयं काय\nमिशन विदर्भ असे या दौऱ्याला संबोधले जात आहे. पक्ष वाढीबरोबरच पक्षातील अंतर्गच मतभेद मिटवण्यासाठी हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. विदर्भात पक्षाची कशी वाटचाल राहणार याअनुषंगाने हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत\nचोरट्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या डॉक्टरचं घरही सोडले नाही सोमवारी पहाटे काय घडलं\nDr Sandesh Mayekar : चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी वांद्रे पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पोलिसांकडून या चोरीप्रकरणी पंचनामा केला जातो आहे.\nMahim Police Colony: माहीम पोलीस कॉलनीत “गढुळाचं पाणी\nपाणी फक्त 10 मिनिटेच येत असल्याची तक्रार नागरिकांची आहे. इतक्या कमी कालावधीत येणारं पाणीही बराच वेळ आधी गढूळ येतं अशीही इथल्या नागरिकांची तक्रार आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांनी...\n गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचा मार्ग खडतर; मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, व्हिडीओ पाहाच\nयंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांनी आपली कंबर आणि मणका सांभाळणं गरजेचं आहे याचं कारण मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय.\n‘कुणाची हंडी कोण फोडेल हे जनताच ठरवेल’, अनिल परबांचं फडणवीसांना उत्तर; एकनाथ शिंदेंवरही निशाणा\nदेवेंद्र फडणवीस यांनी आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडू आणि विकासाच्या हंडीतून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम करु, असं फडणवीस म्हणाले. त्याला आता शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलंय.\nAaditya Thackeray : गद्दार अधिवेशनाला आले, पण नजरेला नजर भिडवू शकले नाही; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल सुरूच\nAaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा चौथा टप्पा सुरू आहे. अलिबाग येथे ही शिवसंवाद यात्रा पोहोचली. आदित्य ठाकरे यांची ज्या ठिकाणी सभा झाली, त्याच्या बाजूलाच भाजपचं मध्यवर्ती कार्यालय आहे. त्यामुळे या सभेची जोरदार चर्चा होती.\nAaditya Thackeray : कामाची चौकशी झाली तरी आनंदच, आदित्य ठाकरे असे का म्हणाले\nआज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेनेतून बंड केलेले आमदार हे नजरेत नजर घालून बघू शकत नव्हते. त्यांच्यामध्ये कुठेतरी आपण चूकच केली हा भाव चेहऱ्यावर असल्याचेही ठाकरे म्हणाले आहेत. फक्त वाईट ह्याच गोष्टीचे वाटतंय की, ते पाठीत खंजीर खूपसून गेले. शिवाय तिथेही गद्दरांना स्थान नाही. तर अपक्ष आणि महिलांवर मंत्रिमंडळाबाबतीत निराश\nVinayak Mete passed away : तासभर आधीच उपचार मिळाले असते तर… विनायक मेटेंचे सहकारी एकनाथ कदम म्हणतात की…\nएकानेही गाडी थांबवून मदत नाही केली, असं एकनाथ कदम यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. दरम्यान, एका छोटाशा टेम्पो चालकाने विनायक मेटे यांच्या अपघातग्रस्त वाहनाला पाहून गाडी थांबवली आणि मदत केली, असं कदम यांनी म्हटलंय.\nVinayak Mete Accident: विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू, ना पल्स, ना बिपी, ना हार्टबिट डॉक्टरांची मोठी माहिती, मेटेंचा मृत्यू ब्रेनइंज्युरीमुळे\nShiv sangram Vinayak mete passed away : विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात हा पहाटे साडेपाच वाजता नव्हे तर पाच वाजून पाच मिनिटांनी झाला होता, असंही म्हटलंय\nसादर करण्यात आलेल्या कागद पत्रांवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार यासह पहा इतर अपडेट महाफास्ट न्यूज 100 मध्ये\nअंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेचा प्रचाराचा काय आहे प्लॅन पहा यासह 4 मिनिट 24 हेडलाईन्स\nउद्धव ठाकरेंनी का मागितले आणखीन काही दिवस यासह इतर बातम्यांच्या अपडेटसाठी पहा महाफास्ट न्यूज 100\nशेतकऱ्यांना 12 तास वीज देणार यासह पहा राज्यभरातील अपडेट 36 जिल्हे 72 बातम्यामधून\n“उद्धव ठाकरेंच्या भाषणाला दर्जा नाही, बोलायला लागले की लोक निघून जातात”\n“बाळासाहेबांनी आम्हाला जीवापाड जपलं, पण…”, नारायण राणे यांनी खंत बोलून दाखवली\nशिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिक आणि शिंदेगट आमनेसामने, कारण पाहा…\nमहाराष्ट्राच्या मनामनाची पसंती फक्त TV9 मराठी, टीआरपीमध्ये पुन्हा एकदा नंबर वन…\nधनुष्यबाणाचा निर्णय लांबला, अंधेरी निवडणुकीत काय होणार, वाचा 3 पर्याय\nशिंदे सरकारवर पहिला भ्रष्टाचाराचा आरोप, दिवाळी गिफ्टवर अंबादास दानवेंचा आक्षेप काय\nZaheer Khan : झहीर खानने अभिनेत्रीच्या कुटुंबाला अशा प्रकारे मनवलं होतं, जाणून घ्या लव्हस्टोरी\nफक्त प्रेम.. रणबीरने आलियाला केलं किस; बेबी शॉवरमधील खास क्षण\nफोटो गॅलरी1 day ago\nदक्षिण आफ्रिकेवर भारी पडणार ‘हे’ दोन खेळाडू, जाणून घ्या….\nमौनी रॉयचा आऊटफिट पाहून नेटकरी घायाळ; फोटोंवर लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव\nफोटो गॅलरी1 day ago\nRishabh Pant : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये ऋषभ पंतचा वाढदिवस साजरा, चाहते म्हणाले उर्वशीही…\nफोटो गॅलरी2 days ago\nMouni Roy | मौनी रॉयचा पांढऱ्या साडीत किलर लूक, पाहा फोटो…\nEsha Gupta | ईशा गुप्ताचे लेहेंग्यावर जबरदस्त फोटोशूट, पाहा फोटो…\nटाइट बॉडीकॉन ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा जबरदस्त लूक, पाहा फोटो…\nरिचा चढ्ढा आणि अली फजलच्या रिसेप्शनला ‘या’ स्टार्सने लावली हजेरी, पाहा फोटो…\nNeha Sharma | नेहा शर्माने शेअर केली बोल्ड लूकमधील खास फोटो…\nलालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ, ‘या’ नव्या घोटाळ्यात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल\nफेसबुक युजर्सना धोक्याचा इशारा, आजच आपला पासवर्ड बदला अन्यथा…\nThird World War: जग तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ बायडेनचे वक्तव्य चिंतेत टाकणारे\nMLA Marriage : 28 वर्षाच्या महिला आमदाराचं कार्यकर्त्यांशी लग्न, अशी जुळून आली लग्नगाठ\nलोकलट्रेनच्या सीटवर, गर्दीत कुत्रा निवांत झोपला, पण त्याला कुणीही उठवलं नाही, उलट…\nपावसाचं पुन्हा धुमाशान; पुढील 48 तासात “या’ भागात जोरदार बरसणार…\nअन्य जिल्हे5 hours ago\n‘गल्लीत येऊन दाखव’, मुलीचा 2 मुलांना चॅलेन्ज, मुलांचे मृतदेहच आले घरी\nDiwali 2022: यंदाच्या दिवाळीत लागणार सूर्यग्रहण, या पाच राशींसाठी राहणार अशुभ\nनरभक्षक वाघाची दहशत, वन विभागाची तीन पथकं वाघाच्या शोधात\nOffer : खास रामभक्तांसाठी IRCTC ची बंपर ऑफर, प्रभू रामाने पदस्पर्श केलेल्या 13 ठिकाणांची स्वस्तात सफर\nफेसबुक युजर्सना धोक्याचा इशारा, आजच आपला पासवर्ड बदला अन्यथा…\nपावसाचं पुन्हा धुमाशान; पुढील 48 तासात “या’ भागात जोरदार बरसणार…\nअन्य जिल्हे5 hours ago\nMarathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nअन्य जिल्हे20 hours ago\nMLA Marriage : 28 वर्षाच्या महिला आमदाराचं कार्यकर्त्यांशी लग्न, अशी जुळून आली लग्नगाठ\nलोकलट्रेनच्या सीटवर, गर्दीत कुत्रा निवांत झोपला, पण त्याला कुणीही उठवलं नाही, उलट…\n‘गल्लीत येऊन दाखव’, मुलीचा 2 मुलांना चॅलेन्ज, मुलांचे मृतदेहच आले घरी\nसख्खा भाऊ बनला पक्का वैरी, लहान भावाने मोठ्या भावासोबत जे केलं ते पाहून धक्काच बसेल\nअन्य जिल्हे7 hours ago\nOffer : खास रामभक्तांसाठी IRCTC ची बंपर ऑफर, प्रभू रामाने पदस्पर्श केलेल्या 13 ठिकाणांची स्वस्तात सफर\nया रिक्षात सामावलाय शिवाजी महाराजांचा इतिहास, खासदारालाही पाडली भुरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/125707", "date_download": "2022-10-07T23:37:04Z", "digest": "sha1:TAAPGERXW2ELBZHHSCWRDZCEXSHIOIBV", "length": 2546, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. १३९०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इ.स. १३९०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:०६, २५ ऑगस्ट २००७ ची आवृत्ती\n१३ बाइट्सची भर घातली , १५ वर्षांपूर्वी\n०२:३५, ६ ऑगस्ट २००७ ची आवृत्ती (संपादन)\nbot (चर्चा | योगदान)\n२२:०६, २५ ऑगस्ट २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://parbhani.gov.in/mr/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-07T22:59:43Z", "digest": "sha1:F5NMJNSIJ6AUWCA5TINN37UWMVDTHAOP", "length": 7086, "nlines": 123, "source_domain": "parbhani.gov.in", "title": "भुमि अभिलेख कार्यालय | परभणी | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nडॉ.प्रफुल्ल पाटील मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल\nसरस्वती – धन्वंतरी डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल\nमहसुल / दंडाधिकार शाखा\nस्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nउप प्रादेशिक परिवहन कार्यालय\nजिल्हा परिषद, पंचायत समिती तालुका निहाय प्रारुप व अंतिम प्रभाग रचना\nमाहे ऑक्टोबर-नोव्हेंंबर २०१९ मधे झालेल्या अवेळी पावसामुळे बाधित शेतकरी यांंच्या मदत वाटप याद्या\nपरभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची विधान परिषद निवडणुक – २०१८\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या (दुसरा टप्पा)\nप्रधानमंत्री पिक विमा योजना २०१७ लाभार्थी यादी\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ पात्र लाभार्थी याद्या\nखरीप २०१८ दुष्काळी अनुदान पहिला व दुसरा टप्पा\nखासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंंतर्गत २०१४-१५ ते २०१८-१९ या कालावधीमधील मंजुर कामांंची यादी\nऔरंंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२०\nपरभणी जिल्ह्यातील कब्जेहक्काने व भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमीनीचे आदेश\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)\nकार्यालयाचे नांव : जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, परभणी\nपत्ता : प्रशासकीय इमारत, तळमजला, परभणी\nविभाग प्रमुख : अधीक्षक भूमि अभिलेख, परभणी\nविभाग : उपसंचालक भूमि अभिलेख,औरंगाबाद\nमंंत्रालय : महसूल व वनविभाग\nकार्यक्षेत्र : परभणी जिल्हा\nभूसंपादन व इतर मोजणीची कामे.\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 23, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/videos/mahafast-100-news-superfast-news-from-maharashtra-news-india-news-entertainment-news-sports-news-12-pm-16-august-2022-au37-784252.html", "date_download": "2022-10-07T21:54:46Z", "digest": "sha1:6MORWFUQ7SYP5JNEBT6Z7AMJNNZHW6SI", "length": 8699, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nविधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी आता भाजपाने हालचाली करण्यास सुरूवात केलीयं. यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक होण्याची देखीस शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत 40 आमदार आपल्यासोबत घेत.\nशितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल |\nविधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी आता भाजपाने हालचाली करण्यास सुरूवात केलीयं. यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक होण्याची देखीस शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत 40 आमदार आपल्यासोबत घेत. महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवला आहे. इतकेच नाही तर आता राज्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार आले आहे. त्यामुळे भाजपाने विधान परिषदेच्या 12 आमदार नियुक्तीसंदर्भात जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.\nटू पीसमध्ये इलियाना डिक्रूझची हवा हवाई\n‘संस्कारी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीचे संस्कारी रूप\nनोरा फतेहीची रिवीलिंग जादू पाहिली का\nमौनी रॉयचा केसरिया रंग…. फोटोशूटसाठी पहा काय केलं\nसादर करण्यात आलेल्या कागद पत्रांवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार यासह पहा इतर अपडेट महाफास्ट न्यूज 100 मध्ये\nअंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेचा प्रचाराचा काय आहे प्लॅन पहा यासह 4 मिनिट 24 हेडलाईन्स\nउद्धव ठाकरेंनी का मागितले आणखीन काही दिवस यासह इतर बातम्यांच्या अपडेटसाठी पहा महाफास्ट न्यूज 100\nशेतकऱ्यांना 12 तास वीज देणार यासह पहा राज्यभरातील अपडेट 36 जिल्हे 72 बातम्यामधून\nफेसबुक युजर्सना धोक्याचा इशारा, आजच आपला पासवर्ड बदला अन्यथा...\nपावसाचं पुन्हा धुमाशान; पुढील 48 तासात \"या' भागात जोरदार बरसणार...\nMarathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nMLA Marriage : 28 वर्षाच्या महिला आमदाराचं कार्यकर्त्यांशी लग्न, अशी जुळून आली लग्नगाठ\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/congress-cannot-add-bharat-todo-yatra-party-to-bharat-todo-yatra-what-will-the-country-add-ramdas-athawale-criticizes-rahul-gandhi-on-yatras-130294150.html", "date_download": "2022-10-07T21:33:40Z", "digest": "sha1:DRARXF2IJ67IFJOSCMQFVK6W2XZKLVLP", "length": 5911, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "रामदास आठवलेंची राहुल गांधींवर टीका; पक्ष जोडता येत नाही ते देश काय जोडणार | Congress cannot add Bharat Todo Yatra party to Bharat Todo Yatra, what will the country add? Ramdas Athawale criticizes Rahul Gandhi on Yatras - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाँग्रेसची भारत जोडो यात्रा नव्हे तोडो यात्रा:रामदास आठवलेंची राहुल गांधींवर टीका; पक्ष जोडता येत नाही ते देश काय जोडणार\nज्यांना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार, अशी खोचक टीका केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर केली. भारत जोडो यात्रेला भारत तोडो यात्रा संबोधत काँग्रेस पक्षाची अवस्था गलितगात्र झाली असल्याचा हल्लाबोल आठवलेंनी केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे काल संध्याकाळी सातारा जिल्ह्यातील कराड येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळा भारत जोडला आहे. राहुल गांधींना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा सामना करणे हे राहुल गांधींचे काम नाही. नरेंद्र मोदींशी सामना करणारा देशात सध्या दुसरा कोणीही नेता नाही. बिहारचे नितीशकुमार हे मोदींच्या विरोधात विरोधकांना भेटत असले तरी मोदींशी सामना करणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही. जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढा मोदींनाच फायदा होईल, असा टोला आठवलेंनी विरोधकांना मारला.\nमुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला बरोबर घेतल्यास मनसेमुळे परप्रांतीयांची मते मिळणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मनसेला बरोबर घेऊ नये. शिंदे गट सध्या आरपीआय आणि भाजपबरोबर असल्यामुळे मनसेची गरज नसल्याचे रामदास आठवले म्हणाले.\nकेंद्रीय मंत्री आता बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यासाठी येणार असून शरद पवारांची बारामती आपल्या ताब्यात कशी येईल, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. बारामती मतदार संघात भाजपची हवा असल्याने बारामतीची जागा आम्ही जिंकू, असा आम्हाला विश्वास असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले. तसेच 2024 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/video/health-videos/how-to-get-pregnant-tips/videoshow/92816827.cms", "date_download": "2022-10-07T21:59:41Z", "digest": "sha1:BO4H2H4A5JTTEQARORRBGFV3CH2C32OB", "length": 3612, "nlines": 91, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nHow To Get Pregnant | लवकर गर्भधारणा होण्यासाठी टिप्स\nआणि प्रेग्नेंट राहण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनल कुंमटा-काळे यांनी खास मार्गदर्शन केलं आहे.\nआणखी व्हिडीओ : हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE-15-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-55/", "date_download": "2022-10-07T21:58:54Z", "digest": "sha1:VTDVTFYVY2QND5UMHECNLVEJIHKJJHHH", "length": 12008, "nlines": 87, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "बोंबला ! 15 वर्षाच्या विद्यार्थ्याने 23 वर्षीय शिक्षिकेसोबत केले लग्न, कारण समजल्यावर लोकांनी शिक्षिकेला.... - Themaharashtrian", "raw_content": "\n 15 वर्षाच्या विद्यार्थ्याने 23 वर्षीय शिक्षिकेसोबत केले लग्न, कारण समजल्यावर लोकांनी शिक्षिकेला….\n 15 वर्षाच्या विद्यार्थ्याने 23 वर्षीय शिक्षिकेसोबत केले लग्न, कारण समजल्यावर लोकांनी शिक्षिकेला….\nसो’शल मी’डियावर तुम्हाला जगभरातील वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पाहायला आणि ऐकायला मिळतात. सो’शल मे’डीयाच्या अ’तिवाप’रामुळे हल्ली एखाद्या घ’टनेची माहिती क्षणात जगभर प’सरायला जास्त वेळ लागत नाही. काही घ’टना अशा असतात. यापैकी अशाही काही घ’टना असतात ज्यांच्यावर नुसतं वाचून किंवा ऐकून विश्वास ठेवणं कठीण असतं.\nसध्या सो’शल मी’डियावर अशीच एक घ’टना व्हा’यरल होत आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं आहे की, जेव्हा मुलं शाळेत जाऊन बोर होतात. सतत शाळेत जाण्याचा कंटाळा आल्यामुळे एका विद्यार्थ्यानं चक्क त्याच्याच शिक्षिकेशी लग्न केलं आहे. जेणेकरून त्याला शाळेत न जाता घरच्याघरीसुद्धा अभ्यास करता येईल.\nया फोटोवर लोकांनी गमतीदार कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसा तर हा फोटो जुना असल्याचं बऱ्याच जणांकडून सांगितलं जात आहे. तरी देखील सध्या सो’शल मी’डियावर हा फोटो प्र’चंड व्हा’यरल होत आहे. ही घ’डलेली घ’टना चेन्नईची असून 2017 मध्ये हा प्रकार झाल्याचे सांगितलं जात आहे. हा माहिती वाचून थोडा वेळ तुमचाही वि’श्वास बसणार.\nपण होय हे खरं आहे, एका विद्यार्थ्यांच आपल्या शिक्षिकेवरच प्रेम जडल्यानं त्या विद्यार्थ्याने त्याचे मनातील भावना शिक्षिकेला सांगितल्या. त्यानंतर कोणताही वेळ वाया जाऊ न देता लगेचच शिक्षिकेनंही त्या विद्यार्थ्यांच्या मागणीला होकार दिला.\nपरंतु या घ’टनेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलाने त्याच्या मनातील भावना शिक्षिकेला बोलून दाखवल्या त्यावेळी या विद्यार्थ्याचं व’य केवळ १५ वर्ष होतं आणि शिक्षिकेचं वय २३ वर्ष होतं. त्यांनतर आहे त्याच परिस्थितीत दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचे घरच्यांची देखील या लग्नास ना नव्हती. या दोघांच्या घरच्यांनीही लग्नाला परवानगी दिली. पण त्यावेळी मु’लाचं वय जास्तच कमी असल्यामुळे त्यांच्या लग्नाला काय’देशीर अ’डचण येऊ नये म्हणून त्यांनी फक्त साखरपुडा उरकला होता.\nसध्या तरी या दोघांच्याही नात्याबद्धल कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाहीये. त्यांच्यातील साखरपुड्याचा जुना फोटो सो’शल मी’डियावर प्र’चंड व्हाय’रल होत आहे. या फोटोला बघून बऱ्याच नेटकर्यांनी हा फोटो शेयर केला तर काहींनी आपली वयक्तिक मते कॉमेंट्स मधुन मांडली आहेत. काहींनी सकारात्मक तर काहींनी न’कारा’त्मक प्रतिक्रिया नोंदवल्या.\nया फोटोला पाहून एका सो’शल मी’डिया युजरनं मॉडर्न स’मस्येचं मॉडर्न सोल्यूशन अशी धमाकेदार प्रतिक्रिया दिली आहे. तर एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘हा तर खूप हुशार निघाला.’ अनेकांनी चा’ईल्ड लाईनच्या नंबरची देखील मागणी केली आहे. जेणेकरून या प्रकाराबाबत त्यांना माहिती दिली जाईल. आणि असल्या घ’टना घडू नये म्हणून काही दक्षता घेता येईल.\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\nपती ‘नपुं’सक’ असून देखील पत्नी झाली ‘प्रे’ग्नं’न्ट’, खरे सत्य समोर येताच पतीचेही उडाले होश…\nह’निमू’नच्या पहिल्याच रात्री पत्नीला समजले की पती आहे स’मलैं’गि;क, पहा तरीही पतीने पत्नीसोबत केले…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00049173-Y0006V0322AT0L.html", "date_download": "2022-10-07T23:18:03Z", "digest": "sha1:VU4YR3ZCSOSZFG2X77CAPIQGDABDC2QN", "length": 14520, "nlines": 300, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "Y0006V0322AT0L | VPG Foil | अॅरे/नेटवर्क प्रतिरोधक | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर Y0006V0322AT0L VPG Foil खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये Y0006V0322AT0L चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. Y0006V0322AT0L साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/become-a-center/", "date_download": "2022-10-07T21:55:54Z", "digest": "sha1:NHWLK3SWXTWZAQLWCWG4ZLEXRVXXG5IT", "length": 7951, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "become a center Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nतंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र शिक्षणातील उत्तमतेला चालना देणारे केंद्र बनावे – राज्यपाल कोश्यारी\nपुणे : तंत्रशास्त्र किंवा आरोग्यसारख्या एखाद्या विशेष शाखेच्या विद्यापीठाची निर्मिती त्या क्षेत्रातील विशेष अभ्यासक्रम राबविण्यासाठी करण्यात येते. त्यामुळे अशा प्रादेशिक ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/beej-ceremony/", "date_download": "2022-10-07T22:04:39Z", "digest": "sha1:OLUIWNJRKU77NA3TYRMBJRNLWRXEDJNE", "length": 7368, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "beej ceremony Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे : देहूत आज बीज सोहळा\nहेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी \nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://mr.hongkepvcvalve.com/cpvc-ball-valve-valve/", "date_download": "2022-10-07T21:49:07Z", "digest": "sha1:YRVD6PIHKJQF24AS62MEFSHDYPNRQU4A", "length": 6964, "nlines": 232, "source_domain": "mr.hongkepvcvalve.com", "title": " Cpvc बॉल व्हॉल्व्ह उत्पादक आणि पुरवठादार - चीन Cpvc बॉल वाल्व फॅक्टरी", "raw_content": "\n2 पीसी पीव्हीसी बॉल वाल्व मालिका\nपीव्हीसी बॉल वाल्व मार्गदर्शक\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nप्लास्टिक वाल्व, पीव्हीसी बॉल व्हॉल...\nहॉट सेल 1/2″ बॉल वा...\nकॉम्पॅक्ट पीव्हीसी बॉल व्हॉल्व्ह थ्री...\nप्लॅस्टिक टू-पीस बॉल व्हॉल्व्ह\nदक्षिण आफ्रिका Sch80 पीव्हीसी पाईप...\nCPVC युनियन बॉल वाल्व\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nपत्ता:नं. 28, शुगुआंग रोड, जियानशान टाउन, पनआन काउंटी, जिन्हुआ सिटी, झेजियांग प्रांत\nपाईप फिटिंग्ज, बेसिन टॅप, Abs बेसिन Faucets, सिंचन बॉल वाल्व, पीव्हीसी पाईप फिटिंग्ज, पीव्हीसी शेड्यूल 40 बॉल वाल्व्ह,\n© कॉपीराइट - 2010-2021 : सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nबेसिन टॅप, सिंचन बॉल वाल्व, Abs बेसिन Faucets, पाईप फिटिंग्ज, पीव्हीसी शेड्यूल 40 बॉल वाल्व्ह, पीव्हीसी पाईप फिटिंग्ज,\nई - मेल पाठवा\nआमच्याशी गप्पा मारा, powered by LiveChat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/2380", "date_download": "2022-10-07T21:58:02Z", "digest": "sha1:SQEC3BBQFV4NKSQD6OUZERAFBRT5OLPV", "length": 12120, "nlines": 106, "source_domain": "bollyreport.org", "title": "लाखात एक बुद्धिमान व्यक्ती या फोटोमध्ये लपलेला तिसरा खतरनाक प्राणी शोधून दाखवेल, फोटो Zoom करा प्राणी सापडेल ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome Other News लाखात एक बुद्धिमान व्यक्ती या फोटोमध्ये लपलेला तिसरा खतरनाक प्राणी शोधून दाखवेल,...\nलाखात एक बुद्धिमान व्यक्ती या फोटोमध्ये लपलेला तिसरा खतरनाक प्राणी शोधून दाखवेल, फोटो Zoom करा प्राणी सापडेल \nसोशल मीडियावर कधी कुठली गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. मागील काही वर्षांपासुन इंटरनेटचा वापर सर्वच क्षेत्रात होऊ लागला आहे. त्यामुळे या इंटरनेटवर अशा काही गोष्टी व्हायरल होतात ज्याबद्दल आपण कल्पनासुद्धा करु शकत नाही. सोशल मीडियावर व्हिडीओपासुन फोटो सर्व काही व्हायरल होत असतं. जेव्हा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ जेव्हा व्हायरल होतो तेव्हा त्याची चर्चा ही सर्वत्र होते. यामध्ये काही असे फोटो व्हायरल होत असतात जे पाहुन आपल्याला डोक्याला खुप जोर लावावा लागतो.\nसध्या असे फोटो खुप व्हायरल होत आहे. लोकांना सुद्धा रिकाम्या वेळेत सोशल मीडियावरील पझल सोडवायला खुप आवडतात. त्यामुळेच असे फोटो खुप व्हायरल केले जातात. काही लोकांना पझल सोडवायला इतके आवडते कि ते सतत फोनमध्ये तेच सोडवाताना दिसतात. पझल सोडवणाऱ्या लोकांचे डोके खुप चांगले असते. ज्या लोकांना पझल सोडवायला आवडत नाही ते त्यांच्या डोक्याचा फारसा उपयोग करत नाही असे म्हटल्यास हरकत नाही.\nआता पुन्हा एकदा सोशल मीडियावर थोडे डोक्याला ताण देणारे कोडे व्हायरल होत आहे. हे पझल तुम्हाला पुन्हा एकदा बुचकळ्यात पाडु शकते. हे पझल शेअर करणाऱ्याचे म्हणणे आहे कि जो कोणी हे पझल सोडवेल तो व्यक्ती खरोखरच बुद्धीवान असेल. मात्र हा फोटो कुणी आणि कधी सोशल मीडियावर टाकला हे समजलेले नाही. पण मंडळी तुमच्याकडे पेशन्स आणि डोके असेल तर तुम्ही नक्कीच हे कोडे सोडवु शकता.\nसोशल मीडियावर अशा प्रकारचे कोडे व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अशा प्रकारच्या कोड्यांचे फोटो खुप व्हायरल झाले होते. त्यावेळीसुद्धा फोटोंमध्ये दडलेले रहस्य शोधताना लोकांच्या नाकी नऊ आलेले. यामध्ये काही लोकांचा यश आले. अधिकतर लोकांच्या हाती अपयशच आले.\nया ठिकाणी दिल्या गेलेल्या कोड्यात लांडगा आणि ससा हा अगदी सहज दिसतो. पण या फोटोत वाघ सुद्धा दडला आहे जो तुम्हाला शोधायचा आहे. नसेल सापडत तर चिंता नसावी आम्ही तुम्हाला याचे उत्तर देणारच आहोत. पण आम्ही काही सांगण्यापुर्वी तुम्ही स्वता ते शोधण्याचा प्रयत्न करा .\nकाही वेळेस काही गोष्टी आपल्या अगदी दृष्टीसमोरच असतात. पण त्या आपल्याला दिसत नाही. असेच काही या फोटोच्या बाबतीतसुद्धा आहे. या फोटोत वाघ सर्वाच मोठा आहे फक्त तो तुम्ही लक्ष पुर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तो दिसेल. एवढे सांगुन पण जर तुम्हाला वाघ दिसत नसेल तर एक काम करा. फोटोतील लाकडांना नीट लक्षपुर्वक पहा म्हणजे तुम्हाला नक्की वाघ दिसेल. आम्ही आशा करतो कि आता तरी तुम्हाला तो वाघ दिसला असेल.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleऑनलाईन मिटिंग दरम्यान बायको आली किस करायला नंतर जे घडलं ते बघा, आणि श्वेताचे झूम मीट प्रकरण काय आहे जाणून घ्या\nNext articleवयाच्या ३२व्या वर्षी गायिका ‘नेहा कक्कड’ आहे या गंभीर आजाराने त्रस्त, स्वतःच सांगितली कहाणी \nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले प्रसिद्ध कुत्र्यांच्या प्रजाती \n१ मिनिटात रद्दीमध्ये लपलेली मांजर शोधा, ९९ टक्के लोक अयशस्वी, फोटो Zoom करा उत्तर सापडेल \nकदाचित माझा प्रायव्हेट पा’र्ट पाहिला असेल’, रिअॅलिटी शोमध्ये किम कार्दशियनने केलं अजबच वक्तव्य \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/2-g-scam/", "date_download": "2022-10-07T23:01:01Z", "digest": "sha1:LA4R4JVJEQUN7XZGWZSE3EJQ4H3RVKB7", "length": 7559, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "2 g scam Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n2 जी घोटाळा प्रकरण: ‘सीबीआय’च्या आव्हान याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nनवी दिल्ली - युपीए सरकारच्या काळात झालेल्या कथित 2 जी घोटाळा प्रकरणात माजी दूरसंचार मंत्री ए राजा आणि अन्य आरोपींना ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/26-professors-killed/", "date_download": "2022-10-07T21:46:27Z", "digest": "sha1:SCGKQ3R6EMVR3OTFQXUC43Y5RQIFHZMH", "length": 7765, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "26 professors killed Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nCoronaVirus : विद्यापीठात 20 दिवसांत 26 प्राध्यापकांचा मृत्यू, करोनाच्या आणखी एका नव्या व्हेरिएंटचा संशय\nनवी दिल्ली - देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आरोग्य व्यवस्था हतबल ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/beaten-by/", "date_download": "2022-10-07T23:03:54Z", "digest": "sha1:GAYXJEW6JSCGXTZEZHZROTL4GVX2ETPM", "length": 7756, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "beaten by Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांचे कार्टून फॉरवर्ड केल्यामुळे निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सोशल मीडियावर कार्टून फॉरवर्ड केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला जबर मारहाण ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/money/rbi-cancelled-license-of-laxmi-co-operative-bank-in-solapur-mhkp-764389.html", "date_download": "2022-10-07T23:18:28Z", "digest": "sha1:B2THRVT5LGRN4XE4FB3UN6IPDJ5THBE6", "length": 9302, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रुपीनंतर महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला दणका; RBI कडून परवाना कायमस्वरुपी रद्द – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\nरुपीनंतर महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला दणका; RBI कडून परवाना कायमस्वरुपी रद्द\nरुपीनंतर महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला दणका; RBI कडून परवाना कायमस्वरुपी रद्द\nभारतीय रिझर्व्ह बँकेकडून सोलापूरात द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. शंभर वर्षे जुनी असणाऱ्या लक्ष्मी बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्याचे आदेशही दिले गेले आहेत\nभारतीय रिझर्व्ह बँकेकडून सोलापूरात द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. शंभर वर्षे जुनी असणाऱ्या लक्ष्मी बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्याचे आदेशही दिले गेले आहेत\nघराबाहेर उभ्या असलेल्या बहिणींसमोर भावाला उडवलं; कार अपघाताचा थरारक Video\nInstagram च्या फॉलोअर्सवरुन घडला भयानक प्रकार, तरुणीने दिले चॅलेंज अन् दोघांचा..\nमहामुकाबल्यात हा खेळाडू पुन्हा डोकेदुखी ठरणार 12 मॅचमध्ये ठोकल्या 8 फिफ्टी\nनर्सने जिवंत रुग्णाला बॅगेत पॅक करून शवगृहात पाठवलं, दुसऱ्या दिवशी पाहिलं तर...\nप्रीतम पंडित, सोलापूर 23 सप्टेंबर : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सोलापूरात द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. शंभर वर्षे जुनी असणाऱ्या लक्ष्मी बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्याचे आदेशही दिले गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी बँक आर्थिक अडचणीत आल्याने ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र ठेवीदारांचे पैसे परत मिळतील, असं आश्वासन बँक व्यवस्थापनाकडून देण्यात आलं होतं. दरम्यान त्यातील काही ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात आल्या. परंतु, 94 हजार ठेवीदारांच्या ठेवी बँकेमध्ये अडकून पडल्या आहेत.\nphone pe going Karnataka : वेदांता-फॉक्सकॉननंतर आता 'ही' कंपनी महाराष्ट्र सोडणार लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेची 105 कोटी रुपयांची थकबाकी कर्जदारांकडे आहे. लवकरच या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं. ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार असल्याचंही सांगण्यात आलं. रिझर्व बँक ऑफ इंडियाने लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेवरती प्रशासक नियुक्त केलेला आहे. बँकेचे ठेवीदार 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर दावा करू शकतात, असं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.सहकारी बँकेकडं पुरेसं भांडवल नसल्याने सध्याच्या ठेवीदारांची संपूर्ण रक्कम परत करण्याच्या स्थितीत नसल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. Spicejet च्या स्टॉक धारकांना डबल धक्का गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी बँकेचा परवाना रद्द केल्याची घोषणा करताना मध्यवर्ती बँकेनं म्हटलं आहे की, बँकेने दिलेल्या तपशिलानुसार 95 टक्के ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवी ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनमार्फत दिल्या जातील. जर बँक बुडली, तर प्रत्येक ठेवीदाराला नवीन नियमांनुसार ठेव रकमेवर विमा दावा करण्याचा अधिकार असून, त्याची मर्यादा पाच लाखांपर्यंत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AD%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2022-10-07T23:28:58Z", "digest": "sha1:7NXBHAZLLE5WMBJGRWAPVN3R6JDENUYI", "length": 4768, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६७५ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६७५ मधील जन्म\n\"इ.स. १६७५ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ११:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/646/", "date_download": "2022-10-07T21:46:03Z", "digest": "sha1:ZI7KJEXOI4A3CHL6ENXWXC7OBLGTRPAT", "length": 11264, "nlines": 84, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "अनिल परब गद्दार! उद्धवजी लक्ष द्या' -रामदास कदम - Rayatsakshi", "raw_content": "\n उद्धवजी लक्ष द्या’ -रामदास कदम\n उद्धवजी लक्ष द्या’ -रामदास कदम\nराष्ट्रवादीच्या सोबतीने शिवसेना संपविण्याचा घाट घातल्याचा आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र देखील लिहले असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली.\nरयतसाक्षी: शिवसेनेचे आमदार तथा माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत शिवेसेनेवरच हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीकास्त्र केले. आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र देखील लिहले असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली.\nपत्रकार परिषदेत रामदास कदम म्हणाले की, ‘जे मंत्री हरामखोरी करीत आहेत व शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्या मनसे व राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना संपविण्याचा, रामदास कदमला संपविण्याचा घाट घातला आहे.’ अशी टीका रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर केली.\n‘अनिल परबांनी रत्नागिरी जिल्ह्याला वाऱ्यावर सोडले. फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला ते जिल्ह्यात येतात. पण आता आम्हाला संपवण्यासाठी अनिल परब तीन-तीन दिवस जिल्ह्यात येऊन ठाण मांडत आहेत.’ ‘उद्धवजींना तुम्ही मदत करत असाल तर त्याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही दुसऱ्या नेत्याला संपवा असा होत नाही. माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी प्रयत्न केले होते. पण तसे झाले नाही. म्हणून सुडाची भावना ठेवत अनिल परब आता माझ्याविरुद्ध षडयंत्र रचत आहे.’ अशी गंभीर टीका रामदास यांनी केली आहे. पुढे रामदास कदम म्हणाले की, ‘अनिल परबांच्या प्रॉपर्टीबद्दल बोललो म्हणजे मी पक्षाबद्दल बोललो असे होत नाही. मिलींद नार्वेकरांचा बंगला तोडला कारण तो अनधिकृत होता.’ असे देखील रामदास कदम म्हणाले.\n‘गद्दार कोण अनिल परब की रामदास कदम मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पक्षासोबत गद्दारी करतात आणि आमच्या मुलाच्या जीवावर उठतात. दापोली आणि मंडणगड येथे योगेश कदम स्थानिक आमदार आहेत. परंतु अनिल परबांनी स्थानिक जिल्हाप्रमुखांना हाताशी घेऊन थेट उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. अनिल परब हा शिवसेनेच्या मुळावर उठलेला आहे. निष्ठावंतांची हकालपट्टी करत बाटग्यांना अनिल परबांनी तिकिटे दिली. आम्ही निष्ठावंत असुनही मिळणाऱ्या वागणुकीचे दुःख होते’ असे म्हणत रामदास कदमांनी अनिल परबांचा मोठा पाढाच वाचला.\n‘सुभाष देसाईंना मंत्रिपद दिले याचे मला वाईट वाटले’\n‘एक गोपनीय गोष्ट होती ती तुम्हाला सांगतो. शिवसेना भवनात मी स्वत: उद्धव ठाकरेंना सांगितले होते. साहेब, रामदास कदम, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई आमचे आता 70 च्या आसपास वय झाले आहे. आम्हाला मंत्रिपदे देऊ नका. तुम्ही नवीन लोकांना मंत्रिपदे द्या. मला साहेब म्हणाले नक्की मी म्हटले हो साहेब नक्की.. माझी तयारी आहे.\nपण ज्यावेळेस मंत्रिपदाची लिस्ट आली तेव्हा सगळ्यात आधी नाव सुभाष देसाईचे होते. मला वाईट वाटले तेव्हा. माझे मन मुद्दाम मी मोकळे करतोय आज. मला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही. मी मंत्रिपद मागितलेच नाही. पण सुभाष देसाईंना देताय आणि मला नाही म्हणता.. म्हणून मला वाईट वाटले त्याचे. द्या ना तुम्ही मंत्रिपदे नवीन मुलांना..याच गोष्टीचे मला जास्त दु:ख झाले.\nशेवटी पक्षप्रमुखांचा आदेश हा शिरसावंद्य आहे मला. कुठेही त्यात दुमत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो.. प्रस्ताव असा ठेवला होता की, मी, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई आता आमची वय झालेली आहेत. आता आम्हाला बाजूला ठेवा तिघांनाही आणि नवीन लोकांना संधी द्या. असा प्रस्ताव मी ठेवला होता.\n“अनेक सहकारी साखर कारखाने आज खासगी झाले, पण…”\nगद्दार कोण; मी एक शिवसैनिक काय दखल घ्यायची ती पक्ष घेईल- परब\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.insidemarathibooks.in/index.php/2020/03/31/shoe-dog-book-review-in-marathi/", "date_download": "2022-10-07T22:41:05Z", "digest": "sha1:2WROIZHVKC4KMYZY4NKJX5OKWIUE4ZFP", "length": 12192, "nlines": 175, "source_domain": "www.insidemarathibooks.in", "title": "शू डॉग - Shoe Dog Book Review in Marathi - Inside Marathi Books", "raw_content": "\n|| माझिया मराठीची बोलू किती कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके ||\nby अक्षय सतीश गुधाटे\nलेखक – फिल नाईट\nप्रकाशन – सायमन अँड शुस्टर\nमुल्यांकन – ४.८ | ५\nएखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारी किती माणसे आहेत या जगात अगदी बोटावर मोजता येतील इतकीच आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे “फिल नाईट”. खेळासाठी बनवल्या जाणाऱ्या बुटांचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या अवलीयाची ही जगप्रसिध्द कथा. असा कोणी आहे काय ज्याला यशस्वी व्हायचं नसतं अगदी बोटावर मोजता येतील इतकीच आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे “फिल नाईट”. खेळासाठी बनवल्या जाणाऱ्या बुटांचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या अवलीयाची ही जगप्रसिध्द कथा. असा कोणी आहे काय ज्याला यशस्वी व्हायचं नसतं स्वतःसाठी काहीतरी करून दाखवायचं नसतं स्वतःसाठी काहीतरी करून दाखवायचं नसतं स्वतःची स्वप्नं साकारायची नसतात स्वतःची स्वप्नं साकारायची नसतात मात्र ते मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून फार थोडे लोक काम करतात. अशा झपाटून काम करणाऱ्यांच्या मागे यश नेहमीच उभं राहतं हे वेगळं सांगायला हवं काय\nNike (नाईकी) चे जनक फिल नाईट यांच्या अनुभवांचं जीवनचरित्र असणारं हे पुस्तक वाचताना आपणच आपलं आयुष्य पुस्तकातून जगत आहोत असं वाटत राहतं आणि हेच या पुस्तकाचं बाकीच्यांपेक्षा वेगळं गमक आहे. लहानपणी शालेय अभ्यासात मन न रमणाऱ्या, लोकांच्या मतांना अनावश्यक महत्व देऊन मनात न्यूनगंड तयार झालेल्या एका लहान मुलाची ही कहाणी आपल्याला बालपणात घेऊन जाते. आईने केलेले संस्कार, मार्गदर्शन आणि तिचा सतत मिळालेला पाठिंबा हेच फिलच्या यशाचं खरं गमक आहे. सगळीकडे अपयशी ठरणारा मुलगा मात्र एका गोष्टीमध्ये उत्तम असल्याची जाणीव आईने करून दिल्यानंतर फिलने कधीच मागे वळून पाहिले नाही. तो स्वतःच्या आयुष्याला देखील एक धावण्याचीच स्पर्धा मानतो आणि जर ती जिंकायची असेल तर त्यात नियमितता आणि कष्ट कसे महत्वाचे आहेत हे आपल्याला पटवून देतो.\nमुळातच फिलला धावण्याची आवड असल्याने, त्यात आलेले अडथळे दुसऱ्या कोणाला भेडसावू नयेत म्हणून सर्वोत्तम बूट बनवण्यासाठी त्याने सबंध आयुष्य अर्पण केलं. पदवी घेत असताना बुटांवर त्याने स्वतःचा प्रकल्प बनवून, त्यावर संशोधन करून नवनवीन पैलू जगासमोर मांडले. घरच्यांचा विरोधही नव्हता आणि पाठिंबाही नव्हता अशा परिस्थितीत खिशात मोजक्या दमड्या घेऊन निघालेला हा माणूस स्वबळावर आपल्या ध्येयासाठी झगडताना पाहून नक्कीच एक वेगळी ऊर्जा मिळते. जपान आणि अमेरिकेमध्ये विश्व युद्ध चालू असताना एका अमेरिकन नागरिकाने, आमचा बूट कसा चांगला आहे… हे पटवून देणे व याची जपानला कशी मदत होईल हे सांगणे मुळातच हास्यास्पद आहे. त्याला झालेला विरोध, त्याने सहन केलेल्या, अनुभवलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्यालाही आयुष्यात परिपक्व बनवून जातात. जगण्याचे हजारो नवीन पैलू शिकवून जातात. संपूर्ण आयुष्य स्वप्नांसाठी झगडलेल्या एका माणसाच्या सानिध्यात आपल्याला स्वतःची वेगळी ओळख झाल्याशिवाय राहत नाही. अशी ही ध्येयवेडी कथा वाचताना एक वेगळीच जाणीव होते, एक वेगळाच उत्साह अंगात जाणवू लागतो.\nआयुष्याची स्पर्धा जिंकण्यासाठी नक्की काय काय करावं लागतं, त्यात छोट्या छोट्या गोष्टी देखील किती महत्वाच्या असतात हे फिल आपल्याला सांगून जातात. आत्मचरित्र असले तरी कथा-कादंबरी प्रमाणेच यात अनेक विषय व दृष्टिकोन रंगवलेले आहेत. जे आपसूकच आपलं अवघं विश्व व्यापून घेतात. माझ्या लेखी तरी सर्वोत्कृष्ट अशा काही पुस्तकांमध्ये याचा समावेश नक्कीच होतो. वाचण्यासारखं, अनुभवन्यासारखं असं काहीसं हे फिल नावाचं अजब रसायन वाचल्याशिवाय समजतही नाही आणि समजावताही येत नाही \nऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:\nकिंडल आवृत्ती विकत घ्या\nऑडिओ बुक विकत घ्या\nचिल्ड्रन ऑफ ब्लड अँड बोन्स\nहाऊ टू बी अ बाउस\nमराठी पुस्तकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा\nछत्रपती संभाजी – एक चिकित्सा\nसोशल नेटवर्कवर आमच्याशी कनेक्टेड राहा.\nवेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=5330", "date_download": "2022-10-07T22:24:29Z", "digest": "sha1:437RBPQKOONORHKCOONPJ4NC42T5BEYS", "length": 7008, "nlines": 47, "source_domain": "gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta, /* */", "raw_content": "शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार: पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत देलोडा गावानजीकच्या जंगलातील घटना रक्तदान शिबिराद्वारे महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या जिल्हाध्यक्षपदाची वर्षपूर्ती साजरी आरमोरीजवळच्या गाढवी नदीच्या पुलावर अपघात: गडचिरोलीचे आ.डॉ.देवराव होळी थोडक्यात बचावले चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची हत्या: कोवानटोला-जपतलाई येथील घटना एटापल्ली तालुक्यातील संतापजनक घटना: ५० वर्षीय आदिवासी महिलेवर ट्रकचालकाने केला बलात्कार, आरोपीस अटक गडचिरोली: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकणार- शिवसेनेच्या मेळाव्यात जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांचे प्रतिपादन\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार..\nरक्तदान शिबिराद्वारे महेंद्र ब्राम्..\nआ.डॉ.देवराव होळी अपघातात थोडक्यात ब..\nआदिवासी महिलेवर ट्रक चालकाचा बलात्क..\nजिल्हा परिष्द,नगर परिषद निवडणुकीत श..\nनक्षलग्रस्त भागातील पोलिसांना दीडपट..\nट्रकच्या धडकेत महिला ठार: संतप्त ना..\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिर..\nआमचे मत - तुमचे मत\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nडॉ.मंगेश वड्डे यांना ‘पोल्ट्री सायन्स’ विषयात पीएचडी\nगडचिरोली,ता.१२: अकोला येथे स्नातकोतर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ.मंगेश वड्डे यांनी नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठातून ‘पोल्ट्री सायन्स’ या विषयात पीएचडी मिळवली आहे.\nविद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभात पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते त्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. डॉ.मंगेश वड्डे हे धानोरा तालुक्यातील चिंगली(मोहली) येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सोडे येथील आश्रमशाळा व गडचिरोली येथील वसंत विद्यालयात झाले.\n‘इफेक्ट ऑफ इसेंशियल ऑईल अलोन ऑर इनकॉम्बिनेशन ऑन द परफॉर्मन्स ऑफ ब्रायलर्स’ हा त्यांचा प्रबंधाचा विषय होता. या प्रबंधाकfjता डॉ. सतीश मनवर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. डॉ. वड्डे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून रिसर्च आर्टिकल्स प्रकाशित केले आहेत. डॉ. वड्डे यांना शोधनिबंधावर राष्ट्रीय काँफेरन्समध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील स्व. रैसूजी वड्डे, आई जनाबाई वड्डे , पत्नी ईशा, मुलगा मेधानश व गडचिरोली येथील एकलव्य मित्र मंडळाच्या सदस्यांना दिले आहे.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.hongkepvcvalve.com/download/", "date_download": "2022-10-07T22:41:17Z", "digest": "sha1:6RYQ63LPXUQOYEQCL7YGMV2FP7LRAKRL", "length": 5226, "nlines": 199, "source_domain": "mr.hongkepvcvalve.com", "title": " कॅटलॉग - Zhejiang Hongke Valve Co., Ltd.", "raw_content": "\n2 पीसी पीव्हीसी बॉल वाल्व मालिका\nपीव्हीसी बॉल वाल्व मार्गदर्शक\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nपत्ता:नं. 28, शुगुआंग रोड, जियानशान टाउन, पनआन काउंटी, जिन्हुआ सिटी, झेजियांग प्रांत\nपाईप फिटिंग्ज, सिंचन बॉल वाल्व, पीव्हीसी शेड्यूल 40 बॉल वाल्व्ह, पीव्हीसी पाईप फिटिंग्ज, Abs बेसिन Faucets, बेसिन टॅप,\n© कॉपीराइट - 2010-2021 : सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nपीव्हीसी पाईप फिटिंग्ज, पीव्हीसी शेड्यूल 40 बॉल वाल्व्ह, बेसिन टॅप, पाईप फिटिंग्ज, Abs बेसिन Faucets, सिंचन बॉल वाल्व,\nई - मेल पाठवा\nआमच्याशी गप्पा मारा, powered by LiveChat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/1040", "date_download": "2022-10-07T21:21:58Z", "digest": "sha1:Z5IMWKVRCPGSSODHATLL5GSRHPKZBI2G", "length": 10941, "nlines": 105, "source_domain": "bollyreport.org", "title": "अखेर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक, जर आरोप सिद्ध झाले तर इतक्या वर्षांची होऊ शकते शिक्षा ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News अखेर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक, जर आरोप सिद्ध झाले तर इतक्या वर्षांची...\nअखेर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक, जर आरोप सिद्ध झाले तर इतक्या वर्षांची होऊ शकते शिक्षा \nदिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्या प्रकरणात नक्की काय होणार याची उत्सुकता लागली असतानाच अभिनेत्री रिया चक्रवर्ती ला एन सी बी च्या टीमने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूत च्या प्रकरणात ड्र*ग्स संबंधी रियाला आज अटक झाली. गेल्या तीन दिवसांपासून एन सी बी द्वारे रियाची सतत चौकशी चालू होती. आता रियाला मेडिकल टेस्ट साठी घेऊन जाण्यात आले आहे.\nरियाला एन डी पी एस कलम ८ सी, कलम२८, कलम२९ अंतर्गत अटक केली आहे. जर रियावर केलेले आरोप सिद्ध झाले तर रियाला कलम ८सी अंतर्गत सहा महिन्यांसाठी जे ल व दंड, कलम २९ अंतर्गत आरोपांवरून शिक्षा, आणि कलम २८ अंतर्गत दहा वर्षांची जे ल आणि एक लाखाचा दंड होऊ शकतो.\nरविवारी ती पहिल्यांदा एन सी बी समोर पेश झाली होती तेव्हा तिची सहा तास चौकशी झाली. सोमवारी पुन्हा एकदा एन सी बी च्या दोन टिमने तिची आठ तास चौकशी केली. साधारण १९ तासांच्या चौकशीनंतर एन सी बी च्या टीमने मंगळवारी रियाला अटक केली. त्यानंतर दिला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात सादर केले जाईल. याशिवाय रिया चक्रवर्ती ची कोरोना टेस्ट केली त्यामध्ये तिची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.\nसोमवारी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी रिया चक्रवर्ती ने बांद्रा पोलीस स्थानकात सुशांत ची बहीण प्रियंका सिंह विरोधात तक्रार नोंदवली. त्याआधी ५ सप्टेंबरला रिया चक्रवर्ती चा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस हेल्पर दीपेश सावंत आणि सुशांत चा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला अटक केली. सुशांत च्या मृत्यूनंतर सुरुवातीला बॉलिवूडमधील घराणेशाही मुळे ही आ*त्म*ह*त्या झाल्याचे म्हटले जात असतानाच अचानक सुशांत चे वडील केके सिंह यांनी पटना पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतला आ*त्म*ह*त्या करण्यास प्रवृत्त केले व त्याचे पैसे उखळल्याची तक्रार नोंदवली.\nत्यानंतर सगळीकडून सीबीआय तपासणीची मागणी होऊ लागली व ती मागणी मान्य झाल्यावर अचानक या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. ड्र*ग्स कनेक्शन समोर आल्यावर या प्रकरणाचा तपास एन सी बीकडे सुद्धा सोपवण्यात आला. अखेर एन सी बी च्या तीन दिवसांच्या चौकशीनंतर रिया चक्रवर्ती ला अटक झाली.\nPrevious articleरिया चक्रवर्ती माझ्याकडून ड्रु ग्स मागवायची, ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होती, दीपेश सावंतच्या माहितीमुळे रियाच्या अडचणीत वाढ \nNext articleअभिनेते ‘जय प्रकाश रेड्डी’, मृत्यूनंतर इतक्या करोडची संपत्ती मागे सोडून गेले, जाणून थक्क व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://crazymarathi.com/author/imniks54/", "date_download": "2022-10-07T22:26:10Z", "digest": "sha1:ICX5K72N5Z7TXLQBXXZXCH6EODEZCC4Z", "length": 12107, "nlines": 78, "source_domain": "crazymarathi.com", "title": "crazy marathi, Author at Crazy Marathi", "raw_content": "\nलग्नात बायकांनी केला झकास डान्स…\nनमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना माहित आहे कि डान्स हा सर्वांचा आवडीचा विषय आहे. कारण डान्स करताना माणूस खूप आनंदित होऊन आपला आनंद व्यक्त करीत असतो. मग तो डान्स लग्नात केलेला असो व इतर कार्यक्रमात केलेला असो. माणूस आनंदित होऊन डान्स करत असतो. डान्स चे वेग वेगळे प्रकार देखील बघायला मिळतात. कोणी जोडीने डान्स करत असते […]\nसाली बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…\nनमस्कार मंडळी, कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते […]\nलग्नात वहिनीनीं केला भारी डान्स…\n आपल्या सर्वांना माहित आहे कि लग्न म्हटले कि सर्वांना खूप आनंद होत असतो. कारण लग्नात जी मज्जा मस्ती आणि धमाल करायला मिळते तशी मज्जा मस्ती आणि धमाल बाकी गोष्टीत नाही करता येत. लग्नाच्या १ महिन्यापासून वेग वेगळे कार्यक्रम केले जातात. मग तो जागरण गोंधळ असो किंवा मेहेंदीचा कार्यक्रम किंवा मग हळद. आता तर […]\nसुहा’गरात्री बायकोला जोराची उचकी लागते….\nनमस्कार मंडळी, कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते […]\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\n लग्न म्हटले कि सर्व घरात आनंदाचे वातावरण फसरते. सर्व लोक लग्नाच्या तयारीला लागतात. कोणी कपड्याची खरेदी करते तर कोणी सोन चांदीची तर कोणी खाण्याच्या वस्तू बनवतात. तसेच लग्नाची पूर्व तयारी म्हणून विडिओ ग्राफर तसेच फोटो ग्राफर ह्यांची बुकिंग करण्यात येते. लग्नाचा हॉल, डी.जे, बँड ह्याची बुकिंग केली जाते. लग्नाच्या आधी वेग वेगळे कार्यक्रम […]\nचा वट पिंकी एका बस मध्ये चढली…\nनमस्कार मंडळी… कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते […]\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\n लग्न म्हटले कि सर्व घरात आनंदाचे वातावरण फसरते. सर्व लोक लग्नाच्या तयारीला लागतात. कोणी कपड्याची खरेदी करते तर कोणी सोन चांदीची तर कोणी खाण्याच्या वस्तू बनवतात. तसेच लग्नाची पूर्व तयारी म्हणून विडिओ ग्राफर तसेच फोटो ग्राफर ह्यांची बुकिंग करण्यात येते. लग्नाचा हॉल, डी.जे, बँड ह्याची बुकिंग केली जाते. लग्नाच्या आधी वेग वेगळे कार्यक्रम […]\nचा’वट बाई मेडिकल वर गेली…\nनमस्कार मंडळी, कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते […]\nटकला टी शर्ट घालून आला…\n कसे आहात मजेत ना मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन दररोज ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आणि तुम्हाला हसवत आहोत… आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे धमाकेदार विनोद नक्की आवडतच असणार… एक लक्ष्यात ठेवा विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा पदार्थ मसाल्याशिवाय चव देत नाही […]\nमुलीने सासरी जाताना सर्वांना रडवले\n लग्न म्हटले कि सर्व घरात आनंदाचे वातावरण फसरते. सर्व लोक लग्नाच्या तयारीला लागतात. कोणी कपड्याची खरेदी करते तर कोणी सोन चांदीची तर कोणी खाण्याच्या वस्तू बनवतात. तसेच लग्नाची पूर्व तयारी म्हणून विडिओ ग्राफर तसेच फोटो ग्राफर ह्यांची बुकिंग करण्यात येते. लग्नाचा हॉल, डी.जे, बँड ह्याची बुकिंग केली जाते. लग्नाच्या आधी वेग वेगळे कार्यक्रम […]\nलग्नात बायकांनी केला झकास डान्स…\nसाली बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…\nलग्नात वहिनीनीं केला भारी डान्स…\nसुहा’गरात्री बायकोला जोराची उचकी लागते….\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा वट पिंकी एका बस मध्ये चढली…\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा’वट बाई मेडिकल वर गेली…\nमुलीने सासरी जाताना सर्वांना रडवले\nटकला टी शर्ट घालून आला…\nनवरी ताईचा विडिओ बघून रडू येईल…\nबंड्याच्या बेडरूम मधून बायकोचा आवाज आला…\nलग्नात ताईने केला खुपच सुंदर डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nताईने केला खुपच सुंदर डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/pune/clash-between-officers-and-villegers-in-daund-pune-district-mhcp-764193.html", "date_download": "2022-10-07T21:32:42Z", "digest": "sha1:3R7SA34QM6MWXRX7CMIKXKGHIOR2U5BJ", "length": 9099, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दौंड : राहते घर पाडण्यासाठी अचानक जेसीबी गावात, गावकरी संतापले, अधिकाऱ्यांना घेराव – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nदौंड : राहते घर पाडण्यासाठी अचानक जेसीबी गावात, गावकरी संतापले, अधिकाऱ्यांना घेराव\nदौंड : राहते घर पाडण्यासाठी अचानक जेसीबी गावात, गावकरी संतापले, अधिकाऱ्यांना घेराव\nदौंड तालुक्यात पालखी महामार्गाच्या कामावेळी मोठा गोंधळ झाला. प्रशासनातील अधिकारी अचानक घर पाडण्यासाठी आल्याने नागरिकांना संताप आला.\nदौंड तालुक्यात पालखी महामार्गाच्या कामावेळी मोठा गोंधळ झाला. प्रशासनातील अधिकारी अचानक घर पाडण्यासाठी आल्याने नागरिकांना संताप आला.\n'पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट', बॉम्बस्फोटाची धमकी, पुण्यात एकाला बेड्या\nएका बाईनेच बाईला दिला आधार; या Video मुळे पुणे महिला पोलिसांनी जिंकली सर्वांची..\nविद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात, 4 वेळा पलटी कार, दोघांचा मृत्यू, LIVE VIDEO\nपरतीच्या पाऊस मुंबईसह 9 जिल्ह्यांना झोडपणार, हवामान खात्याकडून महत्वाची माहिती\nसुमित सोनवणे, दौंड, 22 सप्टेंबर : संत तुकाराम महाराज पालखी ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या पालखी महामार्गाच्या कामावेळी दौंड तालुक्यातील रोटी गावात मोठा गोंधळ उडाला. रस्ते मार्गासाठी गावातील काही ठिकाणी जमीन अधिग्रहण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी पोलीस बंदोबस्तासह गावातील घरे पाडण्यासाठी दाखल झाले. पण आम्हाला सरकारकडून अद्याप मोबदला मिळालेला नसतानाही आम्ही राहतं घर सोडून जाणार कुठे असा प्रश्न विचारत गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. पालखी महामार्गाच्या कामासाठी जमीन अधिग्रहण केलं जात असताना अनेक ठिकाणी नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. \"या महामार्गात आमचे राहते घर जाणार आहे. मात्र महसूल प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने घराचे मूल्यांकन केले होते. आम्ही केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून पुनर्मूल्यांकन करण्यात आले. मात्र आम्हाला मोबदला म्हणून किती रक्कम दिली जाणार आहे, याची माहिती अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेलं नाही\", असं म्हणत रोटी गावातील नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या आहेत. (उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, मृतांचा आकडा 4 वर) मूल्यांकनानंतर मोबदला मिळणं तर दूरच मात्र नक्की किती मोबदला दिला जाणार आहे, याची रक्कमही आम्हाला सांगितलेली नाही. असं असताना आम्ही राहतं घर सोडून जाणार कुठे असा प्रश्न विचारत गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. पालखी महामार्गाच्या कामासाठी जमीन अधिग्रहण केलं जात असताना अनेक ठिकाणी नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. \"या महामार्गात आमचे राहते घर जाणार आहे. मात्र महसूल प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने घराचे मूल्यांकन केले होते. आम्ही केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून पुनर्मूल्यांकन करण्यात आले. मात्र आम्हाला मोबदला म्हणून किती रक्कम दिली जाणार आहे, याची माहिती अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेलं नाही\", असं म्हणत रोटी गावातील नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या आहेत. (उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, मृतांचा आकडा 4 वर) मूल्यांकनानंतर मोबदला मिळणं तर दूरच मात्र नक्की किती मोबदला दिला जाणार आहे, याची रक्कमही आम्हाला सांगितलेली नाही. असं असताना आम्ही राहतं घर सोडून जाणार कुठे असा प्रश्न या गावातील नागरिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला. दरम्यान, नागरिकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर प्रशासनाने पाडकाम करणं थांबवून ही कारवाई स्थगित केली आहे. मात्र पालखी महामार्गात जाणाऱ्या आमच्या घर आणि जागेचे योग्य मूल्यांकन झाल्याशिवाय आणि त्याची रक्कम कळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका बाधित गावकऱ्यांनी घेतली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/house-flies-if-you-are-suffering-from-mo/", "date_download": "2022-10-07T23:08:25Z", "digest": "sha1:RZJ2VONA2FYJTU6FXDCLSSPFV6KOETMB", "length": 5610, "nlines": 41, "source_domain": "mahaupdate.in", "title": "घरातील माशी - डास आणि झुरळाच्या समस्येने त्रस्त असाल, तर ट्राय करा हे उपाय, समस्या कायमची होईल दूर - Maha Update", "raw_content": "\nHome » घरातील माशी – डास आणि झुरळाच्या समस्येने त्रस्त असाल, तर ट्राय करा हे उपाय, समस्या कायमची होईल दूर\nघरातील माशी – डास आणि झुरळाच्या समस्येने त्रस्त असाल, तर ट्राय करा हे उपाय, समस्या कायमची होईल दूर\nप्रत्येकाला आपले घर स्वच्छ असावे असे वाटत असते. पण पावसाळा सुरू होताच मच्छर, माशा, किड्यांचे प्रमाण अधिक वाढते. मात्र, आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी डास, माशांचा घरात येऊन न देणे गरजेचे असते\nस्वयंपाकघरात झुरळ फिरत असल्याचे पाहून त्याला अन्न खावेसे वाटत नाही. तुम्हालाही अशी समस्या भेडसावत असाल तर आज तुम्हाला त्यावर उपाय करण्याचे सोपे उपाय सांगत आहोत. या उपायाचा अवलंब केल्यावर कीटक आणि माइट्सची ही समस्या मुळापासून नाहीशी होईल.\nकीटक मारण्यासाठी अशी फवारणी करा\nघरातील झुरळ आणि माशी-डास नष्ट करण्यासाठी तुम्हाला स्प्रे बनवावा लागेल. हे करण्यासाठी, आपण एका भांड्यात पाणी भरा. यानंतर भरपूर लसूण साले, मिरचीचे देठ आणि कोरफडीची काडी टाकून झाकून ठेवा. ते पाणी तीन दिवस असेच झाकून ठेवा. यानंतर, पाण्यात असलेल्या सर्व गोष्टी बारीक करा आणि गाळून घ्या आणि त्याच पाण्यात मिसळा. हे केल्यावर तुमची कीटकनाशक फवारणी तयार होईल.\nस्प्रे बनवताना लक्षात ठेवा की त्याला दुर्गंधी येऊ शकते. त्यामुळे ती भांडी स्वयंपाकघरात किंवा झोपण्याच्या खोलीत ठेवू नका. त्याऐवजी, ते भांडे अशा ठिकाणी ठेवा जेथे कुटुंबातील सदस्यांची कमी हालचाल असेल. ते भांडे झाकणाने 3 दिवस घट्ट बंद ठेवा. त्यानंतरच ते उघडा.\nअशा प्रकारे स्प्रे वापरा\nही स्प्रे बनवल्यानंतर, झुरळ आणि डास-माशी लपण्याच्या ठिकाणी 2-3 वेळा फवारणी करा. ज्या ठिकाणी ओलसरपणा आहे किंवा पाणी शिल्लक आहे अशा ठिकाणी ही फवारणी करावी. पलंगाखाली आणि पेटीच्या मागे फवारणी करणे देखील फायदेशीर आहे. त्यामुळे डास व माशांची पैदास होत नाही व घर किडेमुक्त होते.\nकिचन सिंकमधील किड्यांनी त्रस्त आहात, मग ‘हे’ उपाय करून पहा, त्वरित नष्ट होतील\nडास पळवण्यासाठी फायदेशीर ठरतात, ‘हे’ घरगुती उपाय; जाणून घ्या सविस्तर\nबाथरूम स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा असा करा वापर, काही वेळात होईल पूर्णपणे चकाचक, वाचा सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8/", "date_download": "2022-10-07T22:38:52Z", "digest": "sha1:GGYNV3LJJGLXMPGDUZVASRTNNDEKLVA7", "length": 2008, "nlines": 36, "source_domain": "marathilekh.com", "title": "सखी ग मुरली मोहन Archives - Marathi Lekh", "raw_content": "\nसखी ग मुरली मोहन\nसखी ग मुरली मोहन | Sakhi Ga Murali Mohan Marathi Lyrics गीत – पी. सावळाराम संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर …\nमुलांना काळ्या वर्णाच्या मुलींशी लग्न का करावे वाटत नाही\nब्रेकअप झाल्यावर तुम्ही स्वतःला कसे सावरले\nआपण स्वतःशी प्रेम कसे करू शकतो मला तर माझ्यात फक्त दोष दिसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1360141", "date_download": "2022-10-07T23:17:16Z", "digest": "sha1:4BFICLT3CYBBEUPLDUKOMPS44QTTQFC6", "length": 2253, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मंगळवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मंगळवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:३१, १९ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती\n३ बाइट्स वगळले , ७ वर्षांपूर्वी\n→‎हे ही पहा: रिकामे पान साचा, replaced: पाहा → पहा\n०१:२५, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१०:३१, १९ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या (चर्चा | योगदान)\nछो (→‎हे ही पहा: रिकामे पान साचा, replaced: पाहा → पहा)\n'''{{लेखनाव}}''' हा आठवड्यातील एक वार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://sureshpatil.co.in/layouts/", "date_download": "2022-10-07T21:35:50Z", "digest": "sha1:3OT5MWKDOLB6C5PP7U7D2GBQ4XTTWK4J", "length": 2157, "nlines": 22, "source_domain": "sureshpatil.co.in", "title": "Layouts - Suresh Patil", "raw_content": "\nश्री सुरेश पाटील यांचा परिचय\nमा. सुरेश पाटील महापौर पदावर असताना केलेले कार्य\nविधायक दृष्टीकोनातून उभ्या राहिलेल्या सामाजिक शीक्षणिक क्रिडा इ. क्षेत्रातील संस्था.\nआर्थिक व सहकार क्षेत्रातील कामे\nउद्योग, व्यापार अर्थ व सहकार क्षेत्रातिल संघटनात्मक कार्य\nचेअरमन मॅनेजिंग कौन्सिल – लठ्ठे एज्युकेषन सोसायटी, सांगली\nअध्यक्ष – महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळ, मुंबई (कॅबिनेटमंत्री दर्जा प्राप्त)\nश्री. सुरेश पाटील यांचा सहभाग असलेल्या व्यापारी संस्था\nमा. सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदगोंडा बाबगोंडा पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व राजमती नेमगोंडा पाटील वाचनालय, सांगली यांच्या वतीने आयोजित संविधान निर्माता संमेलनातील कार्य\nमा. सुरेश पाटील यांचे 21 वे मराठी बालकुमार साहित्य संमेलनमध्ये केलेले कार्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/lock-up-star-shivam-sharma-reveals-his-family-reaction-over-his-confession-of-having-sex-with-moms-friend-hrc-97-3076059/", "date_download": "2022-10-07T22:29:15Z", "digest": "sha1:2YLITSVO44H2MN4GDQ5ZW2NKOTZCFCAS", "length": 21055, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Lock up fame shivam sharma | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\n“मी आईच्या मैत्रिणीसोबत सेक्स केल्याचं समजताच…”; ‘लॉक अप’ फेम शिवम शर्माने सांगितली कुटुंबियांची प्रतिक्रिया\n‘लॉक अप’मध्ये असताना शिवमने हा खुलासा केला होता.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\n(फोटो – व्हिडीओतून स्क्रीनशॉट)\nटीव्ही अभिनेता शिवम शर्मा या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या ओटीटी रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ शोमध्ये दिसला होता. कंगना रणौत सुत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये शिवमने त्याच्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. शोमध्ये शिवमने सांगितलं होतं की, त्याने एकदा त्याच्या आईच्या मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. पण जेव्हा त्याच्या कुटुंबाला हे कळालं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती याबद्दल आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवमने खुलासा केला आहे.\nहेही वाचा – KBC मध्ये एक कोटी रुपयांसाठी स्पर्धकाला विचारण्यात आला ‘हा’ प्रश्न; तुम्हाला उत्तर माहितीये का\n“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला\nShinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\n“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप\nशिवमने सांगितले की, “हा एपिसोड प्रसारित होताच माझं वक्तव्य ऐकून माझ्या संपूर्ण कुटुंबाने ती महिला कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. माझ्या मावशी आहेत, त्यांनी आईला फोन केले आणि विचारलं. तसेच सगळे मिळून तिचा शोध घेत होते. ही 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मग आपण तेव्हा कुठे राहत होतो आणि मी कोणत्या आईच्या मैत्रिणीबद्दल बोलतोय, याबद्दल शोध सुरू झाला. दरम्यान, माझ्या पालकांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते मला काहीच बोलत नाही, आजपर्यंत त्यांनी मला नेहमीच साथ दिली आहे,” असं शिवम म्हणाला.\nहेही वाचा – ‘या’ कलाकारांचे होते को-स्टारशी अफेअर; पण ब्रेकअपनंतर निवडले इंडस्ट्रीबाहेरचे पार्टनर\nया शोमध्ये असताना स्पर्धकांना नॉमिनेशनपासून वाचवण्यासाठी स्वतःविषयी असलेलं एक डार्क सिक्रेट सांगायचं होतं. अशा परिस्थितीत शिवम शर्माने शोमध्ये बझर दाबून एक धक्कादायक खुलासा केला होता. शिवमचे त्याच्या आईच्या मैत्रिणीशी शारीरिक संबंध होते आणि ती घटस्फोटित होती, असं सांगितलं होतं. याविषयी बोलताना शिवम म्हणाला होता, “एक घटस्फोटित महिला माझ्या घराजवळ राहत होती. ती माझ्या आईची मैत्रिण होती. ती घटस्फोटित होती आणि मला तिला सेक्शुअल लाइफमध्ये मदत करायची होती. मी मस्त व्हाईट सॉस पास्ता बनवतो, म्हणून मी व्हाईट सॉस पास्ता त्यांच्या घरी घेऊन जायचो आणि त्यांच्यासोबत बराच वेळ घालवायचो. ही खूप जुनी गोष्ट आहे, मी कॉलेजमध्ये असताना हे घडलं होतं.” शिवमने शोमध्येच या घटनेचा खुलासा केल्याने त्याच्या कुटुंबियांनाही धक्का बसला होता.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nVideo : तेलंगणातील ‘लायगर’ प्रमोशनला तेलुगू बोलताना अनन्या पांडे अडखळली अन्…\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मेधाली, वैभवला सुवर्ण\nप्रो कबड्डी लीग : दबंग दिल्लीसमोर यू मुम्बाची हाराकिरी\nराष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा -विनोद तोमर\nभारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा\nकाँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका\nधनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण\nमध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०८ ऑक्टोबर २०२२\nपुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\nLow Uric Acid: यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होणे देखील ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ ५ गंभीर आजार\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\n“हा चित्रपट…” ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर प्रिया मराठेची प्रतिक्रिया चर्चेत\n‘झलक दिखला जा’च्या मंचावर लेकाच्या लग्नाची झलक पाहून नीतू सिंग भावुक, म्हणाल्या…\n‘हर हर महादेव’मध्ये अमृता खानविलकर साकारणार बाजीप्रभु देशपांडे यांच्या पत्नीची भूमिका, लूक व्हायरल\n‘हम आपके है कौन…’ चित्रपटतील रेणुका शहाणे यांचा ‘तो’ सीन शूट करताना ढसढसा रडल्या रीमा लागू\nMPSC च्या परीक्षेसाठी शुभेच्छा मागणाऱ्याला हेमांगी कवीचे स्पष्ट उत्तर, म्हणाली….\nएअरपोर्ट लूकमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले “कंगना…”\nबॉलिवूडमधील नकारात्मक विचारांच्या लोकांवर टीका करत करण जोहर म्हणाला, “मी प्रत्येकाच्या…”\n“माझ्यावर टीका केली जातेय हे…” सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल प्राजक्ता माळीने व्यक्त केलं स्पष्ट मत\n‘पुष्पा २’मध्ये होणार ‘या’ आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्याची एंट्री, साकारणार महत्वपूर्ण भूमिका\nमुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘झी टॉकीज’चा मानाचा मुजरा\n“हा चित्रपट…” ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर प्रिया मराठेची प्रतिक्रिया चर्चेत\n‘झलक दिखला जा’च्या मंचावर लेकाच्या लग्नाची झलक पाहून नीतू सिंग भावुक, म्हणाल्या…\n‘हर हर महादेव’मध्ये अमृता खानविलकर साकारणार बाजीप्रभु देशपांडे यांच्या पत्नीची भूमिका, लूक व्हायरल\n‘हम आपके है कौन…’ चित्रपटतील रेणुका शहाणे यांचा ‘तो’ सीन शूट करताना ढसढसा रडल्या रीमा लागू\nMPSC च्या परीक्षेसाठी शुभेच्छा मागणाऱ्याला हेमांगी कवीचे स्पष्ट उत्तर, म्हणाली….\nएअरपोर्ट लूकमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले “कंगना…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87/", "date_download": "2022-10-07T23:07:06Z", "digest": "sha1:JAPQRB2HAIQ5NKU3KLRQ6N45TOZUWLIP", "length": 13424, "nlines": 89, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "पुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही 'हे 4' आजार ... - Themaharashtrian", "raw_content": "\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपुरुषांसाठी पौष्टिक आहार आवश्यक आहे. पौष्टिक आहार घेतल्याने त्यांच्या शरीर सामर्थ्यशाली बनते आणि बर्‍याच रोगांपासून त्यांचे संरक्षण होते. शेवग्याच्या शेंगा पुरुषांसाठी खूप आरोग्यदायी मानल्या जातात आणि त्या शेंगा खाल्ल्याने त्यांचे शरीर बर्‍याच आजारांपासून दूर राहते. म्हणून, आपल्या आहारात नेहमी आपण शेवग्याचे शेंगाची भाजी खाणे आवश्यक आहे.\nशेवग्याचे शेंगेला मोरिंगा आणि ड्रमस्टिक देखील म्हणतात आणि त्यात बरेच औषधी गुणधर्म असतात. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, तांबे, मॅग्नेशियम, लोह आणि जस्त जास्त प्रमाणात असतात. एवढेच नाही तर या शेवग्याच्या शेंगाचे भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, के, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, डी आणि ई देखील भरपूर प्रमाणात असते. या शेंगांची भाजी खाल्ल्याने पुरुषांना अंतर्गत आजार होत नाहीत. तर मग बघुयात की या शेंगांची भाजी खाल्याने कोणते आजार दूर होतात.\nशेवग्याचे शेंगांचे फायदे पुढील प्रमाणे :\nकर्करोगास प्रतिबंध : शेवग्याचे शेंगांचे सेवन करणार्‍या पुरुषांना कर्करोग होण्याची फारशी शक्यता नाही. त्याच्या बिया आणि पानांमध्ये गंधकयुक्त संयुगे म्हणजे ग्लूकोसिनोलेट्स असतात. ज्यामध्ये अँटीकेन्सर गुणधर्म आहेत.\nशेवग्याचे शेंगांवर केलेल्या बर्‍याच अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की या शेंगांची भाजी खाल्ल्याने पुरुषांच्या प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशी वाढत नाहीत आणि या कर्करोगापासून त्यांचे संरक्षण होते. त्याच वेळी, सॉफ्ट प्रोस्टेट हाइपरप्लासीया रोखण्यास देखील उपयुक्त आहे. सॉफ्ट प्रोस्टेट हाइपरप्लासीयामुळे लघवी करण्यास त्रास होतो.\nइरेक्टाईल डीसफंक्शन दूर होते : शेवग्याचे शेंगा खाल्ल्याने अजिबात देखील इरेक्टाईल डीसफंक्शनचां अजिबात त्रास उद्भवत नाही. शेवग्याची शेंग आरोग्यासाठी जितकी महत्वाची असते त्याहीपेक्षा त्याचे बियाणे आणि पानांचे अर्क इरेक्टाईल डीसफंक्शनचे समस्या दूर होऊन बिघडलेले कार्य कमी करण्यासाठी कार्य करतात. म्हणून, ज्या लोकांना ही समस्या आहे, त्यांनी ही भाजी त्यांच्या आहारात नियमित खायला हवी.\nरक्तातील साखर वाढवू देत नाही : रक्तातील साखरेचा त्रास रोखण्यासाठी शेवग्याचे शेंगा खूप फायदेशीर आहे. ते खाल्ल्याने टाइप 2 मधुमेह होत नाही आणि साखर नेहमीच नियंत्रणात असते. वास्तविक, पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही, त्यामुळे साखर निर्माण होते. तथापि, हे खाल्ल्याने इंसुलिन योग्य प्रकारे तयार होते आणि रक्तातील साखर वाढू देत नाही. म्हणून,शेवग्याचे शेंगा शुगर चां आजारही रोखता येतो.\nप्रजनन क्षमता वाढते : ही भाजी प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी देखील प्रभावी असल्याचे सिद्ध होते. नियमितपणे खाल्ल्याने सुपीकता कमकुवत होत नाही. वास्तविक शेवग्याचे शेंगाची पाने आणि बियाणे मध्ये अँटिऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. त्याच वेळी, या भाजीपाल्यावरील बर्‍याच संशोधनात असे आढळले आहे की या भाजीचे सेवन करणारे पुरुष जास्त वयाचे होऊन देखील त्यांच्या प्रजननक्षमता टिकऊन ठेवतात.\nअशा प्रकारे करा सेवन : शेवग्याचे शेंगाचे अनेक प्रकारे सेवन केले जाऊ शकते. बरेच लोक त्याची भाजी तयार करतात आणि खातात. काही लोक त्याची पावडर वापरतात. ड्रम पावडर तयार करणे खूप सोपे आहे. पाने व बिया स्वच्छ करून उन्हात वाळवा. जेव्हा ते चांगले वाळून जाईल तेव्हा त्यांना दळून घ्यायचे. आणि पावडर तयार करायाची. ही पावडर स्वच्छ डबीत ठेवा आणि रोज एक चमचा घ्या.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kolhapur/kolhapur-permanent-solution-to-flood-will-be-found-eknath-shinde-msr-87-3069901/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-07T21:49:02Z", "digest": "sha1:UNCUSETPGOY2VYFQL4MYROYC6LQDMAIZ", "length": 20647, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kolhapur Permanent solution to flood will be found Eknath Shinde msr 87 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\nकोल्हापूर : महापुरावर कायमस्वरुपी तोडगा काढणार – एकनाथ शिंदे\nशासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करण्यात येईल, असंही म्हणाले आहेत.\nWritten by दयानंद लिपारे\nमहापुरामुळे सातत्याने नुकसान होत असल्याने कायमस्वरुपी तोडगा काढला जाणार आहे. त्यासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पूर परिस्थिती आढावा बैठकीत शिंदे बोलत होते. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रकाश आबिटकर आदी आमदारांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nशिंदे म्हणाले, पंचगंगा नदीच्या पुरामुळे शेतपिक, जनावरे व अन्य मालमत्तेचे अतोनात नुकसान होते. स्थलांतराच्या प्रमाणात वाढ होत आहे. याला आळा बसण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येईल. राज्य शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत करण्याचे जाहीर केली आहे.\n“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला\nShinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\n“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप\nकोल्हापूरला ३ कोटी –\nकोल्हापूरातील गांधी मैदानावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शिंदे यांनी तात्काळ तीन कोटी रुपये निधी देण्याचे जाहीर केले. वीज वितरण कंपनीने अतिवृष्टी व पुरामुळे खंडित वीज सेवा तात्काळ सुरु करण्यासाठी एक स्वतंत्र आराखडा तयार करावा, असेही सूचित केले.\nमुख्यमंत्री भेटले पत्रकारांना –\nमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत धरपकड झाल्याने काहीसा तणाव होता. याचा परिणाम मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत झाला. परिणामी मुख्यमंत्री आढावा घेणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांनी मज्जाव केला. पत्रकार बैठकीस्थळी जाण्यासाठी आग्रही होते. अशातच पत्रकारांना पोलिसांनी अरेरवीची भाषा सुरू केली. पत्रकारांनी बैठकीकडे जायचे नाही असा निर्धार करीत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनाची भूमिका घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, खासदार धनंजय महाडिक, पोलीस उपअधीक्षक तिरुपती काकडे, भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी विनवणी करूनही पत्रकार ठाम राहिले. अखेर बैठक संपवून मुख्यमंत्री शिंदे, चंद्रकांत पाटील हे चालत कार्यालयाबाहेर पत्रकारांजवळ येऊन संवाद साधला.\nमराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nकोल्हापूर : मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावेळी कोल्हापूर शिवसेनेतील वाद उफाळला\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मेधाली, वैभवला सुवर्ण\nप्रो कबड्डी लीग : दबंग दिल्लीसमोर यू मुम्बाची हाराकिरी\nराष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा -विनोद तोमर\nभारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा\nकाँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका\nधनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण\nमध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०८ ऑक्टोबर २०२२\nपुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\nLow Uric Acid: यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होणे देखील ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ ५ गंभीर आजार\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\nकोल्हापूर : शिरोळ तालुक्यात सर्वाधिक कर्करोग ; चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर शेतकरी संघटनांची टीका\nकोल्हापूर : राज्यात निधी वाटपात भेदभावप्रकरणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले – अजित पवार\nविश्लेषण : कोल्हापूरचा शाही दसरा कसा ठरतो परंपरा आणि आधुनिकतेचा संगम\nकोल्हापूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात खाणीला तत्त्वत: मंजुरी ; वाघांच्या संचारात अडथळे निर्माण होण्याची भीती\nकोल्हापूर : अनैतिक संबंध असलेल्या विधवेने लग्नास नकार दिल्याने खून ; संशयित आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून पकडले\nकोल्हापूर : दूध दर फरकापोटी गोकुळ १०२ कोटी रुपये देणार ;पाच लाख दूध उत्पादकांची दिवाळी गोड\nकोल्हापूर : गुंतवणुकदारांना लाखोंचा गंडा ; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल\nकोल्हापूर : गुप्तधनाचा हव्यास नडला; महिलेच्या खून प्रकरणी संशयित मांत्रिक आरोपी अटक\nइचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न सुटेना; दूधगंगा पाणी योजनेवरून राजकीय वाद सुरूच\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नी, मुलगा, मुलीचा खून; तिहेरी हत्याकांडाने कागल हादरले\nकोल्हापूर : शिरोळ तालुक्यात सर्वाधिक कर्करोग ; चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर शेतकरी संघटनांची टीका\nकोल्हापूर : राज्यात निधी वाटपात भेदभावप्रकरणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले – अजित पवार\nविश्लेषण : कोल्हापूरचा शाही दसरा कसा ठरतो परंपरा आणि आधुनिकतेचा संगम\nकोल्हापूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात खाणीला तत्त्वत: मंजुरी ; वाघांच्या संचारात अडथळे निर्माण होण्याची भीती\nकोल्हापूर : अनैतिक संबंध असलेल्या विधवेने लग्नास नकार दिल्याने खून ; संशयित आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून पकडले\nकोल्हापूर : दूध दर फरकापोटी गोकुळ १०२ कोटी रुपये देणार ;पाच लाख दूध उत्पादकांची दिवाळी गोड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80-55/", "date_download": "2022-10-07T22:38:32Z", "digest": "sha1:FDKFRHNHJBMEJGJ5ZYW23I4EUSRPMLRP", "length": 11045, "nlines": 87, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "आंघोळ करताना चुकूनही शरीराच्या 'या' 2 भागांवर साबण लावू नका, नाहीतर भोगावे लागतील गं'भीर प'रिणाम... - Themaharashtrian", "raw_content": "\nआंघोळ करताना चुकूनही शरीराच्या ‘या’ 2 भागांवर साबण लावू नका, नाहीतर भोगावे लागतील गं’भीर प’रिणाम…\nआंघोळ करताना चुकूनही शरीराच्या ‘या’ 2 भागांवर साबण लावू नका, नाहीतर भोगावे लागतील गं’भीर प’रिणाम…\nआपण आपल्या दैनंदिन जीवनात नि’रोगी असणे फार महत्वाचे आहे. कारण सद्याच्या परिस्थितीत ही बाब खूप महत्त्वाची आहे. नि’रोगी राहण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करत असतो. जेणेकरून आपण आणि आपला परिवार नि-रोगी रहावा. निरोगी राहण्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा अ-विभा-ज्य भाग म्हणजे आंघोळ करणे.\nप्रत्येकाचा दिवस हा अंघोळ केल्यानंतरच सुरू होतो. खूप लोकांना दिवसातून दोन वेळा अंघोळ करण्याची सवय असते. म्हणजे एकप्रकारे ही सवय वाईट आहे असे आम्ही म्हणत नाही, पण आज आम्ही तुम्हाला अंघोळ करत असताना तुम्ही कुठल्या चुका करत असतात त्याबद्दल सांगणार आहोत चला जाणून घेऊया.\nआंघोळ केल्याने केवळ ताजेप-णा येत नाही तर आपल्या शरीरावरील घा’ण निघून शरीर देखील शुद्ध होते. परंतु आंघोळ करीत असतानाही आपण अजाणतेपणाने अशा काही चुका करतो ज्याचा आपल्या श’रीरावर चु’कीचा प्र’भाव पडतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आंघोळ करताना कधीही श-रीराच्या या दोन भा-गांवर साबण लावू नये.\nकारण मित्रांनो, श-राच्या या भागावर आंघोळ करताना साबण लावण्यामुळे आपले बरेच नुकसान होऊ शकते, आपण या भा-गांवर कधीही साबण लावू नये. आंघोळ करताना डो-ळ्यांजवळ कधीही साबण लावू नये. कारण के-मिक-ल साबणाचा उपयोग करण्यात वापरला जातो आणि जर के-मिकलपासून बनविलेले साबण आपल्या डोळ्यांत गेले तर ते आपल्या डोळ्यांना खूप त्रा-स देऊ शकते.\nआंघोळ करताना श-रीराचा असा एक भाग आहे ज्यावर साबण लावू नये. कारण आंघोळ करताना या अ-वयवावर साबण लावण्याने तुम्ही बर्‍याच आ-जारांना ब-ळी पडू शकता. म्हणून या भा-गावर कधीही साबण वापरू नका. आंघोळ करताना ज-न-नेंद्रि-यांवर कधीही साबण लावू नका, कारण तेथील त्वचा थोडी नाजूक आहे. अशा परिस्थितीत खा-ज सुटणे इत्यादी स-म-स्या उद्भवू शकतात.\nबरेच लोक आंघोळी नंतर टॉवेलने श-रीरावर घा-सतात आणि त्यांना असे वाटते की असे केल्याने त्व-चा अधिक स्वच्छ होईल, परंतु तसे होत नाही. आं-घोळीनंतर टॉवेलने त्वचेला चो-ळल्यास त्व-चा को-रडी होते आणि त्यामुळे के-स गळण्याचा धो-का निमार्ण होतो.\nकाही लोक आंघोळ करताना दोन किंवा तीन वेळा साबण वापरतात, परंतु आंघोळ करताना जास्त प्रमाणात साबण देखील वापरला गेल्यामुळे अति घाम येणे आणि त्वचा को-रडी होणे अश्या सम-स्या निर्माण होतात.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/discharge-of-56-thousand-cusecs-of-water-potential-to-increase-discharge-if-water-inflow-increases-130294806.html", "date_download": "2022-10-07T22:08:01Z", "digest": "sha1:V2F7Q5GATC4Z7UYUE3B5J3EVYJXZSACK", "length": 5218, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "56 हजार क्यूसेक विसर्ग; पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता | Discharge of 56 thousand cusecs of water; Potential to increase discharge if water inflow increases - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजायकवाडी धरणाचे 18 दरवाजे 3 फुटाने उघडले:56 हजार क्यूसेक विसर्ग; पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता\nनाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदापात्रात मोठ्या प्रमाणात आवक येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून सध्या 56 हजार 592 क्यूसेक इतका विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडीचे 18 दरवाजे दुपारी दोन वाजता तीन फुटाने उघडले आहेत. पाण्याची आवक वाढल्यास आणखी विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे.\nनाशिक जिल्ह्यात गुरुवारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदापात्रात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. यावर्षी जायकवाडी धरण जुलै महिन्यात भरले होते. 31 वर्षानंतर पहिल्यांदाच धरण जुलै महिन्यात भरले आहे. जुलै महिन्यात जायकवाडी चे दरवाजे उघडले तेव्हापासून सातत्याने जायकवाडी मधून विसर्ग सूरू आहे.\nजायकवाडी धरणात सध्या 48 हजार 334 क्यूसेक इतकी आवक येत आहे. यामध्ये नांदूर मधमेश्वर मधून 34425 क्यूसेक इतका विसर्ग केला जात आहे. तर देवगड बंधारा 3405 क्यूसेक गंगापूर धरणातून 2546 क्यूसेक तर होळकर ब्रीज इथून 7204 क्यूसेक इतका विसर्ग केला जात आहे.\nपालखेड धरणातून 8470 क्यूसेक विसर्ग केला जात आहे. जायकवाडी धरणात 97 टक्के पाणीसाठा सध्या 2123 दलघमी इतका इतका आहे. तर एकूण पाणीसाठा 2681 दलघमी इतका आहे.हे प्रमाण 97.80टक्के इतका आहे.\nजायकवाडी धरण गेल्या चार वर्षांपासून सातत्याने भरत आहे. हवामान विभागाच्या वतीने आगामी काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे देखील जायकवडीच्या पाणीसाठा मध्ये सातत्याने वाढ होत असल्याने हा विसर्ग कायम वाढत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/money/share-market-updates-why-fall-down-from-last-3-days-mhkk-764646.html", "date_download": "2022-10-07T22:13:29Z", "digest": "sha1:JMNDGHNPHT7JLWXDDKQGAANZ32DKGV2D", "length": 8791, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Share Market: सलग तिसऱ्या दिवशी कोसळलं शेअर मार्केट, मोठं कारण आलं समोर – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\nShare Market: सलग तिसऱ्या दिवशी कोसळलं शेअर मार्केट, मोठं कारण आलं समोर\nShare Market: सलग तिसऱ्या दिवशी कोसळलं शेअर मार्केट, मोठं कारण आलं समोर\nभारतातील शेअर बाजार कोसळण्याची ५ कारणं\nभारतातील शेअर बाजार कोसळण्याची ५ कारणं\n मोठी कंपनी भारतात IPO लाँच करण्याच्या तयारीत\nशेअर बाजार कोसळला, 'या' सेक्टरला बसला मोठा धक्का, तुमचे शेअर्स तर नाहीत\n'या' 20 स्टॉकमध्ये गुंतवणूक करून तुम्ही आज करू शकता भरपूर कमाई\nRBI : सलग चौथ्यांदा महागला रेपो रेट, 0.50% वाढ, कर्ज महागले\nमुंबई : भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला आहे. शुक्रवारी, दुपारी 2:45 वाजता, निफ्टी 289 अंकांनी घसरून 17,340.05वर वधारली तर बीएसई सेन्सेक्स 985 अंकांनी घसरून 58,164.52 वर वधारला. देशांतर्गत आणि जागतिक घटकांचा भारतीय शेअर बाजारावर दबाव कायम असल्याने हा परिणाम दिसत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतील वाढत्या व्याजदर आणि मंदीची तीव्र भीती यांचा भारतीय बाजारावर नकारात्मक परिणाम दिसत आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदारत वाढ केली. चीनमधील आर्थिक मंदीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा वेगही मंदावला. यामुळे भारतीय शेअर बाजारातही घसरण झाल. भारतातील शेअर बाजार कोसळण्याची ५ कारणं US फेडरल बँकेनं व्याजदरात वाढ केल्याने त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर झाला. नोव्हेंबर आणि डिझेंबरमध्ये पुन्हा व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये अमेरिका आर्थिक मंदीचा सामना करू शकते असा अंदाज आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेवर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला आहे. रेपो रेट वाढण्याची शक्यता भारतात महागाई दर वाढण्याची शक्यता आहे. चलनविषयक धोरण समितीच्या पुढील बैठकीत व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. डिसेंबरमध्येही RBI व्याजदरात 0.35 टक्क्यांनी वाढ करू शकते. पुढील वर्षी एप्रिलपर्यंत रेपो दर 6.75 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामुळे शेअर बाजारावरील गुंतवणूकदारांचा विश्वासही डळमळीत झाला आहे. अॅडव्हान्स टॅक्स, डिपॉझिट सिस्टममधून पैसे काढणे, क्रेडिट डिमांट वाढणं अशा अनेक कारणांमुळे लिक्विडिटीमध्ये घट झाली आहे. त्याचा परिणामही बाजारपेठेवर पाहायला मिळत आहे. शेअरच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढवल्या आहेत. त्यामुळे बीएनबीने गुंतवणूकदारांना याबाबत चेतावनी दिली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची धीम्या गतीने ग्रोथ पाहायला मिळत आहे. जूनच्या तिमाहीचे आकडे फार उत्साहजनक नाहीत. त्यामुळे देखील याचा बाजारपेठेवर परिणाम दिसून येत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-2-144139.html", "date_download": "2022-10-07T21:09:43Z", "digest": "sha1:6OMUDDVBPJENO3KJGHCWEKLUULIDKNKD", "length": 17408, "nlines": 220, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मी पंकजा गोपीनाथ मुंडे... | Maharashtraelections2014 - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nMoney Mantra - ही रास असेल तर गुंतवणूक करताना सावधान\nचांगली संधी मिळणार, नशिबाचीही साथ लाभणार; आज काय घडणार पाहा राशिभविष्य\n'या' कालावधीत संबंध ठेवताय 'ही' महत्त्वाची माहिती नक्की वाचा\nरोमान्समध्ये ब्रेक; शारीरिक संबंध थांबवल्यावर नेमकं काय होतं\n उद्धव ठाकरेंचा जवळचा आणखी एक बडा नेता अडचणीत\nबुलढाण्यात विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, कृषी महाविद्यालयाच्या आडमुठेपणाचा बळी\nनालासोपाऱ्यात खळबळजनक घटना, घरकाम करणाऱ्या महिलेसोबत भयानक प्रकार\nबीडमध्ये टीशर्ट आणि जीन्स वापरण्यावर बंदी, अधिकाऱ्याचा महत्त्वाचा आदेश\nरात्री गुपचूप भेटत होते GF-BF; ग्रामस्थांनी मिळून लव्ह स्टोरीचा केला The End\nInstagram च्या फॉलोअर्सवरुन घडला भयानक प्रकार, तरुणीने दिले चॅलेंज अन् दोघांचा..\nवंदे भारत एक्स्प्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात काल 'नाक' तुटलं अन् आज..\nकाँग्रेसच्या 2 आमदारांचं धावत्या ट्रेनमध्ये महिलेसोबत धक्कादायक कृत्य, दारू पिऊन\nMoney Mantra - ही रास असेल तर गुंतवणूक करताना सावधान\nचांगली संधी मिळणार, नशिबाचीही साथ लाभणार; आज काय घडणार पाहा राशिभविष्य\n'या' कालावधीत संबंध ठेवताय 'ही' महत्त्वाची माहिती नक्की वाचा\nरोमान्समध्ये ब्रेक; शारीरिक संबंध थांबवल्यावर नेमकं काय होतं\nप्रेम, कॉमेडी की थ्रीलर; या विकेंडला तुम्ही कोणतं नाटक पाहणार\n अभिनेत्रीच्या हॉटनेसवर ज्येष्ठ अभिनेतेही फिदा\nतेजस्वी प्रकाशच्या मराठी सिनेमाचं गाणं रिलीज; दणकून नाचली अभिनेत्री\nअमृता पहिल्यांदा ऐतिहासिक भूमिकेत; \"हर हर महादेव\"मधील पहिला लुक आला समोर\nमहामुकाबल्यात हा खेळाडू पुन्हा डोकेदुखी ठरणार 12 मॅचमध्ये ठोकल्या 8 फिफ्टी\nकरोडो फुटबॉल चाहते हळहळले... 'या' खेळाडूची मोठी घोषणा, खेळणार शेवटचा वर्ल्ड कप\nटीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात, BCCI ने शेअर केला हा खास फोटो\nमुंबई इंडियन्सला मिळाला फ्यूचर कायरन पोलार्ड वर्ल्ड कपआधी करतोय जोरदार फटकेबाजी\nलीज-रेंट अ‍ॅग्रीमेंटमधला फरक माहिती आहे का सही करण्यापूर्वी घ्या पुरेशी काळजी\nदीर्घकालीन गुंतवणुकीसाठी VPF बेस्ट पर्याय; 8 टक्क्यांपर्यंत मिळतंय व्याज\nफक्त 10 हजार रुपये गुंतवून लाखोंची कमाई करा; लखपती बनवणाऱ्या 5 बिझनेस आयडीया\nDigital Currency च्या दिशेन RBI ची वाटचाल, तुम्हाला घेता येणार की नाही\nMoney Mantra - ही रास असेल तर गुंतवणूक करताना सावधान\nचांगली संधी मिळणार, नशिबाचीही साथ लाभणार; आज काय घडणार पाहा राशिभविष्य\n'या' कालावधीत संबंध ठेवताय 'ही' महत्त्वाची माहिती नक्की वाचा\nरोमान्समध्ये ब्रेक; शारीरिक संबंध थांबवल्यावर नेमकं काय होतं\nहरपलं देहभान... विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन वारकरी; पहा वारीचे सुंदर PHOTO\nया आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nरात्री गुपचूप भेटत होते GF-BF; ग्रामस्थांनी मिळून लव्ह स्टोरीचा केला The End\nनजर, बुद्धिमत्तेची घ्या चाचणी चित्रातील वृद्धाच्या पत्नीला शोधा 11 सेकंदात\nVIDEO- मोठ्याने पिपाणी वाजवणाऱ्यांची वाजली पुंगी; आता तोंडानेही आवाज निघणार नाही\n वाघासोबत सेल्फी घ्यायला गेले तरुण आणि...; काय झाला शेवट पाहा VIDEO\nतळहातावरील ही दोन उंच स्थाने नशीब बदलून टाकतात, राहतो लक्ष्मीचा आशीर्वाद\nवास्‍तुदोष घालवण्यासाठी अक्षतांचा करा असा उपाय, कायम राहील घरात सुख-शांती\nशेवटचे सूर्यग्रहण या राशीच्या लोकांच्या वाढवणार अडचणी; वेळीच रहा सावध\nशास्त्रानुसार 'या' तिथींना शारीरिक संबंध ठेवणं अशुभ; नात्यावर होतो वाईट परिणाम\nमी पंकजा गोपीनाथ मुंडे...\nमी पंकजा गोपीनाथ मुंडे...\n'टोल धोरणाचा आढावा घेणार'\nनगरसेवक ते मुख्यमंत्री...देवेंद्र फडणवीस यांचा अल्पपरिचय\nअसं असेल छोटं मंत्रिमंडळ\nअसा रंगणार 'महा'शपथविधी सोहळा \nफडणवीसांची राज की बात\n'माझे बाबा सीएम झाले'\nMoney Mantra - ही रास असेल तर गुंतवणूक करताना सावधान\nचांगली संधी मिळणार, नशिबाचीही साथ लाभणार; आज काय घडणार पाहा राशिभविष्य\n'या' कालावधीत संबंध ठेवताय 'ही' महत्त्वाची माहिती नक्की वाचा\nप्रेम, कॉमेडी की थ्रीलर; या विकेंडला तुम्ही कोणतं नाटक पाहणार\n अभिनेत्रीच्या हॉटनेसवर ज्येष्ठ अभिनेतेही फिदा\n'लोकांनी मला कचरा...'; बिग बॉसच्या घरात अब्दु रोजिकला आठवले 'ते' दिवस\nलंडनहून परतताच प्राजक्ताची भलतीच लगबग; म्हणाली \"माझ्यासाठी आजचा...\"\n'बिग बॉस मराठी'च्या घरात सुरु होणार भन्नाट टास्क; कोण ठरणार 'पहिला कॅप्टन'\nआता पोस्टातही मिळणार अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टसारख्या सुविधा, करता येणार ऑनलाइन खरेदी\n70 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही या 5 मस्त स्कूटर खरेदी करू शकता\nखात्यात चुकून आले 11 हजार कोटी, बँकेत न जाता खेळला असा गेम, पाहूण सगळेच हैराण\nIPL मध्ये आता खेळू शकेल इम्पॅक्ट प्लेअर, नव्या नियमामुळे प्लेअर्सची होणार चांदी\nतुमच्यासाठी क्रेडिट कार्डची निवड कशी कराल तज्ज्ञांचं सल्ला समजून घ्या\nक्रिती सेनन 'बाहुबली' स्टार प्रभासला करतेय डेट 'या' कारणामुळे चर्चेला उधाण\nअमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचं नाव 'प्रतीक्षा' का बिग बीनी सांगितलं कारण\nमदतच नव्हे तर रक्तदान आपल्या आरोग्यासाठीही उत्तम, जाणून घ्या 5 मोठे फायदे\nसरकारच्या या योजनेत गुंतवणूक करा आणि 21000 दरमाह मिळवा, काय आहे योजना\nशाहरुख खानच्या लेकीला भेटली आपलीच कार्बन कॉपी; दुबई व्हेकेशनचे फोटो आले समोर\nमहागड्या तेलांची नाही गरज, भारदस्त दाढी-मिशांसाठी घरच्या-घरी असे बनवा तेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2022-10-07T22:22:03Z", "digest": "sha1:GTXGAXS4REHUJMCKLEVSM36OCUVAB26J", "length": 4234, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चिलीचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मे २०१४ रोजी ०९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1478/", "date_download": "2022-10-07T23:00:52Z", "digest": "sha1:JHFVHGHKOFURFA542JDMEM3SOLPMHL7G", "length": 7557, "nlines": 78, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "डिटोनेटर स्फोट‌ प्रकरणात आणखी चार आरोपींना पोलीस कोठडी - Rayatsakshi", "raw_content": "\nडिटोनेटर स्फोट‌ प्रकरणात आणखी चार आरोपींना पोलीस कोठडी\nडिटोनेटर स्फोट‌ प्रकरणात आणखी चार आरोपींना पोलीस कोठडी\nचार जणांना 23 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.\nरयतसाक्षी, नांदेड:शांतीनगर भागात झालेला डिटोनेटर स्फोट प्रकरणात उमरखेड तालुक्यातील ढाकणी एक आणि हिमायतनगर येथील तीन अशा चार नवीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी या नवीन चार जणांना 23 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.\nइतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतीनगर भागात 8 जानेवारी रोजी एक स्फोट झाला. तो स्फोट डिटोनेटर प्रकाराचा होता. याबाबत इतवारा पोलीस ठाण्यात ज्या घरात डिटोनेटर सापडले आणि त्या डिटोनेटरला तपासण्यात जखमी झालेल्या दिपक दिगंबर धोंगडे (24) आणि त्याचा नातलग केशव शिवाजी पवार (41) ज्याने हे डिटोनेटर आणून धोंगडेच्या घरात ठेवले होते अशा दोघांना अटक झाली.\nआज या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांनी बळीराम रामा नरवाडे (40) व्यवसाय ब्लॉस्टींग रा.ढाणकी ता.उमरखेड जि.यवतमाळ, साहेबराव फकीरा चव्हाण (43) व्यवसाय दगडफोडने रा.जनता कॉलनी हिमायतनगर जि.नांदेड, राजू बाबू यमलवाड(20) व्यवसाय दगडफोडने रा.वाळकेवाडी ता.हिमायतनगर जि.नांदेड, बाबूलाल हिरामणी पटेल (41) व्यवसाय व्यवस्थापक के्रेशर मशीन खडकी ता.हिमायतनगर जि.नांदेड या चार जणांना पकडून आज न्यायालयासमक्ष हजर केले.\nआपल्या अभिलेखात पोलीस सांगतात सदर डिटोनेटर केशव पवार यांच्याकडे जाणिव पुर्वक कोणता उद्देश ठेवून दिले आहे याचा तपास करणे आहे. डिटोनेटरचा कांही मोठा साठा कोठे ठेवला आहे काय आणि त्यांचे इतर कोणी साथीदार आहेत काय आणि त्यांचे इतर कोणी साथीदार आहेत काय याचा शोध घेणे आहे असा युक्तीवाद मांडला. युक्तीवाद ऐकून न्या.कुलकर्णी यांनी या चार जणांना 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.\nपंकज कुमावत यांची दबंग कारवाई : १७ चंदन तस्करांच्या मुसक्या आवळल्या\nहिंगोली जिल्ह्यात खळबळ :पती-पत्नीच्या नात्याला काळीमा पतीच्या संमतीने मित्राचा विवाहितेवर अत्याचार\nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७…\nवडवाडी दरोडा प्रकणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या\nआठ जणांना अटक:बनावट नोटा चलनात खपवू पाहणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश;…\nभंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/2369/", "date_download": "2022-10-07T21:11:05Z", "digest": "sha1:7I4JCVX2PDZBR3HPECZ7LN3GXWN7PFLG", "length": 18817, "nlines": 91, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "जिल्हा परिषदेची प्रभाग रचना निश्चित , गट- गणात कोणत्या गावांचा समावेश वाचा - Rayatsakshi", "raw_content": "\nजिल्हा परिषदेची प्रभाग रचना निश्चित , गट- गणात कोणत्या गावांचा समावेश वाचा\nजिल्हा परिषदेची प्रभाग रचना निश्चित , गट- गणात कोणत्या गावांचा समावेश वाचा\nनिवडणूकीचा मार्ग मोकळा , प्रभाग रचनेत अंशत बदल\nबीड, रयतसाक्षी: जिल्हा परिषदेचे ६९ गट व पंचायत समितीच्या १३८ गणांची अंतिम प्रभाग रचना विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी अंतिम केल्यानंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी मंगळवारी दि.२७ अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात ६९ गट व १३८ गणांवर शिक्कामोर्तब झाले आहे . दरम्यान , जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेल्या आक्षेप अर्जावरून आष्टी, गेवराई, माजलगांव आणि केज या चार तालुक्यातील गट, गणात अंशत बदल करण्यात आला आहे.\nजिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दि.२ जून रोजी जिल्ह्यातील ६९ गट व पंचायत समितीच्या १३८ गणांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द केल्यानंतर आक्षेप नोंदविण्यास मुदत दिली होती. या मुदतीत जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल १५१ गट, गणाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीवर विभागीय आयुक्त कार्यालयात दि. १७ जून रोजी सुनावणी घेण्यात आल्या.\nया सुनावणीनंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दि. २२ जून रोजी प्रभाग रचना अंतिम केली. त्यानंतर ही अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी दि.२७ जून रोजी गट व गणांची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द केली आहे. या नव्या अंतिम प्रभाग रचनेनुसार आता जिल्ह्यात ६९ गट तर १३८ गण असणार आहेत हे निश्चित झाले आहे. आक्षेप अर्जानंतर आष्टी, गेवराई, केज व माजलगांव तालुक्यातील गट व गणात बदल झाला आहे. एका गट व गणातील गावे दुसऱ्या गट वा गणात टाकण्यात आले आहेत\nदरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी दि.२७ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेनुसार गेवराई तालुक्यातील रेवकी गटात बाग पिंपळगाव व रेवकी गण, तलवाडा गटात तलवाडा व अंतरवली गण, जातेगाव गटात जातेगाव, रोहितळ, गढी गटात गढी, सिरसदेवी, धोंडराई गटात धोंडराई, राजपिंप्री, उमापूर गटात उमापूर, गुळज, चकलांबा गटात चकलांबा, बंगाली पिंपळी, मादळमोही गटात मादळमोही, कोळगाव, पाडळशिंगी गटात पाडळशिंगी, सिरसमार्ग, रुई गटात रुई, पांचेगाव तर वडवणी यातील कवडगाव, गटा हरिश्चंद्र पिंपरी, उपळी गटात उपळी, कुप्पा, चिखलबीड गटात चिखलबीड, चिंचवण.\nबीड तालुक्यातील राजुरी नवगण गटात राजुरी, कामखेडा, बहिरवाडी गटात बहिरवाडी, माळापुरी, नाळवंडी गात, नाळवंडी, घोड़का राजुरी, पिंपळनेर गटात पिंपळनेर, वडगाव गुंदा, ताडसोन्ना गटात ताडसोन्ना, ढेकणमोहा, पाली गटात पाली, येळंबघाट, लिंबागणेश गटात लिंबागणेश, चऱ्हाटा, नेकनुर गटात नेकनुर, मोरगाव, चौसाळा गटात चौसाळा, बोरखेड तर शिरूर तालुक्यातील मातोरी गटात मातोरी, फुलसांगवी, पाडळी गटात पाडळी, राक्षसभुवन, पिंपळनेर गटात पिंपळनेर, वारणी, रायमोहा गटात रायमोहा, खालापुरी, पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही गटात, डोंगरकिन्ही, पिट्टी, तांबाराजुरी गटात तांबाराजुरी, थेरला, अंमळनेर गटात, अंमळनेर, कुसळंब, सौताडा गटात सौताडा, पारगाव.\nतर आष्टी तालुक्यातील दौलावडगाव गटात दौलावडगाव, सावरगाव घाट, धामणगाव गटात, धामणगाव, सुरुडी, बीड सांगवी गटात, बीडसांगवी, ब्रम्हगाव, धानोरा गटात धानोरा, डोंगरगण, लोणी गटात लोणी, रुई नालकोत, कडा गटात कडा, शिराळ, मुर्शदपूर गटात मुर्शदपूर, खडकत, आष्टा गटात आष्टी, पांढरी. तर केज तालुक्यातील विडा गटात विडा, येवता, आडस गटात आडस, जिव्हाची वाडी, होळ गटात होळ, उंबरी, नांदूरघाट गटात नांदूरघाट, शिरुरघाट, चिंचोळीमाळी गटात चिंचोळीमाळी, टाकळी, युसूफवडगाव गटात युसूफवडगाव, सोनी जवळा, बनसारोळा गटात बनसारोळा, जवळबन, धारुर तालुक्यातील तेलगाव गटात तेलगाव, मोहखेड, भोगळवाडी गटात भोगळवाडी, जहांगिरमोहा, आसरडोह गटात, आसरडोह, मोहा.\nपरळी तालुक्यातील पिंप्री बु. गटात पिंप्री बु, पोहनेर, सिरसाळा गटात सिरसाळा, पिंपळगाव गाडे, टोकवाडी गटात, टोकवाडी, पांगरी, नागापूर गटात, नागापूर, मोहा, जिरेवाडी गटात जिरेवाडी, दोनापूर, दाऊतपूर गटात दाऊतपूर, नंदागौळ, धर्मापुरी गटात धर्मापूरी मांडवा तर माजलगाव तालुक्यात सादोळा, मोगरा, किट्टी आडगाव, टाकरवण, तालखेड, पात्रुड, दिंद्रुड हे गट, अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी गटात मोरेवाडी येल्डा, घाटनांदूर गटात, घाटनांदूर, जवळगाव, पट्टीवडगाव गटात पट्टीवडगाव, उजनी, बर्दापूर गटात बर्दापूर, लिंबगाव, जोगाईवाडी गटात जोगाईवाडी सायगाव, चनई गटात चनई, लोखंडी सावरगाव,पाटोदा गटात पाटोदा, राडी हे अंतिम गट व गण असणार आहेत.\nरेवकी, टाकरवण, चिंचोलीमाळीसह लोणी गटात बदल\nजिल्हापरिषद गट व पंचायत समिती गण रचना नुकतीच जाहीर करण्यात आली होती. या रचनेवर कोणाचा आक्षेप असेल तर तो सादर करण्यासंदर्भात निवडणूक विभागाकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाभरातून ११७ आक्षेप दाखल करण्यात आले होते.\nयाची सुनावणी आयुक्तांसमोर झाली. त्यावर निर्णय घेवून काही गट, गणात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये गेवराई तालुक्यातील रेवकी गटातील गैबीनगर तांडा धोंडराई गटात समाविष्ट करण्यात आला आहे. माजलगाव तालुक्यातील टाकरवण गटांतर्गत वाघोरा गणात असलेले सुड़ीं नजीक हे टाकरवण गणात समाविष्ट करण्यात आले तर टाकरवण मधील बाराभाई तांडा वाघोरा गणात समाविष्ट करण्यात आला आहे.\nकेज तालुक्यातील चिंचोली माळी गटातील बोबडेवाडी हे गाव युसूफ वडगाव गटात समाविष्ट करण्यात आले आहे. आष्टी तालुक्यातील लोणी स. गटातील सोलापूरवाडी रुई नालकोल गटामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. तर रुई नालकोलमधील खरडगव्हाण लोणी स. मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. याबरोबरच कडा गटातील पिंप्री घुमरीचा रुई नालकोल गटामध्ये समावेश करण्यात आला आहे.\nटाकळी आमीया कडा गटात बदल\nआष्टी तालुक्यातील टाकळी अमीया हे पंचायत समिती गणाचे गावच कडा गटात समाविष्ट झाल्याने आता त्याऐवजी रुई नालकोल हा पंचायत समिती गण करण्यात आला आहे.\nढेकणमोहा तांडा ग्रामपंचायतीचा कोणत्याच गटात समावेश नाही\nसोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या बीड तालुक्यातील अंतिम जिल्हा परिषद गट / पंचायत समिती गण रचनेत निवडणुक आयोगाच्या निकषानुसार ताडपोन्ना गटात सामाविष्ट होऊ शकणाऱ्या ढेकणमोहा तांडा हे गाव स्वतंत्र ग्रामपंचायत असून सदरील ग्रामपंचायत ही प्रशासनाच्या गलथान काराभारामुळे जिल्ह्यातील कोणत्याही जिल्हा परिषद गटात समाविष्ट करण्यात आलेले नाही. ही अतिशय गंभीर बाब असून, या प्रकरणात प्रशासन व असुरी राजकीय शक्तींचा हस्तक्षेप उघडरीत्या दिसत आहे.\nविभागीय आयुक्‍तांच्या निर्णयानंतर जिल्‍हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध‍ केली आहे. प्रभाग रचना अंतिम झाली असल्याने आता या ६९ जिल्‍हा परिषद मतदारसंघातील आरक्षण जाहीर होतील. त्यामुळे रचना अंतिम झाल्याने आता मतदारसंघाच्या आरक्षण सोडतीकडे इच्‍छुकांचे लक्ष लागले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.\nवेट अँड वॉच च्या पावित्र्यातील भाजप अक्श्न मोडवर, उद्या ठाकरे सरकारची बहुमत चाचणी\nजिल्हा वार्षिक योजना , उर्वरित निधी बाबत विकास कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत- पालकमंत्री धनंजय मुंडे\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/334/", "date_download": "2022-10-07T21:45:22Z", "digest": "sha1:ZMTCQQHBZ6OCWJJTK6OEDP67X2BACQ74", "length": 9565, "nlines": 83, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची कोर्टात सशर्त माफी - Rayatsakshi", "raw_content": "\nराज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची कोर्टात सशर्त माफी\nराज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची कोर्टात सशर्त माफी\nएनसीबचे विभागिय संचालक समिर वानखेडे कुटूंबीयाबाबतवक्तव्य प्रकरण\nमुंबई, रयतसाक्षी: केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांबाबत यापुढे कोणतेही विधान करणार नाही अशी हमी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्य न्यायालयात दिली आहे. गे\nन्यायालयाने कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची लेखी हमी देऊनही त्याचे हेतुत: उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमान कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा करत नवाब मलिक यांनी खडसावलं होतं. तसंच १० डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले होते.\nनवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली असून यापुढे कोणतीही विधाने करणार नसल्याची पुन्हा एकदा हमी दिली आहे.\nनवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यातील अंतरिम दिलासा मिळवण्याच्या मागणीवर एकलपीठातर्फे निर्णय दिला जाईपर्यंत वानखेडे कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी लेखी हमी मलिक यांनी दिली होती. मात्र त्यानंतरही आपल्या कुटुंबीयांवरील आरोपांचे सत्र सुरूच असल्याची बाब ज्ञानदेव यांनी न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती र्मिंलद जाधव यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली होती.\nअवमान याचिका का दाखल करण्यात येऊ नये ; वानखेडे प्रकरणी नवाब मलिक यांना कौरवांची विचारणा\nमलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांविरोधातील आरोपपत्र कायम ठेवून न्यायालयाला दिलेल्या हमीचे उल्लंघन केल्याचेही ज्ञानदेव यांच्या वतीने अ‍ॅड. बीरेंद्र सराफ यांनी मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाला सांगितलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांविरोधात केलेल्या वक्तव्यांचा तपशील असलेले प्रतिज्ञापत्रही ज्ञानदेव यांच्यातर्फे न्यायालयात सादर करण्यात आले.\nवानखेडे कुटूंबाविरोधात वक्तव्यकरणार नसल्याची मंत्री मलिक यांची हमी\nत्याची दखल घेऊन ही वक्तव्ये मलिक यांनी वैयक्तिक पातळीवर केली की राजकीय पक्षाचे प्रवक्ते म्हणून केली आहेत, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यांनी वैयक्तिक पातळीवर वक्तव्ये केली असतील तर त्यांना आताच न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देऊन स्पष्टीकरण द्यायला सांगू, असेही न्यायालयाने बजावलं होतं. त्यावर मलिक यांनी ही वक्तव्ये राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून केल्याचे त्यांची बाजू मांडणाऱ्या अ‍ॅड. कार्ल तांबोळी यांनी न्यायालयाला सांगितलं होतं.\nशेतकऱ्यांच्या हितासाठी जय महेश वाचवणे गरजेचे– नारायण होके\nसोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/2430", "date_download": "2022-10-07T22:22:00Z", "digest": "sha1:WE2IU2JFBU6BHZRQG6P4OTF4MB5TXLPP", "length": 14706, "nlines": 109, "source_domain": "bollyreport.org", "title": "अखेर अमिताभ बच्चन यांच्या २८०० करोड संपत्तीचा वारसदार ठरला, हे असतील अमिताभ यांच्या संपत्तीचे वारसदार ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News अखेर अमिताभ बच्चन यांच्या २८०० करोड संपत्तीचा वारसदार ठरला, हे असतील अमिताभ...\nअखेर अमिताभ बच्चन यांच्या २८०० करोड संपत्तीचा वारसदार ठरला, हे असतील अमिताभ यांच्या संपत्तीचे वारसदार \nबॉलिवुडला अनेक परिवारांचा वारसा लाभला आहे. त्यातल्या बच्चन कुटुंबाशिवाय बॉलिवुड अधुरे आहे असे म्हटल्यास हरकत नाही. या परिवारातील बहुतेक सदस्यांनी हि्ंदी सिनेसृष्टीत त्यांच्या अभिनयाची जादु दाखवली आहे. या परिवारातील प्रत्येक सदस्याची स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे. मात्र या कुटुंबाची लाडकी लेक श्वेता नंदा ही अभिनय क्षेत्रापासुन दुर राहणे पसंत केले.\nपरंतु असे असुन देखील ती बरेचदा लाईमलाइटमध्ये असते. श्वेताचे लग्न दिल्लीचे बिझनेसमन निखिल नंदा सोबत झाले तर अभिषेक बच्चनने जगातील सर्वाच सुंदर महिलांपैकी एक असणाऱ्या ऐश्वर्या राय सोबत लग्न केले. बच्चन परिवाराला अनेकदा एकाच छताखाली आनंद साजरा करताना पाहिले गेले आहे.\nतसे पाहायला गेले तर या परिवारातील प्रत्येक सदस्य एकमेकांवर खुप प्रेम करतो मात्र तरीही ऐश्वर्या राय व तिची नंणद श्वेता नंदा यांचे नाते कसे आहे याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यासोबतच अमिताभ यांच्या संपत्तीबद्दल सुद्धा सांगणार आहोत.\nकुटुंबाची लाडकी सून – अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबाची लाडकी सून आहे. तर श्वेता संपुर्ण कुटुंबाची लाडकी मुलगी आहे. तिच्या लग्नानंतर सुद्धा बच्चन परिवार तिच्यावर खुप प्रेम करतो. ऐश्वर्याचे सुद्धा तिच्या नंणदेवर खुप प्रेम आहे. या दोघांचे खुप चांगले नाते आहे. मात्र तरीही सोशल मीडियामुळे लोकांना या दोघींचे नक्की नाते कसे आहे हे समजत नाही. मात्र प्रत्यक्षात या दोघी सोशल मीडियापासुन खुप दूर असतात. त्या पार्टी आणि इव्हेंट्समध्ये बऱ्यादा एकत्र दिसतात.\nअमिताभ यांनी संपत्तीचे केले दोन भाग – अमिताभ यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे ते त्यांची संपत्ती कोणाच्या नावावर करणार यावर अनेकदा प्रश्न विचारले जातात. काहींचे म्हणणे आहे कि बिग बी त्यांची संपत्ती त्यांच्या मुलाच्याच नावावर करतील. मात्र काही दिवसांनी स्वत: अमिताभ यांनीच सांगितले होते की त्यांच्या संपुर्ण संपत्तीचा मालक हा केवळ अभिषेक नसणार तर त्यात श्वेतासुद्धा बरोबरीची वारसदार असणार आहे.\nमीडिया रिपोर्टस् नुसार अमिताभ बच्चन यांच्याकडे २८०० करोड रुपयांची संपत्ती आहे. या संपत्तीची दोन भागात विभागणी केल्यास श्वेताकडे १४०० करोड रुपये व अभिषेक कडे १४०० रुपये जातील. अमिताभ यांनी संपत्तीच्या वाटणीवरुन घेतलेल्या निर्णयावरुन हे सिद्ध होते की ते मुलगा मुलगी यांच्यात भेदभाव करत नाही. त्यांच्यासाठी दोघेही समान आहेत.\nनंणदेला ऐश्वर्याची ही सवय आवडत नाही – एका टॉक शो दरम्यान श्वेता नंदाने तिच्या वहिनी बाबत काही गोष्टी सांगितल्या. या शोमध्ये तिने तिच्या वहिनीच्या वाईट सवयीसुद्धा सांगितल्या. श्वेताने सांगितले कि ऐश्वर्याचे वेळेचे नियोजन चांगले नसुन ती वेळेत कधील कॉल बॅकस करत नाही. मात्र श्वेताचे ऐश्वर्यावर खुप प्रेम आहे.\nया शोमध्ये श्वेताने तिची भाची आराध्याबद्दल सुद्धा सांगितले. श्वेता म्हणाली कि आराध्या तिच्या वयाच्या मानाने खुपच समजूतदार आहे. या शोमध्ये अभिषेकलासुद्धा विचारले गेले होते कि तो जया बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यात कोणाला जास्त घाबरतो. यावर अभिषेकने सांगितले कि त्याचे त्याच्या पत्नीवर खुप प्रेम आहे. मात्र त्याला ऐश्वर्याची पॅकिंग स्किल बिलकुल आवडत नाही.\nअभिषेक कोणाला घाबरतो या प्रश्नावर श्वेताने सांगितले कि, अभिषेक आईपेक्षा त्याची पत्नी ऐश्वर्याला खुप घाबरतो. श्वेताच्या उत्तरावर तेथील प्रेक्षक खुप हसु लागले होते. श्नेता नंदा लग्नानंतर सुद्धा अनेकदा सणसुदीला माहेरीच सेलिब्रेशन करताना दिसते. चाहात्यांना बच्चन कुटुंबाची बॉंण्डींग खुप आवडते. बच्चन कुटुंब त्यांचे वयक्तिक आयुष्य सोशल मीडियापासुन दूर ठेवते.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleया कारणामुळे तब्बल २२ चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव होते ‘विजय’, कारण जाणून थक्क व्हाल \nNext articleया कारणामुळे जॅकी श्रॉफ यांनी मुलाचे नाव ‘टायगर’ ठेवले, कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/weight-loss-tips-these-zero-calorie-foods-having-in-breakfast-will-help-to-loose-weight-mhpj-746827.html", "date_download": "2022-10-07T22:18:10Z", "digest": "sha1:4NCGNCG5XRIDQ66L2RAX2URVOA4626U3", "length": 6846, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Weight loss tips these zero calorie foods having in breakfast will help to loose weight mhpj - Weight Loss Tips : हे झिरो कॅलरी फूड वजन कमी करण्यात आहेत एक नंबर! नाश्त्यात करा समावेश – News18 लोकमत", "raw_content": "\nWeight Loss Tips : हे झिरो कॅलरी फूड वजन कमी करण्यात आहेत एक नंबर\nबदलत्या काळात चालणे, शारीरिक कष्ट आणि व्यायाम सर्व कमी झाले आहे. त्यामुळे तंदुरुस्त राहण्यासाठी वजन कमी करणे ही एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. त्यासाठीच आम्ही तुम्हाला काही आवश्यक पदार्थांबद्दल सांगणार आहोत.\nवजन कमी करणे जरी सोपे नसले तरी योग्य आहाराचा समावेश असलेली निरोगी जीवनशैली राखून हे साध्य केले जाऊ शकते. वजन कमी करण्यासाठी काही झिरो कॅलरी फूड खाल्यास मदत होते.\nहे पदार्थ केवळ वजन कमी करण्यातच मदत करत नाही तर निरोगी आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अन्न घेणे सुरू करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नाही. हे काही कमी चरबीयुक्त, कमी कॅलरी असलेले शाकाहारी नाश्त्यात पदार्थ आहारात समाविष्ट करा.\nटरबूज : टरबूज शून्य-कॅलरी अन्न आहे, ज्यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यात सिट्रुलीन देखील आहे, जे एक अमीनो ऍसिड आहे. हे शरीर आर्जिनिनमध्ये बदलते, जे वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते.\nब्रोकोली : अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा हा एक उत्कृष्ट स्रोत आहे आणि म्हणूनच ते निरोगी पदार्थांच्या यादीत अग्रस्थानी आहे. ब्रोकोली शून्य-कॅलरी असलेला पदार्थ असून एक कप कच्च्या ब्रोकोलीमध्ये संत्र्याइतके व्हिटॅमिन सी आणि फायबर असते.\nकेल : ही हिरवी पालेभाजी प्रभावी पौष्टिक फायद्यांसाठी प्रसिद्ध आहेत. ही जगातील व्हिटॅमिन K च्या सर्वात श्रीमंत स्त्रोतांपैकी एक आहे, तर कमी कॅलरी एक बोनस आहे. तुम्ही सॅलड्स, स्मूदीजमध्येही केल टाकू शकता.\nबीट्स : शून्य कॅलरी असलेल्या सर्वात कमी दर्जाच्या भाज्यांपैकी ही एक आहे. हे तुमचे रक्तदाब कमी करण्यास आणि मेंदूची शक्ती वाढवण्यासदेखील मदत करते. हे अँटिऑक्सिडंट्सने देखील भरलेले आहे.\nमशरूम : हजारो वर्षांपासून हे अत्यंत औषधी अन्न म्हणून ओळखले जाते. वजन कमी करण्यासाठी शून्य-कॅलरी अन्न असण्याव्यतिरिक्त, मशरूम पचन सुधारण्यास देखील मदत करू शकतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/mumbai-news-hindu-heart-emperor-balasaheb-thackeray-samriddhi-highway/", "date_download": "2022-10-07T22:54:11Z", "digest": "sha1:YKGDZ4LHM4OJD2V4P2F65CRPBJU6F3PR", "length": 14073, "nlines": 44, "source_domain": "mahaupdate.in", "title": "Mumbai news: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Maha Update", "raw_content": "\nHome » Mumbai news: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nMumbai news: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा, गोंदिया, आणि नागपूर ते गडचिरोलीपर्यंत पुढे वाढविण्यात येणार आहे. गडचिरोली पर्यंतच्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून भूसंपादन प्रक्रिया आणि इतर बाबींसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.\nचालू आर्थिक वर्षाच्या नगरविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आणि नियोजन विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.\nमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर, तातडीने करण्यात येईल. रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची पूरक मागणी प्रस्तावित केली आहे. पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अडीचशे कोटी रुपये वर्ग केले आहेत. रांजनोली- मानकोली उड्डाणपुलावरील काही भागातील खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर करण्यात आला आहे. दर्जेदार कामासाठी रेडीमिक्स वापरण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.\nआरे वसाहतीमधील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. मेट्रो मार्ग ५ चा विस्तार करण्यात येणार आहे. ही मार्गिका ठाणे-भिवंडी-कल्याण पुढे शहाड – टिटवाळा पर्यंत नेण्याबाबत आवश्यकतेनुसार विचार करण्यात येईल. ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून पठाणवाडी येथील रिटेनिंग वॉलसंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. मुंबई महानगरात ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून स्कायवॉक बांधण्यात आलेले आहेत. या स्कायवॉकची उपयुक्तता पाहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून आढावा घेण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी स्कायवॉकचा वापर ज्येष्ठांना करताना अडचणी निर्माण होतात, त्यासाठी सरकते जिने, अथवा उदवाहने बसविण्याचा विचार आहे.\nकाही नगरपालिकांची आर्थिक परिस्थिती पाहता विकासकामे थांबणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नवीन रस्ते डांबरीकरणाचे आणि काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nस्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो केंद्राला वित्तीय व तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला आहे, केंद्राच्या मान्यतेनंतर या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल, आणि निधी उपलब्ध करून देण्यात येईल. खडकवासला-स्वारगेट पुलगेट हडपसर-लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये तांत्रिक बाबींची तपासणी करून नागपूर मेट्रोच्या धर्तीवर डबल डेकरचा समावेश करण्याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.\nगोंदिया शहरात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आले आहेत, त्याला मंजुरी देखील मिळाली आहे, त्यात १५५५ लाभार्थी संख्या आहे. कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना देण्यात येतील. वसई-विरार महानगरपलिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह उघड्या गटारींवरील झाकणे बसविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. तुटलेल्या लोखंडी, सिमेंट झाकणांची मागणी नोंदविण्यात आली असून आतापर्यंत ५ हजारपेक्षा अधिक झाकणे बसविण्यात आली आहेत, उर्वरित बसविण्याच्या सूचना देण्यात येतील. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना तातडीने वेळेवर पैसे देण्याचे निर्देश देण्यात येतील. पुरवणी मागणीद्वारे सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व सूचनांची दखल घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.\nउपमुख्यमंत्री तथा नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस उत्तरात म्हणाले, निधी वाटपात कोणावरही अन्याय होवू नये हीच शासनाची भूमिका आहे. मागील सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिलेली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री कामांचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करणार आहेत. निधी वाटपात सर्वांचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, राज्यात रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आणि खड्डे बुजवण्याचे काम लवकरात लवकर होईल यासाठी सकारात्मक प्रयत्न करणार आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी आवश्यकतेनुसार निधी दिला जाईल तसेच हॅमच्या कामांसंदर्भात बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.\nयावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुरवणी मागण्या मंत्री संजय राठोड यांनी मांडल्या होत्या.\nनगरविकास विभागाच्या सन २०२२-२३ वर्षाच्या सुमारे १८८६ कोटी ४१ लाख रुपयांच्या मागण्या यावेळी विधानसभेत मंजूर करण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या सुमारे २४०० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या यावेळी मंजूर करण्यात आल्या.\nMumbai : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील छायाचित्र प्रदर्शनास मुख्यमंत्र्यांची भेट\nMumbai news: नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूया, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद\nMumbai news:केंद्राच्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत वाशिम जिल्ह्याचा गौरव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/father-in-law-ties-knot-with-daughter-in-law-unique-love-story-mhkp-597558.html", "date_download": "2022-10-07T22:19:11Z", "digest": "sha1:AAP4P3B36LZ2WXJ2O3W5XOD5DKANKNMY", "length": 9187, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुनेच्या प्रेमात पडला सासरा; पळून जात केलं लग्न, काही वर्षांनी बाळाला घेऊन घरी परतले पण... – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nसुनेच्या प्रेमात पडला सासरा; पळून जात केलं लग्न, काही वर्षांनी बाळाला घेऊन घरी परतले पण...\nसुनेच्या प्रेमात पडला सासरा; पळून जात केलं लग्न, काही वर्षांनी बाळाला घेऊन घरी परतले पण...\nहातावरच्या सगळ्यात छोट्या बोटाखाली बुधाचा उंचवट्यापर्यंत जाणाऱ्या रेषेला विवाह रेषा म्हटलं जातं.\nमहिलेचं लग्न जेव्हा तिच्या पहिल्या पतीसोबत झालं तेव्हा ती अल्पवयीन होती. यानंतर महिलेनं पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला. तिनं आपल्या इच्छेप्रमाणे सासऱ्यासोबत लग्न केलं\nरात्री गुपचूप भेटत होते GF-BF; ग्रामस्थांनी मिळून लव्ह स्टोरीचा केला The End\nघराबाहेर उभ्या असलेल्या बहिणींसमोर भावाला उडवलं; कार अपघाताचा थरारक Video\nInstagram च्या फॉलोअर्सवरुन घडला भयानक प्रकार, तरुणीने दिले चॅलेंज अन् दोघांचा..\nVIDEO- मोठ्याने पिपाणी वाजवणाऱ्यांची वाजली पुंगी; आता तोंडानेही आवाज निघणार नाही\nनवी दिल्ली 27 ऑगस्ट : प्रेमात वयाचं बंधन नसतं, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अनेकजण प्रेमासाठी (Love Story) समाजाच्या विरोधात जातात, असे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. मात्र, आता एक अजब प्रकरण समोर आलं आहे. यात एका सासऱ्याचंच आपल्या सुनेवर प्रेम जडलं. इतकंच नाही तर यानंतर सासरा आपल्या सुनेला घेऊन पळूनही गेला. यात सुनेचीही सहमती (Father In Law Ties Knot With Daughter In Law) होती. नंतर काही वर्षांनी दोघंही आपल्यासोबत एक दोन वर्षांचं बाळ घेऊन घरी परतले. VIDEO - आता केक कापणार नाही तर...; बर्थडेवरून भडकलेल्या GF ने BF ला दिली धमकी इंडिया डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बदायूमधील बिसोली कोतवाली परिसरातील दबथरा गावातील आहे. महिलेच्या आधीच्या पतीनं आपल्या पत्नी आणि वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पंचायत बोलवण्यात आली. मात्र, सर्वांनी सासरे आणि सुनेच्या बाजूनेच निर्णय दिला. महिलेचं लग्न जेव्हा तिच्या पहिल्या पतीसोबत झालं तेव्हा ती अल्पवयीन होती. यानंतर महिलेनं पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला. महिलेनं आपल्या इच्छेप्रमाणे सासऱ्यासोबत लग्न केलं. नर्सचा डान्स VIDEO घालतोय धुमाकूळ; व्हायरल होताच अधिकाऱ्यांनी घेतली अ‍ॅक्शन समोर आलेल्या वृत्तानुसार, महिला आणि तिच्या पहिल्या पतीचं लग्न 2016 मध्ये झालं होतं. घाईत लग्न करण्याचं कारण एका वर्षापूर्वीच झालेलं मुलाच्या आईचं झालेलं निधन होतं. यानंतर मुलासोबत लग्न केलेल्या सुनेवरच सासऱ्याचं प्रेम जडलं आणि नंतर दोघंही एकमेकांवर प्रेम करू लागले. यानंतर महिलेनं निर्णय घेतला की पतीसोबत घटस्फोट घेऊन ती सासऱ्यासोबत लग्नगाठ बांधेल. आपल्या सुनेसोबत लग्नगाठ बांधणाऱ्या व्यक्तीचं नाव देवानंद आहे. त्यांचं वय सुमारे 45 वर्ष आहे. लग्नानंतर सहा महिन्यांतच संबंधित महिला आणि तिच्या पतीच्या नात्यात दुरावा आला होता. यानंतर महिलेची आपल्या सासऱ्यासोबत जवळीक वाढली आणि दोघांनीही लग्न केलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/20-percent/", "date_download": "2022-10-07T21:45:47Z", "digest": "sha1:YK4HFO3CTIIUGIXGJPHWH47FJIGDU3RS", "length": 7616, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "20 percent Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n20 टक्के वाढीव अनुदान मिळणार तरी कधी\nपुणे - राज्यातील विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित तत्वावर परवानगी मिळालेल्या व 20 टक्के अनुदान मंजूर केलेल्या मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक, माध्यमिक ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/barbados/", "date_download": "2022-10-07T22:53:20Z", "digest": "sha1:CM7C6NPLUTG734D4YWEAMXKHGI23JWK7", "length": 7625, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Barbados Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n उपचारासाठी देश सोडला; पळून गेलेलो नाही – मेहुल चोक्सी\nसेंट जॉन : पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीने आता अजब दावा ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/barshi-mla/", "date_download": "2022-10-07T23:04:27Z", "digest": "sha1:DRZIBM3Y7TB6S2AM4YHNQDWAQSAVZYXA", "length": 7528, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Barshi MLA Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nबार्शीच्या आमदारांना आंधळकरांसाठी धमकी\nमुंबई : पुण्यातील माजी पोलिस अधिकारी आणि शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात राजकारण कराल तर मुंबईतून बाहेर पडू देणार ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/campaign-for-akhilesh-yadav/", "date_download": "2022-10-07T21:28:07Z", "digest": "sha1:BMSAFPRI6WU75VMDOGJXJLL4FBEXJRWJ", "length": 7731, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "campaign for Akhilesh Yadav Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nउत्तरप्रदेशात ममता करणार अखिलेश यादव यांचा प्रचार\nकोलकता - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचा (सप) प्रचार करणार आहेत. ममतांच्या तृणमूल कॉंग्रेसने याआधीच उत्तरप्रदेश विधानसभा ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/ind-vs-nz-2nd-test/", "date_download": "2022-10-07T21:54:42Z", "digest": "sha1:KDCU7H6ARARDP4J4MPGMVTIZL442HXP4", "length": 7749, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IND vs NZ 2nd Test Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nएजाज पटेलने एकाच डावात 10 बळी घेत रचला ‘इतिहास’\nमुंबई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. न्यूझीलंडच्या एजाज पटेलने मुंबई कसोटीत ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/central-railway-recruitment-2022-2422-vacancies/", "date_download": "2022-10-07T22:40:39Z", "digest": "sha1:LBP5RX57L4ICVGZASUKA5KZYIQDU32JO", "length": 7049, "nlines": 109, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2422 जागांसाठी भरती - Bharti jahirat #", "raw_content": "\nमध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2422 जागांसाठी भरती\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nमध्य रेल्वे तर्फे प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 2422 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 17 जानेवारी 2022 ते 16 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकता\nअर्ज कसा कराल : Mode of Application : ऑनलाईन पद्धतीने\nपरीक्षेचे नाव / Exam Name : –\nपदाचे नाव व तपशील / Post Details\nपद क्रमांक क्लस्टर नाव पद संख्या\n1 मुंबई 1659 जागा\n2 भुसावळ 418 जागा\n3 पुणे 152 जागा\n4 नागपूर 114 जागा\n5 सोलापूर 79 जागा\nपदाचे नाव शैक्षणिक पात्रता\nसंबंधित ट्रेड मध्ये ITI\nवयाची अट / Age Limit : 17 जानेवारी 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपरीक्षा शुल्क / Exam Fee\nमागासवर्गीय / SC/ST Category फी नाही\nमाजी सैनिक / Ex. Servicemen फी नाही\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख / Last date of online application : 16 फेब्रुवारी 2022\nअधिकृत संकेतस्थळ / Official Website : पाहा\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMPSC Group C Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC Subordinate Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022\nAir Force Agnipath Recruitment 2022 | भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022\nMPSC State Service Pre 2022 | महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 161 जागा\nMPSC Recruitment | पशुधन विकास अधिकारी पदाच्या 212 जागांसाठी भरती\nIndian Army Recruitment | भारतीय सेना भारती 90 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/1046", "date_download": "2022-10-07T22:30:24Z", "digest": "sha1:KBJTB4YRQPDISIPZJ4KFESK5WIGYMKFI", "length": 13877, "nlines": 108, "source_domain": "bollyreport.org", "title": "नवऱ्याला सोड चिट्टी दिल्यानंतर अभिनेत्री दिया मिर्झा या व्यक्तीसोबत ए कां ता त दिवस घालवत आहे ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News नवऱ्याला सोड चिट्टी दिल्यानंतर अभिनेत्री दिया मिर्झा या व्यक्तीसोबत ए कां ता...\nनवऱ्याला सोड चिट्टी दिल्यानंतर अभिनेत्री दिया मिर्झा या व्यक्तीसोबत ए कां ता त दिवस घालवत आहे \nबॉलीवूड ची सुंदर, सोज्वळ अशी व्याख्या असणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सर्वांची लाडकी दिया मिर्झा.\nहिला आपण अनेक चित्रपटात पाहिले आहे. “रहना हे तेरे दिल में” या चित्रपटात दियाने साकारलेली भूमिका सर्वांना आवडली होती आणि तिचं वागणं, बोलणं सर्वांना मो हू न गेले होते. आता सुद्धा दिया अनेक वर्षानंतर चर्चेचा विषय ठरलेली आहे पण यामागे वेगळेच कारण आहे. चला तर जाणून घेऊया त्या कारणाबद्दल.\nबॉलीवुडची सुंदर अभिनेत्री दिया मिर्झा सध्याच्या दिवसात आपल्या व्य क्ति ग त आयुष्याला घेऊन खूप चर्चेत आहे. बातमी अशी आहे कि दियाच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीचा प्रवेश झाला आहे. दिया मिर्झा सध्याच्या दिवसांत ब्रांदा येथील व्यावसायिक आणि गुंतवणूकदार वैभव रेखीला डे ट करत आहे. हो, प्रेम,लग्न आणि नंतर घ*ट*स्फो*टा*नंतर दिया मिर्झाच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाने आगमन केले आहे. अहवालानुसार सध्या दिया वैभव रेखी सोबत त्याच्या पाली हिल स्थित बंगल्यात राहत आहे.\nआपणास सांगू इच्छितो की, २०१९ मधेच दिया मिर्झाने तिचा पती साहिल सांघा सोबत घ*ट*स्फो*ट घेऊन वि भ क्त झाली होती. दोघांनी आपले पाच वर्षाचे जुने नाते तोडले. पतीपासून वेगळे झाल्यानंतर दियाने याबद्दल एक अ धि कृ त रित्या विधान सुद्धा केले होते. असे म्हटले जाते की, साहिल आणि दिया यांच्या वैवाहिक जीवनात स म स्या निर्माण होण्याचे कारण वैभव रेखी आहे. दियाचे नवीन प्रेम म्हणजेच वैभव रेखी याबद्दल बोलायचे झाल्यास आपणास सांगू इच्छितो की, वैभव रेखी हा सुद्धा घ*ट*स्फो*टी*त आहे. त्याच्या आधीच्या पत्नीचे नाव सुनैना रेखी आहे, जी एक योगा अभ्यासक आहे. वैभव आणि सुनैना यांना एक मुलगी सुद्धा आहे.\nदिया आणि वैभव यांच्यातील ओळख ही ट्विटरच्या माध्यमातून वाढली होती. लॉकडाउनचा काळ दोघांसाठी जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवण्यासाठी सुवर्णमय असा ठरला. एका अहवालानुसार लॉकडाऊन यादरम्यान दिया वैभव सोबत पाली हिल स्थित त्याच्या बंगल्यात राहत आहे. येथे दोघांना एकमेकांसोबत चांगला वेळ व्यतीत करण्यासाठी सुवर्णमय क्षण मिळत आहेत. दियाच्या जवळच्या लोकांचे सुद्धा असे म्हणणे आहे की, दिया आणि वैभव आपल्या नात्याला घेऊन खूप आनंदी आहे. दोघांची साथ त्यांना खूप आवडते आहे. जर या नात्याचा भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास दिया आणि वैभव सध्या कोणताच असा निर्णय घेऊ इच्छित नाहीत, जेणेकरून त्यांना स म स्या निर्माण होईल. सध्या तरी ते दोघे जण आपल्या या नात्याला जास्तीत जास्त वेळ देत आहेत.\nआपणास सांगू इच्छितो की, दिया मिर्झाने साहिल सांघा सोबत आपले पाच वर्ष जुने असलेले लग्न तोडले. दिया आणि साहिल यांचे लग्न १८ ऑक्टोबर २०१४ ला झाले होते. घ*ट*स्फो*टा*नंतर दियाने खूप काळ मौ न पाळले होते परंतु नंतर एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दरम्यान घ*ट*स्फो*ट आणि भविष्यातील नियोजन याबद्दल भाष्य केले होते. त्याने साहिल सांघा सोबत झालेल्या घ*ट*स्फो*ट बद्दल सांगितले होते की, घ*ट*स्फो*टाचा निर्णय घेतल्यानंतर मला कोणताच प च ता वा होत नाही.\nतिचे म्हणणे होते की, आता मला कोणती त क्रा र नाही. मी वयाच्या १४व्या वर्षापासून ध्या न धा र णा करत आहे. माझी प्रत्येक सकाळ सुंदर बागेत मी व्य ती त करते. माझे घर सुद्धा हिरवाईने भरलेले आहे. बाहेरच्या विश्वात खूप रा ग, क्रो ध आहे. माध्यमांमध्ये तर किती क्रो ध द्वे ष पाहायला मिळतो. परंतु आता दियाने आपल्या जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिया आणि वैभव यांच्या डे टिं गच्या बातम्या बाहेर आल्यानंतर त्या दोघांचे चाहते सुद्धा खूप आनंदी आहेत.\nजर आपल्याला वरील लेख आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका\nPrevious articleसारखं सारखं सुट्यांमध्ये सारा अली खान गोव्याला का जाते, मोठ्या गोष्टींवरचा पडदा निघाला, स्वतःच सांगितले कारण \nNext articleया ४० वर्षीय अभिनेत्रीवर मनापासून प्रेम करायचा शाहिद कपूर \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.statusinmarathi.com/search/label/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3+status", "date_download": "2022-10-07T21:56:40Z", "digest": "sha1:IDDHW2HEQS775IELDK6FA5YXXGOC4MBU", "length": 2299, "nlines": 28, "source_domain": "www.statusinmarathi.com", "title": "label/शुभ संध्याकाळ status - Status in Marathi", "raw_content": "\nstatusinmarathi.com या वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठी माणसापर्यंत प्रेरणादायी कविता, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी कोट्स, प्रेरक विचार आणि वाढदिवस शुभेच्छा , मराठी स्टेटस पोचवण्याचा प्रयन्त करत आहोत. जेणे करून त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.👍\nकोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२२ | Kojagiri purnima wishes in marathi 2022,status,quotes, Messages,Images, greetings शेअर करून द्या कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा.\nकोजागरी पौर्णिमा माहिती,कथा,महत्त्व,पूजविधी मराठी | kojagiri purnima information in marathi 2022.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.india.com/marathi/entertainment/bollywood-actress-sherlyn-chopra-accuses-raj-kundra-of-sexual-assault-4850299/", "date_download": "2022-10-07T21:37:57Z", "digest": "sha1:SNODRLK7BKGPIUVZTN2Y4WMSNENBN3F7", "length": 7284, "nlines": 58, "source_domain": "www.india.com", "title": "शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर केला लैंगिक शोषणाचा आरोप, म्हणाली - 'घरात घुसून जबरदस्ती किस करु लागला आणि...'", "raw_content": "\nशर्लिन चोप्राने राज कुंद्रावर केला लैंगिक शोषणाचा आरोप, म्हणाली - 'घरात घुसून जबरदस्ती किस करु लागला आणि...'\nशर्लिन चोप्राची ही तक्रार मुंबई क्राईम ब्रँचकडे गेली आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत.\nमुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Actress Shilpa Shetty) नवरा आणि बिझनेसमन राज कुंद्राच्या (Raj Kundra) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. नुकताच कोर्टाने राज कुंद्राची जामीन याचिका फेटाळत त्याच्या कोठडीत 15 दिवसांची वाढ केली आहे. यातच आता त्याच्यावर बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) लैंगिक शोषणाचा (Sexual Assault) आरोप केला आहे.Also Read - Zaheer Khan Birthday Special : झहीर खानची लव्हस्टोरी आहे खूपच फिल्मी, सागरिकाच्या कुटुंबियांना असं केलं होतं इम्प्रेस\nAlso Read - Sharad Kelkar Birthday: एकेकाळी कर्जबाजारी होता शरद केळकर, अभिनयाच्या जोरावर आज आहे कोट्यवधींचा मालक\nशर्लिन चोप्राने क्राईम ब्रँचला (Mumbai Crime Branch) तिच्यावर राज कुंद्राने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली आहे. शर्लिन चोप्राने राज कुंद्राविरोधात लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली होती. शर्लिन चोप्रा नेहमी चर्चेत असते. तिने 14 एप्रिल 2021 रोजी राज कुंद्राविरोधात तक्रार (FIR Against Raj Kundra) दाखल केली होती. या तक्रारीमध्ये तिने असा खुलासा केला होता की, 2019 मध्ये राज कुंद्राने तिच्या बिझनेस मॅनेजरला एका प्रोपजलवर (Business Praposal) चर्चा करण्यासाठी बोलावले होते. 27 मार्च 2019 रोजी बिझनेस मिटिंगनंतर (Business Meeting) राज कुंद्रा न सांगता माझ्या घरी आला.’ Also Read - 'Adipurush’साठी Prabhas आणि Saif Ali Khan ने वसुल केले इतके कोटी रुपये, जाणून घ्या इतर स्टारकास्टचे मानधन\nया तक्रारीत तिने पुढे असे म्हटले की, ‘त्यावेळी राजने मला जबरदस्ती किस (Kiss) करण्याचा प्रयत्न केला. त्याला मी विरोध करत होती. पण राज थांबत नव्हता. त्यामुळे मी खूप घाबरले. मी त्याला धक्का दिला आणि वॉशरुममध्ये (Washroom) पळत गेली. राज माझ्या घरातून निघून जात नाही तोपर्यंत मी वॉशरुममध्येच होते.’ तिचे असे म्हणणे आहे की, एका विवाहित पुरुषाशी मला संबंध ठेवायचे नव्हते. तसेच बिझनेसला एन्जॉयमेंटशी जोडायचे नव्हते. दरम्यान, शर्लिन चोप्राची ही तक्रार मुंबई क्राईम ब्रँचकडे गेली आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत.\nब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/08/Back-to-the-mobile-regime.html", "date_download": "2022-10-07T23:17:28Z", "digest": "sha1:AKYEIKDOTBI7YC5HD7LXKQO2EG7X6LEW", "length": 7529, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जत मधील अंगणवाडी सेविकांनी त्यांचे शासकीय मोबाईल शासनाला केले परत!", "raw_content": "\nHomeसांगलीजत मधील अंगणवाडी सेविकांनी त्यांचे शासकीय मोबाईल शासनाला केले परत\nजत मधील अंगणवाडी सेविकांनी त्यांचे शासकीय मोबाईल शासनाला केले परत\nजत/प्रतिनिधी: पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत सन २०१९ मध्ये राज्यांतील १,०५,५९२ अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाईल वाटप करण्यात आले होते. सदर मोबाईलची वॉरंटी दोन वर्षे कालावधीची असून तो कालावधी मे २०२१ मध्ये संपला आहे. सदर मोबाईला २ जीबी रॅम आहे. मोबाईलची क्षमता (रॅम) कमी असल्यामुळे व त्यांत भरावयाची माहिती जास्त असल्यामुळे हे मोबाईल हँग होऊन गरम होतात व त्या मोबाईलवर काम करणे कठिण जाते. सदर मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून तो आता जुना झाल्यामुळे सतत नादुरूस्त होतो. त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ४ हजार रु. खर्च होतो व तो अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जातो. महाराष्ट्रात हजारो मोबाईल बिघडलेले आहेत व ३००० पेक्षा जास्त मोबाईल बंद पडलेले आहेत.\nया परिस्थितीत जत मधील सर्व अंगणवाडी सेविकांनी दि. २३.८.२०२१ पासून मोर्चाने प्रकल्प कार्यालयात जावून सर्व मोबाईल परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जत मधील सर्व अंगणवाडी सेविकांनी शासनाने दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाईल एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात परत करण्यात आले आहेत.\nयावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य उपाध्यक्ष निलेश दातखिळे, कार्याध्यक्ष सुर्यमनी गायकवाड, जिल्हासचिव नाझिरा नदाफ, माधुरी जोशी, सत्यव्वा रेड्डी, शैला पाटील, विमल सावंत, हसीना मकानदार यांच्यासह तालुक्यातील असंख्य अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\nमनसेकडून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/tag/mba-jobs/", "date_download": "2022-10-07T21:07:33Z", "digest": "sha1:7NJJ5KIZVR3IWVLYSOKEHR3NCEWQORDD", "length": 16177, "nlines": 92, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "MBA Jobs - Bharti jahirat", "raw_content": "\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nCosmos Bank Recruitment 2022 | कॉसमॉस बँकेत विविध पदांची भरती\nCosmos Bank Recruitment 2022 कॉसमॉस बँकेत विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 14 सप्टेंबर 2022 ते 17 सप्टेंबर...\nSPMCIL Recruitment 2022 | सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि मध्ये 37 जागांसाठी भरती\nSPMCIL Recruitment 2022 सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि मध्ये विविध पदांच्या एकूण 37 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत...\nSBI Specialist Officer Recruitment 2022 SBI मध्ये स्पेशालीस्ट ऑफिसर च्या एकूण 714 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक...\nNewSpace India Limited (NSIL) Recruitment 2022 | न्यू स्पेस इंडिया लिमिटेड मध्ये 26 जागांसाठी भरती\nNewSpace India Limited (NSIL) Recruitment 2022 | न्यू स्पेस इंडिया लिमिटेड मध्ये 26 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून...\nFCI Recruitment 2022 | भारतीय अन्न महामंडळात 113 जागांसाठी भरती\nFCI Recruitment 2022 भारतीय अन्न महामंडळात विविध पदांच्या एकूण 113 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 27 ऑगस्ट...\nRCFL Recruitment 2022 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 19 जागांसाठी भरती\nRCFL Recruitment 2022 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण 19 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून...\nIREL Recruitment 2022 | इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मध्ये 103 जागांसाठी भरती\nIREL Recruitment 2022 | इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण 103 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून...\nALIMCO Recruitment 2022 | आर्टिफिशियल लिंब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 76 जागांसाठी भरती\nALIMCO Recruitment 2022 | आर्टिफिशियल लिंब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 76 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाद्वारे अर्ज मागविण्यात...\nLIC HFL Recruitment 2022 | हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती\nLIC HFL Recruitment 2022 | हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण 80 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून...\nSouth Indian Bank Recruitment 2022 | साउथ इंडियन बँकेत ‘ऑफिसर’ पदांची भरती\nSouth Indian Bank Recruitment 2022 | साउथ इंडियन बँकेत ‘ऑफिसर’ पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 01...\nSAIL Recruitment 2022 | स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 200 जागांसाठी भरती\nSAIL Recruitment 2022 | स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या एकूण 200 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज म्गाविण्यात येत...\nPDIL Recruitment 2022 | प्रोजेक्ट्स & डेवलपमेंट इंडिया लिमिटेड मध्ये 132 जागांसाठी भरती\nPDIL Recruitment 2022 | प्रोजेक्ट्स & डेवलपमेंट इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 132 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून...\nBank of Baroda Recruitment 2022 | बँक ऑफ इंडिया मध्ये 56 जागांसाठी भरती\nBank of Baroda Recruitment 2022 | बँक ऑफ इंडिया मध्ये 56 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार...\nCentral Electronics Limited Recruitment 2022 | सेन्ट्रल इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मध्ये 30 जागांसाठी भरती\nCentral Electronics Limited Recruitment 2022 | सेन्ट्रल इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 30 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाद्वारे अर्ज मागविण्यात येत...\nEXIM Bank Recruitment 2022 | एक्झिम बँक मध्ये 19 जागांसाठी भरती\nEXIM Bank Recruitment 2022 | एक्झिम बँक मध्ये ऑफिसर पदाच्या 19 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार...\nBharat Dynamics Limited Recruitment 2022 | भारत डायनामिक्स लिमिटेड मध्ये 18 जागांसाठी भरती\nBharat Dynamics Limited Recruitment 2022 | भारत डायनामिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 18 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून...\nRCFL Recruitment 2022 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 18 जागांसाठी भरती\nRCFL Recruitment 2022 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये ऑफिसर / Officer पदाच्या एकूण 18 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज...\nSCI Mumbai Recruitment 2022 | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई भरती २०२२.\nSCI Mumbai Recruitment 2022 | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे विविध पदांच्या 46 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात...\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/tumchi-mulgi-kay-karte-fame-jui-bhagwat-daughter-of-actress-dipti-bhagwat-745316.html", "date_download": "2022-10-07T22:53:41Z", "digest": "sha1:L5RJHQODLEBMD3SRRUDMYBRVHU7Z6BB3", "length": 7337, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "tumchi mulgi kay karte fame jui bhagwat daughter of actress dipti bhagwat - तुमची मुलगी काय करते मधील सावनीची खरी आईही आहे मराठी सिनेसृष्टीतील उत्तम अभिनेत्री – News18 लोकमत", "raw_content": "\n'तुमची मुलगी काय करते' मधील सावनीची खरी आईही आहे मराठी सिनेसृष्टीतील उत्तम अभिनेत्री\nसोनी मराठीवरील तुमची मुलगी काय करते मालिकेतील सर्वांची लाडकी सावनी म्हणजेच अभिनेत्री जुई भागवत ही मराठीतील एका सुंदर आणि हुशार अभिनेत्रीची मुलगी आहे. कोण आहे जुई भागवतची अभिनेत्री आई जाणून घ्या.\nसोनी मराठीवरील तुमची मुलगी काय करते ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.\nमालिकेत अभिनेत्री मधुरा वेलणकरनं 12 वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. तर मधुराच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री जुई भागवत ही अभिनेत्री दिसत आहे. जुईच्या निमित्तानं टेलिव्हिजनला आणखी एक स्टार किड मिळाली.\nमालिकेत अभिनेत्री मधुरा वेलणकर सावनीची आई आहे. मात्र खऱ्या आयुष्यातील सावनीची आई देखील मराठी सिनेसृष्टीत उत्तम अभिनेत्री आहे.\nजुई भागवत ही अभिनेत्री दीप्ती भागवत हिची मुलगी आहे.\nअभिनेत्री दीप्ती भागवत अनेक वर्ष सिनेसृष्टीत काम करतेय. ती उत्तम अभिनेत्री तसेच गायिका आणि सूत्रसंचालिका आहे.\nदीप्तीनं आजवर अनेक ऐतिहासिक पौराणिक मालिका सिनेमात कामं केलं आहे.\nदिप्ती अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करताना दिसते. तसंच ती उत्तम कवयत्री देखील आहे. सखी दीप्ती नावानं दिप्ती सोशल मीडियावर तिच्या कविता शेअर करत असते.\nदीप्तीनं तिचा फिटनेसही मेंटेन केला आहे. आई आणि लेकी दोघीही त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.\nदीप्ती याआधी यात्रा, मोगरा फुलला, स्वराज्य सौदामिनी ताराराणी, मेरे साई, स्वामिनी, उंच माझा झोका सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.\nजुईला लहानपणापासूनचं आईकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं. जुई देखील आई इतकीच सुंदर अभिनेत्री म्हणून घडत आहे.\nतर दुसरीकडे जुई शास्त्रीय नृत्यात कथ्थकचेही धडे गिरवत आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये ती सादरिकरण करत असते.\nआईचा खंबीर पाठिंबा जुईला मिळाला आहे पण आईच्या नावाचा फायदा करुन घेण्यापेक्षा तिच्या अनुवाचा मला फायदा नक्की होतो, असं जुई म्हणते.\nतर इकडे दीप्ती आणि मधुरा देखील एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.\nत्यामुळे मालिकेच्या सेटवरही जुईला मधुराकडून ऑनस्क्रिन आईचं प्रेम आणि ऑफस्क्रिन अभिनयाचे धडे मिळत असतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17932/", "date_download": "2022-10-07T23:00:52Z", "digest": "sha1:RWGQBEEUO5M744C6CEKYOVN7HRFLZAJN", "length": 15105, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "चंद्रगोमी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nचंद्रगोमी : (इ. स. ४७१). वंगदेशीय बौद्धधर्मी कवी, तत्त्वज्ञ व वैयाकरण. भर्तृहरीचा गुरू वसुरात याचा गुरू. सत्ताधनलोलुप राजपुत्र रत्नकीर्तीला उपदेश करण्यासाठी रचिलेले ११४ श्लोकांचे शिष्यलेखधर्मकाव्य, तारासाधनाष्टक, लोकानंद नाटक व चांद्रव्याकरण हे त्याच्या नावावरील ग्रंथ आहेत. पाणिनी, कात्यायन आणि पातंजली यांच्या व्याकरणांचा उपयोग करून व त्यांत शोध घालून बौद्ध परंपरेसाठी स्वतंत्र व्याकरण रचिल्यामुळे त्याच्यावर खूप टीका झाली. वैदिकी प्रक्रिया, स्वरप्रक्रिया आणि संज्ञा गाळून त्याने शिक्षा, उणादिसूत्रे, उपसर्गवृत्ती, धातुपाठ, गणपाठ व लिंगानुशासन यांचा अंतर्भाव केला. त्याची सु. ३५ सूत्रे काशिकेत उद्‌धृत केलेली आढळतात (चिकित्सक आवृत्ती— क्षितीशचंद्र चॅटर्जी, डेक्कन कॉलेज, पुणे), तारासाधनाष्टकात त्याने परोपकारार्थ झटणे हाच उत्कृष्ट मोक्षमार्ग सांगितला असून इतर सर्व साधने गौण लेखिली आहेत. पाणिनीच्या व्याकरणाच्या आठ अध्यायांत मिळून ४,००० सूत्रे आहेत उलट चांद्रव्याकरणात सहा अध्यायांत ३,१०० सूत्रे आढळतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n—संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/prisoners-fighting-in-wardha-jail-case-filed-in-police-station-sml80", "date_download": "2022-10-07T23:11:17Z", "digest": "sha1:IVWZQS2OAJSUCLVXFUBB2NPXWQT7WSPR", "length": 8321, "nlines": 64, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Wardha District Jail : 'त्या' कैद्याचा वर्धा जेलमध्ये पुन्हा राडा", "raw_content": "\nWardha District Jail : 'त्या' कैद्याचा वर्धा जेलमध्ये पुन्हा राडा\nयापुर्वी देखील कारागृहात बंदीवानावर हल्ला झाला हाेता.\nWardha Crime News : वर्धा कारागृहात (jail) दोन कैद्यात हाणामारी झाली. दुपट्ट्यात दगड बांधून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. बराक क्रमांक आठमध्ये घडलेल्या या घटनेची नाेंद वर्धा शहर पोलिसांत (police) दाखल करण्यात आली आहे.\nशिक्षाधीन बंदी आणि न्यायदीन बंदीवानात अगदी किरकोळ कारणातून झालेल्या वादात शिक्षाधीन बंदीवानाने न्यायदीन बंदीवानाला दुपट्ट्यात दगड बांधून डोक्यावर मारहाण केल्याची घटना येथील वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बैरेक क्रमांक ८ मध्ये रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेच्या थराराने कारागृहातील इतर कैद्यांस कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली. कपिल नंदकिशोर आखाडे (२६ रा. मारोती वॉर्ड हिंगणघाट) असे जखमी न्यायदीन बंदीवानाचे नाव आहे. तर शेख तौफिक शेख शाकीर असे हल्ला करणाऱ्या शिक्षाधीन बंदीवानाचे नाव आहे.\nMid Day Meal : निकृष्ट पोषण आहार प्रकरणी मुख्याध्यापक निलंबित\nकपिल आखाडे आणि शेख तौफीक हे दोघेही जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या बैरेक क्रमांक ८ मध्ये स्थानबद्ध आहे. १४ रोजी बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास शिक्षाधीन बंदी शेख तौफीक हा कपिल आखाडे याच्या बिछाण्यावर बसून होता. दरम्यान तेथून कपिल आखाडे जात असताना त्याचा धक्का शेख तौफिकला लागला. या कारणातून दोन्ही बंदीवानांमध्ये चांगलाचा वाद झाला होता.\n१५ रोजी गुरुवारी कपिल आखाडे हा बैरेकमध्ये असताना शिक्षाधीन बंदी शेख तौफीक याने एक दिवसापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून एका दुपट्ट्यात छोटे छोटे दगडं बांधून त्याची पोटली तयार करुन कपिल आखाडेवर अचानक हल्ला चढविला. या घटनेने कारागृहातील इतर बंदीवानांसह कारागृह प्रशासनांत चांगलीच खळबळ उडाली. याप्रकरणी कार्यालयीन कर्मचारी यशवंत वरखडे यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दाखल केली. शहर पोलिसांनी याप्रकरणी शिक्षाधीन बंदीवान शेख तौफीक याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.\nNavratri : मनसेची ५० खाेके बक्षीस याेजना; रास दांडियात जिंकल्यास सुरत, गुवाहाटी, गोवा टूर\nन्यायदीन बंदीवान कपिल आखाडे याच्यावर हल्ला केल्यानंतर त्याच्या डोक्यातून रक्त निघत होते. कारागृहात असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर तत्काळ उपचार केला. त्याला तीन टाके पडल्याची माहिती आहे. शेख तौफीक शेख शाकीर याच्यावर पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल असल्याने या गुन्ह्यात त्याला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली असल्याने तो शिक्षा भोगत आहे. त्याची शिक्षा संपून कारागृहाबाहेर येण्यासाठी केवळ महिनाभर वेळ आहे. मात्र, कारागृहातच त्याने न्यायदिन बंदीवानावर हल्ला केल्यामुळे पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/sports/gautam-gambhir-on-virat-kohli-and-ms-dhoni-kapil-dev-cricket-news-latest-update", "date_download": "2022-10-07T21:23:11Z", "digest": "sha1:GE5PEXDNCVQGUK4CP36NWBJVTE43HYYX", "length": 6940, "nlines": 64, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Cricket News Update | विराट कोहली, धोनीचं नाव घेऊ नका; गौतम गंभीरनं राग काढला", "raw_content": "\nविराट कोहली अन् धोनीचं नाव घेणं आधी बंद करा; गौतम गंभीर इतका का भडकला\nविराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव यांची नावं घेत गौतम गंभीरनं रोखठोक मते मांडली.\nGautam Gambhir On Virat Kohli and MS Dhoni | मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या समालोचकाच्या भूमिकेत असलेला गौतम गंभीर हल्ली टीम इंडिया, खेळाडू यांच्याबाबत स्पष्ट आणि रोखठोक मते व्यक्त करतो. आता पुन्हा एका वक्तव्याने गौतम गंभीर चर्चेत आला आहे. भारतीय क्रिकेटनं एका क्रिकेटपटूची पूजा करणं बंद करावं. आपल्याला कपिल देव, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांसारखी नावं मागे टाकून आता टीम इंडियावर चर्चा करायला हवी, असं तो म्हणाला.\nगौतम गंभीर (Gautam Gambhir) हा आपल्या रोखठोक मतांसाठी प्रसिद्ध आहे. एखाद्या दिग्गज खेळाडूविषयी बोलायचं म्हटलं तरी तो जरा सुद्धा कचरत नाही. गौतम गंभीरनं आता पुन्हा असंच बिनधास्त विधान केलं आहे. त्यामुळे त्याची सध्या चर्चा होत आहे. माध्यमांनीही फक्त एका खेळाडूवर नव्हे तर, संघातील इतर खेळाडूंकडेही लक्ष द्यावे, असा सल्ला गंभीरने दिला आहे. आपल्याला कुणा एका खेळाडूला मोठं करण्याऐवजी संपूर्ण टीम मोठी करण्यावर लक्ष दिलं पाहिजे, असंही तो म्हणाला.\nTeam India Jersey : टीम इंडिया टी20 विश्वचषकात दिसणार नव्या अवतारात; जर्सीचा लूक आला समोर\nगौतम गंभीर म्हणाला की, 'ज्या दिवशी विराट कोहलीनं (Virat Kohli) ७१ वे शतक ठोकले, त्याच सामन्यात भुवनेश्वर कुमारने पाच विकेट घेतल्या होत्या. मात्र, सर्वजण विराट कोहलीबद्दल बोलत होते. कुणीही भुवनेश्वरच्या बाबतीत बोललं नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे.'\nमी एकटा असा होतो की, समालोचन करताना सातत्याने भुवनेश्वर कुमारच्या बाबतीत बोलत होतो. भुवनेश्वरने चार षटकांमध्ये पाच विकेट घेतल्या होत्या. याबाबत कुणाला काही माहीत असावं असं मला तरी वाटलं नाही, असंही गौतम गंभीर म्हणाला.\nटी-२० विश्वचषकात ओपनिंग कोण करणार कर्णधार रोहित शर्मा स्पष्टच बोलला\nएका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गौतम गंभीर म्हणाला की, विराट कोहलीनं शतक ठोकलं तर, संपूर्ण देश जल्लोष करत होता. भारताला आता एका हिरोच्या संस्कृतीतून बाहेर पडायला हवं. मग क्रिकेट असो की राजकारण. आपल्याला केवळ आणि केवळ भारतीय क्रिकेटचे गुणगान गायला हवेत, असंही तो म्हणाला.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2021/04/blog-post_16.html", "date_download": "2022-10-07T22:32:55Z", "digest": "sha1:3LBW46SDKUJL4B56OKBLHGQ55LNM72FO", "length": 32166, "nlines": 233, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "कोरोना पसरवल्याचा आरोप असलेल्या तबलिगी जमाअतच्या लोकांचे काय झाले? | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nकोरोना पसरवल्याचा आरोप असलेल्या तबलिगी जमाअतच्या लोकांचे काय झाले\nसुमारे वर्षभरापूर्वी दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमाअतचे मुख्यालय खूपच गाजले. त्यावेळी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेद्वारे कोरोना प्रसाराच्या संसर्गादरम्यान धार्मिक मेळावा आयोजित केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. धार्मिक मेळाव्याला उपस्थित असलेले 24 लोक कोविड-19 पॉज़िटिव असल्याचे आढळून आले तेव्हा या धार्मिक केंद्र कोरोना व्हायरस हॉटस्पॉटच्या रूपात उदयास आले. गुन्हे शाखेने परदेशी कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग कायदा आणि भारतीय दंड संहितेतील विविध तरतुदींनुसार जमाअतच्या 955 परदेशी सदस्यांविरुद्ध खटला दाखल केला.\nदिल्ली पोलिसांनी असा आरोप केला की, हे लोक टुरिस्ट व्हिसाच्या माध्यमातून भारतात भारतात प्रवेश केला आणि जमाअतच्या मर्कजमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले. व्हिसाच्या तरतुदींचे उल्लंघन करण्याव्यतिरिक्त या परदेशी नागरिकांनी संसर्गजन्य रोग तर पसरलाच त्याचबरोबर मर्कजमध्ये उपस्थित असलेल्या लोकांसह सामान्य जनतेच्या जीवालादेखील धोका निर्माण केला, असेही पोलीस म्हणाले.\nया कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी काहींना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले तेव्हा सरकारने तबलिगी जमातच्या लोकांवर भारतात कोरोना विषाणूचा प्रसार केल्याचा आरोप केला, ज्यामुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले. केंद्र सरकारच्या सांगण्यावरून त्यांना शोधून क्वारन्टाइन करण्याची राज्य सरकारांनी देशव्यापी मोहीम हाती घेतली. त्यामुळे एका वर्षानंतर दिल्लीतील तबलिगी जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचे काय झाले हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरेल. -(उर्वरीत पान 7 वर)\nसर्वप्रथम आपण या वस्तुस्थितीकडे पाहू या दिल्लीतील निजामुद्दीन मर्कजमधील 955 परदेशी नागरिकांवर खटला दाखल करण्यात आला होता. त्यांच्यापैकी 911 जणांनी ‘प्ली बार्गेन’ केले होते आणि आपापल्या मायदेशी परतले होते. ’प्ही बार्गेन’ ही सरकारी वकील आणि प्रतिवादी यांच्यातील एक व्यवस्था आहे ज्यामध्ये प्रतिवादी एखाद्या किरकोळ आरोपासाठी स्वतःला दोषी मानतो आणि त्याऐवजी मोठे आरोप एकतर रद्द केले जातात किंवा त्यांना कठोर शिक्षा दिली जात नाही. उर्वरित 44 परदेशी नागरिकांनी खटल्याला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला, त्यापैकी 8 जणांना प्राथमिक पुराव्यांअभावी खटला सुरू होण्यापूर्वी सोडून देण्यात आले आणि उर्वरित 36 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.\nदिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खटल्याव्यतिरिक्त दिल्लीतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये जमाअतच्या सदस्यांविरुद्ध आणखी 29 गुन्हे दाखल करण्यात आले होते. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते एकाच वेळी साकेत कोर्टात स्थानांतरित करण्यात आले. यातील काही खटले रद्द करण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने ट्रायल कोर्टास या याचिकांचा निकाल लागल्याशिवाय कोणताही आदेश देण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. सध्या या 29 खटल्यांपैकी केवळ 13 खटले प्रलंबित आहेत आणि 51 भारतीय नागरिकांचा या खटल्यांमध्ये समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी वेगवेगळ्या भागात दाखल केलेल्या 29 प्रकरणांमधील 193 परदेशी नागरिक हे गुन्हे शाखेच्या खटल्यानुसार निजामुद्दीन मर्कजमध्ये आढळले होते, असे तबलिगी जमाअतच्या वकील आशिमा मांडला यांनी म्हटले आहे.\nमांडला म्हणतात, आम्ही न्यायालयाला सांगितले की, ज्या लोकांना मर्कजमधून ताब्यात घेण्यात आले त्याच लोकांवर शहरातील अन्य मस्जिदींमध्ये त्याच दिवशी दाखवून त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र खटले दाखल करण्यात आले, हे कसे शक्य आहे आशिमा मंडला म्हणतात की, ’प्ली बार्गेन’ अंतर्गत दिल्लीतील तबलिगी जमाअतच्या लोकांनी सुमारे 55 लाख रुपये दिल्ली उच्च न्यायालयात दंड म्हणून जमा केले असून त्यापैकी सुमारे 20 लाख रुपये पीएम केअर फंडात जमा झाले आहेत. मांडला यांच्या मते, तबलिगी जमातच्या लोकांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश 15 डिसेंबर 2020 रोजी आला होता आणि दिल्ली सरकारने अद्याप कोणतेही अपील केलेले नाही. मांडला यांच्या मते निर्दोष सुटलेल्या 36 लोकांपैकी एक ट्युनिशियन नागरिक होता जो मरण पावला आहे. उर्वरित 35 लोक आपल्या मायदेशी परतले आहेत, पण त्यांना अशी अट घालण्यात आली आहे की या प्रकरणात पुढील सहा महिन्यांत अपील झाल्यास त्यांनी सहकार्य करावे. जर निर्दोष सुटल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत अपील न झाल्यास त्यांना खटल्यातून निर्दोष मुक्त समजले जाईल.\nया मुद्द्यावर विविध न्यायालये काय म्हणतात\nपरदेशी नागरिकांना बळीचा बकरा बनविण्यात आला होता आणि त्यांच्याविरूद्ध ली कारवाई नागरिकता (संशोधन) कायद्याच्या विरोधानंतर भारतीय मुस्लिमांसाठी एक अप्रत्यक्ष चेतावणीच आहे, असे म्हणत गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याच प्रकरणात 29 परदेशी नागरिक आणि सहा भारतीयांविरुद्ध दाखल केलेला एफआयआर फेटाळून लावला. तबलिगी जमाअत कार्यक्रमाच्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तसंकलनावरील याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की, अलीकडच्या काळात भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वाधिक गैरवापर झाला आहे. तबलिगी जमाअत प्रकरणावरून प्रसारमाध्यमांचा एक गट जातीय द्वेष पसरवत असल्याचे सांगत एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे विधान केले.\nडिसेंबर 2020 मध्ये दिल्लीतील एका न्यायालयाने 36 परदेशी तबलिगी जमाअतच्या सदस्यांची निर्दोष मुक्तता करताना सांगितले की आरोपी नमूद केलेल्या तारखेला मर्कजमध्ये पोहोचले किंवा मार्च 2020 अखेरपर्यंत मर्कजमध्ये राहिले हे हजेरी रजिस्टर देखील सिद्ध करत नाही. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की 12 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत मर्कजमध्ये कोणत्याही आरोपीचे अस्तित्व सिद्ध करण्यात सरकारी वकील अपयशी ठरले. कुठेही उल्लंघन झालं असं वाटत नाही. तबलिगी जमाअतच्या एका तरुण सदस्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने डिसेंबर 2020 मध्ये म्हटले होते की, नवी दिल्लीतील तबलिगी जमाअत कार्यक्रमात सहभागी झाल्यावर एखाद्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप करणे हे कायद्याचा गैरवापर करण्यासारखे आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबईतील एका न्यायालयाने तबलिगी जमाअतच्या 20 परदेशी सदस्यांची निर्दोष मुक्तता करताना म्हटले की त्यांच्याविरुद्ध जरादेखील पुरावा नाही.\nमर्कज पुन्हा उघडू शकते\nकोविद-19 च्या संक्रमणादरम्यान धार्मिक सभा आयोजित केल्याच्या आरोपावरून बंद करण्यात आलेल्या निजामुद्दीन येथील तबलिगी जमाअतचे मर्कज अजूनही पुन्हा सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहे.\nदिल्ली सरकारने धार्मिक कार्यासाठी मर्कज पुन्हा सुरू करण्याचे मान्य केले असले तरी शब-ए-बारातच्या निमित्ताने राज्य वक्फ बोर्डाने निवडलेल्या 50 जणांना निजामुद्दीन मर्कज येथील एका मस्जिदीत प्रार्थना करण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असे केंद्र सरकारने म्हटले होते.\nयाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप आलेला नाही.\nदिल्ली सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले आहे की, गेल्या वर्षी सोशल डिस्टन्सिंगच्या तथाकथित उल्लंघनाच्या प्रकरणात अडकलेल्या अनेक परदेशी नागरिकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आणि उर्वरित लोकांवर खटल्यास विलंब लागू शकतो आणि गेल्या जूनमध्ये सर्व धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालय मर्कजमधील धार्मिक कार्ये पुन्हा सुरू करण्याचा आदेश देऊ शकते.\nदिल्ली वक्फ बोर्डाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेद्वारे मर्कजमधील मस्जिदी, मदरसे आणि वसतिगृहांसह संपूर्ण कॅम्पस सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.\nतबलिगी जमाअत म्हणजे काय\n1926-27 मध्ये भारतात तबलिगी जमाअतची स्थापना झाली. इस्लामी विचारवंत मौलाना मुहम्मद इलियास यांनी त्याचा पाया घातला. मौलाना मुहम्मद इलियास यांनी दिल्ली लगतच्या मेवात येथील लोकांना धार्मिक शिक्षण देण्याचे काम सुरू केले. नंतर ही मालिका पुढे वाढत गेली.\nतबलिगी जमाअतची पहिली बैठक 1941 साली भारतात झाली आणि त्यात 25,000 लोक सहभागी झाले होते. 1940 च्या दशकापर्यंत जमाअतचे कार्य अविभाजित भारतापुरतेच मर्यादित होते, पण नंतर त्याच्या शाखा पाकिस्तान आणि बांगलादेशात पसरल्या. जमाअतचे कार्य झपाट्याने पसरले आणि ही चळवळ जगभर पसरली. तबलिगी जमाअतचे सर्वांत मोठे संमेलन दरवर्षी बांगलादेशात होते, तर पाकिस्तानात देखील रायविंडमध्ये एक वार्षिक कार्यक्रम आयोजित केला जातो, ज्यामध्ये जगभरातील लाखो मुस्लिम सहभागी होतात. त्याची केंद्रे 140 देशांमध्ये आहेत. भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये याचे मर्कज (केंद्र) आहे. या केंद्रामध्ये वर्षभर इज्तेमा (धार्मिक शिक्षणासाठी लोकांचे एकत्रित जमणे) सुरू असतो.\nतबलिगी जमाअतचा शाब्दिक अर्थ ‘आस्था आणि श्रद्धा लोकांदरम्यान पसरवणारा समूह’ असा होतो. सामान्य मुस्लिमांपर्यंत पोहोचणे आणि विशेषतः आयोजन, पेहराव आणि वैयक्तिक वर्तणुकीच्या बाबतीत त्यांचा विश्वास-आस्था पुनरुज्जीवित करणे हा या लोकांचा उद्देश आहे.\n(बीबीसी हिंदी मधून साभार)\n०७ मे ते १३ मे २०२१\nअमेरिकेचा अफगाणिस्तानला ‘खुदा हाफीज\nआजची परिस्थती अन जकात व्यवस्थेची गरज\nसंयुक्त समाजात राहण्याचे इस्लामी शिष्टाचार\nकोव्हीड लस : विज्ञान आणि राजकारण\nसूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nअल्लाहची उपासना आणि सर्वोत्तम मुस्लिम\n३० एप्रिल ते ०६ मे २०२१\nसंवाद हरला तरी चालेल पण मनं जिंकायला हवीत\nआज्ञाधारकतेसाठी ज्ञानाची व विश्वासाची गरज\nधर्मपरिवर्तन आणि दलित-मुस्लिम एकतेचे सूत्र\nगुजरात राज्यात महिलांची अवस्था\nरमजानचे रोजे आणि सामाजिक योगदान\nसूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nयुगांडाच्या राष्ट्राध्यक्षांचे जनतेला उद्देशून भाषण\n२३ एप्रिल ते २९ एप्रिल २०२१\nरमजान मनं, शरीर शुद्धीचाही महिना\n१६ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१\nपुन्हा संधी रमजान पाहण्याची...\nमुस्लिम समाजाला सामाजिक अभियांत्रिकीची गरज\nमौलाना वली रहेमानी यांचे निधन\nमुस्लिमांची ज्ञानविज्ञानाच्या जगतातही मक्तेदारी\nसूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nकोरोनाचा उद्रेक : लॉकडाऊन\nकायद्याच्या गैरवापरावर अंकुश लावण्याची हीच वेळ आहे\nकोरोना पसरवल्याचा आरोप असलेल्या तबलिगी जमाअतच्या ल...\nकुरआनचे पहिले आणि अंतिम उद्दिष्ट मानवकल्याण आहे\nसूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशात ९० टक्के सरकारी अधिकारी व राजकीय पुढारी भ्रष...\nह्या देशाच्या संपत्तीचा मालक कोण\n०९ एप्रिल ते १५ एप्रिल २०२१\n०२ एप्रिल ते ०८ एप्रिल २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/dahi-handi-gopalkala-wishes-status-quotes-photos-in-marathi-748412.html", "date_download": "2022-10-07T23:05:36Z", "digest": "sha1:LMWO7LNJN4J5ZOZTGWS6O2O3BAAZJAFA", "length": 5118, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Dahi handi wishes status quotes in marathi - Dahihandi Wishes 2022 : गोविंदा आला रे! तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा दहीहंडीचे सुंदर शुभेच्छापर संदेश, सर्वांनाच आवडतील – News18 लोकमत", "raw_content": "\n तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा दहीहंडीचे सुंदर शुभेच्छापर संदेश, सर्वांनाच आवडतील\nDahihandi Whatsapp Status: गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी हा सण साजरा केला जातो. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला दहीहंडीचे शुभेच्छापर संदेश ठेवू शकता आणि इतरांनाही पाठवू शकता.\nगोकुळाष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी दहीहंडी हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोविदांची पथके एकावर एक थर रचून दहीहंडी फोडतात.\nतुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा\nविसरून सारे मतभेद, लोभ अहंकार दूर सोडा. सर्वधर्म समभाव मनात जागवून, आपुलकीची दहीहंडी फोडा.\nफुलांचा हार, पावसाची सर राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर साजरा करुया गोपालकाल्याचा सण\nगोपाळकाल्याच्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबावर सदैव राहो...\nखिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला भिजवून टाका..\nलय झाली ”दुनियादारी”, खूप बघितली ”लय भारी”, आता फक्त आणि फक्त करायची.. दहीहंडीची तयारी..\nआमच्या हृदयात आहे तुझं स्थान हे नंदलाला लवकर ये आणि दहीहंडी फोड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://pdflake.com/marathi-vyakaran-pdf/", "date_download": "2022-10-07T22:03:00Z", "digest": "sha1:TVGXDGAMW7YQACBEASVRYYGT6UFLPFQZ", "length": 30470, "nlines": 72, "source_domain": "pdflake.com", "title": "Best Marathi Vyakaran PDF Free Download | संपूर्ण मराठी व्याकरण", "raw_content": "\nस्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात. पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना ‘स्वर’ असे म्हणतात. स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे होतो. स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या साहाय्यावाचून होतो. स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले (म्हणजेच विवृत असते, म्हणजे स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वर म्हणजे नुसते सूर.\nMarathi Vyakaran PDF मराठी व्याकरण – संपूर्ण मराठी व्याकरण\nआपण बोलत असताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्या वेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्यांचा एक जोडशब्द तयार होतो. उदा. ‘सूर्य उदय झाला.’ असे न म्हणता ‘सूर्योदय झाला.’ असे आपण सहज बोलून जातो. ‘इति आदी’ न म्हणता आपण ‘इत्यादी’ असा शब्द बनवतो. ‘वाक् मय’ याच्याऐवजी ‘वाङ्मय’ असा एक शब्द तयार करून आपण बोलतो.\nअशा प्रकारचे जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दत एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात.\nआपण बोलताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्या वेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्यांचा एक जोडशब्द तयार होतो. वर्णांच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातीत पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. संधी म्हणजे सांधणे, जोडणे होय.\nजवळ जवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल, तेव्हा त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर असे त्याचे स्वरूप असते. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. मराठी व्याकरण – Marathi Vyakaran PDF Free Downloadहे ध्वनी कागदावर लिहून दाखविताना आपण विशिष्ट चिन्हे वापरतो. ध्वर्नीच्या चिन्हांना आपण अक्षरे असे म्हणतो. ब, द, क ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना अर्थ प्राप्त झाला आहे, म्हणून ‘बदक’ हा शब्द तयार झाला.\nएखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला, तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो. ‘बदक पाण्यात पोहते.’ हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पद व शब्द यांत थोडा फरक आहे. ‘पाणी’ हा शब्द आहे. पाण्यात’ हे पद आहे. वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते, त्यास पद असे म्हणतात, पण व्याकरणात पदांनादेखील स्थूलमानाने शब्द असे म्हटले जाते. ‘स्वातीने’ हे पद आहे. यात मूळ शब्द ‘स्वाती’ आहे. मूळ शब्दाला व्याकरणात ‘प्रकृती’ असे म्हणतात. ‘ने’ हा प्रत्यय आहे. इथे शब्दाच्या मूळ रूपाला म्हणजे प्रकृतीला ‘ने’ हा प्रत्यय लागून ‘स्वातीने’ हे जे रूप झाले त्याला ‘विकृती’ असे म्हणतात. विकृती म्हणजे शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप यालाच ‘पद’ असे म्हणतात. वाक्य हे शब्दांचे किंवा पदांचे बनलेले असते.\nशब्दांच्या जाती आठ आहेत. हे मागील पाठामध्ये आपण पाहिले. विकारी आणि अविकारी अशा दोन गटांत त्यांची विभागणी होते. विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या शब्दांच्या प्रकारांना विकारी शब्द असे म्हणतात. अविकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होत नाही. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय हे शब्दांचे प्रकार अविकारी शब्दप्रकारात मोडतात.\n“वस्तू’ या शब्दाच्या अर्थामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ, प्राणी व त्यांच्या अंगी वास करणारे गुण व धर्म यांचा अंतर्भाव होतो. मराठी व्याकरण – Marathi Vyakaran PDF Free Download प्रत्यक्षात असणान्या किंवा कल्पनेने जाणतेत्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे, त्यांना व्याकरणात नामे असे म्हणतात. उदा पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा, हरी, वामन, साखर, देव, स्वर्ग, अप्सरा, नंदनवन, गोडी, धैर्य, खरेपणा, औदार्य, विद्वता इत्यादी.\nनिरनिराळ्या वस्तूंच्या पदार्थांच्या व्यक्तींच्या नावांना नाम असे म्हणतात वेगळ्या शब्दांत सांगायचे तर असे म्हणता येईल की, ज्यावरून एखादा प्रत्यक्ष किंवा काल्पनिक पदार्थ, प्राणी किंवा त्याचा गुणधर्म यांचा आपल्याला बोध होतो, त्याता नाम असे म्हणतात. ‘मराठी घटना, रचना, परंपरा’ या ग्रंथात (लेखक अरविंद मंगरूळकर व कृ. श्री. अर्जुनवाडकर यांनी) नामाची व्याख्या करताना म्हटले आहे. वास्तव अथवा मानस सृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्या शब्दांना नामे असे म्हणतात ‘\nप्रत्येक वाक्य हे एखाद्या कुटुंबासारखे आहे. कुटुंबात आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी, मुलगा, मुलगी अशा विविध नात्यांची काही माणसे एकत्र येतात. कुटुंबात एक व्यक्ती प्रमुख असते. या प्रमुख व्यक्तीशी त्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष असे नाते असते. हीच गोष्ट वाक्यातही पाहावयास मिळते. वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी काही ना काही संबंध असतो. या संबंधाला व्याकरणात कारक असे म्हणतात.\nवाक्यात जे शब्द येतात, ते त्यांच्या मूळ स्वरूपात जसेच्या तसे सामान्यतः येत नाहीत. वाक्यात वापरताना त्यांच्या स्वरूपात बदल करावा लागतो. उदा – ‘शेजारी, मधू, रस्ता, कुत्रा, काठी, मार’ असे शब्द एकापुढे एक ठेवल्याने काहीच बोध होत नाही. मराठी व्याकरण – Marathi Vyakaran PDF या शब्दसमूहाला वाक्य म्हणता येत नाही. ते वाक्य होण्यासाठी ‘शेजारच्या मधूने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले.’ अशा स्वरूपात शब्दरचना करायला हवी. वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो, त्याता व्याकरणात विभक्ती असे म्हणतात.\nपंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले पंतप्रधान विमानातून उत्साहाने खाली उतरले. पंतप्रधानांनी सर्वांना हसून अभिवादन केले. जवळच तहान मुले उभी होती. पंतप्रधान तहान मुलांकडे गेले. पंतप्रधानांना एका मुलाने गुलाबाचे फूल दिले पंतप्रधानांना आनंद झाला.\nवरीत परिच्छेदात थोडा बदल करून तो पुन्हा लिहूया आता वाचा. पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले ते विमानातून उत्साहाने खाली उतरले. त्यांनी सर्वांना हसून अभिवादन केले. जवळच तहान मुले होती ते लहान मुलांकडे गेले. एका तहान मुलाने त्यांना गुलाबाचे फूल दिले. त्यांना आनंद झाला\nवरील दोन्ही परिच्छेदांचे वाचन केल्यावर लक्षात येईल की प्रारंभी ‘पंतप्रधान’ या नामाचा उल्लेख केल्यावर पहिल्या परिच्छेदात त्याच नामाचा उल्लेख पुन पुन्हा अयोग्य वाटतो दुसऱ्या परिच्छेदात, प्रारंभी ‘पंतप्रधान’ या नामाचा उल्लेख केल्यानंतर त्या नामाऐवजी ‘ते’, ‘त्यांना’ असा उल्लेख योग्य वाटतो. नामाचा पुनः पुन्हा येणारा उल्लेख कानाला खटकतो दुसऱ्या परिच्छेदात नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी ‘ते’, ‘त्यांना’ असा उल्लेख आता आहे. अशा नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.\nक्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय, हे आपण पाहिले. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात, हेही आपण पाहिले. खेळतो या शब्दात ‘खेळ’ हा धातू आहे. मराठी व्याकरण – Marathi Vyakaran PDF ‘तो’ हा प्रत्यय लागून ‘खेळतो’ हे क्रियापदाचे रूप बनते. त्याचप्रमाणे ‘खेळ’ या धातूला प्रत्यय लागून खेळणे, खेळताना, खेळणारा’ अशा प्रकारची क्रियादर्शक रूपेही तयार होतात. पण ती वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचे काम करीत नाहीत. धातूपासून बनलेल्या, धातूपासून साधलेल्या अशा रूपांना धातुसाधिते असे म्हणतात.\nसंयुक्त क्रियापदातील धातुसाधितावरून मुख्य क्रियेचा बोध होतो, तर विधानाला केवळ पूर्णता आणण्याचे काम सहायक क्रियापद करते. जेव्हा धातुसाधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो, तेव्हा धातुसाधिताला मदत करणाऱ्या क्रियापदाला ‘सहायक क्रियापद’ असे म्हणतात. ‘अस, नस, हो, ये, जा, दे, लाग, टाक, शक, पाहिजे, नको’ कगैरे ठरावीक धातूंवरून सहायक क्रियापदे बनतात. यांतील ‘अस, हो, नस’ हे धातू काळाचे प्रकार दाखवितात. ‘पाहिजे, नको, नये, नलगे’ हे अर्थाचे प्रकार दाखवितात. सहायक क्रियापदे सर्व काळी, सर्व पुरुषी चालत नाहीत, म्हणून त्यांना गौण क्रियापदे असेही म्हणतात.\nआतापर्यंत आपण नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या चार शब्दप्रकारांचा अभ्यास केला. या चार शब्दप्रकारांवर लिंग, वचन, विभक्ती किंवा काळ व अर्थ यांचा परिणाम होऊन या प्रकारांतील शब्दांच्या रूपात कसा बदल होतो, हे आपण पाहिले. शब्दांच्या आठ प्रकारांपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या प्रकारांना विकारी असे म्हणतात. कारण वाक्यात त्यांचा उपयोग होत असताना, लिंग, वचन, विभक्ती इत्यादींचा त्यांच्यावर परिणाम होऊन या प्रकारातील शब्दांच्या रूपात बदल होतो.\nआता आपण अविकारी शब्दप्रकारांचा अभ्यास करणार आहोत. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय या शब्दप्रकारांना अविकारी असे म्हणतात. कारण लिंग, वचन, विभक्ती इत्यादींचा त्यांच्यावर परिणाम होऊन त्या शब्दप्रकारांतील शब्दांच्या रूपांमध्ये काही बदल होत नाही.\nनामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला ‘नाम विशेषण’ किंवा ‘विशेषण’ असे म्हणतात, हे आपण पाहिले त्याचप्रमाणे क्रियापदाबद्दत अधिक माहिती देणाऱ्या शब्दाता क्रियाविशेषण असे म्हणतात. मराठी व्याकरण – Marathi Vyakaran PDF क्रियापदाने जी क्रिया दर्शविली जाते ती केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडती किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली अशा प्रकारची अधिक माहिती देणारे शब्द वाक्यात येतात त्यांना आपण क्रियाविशेषण असे म्हणतो.\nक्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यातील फरक – क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते पण ते विकारी असते म्हणजे लिंग, वचन इत्यादींचा त्याच्या रूपावर परिणाम होतो त्यानुसार ते बदलते उदा ती मुलगी चांगली गाते’ या वाक्यात ‘चांगली’ हे ‘गाते’ या क्रियापदाचे विशेषण आहे जर या वाक्यातील कर्ता पुल्लिंगी ठेवला, तर हे वाक्य तो मुलगा चांगला गातो’ असे होईल मूळ वाक्यातील कर्ता अनेकवचनी ठेवला, तर त्या मुली चांगल्या गातात ‘ असे ते वाक्य होईल म्हणजे ही क्रियाविशेषणे विकारी आहेत.\nयावरून असे दिसते की, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जी अविकारी राहतात, त्यांना क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. कोणत्याही शब्दाचा प्रकार हा त्याच्या रूपावरून न ठरता वाक्यातील त्याच्या कार्यावरून ठरतो, हे आपण पाहिले आहे. तीच गोष्ट क्रियाविशेषणाच्या बाबतीतही खरी आहे. उदा. ‘मोठा’ हा शब्द विशेषण म्हणून वापरला जातो. तो मुळात विकारी किंवा सत्यय आहे; कारण लिंगवचनांतील बदलाप्रमाणे त्याची रूपे ‘मोठा-मोठी-मोठे’ अशी होतात. पण त्याला तृतीयेचा ‘ने’ हा प्रत्यय लागून ‘मोठ्याने’ असे रूप तयार होते. तो लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही, म्हणून तो शब्द अविकारी किंवा अव्यय, तर ‘मोठा’ हा शब्द विकारी किंवा सव्यय आहे.\nशब्दाचे व्याकरण चालविणे म्हणजे वाक्यातीत प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगणे होय आपण आतापर्यंत शब्दांचे आठ प्रकार, प्रत्येकाचे पोट प्रकार, नाम किंवा सर्वनाम यांना होणाऱ्या लिंग वचन विभक्ती या विकारांची, क्रियापदांचे काळ- अर्थ- प्रयोग यांची संपूर्ण माहिती मिळविली. मराठी व्याकरण – Marathi Vyakaran PDF या माहितीचा ‘शब्दांचे व्याकरण चालविणे यासाठी उपयोग होतो याताच पदपरिस्फोट असेही म्हणतात\n‘शब्दांचे व्याकरण चालविणे’ ही एक प्रकारे व्याकरणाच्या अभ्यासाची चाचणीच आहे. वाक्यात येणाऱ्या शब्दाची पूर्ण माहिती बिनचूकपणे सांगता येते की नाही. हे या चाचणीतून कळते आपण वाक्यात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दप्रकाराचा वेगळा, स्वतंत्र असा अभ्यास केला त्यांचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी “शब्दांचे व्याकरण चालविणे या घटकाचाही अभ्यास आवश्यक आहे वाक्यातील प्रत्येक शब्दाचा प्रकार, त्याचे कार्य यांचा जो अभ्यास आपण केला, त्याचा प्रत्यक्ष उपयोग या चाचणीत होतो शिवाय त्या शब्दाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंधही सांगता यावा हा हेतू ‘व्याकरण चालविणे’ या अभ्यासाच्या मागे असतो. त्या निमित्ताने व्याकरणविषयक सर्व अभ्यास एकत्रितपणे करता येतो व्याकरणाच्या अभ्यासात प्रत्येक शब्दाचा स्वतंत्र, सखोत, सूक्ष्म अभ्यास व वाक्याचा व वाक्यातील घटकांचा एकत्रित अभ्यास होत असतो एका अर्थाने संपूर्ण व्याकरणविषयक माहितीची ही चाचणी असते.\n‘पदपरिस्फोट’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊ या पद म्हणजे वाक्यात येणारा शब्द त्याचा परिस्फोट म्हणजे त्या शब्दाचे व्याकरणातील स्वरूप उकलून दाखविणे, स्पष्ट करून दाखविणे वाक्यातील शब्दांचा परस्परांशी असणारा व्याकरणविषयक संबंध काय आहे ते स्पष्ट करून सांगणे, त्या शब्दाचे वाक्यातीत स्थान व कार्य आणि त्याचे स्वरूप सांगणे हे पदपरिस्फोट किंवा शब्दांचे व्याकरण चालविणे या अभ्यासात अपेक्षित असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/uncategorized/5725/", "date_download": "2022-10-07T23:11:25Z", "digest": "sha1:UWACOYRQNENWLIPDTLBNAAWLSTBYEXXY", "length": 19184, "nlines": 114, "source_domain": "www.snopty.com", "title": "शिक्षणातील यशोगाथा: डॉ. अनिल कुलकर्णी - Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nशिक्षणातील यशोगाथा: डॉ. अनिल कुलकर्णी\nशिक्षणातील क्रांतीचं पाऊल :ग्राममंगल\nकोणत्याही नवीन शैक्षणिक धोरणाची खूप चर्चा होते, त्याच्यावर लेख छापून येतात पण आपल्या मुलांना कशां प्रकारचे शिक्षण कसं, केव्हा, कधी, कुठे, द्यायचं या बबतीत स्वातंत्र्य कुठे आहे.बहूतेक पालक शिक्षण प्रक्रिये बद्दलअनभिज्ञ असतात. मुलांना फक्त शाळेत घातलं की झालं, पालकांनी नुसती प्रगतीपुस्तकावर सही करणं\nआता अपेक्षित नाही. मुलं किती शिकली, काय शिकली, केव्हां शिकली, हे पाहणे आवश्यक झालं आहे. कोव्हीड ने ऑनलाइन, ऑफलाईन दोन रस्ते ठरवून दिले. दोन्हीचे टोल वेगवेगळे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. ज्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही, असले तरी ते वापरायचं ज्ञान नाही,त्यांतही तंत्रज्ञानाला नेट नसेल तर ते धूळखात पडतं, आणि ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे.\nप्रचंड फिस भरायला पालक तयार आहेत, पण कटकट नको, मुलांचं काय करायचे ते शिक्षकांनी करावं, शाळेने करावं, पण आता असं चालणार नाही, पालकांनाही शिक्षण प्रक्रियेत सहभाग घेणे क्रमप्राप्त झाले आहे. प्रत्येक घर आता learning home व प्रत्येक शाळा learning school होणे आवश्यक आहे.\nघाण्याच्या बैलाप्रमाणे मुलाला अभ्यासाला जुंपले जात आहे, अगदी लहान वयापासूनच पुस्तकांचा भडिमार, लिहून घेण्याचा सराव,अशा परिस्थितीत आमचे चिमुरडे शिक्षण घेत आहेत. पाच नाजुक बोटें विकसित व्हायच्या आधीच त्यांच्यावर ताण दिला जातोय.पाच नाजूक बोटांचे कौशल्यच आयुष्याचा गुलमोहर किंवा निवडुंग करतात.\nकागदावर खूप छान चित्र रंगवलं आहे, प्रत्यक्षात पाटी कोरीच आहे. शिक्षक शिकवतात, मुलं शिकतात असं चित्र भासवलें जात आहे, पण कोणत्याही प्रकारची कौशल्य शिकत नाहीत, हेच आजच्या शिक्षण व्यवस्थेचे दुर्दैव आहे.शिक्षण प्रमाण भाषेतूनच दिलं जातं पण, अनेक भागात मुलें बोलीभाषेत विद्यार्थी बोलतात, त्यांना प्रमाण भाषा कळत नाही, त्याचं काय सध्याच्या शिक्षण पद्धतीत मुलं खेळत नाहीत, मुलांमध्ये संवाद नाही, असतो तो फक्त गोंधळ. प्रचंड विद्यार्थी संख्ये मुळे, मुले गटात काम करत नाहीत, गटात सामूहिक काम नसल्यामुळे, पर्यायाने शिक्षक नसतील तर विद्यार्थ्याला कोणतीच कृती करायला वाव नाही आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सांभाळणं एक जिकरीचं काम सध्यां शाळें मध्यें असतं.\nग्राममंगल च्या शाळा पाहण्याचा नुकताच योग आला. डहाणू तालुक्यातील ऐना, पालघर तालुक्यातील विक्रमगड, पुण्यातील ग्राममंगल अशा शाळांमधून विद्यार्थी घेत असलेले शिक्षण पाहण्यात आले, आणि खूप समाधान वाटले. ग्राममंगलने नेमके केले काय तर त्यांनी आधी विद्यार्थ्यांना गुंतवण्यासाठी लागणारी शैक्षणिक साधने तयार केली, कायम स्वरूपात विद्यार्थी वापरू शकतील अशी, ती वर्गातच कपाटात ठेवण्यात येतात. गटात कृती होत असल्यामुळे संबोध स्पष्ट होतात व ग्रहपाठाची तशी गरज पडत नाही. त्यामुळे पाठीवरचे ओझे ही कमीच असते.\nग्राममंगल ने यापूर्वी शैक्षणिक साधन निर्मितीची अनेक प्रशिक्षणे घेतली आहेत, तसेच शैक्षणिक साधने विक्री साठी ही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.\nया शाळेत विद्यार्थ्यांना बसायला बाक नाहीत, खालीच विद्यार्थी बसतात, सामूहिक गटात विद्यार्थी काम करतात आणि शिकतात. खऱ्या अर्थाने\nवर्गावर पहिली, दुसरी चौथी पाचवी, नववी, दहावी अशा पाट्या नाहीत तर विषयानुसार नांवे दिलेली आहेत. मराठी, इतिहास, गणित, भूगोल, विज्ञान. त्या त्या वर्गात विद्यार्थी प्रत्येक तासाला जातात, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची ही शारीरिक हालचाल होते व थोडा बदल ही होतो आणि विद्यार्थ्याला कंटाळा येत नाही.शाळेला तुम्ही केव्हाही भेट दिली तर शांतपणे काम चाललेलं असतं, कुठेंही गडबड नाही, गोंधळ नाही, शिक्षक फक्त मार्गदर्शकाची भूमिका निभावतात.\nयोग्य वयातच अवयवांची वाढ झाल्यानंतरच त्याच्या हातात पेन्सिल पेन दिलं जातं, इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं अक्षर सुंदर आहे.\nशिकवण्याचा एक तर्फे मारा बंद झालां तरच विद्यार्थी शिकतील.\nकवितेच्या तासात कविता ही करायची असतें हे सहावीतल्या मुलाकडे पाहून कळाले, त्याने अतिशय छान कविता बोर्डावर लावल्या होत्या.\nभाजीपाला शाळेत लावल्यामुळे,शिकता शिकता त्याचा हिशोब करायला मुलं शिकतात. अनेक गोष्टी या कृती व अनुभव यावर आधारित आहेत आणि शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतात.\nखरंच सगळ्या शाळेतून असं होऊ शकतं का शहरात चर्चा, गट, समूह कार्य होऊ शकणार नाही कारण पहिले डेस्क हलवायला पाहिजे, जागा भरपूर असेल आणि विचार करायलाही वाव भरपूर असेल तर काहीही करता येतं.\nखेळाची साधने बागेतच पाहायला मिळतात पण इथल्या शाळेत खेळायची साधन असल्यामुळे, मुले भरपूर खेळतात, खेळण्यातून संवाद ,शारीरिक श्रम हे सगळं सहज साध्य होतं.\nआपल्या सध्याच्या शाळांमध्ये खेळाचा एकच तास असतो त्यातही मुले खेळतांतच असंही नाही. गडबड करतात, गोंधळ करतात, हे कुठेतरी संपायला पाहिजे. आता ही पद्धत अमलात आणायला जरी अवघड असली तरी, त्याचा विचार आम्ही कधी करणार आहोत की नाही\nप्रशिक्षण महाविद्यालयात घेतलेल्या प्रशिक्षणा प्रमाणे आमचे शिक्षक शिकवतात का किती शिक्षक शैक्षणिक साधने वापरतात,याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे.\nसिद्धांताप्रमाणे प्रात्यक्षिक झालं तरच शिक्षण सुधारणार आहे.\nआजच्या पारंपारिक शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्याचं गृहपाठ सुद्धा काही पालक करतात, मुलाला शिक्षा होऊ नये म्हणून.\nकृती नाही, आनंद नाही अशा प्रकारचे शिक्षण मुले घेत आहेत.शिक्षक मानसशास्त्र शिकलेले असतात पण मुलांचे मानसशास्त्र ओळखण्याची आणि ओळखलं तरी त्याची अंमलबजावणी करण्याची संधी शिक्षकांना मिळतच नाही. पारंपारिक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकच बोलतात, विद्यार्थी ऐकतात. ग्राममंगल मध्ये वर्गातच सर्व शैक्षणिक साधने असतात आणि ती विद्यार्थ्यांना दिले की गटात विद्यार्थी काम करतात आणि शिक्षक फक्त निरीक्षण करतात. सगळं शांत गडबड गोंधळ न होता चाललेलं असतं.\nआजच्या पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये नुसतं माहितीचं पाठांतर केले जातं, ज्ञान व त्याचे उपयोजन या फार दूरच्या गोष्टी आहेत. कोणत्याच प्रकारची कौशल्य घेऊन मुले बाहेर पडत नाहीत हे दुर्दैव आहे.विद्यार्थ्यांना साधे हिशोब येत नाहीत, दुरुस्तीचे काम जमत नाही,श्रमा चे काम जमत नाही,वाचन नाही, संवादाला वाव नाही.\nसंबोध स्पष्ट झाल्याशिवाय ज्ञान मिळतच नाही आणि हीच आज ची शोकांतिका आहे. शासनाने काहीशाळा ग्राममंगलला चालवायला जर दिल्या तर निश्चित फरक दिसू लागेल. लोकसहभाग आणि देणगीतून शाळा चालू शकतात हे ग्राममंगलने दाखवले आहे.\nशैक्षणिक साधनांची विक्री, निर्मिती प्रशिक्षणही ग्राममंगल घेतं. सध्या येना, विक्रमगड पुणे येथे ग्राममंगल शाळा चालू आहेत.वाई येथे विकास गटाच्या माध्यमातून काम चालू आहे.\nरमेश पानसे त्यासाठी शहरी भाग सोडून येथे कायम वास्तव्यास आले आहेत आणि शाळा सुंदर करण्याचे त्यांचे स्वप्न आहे आणि ते हळूहळू साकार होत आहे.\nकोसबाडच्या टेकडीवरून अनुताई वाघ यांनी दिलेली हाक ऐकून रमेश पानसे हे कार्यरत आहेत. आदिवासी भागात माणसे पेरली की काम ,चळवळ पुढे जाते.\nप्रत्येक दिवस तपासणी चा आहे अशाप्रकारे शाळा चांलली पाहिजे ,कधीही, केव्हांही.\nमुलांच्या अवांतर वाचना साठी पुस्तकें मांडून ठेवलेली असतात व मुलं पुस्तके वाचतात.\nकृती, आनंद, परिसराशी समरसून असणं, त्यात गुंतून असणं, म्हणजेच शिक्षणते इथे पहायला मिळतं. शिक्षण, गट कार्यात मुलं इतके गुंतून गेलेली असतात की शाळा पाहायला कोणी आलंआहे, हे त्यांच्या लक्षातही नसतं, ते शिकत राहतात.\nचांगल्या व नाविनपूर्ण शाळा वाढल्या तरच समाजात अपेक्षित बदल दिसायला लागतील.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nस्मृतीगंध…..ट्रेक नंबर १६…भाग २…कोळे नृसिंहपुर\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://crazymarathi.com/2021/05/16/eka-25-varshachya-mulich-lagn/", "date_download": "2022-10-07T22:28:30Z", "digest": "sha1:6ZPS6GCTYASW6D6FHAOIQ65RCHSF7M7V", "length": 9676, "nlines": 95, "source_domain": "crazymarathi.com", "title": "एक २५ वर्षाच्या मुलीच लग्न ७० वर्षाच्या म्हाताऱ्या बरोबर होत. - Crazy Marathi", "raw_content": "\nएक २५ वर्षाच्या मुलीच लग्न ७० वर्षाच्या म्हाताऱ्या बरोबर होत.\nपुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया –\nविनोद 1 – मुली तीनशे रुपयाची चप्पल खरेदी करून येतात\nआणि सगळ्या घरात नाचत सांगत सुटतात. .\n.”मी शॉपिंग करून आलेय….”मी शॉपिंग करून आलेय…. आणि\nमुले हॉटेलात तीन हजारची पार्टीकरून येतात आणि\nतरीही घरी आल्यावर गपचूप झोपी जातात यालाच म्हणतात साधी राहणी उच्च विचारसरणी\nविनोद 2 – बायको : (रो😛मँटिक मूड मध्ये) तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता\nनवरा : ७२% माझी जान…\nबायको : १००% का नाही करत\nनवरा : वेडी… लग्झरी वस्तूंवर २८ टक्के GST पण लागतो ना…😆😛😅😂😂😂\nविनोद 3 – आजचा सुविचार….\nलय सुविचार सुविचार करता ना\nविनोद 4 – आज पण शाळा सोडल्याचा दाखला पाहिल्यावर जीव भरून\nकारण त्यावर ठळक अक्षरात लिहिलेला 1 सोनेरी शब्द\n” वर्तनूक —चांगली ”\nविनोद 5 – ब्रेकअप करताना…\nती म्हटली मी तुझ्यावर\nप्रेम केलंय ना त्याची शिक्षा दे मला….\nमी जाऊन तिच्या बापाला सांगितलं….\nआई शप्पथ काय धुतली तिला…\nविनोद 6 – गोट्या सिटीस्कॅन करण्यासाठी\nनर्स: चला कपडे काढा लवकर आणि इथं येऊन झोपा…\nगोट्या: (लाजत) मी काय म्हणतो म्याडम..\nआधी सिटीस्कॅन करुयात ना.\nविनोद 7 – डाँक्टर (इंजिनीअरिंग च्या विद्यार्थ्याला):\nतुमची १ किडनी फेल झाली आहे.\nविद्यार्थी आधी खूप खूप रडला…., मग डोळे\nRECHECKING मध्ये निघेल का\nविनोद 8 – पेट्रोल पंपावर गेल्यावर\nबायकोला लांब का थांबवतात \nकारण तिथे लिहिलेले असते\nस्फो ट क पदार्थ लांब ठेवा….\nविनोद 9 – एक २५ वर्षाच्या मुलीच लग्न ७० वर्षाच्या म्हाताऱ्या बरोबर होत.\nदोघे हनि😆मूनला जातात आणि तिथून आल्यावर मुलीचे मित्र तिला विचारतात\n आणि तू इतकी थकलेली का दिसते आहेस\nमुलगी : जेव्हा हा ७० वर्षाचा म्हातारा बोलला होता कि “५० वर्ष मी खूप सा😆😆चवून ठेवलं आहे\nतर मला वाटलं होत कि तो पैशानं बद्दल बोलतो आहे”. पण म्हाताऱ्याने पलंगा😆वरून उतरू दिल नाही आहे मला…\nपुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया.\nआकाश – भाऊ आज OYO ला गेलतो फुल्ल मज्जा २ तास\nनिळू सनीला सायकलवर बसवून फिरायला घेऊन गेले\nबाई डॉक्टर कडे जाते…\nचा’वट पिंकीचे लग्न जमलेले असते…\nनिळू सनीला सायकलवर बसवून फिरायला घेऊन गेले\nलग्नात बायकांनी केला झकास डान्स…\nसाली बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…\nलग्नात वहिनीनीं केला भारी डान्स…\nसुहा’गरात्री बायकोला जोराची उचकी लागते….\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा वट पिंकी एका बस मध्ये चढली…\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा’वट बाई मेडिकल वर गेली…\nमुलीने सासरी जाताना सर्वांना रडवले\nटकला टी शर्ट घालून आला…\nनवरी ताईचा विडिओ बघून रडू येईल…\nबंड्याच्या बेडरूम मधून बायकोचा आवाज आला…\nलग्नात ताईने केला खुपच सुंदर डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nताईने केला खुपच सुंदर डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/women-do-this-yoga-asana-to-stay-fit-an/", "date_download": "2022-10-07T23:05:52Z", "digest": "sha1:PWGJA5QJZIVK64ZX2MERSOOFP5IRVATZ", "length": 5442, "nlines": 49, "source_domain": "mahaupdate.in", "title": "तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी महिलांनी 'हे' योगासन करा! मिळतील अनेक फायदे - Maha Update", "raw_content": "\nHome » तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी महिलांनी ‘हे’ योगासन करा\nतंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी महिलांनी ‘हे’ योगासन करा\nमहिलांच्या वाढत्या वयाबरोबर त्यांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यासाठी त्यांनी आपल्या जीवनशैलीतही बदल करायला हवा. मग ती खाण्यापिण्याशी संबंधित असो किंवा रोजच्या व्यायामाशी. ज्यामुळे ते तंदुरुस्त आणि निरोगी राहतील.\nआज तुम्हाला अशाच काही योगासनांबद्दल सांगत आहोत, ज्याच्या मदतीने महिला त्यांच्या वाढत्या वयातही स्वतःला पूर्णपणे फिट ठेवू शकतात. महिलांसाठीच्या या योग आसनांबद्दल जाणून घेऊया, ज्यांचा वापर करून ती तिच्या वाढत्या वयात प्रत्येक आजाराला स्वतःपासून दूर ठेवून स्वत:ला फिट ठेवू शकते.\nहे आसन वाढत्या वयातील महिलांसाठी सर्वोत्तम आसनांपैकी एक आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराच्या वरच्या भागात स्ट्रेच तर जाणवतोच पण त्यामुळे चेहऱ्यावर चमकही येते.\nहे आसन केल्याने लठ्ठपणा तर कमी होतोच, पण तुमच्या शरीराची मुद्राही योग्य राहते. हे तुमचे संपूर्ण शरीर चांगले ताणण्याचे काम करते.\nहे आसन केल्याने मासिक पाळी नियमित राहते, तसेच ते तुमच्या मांड्या आणि पायांचे स्नायू मजबूत करण्याचे काम करते.\nहे आसन केल्याने गर्भाशय, अंडाशय, किडनीसह शरीराचे अनेक भाग मजबूत होतात.\nहे आसन केल्याने संपूर्ण शरीर ताणले जाते, त्यामुळे दुखण्यात आराम मिळतो, तसेच कोणत्याही प्रकारचा ताण दूर होण्यास मदत होते.\nहा व्यायाम कंबर, नितंब आणि मांडीसाठी उत्तम आहे. यामुळे पाय मजबूत होतात तसेच ते आकारात येण्यास मदत होते.\nया आसनामुळे शरीराचा खालचा भाग मजबूत होण्यास मदत होते. हे तुमच्या पाठीच्या आणि नितंबांच्या दुखण्यातही आराम देते.\nतुम्हालाही आयुष्यभर तंदुरुस्त आणि निरोगी राहायचंय मग जीवनशैलीत करा असा बदल\nवयाच्या ६० नंतर वजन नियंत्रणात ठेवायचंय मग ‘हे’ मार्ग अवलंबा, राहाल तंदुरुस्त\nनिरोगी आयुष्यासाठी लावा ‘या’ ५ सवयी, कोणत्याही वयात राहाल तंदुरुस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:User_gu-3", "date_download": "2022-10-07T21:17:51Z", "digest": "sha1:7K5ARBPRLPPSK5VPAI4ZWWKYYAVN3ZEW", "length": 3132, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:User gu-3 - विकिपीडिया", "raw_content": "\ngu-3 ही व्यक्ती गुजराती भाषेत प्रवीण आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २००८ रोजी २२:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/250/", "date_download": "2022-10-07T23:08:24Z", "digest": "sha1:T35ULQWLSGJUIJOJHQC34UYLXO5NRZ2T", "length": 6402, "nlines": 78, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "भारतीय काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन - Rayatsakshi", "raw_content": "\nभारतीय काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन\nभारतीय काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन\nतहसीलदार मनाळे यांची उपस्थिती ;युवकांनी आंबेडकरी चळवळ गतिमान करावी -- दत्ता कांबळे\nमाजलगाव, रयतसाक्षी: भारतीय काँग्रेस अनु जाती विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त छोट्या खानी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.\nयावेळी तहसीलदार वर्षा मनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील भीम नगर येथील स्मारकस्थळी भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यासतहसीलदार वर्षा मनाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात केले .\nयावेळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी ,” सुशिक्षित युवकांनी व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन,आंबेडकरी चळवळ गतिमान करावी”, असे आवाहन केले.\nतहसीलदार वर्षा मनाळे सह काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे,माजी जिल्हा परिषद सदस्य‌ डॉ. श्रीराम खळगे, माजी नगरसेवक रामभाऊ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अशोक ढगे, भारिपचे अंकुश जाधव , सामाजिक कार्यकर्ते नवनाथ धाईजे,अशोक लांडगे सर,शाहीर युराज ढगे ,अफरोज तांबोळी , हरिश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nदेशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं निधन\nभोकर पत्रकार संरक्षण समितीची कार्यकारिणी जाहिर\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20372/", "date_download": "2022-10-07T21:15:49Z", "digest": "sha1:W7WZZYR6WQUKR27PNUWMP7FNM73MC6CP", "length": 15292, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पटनाइक, राजकिशोर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपटनाइक, राजकिशोर : ( १९१२– ). आधुनिक ओडिया कथा-कादंबरीकार. जन्म कलकत्ता येथे. शिक्षण पूर्ण केल्यावर ते कटक येथे स्थायिक होऊन वकिली करू लागले. वृत्तपत्रकार म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या भगिनी बसंतकुमारी पटनाइक यांनीही कथा-कादंबरीलेखन करून ओडिया साहित्य समृद्ध केले. ह्या दोघांच्याही लेखनात प्रभावी व्यक्तिनिष्ठा व आकर्षक स्वतंत्र शैलीचा प्रत्यय येतो. बसंतकुमारी यांच्या लेखनात स्त्रीसुलभ कोमलता, कौटुंबिक जीवनातील बारीकसारीक तपशील व सहजसुलभ अभिव्यक्ती हे गुणविशेष आढळतात. त्यांच्या अमद बाट (म. शी. अनवट वाट) व सभ्यतार साज (१९५१) ह्या कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय आणि लोकप्रिय आहेत. त्यांच्या अमद बाटचे नाट्यरूपांतरही झाले आहे.\nराजकिशोरांनी विपुल कथा-कादंबरीलेखन केले. त्यांचे हे लेखन पारंपरिक स्वरूपाचे असून ते अत्यंत लोकप्रिय ठरले. तुटा पथर (१९४८) व पथुकि (१९५२) हे कथासंग्रह आणि असरंति (दुसरी आवृ. १९४५), पंजुरी पखी (१९४६), स्वप्न कुहुडी (१९४७), निशाण खुंट (१९५१), राजमहल (१९५१), स्मृतिर मसाणि (१९५१) इ. त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्या होत.\nदास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n—भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22154/", "date_download": "2022-10-07T22:42:44Z", "digest": "sha1:DK5FGWBWJN2XMDQAYZAUBHR7XVHSOVVU", "length": 19804, "nlines": 230, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "चिनोपोडियम तेल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nचिनोपोडियम तेल : (कृमिबीज तेल). हे एक कृमिनाशक तेल असून ते चिनोपोडियम या लॅटिन नावाच्या वनस्पति वंशातील [चक्रवर्त किंवा चाकवत कुल → चिनोपोडिएसी] एका जातीपासून (चिनोपोडियम अँब्रोसिऑइडीस, प्रकार अँथेल्मिटिकम इ. अमेरिकन वर्मसीड मेक्सीकन टी) काढतात. ही वर्षभर जगणारी वनस्पती मूळची द. अमेरिका व वेस्ट इंडीज येथील आहे. द. भारत, बंगाल, सिल्हेट, काश्मीर व महाराष्ट्र येथे तत्सम भारतीय जाती (चिनोपोडियम अँब्रोसिऑइडीस, मेक्सिकन टी वर्मसीड) तणासारखी पाणथळ जागी आढळते. दोन्हींत बरेच साम्य असले, तरी ओळखण्यासारखे काही किरकोळ फरकही आहेत. ही सुंगधी, अनेक फांद्यांची उभी, सरळ व सु. एक मीटरपर्यंत उंच वाढणारी ⇨ओषधी ग्रंथियुक्त (प्रपिंडिय) केसाळ असते. पाने लहान, साधी, फार लहान देठाची, दातेरी व काहीशी खंडित व लांबट असतात. त्यांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकांस लांबट व पाने असलेला कणिश प्रकारचा शाखा युक्त [परिमंजरी → पुष्पबंध] फुलोरा असतो व त्यावर ऑगस्ट ते एप्रिलमध्ये बारीक फुले येतात. अमेरिकी कृमिबीज जातीच्या प्रकारात (अँथेल्मिंटिकममध्ये) फुलोऱ्याला पाने नसतात, हा दोन्ही वनस्पतींतील मुख्य फरक होय. शुष्क फळ [क्लोम → फळ] पापुद्र्यासारख्या सालीचे पण फुगीर असून त्यात फार बारीक (सु. ०·८ सेंमी. व्यासाची), वाटोळी, चकचकीत व पिंगट बीजे असतात. फळांना टर्पेंटाइन किंवा यूकॅलिप्टस (निलगिरी तेल) सारखा वास व तिखट आणि तुरट चव असते. झाडाला काहीसा कापरासारखा वास येतो. त्याच्या व बीजांच्या ऊर्ध्वपातनाने (बंद पात्रात पदार्थ तापवून बनणारी वाफ थंड करून मिळणारा पदार्थ जमविण्याच्या क्रियेने) काढलेले तेल कृमिनाशक असते यालाच ‘वास्तुक तेल’ [चिनोपोडियम आल्बम = वास्तुक (सं.), चाकवत (म.)] असे कोणी म्हणतात व कृमींचा नाश करणारे म्हणून ‘कृमिबीज तेल’ म्हणतात. (इं. वर्मसीड ऑइल). हे तेल फिकट पिवळे किंवा नारिंगी पिवळे असून त्याला उग्र वास व तिखट कडू चव असते त्यात ॲस्कॅरिडॉल हे प्रमुख कृमिनाशक द्रव्य सु. ४०-४५ टक्के असते शिवाय टर्पेनीन, सॅफ्रोल, सॅलिसिलेट, पी-सायमीन इ. द्रव्ये त्यात असतात वनस्पतीत (विशेषतः मुळात) सॅपोनीन असते. ते रासायनिक दृष्ट्या सिनीओलसारखे असून आतड्यातील अनेक जीवोपजीवींचा नाश करू शकते. ते जंत व अंकुशकृमी आणि अमीबीय आमांश यांवर देतात ते काळजीपूर्वकच वापरावे लागते. पाळीव पशूंच्या (कुत्री, मांजरे, डुकरे, घोडे, गाई, बैल, म्हशी, रेडे इ.) पोटातील जंत व अंकुशकृमीवरही या तेलाचा फार उपयोग होतो. अमेरिकी प्रकाराऐवजी भारतीय जाती वापरात आहे. मुंगपू (बंगाल) येथे अमेरिकी प्रकार (अँथेल्मिंटिकम) लागवडीत आणण्याचा प्रयत्न झाला, पण व्यापारी दृष्ट्या तो अयशस्वी झाला. तथापि डेहराडून व इतरत्र अद्याप प्रयत्न सुरू आहेत. चि. बॉट्रिस ही भारतीय जाती वर वर्णिल्याप्रमाणे वापरतात. तेल थंड जागी व प्रकाशापासून सुरक्षित जागी ठेवावे लागते, कारण प्रकाशाचा त्यातील ॲस्कॅरिडॉलावर अनिष्ट परिणाम होतो. ह्या वनस्पतींची सर्वसामान्य शारीरिक लक्षणे चाकवत कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.\nपाटील, शा. दा. परांडेकर, शं. आ.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00029945-YC248-JR-07110KL.html", "date_download": "2022-10-07T23:16:55Z", "digest": "sha1:MOLRPAMZNWUY2XGOLNHIGNADVFDB3RZJ", "length": 14558, "nlines": 300, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "YC248-JR-07110KL | Yageo | अॅरे/नेटवर्क प्रतिरोधक | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर YYageo48-JR-07110KL Yageo खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये YYageo48-JR-07110KL चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. YYageo48-JR-07110KL साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2018/04/blog-post_50.html", "date_download": "2022-10-07T23:21:35Z", "digest": "sha1:KCLXKKZ6DO6RGRX243QGHWS5QGQ22OVQ", "length": 17922, "nlines": 220, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "तलाक हा अत्याचार नसून अत्याचारापासून मूक्तीचा मार्ग | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nतलाक हा अत्याचार नसून अत्याचारापासून मूक्तीचा मार्ग\n- नौशाद उस्मान, औरंगाबाद\nतिहेरी तलाकविरोधी कायद्यांमुळे महिला फार खुष असून तलाकचा आग्रह फक्त पुरूषी मानसिकता असणारेच करतात, असा कांगावा काही अतिपुरोगामी आतापर्यंत करत आलेले आहेत. याचा फायदा मुस्लिमविरोधी राज्यकर्तेही घेत आहेत आणि आपण कसे सुधारणावादी आहोत याचा डांगोरा पिटत आहेत. याची जाहिरात करणारी एक चित्रफीतही ते सध्या फिरवत आहेत. अशाप्रकारे आपण वापरले जात असल्याचे भानही या अतिपुरोगाम्यांनी राहिलेले नाहिये. त्यांना चपराक दिली आहे देशभरात निघणार्या मुस्लिम महिलांच्या शरियतसमर्थक मोर्च्यांनी. तलाक हा अत्याचार नसून अत्याचारापासून मूक्तीचा मार्ग आहे आणि याचा कुठे अपवादात्मक गैरउपयोग होत असेल तर ते आम्हीच प्रबोधनाद्वारे करू, सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची मुळीच गरज नाहीये, तसेच नवर्याला तुरूंगात पाठवून लेकरांना असहाय करणारा, त्यांना शिक्षणापासून वंचित करणारा हा नियोजित कायदा आमच्यावर अत्याचार करणारा असल्याचं त्या बेधडक सांगत आहेत. यामुळे बरेच सत्ताधारीसमर्थक तोंडघशी पडले असून ते जाम खवळले आहेत.\nतेंव्हा मराठा मोर्चांना जसे बदनाम करण्याचा काही वृत्तपत्रांनी प्रयत्न केला तसाच प्रयत्न या मुस्लिम महिला मोर्चांविषयी केला जातोय. काही वृत्तपत्रे पुरूषच बुरखा नेसून मोर्चे काढत असल्याची व्यंगचित्रे काढत आहेत, तर काही पत्रकार मुद्दामून काही अल्पशिक्षित महिलांना निवडून त्यांना विधीशास्त्रातले कायदेविषयक अवघड प्रश्न विचारून त्यांना भांबावून सोडत आहेत आणि नंतर असा जावई शोध लावत आहेत की, त्या महिला पढवून आल्या आहेत, स्वत:हून आलेल्या नाहियेत. म्हणजे मुस्लिम महिला मुर्ख असतात, त्यांना पढवूनच आणावं लागतं, त्यांना स्वत:चे विचारच नसतात, त्यांचं ब्रेन वॉश केलेले असते, अशी सावरासारव आता अतिपुरोगामी करत आहेत. हाच कावा हादिया प्रकरणात इस्लामद्वेष्ट्यांनी केला होता की, ती ब्रेनवॉश केलेली आहे. पण हाच आरोप त्या अतिपुरोगाम्यांवरही केला जाऊ शकतो, ज्यांना कुरआनाचे चार श्लोक नीट वाचता येत नाही अन् त्या कुरआनविरोधी वक्तव्य करत असतात.\nमूळात या अतिपुरोगाम्यांना महिलांसाठी काहीही करायचं नसते तर सत्ताधार्यांना अप्रत्यक्ष अनुकूल ठरतील, खरे मुद्दे बाजुला राहतील याची केलेली ती सुनियोजित सोय असते. सर्वच तसे नसले तरी काही तथाकथित स्वयंसेवी संस्थांच्या आंदोलनांचे अर्थशास्त्र तपासून पाहिल्यावर हा जळफळाट का होतोय, ते स्पष्ट होते.\n२७ एप्रिल ते ०३ मे २०१८\nधर्मांतराचा उद्देश यशस्वी झाला काय\nतलाक हा अत्याचार नसून अत्याचारापासून मूक्तीचा मार्ग\nफतुहाते जहांदारीने बादशहांना दिशा दाखविली\nअल्लाहच्या गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख : प्रेषितवाणी (...\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nतरूणांनी नोकऱ्यांच्या मागे न धावता रचनात्मकतेच्या ...\nडॉ. बाबासाहेब समताकाशातील प्रज्ञासूर्य\n‘देशातील पहिली मुलींची शाळा’ म्हणून पुण्यातील `भिड...\n२० ते २६ एप्रिल २०१८\nअल्लाहच्या गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख : प्रेषितवाणी (...\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n‘शोधन’ मराठीतले एक उत्तम नियतकालिक होऊ पाहात आहे\nतिहेरी तलाक विधेयकाविरोधात ठाण्यात हजारो मुस्लिम म...\nइस्लाम - स्त्रियांच्या हक्कांचा खरा रक्षक\nमृत्यू : एक सापेक्ष अनुभव\nबांग्लादेशामध्ये रोहिंग्या मुलींना वेश्यावृत्तीमध्...\nन्याय हे कोणत्याही राजवटीचे मुख्य स्तंभ\nसरकारने शरियतला बदनाम करणे सोडावे\nअॅट्रोसिटीबद्दल अध्यादेश आणला पाहिजे\nमानवावर प्रेम : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nबहुपत्नीत्व : हेतू आणि अनिवार्यता\n१३ ते १९ एप्रिल २०१८\nलोकशाहीत सर्वांचा व्यवस्थेवर विश्वास हवा\nप्रक्षेपकांमुळे धर्मांध ठरलेला समतावादी विचारवंत ज...\nश्रीलंकेत मुस्लिम विरोधी दंगे\n०६ ते १२ एप्रिल २०१८\n३० मार्च ते ०५ एप्रिल २०१८\nआपण खोटाच इतिहास शिकत आलोय\nसॉरी स्टीफन आम्ही तुला कन्व्हीन्स करू शकलो नाही\nपश्चात्ताप आणि क्षमायाचना : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nहुंडा वधूपक्षावर अत्याचार आहे\nतथाकथित गोरक्षकांना कोर्टाची चपराक\nमशीद भेट आणि शीरखुर्मा, इत्रच्या पलीकडचा संवाद\nभारतीय धर्म संप्रदायांची समृद्ध सहिष्णु परंपरा आणि...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mukundbhalerao.com/blog/2021/08/31/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%98-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-07T22:12:56Z", "digest": "sha1:RMUZII6MCCUDGZALIVTFLES7Z36ITWLG", "length": 9651, "nlines": 238, "source_domain": "www.mukundbhalerao.com", "title": "मेघ बरसला हरी कृपेचा – Mukund Bhalerao", "raw_content": "\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\n हवामे, तैरना मुझे आता,\nप्रवीण बुरकुले on जनाचे श्लोक\nS B Joshi on जनाचे श्लोक\nTushar Shardul on अभिराम मुक्त ऐसा, आनंदकंद आहे……..\nमेघ बरसला हरी कृपेचा\nमाळावरती उभी साजरी, एक सानुली पर्णकुटी\nवेलीवेली मधुनी जातसे, वाट चिमुकली स्वप्न जशी……\nहिरव्या वेली हिरवी पाने, चैतन्याचा दिव्य मळा,\nफुलाफुलांचा रंग बहरला, वनराणीचा गोड लळा…….\nमाळावरती दूर पसरली, हिरवी पिवळी रम्य फुले,\nधुंद पाखरे वने विहरती, वनराणीचा स्नेह फुले……….\nलवलेल्या त्या प्रेमळ वेली, वृक्षावरती प्रेम दिसे,\nमंदगतीने विहरत ललना, वनात त्यांचे प्रेम वसे……….\nवाट चिमुकली ललना जाती, पक्षांचेही लक्ष थवे,\nसूर्याफुलांच्या आसक्तीने, नभी शुकांचे लक्ष थवे……….\nवाट नर्तकी सुंदर भासे, अशी तोरणे पुष्पांची,\nरानफुलांची हिरवी पिवळी, उधळण झाली रंगाची…………\nपर्णकुटीच्या दारावरती, इवल्या इवल्या माळा त्या,\nपाहुनी ललना आनंदाने, तिथे थबकती अवचित त्या…….\nपर्णकुटीच्या अंतर्यामी, सप्तसुरांची दिव्य पदे,\nअवचित ललना मुग्ध जाहल्या, कशा थिरकती शब्दपदे…..\nमधूर मंगल स्वरावली ती, अंतरातले गीत असे,\nप्रेमारंगे हरी भेटण्या, ललनांचे ते रूप दिसे……….\nमीरामय त्या ललना दिसती, हरी शोधण्या मुक्तमनी,\nअधीरतेने कृष्ण सख्याच्या, बावरलेल्या भावांनी……….\nतसा अचानक कृष्ण सखा तो , अवतरला त्या दिव्यवनी,\nयुगायुगाची प्रीत आठवूनी, मीरा-ललना स्तब्ध मनी…………..\nशब्द थांबले उगा कशाला, शब्दांचे ते बंध तसे,\nनयनामधुनी अंतरातले, सुखस्वप्नांचे प्रेम दिसे…………\nमीरा राधा नर्तन करती, आलापांचे गीत जसे,\nमनी भाळला हरी प्रिया तो, प्रेम भासते दिव्य जसे…………..\nवनराणीही तिथे थबकली, धुंद पाहुनी राधा त्या,\nमनी साठवी प्रेम हरीचे, ऐकुनी पावा राधा त्या………………….\nक्षणात सार्‍या स्तब्ध जाहल्या, वेणूचा तो सुर नसे,\nमंगल गाणी सप्त सुरांची, आणि हरी तो तिथे नसे……………\nक्षणात सार्‍या बावरलेल्या, हरी शोधती नीलनभा,\nरूप तयाचे नभात दिसता, मनात त्याची दिव्य अभा……………….\nहरी तसा तो नभात दिसता, क्षणात फिरती शिघ्रगती,\nपदन्यासाने राधांच्या त्या, मेघ बरसला प्रेमरती………………\nमिलन तयांचे तसे आगळे, रंगाचे ते सूर नभी,\nमनी कल्पना स्नेह वलय ते, प्रीत तयांची दिव्य वनी………\nमेघ बरसला हरी रुपाचा, चिंब जाहल्या सार्‍या हो,\nशांत मनीचे प्रीतगीत ही, सर्व हरीच्या झाल्या हो…………….\nऔरंगाबाद / ०१-०५-२०२१ / ३१-०८-२०२१\nतत्वज्ञान – भारतीय तत्वज्ञान व षडदर्शने\nगरम गरम भजी, वाफाळलेला चहा आणि बरेच काही…………\nएक असावे नयनरम्य घर…..\nजंबुद्वीप मित्र असा अस्त पावला\nडोळ्यामध्ये स्मित तुझ्या अन\n|| दे सदबुद्धी त्यांना | सर्वदा ||\nकोसळेल जेंव्हा | वज्र देवेंद्राचे |\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/mpsc-krushi-recruitment-2022-24-vacancies/", "date_download": "2022-10-07T23:21:20Z", "digest": "sha1:53UVLUW5IPNTJTZP2MA7YEEY5YCOA43L", "length": 10921, "nlines": 157, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "MPSC Krushi Recruitment 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 24 जागांसाठी भरती - 2022", "raw_content": "\nMPSC Krushi Recruitment 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 24 जागांसाठी भरती\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMPSC Krushi Recruitment 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र कृषी प्रशासकीय सेवा, गट-अ व सहायक प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र कृषी प्रशासकीय सेवा, गट-ब पदाच्या एकूण 24 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 25 जून 2022 ते 15 जुलै 2022 या कालावधीत अर्ज सदर करू शकता.\nपरीक्षेचे नाव / Exam Name : प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र कृषी प्रशासकीय सेवा, गट-अ व सहायक प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र कृषी प्रशासकीय सेवा, गट-ब\nपदाचे नाव व तपशील / Post Details :\nSr. No. पदाचे नाव /\nSr. No. पदाचे नाव /\nName of Post शैक्षणिक पात्रता /\nवयोमर्यादेत सूट / Age Relaxation :\nप्रवर्ग / आरक्षण /\nइतर मागासवर्गीय / OBC 03 Years\nमहिला / Women सामाजिक आरक्षण नुसार\nपरीक्षा शुल्क / Exam Fee\nप्रवर्ग / आरक्षण /\nइतर मागासवर्गीय / OBC ₹ 719/-\nमहिला / Women सामाजिक आरक्षण नुसार\nमाजी सैनिक / Ex- Servicemen सामाजिक आरक्षण नुसार\nमहत्वाच्या तारखा / Important Dates\nअर्ज सुरु होण्याची तारीख /\nअर्ज करण्याची शेवटची तारीख /\nअधिकृत संकेतस्थळ बघा | Official Website\nकृषी प्रशासकीय सेवा, गट-अ सविस्तर जाहिरात / Detailed Advertisement PDF :↓\nकृषी प्रशासकीय सेवा, गट-ब सविस्तर जाहिरात / Detailed Advertisement PDF :↓\nऑनलाईन अर्ज करा | Apply Online\nहेल्पलाईन माहिती / Helpline Details :\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMPSC Group C Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC Subordinate Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022\nAir Force Agnipath Recruitment 2022 | भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022\nMPSC State Service Pre 2022 | महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 161 जागा\nMPSC Recruitment | पशुधन विकास अधिकारी पदाच्या 212 जागांसाठी भरती\nIndian Army Recruitment | भारतीय सेना भारती 90 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/2888", "date_download": "2022-10-07T23:28:06Z", "digest": "sha1:VMHPMLXBF7BRX4HWB3YD3SQH3KTFZ2TI", "length": 11946, "nlines": 106, "source_domain": "bollyreport.org", "title": "करीना कपूर-खानच्या दुसऱ्या मुलाचं नाव जेह, त्याच्या शब्दाचा अर्थ पाहून वाटेल अजून काय बाकी आहे ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News करीना कपूर-खानच्या दुसऱ्या मुलाचं नाव जेह, त्याच्या शब्दाचा अर्थ पाहून वाटेल अजून...\nकरीना कपूर-खानच्या दुसऱ्या मुलाचं नाव जेह, त्याच्या शब्दाचा अर्थ पाहून वाटेल अजून काय बाकी आहे \nबॉलिवुड म्हटलं की रोज नवं गॉसिप रोज नव्या चर्चा या येतात. बॉलिवुड कलाकारांसोबत त्यांची मुलं देखील स्टारकिड म्हणुण प्रसिद्ध होत असतात. लोकांना सुद्धा या मुलांच राहणीमान कसं आहे. त्यांच आयुष्य सर्वसामान्य मुलांसारख आहे की टीव्हीवर दिसणाऱ्या मुलांसारख यांसाऱख्या गोष्टींची उत्सुकता असते. स्टारकिड्स मध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असलेलं मुलं म्हणजे अभिनेत्री करीना कपुर आणि सैफ अली खानचा मोठा मुलगा तैमुर.. तो लहानपणापासुनच लाइमलाइटमध्ये होता.\nत्यानंतर करीनाने २१ फेब्रुवारीला तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्याच्या जन्मानंतर सुद्धा प्रेक्षकांना तैमुरचा छोटा भाऊ कसा असेल. तो कोणासारखा दिसत असेल.. त्याच नाव काय असेल या सर्व गोष्टींची उत्सुकता लागली होती. लोक त्याच्या नावाबद्दल वेगवेगळे अंदाज लावत होते. खुप दिवस झाले तरी त्या बाळा बद्दल करीना कडुन कोणतीच खबर बाहेर आली नव्हती. तैमुरच्या जन्मानंतर त्य़ाच्या नावावरुन खुप वाद झाला होता त्यामुळे कदाचित पुन्हा तिच चुक होऊ नये यासाठी करीना आणि सैफने त्यांच्या दुसऱ्या नावाबद्दल ती चुक केली नसावी.\nखुप काळाच्या प्रतिक्षेनंतर करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव जग जाहिर केले आहे. तिच्या दुसऱ्या बाळाचे नाव जेह असे ठेवले आहे. रणधीर कपुरने हे नाव जाहिर केल्याचे समजले जात आहे. या नावाचा अर्थ सुद्धा खुप सकारात्मक आहे.\nज्य़ोतिष शास्त्रानुसार जेह हे एक पारसी नाव आहे. या नावाचा अर्थ ‘येणे’ असा होतो. हे खुप सकारात्मक असे नाव आहे. या नावाच्या अर्थाप्रमाणे त्या मुलाच्या येण्याने परिवारात खुप सुख येणार असा होतो. जेह हे नाव सकारात्मकता आणि शुभतेचे प्रतिक आहे. परंतु तरीही सोशल मीडियावर ते ट्रोल झालेच \nअंक ज्योतिषानुसार जेह या नावाला ७ आकडा येतो. साधारणपणे ज्या नावांची अंक ज्योतिष संख्या ही चार, सात आणि आठ येतो त्या मुलांना रिकमेंड केले जात नाही कारण ही मुल खुप आध्यात्मिक असतात. ते सांसारिक भावनांपासुन दूर राहणे पसंत करतात. कदाचित ती मुले वैवाहिक आयुष्यापासुन सुद्धा दूर राहु शकतात. त्यांना व्यवसायात रस नसतो. त्यामुळे ही मुले दुनियादारी पासुन सुद्धा दुर राहतात. ज्योतिषशास्त्रानुसार ही मुले संत महत्मासुद्धा बनु शकतात. या लोकांना दान-पुण्य करण्यात जास्त विश्वास असतो.\nजेह या नावावरुन असे समजते कि त्या बाळाचे त्याच्या आईशी खुप जवळचे संबंध असणार आहेत. या व्यतिरिक्त ते बाळ खुप भावुक आणि दयावान असणार आहे. त्याला त्याच्या भाग्यावरुन खुप काही मिळणार आहे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious article२०१८ मध्ये प्रसिद्ध झालेले डब्बू अंकल परत नवीन व्हिडीओमुळे सोशल मीडियावर व्हायरल, बघा नवीन व्हिडीओ \nNext articleआज आषाढी एकादशी, पाप मुक्त होण्यासाठी आज काय करावे आषाढी एकादशीचे महत्त्व, जाणून घ्या \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/3328", "date_download": "2022-10-07T22:20:53Z", "digest": "sha1:A3RPUQXIG474XO7UMS4V5TTO5USIH55W", "length": 12467, "nlines": 107, "source_domain": "bollyreport.org", "title": "पुष्पा फेम अल्लू अर्जुन आहे तब्बल एवढ्या संपत्तीचा मालक, वाचून वेडे व्हाल ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News पुष्पा फेम अल्लू अर्जुन आहे तब्बल एवढ्या संपत्तीचा मालक, वाचून वेडे व्हाल...\nपुष्पा फेम अल्लू अर्जुन आहे तब्बल एवढ्या संपत्तीचा मालक, वाचून वेडे व्हाल \nगेल्या काही दिवसांत पुष्पा चित्रपटामुळे साऊथ सुपरस्टार अल्लु अर्जुन बराच चर्चेत आहे. पुष्पाने बॉक्स ऑफिसवर ३०० करोड रुपयांचा गल्ला जमावला. या चित्रपटामुळे बॉलिवुडमध्ये सुद्धा अल्लु अर्जुनची डिमांड वाढली आहे. अल्लु अर्जुनने त्याच्या जबरदस्त अभिनयाने आणि स्टाइलने सर्वांची मने जिंकुन घेतली आहेत. त्यामुळे त्याचे चाहते आता संपुर्ण जगभरात पसरले आहेत.\nअल्लु अर्जुन हा साऊथकडील सुपरस्टार चिरंजीवी यांचा भाचा आहे. अल्लु ची लाईफस्टाईलसुद्धा खुप लग्नझरीयस आहे. आज आम्ही तुम्हाला अल्लु अर्जुनच्या वॅनिटी आणि नेटवर्थबद्द्ल सांगणार आहोत. अल्लु अर्जुनचे नाव साउथच्या सर्वात जास्त फिस घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आलीशान घर, करोडोच्या गाड्या , लग्जरीस लाईफ स्टाइल मध्ये तो अगदी राजकुमारासारखा राहतो.\nमीडिया रिपोर्टस् नुसार अल्लु अर्जुनाचा वार्षिक इन्कम हा ३२ करोड हुन अधिक आहे. तर त्याचे नेटवर्थ ३५० करोड रुपयांच्या आसपास आहे. तो एका चित्रपटासाठी १५ करोड रुपये चार्ज करतो. तर वैकुंठपुरमल्लों चित्रपटासाठी त्याने तब्बल २५ करोड रुपये घेतले होते. तसेच तो एका एॅडच्या ब्रांड एंडोर्ससाठी३ करोड रुपये चार्ज करतो.\nअल्लु अर्जुनच्या हैदराबादमधील बंगल्याची किंमत १०० करोड रुपये आहे. तर जुबली हिल्स येथील घर त्याने पॉपुलर इंटीरियर डिजाइनर आमिर आणि हामिदा से डेकोरेट केले आहे. हे घर बॉक्स शेप मध्ये असेल तसेच त्यात जास्त डिझाईन नसेल या गोष्टीचा विचार करुन तयार केले आहे. घरात लिविंग रूम, डाइनिंग, किचन से बार काउंटरपर्यंत सर्व फॅसिलिटी आहे. अल्लु अर्जुन सोशल मीडियावर अनेकदा त्याचे फोटो व्हिडीओ शेअर करत असतो त्यात त्याचे घर दिसते. त्या फोटोमध्ये दिसते कि त्याच्या घरात मुलांना खेळायला लॉनसुद्धा आहे.\nत्याच्या घराच्या लिविंग रुम ला ऑल व्हाइट टच दिला आहे. तिथे लाइटिंगसुद्धा व्हाइटच दिली आहे. अल्लुने त्याच्या पत्नीसोबत एक फोटो शेअर केला होता त्यात त्याच्या लिविंग रूम चा मिनिमालिस्टिक डेकोर पाहण्ययास मिळाला होता. त्याच्या घराच्या किचन मध्ये टॉप शेफ जेवण बनवतात. त्या किचनला पण व्हाईट टच दिला आहे. तिथेच मरुन रंगाचा एक डायनिंग टेबल पण आहे. त्याच्या अलिशान घरात स्विमिंग पुल सुद्धा आहे. त्याच्या शेजारीच छानसा गार्डन एरिया तयार केला आहे.\nत्याच्याकडे ४-५ करोडच्या लग्झरी कार आहेत. त्या कलेक्शन मध्ये रेंज रोवर, ऑडी आणि BMW सीरिज मध्ये BMW X6 Coupe कार आहे ज्याचा नंबर ६६६ असा आहे. याशिवाय त्याच्याकडे जगुआर आणि पोर्शे सारख्या महागड्या गाड्या आहेत.\nअल्लु अर्जुनकडे भारतातली सर्वात महागडी वॅनिटी व्हॅन आहे. त्याने ही व्हॅन २०१९ मध्ये खरेदी केली होती. तिचे नाव Falcon ठेवले आहे. ही गाडी बाहेरुन जितकी सुंदर दिसते तितकीच ती अलिशान सुद्धा आहे. या गाडीत हाई टेक एलईडी लाइट्स लावल्या आहेत.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious article‘कच्चा बदाम’ गाणे गाऊन रातोरात स्टार झालेलया भुवन बादायकर यांचे दिवस पालटले, कंपनीने दिले एवढे लाख रुपये \nNext articleअरुंधती घराबद्दल घेणार महत्वाचा निर्णय, निर्णय ऐकून सर्वांना धक्का बसणार \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/priya-parihar-won-the-title-of-miss-fresher-in-dr-bendale-college-130305162.html", "date_download": "2022-10-07T21:25:21Z", "digest": "sha1:SV6X5DQGUKSRQNEBYGKCPLI2WKUXUGYU", "length": 3623, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "डॉ.बेंडाळे कॉलेजमध्ये मिस फ्रेशरचा बहुमान प्रिया परिहार हिने पटकावला | Priya Parihar won the title of Miss Fresher in Dr. Bendale College| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफ्रेशर्स पार्टीचे आयोजन:डॉ.बेंडाळे कॉलेजमध्ये मिस फ्रेशरचा बहुमान प्रिया परिहार हिने पटकावला\nडॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींकडून फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्या डॉ. गौरी राणे यांच्या हस्ते करण्यात आले.\nमहाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अकरावीच्या विद्यार्थिनींचे बारावीतील विद्यार्थिनींनी स्वागत केले. या निमित्ताने विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमात समूह नृत्य व गीतगायन करून कार्यक्रमात रंगत आणली. तसेच मिस फ्रेशर २०२२साठी चुरशीची स्पर्धा झाली. त्यातून मिस फ्रेशरची निवड करण्यात आली. मिस फ्रेशर २०२२चा बहुमान प्रिया परिहार हिने पटकावला. उपप्राचार्य सुनीता पाटील यांच्या हस्ते मिस फ्रेशरला मुकुट देऊन सन्मानित करण्यात आला. या वेळी एन. जी. बावस्कर, के. सी. वंजारी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/social-activist-trupti-desai-first-reaction-over-physical-relations-training-camp-vvg94", "date_download": "2022-10-07T21:54:15Z", "digest": "sha1:JZ7SXJLW5US7UN7V6TKOEXX5PD4EOODC", "length": 7916, "nlines": 60, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Trupti Desai News |पुण्यात नवरात्रीत लैंगिक प्रशिक्षण देण्यात येणार; तृप्ती देसाईंनी व्यक्त केली मोठी भीती", "raw_content": "\nपुण्यात नवरात्रीत लैंगिक प्रशिक्षण देण्यात येणार; तृप्ती देसाईंनी व्यक्त केली मोठी भीती\nलैंगिक प्रशिक्षणाच्या शिबिरावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.\nTrupti Desai News : पुणे (Pune) शहरात सध्या सोशल मीडियावर लैंगिक प्रशिक्षणाची जाहिरात प्रचंड व्हायरल झाली आहे. यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने लैंगिक प्रशिक्षणाचं तीन दिवसाचं शिबिर घेण्यात येणार आहे. या जाहिरातीवरून सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या लैंगिक प्रशिक्षणाच्या शिबिरावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लैंगिक प्रशिक्षणाच्या शिबिराच्या नावाखाली सेक्स रॅकेट सक्रिय होऊ शकतो, अशी भीती सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली आहे.\nPune News : पुण्यात नवरात्र उत्सवानिमित्त 'सेक्स तंत्र' शिबीर घेणार; धक्कादायक प्रकार उघड\nयंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने पुण्यातील कॅम्प परिसरात तीन दिवसांचे लैंगिक प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. १, २ आणि ३ ऑक्टोबर असे तीन दिवस पुण्यातील कॅम्प भागात शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकी १५००० हजार रुपये घेण्यात येणार आहे. या शिबिराची जाहिरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. सदर लैंगिक प्रशिक्षण शिबिरावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'सदर शिबिराच्या नावाखाली सेक्स रॅकेट सक्रिय होत असल्याची दाट शक्यता आहे. यामुळे पुणे पोलीस आणि गृहमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली आहे.\nFunny Video : याला कुणीतरी आवरा रे भर रस्त्यात मद्यपीचा नागिन डान्स, व्हिडीओ Viral\nदरम्यान, लैंगिक प्रशिक्षण शिबिरावर हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. 'लैंगिक प्रशिक्षणाच्या नावाखाली पुण्यात एक गलिच्छ आणि विकृत व्यवसाय करण्याचा घाट आहे. नवरात्री स्पेशल असं नाव या विकृत प्रकरणाला दिलं गेलं आहे. हा हिंदू आणि त्यांचा दैवतांचा अपमान आहे. हे हिंदू महासंघ कदापि सहन करणार नाही. आयोजकांचा पत्ता ना नाव आणि ना होणाऱ्या कार्यक्रमाचा पत्ता किंवा इतर कोणताही माहिती यावरून हे सर्व फसवं आणि घाणेरडं असून नवीन विकृत संस्कृतीला जन्म देणारे ठरणार आहे. हिंदू महासंघ हे होऊ देणार नाही. उद्या शुक्रवारी दुपारी १२ वाजता आम्ही पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयात याबाबतचं निवेदन देण्यासाठी जाणार असून या विकृतीला रोखण्यासाठी जे करावे लागेल ते ते आम्ही करू', अशी संतप्त प्रतिक्रिया आनंद दवे यांनी दिली.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/ajit-pawar-order-to-complete-panchanama-in-pune-district/", "date_download": "2022-10-07T21:58:37Z", "digest": "sha1:6SJD7A327S75N27BBVR3MIVE4J3SESY7", "length": 10407, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "पुणे जिल्ह्यातील पंचनामे लगोलग पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nपुणे जिल्ह्यातील पंचनामे लगोलग पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश\nपुणे जिल्ह्यातील पंचनामे लगोलग पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश\nमुंबई | निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाची संवाद साधून जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.\nचक्रीवादळाच्या संकटकाळात मदतकार्यात सहभागी झालेले लाईफ गार्ड, पोलीस, संरक्षण दलांचे, एनडीआरएफचे जवान, स्थानिक स्वराज संस्थांचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आपत्कालिन यंत्रणेतील, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, नागरिकांचे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर आभार मानले आहेत.\nपुणे शहरात तसेच मावळ, आंबेगाव, जुन्नर, खेड, वेल्हे, मुळशीसह इतर तालुक्यातही वादळानं मोठे नुकसान केले आहे. घरं, शाळा, अंगणवाड्या, गुरांचे गोठे, भाजीपाल्याची पिके, फळबागांचं झालेलं नुकसान प्रचंड आहे. पोल्ट्री शेड, कांदा चाळी, पॉली हाऊसचे पत्रे उडून गेल्याचे प्रकार घडले आहेत. विजेच्या तारा व खांब मोडून पडल्यानं वीजयंत्रणेचंही नुकसान झालं आहे.\nपुणे जिल्ह्यात आणखी एक-दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधून सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन नुकसानीबद्दलची माहिती जाणून घेतली. पंचनामे पूर्ण होऊन अहवाल येताच मदतीबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\nमुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमधील काही निर्बंध केले शिथील तर नव्या उपक्रमांना दिली संमती\n“लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला हे माझं एकट्याचं नाही तर तुम्हा सर्वांचं यश”\n“दानशूर उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या”\nRTI अंतर्गत PM केअर फंडाबाबत विचारले होते प्रश्न; PM कार्यालयाने उत्तरं दिली नाहीत\nदेशात कोरोनाचा कहर सुरूच… गेल्या 24 तासांतली चिंताजनक आकडेवारी\n“दानशूर उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या”\nनुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री रोरो बोटीतून आलिबागकडे रवाना\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/make-asra-chowk-to-aman-chowk-road-immediately-officials-of-mim-met-the-municipal-commissioner-130309351.html", "date_download": "2022-10-07T23:01:56Z", "digest": "sha1:JK4KW73W2VR3WFNEDJQYWXQNSOSA26CU", "length": 3725, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "आसरा चौक ते अमन चौक रस्ता त्वरित करा ; एमआयएमचे पदाधिकारी भेटले पालिका आयुक्तांना | Make Asra Chowk to Aman Chowk road immediately; Officials of MIM met the Municipal Commissioner - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nखराब रस्ता:आसरा चौक ते अमन चौक रस्ता त्वरित करा ; एमआयएमचे पदाधिकारी भेटले पालिका आयुक्तांना\nआसरा चौक ते अमन चौक या लोकमान्य नगरला जोडणारा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, यासह शहरातील सर्व खड्डेमय रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करत एमआयएमने महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली आणि निवेदन दिले. सततच्या पावसाने शहर आणि परिसरामध्ये विशेष करून हद्दवाढ भागातील रस्ते खराब होत आहेत. यामुळे सर्वसामान्य व वाहनचालक यांना त्रास होत आहे. वारंवार सांगून महापालिका प्रशासनाकडून हद्दवाढ भागातील रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही. आसरा चौक ते अमन चौक लोकमान्य नगरला जोडणारा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. रस्ता नाही केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी रेश्मा मुल्ला, वसीम शेख, इस्सामोद्दीन पीरजादे, आशपाक बागवान, सोहेल चौधरी, शकील शेख, हाजी शेख, खलील टंगसाल आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/before-the-india-pakistan-match-the-reaction-about-kohli-came-from-pakistan-update/", "date_download": "2022-10-07T22:15:32Z", "digest": "sha1:ZCCQG5J37XWMLE3I2VQ2VSH3IMX3I4FE", "length": 7245, "nlines": 42, "source_domain": "mahaupdate.in", "title": "भारत-पाक सामन्यापूर्वी पाकिस्तानमधून कोहलीबद्दल प्रतिक्रिया - Maha Update", "raw_content": "\nHome » भारत-पाक सामन्यापूर्वी पाकिस्तानमधून कोहलीबद्दल प्रतिक्रिया\nभारत-पाक सामन्यापूर्वी पाकिस्तानमधून कोहलीबद्दल प्रतिक्रिया\nनवी दिल्ली : आशिया कप 2022 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि यूएई हे देश सहभागी होत आहेत. 28 ऑगस्ट रोजी भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील महान सामन्यापूर्वी महान फलंदाज विराट कोहलीबाबत जोरदार वाक्प्रचार सुरू आहेत. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.\nभारत-पाक सामन्यापूर्वी कोहलीबद्दल वक्तव्य\nशाहीद आफ्रिदीला सोशल मीडियावर विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म आणि भविष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. शाहीद आफ्रिदीला एका चाहत्याने ट्विटरवर विचारले की, विराट कोहलीच्या भविष्याबद्दल तू काय सांगशील यावर शाहिद आफ्रिदीने आपल्या उत्तराने खळबळ उडवून दिली. विराट कोहलीच्या भविष्याबद्दल शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘आता ते त्याच्या स्वत:च्या हातात आहे.’\nदुसर्‍या एका चाहत्याने शाहिद आफ्रिदीला विचारले की विराट कोहलीने एक हजार दिवसांपेक्षा जास्त शतक केले नाही. याला उत्तर देताना शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘मोठा खेळाडू फक्त कठीण काळातच ओळखला जातो.’ विराट कोहली फॉर्ममध्ये नसला तरी तो जागतिक दर्जाचा फलंदाज आहे. विराट कोहली कधीही फॉर्ममध्ये येऊ शकतो.\nविराट कोहली आशिया कपमध्ये भारताचा सर्वात मोठा सामना विजेता ठरू शकतो. आशिया कपमध्ये विराट कोहली मोठी भूमिका बजावू शकतो. जेव्हा तुम्हाला एखादी मोठी स्पर्धा जिंकायची असते तेव्हा तुम्हाला नेहमी संघासोबत शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्या खेळाडूंची गरज असते आणि तो म्हणजे विराट कोहली. विराट कोहलीत आपल्या फलंदाजीने सामना फिरवण्याची ताकद आहे.\nयाआधी पाकिस्तानचा अनुभवी फिरकी गोलंदाज यासिर शाह याने भारताविरुद्धच्या आशिया चषकाच्या महान सामन्याआधी मोठा इशारा देत टीम इंडियाच्या एका फलंदाजापासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. भारताचा महान फलंदाज विराट कोहलीचा खराब फॉर्म असूनही त्याला हलके घेण्याची चूक करू नका, असा इशारा यासिर शाहने पाकिस्तान संघाला दिला होता.\nपाकिस्तानचा अनुभवी फिरकी गोलंदाज यासिर शाह Paktv.tv ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, ‘विराट कोहलीला हलके घेण्याची चूक करू नका. होय, विराट कोहली फॉर्ममध्ये नाही कारण तो धावा काढण्यासाठी धडपडत आहे, परंतु तो एक जागतिक दर्जाचा फलंदाज आहे. विराट कोहली कधीही फॉर्ममध्ये येऊ शकतो.\nShahid Afridi : शाहिद आफ्रिदीच्या मुलीने फडकावला भारताचा तिरंगा, क्रिकेटरनेच सांगितली संपूर्ण घटना\n“मला त्याच्या मनातले माहित नाही…”; विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सौरव गांगुलीचे मोठे वक्तव्य\nAsia Cup 2022 : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी माजी दिग्गज म्हणाला, “आफ्रिदीला घाबरण्याची गरज…”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/2439", "date_download": "2022-10-07T21:38:36Z", "digest": "sha1:JLNYDS4Q4TLQH3JW7H3APUK6LNCA2IH4", "length": 11133, "nlines": 106, "source_domain": "bollyreport.org", "title": "या कारणामुळे जॅकी श्रॉफ यांनी मुलाचे नाव 'टायगर' ठेवले, कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News या कारणामुळे जॅकी श्रॉफ यांनी मुलाचे नाव ‘टायगर’ ठेवले, कारण जाणून तुम्ही...\nया कारणामुळे जॅकी श्रॉफ यांनी मुलाचे नाव ‘टायगर’ ठेवले, कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल \nजॅकी श्रॉफ यांचा मुलगा आणि बॉलिवुड अभिनेता टायगर श्रॉफने नुकताच त्याचा ३१ वा वाढदिवस साजरा केला. टायगरचा जन्म १९९० मध्ये झाला होता. टायगरचे खरे नाव त्यावेळी जय हेमंत श्रॉफ असे ठेवले होते मात्र नंतर त्याच्या वडिलांनी म्हणजेच जॅकी श्रॉफने त्याचे नाव बदलुन टायगर असे ठेवले. स्वत: जॅकी यांनी यामागचे कारण सांगितले.\nटायगरच्या नावाबद्दल सांगताना जॅकी यांनी सांगितले कि जेव्हा टायगर लहान होता त्यावेळी त्याच्या नखांनी जॅकी यांचा चेहरा बोचकारायचा. त्यांचे डोळे बाहेर काढायचा प्रयत्न करायचा. त्याला डोळे खावेसे वाटायचे. जॅकी यांनी सांगितले कि टायगर जेव्हा डोळे पाहायचा तेव्हा त्याला ती खाण्याची गोष्ट वाटायची. त्यामुळे तो डोळ्यांवर तुटुन पडायचा. त्यावेळी तो केवळ एक-दोन वर्षांचा असेल. त्याची ही चावायची आणि बोचकरायच्या सवयींमुळे त्याच्यासाठी टायगर हे नाव योग्य होते.\nटायगरच्या वाढदिवसानिमित्त जॅकी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली की, टायगरने कमी वयातच त्याची स्वत:ची ओळख निर्माण केली. सध्या मी टायगरच्या नावाने ओळखला जातो ही गोष्ट मला खुप आवडते. त्याचे नाव होत आहे ही खुप चांगली गोष्ट आहे.\nमाझेही या इंडस्ट्रीमध्ये नाव होते मात्र तरी टायगरने ते आणखी रोशन केले आहे. त्याला इंडस्ट्रीमध्ये येऊन खुप कमी वेळ झाला आहे तरी तो खुप मेहनतीने काम करत आहे. जॅकी यांनी त्यांच्या मुलाला -7 डिग्रीमध्ये सुद्धा काम करताना पाहिले आहे. त्यामुळे त्यांना त्याचा आणखी अभिमान वाटतो.\nटायगरने एकदा सांगितलेले की तो जर अभिनेता झाला नसता तर एक फुटबॉलर असता. शाळेत असताना टायगर खुप वेगात धावायचा. मुलांना मारल्यामुळे सुद्धा टायगरच्या तक्रारी घरी यायच्या. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा टायगरची एंट्री झाली तेव्हा त्याला सगळे करीना कपूरच्या नावाने ओळखायचे. कारण लोकांचे म्हणणे होते की तो लेडी करीना कपूर वाटतो.\nयावर टायगरने उत्तर दिले की, जेव्हा त्याच्या चेहऱा आणि करीना कपूरचा चेहऱ्याबद्दल कोणी गॉसिप करत त्यावेळी त्याला बिलकुल वाईट वाटत नाही. उलट त्याला ते खुप आवडतं. निदान त्या निमित्ताने लोक त्याचे नावं तरी घेतात. त्यामुळे त्याची पब्लिसिटी होते.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleअखेर अमिताभ बच्चन यांच्या २८०० करोड संपत्तीचा वारसदार ठरला, हे असतील अमिताभ यांच्या संपत्तीचे वारसदार \nNext articleपोस्ट ऑफिसच्या या आहेत जबरदस्त योजना ज्यात पैसे गुंतवून मिळवू शकता लाखो रुपये, जाणून घ्या \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/terrorist-plot-foiled-ahead-of-independence-day-30-kg-ied-seized-in-pulwama-mhss-744233.html", "date_download": "2022-10-07T23:24:56Z", "digest": "sha1:LUIXMEFMEQDLAAFRJ74MBWGTOZASHAHH", "length": 7081, "nlines": 97, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Terrorist plot foiled ahead of Independence Day 30 kg IED seized in Pulwama mhss - स्वातंत्र्य दिनाच्या आधी दहशतवाद्यांचा कट उधळला, पुलवामामध्ये IED स्फोटाचा LIVE VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /देश /\nस्वातंत्र्य दिनाच्या आधी दहशतवाद्यांचा कट उधळला, पुलवामामध्ये IED स्फोटाचा LIVE VIDEO\nस्वातंत्र्य दिनाच्या आधी दहशतवाद्यांचा कट उधळला, पुलवामामध्ये IED स्फोटाचा LIVE VIDEO\nपुलावामामध्ये सर्कुलर रोडवरील तहब क्रॉसिंगजवळ सुमारे 25 ते 30 किलो वजनाचे IED जप्त करण्यात आले आहे\nपुलावामामध्ये सर्कुलर रोडवरील तहब क्रॉसिंगजवळ सुमारे 25 ते 30 किलो वजनाचे IED जप्त करण्यात आले आहे\nश्रीनगर, 10 ऑगस्ट : देशभरात स्वातंत्र्य दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. पण जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात जवानांना यश आले आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाने पुलवामामध्ये (Pulwama) सुमारे 25 ते 30 किलो वजनाचे इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (IED) जप्त केले आहे. त्यामुळे मोठा हल्ला टळला आहे. जवानांनी IED निकामी केले आहे. पुलावामामध्ये सर्कुलर रोडवरील तहब क्रॉसिंगजवळ सुमारे 25 ते 30 किलो वजनाचे IED जप्त करण्यात आले आहे. आईडी सापडल्यानंतर उधमपूर-कटरा रेल्वे लिंक आणि उधमपूर रेल्वे स्टेशनवर सुरक्षा कडक करण्यात आली.\nस्वातंत्र्य दिनाच्या आधी देशभरात खबरदारी घेतली आहे. अशातच ही घटना समोर आली आहे. पुलवामामध्ये या घटनेनंतर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. विशेष श्वान पथक, रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि आरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. तसंच, काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP), विजय कुमार यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे. दरम्यान, बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. 2022 मध्ये काश्मिरी पंडित शासकीय कर्मचारी असलेल्या राहुल भट यांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या लतीफ रादरसह 3 लष्कर-ए-तोयबा (एलईटी)च्या ठिकाणा लागला आहे. या चकमकीमध्ये जवानांनी घेराव घातला आहे. या प्रकरणाची कारवाई सुरू आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.eturbonews.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2022-10-07T22:47:58Z", "digest": "sha1:Q4GXOIQKWPX3DQMO7HI3XD5K3MLYUSWD", "length": 33543, "nlines": 148, "source_domain": "mr.eturbonews.com", "title": "प्रथम पूर्णपणे रोबोटिक एसोफेजेक्टॉमी पूर्ण | वायर न्यूज", "raw_content": "\nस्थान: होम पेज » पोस्टिंग » वायर न्यूज » प्रथम पूर्णपणे रोबोटिक एसोफेजेक्टॉमी पूर्ण झाली\nप्रथम पूर्णपणे रोबोटिक एसोफेजेक्टॉमी पूर्ण झाली\nनवीन, पूर्णपणे रोबोटिक दृष्टीकोनातून, सेंट जोसेफ हेल्थकेअर हॅमिल्टन येथील थोरॅसिक सर्जनने अन्ननलिका कर्करोगाच्या शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग बदलला आहे. कॅनडातील अन्ननलिका कर्करोगावरील शस्त्रक्रियेतील दोन दशकांहून अधिक काळातील ही सर्वात लक्षणीय प्रगती आहे.\n“अन्ननलिका कर्करोग हा क्वचितच मथळे बनवतो, परंतु सर्व कर्करोगांमध्ये त्याचा दुसऱ्या क्रमांकाचा मृत्यू दर आहे,” डॉ. वाल हॅना, सेंट जोस येथील थोरॅसिक सर्जन आणि हॉस्पिटलच्या बोरिस फॅमिली सेंटर फॉर रोबोटिक सर्जरीमधील संशोधन प्रमुख म्हणतात. \"हे खूप प्राणघातक आहे कारण अन्ननलिका घसा आणि वक्षस्थळामध्ये खोलवर आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या पारंपारिक शस्त्रक्रिया पद्धती वापरून ऑपरेट करणे कठीण आहे.\"\nपारंपारिक एसोफेजेक्टॉमी (पोट पुन्हा जोडण्यासाठी छातीच्या पोकळीत पोट वर खेचताना अन्ननलिकेचा कर्करोगग्रस्त भाग काढून टाकण्याची प्रक्रिया) गुंतागुतीचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत जास्त आहे. हे प्रक्रियेच्या हाताच्या आकाराचे चीर, रुग्णाच्या छातीच्या पोकळीला झालेला आघात आणि ICU मध्ये शस्त्रक्रियेनंतर दीर्घकाळ रिकव्हरी राहणे यामुळे होते ज्यामुळे अनेकदा न्यूमोनिया, संक्रमण आणि हृदयाच्या गुंतागुंतीशी संघर्ष होतो.\nजॉर्जटाउन, ओंट., रहिवासी जॅकी डीन-रॉली यांच्यापेक्षा चांगले हे कोणालाही माहीत नाही. तिची मुलगी रेचेल चुवालो हिला 2011 मध्ये अन्ननलिका कर्करोगाचे निदान झाले होते जेव्हा ती फक्त 29 वर्षांची होती. त्यावेळी पारंपरिक शस्त्रक्रिया हाच पर्याय होता.\n“ती पाच फूट दोन उभी होती, फिट आणि ट्रिम होती,” डीन-रॉली म्हणतात. “तिच्या लहानशा सुंदर शरीराला असा आघात सहन करावा लागत आहे याचा विचार करणेही माझ्यासाठी आता कठीण आहे. पण राहेल एक लढाऊ होती.” चुवालोला तिच्या शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंतीचा अनुभव आला आणि अखेरीस 2013 मध्ये तिच्या आजाराला बळी पडले.\nजागतिक प्रवास पुनर्मिलन वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट लंडन परत आले आहे आणि आपण आमंत्रित आहात. सहकारी उद्योग व्यावसायिकांशी, नेटवर्क पीअर-टू-पीअरशी कनेक्ट होण्याची, मौल्यवान अंतर्दृष्टी जाणून घेण्याची आणि फक्त 3 दिवसांत व्यवसायात यश मिळवण्याची ही तुमची संधी आहे आणि आपण आमंत्रित आहात. सहकारी उद्योग व्यावसायिकांशी, नेटवर्क पीअर-टू-पीअरशी कनेक्ट होण्याची, मौल्यवान अंतर्दृष्टी जाणून घेण्याची आणि फक्त 3 दिवसांत व्यवसायात यश मिळवण्याची ही तुमची संधी आहे आपले स्थान सुरक्षित करण्यासाठी आजच नोंदणी करा आपले स्थान सुरक्षित करण्यासाठी आजच नोंदणी करा 7-9 नोव्हेंबर 2022 दरम्यान होणार आहे. अाता नोंदणी करा\nचुवालोची सेंट जोई येथे काळजी घेतल्यानंतर आठ वर्षांनी डीन-रॉली यांना विविध प्रकारच्या कर्करोगाच्या रूग्णांवर उपचार करताना रोबोटिक शस्त्रक्रिया दाखविल्याबद्दल माहिती मिळाली. तिने डॉ. हॅना यांना भेटले आणि त्यांना समजले की ते अन्ननलिका कर्करोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी नवीन प्रक्रिया कशी करावी यावर संशोधन करत आहेत. डीन-रॉलीला माहित होते की तिला तिच्या मुलीच्या स्मृतीचा आदर करण्याचा आणि अन्ननलिकेचा कर्करोग असलेल्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचा मार्ग सापडला आहे.\nडीन-रॉली यांनी डॉ. हॅना आणि त्यांच्या थोरॅसिक शस्त्रक्रिया सहकाऱ्यांना अन्ननलिकेवरील प्रक्रिया करण्यासाठी सर्जिकल रोबोटचा वापर कसा करायचा याचे विशेष प्रशिक्षण मिळावे यासाठी $10,000 ची भेट दिली. 30 मार्च, 2022 रोजी, हे प्रशिक्षण वापरण्यासाठी डॉ. हॅना आणि डॉ. जॉन ऍग्झारियन यांनी कॅनडातील 74 वर्षीय बर्लिंग्टन, ओंटा., डेव्हिड पॅटरसन नावाच्या व्यक्तीवर कॅनडातील पहिली पूर्णपणे रोबोटिक एसोफेजेक्टॉमी केली होती, ज्याला अन्ननलिका आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये कर्करोग.\n\"शस्त्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे आठ तास लागले आणि रुग्णाच्या पोटात आणि छातीत आठ ते १२ मिमी आकाराच्या अनेक लहान चीरांमधून ही शस्त्रक्रिया करण्यात आली,\" डॉ. हॅना म्हणतात. “तो आठ दिवसांनी हॉस्पिटलमधून बाहेर पडला. आमच्या दृष्टीकोनातून, सर्वकाही खूप चांगले झाले. पण आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर कसे वाटते आणि आम्ही कॅन्सरचे ऑपरेशन करू शकलो की नाही.\nहॉस्पिटलमधून फक्त तीन आठवड्यांहून अधिक काळ, पॅटरसन घरी आहे आणि म्हणतो की तो माफीत आहे. “डॉ. हॅना यांच्या काळजीने आणि पाठिंब्याने, कॅनडामध्ये या प्रकारच्या कर्करोगासाठी पहिली पूर्णपणे रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे. त्यांनी अशा प्रकारे ऑपरेशन केलेले तुम्ही पहिले व्यक्ती आहात हे जाणून घेणे सुरुवातीला खूप त्रासदायक होते. पण एकदा डॉ. हॅना यांनी समजावून सांगितले की, रोबो माझ्या अन्ननलिकेतील कर्करोगाचा भाग कसा काढू शकतो, तसेच मला बरे करणे सोपे करते, तेव्हा तो योग्य निर्णय वाटला. मला माहित नाही की पारंपारिक शस्त्रक्रिया कशी वाटली असेल, परंतु मी जे ऐकले त्यावरून ते माझ्या शरीरावर जास्त वेदनादायक आणि कठीण झाले असते. ही संधी मिळाल्याने मी निश्चितच भाग्यवान समजतो. आशा आहे की, याचा अर्थ माझ्यासारख्या इतर रुग्णांना शस्त्रक्रियेनंतरचे आयुष्य अधिक चांगले मिळेल.”\nरोबोटिक शस्त्रक्रिया प्रशिक्षणासोबतच डॉ. हॅना आणि अग्झारियन यांना प्राप्त झाले, सेंट जोसने प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी त्यांच्या नीतिशास्त्र मंडळ तसेच हेल्थ कॅनडाकडून मंजुरी मागितली. रोबोटिक्समधील उत्कृष्टतेचे केंद्र असलेल्या दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. डॅनियल ओह यांनी ही शस्त्रक्रिया देखील केली होती. रोबोटिक शस्त्रक्रियेला अद्याप OHIP द्वारे निधी उपलब्ध नाही आणि केवळ समाजातील देणगीदारांच्या औदार्याने आणि हॉस्पिटलकडून मिळालेल्या निधीमुळे हे शक्य झाले आहे कारण सेंट जोच्या मते रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये उपचारांना गती देण्याची, अधिक किफायतशीर आणि दबाव कमी करण्याची शक्ती आहे. आरोग्य सेवा प्रणालीवर.\n“येथे सेंट जोस येथे, आम्ही फक्त रोबोट वापरत नाही कारण तो नवीन किंवा चमकदार आहे. आम्ही याचा वापर रुग्णांची काळजी वाढवण्यासाठी करत आहोत. प्रक्रिया पार पाडण्याचा मार्ग बदलण्यासाठी. ज्यांचे कर्करोग पूर्वी अकार्यक्षम असल्याचे मानले जात होते त्यांना मदत करण्यासाठी नवीन प्रक्रिया विकसित करण्यासाठी,” सेंट जोस येथील शस्त्रक्रिया प्रमुख डॉ. अँथनी अदिली म्हणतात. “आम्ही राहेल आणि डेव्हिड सारख्या रूग्णांसाठी आणि भविष्यात अनुसरण करणार्‍यांची काळजी बदलत आहोत आणि सुधारत आहोत. आम्ही सर्व देणगीदारांचे आभारी आहोत ज्यांनी आमच्या समुदायापर्यंत अशी काळजी पोहोचवणे आम्हाला शक्य केले आहे.”\nहा लेख सामायिक करा\nयाची सदस्यता घ्याप्रिंटई-मेलप्रतट्विटरफेसबुकसंलग्नतारVKमेसेंजरWhatsAppएसएमएसपंचकर्मफ्लिपबोर्डकराच्या Tumblrझिंगशेअर करा\nअधिक यावर: रुग्णालयात | कुटुंब | कॅनडा | आरोग्य | आरोग्य कॅनडा\nप्रिन्सेस क्रूझ: कॅनडा सर्व COVID-19 निर्बंध काढून टाकते कॅनडा|\nट्रान्स भूतान ट्रेल: साहस, आराम, सांस्कृतिक विसर्जन कॅनडा|\nकॅनडा जेटलाइनने सेबरशी करार केला आहे कॅनडा|\nसामोआच्या सीमा आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी खुल्या आरोग्य|\nऑबर्ज सेंट-अँटोइन नावाचे कॅनडामधील #1 हॉटेल कॅनडा|\nकॅनडा कुटुंब आरोग्य आरोग्य कॅनडा रुग्णालयात\nअडकलेल्या व्हेलची चमत्कारिक सुटका\nनवीन अभ्यासाने सिद्ध केले आहे की कॅनाइन संगीत तणाव आणि चिंता कमी करते\nजागतिक औद्योगिक भांग बाजार जोरदारपणे विकसित होईल आणि...\nजागतिक ऑटोमोटिव्ह वायरिंग हार्नेस मार्केट प्रतिबिंबित करण्यासाठी...\nस्किनकेअर उत्पादने बाजार मूल्यावर पोहोचेल...\nहर्बल सप्लिमेंट्स मार्केटची नोंदणी अपेक्षित आहे...\nबिझनेस इंटेलिजेंस बाय सॉफ्टवेअर मार्केट तयार आहे...\nकोल्ड रोल्डसाठी कोणते घटक अपेक्षित आहेत...\nवायरलेस माउस मार्केट साइज USD 1.29 अब्ज किमतीचे...\nमेटल कटिंग टूल्स मार्केट 6.9% च्या सीएजीआरची नोंद करेल...\nजागतिक फ्रोझन फूड्स मार्केट मोठ्या प्रमाणात कमाई करण्यासाठी...\nUSD 6.9 अब्ज किमतीचे ग्लोबल लिक्विड बायोप्सी मार्केट...\nकोणते राज्य सर्वात आरोग्यदायी आहे सर्वात जास्त तणावग्रस्त\nजागतिक अधोवस्त्र बाजाराच्या सीएजीआरमध्ये गती येईल...\nजागतिक कार USD 1074.05 किमतीच्या बाजाराचा आकार व्यापते...\nबाटलीबंद पाण्याच्या बाजाराला CAGR पेक्षा अधिक गती मिळेल...\nट्रॅक आणि ट्रेस सोल्यूशन्स मार्केटला वेग येईल...\nइन्सुलिन पंप मार्केट 13.38 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल...\nहोम बेडिंग मार्केटमध्ये USD 86,050 दशलक्ष वाढ...\nजागतिक हेअर डाई उत्पादनांच्या बाजारपेठेतील वाढ...\nतांदूळ बाजाराचा आकार USD USD 293.77 अब्ज किमतीचा आहे. द्वारे...\nFDM इंडस्ट्रियल 3D प्रिंटर मार्केटचा आकार इथपर्यंत पोहोचेल...\nजागतिक आय केअर सर्जिकल उपकरणांच्या बाजारपेठेचा आकार उभा राहिला...\nजागतिक ब्लॉकचेन तंत्रज्ञान बाजार अपेक्षित आहे...\nग्लोबल डेंटल सिरिंज मार्केट प्रमुख खेळाडू: NIPRO...\nUSD 6.32 अब्ज किमतीचे जागतिक दंत रोपण बाजार...\nग्लोबल इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केट 24.52% ची CAGR वाढ...\nजागतिक सेल थेरपी बाजार भांडवल गाठण्यासाठी...\nव्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह मार्केटला वेग येईल...\nप्रतिबिंबित करण्यासाठी ग्लोबल एनर्जी स्टोरेज सिस्टम्स मार्केट...\neTurboNew च्या मुख्य संपादक Linda Hohnholz आहेत. ती होनोलुलु, हवाई येथील eTN मुख्यालयात आहे.\nनवीन फॉलो-अप टिप्पण्या माझ्या टिपण्या नवीन प्रतिसाद\nहॉलंड अमेरिका लाईनसह अलास्कामध्ये वाढती स्वारस्य | eTurboNews\nएरोमेक्सिको: सप्टेंबर २०२२ रहदारी परिणाम | eTurboNews\nब्रेमर हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सने 2022 च्या चौथ्या तिमाहीसाठी पसंतीचा लाभांश जाहीर केला - ठळक बातम्या\n2व्या ICAO असेंब्लीमध्ये नेट झिरो CO41 उत्सर्जन लक्ष्य शीर्षस्थानी | eTurboNews\nवेस्टजेट आणि कोरियन एअरने कोडशेअर करार वाढवला | eTurboNews\nदुसिट इंटरनॅशनलने हँगझोऊ मध्ये नवीन लक्झरी वेलनेस रिसॉर्ट उघडले | eTurboNews\nएम्पायर स्टेट बिल्डिंग वार्षिक रन-अप आयोजित करते | eTurboNews\nअलास्का एअरलाइन्सने अनेक राज्यांमध्ये अंतिम बिअर रन बंद केली | eTurboNews\nमालिबू, मियामी आणि न्यूपोर्ट बीच येथे पहिले NFT फिटनेस/वेलनेस लाउंज उघडले eTurboNews\n2041 पर्यंत व्यावसायिक विमान सेवा बाजार दुप्पट होईल | eTurboNews\nअवनी हॉटेल्स ग्रे गॅप इयर ग्लोब ट्रॉटर्सला प्रेरित करते | eTurboNews\nफ्लोरिडा हॉटेलियर्स गरजू असलेल्या फ्लोरिडा कुटुंबांसाठी राहण्याची सोय करतात - ब्रेकिंग न्यूज\n100 साठी जगभरातील टॉप 2022 सर्वात आवडत्या कामाच्या ठिकाणी मॅरियट सुट्ट्या | eTurboNews\nकॅम्ब्रिया हॉटेल्सने कनेक्टिकटमध्ये दुसरी मालमत्ता उघडली | eTurboNews\nFujita Kanko सह जपान प्रवास बकेट लिस्ट अपडेट करा - ठळक बातम्या\nअमन हॉटेल्ससह नवीन खाजगी जेट मोहीम - ब्रेकिंग न्यूज\nलॉस एंजेलिस ते सोल नवीन नॉनस्टॉप फ्लाइट | eTurboNews\nलाउडॉन ला भेट द्या वाइन कंट्री ब्रँड स्टडी | eTurboNews\nओकवुड हॉटेल आणि अपार्टमेंट्स सायगॉन उघडले | eTurboNews\nअफगाणिस्तान - अल्बेनिया - अल्जेरिया - अमेरिकन सामोआ - अँडोर - अंगोला - अँग्विला - अँटिगा बार्बुडा - अर्जेंटिना - अर्मेनिया - अरुबा - ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रिया - अझरबैजान - बहामाज - बहरैन - बांगलादेश - बार्बाडोस - बेलारूस - बेल्जियम - बेलिझ - बेनिन - बर्म्युडा - भूतान - बोलिव्हिया - बोस्निया हर्जेगोविना - बोत्सवाना - ब्राझील - ब्रिटिश व्हर्जिन बेटे - ब्रुनेई - बल्गेरिया - बुर्किना फासो - बुरुंडी - Cabo Verde - कंबोडिया - कॅमरून - कॅनडा - केमन द्वीपसमूह - सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक - चाड - चिली - चीन - कोलंबिया - कोमोरोस - कॉंगो - कांगो (डेम रिप) - कुक बेटे - कॉस्टा रिका - कोटे दिल्वोरे- क्रोएशिया - क्युबा - कुरकओ - सायप्रस - चेक प्रजासत्ताक - डेन्मार्क - जिबूती - डॉमिनिका - डोमिनिकन रिपब्लीक - पूर्व तिमोर - इक्वाडोर - इजिप्त - अल साल्वाडोर - इक्वेटोरीयल गिनी - इरिट्रिया - एस्टोनिया - इस्वातिनी - इथिओपिया - युरोपियन युनियन - फिजी - फ्रान्स - फ्रेंच पॉलिनेशिया - गॅबॉन - गॅम्बिया - जॉर्जिया - जर्मनी - घाना - ग्रीस - ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड - गुआम - ग्वाटेमाला - गिनी - गिनी बिसाउ - गयाना - हैती - हवाई - होंडुरास - हाँगकाँग - हंगेरी - आइसलँड - भारत - इंडोनेशिया - इराण - इराक - आयर्लंड - इस्राएल - इटली - जमैका - जपान - जॉर्डन - कझाकस्तान - केनिया - किरिबाटी - कोसोव्हा - कुवैत - किरगिझस्तान - लाओस - लाटविया - लेबनॉन - लेसोथो - लायबेरिया - लिबिया - लिंचेनस्टाइन - लिथुआनिया - लक्संबॉर्ग - मकाओ - मादागास्कर - मलावी - मलेशिया - मालदीव - माली - माल्टा - मार्शल बेटे - मार्टिनिक - मॉरिटानिया - मॉरिशस - मायोट्टे - मेक्सिको - मायक्रोनेशिया - मोल्दोव्हा - मोनॅको - मंगोलिया - माँटेनिग्रो - मोरोक्को - मोझांबिक - म्यानमार - नामिबिया - नऊरु - नेपाळ - नेदरलँड्स - न्यू कॅलेडोनिया - न्युझीलँड - निकाराग्वा - नायजर - नायजेरिया - नीयू - उत्तर कोरिया- उत्तर मॅसेडोनिया - नॉर्वे - ओमान - पाकिस्तान - पलाऊ - पॅलेस्टाईन - पनामा - पापुआ न्यू गिनी - पराग्वे - पेरू - फिलीपिन्स - पोलंड - पोर्तुगाल - पोर्तु रिको - कतार - रियुनियन - रोमेनिया - रशिया - रवांडा - सेंट किट्स आणि नेव्हिस - सेंट लुसिया - सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स - सामोआ - सॅन मरिनो - साओ टोमे व प्रिन्सिप - सौदी अरेबिया - स्कॉटलंड - सेनेगल - सर्बिया - सेशेल्स - सिएरा लिऑन - सिंगापूर - सिंट मार्टेन - स्लोवाकिया - स्लोव्हेनिया - सोलोमन आयलॅन्ड - सोमालिया - दक्षिण आफ्रिका - दक्षिण कोरिया - दक्षिण सुदान - स्पेन - श्रीलंका - सेंट युस्टेशियस - सेंट मार्टेन - सुदान - सुरिनाम - स्वीडन - स्वित्झर्लंड - सीरिया - तैवान - ताजिकिस्तान - टांझानिया - थायलंड - जाण्यासाठी - टोंगा - त्रिनिदाद आणि टोबॅगो - ट्युनिशिया - तुर्की - तुर्कमेनिस्तान - टर्क्स आणि केकोस - टुवालु - युगांडा - युक्रेन - युएई - UK - उरुग्वे - यूएस व्हर्जिन बेटे - यूएसए - उझबेकिस्तान - वानुआटु - व्हॅटिकन - व्हेनेझुएला - व्हिएतनाम - येमेन - झांबिया - झिम्बाब्वे -\nएव्हिएशन न्यूज पोस्टिंगसाठी क्लिक करा\nप्रवाशांच्या बातम्यांसाठी क्लिक करा\nब्रेकिंग न्यूज प्रेस रिलीज पोस्टिंगसाठी क्लिक करा\nआमचे ब्रेकिंग न्यूज शो पहा\nहवाई न्यूज Onine साठी येथे क्लिक करा\nमीटिंग्ज, इन्सेन्टिव्ह, अधिवेशने यावरील बातम्यांसाठी क्लिक करा\nप्रवास उद्योग बातम्या लेखांसाठी क्लिक करा\nओपन सोर्स प्रेस रिलीझसाठी क्लिक करा\nकृपया आपले विचार आवडतील, टिप्पणी द्या.x\nबफरप्रतई-मेलफेसबुकफ्लिपबोर्डहॅकर बातम्याओळसंलग्नमेसेंजरमिक्स करावेकराखिसाप्रिंटपंचकर्मएसएमएसयाची सदस्यता घ्यातारच्या Tumblrट्विटरVKWhatsAppझिंगYummly", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://nmk.org.in/mazagon-dock-recruitment/", "date_download": "2022-10-07T23:14:05Z", "digest": "sha1:OR5RDUICZCXMICHUDCHEYE7YYQUGGSMY", "length": 8458, "nlines": 134, "source_domain": "nmk.org.in", "title": "(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये भरती - NMK.ORG.IN", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये भरती\nएकूण पदाच्या 425 जागा\nग्रुप A 1 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 20 2 इलेक्ट्रिशियन 34 3 फिटर 62 4 पाईप फिटर 72 5 स्ट्रक्चरल फिटर 63\nग्रुप B 6 फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) 20 7 इलेक्ट्रिशियन 15 8 पाईप फिटर 15 9 वेल्डर 15 10 कोपा 15 11 कारपेंटर 21\nग्रुप C 12 रिगर 47 13 वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 26\nग्रुप A: 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]\nग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]\nग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]\nवयोमर्यादा: [SC/ST 05 & OBC: 03 वर्ष सूट]\nग्रुप A: 15 ते 19 वर्षे\nग्रुप B: 16 ते 21 वर्षे\nग्रुप C: 14 ते 18 वर्षे\nअर्जाची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2021\n[expand title=”माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड 1388 जागा”]\nएकूण पदाच्या 1388 जागा\nपदाचे नाव: (नॉन एक्झिक्युटिव)\n1 AC रेफ.मेकॅनिक 05\n2 कॉम्प्रेसर अटेंडंट 05\n4 चिपर ग्राइंडर 13\n5 कम्पोजिट वेल्डर 132\n6 डिझेल क्रेन ऑपरेटर 05\n7 डिझेल कम मोटर मेकॅनिक 04\n8 ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल & सिव्हिल) 54\n10 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 55\n12 ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) 13\n13 गॅस कटर 38\n15 मिल राइट मेकॅनिक 10\n17 पाइप फिटर 140\n19 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर 125\n20 स्टोअर कीपर 10\n21 यूटिलिटी हैंड 14\n22 प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल) 08\n24 यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) 135\nशैक्षणिक अटी: जाहिरात पहा\nवयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष [SC/ST05 & OBC 03 वर्ष सूट]\nअर्जाची शेवटची तारीख: 04 जुलै 2021\n[expand title=”माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड 410 जागा”]\n[MCL] माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदासाठी पदभरती होत असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहा.\nएकूण पदांच्या ४१० जागा.\n3 पाईप फिटर ७४\n4 स्ट्रक्चरल फिटर ४३\n6 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक २९\n7 फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) ५४\n10 वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) ३९\nवयोमर्यादा: १४ ते १८ वर्ष\nशैक्षणिक अटी: ८ वी किंवा १० वी आणि संबंधित ITI.\nशेवटची तारीख: ११ जानेवारी २०२१.\n[expand title=”माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, 08 जागा”]\nमुंबई, माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे चालक पदभरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती वाचा.\nपदाचे नाव चालक [Driver]\nपात्रता: १० उत्तीर्ण आणि जड वाहन चालवण्याचा परवाना [Driving Licence]\nवयोमर्यादा: १८ ते ३८ वर्ष.\nफीस: खुला/ओबीसी १००/- SC/ST/PWD साठी फीस नाही.\nशेवटची तारीख: २ नोव्हेंबर २०२०.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://mr.hongkepvcvalve.com/abs-tap/", "date_download": "2022-10-07T21:45:01Z", "digest": "sha1:UVE2WRKGJMZQHLVMDJ744XMBZS3CDSA6", "length": 9012, "nlines": 256, "source_domain": "mr.hongkepvcvalve.com", "title": " एबीएस टॅप उत्पादक आणि पुरवठादार - चीन एबीएस टॅप फॅक्टरी", "raw_content": "\n2 पीसी पीव्हीसी बॉल वाल्व मालिका\nपीव्हीसी बॉल वाल्व मार्गदर्शक\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nप्लास्टिक वाल्व, पीव्हीसी बॉल व्हॉल...\nहॉट सेल 1/2″ बॉल वा...\nकॉम्पॅक्ट पीव्हीसी बॉल व्हॉल्व्ह थ्री...\nप्लॅस्टिक टू-पीस बॉल व्हॉल्व्ह\nदक्षिण आफ्रिका Sch80 पीव्हीसी पाईप...\nसिंकमध्ये बाथरूम बेसिनचा नळ\nविक्रीसाठी प्लास्टिक टॅप नळ मालिका\nABS सिंक कॉक हळू-हळू उघडा\nABS अँगल व्हॉल्व्ह हळू-ओपन\nABS नल हळू-हळू उघडा लहान शरीर\n2 हळू हळू पाण्याचा नळ उघडा\nHONGKE वाल्व ABS प्लेटिंग टॅप प्लास्टिक नळ\nहाँगके किचन प्लॅस्टिक लांब आणि लहान बॉडी वॉटर टॅप नळ\nदोन एक कोन वाल्व प्लास्टिक साहित्य\nसिंगल कोल्डसह किचन नल\nस्वयंपाकघरातील सिंक कॉक नळ क्रोम प्लेटेड\nसिंक कॉक नल एबीएस प्लेटेड सामग्री\nस्वयंपाकघर हंस मान तोटी क्रोम प्लेटेड\n1/2″ 3/4″ पांढरा पाण्याचा नळ\nवॉल वॉटर नलमध्ये मिनी सिंक टॅप करा\nABS किचन बेसिन नल\nप्लॅस्टिक बिबकॉक पोलो बिब कॉक\nABS बिबकॉक घाऊक टॅप\nपीई कॉपर प्लेटेड रंगीत नल\nपीपी बिब कॉक टॅप वॉल आरोहित\nस्टॉकमध्ये मुद्रित प्लास्टिकच्या नळाची लहान रक्कम\nसिंगल होल झिंक अलॉय किचन नल\nप्लॅस्टिक एल्बो पीपी नळ एबीएस बिबकॉक\nसिंकमध्ये ABS प्लेटिंग नल, स्लो फ्लो 360° फिरणारा बिबकॉक\nHongke कोन झडप कोंबडा प्लास्टिक ABS स्टॉप कोंबडा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nपत्ता:नं. 28, शुगुआंग रोड, जियानशान टाउन, पनआन काउंटी, जिन्हुआ सिटी, झेजियांग प्रांत\nसिंचन बॉल वाल्व, बेसिन टॅप, पाईप फिटिंग्ज, Abs बेसिन Faucets, पीव्हीसी शेड्यूल 40 बॉल वाल्व्ह, पीव्हीसी पाईप फिटिंग्ज,\n© कॉपीराइट - 2010-2021 : सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nसिंचन बॉल वाल्व, पाईप फिटिंग्ज, पीव्हीसी शेड्यूल 40 बॉल वाल्व्ह, बेसिन टॅप, पीव्हीसी पाईप फिटिंग्ज, Abs बेसिन Faucets,\nई - मेल पाठवा\nआमच्याशी गप्पा मारा, powered by LiveChat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2022-10-07T23:03:18Z", "digest": "sha1:SOR3ATMLQRFZOTFX7Y77YKZ4WYEQY4PL", "length": 3415, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२०१९ ऑस्ट्रेलियन ओपन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२०१९ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०७वी आवृत्ती होती. ही स्पर्धा मेलबर्न येथे भरवण्यात आली. ही या वर्षातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. स्पर्धेमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकरांमध्ये पुरुष व महिलांसाठी खेळ आयोजित करण्यात आले होते.\n< २०१८ २०२० >\n२०१९ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा\nऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस.\nमुख्य पान: २०१९ ऑस्ट्रेलियन ओपन - महिला एकेरी\nशेवटचा बदल १३ सप्टेंबर २०२१ तारखेला ०४:३६ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०२१ रोजी ०४:३६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00049039-TC164-FR-0712RL.html", "date_download": "2022-10-07T21:56:38Z", "digest": "sha1:EFSCG4RC5FSFXOXDFFM2AUT35QGUP5GX", "length": 14540, "nlines": 300, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "TC164-FR-0712RL | Yageo | अॅरे/नेटवर्क प्रतिरोधक | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर TC164-FR-0712RL Yageo खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये TC164-FR-0712RL चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. TC164-FR-0712RL साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/chief-minister-eknath-shinde-pays-tribute-to-raju-srivastav-srt97", "date_download": "2022-10-07T22:10:06Z", "digest": "sha1:VV4I7KKEVVEF7QSNKUNOGF7C626YNPRS", "length": 6165, "nlines": 60, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Raju Srivastav: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली", "raw_content": "\nRaju Srivastava: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली\nराजू श्रीवास्तव यांच्या निधनामुळे आपण हरहुन्नरी आणि निखळ असा कलावंत गमावला आहे.\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nमुंबई - मनोरंजन क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. हास्यकलाकार राजू श्रीवास्तव (Raju Srivastava Passed Away) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.\n10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील (Delhi) एम्स रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. 42 दिवस जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई लढल्यानंतर आज या कॉमेडियनचे निधन झाले. आता त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. या सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekntah Shinde) यांनी राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.\nChaturshrungi Police Station : पुण्यात पोलीसावर हल्ला; युवकावर गुन्हा दाखल\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, रोजच्या जगण्यातील छोट्या प्रसंगांतून कुशलतेने हास्य फुलवणारा आणि आपल्या निखळ शैलीने देशभरातील घराघरात पोहोचलेला कलावंत गमावला आहे,'अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू श्रीवास्तव यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.\nआपल्या रोजच्या जगण्यातील दमछाक करणाऱ्या प्रसंगांतूनही हास्य फुलवण्याची किमया राजू श्रीवास्तव यांनी साध्य केली. त्यांनी हास्यरंगाच्या अनेक छटा उलगडून दाखवल्या. विनोद निर्मितीतून ते भाषा आणि प्रांत यांच्या सीमा ओलांडून घराघरांत पोहचले. त्यांनी कलाक्षेत्रातही रचनात्मक असे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे आपण हरहुन्नरी आणि निखळ असा कलावंत गमावला आहे,' असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://crazymarathi.com/2022/09/06/2-muli-gharat-bhannat-dance/", "date_download": "2022-10-07T22:56:08Z", "digest": "sha1:FLOY2UKN4GOZCBP6RZ7TTNPNFDPTCA7F", "length": 7251, "nlines": 56, "source_domain": "crazymarathi.com", "title": "२ मुलींचा घरात भन्नाट डान्स.... - Crazy Marathi", "raw_content": "\n२ मुलींचा घरात भन्नाट डान्स….\nसध्याचे जग हे इंटरनेट च जग झालाय. माणूस हा इंटरनेट वर इंटक व्यस्त झाला आहे कि त्याला इंटरनेट शिवाय झोप येत नाही. मग ते इंटरनेट मोबाईल वर असो किंवा कॉम्पुटर वर असो. प्रत्येक माणूस हा इंटरनेट आणि मोबाईलचा अधीन झाला आहे. पण ह्याच इंटरनेट आणि मोबाईल मुळे खूप लोकांचे विडिओ वाय रल होतात आणि लोक एका रात्रीतून प्रसिद्ध होतात.\nअसे भरपूर लोक बघायला मिळतील कि ज्यांची मोबाईल आणि इंटरनेटच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे आणि आता त्यांना अभिनेता आणि अभिनेत्री सारखी वागणूक दिली जात आहे. तसेच भरपूर लोकांनी त्यांच्यात असणारी स्किल लोकांपुढे मोबाईल वर विडिओ बनून दाखून दिली आहे. आणि लोकांनी त्यांची स्किल बघून त्यांना प्रसिद्ध केले आहे.\nआधीच्या काळात लोकांमध्ये भरपूर टॅलेंट होता पण तो लोकां पुढे आणण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म नव्हता… परंतु आता मोबाईल आणि इंटरनेट मुळे लोकांना तो प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्यांनी आपल्यात असणारा टॅलेंट त्यांच्या माध्यमातून लोकांपुढे सादर केला. तुम्ही हि बघत असाल कि सोशल मीडिया मुळे खूप लोकांचे आयुष्य बदलून गेले आहे. खेड्यातील लोक आता शहरात मोठ्या मोठ्या पदावर गेली आहेत. हे सर्व शक्य झालं ते फक्त इंटरनेट आणि सोशल मीडिया मुळेच झाले आहे.\nसदर विडिओ मध्ये तुम्हाला हळदीमध्ये नवरी ताई भन्नाट डान्स करतांना दिसेल. त्या हळदीमध्ये नवरी ताईने इतका सुंदर डान्स सादर केला आहे कि तो डान्स बघून मोठ्या मोठ्या कलाकारांना लाजवेल. हळदीमध्ये नवरी ताईने अप्रतिम असा डान्स केला आहे. हळदीमध्ये नवरी ताईचा डान्स इतका सुंदर डान्स आहे कि त्याचे जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. हा विडिओ सध्या खूप वायरल जात आहे म्हणून आणि तुमच्या पुढे हा विडिओ पोस्ट करत आहोत…..\nविडिओ टाकण्या माघील उद्देश फक्त आणि फक्त मनोरंजन आहे. जर आमच्या कडून काही चूक झाली असेल तर माफी करावी. जर तुम्हाला विडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेयर करा. आणि तुमच्या मित्रांमध्ये शेयर करा. तुमच्या १ शेयर मुळे कोणाचा टॅलेंट लोकांसमोर आणि त्याला प्रसिद्धी प्राप्त होईल … धन्यवाद\nबंड्या पळत दवाखान्यात येतो…\nवेडी बाई वेड्यांच्या डॉक्टर कडे जाते…\nलग्नानंतर बायको नवऱ्याला बोलते…\n३ मुलींनी केला जबरी डान्स…\nलग्नात बायकांनी केला झकास डान्स…\nसाली बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…\nलग्नात वहिनीनीं केला भारी डान्स…\nसुहा’गरात्री बायकोला जोराची उचकी लागते….\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा वट पिंकी एका बस मध्ये चढली…\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा’वट बाई मेडिकल वर गेली…\nमुलीने सासरी जाताना सर्वांना रडवले\nटकला टी शर्ट घालून आला…\nनवरी ताईचा विडिओ बघून रडू येईल…\nबंड्याच्या बेडरूम मधून बायकोचा आवाज आला…\nलग्नात ताईने केला खुपच सुंदर डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nताईने केला खुपच सुंदर डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/jalgaon-students-achieved-success-in-neet-results-130292910.html", "date_download": "2022-10-07T22:06:02Z", "digest": "sha1:HDH5WKGVZHQZFKOPGYMQZYP6LBC3STJ3", "length": 3028, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "नीटच्या निकालात जळगावच्या विद्यार्थ्यांनी मिळवले यश | Jalgaon students achieved success in NEET results| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनिकाल:नीटच्या निकालात जळगावच्या विद्यार्थ्यांनी मिळवले यश\nवैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या नॅशनल इलिजिबीटी टेस्ट (नीट) परीक्षेचा ऑनलाइन निकाल गुरुवारी जाहीर झाला. जळगाव शहरातून सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिला होती. नीट परीक्षेत परेश तुकाराम माळी याने यश संपादन केले आहे.\nयात त्याने ७२० पैकी ६२२ गुण मिळवले आहेत. तो बाहेती विद्यालयाचे शिक्षक टी. एस. माळी व चित्रा माळी यांचा मुलगा आहे. देवश्री संजय वानखेडे हिने नीट परीक्षेत यश मिळविले. तिला ऑल इंडिया रँक ८७८ मिळाली आहे. देवश्री ला.ना. शाळेचे शिक्षक संजय वानखेडे, प्रा. हेमाक्षी वानखेडे यांची मुलगी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/srimanta-dagdusheth-halwai-ganapati-seated-in-the-original-temple-enters-the-temple-from-the-festival-pavilion-for-immersion-procession-the-immersion-will-take-place-on-saturday-morning-130293992.html", "date_download": "2022-10-07T23:15:17Z", "digest": "sha1:QVBF4GOH4A7KBJT4GNDCLKLO4UNJ5RA4", "length": 7447, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मिरवणुकीसाठी मंडळाकडून जोरदार तयारी; शनिवारी पहाटे विसर्जन होणार | Srimanta Dagdusheth Halwai Ganapati seated in the original temple enters the temple from the festival pavilion for immersion procession; The immersion will take place on Saturday morning - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विराजमान:मिरवणुकीसाठी मंडळाकडून जोरदार तयारी; शनिवारी पहाटे विसर्जन होणार\nगणेशोत्सवाची सांगता मिरवणूकसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपातून मूळ मंदिरामध्ये विराजमान शुक्रवारी सकाळी झाला आहे. दगडूशेठ गणपती गणेशोत्सवाच्या काळात लाखो गणेश भक्तांनी दर्शन घेतले असून शुक्रवारी रात्री दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुकीत आकर्षक विद्युत रोशनी केलेल्या रथातून मार्गस्थ होणार असून शनिवारी पहाटे त्याचे विसर्जन होईल.\nदाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमद्धे सकरण्यात आलेले श्री स्वानंददेश रथातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक यंदा निघणार आहे. एलईडी व मोत्याच्या रंगाच्या दिव्यामद्धे हा रथ सकरण्यात आला आहे.\nमिरवणुकीत अग्रभागी देवळणकर बंधू यांचा नगारा, प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन असेल. पुण्यातील महत्वाच्या ठिकाणांची छायाचित्रे असेलला आणि स्वच्छेतेचा संदेश देणारा जय गणेश स्वच्छता अभियान रथ असणार आहे. स्वरूप वर्धिणी संस्थेचे पथक, दरबार व प्रभात ही बॅंड पथके आणि केरळचे चंडा या पारंपरिक वाद्य वादकांचा चमू मिरवणुकीमध्ये असेल.\nअमोघ त्री शक्ति नाग रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाणणाची विसर्जन मिरवणूक निघेल. विशाल ताजनेकर यांनी रथाचे कला दिग्दर्शन केले असून विविध रंगी प्रकाश झोतात रथ उजळून निघेल. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचा सनई चौघड्याचा गाडा, गंधर्व बॅंड तसेच शिवगर्जना वाद्य पथकसह ढोल ताशा पथक सहभागी होतील.\nफूट लांब व 14 फूट रुंद असलेल्या या विसर्जन रथाची उंची 32 फूट असणार आहे. शेषनाग हा 19 फुटांपर्यंत राहणार असून, त्यामागे 11 फुटी त्रिमूर्ती असणार आहेत. हायड्रोलिक तंत्रज्ञान वापरल्यामुळे 30 फुटांचा रथ 11 फुटांनी कमी होऊन 19 फूट होऊन रथ मेट्रोच्या पूलाखालून सहजरीत्या पार होईल. या रथावर विविध लाईट्स लावण्यात येणार आहेत. मिरवणूकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचा सनई चौघडा त्यामागे गंधर्व बँड असणार आहे. तसेच शिवगर्जना वाद्य पथकासह दोन ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी होतील.\nप्रथेप्रमाणे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मूर्ती रथामद्धे बसून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मंडई येथे टिळक पुतळ्याजवळ विराजमान होतील. तेथून पुढे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. या गणपतीच्या विसर्जन मिरवणुक सर्वसाधारणपणे रात्री साडे अकरा वाजता निघणार आहे. श्री राम, नाद ब्रम्ह, सर्ववादक, समर्थ प्रतिष्ठान, यांची पथके असणार आहे. याशिवाय शंख वादन आणि मर्दानी खेळ सादर होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00024727-311-99-108-41-001000.html", "date_download": "2022-10-07T21:53:09Z", "digest": "sha1:7MUSEDMLVT7KUD62OMS7GI652U2DWXQ4", "length": 13355, "nlines": 274, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "311-99-108-41-001000 | Mill-Max | अवर्गीकृत | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर 311-99-108-41-001000 Mill-Max खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 311-99-108-41-001000 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 311-99-108-41-001000 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00000077-1240780000.html", "date_download": "2022-10-07T23:16:19Z", "digest": "sha1:6JRUQF6TFYQ3LR2OPH5GV5AHSS3W6CZC", "length": 13167, "nlines": 274, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "1240780000 | Weidmuller | अवर्गीकृत | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर 1240780000 Weidmuller खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 1240780000 चे 10 तुकडे उपलब्ध आहेत. 1240780000 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/12/under-19-indian-team.html", "date_download": "2022-10-07T23:10:02Z", "digest": "sha1:LFQDFWNBRMWDX6HV5AYFUEIHTXUGF3PW", "length": 5393, "nlines": 84, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "विश्वचषकासाठी भारताचा 'अंडर-19' संघ जाहीर. | Gosip4U Digital Wing Of India विश्वचषकासाठी भारताचा 'अंडर-19' संघ जाहीर. - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome क्रीडा विश्वचषकासाठी भारताचा 'अंडर-19' संघ जाहीर.\nविश्वचषकासाठी भारताचा 'अंडर-19' संघ जाहीर.\n2020 आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक ही आगामी आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2019 दरम्यान\nदक्षिण आफ्रिकेत होणार आहे. 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे ते तेरावे आणि दक्षिण आफ्रिकेत दुसरे आयोजन केले जाईल. चार गटात\nविभागल्या गेलेल्या या स्पर्धेत सोळा संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक गटातील शीर्ष दोन संघ सुपर लीगमध्ये प्रवेश करतील, प्रत्येक गटातील तळाशी दोन संघ प्लेट लीगमध्ये प्रगती करीत आहेत.\nआत्तापर्यंत भारताने ही स्पर्धा 2000, 2008, 2012 आणि 2018 अशा चार वेळा जिंकली होती.\nविश्वचषकासाठी भारताचा 'अंडर-19' संघ जाहीर केली आहे.\nदक्षिण आफ्रिकेत 2020 मध्ये 'अंडर 19' वन डे वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. त्यासाठी भारताचा 'अंडर-19' संघ जाहीर करण्यात आला आहे.\nभारतीय अंडर 19 क्रिकेट संघ असा :\n● प्रियम गर्ग (कर्णधार)\n● धृव चंद जुरेल (उपकर्णधार, विकेट कीपर)\nया स्पर्धेसाठी सर्व क्रिकेट चाहते उत्साहित आहेत.यावर्षीही भारतीय अंडर 19 संघ विजयी होईल अशी आशा आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.phoneky.com/android-games/?id=n1n8379", "date_download": "2022-10-07T21:12:47Z", "digest": "sha1:TLZG4S5XN4MAFX5QKIQQECPX5QIEYZ7Z", "length": 8742, "nlines": 201, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Sunset Riders Android खेळ APK (group.werdoes.app.nes201341028909) - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली शूटिंग\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2022 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Sunset Riders गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\nहे गेम स्थापित केल्यानंतर डाउनलोड करण्यासाठी अतिरिक्त डेटाची आवश्यकता आहे\nहा खेळ जुन्या रेट्रो एनईएस, एसएएन, जीबीए, एन 64 किंवा पीएसएक्स रॉम आहे जो आपण आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसवर चालवू शकता / चालवू शकता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8-221/", "date_download": "2022-10-07T21:33:12Z", "digest": "sha1:QOYKHS3CVXGMP6NEU7NFPCMB4VG6J6YT", "length": 13554, "nlines": 92, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "विवाहानंतर पुरुषांनी 'असा' घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव... - Themaharashtrian", "raw_content": "\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nस्टॅमिना एक अशी ताकद असते ज्यामुळे आपण दिवसभरातील सर्व काम चांगल्या प्रकारे करु शकतो. पण जर चाळीशी नंतर स्टॅमिना कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे तुमचे वाढलेले वजन होय. त्यामुळे आधी आपल्याला तुमचे वजन नियंत्रणात आणावे लागेल. तुमचे वजन बरोबर असेल तरच या सर्व गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. काही घरगुती उपायांनाही स्टॅमिना वाढवण्यास मदत होऊ शकते.\nस्टॅमिना आपल्या आहारावरही अवलंबून असतो. आहारावर अधिक लक्ष द्या. जेवणामुळे शरीराला चांगली उर्जा मिळते. दिवसांतून चार ते पाचवेळा थोड्या वेळाने खाणं चांगले ठरते. पण आपला आहार हा संतुलीत असणे आवश्यक आहे.\nबदललेल्या जीवनशैलीमुळे आणि चूकीच्या सवयीमुळे या सर्वाचा वा’ईट परिणाम आपल्या मनावर होत असतो यामुळेच त’णाव वाढत जातो. तसेच वजन वाढल्यामुळे थकवा, नै’रा’श्य या स’म’स्यादेखील वाढत चालल्या आहेत. विविध आ’जार सुद्धा यामुळे होत आहेत. आपणास लक्षात येईल की डायबिटीस, हार्ट डिसीज, ब्लड प्रेशर, नै’रा’श्य इत्यादी आजार वाढत चालले आहेत. चाळीशीनंतर वाढलेले तुमचे वजन नियंत्रणात आणण्यासाठी आपण काही सोपे उपाय असूकरू शकता आणि ते नियमित केल्यास आपले वजन नियंत्रणात येवू शकते.\n१. अक्रोड : अक्रोडमधील प्रोटीन आरोग्यदायी असून यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण यामुळे कमी होऊ शकते.\n२. तिखट : तिखटात चरबी कमी करणारे कॅस्पिनॉइड हे घटक असते. २००११ मध्ये इंग्लड मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात एका व्यक्तीने दररोज ६ ग्रॅम कॅस्पिनॉइड ऑइलचे म्हणजे तिखटचे सेवन केले. त्यामुळे त्याचे वजन ७ पट वेगाने कमी झाल्याचे दिसून आले होते.\n३. काळे सोयाबीन : काळ्या सोयाबीन आपल्या आहारात वापरल्यामुळे क’र्करो’ग होण्याची शक्यता कमी होत असते. तसेच याच्या सेवनाने वजन देखील वेगाने कमी होते. तुमच्या वजनावरही काळ्या सोयाबीनने नियंत्रण मिळवता येते.\n४. बटाटे खा : अमिरिकेत झालेल्या एका अभ्यासात सांगण्यात आले आहे की बटाटा खाणे कमरेसाठी सर्वाधिक घातक आहे. परंतु तळलेल्या बटाट्याबद्दल हे सर्व सांगितले गेले होते. भाजलेल्या किंवा उकडलेल्या बटाट्यावर काळी मिरी लावून घेणे हा खूप चांगला आहार आहे. र’क्तदाब ची स’मस्या असलेल्या रु’ग्णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. बटाटे उकडून दह्यासोबत खाल्लेले अधिक चांगले.\n५. खरबूज : खरबूजच्या सेवनामुळे ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. यामध्ये केवळ ४५ कॅलरी असते. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास खरबूज आरोग्यदायी आहे.\n६. कोबी : आहारात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने २० टक्के कॅलरी तुम्हाला कमी करता येतात. दररोज २ कप कोबीच्या पानांचा रस खाल्याने तुम्हाला अधिक मात्रेत व्हिटॅमिन-ए मिळू शकते जे तुमच्यासाठी आवश्यक आहे.\n७. पनीर: आपल्या वाढत्या वयाबरोबर तुमचे स्नायू कमजोर होत असतात. आपली पचनप्रक्रिया देखील कमकूवत होत असते. पनीर पासून प्रोटीन मिळते या प्रोटीनपासून आपले स्नायू कणखर बनतात. याच्या सेवनाने वजन देखील नियंत्रणात राहते.\n८. अश्वगंधा : अश्वगंधाची स्टॅमिना वाढवण्यासाठी खूप महत्वाची भूमिका असते आयुर्वेदात सांगितले आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत देखील होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने याचे प्रमाण ठरवून घेवून तुम्ही याचा समावेश करू शकता.\n९. केळी, अंडी : केळ्यात असलेले कार्बोहायड्रेट्स फार उपयोगी असतात. यामुळे एनर्जी वाढवण्यास मदत होत असते. अंडी हे प्रोटिन आणि कॅल्शियमचा चांगले स्त्रोत असतात. यामुळेही स्टॅमिना वाढवण्यास मदत होऊ शकते.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/three-people-with-isis-links-identified-by-police-says-karnataka-home-minister/mh20220920221145719719141", "date_download": "2022-10-07T22:02:10Z", "digest": "sha1:EGSLUCLPR5VVTEDEYUXWW4OYKLF7KESA", "length": 7255, "nlines": 18, "source_domain": "www.etvbharat.com", "title": "Terrorists arrested कर्नाटकात आयएसआयएसच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक", "raw_content": "\nTerrorists arrested कर्नाटकात आयएसआयएसच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक\nTerrorists arrested कर्नाटकात आयएसआयएसच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक\nकर्नाटकमध्ये पोलिसांनी ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.\nबेंगळुरू : कर्नाटकात ISIS च्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. बंदी घातलेल्या इस्लामिक स्टेटच्या ( ISIS ) कारवाया त्यांना पुढे करायच्या होत्या, असा पोलिसांचा दावा आहे. टोळीचे सदस्य राज्यभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.\nशिवमोग्गा येथील सिद्धेश्वर नगर येथील रहिवासी सय्यद यासीन (21), मंगळूर येथील रहिवासी माजी मुनीर अहमद (22) यांना आज अटक करण्यात आली. तिसऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी शिवमोग्गा येथील रहिवासी शारिक, माझी आणि सय्यद यासीन यांच्याविरुद्ध आयपीसी आणि बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस एफआयआरनुसार या टोळीचे सदस्य भारताच्या एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने कट रचत होता.\nगृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले, 'तिघांचेही आयएसशी संबंध होते.' त्यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले की, त्यांच्या कारवायांची सखोल चौकशी सुरू आहे. ते मंगळुरुशी संबंधित असलेल्या शिवमोग्गा आणि तीर्थहल्ली येथील आहेत. त्याचवेळी, एसपी लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले की सय्यद यासीन आणि माजी मुनीर अहमद यांना अटक करण्यात आली आणि त्यांची चौकशी करून शिवमोग्गा न्यायालयात हजर करण्यात आले. संशयितांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.\nअटक करण्यात आलेल्यांनी बॉम्बस्फोट घडवण्यासह दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. एका सूत्राने सांगितले की, यासिनला अटक करण्यात आली असून त्याची बारकाईने चौकशी केली जात आहे. यासीन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करत आहे.\nशिवमोग्गाशीही दहशतवादी संबंध असल्याचा संशय : यासीन शिवमोग्गा येथील एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता, असे सांगितले जाते. तीर्थहळ्ळी सोप्पू गुडधे हा फरार असून त्याच्या अटकेसाठी सापळा रचण्यात आला आहे. १५ ऑगस्ट रोजी प्रेमसिंगच्या चाकूहल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी जेबीवुल्ला याची चौकशी केली असता, तो या तीन लोकांच्या मोबाईल फोनवर संपर्कात असल्याचे आढळून आले. शिवमोग्गा या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा हिंदूत्ववादी कार्यकर्ता हर्षची राज्यात हिजाबच्या वादातून हत्या करण्यात आली तेव्हा तो उकळला होता.\nऑगस्टमध्ये काही उजव्या विचारसरणीच्या सदस्यांनी हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांचे पोस्टर लावल्याने शहरात तणाव सुरू झाला होता. ज्याला काही मुस्लिमांनी विरोध केला. मारहाणीदरम्यान 20 वर्षीय तरुणाला चाकूने वार करून गंभीर जखमी केले. शिवमोग्गा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ज्ञानेंद्र यांनी दावा केला की, अटक केलेल्यांपैकी एकाचा पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांशी संबंध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mensxp.com/marathi/health/mental-health/94310-signs-and-types-of-overthinking-in-marathi.html", "date_download": "2022-10-07T21:56:59Z", "digest": "sha1:Z4OQTFRKRTVTZ3QAL5Z5FQOAITVFAQJR", "length": 18139, "nlines": 102, "source_domain": "www.mensxp.com", "title": "अतिविचार म्हणजे धोक्याची घंटा, जाणून घ्या ही 12 लक्षणे | signs and types of overthinking in marathi", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nजाहिरात द्याMensXP वर सेलआमच्याबद्दलसंपर्क साधा\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nअतिविचार म्हणजे धोक्याची घंटा, जाणून घ्या ही 12 लक्षणे\n· 4 मिनिटांमध्ये वाचा\nअतिविचार म्हणजे धोक्याची घंटा, जाणून घ्या ही 12 लक्षणे\nएक विचार करणे आणि दुसरे म्हणजे, 'खूप विचार करणे\nप्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईट आहे. जास्त विचार करणे देखील वाईट आहे. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी आपल्याला विचारपूर्वक वागायला सांगायचे. पण जर इतका विचार केला की, कामच करता येत नसेल, तर ते संकट आणि मानसिक आजार बनते. या समस्येला अतिविचार म्हणतात\nजास्त विचार करणे ही एक मोठी मानसिक समस्या आहे. भारतासारख्या विकसनशील देशातील बहुतांश लोक या समस्येला गांभीर्याने घेत नाहीत. पण प्रत्यक्षात, जास्त विचार करणे खूप धोकादायक आहे, ते तुम्हाला मानसिक आजाराच्या दलदलीकडे नेऊ शकते.\nपण, अतिविचारामुळे अडचणी येण्याची कारणे कोणती ही समस्या एखाद्या व्यक्तीला वैचारिकदृष्ट्या लकवाग्रस्त का बनवते ही समस्या एखाद्या व्यक्तीला वैचारिकदृष्ट्या लकवाग्रस्त का बनवते जगभरातील मानसिक आरोग्य तज्ज्ञांची याबद्दल वेगवेगळी मते आहेत. पण प्रत्येकजणांचे काही मुद्द्यांवर एकमत आहे.\nया लेखात, आम्ही तुम्हाला सांगू, अतिविचाराची लक्षणे आणि प्रकार काय आहेत हा लेख वाचून, तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे जास्त विचार करण्याबद्दल देखील जाणून घेऊ शकाल.\nहेही वाचाः सेक्स ऍडिक्शन डिसऑर्डर म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि त्यापासून मुक्त होण्याचे मार्ग\nअतिविचाराची लक्षणे (Signs Of Overthinking)\nअतिविचाराचे प्रकार (Forms Of Overthinking)\nजास्त विचार करण्याची जुनी आणि क्लासिक व्याख्या म्हणजे 'छोट्या गोष्टींचा जास्त किंवा जास्त दूरवरचा विचार करणे'. परिस्थितीचा निर्णय किंवा मूल्यमापन करताना खोलवर विचार करणे मानवी स्वभाव आहे.\nपण जेव्हा ही परिस्थिती मनात राहते आणि तुम्ही स्वतःला विचारांपासून वेगळे करू शकत नाही. तर, या स्थितीला जास्त विचार करणे किंवा ओव्हरथिंकिंग करणे असे म्हटले जाऊ शकते.\nहे आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधीतरी घडते. आपण सर्वजण जीवनात अशा घटना अनुभवतो ज्यामुळे आपल्यासाठी चिंता किंवा तणाव निर्माण होतो. परंतु काही लोक त्यांच्या चिंतांपासून मुक्त होऊ शकत नाहीत.\nते भविष्याबद्दल चिंता करतात आणि संभाव्य घटनांबद्दल म्हणजे जे अद्याप घडलेच नाहीत अशांबद्दलही भयानक अंदाज लावतात. ते भूतकाळाचाही विचार करतात, 'स्वतःवर हसले पाहिजे' आणि 'त्यावर मनमोकळेपणाने हसता येते'.\nयावरून ते भांबावून जाऊ शकतात. इतर आपल्याबद्दल काय विचार करतात किंवा त्यांनी स्वतःबद्दल ऐकलेली कोणतीही नकारात्मक गोष्ट त्यांच्या मनात सतत फिरत असते.\nतुम्ही घेतलेला कोणताही कठोर निर्णय देखील समस्या निर्माण करू शकतो. अनेक वेळा तुम्ही तुमच्या मनात अनेक पर्यायांचा विचार करता. पण योग्य पर्यायाचा शोध इतका अवघड होतो की, त्यामुळे तुमच्या विचारसरणीला लकवा मारतो.\nअशा परिस्थितीत तुम्ही विचार करता की, चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा निर्णय न घेणे चांगले. परंतु कोणताही निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे नेहमीच चांगले असते.\nतुम्हाला दीर्घकाळापासून जास्त विचार करण्याची समस्या जाणवत असेल किंवा कठीण निर्णय घेण्याची गरज असेल. तुम्हाला वाटत असेल की तुमचा मेंदू जास्त विचार करतो. तेव्हा तुम्हाला निद्रानाशाचा त्रास सुरु होतो.\nजास्त विचार केल्याने नैराश्य किंवा डिप्रेशनची लक्षणे वाढू शकतात. हे तुमचा स्ट्रेस लेव्हल वाढवू शकतात आणि तुम्हाला चुकीचे निर्णय घेण्यासही भाग पाडू शकतात.\nअतिविचाराची लक्षणे (Signs Of Overthinking)\nजेव्हा तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींवर जास्त विचार करण्याच्या आपल्या प्रवृत्तीबद्दल अधिक जागरूक व्हाल, तेव्हा तुम्ही बदलण्यासाठी पावले उचलू शकता. परंतु प्रथम, तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की. जास्त विचार केल्याने फायद्यापेक्षा जास्त नुकसान होते.\nकधीकधी लोकांना असे वाटते की, त्यांच्या अतिविचार करण्याने एखाद्या प्रकारच्या गोष्टी खराब होण्यापासून रोखतात. पण वास्तव हे आहे की, तुम्ही भूतकाळाबद्दल खूप विचार केला तरी भूतकाळ बदलता येत नाही.\nजर तुम्हाला ही जाणीव झाली तर तुम्ही यापुढे काळजी करणार नाही. परंतु, संशोधनात अगदी स्पष्ट झाले आहे - अतिविचार करणे आपल्यासाठी वाईट आहे आणि ते समस्या टाळण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी काहीही करत नाही.\nजास्त विचार करण्याची काही प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.\nडोक्यात वारंवार लज्जास्पद क्षणांची आठवण येते.\nझोपण्यास त्रास होतो, कारण असे वाटते की मेंदू आता थांबणार नाही.\nस्वतःला वारंवार प्रश्न विचारणे जसे की, असे झाल्यास काय होईल\nभूतकाळातील घटना किंवा घटनांमध्ये लपलेले अर्थ शोधण्यात बराच वेळ घालवणे.\nलोकांना बोललेल्या जुन्या गोष्टींबाबत विचार करणे.\nमी हे केले नसते तर बरे झाले असते किंवा जर मी त्यांना असं म्हटलं नसतं तर...सातत्याने असे विचार येणे.\nआपल्या चुकांबाबत सातत्याने विचार करणे.\nकोणी तरी काही तरी म्हटलेलं असेल तर वारंवार त्यावरच विचार करणे.\nसभोवताली घडलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून, गोंधळल्यासारखं करणं.\nभूतकाळ किंवा भविष्यातील चिंतेबाबत खूप विचार करणे.\nज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण नाही अशा गोष्टींचा विचार करणे.\nआपला त्रास आणि चिंता मनातून काढू शकत नाही.\nअतिविचाराचे प्रकार (Forms Of Overthinking)\nअतिविचार करण्याचे दोन मुख्य प्रकार आहेत, पहिला प्रकार भूतकाळाची चिंता करणारा आहे आणि दुसरा भविष्याबद्दल चिंता करणारा आहे. हे समस्या सोडवण्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. समस्या सोडवण्यामध्ये परिणामांचा किंवा समाधानांचा विचार करणे समाविष्ट असते. अतिविचारात समस्येमध्ये गुंतण्याचा सहभाग आहे.\nहेही वाचाः जाणून घ्या बायपोलर डिसॉर्डर या मानसिक आजाराची लक्षणे, कारणे आणि उपचार\nअतिविचार करणे हे आत्म-प्रतिबिंब किंवा सेल्फ रिफ्लेक्शनपेक्षा वेगळे आहे. निरोगी आत्म-प्रतिबिंब म्हणजे याचा अर्थ आपल्याबद्दल काहीतरी शिकणे किंवा एखाद्या परिस्थितीबद्दल नवीन दृष्टीकोन प्राप्त करणे होय. हे प्रत्यक्षात हेतुपूर्ण आहे.\nज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण नाही अशा सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला किती वाईट वाटते याचा विचार करणे म्हणजे अतिविचार. हे आपल्याला नवीन माहिती विकसित करण्यात मदत करणार नाही.\nसमस्या सोडवणे, आत्म-चिंतन करणे आणि जास्त विचार करणे यातील फरक तुम्ही खोल विचारात घालवलेल्या वेळेबद्दल नाही.\nउपाय शोधण्यात किंवा नवीन गोष्ट किंवा वर्तन शिकण्यात घालवलेला वेळ विधायक मानला जातो. पण जर तुम्ही जास्त वेळ विचारात घालवला, मग ते 10 मिनिटे असो किंवा 10 तास, यामुळे तुमच्या आयुष्यात वाढ होणार नाही.\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/jalgaon-news-six-doors-of-girna-dam-were-opened-rds84", "date_download": "2022-10-07T21:32:39Z", "digest": "sha1:OTIM7LY7LIZNHEYZP324TGTTPLRAHOAX", "length": 4414, "nlines": 58, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Jalgaon: धरणाची चौथ्यांदा ‘शंभरी’; ‘गिरणा’चे सहा दरवाजे उघडले", "raw_content": "\nधरणाची चौथ्यांदा ‘शंभरी’; ‘गिरणा’चे सहा दरवाजे उघडले\nधरणाची चौथ्यांदा ‘शंभरी’; ‘गिरणा’चे सहा दरवाजे उघडले\nचाळीसगाव (जळगाव) : नाशिक जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे गिरणा धरण (Girna Dam) चौथ्यांदा शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून रविवारी (ता. १८) २२ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (Jalgaon News Girna Dam)\nमागील गुरुवारी धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे (Girna River) गिरणा पट्ट्यातील आजूबाजूच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. धरण भरल्यामुळे पिलखोड (Jalgaon) येथील गिरणा नदीला पुराचे स्वरूप आले आहे, तर बहाळ येथील ऋषिपंथा मंदिराजवळील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे पुलापलीकडील बहाळ व आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटलेला आहे. नाशिक जिल्ह्यात सातत्याने पाऊस (Rain) सुरू असल्यामुळे गिरणा धरणात पाण्याची आवक सुरू राहणार आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता हेमंत पाटील यांनी दिला आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://crazymarathi.com/2021/02/18/one-day-a-girl-thought-to-her-mother/", "date_download": "2022-10-07T22:47:33Z", "digest": "sha1:ZT2QZGW4JT2JG7E6B4XVRJK5REUPP7PO", "length": 8876, "nlines": 103, "source_domain": "crazymarathi.com", "title": "एक दिवस एका मुलीने तिच्या आईला विचार मी सु-सु करते तेव्हा.... - Crazy Marathi", "raw_content": "\nएक दिवस एका मुलीने तिच्या आईला विचार मी सु-सु करते तेव्हा….\nजोक 1 : तीसरी क्लास का बच्चा (टीचर से): मैडम मै आपको कैसा लग रहा हूँ\nबच्चाः तो मै अपने मम्मी पापा को कब भेजु आपके घर \nबच्चाः बात आगे बढाने के लिये…….\nमैडमः ये क्या बकवास है\nबच्चाः ट्युशन के लिए……\nक्या मैडम आप भी ना… कसम से Facebook चला चला\nकर बिगड गई हो..\nजोक 2 : मुलगी लग्नच्या काही महिण्यान नंतर\nतिच्या मैत्रिणीला भेटायला आली\nबोलता बोलता तिला रडू कोसळले\n“माझे तर भाग्यच फुटलं आहे…\nमाझ्या नवऱ्याचे दुसऱ्या मुली बरोबर अफेयर चालू आहे…”\nमैत्रीण : ” अरे देवा हे तू काय सांगते आहेस \nपण तुला माहित कस पडलं \nमुलगी : ” माझ्या बॉय-फ्रेंड ने सांगितलं…\nतो पण त्याच्याच कंपनीत काम करतो \nजोक 3 : पप्पू के फ़ोन पर अनजान नंबर से कॉल आया \nलड़की – क्या आप शादीशुदा हैं \nपप्पू – नहीं, पर आप कौन हो \nलड़की – तुम्हारी बीवी, आज घर आना फिर बताउंगी \nथोड़ी देर बाद फिर अनजान नंबर से कॉल आया \nलड़की – क्या आप शादीशुदा हैं\nपप्पू – हाँ, पर आप कौन \nलड़की – तुम्हारी गर्लफ्रेंड, धोकेबाज़ \nपप्पू – सॉरी यार, मुझे लगा मेरी बीवी है \nलड़की – बीवी ही हूँ कुत्ते, आज तो बस तू घर आजा \nजोक 4 : एक मुलाची Engagement एक खूपच सुंदरमुलगी बरोबर होते\nते दोघे पूर्ण दिवस WhatsApp वर $ e x चेटिंग करायचे\nशेवटी दोघांचं लग्न होत\nसुहाग रात्रीला, मुलगा घूंघट उठवत बोलला\nतू खूपच सुंदर आहेस\nसांग हनी मूनला कुठे जायचं\nमुलगी लाजत लाजत बोलली “पुतच्या आतवड्यात दम्मू ततमील टाऊ…\nभावा कमीत कमी एक कॉल तरी केला पाहिजे होता\nपाहिलं का फ्री च्या whatsapp मुळे आणि $ e x चेटिंग मुळे काय झालं\nआत जा “दम्मू ततमील”….\nजोक 5 : लंदन की युनिवर्सिटी में एक क्लास चल रही थी\nप्रोफेसर ने पूछा- अच्छा बताओ दुनिया में सबसे नी..च, ह..रा..मी, दो..ग..ला, ब..द..त..मी..ज मु..ल्क कौन सा है \nएक पा..किस्तानी धीरे से खड़ा हुआ और चिल्ला\n भू..न के रख दूँ..गा अगर किसी ने भी\nपा..किस्तान का नाम लिया तो\nजोक 6 : एक दिवस एका मुलीने तिच्या आईला विचार\nमुलगी : आई, मी सु-सु करते तेव्हा शिट्टी वाजते, पण तू करते तेव्हा नाही वाजत, असं का\nआई : “मुली, माझी पण पहिले वाजायची, पण तुझ्या बापाने वाजवून वाजवून खराब करून टाकली”\nजोक 7 : पप्पू पर 100 बारातियों पर गाड़ी च..ढ़ाकर उन्हें\nकु..चलने का इल्ज़ाम था…\nपु..लिस में पकड़े जाने पर इं..स्पेक्टर ने वजह पूछी..\nपप्पू :- सर गाड़ी के ब्रेक फेल थे और सड़क के एक तरफ एक आदमी था और दूसरी तरफ बराती….\nइं..स्पेक्टर:- तो तुम्हें उस आदमी पर गाड़ी चढ़ानी चाहिए थी….\nपप्पू :- मैं क्या करता, मैं उस आदमी पर गाड़ी चढ़ाने\nही वाला था की अचानक वो भाग कर बारात में घुस गया…\nमुलगा वडीलांना “पप्पा वास्तविकता आणि संभावना यात काय अंतर आहे\nसुहाग रात्रीच्या दुसऱ्या दिवशी खुश होऊन नवरा बायकोला बोलला\nरात्री पलंगावर नवरा त्याच्या झोपलेल्या बायको जवळ जाऊन\nसु-हागरात्रीच्या दिवशी नवरदेव नवरीला तू घाबरू नको ३ नंबर चप्पल मध्ये ७ नंबरचा पाय टाकायचा आणि मग\nबाई ब्लाउज शिवण्यासाठी टेलरकडे गेली…\nलग्नात बायकांनी केला झकास डान्स…\nसाली बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…\nलग्नात वहिनीनीं केला भारी डान्स…\nसुहा’गरात्री बायकोला जोराची उचकी लागते….\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा वट पिंकी एका बस मध्ये चढली…\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा’वट बाई मेडिकल वर गेली…\nमुलीने सासरी जाताना सर्वांना रडवले\nटकला टी शर्ट घालून आला…\nनवरी ताईचा विडिओ बघून रडू येईल…\nबंड्याच्या बेडरूम मधून बायकोचा आवाज आला…\nलग्नात ताईने केला खुपच सुंदर डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nताईने केला खुपच सुंदर डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/religion/astro-tips-in-marathi-simple-remedy-for-children-who-cannot-focus-on-studies-mhpj-763486.html", "date_download": "2022-10-07T22:12:20Z", "digest": "sha1:DE7OY76UWZAJQJSDWU4YRFRG5AAAC5PM", "length": 10503, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Astro Tips : मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? या ग्रहाचा असू शकतो प्रभाव, करा हे सोपे उपाय – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /religion /\nAstro Tips : मुलांचं अभ्यासात मन लागत नाही या ग्रहाचा असू शकतो प्रभाव, करा हे सोपे उपाय\nAstro Tips : मुलांचं अभ्यासात मन लागत नाही या ग्रहाचा असू शकतो प्रभाव, करा हे सोपे उपाय\nमानवी बुद्धिमत्ता बुध ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते, जे मनुष्याला ज्ञानी आणि बुद्धिमान बनवते. जर बुध ग्रह कमजोर असेल तर व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.\nमानवी बुद्धिमत्ता बुध ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते, जे मनुष्याला ज्ञानी आणि बुद्धिमान बनवते. जर बुध ग्रह कमजोर असेल तर व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.\nरोमान्समध्ये ब्रेक; शारीरिक संबंध थांबवल्यावर नेमकं काय होतं\nकोल्हापूर : 7 वर्षांच्या बाळाने गिळली केसातील पिन; पुढे काय झालं पाहा\nकितीही वापरला तरी महिन्याच्या आत संपणार नाही स्वयंपाकाचा गॅस; असा जबरदस्त जुगाड\nत्वचेच्या तक्रारी दूर करण्यासाठी मुलतानी माती हा उत्तम उपाय; लगेच ट्राय करून बघा\nमुंबई, 22 सप्टेंबर : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची क्षमता आणि बुद्धिमत्ता ग्रह आणि नक्षत्रांशी संबंधित आहे. चंद्र आणि बुध ग्रह यांचा संबंध मनुष्याच्या एकाग्रतेशी आहे असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. चंद्राचा मनावर परिणाम होतो. तर बुध ग्रहा बुद्धीला. सर्व सुखसोयी मिळूनही काही मुले अभ्यासात कमकुवत असल्याचे अनेकदा दिसून येते. ज्योतिष शास्त्रानुसार मुलांच्या अभ्यासातील कमजोरीसाठी हे ग्रह कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. कुंडलीतील या ग्रहांच्या दोषाचा प्रभाव व्यक्तीच्या शैक्षणिक स्तरावर आणि करिअरमध्ये अपयशी ठरतो. या ग्रहांच्या दोषामुळे मुलांची एकाग्रता भंग होते आणि त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाते. भोपाळमध्ये राहणारे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी यासाठी काही उपाय सांगितले आहेत.\nVastu: सतत अभ्यासात मागे राहतंय मुल; वास्तूनुसार अभ्यासाच्या खोलीत करा असे बदल\nबुध ग्रहाचा प्रभाव ज्योतिषशास्त्राचे असे मत आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत बुध ग्रह सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात स्थित असतो आणि त्यावर गुरुची दृष्टी असते. तेव्हा त्या व्यक्तीच्या शिक्षणात अनेक समस्या येतात आणि त्यांचे शिक्षण अपूर्ण राहण्याची भीती कायम राहाते. एखादी व्यक्ती कठोर परिश्रम करूनही करिअरमध्ये चांगले स्थान मिळवू शकत नाही. चंद्राचा प्रभाव चंद्राचा मनावर परिणाम होतो असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. याशिवाय चंद्राचा संबंध शिक्षणाशी आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र दोष असेल तर त्या व्यक्तीला शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. परंतु ज्या घरामध्ये जन्म कुंडलीत चंद्र बसला असेल त्या घरामध्ये गुरु ग्रह दिसत असेल तर त्याचे परिणाम फारसे वाईट नसतात.\nकामावर नेहमी बॉसचा ओरडा खातात या राशीचे लोक, असा करा उपाय\nया दोषांवर करा हे सोपे उपाय - ज्योतिषशास्त्रात या ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. - सकाळी उठल्यावर तुळशीच्या पानांचे सेवन करावे आणि “ओम ऊँ सरस्वताय नमः” चा जप करावा. - दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा. - एकाग्रता सुधारण्यासाठी पन्ना रत्न घाला, परंतु विद्वान ज्योतिषाचा सल्ला घ्या. - सूर्यदेवाला जल अर्पण करा. हिरव्या भाज्या आणि सॅलड्स खा. - रोज सकाळी गायत्री मंत्राचा जप करा. - हिरवे कपडे घाला. सकाळी आंघोळीनंतर कपाळ, कंठ आणि छातीवर पिवळे चंदन लावा.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/utility-news/know-the-indian-railways-rules-for-child-fare-in-train-journey-au177-785503.html", "date_download": "2022-10-07T23:00:15Z", "digest": "sha1:ZBFN5FMAD7KSHLN5HGJEMZOLCPQB2E6A", "length": 14759, "nlines": 195, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nIndian Railways: 5 वर्षांच्या मुलांनाही लागू होणार पूर्ण तिकीट \nरेल्वे प्रवासादरम्यान 5 वर्षांखालील मुलांसाठीही ट्रेनचे पूर्ण तिकीट विकत घ्यावे लागणार आहे, अशा बातम्या काही दिवसांपासून फिरत आहेत. मुलांच्या प्रवासासाठी रेल्वेचे नियम काय आहेत, ते जाणून घेऊया.\nरेल्वे प्रवासादरम्यान 5 वर्षांखालील मुलांसाठीही ट्रेनचे पूर्ण तिकीट विकत घ्यावे लागणार आहे, अशी बातमी सध्या व्हायरल झाली आहे. याबाबत सरकारी एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने (PIB – Press Information Bureau) पडताळणी केली असून या बातम्या चुकीच्या असून त्या भ्रम पसरवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर लहान मुलांच्या तिकीटासंदर्भातील नियमांत (Ticket Rules) कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे भारतीय रेल्वेतर्फेही (Indian Railway) स्पष्ट करण्यात आले आहे. खरंतर, लहान मुलांच्या तिकीटाबद्दल रेल्वेचे नियम स्पष्ट असून त्यांचे तिकीट काढणे वा न काढणे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. प्रवासादरम्यान लहान मुलांसाठी सीट अथवा बर्थ हवा आहे की नाही, यावर त्यांचे तिकीट काढायचे की नाही, हे अवलंबून असते. जर तुम्हालाही या बातमीबाबत काही संदिग्धता असेल, आणि हे नियम नेमके काय आहेत, हे समजत नसेल तर 5 वर्षांखालील मुलांसाठी रेल्वेचे नियम काय आहेत, ते स्पष्ट जाणून घेऊया\nकाय आहेत लहान मुलांसाठी तिकीटांचे नियम \nरेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेनमध्ये आरक्षित केलेली सीट अथवा बर्थ याचा एकच प्रवासी वापर करु शकतो. मात्र 5 वर्षांखालील मुलांसोबत त्यांचे आई-वडील असणे आवश्यक असते. त्यामुळे आई किंवा वडील त्यांच्या 5 वर्षांखालील पाल्याला घेऊन एकाच सीटवर बसू शकतात, अशी सूट रेल्वेतर्फे देण्यात येते. लहान मुलांसाठ वेगळी सीट मिळत नसल्याने, त्यांचे वेगळे तिकीट घेणेही गरजेचे नसते. मात्र प्रवासादरम्यान लहान मुलांसाठी वेगळी सीट हवी , अशी आई-वडीलांची इच्छा असेल, तर ते त्यांच्यासाठी वेगळी सीट अथव बर्थ बूक करू शकतात. अशा वेळी, सामान्य प्रवाशांना लागू होणारे नियमच (लहान मुलांसाठीही) त्यांच्यासाठी लागू होतात. म्हणजेच 5 वर्षांखालील लहान मुलांसाठी वेगळी सीट अथवा बर्थ हवा असेल तर वयस्क नागरिकांच्या तिकीटासाठी लागेल, तेवढीच रक्कम भरावी लागते. 5 वर्षांखालील मुलांचे तिकीट काढणे वा न काढणे हा ऐच्छिक मुद्दा आहे. लहान मुलांसाठी वेगळी सीट बूक केली नसेल तर त्यांचे तिकीट विचारण्यात येत नाही. मात्र जर त्यांच्यासाठी सीट अथवा बर्थ मागितला गेला तर तिकीट काढणे किंवा आधीच जागा आरक्षित करणे, आवश्यक आहे.\nMonsoon Session: अजित पवारांच्या प्रश्नावर तानाजी सावंत गडबडले\nDaagdi Chaawl 2: ‘दगडी चाळ 2’मध्ये शकील-डॅडीमध्ये रंगणार नवं राजकारण; चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू\nT 20 वर्ल्ड कपसाठी 80 ते 90 टक्के संघ तयार, Rohit Sharma ची घोषणा\nMonsoon Session: “गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी”, शिंदे सरकार विरोधात विरोधकांचा हल्लाबोल\nजर एखादे मूल 5 वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल तर आरक्षित अथवा अनारक्षित कंपार्टमेंटमध्ये तिकीट काढणे हे ऐच्छिक आहे. नियमांनुसार, तिकीट बूक करताना पालकांनी लहान मुलांसाठी जागा आरक्षित केली नाही, तरी संबंधित कॉलममध्ये त्यांची माहिती देणे आवश्यत आहे. रेल्वेकडे ही माहिती नोंद स्वरुपात राहील, मात्र तिकीटाचे शुल्क केवल 5 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांसाठीच आकारले जाईल. मात्र ( 5 वर्षांखालील) लहान मुलांसाठी वेगळी सीट हवी असल्यास तिकीटाचे पूर्ण शुल्क भरावे लागेल. या बर्थ अथवा सीटसाठी बूकिंगपासून त्यावरील सूट, या सर्वांचे नियम लागू होतात.\nजर एखाद्या मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा अधिक आणि 12 वर्षांपेक्षा कमी असेल, तर त्यांच्यासाठी तिकीट काढणे बंधनकारक आहे. त्यांच्यासाठी वेगळ्या सीट अथवा बर्थची मागणी (तुम्ही) केली नसल्यास, या वयोगटातील मुलांसाठी, तिकीटाचे निम्मे शुल्क भरावे लागेल. मात्र मुलांसाठी वेगळी सीट अथवा बर्थची मागणी केल्यास, त्याचे पूर्ण शुल्क भरावे लागेल. तसेच जर संपूर्ण ट्रेन सीटिंग असेल ( उदा. शताब्दी किंवा जन शताब्दी) तर 5 ते 12 या वयोगटातील मुलांसाठी सीट घ्यावी लागेल व त्याचे पूर्ण शुल्क भरावे लागेल. जनरल डब्यातून प्रवास करत असल्यास या वयोगटातील मुलांसाठी तिकीटाचे निम्मे शुल्क भरावे लागेल.\nजर तुमचे पाल्य 12 वर्षांपेक्षा अधि वयाचे असेल तर त्याला वयाच्या आधारावर कोणतीही सूट मिळणार नाही. तिकीट बूक करताना प्रौढ व्यक्तीच्या तिकीटासाठी जेवढे शुल्क लागेल, तेवढीच रक्कम भरावी लागेल.\nUse cold milk : चेहऱ्याच्या अनेक समस्या, वापरा थंड दूध\nदहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2021/01/13/zgeeta20/", "date_download": "2022-10-07T22:14:39Z", "digest": "sha1:H7H6JWB4AYLGSM2CPXIVXIMIOS7Z3T3Q", "length": 17301, "nlines": 153, "source_domain": "kokanmedia.in", "title": "झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद - अध्याय तिसरा - भाग २ - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nझोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय तिसरा – भाग २\nJanuary 13, 2021 Kokan Media अध्यात्म, झोंपाळ्यावरची गीता, संस्कृती, साहित्य Leave a comment\nखासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.\nझोंपाळ्यावरची गीता – अध्याय तिसरा – कर्मयोग\n(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय\nइंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)\nश्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)\nलोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ \nज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ॥३-३॥\nन च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥३-४॥\nन हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् \nकार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥३-५॥\nकर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् \nइन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥३-६॥\nकर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥३-७॥\nनियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः \nशरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥३-८॥\n(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)\n(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\n(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\n(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)\nसंकलन : अनिकेत कोनकर\nप्रकाशन : सत्त्वश्री प्रकाशन…\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nरत्नागिरीच्या ‘आविष्कार’चे दिवाळी गिफ्ट बॉक्स सज्ज\nमहाराष्ट्र राज्य फिडे मानांकन बुद्धिबळ निवड स्पर्धेस दिमाखात प्रारंभ\nस्वरूपानंद पतसंस्थेच्या आर्थिक भक्कमतेची ग्वाही देणारा निर्देशांक\nवाशिष्ठीच्या दूध संकलन केंद्राचा मालघरमध्ये शुभारंभ\nमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समुळे कोकणातील उद्योजकांना पाठबळ – संतोष तावडे\nदसरा मेळावे : विचारांचे (\nAnanttanayArjunaअनंततनयअर्जुनइंग्रजीकोकणकोकण बातम्याकोकण मीडियागीताईझोंपाळ्यावरची गीताझोपाळ्यावरची गीतादत्तात्रय अनंत आपटेदत्तात्रेय अनंत आपटेमराठीरत्नागिरीरत्नागिरी बातम्याराजेंद्रप्रसाद मसुरकरश्रीकृष्णश्रीमद्भगवद्गीतासंस्कृतसिंधुदुर्गसिंधुदुर्ग बातम्याDattatray Anant ApteGeetaKokanKokan MediaKokan NewsKonkanRatnagiriRatnagiri NewsShrikrishnaShrimad Bhagvad GeetaSindhudurgSindhudurg NewsZopalyawarchi Geeta\nPrevious Post: करोनाचे रत्नागिरीत नऊ, तर सिंधुदुर्गात १३ नवे रुग्ण\nNext Post: रत्नागिरीत १७, तर सिंधुदुर्गात २२ जण करोनामुक्त\nरत्नागिरी येथील आविष्कार संस्थेच्या श्री शामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले दिवाळी गिफ्ट बॉक्स विक्रीसाठी सज्ज झाले आहेत. शामराव भिडे कार्यशाळेत बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्याद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याचा उद्देश डोळ्यांसमोर असतो.\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (17) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (17) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (58) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,089) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,596) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (281) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (27) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (305) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (236) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (352)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A8%E0%A5%AC_%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2022-10-07T22:25:51Z", "digest": "sha1:GESKPPLMR3P4SEXDD6CWNA6JLU3VA3ED", "length": 3775, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:२६ डिसेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:२६ डिसेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n\"२६ डिसेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ फेब्रुवारी २०११ रोजी २०:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://virtuagirlfullhd.info/mr/katy-angel-primal-heat/", "date_download": "2022-10-07T21:19:17Z", "digest": "sha1:6PWD4S7MVUKWVD5DF5U3RBJOUZB57RS6", "length": 4554, "nlines": 53, "source_domain": "virtuagirlfullhd.info", "title": "केटी देवदूत | सर्वांत महत्त्वाचा उष्णता - व्हर्चुआ गर्ल एचडी", "raw_content": "\nकेटी देवदूत | सर्वांत महत्त्वाचा उष्णता\nकेटी देवदूत Virtuagirl येथे एक अननुभवी आहे. ती रोमेनिया पासुन आहे. आपण प्रेम तिला असेल विश्वास. तिचे नाव साधन विरोध म्हणून, केटी व्रात्य मिळत आणि काठावर जीवनशैली पसंत आनंद. ही बाई नैसर्गिकरित्या लैंगिक एक आहे आणि ती मलमपट्टी आणि स्टेज वर आणि तिच्या स्वत: च्या आयुष्यात दोन्ही विविध थोडय़ा मध्ये भूमिका वठविणे आवडतात. तिच्या शरीरावर तिचा उत्तम भाग तिच्या अत्यंत नाजूक डोक आहेत. केटी अहवाल, काय भावना तिच्या मिळविण्यासाठी आवश्यक आहे एक सभ्य स्पर्श आहे, किंवा तिच्या tits दिशेने चरणे आणि ही मुलगी लगेच इच्छा आदळला. प्रत्येक वेळी आपण तिला पूर्ण शो प्राप्त, आपण त्याच प्रकारे तिच्या nipples आनंद घेणे मिळेल…\nLynette / चला रोल प्ले\nLynette / मुलभूत तत्त्वे बेबे\nलिंगाधारित कामाची विभागणी आहे Bradburry / Mantrap\nकेटी देवदूत | सर्वांत महत्त्वाचा उष्णता\nLena प्रेम / फ्लॅश डान्सर\nचेंडू जॉर्ज बेलीला रायडर / प्रौढ मध्ये लाल\nदाट तपकिरी रंगाचे केस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/will-he-marry-another-mayuri-spoke-on-this-subject-for-the-first-time-after-ashutosh-left/", "date_download": "2022-10-07T23:06:27Z", "digest": "sha1:GINIIPEYP4ZVOYLWS3HXZQRDBQC5UG52", "length": 10258, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "दुसरं लग्न करणार का?, आशुतोष सोडून गेल्यानंतर मयुरी पहिल्यांदाच या विषयावर बोलली", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nदुसरं लग्न करणार का, आशुतोष सोडून गेल्यानंतर मयुरी पहिल्यांदाच या विषयावर बोलली\nदुसरं लग्न करणार का, आशुतोष सोडून गेल्यानंतर मयुरी पहिल्यांदाच या विषयावर बोलली\nमुंबई | झी मराठी वरील ‘खुलता कळी खुळेना’ या मालिकेतील मानसीच्या भूमिकेनं अभिनेत्री मयुरी देशमुखनं सगळ्यांनाच भूरळ घातली होती. आता मयुरीनं हिंदी मालिकेतही पदार्पण केलं आहे. सध्या स्टार प्लस वरील ‘इमली’ या मालिकेत ती काम करत आहे.\nमयुरीच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत सुरू होतं. ती तिच्या आयुष्यात यशाची शिखरं गाठत होती. मालिकेनंतर तिनं काही नाटकांत काम केलं होतं आणि ती यशस्वी देखील ठरली होती. 2016 ला तिनं अभिनेता आशुतोष भाकरे याच्याशी लग्न केलं होतं. मात्र, आशुतोषनं मागील वर्षी जुलै 2020 मध्ये राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेनं मयुरीला मोठा धक्का बसला होता.\nमागील वर्ष 2020 माझ्यासाठी, माझ्या घरातील प्रत्येकासाठी अतिशय कठीण होतं. आशुतोष आम्हाला कायमचा सोडून गेला. त्याचं जाण्याचं दुःख हे आभाळ कोसळण्यासारखंच होतं. पण यातून सावरणं गरजेचं होतं. माझ्या कुटुंबातील सर्वांनी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी या दुःखातून मला बाहेर पडायला मदत केली आणि मी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली, असं एका मुलाखती दरम्यान मयुरीनं सांगितलं आहे.\nदरम्यान, माझं आजही आशुतोषवर मनापासून प्रेम आहे, आजही तो माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते. आशुतोष त्याच्या भाचीच्या खूप जवळ होता. त्या दोघांमध्ये खूप प्रेम होत. आशुतोषला लहान मुल खूप आवडायची. त्यामुळे आता तो गेल्यानंतर मी मूल दत्तक घेण्याचा विचार करत आहे. अनेकदा मला दुसरं लग्न करण्याबाबत सतत विचारलं जातं. परंतु मुलांसाठी दुसरं लग्न करण्याची काय आवश्यकता आहे, असं मयुरी यावेळी म्हणाली.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\nप्रियांका चोप्राची बहिण आली भांडणावर, प्रियांकावर केले अत्यंत धक्कादायक आरोप\nतलफ तलफ तलफ… गुटखा, तंबाखूची पुडी, देशी दारु महागली\nपुण्यात महिलेचा मृतदेह आढळला, अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्यानं खळबळ\nआज 4 वाजल्यानंतर हे काम कराच, अन्यथा मिळणार नाही कोरोनावरील लस\nविराट कोहलीला मोठा दिलासा, रोहित शर्मानं उधारीवर दिला आपला ‘हा’ खेळाडू\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातल्या प्रत्येकाला मिळणार मोफत लस\nराज्यातील लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढवला, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%82-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%82/", "date_download": "2022-10-07T21:32:34Z", "digest": "sha1:4WT3FLWDLZTNDYDTOQQJCXLS3XDAEF7T", "length": 2006, "nlines": 36, "source_domain": "marathilekh.com", "title": "चल जाऊ रमूं या वनीं Archives - Marathi Lekh", "raw_content": "\nचल जाऊ रमूं या वनीं\nचल जाऊ रमूं या वनीं | Chal Jau Ramu Ya Vani Marathi Lyrics गीत – दत्ता डावजेकर संगीत – दत्ता …\nमुलांना काळ्या वर्णाच्या मुलींशी लग्न का करावे वाटत नाही\nब्रेकअप झाल्यावर तुम्ही स्वतःला कसे सावरले\nआपण स्वतःशी प्रेम कसे करू शकतो मला तर माझ्यात फक्त दोष दिसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/koffee-with-karan-7-sidharath-malhotra-statement-on-sex-and-love-mrj-95-3079891/", "date_download": "2022-10-07T21:44:38Z", "digest": "sha1:2INEX43WQMTESL4BW6JHWF6W2VLS5U3D", "length": 21679, "nlines": 259, "source_domain": "www.loksatta.com", "title": "\"प्रेम नसताना सेक्स करणं...\" शरीरसंबंधांबाबत सिद्धार्थ मल्होत्राचं वक्तव्य चर्चेत | koffee with karan 7 sidharath malhotra statement on sex and love | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\n“प्रेम नसताना सेक्स करणं…” शरीरसंबंधांबाबत सिद्धार्थ मल्होत्राचं वक्तव्य चर्चेत\n‘कॉफी विथ करण ७’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रानं केलेलं हे वक्तव्य बरंच चर्चेत आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nसिद्धार्थने शरीरसंबंधांबाबत केलेलं एक वक्तव्य बरंच चर्चेत आहे.\nबॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. कियारा आडवाणीशी असलेल्या त्याच्या नात्यामुळे तो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. नुकतीच सिद्धार्थ मल्होत्रा आणि विकी कौशल यांनी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये दोघांनीही त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. पण यावेळी सिद्धार्थने शरीरसंबंधांबाबत केलेलं एक वक्तव्य बरंच चर्चेत आहे.\nसिद्धार्थ मल्होत्राने या शोमध्ये त्याच्या आणि कियारा आडवाणीच्या नात्याबाबत हिंट तर दिलीच पण प्रेम आणि शरीरसंबंध या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कशाप्रकारे एकमेकांत गुंतलेल्या आहेत यावरही भाष्य केलं. या एपिसोडमध्ये सिद्धार्थ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या हटके पंजाबी स्टाइलमध्ये त्यांच्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.\nआणखी वाचा- “…तर भारताचा अपमान होईल” कॅनडाच्या दिग्दर्शकाचं ‘द कश्मीर फाईल्स’बाबत वक्तव्य चर्चेत\n“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला\nShinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\n“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप\nकरण जोहरने या शोमधील एका सेशनमध्ये विकी कौशलसाठी नेटिजन्स काय कमेंट्स करतात हे वाचून दाखवलं. एका युजरनं विकी कौशलवर कमेंट करताना लिहिलं होतं, “विकी कौशलमध्ये एवढी एनर्जी आहे की कतरिनाला दिलासा देणाऱ्या कोणत्याच व्यक्तीची गरज पडणार नाही.” यावर विकीने लगेचच, “ही कमेंट मला आवडली” असं उत्तर दिलं.\nआणखी वाचा- “कियारा आडवाणीशी लग्न करण्याचा काय प्लान” करणच्या प्रश्नावर सिद्धार्थ मल्होत्रा म्हणतो…\nकरण जोहर त्याच्या शोमध्ये येणाऱ्या सर्वच पाहुण्यांना त्यांच्या सेक्स लाइफबद्दल प्रश्न विचारताना दिसतो. यावेळी त्याने विकी कौशलला आणखी एक कमेंट वाचून दाखवली. ती अशी होती की, “विकी कौशल इतर अभिनेत्यांच्या तुलनेत कमी सेक्शुअल आहे.” करणच्या या कमेंटवर सिद्धार्थने लगेच प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “सेक्शुअल होण्यासाठी प्रेमदेखील गरजेचं आहे. प्रेम नसेल तर सेक्स करणं म्हणजे प्रामाणिक नसल्यासारखं आहे.” सिद्धार्थच्या या वक्तव्यानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर त्याचं कौतुक होताना दिसत आहे.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nपाहताक्षणीच पत्नीच्या प्रेमात पडले होते राजू श्रीवास्तव, १२ वर्ष होकाराची वाट पाहिली अन्…\nवाई : शिवेंद्रसिंहराजे माझे मुख्य प्रचार-उदयनराजे\nमिलिंद एकबोटेंचा राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप, म्हणाले “कत्तलखान्यातून दहशतवाद्यांना…”\n“पण एकनाथ शिंदेंच्या काय मनात आलं अन् एकदम…” ‘५० खोके एकदम ओके’ म्हणत अजित पवारांची तुफान टोलेबाजी\n“आगामी निवडणुकीत मुंबईतील २४ हजार कष्टकरी…”, गुणरत्न सदावर्तेंची मुंबईत मोठी घोषणा\nआनंद महिंद्रा यांनी खरेदी केली Scorpio- N कार; ट्विटरवर फोटो शेअर करत म्हणाले “चांगले नाव सुचवा…” लोकांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया\nऐन टी२० विश्वचषकाच्या तोंडावर न्यूझीलंड संघाला मोठा झटका दुखापतीमुळे हा खेळाडू अष्टपैलू पडला बाहेर\nमुंबई : निम्मे शैक्षणिक वर्ष सरत आल्यानंतरही महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी गणवेशापासून वंचित\nकोल्हापूर : राज्यात निधी वाटपात भेदभावप्रकरणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले – अजित पवार\nवसईत घरावर वीज कोसळली\nनवी मुंबई, उरणमध्ये दिवसभर पावसाची दमदार हजेरी\nगडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\n‘झलक दिखला जा’च्या मंचावर लेकाच्या लग्नाची झलक पाहून नीतू सिंग भावुक, म्हणाल्या…\n‘हर हर महादेव’मध्ये अमृता खानविलकर साकारणार बाजीप्रभु देशपांडे यांच्या पत्नीची भूमिका, लूक व्हायरल\n‘हम आपके है कौन…’ चित्रपटतील रेणुका शहाणे यांचा ‘तो’ सीन शूट करताना ढसढसा रडल्या रीमा लागू\nMPSC च्या परीक्षेसाठी शुभेच्छा मागणाऱ्याला हेमांगी कवीचे स्पष्ट उत्तर, म्हणाली….\nएअरपोर्ट लूकमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले “कंगना…”\nबॉलिवूडमधील नकारात्मक विचारांच्या लोकांवर टीका करत करण जोहर म्हणाला, “मी प्रत्येकाच्या…”\n“माझ्यावर टीका केली जातेय हे…” सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल प्राजक्ता माळीने व्यक्त केलं स्पष्ट मत\n‘पुष्पा २’मध्ये होणार ‘या’ आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्याची एंट्री, साकारणार महत्वपूर्ण भूमिका\nमुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘झी टॉकीज’चा मानाचा मुजरा\nVideo : ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी सलमान खानसाठी तयार केलं आलिशान घर, व्हिडीओ समोर\n‘झलक दिखला जा’च्या मंचावर लेकाच्या लग्नाची झलक पाहून नीतू सिंग भावुक, म्हणाल्या…\n‘हर हर महादेव’मध्ये अमृता खानविलकर साकारणार बाजीप्रभु देशपांडे यांच्या पत्नीची भूमिका, लूक व्हायरल\n‘हम आपके है कौन…’ चित्रपटतील रेणुका शहाणे यांचा ‘तो’ सीन शूट करताना ढसढसा रडल्या रीमा लागू\nMPSC च्या परीक्षेसाठी शुभेच्छा मागणाऱ्याला हेमांगी कवीचे स्पष्ट उत्तर, म्हणाली….\nएअरपोर्ट लूकमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले “कंगना…”\nबॉलिवूडमधील नकारात्मक विचारांच्या लोकांवर टीका करत करण जोहर म्हणाला, “मी प्रत्येकाच्या…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://navrangruperi.com/cinema/marathi-cinema/pawankhind-marathi-film-poster-launched/", "date_download": "2022-10-07T21:26:47Z", "digest": "sha1:4ALY3GPV54DHV2NEYXI6AGIWELCPYZE7", "length": 11618, "nlines": 175, "source_domain": "navrangruperi.com", "title": "पराक्रमी दिनाचे औचित्य साधून पावनखिंड’ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित - Navrang Ruperi", "raw_content": "\nपराक्रमी दिनाचे औचित्य साधून पावनखिंड’ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित\nआमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम\n१३ जुलै १६६०….स्वराज्याच्या इतिहासातील एका अभूतपूर्व लढतीचा दिवस….\nपावनखिंडीचा (Battle of Pawankhind) रणसंग्राम घडून आज ३६१ वर्षांचा काळ उलटला असला तरी या रणसंग्रामाचा लढा आणि बाजीप्रभूंच्या स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे. लढण्याची जिद्द असेल तर प्रचंड फौजफाटा आणि अमाप शस्त्रास्त्रांचा वापर न करतासुद्धा लढाई जिंकता येते याचा प्रत्यय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांची जिद्द पहाताना येतो. याच प्रबळ जिद्दीच्या बळावर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पावनखिंडीचा लढा अभूतपूर्व पराक्रमाने लढला. (PawanKhind Marathi Film Poster launched)\nया पराक्रमी दिनाचे औचित्य साधून झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या अजोड पराक्रमाचा अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर (Director Digpal Lanjekar) लिखित-दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या टीमच्या वतीने या नरवीरांना आणि त्यांच्या हौतात्म्याला हे पोस्टर समर्पित करण्यात आले आहे. ए.ए.फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे.\n१३ जुलै १६६०, पावनखिंड लढतीला आज ३६१ वर्ष पूर्ण होत आहेत.\nलाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे.\nअसे म्हणून स्वराज्याच्या स्वप्नासाठी उभा जन्म आणि छत्रपती शिवरायांसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या बाजीप्रभू आणि बांदल सेनेच्या पराक्रमाचा दिवस\nजुलै महिन्यातील अंधारी रात्र, मुसळधार कोसळणारा पाऊस मशालीच्या उजेडात रस्ता तुडवत मराठी सैन्य गजापूरच्या घोडखिंडीत पोहोचले. हजारोच्या सैन्याचा मुकाबला करताना बाजी, फुलाजी बंधू आणि ३०० बांदल सेनेच्या वीरांनी पराक्रमाची शिकस्त करत महाराज विशालगडावर पोहचेपर्यंत घोडखिंड प्राणप्रणाने लढवली आणि घोडखिंडीतला हा लढा बाजीप्रभू यांच्या स्वराज्यनिष्ठेच्या पवित्र रक्ताने ‘पावन’ झाला.\nछत्रपती शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या बाजीप्रभू आणि बांदल सेनेच्या बलिदानाची गाथा उलगडणारा ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या रूपाने लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.\nअभिजित मोहन वारंग दिग्दर्शित चित्रपट 'प्रेम प्रथा धुमशान' २८ ऑक्टोबरला\nजानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार बिगबजेट चित्रपट \"अंकुश\"\nप्रसाद खांडेकरची दिग्दर्शकीय इनिंग, ‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'सहेला रे' चा ट्रेलर प्रदर्शित\nतुझ्या इश्काचा नादखुळा मालिकेत होणार सुप्रसिद्ध अभिनेता संजय नार्वेकर यांची एण्ट्री\nमुक्ता आणि उमेश झळकणार सोनी मराठी वाहिनीवर – ‘अजूनही बरसात आहे’ 12 जुलैपासून\n‘मनी हाईस्ट’ मधील ‘Bella Ciao च्या कडक मराठी व्हर्जन’ ची चर्चा\nदिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये..\nराम कदम यांच्या संगीतातील ‘स्वराशा’\n“तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही” …शब्दांचा जादूगार ..गुलजार\nदिवाना मुझसा नही…शम्मी कपूर\nप्रतिभेला आलेला बहार…नृत्यांगना अभिनेत्री वैजयंतीमाला\nअभिजित मोहन वारंग दिग्दर्शित चित्रपट ‘प्रेम प्रथा धुमशान’ २८ ऑक्टोबरला\nजानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार बिगबजेट चित्रपट “अंकुश”\nप्रसाद खांडेकरची दिग्दर्शकीय इनिंग, ‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ चा ट्रेलर प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://navrangruperi.com/film-news/teaser-of-ajay-devgns-bhuj-the-pride-of-india-released-trailer-on-12th-july/", "date_download": "2022-10-07T22:14:11Z", "digest": "sha1:6JXTIBDEVEAB7SJASWSGJ44XNSMGYXV2", "length": 9719, "nlines": 171, "source_domain": "navrangruperi.com", "title": "भुज चे टिझर प्रदर्शित, ट्रेलर येणार उद्या १२ जुलै रोजी - Navrang Ruperi", "raw_content": "\nभुज चे टिझर प्रदर्शित, ट्रेलर येणार उद्या १२ जुलै रोजी\nवास्तविक जीवनातील नायकांद्वारे प्रेरणा घेऊन काही भव्य चित्रपट निर्माण केल्यानंतर, या स्वातंत्र्यदिनी अजय देवगण बहुप्रतिक्षित युद्धपट ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ घेऊन येत आहे. आज अजय देवगणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे सिनेमाचे नवीन टिझर रिलीज केले. (Teaser of Ajay Devgn’s Bhuj: The Pride of India released. Trailer on 12th July)\n१९७१ च्या भुज एअरबेस वर लढल्या गेलेल्या युद्धाच्या दृश्यांच्या पार्श्वभूमीवर या उत्कंठावर्धक टिझर मध्ये अजय देवगण म्हणत असतो की, ‘मेरे मरने का मातम मत करना, मैंने खुदही शहादत चुनी है, मैं जीता हूँ मरने के लिए, मेरा नाम है सिपाही’\nया चित्रपटाच्या कलाकारांमध्ये संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अम्मी विर्क, नोरा फतेही आणि शरद केळकर हे देखील मुख्य भूमिकेत आहे. इंडियन एअर फोर्सच्या भुज एअर बेसचे स्क्वॉड्रॉन विजय कर्णिक यांच्या शौर्याची कथा आपल्याला यात बघायला मिळणार आहे.\nया भव्य चित्रपटाचा ट्रेलर उद्या १२ जुलै २०२१ रोजी लाँच होणार असून आज चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले आहे. टी-सीरिज आणि अजय देवगण फिल्म्स प्रस्तुत, ‘भुज: प्राइड ऑफ इंडिया’ची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, गिन्नी खानुजा, वजीर सिंग आणि बनी संघवी यांनी केली आहे. अभिषेक दुधैया दिग्दर्शित अभिषेक दुधैया, रमण कुमार, रितेश शहा आणि पूजा भवोरिया हे चित्रपटाचे लेखक असून हा चित्रपट १३ ऑगस्ट २०२१ रोजी फक्त डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी वर रिलीज होणार आहेत.\nअभिजित मोहन वारंग दिग्दर्शित चित्रपट 'प्रेम प्रथा धुमशान' २८ ऑक्टोबरला\nजानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार बिगबजेट चित्रपट \"अंकुश\"\nप्रसाद खांडेकरची दिग्दर्शकीय इनिंग, ‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'सहेला रे' चा ट्रेलर प्रदर्शित\nचंकी पांडे यांची आई स्नेहलता पांडे यांचे निधन\nसिनेसृष्टीचे लोकप्रिय खलनायक बरखूरदार… प्राण\nअमेझॉन मिनी टीवीवर कॉमिक कार्यक्रमांची घोषणा\n‘लॉ ऑफ लव्ह’ चे ट्रेलर प्रदर्शित, सिनेमा ४ फेब्रुवारीला\nदिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये..\nराम कदम यांच्या संगीतातील ‘स्वराशा’\n“तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही” …शब्दांचा जादूगार ..गुलजार\nदिवाना मुझसा नही…शम्मी कपूर\nप्रतिभेला आलेला बहार…नृत्यांगना अभिनेत्री वैजयंतीमाला\nअभिजित मोहन वारंग दिग्दर्शित चित्रपट ‘प्रेम प्रथा धुमशान’ २८ ऑक्टोबरला\nजानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार बिगबजेट चित्रपट “अंकुश”\nप्रसाद खांडेकरची दिग्दर्शकीय इनिंग, ‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ चा ट्रेलर प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-20-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-2-%E0%A4%AF%E0%A5%8B55/", "date_download": "2022-10-07T22:46:19Z", "digest": "sha1:KMV4MF2OKPPAOX37N2ZX5RV5B23GEVUX", "length": 12564, "nlines": 91, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "'या' 20 वर्षीय तरुणीकडे आहे 2 यो'नी, एकाचवेळी दोनदा येतात पी'रिय'ड्स', म्हणाली; दोन्ही यो'नीच्या आधारे मी एकाचवेळी... - Themaharashtrian", "raw_content": "\n‘या’ 20 वर्षीय तरुणीकडे आहे 2 यो’नी, एकाचवेळी दोनदा येतात पी’रिय’ड्स’, म्हणाली; दोन्ही यो’नीच्या आधारे मी एकाचवेळी…\n‘या’ 20 वर्षीय तरुणीकडे आहे 2 यो’नी, एकाचवेळी दोनदा येतात पी’रिय’ड्स’, म्हणाली; दोन्ही यो’नीच्या आधारे मी एकाचवेळी…\nनिसर्गाची करणी आणि नारळात पाणी अशी म्हण आपण ऐकली असेल. निसर्ग काहीही निर्माण करू शकतो. आज आम्ही आपल्याला एक घटना अशीच सांगणार आहोत. अमेरिकेच्या एका शहरात ही घटना उघडकी’स आलेली आहे. एका 20 वर्षीय मुलीची कहाणी आपण जर ऐकली तर आपण तोंडात बोटे घालाल.\nकारण त्या वीस वर्षीय तरुणीला दोन ग’र्भाशय आणि दोन यो’नी आहेत. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र, ही घ’टना खरी आहे. या तरुणीला ती अठरा वर्षाची झाल्यानंतर ही बाब क’ळली आणि ती देखील हा’दरून गेली. विशेष म्हणजे जगातील ही पहिलीच घ’टना असल्याचे सांगण्यात येते. वीस वर्षीय पेज डीएंजेलो या घटनेची स्वतः साक्षीदार आहे.\nया तरुणीने दोन ग’र्भाशय आणि दोन यो’नी सोबत जन्म घेतला आहे. ही घटना अतिशय दुर्मिळ आहे. या तरुणीला मा’सिक पा’ळीदरम्यान खूप मोठ्या अडचणींचा सामना देखील करावा लागतो. तज्ञनुसार या दु’र्मिळ घ’टनेला विज्ञानाच्या भाषेमध्ये यू’ट्रस डिडेलफिस असे संबोधण्यात येते. पेज सोशल मीडियावर काम करते.\nतिने आपला टिक टॉक वर व्हिडिओ बनवून याबाबत नुकताच खुलासा केला आहे. एका बातमीनुसार पेजही दहावीला असताना तिला मा’सिक पा’ळी दरम्यान दोन वेळेस पी’रिय’ड्स’ येत होते. त्यामुळे ती अठरा वर्षाची झाल्यानंतर तिने एका गा’यनो’लॉजिस्टला याबाबत दाख’वल. त्यानंतर याबाबतचा खुलासा केला.\nत्यानंतर डॉ’क्टरांनी तिला असे सांगितले की, ती एकच वेळेस दोनदा प्रे’ग्नेंट देखील होऊ शकते. मात्र, ती दोनदा प्रे’ग्नेंट झाली तरी तिला ते समजणार नाही, असेही सांगण्यात येते. मात्र, एकाच वेळेस दोनदा प्रे’ग्नेंट झाली तर तिला शा’रीरिक दु’खणे मागे लागू शकते, असेही डॉक्ट’रांनी सांगितले आहे.\nमहिन्यात येतात दोनदा मा’सिक पा’ळी\nयाबाबत पेजने नुकताच एक टिक टॉक वर व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली होती, की मला अनियमित पिरे’ड येत होते. तसेच महिन्यात दोनदा मला हा त्रा’स होतो. हा त्रा’स एका आठवड्यातच व्हायचा. त्यामुळे मी शाळेत खूप त्र’स्त राहायचे. मला असे वाटायचे की, लोकांना माझा दोन यो’नी दिसतात का मात्र असे काही नव्हते.\nमी अनेकदा लोकांकडे याबाबत सांगते. ते देखील एकदम आ’श्चर्यचकित होतात, असेही ती म्हणाली. यानंतर ती डॉ’क्टरांकडे गेली. त्यानंतर इतर सगळ्या तपासण्या करण्यात आल्या. पेज हिच्या दोन्ही यो’नी इतर म’हिलांच्या यो’नी पेक्षा कमी साईजच्या असल्याचे आढळले आहे. त्यामुळे अशा परि’स्थितीमध्ये ती ग’र्भव’ती राहिली असती तरी प्री मॅच्युअर डि’लिव्हरी किंवा ग’र्भपा’त होण्याची अधिक शक्यता असल्याचे देखील डॉ’क्टरांनी सांगितले आहे.\nत्यामुळे डॉक्टरांनी तिला जेव्हा लग्न होईल त्या वेळेस मूल जन्माला न घालता स’रोगसीचा सल्ला दिला आहे. द्रेक्साल यूनिवर्सिटी मध्ये सध्या ती शकते. ती पण इतरांसारखे आपले कुटुंब असावे, असा विचार करत होती. मात्र आपल्याला सामान्य महिलांसारखे जीवन जगता येणार नाही, असेही तिने म्हटले आहे. तिला अनेकांनी धीर देखील दिला आहे.\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\nपती ‘नपुं’सक’ असून देखील पत्नी झाली ‘प्रे’ग्नं’न्ट’, खरे सत्य समोर येताच पतीचेही उडाले होश…\nह’निमू’नच्या पहिल्याच रात्री पत्नीला समजले की पती आहे स’मलैं’गि;क, पहा तरीही पतीने पत्नीसोबत केले…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00036227-EXB-2HV564JV.html", "date_download": "2022-10-07T22:53:37Z", "digest": "sha1:GA3T7GT57HQJDREBO6BG3IYKWIIHYJMK", "length": 14527, "nlines": 300, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "EXB-2HV564JV | Panasonic | अॅरे/नेटवर्क प्रतिरोधक | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर EXB-2HV564JV Panasonic खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये EXB-2HV564JV चे 6890 तुकडे उपलब्ध आहेत. EXB-2HV564JV साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/gas-cylinder-blast", "date_download": "2022-10-07T22:33:38Z", "digest": "sha1:KBYJE5UQFDF7UCLOAN2WOAVC6IVVZLNC", "length": 8560, "nlines": 208, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nVirar Blast : विरारमध्ये चायनीजच्या दुकानात रहस्यमय ब्लास्ट सिलिंडर, एसी सुरक्षित, मग ब्लास्ट कशाचा सिलिंडर, एसी सुरक्षित, मग ब्लास्ट कशाचा\nDombivli Cylinder Blast: पुजेसाठी अगरबत्ती पेटवली आणि गॅस सिलिंडर फुटला स्फोटाचा आवाजाने डोंबिवली हादरली, एक गंभीर जखमी\nNashik: गॅस गळतीनंतर भीषण स्फोट स्फोटात महिलेचा जागीच मृत्यू,, तर 16 वर्षीय तरुणी भाजली\nYavatmal Cylinder Blast | Arni तालुक्याच्या आयता गावात सिलिंडरचा स्फोट, 2 जणांचा मृत्यू\n‘गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास 6 लाखांचा मोफत विमा, इतर खर्चासाठी 4 लाख’, तुम्हाला ‘हे’ माहितीय\nआग विझवताना गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या 3 जवानांसह ७ जखमी\nसाकीनाक्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, भीषण आगीत 5 होरपळले, एका मुलीचा मृत्यू\nपुण्यात गॅस सिलेंडर लीकेज झाल्याने आग, आई-मुलगा होरपळले\nZaheer Khan : झहीर खानने अभिनेत्रीच्या कुटुंबाला अशा प्रकारे मनवलं होतं, जाणून घ्या लव्हस्टोरी\nफक्त प्रेम.. रणबीरने आलियाला केलं किस; बेबी शॉवरमधील खास क्षण\nदक्षिण आफ्रिकेवर भारी पडणार ‘हे’ दोन खेळाडू, जाणून घ्या….\nमौनी रॉयचा आऊटफिट पाहून नेटकरी घायाळ; फोटोंवर लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव\nRishabh Pant : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये ऋषभ पंतचा वाढदिवस साजरा, चाहते म्हणाले उर्वशीही…\nसादर करण्यात आलेल्या कागद पत्रांवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार यासह पहा इतर अपडेट महाफास्ट न्यूज 100 मध्ये\nअंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेचा प्रचाराचा काय आहे प्लॅन पहा यासह 4 मिनिट 24 हेडलाईन्स\nउद्धव ठाकरेंनी का मागितले आणखीन काही दिवस यासह इतर बातम्यांच्या अपडेटसाठी पहा महाफास्ट न्यूज 100\nशेतकऱ्यांना 12 तास वीज देणार यासह पहा राज्यभरातील अपडेट 36 जिल्हे 72 बातम्यामधून\n“उद्धव ठाकरेंच्या भाषणाला दर्जा नाही, बोलायला लागले की लोक निघून जातात”\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/tag/bachelor-of-pharmacy/", "date_download": "2022-10-07T21:53:26Z", "digest": "sha1:NZTPV5TZBDE3SB2QL2LXAI5KXFZTRXGD", "length": 7625, "nlines": 61, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "Bachelor of Pharmacy - Bharti jahirat", "raw_content": "\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nNCL India Recruitment 2022 | नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 481 जागांची भरती\nNCL India Recruitment 2022 | नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण 481 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत...\nHAL Recruitment 2022 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 633 जागांसाठी भरती\nHAL Recruitment 2022 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 633 जागांसाठी भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 10...\nMPSC Recruitment | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 588 जागांसाठी भरती\nMPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 (MPSC Technical Services) अंतर्गत विविध पदांच्या एकूण 588 रिक्त पदांच्या भरतीसाठी...\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/289952", "date_download": "2022-10-07T22:44:35Z", "digest": "sha1:FCFMFM73ZS7UCYLD4USUAZN57PYFMY5D", "length": 2367, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १८३८ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १८३८ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १८३८ मधील जन्म (संपादन)\n२३:४४, २८ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती\n५१ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n११:२१, २४ मे २००८ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n२३:४४, २८ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://nmk.org.in/current-affairs-20-january-2021/", "date_download": "2022-10-07T21:47:29Z", "digest": "sha1:Z5TKVVDOFG3PG3UALEW6MR7CURYCYQQW", "length": 3709, "nlines": 56, "source_domain": "nmk.org.in", "title": "[Current Affairs] चालू घडामोडी 20 जानेवारी 2021 - NMK.ORG.IN", "raw_content": "\n[Current Affairs] चालू घडामोडी 20 जानेवारी 2021\nमराठा आरक्षनावरची पुढची सुनावणी 5 फेब्रुवारीपासून होणार – सर्वोच्च न्यायालय.\nराज्यातली लसीकरणाची मोहीम समाधानकारक आहे – आरोग्यमंत्री राजेश टोपे.\nकोव्हीशिल्ड लसीची दीड लाख डोसची पहिली खेप भूतानच्या ठिणफुसाठी रावाना.\nकेंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.\nअर्थव्यवस्थेला पुन्हा बळकटी: राष्ट्रीयीकृत बँकांना PCGCS 2.0 द्वारे अधिक लवचिकता.\nसंसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे पार पाडाव – लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला.\nWhatsapp ने गोपनीयता धोरणात अलीकडेच केलेले बदल मागे घ्यायला केंद्र सरकारन सांगितल आहे.\nभारत आणि फ्रान्सच्या हवाईदलाचा जोधपुर हवाईतळावर डेझर्ट नाईट – 21 हा द्विपक्षीय हवाई सराव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-57170551", "date_download": "2022-10-07T23:27:34Z", "digest": "sha1:K43XCJTS3HKWAN57ZGO5DFVRIRPQBEQB", "length": 31616, "nlines": 167, "source_domain": "www.bbc.com", "title": "इस्रायलनं अपहरण झालेल्या विमानातील 102 नागरिकांना 58 मिनिटांमध्ये कसं सोडवलं? - BBC News मराठी", "raw_content": "\nइस्रायलनं अपहरण झालेल्या विमानातील 102 नागरिकांना 58 मिनिटांमध्ये कसं सोडवलं\n27 जून 1976 रोजी तेल अविवमधून पॅरिसला जाणारं एअर फ्रान्सचं विमान फ्लाईट 139 अथेन्सला थोड्य़ा काळासाठी थांबलं. पुढच्या प्रवासासाठी या विमानानं उड्डाण करताच 4 प्रवासी अचानक जागेवरुन उठले. त्यांच्या हातामध्ये पिस्तुलं आणि ग्रेनेड होते.\nविमानावर नियंत्रण मिळवताच त्यांनी पायलटला लिबियातल्या बेन्गाझी शहराकडे जाण्याचा आदेश दिला. या चार अपहरण करणाऱ्यांमध्ये दोन पॅलेस्टिनी नागरिक आणि दोन जर्मन नागरिक होते.\nत्या चौघांमधील एक महिला ब्रिजेत कुलमानने हँड ग्रेनेडची पिन काढली आणि कोणीही प्रतिकार केल्यास सगळं विमान उडवून देईन अशी धमकी दिल्याचं विमानातले एक प्रवासी जियान हारतुव सांगतात.\nबेन्गाझीमध्ये सात तास थांबल्यावर आणि इंधन भरल्यावर अपहरण करणाऱ्यांनी युगांडाच्या एंटेबे विमानतळाकडे विमान नेण्याची सूचना पायलटला दिली.\nइ. मोझेस: 80 वर्षांपूर्वी मुंबईकरांना साथीच्या रोगातून वाचवणारे ज्यू महापौर\nएका मुसलमान राज्याचा मराठी ज्यू पंतप्रधान होतो तेव्हा...\nदिल्लीमध्ये मराठी पताका फडकवत ठेवणारे बेने इस्रायली समुदायाचे इझिकेल मळेकर\nत्यावेळेस युगांडाची सत्ता हुकुमशहा इदी अमिन यांच्याकडे होती. त्यांचा अपहरण करणाऱ्यांना पूर्ण पाठिंबा होता. अपहरण करणाऱ्या लोकांना एंटेबे विमानतळावर त्यांचे 4 सहकारी येऊन मिळाले.\nत्यांनी ज्यू प्रवाशांना वेगळं केलं आणि जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये कारागृहात असणाऱ्या 54 पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करण्याची मागण केली. त्यांची मागणी मान्य न केल्यास एकेक प्रवाशाला मारायला सुरू करू अशी धमकीही दिली.\nएंटेबे इस्रायलपासून सुमारे 4000 किमी दूर आहे. त्यामुळे प्रवाशांन वाचवण्यासाठी मोहीम आखण्याचा विचारही केला जाऊ शकत नव्हता. प्रवाशांच्या संबंधित लोकांनी तेल अविवमध्ये निदर्शनं सुरू केली होती.\nओलीस ठेवलेल्या लोकांमध्ये काही लोक इस्रायलचे पंतप्रधान राबिन यांच्या जवळचे होते. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना सोडवलं जावं असा त्यांच्यावर मोठा दबाव होता. त्यांनी या प्रवाशांना सोडवण्यासाठी एक धाडसी मोहीम आखली त्याला 'ऑपरेशन थंडरबोल्ट' असं म्हटलं जातं.\n'ज्यू प्रवाशांना वेगळं केलं'\nअपहृत प्रवाशांमधील सारा डेव्हिडसन सांगतात की अपहरण करणाऱ्यांनी सर्व प्रवाशांची दोन भागात विभागणी केली. \"त्यांनी लोकांची नावं घेतली आणि त्यांना दुसऱ्या खोलीत जाण्यास सांगितलं. थोड्यावेळानं ते फक्त ज्यू लोकांची नावं घेत असल्याचं लक्षात आलं.\"\nज्यू नसलेल्या 47 प्रवाशांना सोडून देण्यात आलं. त्यांना एका खास विमानाने पॅरिसला नेण्यात आलं. तिथं मोसादच्या हेरांनी त्यांच्याशी बोलून एंटेबेची सखोल माहिती जाणून घेतली.\nमोसादच्या एका एजंटनी केनियामध्ये एक विमान भाड्यानं घेतलं आणि एंटेबेवर जाऊन त्या विमानतळाची भरपूर छायाचित्रं घेतली. विशेष म्हणजे एंटेबे विमानतळाच्या ज्या टर्मिनलवर प्रवाशांना ओलीस ठेवलं होतं ते टर्मिनल इस्रायली कंपनीने बांधलं होतं.\nत्या कंपनीकडून टर्मिनलचा नकाशा मिळवण्यात आला आणि कमांडोना हल्ल्याच्या अभ्यासासाठी तसंच एक मॉडेल तयार करण्यात आलं.\nमोहिमेत सर्वोत्तम सैनिकांचा समावेश\nअपहरण झालेल्या लोकांची सुटका झाल्यानंतर व्यक्त करण्यात आलेला आनंद\nया मोहिमेसाठी इस्रायली सैन्यातील 200 सर्वोत्तम सैनिकांना निवडण्यात आलं. कमांडो मिशनमध्ये अनेक अडथळ्यांची शक्यता होती. एंटेबे विमानतळाचे दिवे रात्री बंद केले तर किंवा धावपट्टीवर इदी अमिनच्या सैनिकांनी ट्रक उभे करून ठेवले तर किंवा धावपट्टीवर इदी अमिनच्या सैनिकांनी ट्रक उभे करून ठेवले तर अशा अनेक संभाव्य अडथळ्यांची शक्यता होती.\nअपहरण करणाऱ्यांबरोबर आपण चर्चेला तयार आहोत असा इस्रायली सरकारने संकेत दिला आणि कमांडो मोहिमेच्या तयारीला थोडा वेळ मिळवला. इदी अमिनचे मित्र समजले जाणारे माजी सैन्याधिकारी बार लेव यांना बोलणी करण्यासाठी नेमण्यात आलं.\nत्यांनी इदी अमिन यांच्याशी फोनवर अनेकदा बोलणी केली. मात्र प्रवाशांना सोडवण्यात यश आलं नाही. त्यातच इदी अमिन अफ्रिकेतील देशांच्या एका बैठकीत जाण्यासाठी मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईसला गेले. त्यामुळे इस्रायलला आणखी वेळ मिळाला.\nत्यावेळेस जनरल अशोक मेहता भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. ते अमेरिकेतील पोर्ट लॅवनवर्थच्या कमांड अँड जनरल स्टाफ कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेत होते.\nहवेतच विमानात भरलं इंधन\nजनरल अशोक मेहता म्हणतात, 4000 किमी जाऊन पुन्हा 4000 किमी परत येणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. त्यामुळे हवेतच दुसऱ्या विमानातून या विमानात इंधन भरण्यात आलं.\nब्रिगेडियर जनरल डॅम शॉमरॉन यांच्याकडे पूर्ण मोहिमेची जबाबदारी देण्यात आली आणि लेफ्टनंट कर्नल योनाथन नेत्यानाहू यांना फिल्ड ऑपरेशनची सूत्र देण्यात आली.\nइस्रायलकडे तीन पर्याय होते. पहिला म्हणजे हल्ल्यासाठी विमानांची मदत घेणे, दुसरा म्हणजे बोटींद्वारे तिथं पोहोचणं आणि तिसरा म्हणजे केनियातून रस्ता मार्गे युगांडामध्ये जाणं.\nशेवटी एंटेबेमध्ये पोहोचण्यासाठी विमानाचा वापर करण्याचं ठरलं आणि इदी अमिन परदेशातून परतत आहेत असा आभास युगांडाच्या सैनिकांसमोर करायचं ठरलं.\n4 जुलै रोजी इस्रायलच्या सिनाई तळावरुन चार हर्क्युलस विमानं हवेत झेपावली. इजिप्त, सुदान आणि सौदी अरेबियाच्या रडारवर येऊ नये म्हणून त्यांनी फक्त 30 मीटर उंचीवरुन उडत त्यांनी तांबडा समुद्र पार केला. वाटेत इस्रायली कमांडोंनी युगांड्या सैनिकांचा पोशाख घातला.\nफक्त सहा मिनिटांचा वेळ\nविमानांनी उड्डाण केल्यानंतरच पंतप्रधान राबिन यांनी या मोहिमेची माहिती मंत्रिमंडळाला दिली. सलग सात तास प्रवास केल्यावर रात्री एक वाजण्याच्या सुमारास पहिलं हर्क्युलस विमान एंटेबेच्यावर पोहोचलं.\nत्यांच्याकडे विमान उतरवून अपहरणकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी सहा मिनिटांचा वेळ होता. त्यावेळेस धावपट्टीवरील दिवे सुरू होते. कमीत कमी वेळ वाया जावा म्हणून विमान उतरण्याच्या आठ मिनिटे आधीच हर्क्युलसचे रँप उघडण्यात आले.\nविमान उतरताच पायलटने विमान धावपट्टीवर मध्यभागी थांबवलं आणि पॅराट्रुपरच्या एका तुकडीला उतरवलं. त्या तुकडीला नंतर येणाऱ्या विमानांसाठी इमर्जन्सी दिवे लावता येणार होते.\nविमानातून एक काळी मर्सिडिज कार उतरवण्यात आली. ही कार राष्ट्रपती अमिन यांच्या कारशी मिळतीजुळती होती. तिच्यामागे कमांडो भरलेल्या दोन लँड रोव्हर गाड्या उतरवण्यात आल्या. ही वाहनं वेगाने टर्मिनलच्या दिशेने जाऊ लागली. टर्मिनलपर्यंत गेल्याशिवाय गोळ्या चालवायच्या नाहीत अशा सूचना कमांडोंना देण्यात आल्या होत्या.\nविमानातून एक काळी मर्सिडिज कार उतरवण्यात आली. ही कार राष्ट्रपती अमिन यांच्या कारशी मिळतीजुळती होती.\nइदी अमिन ओलीस ठेवलेल्या प्रवाशांना भेटायला आले आहेत असा युगांडाच्या सैनिकांचा समज होईल असं इस्रायली सैनिकांना वाटत होतं. पण इदी अमिन यांनी काहीच दिवसांपूर्वी पांढरी गाडी वापरायला सुरुवात केली होती हे इस्रायली सैनिकांना माहिती नव्हतं.\nत्यामुळेच टर्मिनल बाहेर उभ्या असलेल्या युगांडाच्या सैनिकांनी रायफल्स सरसावल्या. तत्क्षणीच इस्रायली कमांडोंनी सायलेन्सर लावलेल्या बंदुकांनी त्यांना उडवलं.\nगोळ्या झाडताच कमांडरने सर्वांना वाहनांमधून उतरून चालतच जिथं प्रवासी ठेवलेत त्या टर्मिनलवर हल्ला करण्यास सांगितलं. कमांडोंनी बुल हॉर्नचा वापर करून प्रवाशांना आम्ही इस्रायली सैनिक आहोत आणि आपल्याला वाचवायला आलो आहोत असं हिब्रू आणि इंग्रजीत सांगितलं. त्यांनी प्रवाशांना जमिनीवर पडून राहाण्स सांगितलं आणि हिब्रूमध्ये अपहरण करणारे लोक कोठे आहेत असं त्यांना विचारलं.\nजिथं मोहीम झाली त्या एंटेबे विमानतळाचा नकाशा\nप्रवाशांनी मुख्य हॉलमध्ये उघडणाऱ्या दरवाजाकडे इशारा केला. कमांडो हँड ग्रेनेड फेकत त्या हॉलमध्ये घुसले. इस्रायली कमांडोना पाहताच अपहरण करणाऱ्यांनीही गोळ्या झाडायला सुरुवात केली. त्यात इस्रायलचा केवळ एक सैनिक मारला गेला.\nया गोळीबारात अपहरण करणारे सर्व मेले. तीन प्रवाशांचाही मृत्यू झाला.\nयाच काळात इस्रायलची आणखी दोन विमानं उतरली, त्यातही सैनिक होते. चौथं विमान प्रवाशांना नेण्यासाठी होतं. ते पूर्ण रिकामंच एंटेबेमध्ये आणलं होतं.\nएटंबेत उतरताच वीस मिनिटांमध्ये प्रवाशांना लँड रोव्हरमधून विमानात पोहोचवण्यात आलं. त्यावेळी युगांडाच्या सैनिकांनी गोळीबार सुरू करून पूर्ण विमानतळाचे दिवे घालवले.\nमोहिमेत प्राण गमावणाऱ्या योनाथन नेत्यानाहू या आपल्या भावाला श्रद्धांजली अर्पण करणारे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू\nया मोहिमेत इस्रायलचा केवळ एक सैनिक मारला गेला. ते म्हणजे लेफ्टनंट कर्नल नेत्यानाहू.\nसैनिकांनी जखमी नेत्यानाहू यांना विमानात आणलं. एंटेबेवर उतरल्यानंतर 58 व्या मिनिटाला प्रवाशांना घेऊन ही विमानं परतण्यासाठी हवेत झेपावली. त्यापूर्वी त्यांनी एंटेबेवर असलेली 11 मिग जहाजं नष्ट केली जेणेकरुन ती त्यांचा पाठलाग करणार नाहीत.\nप्रवासात असतानाच नेत्यानाहू यांनी प्राण सोडले. या मोहिमेत 7 अपहरणकर्ते आणि युगांडाचे 20 सैनिक मारले गेले. एक प्रवासी डोरा ब्लॉक यांना परत आणता आलं नाही कारण त्यांना कंपालाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.\nया मोहिमेनंतर डोरा ब्लॉक यांना इदी अमिन यांच्या आदेशानुसार दोन सैनिकांनी पलंगावरुन खाली ओढून ठार मारल्याची माहिती युगांडाच्या अॅटर्नी जनरलनी मानवाधिकार आयोगाला दिली.\nइतिहासातली सर्वात धाडशी मोहीम\n4 जुलै रोजी सकाळी अपहरणातून सोडवलेले 102 प्रवासी आणि इस्रायली कमांडो नैरोबीमार्गे तेल अविवला पोहोचले. यासर्व मोहिमेला इस्रायलच्या इतिहासातली सर्वात धाडशी मोहीम मानलं गेलं.\nकमांडो दलाचे सदस्य लेफ्टनंट कर्नल मोर सांगतात, \"जेव्हा आम्ही बेन गुरियान विमानतळावर उतरलो तेव्हा इस्रायली लोकांचा समूह एखाद्या समुद्रासारखा आमच्या सन्मानासाठी उपस्थित होता. दस्तुरखुद्द पंतप्रधान राबिन आणि त्यांचं मंत्रिमंडळ स्वागतासाठी आलं होतं.\"\nजनरल अशोक मेहता सांगतात, जेव्हा पंतप्रधान राबिन यांनी विरोधी पक्षनेते मेनाखिम बेगिन यांना शुभेच्छा आणि आनंदाची बातमी देण्यासाठी बोलावलं.\nसुटका झालेल्या लोकांबरोबर आनंद व्यक्त करताना विरोधी पक्षाचे नेते बेगिन मेनाखिम\nतेव्हा बेगिन म्हणाले, \"मी दारू पित नाही म्हणून मी चहा पिऊन हा आनंद साजरा करणार. राबिन यांनी त्यांना सिंगल माल्ट दारू दिली आणि रंगीत चहा समजून प्या असं सांगितलं. त्यावर बेगिन म्हणाले, मी आज काहीही पिऊ शकतो. इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दिवस होता. यासारखं वेडं धाडस करणारी मोहीम आधी कधीच सफल झाली नाही आणि पुढे क्वचितच असं होईल.\"\nम्युनिक ऑलिम्पिकमधली 'ती' रक्तरंजित रात्र जेव्हा 11 इस्रायली खेळाडूंची हत्या झाली होती...\nमोसादने लाखो ज्यूंची हत्या घडवून आणणाऱ्या आइकमनला कसं पकडलं\nप्रेमाच्या जाळ्यात ओढणारी इस्राईलची महिला गुप्तहेर\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\nधनुष्यबाण आणि शिवसेना कुणाची उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस\nनोबेल शांतता पुरस्कार अॅलेस बियालत्स्की यांना जाहीर\n त्याचा तुमच्या-आमच्या ऑनलाईन खरेदीवर काय परिणाम होणार\nउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाबद्दलचे शब्द जाहीरपणे मागे घ्यावेत- फडणवीस\nदसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे का बोलले नाहीत\nएकनाथ शिंदेंनी वि. उद्धव ठाकरे- दसरा मेळाव्यात कुणी कुणावर केली मात\nउद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणातल्या 3 हुकलेल्या संधी आणि 1 चूक\n'स्वतःही खुराड्यात राहिलात आणि आम्हालाही कोंडून ठेवलं' - शहाजी बापू पाटील\nपंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा राजकीय अर्थ काय\nलहान मुलांना कफ सिरप देणं किती सुरक्षित\nठाकरेंना धनुष्यबाणावर दाव्यासाठी उद्यापर्यंतची मुदत | तीन गोष्टी पॉडकास्ट\nगावाकडची गोष्ट : बोगस सातबारा उतारा ओळखण्याचे 3 सोपे उपाय...\nश्रीलंकेतल्या आर्थिक संकटाला सेंद्रिय शेती कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय, कारण...\nशेवटचा अपडेट: 23 मे 2022\nमहागाईच्या काळात या 7 मार्गांनी तुम्ही खाण्यापिण्यावरचा खर्च कमी करू शकता\nशेवटचा अपडेट: 3 ऑगस्ट 2022\nजेवणातून चपाती-भात पूर्णपणे बंद केले तर काय फायदे होतात या पदार्थांना पर्याय काय\nएअर फ्रायर की मायक्रोवेव्ह ओव्हन, कोणत्या उपकरणातील स्वयंपाक आरोग्यदायी\nशेवटचा अपडेट: 31 जुलै 2022\nऔरंगजेब पाहताक्षणीच दासीच्या प्रेमात पडला, पण ही प्रेम कहाणी अधुरीच राहिली...\nकोंबड्यांमुळे सापडलं 20 हजार लोकांसाठी वसवलेलं जमिनीखालचं प्राचीन शहर\nदसऱ्याला 'सोनं' म्हणून आपट्याची पानं का लुटतात या झाडाचं महत्त्व काय\nधनुष्यबाण आणि शिवसेना कुणाची उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस\nहिंदू-मुसलमान जिथं अनेक वर्ष एकत्र राहिले त्या शहरात असं झालंच कसं\nआर्थिक मंदी काय असते, ती कधी येते, त्यावर उपाय काय\nशेवटचा अपडेट: 5 ऑगस्ट 2022\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.learningwithsmartness.com/2021/04/blog-post_99.html", "date_download": "2022-10-07T22:13:52Z", "digest": "sha1:6H43TWECFMRJEZ5UAUVXDN62MMPA2MAB", "length": 13218, "nlines": 240, "source_domain": "www.learningwithsmartness.com", "title": "Learning With Smartness", "raw_content": "\nशिष्यवृत्ती परीक्षा 5वी भाषा\nशिष्यवृत्ती परीक्षा 5वी बुध्दिमत्ता\nशिष्यवृत्ती परीक्षा 5वी गणित\nशिष्यवृत्ती परीक्षा 5वी इंग्रजी\n2020-21 ची शाळासिद्धी माहिती 26 एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण करणेबाबत\nविषय :- शाळासिध्दी कार्यक्रमांतर्गत शाळांचे सन २०२०-२१ स्वयंमूल्यमापन पूर्ण करणेबाबत\nसंदर्भ :- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.शैगुवि/२०१६/(१२/२०१६) एस.डी.६,\n२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.शैगुवि/२०१६/(१८९/२०१६) एस.डी.६,\n३.या कार्यालयाचे पत्र जाक्र/मराशैसंप्रप/शाळासिद्धी/२०१९-२०/४७८४ दि.०६/१२/२०१९\n४.निपा,नवी दिल्ली (शाळासिद्धी कक्ष ) यांचा दि.१५/०३/२०२१ रोजीचा ई मेल\nउपरोक्त संदर्भिय पत्र क्र. १ व २ नुसार राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणिकरण करून घेणे व शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे महत्त्वाचेअसून शैक्षणिक,भौतिक तसेच संस्थात्मक गुणवत्ता वाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शाळासिध्दी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यानुसार राज्यातील १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन निपा,नवी दिल्ली यांच्या शाळासिद्धी वेबपोर्टलवर करणे आवश्यक आहे.संदर्भिय शासन निर्णयानुसार दरवर्षी राज्यातील १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन करावयाचे आहे. संदर्भ क्रं ३ अन्वये आपण आपल्या जिल्हयातील शाळासिध्दी संपर्क अधिकारी (NodalOfficer) व तालुकास्तरीय शाळासिध्दी संपर्क अधिकारी यांची निवड केली आहे.संदर्भ क्र. ४ अन्वये शाळासिध्दी कार्यक्रमासाठी निपा, नवी दिल्ली यांच्याwww.shalasiddhi.niepa.ac.in या वेबपोर्टलवरील सन २०२०-२१ च्या शाळांच्या स्वयंमूल्यमापनाची\nटॅब सुरु झाली आहे. सर्व शाळांनी या आपल्या शाळेचे सन २०२०-२१ मधील स्वयंमूल्यमापन पूर्ण\nकरून त्याची माहिती दि.२६एप्रिल,२०२१ पर्यंत शाळासिद्धी वेबपोर्टलवर भरावयाची आहे. शाळासिध्दी\nकार्यक्रमाची संपूर्ण माहिती www.shalasiddhi.niepa.ac.in वेबपोर्टलवर आहे .वेबपोर्टलचा वापर कसा करावा यासाठी वेबपोर्टलवर माहिती ( USERMANUAL) देण्यात आली आहे .यासोबत मराठी\nमाध्यमाची शाळासिद्धी पुस्तिका देखील उपलब्ध आहे.तसेच दि.२५/०३/२०२१ रोजी झालेले\nशाळासिद्धी स्वयंमूल्यमापन वेबिनार https://youtu.be/B1XpcivTU0c या युट्यूबच्या लिंकवर उपलब्ध\nआहे. सर्व शाळांनी सन २०२०-२१ मधील स्वयंमूल्यमापन सदर वेबिनार मधील निपा, नवी दिल्ली यांनी\nदिलेल्या सूचनांनुसार पूर्ण करावे.\nसन २०२०-२१ चे शाळांचे स्वयंमूल्यमापन करतांना मुख्याध्यापकांनी शाळासिध्दीची\nस्वतंत्र संचिका करून त्यात USERNAME आणि PASSWORD स्वत:च्या ताब्यात ठेवावे.\nमुख्याध्यापकांची बदली झाल्यास कार्यभार हस्तांतरणाच्यावेळी सदर संचिका पुढील मुख्याध्यापकाकडे\nहस्तांतरीत करावी.सन २०२०-२१ चे स्वयंमूल्यमापनपूर्ण केलेल्या शाळांनी त्याची हार्ड कॉपी सदर\nसंचिकेत लावावी व असे दरवर्षी करावे.\nतरी सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/मनपा), शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी\nयांनी आपल्या अधीनस्त अधिका-यांमार्फत १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन पूर्ण करून घेण्याबाबत\nअशा प्रकारे 30/03/2021 रोजीचा वरील G.R.आहे.\nशाळासिद्धी माहिती भरण्यासाठी व लॉगिन करण्यासाठीं खालील लिंकवर स्पर्श करा\nमागील सर्व सर्व G.R.साठी व माहितीसाठी\nखालील लिंकवर स्पर्श करा\nएकून सात क्षेत्र व 46 गाभामानके आहेत.46 गाभामानकांसाठी\nस्तर 1 असल्यास 1 गुण\nस्तर 2 असल्यास 2 गुण\nस्तर 3 असल्यास 3 गुण\nस्वयंमूल्यमापण झालेल्या प्रत्येक शाळेला कमित कमी 46 व जास्तीत जास्त 138 गुण मिळतात.\n50 % ते 80 % बी ग्रेड\n50 % पेक्षा कमी सी ग्रेड\nआपल्या शाळेचा ग्रेड असा काढा\nशाळासिध्दी ए ग्रेड शाळांना 138 पैकी मिळालेले गुण दर्शविले आहे. या गुणाला / पाॅईंटला 1.38 ने भाग दिल्यास टक्केवारी समजते.\nशाळा बंद विद्यार्थी हजेरी कशी भरावी\nक्षेत्र क्रमांक. ३ विद्यार्थ्यांची प्रगती, संपादणूक आणि विकास हे क्षेत्र कसे भरावे\nविद्यार्थी उपस्थिती १००% भरावी\nMDM Back Dated Information | शालेय पोषण आहार योजना बॅक डेटेड माहिती भरणे\nSanklit Mulyamapan | संकलित मूल्यमापन | प्रथम सत्र प्रश्नपत्रिका\nMahatma Gandhi | महात्मा गांधी जयंती | सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | लहान गट|पहिली ते पाचवी\n5वी ते 10वी अभ्यास\nMDM Back Dated Information | शालेय पोषण आहार योजना बॅक डेटेड माहिती भरणे\nSanklit Mulyamapan | संकलित मूल्यमापन | प्रथम सत्र प्रश्नपत्रिका\nMahatma Gandhi | महात्मा गांधी जयंती | सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | लहान गट|पहिली ते पाचवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/health/1925/", "date_download": "2022-10-07T21:59:32Z", "digest": "sha1:PLR47NLT2YP7LM4TZTGVPCAYDSULAPMV", "length": 50467, "nlines": 322, "source_domain": "www.snopty.com", "title": "चिंता ता चिता चिता चिंता ता ता - Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nचिंता ता चिता चिता चिंता ता ता\nएके दिवशी सकाळी मी माझ्या गाडीतून मुंबईला निघालो होतो. गाडी सुरू केली तेवढ्यात माझा बालमित्र जगन्नाथ मला भेटला. मी त्याला नमस्कार केला आणि म्हंटले, ‘नमस्कार जगन्नाथा, ओळखलस का मला.’\n‘अरे मी तुला ओळखत नाही, असं होईल का. मी तुझ्याकडे आणि तुझ्या गाडीकडे पहातच बसलोय. तुझ्यासारखा सुखी माणूस तूच आहेस. शेजारी ड्रायव्हर आहे, तुला गाडी चालवायचंहि न्याट नाही. आम्हाला बघ, बारा वर्षे झाली तीच मोटरसायकल वापरतोय. एक दोन आठवड्यात तिला तिच्या डॉक्टरांच्याकडे न्यावेच लागते. कधी हे मोडले, कधी ते मोडले, कधी हे बिघडले, कधी ते बिघडले, चालूच आहे. घरच्यांनीही वैताग दिलेला आहे. बायकोचे आजारपण चालूच आहे. अगदी माझ्या गाडीसारखी तिची अवस्था झाली आहे. गाडीची दुरुस्ती आणि तिची दुरुस्ती सारखीच चालू आहे. गाडी पण सुख देईना आणि बायकोपण सुख देईना.’\n‘एवढं काय झाले वहिनींना\n‘काय झालय काय विचारता. कुठला आजार शिल्लक राहिला नाही, बीपीचा त्रास आहे. शुगरचा त्रास आहे. गुडघेदुखी आहे,चक्कर येत आहे.’\n‘जगन्नाथा, दीदी आता मोठी झाली असेल, ती सातआठ वर्षांची असताना पाहिले असेल मी तिला. त्यानंतर कधीच घरी आलो नाही रे तुझ्या. काय करते ती किती शिकली आहे ती’ ‘खूप शिकली आहे ती. हुशार आहे. ती तशी बीए झाली आहे. तिच्या हिमतीवरच कॉलेज पूर्ण केले तिने. परंतु काय उपयोग. चांगली नोकरी मिळत नाही. लग्न करावं तर नवरा मिळत नाही. खूप स्थळे बघितली. कधी आम्हाला पसंत नसते, तर कधी त्यांना पसंत नसते. काय करायचं. ओळखीचं एखादं स्थळ असलं तर सांग.’\n‘जरूर जरूर, माझ्या खूप ओळखी आहेत. पाहीन मी आणि छोकरा लहान आहे ना रे तुझा. तो काय करतो दिदीपेक्षा तीन वर्षांनी लहान असावा, असं वाटतंय.’\n‘बरोबर आहे. तीन वर्षांनी लहान आहे. बारावी झाला कसा तरी गेल्यावर्षी. पुढे शिकायचं नाही म्हणतोय. काय करायचं शिकून, दीदी एवढी शिकली, पण तिला तरी कुठे चांगली नोकरी मिळाली. त्यापेक्षा मी शेती करतो म्हणतोय. माझं आयुष्य शेती आणि मसरात गेलं, पोरांचं जाऊ नये, असं वाटलं होतं, परंतु कर्म माझं. पोरगं काही वेगळे करेल असं वाटत नाही.’\n‘त्याला अजून शिकव. वेळ गेलेली नाही. तुझं नाही ऐकलं तर मला सांग, मी समजावून सांगेन त्याला.’\n‘एक ना धड, भाराभर चिंध्या. एक अडचण सोडवली की दुसरी, दुसरी सोडवली की तिसरी. जाऊ दे. पण हे असंच चालायचं. कधीकधी वाटतं सगळं सोडून द्यावं आणि मसनवाट्यात जाऊन राहावं.’\nमी जगन्नाथकडे निरखून पाहिले, खरंच चेहरा पडलेला, केसं पिकलेली, दाढी थोडीशी वाढलेली, मिशा पिकलेल्या, हसण्याचा प्रयत्न करत करत त्याचे प्रॉब्लेम्स मला तो सांगत होता. मी जगन्नाथाला म्हटले, ‘एवढा का वैतागला आहेस, चल मुंबईला माझ्याबरोबर. गप्पा मारू. दोन दिवस राहू. माझी कामे आहेत, तुझी पण सोबत होईल.’\nजगन्नाथ म्हणाला, ‘एवढं कुठलं आमचं नशीब मुंबईला यायचं. पंधरा वर्षांपूर्वी वडिलांच्या बरोबर गेलो होतो. त्यांची काहीतरी कामं होती. काकांच्या चाळीतल्या घरी राहिलो होतो, पण परत मुंबईचं दर्शन नाही. आता तर शक्यच नाही. म्हशींना कोण सोडणार. सर्व कामे माझ्या बोकांडीवर आहेत.’\nत्याचा त्रागा पाहून मी म्हटले, ‘राहू दे. पण बुधवारी सकाळी तू माझ्याकडे ये. आपण गप्पा मारत बसू या. पण नक्की ये. मी तुझ्यासाठी वेळ काढून ठेवतो. सकाळी सात वाजता मी रनिंगला जात असतो. त्यावेळी पळणेही होईल, फिरणेही होईल, आणि गप्पाही होतील.’\nबुधवारी सकाळी सात वाजताच जगन्नाथ माझ्याकडे आला. मी रनिंगला बाहेर पडण्याच्या तयारीत होतो. जगन्नाथा, पळ माझ्याबरोबर, असे म्हणताच जास्त काही न बोलताच, आम्ही रनिंगला सुरुवात केली. दोन किलोमीटर रनिंग केल्यानंतर आम्ही एका नदीकिनारी थांबलो. नदीला सुंदर असा घाट होता. पाणी दुथडी भरून वाहत होते. पावसाळा नुकताच संपल्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूला हिरवळही पसरलेली होती. महादेवाचे मंदिर नदीकिनारी होते. मंदिराच्या पुढे मोठा पार होता. पाराच्या मधोमध पिंपळाचे एक मोठे झाड होते. पिंपळाच्या पानांची सळसळ ऐकू येत होती. वातावरण एकदम आल्हाददायक असे होते. मी जगन्नाथाला म्हटले, ‘जगन्नाथा, दमला असशील. आता जरा आपण बसुया. चल पारावर बसूया. किती छान निसर्गसौंदर्य आहे ते पहा. पलीकडच्या तीराला एक मंदिर दिसत आहे. मंदिराच्या पायऱ्या किती छान आहेत. मंदिराच्या दोन्ही बाजूला हिरवळ कशी पसरली आहे. जगन्नाथा, हे जग किती सुंदर आहे, पण ते पाहण्यासाठी आपणाला सुंदर डोळे हवे आहेत. अर्थ कळाला का तुला सुंदर डोळे म्हणजे अगदी चिकणे डोळे दिसायला पाहिजेत असं नव्हे, परंतु प्रत्येक वस्तू, व्यक्ती आणि घटना पाहताना त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून, सुंदरतेच्या दृष्टिकोनातून पाहता यायला हवे. अशाप्रकारचे सुंदर डोळे हवे आहेत. काय वाटतं तुला सुंदर डोळे म्हणजे अगदी चिकणे डोळे दिसायला पाहिजेत असं नव्हे, परंतु प्रत्येक वस्तू, व्यक्ती आणि घटना पाहताना त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून, सुंदरतेच्या दृष्टिकोनातून पाहता यायला हवे. अशाप्रकारचे सुंदर डोळे हवे आहेत. काय वाटतं तुला\n‘हो डॉक्टर, खरे म्हणणे आहे तुझं. काही लोक विनाकारण नावे ठेवत राहतात. नदीला पाणी नसलं तरी यांना वाईट वाटतं, नदीला पूर आला तरी यांना वाईट वाटतं. पाऊस नाही पडला तरी रडतात, पाऊस पडला तरी रडतात. त्यांचा स्वभावच रडका असतो.’\n‘आपण नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या धैर्याने करावयास पाहिजेत आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्या आपण आनंदाने स्वीकारायला पाहिजेत. पाऊस कधी कुठे किती पडेल हे आपण सांगू शकत नाही किंवा कधी कुठे किती पाडावा हे आपल्या हातात नाही. म्हणून तो केव्हा पडेल तेव्हा आनंद मानणे आपल्या हातात आहे आणि तेच आपल्या हिताचे आहे. जगन्नाथ, पाऊसाचे तर आहेच, पण प्रत्येक ऋतूबद्दल माझे हेच म्हणणे आहे. थंडी पडली म्हणून काही लोक विव्हळत बसतात. त्यांना त्रास होत असतो. माझे मन मी सेट करून घेतले आहे. कोणताही ऋतू असू दे, आपण चांगला माणून घ्यायचे, तरच आपल्याला त्रास होणार नाही.’\n‘तसा विचार केला तर तू म्हणत आहेस ते बरोबरच आहे, परंतु यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे माझे एक एकरातले सोयाबीनचे पीक वाया गेले. जास्त पावसामुळे ते ओंबळले. सोयाबीनची पाने पिवळी पडली. सोयाबीनच्या शेंगा सडून गेल्या. काही ठिकाणी सोयाबीन पुन्हा उगवले. सगळी दाणादाण झाली. वाटले होते या वर्षी सोयाबीनचे पीक चांगले आलेले आहे, एकरात 12 पोती होतील आणि माझा कर्जाचा डोंगर थोडासा कमी होईल. परंतु झालं उलटच. सर्वच्या सर्व पीक वाया गेले आणि काढणीचा खर्च झाला तो वेगळाच. एवढं सगळं करुन कसं तरी एक पोतं घरी आलं.’\n‘ जगन्नाथा, खरोखरच तुझे खूप नुकसान झाले आहे, पण आपण विचार करूया. हे मोठे संकट टाळण्यासाठी आपण काय करू शकलो असतो. पाऊस थांबवू शकलो असतो का आपल्या शेतावरील पाऊस आपण ढकलून दुसऱ्याच्या शेतावर घालवू शकलो असतो का आपल्या शेतावरील पाऊस आपण ढकलून दुसऱ्याच्या शेतावर घालवू शकलो असतो का पावसाळा संपल्यानंतर आपण सोयाबीन पेरू शकलो असतो का पावसाळा संपल्यानंतर आपण सोयाबीन पेरू शकलो असतो का हे तीन प्रश्न तुझ्या मनाला विचार. उत्तर नाही असेच मिळेल. म्हणून म्हणतोय, कि ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्या आनंदाने स्वीकारावयाच्या. अरे, शेती म्हटले तर ती निसर्गावर अवलंबून आहे. कधी फायदा कधी तोटा हे ठरलेलेच आहे. बऱ्याच वेळा आपण खूप खूप विचार करून निर्णय घेत असतो, परंतु निसर्ग त्याची वाट लावत असतो. काय करणार हे तीन प्रश्न तुझ्या मनाला विचार. उत्तर नाही असेच मिळेल. म्हणून म्हणतोय, कि ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्या आनंदाने स्वीकारावयाच्या. अरे, शेती म्हटले तर ती निसर्गावर अवलंबून आहे. कधी फायदा कधी तोटा हे ठरलेलेच आहे. बऱ्याच वेळा आपण खूप खूप विचार करून निर्णय घेत असतो, परंतु निसर्ग त्याची वाट लावत असतो. काय करणार निसर्गापुढे कोणाचाच काही विलाज नाही. तुला माहित आहे का जगन्नाथा, माझ्या अमरावतीच्या मित्राची काय गंमत झाली ते. त्याने शेतामध्ये औषधी वनस्पती शतावरी लावली होती. शतावरीला पाणी कमी लागते. त्याच्या भागात तसा पाऊस कमी पडत असतो. परंतु यावर्षी धो-धो पाऊस पडला आणि दहा एकराच्या शतावरीची अक्षरशा वाट लागली. कुजून गेली, कुजून. सांग काय करायचे त्याने निसर्गापुढे कोणाचाच काही विलाज नाही. तुला माहित आहे का जगन्नाथा, माझ्या अमरावतीच्या मित्राची काय गंमत झाली ते. त्याने शेतामध्ये औषधी वनस्पती शतावरी लावली होती. शतावरीला पाणी कमी लागते. त्याच्या भागात तसा पाऊस कमी पडत असतो. परंतु यावर्षी धो-धो पाऊस पडला आणि दहा एकराच्या शतावरीची अक्षरशा वाट लागली. कुजून गेली, कुजून. सांग काय करायचे त्याने 22 लाख कर्ज घेऊन त्याने हे धाडस केले होते. तुझे तर एक एकरातील सोयाबीन होते. माझ्या घराच्या पाठीमागे तीन एकरामध्ये असणारा ऊस गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या वादळ आणि पावसामुळे पूर्ण झोपला आहे.’\n‘ अरे मी माझ्या बायकोच्या आजारपणासाठी 50 हजार रुपये कर्ज काढले होते. ते मी या सोयाबीनमधून फेडणार होतो. बायकोची तब्येत अजून बरी नाहीच. आमच्या गावात बऱ्याच डॉक्टरांना तिची तब्येत दाखवली पण कोणाचा गुण येत नव्हता. शेवटी एका डॉक्टरांनी तिला जवळच्या शहरातील एका नामांकित डॉक्टरना दाखवण्यास सांगितले. त्यांनी अनेक प्रकारच्या तपासण्या केल्या. रक्त तपासणी, लघवीची तपासणी केली. एक्स-रे काढला. MRI केले. तरीही निदान पक्के झाले नाही. बीपीचा आणि मधुमेहाचा त्रास कमी झाला आहे परंतु, तिची चक्कर येण्याची काही थांबत नाही. मी तर वैतागलो आहे, तिच्या या दुखण्याला.’\n‘आशा वहिनींना काय काय त्रास होत आहे फक्त चक्कर येते का दुसरा काही त्रास आहे फक्त चक्कर येते का दुसरा काही त्रास आहे रक्ताचे प्रमाण किती आहे रक्ताचे प्रमाण किती आहे कानाचा काही त्रास आहे का कानाचा काही त्रास आहे का उलट्या होतात का पित्ताचा त्रास आहे का टेन्शन आहे का चक्करसारखा आजार शक्यतो जास्त दिवस राहत नाही, परंतु काही काही पेशंटमध्ये चक्कर जास्त दिवसही राहते. जर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर तू थोडा दम धर. औषधे चालू ठेव. हा आजार बरा व्हावयाला काही अवधी लागतो. त्या आजाराला लागणारा अवधी त्याला द्यायलाच पाहिजे. काळ हे मोठे औषध आहे, हे लक्षात ठेव.’\n‘ अरे यार, तिचे दुखणे तर चालूच आहे, पण मलाही चार वर्षापासून मधुमेह झाला आहे. मी नियमित औषधे घेत आहे, परंतु भीती वाटते. मधुमेह भयानक आजार आहे. कधी काय होईल सांगता येत नाही.’\n‘नियमित औषधोपचार, नियमित तपासण्या, नियमित पथ्य आणि नियमित व्यायाम ही चतु:सूत्री जर अमलात आणलीस तर हा आजार तुला काहीच करणार नाही. काहीच त्रास देणार नाही. मधुमेह होऊ नये पण झालाच आहे तर त्याला तुझा मित्र मान. त्याला काय पाहिजे, काय नको ते पहा, मग तो आजार हा आजार रहातच नाही, तो तुझा मित्र बनेल.’\n‘ खरे तर माझ्या आई-वडिलांना मधुमेह होता, त्यामुळे मला झाला. हा आजार अनुवंशिक आहे हे मला माहित आहे. मला काळजी वाटते की, माझ्यामुळे माझ्या मुलांना हा आजार होऊ नये. त्यांचे अजून लग्न व्हावयाचे आहे. दिदी एका खाजगी कंपनीत नोकरी करीत आहे. तिच्या लग्नाचा प्रश्न भेडसावत आहे. तिचे वय आता अठ्ठावीस वर्षे झालेले आहे. लग्नासाठी स्थळे येतात, पण कधी त्यांना पसंत असते तर कधी दिदीला पसंत नसते, त्यामुळे प्रॉब्लेम येत आहेत. चार वर्षे झाली आम्ही स्थळे पाहात आहोत, परंतु अजून कुठे जमलेले नाही. ओंकार तर बारावी झाल्यानंतर शेतीच करत आहे. त्याचेही वय पंचवीस वर्षे झालेले आहे. शेती म्हटले की, मुली लग्नाला तयार होत नाहीत. त्यांना सरकारी नोकरी करणारा मुलगाच पाहिजे असतो. दोघांची लग्ने कधी होणार कोणास ठाऊक.’\n‘जगन्नाथा, मधुमेह हा आजार अनुवंशिक आहे. तू म्हणतोस ते सत्यच आहे. परंतु तो तुझ्या मुलांना होईलच अशी खात्री नाही. जर त्यांनी व्यायाम आणि आहार याचे पथ्य पाळले तर शक्यतो होणार नाही आणि जर अनुवंशिकतेमुळे झालाच तर स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. तू कसे स्वीकारलेस, तसेच त्यालाही ते स्वीकारावे लागेल. अनुवंशिकता बदलणे आपल्या हातात आहे का मग त्याचा आनंदाने स्वीकार करावयाचा.’\n‘ दुसरा प्रश्न राहतो त्यांच्या लग्नाचा. अरे एऱ्यागबाळ्यांची लग्ने होतात. तुझी मुलगी दिसावयास छान आहे. तुझा मुलगा तर स्मार्ट आहे. गोरा आहे. उंच आहे. दिदी खाजगी कंपनीत असली तरी, काहीतरी करून दाखवण्याची तिच्या ठिकाणी जिद्द आहे. त्यामुळे घाबरू नकोस. लग्न होण्यासाठी आपण स्थळे पाहतच राहावयाचे, प्रयत्न करतच राहावयाचे. जेव्हा योगायोग असेल तेव्हा त्यांची लग्ने नक्कीच ठरतील. एखाद्यावेळेस त्याने त्याची जोडीदारीण शोधली पण असेल. तू उगाच चिंता करत बसू नकोस, फक्त प्रयत्न करत राहा.’\n‘डॉक्टर, माझ्याच मागे एवढी संकटे का लागली आहेत. माझे नातेवाईक, तुझ्यासारखे माझे मित्र किती सुखात आहेत. देवाने मला संकटाच्या खाईत ओढले आहे. एक संकट झाले की दुसरे, दुसरे झाले की, तिसरे. मी अगदी खचून गेलो आहे.’\n‘अरे मित्रा, संकटे कोणाला चुकली आहेत. तुला वाटते का माझ्यापुढे संकटे नसतील. रोज रोज नवीन नवीन संकटे येतात, परंतु मी शांत डोक्याने त्यावर उपाय करत असतो. नाही उपाय निघाला तर सोडून देत असतो. फार वर्षांपूर्वी मीही असाच संकटांना घाबरायचो, वैतागायचो. परंतु आता संकटे झेलून झेलून मन खंबीर झाले आहे. कितीही मोठे संकट आले तरी ते संकट वाटतच नाही, ते एक चॅलेंज वाटते, ती एक संधी वाटते.’\n‘मित्रा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संकटे येतच असतात, किंबहुना आयुष्य हे संकटांची एक मालिकाच आहे. संकटांना धीरगंभीरपणे सामोरे जायचे की, हातपाय गाळून रडतकुढत बसायचे, हे ज्याचे त्याने ठरवावयाचे असते.’\n‘मित्रा, त्या तिकडे नदीकिनारी पहा. कैलास स्मशानभूमीत कोणाचीतरी चिता जळत आहे. आगीचा डोंब उसळला आहे. स्मशानभूमीतून धूर निघत आहे. कोण असेल तो कोणास ठाऊक. पण त्याच्याबरोबर त्याची चिंताही जळत आहे. चिंता ही चितेपेक्षा भयानक असते. चिता ही एकदाच जाळते परंतु चिंता ही रोजरोज जाळत असते. चितेचे चटके बसत नाहीत, परंतु चिंतेचे मात्र जबरदस्त चटके बसत असतात. चिता ही शरीराला जाळते, तर चिंता ही मनाला जाळते, हे लक्षात ठेव.’\nकधीही चिंता निर्माण झाली तर जागरूकपणे त्याच्यावर विचार करावयाचा. हे संकट खरेच आहे का, नुसते आभासी आहे. बऱ्याचवेळा संकटे ही आभासी असतात. बऱ्याचवेळा भीती ही आभासी असते. जर संकट खरेच असले तर, मनाला त्याचा स्वीकार करायला लावायचा. स्वीकार केल्यामुळे अनेक संकटे हलकी होतात किंवा नाहीशी होतात. मनातल्या नकारामाला काढून सकारामाला दोस्त बनवलं पाहिजे. आपल्या आयुष्याचे इंजीनियरिंग आपणच करावयाला पाहिजे. आपले मानसिक ताणतणाव बऱ्याच वेळा आपणच निर्माण केलेले असतात. आपणच त्यावर योग्य तो मार्ग काढला पाहिजे. बऱ्याच वेळा काही समस्यांवर काळ हेच औषध असते. त्यामुळे जर समस्या सुटत नसेल तर, त्याकडे दुर्लक्ष करणे गरजेचे असते. कालांतराने त्यावर उपाय आपोआपच सुचत असतो किंवा निघत असतो. आपण समाधानी राहावयाला शिकले पाहिजे. देवाने आपल्याला जे काही दिलेलं आहे ते खूप काही छान दिलेलं आहे असं नेहमी मनाला सांगितलं पाहिजे. यापेक्षा जास्त मिळण्याच्या अपेक्षा करण्यात काहीच गैर नाही, परंतु जास्त मिळाले नाही तर नाराज होणे यामध्ये गैर आहे, हे लक्षात ठेव. समस्या आली तर चिंता करत बसण्यापेक्षा माझ्याकडे ये. आपण दोघे चर्चा करू. मी नसलो तर कोणत्याही हितचिंतक मित्राशी चर्चा कर किंवा गुरूंशी चर्चा कर. ते योग्य तो मार्ग सुचवतील.’\nडॉक्टर मित्रा,तू फारच अभ्यास केलेला दिसतोयस. हे ज्ञान कुठून मिळालं तुला\n‘ माझ्या गुरुंपासून, माझ्या वाचनातून, माझ्या युट्युब वरील व्हिडिओ पाहण्याच्या छंदातून आणि माझ्या सकारात्मक विचारातून मला हे ज्ञान मिळालेले आहे. मित्रा, मी अनेक वर्षे हा अभ्यास सातत्याने करीत आहे. नियमितपणे योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायाम मी करीत असतो. तसेच रोज मी ध्यान करीत असतो. ध्यानाच्या शेवटच्या अल्फा अवस्थेमध्ये मी माझे प्रॉब्लेम्स फक्त पहात राहत असतो. फक्त पहात राहण्यामुळे जे खरच प्रॉब्लेम्स नसतात ते विरून जातात आणि जे खरे प्रॉब्लेम्स असतात त्यावर मला उपाय आपोआप सुचत असतात. हे उपाय कोण सुचवत असेल असे तुला वाटते. निसर्गामध्ये जी प्रचंड शक्ती आहे तिच हे उपाय मला सुचवत असेल. कदाचित देव मला ही बुद्धी देत असतील. मला माहित नाही, परंतु अनेक संकटावर आणि अनेक समस्यांवर मला या ध्यानामध्ये उपाय सापडलेले आहेत. जगन्नाथा, तुही नियमित योगासने कर, सूर्यनमस्कार कर, प्राणायाम कर, ध्यान कर. तुलाही हे अनुभव येतील, हे मात्र निश्चित.’\n‘ मित्रा, खूप मोलाचा सल्ला मला दिला आहेस. माझ्या जीवनातील सर्व समस्या आणि सर्व संकटे सोडवण्याची गुरुकिल्ली तू मला दिली आहेस. खरेतर मैत्रीमध्ये उपकार मानावयाचे नसतात, परंतु तुझे उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत.’\nबस्, मी सांगितलेली गुरुकिल्ली रोज वापरत जा आणि सुख, समाधान, शांती, आनंद, आरोग्य टिकवून प्रगती करत रहा. हेच यशाचे रहस्य आहे आणि हेच जीवनाचे यश आहे, हे लक्षात ठेव. मित्रा, खूप वेळ झालेला आहे. आता आपण परत फिरू या.\n दिवसांपासून मीही चिंतेत होतो.तुमच्या सहवासात आलो , मार्गदर्शन मिळाले.मनापासून आभार सर लिहित रहा उद्बोधक लिहिता.खूप खूप सर लिहित रहा उद्बोधक लिहिता.खूप खूप \nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nचिंता ता चिता चिता चिंता ता ता\nतिसरी लाट रोखायची असेल तर……\nतुझ्या या निसर्ग मित्राला\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/riya-chakraborty-once-again-on-the-field-demanding-the-release-of-american-pop-star-britney-spears-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-07T22:25:56Z", "digest": "sha1:6ZVSNQNQN72MWWLJL4QI6LQBYELPER2W", "length": 11299, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा मैदानात! अमेरिकन पाॅप स्टार ब्रिटनी स्पीअर्सच्या स्वातंत्र्यची मागणी", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nरिया चक्रवर्ती पुन्हा एकदा मैदानात अमेरिकन पाॅप स्टार ब्रिटनी स्पीअर्सच्या स्वातंत्र्यची मागणी\nरिया चक्रवर्ती पुन्हा एकदा मैदानात अमेरिकन पाॅप स्टार ब्रिटनी स्पीअर्सच्या स्वातंत्र्यची मागणी\nनवी दिल्ली | सध्या सोशल मीडियावर ‘फ्री-ब्रिटनी’ हॅशटॅग मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी प्रसिद्ध अमेरिकन पाॅप स्टार ब्रिटनीची पोस्ट केली आहे तर काहींनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा हॅशटॅग लावून ब्रिटनीसाठी पाऊल उचललं आहे. अशातच प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील आता ब्रिटनीसाठी मैदानात उतरली आहे.\nब्रिटनी स्पीअर्स ही अमेरिकन पाॅप स्टार असून तिचं ‘बेबी वन मोर टाईम’ हे गाण सर्वात जास्त सुपर हिट झालं होतं. त्यानंतर ब्रिटनीने लोकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. मात्र ब्रिटनीचेे वडिल जेमी स्पीअर्स हेच ब्रिटनीच्या आयुष्याचे सर्व निर्णय घेतात. गेल्या काही वर्षांपासून ब्रिटनी नैराश्येमध्ये होती. या काळात वडील तिच्या संपत्तीची देखभाल करत होते. पण आता वडिलांचा हस्तक्षेप ब्रिटनीला नकोसा झाला आहे.\nब्रिटनीने याबाबत कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. माझे वडील घोटाळेखोर असून त्यांना तुरुंगात टाका, अशी विनंती देखील तिने कोर्टात केली आहे. बुधवारी लॉस एंजिल्स कोर्टात तिच्या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी ब्रिटनीने तिची व्यथा सांगितली. ब्रिटनी 445 कोटींची मालकीण आहे आणि तिचे वडील या पैशाचे आणि तिचे गार्डियन आहे. ब्रिटनीला आता यातून मुक्तता हवी आहे. अशास्थितीत सोशल मीडियावर ब्रिटनीच्या चाहत्यांनी ‘FreeBritney’ नावाची मोहिम सुरू केली आहे.\nदरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही सुद्धा ब्रिटनीच्या बाजुने मैदानात उतरली आहे. ब्रिटनीला तिचे स्वातंत्र्य द्या, अशी मागणी करत रियाने तिच्या इन्स्टा अकाऊंट स्टोरी शेअर केली आहे. ‘तिला स्वतंत्र करा,’ असे तिने यात म्हटले आहे. यामुळे रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यापुर्वी देखील बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ती चर्चेत आली होती. तसेच त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात ती पुन्हा चर्चेत आली होती.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\nपुणेकरांना दिलासा नाहीच; सोमवारपासून ‘हे’ निर्बंध लागू\n बहुप्रतिक्षीत ‘स्पुटनिक वी’ लस ‘या’ तारखेपासून मिळणार\n“शरद पवारांचं महत्व वाढवण्याची काय गरज, पवारांचा सल्ला मोदीही घेतात”\n“पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं वागणं मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा देणारं”\n‘झेपत नसेल तर राजीनामा द्या’; खासदार सुप्रिया सुळेंनी मुरलीधर मोहोळ यांना सुनावलं\nकोरोनाच्या घातक डेल्टा प्लस विषाणूने या जिल्ह्यात पहिला बळी; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती\n“केंद्र सरकार आपल्या कर्तव्यात चुकल्यामुळेच ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलं”\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/tag/bachelor-of-computer-science/", "date_download": "2022-10-07T22:11:25Z", "digest": "sha1:VDAUXSJUOBMRRNELMUF655MVHNFXOSP7", "length": 9353, "nlines": 68, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "Bachelor of Computer Science - Bharti jahirat", "raw_content": "\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nSBI Specialist Officer Recruitment 2022 SBI मध्ये स्पेशालीस्ट ऑफिसर च्या एकूण 714 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक...\nRCFL Recruitment 2022 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 33 जागांसाठी भरती\nRCFL Recruitment 2022 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 33 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून...\nCentral Electronics Limited Recruitment 2022 | सेन्ट्रल इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मध्ये 30 जागांसाठी भरती\nCentral Electronics Limited Recruitment 2022 | सेन्ट्रल इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 30 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाद्वारे अर्ज मागविण्यात येत...\nMSC Bank Recruitment | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांच्या 17 जागांची भरती\nThe Maharashtra State Co-operative Bank Ltd. | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांच्या 17 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत...\nCentral Bank of India | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 19 जागांसाठी भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये माहिती तंत्रज्ञान, वरिष्ठ व्यवस्थापक / Information Technology, Senior Manager पदाच्या एकूण 19 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने...\nNNSB Recruitment | नागपूर नागरी सहकारी बँक लिमिटेड | 29 जागा\nनागपूर नागरी सहकारी बँक लिमिटेड तर्फे विविध पदांच्या एकूण 29 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाद्वारे अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार...\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/upsc-civil-services-recruitment-2022-816-vacancies/", "date_download": "2022-10-07T22:16:35Z", "digest": "sha1:I2FZRQ5LEZKHW4XROUCZUK4MV7VFGKLT", "length": 7256, "nlines": 117, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 | 816 जागा - Bharti jahirat", "raw_content": "\nUPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 | 816 जागा\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nUPSC / केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आयोजित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 816 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 2 फेब्रुवारी 2022 ते 22 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 06 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकता\nपदाचे नाव शैक्षणिक पात्रता\nवयाची अट / Age Limit : 01 ऑगस्ट 2022 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपरीक्षा शुल्क / Exam Fee\nइतर मागासवर्गीय / OBC 100/-\nअनुसूचित जमाती / Schedule Tribe फी नाही\nअनुसूचित जाती / Schedule Caste फी नाही\nमहिला / Women फी नाही\nमहत्वाच्या तारखा / Important Dates\nअर्ज सुरु होण्याची तारीख /\nअर्ज करण्याची शेवटची तारीख /\n22 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 06 वाजेपर्यंत\nपूर्व परीक्षेची अपेक्षित तारीख /\nमुख्य परीक्षेची अपेक्षित तारीख /\nअधिकृत संकेतस्थळ बघा | Official Website\nऑनलाईन अर्ज करा | Apply Online\nहेल्पलाईन माहिती / Helpline Details :\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMPSC Group C Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC Subordinate Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022\nAir Force Agnipath Recruitment 2022 | भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022\nMPSC State Service Pre 2022 | महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 161 जागा\nMPSC Recruitment | पशुधन विकास अधिकारी पदाच्या 212 जागांसाठी भरती\nIndian Army Recruitment | भारतीय सेना भारती 90 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/urmila-matondkar-talk-on-economy-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-07T21:31:21Z", "digest": "sha1:2WUCHP3OK5BHYRXM6GIHBGSWZ7QXVXEP", "length": 10398, "nlines": 112, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "फाटलेली जीन्स युवा सांभाळतील पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?- उर्मिला मातोंडकर", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nफाटलेली जीन्स युवा सांभाळतील पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय\nफाटलेली जीन्स युवा सांभाळतील पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय\nमुंबई | आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का हे कसले संस्कार आहेत, असं वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर केलं होतं. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी नेत्यांना लक्ष्य केलं आहे.\nफाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार युवा नक्की सांभाळतील. पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय करणार, असा खोचक सवाल करत उर्मिला मातोंडकर यांनी निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. त्यासोबतच शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही तीरथ सिंग रावत यांच्यावर निशाणा साधला होता.\nदेशातील संस्कृती आणि संस्कारावर त्या पुरुषांना फरक पडतो, जो महिलांना आणि त्यांच्या कपड्यांना जज करतात. विचार बदला मुख्यमंत्री रावतजी, असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं होतं.\nदरम्यान, एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना जवळच घेऊन बसलेली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं तुम्ही कुठे जात आहात यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. मी पुढे चौकशी केली तर त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल, असं तीरथ सिंह रावत म्हणाले होते.\nमान्यवर… फटी हुई #jeans को तो देश का होनहार युवा संभाल लेगा.. लेकिन फटी हुई #economy का क्या..🤔🤫🤭#RippedJeansTwitter #rippedjeans\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n ट्रकमध्ये हेल्मेट नाही घातलं म्हणुन चालकाला तब्बल एवढा दंड\n“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अतिशय प्रामाणिक आणि नम्र व्यक्ती”\n ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nश्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश\n‘मंत्रालयाची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कसची पाटी लावा”\n ट्रकमध्ये हेल्मेट नाही घातलं म्हणुन चालकाला तब्बल एवढा दंड\n…अन् प्रवाशांनी खचाखच भरलेली रेल्वे जेव्हा उलटी धावायला लागते, पाहा व्हिडिओ\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1139130", "date_download": "2022-10-07T23:33:45Z", "digest": "sha1:MKRLX2FBUFC7DGUHE3LQCS2GLZFX4G7K", "length": 4320, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. ७९३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इ.स. ७९३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:३१, ११ मार्च २०१३ ची आवृत्ती\n१,२९५ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n→‎समाप्ती: आंतरविकी दुवे काढले, विकिडेटावरून थेट दुवे असतील\n०४:२७, ३० जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:793, rue:793)\n०६:३१, ११ मार्च २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या (चर्चा | योगदान)\nछो (→‎समाप्ती: आंतरविकी दुवे काढले, विकिडेटावरून थेट दुवे असतील)\n[[वर्ग:इ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे]]\n[[वर्ग:इ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे]]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00049815-RM3216B-102-302-NWWP10.html", "date_download": "2022-10-07T22:18:19Z", "digest": "sha1:EFSM4AFBVYUAPXMSDWFRLSAFCAMVSXSZ", "length": 14641, "nlines": 300, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "RM3216B-102/302-NWWP10 | Susumu | अॅरे/नेटवर्क प्रतिरोधक | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर RM3216B-102/302-NWWP10 Susumu खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये RM3216B-102/302-NWWP10 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. RM3216B-102/302-NWWP10 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-4-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95-55/", "date_download": "2022-10-07T21:56:09Z", "digest": "sha1:U3UBOPTEIFMXA4ZKYZKVMAISLRO4PTTK", "length": 11852, "nlines": 88, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "महिन्यात फक्त 4 वेळा खा 'हे' कडधान्य, वयाच्या 70 व्या वर्षी देखील घ्याल सळसळत्या जवानीचा आनंद... - Themaharashtrian", "raw_content": "\nमहिन्यात फक्त 4 वेळा खा ‘हे’ कडधान्य, वयाच्या 70 व्या वर्षी देखील घ्याल सळसळत्या जवानीचा आनंद…\nमहिन्यात फक्त 4 वेळा खा ‘हे’ कडधान्य, वयाच्या 70 व्या वर्षी देखील घ्याल सळसळत्या जवानीचा आनंद…\nभारतीय आहार पद्धती ही जगामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिले जाते. भारतीय आहार पद्धती मध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे भरलेले असतात, असे म्हणतात. स्वयंपाक करताना माणसाने हे प्रसन्न राहिले पाहिजे. त्यानंतरच आपला स्वयंपाक हा अतिशय दर्जेदार होत असतो.\nनाहीतर उदासीन राहून आपण स्वयंपाक केला तर आपल्या स्वयंपाकामध्ये त्याचे गुण उतरत असतात आणि स्वयंपाक बेचव होत असतो. त्यामुळे स्वयंपाक करणाऱ्यांनी नेहमी प्रसन्न राहिले पाहिजे, असे सांगण्यात येते. भारतीय आहार पद्धतीमध्ये भाजी, वरण, भात पोळी असा सकस आहार दिला जातो. यामध्ये चटणी, कोशिंबीर याचा देखील समावेश असतो.\nत्यात तांदूळ खाणे हे अतिशय चांगले मानले जाते. जेवणापूर्वी आपण तूप, भात, खात असतो त्यानंतर मुख्य जेवणाकडे सुरुवात करत असतो. भात खाल्ल्याने पचन क्रिया ही खूप चांगल्या प्रकारे सुधारत असते. मात्र, भात हा पांढरा तांदळाचा खाल्ल्यापासून विविध आजार निर्माण होऊ शकतात.\nत्यामुळे आपण ब्राऊन तांदूळ खाऊ शकता. तसेच काळा तांदूळ देखील खाऊ शकता. काळा तांदूळ सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात मिळत आहे. काळा तांदूळ खाऊन आपण 70 वर्षापर्यंत तरुण दिसू शकतात. त्यामुळे आम्ही आपल्याला आज या लेखामध्ये काळा तांदूळ खाण्याचे फायदे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत फायदे…\n1. एंटीऑक्सीडेंट तत्व : काळा तांदूळ मध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट तत्व असतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती ही मोठ्या प्रमाणात वाढत असते आणि आपण विविध आजारांचा सामना हा करू शकता. तसेच यामुळे आपल्याला इतर आ’जार देखील होत नाहीत. त्यामुळे आपण काळा तांदूळ खाल्ला पाहिजे. महिन्यातील चार दिवस तरी आपण काळा तांदूळ नियमित खावा आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो.\n2. डोळ्याचा प्रकाश: जर आपल्याला डोळ्याच्या प्रकाशा बद्दल काही अडचण असेल तर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याला औषध लिहून देतात आणि आपल्या डोळ्यासमोर सबंधित एक्सरे देखील काढतात. त्यामुळे आपण डोळे सुदृढ ठेवण्यासाठी काळा तांदूळ हा नियमितपणे खाल्ला पाहिजे. यामुळे आपले डोळेही चांगले राहतात.\n3.रोगांपासून दूर : जर आपण नियमितपणे आजारी पडत असेल तर आपण आपल्या जेवणामध्ये काळा तांदूळच समावेश करावा. काळा तांदुळाचा भात आपण नेहमी खावा. जर असे जमत नसेल तर आपण महिन्यातून चार वेळेस हा भात खावा आपण किमान 70 वर्षांपर्यंत तरुण रहाल.\n4. कमजोरी: वाढत्या वयानुसार अनेकांना कमजोरी समस्या निर्माण होते. अशा लोकांनी नियमित काळा तांदुळाचे सेवन करावे. यामुळे आपली शारीरिक कमजोरी ही दूर होते. तसेच लैंगिक समस्या देखील दूर होऊन आपण आपल्या पत्नीला संतुष्ट करू शकता. त्यामुळे काळा तांदुळाची नियमितपणे सेवन करावे.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00046644-RM064PJ512CS.html", "date_download": "2022-10-07T22:10:48Z", "digest": "sha1:DZWXHOFAVCVGSJSLQMBKBT6775QLFXDG", "length": 14537, "nlines": 300, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "RM064PJ512CS | Samsung Electro-Mechanics | अॅरे/नेटवर्क प्रतिरोधक | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर RM064PJ512CS Samsung Electro-Mechanics खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये RM064PJ512CS चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. RM064PJ512CS साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.insidemarathibooks.in/index.php/2020/05/05/not-without-my-daughter-book-review-in-marathi/", "date_download": "2022-10-07T22:52:53Z", "digest": "sha1:DBIWFG4XRV7YX5GSMI63MFPOVMOAQ62G", "length": 14730, "nlines": 187, "source_domain": "www.insidemarathibooks.in", "title": "नॉट विदाउट माय डॉटर - Not Without My Daughter - Book Review In Marathi", "raw_content": "\n|| माझिया मराठीची बोलू किती कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके ||\nनॉट विदाउट माय डॉटर\nलेखक – बेटी मेहमूदी\nमूल्यांकन – ४.८ | ५\nतब्बल ३२ वर्ष जुनी असली तरीही आज सुद्धा एखाद्याला जगण्याची नवी उमेद देणारी अशी ही गोष्ट आहे. १९९७ साली पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आणि साधारण २००४-०५ साली आमच्या घरी हे पुस्तक मी पाहिलं. अर्थात ५-६वीत असल्याने असं कोणतंतरी पुस्तक वाचायची तेवढी आवड निर्माण नव्हती झाली. पण ते पुस्तक काही माझ्या डोक्यातून जाईना आणि ९वीत असताना प्रथम मी ते पुस्तक सुट्टीत वाचायला घेतलं. हे माझं पहिलाच मोठा पुस्तक असेल आणि कदाचित पहिलाच जे वाचून ‘सून्न होणे’ ह्या वाक्प्रचाराचा खरा अर्थ मला सापडला.\nलेखिकेने स्वतःचा अनुभव लिहला असल्याने कथेची तीव्रता किंवा दाहकता अगदी स्पष्ट जाणवते. हे पुस्तक वाचून जेव्हा आपण त्या खऱ्या बेट्टी चा फोटो बघतो तेव्हा आपोआप डोळ्यात पाणी आल्याशिवाय नाही राहत. ह्यात कुठेही खोटं, मनोरंजनासाठी रंगवलेले प्रसंग असा काहीही नाही. तिचा अमेरिका ते तेहरान ते पुन्हा अमेरिका हा प्रवास ह्यात मांडला आहे. आणि तो प्रवास होता फक्त का आयुष्याला कलाटणी देणारं एक वाईट स्वप्नं हे पुस्तक वाचूनच माणूस सांगू शकतो.\nअमेरिका, आणि इराण ह्यांचे राजकिय संबंध आज हि तणावपूर्ण आहेत तर आपण कल्पना करू सह्कतो ३० वर्षांपूर्वी ते कसे असतील अशा काळात एक अमेरिकन नागरिकत्व असलेली स्त्री, एकदा घटस्फोट होऊन एका इराणी माणसाची पुन्हा लग्न करून, एक ७-८ वर्षांची मुलगी पदरात घेऊन फक्त तिच्या नवऱ्यावर विश्वास ठेऊन तेहरान येते आणि तिचा नवीन आयुष्य सुरु होतं. साहजिकच हे वाचून कोणालाही किती धोका पत्करून ती इथपर्यंत अली असेल ह्याची कल्पना येईल. पण २ आठवड्यांच्या बोलीवर ती मूडी ह्या तिच्या नवऱ्यासाठी हे धाडस करते आणि आयुष्यभराची चूक करून बसते.\nप्रश्न फक्त अमेरिका आणि इराणचा नसून चालीरीती, विचारसरणी, स्वातंत्र्य ह्यांचा तफावतीचा आहे हे तिला लवकरच लक्षात येत. पण हे सगळं कळत असताना तिचे अमेरिकेला जायचे सगळे मार्ग कसे बंद होतायेत हे ती डोळ्यादेखत बघत असते. कितीही सोसावं लागला तरी हिम्मत हरायची नाही, हे ती पक्क करते आणि तिचा असाधारण लढा सुरु होतो. नवऱ्याची आता काहीही मदत होणे शक्य नाही असे तिला पहिला काही महिन्यातच ध्यानात येते आणि वेगवेगळी माणसं ती जोडायला सुरु करते आणि मग तिचा अमेरिका चा प्रवास सुरु होतो.\n४-५ ओळींमध्ये ह्या सगळ्याचे वर्णन करणे अगदीच शक्य नाही आणि म्हणूनच पुस्तक वाचणंच योग्य ठरेल. आपण किती लहान सहान प्रश्नांचा बाऊ करतो हे मला बेट्टीचा संघर्श बघून जाणवलं. आपल्या घरात आपल्या देशात सुखी असणं कशाला म्हणतात ह्याची जाणीव ह्या पुस्तकाने होते. समोर कितिही अशक्य परिस्थिती असली तरी आत्मविश्वास आणि चिकाटी आपल्याला त्यावर मात करायला शिकवते हेच ह्या पुस्तकाचे सार आहे. आणि म्हणूनच एखाद्याचा आयुष्य पणाला लागून सुद्धा माणूस त्यातून कसा बाहेर पडतो हे बघायचे असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.\nऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:\nकिंडल आवृत्ती विकत घ्या\nद पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड\n‘इस दुनिया में सबसे बडा योध्दा मां होती है’ या वाक्यासोबत आपण सगळेच परिचित आहोत. ह्याच वाक्याला न्याय देणारी व वाचकांना खिळवून ठेवणारी घटना ह्या पुस्तकातून मांडण्याचा हा प्रयत्न.\nस्वतंत्र विचारसरणीला प्राधान्य देणारया प्रगतशील अशा अमेरिका देशातून जेव्हा लेखिकेला केवळ नवरयच्या आग्रहाखातर इराणला यावे लागते तेव्हाच तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. इराणला आल्यावर तेथील लोकांची विचारसरणी, स्त्रीयांना मिळणारी दुय्यम वागणूक, तरीही ‘पती हाच परमेश्वर’ असे मानणारया स्त्रिया, तेथील अस्वछता, ढिसाळ कारभार ह्यामुळे बेट्टी व मुलगी मोहताबच्या मनात स्वगृही परतण्याची इच्छा अजुनच तीव्र होते.\nपरंतू नवरयच्या वागणूकीवरुन त्याचा इराणलाच कायम राहण्याच्या डाव जेव्हा बेट्टी समोर उघडकीस येतो तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकते. आणी मग बंड केलेल्या बेट्टीला दडपण्यासाठी सुरु होते नजरकैद.\nह्याच नजरकैदेतून बेट्टी व मोहताब ह्यांची सुटका होते की नाही, हे समजून घेण्यासाठी शेवटी पुस्तकच वाचावे\nआईची मुलीच्या स्वातंत्र्यासाठीची तळमळ, प्राणप्रिय मुलीपासुन होणारी ताटातूट, स्वगृही परतण्याची इच्छा, स्वातंत्र्याची किंमत, 18 महिन्याच्या ह्या नजरकैदेतून सुटण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा हा थरार नक्कीच वाचकांना खिळवून ठेवतो.\nएका आईच्या लढावू वृत्तीला ह्या पुस्तकातर्फे एक सलाम असेल असेच आपण म्हणू शकतो \nमराठी पुस्तकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा\nछत्रपती संभाजी – एक चिकित्सा\nसोशल नेटवर्कवर आमच्याशी कनेक्टेड राहा.\nवेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/pune/finance-minister-nirmala-sitaraman-in-baramati-got-angry-in-press-conference-mhsd-764270.html", "date_download": "2022-10-07T22:24:22Z", "digest": "sha1:XWOS76C4TYEKHSXKX75WGZPBV34ZSSHR", "length": 8427, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निर्मला सीतारामन पवारांच्या बालेकिल्ल्यात, 'मिशन बारामती'साठी आलेल्या अर्थमंत्री पहिल्याच दिवशी भडकल्या – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nनिर्मला सीतारामन पवारांच्या बालेकिल्ल्यात, 'मिशन बारामती'साठी आलेल्या अर्थमंत्री पहिल्याच दिवशी भडकल्या\nनिर्मला सीतारामन पवारांच्या बालेकिल्ल्यात, 'मिशन बारामती'साठी आलेल्या अर्थमंत्री पहिल्याच दिवशी भडकल्या\nनिर्मला सीतारामन शरद पवारांच्या बारामतीमध्ये\nभाजपने 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात आहेत.\nदसरा मेळाव्यानंतर 24 तासात वेगवान घडामोडी, दोन बडे नेते अमित शाहंच्या भेटीला\nDasara Melava : दसरा मेळावा कुणाचा ऐकणार\nलेडी कंडक्टरसाठी रोहित पवार मैदानात, म्हणाले...\nएकनाथ शिंदेंचा शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला धक्का, ठाण्यातला 'मोठा मासा' गळाला\nबारामती, 22 सप्टेंबर : भाजपने 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात आहेत. देशभरात मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजप जिकडे दुसऱ्या क्रमांकावर होती, त्या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यावर देण्यात आली आहे. निर्मला सीतारामन यांच्याकडे सुप्रिया सुळे खासदार असलेल्या बारामती मतदारसंघाची जबाबदारी आहे. बारामती मतदारसंघाच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी निर्मला सीतारामन या पत्रकार परिषदेत संवाद साधत होत्या, पण या पत्रकार परिषदेत वारंवार लोकसभा निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात येत असल्यामुळे सीतारामन भडकल्या. मी पक्ष संघटन मजबूत करायला आले आहे. सतत लोकसभा निवडणुकींवर प्रश्न विचारू नका, असं निर्मला सीतारामन पत्रकारांना म्हणाल्या. 'मी भाजपची संघटना मजबूत करायला आली आहे. कुठल्या परिवाराबद्दल बोलायला आली नाही. भारतात सगळ्या लोकसभा मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. इडी ही स्वायत्त संस्था आहे, त्यांच्या कामकाजात आम्ही दखल देत नाही. इडीची कामाची पद्धत वेगळी आहे,' असं वक्तव्य निर्मला सीतारामन यांनी केलं. 'महागाई वाढली हे मान्य नाही, याबाबत मी सभागृहात उत्तर दिलं आहे. सगळ्या जगात काय सुरू आहे ते पाहा. अमेरिकेत 40 वर्षात नव्हती तेवढी महागाई आहे. जर्मनीत 30 टक्के महागाई आहे. आपल्याकडे फक्त 2 टक्क्यांपर्यंत महागाई वाढली आहे, ती नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करतोय,' असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.economictimes.com/business-news/four-rules-change-using-debit-and-credit-cards-by-rbi/articleshow/94303801.cms", "date_download": "2022-10-07T21:23:11Z", "digest": "sha1:BNNE6E3B6SBHQCSCF7IQ25DNNXTJ2FL2", "length": 5741, "nlines": 34, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरण्याशी संबंधित 4 नियम लवकरच बदलणार, जाणून घ्या तुमच्यावर काय होईल परिणाम - four rules change using debit and credit cards by rbi | Economic Times Marathi\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nडेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरण्याशी संबंधित 4 नियम लवकरच बदलणार, जाणून घ्या तुमच्यावर काय होईल परिणाम\n1st October: पुढील महिन्यात 1 ऑक्टोबरपासून क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरण्याचे नियम बदलणार आहेत.\n1st October: पुढील महिन्यात 1 ऑक्टोबरपासून क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरण्याचे नियम बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (RBI) कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम बदलेल. नवीन नियमांमुळे क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल. आता जेव्हा ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन, पॉइंट ऑफ सेल (POS) किंवा अॅपद्वारे व्यवहार कराल तेव्हा सर्व तपशील एनक्रिप्टेड कोडमध्ये जतन केले जातील.\n1. OTP द्वारे परवानगीची गरज\nनवीन नियमानुसार एखाद्या ग्राहकाने कंपनीचे क्रेडिट कार्ड घेतल्यापासून 30 दिवसांच्या आत ते सक्रिय केले नाही तर कंपनीला ग्राहकाकडून सक्रिय करण्यासाठी वन-टाइम-पासवर्ड (OTP) द्वारे परवानगी मिळू शकेल. ग्राहकाने संमती न दिल्यास, त्यांना त्याचे/तिचे क्रेडिट कार्ड खाते बंद करावे लागेल.\n2. बॅंका परवानगीशिवाय क्रेडिट मर्यादा वाढवू शकत नाहीत\nदुसरा नियम असा आहे की ग्राहकाच्या मान्यतेशिवाय क्रेडिट मर्यादा वाढवू शकणार नाही.\n3. को-ब्रँडेड कार्डांना दिलासा नाही\nआरबीआयने त्या नियमांची अंमलबजावणी करताना कोणत्याही फिनटेक कंपन्यांना दिलासा देण्यात आलेला नाही.\nशिवाय काही नियम को-ब्रँडेड कार्डांसाठी आहे. ज्यात (Slice), यूनि (Uni), वनकार्ड (OneCard), लेजीपे (Fi), पेयूज (PayU’s), जुपिटर (Jupiter) इ येतात.\n4. को-ब्रँड्सना माहिती दिली जाणार नाही\nनवीन नियमांनुसार, कार्डद्वारे केलेल्या व्यवहारांशी संबंधित माहिती को-ब्रँडिंग पार्टनरला देता येणार नाही. या तरतुदींचा को-ब्रँडेड कार्ड विभागात काम करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवसाय मॉडेलवर परिणाम होऊ शकतो कारण ते या व्यवहारांवर आधारित विविध ऑफर्ससह ग्राहकांना आकर्षित करतात.\nNational Tourism Policy : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारकडून नवीन पर्यटन धोरणाला चालना मिळण्याची शक्यतामहत्तवाचा लेख", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2018/05/blog-post_1.html", "date_download": "2022-10-07T22:19:25Z", "digest": "sha1:Z7S3ZWHDQZU6XMGYC47GPEKHDVZWMYC5", "length": 21666, "nlines": 210, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "जगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी : प्रेषितवाणी (हदीस) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nजगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी : प्रेषितवाणी (हदीस)\nमाननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘आपल्या जनसमुदायाच्या बाबतीत ज्या गोष्टीपासून सर्वाधिक मला भय आहे ती म्हणजे माझा जनसमुदाय आपल्या इच्छांचे म्हणणे ऐकू लागेल आणि भौतिक जग प्राप्त करण्यासाठी लांबलचक दिवास्वप्ने पाहू लागेल तेव्हा त्याच्या स्वअभिलाषेचे म्हणणे ऐकण्याच्या परिणामस्वरूप तो सत्यापासून दूर होईल आणि भौतिक जग प्राप्त करण्याच्या आकांक्षा परलोकापासून गाफील करतील. (लोकहो या जगाने कूच केले आहे, ते जाऊ लागले आहे आणि परलोकाने कूच केले आहे, ते येऊ लागले आहे. त्यांच्यापैकी प्रत्येकाचे मानणारे आहेत जे त्याच्यावर प्रेम करतात. तुमच्यासाठी उत्तम आहे की तुम्ही जगाचे लोभी बनू नका, तुम्ही या वेळी अनुसरणाच्या घरात आहात आणि हिशोबाची वेळ अजून आलेली नाही आणि उद्या तुम्ही हिशोबाच्या घरात (परलोकात) असाल, तेथे अनुसरणाची कसलीही संधी मिळणार नाही.’’ (हदीस : मिश्कात)\nपैगंबर मुहम्मद (स.) एका मनुष्याला उपदेश करताना म्हणाले, ‘‘तुम्ही पाच गोष्टींची पाच गोष्टींपूर्वी कदर करा- आपल्या तारुण्याला वृद्धत्व येण्यापूर्वी, आपल्या आरोग्याला आजारापूर्वी, आपल्या खुशालीला आपल्या दारिद्र्यापूर्वी, आपल्या पुâरसतीला व्यस्ततेपूर्वी आणि आपल्या जीवनाला मृत्यूपूर्वी.’’ (हदीस : मिश्कात)\nस्पष्टीकरण : तारुण्यात खूप अनुसरण करा, कारण जख्ख वृद्धत्वाच्या स्थितीत इच्छा असूनदेखील काहीही करू शकणार नाही. आपल्या निरोगीपणाचा परलोकाच्या तयारीत वापर करा, कदाचित आजारी पडाल आणि काहीही करू शकणार नाही. जेव्हा अल्लाह खुशाली देईल तेव्हा त्यापासून आखिरतचे कार्य करा, कदाचित तुम्ही गरीब व्हाल. मग अल्लाहच्या मार्गात संपत्ती खर्च करण्याची संधी मिळणार नाही. या संपूर्ण जीवनाची कदर करा आणि ते अल्लाहच्या कार्यात व्यतीत करा अन्यथा मृत्यू येऊन अनुसरणाच्या सर्व संधी संपुष्टात येतील.\nमाननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) नमाजसाठी मस्जिदमध्ये आले तेव्हा त्यांनी पाहिले की काही लोक मोठमोठ्याने हसत होते. पैगंबर म्हणाले, ‘‘जर तुम्ही सुख नष्ट करणाऱ्या मृत्यूला अधिक आठवले असते तर त्याने तुम्हाला हसण्यापासून रोखले असते. मृत्यूची मोठ्या प्रमाणात आठवण करा, तो सुख नष्ट करणरा आहे आणि कबर दरदिवशी म्हणते की मी वाटसरूंचे घर आहे, मी एकांताची कोठडी आहे, मातीचे घर आहे आणि जेव्हा एखादा मोमिन भक्त कबरीत दफन केला जातो तेव्हा कबर त्याचे स्वागत करते. म्हणते की तू माझ्या पाठीवर चालणाऱ्यांपैकी मला सर्वाधिक प्रिय होतास. आज तुला माझ्या ताब्यात देण्यात आले आहे. पाहा मी तुझ्याशी किती चांगला व्यवहार करते ते.’’ पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘त्या मोमिन भक्तासाठी ती कबर त्याची दृष्टी जेथवर पोहोचेल इतकी ती विशाल बनते. त्याच्यासाठी स्वर्गाच्या दिशेने एक दरवाजा उघडला जातो. जेव्हा एखादा दुराचारी अथावा एकेश्वरत्व नाकारणारा दास दफन केला जातो तेव्हा कबर त्याचे स्वागत करीत नाही. ती म्हणते की तू माझ्याकरिता माझ्या पाठीवर चालणारांपैकी सर्वाधिक अप्रिय मनुष्य होतास. आता तुला माझ्या हवाली करण्यात आले आहे आणि तू माझ्याजवळ आला आहेस. पाहा, मी तुझ्याशी किती वाईट व्यवहार करते ते.’’ पैगंबर म्हणतात, ‘‘मग कबर त्याच्यासाठी आकुंचित पावते आणि इतकी अरुंद होईल की त्याच्या फासळ्या एकमेकांत अडकतील.’’ असे म्हणत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एका हाताची बोटे दुसऱ्या हाताच्या बोटांमध्ये अडकविली. त्यानंतर म्हणाले, ‘‘त्याच्यावर ७० अजस्र साप सोडण्यात येतील. त्यांच्यापैकी प्रत्येक साप इतका विषारी असेल की जमिनीवर त्याने फुंकर मारली तर त्याच्या विषाच्या परिणामामुळे त्या जमिनीवर कधीही काहीही उगवू शकणार नाही. मग हे सर्व अजस्र साप त्याच्या दंश करतील आणि चावा घेतील. असेच अंतिम निवाड्याचा दिवस येईपर्यंत त्याच्याशी होत राहील. तो अल्लाहच्या दरबारात हिशोब देण्यासाठी उभा केला जाईल.’’ मग पैगंबर म्हणाले, ‘‘कबर मनुष्याकरिता स्वर्गाच्या बागांपैकी एक बाग बनते अथवा नरकाच्या खड्ड्यांपैकी एक खड्डा.’’ (हदीस : तिर्मिजी)\nस्पष्टीकरण : जेव्हा एखादा मनुष्य आपल्या क्षमतेनुसार जगातील दुष्टव्यांचा सामना करीत पारलौकीक जीवनाची तयारी करता करता मरण पावतो. दरम्यानच्या जीवनात ज्याला कबर म्हटले जाते, त्याच्याशी अल्लाह कृपा करतो आणि तो आनंदित होतो. जो मनुष्य जीवनभर वाईट कर्म करीत राहतो आणि पश्चात्ताप व्यक्त न करता मरण पावतो तेव्हा त्याच्याशी काहीसा तसाच व्यवहार केला जाईल जसा न्यायालयात हजर होण्यापूर्वी कारावासात होत असतो. हदीसच्या शेवटच्या भागाचा अर्थ आहे की मनुष्याने हवे तर आपल्या वर्तणुकीद्वारे कबरीतील जीवनाला आरामदायक व सुखमय जीवन बनवावे अथवा मग दुराचाराच्या स्थितीत हे जीवन व्यतीत करावे आणि मग कबरीतील शिक्षेला सामोरे जावे.\n२५ मे ते ३१ मे २०१८\nसाहित्य संमेलनासारख्या उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्य...\nआपण जितके मानवतावादी तितकेच आपले प्रबोधन सत्यनिष्ठ...\nकुरआनचे पठण : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n१८ मे ते २४ मे २०१८\nडील करण्याची खरी वेळ\nजगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी (भाग ३) : प्रेषित...\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nजगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी (भाग २) : प्रेषित...\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\nबलात्काऱ्यांना फाशी देऊन उपयोग नाही व्यवस्था बदलाव...\nउस्मान शेख यांना पोलीस महासंचालकांचे मानचिन्ह\nकाँग्रेस एक मुस्लिम पक्ष आहे का\n११ मे ते १७ मे २०१८\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०४ मे ते १० मे २०१८\nहे तर अपेक्षितच होतं\nमोदींनी आता बोलकं व्हाव - डॉ. मनमोहन सिंग\nखिर्द ने कह भी दिया तो क्या हासिल\n‘आरोपी बचाव’ भाजपची नवी घोषणा\nराजर्षी शाहू, कर्मवीरांचे विचार प्रभावीपणे पुढे यावेत\nदेशातील प्रसारमाध्यमे ही लोकशाहीची खरी शक्ती - डॉ....\nजगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/tag/master-of-pharmacy-jobs/", "date_download": "2022-10-07T22:28:22Z", "digest": "sha1:MUHXCCDKYGY2UTPHCI7HYJZBCHARNI7L", "length": 7015, "nlines": 59, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "Master of Pharmacy Jobs - Bharti jahirat", "raw_content": "\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nCSIR-Central Drug Research Institute Recruitment 2022 केंद्रीय औषध संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण 21 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक...\nNIPER Recruitment 2022 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि संशोधन संस्थेत 11 जागा\nNIPER Recruitment 2022 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण 11रिक्तपदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत...\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.statusinmarathi.com/100-best-motivational-inspirational-marathi-suvichar/", "date_download": "2022-10-07T21:49:02Z", "digest": "sha1:ZEVCLTDKUVK6BSSDZI7WVE5FCZ33OLYM", "length": 44097, "nlines": 481, "source_domain": "www.statusinmarathi.com", "title": "Inspirational Thoughts in Marathi for Students | Best Motivational Thoughts in Marathi for Students - Status in Marathi", "raw_content": "\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nBest Motivational Thoughts in Marathi for Students | विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये सर्वोत्कृष्ट प्रेरणादायक सुविचार\nInspirational Thoughts in Marathi for Students: प्रत्येक विद्यार्थ्याची आयुष्यात अशी इच्छा असते की तो यशस्वी झाला पाहिजे. या इच्छेपोटी सर्व विद्यार्थी मेहनत करतात. परंतु प्रत्येक विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी व्यक्ती बनू शकतो असे नाही.\nयश मिळवण्यासाठी, तो कोणीही असो, मग तो विद्यार्थी असो वा इतर, त्याला आयुष्यात यश मिळवण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते. महान व्यक्तींनी सांगितलेले विचार या प्रेरणेचा मोठा स्रोत आहेत. आणि म्हणूनच आम्ही आजच्या या लेखात तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Best Motivational Thoughts in Marathi for Students, Motivational thoughts in Marathi, Marathi suvichar for school students, Best motivational quotes in Marathi, Marathi positive thoughts, Great people thoughts in Marathi तसेच Motivational quotes in Marathi for success संघ्रहीत केलेले आहेत.\nहे Motivational status in Maraतुमच्या मित्रांसोबत फेसबुक आणि व्हाट्सअप वर शेअर नक्की करा.\n“आपल्या मनात गाठ बांधण्याची एक गोष्ट,\nया जगात अशक्य काहीही नाही.”\n“जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो,\nपरंतु जो स्वतःच्या मनातुन हार मानतो\nतो माणूस कधीही जिंकू शकत नाही \n“जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत\nतर त्या सवयी आपला वेळ बदलतात.”\n“ज्या व्यक्तीने कधीही चूक केली नाही\nत्याने कधीही नवीन काहीही करण्याचा\n“जीवनात तेच व्यक्ती अपयशी होतात जे\nविचार खूप करतात पण कृती करत नाही.”\n“कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा,\nजेव्हा आपण काहीतरी नवीन करून\nतेव्हाच आपण पुढे जाऊ शकता. ”\n” संघर्ष हे जीवनाचे आणखी एक नाव आहे.”\n“वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. “\n“यशाचा रस्ता प्रामाणिकपणाच्या मार्गावरुन जातो.”\n“स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा,\nगती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत”\nMotivational thoughts in Marathi | मराठी छोटे सुविचार विद्यार्थ्यांनसाठी\nआपण स्वत: ला फसवित आहात.”\n“स्वप्ने ते नसतात जे झोपेत पडतात,\nस्वप्ने अशी असतात जे आपल्याला\n“यशाचा कोणताही मंत्र नाही,\nतो फक्त परिश्रम करण्याचा\n“आपल्या पाठीमागे बोलनाऱ्याकडे लक्ष देऊ नका,\nयाचा अर्थ असा आहे की आपण\nत्यांच्यापेक्षा दोन पाऊल पुढे आहात”\n“नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा,\nआयुष्य आपल्याला दररोज एक नवीन संधी देते.”\n“विचार करण्यात आपला वेळ वाया घालवू नका,\nआत्ता आपले काम सुरू करा.”\nMarathi suvichar for school students | मराठी प्रेरणादायक सुविचार शालेय मुलांसाठी\nटॅलेंट काहीच कामाचे नाही.”\n“जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे\nआपण करू शकत नाही असे लोक म्हणतात\nते कार्य करणे होय.”\n“वेळेचा अपव्यय तुम्हाला विनाशाकडे नेतो.”\n“आपल्याला पडण्याची भीती असल्यास\nआपण कधीही उभे राहू शकणार नाही.”\n” कोणाचा विश्वास कधीही तोडू नका,\nकारण एकदा तो मोडला की,\nतो पुन्हा जोडला जाणार नाही.”\n“कधीकधी डोळे देखील फसवले जातात,\nम्हणून नेहमी आपले डोळे आणि कान खुले ठेवा.”\n“वेळ” राजाला रंक बनवू शकतो,\nतर रंकला राजा बनवू शकतो.”\n“जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल\nज्याने तुमचे आयुष्य बदलले असेल\nतर तुम्ही आरशात पाहा…\n” शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे ”\n” जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण. “\n“तुमचे विजय तुमच्या डोक्यावर जाऊ देऊ नका\nकिंवा तुमच्या अपयशा तुमच्या मनात येऊ नयेत.”\n” शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे\nआणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. “\n“आव्हाने हीच जीवन रुचीपूर्ण बनवतात.\nत्यांच्यावर मात करणे म्हणजेच\nजीवनाला अर्थपूर्ण बनवते. ”\n– जोशुआ जे. मरीन\nBest motivational quotes in Marathi | सर्वोत्तम मराठी प्रेरणादायक सुविचार\n“जग बदलायचे असेल तर\n“जर तुम्ही वेळेसोबत जात नाही आहात तर\n“भूतकळा पसून शिका, वर्तमानासाठी जगा,\nउद्याची आशा ठेवा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे\nस्वतःला प्रश्न करणे थांबु नका “\n“इतरांप्रमाणेच आपणही अद्वितीय आहात\nहे नेहमी लक्षात ठेवा.”\n“तुम्ही पाण्यात पडून बुडत नाही;\nतुम्ही तिथे राहून बुडतात. ”\n“शिक्षक केवळ यशाचा मार्ग दर्शवू शकतो,\nपरंतु आपल्याला त्या मार्गाचा अवलंब करावा लागेल.”\n“यश साजरा करणे चांगले आहे,\nपरंतु आपल्या अपयशापासून शिकणे महत्वाचे आहे”\n“परीक्षा जे पात्र आहे त्यांच्यासाठी आहे.”\nत्या गोष्टींवर काम करा ज्या वर तुम्हाला विश्वास आहे.\nजर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही\nतुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली (समर्पित) करत आहात”.\n– डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम\nmarathi suvichar one line for students | मराठी सुविचार विद्यार्थ्यांनसाठी एक ओळ\n“तुम्ही जसे विचार करता तशीच कृती करत असतात”\n“यश हे दिवस आणि दिवस\nवारंवार वारंवार पुनरावृत्ती होणार्‍या\nअनेक लहान प्रयत्नांची बेरीज आहे.”\n“कठोर परिश्रमाला पर्याय नाही.”\n“जर तुम्हाला सर्वोत्कृष्ट व्हायचं असेल\nतर तुम्हाला अशी कामे करावी लागतील\nजी इतर लोक करायला तयार नाहीत.”\n“कधीकधी दुसर्‍या संधी नसतात, वेळ नसते,\nपुढली वेळ नसते, तेव्हा फक्त आता किंवा कधीच नसते\n“जेव्हा आपण बोलता तेव्हा आपण\nआपल्या ओळखीच्याच गोष्टीची पुनरावृत्ती करत असता.\nआपण जेव्हा ऐकता तेव्हा आपण काहीतरी नवीन शिकू शकता.”\n“आनंद आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून असतो,\nआपल्याकडे काय आहे यावर नाही .”\nमराठी सकारात्मक सुविचार | Marathi positive thoughts\n“जर तुम्हाला यश मिळविण्यापासून\nकोणी रोखू शकत असेल\nतर ते तुम्ही स्वत: आहात.”\n“मुंग्या त्याच्या दुप्पट वजन उचलून\nआपण तर माणूस आहात.”\n“जर तुमच्यासाठी एखादी गोष्ट महत्वाची असल्यास,\nतुम्हाला मार्ग सापडेल. नसल्यास, आपल्याला निमित्त सापडेल. “\n“आपण एकटे असलो तरी हरकत नाही.\nआपल्यामागे कुणी येवो ना येवो .\nजे आपल्याला करावस् वाटत ते करण्यातच\nआपल्या जीवनाची सार्थकता आहे”\n“आपले कार्य स्वतः करा\nजर आपला इतरांवर विश्वास असेल\nतर आपण नेहमीच फसवले जाताल.”\n“आज तुम्हाला ज्या वेदना जाणवत आहेत\nती म्हणजे उद्याच्या ताकतीचा भास आहे.\nप्रत्येक आव्हानात वाढ करण्याची संधी असते. ”\n“शिकण्याची क्षमता ही एक भेट आहे;\nशिकण्याची क्षमता एक कौशल्य आहे;\nशिकण्याची इच्छा ही निवड आहे. ”\n“माझ्यासाठी, मी काय करायचे आहे\nयावर मी लक्ष केंद्रित केले आहे.\nचॅम्पियन होण्यासाठी मला काय करावे लागेल\nहे मला माहित आहे, म्हणून मी यावर कार्य करीत आहे. ”\n“आपल्याकडून पैसे काढून घेतले जाऊ शकतात,\nपरंतु ज्ञान नेहमी आपल्याकडे राहील.”\n“आयुष्य आपल्याला शिकण्यासाठी नव्हे तर\nआपली समज सुधारण्यासाठी दररोज नवीन धडे देते.”\n“जर तुमच्याकडे चांगले विचार असतील\nतर ते तुमच्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाशाप्रमाणे चमकतील\nआणि आपण नेहमीच सुंदर दिसू शकाल.”\n“चुका म्हणजे एखाद्याने संपूर्ण\n“मी नेहमी म्हणतो की सराव आपल्याला\nबर्‍याचदा अव्वल स्थानांवर नेतो.”\n“स्वतःला एखाद्या गोष्टीत ढकलून द्या कारण,\nकोणीही आपल्यासाठी हे करणार नाही.”\n“आपण नेहमी एकमेकांना भेटून\nआणि स्मित हास्य करणे ही प्रेमाची सुरुवात आहे.”\n“मी असे म्हणणार नाही की मी १००० वेळा अयशस्वी झालो,\nमी असे म्हणेन की मला असे १००० मार्ग सापडले जे कार्य करीत नाहीत आणि अयशस्वी होऊ शकतात.”\nGreat people thoughts in Marathi | महान व्यक्ती सुविचार मराठीमध्ये\n“जर तुम्हाला खरोखर काहीतरी करायचे असेल तर तुम्हाला एक मार्ग सापडेल. जर आपण तसे केले नाही तर आपल्याला शिकवणं मिळेल. ”- जिम रोहन\n“कधीकधी हृदय डोळ्यांसमोर जे अदृश्य आहे ते पाहते.”\n– एच. जॅक्सन ब्राउन, जूनियर\n“आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिल्यास, आपण आपले वर्तमान गमावाल.”\n“उद्या करायाच आहे ते आज करा,\nआज जे करायाचे ते आता करा.”\n“जे स्वतःसाठी जगतात ते मरतात,\nजे समाजासाठी मरतात ते जिवंत राहतात”.\n“आपण हार मानत नाही तोपर्यंत\nआपला पराभव होणार नाही.”\n“आपण काही नवीन करत नसल्यास\nआपण यश प्राप्त करू शकत नाही.”\n“केवळ ज्या व्यक्तीला ध्येय व्यतिरिक्त काही दिसत नाही\nतोच आपले ध्येय साध्य करू शकतो.”\n“वेळ खूप वेगाने जात आहे,\nजे करायचे ते आता पूर्ण करावे लागेल.”\n“आधुनिक मनुष्याची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे तो निसर्गापसून दूर गेला आहे. आणि त्यामुळेच तो परमात्म्यापासून सुद्धा दूर गेला आहे. कारण निसर्गातच आपल्याला परमेश्वराची प्रथम झलक प्राप्त होत असते “- ओशो\n“कधीही हार मानू नका आजचा दिवस खडतर आहे,\nउद्या हा दिवस आणखीनच वाईट होईल,\nपरंतु परवाचा दिवस हा प्रकाशची पहाट असेल.”\nविश्रांतीचा विचार करू नका.”\nएक पुस्तक, एक पेन, एक मूल आणि\nशिक्षक जग बदलू शकतात.\n“आपणास काहीतरी वेगळे करायचे असेल तर\nगर्दीपासून दूर जा, गर्दी धैर्य देते पण ओळख हिसकावते.”\nपैशाची खरी शक्ती म्हणजे देणगी देण्याची शक्ती.\n“एक सकारात्मक दृष्टीकोन खरोखर स्वप्ने\nसत्यात उतरवू शकते आणि तेच माझ्यासाठी झाले.”\n“तुम्ही आयुष्याचे सर्व दिवस जगू शकता.”\n“एक नेता म्हणजे त्याला मार्ग माहित असतो,\nतो त्या मार्गावर जातो आणि मार्ग दाखवितो.”\n– जॉन सी. मॅक्सवेल\n“केवळ आपणच चांगले असले पाहिजे असे नाही\nतर आपण कशासाठी तरी चांगले असले पाहिजे.”\n– हेनरी डेव्हिड थोरो\n“सतत कृतज्ञतेमुळेच आपण आपले\nसामान्य व्यक्तिमत्व मानवी चुंबकामध्ये बदलू शकता.”\n“स्वत: वर प्रेम करा.\nसकारात्मक राहणे महत्वाचे आहे\nकारण सौंदर्य आतून येते. ”\n“लोकांचा जास्त विचार करू नका कारण\nज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि\nज्याच्याकडे सर्व काही आहे त्याला जळतात.”\n“जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर,\nतुमच्या कामाची पद्धत बदला, तुमचे तत्व नाही,\nकारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात मुळ नाही.”\n“नशिबावर अवलबून राहू नका,\nकारण नशिबाचा भाग हा १ टक्के असतो\nतर मेहनतीचा भाग ९९ टक्के.”\n“एवढे लहान बना कि प्रत्येक जण तुमच्यासोबत बसू शकेल\nआणि इतके मोठे बना कि जेव्हा तुम्ही उभे राहाल\nतेव्हा कोणीही बसलेला नसेल.”\n“परीस्थिती प्रमाणे बदलणारे मित्र\nसांभळण्या पेक्षा परीस्थिती बदलविणारेल मित्र सांभाळा,\nआयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही.”\n“एक पेन चुक करू शकतो.\nपण एक पेन्सील कधीच चुक करत नाही,\nकारण तीचा partner (खोडरबर) तीच्या सोबत असतो,\nतो तिच्या सर्व चुका सुधारतो,\nम्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मित्र असावा,\nजो आपल्या चुका सुधारेल.”\n“जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,\nस्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी\n“जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही,\nतोपर्यंत आपल्याला कोण हरवू शकत नाही.”\n“आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत,\nतर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात.”\n“स्वप्न ती नाहीत जी झोपल्यावर पडतात,\nस्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत.”\n“जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असेल,\nतर तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त रहा.”\n“जेव्हा नख वाढतात तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो,\nनख वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही.\nजेव्हा तुमच्यात गेरसमज होतात\nतेव्हा तुमच्यातला अहंकार कापा,\nतुमच्यातल्या नात्याला कापू नका.”\n“हातातल्या Lines वर कधीच विसवास ठेउ नका\nकारण future तर त्याच पण असते ज्यांना हात नसते.”\n“जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे,\nहि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही,\nतोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.”\n“कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही,\nकारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.”\n“प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा,\nआणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.”\n“चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय,\nडोडे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगड”\nजी माणसं आयुष्यात आहेत\nत्यांच्या सोबत हसायचं सोडून,\nत्यांच्यासाठी रडत बसतो आपण.”\n“जीवनामध्ये या 5 गोष्टींना कधीच तोडु नका\nया गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही,\nपरंतु वेदना खुप होतात.”\n“सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे.”\n“जीवनात अनुभव एक असा कठोर शिक्षक आहे,\nजो पहिले परीक्षा घेतो आणि\n“जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते,\nपण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.”\n“स्वतः च्या जीवनातले काही क्षण\nस्वतः च्या माणसासाठी जगा कारण,\nपरत परत नाही जन्माला येणार कोणी\nजीवनात onece more नसतो.”\n“तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील,\nपण माझ्या सारखा जीव लावणारा,\nएक पण नाही मिळणार.”\nपण प्रेम करून फसवू नकोस,\nविचार करून प्रेम कर,\nपण प्रेम करून विचार करू नकोस,\nहृदय तोडून प्रेम कर,\nपण प्रेम करून हृदय तोडू नकोस.”\n“प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे,\nजी दुर्बल व्यक्तीला मजबूत\nआणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.”\n“तुझ्या शिवाय मी कधी कुणावर प्रेम केलंच नाही,\nकारण माझं मन तुझ्या शिवाय कधी कुठे रमलेच नाही.”\n“ही लई cute आहे राव,\nतो प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे,\nकारण माझ्यासोबत तू आहेस.”\n“प्रेमाचे तर माहीत नाही,\nपण तुमच्या सोबत जे आहे,\nते इतकं कोणासोबत नाही.”\n“प्रेम कधी अधुरे राहत नाही,\nअधुरा राहतो तो विश्वास,\nअधुरा राहतो तो स्वास,\nअधुरी राहते ती कहाणी,\n“आयुष्यात त्या व्यक्तीला विसरू नका,\nजी तुमच्यासाठी सारं काही विसरण्यास तयार असतो.”\nहजारो Like साठी नाही,\nतर एका खास व्यक्तीला आपल्या,\n“कितीही भांडण झालं तरी\nमनात कोणताही राग न ठेवता,\nजे लगेच गोड होतात ना,\n“खरे प्रेम कधी कोणाकडून मागावं लागतं नाही,\nते शेवटी आपल्या नशिबात असावं लागत.”\n“या जगात प्रेम तर सर्वच करतात,\nप्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.”\nआयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे,\nआणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे..\nकोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणे,\nशांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.\nनिर्णय चुकला तरी हरकत नाही.\nस्वतःवर विश्वास असला की,\nजीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.\nहातावरील रेषेत दडलेले भविष्य बनवू नका,\nत्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा.\nसूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो,\nपरंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध राहतो,\nअशा सूर्यप्रकाशा प्रमाणे आपण आपले चारित्र्य घडविले पाहिजे.\nहरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटलं पाहिजे.\nकी हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता\nध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,\nजगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,\nकारण वेळेस लोक इतिहास घडवतात,\nआणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात…\nआयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारण असतात,\nएकतर आपण विचार न करता कृती करतो,\nकिंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.\nकोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर,\nस्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,\nस्वतःची सावली निर्माण करण्यासाठी,\nस्वतः उन्हात उभे रहावे लागते..\nजेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,\nतीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची..\n“ कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा,\nजेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल,\nतेव्हाच आपण पुढे जाऊ शकता.”\nस्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त वा की,\nम्हाला दुसर्‍यांच्या चुका शोधायला वेळच नाही मिळाला पाहिजे.\nजोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही,\nतोपर्यंत कोणीही आपल्याला हरवू शकत नाही.\nजे काय करायचे आहे ते गर्दीतून बाहेर येऊन करा,\nकारण गर्दी तुम्हाला धाडस तर देईल पण ओळख नाही.\n“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही,\nतर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”\nयश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते,\nत्यापेक्षा दुपट्टा महिन्यात ते टिकवण्यासाठी करावी लागते.\nआपली खरी स्वप्न तीच आहेत,\nजी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास\nआणि सकाळी लवकर उठण्याचे भाग पाडतात.\n”आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो,\nत्याला कोणीही हरवू शकत नाही.”\nअनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव,\nतेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत,\nयाची त्यांना कल्पना नसते.\nतलाव जेव्हा पाण्याने भरतो,\nतेव्हा मासे किड्यांना खात असतात,\nतलावातलं पाणी संपून कोरडा होतो,\nतेव्हा किडे मास्यांना खात असतात,\nसंधी सगळ्यांना भेटते मित्रांनो फक्त\nआपली वेळ येण्याची वाट पहा…\nजिंकण्याची मजा तेव्हाच येते,\nजेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात..\nयशस्वी व्यक्ती म्हणजे तो सकाळी लवकर उठतो,\nआणि आज कोणते काम करायचे आहे ते ठरवतो,\nआणि रात्रीपर्यंत ती सर्वकाही कितीही त्रास आहे नंतर पूर्ण करतो.\n“आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,\nनिदान एक काम पूर्ण करीन,\nनिदान एक अडथळा ओलांडून,\nनिदान प्रयत्न तरी करीनच करीन.”\n“अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप #भावूक बनवून जाते,\nती म्हणजे हिंमतीने हारा…\nपण कधी हिंमत हरू नका..”\n“प्रामाणिकपणा, ही शिकवण्याची बाब नाही,\nसावा लागतो, त्यात टक्केवारी नसते,\nतो असतो किंवा नसतो.”\n“एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्या सोबत बसू शकेल,\nआणि इतके मोठे बना की,\nजेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल.”\nहिम्मत एवढी मोठी ठेवा की,\nतिच्यासमोर नशिबाला पण झुकाव लागेल.\nकासवाच्या गतीने का होईना,\nपण रोज थोडी थोडी प्रगती करा.\nखूप ससे येथील आडवे बस त्यांना हरवण्याची हिम्मत ठेवा.\nलोकं असं जरूर म्हणतात की,\nतुम्ही चांगलं करा मात्र,\nहे कधीच म्हणत नाही की माझ्यापेक्षा चांगला करा.\n“खेड पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा,\nतुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल.”\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nstatusinmarathi.com या वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठी माणसापर्यंत प्रेरणादायी कविता, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी कोट्स, प्रेरक विचार आणि वाढदिवस शुभेच्छा , मराठी स्टेटस पोचवण्याचा प्रयन्त करत आहोत. जेणे करून त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.👍\nकोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२२ | Kojagiri purnima wishes in marathi 2022,status,quotes, Messages,Images, greetings शेअर करून द्या कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा.\nकोजागरी पौर्णिमा माहिती,कथा,महत्त्व,पूजविधी मराठी | kojagiri purnima information in marathi 2022.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=5292", "date_download": "2022-10-07T22:21:04Z", "digest": "sha1:GENQTY5XVEIFPSZ52CEZOQLE6KVSHGBP", "length": 9253, "nlines": 48, "source_domain": "gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta, /* */", "raw_content": "शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार: पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत देलोडा गावानजीकच्या जंगलातील घटना रक्तदान शिबिराद्वारे महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या जिल्हाध्यक्षपदाची वर्षपूर्ती साजरी आरमोरीजवळच्या गाढवी नदीच्या पुलावर अपघात: गडचिरोलीचे आ.डॉ.देवराव होळी थोडक्यात बचावले चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची हत्या: कोवानटोला-जपतलाई येथील घटना एटापल्ली तालुक्यातील संतापजनक घटना: ५० वर्षीय आदिवासी महिलेवर ट्रकचालकाने केला बलात्कार, आरोपीस अटक गडचिरोली: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकणार- शिवसेनेच्या मेळाव्यात जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांचे प्रतिपादन\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार..\nरक्तदान शिबिराद्वारे महेंद्र ब्राम्..\nआ.डॉ.देवराव होळी अपघातात थोडक्यात ब..\nआदिवासी महिलेवर ट्रक चालकाचा बलात्क..\nजिल्हा परिष्द,नगर परिषद निवडणुकीत श..\nनक्षलग्रस्त भागातील पोलिसांना दीडपट..\nट्रकच्या धडकेत महिला ठार: संतप्त ना..\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिर..\nआमचे मत - तुमचे मत\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nगडचिरोलीच्या परिचारिका शालीनी कुमरे यांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान\nगडचिरोली,ता.१६: आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या देशभरातील ५१ परिचारिकांना बुधवारी(ता.१५) सांयकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय २०२० च्या राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील दोन परिचारिकांचा समावेश असून, गडचिरोली येथील परिचारिका शालीनी नाजुकराव कुमरे यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे.\nपदक, प्रशस्तीपत्र आणि ५० हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. १९७३ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. १२ मे हा दिवस ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’यांचा जन्मदिन असून, तो ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’म्हणून साजरा केला जातो. परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे त्यावेळी हा कार्यक्रम होऊ शकला नाही. बुधवारी दुरस्थ प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य तथा कुंटुब कल्याण मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय राज्य आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार या उपस्थित होत्या.\nजिल्हा सामान्य रूग्णालय, गडचिरोली येथील आंतर रूग्ण विभागाच्या परिचारिका शालिनी नाजुकराव कुमरे यांनाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा परिचारिका क्षेत्रातील ३५ वर्षाचा अनुभव आहे. श्रीमती कुमरे यांनी आपले काम पूर्ण क्षमतेने पार पाडले. आपत्कालिन जीवन रक्षात्मक प्रणाली त्यांनी सक्षमपणे सांभाळली असून, नक्षलग्रस्त भागात चांगली कामगिरी बजावली आहे. आरोग्य क्षेत्रातील अतिशय महत्वाचा भाग असणाऱ्या ‘अवयव दान’ क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. आता त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत.\nजळगाव जिल्ह्यातील खुर्द येथील उपकेंद्रातील प्रेमलता संजय पाटील या ऑग्जिलिएरी नर्स मिडवाइव्स (एएनएम) आहेत. मागील १४ वर्षांपासून त्या आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. श्रीमती पाटील महिलांना समुपदेशन करण्याचे काम उत्तम प्रकारे पार पाडतात. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातंर्गत असणारी कामे त्यांनी चोख पार पाडली आहेत, त्यांच्या या कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/11/blog-post_25.html", "date_download": "2022-10-07T22:07:14Z", "digest": "sha1:NVUXOM6O7EAS36E3T27PAFLWUM7NYBSI", "length": 7615, "nlines": 76, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "ज्वारीच्या भाकरीचे महत्व | Gosip4U Digital Wing Of India ज्वारीच्या भाकरीचे महत्व - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome हेल्थ ज्वारीच्या भाकरीचे महत्व\nजेवणात का खावी ज्वारीची भाकरी\nज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते.\nज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते.\nबद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.\nतसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.\nज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.\nतसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो.\nभाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.\nज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.\nज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.\nज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.\nरक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.\nहृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.\nशरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.\nशरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.\nमहिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.\nज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.\nशौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे.\nकाविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.\nज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या आणि गव्हाचा सणावाराला उपयोग करा.\nगव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mukundbhalerao.com/blog/2022/04/08/%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-07T21:18:49Z", "digest": "sha1:UOOZPQ2M5MID2RYJADXRYZVURSXIE5XA", "length": 7861, "nlines": 225, "source_domain": "www.mukundbhalerao.com", "title": "|| तमसो मा ज्योतिर्गमय || – Mukund Bhalerao", "raw_content": "\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\n हवामे, तैरना मुझे आता,\nप्रवीण बुरकुले on जनाचे श्लोक\nS B Joshi on जनाचे श्लोक\nTushar Shardul on अभिराम मुक्त ऐसा, आनंदकंद आहे……..\n|| तमसो मा ज्योतिर्गमय ||\nअंधारातून उजेडाकडे, निराशेतून आशेकडे,\nतिमिरातून प्रकाशाकडे, स्वत:पासून कुटुंबाकडे,\nएकाकडून सर्वांकडे, कोलाहलातून शांततेकडे,\nव्यक्तिकडून समष्टिकडे, आत्म्याकडून परमात्म्याकडे…….\nध्वनिपासून संगीताकडे, संगीतापासून शब्दाकडे,\nशब्दाकडून अर्थाकडे, अर्थाकडून भावनेकडे,\nभावनेकडून अणुकडे, अणुपासून विश्वाकडे,\nविश्वापासून मानवाकडे, शरीराकडून विदेहाकडे…….\nकाश्मीरपासून कन्याकुमारीपर्यन्त, द्वारकेपासून त्रिपुरेश्वरीपर्यंत,\nबालकापासून वृद्धाँपर्यंत, माझ्याकडून तुझ्याकडे,\nकुटुंबाकडून समाजाकडे, घराकडून देशाकडे,\nदु:खाकडून आनंदाकडे, वेदनेकडून निरामयाकडे……..\nएकाकडून अनेकाकडे, आत्मज्योतीकडून विश्वज्योतीकडे,\nउच्चारांकडून निस्तब्धतेकडे, शब्दांपासून निशब्दतेकडे,\nध्वनिपासून तरंगाकडे, तरंगातून श्रीरंगाकडे,\nआपत्तीतून आशिर्वादाकडे, आशिर्वादातून उन्मेशाकडे……\nउन्मेशातून रचनेकडे, रचनेकडून ब्रम्हांडाकडे,\nभास्कराच्या स्वदिनी, निशेच्या रात्रमनी,\nअभूतपूर्व शांतक्षणी, नवपल प्रकाशवर्ष,\nजागऊ असे आम्ही, मनामनास हर्षस्पर्श………..\nआसमंत हो प्रकाश, वेदनांचा हो विनाश,\nव्याधीं हो समूळ नष्ट, नाशवंत हो अरिष्ट,\nसर्व हो शतायुषी, मंगलमय सर्व विश्व,\nदु:ख जाओ विलयास, आरोग्य लाभो भारतास…….\nऔरंगाबाद / महाराष्ट्र / भारत\nअभिराम मुक्त ऐसा, आनंदकंद आहे……..\nगरम गरम भजी, वाफाळलेला चहा आणि बरेच काही…………\nएक असावे नयनरम्य घर…..\nजंबुद्वीप मित्र असा अस्त पावला\nडोळ्यामध्ये स्मित तुझ्या अन\n|| दे सदबुद्धी त्यांना | सर्वदा ||\nकोसळेल जेंव्हा | वज्र देवेंद्राचे |\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://parbhani.gov.in/mr/notice/%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF-2/", "date_download": "2022-10-07T23:09:42Z", "digest": "sha1:TTJ4VHJ2GZGDXT43OLILLBP2XKE3AIXF", "length": 8329, "nlines": 123, "source_domain": "parbhani.gov.in", "title": "खनिपट्ट्याचे लिलावाकरिता भुविज्ञानकीय तांंत्रिक अहवाल तयार करणेसाठी पर्यावरण सल्लागार नेमणुक करिता ई-निविदासाठी मुदतवाढ | परभणी | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nडॉ.प्रफुल्ल पाटील मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल\nसरस्वती – धन्वंतरी डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल\nमहसुल / दंडाधिकार शाखा\nस्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nउप प्रादेशिक परिवहन कार्यालय\nजिल्हा परिषद, पंचायत समिती तालुका निहाय प्रारुप व अंतिम प्रभाग रचना\nमाहे ऑक्टोबर-नोव्हेंंबर २०१९ मधे झालेल्या अवेळी पावसामुळे बाधित शेतकरी यांंच्या मदत वाटप याद्या\nपरभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची विधान परिषद निवडणुक – २०१८\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या (दुसरा टप्पा)\nप्रधानमंत्री पिक विमा योजना २०१७ लाभार्थी यादी\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ पात्र लाभार्थी याद्या\nखरीप २०१८ दुष्काळी अनुदान पहिला व दुसरा टप्पा\nखासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंंतर्गत २०१४-१५ ते २०१८-१९ या कालावधीमधील मंजुर कामांंची यादी\nऔरंंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२०\nपरभणी जिल्ह्यातील कब्जेहक्काने व भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमीनीचे आदेश\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)\nखनिपट्ट्याचे लिलावाकरिता भुविज्ञानकीय तांंत्रिक अहवाल तयार करणेसाठी पर्यावरण सल्लागार नेमणुक करिता ई-निविदासाठी मुदतवाढ\nखनिपट्ट्याचे लिलावाकरिता भुविज्ञानकीय तांंत्रिक अहवाल तयार करणेसाठी पर्यावरण सल्लागार नेमणुक करिता ई-निविदासाठी मुदतवाढ\nखनिपट्ट्याचे लिलावाकरिता भुविज्ञानकीय तांंत्रिक अहवाल तयार करणेसाठी पर्यावरण सल्लागार नेमणुक करिता ई-निविदासाठी मुदतवाढ\nखनिपट्ट्याचे लिलावाकरिता भुविज्ञानकीय तांंत्रिक अहवाल तयार करणेसाठी पर्यावरण सल्लागार नेमणुक करिता ई-निविदासाठी मुदतवाढ\nखनिपट्ट्याचे लिलावाकरिता भुविज्ञानकीय तांंत्रिक अहवाल तयार करणेसाठी पर्यावरण सल्लागार नेमणुक करिता ई-निविदासाठी मुदतवाढ\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 28, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.insidemarathibooks.in/index.php/2021/05/28/aavran-marathi-book-review/", "date_download": "2022-10-07T22:48:00Z", "digest": "sha1:F2H5UGHMNEDQAM2BAWNAN7PFDHM2BKFX", "length": 12006, "nlines": 176, "source_domain": "www.insidemarathibooks.in", "title": "आवरण - Aavran - Book Review - Inside Marathi Books", "raw_content": "\n|| माझिया मराठीची बोलू किती कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके ||\nby अक्षय सतीश गुधाटे\nलेखक – डॉ. एस. एल. भैरप्पा\nअनुवाद – उमा कुलकर्णी\nप्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाउस\nमुल्यांकन – ४.८ | ५\nमाहीत नाही पण का कोणास ठावूक हे पुस्तक पाहिलं आणि मनात याच्या नावानेच एक उत्कंठा निर्माण झाली. नक्की काय आहे पुस्तकात कशावर असेल आवरण म्हणजे नक्की कशाच आवरण चढवलेले की उतरवलेले अशा अनेक प्रश्नांची माळ मला गप्प बसू देईना. या पुस्तकाची खास बाब म्हणजे हे पुस्तक प्रकाशित होण्या आधीच याच्या सगळ्या प्रती विकल्या गेल्या होत्या. आणि शिवाय पहिल्या पाच महिन्यातच याला दहा वेळा पुनर्मुद्रित करावं लागल आहे, आणि यामुळे पुस्तक वाचण्याची इच्छा अजूनच तीव्र होत गेली. त्यातून एस. एल. भैरप्पा हे नाव आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच आहे. अभ्यासपूर्ण लेखनशैली आणि विविध गोष्टींतून आपली कथा मांडन्याची हातोटी सगळ्यांनाच अवगत आहे.\nपुस्तक वाचायला सुरवात केली आणि सुरवातीच्या हंपीच्या वर्णनाने किंवा तिथल्या प्रसंगानेच मनाला एका कोड्यात टाकलं. विचार करायला भाग पाडलं. एका ग्रामीण भागातील मुलगी. नाव ‘लक्ष्मी’, पुण्यात शिक्षण, फिल्म इंडस्ट्रीत काम आणि सोबतच एका ‘अमीर’ नावाच्या मुलावर प्रेम. आणि त्यानंतर लग्न करून धर्म परिवर्तन करून मुस्लिम धर्म स्वीकारून तिथे ‘रझिया’ होऊन नव्या आयुष्याची सुरवात करते. स्वाभाविक घरच्यांचा विरोध आणि नवीन अनुभव. पण इथपर्यंत ही गोष्ट आपल्याला ओळखीचं आणि साधीच वाटते. पण खरं पुस्तक सुरूच इथून होत. त्यानंतर स्वतः कादंबरी लिहिण्याचा तिचा विचार. कादंबरी मधे लिहिलेली एक कादंबरी तुम्हाला थक्क करेल.\nधर्माचा इतका बारीक अभ्यास. आणि फक्त एकच नाही तर अनेक धर्मांचा पाया जाणून घेऊन त्यातील अर्थपूर्ण गोष्टीची एक माळ गुंफली आहे. त्याला इतिहासाची आणि भूगोलाची जोड. अनेकांना आजूनही माहिती नसलेल्या अनेक लहान सहान गोष्टी. लिखाणातील बारकावे, इतिहासाचे तपशील आणि त्याला दिलेली पुराव्यांची जोड. संपुर्ण भारताचा इतिहास आणि साधारण ५०० वर्षांच्या कालखंडाचा एक धावता आढावा. त्यातच औरंगजेब आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाची झलक. टिपू सुलतान आणि बुंदेल खंडाची इतिहासातील उदाहरणे. काशी मधील आश्चर्यकारक बदल. उत्तर भारत, ते पश्चिम भारताचा इतिहासाची एक सलग माळ. तुम्हाला एकच कथेतून पहायला मिळेल. आणि फक्त इतकेच नाही तर त्याला आजच्या चालू घडीची जोड. म्हणजे अमेरिका, युरोप यांचा आपल्या देशावर झालेले काही बारीक परिणाम निरिक्षणपुर्ण मांडण्याचा प्रयत्न आपल्या डोक्याला एक वेगळ्याच प्रकारची झिंग चढवून जातो.\nआपण या कादंबरीला धर्म, संस्कृती आणि आताचा चालू काळ यात एक सुंदर विणलेली माळ म्हणू शकतो. खेड्याचा चेहरामोहरा कसा बदलत आहे आणि सोबतच शहराचाही.. इतका अभ्यास आणि त्यातून असलेली कथा लिखाणाची सुंदर शैली या पुस्तकाला एक वेगळी ओळख देतात. वैचारिक मंथन यातून आपल्याला अनेक अंगी दृष्टीकोन समजतो. भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेल्या ‘हिंदू’ ची मला यात एक हलकी झलक दिसली, परंतू यात ती अजूनच विस्तृत प्रमाणात मांडली आहे, असही जाणवलं. सर्वांनाच हे पुस्तक आवडेल असे नाही, पण नक्कीच अनेक गोष्टी यातून शिकू शकता. तुम्हीही वाचा आणि तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा\nऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:\nकिंडल आवृत्ती विकत घ्या\nमराठी पुस्तकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा\nछत्रपती संभाजी – एक चिकित्सा\nसोशल नेटवर्कवर आमच्याशी कनेक्टेड राहा.\nवेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/11/blog-post_8.html", "date_download": "2022-10-07T21:20:24Z", "digest": "sha1:X6DJKTVHAWJ7DQ2KYMNWNPV7XBWI7CFN", "length": 5851, "nlines": 61, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "८२ वर्षे वय महिला बॉडी बिल्डर ने घरात घुसलेल्या घुसखोराला टेबले नी तो तुटेपर्यंत मारहाण केली. | Gosip4U Digital Wing Of India ८२ वर्षे वय महिला बॉडी बिल्डर ने घरात घुसलेल्या घुसखोराला टेबले नी तो तुटेपर्यंत मारहाण केली. - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome देश-विदेश ८२ वर्षे वय महिला बॉडी बिल्डर ने घरात घुसलेल्या घुसखोराला टेबले नी तो तुटेपर्यंत मारहाण केली.\n८२ वर्षे वय महिला बॉडी बिल्डर ने घरात घुसलेल्या घुसखोराला टेबले नी तो तुटेपर्यंत मारहाण केली.\nन्यूयॉर्कमध्ये 82 वर्षीय महिला शरीरसौष्ठवपटू विली मर्फीने घरात घुसलेल्या एका व्यक्तीला मारहाण केली.\nसीएनएनला घटनेचे स्पष्टीकरण देताना मर्फी म्हणाली, “हा अर्ध-अंधाराचा प्रकार आहे आणि मी एकटाच आहे, आणि मी म्हातारी झाली आहे. पण मी अतिशय मजबूत आहे. घुसखोराने चोरण्यासाठी चुकीचे घर निवडले. ”\nमर्फीने घुसखोरांना घरातील वस्तूंसह टेबलनी मारहाण करण्यास सुरुवात केली. “मी ते टेबल घेतले आणि मी त्याच्यावर मारहाण करायला गेले. आणि काय टेबल तुटला, ”तिने डब्ल्यूएएचएएमला सांगितले.\nटेबलाच्या मेटल पायांनी त्याला वाईट प्रकारे मारहाण केल्यानंतर, मर्फीने त्याच्यावर दोन वेळा उडी मारली, बेबी शैम्पूची एक बाटली घेण्यासाठी स्वयंपाकघरच्या दिशेने पळत गेली आणि ती त्याच्या तोंडावर पिळली. तिने त्याला झाडूने मारहाण केली आणि घराबाहेर काढले. मर्फी म्हणते की ती 220 पौंड डेडलिफ्ट करू शकते परंतु त्या माणसाला तिच्या घराबाहेर ओढण्यासाठी धडपडत करीत होती.\n“त्याला तेथून बाहेर पडायचे आहे आणि मी त्याला घराबाहेर पडण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे, पण तो खूप भारी आहे. मी त्याला हलवू शकले नाही. तो वजनदार आहे, ”ती म्हणाली.\nपोलिसांनी वेळीच आगमन केले आणि घुसखोरांना पकडले.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/jibhevr-lal-chatte-astil-tr-vacha-he-article/", "date_download": "2022-10-07T22:43:54Z", "digest": "sha1:M5SSROP6F4D52KJHQTEQDCAW46HISTNP", "length": 14747, "nlines": 93, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "तुमच्या जिभेवर जर 'पांढरा' थर किंवा 'लाल' चट्टे असतील तर आजच सावध व्हा, असू शकते 'या' भयानक आजराचे लक्षण - Themaharashtrian", "raw_content": "\nतुमच्या जिभेवर जर ‘पांढरा’ थर किंवा ‘लाल’ चट्टे असतील तर आजच सावध व्हा, असू शकते ‘या’ भयानक आजराचे लक्षण\nतुमच्या जिभेवर जर ‘पांढरा’ थर किंवा ‘लाल’ चट्टे असतील तर आजच सावध व्हा, असू शकते ‘या’ भयानक आजराचे लक्षण\nसहसा साहजिकचं आपल्या दैनंदिन आयुष्यतल्या दिनचर्येची सुरूवात ही तोंडाच्या सफाईपासून होते, अर्थात आपण दातांची सफाई करून घेतो. परंतु बऱ्याचदा आपल्या दिनचर्येत आपण दातांकडेच इतके लक्ष देत राहतो की, आपल्या जिभेकडे नकळत का असेना कानाडोळा होतो.\nमुळात हीच बाब प्रकर्शाने आता बोलायची आहे. ती म्हणजे, जर दात साफ करताना तुम्ही तुमच्या जिभेच्या रंगाकडे रोज लक्ष देत राहिलात तर तुम्हाला समजेल की, जिभेवर सकाळच्या प्रहरी असणारे रंग काही विशेष गोष्टींना सुचीत करतात. तर मुळ म्हणजे, हे जिभेवरील रंग तुमच्या आरोग्यविषयक बाबी दर्शवितात.\nत्यामुळे तुम्ही याकडे दुर्लक्ष करत असाल तर ही मोठी चुक ठरू शकते. ज्याप्रमाणे आपली जिभ ही आहाराच्या चवीची जाणीव करून देते त्याचप्रमाणे हीच जिभ आपल्याला आपल्या आरोग्याचीही जाणीव करून देत असते.\nतुम्ही याकडे बारकाईने लक्ष द्या, जेव्हा कधीही तुम्ही डाॅक्टरांकडे जाता तेव्हा सर्वप्रथम ते तुमच्या तोडांतील जिभेला बारकाईने न्याहाळतात. त्यामुळे हे सिद्धच होतं की, जिभ ही आरोग्यविषयक अनेक गोष्टींची सुचक अवयव मानायला हरकच नसावी.\nजिभेवर उमटणारे पांढरे चट्टे किंवा लाल जखमा यांबद्दल थोडसं जाणून घेऊयात. जर चुकून तुमच्या जिभेवर असे काही पांढरे छोटेखानी चट्टे किंवा लाल जखमा पडत असतील तर समजून जा की, पोटासंबंधी गंभिर आजाराची शक्यता आहे. पचनक्रियेतील काही गडबग ही स्पष्टपणे जिभेवर दिसून येते कारत पचनक्रियेतील इतर अवयवांच्या संपर्कात असणं हा जिभेचाच वाटा आहे.\nअनेकदा हे अशा प्रकारचे लक्षणं, “हार्पिज” नावाच्या आजाराशीही निगडीत असतात, तो आजार घरगुती उपायांनी बराही होतो परंतु अनेकदा डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही गोष्ट चुकीची ठरू शकते. बऱ्याचदा जिभेवर पांढऱ्या रंगाचे तवंगही जमू लागतात. सहसा जिभेवर कमी प्रमाणात पांढऱ्या रंगाच्या तवंगाचं येणं जिभेच्या उत्तम स्थास्थ्याच लक्षण ठरतं.\nपरंतु अनेकदा हे तवंग अधिक काळ जिभेवर टिकणं म्हणजे, “कैंडिडा” सारख्या फंगलच्या आजारात बदलल्या जातं. हे शरीरासाठी घातकं ठरतं. पुढे चालून हे फंगल व यिस्ट इन्फेक्शन शरीरासाठी फारच घातक ठरू शकतं, त्यामुळे योग्यवेळी खबरदारी घेणंच उचीत राहतं.\nयापेक्षाही गंभिर परिस्थितीतली बात म्हणजे, लाल रंगाच्या चट्ट्यांच जिभेवर सतत उमटणं. यातून ज्या आजारचा निष्कर्ष निघतो तो आजार ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यात पडाल आणि काळजीही वाटेल. जिभेवर लाल रंगांच्या चट्ट्यांच येणं हे कॅन्सरसारख्या गंभिर आजाराचं लक्षण समजल्या जातं.\nअनेकदा हे चट्टे एखाद-दोन आठवड्यात ठीक होतात तेव्हा त्यांची गांभिर्याने दखल घेण्याची आवश्यकता नाही परंतु जर एक महिना किंवा दीड महिना यापेक्षा अधिक काळ जर हे लाल चट्टे जिभेच्या खालच्या व वरच्या भागावर राहिले तर मात्र विलंब न करता डाॅक्टरांच्या सल्ल्याची गरज पडेल हे लक्षात ठेवा.\nकॅन्सरसारखे मोठे आजार सुरूवातीच्या टप्प्यात आपल्या शरीरात जास्त हानी निर्माण करत नाहीत, ही बाब ध्यानात ठेवण्यासारखी आहे. महत्त्वाचं म्हणजे, अनेकदा आपली जिभ ही लाल पडते किंवा अधिक प्रमाणात मऊ होते. तर अशावेळीही आपण सावधानता बाळगायला हवी आहे. “विटामिन बी-12” आणि “आयरन” यांच्या कमतरतेमुळे तुमची जिभ मऊ पडू शकते.\nअशावेळी लिक्विड पदार्थ पितानाही जिभेला त्रास झाल्याचं जाणवतं. वेजिटेरियन लोकांमधे विटामिन “बी-12” च्या कमतरतेची शक्यता अधिक असते. अनेकदा जिभेला भुरा रंग येतो किंवा जिभेवर थोडेश्या रेषा दिसायला लागतात तर या गोष्टी नार्मल असू शकतात.\nकारण जिभेचाच भाग असलेल्या पेपिला या रेषांमधून दिसू लागतात. शक्यतो जिभेची स्वच्छता ठेवणं ही बाब तितकीच महत्वाची आहे जितकी काळजी आपण इतर अवयवांची घेत असतो. परंतु अनेकदा आपलं याच महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष होतं, तर यापुढे आवर्जून लक्षात ठेवून जिभेची योग्य ती काळजी घ्या.धन्यवाद\nटीप: ही माहिती ऑनलाइन पध्दतीने मिळवलेली आहे, त्यामुळे काहीही करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/shavs-cha-vyavyam/", "date_download": "2022-10-07T22:11:20Z", "digest": "sha1:CV7FZA5QNH3Q5GLSZZFF2OHJRRW4DGYD", "length": 11908, "nlines": 89, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "को'रोनात फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यासाठी करा श्वसनाचे '5' महत्त्वाचे व्यायाम, जाणून घ्या.. - Themaharashtrian", "raw_content": "\nको’रोनात फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यासाठी करा श्वसनाचे ‘5’ महत्त्वाचे व्यायाम, जाणून घ्या..\nको’रोनात फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यासाठी करा श्वसनाचे ‘5’ महत्त्वाचे व्यायाम, जाणून घ्या..\nको’रो’ना म’हामा’रीनं संपूर्ण देशाला सं’कटात टाकलं. दररोज ४ लाखांच्या पुढे को’रो’नाबाधित रु’ग्ण आढळून येत आहेत. देशाच्या आ’रोग्य यंत्रणेवर प्र’चंड ता’ण आला आहे. को’रो’ना वि’षाणू लोकांवर गं’भीर प’रिणाम करत आहेत. हा वि’षाणू थेट लोकांच्या फु’फ्फुसां’वर ह’ल्ला करतो. त्यामुळे लोकांची श्व’सनसं’स्था निकामी होण्याचा धो’का असतो. अशावेळी लोकांनी आपली श्वसनसंस्था सुरक्षित ठेवण्यासाठी काही टीप्स फॉलो करणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला असे काही व्यायाम प्रकार सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुमची श्वसनसंस्था मजबूत होईल.\n१) खोल श्वास: हा सर्वात सोपा आणि महत्त्वाचा श्वास आहे. यामुळे फुफ्फुसे मजबूत होतात, तसेच रक्त प्रवाह सुधारतो, इम्युनिटी वाढते आणि ताण कमी होतो.\nकसा करायचा व्यायाम- निवांत जमिनीवर बसा, मोठा श्वास घ्या. यावेळी श्वास घेण्याचा आणि श्वास सोडण्याची वेळ मोजा. प्रत्येक श्वासागणिक वेळ वाढवा. २ के ५ मिनिटांपर्यंत हा व्यायाम करा.\n२) डायफ्रामामॅटिक श्वास: यामध्ये ताण, राग कमी होण्यास मदत होते. लोक सहसा त्यांच्या फुफ्फुसांचा परिपूर्ण वापर करत नाहीत. या व्यायाम पद्धतीने फुफ्फुसांची श्वसन क्षमता वाढण्यास मदत होते.\nकसा करायचा व्यायाम- जमिनीवर रिलॅक्सपणे बसा. एक हात छातीच्या खाली आणि पोटाच्या वरती ठेवा. diaphragm याच ठिकाणी असते. मोठा श्वास घेऊन तो हळूहळू बाहेर सोडा.\n3) हृदय व्यायाम- याचा फायदा तुम्हाला हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी होतो. यामुळे तुमच्या शरीरात अधिकप्रमाणात ऑक्सिजन घेतले जाते. यामध्ये जोरात चालणे, स्पॉट जॉगिंग, दोरी उड्या, पायऱ्या चढणे या व्यायाम पद्धतीचा समावेश होतो.\n4) अनुलोम-विलोम: याला नाकपुड्यांचा श्वास असंही म्हटलं जातं. हा प्राणायमचा प्रकार असून हटयोगामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे श्वसनसंस्थेची शक्ती वाढण्यास मदत होते. रिकाम्या पोटी हा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.\nकसा करायचा व्यायाम- जमिनीवर किंवा खुर्चीवर बसा. उजव्या हाताचा अंगढ्याने तुमची उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. आता उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. तुमच्या मधल्या बोटाने आणि करंगळीच्या शेजारच्या बोटाने डावी नाकपुडी बंद करा. आता उजव्या नाकपुडीने श्नास घ्या. हीच प्रक्रिया वारंवार करा.\n५) भ्रामरी- या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो माशी. ही गुंजन करण्याचा प्रकार असून यामुळे रक्त प्रवाह सुरळीत राहतो. यात तुम्ही तुमच्या अंगठ्याने कान बंद करा आणि मधले बोट आणि अनामिकेने डोळे बंद करा. तर्जनी भुवयांच्यावरती ठेवा आणि करंगळी गालावर ठेवा. श्वास घेताना माशीसारखा गुंजन्याचा (हम्म्म) आवाज करा. १० मिनिटांपर्यंत तुम्ही हा व्यायाम करु शकता.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/04/blog-post_17.html", "date_download": "2022-10-07T22:38:22Z", "digest": "sha1:7XMWMUYF2JQMQXAB5YVEC3RQDO2XBQTH", "length": 9671, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "नागरिकांच्या सुविधेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अँबुलन्स कंट्रोल रूम कार्यान्वित", "raw_content": "\nHomeसांगलीनागरिकांच्या सुविधेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अँबुलन्स कंट्रोल रूम कार्यान्वित\nनागरिकांच्या सुविधेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अँबुलन्स कंट्रोल रूम कार्यान्वित\nजत वार्ता न्यूज - April 17, 2021\nसांगली: कोरोना बाधीत रूग्णांना उपचाराकरिता हॉस्पीटल पर्यंत पोहोचवणे व उपचारानंतर बरे झालेले रूग्ण घरी सोडण्याकरीता खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या अँबुलन्स नागरीकांना माफक दरात व वेळेवर मिळाव्यात याकरीता जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे अँबुलन्स कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली आहे.\nकंट्रोल रूम कडून नागरिकांना मदत, सुविधा व माहिती पुरवण्यात येतील. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे 24 x 7 करीता अँबुलन्स कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली असून त्याचा दुरध्वनी क्रमांक 0233-2310555 आहे. या क्रमांकावर ज्या नागरिकांना खाजगी अँबुलन्सची आवश्यकता आहे, त्यांना संपर्क साधून अँबुलन्सचे बुकिंग करता येईल. अँबुलन्स बुकिंग केल्यानंतर संबंधित नागरिकांना अँबुलन्स क्रमांक, चालकाचे नाव व मोबाईल क्रमांक पुरवला जाईल. जिल्ह्यातील खाजगी हॉस्पीटलचे डॉक्टर्स यानांही कंट्रोल रूम मार्फत अँबुलन्स बुकिंग करता येईल. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सांगली यांनी दि. 7 जुलै 2020 रोजीच्या बैठकीत खालीलप्रमाणे मंजुर केलेल्या भाडेदराप्रमाणे भाडे अदा करता येईल. अँबुलन्सचे चालक/मालक यांनी मंजुर भाडे दरापेक्षा जादा दराची आकरणी केल्यास, कंट्रोल रूमकडे तक्रार दाखल करता येईल. तक्रारीत रूग्णाचे नाव, अँबुलन्सचा क्रमांक, कोठून कोठे असे प्रवास ठिकाण, प्रवासाचा दिनांक व वेळ इत्यादी नमुद करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले आहे.\nप्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सांगली यांनी अँबुलन्स करीता मंजुर केलेले भाडेदर पुढीलप्रमाणे आहेत. मारूती व्हॅनसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 550 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 11 रूपये. टाटा सुमो / मारूती इको / मॅटेडोर सदृष्य वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 700 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 14 रूपये. टाटा 407/स्वराज माझदा / टेंपो ट्रॅव्हलर इत्यादी वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 900 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 18 रूपये. ALS/आय.सी.यु. वातानुकुलीत वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 1200 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 24 रूपये आहे.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\nमनसेकडून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/08/Dbss.html", "date_download": "2022-10-07T22:02:42Z", "digest": "sha1:IWT56YKPGGVGWT4WAHCOGKVEEEPIBJOR", "length": 6409, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वह्या वाटप; देवदान बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम", "raw_content": "\nHomeसांगलीअण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वह्या वाटप; देवदान बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम\nअण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वह्या वाटप; देवदान बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम\nसांगली: देवदान बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करणेत आली. युवासेना जिल्हाप्रमुख सचिन कांबळे व कुपवाड शहर संघर्ष समितीचे संचालक परवेज मुलाणी यांचे हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करणेत आला. यावेळी मान्यवरांचे हस्ते शालेय विद्याथ्र्यांना वाह्यांचे वाटप करणेत आले. कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे सेक्रेटरी प्रा. अजिंक्य मोहिते यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय आदर्श शिक्षक अनिल मोहिते यांनी केले. तसेच यावेळी सचिन कांबळे व परवेज मुलाणी यांनी मनोगत व्यक्त केले.\nयावेळी युवासेना तालुका समन्वयक पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष संदीप पाटोळे, युवासेना उप तालुका प्रमुख प्रमोद कदम, प्रमोद आवळे आदी उपस्थित होते.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\nमनसेकडून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/nagpur-corona-positive-patient-update/", "date_download": "2022-10-07T23:03:21Z", "digest": "sha1:EDGVYYHXLSKXTCFAPDF6Q4M5YCSG5PWZ", "length": 10030, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 500च्या खाली", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nकोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 500च्या खाली\nकोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 500च्या खाली\nनागपूर | गेल्या वर्षीपासून कोरोनाने संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर पहिल्या लाटेपासूनच कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती.\nदरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नागपूरमधील नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात नागपूरमध्ये एकूण 2 हजार 003 जणांनी कोरोनावर मात केली आहे.\nनागपूरमध्ये आज दिवसभरात अवघ्या 482 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 28 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. आतापर्यंत नागपूरमध्ये एकूण 4 लाख 71 हजार 541 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आतापर्यंत 4 लाख 50 हजार 360 जण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. एकेकाळी कोरोनाचं हाॅटस्पाॅट बनलेल्या नागपूरमधुन आता दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.\nनागपूरमध्ये आतापर्यंत 8 हजार 797 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जूनपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम हळूहळू महाराष्ट्रातील विविध भागांमधून पाहायला मिळत आहे. विविध भागांमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“मोदी सरकारने भारतीयांना पीएम केअर्स फंडाचा हिशोब द्यावा”\nकोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्गाचा धोका नाही; एम्सचे संचालक म्हणतात…\nपोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे भररस्त्यात फाडले कपडे आणि नंतर घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार\nकिंग कोहलीचा ‘हा’ खास लूक सोशल मीडियावर व्हायरल\nमहाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला उकाड्यापासून दिलासा; संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पावसाला सुरुवात\n“मोदी सरकारने भारतीयांना पीएम केअर्स फंडाचा हिशोब द्यावा”\n‘…तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देईल- संभाजीराजे भोसले\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://crazymarathi.com/2022/08/15/vahini-barobar-sundar-dance/", "date_download": "2022-10-07T22:33:53Z", "digest": "sha1:ZLUS6KVPL6V3GSTE5KH27TE6G5STQMZ5", "length": 7649, "nlines": 57, "source_domain": "crazymarathi.com", "title": "दिराने केला वहिनी बरोबर सुंदर डान्स… - Crazy Marathi", "raw_content": "\nदिराने केला वहिनी बरोबर सुंदर डान्स…\nकसे आहात मजेत असणार आम्हाला विश्वास आहे….तुम्हा सर्वांना माहित आहे कि डान्स हा सर्वांचा आवडीचा विषय आहे. कारण डान्स करताना माणूस खूप आनंदित होऊन आपला आनंद व्यक्त करीत असतो. मग तो डान्स लग्नात केलेला असो व इतर कार्यक्रमात केलेला असो. माणूस आनंदित होऊन डान्स करत असतो. डान्स चे वेग वेगळे प्रकार देखील बघायला मिळतात.\nकोणी जोडीने डान्स करत असते तरी कोणी एकट्याने डान्स करत असते. तर कोणी ग्रुप करून डान्स करत असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या परीने डान्स करून कार्यक्रमाचा आनंद घेत असतो. लग्न कार्यात डिजे किंवा बँड च्या गाण्यावर व्यक्ती डान्स करत असते. डान्स करताना माणूस सर्व विचार आणि दुःख विसरून आनंदित होऊन मज्जा घेत असतो.\nजास्त करून भारत देशात लग्न कार्यात आणि हळदीच्या दिवशी डान्स केला जातो. डीजे तालावर माणूस बेभान होऊन डान्स करत असतो. हळदीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला वाटत असते कि ती हळदीची रात्र संपूच नये आणि रात्र भर नाचतच राहावे. दुस्र्या दिवशी लग्नाच्या वरातीत देखील लोक तुफान डान्स करीत असतात. खरंच तो प्रसंग खूप आनंदित असतो. सर्व लोक खूप खुश असतात.\nतसेच कधी कधी डान्स करण्यासाठी कोणत्या कार्यक्रमाची गरज देखील नसते. व्यक्तीचे मन झाले कि व्यक्ती डान्स करत असते. मग तो डान्स घरात असतो किंवा निसर्गाच्या सानिध्यात असतो. तसेच काही व्यक्ती आपली नाचण्याची कला दाखवण्यासाठी डान्स करत असते आणि त्याचे छायाचित्रण करून आपल्या पुढे मांडत असतात.\nसदर विडिओ हा देखील डान्सचा आहे, तुम्हाला विडिओ बघून दिसून येईल कि डान्स करण्यासाठी कोणत्या वयाची किंवा कोणत्या कार्यक्रमाची गरज नसते. डान्स करतांना चेहऱ्यावर किती आनंद असतो तो हा विडिओ बघून तुम्हाला दिसून येईल. हा विडिओ बघितल्यावर तुम्हाला देखील तुम्ही केलेल्या डान्सची आठवण होईल आणि पुन्हा तुम्हाला डान्स करूशी वाटेल, मग बघता काय सुरु होऊन जा….\nसदर विडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेयर करा, कारण विडिओ टाकण्यामागचे एकच उद्देश आहे डान्स करणारी व्यक्तीचा डान्स प्रसिद्ध होवो आणि त्या व्यक्तीला प्रसिद्धी प्राप्त होवो, व्हिडिओ टाकण्यात काही चूक झाली असेल तर माफी असावी, चला तर मग बघूया डान्सचा विडिओ –\nवहिनी आणि दिराने केला नादखुळा डान्स..\nनवरा रात्री रोमॅं टिक होऊन बायको जवळ गेला…\nसुनबाई बाळाला दूध पाजत असते…\nकॉलेजच्या मुलींनी केला राडा…\nसुहा’गरात्रीच्या दिवशी लाईट जाते…\nलग्नात बायकांनी केला झकास डान्स…\nसाली बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…\nलग्नात वहिनीनीं केला भारी डान्स…\nसुहा’गरात्री बायकोला जोराची उचकी लागते….\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा वट पिंकी एका बस मध्ये चढली…\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा’वट बाई मेडिकल वर गेली…\nमुलीने सासरी जाताना सर्वांना रडवले\nटकला टी शर्ट घालून आला…\nनवरी ताईचा विडिओ बघून रडू येईल…\nबंड्याच्या बेडरूम मधून बायकोचा आवाज आला…\nलग्नात ताईने केला खुपच सुंदर डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nताईने केला खुपच सुंदर डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/rakesh-jhunjhunwala-golden-investment-tips-by-big-bull-of-stock-market-to-huge-some-money/articleshow/93588310.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article13", "date_download": "2022-10-07T21:17:12Z", "digest": "sha1:VCN5MN4Z4YQWGO5SWWVBU4NJPF2HKEDB", "length": 16243, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nतुम्ही होऊ शकता पुढचे राकेश झुनझुनवाला, हे आहेत गोल्डन टिप्स\nRakesh Jhunjhunwala Investment Tips: राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातून करोडोंची कमाई केली आहे. त्यांनी अनेकदा आपल्या फॉलोअर्सना टिप्सही दिल्या आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही देखील शेअर बाजाराचे पुढील 'बिग बुल' बनू शकता.\nराकेश झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्ट २०२२ रोजी निधन झाले.\nआज भारतातील लाखो लोक राकेश झुनझुनवाला यांच्या टिप्सने कोट्यवधींची कमाई करत आहेत.\nशेअर बाजारात मोठे चमत्कार घडू शकतात, असे आश्वासन त्यांनी लोकांना दिला होता.\nमुंबई : छोट्या गुंतवणुकीतून मोठा निधी निर्माण होतो. परंतु, योग्य रणनीती आणि शेअर बाजारात पैसे गुंतवल्यासच परतावा मिळतो. देशातील दिग्गज गुंतवणूकदार आणि बाजारातील 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांनी गेल्या दोन दशकांत पैशातून पैसा कमावला आहे. त्यांना भारताचे वॉरेन बफे मानले जाते.\nराकेश झुनझुनवाला यांनी बाजारातून करोडोंची कमाई केली. त्यांनी अनेकदा त्याच्या फॉलोअर्सना टिप्सही दिल्या, ज्याचा अवलंब करून तुम्हीही शेअर बाजारातून कमाई करू शकता. आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया, ज्याद्वारे तुम्ही छोटी गुंतवणूक करून श्रीमंत होऊ शकता.\nवाचा - फक्त दीड वर्षात १ लाखाचे झाले ५० लाख, गुंतवणूकदार कसे झाले मालामाल जाणून घ्या...\nतुमच्या गुंतवणुकीला वेळ द्या\nराकेश झुनझुनवाला यांचा दृष्टीकोन नेहमीच दीर्घकालीन गुंतवणूकीचा राहिला आहे. ते अनेकदा सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा सल्ला द्यायचे. अल्पावधीत नफा मिळवण्याऐवजी गुंतवणुकीला अनेक पटींनी वाढ करण्यासाठी वेळ दिला पाहिजे असे त्यांचे मत आहे. झुनझुनवाला यांच्या म्हणण्यानुसार बाजारात पैसे परिपक्व होण्यासाठी वेळ द्या, तुम्हाला थोडी वाट पहावी लागेल पण परतावा नक्की मिळेल.\nवाचा - बाजारात उलथापालथ, पण झुनझुनवाला एकदम ओक्केमध्ये; जाणून घ्या 'बिग बुल'ची स्ट्रॅटर्जी\nकिंमत नाही कंपनीचे मूल्य पाहा\nराकेश झुनझुनवाला यांचे म्हणणे की कंपनीच्या शेअरची किंमत तुम्ही त्यात गुंतवणूक करावी की नाही हे ठरवत नाही. त्याऐवजी कंपनीचे मूल्य अधिक महत्त्वाचे आहे. अनेकदा लोक जास्त किंमतीचे शेअर्स घेण्यास प्राधान्य देतात. पण, गेल्या १ किंवा पाच वर्षांत कंपनीची कामगिरी कशी आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. कंपनीचा दृष्टीकोन चांगला असेल तर शेअर बाजारातील चढ-उतार असतानाही ती तुम्हाला चांगला परतावा मिळवून देईल.\nदुसऱ्यांना पाहून पैसे खर्च करू नका\nशेअर बाजारात गुंतवणूक करणे नेहमीच बँकांइतके सुरक्षित नसते. जर येथे मोठा परतावा असेल तर धोका देखील आहे. म्हणूनच कंपनीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच पैसे गुंतवणे महत्त्वाचे आहे. एखाद्याने शेअरमध्ये पैसे गुंतवू नये कारण इतर लोक त्यात पैसे गुंतवत आहेत.\nरोख अधिशेष देखील पहा\nजर कंपनी शेअर बाजारात चांगली कामगिरी करत असेल तर ती तुम्हाला चांगला परतावा देईलच असे नाही. म्हणूनच गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची पार्श्वभूमी तपासणे आणि कंपनीने किती लाभांश दिला आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. शेअर बाजारात लाभांशाला खूप महत्त्व आहे. जर कंपनी दीर्घ काळासाठी नियमितपणे लाभांश देत असेल तर याचा अर्थ असा की तिच्याकडे रोखीची कमतरता नाही. रोख अधिशेष असलेल्या कंपन्या अनेकदा चांगली कामगिरी करतात.\nवाचा - राकेश झुनझुनवालांची 'ती' एक इच्छा शेवटपर्यंत अपूर्णच राहिली\nएकाच वेळी सर्व पैसे गुंतवू नका\nतुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी चांगली रक्कम असू शकते. परंतु तुम्ही सर्व पैसे एकाच वेळी गुंतवले पाहिजेत असे नाही. नफा मिळवण्याची इच्छा चांगली आहे, परंतु नियमानुसार केवळ एक छोटी गुंतवणूक चांगल्या परताव्याची हमी देते. कोणत्याही एका शेअरमध्ये पैसे गुंतवताना तुमच्या गुंतवणुकीची रक्कम भागांमध्ये विभागून घ्या आणि वेळोवेळी खरेदी करा. जर स्टॉक कमी झाला तर खरेदी सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खरेदीची सरासरी कमी होईल.\nकंपन्यांचे कर्ज देखील पहा\nशेअर बाजारात कंपन्यांवर किती कर्ज आहे यावर लक्ष ठेवून राहिले पाहिजेत. कर्ज कमी असेल तर कंपन्यांवर रोखीचा दबाव राहणार नाही. पण, कर्ज जास्त असल्यास कंपनीचे मूल्यांकन कधीही चढउतार होऊ शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीच्या कर्जाचा आढावा घ्या.\nमहत्वाचे लेखगृहकर्जाचे व्याजदर वाढले; होम लोन हस्तांतरणाची हीच योग्य वेळ, जाणून घ्या कसा घ्यावा फायदा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसोलापूर उद्धव काकांचा दसरा मेळावा पाहिला का, पुतण्या अमित ठाकरेंचं 'स्मार्ट' उत्तर\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nLive Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी\n शिंदे गट आणि शिवसैनिक आमने सामने, पोलिसांनीच काढला तोडगा\nअर्थवृत्त डिजिटल रुपया म्हणजे नेमकं काय, क्रिप्टोपेक्षा कसा आहे वेगळा जाणून घ्या कसे होतील व्यवहार\nक्रिकेट न्यूज थायलंडकडून पराभव होणाऱ्या पाकिस्तानकडून टीम इंडियाचा पराभव; ऋचा घोषची वादळी फलंदाजी पण...\nमटा ओरिजनल मुंढेंच्या धाडसत्राने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, रात्री डॉक्टर नसल्यास थेट घरचा आहेर\nऔरंगाबाद राहुल गांधींना लग्न करायला सांगा,नंतर मुलगी नाही भेटणार; औरंगाबादच्या तरुणाचा थेट बाळासाहेब थोरातांना फोन\nअर्थवृत्त सेबीकडून BSE ला मिळाली सोशल स्टॉक एक्सचेंजची मिळाली परवानगी, पाहा आहे तरी काय\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nइलेक्ट्रॉनिक्स 8GB रॅम आणि 10,090 mAh बॅटरी पावर असणाऱ्या या Samsung Tabs खरेदी करा आणि मिळवा ₹18000 इतका जबरदस्त डिस्काउंट\nहेल्थ पुरुषहो सावधान, आधी लठ्ठपणा मग डायबिटीज आणि नंतर येते नपुंसकता, ताबडतोब करा हे उपाय\nआर्थिक राशीभविष्य आर्थिक राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२२ : जाणून घ्या उद्याचा दिवस कोणासाठी ठरेल धनप्राप्तीचा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/dad-tickets-for-india-pak-match-sold-out-in-5-minutes-a-big-step-taken-by-the-organizers/", "date_download": "2022-10-07T23:30:46Z", "digest": "sha1:NPVX67KQUFL77FAARAVDRVZGBZQYOEDK", "length": 4796, "nlines": 38, "source_domain": "mahaupdate.in", "title": "बाबो..! 5 मिनिटांत विकली गेली भारत-पाक सामन्याची तिकिटे, आयोजकांनी उचलले मोठे पाऊल - Maha Update", "raw_content": "\n 5 मिनिटांत विकली गेली भारत-पाक सामन्याची तिकिटे, आयोजकांनी उचलले मोठे पाऊल\n 5 मिनिटांत विकली गेली भारत-पाक सामन्याची तिकिटे, आयोजकांनी उचलले मोठे पाऊल\nनवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा ब्लॉकबस्टर चित्रपटापेक्षा कमी नाही. जेव्हा-जेव्हा हे दोन संघ भिडले, तेव्हा चाहत्यांना मैदानावर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. T20 विश्वचषक 2022 या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे जिथे भारत-पाकिस्तान गट टप्प्यातील सामन्यात भिडतील.\nभारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सामना होणार आहे, त्याबाबतची मोठी बातमी समोर आली आहे. सामन्यासाठी तिकिटे काढण्यात आली आणि अवघ्या ५ मिनिटांत सर्व तिकिटे विकली गेली. सर्व तिकिटे विकली गेली आहेत पण जास्तीत जास्त चाहत्यांना हा सामना पाहता यावा यासाठी आयोजकांनी अनोखे पाऊल उचलले आहे.\nतिकिटे संपल्याने, आयोजकांना आता बसण्याची जागा व्यतिरिक्त मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर फक्त स्टँडिंग रूम-तिकीटे विकणे भाग पडले आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर केवळ स्टँडिंग-रूमची तिकिटे देखील उपलब्ध आहेत जी क्वचित प्रसंगी विकली जातात.\nभारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची मागणी पाहता आयोजकांना येथील तिकीटांची विक्री करावी लागली. या भागात एकूण 4,000 तिकिटे आहेत जी आता विकली जात आहेत. याशिवाय मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या क्षमतेबद्दल बोलायचे झाले तर 90 हजार प्रेक्षक एकत्र सामने पाहण्याची व्यवस्था आहे.\nIND vs SA : T20 सामना आज गुवाहाटीत होणार नाही\nAsia Cup 2022 : भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल चाहते उत्सुक, तिकिटांची विक्री 5 लाखांवर पोहोचली\nPrize Money : T20 विश्वचषक, IPL की FIFA विश्वचषक…कोणाला मिळते सर्वाधिक बक्षीस रक्कम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://nmk.org.in/current-affairs-21-september-2020/", "date_download": "2022-10-07T21:51:36Z", "digest": "sha1:FXQC52DHH5DATCRJUWOXNKZEZ2DZKOES", "length": 5097, "nlines": 59, "source_domain": "nmk.org.in", "title": "चालू घडामोडी 21 सप्टेंबर 2020. - NMK.ORG.IN", "raw_content": "\nचालू घडामोडी 21 सप्टेंबर 2020.\nचालू घडामोडी 21 सप्टेंबर 2020.\nबिहारमध्ये ९ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच आणि ऑप्तिकल इंटरनेट सेवांच आज माननीय पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केले.\nराज्यसभेत काल गदारोळ झाला होता त्यामुळ आज ८ सदस्य निलंबित करुण सुधा सतत गदारोळ होत आसल्या मुळ कामकाज उद्या पर्यंत स्थगित करण्यात आले.\nकोरोनाचा धोका निर्माण होण्या आगोदरच उपाय योजना केल्याचे आरोग्य मंत्री लोकसभेत सांगतात .\nकोट्यवधी शेतकरी यांना सक्षम करणार्या आणि कृषि क्षेत्रात मोठ परिवर्तन घडवनार्या विधेयक सवसदेत मजूर झाले, हा एक एतिहासिक क्षण आहे आसे माननीय पंतप्रधान मोदी म्हणाले.\nराज्यसभेत काल जो गदारोळ झाला तो बरोबर नसल्याचे राजनाथसिंह म्हणाले.\nभिवंडित आज तिन मजलि इमारत कोसळली त्यामध्ये दुर्दांने १० जन मृत्युमुखी पडले. पालकमंत्री यांनी मृतकांच्या परिवाराला मदत जाहिर केलि. तसेच बचाव कार्य सुरु आहे.\nदेशामध्ये कोरोना पासून रुग्ण बरे होण्याचा दर ८०.१२% झाला आहे आणि राज्यात २६४०८ रुग्ण उपचारा नंतर बरे झाले.\nआज प्रवाशी मागणी वाढत आसल्याने आजपासून देशाल ४० रेल्वे गड्या सुरु होणार आहेत.\nकृषि मंत्री दादा भूसे याच्या हस्ते ‘विकल ते पिकेल योजना’ या राज्य सरकारच्या योजनेचे उद्घाटन झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=5296", "date_download": "2022-10-07T22:49:43Z", "digest": "sha1:EZGJZDTQYLM6U4PY7LD7UTYD7E2FN2A7", "length": 7170, "nlines": 47, "source_domain": "gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta, /* */", "raw_content": "शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार: पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत देलोडा गावानजीकच्या जंगलातील घटना रक्तदान शिबिराद्वारे महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या जिल्हाध्यक्षपदाची वर्षपूर्ती साजरी आरमोरीजवळच्या गाढवी नदीच्या पुलावर अपघात: गडचिरोलीचे आ.डॉ.देवराव होळी थोडक्यात बचावले चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची हत्या: कोवानटोला-जपतलाई येथील घटना एटापल्ली तालुक्यातील संतापजनक घटना: ५० वर्षीय आदिवासी महिलेवर ट्रकचालकाने केला बलात्कार, आरोपीस अटक गडचिरोली: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकणार- शिवसेनेच्या मेळाव्यात जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांचे प्रतिपादन\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार..\nरक्तदान शिबिराद्वारे महेंद्र ब्राम्..\nआ.डॉ.देवराव होळी अपघातात थोडक्यात ब..\nआदिवासी महिलेवर ट्रक चालकाचा बलात्क..\nजिल्हा परिष्द,नगर परिषद निवडणुकीत श..\nनक्षलग्रस्त भागातील पोलिसांना दीडपट..\nट्रकच्या धडकेत महिला ठार: संतप्त ना..\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिर..\nआमचे मत - तुमचे मत\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nगडचिरोली पोलिस दलास ‘सर्वोत्कृष्ठ’ पोलिस घटक’ म्हणून दोन पुरस्कार जाहीर\nगडचिरोली,ता.१७:पोलिस महासंचालकातर्फे गडचिरोली पोलिस दलास सर्वोत्कृष्ठ पोलिस घटक म्हणून ‘बेस्ट युनिट इन यूस ऑफ टेक्नॉलॉजी फॉर पोलिसिंग’ व ‘बेस्ट युनिट इन कॉम्युनिटी पोलिसिंग इनिशिएटीव्ह’ हे दोन पुरस्कार दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. गडचिरोली पोलिस दलास अशाप्रकारचे दोन ‘सर्वोत्कृष्ठ पोलिस घटक’ पुरस्कार जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nमहाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस घटकांची कार्यक्षमता, कामगिरी, निर्धारित कालावधीत उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्याचा तपास, त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या निकषानुसार गडचिरोली पोलिस दलाच्या जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीतील कामगिरीचे मूल्यांकन करुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.\nगडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल असून, जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, पोलिसांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. एकीकडे नक्षल्यांशी दोन हात करताना कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारीही पोलिसांना हाताळावी लागत असते. अशा परिस्थितीत पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी अतिशय खडतर सेवा बजावत असलेले सर्व अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/2392", "date_download": "2022-10-07T23:26:00Z", "digest": "sha1:T3QOMNDELLDY3TOYUL4MHWPIHVNDVLI3", "length": 13594, "nlines": 108, "source_domain": "bollyreport.org", "title": "वयाच्या ३२व्या वर्षी गायिका 'नेहा कक्कड' आहे या गंभीर आजाराने त्रस्त, स्वतःच सांगितली कहाणी ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News वयाच्या ३२व्या वर्षी गायिका ‘नेहा कक्कड’ आहे या गंभीर आजाराने त्रस्त, स्वतःच...\nवयाच्या ३२व्या वर्षी गायिका ‘नेहा कक्कड’ आहे या गंभीर आजाराने त्रस्त, स्वतःच सांगितली कहाणी \nबॉलिवुडची सध्याची आघाडीची नायिका या दिवसांत सिंगिग रियालिटी शो इंडियन आयडॉल १२ ची परीक्षक म्हणुन खुप चर्चेत आहे. या शो मध्ये तिने बऱ्याचदा तिच्य़ा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. असाच एक खुलासा तिने पुन्हा एकदा केला. यावेळी तिने तिला असलेल्या आजाराबद्दलची माहिती दिली.\nनेहा ने सांगितले कि तिला सध्या असा एक आजार झाला आहे ज्यामुळे ती सारखी डीस्टर्ब होत असते. नेहा ही बॉलिवुडची एक प्रसिद्ध गायिका आहे. तिने अनेक हिट गाणी बॉलिवुडला दिली आहेत. तसेच नेहाने ऑक्टोबरमध्ये तिच्याहुन ८ वर्षांनी लहान असलेला गायक रोहनप्रित सिंगसोबत लग्न केले. लग्नावेळी नेहाने जो लेहंगा घातलेला त्यामुळे ती सोशल मीडियावर खुप ट्रोल झालेली.\nनेहा कक्कडने सांगितले कि तिच्याकडे प्रेम, चांगला परिवार, करियर सर्व काही आहे पण तिला एं*ग्‍जा*इ*टी इश्‍यू मुळे खुप त्रास होतो. ही गोष्ट इंडीयन आयडॉलच्या सेटवर सांगताना नेहा खुप भावुक झालेली. ही गोष्ट नेहाने ज्या एपिसोडमध्ये सांगितली तो एपिसोड अजुन टेलिकास्ट झालेला नाही. तो वीकेंडला प्रदर्शित होइल.\nया शोमध्ये चंदीगढच्या एका स्पर्धकाने लुकाछुपीमधलं एक गाण गायलं त्यावेळी नेहा खुप भावुक झाली. ते गाणे ऐकुन नेहा रडायलाच लागली. त्यावेळी तिने सांगितले कि तिला सुद्धा एं*ग्‍जा*इ*टी इश्‍यू आहे. तिला थायरॉइडचा त्रास असुन तो तिच्या एं*ग्‍जा*इ*टी*ची सर्वात मोठी समस्या आहे. स्टेजवर जाण्यापुर्वी तिचे हातपाय का*पा*य*ला लागतात त्यामुळे काहीवेळेस तिचा आवाजसुद्धा बाहेर पडत नाही.\nकाही दिवसांपुर्वीच नेहाने गीतकार संतोष आनंद यांची आर्थिक मदत केली होती. जिंदगी की ना टूटे लड़ी प्यार कर ले घड़ी दो घड़ी.. यांसारख्या शानदार गाण्यांना संगीत देणारे गीतकार संतोष आनंद सध्या आर्थिक परिस्थितीशी झगडत आहेत. त्यांना इंडीयन आयडॉलच्या सेटवर बोलावले होते तेव्हा त्यांनी त्यांची कै*फि*य*त मांडत सांगितले कि त्यांच्याकडे सध्या काम नाही तसेच त्यांच्यावर खुप कर्जसुद्धा आहे. त्यांची कहाणी ऐकुन भावुक नेहाने ५ लाख रुपयांची मदत लगेच देऊ केली.\nनेहाबद्दल खुप कमी लोकांना ठाऊक आहे की ती ११ वीत असताना इंडीयन आयडॉलमध्ये स्पर्धक म्हणुन सहभागी झाली होती. मात्र त्या शोमध्ये ती जास्त पुढे जाऊ शकली नाही. तिला रिजेक्ट केले गेले होते. बॉलिवुडमध्ये स्वत:च्या हिंमतीवर जागा बनवणाऱ्या कलाकारांपैकी एक अशी नेहा सुद्धा आहे. नेहा ही मिडल क्लास कुटुंबातुन आली आहे. तिने खुप स्ट्रगल केले आणि सफल झाली.\nनेहाने वयाच्या चौथ्या वर्षापासुन गाणे शिकायला सुरुवात केली होती. तिने तिचा भाऊ टोनी आणि बहिण सोनुकडुन ट्रेनिंग घेतली आहे. नेहा तिच्या करियरच्या सुरुवातीला तिच्या भावंडांसोबत भजने गायची. पण तिला प्रसिद्धी युट्युबमुळे मिळाली्. नेहाने 2008 मध्ये नेहा द रॉक स्टार हा अल्बम रिलीज केला होता. तो अल्बम मित ब्रदर्सने कंपोज केला होता.\nवो एक पल, सेकंड हैंड ज*वा*नी, एसआरके एंथम, शै*ता*न, जादू की झप्पी, बोतल खोल, मनाली टेरेंस, ध*तिं*ग नाच, पार्टी शोज बिंदास, आओ राजा, सनी सनी, लंदन ठुमकदा. यामधली तिची गाणी सुपरहिट झाली. एकेकाळी जागराणात भजने गाणारी नेहा आज बॉलिवुडची टॉपची आणि महागडी फिमेल गायिका आहे. तिच्या फि बद्दल बोलायचे झाल्यास ती एका गाण्यासाठी १० ते १५ लाख रुपये चार्ज घेते.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleलाखात एक बुद्धिमान व्यक्ती या फोटोमध्ये लपलेला तिसरा खतरनाक प्राणी शोधून दाखवेल, फोटो Zoom करा प्राणी सापडेल \nNext articleकाजोल सोबत रोमॅंटिक सीन्स करताना शाहरुखने केले असे काही, ज्यामुळे हैराण झाली काजोल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/chalisgaon/news/anjali-and-swati-pawras-mathematical-activity-apparatus-won-the-first-prize-130300064.html", "date_download": "2022-10-07T21:56:30Z", "digest": "sha1:4BTFCNCLANFJKG4USYYKSX3SADU3NBQ5", "length": 4453, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अंजली व स्वाती पावरा यांच्या गणितीय क्रिया उपकरणास मिळाले प्रथम बक्षीस | Anjali and Swati Pawra's Mathematical Activity Apparatus won the first prize| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनिवड:अंजली व स्वाती पावरा यांच्या गणितीय क्रिया उपकरणास मिळाले प्रथम बक्षीस\nहातेड येथील स्वर्गीय नानासाहेब उत्तम पाटील माध्यमिक विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी अकुलखेडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश संपादन केले.माध्यमिक गटातून बारावीतील आरती ठाणसिंग पावरा व मीना सुरेश पावरा यांच्या “बहुउद्देशीय चूल’ या उपकरणास प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तसेच या उपकरणाची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.\nत्यांना माध्यमिक विभागाचे विज्ञान शिक्षक भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच हातेड बुद्रुक येथील अनुसूचित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील आठवीची अंजली कीर्तन पावरा व सातवीतील स्वाती कीर्तन पावरा यांच्या “गणितीय क्रिया’ या उपकरणास प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्राथमिक शिक्षक एन. डी. धनगर, जितेंद्र सोनवणे, गंगाराम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थी, मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचा पुरवठा अधिकारी देवेंद्र नेतकर यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सचिव मीनाक्षी सोनवणे, सागर सोनवणे यांच्या सत्कार करण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/sports/football/news/england-beat-denmark-2-1-in-euro-2020-semifinal-will-play-against-italy-in-the-final/articleshow/84226541.cms?utm_source=hyperlink&utm_medium=cricket-news-articleshow&utm_campaign=article-1", "date_download": "2022-10-07T22:30:00Z", "digest": "sha1:2RRK346YR4XEKA6ZILZBOGUPQJ625BGO", "length": 11051, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nइंग्लंड युरो कप २०२०च्या फायनलमध्ये; डेन्मार्कचा २-१ने पराभव केला, १९६६ नंतर प्रथमच...\nEuro 2020 डेन्मार्कचा पराभव करून इंग्लंडने प्रथमच युरो कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी रात्री झालेल्या लढतीत इंग्लंडने डेन्मार्कचा २-१ असा पराभव केला.\nलंडन: इंग्लंड युरो कप २०२०च्या फायनलमध्ये पोहोचला आहे. १९६६ च्या वर्ल्डकपनंतर इंग्लंडने प्रथमच एखाद्या स्पर्धेतील सेमीफायनलची लढत जिंकली आहे. कर्णधार हेरी केनच्या गोलमुळे इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे त्याच्या आधी केनने मारलेली पेनल्टी वाचवण्यात आली होती.\nवाचा- ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'त्या' हॉट फोटोवर पाकिस्तानी महिलेनं केली कमेंट; अन् मग...\nबुधवारी रात्री झालेल्या लढतीत इंग्लंडने डेन्मार्कचा २-१ असा पराभव केला. आता रविवारी अंतिम फेरीत जेतेपदासाठी इंग्लंडची लढत इटलीविरुद्ध होणार आहे. इटलीने सेमीफायनलमध्ये स्पेनचा पेनल्टी शूटआउटमध्ये ४-२ असा पराभव केला.\nवाचा- भारताविरुद्धच्या मालिकेआधी श्रीलंका क्रिकेटमध्ये राडा\nइंग्लंड संघाने १९६६च्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर प्रथमच एखाद्या सेमीफायनलमधील मॅच जिंकली आहे. इंग्लंडच्या हेरी केनने अतिरिक्त वेळेत केलेल्या गोलमुळे ते अंतिम फेरीत पोहोचले. युरो कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची इंग्लंडची ही पहिलीच वेळ आहे. सामन्यात पहिल्या हाफमध्ये ३०व्या मिनिटाला डेन्मार्कच्या मिक्केल डेम्सगार्डने २५ मीटर लांबून फ्री किक मारला आणि आघाडी मिळवून दिली. यामुळे इंग्लंडचे चाहते निराश झाले.\nवाचा- शुभमन गिलला इंग्लंड सोडण्याचे आदेश; बदली खेळाडूबाबत ही आहे अपडेट\nत्यानंतर ९ मिनिटांनी डेन्मार्कचा बचाव भेदत इंग्लंडने बरोबरी साधली. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. ९० मिनिटात दोन्ही संघांनी १-१ गोल केल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला.\nमहत्वाचे लेखख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'त्या' हॉट फोटोवर पाकिस्तानी महिलेनं केली कमेंट; अन् मग...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमुंबई शकील, छोटा राजनला माझी सुपारी दिली; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nमटा ओरिजनल मुंढेंच्या धाडसत्राने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, रात्री डॉक्टर नसल्यास थेट घरचा आहेर\nपुणे सरकार बदललं अन् रश्मी शुक्लांना क्लीनचिट मिळाली, मविआ नेत्यांना जी भीती होती तेच घडलं\nक्रिकेट न्यूज कमजोर पाकिस्तानने रोखला भारतीय संघाचा विजयरथ, आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला हरवलं\nसिंधुदुर्ग उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे राहणारा आमदार चौकशीच्या फेऱ्यात, कोकणातल्या नेत्याला एसीबीची नोटीस\nक्रिकेट न्यूज उभारायला गेले MS Dhoni चा मेणाचा पुतळा, पण धोनीची झाली अनहोनी, पाहा भन्नाट memes\nसोलापूर Breaking : भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआयची जीवे मारण्याची धमकी; क्राईम ब्रँचकडे तपास\n जे लॉटरीचं तिकीट कचऱ्यात टाकलं, त्यानेच बनवले या महिलेला करोडोंची मालकीण\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-07T23:28:14Z", "digest": "sha1:26F7MSJBD6TNSN3SSZJRNBZJC2BHG5TO", "length": 11719, "nlines": 87, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "राजस्थान मधील असे एक गाव जिथे म'हिलांना झो'पावे लागते दिरासोबत, कारण फक्त एवढे की... - Themaharashtrian", "raw_content": "\nराजस्थान मधील असे एक गाव जिथे म’हिलांना झो’पावे लागते दिरासोबत, कारण फक्त एवढे की…\nराजस्थान मधील असे एक गाव जिथे म’हिलांना झो’पावे लागते दिरासोबत, कारण फक्त एवढे की…\nदेश तेवढ्या संस्कृती आपण असे अनेकदा म्हणत असतो. वेगवेगळ्या देशातील विभिन्न अशा सांस्कृतिक पाहायला मिळत असतात. युरोप खंडात गेले तर तिकडे वेगळ्या संस्कृती असतात. आफ्रिका खंडामध्ये या संस्कृती अतिशय वेगळ्या असतात. तर आशिया खंडामध्ये या संस्कृती वेगवेगळ्या प्रकारच्या पाहायला मिळतात.\nधर्म, समाज, संस्था त्याच्या प’रंपरा या वेगवेगळ्या असतात. भारतामध्ये तर अनेक जा’ती ध’र्माचे लोक एकत्र राहताना आपण पाहतो. भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, बौद्ध यासोबतच बहुसंख्य जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. असे असले तरी सर्वांची खानपान संस्कृती ही वेगवेगळी असते. रोटी-बेटी व्यवहार देखील वेगवेगळे असतात.\nकाही धर्मांमध्ये रितीरिवाज हे वेगवेगळे असतात. मात्र, असे असले तरी काही संस्कृती या विचित्र पद्धतीच्या पाहायला असल्याचे मिळत आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी मनाला न पटणाऱ्या संस्कृती आपण पाहिल्या असतील. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात इतका भ’यंकर प्रकार सध्या घ’डताना दिसत आहे की, सासऱ्यासोबत सुनेचे सं’बं’ध असल्याचे देखील व्हिडिओ व्हा’यर’ल होत आहे.\nयामुळे आपल्या स’माजावर वा’ईट प’रिणाम प’डत आहेत. मात्र, असे असले तरी खऱ्याखुऱ्या आयुष्यात देखील असे सं’बं’ध अनेकदा पाहायला मिळत असतात. असे असले तरी हे सं’बंध जास्त काळ टिकत नाहीत. याचे कारण म्हणजे ते सं’बंध अ’नै’तिक असतात, म्हणून ते टिकत नसतात. यासाठी आपल्याला रितीरिवाजाप्रमाणे वागले तरच आपण आनंददायी राहू शकतो.\nभारतामध्ये असे काही समाज आहेत की, त्यांच्या परंपरा या अतिशय भिन्न असतात. भावाने ब’हि’णी सोब’त लग्न करणे किंवा सासर्‍यांनी सुना सोबत सं’बंध ठेवणे, असे अनेकदा आपण ऐकले असेल. आम्ही आपल्याला एक अशी घ’टना सांगणार आहोत की, या गावांमध्ये म’हिलेला तिच्या दिरासोबत सं’बं’ध ठेवावे लागतात.\nही अतिशय जुनी प’रंपरा आहे, असे येथील लोक मानतात. राजस्थानातील एका गावांमध्ये असाच एक अ’घोरी प्रकार सध्या च’र्चेत आलेला आहे. राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील मन खेरा या गावांमध्ये अतिशय वा’ईट अशी एक प्रथा समोर आलेली आहे. या गावांमध्ये लग्न झालेल्या म’हिलांना त्यांच्या दिरा सोबत सं’बंध ठेवावे लागतात.\nत्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले, तर पतीच्या भावासोबत देखील म’हिलांना सं’बंध ठेवावे लागतात. याचे कारण म्हणजे ही प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे, असे त्यांच्या पूर्वजांचा समज आहे. त्यामुळे अनेक म’हिलांसो’बत असे प्रकार घ’डत असतात. तसेच जमिनीचा एखादा हिस्सा या महिलेच्या नावावर करण्यात येतो, असे देखील सांगण्यात येत आहे. सध्या याबाबत त्या पोस्ट सो’शल मी’डियावर मोठ्या प्रमाणात व्हा’यरल होत आहेत.\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\nपती ‘नपुं’सक’ असून देखील पत्नी झाली ‘प्रे’ग्नं’न्ट’, खरे सत्य समोर येताच पतीचेही उडाले होश…\nह’निमू’नच्या पहिल्याच रात्री पत्नीला समजले की पती आहे स’मलैं’गि;क, पहा तरीही पतीने पत्नीसोबत केले…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://usu.kz/langs/mr/remote/accounting_of_employees.php", "date_download": "2022-10-07T21:25:20Z", "digest": "sha1:QYSLW3XIPUQJPBKMVAXMZKWE5AAWCEA4", "length": 75447, "nlines": 584, "source_domain": "usu.kz", "title": " 🥇 कर्मचार्‍यांचा हिशेब", "raw_content": "\nआपण आपले सर्व प्रश्न यावर पाठवू शकता: info@usu.kz\nआपण कार्यक्रम खरेदी करू इच्छिता\nरेटिंग: 4.9. संघटनांची संख्या: 724\nकार्यक्रमांचा गट: USU software\nकॉपीराइट आमच्या प्रोग्राममध्ये वापरल्या जाणार्‍या व्यवसाय ऑटोमेशनच्या अद्वितीय पद्धतींचे संरक्षण करते.\nआम्ही एक सत्यापित सॉफ्टवेअर प्रकाशक आहोत. आमचे प्रोग्राम्स आणि डेमो-आवृत्त्या चालवताना हे ऑपरेटिंग सिस्टममध्ये प्रदर्शित केले जाते.\nआम्ही लहान व्यवसायांपासून ते मोठ्या व्यवसायांपर्यंत जगभरातील संस्थांसोबत काम करतो. आमची कंपनी कंपनीच्या आंतरराष्ट्रीय रजिस्टरमध्ये समाविष्ट आहे आणि तिच्याकडे इलेक्ट्रॉनिक ट्रस्ट मार्क आहे.\n आपण आपल्या देशात किंवा शहरात आमचे प्रतिनिधी होऊ शकता\nआम्ही आमच्या देशातील आपल्या वस्तू किंवा सेवांचे प्रतिनिधित्व करण्यास देखील तयार आहोत.\nहा व्हिडिओ आपल्या स्वतःच्या भाषेतील उपशीर्षकांसह पाहिला जाऊ शकतो.\nडेमो आवृत्ती डाउनलोड करा\nप्रोग्राम सुरू करताना आपण भाषा निवडू शकता.\nपरवडणाऱ्या किमतीत प्रीमियम-क्लास प्रोग्राम\n1. कॉन्फिगरेशनची तुलना करा\nप्रोग्रामच्या कॉन्फिगरेशनची तुलना करा\n2. एक चलन निवडा\n3. कार्यक्रमाची किंमत मोजा\nआपण फक्त एकदाच पैसे द्या. मासिक पैसे नाहीत\nविनामूल्य तांत्रिक सहाय्य तास\nतांत्रिक सहाय्यासाठी अतिरिक्त तास\n4. आवश्यक असल्यास, व्हर्च्युअल सर्व्हर भाड्याने ऑर्डर करा\nतुमच्या सर्व कर्मचार्‍यांना एकाच डेटाबेसमध्ये काम करण्यासाठी, तुम्हाला कॉम्प्युटर (वायर्ड किंवा वाय-फाय) दरम्यान स्थानिक नेटवर्कची आवश्यकता आहे. परंतु आपण क्लाउडमध्ये प्रोग्राम स्थापित करण्याची ऑर्डर देखील देऊ शकता जर:\nतुमच्याकडे एकापेक्षा जास्त वापरकर्ते आहेत, परंतु संगणकांमध्ये कोणतेही स्थानिक नेटवर्क नाही.\nलोकल एरिया नेटवर्क नाही\nकाही कर्मचाऱ्यांना घरून काम करणे आवश्यक आहे.\nतुमच्या अनेक शाखा आहेत.\nसुट्टीत असतानाही तुम्हाला तुमच्या व्यवसायावर नियंत्रण ठेवायचे आहे.\nदिवसाच्या कोणत्याही वेळी कार्यक्रमात काम करणे आवश्यक आहे.\nतुम्हाला मोठ्या खर्चाशिवाय शक्तिशाली सर्व्हर हवा आहे.\nव्हर्च्युअल सर्व्हरची किंमत मोजा\nतुम्ही कार्यक्रमासाठी फक्त एकदाच पैसे द्या. आणि क्लाउडसाठी दरमहा पेमेंट केले जाते.\n5. करारावर स्वाक्षरी करा\nकरार पूर्ण करण्यासाठी संस्थेचे तपशील किंवा फक्त तुमचा पासपोर्ट पाठवा. करार ही तुमची हमी आहे की तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल. करार\nस्वाक्षरी केलेला करार आम्हाला स्कॅन प्रत किंवा छायाचित्र म्हणून पाठविला जाणे आवश्यक आहे. ज्यांना कागदी आवृत्ती आवश्यक आहे त्यांनाच आम्ही मूळ करार पाठवतो.\n6. कार्ड किंवा इतर पद्धतीने पैसे द्या\nतुमचे कार्ड सूचीमध्ये नसलेल्या चलनात असू शकते. तो एक समस्या नाही. तुम्ही कार्यक्रमाची किंमत यूएस डॉलरमध्ये मोजू शकता आणि सध्याच्या दराने तुमच्या मूळ चलनात पैसे देऊ शकता. कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी, तुमच्या बँकेची वेबसाइट किंवा मोबाइल अॅप्लिकेशन वापरा.\nPayPal द्वारे पैसे द्या\nPayPal द्वारे पैसे द्या\nआंतरराष्ट्रीय हस्तांतरण वेस्टर्न युनियन किंवा इतर कोणत्याही\nआमच्या संस्थेकडून ऑटोमेशन ही तुमच्या व्यवसायासाठी संपूर्ण गुंतवणूक आहे\nया किमती फक्त पहिल्या खरेदीसाठी वैध आहेत\nआम्ही केवळ प्रगत परदेशी तंत्रज्ञान वापरतो आणि आमच्या किमती प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत\nप्रोग्रामच्या कॉन्फिगरेशनची तुलना करा\nनिवडलेल्या प्रोग्रामची मुख्य कार्ये व्हिडिओ पहा\nसर्व व्हिडिओ तुमच्या स्वतःच्या भाषेत सबटायटल्ससह पाहिले जाऊ शकतात\nएकापेक्षा जास्त परवाने खरेदी करताना मल्टी-यूजर ऑपरेशन मोड व्हिडिओ पहा\nविविध भाषांसाठी समर्थन व्हिडिओ पहा\nहार्डवेअरचे समर्थन: बारकोड स्कॅनर, पावती प्रिंटर, लेबल प्रिंटर व्हिडिओ पहा\nमेलिंगच्या आधुनिक पद्धती वापरणे: ईमेल, एसएमएस, व्हायबर, व्हॉइस स्वयंचलित डायलिंग व्हिडिओ पहा\nमायक्रोसॉफ्ट वर्ड फॉरमॅटमध्ये कागदपत्रे स्वयंचलितपणे भरणे कॉन्फिगर करण्याची क्षमता व्हिडिओ पहा\nटोस्ट सूचना सानुकूलित करण्याची शक्यता व्हिडिओ पहा\nप्रोग्राम डिझाइन निवडत आहे व्हिडिओ पहा\nसारण्यांमध्ये डेटा आयात सानुकूलित करण्याची क्षमता व्हिडिओ पहा\nवर्तमान पंक्तीची कॉपी करणे व्हिडिओ पहा\nटेबलमधील डेटा फिल्टर करणे व्हिडिओ पहा\nपंक्तींच्या गटबद्ध मोडसाठी समर्थन व्हिडिओ पहा\nमाहितीच्या अधिक व्हिज्युअल सादरीकरणासाठी प्रतिमा नियुक्त करणे व्हिडिओ पहा\nअधिक दृश्यमानतेसाठी संवर्धित वास्तव व्हिडिओ पहा\nप्रत्येक वापरकर्त्याद्वारे स्वतःसाठी काही स्तंभ तात्पुरते लपवून ठेवणे व्हिडिओ पहा\nविशिष्ट भूमिका असलेल्या सर्व वापरकर्त्यांसाठी विशिष्ट स्तंभ किंवा सारण्या कायमचे लपवत आहे व्हिडिओ पहा\nमाहिती जोडणे, संपादित करणे आणि हटवणे सक्षम होण्यासाठी भूमिकांसाठी अधिकार सेट करणे व्हिडिओ पहा\nशोधण्यासाठी फील्ड निवडत आहे व्हिडिओ पहा\nअहवाल आणि क्रियांची उपलब्धता वेगवेगळ्या भूमिकांसाठी कॉन्फिगर करणे व्हिडिओ पहा\nसारण्या किंवा अहवालांमधून विविध स्वरूपांमध्ये डेटा निर्यात करा व्हिडिओ पहा\nडेटा कलेक्शन टर्मिनल वापरण्याची शक्यता व्हिडिओ पहा\nतुमचा डेटाबेस व्यावसायिक बॅकअप सानुकूलित करण्याची शक्यता व्हिडिओ पहा\nवापरकर्त्याच्या क्रियांचे ऑडिट व्हिडिओ पहा\nव्हर्च्युअल सर्व्हरचे भाडे. किंमत\nतुम्हाला क्लाउड सर्व्हर कधी लागेल\nव्हर्च्युअल सर्व्हरचे भाडे युनिव्हर्सल अकाउंटिंग सिस्टमच्या खरेदीदारांसाठी अतिरिक्त पर्याय म्हणून आणि स्वतंत्र सेवा म्हणून दोन्ही उपलब्ध आहे. किंमत बदलत नाही. तुम्ही क्लाउड सर्व्हर भाड्याने ऑर्डर करू शकता जर:\nतुमच्याकडे एकापेक्षा जास्त वापरकर्ते आहेत, परंतु संगणकांमध्ये कोणतेही स्थानिक नेटवर्क नाही.\nकाही कर्मचाऱ्यांना घरून काम करणे आवश्यक आहे.\nतुमच्या अनेक शाखा आहेत.\nसुट्टीत असतानाही तुम्हाला तुमच्या व्यवसायावर नियंत्रण ठेवायचे आहे.\nदिवसाच्या कोणत्याही वेळी कार्यक्रमात काम करणे आवश्यक आहे.\nतुम्हाला मोठ्या खर्चाशिवाय शक्तिशाली सर्व्हर हवा आहे.\nआपण हार्डवेअर जाणकार असल्यास\nतुम्ही हार्डवेअर जाणकार असल्यास, तुम्ही हार्डवेअरसाठी आवश्यक वैशिष्ट्ये निवडू शकता. निर्दिष्ट कॉन्फिगरेशनचा व्हर्च्युअल सर्व्हर भाड्याने देण्यासाठी तुम्हाला ताबडतोब किंमत मोजली जाईल.\nजर तुम्हाला हार्डवेअरबद्दल काही माहिती नसेल\nआपण तांत्रिकदृष्ट्या जाणकार नसल्यास, फक्त खाली:\nपरिच्छेद क्रमांक 1 मध्ये, तुमच्या क्लाउड सर्व्हरमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या दर्शवा.\nपुढे तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे ते ठरवा:\nसर्वात स्वस्त क्लाउड सर्व्हर भाड्याने घेणे अधिक महत्त्वाचे असल्यास, दुसरे काहीही बदलू नका. हे पृष्ठ खाली स्क्रोल करा, तेथे तुम्हाला क्लाउडमध्ये सर्व्हर भाड्याने देण्याची गणना केलेली किंमत दिसेल.\nजर तुमच्या संस्थेसाठी खर्च खूप परवडणारा असेल, तर तुम्ही कामगिरी सुधारू शकता. चरण # 4 मध्ये, सर्व्हर कार्यप्रदर्शन उच्च वर बदला.\nJavaScript अक्षम आहे, गणना करणे शक्य नाही, किंमत सूचीसाठी विकसकांशी संपर्क साधा\nव्हर्च्युअल सर्व्हरवर काम करणाऱ्या लोकांची संख्या निर्दिष्ट करा.\nऑपरेटिंग सिस्टीम जितकी नवीन असेल तितके अधिक शक्तिशाली हार्डवेअर त्यासाठी आवश्यक आहे.\n3. डेटा सेंटरचे स्थान\nवेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या क्षमतेचे आणि खर्चाचे सर्व्हर आहेत. आपल्यास अनुकूल असलेले एक निवडा.\nरशिया, सेंट पीटर्सबर्ग, सर्व्हर 1 रशिया, सेंट पीटर्सबर्ग, सर्व्हर 2 रशिया, मॉस्को, सर्व्हर १ रशिया, मॉस्को, सर्व्हर 2 रशिया, व्लादिवोस्तोक रशिया, नोवोसिबिर्स्क कझाकस्तान, अल्माटी, सर्व्हर १ कझाकस्तान, अल्माटी, सर्व्हर 2 बेलारूस, मिन्स्क\nकृपया उपकरणाची आवश्यक कामगिरी निवडा. तुमच्या आवडीनुसार, भिन्न प्रोसेसर आणि RAM वैशिष्ट्ये उपलब्ध असतील.\nबेस कामगिरी उच्च कार्यक्षमता\nव्हर्च्युअल सर्व्हरवर प्रोसेसर जितका अधिक शक्तिशाली असेल तितक्या वेगाने प्रोग्राम ऑपरेशन्स करतील.\nप्रोसेसर कोरची संख्या: 1 pcs\n6. यादृच्छिक प्रवेश मेमरी\nक्लाउडमध्ये सर्व्हरची जितकी जास्त RAM असेल तितके जास्त प्रोग्राम तुम्ही चालवू शकता. आणि अधिक वापरकर्ते आरामात काम करण्यास सक्षम असतील.\nयादृच्छिक प्रवेश मेमरी: 2 जीबी\nविलंब न करता क्लाउड सर्व्हरमध्ये काम करण्यासाठी, हाय-स्पीड एसएसडी डिस्क निवडणे चांगले. सॉफ्टवेअर हार्ड ड्राइव्हवर माहिती संग्रहित करते. डिस्कसह डेटाची देवाणघेवाण जितकी जलद होईल तितके वेगवान प्रोग्राम्स आणि ऑपरेटिंग सिस्टम स्वतः कार्य करतील.\nस्पीड डिस्क SSD नियमित डिस्क SAS\nअधिक माहिती संचयित करण्यात सक्षम होण्यासाठी तुम्ही समर्पित सर्व्हरसाठी मोठ्या प्रमाणात डिस्क स्टोरेज निर्दिष्ट करू शकता.\nडिस्क क्षमता: 40 जीबी\n8. संप्रेषण चॅनेल रुंदी\nसंप्रेषण चॅनेल जितके विस्तीर्ण असेल तितक्या वेगाने क्लाउड सर्व्हरची प्रतिमा प्रदर्शित होईल. आपण क्लाउड सर्व्हरवर फायली हस्तांतरित केल्यास किंवा व्हर्च्युअल सर्व्हरवरून फायली डाउनलोड केल्यास, हे पॅरामीटर होस्टिंगसह माहिती एक्सचेंजच्या गतीवर परिणाम करेल.\nडेटा ट्रान्सफरचा दर: 10 Mbit/s\nव्हर्च्युअल सर्व्हर भाड्याची किंमत\nकृपया क्लाउड सर्व्हर भाड्याने देण्याची किंमत मोजणे तुमच्यासाठी अधिक सोयीचे असेल असे चलन निवडा. किंमत या चलनात मोजली जाईल आणि भविष्यात कोणत्याही चलनात पैसे देणे शक्य होईल. उदाहरणार्थ, ज्यामध्ये तुमच्याकडे बँक कार्ड आहे.\nक्लाउड सर्व्हर भाड्याने ऑर्डर करण्यासाठी, फक्त खालील मजकूर कॉपी करा. आणि आमच्याकडे पाठवा.\nआपण कार्यक्रम खरेदी करू इच्छिता\nआमच्या यूएसयू सॉफ्टवेअर सिस्टम प्रोग्रामने तयार केलेल्या आमच्या कर्मचार्‍यांच्या मदतीचा वापर न करता कर्मचार्‍यांसाठी लेखांकन केले जाणे आवश्यक आहे. कर्मचार्‍यांकडून लेखा काढण्यासाठी, आपण अकाउंटिंग डेव्हलपमेंटमध्ये, यूएसयू सॉफ्टवेअर अकाउंटिंग बेसच्या विद्यमान बहु-कार्यक्षमतेचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे ज्याच्या आमची चाचणी डेमो आवृत्ती मदत करते, जे त्याच्या क्षमतांनुसार एक विनामूल्य आणि सोपी प्रणाली आहे. प्रत्येक कर्मचार्‍याच्या अकाउंटिंगमध्ये, यूएसयू सॉफ्टवेअर अकाउंटिंग सिस्टम प्रोग्रामची अतिरिक्त कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात उपयुक्त आहे, जी आमची अग्रणी कर्मचारी ग्राहकांच्या विनंतीनुसार जोडण्यात मदत करतात. सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक कागदपत्रे समाविष्ट केल्यामुळे कार्य करण्याच्या प्रक्रियेच्या सक्रिय लेखा विकासात योगदान करण्यायोग्य स्वरुपात विविध प्रकारच्या शक्यतांचा वाटा आहे. कामाची गुणवत्ता आणि वर्कफ्लो तयार करण्याच्या गतीविषयी कर्मचार्‍यांचे रिमोट अकाउंटिंग संपूर्ण लेखा नियंत्रणासह केले जावे. दूरस्थ कर्मचार्‍याचा हिशेब ठेवण्यासाठी, सर्वात सोपा मार्ग म्हणजे विविध प्रकारच्या फंक्शन्समधून अर्ज करणे, विविध आवश्यक क्षमता जे हेतू म्हणून वापरल्या जाव्यात. दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या नोकरीच्या वर्णनाकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष केले आणि व्यवसाय कालावधीत विविध अनुचित कार्यक्रमांचा वापर केला. परंतु (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला स्थिती पाहता बर्‍याच उपक्रमांना सध्याच्या कर्मचार्‍यांच्या रोस्टरवर संपूर्ण हिशेब ठेवून रिमोटच्या कामावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. रिमोट अकाउंटिंग फॉरमॅटनुसार, कामाच्या दरम्यान, विविध प्रश्न उद्भवू शकतात, ज्यावर आपल्याला मदतीसाठी आमच्या कंपनीशी संपर्क साधण्याची आवश्यकता आहे, जिथे आमचे विशेषज्ञ वेळेवर सल्ला देऊ शकतात. दस्तऐवज तयार करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण सहाय्यक आणि देखरेखीसह एक मॉनिटरींग अकाउंटिंग सिस्टम सॉफ्टवेअरच्या विद्यमान मोबाइल आवृत्तीद्वारे मदत केली जाऊ शकते, जी त्वरीत संपूर्ण आवश्यक कार्य श्रेणी पूर्ण करते. कर्मचार्‍यांच्या त्यांच्या थेट नोकरीच्या जबाबदा to्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या दृष्टिकोनातून काम करण्याच्या क्षमतेत लक्षणीय घट झाली असल्याने जवळजवळ सर्व उद्योगांनी कर्मचार्‍यांचे रिमोट अकाउंटिंग आवश्यक होते. मागील वर्षाच्या घटनांमुळे कोणतीही कंपनी स्थिर स्थितीत राहिली नाही परंतु नुकसान झालेल्या अनेक उद्योगांची आर्थिक परिस्थिती ढासळली आणि विशेषकरुन ते दिवाळखोर झाले. यूएसयू सॉफ्टवेअर सिस्टम अकाउंटिंग प्रोग्राममध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे आणि विक्री बाजारातील मागणीत वाढ देखील झाली आहे, त्या संदर्भात विविध व्यवसायातील प्रमुखांच्या कार्यप्रणालीचे परिष्करण करण्यासाठी आमच्या कंपनीकडे वळले. हे सांगणे सुरक्षित आहे की आपण यूएसयू सॉफ्टवेअर अकाउंटिंग सिस्टम प्रोग्रामच्या स्वरूपात कार्यक्षमतेच्या दृष्टीने जास्तीत जास्त कार्यक्षमतेसह कोणत्याही प्रश्नांसाठी आणि कामाच्या लेखा प्रक्रियेसाठी आपल्या कंपनीला विश्वासार्ह आणि विश्वासू मित्राची ओळख करुन दिली आहे. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण आपल्या अधीनस्थ आणि रिमोट अकाउंटिंग करणार्‍या कर्मचार्‍यांवर वेळेवर आणि कार्यक्षमतेने नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहात. तात्पुरती पाळत ठेवणारा सेन्सर स्थापित करून ही यंत्रणा कार्यरत दिवसाच्या सुरूवातीपासूनच कामगार कर्तव्यांच्या कामगिरीचे स्वयंचलितपणे परीक्षण करते. प्राप्त माहिती त्वरीत कंपनीच्या व्यवस्थापनावर प्रक्रिया करण्यासाठी आणि पडताळणीसाठी, तसेच कर्मचार्‍यांना आणि लेखा विभागाला त्यानंतरच्या वेतन व अतिरिक्त देयकाच्या वापरासाठी हस्तांतरित केली. ग्राहकाच्या निवडीनुसार तयार केलेले लेखा अहवाल कोणत्याही ग्राफिकल स्वरुपात प्रदान केले जाऊ शकतात, ते चार्ट, आलेख, सारण्या, हिस्टोग्राम असू शकतात. नवीनतम परिस्थितीचा विचार करता आम्ही हे सांगू शकतो की या सॉफ्टवेअरची मागणी लक्षणीय वाढली आहे, ज्यायोगे त्याचे नियमित ग्राहक आहेत, यूएसयू सॉफ्टवेअर बेसला बरेच सकारात्मक पुनरावलोकने आणि सुप्रसिद्ध नाव प्राप्त झाले आहे. संचालकांसाठी कर्मचार्‍यांची रिमोट अकाउंटिंग नोंदणी हा एक महत्त्वाचा घटक आहे, जे त्यांच्या कामाच्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करणा attitude्या वृत्ती असलेल्या कर्मचार्‍यांना ओळखण्यास आणि त्या व्यक्तीला बदलू शकत नसल्यामुळे त्यांना निरोप घेण्यास सक्षम असतात. यूएसयू सॉफ्टवेअर बेसने, स्थापना केल्यापासून, दोषांची वस्तुस्थितीचा पुरावा, एक डिग्री किंवा दुसर्या प्रमाणात प्राप्त केल्याने आम्ही इतर सॉफ्टवेअरपेक्षा त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास सक्षम आहोत असे कोणतेही धनादेश पास केले आहेत. जर आम्ही लेखा प्रोग्राम यूएसयू सॉफ्टवेअर सिस्टमची इतर डेटाबेसशी तुलना केली तर आपण स्वतःच कसे कार्य करावे हे शिकण्याच्या क्षमतेसह सॉफ्टवेअरकडे असलेल्या साध्या आणि अंतर्ज्ञानी वर्किंग इंटरफेसची आपण प्रशंसा करू शकता. त्याच्या कामाच्या संगणकाशी कनेक्ट होण्याची आणि कार्यरत कालावधीच्या कोणत्याही कालावधीसाठी स्नॅपशॉटच्या स्वरूपात डेटा प्राप्त करण्याची क्षमता असलेल्या कर्मचार्‍याची स्क्रीन पाहण्याच्या संभाव्यतेद्वारे सर्वात सोयीस्कर ट्रॅकिंग प्रक्रिया. आपण कर्मचार्‍यांना पाहण्यास प्रारंभ करण्यापूर्वी कंपनी संचालकांनी उत्पादकता वाढविण्यासाठी आणि विश्रांती कमी करण्यासाठी या क्षणी कर्मचार्‍यांना सूचित करणे आवश्यक आहे. विविध प्रकारच्या वर्कफ्लोमध्ये, आपण यूएसयू सॉफ्टवेअर अकाउंटिंग बेसच्या जर्नलच्या सूचीचा अभ्यास करण्यासाठी कोणत्याही प्राथमिक दस्तऐवजांचा वापर करू शकता. अनेक अतिरिक्त नियंत्रण आणि लेखा क्षमता संपादन करून, आपण कर्मचार्‍यांना त्यांचे वेतन पटकन मिळू देणार नाही आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच त्यांचे कर्तव्य पार पाडण्यास वेळ मिळाला पाहिजे. संकटाच्या काळात, छोट्या आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांचे लक्षणीय नुकसान झाले आहे, अशा प्रकारच्या कर्मचार्‍यांच्या विश्रांतीविषयी बोलण्याची गरज नाही, जे कंपन्यांच्या कठीण आर्थिक परिस्थितीला आणखी क्षीण करू शकतात. केवळ कार्यालयीन कर्मचारी कामाच्या क्रियाकलापांसाठी दूरस्थ स्वरूपात बदलत आहेत आणि उत्पादन निसर्गातील कर्मचारी पूर्वीप्रमाणेच दुकानात आपले काम सुरू ठेवतात. असे निर्भयपणे सांगितले जाते की या मार्गाने बाहेर जाणे एखाद्या कठीण परिस्थितीस मदत करते, जे अर्थव्यवस्था आणि उद्योगांसाठी शक्य तितक्या कमी नुकसानीसह वाचले पाहिजे. दूरस्थपणे जाताना कंपनीचे स्पर्धात्मकता आणि नफा कमविण्यात मदत होते तर विविध खर्च आणि खर्च कमी करता येतात. दररोज काम केलेल्या तासांच्या चिन्हे असलेल्या स्पेशल रिपोर्ट कार्डनुसार, वेतनाच्या मोजणीत माहिती प्रविष्ट करुन वापरकर्ते कर्मचार्‍यांच्या यादीसह काही अंतरावर गणना करण्यास सक्षम असतात. कॉर्पोरेट नेटवर्क असल्यास, त्याचे दूरस्थपणे कार्य करण्याची क्षमता असीमित संख्येने कामगार प्रदान करुन त्याचे योग्यरित्या परीक्षण केले जाते. व्ह्यूइंग मोडमध्ये एकमेकांची पूर्ण केलेली माहिती पाहण्यासाठी भिन्न प्रकारच्या स्वरुपाचा वापर करुन कर्मचारी एकमेकांशी अधिक प्रभावीपणे संवाद साधू शकतात. आपण यूएसयू सॉफ्टवेअर अकाउंटिंग डेटाबेसमधील आपल्या नोकरीच्या अनेक कार्यांसाठी स्वतंत्र वर्ण स्वतंत्ररित्या बदलू शकता. कोणत्याही आकाराच्या कंपन्या यूएसयू सॉफ्टवेअर सिस्टम प्रोग्राम खरेदी करू शकतात, ज्याचा हेतू सर्व ग्राहकांच्या उत्पादनाच्या प्रमाणात विचार न करता केला जातो. यूएसयू सॉफ्टवेअर अकाउंटिंग डेटाबेसची एक स्पष्ट आणि सोपी कॉन्फिगरेशन कंपनीचा महत्त्वपूर्ण फायदा आहे, ज्याच्या बाबतीत आपण कंपनीच्या व्यवस्थापनाची कार्य कार्यक्षमतेने आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यास सक्षम आहात आणि त्यांना ई-मेलद्वारे पडताळणीसाठी पाठवू शकता. संकटाच्या काळात यूएसयू सॉफ्टवेअर सिस्टम प्रोग्रामच्या अधिग्रहणामुळे, कर्मचार्‍यांच्या त्यांच्या कार्याच्या कार्याच्या रिमोट दूरस्थपणे कार्यक्षमतेने आणि कार्यक्षमतेने ठेवणे शक्य आहे.\nलेखा कार्यक्रम हळूहळू संदर्भ पुस्तके भरण्याच्या आवश्यक प्रक्रियेसह कंत्राटदार बेस विकसित करतो. सध्याच्या कर्तव्याच्या कर्तव्यासाठी आपण दोन्ही बाजूंनी स्वाक्षरी करण्यासाठी बेसमध्ये कागदपत्रे तयार करण्यास सुरवात करता. प्रत्येक कर्मचा-याच्या कामाचा दिवस सॉफ्टवेअरमध्ये कामकाजाच्या तासांचा स्पष्टपणे मागोवा घेण्यात येतो. कोणतीही आवश्यक प्राथमिक कागदपत्रे कंपनीच्या संचालक तसेच ग्राहक व पुरवठादारांकडून स्वयंचलितपणे प्राप्त केली जाऊ शकतात.\nकर आकारणीसाठी असंख्य जमा पूर्णपणे डेटाबेसमध्ये तयार केले आणि एका विशेष साइटवर हस्तांतरित केले.\nअतिरिक्त शुल्कावरील डेटासह आपण सॉफ्टवेअरमध्ये मजुरी तयार करण्यासाठी आपण एक गणना द्रुतपणे तयार करू शकता. प्राप्त माहितीसह द्रुतपणे कार्य करण्यास आपण नवीन डेटाबेसमध्ये माहिती आयात करण्याची प्रक्रिया प्रारंभ करता. आपण उपलब्ध असलेल्या कर्मचार्‍यांचे मॉनिटर्स पाहून आपल्या कर्मचार्‍यांकडून केलेल्या कामाच्या प्रमाणात आपल्याला सूचित करणे आवश्यक आहे. सॉफ्टवेअरमध्ये नॉन-कॅशलेस उद्देशाशी संबंधित वापरकर्ते बँकिंग प्रक्रियेचा डेटा तयार करू शकतात.\nरिमोट कॅश उलाढाल संपूर्णपणे डेटाबेसमध्ये खर्च आणि पावतींसाठी रोख पुस्तकात डेटा प्रविष्ट केल्याने तयार केली जाते. प्रोग्राममध्ये, वापरकर्ते आधुनिक बार-कोडिंग उपकरणे वापरून एखादी यादी बनवू शकतात. हे काय घडत आहे त्याचे संपूर्ण चित्र प्रदान करू शकेल अशा कार्यासाठी विविध वेळापत्रक काढण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये आढळते. सॉफ्टवेअरमध्ये काम करण्याच्या शैक्षणिक कामगिरीच्या तुलनेत कार्यपद्धतीनुसार आणि कर्मचार्‍यांच्या कामगिरीवर आकृती अद्ययावत आहे.\nप्रोग्रामची उपलब्ध चाचणी डेमो आवृत्ती क्लायंटच्या मुख्य बेस खरेदी करण्याच्या इच्छेस अनुकूलतेने प्रभावित करते. आपण सेल फोनवर काही मिनिटांत मोबाइल प्रोग्राम स्थापित करण्यास सक्षम आहात, जे ऑफिसच्या बाहेर असताना कर्मचार्यांना नियंत्रित करण्यात मदत करते. हे देखावा ओळखण्यासाठी उपकरणे स्थापित करण्यासाठी खोलीच्या प्रवेशद्वाराजवळ वळते, जे सॉफ्टवेअरद्वारे वैयक्तिक डेटाची गणना करण्यास मदत करते.\nकागदपत्रांच्या द्रुत सेटसाठी, शोध इंजिनमध्ये तिर्यक वापरणे आणि पूर्ण नाव डेटा टाइप करणे पुरेसे आहे. सॉफ्टवेअरमध्ये काम सुरू करण्यापूर्वी, आपल्याला द्रुत नोंदणी करणे आवश्यक आहे, जे कर्मचार्‍यांना लॉगिन आणि संकेतशब्दाची माहिती प्रदान करते.\nआर्थिक बाजू असलेले कोणतेही करार आपोआप नूतनीकरण प्रक्रियेसह सॉफ्टवेअरमध्ये प्रतिबिंबित होतात.\nवापरकर्ते निरिक्षण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी विविध मार्गदर्शक सारण्या वापरण्यास सक्षम आहेत. संदेशन वैशिष्ट्य वापरुन, आपण ग्राहक माहिती वापरू शकता आणि कर्मचार्‍यांच्या नोंदी दूरस्थपणे ठेवू शकता. आवश्यक स्वयंचलित डायलिंगची व्यवस्था अशा प्रकारे केली जाते की ती सप्लायर कंपनीच्या वतीने सूचित करते आणि रिमोट मोड चालवते. दस्तऐवज व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत, आपल्याकडे आवश्यक माहिती आहे, जी आपण आयात पद्धतीने निवडलेल्या सुरक्षित ठिकाणी हस्तांतरित करा. रिमोट अ‍ॅक्टिव्हिटी प्रक्रियेतील प्रोग्राम कर्मचार्‍यांनी केलेल्या कामाची आकडेवारी दर्शवितो. डेटाबेसमध्ये एक साधा आणि सोपा इंटरफेस असल्याने आपण ते स्वतः शोधू शकाल आणि बाह्य तज्ञांना गुंतवून ठेवू शकणार नाही. प्रोग्राममधील विशेष अहवालाच्या निर्मितीसह, आपण ग्राहकांना नियंत्रित करण्यास सक्षम आहात ज्यांनी दूरस्थ हस्तांतरण पूर्णपणे पूर्ण केले नाही. आपल्याकडे गोदामांच्या स्थितीबद्दल, वस्तू, वस्तू आणि सामग्रीच्या हालचालींची संख्या यावर नियंत्रण आहे.\nअपीलचा प्रकार *कार्यक्रम खरेदी कराप्रश्न विचारण्यासाठी कॉन्फिगरेशनआर्थिकदृष्ट्यामानकव्यावसायिक\nप्रोग्रामच्या कॉन्फिगरेशनची तुलना करा\nसंदेश पाठविला जाऊ शकला नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.\n नजीकच्या भविष्यात, आपल्याला उत्तर मिळेल याची खात्री आहे.\nआपण आपले सर्व प्रश्न यावर पाठवू शकता: info@usu.kz\nआपण कार्यक्रम खरेदी करू इच्छिता\nआम्ही लवकरच ऑनलाईन होऊ . दरम्यान, आम्हाला मेलद्वारे संदेश पाठवण्यासाठी येथे क्लिक करा\nतुर्कमेनिस्तान: +993 (62) 86 00 68\n आपण आपल्या देशात किंवा शहरात आमचे प्रतिनिधी होऊ शकता\nआम्ही आमच्या देशातील आपल्या वस्तू किंवा सेवांचे प्रतिनिधित्व करण्यास देखील तयार आहोत.\nतात्पुरत्या स्टोरेज वेअरहाऊसचा लेखाजोखा\nवेअरहाऊसवर पत्ता संचयन कार्यक्रम\nउत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा\nएक छपाई घरासाठी कार्यक्रम\nखाजगी सुरक्षा कंपनीसाठी कार्यक्रम\nआमच्याकडे शंभरहून अधिक कार्यक्रम आहेत. सर्व प्रोग्राम्सचे भाषांतर केलेले नाही. येथे आपण सॉफ्टवेअरची पूर्ण यादी पाहू शकता\nकामाची वेळ नियंत्रित करा\nलेखा आणि कर्मचार्‍यांचे नियंत्रण\nलेखा आणि कामकाजाचा कालावधी\nकामगारांनी काम केलेल्या तासांचा हिशेब\nकामगार आणि कामकाजाचा हिशेब\nकाम केलेल्या कामाचा हिशेब\nरिमोट कामावर कामकाजाचा हिशेब\nकर्मचार्‍यांच्या कामाच्या वेळेचा हिशेब\nएंटरप्राइझ कर्मचार्‍यांच्या कामाच्या वेळेचा हिशेब\nकर्मचार्‍यांच्या कामाच्या वेळेचा हिशेब\nकर्मचार्‍याच्या कामाच्या वेळेची लेखा प्रणाली\nकामाच्या वेळेच्या लेखाचे विश्लेषण\nकर्मचारी कामगिरी नियंत्रण मूल्यांकन\nकामाच्या वेळेचे स्वयंचलित लेखा\nकामाच्या लेखाची स्वयंचलित प्रणाली\nकामाच्या वेळेचे स्वयंचलित लेखा\nदूरचे काम तपासत आहे\nदूरस्थ काम तपासत आहे\nसंस्था कर्मचार्‍यांच्या व्यवस्थापनात नियंत्रण\nरिअल टाइम मध्ये नियंत्रित करा\nकामाच्या वेळेच्या लेखा नियंत्रित करणे\nसंस्थेच्या कर्मचार्‍यांच्या कार्याचे नियंत्रण\nअधीनस्थ कर्मचार्‍यांच्या कार्याचे नियंत्रण\nकर्मचार्‍यांच्या रिमोट कामावर नियंत्रण\nकामाच्या वेळेच्या वापरावर नियंत्रण\nकार्यरत वेळ मोडचे नियंत्रण\nकर्मचार्‍यांच्या कामाच्या वेळेचे नियंत्रण\nदूरस्थ कामांवर नियंत्रण ठेवा\nकर्मचार्‍यांच्या कामांवर नियंत्रण ठेवा\nअधिका of्यांच्या कामावर नियंत्रण ठेवा\nविभागाच्या कामांवर नियंत्रण ठेवा\nकामाच्या वेळेसाठी नियंत्रण प्रणाली\nकर्मचार्‍यांच्या कामाची नियंत्रण प्रणाली\nरिमोट वर्क बद्दल डेटा\nकामकाजासाठी प्रोग्राम डाउनलोड करा\nकामाच्या वेळेच्या लेखासाठी प्रोग्राम डाउनलोड करा\nकामाच्या वेळेच्या विनामूल्य लेखासाठी सॉफ्टवेअर डाउनलोड करा\nसंगणकावर कर्मचारी ट्रॅकिंग प्रोग्राम\nकामाच्या वेळेच्या लेखाची वैशिष्ट्ये\nकामाच्या तासांचे विनामूल्य लेखा\nकामाच्या वेळेचे सामान्य लेखा\nकामकाजाचा हिशेब करण्याचे तास\nकामाच्या तासांचा मागोवा कसा ठेवावा\nरिमोट वर्क कसे आयोजित करावे\nदूरच्या कामाचे आयोजन कसे करावे\nएखाद्या कर्मचार्‍यास दूरच्या कामात कसे बदलावे\nकामाच्या वेळेचे वैयक्तिक लेखा\nकामकाजाच्या वेळेचे स्वस्त हिशेब\nकर्मचार्‍यांच्या नियंत्रणासाठी प्रोग्राम स्थापित करा\nसामान्य कामाचा लॉग ठेवणे\nकर्मचार्‍यांच्या कामाच्या वेळेची नोंद ठेवणे\nकर्मचा .्यांचा मागोवा ठेवा\nकामाच्या वेळेच्या लेखासाठी लॉगबुक\nदूरच्या कामासाठी व्यवस्थापन प्रणाली\nकामाच्या वेळेचे हिशेब ठेवण्याच्या पद्धती\nऑपरेटिंग मोड आणि कामाच्या वेळेचे लेखा\nकर्मचारी आणि कर्मचार्‍यांच्या कार्याचे नियंत्रण\nकर्मचार्‍यांचे संघटन आणि कार्य नियंत्रण\nकामाच्या तासांच्या लेखाचे आयोजन\nकर्मचारी नियंत्रण प्रणालीची संघटना\nतज्ञांच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची संस्था\nएंटरप्राइझच्या रिमोट वर्कचे आयोजन\nकर्मचार्‍यांच्या रिमोट कामाचे आयोजन\nरिमोट मोडमध्ये कार्याचे आयोजन\nदूरच्या कामगारांच्या कार्याचे आयोजन\nकर्मचार्‍यांचे संघटनेचे काम लेखा\nस्वतःच्या वेळेच्या लेखासाठी कार्यक्रम\nवेळ लेखा साठी कार्यक्रम\nविनामूल्य कामाच्या वेळेच्या लेखासाठी प्रोग्राम\nकर्मचारी मागोवा घेण्यासाठी प्रोग्राम\nवेळ मागोवा घेण्यासाठी प्रोग्राम\nदुर्गम कामावर प्रगती अहवाल\nदूरस्थ काम पुरवित आहे\nदुर्गम कामावर कर्मचा on्यांचा अहवाल\nकामाच्या वेळेचे लेखा सेटअप करा\nकामाच्या वेळेचा साधा लेखा\nकर्मचार्‍यांच्या कामावर देखरेख ठेवा\nवेळ लेखा साठी प्रणाली\nकर्मचार्‍यांची नियंत्रण व व्यवस्थापनाची व्यवस्था\nएंटरप्राइझ कर्मचार्‍यांच्या नियंत्रणाची प्रणाली\nवेळ व्यवस्थापन आणि कार्य वेळ नियोजन\nकर्मचार्‍यांचा वेळ मागोवा घेणे\nकर्मचार्‍यांचा वेळ मागोवा घेणे\nकर्मचार्‍यांचा वेळ मागोवा घेणारा कार्यक्रम\nवेळ ट्रॅकिंग सिस्टम कर्मचारी\nकर्मचार्‍यांच्या कामाचा मागोवा घेत आहे\nदूरस्थ कामाचा मागोवा घेत आहे\nदूरस्थ कामात कंपनीचे हस्तांतरण\nदूरस्थ कामात संस्थेचे हस्तांतरण\nकर्मचार्‍यांना दूरच्या कामात बदली\nकामाच्या रिमोट मोडमध्ये स्थानांतरित करा\nकर्मचार्‍यांना दूरच्या कामात बदल\nकामगारांना दुर कामात बदल\nकार्यरत वेळ व्यवस्थापन प्रणाली\nकर्मचार्‍यांकडून कामाच्या कामगिरीचे लेखा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2019/11/blog-post_1.html", "date_download": "2022-10-07T21:32:14Z", "digest": "sha1:7MJJRWAS7C5E67CQBCOL4RXZKXN7F3P2", "length": 31365, "nlines": 221, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "उत्तरांचा शोध अन् शोधांचे प्रयोग | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nउत्तरांचा शोध अन् शोधांचे प्रयोग\nजागतिक गरिबीचा प्रश्‍न खूप मोठा आहे, परंतु त्याची उत्तरे लहान-लहान व्यवहार्य आणि परिणामकारक प्रयोगांमध्ये आहेत. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झालेल्या अभिजित बॅनर्जी, एस्थर डुफ्लो आणि मायकेल क्रेमर या टीमने सैद्धांतिक पातळीवरील अर्थशास्त्राला त्यांनी लोकांच्या जगण्याशी जोडले. गरिबीच्या प्रश्‍नांची कारणमीमांसा करणे, त्यांच्या उत्तरांचा शोध घेणे आणि कोणत्या परिस्थितीत, कशा पद्धतीने ती प्रभावी ठरू शकतात याचा शास्त्रशुद्ध अभ्यास मांडणे हे त्यांचे योगदान...\nकच्छच्या रणात मी फिरत होते. बन्नी परिसरातील भटक्या जमातींसोबत एक सामाजिक अभ्यास सुरू आहे. त्यांच्यापर्यंत कोणत्या शासकीय योजना पोहोचल्या याची पाहणी सुरू आहे. उंट आणि म्हशींचे ताफे घेऊन भटकंती -(उर्वरित लेख पान 7 वर)\nकरणारी जमात. हक्काची जमीन नाही की स्थिर निवास नाही. रेशन, घरकुल या सार्‍या योजना यांच्यापासून कोसो मैल दूर आहेत. शिक्षण, आरोग्य सेवा याचा लवलेशही नाही. माझ्याभोवती दहाबारा मुलींचा घोळका जमला होता. त्यातील एकही शाळेत जात नव्हती. ज्या जात होत्या त्याही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्या. इतक्यात माझ्या फोनची रिंग वाजली आणि अभिजित बॅनर्जी, एस्थर डुफ्लो आणि मायकेल क्रेमर या तीन अर्थशास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार मिळाल्याची आनंदाची बातमी समजली. माझ्या चेहर्‍यावरील आनंद त्या मुलींनी क्षणात हेरला आणि उत्सुकतेने चौकशी करू लागल्या ... नेमकं काय झालं.. मी त्यांना समजेल असे त्यांना समजावून सांगू लागले.. त्यांच्या जगण्याचे प्रश्‍न आणि नोबेल पुरस्काराची ही जागतिक घटना यांचा थेट संबंध होता. अशाच रणरणत्या उन्हात राजस्थानातील मुलींच्या शिक्षणाचे संशोधन करण्यासाठी गावोगावी फिरणारे अभिजित आणि एस्थर माझ्या डोळ्यासमोर आले आणि यांना मिळालेला पुरस्कार भारतच नाही तर जगातील तमाम गरिबांसाठी किती दिलासादायक आहे याची जाणीव झाली.\nभारतीय असलेल्या अभिजित यांना मिळालेल्या या सर्वोच्च पुरस्काराची चर्चा गेल्या काही दिवसांत भरपूर झाली आहे. परंतु, अभिजित आणि त्यांच्या पत्नी एस्थर आणि सहकारी मायकेल यांचे अनमोल योगदान आहे ते भारतासारख्या गरिबीशी झगडणार्‍या देशासाठी उत्तरे शोधण्याचे. त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे, जागतिक गरिबीचा प्रश्‍न खूप मोठा आहे, परंतु त्याची उत्तरे लहान-लहान व्यवहार्य आणि परिणामकारक प्रयोगांमध्ये आहेत. थोडक्यात म्हणजे, सैद्धांतिक पातळीवरील अर्थशास्त्राला त्यांनी लोकांच्या जगण्याशी जोडले. गरिबीच्या प्रश्‍नांची कारणमीमांसा करणे, त्यांच्या उत्तरांचा शोध घेणे आणि कोणत्या परिस्थितीत, कशा पद्धतीने ती प्रभावी ठरू शकतात याचा शास्त्रशुद्ध अभ्यास मांडणे हे त्यांचे योगदान. तेदेखील विद्यापीठीय भिंतींच्या पलीकडे जाऊन जगभरातील तीनशेहून अधिक देश, हजारो अर्थशास्त्रज्ञ, स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणा आणि प्रत्यक्ष लोक यांच्यासोबत समन्वयाची मोट बांधून.\nविकसनशील देशांनी मुक्त अर्थव्यवस्थेद्वारे जगाची कवाडे खुली केल्यावर आर्थिक वृद्धीच्या आधारे गरिबीचे निर्मूलन होईल अशी एक धारणा होती. भारतासारख्या देशात काही प्रमाणात ही प्रक्रिया सुरूही झाली होती. परंतु, ज्या वेगाने गरिबांची परिस्थिती सुधारणे अभिप्रेत होते तो वेग आणि त्यातील गुंतागुंतीची आव्हाने कायमच होती. आर्थिक विकास दर वाढला म्हणजे विकास झाला असे नाही हे परिमाण अमर्त्य सेन यांच्यासारख्या शास्त्रज्ञांच्या संशोधनातून पुढे आले. कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, शिक्षण, आरोग्य हेदेखील विकासाच्या मोजपट्टीतील महत्त्वाचे निकष आहेत हे दाखवून देत त्यांनी मानव विकास निर्देशांकाची मोजपट्टी जगाला दिली. त्याचे पुढले पाऊल बॅनर्जी आणि त्यांच्या टीमने टाकले. सेन यांच्यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक वृद्धी दरापलीकडील प्रश्‍न मांडले तर बॅनर्जी आणि त्यांच्या टीमने त्यावरील उत्तरांच्या दिशेने जगाला नेले. ‘पुअर्स इकॉनॉमिक्स’ या आपल्या पुस्तकात ते म्हणतात, शक्यतम उत्तरांचा शोध न घेता केवळ जगातील प्रश्‍नांची चर्चा करत बसणं म्हणजे प्रगतीच्या ऐवजी पंगुत्वाच्या दिशेने जाणे. केवळ प्रश्‍नांची जाणीव झाली म्हणजे ते सुटले असं नाही. प्रश्‍नांची जाणीव म्हणजे फक्त आपण कुठे अपयशी होऊ शकतो याचा अंदाज येणे’ आणि याच भूमिकेतून त्यांनी जगातील गरिबीचा प्रश्‍न सोडविण्याचे अनंत यशस्वी आणि व्यवहार्य प्रयोग केले, संशोधने केली. गरिबातल्या गरिबाला त्याच्या गांजलेल्या स्थितीतून वर काढण्यात बाजारपेठीय अर्थव्यवस्था पूर्णपणे यशस्वी झाली नाही. जे सक्षम झाले त्यांना पुढे नेण्यात ती उपयुक्त ठरली, परंतु जे मागे होते त्यांना हात देण्यासाठी कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून शासनाचा हस्तक्षेप गरजेचा ठरू लागला. जनहिताच्या हेतूने शासकीय योजनांची आखणी झाली, मात्र त्यांची परिमाणकारक आणि प्रभावी अंमलबजावणी हा फक्त भारतात नाही तर जगभरातील बहुतांश विकसनशील देशांपुढील पेच होता. डेव्हलपमेंटल इकॉनॉमी अर्थशास्त्राची शाखा यावर पूर्वीपासून कार्यरत होती. सुरुवातीचे तिचे काम सैद्धांतिक पातळीवर होते. मात्र, गेल्या वीस-तीस वर्षांत संगणकामुळे खूप डेटा संकलित होऊ लागला. त्या वेळी क्रेमर, अभिजित आणि एस्थर यांनी केनियातील एका स्वयंसेवी संस्थेसोबत केलेल्या अभ्यासाचे अत्यंत चांगले रिझल्ट्स मिळाले होते. त्यावर आधारित त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि भारतातील गरिबांसोबत काम सुरू केले. गरिबी संपवण्यासाठी गरिबांची केवळ सांपत्तिक स्थिती वाढवून उपयोगाचे नाही तर गरिबीस कारणीभूत अन्य बहुविध घटकांचा शोध घेऊन त्यावर काम करणे गरजेचे असल्याचे त्यांच्या संशोधनातून सिद्ध झाले. त्यासाठी त्यांनी 2003 साली एमआयटीमध्ये अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अ‍ॅक्शन लॅब ही संशोधन संस्था सुरू केली आणि त्याच्या माध्यमातून जगभरातील शेकडो देशांमध्ये गरिबी निर्मूलनाचे असंख्य प्रयोग यशस्वी करून दाखविले.\nआरटीसी म्हणजे रँडमाइज्स कंट्रोल ट्रायल ही यांच्या संशोधनाची अत्यंत शास्त्रशुद्ध आणि काटेकोर पद्धत. उदाहरणादाखल आपण सार्वजनिक आरोग्य आणि गरिबीचा एक प्रश्‍न बघू. दक्षिण आफ्रिकेतील देशांमध्ये डासांमुळे होणारे अनेक रोग आहेत. त्यामुळे गरिबांची शारीरिक-आर्थिक क्षमता अधिक खालावते इथपर्यंत विकसनशील अर्थशास्त्राने विश्‍लेषण केले होते. बॅनर्जी आणि त्यांच्या टीमने त्याच्या पुढे जाऊन यावर नेमके व प्रभावी उत्तर कोणते असेल, यावर संशोधन केले. डासांपासून होणार्‍या रोगांच्या समस्येवर अनेक उपाय असू शकतात. परंतु, त्यातील परिणामकारक आणि व्यवहार्य उपाय कोणते यावर त्यांचे संशोधन बेतले आहे. या प्रश्‍नावर मात करण्यासाठी लोकांना थेट मच्छरदाण्या पुरवणे, मच्छरदाण्या घेण्यासाठी त्यांना थेट पैसे देणे, डासांचे निर्मूलन करणे किंवा सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करणे किंवा डासांपासून बचाव करण्याचे लोकांमध्ये प्रबोधन करणे, शिक्षण देणे की हे सगळेच करणे हे उपाय असू शकतात. त्याचा प्रदीर्घ अभ्यास करून त्यांनी गरिबांच्या दृष्टिकोनातून यातील सर्वाधिक उपयुक्त कोणता हे पुढे आणले. सांख्यिकी निकषांसोबतच अर्थशास्त्राचा अभ्यास करीत असताना त्यास समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय आयामांची जोड हे यांच्या संशोधनाचे महत्त्वाचे योगदान.\nशासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा लोक योजनांचा उपयोग करून घेत नाहीत ही बोंब नेहमी होत असते. मात्र, ते का, आणि कशा प्रकारे बदलू शकते या मुळापर्यंत पोहोचणारे संशोधन ते करतात. सध्या राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या धामधुमीत सर्वच पक्षांनी आपापले जाहीरनामे जाहीर केले आहेत. हे जाहीरनामे म्हणजे शासकीय योजनांच्याच घोषणा आहेत. सत्तेवर आलेले सरकार त्यांची पूर्तता करण्यासाठी धोरणे आखते, योजना आणते, परंतु काही काळातच त्या अपयशी ठरल्याचे सूर पुढे येऊ लागतात. कारण शासकीय योजनांची आखणी ही अत्यंत गंभीर आणि शास्त्रशुद्ध संशोधनावर आधारलेली एक निरंतर प्रक्रिया आहे, यातील गमक मात्र कुणी लक्षात घेत नाही, जे बॅनर्जी, एस्थर आणि क्रेमर यांच्या कामातून सिद्ध झाले आहे.\nभारतातील अनेक राज्यांत त्यांनी हे प्रयोग यशस्वी केले आहेत. आंध्र प्रदेशात रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी कशी होऊ शकेल, राजस्थान आणि मुंबईत शिक्षणाच्या सार्वत्रिक अंमलबजावणीत त्यांचे योगदान आहे. ’प्रथम’ संस्थेच्या असर प्रकल्पातून शिक्षणाच्या दर्जातील अडथळे पुढे आले, त्यावर मात करण्याचे उपाय त्यांच्या संशोधनातून शोधले जात आहेत. शाळांमधील मुलांच्या गळतीमागे मुलांच्या पोटातील जंत या अंधारातील प्रश्‍नापर्यंत ते पोहोचले आणि त्यावरील ‘नॅशनल डिर्व्हमिंग डे’ सारख्या उपाययोजनेतून जगातील तीनशे देशांतील मुलांचा आरोग्याचा आणि शिक्षणाचा पट वाढवला.\n(साभार ः दिव्य मराठी, रसिक पुरवणी )\nसत्तेच्या मांडवलीत महाराष्ट्र होरपळतोय\nसरकारी प्रतिष्ठानांच्या विक्रीचा अथ\n२९ नोव्हेंबर ते ०५ डिसेंबर २०१९\n२२ ते २८ नोव्हेंबर २०१९\nभारतरत्न नाकारणारा अवलिया : मौलाना आझाद\nसंयम आणि सौहार्दाचा विजय\nमिलादुन्नबीनिमित्त 3 हजार 178 जणांनी केले रक्तदान\nअमीर (अध्यक्ष) - (भाग 10)\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि आपली जबाबदारी\nइस्लामोफोबिया : कारणे आणि उपाय\n१५ ते २१ नोव्हेंबर २०१९\nइमामत (नमाजचे नेतृत्व) : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसांप्रदायिक तणाव आणि राजकारण\nअयोध्येसंबंधीचा निर्णय सर्वांनी शांतपणे स्विकारावा\nजमाअत - ए - इस्लामीची आवश्यकता का भासली - (भाग-9)\nप्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या शिकवणीचा संक्षिप्त...\n‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’\nसामूहिक नमाज : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nजागतिक दहशतवाद : अमेरिकी पापांचे फलित\nडॉ. ईलाहीपाशा मासुमदार यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट...\nउर्दू सा. दावत, न्यूज पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅपचे विमोचन\nआमचं हे कर्तव्य वाटलं म्हणून आम्ही उभे राहिलो : (भ...\nफेसबुक व धार्मिक भावना\nमुली अन् पत्नी दोहोंच्या सुरक्षेची जबाबदारी पुरूषाची\nराज्यात पुन्हा तेच; विरोधक मात्र मजबूत\nझुंडबळी आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे आकडे गायब\n०८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०१९\nनमाजचे महत्त्व : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nगुन्हे अहवालात ‘मॉब लिंचिग’ गायब\n०१ नोव्हेंबर ते ०७ नोव्हेंबर २०१९\nतुमचं जीवन हेच इस्लामची साक्ष बनली पाहिजे\nइस्लामी राज्य आणि मुस्लिम देश यात काही फरक आहे काय\nआर्थिक मंदी म्हणजे काय\nउत्तरांचा शोध अन् शोधांचे प्रयोग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/mansi-bhange-smriti-natyachhata-mahotsav-of-childrens-theater-parishad-was-filled-with-enthusiasm-130303728.html", "date_download": "2022-10-07T22:35:38Z", "digest": "sha1:PVFKDWXP2ULXMURVPTGM7YJPGZJZV7LH", "length": 6399, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "उत्साहात रंगला बालरंगभूमी परिषदेचा मानसी भणगे स्मृती नाट्यछटा महोत्सव | Mansi Bhange Smriti Natyachhata Mahotsav of Children's Theater Parishad was filled with enthusiasm | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरंगमंच:उत्साहात रंगला बालरंगभूमी परिषदेचा मानसी भणगे स्मृती नाट्यछटा महोत्सव\nबालरंगभूमी परिषदेच्या जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या “मानसी भणगे स्मृती नाट्यछटा स्पर्धा महोत्सव शनिवार दिनांक १० सप्टेंबर रोजी संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये नेहमीप्रमाणे जल्लोष होता. ह्या स्पर्धेत एकूण तीन गटात शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. नगर शहर, राहुरी, संगमनेर, जळगाव येथील शालेय विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. ही स्पर्धा नगरमधील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये उत्साहात पार पडली.\nस्पर्धेचे उद्घाटन सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य आर. वाय. शिंदे, बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, परिषदेच्या अध्यक्षा उर्मिला लोटके, प्रमुख कार्यवाह प्रसाद भणगे, प्रसाद बेडेकर, परीक्षक सविता काळे, अॅड. दीपक शर्मा, नाना मोरे, देवीप्रसाद सोहोनी यांच्या हस्ते झाले.\nया स्पर्धेचे संयोजन स्पर्धा प्रमुख टीना इंगळे, श्रिया देशमुख, सुजाता पायमोडे, शैलेश देशमुख, विद्या जोशी, संध्या पावसे या बालरंगभूमी परिषद कार्यकारिणी सदस्यांनी केले. तर प्रशांत सुर्यवंशी, विशाल तागड, संदीप गोसावी, शिवशाहीर शिंदे, खळेकर, काळे मॅडम यांनी सहकार्य केले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला गायिका अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड, बालरंगभूमी परिषद, मुंबईचे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी, नाट्यपरिषद नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजित दळवी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुजाता पायमोडे यांनी केले. श्रेया देशमुख यांनी आभार मानले.\nस्पर्धेचा सर्वोत्कृष्ट्र, उत्तम व उत्तेजनार्थ निकाल\nगट एक : सायली गिरी व अन्वय घाटेवाल. अनन्या काळे व आराध्या गाडे. अवनी बोठे. गट दोन : मैत्रेयी मेहेर, अर्णव ढोबळे व भावना बनकर. श्रावणी वाबळे, अनुष्का कोरडे व अंकित अध्यापक. भैरवी केळकर व भव्या रसाळ. गट तीन : श्रेया देशपांडे, हर्ष बूब व महेश्वरी वाळुंज. कालिका जावळे, श्रेयस शास्त्री, सिमरन शेख व प्राची भदे. पुष्कर पंडित, गुंजन वरखडे व चैतन्य हिरे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/yavatmal/news/heavy-rain-again-in-the-district-with-lightning-exceeded-average-130304476.html", "date_download": "2022-10-07T23:14:36Z", "digest": "sha1:HBUKB5QRWH3Q3CXQCKC5GCHKII6WXQEU", "length": 9368, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात पुन्हा मुसळधार पाऊस; सरासरी ओलांडली | Heavy rain again in the district with lightning; Exceeded average \\ marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनदी-नाल्यांना पूर:जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात पुन्हा मुसळधार पाऊस; सरासरी ओलांडली\nविश्रांती घेतलेल्या पावसाने रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी पहाटेपासून संपूर्ण जिल्ह्यात हजेरी लावली. विजांच्या कडकडाटात झालेल्या मुसळधार पावसामुळे छोट्या, मोठ्या नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे नाल्याला आलेल्या पुरात एक ४० वर्षीय शेतमजूर वाहून गेला. वाघू शेषराव रणमले असे वाहून गेलेल्या व्यक्तिचे नाव असून, रविवारी सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.\nजिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा अधिक पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत जिल्ह्यातील दीडशेहून अधिक महसुली मंडळातील ३ लाख ७८ हजार ४६१ शेतकऱ्यांच्या तीन लाख ८९ हजार ५५८ हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर यांसह बहु-वार्षीक पिकांचे नुकसान झाले. तर ३० ऑगस्ट रोजी लोहणबेळ, रूंझा आणि वरध या तीन महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. अधून-मधून येणाऱ्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना यंदा लागवडीचा खर्च सुद्धा निघणार की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.\nगेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, शनिवारी मध्यरात्रीपासून सुसाट वाऱ्यासह रिमझिम पावसाने संपूर्ण जिल्ह्यात हजेरी लावली. रविवार, ११ सप्टेंबर रोजी पहाटेपासून विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्याभरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे छोट्या, मोठ्या नदी-नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तर महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील नाल्याला आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने वाघू रणमले नामक शेतमजूर वाहून गेला. याबाबत माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्याचा शोध घेतला, परंतू सायंकाळी उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. तर ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसानीसह आणखी दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे..\nचाऱ्यासाठी गेलेला शेतमजूर पुरात गेला वाहून परतीच्या पावसाने शनिवारी रात्रीपासून संततधार सुरू केली आहे. ज्या मुळे नदी, नाल्यांना पूर आला असून, या पुरात रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी येथील वॉर्ड क्रमांक तीन मधील इसम वाहून गेल्याची घटना घडली आहे. वाघू शेषराव रणमले वय ४० वर्ष, असे वाहून गेलेल्या शेतमजुराचे नाव आहे. बकरीचा चारा आणण्यासाठी सिंचन विभागाच्या बंधाऱ्याच्या पुरातून गेलेला शेतमजूर वाघू शेषराव रणमले वाहून गेला. प्रथमदर्शनी नागरिकांनी आरडाओरडा केली. नागरिकांनी सदर इसमाला शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. वृत्त लिहिपर्यंत त्याचा वाघू रणमले यांचा शोध लागला नव्हता.\nआठरीचा नाला ओव्हरफ्लो; वाहतूक ठप्प परतीच्या पावसाने शनिवारी मध्यरात्रीपासून झोडपणे सुरू केले. रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी पर्यंत पावसाचा कहर सुरू होता. त्यामुळे आठरीचा नाला ओव्हर फ्लो झाला होता. पुलावरून अंदाजे दोन ते तीन फुट पाणी वाहू लागल्याने तब्बल चार तास वाहतूक ठप्प पडली होती. मागिल १५ दिवसांच्या उघडीप नंतर परतीच्या पावसाने हजेरी लावली. तीव्र उन्हाच्या दाहकतेने पिकांना फटका बसत होता. बळीराजाच्या चिंतेत वाढ दिसत होती. तुरळक पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आणि पिकांना नवसंजीवनी मिळाली. अशात आठरीचा नाल्याला पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी, ढाणकी-बिटरगाव मार्ग तास बंद होता. साधारणत: चार तास वाहतूक ठप्प होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/malegaon/news/future-of-paramedical-student-health-department-mla-nitin-pawars-disobedience-130305740.html", "date_download": "2022-10-07T23:05:23Z", "digest": "sha1:INLUAUDMUJO5QVCATPSI7IW3ABPL3475", "length": 6146, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पॅरामेडिकल चे विद्यार्थी आरोग्य विभागाचे भविष्य; आमदार नितीन पवार यांचे गाैरवाेद्गार | Future of Paramedical Student Health Department; MLA Nitin Pawar's disobedience| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्नेहसंमेलन:पॅरामेडिकल चे विद्यार्थी आरोग्य विभागाचे भविष्य; आमदार नितीन पवार यांचे गाैरवाेद्गार\nआरोग्य क्षेत्रातील विविध उपचारांना दिशा देणारे आणि डाॅक्टरांचे कान डोळे बनून काम करणाऱ्या पॅथाॅलाॅजिकल लॅब आणि नर्सिंग क्षेत्राला आज अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा पॅरामेडिकल सायन्सेसचे विद्यार्थी आरोग्य विभागाचे भविष्य असल्याचे गौरवोद्गार आमदार नितीन पवार यांनी काढले.भाऊ एज्युकेशनच्या साई पॅरामेडिकल सायन्सेस काॅलेजच्या स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.\nअध्यक्षस्थानी तहसीलदार बंडू कापसे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून वकील संघाचे अध्यक्ष संजय पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेख आदी उपस्थित होते.तहसीलदार कापसे म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शाॅर्टकट न वापरता सखोल अभ्यास करावा. तसेच साई पॅरामेडिकल काॅलेजचे वार्षिक कामकाज प्रशासनाला मदत करणारे व प्रशंसनीय आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.\nयामध्ये कोरोना काळातील परिस्थितीचे वास्तव दर्शन गाण्यांच्या माध्यमातून मांडून उपस्थितांची वाहवाह मिळवली. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विविध अडचणी, कर्तव्य व नागरिकांची विचारसरणी आणि आजची परिस्थिती यावर विविध कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक संस्थापक डॉ. दीपक शेवाळे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी पवार व स्नेहल निकम यांनी केले. रवींद्र बोरसे यांनी आभार मानले.\nयावेळी वकील संघाचे सचिव संजय बोरसे, उपनगराध्यक्ष राहूल पगार, रोहित पगार, डॉ. राकेश शेवाळे, डॉ. रवी पाटील, डॉ. धनंजय गांगुर्डे, डॉ. रवींद्र भामरे, सुभाष शेवाळे, लक्ष्मण पगार, राकेश बोरसे, योगेश बोरसे, डॉ. नूतन आहेर, डॉ. पूनम पूरकर, डॉ. अश्विनी खैरनार, निशा शेवाळे, प्राचार्य सुनंदा भोये, प्रा. रेवती ठाकरे, सृष्टी आहेर, कोमल निकम, सुजाता पगार, शीतल पगार, सुजाता मते, विजय जगताप आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/heatlh/backyard-hens-eggs-contain-more-lead-than-poultry-farm-shop-eggs-mhpl-gh-748415.html", "date_download": "2022-10-07T22:08:44Z", "digest": "sha1:LC7XJUNVSVH3U7PPXZSKIIESPB4GEC6S", "length": 13384, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Backyard hens eggs contain more lead than Poultry Farm shop eggs mhpl gh - पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांपेक्षा घरच्या कोंबड्यांची अंडीच धोकादायक; संशोधनातून धक्कादायक खुलासा – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /heatlh /\nपोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांपेक्षा घरच्या कोंबड्यांची अंडीच धोकादायक; संशोधनातून धक्कादायक खुलासा\nपोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांपेक्षा घरच्या कोंबड्यांची अंडीच धोकादायक; संशोधनातून धक्कादायक खुलासा\nपोल्ट्री फार्म आणि घरगुती कोंबड्यांच्या अंड्याबाबत संशोधन.\nकोंबड्यांच्या अंड्यांची तपासणी केली असता निम्म्याहून अधिक अंड्यांमध्ये शिसं जास्त प्रमाणात असल्याचं दिसून आलं आहे.\nरोमान्समध्ये ब्रेक; शारीरिक संबंध थांबवल्यावर नेमकं काय होतं\nकितीही वापरला तरी महिन्याच्या आत संपणार नाही स्वयंपाकाचा गॅस; असा जबरदस्त जुगाड\nत्वचेच्या तक्रारी दूर करण्यासाठी मुलतानी माती हा उत्तम उपाय; लगेच ट्राय करून बघा\nअपुऱ्या झोपेमुळे होऊ शकतात 'हे' गंभीर आजार\nमुंबई, 19 ऑगस्ट : सध्याच्या काळात शहरी नागरिकांना ताजा, अगदी शेतातून काढलेला भाजीपाला, फळं मिळणं तसं अवघड आहे. अंड्यांच्या बाबतीतही तशीच काहीशी स्थिती आहे. ग्रामीण भागात (Rural Area) ताजा भाजीपाला, फळं, कोंबडीची अंडी आदी गोष्टी अगदी सहजपणे उपलब्ध होतात. ग्रामीण भागात अनेक शेतकरी शेतीपूरक म्हणून कोंबडीपालन करतात. त्यामुळे या भागात अंडीही (Eggs) ताजी उपलब्ध होतात; पण अंडी केवळ ताजी असून उपयोग नाही. कारण पोल्ट्री फार्मच्या (Poultry Farm) तुलनेत घरी पालन केलेल्या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये शिसं (Lead) जास्त प्रमाणात असतं, असं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. जास्त प्रमाणात शिसं असलेली अंडी सेवन केल्यास त्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अंड्यातलं शिसाचं वाढतं प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. घरी पालन केलेल्या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये, व्यावसायिकरित्या उत्पादित केलेल्या अंड्यांच्या तुलनेत सरासरी 40 पट जास्त शिसं असतं, असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून दिसून आलं आहे. ऑस्ट्रेलियात (Australia) सुमारे 4 लाख जण घरगुती स्वरूपात कोंबडीपालन करतात. या संशोधनात दोनपैकी एका कोंबडीच्या (Hen) रक्तात शिसं जास्त प्रमाणात असल्याचं दिसून आलं आहे. या कोंबड्यांच्या अंड्यांची तपासणी केली असता, निम्म्याहून अधिक अंड्यांमध्ये शिसं जास्त प्रमाणात असल्याचं दिसून आलं आहे. या संशोधनांतर्गत, ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमधल्या 55 घरांच्या बागेतल्या (Garden) मातीचं परीक्षण (Soil Testing) करण्यात आलं. कोंबड्यांना दिला जाणारा आहार आणि जनावरांना दिलं जाणारं पाणी या दोन्हींमधून शिसं शरीरात जात असल्याचं दिसून आलं. यानंतर Vegesafe च्या एका मोहिमेंतर्गत ऑस्ट्रेलियातल्या घरांमधल्या 25 हजारहून अधिक बागांमधल्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यात शिसं हे प्रमुख चिंतेचं कारण होतं. हे वाचा - काळजी घ्या हृदयविकाराचा झटका आलेल्यांमध्ये 50 टक्के डायबेटिसचे रुग्ण कोंबडी किंवा इतर पक्ष्यांसाठी रक्तातल्या शिशाच्या पातळीसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वं नाहीत. पशुवैद्यकीय मूल्यांकन आणि संशोधनानुसार, 20 मायक्रोग्रॅम/ प्रति डेसीलीटर किंवा त्याहून अधिक पातळी कोंबड्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. घरगुती पालन केलेल्या 69 कोंबड्यांची चाचणी केली असता, त्यांच्यापैकी 45 टक्के कोंबड्यांच्या रक्तात (Hens Blood) शिशाचं प्रमाण 20 मायक्रोग्रॅम/डीएलपेक्षा अधिक असल्याचं दिसून आलं. त्यानंतर या कोंबड्यांच्या अंड्यांची तपासणी करण्यात आली. ऑस्ट्रेलिया, तसंच जगभरातल्या कोणत्याही देशात अंड्यांतल्या शिशाच्या प्रमाणाबाबत कोणतंही मानक नाही. तथापि, 19 व्या ऑस्ट्रेलियन टोटल डाएट स्टडीमध्ये दुकानातून विकत घेतलेल्या अंड्यांच्या एका लहान नमुन्यात 5 मायक्रोग्रॅम/डीएलपेक्षा कमी शिशाची पातळी असल्याचं दिसून आलं. घरगुती स्वरूपात पालन केल्या जाणाऱ्या कोंबड्यांच्या अंड्यात शिशाची सरासरी पातळी 301 मायक्रोग्रॅम प्रति किलोग्रॅम अशी होती. त्याच वेळी बाजारातून खरेदी केलेल्या 9 अंड्यांमध्ये हे प्रमाण 7.2 मायक्रोग्रॅम प्रति किलोग्रॅम असल्याचं दिसून आलं. बागेतल्या किंवा घराच्या अंगणातल्या जमिनीतल्या शिशाच्या पातळीनुसार, घरगुती पालन केलेल्या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये शिशाची पातळी असू शकते. मातीमध्ये शिसं असल्यामुळे बहुतेक वेळा हे शिसं कोंबड्यांच्या शरीरात जातं. कारण त्या माती उकरतात आणि जमिनीवर टाकलेलं अन्न खातात. हे वाचा - Anti Diabetic: कडुलिंबाची पानं मधुमेहावर जालीम उपाय; इतक्या आजारांवर आहेत फायदेशीर शिशाची पातळी कमी असली तरी ती मानवी आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. यामुळे माणसांना हृदयविकार, कमी आयक्यू, किडनीचे आजार होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, लेड एक्सपोजरची (Lead Exposure) कोणतीही सुरक्षित पातळी अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. एकूणच कोंबड्यांच्या अंड्यातलं शिसं मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B2_%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80.", "date_download": "2022-10-07T23:13:05Z", "digest": "sha1:GDV3BFJWY6KH53RBB6ODI6VKLMKAXXBT", "length": 16986, "nlines": 223, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लिव्हरपूल एफ.सी. - विकिपीडिया", "raw_content": "\n(लिवरपूल एफ.सी. या पानावरून पुनर्निर्देशित)\nप्रिमियर लीग, ६ वा\nलिवरपूल फुटबॉल क्लब हा प्रिमियर लीग फुटबॉल मधील लिवरपूल, इंग्लंड स्थित क्लब आहे. हा क्लब इंग्लंडमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब असून त्यांनी इतर कोणत्याही क्लब पेक्षा जास्त युरोपियन कप जिंकलेले आहेत. आजवर सहा युरोपियन कप, तीन युरोप लीग आणि तीन युएफा सुपर कप जिंकलेले आहेत. तसेच त्यांनी १८ सर्वसाधारण लीग विजेतेपद, सात एफए कप , आठ लीग कप, आणि १५ एफए कम्युनिटी शील्ड्स जिंकलेले आहेत. असे जरी असले तरी प्रिमियर लीगला १९९२ साली सुरुवात झाल्यापासून त्यांना ती जिंकता आली नव्हती. २०२० मध्ये करोना महामारीमध्ये झालेल्या या लीगमध्ये तब्बल 30 वर्षांनी त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली. [१]\nसंघाची स्थापना १८९२ साली झाली आणि पुढच्याच वर्षी त्यांचा फुटबॉल लीग मध्ये समावेश झाला. स्थापना झाल्यापासूनच त्यानी एन्फिल्ड वर सामन्यांचे आयोजन केले आहे. लिवरपूल संघाने इंग्लंड आणि युरोपमधील एक अत्यंत बलशाली फुटबॉल संघ म्हणून स्वतःला १९७०-८० च्या दरम्यान प्रस्थापित केले. या काळात बिल शांकली आणि बॉब पेस्ली यांच्या नेतृत्वाखाली संघाने ११ लीग करंडक आणि सात युरोपियन ट्रोफिज जिंकल्या. राफा बेनिटेज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्णधार स्टीवन जेरार्ड याच्या नेतृत्वाखाली मध्यंतराला ३-० ने पिछाडीवर असतानाही २००५ साली एसी मिलान संघाविरुद्ध सामना जिंकून लिवरपूल पुन्हा एकदा युरोपियन विजेते बनले.\n२०१३-१४ साली लिवरपूल हा जगातील नववा सर्वाधिक मिळकत असेलला फुटबॉल क्लब होता, आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न हे €३०६ मिलियन इतके होते ,[२] आणि २०१५ साली ९८२ मिलियन डॉलर्स इतक्या मुल्ल्यासह जगातील आठवा सर्वात श्रीमंत फुटबॉल संघ होता. [३]\nया संघाचे समर्थक हे दोन अतिशय दुःखद अशा घटनांचे साक्षीदार राहिलेले आहेत. या पैकी पहिली म्हणजे १८९५ साले घडलेली हेसेल स्टेडियम दुर्घटना जिथे स्टेडियममधील एक भिंत कोसळून त्याखाली ३९ समर्थक मारले गेले होते . यामध्ये बहुतांशी समर्थक हे इटालियन आणि जूवेंटस या संघाचे समर्थक होते. या घटनेनंतर सर्व इंग्लिश संघांना सर्व प्रकारच्या युरोपियन स्पर्धांमधून पाच वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. दुसरी घटना म्हणजे १९८९ सालची हिल्सबोरो दुर्घटना ज्यामध्ये मैदानात चेंगराचेंगरी होऊन लिवरपूलचे ९६ समर्थक प्राणास मुकले होते. १९६४ साली संघाने आपला लाल शर्ट आणि पांढरी चड्डी हा पोशाख बदलून सर्व लाल केला,जो आजतागायत तसाच आहे. \"यू विल नेवर वॉक अलोन\" हे या संघाचे स्फूर्तीगीत आहे\nजॉन हुल्डींग ,लिवरपूल संघाचे संस्थापक.\nलिवरपूल फुटबॉल संघाची स्थापना ही एव्हर्टन फुटबॉल संघाचे प्रशासक आणि क्लबचे अध्यक्ष व एन्फिल्ड या जमिनीचे मालक जॉन हुल्डींग यांच्यातील वादामुळे झाली. स्टेडीयममध्ये आठ वर्षे घालवल्यानंतर १८९२ साली एव्हर्टन संघाचे गूडीसन पार्क येथे स्थलांतर झाले आणि हुल्डींग यांनी एन्फिल्ड मैदानावर खेळण्यासाठी लिवरपूल फुटबॉल क्लब या संघाची स्थापना केली. [४] संघाचे मूळ नाव जे \"एव्हर्टन फुटबॉल क्लब आणि एथलेटिक्स ग्राउंड \" असे होते ते मार्च १८९२ मध्ये लिवरपूल फुटबॉल क्लब असे करण्यात आले. फुटबॉल असोसिएशन ने एव्हर्टन या नावास नकार दिल्यानंतर साधारण तीन महिन्यानंतर लिवरपूल फुटबॉल क्लब या नावासस औपचारिक मान्यता मिळाली. संघाने पदार्पणाच्या हंगामातच लँकेशायार लीग ही स्पर्धा जिंकली आणि १८९३-९४ च्या फुटबॉल लीगच्या द्वितीय श्रेणीत प्रेवेश केला. यामध्ये देखील प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर संघाने प्रथम गटात प्रवेश केला आणि १९०१ साली तसेच पुन्हा १९०६ साली ती लीग जिंकली. लिवरपूल फुटबॉल संघ २०२० मध्ये इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळविले. करोना संकटकाळात सर्व स्पर्धांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र २०२० मध्ये काही देशांत फुटबॉल स्पर्धा सुरू झाल्या. त्या वेळी लिवरपूलने इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळविले होते. १९९० नंतर तीस वर्षांनी लिवरपूलने हे विजेतेपद मिळविले.\nए.एफ.सी. बोर्नमाउथ • आर्सेनल • अॅस्टन व्हिला • चेल्सी • क्रिस्टल पॅलेस • एव्हर्टन • लेस्टर सिटी • लिव्हरपूल • मँचेस्टर सिटी • मँचेस्टर युनायटेड • न्यूकॅसल युनायटेड • नॉरिच • साउथहँप्टन • स्टोक सिटी • संडरलँड • स्वॉन्झी सिटी • टॉटेनहॅम हॉटस्पर • वॉटफर्ड • वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन • वेस्टहॅम युनायटेड\nबार्नस्ले • बर्मिंगहॅम सिटी • ब्लॅकबर्न रोव्हर्स • ब्लॅकपूल • बोल्टन वाँडरर्स • ब्रॅडफर्ड सिटी • बर्नली • चार्लटन अॅथलेटिक • कॉव्हेंट्री सिटी • डर्बी काउंटी • फुलहॅम • हल सिटी • इप्सविच टाउन • लीड्स युनायटेड • मिडल्सब्रो • नॉटिंगहॅम फॉरेस्ट • ओल्डहॅम ॲथलेटिक • पोर्टस्मथ • क्वीन्स पार्क रेंजर्स • रीडिंग • शेफिल्ड युनायटेड • शेफिल्ड वेन्सडे • स्विंडन टाउन • विगन ॲथलेटिक • विंबल्डन • वोल्व्हरहँप्टन वांडरर्स\n^ \"अखेर लिव्हरपूल ३० वर्षांनी चॅम्पियन\". kheliyad (इंग्रजी भाषेत). 2020-05-30. 2020-07-05 रोजी पाहिले.\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०२२ रोजी ००:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20635/", "date_download": "2022-10-07T21:27:47Z", "digest": "sha1:BXGKRNLMY5URTYZUAVS6NSJYA4HZ6XFX", "length": 15110, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पाउलस्तोव्हस्की, कन्स्तांतीन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपाउस्तोव्हस्की, कन्स्तांतीन : (३१ मे १८९२–१५ जुलै १९६८). सोव्हिएट कथाकर. मॉस्कोमध्ये जन्मला.शिक्षण कीव्ह (कीएफ) आणि मॉस्को विद्यापीठांत झाले. आरंभीचे आयुष्य कष्टाचे गेले. उदरनिर्वाहासाठी मजुरीही करावी लागली.\n‘अग्नी’(इं. शी. फायर) ही त्याची पहिली कथा १९११ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘कारा-बुगाज’ (१९३२), ‘पोविस्त अ लिसाख’ (१९४८, इं. शी. द स्टोरी अबाउट फॉरेस्ट्स),‘रझ‌्द्येनिये मोर‌्या’ (१९५२, इं.शी. द बर्थ ऑफ द सी) ह्यांसारख्या स्वच्छंदतावादी वळणाच्या अनेक कथा लिहिल्या. उत्कट निसर्गप्रेम हे त्याच्या कथालेखनाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. रमांतिकी (१९३५, इं. शी. रोमँटिक्स) ही त्याची कांदबरीही प्रसिद्ध आहे. ह्यांखेरीज अनेक खंडांत प्रसिद्ध झालेल्या रास्सकाज झीज्नी (१९४६–६२, इ.भा. द स्टोरी ऑफ अ लाइफ, १९६४) ह्या आत्मचरित्राचा अंतर्भाव त्याच्या उत्कृष्ट साहित्यकृतींत करावा लागेल. दर्जेदार निबंधलेखनही त्याने केलेले आहे.\nमॉस्कोमध्ये तो निधन पावला.\nपांडे, म. प. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00021256-WM-950-974-SC-PK.html", "date_download": "2022-10-07T21:28:30Z", "digest": "sha1:UTZBQ5JLLBL4FET3NBNHVX6JWONGQ76C", "length": 13309, "nlines": 274, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "WM-950-974-SC-PK | Brady Corporation | अवर्गीकृत | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर WM-950-974-SC-PK Brady Corporation खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये WM-950-974-SC-PK चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. WM-950-974-SC-PK साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/politics/4999/", "date_download": "2022-10-07T22:19:47Z", "digest": "sha1:4AFH2HLIWNUWGLGIIFD6QS2IKRFIIU2B", "length": 65448, "nlines": 341, "source_domain": "www.snopty.com", "title": "आत्मनिर्भर भारत : समज आणि गैरसमज - Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nआत्मनिर्भर भारत : समज आणि गैरसमज\nकोरोना महामारीमुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे ‘टाळे’ उघडताना केंद्र सरकारने 20 लाख कोटी रूपयांचे पॅकेज घोषित केले होते. हे पॅकेज देताना ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेची घोषणा केली. भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये एक मोठी क्रांती आणणारी ही घटना होती. यानंतर सबंध देशभरात ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेविषयी मोठी चर्चा सुरू झाली. अनेकांनी या संकल्पनेचे स्वागत केले; पण त्याच वेळी याविषयी काही गैरसमजही जनतेत दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर भारत ही नेमकी संकल्पना काय आहे, तिचा उगम कसा झाला हे समजून घेणे आवश्यक आहे.\n‘आत्मनिर्भर भारत’ची गरज का निर्माण झाली \nकोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यानंतर मार्च महिन्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या संसर्गाला ‘जागतिक महामारी’ म्हणून जाहीर केले. त्याआधी जानेवारीपासूनच जागतिक व्यापारावर कोरोनाचा प्रभाव पडू लागला होता. राष्ट्रांनी आपल्या देशांच्या सीमा बंदिस्त केल्या होत्या. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. याचा फटका भारतालाही बसला. कारण भारत अनेक बाबतीत या पुरवठा साखळीवर अवलंबून होता. भारतातील 33 क्षेत्रांवर याचे गंभीर परिणाम झाले. त्यातूनच ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेने मूळ धरले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेतून या संकल्पनेला मूर्त रूप आले. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी देशाला संबोधून केलेल्या भाषणातून ही संकल्पना अधिक विस्तृतपणाने समोर आली. पंतप्रधानांनी या भाषणात ‘भारत किती दिवस जगाला कच्चा माल पुरवत राहाणार भारत किती दिवस जगाचा तयार माल वापरणार भारत किती दिवस जगाचा तयार माल वापरणार’ असे काही प्रश्न उपस्थित करत ही संकल्पना विषद केली. पंतप्रधानांचे हे प्रश्न अत्यंत रास्त होते. पूर्वीच्या काळी इंग्लंडसारखे वसाहतवादी देश भारतातून कच्चा माल घेऊन जात आणि पक्का माल तयार करुन पुन्हा भारतात आणून ते विकत असत. त्यामुळे कच्चा माल पुरवणारी आणि पक्का माल विकत घेणारी बाजारपेठ अशी भारताची प्रतिमा बनली होती. दुर्देवाने आजही काही अंशी ही परिस्थिती कायम आहे. आजही भारत कच्चा माल पुरवणारा आणि इतर देशांचा पक्का माल विकत घेणारा देश आहे.\nयाचे उदाहरण म्हणून भारत -चीन संबंधांकडे पाहता येईल. आज भारत आणि चीन यांच्यामध्ये मोठी व्यापारतूट आहे. चीन 80 अब्ज डॉलरचा पक्का माल भारतात विकतो. पण भारताकडून मात्र प्रामुख्याने कच्चा मालच खरेदी करतो. त्यातूनच ही व्यापारतूट मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यामुळे मोदींनी त्यांच्या भाषणात सूचक वक्तव्य केले होते.\nआत्मनिर्भरतेची संकल्पना ः काही गैरसमज\nआत्मनिर्भर भारत म्हणजे काय हे समजून घेताना यामध्ये काय अनुस्यूत नाही हे प्रथम पाहाणे गरजेचे आहे. कारण या संकल्पनेविषयी अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. आत्मनिर्भर भारत म्हणजे भारत आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे पूर्णपणे पाठ फिरवेल, स्वतःला जगापासून विलग करेल असे सांगितले जात आहे. 1990 च्या दशकात भारताने खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारले आणि देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यापुर्वी भारताचे व्यापार धोरण स्थानिक, देशी व्यापाराला पूर्णपणे संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय व्यापारापासून पूर्णतः पाठ असे होते. याला अँटोर्किक सेल्फ रिलायंट म्हणजेच स्वतःवर अतिरेकी पद्धतीने विसंबून राहाणे असे म्हणतात. अनेक जाणकारांनी याला ‘लायसेन्सराज किंवा परमिट राज’ म्हटले होते. हा काळ होता 1991सालाच्या पुर्वीचा. आत्मनिर्भर भारत म्हणजे पुन्हा एकदा या परमिट राजकडे जाणे असा अर्थ काहींनी लावला आहे. आर्थिक उदारीकरणानंतरच्या गेल्या 30 वर्षात केलेली प्रगती बाजूला सारत भारत आपल्या सीमा इतर देशांसाठी बंद करणार आहे, असे सांगितले जात आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. गेल्या दहा वर्षात भारताचा जीडीपी किंवा विकास दर हा सातत्याने 7-8 टक्क्यांपर्यंत राहिला आहे. यामध्ये तब्बल 40 टक्के योगदान भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे आहे. असे असताना आंतरराष्ट्रीय व्यापारापासून फारकत घेऊन कसे चालेल, बंदिस्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणे कितपत योग्य आहे, असे गैरसमजांच्या आधारावरील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.\nआत्मनिर्भरतेचा नेमका अर्थ काय\nवस्तुतः, आत्मनिर्भर भारत याचा अर्थ लायसन्स परमिट राज असे नाही. त्याचा अर्थ स्थानिक उद्योगांना जागतिक दर्जाचे बनवून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाक्षम बनवणे असा आहे. यासाठी त्यांना प्रचंड बळकटी देणे. यासाठी काही उदाहरणे पाहूया.\n1) दक्षिण भारतात होजिअरी कापडाचा मोठा व्यवसाय आहे. भारत मोठ्या प्रमाणात या उत्पादनांची निर्यात करतो. परंतु या होजिअरीसाठी लागणारी बटन्स, झिपर्स किंवा चेन या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण चीनकडून आयात करतो. साहजिकच, चीनकडून या दोन गोष्टी येत नाहीत तोपर्यंत होजिअरी व्यापार्‍यांना कपड्यांची निर्यात करता येत नाही. अशा वेळी आपल्याला जर हा व्यापार वाढवायचा असेल तर देशातच झिपर्स आणि बटन्स तयार करणे आवश्यक आहे. म्हणजेच या दोन्हींच्या उत्पादनात आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागणार आहे. आज कोरोनाच्या काळात पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे व्यवसाय ठप्प पडू देणे शक्य नाही. त्यापेक्षा देशांतर्गत स्थानिक पातळीवर त्याचे उत्पादन सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक उद्योगांना बळकटी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.\n2) आज युरोपातील एखाद्या मॉलमध्ये आपण गेलो तर तिथे बांग्लादेशात निर्माण झालेले कपडे विक्रीला असतात. भारताकडून युरोपात पिलो कव्हर आणि बेडशीट निर्यात होतात. भारत कापूस उत्पादनात जगात अग्रेसर आहे. हा कापूस प्रामुख्याने चीनला निर्यात होतो. चीन त्याचा पक्का माल तयार करतो आणि मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. आज अमेरिकेचे ध्वज हे 100 टक्के चीनमध्ये भारताच्या कापसापासून तयार होतात. यामध्ये कच्चा माल विकणार्‍या भारतापेक्षा पक्का माल विकणारा चीन प्रचंड पैसा कमावतो.\n3) गेल्या काही वर्षांत असे दिसून आले आहे की, अनेक भारतीय उद्योगपती बांग्लादेशात जाऊन कापडाचा कारखाना उभा करतात आणि तिथून तयार कापडाची निर्यात करतात. असे का घडते कारण बांग्लादेशने या उद्योगांना सोयीसवलती दिल्या आहेत. बांग्लादेशात कारखाना उभारणे तुलनेने अधिक सुलभ आहे.\n4) कोरोना विषाणू संक्रमणाबाबतच्या संशयामुळे आधीपासून घसरत चाललेली चीनविषयीची विश्वासार्हता आता रसातळाला गेली आहे. परिणामी, आज चीनमधून अनेक मोठे उद्योग बाहेर पडताहेत.\nअसे असले तरी चीनमधून बाहेर पडणारे अर्ध्याहून अधिक उद्योग व्हिएतनाममध्ये जाताहेत. ते भारतात का येत नाहीत, याच्या कारणांचा विचार करणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला उद्योगधंद्यांना पूरक वातावरण देशात निर्माण करावे लागेल. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचे हे एक मुख्य उद्दिष्ट आहे. थोडक्यात काय या संकल्पनेमध्ये परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आकर्षित करणे, स्थानिक उद्योगांची कार्यक्षमता वाढवणे, त्यांना जागतिक दर्जाचे आणि स्पर्धाक्षम बनवणे यांचा समावेश आहे. वास्तविक, आपल्याकडे या सर्व क्षमता आहेतच; पण त्याकडे योग्य दृष्टीने पाहिले गेले नाही.\n‘आत्मनिर्भर’तेची कास धरणारे देश\nआत्मनिर्भरतेची संकल्पना राबवणारा भारत हा पहिलाच देश नाही. यापूर्वी अमेरिका, दक्षिण कोरिया, चीन या देशांनींही आत्मनिर्भरतेची संकल्पना राबवली आहे. अमेरिकेतही स्थानिक व्यवसायांना मदत केली आहे. भारतात 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधूनही स्थानिक उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जर्मनी या देशाने योग्य सरकारी धोरणे राबवून वाहन उद्योगाला प्रचंड बळकटी दिली. परिणामी, आज या क्षेत्रात जर्मनीला तुल्यबळ स्पर्धक नाही. स्कोडा, बीएमडब्ल्यू या जर्मन कंपन्या अव्वल जागतिक दर्जाच्या आहेत. अशीच नीती दक्षिण कोरियाने वापरली. दक्षिण कोरियाने देखील स्थानिक उद्योगांना बळकटी दिली. ती इतकी मोठी होती की दक्षिण कोरियाच्या जीडीपीमध्ये स्थानिक उद्योगांचा वाटा तब्बल 70 टक्के इतका आहे. आज होम अल्पायन्सेसमध्ये दक्षिण कोरियाशी स्पर्धा करणारा दुसरा देश नाही. एलजी, व्हर्लपूल, सँमसंग या सर्व दिग्गज कंपन्या दक्षिण कोरियातील आहेत. हा टप्पा गाठण्यासाठी दक्षिण कोरियाने आत्मनिर्भरतेची कास धरली. आत्तापर्यंत भारताने याकडे लक्ष केंद्रित केले नव्हते. भारत केवळ कच्चा माल पुरवणारा देश बनून राहिला होता. आता पक्का माल बनवण्यासाठी तशा प्रकारच्या उद्योगांना बळकटी देणारी धोरणे आखणे आवश्यक आहे.\nअर्थशास्रीय गणिते नीट राहण्यासाठी मागणी आणि पुरवठा यांचे संतुलन आवश्यक असते. केवळ उत्पादन वाढत राहिले आणि त्यांना मागणी नसेल तर उद्योगधंदे तोट्यात जातात. पण भारताकडे नेमकी याबाबतची जमेची बाजू आहे. आज आंतरराष्ट्रीय व्यापारात देशाचे 40 टक्के योगदान असले तरी देशांतर्गत बाजारातून मागणी 60 टक्के आहे. ही मागणी आज बर्‍याच अंशी आयात उत्पादनांनी पूर्ण केली जाते. भारतामध्ये वापरल्या जाणार्‍या एअर कंडिशनरपैकी 80 टक्के एअर कंडिशनर आयात केले जातात. त्यात चीनचे प्राबल्य आहे. त्याचे उत्पादन भारतात निश्चितपणे होऊ शकते. मोबाईल हँडसेटची हीच परिस्थिती आहे. आपल्याकडील सुमारे 90 टक्के मोबाईल हे विदेशात तयार झालेले असतात. भारताची देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी प्रतिवर्षी 15 अब्ज डॉलरची आहे. अशा वेळी एअर कंडिशनर, टीव्ही, मायक्रोव्हेव, वॉशिंग मशीन हे सर्व भारतातच का नाही तयार होऊ शकत यासाठी विशिष्ट योजना राबवाव्या लागतील. विशिष्ट उद्योगांना चालना द्यावी लागेल, प्रोत्साहन द्यावे लागेल. आत्मनिर्भर भारत साकारताना या गोष्टी प्राधान्याने होणे आवश्यक आहे. देशांतर्गत बाजारपेठ काबीज करणे तितकेच महत्त्वाचे आहे.\nपाच ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीचे\nकोरोना संकटाचे आगमन होण्यापूर्वी केंद्र सरकारने एक दीर्घकालीन कृतीआराखडा बनवला होता. त्याअंतर्गत भारतीय अर्थव्यवस्था येणार्‍या पाच वर्षांत ‘पाच ट्रिलियन डॉलर्स’ची बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यासाठी पुढील काही वर्षे जीडीपीचा वाढीचा दर किमान 10 टक्के राखणे आवश्यक आहे. कोरोना महामारीमुळे काही काळ ते शक्य होणार नाही; परंतु पुढे जाऊन हे उद्दिष्ट साध्य करावेच लागेल. स्थानिक उद्योगांचे सक्षमीकरण झाले तर ते शक्य आहे.\nदारिद्य्र निर्मूलनासाठीही आत्मनिर्भरतेची गरज\nआज भारतात 30 टक्के लोक दारिद्य्ररेषेखाली राहाताहेत. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी आत्मनिर्भर भारताची संकल्पना योग्य पद्धतीने राबवावी लागणार आहे. भारताला अण्वस्त्रे, प्रचंड मोठे सैन्य या कोणत्याही गोष्टीतून आपले दारिद्य्र दूर करता येणार नाही. याचा एकमेव मार्ग म्हणजे 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 10 टक्के विकासदर. हीच गोष्ट चीनने केली. चीनमध्ये 20 वर्षांपुर्वी 15 ते 20 कोटी लोक दारिद्य्ररेषेखाली होते. पण आज चीनमध्ये हे प्रमाण अगदीच नगण्य आहे.\nआत्मनिभर्रता ः आपली आणि चीनची\nआता चीनने देखील पुन्हा आत्मनिर्भरतेवर भर दिला आहे. अर्थात चीनची आत्मनिर्भरतेची संकल्पना आणि भारताची संकल्पना यात गुणात्मक फरक आहे. चीनने आत्मनिर्भरतेचे अभियान राबवायला सुरूवात करण्याचे कारण म्हंजे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने आणि चिनची विश्वासार्हता ढासळल्याने चीनची निर्यात थांबली आहे. आजवर चीनी वस्तू जगात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जायच्या परंतू त्यांचे प्रमाण आता घटले आहे. त्यामुळे चीनमधील उद्योगधंदे आता देशांतर्गत गरज भागवण्यासाठी उत्पादन करताहेत. थोडक्यात चीनची आत्मनिर्भरतेची संकल्पना ही बचावात्मक आहे. याउलट भारताला स्थानिक उद्योगांना बळकटी देऊन निर्यात वाढवायची आहे. त्यामुळे भारताची संकल्पना आक्रमक आहे. हा गुणात्मक फरक फार महत्वाचा आहे आणि तो लक्षात ठेवावा लागेल.\nआता प्रश्न उरतो तो भारताने कोणत्या क्षेत्रात प्राधान्याने आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे\n1) आरोग्य क्षेत्र ः जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली त्याचा फटका भारतात आरोग्य क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर बसला. देशांतर्गत औषध निर्मिती क्षेत्र हे आजही 70 टक्क्यांपर्यंत चीनकडून येणार्‍या कच्च्या मालावर अवलंबून आहोत. औषध निर्मिती क्षेत्राला लागणारे दोन महत्त्वाचे घटक असतात. एपीआय म्हणजे अ‍ॅक्टीव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंटस् आणि स्टार्टिंग फॅक्टर्स. हे दोन्हीही घटक चीनकडून घ्यावे लागतात. 2019 मध्ये चीनकडून भारताने 5 अब्ज डॉलर्सचे 53 एपीआय आयात केले. ही आयात होत नाही तोपर्यंत त्या औषधांचे उत्पादन करू शकत नाही. आजही भारतात चीनकडून मल्टिव्हिटामिन्ससाठीचे एपीआय, पेनिसिलिन नावाचे औषध यांची 100 टक्के आयात करतो. कोरोनाकाळात पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने औषध क्षेत्रावर परिणाम होऊ लागले. तेव्हा केंद्राने मार्च महिन्यात एक महत्त्वाचा निर्णय घेत जवळपास 900 दशलक्ष डॉलर्सची एक योजना घोषित केली. त्या अंतर्गत ज्या ठिकाणी औद्योगित परिक्षेत्र आहेत तिथे एपीआय पार्क सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात औषधांसाठीच्या कच्च्या मालाबाबत आपले परावलंबित्त्व नगण्य पातळीवर येईल अशी अपेक्षा आहे.\nआज जगाचा विचार करता, कोरोनानंतर राष्ट्राराष्ट्रांकडून आरोग्य क्षेत्रात सर्वाधिक खर्च होईल. प्रसंगी संरक्षण आदी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होईल पण आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक नक्की वाढेल. कारण कोरोना काही शेवटचा विषाणू नाही. भविष्यातही जगाला अशा प्रकारच्या विषाणूजन्य आजाराला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे अनेक देश आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय गुंतवणूक वाढवतील. ही भारतासाठी मोठी संधी आहे. भारताकडे तांत्रिक मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर आहे. कोरोनाच्या काळातही भारताने जगाला डॉक्टर आणि नर्सेस पाठवल्या आहेत. भारताने या क्षेत्रात लक्ष केंद्रीत केले तर संधी अमाप आहेत. आज युरोपात ज्येष्ठ नागरिकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी, शुश्रुषा करण्यासाठी नर्सेस आणि डॉक्टर्स यांची आवश्यकता आहे. आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेअंतर्गत डॉक्टर्स किंवा नर्सेस निर्माण कऱणार्‍या शिक्षणसंस्था वाढवल्या तर या व्यावसायिकांना भारत परदेशात पाठवू शकतो. जेनेरिक औषधांच्या क्षेत्रात भारताचा जगात हातखंडा आहे. भारत स्वस्तात औषध निर्यात करणारा देश आहे. भविष्याचा विचार करता या औषधांना मागणी प्रचंड वाढणार आहे. म्हणूनच आरोग्य क्षेत्रातच आत्मनिर्भरता प्राधान्याने राबवावी लागेल.\n2) संरक्षण क्षेत्र ः भारताची प्रतिमा ही आशिया खंडातील सर्वात मोठा संरक्षण क्षेत्रातील आयातदार देश म्हणून आहे. भारताचा पैसा मोठ्या प्रमाणात यात खर्च करतो. चालू खात्यातील तुटीमध्ये या क्षेत्राचा वाटा मोठा आहे. भारत तेल, संरक्षण साहित्य आणि सोने या तीन गोष्टी मोठ्या प्रमाणावर आयात करतो. या तीनही गोष्टींच्या आयातीमुळे चालू खात्याची तूट वाढत जातेय. ही तूट कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची संकल्पना राबवायला हवी. नुकतीच संरक्षण खात्याने 100 अशा गोष्टींची यादी केली ज्या गोष्टी भारत आता आयात करणार नाही. त्या देशांतर्गतच उत्पादित होणार आहेत. अशा निर्णयाने स्थानिक उद्योगांना बळकटी मिळेल. स्थानिकांना रोजगार संधी मिळतील. आयात कमी करतानाच भारत संरक्षण क्षेत्रात निर्यातदार देश कसा होईल याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. त्या दिशेने भारताची वाटचाल सुुरु आहे. भारत ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र चार देशांना निर्यात करणार आहे. त्याचबरोबर पाणबुड़्या, लष्करी हेलिकॉप्टर्सदेखील भारताने निर्यात करायला सुरूवात केली आहे. आयात कमी आणि निर्यात अधिक या सूत्राने संरक्षणक्षेत्राची आत्मनिर्भर होण्यासाठी वाटचाल झाल्यास त्याचे रोजगारनिर्मिती, अर्थव्यवस्थेला चालना असे अनेक फायदे आहेत.\n3) आयटी क्षेत्र ः माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होताना मात्र आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वळावे लागेल. याबाबतीत आपले थोडे दुर्लक्ष झाले आहे. 2000 ते 2010 पर्यंत भारताची आयटी क्षेत्रात एक प्रकारची मक्तेदारी होती. चीनही भारतापेक्षा मागे होता. पण कृत्रिम बुद्धीमत्तेत प्राविण्य मिळवून चीन भारताच्या पुढे गेला आहे. चीनच्या या प्रगतीचा अभ्यास करून आपल्याकडे कृत्रिम बुद्धीमत्ता कशी वाढवता येईल हे पाहिले गेले पाहिजे.भारताला भविष्यात विकासाच्या दृष्टीने हे क्षेत्र महत्त्वाचे आहे.\nआत्मनिर्भरतेची संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी भारताला मोठे धोरणात्मक बदल घडवून आणावे लागणार आहेत. परदेशी पैसा आणि कंपन्यांना भारताकडे आकर्षित करण्यासाठी हे बदल गरजेचे आहेत. गेल्या सहा महिन्यात दीड हजार कंपन्यांनी चीनला रामराम केला; परंतू त्यातील बहुतांश कंपन्या दक्षिण पूर्व आशियातील कंबोडिया, इंडोनेश़िया देशात गेल्या. त्या भारतात आल्या नाहीत. भारताने डुईंग बिझनेस विथ ईझ अर्थात उद्योगसुगमतेच्या क्रमवारीत 64 व्या क्रमांकावर मजल मारली आहे आणि 50पर्यंत जाण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आज भारतात येऊन कंपन्यांना उद्योग सुरू करण्यासाठी विविध प्रकारचे परवाने घ्यावे लागतात. त्याचे प्रमाण कमी करावे लागतील. व्यवसाय उभारण्यासाठी जमीनीची उपलब्धता, वीज उपलब्धता, पर्यावरण परवानगी, कनेक्टिव्हिटी या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडे भूसंपादनाचे विधेयक अजूनही प्रलंबित आहे, करविषयक विधेयक प्रलंबित आहेत. देशातील कामगार कायदे हे 100 वर्ष जुने आहेत. त्यातही इष्ट बदल करावे लागतील. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो दळणवळणाचा. आज पुण्यात एखादा कारखाना उभारण्यासाठी लागणारा कच्चा माल देशातील विविध भागातून मागवावे लागतो. परंतू खूप अंतरावरून तो वाहून आणण्याचा खर्च खूप जास्त आहे. परिणामी वस्तूचा उत्पादनखर्च वाढून किंमत वाढते. ही दळणवळणाची समस्या सोडवली पाहिजे. याबाबत चीनचे उदाहरण पाहू. वुहान हे चीनमधील औद्योगिक शहर आहे. तिथल्या उद्योगांना लागणारा कच्चा माल पुरवणारे कारखाने हे वुहानमध्येच उभे करण्यात आले. एखादी मोबाईल बनवणारी कंपनी असेल तर त्यासाठी लागणारा कच्चा माल बनवणारे उद्योग वुहानमध्येच उभारले. त्यामुळे दळणवळणाचा खर्च वाचला. उत्पादनखर्च कमी होतो. परिणामी वस्तूची किंमत कमी होते आणि ते स्पर्धाक्षम बनते. भारतानेही त्याच धर्तीवर औद्योगिक परिक्षेत्रे, उद्योगनगरे उभी करावी लागतील जिथे कच्चा आणि पक्का माल दोन्ही एकाच ठिकाणी तयार होईल.\nभारतात गेल्या काही वर्षांत परदेशी गुंतवणूक वाढत आहे; पण ती ती संसाधनांच्या विकासासाठी आकर्षिक करावी लागेल. आज ती ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये येत आहे. याचे कारण भारतीयांची मानसिकता. भारतीयांना एकाच वेळी 20 प्रकारचे चिप्स खायला आवडतात. त्यामुळे वेफर्सच्या उत्पादनात परदेशी गुंतवणूक होऊ लागली. वास्तविक ती कॉम्प्युटरच्या चिपमध्ये व्हायला हवी. आपल्याला उर्जा क्षेत्र, संसाधन विकास या क्षेत्रात गुंतवणूकदार आकर्षित कसे करता येतील याचा विचार करावा लागेल. त्यासाठी व्यापार धोऱणात बदल करावे लागेल. भारताने तीन प्रकारचे व्यापार धोरण आखावे लागेल.\nपहिले धोऱण म्हणजे परस्परपूरक. उदाहरणार्थ, भारत आखातातून तेल आयात करतो. या तेलाचे देयक रुपयात देण्याऐवजी त्यांना अन्नधान्य, बीफ पुरवले जाते.\nदुसरे धोरण म्हणजे प्राधान्यक्रमानुसार व्यापार. भारताला इथून पुढे व्यापाराच्या दृष्टीने काही क्षेत्राला प्राधान्य द्यावे लागेल. क्वाडसारखा समूह भारतासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारतात गुंतवणुकी वाढतील. काही देशांना आपल्याला व्यापाराच्या दृष्टीने महत्त्व द्यावे लागेल.\nतिसरा प्रकार सामरिक व्यापार. काही देश या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. उदा. ऑस्ट्रिया. हा देश चीनच्या विरोधात आहे आणि तो युरेनिअमचा पुरवठा करतो.\nआत्मनिर्भरतेला हवी गांधीविचारांची जोड\nअशा सर्व पातळ्यांवर काटेकोरपणाने प्रयत्न करुन आत्मनिर्भर भारताची संकल्पना विकसित होत गेली पाहिजे. पण याचा केंद्रबिंदू काय असला पाहिजे आपल्याकडे लोकसंख्येची तीन प्रकारची वैशिष्ट्ये आढळतात. आपल्याकडे 4 ते 5 टक्के अतिश्रीमंत लोक आहेत. त्यांची तुलना डेन्मार्क, स्वित्झर्लंडसारख्या अत्यंत श्रीमंत देशातील धनिकांशी होऊ शकेल. दुसरा गट आहे मध्यम उत्पन्न गट. हे युरोपियन लोकांसारखे मध्यम वर्गीय आहेत. तिसरे म्हणजे आफ्रिकन देशांपेक्षाही गरीब लोक आपल्याकडे आहेत. अशा वेळी आत्मनिर्भरतेचे धोरण कोणासाठी ठरवणार आपल्याकडे लोकसंख्येची तीन प्रकारची वैशिष्ट्ये आढळतात. आपल्याकडे 4 ते 5 टक्के अतिश्रीमंत लोक आहेत. त्यांची तुलना डेन्मार्क, स्वित्झर्लंडसारख्या अत्यंत श्रीमंत देशातील धनिकांशी होऊ शकेल. दुसरा गट आहे मध्यम उत्पन्न गट. हे युरोपियन लोकांसारखे मध्यम वर्गीय आहेत. तिसरे म्हणजे आफ्रिकन देशांपेक्षाही गरीब लोक आपल्याकडे आहेत. अशा वेळी आत्मनिर्भरतेचे धोरण कोणासाठी ठरवणार अतिश्रीमंत, मध्यमवर्गीय की अतिगरिब लोकांसाठी अतिश्रीमंत, मध्यमवर्गीय की अतिगरिब लोकांसाठी हा मोठा पेचप्रसंग आहे, असे वाटू शकते. तथापि, श्री. मोहनकुमार हे परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ माजी अधिकारी आहेत. त्यांनी असे सांगितले आहे की सरकारने यासाठी गांधीयन लिटमस टेस्ट घ्यावी. महात्मा गांधी म्हणाले होते की सरकारने कोणतीही कृती करताना जो रस्त्यावरील सर्वात गरीब व्यक्ती आहे तो डोळ्यासमोर ठेवावा. त्याचे भले होणार का हा विचार करूनच प्रत्यक्ष कृती करावी. त्यामुळे आत्मनिर्भरतेची संकल्पना तयार करताना रस्त्यावर बसलेल्या अत्यंत गरीब व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. त्याची गरिबी दूर करण्यासाठी या लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे आत्मनिर्भरतेचे महत्त्वाचे उद्दीष्ट आहे. आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक सुधारणा घडवून आणायच्या आहेत.\nभारत आता इतरांच्या नियमांचे पालन करणारा देश नसून नियम बनवणारा देश बनला पाहिजे. नियम घडवणारा देश होण्याची क्षमता आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेत आहेत. चीनही एका दिवसात महासत्ता झाला नाही तर गेली तीस वर्षे आत्मनिर्भरतेची संकल्पना राबवली. 1981 पासून सुरू केल्यानंतर 2011 मध्ये चीन जगाची फॅक्टरी म्हणून समोर आला. भारतालाही वेळ लागणार आहे. त्यामुळे आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेकडे सकारात्मकतेने पाहाणे, संयम बाळगणे, सातत्याने सरकारी योजना तयार करून राबवत राहाव्या लागतील. याचे सकारात्मक निष्कर्ष 100 टक्के मिळतील. मात्र त्यासाठी संयम ठेवणे गरजेचे आहे.\nपरराष्ट्र, संरक्षण धोरणातील, आंतरराष्ट्रीय संबंधातील सर्व चालूघडामोडींविषयी, कोरोना, भारत – चीन तणाव या विषयी मराठी व इंग्रजीतून माहिती व विश्लेषणासाठी.\nयेथे टिप्पणी करण्यासाठी लॉगिन करा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nआत्मनिर्भर भारत : समज आणि गैरसमज\nसिटवे बंदर : भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’\nअस्मिता नव्हे, ममतांचे राजकारण\nआम्हाला आमचे प्राधान्यक्रम ठरवू द्या\nहाच तो महाराष्ट्र धर्म\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.statusinmarathi.com/lakshmi-puja-wishes-in-marathi/", "date_download": "2022-10-07T21:30:59Z", "digest": "sha1:DVLLZQNS53OU5F7GAOVFX7JZFUOBH3QU", "length": 11849, "nlines": 172, "source_domain": "www.statusinmarathi.com", "title": "लक्ष्मीपूजा शुभेच्छा मराठी 2022 | Lakshmi puja wishes in Marathi - Status in Marathi", "raw_content": "\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nलक्ष्मीपूजा शुभेच्छा संदेश मराठी | Lakshmi puja shubhechha Marathi\nलक्ष्मीपूजा स्टेटस मराठी / lakshmi puja status Marathi\nधनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,\nविद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..\nया दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,\nलक्ष्मि चा हात असो,\n‘सरस्वती ची साथ असो,\nगणराया चा निवास असो,\nआणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने\nआपले जीवन नेहमी उजळून राहो.\nलक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nपणतीचा उजेड अंगणभर पडू दे\nचांदण्यांचा सडा अंगणभर पसरलेला\nदारातला दिवा आकाशात खुललेला\nलक्ष्मीची पाऊले आज येतील दारात.\nलक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nआणि सुखाचे मंगल क्षण आपणांस\nश्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या\nआपल्या घरी नित्य राहावा\nआपणास लक्ष्मी प्राप्त होवो \nलक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो \nघरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न \nघरी नांदू दे सुख-समृद्धी\nॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद\nॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नमः॥\nआपणां सर्वांवर सदैव राहो,\nसदृढ आरोग्य यांचा वास\nआपल्या घरात सदैव राहो.\nआपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा\nलक्ष्मीपूजा पूजा मेसेज मराठी / lakshmi sms marathi.\nमांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारी\nलक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने\nतुम्हाला व तुमच्या परिवारास\nसुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून\nलक्ष्मीपूजन शुभेच्छा आमुच्या जपा मनी\nपैसा चा पाऊस पडो,\nलक्ष्मी चा वास हो,\nसंकटा चा नाश हो,\nशान्ति चा वास हो.\nसमृद्धी यावी सोन पावली उधळण\nभाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षा\nलक्ष्मी पुजनाच्या हार्दिक शुभेच्छा\nसुखाचे दीप उजळु दे..\nघर सुख समदीने भरू दे..\n॥ लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा ॥\nसुख आणि समृद्धी घेउनी आगमन\nदिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे\nमी व माझ्या परिवारातर्फे\nतुम्हाला व तुमच्या कुटूंबीयांना\nलक्ष्मीपूजन व दिपावलीच्या मंगलमय\nसनाईच्या शुभ्र कळ्या, लक्ष्मीपूजनी तळपती\nदिवाळी सण खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास\nउटण्याचे अभ्यंगस्नान, फराळाचा सुगंधी वास\nदिव्यांची मनमोहक आरास, मनाचा वाढवी उल्हास…\nदिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nstatusinmarathi.com या वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठी माणसापर्यंत प्रेरणादायी कविता, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी कोट्स, प्रेरक विचार आणि वाढदिवस शुभेच्छा , मराठी स्टेटस पोचवण्याचा प्रयन्त करत आहोत. जेणे करून त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.👍\nकोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२२ | Kojagiri purnima wishes in marathi 2022,status,quotes, Messages,Images, greetings शेअर करून द्या कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा.\nकोजागरी पौर्णिमा माहिती,कथा,महत्त्व,पूजविधी मराठी | kojagiri purnima information in marathi 2022.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/backward-report-is-a-mirror-of-the-maratha-community-the-issue-of-fifty-percent-limit-will-come-to-an-end/", "date_download": "2022-10-07T23:09:29Z", "digest": "sha1:BR2QCFMNFRRC67KQGBCJMOGBD65LEJD3", "length": 10194, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"मागास रिपोर्ट मराठा समाजाचा आरसा, पन्नास टक्के मर्यादेचा मुद्दा संपुष्टात येईल\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“मागास रिपोर्ट मराठा समाजाचा आरसा, पन्नास टक्के मर्यादेचा मुद्दा संपुष्टात येईल”\n“मागास रिपोर्ट मराठा समाजाचा आरसा, पन्नास टक्के मर्यादेचा मुद्दा संपुष्टात येईल”\nमुंबई | मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केल्यानंतर मराठा समाज मोठ्या प्रमाणात सरकारविरोधात आंदोलनासाठी एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात आंदोलन देखील होणार आहेत. मराठा क्रांती आंदोलनाची सुरुवात काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरातून झाली होती.\nमराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा यासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या वतीने अॅड. संदीप देशमुख यांनी फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात रविवारी दाखल केली आहे. राज्य सरकारआधीच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करून या याचिकेत आरक्षणाच्या 50 टक्क्यांची मर्यादा ठरवणाऱ्या निकालाला आव्हान देण्यात आलं आहे.\nराज्य सरकारनेदेखील तत्काळ फेरविचार याचिका दाखल केली पाहिजे. मला पूर्ण विश्वास आहे, हे केले तर पन्नास टक्के मर्यादेचा मुद्दा संपुष्टात येईल. मागास रिपोर्ट मराठा समाजाचा आरसा आहे, त्यामुळे मराठा आरक्षण टिकविण्यासाठी अतिशय ताकदीने राज्य सरकार व केंद्र सरकारने दोघांनी प्रयत्न करावा. समाज म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.\nदरम्यान, वेगवेगळ्या 54 मुद्द्यांना अनुसरून आम्ही फेरविचार याचिका दाखल केल्याचं विनोद पाटील यांनी सांगतलं आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनेही तत्काळ याचिका दाखल करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात\nपुण्यातील गर्दीला अजित पवार जबाबदार, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा- प्रविण दरेकर\n“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…, हे वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल”\n एकदा कोरोना होऊन गेल्यावर दुसऱ्यांदा संक्रमणाचा धोका कमी\nकोरोना काळात शेतकरी बांधव राबला म्हणून इतर जगू शकले- विजय वडेट्टीवार\n‘या’ गावाने करून दाखवलं; 100 टक्के लसीकरण करणारं देशातील पहिलं गाव ठरलं\nशरद पवार दिल्लीला रवाना; विरोधी पक्षातील विविध नेत्यांना भेटणार\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.hongkepvcvalve.com/news/introduction-to-the-types-of-valves-used-in-various-industries/", "date_download": "2022-10-07T23:12:11Z", "digest": "sha1:3ITUXTFXLAPF6VC2K7H3HU6LNLGCWO5U", "length": 12389, "nlines": 114, "source_domain": "mr.hongkepvcvalve.com", "title": " बातम्या - विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणार्‍या वाल्व्हच्या प्रकारांची ओळख", "raw_content": "\n2 पीसी पीव्हीसी बॉल वाल्व मालिका\nपीव्हीसी बॉल वाल्व मार्गदर्शक\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nविविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणार्‍या वाल्व्हच्या प्रकारांचा परिचय\nविविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणार्‍या वाल्व्हच्या प्रकारांचा परिचय\n1. पर्यावरण संरक्षण उद्योगातील वाल्व्ह\nपर्यावरण संरक्षण प्रणालीमध्ये, पाणीपुरवठा यंत्रणेला मुख्यतः सेंटरलाइन बटरफ्लाय व्हॉल्व्ह, सॉफ्ट-सीलबंद गेट व्हॉल्व्ह, बॉल व्हॉल्व्ह आणि एक्झॉस्ट व्हॉल्व्ह (पाइपलाइनमधील हवा काढून टाकण्यासाठी वापरला जातो) वापरणे आवश्यक आहे.सीवेज ट्रीटमेंट सिस्टमला मुख्यतः सॉफ्ट-सीलबंद गेट व्हॉल्व्ह आणि बटरफ्लाय व्हॉल्व्ह आवश्यक आहेत;\nदुसरे, बांधकाम उद्योग अनुप्रयोग झडप\nशहरी बांधकाम उद्योग प्रणाली सामान्यतः कमी-दाब वाल्व वापरतात, जे सध्या पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा-बचत करण्याच्या दिशेने विकसित होत आहेत.पर्यावरणपूरक रबर प्लेट व्हॉल्व्ह, बॅलन्स व्हॉल्व्ह, मिडलाइन बटरफ्लाय व्हॉल्व्ह आणि मेटल-सील केलेले बटरफ्लाय व्हॉल्व्ह हळूहळू लो-प्रेशर लोखंडी गेट व्हॉल्व्ह बदलत आहेत.घरगुती शहरी इमारतींमध्ये वापरल्या जाणार्‍या बहुतेक झडपा म्हणजे बॅलन्स व्हॉल्व्ह, सॉफ्ट-सीलबंद गेट व्हॉल्व्ह, बटरफ्लाय व्हॉल्व्ह इ.;\n3. गॅस उद्योगात वापरलेले वाल्व्ह\nमुख्य गॅस झडपा म्हणजे बॉल व्हॉल्व्ह, प्लग व्हॉल्व्ह, दाब कमी करणारे झडप आणि सुरक्षा झडप;\n4. गरम करण्यासाठी वाल्व\nहीटिंग सिस्टममध्ये, ऊर्जा-बचत आणि उष्णतेचा हेतू साध्य करण्यासाठी, पाइपलाइनच्या उभ्या आणि क्षैतिज हायड्रॉलिक असंतुलनाची समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात धातू-सीलबंद बटरफ्लाय वाल्व, क्षैतिज शिल्लक वाल्व आणि थेट दफन केलेले बॉल वाल्व्ह आवश्यक आहेत. शिल्लक\n5. जलविद्युत केंद्रांसाठी झडपा.\nपॉवर स्टेशनला मोठ्या व्यासाचे आणि उच्च-दाब सुरक्षा झडपा, दाब कमी करणारे वाल्व, ग्लोब व्हॉल्व्ह, गेट व्हॉल्व्ह, बटरफ्लाय व्हॉल्व्ह, आपत्कालीन शट-ऑफ व्हॉल्व्ह आणि फ्लो कंट्रोल व्हॉल्व्ह, गोलाकार सीलिंग इन्स्ट्रुमेंट ग्लोब व्हॉल्व्ह,\n6. अन्न आणि औषधांसाठी वाल्व\nया उद्योगाला प्रामुख्याने स्टेनलेस स्टील बॉल व्हॉल्व्ह, नॉन-टॉक्सिक ऑल-प्लास्टिक बॉल व्हॉल्व्ह आणि बटरफ्लाय व्हॉल्व्हची गरज आहे.त्यापैकी, इन्स्ट्रुमेंट व्हॉल्व्ह, नीडल व्हॉल्व्ह, नीडल ग्लोब व्हॉल्व्ह, गेट व्हॉल्व्ह, ग्लोब व्हॉल्व्ह, चेक व्हॉल्व्ह, बॉल व्हॉल्व्ह आणि बटरफ्लाय व्हॉल्व्ह यांसारखे सामान्य-उद्देशाचे झडपे आहेत;\nसात, मेटलर्जिकल उद्योग ऍप्लिकेशन वाल्व.\nमेटलर्जिकल उद्योगात, अॅल्युमिनाला प्रामुख्याने पोशाख-प्रतिरोधक स्लरी व्हॉल्व्ह (इन-फ्लो स्टॉप वाल्व्ह) आणि रेग्युलेटिंग ट्रॅप्सची आवश्यकता असते.पोलाद बनवण्याच्या उद्योगाला प्रामुख्याने मेटल-सीलबंद बॉल व्हॉल्व्ह, बटरफ्लाय व्हॉल्व्ह, ऑक्साइड बॉल व्हॉल्व्ह, स्टॉप फ्लॅश आणि चार-मार्गी दिशात्मक झडपांची गरज असते;\n8. पेट्रोलियम स्थापनेसाठी वाल्व\n1. परिष्करण युनिट.ऑइल रिफायनिंग प्लांटमध्ये वापरण्यात येणारे बहुतेक व्हॉल्व्ह पाइपलाइन व्हॉल्व्ह आहेत, प्रामुख्याने गेट व्हॉल्व्ह, ग्लोब व्हॉल्व्ह, चेक व्हॉल्व्ह, सेफ्टी व्हॉल्व्ह, बॉल व्हॉल्व्ह, बटरफ्लाय व्हॉल्व्ह आणि स्टीम ट्रॅप्स.त्यापैकी, गेट वाल्व्हची मागणी एकूण वाल्व्हच्या सुमारे 80% आहे;\n2. रासायनिक फायबर उपकरण.रासायनिक फायबर उत्पादनांमध्ये प्रामुख्याने तीन श्रेणींचा समावेश होतो: पॉलिस्टर, ऍक्रेलिक आणि नायलॉन.बॉल व्हॉल्व्ह आणि जॅकेटेड व्हॉल्व्ह (जॅकेटेड बॉल व्हॉल्व्ह, जॅकेटेड गेट व्हॉल्व्ह, जॅकेटेड ग्लोब व्हॉल्व्ह)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nपत्ता:नं. 28, शुगुआंग रोड, जियानशान टाउन, पनआन काउंटी, जिन्हुआ सिटी, झेजियांग प्रांत\nपीव्हीसी पाईप फिटिंग्ज, Abs बेसिन Faucets, बेसिन टॅप, सिंचन बॉल वाल्व, पीव्हीसी शेड्यूल 40 बॉल वाल्व्ह, पाईप फिटिंग्ज,\n© कॉपीराइट - 2010-2021 : सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nपीव्हीसी शेड्यूल 40 बॉल वाल्व्ह, बेसिन टॅप, पीव्हीसी पाईप फिटिंग्ज, पाईप फिटिंग्ज, Abs बेसिन Faucets, सिंचन बॉल वाल्व,\nई - मेल पाठवा\nआमच्याशी गप्पा मारा, powered by LiveChat", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/tips-to-donate-blood-and-blood-donation-benefits-294767.html", "date_download": "2022-10-07T21:34:15Z", "digest": "sha1:5D62QI7WWT6IXPSNGET2OPQGKIBF4YNM", "length": 7827, "nlines": 94, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रक्तदान करताना 'या' चुका चुकूनही करु नका – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /\nरक्तदान करताना 'या' चुका चुकूनही करु नका\nरक्तदान करताना 'या' चुका चुकूनही करु नका\nआजही अनेकांना असे वाटते की, रक्तदान केल्यामुळे हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. पण मुळात असे काही नसते.\nआजही अनेकांना असे वाटते की, रक्तदान केल्यामुळे हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. पण मुळात असे काही नसते.\nरक्तदानाचा जरा समोरच्या वक्तीला फायदा होतो तसाच फायदा रक्तदात्यालाही होतो. शरीरात नवीन रक्त तयार व्हायला मदत होते. रक्तदान करणाऱ्या व्यक्ती या इतरांपेक्षा जास्त स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात. पण रक्तदान करताना ठराविक गोष्टींची जर काळजी घेतली गेली नाही तर आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. रक्तदानाबद्दल अनेकांच्या मनात आजही अनेक शंका असतात. आज आम्ही तुमच्या याच शंकेचं निरसन करणार आहोत. रक्तदान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काय करावं याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. स्वस्थ पुरुष तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करु शकतो. तर स्वस्थ महिला चार महिन्यांतून एकदा रक्तदान करु शकतात. महिला आणि पुरुषांच्या रक्तदान करण्यामध्ये फरक असण्याचं मुख्य कारण म्हणजे दोघांच्या शरीराची जढण वेगळी आहे. मासिकपाळीमुळे महिलांच्या अंगातून महिन्यातून एकदा दुषित रक्त बाहेर पडत असतं. त्यामुळे त्यांनी शक्यतो चार महिन्यांतून एकदा रक्तदान करावे. आजही अनेकांना असे वाटते की, रक्तदान केल्यामुळे हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. पण मुळात असे काही नसते. रक्तदान केल्यानंतर 21 दिवसांनंतर शरीरात नवीन रक्त तयार होतं. शरीरातील हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर अनेक आजार होऊ शकतात. सतत थकणं, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणं, चक्कर येणं, डोकं दुखणं अशा आजाराने माणूस त्रस्त होतो. एकावेळी कोणाच्याही शरीरातून 471 एमएलपेक्षा जास्त रक्त घेतले जात नाही. रक्तदान करण्याच्या एकदिवस आधी धुम्रपान करु नये. तसेच 48 तासांपूर्वी मद्यपान करु नये. जर मद्यपान केले असेल तर रक्तदान करु नये. रक्तदान केल्यानंतर दर तीन तासांनी भरपेट खाणं गरजेचं आहे. रक्तदान केल्यानंतर ज्यूस, चिप्स, फळं यांसारखा आहार करावा. शरीराला आवश्यक पदार्थ सातत्याने खालले नाही तर त्याचा परिणाम लगेच दिसू लागतो. तसेच रक्तदान केल्यानंतर पुढील 12 तासांमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यायाम करु नये.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/nirjan-vadyatun-yet-hota-mulach-aavaj/", "date_download": "2022-10-07T23:04:40Z", "digest": "sha1:R5ORMNDZUE4ZHIMCIFE5NSWYUSDW7SDO", "length": 13810, "nlines": 89, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "भयंकर ! मध्यरात्री निर्जन वाड्यातून येत होता लहान मुलाच्या रडण्याचा आवाज; हिम्मत करून गावकरी बघायला गेले तेव्हा सर्वांची उडाली झोप... - Themaharashtrian", "raw_content": "\n मध्यरात्री निर्जन वाड्यातून येत होता लहान मुलाच्या रडण्याचा आवाज; हिम्मत करून गावकरी बघायला गेले तेव्हा सर्वांची उडाली झोप…\n मध्यरात्री निर्जन वाड्यातून येत होता लहान मुलाच्या रडण्याचा आवाज; हिम्मत करून गावकरी बघायला गेले तेव्हा सर्वांची उडाली झोप…\nप्रत्येक गावात एक तरी असा वाडा, किंवा इमारत किना जागा असते जी पूर्णपणे निर्जन असते. त्या जागेच्याबद्दल अनेक वेगवेगळ्या घटना आणि किस्से प्रसिद्ध असतात. अनेक वेळा तिथं काही अदृश्य शक्तींचा वास आहे म्हणजेच भू’तबाधा आहे असं देखील सांगितले जाते आणि त्यामुळे तिथे जाण्यास कोणी सरसावतं नाही.\nबऱ्याच वेळा या केवळ भाकड कथा असल्याचे देखील समोर आले आहे, मात्र तरीही काही लोक त्यावर विश्वास ठेवत नाही. असाच एक अगदी निर्जन वाडा उत्तर प्रदेश येथील कानपूरमधील फत्तेपूर या गावातील आहे. या वाड्याबद्दल अनेक किस्से आणि घटना प्रसिद्ध आहेत आणि म्हणून तिकडे कोणीच जात नाही.\nया निर्जन आणि भकास वाड्यामधून, मंगळवारी रात्री एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. गावाच्या बाहेर असणाऱ्या या वाड्यात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज अचानकच येऊ लागला आणि गावकरी अचं’बित झाले. रस्त्यावरून येणाऱ्या काही गावकऱ्यांनी लहान मुलाचा आवाज ऐकला आणि मग गावात जाऊन त्यांनी इतरांना देखील याबद्दल सर्व सांगितले.\nगावकऱ्यांनी हिंमत केली आणि त्या निर्जन वाड्याजवळ गेले. मात्र त्यांन समोर जो प्रकार दिसला तो पाहून सगळेच चांगलेच च’क्रावले. याठिकाणी एका लहान मुलाची बेदम मारहाण करण्यात अली होती. आणि त्यानंतर त्याला तेथील एका खां’बाला बां’धण्यात आलं होतं. हा मुलगा भी’तीमुळे अक्षरशः थ’थर का’पत होता.\nमा’रहा’ण आणि भी’ती यामुळे तो मुलगा बे’शुद्ध होण्याच्या स्थितीत होता. गावकऱ्यांनी ता’त्काळ तेथील स्थानिक पो’लिसां’ना याबद्दलची सूचना दिली. याबद्दल सूचना मिळताच पो’लीस ता’तडीने घ’टनास्थळी पोहचले आणि त्या मुलाला मुक्त करून जवळच्या रु’ग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. उत्तर प्रदेश येतील फत्तेपूर गावातील ही अमा’नुष घ’टना समोर आली आहे.\n१२ वर्षाच्या छोट्या मुलाला बेद’म मा’रहा’ण करण्यात आली होती. त्याच गावात राहणारा रामप्रकाश राठोड यांचा मुलगा रमन मंगळवारी, जांभळं तोडण्याकरिता त्याचा मित्र किशोर याच्यासोबत गेला होता. रमन आणि किशोर दोघे मित्र द’गड मा’रत जांभूळ तोडत होते. त्यावेळी रमनने फे’कलेला दगड किशोरच्या डो’क्यात लाग’ला.\nत्यामुळे त्याच्या डो’क्याला गं’भीर दुखा’पत झाली आणि प्र’चंड र’क्तस्त्रा’व झाला. किशोरचे वडील राजू यांनी त्वरित त्याला दवा’खान्यात डॉ’क्टरांकडे नेले. डॉ’क्टरांनी त्याच्यावर उपचार केले. आणि त्यानंतर राजूने रमनच्या घरी जाऊन त्याला शिवीगाळ केली. तू जाणून माझ्या मुलाचं डो’कं फो’डलं आणि याचा मी नक्कीच ब’दला घेईन अशी ध’की देखील त्याने त्यावेळी दिली.\nमंगळवारी रात्री राजूने रमनला पक’डलं आणि त्याला शेताच्या रस्त्यावरून नि’न वाड्यात नेले. राजूने रमनला बेद’म मा’रहा’ण केली. त्यानंतर त्याला खां’बाला ‘बांधून तिथून निघून गेला. दुसरीकडे रमनचे कुटुंब त्याचा शोध घेऊ लागलं. दुसरीकडे, मंगळवारी रात्री काही गावकरी त्या परिसराजवळून जात असताना त्यांनी लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला.\nत्या गावकऱ्यांनी इतर गावकऱ्यांना याची माहिती दिली आणि मग सगळेच जण त्या निर्जंन वाड्याजवळ गेले. तेव्हा लहान मुलाला बे’दम मा’रहा’ण करून खां’बाला बांध’ल्याचं दिसून आलं. हा मुलगा खूप घा’बरला होता आणि तो काहीही बोलण्याच्या म’नस्थि’तीत अजिबातच नव्हता. तातडीने पो’लिसां’नी त्याला उ’पचारासाठी रु’ग्णालयात दाखल केले. मुलगा खूप घा’बरलेला आहे. त्याची चौक’शी सुरू आहे. दो’षीवर योग्य का’रवाई केली जाईल असं पो’लिसां’नी सांगितले.\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\nपती ‘नपुं’सक’ असून देखील पत्नी झाली ‘प्रे’ग्नं’न्ट’, खरे सत्य समोर येताच पतीचेही उडाले होश…\nह’निमू’नच्या पहिल्याच रात्री पत्नीला समजले की पती आहे स’मलैं’गि;क, पहा तरीही पतीने पत्नीसोबत केले…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/27729/", "date_download": "2022-10-07T21:29:21Z", "digest": "sha1:VLXBAE4I4YPZMSRVGPYZCD72226MY2SG", "length": 16728, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "फुकुओका – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nफुकुओका : जपानच्या उत्तर क्यूशू विभागातील याच नावाच्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण व बंदर. लोकसंख्या १०,३९,२८६ (१९७७ अंदाज). हे डेल्टा नदीवर, हाकाटा उपसागराच्या उत्तर शिरोभागी नागासाकीच्या ईशान्येस सु. ११० किमी.वर आहे. हाकाटा हे मध्ययुगात जपानचे निर्यात व्यापाराचे प्रमुख बंदर होते. १२७४ ते १२८१ मध्ये कूब्‍लाईखानाने या शहरावर हल्ले केले होते. नाका नदीमुळे शहराचे हाकाटा आणि फुकुओका असे दोन भाग झाले असले, तरी १८७८ मध्ये दोहोंचे एकत्रीकरण होऊन १९४० च्या सुमारास हाकोझाकी हा विभागही यात समाविष्ट झाल्यापासून शहराचा विकास झपाट्याने होत गेला.\nकोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात जहाजबांधणी, जड रसायने, साखर शुद्धीकरण, यंत्रसामग्री, लोखंड व पोलाद कारखाने तसेच काचसामान, मृत्पात्रे, कागद, सुती व रेशमी कापड इ. उद्योग चालतात. यांपैकी बरीचशी उत्पादने निर्यात होतात. जगप्रसिद्ध हाकाटा बाहुल्यांची निर्मितीही येथेच होते. येथे ठोक व किरकोळ व्यापारही फार मोठ्या प्रमाणावर चालत असून बॅंकिंग, विमा इ. व्यवसायही प्रगत आहेत.\nफुकुओका बंदर आधुनिक सोयींनी सुसज्‍ज असून ते मच्छीमारीचे केंद्र आहे. आग्‍नेय आशियाशी येथूनच दैनंदिन वाहतूक चालू असते. लोहमार्गांनी देशातील अनेक शहरांशी हे जोडलेले असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळही आहे.\nदुसऱ्या महायुद्धातील बाँबवर्षावात (१९४५) शहराची खूप नासधूस झाली. त्यानंतर आधुनिक पद्धतीने त्याची पुनर्रचना करण्यात आली. क्यूशू (स्था. १९१०) आणि इतर चार विद्यापीठे हाकोझाकी विभागात आहेत. वेस्ट पार्क भागामध्ये शासकीय कार्यालये, फुकुओका किल्ल्याचे अवशेष व सैनिकी बराकी आहेत. शहरातील ऐतिहासिक वास्तूंत कन्नोन्‌जी बौद्ध मंदिर, डाझैफू तेम्मांगू मंदिर आणि सोळाव्या शतकातील शिंतो-मंदिर यांची प्रामुख्याने गणना केली जाते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/30798/", "date_download": "2022-10-07T21:53:37Z", "digest": "sha1:6Z6ELZQG6DUFAYHOMWRKEXVWYBRFAYDS", "length": 19852, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "युआन – शृ – खाय्‌ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nयुआन – शृ – खाय्‌\nयुआन – शृ – खाय्‌\n १८५९−६ जून १९१६). प्रजासत्ताक चीनचा पहिला अध्यक्ष (१९१२ −१६), मुत्सद्दी व लष्करी नेता. हूनान्‌ प्रांतातील श्यांग छंग्‌ येथे एका जमीनदार कुटुंबात जन्म. विद्यार्थिदशेत त्याचा ओढा अभ्यासापेक्षा इतर अवांतर उलाढाली करण्याकडे जास्त होता तथापि त्याच्यात धूर्तपणा आणि संघटक वृत्ती होती. परिणामतः जुजबी शिक्षण घेऊनसुद्धा त्याला कोरियाचा गव्हर्नर नेमण्यात आले. त्याने कोरियावरील चीनच्या सार्वभौमत्वाचा हक्क प्रस्थापित केला. लष्करी व आर्थिक बाबतीत त्याने योग्य ती पावले उचलली. त्याला सेऊल येथे आयुक्त नेमण्यात आले (१८८५). पुढे चिनी-जपानी युद्धाला उपयुक्त असे वातावरण त्याने निर्माण केले (१८९४−९५). चीनचा सर्व बाजूंनी या युद्धात पराभव होत असताना त्याने अद्यावत असे स्वतंत्र सैन्य आपल्या नेतृत्वाखाली तयार करून बॉक्सर बंडात चीनची अब्रू वाचवण्याचा प्रयत्न केला (१९००). यामुळे त्सस्यी (कार. १८६१−१९०८) महाराणीचा त्याच्यावरील विश्वास वाढला. तिने त्यास जृली प्रांताचा गव्हर्नर नेमले. युआन-शृ-खाय्‌ने त्यानंतर आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्यास सुरुवात केली. त्या प्रांतातील शिक्षणसंस्था व उद्योगधंदे वाढविण्याचा यत्न केला. थोड्याच काळात उत्तर चीनचा लष्करी नेता म्हणून तो प्रसिद्धीस आला. त्याने चीनच्या आधुनिकीकरणास प्रारंभ केला आणि सर्व क्षेत्रांत झपाट्याने क्रांती होऊ लागली.\nमांचू महाराणी १९०८ मध्ये मृत्यू पावली आणि मांचू गादीच्या कारभाऱ्यांनी त्याला घरी पाठविले. यावेळी शत्रूंनी सर्व बाजूंनी उठाव करून चिनी क्रांतीने उग्र स्वरूप धारण केले. मांचू साम्राज्य धोक्यात आले. अशा वेळी क्रांतिकारक व साम्राज्यवादी या दोघांना देशाच्या एकात्मतेसाठी व शांततेकरिता युआन ही एकच व्यक्ती डोळ्यासमोर होती. त्यांनी प्रजासत्ताक चीनचा अध्यक्ष म्हणून त्याची निवड केली (१९११) आणि डॉ. सन्‌-यत्‌-सेनने आपल्या तात्पुरत्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.\nअध्यक्ष होताच स्वातंत्र्य, समता वगैरे लोकशाहीवादी संकल्पनांना धुडकावून देऊन त्याने राजेशाहीस पाठिंबा दिला व क्वोमिनतांग (ग्वोवमिन्‌दांग्‌) पक्षावर बंदी घालून त्या पक्षातील नेत्यांना शिक्षा ठोठावल्या व काहींना कैदेत ठेवले. युआन-शृ-खाय्‌च्या या धोरणास शह देण्यासाठी सन-यत्‌-सेन्‌ने प्रयत्न करण्यास सुरुवात केली पण नानकिंगच्या लढाईत त्याचा पराभव होऊन सन-येत्‌-सेन्‌ला चीन सोडून जपानला पळ काढावा लागला. यामुळे क्रांतिकारकांच्या आशा काही काळ दुरावल्या.\nयुआन-शृ-खायने पार्लमेंट रद्द करून हाताखालील अधिकाऱ्यांची गव्हर्नर म्हणून नेमणूक केली व एक शासकीय मंडळ स्थापन केले. थोड्याच दिवसांत त्याला बादशाह होण्याची स्वप्ने दिसू लागली व १९१६ च्या नववर्ष दिनाच्या मुहूर्तावर त्याने चीनचा बादशहा म्हणून स्वतःला घोषित केले. तथापि त्याच्या या प्रयत्नांची सर्वत्र निंदा झाली आणि त्याच्या राजवटीविरुद्ध अनेक प्रांतांत बंडे उद्‌भवली. परदेशी सत्तांनीसुद्धा त्याला दिलेला पाठिंबा काढून घेतला. असा सर्व बाजूंनी पराभव अटळ झाल्यामुळे त्याचा धीर खचला आणि त्याला मृत्यूनी गाठले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nकॅनिंग, लॉर्ड चार्ल्स जॉन\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/31689/", "date_download": "2022-10-07T23:27:53Z", "digest": "sha1:24KJ25NVHVFBK7HWQHFM5IG3I4LSW3OE", "length": 15627, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "लंबा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nलंबा : भारतातील एक वन्य जमात. ती लिंबू, लंबू, लंब आदी नावांनी प्रसिद्ध असून प. बंगाल व हिमाचल प्रदेश या राज्यांत प्रामुख्याने आढळते. खंबू व यख या दोन जमातीमध्ये तिचे स्थान आहे. या तिन्ही जमाती किराती ऊर्फ किरात या जमातीत मोडतात. लिंबूचे लेपच्यांशी पुष्कळ मिश्रण झालेले आहे. लिंबू ऊर्फ दस (दश) यांच्या तेरा शाखा आहेत. ते स्वतःला दिवाण म्हणवून घेत असले, तरी पूर्वी हिमाचल प्रदेशात असताना व नेपाळात येण्यापूर्वी त्यांचा धंदा याक माणसाळविण्याचा होता. तिबेटात अर्थातच पशुपालन हाच त्यांचा व्यवसाय होता. पुढे त्यांच्या दहा शाखा झाल्या, म्हणून दुसरे लोक त्यांना दश-लिंबू म्हणू लागले. भूतान, सिक्किम आणि नेपाळमधील लोक त्यांना त्सोंग म्हणतात कारण त्यांची पाच गोत्रे आहेत. लेपचा त्यांना चांग म्हणतात. किराती जमातीचे लोक त्यांना आदराने सुभा ऊर्फ सुभेदार म्हणतात. यांची विवाहपद्धती बहिर्विवाही म्हणजे असगोत्र असून परंपरा पितृवंशीय आहे. यांच्यात मृताला जाळण्याची त्याचप्रमाणे पुरण्याचीदेखील प्रथा अस्तित्वात आहे.\nमुर्मी, लेपचा व भूतिया या जमातींतले लोक लिंबू लोकांना आपल्यात घेतात. या जमाती बौद्ध वळणाच्या आहेत. ते हिमारिया (हिमालय) या वनदेवाची पूजा रविवारी करतात. त्याला मका, बोकड, डुक्कर वा कोंबडी अर्पण करतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postलतिफ, सय्यिद मुहम्मद\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mensxp.com/marathi/fashion/style-guide/96803-underwear-styles-for-men-in-marathi.html", "date_download": "2022-10-07T22:54:27Z", "digest": "sha1:S7FIGMCTXCJIQDTAPU6KS4XW2NQKJBYE", "length": 18771, "nlines": 114, "source_domain": "www.mensxp.com", "title": "पुरुषांसाठी बेस्ट असलेले 5 स्टायलिश अंडरवेअरचे प्रकार | Underwear styles for men in marathi", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nजाहिरात द्याMensXP वर सेलआमच्याबद्दलसंपर्क साधा\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nपुरुषांसाठी बेस्ट असलेले 5 स्टायलिश अंडरवेअरचे प्रकार\n· 4 मिनिटांमध्ये वाचा\nपुरुषांसाठी बेस्ट असलेले 5 स्टायलिश अंडरवेअरचे प्रकार\n2016 साली प्रदर्शित झालेल्या फ्रीकी अली या चित्रपटामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने एका अंडरवेअर विक्रेत्याची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यात अंडरवेअर विकतानाचा त्याचा एक मोठा मोनोलाॅग प्रचंड लोकप्रिय झाला होता. तुम्हीही नवाजचा हा व्हिडिओ पाहून खूप हसला असला. अंडरवेअर ही खूप खासगी बाब मोठ्याने बोलताना अवघडल्यासारखे होते. अंतवस्त्रांविषयी बोलणे फार कठीण असते.\nपूर्वीच्या काळी लोक अंडरवेअरऐवजी लंगोटचा वापर करायचे. आजही काही लोक अंडरवेअर न घालता लंगोट घालणे पसंत करतात. तरुणांना स्टायलिश अंडरवेअर घालणे आवडते. अनेक जाहिरातांमुळे या क्षेत्राची भरभराट होत आहे.\nअशा कपड्यांप्रमाणे अंडरवेअर खरेदी करणे देखील खूप आवश्यक आणि महत्त्वपूर्ण असते.\nअंडरवेअर खरेदी करताना फिटिंग हा मुद्दा नेहमी लक्षात ठेवावा.\nटाइट अंडरवेअर घातल्यामुळे पुरुषांचा स्पर्म काउंट कमी होतो असे म्हटले जाते. अंडरवेअरच्या घट्टपणामुळे फर्टिलिटीवर नकारात्मक परिणाम होतो. लूज, सैल अंडरवेअर घातल्यास हर्निया हा आजार होण्याची शक्यता असते.\nया गोष्टींमध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही डाॅक्टरांची मदत घेऊ शकता.\nप्रत्येक माणूस वेगळा असतो. प्रत्येक पुरुषाच्या शरीराची रचना देखील वेगळी असते. प्रत्येकाच्या गुप्तांगाचा आकार सुद्धा वेगळा असतो. अशा वेळी काहीजणांना अंडरवेअर अनकंफर्टेबल वाटू शकते, तर काही पुरुषांचे गुप्तांग आकाराने जास्त मोठे असल्यामुळे त्यांना नाॅर्मल अंडरवेअर घालताना त्रास होऊ शकतो.\nअंडरवेअर निवडताना चुक केल्यास पुढे जाऊन खाज, घाम, इंफेक्शन अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.\nया आर्टिकलमध्ये स्टायलिश अंडरवेअर उत्पादनांची माहिती दिली आहे. जुन्या पद्धतीच्या अंडरवेअरचा वापर करुन कंटाळले असल्यास या कंफर्टेबल अंडरवेअर प्राॅडक्टचा तुम्ही वापर करु शकता.\n5 कंफर्टेबल आणि स्टायलिश अंडरवेअर\nसर्वात आरामदायक अंडरवेअर (Stretch Elastane Briefs)\nफिटिंग असलेले आरामदायी अंडरवेअर (Mini Boxers)\nया गोष्टीही लक्षात ठेवा\nसर्व प्रथम जाणून घेऊयात अंडरवेअरच्या 3 वेगवेगळ्या स्टाइल्स\nब्रीफ या अंडरवेअरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. बहुतांश पुरुष ब्रीफ स्टँडर्ड स्टाइल असलेले अंडरवेअर वापरणे पसंत करतात. खेळाच्या मैदानात ब्रीफ अंडरवेअर घालणे योग्य असते असे म्हटले जाते.\nफाॅर्मल कपड्यांमध्ये ब्रीफ अंडरवेअर घालू नये. तसेच टाइट पॅन्ट घालणार असल्यास ब्रीफ अंडरवेअर वापरणे टाळावे. या स्टाइलमधील अंडरवेअर हाय, मीडियम आणि लो या आकारांमध्ये उपलब्ध असतात.\nट्रंक्स ही अंडरवेअर स्टाइल सध्या प्रचंड प्रमाणात लोकप्रिय होत आहे. ब्रीफ आणि बाॅक्सर या दोन्ही स्टाइल्सचे गुण या अंडरवेअर स्टाइलमध्ये असतात. याच्या आयताकृती आकारामुळे आणि शॉर्ट लेग्समुळे बरेचसे पुरुष टंक्स घालणे पसंत करतात.\nनव्या पद्धतीच्या या अंडरवेअरचा वापर प्रामुख्याने तरुण मंडळी करतात. सडपातळ अंगकाठी असलेल्या पुरुषांसाठी हा ऑप्शन परफेक्ट असल्यामुळे या स्टाइलच्या अंडरवेअरच्या विक्रीचे प्रमाण वाढत आहे. फाॅर्मल आणि कॅज्युअल अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांच्या आत ट्रंक्स अंडरवेअर घालणे सोपे असते.\nबाॅक्सर ही अंडरवेअरची फार जुनी फिटिंग स्टाइल आहे. या प्रकारची अंडरवेअर घातल्यानंतर खालच्या बाजूने हवा आत येऊ शकते. बरेचसे सडपातळ लोक बाॅक्सरचा वापर करतात. रात्री झोपताना टाइट फिटिंग असलेली अंडरवेअर घालणे अपायकारक असल्यामुळे लोक रात्री बाॅक्सर घालून झोपतात.\n5 कंफर्टेबल आणि स्टायलिश अंडरवेअर\n1. सर्वात आरामदायक अंडरवेअर (Stretch Elastane Briefs)\n95% काॅटन आणि 5% स्पॅन्डेक्स (Spandex) यांनी तयार केलेली अंडरवेअर खूप आरामदायक असते. ज्या पुरुषांच्या गुप्तांग (लिंग) या अवयवाचा आकार तुलनेने मोठा असतो, त्या पुरुषांसाठी ही अंडरवेअर परफेक्ट असते. असे पुरुष जेव्हा या अंडरवेअरचा वापर करतात, तेव्हा अंडरवेअरचा कपडा ताणतो. कपडा ताणल्यामुळे त्या पुरुषांना कंफर्टेबल वाटते.\n2. प्रत्येक स्थितीमध्ये मिळणारा आरामदायी अनुभव (Underwear With A Pouch)\nआपल्या शरीराची हालचाल होत असताना गुप्तांगाची देखील हालचाल होत असते. लिंगाची स्थिती स्थिर नसल्यामुळे त्रास होऊ शकतो. अशा वेळी पाऊच (Pouch) असलेल्या अंडरवेअरचा वापर करावा. या अंडरवेअरचा वापर केल्यानंतर आधी होणारा त्रास पूर्णपणे नाहीसा होईल.\n3. चांगली फिटिंग असलेले अंडरवेअर (Low Rise, Power Stretch Briefs)\nजीन्स, टी-शर्ट अशा कपड्यांप्रमाणे अंडरवेअरमध्येही फिटिंग ही गोष्ट महत्त्वपूर्ण असते. लो राइज अंडरवेअरमध्ये गुप्तांगासाठी मोठी जागा असते. यामुळे अशा प्रकारची अंडरवेअर घातल्यानंतर आरामदायक अनुभव येतो. फिटिंग नीट असल्यामुळे जाॅगिंग करताना कपड्यांच्या आतमध्ये ही अंडरवेअर घालणे उपयुक्त असते. इतर वेळी ही याचा वापर करता येतो.\nतुमच्या बाॅडी टाईपनुसार परफेक्ट टी-शर्ट खरेदी करायचे असल्यास वापरा ह्या ८ टिप्स\nमायक्रो फायबर कपडा अँटी-फंगल असतो. गुप्तांगाजवळ खाज होण्यासाठी काही जीवाणू कारणीभूत असतात. मायक्रो फायबरमुळे हे जीवाणू मरतात. गुप्तांगाचा आकार मोठा असल्यास त्या जागी प्रचंड घाम येतो. जास्त प्रमाणामध्ये घाम आल्यास खाज सुटते. ही अंडरवेअर घातल्यामुळे तुमची घामाची समस्या सुद्धा नाहीशी होईल.\n5. फिटिंग असलेले आरामदायी अंडरवेअर (Mini Boxers)\nपुरुषांना दिवसभर शारीरिक कसरती कराव्या लागतात. हा मुद्दा लक्षात ठेवून या डिझायनची अंडरवेअर तयार करण्यात आली आहे. या प्रकारची मिनी बाॅक्सर घातल्यामुळे गुप्तांगाला त्रास होत नाही. गुप्तांगावर ताण न आल्यामुळे कंफर्टेबल फिल होते. या अंडरवेअरचा आकार खूप रिसर्च करुन ठरवला आहे. अंडरवेअर तयार करताना वापरलेल्या फॅब्रिकमुळे आरामदायी अनुभव मिळतो. ही अंडरवेअर घातल्यानंतर तुम्हांला फिटिंगचा अंदाज येईल.\nT-Shirt vs Undershirt : समजून घ्या अंडरशर्ट म्हणजे काय \nहे कॉमन कलरचे शूज कोणत्याही रंगाच्या ड्रेससह सहज मॅच होतात\nया गोष्टीही लक्षात ठेवा.\n1. नेहमी धुतलेली अंडरवेअर वापरा.\n2. घाणेरडी आणि जुनी अंडरवेअर वापरु नये.\n3. जर तुमच्या गुप्तांगाच्या जागी प्रचंड घाम येत असेल, तर एका दिवसात दोन अंडरवेअर बदला.\n4. काही महिन्यांनी नवीन अंडरवेअर खरेदी करा.\n5. रस्त्याच्या कडेवर असलेल्या दुकानांमधून अंडरवेअर खरेदी करु नये.\n6. वर्कआऊट सेशन संपल्यानंतर अंडरवेअर बदलणे आवश्यक असते.\n7. इंफेक्शन होऊ नये यासाठी दोन-तीन महिन्यांनंतर नव्या अंडरवेअरचा वापर करायला सुरुवात करा.\n8. रात्री झोपताना अंडरवेअर घालू नये.\n9. अंडरवेअर ओली असल्यास ती घालणे टाळावे. असे केल्यास इंफेक्शन होऊ शकते.\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/pakode-becho-agitation-in-amravati-by-youth-congress-against-pm-modi-and-central-government-on-his-birthday-ab95", "date_download": "2022-10-07T21:25:50Z", "digest": "sha1:B4LQUAZPZBABC2H2GNJ2DREB2AHUCBFN", "length": 6771, "nlines": 62, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Amravati Latest News | पंतप्रधान मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा", "raw_content": "\nAmravati: पंतप्रधान मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा; युवक कॉंग्रेसने पकोडे विकून केला निषेध\nPakode Becho Agitation In Amravati: बेरोजगारीला विरोध म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क पकोडे (भजे) विकून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारविरोध केला आहे.\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nअमरावती: आज, १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस (PM Modi Birthday) भाजपकडून जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त भाजपने देशभरात विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र, कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवाच्या दिवशी विविध मुद्द्यांना हात घालत आंदोलन केले आहे. अमरावतीत (Amravati) कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे. बेरोजगारीला विरोध म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क पकोडे (भजे) विकून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारविरोध केला आहे. (Amravati Latest News)\nSharad Pawar: सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये असं सत्ताधाऱ्यांचं धोरण; 'गृहपाठ'वरून शरद पवारांनी घेतली 'शाळा'\nराज्यातील विविध मुद्द्यांवरुन अमरावती कॉंग्रेसने सरकारविरोधात निदर्शनं केली आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील शिंदे सरकार तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांनी टीका केली केले आहे. अमरावती येथील पंचवटी चौकात युवक काँग्रेसच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे.\nManikrao Gavit: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री माणिकराव गावित यांचे निधन\nयावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना चक्क हातगाडीवर पकोडे विकून पंतप्रधान मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पामार्फत महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना रोजगार मिळणार होता. मात्र आता तरुणांचा रोजगार हिरावल्याची भावना राज्यातील जनतेत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. यावेळी 'पन्नास खोके एकदम ओके', 'खोके सरकारच्या या कृतीचा निषेध' अशा आशयाचे बॅनर्स झळकवण्यात आले होते.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/12/Harinder-Pal-Sandhu.html", "date_download": "2022-10-07T23:09:03Z", "digest": "sha1:IDJ3FQCLHLUQMVXEK7UKBXQMBM35B6Y7", "length": 3558, "nlines": 57, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "स्क्वॉशमध्ये हरींदर संधुचे पुनरागमन | Gosip4U Digital Wing Of India स्क्वॉशमध्ये हरींदर संधुचे पुनरागमन - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome क्रीडा स्क्वॉशमध्ये हरींदर संधुचे पुनरागमन\nस्क्वॉशमध्ये हरींदर संधुचे पुनरागमन\nभारताचा स्क्वॉशचा खेळाडू हरींदर संधु याने जापानच्या तोमोताका एंडोला 11-5, 11-6, 11-7 ने पराभूत करुन एचसीएल एसआरएफआय भारत दौर्‍याचा अंतिम सामना सहज जिंकला.\nमागील डिसेंबरमध्ये तीव्र नर्व्ह इंपिंजमेंटनंतर हरींदरला बरे व्हायला तब्बल 10 महीने लागले होते परंतु त्यानंतरही स्पर्धा जिंकणे ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे.\nएप्रिल 2018 च्या पीएसएच्या क्रमवारीत अव्वल 50 मध्ये असणारा हरींदर सध्या जागतिक क्रमवारीत 177 व्या क्रमांकावर आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2019/11/blog-post_10.html", "date_download": "2022-10-07T21:28:33Z", "digest": "sha1:RWCFIOMACBWDUWDZWS6XJ4NH646GPISH", "length": 42693, "nlines": 240, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "आर्थिक मंदी म्हणजे काय? | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआर्थिक मंदी म्हणजे काय\nये जब्र भी देखा है तारीख की नजरोंने\nलम्हों ने खता की थी सदियों ने सजा पायी\nजेव्हा-जेव्हा नागरिकांची क्रयशक्ती (खरेदी क्षमता) कमी होते तेव्हा-तेव्हा मंदी येते. नागरिकांची क्रयशक्ती कमी होण्याची अनेक कारणे आहेत. आर्थिक विषमता, भ्रष्टाचार, उत्पादनातील असंतुलन, सरकारी भेदभाव इत्यादी कारणामुळे नागरिकांची क्रयशक्ती कमी होते. विषमतेमुळे आर्थिकदृष्ट्या खालच्या पायरीवर असलेल्या लोकांकडे वस्तू विकत घेण्याएवढे पैसे नसतात. म्हणून इच्छा असून, गरज असून सुद्धा ते वस्तू विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे बाजारामध्ये माल पडून राहतो. मालाला उठाव नसल्यामुळे उत्पादक आपले उत्पादन कमी करतात. त्यामुळे कारखान्यातील शिफ्ट कमी होतात. शिफ्ट कमी झाल्यामुळे लोक बेरोजगार होतात. बेरोजगारीमुळे लोकांची क्रयशक्ती आणखीन कमी होते. आजारी उद्योग बंद पडतात आणि चांगले उद्योग आजारी पडतात. एकंदरित या स्थितीमुळे पुन्हा बाजारात माल पडून राहू लागतो. पुन्हा उत्पादन कमी केले जाते. शेवटी जीडीपी कमी होतो. सलग दोन तिमाहीमध्ये जीडीपी कमी झाला तर त्याला मंदी म्हणतात.\nबाजारात मालाला उठाव नसल्यामुळे उद्योजक बँकांकडून कर्ज घेत नाहीत, नवे उद्योग सुरू होत नाही, म्हणून नवे रोजगार निर्माण होत नाहीत. परिणामी बँकांचे उत्पादन घटते, मात्र ठेवीदारांना व्याज द्यावेच लागते, त्यामुळे बँका डबघाईला येतात. खातेदार उद्योजक माल विक्री होत नसल्यामुळे वेळेवर हफ्ते भरू शकत नाहीत. या स्थितीमध्ये व्ही.जी. सिद्धार्थ (सीसीडीचे मालक) सारखे उद्योगपती आत्महत्या करतात तर विजय माल्या सारखे चतूर उद्योगपती देश सोडून पळून जातात. त्यामुळे अनेक बँका बुडतात. बँकेतील कर्मचारी रस्त्यावर येतात. त्यामुळे आणखीन बेरोजगारी वाढते. गरीब ठेवीदारांच्या ठेवी बुडतात. म्हणून आर्थिक क्षमता आणखीन कमी होते. त्यामुळे या लोकांची क्रयशक्ती आणखीन कमी होते. त्यामुळे लोक वस्तू खरेदी - (उर्वरित पान 2 वर)\nकरू शकत नाहीत. त्यातून पुन्हा मंदी वाढते.\nमंदीचे तीन प्रकार असतात. एक आर्थिक घसरण (इकॉनॉमिक स्लो डाऊन), दूसरा - मंदी, तीसरा - महामंदी (ग्रेट डिप्रेशन). आज आपला देश मंदी पहिल्या टप्प्यात असल्याचे नुकतेच नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक अभिजित बॅनर्जीपासून ते रघुराम राजनपर्यंत सर्व अर्थतज्ज्ञांनी मान्य केले आहे. जागतिक बँकेेने चालू वित्तीय वर्षात आपल्या देशाचा जीडीपी कमी होण्याचे भाकित केलेले आहे. या स्थितीवर सरकारने जे उपाय केलेले आहेत ते अगदीच किरकोळ स्वरूपाचे आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असे वाटत नाही. कोणत्याही देशात औद्योगिक उत्पादन खाजगी उत्पादक करत असतात. सरकार फक्त उद्योग स्नेही वातावरण निर्माण करत असते. फार कमी उद्योग असे असतात जे सरकारी असतात.\nजेव्हा मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा शासनकर्ते चतूर असतील तर ते तात्काळ लोकांच्या हातात पैसा येईल यासाठी वेगवेगळे उपाय करतात. आपल्या देशात मनरेगा एक अशी योजना आहे जिच्या साह्याने सरकार आर्थिकदृष्ट्या शेवटच्या पायरीवरील लोकांच्या हातात पैसा खेळत राहील याची व्यवस्था करते. मंदी जास्त वेग पकडू नये म्हणून सरकारने पुढे येवून खर्च करणे अपेक्षित असते. सरकारने रस्ते बांधावेत, पूल बांधावेत, मोठमोठ्या इमारती बांधाव्यात, बागा बांधाव्यात, तलाव बांधावेत, कालवे बांधावेत, ज्यामुळे लोकांच्या हातात पैसा येईल व ते बाजारातून वस्तू खरेदी करतील व त्यातून मागणी वाढेल. त्यामुळे उद्योगांना शिफ्ट वाढवाव्या लागतील, नवीन उद्योजक पुढे येतील, नवीन उद्योग वाढतील, त्यातून रोजगार वाढेल व लोकांच्या हातात पुन्हा पैसा येईल व ते पुन्हा खरेदी करतील आणि देश मंदीतून निघेल.\nमात्र नोटबंदी आणि जीएसटीसारख्या अर्थघाती निर्णयामुळे बसलेल्या झटक्याने उद्योगधंदे आणि सरकार दोघांचेही उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे लाखो लघुउद्योग बंद पडले असून, अनेक पडत आहेत. त्यातील लोक बेरोजगार झालेले आहेत. सरकारने सरकारी कंपन्या विकून आपला खर्च भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केलेला आहे. आपले केंद्र सरकार आर्थिकदृष्ट्या योग्य निर्णय घेत नसल्याचा निर्वाळा खुद्द भाजपचे खासदार व अर्थतज्ज्ञ सुब्रहमन्यम स्वामी यांनी वेळोवेळी दिलेला आहे. या आठवड्यात तर त्यांनी जीएसटी ही मोठी घोडचूक होती. या शब्दात जीएसटीचे वर्णन केलेले आहे.\nउत्पन्नापेक्षा जेव्हा सरकारचा खर्च जास्त होतो तेव्हा त्याला फिस्कल डेफीसीट (आर्थिक तूट) असे म्हणतात. अस्थिर आर्थिक धोरण आणि योजनाबहाय्य खर्चामुळे या सरकारचा खर्च उत्पादनापेक्षा वाढत चाललेला आहे. केवळ जाहिराती आणि पंतप्रधानांच्या विदेशी दौर्‍यांवर जो अमाप खर्च झाला तो झाला नसता तर तो पैसा देशांतर्गत मंदी दूर करण्यासाठी वापरता आला असता. कारण या दोन्हीमधून देशाला फारसा काही लाभ झालेला नाही. मंदीतून बाहेर येण्यासाठी सरकारने वीज, पेट्रोल आणि डिझल यावर प्रचंड कर लादलेले आहेत. त्यामुळे या वस्तू अतिशय महाग झालेल्या आहेत, म्हणून सामान्य नारिकांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.\nसाधारणपणे अशी स्थिती निर्माण झाली तर सरकार सुरक्षा बाँड, किसान पत्र, रेल्वे बाँड सारखे हमीपत्र नागरिकांना देऊन त्यांच्याकडील ठेवी घेऊन त्यांच्यावरच खर्च करत असते. मात्र त्यातून सरकारवर कर्जाचा बोजा वाढतो व व्याजही द्यावे लागते. म्हणून हा उपायसुद्धा सध्याचे सरकार अमलात आणू शकत नाहीये. शिवाय या प्रक्रियेतून चलनवाढही होत असते. त्यातून रूपयाचे अवमुल्यन होत असते. शेअर मार्केट कोसळत असतो आणि मंदीच्या भीतीने विदेशी गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावतात. त्यामुळे स्थिती आणखीनच बिकट होते. आपल्या देशात सध्या हीच प्रक्रिया सुरू आहे.\nमागील सरकार किंवा सध्याचे सरकार सार्वजनिक आरोग्य, शिक्षण यावरसुद्धा पुरेसा खर्च करत नाही, त्याचे कारण हेच आहे की, सरकारची आर्थिक तूट वाढू नये. सध्याच्या सरकारने काही मुठभर उद्योगपतींचे लाखो कोटींचे कर्ज माफ केलेले आहे, त्यामुळे देखील सरकारवरील आर्थिक बोजा वाढलेला आहे.\nया स्थितीतून सरकारला काढण्यासाठी एक उपाय म्हणून सरकारला काळा पैसा बाहेर काढता येतो. परंतु हा उपाय वचन देऊनही सध्याच्या केंद्र सरकारने अवलंबिलेला नाही, कारण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांनीच निवडणूक लढविण्यासाठी भाजपला कोट्यावधी रूपये दिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर हात टाकणे सरकारला शक्य नाही.\nमंदीचा सर्वात जास्त वाईट परिणाम जे भ्रष्टाचार करू शकत नाहीत त्यांच्यावर होतो. ज्या उद्योगात काळा पैसा गुंतलेला आहे त्या उद्योगाला मंदीची झळ पोहोचत नाही. उदा. बांधकाम व्यवसाय. बहुतेक बांधकाम व्यवसायामध्ये नेत्यांचा काळा पैसा गुंतवलेला असतो. मुंबई-पुण्यासारख्या देशातील मोठ्या पाच-पन्नास शहरामध्ये लाखो फ्लॅट्स आणि रो हाऊसेस बांधून गेल्या अनेक वर्षांपासून विक्रीअभावी पडून आहेत. परंतु बिल्डर ते स्वस्तामध्ये विकण्यास तयार नाहीत, कारण त्यात काळा पैसा गुंतवलेला आहे. त्यामुळे हा उद्योग बुडण्याची शक्यता नाही. कितीही वर्षे घरं विकली नाही गेली तरी ती तशीच ठेवली जातात व बिल्डरला हव्या त्या किमतीमध्येच विकली जातात. या उलट छोटे-मोठे लघू उद्योजक किंवा व्यापारी जे बँकांकडून कर्ज घेऊन आपला व्यवसाय चालवतात त्यांना माल विकल्याशिवाय हफ्ते फेडता येत नाहीत. त्यांच्या व्यवसायात काळा पैसा नसल्यामुळे त्यांना प्रसंगी मुदलात माल काढून टाकावा लागतो. कधी-कधी तर पैसे खुले करण्यासाठी तोट्यात माल विकावा लागतो. यातूनच ही व्यापारी प्रतिष्ठाने मंदीच्या तडाख्याने बंद पडतात.\nशेतीमध्ये भ्रष्टाचार करता येत नाही म्हणूनच शेती सर्वात जास्त तोट्यात असलेला व्यवसाय आहे. हेच कारण आहे की, सरकारही या क्षेत्राकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे नाविलाजाने ग्रामीण भागातून लोकांना शहराकडे पलायन करावे लागते. एक अंदाज्याप्रमाणे देशभरातून एकट्या मुंबईमध्ये दररोज दोन हजार नवीन लोक येत असतात. यामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरांची लोकसंख्या प्रचंड फुगलेली आहे. त्यामुळे ट्राफिक जामपासून आजार, मनोरूग्ण आणि गुन्हेगारीसारख्या नवीन समस्यांना या शहरांना तोंड द्यावे लागते.\nमौलाना सय्यद अबुल आला मौदूद (रहे.) यांनी 30 डिसेंबर 1946 रोजी मुरादपूर जिल्हा सियालकोट येथे केलेल्या भाषणामध्ये म्हटलेले होते की, ”एक वक्त हो आयेगा जब कम्युनिझम खुद मास्को में अपने बचाव के लिए परेशान होगा. पूंजीवादी डेमोक्रेसी खुद वॉश्िंगटन और न्यूयॉर्क में अपने हिफाजत के लिए बेचैन दिखाई देगी. भौतिकवादी नास्तीकता खुद लंदन और पॅरिस की युनिव्हर्सिटीयों में जगाह पाने में खुद को असमर्थ पायेगी.” मौलानांनी केलेल्या या भाकिताप्रमाणे साम्यवादी अर्थव्यवस्थेचा अंत झालेला असून, भांडवलशाही अर्थव्यवस्थाही दिशाहीन झालेली आहे. जगातील अनेक देशांचा विश्‍वास या व्यवस्थेवरून उठल्याची जाणीव होऊ लागलेली आहे. या दोन्ही अर्थव्यवस्थांचा अनुभव जगाने घेतलेला असून, एक तीसरी व्यवस्था अजून शिल्लक आहे जिचा अनुभव जगाने घेतलेला नाही ती आहे इस्लामी अर्थव्यवस्था. चला तर या व्यवस्थेसंबंधी आपण थोडक्यात माहिती घेऊया.\nसाम्यवादी असो का भांडवलशाही असो या दोन्ही अर्थव्यवस्थांचा मुलभूत आधार व्याज आहे. व्याजावरच या दोन्ही अर्थव्यवस्थांची इमारत उभी असते.\nइस्लामी अर्थव्यस्थेचे पहिले वैशिष्ट असे की ही वर नमूद दोन्ही अर्थव्यवस्थांच्या एकदम उलट आहे. या अर्थव्यवस्थेमध्ये व्याजाला स्थानच नाही उलट त्याला एक गंभीर सामाजिक अपराध म्हंटलेले आहे. व्याजाधारित अर्थव्यवस्थेमध्ये संपत्तीचे स्थलांतर खालून (व्याजाच्या मार्गाने) वर जाते, म्हणजे गरजू लोक बँकेकडून कर्ज घेऊन आपले व्यवसाय सुरू करतात व ते जे व्याज देतात ते वरच्या स्तरावर बसलेल्या भांडवलदारांना मिळते, ज्यांनी फक्त पैसा गुंतवलेला असतो. इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये मात्र संपत्तीचे स्थलांतर वरून खाली होते. श्रीमंतांकडून जकात, फितरा, सदका, उश्र इत्यादी टॅक्सच्या माध्यमातून पैसा गोळा करून तो खाली झिरपवला जातो. एकतर तो व्याजरहित असतो किंवा अनेकवेळा मोफत असतो. त्यामुळे कमी उत्पन्न गटाच्या लोकांना त्याचा सरळ लाभ मिळतो.\nइस्लामी अर्थव्यवस्थेचे दूसरे वैशिष्ट असे की, इतर अन्य व्यवस्थांमध्ये एक तर उत्पन्नावर कर (इन्कम टॅक्स) लावला जातो किंवा विक्रीवर (सेल टॅक्स). इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये मात्र या दोन्हीवर कर न लावता बचतीवर कर लावला जातो. उत्पन्न किंवा विक्री ही कमी दाखविता येते, मात्र बचत कमी दाखवता येत नाही. त्यामुळे या व्यवस्थेत कर बुडवता येत नाही. असे गृहित धरा की, एखाद्या व्यक्तीने एक कोटी रूपये एका वर्षात कमविले आणि ते खर्च करून टाकले, तर त्याच्यावर एक रूपयासुद्धा कर लागत नाही. कारण हे पैसे अर्थव्यवस्थेमध्ये फिरत असतात. पण समजा त्याच व्यक्तीने 1 कोटीच्या व्यवहारातून 10 लाखाची बचत केली, त्याच्यावर मात्र अडीच टक्के त्याला कर द्यावा लागतो. किंवा सरकार अधिकसुद्धा कर आकारू शकते.\nइस्लामी अर्थव्यवस्थेचे तीसरे वैशिष्ट्ये असे की, समाज विघातक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करता येत नाही. उदा. दारू, चित्रपट, गुटखा, सीगारेट सारख्या शेकडो समाजविघातक वस्तूंच्या उत्पादनामध्ये गुंतवणूक करता येत नाही किंवा संगीत, डान्सबार सारख्या अश्‍लीलता पसरविणार्‍या उद्योगांमध्येही गुंतवणूक करता येत नाही, म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादन करण्यासाठी भरपूर संपत्ती उपलब्ध असते. याचा सरळ लाभ सामान्य माणसाला मिळतो.\nइस्लामी अर्थव्यवस्थेचे चौथे वैशिष्टये असे की, अनिश्‍चित किंवा जोखीमीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा उदा. वीमा वगैरे गुंतवणूक करता येत नाही.\nइस्लामी अर्थव्यवस्थेचे पाचवे वैशिष्ट्ये असे की, बँकांच्या माध्यमातून सरकार व्याज विरहित कर्ज देण्याची व्यवस्था लागू करण्यासाठी बांधील असते. त्यामुळे या व्यवस्थेचा लोकांना सरळ लाभ होतो. या व्यवस्थेमुळे वस्तूंच्या किमती इतर व्यवस्थांमधील किमतीपेक्षा 40 ते 50 टक्के आपोआप कमी असतात. कारण अ) गुंतवणूकीवर व्याज द्यावे लागत नाही. ब) व्याजदर वाढतील या भीतीने वस्तूंच्या किमती कृत्रिमरित्या वाढविण्याची गरज भासत नाही. आर्थिक विषमता वाढण्याचे मुख्य कारण व्याज आहे. त्यालाच जर काढून टाकले तर अर्थव्यवस्थेची वाढ ऑरगॅनिक (नैसर्गिक) पद्धतीने होते. व्याजाधारित अर्थव्यवस्थेमध्ये वाढ (इनऑरगॅनिक) पद्धतीने म्हणजेच कृत्रिमरित्या होत असते. त्यामुळे ती समाज विघातकही असते आणि ती वाढ असंतुलितही असते. ज्याच्याकडे जेवढा पैसा जास्त तेवढा त्याचा विकास जास्त. ज्याच्याकडे जेवढा पैसा कमी त्याचा तेवढा विकास कमी. इस्लाम संपत्तीला एक ठिकाणी किंवा काही मुठभर लोकांच्या हातात रोखनू धरण्याच्या सख्त विरोधात आहे. इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही व्यक्तिच्या आर्थिक नुकसानाला राष्ट्रीय नुकसान समजले जाते. त्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही, यासाठी सरकार डोळ्यात तेल घालून लक्ष देत असते.\nमुळात इस्लामी अर्थव्यवस्था समजण्यापूर्वी इस्लाम काय आहे हे समजणे आवश्यक आहे, कारण व्याजविरहित अर्थव्यवस्था हा एक इस्लामचा भाग आहे, पूर्ण इस्लाम नव्हे. इस्लामचा एक उद्देश्य सर्व नागरिकांना समान विकासाची संधी देणे सुद्धा आहे. कारण कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,\n आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त चारित्र्यवान आहे. निश्‍चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे. (सुरे हुजरात आयत नं.:13)\nपृथ्वीवरील सर्व माणसे जेव्हा एका आई अन् वडिलांचा विसरत आहेत तेव्हा त्यांच्यात सामाजिक असो का आर्थिक भेदभाव करताच येत नाही. एवढी उच्च मानवीय मुल्य जगातील कुठल्याच अर्थव्यवस्थेचा पाया नाहीत. हा केवळ इस्लामी अर्थव्यवस्थेचाच पाया आहे. म्हणून आज ना उद्या हीच अर्थव्यवस्था शेवटी जगाला नाईलाजास्तव का होईना स्वीकारावीच लागेल.\nसत्तेच्या मांडवलीत महाराष्ट्र होरपळतोय\nसरकारी प्रतिष्ठानांच्या विक्रीचा अथ\n२९ नोव्हेंबर ते ०५ डिसेंबर २०१९\n२२ ते २८ नोव्हेंबर २०१९\nभारतरत्न नाकारणारा अवलिया : मौलाना आझाद\nसंयम आणि सौहार्दाचा विजय\nमिलादुन्नबीनिमित्त 3 हजार 178 जणांनी केले रक्तदान\nअमीर (अध्यक्ष) - (भाग 10)\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि आपली जबाबदारी\nइस्लामोफोबिया : कारणे आणि उपाय\n१५ ते २१ नोव्हेंबर २०१९\nइमामत (नमाजचे नेतृत्व) : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसांप्रदायिक तणाव आणि राजकारण\nअयोध्येसंबंधीचा निर्णय सर्वांनी शांतपणे स्विकारावा\nजमाअत - ए - इस्लामीची आवश्यकता का भासली - (भाग-9)\nप्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या शिकवणीचा संक्षिप्त...\n‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’\nसामूहिक नमाज : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nजागतिक दहशतवाद : अमेरिकी पापांचे फलित\nडॉ. ईलाहीपाशा मासुमदार यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट...\nउर्दू सा. दावत, न्यूज पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅपचे विमोचन\nआमचं हे कर्तव्य वाटलं म्हणून आम्ही उभे राहिलो : (भ...\nफेसबुक व धार्मिक भावना\nमुली अन् पत्नी दोहोंच्या सुरक्षेची जबाबदारी पुरूषाची\nराज्यात पुन्हा तेच; विरोधक मात्र मजबूत\nझुंडबळी आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे आकडे गायब\n०८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०१९\nनमाजचे महत्त्व : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nगुन्हे अहवालात ‘मॉब लिंचिग’ गायब\n०१ नोव्हेंबर ते ०७ नोव्हेंबर २०१९\nतुमचं जीवन हेच इस्लामची साक्ष बनली पाहिजे\nइस्लामी राज्य आणि मुस्लिम देश यात काही फरक आहे काय\nआर्थिक मंदी म्हणजे काय\nउत्तरांचा शोध अन् शोधांचे प्रयोग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/3330", "date_download": "2022-10-07T21:52:26Z", "digest": "sha1:OGBDQ5HHBM4HA7TL244TZDHTLOVAQAAF", "length": 11253, "nlines": 105, "source_domain": "bollyreport.org", "title": "'कच्चा बदाम' गाणे गाऊन रातोरात स्टार झालेलया भुवन बादायकर यांचे दिवस पालटले, कंपनीने दिले एवढे लाख रुपये ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News ‘कच्चा बदाम’ गाणे गाऊन रातोरात स्टार झालेलया भुवन बादायकर यांचे दिवस पालटले,...\n‘कच्चा बदाम’ गाणे गाऊन रातोरात स्टार झालेलया भुवन बादायकर यांचे दिवस पालटले, कंपनीने दिले एवढे लाख रुपये \nसोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातच एखादी साधी वाटणारी गोष्ट देखील व्हायरल होऊन ती पुढे खुप प्रसिद्धीस येते. या यादीत रानु मंडल ,डब्बु अंकल, बचपन का प्यार फेम सहदेव यांची नावे आहेत. आता या यादीत आणखी एक व्यक्तीचे नाव सहभागी झाले आहे. ते नाव म्हणजे कच्चा बादाम हे गाणे गाणारा भुबन बादायकर.\nसध्या सोशल मीडियावर कच्चा बादाम हे गाणे खुप ट्रेंड मध्ये आहे. सध्या सर्वसामान्यांपासुन ते अगदी सेलिब्रेटींपर्यंत सगळेच या गाण्यांवर व्हिडीओ तयार करत आहे. हे गाणे देशातच नव्हे तर विदेशामध्ये देखील खुप फेमस झाले आहे. त्यामुळे या गाण्याचा खरा गायक असणारा शेंगदाणे विक्रेता भुबन बादायकर सध्या खुप प्रसिद्धीच्या झोतात आहे.\nम्युझिक कंपनीसोबत गाणे केले रेकॉर्ड – एका मुलाखतीत भुबन बादायकरने सांगितले की कच्चा बादाम हे गाणे फेमस झाल्यावर ते मी एका म्युझिक कंपनीसोबत रेकॉर्ड केले. पण त्यासाठी त्यांना त्याचे पैसे सुद्धा मिळाले नाही. इतरवेळी पण लोक येतात आणि त्याच्यासोबत व्हिडीओ बनवुन निघुन जातात. पण त्याचा हक्क त्याला मिळत नाही. पण आता त्याचा हक्क त्याला मिळावा अशी मागणी जनतेकडुनच होत आहे.\nभुबन बादायकरला म्युझिक कंपनीने दिला इतक्या लाखांचा चेक – बंगाली भाषेत कच्चा बादाम गाणे गाणारा ओरिजनल सिंगर भुबन बादायकर हा एक शेंगदाणे विक्रेता आहे. तो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे गाणे गाऊन शेंगदाणे विकतो. पण या गाण्यामुळेच भुबन बादायकरचे दिवस पालाटले आहे. ज्या म्युझिक कंपनीने त्याचे गाणे रेकॉर्ड केले त्याला तीन लाखांचा चेक दिला आहे. तसेच त्याच्यासोबत एक नवे कॉण्ट्रॅक्टसुद्धा केले आहे. त्यासाठी त्याला आणखी दीड लाख रुपये सुद्धा दिले आहेत.\nपश्चिम बंगालच्या पोलिसांनी केले सन्मानित – कच्चा बादाम हिट झाल्यावर भुबन बादायकर सेलिब्रिटी झाला आहे. लोक त्याच्यासोबत व्हिडीओ , फोटो काढायला गर्दी करु लागले आहेत. एवढेच नाही तर बंगाल पोलिसांनी देखील त्याचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला आहे. म्युझिक कंपनी कडुन पैसे मिळाल्यावर भुबन बादायकर ला फार आनंद झाला. मात्र भुबन ला फार कमी पैसे मिळाल्याची भावना लोकांकडुन व्यक्त केली जात आहे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious article‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत जेसिकाने यशाचा हातात हात घेतल्यामुळे नेहाचा जळफळाट \nNext articleपुष्पा फेम अल्लू अर्जुन आहे तब्बल एवढ्या संपत्तीचा मालक, वाचून वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1028/", "date_download": "2022-10-07T22:41:51Z", "digest": "sha1:5THDCMFTNP2VZ3G72J5FCJBFOPGR2PIE", "length": 7158, "nlines": 79, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा - Rayatsakshi", "raw_content": "\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेश व्यक्त केला आहे.\nमुंबई, रयतसाक्षी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला 2022 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारे नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारे, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या, संपूर्ण कोरोनामुक्तीच्या वाटेवर घेऊन जाणारे ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.\nउपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, मावळते 2021 वर्ष अनेक संकटांना, आव्हानांना घेऊन आले. मात्र, महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण या आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे.\nराज्य आणि देशासमोर ओमायक्रॉनचा धोका आणि कोरोनारुग्णांची वाढती संख्या हे नवीन आव्हान नववर्षाच्या सुरुवातीलाच उभे राहिले आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून आपण या संकटावर लवकरच विजय मिळवू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.\nकृषी, उद्योग व्यापार, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचे हे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा दृढसंकल्प होऊया, असे सांगतानाच नववर्षाचे स्वागत उत्साहाने मात्र आरोग्यभान राखत संयमाने करा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.\nबेघर व गरजूंसाठी महाआवास अभियान\nकेज मध्ये एकाच रात्रीत दोन धाडसी चोऱ्या\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1523/", "date_download": "2022-10-07T21:09:22Z", "digest": "sha1:STUO75HKA4YF36AHIAIXKJGJTA2UNGDU", "length": 6982, "nlines": 78, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "हिंगोली: चौकशी मागणीसाठी एकाचा अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न - Rayatsakshi", "raw_content": "\nहिंगोली: चौकशी मागणीसाठी एकाचा अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न\nहिंगोली: चौकशी मागणीसाठी एकाचा अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोरच घडला प्रकार; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला\nहिंगोली, रयतसाक्षी : भारतीय मानव अधिकार संघटनेचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष मिलिंद प्रधान यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आज दिनांक 26 जानेवारी रोजी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्यामुळे अनर्थ टळला.\nपदाचा दुरुपयोग करून शासकीय महसूल बुडवून तुकडे बंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी रजिस्टर सेनगाव यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी मिलिंद प्रधान यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.\nहिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील खरेदी कार्यालयात तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन केले जात असून, पैशा पोटी सबरजिस्टर मौजे तळणी येथील दस्त क्रमांक २४/२२व २५/२२ व २३/२२ दी.०३/०१/२०२२ तुकडे बंदी कायद्याचे भंग होणारे तीन दस्त हे मोठ्या प्रमाणावर पैशाची देवाण-घेवाण करून कोणतीही चौकशी न करता दस्त केले आहेत.\nयासह विविध प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली होती. चौकशी न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला होता. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आज मिलिंद प्रधान यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळ एकच खळबळ उडाली होती. यावेळी कर्तव्यावर हजर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला.\nबिपीन रावत, प्रभा अत्रेंसह चौघांना पद्मविभूषण; सायरस पुनावाला पद्मभूषण, सुलोचना चव्हाणांना पद्मश्री\n..तर भाजपला सर्वप्रथम राष्ट्रपतींचा राजीनामा घ्यावा लागेल- संजय राऊत\nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nमराठा क्रांती मोर्चा आक्रमक:तानाजी सावंत यांनी माफी मागावी, अन्यथा एकाही मंत्र्याला…\nपोटोद्या जवळ स्वीप्ट- कंटेनरचा भीषण अपघात सहा ठार\nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/830/", "date_download": "2022-10-07T23:18:58Z", "digest": "sha1:K5GAN6WDKQ2L3EBAQWHFFTAOOCCCMIQC", "length": 13655, "nlines": 112, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "ओमिक्रॉनचा धोका वाढला, महाराष्ट्रातील निवडणुकाही बारगळणार?; सभागृहातही चर्चा - Rayatsakshi", "raw_content": "\nओमिक्रॉनचा धोका वाढला, महाराष्ट्रातील निवडणुकाही बारगळणार\nओमिक्रॉनचा धोका वाढला, महाराष्ट्रातील निवडणुकाही बारगळणार\nकोरोनाचं संकट वाढत असून ओमिक्रॉनचाही फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इलाहाबाद हायकोर्टाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी वर्षी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याचे आवाहन केलं आहे.\nमुंबई, रयतसाक्षी: कोरोनाचं संकट वाढत असून ओमिक्रॉनचाही फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इलाहाबाद हायकोर्टाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी वर्षी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याचे आवाहन केलं आहे.\nत्यामुळे उत्तर प्रदेशातील निवडणुका पुढे जाण्याची शक्यता असतानाच राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. आज विधानसभेतही त्याबाबतची चर्चा झाली. शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी तर उत्तर प्रदेशातील निवडणुका पुढे ढकलण्याची सूचना कोर्टाने पंतप्रधानांना केली आहे.\nनिवडणूक आयोगाने तसा निर्णय घेतला तर महाराष्ट्रातही निवडणूक आयोगाला असाच निर्णय घ्यावा लागेल असं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातही निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.\nसुनील प्रभू यांनी एका चर्चे दरम्यान विधानसभेत हे विधान केलं. ओमिक्रॉनचे रुग्ण उत्तर प्रदेशात वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात अशी सूचना इलाहाबाद कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. ही परिस्थिती पाहून निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागणार आहे.\nनिवडणूक पुढे ढकला जाऊ शकते का याबाबत भविष्य मी करणार नाही, करू शकत नाही. पण महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले तर निवडणूक आयोगाला समान निर्णय घ्यावा लागेल, असं प्रभू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असल्याची चर्चा आहे.\nराज्यात मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिकेसह 22 महापालिकांची निवडणूक होणार आहेत. त्याशिवाय ग्रामपंचायती आणि नगर परिषदांच्याही निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, देशावर कोरोना आणि ओमिक्रॉनचं संकट वाढल्याने या निवडणुकाही पुढे ढकलल्या जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nइलाहाबाद कोर्ट काय म्हणाले\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका जसा जगाला आहे, तसाच भारतालाही आहे. उत्तर प्रदेश हायकोर्टात न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या खंडपीठासमोर एका जामीनाच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी कोर्टातील गर्दी पाहून कोर्टाने मोदींना हे आवाहन केले आहे.\nहायकोर्टाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी निवडणूक रॅली आणि सभांवर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. कोर्टाने म्हटले आहे की, निवडणुकीचा प्रचार टीव्ही आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून करावा. तसेच मोदींनी निवडणुका तहकूब करण्याबाबतही विचार करावा, असे मतही इलाहाबाद कोर्टाने नोंदवले आहे.\n22 महापालिकांची मुदत कधी संपणार\n✓ मुंबई महापालिका- 7 मार्च 2022 रोजी संपणार आहे.\n✓ ठाणे महापालिका- 5 मे 2022 रोजी मुदत संपत आहे.\n✓ नवी मुंबई महापालिका- 8 मे 2020 रोजी मुदत संपली आहे.\n✓ पनवेल महापालिका- 9 जुलै 2022 रोजी संपणार आहे.\n✓कल्याण-डोंबिवली महापालिका- 10 नोव्हेंबर 2020 रोजी मुदत संपली आहे.\n✓ भिवंडी-निजामपूर महापालिका – 8 जून 2022 रोजी मुदत संपते आहे.\n✓ उल्हासनगर महापालिका – 4 एप्रिल 2021 रोजी मुदत संपत आहे.\n✓ मीरा-भाईंदर महापालिका – 27 ऑगस्ट 2022 रोजी मुदत संपत आहे.\n✓ वसई-विरार महापालिका- 27 जून 2020 रोजी मुदत संपली\n✓पुणे महापालिका- 14 मार्च 2022 रोजी मुदत संपणार आहे.\n✓पिंपरी चिंचवड महापालिका- 13 मार्च 2022 रोजी मुदत संपणार आहे.\n✓ नाशिक महापालिका- 14 मार्च 2022 रोजी या महापालिकेची मुदत संपणार आहे.\n✓मालेगाव महापालिका – 13 जून 2022 रोजी मुदत संपत आहे.\n✓धुळे महापालिका – 30 डिसेंबर 2023 रोजी मुदत संपत आहे.\n✓जळगाव महापालिका – 17 सप्टेंबर 2023 रोजी मुदत संपत आहे.\n✓ अहमदनगर महापालिका – 27 डिसेंबर 2023 रोजी मुदत संपत आहे.\n✓औरंगाबाद महापालिका- 28 एप्रिल 2020 रोजीच संपली आहे.\n✓ परभणी महापालिका – 15 मे 2022 रोजी मुदत संपत आहे.\n✓नांदेड महापालिका – 31 ऑक्टोबर 2022 रोजी मुदत संपत आहे.\n✓ लातूर महापालिका – 21 मे 2022 रोजी मुदत संपत आहे.\n✓ नागपूर महापालिका- 4 मार्च 2022 रोजी मुदत संपणार आहे.\n✓ अमरावती महापालिका – 8 मार्च 2022 रोजी मुदत संपत आहे.\n✓चंद्रपूर महापालिका – 28 मे 2022 रोजी मुदत संपत आहे.\n✓ अकोला महापालिका – 8 मार्च 2022 रोजी मुदत संपत आहे.\n✓कोल्हापूर महापालिका- 15 नोव्हेंबर 2020 रोजी मुदत संपली आहे.\n✓ सोलापूर महापालिका – 7 मार्च 2022 रोजी मुदत संपत आहे.\n✓सांगली-मिरज महापालिका – 19 ऑगस्ट 2023 रोजी मुदत संपत आहे.\nमहाराष्ट्र विधानसभेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे विधान\nअहमदनगर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील१९ विद्यार्थी ‌कोरोना‌ बाधीत\nलसिकरणासाठी गोमळवाड्यात आरोग्य कर्मचारी थेट बांधावर\nभाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नाला यश\nधक्कादायक: जमीनीच्या वादातून महिलेच्या खूनाचा तिन महिण्यानंतर उलगडा\nभारती महाराजांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी\nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/tag/chemical-diploma-jobs/", "date_download": "2022-10-07T22:41:31Z", "digest": "sha1:YZ3BSVENLSF4FDIHTVFZA6J5C3WPSMDI", "length": 6406, "nlines": 57, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "Chemical Diploma Jobs - Bharti jahirat", "raw_content": "\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nइंडियन ऑईल मध्ये 137 जागांसाठी भरती\nइंडियन ऑईल तर्फे इंजिनिअरिंग असिस्टंट व टेक्निकल अटेंडंट पदाच्या एकूण १३७ रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार...\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nUPSC CAPF Recruitment 2022 | संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2022 [DAF]\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nUPSC CAPF Recruitment 2022 | संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2022 [DAF]\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nUPSC CAPF Recruitment 2022 | संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2022 [DAF]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/1054", "date_download": "2022-10-07T23:12:40Z", "digest": "sha1:SQYQJ5QHMNPJJFTXSZL6ZI2OWZIY7MKA", "length": 10430, "nlines": 105, "source_domain": "bollyreport.org", "title": "अभिनेते ‘जय प्रकाश रेड्डी', मृत्यूनंतर इतक्या करोडची संपत्ती मागे सोडून गेले, जाणून थक्क व्हाल ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News अभिनेते ‘जय प्रकाश रेड्डी’, मृत्यूनंतर इतक्या करोडची संपत्ती मागे सोडून गेले, जाणून...\nअभिनेते ‘जय प्रकाश रेड्डी’, मृत्यूनंतर इतक्या करोडची संपत्ती मागे सोडून गेले, जाणून थक्क व्हाल \nसाऊश सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी नि ध न झाले. आंध्रप्रदेशच्या गुंटूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृ दय वि का रा च्या झ ट क्या ने जयप्रकाश रेड्डी यांचे मंगळवारी सकाळी नि ध न झाले. साउथ कडील सुपरस्टार जय प्रकाश रेड्डी यांना आपण साउथ चित्रपटांमध्ये विनोदी कलाकार किंवा कधीकधी खलनायक म्हणून पाहिले आहे.\nमीडिया रिपोर्टनुसार जयप्रकाश रेड्डी यांना बाथरुममध्ये हृ दय वि का रा चा झ ट का आला आणि ते खाली को स ळ ले. रेड्डी हे कुर्नूलच्या अल्लागड्डा येथील आहेत. १९८० पासून त्यांनी अनेक सिनेमात काम केले होते. अलीकडे साऊथचे सिनेमे हिंदीमध्ये डब करुन दाखवले जातात. यात जयप्रकाश रेड्डी यांची भूमिका हमखास प्रेक्षकांना पाहायला मिळत असते. आज दुर्दैवाने त्यांचे नि ध न झाले.\nतेलुगु सिनेमात त्यांना जेपी नावाने ओळखलं जायचं. जयप्रकाश रेड्डी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात १९८८ मध्ये आलेला तेलगू चित्रपट ब्राम्हा पुत्रुडू मधून केली होती. १९९९ मध्ये समारासिम्हा रेडी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि रातोरात त्यांची ओळख जगाला समजली. या चित्रपटानंतर त्यांच्या करिअरची गाडी सुसाट सुटली व एकापाठोपाठ एक चित्रपट करून प्रेक्षकांच्या मनात त्यांनी स्वतःचे स्थान पक्के केले.\nप्रकाश रेड्डी यांचे घर हैदराबाद मध्ये होते तेथे त्यांच्या कुटुंबासोबत राहायचे. त्यांच्याकडे ऑडी आर ८, आणि ऑडी क्यू ७, ३५ लाखांची टोयोटा फॉर्च्यूनर यांसारख्या वेगवेगळ्या महागड्या गाड्या होत्या. जय प्रकाश रेड्डी एका चित्रपटात अभिनय करण्यासाठी ८० ते ९० लाख रुपये फी घ्यायचे. द टॉप एव्हरीथिंग या युट्युब चॅनेल आणि ट्रेंडसेलेब्सनाऊ.कॉम या संकेतस्थळाच्या माहितीनुसार त्यांची निव्वळ संपत्ती १ मिलियन ते ५ मिलियन डॉलर इतकी आहे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleअखेर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक, जर आरोप सिद्ध झाले तर इतक्या वर्षांची होऊ शकते शिक्षा \nNext article१२ लाख रुपयाचे गाठोडे घेऊन जाणाऱ्या त्या व्हायरल शेतकऱ्याबाबत नवीनच माहिती, जाणून घ्या \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/ananya-panday-ananya-enjoys-vacation-after-liger-flop-look-at-the-photo/", "date_download": "2022-10-07T22:30:41Z", "digest": "sha1:Y72V76PKBZLOLHLESKGMQ3G3TPYKTPHW", "length": 5126, "nlines": 40, "source_domain": "mahaupdate.in", "title": "Ananya Panday : 'लाइगर'च्या फ्लॉपनंतर अनन्या घेतीये सुट्टीचा आनंद; बघा फोटो - Maha Update", "raw_content": "\nHome » Ananya Panday : ‘लाइगर’च्या फ्लॉपनंतर अनन्या घेतीये सुट्टीचा आनंद; बघा फोटो\nAnanya Panday : ‘लाइगर’च्या फ्लॉपनंतर अनन्या घेतीये सुट्टीचा आनंद; बघा फोटो\nमुंबई : अभिनेत्री अनन्या पांडे बरेच दिवस लीगरच्या प्रमोशनमध्ये धावत होती पण आता हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर फ्लॉप झाला आहे. अशा परिस्थितीत हा तणाव दूर करण्यासाठी अनन्या पांडे इटलीच्या सुट्टीवर गेल्याचे दिसते.\nअनन्या पांडे सध्या सुट्टीवर आहे, ती भारतापासून खूप दूर कॅप्री, इटलीमध्ये आहे जिथे ती खूप एन्जॉय करताना दिसत आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिच्या हॉलिडेचे खास फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती कधी आईस्क्रीमचा आनंद लुटताना दिसत आहे तर कधी बिकिनी घालून समुद्र किनाऱ्यावर मस्ती करताना दिसत आहे.\nअनन्याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच ते व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. अनन्या हिरव्या रंगाची बिकिनी घालून सूर्यस्नान करताना दिसत आहे. तसेच तिचे परफेक्ट अॅब्स फ्लॉंट करत आहे.\nअनन्या पूर्णपणे आराम करण्याच्या मूडमध्ये आहे, म्हणून तिने जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक कॅप्री, इटलीची निवड केली, जिथे ती स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेताना दिसते आणि कधीकधी हुशारीने पोज देताना दिसते.\nनुकताच अनन्या पांडेचा लिगर रिलीज झाला, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे, विजय देवरकोंडा आणि अनन्या या दोघांनाही कल्पना नव्हती की या चित्रपटाचे असे नशीब असेल. या तणावावर मात करण्यासाठी सध्या ती सुट्टीवर भर देत आहे.\nअनन्या पांडेच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटात दिसणार आहे. अनन्यासोबत या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव देखील दिसणार आहेत.\nMalaika Arora : मलायकाचे फोटो पाहून चाहत्यांनी विचारला प्रश्न; म्हणाले, अर्जुन कुठे आहे\nAnanya Panday : उंचीमुळे अनन्या ट्रोल, नेटकरी म्हणाले, ‘बुर्ज खलिफाची धाकटी बहीण’\nविजय देवरकोंडाच्या ‘लिगर’ चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर होतोय व्हायरल, तुम्ही पाहिला का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/childrens-eyes-weakening-excessive-mobiles-computers-stop-worrying-follow-tips/", "date_download": "2022-10-07T23:23:35Z", "digest": "sha1:ICG5JYO74J6CJLRHAHQNUPIEUNMX276G", "length": 8127, "nlines": 48, "source_domain": "mahaupdate.in", "title": "मोबाईल, कॉम्प्युटरच्या जास्त वापराने मुलांचे डोळे कमकुवत होत आहेत, मग चिंता सोडा 'या' टिप्स फॉलो करा - Maha Update", "raw_content": "\nHome » मोबाईल, कॉम्प्युटरच्या जास्त वापराने मुलांचे डोळे कमकुवत होत आहेत, मग चिंता सोडा ‘या’ टिप्स फॉलो करा\nमोबाईल, कॉम्प्युटरच्या जास्त वापराने मुलांचे डोळे कमकुवत होत आहेत, मग चिंता सोडा ‘या’ टिप्स फॉलो करा\nकोरोना काळापासून ते आजपर्यंत अजूनही अनेक मुले स्मार्टफोनवर अभ्यास करत आहेत. अभ्यासाच्या नावाखाली मुले कॉम्प्युटरवर जास्तवेळ गेम्स खेळत असतात. याकडे जास्तवेळ बघत राहिल्याने बऱ्याच मुलांचे डोळे कमकुवत होत असल्याचे पालक सांगत असतात.\nयामुळे मुलांना लहानपणातच डोळ्यावर चष्मा वापरावा लागत आहे. अशा परिस्थितीत मुलांची दृष्टी वाचवण्यासाठी वेळीच योग्य ती पावले उचलणे ही पालकांची जबाबदारी बनते. वेळीच काही खबरदारी घेतल्यास तुम्ही तुमच्या मुलांची दृष्टी सुधारू शकता.\nयासाठी तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण, आज येथे आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांना कमजोर नजरेपासून वाचवू शकाल. चला तर मग जाणून घेऊ त्याविषयी…\nमुलांची दृष्टी सुधारण्यासाठी काही पदार्थ आहेत. मुलांच्या आहारात व्हिटॅमिन ए, सी आणि ई, ओमेगा -3 फॅटी अॅसिड आणि जस्त समृध्द पदार्थांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि बी12 देखील असतात, जे डोळ्यांसाठी खूप चांगले असतात. गाजर आणि रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन असते आणि रेटिना निरोगी ठेवते.\nसंतुलित आहारासोबतच दररोज व्यायाम करणेही गरजेचे आहे. असे केल्याने बाळाला संपूर्ण शरीरात रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत होईल. ज्यामुळे मुलांची दृष्टी योग्य राहील.\nडोळे हा आपल्या शरीराचा अतिशय नाजूक भाग आहे, त्यामुळे त्यांना मसाज करण्याची पद्धतही वेगळी आहे. 10-20 सेकंद आपल्या बोटांनी पापण्या आणि भुवयांच्या दरम्यान हळूवारपणे मालिश करा. यानंतर दोन्ही हातांचे तळवे गरम होईपर्यंत घासत राहा. यानंतर, डोळे बंद करा आणि आपले तळवे पापण्यांवर ठेवा. त्यामुळे डोळ्यांचे रक्ताभिसरण बरोबर राहून डोळ्यांना आरामही मिळतो.\nइलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वापर कमी करा\nतुमच्या मुलांना शक्य तितक्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. मुलाचा स्क्रीन वेळ मर्यादित करा. या गॅजेट्समधून निघणाऱ्या प्रकाशाचा मुलांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते. जर मूल अभ्यासासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरत असेल तर लक्षात ठेवा की तो वारंवार ब्रेक घेत आहे.\nनियमित डोळ्यांची तपासणी करा\nतुमच्या मुलांचे डोळे नियमितपणे तपासा. तुमच्या मुलाला दर सहा महिन्यांनी नेत्रतपासणीसाठी नेत्रतज्ज्ञांकडे घेऊन जा. जेणेकरून त्याची दृष्टी ठीक आहे की नाही हे वेळोवेळी कळू शकेल. आणि आपण वेळेत मुलाचे डोळे निश्चित करू शकता.\nमुलांच्या डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठी त्यांना खायला द्या ‘हे’ 5 पदार्थ, चष्मा लावण्याची गरज पडणार नाही\nतुमचीही मुले केलेला अभ्यास विसरतात का अशा प्रकारे वाढवा मुलांची स्मरणशक्ती\nमुलांचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो; जाणून घ्या लक्षणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/rakhi-sawants-hospital-video-is-going-viral-what-is-the-matter-read-in-detail-update/", "date_download": "2022-10-07T22:50:22Z", "digest": "sha1:HMCGH54GTFSLNTZ32X2V6WZ6ENWISRQ2", "length": 5644, "nlines": 41, "source_domain": "mahaupdate.in", "title": "राखी सावंतचा हॉस्पिटलमधील व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर - Maha Update", "raw_content": "\nHome » राखी सावंतचा हॉस्पिटलमधील व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल, काय आहे प्रकरण\nराखी सावंतचा हॉस्पिटलमधील व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल, काय आहे प्रकरण\nमुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. वास्तविक, अभिनेत्रीची नुकतीच एस सर्जरी झाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीने आपली अवस्था सांगत हॉस्पिटलच्या खोलीतून स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राखी सावंतचा प्रियकर आदिल दुर्रानी देखील हॉस्पिटलमध्ये तिची काळजी घेताना दिसत आहे.\nरुग्णालयात दाखल झाल्यानंतरही राखी लोकांचे मनोरंजन करणे सोडत नाहीये. हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून ती तिथून सतत व्हिडिओ बनवून तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर करत आहे. हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होऊनही राखीची ही सकारात्मक ऊर्जा सर्वांनाच प्रभावित करत आहे. असे सांगितले जात आहे की राखीच्या गर्भाशयाजवळ एक गाठ होती जी तिने ऑपरेशनद्वारे काढली.\nपुन्हा एकदा राखी सावंतने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती सांगत आहे की ती आता घरी जाणार आहे आणि लवकरच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. यादरम्यान तिने व्हिडिओमध्ये आदिल खानलाही दाखवले आहे. त्याचबरोबर यावेळी यूजर्स तिच्या व्हिडिओची खिल्ली उडवत आहेत. खरं तर, राखीने व्हिडिओमध्ये खूप मेकअप केला आहे, त्यामुळे लोक तिला ट्रोल करत आहेत.\nराखी सावंतचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे\nराखीच्या व्हिडिओवर कमेंट करताना लोक लिहित आहेत, ‘हॉस्पिटलमध्येही मेकअप करण्यासाठी वेळ कसा मिळतो’ राखीने 7 तासांपूर्वी इन्स्टावर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 18 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.\n#Video : फक्त राखी नाही, आता डॉक्टर राखी सावंत…डिग्री मिळाल्यानंतर व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ व्हायरल\nRakshabandhan 2022 : बॉलिवूड अभिनेत्रीने रस्त्यावर उतरून सामान्य लोकांना बांधली राखी, चाहते म्हणाले…\nRakhi Sawant Video : राखीने बॉयफ्रेंड आदिलवर केले गंभीर आरोप; म्हणाली, “रोज चावतो आणि…”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%8B_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2022-10-07T22:59:42Z", "digest": "sha1:T3PW4KVITQXB3GHMAFXZGRHYZ7IJKIWY", "length": 6952, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लुडो (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nलुडो हा २०२०चा अनुराग बासू दिग्दर्शित भारतीय चित्रपट आहे. भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, अनुराग बासू, तानी बासू आणि दीपशिका बोस यांनी ही निर्मिती केली आहे. चित्रपटाची शैली डार्क कॉमेडी आणि गुन्हा आहे[१]. या चित्रपटाचे मुख्य कलाकार अभिषेक बच्चन, आदित्य रॉय कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, रोहित सुरेश सराफ, पर्ले माने आणि इनायत वर्मा आहेत. हा चित्रपट १२ नोव्हेंबर २०२० रोजी प्रकाशित झाले[२].\nती एक पुनरुत्पादित सेक्स टेप आणि पैशाच्या नकली सूटकेसची कहाणी आहे[३].\nइ.स. २०२० मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ रोजी २३:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%AC%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-07T23:28:28Z", "digest": "sha1:M5Y2GWGLEFD6CI2GYHRNRQYXCDWGPCAI", "length": 12280, "nlines": 89, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "बऱ्याचदा अक्षय कुमार त्याच्या मुलीचा चेहरा का लपवतो ? जाणून घ्या त्यामागचे ‘हैराण’ करणारे कारण - Themaharashtrian", "raw_content": "\nबऱ्याचदा अक्षय कुमार त्याच्या मुलीचा चेहरा का लपवतो जाणून घ्या त्यामागचे ‘हैराण’ करणारे कारण\nबऱ्याचदा अक्षय कुमार त्याच्या मुलीचा चेहरा का लपवतो जाणून घ्या त्यामागचे ‘हैराण’ करणारे कारण\nअक्षय कुमारचा एक चित्रपट आला होता खिलाडिय़ों का खिलाड़ी त्यात एक गाणे होते… अरे ना हम अमिताभ, ना दिलीप कुमार, ना किसी हिरो के बच्चे, हम है सिधे सादे अक्षय…. हे गाणे त्याच्या वास्तविक जीवनाशी खूप जुळणारे आहे. असे म्हटले जाऊ शकते की अक्षय कुमार बॉलीवूडमधील एक आगळा वेगळा अभिनेता आहे.\nजिथे इतर अभिनेते संपूर्ण रात्री जागून पार्टी करतात … पार्टीत डान्स, गाणे … म द्यपान करतात, तिथे अक्षय हा घरात रात्रीच्या पार्ट्याला न जाता शांत झोप घेतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की खऱ्या आयुष्यात अक्षय ना दारू पितो ना सिगारेट.\nपहाटे पाच वाजता बेड सोडतो म्हणजे झोपेतून उठतो. यावेळी बैठका आणि मुलाखती तो करतो. आज जिथे सोशल मीडियाचा संपूर्ण युग वेडा आहे … तिथे अक्षय त्यावर आवश्यक तेवढेच लक्ष देतो. बिनकामी तो ना ट्विटर वर येतो ना इंस्टाग्राम ना फेसबुक वर….\nसर्वात मजेची गोष्ट म्हणजे त्याची मुले सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर आहेत.अक्षय कुमार हा बॉलिवूडचा अव्वलचा अभिनेता आहे आणि कोट्यावधी लोक त्याचे चाहते आहेत पण जेव्हा तो घरी जातो तेव्हा घरात तो फक्त एक नवरा आणि वडील म्हणून वावरत असतो. ते एक सामान्य जीवन जगतो आणि प्रत्येक विवाद घरापासून दूर ठेवतो.\nअक्षय त्याच्या कुटुंबासाची किती काळजी घेतो हे कोणी त्याच्याकडून शिकावे. तो केवळ मुलगा आरव याला सोशल मीडियापासून दूर ठेवत नाही तर मुलगी नितारा हीला सुद्धा मीडियापासून लपवून ठेवतो. निताराची छायाचित्रे तुम्ही बर्‍याचदा पाहिली असतील, परंतु चेहरा कधीच नीट पाहिला नसेल, कारण जेव्हा जेव्हा खिलाडी अक्षय कुमार मीडियाच्या समोर येतो तेव्हा तो निताराचा चेहरा लपवतो.\nतो पटकन तिच्या चेहऱ्यायावर हात ठेवतो जेणेकरून कोणालाही निताराचा चेहरा दिसणार नाही किंवा एखादा फोटोही काढता येणार नाही.जेव्हा जेव्हा अक्षय आणि ट्विंकल आपल्या मुलीचे चित्र सोशल मीडियावर शेअर करतात तेव्हा त्या फोटोत मुलीचा चेहरा कधीच दिसत नाही. एकतर निताराचा मागचा भाग दिसत असतो किंवा थोडासा चेहरा दिसत असतो. संपूर्ण चेहरा कधीही दिसत नाही.\nआता प्रश्न असा पडतो की अक्षय हे असं का करतो\nतर यामागे असे कोणतेही खास कारण नाही परंतु अक्षय आपल्या मुलीसाठी खूप सकारात्मक (पजेसीव) आहे. त्याला माहिती आहे की माध्यम हे कधीकधी किती वाईट बनतात आणि लहान लहान गोष्टी मोठ्या मोठ्या करून आपल्या समोर मांडतात. अमिताभ बच्चन यांची नात नव्या किंवा शाहरुखचा मुलगा आर्यन खान, सैफची मुलगी सारा किंवा अभिषेकची लाडकी आराध्य मीडियावर या सर्वांच्या संबंधित बातम्या देत असते.\nया बातम्यांमुळे बर्‍याचदा त्यांच्या मुलांचे वैयक्तिक जीवन कसे आहे हे मीडिया सांगत असते. शाहरुखची मुलगी आणि अमिताभची नात नव्या यांच्यासोबत जे घडले त्याप्रमाणे निताराबाबत असे काहीही घडू अशी अक्षयची इच्छा नाही. जेव्हा नितारा मोठी होईल, तेव्हा अक्षय तिला मीडियासमोर आणेल.\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nसुरेश रैनाच पहिलं क्रश होती ‘ही’ मराठीमोळी अभिनेत्री, डेट करण्याची होती इच्छा…\nBig Boss Marathi Season 4 मध्ये पहिल्याच दिवशी पडली वादाची ठीणगी, अपूर्वा प्रसादला म्हणाली की तुझ्या सारख्या उद्धट…\nमहेश मांजरेकर यांच्या दुसऱ्या पत्नीची पहिल्या पतीपासून असलेली मुलगीही आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री..पहा दिसते अतिशय सुंदर…\nसई ताम्हाणकरच्या ‘या’ कि’सिंग सीनने तोडल्या होत्या सर्व मर्यादा, दिला असा बो’ल्ड सीन की बॉलीवूडमध्येही आपण कधी पाहिला नसेल…\n‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री आहे ‘मकरंद अनासपुरे’ यांची पत्नी, दोघांनी अनेक चित्रपटात केलंय काम, पहा फोटो…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.hongkepvcvalve.com/pommix-tap/", "date_download": "2022-10-07T21:19:21Z", "digest": "sha1:KC32S2IFNEBJ7PJRF3UYCWPKR27R4INI", "length": 7226, "nlines": 235, "source_domain": "mr.hongkepvcvalve.com", "title": " पीओएम(मिक्स) टॅप उत्पादक आणि पुरवठादार - चीन पीओएम(मिक्स) टॅप फॅक्टरी", "raw_content": "\n2 पीसी पीव्हीसी बॉल वाल्व मालिका\nपीव्हीसी बॉल वाल्व मार्गदर्शक\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nप्लास्टिक वाल्व, पीव्हीसी बॉल व्हॉल...\nहॉट सेल 1/2″ बॉल वा...\nकॉम्पॅक्ट पीव्हीसी बॉल व्हॉल्व्ह थ्री...\nप्लॅस्टिक टू-पीस बॉल व्हॉल्व्ह\nदक्षिण आफ्रिका Sch80 पीव्हीसी पाईप...\nचीन उत्पादनासाठी किचन नल\nPOM सामग्रीसाठी किचन नल\nPOM CP मिक्सर किचन नल\nउच्च दर्जाचे पोम हॉट आणि कोल्ड बिबकॉक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nपत्ता:नं. 28, शुगुआंग रोड, जियानशान टाउन, पनआन काउंटी, जिन्हुआ सिटी, झेजियांग प्रांत\nबेसिन टॅप, पाईप फिटिंग्ज, पीव्हीसी पाईप फिटिंग्ज, सिंचन बॉल वाल्व, पीव्हीसी शेड्यूल 40 बॉल वाल्व्ह, Abs बेसिन Faucets,\n© कॉपीराइट - 2010-2021 : सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nपीव्हीसी शेड्यूल 40 बॉल वाल्व्ह, पाईप फिटिंग्ज, बेसिन टॅप, पीव्हीसी पाईप फिटिंग्ज, सिंचन बॉल वाल्व, Abs बेसिन Faucets,\nई - मेल पाठवा\nआमच्याशी गप्पा मारा, powered by LiveChat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/mahatransco-apprentice-recruitment-2022-40-vacancies/", "date_download": "2022-10-07T22:44:38Z", "digest": "sha1:2QDI4KMBOE5GCDRBYCMF6332IZUJBIEB", "length": 6495, "nlines": 102, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाच्या ४० जागांसाठी भरती - Bharti jahirat", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाच्या ४० जागांसाठी भरती\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विजतंत्री अप्रेंटिस पदाच्या एकूण ४० पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने email द्वारे अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार 31 जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज सादर करू शकता.\nजाहिरात क्रमांक / Advertisement no. : का.अ./अउदा/संवसुवि/औरंगाबाद/00067\nपरीक्षेचे नाव / Exam Name : –\nपदाचे नाव व तपशील / Post Details\nपद क्रमांक पदाचे नाव पद संख्या\n1 विजतंत्री अप्रेंटिस 40 जागा\nपदाचे नाव शैक्षणिक पात्रता\nवयाची अट / Age Limit : 31 जानेवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बलघटक: 05 वर्षे सूट]\nपरीक्षा शुल्क / Exam Fee\nखुला प्रवर्ग फी नाही.\nमाजी सैनिक फी नाही.\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख / Last date of online application : ३१ जानेवारी २०२२\nअधिकृत संकेतस्थळ / Official Website : पाहा\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMPSC Group C Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC Subordinate Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022\nAir Force Agnipath Recruitment 2022 | भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022\nMPSC State Service Pre 2022 | महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 161 जागा\nMPSC Recruitment | पशुधन विकास अधिकारी पदाच्या 212 जागांसाठी भरती\nIndian Army Recruitment | भारतीय सेना भारती 90 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://crazymarathi.com/2022/09/23/sunny-tailor-kade-geli/", "date_download": "2022-10-07T22:23:46Z", "digest": "sha1:UHNNFK5RTVI2JWOJ4MCHML4SIZUERW3H", "length": 11052, "nlines": 96, "source_domain": "crazymarathi.com", "title": "स’नी रुमाल घेऊन टेलर कडे गेली… - Crazy Marathi", "raw_content": "\nस’नी रुमाल घेऊन टेलर कडे गेली…\nनेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….\nविनोद १ : एक स्त्री नोकरीच्या पहिल्याच् दिवशी ऑफिस मध्ये उशिरा येते.\nबॉस : काय हे\nस्त्री : सॉरी सर, पण सकाळी झोपेतून उठत असताना अचानक दोन्ही पायांमध्ये गोळे आले होते….\nबॉस : ठीक आहे, नाव काय तुमचं\nस्त्री : सौ. गोळे…\nविनोद २ : ग_र्ल्स हॉ_स्टेल मध्ये ३ दिवसांपासून लाइट नव्हती….\nशेवटी वैतागून वार्डनने MSEB ला कॉल केला आणि बोलली\n३ दिवसापासून मुली मेणबत्त्यांनी का_म चालवता आहेत आज तरी माणूस पाठवा…..\nविनोद ३ : दू_धवाला लागातार दरवाज्याची घंटी वाजवत होता\nघरातून आवाज आला, बाई बोलली बस कर किती द_बशील तुझ्या पेक्षा तर तो Newpaper वाला चांगला हळूच येतो खा_लून टा_कतो आणि चालला जातो\nविनोद ४ : संता खूप धीम्या आवाजात फोन वर बोलत होता\nबायको : इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलता आहात\nबायको : बहिणीशीच बोलता आहेत ना, मग घाबरतंय कश्याला\nसंता : ती तुझी बहीण आहे….\nविनोद ५ : एका सासूने सुनेला विचारलं\nसासू : अगं ये सुनबाई जे नवीन तांदूळ आणले आहे ते कसे आहेत\nसून : (रा_गा रा_गात बोलली) एकदम तुमच्या मुलं सारखे….\n सुनबाई मला समजलं नाही\nसून : च_ढवताच होऊन जातात जाणीव पाणी सोडायला लागतात, मग लगेच खाली उतरावे लागतात….\nविनोद ६ : एकदा एक मुलगी मिनी स्क_र्ट घालून स्कुटी चालवत असते\nएक मुलगा जोरात ओरडतो “A.B.C.D”\nती मुलगी परत मागे येते आणि त्या मुलाला विचारते\nA.B.C.D म्हणजे काय रे\nविनोद ७ : अँपल कंपनीच्या यशामागे दादा कोंडकें यांचा मोलाचा वाटा आहे. कसा\nस्टिव्ह जॉब्स : दादा माझे प्रॉडक्ट यश्ववी होण्यासाठी काय करू\nदादा कोंडके : “i” घाल\nयानंतर तुम्ही बघीतलेच iPhone, iPad, iPad etc.\nविनोद ८ : गण्या : स्वामीजी इथे ह्या डोंगरावर खूपच थन्डी आहे. इतक्या थन्डीत तुमच्या खुशीच राज काय आहे\nस्वामीजी : २१ वर्षाची तपस्या आणि ग्रीन टी जी मला थंडी पासून वाचवते.\nतु काय घेणं पसंद करशील तपस्या कि ग्रीन टी\nगण्या : ग्रीन टी…\nस्वामीजी : तपस्या, दोन कप ग्रीन टी आन….\nविनोद 9- नवरा बायको टीव्ही वर B P बघत असतात…अचानक मुलगा येतो\nमुलगा- बाबा हे ना गडे का आहेत बाबा- अरे बेटा हे गरीब लोक आहे\nत्यांच्या कडे कपडे नाहीय… मुलगा- बाबा आई पण गरीब आहे का…\nबाबा- नाही बाळा.. काय झालं मुलगा- अहो मग काल तुम्ही जेव्हा घरी नव्हते तेव्हा\nआई आणि रामू काका पण असेच गरीब झालेले होते…\nविनोद १०- एकदा स नी लि योन रुमाल घेऊन टेलर कडे गेली\nस नी लि योन- टेलर भाऊ ह्यात ३ ड्रेस शिवून द्या…\nटेलर रुमाल हातात घेतो आणि हसायला लागतो…\nस नी लि योन- काय झालं भाऊ टेलर- अहो ताई…. विचार करतोय ३ ड्रेस शिवल्यानंतर\nबाकीच्या कपड्याच काय करू…\nनेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….\nविदाईचा विडिओ बघून नक्की रडू येईल….\nकाकांची कॉमेडी ऐकून हसून हसून पोट दुखेल…\nसुंदर बाईनीं केला नादखुळा डान्स…\nJoke – बबलुच्या घरचे गावाला गेलेले असतात म्हणून तो\nअडाणी मुलीची लग्नाची पहिली रात्र असते…\nलग्नात बायकांनी केला झकास डान्स…\nसाली बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…\nलग्नात वहिनीनीं केला भारी डान्स…\nसुहा’गरात्री बायकोला जोराची उचकी लागते….\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा वट पिंकी एका बस मध्ये चढली…\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा’वट बाई मेडिकल वर गेली…\nमुलीने सासरी जाताना सर्वांना रडवले\nटकला टी शर्ट घालून आला…\nनवरी ताईचा विडिओ बघून रडू येईल…\nबंड्याच्या बेडरूम मधून बायकोचा आवाज आला…\nलग्नात ताईने केला खुपच सुंदर डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nताईने केला खुपच सुंदर डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/honey-singh-and-shalini-talwar-divorced-hearing-in-saket-family-court-singer-gave-1-crore-as-alimony-130294539.html", "date_download": "2022-10-07T21:07:04Z", "digest": "sha1:JXT3IZP5PXJBGAZ36OCONWLPBO2UQEWA", "length": 7234, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "साकेत कौटुंबिक न्यायालयात खटल्याची सुनावणी, गायकाने 1 कोटी दिली पोटगी | Honey Singh And Shalini Talwar Divorced: Hearing In Saket Family Court, Singer Gave 1 Crore As Alimony - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहनी सिंग आणि शालिनी तलवार यांचा घटस्फोट:साकेत कौटुंबिक न्यायालयात खटल्याची सुनावणी, गायकाने 1 कोटी दिली पोटगी\nपंजाबी गायक यो यो हनी सिंग आणि पत्नी शालिनी तलवार यांचा घटस्फोट झाला आहे. दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी केली. हनी सिंगने एक कोटी रुपयांचा धनादेश शालिनी तलवारला सीलबंद लिफाफ्यात दिला आहे.\n1 कोटीच्या पोटगीवर खटला निकाली निघाला\nयो यो हनी सिंग आणि शालिनी तलवार यांच्यातील उलट-सुलट आरोपानंतर गुरुवारी न्यायालयात हे प्रकरण मिटले. त्यानंतर दोघांमध्ये 1 कोटींच्या पोटगीचा करार झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 मार्च 2023 रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये पुढील प्रस्तावावर सुनावणी होणार आहे.\nहनी सिंगवर मारहाणीचा आरोप केला होता\nशालिनी तलवारने हिरदेश सिंग म्हणजेच हनी सिंग विरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत गेल्या वर्षी 3 ऑगस्ट रोजी तीस हजारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिने हनी सिंगवर मारहाणीचा आरोप केला होता. या लग्नाला 10 वर्षे दिली आणि त्याबदल्यात फक्त शारीरिक आणि मानसिक छळ मिळाल्याचे शालिनीने म्हटले होते.\nशालिनीने केली होती 10 कोटी रुपयांची मागणी\nशालिनी तलवारने हनी सिंगवर आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जाण्याच्या बहाण्याने इतर महिलांशी अवैध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. शालिनीने सांगितले की, तिच्या पतीने तिला जनावरासारखी वागणूक दिली आणि आता तिला हनी सिंगपासून वेगळे व्हायचे आहे. याचिका दाखल करताना शालिनीने हनी सिंगकडे 10 कोटी रुपयांच्या पोटगीची मागणीही केली होती.\nहनी सिंग आणि शालिनी तलवार यांचे 2011 मध्ये लग्न झाले होते.\n17 वर्षे डेटिंग केल्यानंतर 2011 मध्ये केले होते लग्न\n17 वर्षे डेट केल्यानंतर हनी सिंग आणि शालिनी तलवार यांनी 23 जानेवारी 2011 रोजी लग्न केले होते. दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते आणि एकाच शाळेत शिकत होते. आता त्याच्या पत्नीने लग्नाच्या 10 वर्षानंतर हनी सिंगवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता.\nहनी सिंगने शालिनीचे आरोप फेटाळून लावले\nशालिनीच्या आरोपानंतर हनी सिंगने 6 ऑगस्टला सोशल मीडियावर एक नोट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. हनी सिंगने या नोटमध्ये लिहिले होते की, 'माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले ही अत्यंत दुःखाची बाब आहे. या आरोपांमुळे मी खूप अस्वस्थ आहे. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निंदनीय आहेत आणि ते केवळ मला त्रास देण्यासाठी करण्यात आले आहेत,' असे हनी म्हणाला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/akola/news/how-to-do-ganapati-visarjan-know-the-immersion-time-and-muhurat-130290798.html", "date_download": "2022-10-07T23:07:47Z", "digest": "sha1:N26K4IVHN3IZ4A6ZORRH5JLZ7NYDNBMN", "length": 7127, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "विघ्नहर्त्या गणरायाचे कसे करावे विसर्जन; जाणून घ्या गुरुजींनी सांगितलेली वेळ आणि मुहूर्त! | How to do Ganapati Visarjan; Know the immersion time and Muhurat! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n:विघ्नहर्त्या गणरायाचे कसे करावे विसर्जन; जाणून घ्या गुरुजींनी सांगितलेली वेळ आणि मुहूर्त\nगणेश चतुर्थीपासून सुरू झालेला गणेशोत्सव 10 दिवसांनंतर अनंत चतुर्दशीला संपतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जनही केले जाते. संपूर्ण देशात अनंत चतुर्दशीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. उद्या 9 सप्टेंबर रोजी शुक्रवारी अनंत चतुर्दशी असल्याने बाप्पाचे विसर्जनाचा मुहूर्त आणि वेळ काय आहे जाणून घ्या.\nया वेळात करा विसर्जन\nगणेश विसर्जनासाठी सर्व मुहूर्त शुभ मानले जातात. शुक्रवार 9 सप्टेंबर सूर्योदयापासून गणेश विसर्जन करता येणार आहे. सकाळचा मुहूर्त- शुक्रवारी, 06:03 ते सकाळी 10:44 पर्यंतचा विसर्जनाचा मुहूर्त शुभ आहे. त्यानंतरही विसर्जन करता येईल, असे अकोला पौरोहित्य संघाचे रवी कुमार पंडित यांनी सांगितले.\nगणपती विसर्जन कसे करावे \nगणपती विसर्जन करताना कोणतीही पूजा करण्याची गरज नाही. विसर्जनाच्या वेळी गणपतीची योग्य पूजा करा, आरती करा आणि नंतर गणपती विसर्जन घरीच करणार असाल तर, परत गणेश आरती म्हणायची गरज नाही. आपण जर विहिरीवर नदीवर किंवा इतर ठिकाणी विसर्जन करणार असाल, तर तिथे पण गणपतीची आरती करा. योग्य पद्धतीने पूजा करा आणि प्रसाद वाटावा.\nगणेश विसर्जन शुभ मुहूर्त\nसकाळचा मुहूर्त - शुक्रवार सकाळी 06.03 ते 10.44 पर्यंत\nदिवसाचा मुहूर्त – 12.18 ते 01.52 पर्यंत\nसायंकाळचा मुहूर्त – 5.00 ते 06.34 पर्यंत\nरात्रीचा मुहूर्त – 09.26 ते 10.52 पर्यंत\nमध्य सत्राचा मुहूर्त – शुक्रवारी मध्यरात्री 12.18 ते शनिवारी सकाळी 04.47 पर्यंत\nविसर्जन विधीमध्ये गणपतीची आरती करून उत्तर पूजा केली जाते. गणपतीवर अक्षता, फुले वाहिले जातात. त्यानंतर मूर्ती हलविली जाते. मूर्तीत प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्यात गणरायाचे वास्तव्य मानले जाते. ते उत्तर पूजेनंतर मूर्ती हलवेपर्यंतच असते. एवढ्या दिवस श्रध्देने मनोभावे पूजलेल्या या मूर्तीला नंतर पाण्यात विसर्जित केले जाते. गणपतीवर अक्षता टाकल्यानंतर आणि गणपतीची मूर्ती हलव्यानंतर गणपतीचे विसर्जन झालेले आहे. नंतर विसर्जनासाठी घरी, तलाव किंवा अन्य ठिकाणी मूर्ती नेता येते.\nकुंडाचे व तुळशीचे रोप वितरण\nगणेश भक्तांनी घरी स्थापन केलेल्या शाडूमातीच्या अथवा पर्यावरणपुरक गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी होणार आहे. त्या गणेशभक्तांना घरीच पर्यावरण पूरक विसर्जनाकरिता कुंडाची गरज आहे. विसर्जन कुंडांबरोबर तुळशीचा रोपाचे वितरण अनेक संस्थाकडून करण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/beed/news/concerns-of-3-districts-including-beed-resolved-cat-4429-water-storage-130303730.html", "date_download": "2022-10-07T21:16:21Z", "digest": "sha1:E6XJCES4WIRHRRQY2XRTQ4K4OEO5HHV2", "length": 6901, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बीडसह 3 जिल्ह्यांची चिंता मिटली; मांजरा त 44.29% पाणीसाठा | Concerns of 3 districts including Beed resolved; Cat 44.29% water storage| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचिंता मिटली:बीडसह 3 जिल्ह्यांची चिंता मिटली; मांजरा त 44.29% पाणीसाठा\nपावसाळ्याच्या तीन महिन्यांच्या कालावधीत मोठे पाऊस न झाल्याने धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणात मोठी आवक झालेली नाही. मात्र, आता ३०.८२२ दलघमी आवक झाली असून धरणात ४४.२९ टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या लातूर, बीड व उस्मानाबाद या जिल्ह्यातील ५ शहरांसह अनेक गावांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.\nधनेगाव येथील मांजरा धरणाची साठवण क्षमता २२४.०९३ दलघमी आहे. तर धरणातून वर्षभरासाठी लातूर शहराला २४ दलघमी, लातूर एमआयडीसीला ३ दलघमी, अंबाजोगाई शहराला ३.५ दलघमी, कळंब शहराला २.२५ दलघमी, केज व धारूर शहराला १.५० दलघमी, मुरुड-शिराढोण या गावांना ०.५ दलघमी, युसूफवडगावला ०.५ दलघमी यासह इतर गावांसाठीच्या लहान योजनांसाठी अंदाजे २६ ते २७ दलघमी पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यापूर्वी धरणात ९४.६९१ दलघमी पाणीसाठा होता. तर पावसाळ्याच्या ३ महिन्यांच्या कालावधीत मोठे पाऊस झाले नाहीत. त्यात १ महिना पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील लहान-मोठ्या तलावात आणखी अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही.\nपरिणामी, मांजरा धरणात मोठी आवक झालेली नाही. परंतु धरणात क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे आणि मांजरा नदीतून आलेल्या पाण्यामुळे तीन महिन्यांच्या कालावधीत ३०.८२२ दलघमी इतकी पाणीसाठ्याची भर पडली आहे. तर ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत धरणात १२५.५१३ दलघमी इतका पाणी साठा झाला आहे. धरण भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. मात्र धरणात उपलब्ध असलेला ४४.२९ टक्के पाणीसाठा हा वर्षभरासाठी धरणावर अवलंबून असलेल्या लातूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील पाच शहरांसह अनेक गावांची पाणीपुरवठा योजनांसाठी पुरेसा आहे. त्यामुळे वर्षभराची टंचाईची चिंता मिटली आहे. शिवाय पाण्याचा अपव्यय टाळून वापर केल्यास टंचाईच्या काळात सिंचनासाठी पाणी वापरता येऊ शकते. मात्र येणाऱ्या काळात मोठे व परतीच्या पावसावर धरण भरण्याची अपेक्षा आहे.\nग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी आणखी पावसाची प्रतीक्षा कायम\nकेज तालुक्यात मोठे पाऊस न झाल्याने लहान-मोठ्या तलावात अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे या तलावातून सुरू असलेल्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आणखी पावसाची प्रतीक्षा आहे. शिवाय तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढल्याने सिंचन क्षेत्राच्या दृष्टीने पाऊस महत्त्वाचा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/peanut-butter-is-a-boon-for-these-things-yo/", "date_download": "2022-10-07T22:28:36Z", "digest": "sha1:GKGCYIBWLS6DN5JYZZTYYVJQLORFPLE5", "length": 7103, "nlines": 45, "source_domain": "mahaupdate.in", "title": "पीनट बटर 'या' गोष्टींसाठी ठरते वरदान, जाणून तुम्ही थक्क व्हाल - Maha Update", "raw_content": "\nHome » पीनट बटर ‘या’ गोष्टींसाठी ठरते वरदान, जाणून तुम्ही थक्क व्हाल\nपीनट बटर ‘या’ गोष्टींसाठी ठरते वरदान, जाणून तुम्ही थक्क व्हाल\nशेंगदाण्यापासून तयार केलेल्या बटरमध्ये भरपूर गुणधर्म असतात. हे इतके चविष्ट आहे की प्रत्येक पदार्थाची चव वाढवते. अन्नाव्यतिरिक्त पीनट बटरचे इतर उपयोग देखील आहेत. ते जाणून घ्या.\nखाण्याव्यतिरिक्त इतर कोणत्या गोष्टींसाठी वापरली जाऊ शकते याबद्दल आम्ही बोलत आहोत. जेणेकरून तुम्हाला त्याच्या आश्चर्यकारक उपयोगांबद्दल माहिती मिळेल आणि तुमची अनेक वाईट कामे स्वस्तात करता येतील…\n1. फर्निचर वर ओरखडे\nघराची साफसफाई किंवा शिफ्टिंग करताना अनेकदा ही समस्या उद्भवते की लाखोच्या काळजीनंतरही कोणत्या ना कोणत्या फर्निचरमध्ये ओरखडे येतात. अशा परिस्थितीत पीनट बटर तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. पीनट बटर घ्या आणि स्क्रॅचवर लावा आणि नंतर 30 मिनिटे सोडा. आता सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्या. तुमच्या लक्षात येईल की स्क्रॅच आता पूर्वीसारखे हायलाइट केलेले नाही.\n2. लेदरची चमक वाढवू इच्छिता\nशूज, पर्स, सोफ्यापासून ते जॅकेट आणि इतर अनेक वस्तू, जर तुम्ही चामड्याचे सामान विकत घेत असाल तर त्यांच्या काळजीमध्ये पीनट बटर तुमच्यासाठी उत्तम उपाय ठरणार आहे. पीनट बटर लेदरला अगदी नवीन सारखे चमकवते. मऊ कापडावर थोडे पीनट बटर घेऊन तुम्ही लेदरची कोणतीही वस्तू साफ करू शकता आणि जुनी चमक परत मिळवू शकता.\n3. स्टिकर गोंद साफ करणे\nजर तुम्ही कोणत्याही भांड्यातून किंवा काचेच्या भांड्यातून किंवा इतर कोणत्याही वस्तूचे स्टिकर काढले असेल, परंतु त्याचा चिकट गोंद काढत नसेल, तर तुम्ही पीनट बटरच्या मदतीने ते स्वच्छ करू शकता. यासाठी गोंदावर पीनट बटर लावून 2 ते 3 मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर स्वच्छ घासून घ्या. तुमची समस्या दूर होईल.\n4. त्वचेची चमक वाढवण्यासाठी\nजर तुम्हाला तुमच्या त्वचेची चमक वाढवायची असेल किंवा वॅक्सनंतर त्वचेला विशेष उपचार द्यायचे असतील तर तुमच्या त्वचेला पीनट बटरने मसाज करा. 15 ते 20 मिनिटांनी कोमट पाण्याने आंघोळ करा. मग बघा तुमची त्वचा कशी आरशासारखी चमकते. एवढी काळजी घ्या की या सर्व कामात वापरण्यासाठी साधे पीनट बटर घ्या, म्हणजे त्यात कोणत्याही ड्रायफ्रुट्सचे छोटे तुकडे नसावेत. त्याऐवजी ती फक्त एक गुळगुळीत पेस्ट असावी.\nजर तुमची शेव्हिंग क्रीम संपली असेल आणि तुम्हाला तुमचे पाय मुंडायचे असतील तर हे पीनट बटर शेव्हिंग क्रीम म्हणून एकदा वापरून पहा… तुम्ही त्याचे चाहते व्हाल. कारण हे चविष्ट लोणी तुमची त्वचा लोण्यासारखी गुळगुळीत करणार आहे.\nचुकूनही लहान मुलांना ‘हे’ पदार्थ खायला देऊ नका; अन्यथा वाढतील आरोग्याच्या समस्या, जाणून घ्या सविस्तर\nवर्कआउट करण्यापूर्वी ‘या’ ५ गोष्टींचे सेवन करा, झपाट्याने कमी होईल वजन\nमजबूत आणि मोठे बॉडी बायसेप्स बनवण्यासाठी आजच आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1345/", "date_download": "2022-10-07T21:50:44Z", "digest": "sha1:3YAC45F5BE2AH6US2VGJXWPV5PYFOFXG", "length": 6821, "nlines": 77, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "बुद्ध सृष्टीच्या विकासासाठी धम्मदान - Rayatsakshi", "raw_content": "\nबुद्ध सृष्टीच्या विकासासाठी धम्मदान\nबुद्ध सृष्टीच्या विकासासाठी धम्मदान\nकिर्ती महेंद्र कसबे यांनी ५० हजार रु. चे धम्मदान दिले.\nकेज, रयतसाक्षी: सेवा निवृत्तीच्या पैशातून बीड उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर अत्यंत देखणी अशी बुद्ध सृष्टी विकसीत करून त्यात अत्यंत भव्य दिव्य अशा बुद्ध मूर्तींची उभारणी केलेल्या त्रिवेणीताई कसबे-पोटभरे यांच्या सामाजिक कार्याने प्रेरित होऊन बुद्ध सृष्टीच्या उर्वरित कामाच्या विकासासाठी धम्म भगिनी आयु किर्ती महेंद्र कसबे यांनी ५० हजार रु. चे धम्मदान दिले आहे.\nत्रिवेणी ताई कसबे पोटभरे यांनी अत्यंत कष्टाने आणि प्रचंड मेहनतीने त्यांना सेवा निवृत्ती नंतरच्या मिळालेल्या भविष्य निर्वाह निधी आणि उपदानाच्या रकमेतून स्वतःच्या भावी आयुष्याची चिंता बाजूला ठेऊन सुमारे १४ लक्ष रु. खर्च करून केज-कळंब रोड लगत भव्य अशी बुद्ध मुर्ती उभारली आहे. तेथे बुद्ध सृष्टी उभारली आहे. तेथे अत्यंत मनमोहक असे फुलझाडे, लॉन आणि बुद्धगया येथील बौद्धी वृक्षांची लागवड केली आहे.\nतसेच अत्यंत रेखीव व आकर्षक असे सांचीच्या स्तूपाच्या समोर असलेल्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती उभारून त्याला सोनेरी रंग दिला आहे. तेथे जाणाऱ्या येणाऱ्या ते प्रवेशद्वार हे सोनेरी असल्याचा आभास होतो. या ठिकाणी अद्याप भिक्खू निवास आणि धम्म हॉल व इतर सुख सुविधा याचे काम हे निधी अभावी रखडले आहे. या सर्व बाबीं व त्यासाठी आर्थिक नियोजन यासाठी धम्मभगिनी आयु. किर्तीताई महेंद्र कसबे यांनी ५० हजार रु. च्या धम्मदाना₹ त्रिवेणिताई कसबे पोटभरे यांच्या स्वाधीन केला. बुद्ध धम्मात सम्यक दान कशाला म्हणतात याचे स्वतः दाखवून दिले.\nशिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीवर राजनंदिनी तळेकर हिने उमटवली मोहोर\nपिस्टलचा धाक दाखवून दरोडा टाकणार-या आरोपींच्या मुसक्या आवळल्या\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1840/", "date_download": "2022-10-07T22:38:57Z", "digest": "sha1:A27F7HXDQD4EL774SNQHQTRKV5OTKBH2", "length": 8125, "nlines": 84, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "सर्परातील वन्यजीवांच्या सहवासात रमले पद्मश्री डॉ प्रकाश आमटे - Rayatsakshi", "raw_content": "\nसर्परातील वन्यजीवांच्या सहवासात रमले पद्मश्री डॉ प्रकाश आमटे\nसर्परातील वन्यजीवांच्या सहवासात रमले पद्मश्री डॉ प्रकाश आमटे\n\"सर्पराज्ञीत घरी आल्यासारख वाटतंय\". - पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे\nशिरूर कासार, रयतसाक्षी : वन्यजीव दिनाच्या दुसऱ्या दिवशी थोर समाजसेवक आदरणीय पद्मश्री डॉ.प्रकाश बाबा आमटे व मंदाताई आमटे यांची अचानक सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात भेट देऊन तेथील जखमी ,आजारी व मातृत्वापासून दुरावलेल्या वन्यजीवांची पाहणी करत,”सर्पराज्ञीत आल्यानं घरी आल्यासारखं वाटतंय ” असे गौरवोद्गार काढले.\nगेल्या दोन तपासून जखमी, आजारी व मातृत्वापासून दुरावलेल्या वन्य जीवांची सेवा सुश्रुषा करणारे सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे ,दांपत्य चालवत असलेल्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रास काल थोर समाजसेवक आदरणीय पद्मश्री डॉ.प्रकाश बाबा आमटे व मंदाताई आमटे यांनी भेट दिली. येथील जखमी ,आजारी व मातृत्वापासून दुरावलेल्या वन्यजीवांची मोठ्या आपुलकीने पाहणी करून, प्राण्यांवर प्रेमाने हात फिरवत सृष्टी आणि सिद्धार्थ सोनवणे करत असलेल्या कार्यास शुभेच्छा दिल्या.\nतसेच येथील गंगाई नक्षत्र वन, रामवन घनवान व नंदनवन दुर्मिळ अति दुर्मिळ वनस्पती जतन केंद्राची मोठ्या उत्साहात सिद्धार्थ सृष्टी सोनवणे यांच्या सोबत स्वतः पद्मश्री डॉ.प्रकाश बाबा आमटे व मंदाताई आमटे पायी फिरून पाहणी केली.\nयावेळी सर्पराज्ञीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पद्मश्री डॉ प्रकाश बाबा आमटे व मंदाताई आमटे यांच्या हस्ते दुर्मिळ अशा बोधी वृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत नितीनजी पवार आणि मंजिरीताई परांजपे होते.\nयावेळी पुणे येथून आलेले आर्किटेक जोशी, निसर्गमित्र नरेंद्र पितळी काका, प्रक्रियाचे सचिन नलावडे मुग्धा ताई नलावडे उपस्थित होते.\nप्रत्यक्षात देव भेटल्याचे समाधान\n”आदरणीय थोर समाजसेवक पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे व मंदाताई आमटे यांनी सर्पराज्ञीस दिलेली अचानक भेट ही आमच्यासाठी आमच्या वन्यजीवांच्या सेवा सुश्रुषाच्या दोन तपांच्या तपश्चर्येची साक्षात परमेश्वराने दिलेली भेट होय .ही भेट अविस्मरणीय व आनंददायी होय ”\n(संचालक:सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र)\nभाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नाला यश\n….अखेर पंचवीस पंधराच्या कामांना सुरवात\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/2236/", "date_download": "2022-10-07T22:24:35Z", "digest": "sha1:IPWBPDK3KCDFKZWNIFK2ZRRVADXKWVJ4", "length": 6243, "nlines": 77, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "मोहटा गडावर आदीशक्ती- लोकशक्तीचा संगम - Rayatsakshi", "raw_content": "\nमोहटा गडावर आदीशक्ती- लोकशक्तीचा संगम\nमोहटा गडावर आदीशक्ती- लोकशक्तीचा संगम\nलोकनेत्या पंकजा मुंडे आज मोहटा देवी चरणी, हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा- पै. माऊली पानसंबळ\nशिरूर कासार, रयतसाक्षी: मोहटा गडावर लोकनेत्या पंकजा मुंडे आज मंगळवार (दि.२१) मोहटा देवीच्या चरणी येत आहेत. मोहटा गडावर विविध विकास कामांचा आढावा यासह देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी लोकनेत्या पंकजा मुंडे येत असल्याने आदीशक्ती- लोकशक्तीचा संगम होणार आहे. लोकनेत्या पंकजा मुंडे याच्या स्वागतास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन पै. माऊली पानसंबळ यांनी केले आहे.\nमोहटा गडाच्या तेजोमय विकासामध्ये लोकनेत्या मा. ना. पंकजा मुंडे यांचे कायम योगदान राहीले आहे. गडावर येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी लोकनेत्या पंकजा मुंडे नेहमीच अग्रही आहेत. गडाच्या विकास कामांसाठी राज्य व केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून लोकनेत्या पंकजा मुंडे यांनी गडाचा दैदिप्यमान विकास साधला आहे. सोई- सुविधांमुळे मोहटा गडावर येणाऱ्या भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.\nभाविकांची वाढती संख्या लक्षात घेउन लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे होऊ घातली आहेत. मोहटा गडावर आदीशक्ती आणि लोकशक्तीचा संगम होणार असल्याने याचे साक्षीदार होण्यासाठी जिल्हाभरातील भाविक, कार्यर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे पै. माऊली पानसंबळ यांनी केले आहे.\nकेंद्र सरकारच्या हुकूमशाहीचा काँग्रेसकडून निषेध्\nमविआ सरकार फुटीच्या उंबरठ्यावर \nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nमराठा क्रांती मोर्चा आक्रमक:तानाजी सावंत यांनी माफी मागावी, अन्यथा एकाही मंत्र्याला…\nपोटोद्या जवळ स्वीप्ट- कंटेनरचा भीषण अपघात सहा ठार\nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.hongkepvcvalve.com/fm-wire-octagonal-ball-valve-product/", "date_download": "2022-10-07T23:05:57Z", "digest": "sha1:4ZHSDSSGKVOOZZFGDIWUTAW3AYVMFO2S", "length": 9508, "nlines": 224, "source_domain": "mr.hongkepvcvalve.com", "title": " चीन F/M वायर अष्टकोनी बॉल वाल्व निर्माता आणि पुरवठादार |हाँगके", "raw_content": "\n2 पीसी पीव्हीसी बॉल वाल्व मालिका\nपीव्हीसी बॉल वाल्व मार्गदर्शक\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nF/M वायर अष्टकोनी बॉल वाल्व\nवस्तूचे नाव उच्च दर्जाचे टिकाऊ उपयुक्त सर्व आकार भिन्न रंगांसह प्लास्टिक बॉल वाल्व पीव्हीसी बॉल वापर: वाल्व वापर कृषी सिंचन/मेरीकल्चर/स्विमिंग पूल/इंजिनियरिंग\nपॅकिंग: कार्टन, पॉलीबॅग, कलर बॉक्स किंवा सानुकूलित\nरंग: निवडीसाठी अनेक रंग उपलब्ध आहेत\nआमचा माल व्यापकपणे अंतिम वापरकर्त्यांद्वारे ओळखला जातो आणि त्यावर विश्वास ठेवला जातो आणि फॅक्टरी किंमत चीन घाऊक 2-1/2″-4″ इंच टिकाऊ उपयुक्त सामान्य दाब पीव्हीसी अष्टकोनी बॉल व्हॉल्व्हसाठी सतत विकसित होत असलेल्या आर्थिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करू शकतात, जर तुम्हाला जवळजवळ स्वारस्य असेल तर आमची कोणतीही वस्तू, तुम्ही आम्हाला कॉल करण्यासाठी कधीही वाट पाहत नाही याची खात्री करा आणि पुढे जा आणि यशस्वी व्यावसायिक रोमान्स तयार करण्यासाठी प्रारंभिक पाऊल उचला.\nफॅक्टरी किंमत चायना UPVC बॉल व्हॉल्व्ह, PVC कॉम्पॅक्ट बॉल व्हॉल्व्ह, आम्ही संपूर्ण पुरवठा साखळी नियंत्रित करण्यासाठी पूर्णपणे दृढनिश्चय करत आहोत जेणेकरून वेळेवर स्पर्धात्मक किंमतीत दर्जेदार उत्पादने आणि उपाय ऑफर करता येतील.आमच्या ग्राहकांसाठी आणि समाजासाठी अधिक मूल्ये निर्माण करून आम्ही प्रगत तंत्रांचा वापर करत आहोत.\nमागील: गडद राखाडी हेवी अष्टकोनी बॉल वाल्व\nपुढे: ग्रे क्विक कपलिंग चीन पुरवठादार\nABS बिबकॉक घाऊक टॅप\nस्वयंपाकघर हंस मान तोटी क्रोम प्लेटेड\nपीव्हीसी मिल्की व्हाईट बॉल वाल्व\nकॉम्पॅक्ट पीव्हीसी बॉल वाल्व थ्रेडेड इंटरफेस\nस्टॉकमध्ये मुद्रित प्लास्टिकच्या नळाची लहान रक्कम\nहाँगके ब्लू उच्च दर्जाचे प्लास्टिक पीव्हीसी 4 इंच ऑक्टो...\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nपत्ता:नं. 28, शुगुआंग रोड, जियानशान टाउन, पनआन काउंटी, जिन्हुआ सिटी, झेजियांग प्रांत\nAbs बेसिन Faucets, पीव्हीसी पाईप फिटिंग्ज, बेसिन टॅप, सिंचन बॉल वाल्व, पीव्हीसी शेड्यूल 40 बॉल वाल्व्ह, पाईप फिटिंग्ज,\n© कॉपीराइट - 2010-2021 : सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nपीव्हीसी शेड्यूल 40 बॉल वाल्व्ह, सिंचन बॉल वाल्व, पाईप फिटिंग्ज, Abs बेसिन Faucets, बेसिन टॅप, पीव्हीसी पाईप फिटिंग्ज,\nई - मेल पाठवा\nआमच्याशी गप्पा मारा, powered by LiveChat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1751/", "date_download": "2022-10-07T23:00:15Z", "digest": "sha1:32UMFGPOYHGJXEFGFGABSHJWZJE2NFDM", "length": 7973, "nlines": 81, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश - Rayatsakshi", "raw_content": "\nबीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश\nबीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश\nसहाय्यक पोलीस अधिक्षक कुमावत यांच्या पथकाची कारवाई\nबीड, रयतसाक्षी : आयकर चुकवून टोकन पद्ध्तीने पैशांची देवाणघेवाण करणरा हवाला रॅकेटचा सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने दि. २८ सोमवारी पर्दाफाश केला. शहरात तीन ठिकाणी धी टाकून तिघांना ताब्यात घेत सुमारे ५१ लाख रूपयांची बेहिशोबी रक्कम हस्तगत केली.\nबीड शहरात विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या हवाला रॅकेट सुरु असल्याची माहिती केजचे सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक रवाना केले. या पथकाने शहरातील कबाडगल्लीतील न्यू इंडिया अंगडिया, जालना रोडवरील आर क्रांती ट्रेडर्स व सिध्दीविनायक कॉम्प्लेक्ससमोरील एका ठिकाणी छापा टाकला. सायंकाळी साते ते रात्री आठ दरम्यान ही कारवाई करण्यात आली.\nयात अनुक्रमे ३५ लाख ७९ हजार रुपये, ९ लाख रुपये, ६ लाख ४१ हजार रुपये अशी एकूण ५१ लाख २६ हजार रुपयांची बेकायदेशीर रोकड आढळून आली.याबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्यांना हिशेब देता आला नाही.\nयावेळी तिन्ही ठिकाणच्या व्यवस्थापकांना तब्यात घेतले. मयूर विठ्ठल बोबडे, हरीश रतीलाल पटेल, सूरज पांडूरंग घाडगे अशी त्यांची नावे आहेत. शिवाजीनगर ठाण्याचे उपनिरीक्षक बाळराजे दराडे, हावलदार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, दिलीप गित्ते, राजू वंजारे, पो. ना. विष्णू चव्हाण, रवी आघाव, संजय टुले, दिपक जावळे, अविनाश सानप यांचा या कारवाईत समावेश होता.\nदरम्यान, पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडलेल्या तिन्ही संशयितांकडे कसून चौकशी सुरू आहे. हवाला रॅकेट कसे चालायचे, किती रूपयांचा व्यवहार व्हायचा, कमिशन किती मिळायचे या बाबी चौकशीत निष्पन्न होतील. पोलीस आयकर विभागाला पत्र देणार असून ते पुढील कार्यवाही करणार आहेत.\nपैसे मोजण्याचे यंत्र, मोबाईल जप्त\nकारावाई दरम्यान पैसे मोजण्याचे यंत्र, मोबाइल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. हवाला रॅकेटचे इतर ठिकाणचे कनेक्श्न देखील या कारवाईमुळे समोर येण्याची शक्यता आहे. थेट कार्यालये थाटून हवाला रॅकेट सुरू असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.\nभारती महाराजांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी\nशिवालये गजबजली: शिरूरच्या धाकट्या अलंकापुरीत शिवभक्तांची मांदीआळी\nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७…\nवडवाडी दरोडा प्रकणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या\nआठ जणांना अटक:बनावट नोटा चलनात खपवू पाहणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश;…\nभंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/12/weather-report.html", "date_download": "2022-10-07T21:58:13Z", "digest": "sha1:MF64YDTEKSIJIMWZQWWMUK675FQFPK4S", "length": 4591, "nlines": 60, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "राज्यात पुन्हा पाऊस बरसणार . | Gosip4U Digital Wing Of India राज्यात पुन्हा पाऊस बरसणार . - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या राज्यात पुन्हा पाऊस बरसणार .\nराज्यात पुन्हा पाऊस बरसणार .\nयेत्या 2-3 दिवसांमध्ये मध्यम ते किरकोळ पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nभारतीय हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यात किमान तापमानात घट होत असली तरीही कमाल तापमान वाढत आहे.\nत्यामुळे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पावसाची सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच गडगडाटाची शक्यता आहे.\nअरबी समुद्रामध्ये दक्षिण पश्चिम दिशेला कमी दाबाच्या क्षेत्राचे येत्या 3 दिवसामध्ये चक्रीवादळामध्ये रूपांतर झाल्यास ते सोमालियाच्या बाजूने सरकण्याची शक्यता आहे.\nया चक्रीवादळामुळे येत्या काही दिवसात कोकण किनारपट्टीसह औरंगाबाद, परभणी, बीड, जालना, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये वादळी वारा, गडगडाटासह पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nनगर गारठले : राज्यात अद्याप थंडी जाणवत नसली तरीही राज्यात अहमदनगरमध्ये सर्वाधिक तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2018/07/blog-post_36.html", "date_download": "2022-10-07T21:11:30Z", "digest": "sha1:WYWEKKFROBZRE5K6GSMWUNPJ6ZEFPA3Z", "length": 20318, "nlines": 220, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "आलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n(४८) (ईशदूतांनी पुन्हा आपल्या संभाषणाच्या ओघात म्हटले) ‘‘आणि अल्लाह त्याला ग्रंथ व विवेकाची शिकवण देईल, तौरात व इंजिलचे शिक्षण देईल.\n(४९) आणि त्याला बनीइस्राईलसाठी आपला पैगंबर नियुक्त करील.’’ (आणि जेव्हा तो पैगंबर म्हणून बनीइस्राईलपाशी आला तेव्हा त्याने सांगितले) ‘‘मी तुमच्या पालनकर्त्याकडून तुम्हापाशी संकेतचिन्ह घेऊन आलो आहे. मी तुमच्यासमोर मातीपासून पक्ष्याच्या आकाराचा एक पुतळा तयार करतो आणि त्याला फुंकर मारतो. तो अल्लाहच्या आदेशाने पक्षी बनतो. मी अल्लाहच्या आज्ञेने जन्मजात आंधळ्याला व महारोग्याला बरे करतो आणि त्याच्या आज्ञेने मृताला जिवंत करतो. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय खाता आणि आपल्या घरांत काय साठा करून ठेवता. यात तुमच्यासाठी पुरेशी निशाणी आहे जर तुम्ही ईमानधारक असाल.४५\n(५०) आणि मी ती शिकवण व त्या मार्गदर्शनाचे समर्थन करण्यासाठी आलो आहे जे यापूर्वीच्या तौरातमध्ये विद्यमान आहे,४६ आणि यासाठी आलो आहे की तुम्हासाठी काही अशा वस्तूंना मी वैध करावे ज्या तुम्हासाठी निषिद्ध करण्यात आल्या आहेत.४७ पाहा, मी तुमच्या पालनकर्त्याकडून तुम्हापाशी संकेत घेऊन आलो आहे, म्हणून अल्लाहचे भय बाळगा आणि माझी आज्ञा पाळा.\n४५) म्हणजे या निशाण्या तुम्हाला याचा विश्वास ठेवण्यास पुरेशा आहेत की मी त्या अल्लाहचा पाठविलेला पैगंबर आहे जो या सृष्टीचा निर्माणकर्ता व प्रभुत्वशाली शासक आहे. अट ही आहे की तुम्ही सत्य मान्य करण्यास तयार असावे व हटधर्मी असू नये.\n४६) म्हणजेच मी अल्लाहकडून पाठवीला गेलो असल्याचे एक आणखी प्रमाण आहे. मी त्याच्याकडून पाठविला गेलो नसतो आणि एक खोटा दावेदार असतो तर स्वत:च एक नवीन धर्म स्थापन केला असता. माझ्या या चमत्कारांनी तुम्हा लोकांना मूळ धर्मापासून (जीवनपद्धती) हटवून माझ्या स्वनिर्मित धर्माकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला असता. परंतु मी तर केवळ त्याच मूळ धर्माला (जीवनपद्धतीला) मान्य करतो आणि त्याच शिकवणीनुसार चालतो जी शिकवण माझ्यापूर्वीं अल्लाहच्या पैगंबरांनी दिलेली आहे. आदरणीय पैगंबर इसा (अ.) तोच धर्म (दीन) घेऊन आले होते जे आदरणीय पैगंबर मूसा (अ.) आणि इतर पैगंबरांनी सांगितले होता, ही गोष्ट सद्य इंजिलमध्ये (बायबल)सुद्धा स्पष्टपणे आठवते. मत्तीच्या उल्लेखानुसार पर्वतावरील प्रवचनात पैगंबर इसा (अ.) सांगतात, ``लोकहो, तुम्ही हे समजू नका की मी तौरात व इतर पैगंबरांच्या ग्रंथांना रद्दबातल ठरविण्यासाठी आलो आहे. रद्द करण्यासाठी नव्हे तर पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे.'' (५:१७) एका यहुदी (ज्यू) विद्वानाने आदरणीय पैगंबर इसा (अ.) यांना प्रश्न विचारला की धर्माच्या आदेशांपैकी सर्वप्रथम आदेश कोणता आहे उत्तर देताना इसा (अ.) यांनी सांगितले, ``तुम्ही आपल्या निर्माणकर्त्या प्रभुशी आपले मन, प्राण आणि बुद्धीने प्रेम करा. श्रेष्ठ आणि सर्वप्रथम आदेश हाच आहे आणि याचसमान दुसरा आदेश आहे की आपल्या शेजाNयावर आपल्यासारखे प्रेम कर. हेच दोन आदेश संपूर्ण तौरात आणि इतर ईशग्रंथांचे मूळाधार आहेत.'' (मत्ती २२ : ३७-४०) आदरणीय पैगंबर इसा (अ.) आपल्या अनुयायांना उपदेश करतात, ``धर्मशास्त्री आणि धार्मिक विद्वान मूसा (अ.) यांच्या गादीवर बसलेले आहेत. म्हणून ते जे सांगतील ते करा आणि मान्य करा. परंतु त्यांच्याप्रमाणे बनू नका कारण ते सांगतात परंतु करत नाहीत.'' (मत्ती २३ : २-३)\n४७) म्हणजेच तुमच्या अज्ञानी लोकांचे अंधविश्वास, तुमच्या धर्ममार्तंडाचे धर्मविधी (कायदा) विषयी किस काढणे तसेच तुमच्या संन्याशी लोकांचा अतिरेक आणि मुस्लिमेतर लोकांचे वर्चस्वशाली बनणे यामुळे मूळ अल्लाहरचित धर्मविधान (शरीयत) मधील प्रतिबंधात जी वृद्धी झाली आहे, मी तिला मोडून काढीन आणि तुमच्यासाठी त्याच वस्तू वैध आणि अवैध ठरविन जे अल्लाहने तुमच्यासाठी वैध व अवैध ठरविल्या आहेत.\nमानवांवर कृपा : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमला मिळालेला परिपूर्ण धर्म- इस्लाम\nपेटवायची हौस असेल तर गरिबांच्या चुली पेटवा\n‘गुजरात फाईल्स’ कृष्णकृत्यांचा रहस्यभेद\nतंटामुक्ती स्वीकार्य तर शरई पंचायत का नाही\n२७ जुलै ते ०२ ऑगस्ट २०१८\nऔरंगजेबाचे कृषी धोरण विषयक फर्मान : भाग २\nपुण्यामध्ये समविचारी पुरोगामी संघटनांची “अघोषित आण...\nअनेक लोक निरूद्देश जीवन जगत आहेत\nअफवांचे आभाळ भाकरीचा चंद्र\nभ्रष्टाचार दबू शकतो पाणी कसे दबणार\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये कोण-को...\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणत...\nशिक्षणाची पद्धत : पेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nअस्तित्वहीन ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स’\n२० जुलै ते २६ जुलै २०१८\nनामोस्मरण , याचना आणि उपासना\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसमस्त मानवकल्याणाची चिंता करावी लागेल\nऔरंगजेबाचे कृषी धोरणविषयक दोन फर्मान\nखरंच मुसलमान संविधान मानत नाहीत का\nधर्म आणि दहशतवादाचा काही संबंध नाही\nनिकले किसी के गम में ....\n१३ जुलै ते १९ जुलै २०१८\nआणखी एक टंचाई - तांबे\nहिरे बाजारात घुसलेली लबाडी\nनामोस्मरण आणि याचना : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nचर्चने मोदी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आ...\nप्रलंबित कोर्ट केस खटल्यांची शोकांतिका\nतुर्कीचे तीन वेळेस पंतप्रधान, दुसर्‍यांदा राष्ट्रप...\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणत...\nईश्‍वर आपल्याला जाब विचारेल याची जाणीव लोप पावत आह...\nआपल्या देशात मुल्याधिष्ठीत शिक्षणाची गरज : डॉ. पार...\n०६ ते १२ जुलै २०१८\n२९ जून ते ०५ जुलै २०१८\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2019/09/blog-post_48.html", "date_download": "2022-10-07T22:23:01Z", "digest": "sha1:WLOUYXSWIQD765IWWLBYTRJYT456OVYN", "length": 21314, "nlines": 223, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "भाग्यावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nभाग्यावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nमाननीय अबू ख़िजामा (वडिलांकडून प्राप्त माहितीवरून) यांच्या कथनानुसार, ते म्हणाले, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘ही दुआ (प्रार्थना) ‘तअवीज्’ (ताईत) जे आम्ही आजारपणाच्या बाबतीत करतो आणि ज्या औषधांचा आम्ही आपला आजार दूर करण्यासाठी वापरतो आणि दु:ख व संकटांपासून वाचण्यासाठी जे उपाय करतो, हे सर्व उपाय अल्लाहच्या भाग्यापासून वाचवू शकतात काय’’ पैगंबरांनी उत्तर दिले, ‘‘या सर्व वस्तूदेखील अल्लाहच्या भाग्याचाच एक भाग आहेत.’’ (हदीस : तिर्मिजी)\nपैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उत्तराचे स्पष्टीकरण असे आहे की ज्या अल्लाहने हा आजार आमच्यासाठी लिहिला आहे त्याच अल्लाहने हेदेखील निश्चित केले आहे की अमुक औषधाने आणि अमुक उपायाद्वारे हा आजार बरा होऊ शकतो. आजार निर्माण करणारा अल्लाहच आहे आणि तो बरा करणारे औषधाचा निर्मातादेखील. सर्वकाही त्याने बनविलेल्या कायदेकानू- नुसारच आहेत.\nमाननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मागे स्वारीवर बसलो होतो. पैगंबर म्हणाले, ‘‘हे मुला, मी तुला काही सांगत आहे (ते लक्षपूर्वक ऐक). पाहा, तू अल्लाहचे स्मरण कर अल्लाह तुझे स्मरण करील. तू अल्लाहचे स्मरण कर, अल्लाहला समोर पाहशील. जेव्हा मागशील तेव्हा अल्लाहकडे माग. जर तुला एखाद्या संकटात मदत हवी असेल तर अल्लाहकडे माग. अल्लाहला तुझा मदत करणारा बनव आणि या गोष्टीवर विश्वास ठेव की अल्लाहने तुझ्याकरिता जे काही लिहून ठेवले आहे त्याव्यतिरिक्त लोक एकत्र येऊन तुला एखादा लाभ पोहोचवू इच्छित असतील तरी ते तुला लाभ पोहचवू शकणार नाहीत. (म्हणजे कोणाकडे देण्याकरिता काहीही नसल्यामुळे तो देऊ शकणार नाही, सर्व काही अल्लाहचे आहे. तो जे काही देण्याचा एखाद्याबाबत निर्णय घेतो तेवढेच मिळेल, मग ते कोणत्याही माध्यमातून मिळो.) आणि अल्लाहने तुझ्या भाग्यात जे काही लिहिले आहे त्याव्यतिरिक्त जर लोकांनी एकत्र येऊन तुला एखादे नुकसान पोहचवू इच्छिले तरी ते कसलेही नुकसान पोहोचवू शकणार नाहीत. (तर मग अल्लाहलाच आपला एकमेव आधार बनविले पाहिजे.) (हदीस : मिश्कात)\nमाननीय अबु हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दुर्बल ‘मोमिन’ (ईमानधारक) च्या तुलनेत शक्तिशाली ‘मोमिन’ उत्तम आणि अल्लाह अधिक पसंत आहे आणि दोघांमध्ये चांगुलपणा व लाभ आहे आणि तू (परलोकात) लाभ देणाऱ्या वस्तूचा लोभी बन आणि आपल्या संकटांत अल्लाहपाशी मदत माग आणि धैर्य खचू देऊ नकोस आणि तुझ्यावर एखादे संकट कोसळल्यास मी असे केले तर असे होईल असा विचार न करता, अल्लाहने माझ्या नशिबी जे लिहिले, जे त्याने इच्छिले ते केले, असा विचार कर; कारण ‘ओठ’ (कस्रfचत) शैतानाच्या अनुसरणाचे द्वार उघडतात. (मिश्कात)\nया हदीसच्या पहिल्या भागाचा अर्थ आहे की एक तर तो मोमिन (ईमानधारक) आहे जो शारीरिक आणि काळजीवाहक क्षमता बाळगणारा असेल तर निश्चितच जेव्हा तो आपली सर्व क्षमता अल्लाहच्या मार्गात खर्च करील तर ‘दीन’चे (जीवनधर्माचे) काम त्याच्या हातून अधिक होईल त्या व्यक्तीच्या तुलनेत जो दुर्बल आहे, ज्याची शारीरिक क्षमता चांगली नाही अथवा काळजीवाहक नाही, तेव्हा अल्लाहच्या मार्गात तोदेखील आपल्या क्षमतांचा वापर करील मात्र तितके काम तो करू शकणार नाही जितके पहिल्या मनुष्य करतो. यासाठी त्याला दुसऱ्याच्या तुलनेत बक्षीस अधिक मिळाले पाहिजे. दोघेही एकाच मार्गाचे म्हणजेच अल्लाहच्या मार्गाचे प्रवासी आहेत म्हणून या दुर्बल ‘मोमिन’ला कमी काम केल्यामुळे बक्षीसापासून वंचित केले जाणार नाही. खरे तर शक्ती बाळगणाऱ्या ‘मोमिन’ला हे सांगण्याचा उद्देश असा की आपल्या शक्तीचा आदर करा, तिच्याद्वारे जितके पुढे जाऊ शकता तितके जा, दुर्बलता आल्यानंतर मनुष्य काही करू इच्छित असेल तरीही करू शकत नाही. आणि हदीसच्या शेवटच्या भागाचा अर्थ आहे की मोमिन आपल्या प्रकृती, उपाय व क्षमतेला सहारा बनवत नाही तर त्याच्यावर जेव्हा संकट कोसळते तेव्हा त्याच्या मनात विचार येतो की हे संकट माझ्या पालनकर्त्याकडून आले आहे, हा माझ्या सुधाराच्या प्रशिक्षणाचा एक भाग आहे. अशाप्रकारे\nहे संकट त्याचे ईमानात (अल्लाहवरील श्रद्धेत) वाढ करण्याचे माध्यम बनते.\nसत्याची साक्ष - भाग-6\nमानवतेच्या कल्याणास्तव जमाअतचे प्रशिक्षण शिबीर\nडोळ्यात खुपणार्‍या कोणत्याही राज्याची भविष्यात हीच...\nशरद पवारांच्या सक्रीयतेने राज्यात भाकरी फिरणार\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nउत्सव आनंदाचा साजरा करायचा असतो विध्वंसाचा नव्हे \nहैदराबाद मुक्तीचा दुर्लक्षित इतिहास\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nशहादत-ए-हुसैन दु:खाचे नव्हे तर प्रेरणेचे स्त्रोत आहेत\nपूरग्रस्तांसाठी पाठविली 40 हजारांची औषधे\nआपल्या अस्तित्वाला उपयोगी सिद्ध करा\nकाश्मीर : स्वर्गाचा घात आणि फाळणीच्या नरकाचा ध्यास\nमहापूर ओसरला; अडचणी कायम\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०१९\nभाग्यावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशापुढे आर्थिक मंदीचे आव्हान\nमुस्लिम समाजाविषयीचा अहवाल आणि पोलिसांची मानसिकता\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nडिजिटल लोकशाही बदलते आयाम\nमहानगरी स्त्रियांना येणारे जातिभेदाचे अनुभव\nसत्याची साक्ष - भाग-5\nएकमेकांना भेटण्याचे इस्लामी शिष्टाचार\nएनआरसी : डोंगर पोखरून निघाला उंदीर\nद्वेषाने गाठला परमोच्च बिंदू\nजमीयत उलेमा ए हिंदतर्फे मुस्लिम बोर्डिंग येथे पूरग...\nसावित्रीबाई फुले रुग्णालयाला औषधांचा साठा प्रदान\nआजची युवापिढी व्यसनाच्या आहारी\nपवित्र कुरआनवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nविकासासाठी शाश्वत उपायांची गरज\nभारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पोहोचवलाय काय\nश्रद्धा - अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकेाण\nकाश्मीर : आयएएस अधिकार्‍याचा राजीनामा\n०६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/1101", "date_download": "2022-10-07T22:58:33Z", "digest": "sha1:QBRI6B7JAZJ2OQZBFNCCU4CXARXLUD6A", "length": 10115, "nlines": 106, "source_domain": "bollyreport.org", "title": "रिया चक्रवर्तीने ड्रु ग्स प्रकरणात या ५ बॉलिवूड सेलिब्रिटींची नाव घेतली, नाव पाहून तुम्हाला धक्का बसेल ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News रिया चक्रवर्तीने ड्रु ग्स प्रकरणात या ५ बॉलिवूड सेलिब्रिटींची नाव घेतली, नाव...\nरिया चक्रवर्तीने ड्रु ग्स प्रकरणात या ५ बॉलिवूड सेलिब्रिटींची नाव घेतली, नाव पाहून तुम्हाला धक्का बसेल \nसुशांतसिंग राजपूत प्रकरणात एन सी बी चौकशी करत आहे. रिया चक्रवर्ती यांच्या अटकेनंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन को ठ डी सुनावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत आहेत की लवकरच रिया चक्रवर्ती बॉलिवूडची अनेक मोठी नावे उघडकीस आणू शकेल. ताज्या माहितीनुसार, रियाने बी टाऊनची 25 मोठी नावे नमूद केली आहेत जे ड्र ग्ज घेतात किंवा ड्र ग पार्ट्यामध्ये भाग घेत असत. मीडिया रिपोर्टनुसार यातील 25 नावे ज्ञात आहेत. यामध्ये सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांच्यासह सीमोन, रोहिणी अय्यर, मुकेश छाबडा इतर स्टार्सचा समावेश आहे.\nसारा अली खान – सुशांतचा मित्र सॅम्युएलने सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान यांच्याबद्दल अनेक खुलासे केले होते. ‘केदारनाथ’च्या वेळी सारा आणि सुशांत एकमेकांना डेट करत असल्याचे त्याने सांगितले होते पण लवकरच त्यांचा ब्रेकअप झाला. परंतु सारा किंवा सुशांत दोघांनीही हे कधीही स्वीकारले नाही. सारा अली खान आणि रिया चक्रवर्ती यांचीही एकेकाळी चांगली मैत्री होती. दोघांनाही बर्‍याचदा एकत्र पाहिले. आता रियाच्या नंतर एन सी बी सारावर कारवाई करण्याची तयारी करत आहे.\nरकुल प्रीत सिंग – मीडिया रिपोर्ट्स दावा करीत आहेत की रिया चक्रवर्ती हिने ड्र*ग्स कनेक्शनमध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांचे नाव घेतले आहे. दिल्लीच्या रकुल प्रीत सिंगने 2009 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. रकुलची रियाशी चांगली मैत्री आहे.\nसिमोन खंभाटा – रिया चक्रवर्ती यांचे जवळचे मित्र सिमोन खंभाटा हे व्यवसायाने डिझाइनर आहेत. सिमोनला बॉलिवूडमधील अनेक स्टार्स जवळचा मानला जातो. आता एनसीबी लवकरच त्यांची चौकशी करू शकते.\nमुकेश छाबरा – कास्टिंग डायरेक्टर आणि दिग्दर्शक मुकेश छाबरा असे या यादीतील पाचवे नाव आहे.\nमुकेश छाबराने सुशांतचे नाव ‘काय पो चे’ चित्रपटासाठी सुचवले होते.\nPrevious articleलाखात १ बुद्धीमान माणूस शोधू शकतो या फोटोमधील प्राणी, फोटो झूम करून पहा उत्तर सापडेल \nNext articleअजय देवगण लग्नाआधी पडले होते या दोन अभिनेत्रींच्या प्रेमात \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%AC_%E0%A4%93%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2022-10-07T22:26:07Z", "digest": "sha1:RIG7UGGYIRSXDZGJCVMVHCHS2ZNAGDDN", "length": 9299, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेकब ओराम - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव जेकब डेव्हिड फिलिप ओराम\nजन्म २८ जुलै, १९७८ (1978-07-28) (वय: ४४)\nउंची १.९८ मी (६ फु ६ इं)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम\nएकदिवसीय शर्ट क्र. २४\n१९९७–सद्य सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स\n२००८–२००९ चेन्नई सुपर किंग्स\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लिस्ट अ\nसामने ३३ १४५ ८५ २२७\nधावा १,७८० २,२३० ३,९९२ ४,१२४\nफलंदाजीची सरासरी ३६.३२ २४.५० ३३.८३ २५.९३\nशतके/अर्धशतके ५/६ १/१२ ८/१८ ३/२२\nसर्वोच्च धावसंख्या १३३ १०१* १५५ १२७\nचेंडू ४,९६४ ६,१७५ १०,६८२ ८,५७७\nबळी ६० १४७ १५५ २००\nगोलंदाजीची सरासरी ३३.०५ ३०.४४ २६.९१ ३१.०५\nएका डावात ५ बळी ० २ ३ २\nएका सामन्यात १० बळी ० ० ० ०\nसर्वोत्तम गोलंदाजी ४/४१ ५/२६ ६/४५ ५/२६\nझेल/यष्टीचीत १५/– ४३/– ३६/– ६८/–\n८ फेब्रुवारी, इ.स. २०११\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nजेकब डेव्हिड फिलिप ओराम (जुलै २८, इ.स. १९७८:पामरस्टन नॉर्थ, मानावाटू, न्यू झीलँड - ) हा न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू आहे.\nओराम डावखोरा फलंदाज आहे व तो उजव्या हाताने जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.\nन्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nन्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nन्यू झीलँड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n११ व्हेट्टोरी(ना.) •४२ ब्रॅन्डन(य.) •५२ बेनेट्ट •७० फ्रँकलिन •३१ गुप्टिल • हॉव •१५ नेथन •३७ मिल्स •२४ ओराम •७७ रायडर •३८ साउथी •५६ स्टायरिस •३ टेलर • २२ विल्यमसन • वूडकॉक •प्रशिक्षक: राईट\nन्यू झीलँड संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७\n१ फ्लेमिंग • २ व्हेट्टोरी • ३ बॉन्ड • ४ फ्रँकलिन • ५ फुल्टन • ६ गिलेस्पी • ७ मॅककुलम • ८ मॅकमिलन • ९ मार्शल • १० मार्टीन • ११ मॅसन • १२ ओराम • १३ पटेल • १४ स्टायरिस • १५ टेलर • १६ टफी • १७ व्हिंसेंट • प्रशिक्षक: ब्रेसवेल\nटफी व व्हिंसेंट यांनी दुखापतीमुळे माघार घेतली. त्यांच्या ऐवजी मार्टिन व मार्शल यांचा समावेश करण्यात आला.\nसेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स संघ - २०१० २०-२० चँपियन्स लीग\nमॅथ्यू सिंकलेर • पीटर इंग्राम • जेमी हॉव (क) • जेकब ओराम • डग ब्रेसवेल • ब्रेंडन दिमंती • ब्रॅड पॅटोन • जॉर्ज वर्कर • बेवन ग्रीग्स • टिम वेस्टन • मायकेल मॅसन • मिचेल मॅकक्लॅनेघन • ऍडम मिल्ने • किरन नोएम-बार्नेट • सेट रान्स •प्रशिक्षक: डेरमॉट रीव\nसाचा:देश माहिती सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स\nइ.स. १९७८ मधील जन्म\nइ.स. १९७८ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२८ जुलै रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nन्यू झीलंडचे क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑगस्ट २०२२ रोजी २१:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2018/06/blog-post_78.html", "date_download": "2022-10-07T21:17:49Z", "digest": "sha1:OXIR2DWV2LASH5GQCWQ7DQQBLLFS6FXU", "length": 16437, "nlines": 203, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "खरा इतिहास लोकांसमोर आणावा | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nखरा इतिहास लोकांसमोर आणावा\nसोलापूर (शोधन सेवा) - 1857 च्या उठावामध्ये मुस्लिम केंद्रस्थानी होते. हे लक्षात आल्यावर इंग्रजांनी मुस्लिमांचा अनेकप्रकारे छळ केला. फोडा आणि राज्य करा या नितीला अनुसरून बहुसंख्य हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचे सर्वस्वी प्रयत्न केले. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे इंग्रजांनी भारतीय मुस्लिमांचा विकृत करून लिहिलेला इतिहास होय. त्याचीच री जमातवादी इतिहासकारांनी ओढलेली आहे. इतिहास खोटा का लिहिला जातो याच्या कारणांवर लक्ष देऊन ती कारणे वर्तमान काळात परत उपलब्ध करून दिली जाणार नाहीत, याकडे मुस्लिम समाजाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन एम.आय. शेख यांनी येथे केले.\nसोलापूरच्या समाजकल्याण केंद्राच्या सभागृहात ऍड. गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरतर्फे आयोजित सरफराज शेख लिखित व पुणे येथील डायमंड पब्लिकेशनद्वारा प्रकाशित ’सल्तनत-ए-खुदादाद’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.\nमंचावर मुक्त पत्रकार कलीम अजीम, शोधनचे उपासंपादक बशीर, मराठी साहित्यिक डॉ. फारूख तांबोळी, लखेक सरफराज शेख, समीर शेख, हमीद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कलीम अजीम म्हणाले, नव इतिहास लेखकांनी समोर येवून खरा इतिहास लिहिण्याचे कार्य करावे. आज काही तथाकथित लोकांनी खोटा इतिहास लिहून समाजाची मने गढूळ करण्यात यश मिळविले आहे. मात्र खरा इतिहास समोर येत असल्याने ते आगपाखड करत आहेत. त्यामुळे खरा आणि खोटा याची तुलना करण्यात आणि इतिहास समजण्यात अडचण होणार नसल्याचे कलीम अजीम म्हणाले. डॉ. फारूख तांबोळी म्हणाले, इतिहासाचे विकृतीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. टिपु सुलतान समजायचे असेल तर सल्तनत-ए-खुदादाद पुस्तक वाचायलाच हवे. वडिलांची भूमिका काय असते हे जर कोणाला बघायचे असेल तर त्यांनी या पुस्तकातील हैदरअली यांना काळजीपूर्वक वाचावे. शोधनचे उपसंपादक बशीर शेख म्हणाले, कठिण परिस्थितीत सरफराज शेख यांनी सल्तनत-ए-खुदादाद लिहून लोकांसमोर सत्य इतिहास आणला. त्यांचे कार्य वाखाण्याजोगे आहे. सल्तनत-ए-खुदादाद वाचल्यावर लक्षात येते की, टिपू सुलतान किती नितीमान राजा होते. ते अल्लाह आणि प्रेषित सल्ल. यांना फक्त मानतच नव्हते या पुस्तकातील मथळ्याखाली दिलेले एंट्रो जरी कोणी ओघात वाचले तरी वाचकाला टिपू सुलतानांची महती कळून येईल. प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष तथा गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरचे उपाध्यक्ष राम गायकवाड यांनी केले. सुत्रसंचालन संघर्ष खंडागळे यांनी केले. आभार इस्माईल शेख यांनी मानले. यावेळी ऍड. महेबूब कोथिंबिरे, समिउल्लाह शेख, शफिक काझीसह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\nईद : मानवप्रेमाचे निमंत्रण\nएक प्रदुषण मुक्त नितांत सुंदर अनुभव - ईद-उल-फित्र\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\nमाझी पहिली रमजान ईद\nरमजान-सांस्कृतीक एकात्मीक समाजरचनेची प्रेरणा\nआदर्श माणूस घडवणारा पवित्र महिना\nरमज़ान आणि लहान मुलं\nसमस्त देशबांधवांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा\nमानवता प्राप्तीचा मार्ग रमजान\nमानवतेला ईशभयाचा संदेश देणारा ‘रोजा’\n१५ जून ते २८ जून\nकर्नाटकातील राजकीय नाटकाचा अन्वयार्थ\nइऩफा़क (खर्च करणे) : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०८ जून ते १४ जून\nबेसहारा गरिबांना ‘रम़जान किट्स’चे वितरण\nवास्तवाचा शोध घेणारे ‘शोधन’\nजकात : गरीबी उन्मूलनाचा अद्वितीय मार्ग\nअद्भुत लेखनशैलीचे जनक मौलाना मौदूदी\nनकबा : इस्राईल-पॅलेस्टाईन संघर्षाची सुरूवात\nखरा इतिहास लोकांसमोर आणावा\n०१ जून ते ०७ जून २०१८\nऐच्छिक व मध्यरात्रीनंतरची नमाज : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमीडियाचे आव्हान स्विकारायला हवे\nहामिद अन्सारी, जिन्नांची फोटो आणि एएमयूमधील धिंगाणा\nशरिया म्युच्युअल फंड एक लाभदायक गुंतवणूक\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2019/09/blog-post_14.html", "date_download": "2022-10-07T22:58:36Z", "digest": "sha1:GPK4O7QXMCFS7POSRAJGZKIUM6R5GLEM", "length": 12172, "nlines": 222, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nसत्याची साक्ष - भाग-6\nमानवतेच्या कल्याणास्तव जमाअतचे प्रशिक्षण शिबीर\nडोळ्यात खुपणार्‍या कोणत्याही राज्याची भविष्यात हीच...\nशरद पवारांच्या सक्रीयतेने राज्यात भाकरी फिरणार\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nउत्सव आनंदाचा साजरा करायचा असतो विध्वंसाचा नव्हे \nहैदराबाद मुक्तीचा दुर्लक्षित इतिहास\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nशहादत-ए-हुसैन दु:खाचे नव्हे तर प्रेरणेचे स्त्रोत आहेत\nपूरग्रस्तांसाठी पाठविली 40 हजारांची औषधे\nआपल्या अस्तित्वाला उपयोगी सिद्ध करा\nकाश्मीर : स्वर्गाचा घात आणि फाळणीच्या नरकाचा ध्यास\nमहापूर ओसरला; अडचणी कायम\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०१९\nभाग्यावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशापुढे आर्थिक मंदीचे आव्हान\nमुस्लिम समाजाविषयीचा अहवाल आणि पोलिसांची मानसिकता\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nडिजिटल लोकशाही बदलते आयाम\nमहानगरी स्त्रियांना येणारे जातिभेदाचे अनुभव\nसत्याची साक्ष - भाग-5\nएकमेकांना भेटण्याचे इस्लामी शिष्टाचार\nएनआरसी : डोंगर पोखरून निघाला उंदीर\nद्वेषाने गाठला परमोच्च बिंदू\nजमीयत उलेमा ए हिंदतर्फे मुस्लिम बोर्डिंग येथे पूरग...\nसावित्रीबाई फुले रुग्णालयाला औषधांचा साठा प्रदान\nआजची युवापिढी व्यसनाच्या आहारी\nपवित्र कुरआनवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nविकासासाठी शाश्वत उपायांची गरज\nभारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पोहोचवलाय काय\nश्रद्धा - अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकेाण\nकाश्मीर : आयएएस अधिकार्‍याचा राजीनामा\n०६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/2444", "date_download": "2022-10-07T21:44:09Z", "digest": "sha1:KB2EQ6K2HJPNQJKOG2QE6FKVSK6LVOY4", "length": 15478, "nlines": 111, "source_domain": "bollyreport.org", "title": "पोस्ट ऑफिसच्या या आहेत जबरदस्त योजना ज्यात पैसे गुंतवून मिळवू शकता लाखो रुपये, जाणून घ्या ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome Other News पोस्ट ऑफिसच्या या आहेत जबरदस्त योजना ज्यात पैसे गुंतवून मिळवू शकता लाखो...\nपोस्ट ऑफिसच्या या आहेत जबरदस्त योजना ज्यात पैसे गुंतवून मिळवू शकता लाखो रुपये, जाणून घ्या \nआपल्या देशात बॅंकांप्रमाणेच पोस्टात सुद्धा अनेक बचत योजना असतात. या योजनांमुळे लोकांना पैशांची बचत करणे सोप्पे जाते. पोस्टातील योजना या सरकार द्ववारे राबवल्या जातात त्यामुळे लोकांचे पैसे सुद्धा सुरक्षित राहतात. जुलै २०२० मध्ये केंद्र सरकारने पोस्टातील बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याज दरांचे समिक्षण केले. सरकारद्वारे राबवण्यात येणाऱ्या नवनवीन व्याजदरांनुसार पोस्टातील अनेक योजनांमध्ये गुंतवणुक केल्यावर गुंतवणुकदरांना त्याबदल्यात चांगली मिळकत मिळते. चला तर जाणुन घेऊ पोस्टातील कोणत्या योजनांवर किती व्याज दर मिळतो.\nपोस्टातील बचत योजनांचे उद्देश काय – लोकांमध्ये बचतीची भावना निर्माण करणे हे पोस्टातील बचत योजनांचे मुख्य उद्देश्य असते. यासाठी सरकारने बचत योजनेत गुंतवणुक करणाऱ्या गुंतवणुकदारांना उच्च व्ययाज दरासोबतच करामध्ये देखील सुट दिली आहे. या स्किममुळे गुंतवणुकदार आर्थिकदृष्ट्यादेखील सक्षम बनेल. पोस्टात बचतीच्या अनेक योजना आहेत. या योजना सर्व वर्गातील लोकांचा विचाक करुन तयार केल्या आहेत. यामध्ये प्रत्येक वर्गातील लोकांना कोणती ना कोणती स्किम देण्यात आली आहे. ज्यामुळे लोक मोठ्या संख्येने पोस्टातील स्किम मध्ये पैशांची सेव्हिंग करतील.\nपोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट स्कीम – पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट स्कीममध्ये गुंतवणुक करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यकाळाचा वेळ दिलेला असतो. या स्किम मध्ये कमीतकमी २०० रुपयांची गुंतवणुक करता येते. तसेच या स्किममध्ये उघडलेले खाते दुसऱ्याला सुद्धा ट्रान्सफर करता येते. या खात्याला चार कार्यकाळात विभागले जाते. जर तुम्ही एका वर्षाचे डिपोजिट करत असाल तर त्यावर ५.५ टक्के व्याजदर आकारण्यात आला आहे. पण जर तुम्ही ५ वर्षांसाठी डिपोजिट करता तर ६.७ टक्के व्याजदर मिळेल.\nसुकन्या समृद्धि योजना – ही योजना खास मुलींसाठी तयार केली गेली आहे. या योजनेअंतर्गत ७.६ टक्के व्याज दर निर्धारित केला गेला आहे. या योजनेत कमीतकमी १००० रुपये तर जास्तीतजास्त १,५०,००० रुपयांची गुंतवणुक करता येते.\nनेशनल सेविंग सर्टिफिकेट – या योजनेत गुंतवणुक करण्यासाठी ५ वर्षांचा मॅच्युरिटी पिरीएड निर्धारित केला आहे. या योजनेतील गुंतवणुकदारांसाठी ६.८ टक्के व्याज दर आकारण्यात आला आहे. या योजनेत कमीतकमी १०० रुपयांपासुन ते जास्तीजास्त कितीही रक्कम गुंतवता येते.\nपब्लिक प्रोविडेंट फंड – पब्लिक प्रोविडेंट फंड ही एक १५ वर्षांची लॉंग टर्म गुंतवणुक योजना आहे. या योजनेअंतर्गत ७.१ टक्के व्याजदर निर्धारित केला आहे. या योजनेत कमीतकमी ५०० रुपयांपासुन ते जास्तीत जास्त १५०००० रक्कम गुंतवता येते.\nसीनियर सिटीजन सेविंग स्कीम – ही योजना ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी आहे. या योजनेअंतर्गत ७.४ टक्के व्याजदर निर्धारित केला आहे. या योजनेत जास्तीजास्त १५०००० रक्कम गुंतवता येते.\nकिसान विकास पत्र – ही योजना देशातील शेतकरी बांधवांसाठी आहे. यात कोणीही व्यक्ती गुंतवणुक करु शकतो. या योजनेअंतर्गत ६.९टक्के व्याजदर निर्धारित केला आहे. ९ वर्षे ४ महिन्यांचा या योजनेचा कार्यकाळ असतो. या योजनेत कमीतकमी १००० रुपयांपासुन ते जास्तीजास्त कितीही रक्कम गुंतवता येते.\nपोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट – हि एक मासिक गुंतवणुक योजना आहे. ही योजना ५ वर्षांसाठी असते. या योजनेत गुंतवणुकदारास दर महिना पैसे भरावे लागतील. या योजनेअंतर्गत ६.९टक्के व्याजदर निर्धारित केला आहे. या योजनेत कमीतकमी १० रुपयांपासुन ते जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवता येते.\nपोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम – या योजनेअंतर्गत गुंतवणुकदारास दरमहिना त्यांच्या गुंतवणुकीवर एक ठराविक रक्कम मिळते. या योजनेत कमीतकमी १५०० रुपयांपासुन ते जास्तीजास्त ४.५ लाख रुपये सिलिंग होल्डिंग तथा ९००००० रुपये जॉइंट अकाउंटसाठी गुंतवता येतात. या योजनेअंतर्गत ६.६ टक्के व्याजदर निर्धारित केला आहे. या योजनेचा मॅच्युरिटी पिरिएड ५ वर्षांचा ठेवला आहे.\nपोस्टात बचत योजनेची पात्रता – पोस्टात बचत योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी भारताचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. 1. आधार कार्ड 2. पैन कार्ड 3. पासपोर्ट साइज फोटोग्राफ 4. मोबाइल नंबर 5. निवासी प्रमाणपत्र\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleया कारणामुळे जॅकी श्रॉफ यांनी मुलाचे नाव ‘टायगर’ ठेवले, कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल \nNext articleरणवीर सिंग नाही तर ही व्यक्ती आहे दीपिका पदुकोणच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर, जाणून घ्या \nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले प्रसिद्ध कुत्र्यांच्या प्रजाती \n१ मिनिटात रद्दीमध्ये लपलेली मांजर शोधा, ९९ टक्के लोक अयशस्वी, फोटो Zoom करा उत्तर सापडेल \nकदाचित माझा प्रायव्हेट पा’र्ट पाहिला असेल’, रिअॅलिटी शोमध्ये किम कार्दशियनने केलं अजबच वक्तव्य \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/crime/those-who-die-today-get-paradise-15-year-old-girl-live-commits-suicide-after-mothers-reply-mhmg-594842.html", "date_download": "2022-10-07T21:56:02Z", "digest": "sha1:UVDCM2XO4O2LXTOGNBZKEW2B5LAHBRMD", "length": 9967, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकली 15 वर्षांची राबिता; आईच्या उत्तरानंतर गळफास घेऊन आत्महत्या – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /क्राईम /\nजन्म-मृत्यूच्या चक्रात अडकली 15 वर्षांची राबिता; आईच्या उत्तरानंतर गळफास घेऊन आत्महत्या\nजन्म-मृत्यूच्या चक्रात अडकली 15 वर्षांची राबिता; आईच्या उत्तरानंतर गळफास घेऊन आत्महत्या\nया मुलीने मोहरमच्या दिवशीच गळफार घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आईला अनेक प्रश्न विचारले होते.\nया मुलीने मोहरमच्या दिवशीच गळफार घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आईला अनेक प्रश्न विचारले होते.\nघराबाहेर उभ्या असलेल्या बहिणींसमोर भावाला उडवलं; कार अपघाताचा थरारक Video\nInstagram च्या फॉलोअर्सवरुन घडला भयानक प्रकार, तरुणीने दिले चॅलेंज अन् दोघांचा..\nमहामुकाबल्यात हा खेळाडू पुन्हा डोकेदुखी ठरणार 12 मॅचमध्ये ठोकल्या 8 फिफ्टी\nनर्सने जिवंत रुग्णाला बॅगेत पॅक करून शवगृहात पाठवलं, दुसऱ्या दिवशी पाहिलं तर...\nइंदूर, 21 ऑगस्ट : इंदूरमध्ये (Indore News) एका 15 वर्षांच्या मुलीने मोहरमच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आईला काही प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तर ऐकल्यानंतर मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीच्या अशा मृत्यूमुळे आईवर तर शोककळा पसरली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी तिला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.\nकाय विचारलं होतं मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने आईला काही प्रश्न विचारले होते. तिने आईला विचारलं की, इमाम हुसेन आजच्याच दिवशी शहीद झाले होते आज ज्या लोकांचा मृत्यू होतो, त्यांना शहादद मिळते आज ज्या लोकांचा मृत्यू होतो, त्यांना शहादद मिळते ते जन्नतमध्ये जातील आईने यासर्वांचं उत्तर हो असं दिलं. यानंतर काही वेळात मुलीने गळफार घेऊन आत्महत्या केली. ही घटना मुलीके रावजी बाजार येथील चंपा बाप स्थित हाथीपाला येथील आहे. येथे राबियाचे वडील इकबाल शेख आपल्या संपूर्ण कुटुंबासह मोहरमनिमित्ताने शुक्रवारी सायंकाळी रोजा सोडण्यासाठी बसले होते. आईने मुलीच्या आवडीची खीरदेखील तयार केली होती. रोजा सोडण्यापूर्वी केवळ एका प्रश्नाने मुलीचा जीव घेतला. या घटनेनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. हे ही वाचा-रात्री विचित्र आवाजांमुळे नवऱ्याला आली जाग; बायको गायब,CCTV पाहिला तर धक्का बसला\nदोन दिवसांपूर्वी 11 पुस्तकं खरेदी केली होती कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, काही दिवसांपूर्वी राबिता हिचं 11 वीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. एडमिशनसाठी 3800 रुपयेदेखील भरले होते. दोन दिवसांपूर्वी तिला 11 वीच्या वर्गातील पुस्तकं खरेदी करून दिली होती. ती खूप आनंदात होती, मात्र तिने हे पाऊल का उचललं यामागील कारण अद्याप त्यांच्या लक्षात आलं नाही.\nपिकनिकमध्ये मैत्रिणीचा झाला होता मृत्यू कुटुंबीयांनी सांगितलं की, काही वर्षांपूर्वी तिच्या शाळेची पिकनिक राऊ सर्कलजवळ गेली होती. येथे राबिताची मैत्रिण पाळण्यावरुन खाली पडली आणि यातच तिचा मृत्यू झाला. यानंतर राबिता काही विचित्र बडबड करीत होती. जिवन आणि मृत्यू काय आहे आपण कधीही मरू शकतो, असं काहीसं बोलत राहायची. अनेकदा आई-वडिलांनी यावरुन तिला ओरडलेही होते. मात्र मैत्रिणीच्या मृत्यूनंतर ती मानसिक रित्या खचून गेली होती.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/rakshabandhan-2022-anushka-sharma-and-karnish-sharmas-throwback-photo-viral-mhad-744356.html", "date_download": "2022-10-07T21:22:27Z", "digest": "sha1:EAEV74I7WEYBAF7XE74P7VVSEV6B6SJI", "length": 5360, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "- Rakshabandhan 2022: ओळखलं का या बहीण-भावाच्या जोडीला? आज बॉलिवूडवर करताहेत राज्य – News18 लोकमत", "raw_content": "\nRakshabandhan 2022: ओळखलं का या बहीण-भावाच्या जोडीला आज बॉलिवूडवर करताहेत राज्य\nसध्या देशभरात रक्षाबंधनाची धूम सुरु आहे. बहीण भावाच्या या गोड सणाची सर्वानांच उत्सुकता आहे.\nसध्या देशभरात रक्षाबंधनाची धूम सुरु आहे. बहीण भावाच्या या गोड सणाची सर्वानांच उत्सुकता आहे.\nतसेच अनेक लोकांना आपल्या आवडत्या कलाकारांच्या भावंडांबाबत जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते.\nरक्षाबंधनानिमित्त अनेक कलाकार सोशल मीडियावर आपल्या भावंडांसोबतचे जुने फोटो शेअर करत असतात.\nअशातच सध्या सोशल मीडियावर दोन चिमुकल्यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून हे सेलिब्रेटी आहेत याची सर्वानांच उत्सुकता लागली आहे.\nआम्ही तुम्हाला सांगू इच्छितो ही बहीण-भावाची जोडी कुणी दुसरी नसून अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कर्णेश शर्माची आहे.\nअनुष्काबाबत सर्वानांच माहिती आहे. परंतु कर्णेशसुद्धा बॉलिवूडशी निगडित आहे.\nतो एक दिग्दर्शक आणि निर्माता आहे. त्याने अनुष्का सोबत मिळून स्वतःचं एक प्रॉडक्शन हाऊस सुरु केलं आहे. लेकीच्या जन्मानंतर अनुष्काने यातून एक्झिट घेतली होती. सध्या कर्णेश एकटा ही जबाबदारी पेलत आहे.\nकर्णेशने अनुष्कासोबत मिळून NH 10, परी, फिलौरी, बुलबुल अशा चित्रपट आणि वेबसीरीजचीसुद्धा निर्मिती केली आहे.\nअनुष्काच नव्हे तर भावोजी विराटसोबतसुद्धा कर्णेशचं चांगलं बॉन्डिंग आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2022-10-07T22:42:35Z", "digest": "sha1:VGPYJX55OARQU5YKEBWDRAVGUZXELTSD", "length": 5194, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आल्बेनियाचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वीकार १९१२ (मूळ ध्वज)\n७ एप्रिल १९९२ (सद्य ध्वज)\nआल्बेनिया देशाचा नागरी ध्वज लाल रंगाचा असून त्याच्या मधोमध काळ्या रंगाने एक दुतोंडी गरूड काढला आहे.. हा ध्वज १९९२ सालापासून वापरात असून त्यापूर्वी ह्या ध्वजामध्ये अनेकदा बदल केले गेले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०१:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00011985-PS-750-2-GY-2.html", "date_download": "2022-10-07T22:40:57Z", "digest": "sha1:CNBTPNNK2VHRSMJX3YGVMYWORJOIJKM7", "length": 13263, "nlines": 274, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "PS-750-2-GY-2 | Brady Corporation | अवर्गीकृत | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर PS-750-2-GY-2 Brady Corporation खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये PS-750-2-GY-2 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. PS-750-2-GY-2 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/hindi-bhasha-din-hindi-language-day-third-highest-speaking-language-of-world-dnb85", "date_download": "2022-10-07T23:19:48Z", "digest": "sha1:IUTQ6BHDQAB3MDNVIWSFBQ3HMR6MB2K4", "length": 9232, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hindi Din : हिंदी जगातली तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा | Sakal", "raw_content": "\nHindi Language Day : हिंदी जगातली तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा\nHindi Bhasha din : आज हिंदी भाषा दिन आहे. जगात हिंदी भाषेचे वर्चस्व वेगात वाढत आहे. १९०० ते २०२१ या १२१ वर्षांच्या काळात हिंदीच्या प्रसाराचा वेग १७५.५२ टक्क्यांनी वाढला आहे. इंग्रजीचा वेग ३८०.७१ टक्के आहे. त्यानंतर सर्वात वेगात प्रसार होणारी भाषा हिंदी आहे. सध्या जगात इंग्रजी आणि मंदारिन या भाषांनंतर हिंदी तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे.\nहेही वाचा: भारताविरूद्ध चीनचा नवा डाव हिंदी भाषा येणाऱ्यांची सैन्यदलात भरती\nआधी १९ व्या शतकात जागात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी चौथ्या स्थानावर होती. स्टॅटेस्टिकनुसार त्यावेळी मंदारिन, स्पॅनिश आणि इंग्रजी या अनुक्रमे पहिल्या तीन भाषा होत्या. जसजसा देश प्रगती करत आहे तशी भारतीय भाषांची विशेषतः हिंदीची पोहच वाढली आहे. बऱ्याच कालावधीनंतर १९६१ मध्ये हिंदी भाषेने स्पॅनिश भाषेला मागे टाकत जगातिल सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले. आता जगभरात ४२.७ कोटी लोक हिंदी बोलतात. त्यात वाढ होत २०२१ मध्ये ६४.६ कोटीवर पोहचली. ही संख्या ज्यांची मातृभाषा हिंदी अशा ५३ कोटी लोकांशिवाय आहे.\nहेही वाचा: संयुक्त राष्ट्रसुद्धा स्विकारणार हिंदी भाषा; भारताचा प्रस्ताव मान्य\nभारतात ५३ कोटी लोकांची मातृभाषा हिंदी\nदेशात ४३.६३ टक्के म्हणजेच ५३ कोटी लोकांची मातृभाषा हिंदी आहे. १३.९ कोटी म्हणजेत ११ टक्के लोकांची ही दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. जगात ६४.६ कोटी लोक हिंदी भाषिक आहेत.\nहेही वाचा: हिंदी भाषा केवळ शूद्रांसाठी; DMK च्या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य\nगूगलवर १० लाख कोटी पाने हिंदीत आहेत.\nगूगलवर सात वर्षात हिंदी भाषेतील माहिती ९४ टक्क्याने वाढते. याचे १० लाख कोटी पाने हिंदीत उपल्ब्ध आहेत.\nजगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये ६ हिंदी वृत्तपत्र आहेत.\nभारताबाहेर २६० हून अधिक विश्वविद्यालयांत हिंदी शिकवली जाते.\nपरदेशात २८ हजारपेक्षा जास्त शिक्षण संस्था हिंदी शिकवत आहेत\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/who-pays-for-pm-modi-food-information-came-out-through-rti-aau85", "date_download": "2022-10-07T22:58:10Z", "digest": "sha1:F3THQSWGS2B6FZ4WPEDVRZRRUU6LY6VI", "length": 9973, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "PM मोदींच्या जेवणाचा खर्च कोण करतं? RTI मधून माहिती आली समोर | Sakal", "raw_content": "\nPM मोदींच्या जेवणाचा खर्च कोण करतं RTI मधून माहिती आली समोर\nनवी दिल्ली : पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या जेवणाचा अर्थात खानपानाचा खर्च कोण करत असेल असा प्रश्न तुम्हाला कधी पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. पंतप्रधान कार्यालयानं खानपानाबाबत माहिती दिली आहे. माहिती अधिकार कायदा अर्थात RTI मार्फत ही माहिती मागवण्यात आली होती. (Who pays for PM Modi food information came out through RTI)\nहेही वाचा: धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड\nपंतप्रधान कर्यालयानं माहिती देताना सांगितंल की, पंतप्रधानांच्या खानपानावर सरकारी तिजोरीतून खर्च होत नाही. पंतप्रधान म्हणतात की सक्षम व्यक्तींनी आपला खर्च स्वतःच उचलू नये तर गरजवंतांच्या मदतीसाठी पुढे यावं. PM मोदींनी कोरोनाच्या काळात गरीबांसाठी मोफत गहू-तांदूळ वितरणाची व्यवस्था केली होती.\nहेही वाचा: मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे\nPM मोदींच्या आवाहनावर आर्थिक संपन्न लोकांनी घरगुती गॅस सिलेंडरवर मिळाणारं अनुदान स्वेच्छेनं सोडलं होतं. स्वतः पंतप्रधानही ही गोष्ट फॉलो करतात. पंतप्रधान मोदींच्या कपड्यांवरील खर्चाबाबतही एक आरटीआय दाखल करण्यात आलं होतं. त्यावर पीएमओनं म्हटलं होतं की, पंतप्रधान स्वतः आपल्या कपड्यांचा खर्च करतात.\nहेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं\nआरटीआय अंतर्गत पीएमओकडे विचारणा करण्यात आली होती की, पंतप्रधान आपल्या जेवणावर किती खर्च करतात त्यावर उत्तर देण्यात आलं की, त्यांच्या जेवणासाठी सरकारी खर्च होत नाही. तर पंतप्रधान निवासस्थानाची देखभाल केंद्रीय लोकनिर्माण विभागामार्फत केली जाते. तर वाहनांची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपवर (एसपीजी) असते. आरटीआयमध्ये मोदींचा पगार आणि भत्त्याबाबतही माहिती विचारण्यात आली होती. पण यावर उत्तर देताना नियमांचा हवाला देत वेतनाची माहिती न देता पगारवाढ नियमानुसार केली जात असल्याचं म्हटलं आहे.\nसंसदेच्या कॅन्टिनमध्ये पंतप्रधानांनी स्वतः केलं पेमेंट\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ मार्च २०१५ रोजी बजट सेशनमध्ये संसद भावनाच्या कॅन्टिनमध्ये जात सर्वांना धक्का दिला. असं पहिल्यांदाच घडत होतं की पंतप्रधानांनी कॅन्टिनमध्ये जेवण केलं होतं. त्यांनी इथं पाणी देखील कॅन्टिनचं प्यायलं होतं. त्यांनी शाकाहारी जेवणाची थाळी घेत २९ रुपये अदा देखील केले होते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/education-jobs/dr-prachi-javadekar-writes-procedures-in-warehouse-pjp78", "date_download": "2022-10-07T23:18:01Z", "digest": "sha1:SUNAVJNIJQQI3TPRSK5G73WB42X6HBC3", "length": 10922, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "न्यू नॉर्मल : वेअरहाउसमधील कार्यपद्धती | Sakal", "raw_content": "\nपुस्तकांसाठी १९९४मध्ये एक ऑनलाइन मार्केटप्लेस म्हणून सुरू झालेल्या अमेझॉनने दोन दशकांत ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स या दोन्हीत निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं.\nन्यू नॉर्मल : वेअरहाउसमधील कार्यपद्धती\nपुस्तकांसाठी १९९४मध्ये एक ऑनलाइन मार्केटप्लेस म्हणून सुरू झालेल्या अमेझॉनने दोन दशकांत ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स या दोन्हीत निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं. ॲमेझॉन १८५पेक्षा जास्त देशांमध्ये ४० कोटीहून अधिक उत्पादने विकते. नव्या डिजिटल तंत्रज्ञानाची, सुपर स्मार्ट रोबोची सेना, ३५० अब्ज डॉलरचा व्यवसाय असलेल्या ॲमेझॉनची त्रिसूत्री आहे. ॲमेझॉन किंवा अमेझॉन रोबोटिक्स प्रणाली वापरते. वस्तू साठवली जाते तेव्हा ती आकारमानानुसार ठेवली जाते. बारकोड वस्तू काय आहे हे सांगते. यात ड्रोन, स्वयंचलित व्हॅन, जीपीएस असलेले ट्रक्स हे सगळंही जोडलेलं आहे. त्यामुळे वस्तू ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत ॲमेझॉन तिच्या प्रवासाचा मागोवा घेते. अमेझॉन-ASIN १० वर्णांची अल्फान्युमेरिक मानक ओळख क्रमांक पद्धत वापरते. गोदामांची जुनी कल्पना आता हद्दपार झाली आहे. आता गोदामात प्रशिक्षित कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था, मालाची ने आण करायला आधुनिक यंत्र सामग्री असते.\nजड वाहनांना शहरात प्रवेश नसल्यामुळे लॉजिस्टिक्स पार्क अंतर्गत ही गोदाम पुण्याजवळ वाघोली, चाकण, मुळशी इथे विकसित होत आहेत. याचा अभ्यास करताना आम्ही ईस्क्वेअर वेअर हाऊसचे मालक व संचालक मोहन नायर यांना भेटलो. ते म्हणाले, ‘‘आम्ही काम सुरू केले तेव्हा या क्षेत्राला लॉजिस्टिक असं नामकरण नव्हतं. आमचं काम दळणवळण विभागात मोडत असे. वेअर हाऊस म्हणजे स्टोअरेज, त्याचा उपयोग केवळ माल भरण्यापुरता सीमित होता. जागतिकीकरणामुळे त्याच नामकरण ‘मटेरिअल मॅनेजमेंट’ असं झालं. मग स्पर्धा वाढली आणि त्याची जागा सप्लाय चेन मॅनेजमेंटने घेतली. वस्तू मिळण्याचा वेग आणि किंमत महत्त्वाची ठरली आणि ही प्रक्रिया लॉजिस्टिक म्हणून प्रस्थापित होऊ लागली.’\nत्यांच्याशी बोलताना लक्षात आलं वेग आणि किंमत या बरोबर माहिती तंत्रज्ञान हा घटक महत्त्वाचा ठरत आहे. आता डेटा अॅनालिसिस महत्त्वाचे ठरते आहे. नायर यांच्या गोदामात ‘किंबरली क्लार्क’ चे सर्व प्रॉडक्ट्सचे पॅकिंग, री-पॅकिंग व डिस्पॅच (माल पाठवणे) होते. त्यांच्या कंपनीत असणारा मानवी संबंधाचा ओलावा, कुटुंब म्हणून कामगारांची काळजी त्यांचा विकास, त्यांच्या कल्पनांना दिलेली दाद, हे सगळे वेगळे होते. याचे श्रेय नेतृत्वाला त्यांच्या दातृत्वाला जाते. मात्र आजही लघु आणि मध्यम उद्योगामध्ये ही संवेदना रुजलेली दिसत नाही. या लोकांना कामातले बारकावे कळतात, त्यांच्यातीलच लोक व्यवसाय वृद्धीसाठी उत्तम सूचना देतात, छोटे छोटे बदल सुचवतात. लॉजिस्टिक्स आणि गोदाम क्षेत्रातील कौशल्य विकासाचे महत्त्व पुन्हा एकदा ठसठशीतपणे समोर आले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/launching-of-navy-warship-taragiri-on-11th-september-pjp78", "date_download": "2022-10-07T22:25:43Z", "digest": "sha1:NPUXYD26TPHNDWW2V6GCZRIDZJLS6A67", "length": 8794, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "नौदलाच्या युद्धनौका तारागिरीचे लॉचिंग ११ सप्टेंबरला | Sakal", "raw_content": "\nमाझगाव डॉकच्या माध्यमातून तिसऱ्या युद्धनौकेच्या लॉंचिंग प्रकल्पाला येत्या ११ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.\nनौदलाच्या युद्धनौका तारागिरीचे लॉचिंग ११ सप्टेंबरला\nमुंबई - माझगाव डॉकच्या माध्यमातून तिसऱ्या युद्धनौकेच्या लॉंचिंग प्रकल्पाला येत्या ११ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. प्रोजेक्ट 17 अ अंतर्गत तारागिरी प्रकल्पाच्या लॉंचिंगच्या कामाला लवकरच सुरूवात होणे अपेक्षित आहे. तारागिरी प्रकल्पातील पोलादी कण्याचे (कील) चे काम हे १० सप्टेंबर २०२० मध्ये सुरू करण्यात आले होते. तर येत्या ऑगस्ट २०२५ मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करणे अपेक्षित आहे. याआधीच माझगाव डॉक लिमिटेडने उदयगिरी आणि सूरत या युद्धनौकांचे लॉंचिंग नुकतेच केले होते.\nसंपूर्ण तारागिरीचे काम हे इंटिग्रेटेड कंस्ट्रक्शन मेथडॉलॉजीने करण्यात येत आहे. त्यामध्ये ब्लॉकची निर्मिती विविध ठिकाणी करूनच माझगाव डॉक लिमिटेड येथे हे सुटे भाग जोडण्यात येणार आहेत. जवळपास ३५१० टनची युद्धनौका नौदलाला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. ब्युरो ऑफ नेव्हल डिझाईनच्या माध्यमातून या युद्धनौकेचे डिझाईन करण्यात आले आहे.\nएमडीएलच्या माध्यमातून डिटेल डिझाईन आणि युद्धनौका बांधणीचे काम हे वॉरशीप ओव्हरसिईंग टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दोन गॅस टर्बाईन्स तसेच २ डिझेल इंजिनच्या माध्यमातून २८ नॉटिकल माईल्सचा वेग गाठणे हे युद्धनौकेला शक्य होणार आहे. यासाठी कार्बन मायक्रो अलॉय स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तसेच युद्धनौकेसाठीची शस्त्रे, सेन्सर, एडव्हान्स एक्शन इन्फॉर्मेशन सिस्टिमचा वापरही युद्धनौकेसाठी करण्यात आला आहे. सरफेस टू सरफेस अशा मिसाईल सिस्टिमचाही वापर युद्धनौकेसाठी करण्यात आला आहे. गनफायर सपोर्टही युद्धनौकेसाठी देण्यात आला आहे. तसेच रॉकेट लॉंचरचे फीचरही समाविष्ट करण्यात आले आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mbi22b08349-txt-mumbai-20220824030713", "date_download": "2022-10-07T21:43:50Z", "digest": "sha1:DLOCSKBDXWBPGEM3I6SJMHHHCWIUYFFW", "length": 9618, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "भायखळ्यात ‘केबल स्टे’ पूल | Sakal", "raw_content": "\nभायखळ्यात ‘केबल स्टे’ पूल\nभायखळ्यात ‘केबल स्टे’ पूल\nमुंबई, ता. २४ : भायखळा रेल्वे स्थानकाबाहेरील ब्रिटिशकालीन उड्डाणपूल जीर्ण झाल्याने तो पाडून त्या जागी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. सी-लिंकच्या धर्तीवर ‘केबल स्टे’ तंत्रज्ञानाचा वापर करून हा पूल उभारण्यात येत असून मुंबईतील हा दुसरा पूल ठरणार आहे. नवीन पुलाच्या उभारणीसाठी जागेची अडचण असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूल उभारण्याचा निर्णय संबंधित विभागाने घेतल्याची माहिती उपमुख्य अभियंता संजय इंगळे यांनी दिली.\nभायखळ्यातील ब्रिटिशकालीन पूल साधारणतः सव्वाशे वर्षे जुना आहे. दगड आणि पोलादी गर्डरचा वापर करून हा पूल उभारण्यात आला होता. हा पूल मध्य रेल्वेच्या क्षेत्रात आहे. तो जुना आणि धोकादायक असला तरी रेल्वेकडून त्याची डागडुजी करण्यात येत आहे. सध्या पुलाच्या ‘रिगर्डनिंग’चे काम सुरू आहे. पुलावरून जाणाऱ्या वाहनांच्या संख्येच्या तुलनेत हा पूल अपुरा पडत असल्याने त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.\nभायखळा पुलाच्या आसपास अनेक जुनी बांधकामे आणि इमारती आहेत. त्यामुळे पुलाच्या बांधकामाचे खांब उभारण्यासाठीही जागा शिल्लक नाही. पुलाच्या बांधकामासाठी अधिक जागेचा वापर करता येणार नाही. त्यामुळे या पुलाचे बांधकाम ‘केबल स्टे’च्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरून वरळी सी-लिंक उभारण्यात आला आहे.\n१) भायखळा पूल वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. वाहतुकीसाठी बंद करून त्याचे काम करता येणार नाही. त्यामुळे पालिकेच्या पूल विभागाने जुना पूल सुरू ठेवून नवीन पुलाचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.\n२) सहा महिन्यांपूर्वीच नवीन पुलाचे काम सुरू झाले असून चार खांब उभारले आहेत. महारेलच्या मदतीने पुलाची उभारणी करण्यात येत असून, त्याची लांबी ३०० मीटर आहे. २०२४ च्या अखेरीस या पुलाचे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी पालिका २५० कोटी रुपये खर्च करणार आहे.\nपुलाच्या खाली ६-७ व्यावसायिक गाळे आहेत. शिवाय त्याच्या कडेला जुनी मस्जिददेखील आहे. मस्जिदला बाधा येणार नाही, अशा प्रकारे नवीन पुलाचे डिझाईन तयार केले असून व्यावसायिक गळ्यांचे मात्र पुनर्वसन केले जाईल.\n- संजय इंगळे, उपप्रमुख अभियंता, पूल विभाग\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y92577-txt-kopdist-today-20220904111307", "date_download": "2022-10-07T22:33:17Z", "digest": "sha1:LROWNAIGLH4T7MYRZA7F366WKEGKKU47", "length": 8505, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "कौटूंबिक वादाची सीमा ओलांडू नका; न्यायाधीश ओंकार देशमूख | Sakal", "raw_content": "\nकौटूंबिक वादाची सीमा ओलांडू नका; न्यायाधीश ओंकार देशमूख\nकौटूंबिक वादाची सीमा ओलांडू नका; न्यायाधीश ओंकार देशमूख\nकौटुंबिक वादाची सीमा ओलांडू नका\nन्यायाधीश ओंकार देशमुख; हरळीमध्ये महिला विधी साक्षरता अभियान\nगडहिंग्लज, ता. ४ : घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच, असं म्हटलं जातं. कुटुंबातील निकोप वातावरणासाठी सर्व सदस्यांनी एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. पण काही वेळेला टोकाच्या वादाचे रूपांतर भांडणात होते व त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात, म्हणूनच कधीच कौटुंबिक वादाची सीमा ओलांडू नये, असे आवाहन येथील जिल्हा न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी केले.\nहरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील सिंबायोसिस स्कूलमध्ये ग्रामपंचायत व तालुका विधी सेवा समिती आयोजित महिला विधी साक्षरता अभियानात ते बोलत होते.\nदेशमुख म्हणाले, ‘‘आपण शिक्षणाने साक्षर होतोच. पण त्याबरोबरच महिलांच्या सक्षमीकरणासाठी असलेले कायदेविषयक ज्ञान समजून घेत साक्षर होणे काळाची गरज आहे. त्याच हेतूने हे अभियान तालुक्यात राबविण्यात येत आहे.’’\nगटविकास अधिकारी शरद मगर, अ‍ॅड. शीतल साळवी, डॉ. शुभांगी निकम, गीता मोरे यांनी मार्गदर्शन केले. भारतरत्न मदर तेरेसा यांच्या जीवनपटावर आधारित तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे अनावरण झाले. मुख्याध्यापक संभाजी कार्वेकर यांनी स्वागत केले. ‘सिंबायोसिस’च्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत म्हटले. मारुती कोळूनकर व जाधव यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामसेविका वैशाली कुरळे यांनी आभार मानले. सरपंच नीलम कांबळे, उपसरपंच बाजीराव गोरुले, रेणुका परीट, शिरीष हरळीकर, बळवंत गुरव, अंजना साटपे, मेघा पाटील, छाया खवरे, नीलिमा डवरी, विस्तार अधिकारी घुले, अमर कांबळे, संदीप उंडाळे उपस्थित होते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y93221-txt-kopdist-today-20220904120058", "date_download": "2022-10-07T21:49:47Z", "digest": "sha1:36GHTLYDHQ6PRFYX5B7V4CBTLUNGOF4U", "length": 10003, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "अपयशाची भिती मोडून काढा; प्रकाश मोरे | Sakal", "raw_content": "\nअपयशाची भिती मोडून काढा; प्रकाश मोरे\nअपयशाची भिती मोडून काढा; प्रकाश मोरे\nगडहिंग्लज : गडहिंग्लज युनायटेडतर्फे खेळाडूंशी संवाद साधताना प्रकाश मोरे. व्यासपीठावर महादेव पाटील, मल्लिकार्जुन बेल्लद, सुरेश कोळकी.\n(आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)\nअपयशाची भीती मोडून काढा\nप्रकाश मोरे; गडहिंग्लज युनायटेड फुटबॉलतर्फे खेळाडूंशी संवाद\nगडहिंग्लज, ता. ४ : स्पर्धा असो की परीक्षा दडपण हे असणारच. त्याला न घाबरता मनापासून घेतलेल्या तुमच्या मेहनतीवर विश्‍वास ठेवा. अपयशाची भीती मोडून काढत सर्वोच्च कामगिरीच्या जिद्दीने प्रयत्नांची शिकस्त करा. यश तुम्हाला नक्की सलाम करेल, असा सल्ला आयर्न मॅन उद्योजक प्रकाश मोरे यांनी दिला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे ‘आयर्न मॅन स्पर्धा एक अनुभव’ याविषयी खेळाडूंशी संवाद साधला. एम. आर. हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील होते.\nसुरुवातीला युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात खेळाची पार्श्‍वभूमी नसताना पंचेचाळीशीनंतर मोरेंचे यश प्रेरणादायक असल्याचे सांगितले. आयर्न मॅन स्पर्धेतील यशाबद्दल युनायटेडचे अध्यक्ष मलिकार्जुन बेल्लद यांच्या हस्ते मोरे यांचा गौरव करण्यात आला.\nमोरे आपला प्रवास उलगडताना म्हणाले, ‘‘वयाच्या चाळीशीत आई आणि पत्नी यांच्या टीकेमुळे फिट राहण्यासाठी खेळाकडे वळलो. सुरुवातीला धावण्यावर भर दिला. बेळगाव अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील यशाने उत्साह वाढला. इंटरनेट आणि तज्ज्ञाच्या सल्याने वैज्ञानिकदृष्ट्या सरावावर भर दिला. रस्त्यावर धावून, तलावात पोहून तयारी केली. स्पर्धेत ऐनवेळी आजारी पडल्याने कामगिरीवर परिणाम झाला; पण चिकाटीने स्पर्धा पूर्ण करण्याचा निश्‍चय करत यश खेचून आणले. खेळाडूंनी सरावाइतकेच आहार आणि व्यायामावर भर देण्याची गरज आहे. बिट, दूध, दही, अंडी, पालेभाज्या, कडधान्ये, लिंबू सरबत, फळे ही अत्यल्प दरातील ऊर्जा देणारे स्त्रोत आहेत.’’ या वेळी प्रशांत दड्डीकर, मनीष कोले, अभिजित चव्हाण, डॉ. उदय कोळी, यासीन नदाफ, सौरभ जाधव यांच्यासह खेळाडू, पालक उपस्थित होते. संचालक सुरेश कोळकी यांनी आभार मानले.\n- मेहनतीत सातत्य ठेवा\n- पालेभाज्या, कडधान्यावर भर द्या\n- दुखापतीत सराव टाळा\n- सराव, आहार, विश्रांतीचा मेळ घाला\n- सुरक्षा उपकरणे सक्तीने वापरा\n- वॅार्मअप, स्ट्रेचिंग गांभीर्याने करा\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/ganeshotsav-2022-pimpri-rare-plants-biodiversity-scholar-worried-rj01", "date_download": "2022-10-07T21:47:14Z", "digest": "sha1:VMVKFLOJJEFZPQBJTXIMNOYGONMIGAHY", "length": 10317, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pimpri : दुर्मीळ वनस्पतींना धोका | Sakal", "raw_content": "\nPimpri : दुर्मीळ वनस्पतींना धोका\nपिंपरी : गौरी आगमनाच्या पूजेसाठी मावळ भागातील कोंडिवडे, माऊ, वडेश्वर, फळणे, कुसवली, वहानगाव, बोरिवली, कामशेत, कुसूर, खांडी, लोणावळा, तळेगाव येथून मोठ्या प्रमाणात रानहळद आणि रानआले या वनस्पतींची आवक झाली आहे. एकाच वनस्पतीप्रमाणे सारख्या दिसणाऱ्या वनस्पतींची तोड केली जात असून, यामध्ये दुर्मिळ वनस्पतींची बेसुमार तोड होत असल्यामुळे वनस्पती नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी पत्री आणि पूजा फूल साक्षरता अभियान व जनजाजागृतीची गरज असल्याचे मत जैववैविध्य अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.\nमहालक्ष्मीचे खरे आसन कमळ फूल सोडून इतर दुर्मिळ फुलांची व कुमुदिनीची विक्री केली जात आहे. मूळ पुजापत्री सोडून विदेशी व इतर पत्रीची तोड करून बाजारात विक्री सुरु आहे. स्थानिक तेरडा गड्डी ३० रुपये, रानहळद एक नग ४० रुपये, गौरीची वेणी एक नग ४० रुपये, शंकरोबाची गड्डी १० रुपये प्रमाणे विक्रीला आहे. गौरीपूजनासाठी लागणारी खरी पत्री माका, डोरली, मधुमालती, बेल अर्जुन, जाई, हादगा यांचा बाजारपेठांमध्ये अभाव आहे. त्यामुळे, विदेशी वनस्पतींची भेसळ करून याची विक्री केली जात आहे.\nबेलऐवजी वायवर्णा वनस्पती, शमी ऐवजी दुरंगी बाभूळ, शंकरोबा म्हणून भारंगीची विक्री केली जात आहे. द्विपक्षीय सममिती असणारी फुल शंकरोबा म्हणून वापरली जात आहेत.तेरडा या वनस्पतीबद्दल मौखिक ओवी आहे. ‘आजी गौरी तू जाशील कधी ग येशील नदी भरलं तेरडा फुलेल मग मी येईल.’ त्यामुळे, मावळातील बऱ्याच भागात कवदरी किंवा चवेणीच्या पानांची दुरडी करून तेरड्याची फुले वाजत-गाजत घरी आणली जातात.\nपाण्यामधल्या वनस्पतींमध्ये आणि पाण्यामध्ये महालक्ष्मी वास करते, अशी श्रद्धा आहे. यासाठी पर्याय म्हणून, लव्हाळ वर्गीय वनस्पतींमध्ये यांचा वापर, नागरमोथा वनस्पतींचा वापर करून तेरडा वनस्पतींची लागवड बागेमध्ये करण्यास हरकत नाही. गौराई म्हणून रानहळद आणि तेरडा विक्री केली जात असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.\nकाही परंपरा आणि पूजापद्धती या लिखित असतात. अनेक वर्षांपासून त्या लोकसंस्कृतीचा भाग आहेत. त्याला पर्यायी वनस्पती वापरली जाते. पूजेसाठी जंगलातील सुंदर आणि आकर्षक फुले यांचा मोह स्थानिकांना टाळता येत नाही. म्हणूनच, अशा वनस्पती जंगलातून गोळा करायला बंदी घालायला हवी. त्याची ऊतिसंवर्धनमार्फत लागवड करून रोजगार उपलब्ध केला जाऊ शकतो. दुर्मीळ वनस्पतीऐवजी बाजारातील शेवंती, झेंडू, गुलाब, मोगरा आणि इतर फुलांची सजावट केली जाऊ शकते.\n- प्रा. किशोर सस्ते, वनस्पती आणि जैवविविधता अभ्यासक\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/todays-latest-marathi-news-pne22d88381-txt-pc-today-20220809122744", "date_download": "2022-10-07T23:00:28Z", "digest": "sha1:HXB4SHGICTRJWHVPCB4PFIS2IUUNSHXU", "length": 16018, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "क्रांतीदिन साजरा | Sakal", "raw_content": "\nक्रांतिदिन ः शाळांमधून घोषणा देत केली जनजागृती\nपिंपरी, ता. ९ ः क्रांतिकारकांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी, विविध संस्था-संघटना आणि शाळांनी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांनी क्रांतिदिन साजरा केला. ‘तिरंगा है मेरी जान, भारत देश मेरा महान,’ ‘भारत मातेचे सेवक आम्ही, तिरंग्याचे रक्षक आम्ही,’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, भारतमाता, शिवाजी महाराज, संत तुकाराम, क्रांतिकारी, सैनिक, पोलिस यांच्या वेशभूषा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. परिणामी, शहर परिसरात स्वातंत्र्याचे व देशभक्‍तीचे वातावरण निर्माण झाले होते.\nकाळेवाडी येथील कै. श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत क्रांतिदिनी ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढली. शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाचे सचिव मल्हारी तापकीर, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर, कै. श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पवार, पालक व नागरिक उपस्थित होते. प्रभातफेरीचे नियोजन उपशिक्षिका उल्का जगदाळे, पुनम कांबळे, रवींद्र बामगुडे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.\nचिंचवडेनगर येथे शेखर बबनराव चिंचवडे यांच्याकडून ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम परिसरात साजरा केला. घराघरांवर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत अभिमानाने तिरंगा फडकावून भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्यासाठी चिंचवडे यांच्याकडून राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिले.\nश्री फत्तेचंद कॉलेजमध्ये व्याख्यान\nश्री फत्तेचंद जैन ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांती दिन साजरा करण्यात आला. थोर क्रांतिकारक चाफेकर बंधू यांच्या स्मारकाला भेट देऊन प्राचार्या, उपप्राचार्य, विभागप्रमुख व विद्यार्थ्यांनी आदरांजली वाहिली व अभिवादन केले. चाफेकर वाड्यात बोबडे यांनी चापेकरांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. महाविद्यालयामध्ये क्रांती दिनानिमित्ताने शिल्पा दिघीकर या वीर मातेच्या व्याख्यानाचे आयोजन\nकरण्यात आले होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात कारगिल शहीद जवानांच्या अमर बलिदानाची गाथा मांडली. युवकांना भारतीय सेना दिलात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. क्रांती दिनानिमित्त महाविद्यालयाचे सचिव राजेंद्र मुथा व शाळा समितीचे अध्यक्ष अनिलकुमार कांकरिया व इतर पदाधिकाऱ्यांनी सर्वांना क्रांती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विरांच्या स्मृतींना उजाळा दिल्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषा करून क्रांती मशाल प्रज्वलित केली. महाविद्यालयाच्या प्राचार्या सुनीता नवले यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल गुंजाळ यांनी करून दिला. आभार वाणिज्य विभाग प्रमुख सौ. वांजळे यांनी मानले. अशा पद्धतीने मंगलमय व क्रांती पूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.\nनऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ‘काका’स इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने पदयात्रा काढली. पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांनी गोडांबे कॉर्नर येथे पदयात्रेचे स्वागत केले. पदयात्रेत ‘भारत माता की जय, जय जवान जय किसान,, वंदे मातरम’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. नागरिकांना हर घर तिरंगा असा संदेश देण्यात येत होता. कार्यक्रमाचे आयोजन स्वीकृत नगरसेवक व सांगवी काळेवाडी मंडल अध्यक्ष विनोद हनुमंत तापकीर स्कूलचे ट्रस्टी ज्ञानेश्वर तापकीर, अध्यक्ष नवीन तापकीर, नीलेश तापकीर व ‘काका’स इंटरनॅशनलच्या मुख्याध्यापिका बबिता नायर यांनी केले. माजी नगरसेविका सविता खुळे, बाबासाहेब त्रिभुवन, प्रमोद ताम्हनकर, गणेश भोसले, राहून बनकर, विनय मोरे, कैलास सानप, अभिषेक वाळके उपस्थित होते. पदयात्रेत दरम्यान जागोजागी पदयात्रेचे स्वागत करून लहान मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आले. स्कूलच्यावतीने वृक्षारोपण केले. या पदयात्रेस माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे मार्गदर्शन झाले. विनोद तापकीर यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.\nसंत साई स्कूलमध्ये क्रांतीसप्ताहाची अतिशय उत्साहात सुरवात\nझाली. शाळा ते भोसरी गाव मार्गे प्रभातफेरी काढण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल ओमप्रकाश मसरकल व शाळेचे प्राचार्य शिवलिंग ढवळेश्वर यांच्या हस्ते क्रांतिज्योत प्रज्वलित करण्यात आली. उपमुख्याध्यापिका रूपाली खोल्लम, प्रायमरी प्रभारी तेहमिना तहसीलदार, सहशिक्षक मृणाल लिमये, मनोज वाबळे, स्मिता ढमाले, प्रमोद शिंदे, संजय अनर्थे, काशिनाथ कत्नाळी, भारती ढवळेश्वर व इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी शिक्षक वृंद, पालक -शिक्षक संघाचे प्रतिनिधींनी फेरीत सहभाग घेतला. पाचवी, सहावी, सातवीची मुले स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारकांचा वेश धारण करून सहभागी झाले होते. भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणांनी भोसरी परिसर दुमदुमून गेला. या प्रभात फेरीच्या माध्यमातून वसुंधरा संवर्धनाचा संदेश दिला.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/katraj-murder-out-of-anger-speaking-obscenities-crime-pjp78", "date_download": "2022-10-07T21:52:56Z", "digest": "sha1:7LF3CA5N7442AWYTRY7RN2ULV6N3VORC", "length": 6806, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "कात्रज : अश्लिल बोलल्याच्या रागातून खून | Sakal", "raw_content": "\nपत्नीवर वाईट नजर ठेवून तिला वारंवार त्रास दिला आणि तिच्याशी अश्लिल बोलल्याच्या रागातून खून केल्याची घटना घडली.\nकात्रज : अश्लिल बोलल्याच्या रागातून खून\nकात्रज - पत्नीवर वाईट नजर ठेवून तिला वारंवार त्रास दिला आणि तिच्याशी अश्लिल बोलल्याच्या रागातून महादेव दुपारगुडे याचा खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. १९) दहिहांडीच्या दिवशी जांभुळवाडी दरीपूलाच्या जवळ घडली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी पुढील ४८ तासात तपासयंत्रणा कामाला लावत खूनाचा छडा लावला असून तुषार मेटकरी, आशा मेटकरी, विनोद दुपारगुडे आणि किरण चौधरी यांना अटक केली आहे.\nसदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरिक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन शिंदे, धिरज गुप्ता, गौरव देव, अंकुश कर्चे, रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, नरेंद्र महांगरे, अवधुत जमदाडे, तुळशीराम टेभुर्णे आदीच्या पथकाने केली. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ करत आहेत.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22r65754-txt-pune-today-20220911124415", "date_download": "2022-10-07T22:23:25Z", "digest": "sha1:SDRYLKYS6CNUAWGIU4AH4KMHGU3CCDSU", "length": 10306, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "MPSC : विद्यार्थ्यांची ट्वीटर जागृती मोहीम, हजार पदांचा समावेश करण्याची मागणी | Sakal", "raw_content": "\nएमपीएससीचे विद्यार्थी आज ट्विटर मोहीम राबविणार राज्यसेवा परीक्षेत एक हजार पदांचा समावेश करण्याची मागणी\nMPSC : विद्यार्थ्यांची ट्वीटर जागृती मोहीम, हजार पदांचा समावेश करण्याची मागणी\nपुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ही वस्तुनिष्ठ बहूपर्यायी पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा आहे. पुढच्या वर्षी ही परीक्षा वर्णनात्मक स्वरूपात होणार आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना शेवटची संधी आहे. त्यामुळे या परीक्षेच्या पद संख्येत वाढ करावी. या मागणीकडे सोमवारी (ता.१२) राज्यसरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘ट्विटर जागृती मोहीम’ राबविणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.\nएमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून ही मोहीम सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत राबविली जाणार आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. तसेच सरकारने एमपीएससीला ५०१ जागांचे मागणीपत्र पाठवले आहे. त्यामुळे या पदांचा समावेश केला, तर राज्य सेवा परीक्षा एक हजार पदांसाठी होऊ शकते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. राज्य सेवा २०२२ ही परीक्षा १६१ पदांसाठी जाहीर झाली होती. त्यावर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट फोन करून राज्य सेवा परीक्षेत पदांची संख्या वाढविण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत ३४० पदांचा समावेश केला होता. त्यानुसार आता २१ संवर्गातील एकूण ५०१ पदांसाठी परीक्षा होत आहे. ११ संवर्गातील पदांचे मागणीपत्र एमपीएससीला पाठवले गेले नाही. ते पाठवले तर जागा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ मागणीपत्र पाठवावे आणि एकूण एक हजार पदांची परीक्षा घ्यावी, असे सुमेध पाटील आणि राम आडे या विद्यार्थ्यांनी सांगितले.\n- मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीकडून १०० टक्के पदभरतीला मान्यता दिली आहे\n- मात्र सरकारी विभाग रिक्त पदांचे मागणीपत्र एमपीएससी पाठविण्याबाबत उदासीन\n- हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील राज्यसेवा २०२२ ही शेवटची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा ठरणार\n- ३२ संवर्गातील रिक्त पदांचे मागणीपत्र तत्काळ एमपीएससीला पाठवावीत\n- या वर्षी ११ हजार २६ पदे एमपीएससीकडून भरली जातील, असे मंत्र्यांनी जाहीर केले असून अधिकाऱ्यांनी त्याचे पालन करावे\n- नायब तहसीलदार, मुख्याधिकारी गट ब, उद्योग अधिकारी, कामगार विभागातील पदे, कौशल्य विकास अधिकारी, मंत्रालय कक्ष अधिकारी आदी रिक्त पदांचे मागणीपत्र एमपीएससीला पाठवावे\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/video-story/ipl-2022-live-predictions-rcb-vs-kkr-cricket-aab99", "date_download": "2022-10-07T22:12:35Z", "digest": "sha1:VUOYC25WTSUX7ETL2CJZ6IXPNERGV7MB", "length": 5327, "nlines": 145, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ipl 2022 live predictions rcb vs kkr cricket | Sakal", "raw_content": "\nआजच्या 'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात रॉयल चॅलेंजर बंगळूर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या आज होणाऱ्या सलामी सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील , धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/story/1703/", "date_download": "2022-10-07T22:46:40Z", "digest": "sha1:TIOOSUHFP6FHR5K3VQ33QK45DY4TNMWQ", "length": 26768, "nlines": 296, "source_domain": "www.snopty.com", "title": "अशी ही साताऱ्याची तऱ्हा - Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nअशी ही साताऱ्याची तऱ्हा\n*अशी ही साताऱ्याची शैली*\n( पु. ल. देशपांडे लिखीत)\nसातारची एक वेगळीच बोली, शेलक्‍या शिव्या, विशिष्ट हेल आहे. तसेच वेगळे-वैशिष्ट्यपूर्ण खाद्यप्रकारही आहेत. सातारी जेवण म्हणजे फक्त ‘चुलीवरचे गावरान चिकण किंवा मटण आणि भाकरी’ असा एक समज आहे. पण या व्यतिरिक्त कितीतरी अस्सल सातारी खाद्यप्रकार आहेत.\nपौष महिना संपला, की सातारा जिल्ह्याला यात्रांचे वेध लागतात. गावोगावी यात्रा असतात. यात्रेच्या पहिल्या दिवशी गोड जेवण असते. म्हणजे पोळीचे पोळी म्हणजे पुरणाची पोळी. साध्या पोळीला चपाती म्हणतात. पोळीबरोबर गुळवणी हवीच. अशा पोळ्यांचे ‘पाचुंदे’ (पाच पोळ्यांचे एकक) पचवणारे बहाद्दर गावोगावी आहेत. सातारा परिसरात कोणत्याही सणासुदीला पोळी आणि कटाची आमटीच सहसा असते.\nयात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्रमपरिहारार्थ ‘नळीचे’ जेवण चुलीवर भाजलेल्या टम्म भाकऱ्या आणि लालभडक तर्रीदार तवंग असलेल्या मटणाचा पातळ रस्सा आणि सुक्के चुलीवर भाजलेल्या टम्म भाकऱ्या आणि लालभडक तर्रीदार तवंग असलेल्या मटणाचा पातळ रस्सा आणि सुक्के हा रस्सा कितीही प्यायला तरी बाधत नाही. पितळीत भाकऱ्या कुस्करून त्यावर रस्सा घालून खायचे. यजमान, जावाई-ईवाई यांना आग्रह करतच असतो – ‘पावणं, कुस्करू कुस्करू हाना.’ नळीच्या जेवणाचे आमंत्रण द्यायचीही एक विशिष्ट भाषा आहे. यात्रेचे मटण खायला या म्हणून आमंत्रण देताना ‘खेळायला या’ असे सांगतात. अस्सल सातारकराची पहिली पसंती अर्थातच मटणाला हा रस्सा कितीही प्यायला तरी बाधत नाही. पितळीत भाकऱ्या कुस्करून त्यावर रस्सा घालून खायचे. यजमान, जावाई-ईवाई यांना आग्रह करतच असतो – ‘पावणं, कुस्करू कुस्करू हाना.’ नळीच्या जेवणाचे आमंत्रण द्यायचीही एक विशिष्ट भाषा आहे. यात्रेचे मटण खायला या म्हणून आमंत्रण देताना ‘खेळायला या’ असे सांगतात. अस्सल सातारकराची पहिली पसंती अर्थातच मटणाला ब्रॉयलर चिकन, समुद्री मासे या नाइलाजाने खायच्या वस्तू ब्रॉयलर चिकन, समुद्री मासे या नाइलाजाने खायच्या वस्तू कोंबडी असेल तर देशी आणि मासा असेल तर नदीचा हवा असा हट्टच असतो. सातारकराला सर्दी झाली की सुचवला जाणारा हमखास उपाय म्हणजे खेकड्याचा किंवा माशाचा गरम तिखटजाळ, पातळ रस्सा पिणे. सातारकराचे वशाटाबिगर भागतच नाही. निदान ‘कवट’ (अंडे) तरी हवेच कोंबडी असेल तर देशी आणि मासा असेल तर नदीचा हवा असा हट्टच असतो. सातारकराला सर्दी झाली की सुचवला जाणारा हमखास उपाय म्हणजे खेकड्याचा किंवा माशाचा गरम तिखटजाळ, पातळ रस्सा पिणे. सातारकराचे वशाटाबिगर भागतच नाही. निदान ‘कवट’ (अंडे) तरी हवेच\nखोबऱ्याचे मुळीच कौतुक नाही. भुईमूग हा वीकपॉईंट ज्यात त्यात कूट घालायचे. गरगटे, तव्यातला बटाटा, पावट्याचा रस्सा, भाकरी आणि कोरड्यास ‘चटणी’ किंवा खर्डा आणि बुक्कीने फोडलेला कांदा.\n‘चटणी’ हा एक विषयच आहे. चटणी किंवा तिखट म्हणजे शहरी भाषेत कांदा लसूण मसाला. साध्या तिखटाच्या पुडीला इकडे ‘भगवती’ म्हणतात. उन्हाळा लागला, की घराघरातून वर्षभराची चटणी बनवायचे वेध लागतात. मिरच्या आणणे, त्यांना ऊन दाखवणे, ‘सौदा’ (गरम मसाल्याचे जिन्नस) आणणे, डंकावर चटणी कुटायला सामुदायिकरीत्या जाणे आणि कानातून वाफा काढणारी ताजी ताजी चटणी आणि तेल भाकरीबरोबर खाणे म्हणजे परम सौख्य सातारकरांच्या जिभेचे तसे चोचले नसतात. कालवणाला काही नसले, तर भरड कुटाचा ‘म्हाद्या’ चालतो. म्हाद्या घट्ट, पातळ, पळीवाढा – जसा हवा तसा करता येतो. तीन-चार दिवस टिकतोही सातारकरांच्या जिभेचे तसे चोचले नसतात. कालवणाला काही नसले, तर भरड कुटाचा ‘म्हाद्या’ चालतो. म्हाद्या घट्ट, पातळ, पळीवाढा – जसा हवा तसा करता येतो. तीन-चार दिवस टिकतोही लोखंडी कढईत, तव्यावर म्हाद्या शिजत असतो तेव्हा ‘चुटचुट’ असा आवाज येतो म्हणून त्याला ‘चुटचुटं’ही म्हणतात. तर वाईकडे ‘फुदकनं’ म्हणतात.\nपोलिस खातात हे जगजाहीर आहे पण सातारकर ‘पोलिस खातात’ याचा अर्थ अंमळ वेगळाच आहे. पोलिस म्हणजे काळा घेवडा. चटणी घालून केलेले पोलिसाचे कालवण, मटणाच्या रश्‍श्‍याला तोंडात मारील असे असते. वाटल्या डाळीचा झुणका किंवा झुणक्‍याची पोळी, शाळूची भाकरी, भातवड्या अशा बारीक सारीक खासीयती वेगळ्याच. लग्नाळू मुलगी सुगरण आहे हे जोखण्याची एक सातारी पद्धत आहे. भाकरीचे पीठ मळताना त्यात एक चार आण्याचे नाणे घालायचे, भाकरी भाजून झाली की तिच्या दोन पदरात नाणे खुळखुळले की मुलगी सुगरण\nपावसाळी थंडीतला सातारचा आवडीचा पदार्थ म्हणजे ठिकरीची फोडणी घातलेले वाफाळलेले घुटे आणि हुलग्याचे माडगे सालीसकटच्या उडदाच्या डाळीचे, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून केलेले, वरून ठिकरीची फोडणी दिलेले रसायन म्हणजे घुटे सालीसकटच्या उडदाच्या डाळीचे, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून केलेले, वरून ठिकरीची फोडणी दिलेले रसायन म्हणजे घुटे ठिकरी म्हणजे दगडाची खोलगट कपची. ती लाललाल तापवून त्यातच लसणीची फोडणी करून ते घुट्यात दडपायचे. ठिकरीचा चुर्रर्र आवाज, घुट्याचा हिरवागार रंग आणि आसमंतात पसरलेला दरवळ म्हणजे जिभेला चटका आणि मेंदूला मुंग्या ठिकरी म्हणजे दगडाची खोलगट कपची. ती लाललाल तापवून त्यातच लसणीची फोडणी करून ते घुट्यात दडपायचे. ठिकरीचा चुर्रर्र आवाज, घुट्याचा हिरवागार रंग आणि आसमंतात पसरलेला दरवळ म्हणजे जिभेला चटका आणि मेंदूला मुंग्या धुवाधार पावसात, चिखलपाण्यात दिवसभर राबराबून सांजच्याला घरला आल्यावर कारभारणीने माडग्याचा वाडगा पुढे केल्यावर सगळे कष्ट क्षणात मिटतात. सातारा परिसरात पावसाळ्यातच फक्त मिळणाऱ्या भारंगी पाथरीसारख्या रानभाज्याही चविष्ट लागतात. माडग्यासारखे उन्हाळी पेय म्हणजे ज्वारी किंवा नाचणीच्या पिठाची आंबिल धुवाधार पावसात, चिखलपाण्यात दिवसभर राबराबून सांजच्याला घरला आल्यावर कारभारणीने माडग्याचा वाडगा पुढे केल्यावर सगळे कष्ट क्षणात मिटतात. सातारा परिसरात पावसाळ्यातच फक्त मिळणाऱ्या भारंगी पाथरीसारख्या रानभाज्याही चविष्ट लागतात. माडग्यासारखे उन्हाळी पेय म्हणजे ज्वारी किंवा नाचणीच्या पिठाची आंबिल उन्हाने तलखी होऊ नये, पोटाला ‘धर’ राहावा म्हणून आंबिल पिऊनच घरातून निघायचे. अजिबात तहान तहान होत नाही आणि ‘आंबिल’ नाव जरी चमत्कारिक असले, तरी नाचणीची आंबिल हिमोग्लोबिन वाढीसाठी प्रचंड उपयोगी आहे. थंडी संपता संपता, वावरात, झाडाखाली, तीन दगडांची चूल मांडून मातीच्या मडक्‍यात केलेला ‘शेंगसोला’ म्हणजे ऊंधियाचा ग्रामीण आविष्कार उन्हाने तलखी होऊ नये, पोटाला ‘धर’ राहावा म्हणून आंबिल पिऊनच घरातून निघायचे. अजिबात तहान तहान होत नाही आणि ‘आंबिल’ नाव जरी चमत्कारिक असले, तरी नाचणीची आंबिल हिमोग्लोबिन वाढीसाठी प्रचंड उपयोगी आहे. थंडी संपता संपता, वावरात, झाडाखाली, तीन दगडांची चूल मांडून मातीच्या मडक्‍यात केलेला ‘शेंगसोला’ म्हणजे ऊंधियाचा ग्रामीण आविष्कार मिळेल त्या भाज्या, हाताने मोडायच्या. अमुकच मसाला, अमुकच प्रमाण असे काही नाही. सोबत तीळ लावलेली मीठ घातलेली बाजरीची भाकरी मिळेल त्या भाज्या, हाताने मोडायच्या. अमुकच मसाला, अमुकच प्रमाण असे काही नाही. सोबत तीळ लावलेली मीठ घातलेली बाजरीची भाकरी चव विसरता विसरतच नाही.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nतिसरी लाट रोखायची असेल तर……\nअस्मिता नव्हे, ममतांचे राजकारण\nचांगुलपण दुर्लभ,दुर्मिळ परी ऐसे जगणे करी जीवन सुफळ\nपर्यायी मार्गात कधीच नसते समाधानाची खात्री\nबदलती शिक्षण पद्धती आणि शिक्षणाचे होत असलेले बाजारीकरण\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://mr.hongkepvcvalve.com/2-piece-ball-valve-valve/", "date_download": "2022-10-07T22:34:47Z", "digest": "sha1:DN733HDLJ67H773NT4FXG5LDONENIX3O", "length": 7340, "nlines": 234, "source_domain": "mr.hongkepvcvalve.com", "title": " 2 पीस बॉल व्हॉल्व्ह उत्पादक आणि पुरवठादार - चीन 2 पीस बॉल वाल्व फॅक्टरी", "raw_content": "\n2 पीसी पीव्हीसी बॉल वाल्व मालिका\nपीव्हीसी बॉल वाल्व मार्गदर्शक\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n2 तुकडा बॉल वाल्व\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nप्लास्टिक वाल्व, पीव्हीसी बॉल व्हॉल...\nहॉट सेल 1/2″ बॉल वा...\nकॉम्पॅक्ट पीव्हीसी बॉल व्हॉल्व्ह थ्री...\nप्लॅस्टिक टू-पीस बॉल व्हॉल्व्ह\nदक्षिण आफ्रिका Sch80 पीव्हीसी पाईप...\n2 तुकडा बॉल वाल्व\n2 पीस बॉल व्हॉल्व्ह एसएस हँडल दक्षिणपूर्व आशिया गरम विक्री\nप्लॅस्टिक टू-पीस बॉल व्हॉल्व्ह\nहाँगके एबीएस बॉल एसएस हँडल पीव्हीसी दोन तुकडे बॉल वाल्व\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nपत्ता:नं. 28, शुगुआंग रोड, जियानशान टाउन, पनआन काउंटी, जिन्हुआ सिटी, झेजियांग प्रांत\nसिंचन बॉल वाल्व, पीव्हीसी पाईप फिटिंग्ज, पीव्हीसी शेड्यूल 40 बॉल वाल्व्ह, पाईप फिटिंग्ज, बेसिन टॅप, Abs बेसिन Faucets,\n© कॉपीराइट - 2010-2021 : सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nAbs बेसिन Faucets, पीव्हीसी शेड्यूल 40 बॉल वाल्व्ह, सिंचन बॉल वाल्व, पाईप फिटिंग्ज, बेसिन टॅप, पीव्हीसी पाईप फिटिंग्ज,\nई - मेल पाठवा\nआमच्याशी गप्पा मारा, powered by LiveChat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2021/04/blog-post_27.html", "date_download": "2022-10-07T21:55:54Z", "digest": "sha1:JTFVBJUAWSVR34Y42YRJRIQ5RX7RAW57", "length": 11681, "nlines": 219, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "३० एप्रिल ते ०६ मे २०२१ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\n३० एप्रिल ते ०६ मे २०२१\n०७ मे ते १३ मे २०२१\nअमेरिकेचा अफगाणिस्तानला ‘खुदा हाफीज\nआजची परिस्थती अन जकात व्यवस्थेची गरज\nसंयुक्त समाजात राहण्याचे इस्लामी शिष्टाचार\nकोव्हीड लस : विज्ञान आणि राजकारण\nसूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nअल्लाहची उपासना आणि सर्वोत्तम मुस्लिम\n३० एप्रिल ते ०६ मे २०२१\nसंवाद हरला तरी चालेल पण मनं जिंकायला हवीत\nआज्ञाधारकतेसाठी ज्ञानाची व विश्वासाची गरज\nधर्मपरिवर्तन आणि दलित-मुस्लिम एकतेचे सूत्र\nगुजरात राज्यात महिलांची अवस्था\nरमजानचे रोजे आणि सामाजिक योगदान\nसूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nयुगांडाच्या राष्ट्राध्यक्षांचे जनतेला उद्देशून भाषण\n२३ एप्रिल ते २९ एप्रिल २०२१\nरमजान मनं, शरीर शुद्धीचाही महिना\n१६ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१\nपुन्हा संधी रमजान पाहण्याची...\nमुस्लिम समाजाला सामाजिक अभियांत्रिकीची गरज\nमौलाना वली रहेमानी यांचे निधन\nमुस्लिमांची ज्ञानविज्ञानाच्या जगतातही मक्तेदारी\nसूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nकोरोनाचा उद्रेक : लॉकडाऊन\nकायद्याच्या गैरवापरावर अंकुश लावण्याची हीच वेळ आहे\nकोरोना पसरवल्याचा आरोप असलेल्या तबलिगी जमाअतच्या ल...\nकुरआनचे पहिले आणि अंतिम उद्दिष्ट मानवकल्याण आहे\nसूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशात ९० टक्के सरकारी अधिकारी व राजकीय पुढारी भ्रष...\nह्या देशाच्या संपत्तीचा मालक कोण\n०९ एप्रिल ते १५ एप्रिल २०२१\n०२ एप्रिल ते ०८ एप्रिल २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/12/fadanvis.html", "date_download": "2022-10-07T22:17:38Z", "digest": "sha1:KUY2IG2BGAQXOWBHMRCN72RDW3YURWRG", "length": 4415, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "फडणवीस सरकारच्या काळात 65 हजार कोटींचा घोळ. | Gosip4U Digital Wing Of India फडणवीस सरकारच्या काळात 65 हजार कोटींचा घोळ. - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome राजकीय फडणवीस सरकारच्या काळात 65 हजार कोटींचा घोळ.\nफडणवीस सरकारच्या काळात 65 हजार कोटींचा घोळ.\nफडणवीस सरकारच्या 2017-18 या आर्थिक वर्षात साधारण 65 हजार कोटी रुपयांचा घोळ झाल्याचा ठपका नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी ठेवला आहे.\nएखादे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र 12 महिन्यांच्या आत सादर करायचं असतं. काम योग्यरित्या झाल्याचे ते प्रमाणपत्र असते.\nमात्र 2018 पर्यंत झालेल्या विविध कामांसाठी दिलेल्या अनुदानांची उपयोगिता प्रमाणपत्रं नसल्याचंही कॅगने अहवालात नमूद केलं आहे.\n65 हजार कोटींहून अधिक रकमेच्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे न जोडणे म्हणजेच निधीचा दुरुपयोग किंवा अफरातफरीचा धोका संभवतो, असं निरीक्षण कॅगनं नोंदवलं आहे.\nकेंद्र सरकारकडून येणारं अनुदान घटल्याचंही कॅगने म्हटलं आहे. गेल्यावर्षी 11 टक्के अनुदान आलं होतं ते प्रमाण आता 9 टक्क्यांवर आल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/2897", "date_download": "2022-10-07T21:58:44Z", "digest": "sha1:2O4WFYICIQEABUWPJLNMNFTP3MUTTQKP", "length": 13906, "nlines": 105, "source_domain": "bollyreport.org", "title": "आज आषाढी एकादशी, पाप मुक्त होण्यासाठी आज काय करावे ? आषाढी एकादशीचे महत्त्व, जाणून घ्या ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome Other News आज आषाढी एकादशी, पाप मुक्त होण्यासाठी आज काय करावे \nआज आषाढी एकादशी, पाप मुक्त होण्यासाठी आज काय करावे आषाढी एकादशीचे महत्त्व, जाणून घ्या \nया एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्‍तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते. या दिवशी रोजच्या पुजेबरोबरच श्रीविष्णूची `श्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. तसेच घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्याचीही मनोभावे पूजा केली जाते. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे.\nपूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, प्रत्येक जणच भगवत्‌स्वरूप झालेला असल्याने एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून एकमेकांप्रती आदर व्यक्त करत. पायांवर डोके ठेवण्याने अनेक लाभ होतात. दोहोंमधील चैतन्य एक होऊन दोहोंचेही तेज वाढण्यास साहाय्य होते. ‘मी’पणा, ताठा, अहंकार न्यून होतो. ‘सगळीकडे ईश्वर भरलेला आहे’, ही भावना बळावते. आपले अनुभव सांगत, नवीन रचना, अभंग, भजने, ओव्या म्हणून दाखवत. प्रसाराच्या नवीन कल्पना सांगत. इतरांना मार्गदर्शन करत. प्रत्येक जण या मेळाव्यात उपस्थित असल्याचे इतरांना समजावे, यासाठी पताका बाळगत असे. तोच प्रघात आजतागायत सुरू आहे. कार्तिकी एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याचा अन् पुढील मार्गदर्शन घेण्याचा हा दिवस असल्याने या एकादशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले, असे सांगितले जाते.\nआषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करुन वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो असे म्हटले जाते.\nएकादशीची कथा – मृदुमान्य नावाच्या रा*क्ष*सा*ला भगवान शंकराने प्रसन्न होऊन तू कोणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील,’ असा वर दिला होता. या वरामुळे उन्मत झालेला राक्षसाने देवांवर स्वारी केली. यावेळी सर्व देव मदतीसाठी शंकराकडे धावले. मात्र शंकारांनाही काही करता येत नव्हते. यावेळी देव शंकरासह एका गुहेत जाऊन लपून बसले. यावेळी देवांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिने मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली. त्या दिवशी पाऊस पडत होता. त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले. तसेच सर्वजन गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात पडला. या देवीचे नाव होते एकादशी.\nशास्त्रानुसार, जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णुसह देवी एकादशीची मनोभावे पूजा करतो ती व्यक्ती पापमुक्त होते असे म्हटले जाते. तसेच त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होते.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleकरीना कपूर-खानच्या दुसऱ्या मुलाचं नाव जेह, त्याच्या शब्दाचा अर्थ पाहून वाटेल अजून काय बाकी आहे \nNext articleआपल्या नवऱ्या सोबत बायका या १० गोष्टी नक्की खोटं बोलतात, बघा आपली पत्नी यापैकी काय बोलते \nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले प्रसिद्ध कुत्र्यांच्या प्रजाती \n१ मिनिटात रद्दीमध्ये लपलेली मांजर शोधा, ९९ टक्के लोक अयशस्वी, फोटो Zoom करा उत्तर सापडेल \nकदाचित माझा प्रायव्हेट पा’र्ट पाहिला असेल’, रिअॅलिटी शोमध्ये किम कार्दशियनने केलं अजबच वक्तव्य \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://nmk.org.in/category/news/", "date_download": "2022-10-07T22:55:07Z", "digest": "sha1:S7ICHBRX5YF4PERSYPFASDGNNH5NZIG6", "length": 4042, "nlines": 63, "source_domain": "nmk.org.in", "title": "लक्षवेध Archives - NMK.ORG.IN", "raw_content": "\nसरकारी नौकरी | Government Job सरकारी नौकरी साठी प्रत्येक तरुण कसोशीने आभ्यास करत आसतो, त्याच समजा एक चतुर्थ …\nWhat is ITI Course ITI इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टिट्यूट येथे सर्व प्रकारचे तांत्रिक काम शिकवले जाते. काही उदाहरण म्हणजे …\nराज्यात १२ हजार ५२८ पोलिस भरती साठी मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे.\n१६ सप्टेम्बर २०२० रोजी झालेल्या बैठकीत पोलिस भरती साठी २०१९ च्या भारवायास राहिलेली रिक्त पदे आणि नव्याने २०२० …\nMahabharti | Marathi Job Websites | Maha Bharti विद्यार्थि मित्रांसाठी आज आपण आपल्या महाराष्ट्र राज्यातील खुपच लोकप्रिय मराठी …\nMPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा निकाल\nMPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा- २०१७ या परीक्षेचा निकल ज़ाहिर झालेला आहे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1890/", "date_download": "2022-10-07T22:53:50Z", "digest": "sha1:45NMS7DJZIWPTOVDZAPYJGO6QVXMF76T", "length": 11199, "nlines": 81, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "बोर्ड परीक्षेसाठी विलंबाने उपस्थित राहणाऱ्या परीक्षार्थीना प्रवेश नाही - Rayatsakshi", "raw_content": "\nबोर्ड परीक्षेसाठी विलंबाने उपस्थित राहणाऱ्या परीक्षार्थीना प्रवेश नाही\nबोर्ड परीक्षेसाठी विलंबाने उपस्थित राहणाऱ्या परीक्षार्थीना प्रवेश नाही\nइयत्ता दहावी – बारावीच्या पारिक्षार्थींना लातूर विभागिय मंडळाच्या सूचना\nनांदेड, रयतसाक्षी : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत होत आहेत. या परीक्षेस उशिराने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थीना प्रवेश नाकारण्यात येईल यांची पालक, शिक्षक व इतर संबंधित घटकांनी यांची नोंद घ्यावी, अशा सूचना लातूर विभागीय मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत.\nया परीक्षेसाठी विहित वेळेपेक्षा सकाळ सत्रात १०:३० व दुपार सत्रात ३:०० वाजता उशिराने येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत पुढीलप्रमाणे कार्यपध्दती होती. उत्तरपत्रिका लेखन प्रत्यक्ष सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीत या वेळेत १० मिनीटे उशिरा येणाऱ्या परीक्षार्थ्यांना विलंबाच्या कारणाची खातरजमा करुन केंद्रसंचालक स्तरावर परवानगी देण्यात येत होती.\nदहा मिनीटानंतर अतिशय अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होण्यास केंद्रावर आल्यास व त्यामागचे कारण केंद्रसंचालकांना रास्त वाटल्यास त्यांनी विभागीय अध्यक्ष,विभागीय सचिव यांची दूरध्वनीवरुन पूर्वमान्यता घेवून आणखी १० मिनीटे एकूण २० मिनीटांचा विलंब क्षमापित करुन परीक्षार्थ्यांला परीक्षेस प्रविष्ठ करुन घेता येईल, अशा सूचना राज्य मंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत.\nया सवलतीचा लाभ घेवून लेखी परीक्षेस उशिरा प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये गैरमार्गाने प्रसारित झालेला प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याने अशा प्रकरणांमध्ये संबंधीताविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी लेखी परीक्षेस उशिराने प्रविष्ठ होवू देण्याची सवलत १६ मार्च २०२२ पासून बंद करण्यात आली आहे. याबाबत संबंधिताना पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.\nसर्व संबंधीत विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरु होण्यापुर्वी १० मिनीटे अगोदर प्रश्नपत्रिका वाटप करण्याच्या वेळेपर्यत म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये १०:२० पर्यंत आणि दुपारच्या सत्रामध्ये दुपारी २.५० पर्यंत परीक्षा कक्षामध्ये हजर राहणे बंधनकारक राहील.\nविद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होते वेळी म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये सकाळी १०:३० वा व दुपारच्या सत्रामध्ये दुपारी ३:०० वाजेपर्यत आल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी त्यांची तपासणी करुन विद्यार्थ्यांस विभागीय मंडळाच्या मान्यतेने परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात यावी. परीक्षा सुरु झाल्यानंतर म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये सकाळी १०:३० नंतर व दुपार सत्रामध्ये दुपारी ३:०० नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देण्यात येवू नये.\nदक्षता पथकामार्फत परीक्षा केंद्र, उपपकेंद्राना वारंवार भेटी देवून परीक्षा काळात होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. यांची परीक्षार्थी व सर्व संबंधित घाटकांनी नोंद घ्यावी, असेही लातूर विभागीय मंडळाकडून कळविण्यात आले आहे.\nकर्तव्या सोबत ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा जतनासाठी पुढे या – आयुक्त केंद्रेकर\nखामगाव गोदापत्रात पथकाची धाडशी कारवाई\nविद्यार्थांनी कायद्याचे ज्ञान आत्मसात करावे – पोलिस निरीक्षक श्री. माने\nशिरूरच्या सनराईजचा बारावी बोर्ड परीक्षेत डंका\nइंग्रजी शाळांमधून चार हजारांवर विद्यार्थी झेडपीच्या शाळेत\nशिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लांबणीवर\nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/2286/", "date_download": "2022-10-07T22:40:50Z", "digest": "sha1:5K5SAOH22HGQRQHEQOAR5AZTGOHCGRUG", "length": 7621, "nlines": 77, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "बीडच्या युवा शेतकऱ्याची राजकिय घडामोडींवर राज्यपालांकडे मागणी - Rayatsakshi", "raw_content": "\nबीडच्या युवा शेतकऱ्याची राजकिय घडामोडींवर राज्यपालांकडे मागणी\nबीडच्या युवा शेतकऱ्याची राजकिय घडामोडींवर राज्यपालांकडे मागणी\nमला प्रभारी मुख्यमंत्री करा, राज्यपालांना पत्र तर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nबीड, रयतसाक्षी : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करत सरकार स्थापनेसाठी पुरेशा संख्याबळाचा दावा केले आहे. राज्याच्या राजकियक्षेत्रात घडामोडींना उधान आलेले असतानाच बीडच्या युवा शेतकऱ्याने पत्राद्वारे राज्यपालकांकडे अजब मागणी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे राज्यातील प्रश्नांकडे लक्ष नसल्याने मला मुख्यमंत्री करा, अशी मागणी शेतकरी युवकाने राज्यपालांना पत्र व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कली आहे.\nबीड जिलह्यातील दहिफळ वडमाऊली (ता. केज) येथील श्रीकांत गदळे या शेतकऱ्याने राज्याच्या राजकारणातील घडामोडींवर अजब मागणी करत राज्यपालांना पत्र लिहीले आहे. जिल्हाधिकारी यांनाही निवेदनाद्वारे युवा शेतकऱ्यांनी मागणी केल्याने सर्वक्षेत्रातून अश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पत्राद्वारे शेतकऱ्याने लिहिले आहे की, मी १० ते १२ वर्षापासून राजकारण, समाजकारणात अग्रेसर आहे . सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे.\nपरंतू सरकारने तात्काळ मदत करणे अपेक्षीत होती. मात्र, ती मदत मिळाली नाही. तसंच मुख्यमंत्री यांनी आडिच वर्षे सत्तेत राहून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. राज्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सत्तेत राहून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना आकरण्यात आली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू अथवा प्रभारी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती न देता मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी, अशी मागणी श्रीकांत गदळे या शेतकऱ्याने राज्यपालांकडे पत्राद्वारे तर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.\nपवारांना धमक्या देणं ही भाजपची संस्कृती आहे का\nपावसाच्या हूलकावणीने शेतकरी चिंतेत\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/shiv-sena-another-big-blow-to-uddhav-thackeray-by-election-commission-only-15-days-time-to-present-his-side-au130-781070.html", "date_download": "2022-10-07T22:45:25Z", "digest": "sha1:R4LWMYR7V6EPMML5KPR32UVNNOL5XS7H", "length": 12250, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nShiv sena : निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, बाजू मांडण्यासाठी फक्त 15 दिवसांची वेळ\nशिवसेनेचं चिन्ह कुणाचं हा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर पोहोचला आहे. तसेच हा वाद सध्या कोर्टातही सुरू आहे. यावरती निर्णय होणं मात्र अद्याप बाकी आहे. ही अटीतटीची लढाई कोण जिंकणार याकडे संपूर्ण देशाचा लक्ष लागलं आहे.\nनवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बसणारे हादरे सध्या सुरूच आहेत. अशातच होता निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) त्यांना आणखी एक मोठा हादरा दिला आहे. ठाकरेंना आपली बाजू निवडणूक आयोगासमोर मांडण्यासाठी चार आठवड्यांचा नाही तर केवळ पंधरा दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता त्यांना सर्व पुराव्यांशी बाजू मांडण्यासाठी फक्त 23 ऑगस्ट पर्यंतचा वेळ असणार आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेचं चिन्ह कुणाचं हा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर पोहोचला आहे. तसेच हा वाद सध्या कोर्टातही (Supreme Court) सुरू आहे. यावरती निर्णय होणं मात्र अद्याप बाकी आहे. ही अटीतटीची लढाई कोण जिंकणार याकडे संपूर्ण देशाचा लक्ष लागलं आहे.\nफक्त पंधरा दिवसांची मुदत\nसध्या ही लढाई सुप्रीम कोर्टात सुरू असल्यामुळे सुप्रीम कोर्टातील निकाल लागेपर्यंत शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये अशी विनंती ठाकरेंकडून करण्यात आलेली आहे. शिवसेनेकडून कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे चार आठवड्यांची मुदत मागितली गेली होती, मात्र शिवसेनेचे ही मागणी धुडकावून लावत निवडणूक आयोगाने फक्त दोन आठवडे म्हणजेच पंधरा दिवसाची मुदत शिवसेनेला दिलेली आहे.\nकाय सिद्ध करावं लागणार\nयामध्ये शिवसेनेला लोकसभा, विधानसभा आणि शिवसेनेच्या राजकीय पक्ष रचनेत कुणाकडे बहुमत आहे हे सिद्ध करावे लागणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आणि नवं सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील आमदारांना शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी असं पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं. हे पत्र एकनाथ शिंदे यांनी 19 जुलै 2022 ला पाठवलं होतं. त्याच्यावरतीच शिवसेनेकडून बाजू मागवण्यात आलेली आहे.\nमागच्या वेळी कुणाच्या निवडी कशा\n2018 मधील कार्यकारणीत उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदी निवड करण्यात आली होती. तर एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर विधानसभेत सरकार स्थापन झाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र आता शिवसेनेतच उभे फूट पडल्याने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कुणाचं आणि कायदेशील व्हीप नेमका कुणाचा आणि कायदेशील व्हीप नेमका कुणाचा हा वाद निर्माण झाला आहे आणि त्यावर निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायचा आहे.\nदोन तारखा ठाकरेंसाठी महत्वाच्या\nया वादाबाबत ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टातही धाव घेण्यात आलीय. या वादात त्यांनी एक नाही दोन नाहीतर तब्बल पाच याचिका दाखल केल्या आहेत. त्याच्यावरती ही सुनावणी पार पडत आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी ही 22 ऑगस्टला पार पडणार आहे. त्यामुळे 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट या दोन तारखा उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेतय\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/tet-scam-ed-to-investigate-tet-scam-case-au177-778250.html", "date_download": "2022-10-07T21:43:21Z", "digest": "sha1:D6UZMD3RPRXN5GUNBZ3PP67EWHYOAWLQ", "length": 10300, "nlines": 192, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nTET Scam: टीईटी घोटाळ्यातही आता ED ची एन्ट्री, मनी लॉड्रींगचा तपास करणार\nटीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी ईडीने टीईटी परीक्षा, आरोग्य विभाग परीक्षा एएमडी म्हाडा परीक्षेशी संबंधित पुणे पोलिसांकडे दाखल झालेल्या घोटाळ्यांची माहिती मागवली.\nअंमलबजावणी संचालनालयाने (ED) टीईटी (Teachers Eligibility Test) घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी ईडीने टीईटी परीक्षा, आरोग्य विभाग परीक्षा एएमडी म्हाडा परीक्षेशी संबंधित पुणे पोलिसांकडे दाखल झालेल्या घोटाळ्यांची माहिती मागवली. शिक्षक पात्रता परीक्षा (TET Scam) या घोटाळ्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जारी करण्यात आली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख यांची नावे या यादित असल्याचे समोर आले.आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची ही नावं आहेत. याबाबत अब्दुल सत्तार यांना विचारले असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. आता या संदर्भातली नवीन माहिती समोर येत आहे. या संदर्भातील चौकशी अंमलबजावणी संचालनालय, ईडी करणार असल्याचं समोर आलंय.\n“महाराष्ट्र | टीईटी (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय” अशा आशयाचं ट्विट ANI संस्थेने केलं आहे.\nकाय म्हणाले शरद गोसावी\nमार्च 2019 मध्ये झालेल्या टिईटी परिक्षेचा निकाल 2022 ला लागला होता. 16,705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.\nशिक्षण संचालक प्राथमिक, शिक्षण संचालक माध्यमिक हे या प्रकरणात पुढील कारवाई करतील\n293 जणांना बनावट प्रमाणपत्र दिले गेले होते पुणे सायबर पोलिसांकडून ही माहिती आली यातून विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द केली गेली\n2021 मध्ये घोटाळा उघड झाला. ज्यात 7 हजार 880 संशयित विद्यार्थ्य्यांची यादी रद्द केली. त्यांची नेमणूक रद्द केली.\nशिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक या प्रकरणात पुढील कारवाई करणार\nदरम्यान याचसंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) म्हणाले, मार्च 2019 मध्ये झालेल्या टीईटी परिक्षेचा निकाल 2020 ला लागला होता. 16,705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. शिक्षण संचालक प्राथमिक, शिक्षण संचालक माध्यमिक हे या प्रकरणात पुढील कारवाई करतील.\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/tag/12th/", "date_download": "2022-10-07T23:11:16Z", "digest": "sha1:LVHMS6FXMEWURRIE6PQUJ7TGZCDZGKFX", "length": 6281, "nlines": 57, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "12th - Bharti jahirat", "raw_content": "\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nकर्मचारी राज्य विमा महामंडळात 594 जागांसाठी भरती\nकर्मचारी राज्य विमा महामंडळात उच्च श्रेणी लिपिक (UDC), स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफ अश्या विविध पदांच्या एकूण 594 भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात...\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/heatlh/popcorn-benefits-popcorn-for-weight-loss-see-other-benefits-mhpj-762881.html", "date_download": "2022-10-07T23:19:12Z", "digest": "sha1:DL5M3U63UH76EX326QLEQUSFPJQL5K42", "length": 9443, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Popcorn Benefits : हलकेफुलके पॉपकॉर्न तुमचंही वजन कमी करतात; इतरही आश्चर्यकारक फायदे – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /heatlh /\nPopcorn Benefits : हलकेफुलके पॉपकॉर्न तुमचंही वजन कमी करतात; इतरही आश्चर्यकारक फायदे\nPopcorn Benefits : हलकेफुलके पॉपकॉर्न तुमचंही वजन कमी करतात; इतरही आश्चर्यकारक फायदे\nपॉपकॉर्नमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात जे शरीरातील चरबी कमी करतात आणि हृदय, रक्तातील साखर, रक्तदाब यासारख्या समस्यांपासून संरक्षण करतात.\nपॉपकॉर्नमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात जे शरीरातील चरबी कमी करतात आणि हृदय, रक्तातील साखर, रक्तदाब यासारख्या समस्यांपासून संरक्षण करतात.\nरोमान्समध्ये ब्रेक; शारीरिक संबंध थांबवल्यावर नेमकं काय होतं\nकितीही वापरला तरी महिन्याच्या आत संपणार नाही स्वयंपाकाचा गॅस; असा जबरदस्त जुगाड\nत्वचेच्या तक्रारी दूर करण्यासाठी मुलतानी माती हा उत्तम उपाय; लगेच ट्राय करून बघा\nअपुऱ्या झोपेमुळे होऊ शकतात 'हे' गंभीर आजार\nमुंबई, 22 सप्टेंबर : थिएटरमध्ये मुव्ही पाहताना असो किंवा घरात हॉलमध्ये सिनेमा पाहणे असो. चित्रपट पाहण्याची मजा पॉपकॉर्नशिवाय अपूर्ण राहते. अनेक फिटनेस फ्रिक लोक ज्यांना त्यांच्या डाएटशी फसवणूक करायला आवडत नाही, ते अनेक वेगवेगळ्या डाएट प्लॅन फॉलो करतात, पण तुम्हाला माहित आहे का की डाएटमध्ये फसवणूक न करता तुम्ही पॉपकॉर्नसारखा चविष्ट स्नॅक्स अगदी पोटभर खाऊ शकता. पॉपकॉर्न खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कारण पॉपकॉर्नमध्ये भरपूर फायबर असते आणि त्यात पॉलिफेनॉलिक कंपाऊंड्स, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि मॅग्नेशियम सारखे घटक असतात. पॉपकॉर्न हे निरोगी संपूर्ण धान्य आहे, जे जगभरात खूप लोकप्रिय आहे. पॉपकॉर्न हे हलके आणि कमी उष्मांक असलेले अन्न आहे, जे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. चला तर मग जाणून घेऊया पॉपकॉर्नचे आरोग्यदायी फायदे.\nवजन कमी करण्यासाठी तुम्ही देखील खाता का सॅलेड मग जरा सांभाळून, कधीही करु नका 'या' चूका\nपॉपकॉर्नचे आरोग्य फायदे मधुमेहाचा धोका कमी करा WebMD.com नुसार, संपूर्ण धान्य खाल्ल्याने तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळतात. नियमितपणे संपूर्ण धान्य खाल्ल्यास टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. विशेषतः मध्यम वयोगटातील महिला आणि पुरुषांसाठी ते फायदेशीर आहे. उच्च रक्तदाब प्रतिबंध पॉपकॉर्नच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाच्या समस्या कमी होतात, मीठाचे सेवन कमी केल्यास उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होतो. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त वजन कमी करणे हे खूप कठीण काम असते. अशा परिस्थितीत, पॉपकॉर्न हा एक उत्तम लो कॅलरी स्नॅक पर्याय आहे, जो वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. पॉपकॉर्न हलके असते आणि तरीही त्याने पोट बराच काळ भरलेले राहते. हे वाचा : पुदिन्यामध्ये आहेत अनेक औषधी गुणधर्म; 7 महत्त्वाचे फायदे येथे जाणून घ्या हृदयाच्या समस्या होतात कमी पॉपकॉर्नमध्ये भरपूर फायबर गुणधर्म असतात, त्याच्या जास्त सेवनाने हृदयविकार तसेच कोरोनरी हृदयरोगाचा धोका कमी होतो. फायबर हा संपूर्ण आहाराचा प्रमुख भाग आहे. तुम्ही तुमच्या नाश्त्यातही याचा समावेश करू शकता.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A2%E0%A4%BE_(%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%AD)", "date_download": "2022-10-07T22:26:35Z", "digest": "sha1:E5ACI756ES2KM4PLOFWUXEE6I2Q2VMAO", "length": 5250, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डान्झिगचा वेढा (१८०७) - विकिपीडिया", "raw_content": "\nडान्झिगचा वेढा हा वेढा डान्झिग शहराला (सध्याचे पोलंडमधील गदान्स्क) येथे मार्च १९ ते मे २४ इ.स. १८०७ पर्यंत फ्रान्सने घातलेला वेढा होता. डान्झिग त्यावेळी प्रशियाच्या आधिपत्यात होते. या वेढ्याच्या काळात प्रशियाला रशियन साम्राज्य व संयुक्त राजतंत्र यांची मदत होती. अंदाजे दोन महिन्यांनतर डान्झिगने शरणागती पत्करली. सप्टेंबरमध्ये डान्झिगला स्वतंत्र शहराचा दर्जा देण्यात आले.\nश्लाइझ • साल्फेल्ड • जेना-ऑर्स्टेड • एर्फर्ट • हॅले • प्रेन्झ्लॉ • पेसवॉक • स्तेतिन • वारेन-नोसेन्तिन • ल्युबेक • पोलंडचा उठाव • माक्देबुर्ग • हामेल्न • झार्नोवो • गोलिमिन • पुल्तुस्क • स्ट्रालसुंड • मोहरुन्जेन • एयलाऊ • ओस्त्रोलेका • कोलबर्ग • डान्झिग • गुटश्टाट-डेपेन • हाइल्सबर्ग • फ्रीडलँड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ मे २०१७ रोजी ११:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/crime/honor-killing-maipuri-murder-uttar-pradesh-crime-brother-shot-his-sister-as-she-did-love-marriage-going-against-the-family-696191.html", "date_download": "2022-10-07T21:29:14Z", "digest": "sha1:XIVA4PJBBHHHPEN457VOCX2RKP6RRZO7", "length": 11449, "nlines": 188, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nऑनर किलिंग नव्हे हे तर हॉरर किलिंग घरातल्यांच्या विरोधात जाऊन Love Marriage, मुलीची गोळ्या घालून हत्या\nHonour killing Mainpuri Murder : 20 एप्रिलला या मुलीनं घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं.\nउत्तर प्रदेश : देशातील ऑनर किलिंगच्या (Honour killing) घटना कधी थांबणार, असा प्रश्न आता उत्तर प्रदेशात घडलेल्या एक थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे पुन्हा उपस्थित झाला आहे. घटना उत्तर प्रदेशच्या (UP crime) मैनपुरीमधली आहे. मैनपुरीच्या कोतवालीमध्ये एक मुलीनं प्रेमविवाह केला. घरातल्यांच्या विरोधात जाऊन केलेला हा प्रेमविवाह (Love marriage) नातलगांना अजिबात पटला नाही. संतापलेल्या नातलगांनी आपल्याच मुलीवर गोळ्या झाडल्या आणि तिचा मुडदा पाडला. नवविवाहित दाम्पत्यावर झाडण्यात आलेल्या आलेल्या गोळ्या मुलीचा तर जागीच मृत्यू झाला आणि नवरा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. घरात घुसून मुलीच्या कुटुंबीयांनी ही हत्या केली. यामध्ये मुलीच्या पतीहीसह त्यांचे कुटुंबीयदेखील जखमी झाले आहेत. सध्या सगळ्याच जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.\nऑनर किलिंगच्या उद्देशानं करण्यात आलेला हा हल्ला पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पथकंही तैनात केली आहे. एकून तीन पथकांच्या मदतीनं फरार मारेकऱ्यांचा शोध घेतला जातो आहे.\nआज तकच्या पुष्पेंद्र सिंह यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार 20 एप्रिलला या मुलीनं घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. मुलाचं नाव करण असून मुलीचं नाव कोमल आहे. करणने फारुखाबादच्या कायमगंजमध्ये राहणाऱ्या कोमलसोबत प्रेमविवाह केला होता.\nगेल्या वर्षापासून त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं. करणच्या घरातले या लग्नासाठी राजी होते. पण कोमलच्या घरातल्यांचा लग्नाला तीव्र विरोध होता. पण कोमलच्या आईनं आपल्या मुलीच्या लग्नासाठी तिची साथ दिली. कोमलच्या आईनं तिचं लग्न करणशी लावून दिलं.\nसासरी असताना घरात घुसून हल्ला\nकोमन आपल्या सासरी राहत होती. पुरोहिताना मोहल्ल्या राहणाऱ्या कोमलच्या घरात तिचा भाऊ आणि काका घुसले. घरात घुसताच करण आणि कोमल यांना त्यांनी गोळी मारली. यानंतर घरातल्यांनी गोळी झाडणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यात दोघे जण जखमी झाले. यानंतर कोमलच्या भावानं आणि काकानं घटनास्थळावरुन पळ काढला. या हल्ल्यात कोमल जागीच ठार झाली. तर तिचा पती गंभीर जखमी झाला. जखमी करणसोबत त्याची आई पिंकी आणि भाऊ रॉकी हे देखील जखणी झाले. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय. या धक्कादायक घटनेनं ऑनर किलिंगच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे.\nटू पीसमध्ये इलियाना डिक्रूझची हवा हवाई\n‘संस्कारी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीचे संस्कारी रूप\nनोरा फतेहीची रिवीलिंग जादू पाहिली का\nमौनी रॉयचा केसरिया रंग…. फोटोशूटसाठी पहा काय केलं\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/12/wireless-iphone.html", "date_download": "2022-10-07T23:05:09Z", "digest": "sha1:O3JXFCCAVTJ74PKHEN4BL7ELFGJNYOQ6", "length": 4880, "nlines": 61, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "2021 मध्ये येणार अ‍ॅपलचा संपूर्णपणे 'वायरलेस आयफोन येणार | Gosip4U Digital Wing Of India 2021 मध्ये येणार अ‍ॅपलचा संपूर्णपणे 'वायरलेस आयफोन येणार - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome तंत्रज्ञान 2021 मध्ये येणार अ‍ॅपलचा संपूर्णपणे 'वायरलेस आयफोन येणार\n2021 मध्ये येणार अ‍ॅपलचा संपूर्णपणे 'वायरलेस आयफोन येणार\n2021 मध्ये अमेरिकेतील टेक कंपनी अ‍ॅपल पूर्णपणे वायरलेस आयफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, असा दावा टेक अ‍ॅनालिस्ट मिंग-ची क्योने आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे.\nआतापर्यंत अ‍ॅपलमध्ये चार्जिंग पोर्ट म्हणून अ‍ॅपलमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळत आले आहे.\nरिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, आता कंपनी संपूर्णपणे वायरलेस फोनच्या टेक्नॉलॉजीकडे वळत आहे.\nअ‍ॅपल हायस्ट एंड आणि हाय एंड मॉडलमध्ये अंतर ठेवणार आहे. ज्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये त्यांच्या सर्वात वरच्या मॉडेलची विक्री जास्त होईल.\nआशा केली जात आहे की, 2021 मध्ये आयफोनच्या टॉप-एंड मॉडल्समध्ये लाइटनिंग पोर्ट नसेल आणि या संपूर्णपणे वायरलेस अनुभव मिळेल. 2020 मध्ये अ‍ॅपल एकूण 5 आयफोन बाजारात आणू शकतो.\nपुढील वर्षी लॉन्च होणाऱ्या मॉडल्समध्ये एक 6.7 इंच हाय-एंड आयफोन, दोन 6.1 इंच आयफोन आणि एक एंट्री लेवल 5.4 इंच आयफोन असेल. त्या सर्व फोनमध्ये 6 गीगाहर्ट्ज आणि 5जी एमएम वेव सपोर्ट मिळेल.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2018/06/blog-post.html", "date_download": "2022-10-07T21:07:49Z", "digest": "sha1:LR2YSVVODZFJLIEYFGRUTYSZYRUKRFX4", "length": 39662, "nlines": 218, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "शरिया म्युच्युअल फंड एक लाभदायक गुंतवणूक | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशरिया म्युच्युअल फंड एक लाभदायक गुंतवणूक\nशरियतमध्ये व्याज घेणे आणि देणे निषिद्ध मानले आहे. मात्र आज जगात मोठ्या प्रमाणात सगळीकडे व्याजरहित अर्थव्यवस्था चालते. या व्याजरहित अर्थव्यवस्थेमुळे अनेक लोक मेटाकुटिला येवून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. त्यामुळे या व्यवस्थेपासून जर दूर जायचे असेल आणि त्याला पर्याय उभा करायचा असेल तर शरियत आधारित अर्थव्यवस्थेला प्राधान्य द्यावे लागेल. शरियत आधारित अर्थव्यवस्थेविषयी समाजात अजूनही मोठ्या प्रमाणात अज्ञानता आहे. त्यामुळे लोक याकडे वळत नाहीत. ज्या गोष्टीत अधिक सुरक्षितता आणि फायदा असतो, त्याबद्दल लोकात जनजागृती फार कमी होते. शरियत आधारित म्युच्युअल फंड म्हणजे नेमके काय त्या कोणत्या कंपन्या आहेत, त्याची कुठे गुंतवणूक होते त्या कोणत्या कंपन्या आहेत, त्याची कुठे गुंतवणूक होते त्याची सुरक्षितता आहे काय त्याची सुरक्षितता आहे काय यासारख्या अनेक प्रश्नांची उकल होणे गरजेचे आहे. शरियत आधारित आर्थिक व्यवस्थेला सर्वापर्यंत पोहोचविणे आणि प्रत्यक्षात त्याचे लोकांना फायदा मिळवून देण्याचे ध्येय समोर ठेवून आपलं करिअर निवडले आहे शेख सलीम छोटुमियाँ यांनी. त्यांची शरिया म्युच्युअल फंडासंबंधी शोधनचे उपसंपादक बशीर शेख यांनी घेतलेल्या मुलाखतीचा काही अंश वाचकांच्या सेवेत सादर.\nशेख सलीम छोटुमियाँ हे मूळ तूळजापुरचे रहिवाशी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून लातूरला स्थायिक आहेत. त्यांच शिक्षण बी.कॉम. एमबीए फायनान्स, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद येथे झालेे. त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात एसबीआय क्रेडिट कार्ड विभाग औरंगाबाद येथून सुरू केली. त्यानंतर ते आयसीआयसीआय बँकेत इन्शुरन्स सेल्स विभागात अॅडव्हायजर म्हणून काही काळ काम पाहिले. त्यानंतर एचडीएफसी बँकेत मॅनेजर या पदावर दीड वर्षे काम केले. येथून नंतर ते बजाज अलायन्झमध्ये दाखल झाले आणि तेथून चीफ ब्रँच मॅनेजर म्हणून निवृत्ती घेतली. सध्या ते अब्बास कॉम्प्लेक्स लातूर येथून शरीयत म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीचे काम करतात.\nआपण शरिया म्युच्युअल फंडाकडे कसे वळलात\n- मला इस्लामबद्दल अधिक माहिती नव्हती. मला कधी तसे वातावरणही भेटले नाही. त्यामुळे शरियत काय असते, त्याची आर्थिक व्यवस्था कशी आहे. याची काहीच माहिती नव्हती. योगायोगाने 2005 मध्ये मला काही कारणास्तव लातूरला यावे लागले. येथे आल्यानंतर समाजातील विविध लोकांशी संपर्क आला. बरेच जण म्हणायचे इस्लाममध्ये व्याज देणे आणि घेणे हराम (निषिद्ध) आहे. त्याला पर्यायी व्यवस्था म्हणजे शरियतवर आधारित गुंतवणूक. मात्र याबद्दल मलाही अधिक माहिती नव्हती. मी जमाअते इस्लामी हिंदच्या कार्यक्रमात यायचो. येथे मला इस्लामबद्दल बरीच माहिती मिळाली. या दरम्यान मध्ये माझा जमाअते इस्लामी हिंदचे प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांच्यासोबत संपर्क आला. त्यांना माहित होते की माझी पदवी बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमधील आहे. त्यांनी माझ्याशी चर्चा करताना मला सांगितले की, मला टॅक्स सेव्हींग बद्दल काही ऑप्शन असतील तर सांगा, जो शरियावर आधारित असेल. शरिया आधारित व्यवस्थेत गुंतवणूक करायची आहे. याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. ते म्हणाले त्याबद्दल तुम्ही माहिती घ्या. त्यांनी मला इस्लाममध्ये आर्थिक देवाण-घेवाणीबद्दल इत्यंभुत माहिती दिली. त्यामुळे मी विचार केला की, आपणाला याबद्दल अधिक माहिती काढावी लागेल. मला कळाले की, यासंबंधी बझाज अलायन्समध्ये एक प्रोव्हीजन आहे.\nत्यांच्यामुळे मला शरियाबद्दल अभ्यास करायची संधी मिळाली. यानंतर मी त्यांना शरियाआधारित गुंतवणूक करून दिली. त्यानंतर मला या क्षेत्रात काम करण्याची उस्तुकता वाढली. जेव्हा-जेव्हा मी लातूरला येई तेव्हा तौफिकसाहेबांची भेट घेई. माझी वारंवार चर्चा होई. गेल्या चार-पाच वर्षांपासून मनात शरियाबद्दल घोळण सुरूच होती. माझे आहे ते काम सोडून ते काम करावं असं वाटत होतं. परंतु, काही कारण सापडत नव्हतं. गेल्या वर्षापासून अशा काही घटना घडत गेल्या की मला लातूरला कायमस्वरूपी स्थायिक व्हावं लागलं आणि जॉब सोडावा लागला. माझ्या वडिलांची तब्येत अचानक खराब झाली आणि कंपनीने माझी बदली चेन्नईला केली. चेन्नईमध्ये राहून अर्धे तामिळनाडूत काम करायचं होतं.तेथे काम करण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो. माझ्या मनात होतं शरियावर आधारित आर्थिक व्यवस्थेत काम करावं. त्यातही शरिया म्युच्युअल फंडमध्ये काम करावं. ज्याची आवश्यकता सर्व भारतीयांना आहे.\nआर्थिक गुंतवणुकीबद्दल समाजात फार मोठी अज्ञानता आहे. थोडी फार माहिती म्हणजे बँकेत जाणे, अकाऊंट काढणे, एफ.डी., आर.डी. अशा योजनाबद्दल माहिती असते. मात्र याच्यापुढे अधिक फायदा देणारे स्त्रोत माहित नसतात. यामध्येही शरिया बेस आहे हे ही माहित नसते.\nम्युच्युअल फंड संबंधात निपुनता यावी म्हणून मी अॅम्फी सर्टिफिकेशन कोर्स (एएमएफआय) केला. जो सरकारी आहे. हा सर्टिफाईड कोर्स केल्यानंतर आपणाला देशात जे काही म्युच्युअल फंड आहेत, त्याचे आपण अधिकृत डिस्ट्रीब्युटर बनू शकतो. आज लातूरमध्ये जवळपास 22 जण आहेत. मात्र त्यामध्ये एकही शरई म्युच्युअल फंड तज्ज्ञ नाही. ती उणीव मी भरून काढलेली आहे. लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड इत्यादी शहरात. म्युच्युअल फंड या क्षेत्रात काम करणार्या जवळपास 38 कंपन्या आहेत. त्यांचे 7 हजार 801 फंड आहेत. मात्र या फंडात शरिया बोर्डाचे जे प्रमाणपत्र आहे ते फक्त दोन कंपन्याकडे आहे. यात विशिष्ट अशी गाईडलाईन पूर्ण करावी लागते. यामधील जे दोन फंड आहेत ते एक टाटा कंपनीकडे आहे आणि दूसरे तौरस कंपनीकडे. या दोन्ही कंपन्याकडे एक-एक शरिया फंड आहे.\nशरिया गाईडलाईन काय आहे\nशरिया गाईड लाईन म्हणते, आपण जेव्हा पैशाची गुंतवणूक करता तेव्हा गुंतवणुकीमध्ये नफा आणि नुकसानीची शक्यता बरोबर असली पाहिजे. दूसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा आम्ही गुंतवणूक करतो तेव्हा म्हणतो की व्याज हराम आहे. हे खरे आहे. कारण याबाबत कुरआन, हदीसमध्ये सांगण्यात आले आहे. या सगळ्या बेसिक गोष्टी माहित आहेत. मात्र पैसा गुंतवणुकीसाठी आपल्याकडे पर्याय नसतो. मग आपण तो पैसा मजबुरीत बँकेत ठेवतो, एलआयसीत गुंतवतो, एफडी, आर.डी. करतो जेथून व्याजाद्वारे आपल्याला अधिक फायदा मिळतो. ऑप्शन नसल्यामुळे मुस्लिम समाज तेथे गुंतवणूक करते. किंवा ऐसेही लोक आहेत जे बँकेत पैसे ठेवतात. मात्र त्याचे व्याज ते दान करतात. स्वतः वापरत नाहीत. मग याला पर्याय काय आहे. कारण आपण बोलताना सरळ म्हणतो की व्याज हराम आहे. मात्र त्याची पर्यायी व्यवस्था तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जी शरियावर आधारित असावी. तर मी फक्त व्याज हराम आहे म्हणून थांबत नाही तर लोक यापासून कसे दूर राहतील आणि शरियतवर आधारित कुठे, कशी, कधी, केव्हा गुंतवणूक करावी यावर सविस्तर मार्गदर्शन करतो. त्यामुळे मी या कामाला स्वतःसाठी पुण्याचे काम समजतो. दूसरी गोष्ट म्हणजे लोक जे पण पैसे या माध्यमातून कमावतील ते हलाल असतील. मार्केटमध्ये काही लोक हलालच्या नावावर धोकेबाजी करतानाही समोर आले आहे. त्यापासूनही वाचावे लागेल. जेव्हा कोणी व्यक्ती स्वतःच्या इमानदारीचा एक रूपयाही गुंतवणूक करतो, तेव्हा विचार करत नाही की तो पैसा जातोय कुठे. त्यापासून फायदा मिळतोय मात्र तो कुठून तर मला फायनान्समध्ये काम केल्यामुळे या सर्व गोष्टींचे अद्यायावत ज्ञान असल्यामुळे मला याची माहिती मिळाली. आणि जे ज्ञान आपल्याला मिळाले ते दुसर्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. म्युच्युअल फंडमधील सगळा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतविला जातो. शेअर मार्केटची अशी हवा बनविली आहे की, शेअर मार्केटमध्ये तोच पैसा गुंतवू शकतो ज्याला त्याचे ज्ञान आहे. ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे. तेच लोक गुंतवणूक करतील. सामान्य माणूस याचा विचार करीत नाही कारण त्याला याचे ज्ञान नसते. आम्हाला जर मोठ व्हायचे असेल, गुंतवणुकीत अधिक फायदा मिळवायचा असेल तर आम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेसोबत सोबत चालावे लागेल. सध्याची राजकीय परिस्थिती सोडून द्या. मेन स्ट्रीममध्ये कोण-कोण येवू शकतो तर मला फायनान्समध्ये काम केल्यामुळे या सर्व गोष्टींचे अद्यायावत ज्ञान असल्यामुळे मला याची माहिती मिळाली. आणि जे ज्ञान आपल्याला मिळाले ते दुसर्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. म्युच्युअल फंडमधील सगळा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतविला जातो. शेअर मार्केटची अशी हवा बनविली आहे की, शेअर मार्केटमध्ये तोच पैसा गुंतवू शकतो ज्याला त्याचे ज्ञान आहे. ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे. तेच लोक गुंतवणूक करतील. सामान्य माणूस याचा विचार करीत नाही कारण त्याला याचे ज्ञान नसते. आम्हाला जर मोठ व्हायचे असेल, गुंतवणुकीत अधिक फायदा मिळवायचा असेल तर आम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेसोबत सोबत चालावे लागेल. सध्याची राजकीय परिस्थिती सोडून द्या. मेन स्ट्रीममध्ये कोण-कोण येवू शकतो जो साधारण कामगारही आहे तो ही आणि उच्च गर्भश्रीमंतही. मला अमीर हल्का म्हणतात की, जसं नमाजमध्ये आम्ही उभे राहतो तेव्हा हे बघत नाही की आजूबाजूला गरीब आहे का श्रीमंत. येथे सगळे लोक समान आहेत. शरिया म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही तसेच आहे. मी काही लोकांना अशी गुंतवणूक करून दिली आहे जे, पाचशे रूपये दररोज कमवतात. म्हणजेच मिस्त्री आहे. त्या लोकांचे पॅनकार्ड काढून दिले त्यांची गुंतवणूक शरिया म्युच्युअल फंडात केली आहे. म्हणजे करोडपती आणि पाचशे रूपये कमाविणाराही सोबतच. सर्वांसाठी नियम सारखे, सर्वांना त्याप्रमाणे फायदाही. दूसरी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडात पैसा गुंतवायचा असेल तर आवश्यक नाही की त्याचे संपूर्ण ज्ञान असावे. कारण हे काम फंड मॅनेजमेंटचे काम आहे. जे की टाटा आणि तौरसचे शरिया फंड आहेत. या सगळ्या गोष्टी कायदेशीर आहेत. ज्यांच्याकडे बँक अकाऊंट आहे, पॅनकार्ड आहे, तेच लोक गुंतवणूक करू शकतात. मी सांगितले की या गुंतवणुकीत नफा आणि नुकसान दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्हाला एवढे टक्के जास्त पैसा मिळेल किंवा मिळणार नाही. कंपनी फायद्यात तर तुम्ही फायद्यात. कंपनी तोट्यात तर तुम्हीही तोट्यात. परंतु, आतापर्यंत शरिया गुंतवणुकीत गेल्या 30 वर्षात कोणीही नुकसानीत आलेले नाही.\nसमजा तुमच्याकडे जर 10 हजार रूपये आहेत आणि तुम्हाला मार्केट मध्ये शेअर घ्यायचा आहे. तर तुम्ही एक किंवा दोन शेअर्स घ्याल. मारूती कंपनीचा एखादा शेअर घ्यायचा आहे तर त्याची किमत 9 हजार रूपये आहे. तर तुम्ही फक्त 1 शेअर घ्याल. शेअर मार्केट अप डाऊन होत राहते. जर शेअर मार्केट कोलॅप्स झाले तर तुमच्या पैशाची किंमत अर्ध्यावरही येवू शकते. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये रिस्क जास्त असते. म्युच्युअल फंडात रिस्क कमी आणि फायदा वाढत राहतो. यामध्ये सगळ्यांचे पैसे एकत्रित करून गुंतवणूक केली जाते. शेअर मार्केटमध्ये मात्र वैयक्तिक गुंतवणूक राहते. म्युच्युअल फंडातील पैसा एकाच कंपनीत जात नाही. जवळपास तो 70 ते 80 कंपन्यांमध्ये जातो. त्यामुळे एखाद्या कंपनीत नुकसान झाले तर बाकीच्या कंपन्या ह्या स्थिर असतात किंवा वाढत असतात. नुकसान अधिक होत नाही. त्यामुळे रिस्क कमी राहते. फायदा जास्त होण्याची शक्यता असते.\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची पद्धत कशी आहे\nम्युच्युअल फंड म्हणजे ”एकापेक्षा जास्त लोकांच्या समुहाने काही उद्देशपूर्ती करण्यासाठी एकत्र येवून केलेली गुंतवणूक म्हणजे म्युच्युअल फंड होय.” यामध्ये दोन प्रकारे पैसा गुंतवू शकतो. महिनावर गुंतवणूक राहते ज्याला आम्ही एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान). यामध्ये महिना 500 रूपये गुंतवणूक करू शकतो. दूसरा प्रकार म्हणजे लमसम. लमसम म्हणजे एकदाच. यामध्ये कमीत कमी 5000 रूपयांपासून गुंतवणूक सुरू राहते. म्युच्युअल फंडाचा अजून एक फायदा असा आहे की, हे ओपन एंडेड स्कीम राहते. यामध्ये कुठलाही बंदीस्त काळ नसतो. जसं आपण एफ डी करतो तसं यामध्ये नसतं. तुम्ही कधीही पैसा गुंतवू शकता आणि कधीही काढू शकता. जसं दुसर्या स्कीममध्ये वेळेच्या आत पैसा काढताना मोठी कपात केली जाते. तशी शरिया म्युच्युअल फंडात तेवढी कपात होत नाहीत. हा मूळ फरक आहे.\nबँकेच्या कुठल्याही योजनेपेक्षा अधिक नफा शरियत फंडात मिळतो. मागील 20 वर्षातील शरीया फंडाची सरासरी काढली तर त्याचा परतावा 18 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. काही वेळा 35 टक्केही परतावा मिळाला आहे. यामध्ये अकाऊंट काढण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाऊंट चेक लागते. रोख व्यवहाराची परवानगी नाही.\nशरिया बेसिस फंड म्हणजे नेमके काय\nज्यावेळेस आम्ही पैशाची गुंतवणूक करतो त्यावेळी शरिया गाईडलाईनने चालणार्या कंपन्या या पैशाची गुंतवणूक वैध कार्यात करतात. त्या व्याजाधारित कामात गुंतवत नाहीत, त्या दारूच्या फॅक्टरीला पैसा लावत नाही, शरियतनुसार निषिद्ध फुड्स कंपन्यात गुंतवणूक करत नाहीत, तसेच मीडिया आणि इंटरटेनमेंट यातही गुंतवणूक करत नाही. त्या इस्लामिक नियमानुसार चालणार्या कंपन्यातच गुंतवणूक करतात. बाजाप्ता त्याची यादी लाभधारकाला दिली जाते. आपला पैसा अॅटोमोबाईल सेक्टर, रिअल इस्टेट सेक्टर, कंझ्युमर ड्युरेबलचे सेक्टर, पेट्रो केमिकल , सिमेंट इत्यादी शरियानुसार वैध कंपन्यात लागतो. डेली बेसिसवर आपण आपला पैसा चेक करू शकता. 24 मे 1996 पासून टाटाचा शरिया फंड सुरू आहे. तर तौरसने 2005 मध्ये शरिया फंडाची सुरूवात केलेली आहे. येणार्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेची गती वाढणार आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढत आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून मेन स्ट्रीममध्ये येण्याचा हा ही एक मार्ग आहे. पुणे, मुंबई आणि मेट्रोसिटीचे बहुतेक लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. यामध्ये गुंतवणुकदाराला शिक्षणाची काही अट नाही. मात्र माझं म्हणण आहे की, डिस्ट्रीब्युटरन त्याला याचं शिक्षण दिलं पाहिजे. तेव्हा तो याची अपडेट माहिती ठेवेल.\nमी म्युच्युअल फंडची कन्सल्टींग करतो. गुंतवणुकदाराला त्याची इत्यंभुत माहिती देतो. त्याला रोजच्या रोज अपडेटींग माहिती मागितल्यास देतो. मार्केटमधील उतार चढाव आदी सर्व माहिती देतो. मी जास्त करून सध्या शरिया म्युच्युअल फंडाबाबत अधिक जनजागृती करत आहे. कारण यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक अधिक फायदा आहे.\nजर आपणास शरीया फंडात गुंतवणूक करावयाची असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास सलीम शेख - 9860312005 यांच्याशी संपर्क करावा.\nईद : मानवप्रेमाचे निमंत्रण\nएक प्रदुषण मुक्त नितांत सुंदर अनुभव - ईद-उल-फित्र\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\nमाझी पहिली रमजान ईद\nरमजान-सांस्कृतीक एकात्मीक समाजरचनेची प्रेरणा\nआदर्श माणूस घडवणारा पवित्र महिना\nरमज़ान आणि लहान मुलं\nसमस्त देशबांधवांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा\nमानवता प्राप्तीचा मार्ग रमजान\nमानवतेला ईशभयाचा संदेश देणारा ‘रोजा’\n१५ जून ते २८ जून\nकर्नाटकातील राजकीय नाटकाचा अन्वयार्थ\nइऩफा़क (खर्च करणे) : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०८ जून ते १४ जून\nबेसहारा गरिबांना ‘रम़जान किट्स’चे वितरण\nवास्तवाचा शोध घेणारे ‘शोधन’\nजकात : गरीबी उन्मूलनाचा अद्वितीय मार्ग\nअद्भुत लेखनशैलीचे जनक मौलाना मौदूदी\nनकबा : इस्राईल-पॅलेस्टाईन संघर्षाची सुरूवात\nखरा इतिहास लोकांसमोर आणावा\n०१ जून ते ०७ जून २०१८\nऐच्छिक व मध्यरात्रीनंतरची नमाज : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमीडियाचे आव्हान स्विकारायला हवे\nहामिद अन्सारी, जिन्नांची फोटो आणि एएमयूमधील धिंगाणा\nशरिया म्युच्युअल फंड एक लाभदायक गुंतवणूक\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/russsia-ukraine-war-life-on-the-road-for-ukraines-displaced-and-homeless-citizens/articleshow/90092014.cms?utm_source=nextstory&utm_medium=referral&utm_campaign=articleshow", "date_download": "2022-10-07T22:48:41Z", "digest": "sha1:35UROA3DVGKCSMCCYG2MTGJBKJH3QMGO", "length": 16298, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nUkraine Crisis: युक्रेनमधून २० लाख निर्वासित, कीव्हसह शहरांमधून नागरिकांच्या जत्थ्यांचे स्थलांतर\nRussia Ukraine War : कीव्हच्या उपनगरांमध्ये जोरदार बॉम्बफेक सुरू आहे. दिवस-रात्र होत असलेल्या बॉम्बच्या वर्षावांमुळे मृतदेहही ताब्यात घेता आलेले नाहीत. भटकी कुत्री मृतदेहांभोवती फिरत असून, हे चित्र खूपच विदारक आहे, असं कीव्हच्या महापौरांनी म्हटलंय.\nयुक्रेनमधून २० लाख निर्वासित, कीव्हसह शहरांमधून नागरिकांच्या जत्थ्यांचे स्थलांतर\nरशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनच्या शहरांमधून लाखो नागरिकांनी स्थलांतर केले. शहरांमधून नागरिकांनी भरलेल्या बस बाहेर पडत असल्याचे चित्र मंगळवारी दिसून येत होते. युक्रेनमधील निर्वासितांची संख्या २० लाखांपर्यंत पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nरशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या युरोपातीस सर्वांत मोठ्या युद्धाचा भडका उडाला आहे. राजधानी कीव्हसह प्रमुख शहरांना रशियाने लक्ष्य केले आहे. त्यामुळे, शहरांमध्ये अन्न, पाणी आणि औषधांचा तुटवडा भासत आहे. रशियाने हल्ले तीव्र केल्यानंतर नागरिकांनी शहरातून बाहेर पडत आहे. पूर्वेकडील सुमी शहर आणि मारीपोल या बंदरातून नागरिकांनी भरलेल्या बस दिसून येत होत्या. 'सुमी शहरातून ग्रीन कॉरिडॉर देण्यात आला आहे. त्यामुळे, तेथे अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे,' असे युक्रेन सरकारकडून ट्वीटमध्ये म्हटले आहे. अनेक बस अन्य शहरांकडे जात असल्या, तरीही बहुतांश नागरिक देशातून बाहेर पडण्याला प्राधान्य देत असल्याचे सांगण्यात आले. संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतरांच्या संघटनेचे प्रवक्ते सफा एमसेहली यांनी केलेल्या ट्वीटप्रमाणे युक्रेनच्या २० लाख नागरिकांनी देश सोडला आहे.\n'कीव्हच्या उपनगरांमध्ये जोरदार बॉम्बफेक सुरू आहे. दिवस-रात्र होत असलेल्या बॉम्बच्या वर्षावांमुळे मृतदेहही ताब्यात घेता आलेले नाहीत. भटकी कुत्री मृतदेहांभोवती फिरत असून, हे चित्र खूपच विदारक आहे,' अशी प्रतिक्रिया कीव्हचे महापौर अनातोल फेडोरुक यांनी व्यक्त केली.\nWatch Video: जगणार आणि मरणारही तुझ्यासोबतच युद्धभूमीवर फुलले प्रेमाचे अंकुर...\nUkraine Crisis: युक्रेनच्या महिला स्वस्त आणि सेक्सी; 'महिला दिनी' नेत्याच्या 'दरिद्री' विचारांची पोलखोल\n५२ भारतीय खलाशांची मायकोलिव्हमधून सुटका\nमायकोलिव्ह बंदरावर अडकलेल्या ७५ भारतीय खलाशांपैकी ५२ जणांची सुटका करण्यात भारतीय दूतावासाला यश आले आहे. उर्वरित २३ खलाशांची सुटका करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात येणार आहे. या खलाशांबरोबरच लेबॅनॉनचे दोन आणि सीरियाच्या तीन जणांची सुटका करण्यात आली. या सर्वांना एका बसमधून बाहेर काढण्यात आल्याची माहिती भारतीय दूतावासाने ट्विटरवरून दिली आहे. 'ऑपरेशन गंगा'मधून आतापर्यंत १७ हजार १०० जणांची सुटका करण्यात आली आहे.\n'भारतावर निर्बंध मूर्खपणाचे ठरेल'\nभारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी देश आहे. त्यामुळे, रशियाकडून एस-४००सारखी क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली घेतल्यावरून भारतावर निर्बंध लादणे मूर्खपणाचे ठरेल, अशी प्रतिक्रिया अमेरिकेतील सिनेटर टेड क्रुझ यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार, रशिया, इराण, उत्तर कोरिया यांसारख्या देशांकडून मोठ्या प्रमाणात व्यवहार केल्यास, त्या देशावर कडक निर्बंध लादता येतात. रशियाने २०१४मध्ये क्रायमिया गिळंकृत केल्यानंतर आणि २०१६च्या अध्यक्षीय निवडणुकीतील हस्तक्षेपावरून अमेरिकेने रशियाकडून शस्त्रखरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.\n'भारतासाठी रशियाशी मैत्री अपरिहार्य'\nरशियाबरोबरील संबंध ही भारतासाठी अपरिहार्यता आहे, असे सांगून अमेरिकेचे माजी राजनैतिक अधिकारी अतुल केशाप यांनी भारताच्या तटस्थ राहण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. रशियाविरोधातील संयुक्त राष्ट्रांमधील दोन मतदानामध्ये भारताने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, अमेरिकेतील लोकप्रतिनिधींनी भारतावर टीका सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, केशाप यांनी भारताचे समर्थन केले आहे.\nUkraine Crisis: मानवी कॉरिडॉरचे उल्लंघन, रशिया-युक्रेनचे परस्परांवर आरोप\nUkraine Crisis: युक्रेन जवानांच्या जिद्दीनं भारावला भारतीय तरुण, रशियाविरुद्ध युद्धात सहभागी\nमहत्वाचे लेखUkraine Crisis: मानवी कॉरिडॉरचे उल्लंघन, रशिया-युक्रेनचे परस्परांवर आरोप\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमुंबई ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा ते दिघेंच्या मृत्यूचं ठाकरे कनेक्शन, मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nमुंबई धाकधूक वाढली, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या हालचाली\nक्रिकेट न्यूज उभारायला गेले MS Dhoni चा मेणाचा पुतळा, पण धोनीची झाली अनहोनी, पाहा भन्नाट memes\nदेश वंदे भारत एक्स्प्रेस दुसऱ्यांदा दुर्घटनाग्रस्त, सलग दुसऱ्या दिवशी वेगवान ट्रेनचा खोळंबा\nमुंबई आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन\nसातारा माझ्या भावाचं माझ्यावर खूपच प्रेम, मी माझा जितका प्रचार करत नाही, तितका...: उदयनराजे\nमुंबई ठाकरेंबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर विनायक राऊतांकडून राणेंची कोंडी करण्याचा प्रयत्न\nक्रिकेट न्यूज कमजोर पाकिस्तानने रोखला भारतीय संघाचा विजयरथ, आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला हरवलं\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00021316-34002A68003200B00.html", "date_download": "2022-10-07T22:46:26Z", "digest": "sha1:JLN3PIEOH5UVAIVMOHBGPVCYQWCYPFCT", "length": 13321, "nlines": 274, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "34002A68003200B00 | Omron Automation & Safety Services | अवर्गीकृत | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर 34002A68003200B00 Omron Automation & Safety Services खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 34002A68003200B00 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 34002A68003200B00 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/280-companies/", "date_download": "2022-10-07T22:19:57Z", "digest": "sha1:AYZ2S64KLCJ3AC4T3YMMOHCG7G7PMIGV", "length": 7698, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "280 companies Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nकाश्‍मीरच्या अतिसंवेदनशील भागात सैन्याच्या 280 तुकड्या तैनात\nश्रीनगर : जम्मू काश्‍मीरमध्ये मागील काही दिवसांपासून सैन्याचा अतिरिक्‍त ताफा तैनात करण्यात येत असल्याने इथल्या नागरिकांसह राजकीय नेत्यांमध्ये अनेक चर्चा ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/bulandshahr/", "date_download": "2022-10-07T22:39:00Z", "digest": "sha1:TKCAPHAZ6U5O64HC3OCBSEPYRYWOFQBZ", "length": 10607, "nlines": 216, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Bulandshahr Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nबुलंदशहरच्या तान्या सिंगला १२वीचा परीक्षेत 500 पैकी 500 गुण\nबुलंदशहर - सीबीएसई बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील रहिवासी असलेल्या तान्या सिंगने 12वीच्या परीक्षेत 500 ...\nपॉलिटेक्निक कॉलेजच्या वसतिगृहात सिलेंडरचा स्फोट, 10 विद्यार्थ्यांसह 13 जण होरपळले\nबुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात 10 विद्यार्थ्यांसह 13 जण भाजले गेले ...\nCrime | अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने ‘खून’; पत्नीसह दोघे अटकेत\nबुलंदशहर - अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतिचा पत्नीने प्रियकर आणि भावाच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही घटना ...\n महिला PSIची चिठ्ठी लिहून आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलेय, ‘हे माझ्या कर्माचे फळ’\nबुलंदशहर - उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील अनूपशहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना ...\nआता बुलंदशहरबाबत भाजप गप्प का – खासदार हुसेन दलवाई\nनवी दिल्ली : पालघरमधील साधूंच्या हत्येवरून राजकारण करणारे आता बुलंदशहरातील साधूंच्या हत्येबाबत गप्प का असा सवाल कॉंग्रेसचे नेते आणि खासदार ...\nकरोनामुळे घट्ट झाली माणुसकी :मुस्लिम बांधवांनी दिला प्रेताला खांदा\nनवी दिल्ली : करोनामुळे एकीकडे सर्वजण शहराला दूर करून आपल्या गावाला जवळ करत आहेत. त्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यामुळे कोणत्याही ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/massive-discounts-on-realme-9-5g-and-galaxy-f23-5g-see-offers-and-features/articleshow/92697181.cms", "date_download": "2022-10-07T22:21:55Z", "digest": "sha1:5YNASQZIEYXZU2HY53B2MAQHERIMEDHE", "length": 12997, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nSmartphones Offers: Realme 9 5G सह सॅमसंगच्या 'या' जबरदस्त स्मार्टफोनवर तब्बल १३ हजारांपर्यत सेव्हिंगची संधी\nRalme Offers: ब्रँडेड स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करण्याची जबरदस्त संधी तुमच्याकडे आहे. भन्नाट ऑफरसह Galaxy F23 5G आणि Realme 9 5G कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. पाहा डिटेल्स.\nReality 9 5G वर देखील डिस्काउंट\nफोनचे फीचर्स आहेत जबरदस्त\nनवी दिल्ली: Samsung Galaxy F23 5G Price: नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ६ जुलै ते १० जुलै दरम्यान फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक्स सेलचे आयोजन करण्यात येत असून सेलमध्ये कंपनी Sasmung, Vivo, Oppo सारख्या ब्रँडेड स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर देत आहे. सॅमसंगचा परवडणारा 5G स्मार्टफोन Samsung Galaxy F23 5G या सेलमध्ये कमी किंमतीत खरेदी करता येईल. याशिवाय, बँक ऑफरसह कमी किमतीत Realme 9 5G खरेदी करण्याची संधी देखील आहे. दोन्ही फोनवर १२,५०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे. Galaxy F23 5G आणि Realme 9 5G वरील सवलती आणि ऑफरचे डिटेल्स पाहा.\nवाचा: Amazon-Flipkart वरून शॉपिंग करतांना डोक्यात ठेवा 'या' गोष्टी, राहा सेफ, अन्यथा होणार नुकसान\nSamsung Galaxy F23 5G स्मार्टफोन Citi क्रेडिट आणि डेबिट कार्डने खरेदी केल्यास १० टक्के ऑफ मिळेल. त्याच वेळी, बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड आणि सिटी क्रेडिट कार्ड ईएमआयद्वारे व्यवहारांसह फोन खरेदीवर १० टक्के सूट मिळेल. Flipkart Axis Bank कार्डवर ५ टक्के कॅशबॅक देखील मिळेल. फोन डेबिट कार्ड EMI द्वारे १००६ रुपये प्रति महिना खरेदी कर ता येईल . फोनवर १२,५०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे.\nवाचा: भारतात एन्ट्री साठी तयार Redmi K-Series चे स्मार्टफोन्स, फीचर्स असतील जबरदस्त, पाहा डिटेल्स\nSamsung Galaxy F23 5G स्मार्टफोनमध्ये ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज आहे. फोनमध्ये ६.६ इंच फुलएचडी+ डिस्प्ले आहे. सॅमसंगच्या या फोनला ५० मेगापिक्सल प्रायमरी, ८ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल्सचे तीन सेन्सर देण्यात आले आहेत. हँडसेटमध्ये ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी, Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर देण्यात आला आहे.\nRealme 9 5G : १५,९९९ रुपयांमध्ये\nडेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे Realme 9 5G स्मार्टफोन खरेदी करण्यावर ३,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळेल. ५ टक्के कॅशबॅक फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डद्वारे उपलब्ध असेल. फोन घेतल्यावर गाना प्लस सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी मोफत उपलब्ध असेल. हँडसेट १००६ प्रति महिना डेबिट कार्ड ईएमआयवर मिळू शकतो. हँडसेटवर १२,५०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. स्मार्टफोनमध्ये ४ GB रॅम देण्यात आली आहे. फोनमध्ये ६४ GB इनबिल्ट स्टोरेज आहे. जे, मायक्रोएसडी कार्डद्वारे १ TB पर्यंत वाढवता येते.\nवाचा: SIM Vs E SIM: ईझी ट्रान्सफर ते एका वेळी ५ नेटवर्कचा वापर, पाहा E SIM चे 'हे' बेनेफिट्स\n लाँचआधीच iPhone 14 ची प्री-बुकिंग सुरू, किंमत वाचून बसेल धक्का; पाहा काय आहे खास\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nसिनेन्यूज विजय देवरकोंडा आणि रश्मिका लपत-छपत कुठे निघाले Video पाहून नेटकऱ्यांनी लावायचा तो अंदाज लावलाच\nइलेक्ट्रॉनिक्स 8GB रॅम आणि 10,090 mAh बॅटरी पावर असणाऱ्या या Samsung Tabs खरेदी करा आणि मिळवा ₹18000 इतका जबरदस्त डिस्काउंट\nआर्थिक राशीभविष्य आर्थिक राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२२ : जाणून घ्या उद्याचा दिवस कोणासाठी ठरेल धनप्राप्तीचा\nमुंबई आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन\nसोलापूर Breaking : भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआयची जीवे मारण्याची धमकी; क्राईम ब्रँचकडे तपास\nमुंबई धाकधूक वाढली, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या हालचाली\nक्रिकेट न्यूज कमजोर पाकिस्तानने रोखला भारतीय संघाचा विजयरथ, आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला हरवलं\nक्रिकेट न्यूज उभारायला गेले MS Dhoni चा मेणाचा पुतळा, पण धोनीची झाली अनहोनी, पाहा भन्नाट memes\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/india-vs-zimbabwe-this-players-career-ended-before-it-started/", "date_download": "2022-10-07T23:29:13Z", "digest": "sha1:I7UJAULHV5DOYT3XZ3CHNHLSYF2JCEMZ", "length": 5783, "nlines": 39, "source_domain": "mahaupdate.in", "title": "India vs Zimbabwe : सुरू होण्यापूर्वीच संपली \"या\" खेळाडूची कारकीर्द! - Maha Update", "raw_content": "\nHome » India vs Zimbabwe : सुरू होण्यापूर्वीच संपली “या” खेळाडूची कारकीर्द\nIndia vs Zimbabwe : सुरू होण्यापूर्वीच संपली “या” खेळाडूची कारकीर्द\nनवी दिल्ली : भारतीय संघाने झिम्बाब्वे विरुद्धची मालिका आधीच जिंकली आहे. अशा स्थितीत कर्णधार केएल राहुलने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले. त्याने दीपक चहर आणि आवेश खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. उत्कृष्ट फॉर्म असूनही एक खेळाडू बेंचवर बसला होता. या खेळाडूला पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये संधी मिळाली, पण तरीही त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.\nझिम्बाब्वे दौऱ्यावर शाहबाज अहमदचा जखमी वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तर शाहबाज अहमद उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. खतरनाक गोलंदाजी आणि धडाकेबाज फलंदाजीत तो निष्णात खेळाडू आहे. शाहबाज अहमदला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी मिळाली. झिम्बाब्वे दौरा त्याच्यासाठी दुःस्वप्नापेक्षा कमी राहिला नाही.\nशाहबाज अहमदने आयपीएल 2022 मध्ये अप्रतिम कामगिरी केली, ज्याचे परिणाम त्याला आता मिळाले आहेत. शाहबाज अहमदने आयपीएल 2022 मध्ये आरसीबीसाठी 16 सामने खेळले, ज्यात त्याने चार विकेट घेतल्या. त्याचवेळी त्याने या 16 सामन्यांमध्ये 219 धावा केल्या. अहमदने 27.38 च्या सरासरीने या धावा केल्या आणि त्याचा स्ट्राइक रेट 120.99 आहे. शाहबाज अहमद किलर बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये पारंगत आहे.\nतिसऱ्या वनडेमध्ये कर्णधार केएल राहुलने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले. त्याने दीपक चहर आणि आवेश खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. त्याचबरोबर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. टीम इंडियाला तिसरा एकदिवसीय सामना जिंकून क्लीन स्वीप करायचा आहे.\nतिसऱ्या वनडेसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन :\nकेएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, संजू सॅमसन, दीपक हुडा, इशान किशन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, आवेश खान, दीपक चहर, कुलदीप यादव.\nIND vs SA : तिसऱ्या T20 मध्ये “हे” 2 खतरनाक खेळाडू घेतील कोहली-राहुलची जागा अशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग 11\n‘हे’ तीन खेळाडू टी-20 वर्ल्ड कपमध्ये घेऊ शकतात रवींद्र जडेजाची जागा..\nTeam India : भारतीय संघात पुनरागमन करणे “या” तीन खेळाडूंसाठी अशक्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AA%E0%A5%AB", "date_download": "2022-10-07T23:11:08Z", "digest": "sha1:IAXQLZS7ME2T4EPCRA754LANG7IBGU6H", "length": 8138, "nlines": 319, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)\nदोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)\n→‎समाप्ती: आंतरविकी दुवे काढले, विकिडेटावरून थेट दुवे असतील\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:645, rue:645\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mhr:645\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lmo:645\nवर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:645 жыл\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: tt:645 ел\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:645\nr2.6.4) (सांगकाम्याने काढले: ksh:Joohr 645\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:645\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ur:645ء\nr2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: et:645\nसांगकाम्याने वाढविले: vi:645; cosmetic changes\nसांगकाम्याने वाढविले: os:645-æм аз\nसांगकाम्याने बदलले: new:सन् ६४५\nसांगकाम्याने वाढविले: fa:۶۴۵ (میلادی), vo:645\nसांगकाम्याने वाढविले: lt:645 m.\nई.स. ६४५ वरील दुवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/batting-against-sunrisers-hyderabad/", "date_download": "2022-10-07T22:49:56Z", "digest": "sha1:Q4GVPUZFP4TAEO4SK5A6UA43GVLBDWYC", "length": 7765, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "batting against Sunrisers Hyderabad Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nIPL 2021 : सनरायजर्स हैद्राबादविरुद्ध बेंगळुरूची फलंदाजी\nचेन्नई - इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. स्पर्धेतील ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/jalgaon-news-ajit-pawar-allegation-state-goverment-rds84", "date_download": "2022-10-07T21:14:50Z", "digest": "sha1:7DLKL5WWHONRXBTH5PKOYDXVIMWEACAL", "length": 5861, "nlines": 64, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Ajit Pawar: काही तरी गाजर दाखविल्‍यानेच प्रकल्‍प बाहेर गेला; अजित पवार यांचा आरोप", "raw_content": "\nAjit Pawar: काही तरी गाजर दाखविल्‍यानेच प्रकल्‍प बाहेर गेला; अजित पवार यांचा आरोप\nकाही तरी गाजर दाखविल्‍यानेच प्रकल्‍प बाहेर गेला; अजित पवार यांचा आरोप\nजळगाव : मुख्यमंत्र्यांचे वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या आशीर्वादाने ते मुख्यमंत्री झाले आहेत. आता त्यांनी हा प्रकल्प राज्यात आणावा; असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लगावला. तसेच हा प्रकल्प बाहेर जात असेल तर कुठे तरी गाजर दाखवले जात असल्याचा आरोप अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. (Jalgaon News Ajit Pawar News)\nBuldhana: मुले चोरणारी महिला समजून तृतीय पंथियाला जमावाची बेदम मारहाण...\nराज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज (ता. १५) जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत (Chalisgaon) चाळीसगाव, पाचोरा व जळगाव येथे मेळावे होणार आहेत. जळगावात आगमन झाल्‍यानंतर त्‍यांनी माध्‍यमांशी संवाद साधला.\nविरोधी पक्षनेते अजित पवार म्‍हणाले, की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाबाबत राज्यात आवश्यक ती सर्व प्रक्रिया पार पडलेली होती. परंतु, राज्यात येणारा प्रकल्प हा दुसऱ्या राज्यात जात असेल तर हे कदापिही खपवून घेणार नाही. यामुळे दीड लाख लोकांचा रोजगार हिरावला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून काहीही करा पण हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणा असेही अजित पवार म्हणाले.\nहा प्रकल्प बाहेर जात असेल तर कुठे तरी गाजर दाखवल जात असल्याचा आरोप करत हा प्रकल्प आधी आणावा आणि दुसरा प्रकल्प उभारायचा असेल तर उभारा. प्रकल्पासंदर्भात कुणीही राजकारण करू नये. राज्याच्या हिताचे जे जे प्रकल्प असतील ते प्रकल्प राज्यात आले पाहिजे; असे मत पवार यांनी व्‍यक्‍त केले.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/ncp-chief-sharad-pawar-and-supriya-sule-interview-by-pune-doctor-association-in-pune-news-update-vvg94", "date_download": "2022-10-07T22:51:05Z", "digest": "sha1:RQPLGFFGWMIVLO3V7X6Q7XS7ILQ67NDT", "length": 6471, "nlines": 61, "source_domain": "www.saamtv.com", "title": "sharad pawar News |एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात : शरद पवार", "raw_content": "\nSharad Pawar | एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात : शरद पवार\n'सुप्रिया सुळे राजकारणात येईल असं वाटलं नव्हतं. पण एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात.\nSharad Pawar News : 'सुप्रिया सुळे राजकारणात येईल असं वाटलं नव्हतं. पण एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात. मुलीबद्दल अंदाज कसं चुकू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणावं लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका जुन्या मुलाखतीमधील अंदाजावर भाष्य केले.\nराज ठाकरेंनी सांगितला अजय-अतुल यांच्या आईचा 'तो' किस्सा; महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचे केले वर्णन\nपुणे डॉक्टर्स असोसिएशनचा वतीने एक मुलगी असणाऱ्या कुटुंबांचा सन्मान करण्यात येत आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणाऱ्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेण्यात येत आहे. या कार्यक्रमातील मुलाखतीत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली.\nया मुलाखतीमधील कार्यक्रमात शरद पवारांची एक जुनी मुलाखत लागली, यात शरद पवार म्हणाले, माझी मुलगी लगेच राजकारणात पडेल असं नाही. तिला तशी इच्छा पण नाही'. या चुकलेल्या अंदाजावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेही खळकळून हसले. या चुकलेल्या अंदाजावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, 'एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात. मुलीबद्दल अंदाज कसं चुकू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणावं लागेल'.\nआदित्य ठाकरेंच्या १०० खोक्यांची पोलखोल करू; शिंदे गटातील नेत्याचा इशारा\nशरद पवार हे स्त्री दृष्टीकोनावर पुढे म्हणाले, 'माझ्यावर झालेल्या संस्काराचे श्रेय माझ्या आईचे आहे. घरात कोणी शिक्षित नव्हते. आईने आम्हाला शिकवलं. त्यामुळे माझा स्त्रियांविषयी विचार करण्याची मानसिकता तेव्हा पासूनच बदलली. निवडणुकीला उभा राहिलो आणि एका गावात गेलो. तिथे लोक म्हणाले तुम्हाला मत देतो पण एकच मुलगी अग्नी कोण देणार म्हणजे लोकांना अग्नीची चिंता'.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/vegetables-price-hike-double-in-mumbai-vegetables-price-list-today-ssd92", "date_download": "2022-10-07T22:16:34Z", "digest": "sha1:6BGNGRNA7UAUQGOXVDLNDA7INGPEWT5V", "length": 6017, "nlines": 69, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Vegetables Price Today | भाज्यांचे दर कडाडले; आठवडाभरात दुपटीने वाढ", "raw_content": "\nVegetables Price : भाज्यांचे दर कडाडले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री\nमार्केटमध्ये भाज्यांचे दर तब्बल 40 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत.\nभूषण शिंदे, साम टिव्ही मुंबई\nVegetables Price In Mumbai : आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आणखी एक चिंताजनक बातमी आहे. कारण, पेट्रोल-डिझेल, गॅस पाठोपाठ आता भाज्यांचे दर (Vegetables) कडाडले आहेत. लहरी पावसाचा शेतीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातच इंधन दरवाढीमुळे भाजीपाला महागला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटला कात्री लागली आहे. (Vegetables Price List Today In Mumbai)\nGram Panchayat Election 2022 : ५ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर; शिंदे गटानं खातं उघडलं\nभाज्यांच्या दरात मोठी वाढ\nगेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाचा परिणाम भाज्यांच्या दरांवर झाला आहे. मुंबईच्या (Mumbai) दादर मार्केटमध्ये भाज्यांचे दर तब्बल 40 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत.\nकांदा-बटाटा आणि कोबी वगळता बहुतांश सर्व भाज्यांचे दर (Price) तेजीत आहेत. घाऊक बाजारांत कवडीमोल दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी काही भाज्या फेकून दिल्यात. पुरेशी लागवड न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक कमी होत आहे. (Mumbai APMC Market Rates Today)\nMaharashtra Politics : मुंबई जिंकण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा नवा प्लॅन; ठाकरेंना धक्का\nकाय आहेत भाजीपाल्याचे नवीन दर\nटोमॅटो - आधी 30 ते 40 रुपये आणि आता 60ते 70 रुपये प्रति किलो\nभेंडी - आधी 30 ते 40 रुपये आणि आता 60ते 70 रुपये प्रति किलो\nकोबी - आधी 20 ते 30 रुपये आणि आता 50 ते 60 रुपये प्रति किलो\nमिरच्या - आधी 30 ते 40 रुपये आणि आता 60 ते 70 रुपये प्रति किलो\nघेवडा - आधी 20 ते 30 रुपये आणि आता 40ते 50 रुपये प्रति किलो\nफ्लॉवर - आधी 30 ते 40 रुपये आणि आता 60 ते 70 रुपये प्रति किलो\nवांगी - आधी 30 ते 40 रुपये आणि आता 60ते 70 रुपये प्रति किलो\nकाकडी - आधी 20 ते 30 रुपये आणि आता 40 ते 50 रुपये प्रति किलो\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2018/07/blog-post_84.html", "date_download": "2022-10-07T23:19:04Z", "digest": "sha1:6WDYVMIKBMMER3NIGP3PK2BUDCEMKZJ4", "length": 24151, "nlines": 238, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "पेटवायची हौस असेल तर गरिबांच्या चुली पेटवा | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nपेटवायची हौस असेल तर गरिबांच्या चुली पेटवा\nलोकांना जोडतो तो धर्म आणि तोडतो तो अधर्म आहे. सर्व माणसे एकाच आई-बापाची लेकरे आहेत. त्यामुळे समाजासमाजात वाद पेटवू नका. पेटवायची फारच हौस असेल, तर गरिबांच्या चुली पेटवा, असा रोखठोक संदेश ’जमाअत-ए-इस्लामी हिंद’चे प्रचारक डॉ. सय्यद रफिक पारनेरकर यांनी दिला. देशात बंधुभाव, शांतता, न्याय, नीती प्रस्थापित होओ, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.\n‘सकाळ’ आणि ‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’ यांच्या वतीने शनिवारी (ता. 14) ईद मिलन कार्यक्रम झाला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, ठसकाळ’ मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड, उपसरव्यवस्थापक रमेश बोडके, जमाअत-ए-इस्लामी हिंदचे शहर अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही, काझी मकदूम मोहियोद्दीन, वाजेद कादरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा ऑडिओ संदेश उपस्थितांना ऐकविण्यात आला.\n‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’चे मराठी प्रचारक डॉ. सय्यद रफिक पारनेरकर यांचे मुख्य व्याख्यान झाले. ते म्हणाले, की आज समाजात अनेक दुखणी आहेत. मुले आई-बापाला विचारत नाहीत. सर्वत्र भ्रष्टाचार आहे. गरिबांची काळजी कुणाला नाही. बेईमान लोकांचा सुळसुळाट झाला आहे. असे एखादे अँटिकरप्शन व्हॅक्सीन निघावे, की ज्याची लस लहानपणीच टोचली, तर तो आयुष्यात कधी भ्रष्टाचार करणार नाही; परंतु असे इंजेक्शन अस्तित्वात येणे शक्य नसले, तरी असे ईद मिलनसारखे कार्यक्रम समाजाला चांगला संदेश देऊन लसीकरणाचेच काम करतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. शहरातील अस्वस्थ वातावरणात समाजासमाजांत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी ’सकाळ’ दरवर्षी असे उपक्रम राबवीत असल्याचे सांगत संजय वरकड यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. फेरोज पठाण यांनी केले. यावेळी यावेळी माजी आमदार कल्याण काळे, नामदेव पवार, उपमहापौर विजय औताडे, निवृत्ती महाराज घोडके गांधेलीकर, माजी महापौर भगवान घडमोडे, नगरसेवक राजू शिंदे, भाऊसाहेब जगताप, शेख सोहेल, सरदार मानधारी, गांधेलीचे सरपंच राहुल सावंत, माजी उपमहापौर भाऊसाहेब वाघ, आदींसह सर्वधर्मीय नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.\nअण्णा हजारे यांचा ध्वनिसंदेश\nकार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपला संदेश ऑडिओ क्लिपद्वारे पाठविला. तो ध्नविक्षेपकातून उपस्थितांना ऐकविण्यात आला. ते म्हणाले, “आपला देश हा रंग, रूप, वेश, भाषा आणि धर्मांचे वैविध्य बाळगून आहे; मात्र, सर्व धर्मांच्या मुळाशी मानवता हेच तत्त्व आहे. आपण शेजार्यांच्या सुख दुःखात सहभागी होत नाही, तोवर धर्माची तत्त्वे कितीही उदात्त असली तरी गौण ठरतात. त्यामुळे सर्वांशी सौहार्दाने वागावे.” ---------------\n“वैचारिक भूमिकेने मन पक्के होते. धर्म, संस्कार आणि संतांच्या सान्निध्यात भूमिका तयार होते. अशा सार्वजनिक कार्यक्रमांमधून आपण परस्परांशी सौहार्दाने वागण्याचे संस्कार करून घेत असतो. मन घडविणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. ’सकाळ’ अशा कार्यक्रमांद्वारे नागरिकांचे मन घडविण्याचे काम करतो.\n- हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष\n“मुंबईत मोठा इज्तेमा झाला तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोफत जागा उपलब्ध करून दिली होती. आम्हाला सर्व धर्माच्या माणसांना समान वागणूक देण्याची शिकवण त्यांनी दिली. ’सकाळ’ लेखणीच्या माध्यमातून सर्वधर्मीयांना एकत्र आणण्याचेच काम करतो.”\n- नंदकुमार घोडेले, महापौर, औरंगाबाद.\n“फारच प्रभावी कार्यक्रम झाला. मुख्य वक्त्यांनी संत तुकाराम, संत कबीर आणि इस्लामच्या शिकवणीतील साधर्म्य उलगडून सांगितले. माणसाला माणसाशी जोडणारे असे कार्यक्रम होत राहणे समाजाच्या आरोग्यासाठी हितकारक असते.” - चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त, औरंगाबाद.\n“ईद मिलन कार्यक्रम स्तुत्य आहे. सध्या आपल्या परिसरासह देशभरात अराजकता निर्माण झाली आहे. अशा कार्यक्रमांमुळे समाजातील तेढ कमी होईल. माणसातले माणूसपण जागे करून सर्वांना सद्बुद्धी मिळावी, असा संदेश आजच्या कार्यक्रमातून मिळाला.” - कल्याण काळे, माजी आमदार.\n“संत तुकाराम महाराजांसह सर्वच संतांच्या साहित्याचे अध्ययन करा. पैगंबरांनी न्यायाचा संदेश दिला आहे. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) हे शेवटचे पैगंबर आहेत. कुराण फक्त मुसलमानांसाठी नाही. त्यामुळे कुरआनचा अभ्यास करा. अठरापगड जातींच्या शेकडो लोकांना जोडण्याचे काम ’सकाळ’ने केले आहे.“ - डॉ. सय्यद रफिक, पारनेर.\n“प्रत्येक धर्माची शिकवण मानव कल्याणाचीच आहे. संत तुकाराम महाराजांनी अल्लाहला उद्देशून अभंग लिहिले आहेत. हा विश्वास त्यांनी चारशे वर्षांपूर्वी दाखविला असेल, तर आपण एकमेकांना विश्वासाने का वागवू शकत नाही एकमेकांची भाषा, आचारविचार समजून घेतले पाहिजेत.”- भास्करराव पेरे, उपसरपंच, आदर्श गाव पाटोदा.\n“अशा कार्यक्रमांमुळे समाजासमाजांतील गैरसमज दूर होऊन सद्भाव निर्माण होतो. सर्वांची प्रगती होऊन शांतता नांदावी, याच देशहिताच्या हेतूने जमाअत-ए-इस्लामी हिंद कार्य करते. हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे.“\n- काझी मकदूम मोहियोद्दीन, शहराध्यक्ष, जमाअत-ए-इस्लामी हिंद, औरंगाबाद.\n“सर्व माणसे एकाच ईश्वराची पूजा करतात. ही धरती शांतता आणि समाधानात राहावी, सगळी भांडणे मिटावीत, अशी ईश्वराची इच्छा असते. माणसाने स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवावे, यासाठी रोजा पाळण्याचा संदेश आहे.” - मौलाना इलियास खान फलाही, शहराध्यक्ष, जमाअत-ए-इस्लामी हिंद.\nमानवांवर कृपा : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमला मिळालेला परिपूर्ण धर्म- इस्लाम\nपेटवायची हौस असेल तर गरिबांच्या चुली पेटवा\n‘गुजरात फाईल्स’ कृष्णकृत्यांचा रहस्यभेद\nतंटामुक्ती स्वीकार्य तर शरई पंचायत का नाही\n२७ जुलै ते ०२ ऑगस्ट २०१८\nऔरंगजेबाचे कृषी धोरण विषयक फर्मान : भाग २\nपुण्यामध्ये समविचारी पुरोगामी संघटनांची “अघोषित आण...\nअनेक लोक निरूद्देश जीवन जगत आहेत\nअफवांचे आभाळ भाकरीचा चंद्र\nभ्रष्टाचार दबू शकतो पाणी कसे दबणार\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये कोण-को...\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणत...\nशिक्षणाची पद्धत : पेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nअस्तित्वहीन ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स’\n२० जुलै ते २६ जुलै २०१८\nनामोस्मरण , याचना आणि उपासना\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसमस्त मानवकल्याणाची चिंता करावी लागेल\nऔरंगजेबाचे कृषी धोरणविषयक दोन फर्मान\nखरंच मुसलमान संविधान मानत नाहीत का\nधर्म आणि दहशतवादाचा काही संबंध नाही\nनिकले किसी के गम में ....\n१३ जुलै ते १९ जुलै २०१८\nआणखी एक टंचाई - तांबे\nहिरे बाजारात घुसलेली लबाडी\nनामोस्मरण आणि याचना : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nचर्चने मोदी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आ...\nप्रलंबित कोर्ट केस खटल्यांची शोकांतिका\nतुर्कीचे तीन वेळेस पंतप्रधान, दुसर्‍यांदा राष्ट्रप...\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणत...\nईश्‍वर आपल्याला जाब विचारेल याची जाणीव लोप पावत आह...\nआपल्या देशात मुल्याधिष्ठीत शिक्षणाची गरज : डॉ. पार...\n०६ ते १२ जुलै २०१८\n२९ जून ते ०५ जुलै २०१८\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/pv-sindhu-horoscope-2018.asp", "date_download": "2022-10-07T23:39:49Z", "digest": "sha1:TC6BWTSMYEBCMKHSLKPT32W5N7Y2QD3A", "length": 25498, "nlines": 312, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "पिवी सिंधु 2022 जन्मपत्रिका | पिवी सिंधु 2022 जन्मपत्रिका Sports", "raw_content": "\nचायनीज राशि भविष्य 2022\nलाल किताब राशि भविष्य 2022\nस्टॉक मार्केट 2022 भविष्यवाणी\nतमिळ राशि भविष्य 2022\nतेलगू राशि भविष्य 2022\nकन्नड राशि भविष्य 2022\nमल्याळम राशि भविष्य 2022\nगुजराती राशि भविष्य 2022\nमराठी राशि भविष्य 2022\nबंगाली राशि भविष्य 2022\nपंजाबी राशि भविष्य 2022\nसाप्ताहिक प्रेम राशि भविष्य\nसेलिब्रिटी राशि भविष्य/ कुंडली\nशनी साडे साती रिपोर्ट\nसूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ\nलाल किताब काय आहे\nलाल किताब चार्ट ऑनलाइन\nलाल किताब कुंडली ऑनलाइन\nलाल किताब फेसबुक चर्चा\nमोफत लाल किताब इ- पुस्तक\nकेपी सिस्टम म्हणजे काय\nऑनलाइन केपी चार्ट बनवा\nकेपी होररी चार्ट ऑनलाइन\nसाई बाबा मदत करा\nगणपतीला विचारा : गणपती तुमच्यासाठी बोलतो\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पिवी सिंधु जन्मपत्रिका\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nअपुष्ट जन्म वेळेसह डेटा वगळा\nपिवी सिंधु 2022 जन्मपत्रिका\nपिवी सिंधु प्रेम जन्मपत्रिका\nपिवी सिंधु व्यवसाय जन्मपत्रिका\nपिवी सिंधु जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nपिवी सिंधु 2022 जन्मपत्रिका\nपिवी सिंधु ज्योतिष अहवाल\nपिवी सिंधु फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nवर्ष 2022 कुंडलीचा सारांश\nतुमच्या बुद्धिमत्तेची सर्व स्तरांतून प्रशंसा होईल. तुमचा व्यवसाय आणि उद्योग यात तुम्ही चमकाल. कुटुंबात होणारा बाळाचा जन्म तुम्हाला आनंद देईल. या काळात ज्ञान आणि धार्मिक शिकवण मिळेल. या काळात तीर्क्षक्षेत्री किंवा एखाद्या मनोरंजन स्थळाला भेट द्या. तुमचा सन्मान होईल आणि शासनकर्ते व उच्च अधिकारी यांच्याकडून तुमची प्रशंसा होईल.\nतुमच्याकडे भरपूर संधी चालून येणार असल्या तरी त्यांचा लाभ उठवता येणार नाही. तुमच्या किंवा तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे तुमची स्वत:ची आणि तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. दूरचे प्रवास संभवतात, पण ते टाळलेलेच बरे कारण त्यातून कोणताही फायदा संभवत नाही. हा तुमच्यासाठी मिश्र घटनांचा कालवधी आहे. लोकांशी आणि तुमच्या सहकाऱ्यांशी भांडणाची शक्यता. सर्दी किंवा तापासारखे विकार संभवतात. कोणत्याही निश्चित कारणाशिवाय मानसिक तणाव राहील.\nतुमची कष्ट करायची तयारी असेल तर हा काळात तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही नवीन संधी मिळतील. घरी आणि कामाच्या ठिकाणी होणारे बदल तुमच्या पथ्यावर पडतील. तुम्ही या वेळी काही निश्चित निर्णय घ्याल. ते निर्णय तुम्हाला प्रगतीपथावर नेईन. या काळात तुमचा वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवायला हवे. तुम्हाला आत्मविश्वास आणि उर्जेची कमी जाणवेल.\nहा संमिश्र घटनांचा काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही 100 टक्के योगदान द्याल. तुमचे ध्येय निश्चित राहील आणि एकदा हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्य़ंत तुम्ही थांबणार नाही आणि तुमची एकाग्रताही कायम राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. तुमच्या या वागणूकीमुळे तुमच्या लोकप्रियतेत घट होईल. लोकांशी संवाद साधताना सौम्य आणि लवचिक राहा. तुमच्या भावाबहिणींनी तुम्ही मदत कराल. तुमच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागेल.\nतुम्ही स्वत:ची काळजी घ्या आणि स्वत:वर जास्त दबाव येऊ देऊ नका, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळपर्यंत व्यवस्थित काम करू शकाल. काही अपेक्षाभंगाचे प्रसंग घडतील. तुमचे धाडस आणि अंदाज हे तुमचे बलाढ्य गुण आहेत, पण त्यामुळे तुम्हाला थोडा अहंकार चढू शकेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यातून फायदा होणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून तुम्हाला योग्य सहकार्य मिळणार नाही. कुटुंबातील व्यक्तींचा दृष्टिकोन वेगळा असू शकेल. आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील आणि तुम्हाला मळमळ, ताप, कानाची दुखणी आणि उलट्या यासारखे विकार संभवतात.\nतुमच्या कामाच्या ठिकाणी स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आणि कामच्या दबावामुळे तुमच्या कारकीर्दीमध्ये काही अडथळे निर्माण होतील. ही परिस्थिती हाताळ्यासाठी तुम्ही थोडे लवचिक धोरण अवलंबिण्याची गरज आहे. नवे प्रकल्प आणि करिअरमध्ये धोके पत्करू नका. वाद आणि कामाच्या स्वरूपातील बदल टाळा. संवाद साधताना सकारात्मक असा आणि बोलताना किंवा लिखित स्वरूपात अपमानकारक शब्दांचा वापर करू नका. विरुद्ध लिंगी व्यक्तींसोबतचे तुमचे संबंध सलोख्याचे राहणार नाहीत. जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ राहील. अनावश्यक प्रवास टाळा. तुम्हाला काही अनपेक्षित दु:ख किंवा कोणताही आधार नसलेल्या आरोपांना सामोरे जावे लागेल.\nउत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.\nतुम्ही तुमचा स्वभाव समतोल ठेवा, जेणेकरून चांगले निष्कर्ष मिळतील. या काळात विकास होईल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी सुसंवाद राहील. उत्पन्नाचा स्रोत व्यवस्थित राहील आणि कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल. अध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सक्रीय व्हाल. तुम्ही बढतीची अपेक्षा करत असाल तर ते नक्की होईल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. अचानक होणार प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. तुम्ही थोडा दानधर्म कराल आणि तुमची या काळात समृद्धी होईल.\nतुमच्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवाल. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असाल. एकाहून अधिक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमचे क्लाएंट्स, सहकारी आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही या काळात काही चैनीच्या वस्तू विकत घ्याल. एकूणातच हा काळ तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा असेल.\nतुमच्या रोमँटिक आय़ुष्यात थोडी रंगत आणण्याचा हा काळ आहे. तुम्ही मिळवेली कंत्राटे आणि करार यातून फायदा मिळविण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवहार करू शकता. हे व्यवहार तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. उद्योगातून आणि इतर धंद्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल आणि तुमची पत व स्थान यातही वृद्धी होईल. तुमच्या खासगी आयुष्यात सौख्य आणण्यासाठीच्या सर्व आवश्यकता पूर्ण झालेल्या असतील. तुम्ही वाहन किंवा इतर आरामदायी वस्तुंची खरेदी कराल. तुमचे आणि कुटुंबाचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणे आहे.\nनायकांना सूचित करणे. दुरुस्ती करण्यास सांगणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96/", "date_download": "2022-10-07T23:26:10Z", "digest": "sha1:T2DQ343PSQKH2PL4QMJVG34LLLUEZGJJ", "length": 12930, "nlines": 92, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "सांधे आणि स्नायू च्या दुखण्यातून मुक्ती मिळण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय, पहा म्हातारपणात देखील तुमचा... - Themaharashtrian", "raw_content": "\nसांधे आणि स्नायू च्या दुखण्यातून मुक्ती मिळण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, पहा म्हातारपणात देखील तुमचा…\nसांधे आणि स्नायू च्या दुखण्यातून मुक्ती मिळण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, पहा म्हातारपणात देखील तुमचा…\nसांधे आणि स्नायूंच्या दुखण्याचा त्रास साधारणपणे म्हातारपणात होत असतो. पण योग्य आहार आणि व्यायामाची शरीराला सवय नसेल तर हा त्रास कोणत्याही वयात होवू शकतो. मात्र शरीराकडे दुर्लक्ष झाल्याने अशाप्रकारचा त्रास होवू शकतो. शिवाय हे दुखणे खूपच असह्य असते. चालण-फिरणे अवघड होऊन बसते.\nकाहीवेळा तर बसल्या जागेवरून उठतादेखील येत नाही. अशा त्रासदायक आजाराने अनेकजण त्रस्त असतात. यासाठी काही उपाय घरच्याघरी देखील करता येऊ शकतात. ज्यामुळे दुखण्यापासून आराम मिळू शकतो. याआधी आपण सांधेदुखी च्या कारणांबद्दल चर्चा करू.\n– वाढत्या वयामुळे संधिवाताचा त्रास होतो. साधारणतः साठ वर्षानंतर हा त्रास वाढता असल्याचे दिसून येतो > – लठ्ठपणामुळे संधिवात होण्याची शक्यता वाढते >- वाढलेल्या वजनाचा अति भार हा गुडघ्यावर व खुब्याच्या सांध्यावर पडत असतो >- व्यायामाचा अभाव असल्यास कार्टिलेजची क्षमता कमी होते >- हाडाचे फ्रॅक्चर असल्यास हा त्रास वाढतो >- दोन सांध्यांमध्ये गॅप असल्यास ही स्थिती निर्माण होते.\n– शरिरातील हार्मोनल बदल, मासिक पाळी यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होत असल्याने पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये सांधीवात होण्याची शक्यता अधिक असते\nचला आता आम्ही आपणास सांधेदुखी आणि स्नायूचे दुखणे दूर करण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे उपाय सांगनार आहोत.\n१) शरीराच्या सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना झाल्यानंतर दिवसभर अस्वस्थ वाटत राहते. याचा कार्यक्षमतेवरही नकारात्मक परिणाम होतो. स्नायूंमध्ये निर्माण होणारा आकस व ताणापासून बचाव करण्यासाठी आणि वेदनेपासून सुटका करण्यासाठी विविध उपाय आहेत. त्यापैकी एक म्हणजे मालिश करणे होय.\n२) वेदना झाल्यास बामने थोडेसे चोळावे. बाममध्ये असलेला पुदिन्याचा सार व कापुराने पेन फायबर्सचे सेन्सर्स ब्लॉक होतात. त्यामुळे वेदना कमी होतात. तसेच चोळल्यामुळे रक्तप्रवाहही सुरळीत होतो.\n३) तसेच मॅग्नेशियमची कमतरता असल्यासही स्नायूंमध्ये वेदना होऊ लागतात. भरपूर मॅग्नेशियम असलेल्या केळी, भुईमूग, अॅ्व्होकॅडो, सर्व प्रकारचे धान्य व सोयाबीनपासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.\n४) आंघोळ करताना पाण्यात थोडेसे मीठ मिसळल्यास वेदना कमी होतात. > ५) तसेच हा त्रास घालविण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर वर्कआऊटही करता येईल. योगासने, थाय-ची व वॉकिंग अशा एक्झरसाइजमुळे वेदना कमी होऊ शकतात. यापैकी कोणताही व्यायाम करणारांचे स्नायू नेहमी रिलॅक्स असतात.\n६) संगीत ऐकल्यानेही सांधे आणि स्नायूंच्या वेदनेपासून सुटका होते, असे एका फ्रेंच संशोधनात आढळले आहे. या संशोधकांना कर्करोगपीडितांवर केलेल्या प्रयोगात असे दिसून आले की, जे पीडित ३० मिनिट संगीत ऐकत होते, त्यांच्या वेदना ५० टक्क्यांनी कमी झाल्या. संगीत ऐकल्यानंतर मिळणाऱ्या आनंदामुळेच वेदनेकडे दुर्लक्ष होते.\n७) नियमित व्यायाम, योगासने करावीत, चालणे, सायकलिंग, पोहणे असे व्यायाम करावेत. > ८) हाडांची झीज होत असल्यास कॅल्शियमचे हाडांपर्यंत शोषण होण्यासाठी ड जीवनसत्त्वाची गरज असते. त्यासाठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.statusinmarathi.com/bill-gates-motivational-quotes-in/", "date_download": "2022-10-07T22:37:48Z", "digest": "sha1:Q56BP7II5AIQ2EK3NTUOQ2P245YYMYNQ", "length": 26103, "nlines": 174, "source_domain": "www.statusinmarathi.com", "title": "बिल गेट्स सर्वोत्तम प्रेरणादायी महान विचार | Bill gate suvichar in Marathi | Bill gates Quotes in Marathi | Bill gate status in Marathi - Status in Marathi", "raw_content": "\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nBill gates motivational Quotes in Marathi: (बिल गेट्स सर्वोत्कृष्ट आणि प्रेरणादायी विचार): विचार ही एकमेव गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्तीला विशेष बनवते. आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण यशस्वी व्यक्तींचे चरित्र आणि विचारांचे अनुसरण केले पाहिजे.\nआज मी तुमच्यासोबत मायक्रोसॉफ्ट कंपनी चे संस्थपाक Bill Gates thoughts in Marathi तुमच्या सोबत शेअर करणार आहे.\nQuotes 1 : “जर तुम्ही गरीबीत जन्माला आलात तर हा तुमचा दोष नाही जर तुम्ही जर गरीबीत मेलात तर ती तुमची चूक आहे.”\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 2 : “स्वत: ची तुलना इतर कोणाशीही करु नका ,जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही स्वत: चा अपमान करीत आहात.”\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 3 : “आपले सर्वात निराश ग्राहक आपले शिकण्याचे सर्वात मोठे स्रोत आहेत.”\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 4 : “यश साजरा करणे चांगले आहे, परंतु आपल्या अपयशापासून शिकणे महत्वाचे आहे”\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 5 : “आपणास मोठ्या विजयासाठी कधीकधी मोठे धोके घ्यावे लागतात.”\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 6 : “तंत्रज्ञान हे एक साधन आहे. मुलांना एकत्रितपणे आणि हेतूने कार्य करण्यासाठी शिक्षक सर्वात महत्वाचे आहेत.”\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 7 : “आम्हाला प्रत्येकास अभिप्राय देणार्‍या लोकांची आवश्यकता आहे. अशाप्रकारे आपण सुधारतो.”\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 8 : “मी आधीच अंतिम ध्येय ठेवले असेल तर वर्षांपूर्वी मी ते साध्य केले असते असे तुम्हाला वाटत नाही.”\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 9 : “आपल्या शाळेने विजेते आणि पराभूत झालेल्यांचा उल्लेख थांबविला असेल, परंतु जीवनात तसे नाही.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 10 : “आपण आपण चुका केल्यास, ही आपल्या पालकांची चूक नाही, म्हणून आपल्या चुकांबद्दल त्यांच्याकडे ओरडू नका, त्यांचुकातून काहीतरी शिका.“\nबिल गेट्स Bill gates\nBill gates good thoughts in Marathi | बिल गेट्स यांचे प्रेरणादायी विचार\nQuotes 11 : “मला माहित नाही” बनले आहे “मला अद्याप माहित नाही.”\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 12 : “धैर्य हे यशाचे महत्त्वपूर्ण घटक आहे.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 13 : “इंटरनेट हे उद्याच्या जागतिक गावचे शहर चौरस बनत आहे.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 14 : “पीसी कसा असू शकतो आम्ही त्या मूलभूत स्वप्नाच्या शेवटालाही नाही.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 15 : “मला वाटते की श्रीमंतांनी गरिबांना मदत करण्याची सामान्य कल्पना खूप महत्त्वाची आहे.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 16 : “मायक्रोसॉफ्ट हे लोभाबद्दल नाही तर ते नाविन्य आणि निष्पक्षतेबद्दल आहे.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 17 : “संगणकाच्या नोटबुकविषयी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती कितीही भरली तरी ती मोठी किंवा भारी नसते.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 18 : “सुमारे 10 वर्षांपूर्वी मला वाटले की माझी संपत्ती समाजात परतली पाहिजे. अशी संपत्ती, ज्याचा अंदाज करणे कठीण आहे, कोणा एका मुलास ती मिळणे योग्य नाही.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 19 : “जर आपण लोकांना साधने दिली आणि त्यांनी त्यांची नैसर्गिक क्षमता आणि कुतूहल वापरले तर ते अशा प्रकारे गोष्टी बनवतील जे तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त आश्चर्य वाटेल.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 20 : “व्यवसायाच्या जगात जाण्यासाठी ही एक उत्तम वेळ आहे, कारण मागील ५० वर्षांच्या तुलनेत पुढील १० वर्षांत व्यवसाय अधिक बदलणार आहे.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 21 : “पुढच्या शतकाकडे आपण पाहिले तर नेते तेच असतील जे इतरांना सामर्थ्य देऊ शकतात.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 22 : “माझा असा विश्वास आहे की गरीबांमधील गुंतवणूकीवरील परतावा व्यवसाय क्षेत्रामध्ये मिळालेल्या यशाइतकाच उत्साहवर्धक आहे आणि त्यापेक्षा तो अर्थपूर्ण आहे\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 23 : “असे लोक आहेत ज्यांना भांडवलशाही आवडत नाही आणि असे लोक आहेत ज्यांना वैयक्तिक संगणक आवडत नाहीत. पण असा कोणी नाही ज्याला पीसी आवडत नाही आणि मायक्रोसॉफ्ट आवडत नाही.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 24 : “मी कठोर काम करण्यासाठी आळशी माणसाचा शोध घेत आहे. कारण आळशी माणसाला हे करण्याचा सोपा मार्ग सापडेल.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 25 :“ ते Google असो किंवा apple किंवा विनामूल्य सॉफ्टवेअर असो, आमच्याकडे काही चांगले प्रतिस्पर्धी आहेत जे आम्हाला नेहमी चक्कीत करतातं.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 26 : “मोठ्या संस्था त्यांचामध्ये सहभागी लोकांकडून उच्चस्तरीय वचनबद्धतेची मागणी करतात.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 27 : “सुरुवातीपासूनच आमचे यश भागीदारीवर आधारित आहे.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 28 : “लोक नेहमीच बदलाची भीती बाळगतात. विजेचा शोध लागला तेव्हा लोकांना भीती वाटली, बरोबर ना \nबिल गेट्स Bill gates\nQuotes 29 : “यश हे एक गरीब शिक्षक आहे. यामुळे लोकांना असे वाटते की ते अयशस्वी होऊ शकत नाहीत“.\nबिल गेट्स Bill gates\nबिल गेट विद्यार्थ्यांनसाठी मार्गदर्शक सुविचार मराठी | Bill gates Quotes for students.👌\nQuotes 30 : “आपला शिक्षक उद्धट आहे असे आपल्याला वाटत असल्यास, आपल्याला बॉस भेटू पर्यंत थांबा.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 31 :“ उत्तम शिक्षक खूप संवादी असतात.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 32 : “बौद्धिक संपत्तीचे शेल्फ लाइफ केळीइतकेच आहे.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 33 : “आम्ही पुढील दोन वर्षात होणार्‍या बदलांस नेहमीच अधिक महत्त्व देतो आणि पुढच्या 10 वर्षात होणार्‍या बदलाला कमी लेखू नका आणि स्वत: ला निष्क्रिय होऊ देऊ नका.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 34 : “वागणूक बदलण्यासाठी आम्हाला खूप पैसा खर्च करावा लागतो.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 35 : “सॉफ्टवेअरमध्ये एकच युक्ती आहे आणि ती म्हणजे प्री-लिखित सॉफ्टवेअर वापरणे.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 36 : “व्यवसायात वापरल्या जाणार्‍या कोणत्याही तंत्रज्ञानाचा पहिला नियम असा आहे की कार्यक्षम ऑपरेशनमध्ये ऑटोमेशन आणल्यास कार्यक्षमता वाढेल. दुसरा नियम असा आहे की अकार्यक्षम ऑपरेशनमध्ये ऑटोमेशन आणून ऑटोमेशन वाढेल.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 37 : “सॉफ्टवेअरसह लोकांना सक्षम बनविणे , महत्त्वाचे असलेल्या कोणत्याही गोष्टीचे योगदान देणे यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 38 : “आयुष्य न्याय्ययुक्त नाही, याची सवय लावा.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 39 : “पूर्वी मायक्रोसॉफ्टचे स्पष्ट प्रतिस्पर्धी होते. आमच्याकडे त्यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी संग्रहालये आहेत ही चांगली गोष्ट आहे.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 40 : “आम्ही पीसी उद्योग तयार करण्यासाठी जबाबदार आहोत. संगणकात, आम्ही सुसंगत मशीन आणि बरेच सॉफ्टवेअरची संपूर्ण कल्पना आणली. आणि म्हणून त्या स्वप्नांच्या मध्यभागी सुरक्षेसारख्या गोष्टी मिळू नयेत ही आपली जबाबदारी आहे.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 41 : “कोणालाही 640 किलो बाइट वापरास पुरेसे असेल.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 42 : “जेव्हा पायरसी नसते तेव्हा लिनक्सची स्पर्धा करणे आमच्या सॉफ्टवेअरसाठी सोपे आहे.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 43 : “जगाला तुमच्या स्वाभिमानाची काळजी नाही. आपण स्वतःबद्दल चांगले वाटण्यापूर्वी आपण काहीतरी मिळवावे अशी जगाची अपेक्षा आहे.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 44 : “माझा विश्वास आहे की जर आपण लोकांना समस्या दर्शविल्या आणि आपण त्यांना निराकरण केले तर त्यांना कारवाई करण्यास भाग पाडता येईल.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 45 : “प्रभावी परोपकारासाठी बर्‍याच सर्जनशीलता आवश्यक असते जसे व्यवसाय बनविण्यासाठी आवश्यक लक्ष आणि कौशल्य.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 46 : “आपण चांगले करू शकत नसल्यास, चांगले दिसण्यासाठी किमान ते करा.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 47 : “प्रत्येकाला कोचची गरज असते. आपण बास्केटबॉल खेळाडू, टेनिसपटू, जिम्नॅस्ट किंवा ब्रिज प्लेयर असलात तरी हरकत नाही.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 48 : “जर जनरल मोटर्सने संगणक तंत्रानुसार त्याचे तंत्रज्ञान विकसित केले असते तर आज आपण 25 डॉलर किंमतीची गाडी चालवू शकतो जी प्रति गॅलन 1000 मैलांवर धावली असती.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 49 : “दूरदर्शन खरं आयुष्य नाही. वास्तविक जीवनात लोकांना कॉफी सोडुन नोकरीला जावे लागते.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 50 : “जर एखादी वस्तू विकसित करणे महाग असेल आणि कोणालाही त्याचा मोबदला दिला जात नसेल तर ते विकसित होणार नाही, तर तुम्ही ठरवा तुम्हाला सॉफ्टवेअर लिखित हवे आहे की नाही\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 51 : “आयुष्य सेमेस्टरमध्ये विभागलेले नाही. आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळत नाहीत आणि फारच कमी मालक आपल्याला मदत करण्यास तयार असतात.संकटात स्वतःला शोधा.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 52 : “मी 10% व्यवसायाबद्दल विचारात व्यतीत करतो. व्यवसाय इतका गुंतागुंतीचा नाही.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 53 : “तीन वर्षांत, माझी कंपनी बनवित असलेली प्रत्येक उत्पादने निरुपयोगी होईल. एकच प्रश्न आहे की आपण त्याला निरुपयोगी करतो की इतर कोणी\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 54 : “मला नावीन्यपूर्णतेवर विश्वास आहे आणि आपल्याला नवीनता मिळविण्याच्या मार्गावर संशोधन करणे आणि मूलभूत गोष्टी शिकणे आवश्यक आहे.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 55 : “या व्यवसायात, आपण धोक्यात असल्याचे आपल्या लक्षात येईपर्यंत स्वतःचे संरक्षण करण्यास उशीर होईल, जोपर्यंत आपण सर्वकाळ भितीने चालत नाही तोपर्यंत आपण बचावात आहात.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 56 : “विंडोजमध्ये काय होईल याचा निर्णय कोण घेतो जो ग्राहक त्याला विकत घेत असतो.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 57 : “दरवर्षी चीनमध्ये सुमारे 3 दशलक्ष संगणक विकले जातात, परंतु लोक सॉफ्टवेअरसाठी पैसे देत नाहीत, परंतु एक दिवस ते देतील. ते सॉफ्टवेअर चोरी करीत असताना त्यांनी आमची चोरी करावी अशी आमची इच्छा आहे. त्यांना एक प्रकारे व्यसनाधीन केले जाईल आणि मग पुढच्या दशकात पैसे काढून घेण्यासाठी एक मार्ग आम्ही शोधून काढू.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 58 : “मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला खूप स्वप्ने पाहिली होती आणि मला वाटते की त्यापैकी बहुतेकांची भरभराट झाली कारण मला बरच काही शिकायला मिळाले.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 59 : “दररोज आपण म्हणतो, ‘आम्ही या ग्राहकाला कसे आनंदित ठेवू’ हे करून आपण नाविन्यात आणून पुढे जाऊ शकतो, कारण जर आपण ते केले नाही तर कोणीतरी ते करेल.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 60 : “महान देणगीदार असे लोक आहेत जे खरंच अर्थपूर्ण त्याग करीत आहेत.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 61 : “मी ऑफिसमध्ये असो, घरी असो किंवा रस्त्यावर, माझ्याजवळ नेहमीच मला वाचायचे आहे असे पुस्तकांचा संग्रह असतो.“\nबिल गेट्स Bill gates\nQuotes 62 : “प्रोग्रामर होण्याच्या तयारीचा उत्तम मार्ग म्हणजे प्रोग्राम लिहिणे आणि इतरांनी लिहिलेल्या उत्तम प्रोग्राम्सचा अभ्यास करणे.“\nबिल गेट्स Bill gates\nतुम्हाला Bill gates motivational Quotes in Marathi कसे वाटले ते कंमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कडे सुद्धा काही असेच Bill gates Marathi Suvichar असतील तर खाली कंमेंट मध्ये अपडेट करा. आम्ही तुम्ही दिलेले सुविचार तुमच्या नावासोबत आमच्या या वेबसाईट वर अपडेट करू.\nBill gates Thoughts in Marathi तुम्हाला आवडले असतील तर फेसबुक व व्हाट्सअँप वर शेअर नक्की करा.\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nJack ma Quotes in Marathi | जॅक मा यांचे प्रेरणादायक सुविचार मराठीमधे\nstatusinmarathi.com या वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठी माणसापर्यंत प्रेरणादायी कविता, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी कोट्स, प्रेरक विचार आणि वाढदिवस शुभेच्छा , मराठी स्टेटस पोचवण्याचा प्रयन्त करत आहोत. जेणे करून त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.👍\nकोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२२ | Kojagiri purnima wishes in marathi 2022,status,quotes, Messages,Images, greetings शेअर करून द्या कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा.\nकोजागरी पौर्णिमा माहिती,कथा,महत्त्व,पूजविधी मराठी | kojagiri purnima information in marathi 2022.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/meeting-between-sambhaji-raje-and-chief-minister-thackeray-today/", "date_download": "2022-10-07T23:17:44Z", "digest": "sha1:3NTSBNEOQ6BW4KXP7KW6ITEW2F3S56MB", "length": 10648, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "संभाजीराजेंना मुख्यमत्र्यांचं बोलावणं, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष बैठकीकडे!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nसंभाजीराजेंना मुख्यमत्र्यांचं बोलावणं, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष बैठकीकडे\nसंभाजीराजेंना मुख्यमत्र्यांचं बोलावणं, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष बैठकीकडे\nमुंबई | मराठा समाजाचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाला एकत्र करून आरक्षणासाठी लढा पुकारला आहे. मराठा क्रांती मूक आंदोलनाची सुरुवात संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातून झाली आहे. दरम्यान, कोल्हापुरात झालेल्या या आंदोलनातील गर्दी पाहता मराठा आरक्षणाचा मुद्दा ठाकरे सरकार बैठकीच्या माध्यमातून सोडवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.\nखासदार संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज बैठक होणार आहे. मराठा आरक्षणविषयी मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यावर ही बैठक होईल. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक आणि ठाकरे सरकारमधील काही मंत्री देखील उपस्थित असतील. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे.\nमराठा क्रांती मुक आंदोलनात सतेज पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी सतेज पाटील यांनी राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री व इतर महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करण्यासाठी आपण उद्याच मुंबईला या असं आमंत्रण संभाजीराजेंना दिलं होतं. सतेज पाटील यांनी मराठा समाजाच्या संयमाच्या भूमिकेचं कौतुक आहे आणि या संयमाला राज्यशासन म्हणून आम्ही चर्चेची साथ देऊ आणि राज्य सरकार यासंबंधी कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द देतो असं सतेज पाटील म्हणाले होते.\nदरम्यान, गेल्या 6 वर्षांपासून राजकारणाच्या मुख्य धारेत राहिलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आता सुटणार का असा प्रश्न विचारला जात आहे. कोल्हापुरनंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही आंदोलनाची मशाल जाणार आहे. नाशिक, औरंगाबाद, अमरावती, आणि कोकण असं पहिल्या टप्प्यात आंदोलन केलं जाणार आहे.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n‘…त्या शुक्राचार्यांचं पितळ उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही’; नितीन राऊत आक्रमक\nकोवॅक्सिनमध्ये गायीच्या वासराचं सीरम; भारत बायोटेक अन् केंद्र सरकारनं दिलं स्पष्टीकरण\nपुढचे तीन ते चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता\n“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आणि आजची शिवसेना कुठे\n“सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच”\n; 25-30 आमदार अन् 2 खासदार भाजप सोडण्याच्या तयारीत\n“उद्धव ठाकरे मोदींसमोर नाक घासून आलेत, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/12/VishwanathAnand.html", "date_download": "2022-10-07T22:38:15Z", "digest": "sha1:U3XUJ7KSMX5WOMKR7OX5AXVYJ5ZBG6CQ", "length": 7434, "nlines": 69, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "बुद्धिबळातील 'कोहीनूर' विश्वनाथन आनंद | Gosip4U Digital Wing Of India बुद्धिबळातील 'कोहीनूर' विश्वनाथन आनंद - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome क्रीडा बुद्धिबळातील 'कोहीनूर' विश्वनाथन आनंद\nबुद्धिबळातील 'कोहीनूर' विश्वनाथन आनंद\nबुद्धिबळातील जगज्जेतेपद निर्विवाद गाजवणारा अव्वल क्रमांकाचा खेळाडू म्हणजे विश्वनाथन आनंद. त्यांचा आज वाढदिवस. यानिमित्त जाणून घेऊ त्यांच्याविषयी खास काही...\nआनंद यांना बुद्धिबळाची प्रेरणा आई व मामांकडून मिळाली. ते बुद्धिबळ खेळत असल्याने आनंद त्याकडे आकर्षित होत गेले. मात्र बुद्धिबळात यश मिळवायला सुरु केल्यावर त्यांनी परत मागे पाहिलेच नाही.\nवडील विश्वनाथन अय्यर दक्षिण रेल्वेचे निवृत्त महाव्यवस्थापक आहेत. त्यांची आई सुशीला ही गृहिणी व त्यांच्या गुरु आहेत. त्यांना एक बहीण व एक भाऊ आहे.\nवयाच्या 6 व्या वर्षापासूनच त्यांनी बुद्धिबळाच्या पटाशी गट्टी जमविली. पाहता-पाहता त्यांनी या खेळामध्ये नैपुण्य प्राप्त केले.\n1983 मध्ये 9 पैकी 9 गुण घेत ते कनिष्ठ गटाचे राष्ट्रीय विजेते बनले. वयाच्या 15 व्या वर्षी ते 'इंटरनॅशनल मास्टर' बनले. हे विक्रम करणारे आशियातील ते एकमेव खेळाडू आहेत.\n1986 मध्ये 16 व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा’ जिंकली. 1987 मध्ये फिलिपाईन्समध्ये जागतिक ज्युनिअर चॅम्पियनशिप जिंकणारे ते पहिले आशियाई ठरले. 1987 मध्ये ते ग्रॅण्डमास्टर बनणारे ते एकमेव भारतीय आहेत.\n1991 मध्ये गॅरी कॅस्पारॉव्ह व अनातोली कारपोव मागे टाकून 'रेगिया इमीलिया' स्पर्धा त्यांनी जिंकली. 1998 मध्ये लिनारेस विजेतेपद त्यांनी मिळविले. पाच वेळा कोरस बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.\nदरम्यानच्या काळात गॅरी कॅस्पारॉव्ह, मिखेल बोत्वीनिक, बोरिस स्पॅस्की, अ‍ॅलेक्झांडर अलीखाईन व व्लादिमीर क्रॅमनिक या रशियातील खेळाडूंचे वर्चस्व विश्वनाथन आनंद यांनी मोडून काढले.\nबुद्धिबळातील सर्व प्रकारामध्ये जिंकलेले आनंद हे एकमेव खेळाडू आहेत. 4 वेळा जगज्जेता, 5 वेळा बुद्धिबळातील ऑस्कर विजेता, सर्वात कमी वयात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविण्याचा विक्रम करणारे आनंद गत 3 दशकांपासून बुद्धिबळाचे राजा आहेत.\nआनंद यांचे यश :\n▪ 5 वेळा बुद्धिबळातील ऑस्कर (खेळातील सर्वोत्तम पुरस्कार)\n▪ बुद्धिबळातील सर्व प्रकाराचे जगज्जेतेपद जिंकलेले एकमेव.\n▪ सर्वांत कमी वयात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविण्याचा विक्रम.\n▪ राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी (1991)\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/783075", "date_download": "2022-10-07T23:08:02Z", "digest": "sha1:SJTM4TELZ6PRJULIZH2464GUPBVKVAZ4", "length": 2386, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मंगळवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मंगळवार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:०५, २८ जुलै २०११ ची आवृत्ती\n४६१ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n०९:४४, २५ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: lbe:Тталат)\n०९:०५, २८ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nKatyare (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.learningwithsmartness.com/2020/12/blog-post_562.html", "date_download": "2022-10-07T21:16:07Z", "digest": "sha1:6IOZHVB5YJ3GYWPETRNYOWMHSDJHVB5U", "length": 6779, "nlines": 165, "source_domain": "www.learningwithsmartness.com", "title": "Learning With Smartness", "raw_content": "\nशिष्यवृत्ती परीक्षा 5वी भाषा\nशिष्यवृत्ती परीक्षा 5वी बुध्दिमत्ता\nशिष्यवृत्ती परीक्षा 5वी गणित\nशिष्यवृत्ती परीक्षा 5वी इंग्रजी\nमराठी व्याकरण वचन या घटकावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी येथे स्पर्श करा.\nवचन - एकवचन व अनेकवचन ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी येथे स्पर्श करा.\nइयत्ता पाचवी गणित बेरीज या घटकावर आधारित ऑनलाईन टेस्ट\nमराठी व्याकरण वाक्याचे भाग उद्देश्य व विधेय व्हिडिओ पाहण्यासाठी येथे स्पर्श करा.\nहिंदी गिनती ऑनलाईन टेस्ट\nमराठी आपल्या समस्या आपले उपाय आँनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी येथे स्पर्श करा\nमराठी - स्वच्छतेचा प्रकाश ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी येथे स्पर्श करा\nमराठी - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठावर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी येथे स्पर्श करा.\nपरिसर अन्न टिकवण्याच्या पद्धती ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी येथे स्पर्श करा.\nगणित दशांश अपूर्णांक टेस्ट सोडवण्यासाठी येथे स्पर्श करा.\nगणित दशांश अपूर्णांक ऑनलाईन टेस्ट\nगणित गुणाकार ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी येथे स्पर्श करा\nगणित- दशांश अपूर्णांक ऑनलाईन टेस्ट\nगणित पदावली व्हिडिओ पाहण्यासाठी येथे स्पर्श करा\nगणित पदावली यावर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी येथे स्पर्श करा.\nकागद मापन ऑनलाईन टेस्ट\nस्कॉलरशिप परीक्षा तर्क संगती व अनुमान ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी येथे स्पर्श करा.\nMDM Back Dated Information | शालेय पोषण आहार योजना बॅक डेटेड माहिती भरणे\nSanklit Mulyamapan | संकलित मूल्यमापन | प्रथम सत्र प्रश्नपत्रिका\nMahatma Gandhi | महात्मा गांधी जयंती | सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | लहान गट|पहिली ते पाचवी\n5वी ते 10वी अभ्यास\nMDM Back Dated Information | शालेय पोषण आहार योजना बॅक डेटेड माहिती भरणे\nSanklit Mulyamapan | संकलित मूल्यमापन | प्रथम सत्र प्रश्नपत्रिका\nMahatma Gandhi | महात्मा गांधी जयंती | सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | लहान गट|पहिली ते पाचवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/story/5679/", "date_download": "2022-10-07T21:53:48Z", "digest": "sha1:NFEEXMM3ZFYCB7PKD7QTP6EY6XPE2F3T", "length": 5648, "nlines": 83, "source_domain": "www.snopty.com", "title": "स्थानमः महात्म्य प्रमानमः - Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nमृत्यूपूर्वी वडिल आपल्या मुलाला म्हणाले, “माझ्या आजोबांनी मला दिलेले हे *घड्याळ* आहे. हे जवळजवळ *२०० वर्षे जुने* आहे. मी ते तुला देतो, तु *दागिन्यांच्या दुकानात* जा. त्यांना सांग की मला ते विकायचे आहे आणि ते आपल्याला किती ऑफर देतायत ते पहा. “मुलगा दागिन्याचा दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला, आणि म्हणाला, “त्यांनी *१५० रू* ऑफर केले कारण, ते फारच जुने आहे.” वडिल म्हणाले, “आता *भंगाराच्या दुकानात* जा.” मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येवून म्हणाला, “त्यांनी *२० रू* अॉफर केले कारण, ते खूप खराब आहे.”वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन *संग्रहालयात* जायला सांगितलं. तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला. “बाबा, क्युरेटरने या दुर्मिळ तुकड्यास त्याच्या *मौल्यवान वस्तूंच्या संग्रहालयात* समाविष्ट करण्यासाठी *५ लाख* ची ऑफर दिली.” *वडिल शांतपणे स्मितहास्य* करत म्हणाले, मला तुला हेच सांगायचे होते की *योग्य ठिकाणीच* तुमच *योग्य मूल्य* आहे. स्वतःला *चूकीच्या जागी शोधू* नका आणि तुमचे *मूल्य* नसल्यास रागावू नका. ज्यांना आपले *मूल्य* माहित आहे, तेच आपली प्रशंसा करतात.आपली *किंमत जाणून घ्या..* म्हणजे अशा व्यक्ती पासून दुर रहा, ज्याना आपली *किंमत नाही….* सर्व मित्रांना समर्पित… 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nचांगुलपण दुर्लभ,दुर्मिळ परी ऐसे जगणे करी जीवन सुफळ\nपर्यायी मार्गात कधीच नसते समाधानाची खात्री\nबदलती शिक्षण पद्धती आणि शिक्षणाचे होत असलेले बाजारीकरण\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/uncategorized/5731/", "date_download": "2022-10-07T23:28:18Z", "digest": "sha1:LL6C5NRFVYVYTMRBMW5MI3VNBVNPNQNN", "length": 16318, "nlines": 99, "source_domain": "www.snopty.com", "title": "स्मृतीगंध.....ट्रेक नंबर ८.....वैराटगड - Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nरोजचाच हा प्रवास नवा…. भेटतात नवे रोज चेहरे किती…. जेव्हा झाकले मनात स्वतःच्या…. तेव्हा सापडलो माझ्यातील मी\nसाताऱ्यापासून अगदी ३०-३५ किमी अंतरावर असणारा एक छोटेखानी पण अगदी सुरेख असणारा गड म्हणजे वैराटगड……गडावर चढाई करण्याचे २ मार्ग आहेत.पाचवड – वाई रस्त्यावर असणाऱ्या व्याजवाडी गावातून जाणारा एक रस्ता आहे.ह्या मार्गे थोड्या भागात चढाई जरा अवघड वाटते नाहीतर चढाई एकदम सोपी आहे.तर दुसरा मार्ग आहे तो पाचवडच्या थोडे अलिकडून कुडाळ कडे जाणाऱ्या सरताळे- कापसेवाडी गावातून.ह्या मार्गे गडाच्या अगदी पायथ्यापर्यंत गाडी घेवून जाता येते…ह्याच मार्गे गडाची चढाई करण्याचे ठरवले आणि त्यानुसार आम्ही पाच जण वैराटगडाच्या दिशेने मार्गस्थ झालो.\nउन्हाळ्याचे दिवस असल्याने हिरवळ कुठे पाहता येत नाही…त्यात असलेले वाळलेले गवत देखील जळलले…जाळलेले दिसते….नाकाडावरून गडावर जाणारी पायवाट अगदी स्पष्ट दिसते….पण चढाई पूर्वी सोपी वाटणारी चढण पाय घसरत असल्याने थोडी अवघड वाटते…चढाई चे ३ टप्पे लागतात…थोडी खडी चढाई केली की पुन्हा…सपाट असा भाग…पुन्हा पुढचा टप्पा…असा हा प्रवास….थोडीशी थ्रील…आणि थोडा आराम… अश्या मिश्र स्वरूपाचा वाटतो…बऱ्याच ठिकाणी घसरता भाग आहे आणि तिथे सावरता यावे यासाठी झाडी देखील नाही त्यामुळे एक तर पायातील शूज खूप चांगले असावेत…नाहीतर स्वतःचे स्वतःला तशा भागात सावरता येईल हे कसब अंगी असावे.\nप्रत्येक टप्पा पार करताना समोर दिसणारे गडाचे शिखर पाहताना मनाला एक वेगळाच आनंद होत असतो…..आपल्या सह्याद्रीला लाभलेली कड्या कपारीची भक्कम जोड ही खरंच खूप विलक्षण आणि अतुल्य आहे…\nगडाची बांधणी ११ व्या शतकात शिलाहार राजा भोज ह्याने केली आहे….नंतर हा गड आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाला तेव्हा वैराटगड हे एक टेहेळणीसाठी,शस्त्रागार आणि लष्करी ठाणे म्हणून होते…..\nगडाचा थोडाफार इतिहास सांगण्यापूर्वी मला सांगायचं आहे ते तिथल्या पाण्याच्या टाक्यांचे वैशिष्ट्य….म्हणतात ना निसर्गापेक्षा मोठा कलाकार कोण असूच शकत नाही….तीच अनुभूती…तोच अनुभव इथे असणारी पाण्याची टाके पाहताना येतो….दगडाची भली मोठी निसर्गाने बांधलेली भिंत…..त्याच्या मुळाशी आहे ते आत खोलवर……पसरलेले पाण्याचे कुंड…..अशी ५ कुंड पाहायला मिळतील…..४ टाकी ही पाण्याने भरलेली तर आहेत…पण त्यात असणारे शैवाल…आणि इतर वनस्पती ह्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नाही….पण पुढे असणारे एक टाके आहे ज्यात अगदी थंड आणि स्वच्छ असे पिण्यायोग्य पाणी आहे….अंगाची लाही करणाऱ्या ह्या उन्हातून जेव्हा गडाच्या मुख्यद्वारापासून…अलीकडे असणारी ही टाकी दिसतात तेव्हा तिथल्या थंड पाण्याने चेहरा धुतला आणि तिथे थोडा विसावा घेतला की सारा थकवा कसा क्षणात दूर होतो ह्याचा अनुभव हवा असेल तर नक्कीच सर्वांनी वैराटगड सफर करावी.\nह्या टाक्यांपासून थोडे पुढे आले की साधारण…२५ -३० पायऱ्या चढलो की मुख्य द्वार लागते….कमान पूर्णपणे ढासळली असली तरी ती तिच्या अस्तित्वाच्या खुणा स्पष्ट दाखवते…द्वारातून आत आले की लगेच डावी बाजू आहे तिथे लागते ते उताणा मारुतीचे मंदिर….मंदिरात सुबक अशी हनुमानाची मूर्ती आहे…तर त्या मूर्ती शेजारीच आपल्या शिवभक्तांनी एक सुंदर अशी बैठी…छत्रपती शिवाजी राजांची मूर्ती स्थापन केली आहे….मंदिराच्या बाहेर देखील खुल्या जागेत..आणखी एक हनुमानाची मूर्ती आहे…तिथून गडाची पश्चिमेकडील बाजू .. फिरायला जाताना….भग्न अवस्थेत…म्हणजे नुसते अवशेष म्हणले तरी चालू शकेल असे शस्त्रागार…..सरदारांचे वाडे….धान्य कोठार…हे पाहायला मिळेल….तसेच पुढे गेले की दिसणारी चोरवाट…ही मनाला खूप आनंद देवून जाते…आम्हाला देखील त्यातून खाली उतरण्याचा मोह आवरता आला नाही…थोडासा अवघड जरी वाटत असली तरी उत्तम अशी ही चोरवाट उतरणे आणि चढणे हे नेहमीच्या भटकंती करण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींना खूप आनंद देवून जाईल…नवख्या व्यक्तींनी इथे उतरणे शक्यतो टाळावे…कारण….पूर्ण दगडी आणि निमुळता…खोल असणारा हा मार्ग इजा पण पोहोचवू शकतो….मग फक्त वरून ह्या वाटेला पाहून पुढे ध्वजस्तंभाकडे जावे…तिथून पुढे दिसणारा डोंगर आणि सभोवती असणाऱ्या त्याच्या रंगातून…दिसणाऱ्या पायवाटा सांगून जातात की इथे यायला वेगळ्या मार्गे…वेगळ्या पद्धतीने यायला…लोक आतुर असतात……\nतिथून पुन्हा गडाच्या पूर्वेकडे चालताना दिसते ती गडाची भक्कम तटबंदी…एवढ्या वर्षांचा काळ निघून गेला तरी कपारीला असणारी ही भक्कम तटबंदी अभेद्य स्वराज्याची आठवण करून देते…\nराजांनी अगदी मूठभर मावळे हाती घेवून गनीमाला कसे रोखले तर हाच अभेद्य सह्याद्री आहे जो एका मावळ्याला हजार हत्तीचे बळ देत होता…ह्याच कड्या कपाऱ्यातील दगड होते जे भेदक शस्त्र म्हणून चालवले जात होते….खरंच आपण सातारकर आहोत…..ह्या सह्याद्रीला जवळून पाहत आहोत..आणि ह्याच भक्कम कडा.. जिद्द ,चिकाटी आणि आपल्या निर्धाराला ठाम करण्याचे बळ आजही देत आहेत.\nगडावर पूर्वकडे असणारे वैराटेश्वराचे सुंदर मंदिर १९९४ मध्ये पुन्हा नव्याने बांधले आहे…तिथल्या गाभाऱ्यात… पिंडीसमोर नतमस्तक होवून शांत आणि प्रसन्न वातावरणात स्वतःला स्थब्द करून आत्मपरीक्षण करत बराच वेळ तिथे बसलो की मनाला नक्कीच एक विलक्षण ऊर्जा…आत्मशांती…आणि प्रसन्नता मिळते.\nज्यांनी हा अनुभव घेतला आहे त्यांना नव्याने सांगणे गरजेचे नाही…पण जे कोणी गेले नसतील…त्यांनी नक्कीच साताऱ्यातून अगदी जवळ असणाऱ्या ह्या वैराटगडाला भेट द्यावी….\nसरतेशेवटी राहिले ते शिवक्रांती हिंदवी सेनेचे कौतुक…..स्वप्नील धनावडे, सुधीर कांबळे आणि सर्व मावळ्यांचे मनापासून आभार…..गडावर सर्व ठिकाणी…योग्य मार्गदर्शक…मार्गसुचक फलक लावून…खूप मोलाचे काम केले आहे…..त्यामुळे….सोबत कोणी गाईड नसेल तरी खूप आरामात गडाची माहिती घेता येते…..शिवकार्यासाठी सदैव तत्पर…..ना आपली भेट झाली…ना आपली ओळख…पण राजांनी उभे केलेले स्वराज्य…आणि त्याचे पाईक होण्याचा प्रयत्न करणारे आपण सारे….हे एकमेकांचे आहोत ते ह्या शिवबंधनाने…..असेच कार्य सुरू ठेवू…असेच अवघे मिळून राहू…जय शिवराय….\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nस्मृतीगंध…..ट्रेक नंबर १६…भाग २…कोळे नृसिंहपुर\nस्मृतीगंध…..ट्रेक नंबर १६…भाग २…कोळे नृसिंहपुर\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/12/66thnaationalaward.html", "date_download": "2022-10-07T22:58:26Z", "digest": "sha1:3XCXFPQTCHVZHLFG3ZYEIOS37LRDU3SN", "length": 6148, "nlines": 66, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण | Gosip4U Digital Wing Of India राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome मनोरंजन राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण\nआज दिल्लीच्या विज्ञान भवन येथे 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. यामध्ये विविध श्रेणींमध्ये कलाकारांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.दिव्या दत्ता आणि सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जाणून घेऊयात या सन्मानांविषयी...\nकलाकार व पुरस्कार :\n▪ अभिनेता आयुष्मान खुरानाला 'अंधाधुन' चित्रपटासाठी 'बेस्ट अ‍ॅक्टर' म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला.\n▪ अभिनेता विक्की कौशलला उरी : द सर्जिकल स्ट्राईक सिनेमासाठी 'बेस्ट अ‍ॅक्टर' म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला.\n▪ साऊथ अ‍ॅक्ट्रेस कीर्ती सुरेशला 'महानती' या तेलगू सिनेमासाठी 'बेस्ट अ‍ॅक्ट्रेस' म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला.\n▪ अभिनेता अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' या सिनेमाला 'बेस्ट सोशल फिल्म' म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.\n▪ बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांना 'दासाहेब फाळके' पुरस्काकारानं सन्मान देण्यात आला.\n▪ सुरेखा सिक्री यांना बधाई हो मधील चमकदार कामगिरीबद्दल नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.\n4 बाल कलाकारांना पुरस्कार :\nबाल कलाकार मास्टर रोहित, मास्टर समीप सिंह रणौत, मास्टर ताल्हा अरशद आणि मास्टर श्रीनिवास यांना नॅशनल अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं.\nबॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. 77 वर्षीय बच्चन हे तापाने आजारी आहेत. बच्चन यांनी ट्विटरवरून हि माहिती दिली.\nदरम्यान, याव्यतिरिक्त अनेक भाषिक चित्रपटनांही वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://marathisky.com/sardar-vallabhbhai-patel-information-in-marathi/", "date_download": "2022-10-07T22:28:08Z", "digest": "sha1:ACSZNOXL2EUM5QKFCKXW77QKG2DSUMOT", "length": 51679, "nlines": 215, "source_domain": "marathisky.com", "title": "सरदार वल्लभभाई पटेल जीवनचरित्र Sardar vallabhbhai patel information in Marathi - मराठी स्काइ", "raw_content": "\nSardar vallabhbhai patel information in Marathi: नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनचरित्र विषयी माहिती जाणून घेणार आहोत, कारण सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय राजकारणातील एक नावाजलेले नाव आहे. ते वकील आणि राजकीय कार्यकर्ते होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतर त्यांनी 500 पेक्षा जास्त रियासत भारतीय संघटनेत एकत्रिकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.\nगांधींच्या विचारसरणीवर आणि तत्त्वांवर त्यांचा खूप प्रभाव होता. नेत्याबरोबर अगदी जवळून काम केले. जनतेची निवड असूनही सरदार पटेल यांनी महात्मा गांधी यांच्या विनंतीवरून कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या उमेदवारीपासून माघार घेतली. ते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते आणि देशाच्या एकत्रीकरणाच्या प्रयत्नांमुळे त्यांना ‘आयर्न मॅन’ हे नाव मिळाले.\n1.2 वल्लभभाई पटेल यांचे जन्म आणि प्रारंभिक जीवन (Vallabhbhai Patel’s birth and early life)\n1.6.1 भारतीय राष्ट्रीय चळवळीतील भूमिका –\n1.6.2 महामंडळाचे अध्यक्ष ते देशाचे पहिले गृहमंत्री –\n1.6.3 भारताचे पहिले गृहमंत्री –\n1.6.4 रियासतांचे एकीकरण करण्यात सरदार पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली-\n1.6.5 सरदार वल्लभभाई पटेल आणि भारत विभाजन –\n1.12 तुमचे काही प्रश्न\n1.12.1 वल्लभभाई पटेल यांनी काय केले\n1.12.2 वल्लभभाई पटेल यांचा मृत्यू कधी झाला\n1.12.3 सरदार पटेल यांचा नारा काय आहे\n1.12.4 वल्लभभाई पटेल यांना सरदार का म्हणतात\n1.12.5 पटेल योजना काय आहे\n1.12.6 भारताचा लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते\n1.12.7 हे पण वाचा\n1.12.8 आज आपण काय पाहिले\nसरदार वल्लभभाई पटेल जीवन परिचय (Sardar vallabhbhai patel biodata)\nपूर्ण नाव वल्लभभाऊ झावरभाई पटेल\nजन्म तारीख 31 ऑक्टोबर 1875\nजन्म स्थान नाडियाद, बॉम्बे प्रेसिडेन्सी (सध्या गुजरात)\nवडिलांचे नाव झावरभाई पटेल\nमुले मनिबेन पटेल, दह्याभाई पटेल\nशिक्षण एन.के. हायस्कूल, पेटलाड; इन्स ऑफ कोर्ट, लंडन, इंग्लंड\nराजकीय विचारसरणी मध्यम, उजवीकडे\nएका राष्ट्राच्या प्रकाशन कार्याच्या कल्पनाः वल्लभभाई पटेल, वल्लभभाई पटेल यांची संग्रहित कामे, खंड\nमृत्यू 15 डिसेंबर 1950\nवल्लभभाई पटेल यांचे जन्म आणि प्रारंभिक जीवन (Vallabhbhai Patel’s birth and early life)\nसरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातच्या नाडियाड येथे एक जमींदार कुटुंबात झाला. ते त्यांचे वडील झावरभाई पटेल आणि आई लाडबाई यांचे चौथे पुत्र होते. त्याचे वडील एक शेतकरी होते, तर आई एक आध्यात्मिक आणि धार्मिक स्त्री होती. आम्हाला सांगू की त्यांचे तीन मोठे भाऊ नरसीभाई, विठ्ठलभाई आणि सोमाभाई पटेल आणि दहीबा पटेल अशी एक बहिण होती.\nबालविवाहाच्या रूढीनुसार वल्लभभाई पटेल यांचेही वयाच्या 16 व्या वर्षी झवेर्बा नावाच्या मुलीशी 1891 साली लग्न झाले होते. त्यांच्याकडून दह्याभाई आणि मनीबेन पटेल अशी दोन मुले होती.\nवल्लभभाई पटेल यांची पत्नी झवेर्बा कर्करोगाने ग्रस्त असल्याने त्यांच्याबरोबर जास्त काळ राहू शकली नाहीत, 1990 मध्ये वल्लभभाई पटेल यांना सोडून झवेराबा हे जग सोडून गेले.\nजेव्हा वल्लभभाई पटेल यांना झवेर्बाच्या मृत्यूची बातमी कळली, त्यावेळी ते आपल्या काही न्यायालयीन कामकाजात व्यस्त होते आणि ही बातमी ऐकूनही त्यांनी आपली कार्यवाही सुरू ठेवली आणि त्यांनी केसही जिंकली, त्यानंतर त्यांनी पत्नीची हत्या केली. (Sardar vallabhbhai patel information in Marathi) सर्वांना ही बातमी दिली गेली आणि त्यानंतर त्याने आयुष्यभर आपल्या मुलांबरोबर विधुर म्हणून घालवले.\nवल्लभाई पटेल यांचे प्रारंभिक शिक्षण गुजराती माध्यमाच्या शाळेत झाले, त्यानंतर त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण करण्यास त्याला बराच वेळ लागला. वयाच्या 22 व्या वर्षी 1897 साली त्याने दहावीची परीक्षा दिली.\nकौटुंबिक परिस्थितीमुळे, महाविद्यालयात जाण्याऐवजी, उसने उधारलेली पुस्तके घेऊन घरीच अभ्यास केला, त्यासोबतच त्यांनी जिल्हा दंडाधिका’ऱ्याच्या परीक्षेचीदेखील घरी तयारी केली होती, तर सरदार पटेल अभ्यासामध्ये इतके आश्वासक होते. या परीक्षेत त्याने सर्वोच्च क्रमांक मिळविला होता.\nत्यानंतर, सन 1910 मध्ये ते लॉ येथे पदवी मिळविण्यासाठी इंग्लंडला गेले. त्यांना महाविद्यालयात जाण्याचा अनुभव नव्हता, परंतु तो बुद्धिमत्तेच्या बाबतीत इतका वेगवान होता की त्याने केवळ 30 महिन्यांत 36 महिन्यांचा कायदा अभ्यासक्रम पूर्ण केला, अशा प्रकारे सन 1913 मध्ये वल्लभभाई पटेल यांनी इन्स ऑफ कोर्टमधून आपला कायदा केला. त्याने अभ्यास पूर्ण केला आणि यावेळी त्यांनी सर्वाधिक गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला.\nयानंतर ते भारतात परतले आणि गुजरातमधील गोध्रामध्ये आपल्या कायद्याची प्रथा सुरू केली. त्याच वेळी, कायद्यात त्यांची कुशल प्रवीणता पाहून, ब्रिटीश सरकारने त्यांना बर्‍याच मोठ्या पदांवर नियुक्त करण्याचीही ऑफर दिली होती, परंतु वल्लभभाई पटेल यांनी ब्रिटीश सरकारचा कोणताही प्रस्ताव स्वीकारला नाही, कारण त्यांना ब्रिटिश कायदे अजिबात आवडत नाहीत आणि त्यांचे जोरदार विरोध दर्शवित त्यांनी ब्रिटीशांसोबत काम करण्याची ऑफर नाकारली.\nस्थानिक कामः गुजरातमधील रहिवासी असलेल्या वल्लभभाईंनी सर्वप्रथम आपल्या स्थानिक भागातील दारू, अस्पृश्यता आणि स्त्रियांवरील अत्याचाराविरूद्ध लढा दिला. हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.\nखेडा चळवळ: 1971 मध्ये गांधीजींनी वल्लभभाई पटेल यांना खेड्यातील शेतकर्‍यांना एकत्र आणण्यास आणि ब्रिटीशांविरूद्ध आवाज उठवण्यास उद्युक्त करण्यास सांगितले. त्या काळात फक्त शेती ही भारताच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत होता, परंतु शेती नेहमीच निसर्गावर अवलंबून असते.\nत्या दिवसांची अशीच परिस्थिती होती. 1971 मध्ये जेव्हा अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांची पिके नष्ट झाली होती, परंतु तरीही ब्रिटीशांचे शासन अद्याप योग्य रीतीने झाले नव्हते. (Sardar vallabhbhai patel information in Marathi) ही आपत्ती पाहून गांधीजींसोबत वल्लभभाईंनी शेतकऱ्याना कर न भरण्यास भाग पाडले आणि शेवटी ब्रिटीश सरकारला सहमती दर्शवावी लागली आणि खेडा चळवळ म्हणून स्मरणात ठेवलेला हा पहिला मोठा विजय होता.\nत्यांनी प्रत्येक चळवळीत गांधीजींचे समर्थन केले. त्याने आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाने इंग्रजी कपड्यांवर बहिष्कार घालून खादीचा अवलंब केला.\nया कर्कश आवाज नेत्या वल्लभभाईंनी बारडोलीमध्ये सत्याग्रहाचे नेतृत्व केले. सायमन कमिशनच्या विरोधात हा सत्याग्रह 1928 मध्ये करण्यात आला होता. यात शासनाने वाढविलेल्या कराला विरोध दर्शविला आणि ब्रिटीश व्हायसराय यांना शेतकरी बांधव पाहून खाली झुकले. या बारडोली सत्याग्रहामुळे वल्लभभाई पटेल यांचे नाव संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले आणि लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या चळवळीच्या यशामुळे बारदोलीतील लोकांनी वल्लभभाई पटेल यांना सरदार म्हणू लागले, त्यानंतर त्यांना सरदार पटेल यांच्या नावाने प्रसिद्धी मिळू लागली.\nभारतीय राष्ट्रीय चळवळीतील भूमिका –\n1917 मध्ये सरदार वल्लभभाई यांची गुजरात सभेचे सचिव म्हणून निवड झाली. ब्रिटिशांनी करारा पुराचा आग्रह धरल्यानंतर शेतकऱ्याना कर न भरण्यास उद्युक्त केले. 1918 मध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात कर न भरविण्याच्या मोहिमेचे नेतृत्व केले. शांततेच्या चळवळीमुळे ब्रिटीश अधिकाऱ्याना शेतकऱ्याकडून घेतलेली जमीन परत करण्यास भाग पाडले.\nआपल्या परिसरातील शेतकऱ्याना एकत्र आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांना ‘सरदार’ ही पदवी मिळाली. गांधींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीचे त्यांनी सक्रिय समर्थन केले. पटेल यांनी आपल्यासोबत देशाचा दौरा केला, 300,000 सदस्य भरती केले आणि 15 लाख रुपये जमा केले.\n1928 मध्ये पुन्हा बारडोलीच्या शेतकर्‍यांना “कर वाढ” या समस्येचा सामना करावा लागला. प्रदीर्घ समन्स नंतर जेव्हा शेतकऱ्यानी अतिरिक्त कर भरण्यास नकार दिला. तर सरकारने त्यांच्या जबास जप्त केल्या. हे आंदोलन सहा महिन्यांहून अधिक काळ चालले. पटेल यांनी अनेक फेऱ्या बोलल्यानंतर सरकार व शेतकरी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या करारानंतर जमीन परत शेतकर्‍यांना देण्यात आली.\n1930 मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या प्रसिद्ध मीठ सत्याग्रह चळवळीत भाग घेतल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल हे कैदेत होते. “मीठ चळवळी” दरम्यान त्यांनी केलेल्या प्रेरणादायी भाषणांनी अनेकांचा दृष्टीकोन बदलला. (Sardar vallabhbhai patel information in Marathi) ज्याने नंतर आंदोलन यशस्वी करण्यात प्रमुख भूमिका बजावली. त्यांनी संपूर्ण गुजरातमध्ये सत्याग्रह चळवळीचे नेतृत्व केले.\nमहात्मा गांधी आणि तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड इरविन यांच्यात झालेल्या करारानंतर 1931 मध्ये सरदार पटेल यांना मुक्त करण्यात आले. हा करार गांधी-इर्विन करार म्हणून ओळखला जात असे. त्याच वर्षी कराचीच्या अधिवेशनात पटेल यांना भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. तेथे पक्षाने भावी मार्गाचा उल्लेख केला होता. मूलभूत आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी कॉंग्रेसने स्वत: ला वचनबद्ध केले. या अधिवेशनात धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे स्वप्न पडले.\n1934 च्या विधानसभेच्या निवडणुकीत सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेससाठी प्रचार केला. जरी त्यांनी निवडणूक लढविली नाही, तरी सरदार पटेल यांनी निवडणुकीत त्यांच्या साथीदारांना मदत केली.\n1942 च्या भारत छोडो चळवळीत पटेल यांनी गांधींना अतूट पाठिंबा दिला. अनेक समकालीन नेत्यांनी नंतरच्या निर्णयावर टीका केली. हार्दिक भाषणांच्या चळवळीच्या चळवळीचा अजेंडा प्रचार करत ते देशभर फिरत राहिले. 1942 मध्ये पुन्हा अटक झाली आणि अहमदनगर किल्ल्यात कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांसह 1945 पर्यंत तुरूंगात डांबण्यात आले.\nसरदार पटेल यांच्या भेटीत कॉंग्रेसच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांशी अनेकदा संघर्ष होता.1936 मध्ये त्यांनी जेव्हा जवाहरलाल नेहरूंनी समाजवाद स्वीकारला तेव्हा उघडपणे त्यांची नाराजी व्यक्त केली. (Sardar vallabhbhai patel information in Marathi) पटेल हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापासूनही सावध होते आणि त्यांना पक्षात अधिक सत्तेसाठी उत्सुक मानले गेले.\nमहामंडळाचे अध्यक्ष ते देशाचे पहिले गृहमंत्री –\nसरदार वल्लभभाई पटेल यांची कीर्ती सातत्याने वाढत होती, म्हणूनच त्यांनी अहमदाबादमध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुका सतत जिंकल्या, आपल्याला सांगू द्या की 1922, 1924 आणि 1927 मध्ये ते अहमदाबादच्या महामंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. गेले\nत्याच वेळी सन 1931 मध्ये वल्लभभाई पटेल यांना कॉंग्रेसच्या 31 व्या अहमदाबाद अधिवेशनाच्या स्वागता समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आणि गुजरात प्रदेशातील कॉंग्रेस कमिटीचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली, त्यानंतर ते कॉंग्रेस राहिले. 1945 पर्यंत गुजरातचे अध्यक्ष.\nभारताचे पहिले गृहमंत्री –\nमात्र, यावेळी त्यांना अनेक वेळा तुरुंगातही जावे लागले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ते गृहमंत्री आणि भारताचे उपपंतप्रधान झाले. जरी सरदार वल्लभभाई पटेल यांची कीर्ती इतकी पसरली होती की ते पंतप्रधानपदाचे पहिले दावेदार होते, परंतु गांधी यांच्यामुळे त्यांनी स्वत: ला या शर्यतीपासून दूर ठेवले आणि जवाहरलाल नेहरू यांना देशाचे पहिले पंतप्रधान केले गेले.\nरियासतांचे एकीकरण करण्यात सरदार पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली-\nस्वतंत्र भारताचे गृहमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपली राजकीय दूरदृष्टी व बुद्धिमत्ता वापरुन भारताच्या वेगवेगळ्या रियासतांच्या राजांना संघटित केले आणि भारतीय संघाच्या 565 राजांच्या राजांना हे पटवून दिले की स्वतंत्र राज्याचे स्वप्न पाहणे शक्य नाही.\nत्यानंतर, सर्व राज्यांनी भारतामध्ये विलीन होण्याचे मान्य केले, परंतु हैदराबादचे निजाम, जुनागड आणि जम्मू-काश्मीरच्या नवाबांनी त्यांची रियासत भारतात विलीन करण्यास नकार दिला. (Sardar vallabhbhai patel information in Marathi) त्यानंतर वल्लभभाई पटेल यांनी आपल्या हुशारी व बुद्धिमत्तेच्या बळावर सैन्य वापरुन या तिन्ही राजांच्या राजांना त्यांचे राजे भारतात विलीन करण्यास प्रवृत्त केले.\nअशाप्रकारे वल्लभभाई पटेल यांनी कोणतेही संघर्ष न करता भारतीय संघ शांततेत एकत्र केले, तर या महान कार्यासाठी त्यांना आयर्न मॅन ही पदवी दिली गेली.\nसरदार वल्लभभाई पटेल आणि भारत विभाजन –\nमुस्लिम लीग नेते मुहम्मद अली जिन्ना यांच्या नेतृत्वात वाढत्या अलगाववादी चळवळीने स्वातंत्र्याच्या अगदी आधी हिंदू-मुस्लिम दंगलींना हिंसक वळण लावले होते. ज्यावर सरदार पटेल यांचा असा विश्वास होता की स्वातंत्र्यानंतर असे हिंसक आणि जातीय दंगल झाले.\nडिसेंबर 1946 मध्ये त्यांनी व्ही.पी. मेनन या सिव्हिल वर्करबरोबर काम केले आणि नंतर लोकशाही देशाच्या बळकटीसाठी विनाशकारी ठरणाऱ्याकेंद्र सरकारची कार्यक्षमता कमकुवत करणाऱ्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी विभाजन परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले.\n1950 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रकृती खालावू लागली, तर २ नोव्हेंबर 1950 रोजी त्यांची तब्येत इतकी बिघडली की त्यांना अंथरुणावरुन बाहेर पडूही शकला नाही, त्यानंतर 15 डिसेंबर 1950 रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला ज्यामुळे हा महान आत्मा मरण पावला. मुदत संपली.\nसरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार (Sardar Vallabhbhai Patel Award)\n1991 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर, त्याचा वाढदिवस 31 ऑक्टोबर हा वर्ष 2014 मध्ये राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित करण्यात आला.\nत्याशिवाय 31 ऑक्टोबर 1965 रोजी भारत सरकारने सरदार पटेल यांचे स्मारक म्हणून टपाल तिकिट देखील जारी केले. इतकेच नव्हे तर बर्‍याच शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि विमानतळांची नावे त्यांच्या नावावर होती. जसे –\nसरदार वल्लभभाई पटेल कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, मेरठ\nसरदार वल्लभभाई राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था सूरत\nसरदार पटेल विद्यापीठ, गुजरात\nसरदार वल्लभभाई पटेल तंत्रज्ञान संस्था, वसाड\nमेमोरियल सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट\nसरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारक, अहमदाबाद\nसरदार सरोवर धरण, गुजरात\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबाद\nसरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अहमदाबाद\n“तुझी चांगुलपणा आपल्या मार्गात अडथळा आहे, म्हणून रागाने आपले डोळे लाल होऊ द्या आणि जोरदार हातांनी अन्याय सहन करा.”\n“स्वातंत्र्यानंतरही अधीनतेचा वास येत राहिला तर स्वातंत्र्याचा सुगंध पसरत नाही.”\n“आपला अपमान सहन करण्याची कला आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.”\n“शक्ती नसतानाही विश्वास व्यर्थ आहे. विश्वास आणि सामर्थ्य दोन्ही महान कार्य करण्यासाठी आवश्यक आहेत.”\n“संस्कृती जाणीवपूर्वक शांतीवर बांधली गेली आहे. जर त्यांना मरावे लागले तर ते आपल्या पापात मरतील. जे प्रेम व शांतीने केले जाते ते वैरभावनेने केले जात नाही. ”\n“जोपर्यंत माणूस ते मिळवून देण्यास किंमत मोजत नाही तोपर्यंत हक्क माणसाला अंध बनवतील.”\n“या मातीमध्ये काहीतरी अनोखे आहे, जे अनेक अडथळे असूनही नेहमीच महान आत्म्यांचे वास राहिले आहे.”\n“जेव्हा लोक एक झाले, तेव्हा अगदी क्रूर राजवटदेखील त्यांच्यासमोर उभे राहू शकत नाही, म्हणून जातीय आणि उच्च-नीच भेदभाव विसरून सर्वजण एक झाले पाहिजे.”\n“आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एका दिवसात घडत नाही.”\n“अविश्वास हे भीतीचे कारण आहे.”\n“विवेकी व्यक्ती नेहमी आशावादी असते.”\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवनचरित्र (Biography of Sardar Vallabhbhai Patel)\nलंडनमधून बॅरिस्टर या पदव्या संपादनानंतर ते 1913 मध्ये भारतात परत आले.\nलखनऊमधील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात 1916 मध्ये वल्लभभाईंनी गुजरातचे प्रतिनिधित्व केले.\n1917 मध्ये ते अहमदाबाद नगरपालिकेत निवडून आले.\n1917 मध्ये त्यांनी खेडा सत्याग्रहात भाग घेतला, त्यांनी सरबंदी चळवळीचे नेतृत्व केले, शेवटी सरकारला नतमस्तक व्हावे लागले, सर्व कर परत घेतला, सरदारांनी त्यांच्या नेतृत्वात ही चळवळ जिंकली, जून 1918 च्या महिन्यात गांधीजींनी विजय साजरा केला. (Sardar vallabhbhai patel information in Marathi) त्या वेळी. वल्लभभाई यांना बोलवून प्रमाणपत्र देण्यात आले.\n1919 मध्ये वल्लभभाईंनी अहमदाबादमध्ये राऊलट कायद्याचा निषेध करण्यासाठी मोठा मोर्चा काढला.\n1920 मध्ये गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली, वल्लभभाईंनी आपले सर्व आयुष्य या असहकार चळवळीत देशासाठी वाहून घेतले, ज्याला महिन्याला हजारो रुपये मिळणारे वकील त्यांनी सोडले.\n1921 मध्ये ते गुजरात प्रांतीय कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.\n1923 मध्ये, तिरंग्यावर बंदी घालण्यासाठी ब्रिटीश सरकारने कायदा बनविला, नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणाहून हजारो सत्याग्रह जमले, हा लढा साडेतीन महिने पूर्ण उत्साहाने सुरू झाला, सरकारने हा लढा दडपण्याचा अशक्य प्रयत्न केला.\n1928 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली बारडोली येथील वल्लभभाईंनी शेतकर्‍यांसाठी सरबंदी चळवळ सुरू केली, प्रथम वल्लभभाईंनी सरकारला सर्व कमी करण्याची विनंती केली, परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, योजनेसह आंदोलन सुरू केले आणि सावधगिरीने सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला . अशक्य असण्याचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी मुंबई विधानसभेच्या काही सदस्यांनी त्यांच्या जागा सोडल्या. याचा परिणाम म्हणून सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या सशर्त मान्य केल्या, बारडोली शेतक्यांनी वल्लभभाईंना ‘सरदार’ चा मान दिला.\n1931 मध्ये कराची येथे झालेल्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात वल्लभभाई अध्यक्ष होते.\n1942 मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना तुरूंगात जावं लागलं.\n1946 मध्ये स्थापन झालेल्या इंटरमिजिएट अ‍ॅक्टिंग कॅबिनेटमध्ये ते गृहमंत्री होते, ते घटना समितीचे सदस्यही होते.\n15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, स्वातंत्र्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना उप-उपराष्ट्रपती पदाची पदवी मिळाली, त्यांना गृह माहिती व प्रसारण देण्यात आले, घटक राज्यांशी संबंधित असे प्रश्न दिले गेले.\nस्वातंत्र्यानंतर, वल्लभभाईंनी भारतात विलीनीकरण केले, हैदराबाद संस्था देखील त्यांच्या पोलिस कारवाईमुळे 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतात विलीन झाली.\nसरदार वल्लभभाई पटेल चित्रपट (Sardar Vallabhbhai Patel movie)\n1993 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘सरदार’ हा बायोपिक चित्रपट आला, जो केतन मेहता दिग्दर्शित होता. अभिनेता परेश रावल यांनी सरदार पटेलची भूमिका साकारली होती.\nवल्लभभाई पटेल यांनी काय केले\nत्यांनी भारताचे राजकीय एकत्रीकरण आणि 1947 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान गृहमंत्री म्हणून काम केले. पटेल यांनी जवळजवळ प्रत्येक संस्थानांना भारतात सामील होण्यासाठी राजी केले. नवीन स्वतंत्र देशात राष्ट्रीय एकात्मतेबद्दलची त्यांची बांधिलकी संपूर्ण आणि बिनधास्त होती, ज्यामुळे त्यांना “भारताचा लोहपुरुष” हा सन्मान मिळाला.\nवल्लभभाई पटेल यांचा मृत्यू कधी झाला\nवल्लभभाई पटेल, संपूर्ण वल्लभभाई झावरभाई पटेल, सरदार पटेल (जन्म 31 ऑक्टोबर, 1875, नडियाद, गुजरात, भारत 15 डिसेंबर 1950 रोजी मृत्यू झाला, बॉम्बे [आता मुंबई]), भारतीय बॅरिस्टर आणि राजकारणी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांपैकी एक भारतीयांच्या लढ्यादरम्यान.\nसरदार पटेल यांचा नारा काय आहे\n“धर्माच्या मार्गावर जा – सत्य आणि न्यायाचा मार्ग. आपल्या शौर्याचा गैरवापर करू नका. एकसंध राहा. सर्व विनम्रतेने पुढे जा, परंतु तुमच्या अधिकार आणि दृढतेची मागणी करत तुम्ही ज्या परिस्थितीला सामोरे जात आहात त्याबद्दल पूर्णपणे जागृत रहा. ”\nवल्लभभाई पटेल यांना सरदार का म्हणतात\nसरदार म्हणजेच सरदार ही पदवी महात्मा गांधींनी त्यांना दिली होती. हे नाव त्यांना बारडोली सत्याग्रहादरम्यान त्यांच्या अपवादात्मक संघटनात्मक कौशल्याची ओळख म्हणून देण्यात आले. वल्लभभाई पटेल यांनी शेवटी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले आणि त्याच्या यशामुळे त्यांना ‘सरदार’ ही पदवी मिळाली.\nपटेल योजना काय आहे\nएकीकरणाची प्रक्रिया तिप्पट होती आणि “पटेल योजना” म्हणून ओळखली जाते. (Sardar vallabhbhai patel information in Marathi) पटेल योजनेंतर्गत खालील तरतुदी होत्या: – लहान राज्यांचे शेजारील प्रांतांमध्ये विलीनीकरण: जवळपास 216 राज्ये त्यांना लागून असलेल्या प्रांतांमध्ये विलीन झाली.\nभारताचा लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते\n‘भारताचा लोहपुरुष’: सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मरण. 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातच्या नडियाद येथे जन्मलेल्या पटेल यांनी 1897 साली त्यांच्या मूळ शहरात शालेय शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यासक्रम घेण्याचा निर्णय घेतला.\nSIP चा मराठीत अर्थ\nमांजरी बद्दल संपूर्ण माहिती \nकोलाबा किल्ल्याची संपूर्ण माहिती\nआज आपण काय पाहिले\nतर मित्रांनो, वरील लेखात आपण Sardar vallabhbhai patel information in marathi पाहिली. यात आपण सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म, शिक्षण आणि त्यांचे करियर बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.\nआमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.\nतसेच Sardar vallabhbhai patel In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Sardar vallabhbhai patel बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.\nतर मित्रांनो, वरील सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवनचरित्र या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/tips-tricks/how-to-make-payment-using-phone-camera-read-details/articleshow/87812134.cms?utm_source=hyperlink&utm_medium=tips-tricks-articleshow&utm_campaign=article-3", "date_download": "2022-10-07T23:17:01Z", "digest": "sha1:E5Q3NJOMM4MPHZVKHCQWVI4YSN5ME6ZT", "length": 13050, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nUPI Payment : फोनच्या कॅमेराने लगेच होणार UPI पेमेंट, प्रोसेस खूपच सोप्पी, फॉलो करा या टिप्स\niOS 15 मधील एक फीचर भारतीय युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. या फीचर अंतर्गत युजर्सना नेमकं काय मिळेल आणि त्याचा त्यांना कसा फायदा होईल जाणून घ्या.\niOS 15 मध्ये नवीन अपडेट\nथेट कॅमेरा वरून करा UPI पेमेंट\nनवी दिल्ली: iOS 15 आले असून त्यासोबत काही नवीन वैशिष्ट्ये येत आहे . यातील एका फीचर अंतर्गत UPI पेमेंट पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे. या फीचर अंतर्गत, यूपीआय पेमेंट थेट आयफोन कॅमेरा अॅपवरून केले जाऊ शकते. यासाठी UPI अॅप उघडण्याची गरज नाही. Apple च्या iOS 15 वैशिष्ट्यांच्या पेजनुसार, युजर्स आता त्यांनी अलीकडे वापरलेल्या UPI पेमेंट अॅप्सपैकी एक निवडण्यास सक्षम असतील.\nवाचा: Laptop Tips : स्लो Laptop ला 'असे' करा सुपरफास्ट, फॉलो करा या सोप्पी टिप्स\nहे वैशिष्ट्य iOS 15 बीटा युजर्सठी काम करणार नाही. हे फीचर वापरण्यासाठी तुम्ही iOS 15 सॉफ्टवेअरमध्ये अपग्रेड करू शकाल. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी जनरल वर टॅप करावे लागेल .\nयासाठी तुम्‍हाला तुमच्‍या फोनवर UPI पेमेंट अॅप असल्‍याची देखील खात्री करणे आवश्‍यक आहे जिथून तुम्ही पेमेंट करू इच्छिता. यानंतर तुम्ही कॅमेरा सेटिंग्जमधून स्कॅन QR कोड टॉगल सक्षम केले आहे याची देखील खात्री करावी लागेल . या सेटिंग्जशिवाय, तुम्ही तुमचा कॅमेरा अॅप वापरून UPI पेमेंट करू शकणार नाही. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.\niPhone वर कॅमेरा अॅप उघडा. नंतर जेव्हा तुम्हाला पेमेंट करायचे असेल तेव्हा कॅमेरा UPI QR कोडवर दाखवा.\nकॅमेरा QR कोड ओळखतो तेव्हा तो तुम्हाला तुमचे UPI पेमेंट अॅप व्ह्यूफाइंडरमध्ये दाखवेल.त्यानंतर पेमेंट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.\nत्यानंतर पॉप-अपमध्ये एक Message दिसेल. त्यावर “कॅमेरा उघडायचा आहे (तुमच्या UPI पेमेंट अॅपचे नाव) असे लिहिलेले असेल.\nतुम्हाला ओपन वर टॅप करावे लागेल. पुढे, ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी तुम्ही फॉलो करत असलेल्या steps फॉलो करा.\nशेवटी, पेमेंट कन्फर्म करा. तुम्हाला इतर कोणतेही UPI पेमेंट अॅप वापरायचे असल्यास, तुम्हाला व्ह्यूफाइंडरच्या तळाशी उजव्या बाजूला असलेल्या QR कोड स्कॅनरवर टॅप करावे लागेल.\nतुम्हाला तुमच्या फोनवर UPI अॅप्सची सूची दिसेल. यानंतर, तुम्हाला ज्या अॅपमधून पेमेंट करायचे आहे ते अॅप निवडावे लागेल.\nतुमचा कॅमेरा अॅप वापरण्याची परवानगी द्या आणि उर्वरित स्टेप्स फॉलो करा.\nवाचा: Jio Plans : Jio च्या ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळताहेत डेटा-कॉलिंग-OTT सह 'हे' बेनिफिट्स\nवाचा: Smartphones: Galaxy S21 F ते OnePlus Nord N20 पर्यंत हे स्मार्टफोन्स एन्ट्री करण्यास सज्ज\nवाचा: Airpods Tips : AirPods चे मायक्रोफोन नीट काम करत नसतील तर फॉलो करा 'या' टिप्स\nमहत्वाचे लेखPhonepe : इलेक्ट्रिसिटी बिल भरण्यासाठी अशी घ्या PhonePe ची मदत, फॉलो करा 'या' टिप्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nसिनेन्यूज विजय देवरकोंडा आणि रश्मिका लपत-छपत कुठे निघाले Video पाहून नेटकऱ्यांनी लावायचा तो अंदाज लावलाच\nइलेक्ट्रॉनिक्स 8GB रॅम आणि 10,090 mAh बॅटरी पावर असणाऱ्या या Samsung Tabs खरेदी करा आणि मिळवा ₹18000 इतका जबरदस्त डिस्काउंट\nआर्थिक राशीभविष्य आर्थिक राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२२ : जाणून घ्या उद्याचा दिवस कोणासाठी ठरेल धनप्राप्तीचा\n जे लॉटरीचं तिकीट कचऱ्यात टाकलं, त्यानेच बनवले या महिलेला करोडोंची मालकीण\nमटा ओरिजनल मुंढेंच्या धाडसत्राने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, रात्री डॉक्टर नसल्यास थेट घरचा आहेर\nसिंधुदुर्ग उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे राहणारा आमदार चौकशीच्या फेऱ्यात, कोकणातल्या नेत्याला एसीबीची नोटीस\nLive Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी\nदेश ​देश हादरला... लग्न करण्यास नकार दिला, त्याने १९ वर्षीय मारुतीला पेट्रोल ओतून पेटवलं...​\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://nmk.org.in/zp-dhule-recruitment/", "date_download": "2022-10-07T22:06:50Z", "digest": "sha1:WQSV4IUSARKLV4APNV3G42KOKWWUULUY", "length": 2505, "nlines": 48, "source_domain": "nmk.org.in", "title": "जिल्हा परिषद, धुळे येथे पदभरती - NMK.ORG.IN", "raw_content": "\nजिल्हा परिषद, धुळे येथे पदभरती\nग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद, धुळे येथे पदभरती सुरु झाली असून पात्र उमेदवाराने अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी खालील सविस्तर माहिती वाचावी.\nएकूण पदाच्या २८ जागा.\nशैक्षणिक अटी: अधिक माहिती साठी जाहिरात नक्की पहावी.\nशेवटची तारीख: ११ जानेवारी २०२१.\nअर्जा साठीचा पत्ता: मा. जिल्हाधिकारी, (पुरवठा शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/dhule-news-bjp-on-32-gram-panchayats-out-of-33-gram-panchayats-rds84", "date_download": "2022-10-07T21:37:59Z", "digest": "sha1:VSSMZUO5J5WQQ3TDJOBBXVERLDSQTVNC", "length": 5461, "nlines": 62, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Dhule: 33 ग्रामपंचायतींपैकी 32 ग्रामपंचायतींवर भाजप; शिरपूर तालुक्‍यात आमदार पटेलांचेच वर्चस्‍व", "raw_content": "\nGram Panchayat Result: 32 ग्रामपंचायतींवर भाजप; शिरपूर तालुक्‍यात आमदार पटेलांचेच वर्चस्‍व\n33 ग्रामपंचायतींपैकी 32 ग्रामपंचायतींवर भाजप; आमदार पटेलांचेच वर्चस्‍व\nधुळे : शिरपूर तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीचे मतमोजणीचे निकाल हाती आले आहेत. या 33 ग्रामपंचायतीपैकी 32 ग्रामपंचायतींवर भाजपचे (BJP) वर्चस्व असल्याचे बघावयास मिळाले आहे. तर एका ग्रामपंचायतीवर राष्‍ट्रवादी काँग्रेसला (Congress) विजय मिळाला आहे. (Dhule News Shirpur Taluka BJP)\nHeavy Rain: धुळे तालुक्‍यात मुसळधार; अनेक गावांमध्‍ये शिरले पुराचे पाणी\nशिरपूर (Shirpur) तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज सकाळी दहा वाजेपासून या 33 ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच ग्रामपंचायतीच्या निकालावर भाजपचे वर्चस्व असल्याचे बघावयास मिळाले आहे. तालुक्‍यातील 32 ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व कायम ठेवल्याचे बघायला मिळाले आहे.\nशिरपूर तालुक्यातील संपूर्ण राजकारण हे माजी मंत्री तथा (Amrish Patel) आमदार अमरीशभाई पटेल यांच्या भोवतीच नेहमीच फिरताना बघायला मिळाले आहे. यापूर्वी अमरीश पटेल हे काँग्रेसमध्ये असताना शिरपूर तालुक्यात पूर्णतः काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते. परंतु त्यानंतर अमरीश पटेल यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या काही निवडणुकांपासून शिरपूर तालुक्यात भाजपचे वर्चस्व बघायला मिळाले आहे. 33 ग्रामपंचायतच्या निकालावर देखील भाजपचेच वर्चस्व असल्याचे बघायला मिळाले आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00012914-NYB1C-31392.html", "date_download": "2022-10-07T22:07:41Z", "digest": "sha1:SJSH655DCNDYTJDDJ37OS3NZENBX2QWM", "length": 13289, "nlines": 274, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "NYB1C-31392 | Omron Automation & Safety Services | अवर्गीकृत | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर NYB1C-31392 Omron Automation & Safety Services खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये NYB1C-31392 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. NYB1C-31392 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/allow-those-who-have-taken-2-doses-of-the-vaccine-to-travel-locall-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-07T21:51:53Z", "digest": "sha1:7YMP7V5QDA7GBXL5JDQEN3TYMXFPKO2I", "length": 9704, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर….\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर….”\n“ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर….”\nमुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लसीचे डोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. आता यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.\nज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या. राजसाहेबांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती, नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.\nमुंबईतील जवजवळ सर्व कार्यलय सुरू आहेत. सर्वांना घरून काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवासा करावा लागतो. त्यात लोकल बंद असल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्र सरकारनं बस सेवेला परवानगी दिली. पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होतीये. यामुळे रोग पसरण्याचा धोका आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.\nदरम्यान, सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरु करण्यासाठी आंदोलन सुरू करेल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n ‘या’ तारखेपासून सुरु होऊ शकते मेट्रो\nनव्या कोरोना व्हायरसचं रहस्य उलगडलं; ‘माणसाच्या शरिरात गेल्यावर…’\nनोकरीची बातमी | 1 लाख भारतीयांना ‘ही’ दिग्गज आयटी कंपनी देणार नोकरी\n‘…म्हणून राज कुंद्राला अटक केलं’; मुंबई पोलिसांनी सांगितलं कारण\nआरबीआयची मोठी कारवाई; ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द्\n ‘या’ तारखेपासून सुरु होऊ शकते मेट्रो\nबाॅक्सिंगमध्ये भारताचं पदक निश्चित; लवलीना बोर्गोहेनची दमदार कामगिरी\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.economictimes.com/business-news/central-bank-of-india-relief-from-pca-restrictions-from-rbi/articleshow/94341272.cms", "date_download": "2022-10-07T21:36:24Z", "digest": "sha1:QZJMUAK275674GDAMWZHRCURYH5KBRVA", "length": 9414, "nlines": 33, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\ncentral bank of india : सेंट्रल बँक ऑफ इंडियाला मोठा दिलासा, आरबीआयकडून पीसीए निर्बंधातून मुक्ती\ncentral bank of india : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कामगिरीतील सुधारणा लक्षात घेऊन, आरबीआयनेने पीसीएच्या निर्बंध आराखड्यातून बाहेर काढले आहे. मात्र, यापुढेही बँकेच्या कामकाजावर लक्ष ठेवले जाणार आहे.\nमुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सेंट्रल बँक ऑफ इंडियाला मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने मंगळवारी जाहीर केले की सेंट्रल बँक ऑफ इंडियाला प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन फ्रेमवर्क (PCAF) च्या कक्षेतून बाहेर काढले जात आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही देशातील एकमेव सरकारी बँक आहे, जी गेल्या 5 वर्षांपासून पीसीएच्या कक्षेत होती. खराब आर्थिक कामगिरीमुळे ते जून 2017 मध्ये पीसीए फ्रेमवर्क अंतर्गत आणले गेले. त्यावेळी बँकेची अनुत्पादित मालमत्ता (NPA) खूप जास्त होती, तर मालमत्तेवर परतावा (ROA) खूप कमी होता. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बँकेच्या कामकाजात सातत्याने सुधारणा होत असून, त्यानंतर आरबीआयने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त, आणखी दोन सरकारी बँका - इंडियन ओव्हरसीज बँक आणि युको बँक (UCO Bank) यांना देखील आरबीआयच्याच्या पीसीए फ्रेमवर्कच्या कक्षेत ठेवण्यात आले होते, परंतु त्यांनी सप्टेंबर 2021 मध्येच निर्बंधातून मुक्तता मिळवली.\nरिझर्व्ह बँकेने आढावा घेतल्यानंतर घेतला निर्णय\nरिझर्व्ह बँकेच्या पीसीए फ्रेमवर्क अंतर्गत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कामगिरीचा वित्तीय पर्यवेक्षण मंडळाने आढावा घेतला. या पुनरावलोकनात असे आढळून आले की 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील बँकेच्या डेटाने पीसीए पॅरामीटर्सचे उल्लंघन केले नाही. बँकेने किमान नियामक भांडवल, निव्वळ एनपीए आणि लीव्हरेज रेशोच्या बाबतीत नेहमी सर्व नियमांचे पालन केले जाईल असे लेखी आश्वासन दिले आहे. यासोबतच त्यांनी आरबीआयला त्याच्या संरचनेत आणि प्रणालीमध्ये केलेल्या सुधारणांबाबतही माहिती दिली, ज्यामुळे बँकेला हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात सतत मदत होईल. आरबीआयच्या विधानानुसार, या गोष्टी लक्षात घेऊन सेंट्रल बँक ऑफ इंडियाला काही अटींसह पीसीए अंतर्गत लागू असलेल्या निर्बंधांच्या कक्षेतून बाहेर काढले जात आहे. मात्र, त्यानंतरही बँकेच्या कामकाजावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे.\nसेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कामगिरीत सुधारणा\nजून 2022 ला संपलेल्या तिमाहीत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या निव्वळ नफ्यात 14.2 टक्के वाढ नोंदवली गेली. जून तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा रु. 234.78 कोटी होता, जो मागील वर्षी याच कालावधीत रु. 205.58 कोटी होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही काळापूर्वी बँकेने आपला कामगिरी अहवाल आरबीआयला सादर केला होता, ज्यामध्ये त्यांनी गेल्या 5 तिमाहीत आपल्या आर्थिक कामगिरीत सातत्याने सुधारणा झाल्याची माहिती दिली होती.\nबँकांना पीसीएच्या कक्षेत आणण्याची गरज का आहे\nखराब आर्थिक कामगिरीमुळे बँका जेव्हा मालमत्तेवर परतावा, किमान भांडवल आणि एनपीएशी संबंधित नियामक मापदंडांची पूर्तता करू शकत नाहीत तेव्हा त्यांना पीसीएच्या कक्षेत आणले जाते. पीसीएच्या कक्षेत असलेल्या बँकांना लाभांश वितरण, नवीन शाखा उघडणे आणि व्यवस्थापनाकडून मिळणारे वेतन भत्ते या बाबतीत अनेक निर्बंधांचा सामना करावा लागतो.\nअशा बँकांच्या प्रवर्तकांना त्यांची भांडवली गुंतवणूक वाढवण्यासही सांगितले जाऊ शकते. रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी बँकांसाठी सुधारित पीसीए फ्रेमवर्क देखील जारी केले होते, ज्यामध्ये देखरेखीद्वारे योग्य वेळी त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याची तरतूद करण्यात आली आहे.\nBHEL Recruitment 2022 : भेलमध्ये 150 जागांसाठी भरती, अटी आणि अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्यामहत्तवाचा लेख", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/cat/important-recruitment/", "date_download": "2022-10-07T22:20:29Z", "digest": "sha1:JV2DS4YYHARKSORISYJXMM6ZS6DT2EMY", "length": 17886, "nlines": 91, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "Important recruitment - Bharti jahirat", "raw_content": "\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMPSC Group C Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC Group C Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 228 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 01 ऑगस्ट 2022 ते 22 ऑगस्ट 2022 या कालावधीत अर्ज...\nIndian Army Agniveer Recruitment Rally 2022 | भारतीय सेना भरती 2022 अंतर्गत अग्निवीर व इतर विविध पदांच्या भरतीसाठी भरती रॅली चे आयोजन करण्यात आले असून रॅलीत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे इच्छुक उमेदवार दिनांक 05 जुलै 2022 ते 03...\nMPSC Subordinate Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022\nMPSC Subordinate Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 800 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 25 जून 2022 ते 15 जुलै 2022 या कालावधीत...\nAir Force Agnipath Recruitment 2022 | भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022\nAir Force Agnipath Recruitment 2022 | भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरवायु पदाच्या भरती साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 24 जून 2022 ते 05 जुलै 2022 दरम्यान अर्ज सदर करू शकता जाहिरात क्रमांक / Advertisement no. : AGNIVEERVAYU...\nMPSC State Service Pre 2022 | महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 161 जागा\nMPSC State Service Pre 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे \"महाराष्ट्र राज्य सेवापूर्व परीक्षा 2022 चे 21 ऑगस्ट 2022 रोजी आयोजन करण्यात आले असून विविध पदांच्या एकूण 161 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. जाहिरात क्रमांक / Advertisement no. : 045/2022 अर्ज...\nMPSC Recruitment | पशुधन विकास अधिकारी पदाच्या 212 जागांसाठी भरती\nMPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पशुधन विकास अधिकारी पदाच्या 212 जागांसाठी भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 15 फेब्रुवारी 2022 ते 07 मार्च 2022 दरम्यान अर्ज सदर करू शकता जाहिरात क्रमांक / Advertisement no. : 012/2022 अर्ज कसा कराल :...\nIndian Army Recruitment | भारतीय सेना भारती 90 जागांसाठी भरती\nभौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण व JEE (Mains) 2021 परीक्षेस प्रविष्ठ असलेल्या अविवाहित भारतीय पुरुषांकडून टेक्निकल इंट्री स्कीम 47 अंतर्गत भारतीय सेनेत कायमस्वरूपी निवडीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 24 जानेवारी 2022 ते 23 फेब्रुवारी 2022 या...\nEast Coast Railway Recruitment | पूर्व कोस्ट रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 756 जागांसाठी भरती\nEast Coast Railway Recruitment / पूर्व कोस्ट रेल्वेत अप्रेंटिस / Apprentice पदाच्या 756 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 08 फेब्रुवारी 2022 ते 07 मार्च 2022 दरम्यान ऑनलाईन अर्ज सादर करू शकता जाहिरात क्रमांक / Advertisement no....\nNVS Recruitment | नवोदय विद्यालय समिती 1925 जागांसाठी भरती\nकर्मचारी राज्य विमा निगम तर्फे विविध पदांच्या एकूण 1925 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 12 जानेवारी 2022 ते 10 फेब्रुवारी 2022 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता जाहिरात क्रमांक / Advertisement no. : - अर्ज...\nBank of Maharashtra Recruitment | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल II) व जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल III) पदाच्या एकूण 500 रिक्त पदांची भारती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 05 फेब्रुवारी 2022 ते 22 फेब्रुवारी 2022 दरम्यान अर्ज सादर करू...\nUPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 | 816 जागा\nUPSC / केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आयोजित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 816 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 2 फेब्रुवारी 2022 ते 22 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 06 वाजेपर्यंत अर्ज सादर करू...\nUPSC भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2022 | 151 जागा\nUPSC / केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आयोजित वन सेवा परीक्षा 2022 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 151 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 2 फेब्रुवारी 2022 ते 22 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 06 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकता जाहिरात...\nSSC CHSL स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2021\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षेद्वारे कनिष्ठ विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर व डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ पदांच्या रिक्त जागांची भरती करण्यासाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक...\nCISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1398 जागांसाठी भरती\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल (फायर-पुरुष) पदाच्या 1398 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 29 जानेवारी 2022 ते 04 मार्च 2022 रोजी सायंकाळी 05 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकता. जाहिरात क्रमांक / Advertisement no. : - अर्ज...\nकर्मचारी राज्य विमा महामंडळात 594 जागांसाठी भरती\nकर्मचारी राज्य विमा महामंडळात उच्च श्रेणी लिपिक (UDC), स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफ अश्या विविध पदांच्या एकूण 594 भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 15 जानेवारी 2022 ते 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान अर्ज सादर करू शकता. जाहिरात क्रमांक / Advertisement...\nमध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2422 जागांसाठी भरती\nमध्य रेल्वे तर्फे प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 2422 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 17 जानेवारी 2022 ते 16 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकता जाहिरात क्रमांक / Advertisement no. : RRC/CR/AA/2022 अर्ज कसा कराल...\nबेसिल भरती 500 जागा\nब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड तर्फे अन्वेषक / Investigator व पर्यवेक्षक / Supervisors पदाच्या एकूण 500 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून इमेल द्वारे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक १७ जानेवारी २०२२ ते २५ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज सादर करू शकता. जाहिरात क्रमांक...\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMPSC Group C Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC Subordinate Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022\nAir Force Agnipath Recruitment 2022 | भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022\nMPSC State Service Pre 2022 | महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 161 जागा\nMPSC Recruitment | पशुधन विकास अधिकारी पदाच्या 212 जागांसाठी भरती\nIndian Army Recruitment | भारतीय सेना भारती 90 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00042299-YC162-FR-075K1L.html", "date_download": "2022-10-07T21:54:20Z", "digest": "sha1:HCIMBIPX4XS55UOCJLSWAIOAA4DKSBLC", "length": 14466, "nlines": 300, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "YC162-FR-075K1L | Yageo | अॅरे/नेटवर्क प्रतिरोधक | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर YC162-FR-075K1L Yageo खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये YC162-FR-075K1L चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. YC162-FR-075K1L साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/uncategorized/5870/", "date_download": "2022-10-07T22:31:17Z", "digest": "sha1:FVSOBD34FKJ3CUHXAP7U6UUJKU746LMM", "length": 28485, "nlines": 132, "source_domain": "www.snopty.com", "title": "स्मृतीगंध...ट्रेक नंबर १७….पाटेश्वर भाग ३ - Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nस्मृतीगंध…ट्रेक नंबर १७….पाटेश्वर भाग ३\n१२ आणि २६ डिसेंबर २०२१\n*भाग १- प्रवासवर्णन आणि वैयक्तिक मते*\n*भाग २ – आख्यायिका आणि इतिहास*\n*भाग ३ – पाटेश्वर इतिहास जागृती आवाहन,संशोधन, प्रसार आणि प्रसिद्धी*\nह्या ३ भागात असलेलं लिखाण तुम्हाला हवी तेवढीच माहिती वाचून आपला वेळ वाचावा ह्यासाठी केलेलं आहे.ऐतिहासिक वारसा हा काही ठिकाणी फक्त पुजण्यासाठी तर काही ठिकाणी फक्त झिजण्यासाठी असलेला दिसतोय.हा अनमोल ठेवा योग्यरीत्या जपण्यासाठी आहे.तो पुढच्या पिढीला फक्त वाचून न्हवे पाहून समजायला हवा.त्यासाठी संवर्धन आणि संशोधन दोन्ही हवंय.\n*पायी रुतेल जीवघेणा काटा*\n*अंगावर येतील विरोधांच्या असंख्य लाटा*\n*परी ध्येयास कधी न फुटो फाटा*\n*मिळून शोधू भविष्याच्या सुंदर नव्या वाटा*\n*जपलं तरच राहणार,खुपलं तर काय होणार*\n*भुतलाचे पाहुणे आपण आज आहोत उद्या नसणार*\n*जगलो फक्त धुंदीत आपल्या तर पुढची पिढी काय पाहणार*\n*म्हणून आजच होऊ दक्ष, देऊ संवर्धनावर लक्ष*\n*हे कार्य तुझे न माझे हे कार्य ईश्वराचे*\n*साता समुद्रापार घुमावे नाव पाटेश्वराचे*\n*भाग ३ – पाटेश्वर इतिहास जागृती आवाहन,संशोधन, प्रसार आणि प्रसिध्दी*\nनमस्कार पहिल्या भागात आपण पाटेश्वरवरील ठिकाणे तर दुसऱ्या भागातील उपभाग १ आणि २ मधुन त्या कलाकृतींचा अंदाजे अर्थ लावून तो इतिहास जाणण्याचा प्रयत्न केला.\nखर तर त्या दोन्ही भागाचे विस्तृतपणे लिखाण करावं लागणं हेच दुर्दैव आहे.एवढ्या सुंदर स्थळाची माहिती सहजासहजी उपलब्ध नाही ही फारच मोठी शोकांतिका नाही का..\nसोमवार,महाशिवरात्री याच दिवशी देवाचा आशिर्वाद मिळावा एवढंच महात्म्य ह्या स्थळाचं आहे का..देगाव गावातून पाटेश्वरवर यायला अगदी चांगला डांबरी रस्ता आहे.त्यामुळे सहजपणे कोणीही मंदिरात येऊ शकत.शासनाने केलेली ही सुविधा उत्तमच.\nमुख्य पाटेश्वर मंदिराची स्वच्छता उत्तमच अगदी कोणीही भाविक आला तरी हे सारं पाहून नक्कीच प्रसन्न होईल.मग एवढं सगळं चांगले आहे असं म्हणणाऱ्या मला अडचण काय असा प्रश्न उभा राहतो ना… एका बाजूला म्हणायचे सार काही उत्तम आणि पुन्हा म्हणायचे दुर्दैव हा विरोधाभास न्हवे का..\nतर वाचकांनो,मित्रांनो आणि वडीलधाऱ्या व्यक्तींनो आणि सर्व मान्यवरांनो मी आपली क्षमा मागूनच काही मुद्दे इथे मांडत आहे.कारण त्यामागे काही छुपी कारणे, बंधने असतील तर ती मी न जाणता तिथं जे काही पाहिलं या आधारावर लिहितोय.मग त्यात माझं काही चुकत असेल तरी अवश्य सांगावं.पण समजून हे घ्यावं की ह्यात मला कोणाला कमी किंवा चूक दाखवून कसला असुरी आनंद घ्यायचा नाही तर एकमेव हेतू हाच आहे की आपल्या साताऱ्यातुन एवढ्या जवळ असणाऱ्या सुंदर स्थळाला चांगली प्रसिद्धी मिळावी.\nखर तर मी पहिल्यांदा गेलो ते ट्रेकिंगसाठी जवळचे ठिकाण आहे लगेच बघून होईल या उद्देशाने.सकाळी ७ ला निघालो तरी १० पर्यंत माघारी येऊ अस काय ते नियोजन.कारण काय..तर तिथं नुसत्या पिंडी आहेत एवढीच माहिती कानावर.मग पिंडी बघायला असा किती वेळ लागतो दर्शन घेऊ आणि निघू.पण तिथं गेल्यावर जे दिसलं,जे अनुभवलं ते फारच सुंदर.\nट्रेकिंग म्हणजे सकाळी लवकर निघणे हे आलंच म्हणून आम्ही ७ वाजता तिथं पोहोचलो.पण तिथं गेटजवळ पोहोचलो आणि बोर्ड वाचला कोविडची सूचना ” भक्तांसाठी दर्शनाची वेळ सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ५” म्हणजे इतर वेळेत परिसर बंद राहील.आता ह्यात मी काही चूक काढावी अस नाही.शेवटी देवस्थानाने घेतलेला हा निर्णय आहे.\nपण मला एकच सांगायच आहे की पाटेश्वर हे एवढा ऐतिहासिक ठेवा असलेलं ठिकाण फक्त देवस्थान म्हणून का पहावं… इथे फक्त भाविकांनी यावं देवाचे दर्शन घेऊन जावं एवढं साधं ठिकाण आहे का हे…\nअहो हजारो किलोमीटर अंतर पार करून ,हजारो रुपये खर्च करून,वातावरणाची तमा न बाळगता भक्ती,श्रद्धा,आस्था या गोष्टीसाठी स्वतःच्या शरीराची कमजोरी विसरूनही म्हातारी लोकं का जात असतील अमरनाथ यात्रेला…,का फिरत असतील चार धाम…,का फिरत असतील चार धाम…,का करत असतील १२ ज्योतिर्लिंग यात्रा…,का करत असतील १२ ज्योतिर्लिंग यात्रा…कारण फक्त एकच त्या जागेच महात्म्य लोकांपर्यंत पोहोचलय.पिढ्यानपिढ्या सगळेजण ऐकत आले आहेत.तिथली अद्भुत शक्ती,भगवान शंकरावर असणारी श्रद्धा आपोआप सर्वांना खेचते.अगदी वर्षभर यात्रा भरावी अशी सुंदर ठिकाण आपल्या देशात आहेत.इथं जाणारा प्रत्येक भाविक काय फक्त देवाचा आशीर्वाद मिळावा ह्याच हेतूने जात असावा का ओ…कारण फक्त एकच त्या जागेच महात्म्य लोकांपर्यंत पोहोचलय.पिढ्यानपिढ्या सगळेजण ऐकत आले आहेत.तिथली अद्भुत शक्ती,भगवान शंकरावर असणारी श्रद्धा आपोआप सर्वांना खेचते.अगदी वर्षभर यात्रा भरावी अशी सुंदर ठिकाण आपल्या देशात आहेत.इथं जाणारा प्रत्येक भाविक काय फक्त देवाचा आशीर्वाद मिळावा ह्याच हेतूने जात असावा का ओ…तर कित्येक चौकस बुद्धी,अभ्यासूवृत्ती असणारी मंडळी ह्याच ठिकाणांत लपलेला इतिहास वर आणत असतात.\nभक्ती सोबत ,जिज्ञासूवृत्ती ठेवून आजवर कित्येक लपलेली ठिकाणं वर आली आहेत.आता तुम्हाला वाटेल मग या सगळ्याचा इथे काय संबंध…\nतर संबंध आहे.अहो आजवर ट्रेकिंगसाठी म्हणून जास्त नाही पण थोडं बहुत आपल्या ह्या सातारा जिल्ह्यात फिरलो.प्रत्येक गडावर काही ना काही जुने अवशेष दिसत असतात त्यांना नजरेत आणि कॅमेऱ्यात साठवून ठेवत असतो.पण मी एवढी सुंदर कलाकृती…नुसती कलाकृती नाही तर त्याच भांडार दुसरीकडे कुठं नाही पाहिलं जेवढं पाटेश्वरवर आहे.\nपण मी जे दुर्दैव म्हणतोय ना तो विषय खर सुरू होतो तो आत्ता.कोविड चे नियम सातारा नाही तर पूर्ण जगभर आहेत.काही महिन्यांपूर्वी तुळजापूरला आई तुळजाभवानीचे दर्शन सगळे नियम पाळून घेतले सकाळी ६ वाजता.प्रचंड गर्दी पण तरीही ठराविक अंतर ठेवून,रांगेने गेलो १.३० तास रांगेत वेळ गेला पण छान दर्शन झाले आणि बाहेर आलो.मागच्या महिन्यात रायगडावर गेलो.गडाची पुनर्निर्मिती(उभारणी) सुरू आहे,भारतीय पुरातत्व विभागाकडे सगळी जबाबदारी आहे.त्यानुसार नाममात्र फी घेऊन सकाळी ७ वाजता गड सर्वांसाठी खुला होतो आणि संध्याकाळी ५.३० पर्यंत पाहता येतो.परवा लोहगड पाहण्याचा योग आला तोही पुरातत्त्व विभागाकडे असल्याने नाममात्र तिकीट ठेवून सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत खुला आहे.\nम्हणजे यातून मला हे सांगायच आहे की सगळे नियम व्यवस्थित पाळून ही गर्दीची आणि प्रसिद्घ ठिकाणे दिवसभर खुली आहेत आणि तिथं रोज हजारो लोकांची( देवस्थानच्या ठिकाणी रोज तर गडांवर शनिवार रविवार) ये जा सुरू आहे.तरीही सार व्यवस्थीत सुरू आहे.\nमग त्यामानाने काहीच गर्दी नसलेल्या आपल्या पाटेश्वरवर असा नियम का.. सूचना फलकावर शेवटचा मुद्दा काय तर बिबट्याचा वावर असल्याने मंदिर परिसरात जास्त वेळ थांबू नये.आता यावर काय बोलावं..दुपारी १२ ते ३ हा बिबट्याचा जेवणाचा वेळ असावा का… सूचना फलकावर शेवटचा मुद्दा काय तर बिबट्याचा वावर असल्याने मंदिर परिसरात जास्त वेळ थांबू नये.आता यावर काय बोलावं..दुपारी १२ ते ३ हा बिबट्याचा जेवणाचा वेळ असावा का… ज्यामुळे चुकून तिथं सापडलो तर आपली शिकार व्हावी.\nमला यावर कुचेष्टा नाही करायची पण हा नियम नक्की कोणाच्या सोयीसाठी…. जर तिथं बिबट्याचा वावर आहे तर एखादी फॉरेस्ट खात्याची पोस्ट नसावी का मग…\nतिथं श्री सदगुरू गोविंदानंदांचा मठ आहे.(कृपया माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका.) म्हणजे तिथं मनुष्य वास्तव्य आहे.मी तिथे असणाऱ्या मुख्य गुरूंना भेटलो नाही.किंवा मला त्यांच्याबद्दल काही चूक म्हणायचे नाही.पण आलेला अनुभव मी मांडतोय.\nआम्ही ग्रुपने तिथं गेल्यावर ह्या शांत ठिकाणी आमच्या गप्पांमुळे दंगा झाला.आम्हाला दंगा करू नका सांगण्यात आलं.अगदी योग्य आहे हे.पवित्र ठिकाणी दंगा मस्ती नसावीच.मग मी त्या मुलाला विचारले की “अहो मी जी माहिती वाचली होती त्यानुसार इथं मरगळ म्हशीचे लेणे कुठे आहे.”त्याने मठाच्या मागील बाजूस हात करून सांगितले “इथून मागे जावा सगळं तिकडेच आहे.”मी विश्वेश्वर पुष्करणी पाहिली होती मुख्य मंदिर ही पाहून खाली आलो होतो.मठाच्या मागील बाजूस असणारी ठिकाणे ही पाहून आलो पण मी जे विचारले ते मला दिसले न्हवते.मग फिरुन आल्यावर त्याच व्यक्तीला मी विचारलं “अहो नाही मागे.बघा ना कुठे आहे अशी पिंड ज्यावर म्हैस कोरली आहे आणि त्यावरच पिंड आहे”.त्याने नकारार्थी मान हलवून नाही माहीत अस सांगितले.\nआता माहीत नसणे ह्यात त्याची काही चूक आहे अस मी म्हणतच नाही.पण मला ती जागा काही करून पहायची होती.मी यू ट्यूब वर पाहिले,नेट वर माहिती पाहिली पण नाही माहिती मिळाली.पण एक संदर्भ मिळाला होता की विश्वेश्वर पुष्करणी जवळ हे लेणे आहे.मग १२ डिसेंबरची अर्धी माहिती मनात साठवून नव्या माहितीसाठी २६ डिसेंबर ला पुन्हा मित्रांसोबत आलो.आधी पाहिलेली सगळी ठिकाणे सर्वांसोबत पुन्हा व्यवस्थीत पाहिली आणि मग जाताना पुष्करणीच्या बाजूला माझ्या घिरट्या चालू झाल्या.तसा मी नियम मोडलाच त्याबद्दल माफी असावी पण काट्या टाकून बंद केलेलं आणि येणं जाणं बंद असल्याने झुडपं वाढलेली एक जागा दिसली.जमेल तशी ती अडचण दूर करून आत गेलो असता मला ते सुंदर दृश्य पहायला मिळालं.\nआता हे एवढं सार सांगण्याचा हेतू स्पष्ट करतो.बघा ना संपूर्ण परिसराची स्वछता करण्याच काम ह्या मठातील व्यक्ती पाहतात.मुख्य मंदिराची स्वछता आणि तिथं जाणारा पायरी मार्ग फारच उत्तमरीत्या स्वच्छ ठेवला आहे.ह्यात काहीच शंका नाही.\nपण मरगळ म्हशीच्या लेण्याची अवस्था,मठामागील पाण्याचे टाके,आणि बलीभद्र लेण्यातील पिंडी आणि बाजूचा भाग हा एकदम दुर्लक्षित दिसतो.यात चूक त्या व्यक्तीची आहे किंवा स्वछता पाहणाऱ्या कोण्या एकाची आहे असं नाही म्हणायच मला.\nदोष आहे तो आपल्या सगळ्यांचा.कारण योग्य त्या माहितीचे फलक ज्या त्या ठिकाणी लावले गेले तर येणारा भाविक असो वा ट्रेकिंग साठी आलेला कोणी असो.जर माहिती वाचनात आली तरच त्याचा प्रसार आणि जागृती होईल ना…\nजर योग्य माहितीचे फलक सगळ्या ठिकाणी लागले तर पर्यटक फक्त मुख्य मंदिर नाही तर सारा परिसर फिरतील आणि सारा परिसर सर्वांच्या पाहण्यात आला तर आपोआप साऱ्या ठिकाणाची स्वछता ही केली जाईल ना.\nआणि माझं एकमेव हेच मत आहे की इथे असणाऱ्या प्रत्येक पिंडीच्या आकारात काही ना काही अर्थ दडले आहेत.आपल्याकडे जाणकार ,अभ्यासू लोकांची कमीही नाही.मग जर सर्वांनी पुढाकार घेऊन अध्यात्माचा अभ्यास असणारे,इतिहास आणि जुन्या भाषेचे ज्ञान असणारे जाणकार इथे आणले… त्यांच्याकडून योग्य ती माहिती घेऊन सरकार दफ्तरी जमा केली. यावर योग्य ती कार्यवाही करून संपूर्ण पाटेश्वर परिसर प्रकाशझोतात आणला तर आज जसे वासोटा एक सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ झालंय तसेच आपले पाटेश्वर होणार नाही का…\nलहानतोंडी मोठा घास म्हणून मी जास्त काही बोलून गेलो असलो तरी माफी असावी.पण मला पाटेश्वर परिसर खूप आवडला आणि यावर काही अजून सखोल माहिती मिळेल अस आमचे मित्र श्री धनंजय कणसे यांनी सांगितले मग मी आमचे बंधू गुरुनाथ यांच्या सोबत आपल्या सातारा येथील वस्तू संग्रहालयात कार्यरत असलेल्या श्री.प्रवीण शिंदे सरांना भेटलो होतो तेव्हा तिथेही काही माहिती उपलब्ध नसून पाटेश्वर पुरातत्व विभागाकडे येत नाही हे समजले.\nमी त्यांना सहज म्हणालो अहो तिथं असणाऱ्या सगळ्या पिंडी ह्या पुरातन आहेत हे तर मान्य आहे ना सर्वांना. मग तरीही कस काय नाही येत पुरातत्त्व विभागाच्या अधिकारात…\nतर काही इतर गोष्टी समजल्या.जर आपल्या पाटेश्वरला चांगल्या प्रकारे प्रकाशझोतात आणायचे असेल तर आपल्या सर्वांना एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.विशेषतः देगावकरांनी पुढाकार घेऊन शासनाला निवेदन देणे गरजेचे आहे.तर आणि तरच शासन देखील लक्ष घालेल आणि तेव्हाच ह्या कलाकृतींना ,शिल्पांना योग्य तो न्याय मिळेल.भले आज ती शिल्प कोणी बनवली हा उल्लेख कुठे नसेल.पण ज्या भक्तीभावाने त्या कारागिरांनी ही शिल्प उभी केली ती जगासमोर दिमाखात सादर झाली पाहिजेच ना.\nआतील काही गोष्टी समजल्या त्याची मला वाच्यता करायची नाही.पण खरंच सर्वांनी आपले वैयक्तिक हेवेदावे बाजूला सारून प्रयत्न केले तर नक्कीच कास,वासोट्याला लाभलेली जनमाणसांची अभूतपूर्व साथ आपल्या पाटेश्वरला ही लाभेल.\nमग पुढच्या गोष्टी सांगाव्या लागतील एवढया अवघड नाहीतच.पर्यटन वाढले की रोजगार वाढणार ह्यात शंकाच नाही.काही चुकीचे शब्द आले असतील तर पुन्हा एकदा माफी मागतो.सर्वांनी मिळून पाटेश्वर एक सुंदर देवस्थान आणि पर्यटनस्थळ बनावं यासाठी एकत्र येऊ.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nस्मृतीगंध…..ट्रेक नंबर १६…भाग २…कोळे नृसिंहपुर\nस्मृतीगंध…..ट्रेक नंबर १६…भाग २…कोळे नृसिंहपुर\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/remove-nawab-malik-and-give-parbhani-a-full-time-dutiful-guardian-minister/", "date_download": "2022-10-07T21:46:59Z", "digest": "sha1:AOSDYMJ7BNDVE6YVYH3FISJ62HRFOJ6V", "length": 10438, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"नवाब मलिक यांना हटवून, परभणीला पूर्णवेळ देणारा, कर्तव्यदक्ष पालकमंत्री द्या\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“नवाब मलिक यांना हटवून, परभणीला पूर्णवेळ देणारा, कर्तव्यदक्ष पालकमंत्री द्या”\n“नवाब मलिक यांना हटवून, परभणीला पूर्णवेळ देणारा, कर्तव्यदक्ष पालकमंत्री द्या”\nपरभणी | परभणीचे पालक मंत्री नवाब मलिक यांना बदलून त्यांच्या जागी दुसरा कर्तव्यदक्ष पालकमंत्री द्या, अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे. परभणी जिल्ह्याला पूर्णवेळ देणारा पालकमंत्री हवा, अशा मागणीचे पत्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.\nप्रहार जनशक्ती पक्षाचे परभणीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नवाब मलिक हे राज्यातील मोठे नेते असून त्यांच्यावर अनेक मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे ते परभणी जिल्ह्याला वेळ देण्यात असमर्थ ठरत आहेत. असं म्हणत जिल्ह्याला नवा कर्तव्यदक्ष पालकमंत्री द्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.\nयाबरोबरच, पालकमंत्र्यांची जबाबदारी पार पाडत असताना जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीसाठी नवाब मलिक यांनी परभणी जिल्ह्याकडे लक्ष देणं अपेक्षित होतं पण त्यांनी जिल्हा दुर्लक्षित ठेवला असल्याचाही आरोप शिवलिंग बोधने यांनी या पत्रात केला आहे.\nपरभणीमध्ये सध्या बेड्स आणि रेमडेसिविर इंजेक्शन यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईला बसून परभणीचा कारभार कसा काय होऊ शकतो असा प्रश्न सामान्य परभणीकर विचारत होते. त्यातच प्रहार जनशक्ती पक्षाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जिल्ह्याला नवा कर्तव्यदक्ष आणि पूर्ण वेळ देणारा पालक मंत्री लवकरात लवकर द्यावा आणि जिल्ह्यातील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांना केली आहे.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n‘या’ ठिकाणावरून 318 ऑक्सिजन काॅंन्स्नट्रेटर घेऊन निघालं विमान; अवघ्या काही तासांत भारतात येणार\nनोकरीला नसून देखील 15 वर्षांपासून बँकेत जमा व्हायचा पगार, मोठं रहस्य आलं समोर\n“भारतात कोरोना मृतांची संख्या लपवली जात आहे, खरा आकडा 4 ते 5 पट अधिक”\n वॉर्डबॉयनं मृताच्या बोटाचे ठसे वापरून केलं हे धक्कादायक कृत्य\nठाण्यातील खासगी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू; जितेंद्र आव्हाडांचे चौकशीचे आदेश\n‘या’ ठिकाणावरून 318 ऑक्सिजन काॅंन्स्नट्रेटर घेऊन निघालं विमान; अवघ्या काही तासांत भारतात येणार\nकोरोनामुळे कलाकारांवरही वाईट वेळ, तारक मेहता फेम नट्टू काकांची परिस्थिती गंभीर\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%81%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2022-10-07T22:52:42Z", "digest": "sha1:7ATCZCW5V5Q6QJN6NGZ7WF6VMLGDTL2Q", "length": 2708, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हांबुर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(हँबुर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)\nहांबुर्ग (जर्मन: Freie und Hansestadt Hamburg) हे जर्मनीतील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व जर्मनीच्या १६ राज्यांपैकी एक आहे.\nक्षेत्रफळ ७५५ चौ. किमी (२९२ चौ. मैल)\n- घनता २,३४३ /चौ. किमी (६,०७० /चौ. मैल)\nएल्बे नदीच्या काठावर वसलेले हांबुर्ग शहर युरोपातील ३रे व जगातील ९वे सर्वात मोठे बंदर आहे. हांबुर्ग हे जर्मनी मधील सर्वात मोठे बंदर आहे.\nशेवटचा बदल १९ मार्च २०२२ तारखेला २३:५८ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२२ रोजी २३:५८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/three-brothers-died-of-corona-in-a-row-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-07T22:45:05Z", "digest": "sha1:CUQM3HCS7JTIJ2Y4TARIH2RMPIS63VJW", "length": 9484, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "हृदय पिळवटून टाकणारी घटना; तीन भावांचा एकापाठोपाठ कोरोनामुळे मृत्यू", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nहृदय पिळवटून टाकणारी घटना; तीन भावांचा एकापाठोपाठ कोरोनामुळे मृत्यू\nहृदय पिळवटून टाकणारी घटना; तीन भावांचा एकापाठोपाठ कोरोनामुळे मृत्यू\nपुणे | कोरोनाचा वाढता प्रभाव सध्या संपूर्ण देशात पहायला मिळत आहे. कोरोनाच्या विळख्यात आल्यामुळे कुटुंबच्या कुटुंबं उद्ध्वस्त झाल्याचं समोर येत आहे. आता शिरुर येथील एका कुटुंबातील तीन भावांचा अवघ्या 15 दिवसात कोरोनाने मृत्यू झाला आहे.\nपोपट धोंडिबा नवले यांचा 15 एप्रिल रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि उपचारादरम्यान 23 एप्रिल रोजी त्यांचं निधन झालं. त्यांनतर अवघ्या चार दिवसांनी 27 एप्रिल रोजी त्यांचा दुसरा भाऊ सुभाष धोंडिबा नवले तर 6 मे रोजी त्यांचा तिसरा भाऊ विलास धोंडिबा नवले यांचं निधन झालं. 15 दिवसातच एकाच कुटुंबातील तीन भावांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.\nयाआधी शिरूर तालुक्यातील मलठण येथे दहा दिवसातच कोरोनामुळे दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. विशाल कृष्णकांत गायकवाड आणि तुषार कृष्णकांत गायकवाड या दोघा भावांचा दहा दिवसातच कोरोनाने बळी घेतला.\nविशालचा मृत्यू 22 एप्रिल रोजी तर तुषारचा मृत्यू 3 मे रोजी झाला. डोळ्यांदेखत आपल्या पोटच्या पोरांना कायमचं निघून जाताना पाहून आई-वडिलांना आपलं दुःख अनावर झालं. आमचा देव चोरीला गेला हो… असं म्हणून त्यांनी एकच टाहो फोडला, तेव्हा संपूर्ण परिसर सुन्न झाला.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\nमंगळावर अज्ञात हेलिकॉप्टरचा वावर नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद, पाहा व्हिडीओ\nपुण्यात देशातलं पहिलं ‘चाईल्ड कोविड सेंटर’ उभारणार; पुणे महापालिका अलर्ट मोडवर\nमराठमोळ्या ऑक्सिजन संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू; डॉ. भालचंद्र काकडे यांचं निधन\nकोरोना रुग्णांना होतोय ‘म्युकर मायकोसिस’ हा गंभीर आजार; 20 जणांचे डोळे निकामी\nपुण्यात भितीचं वातावरण तयार होऊ नये म्हणून मुरलीधर मोहोळ यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल\nमंगळावर अज्ञात हेलिकॉप्टरचा वावर नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद, पाहा व्हिडीओ\nअभिनेत्री कंगणा राणावतला कोरोनाची लागण\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/raj-thackeray-aurangabad-sabha-accident-of-raj-thackeray-convoy-of-8-to-10-cars-know-how-many-time-convoy-reported-accident-watch-video-699215.html", "date_download": "2022-10-07T23:10:31Z", "digest": "sha1:E6NXJIMUTGNVAJI5YGWDEEXCBG7HIFXO", "length": 13551, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nRaj Thackeray Convoy Accident : राज ठाकरेंच्या ताफ्यात अपघात काही नवीन गोष्ट नाही\nराज ठाकरेंच्या ताफ्यात सामीन झालेल्या या गाड्याही एकापेक्षा एक होत्या. क्रेटा, इनोव्हा, अर्टीगा, स्विफ्ट, असा दर्जेदार गाड्यांच्या दर्शनी भागाचं या अपघातात नुकसान झालंय.\nऔरंगाबादला जात असताना अपघात\nमुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Convoy) यांची गाडी, त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीचा ताफा आणि जोरदार शक्तिप्रदर्शनं हे महाराष्ट्रात (Maharashtra Navnirman Sena) नवं नाही. राज ठाकरे जिथे जातील, तिथं त्यांच्या मागे त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं गेले नाहीत, तरच नवल तसंच होतं आलंय. तसंच होत राहिलं, तर नवलही वाटण्याचं कारण नाही. आता औरंगाबादेत (Raj Thackeray Aurangabad Accident) राज ठाकरेंची सभा होणं, त्यासाठी शेकडोंच्या संख्येनं महाराष्ट्रभरातून त्यांचा चाहता वर्ग, कार्यकर्ते येणं, हेही होणारच होतं. तब्बल शंभर पेक्षा जास्त गाड्यांचा ताफा राज ठाकरेंच्या सोबत औरंगाबादच्या दिशेनं कूच करत होता. या दृश्याची फक्त कल्पना करता येऊ शकते. सटासट, सुसाट, एकामागोमाग एक शंभरहून अधिक गाड्या, एकत्र जाणं एखाद्या सिनेमासारखंच दृश्य आहे. माध्यमांचे कॅमेरेही हे दृश्य टिपण्यासाठी तैनात होतेच. पण या सगळ्याला गालबोट लावणारी एक घटना घडली.\nराज ठाकरेंच्या ताफ्यातील जवळपास आठ ते दहा गाड्या एकमेकांवर आदळल्या. करकचून ब्रेक लागल्याचा परिणाम बाकीच्या गाड्यांनाही भोवला. मागून येणाऱ्या गाड्याची एकमेकांवर आदळल्या. गाड्याच्या बोनेटचं यामध्ये नुकसान झालं. आणि औरंगाबादला जाण्याच्या संपूर्ण दौऱ्यावरतही खोडा झाला. पण सुदैवानं कोणतीही जीवितहानी या अपघातात झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ तर टळला आहेच. पण एक बाब यानिमित्तानं पुन्हा अधोरेखित झाली. ती म्हणजे राज ठाकरे आणि त्यांच्या ताफ्याचे अपघात हे काही नवे नाहीत.\nऔरंगाबादला जातेवेळी मनसेचे कार्यकर्ते आपआपल्या गाड्या घेऊन निघाले होते. राज ठाकरेंच्या ताफ्यात सामीन झालेल्या या गाड्याही एकापेक्षा एक होत्या. क्रेटा, इनोव्हा, अर्टीगा, स्विफ्ट, असा दर्जेदार गाड्यांच्या दर्शनी भागाचं या अपघातात नुकसान झालंय.\nबघा रे तो व्हिडीओ :\nदरम्यान, तीन वर्षांपूर्वीही राज ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झााल होता. तारीख होती 5 ऑक्टोबर 2019. शर्मिला ठाकरे आणि त्यांच्या बहिणीला या अपघातात किरकोळ दुखापत झाली होती. या अपघातात इनोव्हा कारच्या दर्शनी भागाचं नुकसान झालेलं. एक रिक्षा आडवी आल्यानं तिला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला होता. मागून येणाऱ्या गाडीनं हा अपघात झाला होता. मुंबईच्या दिशेने राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा येत असताना हा अपघात झाला होता.\nबघा रे तो व्हिडीओ :\nदुसरीकडे महिन्याभरापूर्वी नवी मुंबईत राज ठाकरेंची रॅली निघाली होती. त्यादरम्यानही, एक अपघात झाला होता. बाईकवरुन जाणाऱ्या दोघे रस्त्यावर रॅलीदरम्यान पडले होते. यावेळी रस्त्यावर असलेल्या क्रेटा कारच्या खाली जाता जाता थोडक्यात ते वाचले होते. रस्त्यावर रेती असल्यामुळे ही बाईक स्लिप झाली होती आणि बाईकस्वार खाली पडले होते. दोघांना अगदी किरकोळ मार लागला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी गाडीत बसूनच नेमकं काय झालं, याची चौकशी केली होती.\nबघा रे तो व्हिडीओ :\nदरम्यान, राज ठाकरेंची सभा झाल्यानंतर औरंगाबादेत सभेसाठी गेलेल्या राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांना सावकाश येण्याचं आवाहन केलं जातंय. राज्यात गेल्या काही दिवसांत रस्ते अपघातांचं प्रमाण चिंतजनक आहे. रस्ते अपघातातील बळींमध्ये महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातील आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी येताना सावकाश या, असं आवाहन केलं, तर आश्चर्य वाटायला नको.\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.ykremote.com/oem/", "date_download": "2022-10-07T21:53:23Z", "digest": "sha1:VVM2WFL6XISSRBTIJOEI6GKW23EI5M7A", "length": 3466, "nlines": 147, "source_domain": "mr.ykremote.com", "title": "ओई - शांघाई यांगकाई इलेक्ट्रॉनिक्स कंपनी, लि.", "raw_content": "\nस्मार्ट व्हॉइस रिमोट कंट्रोल\nAndroid टीव्ही बॉक्स रिमोट कंट्रोल\nयांगकाई ही OEM सेवेची आपली सर्वात चांगली निवड आहे. खालीलप्रमाणे कारणेः\nरिमोट कंट्रोल उत्पादनांच्या उत्पादनात 1. डेकडेसचा अनुभव.\n2. उन्नत उपकरणे आणि पुरेशी क्षमता.\n3. शक्तिशाली पुरवठा साखळी.\n4. व्यावसायिक व्यवस्थापन संघ आणि कुशल तंत्रज्ञ आणि ऑपरेटर.\nQuality. गुणवत्ता आश्वासन व खर्च नियंत्रण यामध्ये पूर्ण व्यवस्थापन व्यवस्था.\nपत्ता:कक्ष 98 8,, ब्लॉक ,१, क्रमांक 8686, झियानन रोड, ल्विव्हियांग टाउन, जिन्शान जिल्हा, शांघाय\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/asia-cup-this-player-can-start-the-innings-instead-of-kl-rahul/", "date_download": "2022-10-07T21:25:48Z", "digest": "sha1:B23RSXAOVLSVOT26QDZLJSSFHRLQH3JA", "length": 5075, "nlines": 38, "source_domain": "mahaupdate.in", "title": "Asia Cup : KL राहुलच्या जागी \"हा\" खेळाडू करू शकतो डावाची सुरुवात..! - Maha Update", "raw_content": "\nHome » Asia Cup : KL राहुलच्या जागी “हा” खेळाडू करू शकतो डावाची सुरुवात..\nAsia Cup : KL राहुलच्या जागी “हा” खेळाडू करू शकतो डावाची सुरुवात..\nनवी दिल्ली : आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवने भारतीय संघासाठी डावाच्या सुरुवातीसह विविध ठिकाणी फलंदाजी केली आहे आणि टी-२० संघात तो कोणत्याही स्थानावर फलंदाजी करू शकतो, असे त्याने सांगितले. सूर्यकुमारने बुधवारी 26 चेंडूत 68 धावांचे नाबाद अर्धशतक झळकावले आणि हाँगकाँगवर 40 धावांनी विजय मिळवून भारताने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.\nसूर्यकुमार चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला, त्याने विविध फटके खेळले आणि सहा षटकार आणि तब्बल चौकार मारले. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार म्हणाला, ‘मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो फक्त मला साधी दिली पाहिजे.’\nउपकर्णधार केएल राहुल दुखापतीतून पुनरागमन करत आहे, मात्र तो आतापर्यंत स्पर्धेत त्याच गतीने खेळू शकलेला नाही. हाँगकाँगविरुद्ध त्याने 39 चेंडूत 36 धावा केल्या होत्या. जेव्हा सूर्यकुमारला विचारण्यात आले की तो रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करणार का, तेव्हा तो म्हणाला, ‘तुम्ही म्हणताय की आम्ही केएल भाईला (राहुल) खेळवू नये’.\nतो म्हणाला, “तो राहुल दुखापतीतून पुनरागमन करत आहे आणि त्याला थोडा वेळ हवा आहे आणि आमच्याकडे वेळ आहे.’ तो म्हणाला, ‘गोष्टी चालूच राहतील, अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपण प्रयत्न करत आहोत, प्रयोग करत आहोत. अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला करायच्या आहेत आणि त्या सराव सत्रांऐवजी सामन्यांमध्ये वापरून पाहणे चांगले होईल.”\nAsia Cup 2022 : कोणत्याही फलंदाजीच्या क्रमावर खेळण्यास तयार : सूर्यकुमार यादव\nAsia Cup 2022 : कर्णधार रोहित शर्माला मिळेल “या” धोकादायक खेळाडूंची साथ; आशिया कपसाठी संभाव्य भारतीय संघ\nAsia Cup 2022 : पाकिस्तान विरुद्ध अशी असेल भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://nmk.org.in/nhai-recruitment-2021/", "date_download": "2022-10-07T23:09:53Z", "digest": "sha1:W2ZFLO4HPNZ5RFW7DYWMMBMPTLBU5UX6", "length": 2942, "nlines": 50, "source_domain": "nmk.org.in", "title": "(NHAI) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये भरती - NMK.ORG.IN", "raw_content": "\n(NHAI) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये भरती\nडेप्युटी मॅनेजर (फायनान्स आणि अकाउंट्स), डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल), असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट, एचआर अँड अॅडमिन, सीनियर मॅनेजर, लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर, सीनियर मॅनेजर, रोपवेज सीनियर मॅनेजर आणि पॅसेंजर कन्व्हिनियन्स इन्फ्रास्ट्रक्चर.\nशैक्षणिक अटी:- पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून डाऊनलोड करून पाहावी.\nअर्जाची शेवटची तारीख: 22, 29 व 30 नोव्हेंबर 2021.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/share-market-opening-updates-5-september-2022-ask97", "date_download": "2022-10-07T22:13:28Z", "digest": "sha1:CJRPOIWAXFSSEWVWNQ62SXJLX7ULYLBP", "length": 8898, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "Share Market : घसरणीला ब्रेक, शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स 276 अंकांवर | Sakal", "raw_content": "\nShare Market : घसरणीला ब्रेक, शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स 276 अंकांवर\nशुक्रवारी झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजार सावरत असल्याचे चित्र दिसून आले आहे. भारतीय शेअर बाजारात तेजीचे संकेत दिसून येत आहे. तर आशियाई शेअर बाजारात घसरण झाल्यानंतरही भारतीय शेअर बाजाराला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले. आज सुरवतीच्या सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 276 अंकांच्या तेजीसह 59,080 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी 82 अंकांच्या तेजीसह 17,629 अंकांवर खुला झाला आहे\nशुक्रवारी शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली होती. तर शेअर बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 36 अंकांची वाढ झाली होती. सेन्सेक्समध्ये 0.06 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,803 अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टीमध्ये 0.02 टक्क्यांची घट होऊन तो 17,539 अंकांवर स्थिरावला होता.\nहेही वाचा: गौरी गणपतीत सोनं स्थिरावलं जाणून घ्या आजचे नवे दर\nआज कशी असेल बाजाराची स्थिती \nसध्या निफ्टी 17450-17700 च्या रेंजमध्ये व्यवहार करत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. 20-दिवसीय SMA (सिंपल मूव्हिंग अॅव्हरेज) आणि 17450 हे आता ट्रेडर्ससाठी महत्त्वाचे सपोर्ट झोन असतील तर 17700 ची पातळी निफ्टीसाठी रझिस्टंस म्हणून दिसू शकते.\n17700 च्या ब्रेकआउटनंतर वरची वाटचाल शक्य आहे. याच्या वर निफ्टी 17900-18000 पर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे, निफ्टी 17450 च्या खाली गेल्यास तो 17250-17150 च्या पातळीवर सरकला जाऊ शकतो.\nगेल्या आठवड्यात वोलेटाईल ऍक्शननंतर, निफ्टीने विकली चार्टवर नेगिटिव्ह क्लोज पोस्ट केल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. गेल्या 2-3 आठवड्यांतील प्राईस ऍक्शनमधून लक्षात येते की इंडेक्स शॉर्ट टर्म में कंसोलिडेशन फेजमध्ये आहे. हे सध्या क्रुशियल फॉलिंग ट्रेंडलाइनच्या खाली साइडवे एक्शन दाखवत आहे.\nहेही वाचा: बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/fake-university-list-delhi-ugc-crackdown-rmn00", "date_download": "2022-10-07T21:31:25Z", "digest": "sha1:TYFEIRVEGYQ7KKC33OZHQKMR3E3OKYHU", "length": 8391, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "देशात 21 विद्यापीठं बनावट, UGC ने जाहीर केली यादी | Sakal", "raw_content": "\nदेशात 21 विद्यापीठं बनावट, UGC ने जाहीर केली यादी\nविद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) पुन्हा एकदा बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे, यामध्ये 21 विद्यापीठ हे बनावट असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यापीठे ही दिल्ली मधील, नंतर उत्तर प्रदेश मधील आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने UGC चे नियमांचा अहवाल देत सांगितलकी UGC च्या नियमांचे पालन केल्यानंतरच UGC विद्यापीठांना मान्यता देते.\nत्या नियमांच उल्लंघनकेल्या नंतर विद्यापीठाला बनावट समजले जाते. सांगितल जात आहे या वर्षात विद्यापीठ अनुदान आयोगाने शेकडो बनावट विद्यापीठांवर कारवाई केली आहे. बनावट विद्यापीठांबाबत UGC जाहिर केलेल्या सूचनांनमध्ये विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना कळवण्यात आले आहे की, देशाच्या विविध भागांमध्ये अशी 21 विद्यापीठे आहेत. जी स्वत: तयार करण्यात आली आहेत आणि त्यांना कोणतीही मान्यता नाही. ही सर्व विद्यापीठे, विद्यापीठ अनुदान आयोग, कायदा 1956 चे उल्लंघन करत आहेत.\nहेही वाचा: काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आझाद यांची मोठी घोषणा; काढणार स्वतःचा पक्ष\nUGC च्या माहिती नुसार बनावट विद्यपीठांमध्ये सगळ्यात जास्त दिल्लीमध्ये 8, उत्तर प्रदेश मध्ये 4 , पश्चीम बंगाल मध्ये 2, ओडीसा 2 तसेच महाराष्ट्र, केरल, कर्नाटक, आणि आंध्र प्रदेश मध्ये प्रत्येकी 1-1 बनावट विद्यापीठे आहेत. सार्वजनिक सूचनेनुसार, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा 1956 च्या कलम 22(1) नुसार, केंद्रीय, राज्य, प्रांतीय कायद्यांतर्गत स्थापन झालेली विद्यापीठे किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कलम 3 अंतर्गत स्थापन झालेली डीम्ड विद्यापीठे पदवी देऊ शकतात. ज्यांना विशेष संसदेच्या कायद्याद्वारे पदवी प्रदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/sapana-chaudhary-haryanvi-dancer-share-video-arrest-warrant-fans-comment-khandani-garib-yst88", "date_download": "2022-10-07T22:13:01Z", "digest": "sha1:Y4OKYETIM5FWXCI52SNOCE4562QOKUDH", "length": 10076, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sapana Chaudhary: 'आम्ही खानदानी...' कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावरही अकड जाईना!| Sapana Chaudhary Haryanvi dancer share video | Sakal", "raw_content": "\nSapana Chaudhary: कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावरही अकड जाईना\nSocial media viral video: सपना ही तिच्या वेगवेगळ्या प्रकारे चर्चेत राहण्यासाठी ओळखली जाते. देशात सपना ही सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी आहे. तिच्या (sapana chaudhary) व्हिडिओला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये तर तिचा प्रचंड चाहतावर्ग आहे. आता सपना ही कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. प्रेक्षकांची फसवणूक केल्याप्रकरणी (insta star video) तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशावेळी सपनानं देखील एक वेगळा व्हिडिओ शेयर करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आम्ही गरीब, आमचे वडिल गरीब, आमच्या सात पिढ्या गरीब असं सपनानं त्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.\nसोशल मीडियावर आता सपनाचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तिनं आम्ही खानदानी गरीब असल्याचे म्हटले आहे. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तिला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं तर गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील तुला कसे वागायचे कळत नाही... असे म्हटले आहे. तर दुसऱ्यानं प्रेक्षकांना गृहित धरु नये. तसे केल्यास त्यांची नाराजी महागात पडल्याशिवाय राहत नाही. असे सांगून सपनाला काळजी घेण्यास सांगितले आहे. सपनाच्या त्या व्हिडिओला आतापर्यत दहा हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. जेव्हा कुणी माझ्याकडे उधारीचे पैसे मागतात तेव्हा...असं कॅप्शन तिनं त्या व्हिडिओला दिले आहेत.\nहेही वाचा: Amruta Khanwilkar: 'चंद्रा' वेगळ्या रंगात, अनोख्या ढंगात\nकाही दिवसांपासून सपनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. त्याचे कारण तिनं प्रेक्षकांची केलेली फसवणूक. लखनऊमध्ये तिच्या डान्स शो चे आयोजन करण्यात आले होते. तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तीनशे रुपयांचे तिकिटही खरेदी केले होते. मात्र त्या शोसाठी ती काही गेलीच नाही. तिला त्या शो साठी जाण्यास बराच वेळ लागला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी गोंधळ केला. लोकांनी आयोजकांकडे पैशांची मागणी केली तेव्हा त्यांनी ते परत केले नाही. त्यानंतर अनेकांनी पोलिसांकडे धाव घेत सपना आणि त्या कार्यक्रमाचे निर्माते यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. सपना कोर्टात हजर न झाल्यानं तिच्याविरोधात वॉरंटही निघाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.\nहेही वाचा: Laal Singh Chaddha: 'मैंने कहा था एक दिन मैं हसूंगा तुम रोओगे' चतूरच्या मीम्सचा कहर\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y93978-txt-kopcity-today-20220906023041", "date_download": "2022-10-07T22:34:47Z", "digest": "sha1:HZX72YWGMJXSNRQKE2334X2R4O24Q3SF", "length": 9337, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम वक्तृत्त्व स्पर्धेचा निकाल | Sakal", "raw_content": "\nब्राह्मण सभा करवीर मंगलधाम वक्तृत्त्व स्पर्धेचा निकाल\nब्राह्मण सभा करवीर मंगलधाम वक्तृत्त्व स्पर्धेचा निकाल\nब्राह्मण सभा करवीर मंगलधाम\nवक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर\nकोल्हापूर : ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे चिंतामण रामचंद्र तथा राजाभाऊ जोशी यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुलभा जोशी पुरस्कृत वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. ४० शाळांमधून २८१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. रविवारी निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर उपस्थित होते. स्पर्धेत नेहरूनगर विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे दत्तात्रय कुलकर्णी, संचालक अशोक कुलकर्णी यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला कायमस्वरूपी ढाल बक्षीस देण्यात आली. क्रमांकांऐवजी ‘मुलांसाठी सर्वोत्तम वक्ता, मुलींसाठी सर्वोत्तम वक्त्या’ अशी पारितोषिके ठेवण्यात आली. त्यामुळे मुलांच्या मनात केवळ स्पर्धा असावी, ईर्षा नसावी, असे मत दीपक भागवत यांनी व्यक्त केले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रके, पुस्तके अशी भेट देण्यात आली. संचालक संतोष कोडोलीकर, व्यवस्थापक अशोक जोशी, श्रीकांत नांगनूरकर, सेवक वर्ग यांनी सहकार्य केले. स्पर्धा प्रमुख म्हणून दीपक भागवत, दासबोध अभ्यास मंडळाचे गोविंद पाटगांवकर, प्रा. तन्मय कुलकर्णी यांनी काम पाहिले. संस्थेचे संचालक नंदकुमार मराठे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष अॅड. विवेक शुक्ल यांनी स्वागत केले. कार्यवाह श्रीकांत लिमये यांनी स्पर्धेच्या निकालाचे वाचन केले. खजानीस रामचंद्र टोपकर यांनी आभार मानले.\nनिकाल असा : गट क्रमांक पहिला (तिसरी, चौथी) सर्वोत्तम : दीपिका दीक्षित, परिणिती धामणकर, आराध्या जठार, श्रेया कांबळे, समृद्धी खुडे, अनुज मिठारी, प्रणव ओंकार, वीर सातार्डेकर, वरद वरणे, साक्षी यादव, अनय ढवळे. गट दुसरा (पाचवी, सहावी, सातवी) सर्वोत्तम : अनघा गुरव, रुद्राक्षी हिरेमठ, सुहानी कदम, अथर्व खांबे, ब्रह्मतेज मुनीश्वर, सबा मणेर, अनन्या रायरीकर, विश्ववेदा सावंत. गट तिसरा -(आठवी, ९ वी व १० वी) : अभिरत्न मिणचेकर, कल्याणी कुलकर्णी, सिद्धी नाईक, शंतनू रायरीकर.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/solapur-sarpanch-bhabhi-administration-deputy-sarpanches-rsn93", "date_download": "2022-10-07T22:19:35Z", "digest": "sha1:YYLH6HERJL2BMZGBREG3S7KEJXLNOZ6J", "length": 8522, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solapur : सरपंच भाभी सापडेना; कारभार उपसरपंचांकडे? | Sakal", "raw_content": "\nSolapur : सरपंच भाभी सापडेना; कारभार उपसरपंचांकडे\nसोलापूर : कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावच्या सरपंच भाभी जैतुनबी शेख या ७ सप्टेंबरपासून बेपत्ता आहेत. त्या स्वत:हून बेपत्ता झाल्या की कोणी घातपात केला, याचा ठावठिकाणा अद्याप शहर पोलिसांना लागलेला नाही. १३ दिवसांपासून त्या बेपत्ता असल्याने आता गावचा कारभार ग्रामपंचायत अधिनियमानुसार उपसरपंचांकडे दिला जाईल, अशी माहिती उत्तर सोलापूर पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.\nबुधवारी (ता. ७) भरदुपारी साडेबाराच्या सुमारास पावणेपाच वर्षे गावचा कारभार हाकलेली महिला सरपंच बेपत्ता होते आणि त्यांच्या कुटुंबियांसह गावातील कोणालाच काहीही माहिती होत नाही, ही बाब पोलिसांना पण विचार करायला लावणारी आहे. सलगर वस्ती पोलिसांनी गावातील जवळपास १०० लोकांकडे सरपंच भाभीबद्दल विचारपूस केली. त्यावेळी ‘भाभी अच्छी थी, उनका किसीसे कोई झगडा नही था’ हेच उत्तर पोलिसांना सातत्याने ऐकायला मिळाले. परंतु, सर्वांसोबत चांगले संबंध असणारी भाभी गाव तथा गावचा कारभार सोडून गेली कुठे, याचा शोध पोलिसांना आव्हानात्मक झाला आहे.\nसरपंच भाभीच्या कुटुंबियांसह गावातील एकूण १२ जणांचे जबाब सुध्दा पोलिसांनी घेतले. पण, पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागलाच नाही. एका गावची सरपंच महिला भर दुपारी गावच्या शिवारातून बेपत्ता होते आणि १३ दिवस होऊनही पोलिसांना त्यांचा शोध लागत नाही, ही बाब चिंताजनक मानली जात आहे. दरम्यान, सरपंच भाभीचा कालावधी साधारणत: तीन-चार महिन्यांपर्यंतच आहे. गावच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेताना प्रशासकीय अडचणी येत असल्याने पुढील आठवड्यातील मासिक सभेत उपसरपंचाकडे गावचा कारभार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/todays-latest-marathi-news-vdm22b02649-txt-pc-today-20220827092536", "date_download": "2022-10-07T21:47:52Z", "digest": "sha1:6B4BVD65Q7EPFMO3HZP2EIZJGFQLDQ6H", "length": 8283, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "तळेगाव दाभाडे ते रायगड एसटी सुरू करण्याची मागणी | Sakal", "raw_content": "\nतळेगाव दाभाडे ते रायगड एसटी सुरू करण्याची मागणी\nतळेगाव दाभाडे ते रायगड एसटी सुरू करण्याची मागणी\nवडगाव मावळ, ता. २७ ः शिवभक्तांच्या सोयीसाठी तळेगाव दाभाडे ते किल्ले रायगड अशी नियमित एसटी बस सेवा सुरु करावी, अशी मागणी वडगाव येथील गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्थेने केली आहे.\nसंस्थेचे पदाधिकारी श्यामराव ढोरे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव दाभाडे आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यातून असंख्य शिवभक्त रायगडाची नियमित वारी करतात. काही जण सह कुटुंब रायगडाच्या दर्शनासाठी जातात. मावळ तालुक्यातून किल्ले रायगडावर थेट जाण्यासाठी वाहतुकीची कोणतीही सोय उपलब्ध नाही. त्यामुळे शिवभक्त सह कुटुंब, वैयक्तिक व सामूहिकरीत्या जाऊ इच्छितात. त्यांची गैरसोय होते. त्यांच्या सोयीसाठी रायगडला जाण्यासाठी तळेगाव दाभाडे ते किल्ले रायगड अशी नियमित एसटी बस सेवा चालू करावी. ही बससेवा तळेगाव दाभाडे-लोणावळा-पाली-किल्ले रायगड (परतीचा मार्ग तसाच) किंवा तळेगाव दाभाडे-मुळशी-ताम्हिणी घाट-किल्ले रायगड (परतीचा मार्ग तसाच) या मार्गे दररोज तळेगावातून सकाळी सहा वाजता सुटून रायगड पायथा येथे साडेनऊला पोचेल तसेच परतीच्या वेळी ती संध्याकाळी सहा वाजता सुटून अंदाजे नऊ वाजता पोचेल. या प्रमाणे चालू करावी, अशी सूचनाही केली आहे. या सेवेमुळे एका दिवसात किल्ले रायगडाचे व्यवस्थित दर्शन होऊ शकेल. ही गाडी पाली मार्गे गेल्यास गणेश भक्तांना पाली येथील श्री बल्लाळेश्वराचे दर्शनही करता येईल. किल्ले सरसगड, सुधागड या ठिकाणीही भेट देता येईल. या सेवेचा मार्गात येणाऱ्या गावांनाही फायदा होईल.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/all-colleges-along-with-pune-university-lower-fees-pjp78", "date_download": "2022-10-07T23:16:29Z", "digest": "sha1:V2SJ454OCQM73HIFH3OUWN2DPFXWWVYC", "length": 11619, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुणे विद्यापीठाबरोबरच सर्व महाविद्यालयांचे शुल्क होणार कमी | Sakal", "raw_content": "\nपुणे विद्यापीठाबरोबरच सर्व महाविद्यालयांचे शुल्क होणार कमी\nपुणे - कोरोनामुळे (Corona) निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा फटका विद्यार्थी, (Student) पालकांना (Parents) बसला असून याचा विचार करता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Pune University) शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी शुल्क कपातीचा (Fee Reduction) निर्णय (Decision) घेतला आहे. तसेच कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे (Student) संपूर्ण शुल्क (१०० टक्के) माफ करण्यात येणार असल्याचेही विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करण्याचा, शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला होता. राज्य सरकारच्या आदेशानुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सुधाकर जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने शुल्क कपातीची शिफारस करणारा अहवाल विद्यापीठ प्रशासनासमोर सादर केला. हा अहवाल कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्वीकारला असून त्यातील शिफारशींना मान्यता दिली असून त्यानुसार शुल्क कपात होणार आहे.\nकोरोना काळात विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही किंवा एक पालक गमावले आहेत, त्यांना शुल्कामध्ये १०० टक्के सवलत देण्यात आली आहे. शुल्कामध्ये केलेली कपात ही केवळ शैक्षणिक वर्ष २०२१-२२साठी लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांनी लेखी अर्ज केल्यानंतर त्यांना हप्त्यांमध्ये शुल्क भरता येणार आहे.\nहेही वाचा: पुणे : पोलिसांमुळे घराचा आधार गेला; सुरेश पिंगळे यांच्या पत्नीचा आक्रोश\nशुल्क कपातीबाबत असे असतील निर्णय -\n- कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शुल्कात १०० टक्के सवलत\n- गरजू विद्यार्थ्यांनी लेखी अर्ज केल्यानंतर हप्त्यांत शुल्क भरण्याची मिळणार मुभा\n- विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात आल्यानंतर वसतिगृह/निवास शुल्क लागू होईल.\nअशी होणार शुल्कात कपात :\nशुल्काचा तपशील : शुल्क कपात टक्केवारीत\nग्रंथालय शुल्क : ५० टक्के\nप्रयोगशाळा शुल्क : ५० टक्के\nजिमखाना शुल्क : ५० टक्के\nविद्यार्थी कल्याण निधी : ७५ टक्के\nअभ्यासाव्यतिरिक्त उपक्रम : ५० टक्के\nपरीक्षा शुल्क :२५ टक्के\nऔद्योगिक भेटी : १०० टक्के\nमहाविद्यालय मासिक : १०० टक्के\nविकास निधी: २५ टक्के\nकॉशन मनी डिपॉझिट : १०० टक्के\nइतर ठेवी : १०० टक्के\nआरोग्य तपासणी शुल्क : १०० टक्के\nआपत्ती व्यवस्थापन शुल्क : १०० टक्के\nअश्वमेध : १०० टक्के,\nसंगणक सुविधा : ५० टक्के\n‘विद्यापीठ आणि संलग्न सर्व महाविद्यालयांसाठी शुल्क कपातीचा घेतलेला निर्णय लागू असणार आहे. कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ केले जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठ आणि विविध महाविद्यालयांकडून माहिती मागविण्यात आली आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना हप्त्याने शुल्क देण्याची सुविधा मिळावी, यासाठी संबंधित महाविद्यालयात अर्ज पडताळणी (स्क्रुटनी) समिती कार्यान्वित करण्याची सूचना केली आहे. या समितीद्वारे अर्जाची पडताळणी करून गरजू विद्यार्थ्यांना हप्त्याने शुल्क भरण्याची सवलत दिली जाईल.’\n- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/nale-pond-destroyed-in-flood-70-acres-of-agricultural-crops-flooded-nashik-latest-marathi-news-psl98", "date_download": "2022-10-07T23:01:03Z", "digest": "sha1:2H2A7NHQMYKFO2AHENK5XWWJHKZYNWBJ", "length": 11328, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "Latest Marathi News | नाळेच्या पाझर तलावाला भगदाड; 70 एकर शेतीतील पीक जलमय | Sakal", "raw_content": "\nनाळेच्या पाझर तलावाला भगदाड; 70 एकर शेतीतील पीक जलमय\nमालेगाव (जि. नाशिक) : शहरासह तालुक्यात दोन दिवस झालेल्या संततधारेमुळे नाळे (ता. मालेगाव) येथील पाझर तलावाला मोठे भगदाड पडले. तलावाचे पाणी वाहून गेल्याने व जोरदार प्रवाहामुळे सुमारे २५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे ७० एकर शेतीतील पीक जलमय झाले. देवारपाडे, शेंदुर्णी, साजवहाळ या गावातील पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले.\nकापूस, मका, डाळिंब, कांदा या पिकांसह शेतातील सुपीक माती वाहून गेली. सुमारे दोन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. महसूल विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. (Nale pond destroyed in flood 70 acres of agricultural crops flooded Nashik Latest Marathi News)\nदरम्यान, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी जलसंधारण अधिकाऱ्यांसमवेत नुकसानीची पाहणी केली. नाळे येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम व सहकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.\nश्री. शर्मा यांनी उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांना बंधारा दुरुस्तीचा प्रस्ताव तत्काळ दाखल करण्याची सूचना दिली. नाळेनजीकच्या साजवहाळ येथील गाव तलावाच्या भिंतीमधून पाणी पाझरत असून, त्याची पाहणी केल्यानंतर शाखा अभियंता युवराज अहिरे यांना उपाययोजना करण्याबाबत आदेश देण्यात आले. तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक उपस्थित होते. त्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.\nसंततधारेमुळे नाळे येथील पाझर तलाव संपूर्ण भरला. सोमवारी (ता. १९) रात्री अकराच्या सुमारास बंधारा फुटण्यास सुरवात झाली. पहाटे बंधाऱ्याला मोठे भगदाड पडून तलावाचा बांध फुटला. त्यात मनीष सूर्यवंशी, देवबा म्हस्के, भरत चिकने, सुधाकर सरोदे, रामा म्हस्के, भिकन गुढे, बाळू म्हस्के, पिंटू सरोदे, संजय चिकने आदींसह २५ ते ३० शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कापूस, डाळिंब, मका, कांदा या पिकांना प्रामुख्याने फटका बसला. सुपीक माती वाहून गेल्याने जमीन नापीक झाली. शेतात व विहिरीत पाणी शिरल्याने काही विहिरी बुजल्या गेल्या. नदी व बंधाऱ्याकाठची शेती वाहून गेली.\nहेही वाचा: चिमुरड्याने गिळले नेलकटर; MVP वैद्यकीय महाविद्यालयात यशस्वी शस्त्रक्रिया\nपावसामुळे मनोज शिंदे यांची गाय मृत झाली. नांदगाव बुद्रुक येथील युवराज गोसावी यांच्या घराची दक्षिणोत्तर भिंत कोसळली. घाणेगाव येथील साहेबराव कसेकर यांच्या घराची भिंत पडली. सुदैवाने या दोन्ही दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. श्री. निकम यांनी नाळे येथील पाझर तलाव फुटल्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली.\nतलाव फुटल्याने पूर्ण पाणी वाहून गेले आहे. आगामी काळात नाळे व देवारपाडे येथील शेतकऱ्यांना पाणीटंचाईची भीती व्यक्त करीत उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्यासमवेत एकनाथ लांबखेडे, मनीष सूर्यवंशी, देवा पाटील, श्याम गांगुर्डे, स्वप्नील भदाणे व शेतकरी उपस्थित होते.\nहेही वाचा: Crime Update : PAN Card अपडेटच्या नावाखाली 5 लाखांना गंडा\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/web-story/dhanashree-kasgoankar-our-father-look-at-the-traditional-dress-of-vahinisaheb-aak11", "date_download": "2022-10-07T22:32:47Z", "digest": "sha1:A7JWAAKU2L7C2AJKLOGMUHHWSX5WYS4G", "length": 1532, "nlines": 16, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhanashree Kasgoankar : आमचं पप्पा ! बघाच वहिणीसाहेबांचा पारंपारीक साज | Sakal", "raw_content": "Dhanashree Kadgoankar : वहिनीसाहेबांचा पारंपारीक साज\nधनश्री ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत ‘वहिनीसाहेब’ भूमिका सकारात घराघरांत पोहोचली\nअभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे\nतिची ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका चांगलीच गाजली\nवहिनीसाहेबांचे कोल्हापुरी ठसका असलेले डायलॉग प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत\nधनश्रीने तिचे साडीतले काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत यात ती खूपच सुंदर दिसत आहे\nचाहतेही धनश्रीच्या या फोटोंवर फिदा होत असतात\nया लूकमध्ये ती कमालीची ग्लॅमरस आणि सुंदर दिसतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/city/nagpur/team-india-and-australia-both-teams-claimed-our-victory-in-the-second-t-twenty-match/mh20220923125513761761727", "date_download": "2022-10-07T21:32:39Z", "digest": "sha1:JQR2WNGWCUSSVBJ4XL7ZQXT2CNQXKXSF", "length": 5015, "nlines": 15, "source_domain": "www.etvbharat.com", "title": "IND vs AUS : दुसऱ्या टी-20 सामन्यात आमचाच विजय; दोन्ही संघांनी केला दावा", "raw_content": "\nIND vs AUS : दुसऱ्या टी-20 सामन्यात आमचाच विजय; दोन्ही संघांनी केला दावा\nIND vs AUS : दुसऱ्या टी-20 सामन्यात आमचाच विजय; दोन्ही संघांनी केला दावा\nआज नागपुरात पावसाची संततधार असल्याने आज भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ ( Team India and Australia ) सराव करू शकले नाही. मात्र दोन्ही संघांनी विजयाचा दावा ( Both teams claimed Our victory in the second T-Twenty match ) केला आहे. ( IND vs AUS T20 Series )\nनागपूर : आज नागपुरात पावसाची संततधार असल्याने आज भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ ( Team India and Australia ) सराव करू शकले नाही. मात्र दोन्ही संघांनी विजयाचा दावा केला आहे. पहिल्या टी-20 क्रिकेट सामन्यात ( T-Twenty matches ) भारताचा पराभव झाल्याने उद्याचा सामना जिंकणे आवश्यक आहे, तर सलग दुसरा विजय मिळवून मालिका खिशात घालण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरणार आहे. ( second T Twenty matches )\nभारतीय खेळपट्ट्यांची चांगली जाण-टीम डेव्हिड : पहिल्या टी-20 सामन्यात ( IND vs AUS T20 Series ) पदार्पण करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडू टीम डेव्हिडने नागपूरच्या सामन्यात चमकदार कामगिरीची आशा व्यक्त केली आहे. आज टीम डेव्हिडची ऑनलाइन पत्रकार परिषद संपन्न झाली त्यामध्ये तो बोलत होता. तो म्हणाला की भारतीय परिस्थितीत खेळण्याचा त्याच्याकडे खूप अनुभव आहे. त्यामुळे त्याला भारतीय खेळपट्ट्यांची चांगली जाण असल्याने अधिक धावा करण्यास मदत मिळेल. टीम डेव्हिड आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जातो. आणि मागच्या सामन्यात डेव्हिडने 128 च्या स्ट्राईक रेटने 18 धावांची इनिंग खेळली.\nरोहितच्या त्या कृतीचे समर्थन : सुर्यकुमार यादव : मोहाली येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या टी- २० सामन्यात भारताच्या पराभवापेक्षा कर्णधार रोहित शर्माच्या (Captain Rohit Sharma) आक्रमक वृत्तीची अधिक चर्चा होत आहे. वास्तविक,सामन्यादरम्यान रोहित खूप आक्रमक होता. दरम्यान, त्याने दिनेश कार्तिकचे डोकेही धरलेले दिसले. त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. यावर सूर्यकुमार यादवने रोहित शर्माचा बचाव करताना सांगितले की, मैदानावर खूप दडपण असतं. रोहित शर्माने वातावरण निवळण्यासाठी हे सर्व केले आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह आता पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सूर्यकुमार म्हणाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/beed/news/ten-hour-long-processions-in-beed-city-flower-showers-on-ganapati-bappa-130299760.html", "date_download": "2022-10-07T21:21:53Z", "digest": "sha1:K7QN77VOWWLTOX7L5A4FP3DTRATPYMI3", "length": 7527, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बीड शहरात दहा तास चालल्या मानाच्या मिरवणुका; गणपती बाप्पांवर पुष्पवृष्टी | Ten-hour long processions in Beed city; Flower showers on Ganapati Bappa | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुढच्या वर्षी लवकर या:बीड शहरात दहा तास चालल्या मानाच्या मिरवणुका; गणपती बाप्पांवर पुष्पवृष्टी\nगुलालाची उधळण, गणपती बाप्पा माेरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष, ढोल पथकाबरोबरच डीजेचाही ठेका आणि बेभान विसरून नाचणारे गणेशभक्त अशा वातावरणात शुक्रवारी दहा दिवसांनंतर जिल्ह्यात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच मोठा उत्साह विसर्जन मिरवणुकांध्ये होता. शहरातील मिरवणुका तब्बल दहा तास चालल्या. सन २०१९ च्या तुलनेत अधिक वेळ या मिरवणुका चालल्या. दरम्यान, जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार, वाद अथवा दुर्घटना न घडता विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पडल्या असून ध्वनी प्रदूषणाचा एकही गुन्हा जिल्ह्यात नोंदवला गेला नाही.\nकोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा प्रथमच कुठल्याही निर्बंधांशिवाय गणेशोत्सव पार पडला. सुरुवातीपासूनच गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. जिल्ह्यात दीड हजार सार्वजनिक मंडळांनी गणेश स्थापना केली होती. देखावे, सामाजिक उपक्रमांमुळे गणेशोत्सवाला रंगत होती. दहा दिवस विविध उपक्रम मंडळांनी राबवले. बीड शहरात दुपारी १ वाजेपासून मानाच्या गणपतीच्या मिरवणुकांना सुरुवात झाली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा विसर्जन मार्गावर तैनात हाेता. हजारोंच्या संख्येने भाविक या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. चौकाचौकात ढोल पथक, झांज पथक, हलगी पथक आणि डीजे लावून भाविक बाप्पासमोर नाचत होते. भाविकांकडून स्वागत केले जात होते. शहरातील कनकालेश्वर मंदिराजवळील विहिरीत गणपतीचे विसर्जन केले. रात्री १२ वाजेपर्यंत मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.\nविसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात पोलिसांनीही बाप्पा समोर ताल धरला. तर, शिवाजीनगर, बीड ग्रामीण ठाण्यातील बाप्पाचे सकाळी विसर्जन करण्यात आले. यावेळीही ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी बाप्पासमोर नाचून उत्साहात विसर्जन केले आणि मग बंदोबस्तावर तैनात झाले.\nशहरातील सर्व मंडळांबरोबरच घरगुती गणपतीचेही कनकालेश्वर कुंड, कर्परा नदी, बिंदुसरा नदी, पाली येथील प्रकल्पात नागरिकांकडून विसर्जन करण्यात येत होते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत यामध्ये नागरिक सहभागी झाले होते.\nएसपींसह यंत्रणा उतरली रस्त्यावर\nविसर्जन मिरवणुका शांततेत, शिस्तीत व्हाव्यात यासाठी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके हे रस्त्यावर उतरले होते. त्यांच्यासह ठाणेप्रमुख, कर्मचारी, एसआरपी, आरसीपी, क्यूआरटी पथके, होमगार्ड असा दोन हजार पोलिसांचा फौजफाटा जिल्ह्यात तैनात होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/if-you-cough-for-more-than-two-weeks-you-may-have-lung-cancer-gh-mhcp-747237.html", "date_download": "2022-10-07T22:35:10Z", "digest": "sha1:YU5VKLQYAA2MSFFZSYUVVKC7EBBBG6X5", "length": 10856, "nlines": 93, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "If you cough for more than two weeks you may have lung cancer दोन आठवड्यांपासून खोकला येतोय? सावध व्हा! 'या' मोठ्या आजाराची लागण झाल्याची शक्यता – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /\nदोन आठवड्यांपासून खोकला येतोय सावध व्हा 'या' मोठ्या आजाराची लागण झाल्याची शक्यता\nदोन आठवड्यांपासून खोकला येतोय सावध व्हा 'या' मोठ्या आजाराची लागण झाल्याची शक्यता\nफुफ्फुसाच्या कर्करोगाची काही लक्षणं (Symptoms) सुरुवातीला दिसतात, मात्र अनेक रुग्ण त्याकडे कानाडोळा करतात. यामुळे हा आजार जीवघेणा बनतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.\nकर्करोग (Cancer) हा काही असाध्य रोगांपैकी एक आहे. कर्करोगाच्या काही प्रकारांमध्ये औषधांनी धोका कमी होऊ शकतो. मात्र आजही रुग्ण दगावण्याचं प्रमाण या आजारात पुष्कळ आहे. वरवर साधी वाटणारी लक्षणंही काहीवेळा कर्करोगाची असू शकतात. त्यामुळे आजाराचं लवकर निदान होत नाही. यामुळेच आजार गंभीर स्वरूपापर्यंत पोहोचतो आणि जीवाला धोका निर्माण होतो. वाढतं प्रदूषण, तंबाखु-सिगारेटचं व्यसन यामुळे सध्या फुफ्फुसाचा कर्करोग (Lungs Cancer) होण्याचं प्रमाण वाढलंय. खोकला (Cough) हे या आजाराचं एक प्रमुख लक्षण आहे. वारंवार खोकला होणं, दोन-तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला येत राहणं अशी लक्षणं असतील, तर डॉक्टरांशी चर्चा करणं आवश्यक असतं. टीव्ही 9 हिंदीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाची काही लक्षणं (Symptoms) सुरुवातीला दिसतात, मात्र अनेक रुग्ण त्याकडे कानाडोळा करतात. यामुळे हा आजार जीवघेणा बनतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. गेल्या काही वर्षांत फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलं असल्याचं फोर्टिस अ‍ॅस्कॉर्ट्स रुग्णालयाचे संचालक आणि पल्मनॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. रविशेखर झा यांचं म्हणणं आहे. चाळीशीच्या आतल्या रुग्णांमध्येही हा कर्करोग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. बहुतेकवेळा कर्करोग गंभीर झाल्यावरच त्याचं निदान होतं आहे, ही चिंतेची गोष्ट आहे. यामुळे त्यावर औषधोपचार (Medications) करणं कठीण होतं. पुरुषांमध्ये या कर्करोगाचं प्रमाण जास्त असल्याचं आढळतं, असं डॉ. झा यांचं म्हणणं आहे. (सावधान ...तर मधुमेहामुळे तुमचा पायही कापावा लागू शकतो, 'ही' लक्षणं ओळखा लवकर) सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचं एक प्रमुख लक्षण आहे, मात्र नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात, असं वरिष्ठ फिजिशियन डॉ. कवलजितसिंग यांनी सांगितलं. अशावेळी एखाद्या रुग्णाला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असेल, तर डॉक्टरांना दाखवून (Longer Cough Symptoms Should Be Checked) औषधोपचार सुरू केले पाहिजेत. यामुळे कर्करोगाचा धोका टाळता येतो. तसंच क्षयरोगासारख्या गंभीर आजाराचंही यामुळे निदान होऊ शकतं. फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं छातीत दुखणं. वजन झपाट्यानं कमी होणं. दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला राहणं. खोकल्याची उबळ येऊन त्यात रक्त पडणं. कर्करोगाचं प्रमुख कारण धूम्रपान धूम्रपान (Smoking) करण्याची सवय फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमुख कारण असतं. मात्र आता वायू प्रदुषणामुळेही फुफ्फुसाचा कर्करोग होत असल्याचं समोर आलंय. प्रदूषित हवा, औद्योगिक प्रदूषण, चुकीची आहार पद्धती, हुक्का, विडी यामुळे हा कर्करोग होण्याचा धोका असतो. त्यामुळे संतुलित व पौष्टिक आहार घेणं, घरातली हवा शुद्ध करण्यासाठी एअर प्युरिफायरचा वापर करणं, धूम्रपान न करणं, घरात, आजूबाजूला झाडं लावणं हे काही उपाय करता येऊ शकतात. त्याशिवाय बाहेर जाताना मास्क वापरणं ही सवय खूप हितकारक ठरू शकते. प्रत्येकानं दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी करावी. त्यामुळेही आजाराचं निदान सुरुवातीच्या टप्प्यात होऊ शकतं व आजार बरा होण्याची शक्यता वाढते. चांगली जीवनशैली अंगिकारणं हा आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाय असतो. तसंच योग्य व वेळेवर निदान हा कोणताही आजार लवकर बरा करण्यासाठीची महत्त्वाची पायरी असते.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/ratan-tata-invest-in-goodfellows-startup-feemium-model/articleshow/93660860.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2022-10-07T22:14:11Z", "digest": "sha1:FL7MQFRJ6BZSZ4USGNAPPC5C7FSTHPTD", "length": 15377, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "ratan tata invest in startup, रतन टाटांनी गुंतवणूक केलेले वृद्धांसाठीचे पहिले फ्रीमियम मॉडेल काय आहे\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nरतन टाटांनी गुंतवणूक केलेले वृद्धांसाठीचे पहिले फ्रीमियम मॉडेल काय आहे OTT शीही संबंध आहे या स्टार्टअपचा\nRatan Tata invest in Freemium Startup Model: रतन टाटांनी वृद्धांसाठीच्या देशातल्या पहिल्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. वाचा काय आहे हे स्टार्टअप...\nरतन टाटांनी गुंतवणूक केलेले वृद्धांसाठीचे पहिले फ्रीमियम मॉडेल काय आहे OTT शीही संबंध आहे या स्टार्टअपचा\nRatan Tata invest in Freemium Startup Model: सध्या फायनेंशिअल वर्ल्डमध्ये फ्रीमियम (Freemium) हा शब्द सतत ऐकू येतोय. हा शब्द फ्री आणि प्रीमियम या दोन शब्दांनी बनला आहे. मागील काही दिवसात गुडफेलोज (Goodfellows) नावाच्या ज्या स्टार्टअपमध्ये रतन टाटा (Ratan Tata) यांनी गुंतवणुकीची घोषणा केली होती, त्याच मॉडेलवर हे आधारित आहे. गुडफेलोज वृद्धांसंबंधीत देशातील पहिलं स्टार्टअप आहे, जे कम्पॅनियनशिप देतं. अर्थात त्यांचा एकटेपणा दूर करतो. हे स्टार्टअप फ्रीमियम मॉडेलवर आधारित आहे. फ्रीमियम एक प्रकारचं बिजनेस मॉडेल आहे. यात सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा मालक युजर्सकडून बेसिक फीचर्ससाठी कोणताही चार्ज घेत नाही. म्हणजेच मूलभूत गोष्टी मोफत दिल्या जातात. प्रीमियम सेवा आणि फीचर्ससाठी फी घेतली जाते.\nफ्री आणि प्रीमियम (Free and Premium) या दोन शब्दांनी फ्रीमियम शब्द बनला आहे. हा शब्द तयार करण्याचं श्रेय जॅरिड ल्‍यूकिन यांना जातं. २००६ मध्ये त्यांनी हा शब्द तयार केला. फ्रीमियम मॉडेल (Freemium Model) इंटरनेट कंपन्यांमध्ये लोकप्रिय आहे. या मॉडेलचा अवलंब करणाऱ्या कंपन्यांना आधी विश्वासू ग्राहक तयार करावे लागतात. यात ऑनलाइन जाहिराती, ईमेल, रेफरल नेटवर्कच्या मदतीने प्रीमियम सर्विससाठी फी घेतली जाते.\nटाटांची गुंतवणूक असणाऱ्या वेंचरशी फ्रीमियमचं कनेक्शन\nउद्योगपती रतन टाटा यांनी गुडफेलोज नावाच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली. याचे संस्थापक शांतनू नायडू आहेत. हे स्टार्टअप वृद्धांचा एकटेपणा दूर करण्यास मदत करेल. त्यांना तरुणांद्वारे कॅम्पेनियनशिप दिली जाते. गुडफेलोजचं बिजनेस मॉडेल फ्रीमियम सब्सक्रिप्शनवर आधारित आहे. याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सेवा अनुभवण्यासाठी पहिला महिना मोफत सेवा दिली जाते. दुसऱ्या महिन्यापासून पेन्शनधारकांना त्यांच्या क्षमतेनुसार कमी फी द्यावी लागते.\nही सेवा मोफत दिल्यानंतर त्या ग्राहकाला एखादा कॅम्पेनियन आठवड्यातून तीन वेळा भेटायला (Freemium Model OTT) जातो. तो चार तास वृद्धांसोबत वेळ घालवतो. त्यानंतर एका महिन्याच्या मोफत सेवेनंतर कंपनी एका महिन्यासाठी ५००० रुपये मासिक शुल्क घेते. प्रीमियम सेवांसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. अतिशय बेसिक सेवाच या फ्रीमियम मॉडेलमध्ये फ्री असतील. आता अनेक ठिकाणी हे फ्रीमियम मॉडेल फॉलो केलं जात असल्याची माहिती आहे.\nओटीटी प्लॅटफॉर्म फ्रीमियम मॉडेलकडे का वळत आहे\nओटीटी प्लॅटफॉर्मचाही याकडे मोठा कल आहे. त्यांच्यासमोर कमाई करण्याचं मोठं आव्हान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ओटीटीवर कंटेंट वाढत वाढतो आहे. देशात डिजीटल व्हिडिओ ऑडियन्स जवळपास ३५ कोटी आहे. पण केवळ ४ कोटी पेड सब्सक्रायबर्स आहेत. ओटीटी कंपन्यांना आपले सब्सक्रायबर्स वाढवायचे आहेत आणि पेड सब्सक्रिप्शनही वाढवायचं आहे. त्यामुळेच त्यांचा मधला मार्ग साधत फ्रीमियम मॉडेलकडे कल आहे. यात प्रीमियम सर्विस किंवा कंटेंटसाठी फी घेतली जाते.\nरतन टाटांची फ्रीमियम मॉडेल असलेल्या स्टार्टअपमध्ये गुंतणूक\nप्रीमियम सर्विस घेतल्यानंतर जाहिराती येत समोर येत नाहीत. त्यामुळे युजर सहजपणे आपल्या आवडीचा कंटेंट पाहू शकतो. काही कंटेंट सर्वांसाठी असतो, पण प्रीमियम कंटेंटसाठी फी घेतली जाते. प्रीमियम कंटेंटही वेगवेगळ्या कॅटगरीमध्ये विभागला आहे. त्याची फीदेखील वेगवेगळी असते. या फ्रीमियम मॉडेलमुळे ओटीटीला फायदा होऊ शकतो. त्यामुळे अशा कंपन्यांचा रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या स्टार्टअप बिजनेस मॉडेलकडे कल आहे.\nमहत्वाचे लेखजीवन विमाचे विविध प्रकार तुम्हाला माहिती आहेत का आधी जाणून घ्या आणि मगच निर्णय घ्या\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमुंबई आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nदेश ​देश हादरला... लग्न करण्यास नकार दिला, त्याने १९ वर्षीय मारुतीला पेट्रोल ओतून पेटवलं...​\nमुंबई शकील, छोटा राजनला माझी सुपारी दिली; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप\nक्रिकेट न्यूज उभारायला गेले MS Dhoni चा मेणाचा पुतळा, पण धोनीची झाली अनहोनी, पाहा भन्नाट memes\nक्रिकेट न्यूज कमजोर पाकिस्तानने रोखला भारतीय संघाचा विजयरथ, आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला हरवलं\nमुंबई ठाकरेंबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर विनायक राऊतांकडून राणेंची कोंडी करण्याचा प्रयत्न\nLive Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी\nपुणे ब्रेकअपच्या रागातून गर्लफ्रेंडच्या घरात २७ तोळे सोन्याची चोरी, पुण्यातील घटनेनं खळबळ\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%A6_%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80,_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2022-10-07T23:39:30Z", "digest": "sha1:OWW2LORJY3R5PF63I26HTZCAYHDA4JTR", "length": 5274, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेक ऑफ द वूड्स काउंटी, मिनेसोटा - विकिपीडिया", "raw_content": "लेक ऑफ द वूड्स काउंटी, मिनेसोटा\nअमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवरील ९१९ क्रमांकाचा खुणेचा दगड\nलेक ऑफ द वूड्स काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बॉडेट येथे आहे.[१]\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,७६३ इतकी होती.[२]\nनॉर्थवेस्ट अँगल हा अमेरिकेच्या सलग ४८ राज्यांतील सगळ्यात उत्तरेचा बिंदू या काउंटीमध्ये आहे.\nलेक ऑफ द वूड्स काउंटी (मिनेसोटा)\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०२२ रोजी १०:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2022-10-07T22:52:37Z", "digest": "sha1:KWFWY54B4QDE6VC7VRB7ZA7GV2P4VZQI", "length": 7531, "nlines": 153, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "लेक आणि लक्ष्मीची कहाणी", "raw_content": "\nलेक आणि लक्ष्मीची कहाणी\nपूर्वापारपासून राजस्थानातले राइका प्रवासात वेळ घालवण्यासाठी म्हणून गोष्टी सांगत आले आहेत. मात्र आजकाल त्यांच्या या गोष्टी आणि त्यांची गायरानं दोन्हीला ओहोटी लागली आहे. पुढील चित्रफितीत फुयाराम राइका आपल्याला सतर्क रहा असा संदेश देणारी गोष्ट सांगतात\nकित्येक शतकांपासून राजस्थानच्या पाली जिल्ह्यातल्या सादरी गावचे राइका उंट पाळत आले आहेत. मी फुयाराम राइकांसोबत चडिये किंवा चारणीला गेले. खरं तर हे दिवसभराचं काम असतं. फुयारामजी सकाळी घर सोडतात, सोबत चहाचं सामान आणि रोट्या मुंडाशात बांधून घेतात आणि सांजेला परत येतात. राजस्थानातला असह्य गरमा आणि २० उंटांवर देखरेख ठेवण्याचं काम असतानाही ते त्यांच्या चहात मलाही वाटेकरी करून घेतात.\nफुयारामजींना कदाचित कल्पना असावी की त्यांच्या कुटुंबातलं कुणीच त्यांच्या पावलावर पाऊल टाकणार नाहीये. त्यांची मुलं कसं हे काम करणार नाहीत हे त्यांनी बोलून दाखवलं. आता पशुपालकांसाठी उरलेल्या मोजक्या काही गायरानांमधून जात असताना त्यांनी मला सांगितलं की कधी काळी राइका लोक सादरीच्या रानावनातून मुक्तपणे संचार करत आणि वाटेत भेटेल त्याच्याशी त्यांचे पक्के ऋणानुबंध जुळत असत.\nव्हिडिओ पहाः सादरी गावचे जुनेजाणते फुयारामजी राइका आपल्याला नशिबाबद्दल एक कहाणी सांगतात. त्यांच्या कुटुंबातलं कुणीही त्यांच्यासारखं पशुपालकाचं आयुष्य जगणार नाही याची त्यांना कल्पना आहे\nपण आता गोष्टी बदलल्या आहेत. आता पुरेशी कुरणं नाहीत, कारण बरीचशी जमीन खाजगी मालमत्ता झालीये किंवा सरकारने ताब्यात घेतली आहे. पशुपालकांना पूर्वी जसं गायरानांचा मुक्त वापर करता यायचा त्यावर आता मर्यादा आल्या आहेत. आणि पूर्वापारपासून एकत्र नांदलेल्या शेतकरी आणि पशुपालकांमध्ये आता तेढ निर्माण होऊ लागली आहे.\nमी फुयारामजींना त्यांच्या लहानपणी त्यांनी ऐकलेल्या गोष्टी सांगण्याची विनंती केली. त्यांनी एक गोष्ट सांगितली – ही गोष्ट आहे एका भावा बहिणीची, आणि दोन देवांची – भाग्य आणि संपत्तीची. संपत्तीच्या मागे धावणाऱ्यांना सावध करण्यासाठी ही गोष्ट सांगितली जाते.\nसंलग्न कहाणीः राजस्थानचे राइका\n‘सध्या काही जण दिवसातून एकदाच जेवतायत’\n‘त्या दिवशी मी तुरुंगात जाणार, मला माहित होतं...’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.transliteral.org/pages/z140730073132/view", "date_download": "2022-10-07T21:33:22Z", "digest": "sha1:2HOCWGRH4MQP3MCSYJTWCAK4AGXOGP4F", "length": 8419, "nlines": 64, "source_domain": "www.transliteral.org", "title": "स्मरणालंकार - लक्षण १ - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|स्मरणालंकार|\nस्मरणालंकार - लक्षण १\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\n“ सादृश्यज्ञानाच्या योगानें जाग्रत झालेला जो संस्कार, त्या संस्कारानें उत्पन्न झालेल्या स्मरणाला स्मरणालंकार म्हणावें. ”\n“ ज्याच्या दोन बलिष्ठ बाहूंनीं वाकविलेल्या तेजस्वी धनुष्याच्या केवळ प्रचंद ध्वनीनेंच, माजलेल्या शत्रुसमूहाला नष्ट करून टाकलें आहे, अशा तुला, हे राजा, रणामध्यें पाहून, हातांत नाचणार्‍या धनुष्यांतून सोडलेल्या बाणांच्या समूहांतून निघालेल्या अग्नीच्या ज्वाळांच्या तांडवानें जळणारें जें खांडववन, त्याच्यावर क्तुद्ध झालेल्या अर्जुनाचें कोणाला स्मरण होणार नाहीं बरें \n“ हे शत्रुसमूहाचा विध्वंस करणार्‍या राजा, ज्याच्या हातांत फिरणार्‍या पट्टिश अस्त्रानें मोठमोथया मत्त हत्तींना चेचून टाकलें आहे, अशा तुला, रणांगणामध्यें पाहाणार्‍या कोणत्या मनुष्याच्या ह्लदयामध्यें, आपल्या वज्राच्या भयंकर प्रहारानें ज्यानें विंध्य पर्वताचे तुकडे तुकडे करून टाकले आहेत असा इंद्र एकदम प्रकट होणार नाहीं बरें \nवरील दोन्हीहि श्लोकांमध्यें राजाविषयीं कवीच्या मनांत असलेली भक्ति ही मुख्य आहे. व श्लोकांत सांगितलेलें स्मरण त्या भक्तीचा उत्कर्ष करीत असल्यानें, तें ( स्मरण ) येथें अलंकार झालें आहे. ह्या दोन श्लोकां-पैकीं पहिल्या श्लोकांतलें स्मरण शब्दानें सांगितलें असल्यानें, वाच्य आहे व दुसरें स्मरण लक्ष्य आहे, हा या दोन स्मरणांत फरक. ह्या दोन्हीहि श्लोकांत असलेला वीररस पण, श्लोकांतील प्रधान असलेल्या रतिभावाचा उत्कर्ष करीत असल्यानें, अलंकार झाला आहे.\n“ प्रलयकालीं, एकांत एक मिसळून जाणार्‍या समुद्राप्रमाणें, रणांगणांतील ( एकत्र झालेलें ) कौरवांचें सैन्य पाहून, भगवान श्रीकृष्णाला, शेषाच्या शरीराची केलेली सुंदर शय्या व त्यावर स्वत: पडून घेतलेली योग-निद्रा ह्या दोहोंचें स्मरण झालें. ”\nह्या श्लोकांत, शय्या व निद्रा ह्या दोहोंचें झालेलें स्मरण हें, त्या दोन वस्तूंशीं सदृश असलेल्या पदार्थाच्या दर्शनानें जाग्रत झालेल्या संस्कारा-मुळें झालेलें नसलें तरी, सैन्याशीं सदृश असलेल्या समुद्राचें दर्शन झाल्यामुळें, समुद्राविषयींचा जो संस्कार जाग्रत झाला, त्या संस्कारामुळें पयोधीचें स्मरण प्रथम झालें व त्यामुळें त्या स्मरणावर अवलंबून असलेल्या शेषशय्या व योगनिद्रा ह्या दोहोंचें स्मरण, नंतर झालें. अर्थात्‍ समुद्र ह्या सदृश वस्तूच्या प्रत्यक्ष दर्शनानें जाग्रत होणार्‍या संस्कारामुळेंच शेषशय्या व योगनिद्रा ह्यांचें स्मरण झालें असल्यामुळें, तें ( स्मरण ) कसल्यातरी सादृश्याला पाहून उद्‍बुद्ध झालेल्या संस्कारानेंच उत्पन्न झालें आहे, असें म्हणतां येईल.\nविंध्याश्र्व n. (सो. अज.) एक राजा, जो इंद्रसेन राजा का पुत्र था मेनका नामक अप्सरा से इसे जुड़वी संतान उत्पन्न हुई थी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/kami-vayat-kes-pandhare-zalet-kara-he-upay/", "date_download": "2022-10-07T21:55:28Z", "digest": "sha1:DJTSXAJEXSVOMMUSVQX4SK4RH7RDZ3WA", "length": 7995, "nlines": 87, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "कमी वयात केस पांढरे झालेत, करा हे घरगुती उपाय - Themaharashtrian", "raw_content": "\nकमी वयात केस पांढरे झालेत, करा हे घरगुती उपाय\nकमी वयात केस पांढरे झालेत, करा हे घरगुती उपाय\nसध्या कमी वयात केस पांढरे होणे ही कॉमन समस्या झाली आहे. अगदी ९-१० वर्षांच्या मुलापासून तर तरुणांपर्यंत सर्वांचे केस पांढरे असतात. आपली बदलती जीवनशैली, बदललेल्या खानपानपद्धती, तणाव, अपुरी झोप या सर्व कारणांमुळे केस पांढरे होत असतात.\nआता यावर आम्ही काही घरगूती उपाय सांगणार आहोत, ते केल्यास नक्कीच फरक पडेल.\n१) साधारणपणे मोठ्या वाटीत कढीपत्ता उकळवून घ्या. आणि मग पाणी थंड करायला ठेवा. पाणी थंड/कोमट झाले की प्या. रोज हा उपाय केल्यास नक्कीच बदल जाणवेल. फक्त असे पाणी पिण्यात सातत्य असावे.\n२) एका ग्लासमध्ये लिंबू पिळावे आणि त्यात आवळा पावडर घ्या. चांगले ढवळून घ्या. मग हे मिश्रण प्या.\nहा उपाय सकाळी करावा. केस तुटणे, केसांना इजा पोचणे आणि केस पांढरे होण्यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते.\n३) त्रिफळा चूर्ण केसांसाठी फायदेशीर असते. त्रिफळा चूर्ण केसांना पांढरे होण्यापासून थांबविण्याबरोबरच डॅमेज झालेल्या केसांनादेखील ठीक करते.\n४) रोज रात्री कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून रात्रभर केस तसेच ठेवावे आणि सकाळी डोक्यावरून अंघोळ करावी.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.rdflexitank.com/news/temporary-fuel-storage-tank-for-mining-and-agriculture/", "date_download": "2022-10-07T23:11:00Z", "digest": "sha1:ABMRXO5WIBSFFKHDX5ACM7KDUOU2NGJG", "length": 7750, "nlines": 165, "source_domain": "mr.rdflexitank.com", "title": "बातम्या - खाणकाम आणि शेतीसाठी तात्पुरती इंधन साठवण टाकी", "raw_content": "आमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये आपले स्वागत आहे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nखाणकाम आणि शेतीसाठी तात्पुरती इंधन साठवण टाकी\nखाणकाम आणि शेतीसाठी तात्पुरती इंधन साठवण टाकी\nकोलॅप्सिबल फ्युएल स्टोरेज टँक हे इंधन फार्म किंवा मोठ्या स्टोरेज एरिया सेटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात द्रव साठवण्याचा एक किफायतशीर मार्ग आहे. ट्रान्सपोर्टेड रोल अप आणि तैनात करणे सोपे, आमच्या लवचिक टाक्या खाणकाम, पाइपलाइन दुरुस्ती, लष्करी ऑपरेशन्स आणि बरेच काही दरम्यान तात्पुरत्या इंधन साठवणुकीसाठी एक आदर्श पर्याय आहेत.\nइंधन फार्मसाठी संकुचित टाक्या\nकोलॅप्सिबल बल्क लिक्विड स्टोरेज टँक अधिक कठोर लिक्विड स्टोरेज टँकचे अनेक फायदे देतात. काही फायद्यांमध्ये हे समाविष्ट आहे:\nमोठी क्षमता: टाक्या 210,000 गॅलन पर्यंतच्या क्षमतेमध्ये बनवता येतात, ज्यामुळे खूप कमी खर्चात मोठ्या क्षमतेची साठवण करता येते.\nजलद उपयोजन आणि सेट अप: लवचिक टाक्या गुंडाळून पाठवल्या जातात, त्यामुळे तुम्ही एका वेळी मोठ्या प्रमाणात प्राप्त करू शकता आणि तुमचा प्रकल्प लवकर सुरू करू शकता. त्यांच्या जलद तैनातीमुळे ते आपत्कालीन परिस्थितीसाठीही परिपूर्ण झाले आहेत.\nविस्तृत हवामान श्रेणी: तात्पुरत्या इंधन साठवणुकीच्या टाक्या विस्तृत हवामानाचा सामना करण्यासाठी बनविल्या जातात.\nउच्च किंवा निम्न प्रोफाइल उपलब्ध: तुमच्या अनुप्रयोगांवर अवलंबून, तुमच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी टाक्या उच्च किंवा निम्न प्रोफाइलसह बनविल्या जातात.\nखाली दिलेल्या नमुना डिझाइनमध्ये पाहिल्याप्रमाणे कोलॅप्सिबल टाक्या इंधन फार्म लेआउटमध्ये ठेवल्या जातात. संकुचित इंधन टाक्या या प्रत्येक टाकीला जोडलेल्या इंधन रेषेभोवती ठेवल्या जातात.\nअधिक माहितीसाठी किंवा वेगळ्या टाकी डिझाइनसाठी, आम्हाला ईमेल करण्यासाठी स्वागत आहे rdflexitank@126.comकिंवा 86-13589398394 वर कॉल करा तुमच्या विशिष्ट प्रकल्पावर तुमच्यासोबत काम करण्यात आणि तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट काम करणारी रचना शोधण्यात आम्हाला अधिक आनंद होत आहे.\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा आमच्या जाहिराती, सवलत, विक्री आणि विशेष ऑफरसह अद्ययावत राहण्यासाठी\nलवचिक स्टोरेज पिलो टाकी\nपत्ता: शुआंगफेंग रोड आणि वेनहुआ ​​रोडच्या छेदनबिंदूपासून पूर्व 380 मी.\nसोम - शुक्र: सकाळी 10 ते संध्याकाळी 7\n© कॉपीराइट - 2010-2020 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/sleeping-on-chair-is-it-good-or-bad-to-sleep-sitting-in-a-chair-how-does-it-affect-health-mhpj-743024.html", "date_download": "2022-10-07T23:18:03Z", "digest": "sha1:MFXDKV3AGNBRGGFQB76WOGG3P3PAHQWA", "length": 12296, "nlines": 98, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sleeping on chair is it good or bad to sleep sitting in a chair how does it affect health mhpj - Sleeping On Chair : खुर्चीत बसून झोपणं चांगलं की वाईट? आरोग्यावर कसा होतो परिणाम? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /\nSleeping On Chair : खुर्चीत बसून झोपणं चांगलं की वाईट आरोग्यावर कसा होतो परिणाम\nSleeping On Chair : खुर्चीत बसून झोपणं चांगलं की वाईट आरोग्यावर कसा होतो परिणाम\nडेस्कसमोर काम करताना थकवा आल्यानंतर खुर्चीवर बसून डुलकी घेणे, शाळेत बाकांवर डोके ठेवून झोपणे. अशी सवय बऱ्याच लोकांना असते. पण अशा प्रकारे झोपल्याने अनेकदा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.\nडेस्कसमोर काम करताना थकवा आल्यानंतर खुर्चीवर बसून डुलकी घेणे, शाळेत बाकांवर डोके ठेवून झोपणे. अशी सवय बऱ्याच लोकांना असते. पण अशा प्रकारे झोपल्याने अनेकदा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.\nमुंबई, 7 ऑगस्ट : अनेकांना बसल्या बसल्या झोपण्याची सवय असते. काही लोक कम्प्युटरसमोर काम करता करता तिथेच झोपतात. अशा प्रकारे झोपणे त्या क्षणासाठी आरामदायक वाटू शकते, परंतु नंतर तुम्हाला तीव्र पाठदुखी, मान आणि खांद्यावर कडकपणा येऊ शकतो. तासनतास शांत बसणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्याने तुमच्या सांध्यांवर परिणाम होऊ शकतो. यासोबत अनेक त्रास तुम्हाला होऊ शकतात. मात्र याचे काही फायदेदेखील आहेत. आज आम्ही तुम्हाला खुर्चीत बसून झोपण्याचे चांगले आणि वाईट परिणाम सांगणार आहोत. खुर्चीत बसून झोपण्याचे दुष्परिणाम - जेव्हा आपण अंथरुणावर झोपतो तेव्हा आपल्या हात आणि पायांचे स्नायू ताणले जातात आणि विश्रांती घेतात. मात्र बसून झोपल्याने रक्ताभिसरण मंदावते आणि हालचालींवर मर्यादा येतात. यातून नवीन समस्या येतात. - जर तुम्हालाही बसून झोपण्याची सवय असेल तर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. झोपेमुळे तुमच्या स्पायनल कॉलमचा आकार खराब होतो. त्यामुळे पाठदुखीच्या तक्रारी तर होऊ शकतात, सोबतच पाठीला सूजही येऊ शकते. - जास्त वेळ एकाच स्थितीत झोपल्यामुळे तुमच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजची समस्या उद्भवते. यासोबतच मुंग्या येण्याची समस्यादेखील होऊ शकते, पायांमध्ये रक्ताची गुठळी देखील होऊ शकते, ज्यामुळे चालण्यात अडचण येऊ शकते. - बसून झोपल्यामुळेही सांधे जड होण्याची समस्या उद्भवते. एवढेच नाही तर झोपेमुळे पायांच्या नसांमध्ये ताण येऊ शकतो. यासोबतच बराच वेळ एकाच स्थितीत बसल्यामुळे शरीराची हालचाल शक्य होत नाही.\nझोपेत बोलण्याच्या, चालण्याच्या समस्याही होतात ठीक; डॉक्टर कसा करतात उपचार\nखुर्चीत बसून झोपण्याचे फायदे - गरोदरपणात महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोपण्याची योग्य स्थिती, अशा स्थितीत महिला नेहमी योग्य मार्गाच्या शोधात असतात. तेव्हा बसून झोपणे त्यांच्यासाठी खूप आरामदायी ठरू शकते. - खुर्चीत बसून झोपल्‍याने जठराच्‍या अनेक प्रकारच्या प्रॉब्लेमवर मात करता येते. जर आपल्याला नीट झोप येत नसेल तर आपल्याला बद्धकोष्ठता, गॅस इत्यादी समस्या होऊ शकतात. अशा परिस्थितीत बसून झोपणे प्रभावी ठरू शकते. यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात आणि गॅस बद्धकोष्ठता दूर होते. - झोपेत असताना अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो. पण जेव्हा ते खुर्चीत बसून झोपतात तेव्हा त्याचे स्नायू उघडे राहतात. ज्यामुळे झोपताना श्वास घेण्याचा त्रास दूर होतो. त्यामुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया बसून झोपल्याने निघून जातो.\nHow to Control BP : औषधांशिवायही नियंत्रित राहू शकतं ब्लडप्रेशर; करा हे सोपे उपाय\nखुर्चीत बसून झोपल्याने मृत्यूही होऊ शकतो का झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ खुर्चीत बसून झोपल्याने यापनमध्ये वेदना होणे, पायांना सूज येणे आणि गंभीर परिस्थितींमध्ये पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे. याचा त्रास होऊ शकतो. कोणतीही हालचाल न करता एका ठिकाणी बसणे आणि झोपणे किंवा बराच वेळ बसणे आणि झोपणे यामुळे अशी नकारात्मक परिस्थिती उद्भवू शकते. वेळीच उपचार न घेतल्यास परिस्थिती बिघडू शकते आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो. खुर्चीत बसून झोपताना घ्या ही काळजी जर तुम्हाला खुर्चीत बसून झोपायचे असेल तर तुम्ही रिक्लिनर्सचा वापर करू शकता. झोपण्यासाठी कोणतीही अस्ताव्यस्त स्थिती नाही याची खात्री करा. ज्यांना झोपेच्या वेळी श्वासोच्छवासाचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम आहे. अॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना चांगली झोप येण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/vicky-kaushal-reveal-that-why-he-married-to-katrina-kaif-in-hurry-at-koffee-with-karan-mrj-95-3076293/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-07T22:55:14Z", "digest": "sha1:USALAILBV3IR5UP4TZXXYEHE2HWI7KJB", "length": 21497, "nlines": 259, "source_domain": "www.loksatta.com", "title": "vicky kaushal reveal that why he married to katrina kaif in hurry at koffee with karan | विकी कौशलने कतरिनासह सप्तपदी घेण्यासाठी केली होती घाई, लग्नाबाबत केला रंजक खुलासा | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\nविकी कौशलने कतरिनासह सप्तपदी घेण्यासाठी केली होती घाई, लग्नाबाबत केला रंजक खुलासा\nविकी कौशलनं करण जोहरच्या चॅट शोमध्ये लग्नाबाबत खुलासे केले आहेत.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nविकी कौशल कतरिना कैफशी लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच या शोमध्ये दिसणार आहे.\nप्रसिद्ध बॉलिवूड निर्माता करण जोहरचा लोकप्रिय चॅटशो ‘कॉफी विथ करण ७’च्या आगामी एपिसोडमध्ये विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी पाहायला मिळणार आहे. एकीकडे विकी कौशल कतरिना कैफशी लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच या शोमध्ये दिसणार आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्राही या शोमध्ये त्याच्या लव्ह लाइफबद्दल नवे खुलासे करताना दिसणार आहे.\nकरण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटी बरेच खुलासे करताना दिसतात. खासकरून सेलिब्रेटींचं खासगी आयुष्य, लव्ह स्टोरी, बेडरुम सीक्रेट्स या गोष्टींसाठी हा शो ओळखला जातो. करण जोहर या शोमधू बी-टाऊनमध्ये कोणालाच माहीत नसलेले किस्से प्रेक्षकांसमोर आणतो. हा शो आठवड्याच्या प्रत्येक गुरूवारी डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रसारित होतो.\nआणखी वाचा-“कियारा आडवाणीशी लग्न करण्याचा काय प्लान” करणच्या प्रश्नावर सिद्धार्थ मल्होत्रा म्हणतो…\n“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला\nShinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\n“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप\nनव्या एपिसोडमध्ये हजेरी लावलेल्या विकी कौशलने या एपिसोडमध्ये कतरिना कैफ आणि त्याच्या लव्ह लाइफबद्दल बरेच खुलासे केले आहेत. कतरिना आणि आपल्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना विकी म्हणाला, “आम्ही पहिल्यांदा जोया अख्तरच्या घरी भेटलो होतो. तिथून आमच्या लव्हस्टोरीची सुरूवात झाली.” लग्नाच्या आठवणींबद्दल सांगताना विकीने धमाकेदार लग्नसोहळ्यातही त्यांनी मीम्स आणि मजेदार ट्वीट्सवर कसं लक्ष ठेवलं होतं आणि हे सगळं कसं एन्जॉय केलं हे सांगितलं.\nविकी कौशल म्हणाला, “सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर, हेलिकॉप्टरमधून रॉयल एंट्री यांसारख्या अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यावेळी आम्ही पाहत होतो. यावेळ मी पंडितजींना सांगितलं होतं की, हा सर्व गोंधळ सुरू आहे तोपर्यंतच लवकरात लवकर आमचं लग्न लावून द्या. एक तासापेक्षा जास्त वेळ घेऊ नका. आणखी छापून येण्याआधी आम्हाला लग्न उरकून घ्यायचं होतं. त्यामुळे आम्ही यासाठी घाई केली होती.\nआणखी वाचा- “आता यांना धडा शिकवायलाच हवा…” बॉयकॉट ट्रेंडवर अर्जुन कपूर भडकला\nदरम्यान करण जोहरच्या या शोमध्ये आतापर्यंत आलिया भट्ट-रणवीर सिंह, जान्हवी कपूर-सारा अली खान, अक्षय कुमार-सामंथा रुथ प्रभु, विजय देवरकोंडा-अनन्या पांडे, आमिर खान-करीना कपूर यांच्यासह सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांनीही हजेरी लावली आहे.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘कट्यार काळजात घुसली’ साठी सचिन पिळगावकर नव्हे तर ‘या’ हिंदी कलाकारांना होती पसंती, पण…\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मेधाली, वैभवला सुवर्ण\nप्रो कबड्डी लीग : दबंग दिल्लीसमोर यू मुम्बाची हाराकिरी\nराष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा -विनोद तोमर\nभारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा\nकाँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका\nधनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण\nमध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०८ ऑक्टोबर २०२२\nपुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\nLow Uric Acid: यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होणे देखील ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ ५ गंभीर आजार\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\n“हा चित्रपट…” ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर प्रिया मराठेची प्रतिक्रिया चर्चेत\n‘झलक दिखला जा’च्या मंचावर लेकाच्या लग्नाची झलक पाहून नीतू सिंग भावुक, म्हणाल्या…\n‘हर हर महादेव’मध्ये अमृता खानविलकर साकारणार बाजीप्रभु देशपांडे यांच्या पत्नीची भूमिका, लूक व्हायरल\n‘हम आपके है कौन…’ चित्रपटतील रेणुका शहाणे यांचा ‘तो’ सीन शूट करताना ढसढसा रडल्या रीमा लागू\nMPSC च्या परीक्षेसाठी शुभेच्छा मागणाऱ्याला हेमांगी कवीचे स्पष्ट उत्तर, म्हणाली….\nएअरपोर्ट लूकमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले “कंगना…”\nबॉलिवूडमधील नकारात्मक विचारांच्या लोकांवर टीका करत करण जोहर म्हणाला, “मी प्रत्येकाच्या…”\n“माझ्यावर टीका केली जातेय हे…” सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल प्राजक्ता माळीने व्यक्त केलं स्पष्ट मत\n‘पुष्पा २’मध्ये होणार ‘या’ आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्याची एंट्री, साकारणार महत्वपूर्ण भूमिका\nमुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘झी टॉकीज’चा मानाचा मुजरा\n“हा चित्रपट…” ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर प्रिया मराठेची प्रतिक्रिया चर्चेत\n‘झलक दिखला जा’च्या मंचावर लेकाच्या लग्नाची झलक पाहून नीतू सिंग भावुक, म्हणाल्या…\n‘हर हर महादेव’मध्ये अमृता खानविलकर साकारणार बाजीप्रभु देशपांडे यांच्या पत्नीची भूमिका, लूक व्हायरल\n‘हम आपके है कौन…’ चित्रपटतील रेणुका शहाणे यांचा ‘तो’ सीन शूट करताना ढसढसा रडल्या रीमा लागू\nMPSC च्या परीक्षेसाठी शुभेच्छा मागणाऱ्याला हेमांगी कवीचे स्पष्ट उत्तर, म्हणाली….\nएअरपोर्ट लूकमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले “कंगना…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/15-mm-in-half-an-hour-rain-due-to-the-storm-the-tree-near-the-collectors-office-was-uprooted-130305125.html", "date_download": "2022-10-07T23:12:59Z", "digest": "sha1:SCBNF4YF4G2RYCFZ3FAZ5LMUYBJCIN6F", "length": 6485, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अर्ध्या तासातच १५ मि.मी. पाऊस; वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरील झाड काेसळले | 15 mm in half an hour. rain; Due to the storm, the tree near the collector's office was uprooted| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदाणादाण:अर्ध्या तासातच १५ मि.मी. पाऊस; वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरील झाड काेसळले\nशहरात रविवारी दुपारी दाेन वाजता दमदार पाऊस झाला. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह झालेल्या या पावासने नागरिकांची धावपळ उडाली. अवघ्या अर्ध्या तासामध्ये पावसाने नवीपेठेसारख्या सखल भागात पाणी साचले. पिंप्राळासह परिसरात अवघ्या अर्धा तासात १५ मिमी पाऊस झाला.रविवारी दुपारी २ वाजता पावसाने शहरात वादळी हजेरी लावली. वादळी पावसाने झाडांच्या फांद्या तुटून पडणे, जीर्ण झाडे पडण्याच्या घटना घडल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंतीला लागून असलेल्या उपवनसंरक्षकांच्या बंगल्यातील एक झाड रस्त्यावर काेसळले. या झाडाच्या तीन माेठ्या फांद्या रस्त्यावर काेसळल्याने वाहतूक ठप्प झाली हाेती.\nदिवसभराच्या पावसाने वीज गुल\nशहरात रविवारी झालेल्या पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला; मात्र या पावसामुळे अनेक भागात वीज गुल झाल्याची घटना घडली. तर आकाशवाणी चौकात झाडाची फांदी पडून एका बाजूची रहदारी ब्लाॅक झाल्याने गैरसाेय झाली. रविवारी सकाळपासूनच उकाड्यात वाढ झाली होती. तर दुपारी एक वाजेदरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे पाऊस सुरू झाल्याबरोबर शहरात अनेक भागात वीज गुल झाली. दिवसभर विजेचीही जा-ये सुरू होती.दिवसभर विजेचा हा लपंडाव सुरू होता. दुपारी १ वाजता जोरदार पावसामुळे अनेक भागात वीज गुल झाली. यात नवीपेठ, शनिपेठ, बळीरामपेठ, आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, हरिओमनगर, कांचननगर, मोहन टॉकीज, जैनाबाद, आसोदा रोड व शहरातील उपनगरांचा समावेश हाेता.\nनवीपेठेत साचले पाणी : स्टेडियमपासून रस्त्याचे पाणी थेट शिवतीर्थ मैदानावर वाहत जाते. या मैदानाचे पाणी पुन्हा रस्त्याने पुढे गाेलाणी मार्केटकडे वाहत येते. मुख्य रस्त्याने अरुंद आणि बुजलेल्या गटारी असल्याने हे पाणी थेट रस्त्याने नवीपेठेतील सखल, खाेल गल्लीमध्ये येऊन तुंबून राहते. नवीपेठेतील गाेलाणी मार्केटला समांतर असलेल्या चार गल्लीमध्ये रविवारी दुपारी पाणी साचलेले हाेते. काेर्ट चाैक ते चित्रा चाैकादरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी तळे साचलेले हाेते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/06/01/missionbeginagain/", "date_download": "2022-10-07T23:13:59Z", "digest": "sha1:V3YJEC5MEIBC2VYOFSR7QR3W2U4ZQAQJ", "length": 36268, "nlines": 157, "source_domain": "kokanmedia.in", "title": "नवी सुरुवात; राज्यातील लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल; नियमावली जाहीर - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nनवी सुरुवात; राज्यातील लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल; नियमावली जाहीर\nमुंबई : ‘मिशन बिगिन अगेन’ या अभियानांतर्गत राज्य सरकारने लॉकडाउनमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात तीन जून, पाच जून आणि आठ जून अशा तीन टप्प्यांत केली जाईल. यामुळे राज्याच्या अर्थचक्राला पुन्हा गती मिळणार आहे. काही निर्बंधासह रिक्षा, स्कूटर या वाहनांना परवानगी देण्यात आली असून, दुकानेसुद्धा निर्धारित केलेल्या नियमानुसार व वेळेत सुरू राहतील. हा आदेश एक जूनपासून अमलात येत असून, तो ३० जून २०२०पर्यंत लागू राहणार असल्याचे शासनाने जाहीर केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.\nकरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन या कालावधीत केले जाणार असून, त्या आधारे राज्याने आपली नियमावली बनवली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता राज्यात रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी राहील. स्थानिक प्रशासन त्यांच्या अधिकार क्षेत्रासाठी सीआरपीसीच्या कलम १४४अंतर्गत बंदीचे आदेश काढून त्याची कडक अंमलबजावणी करतील. ६५ वर्षावरील व्यक्ती, कोमॉ बिडिज असणाऱ्या व्यक्ती, गरोदर महिला आणि मुलांनी वैद्यकीय व इतर अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडू नये, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.\nप्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन्स)\nकेंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्र नेमके कोणते असेल हे महापालिका किंवा जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत ठरविण्यात येईल. महानगरपालिका क्षेत्रात पालिका आयुक्त, तर जिल्ह्यातील इतर भागासाठी जिल्हाधिकारी यांना प्रतिबंधित क्षेत्र नेमके कोणते असेल हे ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित क्षेत्राची तपासणी वेळोवेळी करणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्रात रहिवासी संकुल आणि वस्ती, झोपडी, इमारत, रस्ता, वॉर्ड, पोलीस ठाणे परिसर, छोटी गावे असू शकतील. पूर्ण तालुका, पूर्ण पालिका क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यापूर्वी मुख्य सचिवांची परवानगी घेणे आवश्यक राहील.\nकंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांच्या ये-जा करण्यावर कडक निर्बंध घालण्यात आले असून, त्यावर बारकाईने देखरेख ठेवण्यात येईल. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार वैद्यकीय आणि जीवनाश्यक वस्तूंना यामधून सूट देण्यात आली आहे.\nनिर्बंधातून सूट आणि टप्प्याटप्प्याने मोकळीक\nबृहन्मुंबई महानगरपालिका आणि पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रात आधीच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आलेल्या कामांशिवाय इतर कामांनाही काही निर्बंधांसह परवानगी देण्यात येत आहे. तथापि या क्षेत्रातील कंटेनमेंट झोनमध्ये ही कामे करता येणार नाहीत.\nमिशन बिगिन अगेन – पहिला टप्पा (तीन जून २०२०पासून)\nबाह्य हालचाली : सायकलिंग/जॉगिंग/धावणे/चालणे यांसारख्या वैयक्तिक शारीरिक व्यायामासाठी किनारपट्टी, सार्वजनिक/खासगी क्रीडांगणे, सोसायट्या/संस्थांची क्रीडांगणे, उद्याने आणि टेकड्यांवर काही अटी व शर्तींवर सर्वसामान्य नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे; मात्र बंद भागामध्ये (इनडोअर) अथवा इनडोअर स्टेडियममध्ये कोणत्याही कामांना परवानगी देण्यात आलेली नाही.\nही परवानगी ही सकाळी पाच ते संध्याकाळी सातपर्यंत असेल.\nकोणत्याही सामूहिक कामास (ग्रुप अॅक्टिव्हिटी) अथवा क्रियेस परवानगी दिली जाणार नाही. मुले असल्यास त्यांच्याबरोबर प्रौढ व्यक्तीदेखील असाव्यात.\nशारीरिक व्यायामासाठी घराबाहेर पडायचे असल्यास लोकांनी मर्यादित कालावधीतच बाहेर पडावे, असा सल्ला देण्यात आला आहे.\nइतर कोणत्याही कामांना अथवा उपक्रमांना परवानगी नाही.\nलोकांना फक्त जवळपासच्या मोकळ्या जागांचा वापर करण्याची परवानगी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासास परवानगी दिली जाणार नाही.\nलोकांनी गर्दी असलेल्या मोकळ्या जागांना टाळावे, असा सल्ला देण्यात येत आहे.\nसायकलिंगसारख्या शारीरिक व्यायामावर जास्त भर द्यावा, जेणेकरून सामाजिक अंतर ठेवण्यास आपोआप मदत होईल.\nप्लंबर, इलेक्ट्रिशियन, कीटक नियंत्रक (पेस्ट कंट्रोल) व तंत्रज्ञ यासारख्या स्वयंरोजगार करणाऱ्यांनी योग्य सामाजिक अंतर पाळून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून कामे करावीत.\nपूर्वपरवानगी घेऊन/ वेळ ठरवून घेऊन वाहनांची दुरुस्ती व वर्कशॉप सुरू करता येतील.\nसर्व शासकीय कार्यालये (आणीबाणी, आरोग्य व वैद्यकीय, तिजोरी, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, नगरपालिका सेवा वगळता जी शेवटच्या पातळीपर्यंत गरजेनुसार कामे करू शकतात) ही १५ टक्के कर्मचारी अथवा कमीत कमी १५ कर्मचारी यांपैकी जी जास्त संख्या असेल त्या संख्येच्या मनुष्यबळांसह सुरू करण्यात येतील.\nमिशन बिगिन अगेन – टप्पा दोन (पाच जून २०२०पासून)\nसर्व मार्केटस्, मार्केट क्षेत्र आणि दुकाने (मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सशिवाय) पी – वन, पी – टू तत्त्वावर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील. (रस्ता, गल्ली किंवा एखाद्या क्षेत्रातील एका बाजूची दुकाने विषम तारखेला तर दुसऱ्या बाजूची दुकाने सम तारखेला खुली राहतील.)\nकरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने, कपड्यांच्या किंवा तत्सम दुकानांमध्ये ट्रायल रूमचा वापर करता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) राहील याची दुकानदारांनी खबरदारी घ्यायची आहे. ग्राहकांना उभे राहण्यासाठी जमिनीवर चिन्ह तयार करणे, टोकन पद्धती, होम डिलिव्हरी आदींना प्रोत्साहन द्यावे.\nखरेदीसाठी लोकांनी पायी जावे किंवा सायकलचा वापर करावा. शक्यतो जवळची दुकाने किंवा मार्केटमध्ये खरेदी करावी. अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी लांबच्या प्रवासाला अनुमती नाही. खरेदीसाठी वाहनांचा वापर करण्यात येऊ नये.\nसोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित दुकान, मार्केट प्रशासनाकडून बंद करण्यात येईल.\nटॅक्सी, कॅब, ॲग्रिगेटर यांना अत्यावश्यक सेवेकरिता चालक अधिक दोन प्रवासी, रिक्षासाठी अत्यावश्यक सेवेकरिता चालक अधिक दोन प्रवासी, चारचाकी वाहनांसाठी अत्यावश्यक सेवेकरिता चालक अधिक दोन प्रवासी, तर मोटारसायकलसाठी अत्यावश्यक सेवेकरिता एक प्रवासी याप्रमाणे अनुमती असेल.\nमिशन बिगिन अगेन – टप्पा क्रमांक तीन (आठ जूनपासून सुरू होईल)\nसर्व खासगी कार्यालये १० टक्के मनुष्यबळासह सुरू करता येतील. इतर कर्मचारी घरी राहून काम करतील. कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर यांचे नियम पाळावे लागतील. घरी परतल्यानंतर घरातील वयस्कर व्यक्तींना कोणताही संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. या अनुषंगाने संबंधित आस्थापनांनी योग्य त्या सूचना/निर्देश सर्व कर्मचाऱ्यांना द्यावेत.\nजी कामे करण्यासाठी बंदी नाही, ती सुरू ठेवता येतील. परवानगी असलेल्या कामांसाठी कोणत्याही शासकीय परवानगीची गरज असणार नाही. स्टेडियम आणि खुली क्रीडा संकुले ही व्यक्तिगत कवायती, व्यायामासाठी वापरात येतील; मात्र या ठिकाणी प्रेक्षक वा दर्शकांच्या सहभागावर पूर्णपणे बंदी राहील. इनडोअर स्टेडियममध्ये कोणत्याही बाबीस परवानगी दिली जाणार नाही. सर्व शारीरिक कवायती आणि व्यायाम सामाजिक अंतराचे नियम पाळून करणे आवश्यक राहील.\nसर्व खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन पुढीलप्रमाणे राहील – दुचाकी एक प्रवासी, तीन चाकी किंवा ऑटो रिक्षा – चालक अधिक दोन प्रवासी, चारचाकी वाहने – चालक अधिक दोन प्रवासी.\nजिल्ह्यांतर्गत बस वाहतुकीला जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेसह अनुमती असेल. तसेच यामध्ये दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, तसेच स्वच्छताविषयक काळजी घ्यावी लागेल.\nआंतरजिल्हा (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) बस वाहतुकीला अनुमती नसेल. या संदर्भातील आदेश स्वतंत्ररीत्या निर्गमित करण्यात येतील.\nसर्व दुकाने, मार्केट्स सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुली राहतील. गर्दी दिसल्यास किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासनाकडून ही दुकाने किंवा मार्केट तातडीने बंद करण्यात येतील.\nपुढील बाबींना राज्यभर प्रतिबंध :\nशाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, विविध शिकवणी वर्ग बंद.\nप्रवाशांच्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासास बंदी. (गृह मंत्रालयाच्या परवानगीने जात असलेले प्रवासी सोडून)\nमेट्रो, रेल्वे सेवा पूर्णपणे बंद.\nस्वतंत्र आदेश आणि मानक प्रक्रियेद्वारे (एसओपी) परवानगी न घेतल्यास रेल्वे आणि आंतरदेशीय विमान प्रवासास बंदी.\nसिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, मोठे सभागृह, आणि तत्सम इतर ठिकाणे बंद.\nसामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, तसेच मोठ्या समारंभांना बंदी.\nसार्वजनिक धार्मिक स्थळे, पूजास्थळे बंद.\nकेशकर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर बंद.\nशॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद.\nनिर्बंध कमी करण्याची प्रक्रिया, तसेच यातील काही बाबी सुरू करण्यास विशिष्ट मानकांद्वारे आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून टप्प्याटप्प्याने परवानगी दिली जाईल.\nविशिष्ट प्रकरणात व्यक्ती आणि वस्तूंच्या हालचालींसाठी निर्देश\nसर्व प्राधिकाऱ्यांनी वैद्यकीय व्यावसायिक, परिचारिका व पॅरामेडिकल कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिकांना कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाशिवाय राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय हालचाली/वाहतुकीस परवानगी द्यावी.\nतथापि, लोकांच्या आंतरराज्यीय आणि आंतरजिल्हा हालचालींवर नियंत्रण असेल. अडकलेले मजूर, स्थलांतरित कामगार, प्रवासी भाविक, पर्यटक इत्यादींच्या हालचालींचे नियमन वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या प्रमाणित कार्य मानके/कार्यप्रणालीनुसार (एसओपी) केले जाईल.\nश्रमिक विशेष रेल्वेगाड्या व सागरी वाहतूकदारांकडून होणाऱ्या वाहतुकीचे नियमन वेळोवेळी जारी केलेल्या ‘एसओपी’नुसार केले जाईल.\nदेशाबाहेर अडकलेल्या भारतीय नागरिकांची त्यांना देशात आणण्यासाठी तसेच विशिष्ट व्यक्तींची परदेशात जाण्यासाठी हालचाल; परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविणे; भारतीय खलाश्यांचे साइन-ऑन आणि साइन-ऑफ यांचे नियमन वेळोवेळीच्या ‘एसओपी’नुसार केले जाईल.\nसर्व प्राधिकाऱ्यांनी सर्व प्रकारच्या वस्तू/मालाच्या आंतरराज्यीय वाहतुकीस परवानगी द्यावी. यामध्ये रिकाम्या ट्रकच्या हालचालीचाही समावेश राहील.\nशेजारील देशांसोबतच्या करारानुसार संबंधित देशांबरोबर होणाऱ्या व्यापारांतर्गत वस्तू/मालवाहतुकीस कोणतेही प्राधिकरण अडथळा आणणार नाही.\nआरोग्य सेतू ॲपचा वापर\n‘आरोग्य सेतू’ ॲप संक्रमणाच्या संभाव्य जोखमीची लवकर ओळख करण्यास सक्षम आहे. कार्यालये व कामाच्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाइल फोनमध्ये ‘आरोग्य सेतू’ ॲप कार्यान्वित करण्यासाठी सर्व नियोक्त्यांनी विशेष प्रयत्न करावेत, तसेच त्याबाबतची खात्री करावी.\nजिल्ह्यातील प्राधिकाऱ्यांनी नागरिकांना स्मार्टफोनवर ‘आरोग्य सेतू’ अॅलप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी व त्यावर त्यांची आरोग्य स्थिती नियमितपणे अद्ययावत करण्याचा सल्ला दिला पाहिजे. यामुळे करोना संसर्गाचा धोका असू शकणाऱ्या व्यक्तींना वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे सुलभ जाऊ शकते.\nकंटेनमेंट क्षेत्रात यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्यविषयक प्रोटोकॉलचे (नियमावलीचे) पालन केले जाईल.\nया मार्गदर्शक सूचनांच्या विरोधात कोणतेही आदेश/मार्गदर्शक सूचना/दिशानिर्देशन कोणत्याही जिल्हा, क्षेत्रीय किंवा राज्य प्राधिकरणास, राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहमतीशिवाय काढता येणार नाहीत.\nकोणत्याही व्यक्तीने या निर्देशांचे उल्लघन केल्यास, ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५च्या कलम ५१ ते ६० अंतर्गत कारवाईस पात्र राहील. भारतीय दंड संहिता (IPC) कलम १८८ आणि इतर कायदेशीर तरतुदींनुसार कार्यवाही केली जाईल.\n(सरकारचा इंग्रजीतील मूळ आदेश वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.)\nवाशिष्ठीच्या दूध संकलन केंद्राचा मालघरमध्ये शुभारंभ\nमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समुळे कोकणातील उद्योजकांना पाठबळ – संतोष तावडे\nदसरा मेळावे : विचारांचे (\nटाळेबंदी शिथिलपुनश्च हरिओममिशन बिगिन अगेनसंचारबंदी शिथिलMaharashtramission begin againUnlockUnlock 1.0\nPrevious Post: रत्नागिरीतील करोना रुग्णसंख्या २६९; सिंधुदुर्गातील संख्या ५६वर\nNext Post: खेडशी येथे रविवार, ७ जून रोजी रक्तदान शिबिर\nरत्नागिरी येथील आविष्कार संस्थेच्या श्री शामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले दिवाळी गिफ्ट बॉक्स विक्रीसाठी सज्ज झाले आहेत. शामराव भिडे कार्यशाळेत बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्याद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याचा उद्देश डोळ्यांसमोर असतो.\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (17) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (17) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (58) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,089) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,596) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (281) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (27) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (305) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (236) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (352)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/ya-tin-karnamule-aaple-pot-bhaer-yet/", "date_download": "2022-10-07T22:45:09Z", "digest": "sha1:2GHZFWYSGFR2S4LXWUACY7HFZNRNV7VM", "length": 9385, "nlines": 93, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "या तीन कारणांमुळे आपले पोट बाहेर येते..! - Themaharashtrian", "raw_content": "\nया तीन कारणांमुळे आपले पोट बाहेर येते..\nया तीन कारणांमुळे आपले पोट बाहेर येते..\nअनियमित जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे प्रत्येक ऋतुत पाेट फुगते. कामाचा व्यस्त पणा घाईगडबडीच्या युगात शरिरावर लक्ष न देण. अशी अनेक पोट फुगण्याची कारण आहेत. परंतु पोट फुगण्याची इतर कारणेदेखील आहेत. ते जाणून घेऊया…\n1. जास्त मीठ खाणे\nआपण जे जंक फूड खोतो त्यात आणि इतर प्रकारच्या स्नॅक्समध्ये मिठाचा जास्त प्रमाणात केला जातो, त्यामुळे पोट फुगते. पोट फुगण्याचे आणखी एक कारण म्हणजे खाण्यापिण्याची चुकीची सवय, जेव्हा तेल आणि मसालेयुक्त आहार घेतला जातो तेव्हा अॅसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळेदेखील पोट फुगते.\nया व्यतिरिक्त शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने किंवा पीरियडसच्यावेळी हार्मोनल बदलामुळेदेखील पोट फुगते. मुलांना जंक फुड अावडत असेल तर त्याचे प्रमाण कमी ठेवले पाहिजे, नाहीतर मोठी समस्या उद्भवू शकते.\n2. जेवण केल्यावर बसून राहणे\nजेवण केल्यावर बराच काळ बसून राहिल्यानेदेेखील पोट फुगत असते. त्यामुळे शक्यतो दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास फिरणे आवश्यक आहे. वेळ कमी असेल तर पायऱ्या चढा आणि उतरा. या लहान व्यायामामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. ही ऊर्जा पातळी वाढल्याने झोप येत नाही.\nआपला मेंदू आणि आतडे यांच्यात थेट संबंध आहे. दोघांपैकी एकामध्येही काही समस्या झाली तर एकमेकांवर परिणाम होतो. म्हणूनच, जेव्हा तुम्ही टेंशन घेता किंवा ताणतणावात राहता तेव्हा पोट फुगते. अमेरिकन कॉलेज ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीच्या मते, तणावग्रस्त लोकांना ही समस्या जास्त असते. या व्यतिरिक्त, ताण घेतल्याने पचनक्रियाचे संतुलन बिघडते आणि पोटाच्या इतर समस्या निर्माण होतात.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\nOne thought on “या तीन कारणांमुळे आपले पोट बाहेर येते..\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/independence-day-special-upcoming-movies-including-vicky-kaushals-sam-bahadur-akshay-kumars-gorkha/articleshow/93566914.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2022-10-07T22:18:22Z", "digest": "sha1:KQTVUP4QU6KH7ZDKNGA6XTEE3ZPME62O", "length": 18341, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "independence day, सळसळता देशाभिमान\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\n विकी कौशल, अक्षय कुमार ते कंगना रणौत... कलाकारांचे देशभक्तीपर सिनेमे रांगेत\nदेभभक्तीपर चित्रपटांना प्रेक्षक हमखास प्रतिसाद देतात, मग ती एखादी घटना असेल, युद्धाचे प्रसंग असतील वा एखादा जीवनपट असेल. असे अनेक चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार असून, आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आगामी अशाच काही देशभक्तीपर चित्रपटांचा घेतलेला हा आढावा.\nमुंबई: गेल्या वर्षी अजय देवगण अभिनित 'भुज : द प्राईड ऑफ इंडिया' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित होता. आता याच युद्धावर आधारित 'पिप्पा' हा सिनेमादेखील निर्मिला जातोय. या चित्रपटात इशान खट्टर, मृणाल ठाकूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. राजा कृष्णा मेनन दिग्दर्शित हा चित्रपट 'द बर्निंग चाफीज' या पुस्तकावर आधारित आहे. अभिनेता इशान खट्टर यात ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांची भूमिका साकारतोय. तसंच दुसरीकडे अभिनेता वरुण धवनदेखील, परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलेले लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्यावर आधारित सिनेमा करतोय. याचं दिग्दर्शन श्रीराम राघवन करणार आहेत.\nहे वाचा-जिलेबी, बक्षीसं अन् भाषणं...मराठी कलाकारांच्या आठवणी तुम्हाला घेऊन जातील शाळेत\nभारताचे पहिले फिल्ड मार्शल म्हणून ओळखले जाणारे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या सिनेमात अभिनेता विकी कौशल दिसणार आहे. यात तो सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारत आहे. या सिनेमांच्या निमित्तानं विकी पुन्हा लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात अभिनेत्री सान्या मल्होत्रा सॅम माणेकशॉ यांची पत्नी सिल्लू माणेकशॉ यांच्या भूमिकेत तर अभिनेत्री फातिमा सना शेख माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वीच या सिनेमांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून मेघना गुलजार या सिनेमांचं दिग्दर्शन करत आहेत. 'सॅम बहादूर' असं या सिनेमाचं नाव निश्चित झालंय.\nअक्षय कुमार दिसणार 'गोरखा' सिनेमात\nतसंच अभिनेता अक्षय कुमारदेखील पुन्हा एकदा देशभक्तीपर सिनेमात दिसणार आहे. त्याच्या आगामी 'गोरखा' चित्रपट हा महान गुरखा नायक मेजर जनरल इयान कार्डोझोच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी १९६२, १९६५ आणि १९७१ सालात युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.\nहॉकीचे जादूगार म्हटले जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या आयुष्यावरील चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. १९७५च्या विश्वकरंडक विजेत्या हॉकी संघाचे महत्त्वाचे सदस्य आणि मेजर ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांनी या जीवनपटाविषयी माहिती दिली. अभिषेक चौबे या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील. बॉलिवूडमधील प्रख्यात चित्रपट निर्माता असलेले रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.\nदुसरीकडे अजय देवगणने त्याच्या आगामी चित्रपट 'मैदान'मध्ये मैदानावरील देशभक्ती दिसणार आहे. 'मैदान' या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळावर प्रकाश टाकला जाणार आहे. चित्रपटात अजय देवगण सैय्यद अब्दुल रहिम यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सैय्यद अब्दुल रहिम हे १९५० ते १९६३ या दरम्यान भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते.\nहे वाचा-आजोबा आमच्याशी बोलतील का मुलांचा तो प्रश्न ऐकून जिनिलिया झाली भावुक, म्हणाली...\nवरुण धवन लवकरच मोठ्या पड्यावर बायोपिक साकारताना दिसणार आहे. परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलेल्या लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्यावर आधारित हा जीवनपट असेल. या सिनेमाचं शीर्षक अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही. याचं दिग्दर्शन श्रीराम राघवन करणार आहेत. 'बदलापूर' सिनेमानंतर पुन्हा एकदा वरुण श्रीराम राघवन यांच्या सोबत आता काम करणार आहे.\nआजवर अभिनेत्री कंगना रणौटने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका लीलया निभावल्या आहेत. अभिनयाच्या बाबतीत ती सरस आहे; हे तिनं सर्वांना दाखवून दिलंय. सोबतच दिग्दर्शक म्हणूनदेखील तिनं तिचं कौशल्य यापूर्वी दाखवलं आहे. आता पुन्हा एकदा केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर दिग्दर्शक म्हणूनदेखील ती प्रेक्षकांसमोर आलीय. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका आता कंगना साकारतेय. 'इमर्जन्सी' असं या सिनेमांचं नाव आहे. तसेच दुसरीकडे सर्वेश मेवाडाद्वारे लिखित आणि दिग्दर्शित 'तेजस' सिनेमातही प्रमुख व्यक्तिरेखा ती साकारते आहे. यात ती हवाई दलातील पायलटची भूमिका करते आहे.\nथोर स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर याआधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा निर्मिला जातोय. विशेष म्हणजे या सिनेमांचं दिग्दर्शन ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर करत आहेत. तर सिनेमात अभिनेता रणदीप हुड्डा हा स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारतोय. सावरकरांच्या संघर्षाची गाथा जगाला कळावी या उद्देशाने हा सिनेमा निर्मिला जातोय.\nमहत्वाचे लेखHar Ghar Tiranga: सलमान, आमिरपासून आलियापर्यंत घराघरात फडकला तिरंगा, बॉलिवूडचं सेलिब्रेशन पाहाच\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमटा ओरिजनल मुंढेंच्या धाडसत्राने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, रात्री डॉक्टर नसल्यास थेट घरचा आहेर\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nसोलापूर Breaking : भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआयची जीवे मारण्याची धमकी; क्राईम ब्रँचकडे तपास\nमुंबई आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन\nसिंधुदुर्ग उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे राहणारा आमदार चौकशीच्या फेऱ्यात, कोकणातल्या नेत्याला एसीबीची नोटीस\nदेश काँग्रेस नेत्यानं हॉटेलमध्ये नेलं, मग सामूहिक अत्याचार केले, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर तिघांना अटक\nमुंबई धाकधूक वाढली, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या हालचाली\nक्रिकेट न्यूज कमजोर पाकिस्तानने रोखला भारतीय संघाचा विजयरथ, आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला हरवलं\nपुणे ब्रेकअपच्या रागातून गर्लफ्रेंडच्या घरात २७ तोळे सोन्याची चोरी, पुण्यातील घटनेनं खळबळ\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/cabinet-expansion/", "date_download": "2022-10-07T22:57:18Z", "digest": "sha1:4C2PR73DRQYEPCXZASO2Z4TNZV7PBWYT", "length": 13611, "nlines": 229, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "cabinet expansion Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n“मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत”; मंत्रीमंडळ विस्तारावरुन शिवसेनेची राज्य सरकारवर टीका\nमुंबई : राज्यात नुकताच नव्याने स्थापन झालेल्या स०००रकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. दरम्यान, याच मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...\nसुप्रिया सुळेंनी मंत्रीमंडळ विस्तारावर व्यक्त केली नाराजी; मोदींचा उल्लेख करत म्हणाल्या,”स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या…”\nमुंबई : राज्यात नव्याने सत्ता स्थापन झाल्यानंतर आज तब्बल ४० दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात शिंदे ...\nराज्य सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराआधी विनायक राऊतांचा मोठा दावा, म्हणाले “काही आमदार…”\nमुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आज अखेर मुहूर्त मिळाला आहे. छोटेखानी पद्धतीने आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ...\nमहाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ दिल्लीत; मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होणार\nनवी दिल्ली (वंदना बर्वे) - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्राचे अख्ख मंत्रिमंडळ देशाची राजधानी दिल्ली दाखल झाले आहे. मंत्रिमंडळ दोन ...\nमंत्रिमंडळ विस्तार रखडण्याचे “हेच’ खरे कारण; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून\nमुंबई - हायव्होल्टेज राजकीयनाट्यानंतर महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शनिवारी एक महिना पूर्ण झाला, पण अजून राज्यमंत्रिमंडळाच्या ...\nमंत्रिमंडळ विस्तारासाठी आता मोर्चे काढावे लागतील – सतेज पाटील\nकोल्हापूर, दि. 29 -महाराष्ट्र हे गोव्यासारखे छोटे राज्य नाही. या राज्यात सरकार केवळ नाममात्र स्थितीत अस्तित्वात आहे. त्यामुळे राज्याचे ...\nMaharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार लवकर करा अन्यथा मोर्चा काढू – माजी मंत्र्याच्या इशारा\nकोल्हापुर - महाराष्ट्र हे गोव्या सारखे छोटे राज्य नाही. या राज्यात सरकार केवळ नाममात्र स्थितीत अस्तित्वात आहे. त्यामुळे राज्याचे अनेक ...\n“अतिवृष्टीमुळे जनता हैराण; नवीन सरकार मात्र मंत्रीमंडळ विस्तारातच व्यस्त”\nनांदेड - शिंदे गट आणि भाजपा यांच्या युतीचे नवीन सरकार राज्यात स्थापन झाले आहे. मात्र, अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त लागलेला ...\nभगवंत मान मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार; मंत्रिमंडळात 10 मंत्र्यांचा होऊ शकतो समावेश\nचंदीगड - पंजाबमध्ये उद्या, शनिवारी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित पंजाब मंत्रिमंडळात सामिल ...\nदिल्ली वार्ता : क्षणभंगुर मंत्रिपद\n- वंदना बर्वे ईश्‍वरीय सत्तेवर विश्‍वास ठेवणाऱ्या माणसांना जीवन जसं क्षणभंगुर वाटतं; तसंच नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्यांना मंत्रिपद क्षणभंगुर वाटू ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/india-rank/", "date_download": "2022-10-07T22:47:31Z", "digest": "sha1:SRQTNTEAPKSFSGR5RORDLQKN3NZTP2FL", "length": 7787, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "india rank Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nकोरोना लसीकरणामध्ये देशाचा लागतो ‘हा’ क्रमांक;12 राज्यांमध्ये 2 लाखांपेक्षा अधिक लाभार्थींना लसीकरण\nनवी दिल्ली : जगामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग हा झपाट्याने वाढला आहे. त्यातही ज्या देशांमध्ये देशात कोरोना लसीकरणामध्ये जगात अव्वल ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/perfect-reply/", "date_download": "2022-10-07T22:08:23Z", "digest": "sha1:FBOUVLSVUHXPHMQSNTC7OOHDTVES73N5", "length": 7644, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "perfect reply Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n#ENGvIND 3rd Test : डिवचणाऱ्या प्रेक्षकांना सिराजचेही दमदार प्रत्युत्तर\nलीड्‌स - भारत आणि इंग्लंड यांच्यात येथील हेडिंग्ले मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/will-ashok-chavan-leave-the-congress-party-on-this-question-balasaheb-thorat-said-that-party/", "date_download": "2022-10-07T22:29:39Z", "digest": "sha1:FHSEATJINHLNVROA6NJX6T5DTEDNUTJD", "length": 12357, "nlines": 221, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अशोक चव्हाण काँग्रेस पक्ष सोडणार का? या प्रश्नावर बाळासाहेब थोरात म्हणाले,\"ते पक्ष...\"", "raw_content": "\nअशोक चव्हाण काँग्रेस पक्ष सोडणार का या प्रश्नावर बाळासाहेब थोरात म्हणाले,”ते पक्ष…”\nवर्धा : मागील काही दिवसांपासून कोंगीसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. मात्र या चर्चांवर आता काँग्रेसच्या विधिमंडळ गटाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात, पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरात जे घोषणा कशा द्यायच्या, याची मूलभूत शिकवण देतात, ते पक्ष कसा सोडणार, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच काँग्रेसच्या विधिमंडळ गटाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी चव्हाण काँग्रेस पक्ष सोडणार, या निव्वळ वावड्या असल्याचे यावेळी म्हटले.\nयवतमाळ येथून नागपूरला जात असताना वाटेत ते शेखर शेंडे यांच्या निवासस्थानी थांबले होते. वर्षाताई प्रमोद शेंडे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. चव्हाण पक्ष सोडणार असल्याची बाब त्यांनी सपशेल फेटाळली. मात्र, तुम्ही किंवा अन्य काँग्रेस नेत्यांबाबत अशी चर्चा का होत नाही, चव्हाणांबाबतच का, या प्रश्नावर त्यांनी स्मितहास्य देत अधिक भाष्य टाळले.\nप्रदेश प्रतिनिधी म्हणून जी नावे जिल्ह्यातून गेली, त्यात नेत्यांचे सेवक, गणगोत, कंत्राटदार हे पण असल्याने असंतोष जाहीरपणे व्यक्त होत आहे. दलित, मुस्लीम, आदिवासी यांचा एकही प्रतिनिधी नसल्याने या घटकांत नाराजी असल्याचे निदर्शनास आणून दिले असता, थोरात यांनी, हा माझा विषय नाही. परंतु ही बाब गंभीर आहे, योग्य ठिकाणी मांडू, असे उत्तर दिले.\n“‘धनुष्यबाण’ चिन्ह नेमकं कोणाचं होणार, निवडणूक आयोग उद्या निर्णय देणार, निवडणूक आयोग उद्या निर्णय देणार”; चिन्हाचा लढा शेवटच्या टप्प्यात\n‘सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट, बापाच्या नावाने..”; अतुल भातखळकरांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका\nराम कदम यांनी दिला इशारा; म्हटले,”‘आदिपुरुष’ चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही”\nअजित पवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले,”काहींची भाषणं नको तितकी लांबली”\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/badalapur-police-arrests-accused-for-hitting-former-corporator-avinash-more-sml80", "date_download": "2022-10-07T22:51:40Z", "digest": "sha1:PUSKWSL7KWMZR77DTV3D3K4LV5KKFCDV", "length": 7044, "nlines": 63, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Badlapur News I 'त्या' एका गोष्टीचा राग इतकी वर्षे मनात होता, ९ वर्षांनंतर केला माजी नगरसेवकावर हल्ला", "raw_content": "\nBadlapur News: 'त्या' एका गोष्टीचा राग इतकी वर्षे मनात होता, ९ वर्षांनंतर केला माजी नगरसेवकावर हल्ला\nपिस्टल दाखवत दिली हाेती जीवे मारण्याची धमकी दिली.\nBadlapur : बदलापुरातील (badlapur) माजी नगरसेवकावर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांनी एका संशयित आरोपीस अटक (arrest) केली आहे. पूर्ववैमनस्यातून माजी नगरसेवक अविनाश मोरे यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पाेलिसांकडून (police) देण्यात आली. दरम्यान या घटनेतील मुख्य संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून २ पथकं रवाना झाली आहेत. (badlapur latest marathi news)\nया घटनेबाबत पाेलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी - बदलापूरमधील माजी नगरसेवक अविनाश उर्फ आऊ मोरे हे मंगळवारी रात्री शिरगाव आपटेवाडी परिसरातून कारने त्यांच्या घरी जात होते. यावेळी महेंद्र उर्फ पप्पू बागुल, अरबी विशाल आचार्य या दोघांनी मोरे यांच्या गाडीला आडवी घातली. यानंतर पप्पू बागुल याने मोरे यांच्याजवळ जात त्यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. तसंच पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.\nयाप्रकरणी माेरे यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदवली हाेती. बदलापूर पूर्व पोलिसांनी तपासाची चक्रं वेगानं फिरवत विशाल आचार्य याला त्याच्या गाडीसह ताब्यात घेतलं. त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली.\nबदलापुरात माजी नगरसेवकावर हल्ला, आधी बंदूक दाखवत कार अडवली, नंतर मारहाण\nसहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव म्हणाले या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पप्पू बागुल याने २०१३ साली शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी म्हात्रे यांचे समर्थक असलेल्या आऊ मोरे यांनी बदलापूर बंदची हाक दिली होती. त्याच रागातून मोरे यांच्यावर ९ वर्षांनी हल्ला केला असे तपासात समाेर आले आहे.\nपप्पू बागुल हा सराईत गुंड आहे. त्याच्यावर आत्तापर्यंत आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या शोधासाठी आता पोलिसांनी २ पथकं रवाना केली आहेत असेही सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी नमूद केले.\nNandurbar : नंदुरबारच्या सराफास लुटणाऱ्या सहा युवकांना बदलापूरात अटक\nBail Pola In Maval : बैल पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर आला नवा शासन निर्णय\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/education/sudhir-mungantiwar-on-cabinet-expansion-au139-779652.html", "date_download": "2022-10-07T21:33:39Z", "digest": "sha1:ND3FAVSM3UGO4MCNI47E3TE67TOT2765", "length": 9381, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nSudhir Mungantiwar on Cabinet Expansion | सरकारचं खातेवाटप निश्चित मुनगंटीवारांना कोणतं खातं\nशिंदे यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काल शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा आज शपथविधी होणार आहे.\nमहेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल | Edited By: सागर जोशी\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 41 दिवसांनी एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दोन सदस्यीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. दक्षिण मुंबईतील राजभवनात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही. यासह, महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या आता 20 झाली आहे, जी 43 सदस्यांच्या कमाल संख्याबळाच्या निम्म्याहून कमी आहे. भाजपने अनेक माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांना संधी दिली आहे. शिंदे गटानेही मंत्रिपदाची माळ जुन्या मंत्र्याच्या गळ्यात घातली. शिंदे यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काल शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा आज मंत्रीमडळ विस्तार होणार आहे.\nटू पीसमध्ये इलियाना डिक्रूझची हवा हवाई\n‘संस्कारी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीचे संस्कारी रूप\nनोरा फतेहीची रिवीलिंग जादू पाहिली का\nमौनी रॉयचा केसरिया रंग…. फोटोशूटसाठी पहा काय केलं\nसादर करण्यात आलेल्या कागद पत्रांवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार यासह पहा इतर अपडेट महाफास्ट न्यूज 100 मध्ये\nअंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेचा प्रचाराचा काय आहे प्लॅन पहा यासह 4 मिनिट 24 हेडलाईन्स\nउद्धव ठाकरेंनी का मागितले आणखीन काही दिवस यासह इतर बातम्यांच्या अपडेटसाठी पहा महाफास्ट न्यूज 100\nशेतकऱ्यांना 12 तास वीज देणार यासह पहा राज्यभरातील अपडेट 36 जिल्हे 72 बातम्यामधून\nफेसबुक युजर्सना धोक्याचा इशारा, आजच आपला पासवर्ड बदला अन्यथा...\nपावसाचं पुन्हा धुमाशान; पुढील 48 तासात \"या' भागात जोरदार बरसणार...\nMarathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nMLA Marriage : 28 वर्षाच्या महिला आमदाराचं कार्यकर्त्यांशी लग्न, अशी जुळून आली लग्नगाठ\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/mpsc-subordinate-services-recruitment-2022-800-vacancies/", "date_download": "2022-10-07T21:31:52Z", "digest": "sha1:WDOM2Y34UKR54B35PX3SXMIJVXVOJ7L4", "length": 10553, "nlines": 169, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "MPSC Subordinate Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022 - 2022", "raw_content": "\nMPSC Subordinate Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMPSC Subordinate Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 800 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 25 जून 2022 ते 15 जुलै 2022 या कालावधीत अर्ज सादर करू शकता\nपरीक्षेचे नाव / Exam Name : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022\nपदाचे नाव व तपशील / Post Details :\nSr. No. पदाचे नाव /\n1 सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) /\n2 राज्य कर निरीक्षक (गट-ब) /\n3 पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) /\n4 दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) /\nSr. No. पदाचे नाव /\nName of Post शैक्षणिक पात्रता /\n1 सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) /\n2 राज्य कर निरीक्षक (गट-ब) /\n3 पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) /\n4 दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) /\nसहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) /\nराज्य कर निरीक्षक (गट-ब) /\nपोलीस उपनिरीक्षक (गट-ब) /\nदुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) /\nवयोमर्यादेत सूट / Age Relaxation :\nप्रवर्ग / आरक्षण /\nइतर मागासवर्गीय / OBC 03 Years\nमहिला / Women सामाजिक आरक्षण नुसार\nपरीक्षा शुल्क / Exam Fee\nप्रवर्ग / आरक्षण /\nइतर मागासवर्गीय / OBC ₹ 394/-\nमहिला / Women सामाजिक आरक्षण नुसार\nमाजी सैनिक / Ex- Servicemen सामाजिक आरक्षण नुसार\nमहत्वाच्या तारखा / Important Dates\nअर्ज सुरु होण्याची तारीख /\nअर्ज करण्याची शेवटची तारीख /\nअधिकृत संकेतस्थळ बघा | Official Website\nऑनलाईन अर्ज करा | Apply Online\nहेल्पलाईन माहिती / Helpline Details :\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMPSC Group C Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nAir Force Agnipath Recruitment 2022 | भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022\nMPSC State Service Pre 2022 | महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 161 जागा\nMPSC Recruitment | पशुधन विकास अधिकारी पदाच्या 212 जागांसाठी भरती\nIndian Army Recruitment | भारतीय सेना भारती 90 जागांसाठी भरती\nEast Coast Railway Recruitment | पूर्व कोस्ट रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 756 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/02/blog-post_29.html", "date_download": "2022-10-07T22:48:39Z", "digest": "sha1:CHW22LPSFU3LYRMBBAU57GTY2VFIY6TD", "length": 5887, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जत तालुका काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार", "raw_content": "\nHomeजतवार्ताजत तालुका काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार\nजत तालुका काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार\nजत/प्रतिनिधी: राष्ट्रीय काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मुंबई येथे सत्कार केला.\nयावेळी जत तालुक्यातील विविध प्रश्न, पक्षाचे संघटन, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी विषयावर आ. सावंत व आ. पटोले यांच्यात चर्चा झाली. आ. नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असताना त्यांनी जत तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लागावेत यासाठी चांगले सहकार्य केले होते, याबद्दल आ. विक्रमसिंह सावंत यांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या वाढीसाठी आपल्या नेतृत्वाखाली नेटाने काम करू असे अभिवचन आ. सावंत यांनी दिले.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\nमनसेकडून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/woman-killed-her-own-son-with-the-help-of-her-boyfriend-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-07T23:14:31Z", "digest": "sha1:YNHKVV5RIRCJPZMG6PW22A6SSICNW5RF", "length": 10680, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून आईने केली पोटच्या पोराची हत्या", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n प्रियकरासोबत मिळून आईने केली पोटच्या पोराची हत्या\n प्रियकरासोबत मिळून आईने केली पोटच्या पोराची हत्या\nनवी दिल्ली | लुभाना येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे रहिवासी असणाऱ्या एका महिलेने स्वतःच्याच पोटच्या पोराची हत्या केली असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येमध्ये तिने आपल्या प्रियकराची मदत घेतली आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान महिलेने अत्यंत क्रूरपणे आपल्या लेकाची हत्या केली असल्याचं समोर आलं आहे.\nसंबंधित आरोपी आईचं नाव रूपिंदर कौर असं असून तिचे सुखविंदर सिंह नावाच्या एका व्यक्तीसोबत गेल्या सहा महिन्यांपासून अफेअर सुरू होतं. संबंधित मुलाचं नाव रणदीप सिंह असं आहे. रणदीप सिंह हा विवाहित होता. त्याची पत्नी परदेशात होती. मृत रणदीप सिंह याच्या खात्यात पाच लाख रूपये असून त्याला त्याच्या पत्नीकडे कॅनडाला जायचं होतं. पण त्याच्या आईने गोड बोलून त्याच्याकडून ते पाच लाख स्वत:च्या अकाउंटवर ट्रान्सवर करून घेतले.\nपैसे खात्यावर जमा झाल्यावर आई मुलासोबत विचित्र वागू लागली. मुलगा घरात असल्याने ती तिच्या प्रियकराला भेटू शकत नव्हती. या कारणामुळे महिला आणि तिच्या प्रियकराने रणदीपला मार्गातून हटवण्याचा प्लॅन केला. यामध्ये त्यांनी सुखविंदरच्या मित्राची मदत घेतली. आरोपी आईने रणदीपला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर बेशुद्ध असतानाच आरोपींनी त्याच्यावर हातोडे आणि चाकूने सपासप वार करत त्याची हत्या केली. हत्या लपवण्यासाठी आरोपींनी मिळून मृतदेह जाळला.\nदरम्यान, गावात रणदीप सिंह गायब असल्याची खबर आगीसारखी परसली होती. पोलीस आरोपी आई रूपिंदर कौरकडे गेले असता त्यांनी तिला ड्रेनेजजवळ एका तरूणाचा मृतदेह सापडला असल्याचं सांगितलं. मृतकाची ओळख पटवण्यासाठी रूपिंदर सिंहला नेण्यात आलं. तेव्हा तिने मुलाचाच मृतदेह ओळखण्यास नकार दिला. मात्र तपास करताना संपुर्ण सत्य समोर आलं.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“प्रियांका, कंगणाला भेटणाऱ्या मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान”\n फुरसुंगीत कॅनॉलमध्ये एकामागोमाग एक मृतदेह आले वाहत\n“बाबा माझे कपडे फाटलेत…”,बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी दीड वर्षांनंतर परिवाराला भेटली\n“भाजपने ॲापरेशन लोटसचा कधीच दावा केला नाही, तरी एवढी धास्ती का\n12 नावांची यादी खरंच भूतांनी पळवली, राज्यपाल कार्यालयाचं तात्काळ स्पष्टीकरण\n अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकूने हल्ला\n 5 रूपयांसाठीच्या अपमानामुळे आज ‘ती’ करतीय लोखोंचा व्यवसाय\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2019/10/blog-post_49.html", "date_download": "2022-10-07T22:26:20Z", "digest": "sha1:TD227OPN6KP3IBPEQHPWZRA5WJ2ZEL7G", "length": 25501, "nlines": 220, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n(१७) नि:संशय कुफ्र (नकार) त्या लोकांनी केला ज्यांनी सांगितले की मरयमपुत्र मसीह हाच ईश्वर आहे.३९ हे नबी (स.) त्यांना सांगा की जर अल्लाहने मरयमपुत्र मसीह आणि त्याची आई तसेच पृथ्वीवरील सर्वांना नष्ट करू इच्छिले तर कोण त्याला या इराद्यापासून रोखू शकेल त्यांना सांगा की जर अल्लाहने मरयमपुत्र मसीह आणि त्याची आई तसेच पृथ्वीवरील सर्वांना नष्ट करू इच्छिले तर कोण त्याला या इराद्यापासून रोखू शकेल अल्लाह तर पृथ्वी आणि आकाशांचा आणि त्या सर्व वस्तूंचा स्वामी आहे ज्या पृथ्वी आणि आकाशांमध्ये आढळतात. तो जे काही इच्छितो सृजन करतो४० व त्याचे प्रभुत्व प्रत्येक वस्तूवर आहे.\n(१८) यहुदी आणि खिस्ती सांगतात की आम्ही अल्लाहचे पुत्र व त्याचे लाडके आहोत. त्यांना विचारा, मग तो तुमच्या अपराधांकरिता तुम्हाला शिक्षा का देतो खरे पाहता तुम्हीदेखील तशीच माणसे आहात जशी इतर माणसे अल्लाहने निर्माण केली आहेत.तो ज्याला इच्छितो माफ करतो आणि ज्याला इच्छितो शिक्षा देतो. पृथ्वी, आकाश आणि त्यात आqस्तत्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्या मालकीच्या आहेत आणि त्याच्याकडे सर्वांना परतावयाचे आहे.\n आमचा हा पैगंबर अशा वेळी तुमच्यापाशी आला आहे आणि धर्माची अशी सुस्पष्ट शिकवण तुम्हाला देत आहे - जेव्हा पैगंबरांच्या आगमनाचा क्रम एका दीर्घकाळापासून बंद होता - ते अशाकरिता की तुम्ही असे सांगू नये की आमच्यापाशी कोणी शुभवार्ता देणारा आणि भय दाखविणारा आला नाही. तर पाहा, आता तो शुभवार्ता देणारा व भय दाखविणारा आला आहे - आणि अल्लाह प्रत्येक वस्तूवर प्रभुत्वसंपन्न आहे.४१\n(२०) आठवा, तो प्रसंग जेव्हा मूसा (अ.) यांनी आपल्या लोकांना सांगितले होते की, ‘‘हे माझ्या बांधवांनो अल्लाहची ती देणगी ध्यानात घ्या जी त्याने तुम्हाला प्रदान केली होती. त्याने तुमच्यात नबी (पैगंबर) निर्माण केले. तुम्हाला सत्ताधारी बनविले आणि तुम्हाला ते सर्वकाही दिले जे या जगात कोणालाच दिले नव्हते.४२\n(२१) हे माझ्या बांधवांनो या पवित्रभूमीत दाखल व्हा जी अल्लाहने तुमच्याकरिता विधिपूर्वक बहाल केली आहे.४३ मागे फिरू नका नाहीतर अयशस्वी व निराश परताल.’’४४\n३९) खिस्ती लोकांनी सुरवातीला इसा (अ.) यांच्या व्यक्तित्वाला मानवता आणि ईशत्वाचे मिश्रण दाखवून जी घोडचूक केली त्याची फलनिष्पत्ती इसा (अ.) त्यांच्यासाठी एक रहस्य बनून राहण्यात झाली. या रहस्याला त्यांच्या धर्मविद्वानांनी शब्दजाळात आणि कल्पनाविलासाने जाणून घेण्याचा जितका प्रयत्न केला तितकेच ते आणखी भ्रमात पडत गेले. त्यांच्यापैकी ज्यांच्या मनावर या मिश्रित व्यक्तिमत्त्वाच्या मानवअंशाचा प्रभाव होता, त्यांनी इसा (अ.) यांना खुदाचा बेटा (ईशपुत्र) आणि तीन ईश्वरांपैकी एक होण्यावर जोर दिला. तसेच ज्या लोकांच्या मनावर ईशत्वाच्या अंशाचा मोठा प्रभाव पडला त्यांनी पैगंबर इसा (अ.) यांना अल्लाहचे शारीरिक प्रकटन समजून (अवतार) साक्षात ईश्वर बनवून टाकले आणि पैगंबर इसा (अ.) यांना ईश्वर मानून त्यांची उपासना सुरु केली. या दोघांच्या मधला मार्ग ज्यांनी काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी शब्दजाळात फसून असे शब्दप्रयोग केले ज्यामुळे पैगंबर इसा (अ.) यांना ईश्वर व मनुष्य दोन्ही समजण्यात येऊ लागले. अशाप्रकारे ईश्वर आणि मसीह (इसा) वेगवेगळेसुद्धा राहावेत आणि एकसुद्धा राहावेत. (पाहा कुरआन ४:१७१, टीप २१२,२१३,२१५)\n४०) या वाक्यात एक सूक्ष्म संकेत आहे. फक्त इसा (अ.) यांचे चमत्कारिकरित्या जन्माला येणे आणि त्यांच्या नैतिक परिपूर्णतांना आणि साक्षात चमत्कारांना पाहून ज्यांनी त्यांना ईश्वर ठरवून टाकले होते; ते लोक खरे तर नादान आहेत. पैगंबर इसा (अ.) तर अल्लाहच्या अगणित निर्मितीपैकी एक निर्मिती आहे ज्याला पाहून या दृष्टीदोष असलेल्या लोकांचे डोळे विस्फारले गेले. या लोकांना व्यापक दृष्टी असती तर याना स्पष्ट दिसले असते की अल्लाहने यापेक्षासुद्धा अधिक चमत्कारिक निर्मिती केलेल्या आहेत. तसेच अल्लाहचे सामथ्र्य एका मर्यादेत सीमीत नाही, याची त्यांना जाणीव झाली असती. म्हणून ही एक घोर अविचारी वृत्ती आहे की, सृष्टीच्या चमत्कारांना पाहून स्रष्टीलाच सृष्टा (निर्माता) समजून बसावे. समजुतदार लोक तर ते आहेत जे सृष्टीच्या निशाण्यांमध्ये (चमत्कार) सृष्टीनिर्मात्या अल्लाह (स्रष्टा) च्या महान सामथ्र्याला पाहतात आणि त्यातून ईमानचा प्रकाश प्राप्त् करतात आणि आणखीन दृढ श्रद्धाशीलता धारण करतात.\n४१) या प्रसंगी हे वाक्य अत्यंत भावपूर्ण आणि सूक्ष्म आहे. याचा अर्थ असासुद्धा होतो की अल्लाह शुभवार्ता आणि भयवार्ता देणारे पैगंबर पाठविण्याचे सामथ्र्य राखून होता. त्यानेच आता पैगंबर मुहम्मद (स.) यांना जगात यासाठी पाठविले आहे. अल्लाह असे करण्याचे सामथ्र्य राखून आहे. दुसरा अर्थ होतो की जर तुम्ही शुभवार्ता आणि भयवार्ता देणाऱ्याचे म्हणणे ऐकले नाही तर याद राखा की अल्लाह सामथ्र्यवान आणि बलशाली आहे. कोणतीही शिक्षा तो तुम्हाला विनाविलंब कधीही देऊ शकतो.\n४२) हा संकेत आहे बनीइस्राईलच्या गतवैभवाकडे जे पैगंबर मूसा (अ.) यांच्या फार पूर्वीच्या काळात त्यांना प्राप्त् होते. एकीकडे पैगंबर इब्राहीम, इसहाक, याकूब आणि यूसुफ (अ.) असे महान पैगंबर त्यांच्या वंशात जन्माला आले. दुसरीकडे पैगंबर यूसुफ (अ.) यांच्या काळात आणि त्यानंतर बनीइस्राईलींना इजिप्तची पूर्ण सत्ता प्राप्त् झाली होती. बराच काळ सभ्य जगाचे सर्वात मोठे शासक म्हणून हेच बनीइस्राईल लोक होते. इजिप्त् आणि त्याच्या लगतच्या प्रदेशात यांचा पूर्ण दरारा होता. सर्वसामान्यत: लोक बनीइस्राईलच्या उत्कर्षाचा इतिहास पैगंबर मूसा (अ.) यांच्यापासून सुरू करतात. परंतु कुरआन येथे स्पष्ट करत आहे की बनीइस्राईलचा खरा वैभवाचा काळ हा पैगंबर मूसा (अ.) यांच्या पूर्वीचा काळ होता. या गत वैभवाला स्वत: पैगंबर मूसा (अ.) आपल्या लोकसमुदायापुढे एक आदर्श काळ म्हणून सांगत होते.\n४३) म्हणजे पॅलेस्टाईन (पॅलेस्टीन) ची भूमी जी पैगंबर इब्राहीम, इसहाक व याकूब (अ.) यांची जन्मभूमी होती, त्या काळी कट्टर अनेकेश्वरवादी आणि दृष्ट लोकांनी ती भूमी वसलेली होती. बनीइस्राईल जेव्हा मिस्र (इजिप्त्) हून बाहेर पडले तेव्हा याच भूमीला अल्लाहने त्यांच्यासाठी नामांकित केले आणि आदेश दिला की जा आणि त्या भूभागावर विजय प्राप्त् करा.\n४४) आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांचे हे भाषण त्या काळातले आहे जेव्हा इजिप्तहून बाहेर पडल्यानंतर दोन वर्षानी त्यांनी आपल्या अनुयायींना घेऊन फारानच्या जंगलात पडाव टाकलेला होता. हे जंगल अरबच्या उत्तरे कडील सीना प्रायद्वीपमध्ये स्थित आहे जे पॅलेस्टाईनच्या दक्षिण भागाला लागून आहे.\n२५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१९\nनमाजचे महत्त्व : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनिकालाची नव्हे संयमाची आतुरता...\n‘सत्याची साक्ष देणे हाच जीवनाचा खरा उद्देश’\nमोबाईलवर तासनतास बोलणे बंद केली पाहिजे\nभारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत\nगांधी जयंतीनिमित्त आपली प्रतीमा उजळवण्याचा प्रयत्न\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर \nदेशबांधवांसाठी मीरा रोड येथे मस्जिदचे दरवाजे उघडे ...\n‘हजारो गोरगरीब, सर्वसामान्यांच्या प्रगतीत हातभार ल...\nनागरिकांनी मताधिकाराचा अवश्य वापर करावा\nमुहम्मद (सल्ल.) के शहर में\nउत्सव लोकशाहीचा: राजकीय बंडाळीचा, जनतेच्या विवेकाचा\n१८ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०१९\n‘एक ईश्वर एक मानव कुटूंब’\nवसमत येथे मस्जिद परिचय कार्यक्रम संपन्न\nसब से पहले सच्चे मुसलमान बनें : प्रा. अझहरअली वारसा\nमहाराष्ट्रातील बिनव्याजी सोसायट्या देशात अव्वल\nकाश्मीरमधील बंदी उठवायला हवी\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०१९\nईडी - पोपट ०.२\nमांसाहार लोकांना हिंसक बनवितो काय\nमराठवाडा मुक्तीसंग्राम : एमआयएम आणि वर्तमान\nरणांगण निवडणुकीचे, आश्‍वासनांचे भूलथापांचे\nमुस्लिम एकात्मतेचा ठोस पाया\nनशेच्या सर्वच पदार्थांवर बंदी हवी\n०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०१९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/tag/bachelor-of-veterinary-science-jobs/", "date_download": "2022-10-07T22:51:47Z", "digest": "sha1:2EGXK2EDMDY6DQUMNPDO6MHRWDWQTIYK", "length": 6944, "nlines": 59, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "Bachelor of Veterinary Science Jobs - Bharti jahirat", "raw_content": "\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nPCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे मध्ये 386 जागांसाठी भरती\nPCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे मध्ये विविध पदांच्या एकूण 386 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून...\nIISC Bangalore Recruitment | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये 100 जागांची भरती\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर येथे तांत्रिक सहाय्यक / Technical Assistant पदाच्या एकूण 100 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत...\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/dont-get-used-to-seeing-me-at-every-show-why-did-bharti-singh-say-that-read-in-detail-update/", "date_download": "2022-10-07T22:19:56Z", "digest": "sha1:7QWJRAJ7OC4C6A7NVNHLLLDZJDHCUAGB", "length": 5633, "nlines": 41, "source_domain": "mahaupdate.in", "title": "\"प्रत्येक 'शो'मध्ये मला पाहण्याची सवय लावू नका\"; असं का म्हणाली भारती सिंग? वाचा सविस्तर - Maha Update", "raw_content": "\nHome » “प्रत्येक ‘शो’मध्ये मला पाहण्याची सवय लावू नका”; असं का म्हणाली भारती सिंग\n“प्रत्येक ‘शो’मध्ये मला पाहण्याची सवय लावू नका”; असं का म्हणाली भारती सिंग\nमुंबई : द कपिल शर्मा शो टीव्हीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रेक्षकांचा सर्वात आवडता शो 10 सप्टेंबरपासून प्रसारित होणार आहे. पण यावेळी जिथे अनेक नवीन चेहरे या शोमध्ये दिसणार आहेत, तर यावेळेस द कपिल शर्मा शोमधून शोचे अनेक प्रसिद्ध चेहरे गायब होणार आहेत. यातीलच एक म्हणजे चाहत्यांचा आत्मा भारती सिंग.\nभारतीने शो न करण्याचे कारण सांगितले\nद कपिल शर्मा शोमध्ये भारती सिंग न दिसल्याने तिच्या चाहत्यांची मजा नक्कीच विदारक होणार आहे. पण द कपिल शर्मा शोच्या नवीन सीझनपासून भारतीने स्वतःला दूर का केले आता तिने यामागचे कारणही सांगितले आहे. मीडियाशी संवाद साधताना भारती सिंह म्हणाली, कपिल शर्मा शोच्या आधी तिला जास्त ब्रेक हवा होता, कारण दुसरा शो जास्त काळ चालणार होता. पण शो लवकर सुरू झाला. आणि मी दुसरीकडे कमिटमेंट दिली होती.\nभारती पुढे म्हणाली, मी सा रे ग म प साठी वचनबद्धता दिली आहे. पण जर सा रे ग मा शो आणि द कपिल शर्मा शोचा टाईम क्लॅश झाला नाही, तर तुम्ही मला शोमध्ये मधल्या काळात बघाल. भारती असेही म्हणाली- मी पण आता आई आहे, त्यामुळे मला प्रत्येक शोमध्ये पाहण्याची सवय लावू नका, पण तुम्ही मला वेळोवेळी पाहत रहाल.\nभारती सिंगचे बोलणे ऐकून अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. भारतीला द कपिल शर्मा शोमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत, कारण भारती ज्या शोमध्ये येते तो शो जिवंत होतो.\nतुम्ही शो कधी पाहू शकाल\nद कपिल शर्मा शोची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. 10 सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवारी रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांचा सर्वात आवडता कार्यक्रम प्रसारित केला जाईल. शोची रिलीज डेट समोर आल्यापासून चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.\n‘द कपिल शर्मा शो’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला; कपिल दिसणार नव्या अवतारात\nThe Kapil Sharma Show : नव्या अवतारात कपिल शर्मा शो पुन्हा परतणार…पण “या” कलाकाराची एक्झिट\nकृष्णा अभिषेक नंतर “या” कलाकाराचा कपिल शर्मा शोला अलविदा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.insidemarathibooks.in/index.php/2020/04/18/the-mahabharat-secret-book-review-in-marathi/", "date_download": "2022-10-07T21:29:43Z", "digest": "sha1:6EVFEKVYQ6IDXDAARKPJCAAJSCXEJVVE", "length": 10428, "nlines": 182, "source_domain": "www.insidemarathibooks.in", "title": "दि महाभारत सिक्रेट - The Mahabharat Secret - Book Review In Marathi", "raw_content": "\n|| माझिया मराठीची बोलू किती कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके ||\nby ईनसाईड मराठी बुक्स\nलेखक – ख्रिस्तोफर .सी. डॉयल\nसमीक्षण – वरूण कमलाकर\nप्रकाशन – ओम बुक्स इंटरनॅशनल\nमूल्यांकन – ४.७ | ५\nइतिहास हा विषय प्रत्येक व्यक्ती शिकत आलेला आहे. प्रत्येकाला इतिहास आवडतोच असे नाही. काही जणांना इतिहास ऐकायला आवडतो तर काही जणांना इतिहास जाणून घ्यायला आवडतो तर काही जणांना इतिहास आवडतच नाही. पण इतिहासात एक घटक असतो तो म्हणजे ऐतिहासिक रहस्य. अशीच एक कहाणी लेखक ख्रिस्तोफर डॉयल या पुस्तकातून आपल्या भेटीला घेऊन आले आहेत.\nइ.स.२४४ मध्ये अशोका दि ग्रेट याने शोधून काढलेले अत्यंत भयानक रहस्य ज्याचे सुलगावे महाभारतात अत्यंत हुशारीने लपविलेले आहेत. संपूर्ण विश्वाला नष्ट करू शकेल असे रहस्य २२०० वर्षासाठी लपून राहिलेले आहे. हे रहस्य कुणा वाईट व्यक्तीच्या हातात पडले तर त्याच्या मदतीने तो संपूर्ण विश्व नष्ट करू शकेल .\nही एक रहस्यमय कहाणी काल्पनिक स्वरूपाची आहे. एका नियुक्त अणुवैज्ञानिकाचा खुन झालेला आहे. ह्या अणुवैज्ञानिकाकडे २००० वर्षापासून लपून राहिलेने एक रहस्य आहे. ह्या अणुवैज्ञानिकाचा खुन होण्याआधी २००० वर्षे लपून राहिलेले रहस्य तो त्याच्या भाच्याला ईमेलद्वारे त्यातले काही सुलगावे देतो. त्या रहस्याची जाणीव एका दहशतवादी संघटनेच्या व्यक्तींना झालेली आहे. ते रहस्य मिळवण्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात.\nह्या रहस्याचा शोध घेण्यासाठी विजय व त्याचे काही सवंगडी निघाले आहेत. ह्या खतरनाक प्रवासामध्ये त्यांना खूप भयानक प्रसंगांना सामोरे जावे लागते. दहशतवाद्यांना ह्या रहस्याचा वापर करुन संपूर्ण जगात दहशत पसरवायची आहे. हे पुस्तक वाचत असताना वाचक रहस्याच्या विश्वात नक्कीच हरवून जाईल.\nकथेतला हा रहस्यमयी प्रवास वाचकांना प्रसन्न करून जाईल. कथेत पुढे काय होईल हे जाणून घेण्यागठी वाचकाची उत्कंठा पानागणिक वाढत जाईल. अन् पुस्तकाच्या शेवटपर्यंत वाचक तितकाच आतूर राहतो जितका पुस्तक वाचण्याआगोदर होता.\nया कथेत सहा जण मिळून ह्या रहस्याचा शोध घेत आहेत पण त्यात एक व्यक्ती जो जौनगर्हचा राजा आहे त्याने पैशांच्या हव्यासापोटी दहशतवाद्यांबरोबर हातमिळवणी केलेली आहे. या सर्वाचा ठावठिकाणा अगोदर न लागल्यामुळे रहस्यशोधकांवर जे संकट ओढावले आहे ते वाचनीय आहे. अत्यंत सुंदर व उत्कृष्ट असणारे हे पुस्तक, तुम्ही नक्कीच खरेदी करून वाचू शकता\nसमीक्षण – वरूण कमलाकर\nऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:\nकिंडल आवृत्ती विकत घ्या\nऑडिओ बुक (इंग्रजी) विकत घ्या\nकिंडल आवृत्ती (मराठी) विकत घ्या\nमराठी पुस्तकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा\nछत्रपती संभाजी – एक चिकित्सा\nसोशल नेटवर्कवर आमच्याशी कनेक्टेड राहा.\nवेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/amazons-minor-game/articleshow/66103579.cms?utm_source=nextstory&utm_medium=referral&utm_campaign=articleshow", "date_download": "2022-10-07T21:33:09Z", "digest": "sha1:DXEOPLFWM2L7WG6IPGMSD4HS2736YX4L", "length": 21162, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nमध्यंतरी फेसबुकवर कंपन्यांची नावे आणि त्यांच्या लोगोंची पोस्ट व्हायरल झाली होती त्या पोस्टमध्ये अॅमेझॉनच्या लोगोविषयीही बरीच रंजक माहिती होती...\nमध्यंतरी फेसबुकवर कंपन्यांची नावे आणि त्यांच्या लोगोंची पोस्ट व्हायरल झाली होती. त्या पोस्टमध्ये अॅमेझॉनच्या लोगोविषयीही बरीच रंजक माहिती होती. कंपनीच्या लोगोमध्ये कंपनीच्या नावाची आद्याक्षरे असून, ए आणि झेड या अक्षरांच्या खाली एक बाण दर्शविण्यात आला आहे. याचा अर्थ कंपनी आपल्या ग्राहकांना 'ए टू झेड' सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद करण्यात आले होते. सध्या 'अॅमेझॉन'चा प्रवासही अथपासून इतिपर्यंत सुरू झाल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन रिटेल बाजारातील जगातील आघाडीची कंपनी असणाऱ्या अॅमेझॉनने आता भारतातील किरकोळ वस्तूंच्या बाजारपेठेत पाय रोवण्याची तयारी आरंभली आहे.\nसध्या कुठेही नजर टाका...वर्तमानपत्र असो किंवा टीव्ही...एफएम चॅनेल असो वा मोठमोठी होर्डिंगही....सर्वत्र ऑनलाइन रिटेलच्या आगामी सेलच्या जाहिराती पाहायला मिळत आहेत. त्याचे कारणही तसेच आहे... कारण त्यांना आगामी फेस्टिव्ह सीझनची चाहूल लागली आहे. आता दोन-चार दिवसांत नवरात्राला सुरुवात होईल. त्यानंतर दसरा, दिवाळी आणि नवीन वर्षाच्या आगमनाकडे बाजारपेठेचे डोळे लागतील...\nयंदाचा फेस्टिव्ह सीझन बऱ्याच कारणांमुळे व्हेरी व्हेरी स्पेशल असणार आहे. याचे कारण म्हणजे जगातील सर्वांत मोठी इंटरनेट कंपनी असणाऱ्या अॅमेझॉनने देशातील किरकोळ (रिटेल) वस्तू बाजारात मागच्या दाराने का होईना चंचूप्रवेश केला आहे. अॅमेझॉनच्या या एंट्रीमुळे आगामी कालावधीत देशातील रिटेल बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर किंमतयुद्ध रंगण्याची दाट शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. गेल्या वर्षभरात रिलायन्स जिओच्या आगमनामुळे दूरसंचार उद्योगातील किंमतयुद्ध आपण सर्वांनीच अगदी जवळून अनुभवलंही आहे. अगदी सहा महिन्यांपूर्वीच अमेरिकेतील वॉलमार्ट या भल्यमोठ्या कंपनीनेही फ्लिपकार्ट या भारतीय कंपनीला आपलंसं करून टाकल्याचेही आपण अनुभवले. अॅमेझॉनने २०१३मध्ये देशातील ई-कॉमर्स क्षेत्रात उडी मारली आणि पाहतापाहता कंपनीने फ्लिपकार्ट य़ा आघाडीच्या कंपनीला शह देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, वॉलमार्टने फ्लिपकार्टचे अधिग्रहण केल्याने अॅमेझॉनचे मनसुबे धुळीला मिळाले. पण, हार मान्य करील ती अॅमेझॉन कसली...अ‍ॅमेझॉनने आदित्य बिर्ला समूहातील मोअर या कंपनीवर एका भारतीय कंपनीच्या माध्यमातून (समारा कॅपिटल) ताबा मिळवला.\nदेशात सध्या मोअर ब्रँडचे ५०९ सुपर मार्केट आणि २० हायपर मार्केट आहेत. बहुब्रँड रिटेल क्षेत्रात भारतात अजूनही ४९ टक्क्यांपेक्षा अधिक भागभांडवल अधिग्रहित करण्याची परवानगी परदेशी कंपन्यांना नाही. त्यामुळे मोअरमध्ये अ‍ॅमेझॉनचा हिस्सा ४९ टक्के, तर समारा कॅपिटलचा हिस्सा ५१ टक्के राहणार आहे. हा व्यवहार ४,२०० कोटी रुपयांचा असल्याची चर्चा आहे. समारा कॅपिटलने मोअर खरेदी करण्यासाठी आदित्य बिर्ला रिटेलसोबत जूनमध्ये करार केला होता. त्यानंतर दुसऱ्या गुंतवणूकदाराच्या धर्तीवर अॅमेझॉन आणि गोल्डमन सॅकची चर्चा सुरू झाली. मात्र, त्यानंतर गोल्डमन सॅकने या व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता अॅमेझॉन किराणा आणि अन्नपदार्थ व्यवसायात जम बसवू इच्छित आहे. आता मोअरमुळे त्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे. सध्या अॅमेझॉन ऑनलाइन रिटेलमध्ये अव्वल स्थानी असून, या माध्यमातून त्यांना अन्नपदार्थ आणि किराणा विक्रीमध्ये जम बसवायचा आहे.\nसध्या देशातील संघटित रिटेल क्षेत्रामध्ये मोअरचा चौथा क्रमांक लागतो. आजच्या घडीला किशोर बियाणी प्रवर्तित फ्यूचर समूहाची बिग बझार साखळी पहिल्या स्थानी आहे. त्या पाठोपाठ रिलायन्स रिटेल, आणि डीमार्ट यांचा क्रमांक लागतो. आदित्य बिर्लासारख्या वित्तीय क्षेत्रात अतिशय दर्जेदार आणि अव्वल मानल्या गेलेल्या समूहाचे पाठबळ असूनही मोअरला मोठी झेप मारता आली नाही, याचे आश्चर्य वाटते.\nदेशांतर्गत बाजारपेठेवर परिणाम काय\nदैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या छोट्या-मोठी गोष्टी विकत घेण्यासाठी आपण राहतो त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या छोट्या दुकानांवरच आपला प्रामुख्याने भर असतो. या दुकानांमध्ये अगदी सुईदोऱ्यापासून ते गरजेच्या सर्व वस्तू विनासायास उपलब्ध होतात. दररोज सकाळी नित्यनेमाने देशातील पाच कोटी छोटे दुकानदार दुकाने उघडून ९० कोटी ग्राहकांच्या सेवेत रूजू होतात. या पार्श्वभूमीवर देशातील रिटेल बाजारपेठेची उलाढाल जवळपास ६५० अब्ज डॉलरच्या घरात पोहोचली असून, पैकी ९० टक्के उलाढाल एकट्या किरकोळ व्यापाऱ्यांची आणि छोट्या दुकानदारांची आहे. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात भर घालण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीमध्येही छोट्या दुकानदारांचा वाटा मोठा आहे. त्यामुळेच की काय सध्या देशाताल मोठमोठ्या देशी आणि बहुराष्ट्रीय कंपन्या रिेटेल क्षेत्रामध्ये हळूहळू आपले नशीब आजमावत आहेत. गेल्या काही वर्षांत मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्याचा ट्रेंड वाढीला लागला असला तरी, एक ठरावीक मानसिकतेचा आणि वयोगटातील वर्ग तेथे जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही बाजारपेठ फारशी विस्तारल्याचे चित्र दिसून येत नाही. कारण, अजूनही कोट्यवधी किराणा दुकानदारांनी आणि मध्यम व्यापाऱ्यांनी या व्यवसायावर मिळवलेले वर्चस्व पूर्णपणे मोडून काढणे त्यांना जमलेले नाही, हे वास्तव आहे. कितीही मोठमोठ्या ऑफर द्या किंवा डिस्काउंटचा मारा करा, विविध कारणांमुळे किरकोळ दुकानदार आणि व्यापाऱ्यांशी जोडलेला सामान्य ग्राहकवर्ग तोडणे काही या कंपन्यांना अद्याप शक्य झालेले नाही. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आर्थिक व्यवहार होत असतानाच दुसरीकडे एकाच घरातील कित्येक पिढ्यांचे ठरावीक दुकानांशी निर्माण झालेले भावनिक नाते आणि घरोब्याचे संबंध...असे असले तरी शहरीकरणाचा अजस्त्र रेटा आणि केंद्र आणि राज्य सरकारे देशात एकलब्रँड आणि बहुब्रँड रिटेलच्या (मल्टिब्रँड) वाढीसाठी करीत असलेसे प्रयत्न आणि देशाच्या लोकसंख्येमुळे या उद्योगाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे असा विश्वास जगभरच्या विश्लेषकांना वाटत आहे. त्यातच संघटित रिटेलच्या बरोबरीने भारतात ई-टेल कंपन्यांनीही हातपाय पसरायला सुरुवात केल्यामुळे त्याही आघाडीवर एक किफायतशीर बाजारपेठ म्हणून आपल्या देशाकडे जगाचे लक्ष लागले आहे.\nरिटेल बाजारपेठ एका दृष्टिक्षेपात...\nकिरकोळ विक्री बाजारपेठ दोन वर्षांत ७७ लाख कोटी रुपयांवर जाईल.\nसध्याची वार्षिक उलाढाल ४७ लाख कोटी रुपयांची.\nवार्षिक २० टक्के वाढ अपेक्षित\nमहत्वाचे लेखहरिपुरा अधिवेशन आणि गांधीजी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nदेश काँग्रेस नेत्यानं हॉटेलमध्ये नेलं, मग सामूहिक अत्याचार केले, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर तिघांना अटक\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nक्रिकेट न्यूज कमजोर पाकिस्तानने रोखला भारतीय संघाचा विजयरथ, आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला हरवलं\nकोल्हापूर एकनाथ शिंदे गर्दी दिसली म्हणून काहीही बोलत सुटले, उद्धव ठाकरेंच्या भाषणालाच प्रतिसाद: अजित पवार\nक्रिकेट न्यूज उभारायला गेले MS Dhoni चा मेणाचा पुतळा, पण धोनीची झाली अनहोनी, पाहा भन्नाट memes\nदेश ​देश हादरला... लग्न करण्यास नकार दिला, त्याने १९ वर्षीय मारुतीला पेट्रोल ओतून पेटवलं...​\nदेश वंदे भारत एक्स्प्रेस दुसऱ्यांदा दुर्घटनाग्रस्त, सलग दुसऱ्या दिवशी वेगवान ट्रेनचा खोळंबा\nसोलापूर Breaking : भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआयची जीवे मारण्याची धमकी; क्राईम ब्रँचकडे तपास\n जे लॉटरीचं तिकीट कचऱ्यात टाकलं, त्यानेच बनवले या महिलेला करोडोंची मालकीण\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://parbhani.gov.in/mr/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2022-10-07T23:01:26Z", "digest": "sha1:APL2LWD5KDSQ32P5MJZCRPANHW5FTIUX", "length": 6711, "nlines": 126, "source_domain": "parbhani.gov.in", "title": "तालुके | परभणी | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nडॉ.प्रफुल्ल पाटील मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल\nसरस्वती – धन्वंतरी डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल\nमहसुल / दंडाधिकार शाखा\nस्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nउप प्रादेशिक परिवहन कार्यालय\nजिल्हा परिषद, पंचायत समिती तालुका निहाय प्रारुप व अंतिम प्रभाग रचना\nमाहे ऑक्टोबर-नोव्हेंंबर २०१९ मधे झालेल्या अवेळी पावसामुळे बाधित शेतकरी यांंच्या मदत वाटप याद्या\nपरभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची विधान परिषद निवडणुक – २०१८\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या (दुसरा टप्पा)\nप्रधानमंत्री पिक विमा योजना २०१७ लाभार्थी यादी\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ पात्र लाभार्थी याद्या\nखरीप २०१८ दुष्काळी अनुदान पहिला व दुसरा टप्पा\nखासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंंतर्गत २०१४-१५ ते २०१८-१९ या कालावधीमधील मंजुर कामांंची यादी\nऔरंंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२०\nपरभणी जिल्ह्यातील कब्जेहक्काने व भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमीनीचे आदेश\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 23, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://sureshpatil.co.in/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95/", "date_download": "2022-10-07T22:38:12Z", "digest": "sha1:PPNI6TPD3EHPRDWKBNUCGAQ7FLWYH4IR", "length": 15768, "nlines": 61, "source_domain": "sureshpatil.co.in", "title": "उद्योग, व्यापार अर्थ व सहकार क्षेत्रातिल संघटनात्मक कार्य - Suresh Patil", "raw_content": "\nश्री सुरेश पाटील यांचा परिचय\nउद्योग, व्यापार अर्थ व सहकार क्षेत्रातिल संघटनात्मक कार्य\nउद्योग व व्यापार चळवळीतील सहभाग\nसन 1988:- संचालक, सांगली चेबर्स आॅफ काॅमर्स\nसन 1989-91:- उपाध्यक्ष, सांगली चेबर्स आॅफ काॅमर्स\nसन 1992-99:- अध्यक्ष, सांगली चेंबर आॅफ काॅमर्स या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत व्यापारी व उद्योजकांवर होणा-या अन्याय थांबविण्यासाठी अनेक चळवळी उभारल्या या 85 वर्‛ााच्या महारा‛ट्रातील जून्या व्यापारी संघटनेच्या गेल्या 82 वर्‛ाातील सर्वात तरुण वयाचा अध्यक्ष होण्याचा मान. सांगली जिल्हयातील व्यापारी वर्गाचे यषस्वी संघटन. या जिल्हा पातळीवरील संस्थेषी तालुका पातळीवरील व्यापारी संघटनासहीत एकूण 27 संघटना सलंग्न. राज्य व्यपारी परि‛ादेचे 3 वेळा यषस्वी संयोजन.\nसन 1987:- जकात विरोधी आंदोलन निमित्त संपूर्ण जिल्हयातील संघटना एकत्रीत करुन् उपो‛ाण, मोर्चा, सायकल मोर्चा काळया फीती लावून मूक मोर्चा व्दारे जनजागृती\nसन 1990:- षासनाने गुळावर सेल्स टॅक्स बसविला त्या विरोधात सांगली जिल्हयातील गुळ व्यापार 21 दिवास बंद आदोंलन. त्यावेळी संपूर्ण महारा‛ट्रात ुक्त सांगली बाजारपेठेत गुळाची आवक होती. संपूर्ण महारा‛ट्रात आंदोलन तीव्र झाले. शासनाने विधानसभेत पास केलेला कायदा विधानसभेत मागे घेतला.\nसन 1990:- सांगली षहरातील पूरामुळे दोन हजार लोकांचे जनजीवन विस्क्ळीत झाले होते. अषावेळी त्यांना तांदूळ व डाळ पूरविणे जेव्हा जीवनावष्यक वरूतुंच्या किंमती आकाषाला भिडल्या तेव्हा चेंबर आॅफ काॅमर्स ने रास्त भाव दुकानामार्फत ळया वस्तु पुरविल्या.\nसन 1992:- राज्य व्यापारी परि‛ादेचे 3 वेळा यषस्वी संयोजन या प्रसंगी प्रमुख पाहूणे अर्थराज्यमंत्री अरुणभाई गुजराथी हे होते.\nसन 1993:- कृ‛ाी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील जाचक तरतुदी विरोधी आंदोलनाचे जिल्हयातील यषस्वी नेतृत्व. सातारा येथील परि‛ादेमध्ये राज्याचे सहकारमंत्री मा. अभयसिंहरोज भोसले यांचे उपस्थित हा प्रष्न जोरदार पणे मांडला व त्याचवेळी मा. सहकार मंत्र्यानी या जाचक तरतूदी रदद् केलयाची घो‛ाणा केली.\n25 नोव्हेंबर 1994:- राज्य व्यापारी व उद्योजक भव्या परि‛ाद कृ‛णा व्हूली व चेंबरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परि‛ादेस पाच हजार व्यापारी व उद्योजक उपस्थित. तत्कालीन मुख्यमंत्री मा. षरद पवार यांचे उपस्थितीत ही परि‛ाद संपन्न झाली. मा. मुख्यमंत्र्यांनी षासनाचे व्यापार धोरण जाहीर केले.\nसांगली जिल्हयात 4000 एकराची MIDC ची मागणी. मा. नामदार षरद पवारसाहेब यांनी MIDC उभारणीबाबत घो‛ाणा.\nमहारा‛ट्रातील निरनिराळया ठिकाणी वेळोवेळी होणा-या परि‛ादामध्ये व्यापा-यांचे प्रष्न तळमळीने मांडणारा प्रमुख वक्ता म्हणून सहभाग.\nआॅगस्ट 1994:- सांगली षहरातील जकात ठेकेदारांची अन्यायकारक वसुली बंद पाडली. या प्रसंगी षहरातील व्यापा-यांच्या भव्य मोर्चाचे आयोजन\nसन 1994:- सांगली मार्कट याार्डात बेदाण्याचा उघड लिलाव पध्दतीने व्यापार सुरु केला. संपूर्ण भारतात सर्व प्रथम असा व्यापार सांगली येथे सुरु करणेचे कार्यज्ञत पुढाकार.व्यापा-यांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी, व्यापारी वर्गात जागृती करण्यासाठी व्यापार वि‛ायक नियतकालीकातून व वर्तमान पत्रातून सातत्याने लेखन. 1995 साली मार्केट अॅक्ट मध्ये षेतक-यांच्या पटट्ीतील खर्चाबाबत षासनाने तो कायदा मागे घेतला. या कामी पूणे परि‛ाद व सांगली षहर व्यापारात तीव्रता वाढवली.\nमा. मुख्यमंत्री मनोहर जोषी व उपमुख्यमंत्री श्री गोपिनाथ मुंडे यांचे बरोबर व्यापारी समस्याबाबत षासनाने व्यापार वि‛ायक धोरण जाहीर करणेबाबत चर्चा केली.\nसन 1992:- महारा‛ट्र चेंबर आॅफ काॅमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज या संस्थेवर सांगली व सातारा विभागात अध्यक्ष म्हणून निवड\nसन 1994:- महारा‛ट्र चेंबर आॅफ काॅमर्स गव्हर्निंग कौन्सिलवर सदस्य म्हणून निवड.\nमार्केट यार्डातील अडत व्यापा-यांची संघटना केली. 1989 साली संघटना स्थापना केली. दैनदिन हिषोबाबाबत अडचणी सोडविणेस या संघटनेचा मोलाचा वाटा.\nसांगली षहरात वखारभाग येथे प्रवासी वाहतूक करणा-या ट्रॅक्स गाडयासाठी पार्किगची सोय करण्यात पुढाकार घेवून योजना तयार करुन मंजूर करुन घेतली.\nसांगली षहरात दत्त मारुती रोड वरील अतिक्रमाणामुळे नागरिकंाना होणारा त्रास थांबविण्यासाठी आंदोलन.\nसन 1995:- रोटरी क्लब व व्यापारी मित्र यांचे संयुक्त विद्यमाने ज्ञान सत्र षिबीराचे आयोजन.\nचेंबर भवन महावीरनगर येथे 5 लाख रु. खर्चाचा अत्याधुनिक सुविधा असलेला व अंदाजे 200 लोकांची व्यवस्था असू षकेल असा काॅन्फरन्स हाॅल.\nबेदाण्यावरील जकात संपुर्ण माफ तसेच सोने चांदीवरील जकात कमी करणेबाबत यषस्वी प्रयत्न.\nसन 1998:- राज्यस्तरीय व्यापारी परि‛ादेचे आयोजन स्थळ – राजमती भवन, सांगली\nसन 1998:- उपाध्यक्ष महारा‛ट्र चेंबर आॅफ काॅमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज, मुंबई\nसन 1999:- सांगली जिलहा इंटरनेट नोड कार्यान्वीत करणेत पुढाकार\nमिरज पुढरपूर रोडवर 5000 एकरांची भव्य एम.आय.डी.सी. होणेसाठी गेले 5 वर्षे सातत्याने षासन दरबारी प्रयत्न. उद्योग मित्र परि‛ादेत उद्यसेगमंत्री लीळाधर डाके यांनी सांगली येथे ही एम.आय.डी.सी. करण्याचे जाहीर केली.\nपुणे ते संकेष्वर पर्यत पर्यायी महामार्गाची संकल्पना मांडली. पुणे, हडपसर, जेजूरी, फलटण, विटा, तासगांव, सांगली, मिरज, चिकोडी, संकेष्वर असा महामार्ग व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. षासनाने आष्वासन दिले आहे.\nPrevious Post चेअरमन मॅनेजिंग कौन्सिल – लठ्ठे एज्युकेषन सोसायटी, सांगली\nNext Post आर्थिक व सहकार क्षेत्रातील कामे\nमा. सुरेश पाटील महापौर पदावर असताना केलेले कार्य\nविधायक दृष्टीकोनातून उभ्या राहिलेल्या सामाजिक शीक्षणिक क्रिडा इ. क्षेत्रातील संस्था.\nआर्थिक व सहकार क्षेत्रातील कामे\nउद्योग, व्यापार अर्थ व सहकार क्षेत्रातिल संघटनात्मक कार्य\nचेअरमन मॅनेजिंग कौन्सिल – लठ्ठे एज्युकेषन सोसायटी, सांगली\nअध्यक्ष – महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळ, मुंबई (कॅबिनेटमंत्री दर्जा प्राप्त)\nश्री. सुरेश पाटील यांचा सहभाग असलेल्या व्यापारी संस्था\nमा. सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदगोंडा बाबगोंडा पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व राजमती नेमगोंडा पाटील वाचनालय, सांगली यांच्या वतीने आयोजित संविधान निर्माता संमेलनातील कार्य\nमा. सुरेश पाटील यांचे 21 वे मराठी बालकुमार साहित्य संमेलनमध्ये केलेले कार्य\nमा. सुरेश पाटील महापौर पदावर असताना केलेले कार्य\nदेवदासी रक्षाबंधन – देवदासींच्या वस्तीत जाऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम स्वच्छ व सुंदर महापालिका अभियान – इंदिरानगर झोपडपट्टीमधील साक्षरता कार्यक्रम, महापौर दौडीचे…\nविधायक दृष्टीकोनातून उभ्या राहिलेल्या सामाजिक शीक्षणिक क्रिडा इ. क्षेत्रातील संस्था.\nशैक्षणिक कार्ये सन 1990 :- श्री. ए. बी. पाटील इंग्लीश स्कूलची नेमिनाथ नगर येथे स्थापना. सांगली शहरातील एक आदर्श शाळा…\nआर्थिक व सहकार क्षेत्रातील कामे\nसन 1989 :- सांगली जनता सहकारी बॅंकेत संचालक म्हणून बिनविरोध निवड तसेच 1994 सालीही संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली सन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20903/", "date_download": "2022-10-07T22:43:49Z", "digest": "sha1:BEKMPFFMGDXA26ENSZVPYX4JUTKYUYQH", "length": 17306, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पिनँग – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपिनँग : मलेशियाच्यापिनँगराज्याच्याराजधानीचेठिकाणवएकखुलेबंदर. जॉर्जटाउनयाहीनावानेहे ओळखले जातअसले, तरी प्रामुख्यानेशहरातीलव्यापारपेठेलाचउद्देशूनतेवापरलेजाते. हेमलेशियाच्यामुख्यभूमीपासूनवायव्येसपाचकिमी. वरअसलेल्यापिनँगयाडोंगराळबेटाच्याईशान्यकिनाऱ्यावरवसलेआहे. हे मलेशियातीलदुसऱ्याक्रमांकाचेमोठेशहरअसून, त्याचीलोकसंख्या २,७०,३७८ उपनगरांसह३,३२,१२८ (१९७०) आहे. १७८६मध्येकेडाहच्यासुलतानाकडूनपिनँगबेटब्रिटीशईस्टइंडियाकंपनीच्याताब्यातआले. तत्कालीनभारत–चीनसमुद्रमार्गावरया बेटाचे लष्करी वव्यापारी महत्त्वओळखूनब्रिटीशकॅ. फ्रान्सिसलाइटयानेतेथेया शहराचीउभारणीकेली. दक्षिणेकडीलउथळसमद्रमार्गटाळण्यासाठीसामान्यपणेपिनँगसामुद्रधुनीतूनचजहाजवाहतूकअधिकहोते. हेशहरयासामुद्रधुनीच्या उत्तरटोकाशीवसलेलेअसल्याने साहजिकचत्याचेमहत्त्ववाढले. पुढे सिंगापूरच्या विकासानंतरपिनँगचे लष्करी वव्यापारी महत्त्वकमी झाले. सिंगापूर–बँकॉकरस्ता वलोहमार्गयांचाफाटापिनँगलाजातअसूनसामुद्रधुनीपलीकडेमलेशियाच्यामुख्यभूमीवरीलप्राईवबटरवर्थशी फेरी वाहतूकचालते. येथेआंतरराष्ट्रीयविमानतळहीआहे. येथे चिनीव्यापाऱ्याचीसंख्या अधिकअसूनत्यांखालोखालभारतीयवमलायी व्यापारी आढळतात. १९६७ मध्ये येथे वांशिक दंगल उसळली होती.\nकथिल-प्रगलन, साबणकारखाने, भातसडण्याच्या वखोबरेलतेलाच्या गिरण्या, वेताच्या वबांबूच्या वस्तूंचीनिर्मिती इ. उद्योगधंदे येथे चालतात. आसमंतातरबर, नारळ, ऊस, अननस, मसाल्याचे पदार्थयांचेउत्पादनहोते. याबंदरातूनमुख्यत: कथिल, रबर, सुपारी, खोबरे वखोबऱ्याचे तेल, मसाल्याचे पदार्थयांचीनिर्यातकेली जाते. येथेशंभरांवरपॅगोडेवमंदिरेअसूनत्यांतीलप्रसिध्दसर्पमंदिरातजिवंत सापसोडलेले आहेत. येथीलसेंट जॉर्जचर्च (१८१७), कॉर्नवॉलिसकिल्ला या वसाहतकालीनवास्तू आणि १०,०००बुध्दमूर्तीअसलेलाबॅन हूडपॅगोडा इ. प्रेक्षणीयआहेत. येथे पिनँगविद्यापीठअसूनपश्चिमेस६·५किमी. वरीलनिसर्गरम्यपिनँगटेकडी (८३०मी.) पर्यटनकेंद्र म्हणूनउल्लेखनीयआहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00039991-4816P-2-131.html", "date_download": "2022-10-07T22:01:28Z", "digest": "sha1:VF43MX2GNDYZAVXBSDBFALAZP23Q3KNW", "length": 14489, "nlines": 300, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "4816P-2-131 | J.W. Miller / Bourns | अॅरे/नेटवर्क प्रतिरोधक | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर 4816P-2-131 J.W. Miller / Bourns खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 4816P-2-131 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 4816P-2-131 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.insidemarathibooks.in/index.php/2020/01/19/review-prakashwata-marathi-book/", "date_download": "2022-10-07T21:39:00Z", "digest": "sha1:JDHNT7S4FRI6MLWDM5BJLTFFMZFRNSZV", "length": 22104, "nlines": 193, "source_domain": "www.insidemarathibooks.in", "title": "प्रकाशवाटा - Inside Marathi Books", "raw_content": "\n|| माझिया मराठीची बोलू किती कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके ||\nby अक्षय सतीश गुधाटे\nलेखक – डॉ. प्रकाश बाबा आमटे\nप्रकाशन – समकालीन प्रकाशन\nमुल्यांकन – ४.७ | ५\nरामन मॅगसेसे पुरस्कार विजेता एक माणूस आपल्या महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात राहून प्रसिध्दीच्या आणि पैश्यांच्या पलीकडे जाऊन गरीब आणि आदिवासी भागात विकासाचे आणि शिक्षणप्रसाराचे काम करत आहे. आणि याची दखल घेणे तर सोडाच पण त्यांना तो परदेशी व्हिसा नाकारला जातो. आपण कोण आहात आणि आपलं वार्षिक उत्पन्न किती या कारणांस्तव, याला आपलंच दुर्दैव म्हणावे लागेल. बाबांच्या आनंदवनातील जीवनाचा आदर्श घेऊन गरिबांसाठी आणि आदिवासी लोकांच्या सुधारणेसाठी आपलं आयुष्य पणाला लावलेल्या एका माणसाची ही आत्मकथा आहे. हे काम त्यावेळी अजून अवघड वाटते जेंव्हा त्यातून आपल्यालाच कष्ट आणि त्रास होणार आहे.\nवैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, सपत्निक आदिवासी भागात जाऊन काम करण्याच्या निर्णय घेऊन हे दोघे निघाले आणि हेमलकासा सारख्या अगदी छोट्या गावात जाऊन ठेपले. तिथं अनेक घटनांनी त्यांना नवे अनुभव दिले याच वर्णन करताना लेखक अगदी योग्य आणि व्यवस्थित कथावर्णन करतो. त्यात आलेल्या अनेक अडचणी लोकांनी घातलेला मोडता आणि या सर्वांतून घडलेला जिद्दीच्या प्रवासचे काही क्षण आपल्या डोळ्यात पाणी आणतील आणि आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला इतक्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. याचे नक्कीच मनात एक वारूळ उठेल.\nआईच्या मायेचा एक किस्सा लेखकाने अतिशय सुरेख सांगितला आहे. आपल्या मुलाला तिकडे रानावनात राहावं लागतं आणि तिकडे पंखा नाही हे समजल्यावर त्या आईने घरी स्वतःला पंखा असूनही तो कधीच चालवला नाही हे फक्त आईच काळीज करू शकते. आदिवासी लोकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांनी एक नवीन विश्व निर्माण केलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक ठिकाणी सुधारणा झाल्या पण खरी गरज असणाऱ्या आदिवासी भागात मात्र काहीच नव्हते अशा ठिकाणी सरकारी यंत्रणा आणि योजना त्या ठिकाणी पोहचाव्यात म्हणून लेखकाने दिलेला लढा आणि दाखवलेले धाडस वाखाणण्याजोगे आहे. अशातच तिथल्या स्थानिक लोकांना वैद्यकिय सुविधा मोफत पुरवणे आणि आणि त्याचबरोबर भुतदयेने अनेक माणसांसोबत प्राण्यांना देखील वाचवून तिथे नंदनवन फुलवले आणि गोकुळ निर्माण केले.\nपुस्तक वाचताना अंगावर शहारे आणि काटे उभे करणारे अनेक प्रसंग आहेत. पण त्यासोबतच स्वतःला सावरत आपण खरे कोण आहोत आणि किती भाग्यवान आहोत याचीही जाणीव होते. आपण बाह्य गोष्टींना किती महत्त्व देतो आणि त्या खरेच इतक्या महत्वाच्या आहेत का असा एक मोलिक प्रश्न तुमच्या समोर उभा राहील. आणि मला वाटते याचे उत्तर आपण सर्वांनीच स्वतःपुरते का होईना पण शोधायला हवे. मानव म्हणून जन्म सार्थकी लागेल असे मला वाटते. अशी पुस्तकं माणसं घडवतात माणसातील माणूसपण जपतात. या प्रकल्पात सहभागी होऊन मदत करणारे नाना पाटेकर असतील किंवा पुल असतील त्यांनी आपापला वाटा सार्थ पणे उचलला आहे आणि आपणही उचलावा असे वाटते. यातून मिळालेले अनुभव जीवन सुखावणारं नाहीत पण मन पोळवून जगायला शिकवतात. नक्की वाचा ही प्रेरणादायी कथा.\nऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:\nईनसाईड मराठी बुक्स says:\nसमीक्षण – नितीश पारकर\nलेखक: डॉ. प्रकाश आमटे\nमूल्यांकन: ५ | ५\nमाडिया गोंड आदिवासींना मुख्य प्रवाहात सामील करून घ्यावे आणि त्यांची होणारी पिळवणूक थांबावी या भूमिकेतून बाबा आमटेंनी हेमलकसाला लोकबिरादरी प्रकल्पाची सुरुवात केली. वयाच्या बाविसाव्या वर्षी डॉ. प्रकाश आमटे यांनी त्याची धुरा हाती घेतली आणि तो यशस्वी करून दाखवला. प्रकाशवाटा म्हणजे प्राण्यांविषयी लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी प्राणी पाळणे, पाण्याविषयी लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी भोवऱ्यात उडी मारणे असे अनेक विलक्षण प्रयोग करणाऱ्या या अवलियाची गोष्ट.\nलोकबिरादरी प्रकल्पासाठी जेव्हा त्यांना जमीन मिळाली तेव्हा तेथे फक्त जंगल होते. त्यामुळे अगदी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यापासून सुरुवात करावी लागली. अतिशय दुर्गम अशा या भागात त्या काळी ना संपर्काची साधने उपलब्ध होती ना दळणवळणाची सोय. पहिली १७ वर्षे तर वीजही नव्हती. पावसाळ्यात नद्यांना पूर येऊन काही महिने बाहेरच्या जगाशी संपूर्णपणे संपर्क तुटायचा. जंगलात डासांचा सुळसुळाट, त्यामुळे पहिल्या वर्षी सर्वांना मलेरिया झाला. तिथल्या पाण्यामुळे आजारी पडणं तर सामान्य बाब. जंगलात राहताना एकटेपणा ही यायचा. सगळेच कुटुंबापासून दूर राहत होते, त्यामुळे मतभेद झाले तर मन मोकळे करायला किंवा सल्ला मागायलाही कुणी नव्हते. सर्वांसाठी एकाच स्वयंपाकघर, त्यामुळे जे स्वयंपाकी करेल तेच सर्वांना खावे लागे. सुरुवातीला तर सर्व कार्यकर्ते चक्क झाडाखालीच झोपायचे, नंतर सर्वांसाठी एक झोपडी बांधण्यात आली. सगळ्यांना या परिस्थितीचा त्रास झाला, पण सर्व त्यातून मार्ग काढायलाही शिकले आणि त्यामुळेच एकमेकांच्या जवळ आले.\nआदिवासींची जीवनशैली, त्यांची सहनशीलता, जगण्याविषयीचा व्यावहारिक दृष्टिकोन यांचीही बरीच उदाहरणे पुस्तकात वाचायला मिळतात. सुरुवातीला तर हे आदिवासी प्रकल्पावर फिरकतही नसत. त्यांच्यातील अंधश्रद्धा, चालीरीती, बाहेरच्या माणसांनी वर्षानुवर्षे केलेले शोषण अशा अनेक कारणांमुळे त्यांच्या मनात बाहेरच्यांविषयी अविश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी केलेल्या धडपडीचेही वर्णन या पुस्तकात वाचावयास मिळते. अगदी त्यांची भाषा शिकण्यापासून ते त्यांच्यासाठी शाळा सुरु करण्यापर्यंत. आदिवासींचाही त्यांच्या जीवनशैलीवर बराच प्रभाव पडला. आधीच आमटेंचे राहणीमान साधे होते, आदिवासींकडे बघून त्यांनी आपल्या गरज अजून कमी केल्या.\nवैद्यकीय सेवा पुरवण्यातही अनेक अडचणी आल्या. तिथे कोणी specialist डॉक्टर नव्हते. त्यामुळे सगळ्या दुखण्यांवर, अगदी डोळ्यांपासून हाडांपर्यंत, प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनाच उपचार करावे लागत. इतर मेडिकल स्टाफ ही नसल्यामुळे कार्यकर्त्यांनाच प्रशिक्षण दिले गेले. पशुवैद्य नसल्याने प्राण्यांवरही उपचार केले. वीज नसल्याने कंदिलाच्या प्रकाशात कित्येक ऑपरेशन्स केली. एखाद्या आजाराविषयी किंवा उपचार पद्धतीविषयी माहिती नसेल तर पुस्तकात वाचून उपचार केले. इतर कुठेही सापडणार नाही अशा अविश्वसनीय केसेस चे वर्णन प्रकाशवाटा मधे वाचावयास मिळते.\nथोडक्यात काय, तर आपल्याकडे startup culture लोकप्रिय होण्याआधी आमटेंनी सुरु केलेली ही startup. येथे कोणीही प्रमुख नव्हता, सर्वच कार्यकर्ते(flat hierarchy). अंगावर पडेल ते काम करून, त्यासाठी जरुरी ती कौशल्ये स्वतःच आत्मसात करून आणि येणाऱ्या सर्व अडचणींवर उपलब्ध संसाधने वापरून मार्ग काढून या सर्वानी लोकबिरादरी प्रकल्प यशस्वी करून दाखवला.\nहा प्रकल्प यशस्वी करण्यात प्रकाश आमटेंबरोबरच त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे, भाऊ विकास आमटे, सुरुवातीचे त्यांचे सहकारी अशा अनेकांचा सिंहाचा वाटा आहे. या प्रकल्पात जसे अनेक व्यक्तिंचे योगदान लाभले, तसे काहींनी खोडा घालण्याचा प्रयत्नही केला. परंतु पुस्तकात कोणावरही टीका करताना त्या व्यक्तीचे नाव घेतलेले नाही, मात्र प्रकल्पास ज्यांची मदत झाली त्यांची स्तुती मात्र नाव घेऊन केली आहे.\nया प्रकल्पाव्यतिरिक्त आमटेंचे बालपण आणि जडणघडणीच्या अनेक प्रसंगांचे वर्णन या पुस्तकात आहे. हे पुस्तक म्हणजे खरंतर प्रकाश आमटेंच्या जीवनातील अनेक किस्स्यांचा संग्रहच. यातील काही खळखळून हसवतात, तर काही डोळ्यातून टचकन पाणी आणतात. हे सर्व किस्से एकेमकांमध्ये सुसंबद्धपणे गुंफून आमटेंनी हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाची आणि त्यांच्या जीवनाची गोष्ट सांगितली आहे. त्यांच्या या प्रवासातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यामुळे हे पुस्तक जरूर वाचावे. अगदीच काही नाही तर अनेक गोष्टींविषयी एक नवा दृष्टिकोन नक्की मिळेल.\nसमीक्षण – नितीश पारकर\nमराठी पुस्तकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा\nछत्रपती संभाजी – एक चिकित्सा\nसोशल नेटवर्कवर आमच्याशी कनेक्टेड राहा.\nवेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/travel/5667/", "date_download": "2022-10-07T23:02:53Z", "digest": "sha1:TE5SBTBQ2QPWHLLY7WUWUCQ2OUEQ4N64", "length": 3915, "nlines": 92, "source_domain": "www.snopty.com", "title": "गरज नसतांना.. - Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nगरज नसतांना का कोसळावा\nगरज नसतांना का कोसळाव्या\nअश्रू असो वा पाऊस अती झाला की चिखलच होतो\nनासधूस पिकांची अन् भावनांचा उद्रेक होतो..\nअवकाळी हा पाऊस, होते सर्दी अन् ताप अंगात\nअवेळी ह्या अश्रूधारा, होते विचारांची गर्दी संताप अंगात\nबळीराजा ‘तोल’ साधून निसर्ग नियमांचे करतो पालन\nते मन, आभाळाएवढे दुःखाश्रू गिळतो रोजच आपण\nनिसर्गाचा समतोल न साधावा आपण, प्रत्येक कौल मानावा आपलाच,’अवकाळीचे’ ही करावे स्वागत..\nमन तसेच किती धरावा धीर आपण भावनांना द्यावी करुन वाट मोकळी, अवेळी अश्रूंचेही गावे नव गीत\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nस्मृतीगंध…..ट्रेक नंबर १६…भाग २…कोळे नृसिंहपुर\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://gadchirolivarta.com/", "date_download": "2022-10-07T23:19:39Z", "digest": "sha1:SSBUAEI7OSFSJ4I7YAUTPXAB3X4LVB4N", "length": 15256, "nlines": 148, "source_domain": "gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta, /* */", "raw_content": "शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार: पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत देलोडा गावानजीकच्या जंगलातील घटना रक्तदान शिबिराद्वारे महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या जिल्हाध्यक्षपदाची वर्षपूर्ती साजरी आरमोरीजवळच्या गाढवी नदीच्या पुलावर अपघात: गडचिरोलीचे आ.डॉ.देवराव होळी थोडक्यात बचावले चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची हत्या: कोवानटोला-जपतलाई येथील घटना एटापल्ली तालुक्यातील संतापजनक घटना: ५० वर्षीय आदिवासी महिलेवर ट्रकचालकाने केला बलात्कार, आरोपीस अटक गडचिरोली: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकणार- शिवसेनेच्या मेळाव्यात जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांचे प्रतिपादन\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार..\nरक्तदान शिबिराद्वारे महेंद्र ब्राम्..\nआ.डॉ.देवराव होळी अपघातात थोडक्यात ब..\nआदिवासी महिलेवर ट्रक चालकाचा बलात्क..\nजिल्हा परिष्द,नगर परिषद निवडणुकीत श..\nनक्षलग्रस्त भागातील पोलिसांना दीडपट..\nट्रकच्या धडकेत महिला ठार: संतप्त ना..\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिर..\nआमचे मत - तुमचे मत\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार\nगडचिरोली,ता.७: पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना आज दुपारी गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत देलोडा (ता.आरमोरी) गावानजीकच्या जंगलात घडली. ठेमाजी माधव आत्राम(५०) रा.देशपूर, असे मृत इसमाचे नाव आहे. ठेमाजी आत्राम हा आज सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह गुरे चारण्यासाठी देलोडा ब...\nरक्तदान शिबिराद्वारे महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या जिल्हाध्यक्षपदाची वर्षपूर्ती साजरी\nगडचिरोली,ता.६: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज काँग्रेसने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले. काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेल व इतर विभागाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हे शिबिर घेण्यात आले. याव...\nआ.डॉ.देवराव होळी अपघातात थोडक्यात बचावले\nगडचिरोली,ता.५: आरमोरी येथील दुर्गादेवीच्या दर्शनाला जात असताना गाढवी नदीच्या पुलावर मोटारसायकलस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात आ.डॉ.देवराव होळी यांच्या मोटारीला अपघात झाला. मात्र, आ.डॉ.होळी थोडक्यात बचावले असून, मोटारसायकलस्वार युवक जखमी झाला आहे. प्रलय सुधाकर मडावी(३०) रा.रायपूर, ता.चामोर्शी असे जखमी युवकाचे नाव आहे....\nमेंढालेखा (देवाजी तोफा) वृत्तपट\nमुलचेरा तालुक्याला वादळाचा तडाखा, अनेक कौलारु घरांवरील छत उडाल्याने नागरिकांचे नुकसान\nजिल्ह्यात ठिकठिकाणी रामनवमी उत्साहात साजरी. मिरवणूक काढून साजरा केला रामजन्मोत्सव\nपावसाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंतातूर, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड\nआदिवासी विकास महामंडळाने धानाच्या बोनसची रक्कम न दिल्याने कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष\nरस्त्यात अडवून शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या दोन युवकांना अटक, आष्टी पोलिसांची कारवाई\nजिल्हा परिष्द,नगर परिषद निवडणुकीत ...\nओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी काँग्...\nकाँग्रेसच्या महारॅलीत गडचिरोलीतून ...\nराज्य सरकारकडून पूरग्रस्तांची घोर ...\nमहागाईचा विरोध: केंद्र सरकारच्या न...\nकेंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच...\nयुवतीवर चाकूने हल्ला करून युवकाची ...\nपीएचसीच्या डॉक्टरसह तीन नक्षल समर्...\nएटीएम मशिन फोडणाऱ्या तिघांना अटक: ...\nमुलाने केला वडिलांचा खून...\nलाकूड तस्करांकडून ८ लाख ५० हजारांच...\nगौतम निमगडे खून प्रकरणातील आरोपीस ...\nमोहगावात सुरु झाली गोंडी भाषेतून श...\nआ.गजबेंचे प्रयत्न सत्कारणी:पुराडा ...\nलोहप्रकल्पासाठी एमआयडीसीने लॉयड मे...\nकोनसरीतील लोहप्रकल्प सर्वांच्या सह...\nलॉयडच्या लोहप्रकल्पातून भरपूर रोजग...\nगडचिरोली पोलिस दलातील तिघांना शौर्...\nराज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अद्विक ...\nगडचिरोली जिल्ह्यातील ७ पोलिसांना र...\nडॉ.मंगेश वड्डे यांना ‘पोल्ट्री साय...\nगडचिरोली पोलिस दलास ‘सर्वोत्कृष्ठ’...\nगडचिरोलीच्या परिचारिका शालीनी कुमर...\n५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्ष...\nप्रा.श्रीनिवास वरखेडी दिल्लीच्या क...\nचित्रपट हे समाजप्रबोधनाचे प्रभावी ...\nडॉ. प्रशांत बोकारे गोंडवाना विद्या...\nगोंडवाना विद्यापीठात ‘इग्नू’चे अभ्...\n‘काँग्रेस जिल्हाध्यक्ष हटाव’ कॅसेट...\nचारही विचारप्रवाहांनी जगाला खरा गा...\nभारताचा विकास दर वाढत असला; तरी वि...\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबा...\nविषमता दूर झाली तरच नक्षलवाद संपेल...\n\"आदिवासी मुलांवर मारपीट, बंदुकांचे...\nजिल्हा परिषद शाळांमधील ‘त्या’ गुर्...\nआमदार भाई जयंत पाटील आणि शेकाप...\nअल्पावधीतच समाजमन जिंकणाऱ्या नगराध...\nचला, निसर्गाच्या सफाई कामगाराचे सं...\nरस्त्याच्या उजव्या बाजूने चला........\nमहिलांनी निर्भीडपणे पुढे यावे: शाह...\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार...\nरक्तदान शिबिराद्वारे महेंद्र ब्राम...\nआ.डॉ.देवराव होळी अपघातात थोडक्यात ...\nआदिवासी महिलेवर ट्रक चालकाचा बलात्...\nनक्षलग्रस्त भागातील पोलिसांना दीडप...\nट्रकच्या धडकेत महिला ठार: संतप्त न...\nबृहन्मुंबई महानगर पालिकेत २२८ पदव्...\nपुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता(...\nसहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या २४...\nनागपूर एम्समध्ये विविध प्रकारच्या ...\nमहाराष्ट्र शासनाचे जीआर बघा\nमहाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ\nमतदारयादीत आपले नाव शोधा\nटेलिफोनचे ऑनलाईन बिल भरा\nविजबिलऑनलाईन बघा आणि भरा\nरेल्वेचेऑनलाईन तिकिट बूक करा\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/sports/badminton/malvika-bansod-beats-saina-nehwal-in-strait-sets-2nd-indian-to-defeat-her-since-2007/articleshow/88877255.cms?utm_source=hyperlink&utm_medium=cricket-news-articleshow&utm_campaign=article-1", "date_download": "2022-10-07T22:27:25Z", "digest": "sha1:RIVLXYP5LNDSHIA3ETDRZS6WQQ7NPWJM", "length": 16124, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " नागपूरच्या मालविकाने सायनाला दिला पराभवाचा धक्का | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nIndia Open 2022 : शेवटच्या क्षणी गेम फिरला नागपूरच्या मालविकाने सायनाला दिला पराभवाचा धक्का\nIndia Open 2022 : इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत एक मोठा फेरबदल झाला आहे. नाशिकच्या मालविका बनसोडेने भारताची पहिली फुलराणी सायना नेहवाल पराभव करत एकच धक्का दिला\nIndia Open 2022 : शेवटच्या क्षणी गेम फिरला नागपूरच्या मालविकाने सायनाला दिला पराभवाचा धक्का\nनवी दिल्ली : २० वर्षीय मालविका बनसोडने गुरुवारी (१३ जानेवारी) बॅडमिंटन विश्वात मोठ्या उलटफेराची नोंद केली आहे. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती भारताची पहिली फुलराणी सायना नेहवाल प्रदीर्घ कालावधीनंतर बॅडमिंटन कोर्टवर परतली होती, पण तिचा प्रवास लवकरच संपुष्टात आला. इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या २० वर्षीय मालविका बनसोडने सायनाचा पराभव केला. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या या सामन्यात मालविकाने सायनाला २१-१७, २१-९ असा सलग सेटमध्ये पराभवाचा धक्का दिला. हा सामना फक्त ३४ मिनिटे चालला. सायना सध्या जागतिक क्रमवारीत २५ व्या क्रमांकावर, तर मालविका १११ व्या क्रमांकावर आहे.\nवाचा- जेव्हा जेव्हा बुमराह ५ विकेट घेतो, तेव्हा भारतीय संघासोबत होते ही खास गोष्ट\nसायनाचा वर्षातील पहिल्या बॅडमिंटन स्पर्धेतील प्रवास दुसऱ्या फेरीतच थांबला आहे. दुसरीकडे भारताची आणखी एक स्टार शटलर पी.व्ही. सिंधूनेही विजयासह पुढील फेरीत प्रवेश केला आहे. तिने इरा शर्माविरुद्धचा दुसऱ्या फेरीचा सामना २१-१०, २१-१० असा जिंकला. तसेच अश्मिता चलिहा हिनेही दुसऱ्या फेरीचा सामना जिंकला आहे. आता तिसऱ्या फेरीत अश्मिताचा सामना सिंधूशी होणार आहे.\nवाचा- रहाणे-पुजारा यांनी खेळली अखेरची कसोटी; वारंवार अपयशी ठरल्याने मिळणार डच्चू\nदरम्यान, पी.व्ही.सिंधूने सायनाला याआधी पराभूत केले होते. सिंधू ही पहिली तर मालविका ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे, ज्यांनी सायनाला महत्वाच्या बॅडमिंटन स्पर्धेत पराभूत केले आहे. सायनाला पहिल्या फेरीत झेक प्रजासत्ताकची तेरेझा स्वाबिकोवा हिला दुखापत झाल्यामुळे थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला होता.\nवाचा- UAE नव्हे तर या देशात होणार IPL २०२२; बीसीसीआयने तयार केला प्लॉन\nपहिल्या गेममध्ये ४-४ अशा बरोबरीनंतर आघाडी\nपहिल्या गेमच्या सुरुवातीला सायना आणि मालविका यांच्यात बरोबरी होती. एकवेळ दोन्ही खेळाडू ४-४ असे बरोबरीत होत्या. त्यानंतर मालविकाने आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम राखली. दुसऱ्या गेममध्येही दोघेही २-२ अशा बरोबरीत होत्या. त्यानंतर मालविकाने आपला वेग वाढवला आणि सामना जिंकेपर्यंत तिने मागे वळून पाहिले नाही.\nवाचा- ५ विकेट घेणाऱ्या बुमराहपेक्षा, २ विकेट घेणाऱ्या शमीचे होत आहे कौतुक; हे आहे कारण\nकोण आहे मालविका बनसोड\nमालविका ही महाराष्ट्रातील एक प्रतिभावान बॅडमिंटन खेळाडू आहे. तिने १३ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील स्तरावर राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्या आहेत. २०१८ मध्ये, तिची जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. २०१८ मध्ये तिने काठमांडू येथील दक्षिण आशियाई बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. २०१९ मध्ये तिने ऑल इंडिया सीनियर रँकिंग टूर्नामेंट जिंकली. तसेच २०१९ मध्येच मालविकाने मालदीव इंटरनॅशनल फ्युचर सीरीज स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले होते.\nवाचा- IND vs SA :'रागावलो नाही, फक्त मी...'; ५ बळी घेतल्यानंतर बुमराहने व्यक्त केल्या भावना\nमी आता कुठे उभी आहे हे पाहण्यासाठी आले\nगुडघा आणि मांडीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर सायना नेहवाल तिची पहिली स्पर्धा खेळत होती. मालविकासोबतच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर ती म्हणाली, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मी जखमी झाले. २७ डिसेंबरपासून मी पुन्हा खेळायला सुरुवात केली आहे. मी आता कुठे उभी आहे आणि अजून किती सुधारणा आवश्यक आहेत, हे पाहण्यासाठी मी या स्पर्धेत आले होते.\n'मी दोन सामने खेळू शकले, याचा मला आनंद आहे, पण हे मान्य करावेच लागेल की, खराब फिटनेसशिवाय मालविका, अकाशी आणि सिंधूसारख्या खेळाडूंविरुद्ध खेळणे फार कठीण आहे. मालविकाबाबत सायना म्हणाली की, 'ती चांगली खेळत आहे आणि तिच्या खेळात सातत्याने सुधारणा होत आहेत. ती रॅली खेळण्यात उत्कृष्ट आहे. मालविका या स्पर्धेतही चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे.'\nमहत्वाचे लेखसात भारतीय खेळाडूंना करोनाची लागण; स्पर्धेतून माघार घेतली\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमुंबई शकील, छोटा राजनला माझी सुपारी दिली; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nमटा ओरिजनल मुंढेंच्या धाडसत्राने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, रात्री डॉक्टर नसल्यास थेट घरचा आहेर\nसिंधुदुर्ग उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे राहणारा आमदार चौकशीच्या फेऱ्यात, कोकणातल्या नेत्याला एसीबीची नोटीस\nदेश ​देश हादरला... लग्न करण्यास नकार दिला, त्याने १९ वर्षीय मारुतीला पेट्रोल ओतून पेटवलं...​\nपुणे ब्रेकअपच्या रागातून गर्लफ्रेंडच्या घरात २७ तोळे सोन्याची चोरी, पुण्यातील घटनेनं खळबळ\nक्रिकेट न्यूज कमजोर पाकिस्तानने रोखला भारतीय संघाचा विजयरथ, आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला हरवलं\nदेश काँग्रेस नेत्यानं हॉटेलमध्ये नेलं, मग सामूहिक अत्याचार केले, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर तिघांना अटक\nLive Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/ipl/yuzvendra-chahal-give-flying-kiss-to-dhanashree-verma-moment-goes-viral-after-rajasthan-beat-hyderabad-see-pics-scsg-91-2864784/", "date_download": "2022-10-07T22:09:15Z", "digest": "sha1:SRODA363TCBMJEJ5F2ZWLFZGHCCRNJZT", "length": 18787, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2022: ...अन् सामना सुरु असतानाच चहलने पत्नी धनश्रीला दिला Flying Kiss | Yuzvendra Chahal Give Flying Kiss to Dhanashree Verma Moment Goes Viral After Rajasthan Beat Hyderabad SEE PICS scsg 91 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\nIPL 2022: …अन् सामना सुरु असतानाच चहलने पत्नी धनश्रीला दिला Flying Kiss\nचहलने राजस्थान विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात तीन गडी बाद करत नवीन संघासोबत दमदार सुरुवात केली.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nया फोटोंना जवळजवळ तीन लाख ७० हजारांच्या आसपास लाइक्स आहेत (फोटो राजस्थान रॉयल्सच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)\nजर्सीचा रंग बदलला असला तरी यजुवेंद्र चहलची शैली बदलेली नाही असेच राजस्थान विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघांमधील मंगळवारचा सामना पहिल्यानंतर पुन्हा एकदा दिसून आलं. चहलने या सामन्यामध्ये राजस्थानकडून खेळताना तीन गडी बाद करत नवीन संघासोबत दमदार सुरुवात केली. अवघ्या २२ धावांमध्ये तीन गड्यांना तंबूत पाठवणारा चहल हा राजस्थानसाठी स्टार गोलंदाज ठरला. अर्थात या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सने उभा केलेला २१० धावांचा डोंगर पाहता चहलच्या गोलंदाजीमुळे अगदी सामना फिरला असं म्हणता येत नसलं तरी या कामगिरीमुळे पुन्हा एकदा चहलला टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात समावेश करण्यासंदर्भातील शक्यता पुन्हा चर्चेत आल्यात.\nनक्की वाचा >> IPL : मोहम्मद शमीसाठी अमेरिकन पॉर्नस्टारची पोस्ट; थेट शमीला टॅग करत म्हणाली…\nआपल्या खेळाबरोबरच हटके स्टाइल आणि सतत काही ना काही मजेदार गोष्टींमुळे चर्चेत असणाऱ्या चहलने या सामन्यामध्येही अशी एक गोष्ट केली ती त्याची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागलीय. झालं असं ती चहलची पत्नी धनश्री ही त्याचा फोटो घेण्याचा प्रयत्न करत होती. त्याच वेळी चहलने पत्नीला मैदानामधूनच फ्लाइंग कीस दिला. या अ‍ॅक्शन रिअ‍ॅक्शनचे फोटो राजस्थान रॉयल्सच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन शेअर करण्यात आलेत.\n“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला\nShinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\n“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप\nचहलला बंगळुरुच्या संघाने रिटेन न केल्याने तो यंदा लिलावाच्या माध्यमातून राजस्थानच्या संघामध्ये सहभागी झालाय. पहिल्याच सामन्यात त्याने बंगळुरुच्या संघाला आपण याला सोडून चूक केली की काय असं वाटवं अशी कामगिरी केलीय. त्यामुळे आता मालिकेमध्ये पुढे चहल कसा खेळतो याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. पण कालच्या सामन्यामध्ये त्याच्या कामगिरीबरोबरच या फ्लाइंग किसनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले हे मात्र नक्की. या फोटोंना जवळजवळ तीन लाख ७० हजारांच्या आसपास लाइक्स आहेत.\nहा सामना राजस्थान रॉयल्सने ६१ धावांनी जिंकला. २११ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला २० षटकात ७ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारता आली.\nमराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nIPL : मोहम्मद शमीसाठी अमेरिकन पॉर्नस्टारची पोस्ट; थेट शमीला टॅग करत म्हणाली…\nLow Uric Acid: यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होणे देखील ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ ५ गंभीर आजार\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : डायव्हिंगमध्ये मेधाली, तर योगासनात वैभवला सुवर्ण\nबुमरा, जडेजाची अनुपस्थिती इतरांसाठी संधी – शास्त्री\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारतीय महिला संघाची विजयाची मालिका खंडित; पाकिस्तानकडून १३ धावांनी पराभूत\nहरमनप्रीत सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्तम हॉकीपटू\nधनुष्य-बाण चिन्हाचा वाद : हंगामी आदेशास ठाकरे गटाचा विरोध; दोन्ही गटांच्या कागदपत्रांची सत्यता तपासून अंतिम निर्णय घेण्याची विनंती\nअन्न प्रक्रिया उद्योगात राज्यात सांगली अव्वल; पुणे दुसऱ्या, तर औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावर\nआदिवासी विकास विभागातील शिक्षणविस्तार अधिकाऱ्यास अटक; आश्रमशाळा अधिक्षिकेची विनयभंगाची तक्रार\nपेटंट कायदा जागते रहो\nराज्यात सर्वाधिक हत्याकांड अनैतिक संबंधातून; ‘एनसीआरबी’ची आकडेवारी\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\nमागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : विषाणूंचे डंख\nपालघर : भात कापणीआधीच स्थलांतर ; रोजगार हमी योजना राबवूनही स्थलांतराची समस्या कायम\nपडसाद : ‘मूनलायटिंग’ नकोच\nविरार : महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची सूचना\nराज्यातील विजेच्या मागणीत मोठी घट\nपोळी-भाजी केंद्र बंद करण्याकडे कल; करोनानंतर विद्यार्थी संख्येत घट, गॅस, जीवनावश्यक साहित्य महागल्याचा परिणाम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune/ajit-pawar-criticizes-the-waste-of-money-in-the-name-of-smart-city-in-pimprit-pune-print-news-amy-95-3060813/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-07T22:49:31Z", "digest": "sha1:27CFBLUIOHBOL4U5LBAOAJZQXIXGVVU7", "length": 22243, "nlines": 259, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पिंपरीत स्मार्ट सिटीच्या नावाखाली बकालपणा , पैशांची वारेमाप उधळपट्टी अजित पवारांची टीका | Ajit Pawar criticizes the waste of money in the name of smart city in Pimprit pune print news amy 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\nपिंपरीत स्मार्ट सिटीच्या नावाखाली बकालपणा , पैशांची वारेमाप उधळपट्टी अजित पवारांची टीका\nशहर राष्ट्रवादीच्या ‘निर्धार विजयाचा’ मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.\nWritten by लोकसत्ता टीम\nअजित पवार (संग्रहित फोटो)\nपिंपरी पालिकेत भाजपकडून गेल्या पाच वर्षात मनमानी कारभार सुरू होता. सत्ताधाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नव्हते की त्यांना योग्य मार्गदर्शन नव्हते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली उधळपट्टीबरोबरच बकालपणा सुरू आहे. रस्ते अरूंद करून पदपथ मोठे केले आहेत. त्यामुळे यापूर्वी नसलेल्या वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली.\nशहर राष्ट्रवादीच्या ‘निर्धार विजयाचा’ मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वर्पे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदी उपस्थित होते. मेळाव्यात माधव पाटील, काशिनाथ जगताप, शुक्ला पठाण, ज्ञानेश्वर कांबळे, कविता खराडे, पल्लवी पांढरे, शिवाजी पाडुळे, विजय लोखंडे, प्रसन्ना डांगे, वर्षा जगताप, भाऊसाहेब भोईर, रविकांत वर्पे, अजित गव्हाणे यांनी मनोगते व्यक्त केली.\n“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला\nShinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\n“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप\nपवार म्हणाले, पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना शहराचा सर्वांगिण विकास सुरू होता. विरोधकांनी पक्षाची बदनामी केल्याने सत्ताबदल झाला. सत्तेत आलेल्या भाजप नेत्यांनी पाच वर्षांत पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले. चुकीच्या पद्धतीने पदपथ केले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.\nगव्हाणे म्हणाले, भाजपच्या भ्रष्टाचारी कारभाराला जनता विटली आहे. तीनचा तथा चारचा प्रभाग झाला तरी यंदा पालिकेत राष्ट्रवादीचीच सत्ता येईल आणि महापौरही राष्ट्रवादीचाच होईल.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक रणसुंभे यांनी केले. सूत्रसंचालन दिपक साकोरे यांनी केले.\nआघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवरच\nकाँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीबाबत जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो राज्यस्तरावर होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आघाडीचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले जातील. त्यामुळे आघाडीबाबत निर्णय घेताना सखोल अभ्यास करण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या.\n…तर कधीही निवडणुकांची शक्यता\nप्रभागरचना बदलण्याच्या विरोधात काहीजण न्यायालयात गेले आहेत. त्यांचा युक्तीवाद न्यायालयाने मान्य केल्यास केव्हाही निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळे कोणीही गहाळ राहू नका. निवडणुकीत राष्ट्रवादी कमी पडता कामा नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले.\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nपुणे : उद्यानाला दिलेल्या वैयक्तिक नावाचा फलक न हटविल्याप्रकरणी आयुक्तांना नोटीस\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मेधाली, वैभवला सुवर्ण\nप्रो कबड्डी लीग : दबंग दिल्लीसमोर यू मुम्बाची हाराकिरी\nराष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा -विनोद तोमर\nभारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा\nकाँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका\nधनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण\nमध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०८ ऑक्टोबर २०२२\nपुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\nLow Uric Acid: यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होणे देखील ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ ५ गंभीर आजार\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\nअन्न प्रक्रिया उद्योगात राज्यात सांगली अव्वल; पुणे दुसऱ्या, तर औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावर\nपुन्हा चार दिवस पाऊस जोमात; मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास यंदाही उशिरा\nपुणे : प्रेमसंबंध तुटल्यानंतर प्रेयसीच्या घरात चोरी ; एकास अटक; १४ लाख ६७ हजारांचा ऐवज जप्त\nपुणे : पैगंबर जयंतीनिमित्त रविवारी वाहतुकीत बदल\nपुणे : खासगी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातील बेकायदा प्रवेशांना मान्यता नाही ; सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांचे स्पष्टीकरण\nपिंपरी : रस्त्यांवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेचे पिंपरी पालिकेत आंदोलन\nडुलकी लागल्याच्या आरोपांवर दिपक केसरकरांचे स्पष्टीकरण; म्हणाले “मी झोपलो नव्हतो, तर….”\nपुणे : मुख्यमंत्र्यांच्या नातवावरील टीकेचे पुण्यातही पडसाद ; ‘एक दुखावलेला दीड वर्षाच्या मुलाचा बाप’ पत्राचे पुण्यात फलक\nपुणे : सिकलसेल ॲनिमिया आजारावर आयुर्वेदिक औषधाची निर्मिती ; विद्यापीठातील डॉ. पूजा दोशी यांचे विद्यार्थ्यांच्या सहाय्याने संशोधन\n‘विघ्नहर’कडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड ; दिवाळीपूर्वी उसाची रक्कम, कामगारांना १२ टक्के बोनस\nअन्न प्रक्रिया उद्योगात राज्यात सांगली अव्वल; पुणे दुसऱ्या, तर औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावर\nपुन्हा चार दिवस पाऊस जोमात; मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास यंदाही उशिरा\nपुणे : प्रेमसंबंध तुटल्यानंतर प्रेयसीच्या घरात चोरी ; एकास अटक; १४ लाख ६७ हजारांचा ऐवज जप्त\nपुणे : पैगंबर जयंतीनिमित्त रविवारी वाहतुकीत बदल\nपुणे : खासगी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातील बेकायदा प्रवेशांना मान्यता नाही ; सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांचे स्पष्टीकरण\nपिंपरी : रस्त्यांवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेचे पिंपरी पालिकेत आंदोलन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/remove-the-mask-raj-thackerays-order-directly-to-the-former-mayor/", "date_download": "2022-10-07T21:54:43Z", "digest": "sha1:U7N2RJFYM7GJ7IRABFTQLR227IKJXU5I", "length": 9790, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "...अन् राज ठाकरेंनी माजी महापौरांना देखील मास्क काढायला लावला!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n…अन् राज ठाकरेंनी माजी महापौरांना देखील मास्क काढायला लावला\n…अन् राज ठाकरेंनी माजी महापौरांना देखील मास्क काढायला लावला\nनाशिक | कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मुबंई आणि पुण्यात आकडे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. लवकरच महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या 10 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मास्क घालण्याचं आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे त्यांचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारी नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी देखील राज ठाकरे विनामास्क नाशिकात दाखल झाले. यावेळी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या समवेत इतर पदाधिकारी आले होते. स्वागतावेळी अशोक मुर्तडक यांनी मास्क घातलं होतं. त्यावेळी राज ठाकरेंनी मुर्तडकांना मास्क काढण्याचा आदेश दिला. त्यानंतर लगेच आदेश मान्य करत मुर्तडकांनी मास्क काढला.\nराज ठाकरे दीड वर्षांनी नाशिकमध्ये पोहोचले आहेत. झालेल्या प्रकारामुळे राज ठाकरेंवर कारवाई केली जाईल की नाही अशी चर्चा रंगली आहे. या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांनी गर्दी करू नये असा इशाराही दिला होता.\nदरम्यान, मुंबईत झालेल्या एका मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय, असं उत्तर राज ठाकरेंनी पत्रकारांना दिलं होतं. याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारल्यावर त्यांना माझा नमस्कार सांगा, अशी सौम्य भुमिका घेतली होती. तर काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय बैठकीत देखील राज ठाकरे विनामास्क आले होते.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली कोरोनाची लस\nरस्त्यात छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला तिने बेशुद्ध होईपर्यंत धू-धू धुतलं\n…हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचं लक्षण नाही, हा उठावडेपणा आहे- एकनाथ खडसे\nतब्बल 500 दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘या’ देशाचा दौरा\nरूसलेल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी कायपण…; तरूणाने केला ‘हा’ कारनामा\n राज्य सरकारचा हा ऑनलाईन कोर्स लवकरच सुरू होणार; सविस्तर वाचा…\n“मोदी सरकारची चमचेगिरी करणाऱ्यांच्या उलाढाली स्वच्छ आहेत काय\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/pak-vs-afg-next-time-dont-bring-on-the-country-former-afghanistan-cricket-chief-warns-shoaib-akhtar/", "date_download": "2022-10-07T21:23:21Z", "digest": "sha1:LIPWP3TFK4BTKWTU7DOL5RB75KBQ4SNJ", "length": 6356, "nlines": 44, "source_domain": "mahaupdate.in", "title": "PAK vs AFG : 'पुढच्या वेळी देशावर आणू नका...'; अफगाणिस्तानच्या माजी क्रिकेट प्रमुखाची शोएब अख्तरला चेतावणी - Maha Update", "raw_content": "\nHome » PAK vs AFG : ‘पुढच्या वेळी देशावर आणू नका…’; अफगाणिस्तानच्या माजी क्रिकेट प्रमुखाची शोएब अख्तरला चेतावणी\nPAK vs AFG : ‘पुढच्या वेळी देशावर आणू नका…’; अफगाणिस्तानच्या माजी क्रिकेट प्रमुखाची शोएब अख्तरला चेतावणी\nनवी दिल्ली : शारजाह येथे खेळल्या गेलेल्या सुपर 4 (आशिया कप 2022) सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा (PAK vs AFG) एका विकेटने पराभव केला. शेवटपर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक सामन्यात नसीम शाहने गोलंदाज फजलहक फारुकीच्या चेंडूवर सलग दोन षटकार ठोकत सामना पाकिस्तानच्या बाजूने नेला.\nमात्र, शेवटच्या षटकात नसीम शाहने दोन चौकारांचे फटके खेळले तोपर्यंत अफगाणिस्तान खेळात राहिला आणि त्यांच्या विजयाची शक्यता जास्त होती. पण, शेवटी पराभव झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या चाहत्यांना हा पराभव पचवता आला नाही आणि त्यांनी स्टेडियमची तोडफोड सुरू केली. यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (ACB) माजी सीईओ शफीक स्टॅनिकझाई यांनी एका व्हिडिओवरून ट्विटरवर भांडण केले.\nखरं तर, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने ट्विटरवर अफगाण चाहत्यांच्या हिंसक वर्तनाबद्दल त्याला फटकारले, त्याने लिहिले, “अफगाण चाहते हेच करत आहेत. यापूर्वीही त्याने अनेकदा असे केले आहे. हा एक खेळ आहे आणि तो खेळला पाहिजे आणि योग्य भावनेने घेतला पाहिजे.”\nस्टॅनिकझाईला टॅग करताना तो म्हणाला, “तुम्हाला खेळात पुढे जायचे असेल तर तुमचा जमाव आणि तुमचे खेळाडू दोघांनीही काही गोष्टी शिकल्या पाहिजेत.”\nस्टानिकझाई यांनी “रावळपिंडी एक्स्प्रेस” ला प्रत्युत्तर दिले आणि त्यांच्या एका कृतीवर संपूर्ण देशाला प्रश्न विचारू नका असा सल्ला दिला. त्याने ट्विटला उत्तर देत लिहिले की, “तुम्ही गर्दीच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि क्रिकेटच्या जगात अशा घटना घडल्या आहेत, तुम्ही कबीर खान, इंझमाम भाई आणि रशीद लतीफ यांना विचारा की आम्ही त्यांच्याशी कसे वागलो. मी तुम्हाला एक सल्ला देत आहे, पुढच्या वेळी हे प्रकरण देशावर घेऊ नका.”\nAsia Cup : पराभवानंतर अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी केली मारहाण, व्हिडिओ व्हायरल\n#Video : ‘पाक संघ T20 World Cup च्या पहिल्याच फेरीतून बाहेर होणार’, शोएब अख्तरने सांगितले कारण\nAsia Cup : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर 1 विकेटने विजय, टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE-5-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8711/", "date_download": "2022-10-07T21:38:47Z", "digest": "sha1:NRNVNFHSOD7LNIA5E7ZZRKTKNRBQ2TQK", "length": 12044, "nlines": 89, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "पुरुषांनी \"या\" 5 पदार्थांचे सेवन केल्यास शरीरातील कुठल्याही प्रकारची कमजोरी होईल दूर, कमजोर पौरुषत्वाची ताकत वाढून तुमचा स्टॅमिनाही वाढेल... - Themaharashtrian", "raw_content": "\nपुरुषांनी “या” 5 पदार्थांचे सेवन केल्यास शरीरातील कुठल्याही प्रकारची कमजोरी होईल दूर, कमजोर पौरुषत्वाची ताकत वाढून तुमचा स्टॅमिनाही वाढेल…\nपुरुषांनी “या” 5 पदार्थांचे सेवन केल्यास शरीरातील कुठल्याही प्रकारची कमजोरी होईल दूर, कमजोर पौरुषत्वाची ताकत वाढून तुमचा स्टॅमिनाही वाढेल…\nआजच्या या जीवनात भेसळयुक्त अन्नामुळे आपल्या आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नु-कसान होत आहे. इतका पैसा खर्च करूनही लोकांना हवे ते फळ मिळत नाही जे त्यांना हवे असते. आजकाल लोक या धावपळीच्या जीवनात कमकुवत होत चालले आहेत, म्हणून त्यांच्या श-रीरात श-क्ती निर्माण करण्यासाठी ते एक ना अनेक उपाय करा. बरेच लोक शरीरात ऊर्जा निर्माण होण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या सामान्य पा-वडरचे से-वन करतात.\nआज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्या तुमच्या शरीराला अनेक प्रकारे मदत करतील. आज आम्ही तुम्हाला त्या गोष्टींबद्दल सांगत आहोत, त्या सेवनने तुमच्या शरीरात सिं-हासारखे सामर्थ्य येईल. आज आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यांचा पुरुषांनी नेहमी वापर करावा. या गोष्टींचे सेवन केल्याने पुरु-षांमध्ये शा-रीरिक शक्ती वाढते आणि शरीर कधीही क-मकुवत होत नाही.\nया 5 गोष्टींचे सेवन केल्याने कायमची शारीरिक दुर्बलता दूर होते –\nगूळ – लोह आणि कॅल्शियम गुळामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. अशा अनेक गोष्टी गूळामध्ये आढळतात ज्यामुळे आपल्या श-रीराला ऊ-र्जा मिळते. म्हणून, जर तुम्ही दररोज गुळाचे सेवन केले तर तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारची क-मकु-वतपणा येणार नाही. श-रीरातील उ-र्जा इतकी वाढेल की तुम्हाला अगदी कष्टाचे काम करून देखील थकल्यासारखे वाटणार नाही.\nखजूर- श-रीराची दु-र्बलता दूर करण्यासाठी खजूर खूप फायदेशीर असते. जर आपण दररोज कमीतकमी पाच खजूर सेवन केले तर आपले शरीर\nद-नगट होऊन चपळ देखील होईल. खजूर आपल्याला मार्केट मध्ये सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. तसेच खजुराची चव देखील गोड असल्याने खाण्यास देखील चविष्ट असते. खजूर नियमित सेवन केल्याने आपले शरीर नेहमीच ऊर्जेने परिपूर्ण भरलेले रहाते.\nकेळी- केळी हे फळ शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. जर आपण एका दिवसात दोन केळीचे सेवन केले तर शरीरातील असलेला थकवा दूर होईल. म्हणून आपण दररोज केळीचे सेवन करायलाच पाहिजे. केळी देखील खाण्यास गोड आणि चविष्ट असतात.\nदूध- व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि लोह हे दुधात खूप जास्त प्रमाणात आढळते, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. म्हणूनच असे नेहमीच म्हटले जाते की दूध प्रत्येकाने प्यावे. दुधात बरेच गुण आढळतात. दररोज दुधाचे सेवन केल्याने शरीरातील सर्व दुर्बलता काही वेळातच दूर होते. दूध हे शक्तिवर्धक असते.\nहरभरा – यात आरोग्याशी संबंधित अनेक गुणधर्म आढळतात, दररोज हरभरा सेवन केल्याने शरीर चपळ राहतं आणि त्याचबरोबर शरीरातील बरेच रोग बरे होतात. म्हणून दररोज सकाळी न्याहारीसाठी हरभरा आणि गूळ खायला पाहिजे.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82/word", "date_download": "2022-10-07T21:49:43Z", "digest": "sha1:4M4GAYI5LBOANWX46YAGMNONYMRLKRBL", "length": 12324, "nlines": 164, "source_domain": "www.transliteral.org", "title": "(अपराध) पोटीं घालणें - Dictionary Definition - TransLiteral Foundation", "raw_content": "\nSee also: (अन्याय) पोटीं घालणें\nमराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | |\nअन्याय विसरणे. ‘अपराध कोटि पोटीं घालाया मुकुट पाय ते करितो\n(अपराध) पोटीं घालणें पानावर पान घालणें (अन्याय) पोटीं घालणें गांठ घालणें गवसणी घालणें घोडें पुढें घालणें आपला अपराध चुकवावया, दुजावर घालूं नको वायां पोटीं माती पडणें मंत्र घालणें मुखीं बोटें घालणें उंटावर खोगीर घालणें जेवूं घालणें भरल्या पोटीं पाखर घालणें करवतीं घालणें युक्तिच्या पोटीं पाय पोटीं जाणें घोडी घालणें चिरा घालणें फिरकंडें घालणें रुंजी घालणें घर पालथे घालणें भर घालणें जीभ नरकात घालणें शेव घालणें माप पदरांत घालणें (लबाडी इ. चें) मुळाशीं हात घालणें उखळांत शीर घालणें वाचा नरकांत घालणें रुजू घालणें आंख घालणें फांसा घालणें बिब्ब्यावर घालणें बारनिशीवर घालणें (डोळ्यांत) धुरळा घालणें तोंड भरुन साखर घालणें द्यावी काळावर दृष्टि, समाधान मानावें पोटीं वासनेच्या पोटीं, असती कर्माच्या कटकटी शुद्धबीजा पोटीं | फळें रसाळ गोमटीं || ज्‍याच्या टांगड्या त्‍याच्याच गळ्यात घालणें स्नेहांत पाणी घालणें (कामाची) माळ घालणें नंगा नाच घालणें धारा घालणें ज्याचीं बोटें त्याच्याच डोळयांत घालणें वाद घालणें वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी घाण्यावर घालणें खो घालणें धाड घालणें\nब्रम्हस्तुति - चरण २ - भाग २\nब्रम्हस्तुति - चरण २ - भाग २\nस्कंध ४ था - अध्याय ६ वा\nस्कंध ४ था - अध्याय ६ वा\nब्रम्हस्तुति - चरण २ - भाग १\nब्रम्हस्तुति - चरण २ - भाग १\nश्री कल्याण स्तवन - तगतो धणी माझा धणी माझा \nश्री कल्याण स्तवन - तगतो धणी माझा धणी माझा \nअभंग - मन लागलें लागलें\nअभंग - मन लागलें लागलें\nअध्याय ५७ वा - श्लोक ११ ते १५\nअध्याय ५७ वा - श्लोक ११ ते १५\nस्कंध ४ था - अध्याय ७ वा\nस्कंध ४ था - अध्याय ७ वा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चोविसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चोविसावा\nअध्याय १ ला - श्लोक ५१ ते ५५\nअध्याय १ ला - श्लोक ५१ ते ५५\nसंग्रहांत आलेल्या शब्दांचे अर्थ\nसंग्रहांत आलेल्या शब्दांचे अर्थ\nपद - आई जगदंबा श्रीमंत\nपद - आई जगदंबा श्रीमंत\nपदे ५ ते ८\nपदे ५ ते ८\nपद - आम्ही चुकलों\nपद - आम्ही चुकलों\nतृतीयपरिच्छेद - मुलास पाळण्यांत घालणें\nतृतीयपरिच्छेद - मुलास पाळण्यांत घालणें\nसमासोक्ति अलंकार - लक्षण १९\nसमासोक्ति अलंकार - लक्षण १९\nआत्मसुख - अभंग १९१ ते २००\nआत्मसुख - अभंग १९१ ते २००\nअध्याय ३० वा - श्लोक ३६ ते ४०\nअध्याय ३० वा - श्लोक ३६ ते ४०\nअध्याय २२ वा - श्लोक २१ ते २५\nअध्याय २२ वा - श्लोक २१ ते २५\nअध्याय २७ वा - श्लोक ६ ते १०\nअध्याय २७ वा - श्लोक ६ ते १०\nआत्मसुख - अभंग २१ ते ३०\nआत्मसुख - अभंग २१ ते ३०\nबहीणभाऊ - रसपरिचय २\nबहीणभाऊ - रसपरिचय २\nश्री वेंकटेश्वर - पदे ११ ते २०\nश्री वेंकटेश्वर - पदे ११ ते २०\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ५ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ५ वा\nउपदेश - उपासकांस उपदेश\nउपदेश - उपासकांस उपदेश\nअध्याय ३ रा - श्लोक २१ ते २५\nअध्याय ३ रा - श्लोक २१ ते २५\nकोकीळामहात्म्य - अध्याय तेरावा\nकोकीळामहात्म्य - अध्याय तेरावा\nश्रीआनंद - अध्याय दहावा\nश्रीआनंद - अध्याय दहावा\nअध्याय १७ वा - श्लोक १ ते ३\nअध्याय १७ वा - श्लोक १ ते ३\nकोकीळामहात्म्य - अध्याय अठठाविसावा\nकोकीळामहात्म्य - अध्याय अठठाविसावा\nअध्याय १ ला - श्लोक ४८ ते ५०\nअध्याय १ ला - श्लोक ४८ ते ५०\nअध्याय ६० वा - श्लोक ४६ ते ५०\nअध्याय ६० वा - श्लोक ४६ ते ५०\nविराटपर्व - अध्याय सातवा\nविराटपर्व - अध्याय सातवा\nसाक्षात्कार - अध्याय दुसरा\nसाक्षात्कार - अध्याय दुसरा\nपरिशिष्ट पदे - पदे ३३ ते ३८\nपरिशिष्ट पदे - पदे ३३ ते ३८\nलघुभागवत - अध्याय ३ रा\nलघुभागवत - अध्याय ३ रा\nपरिशिष्ट पदे - पदे १ ते १०\nपरिशिष्ट पदे - पदे १ ते १०\nअध्याय ३ रा - श्लोक २६ ते २८\nअध्याय ३ रा - श्लोक २६ ते २८\nअभंग ४१ ते ५०\nअभंग ४१ ते ५०\nअभंग ४१ ते ५०\nअभंग ४१ ते ५०\nदशक तिसरा - सगुणपरीक्षा\nदशक तिसरा - सगुणपरीक्षा\nअध्याय ६८ वा - श्लोक ४६ ते ५४\nअध्याय ६८ वा - श्लोक ४६ ते ५४\nसाईसच्चरित - अध्याय १ ला\nसाईसच्चरित - अध्याय १ ला\nअध्याय ८ वा - श्लोक ४० ते ५२\nअध्याय ८ वा - श्लोक ४० ते ५२\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४४ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४४ वा\nगर्भिणी स्त्रीचे धर्म सांगतो\nगर्भिणी स्त्रीचे धर्म सांगतो\nगज्जलाञ्जलि - किति मैल अन्तर राहिलें अप...\nगज्जलाञ्जलि - किति मैल अन्तर राहिलें अप...\nश्रीमांगीशमहात्म्य - अध्याय नववा\nश्रीमांगीशमहात्म्य - अध्याय नववा\nअध्याय ४७ वा - श्लोक १६ ते २०\nअध्याय ४७ वा - श्लोक १६ ते २०\nपितापुत्र अथवा भाउ भाउ एकाच नक्षत्रावर जन्मले असता त्याचे काय परिणाम होतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2019/12/blog-post_13.html", "date_download": "2022-10-07T22:17:44Z", "digest": "sha1:YMP2NL52Y5Q73SY7GSW3WLVGEFRYDFZB", "length": 11461, "nlines": 215, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "१३ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०१९ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\n१३ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०१९\nस्त्रियांना विक्रीकलेचे साधन आणि स्त्री-शरीराला वस...\n२७ डिसेंबर २०१९ ते ०२ जानेवारी २०२०\nजामिया विद्यापीठातील पोलिसांची कारवाई की सूड\nहिटलरी छळ छावण्रांतून हिंदू राष्ट्राकडे\n‘जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड, जस्टीस हरिड इज जस्...\n‘इतिहास घराचा पत्ता असतो, तो विसरता कामा नये’ –डॉ....\nCAB नव्या दहशतीची चाहुल\nउर्दू साहित्यिक आणि विचारवंतांचा बेशरमपणा\nसबका साथ, एक का अपवाद\nकर्जदाराशी सहिष्णुतेची वर्तणूक : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनागरिकता संशोधन बिल : सहिष्णू भारताची प्रतिमा डागा...\nमुस्लिमांना देशविहीन करण्याच्या दिशेने भाजपाचे पहि...\n‘नागरिकत्व संशोधन विधेयक-२०१९’ लोकशाहीपुढील आव्हान\n२० डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१९\nभांडवलशाही साम्राज्य आणि स्त्रिया\nज्ञानाला हत्यार नव्हे तर विजेरी बनवा\nमहाराष्ट्रातील सत्तांतराचा देशावर परिणाम\n१३ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०१९\nव्यापार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमहाराष्ट्राने खोदली नवपेशवाईची कबर\nबीएचयूमधील वाद लोकशाहीसाठी घातक\n०६ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०१९\nवैध कमाई : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी प्रेषिततत्व अंगीकारायल...\nस्त्री समानतेचे प्रणेते प्रेषित मुहम्मद (सल्ल.)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/female-tiktoker-was-allegedly-harassed-and-assaulted-at-minar-e-pakistan-by-a-mob-mhkp-593540.html", "date_download": "2022-10-07T21:56:39Z", "digest": "sha1:5OAL24LN7ELPZ5K54VFNEEDUCILR2M5V", "length": 9443, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच जमावाचं राक्षसी कृत्य, महिला टिकटॉकरला हवेत फेकून फाडले कपडे, Shocking Video – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nपाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच जमावाचं राक्षसी कृत्य, महिला टिकटॉकरला हवेत फेकून फाडले कपडे, Shocking Video\nपाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच जमावाचं राक्षसी कृत्य, महिला टिकटॉकरला हवेत फेकून फाडले कपडे, Shocking Video\nतिनं सांगितलं, प्रचंड गर्दी होती आणि हे सर्व लोक आमच्याकडे येत होते. लोक मला धक्का देत होते आणि इतक्या जोरजोरात ओढत होते की त्यांनी माझे कपडेही फाडले (Female TikToker's Clothes Torn by Mob) .\nतिनं सांगितलं, प्रचंड गर्दी होती आणि हे सर्व लोक आमच्याकडे येत होते. लोक मला धक्का देत होते आणि इतक्या जोरजोरात ओढत होते की त्यांनी माझे कपडेही फाडले (Female TikToker's Clothes Torn by Mob) .\nरात्री गुपचूप भेटत होते GF-BF; ग्रामस्थांनी मिळून लव्ह स्टोरीचा केला The End\nVIDEO- मोठ्याने पिपाणी वाजवणाऱ्यांची वाजली पुंगी; आता तोंडानेही आवाज निघणार नाही\n वाघासोबत सेल्फी घ्यायला गेले तरुण आणि...; काय झाला शेवट पाहा VIDEO\n मृतदेहाच्या तपासणीसाठी शवगृहात गेले डॉक्टर; जे दिसलं ते पाहून हादरले\nलाहोर 18 ऑगस्ट : एका महिला टिकटॉकरनं असा आरोप केला आहे, की स्वातंत्र्यदिनीच काही लोकांनी तिला आणि तिच्या साथीदारांना मारहाण (Female TikToker Was Allegedly Harassed) केली आहे. लाहोर पोलिसांनी ग्रेटर इकबाल पार्क (Greater Iqbal Park) येथे झालेल्या या गोंधळाप्रकरणी शेकडो अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉननं वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, महिलेचं असं म्हणणं आहे, की ती आपल्या सहा साथीदारांसह स्वातंत्र्य दिनानिमित्त मिनार ए पाकिस्तानजवळ (Pakistan) एक व्हिडिओ बनवत होती. याचवेळी तब्बल 300 ते 400 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. VIDEO- यांच्यापेक्षा जनावरं बरी प्राणीसंग्रहालयात एकमेकांच्या जीवावर उठली माणसं तक्रारीत तिनं म्हटलं, की मी आणि माझ्या साथीदारांनी या लोकांपासून वाचण्याचा भरपूर प्रयत्न केला. स्थिती पाहून पार्कमधील सुरक्षा गार्डनं मीनार-ए-पाकिस्तानच्या आसपासच्या वाड्याचे गेट उघडले. पुढे तिनं सांगितलं, प्रचंड गर्दी होती आणि हे सर्व लोक आमच्याकडे येत होते. लोक मला धक्का देत होते आणि इतक्या जोरजोरात ओढत होते की त्यांनी माझी कपडेही फाडले (Female TikToker's Clothes Torn by Mob) . काही लोकांनी माझी मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र गर्दी खूप होती आणि हे लोक मला हवेत फेकत राहिले, असंही ती म्हणाली. VIDEO: हवेतच लष्काराच्या विमानानं घेतला पेट; कॅमेऱ्यात कैद झाला तो थरारक क्षण आपल्या तक्रारीत ही महिला पुढे म्हणाली, की तिच्या साथीदारांनाही मारहाण केली गेली. यादरम्यान तिचे कानातील झुमके आणि अंगठीही जबरदस्ती काढून घेण्यात आली. इतकंच नाही तर तिच्यासोबतच्या आणखी एका व्यक्तीकडील मोबाईल, ओळखपत्र आणि 15,000 रुपयेदेखील चोरी केले गेले. अज्ञातांनी आमच्यावर जीवघेणा हल्ला केला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात महिलेचे कपडे फाडणं, चोरी आणि दंगा यासारखे विविध गुन्हे दाखल केले आहेत. घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.economictimes.com/markets/share-market/demat-account-complete-two-factor-authentication-by-30-september-otherwise-the-account-will-be-closed/articleshow/94314883.cms", "date_download": "2022-10-07T22:55:52Z", "digest": "sha1:FNUSK6LTVD3G7MAFZ4SRN6KD4WISRQOX", "length": 5520, "nlines": 33, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nDemat account : डिमॅट खातेधारकांसाठी महत्वाची अपडेट, ३० सप्टेंबरपर्यंत 'हे' काम करणे अनिवार्य\ntwo factor authentication : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या किंवा ट्रेड करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी आहे. डिमॅट खातेधारकाने 30 सप्टेंबरपर्यंत टु फॅक्टर ऑथंटिकेशन ((2 Factor Authentication))करणे आवश्यक आहे. त्यानंतरच खातेधारकाला लॉग इन करता येणार आहे.\nमुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या किंवा ट्रेड करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी आहे. डिमॅट खातेधारकाने 30 सप्टेंबरपर्यंत टु फॅक्टर ऑथंटिकेशन ((2 Factor Authentication))करणे आवश्यक आहे. त्यानंतरच खातेधारकाला लॉग इन करता येणार आहे.\nनॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने हे परिपत्रक जारी केले आहे. आता डीमॅट खात्यात लॉग इन करण्यासाठी, प्रमाणीकरण घटक म्हणून बायोमेट्रिक प्रमाणीकरण करावे लागेल. बायोमेट्रिक प्रमाणीकरणामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनिंग, फेशियल आणि व्हॉइस रेकग्निशन समाविष्ट आहे. यासोबतच नॉलेज फॅक्टरचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. नॉलेज फॅक्टरमध्ये पासवर्ड, पिन किंवा कोणतेही पजेशन फॅक्टर समाविष्ट असतो. त्याची माहिती फक्त वापरकर्त्यासाठी उपलब्ध आहे.\n30 सप्टेंबर शेवटची तारीख\nएनएसईने 30 सप्टेंबर नंतर लॉग इन करण्यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) यांनी या संदर्भात सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या 2018 च्या परिपत्रकाचा हवाला दिला आहे.\nडिमॅट खात्यांची संख्या वाढली\nकोरोना महामारीनंतरच्या देशात शेअर बाजारातील गुंतवणूक सातत्याने वाढत आहे.विशेषत: तरुण वर्ग त्यात मोठ्या प्रमाणात रस घेत आहे. देशात डिमॅट खात्यांची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली आहे. हे लक्षात घेऊन एनएसईने हा नियम आणला आहे.\nMultibagger Stock : फक्त 2 वर्षात एका लाखाचे झाले 20 लाख; 'या' शेअरने दिला बक्कळ परतावामहत्तवाचा लेख", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.phoneky.com/android-games/?id=n1n11344", "date_download": "2022-10-07T21:40:40Z", "digest": "sha1:ZVZPOHZSHVOVPG5OZH64VHNRMP3N4GGO", "length": 10006, "nlines": 256, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Yu-Gi-Oh! GX Duel Academy Android खेळ APK - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली रेसिंग\nरेटिंग आणि पुनरावलोकने (6)\n100%रेटिंग मूल्य. या गेमवर लिहिलेल्या 6 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2022 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Yu-Gi-Oh GX Duel Academy गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक GX Duel Academy गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\nहे गेम स्थापित केल्यानंतर डाउनलोड करण्यासाठी अतिरिक्त डेटाची आवश्यकता आहे\nहा खेळ जुन्या रेट्रो एनईएस, एसएएन, जीबीए, एन 64 किंवा पीएसएक्स रॉम आहे जो आपण आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसवर चालवू शकता / चालवू शकता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-mp-sanjay-raut-remanded-in-judicial-custody-till-august-22-latest-update-patra-chawl-scam-rmm-97-3061655/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-07T23:07:47Z", "digest": "sha1:PIFNUMYK36I62SPOFEW6UUISQ267UPHG", "length": 21152, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Money Laundering Case: Patra Chawl Land Scam: Sanjay Raut Judicial Custody till 22 August 2022 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\nPatra Chawl Land Case: संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी\nSanjay Raut Judicial Custody till 22 August 2022 : शिवसेना खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nसंजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी\nMoney Laundering Case: शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना आज पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मागील काही दिवसांपासून ते ईडी (सक्तवसुली संचालनालय) कोठडीत होते. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली होती.\nपीएमएलए कायद्यानुसार, संजय राऊत यांना आज पुन्हा ईडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडीत पाठवलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण न्यायालयाने संजय राऊत यांना काहीसा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपासून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे २२ ऑगस्टनंतर संजय राऊत यांना जामीन मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.\n“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला\nShinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\n“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप\nआजपासून संजय राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे. संजय राऊत ईडी कोठडीत असताना त्यांना काही सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव राऊतांना त्याच प्रकारच्या सुविधा कारागृहात पुरवल्या जाव्यात, अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलांनी केली आहे. घरचं जेवणं, औषधं आणि हवेशीर खोली मिळावी, अशी मागणी राऊतांच्या वकिलांनी केली. त्यावर न्यायालयाने याबाबत आर्थर रोड तुरुंग प्रशासनाशी बोलण्यास सांगितल्याचे समजते.\nहेही वाचा- ईडी चौकशीत संजय राऊतांशी भेट झाली का पत्रकारांच्या प्रश्नावर वर्षा राऊत म्हणाल्या…\nखासदार संजय राऊत यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना कोणत्या बॅरेकमध्ये ठेवण्यात येणार याची माहिती देण्यास तुरुंग अधिकाऱ्यांनी नकार दिला. दरम्यान, सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करून त्यांना स्वतंत्रपणे तुरुंगात ठेवण्यात येईल. राऊत यांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. मात्र त्यांना आमदार नवाब मलिक किंवा अनिल देशमुख यांच्यासोबत ठेवण्यात येणार नाही. देशमुख हे आधीपासून पीएमएलए प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात आहेत, असे सूत्रांनी सांगितले.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nअमरावती जिल्‍ह्यात मुसळधार; वरूड तालुक्‍यात पूरस्थिती; बारा तासांत ९२ मिमी पाऊस\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मेधाली, वैभवला सुवर्ण\nप्रो कबड्डी लीग : दबंग दिल्लीसमोर यू मुम्बाची हाराकिरी\nराष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा -विनोद तोमर\nभारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा\nकाँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका\nधनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण\nमध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०८ ऑक्टोबर २०२२\nपुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\nLow Uric Acid: यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होणे देखील ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ ५ गंभीर आजार\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\nपावसामुळे भातपीक कापणी लांबणीवर पडणार; पावसाचा जोर वाढल्यास पिकाला धोका, शेतकरी चिंतेत\nशिवसेना आणि काँग्रेसशी युतीसाठी प्रकाश आंबेडकर तयार\nकास महोत्सवाकडे पर्यटकांची पाठ\nदोन वर्षांपासून सरकार पाडण्याची तयारी सुरू होती म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…\nबडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारचा कारभार…”\nसातारा : मी माझा इतका प्रचार करत नाही, तितका ‘ते’ माझा प्रचार करतात, उदयनराजे कोणाबद्दल म्हणाले\nमिलिंद एकबोटेंचा राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप, म्हणाले “कत्तलखान्यातून दहशतवाद्यांना…”\n“पण एकनाथ शिंदेंच्या काय मनात आलं अन् एकदम…” ‘५० खोके एकदम ओके’ म्हणत अजित पवारांची तुफान टोलेबाजी\n“आगामी निवडणुकीत मुंबईतील २४ हजार कष्टकरी…”, गुणरत्न सदावर्तेंची मुंबईत मोठी घोषणा\nMumbai Crime : मैत्रिणींच्या मदतीने पत्नीने पतीच्या प्रेयसीला संपवले, मृतदेहाची विल्हेवाट लावतानाचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद\nपावसामुळे भातपीक कापणी लांबणीवर पडणार; पावसाचा जोर वाढल्यास पिकाला धोका, शेतकरी चिंतेत\nशिवसेना आणि काँग्रेसशी युतीसाठी प्रकाश आंबेडकर तयार\nकास महोत्सवाकडे पर्यटकांची पाठ\nदोन वर्षांपासून सरकार पाडण्याची तयारी सुरू होती म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…\nबडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारचा कारभार…”\nसातारा : मी माझा इतका प्रचार करत नाही, तितका ‘ते’ माझा प्रचार करतात, उदयनराजे कोणाबद्दल म्हणाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82/word", "date_download": "2022-10-07T21:58:56Z", "digest": "sha1:ZMOYYJD2ZRPLPGJJUPOCCKUUWZLL4WYT", "length": 11646, "nlines": 163, "source_domain": "www.transliteral.org", "title": "झोला बसणें - Dictionary Definition - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमहाराष्ट्र शब्दकोश | mr mr | |\nगोता बसणें ; नुकसाण होणें .]\nबसणें आ पसरून बसणें गोकटीस बसणें खुरमुंडीस येणें, खुरमुंडी घालून बसणें झोला बसणें गळा बसणें नरडीस बसणें थेटून बसणें अंगाला बसणें पिच्छयास बसणें खळ्या खांदीत बसणें अंडावर अंड घालून बसणें सांधा बसणें मोचा बसणें अंडाचें निवणें करुन बसणें रांडसांधीस बसणें मेट बसणें बसोटी बसणें डोकें खुपसून बसणें हातचे घालविणें, निराश बसणें डोळ्यांत वात घालून बसणें अंडाचें निवणें नि चोटाची फडा करुन बसणें न्होकुन बसणें पटाला बसणें कानांत तुळशी (पत्र) घालून बसणें भक्ति बसणें अंतःकरणांत घर करुन बसणें पायाशीं पाय बांधून बसणें माशा मारीत बसणें अंबारींत बसणें घसा बसणें कमर बसणें उपासीतापासी बसणें घरीं बसणें कानपूर ओस करून बसणें ज्ञानमठांत बसणें गांडींत शेंपूट घालून बसणें मांडीस मांडी टेंकून बसणें तोंडाला शिवण बसणें नगद होऊन बसणें घरी बसणें विद्वान् माणसाला, व्यवहारदक्षतेनें झोला दिला तांबड्‌या घोड्यावर बसणें हरि हरि म्हणत बसणें भरल्या बंदाखालीं बसणें खपाटा बसणें मुरमुसून बसणें कपाळाला हात लावून बसणें मांडी टेंकून बसणें एका नावेत बसणें\nदोहावली - भाग १६\nदोहावली - भाग १६\nमाधव जूलियन - डोला बाऊ, डोला \nमाधव जूलियन - डोला बाऊ, डोला \nगर्भिणी स्त्रीचे धर्म सांगतो\nगर्भिणी स्त्रीचे धर्म सांगतो\nजीवनबाग - प्रभु माझी जीवनबाग सजव\nजीवनबाग - प्रभु माझी जीवनबाग सजव\nतारकांचें गाणें - कुणि नाहीं ग, कुणि नाहीं ...\nतारकांचें गाणें - कुणि नाहीं ग, कुणि नाहीं ...\nधर्मसिंधु - गर्भिणी स्त्री धर्म\nधर्मसिंधु - गर्भिणी स्त्री धर्म\nकबीर के दोहे - बंदे क्यों भूलाजी क्यौं भ...\nकबीर के दोहे - बंदे क्यों भूलाजी क्यौं भ...\nबोधपर अभंग - ५२२१ ते ५२३०\nबोधपर अभंग - ५२२१ ते ५२३०\nअध्यात्मपर पदे - भाग २\nअध्यात्मपर पदे - भाग २\nभारूड - चल चल चल याद करो गुरु ग...\nभारूड - चल चल चल याद करो गुरु ग...\nलावणी ३७ वी - हे सुवर्णचंपके सखे, तुजला...\nलावणी ३७ वी - हे सुवर्णचंपके सखे, तुजला...\nमूत्रवहस्त्रोतस् - मूत्रनिग्रहज उदावर्त\nमूत्रवहस्त्रोतस् - मूत्रनिग्रहज उदावर्त\nअध्याय बारावा - समास तिसरा\nअध्याय बारावा - समास तिसरा\nराम गणेश गडकरी - घरांत बसलेल्या काजव्यास--...\nराम गणेश गडकरी - घरांत बसलेल्या काजव्यास--...\nजनांस शिक्षा अभंग - ५९४१ ते ५९५०\nजनांस शिक्षा अभंग - ५९४१ ते ५९५०\nप्राणवहस्त्रोतस् - व्यायाम शोष\nप्राणवहस्त्रोतस् - व्यायाम शोष\nस्कंध १ ला - अध्याय ६ वा\nस्कंध १ ला - अध्याय ६ वा\nप्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ७\nप्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ७\nरक्तवहस्त्रोतस् - किलास कुष्ठ\nरक्तवहस्त्रोतस् - किलास कुष्ठ\nश्रीमदाद्यशंकराचार्य - चरित्र ३\nश्रीमदाद्यशंकराचार्य - चरित्र ३\nप्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २८ वे\nप्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २८ वे\nचिद्बोधरामायण - द्वितीय सर्ग\nचिद्बोधरामायण - द्वितीय सर्ग\nशिवभारत - अध्याय दहावा\nशिवभारत - अध्याय दहावा\nतृतीय परिच्छेद - कृतघटस्फोटाचा संग्रहविधि\nतृतीय परिच्छेद - कृतघटस्फोटाचा संग्रहविधि\nश्रीनरहरी सोनार चरित्र २\nश्रीनरहरी सोनार चरित्र २\nएकनाथी भागवत - श्लोक ७० वा\nएकनाथी भागवत - श्लोक ७० वा\nअष्टावक्र गीता - अध्याय १३\nअष्टावक्र गीता - अध्याय १३\nश्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १६ वा\nश्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १६ वा\nसारस्वत चम्पू - सर्ग ६\nसारस्वत चम्पू - सर्ग ६\nयशवंतराय महाकाव्य - सर्ग बाविसावा\nयशवंतराय महाकाव्य - सर्ग बाविसावा\nदेवाच्या दानपेटीत पैसे का टाकतात आणि देवाला नैवेद्य का दाखवतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/crime/mumbai-crime/australian-court-order-to-indian-origin-man-to-pay-former-wife-rs-32-lakh-upheld-au136-782875.html", "date_download": "2022-10-07T21:17:27Z", "digest": "sha1:5EV6C5NOAVJEBW3DBMBVX3PSN37FC2IW", "length": 14214, "nlines": 190, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nMumbai : पत्नीला 32 लाख रुपये देण्याचे पतीला आदेश ऑस्ट्रेलियन कोर्टाचा निर्णय मुंबई कोर्टानं कायम ठेवला, नेमकं प्रकरण काय\n1991 साली पीडित महिलेचं लग्न झालं होतं. त्यानंतर ही महिला पत्नीसोबत 1994 साली यूएसमध्ये राहायला गेली होती. दरम्यानच्या काळात या दाम्पत्याला ऑस्ट्रेलियाचा कायमस्वरुपीच नागरिकत्व विझा मिळाला होता.\nपीएफआय प्रकरणातील संशयित आरोपींच्या कोठडीत वाढ\nमुंबई : घटस्फोटाच्या (Divorce case) एका खटल्यात कौंटुबिक न्यायालयाने पतीला दणका दिला आहे. पतीला 32 लाख रुपये दंड पत्नीला देण्याचे आदेश देण्यात आले आहे. या घटस्फोट प्रकरणाची सुरुवात खरंतर ऑस्ट्रेलियातून झाली होती. मूळचं भारतीय असलेलं दाम्पत्य ऑस्ट्रेलियात जाऊन तिथे सेटल झालं. त्यानंतर तिथलं नागरिकत्वही या दाम्पत्याला मिळालं होतं. सुरुवातीला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप पत्नीनं पतीवर केला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या आरोपांवर ऑस्ट्रेलियातील कोर्टात (Australian Court) खटलाही चालला. या खटल्यात ऑस्ट्रेलियन कोर्टाने दिलेला निर्णय मानण्यास पतीने नकार दिला होता. त्यानंतर अखेर पीडित पत्नीला भारतीय न्यायालयाचं दार ठोठावण्यास भाग पाडण्यात आलं. अखेर मुंबईतील (Mumbai Civil Court) कौटुंबिक न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार आता पीडित पत्नीला 32 लाख रुपये दंड देण्याचे आदेश पतीला देण्यात आले आहेत. त्यानुसार आता 55 वर्षीय पतीला निर्देश देण्यात आले असून तसं न केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असंही कोर्टाने म्हटलंय.\nनेमकं प्रकरण काय आहे\n17 वर्षांपूर्वी पीडित पत्नीनं आपल्या पतीविरोधात कोर्टाची पायरी चढली. त्यानंतर कोर्टात युक्तिवाद सुरु होता. 17 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयानं पतीला फटकारलंय. शिवाय पत्नीला भरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत. 2009 साली पीडित पत्नी भारतातील कोर्टात दाद मागण्यासाठी आली होती. ऑस्ट्रेलियातील कोर्टात 2007 साली पीडित पत्नीची याचिका ऐकल्यानंतर कोर्टाने 32 लाख रुपये भरपाई आणि सोन्याचे दागिने देण्याचे आदेश देण्यात आले होते. पण पतीने हे आदेश आपल्याला लागू होत नाही, आपण भारतीय कायद्यानुसार विवाह केला आहे, असा युक्तिवाद करत ऑस्ट्रेलियातील कोर्टाचे आदेश फेटाळून लावले होते. तसंच पत्नीने केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत, असाही दावा केला होता.\nत्यानंतर मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात हे प्रकरण सुरु होतं. या प्रकरणी अखेर कोर्टाने पतीला दणका दिलाय. पीडित पत्नीने पत्नीवर सनसनाटी आरोप केले होते. पती आपल्याला मारहाण करत छळ करतो, असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आपल्याला पतीपासून वेगळं राहायचं असून पतीच्या संपत्तीचा 70 टक्के वाटा आणि मुलांचा ताबा मिळावा, यासाठी पीडित पत्नीनं कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल अखेर पीडित पत्नीच्या बाजूने लागलाय.\nVinayak Mete Accident : धक्कादायक, वाहनांना हात केला, रस्त्यावर झोपलो, 100 नंबर फिरवला, पण तासभर मदत मिळालीच नाही; विनायक मेटे यांच्या चालकाचा आरोप\nRakesh Jhunjhunwala : प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं मुंबईत निधन, ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nVinayak Mete : ज्या कारमधून विनायक मेटे मुंबईला येत होते, ती Ford Endeavour कार किती सुरक्षित\n1991 साली पीडित महिलेचं लग्न झालं होतं. त्यानंतर ही महिला पत्नीसोबत 1994 साली यूएसमध्ये राहायला गेली होती. दरम्यानच्या काळात या दाम्पत्याला ऑस्ट्रेलियाचा कायमस्वरुपीच नागरिकत्व विझा मिळाला होता. या दाम्पत्याला 1995 आणि 2004 साली मूलही झालं. दोन मुलं असलेल्या या दाम्पत्यामध्ये 2005 सालापासून खटके उडू लागले. पती पत्नीला मारहाण करु लागला होता. पत्नी अखेर पतीपासून वेगळी राहू लागली. 2006 साली या महिलेने ऑस्ट्रेलियाच्या कोर्टात पतीविरोधात खटला दाखल केला होता. या खटल्याचा निकाल पत्नीच्या बाजूने लागला. पण पतीने आपल्या पत्नीवर पुन्हा गंभीर आरोप केले. खोटे आरोप आणि फसवणूक करुन पत्नीने या खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लावला असल्याचा दावा केला होता. पण हा दावा भारतीय न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही. अखेर कोर्टाने ऑस्ट्रेलियातील कोर्टाने पतीला ठोठावलेला दंड कायम ठेवत पत्नीला दिलासा दिलाय.\nटू पीसमध्ये इलियाना डिक्रूझची हवा हवाई\n‘संस्कारी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीचे संस्कारी रूप\nनोरा फतेहीची रिवीलिंग जादू पाहिली का\nमौनी रॉयचा केसरिया रंग…. फोटोशूटसाठी पहा काय केलं\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9/", "date_download": "2022-10-07T22:36:48Z", "digest": "sha1:ZN6CDVTS2CPMBQJPYCFKK5NVNALP4FY7", "length": 11299, "nlines": 87, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "अंडी खरीदी करताना ताजे आहेत की शिळे कसे ओळखाल? पहा सर्वात सोपी आणि घरगुती ट्रिक - Themaharashtrian", "raw_content": "\nअंडी खरीदी करताना ताजे आहेत की शिळे कसे ओळखाल पहा सर्वात सोपी आणि घरगुती ट्रिक\nअंडी खरीदी करताना ताजे आहेत की शिळे कसे ओळखाल पहा सर्वात सोपी आणि घरगुती ट्रिक\nदेशात आणि जगात सध्या को-रोना म-हामा-रीमुळे थै-मान घातलेले आहे. अनेक रुग्णालयात अ-संख्य रु-ग्ण भरती झाले आहेत. त्यामुळे प्रशासनावर याचा ताण देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रशासनाला रु-ग्णाला उपचार सेवेसोबतच सकस आहार देखील द्यावा लागतो.\nया रु-ग्णांमध्ये तातडीने प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये रु-ग्णांना अंडी देण्यात येत आहेत. दोन वेळेस तरी ही अंडी देण्यात येत आहेत. अंड्याचे सेवन केल्याने रु-ग्णाची प्रतिकारशक्ती ही मोठ्या प्रमाणात वाढते आणि को-रोना म-हामा-री वर मात करू शकतात. त्यामुळे अंड्याचे महत्त्व सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे.\nतसेच आपण फार पूर्वीपासून देखील संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, ही जाहिरात आपण ऐकली असेल. त्यामुळे अंड्याचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढतच आहे. अंडे खाल्ल्याने आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. अंड्यामध्ये सर्व प्रकारचे विटामिन भरलेली असतात. अंड्यामध्ये b12 सोबतच इतर पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात.\nत्यामुळे डॉक्टर देखील अंडीचे सेवन करण्याचा सल्ला देतात. ज्या लोकांना अंडी खाणे जमत नाही, असे लोक हे औषध गोळ्या घेऊन आपल्या शरीरातील झीज भरून काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नैसर्गिक फळे खाणे हे कधीही चांगले. त्यामुळे नैसर्गिक फळांचे सेवन केले पाहिजे. यासोबतच अंडी खाऊ शकतात.\nमात्र, बाजारामध्ये आजकाल मोठ्या प्रमाणात भेसळ होऊ लागली आहे. काही महिन्यापूर्वीच आपण प्ला-स्टिक अंडे येत असल्याच्या बातम्या वाचल्या असतील. मात्र, बाजारामध्ये भ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता.अनेकदा बाजारामध्ये ताजी अंडी कोणती आणि शिळी कोणती हे ओळखता येत नाही. अनेक लोक हे एक डझन अंडे एकदाच घेऊन जातात.\nमात्र, ही अंडी फ्रीजमध्ये नाही ठेवली तर ती खराब होऊन जातात. त्यामुळे एकाच वेळेस अंडी घेऊन आपण जात असाल तर जरा सावधान. अंडी पाहून खरेदी करावी. आपल्याला शिळे अंडी कोणती आणि ताजी कोणती हे ओळखता येत नाही. मात्र, नुकताच माय गो इंडिया या ट्विटर अकाउंटने एक व्हिडिओ शेअर केला आहे.\nया व्हिडिओमध्ये ताजी अंडी कुठली आणि शिळे अंडी कुठली हे ओळखण्याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. तर आपल्याला ताजी अंडी ओळखायची असल्यास आपण एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्यावे. त्यामध्ये अंडे सोडावे हे अंडे आडवे आणि तळाशी राहिले तर हे अंडे ताजे समजावे. मात्र, अंडे हे वर तरंगत राहिले तर हे अंडे शिळे आहे, असे समजावे. अशाप्रकारे आपण ताजी अंडी आणि शिळे अंडी यामधला फरक ओळखू शकतात.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%B5-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2022-10-07T22:10:03Z", "digest": "sha1:NRFLMKWTD366YJWTIN55MKSEJWMT5A5G", "length": 13446, "nlines": 95, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "त्वचेवर खाज, खरूज व लाल पुरळ वारंवार येत असल्यास करा 'हे' घरगुती उपाय, पहा 3 रा उपाय सर्वांसाठी सोईस्कर... - Themaharashtrian", "raw_content": "\nत्वचेवर खाज, खरूज व लाल पुरळ वारंवार येत असल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय, पहा 3 रा उपाय सर्वांसाठी सोईस्कर…\nत्वचेवर खाज, खरूज व लाल पुरळ वारंवार येत असल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय, पहा 3 रा उपाय सर्वांसाठी सोईस्कर…\nपावसाळा या ऋतूचा पहिला आणि सर्वात वाईट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. वास्तविक, आपली त्वचा पावसाळ्याच्या वेळी योग्य आर्द्रता शोषण्यास सक्षम नसते, ज्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, डाग पडणे, लाल पुरळ येणे आणि मुरुम इत्यादी उद्भवतात. अशा परिस्थितीत या स मस्या बऱ्याचदा पीडिताचे रूप धारण करून पीडिताला त्रा स देतात.\nत्वचेवर खाज सुटल्यामुळे बर्‍याच लोकांना पेच स हन करावा लागतो. याशिवाय बर्‍याचदा खाज सुटण्यामुळे त्व चेवर लाल पुरळ येते, ज्यामुळे खूप वे दना होतात. बहुतेकदा या लाल दाण्यांवर स्क्रॅचिंग म्हणजेच खाजवले असता त्यातून र क्त बाहेर पडते. परंतु आज आम्ही तुम्हाला खाज या स मस्येपासून सुटण्याचे निश्चित औषध सांगणार आहोत, जे तुमच्यासाठी रामबाण औषध असल्याचे सिद्ध ठरेल. वास्तविक आयुर्वेदात अशी अनेक औषधे आहेत जी आपल्याला खाज, खूजली आणि मुरुमांपासून मुक्त करते.\nखाज सुटणे ही समस्या एक अत्यंत ती व्र त्व चारो गाची लक्षण आहे. जर वेळेवर उपचार केले गेले नाहीत तर या स मस्येची मुले त्व चेवर आतपर्यंत रुजतात. अशा परिस्थितीत बरेच लोक खुजलीपासून मुक्त होण्यासाठी अँटी फंगल क्रिम वापरतात परंतु तरीही ते पूर्णपणे कायमचे बरे होऊ शकत नाहीत. या लेखात, आपण खरुजसाठी योग्य औषधाबद्दल, म्हणजेच खरुजवर घरगुती उपचारांबद्दल जाणून घेणार आहोत.\nखाज सुटण्याची प्रमुख कारणे :-\nत्व चेवर अधिक प्र माणापेक्षा जास्त साबण वापरल्यास त्व चेवर पांढरट थर तयार होऊन खाज येऊ लागते. चुना किंवा सोडा सारख्या र सायनांच्या संपर्कात आल्यास देखील त्व चेवर खाज येते. घट्ट कपडे घालण्याचे कारण देखील खाज येण्यास पुरुसे असते.\nखाज खूजली पासून कायमची मुक्तता होण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय –\n1) पिंपळाची साल :- पिंपळाची साल ही खाज खूजली पासून सुटण्याकरिता रामबाण उपाय आहे. यासाठी पिंपळाची साल देसी तूपात मिसळा आणि खाजलेल्या जागेवर लावा. असे केल्याने तुम्हाला लवकरात लवकर खाज सुटण्यापासून आराम मिळेल. याशिवाय आपण सकाळ आणि संध्याकाळी पिंपळाच्या सालीचा काढा देखील पिऊ शकता.\n2) निंबू :- निंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल आणि बरेच आवश्यक पोषक घटक वजन कमी करण्यास तसेच सुटणारी खाज कमी होण्यास उपयुक्त ठरतात. यासाठी केळीचा गुद्धा लिंबाच्या रसामध्ये मिसळा आणि खाजलेल्या जागेवर लावा. यामुळे तुम्हाला खाज सुटण्यापासून आराम मिळेल. याशिवाय चमेलीच्या तेलात लिंबाचा रस मिसळून शरीरावर मालिश केल्यास कोरडी खाज दूर होते.\n3) नारळ :- खाज खूजलीच्या स मस्ये पासून सुटण्यासाठी नारळ तेलाचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो. यासाठी नारळ तेलात लिंबाचा रस मिसळा आणि खाज सुटलेल्या भागावर मालिश करा. आपण निंबाचा रस असाच शोषून घेऊन सुद्धा खाज खूजली पासून मुक्त होऊ शकता. तसेच, 10 मिली लिंबाचा रस 20 मिली नारळाच्या तेलात मिसळून लावल्यास खाज खूजली कमी होते.\n4) कापूर :- तुम्ही पूजा घरात कापूर वापरत असालच, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कापूरचा वापर खाज खूजली पासून मुक्तता मिळवण्याकरिता देखील उपयुक्त ठरतो. विशेषत: आपल्या त्व चेच्या समस्येवर देखील कापूर गुणकारी उपचार म्हणून काम करतो. कापूर चमेली तेलात मिसळा आणि त्या मिश्रणाने शरीरावर मालिश केल्यास खाज खूजली पासून मुक्तता मिळते.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\nOne thought on “त्वचेवर खाज, खरूज व लाल पुरळ वारंवार येत असल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय, पहा 3 रा उपाय सर्वांसाठी सोईस्कर…”\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/sanjay-raut-ed-custody-mla-ashish-shelar-supports-action-against-sanjay-rauta-criticizes-shiv-sena-au36-772822.html", "date_download": "2022-10-07T22:08:21Z", "digest": "sha1:3GYUHFH4WXGIMIMEJ2PJKENUDPPY4ECE", "length": 12570, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nSanjay Raut ED Custody : ‘सूड नाही तर सडेतोड चौकशी सुरु, उद्धवजी तुम्ही भ्रष्टाचार लपवू नका’, आशिष शेलारांचा हल्लाबोल\nसुड नाही तर सडेतोड चौकशी सुरु आहे. उद्धवजी तुम्ही भ्रष्टाचार (Corruption) लपवू नका. गमछे फिरवण्याचा निर्लज्जपणा बंद करा. सामान्य मराठी मुंबईकरांच्या स्वप्नांचा चुराडा तुम्ही करता, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवलाय.\nसंजय राऊत, आशिष शेलार\nराहुल झोरी | Edited By: सागर जोशी\nमुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर ईडीनं अटक केलीय. सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी (ED Custody) सुनावण्यात आली आहे. राऊतांवरील कारवाईनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय. तसंच भाजपवरही जोरदार टीका करण्यात येतेय. त्या टीकेला भाजप नेतेही प्रत्युत्तर देत आहेत. सुड नाही तर सडेतोड चौकशी सुरु आहे. उद्धवजी तुम्ही भ्रष्टाचार (Corruption) लपवू नका. गमछे फिरवण्याचा निर्लज्जपणा बंद करा. सामान्य मराठी मुंबईकरांच्या स्वप्नांचा चुराडा तुम्ही करता, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवलाय.\nआशिष शेलार म्हणाले की, या सगळ्या भ्रष्टाचारातून माहिमला फ्लॅट, जमिनी, दादरला घर, सरकारी जागेचा अपव्यय सुरु आहे. अनधिकृतरित्या तिसऱ्या माणसाचा अधिकार उभा केला. 650 मराठी माणसांना बेघर केलं. 1 हजार कोटी रुपयांचा अपहार केला. राज्यपालांच्या विरोधात आम्ही सर्वात आधी विरोधात भूमिका घेतली होती. मराठी माणसांच्या इमारती धोकादायक, चाळीत मराठी माणसांना त्रास देण्याचं काम तुमच्या शिवसेनेनं केलं. त्यांना घराबाहेर काढायचं काम तुम्ही केलं. आज मी सगळं काही सांगणार नाही. माझ्या 9 आरोपांना उद्धव ठाकरे यांनी किंवा शिवसेनेतील कुणीही उत्तर द्यावं. त्यावर मी नंतर बोलेन, असं थेट आव्हानच आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दिलंय.\nआमदार श्री. आशीष शेलार यांची पत्रकार परिषद. https://t.co/UbJguC0hkp\nदिवस फिरले तर… उद्धव ठाकरेंचा इशारा\nउद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपचा वंश कुठून सुरू होतो हे पाहावे लागेल. दिवस सारखे राहत नाहीत. दिवस येतात आणि जातात. काळ सारखाच राहत नाही. नंतर जे लोक येतील ते तुमच्यासारखेच वागले तर काय होईल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. प्रादेशिक अस्मिता संपवून टाकायची, हिंदूत फूट पाडायची आणि स्थानिक अस्मिता चिरडून टाकायची, राजकारणाच्या तुंबड्या भरायच्या हे भाजपचं कारस्थान असल्याचा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.\n‘भाजपसोबत लढणारा कोणताच राजकीय पक्ष आज शिल्लक नाही’\nदेशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपच राहणार, असं वक्तव्य भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर नड्डा यांचं हे वक्तव्य आल्यानं राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. अशावेळी आज शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नड्डांना थेट उत्तर दिलंय. ‘भाजपसोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष शिल्लक नाही. कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले. जे संपले नाहीत ते संपतील. फक्त आपणच टिकणार हे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहेत. महाराष्ट्रात शिवसेना संपणार म्हणतात, पण हे त्यांनी करूनच पाहावं, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलंय.\nटू पीसमध्ये इलियाना डिक्रूझची हवा हवाई\n‘संस्कारी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीचे संस्कारी रूप\nनोरा फतेहीची रिवीलिंग जादू पाहिली का\nमौनी रॉयचा केसरिया रंग…. फोटोशूटसाठी पहा काय केलं\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/why-do-beloved-ganesha-immerse/", "date_download": "2022-10-07T22:33:07Z", "digest": "sha1:RM5GUHZWDYQJ4WULLT2ZANIEBPBJHB52", "length": 8235, "nlines": 42, "source_domain": "mahaupdate.in", "title": "लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन का करतात, जाणून घ्या एका क्लिकवर - Maha Update", "raw_content": "\nHome » लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन का करतात, जाणून घ्या एका क्लिकवर\nलाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन का करतात, जाणून घ्या एका क्लिकवर\nदेशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जात आहे, 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण सर्वांनी विघ्नहर्ता बाप्पाचे घरोघरी स्वागत केले आणि आज म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी बाप्पा आपल्या दु:खाला हरवून आपल्या घरातून निघून जाणार आहेत.\nजर विसर्जनाच्या शुभ मुहूर्ताबद्दल बोलायचे झाले तर, आज श्रीगणेशाच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ६.०३ वाजल्यापासून सुरू झाला आहे, जो संध्याकाळी ६.०७ पर्यंत राहील. तर रवि योग सकाळी 6:03 ते 11:35 पर्यंत आहे, तर सुकर्म योग सकाळी 6:12 ते सायंकाळी 6.12 पर्यंत आहे. दरवर्षी अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते.\nअनेक ठिकाणी गणपती विसर्जन दीड ते पाच दिवस झाले तरी चालते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की गणपती फक्त 10 दिवस का बसतात गणेश विसर्जन का केले जाते गणेश विसर्जन का केले जाते आजच्या तुम्हाला गणेश चतुर्थीपासून 10 दिवसांनी गणेश विसर्जन करण्यामागील खास कारणे सांगणार आहोत.\nगणेश विसर्जन 2022 का केले जाते ते जाणून घ्या\nगणेश विसर्जनामागील कारण महाभारताशी संबंधित आहे हे तुम्हाला माहीत आहे का, पौराणिक कथेनुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीला भगवान गणेशाचा जन्म झाला होता. या दिवसापासून महाभारताचे लेखन सुरू झाले, आता ते कसे शक्य आहे याचा विचार तुम्ही करत असाल. तुम्हा सर्वांना माहित असेलच की महाभारत ऋषी वेद व्यासांनी बोलले होते आणि ते भगवान गणेशाने लिहिले होते.\nगणेश विसर्जनाची कथाही त्याभोवती फिरते. वास्तविक, महर्षी वेद व्यासांनी भगवान गणेशाला महाभारत लिहिण्याची विनंती केली होती, महर्षी न थांबता महाभारत बोलतील हे लेखकाला कळणे अत्यंत आवश्यक होते आणि लेखकालाही लेखणी न थांबवता हे महायुद्ध सतत लिहावे लागते. लेखणी थांबली तर महर्षी पुढे बोलायचे थांबतील, असे सांगितल्यावर वेद व्यासजींनी भगवान गणेशाला सांगितले की, तू विद्वानांचा विद्वान, विद्येची देवता आहेस आणि मी साधा ऋषी आहे, श्लोक बोलण्यात काही चूक झाली असेल तर. मला, मग तुम्ही त्याला सांगू शकता. तुम्ही ते बरोबर लिहू शकता.\nगणेश उत्सव 2022 आज संपणार आहे\nभगवान गणेशाने महर्षी वेद व्यासांची प्रार्थना स्वीकारली आणि अशा प्रकारे महाभारत लिहिण्याचे काम सुरू झाले. पौराणिक कथांनुसार, हे लेखन कार्य सुमारे 10 दिवस चालले, त्यानंतर 11 व्या दिवशी महाभारत लिहिण्यात आले, त्याच आसनात बसल्यामुळे भगवानांचे शरीर सुन्न झाले. त्यांच्या अंगावर धूळ आणि माती साचली होती, त्यामुळे जवळच्या सरस्वती नदीत स्नान करून श्रीगणेशाने त्यांच्या अंगावरील धूळ आणि माती स्वच्छ केली. यामुळेच बाप्पाची 10 दिवस स्थापना केली जाते आणि त्यानंतर 11 व्या दिवशी अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.\nगणेशोत्सवाच्या या 10 दिवसांत लहान मुलाच्या आगमनाप्रमाणे सर्व घरांमध्ये जल्लोष असतो. असे मानले जाते की विघ्नहर्ता बाप्पा सर्व लोकांच्या जीवनातील सर्व अडथळे आणि दुःखांचा नाश करतात. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे जीवन आनंदाने भरलेले आहे.\n जाणून घ्या तिथी, पूजा पद्धती आणि महत्त्व\nNHAI ने १०५ तासांत बनवला इतक्या लांबीचा रस्ता, ज्याची गिनीज बुक मध्ये झाली नोंद\nTMKOC : गणपती उत्सवादरम्यान होणार नवीन तारक मेहताची एन्ट्री, शैलेश लोढा यांच्या जागी ‘आश्रम’ फेम सचिन श्रॉफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2022-10-07T21:59:18Z", "digest": "sha1:WSLC2I7N3P3JSIFCHO7Q62WEN4XLWQA5", "length": 6886, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निळ्या टोपीचा कस्तूर - विकिपीडिया", "raw_content": "\nनिळ्या टोपीचा कस्तूर हा पक्षी साधारण १७ सें. मी. आकाराचा आहे. यातील नर पाठीकडून गडद निळा आणि काळा, डोके व कंठ निळा, पोटाकडून तांबूस-पिंगट असा आहे. नर उडतांना त्याच्या पंखावर पांढरा पट्टा दिसतो. मादी पाठीकडून फिकट तपकिरी, पोटाकडून पांढुरकी आणि गर्द तपकिरी अशी आहे.\nपानगळीची आर्द्र जंगले, सदाहरित मध्यम आकाराची जंगले, कॉफीच्या लागवडीची क्षेत्रे आणि दाट बांबूच्या जंगलात राहणारा हा पक्षी हिवाळ्यात जवळजवळ संपूर्ण भारतभर तर उन्हाळ्यात काश्मीर, हिमालयातील १००० ते ३००० मी. उंचीपर्यंतच्या क्षेत्रात, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड, मेघालय या ठिकाणी आढळतो.\nजमिनीवर आणि झाडांवर आढळणारे विविध कीटक या पक्ष्याचे खाद्य आहे.\nनिळ्या टोपीचा कस्तूर या पक्ष्याचा प्रजनन काळ साधारण एप्रिल ते जून असून झाडांच्या ढोलीत किंवा कडेकपारीत गवत आणि विविध पानांनी घरटे बनविले जाते. मादी एकावेळी ४ ते ६ गुलाबी-पांढऱ्या रंगाची त्यावर फिकट लाल-तांबड्या रेषा असलेली अंडी देते.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२२ रोजी २२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/tag/master-of-hindi-jobs/", "date_download": "2022-10-07T22:50:26Z", "digest": "sha1:OFYFET5DIGQ6FROO3QAYU4B6NTOLPPE7", "length": 6270, "nlines": 57, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "Master of Hindi Jobs - Bharti jahirat", "raw_content": "\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nNVS Recruitment | नवोदय विद्यालय समिती 1925 जागांसाठी भरती\nकर्मचारी राज्य विमा निगम तर्फे विविध पदांच्या एकूण 1925 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 12...\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/1065", "date_download": "2022-10-07T22:03:05Z", "digest": "sha1:CWUOAWGBRLGMFYN6IMD7KZWZTW4GGFDG", "length": 11483, "nlines": 107, "source_domain": "bollyreport.org", "title": "१२ लाख रुपयाचे गाठोडे घेऊन जाणाऱ्या त्या व्हायरल शेतकऱ्याबाबत नवीनच माहिती, जाणून घ्या ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome Other News १२ लाख रुपयाचे गाठोडे घेऊन जाणाऱ्या त्या व्हायरल शेतकऱ्याबाबत नवीनच माहिती, जाणून...\n१२ लाख रुपयाचे गाठोडे घेऊन जाणाऱ्या त्या व्हायरल शेतकऱ्याबाबत नवीनच माहिती, जाणून घ्या \nशेतकरी म्हटले की त्याचे काबाडकष्ट त्याची मेहनत या सर्व गोष्टी डोळ्यासमोर येतात. शेतात राबराब राबून सुद्धा शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव मिळत नाही या बातम्या सतत टीव्ही, वृत्तपत्र ,सोशल मिडीया माध्यमातून फिरत असतात. शेतकऱ्याला कधी दुष्काळाला सामोरे जावे लागते तर कधी अवेळी पावसाळ्याला. या सर्व अडचणीतून मात करत शेतकरी थोडेफार पैसे कमावतो.\nया शेतकर्‍यांमधून असाच एक शेतकरी नशीबवान निघाला. केवळ चार एकर जमिनीतून त्याने साडेबारा लाख रुपयांच्या कोथिंबिरीचे उत्पादन केले. सोशल मीडिया हे असे एक माध्यम आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट व्हायरल झाली की ती अशी प्रसिद्ध होते की एखादेवेळेस त्या प्रसिद्धीचे कौतुक वाटते तर कधीकधी त्या प्रसिद्धीचा म न स्ता प होतो. त्यामुळे एखादी गोष्ट व्हायरल होण्यापूर्वी लक्ष द्यावे.\nकाही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक शेतकरी डोक्यावर पैशांच्या नोटा असलेले गा ठो डे घेऊन उभा असलेला दिसतो. या फोटोखाली तो शेतकऱ्याला चार एकर कोथिंबिरी साठी साडेबारा लाख रुपये मिळाल्याची माहिती दिली आहे.\nही खोटी बातमी एका वृत्तपत्राने व्हायरल केल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्रास सहन करावा लागला. याबाबत अधिक माहिती मिळवली असता असे लक्षात आले यामधील माहिती जरी खरी असली तरीही त्या माहिती सोबत दिला गेलेला फोटो हा कोणा भलत्याच व्यक्तीचा आहे.\nझाले असे की, सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील शेतकरी विनायक हेमाडे यांनी चार एकरात कोथिंबिरीचे उत्पादन घेऊन कोथींबीरीच्या दरात चांगली वाढ झाल्यामुळे १२ लाख ५१ हजारांचा सौदा केला होता. त्या बदली त्यांना धनादेश मिळाला मात्र सोशल मीडियावर त्यांच्याऐवजी भलत्याच व्यक्तीचा बातमीसह फोटो छापून आला. त्यामुळे हेमाडे यांना भलताच म न स्ता प सहन करावा लागला.\nत्यामुळे त्या दिवशी हेमाडे व त्यांच्या कुटुंबीयांना विचारपूस करण्यासाठी दिवसभर फोन येत होते. याशिवाय त्यांचे मित्र ग्रामस्थ यांनी देखील त्यांची वैयक्तिक भेट घेऊन विचारपूस केली. सकाळ या वृत्तपत्रात ४ सप्टेंबर रोजी हेमाडे यांच्या कोथिंबीरीच्या दराची माहिती प्रसिद्ध झाली होती मात्र काही दिवसांनी सोशल मीडियावर ही बातमी भलत्याच व्यक्तीचा फोटो लावून व्हायरल करण्यात आली.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleअभिनेते ‘जय प्रकाश रेड्डी’, मृत्यूनंतर इतक्या करोडची संपत्ती मागे सोडून गेले, जाणून थक्क व्हाल \nNext articleअक्षय कुमारने या कारणामुळे बदलले स्वतःचे नाव, जाणून घ्या त्यामागचे कारण \nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले प्रसिद्ध कुत्र्यांच्या प्रजाती \n१ मिनिटात रद्दीमध्ये लपलेली मांजर शोधा, ९९ टक्के लोक अयशस्वी, फोटो Zoom करा उत्तर सापडेल \nकदाचित माझा प्रायव्हेट पा’र्ट पाहिला असेल’, रिअॅलिटी शोमध्ये किम कार्दशियनने केलं अजबच वक्तव्य \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/2451", "date_download": "2022-10-07T22:17:09Z", "digest": "sha1:DPGNDAX6LXJWRPWQYNTLXFZ7ILZ2QI6J", "length": 10819, "nlines": 105, "source_domain": "bollyreport.org", "title": "दोन लग्न झालेल्या माणसासोबत लग्न केल्यानंतर या मराठी अभिनेत्रींचा उडवत होते मजाक पण ट्रोलींगला नेहा पेंडसेने सडेतोड उत्तर ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News दोन लग्न झालेल्या माणसासोबत लग्न केल्यानंतर या मराठी अभिनेत्रींचा उडवत होते मजाक...\nदोन लग्न झालेल्या माणसासोबत लग्न केल्यानंतर या मराठी अभिनेत्रींचा उडवत होते मजाक पण ट्रोलींगला नेहा पेंडसेने सडेतोड उत्तर \nटीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसेने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात शार्दुल व्यास सोबत लग्न केले. शार्दुल हा घ*ट*स्फो*टी*त असुन त्याचे आधी दोन लग्न झाली आहेत. आधीच्या दोन लग्नांमधुन त्याला एक मुलगा आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासुन नेहा पेंडसेला ट्रोल करण्यात येत आहे. अशातच या ट्रोलींगला नेहा पेंडसेने सडेतोड उत्तर दिले आहे.\nनेहा ने सांगितले कि ती आता या ट्रोल्सला इग्नोर करायला शिकली आहे. नेहाने सांगितले कि सततच्या या ट्रोलिंगमुळे सुरुवातीला तिचे पती खुप कंटाळायचे. त्यांना या सर्व गोष्टींची सवय नव्हती पण कालांतराने ते हळुहळु सर्व शिकले. आता होणाऱ्या ट्रोलिंगचा त्यांच्यावर कोणताच परिणाम होत नाही.\nनेहाने तिला इंडस्ट्रीमध्ये कराव्या लागलेल्या सामन्यांबद्दलसुद्धा माहिती दिली. तिला एक महिला असल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींना तोंड द्यावे लागले होते. नेहाने सांगितले कि एक महिला म्हणुन जर तुम्ही कामाच्या ठिकाणी कमजोर पडलात तर लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. लोक जेव्हा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपण आणखी मजबुत होतो असे नेहा सांगते.\nनेहा सध्या ‘भाभीजी घर पर है’ या लोकप्रिय कार्यक्रमात सौम्या टंडनच्या जागी काम करत आहे. नेहा साकारत असलेली अनिता भाभी प्रेक्षकांच्या सुद्धा पसंतीस पडत आहे. नेहा बद्दल सांगायचे झाल्यास तिचा जन्म २९ नोव्हेंबर १९८४ ला झाला होता. झी मराठीच्या भाग्यलक्ष्मी कार्यक्रमातुन तिने तिच्या मराठी क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली.\nनेहाने मराठीसोबतच तमिळ, तेलगु, मल्याळम, आणि हिंदी या भाषांमध्ये सुद्धा काम केले आहे. यात तिने काही ठिकाणी अभिनय तर काही ठिकाणी डान्स परफोर्म केले. नेहा ५ जानेवारी २०२० रोजी शार्दुल सिंह व्याससोबत विवाहबंधनात अडकली. नेहाने आतापर्यंत हसरते, मीठी मीठी बाते, भाग्यलक्ष्मी, मे आय कम इन मॅडम यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleरणवीर सिंग नाही तर ही व्यक्ती आहे दीपिका पदुकोणच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर, जाणून घ्या \nNext articleदुबईच्या बुर्ज खलिफामध्ये आहे या सुपरस्टारचा फ्लॅट, संपत्ती एवढी आहे की वाचून चक्रावून जाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/permanent-registrar-to-the-university-dr-vined-patil-accepted-the-charge-130289141.html", "date_download": "2022-10-07T23:00:54Z", "digest": "sha1:CFZIT3TRXN3MMOIYJT7W44FXS3CJ6SMA", "length": 3892, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "विद्यापीठाला कायमस्वरूपी कुलसचिव; डाॅ. विनाेद पाटील यांनी स्वीकारला पदभार | Permanent Registrar to the University; Dr. Vined Patil accepted the charge| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनियमित कुलसचिव:विद्यापीठाला कायमस्वरूपी कुलसचिव; डाॅ. विनाेद पाटील यांनी स्वीकारला पदभार\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार डॉ. विनोद पाटील यांनी बुधवारी प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार यांच्याकडून स्वीकारला. डॉ. विनोद पाटील हे विद्यापीठाचे सातवे नियमित कुलसचिव ठरले आहेत. १० मार्च रोजी गणितशास्त्र प्रशाळेतील प्रा. किशोर पवार यांनी प्रभारी कुलसचिव म्हणून पदभार स्वीकारला होता.\nजुलैअखेर कुलसचिव पदासाठी झालेल्या मुलाखत प्रक्रियेद्वारे डॉ.पाटील यांची कुलसचिवपदी निवड झाली होती. बुधवारी प्रा. पवार यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित हाेते. सर्वांना साेबत घेऊन पथदर्शी असे काम करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही नवनिर्वाचित कुलसचिवांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.insidemarathibooks.in/index.php/2020/04/02/shriyut-gangadhar-tipre-arthat-anudini-marathi-book-review/", "date_download": "2022-10-07T22:53:29Z", "digest": "sha1:KN3KHPM4KCQGF767RIZIXN4BZLDNFXNO", "length": 12152, "nlines": 182, "source_domain": "www.insidemarathibooks.in", "title": "श्रीयुत गंगाधर टिपरे अर्थात अनुदिनी - Marathi Book Review Inside Marathi Books", "raw_content": "\n|| माझिया मराठीची बोलू किती कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके ||\nश्रीयुत गंगाधर टिपरे अर्थात अनुदिनी\nलेखक – दिलीप प्रभावळकर\nप्रकाशन – उत्कर्ष प्रकाशन\nमूल्यांकन – ४.६ | ५\n२००५ साली हे पुस्तक माझ्या ताई ने विकत घेतलं. ह्या पुस्तकावर आधारित एक मालिका २००१-२००३ मध्ये होऊन गेली आणि म्हणूनच हे पुस्तक तिने आणले होते. मी त्यानंतर २-३ वर्षांनी हे पुस्तक सहज म्हणून वाचायला घेतलं आणि एका दिवसातच वाचून काढलं. अत्यंत साधी सोप्पी भाषा असलेला हे पुस्तक अर्धवट वाचून ठेवणं अशक्य आहे. स्वतः दिलीप प्रभावळकर त्या मालिकेत काम करीत असल्याने व त्यांनीच हे पुस्तक लिहल्यामुळे खूप गोष्टी खऱ्या आणि सोप्प्या वाटतात. शिवाय मालिका होऊन गेल्यानंतर हे पुस्तक आल्याने आपल्या डोळ्यासमोर त्यांचं घर , राहणीमान , पोषाख अगदी हुबेहूब उभे राहतात.\nहे पुस्तक लिहताना त्यांनी अनुदिनी म्हणजेच डायरी ची संकल्पना घेतलीये. मालिका आधीच होऊन गेल्याने लेखकाने लिहताना कुठेही शॉर्ट कट मारला नाही उलट सगळ्या व्यक्तिरेखा मालिकेप्रमाणेच घेतल्या आहेत जेणेकरून पुस्तक अधिक आपलंसं वाटेल. कुटुंबातील ५ सदस्य शेखर, शामल, शिऱ्या , शलाका आणि आबा हे लोकं रोज डायरी लिहितात अशीच पुस्तकाची रचना लेखकाने केली आहे. एकच प्रसंग प्रत्येकाच्या डायरी मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वाचायला मिळणे हे त्यांच्या लेखनाची आणि स्वभावाची कमाल आहे. मध्यम वर्गीय कुटुंबात घडणाऱ्या या सर्व गोष्टी मनाला अगदी आपल्याशा वाटून जातात.\nसर्वांनी हे पुस्तक एकदा वाचून बघावं म्हणजे आपोआपच ते तुम्ही पुन्हा पुन्हा वाचाल. आज भाजी कोणती केली आहे पासून ते निवडणुकीच्या गोष्टी असे एक ना अनेक हलके फुलके प्रसंग लेखकाने रेखाटले आहेत. काही काही गोष्टी तर अगदी आपल्याच घरात घडून गेल्यासारख्या वाटतात आणि म्हणूनच की काय हे पुस्तक लक्षात राहतं . डायरी लिहण्याचा क्रम कसाही असला तरी म्हणजे आधी शेखर, मग शलाका, मग शामल असा कोणताही एक ठरलेला क्रम नाहीये म्हणून पुस्तक वाचताना ते जास्त सहज वाटतं . २-३ दिवसांची डायरी वाचली कि प्रत्येकाची लिहण्याची पद्धत आपल्याला कळून येते व आपण देखील पुढे तसंच अनुमान करायला लागतो कि “अमुक एखाद्या” प्रसंगावर कोणी कसे या काय लिहले असेल. तसेच ३ पिढ्या घरात वावरत असल्याने तरुण, मध्यम आणि प्रौढ व्यक्ती हे पुस्तक सहज वाचू शकतात .\nह्या पुस्तकाची अजून एक गम्मत म्हणजे डायरी मध्ये आपण नेहेमी गुपितं लिहतो म्हणूनच वाचकाला सर्वांची गुपितं आपोआप समजत जातात आणि आपण ते लक्षात ठेऊनच बाकी पुस्तक वाचतो . त्यांना एकेमेकांबद्दल वाटणारी ओढ , प्रेम , कधीतरी आलेला राग हे सगळं आपल्याला अगदी आपल्याच घरातलं वाटू लागतं .\nमाणूस प्रत्येक वयोगटात , विविध प्रसंगात कसा वागतो आयुष्य जगताना छोट्या छोट्या गोष्टी किती महत्वाच्या असतात आयुष्य जगताना छोट्या छोट्या गोष्टी किती महत्वाच्या असतात एक गृहिणी, एक नोकरी करणारा कर्ता पुरुष, एक ८० वर्षाचे आजोबा, एक २० वर्षाची धाकटी लेक आणि एक २५ वर्षाचा घरातला मोठा लेक ह्यांचे आयुष्याकडे बघण्याचे दृष्टिकोन जाणून घ्यायचे असतील तर हे पुस्तक एकदा नक्की वाचावं .\nऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:\nकिंडल आवृत्ती विकत घ्या\nचीपर बाय द डझन\nमराठी पुस्तकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा\nछत्रपती संभाजी – एक चिकित्सा\nसोशल नेटवर्कवर आमच्याशी कनेक्टेड राहा.\nवेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/category/spirituality/", "date_download": "2022-10-07T22:52:27Z", "digest": "sha1:IRAVMHSHRPT7WLZCVG5G6RCSSVMRDO6S", "length": 3167, "nlines": 98, "source_domain": "www.snopty.com", "title": "अध्यात्म Archives - Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nसात दिवसात अधिक प्रसिद्ध\nपुनरावलोकन गुण संख्येच्या आधारे\nस्मृतीगंध…ट्रेक नंबर १७….पाटेश्वर भाग ३\nस्मृतीगंध…ट्रेक नंबर १७….पाटेश्वर भाग २ मधील उपभाग २\nस्मृतीगंध…ट्रेक नंबर १७…पाटेश्वर भाग २ मधील उपभाग १\nस्मृतीगंध….ट्रेक नंबर १७……पाटेश्वर भाग १\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/suresh-raina/", "date_download": "2022-10-07T23:14:43Z", "digest": "sha1:S355SHCAS3YNJRQLMNOXLNB6TYWPD6K5", "length": 6415, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठी बातम्या | Suresh Raina, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nSuresh Raina : 'मिस्टर आयपीएल' सुरेश रैनाची सर्व प्रकारातून निवृत्ती\n टीम इंडियाचे दोन खेळाडू शिंदेंना भेटले\nनिवड समितीवर सुरेश रैना नाराज, कार्तिकचं नाव घेत साधला निशाणा\nCSK च्या विजयानंतर रैनानं केलं खास ट्विट, धोनीचं नाव न घेतल्याने वेधले लक्ष\nशास्त्रींची मीटिंग, रैनाचे अश्रू, अक्षरने सांगितली ड्रेसिंग रूममधली Inside Story\nरैनासोबतची ती 5 मिनिटांची भेट ठरले Unforgettable,बदललं Tilak Varmaचं आयुष्य\nCSK च्या पराभवानंतर रैनाची चर्चा, टीम मॅनेजमेंटला मिळाली तिसरी वॉर्निंग\nIPL 2022 च्या दरम्यान 'हा' दिग्गज खेळाडू करु शकतो निवृत्तीची घोषणा\nCSK ने रैनाला का केलं नाही रिटेन सेहवागने केला मोठा खुलासा\nCSK च्या माजी खेळाडूनं घेतली विराटची जागा, रैनानं पाठवला मित्राला खास मेसेज\nIPL टीम्सनी दुर्लक्ष केलेल्या सुरेश रैनाचा 'या' देशाच्या सरकारनं केला सन्मान\nसुरेश रैनाची होणार आयपीएलमध्ये एन्ट्री, शास्त्रींसोबत सुरू करणार नवी इनिंग\nIPL : धोनीनंतर हार्दिकचाही रैनाला धक्का, मिस्टर आयपीएलची अखेरची आशाही मावळली\nसुरेश रैनाची गुजरात टायटन्समध्ये एन्ट्री जाणून घ्या Viral Photo मागील सत्य\nIPL मध्ये बोली नाही, कुठेतरी खेळू द्या स्टार क्रिकेटपटूचं BCCI ला इमोशनल अपील\nIPL Auction 2022 : सुरेश रैनाला विकत का घेतलं नाही CSK ने सांगितलं कारण\nIPL Auction 2022 : 'ओव्हर अ‍ॅक्टिंग बंद करा', रैनाच्या फॅन्सनी CSK ला सुनावले\nIPL मेगा ऑक्शनमध्ये आत्तापर्यंत Unsold असलेल्या खेळाडूंचं काय होणार\nसुरेश रैनाच्या वडिलांचे निधन, कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी\nIPL 2022: 'पुन्हा पिवळ्या जर्सीत दिसणार रैना', रॉबिन उथप्पाने केला दावा\nसुरेश रैना गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी 28 तासांचा प्रवास करून पोहचला होता लंडनला...\nIPL Final 2021 : धोनीच्या CSK कडून खेळला प्रत्येक फायनल, यावेळी मात्र संधी नाही\nFB, Insta, Whatsapp ठप्प झाल्यावर KL Rahul का आला चर्चेत\nIPL 2021 : एमएस धोनीने जिगरी दोस्तालाच केलं बाहेर, CSK चा कठोर निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/health-tips-drink-these-things-mixed-with/", "date_download": "2022-10-07T22:08:12Z", "digest": "sha1:CNJ54H5UZ7VXC5DCETAJWAIGDZEIDC27", "length": 6049, "nlines": 43, "source_domain": "mahaupdate.in", "title": "Health Tips : दुधामध्ये 'या' गोष्टी मिसळून प्या आणि रोगांना दूर ठेवा! - Maha Update", "raw_content": "\nHome » Health Tips : दुधामध्ये ‘या’ गोष्टी मिसळून प्या आणि रोगांना दूर ठेवा\nHealth Tips : दुधामध्ये ‘या’ गोष्टी मिसळून प्या आणि रोगांना दूर ठेवा\nप्रत्येकाला माहित आहे की दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दूध निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत करते. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या पद्धतीने प्यायला आवड असते. त्यामधील एक म्हणजे एका जातीची बडीशेप आणि साखर कँडी आहे.\nबडीशेपमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. दूध देखील कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. चला जाणून घेऊया या तिन्ही पदार्थांचे मिश्रण पिण्याचे काय फायदे आहेत.\nदिवसभर कामाची चिंता, तणाव वाढू लागतो, त्यामुळे डोकेदुखी सुरू होते. अशा परिस्थितीत, एका जातीची बडीशेप आणि साखर कँडी मिसळून दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हे पेय प्यायल्याने मन थंड राहते आणि स्ट्रेस हार्मोन्स तणाव निर्माण होऊ देत नाहीत.\nपोटाच्या समस्येपासून सुटका मिळेल\nआजकाल लोकांना बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास जास्त असतो. यासाठी चांगल्या खाण्या-पिण्यासोबत असे काही पेय प्यावे, ज्यामुळे पोटाचा त्रास होत नाही, अशा परिस्थितीत साखर आणि एका जातीची बडीशेप मिसळलेले दूध प्यावे, हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. बडीशेपमध्ये एस्ट्रेंजेल आणि ऍनेथोल गुणधर्म असल्यामुळे ते जुनाट बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते.\nपावसाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू लागतात, त्यासाठी महागड्या क्रिमचा वापर केला जातो. जर तुम्हाला नेहमी त्वचेची ऍलर्जी आणि मुरुमांची समस्या येत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही दूध, एका जातीची बडीशेप आणि साखरेचे द्रावण प्यावे कारण एका बडीशेपमध्ये अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात. जे त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.\nदिवसभर कॉम्प्युटर किंवा मोबाईलसमोर काम केल्याने डोळ्यांवर खोलवर परिणाम होतो. दूध, एका जातीची बडीशेप आणि साखर कँडी पिऊन डोळ्यांवरील हे परिणाम कमी करता येतात. कारण बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, ज्यामुळे दृष्टी स्वच्छ राहण्यास मदत होते.\nबडीशेप आणि साखर रुग्णांसाठी वरदान, असा करा अवलंब\nबडीशेप खाल्ल्याने वजन होते कमी, जाणून घ्या याचा सर्वोत्तम मार्ग\nसकाळी उठल्याबरोबर बडीशेपचे पाणी प्या, होतील आश्चर्यकारक फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://parbhani.gov.in/mr/notice/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4/", "date_download": "2022-10-07T23:23:45Z", "digest": "sha1:YEK4UQQQMPKIXBYRYAJF3V74X76PBN57", "length": 8737, "nlines": 123, "source_domain": "parbhani.gov.in", "title": "अल्पसंख्यांंक समाजातील तरुणांंकरिता पोलीस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम सन २०१८-१९ – बौद्ध प्रवर्गातील पात्र उमेदवारांंची यादी | परभणी | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nडॉ.प्रफुल्ल पाटील मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल\nसरस्वती – धन्वंतरी डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल\nमहसुल / दंडाधिकार शाखा\nस्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nउप प्रादेशिक परिवहन कार्यालय\nजिल्हा परिषद, पंचायत समिती तालुका निहाय प्रारुप व अंतिम प्रभाग रचना\nमाहे ऑक्टोबर-नोव्हेंंबर २०१९ मधे झालेल्या अवेळी पावसामुळे बाधित शेतकरी यांंच्या मदत वाटप याद्या\nपरभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची विधान परिषद निवडणुक – २०१८\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या (दुसरा टप्पा)\nप्रधानमंत्री पिक विमा योजना २०१७ लाभार्थी यादी\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ पात्र लाभार्थी याद्या\nखरीप २०१८ दुष्काळी अनुदान पहिला व दुसरा टप्पा\nखासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंंतर्गत २०१४-१५ ते २०१८-१९ या कालावधीमधील मंजुर कामांंची यादी\nऔरंंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२०\nपरभणी जिल्ह्यातील कब्जेहक्काने व भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमीनीचे आदेश\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)\nअल्पसंख्यांंक समाजातील तरुणांंकरिता पोलीस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम सन २०१८-१९ – बौद्ध प्रवर्गातील पात्र उमेदवारांंची यादी\nअल्पसंख्यांंक समाजातील तरुणांंकरिता पोलीस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम सन २०१८-१९ – बौद्ध प्रवर्गातील पात्र उमेदवारांंची यादी\nअल्पसंख्यांंक समाजातील तरुणांंकरिता पोलीस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम सन २०१८-१९ – बौद्ध प्रवर्गातील पात्र उमेदवारांंची यादी\nअल्पसंख्यांंक समाजातील तरुणांंकरिता पोलीस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम सन २०१८-१९ – बौद्ध प्रवर्गातील पात्र उमेदवारांंची यादी\nअल्पसंख्यांंक समाजातील तरुणांंकरिता पोलीस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम सन २०१८-१९ – बौद्ध प्रवर्गातील पात्र उमेदवारांंची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Oct 06, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20686/", "date_download": "2022-10-07T23:04:52Z", "digest": "sha1:W6P3XEUS7XXMM6PF5GBV6IXHFZGWRIVN", "length": 14787, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पातकई टेकड्या – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपातकई टेकड्या : भारत व ब्रह्मदेश यांच्या सरहद्दीवर असलेली टेकड्यांची मालिका. या टेकड्या २५° ३०’ उ. ते २७° १५’ उ. व. ९५° १५’ पू. ते ९६° १५’ पू. यांदरम्यान ईशान्य-नैर्ऋत्य पसरलेल्या असून, नैर्ऋत्येकडे त्या नागा टेकड्यांमध्ये समाविष्ट होतात. येथून पुढे ब्रह्मदेशात ह्यांना आराकान योमा पर्वतश्रेणी म्हणतात. यांची सरासरी उंची २,४३८–२,७४३ मी.पर्यंत असून सरमती (३,८२६ मी.) हे सर्वोच्च शिखर आहे. यांमुळे एका बाजूला ब्रह्मपूत्रामेघना खोरे व दुसऱ्या बाजूला इरावती-चिंदूविन खोरे असे विभाजन झाले आहे. वनाच्छादित पातकई टेकड्यांत तृतीयक काळातील खडक आहेत. लेडो-तौग्नी हा मार्ग यांतून काढला आहे. पांम्सॉ ही यांधील खिंड प्रसिद्ध असून ती भारत–ब्रम्हदेश यांधील दळणवळणाचा एक दुवा आहे. तेराव्या शतकात आहोम लोक या टेकड्या ओलांडून ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात आले आणि तेथे त्यांनी वसाहती केल्या. या भागात नागा लोकांची वस्ती आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postपाने गुंडाळणारी अळी\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/28-students/", "date_download": "2022-10-07T21:42:34Z", "digest": "sha1:KGWYPGCBKI3V4RMTTKSB23LOXXAKNWQQ", "length": 7717, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "28 students Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘चिक्की’ खाल्ल्याने सरकारी शाळेतील 28 विद्यार्थी आजारी, रुग्णालयात दाखल\nछत्तीसगड - छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात, 'चिक्की' खाल्ल्याने एका सरकारी प्राथमिक शाळेतील 28 विद्यार्थी अचानक आजारी पडल्याची बातमी समोर आली आहे. ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/cancer-victim-children/", "date_download": "2022-10-07T23:15:53Z", "digest": "sha1:6R75BD6JPS36XTFDDXQYMXTDLAC3JB2Q", "length": 7779, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "cancer victim children Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nपुण्यातील कर्करोगग्रस्त मुलांनी पंतप्रधानांना लिहिली पत्र\nपुणे: आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनाच्या निमित्ताने पुण्यातील कर्करोगग्रस्त मुले आणि त्यांच्या पालकांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून बाल कर्करोगासाठी राष्ट्रीय धोरण ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/3078189/marathi-actress-neha-joshi-reveled-why-she-married-secretly-with-omkar-kulkarni-nrp-97/", "date_download": "2022-10-07T22:57:25Z", "digest": "sha1:QLOELNHHVTS2O7KWDQHCP5HS2QRJX4PQ", "length": 18364, "nlines": 315, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Actress Neha Joshi reveled why she married secretly With Omkar Kulkarni nrp 97 | \"माझ्या कुटुंबातील...\" नेहा जोशीने सांगितले गुपचूप लग्न करण्यामागचे कारण | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\n“माझ्या कुटुंबातील…” नेहा जोशीने सांगितले गुपचूप लग्न करण्यामागचे कारण\nनेहा ही ३८ वर्षांची असून ओमकार हा तिच्यापेक्षा एक वर्षांनी लहान आहे.\nमराठी-हिंदी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नेहा जोशीला ओळखले जाते.\nनुकतंच नेहा जोशी ही विवाहबंधनात अडकली आहे. ओमकार कुलकर्णी असे तिच्या पतीचे नाव आहे.\nनेहा आणि ओमकार यांचा विवाह नुकताच संपन्न झाला.\nयाचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.\nपण तिने या लग्नाचा कोणताही गाजावाजा केला नाही.\nअगदी घरगुती पद्धतीने, मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला.\nअभिनेत्री नेहा जोशीचा पती ओमकार हा मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता आहे.\nत्यासोबत तो लेखक आणि कवी देखील आहे.\nनेहा ही ३८ वर्षांची असून ओमकार हा तिच्यापेक्षा एक वर्षांनी लहान आहे.\nनुकतंच ‘ई-टाईम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने गुपचूप लग्न का केले याचा खुलासा केला आहे.\nयात ती म्हणाली, “लग्न ही माझ्यासाठी अतिशय खाजगी बाब आहे आणि त्यामुळे यातील सर्व सोहळे हे मी माझ्यापुरती मर्यादित ठेवले.\n“मी लग्न करणार असल्याची गोष्ट फारच खासगी ठेवायची होती, कारण मला तेच करायचे होते.”\n“माझ्या कुटुंबातील सदस्यांसाठी आणि इतर जवळच्या लोकांसाठी मला एक साधे महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करायचे होते. “\n“त्यानुसार आज (१७ ऑगस्ट) आम्ही लग्न केले आणि उद्या कोर्ट मॅरेज करुन रिसेप्शन करु”, असे नेहाने म्हटले.\nनेहाच्या लग्नाचे सुदंर फोटोही आता समोर आले आहे. या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.\nमराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी यावर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत\nनेहाने आतापर्यंत अनेक मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटात भूमिका साकारली आहे.\n‘वाडा चिरेबंदी’, ‘बेचकी’, ‘कनुप्रिया’ या नाटकात तिने फार उल्लेखनीय काम केले आहे. त्यासोबतच ‘झेंडा’, ‘पोश्टर बॉइज’, ‘लालबागची राणी’, ‘बघतोस काय मुजरा कर,’ अशा चित्रपटातही ती झळकली होती.\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : डायव्हिंगमध्ये मेधाली, तर योगासनात वैभवला सुवर्ण\nबुमरा, जडेजाची अनुपस्थिती इतरांसाठी संधी – शास्त्री\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारतीय महिला संघाची विजयाची मालिका खंडित; पाकिस्तानकडून १३ धावांनी पराभूत\nहरमनप्रीत सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्तम हॉकीपटू\nधनुष्य-बाण चिन्हाचा वाद : हंगामी आदेशास ठाकरे गटाचा विरोध; दोन्ही गटांच्या कागदपत्रांची सत्यता तपासून अंतिम निर्णय घेण्याची विनंती\nअन्न प्रक्रिया उद्योगात राज्यात सांगली अव्वल; पुणे दुसऱ्या, तर औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावर\nकर्नाटकात पदवी स्तरावर सायबर सुरक्षा शिक्षण अनिवार्य; पुढील शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी\nआदिवासी विकास विभागातील शिक्षणविस्तार अधिकाऱ्यास अटक; आश्रमशाळा अधिक्षिकेची विनयभंगाची तक्रार\nपेटंट कायदा जागते रहो\nराज्यात सर्वाधिक हत्याकांड अनैतिक संबंधातून; ‘एनसीआरबी’ची आकडेवारी\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2019/11/8.html", "date_download": "2022-10-07T21:15:31Z", "digest": "sha1:UMHUNSHQL4ANDEBRVAM6AUD76NHN7PBH", "length": 25658, "nlines": 222, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "आमचं हे कर्तव्य वाटलं म्हणून आम्ही उभे राहिलो : (भाग-8) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआमचं हे कर्तव्य वाटलं म्हणून आम्ही उभे राहिलो : (भाग-8)\nयाप्रमाणे ज्यांना या सर्व गोष्टी मान्य असतील ते जमाअत-ए- इस्लामीमध्ये सामील होऊ शकतात. त्यांच्यासाठी आमच्याकडे फक्त एकच असे काम आहे की त्यांनी आपल्या कथनी आणि करणीने इस्लाम सत्य असल्याची साक्ष द्यावी आणि संपूर्ण इस्लामला जीवन जगण्याची एक व्यवस्था म्हणून स्वतःच्या जीवनात कायम करावे व समाजामध्येही कायम करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावेत. जेणेकरून समाजासमोर सत्याची साक्ष देण्याची गरज पूर्णपणे स्पष्ट होईल.\nतोंडी साक्ष देण्याचा जिथपर्यंत संबंध आहे तर आम्ही आमच्या सदस्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देत आहोत की जेणेकरून ते आपापल्या योग्यतेप्रमाणे जीव्हेने, लेखनीने जास्तीत जास्त लोकांना इस्लाम सत्य असल्याची साक्ष देण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करावा.\nयासाठी आम्ही अनेक छोट्या-छोट्या संस्थाही सुरू केलेल्या आहेत ज्या की आपल्या संघटित प्रयत्नांतून इस्लामी ज्ञानातील खरेपणा आपल्या साहित्यातून लोकांसमोर स्पष्ट करतील. आणि या उद्देशाच्या प्राप्तीसाठी प्रचाराची जेवढी म्हणून साधने उपलब्ध आहेत त्या सर्वांचा आम्ही उपयोग करू. राहता राहिली गोष्ट प्रत्यक्ष साक्षची तर या संबंधात आमचे हे प्रयत्न आहेत की, सुरूवातीला आमच्या प्रत्येक सदस्याला इतके प्रशिक्षित करण्यात येईल की, ते इस्लामचे जीवंत साक्षीदार होऊन समाजात वावरतील आणि मग अशा लोकांचा एक संघटित समाज विकसित होईल, ज्यामध्ये इस्लाम आपल्या मूळ उद्देशाप्रमाणे काम करत असल्याचे जगाला पाहता येईल. शेवटी हाच समाज आपल्या भगीरथी प्रयत्नाने अन्यायपूर्ण व्यवस्थेच्या वर्चस्वाला शह देऊन सत्याचे वर्चस्व कायम करील, जो की सगळ्या जगामध्ये इस्लामचे प्रतिनिधीत्व करणारा असेल.\n फक्त हाच आमचा उद्देश आणि कार्यक्रम आहे. आम्हाला अशी शंका नव्हती की, हे काम करत असतांना मुस्लिमांना काही आक्षेप असू शकेल. परंतु ज्या दिवसापासून आम्ही या मार्गामध्ये चालत आहोत, आक्षेपांचा महापूर आमच्यासमोर आलेला आहे. मात्र हे सारे आक्षेप लक्ष देण्याइतपत महत्त्वाचे नाहीत. ना एका बैठकीमध्ये त्यांच्या बाबतीत फारसं काही सांगता येण्यासारखे आहे. मात्र याप्रसंगी मी त्या आक्षेपांबद्दल थोडसं स्पष्टीकरण देऊ इच्छितो ज्यांचा उपयोग आपल्या शहरामध्ये गैरसमज पसरविण्यासाठी केला जात आहे.\nअसं म्हटलं जात आहे की, तुमची ही जमाअते इस्लामी एका नव्या सांप्रदायाची (फिरका) पायाभरणी करीत आहे. या प्रकारची भाषा जे लोक बोलत आहेत त्यांना कदाचित माहित नसेल की फिरकाबंदीची कारणं काय असतात, धर्मामध्ये ज्या कारणांमुळे खूप फूट पडत असते ती कारणं फक्त चार प्रकारची आहेत. पहिले प्रकार असा की, धर्मामध्ये एखादी अशी गोष्ट वाढविली जाईल, जी की मूळ धर्मात नव्हती आणि त्याच गोष्टीला ईमान आणि कुफ्र (इन्कार), उपदेश (हिदायत) आणि पथभ्रष्टता यामध्ये फरक करण्यासाठीचा निकष मानले जाईल.\nदूसरा प्रकार असा की, धर्माच्या एका विशिष्ट गोष्टीला एवढे अवास्तव महत्व दिले जाईल, जेवढे महत्व कुरआन आणि हदिसच्या अनुसार त्या गोष्टीला प्राप्त नाही. तीसरा प्रकार असा की, त्या धार्मिक प्रश्‍नांमध्ये अतिशोक्ती केली जाईल ज्यांचा स्पष्टपणे कुरआन आणि हदिसमध्ये उल्लेख नसेल. उलट कुरआन आणि हदीसच्या सामान्य आदेशांच्या प्रकाशामध्ये विचार करून निर्धारित केले गेलेले असतील. (इज्तेहादी मसले अर्थात धर्माचा अर्थ लावून घेतलेले निर्णय). याप्रकरणी आपल्या मताच्या विरूद्ध ज्यांची मतं आहेत त्यांना काफीर ठरविले जाईल, त्यांचा अपमान केला जाईल किंवा कमीत कमी त्यांच्यापासून अलिप्तता बाळगण्यात येईल.\nचौथा प्रकार असा की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या नंतर एखाद्या खास व्यक्तीच्या संबंधाने असा दावा केला जाईल जणू तो प्रेषितच आहे आणि त्याचे म्हणणे मानल्यानेच मुस्लिम राहता येईल आणि जे मानणार नाहीत ते काफिर ठरविले जातील किंवा एखादी संघटना असा दावा घेऊन उठेल की, जे त्यांच्या संघटनेमध्ये सामील आहेत तेच सत्य मार्गावर आहेत बाकी सगळे मुसलमान पथभ्रष्ट आहेत.\nआता मी आपल्याला विचारू इच्छितो या चार प्रकारांपैकी आम्हाला कोणत्या प्रकारामध्ये बसवणार आम्ही कोणता अपराध केलाय आम्ही कोणता अपराध केलाय जर कोणाकडे काही पुरावा आणि तर्क असेल तर त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगावं की तुम्ही आमुक हा अपराध केलेला आहे. आम्ही तात्काळ तौबा करू आणि आपल्या वर्तनामध्ये सुधार करतांना आम्हाला किंचितही संकोच होणार नाही. कारण आम्ही स्वतःच अल्लाहच्या या सत्य धर्माला स्थापित करण्यासाठी उठून उभे राहिलेलो आहोत, यात फूट पाडण्यासाठी नव्हे. मात्र अशी कोणतीही चूक आम्ही केलेली नाही तर मग आमच्या कामामुळे कुठल्यातरी नवीन सांप्रदायाची पायाभरणी होत आहे, असा अंदाज कसा काय केला जाऊ शकतो\nआम्ही केवळ मूळ स्वरूपात असलेल्या इस्लामला त्याच्यात किंचितही घट किंवा वाढ न करता घेऊन उभे राहिलेलो आहोत आणि मुस्लिमांसमोर आमचा संदेश याशिवाय दूसरा कुठलाच नाही की, या आपण सर्व मिळून या सत्य धर्माला प्रत्यक्षात आपल्यामध्ये स्थापित करू आणि जगासमोर हेच सत्य असल्याची साक्ष देऊ. जमाअते इस्लामीचा पाया आम्ही संपूर्ण इस्लामला बनविलेला आहे, त्याच्या एखाद्या आदेशाला किंवा भागाला नाही.\nअशी प्रश्‍न ज्यांचा स्पष्ट उल्लेख कुरआन आणि हदीसमध्ये आलेला नाही त्या प्रश्‍नासंबंधी आम्ही सर्वांच्या मतांना आणि विचारपीठांना तिथपर्यंत मान्यता देतो जिथपर्यंत शरीयतमध्ये परवानगी आहे. यासंदर्भात आम्ही प्रत्येकाचा अधिकार इथपर्यंत स्वीकार करतो की, आपल्याला ज्या विचारपीठाच्या विचारांविषयी संतुष्टी वाटेल, आपण त्यांची अंमलबजावणी करा. मात्र त्या गोष्टीला पाया बनवून आपला वेगळा गट तयार करण्याला आम्ही योग्य समजत नाही.\nजमाअते इस्लामीबाबतही आम्ही कुठल्याही अतिशोक्तीपासून लांब राहिलेलो आहोत. आम्ही असा कधीच दावा केलेला नाही की, सत्य आमच्याच जमाअतमध्ये एकवटलेले आहे. आम्हाला आमचंं हे कर्तव्य वाटलं म्हणून आम्ही उठून उभे राहिलो आहोत आणि आपल्याला आपल्या कर्तव्याची आठवण करू देत आहोत. आता हे आपल्या मर्जीवर अवलंबून आहे की आपण आमच्यासोबत उभे राहता किंवा स्वतः उठता आणि आपल्या कर्तव्याचे निर्वहन करता किंवा दूसरा कोणी या कर्तव्याचा निर्वाह करत आहे असे आपणाला वाटत असेल तर आपण त्यांची साथ देता.\nसत्तेच्या मांडवलीत महाराष्ट्र होरपळतोय\nसरकारी प्रतिष्ठानांच्या विक्रीचा अथ\n२९ नोव्हेंबर ते ०५ डिसेंबर २०१९\n२२ ते २८ नोव्हेंबर २०१९\nभारतरत्न नाकारणारा अवलिया : मौलाना आझाद\nसंयम आणि सौहार्दाचा विजय\nमिलादुन्नबीनिमित्त 3 हजार 178 जणांनी केले रक्तदान\nअमीर (अध्यक्ष) - (भाग 10)\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि आपली जबाबदारी\nइस्लामोफोबिया : कारणे आणि उपाय\n१५ ते २१ नोव्हेंबर २०१९\nइमामत (नमाजचे नेतृत्व) : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसांप्रदायिक तणाव आणि राजकारण\nअयोध्येसंबंधीचा निर्णय सर्वांनी शांतपणे स्विकारावा\nजमाअत - ए - इस्लामीची आवश्यकता का भासली - (भाग-9)\nप्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या शिकवणीचा संक्षिप्त...\n‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’\nसामूहिक नमाज : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nजागतिक दहशतवाद : अमेरिकी पापांचे फलित\nडॉ. ईलाहीपाशा मासुमदार यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट...\nउर्दू सा. दावत, न्यूज पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅपचे विमोचन\nआमचं हे कर्तव्य वाटलं म्हणून आम्ही उभे राहिलो : (भ...\nफेसबुक व धार्मिक भावना\nमुली अन् पत्नी दोहोंच्या सुरक्षेची जबाबदारी पुरूषाची\nराज्यात पुन्हा तेच; विरोधक मात्र मजबूत\nझुंडबळी आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे आकडे गायब\n०८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०१९\nनमाजचे महत्त्व : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nगुन्हे अहवालात ‘मॉब लिंचिग’ गायब\n०१ नोव्हेंबर ते ०७ नोव्हेंबर २०१९\nतुमचं जीवन हेच इस्लामची साक्ष बनली पाहिजे\nइस्लामी राज्य आणि मुस्लिम देश यात काही फरक आहे काय\nआर्थिक मंदी म्हणजे काय\nउत्तरांचा शोध अन् शोधांचे प्रयोग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/follow-these-4-simple-methods-remove-furniture-scratches-they-disappear-no-time/", "date_download": "2022-10-07T22:42:48Z", "digest": "sha1:4T7UDN7DGRJJMAGYGPAKC3HXI4D36XRH", "length": 6214, "nlines": 44, "source_domain": "mahaupdate.in", "title": "फर्निचरवरील स्क्रॅच काढण्यासाठी अवलंबा 'या' ४ सोप्या पद्धती, ते चुटकीसरशी गायब होतील - Maha Update", "raw_content": "\nHome » फर्निचरवरील स्क्रॅच काढण्यासाठी अवलंबा ‘या’ ४ सोप्या पद्धती, ते चुटकीसरशी गायब होतील\nफर्निचरवरील स्क्रॅच काढण्यासाठी अवलंबा ‘या’ ४ सोप्या पद्धती, ते चुटकीसरशी गायब होतील\nघराची स्वछता करणे महिलांसाठी खूप अवघड काम असते. घरातील एक-एक वस्तू महिला खूप काळजीपूर्वक साफ करतात. पण अनेकदा महिलांकडून घाईघाईत साफ सफाई करताना घरातील फर्निचरवर ओरखडे पडतात.\nखरतर फर्निचर हे घराचे सौंदर्य वाढवण्याचे काम करत असते. पण त्यावर पडलेले ओरखडे हे दिसायला खराब वाटतात. हे काढणे अवघड होऊन बसते.अशा वेळी काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही फर्निचरमधील ओरखडे लगेच दूर करू शकता.\nचला तर मग आज आम्ही तुम्हाला फर्निचरवरील ओरखडे काढण्याचे मार्ग घेऊन आलो आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही चुटकीसरशी फर्निचर नवीन बनवू शकता.\nमेणाने डाग काढून टाका\nस्क्रॅच मार्क्स काढण्यासाठी तुम्ही मेण वापरू शकता. यासाठी पांढरा मेण मॅश करून फर्निचरवर लावा. आपण इच्छित असल्यास, आपण मेण थेट स्क्रॅचवर देखील घासू शकता. यानंतर, सूती कापडाने स्क्रॅच घासून घ्या. 2-3 मिनिटे कापडाने घासल्यानंतर तुम्हाला स्क्रॅच गायब झाल्याचे दिसेल.\nफर्निचरमधील ओरखडे काढण्यासाठी पेट्रोलियम जेलीचा उत्तम वापर केला जातो. यासाठी लाकडी फर्निचरवर पेट्रोलियम जेली लावा. आता 5 मिनिटांनंतर मायक्रोफायबर कापडाने स्क्रॅच घासून घ्या. स्क्रॅच थोड्याच वेळात सहज काढले जातील.\nइरेजर वापरणे हा देखील स्क्रॅच डाग काढून टाकण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे. यासाठी फर्निचरच्या स्क्रॅच केलेल्या भागावर पांढरा आणि स्वच्छ इरेजर घासून घ्या. नंतर 4-5 मिनिटे घासल्यानंतर, मेण किंवा पेट्रोलियम जेलीने ओरखडे पुसून टाका. हे लगेच स्क्रॅच काढून टाकेल.\nस्क्रॅच रिमूव्हर उपयुक्त ठरेल\nफर्निचरवरील ओरखडे काढण्यासाठी तुम्ही स्क्रॅच रिमूव्हर उत्पादनाचीही मदत घेऊ शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की स्क्रॅच रिमूव्हर उत्पादन हार्डवेअरच्या दुकानात सहज उपलब्ध आहे. त्याच वेळी, हे उत्पादन फर्निचरवर पुसून, ओरखडे काढण्याबरोबरच, फर्निचरला चमक देखील मिळते.\nलॅपटॉपच्या स्क्रीनवर पडलेले डाग आणि ओरखडे काढण्यासाठी अवलंबा ‘या’ ४ टिप्स, स्क्रीन नवीनसारखी चमकू लागेल\nतुमच्याही कारच्या काचेवर स्क्रॅच पडलेत मग फॉलो करा ‘या’ टिप्स, एकही स्क्रॅच दिसणार नाही\nपीनट बटर ‘या’ गोष्टींसाठी ठरते वरदान, जाणून तुम्ही थक्क व्हाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://parbhani.gov.in/mr/notice/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2022-10-07T22:24:18Z", "digest": "sha1:OLVRENP25XGW4G46JTQSLFL3PD3KVSEH", "length": 7865, "nlines": 123, "source_domain": "parbhani.gov.in", "title": "अनुसूचित जमातीच्या भरती स्पेशल ड्राइव्ह 2019 साठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी- मराठी माध्यम | परभणी | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nडॉ.प्रफुल्ल पाटील मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल\nसरस्वती – धन्वंतरी डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल\nमहसुल / दंडाधिकार शाखा\nस्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nउप प्रादेशिक परिवहन कार्यालय\nजिल्हा परिषद, पंचायत समिती तालुका निहाय प्रारुप व अंतिम प्रभाग रचना\nमाहे ऑक्टोबर-नोव्हेंंबर २०१९ मधे झालेल्या अवेळी पावसामुळे बाधित शेतकरी यांंच्या मदत वाटप याद्या\nपरभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची विधान परिषद निवडणुक – २०१८\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या (दुसरा टप्पा)\nप्रधानमंत्री पिक विमा योजना २०१७ लाभार्थी यादी\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ पात्र लाभार्थी याद्या\nखरीप २०१८ दुष्काळी अनुदान पहिला व दुसरा टप्पा\nखासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंंतर्गत २०१४-१५ ते २०१८-१९ या कालावधीमधील मंजुर कामांंची यादी\nऔरंंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२०\nपरभणी जिल्ह्यातील कब्जेहक्काने व भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमीनीचे आदेश\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)\nअनुसूचित जमातीच्या भरती स्पेशल ड्राइव्ह 2019 साठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी- मराठी माध्यम\nअनुसूचित जमातीच्या भरती स्पेशल ड्राइव्ह 2019 साठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी- मराठी माध्यम\nअनुसूचित जमातीच्या भरती स्पेशल ड्राइव्ह 2019 साठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी- मराठी माध्यम\nअनुसूचित जमातीच्या भरती स्पेशल ड्राइव्ह 2019 साठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी- मराठी माध्यम\nअनुसूचित जमातीच्या भरती स्पेशल ड्राइव्ह 2019 साठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी- मराठी माध्यम\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 28, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/vinayak-mete-passed-away-mother-crying-at-home-beed-mhss-746286.html?utm_source=home&utm_medium=local_widget&utm_campaign=state_stories", "date_download": "2022-10-07T21:14:22Z", "digest": "sha1:H5EC6ELUT2XH4KVHPEBC3TTJHMFLXBR3", "length": 7508, "nlines": 95, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vinayak mete passed away mother crying at home beed mhss - Vinayak mete : 'देवा, तू मला का घेऊन गेला नाहीस' विनायक मेटेंच्या आईंच्या काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nVinayak mete : 'देवा, तू मला का घेऊन गेला नाहीस' विनायक मेटेंच्या आईंचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश VIDEO\nVinayak mete : 'देवा, तू मला का घेऊन गेला नाहीस' विनायक मेटेंच्या आईंचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश VIDEO\nदेवा, तू मला का घेऊन गेला नाहीस. मला सरणात उडी घेऊन द्या. मला अन्न पाणी देवू नका..काय माझ्या बाबाने लोक जमवली'\nदेवा, तू मला का घेऊन गेला नाहीस. मला सरणात उडी घेऊन द्या. मला अन्न पाणी देवू नका..काय माझ्या बाबाने लोक जमवली'\nबीड, 14 ऑगस्ट : 'देवा, तू मला का घेऊन गेला नाहीस. मला सरणात उडी घेऊन द्या. मला अन्न पाणी देवू नका.., आता काय करू' असा म्हणत विनायक मेटे (Vinayak mete) यांच्या आईंनी आक्रोश केला. मेटेंच्या आईंचा आक्रोश पाहून उपस्थितींच्या डोळ्यात पाणी आलं. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांचं अपघाती निधनामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. बीडच्या तुकाई निवासस्थानी विनायक मेटे यांच्या घरी त्यांच्या आईंना आणण्यात आले त्यावेळी आईंनी एकच आक्रोश केला. देवा, तू मला का घेऊन गेला नाहीस. मला सरणात उडी घेऊन द्या. मला अन्न पाणी देवू नका..काय माझ्या बाबाने लोक जमवली, घरी 15-17 लोक आली तर कधी हाडतूड केली नाय... कुणाला आम्ही जाऊ नका म्हणालो नाय' असं म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी तिथे उपस्थितीत असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. तसंच, विनायक मेटे जसे समाजकारणात सक्रिय होते, अगदी तसेच ते नाते सांभाळण्याचा देखील प्रयत्न करत होते. मेटे साहेबांनी मला वडिलांची कमतरता जाणवू दिली नाही. त्यांनी मला वडिलांचं प्रेम दिलं, त्यामुळं मला सासर आहे असं कधीचं वाटलं नाही. असं म्हणत विनायक मेटे यांच्या भावजई वैशाली मेटे यांनी आपल्या भावना व्यक्त करत आठवण सांगितली. तर आमदार विनायक मेटे हे माझे मामा होते, त्यांनी माझ्यासह माझ्या भाऊ आणि बहिणीला वडीलांसारखं सांभाळलं आहे. अगदी मुलगी जशी वडिलांकडे हट्ट करते तसाच हट्ट मी देखील करत होते. असं म्हणत आमदार विनायक मेटे यांच्या भाच्ची कल्पना वळेकर यांनी भावना व्यक्त करत आठवण सांगितली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00726.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/as-chief-minister-shinde-and-chief-justice-came-to-a-platform-the-chief-minister-trampled-on-the-signal-130305588.html", "date_download": "2022-10-07T22:27:33Z", "digest": "sha1:ZCUJNZFGTMGRY3QAAJBSDOO3NG53GR7W", "length": 5745, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मुख्यमंत्री शिंदे अन् सरन्यायाधीश एका व्यासपीठावर आल्याने वादंग, मुख्यमंत्र्यांनी संकेत पायदळी तुडवले | As Chief Minister Shinde and Chief Justice came to a platform, the Chief Minister trampled on the signal. - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहाविकास आघाडीची टीका:मुख्यमंत्री शिंदे अन् सरन्यायाधीश एका व्यासपीठावर आल्याने वादंग, मुख्यमंत्र्यांनी संकेत पायदळी तुडवले\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी एकाच व्यासपीठावर हजेरी लावल्याने नवा वाद उद्भवला आहे. शिंदे गट आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्यास हजेरी लावून संकेत पायदळी तुडवले असल्याची टीका महाविकास आघाडीने केली आहे.\nनवनियुक्त सरन्यायाधीश उदय लळीत यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने शनिवारी ताज महाल हॉटेलमध्ये सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास मुख्यमंत्री शिंदे आणि सरन्यायाधीश एकाच व्यासपीठावर होते. याप्रसंगी महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरतील, या शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावरून हा वाद पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सरन्यायाधीशांसोबत एकाच व्यासपीठावर बसणे संकेतांना धरून नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर केली आहे.\nव्यासपीठावरील विसंगती उठून दिसते : काँग्रेस शिंदे सरकारची वैधता तपासली जात असताना सध्याचे सरकारच नाही तर राज्याचे नेतृत्व करणारी व्यक्तीही अपात्र ठरवली जाऊ शकते, अशी परिस्थिती असताना व्यासपीठावरील विसंगती उठून दिसते, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/know-what-is-difference-between-sim-and-e-sim-and-their-benefits/articleshow/92694291.cms?utm_source=hyperlink&utm_medium=mobile-phones-articleshow&utm_campaign=article-3", "date_download": "2022-10-07T22:03:26Z", "digest": "sha1:L3Q2SMJ75FRIQZETKYMQ3ERY6RDB4PWZ", "length": 12937, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nSIM Vs E SIM: ईझी ट्रान्सफर ते एका वेळी ५ नेटवर्कचा वापर, पाहा E SIM चे 'हे' बेनेफिट्स\nSIM Vs E SIM : ई-सिम वापरण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढणार आहे. मात्र, ई-सिमबाबत अनेक गोष्टी कानावर येत असतात . त्यातील काही खऱ्या आहेत तर, काही नाही. ई-सिमशी संबंधित सर्व तपशील जाणून घेऊया.\nसध्या सर्वत्र E SIM ची चर्चा\nSIM आणि E SIM मध्ये काय आहे फरक\nपाहा E SIM वापरण्याचे फायदे\nनवी दिल्ली: E- SIM: येत्या काही दिवसांत सामान्य फिजिकल सिमचा वापर कमी होणार असून लवकरच फिजिकल सिमच्या जागी ई-सिम येईल. अशा स्थितीत ई-सिमची गरज का, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. ई-सिम आणि फिजिकल सिममध्ये काय फरक आहे. या दोन्ही सिमचा वापर कसा आणि कधी करता येतो जाणून घेऊया याबद्दल सविस्तर. सामान्य सिम हे काही धातूच्या कणांनी बनलेले छोटे प्लास्टिक कार्ड असते. त्यात ग्राहकांची माहिती असते. मोबाईल सिम कार्डमध्ये मोबाईल नंबर असतो. ज्यावरून तुम्ही कॉल करू शकता. तसेच, फोनवर कॉल प्राप्त करण्यापासून, तुम्ही मजकूर आणि डेटामध्ये प्रवेश करण्यास सक्षम असता. संपर्क, फोन नंबर सिम कार्डमध्ये साठवले जातात. जे एका फोनवरून दुसऱ्या फोनमध्ये सहजपणे सिम ट्रान्सफर करू शकतात.\n सब्सक्रिप्शन शिवाय Free मध्ये घेता येणार Netflix चा आनंद, लगेच पाहा जिओचे 'हे' भन्नाट ५ प्लान्स\nई सिम म्हणजे काय \nई-सिम ही तुमच्या फोनमध्ये असलेली एक छोटी चिप असते. जी फोनमधून काढता येत नाही. लवकरच ई-सिम प्लास्टिक सिमची जागा घेईल असेही सांगण्यात येत आहे. ई-सिमच्या मदतीने एका नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कमध्ये सहजपणे ट्रान्सफर करता येतो. यामध्ये सिमकार्ड काढण्याची किंवा नवीन सिम टाकण्याची गरज नाही. सर्वात मोठा फायदा म्हणजे एका ई-सिममध्ये ५ व्हर्च्युअल सिम साठवता येतात. याचा अर्थ तुम्ही एकाच ई-सिममध्ये ५ नेटवर्क वापरण्यास सक्षम असाल. तसेच, तुम्ही एका सिममधून दुसऱ्या सिममध्ये सहज ट्रान्सफर करू शकता. यामध्ये तुम्ही प्रवास करताना लोकल नेटवर्कवर शिफ्ट करू शकाल. ई-सिममुळे फोनमध्ये अतिरिक्त जागेची गरज भासणार नाही. याच्या मदतीने स्मार्टफोन उत्पादक फोन स्लिम आणि हलका बनवू शकतात.\nवाचा: भारतात एन्ट्री साठी तयार Redmi K-Series चे स्मार्टफोन्स, फीचर्स असतील जबरदस्त, पाहा डिटेल्स\nफोनमध्ये E-SIM वापरण्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन मोबाईल प्लान जोडावा लागेल. यानंतर, तुम्ही तुमच्या ईमेल आयडीवर पाठवलेला QR कोड स्कॅन करून सिम वापरू शकता. तुम्ही एका फोनमध्ये अनेक ई-सिम मोबाइल प्लान जोडू शकता. टि मोबाईल (American Telecom Company) नुसार, तुम्ही एकावेळी १० e-SIM प्रोफाइल जोडू शकता. पण, सध्या भारतात हे उपलब्ध नाही.\nवाचा: Spam Calls: नको असलेल्या स्पॅम कॉल्सपासून 'अशी' मिळवा सुटका, करावे लागेल 'हे' काम, पाहा टिप्स\nमहत्वाचे लेखRecharge Plans: १ वर्षाची व्हॅलिडिटी, ७३० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह हॉटस्टार फ्री; पाहा ‘हा’ प्रीपेड प्लान\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nइलेक्ट्रॉनिक्स 8GB रॅम आणि 10,090 mAh बॅटरी पावर असणाऱ्या या Samsung Tabs खरेदी करा आणि मिळवा ₹18000 इतका जबरदस्त डिस्काउंट\nहेल्थ पुरुषहो सावधान, आधी लठ्ठपणा मग डायबिटीज आणि नंतर येते नपुंसकता, ताबडतोब करा हे उपाय\nआर्थिक राशीभविष्य आर्थिक राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२२ : जाणून घ्या उद्याचा दिवस कोणासाठी ठरेल धनप्राप्तीचा\nसिनेन्यूज हर्षद मेहता फेम प्रतीक गांधी आणि सई ताम्हणकर काय करतायत एकत्र\nकार-बाइक आनंद महिंद्रांचा स्वॅग, नवीन Scorpio N घेऊन शेअर केला फोटो, लोक म्हणतायत, 'ये तोहफा मैंने खुद को दिया है'\nसिनेन्यूज मला त्यासाठी कर्ज काढायचं नव्हतं, माझ्या बॅंक अकाऊंटमध्ये आजही...आलियाचा मोठा खुलासा\nक्रीडा World Smile Day: यांच्या एका स्माईलवर क्लीन बोल्ड होतात चाहते, यातल्या कितीजणी तुम्हाला माहीत आहेत\nमुंबई मोदी पाकिस्तानला केक खायला गेले तर बिघडलं कुठे राणेंनी ठाकरेंना थेअरी सांगितली\nसोलापूर उद्धव काकांचा दसरा मेळावा पाहिला का, पुतण्या अमित ठाकरेंचं 'स्मार्ट' उत्तर\nधुळे भाजप आमदार जयकुमार रावलांवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल; धुळ्यात राजकीय वातावरण तापले\n शिंदे गट आणि शिवसैनिक आमने सामने, पोलिसांनीच काढला तोडगा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai-high-court-big-decision-on-dasara-melava-shivaji-park-mhcp-764606.html", "date_download": "2022-10-07T21:55:25Z", "digest": "sha1:ATXEUR4BQUVGT2QDR6RHRS2TRAJNPS5L", "length": 23117, "nlines": 96, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा दिलासा, शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nउद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा दिलासा, शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी\nउद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा दिलासा, शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी\nशिवाजी पार्क मैदानात उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार, मुंबई हायकोर्टाचा सर्वात मोठा दिलासा, शिंदे गटाला फटका\nतीनही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निकाल वाचनाला सुरुवात केली. मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली आहे.\nमुंबई, 23 सप्टेंबर : मुंबई हायकोर्टाने आज सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर शिवसेनेकडून दरवर्षी दसरा मेळावा घेतला जातो. पण यावर्षी हा दसरा मेळावा वादात सापडला होता. दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने मुंबई महापालिकेत अर्ज केला होता. पण मुंबई महापालिकेने कायदा-सुव्यवस्थेचं कारण सांगत दोन्ही गटाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गट दोघांच्या बाजून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच मुंबई महापालिका देखील कोर्टात गेली होती. या संबंधित सर्व याचिकांवर कोर्टात आज सुनावणी झाली. तीनही पक्षकारांकडून प्रचंड युक्तीवाद करण्यात आला. कोर्टाने तीनही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून घेत मुख्य शिवसेनेला दसरा मेळावासाठी परवानगी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा येत्या दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क मैदानावर आवाज घुमणार हे निश्चित झालं आहे. मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची मध्यस्थी याचिका फेटाळली. अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्य होता. कायदा-सुव्यवस्थेचा विचार करुनच पालिकेने परवानगी नाकारली, असं निरीक्षण कोर्टाने नमूद केलं. यावेळी पालिकेने 2017 मध्ये कशी परवानगी दिली हे पाहवं लागेल, असं न्यायाधीश म्हणाले. 2016 च्या आधी शिवसेनेला परवानगी मिळाली होती. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्षांपासून होतोय. खरी शिवसेना कुणाचा यात आम्हाला जायचं नाही. 22 आणि 26 दोन्ही तारखेचे अर्ज पालिकेला आलेले होते. पालिकेकडून शिवसेनेला प्रतिसाद न मिळाल्याची याचिका आहे, असं न्यायाधीशांनी नमूद केलं. पोलिसांनी पालिकेला कायदा आणि सुव्यवस्थेचा २१ तारखेला अहवाल दिला. कायदा-सुव्यवस्थेमुळे परवानगी न देण्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता, असं कोर्टाने म्हटलं. यावेळी कोर्टाने पालिका प्रशासनालाही सुनावलं. पालिकेचा निर्णय अंतिम नाही. दुसऱ्या गटाच्या अर्जाबाबत पालिकेला माहिती होतं. मुंबई पालिकेचा निर्णय तथ्यात्मक नाही. मुंबई पालिकेने कायद्याचा दुरुपयोग केला, असं कोर्टाने स्पष्ट म्हटलं. गेल्या सात दशकांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय. दसरा मेळाव्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा कधीच प्रश्न निर्माण झालेला नाही. त्यामुळे यावर्षी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही ना अशी हमी कोर्टाने मागितली. त्यावर ठाकरे गटाने हमी दिली. त्यानंतर कोर्टाने ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आज मुंबई हायकोर्टात पोहोचला. दोन्ही गटाला दसरा मेळावा घ्यायचा आहे. दोन्ही गटाला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान अर्थात शिवतीर्थ येथे दसरा मेळावा घ्यायचा आहे. त्यासाठी दोन्ही गटाकडून मुंबई महापालिकेकडे परवानगी मिळावी, असा अर्ज करण्यात आला होता. पण सुरक्षेचा विचार करुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये म्हणून मुंबई महापालिकेने दोन्ही गटाला शिवतीर्थ येथे दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली. पण याच मुद्द्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटाने मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर आज मुंबई हायोर्टात शिंदे गट, ठाकरे गट आणि मुंबई महापालिकेकडून युक्तीवाद करण्यात आला. तीनही बाजूचा युक्तीवाद संपल्यानंतर कोर्टाकडून लगेच निकाल वाचण्यात आला.\nकोर्टात नेमकं काय-काय घडलं\nसर्वात आधी बीएमसी वकील मिलिंद साठ्ये यांचा युक्तिवाद सुरु झाला. त्यांच्या युक्तीवादातील मुद्दे : 15 ऑक्टोबर 2012 आणि 24 ऑक्टोबर 2012 ला हायकोर्टानं एक आदेश दिला होता. शिवसेनेनं यावर्षी परवानगी द्या. पुढील वर्षीचा हक्क सोडतो, अशी भूमिका घेतली होती. बालमोहन विद्यामंदिर, बालदिन कार्यक्रमासाठी हक्क सोडला होता. शिवसेनेच्या वतीने 3 अर्ज आले होते. विभाग प्रमुख शशी फडके, अनिल देसाई आणी सदा सरवणकर यांच्या वतीने 2017 ला 3 अॅप्लिकेशन दिलं होतं. 2019 ला पुन्हा 2 अर्ज होते. सदा सरवणकर आणि अनिल देसाई यांचे अर्ज आले होते. तेव्हा 2019 मध्ये अनिल देसाई यांच्या नावे परवानगी दिली. 2020 ला सदा सरवणकर यांचं अर्ज होतं. पण कोरोना संकटामुळे परवानगी नाकारली होती. कोरोनामुळे शासन निर्णय न झाल्याने परवानगी नाकारली होती. 14 सप्टेंबर 2022 ला वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी बीएमसीला पत्र दिलं. अवैध राजकीय पोस्टर लावल्याने वाद निर्माण होऊ शकतात, असा मजकूर त्यामध्ये होता. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, असं पोलिसांनी स्पष्ट केलं. 26 ऑगस्टला अनिल देसाई यांचं शिवसेना परवानगी पत्र आलं. तर 30 ऑगस्टला सदा सरवणकर यांनी परवानगी पत्र दिलं. 2 पार्ट्यांनी परवानगी मगितल्याचं पत्र आल्यानं पोलीस उपायुक्त यांना बीएमसीनं अभिप्राय मागितला. पोलिसांनी दोन्ही शिवसेना गटात झालेल्या राड्याचा उल्लेख करून पत्र दिलं. परवानगी दिली तर कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न उपस्थित होऊ शकतो हे स्पष्ट मत दिलं. स्थानिक आमदार सदा सरवणकर यांना मागील 2 वर्षी दसरा मेळावा परवानगी नाकारली तर यंदा त्यांना परवानगी द्यावी, असं पोलिसांचं पत्र आलं. मात्र याच पत्रात 2 अर्ज असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून दोघांनाही परवानगी नाकारावी, असं स्पष्ट लेखी मत पोलीस उपायुक्तांनी बीएमसीला दिलं. शिवाजी पार्क मैदान मिळावं याकरीता अनेक अर्ज असले तरी सदा सरवणकर यांचं अर्ज दरवेळी असतं. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकते. या पोलिसांनी दिलेल्या स्पष्ट अभिप्रायमुळे परवानगी दोघांनाही नाकारली. कारण 2 गटात तणाव असल्याने दोघांत वाद घटना घडल्याचा पोलिसांचा अहवाल आहे. अनिल देसाई आणी सदा सरवणकर हे दोघंही अनेक वर्षांपासून या दसरा मेळाव्यासाठी अर्ज करताय हा इतिहास आहे. सदा सरवणकर यांचे वकील जनक द्वारकादास यांचा युक्तिवाद : मुंबई महापालिकेच्या वकिलांच्या युक्तीवादानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे वकील जनक द्वारकादास यांनी कोर्टात युक्तिवाद सुरु केला. अर्जदार सदा सरवणकर हे पक्षाचे स्थानिक आमदार आहेत आणि त्यांचं कार्यालयही त्याच भागात आहे. अर्जदार सदा सरवनकर हे पक्षाचे स्थानिक आमदार आणि त्यांचं कार्यालयही त्याच भागात आहे. दुसरे अर्जदार अनिल देसाई हे खासदार आणि त्या भागाचे रहिवासी नाहीत. दरवेळी सदा सरवणकर हे परवानगी मागतात. सरवणकर हे स्थानिक आमदार आहेत तर देसाई हे पक्षाचे सचिव आहेत. अर्थात स्थानिक आमदार यांचा अर्ज हे व्यवहार्य आहे. या याचिकेत अनेक त्रुटी आहेत. उद्धव ठाकरे यांचे आता सरकार नाही. मूळ पक्ष कुणाचा याबद्दलच्या वादाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे देखील सुनावणी सुरू आहे. सदा सरवणकर हे पक्षात नाही, असं कुठेही म्हणाले नाही. अशा ग्राउंड रिअॅलिटीमुळे त्यांना मध्यस्थ म्हणून बाजू मांडायचा हक्क आहे. सरवणकर हे शिवसेनेतच आहेत आणि सरकार शिवसेनेचं आहे. शिवसेना म्हणजे काय सचिव अनिल देसाई अर्ज म्हणजे शिवसेना का सचिव अनिल देसाई अर्ज म्हणजे शिवसेना का स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांचा अर्ज म्हणजे शिवसेना नाही का स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांचा अर्ज म्हणजे शिवसेना नाही का सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे म्हणून सदा सरवणकर हे शिवसेनेत नाही हे अनिल देसाई कसं म्हणू शकतात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे म्हणून सदा सरवणकर हे शिवसेनेत नाही हे अनिल देसाई कसं म्हणू शकतात देसाई यांनी सांगावं की आमचा कोणी स्थानिक आमदार नाही, असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील जनक द्वारकादास यांनी कोर्टात केला. न्यायमूर्ती आर डी धनुका यांनी सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या सुनावणीबद्दल काहीही ऐकायला नकार दिला आणि सदा सरवणकर यांचे वकील जनक द्वारकादास स्पष्ट शब्दात कानपिचक्या दिल्या. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांत घडलेल्या शिवसेनेतील घडामोडींबद्दल पुन्हा सरवणकर यांचे वकील जनक द्वारकादास यांनी मुद्दे मांडायला सुरुवात केली. त्यावरून पुन्हा त्यांना थांबवून न्यायाधीश आर डी धनुका यांनी खडेबोल सुनावले. अर्ग्युमेंट काय करायचं हे तुम्हाला समजायला हवं असं स्पष्ट सुनावलं. मात्र आपला मुद्दा जनक द्वारकादास काही सोडायला तयार नव्हते. त्यानंतर कोर्टानं स्पष्ट नाराजी व्यक्त केली. ठाकरे गट वकील एस्पि चिनॉय यांचा युक्तीवाद मुंबई महापालिका आणि शिंदे गटानंतर ठाकरे गटाचे वकील एस्पि चिनॉय यांनी अतिशय कमी शब्दांत युक्तीवाद केला. आपल्याला कोर्टाचा वेळ वाया घालायचा नाही, असं म्हणतच त्यांनी युक्तीवाद सुरु केला. शिवसेनेत डिस्प्युट हा मुद्दाच नाही. कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. पहिला अर्ज आमचा आहे. आम्ही शिवसेना नाही हे पालिका आयुक्तांनी अमान्य केलं नाही. सदा सरवणकर हे स्थानिक आमदार आहेत. स्थानिक आमदार म्हणजे पक्ष होत नाही. आम्ही पक्ष म्हणून परवानगी मागितली, असा मुद्दा वकिलांनी मांडला.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/bollywood/shah-rukh-khan-teases-mumbai-police-commissioner-reveals-who-his-real-boss-is-watch-video-au163-777920.html", "date_download": "2022-10-07T22:19:29Z", "digest": "sha1:X66YLVCTAQ3RPPLVGETNF4KWNUWM4QB7", "length": 11225, "nlines": 192, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nShah Rukh Khan: “त्या एका व्यक्तीसमोर त्यांनाही झुकावं लागतं”; शाहरुखने केली माजी मुंबई पोलीस आयुक्तांची मस्करी\nमुंबई पोलिसांना (Mumbai Police) अभिवादन करण्यासाठी दरवर्षी उमंग हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी परफॉर्म करून पोलिसांचे आभार मानतात.\nशाहरुखने केली माजी मुंबई पोलीस आयुक्तांची मस्करी\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: स्वाती वेमूल\nबॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच त्याच्या चित्रपट किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहरुख कुठेही गेला तरी त्याचे चाहते त्याची पाठ सोडत नाहीत. जगभरात शाहरुखचा मोठा फॅन फॉलोइंग आहे. तो नुकताच मुंबईतील प्रसिद्ध ‘उमंग’ (Umang 2022) या कार्यक्रमात पोहोचला होता. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) अभिवादन करण्यासाठी दरवर्षी उमंग हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी परफॉर्म करून पोलिसांचे आभार मानतात. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खाननेही ‘उमंग 2022’ या मुंबई पोलिसांच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमातील शाहरुख आणि कॉमेडियन भारती सिंगचा पती हर्ष लिंबाचिया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुख हर्षसोबत मजामस्करी करताना दिसत आहे.\nया व्हिडिओमध्ये शाहरुख मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची मस्करी करताना दिसत आहे. व्हिडिओची सुरुवात कॉमेडियन हर्ष लिंबाचियापासून होते. “याठिकाणी अनेक सेलिब्रिटी असताना मी मुंबई पोलिस आयुक्तांवरून नजर हटवू शकत नाही. मुंबई पोलीस आयुक्त बनणं ही खूप मोठी गोष्ट आहे,” असं तो म्हणतो. त्यावर शाहरुख गंमतीने म्हणतो की, “जरी सगळ्यांना त्यांचं ऐकावं लागत असलं तरी एक व्यक्ती अशी आहे जिच्यासमोर त्यांनाही येस बॉस, येस बॉस असं म्हणावं लागतं. मुंबई पोलीस आयुक्तांनाही त्या व्यक्तीसमोर झुकावं लागतं आणि ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी.” त्याचं हे वक्तव्य ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.\nशाहरुख युरोपमध्ये त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाचं शूटिंग आटपून गुरुवारी मुंबईत परतला. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नूदेखील मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ‘पठान’ आणि दिग्दर्शक अटलीच्या ‘जवान’मध्येही तो झळकणार आहे.\nMiss India USA 2022: भारतीय वंशाच्या आर्या वाळवेकरने जिंकला ‘मिस इंडिया यूएसए’चा किताब\nAnu Kapoor: आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’बद्दल प्रश्न विचारताच अनु कपूर म्हणाले ‘तो कोण आहे’, व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक्\nNithya Menon: मानसिक छळाविषयी पत्रकार परिषदेत व्यक्त झाली अभिनेत्री; म्हणाली “विविध 30 नंबरवरून फोन करून द्यायचा त्रास”\nDaagdi Chaawl 2: डेझी शाहची मराठीत धमाकेदार एण्ट्री; ‘दगडी चाळ 2’ मधील गाण्यावर धरला ठेका\nटू पीसमध्ये इलियाना डिक्रूझची हवा हवाई\n‘संस्कारी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीचे संस्कारी रूप\nमौनी रॉयचा केसरिया रंग…. फोटोशूटसाठी पहा काय केलं\nअजय देवगणच्या ऑनस्क्रीन पत्नी, श्रिया सरनच्या अदा\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://kvkselsura.pdkv.ac.in/?p=1305", "date_download": "2022-10-07T23:07:07Z", "digest": "sha1:X52VRHGCVGJUDAZY6CPTK6LS56UY7M66", "length": 13131, "nlines": 66, "source_domain": "kvkselsura.pdkv.ac.in", "title": "कृषि विज्ञान केंद्र, वर्धा येथे पोषण वाटिका महाभियान व वृक्षलागवड संपन्न – KRISHI VIGYAN KENDRA, SELSURA, WARDHA", "raw_content": "\nकृषि विज्ञान केंद्र, वर्धा येथे पोषण वाटिका महाभियान व वृक्षलागवड संपन्न\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्र येथे कृविके सेलसुरा व इफको यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ सप्टेंबर, २०२२ रोजी पोषण वाटिका महाभियान व वृक्षलागवड कार्यक्रम उत्स्फुर्तरित्या संपन्न झाला. भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी २०१८ साली पोषण अभियानाची सुरुवात केली, ज्यामध्ये जन्मतः कमी वजन असणारे व कुपोषित बालके, गर्भवती महिला, स्तनदा माता यांना आवश्यक ते पोषण मिळावे व त्याबद्दलची जागरूकता निर्माण व्हावी या उद्दिष्टाने मा. डॉ. डी. बी. उंदीरवाडे, संचालक (विस्तार शिक्षण), डॉ. पंदेकृवि, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. जीवन कतोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृविके, सेलसुरा यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.\nसदर कार्यक्रम प्रसंगी उदघाटक म्हणून श्री. प्रमोद गव्हाळे, सरपंच, खापरी, ता. सेलू, तसेच श्री. रितेश जांभुळकर, तालुका समन्वयक बाजार जोडणी (उमेद), श्री. व्यंकट ढाले, कृषी उद्योजक संप्रेरक, सिंजेंटा, ईफकोचे प्रक्षेत्र अधिकारी श्री. राहुल भुजाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात कृषि जगतेचे प्रणेते डॉ. पंजाबराव देशमुख यांचे फोटो पूजन व दीप प्रज्वलनाने झाली.\nग्रामीण महिलांनी कुटुंबासोबतच स्वतः कडे लक्ष देणे आवश्यक आहे त्याकरिता योग्य पोषण आहार घेणे गरजेचे आहे. परंतु प्रत्येक महिला दररोजच्या आहारामध्ये पोषक अन्न विकत घेऊ शकत नाही म्हणून स्वतः आपल्या शेतीमध्ये पोषणवाटिका तयार करून दररोजची गरज भागवू शकतात. सध्याच्या तांत्रिक युगात प्रत्येकाला फास्टफूड, जंकफूड खाण्याची आवड आहे परंतु याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत आहे. शहरातील किंवा गावातील तरुण मुला-मुलींनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या शेतीमध्ये सेंद्रिय खाद्याचे उत्पन्न घेतल्यास योग्यपोषण आहार उपलब्ध होऊ शकतो असे श्री. प्रमोद गव्हाळे, यांनी उदघाटन प्रसंगी प्रतिपादन केले.\nपोषण वाटिका लावून कुपोषण दूर करा, महिलांनी व लहान मुलांनी कडधान्य खाण्याकडे कल वाढविला पाहीजे, सध्याच्या परिस्थिती मध्ये स्वतः ची क्षमता वाढविणे खूप आवश्यक झालेले आहे. याकरिता तज्ञ लोकांची मदत घ्या, असा सल्ला श्री. रितेश जांभुळकर यांनी दिला.\nभारताला ७५ वर्षे पूर्ण होत असून स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने बालके व महिला कुपोषण मुक्त व्हावे या करिता त्यांना पोषण आहार विषयी संपूर्ण ज्ञान तसेच पोषण वाटिका तयार करण्याकरिता मान्यवरांच्या हस्ते भाजीपाला पिकांचे बियाणे संच व रोपटे वाटप करण्यात आले. कृविके प्रक्षेत्रावर अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सर्वांनी कृविके उपक्रमाचे तोंडं भरुन कौतुक केले तसेच सदर कार्यक्रमाकरिता वर्धा जिल्ह्यातील वायफड, टाकळी, नांदोरा, दहेगाव, पळसगाव, तरोडा, वाघोली, देवळी, सालोड, सिंधी (मेघे), तळेगाव, बाबूळगाव , शिरपूर, वाबगाव, काजळसरा, बोरगाव, सावंगी (मेघे) या गावातील महिला गट, शेतकरी, ग्रामीण युवक-युवती बहु संख्येने उपस्थित होते.\nप्रत्येक पुरुषाच्या प्रगती मागे एका स्त्रीचा सहभाग असतो मग ती आई, बहीण, पत्नी, मुलगी कोणीही असू शकते. प्रत्येक घरातील महिला जर सुदृढ असेल तर प्रत्येक कुटुंब पर्यायाने संपूर्ण देश सशक्त बनेल. स्त्री जशी संपूर्ण कुटुंबाची काळजी घेते तशीच तिने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे या करिता पोषणयुक्त आहार घेणे आवश्यक आहे असे डॉ. जीवन कतोरे यांनी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले.\nतांत्रिक सत्रा मध्ये गृह विज्ञान विषयतज्ञ डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी शेतकरी महिलांना पोषण वाटिकेचे महत्व, जैवसंपृक्त वाण तसेच पौष्टिक तृण धान्याचे आरोग्यासाठी महत्व या विषयांवर मार्गदर्शन केले.\nया कार्यक्रमाचे आभार डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी मानले ,या कार्यक्रमाच्या यशस्विते करीता उमेदचे सर्व अधिकारी-कर्मचारी, ईफकोचे प्रक्षेत्र अधिकारी श्री. राहुल भुजाडे तसेच कृविके कार्यालयातील डॉ. रुपेश झाडोदे, डॉ. निलेश वझीरे, डॉ. सचिन मुळे, श्री. गजानन म्हसाळ, पायल उजाडे व सर्व कर्मचारी वृन्द यांनी सहकार्य केले.\n← कृषि विज्ञान केंद्र,सेलसुरा येथे नैसर्गिक शेती कार्यशाळा संपन्न\nकृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे पाच दिवसीय शेतकरी महिला सक्षमीकरण प्रशिक्षण उत्साहात संपन्न →\nकृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे पाच दिवसीय शेतकरी महिला सक्षमीकरण प्रशिक्षण उत्साहात संपन्न\nकृषि विज्ञान केंद्र, वर्धा येथे पोषण वाटिका महाभियान व वृक्षलागवड संपन्न\nकृषि विज्ञान केंद्र,सेलसुरा येथे नैसर्गिक शेती कार्यशाळा संपन्न\nकृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे ९४ आयसीएआर स्थापणा दिवस साजरा करण्यात आला\nकृषि विज्ञान केंद्र सेलसुरा येथे कृषि संजीवनी सप्ताह व कृषि दिन उत्साहात संपन्न\nगरीब कल्याण सम्मेलन व खरीप पूर्व शेतकरी मेळावा\nजागतिक मधुमक्षिका दिन साजरा\nकिसान भागीदारी प्राथमिकता हमारी किसान मेळावा\nकृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा जि. वर्धा येथे डेसी अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न…\nजागतिक महिला दिन साजरा करण्यात आला\n५१ शास्त्रीय सल्लागार समिति सभा संपन्न\nकापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन कार्यशाळा\nकृविके सेलसुरा येथे पोषण वाटिका महाभियान व वृक्ष लागवड कार्यक्रम उत्साहात संपन्न\nकृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे ५०वी शास्त्रीय सल्लागार समिती सभा संपन्न\nजागतिक मृदा दिन कार्यक्रम संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.phoneky.com/gif-animations/?id=s3s210436", "date_download": "2022-10-07T22:03:02Z", "digest": "sha1:JCR7MD6VSL7T533JUDRHQKORYBU55JGS", "length": 5857, "nlines": 121, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "सुंदर मुलगी GIF - PHONEKY वर डाउनलोड करा आणि सामायिक करा", "raw_content": "\nGIF अॅनिमेशन वॉलपेपर थेट वॉलपेपर\nGIF अॅनिमेशन शैली babes\nसुंदर मुलगी GIF एनीमेशन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया अॅनिमेशनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अॅनिमेशनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन एचडी वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते अॅनिमेटेड GIF विनामूल्य डाउनलोड करा\nGIF अॅनिमेशन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅनिमेशन Android, Apple iPhone, Samsung, सोनी, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूवेई, एलजी आणि इतर मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2022 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर सुंदर मुलगी GIF एनीमेशन डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य कोणत्याही मोबाइल डिव्हाइससाठी GIF अॅनिमेशन डाउनलोड करू शकता. मित्रांबरोबर आपल्या संदेशांमध्ये हे GIF संलग्न करा आणि एक छान वेळ द्या या अॅनिमेटेड गीफचे छान आणि सुंदर दिसणे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार अॅनिमेटेड गिफ्सपर्यंत आपणास भिन्न शैलीचे इतर अनेक GIF अॅनिमेशन आढळतील. मोबाईल फोनसाठी टॉप 10 सर्वोत्तम एनीमेटेड गिफ्स पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार अॅनिमेशन निवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0", "date_download": "2022-10-07T22:17:56Z", "digest": "sha1:LRXV75IMN7AIQWBOSTBOJY2P25LI4HD7", "length": 4775, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेपियर - विकिपीडिया", "raw_content": "\nनेपियर न्यू झीलंडमधील हॉक्स बे भागात असलेले प्रमुख शहर आहे. जून २००९ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५८,१०० आहे.\nहेस्टिंग्स सिटीपासून २० किमी अंतरावर असलेल्या या शहराला हेस्टिंग्स सिटीसह बे सिटीझ असे संबोधण्यात येते. दोन्ही शहरांत मिळून सुमारे १,२२,६०० व्यक्ती राहतात.\nनेपियरचे माओरी भाषेतील नाव अहुरिरि आहे.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०२२ रोजी १०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00031775-YC248-FR-07768RL.html", "date_download": "2022-10-07T22:11:44Z", "digest": "sha1:KNGNB3XOP6X3QSRIV4EY6DZZBUO4NALR", "length": 14557, "nlines": 300, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "YC248-FR-07768RL | Yageo | अॅरे/नेटवर्क प्रतिरोधक | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर YYageo48-FR-07768RL Yageo खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये YYageo48-FR-07768RL चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. YYageo48-FR-07768RL साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/iocl-recruitment-2022-137-vacancies/", "date_download": "2022-10-07T21:49:16Z", "digest": "sha1:CGENJJWZEFJCAZ2PDPOQM2QNVFVBO66D", "length": 8024, "nlines": 114, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "इंडियन ऑईल मध्ये 137 जागांसाठी भरती - Bharti jahirat", "raw_content": "\nइंडियन ऑईल मध्ये 137 जागांसाठी भरती\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nइंडियन ऑईल तर्फे इंजिनिअरिंग असिस्टंट व टेक्निकल अटेंडंट पदाच्या एकूण १३७ रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक २४ जानेवारी २०२२ ते १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता\nअर्ज कसा कराल : Mode of Application : ऑनलाईन पद्धतीने\nपरीक्षेचे नाव / Exam Name : –\nपदाचे नाव व तपशील / Post Details\nपद क्रमांक पदाचे नाव पद संख्या\n1 इंजिनिअरिंग असिस्टंट / Engineering Assistant 58 जागा\nपदाचे नाव शैक्षणिक पात्रता\n50% गुणांसह मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST: पास श्रेणी]\nITI {इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ मशीनिस्ट/ मशीनिस्ट (ग्राइंडर)/ मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम/ टर्नर/ वायरमन/ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स & IT/ मेकॅनिक (रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनर)/ मेकॅनिक (डिझेल)}\nवयाची अट / Age Limit : 24 जानेवारी 2022 रोजी 18 ते 26 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपरीक्षा शुल्क / Exam Fee\nखुला प्रवर्ग / इतर मागास वर्ग 100/-\nमाजी सैनिक फी नाही\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख / Last date of online application : 18.02.2022 सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nअधिकृत संकेतस्थळ / Official Website : पाहा\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMPSC Group C Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC Subordinate Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022\nAir Force Agnipath Recruitment 2022 | भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022\nMPSC State Service Pre 2022 | महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 161 जागा\nMPSC Recruitment | पशुधन विकास अधिकारी पदाच्या 212 जागांसाठी भरती\nIndian Army Recruitment | भारतीय सेना भारती 90 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/vinayak-mete-accident-truck-driver-responsible-for-accident-arrested-from-daman-vehicle-seized/articleshow/93561482.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2022-10-07T21:57:55Z", "digest": "sha1:BOQUMD7UARJJZTUAJTLSAKSPHXY6LASO", "length": 12785, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nविनायक मेटेंच्या कारने धडक दिलेला ट्रक अन् चालक सापडला; दमणमधून पोलिसांची कारवाई\nvinayak mete accident: विनायक मेटे यांच्या अपघातास कारणीभूत असलेला ट्रक पालघरमधील असल्याची माहिती समोर आली आहे. मेटे यांच्या कारला धडक दिल्यानंतर ट्रकचा चालक ट्रक घेऊन फरार झाला होता. त्याला पालघर पोलिसांनी अटक केली आहे.\nविनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू\nमुंबई: शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटेंचा आज पहाटे अपघाती मृत्यू झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झालेल्या मेटेंचा म़ृत्यू झाला. विनायक मेटे यांच्या अपघातास कारणीभूत असलेला ट्रक पालघरमधील असल्याची माहिती समोर आली आहे. मेटे यांच्या कारला धडक दिल्यानंतर ट्रकचा चालक ट्रक घेऊन फरार झाला होता. त्याला पालघर पोलिसांनी अटक केली आहे.\nविनायक मेटेंच्या फोर्ड एन्डेवेर कारला आयशर कंपनीच्या ट्रकनं धडक दिली. DN 09 P 9404 असा या ट्रकचा नंबर असून तो पालघरमधील कासा येथील एका व्यक्तीच्या मालकीचा आहे. विनायक मेटे यांच्या कारला अपघात झाल्यानंतर ट्रकचा चालक ट्रक घेऊन फरार झाला. उमेश यादव असं चालकाचं नाव आहे.\nमेटेंच्या कारसारखीच कार कोल्हापुरात ४०० फूट दरीत कोसळली होती; तेव्हा चमत्कार घडला होता\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्यानंतर उमेश यादव ट्रक घेऊन फरार झाला. पालघर आणि रायगड पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी वापी, दमण भागात रवाना झाले. यादव चालवत असलेल्या ट्रकचा अपघात झाल्याची आणि त्यानंतर यादव ट्रक घेऊन फरार झाल्याची माहिती ट्रकच्या मालकानं स्वत:हून पोलिसांना दिली होती. यानंतर पोलिसांनी मालकाला सोबत घेऊन यादवचा शोध सुरू केला. पालघर पोलिसांनी दमणमधून यादवला बेड्या ठोकल्या. अपघातग्रस्त ट्रकदेखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.\nमराठवाड्याच्या नेत्यांची अकाली एक्झिट, एक एक करुन ५ रत्न गेली, विलासरावांच्या स्मृतिदिनी नियतीने मेटेंना नेलं...\nविनायक मेटे यांच्या अपघाती निधनामुळे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांसह बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. उद्या सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत शिवसंग्राम भवन या ठिकाणी मेटे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसंग्राम कार्यालयाकडून मिळाली आहे. दुपारी मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.\nमहत्वाचे लेखविनायक मेटेंच्या कारनं धडक दिलेला ट्रक पालघरचा; महत्त्वाची माहिती समोर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमुंबई आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\n जे लॉटरीचं तिकीट कचऱ्यात टाकलं, त्यानेच बनवले या महिलेला करोडोंची मालकीण\nदेश ​देश हादरला... लग्न करण्यास नकार दिला, त्याने १९ वर्षीय मारुतीला पेट्रोल ओतून पेटवलं...​\nक्रिकेट न्यूज उभारायला गेले MS Dhoni चा मेणाचा पुतळा, पण धोनीची झाली अनहोनी, पाहा भन्नाट memes\nदेश काँग्रेस नेत्यानं हॉटेलमध्ये नेलं, मग सामूहिक अत्याचार केले, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर तिघांना अटक\nLive Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी\nमुंबई ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा ते दिघेंच्या मृत्यूचं ठाकरे कनेक्शन, मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज\nसातारा माझ्या भावाचं माझ्यावर खूपच प्रेम, मी माझा जितका प्रचार करत नाही, तितका...: उदयनराजे\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://navrangruperi.com/drama/ekalagnachipudhachigoshta/", "date_download": "2022-10-07T23:18:52Z", "digest": "sha1:G3VH2CNCBQAMMPGXBXBXTEBHF4MHHIMT", "length": 12448, "nlines": 175, "source_domain": "navrangruperi.com", "title": "'एका लग्नाची पुढची गोष्ट'चा १४ मार्चला ४००वा प्रयोग! जाणून घ्या लग्नाळू आठवड्याचे वेळापत्रक. - Navrang Ruperi", "raw_content": "\n‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चा १४ मार्चला ४००वा प्रयोग जाणून घ्या लग्नाळू आठवड्याचे वेळापत्रक.\nमराठी रंगभूमीला वाहून घेतलेले आजच्या पिढीतील नट असं ज्यांचं यथार्थ वर्णन प्रत्येक मराठी माणूस अभिमानानं करतो त्या प्रशांत दामलेंच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या सदाबहार नाटकाची ४००व्या प्रयोगाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. एका लग्नाची ही खुमासदार आणि खुसखुशीत गोष्ट रसिकांनी इतकी डोक्यावर घेतली की, लॅाकडाऊननंतर पहिला प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ करत त्यांनी प्रशांत दामलेंवरील प्रेमाची जणू पोचपावतीच दिली. रसिक मायबापानं दिलेल्या याच प्रेमाच्या बळावर ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक ४०० प्रयोगांचा टप्पा गाठण्यात यशस्वी झालं आहे.\nप्रशांत दामले फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, सरगम प्रकाशित, झी मराठी प्रस्तुत ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’च्या पुढील प्रयोगांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यात ६ मार्च ते १४ मार्चपर्यंत ‘लग्नाळू आठवडा’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.\n१)३९३ वा प्रयोग दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे ६ मार्चला दुपारी ४:३० वा.\n२)३९४ वा प्रयोग ठाण्यातील डॅा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ७ मार्च रोजी दुपारी ४.३० वा.\n३)३९५ वा प्रयोग गडकरी रंगायतन, ठाणे येथे १० मार्च रोजी रात्री ८:३० वा.\n४)३९६ वा प्रयोग सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे, ११ मार्च, दुपारी ४:३० वा.\n५)३९७ वा प्रयोग प्र. ठाकरे नाट्यगृह बोरिवली येथे १२ मार्च रात्रौ ८.०० वा.\n६)३९८ वा प्रयोग यशवंतराव चव्हाण, कोथरूड येथे, १३ मार्च, दुपारी १२:३० वा.\n७)३९९ वा प्रयोग रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे १४ मार्च, दुपारी १२.३० वा.\n८)४००वा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे १४ मार्चला संध्याकाळी ५:३० वा. सेलिब्रेट करण्यात येईल.\nसर्व प्रयोगांचं ऑनलाईन बुकिंग http://www.bookmyshow.com वर सुरु झालं आहे. ४०० व्या प्रयोगाला प्रमुख पाहुणे कोण असं विचारता ते गुपित आहे पण तुमच्यासाठी सुखद धक्का असेल, असं दामले म्हणाले.\nमराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही सदाबहार जोडी आणि त्यांची ‘ऑनस्टेज’ केमिस्ट्री ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचं खरं वैशिष्ट्य आहे. रिपीट ऑडीयन्सने या नाटकाला खऱ्या अर्थानं आपल्या मनात स्थान दिलं आहे. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकानं मिळवलेलं हे यश रसिकांनी आमच्यावर केलेल्या प्रेमाचं प्रतीक असल्याची भावना प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे. लाँकडाऊननंतर जेव्हा या नाटकानं मराठी रंगभूमीचा पडदा उघडला तेव्हाही रसिकांनी मनापासून प्रेम करत गर्दी करणं ही या नाटकाची पुण्याई आहे. आज आम्ही ४०० व्या प्रयोगापर्यंत पोहोचलो आहोत. पुढे आणखी मोठी मजल मारायची आहे. तेव्हाही रसिकांची अशीच साथ मिळेल अशी आशाही दामले यांनी व्यक्त केली आहे. या नाटकाची कथा इम्तियाज पटेल यांनी लिहिली असून, संहिता व दिग्दर्शन अद्वैत दादरकरनं केलं आहे.\nअभिजित मोहन वारंग दिग्दर्शित चित्रपट 'प्रेम प्रथा धुमशान' २८ ऑक्टोबरला\nजानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार बिगबजेट चित्रपट \"अंकुश\"\nप्रसाद खांडेकरची दिग्दर्शकीय इनिंग, ‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'सहेला रे' चा ट्रेलर प्रदर्शित\nस्मृतिदिन विशेष.. डॉ काशिनाथ घाणेकरांबद्दल आपणास हे माहीत आहे का\nपीबीसीएल सेलेब्रिटी लीगसाठी खेळाडूंचा लिलाव उत्साहात संपन्न\nनाटय व्यवसायासाठी ‘जागतिक मराठी नाटयधर्मी निर्माता संघा’ची महत्त्वाची पावले\nनिर्माता जॅकी भगनानीने ‘बेल बॉटम’ला मिळणाऱ्या कौतुकाबद्दल मानले आभार\nदिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये..\nराम कदम यांच्या संगीतातील ‘स्वराशा’\n“तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही” …शब्दांचा जादूगार ..गुलजार\nदिवाना मुझसा नही…शम्मी कपूर\nप्रतिभेला आलेला बहार…नृत्यांगना अभिनेत्री वैजयंतीमाला\nअभिजित मोहन वारंग दिग्दर्शित चित्रपट ‘प्रेम प्रथा धुमशान’ २८ ऑक्टोबरला\nजानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार बिगबजेट चित्रपट “अंकुश”\nप्रसाद खांडेकरची दिग्दर्शकीय इनिंग, ‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ चा ट्रेलर प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B6/", "date_download": "2022-10-07T21:47:43Z", "digest": "sha1:D2CVVHLKFJV6YOEVIODJBJHMDWGWYYII", "length": 15094, "nlines": 92, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "'तृतीय पंथी' दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही 'पैशाची चणचण'.. - Themaharashtrian", "raw_content": "\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nआपण सर्वांना माहितच आहे की आपला भारत हा एक भिन्न संस्कृतीआणि परंपरांनी परिपूर्ण असा देश आहे. जिथे विविध जाती आणि धर्माचे लोक राहतात. भारत देशाला सणांचा देश असेही म्हटले जाते जिथे प्रत्येक लहान मोठा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.\nआणि कोणत्याही उत्सवाच्या निमित्ताने देणगी देण्याची परंपरा देखील आहे. जेव्हा जेव्हा सण जवळ येतो तेव्हा दक्षिणा मागायला लोक आपल्या घरी येतात. परंतु समाजात असा एक विभाग आहे जो या उत्सवांवर किंवा कोणत्याही आनंदोत्सवाच्या निमित्ताने सर्वाधिक सक्रिय असतो.\nआपल्या समाज पुरुष आणि स्त्रियांपासून बनलेला आहे. पण तृतीय पंथी देखील आपल्या समाजातील एक भाग आहे. त्याची ओळख अशी एक गोष्ट आहे जी सभ्य समाजात चांगली दिसत नाही. समाजातील हा विभाग तृतीय पंथी, नपुंसकन आणि किन्नर म्हणून ओळखला जातो. केवळ भारतातच नाही, संपूर्ण दक्षिण आशियामध्ये कोणालाही त्यांचा आवाज ऐकण्याची इच्छा नाही कारण ते संपूर्ण समाजासाठी एक वाईट प्रतिष्ठा मानले जातात.\nतृतीय पंथी समुदाय सुरुवातीपासूनच मानवी समाजाचा एक भाग आहे. रामायण आणि महाभारतात किन्नारांचा उल्लेखही आहे. नपुंसकांना शिव अर्ध-नरेश्वर रूप मानले जाते, ज्यात पुरुष आणि स्त्री या दोघांचे गुण आहेत. मग आपल्या अर्धनारीश्वर स्वरुपात त्यांची पूजा केली जाते, पण तृतीय पंथिनां सामान्य माणसाचा दर्जा व हक्क मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.\nसमाजाच्या या दुर्लक्षाचा परिणाम हा आहे की किन्नर समाज हा अल्पसंख्याकांप्रमाणे नेहमीच स्वत: ला सामान्य समाजातून वेगळा म्हणून वावरत आहे, परंतु आपल्या घरात एखादा आनंदोत्सव किंवा कार्यक्रम असतो त्यावेळी आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी घरात तृतीय पंथी येतात, किंवा उत्सवात, विवाहसोहळ्यात, अशा शुभ कार्यांसाठी तृतीय पंथीयांना आवर्जून बोलावले जाते.\nतृतीय पंथीयांना खुप शुभ मानले जाते म्हण त्यांना शुभ कार्यक्रमात बोलवले जाते. तृतीय पंथी वर्गाच्या लोकांची ही सवय आहे की जेव्हा जेव्हा ते कुणाच्याही घरी कोणत्याही विशेष प्रसंगी येतात तेव्हा ते खूप गाणी वाजवतात आणि खूप पैशाची मागणी करतात आणि घेतल्याशिवाय ते परत जातही नाही.\nज्यांच्या घरी कार्यक्रम असतो ते देखील पैसे देऊन त्यांना खुश करतात. त्यानंतर ते आनंदी होतात आणि बरेच आशीर्वाद देतात. असे समजले जाते की तृतीय पंथी लोकांना दिलेला आशीर्वाद खूप लाभदायक असतो. आणि त्याचा परिणाम लवकरच दिसू लागतात.\nत्यात तृतीय पंथी लोकांनी जर कुणाला शाप दिला तर त्याला खूप वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते. त्याने यांचे आयुष्य देखील उध्वस्त होऊ शकते. जेव्हा तृतीय पंथी तुम्हाला पैसे मागत असतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी वाद न घालता त्यांना पैसे देऊन लगेच मार्ग वेगळा करतात. परंतु तृतीय पंथी लोकांना पैसे देताना तर तुम्ही हे 2 शब्द बोलले तर तुम्हाला करोडोचा फायदा होऊ शकतो.\nआज आम्ही तुम्हांला तृतीय पंथी लोकांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी असे दोन शब्द सांगणार आहोत, जे तृतीय पंथीशी बोलल्यानंतर तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतात आणि आपले आयुष्य आनंदाने भरून जाईल.\nअसे म्हणतात की हे 2 जादूचर शब्द बोलल्याने तुमची संपत्ती वाढेल आणि तुम्हाला दुप्पट पैसेही मिळतील. तर मग आपण त्या 2 जादूच्या शब्दांबद्दल जाणून घेऊया. पैसे दिल्यानंतर हे दोन जादूचे शब्द बोलले पाहिजेत, जेव्हा तृतीय पंथी आपल्या घरामध्ये, कार्यालयात किंवा दुकानात पैसे मागण्यासाठी आला असेल तर आपण त्याला पैसे दिल्यानंतर असे बोलायचे आहे. “या मग परत” तुम्हाला हे शब्द अगदी सामान्य वाटत असतील, परंतु आपण यापूर्वी हे शब्द कोणत्याही तृतीय पंथीशी बोलले आहेत काय\nकदाचित तुमचे उत्तर नाहीच असणार. जर आपण हे शब्द तृतीय पंथिनां बोललात तर त्यांना वाटेल की आपण त्यांना मनापासून पैसे देत आहोत बळजबरीने नाही. म्हणूनच, ते जात असताना तो तुम्हाला मनापासून आशीर्वाद देईल. हे 2 शब्द अतिशय चमत्कारी आहेत, हे शब्द एखाद्या व्यक्तीचे भविष्यही बदलु शकतात.\nआणि लवकरच आपल्या पैशाचे सर्व मार्ग स्वत: उघडतील. म्हणूनच, जर कुणाच्याकडे तृतीय पंथी तुमच्या घरी आले तर त्यांचा आदर करा आणि त्यांना आनंदी ठेवा जेणेकरून ते तुम्हाला मनापासून आशीर्वाद देतील. कारण त्यांनी मनापासून दिलेला आशीर्वाद तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो.\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\nपती ‘नपुं’सक’ असून देखील पत्नी झाली ‘प्रे’ग्नं’न्ट’, खरे सत्य समोर येताच पतीचेही उडाले होश…\nह’निमू’नच्या पहिल्याच रात्री पत्नीला समजले की पती आहे स’मलैं’गि;क, पहा तरीही पतीने पत्नीसोबत केले…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/kim-jong-un-attended-the-opening-of-a-fertilizer-factory-marathi-news/", "date_download": "2022-10-07T23:08:13Z", "digest": "sha1:O6BVOK5MMK6IFEJPDSTXBGG6XD3V7LDA", "length": 9332, "nlines": 112, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "सर्व अफवा फेटाळून लावत किम जोंग उनची दणक्यात एण्ट्री; सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nसर्व अफवा फेटाळून लावत किम जोंग उनची दणक्यात एण्ट्री; सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल\nसर्व अफवा फेटाळून लावत किम जोंग उनची दणक्यात एण्ट्री; सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल\nप्योंग्यांग | उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने सर्व अफवा फेटाळून लावत दणक्यात एण्ट्री केल्याचं पहायला मिळत आहे. तीन आठवडे गायब असलेल्या किम जोंग उनने सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. किम जोंग उन तीन आठवडे सार्वजनिक कार्यक्रमात दिसला नव्हता.\nकिम जोंग उनच्या प्रकृतीवरुन अनेक उलटसुटल चर्चा सुरु होती. या सर्व पार्श्वभूमीवर किम जोंगने आज एका खताच्या कारखानाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. उत्तर कोरियाची सरकारी न्यूज एजन्सी केसीएनएने याबाबतचं वृत्त दिलं. आहे. तसेच किम जोंग उनचा या कार्यक्रमातील एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nकिम जोंग उन यापूर्वी 12 एप्रिललाला सार्वजनिक कार्यक्रमात दिसला होता. त्यानंतर तो दिसलाच नाही. त्यानंतर किमवर 12 एप्रिल रोजीच हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया झाल्याचं वृत्त समोर आलं होतं.\nदरम्यान, किमने खत कंपनीचं उद्धाटन करुन उपस्थित जनतेला हात दाखवून अभिवादन केलं. यावेळी नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\nइरफान गेला पण कुटुंबाची सोय करून गेला; कुटुंबियांसाठी ठेवली इतक्या कोटींची संपत्ती\n, गावी जायचंय, दुसऱ्या राज्यात जायचंय… वाचा काय आहे प्रक्रिया\nआपलं अपयश झाकण्यासाठी छात्या बडवण्याचा कार्यक्रम सुरु- देवेंद्र फडणवीस\n‘मी काही गमावलं नाहीये…’; इरफान खानच्या पत्नीची काळजाला भिडणारी पोस्ट\n“100 टक्के लोकसंख्येला मोफत कॅशलेस विमा संरक्षण देणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य”\nआपलं अपयश झाकण्यासाठी छात्या बडवण्याचा कार्यक्रम सुरु- देवेंद्र फडणवीस\n‘…म्हणून आम्ही सरकार वाचवू शकलो नाही’; कमलनाथांनी केला मोठा खुलासा\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2018/05/blog-post_63.html", "date_download": "2022-10-07T21:53:26Z", "digest": "sha1:SFYD6WL6HMHX3NJEKOMIIY4PWU5O3TTQ", "length": 22211, "nlines": 208, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "जगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\nदेशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात बेरोजगारीने अगदी कळस गाठला आहे. साधारणत: १०० शिपाईपदासाठी दोन लाखांहून अधिक अर्ज येतात. त्यात डॉक्टर्स, इंजिनीयर्स यासारखे उच्चशिक्षितांचाही समावेश असल्याचे पाहता बेरोजगारीची दाहकता किती भयानक आहे याची प्रचिती येते. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी एक कोटी रोजगार निर्माण करू असे आश्वासन दिले होते, तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी २० लाख रोजगार उपलब्ध करून देण्याचे दिवास्वप्न तरुणांना दाखविले होते. मात्र सत्ता हाती येऊन चार वर्षे पूर्ण होता आली तरी या आश्वासनाची कसलीच पूर्तता झाल्याचे दिसून येत नाही आणि बेरोजगार तरुण नोकरीसाठी वणवण भटकत आहे. दुसरीकडे अकुशल व अल्पशिक्षित युवकांना रोजगारासाठी आटापिटा करावा लागत आहे. हे बेरोजगारीचे भीषण वास्तव आहे. गेल्या ५०-६० वर्षांत शिक्षणानुसार रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळेल अशी व्यवस्थाच निर्माण झाली नाही. सुशिक्षित तरुणांच्या तुलनेत रोजगारनिर्मिती हा तर आपल्याकडे न सुटणाराच प्रश्न आहे. देशात दरमहा दहा लाख तरुण नोकरीच्या रांगेत उभे असतात. त्या तुलनेत रोजगारनिर्मितीचा दर मात्र वर्षाला २० लाख असा आहे. रोजगाराची गरज आणि निर्मिती यात एवढी प्रचंड दरी वाढताना दिसत आहे. लेबर ब्यूरोने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे मोदी सरकारच्या मोठमोठ्या आश्वासनांचे पितळ उघडे पाडले आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची तीव्रता स्पष्ट केली आहे. विकास दरात भारत जगात साठाव्या स्थानावर असताना ‘भारत हा जगातील सर्वाधिक बेरोजगार असलेला देश’ असा बहुमान प्राप्त झाला आहे. या आकडेवारीनुसार देशातील रोजगारांमध्ये एकसारखी घट होत आहे तर स्वयंरोजगारांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक-आर्थिक असमानतेत एकसारखी वाढ होत आहे. दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेला जगातील सर्वांत वेगवान असल्याचे म्हटले जात आहे. देशातील श्रीमंत व गरिबांमधील दरी वाढत आहे. एकूण लोकसंख्येचा एकतृतियांश भाग आजही दारिद्र्यरेषेखालील जीवन व्यतीत करीत आहे. सन २०१७ च्या उपासमारीच्या निर्देशांकात भारत १०० व्या स्थानावर घसरला आहे (२०१६ मध्ये आपण ९७व्या स्थानावर होतो). बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार आणि अनेक आप्रिâकन देशदेखील या बाबतीत भारतापेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. ‘वाढती दरी : भारत असमानतेचा अहवाल २०१८’ या ‘ऑक्सफेम’च्या अहवालानुसार जागतिक पातळीवर फक्त एक टक्का लोकांच्या हातात जगातील एकूण संपत्तीपैकी ५० टक्के संपत्ती आहे तर भारतात एक टक्का लोकांच्या हातात देशातील ५८ टक्के संपत्ती आहे (काही अहवालांनुसार यापेक्षाही अधिक आकडेवारी उपलब्ध होते.) आणि केवळ ५७ अब्जाधीशांकडे देशातील ७० टक्के लोकसंख्येच्या एकूण संपत्तीएवढी मालमत्ता आहे. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जगातील दुसरा सर्वांत मोठा देश असलेल्या भारतातील ६५ टक्के लोकसंख्येचे सरासरी वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. कोणत्याही देशासाठी एवढी मोठी तरुण लोकसंख्या फार मोठी शक्ती असते. परंतु भारतातील या लोकसंख्येचा फार मोठा भाग बेरोजगार आहे. आर्थिक सहकार आणि विकास संघटनेच्या आकडेवारीनुसार देशातील रोजगारांपासून वंचित तरुणांची संख्या फार मोठी असल्यामुळे समाजात असंतोष वाढत आहे. मागील काही वर्षांपासून स्किल इंडिया, मेक इन इंडिया, पंतप्रधान रोजगार सृजन कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजना, पंतप्रधान कौशल विकास योजना यासारख्या वेगवेगळ्या योजना आखण्यात आल्या. परंतु या योजनांचे कार्यालय व प्रचारयंत्रणा पाहणाऱ्या लोकांना रोजगार देण्याव्यतिरिक्त देशात बेरोजगारीवर मात करण्याच्या दिशेने कसलीही प्रगती झालेली नाही. अधिकांश योजना फक्त निवडणुकीतील घोषणांप्रमाणे कसल्याही पूर्वतयारीशिवाय सुरू करण्यात आल्या आहेत. उद्योगांच्या गरजा आणि तरुणांना देण्यात येणारे शिक्षणाच्या दरम्यान कसलाही ताळमेळ आढळून येत नाही. हे प्रशिक्षण इतके कनिष्ठ पातळीचे आहे की त्याद्वारे कसलाही रोजगार मिळू शकत नाही. ज्या उद्योगांमध्ये सर्वाधिक रोजगार उपलब्ध होत होते त्यांची स्थिती अतिशय बिकट आहे. ‘लाइव मिंट’ या वृत्तपत्रानुसार या वंâपन्यांची निर्यातीची स्थिती फक्त बिकटच नसून श्रमकेंद्रित औद्योगिक उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. इतकेच नव्हे तर श्रमकेंद्रित उत्पादकांच्या आयातीत वाढ होत आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीची स्थिती आणखीनच वाईट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी जुलैमध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर ही स्थिती आणखीन खालावली आहे. त्याअगोदर नोटाबंदीच्या काळात अनेक कामागारांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. निरव मोदी आणि मेहुल चौकसी यासारख्या महारथींच्या कर्तुत्वानंतर श्रमकेंद्रित उद्योगांना बँकांमधून कर्ज मिळणे बंद होण्याची शक्यता आहे, याचा वाईट परिणाम रोजगारनिर्मितीबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणार आहे.\n२५ मे ते ३१ मे २०१८\nसाहित्य संमेलनासारख्या उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्य...\nआपण जितके मानवतावादी तितकेच आपले प्रबोधन सत्यनिष्ठ...\nकुरआनचे पठण : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n१८ मे ते २४ मे २०१८\nडील करण्याची खरी वेळ\nजगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी (भाग ३) : प्रेषित...\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nजगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी (भाग २) : प्रेषित...\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\nबलात्काऱ्यांना फाशी देऊन उपयोग नाही व्यवस्था बदलाव...\nउस्मान शेख यांना पोलीस महासंचालकांचे मानचिन्ह\nकाँग्रेस एक मुस्लिम पक्ष आहे का\n११ मे ते १७ मे २०१८\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०४ मे ते १० मे २०१८\nहे तर अपेक्षितच होतं\nमोदींनी आता बोलकं व्हाव - डॉ. मनमोहन सिंग\nखिर्द ने कह भी दिया तो क्या हासिल\n‘आरोपी बचाव’ भाजपची नवी घोषणा\nराजर्षी शाहू, कर्मवीरांचे विचार प्रभावीपणे पुढे यावेत\nदेशातील प्रसारमाध्यमे ही लोकशाहीची खरी शक्ती - डॉ....\nजगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/12/google-pay-2020.html", "date_download": "2022-10-07T21:17:33Z", "digest": "sha1:AEXVNK46XY75SF4W3W7T66UEA4PYU5EU", "length": 5473, "nlines": 65, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "Google Pay कडून 2020 रुपये जिंकण्याची संधी! | Gosip4U Digital Wing Of India Google Pay कडून 2020 रुपये जिंकण्याची संधी! - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome तंत्रज्ञान Google Pay कडून 2020 रुपये जिंकण्याची संधी\nGoogle Pay कडून 2020 रुपये जिंकण्याची संधी\nगुगल पे आपल्या ग्राहकांना पैसे जिंकण्याची संधी देत आहे. यावेळी गुगल पे अ‍ॅपवर 2020 Stamps नावाची ऑफर आणली आहे. त्यासाठी युजर्सला अ‍ॅपच्या मदतीने स्टॅम्प्स एकत्र करावे लागणार आहेत.\nया माध्यमातून युजर्सला 2020 रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. गुगल पे वरही ऑफर 23 डिसेंबरपासून सुरु झाली आहे.\nगुगल पे वरुन पैसे जिंकण्यासाठी युजर्सला Rewards ऑप्शनमध्ये जावे. तेथे गेल्यावर पुगा, डिजे, चष्मा, डिस्को, टॉफी, सेल्फी किंवा पिझ्झा सारखे स्टॅम्प दाखवतात.\nहे स्टॅम्प 3 लेअरमध्ये दिले असून एक पूर्ण केक तयार करावा लागेल. यात एकूण 7 स्टॅम्प आहेत. ते पूर्ण केल्यानंतर युजर्सला 2020 रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्याचसोबत केकची प्रत्येक लेअर पूर्ण केल्यावर देखील बोनस मिळत आहे.\nअसे करा स्टॅम्प(Stamps) कलेक्ट :\n● स्टॅम्प मिळवण्यासाठी त्यात अनेक पर्याय दिले जाणार आहेत. प्रत्येक पर्यायानुसार एका दिवसात 5 स्टॅम्प मिळवता येतात. खाली दिलेल्या स्टेप्सनुसार स्टॅम्प जमा करता येतील.\n● कोणत्याही बिझनेस किंवा गुगल पे युजर्सला 98 अथवा त्यापेक्षा जास्त पैसे पाठवा.\n● कमीत कमी 300 रुपयांचे बिल भरणे अथवा 98 रुपयांचा मोबाईल रिचार्ज करणे.\n● मित्रांना गुगल पे साठी इनव्हिटेशन पाठविल्यानंतर पहिल्या वेळेस पेमेंट करणे.\n● 2020 लिहिलेला क्रमांक स्कॅन करणे.\n● टीव्ही किंवा युट्यूबवर जाहिराती ऐकल्यावर\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/2953", "date_download": "2022-10-07T22:41:19Z", "digest": "sha1:OT4DQUZAYIPJ367CH4DUM27EEBNSOFLH", "length": 14325, "nlines": 111, "source_domain": "bollyreport.org", "title": "ओटीटीवर बोल्डनेसच्या सर्व हद्दी पार केल्या आहेत या वेबसेरीजनी, नंबर ५ वाली तर आहे खूपच बोल्ड ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News ओटीटीवर बोल्डनेसच्या सर्व हद्दी पार केल्या आहेत या वेबसेरीजनी, नंबर ५ वाली...\nओटीटीवर बोल्डनेसच्या सर्व हद्दी पार केल्या आहेत या वेबसेरीजनी, नंबर ५ वाली तर आहे खूपच बोल्ड \nएक का असा होता जेव्हा लोक शुक्रवारची आतुरतेने वाट पहायचे. कारण पुर्वी दर शुक्रवारी एक चित्रपट प्रदर्शित व्हायचा. पण सध्याचा काळ हा वेब सिरीज आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा आहे. लोकांना आता चित्रपटांपेक्षा वेबसिरीज पाहणे आवडु लागले आहे. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती पाहता रोज एक वेब सिरिज तयार केली जात असुन ती प्रदर्शित सुद्धा करत आहे.\nमिर्जापुर आणि फॅमिलीमॅन अशा वेबसिरीज सोबत अजुन काही वेबसिरीज आल्या आहेत ज्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर गोंधळ घातला आहे.\nया वेबसिरीजने बोल्डनेसच्या नावाखाली सर्व सिमा पार केल्या आहेत. मात्र प्रेक्षकांनासुद्धा हा कंटेट आवडत आहे. कोरोना, लॉकडाऊन या सर्व गोंधळात या सिरिजनीं प्रेक्षकांचे भरपुर मनोरंजन केले. बोल्ड सीन्सने भरलेल्या वेबसिरीजची ओटीटी वर काहीच कमी नाही पण तरीही अशाही काही वेबसिरीज आहेत ज्या बोल्ड असुनही प्रेक्षकांच्या मनात त्यांनी वेगळे स्ठान निर्माण केले आहे. या सिरीजच्या का*मु*क दृष्यांना खुप वेगळ्याप्रकारे चित्रीत केले गेले आहे.\nआज आम्ही तुम्हाला ५ वेबसिरिज बद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही नेटफिल्क्स, अमेझॉन प्राईम व्हिडीओ, झी-5, एमएक्सप्लेअर आणि वुटवर पाहु शकता.\n1. व*र्जि*न भास्कर – यातील पहिली सिरीज म्हणजे व*र्जि*न भास्कर. व*र्जि*न भास्कर ही एका बनारसी मुलाची कहाणी आहे. या सिरिजचे नाव वाचुनच तुम्हाला अंदाज आला असेल. ही गाडी अनंत जोशी नावाच्या मुलाची आहे जो या सिरीज मध्ये व*र्जि*न दाखवला आहे. त्याचे करामती मित्र त्याला व*र्जि*न राहु नये यासाठी वेगवेगळ्या कल्पना सांगत असतात. या व*र्जि*न मुलाची आणि त्याची गर्लफ्रेंड दाखवण्यात आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना अचाट करते.\nदरम्यान या सिरीजमध्ये असे काही होते ज्यामुळे मुलीचे मन तुटते. या सिरीजचे दोन्ही सिजन बालाजी आणि झी5 वर प्रदर्शित केले होते. शिवाय या सिरीजमधील कथा ही बनारसमधील असल्यामुळे तेथील बोली भाषा, रस्ते वगैरे दाखवण्यात आले आहेत.\n2. फॉर मोअर शॉट्स प्लिज – या यादीतील दुसरी सिरीज म्हणजे फॉर मोअर शॉट्स प्लिज. ही सिरीज अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात आली. या सिरीजमध्ये चार भारतीय मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. से*क्स हा विषय यात भरपुरप्रमाणात दाखवला आहे. पण तो गरजेपेक्षा जास्त आहे असे म्हणता येणार नाही. स्त्रियांच्या लैं*गि*क स्वातंत्र्यावर चर्चा केली पाहिजे हे या सिरिजमधुन समजते.\n3. फूह से फैंटेसी – वुटची ओरिजनल सिरीज फूह से फैंटेसी मध्ये रिलेशनशिप आणि रोमान्स वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. या सिरीजमध्ये कपल्सची फन फॅंटेसी अगदी चार्मिंग पद्धतीने चित्रीत केली आहे. या सिरीजचे एकुण १० एपिसोड आहेत जे से*क्शु*अ*ल थिमवर आधारित आहेत. यामध्ये नवीन कस्तूरिया, करण वाही, सनाया पिठावाला या कलाकारांनी काम केले आहे.\n4. हेल्लो मिनी – एमएक्स प्लेयरची ओरिजिनल वेब सीरीज ‘हेल्लो मिनी मध्ये कथेपेक्षा बोल्ड सीन्स जास्त दाखवण्यात आले आहे. ही सिरीज एक सस्पेंस कथा असुन त्याचा कंटेंट हा अ*ड*ल्ट करण्यात आला आहे.\n5. गं*दी बात – गंदी बात ही सिरीज तिच्या नावाप्रमाणेच अ*श्ली*ल आहे. यामधील अ*श्लि*ल*ता एवढी आहे की लोक ती एकमेकांसमोर जास्त बोलु शकत पण नाही. बोल्डनेसच्या सर्व सिमा पार केलेल्या या सिरीजमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील का*मु*क कथा दाखवण्यात आल्या आहेत. या वेबसिरीजचे आतापर्यंत ६ सिजन आले आहेत यावरुन तुम्ही या सिरिजची लोकप्रियता समजु शकता.\nएकता कपुरचा डिजिटल प्लॅटफॉर्म अल्ट बालाजीच्या या सिरीजमध्ये से*क्स आणि सेमी न्यु*ड सीनचा भडिमार करण्यात आला आहे. मात्र या सिरिजला लगेच का*मु*क होणाऱ्या प्रेक्षकांनी भरपुर पसंती दर्शवली आहे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleखूप वर्षांपासून एकही चित्रपट नाही तरीही राज कुंद्राची मेव्हणी कमावते करोडो रुपये, जाणून घ्या कसे \nNext articleया कारणामुळे श्रावणात मांसाहार केला जात नाही, हे आहे त्यामागचे वैज्ञानिक कारण \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/without-mens-sperm-this-girl-has-pregnent/", "date_download": "2022-10-07T22:15:34Z", "digest": "sha1:LXGZNCQNXNSMEXHY7HQYMZJPPDPI6NJU", "length": 10843, "nlines": 86, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "पुरुषाच्या 'विर्या'शिवाय 8 महिन्यांची प्रे'ग्नेंट झाली तरुणी; डॉक्टरांना दाखवलं तेव्हा सगळेच गेले हादरून, कारण तिच्या पो'टात वाढत होता... - Themaharashtrian", "raw_content": "\nपुरुषाच्या ‘विर्या’शिवाय 8 महिन्यांची प्रे’ग्नेंट झाली तरुणी; डॉक्टरांना दाखवलं तेव्हा सगळेच गेले हादरून, कारण तिच्या पो’टात वाढत होता…\nपुरुषाच्या ‘विर्या’शिवाय 8 महिन्यांची प्रे’ग्नेंट झाली तरुणी; डॉक्टरांना दाखवलं तेव्हा सगळेच गेले हादरून, कारण तिच्या पो’टात वाढत होता…\nएका महिलेसाठी ग’र्भव’ती होणं हा अत्यंत भावनिक क्षण असतो. आपल्या गर्भात एक लहानशा गर्भाला मोठं होताना अनुभवणं महिलांसाठी मोठी बाब असते. निसर्गाने महिलेलाच ही संधी दिली आहे. महिलेच्या गर्भात 9 महिन्यांपर्यंत बाळ मोठं होतं जातं. तो क्षण प्रत्येक महिला अगदी आनंदाने अनुभवत असते.\nमात्र महिलेला ग’र्भधारणा होण्यासाठी आधी से’क्स करावं लागतं. आता तर आयव्हीएफ (IVF) आणि अन्य नवनवं तंत्रज्ञान आलं आहे. मात्र यातही पुरुषाच्या स्प’र्मची गरज असतेच. इंग्लंडमध्ये राहणारी 19 वर्षीय एबीला आपलं वाढलेलं पोट पाहून ग’र्भव’ती असल्यासारखी वाटत होती. मात्र तिचे कोणासोबत शारिरीक सं’बंध आलेच नव्हते.\nतरीही तिचं पोट ग’र्भव’ती महिलेप्रमाणे वाढलं होतं. जेव्हा ती डॉ’क्टरकडे गेली तेव्हा तिच्यासह कुटुंबीयांनाही ध’क्का बसला. तरुणीच्या पोटात 13 किलोचा मृ’त्यू वाढत होता. अचानक वाढलं वजन.. एबी सर्वसामान्यपणे जगत होती. मात्र गेल्या वर्षी अचानक तिचं वजन वाढू लागलं. पहिल्यांदा तिला वाटलं की जास्त खाल्ल्यामुळे तिचं वजन वाढल आहे.\nयादरम्यान तिने डायटिंगही सुरू केली. मात्र वजन कमी होत नव्हतं. त्यानंतर तिचं पोट हळूहळू वाढू लागलं. आपलेलं वाढलेलं पोट पाहून एबी चिंतेत होती. लोकही तिला प्रे’ग्नेंट समजू लागले होते. मात्र आपण ग’र्भव’ती नसल्याचं तिला माहित होतं. कारण कोणासोबतच तिचे शारिरीक सं’बंध झाले नव्हते. पहिल्यांदा तर एबीला आपलं वाढतं पोट पाहून टेन्शन आलं.\nत्यानंतर मात्र तिला पोटदुखीही सुरू झाली. एबी काहीच काम करू शकत नव्हती. तिचं पोट खूप वाढलं होतं. शेवटी एबीने डॉ’क्टरांना दाखवण्याचं ठरवलं. तेथे गेल्यासमोर कळालं की एबीच्या पो’टात तब्बल 13 किलोचा ट्यू’मर होता. हा ट्युमर लवकर काढला नसता तर त्याचे परिणाम भ’यंकर ठरले असते.\nरात्रभर सुरू होती श’स्त्रक्रिया.. एबीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे श’स्त्रक्रिया करून तिच्या पो’टातील ट्यूम’र काढण्यात आलं. एबीची स’र्जरी रात्रभर सुरू होती. यानंतर डॉ’क्टरांनी 12 किलो 700 ग्रॅम ट्यूमर बाहेर काढला. सर्ज’रीनंतर एबीची तब्येत सुधारत आहे.\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\nपती ‘नपुं’सक’ असून देखील पत्नी झाली ‘प्रे’ग्नं’न्ट’, खरे सत्य समोर येताच पतीचेही उडाले होश…\nह’निमू’नच्या पहिल्याच रात्री पत्नीला समजले की पती आहे स’मलैं’गि;क, पहा तरीही पतीने पत्नीसोबत केले…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16236/", "date_download": "2022-10-07T23:19:19Z", "digest": "sha1:BCT4562DCNSGMOQGERD7ZUP3LDGJK36L", "length": 16286, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कॅसाब्लांका – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकॅसाब्लांका : (अरबी अल्‌ बीदा) मोरोक्कोचे अटलांटिक किनाऱ्यावरील महत्वाचे बंदर व सर्वात मोठे शहर. लोकसंख्या १५,०६,३७३ (१९७१). राबात व मॅझागॅन ह्यांमधील लहानशा उपसागराच्या तोडांशी हे वसले आहे. तेराव्या शतकात हे मच्छीमारी खेडे होते. यूरोपीयास सतावणाऱ्या आफ्रिकेतील चाचे लोकांचे हे केंद्र बनले, म्हणून पोर्तुगीजांनी १४६८ मध्ये बंदराचा ताबा घेतला. अठराव्या शतकात मोरोक्कोच्या सुलतानाने खुले बंदर बनवून बंदराला उर्जितावस्था आणली. हे एक आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र बनले. १९०८ पासून कॅसाब्लांका फ्रेंचांच्या ताब्यात गेले.\nबंदरांच्या थोडे पुर्वेकडे जुने कॅसाब्लाका किंवा मदीना शहर आहे. जुन्या शहरात जुन्या पद्धतीची विटा, माती व पांढरा चुना लावलेली घरे असून येथेच बहुसंख्य यूरोपीय, मुसलमान व यहुदी वस्ती असे. गेल्या ४० वर्षापासून यूरोपीय लोक पश्चिमेकडील बंदर भागात आधुनिक व अलिशान इमारतीत राहू लागले.\nपहिल्या महायुद्धानंतर कॅसाब्लाका व त्याचा परिसर हा लहान मोठया निरनिराळया उत्पादक धंद्यांनी भरभराटला आहे. साखर, तंबाखूचे पदार्थ, सिमेंट कापड वगैरे मोठे उद्योग आणि विटा, लाकूड कापणे, डबाबंद मासळी, सतरंज्या वगैरे लघुउद्योग येथे आहेत. मोरोक्कोच्या परदेशी व्यापाराचा तीन चतुर्थांश व्यापार कॅसाब्लांकामधून चालतो. कॅसाब्लांकापासून माराकेश, राबात तँजिअर,फेज, औज्दा, ओरान, अल्जिअर्स, ट्यूनिस वगैरेकडे लोहमार्ग व मोठमोठया सडका असून २१ किमी. वरील कॅंपकासेस येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. दुसऱ्या महायुद्धातील कॅसाब्लांका परिषद रुझवेल्ट व चर्चिल हयांच्यात १९४३ मध्ये येथेच भरली होती.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/26532/", "date_download": "2022-10-07T22:26:02Z", "digest": "sha1:6TNDIHSHTHWPVK64FFLI5VTJX5Q4TKJQ", "length": 28740, "nlines": 237, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "अणुभार – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nअणुभार : हा रासायनिक मूलद्रव्यांच्या अणूंचा प्रत्यक्ष भार नसून एकक म्हणून घेतलेल्या एखाद्या मूलद्रव्याच्या अणूंचा तुलनात्मक भार म्हणजे गुणोत्तर असतो. हायड्रोजन हा मूलद्रव्यांपैकी सर्वांत हलका असल्यामुळे त्याचा अणुभार हा एकक धरून इतर मूलद्रव्यांच्या अणूंचे भार पूर्वी ठरविले जात. ही पद्धती वापरून निरनिराळ्या मूलद्रव्यांचे अणुभार दाखविणारी सारणी (कोष्टक) तयार करण्यात आली होती. परंतु फारच थोड्या मूलद्रव्यांचे हायड्रोजनाशी सरळ संयोग होतात व तेवढ्यांचेच अणुभार त्यामुळे अचूक ठरविणे शक्य झाले. हायड्रोजनाच्या मानाने ऑक्सिजनाचे पुष्कळच अधिक मूलद्रव्यांशी सरळ सरळ संयोग होत असल्यामुळे व पुष्कळच मूलद्रव्यांचा अणूभार अचूक ठरविता येत असल्यामुळे ऑक्सिजनाच्या संदर्भाने इतर मूलद्रव्यांचे अणुभार ठरविणे अधिक सोयीचे असते. हायड्रोजन हा एकक असणाऱ्या सारणीत ऑक्सिजनाचा अणुभार १५·९२२ असे. त्याऐवजी तो १६·०००० मानून एक सुधारलेली सारणी १९०० साली तयार करण्यात आली व ती १९६१ सालापर्यंत प्रचारात होती. तिला ‘अणुभारांची रासायनिक सारणी’ म्हणत. त्याच वर्षी इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड फिजिक्स आणि इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री या संस्थांनी भौतिकीत व रसायनशास्त्रात पूर्वी वापरात असलेल्या अणुभाराच्या मापनाच्या पद्धती एकत्रित करून एकच नवीन पद्धती तयार केली. C12 हा कार्बनाचा समस्थानिक (एकच अणुक्रमांक पण भिन्न अणुभार असलेला त्या मूलद्रव्यांचा प्रकार, → समस्थानिक) विपुल असल्यामुळे त्याच्या अणुभाराचा १/१२ भार हा एकक त्या पद्धतीत ठरविण्यात आलेला आहे [→ आणवीय द्रव्यमान एकक].\nपुढे असे आढळून आले की, सामान्य नैसर्गिक ऑक्सिजन हा समस्थानिकांच्या मिश्रणाचा बनलेला असून त्याचा ९९·७५ इतका अंश O16 या व उरलेला अत्यल्प अंश O17 व O18 या समस्थानिकांचा बनलेला असतो. सारांश, रासायनिक सारणीतील ऑक्सिजनाचा १६ हा अणुभार निसर्गात आढळणाऱ्या तीन समस्थानिकांच्या मिश्रणाचा सरासरी भार असतो. अशा मिश्रणाचा अणुभार १६ असा मानण्याऐवजी त्याच्यातील सर्वांत विपुल व सर्वांत हलक्या अशा समस्थानिकाचा अणुभार १६ धरून एक नवी सारणी तयार करण्यात आली. तिला ‘अणुभाराची भौतिक सारणी’ म्हणतात. त्या सारणीत सामान्य ऑक्सिजनाचा अणुभार १६·००४४७ आहे. रासायनिक सारणीत तो १६·०००० आहे. सारांश, भौतिक अणुभार = रासायनिक अणुभार × १·०००२७५.\nनैसर्गिक ऑक्सिजनात असणाऱ्या समस्थानिकांचे प्रमाण सर्वत्र स्थिर नसून हवेतील ऑक्सिजनाच्या किंवा पाण्यातून बाहेर पडणाऱ्या ऑक्सिजनाच्या नमुन्यात वरील समस्थानिकांचे प्रमाण किंचित भिन्न असल्याचे अलीकडे आढळून आले आहे. त्यामुळे भौतिक व रासायनिक अणुभारांचा संबंध दर्शविणारे वर उल्लेख केलेले गुणोत्तर किंचित बदलावे लागते.\nअणुभार हे व्यावहारिक आणि सैद्धांतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत व परिमाणात्मक विश्लेषण (पदार्थातील घटकांचे वजनी प्रमाण ठरविणे, →वैश्लेषिक रसायनशास्त्र) करण्यासाठी त्यांचा उपयोग करावाच लागतो. प्रयोगशाळांतील व उद्योगधंद्यांतील रासायनिक कार्यात त्यांचा प्रत्यही उपयोग केला जातो. पदार्थांची संरचना व मौलिक स्वरूपे कशी आहेत याचा उलगडा करून घेण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो.\nअणुभाराची निश्चिती : अणुभार ठरविण्याच्या पद्धतींपैकी महत्त्वाच्या अशा सात पद्धती असून त्यांपैकी चार रासायनिक पद्धती आहेत. एखाद्या मूलद्रव्याचा सममूल्य भार (वजनी ८ भाग ऑक्सिजन किंवा १ भाग हायड्रोजन यांच्याशी संयोग पावणारे किंवा तितके भाग त्यांच्या संयुगातून दूर करणारे मूलद्रव्याचे वजन) किती आहे, हे शोधून काढण्यावर त्या आधारलेल्या आहेत. एखाद्या मूलद्रव्याचा अणुभार हा त्याच्या सममूल्य भाराची एखादी पूर्णांक पट असतो व ती पट कोणती हे प्रयोग करून त्या प्रयोगांच्या फलांवरून ठरवावयाचे असते. म्हणून अणुभार ठरविण्याच्या रासायनिक पद्धती म्हणजे सारत: मूलद्रव्यांच्या संयुजा (अणूंची परस्परांशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) ठरविण्याच्या पद्धतीच असतात. रासायनिक पद्धती पुढील होत :\n(१) कान्नीदझारो पद्धती : एखाद्या मूलद्रव्याच्या पुष्कळशा बाष्पनशील संयुगांच्या रेणुभारांचे (संयुगाचा किंवा मूलद्रव्याचा रेणू हायड्रोजनाच्या अणूच्या किती पट जड आहे हे दर्शविणाऱ्या अंकांचे) मापन करून त्याच्या वरून अणुभार ठरविला जातो.\n(२) डुलाँग व पेटिट पद्धती : एखाद्या मूलद्रव्याचा अणुभार व त्याची विशिष्ट उष्णता ( १ ग्रॅम पदार्थाचे तापमान १० से. वाढविण्यास लागणारी उष्णता आणि १ ग्रॅम पाण्याचे तापमान १० से. वाढविण्यास लागणारी उष्णता यांचे गुणोत्तर) यांच्या गुणाकाराचे फल नेहमीच ६·३ असते, या डुलाँग व पेटिट यांच्या नियमावरून मूलद्रव्यांचा अणुभार स्थूलमानाने कळतो. नंतर अणुभार= सममूल्य भार × संयुजा, हा नियम वापरून स्थूल मूल्यापासून अचूक मूल्य ठरविले जाते [→ सममूल्य भार].\n(३) मिचर्लिख पद्धती : दोन पदार्थ समरूप (सारखा स्फटिकाकार असलेले) असले म्हणजे त्यांची रासायनिक सूत्रे सारखीच असतात, असा अनुभव मिचर्लिख यांना आला होता. यावरून ओघानेच असे ठरते की, अशा समरूप पदार्थांतील ज्या मूलद्रव्यांच्या जोड्या असतात त्यांची संयुजा सारखीच असते. संयुजा कळली म्हणजे त्या मूलद्रव्यांचे अणुभार ठरविता येतात. आता या पद्धतीचा वापर करीत नाहीत.\n(४) मेंडेलेव्ह पद्धती : एखाद्या मूलद्रव्याच्या अणुभाराचे प्रायोगिक पद्धतीने मिळालेले मूल्य बरोबर आहे की नाही, हे त्या मूलद्रव्याच्या आवर्त-सारणीतील (रासायनिक मूलद्रव्यांच्या कोष्टकरूपाने केलेल्या विशिष्ट मांडणीतील) स्थानावरून ठरविता येते.\nइतर पद्धतींपैकी मुख्य म्हणजे पुढील होत :\n(५) क्ष-किरण पद्धती : क्ष-किरणांनी स्फटिकांचे विश्लेषण करून स्फटिकांच्या एकक-कोशिकेचे (स्फटिकातील अणूंच्या आंतरिक संरचनेच्या सर्वांत लहान घटकाचे) आकारमान ठरविता येते आणि बहुतेक स्फटिकांच्या एकक-कोशिकेत असलेल्या अणूंची संख्याही ठरविता येते. स्फटिकांची घनता अगदी अचूक मोजता आली तर एकक-कोशिकेचा व तिच्यातील प्रत्येक अणूचा अणुभार हिशोबाने काढता येतो. ॲव्होगाड्रो-अंकावरून (विशिष्ट परिस्थितीत एक ग्रॅम रेणुभारात असलेल्या रेणुसंख्येवरून) ऑक्सिजनाच्या अणूचा निरपेक्ष भार माहीत होतो व त्याच्यावरून हिशोब करून एखाद्या मूलद्रव्याचा अणुभार अचूक ठरविता येतो.\n(६) द्रव्यमान वर्णपटलेखकावरून : ॲस्टन यांनी १९१९ साली शोधून काढलेल्या द्रव्यमान वर्णलेखकावरून मूलद्रव्यांचे अणुभार अचूक ठरविता येतात [→ द्रव्यमान वर्णपटविज्ञान].\n(७) अणुकेंद्रीय विक्रियांच्या ऊर्जेवरून : या पद्धतीत आइन्स्टाइन यांचे द्रव्यमान (M) आणि ऊर्जा (E) यांच्या संबंधाचे Δ E= Δ Mc2 हे समीकरण वापरतात. या समीकरणात c हा प्रकाशवेग आहे. अणुकेंद्रावर मारा करणारे कण आणि त्यामुळे होणाऱ्या विभाजनाचा परिणाम म्हणून निर्माण झालेले अणुखंड यांच्या ऊर्जा-मूल्यांत ΔE इतका फरक पडला, तर विक्रियेपूर्वीच्या व नंतरच्या एकूण कणांच्या द्रव्यामानातील फरक ΔM इतका असतोच. मापानाने ΔE व ΔM यांची मूल्ये कळली म्हणजे द्रव्यमान वर्णपटमापकाच्या साहाय्याने काढलेल्या आलेखातील संकुलन-अंकाच्या (हा अंक द्रव्यामानांक आणि अणुभार यांतील फरक भागिले द्रव्यमानांक यांच्याबरोबर असतो, → द्रव्यमानांक) वक्र रेषेवरून अचूक अणुभार ठरविता येतो.\nपहा : आवर्त सारणी.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/27423/", "date_download": "2022-10-07T21:44:58Z", "digest": "sha1:MAFD4PPR3UP3L7NRGPQAIUCS2LWABCT3", "length": 34694, "nlines": 245, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "प्रासंगिक खेळ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nप्रासंगिक खेळ : विशिष्ट प्रसंगाच्या निमित्ताने खेळले जाणारे खेळ, इंग्रजीतील ‘पार्टी गेम्स’ या संज्ञेचा हा मराठी पर्याय आहे. यूरोपीय समाजात मेजवानीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या स्त्रीपुरुषांच्या समूहात पार्टी गेम्स किंवा प्रासंगिक खेळ खेळण्याची प्रथा आढळ्ते. ज्या प्रसंगाच्या निमित्ताने प्रासंगिक खेळ खेळले जातात, ते प्रसंग अनेक प्रकारचे असू शकतात. सण आणि उत्सव, विवाहकार्ये आणि वाढदिवस, स्नेहसंमेलने, संस्था व व्यवसाय इत्यादींचे वर्धापनदिन यांसारख्या अनेकविध प्रसंगांच्या निमित्ताने कौटुंबिक व इतर सामाजिक गट मेजवानीचे कार्यक्रम योजतात. प्रासंगिक खेळ या कार्यक्रमाचाच एक भाग होय. या खेळांचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमास आलेले लहानथोर सर्व स्त्रीपुरुष त्यांत सहभागी होतात. असे खेळ मेजवानीच्या आधी वा नंतर खेळले जातात. प्रासंगिक खेळ नेमके केव्हा सुरू झाले हे सांगणे कठीण आहे तथापि प्राचीन काळापासून सुसंघटित समाजात अशा प्रकारचे खेळ रूढ असावेत, असे दिसते. व्यक्तीच्या सहज व उत्स्फूर्त आत्माविष्काराला अगदी मोकळेपणाने वाव मिळावा, असेच या खेळांमागील हेतू असतात. स्वतःला व भोवतालच्या बाह्य विश्वाला विसरून बेभानपणे संगीताच्या तालावर नाचणे, मोठ्या आवाजात गाणी म्हणणे, आनंदाने आरोळ्या देणे, हास्यविनोदात रममाण होणे यांसारख्या मुक्त वर्तनप्रकारांना प्रासंगिक खेळांतून वाव मिळतो. इतरांपासून अलिप्त राहणाऱ्या भिडस्त व लाजऱ्याबुजऱ्या व्यक्तींनाही अशा खेळांत सामील करून घेतले जाते व त्यांना समूहात मिसळण्याची संधी उपलब्ध होते.\nमेजवान्यांचे सामान्यतः तीन प्रकार दिसून येतात : (१) लहान मुलांचे वाढदिवस, बारसे वगैरे प्रसंगी योजलेल्या मेजवान्या. (२) तरुण मुलामुलींसाठी योजलेल्या मेजवान्या. या निमित्ताने तरूण मुलामुलींना एकत्र येण्याची, प्रणयाराधनाची व विवाहासाठी जोडीदार शोधण्याची संधीही उपलब्ध होऊ शकते. (३) गृहस्थाश्रमी व प्रौढ यांच्यासाठी योजलेल्या मेजवान्या. या विविध मेजवान्यांच्या प्रसंगी त्या त्या वयोगटांस अनुरूप अशा खेळांची योजना करतात. प्रासंगिक खेळ हे निव्वळ करमणुकीसाठी असले, तरी त्यांतील काही खेळ बुद्धिकौशल्य, स्मरणशक्ती, अभिनय यांच्या चाचणीसाठी खेळले जातात. काही खेळ समूहगीतांचे व त्यांच्या साथीवरील सोप्या नृत्यप्रकारांचेही असतात. अशा नृत्य-गीतप्रकारांत प्रौढ व्यक्तीही सहजपणे सहभागी होऊ शकतात. प्रत्यक्ष सहभागी होण्यानेच प्रासंगिक खेळांची रंगत व गंमत वाढत असते.\nमेजवानी देणाऱ्या यजमानाने जशी भोजनाच्या पदार्थांची निवड कुशलतेने करावयाची असते, तसेच या प्रसंगी घेतल्या जाणाऱ्या खेळांची व त्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्याची जुळणी व आखणी, ही तत्संबंधी आवश्यक ते पूर्वनियोजन करून, करावी लागते. मेजवानी सुरू होण्यापूर्वी कोणते खेळ खेळावे, मेजवानी चालू असताना काय करता येणे शक्य आहे, मेजवानीनंतर कोणते खेळ खेळावे यांचा क्रमही ठरवून घ्यावा लागतो. यासाठी लागणारे साहित्य म्हणजे कागद, पेन्सिली, चेंडू, फुगे, सुई, दोरा, पत्ते, टाचण्या, शिटी, बाजा, बासरी यांसारखी वाद्ये इ. सहजगत्या उपलब्ध होईल असे हाताशी ठेवले जाते. योजलेले खेळ कोठे खेळायचे त्याची जागा निश्चित केली जाते. यांपैकी बरेचसे खेळ भोजनगृहाजवळच्या एखाद्या दालनामध्ये, काही घराशेजारील हिरवळीवर तर काही घराच्या गच्चीवर घेता येतात. मेजवान्या व त्याप्रसंगी आयोजित केलेल्या प्रासंगिक खेळांचा प्रधान हेतू निमंत्रित लोकांनी एकमेकांच्या व यजमानांच्या संगतीत आनंदात वेळ घालवावा, हा असतो. हा आनंद निर्माण करण्यासाठी व लुटण्यासाठी अशा खेळांचा चांगला उपयोग होतो.\nमेजवानीच्या प्रसंगी आयोजित केलेल्या खेळांच्या कार्यक्रमाचा एक आराखडा करावा लागतो. खेळात विजयी होणाऱ्यांना किंवा विशेष नैपुण्य दाखविणाऱ्यांना छोटी बक्षिसे देण्याचा एखादा गंमतीचा समारंभही घडवितात. त्यासाठी निमंत्रितांतील एखाद्याला अध्यक्ष करून त्याच्या हस्ते छोटी व मजेशीर अशी बक्षिसे हास्यनिर्मिती होईल अशा रीतीने वाटण्यात येतात. या खेळांचे आयोजनच असे असावे, की सर्व लोक त्यात सहजपणे सहभागी होऊ शकतील.\nप्रासंगिक खेळांचे इतके विविध प्रकार आहेत, की त्यांची वर्गवारी करणे अवघड आहे. तरी पुढीलप्रमाणे सामान्यतः वर्गवारी करता येईल : (१) ओळख घडवून आणणारे खेळ, (२) गाण्यांचे अथवा ⇨\nभेंड्यांसारखे खेळ, (३) संगीत खुर्चीसारखे खेळ, (४) स्मरणशक्तीचे व निरीक्षणाचे खेळ, (५) स्पर्शाने वा वासाने वस्तू ओळखण्याचे खेळ, (६) चित्रकलेवर आधारलेले खेळ आणि (७) अभिनयावर आधारलेले खेळ. या प्रत्येक प्रकारातील साधारण एकेक खेळ उदाहरणादाखल पुढे दिला आहे :\n(१) ओळख घडवून आणणारे खेळ : मेजवानीला आलेल्या सर्व निमंत्रितांची एकमेकांशी ओळख व्हावी, म्हणून प्रथम त्यांना एक चौकटी आखलेला कागद दिला जातो व त्यातील चौकोनांत एकमेकांच्या स्वाक्षऱ्या गोळा करण्यास सांगितले जाते. ज्याच्या कागदावर त्यांपैकी जास्त स्वाक्षऱ्या असतील त्याला शेवटी बक्षीस दिले जाते.\n(२) गाण्यांचे वा भेंड्यांचे खेळ : पार्टीला जमलेल्या स्त्रिया व पुरुष यांचे वेगवेगळे दोन गट करतात. त्यांच्यात गाण्यांच्या तसेच वेगवेगळ्या विशेषनामांच्या भेंड्या खेळतात. जिंकणाऱ्यांना बक्षीस दिले जाते.\n(३) संगीत खुर्ची : खेळात भाग घेणारे जेवढे असतील त्यांच्यापेक्षा खुर्च्यांची संख्या एकाने कमी ठेवतात. खुर्च्या गोलाकार किंवा एका ओळीत आलटून पालटून एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंडे येतील अशा ठेवल्या जातात. पेटी वा बाजासारखे वाद्य वाजविले जाते अथवा संगीताची ध्वनिमुद्रिका लावली जाते. सर्वजण खुर्च्यांभोवती फिरतात. अचानक संगीत बंद होताच सर्वजण खुर्च्यांत बसण्याचा प्रयत्न करतात, त्यात ज्याला खुर्ची मिळत नाही, तो बाद होतो. अशा प्रकारे पुढे खेळत असताना प्रत्येक वेळी एकेक खुर्ची कमी केली जाते. जो शेवटी राहील त्याला बक्षीस दिले जाते.\n(४) स्मरणशक्तीचे व निरीक्षणाचे खेळ : मध्यावर एका ट्रेमध्ये निरनिराळ्या वीस ते पंचवीस वस्तू झाकून ठेवतात. सर्वांना त्या एक मिनिटभर दाखविल्या जातात. नंतर त्या वस्तूंची यादी करायला सांगतात. ज्याची यादी मोठी व जास्त बरोबर त्याला बक्षीस दिले जाते.\n(५) स्पर्शाने वा वासाने वस्तू ओळखण्याचे खेळ : छोट्या छोट्या पिशव्यांत काही वस्तू भरून ठेवतात. प्रत्येकजण त्या वस्तू बोटांनी चाचपून पाहून ओळखतो. निरनिराळे वास येणाऱ्या वस्तू पिशव्यांत ठेवतात. वासांवरून वस्तू ओळखण्यास सांगितले जाते.\n(६) चित्रकलेवर आधारलेले खेळ : निमंत्रितांचे चार गट केले जातात. प्रत्येक गटाला ओळीत उभे केले जाते. चित्र काढण्यासाठी एखादा फळा व खडू ठेवतात. सर्व संघाला मिळून एक चित्र काढायला सांगितले जाते. उदा., प्रत्येकजण धावत येऊन हत्तीचा एक अवयव काढतो. सर्वजण मिळून हत्तीचे चित्र पूर्ण करतात. ज्या संघाने चित्र चांगले काढले असेल, त्याला बक्षीस दिले जाते.\n(७) अभिनयावर आधारलेले खेळ : सर्वजण गोलाकार बसतात. एका पुठ्ठ्याच्या खोक्यात चिठ्ठ्या ठेवल्या जातात व प्रत्येक चिठ्ठीवर गंमतीदार अभिनयाची कृती दिली जाते. यजमान बाजा वाजवतो. प्रत्येकजण हे खोके पुढे सरकवीत राहतो. बाजा जेव्हा थांबतो, त्यावेळी खोके ज्याच्यापुढे असेल तो ते उघडून त्यातील एक चिठ्ठी काढतो व तीवर लिहिलेली कृती करतो. उदा., रडक्या मुलाचा अभिनय करणे, गाढवासारखे ओरडून दाखवणे, उखाणा घेणे इत्यादी.\nअलीकडे शाळा, महाविद्यालयांतून सहली, स्नेहसंमेलनांच्या वेळी, गणपती उत्सवात, पालक दिनी, कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी असे खेळ मोठ्या प्रमाणावर खेळले जातात. आनंद मेळा वा गंमतजंमत जत्रा (फन फेअर) या नावाने ओळखले जाणारे कार्यक्रम तर हल्ली फारच लोकप्रिय ठरले आहेत. त्यात वरील प्रकारांबरोबरच डोळे बांधून गाढवाला शेपूट लावणे, डोळे बांधून काठीने मडके फोडणे, एका आगकाडीत जास्तीत जास्त मेणबत्या लावणे, राक्षसाच्या मुखवट्याच्या तोंडात दुरून चणे टाकणे, कडीतून चेंडू टाकणे, तिपाई शर्यत, पोत्यांची शर्यत, चमचालिंबू शर्यत असे कितीतरी प्रकार खेळले जातात.\nप्रासंगिक खेळांमध्ये सर्वांना स्वतःचे वय, अधिकाराचा हुद्दा प्रतिष्ठा वगैरे विसरायला लावून भाग घेता येईल व त्याचा आनंद मनसोक्त लुटता येईल, असेच खेळ अंतर्भूत असावे लागतात.\nमेजवानीनंतर खेळ खेळायचे असतील तर त्यात फार धावपळ होणार नाही, बसून खेळता येतील, असे बैठे खेळ घ्यावे. यातच भेंड्या, गाणी, पत्ते, कॅरम, बुद्धीबळे, सापशिडी इ. खेळांचा समावेश असावा. खेळातील आनंद नष्ट होण्यापूर्वीच ते संपवणे केव्हाही उचित ठरते.\nभारतीय समाजातही अशा रंजक प्रासंगिक किंवा नैमित्तिक खेळांना महत्त्वाचे स्थान असल्याचे दिसून येते. वेगवेगळ्या सण-उत्सवादी प्रसंगी अनेक प्रकारचे खेळ, नाच, गाणी इ. करमणुकीचे प्रकार केले जातात. अक्षय्य तृतीयेस भारतात अनेक ठिकाणी, विशेषतः महाराष्ट्रात खानदेशमध्ये, पतंगाच्या काटाकाटीचे खेळ खेळले जातात. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक ठिकाणी जत्रा भरतात व त्या जत्रांमध्ये अनेक प्रकारचे झुले व पाळणे, बैलगाड्यांच्या शर्यती वगैरे रंजनप्रकार केले जातात. श्रावण महिन्यात नवविवाहित तरुणी मंगळागौर पूजतात, त्यावेळी रात्री स्त्रिया फुगड्या, फेर, कोंबडे असे खेळ खेळतात. तसेच नागपंचमीला झाडांना झोके बांधून खेळण्याची प्रथा आहे. गोकुळअष्टमीला दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम केला जातो. तसेच गुजरातमध्ये रास, गरबा यांसारखे नृत्यप्रकाराचे खेळ अनेक स्त्रीपुरुष एकत्र येऊन खेळतात. सार्वजनिक गणेशोत्सवातील विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल-लेझिमीच्या खेळाने सर्व वातावरण धुंद होऊन जाते. दिवाळीच्या दिवसांत अनेक ठिकाणी प्रेक्षणीय अशी शोभेच्या दारूगोळ्याची-बाणांची युद्धे होतात. रंगपंचमीचा सणही सर्व लहानथोर स्त्रीपुरुष उत्साहाने साजरा करतात. अशा प्रकारे विविध सण व उत्सव प्रसंगी तऱ्हेतऱ्हेचे पारंपरिक खेळ खेळण्याची पद्धती भारतात सर्वत्र आढळून येते.\nशहाणे, शा. वि. पटवर्धन, म. गं.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postप्रियोळकर, अनंत काकबा\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n—खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/30492/", "date_download": "2022-10-07T22:02:47Z", "digest": "sha1:5A3AABC7ZYOE7KQBF5XLHI4LDNOMDCP5", "length": 19062, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मेहेर, गंगाधर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमेहेर, गंगाधर: (१८६२–१९२४). प्रख्यात ओडिया कवी. संबळपूर जिल्ह्यातील बरपल्ली या गावी एका कोष्टी कुटुंबात जन्म. गावातील शाळेत काही काळ प्राथमिक शिक्षण घेतल्यावर ते आपला वाडवडिलार्जित विणकामाचा धंदा करू लागले. नंतर स्थानिक जमीनदाराच्या न्यायालयात अर्जनवीस म्हणून दस्तऐवज लिहिण्याचे काम ते करू लागले. पुढे सरकारी न्यायालयातही त्यांनी हेच काम केले. स्वतःच्या प्रयत्नाने व कर्तृत्वाने ते जीवनात यशस्वी व प्रख्यात झाले. आपल्या बुद्धीचा ज्ञान मिळविण्यासाठी त्यांनी योग्य उपयोग करून घेतला. जुने व नवे ओडिया काव्य त्यांनी वाचून चिकित्सकपणे अभ्यासिले. संस्कृत, हिंदी, बंगाली व इंग्रजी ह्या भाषाही त्यांनी स्वप्रयत्नाने चांगल्या अवगत करून घेतल्या. या भाषांतील दर्जेदार ग्रंथ त्यांनी मुळातून वा भाषांतरित स्वरूपातून चिकित्सकपणे वाचले.\nरामायण व महाभारतातील विषयांवर त्यांनी महाकाव्यसदृश अशी काही दीर्घ व स्वतंत्र कथाकाव्ये रचली. कीचकवध हे त्यातील पहिले काव्य ते प्रसिद्ध होताच त्यांचा ओरिसात सर्वत्र कवी म्हणून लौकिक झाला. बोरसांबर येथील देशभक्त जमीनदाराचा त्यामुळे त्यांना शेवटपर्यंत आश्रय लाभून त्यांच्या हलाखीच्या जीवनास काहीसे स्थैर्यही आले. सीतेच्या जीवनावरीलत्यांचे दुसरे नितान्त सुंदर दीर्घकाव्य तपस्विनी होय. कालिदासाच्या शाकुंतलाचे प्रणय-वल्लरी हे अत्यंत सरस असे ओडिया रूपांतर होय. इंदुमती, उत्कल-लक्ष्मी, अयोध्या-दृश्य, कविता-कल्लोल, अर्घ्य थाली, अहल्यास्तव, महिमा, पद्‌मिनी , भारती-भवन, कृषक-संगीत ही इतर काव्ये वा काव्यसंग्रह होत. त्यांच्या गद्यग्रंथांत त्यांचे अपूर्ण राहिलेले आत्मचरित्र तसेच नृपराजसिंह, फकीर मोहन व काशिनाथ पंडा यांच्यावरील काही निबंध यांचा समावेश होता. त्यांनी अभिजात शैलीत दीर्घ कथाकाव्येच रचली नाहीत, तर आधुनिक प्रकारची उद्देशिका (ओड), सुनीते, भावगीते. देशभक्तिपर गीते इ. प्रकारांतील रचनाही केली असून त्यात त्यांची मौलिकता, सर्वस्पर्शी व्यापक जीवनदृष्टी, कल्पकता, अभिव्यक्तिकौशल्य इत्यादींचा प्रत्यय येतो. त्यांच्या काही कवितांतील प्रखर देशभक्तिपर भावनेमुळे ओरिसात ते राष्ट्रीय वृत्तीचे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. जुन्या व नव्या काव्यप्रकारांचे अत्यंत मनोरम रीतीने संश्लेषण करणारे कवी म्हणून ओडियात ते सर्वत्र ओळखले जातात. ओडिया कवी ⇨ राधानाथ राय यांनी गंगाधर मेहेर यांच्या काव्यप्रतिभेचा खूपच गौरव केला आहे.\nएक महान राष्ट्रकवी म्हणून त्यांचा आदराने सर्वत्र उल्लेख केला जातो. संबळपूर येथील शासकीय महाविद्यालयाला गंगाधरमेहेर यांचे नाव देण्यात आले आहे. संबळपूर येथे ‘गंगाधर साहित्य परिषद’ या नावाची साहित्यसंस्थाही स्थापण्यात आली आहे. १९६२ मध्ये त्यांची जन्मशताब्दी ओरिसात मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी केली गेली.\nदास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) शिरोडकर, द. स. (म.)\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postमेनेंडेथ पिडाल, रामॉन्\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n—भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/32274/", "date_download": "2022-10-07T23:10:34Z", "digest": "sha1:NGITTFQX77HEXBJTCXBIFORJ54DBDV5O", "length": 40228, "nlines": 246, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "वनस्पतिसंग्रह – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nवनस्पतिसंग्रह : (हर्बेरियम). शास्त्रीय अभ्यासासाठी वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांची निरीक्षणे करावी लागतात. पृथ्वीवरील सर्व वनस्पती एकाच बागेत असणे शक्य नाही. शिवाय वर्षातील सर्व ऋतूं त वनस्पतीचे पाने, फुले, फळे इ. सर्व भाग मिळतातच असे नाही म्हणून निरीक्षणाच्या वेळी वनस्पतीचा कोणताही भाग उपलब्ध व्हावा यासाठी त्यांचा संग्रह करून ठेवावा लागतो. अनेक ठिकाणांहून वेळोवेळी येणाऱ्या संदिग्ध वनस्पतींची निश्चिती करण्याकरिता त्यांची ज्ञात वनस्पतींशी तुलना करून त्यांची ओळख पटवून घेणे, न पटल्यास त्या नवीन आहेत हे निश्चित ठरविणे व त्यांची नोंद करून त्या परिरक्षित करणे (जपून ठेवणे) या महत्त्वाच्या गोष्टींकरिता अशा संग्रहाची फार आवश्यकता असते.\nअठराव्या शतकाच्या मध्यास स्वीडनमध्ये⇨कार्ल लिनीअस ह्या श्रेष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञांनी वनस्पतिसंग्रहाचा उपयोग वनस्पतींचे वर्गीकरण व त्यांची शास्त्रीय नावे निश्चित करण्याकरिता अतिशय आवश्यक आहे, असे प्रतिपादन करून ह्या कल्पनेस मूर्त स्वरूप दिले, त्यांच्या शिष्यवर्गाने जगातील बऱ्याच भागांतून वनस्पतींचे असंख्य नमुने वाळवून स्वीडनला पाठविले. अशाच वनस्पतिसंग्रहाचाच्या साहाय्याने प्रत्येक वनस्पतीस शास्त्रीय नाव दिले गेले व त्यांचे वर्गीकरण करण्यात आले. लिनीअस यांच्या नंतर थोड्याच काळात वनस्पतिसंग्रहाचे महत्त्व पटून यूरोपातील अनेक देशांत वनस्पतिसंग्रह स्थापन करण्यात आले व त्यांचा पद्धतशीर अभ्यास सुरू झाला. ब्रिटनमधील ब्रिटिशम्युझियम व क्यू शास्त्रीय उद्यानातील वनस्पतिसंग्रह ह्या संस्था प्रसिद्ध आहेत.\nब्रिटिश म्युझियममध्ये⇨सर जोसेफ बँक्स व⇨रॉबर्ट ब्राऊन यांच्या ऑस्ट्रेलियातील वनस्पतींचा समावेश होतो. क्यू येथील जगप्रसिद्ध वनस्पतिसंग्रहाची स्थापना १७५९मध्ये झाली. पुढे त्याची प्रचंड वाढ⇨सर विल्यम जॅक्सन हूकर व ⇨सर जोसेफ डाल्टन हूकर यांनी केली. ह्या संग्रहात जगातील जवळजवळ प्रत्येक वनस्पतीच्या नमुन्यांचा संग्रह केला आहे. एकंदर नमुन्यांचा संग्रह जवळजवळ ६५लाखांच्या आसापास आहे. दरवर्षी ५०,०००ते ८०,०००नमुन्यांची त्यात भर पडत असते. येथील उष्ण कटीबंधीय ऑर्किडे व नेचे, रसाळ वनस्पती आणि आस्ट्रेलियातील वनस्पती यांचा संग्रह उत्कृष्ट आहे. येथे वस्पतिविज्ञानाच्या प्रत्येक शाखेत मान्यताप्राप्त शास्त्रज्ञ काम करतात. येथे वनस्पति-आनुवंशिकी व वर्गीकरणविज्ञान यांकरिता स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. येथील वनस्पतिविषयक निर्णय फार महत्त्वाचे मानले जातात, म्हणून क्यू वनस्पतिसंग्रह जगातील वनस्पती ओळखण्याचा मानदंड समजला जातो. क्यू शास्त्रीय उद्यानातर्फे क्यू बुलेटीन व इंडेक्स क्यूएन्सीस यांचे प्रकाशन होते आणि दर पाच वर्षांनी त्यांच्या पुरवण्या प्रसिद्ध करण्यात येतात. लिनीअस यांच्या काळापासूनच्या सर्व उच्च दर्जाच्या वनस्पतींची नोंद येथे करण्यात आलेली आहे. एडिंबरो येथील वनस्पतिसंग्रहात२०लाख नमुने असून त्यांत चीन व तिबेटमधील वनस्पतीही आहेत. स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा येथील वनस्पतिसंग्रहात भूमध्यसामुद्रिक व मध्य आशियातील वनस्पतींचा समावेश होतो.⇨ ऑगस्टीन पीराम दे कांदॉल यांची वनस्पति विषय ग्रंथमाला येथेच रचली गेली. जर्मनीमध्ये गटिंगेन व बर्लिन येथील वनस्पतिसंग्रह प्रसिद्ध आहेत. बर्लिनमधील संग्रह अद्ययावत असून सुप्रसिद्ध वनस्पतिवैज्ञानिक ⇨आडोल्फ एंग्लर यांनी जमविलेल्या वनस्पतींचे अनेक दुर्मिळ नमुने येथे आहेत. एंग्लर यांची वनस्पतीच्या वर्गीकरणविषयक जगप्रसिद्ध ग्रंथांची माला येथूनच प्रसिद्ध झाली. ह्याशिवाय यूरोपमध्ये व्हिएन्ना, कोपनहेगन, लेनिनग्राड व अप्साला येथील वनस्पतिसंग्रह प्रसिद्ध आहेत. ह्या वनस्पतिसंग्रहातील काही भाग दुसऱ्या महायुद्धात नष्ट झाला व तो परत भरून काढण्याचे बऱ्याच देशांनी प्रयत्न चालविले आहेत.\nअमेरिकेत हार्व्हर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ ⇨ॲसाग्रे ह्यांचा मोठा संग्रह आहे. सरकारी वनस्पतिसंग्रह वॉशिंग्टन येथे आहे. ह्याशिवाय न्यूयॉर्क बोटॅनिकल गार्डन, मिसूरी बोटॅनिकल गार्डन येथे प्रसिद्ध वनस्पतिसंग्रह आहेत. जगातील इतर भागांत देखील प्रत्येक वनस्पतिविषयक केंद्रास अशी संग्रहालये जोडलेली आहेत.\nभारतातील सर्वात मोठा व जुना वनस्पतिसंग्रह कलकत्ता येथे आहे. १७८७मध्ये विल्यम जोन्स यांनी सुरुवात केलेल्या शाही संग्रहालयाचा छोटा भाग म्हणून या वनस्पतिसंग्रहाची सुरुवात झाली. पुढे १८१४ मध्ये नाथानिएल वालिंच यांच्या खटपटीने वनस्पतिसंग्रहाची झपाट्याने वाढ झाली. आता ह्या संग्रहाच्या पाच मजली इमारतीत वनस्पतींचे जवळजवळ १५लाख नमुने असून भारतातील व आग्नेय आशियाई देशांतील वनस्पतींचा त्यांत समावेश होतो. शिवाय जगातील बहुतेक वनस्पतींचे नमुने येथे आढळतात. ह्याशिवाय अनेक दुर्मिळ पुस्तके, अद्ययावत ग्रंथालय व भारतातील व आग्नेय आशियाई देशांतील वनस्पतींचा त्यांत समावेश होतो. शिवाय जगातील बहुतेक वनस्पतींचे नमुने येथे आढळतात. ह्याशिवाय अनेक दुर्मिळ पुस्तके, अद्ययावत ग्रंथालय व भारतातील प्रसिद्ध⇨शास्त्रीय उद्यान ह्या संग्रहाशी संलग्न केलेली आहेत. भारतातील वनस्पतिविषयक समस्यांचा निर्णय येथून दिला जातो. हल्ली हा संग्रह ⇨ भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या कक्षेत येतो. डेहराडून येथे जंगलविषयक महत्त्वाच्या वनस्पतींचा संग्रह असून त्यात मुख्यत्वेकरून हिमालयातील वनस्पतींचा समावेश होतो. शिलाँग येथे आसाम व मणिपूर येथील वनस्पतींचे संग्रह आहेत. पुणे येथे पश्चिम घाट, मराठवाडा, गुजरात व कर्नाटक येथील वनस्पतींचा संग्रह आहे. कोईमतूर येथे दक्षिण भारतातील वनस्पतींचा संग्रह आहे. भारतातील प्रत्येक विद्यापीठाच्या वनस्पतिविषयक शाखेत वनस्पतिसंग्रहांची वाढ होत आहे. मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजचा संग्रह अद्ययावत असून दक्षिण भारतातील वनस्पतींनी परिपूर्ण आहे. भारतातील प्रसिद्ध वनस्पतिवैज्ञानिक इ. ब्लॅटर, जे. एफ्‌. आर्‌. आल्मेईदा व एच्‌. सांतापाव यांनी येथेच काम केले.\nवनस्पतिसंकलन : वनस्पतिसंग्रहामध्ये प्रत्येक वनस्पतीचे संकलन करणे फार महत्त्वाचे आहे. या संकलनाचे मूलतः सहा भाग पडतात : (अ) वनस्पती गोळा करण्याकरिता लागणारे साहित्य, (आ) वनस्पतींची निवड, (इ) नोंदवहीचा उपयोग, (ई)वनस्पती सुकविणे, (उ) सुकलेल्या वनस्पतींवरील इतर संस्कार व (ऊ) आरोपणपत्राचा उपयोग.\n(अ) वनस्पती व आनुषंगिक माहिती गोळा करण्याकरिता लागणारे साहित्य : (१) वनस्पतिसंग्राहक पेटिका, (२) शिकारी चाकू, (३) बृहदर्शकभिंग, (४) नोंदवही व पेन्सिल, (५) काठी, (६) वनस्पती कापण्याची हत्यारे, (७) होकायंत्र, नकाशा, उंचीदशर्क, (८) कॅमेरा, (९) वनस्पतिदाबक, (१०) वनस्पति-क्रमांक पुस्तक (११) पोलादी टेप, फूटपट्टी, रंगदर्शक सुया, दाढीचे पाते, (१२) प्रथमोपचार पेटी, वैयक्तिक कपडे आणि सामान.\n(आ) वनस्पतींची निवड : प्रत्येक वनस्पतीचे निदान सहा नमुने गोळा करावे, गवतासारखी वनस्पती मुळासकट घ्यावी, वृक्ष, झुडपे, औषधी इत्यादींच्या फांद्यांचे नमुने आरोपणपत्रावर बसतील (४०×२७सेंमी.) इतपतच असावेत, फुलांना वर्गीकरणामध्ये फार महत्त्व असल्याने नमुन्यात हा भाग अवश्य असावा.\n(इ)नोंदवही व क्रमांकवही : यांचा उपयोग गोळा केलेल्या वनस्पतींना क्रमांक देणे व त्यांचा तपशील लिहून काढणे हा असतो. तपशिलात वनस्पतीचे स्थानिक नाव, वनस्पतीचा प्रकार व प्रमाण, जमिनीचा प्रकार, फुलांचा रंग, फळ व बीजाबद्दल माहिती व त्यांचा बहर असल्यास त्याची नोंद, स्थानिक उपयोग व वनस्पती गोळा केल्याचा दिनांक अवश्य नमूद करावा.\n(ई)वनस्पती सुकविणे : वनस्पतीचे मूळ स्वरूप बदलू न देता तिचे निर्जलीकरण करणे. टीपकागदात किंवा वर्तमानपत्रात वनस्पती ठेवून त्या वनस्पतिदाबकात ठेवतात व दिवसातून कमीतकमी दोन वेळा कागद बदलतात. हा क्रम वनस्पती उकळत्या पाण्यात काही मिनिटे ठेवून नंतर वाळवतात. जलवनस्पतीकरिता टीपकागद व जाळी यांचा उपयोग करतात. प्रथम ती वनस्पती पाण्यात टीपकागदावर व्यवस्थित पसरून नंतर जाळीने बाहेर काढून वाळवितात.\n(उ)वनस्पतींवरील इतर संस्कार : वनस्पती सुकल्यानंतर तिला कीड लागू नये म्हणून तिच्यावर मर्क्युरिक क्वोराइडचा विषारी द्राव लावतात किंवा वायुकोठीमध्ये काही काळ ठेवतात. दर १०वर्षांनी ही क्रिया करावी लागते.\n(ऊ)आरोपणपत्राचा उपयोग : ह्या कागदाचे सर्वमान्य आकारमान ४०× २७सेंमी. असते, ह्या कागदावर वनस्पती सरसाने चिकटवितात व दोऱ्याने शिवतात. आरोपणपत्राच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात त्या वनस्पतीचा तपशील देतात. असा पूर्ण झालेला नमुना मग संग्रहालयात वर्गीकरण करून ठेवला जातो.\nयाशिवाय वनस्पतीचे अवजड भाग किंवा सुकविताना बिघडणारे भाग परिरक्षक द्रवात घालून त्यांवर त्या वनस्पतीचा तपशील लावून काचेच्या मोठ्या पात्रात ठेवतात.\nवनस्पतीचे नाव ज्या एका विशिष्ट नमुन्यावरून ठरविले जाते ती नमुनापत्रिका फार महत्त्वाची असते व तिची विशेष काळजी घेतली जाते. अशा नमुन्यांच्या संख्येवरून त्या त्या संग्रहाची श्रेष्ठता ठरविली जाते.\nप्रत्येक वनस्पतिसंग्रहात वनस्पतिपत्रके भरलेली असतात. त्यांवरून एखादी विशिष्ट वनस्पती कोठे किती प्रमाणात सापडेल, फुले, फळे येण्याचा काळ व संग्राहकाची नोंदवही, क्रमांक इ. माहिती चटकन समजते. या पत्रकात त्या वनस्पतीविषयी इतर संदर्भही दिलेले असतात, त्यांवरून वनस्पतिसंकलन कमी श्रमात करता येते.\nवनस्पतिसंग्रहातील वर वर्णन केलेल्या पारंपरिक पद्धतीने बनविलेले नमुने मूळच्या स्वरूपात टिकून न राहता कालांतराने त्यांत हवामानादी भौतिक व रासायनिक घटकांमुळे आणि तसेच कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) व कीटक यांसारख्या काही सजीवांमुळे बरेच फरक पडत जातात व त्यामुळे मूळची वनस्पती ओळखणे कठीण जाते. ही अडचण दूर करून मूळचे स्वरूप टिकवून ठेवता येईल असे तंत्र शोधून काढण्याचे बरेच प्रयत्न कित्येक पाश्चात्त्य व भारतीय शास्त्रज्ञांनी केले. त्यामध्ये श्यामला डी. चितळे व डी. व्ही. चितळे ह्या भारतीय शास्त्रज्ञ दांपत्याने १९६६मध्ये शोधून काढलेल्या तंत्राची रुपरेखा पुढे दिली आहे. पाने व फुले असलेली फुलझाडाची फांदी किंवा मुळांसह लहान रोपटे प्रथम स्वच्छ करून ते चार पाच मिनिटे पुढील टॅनीन-मिश्रणात बुडवून काढावे. ५००मिलि. पाण्यात ५-१०ग्रॅ. टॅनीन पूड घालून अगंज (स्टेनलेस) पोलादाच्या भांड्यात एक उकळी येईतो गरम करून व वस्त्रगाळ करून काचेच्या अगर दुसऱ्या अंगज पोलादाच्या पात्रात हे मिश्रण झाकून ठेवून वापरावयाचे असते. असे बुडविणे न जमल्यास वनस्पतीचा नमुना स्वच्छ कागदावर पसरून त्यावर हे मिश्रण शिंपडावे व त्यानंतर चार पाच मिनिटांनी तो नमुना टीपकागदात पसरून दाबाखाली ठेवावा. एरंडेल व केरोसीन समभाग मिसळून एक लिटर मिश्रण बनवावे व त्यात १०ग्रॅ. कापराचा चुरा व १०ग्रॅ. मेंथॉल घालून ते सर्व एकजीव होऊ द्यावे. नंतर हे मिश्रण ब्रशाने पांढऱ्या कागदावर फासून त्यावर वरचा संस्कारित नमुना ठेवावावहे दुसरे मिश्रण त्यावर घालावे व दुसरा पांढरा कागद त्यावर ठेवावा. ह्यावर नंतर गरम इस्त्री फिरवून ती वनस्पती कोरडी झाल्याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर तो नमुना कापडाच्या घडीत ठेवून पुन्हा इस्त्री फिरवावी, ह्या प्रक्रियेने निर्जलीकरण चांगले होते. नमुन्यावर फार मिश्रण राहू देऊ नये. त्यानंतर जरूरतितक्या जाडीच्या पॉलिथिनाच्या दोन तुकड्यांत तो नुमना ठेवून व खालीवर कापड ठेवून त्यावर गरम इस्त्री दाबून फिरवावी. यामुळे ते तुकडे परस्परांस चिकटतील व नमुना त्यात बंदिस्त होऊन सुरक्षित राहील. ही प्रक्रिया करण्यास आ. २मध्ये दर्शविलेल्या प्रकारचा ‘उष्ण दाबक’ (हॉट प्रेस) वापरणे योग्य ठरते. या पद्धतीने नमुन्याचे रंग चांगले टिकतात तथापि रंगबदल टाळण्यास आवश्यक, तर टॅनिनाशिवाय सायट्रिक अम्ल वापरावे लागते. निर्जलीकरणापूर्वी लाल फुलांवर (उदा., जास्वंद) लिंबाचा रस टाकल्यास रंग टिकून राहतो. या पद्धतीत वापरलेल्या तेलामुळे तो नमुना तेल शोषून घेतो व तो अधिक पारदर्शक बनतो आणि त्यामुळे त्याची संरचना स्पष्ट दिसते, नमुन्यावर असलेल्या तेलाच्या थरामुळे त्याचे कीड व कवकांपासून संरक्षण होते. नमुना लवचिक झाल्यामुळे त्याचे तुकडे होत नाहीत, निरीक्षणात त्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट दिसतात. सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने अपारदर्शक नमुना अधिक चांगला तपासून बिनचूक निष्कर्ष काढणे सोपे जाते.\n४. वर्तक, वा. द. वनस्पति-संकलन पुणे, १९६१.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postवनस्पति – रसायनशास्त्र\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/33165/", "date_download": "2022-10-07T22:44:00Z", "digest": "sha1:RKXJOKYEADONQXV6C3ALSQ25KY5MPOPM", "length": 20934, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "व्हँकूव्हर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nव्हँकूव्हर : कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या महानगर २०,३३,००० (२००० अंदाज), ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ निम्मी लोकसंख्या या महानगराची आहे. प्रांताच्या नैर्ऋत्य भागात, जॉर्जिया सामुद्रधुनीच्या बरार्ड उपखाडीवर, व्हँकूव्हर बेटाच्या विरुद्ध बाजूस हे शहर वसले आहे. मॉंट्रिऑल व टोरॉंटोखालोखाल हे कॅनडातील तिसऱ्या क्रमांकाचे महानगर आहे. शहराच्या दक्षिणेस फ्रेझर नदीचा त्रिभुज प्रदेश आहे. संयुक्त संस्थानांपैकी वॉशिंग्टन राज्याच्या सरहद्दीपासून उत्तरेस फक्त ४० किमी. अंतरावर व्हँकूव्हर शहर आहे. येथील जानेवारीचे सरासरी तापमान २ अंश से., तर जुलैचे सरासरी तापमान १७ अंश से. असते. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०७ सेंमी. असून बहुतांश पाऊस नोव्हेंबर ते मार्च यांदरम्यान पडतो.\nकॅप्टन जॉर्ज व्हँकूव्हर याने १७९२ मध्ये बरार्ड उपखाडीचे समन्वेषण केले. १८०८ मध्ये सायमन फ्रेझर याने येथील नदीचे समन्वेषण केले. त्याचेच नाव त्या नदीला देण्यात आले. १८६२ मध्ये काही ब्रिटिश वसाहतकारांनी उपखाडीच्या उत्तर किनाऱ्यावर एक लाकूड कापण्याची गिरणी सुरू केली. परिसरातील लाकडाच्या विपुलतेमुळे येथे अशा गिरण्यांची वाढ होत गेली. त्यामुळे १८७० मध्ये याला ग्रॅनव्हिल हे नाव देण्यात आले. १८८४ मध्ये कॅनडियन पॅसिफिक लोहमार्गाचे पश्चिमेकडील अंतिम स्थानक म्हणून याची निश्चिती करण्यात आली. याच वर्षी कॅप्टन जॉर्ज व्हँकूव्हर याच्या सन्मानार्थ याला व्हँकूव्हर हे नाव देण्यात आले. १८८६ मध्ये याला शहराचा दर्जा देण्यात आला. १८८७ मध्ये पहिली रेल्वे व्हँकूव्हरला आली.\nजहाजबांधणी, मत्स्यप्रक्रिया, साखर-निर्मिती, अन्नप्रक्रिया, मांस हवाबंद डब्यात भरणे, तेलशुद्धीकरण, वस्त्रोद्योग, धातू, लाकूड व लाकूड उत्पादने, कागद व खनिज उत्पादने हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत. कॅनडातील ठोक व किरकोळ व्यापाराचे हे सर्वांत मोठे केंद्र असून त्यात सु. १,००,००० कामगार गुंतले आहेत. पॅसिफिक किनाऱ्यावरील वर्षभर खुले असणारे व सर्वाधिक रहदारीचे हे एक नैसर्गिक बंदर आहे. या बंदरातून दरवर्षी ६० मे. टन मालाची चढउतार होते. येथून आशियाई देशांशी मोठा व्यापार चालतो. कॅनडातील पॅसिफिकचे प्रवेशद्वार म्हणूनच व्हँकूव्हर ओळखले जाते. ट्रान्स कॅनडियन लोहमार्गावरील हे पश्चिमेकडील अंतिम स्थानक असून कॅनडातील महामार्ग व हवाई मार्गांचे हे पश्चिमेकडील महत्त्वाचे केंद्र आहे तसेच ट्रमॉंटेन नळमार्गाचेही पश्चिमेकडील अंतिम ठिकाण असून त्याद्वारे एडमंटन येथील तेल पश्चिम किनाऱ्या वर आणले जाते.\nकिनारी पर्वतश्रेणी व महासागर यांच्या दरम्यान असलेल्या नयनरम्य टेकडीवरील याच्या स्थानामुळे तसेच बंदराचे व बर्फाच्छादित पर्वतश्रेण्यांचे दिसणारे अतिशय सुंदर दृश्य, किनाऱ्यावरील वालुकामय पुळणी, हिरवीगार वनराजी, विविध उद्याने, विविध करमणूक केंद्रे, सहलीची स्थळे, हिवाळ्यातील सौम्य हवामान यांमुळे बारमाही पर्यटनकेंद्र म्हणून व्हँकूव्हरची ख्याती आहे. येथील स्टॅन्ली पार्क (३६४ हे.) विशेष प्रसिद्ध असून त्यात प्राणिसंग्रहालय व अनेक स्थानिक वनस्पतिप्रकार पहावयास मिळतात. याशिवाय शहरातील वेगवेगळ्या खेळांची प्रशस्त मैदाने, विविध सांस्कृतिक केंद्रे, एच. आर. मॅक्मिलन खगोलालय, वस्तुसंग्रहालये, व्हँकूव्हर कलावीथी (१९३१), क्रीडागार (१९८३) इ. विशेष उल्लेखनीय आहेत. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ (१९०८), सायमन फ्रेझर विद्यापीठ (१९६५), ब्रिटिश कोलंबिया संशोधन मंडळ व इतर अनेक शैक्षणिक संस्था शहरात आहेत. येथील ७०% लोक कॅनडियन असून त्याखालोखाल मोठा गट ब्रिटिशांचा आहे. त्यांशिवाय चिनी, जर्मन, फ्रेंच, इटालियन, युक्रेनियन, स्कँडिनेव्हियन, पोर्तुगीज, भारतीय व जपानी लोकही आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/33660/", "date_download": "2022-10-07T21:24:07Z", "digest": "sha1:Y4YDUQWAM6WTOGDJMF5LZQDP3FSUZ4MM", "length": 45887, "nlines": 238, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "संगीतिका – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसंगीतिका : नाटक आणि संगीत या दोन कलांचा एकात्म आविष्कार साधणारा नाट्यप्रकार. हा पूर्णतः वा बव्हंशी पद्यरूप व संगीतमय असतो. संगीतात रचनाबद्घ केलेली व गायकनटांनी सादर केलेली पद्यात्म नाट्यकृती म्हणजे संगीतिका, असे स्थूलमानाने म्हणता येईल. पाश्चात्त्य ‘ऑपेरा’ या प्रकाराचे विवेचन ⇨ संगीतक या नोंदीत आले आहे. तर प्रस्तुत नोंदीत भारतीय भाषांतील संगीतिकांचा आढावा घेतला आहे. पाश्चात्त्य ऑपेराला ‘संगीतक’ ही संज्ञा बा. सी. मर्ढेकर यांनी योजिली. या संज्ञेमुळे पाश्चात्त्य ऑपेराचे स्वरूप संगीतिका, संगीत नाटक, संगीत सुखात्मिका, काव्यनाट्य या प्रकारांहून वेगळे आहे, हे सूचित व्हावे.\nसंगीतिकेत नाट्य व संगीत हे दोन्ही घटक अपरिहार्य व प्रयोगात ते अभिन्न, एकजीव होऊन येतात. याच्या उलट संगीत नाटकाचा मूलाधार गद्य भाग असतो. संगीत नाटकातील पदे मनोरंजन करतात, क्वचित नाट्य-संहितेच्या ओघाला मदत करतात. असे म्हणता येईल, की संगीतिकेत संगीताला मुख्य व साहित्याला दुय्यम आधारभूत स्थान तर संगीत नाटक, काव्यनाट्य आदी प्रकारांत साहित्याला मुख्य व संगीताला गौण स्थान प्राप्त झालेले कित्येकदा आढळून येते.\nसंगीतिकेत साहित्य, संगीत, अभिनय या तीन घटकांचा एकात्म आविष्कार व नाट्यात्म अनुभवाची तीव्रता ही वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवतात. हा नाट्यानुभव एकस्रोती असतो, त्यामुळे तो काव्याकडे झुकणारा असतो व अनुभवाच्या तीव्रतेमुळे तो संगीतात्मक घाटाला जवळचा असतो. गद्य नाटकामध्ये नाट्यानुभव पात्रमुखातून अवतरताना जो पसरटपणा वा बोथटपणा संभवतो, तो संगीतिकेच्या मूल प्रकृतीला मानवणारा नव्हे. संगीत नाटकात संगीताचे कार्य नाट्यानुभवाला भारून टाकण्याचे, काहीसे साधनात्मक स्वरूपाचे असते तसे ते संगीतिकेत नसते. नाट्यानुभवातील उत्कटता, उत्स्फूर्तता, अनुभवाची तीव्रता व आविष्कारातील लयबद्घता ह्यांचे एकात्म, संश्लिष्ट रूप व त्यातून येणारी संगीतात्मकता हे संगीतिकेचे प्रधान वैशिष्ट्य होय. संगीतिकेतील आशयद्रव्यात कल्पकता, अनुभवाची स्वच्छंदता, प्रतीकात्मकता आढळते तसेच त्याचा आविष्कार एकाच वेळी आस्वादकाच्या दृष्टीस व श्रवणास आवाहन करणारा असतो. पात्रांचे संभाषण, आंगिक-वाचिक अभिनय आणि त्याला वादयमेळाची वा वृंदगानाची साथसंगत या सर्वांच्या एकात्म, सुसंघटित परिणामातून संगीतिकेतील नाट्यनुभव साकार व प्रत्ययकारी होतो. एखादया व्यक्ति-रेखेचे प्रतीक म्हणून संगीतिकेत संगीतरचना कार्य करते. त्यामुळे संगीतिकेत संगीत केवळ संगीत म्हणून न येता, नाट्यधर्मी होऊन अवतरते. संगीतात्मकतेचे दृक्श्राव्यात्म परिमाण नाट्यनुभवाला संगीतिकेचे रूप प्रदान करते.\nआकाशवाणीवरून ज्या संगीतिका ध्वनिक्षेपित केल्या जातात, त्यांचे श्राव्य गुणधर्म जास्त महत्त्वाचे ठरतात. त्यात सामान्यतः एखादया कथेचे गीतमालिकेत रूपांतर केले जाते. तसेच कथनपर संगीतमय लेखनाचाही त्यात अंतर्भाव होतो. अशा श्राव्य संगीतिकेत दृश्यात्म नाटय्गुण असलेच पाहिजेत, असे नाही. रंगभूमीवर सादरीकरण हे त्यांचे प्रयोजनही नव्हे. त्यामुळे अशी संगीतिका नाट्यपूर्ण असलीच पाहिजे, असे नाही आणि बहुशः श्राव्य स्वरूप अशीच त्या संगीतिकेची रचना असते. संगीतिकेत गद्य संभाषणे जवळजवळ नसतात. पात्रांचे संवाद काव्यमय असतात आणि ते गाऊन सादर केले जातात. त्यामुळे अशा संगीतिकेची जडणघडण नाट्यमय असण्यापेक्षा जास्त करून कथनात्मक असते. आकाशवाणी माध्यमाला इष्ट व अनुकूल असा, संगीत व काव्य यांचा मिलाफ असलेला संगीतिका हा श्राव्य प्रकार लेखकांनी निर्माण केला. आकाशवाणीवरून सादर केल्या जाणाऱ्या संगीतिकांचा कालावधी फार तर एक तास दीड तास इतकाच असतो. ह्या मर्यादित कालावधीत संगीतिकेचा एकसंध प्रयोग व परिणाम अपेक्षित असतो. भारतीय आकाशवाणीवर संगीतिका सर्व भाषांतून लिहिल्या गेल्या आहेत आणि प्रसारित झाल्या आहेत.\nपाश्चात्त्य ऑपेराच्या प्रभावातून तसेच स्वतंत्र रीत्याही मराठीसह अन्य भारतीय भाषांत संगीतिका, संगीतके (ऑपेरा ), संगीतनाट्ये हे परस्पर-संलग्न प्रकार विकसित व समृद्घ होत गेले आहेत. पारंपरिक भारतीय मिथके, आख्यायिका, लोककथा यांतून कथाबीजे घेऊन, तसेच सद्यकालीन सामाजिक-राजकीय विषयांवर आधारित अशी अनेक संगीतके व संगीतिका लिहिल्या गेल्या आणि पारंपरिक लोकरंगभूमीचे विविध घाट, लोकनृत्ये, बॅलेसारखे नृत्यप्रकार अशा दृश्यात्म घटकांची जोड देऊन ही संगीतके व संगीतिका भारतीय रंगभूमीवर सादर केल्या गेल्या.\nमराठी : मराठीमध्ये श्राव्य स्वरूपाच्या संगीतिका प्रामुख्याने आकाशवाणीसाठी सादर करण्यात आल्या. त्यांत दृश्य नाट्यत्मकता कमी व कथनात्मकतेवर जास्त भर होता. उदा., ⇨ गजानन दिगंबर माडगूळकर यांची ऐका व्याध सांगती कथा ही शिवलीलामृत पोथीतील दुसऱ्या अध्यायावर आधारलेली संगीतिका. त्यात व्याध, हरिणी ही पात्रे आहेत पण ती रंगभूमीवर वावरण्यासाठी योजिलेली नाहीत. निवेदकाचे वनराजी, निसर्गरम्यता इ. वर्णन आहे. गीतमालिकेतून कथा सांगितली व संगीताच्या साहाय्याने ती आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली. अमृतवृक्ष ही त्यांची दुसरी, वर्षप्रतिपदेला कडुनिंबाच्या वृक्षाची जी उपयुक्तता सांगितली जाते त्यावर लिहिलेली काल्पनिक संगीतिका. पारिजातक ही त्यांनी लिहिलेली आणखी एक संगीतिका. ग. दि. माडगूळकरांचे चार संगीतिका (१९५६) हे पुस्तकही प्रकाशित झाले. मराठीत पहिल्यांदा संगीतके ⇨ बा. सी. मर्ढेकर यांनी पाश्चात्त्य ऑपेरापासून स्फूर्ती घेऊन लिहिली. त्यांची कर्ण (१९४४), औक्षण (१९४६) आणि बदकांचे गुपित (१९४७) ही संगीतके आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आली. यांखेरीज गोविंदराव टेंबे (जयदेव, १९५५) राजा बढे (कादंबिनी ) पांडुरंग दीक्षित (सारीपाट ) मंगेश पाडगावकर (राधा आणि बिल्हण ) वसंत कानेटकर प्रभृतींनी लिहिलेल्या संगीतिकाही आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आल्या.\nवसंत कानेटकर यांचे लेकुरे उदंड जाहली (१९६६) हे पाश्चात्त्य ऑपेराच्या धर्तीवर लिहिलेले संगीतक विशेष उल्लेखनीय आहे. विजय तेंडुलकरांच्या घाशीराम कोतवाल (१९७३) या नाटकात केलेला लोकसंगीताच्या विविध प्रकारांचा वापर अभिनव व वैशिष्ट्यपूर्ण ठरला. हे पात्रमुखी संगीत नव्हे, की पार्श्वसंगीतही नव्हे तर संपूर्ण नाटकव्यापी संगीत होय.\nहिंदी : उर्दू-हिंदीमध्ये नाट्य, काव्य, संगीत व नृत्य या घटकांचे मिश्रण असलेला ‘रहस’ ( रासलीला ) हा रंजनप्रकार ⇨वाजिद अली शहाने १८४३ मध्ये प्रथमतः निर्माण व सादर केला. हे संगीतिकेचे आद्यरूप म्हणता येईल. वाजिद अली शहाच्याच आदेशावरून आगा हसन अमानत याने इंदरसभा (१८५६) हे उर्दू हिंदी भाषेत संगीतप्रधान नाटक लिहून रंगभूमीवर आणले. परंपरेने ती भारतातील पहिली हिंदी संगी-तिका मानली जाते. आधुनिक हिंदी साहित्याचे जनक ⇨ भारतेंदु हरिश्चंद्र (१८५०-८५) यांनी भारत जननी हे संगीत नाटक लिहिले. ⇨जयशंकर ‘प्रसाद ’ यांचे करूणालय हे पद्यनाटक आद्य आधुनिक हिंदी संगीतक मानले जाते. ⇨ मैथिलीशरण गुप्त यांनी अनघा (१९२५) व लिला (१९६१) ही छंदोबद्ध पद्यमय संगीतके लिहिली. ⇨ सुर्यकांत त्रिपाठी- ‘निराला ’ (१८९९–१९६१) यांनी रामायणातील शूर्पणखा प्रकरणावर आधारित पंचवटी प्रसंग ही पाच भागांची संगीतिका मुक्तछंदात लिहिली. ⇨उदयशंकर भट्ट यांनी मत्स्यगंधा (१९३७), विश्वामित्र (१९३८), राधा (१९४१), कालिदास (१९५०), नहुषनिपात (१९६१) यांसारखी पद्यमय भावनाट्ये लिहून हिंदी संगीतिकांत मोलाची भर घातली. काव्य व नाट्य यांचा उत्कृष्ट मिलाफ त्यांत आढळतो. या संगीतिकांना भट्ट यांनीच ‘भावनाट्य’ ही संज्ञा वापरली. ⇨ भगवतीचरण वर्मा यांनी द्रौपदी (१९४५), कर्ण (१९५३) व महाकाल ही संगीतमय नभोनाट्ये लिहिली, ती त्रिपथगा (१९५६) या संग्रहात एकत्रित केली आहेत. त्यांची तारा (१९५०) ही संगीतिका कलात्मकदृष्ट्या यशस्वी मानली जाते. ⇨ सुमित्रानंदन पंत यांनीही आकाशवाणीसाठी श्राव्य घटकावर भर देणाऱ्या काही संगीतिका लिहिल्या, त्यांपैकी ज्योत्स्ना (१९३४) व शिल्पी (१९५२) ह्या वाङ्‍मयीन मूल्यांच्या दृष्टीने सरस आहेत. ⇨ रामधारी सिंह ‘दिनकर’ यांची उर्वशी (१९६१) ही सर्व पद्यरचनाप्रकारांचा संयोग साधणारी कलात्मक संगीतिका प्रसिद्घ आहे. ⇨ धर्मवीर भारतींचे अंधायुग (१९५५) हे मुक्तछंदात्मक शैलीतील पद्यनाट्य संगीतिका या प्रकाराला नवी दिशा देणारे ठरले.\nबंगाली : पाश्चात्त्य ऑपेराच्या वेगवेगळ्या प्रकारांच्या प्रभावातून बंगाली संगीतकांची जडणघडण झाली. कोलकातामधील ‘ ऑपेरा हाउस ’ नाट्यगृहात यूरोपमधून आलेल्या नाटकमंडळींचे ऑपेरांचे प्रयोग होत असत. ‘ऑपेरा कॉमिक’ वा ‘ऑपेरा बूफा’ या प्रकारांच्या प्रभावातून बंगाली भाषेतील प्रारंभीची संगीतके निर्माण झाली. त्यांत संगीत व विनोद यांचे मिश्रण असे. क्षिरोदप्रसाद विदयाबिनोद यांच्या अलिबाबा मध्ये गंभीर प्रसंगही विनोदी शैलीत हाताळले गेले. बंगालीमध्ये ‘ कॉमिक ऑपेरा’ व भव्यगंभीर ‘गँड ऑपेरा’ अशा दोन्ही प्रकारची संगीतके प्रथमतः निर्माण करण्याचे श्रेय रामतरण सन्याल या नाटककाराकडे जाते. राष्ट्रीय बंगाली रंगभूमीचे जनक ⇨ गिरीशचंद्र घोष (१८४४–१९१२) हे सन्याल यांचे समकालीन होत. त्या काळी ऑपेराच्या धर्तीची संगीतप्रधान बंगाली ‘गीतिनाट्ये ’ विशेष प्रचलित होती. त्या प्रभावातून गिरीशचंद्रांनीही काही गीतिनाट्ये लिहिली. त्यांतील आनंद रहो हे मौलिक नाटक असून त्यावर ⇨ ज्यातिरिंद्रनाथ टागोरां च्या अश्रूमती नाटका चा (१८७९) प्रभाव होता. त्या काळी नगेंद्रनाथ बॅनर्जींचे सती की कलंकिनी (किंवा कलंक-भंजन ) हे संगीत-नाट्य रंगभूमीवर अतिशय लोकप्रिय ठरले. ⇨रवींद्रनाथ टागोरांची संगीत नाटके म्हणजे पाश्चात्त्य ऑपेराचा मूर्तिमंत बंगाली अवतार. मायार खेला (१८८८) हे पूर्णतः पद्यमय संगीतक तर वाल्मिकीर प्रतिभा (१८८१) हे गद्यमिश्रित संगीत नाटक यांचा उल्लेख करता येईल. एकोणिसाव्या शतकात पारंपरिक ⇨ बंगाली जात्रा या संगीतप्रधान लोकनाट्यप्रकाराला आधुनिक रूप देऊन ‘गीताभिनय’ हा संगीतक-प्रकार निर्माण करण्यात आला व तो खूपच लोकप्रिय ठरला.\nपंजाबी : ‘किस्साखानी’ या पारंपरिक रंजनप्रकारातून पंजाबी संगीत रंगभूमी उत्कांत झाली. पद्यरूपाने पौराणिक कथा सांगून, तिचा पंजाबी गद्यात साभिनय अर्थ सांगणे, असे किस्साखानीचे स्वरूप असे. पौराणिक कथांप्रमाणेच हीर-रांझा, सोहनी-महिवाल, झुलेखा इ. प्रेमकथाही किस्साखानीचे विषय असत. १९३९ नंतर पंजाबी रंगभूमीवर नवयुग अवतरले. तत्कालीन लेखकांपैकी शीला भाटिया या लेखिकेने लिहून सादर केलेली हीर-रांझा (१९५७) ही पहिली आधुनिक पंजाबी संगीतिका मानली जाते. ह्या संगीतिकेच्या रचनेत लेखिकेने जवळजवळ ३५ लोकधुनी वापरल्या होत्या व त्याला सुशीलदास गुप्तांनी संगीत दिले होते. त्यात पंजाबी लोकगीते, गिद्दा, टप्पा इ. लोकनृत्ये यांच्या मिश्रणातून दृक्श्राव्य परिणाम साधला होता. शीला भाटियांच्याच सुलगदे दर्या ( प्रयोग १९८१) या संगीतिकेत बुले शाहच्या ४० ‘ काफी ’ रचना तसेच शाह हुसेन व बाबा फरिद यांची काव्ये संगीतबद्घ केली होती. १९५० चे दशक व नंतरच्या काळात तारासिंग चन्न ( आखरी परह, साझीश, लक्कड दी लत्त, नील दी शाहजादी, अमर पंजाब इ.) जोगिंदर बहाराला ( धरती दे बोल, हर्री सौनी, डॉलर दा वंजरा ) जगदीश राय फिरादी ( जत्ती हीर, शहीद भगतसिंग, मिर्झा साहिबाँ ) प्रभृतींनी दर्जेदार संगीतिका लिहून या प्रकारात मोलाची भर घातली.\nकाश्मीरी : दीनानाथ नादिम (१९१६– ) यांनी लिहिलेल्या बोंबुर त यंबरझल (१९५३) या संगीतिकेने काश्मीरी ऑपेराची सुरूवात झाली. कामिलची बोंबुर त लोलर (१९६०) ही संगीतिकाही दर्जेदार होती. हीमाल नागराय ही काश्मीरी आख्यायिका रोशन व नादिम यांच्या संगीतिकांचा विषय झाली. मोतीलाल साकी (१९३६– ) याच्या हयतन झियुन, माझ काश्मीरी, गाशी आगूर या काश्मीरी संगीतिका विशेष उल्लेखनीय आहेत. सद्यकालीन काश्मीरी संगीतिकांमध्ये पाश्चात्त्य ऑपेरा व बॅले नृत्य यांचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण आढळते.\nकन्नड : संगीतकसदृश ‘गीत नाटक’ हा प्रकार कन्नडमध्ये रूढ आहे. कन्नड लोकरंगभूमीवरील ⇨ यक्षगान ह्या पारंपरिक नृत्यनाट्य-प्रकारात आधुनिक कन्नड संगीतिकेची मुळे शोधता येतात. आधुनिक काळात ⇨ कोट शिवराम कारंत (१९0२–९७) यांनी काही पद्यनाट्ये, गीत – नाट्ये लिहून या प्रकारात मोलाची भर घातली. त्यांनी मुक्तद्वार, किसागौतमी इ. संगीतनृत्यप्रधान गीतनाटके लिहून ती गामीण रंगभूमीवर सादर केली. त्यांचा गीतनाटके (१९४६) हा संग्रह प्रसिद्घ आहे. ⇨ पुरोहित तिरूनारायण अयंगार नरसिंहाचार्य (१९०५– ) यांनी काही उत्कृष्ट संगीतिका लिहून या प्रकाराला नवसंजीवन दिले. त्यांनी सु. पंधरा संगीतिका ( पद्यनाट्ये ) लिहिल्या. त्यांतील अहल्ये (१९४१), कवि मत्तु दाणिय बिनद (१९४३), गोकुल निर्गमन (१९४५), शबरी (१९४६), विकटकवि विजय (१९४८), हंस-दमयंती मत्तु इतर रूपकगळु (१९६५), रामपट्टाभिषेक (१९६७) इ. विशेष उल्लेखनीय होत. हंस-दमयंती मत्तु इतर रूपकगळु या त्यांच्या संगीतिका-संग्रहास १९६७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार लाभला.\nतमिळ : ‘इसाई नाटकम्’ या नावाने तमिळनाडूमध्ये संगीतक हा प्रकार रूढ आहे. ⇨ कथाकालक्षेपम् व यक्षगान (गेय नाटकम् ) ह्या पारंपरिक नृत्यगानयुक्त रंजनप्रकारांतून तमिळनाडूमध्ये संगीतिका हा प्रकार विकसित होत गेला. या पारंपरिक प्रभावातूनच कवी अरूणाचल कविरायर (१७११-६७) व गोपालकृष्ण भारती यांनी कथाकालक्षेपम्साठी काही उल्लेखनीय संगीतिका रचल्या. त्यांच्या संहिता लिखित रूपात उपलब्ध आहेत. गोपालकृष्ण भारती हे स्वत: उत्कृष्ट संगीतकार व कथाकालक्षेपम्-कलाकार होते. त्यांनी नंदनार चरित्र कीर्तनैगळ हे आख्यान रचून संगीतबद्घ केले. त्यात हिंदुस्थानी व कर्नाटक संगीतशैली तसेच लोकसंगीतप्रकार यांचे रसायन साधले होते. ‘थेरूकूथु’ हा पारंपरिक लोकरंगभूमी-प्रकार स्वरूपत: संगीतिकेला जवळचा होता. एस्. जी. किट्टाप्पा, के. बी. सुंदरम्बाळ ( अभिनेत्री ) हे कलावंत या लोकरंगभूमीच्या परंपरेतून उदयाला आले.\nतेलुगू : आंध्र प्रदेशातील संगीत रंगभूमीला प्राचीन व प्रदीर्घ परंपरा आहे. यक्षगान, बुईकथा, हरिकथा, वीथिनाटकम् आणि समवेतगान हे लोकनाट्य प्रकार परंपरेने चालत आले आहेत. काव्य, नाट्य, नृत्य, संगीत या कलांचा मिलाफ लोकरंगभूमीवर झाल्याचे दिसून येते. या पारंपरिक लोकरंगभूमीतूनच तेलुगू संगीतिका व संगीतके विकसित झाली. त्यांतील गीतांवर संस्कृतचा प्रभाव जाणवतो. जयदेवाचे गीतगोविंद, नारायण-तीर्थांचे कृष्णलिला तरंगिणी, लिलाशुककवीचे कृष्ण कर्णामृतम् यांतील श्लोक तेलुगू संगीतिकांत गायिले जातात. जयदेवाची पत्नी पद्मावती गीतगोविंदाच्या अष्टपदींवर नृत्य करीत असे, असे म्हटले जाते. लिलाशुककवीचा कस्तुरीतिलकम् ललाटफलके हा तरंग त्या काळी खूपच लोकप्रिय होता. हळूहळू संस्कृतच्या जागी तेलुगू पदे संगीतिकांत प्रविष्ट झाली. मात्र त्यांची पार्श्वभूमी संस्कृतचीच होती. ⇨ नन्नेचोड ( बारावे शतक ),⇨ पाल्कुरिकि सोमनाथ ( सु. १२८५–१३२३), यार्राना, श्रीनाथुडू, जक्कणा इ. कवि-लेखकांच्या साहित्यकृतींमध्ये संगीतिकांचे तत्कालीन निर्देश आढळतात. अण्णमाचार्यांची श्रीवेंकटेश्वरावरील लोकप्रिय भक्तिपदे संगीतिकांत गायिली जातात. संगीतिका-लेखकांत तल्लावज्झल शिवशंकरशास्त्री व गेय नाटिकाकर्त्यांत नारायणरेड्डी यांची नावे उल्लेखनीय आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/in-an-open-letter-to-ima-ramdev-baba-asked-these-questions/", "date_download": "2022-10-07T22:28:12Z", "digest": "sha1:HAWYJK44NER4CL3MIUQQDFNBG7YR6RZV", "length": 14157, "nlines": 132, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "ॲलोपॅथी-आयुर्वेद वाद पुन्हा पेटला?; रामदेव बाबांनी IMAला खुलं पत्र लिहुन विचारले 'हे' प्रश्न", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nॲलोपॅथी-आयुर्वेद वाद पुन्हा पेटला; रामदेव बाबांनी IMAला खुलं पत्र लिहुन विचारले ‘हे’ प्रश्न\nॲलोपॅथी-आयुर्वेद वाद पुन्हा पेटला; रामदेव बाबांनी IMAला खुलं पत्र लिहुन विचारले ‘हे’ प्रश्न\nनवी दिल्ली | योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोना मृत्यूमागे ॲलोपॅथी औषधोपचार कारण असल्याचं मागे सांगितलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या पत्रानंतर रामदेव बाबा यांनी वक्तव्य घेतलं होतं. मात्र, अजुनही हा वाद कमी होताना दिसत नाही. आता रामदेव बाबा यांनी आयएमएला एक खुलं पत्र लिहलं आहे.\nइंडियन मेडिकल असोसिएशननं रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावरून आक्रमक पवित्रा घेत रामदेव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी वाद थांबवला असला तरी आता रामदेव यांनी पुन्हा एकदा आयएमए आणि फार्मा कंपन्यांना टार्गेट केलं आहे. त्यात त्यांनी आयएमएला काही प्रश्न विचारले आहेत.\nत्यातील काही महत्वाचे प्रश्न –\n1. उच्च रक्तदाब, मधुमेह या समस्यांवर ॲलोपॅथीकडे कायमस्वरुपीचे काय उपचार आहेत\n2.थायरॉईड, आर्थरायटिस, कोलायटिस आणि दमा यांसारख्या आजारांवर औषध तयार करणाऱ्या फार्मा कंपन्यांकडे कायमस्वरुपी औषधं आहेत का\n3. ॲलोपॅथीला 200 वर्षे झाली असतील तर या उपचार पद्धतीमध्ये फॅटी लिव्हर, लिव्हर सोरायसिस, हेपॅटायटिस आणि क्षयरोग हे आजार कायमस्वरुपी बरे करणारे उपचार आहेत का\n4.फार्मा इंडस्ट्रीकडे हृदयातील ब्लॉकेजेस संपवण्याची औषधं आहेत का\n5. विना बायपास शस्रक्रिया, विना शस्त्रक्रिया आणि अँजिओप्लास्टी टाळण्यासाठी काही कायमस्वरुपाची औषधं आहेत का\n6. विना पेसमेकर हृदयाचं कार्य सुरळीत चालावं यासाठी या क्षेत्राकडं कुठले उपचार आहेत\n7. कोलेस्ट्रॉल आणि किडनी संबंधी साईड इफेक्टवर ॲलोपॅथीमध्ये काय उपचार आहेत\n8. जर व्यक्ती खूपच हिंसक, क्रूर आणि हिंस्र पद्धतीनं वागत असेल तर त्याला माणसात आणण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये काय उपचार आहेत\n9. तसेच एखाद्या व्यसनी व्यक्ती नशा करत असेल तर त्याला यातून बाहेर काढण्यासाठी काही कायमस्वरुपाचे उपचार आहेत का\n10. ॲलोपॅथी आणि आयुर्वेद यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी फार्मा कंपन्यांकडे कोणतं औषध आहे का\n11. विना ऑक्सिजन सिलेंडर रुग्णाच्या शरीरात ऑक्सिजन वाढवण्याचे फार्मा कंपन्यांकडे कोणतं औषध आहे\n12. ॲलोपॅथी औषध कंपन्यांकडे कोरोना रुग्णांना विना ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन क्षमता वाढवण्यासाठी उपाय आहेत का\n13. उच्च रक्तदाबासाठी काही प्रभावी औषध आहे का\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n14.‘ॲलोपॅथीत टाइप-1 आणि टाइप-2 डायबिटीजवर कायमस्वरुपी औषध आहे का\n15. इनलार्ज हार्ट आणि ईएफ कमी होण्यासाठी विना पेसमेकर काही उपाय आहे का\n16. डोकेदुखी, मायग्रेन यावर काही ठोस उपाय आहे का\n17. हार्ट ब्लॉकेज रिव्हर्स करण्यासाठी काय उपाय आहे का\n18. शस्त्रक्रियेशिवाय रोज माणसाचं वजन अर्धा किलो कमी होईल असं औषध आहे का\n19. माणसाला लागलेलं ड्रग्सचं व्यसन सोडण्यासाठी काही औषध आहे का\nअसे प्रश्न बाबा रामदेव यांनी उपस्थित केले आहेत. एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात आयएमएच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि बाबा रामदेव यांच्यात चांगलीच वादाची चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांनी हे पत्र ट्विट केलं आहे.\nमैं इंडियन मेडिकल एसोसिएशन व फार्मा कंपनियों से विनम्रता के साथ सीधे 25 सवाल पूछता हूँ- pic.twitter.com/ATVKlDc9tl\nमहाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लहान मुलांना होतोय कोरोनाचा संसर्ग; तब्बल 166 मुलं कोरोनाबाधित\nटुलकिट प्रकरणाला नवं वळण; दिल्ली पोलिसांची ट्विटर इंडियाला नोटीस\nमहाराष्ट्रातील ‘या’ शहरात एका दिवसात आढळले फक्त 94 कोरोनाबाधित रुग्ण\n महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी\nमुंबईत आमदाराच्या पत्नीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ, ‘हे’ दिलं कारण\nलॉकडाऊनमध्ये दुकान सुरू ठेवल्याने महिला जिल्हाधिकाऱ्यांची मुजोरी, पाहा व्हिडिओ\n मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/ajit-pawar-targets-ministers-who-are-upset-with-the-ministerial-post-in-eknath-shinde-government-au36-783804.html", "date_download": "2022-10-07T23:13:25Z", "digest": "sha1:LCU3MJXGKGIV2DLHTKPPUK2G7UWLB2JA", "length": 12899, "nlines": 190, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nAjit Pawar : खातं वजनदार किंवा हलकं नसतं…, खातेवाटपावरील नाराजीच्या चर्चेवरुन अजितदादांचा मंत्र्यांना टोला\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराज मंत्र्यांना टोला लगावलाय. आपण जे म्हणतो की हे वजनदार खातं, हे थोडसं हलकं फुलकं खातं असं नाही. तुम्हाला काम करायचं म्हटलं तर कुठल्याही खात्यामध्ये तुम्ही काम करु शकता, असं अजित पवार यांनी म्हटलंय.\nअजित पवार, विरोधी पक्षनेते\nसुनील काळे | Edited By: सागर जोशी\nमुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर (Cabinet Expansion) रविवारी खातेवाटपही जाहीर झालं. या खातेवाटपावरुन सरकारमधील मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), दादा भुसे आणि संदीपान भुमरे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत तिनही नेत्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता कोणतंही खातं महत्त्वाचं आणि कोणतंही खातं कमी महत्त्वाचं नसतं. सर्व खाती महत्त्वाची असतात, असं शिंदे गट आणि भाजपकडून सांगितलं जात आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाराज मंत्र्यांना टोला लगावलाय. आपण जे म्हणतो की हे वजनदार खातं, हे थोडसं हलकं फुलकं खातं असं नाही. तुम्हाला काम करायचं म्हटलं तर कुठल्याही खात्यामध्ये तुम्ही काम करु शकता, असं अजित पवार यांनी म्हटलंय.\n‘काम करायचं म्हटलं तर कुठल्याही खात्यामध्ये काम करु शकता’\nमंत्र्यांच्या नाराजीबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले की, आज शिंदे साहेबांचं सरकार आहे. आज त्यांच्या सरकारमध्ये कुणाला मंत्री घ्यायचं, कुणाला नाही घ्यायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. कुणाला कोणती खाती द्यायची हा देखील सर्वस्वी अधिकार एकनाथराव शिंदे साहेबांचा आहे. त्यामुळे त्याबद्दल त्यांना जे योग्य वाटलं आणि आपण जे म्हणतो की हे वजनदार खातं, हे थोडसं हलकं फुलकं खातं असं नाही. तुम्हाला काम करायचं म्हटलं तर कुठल्याही खात्यामध्ये तुम्ही काम करु शकता. त्यातून वेगवेगळे लोक अनेक अर्थ काढू शकतात.\nखातेवाटपात दादा भुसे यांच्याकडे बंदरे आमि खनिकर्म, दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा, तर संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन हे खातं देण्यात आलं आहे. कमी महत्वाचं खातं देण्यात आल्यानं हे मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, नाराजीच्या चर्चांनंतर या मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.\nमाझी तब्येत बरी नसते. प्रवास करणं किंवा दगदग करणं जमत नाही. प्रवासामुळे मला शारिरीक त्रास होत होता. मी गेल्या वर्षभरापासून खातं बदलून देण्याची मागणी केली होती. मागच्या सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आताच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दुसरी जबाबदारी देण्याची मागणी केली होती. कोणतीही जबाबदारी आपल्याला विश्वासाने दिली जाते त्या जबाबदारीला न्याय दिला पाहिजे, असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे.\n‘सामना’तील टीकेला केसरकरांचं उत्तर\nमहाविकास आघाडी असताना जी खाती शिवसेनेकडे होती तीच खाती आम्हाला मिळाली आहेत. उलट आरोग्य खात्यासारखं एक मोठं खातं आम्हाला मिळालं आहे. पर्यटनापेक्षा आरोग्य खातं मोठं आहे. मोठं खातं येत असताना एखादं छोटं खात सोडावं लागतं. सामनामधून टिका करण्यापेक्षा त्यावेळेला जर अधिक जोर केला असता तर चांगली चांगली खाती शिवसेनेच्या वाट्याला आली असती. या सरकारमध्ये तीच खाती आमच्या वाट्याला आली असती, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय.\nटू पीसमध्ये इलियाना डिक्रूझची हवा हवाई\n‘संस्कारी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीचे संस्कारी रूप\nनोरा फतेहीची रिवीलिंग जादू पाहिली का\nमौनी रॉयचा केसरिया रंग…. फोटोशूटसाठी पहा काय केलं\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bollyreport.org/archives/2459", "date_download": "2022-10-07T21:19:28Z", "digest": "sha1:RLFZMYJ4PNFC77T2L36B6HSX7BPNQDBG", "length": 11829, "nlines": 107, "source_domain": "bollyreport.org", "title": "बॉलिवुडच्या या कपलला पाहुन तुम्ही नक्कीच म्हणु शकता प्रेम आंधळे असते, नंबर ३ ची जोडी तर खतरनाक ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome BollyWood News बॉलिवुडच्या या कपलला पाहुन तुम्ही नक्कीच म्हणु शकता प्रेम आंधळे असते, नंबर...\nबॉलिवुडच्या या कपलला पाहुन तुम्ही नक्कीच म्हणु शकता प्रेम आंधळे असते, नंबर ३ ची जोडी तर खतरनाक \nप्रेम आधंळे असते असे म्हणतात पण हे खरे असते की नाही हे सिद्ध झालेले नाही. पण या लेखाद्वारे ही म्हण कशी खरी आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बॉलिवुडचे असे काही कपल आहेत ज्यांच्याकडे बघुन प्रेम खरेच आंधळे असते असेच म्हणावे लागेल. चला तर जाणुन घेऊ बॉलिवुडच्या त्या कलाकारांबद्दल जे डोळे बंद करुन प्रेमात पडले आणि त्यांचे प्रेम निभावले सुद्धा.\nफराह खान आणि शिरीष कुंदर – फराह खान ही बॉलिवुडची प्रसिद्ध कोरीयोग्राफर आणि दिग्दर्शिका आहे. तिने आजपर्यंत ८० हुन अधिक चित्रपट कोरीयोग्राफ केले आहेत. सलमान आणि शाहारुख सोबत तिची विशेष मैत्री आहे. फराहने मै हु ना आणि ओम शांती ओम यांसारखे सुपरहीट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.\nफराहने तिच्या दोन्ही चित्रपटांमध्ये शाहारुखला कास्ट केले होते. फराहनेच दिपिकाला पहिला ब्रेक दिला होता. आणि आज दिपिका बॉलिवुडची सर्वात मोठी स्टार आहे. फराहने शिरिष कुंदर सोबत लग्न केले. त्यानंतर तिने ११ फेब्रुवारी २००८ ला तिळ्यांना जन्म दिला. पण या दोघांची जोडी बघुन पण असेच म्हणावे लागेल प्रेम आंधळे असते.\nइमरान खान आणि अंवतिका मलिक – इमरान खानचा जन्म १३ जानेवारी १९८३ मध्ये झाला होता. इमरान हा बॉलिवुड अभिनेत्यासोबतच अमिर खानचा भाचासुद्धा आहे. अमिरला बॉलिवुडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणुन ओळखले जाते. तो वर्षाला एक चित्रपट करत असतो. पण इमरानला त्याच्या मामाप्रमाणे प्रसिद्धी मिळवता आली नाही.\nइमरानने सुद्धा काही हिट चित्रपट दिले आहेत. पण सध्या तो बॉलिवुडमध्ये फारसा अॅक्टिव्ह नाही. इमरानने अवंतिका मलिकसोबत लग्न केले. यांच्यात सुद्धा प्रेम आंधळे असते असेच म्हणावे लागेल कारण इमरानच्या तुलनेत अवंतिका फारशी खास दिसत नाही. इमरान दिसायला खुप स्मार्ट आहे.\nकिम शर्मा आणि अली पंजाबी – किम शर्माने भलेही बॉलिवुडमध्ये हवेतसे यश मिळवले नसले तरी तिने अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. यामध्ये तिचा मोहब्बतें हा चित्रपट खुप हीट झाला होता. ही चित्रपट मल्टीस्टार होता. यामध्ये शाहारुख खान – ऐश्वर्या रायने काम केले होते. त्यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला.\nपण या चित्रपटात थोडेफार क्रेडीट किम शर्माला पण मिळाल्याने ती सुद्धा प्रसिद्ध झाली. या चित्रपटानंतर ती बॉलिवुडपासुन दूर राहु लागली. त्यानंतर तिने अली पंजाबीसोबत लग्न केले. अली पंजाबी किमपेक्षा वयाने मोठे वाटतात. पण त्यांच्याकडे बघुन नक्कीच बोलु शकतो की प्रेम आंधळे असते.नंबर ३ ची जोडी तर खतरनाक \nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleदुबईच्या बुर्ज खलिफामध्ये आहे या सुपरस्टारचा फ्लॅट, संपत्ती एवढी आहे की वाचून चक्रावून जाल \nNext articleतुझ्या मुलीला एखाद्याने किस केले तर त्याला तू काय करशील यावर शाहरुखने दिले हे धक्कादायक उत्तर \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून… \nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ \nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून तुम्हीही वेडे व्हाल \nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nऐश्वर्याने सांगितली बेडरूम मधली खास गोष्ट, अभिषेकने पहिल्या रात्री बेड मोडून…...\nगोविंदाच्या सामी सामी गाण्यावरचा डांन्स पाहून रश्मीकाच झाली वेडी, पहा व्हिडीओ...\nवरून पूर्णपणे उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अरोराने केला असा डांन्स, पाहून...\nअभिनेत्री पलक तिवारीचा बोल्ड लुक आला तिच्या अंगाशी, ऐन कॅमेऱ्यासमोर ड्रेस...\nतुम्हाला कुत्रे आवडतात का चला तर मग जाणून घेऊ जगातले...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/asia-cup-2022-ready-to-play-in-any-batting-order-suryakumar-yadav-update/", "date_download": "2022-10-07T23:29:43Z", "digest": "sha1:42YZFNKWQFOBKWIDUOBK4XLLLVKJ43QV", "length": 7081, "nlines": 46, "source_domain": "mahaupdate.in", "title": "Asia Cup 2022 : कोणत्याही फलंदाजीच्या क्रमावर खेळण्यास तयार : सूर्यकुमार यादव - Maha Update", "raw_content": "\nHome » Asia Cup 2022 : कोणत्याही फलंदाजीच्या क्रमावर खेळण्यास तयार : सूर्यकुमार यादव\nAsia Cup 2022 : कोणत्याही फलंदाजीच्या क्रमावर खेळण्यास तयार : सूर्यकुमार यादव\nनवी दिल्ली : आशिया चषक 2022 मध्ये हाँगकाँगच्या सामन्याचा हिरो ठरलेल्या सूर्यकुमार यादवने म्हटले आहे की, मी कोणत्याही फलंदाजीच्या क्रमावर खेळण्यास तयार आहे. त्याने हाँगकाँगविरुद्ध 68 धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यात सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. हाँगकाँगच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित करताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, मी कोणत्याही फलंदाजी क्रमाने खेळण्यास तयार आहे, हे मी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकाला सांगितले आहे. मला फक्त खेळण्याची संधी द्या.\nकेएल राहुलच्या बचावात सूर्या\nदुखापतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या केएल राहुलची कामगिरी गेल्या दोन सामन्यांमध्ये विशेष राहिलेली नाही. हाँगकाँगविरुद्ध त्याने 39 चेंडूत केवळ 36 धावा केल्या. हे पाहता, जेव्हा सूर्यकुमार यादवला विचारण्यात आले की, रोहित शर्मासोबत तुम्ही सलामीवीर फलंदाजी का करत नाही.\nयावर सूर्यकुमार यादव म्हणाले, ‘याचा अर्थ तुम्हाला ‘केएल भाई’ (केएल राहुल) वगळावे असे म्हणायचे आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला, ‘तो दुखापतीतून पुनरागमन करत आहे, त्याला थोडा वेळ दिला पाहिजे. आमच्याकडे भरपूर वेळ आहे.\nविशेष म्हणजे आगामी T20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया अनेक खेळाडूंना वेगवेगळ्या बॅटिंग ऑर्डरवर पाठवून आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. सूर्यकुमार यादव पुढे म्हणाले की, सरावाच्या वेळी इतर खेळाडूंना संधी देण्याऐवजी सामन्यातच संधी देण्याचा संघाचा प्रयत्न आहे.\nसूर्यकुमार यादव म्हणाला, ‘आजच्या संघाबद्दल सांगायचे तर, आजचा सामना मी पूर्ण करू शकलो नाही, तर ऋषभ पंत, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जडेजासारखे खेळाडू उपस्थित होते.’ तो पुढे म्हणाला, ‘फलंदाजी करताना ‘विराट भाई’ने मला मुक्तपणे खेळायला सांगितले आणि खेळाचा आनंद घ्यायला सांगितले.’\nहाँगकाँगविरुद्ध सूर्यकुमार यादवने प्रथम वेगवान खेळ करत 22 चेंडूत षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर २६१.५४ च्या स्ट्राईक रेटने २६ चेंडूत ६ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने डावाच्या शेवटच्या षटकात 4 षटकार ठोकले, त्यात हॅट्ट्रिक षटकारही समाविष्ट आहे. डावाच्या शेवटच्या षटकात त्याने 26 धावा दिल्या.\nAsia Cup : KL राहुलच्या जागी “हा” खेळाडू करू शकतो डावाची सुरुवात..\nरोहित शर्माच्या नेतृत्वावर खुश नाही आरपी सिंग; म्हणाला, “हे चुकीचे आहे…”\nSuryakumar Yadav : षटकारांचा पाऊस पाडत सूर्यकुमार यादवने केला मोठा विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2022-10-07T23:38:11Z", "digest": "sha1:RUQ2SNV3NAQCOO2NBSLYI77SNJWKH5PK", "length": 16688, "nlines": 248, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जुही चावला - विकिपीडिया", "raw_content": "\n१३ नोव्हेंबर, १९६७ (1967-11-13) (वय: ५४)\nजय मेहता (ल. १९९५)\nजुही चावला ( ११ नोव्हेंबर १९६७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिची गणना होते. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. १९८६ सालच्या सल्तनत ह्या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १९८८ साली आलेला आमिर खानसोबतचा कयामत से कयामत तक हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व जुही रातोरात सुपरस्टार बनली. तेव्हापासून तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत व तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हिंदीखेरीज जुहीने तेलुगू, तमिळ इत्यादी भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे.\nअभिनयाखेरीज जुही चित्रपट निर्मितीमध्ये देखील कार्यरत आहे. तसेच भारतीय प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स ह्या संघाची ती शाहरुख खानसोबत सह-मालकीण आहे.\n1987 प्रेमलोक शशिकला कन्नड चित्रपट\n1988 कयामत से कयामत तक रश्मी सिंग फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार\nकलियुग कर्नुडू जया तेलुगू चित्रपट\nपरूवा रागम शशिकला तमिळ चित्रपट\n1989 अमर प्रेम पायल बंगाली चित्रपट\nकिंदरी जोगी गंगा कन्नड चित्रपट\nविकी दादा श्यामली तेलुगू चित्रपट\nलव्ह लव्ह लव्ह रीमा गोस्वामी\n1990 काफिला कल्पना अवस्ती\nतुम मेरे हो पारो\n1991 शांती क्रांती शांती क्रांती कन्नड चित्रपट\nशांती क्रांती शांती क्रांती तेलुगू चित्रपट\nनट्टक्कू ओरू नल्लावन नट्टक्कू ओरू नल्लावन तमिळ चित्रपट\nबेनाम बादशा बेनाम बादशा\nकर्ज चुकाना है कर्ज चुकाना है\n1992 अपोन पोर अपोन पोर बंगाली चित्रपट\nबोल राधा बोल बोल राधा बोल\nराधा का संगम राधा का संगम\nराजू बन गया जंटलमन राजू बन गया जंटलमन\nमेरे सजना साथ निभाना मेरे सजना साथ निभाना\nबेवफा से वफा बेवफा से वफा\nदौलत की जंग दौलत की जंग\nइज्जत की रोटी इज्जत की रोटी\nहम हैं राही प्यार के हम हैं राही प्यार के फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार\nकभी हां कभी ना कभी हां कभी ना पाहुणी कलाकार\n1994 ईना मिना डिका ईना मिना डिका\nद जंटलमन द जंटलमन\nअंदाज अपना अपना अंदाज अपना अपना पाहुणी कलाकार\nघर की इज्जत घर की इज्जत\nसाजन का घर साजन का घर\n1995 राम जाने राम जाने\nआतंक ही आतंक आतंक ही आतंक\n1997 येस बॉस येस बॉस\nमिस्टर ॲन्ड मिसेस खिलाडी मिस्टर ॲन्ड मिसेस खिलाडी\nदीवाना मस्ताना दीवाना मस्ताना\n1998 सात रंग के सपने सात रंग के सपने\nहरीकृष्णनन्स हरीकृष्णनन्स मल्याळम चित्रपट\nझूट बोले कौवा काटे झूट बोले कौवा काटे\nअर्जुन पंडित अर्जुन पंडित\nशहीद उद्धम सिंग शहीद उद्धम सिंग\nफिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है हिंदुस्तानी\n2001 वन टू का फोर वन टू का फोर\nएक रिश्ता एक रिश्ता\nआमधनी अठन्नी खर्चा रुपय्या आमधनी अठन्नी खर्चा रुपय्या\n2003 ३ दीवारें ३ दीवारें\nझंकार बीट्स झंकार बीट्स\n2004 देस होया परदेस देस होया परदेस पंजाबी चित्रपट\n2005 माय ब्रदर निखिल माय ब्रदर निखिल\n७½ फेरे ७½ फेरे\n2006 बस एक पल बस एक पल\nवारिस इश्क दा वारिस वारिस इश्क दा वारिस पंजाबी चित्रपट\nक्रेझी ४ क्रेझी ४\nकिस्मत कनेक्शन किस्मत कनेक्शन\n2009 लक बाय चान्स लक बाय चान्स\n2011 आय ॲम आय ॲम\n2012 मैं कृष्ण हूं मैं कृष्ण हूं\nसन ऑफ सरदार सन ऑफ सरदार\n2014 गुलाब गॅंग गुलाब गॅंग\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील जुही चावलाचे पान (इंग्लिश मजकूर)\nफिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री\nमीना कुमारी (१९५४) • मीना कुमारी (१९५५) • कामिनी कौशल (१९५६) • नूतन (१९५७) • नर्गिस (१९५८) • वैजयंतीमाला (१९५९) • नूतन (१९६०)\nबिना रॉय (१९६१ ) • वैजयंतीमाला (१९६२) • मीना कुमारी (१९६३) • नूतन (१९६४) • वैजयंतीमाला (१९६५ ) • मीना कुमारी (१९६६ ) • वहिदा रेहमान (१९६७ ) • नूतन (१९६८) • वहिदा रेहमान (१९६९ ) • शर्मिला टागोर (१९७०) • मुमताज (१९७१) • आशा पारेख (१९७२) • हेमा मालिनी (१९७३) • डिंपल कापडिया आणि जया बच्चन (१९७४) • जया बच्चन (१९७५) • लक्ष्मी (१९७६) • राखी (१९७७) • शबाना आझमी (१९७८) • नूतन (१९७९ ) • जया बच्चन (१९८०)\nरेखा (१९८१) • स्मिता पाटील (१९८२) • पद्मिनी कोल्हापुरे (१९८३) • शबाना आझमी (१९८४) • शबाना आझमी (१९८५) • डिंपल कापडिया (१९८६) • निरंक (१९८७) • निरंक (१९८८) • रेखा (१९८९) • श्रीदेवी (१९९०) • माधुरी दीक्षित (१९९१) • श्रीदेवी (१९९२) • माधुरी दीक्षित (१९९३) • जुही चावला (१९९४) • माधुरी दीक्षित (१९९५) • काजोल (१९९६) • करिश्मा कपूर (१९९७) • माधुरी दीक्षित (१९९८) • काजोल (१९९९) • ऐश्वर्या राय (२०००)\nकरिश्मा कपूर (२००१) • काजोल (२००२) • ऐश्वर्या राय (२००३) • प्रीती झिंटा (२००४) • राणी मुखर्जी (२००५) • राणी मुखर्जी (२००६) • काजोल (२००७) • करीना कपूर (२००८) • प्रियांका चोप्रा (२००९) • विद्या बालन (२०१०) • काजोल (२०११) • विद्या बालन (२०१२) • विद्या बालन (२०१३) • दीपिका पडुकोण (२०१४) • कंगना राणावत (२०१५) • दीपिका पडुकोण (२०१६) • आलिया भट्ट (२०१७)\nइ.स. १९६७ मधील जन्म\nफेमिना मिस इंडिया विजेत्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मे २०२२ रोजी ००:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/rahu04/", "date_download": "2022-10-07T23:27:42Z", "digest": "sha1:M54XFEPZHWWAMJGZ2FINW46QQOATTGUW", "length": 2168, "nlines": 71, "source_domain": "www.snopty.com", "title": "राहुल माने | Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nये पुरुषी हैवाना ...... तुझा जन्म पण त्याच एका उदरातुन झाला, हे कसं विसरलास रे नऊ महिने रक्त शोषलसं, अजुन पण पोट भरलचं नाही रे...\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/uncategorized/5910/", "date_download": "2022-10-07T22:00:12Z", "digest": "sha1:7DJDDDMPI3VHOA6YW4P7O4CJZ3SFK6B3", "length": 12747, "nlines": 105, "source_domain": "www.snopty.com", "title": "मेहनतीची पोहोचपावती - Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nयात्रा असो वा गणपती उत्सव; प्रत्येक मंडळ हे काही जिवंत देखावे सादर करून आपल्या प्रेक्षकांना काहीतरी सामाजिक जाणिवेचे भान राखून काही तरी संदेश द्यायचा प्रयत्न करत असते.\nयानुसार *बाल गणेशोत्सव मंडळ,खिंडवाडी…..* आम्ही यात्रेमध्ये असणाऱ्या सोंगामध्ये *बदलती शिक्षण पद्धती आणि शिक्षणाचे होत असलेले बाजारीकरण* यावर आधारित एक सुंदर देखावा सादर केला होता.\nसर्व ग्रामस्थ,बाहेरून आलेले प्रेक्षक या सर्वांना आवडेल आणि हृदयाला स्पर्श करेल असा सुंदर देखावा आम्हाला सादर करता आला त्याबद्दल आम्ही सर्वजण खूप आनंदी होतो.\nपण त्या आनंदात भर म्हणून अजून एक गोष्ट घडली. सोशल मीडिया वर आम्ही आमचे हे छोटेसे नाटक अपलोड केले होते ते पाहून आपल्या सातारा पंचक्रोशीत असणारे क्षेत्रमाऊली परिसरातील बाल गोपाल गणेशोत्सव मंडळ यांनी आमच्याशी संपर्क साधला.\nआपल्या नाटकाची आणि सादर केलेल्या विषयाची दाद अशी बाहेरून होतेय ही गोष्ट मनाला जास्तच आनंद देणारी होती.त्यानंतर बाल गोपाल गणेशोत्सव मंडळाचे सदस्य भेटीस आले.संपूर्ण नाटक कसे लिहिले,त्यातून कशाप्रकारे संदेश दिला,लिहिताना मनात काय विचार होते,सादरीकरणात कशा गोष्टींचा विचार करावा यावर बरीच चर्चा झाली.\nत्यांना विषय आवडला ही जमेची बाजू होतीच.पण पुढे विषय येतो तो व्यवहाराचा.कारण प्रत्येक मंडळ हे अशा सादरीकरणासाठी बराच पैसा खर्च करत असते.आम्हीही त्यापैकी एक.मग ठराविक रक्कम देवून नाटकाची रेकॉर्ड केलेली मूळ ऑडिओ क्लिप त्यांना दिली.\nआम्ही कशाप्रकारे सादर करतो बघायला या असे म्हणून ते निघून गेले.मग आम्हीही आमच्या मंडळाच्या पुढील नियोजनात गुंतून गेलो.काल रात्री अचानक १०.३० वाजता फोन आला की अहो क्षेत्रमाऊली मधून बोलतोय….तुम्ही दिलेल्या विषयावर आम्ही आमच्या पद्धतीने सादरीकरण केले आहे.तुम्ही पहायला या की.\nवेळ खूप झाली होती.त्यामुळे नकार देण्याच्या मानसिकतेत मी होतो.पण लगेच पुढून आवाज आला.रात्री १ वाजले यायला तरी या.तुमच्यासाठी पुन्हा शो लावतो.पण या नक्की.\nहे ऐकल्यावर नकार द्यायला जीभ उचलली नाहीच.सरळ हो येतो पण वेळ होईल अस सांगून फोन ठेवून दिला.आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना ही माहिती दिली आणि त्यांच्या सोबत गेलो ते थेट बाल गोपाल गणेशोत्सव मंडळाच्या शेड जवळ.\nगेल्या गेल्या श्रीफळ देवून आमचा त्यांनी सत्कार केला आणि मग नाटकाच्या सादरीकरणाला सुरुवात केली.\n*जेव्हा तुम्ही लिहिलेले,स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलेले आणि त्या कथानकात एक भूमिका स्वतः साकारलेले नाटक* आपल्याच समोर एक दुसरा समूह सादर करतोय हे पाहताना मनाला मिळणारा आनंद मला ठीक मांडता येत नाही.पण प्रत्येक कलाकाराचा उत्कृष्ट अभिनय,अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आपल्या भूमिकेला योग्य न्याय देत होते.\nहे सर्व पाहत असताना काही महिन्यापूर्वी आम्ही केलेले ते सादरीकरण त्यासाठी सर्वांनी घेतलेली मेहनत,आलेल्या अडचणी,त्यातून काढलेले मार्ग हे सगळेच डोळ्यासमोरून जात होते.\nमूळ कथानकात काही किरकोळ बदल करून त्यांनी सादर केलेल्या या नाटकाला तिथे देखील मिळणारी पसंती सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती.\nनाटक संपल्यावर सर्व कलाकारांसोबत फोटो घेण्याचा मोह झाला आणि तो सुंदर प्रसंग आम्ही कॅमेऱ्यात कैद केला.कसे झाले आमचे नाटक…. झाले का नीट… अशा सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर होत माझ्याकडे…..उत्तम….खरच फार छान केले तुम्ही.\nतेव्हा अजून एक गोष्ट लक्षात आली.आपण मेहनत घेतो आणि आपल्या मनाला वाटेल असे सादर करतो.यात खरा आनंद नसतो.आनंद तेव्हाच होतो जेव्हा त्याला प्रेक्षकांच्या पसंतीची दाद मिळते.\nखरच कलाकाराला अजून काय हवे असते…..आपल्या कलेला प्रोत्साहन मिळावं यासाठी प्रेमाचे २ शब्द आणि थोडंसं कौतुक.आज आमच्याकडुन ते त्यांना मिळत होत….आणि त्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते.\nपण त्यांच्याहीपेक्षा माझ्या मनात जो एक सकारात्मक उर्जेचा प्रवाह जागा झाला तो मी कधीच नाही विसरू शकत.पुसेसावळी येथे देखील आमच्या या नाटकाचे प्रयोग दाखवले गेले.पण तिथे आम्हाला जाता आले नाही.\nलिखाणात सहकार्य करणाऱ्या माझ्या मंडळातील सदस्यांचे जे मार्गदर्शन मिळाले,सादरीकरणात माझ्या सोबतच्या ज्या कलाकारांनी उत्तम अभिनय केले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये ज्या कलाकारांनी आपले आवाज दिले.आज त्या सर्वांच्या मेहनतीला पोहोचपावती मिळाली होती.\nसन्मानाने मिळालेले श्रीफळ घेवून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो ते मनात एक वेगळाच आत्मविश्वास घेवून.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nस्मृतीगंध…..ट्रेक नंबर १६…भाग २…कोळे नृसिंहपुर\nस्मृतीगंध…..ट्रेक नंबर १६…भाग २…कोळे नृसिंहपुर\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/washim/in-washim-district-cloudburst-like-rain-major-damage-to-fields-au37-778044.html", "date_download": "2022-10-07T21:13:10Z", "digest": "sha1:OPWTCDVDA32NBCFQ5JQ5EVOPYHIEHWB4", "length": 11266, "nlines": 188, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nWashim Rain | वाशिमच्या गिंभा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, गावाला आले नदीचे स्वरूप, प्रशासनाने दिला सर्तकतेचा इशारा\nकाटा येथुन उगम होणाऱ्या काटेपूर्णा नदीच्या उगमस्थानी सुद्धा मोठा पुर आला आहे. त्यामुळे शेतात जाणारे शेतकरी गावातच अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल\nवाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून संध्याकाळी अनेक ठिकाणी ढगफुटी सदृष्य पाऊस पडत आहे. काल सायंकाळी मंगरूळपीर तालुक्यातील गिंभा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे संपूर्ण परिसराला नदीचे स्वरूप आले होते. या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान देखील झालंय. वाशिम जिल्ह्यात 8 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस (Rain) कोसळत असून या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. मात्र, या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र असून हजारो लोकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी (Water) शिरले आहे.\nसततच्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पूर\nसततच्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पुर आला असून गाव परिसरातील नाल्यांनाही पुर आलायं. त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाशिम तालुक्यातील सोनखास येथील खुल्या मैदानात पाणी साचले आहे तर उमरा मोठा ते पार्डी आसरा दरम्यान असलेल्या नाल्याला पुर येऊन वाशिमकडे येणारे वाहनधारक पुरामुळे अडकून आहेत. काटा येथुन उगम होणाऱ्या काटेपूर्णा नदीच्या उगमस्थानी सुद्धा मोठा पुर आला आहे. त्यामुळे शेतात जाणारे शेतकरी गावातच अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.\nIIT Bombay: आयआयटी मुंबईच्या फी पॅनेलवर 4 विद्यार्थ्यांची नेमणूक 15 दिवसांच्या विरोधानंतर विद्यार्थ्यांना दिलासा\nSanjay Raut : तुरुंगात असताना लेख लिहिणे बेकायदेशीर; ईडीचे अधिकारी संजय राऊतांची चौकशी करणार\nMumbai : 60 मिनिटांत छातीत घुसलेली सळई काढली, डॉक्टरांमुळे 22 वर्षीय तरुण जखमी मजुराला अखेर जीवदान\nमोठा उमरा, वारा जहांगीर या गावाचा संपर्क तुटला\nकाल रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात कारंजा तालुक्यातील अडाण, मालेगाव तालुक्यातील सोनल व वाशिम तालुक्यातील एकबुर्जी हे मोठे प्रकल्प आधीच ओसंडून वाहत होते. आता अनेक छोटे प्रकल्पही शंभर टक्के भरले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम तालुक्यातील पारडी आसरा गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने व दुसऱ्या बाजूने पूस नदीलाही पूर आल्याने मोठाउमरा, वारा जहांगीर या गावाचा संपर्क तुटला आहे.\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/nothing-phone-1-will-pack-snapdragon-778g-plus-processor-see-details/articleshow/92565963.cms?utm_source=hyperlink&utm_medium=tips-tricks-articleshow&utm_campaign=article-2", "date_download": "2022-10-07T23:19:11Z", "digest": "sha1:H6DQ3HU2TBIOWXQPY2YCHLT3ISXFRTSS", "length": 12503, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nNothing phone (1) बाबत मोठा खुलासा, फोनमध्ये असेल Snapdragon 778G+ चिपसेट, पाहा डिटेल्स\nNothing Phone (1) : सध्या नथिंग फोन (1) सर्वाधिक चर्चेत आहे आणि आता या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ चिपसेट देण्यात येणार असल्याचेही समोर येत आहे. जाणून घेऊया सविस्तर.\nNothing phone (1) बाबत मोठा खुलासा\nमिळणार Snapdragon 778G+ चिपसेट\nइतरही फीचर्स असतील जबरदस्त\nनवी दिल्ली: Nothing phone (1) Leaks: गेल्या काही दिवसांपासून Nothing phone (1) बाबत सातत्याने माहिती समोर येत आहे. कार्ल पेईच्या स्टार्टअपचा हा पहिला फोन चर्चेत आहे. युजर्समधेही याबाबत बरीच उत्सुकता असून आता कंपनीने स्पष्ट केले आहे की नथिंग फोन (1) मध्ये Qualcomm Snapdragon 778G+ चिपसेट देण्यात येणार असल्याचे Carl Pei यांनी कन्फर्म केले आहे. रिपोर्टनुसार, Pei यांनी फोनमध्ये फ्लॅगशिप ऐवजी मिड-रेंज चिपसेट का दिला आहे हे देखील सांगितले आहे. अहवालानुसार, आजकाल येणारे बहुतेक फोन सामान्य कामांसाठी चांगली कामगिरी करतात.अधिक शक्तिशाली चिपसेट म्हणजे किमतीत वाढ. Pei यांचा विश्वास आहे की 778G+ चिपसेट खूप शक्तिशाली आहे\nवाचा: Recharge Plans: अनलिमिटेड कॉल्ससह भरपूर डेटा देणाऱ्या 'या' प्लानची किंमत नाही जास्त, सिम देखील राहणार वर्षभर अॅक्टिव्ह\nबॅटरी लाईफ ही सर्वात महत्वाची गोष्ट असून Qualcomm ने नथिंग फोन (1) मध्ये ऑफर केलेल्या चिपसेटमध्ये वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला समर्थन दिले आहे. हा सपोर्ट सामान्यत: अधिक हाय-एंड फ्लॅगशिप प्रोसेसरमध्ये दिला जातो. स्नॅपड्रॅगन 778G+ बद्दल बरेच वादविवाद होणार यात शंका नाही. Nothing मधील पहिल्या फोनच्या अनोख्या डिझाईनबद्दल काही युजर्सना नक्कीच फ्लॅगशिप-स्तरीय चिपसेटची अपेक्षा असेल. परंतु, स्नॅपड्रॅगन 778G+ च्या कन्फर्मेशन नंतर , डिव्हाइसच्या कार्यक्षमतेवर निश्चितपणे काही नकारात्मक प्रभाव पडेल, विशेषत: भारतासारख्या बाजारपेठेत जिथे प्रोसेसर फोनमधील सर्वात शक्तिशाली घटक मानला जातो.\nवाचा: Amazon Sale: तयार ठेवा विश लिस्ट लवकरच सुरु होतोय खास सेल, लॅपटॉप-मोबाईलसह 'या' डिव्हाइसेसवर मिळणार शानदार डील्स\nदरम्यान, नथिंग फोन (1) संबंधी नवीन लीक आणि ईएमजेस उघड झाले आहे. हँडसेट देखील काळ्या प्रकारात येईल. आतापर्यंत, कंपनीने फक्त पांढरा प्रकार उघड केला आहे. फोनमध्ये Half Transparent बॅक पॅनल आहे. ज्यावर पाच लाइटनिंग स्ट्रिप्स देण्यात आल्या आहेत. एका YouTuber ने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये नथिंग फोन (1) चा संपूर्ण डिस्प्ले पाहता येतो.\nवाचा: Online Banking: अकाउंट कधीच हॅक होणार नाही, सुरक्षित इंटरनेट बँकिंगसाठी फॉलो करा 'या' ५ टिप्स\nमहत्वाचे लेखFlipkart सुरू होतोय भन्नाट सेल, महागडे स्मार्टफोन्स निम्म्या किंमतीत उपलब्ध; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nसिनेन्यूज विजय देवरकोंडा आणि रश्मिका लपत-छपत कुठे निघाले Video पाहून नेटकऱ्यांनी लावायचा तो अंदाज लावलाच\nइलेक्ट्रॉनिक्स 8GB रॅम आणि 10,090 mAh बॅटरी पावर असणाऱ्या या Samsung Tabs खरेदी करा आणि मिळवा ₹18000 इतका जबरदस्त डिस्काउंट\nआर्थिक राशीभविष्य आर्थिक राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२२ : जाणून घ्या उद्याचा दिवस कोणासाठी ठरेल धनप्राप्तीचा\nमुंबई आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन\nमुंबई शकील, छोटा राजनला माझी सुपारी दिली; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप\nकोल्हापूर एकनाथ शिंदे गर्दी दिसली म्हणून काहीही बोलत सुटले, उद्धव ठाकरेंच्या भाषणालाच प्रतिसाद: अजित पवार\nदेश ​देश हादरला... लग्न करण्यास नकार दिला, त्याने १९ वर्षीय मारुतीला पेट्रोल ओतून पेटवलं...​\nपुणे सरकार बदललं अन् रश्मी शुक्लांना क्लीनचिट मिळाली, मविआ नेत्यांना जी भीती होती तेच घडलं\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://nmk.org.in/tag/current-affairs/", "date_download": "2022-10-07T23:24:20Z", "digest": "sha1:W4BQ7CO766PL5ICSVKXR3CO6ZXFYWO6G", "length": 5519, "nlines": 67, "source_domain": "nmk.org.in", "title": "Current Affairs Archives - NMK.ORG.IN", "raw_content": "\n[Current Affairs] चालू घडामोडी 27 जानेवारी 2021\nमराठी मराठी धुळे जिल्ह्यातले स्वातंत्र्य संग्राम सैनिक महादू मोतीराम चौधरी यांच र्हदय विकाराच्या झटक्याने निधन. पुण्यातल्या विमलाबाई गरवारे …\n[Current Affairs] चालू घडामोडी 25 जानेवारी 2021\nमराठी सांगलीतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हंगामातील नवीन हळदीचे सौदे. पोलिसांसाठी घर – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी …\n[Current Affairs] चालू घडामोडी 24 जानेवारी 2021\nमराठी आरोग्य आणि पर्यावरण सुरक्षेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आज आमची मुंबई सायकल र्यालीच आयोजन. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची …\n[Current Affairs] चालू घडामोडी 23 जानेवारी 2021\nमराठी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. गणतंत्र दिवसाच्या आधी आज …\n[Current Affairs] चालू घडामोडी २ जानेवारी २०२१\nमराठी राज्यातही पुणे, जालना आणि नंदुरबार इथ लसीकरण सराव मोहीम सुरु झाली आहे. भारत आणि ब्रिटन दरम्यान आठ …\nचालू घडामोडी २६ डिसेंबर २०२०\nमराठी देशात काल एकाच दिवशी ५० लाख फास्ट tag च्या व्यवहारांची नोंद झाली. काल आसाम मधल्या २० राष्ट्रीय …\nचालू घडामोडी २५ डिसेंबर २०२०\nमराठी पंडित मदनमोहन मालवीय यांनी सामाजिक सुधारणा आणि देशसेवेसाठी आयुष्य वेचल – पंतप्रधान. माजी पंतप्रधान व दिवंगत भाजपा …\nचालू घडामोडी २४ डिसेंबर २०२०\nमराठी मुंबई: नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते जनजागृती करत आहेत. प्रधानमंत्री किसान योजनेचा पुढचा हप्ता, उद्या पंतप्रधान नरेंद्र …\nचालू घडामोडी १९ डिसेंबर २०२०\nमराठी कोविड-१९ वरील उपचारासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर मर्यादा घालावी – सर्वोच्च न्यायालय. मालवाहतूकितला हिस्सा वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेन राष्ट्रीय …\nचालू घडामोडी १८ डिसेंबर २०२०\nमराठी वंदे भारत मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण ३८ लाख ४० हजार व्यक्तिंना परत आणण्यात आल आहे. कृषिमंत्री तोमर …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.snopty.com/uncategorized/5777/", "date_download": "2022-10-07T22:44:10Z", "digest": "sha1:N53Y7WUESY2T72MTRX76MJZE3G7PNKWD", "length": 3763, "nlines": 97, "source_domain": "www.snopty.com", "title": "संघर्ष - Snopty", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nसंघर्षाविना न कोणाचा उत्कर्ष\nसंघर्षानेच चकाकते पाषाण मुर्ती\nसंघर्षानेच पसरते दाही दिशा किर्ती\nअविभाज्य घटक असतो संघर्ष\nप्रत्येकाचा सोबती असतो संघर्ष\nन घडला इतिहास संघर्षाविना\nन सुकर होतो वर्तमान संघर्षाविना\nसंघर्षाविना ‘न’ जगतो सजीव कोणताच या जगती\nसंघर्षाविना ‘न’ चाखतो रसाळ फळ कोणी या जगती\nजन्म एक संघर्ष, जगणे एक संघर्ष\nमृत्युला करावा लागतो जगण्यावर विजयासाठी संघर्ष\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nस्मृतीगंध…..ट्रेक नंबर १६…भाग २…कोळे नृसिंहपुर\nब्लॉग लिहिण्यासाठी लॉग इन करा. नवीन खाते खाते तयार करण्यासाठी कृपया साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/hpcl-recruitmen-2022-100-vacancies/", "date_download": "2022-10-07T21:54:50Z", "digest": "sha1:LZ5HQH2GCUSVDLBZHWTBB5V3U5KED5WW", "length": 9128, "nlines": 150, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "HPCL Recruitment | हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस पदाच्या 100 जागांसाठी भरती - 2022", "raw_content": "\nHPCL Recruitment | हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस पदाच्या 100 जागांसाठी भरती\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nहिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस पदाच्या 100 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 19 फेब्रुवारी 2022 ते 28 फेब्रुवारी 2022 या दरम्यान ऑनलाईन अर्ज सदर करू शकता.\nपरीक्षेचे नाव / Exam Name : –\nपदाचे नाव व तपशील / Post Details :\nSr. No. पदाचे नाव /\n1 पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस /\nSr. No. पदाचे नाव /\nName of Post शैक्षणिक पात्रता /\n1 पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस /\nGraduate Engineering Apprenticeship 60% गुणांसह इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 50% गुण]\nवयाची अट / Age Limit : 19 फेब्रुवारी 2022 रोजी\nपदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस /\n[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपरीक्षा शुल्क / Exam Fee\nप्रवर्ग / आरक्षण /\nखुला प्रवर्ग / General Category फी नाही.\nइतर मागासवर्गीय / OBC फी नाही.\nअनुसूचित जमाती / Schedule Tribe फी नाही.\nअनुसूचित जाती / Schedule Caste फी नाही.\nमहिला / Women फी नाही.\nमाजी सैनिक / Ex- Servicemen फी नाही.\nमहत्वाच्या तारखा / Important Dates\nअर्ज सुरु होण्याची तारीख /\nअर्ज करण्याची शेवटची तारीख /\nअधिकृत संकेतस्थळ बघा | Official Website\nऑनलाईन अर्ज करा | Apply Online\nहेल्पलाईन माहिती / Helpline Details :\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMPSC Group C Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC Subordinate Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022\nAir Force Agnipath Recruitment 2022 | भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022\nMPSC State Service Pre 2022 | महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 161 जागा\nMPSC Recruitment | पशुधन विकास अधिकारी पदाच्या 212 जागांसाठी भरती\nIndian Army Recruitment | भारतीय सेना भारती 90 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://crazymarathi.com/2022/09/23/shetat-preyasi-priyakar-karat-asata/", "date_download": "2022-10-07T22:44:18Z", "digest": "sha1:NU2L46JCGUX4C3F4GKSLP6DW74D52DRM", "length": 13338, "nlines": 119, "source_domain": "crazymarathi.com", "title": "शेतात प्रियकर प्रेयसी से_क्स करत होते... - Crazy Marathi", "raw_content": "\nशेतात प्रियकर प्रेयसी से_क्स करत होते…\nनेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….\nजोक 1 : शिक्षकाने विचारलं : बापूजीं बद्दल तुम्हाला काय माहित आहे\nशिक्षक (खुश होऊन) : बापूजीच पूर्ण नाव काय होत, ते जे..ल मध्ये का गेले होते आणि कधी बाहेर आले\nएक मुलगा उभा राहिला आणि बोलला मॅडम……बापूजींचं पूर्ण नाव आ..सा..रा..म बापू, पोरीच्या मॅटर मध्ये जे..ल मध्ये गेले आणि\nत्यांनी जे..ल मधून बाहेर येण्यास नकार दिला आहे जेव्हापासून त्याना माहित पडलं कि राधे माँ पण जे..ल मध्ये येणार आहे 😄😄😄😄😄😄😄😄😄\nजोक 2 : एक बाबा किसी महफ़िल में गए वहां सब उनका मजाक उड़ाने लगे\nबाबा ने कहा, “देखो हम फ़क़ीर लोग हैं, हमारा मज़ाक न उड़ाए\n अचानक उन सबको दिखना बंद हो गया\nवे अंधे हो गए वो सब बाबा के कदमों में गिर गए, “बाबा जी हमें माफ़ कर दो वो सब बाबा के कदमों में गिर गए, “बाबा जी हमें माफ़ कर दो\nबाबा जी ने जूता उतारा और सबके एक-एक मारा और बोले,\n कोई जेनरेटर ऑन करो मुझे भी दिखाई नहीं दे रहा है\nजोक 3 : बायको माहेरून परत आली\nनवऱ्याने दरवाजा खोलला आणि जोर जोरात\nबायको : असं का हसता आहेत\nनवरा : गुरुजीं सांगितलं आहे जी जेव्हा पण संकट\nसमोर येईल त्याचा हसत हसत सामना करायचा 😄😄😄\nजोक 4 : बीवी से परेशान पप्पू एक दिन पंडितजी के पास पहुंचा.\nपप्पू – “पंडितजी, एक बात बताइये ये जनम जनम का साथ वाली बात सच है क्या \nपंडितजी – “सौ फ़ीसदी सच \nपप्पू – “मतलब मुझे अगले जनम में भी यही पत्नी मिलेगी … \nपप्पू – “हे भगवान फिर तो ख़ुदकुशी करने से भी कोई फायदा नही … फिर तो ख़ुदकुशी करने से भी कोई फायदा नही … \nगाँव में किसी के भी मरने पर शमशान के पास बने सरकारी स्कूल में छुटटी कर दी जाती थी और बच्चों की मौज हो जाती थी\nआज भी कोई मर गया था इस लिए सभी बच्चे अपने अपने घर जा रहे थे ..\nरास्ते में दो बूढे चौपाल पर हुक्का पी रहे थे ..\nचुन्नू मुन्नू ने उन्हें देखा तो हँसने लगे ..\nएक बूढे ने हँसने का कारण पूछा ..\nचुन्नू ने बताया – बाबा मुन्नू कह रहा है “सामने देख 2 छुट्टीयां हुक्का पी रही हैं\nजोक 5 : संदीप : एक ‘मै..न..फो..र्स’ द्या.\nकेमिस्ट : तू देशपांड्याचा मुलगा ना\nसंदीप : काका मेन्टोस’ बोललो ‘मेन्टोस’,\nआणि एक विस्क पण द्या घास खराब झालाय\nगोळ्यांचं नाव पण नाही निघत आहे बरोबर 😄😄😄\nजोक 6 : पप्पू ट्रेन में एक सीट पर अकेला लेटा हुआ था\nएक यात्री आया और बोला:\nभाई साइड में हो जायें, मुझे भी बैठना है\nपप्पू : तुझे पता नहीं मैं कौन हूँ\nयात्री डर के दूसरी जगह पर जाकर बैठ गया\nफिर एक पहलवान आया और बोला..\nसाइड में हो जा छोटू मुझे भी बैठना है\nपप्पू ने उसे भी रोब दिखाते हुए बोला..\nतुझे पता नहीं मैं कौन हूँ\nपहलवान ने पप्पू की गर्दन पकड़ के उठा लिया और बोला..\nहां, बोल तू कौन है\nपप्पू : जी मैं ‘बीमार’ हूँ, 2 दिन से तेज़ बुखार है\nजोक 7 : बाई : डॉक्टर, आमचे हे माझ्या बरोबर रो..मां..स नाही करत\nडॉक्टर : हे घ्या ३० गोळ्या, रोज एक-एक देत जा मग बघा कमाल\nबाईने पहिल्या दिवशी १ गोळी दिली, नवऱ्याने रात्रभर रो..मा..न्स केला\nदुसरी दिवशी तिने २ गोळी दिली, नवऱ्याने रात्रभर झोपू दिल नाही\nतिसऱ्या दिवशी तिने पूर्ण २७ गोळी दुधात टाकून पाजल्या 😄😄😄\n३ दिवस नंतर, डॉक्टरने बाईच्या घरी फोन केला, फोन मुलाने\nउचलला आणि बोलला आई ३ दिवस पासून खाली बसू शकत नाही आहे\nकाकू आणि मावशी हॉस्पिटल मध्ये आहेत\nकामवाली बाई पळून गेली आहे\nशेजारच्या काकूंनी पप्पावर रे..प के..स केली आहे,\nमाझी गां..ड अजून पण दुखते आहे\nलहान भाऊ झाडात लपला आहे\nआणि पप्पा गार्डन मध्ये नं..गे होऊन Tommy च्या मागे पळता आहेत😄😄😄😄😄😄\nविनोद 8- पप्पू मित्राच्या घरी जातो पण मित्र घरी नसतो… पप्पू बेल वाजवतो…\nमित्राचा मुलगा दरवाजा खोलतो… आई (किचन मधून) – बाळा कोण आहे\nमुलगा- आई काका आले आहेत आई – कोण काका रे \nमुलगा- अगं आई तेच काका जे गेल्यावर तू नेहमी म्हणते\nविनोद 9- एकदा शेतात प्रियकर प्रेयसी से_ क्स करत होते…\nअचानक बंड्या त्यांच्या जवळ गेला… बंड्या- थांबा तुमच्या घरी जाऊन सांगतो…..\nप्रेयसी- अरे बंड्या नको हवं तर तू पण माझ्या सोबत कर… बंड्या खुश होतो आणि करायला लागतो…\nथोड्या वेळाने… बंड्या खूप प्रयत्न करतो पण बंड्याचा बाबुराव उठवत नाही….\nबंड्या- दुनियादारी गेली तेल लावत आता तर मी तुमच्या घरी जाऊन सांगणारच ….😂😂😂😂😂😂\nमराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – ते काय आहे के मे मध्ये नाही पण डिसेंबर मध्ये आहे, आग मध्ये नाही पण पाण्यात आहे\nकाकांची कॉमेडी ऐकून हसून हसून पोट दुखेल…\nलग्नात भाऊ आणि वहीनीने केला तुफान डान्स…\nनवरा सकाळी बायकोला बोलतो…\nसुहा’गरात्रीच्या दिवशी नवऱ्याचा उठत नाही…\nलग्नाची पहिली रात्र असते…\nलग्नात बायकांनी केला झकास डान्स…\nसाली बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…\nलग्नात वहिनीनीं केला भारी डान्स…\nसुहा’गरात्री बायकोला जोराची उचकी लागते….\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा वट पिंकी एका बस मध्ये चढली…\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा’वट बाई मेडिकल वर गेली…\nमुलीने सासरी जाताना सर्वांना रडवले\nटकला टी शर्ट घालून आला…\nनवरी ताईचा विडिओ बघून रडू येईल…\nबंड्याच्या बेडरूम मधून बायकोचा आवाज आला…\nलग्नात ताईने केला खुपच सुंदर डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nताईने केला खुपच सुंदर डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/satara/satara-farmers-in-trouble-bullock-cart-races-bans-dur-to-lumpy-skin-disease-764497.html", "date_download": "2022-10-07T23:00:06Z", "digest": "sha1:ZLMKHGQJF6N5MYATRNMHAYKB7WQ2TQEF", "length": 11107, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Satara : लम्पी आजाराचा बैलगाडा शर्यतीवर परिणाम, लाखोंचं नुकसान होण्याची भीती Video – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nSatara : लम्पी आजाराचा बैलगाडा शर्यतीवर परिणाम, लाखोंचं नुकसान होण्याची भीती Video\nSatara : लम्पी आजाराचा बैलगाडा शर्यतीवर परिणाम, लाखोंचं नुकसान होण्याची भीती Video\nजनावरांच्या शर्यती, बाजार आणि प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. लसीकरण झालेल्या बैलांना शर्यतीमध्ये भाग परवानगी देण्याची मागणी बैलगाडा प्रेमींनी केली.\nजनावरांच्या शर्यती, बाजार आणि प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. लसीकरण झालेल्या बैलांना शर्यतीमध्ये भाग परवानगी देण्याची मागणी बैलगाडा प्रेमींनी केली.\nघराबाहेर उभ्या असलेल्या बहिणींसमोर भावाला उडवलं; कार अपघाताचा थरारक Video\nInstagram च्या फॉलोअर्सवरुन घडला भयानक प्रकार, तरुणीने दिले चॅलेंज अन् दोघांचा..\nमहामुकाबल्यात हा खेळाडू पुन्हा डोकेदुखी ठरणार 12 मॅचमध्ये ठोकल्या 8 फिफ्टी\nनर्सने जिवंत रुग्णाला बॅगेत पॅक करून शवगृहात पाठवलं, दुसऱ्या दिवशी पाहिलं तर...\nसातारा, 23 सप्टेंबर : जनावरांमधील लम्पी रोगाने भयावह रूप धारण केले आहे. काही जनावरे दगावली देखील आहेत. मोठ्या प्रमाणात पशुधनामध्ये आजार फैलावत चालल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्यातील जनावरांच्या शर्यती, बाजार आणि प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अटी शर्तीच्या आधारे शर्यतींना परवानगी द्यावी, अशी मागणी बैलगाडा प्रेमी करत आहेत. सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सद्यःस्थितीत गाय व बैल यांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. आजार नियंत्रणासाठी जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जनावरांच्या वाहतुकीवर मनाई आदेश लागू केला आहे. आदेशानुसार शेतकऱ्यांना बाहेरच्या जिल्ह्यातून तसेच राज्यातून पशुधन खरेदी करणे व जनावरांची वाहतूक करण्यास मनाई आहे. तसेच प्राण्यांच्या शर्यतीवरती देखील बंदी घातली आहे. जिल्ह्याबरोबरच लगतच्या जिल्ह्यांमध्येही लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला असल्याने जिल्ह्यातील जनावरांचे सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. Video : शेतकऱ्यांच्या कामात घोणस अळीचा अडथळा, विषारी दंश झाला तर लगेच करा 'हे' उपाय जिल्ह्यातील इतर आठवडी बाजारांमध्येही जनावरांची खरेदी-विक्री व प्रदर्शन होत असल्यास, त्यालाही मनाई केली आहे. या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पोलीस अधीक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व आनुषंगिक प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी काटेकोरपणे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिलेली परवानगी नाकारली जिल्ह्यातील काही गावांमध्ये बैलगाडा शर्यत भरवण्यात यावे या मागणीचा प्रस्ताव बैलगाडा प्रेमींनी प्रांताधिकारी यांच्याकडे दिला होता. यावरती प्रांत अधिकारी यांनी आदेश प्राप्त होण्याच्या आधी परवानगी आदेश दिले होते. ते आदेश देखील पत्र देऊन थांबवण्यात आले आहेत व पुढील आदेश येईपर्यंत संबंधित बैलगाडा शर्यत व बैल बाजार थांबवण्याचे लेखी पत्र संबंधित बैलगाडा मालक आयोजक यांना प्रांत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 'लम्पी'मध्ये खासगी डॉक्टरांचे फावले, शेतकऱ्यांची सुरू आहे लूट पाहा Video लसीकरण झालेल्या बैलांना परवानगी द्या लसीकरण झालेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी व परवानगी देण्यासाठीची मागणी बैलगाडा प्रेमींनी केली आहे. बैलांना रोज फेरी मारणे तसेच स्पर्धेमध्ये पळवणे हे गरजेचे आहे. अन्यथा आमचे लाखो रुपयांचे बैल या सगळ्या गोष्टी विसरून जाऊ शकतात. यामुळे बैलांची किंमत कमी होऊ शकते. यासाठी प्रशासनाने लक्ष देऊन लसीकरण झालेल्या जनावरांना स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र करावे. अटी शर्तीच्या आधारे शर्यतींना परवानगी द्यावी, अशी मागणी बैलगाडा प्रेमी करत आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/independent-mla-bachu-kadus-reaction-from-the-minister-post-maharashtra-politics-ssd92", "date_download": "2022-10-07T22:17:08Z", "digest": "sha1:QH3IGDBSVQLMKSNHAY4CAKLN7LM4HMSX", "length": 7308, "nlines": 64, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Bacchu Kadu | शिंदे साहेब आम्हाला मंत्रिपद देणारच; बच्चू कडूंनी व्यक्त केला विश्वास", "raw_content": "\nMaharashtra Politics : शिंदे साहेब आम्हाला मंत्रिपद देणारच; बच्चू कडूंनी व्यक्त केला विश्वास\n'आमच्यासाठी मंत्री पद हा फार मोठा विषय नाही, आमच्या कामात मंत्रिपदाची ताकद आहे.'\nBacchu Kadu Latest News : दोन महिन्यांपूर्वी राज्यातील शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडला. या टप्प्यात शिंदे गटातील ८ आणि भाजपच्या ८ मंत्र्यांनी शपथ घेतली. पहिल्या टप्प्यात एकाही अपक्ष आमदाराचा समावेश नव्हता. त्यामुळे मंत्रिपदावर वर्णी न लागल्याने अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) नाराज असल्याची चर्चा रंगली. दरम्यान, या चर्चेवर बच्चू कडू यांनी आज महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. (Bacchu Kadu News Today)\nBacchu Kadu : ...तर मुख्यमंत्री प्रहारचाच असता; बच्चू कडू काय म्हणाले\nकाय म्हणाले बच्चू कडू\n'आमच्यासाठी मंत्री पद हा फार मोठा विषय नाही, आमच्या कामात मंत्रिपदाची ताकद आहे. तरीसुद्धा आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही, तो आमचा अधिकार आहे. शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील. त्यामुळे त्याची चिंता करायची आवश्यकता नाही, असा विश्वास अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत (Amravati) माध्यमांसोबत संवाद साधला यावेळी ते बोलत होते.\n'मंत्रिपद केव्हा मिळणार हे सांगू शकत नाही'\nयावेळी पत्रकारांनी बच्चू कडू यांना मंत्रिपदावरून प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले की मंत्रिपद केव्हा मिळणार हे सांगू शकत नाही, तो माझ्या आटोक्या बाहेरचा विषय आहे. आमच्यासाठी मंत्रिपद हा फार मोठा विषय नाही. आमच्या कामात मंत्रिपदाची ताकद आहे. तरीसुद्धा आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही, तो आमचा अधिकार आहे. शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील, असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केला. (Bacchu Kadu Marathi News)\nUday Samant : वेदांतासारखाच नाणार पण जाणार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय सांगितलं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय सांगितलं\n'मुख्यमंत्री प्रहारचाच राहिला असता'\nअमरावतीत आज शेकडो कार्यकर्त्यांनी प्रहारमध्ये प्रवेश केला. या मेळाव्याला संबोधित करताना आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं. 'राजकारणात काहीही होऊ शकतं आज काय आणि उद्या काय कुणीच सांगू शकत नाही. मी तुम्हांला सांगू इच्छितो प्रहारजवळ जर १० आमदार असते, वेळ जर थोडी अधिक बदलली असती, तर येणारा मुख्यमंत्री सुद्धा प्रहारचाच राहिला असता', असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2018/07/blog-post_61.html", "date_download": "2022-10-07T23:09:51Z", "digest": "sha1:UVZC7WDHETZ2YW3P7RFDWUPO4CW36TEM", "length": 24267, "nlines": 226, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अफवांचे आभाळ भाकरीचा चंद्र | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nअफवांचे आभाळ भाकरीचा चंद्र\nद्वेषपूर्ण अफवा...जहरी प्रचार-प्रसाराच्या सक्षम यंत्रणा, यामुळे जगण्याचा विचार करणाऱ्यांची निष्ठाच ढवळून रसातळाला नेण्याची ही पूर्वापार छुपी चाल आहे. सामान्य नागरिकांची सूजाण बुद्धी गहाण पडण्याची मालिका अखंडपणे भारतात आजही सुरु आहे. निसर्गचमत्कारातून आलेल्या देवांची रूपे पासून महिलांचे केशकर्तन करणाऱ्या माकडमाणूस पर्यंत... हा मंकीमॅन सापडला नाही तरी नंतर मनकीबात ची जाहिरात वाढलीच गोशाला-गोभक्ती, गोमांस यावर अक्कलचे वांदे करुन, संशयावरून माणसे माणसांचे मुडदे पाडू लागले. गाईला माता आणि बाईला भाजता अशी विचित्रता सरेआम झालीय. आणि आत्ता पोरंचौर्य टोळी...मग पुन्हा मरणं... पुन्हा तेच. समाज सातत्याने दाबलेला, वंचित,पीड़ित भयप्रदच राहून विकास कुठे हरवला हा प्रश्‍न विचारू नये म्हणून अशा जीवघेण्या अफवांची द्युतक्रीडा सुरुय.\nपावसाळा सुपिकतेची नांदी घेउन येतो. शेतशिवारात, रानावनांत, मनातही सृजन, सर्जनाचा खेळ सुरू होतो... पण या पावसाच्या सुरूवातीलाच अफवांच्या भरतीला ऊधाण आले. राईपाडा, धुळे येथल्या डवरीगोसावी समाजातील 5 जणांची जमावानं निर्घृण हत्या केली. ’मुलं चोरणारी, पळवणारी टोळी आपल्या भागात आली आहे’ अशा अफवेचा हा वाईट पडसाद. मानवी मन, बुद्धी, समज, संवेदनशीलता या साऱ्या गोष्टी कोसो दूर ठेवत केवळ अफवांवरचा तत्कालीक धादांत खोटा पण पक्का विश्वास, त्याचबरोबर\nजोडीला व्यवस्थेची अल्पसंख्यांकाविरूद्धची द्वेषपूर्ण पेरणी हीच या हत्याकांडाची सरळ सोपी कारणे. अशा हत्या होताना फोटो, व्हीडीओज, पुरावे व्हायरल असताना जीव घेणाऱ्यांना जराशी भिती वाटू नये या घटनेच्या भोवती उभ्या समुहाने मुकपणे हे सर्वमान्य करावे... म्हणजे हा पावसाळा नव्या भयप्रद घटनांची बीजे सुपिक करतोय हेच खरे या घटनेच्या भोवती उभ्या समुहाने मुकपणे हे सर्वमान्य करावे... म्हणजे हा पावसाळा नव्या भयप्रद घटनांची बीजे सुपिक करतोय हेच खरे आपण सातत्याने कुणाला तरी मारलं पाहिजे ही खुनशी वृत्ती, अमानवीय मानसिकता जोमाने घट्ट रूजते आहे. गोमांसाच्या मुद्द्यावरून सुरू असलेला हा भयप्रद प्रवाह अख्लाक, पहलू, मोहसीन पासून केवळ घोड्यावर बसला म्हणून, आंबेडकरांचे गाणे वाजवले म्हणून किंवा विहीरीत आंघोळ केली म्हणून हत्या होण्यापर्यंत सुरूच आहे. माध्यमे आणि व्यवस्था यांच्यातील तीव्र समरसता, अल्पसंख्यांक, शोषीत सर्वहारा वर्गाला अधिकाधिक वंचित करत आता जगण्यापासूनही वंचित करताहेत. मारेकऱ्यांना पाठीशी घालणारे बहुमत, समुहा-समुहात अधिक तिखटपणे वाढलेला दुरावा दिवसेंदिवस अशा घटनांना सुफल वातावरण देत आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली देशाच्या राजधानीत अकराजणांची आत्महत्या आणि धर्माचा रंग लावत रंगवलेली मंदसौर मधली चिमुरडीच्या बलात्काराची घटना, अस्वस्थपणाच्याही चिंधड्या होतील असा विखारी-विषारी प्रचार अफवांनी सुरूच ठेवला आहे. मंदसौर घटनेचे अपराधी नावासकट सापडतात. पण त्यापूर्वी जुन्या फोटो पेस्टींगच्या व्हायरल अफवांनी निष्पाप तरूणांना केवळ मुस्लिम म्हणून अपराधीत्व सहन करून, देशभरातल्या धार्मिक उन्मादाची भूक भागविली जाते. या सगळ्यांना तुकड्यांना जोडत लोकलशी मुंबैकरांच नातं जीवनमरणाचं नातं यात ब्रीज कोसळून मरणं येत. कधी खड्ड्यात पडून\nउरली संवेदना जपून कुठल्या मयतांना श्रद्धांजली द्यायची मारले गेले ते सगळे भारतीय. मग् अफवेने असो की ब्रीज अपघाताने... उरली संवेदना जपून यांना श्रद्धांजली द्यायची मनोमन, तरी शुद्धमनांमध्ये शंकेच वादळ घोंघावतय... माणूस म्हणून, नागरिक म्हणून असणारी सहनशीलता, प्रेम नष्ट करण्याचं अलिकडे अपडेट झालेलं हे मुनवादी सॉफ्टवेअर तितक्याच सॉफ्टली, रितसर एकेक फाईल ओपन करत, प्रोग्राम लॉन्च करत आहेत. मानवतेच्या बाजूने असणारे सगळे आपण केवळ ’व्हायरस’ ठरत आहोत, तात्पुरते मारले गेले ते सगळे भारतीय. मग् अफवेने असो की ब्रीज अपघाताने... उरली संवेदना जपून यांना श्रद्धांजली द्यायची मनोमन, तरी शुद्धमनांमध्ये शंकेच वादळ घोंघावतय... माणूस म्हणून, नागरिक म्हणून असणारी सहनशीलता, प्रेम नष्ट करण्याचं अलिकडे अपडेट झालेलं हे मुनवादी सॉफ्टवेअर तितक्याच सॉफ्टली, रितसर एकेक फाईल ओपन करत, प्रोग्राम लॉन्च करत आहेत. मानवतेच्या बाजूने असणारे सगळे आपण केवळ ’व्हायरस’ ठरत आहोत, तात्पुरते ऍन्टीव्हायरस म्हणून की काय डॉ. रिचा जैन यांच्या बोकड निर्यातबंदीची पोस्ट, बातमी सहेतुक पेरली जाते आणि उतावीळ प्रतिक्रियांचा खचाखच ढीग पुन्हा एक अल्पसंख्य समाजाविरूद्ध तीव्रतेने पडत जातो. पुन्हा मांसाहार- शाकाहार यावर वैज्ञानिक चर्चा घडविल्या जातात. लिहिते- बोलते, बांधव- बहिणींची एकमेकांवर चिखलफेक होते. सर्वांगानी उकल होते... आणि छोट्या छोट्या जातसमुह, अल्पसंख्य जमातींच्या बंदिस्त वर्गीकरण सुरू होतं...\nख्रिश्‍चनांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभागाविषयी पद्धतशीरपणे विधान करून, त्यालाही तुफानी चर्चेला वेग आणला जातो. त्यावर झाडाझडती घडत राहते. एकूण कार्य अनेकविध जातीधर्मांच्या मुद्यावर प्रत्येक धर्मजातीला धर्मप्रीयतेकडे ओढून आणायचं. प्रत्येकाची धर्मवाटणीचा कंपू पक्का तयार करायचा, भावनिक अस्मिता, तात्पुरती कट्टरता, अंधभक्ती या गोष्टीत विशेषत: तरूणांनी गुरफटून घ्यायचं... मग विकास, ’2020 महासत्ता’ कलामांचे स्वप्न, किंवा कालाधन, अच्छे दिन यांची विस्मृती.\nगर्दीला चेहरा नसतो असे म्हणून नामानिराळे होण्यापेक्षा अलीकडे गर्दीला जात असते, धर्म असतो असे म्हणणे रास्त... पण गर्दी जेव्हा समतेची शिकवण देत वाळवंटात, चंद्रभागोतिरी जाणारी असेल, तिथे पुन्हा ’मनु’चं मोठा अशी घोकंपट्टी उधळली जात असेल तर...\nराईनपाड्याच्या भटक्या जातीतल्या, भाकरी शोधणाऱ्या जीवांची हत्या करणाऱ्या समुहाची भित्री-द्वेषी जात ही प्रस्थापित व्यवस्थेन निर्माण केलेली जात आहे तर...\nबलात्कारासारख्या घटनेतूनही धार्मिकतेचा कट्टर परिचय द्यावा असा प्रयत्न करणाऱ्यांची जात आहे तर...अशा जातीची नापिक मातीच व्हावी...\nयंदा पावसाळ्यात किमान यांचा येणारा 2019 साठीचा प्रोग्राम डेटा करप्ट करण्याची ताकत, मानवतेच्या बाजूने उभ्या असणाऱ्या सर्वांमध्ये येवो... भाकरीचा चंद्र प्रत्येकाला प्रेमाने लाभो...\nमानवांवर कृपा : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमला मिळालेला परिपूर्ण धर्म- इस्लाम\nपेटवायची हौस असेल तर गरिबांच्या चुली पेटवा\n‘गुजरात फाईल्स’ कृष्णकृत्यांचा रहस्यभेद\nतंटामुक्ती स्वीकार्य तर शरई पंचायत का नाही\n२७ जुलै ते ०२ ऑगस्ट २०१८\nऔरंगजेबाचे कृषी धोरण विषयक फर्मान : भाग २\nपुण्यामध्ये समविचारी पुरोगामी संघटनांची “अघोषित आण...\nअनेक लोक निरूद्देश जीवन जगत आहेत\nअफवांचे आभाळ भाकरीचा चंद्र\nभ्रष्टाचार दबू शकतो पाणी कसे दबणार\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये कोण-को...\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणत...\nशिक्षणाची पद्धत : पेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nअस्तित्वहीन ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स’\n२० जुलै ते २६ जुलै २०१८\nनामोस्मरण , याचना आणि उपासना\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसमस्त मानवकल्याणाची चिंता करावी लागेल\nऔरंगजेबाचे कृषी धोरणविषयक दोन फर्मान\nखरंच मुसलमान संविधान मानत नाहीत का\nधर्म आणि दहशतवादाचा काही संबंध नाही\nनिकले किसी के गम में ....\n१३ जुलै ते १९ जुलै २०१८\nआणखी एक टंचाई - तांबे\nहिरे बाजारात घुसलेली लबाडी\nनामोस्मरण आणि याचना : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nचर्चने मोदी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आ...\nप्रलंबित कोर्ट केस खटल्यांची शोकांतिका\nतुर्कीचे तीन वेळेस पंतप्रधान, दुसर्‍यांदा राष्ट्रप...\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणत...\nईश्‍वर आपल्याला जाब विचारेल याची जाणीव लोप पावत आह...\nआपल्या देशात मुल्याधिष्ठीत शिक्षणाची गरज : डॉ. पार...\n०६ ते १२ जुलै २०१८\n२९ जून ते ०५ जुलै २०१८\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2018/07/blog-post_94.html", "date_download": "2022-10-07T23:06:48Z", "digest": "sha1:HCULYXS4EDT42AD6ARND6PBPYJZN3I6I", "length": 28194, "nlines": 223, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "औरंगजेबाचे कृषी धोरण विषयक फर्मान : भाग २ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nऔरंगजेबाचे कृषी धोरण विषयक फर्मान : भाग २\nमुहम्मद हाशीमच्या नावे काढलेल्या फर्मानात उपकारबुध्दीची भूमिका\nऔरंगजेबाचे कृषी धोरण स्पष्ट करणारे दुसरे एक फर्मान मोहम्मद हाशीमच्या नावे काढले आहे. हे फर्मान इसवी सन 1669 साली काढण्यात आले आहे. औरंगजेब कोणतेही फर्मान साधारणत: आपली जन्मभूमी असणाऱ्या गुजरातच्या सुभेदाराच्या नावे काढत असे आणि त्याची अंमलबजावणी नंतर संपूर्ण राजवटीत करत असे. मोहम्मद हाशीमच्या नावे काढलेले फर्मान देखील शेतकरी हिताची चर्चा करणारे आहे. या फर्मानात औरंगजेबाने शेतकऱ्यांशी उपकारबुध्दीने वागण्यासाठी सुचना केल्या आहेत, “ हिंदुस्तानी सल्तनतीच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत असलेल्या सध्याच्या आणि भविष्यातील आधिकाऱ्यांनी व अमिलांनी प्रकाशमान कायदा आणि प्राचीन उज्ज्वल पंरपरा यानुसार प्रमाणांत निश्‍चीत करण्यात आलेला महसूल आणि कर महालांकडून वसूल करावा या कायद्यात जे काही सांगण्यात आणि मान्य करण्यात आले आहे ते अचूक आणि विश्वसनीय आहे. त्यांनी प्रत्येक वर्षी नवी मागणी करु नये परंतू या जगात आणि नंतरच्या जगात ( परलौकीक ) त्यांची अप्रतिष्ठा होईल अशा कारणास दूर सारण्याचा विचार करावा. त्यांनी शेतकऱ्यांसोबत उपकारबुध्दीचे होउनच वर्तन करावे. त्यांच्या स्थितीची चौकशी करुन त्यांच्याशी न्यायपूर्ण आणि सौजन्याने वागायला हवे ज्यामूळे ते आनंदाने आणि मन:पुर्वक उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करतील आणि शेतीचा प्रत्येक तुकडा लागवडीखाली आणतील. शक्य झाल्यास वर्षाच्या सुरुवातीसच तुम्ही हे सूचीत करायला हवे की शेतकरी लागवड करीत आहे किंवा नाही वा त्यापासून अलिप्त आहे. जर ते झटून काम करण्यास तयार असतील तर त्यांना उत्तेजन आणि त्यांनी इच्छेने अनुकुलता दर्शविली तर त्यांना साह्य करा परंतू जर चौकशी केल्यानंतर असे आढळले की ते लागवड करण्यात सक्षम आहेत आणि पाउसही चांगला झालेला आहे तरीही ते लागवड करण्यापासून दूर आहेत तेंव्हा त्यासाठी तुम्ही आग्रह करा, दरडावून सांगा, शक्तीचा वापर करा, दंड द्या. ” पळून गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमीनी भाडेपट्ट्याने द्या.\nजो शेतकरी पळून गेला आहे त्यांच्या जमीनी भाडेपट्ट्याने द्याव्यात हा आदेश लागवडीचे क्षेत्र वाढवण्याचे औरंगजेबाचे धोरण अधोरेखीत करणारे आहे. तो म्हणतो, “ जर शेतकरी शेतीची साधने घेण्यासाठी असमर्थ असेल किंवा शेती न पिकविता सोडून पळून जाईल तेव्हा ती शेती दुसऱ्याला भाडेपट्ट्याने द्यावी आणि महसूलाची रक्कम ज्याने शेती कराराने घेतली आहे, त्याच्याकडून वसूल करावी किंवा लागवडीच्या दृष्टीने मालकाच्या भागातून वसूल करा. जर अधिकचे उरले तर शेतीच्या मालकास देण्यात यावे किंवा पळून गेलेल्या मालकाच्या स्थानी अन्य माणसाची नेमणूक करुन , त्याने शेती करुन महसूल भरावा आणि आधिक उत्पादन त्यालाच उपभोगू द्यावे. जेव्हा केव्हा मूळ मालक शेती करण्यास सक्षम होईल, तेव्हा त्यास त्याची शेती परत देण्यात यावी. जर शेतमालक शेती पडीक सोडून पळून गेला असेल तर ती शेती चालू वर्षानंतर करारावर देण्यात यावी.” याच आदेशात पडीक जमीनीविषयी पुढे म्हटले आहे की, “ जर पडीक जमीनीचा मालक माहित असेल तर ती जमीन मालकाकडेच राहू द्या, ती अन्य कोणास देण्यात येउ नये. जर मालक माहित नसेल तर धोरणाची अंमल बजावणी करा व तुम्ही ज्या कोणास तिची काळजी करण्यास योग्य समजाल त्यास ती जमीन देण्यात यावी. जो त्या जमीनीवर लागवड करेल तो मालक म्हणून ओळखण्यात येईल आणि ती जमीन त्याच्याकडून हिसकावून घेण्यात येणार नाही. जर त्या जमीनीत खनिज असेल तर ती जमीन खोदण्यास सर्वप्रकारे मनाई करण्यात यावी. ”\nनैसर्गिक आपत्तीवेळी लागवडीआधी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास करमाफी - अनेक वेळा दुष्काळ, वादळी वारे, अतिवृष्टी आणि पुरामूळे पिकांचे नुकसान व्हायचे. अशावेळी शेतकऱ्यांकडून कर वसूल करणे योग्य नसल्याचे सांगताना या फर्मानात औरंगजेब म्हणतो, “ कोणत्याही अडचणीशिवाय लागवड करण्याची क्षमता असतानाही जर कोणी त्याची शेती पडीक ठवली असेल तर अन्य कामासाठी राखून ठेवलेल्या त्याच्या दुसऱ्या जमीनीपासून महसूल प्राप्त करावा. जर शेतीत पुराचे पाणी घुसले असेल किंवा जेथे अतिवृष्टी झाली असेल किंवा कोणतेही न टाळता येणारे संकट हंगामापुर्वी पिकावर आले असेल ज्यामूळे रयतेस काही शिल्लक राहिले नसेल तर पुढचे वर्ष सुरु होण्यापूर्वी दुसरे पीक घेण्यासाठी पुरेसा वेळ उरला नाही, अशा वेळी महसूल माफ आहे असे समजावे. परंतु जर कापणी झाल्यावर संकट आले असेल किंवा संकट आल्यावरही दुसऱ्या पिकांसाठी पुरेसा वेळ उरला असेल तर महसूल गोळा करावा.\nशेतीचा मालक निश्चित केलेला महसूल देण्यास बांधील आहे. त्याने लागवड केल्यावर वर्षाचा महसूल देण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या वारसदारांना शेतीतील उत्पन्न मिळाले अशावेळी त्यांच्याकडून महसूल घेण्यात यावा. परंतू अशा व्यक्तीचा मृत्यू लागवडीपुर्वीच झाला आणि त्यावर्षी लागवड करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही तर अशा वेळी काहीही घेऊ नका. ” पुढे याच फर्मानात म्हटले आहे , “ जर मुकासिमा जमिनीचा मालक वारसदाराशिवाय मृत झाल तर मुअज्जफ जमिनीशी संबंधित असलेल्या कायद्याच्या अनुसार करावाई करुन जमीन लागवडीसाठी भाडेपट्टावर देण्यात यावी. मुकासिमा संबंधात जर कोणत्या संकटाने पिकांना ग्रासले तर नुकसानीच्या प्रमाणांत महसुलाची रक्कम कमी करण्यात यावी आणि जर संकट धान्य कापणीनंतर आले किंवा पूर्वी आले तर सुरक्षित राहिलेल्या धान्यावर महसूल आकारण्यात यावा.”\nफळबाग लागवडीविषयी सुचना - फळबागा लावताना योग्य अंतर न ठेवता रोपे लावल्याने बागांचे नुकसान होते. त्यामुळे अशापध्दतीने लागवड करणाऱ्यांना दंड म्हणून जास्त महसूलाची आकारणी करण्यात यावी. तथा फळझाडांच्या लागवडीमुळे बराच काळ त्याची वाढ होण्यात जातो. मग महसूल बुडण्याची शक्यता असते. त्यामुळे ही झाडे फळधारणा करत नसली तरी महसूल घ्यावा. याबाबत या फर्मानात आदेश दिले आहेत, “ लागवडीसाठी योग्य अशा जमीनीवर, लागवडीसाठी योग्य म्हणून महसूल कराची आकारणी झाली होती, अशी जमीन जर त्याने कोणत्या उद्यानात रुपांतरीत केली आणि दोन झाडांच्या दरम्यान मोकळी जागा न सोडता फळ झाडे लावली तर त्याच्याकडून 2.2/3 रुपये घेण्यात यावेत, जो अद्यापी फलधारणा न करणाऱ्या झाडासाठीच्या उद्यानासाठी म्हणून आधिकाधिक आहे. परंतु द्राक्ष आणि बदामाच्या झाडांच्या संबंधात त्यांना फलधारणा झालेली नसली तरीही महसूल घेण्यात यावा. जेव्हा ती झाडे फलधारणार करतील तेंव्हा 2.3/4 रुपये जे एक बिघा म्हणजे 45ु45 शहाजहानी गजमधील उत्पन्नासाठी आहे, इतका महसूल घेण्यात यावा, किंवा 60ु60 अशा अधिकृत गजमधील उत्पन्नासाठी 5.1/2 किंवा त्याहून अधिक महसूल घेण्यात यावा, नाहीतर उत्पन्नाचा अर्धाभाग घेण्यात यावा. जर उत्पन्नाचे मूल्य हे पाव रुपयापेक्षा कमी आहे जसे एक रुपयास पाच शहाजहानी शेर धान्य विकल्या जाते, तेव्हा शासनाचा भाग एक शेर धान्याचा होतो, यापेक्षा कमी घ्यायचे नाही. ”\nऔरंगजेबाच्या काही अन्य आदेशातून देखील त्याची कृषी क्षेत्राविषयक भूमिका व्यक्त झाली आहे. औरंगजेब दक्षिणेत आल्यानंतर त्याने शेतकऱ्यांच्या संदर्भात काही आदेश दिले आहेत. तर उत्तरेत राजवटीच्या सुरुवातीच्या काळात त्याने असे आदेश दिले आहेत. औरंगजेबाच्या कृषी धोरणाचा समग्र आकलन होण्यासाठी त्या फर्मानांचा संपूर्ण अभ्यास आवश्यक आहे.\n- सरफराज अ. रजाक शेख\nऍड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर\nमानवांवर कृपा : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमला मिळालेला परिपूर्ण धर्म- इस्लाम\nपेटवायची हौस असेल तर गरिबांच्या चुली पेटवा\n‘गुजरात फाईल्स’ कृष्णकृत्यांचा रहस्यभेद\nतंटामुक्ती स्वीकार्य तर शरई पंचायत का नाही\n२७ जुलै ते ०२ ऑगस्ट २०१८\nऔरंगजेबाचे कृषी धोरण विषयक फर्मान : भाग २\nपुण्यामध्ये समविचारी पुरोगामी संघटनांची “अघोषित आण...\nअनेक लोक निरूद्देश जीवन जगत आहेत\nअफवांचे आभाळ भाकरीचा चंद्र\nभ्रष्टाचार दबू शकतो पाणी कसे दबणार\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये कोण-को...\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणत...\nशिक्षणाची पद्धत : पेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nअस्तित्वहीन ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स’\n२० जुलै ते २६ जुलै २०१८\nनामोस्मरण , याचना आणि उपासना\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसमस्त मानवकल्याणाची चिंता करावी लागेल\nऔरंगजेबाचे कृषी धोरणविषयक दोन फर्मान\nखरंच मुसलमान संविधान मानत नाहीत का\nधर्म आणि दहशतवादाचा काही संबंध नाही\nनिकले किसी के गम में ....\n१३ जुलै ते १९ जुलै २०१८\nआणखी एक टंचाई - तांबे\nहिरे बाजारात घुसलेली लबाडी\nनामोस्मरण आणि याचना : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nचर्चने मोदी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आ...\nप्रलंबित कोर्ट केस खटल्यांची शोकांतिका\nतुर्कीचे तीन वेळेस पंतप्रधान, दुसर्‍यांदा राष्ट्रप...\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणत...\nईश्‍वर आपल्याला जाब विचारेल याची जाणीव लोप पावत आह...\nआपल्या देशात मुल्याधिष्ठीत शिक्षणाची गरज : डॉ. पार...\n०६ ते १२ जुलै २०१८\n२९ जून ते ०५ जुलै २०१८\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/aurangabad/a-minor-girl-was-raped-by-6-people-a-shocking-incident-in-aurangabad-mhss-746637.html", "date_download": "2022-10-07T21:26:45Z", "digest": "sha1:WVP6GDH6TWISHLMKBCBNF2242LWF3O5L", "length": 9040, "nlines": 94, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "A minor girl was raped by 6 people a shocking incident in Aurangabad mhss - स्वातंत्र्य दिनी औरंगाबादमध्ये संतापजनक घटना उजेडात, अल्पवयीन मुलीवर 6 जणांकडून अत्याचार – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nस्वातंत्र्य दिनी औरंगाबादमध्ये संतापजनक घटना उजेडात, अल्पवयीन मुलीवर 6 जणांकडून अत्याचार\nस्वातंत्र्य दिनी औरंगाबादमध्ये संतापजनक घटना उजेडात, अल्पवयीन मुलीवर 6 जणांकडून अत्याचार\nकाही आरोपींकडून यापूर्वीसुद्धा पीडित मुलीची छेड काढून तिच्यावर अत्याचार केला होता.\nकाही आरोपींकडून यापूर्वीसुद्धा पीडित मुलीची छेड काढून तिच्यावर अत्याचार केला होता.\nअविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 15 ऑगस्ट : देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. पण औरंगाबादमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. औरंगाबाद (aurangabad) जिल्ह्यातील कन्नड (kannad) तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका गावात अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार (gang rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. कन्नड ग्रामीण पोलिसांनी या सहाही आरोपींना ताब्यात घेतले असून, यात एका विधीसंघर्ष बालकाचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एका गावात ही घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर सहा नराधमांनी अत्याचार केला. विशेष म्हणजे, यातील काही आरोपींकडून यापूर्वीसुद्धा पीडित मुलीची छेड काढून तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. परंतु घरची परिस्थिती नाजूक आणि प्रतिकूल असल्यामुळे मुलीने घरी सांगितले नाही. त्यामुळे या नराधमांनी या पीडितेच्या असाह्यतेचा फायदा घेत नराधम तिला धमक्या देत होते. त्यामुळे या पीडितेची हिंमत झाली नाही. मात्र सहा नराधमांनी अत्याचार केल्यामुळे वेदना असह्य झाल्या आणि त्यानंतर या मुलीने ही संपूर्ण घटना आपल्या आईला सांगितली. आपल्या लेकीसोबत घडलेल्या घटनेमुळे आईला तर धक्का बसला. तिने क्षणाचाही विलंब न करता कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि मुलीसोबत झालेली हकीकत सांगितली आणि या सहा नराधमांविरोधात तक्रार दिली. पीडितेचा जबाब नोंदवल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तातडीन सूत्र फिरवली आणि सहा आरोपींना कन्नड ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. (VIDEO : खरं प्रेम कधीच संपत नसतं, या आजोबांनी पुन्हा खरं करून दाखवलं) आदिवासी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये किरण साहेबराव गोंडे ( वय 32 वर्षे) व अरुण कैलास दरेकर (वय 31 वर्षे) या दोघांनी तिच्यावर जबरी बलात्कार केला. तसंच यापूर्वीही आरोपी किरण आणि अरुण याच्यासह श्रीकांत अशोक जाधव ( वय 33 वर्षे), गोविंद नेमीनाथ शेळके (वय 29 वर्षे), संकेत जगन जाधव (वय 19 वर्षे) आणि एका विधिसंघर्ष बालकानेही तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घटनेने औरंगाबाद जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology/indian-company-detel-launch-e-bike-price-less-than-petrol-bike-see-details-gh-607712.html", "date_download": "2022-10-07T22:33:55Z", "digest": "sha1:M6AVSUMN5V7EZEI6SGQWWFPYDX46EX6J", "length": 10870, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ola नंतर आता आणखी एक E-Bike लॉन्च, किंमत पेट्रोल बाईकपेक्षाही कमी! – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /\nOla नंतर आता आणखी एक E-Bike लॉन्च, किंमत पेट्रोल बाईकपेक्षाही कमी\nOla नंतर आता आणखी एक E-Bike लॉन्च, किंमत पेट्रोल बाईकपेक्षाही कमी\nइंधनाचे वाढते दर आणि वाढतं प्रदूषण यावर उपाय म्हणून सध्या ई-बाइकचा (E-bike) पर्याय उपलब्ध होत आहे. ही वाहनं विजेवर चालणारी असल्यानं इंधनाचा खर्च आणि प्रदूषण कमी होण्यास हातभार लागणार आहे. ओला (Ola) मोबिलिटीच्या इलेक्ट्रिक स्कूटरनंतर आता डिटेल (Detel) या भारतीय कंपनीनं ई-बाइक लॉन्च केली आहे.\nइंधनाचे वाढते दर आणि वाढतं प्रदूषण यावर उपाय म्हणून सध्या ई-बाइकचा (E-bike) पर्याय उपलब्ध होत आहे. ही वाहनं विजेवर चालणारी असल्यानं इंधनाचा खर्च आणि प्रदूषण कमी होण्यास हातभार लागणार आहे. ओला (Ola) मोबिलिटीच्या इलेक्ट्रिक स्कूटरनंतर आता डिटेल (Detel) या भारतीय कंपनीनं ई-बाइक लॉन्च केली आहे.\nई-स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने मुलाचा मृत्यू\n इलेक्ट्रिक बाइकमधील बॅटरीच्या स्फोटात सात वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू\nजगातील पहिलं इलेक्ट्रिक विमान ‘अ‍ॅलिस’चं उड्डाण यशस्वी, 'ही' आहेत वैशिष्ट्ये\n चक्क मोबाइलपेक्षाही लवकर चार्ज होते ही कार,वाचा चकित करणाऱ्या गोष्टी\nमुंबई, 23 सप्टेंबर : इंधनाचे वाढते दर आणि वाढतं प्रदूषण यावर उपाय म्हणून सध्या ई-बाइकचा (E-bike) पर्याय उपलब्ध होत आहे. ही वाहनं विजेवर चालणारी असल्यानं इंधनाचा खर्च आणि प्रदूषण कमी होण्यास हातभार लागणार आहे. ओला (Ola) मोबिलिटीच्या इलेक्ट्रिक स्कूटरनंतर आता डिटेल (Detel) या भारतीय कंपनीनं ई-बाइक लॉन्च केली आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या ई-बाइकची किंमत कोणत्याही पेट्रोल बाइकच्या तुलनेत खूपच कमी आहे. ही ई-बाइक देशभरात उपलब्ध असेल, अशी घोषणा कंपनीने केली आहे. यासाठी ग्राहकांना डिटेल इंडिया कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन बुकिंग करावं लागेल. कोणताही ग्राहक केवळ 1999 रुपयांत 'डिटेल ईव्ही इझी प्लस' ही बाइक बुक करू शकतो. 'डिटेल ईव्ही इझी प्लस'ची किंमत काय आहे डिटेल इंडियानं (Detel India) दिलेल्या माहितीनुसार, ईव्ही इझी प्लसची (EV Easy Plus) किंमत 39,999 रुपये असेल. जीएसटीसह (GST) या बाइकची एकूण किंमत 41,999 रुपये असेल. याचाच अर्थ बुकिंगची रक्कम भरल्यानंतर डिलिव्हरी घेतेवेळी तुम्हाला 40,000 रुपये भरावे लागणार आहेत. ग्राहकांना ही रक्कम डिलिव्हरीच्या 7 दिवस अगोदर द्यावी लागणार आहे, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. हरियाणात गुरुग्राम इथल्या या ईव्ही उत्पादकाने हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम यूपीमध्ये पार्टनर्सचं नेटवर्क उभारलं आहे. डिटेलच्या ई-बाइकची वैशिष्ट्यं ईव्ही इझी प्लस सिल्व्हर ग्रे आणि मेटॅलिक रेड या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. ईव्ही इझी प्लस सिंगल चार्जिंगमध्ये 60 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकेल. या बाइकचा टॉप स्पीड (Top Speed) 25 किलोमीटर प्रतितास आहे. यात चालकाच्या सीटखाली 20 Ahची बॅटरी बसवण्यात आली आहे. ही बॅटरी कोणत्याही 5 अॅम्पिअरच्या स्लॉटद्वारे चार्ज होऊ शकते. या बाइकच्या दोन्ही चाकांना ड्रम ब्रेक (Drum Break) बसवण्यात आले असून, बाइकचा ग्राउंड क्लिअरन्स 170mm आहे. ईएमआयची सुविधा डिटेल इंडियानं (Detel India) दिलेल्या माहितीनुसार, ईव्ही इझी प्लसची (EV Easy Plus) किंमत 39,999 रुपये असेल. जीएसटीसह (GST) या बाइकची एकूण किंमत 41,999 रुपये असेल. याचाच अर्थ बुकिंगची रक्कम भरल्यानंतर डिलिव्हरी घेतेवेळी तुम्हाला 40,000 रुपये भरावे लागणार आहेत. ग्राहकांना ही रक्कम डिलिव्हरीच्या 7 दिवस अगोदर द्यावी लागणार आहे, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. हरियाणात गुरुग्राम इथल्या या ईव्ही उत्पादकाने हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम यूपीमध्ये पार्टनर्सचं नेटवर्क उभारलं आहे. डिटेलच्या ई-बाइकची वैशिष्ट्यं ईव्ही इझी प्लस सिल्व्हर ग्रे आणि मेटॅलिक रेड या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. ईव्ही इझी प्लस सिंगल चार्जिंगमध्ये 60 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकेल. या बाइकचा टॉप स्पीड (Top Speed) 25 किलोमीटर प्रतितास आहे. यात चालकाच्या सीटखाली 20 Ahची बॅटरी बसवण्यात आली आहे. ही बॅटरी कोणत्याही 5 अॅम्पिअरच्या स्लॉटद्वारे चार्ज होऊ शकते. या बाइकच्या दोन्ही चाकांना ड्रम ब्रेक (Drum Break) बसवण्यात आले असून, बाइकचा ग्राउंड क्लिअरन्स 170mm आहे. ईएमआयची सुविधा डिटेल इंडिया कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, इझी प्लसच्या ग्राहकांना रोडसाइड असिस्टन्स, सर्व्हिसेस आणि इन्शुरन्सची सुविधा देण्यात येईल. याशिवाय तुम्ही ही बाइक फायनान्सवर खरेदी करू इच्छित असाल तर ती तुम्हाला सुलभ हप्त्यांवर घरी घेऊन जाता येईल. कंपनीला देशात इलेक्ट्रिक बाइक्सचं प्रमाण वाढवायचं आहे. त्यामुळे या ई-बाइकची किंमत अन्य ई-बाइक्स आणि स्कूटर्सच्या तुलनेत कमी ठेवण्यात आली आहे; मात्र तंत्रज्ञानात कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही, अशी माहिती डिटेल इंडियाचे संस्थापक डॉ. योगेश भाटिया यांनी दिली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18068/", "date_download": "2022-10-07T22:21:08Z", "digest": "sha1:CSWVIKGKS5C2EWYQNAXLJ7BTFLS5ZC5P", "length": 15922, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "चावडी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nचावडी : गावातील शासकीय कारभाराचे–ग्रामपंचायतीचे–केंद्रस्थान म्हणून भारतीय ग्रामजीवनात ‘चावडी’ या संस्थेला परंपरागत महत्त्व आहे. ‘चौहाट’ या संस्कृत शब्दावरून ‘चावडी’ हा शब्द बनला असावा. गावात शासकीय प्रमुख असलेला पाटील किंवा कोतवाल याची कचेरी या चावडीत भरत असे. देऊळ, धर्मशाळा यांच्याप्रमाणेचावडी ही लहान-मोठ्या अशा सर्वच गावांत दिसून येत असे. गावगाड्याचे विषय सामूहिक रीत्या चर्चिण्याकरिता, गावातील तंटेबखेड्यांच्या बाबतीतील न्यायनिवाड्याकरिता लोक चावडीवर जमत. त्याबद्दलच्या तक्रारींची नोंदही चावडीवर होत असे. करवसुलीसाठी आलेला कारकून, पोलीसपाटील, रामोशी, पांथस्थ वगैरे चावडीवर मुक्काम करीत. चावडीवर मनोरंजनार्थ, गप्पागोष्टी करण्यासाठी तसेच भजन-कीर्तनासाठी ग्रामस्थ जमत. अलीकडे समाजमंदिर, बस-स्थानक इ. समुदाय-केंद्रे अस्तित्वात आल्याने चावडीचे महत्त्व कमी झाले आहे. ग्रामपंचायतीप्रमाणेच व्यक्तीवर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणून जातपंचायतीलाही पूर्वी महत्त्व होते. म्हणून प्रत्येक जातीची अशी वेगळी जातचावडी त्या त्या जातीच्या वस्तीत दिसून येत असे. जातपंचायतीचे अधिकार आधुनिक काळात नाहीसे झाले असले, तरी जातीचे हितसंबंध जपण्याच्या आवश्यकतेनुसार व जातीय भावनेस अनुसरून आजही काही गावांत जातपंचायत व जातचावडी अस्तित्वात आहेत. सार्वजनिक चावडीस पंचायत कचेरी हे नाव अलीकडे प्राप्त झाले आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/astrology/horoscope-today-19-august-2022-daily-astrology-rashi-bhavishya-in-marathi-msr-87-3079128/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-07T22:34:18Z", "digest": "sha1:KFML6XLNMIIMYLS3FY5WQWF3RYOIH5BP", "length": 21247, "nlines": 275, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Horoscope Today 19 August 2022 Daily Astrology Rashi Bhavishya In Marathi msr 87 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १९ ऑगस्ट २०२२\nDaily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार मेष व्यक्तींची कलात्मक गोष्टींची ओढ वाढेल. बौद्धिक चर्चा कराल.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nआजचे राशीभविष्य ०८ ऑक्टोबर , (Dainik Rashi Bhavishya)\nToday Rashi Bhavishya, 19 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.\nकलात्मक गोष्टींची ओढ वाढेल. बौद्धिक चर्चा कराल. जुन्या आठवणींनी मनाला समाधान मिळेल. खर्चासाठी हात आवरता घ्यावा. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल.\n“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला\nShinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\n“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप\nबोलण्यातून समोरच्यांची मने जिंकाल. हातातील कामात खंड पडू देऊ नका. घरातील कामांची जबाबदारी वाढेल. मनात उगाच शंका आणू नका. आरोग्याबाबत हलगर्जीपणा करू नका.\nआपल्या निर्णयावर ठाम राहावे. लोकांशी वैयक्तिक संपर्क टाळावा. आवडीच्या गोष्टी करण्यात अधिक रमून जाल. अनावश्यक गोष्टींसाठी खर्च होऊ शकतो. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल.\nसर्वांशी आपुलकीने वागा. बाहेरील लोकांना भेटणे टाळा. जबाबदारीची जाणीव जागृत ठेवा. प्रिय व्यक्तीची भेट होईल. हौसेवर पैसे खर्च कराल.\nमित्रांशी गप्पा रंगतील. स्वप्नातून बाहेर येऊन कामाला लागा. मनातील खिन्नता काढून टाकावी. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या कामाची शाबासकी मिळेल.\nघरातील वातावरण आनंद देऊन जाईल. वरिष्ठांशी शांतपणे वागा. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. विनाकारण कुणाच्या मदतीला धावू नका. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या.\nउत्तम वाचनाचा आनंद घ्याल. तिखट पदार्थ टाळा. भावंडांसाठी पैसा खर्च होईल. एखादी नवीन योजना सुचेल. शांत राहून मानसिक स्वास्थ्य अनुभवा.\nमुलांवरील खर्च वाढेल. आपल्या बोलण्यातून कोणी दुखवणार नाही याची दक्षता घ्या. अधिकार जपून वापरा. वादाचे प्रसंग टाळावेत. संपर्कातील लोकांशी फटकून वागू नका.\nसमोरच्याचे शांतपणे ऐकून घ्यावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. आर्थिक बाबतीत उत्तम दिवस. आहारावर नियंत्रण हवे. उत्साहाच्या भरात अनाठायी खर्च वाढू शकतो.\nछंद जोपासण्यासाठी वेळ काढावा. इतरांच्या कामात दिवस घालवाल. जुनी कामे व्यवस्थित पार पडतील. उदात्त दृष्टीकोन ठेवाल. दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाल.\nनिरूत्साह झटकून कामाला लागा. घरातील कामे मार्गी लावा. जुन्या गोष्टींबाबत मनात संभ्रम बाळगू नका. धाडस दाखवताना सारासार विचार करावा. समस्यांचे निराकरण करता येईल.\nस्वप्न पूर्ण करण्याची ताकद बाळगा. अचानक येणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवा. अति तिखट पदार्थ कमी खा. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. मुलांना वेळ द्यावा.\n– ज्योतिषी विद्याधर करंदीकर\nमराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमीन राशीतील ‘गुरु वक्री’ या राशींना त्रास देऊ शकतात; जाणून घ्या\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मेधाली, वैभवला सुवर्ण\nप्रो कबड्डी लीग : दबंग दिल्लीसमोर यू मुम्बाची हाराकिरी\nराष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा -विनोद तोमर\nभारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा\nकाँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका\nधनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण\nमध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०८ ऑक्टोबर २०२२\nपुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\nLow Uric Acid: यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होणे देखील ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ ५ गंभीर आजार\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\nMore From राशी वृत्त\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०८ ऑक्टोबर २०२२\nदिवाळीनंतर ५ ग्रह बदलणार त्यांची चाल; ‘या’ ४ राशींना लागू शकते लॉटरी\nकोणत्या राशीसाठी कोणती नोकरी ठरते लाभदायी धन व सन्मान कमवायचा असेल तर काम निवडताना…\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\nनोव्हेंबर महिन्यात शुक्रदेव करणार वृश्चिक राशीत प्रवेश; ‘या’ राशींना होऊ शकतो आकस्मिक धनलाभ\n१३ नोव्हेंबरला दोन ग्रह बदलतील त्यांची चाल; ‘या’ ६ राशीच्या लोकांना होऊ शकतो बक्कळ धनलाभ; नशीब असणार जोरावर\nनववर्षात ‘या राशींचे नशीब चमकणार फक्त.. १३ नोव्हेंबर पर्यंत धन व मन ‘या’ व्यक्तींपासून जपून ठेवा\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार ०६ ऑक्टोबर २०२२\nJupiter Transit : दिवाळीनंतर सुरु होणार ‘या’ राशींचे अच्छे दिन गुरुदेवाचा आशीर्वाद ठरणार लाभदायक\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार ०५ ऑक्टोबर २०२२\nदिवाळीनंतर ५ ग्रह बदलणार त्यांची चाल; ‘या’ ४ राशींना लागू शकते लॉटरी\nकोणत्या राशीसाठी कोणती नोकरी ठरते लाभदायी धन व सन्मान कमवायचा असेल तर काम निवडताना…\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\nनोव्हेंबर महिन्यात शुक्रदेव करणार वृश्चिक राशीत प्रवेश; ‘या’ राशींना होऊ शकतो आकस्मिक धनलाभ\n१३ नोव्हेंबरला दोन ग्रह बदलतील त्यांची चाल; ‘या’ ६ राशीच्या लोकांना होऊ शकतो बक्कळ धनलाभ; नशीब असणार जोरावर\nनववर्षात ‘या राशींचे नशीब चमकणार फक्त.. १३ नोव्हेंबर पर्यंत धन व मन ‘या’ व्यक्तींपासून जपून ठेवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/aaditya-thackeray-replied-to-union-minister-narayan-rane-in-konkan-tour-news-update-vvg94", "date_download": "2022-10-07T23:13:18Z", "digest": "sha1:MKTDGCHQ2GTZWXAC2CTKSXBOLTVFRS4W", "length": 11270, "nlines": 65, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Aaditya Thackeray News | आदित्य ठाकरेंनी दिले नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर", "raw_content": "\nआदित्य ठाकरेंनी दिले नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर; म्हणाले, 'काही लोकांवर...'\nनारायण राणे यांच्या टीकेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.\nAaditya Thackeray News : शिंदे सरकार सत्तेवर विराजमान होऊन तीन महिने झाले तरी शिवसेनेकडून शिंदे गटावर टीका सुरुच आहे. राज्यात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे. शिवसेनेकडून शिंदे गटाला 'गद्दार' म्हणून संबोधले जात आहे. गद्दार शब्दावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 'गद्दारी करणे हे त्यांच्या रक्तात आहे म्हणून ते सारखं गद्दार गद्दार म्हणत आहेत, अशा शब्दात राणे यांनी टीका केली. नारायण राणे यांच्या टीकेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.\nMaharashtra Politics : शिंदे साहेब आम्हाला मंत्रिपद देणारच; बच्चू कडूंनी व्यक्त केला विश्वास\nआदित्य ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. कोकण दौऱ्यावर शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. तसेच नारायण राणे यांच्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिलं आहे.\nशिंदे गट-भाजप यांच्या युतीचे सरकार राज्यावर विराजमान झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. आज नारायण राणे यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधता दिले. 'काही लोकांवर बोलायची पात्रता नाही', अशा एका वाक्यात आदित्य ठाकरे यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिले.\n'बंडखोर आमदारांच्या रक्तात शिवसेना असती तर, आसाममध्ये महापूर आला होता त्यावेळी त्यांनी तिथं मदत केली असती. मला दुःख जास्त याच वाटतंय की, बाळासाहेबांचे विचार म्हणणारे जेव्हा उद्धव साहेबांनी राजीनामा दिला तेव्हा नाचत होते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.\nआदित्य ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 'मुख्यमंत्र्यांना माहितीही नव्हतं की वेदांता प्रकल्प काय आहे हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे तात्पुरते मुख्यमंत्री म्हणतोय कारण हे सरकार कोसळणार आहे. प्रकल्प कुठे गेला याचं काही नाही, पण उद्योग मंत्र्यांना माहितही नाही की प्रकल्प गेला कसा हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे तात्पुरते मुख्यमंत्री म्हणतोय कारण हे सरकार कोसळणार आहे. प्रकल्प कुठे गेला याचं काही नाही, पण उद्योग मंत्र्यांना माहितही नाही की प्रकल्प गेला कसा या प्रकल्पामुळे तरुणांना नोकरी मिळाल्या असत्या.\n'मुख्यमंत्री अनेक वेळा दिल्लीला गेलेला आहात. दिल्लीसमोर जाऊन झुकून आलेला आहात. महाराष्ट्रात एकदा दिल्लीला जा. नवरात्रोत्सव येतोय, त्यांना फिरून रेकॉर्ड करायचा आहे. दहीहंडीची अनेक मंडळ मला येऊन भेटताहेत, म्हणत आहेत की खेळाचा दर्जा केव्हा मिळेल त्यामुळे गोविंद्याला अजूनही विमा मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांकडून नुसत्या घोषण्या केल्या जात आहेत', असेही आदित्य ठाकरे म्हणाले.\nमुख्यमंत्र्याच्या भाषणादरम्यान विद्यार्थ्यांची घोषणाबाजी; मुख्यमंत्री म्हणाले, अरे आम्हाला दोन महिने...\nकाय म्हणाले होते नारायण राणे \nनारायण म्हणाले होते की, 'आदित्य ठाकरे यांना दुसरं काही येत नाही. त्यांना काही माहित नसते. ते बालिश आहे. मला त्यांच्याबद्दल काही प्रश्न विचारू नका. मागच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढले. पण उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. गद्दारी करणे हे त्यांच्या रक्तात आहे, त्यामुळे ते सारखे गद्दार गद्दार म्हणत आहेत.एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांना साथ दिली म्हणून आज शिवसेना उभी राहिली. ते लोणी आज आदित्य ठाकरे खात आहेत'.\n'आम्हाला बोलायला लावू नका. मातोश्रीतील आतल्या आणि बाहेरच्या नको त्या गोष्टी सर्व सांगू. त्यामुळे आदित्य ठाकरे गप्प बसा. तु्म्ही शिवसैनिकांना काय दिलं आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला तर काय फरक पडतो आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला तर काय फरक पडतो तुम्ही विरोधी पक्षात आहे. त्यामुळे तुम्हाला रस्त्यावर यायला हवं. आदित्य ठाकरे यांच्याबाबत मला प्रश्न विचारू नका, तो वेड्या सारखा बडबड करत आहे. अडीच वर्ष उद्धव ठाकरे पिंजऱ्यात बसला होता', असेही नारायण म्हणाले होते.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/national/social-activist-teesta-setalvad-remanded-in-police-custody-till-july-2-au42-745806.html", "date_download": "2022-10-07T22:00:58Z", "digest": "sha1:2QR6GAK3MRRBVPNCOML4BIMWT3VC7XSC", "length": 11260, "nlines": 190, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nTeesta Setalvad : सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी; अहमदाबाद कोर्टाचा निकाल\nतीस्ता सेटलवाड यांना 2 जुलै रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 1 जुलै रोजी अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथयात्रा आहे. त्यामुळे त्या दिवशी पोलीस बंदोबस्तात गुंतलेले असतील. याच कारणास्तव सेटलवाड यांना दुसर्‍या दिवशी म्हणजेच 2 जुलै रोजी न्यायालयापुढे हजर केले जाईल, असे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.\nतीस्ता सेटलवाड यांच्यासह चौघांवर आरोपपत्र दाखल\nवैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम |\nनवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड (Teesta Setalvad) आणि माजी आयपीएस अधिकारी आर. बी. श्रीकुमार (R.B. Shrikumar) या दोघांना आज गुजरातमधील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. गुजरातच्या अहमदाबाद क्राईम ब्रँचने या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यासाठी विनंती केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची ही विनंती अमान्य करीत 2 जुलैपर्यंत कोठडी मंजूर केली. तिस्ता सेटलवाड आणि माजी आयपीएस आरबी श्रीकुमार यांना आज अहमदाबाद मेट्रोपॉलिटन कोर्टाच्या खोली क्रमांक 22 मध्ये हजर करण्यात आले होते.\nतपासासाठी विशेष पथक स्थापन\nगुजरातचे डीजीपी आशिष भाटिया यांनी तीस्ता सेटलवाड प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या टीममध्ये एटीएसचे डीआयजी दीपन भद्रन, डीसीपी क्राइम चैतन्य मंडलिक, एसपी सुनील जोशी आणि एसओजीचे एसीपी बीसी सोलंकी हे सदस्य असणार आहेत. तीस्ता सेटलवाड यांना 2 जुलै रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 1 जुलै रोजी अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथयात्रा आहे. त्यामुळे त्या दिवशी पोलीस बंदोबस्तात गुंतलेले असतील. याच कारणास्तव सेटलवाड यांना दुसर्‍या दिवशी म्हणजेच 2 जुलै रोजी न्यायालयापुढे हजर केले जाईल, असे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. पोलिसांच्या विनंतीवरून न्यायालयाने तीस्ता सेटलवाड आणि आरबी श्रीकुमार यांना 2 जुलै रोजी दुपारपर्यंत हजर करण्याची परवानगी दिली आहे.\nसेटलवाड यांना 25 जून रोजी मुंबईतून ताब्यात घेतले\nतिस्ता सेटलवाड यांना शनिवारी 25 जून रोजी मुंबईतील जुहू येथील घरातून ताब्यात घेण्यात आले. यानंतर एटीएसने त्यांना अहमदाबाद गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले. यानंतर श्रीकुमार आणि तीस्ता सेटलवाड यांच्या अटकेबाबत अहमदाबाद क्राइम ब्रँचने पत्रकार परिषदेत माहिती दिली. (Social activist Teesta Setalvad remanded in police custody till July 2)\nShrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल\nNagpur Crime : नागपुरात 4 वर्षीय मुलीचं अपहरण, खंडणीसाठी केला फोन, दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात\nBlogger Ritika Singh Murder: प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती पत्नी, संतापलेल्या पतीने असा काढला काटा\nटू पीसमध्ये इलियाना डिक्रूझची हवा हवाई\n‘संस्कारी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीचे संस्कारी रूप\nनोरा फतेहीची रिवीलिंग जादू पाहिली का\nमौनी रॉयचा केसरिया रंग…. फोटोशूटसाठी पहा काय केलं\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2019/09/blog-post_8.html", "date_download": "2022-10-07T21:19:47Z", "digest": "sha1:O2VHGUVTGJWAYUUYH75Z6A5FYS6R7XB6", "length": 23141, "nlines": 219, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "नजरकैदेचे राजकारण | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nजम्मू काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि श्रीनगरचे खासदार डॉ. फारुक अब्दुल्ला यांना ‘‘द जम्मू अँड काश्मीर पब्लिक सेफ्टी अ‍ॅक्ट, १९७८' या कायद्यांतर्गत १२ दिवसांकरिता अटक करण्यात आली आहे. या अटकेबाबत राहूल गांधी यांनी म्हटले आहे की ‘राष्ट्रवादी नेते फारुख अब्दुल्ला यांचे राजकीय स्थान संपवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, तसे झाले तर त्यांची जागा दहशतवादी घेतील. त्यानंतर मग काश्मीरचा वापर कायम भारताच्या इतर भागात राजकीय ध्रुवीकरणासाठी केला जाईल,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यापूर्वी त्यांचे पुत्र व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती यांनादेखील ५ ऑगस्ट रोजी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख अब्दुल्ला आणि बेगम अकबर जहान अब्दुल्ला यांच्या घरी डॉ. फारुक अब्दुल्ला यांचा जन्म झाला. जयपूरचे सवाई मानसिंग कॉलेजमधून मेडिकलचे शिक्षण पूर्ण करून डॉ. अब्दुल्ला लंडनमध्ये प्रॅक्टिस करीत होते आणि तेथेच मौली अब्दुल्ला यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पुढे सारा पायलट आणि उमर अब्दुल्ला यांचा जन्म झाला. मग १९८२ मध्ये त्यांचे पिता शेख अब्दुल्ला यांच्या निधनानंतर काश्मीर राज्याचे ते मुख्यमंत्री बनले. या पदावर ते तीन वेळा विराजमान झाले आणि संपूर्ण काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री असल्याचा कीर्तिमानदेखील त्यांच्याच नावावर आहे. सन १९८९ मध्ये जेव्हा डॉ. अब्दुल्ला यांचे राजकीय विरोधक आणि त्यांच्यासारखेच काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मुहम्मद सईद यांची कन्या रुबियाचे अपहरण ‘जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट’ (जेकेएलएफ) द्वारा करण्यात आले होते आणि त्या मोबदल्यात त्यांनी काही दहशतवाद्यांना सोडून देण्याची अट घातली होती. केंद्रातील तत्कालीन व्ही. पी. सिंग यांच्या सरकारने ही अट मान्य केली होती मात्र डॉ. अब्दुल्ला यांनी दहशतवाद्यांना सोडून देण्यात स्पष्ट नकार दिला होता. तेव्हा ते म्हणाले होते की जर आज आम्ही यांना सोडून दिले तर उद्या अशा प्रकारची शंभर कामे सुरू होतील आणि आपण या दहशतवांद्यांच्या हातचे बाहुले बनून राहू. जर कोणी त्यांची कन्या साराचे अपहरण केले असते आणि तिच्या बदल्यात दहशतवाद्यांना मी मुक्त केले नसते. यानंतर केंद्रीय मंत्री आणि सध्याचे केरळचे राज्यपाल आरिफ मुहम्मद खान यांच्यावर डॉ. अब्दुल्ला यांची मनधरणी करण्याचे काम सोपविण्यात आले आणि त्यात त्यांना यशही आले. डॉ. अब्दुल्लांचा नकार असूनदेखील दहशतवाद्यांना सोडून द्यावे लागले आणि पुढील काळात त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. त्यानंतर ‘एअर इंडिया आयसी८१४’चे अपहरण याचे बोलके उदाहरण आहे. सन १९९६-२००२ पर्यंत डॉ. अब्दुल्ला काश्मीरचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या कार्यकाळात दहशतवादाला अंकुश लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच सन २००२ मधील निवडणुकीत १९९६ च्या तुलनेत राज्यात अधिक मतदान झाले होते. सन १९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरू होते तेव्हा डॉ. अब्दुल्ला कारगिलला गेले होते. ते हेलिकॉप्टरमधून मिलिटरी कॅम्पकडे जात असताना पाकिस्तानी आर्टिलरीतून जोरदार गोळीबार सुरू होता. तेव्हा दिल्लीत बसलेल्या प्रधानमंत्री वाजपेयी यांच्या समर्थनाने कारगिल युद्ध लवकर समाप्त करण्यात मदत केली होती. ही गोष्ट डॉ. अब्दुल्ला यांनी इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये सांगितली होती. सन १९५३ मध्ये पंडित नेहरू यांच्या आदेशावरून डॉ. अब्दुल्ला यांचे पिता व तत्कालीन काश्मीर राज्याचे प्रधानमंत्री शेख अब्दुल्ला आणि त्यांचे सहकारी मिर्झा अफजल बेग यांना ‘काश्मीर कॉन्स्परेसी केस’संदर्भात अटक करण्यात आली होती. या खटल्यात या दोघांवर देशविघातक कारवाया करण्याचा आरोप लावण्यात आला होता. या खटल्याच्या निकालानंतर शिक्षेच्या अंमबजावणीनुसार सुमारे ११ वर्षे शेख अब्दुल्ला कारागृहात होते. १९६४ मध्ये पं. नेहरू यांच्या मृत्युपूर्वी काही महिनेच त्यांची कारागृहातून मुक्तता करण्यात आली होती. तेव्हा काश्मीर समस्येच्या अनेक जाणकारांनी या कारवाईस पं. नेहरूंची सर्वांत मोठी चूक असल्याचे म्हटले होते. सध्या अशादेखील बातम्या आहेत की कस्रfचत डॉ. अब्दुल्ला यांना २ वर्षे कारागृहात काढावी लागतील. तसे पाहिले तर सध्या मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री अगोदरपासूनच नजरकैदेत आहेत आणि एक माजी मुख्यमंत्री म्हणजे गुलाम नबी आझाद यांना नुकतीच काश्मीरला जाण्याची सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. यावरून असे वाटते की पं. नेहरूंनी केलेल्या चुकीची पुरावृत्ती मोदीजी करीत नाहीत ना सध्या नजरकैदेत असलेले काश्मीरचे राजकारण पाहता केंद्र सरकारने डॉ. फारुक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती यांना सोडून देऊन संपूर्ण राज्यात निवडणुकीची घोषणा करावी आणि आणि स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा कारण या बाबतीत राजकीय पक्षांचीच केंद्र सरकारला मदत होऊ शकते.\nLabels: शाहजहान मगदुम संपादकीय\nसत्याची साक्ष - भाग-6\nमानवतेच्या कल्याणास्तव जमाअतचे प्रशिक्षण शिबीर\nडोळ्यात खुपणार्‍या कोणत्याही राज्याची भविष्यात हीच...\nशरद पवारांच्या सक्रीयतेने राज्यात भाकरी फिरणार\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nउत्सव आनंदाचा साजरा करायचा असतो विध्वंसाचा नव्हे \nहैदराबाद मुक्तीचा दुर्लक्षित इतिहास\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nशहादत-ए-हुसैन दु:खाचे नव्हे तर प्रेरणेचे स्त्रोत आहेत\nपूरग्रस्तांसाठी पाठविली 40 हजारांची औषधे\nआपल्या अस्तित्वाला उपयोगी सिद्ध करा\nकाश्मीर : स्वर्गाचा घात आणि फाळणीच्या नरकाचा ध्यास\nमहापूर ओसरला; अडचणी कायम\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०१९\nभाग्यावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशापुढे आर्थिक मंदीचे आव्हान\nमुस्लिम समाजाविषयीचा अहवाल आणि पोलिसांची मानसिकता\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nडिजिटल लोकशाही बदलते आयाम\nमहानगरी स्त्रियांना येणारे जातिभेदाचे अनुभव\nसत्याची साक्ष - भाग-5\nएकमेकांना भेटण्याचे इस्लामी शिष्टाचार\nएनआरसी : डोंगर पोखरून निघाला उंदीर\nद्वेषाने गाठला परमोच्च बिंदू\nजमीयत उलेमा ए हिंदतर्फे मुस्लिम बोर्डिंग येथे पूरग...\nसावित्रीबाई फुले रुग्णालयाला औषधांचा साठा प्रदान\nआजची युवापिढी व्यसनाच्या आहारी\nपवित्र कुरआनवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nविकासासाठी शाश्वत उपायांची गरज\nभारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पोहोचवलाय काय\nश्रद्धा - अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकेाण\nकाश्मीर : आयएएस अधिकार्‍याचा राजीनामा\n०६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.economictimes.com/business-news/gold-silver-rate-today-16th-sept-2022-crash-by-2-thousand-rupees-in-2-week-in-mumbai/articleshow/94349414.cms", "date_download": "2022-10-07T23:14:27Z", "digest": "sha1:DGGQHYYR53AA7UMX4WEHE4AJLMYC2NSE", "length": 6237, "nlines": 38, "source_domain": "marathi.economictimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nGold Rate today : एका आठवड्यात सोने तब्बल 2 हजार रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर\nGold Price Today : देशांतर्गत बाजाराबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातही या कमोडिटीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या सहा दिवसांत सोन्याच्या दरात दोन हजारांहून अधिक घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात जेथे सोन्याचे वायदे 51,000 च्या वर राहिले होते, आता त्याची किंमत 49,100 च्या आसपास आली आहे.\nGold Price Today 21 sept 2022 : सराफा बाजारात सोन्याची घसरण सुरूच आहे. देशांतर्गत बाजाराबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातही या कमोडिटीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या सहा दिवसांत सोन्याच्या दरात दोन हजारांहून अधिक घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर 51,000 च्या वर राहिले होता, आज सोन्याचे दर 50 हजाराच्याही खाली आले आहेत.\nमल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे दर 30 रुपयांनी घसरून 49,145 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होते. गेल्या सत्रात सोने 49175 रुपये प्रति तोळेवर बंद झाले होते. तर चांदीचे दर एमसीएक्सवर 56,551 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होते.\nअमेरिकी बाजारातही सोने चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली. अमेरिकेत सोन्याची 7.10 डॉलरने घसरण होऊन 1671.10 डॉलर प्रति औंस नोंदवली गेली.\nसोन्याचे दागिने किरकोळ विक्री दर\n- 24 कॅरेट 4,937 रुपये प्रति ग्रॅम\n- 22 कॅरेट- 4,818 रुपये प्रति ग्रॅम\n- 20 कॅरेट- 4,394 रुपये प्रति ग्रॅम\n- 18 कॅरेट- 3,999 रुपये प्रति ग्रॅम\n- 14 कॅरेट- 3,184 रुपये प्रति ग्रॅम\nचांदी (999) - 56,354 रुपये प्रति किलो\nदेशांतर्गत बाजारपेठांमध्ये सोने चांदीच्या दरांमध्ये असलेल्या अस्थिरतेचा परिणाम मुंबईतील सराफा बाजारातही दिसून आला. आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर 49,960 प्रति 10 ग्रॅमच्या आसपास व्यवहार करीत होते तर चांदीचे दर 56,600 रुपये प्रति किलोच्या आसपास व्यवहार करीत होते.\nसोन्याचे दर 50 हजारांच्या खाली आल्याने गुंतवणूकदार आणि किरकोळ खरेदीदारांसाठी सोने खरेदीची संधी निर्माण झाली आहे. सोन्याच्या सर्वकालीन उच्चांक 56 हजार प्रति तोळेच्या आसपास आहे. त्यामुळे आजच्या दरांप्रमाणे सोने सर्वकालीन उच्चांकापेक्षा तब्बल 6-7 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे.\nAirAsia Free Seat Offer: एअर एशियाची शानदार ऑफर, 50 लाख मोफत तिकिटांची विक्री, 'ही' आहे बुकिंगची शेवटची तारीखमहत्तवाचा लेख", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://nmk.org.in/armed-forces-tribunal-recruitment/", "date_download": "2022-10-07T22:21:43Z", "digest": "sha1:27ZFXPU62TA43HQ4LJ44XQ2I7CGTJSZA", "length": 2941, "nlines": 47, "source_domain": "nmk.org.in", "title": "[AFT] सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रादेशिक खंडपीठ (दिल्ली) पदभरती. - NMK.ORG.IN", "raw_content": "\n[AFT] सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रादेशिक खंडपीठ (दिल्ली) पदभरती.\n[AFT] सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रादेशिक खंडपीठ (दिल्ली) येथे विविध पदासाठी भरती सुरु असून अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.\nन्यायाधिकरण मास्टर, कनिष्ठ लेखा अधिकारी, अपर डिव्हिजन लिपिक, कुलसचिव, सहनिबंधक, उपनिबंधक, प्रधान खासगी सचिव, खाजगी सचिव, विभाग अधिकारी, सहाय्यक,वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, लेखा उप-नियंत्रक,सहाय्यक निबंधक.\nपात्रता : अधिक माहिती साठी जाहिरात पहा.\nशेवटची तारीख : ३१ डिसेंबर २०२०.\nपत्ता : सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान पीठ, पश्चिम ब्लॉक- VIII, सेक्टर- १, आरके पूरम, नवी दिल्ली, पिनकोड- ११००६६.\nअधिकृत वेबसाईट : भेटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2021/04/blog-post_85.html", "date_download": "2022-10-07T21:32:57Z", "digest": "sha1:TZG7YEZZJXQFE42F347AMRXZY54QQB3D", "length": 24500, "nlines": 232, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "आज्ञाधारकतेसाठी ज्ञानाची व विश्वासाची गरज | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआज्ञाधारकतेसाठी ज्ञानाची व विश्वासाची गरज\nइस्लाम म्हणजे परमेश्वराची आज्ञा मानणे होय. परंतु जोपर्यंत मनुष्याला काही गोष्टींचे ज्ञान प्राप्त होत नाही व त्यावर त्याचा विश्वास असत नाही तोपर्यंत तो परमेश्वराचा आज्ञाधारक होऊच शकत नाही.\nसर्वप्रथम मनुष्याला परमेश्वर आहे हा विश्वास असला पाहिजे. त्याला हे ही माहित असले पाहिजे की परमेश्वर फक्त एकच आहे जेणेकरून तो दुसऱ्यासमोर हात जोडणार नाही. परमेश्वर सर्व काही बघत आहे व ऐकत आहे हा विश्वास ज्याला असेल तो त्या परमेश्वराची आज्ञाभंग करणार नाही. इस्लामवर चालण्यासाठी ज्या विचारांची व कर्मांची आवश्यकता आहे ते परमेश्वराला ओळखल्याशिवाय व्यक्तीत येणार नाहीत व तो वाईट विचारांनी व परमेश्वराच्या मर्जीविरूद्ध काम करण्यापासून तो स्वतःला वाचवेल.\nयानंतर मनुष्याला परमेश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा मार्गही माहित असायला हवा. कुठल्या गोष्टी करायला हव्यात व कुठल्या गोष्टींपासून दूर रहायला हवे हे माहित पाहिजे.\nयासाठी त्याला परमेश्वराने मानवांसाठी जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचे ज्ञान असले पाहिजे. त्याला जर नियमच माहित नसतील तर तो पालन कशाचे करणार मनुष्याला परमेश्वराची आज्ञा पाळण्याचे फळ काय मिळणार आहे व आज्ञाभंगाची काय शिक्षा मिळणार आहे हे पण माहित असायला हवे. त्यासाठी त्याचा पारलौकीक जीवनावर परमेश्वराच्या न्यायालयात सादर होण्यावर, आज्ञाधारकतेच्या बक्षीसावर व आज्ञाभंगाच्या शिक्षेवर विश्वास असला पाहिजे. ज्याला आखिरतच्या जीवनावर विश्वास नाही तो आज्ञाधारक राहणार नाही. त्याच्यासाठी आज्ञाधारक व्यक्ती व आज्ञाभंग करणारा व्यक्ती दोन्ही समान आहेत. दोन्ही मातीत मिळणार आहेत. काही व्यक्तींना आखिरत (पारलौकिक) चे ज्ञान असते पण ते त्यावर विश्वास ठेवत नाहीत ते भटकलेले आहेत.\nवरील भागात आपण ज्ञान व विश्वास पाहिला ते म्हणजेच ईमान. ईमान म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेणे व त्यावर विश्वास ठेवणे. जो व्यक्ती परमेश्वराच्या एक असण्यावर आणि त्याच्या नियमांना जाणतो व त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो, तो मोमिन (ईमान असणारा) असतो आणि ईमान असणारा व्यक्ती ’मुस्लिम’ म्हणजेच परमेश्वराच्या आज्ञाधारक बनतो.\nईमान असल्याशिवाय कुठलाही व्यक्ती मुसलमान बनू शकत नाही. ईमान हे मुसलमानरूपी झाडाचे बीज आहे. ईमान व इस्लामच्या दृष्टीने मनुष्याचे चार प्रकार पडतात.\n1. जे ईमान राखतात आणि परमेश्वराच्या आज्ञेचे काटेकोरपणे पालन करतात हे सच्चे मुस्लिम आहेत.\n2. जे ईमान तर राखतात पण पूर्णपणे परमेश्वराचे आज्ञाधारक नसतात हे मुसलमान तर आहेत पण गुन्हेगारसुद्धा आहेत.\n3. ज्यांच्याकडे ईमान असत नाही पण त्यांचे कर्म परमेश्वराच्या नियमाप्रमाणेच असतात हे लोक बंडखोर आहेत.\n4. जे ईमान राखत नाहीत व वाईट कृत्ये करतात हे लोक सर्वात खालच्या दर्जाचे आहेत. हे बंडखोर तर आहेतच तसेच समाजात अशांतता पसरविणारे सुद्धा आहेत.\nपरमेश्वराने निसर्गातच आपल्या असण्याचे संकेत दिलेले आहेत. पण मनुष्याची बुद्धी व त्याचे कौशल्य बहुदा त्या संकेतांना समजण्यात चुका करतो. कोण म्हणतो ’आनंद’ देव आहेत, कोण म्हणतो ’अग्नीचा’ देव वेगळा, ’हवेचा’ देव वेगळा म्हणजे वेगवेगळ्या शक्तींचे वेगवेगळे देव व त्या देवांचा एक वेगळा देव. हे लोक अज्ञानी आहेत.\nआखिरतच्या जीवनासंबंधीही बरेचसे गैरसमज आहेत. काही म्हणतात मृत्यूनंतर पुन्हा जीवन नाही. काही म्हणतात मनुष्य पुन्हा पुन्हा या धरतीवर जन्म घेईल व त्याला त्याच्या कृत्याचे फळ मिळेल.\nपरमेश्वराने आपल्याला ज्ञानापासून वंचित ठेउन आपली कठोर परीक्षा घेतली नाही. परमेश्वराने मनुष्यांमध्येच असे मनुष्य जन्माला आणले ज्यांनी परमेश्वराचे खरे ज्ञान मनुष्याला दिले. मनुष्य म्हणजेच अल्लाहचे पैगंबर किंवा अल्लाहचे नबी. अल्लाहने त्यांना जे ज्ञान दिले त्याला ’वह्य’ असे म्हणतात आणि ज्या पुस्तकात अल्लाहने हे ज्ञान दिले ते पुस्तक (कुरआन ग्रंथ) अल्लाहचा संवाद आहे. आता मनुष्याची खरी परीक्षा आहे की तो पैगंबरांच्या पवित्र जीवनाला व त्यांच्या उच्च ज्ञानाला बघून त्यांच्यावर ईमान आणतो की नाही. जो मनुष्य सतप्रवृत्तीचा आहे तो पैगंबरावर ईमान आणेल पण ज्याने सद्सद्विवेकबुद्धीचा त्याग केला आहे तो यापासून वंचित राहील.\nजेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसते तेव्हा आपण ज्ञान असणाऱ्याचा शोध घेतो व त्याने सांगितलेल्या गोष्टी पाळतो. आपण आजारी असतो तेव्हा डॉ्नटरांकडे जातो. त्याने दिलेले औषध घेतो. आपल्याला त्या औषधांबद्दल काही माहित नसते तरी आपण डॉ्नटरावर विश्वास ठेवून ते औषध घेतो. याचाच अर्थ असा की आपल्याला पृथ्वीच्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान मिळवण्यासाठी कोण्या जाणकारावर ईमान ठेवावा लागतो व त्याने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करावे लागते यालाच परोक्षावर ईमान असणे किंवा गैबवर ईमान असणे म्हणतात. परोक्षावर ईमान असणे म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट माहित नाही व आपण ती गोष्ट जाणणाऱ्यांवर विश्वास ठेवतो. आपल्याला परमेश्वराबद्दल काही माहित नाही, आपल्याला परमेश्वर खुश होईल असे जीवन जगण्याचा मार्ग माहित नाही. आखिरतच्या जीवनाबद्दल माहित नाही. या गोष्टींचे ज्ञान आपल्याला तेव्हा होते जेव्हा आपल्याला एक असा व्यक्ती मिळते जी सतप्रवृत्ती असणारी, परमेश्वराला मानणारी व पवित्र असतेे. तिला परमोच्च ज्ञान असते. त्या व्यक्तीला बघून आपल्याला हा विश्वास बसतो की, ही व्यक्ती जे बोलेल ते सत्य बोलेल. हे विश्वास करणे म्हणजेच परोक्षावर ईमान असणे विश्वास असणे. अल्लाहच्या आज्ञा पाळण्यासाठी व त्याच्या ईच्छेनुसार जीवन जगण्यासाठी परोक्षावर ईमान आवश्यक आहे. पैगंबराशिवाय आपल्याला हे ज्ञान मिळू शकणार नाही व आपण इस्लामच्या मार्गावर चालू शकणार नाही. (संदर्भ : दीनियात)\n- अबु सकलैन रफिक अहमद पटेल\n०७ मे ते १३ मे २०२१\nअमेरिकेचा अफगाणिस्तानला ‘खुदा हाफीज\nआजची परिस्थती अन जकात व्यवस्थेची गरज\nसंयुक्त समाजात राहण्याचे इस्लामी शिष्टाचार\nकोव्हीड लस : विज्ञान आणि राजकारण\nसूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nअल्लाहची उपासना आणि सर्वोत्तम मुस्लिम\n३० एप्रिल ते ०६ मे २०२१\nसंवाद हरला तरी चालेल पण मनं जिंकायला हवीत\nआज्ञाधारकतेसाठी ज्ञानाची व विश्वासाची गरज\nधर्मपरिवर्तन आणि दलित-मुस्लिम एकतेचे सूत्र\nगुजरात राज्यात महिलांची अवस्था\nरमजानचे रोजे आणि सामाजिक योगदान\nसूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nयुगांडाच्या राष्ट्राध्यक्षांचे जनतेला उद्देशून भाषण\n२३ एप्रिल ते २९ एप्रिल २०२१\nरमजान मनं, शरीर शुद्धीचाही महिना\n१६ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१\nपुन्हा संधी रमजान पाहण्याची...\nमुस्लिम समाजाला सामाजिक अभियांत्रिकीची गरज\nमौलाना वली रहेमानी यांचे निधन\nमुस्लिमांची ज्ञानविज्ञानाच्या जगतातही मक्तेदारी\nसूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nकोरोनाचा उद्रेक : लॉकडाऊन\nकायद्याच्या गैरवापरावर अंकुश लावण्याची हीच वेळ आहे\nकोरोना पसरवल्याचा आरोप असलेल्या तबलिगी जमाअतच्या ल...\nकुरआनचे पहिले आणि अंतिम उद्दिष्ट मानवकल्याण आहे\nसूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशात ९० टक्के सरकारी अधिकारी व राजकीय पुढारी भ्रष...\nह्या देशाच्या संपत्तीचा मालक कोण\n०९ एप्रिल ते १५ एप्रिल २०२१\n०२ एप्रिल ते ०८ एप्रिल २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/drink-2-sips-of-amla-juice-every-morning-an/", "date_download": "2022-10-07T21:13:16Z", "digest": "sha1:3LS6TIJGI6HKTBYYBGKZ4VW3PF7TMN4C", "length": 4923, "nlines": 45, "source_domain": "mahaupdate.in", "title": "रोज सकाळी 2 घोट आवळ्याचा रस प्या आणि 'हे' आरोग्य फायदे झटपट मिळवा! - Maha Update", "raw_content": "\nHome » रोज सकाळी 2 घोट आवळ्याचा रस प्या आणि ‘हे’ आरोग्य फायदे झटपट मिळवा\nरोज सकाळी 2 घोट आवळ्याचा रस प्या आणि ‘हे’ आरोग्य फायदे झटपट मिळवा\nआवळ्याच्या रसाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जसे- फायबर, लोह, जस्त, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स, जे अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतात. त्यामुळे त्याचा ज्यूस आरोग्यदायी मानला जातो.\nआवळ्याच्या रसाचे आरोग्य फायदे\nआवळ्याचा रस नियमित प्यायल्याने शरीराचे वजन कमी होऊ शकते. हे आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करते, ज्यामुळे तुम्हाला बरेच फायदे मिळतील. यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस कोमट पाण्यासोबत घ्या. यामुळे चरबी जलद बर्न होते.\nआवळ्याचा रस अँटिऑक्सिडंट गुणधर्माने समृद्ध आहे. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी देखील आढळते, जे रक्त स्वच्छ करण्यासाठी प्रभावी आहे.\nआवळ्याचा रस नियमित प्यायल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. यामुळे त्वचेवरील मुरुम आणि डागांच्या समस्या कमी होऊ शकतात. यासाठी आवळ्याचा रस नियमित प्या. याशिवाय तुम्ही त्याचा रस थेट त्वचेवर लावू शकता.\nआवळ्याचा रस बद्धकोष्ठता, पोटदुखी, अपचन आणि गॅसच्या समस्या दूर करू शकतो. यामुळे पोटात जळजळ आणि अॅसिडिटीपासून आराम मिळतो. विशेषत: तुमच्या पोटात जंत असल्यास त्याचे सेवन करा.\nआवळ्याचा रस डोळ्यांची दृष्टी सुधारतो. याच्या मदतीने डोळ्यात पाणी येणे, खाज येणे आणि जळजळ होण्याची समस्या दूर होऊ शकते. यासाठी आवळ्याचा रस नियमित प्या.\nकेस गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करा, लवकर परिणाम जाणवेल\nहिवाळ्यात रोज खा ‘आवळ्याचा मुरंबा’ ; हे 6 फायदे वाचा, रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी रामबाण उपाय \nदररोज ‘या’ भाजीचा ज्यूस प्या, वजन कमी करण्यासोबत हे ५ फायदे होतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/the-sensational-trailer-of-boys-3-is-here/", "date_download": "2022-10-07T22:11:43Z", "digest": "sha1:UTRKJO5ZWIQPCX7WPEUPSTMALZFLYA6U", "length": 7434, "nlines": 39, "source_domain": "mahaupdate.in", "title": "'बॉईज ३' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला... - Maha Update", "raw_content": "\nHome » ‘बॉईज ३’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…\n‘बॉईज ३’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…\nमुंबई : बॉईज सिरीजने सर्वांचच भरपूर मनोरंजन केले आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर ह्या त्रिकूटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळालं. ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दंगा घातल्यानंतर ‘बॉईज ३’ काय नवीन हंगामा घेऊन येणार याकडे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. नुकताच ‘बॉईज ३’च्या संपूर्ण टीम च्या उपस्तिथीत या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहे.\n‘बॉईज ३’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे त्रिकूट आणि विदुला करत असलेल्या प्रवासाची झलक आपल्याला पाहायला मिळाली आहे. लुंगीतलं हे कमाल त्रिकूट दक्षिण दिशेला करत असलेल्या प्रवासाची ही गोष्ट आहे. त्यांच्या या प्रवासात आलेलं विदुला नावाचे वळण कोणत्या ठिकाणी या तिघांना घेऊन जाणार ते चित्रपट पहिल्या नंतरच कळणार. विदुलाचा कमाल अंदाज ,सुमंत शिंदे ,पार्थ भालेराव, प्रतीक लाड यांच्या उत्कृष्ट अभिनयाने रंगलेला हा चित्रपट येत्या १६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nचित्रपटातील ‘लग्नाळू २.o’ गाणं प्रेक्षकांना भरपूर आवडले असून विदुलाची वेगळीच छबी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. मैत्रीमध्ये एकमेकांना अडचणीत टाकणं असो किंवा त्याच अडचणीतून त्यांना बाहेर काढण्यासाठीची मदत असो मित्र नेहमीच हाजीर असतात. मैत्रीची व्याख्या नव्या अंदाजात ह्या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर यांच्यातील मैत्री खरंच खूप धमाल असणार आहे हे ट्रेलर पाहून वाटत आहे.\nया ट्रेलर बद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, ” ‘बॉईज ३’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून या चित्रपटासाठीची प्रेक्षकांची वाढती उत्सुकता पाहून खूप भारी वाटत आहे. सर्वच ‘बॉईज ३’ च्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षांवर हा चित्रपट खरा उतरेल याची मला खात्री आहे.”\nदिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर म्हणतात,” ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ ला मिळालेल तुफान प्रतिसाद पाहता मनोरंजनात भर म्हणून यंदा ‘बॉईज ३’ तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे. १६ सप्टेंबर ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सर्व प्रेक्षक वर्गाचा प्रेम आणि आशीर्वाद राहो अशी आशा आहे.”\nसुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी ‘बॅाईज ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.\nमराठी चित्रपट भाऊबळी’चा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…\n‘KGF 2’मधील नवीन गाणं ‘सुलतान’ रिलीज, सुपरस्टार यशच्या दमदार लूक पाहून व्हाल घायाळ\nLaal Singh Chadha : आयपीएलच्या फायनलमध्ये प्रदर्शित केला जाणार आमिरच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00003679-05033-000.html", "date_download": "2022-10-07T22:50:47Z", "digest": "sha1:KYRGOZBCT46WWKAVRM6V7LZFZYWZB5OF", "length": 13278, "nlines": 274, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "05033-000 | Omron Automation & Safety Services | अवर्गीकृत | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर 05033-000 Omron Automation & Safety Services खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 05033-000 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 05033-000 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00004539-521222-1.html", "date_download": "2022-10-07T21:31:28Z", "digest": "sha1:KT6J6PIAGDANJDV5IUS4J66UKWLHH6TL", "length": 13211, "nlines": 274, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "521222-1 | TE Connectivity AMP Connectors | अवर्गीकृत | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर 521222-1 TE Connectivity AMP Connectors खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 521222-1 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 521222-1 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.mensxp.com/marathi/grooming/hair-care/93734-best-hair-volumizing-hair-oils-for-men-in-marathi.html", "date_download": "2022-10-07T23:25:55Z", "digest": "sha1:6MJMNJFYA4GYL2VJ5FJXZJQQR7HHXIEP", "length": 28236, "nlines": 107, "source_domain": "www.mensxp.com", "title": "हे 5 बेस्ट हेअर ऑईल प्राॅडक्ट्स वापरल्यामुळे तुमचे केस होतील हेल्दी, साॅफ्ट आणि स्मूद | best hair volumizing hair oils for men in marathi", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nजाहिरात द्याMensXP वर सेलआमच्याबद्दलसंपर्क साधा\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nहे 5 बेस्ट हेअर ऑईल प्राॅडक्ट्स वापरल्यामुळे तुमचे केस होतील हेल्दी, साॅफ्ट आणि स्मूद\nहेअर स्टाईल आणि हेअर केअर\n· 7 मिनिटांमध्ये वाचा\nहे 5 बेस्ट हेअर ऑईल प्राॅडक्ट्स वापरल्यामुळे तुमचे केस होतील हेल्दी, साॅफ्ट आणि स्मूद\nमेन्स हेअर ग्रूमिंग दरम्यान दोन महत्त्वपूर्ण समस्यांमुळे बरेचशी पुरुष त्रासलेले असतात. या समस्या एकदा सुरु झाल्या आणि योग्य उपचार केले नाही, तर त्यांना गंभीर स्वरुप प्राप्त होते. या दोन समस्या आहेत - हेअर फाॅल आणि हेअर लाॅस \nआपल्या डोक्यावरील केसांपैकी 100 -200 केस दररोज गळत असतात. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. परंतु या अपेक्षेपेक्षा जास्त केसगळती होत असल्यास हेअर फाॅल सुरु झाला हे लक्षात येते. नियमित नाॅर्मल हेअर फाॅल होताना गळालेल्या केसांच्या जागी नवे केस येतात. वयानुसार या प्रोसेसचा वेग मंदावतो. काही वेळेस ही प्रक्रिया संपूर्णतः थांबते. यासंबंधित उपचार करवून घेण्यासाठी एक्सपर्ट्सची मदत घ्यावी लागते. नैसर्गिक किंवा शारीरिक कारणांसोबत स्ट्रेस, टेंशन अशा मानसिक कारणांमुळे या समस्यांचे प्रमाण वाढून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते.\nहेअर लाॅस या समस्येला तात्पुरत्या स्वरुपात कंट्रोल करण्यासाठी काही उपाय उपलब्ध आहेत. परंतु फायदा होण्याऐवजी साईड इफेक्ट होण्याचे जास्त चान्सेस आहेत. परिणामी केस पांढरे होणे किंवा केस सडपातळ होणे अशा घटना घडू शकतात.\nफायनल स्टेजमध्ये मेल पॅटर्न बाल्डनेस होऊन संपूर्ण टक्कल पडू लागते. हेअर फाॅल, हेअर लाॅस किंवा मेल पॅटर्न बाल्डनेस यापैकी कोणतीही समस्या उद्भवल्यास व्यक्ती त्याच्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसायला लागतो.\nटक्कल लपवण्यास मदत करतील हे 5 सोपे उपाय\nया प्राॅब्लेमशी डिल करण्याकरिता केसांशी संबंधित समस्या आणि त्यांवरील उपचार यांच्या बाबत संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.\nहेअर प्राॅब्लेम्स दूर व्हावेत म्हणून हेअर ऑईल्सचा वापर केला जातो. हेअर ऑईल्सच्या वापरामुळे केस निरोगी बनतात. केसांमध्ये तेल नसेल, तरच केस अधिक बाऊंसी होऊ शकतात असे बर्‍याच पुरुषांचे मत बनलेले आहे. मुळात हा विचार चुकीचा आहे.\nकेसांमध्ये हेअर ऑईल प्राॅडक्ट्सच्या उपयोगामुळे केसांच्या थिकनेसमध्ये वाढ होत जाते. तेलामुळे केस घनदाट बनतात. शिवाय ते चमकायला लागतात. हेअर ऑईल्सचे अजून एक वैशिष्ट असे की, याचा उपयोग करणे सोपे असते आणि याचा प्रभाव टिकाऊ स्वरुपाचा असतो.\nकेसांकरिता सर्व प्रकारे उपयुक्त असलेल्या हेअर ऑईल या उत्पादनामुळे केसांमध्ये घनता टिकून राहते. त्यासोबतच केसांच्या अंतर्गत भागांमधील समस्या नाहीशा होतात. तेलाचा नियमित वापर केल्यामुळे हेअर फाॅलशी संबंधित अँटी-हेअर फाॅल प्राॅडक्ट्स वापरण्याची गरज भासत नाही.\nया आर्टिकलमध्ये केसांची वाढ होण्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि केस बाऊंसी बनवण्यासाठी मदत करणार्‍या 5 बेस्ट हेअर ऑईल प्राॅडक्ट्सविषयी माहिती देणार आहोत. तुम्ही यापैकी तुम्हांला आवडलेल्या तेलाचा वापर करु शकता.\nउस्तरा आयुर्वेदिक हेअर ऑईल (Ustraa Ayurvedic Hair Oil)\nआपल्या शरीराला होऊ शकणार्‍या प्रत्येक व्याधीवरील उपचार आयुर्वेदामध्ये नमूद केले आहेत. आयुर्वेदामधील काही विशिष्ट पद्धतींचा वापर करुन उस्तरा आयुर्वेदिक हेअर ऑईल (Ustraa Ayurvedic Hair Oil) या प्राॅडक्टची निर्मिती केली जाते. केसांच्या कोणत्याही एका समस्येवर फोकस न करता केसांच्या संपूर्णपणे वृद्धी होण्याकरिता या हेअर ऑईलचा वापर केला जातो.\n5 बेस्ट ऑनियन ऑइल, जे सोडवू शकतात केसांची प्रत्येक समस्या\nउस्तरा कंपनीचे हे एक उत्कृष्ट प्राॅडक्ट आहे. या प्राॅडक्टमुळे तुमचे केस बाऊंसी होतील. त्याचसोबत केस शायनी झाल्याचा अनुभव तुम्हांला होईल. या तेलामुळे हेअर ग्रोथच्या प्रोसेसला वेग येतो.\nया हेअर ऑईलमार्फत केसांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पोषण पोहचत असते. केस घनदाट होण्यासोबत क्वालिटी लेवल मेंटेन करायचे असल्यास हे हेअर ऑईल प्राॅडक्ट वापरणे फायदेशीर ठरु शकते.\nइनातुर ऑनियन हेअर ऑईल (Inatur Onion Hair Oil)\nकांदा (Onion) आपल्या केसांसाठी फार उपयुक्त असतो. हेअर ग्रोथ व्हावी म्हणून बर्‍याचशा हेअर केअर प्राॅडक्ट्समध्ये कांद्याचा समावेश केला जातो.\nकांद्यामध्ये केराटिन प्रोटीन आणि सल्फर हे घटक मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. प्रोटीनपासून केसांची निर्मिती होत असते. तर केराटिन प्रोटीनपासून हेअर फायबर्स तयार होत असतात. सल्फरमुळे सुद्धा केसांची वाढ होण्याकरिता मदत होत असते. आठवड्यातून फक्त दोनदा हे तेल केसांमध्ये लावल्यामुळे केसांना फायदा होतो.\nइनातुर ऑनियन हेअर ऑईल (Inatur Onion Hair Oil) या प्राॅडक्टमध्ये लाल कांद्याचा अर्क, काळ्या तीलांपासून तयार केलेले तेल, लिंबाचे तेल, आल्याचे तेल आणि आवळा अशा औषधी गुण असलेल्या घटकांचा समावेश केला जातो. कांदा हा सल्फरच्या प्रमुख स्त्रोतांपैकी एक मानला जातो.\nया तेलामुळे केसांना नवसंजीवनी मिळते. तसेच केसांमध्ये केराटिन मुबलक प्रमाणामध्ये पोहचत असल्यामुळे हेअर फायबर्स मजबूत होतात. स्कॅल्प आणि केस अशा दोन्ही भागांमध्ये लाल कांद्याचे तेल लावल्यामुळे केस सुरक्षित राहतात. तसेच केसांमध्ये कोंडा होण्यासाठी कारणीभूत असलेले बॅक्टेरियांचा नाश होतो.\nग्रीनबेरी ऑर्गेनिक्स कॅस्टर ऑईल फाॅर हेअर अँड बाॅडी (Greenberry Organics Castor Oil For Hair And Body)\nग्रीनबेरी ऑर्गेनिक्स कॅस्टर ऑईल फाॅर हेअर अँड बाॅडी (Greenberry Organics Castor Oil For Hair And Body) या प्राॅडक्टमध्ये एरंडेल तेलाचे सर्व गुण सामावलेले आहेत. एरंडेल तेल हे आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त असते.\nएरंडेल तेलाचा वापर प्रामुख्याने पोटाशी संबंधित अपाय झाल्यास केला जातो. या तेलामुळे केसांना देखील फायदा होऊ शकतो हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. एरंडेल तेल खूप पौष्टिक मानले जाते. केसांच्या वृद्धीकरिता हे तेल वापरणे फायदेशीर असते. या एरंडेल तेलामध्ये मुबलक प्रमाणामध्ये ओमेगा-6 हे फॅटी अ‍ॅसिड आढळते. केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहचवून ते मुळांपासून मजबूत व्हावेत, त्यांचा आकार वाढावा आणि त्यांच्या संख्येमध्ये वाढ व्हावी याकरिता एरंडेल तेलाचा वापर केला जातो. एरंडेल तेलाची घनता जास्त असल्यामुळे या तेलाचा उपयोग करताना ते फार थोड्या प्रमाणामध्ये वापरायला हवे,\nएरंडेल तेल म्हणजे काय केसांच्या वाढीसाठी त्याचा वापर का करावा\nएरंडेल तेल हे हेअर फाॅल थांबवणे, सेंसिटिव्ह स्किन आणि हेअर ग्रोथ होणे ही उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी बर्‍याच वर्षांपासून वापरले जात आहे. ग्रीनबेरी कंपनीच्या ऑर्गेनिक कॅस्टर ऑईल या प्राॅडक्टमुळे आपल्या केसांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या नाहीशा होतात.\nया उत्पादनामध्ये सर्वात जास्त महत्त्वपूर्ण घटक म्हणजे `एरंडेल तेल'. एरंडेल तेलामध्ये ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड्स मुबलक प्रमाणामध्ये असते. या फॅटी अ‍ॅसिड्समुळे केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत पोषण पोहचत असते. त्याशिवाय ज्या ठिकाणचे केस गळाले आहेत, त्या जागी नवे केस उगवण्यासाठी या फॅटी अ‍ॅसिड्समुळे मदत होत असते. स्कॅल्प आणि केस कोरडे होऊ नये याकरिता त्यांमध्ये प्राकृतिक आर्द्रतेचे प्रमाण संतुलित असायला हवे. ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड्समुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहतो. तसेच स्कॅल्पच्या त्वचेचे पीएच लेवल बॅलेन्स करण्यासाठीही या फॅटी अ‍ॅसिड्स फायदेशीर मानले जातात.\nअराटा नरीशिंग हॅम्पोकाडो ऑईल (Arata Nourishing Hempocado Oil)\nहॅम्पोकाडो ऑईलच्या गुणवत्तेबाबत फार कमी प्रमाणामध्ये माहिती उपलब्ध आहे. फार थोड्याच लोकांना तेलाचे नाव माहित आहे. भांग बियाण्यांना कुटून हॅम्पोकाडो ऑईल तयार केले जाते. आपल्या हेअर ग्रोथसाठी आवश्यक असलेले प्रत्येक पोषक तत्व या तेलामध्ये समाविष्ट असते.\nया पोषक तत्वांमध्ये प्रामुख्याने इसेंशियल विटामिन्स, मिनरल्स आणि फॅटी अ‍ॅसिड्स असे घटक असतात. अराटा नरीशिंग हॅम्पोकाडो ऑईल (Arata Nourishing Hempocado Oil) या प्राॅडक्टच्या वापरामुळे केस कंडीशन होतात. त्यासोबत त्यांना आवश्यक असलेले प्रत्येक घटक मिळतात. परिणामी केस बाऊंसी आणि हेल्दी बनतात. अशा फायद्यांमुळे हे प्राॅडक्ट वापरायचा सल्ला अनेक एक्सपर्ट्स देत असतात.\nहे प्राॅडक्ट पूर्णपणे वेगन पदार्थांपासून तयार केले जाते. तसेच हॅम्पोकाडो ऑईल कोल्ड प्रेस्ड ऑईल आहे. या तेलामुळे केसांना आराम मिळतो. ड्राय आणि डॅमेज्ड केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असलेले पोषण देखील मिळते.\nया प्राॅडक्टच्या वापरामुळे केसांची मुळे मजबूत होतात. परिणामी हेअर ग्रोथ स्टिम्युलेट होते. स्कॅल्पमधील नॅचरल पी एच लेवल मेंटेन करण्यासाठीही या प्राॅडक्टची मदत होत असते.\nहेम्प सीड ऑईल विटामिन, मिनरल्स, आणि इसेंशियल फॅटी अ‍ॅसिड्स हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यामुळे या प्राॅडक्टचा वापर केल्यानंतर केसांमध्ये ओलावा टिकून राहतो. हेअर फायबर्सचे नुकसान झाले असल्यास ते भरुन काढता येते. या प्राॅडक्टमध्ये हेम्प सीड ऑईल म्हणजे भांग बियाणे तेलासोबत एवोकॅडो ऑईल देखील समाविष्ट केले जाते. केसांना पुरेसे पोषण मिळून त्यांची योग्य प्रमाणामध्ये वाढ होण्यासाठी बरेचसे लोक या हेअर ऑईलची निवड करतात.\nरेजुवेनेटिंग उबटन 9 हर्ब्स एनरिच्ड हेड मसाज ऑईल (Rejuvenating Ubtan 9 Herbs Enriched Head Massage Oil) हे केसांकरिता उपयुक्त आणि गुणकारी हेअर केअर प्राॅडक्ट्सपैकी एक आहे असे मानले जाते.\nप्राॅडक्टच्या नावामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे या हेअर ऑईलच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये 9 औषधी घटकांचा समावेश केला जातो. बदाम, नारळ, ऑलिव्ह, तीळ, एरंडेल, भृंगराज आणि जास्वंद या 9 घटकांच्या तेलांपासून या हेअर ऑईलची निर्मिती होत असते. या 9 औषधी वनस्पतींच्या तेलांना एकत्र करुन तयार केलेल्या या प्राॅडक्टच्या वापरामुळे केस घनदाट आणि चमकदार बनतात.\nमहिन्यातून फक्त एकदा या तेलाचा वापर केल्यामुळे सुद्धा केसांना फायदा होऊ शकतो. अधिक चांगल्या प्रकारचा रिझल्ट हवा असल्यास हे हेअर ऑईल गरम करावे आणि पुढे कोमट झाल्यानंतर मगच केसांवर लावावे.\nहेअर ग्रोथसह डँड्रफची समस्या कमी करण्यासाठी आणि केसांना चमक येण्यासाठी या मसाज ऑईलचा वापर केला जातो. या प्राॅडक्टच्या निर्मितीमध्ये समाविष्ट असलेल्या औषधी वनस्पतींचा उपयोग केसांशी निगडीत समस्यांवर मात करण्यासाठी केला जातो.\nया औषधी वनस्पतींमध्ये आढळणारे पोषक तत्व स्कॅल्पच्या त्वचेमार्फत केसांच्या मुळांपर्यंत पोहचत असतात. स्किनमध्ये खोलवर पोषण पोहचल्यामुळे हेअर ग्रोथ प्रोसेसचा वेग वाढतो.\nकेस पातळ होणे किंवा केस गळायला लागणे या समस्यांमुळे तुम्ही वैतागलेले असाल, तर हेअर ऑईल प्राॅडक्ट्स तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन ठरु शकतात. नियमितपणे यांचा वापर केल्यामुळे थोड्याच कालावधीमध्ये सकारात्मक रिझल्ट मिळतील. फक्त अशा पाॅझिटिव्ह रिझल्टसाठी सतत केसांमध्ये हेअर ऑईल लावणे आवश्यक आहे.\nतेल लावल्यामुळे केस चिकट होतात अशी तक्रार आपण करत असतो. सुरुवातीला चिकट, चिपचिपीत वाटणार्‍या तेलाचे फायदे अनुभवल्यावर तुम्ही नेहमी याचा वापर कराल. तुम्हांला तुमचे केस बाऊंसी आणि घनदाट झाल्याचा अनुभव आल्यास तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना हे आर्टिकल नक्की शेअर करा.\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/tips-tricks/follow-these-tips-to-repair-memory-card-see-steps/articleshow/92589470.cms?utm_source=nextstory&utm_medium=referral&utm_campaign=articleshow", "date_download": "2022-10-07T23:05:34Z", "digest": "sha1:O6KOXC73WVJE3CMZWUZLWLJRKM5S3DES", "length": 18088, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nMicro SD Card Tips: या सोप्पी टिप्स वापरून स्वतःच रिपेयर करा खराब मायक्रोएसडी कार्ड\nMemory Cards: तुमच्या फोनच्या मेमरी कार्डमध्ये काही समस्या असल्यास आणि तुम्ही ते दुरुस्त करणार असाल तर सर्वप्रथम मेमरी कार्डचा डेटा बॅकअप घ्या. कारण यादरम्यान तुमच्या फोनमध्ये डेटा असेल तर तोही जाऊ होऊ शकतो. तुमच्या डेस्कटॉपवर किंवा फोनमध्ये डेटाचा बॅकअप घ्या.\nMicro SD Card Tips: या सोप्पी टिप्स वापरून स्वतःच रिपेयर करा खराब मायक्रोएसडी कार्ड\nTips To Repair Micro sd Card: मायक्रोएसडी कार्ड हे डेटा सेव्ह करण्याचे सर्वोत्तम माध्यम मानले जाते. या डिव्हाईसची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सहज डेटा ट्रान्सफर करू शकता. फक्त एका फोनमधून कार्ड काढून दुसऱ्या फोनमध्ये ठेवले.की तुमचे काम होते. इंटरनेट आणि कम्प्युटरचा त्रास नाही. यामुळेच लोक मेमरी कार्डमध्ये सर्वात जास्त वापरत असलेला Data ठेवण्यास प्राधान्य देतात. परंतु, कधी-कधी असे होते की समस्या मायक्रोएसडी कार्डपासून सुरू होते. कधी तेआयडेंटिफाय होत नाही.तर, कधी फाईल उघडू देत नाही. अशा परिस्थितीत, कार्ड खराब झाले आहे असे तुम्हाला वाटते आणि नवीन कार्ड घेण्याचा विचार करता. पण, येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मेमरी कार्ड लवकर खराब होत नाही आणि थोडीशी अडचण आली तरी तुम्ही ती सहज सोडवू शकता, यासाठी काही सोप्प्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.\nमोबाईल वरून दुरुस्ती: जर तुमच्याकडे पीसी नसेल, तर तुम्ही तुमचे कार्ड मोबाईलवरूनही दुरुस्त करू शकता आणि येथे Disk Digger अॅप देखील तुम्हाला मदत करेल. जर तुमचा फोन रूट केलेला असेल तर हे अॅप अधिक चांगले काम करेल अन्यथा रूट नसलेल्या फोनसाठी तुम्ही डिस्कडिगर Pro version वापरू शकता.\nफॉरमॅट : जर तुम्ही डेटाचा बॅकअप घेतला असेल आणि सर्व ट्रिक्स वापरून पाहिल्यानंतर, मेमरी कार्डमध्ये समस्या येत असेल, तर ते अधिक चांगले फॉरमॅट करा. हे पूर्णपणे नवीन पद्धतीने काम करेल. तुमच्या PCशी कनेक्ट करा आणि फॅट 32 वर फॉरमॅट करा.\nवाचा :Reliance Jio चे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान्स, सुरुवातीची किंमत १४९ रुपये, प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलसह भरपूर डेटा\nडिस्कडिगर सॉफ्टवेअरसह कार्ड दुरुस्त करण्यासाठी, प्रथम तुमच्या PC वर install करा आणि नंतर प्रोग्राम सुरू करा. येथे तुम्हाला डिव्हाइस निवडीचा पर्याय मिळेल, तुम्हाला मायक्रोएसडी कार्ड निवडावे लागेल. तुम्हाला नेक्स्ट-नेक्स्ट तीन वेळा करावे लागेल आणि हे सॉफ्टवेअर तुमचे कार्ड स्कॅन करेल. यास थोडा वेळ लागेल. परंतु, काही वेळात सर्व फाईल्स तुमच्या कार्डमध्ये दिसतील. इच्छित असल्यास, आपण तेथून फाइल कॉपी करू शकता आणि ती कुठेही ठेवू शकता. आणि कार्ड नीट काम करत आहे की नाही ते पाहू शकता.\nवाचा: Oppo Reno 8 series चे भारतात लॉंचिंग कन्फर्म, एकाच वेळी २ फोन्स करतील एन्ट्री, पाहा काय असेल खास\nजर फाइल दिसत नसेल तर सॉफ्टवेअरने दुरुस्त करा : जर तुम्हाला फाईल दिसत नसेल आणि वरील पद्धती मदत करत नसेल तर तुम्ही सॉफ्टवेअरची मदत घेऊ शकता. डिस्क डिगर हे उत्तम सॉफ्टवेअर आहे. त्याची चाचणी आवृत्ती विनामूल्य उपलब्ध आहे तर सशुल्क आवृत्तीसह अनेक अतिरिक्त वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. या अॅपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते कार्ड दुरुस्तीसह डिलीट केलेला आणि खराब झालेला डेटा दुरुस्त करण्यास सक्षम आहे. ही ट्रिक खूप कामांची आहे.\nवाचा: Smartphone Tips: Memory Card मधून डिलीट झालेले फोटो 'या' ट्रिक्सच्या मदतीने सहज होतील रिकव्हर\nलॅपटॉपमध्ये कार्ड टाकत असाल आणि ते दाखवत नसेल तर, यासाठी सर्वप्रथम, तुमच्या संगणकावरील सिस्टम मॅनेजरमध्ये फोन उघडा. यानंतर तुम्हाला डिस्क मॅनेजमेंटवर क्लिक करावे लागेल. जर तुमच्याकडे Windows 10 असेल, तर My PC वर राइट-क्लिक केल्यास मॅनेजचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुमच्या लॅपटॉप किंवा पीसीवर उपलब्ध असलेल्या सर्व डिस्कची यादी डाव्या बाजूला येईल. उजव्या बाजूला तुम्हाला एक microSD कार्ड दिसेल. त्यावर राईट क्लिक करा. तुम्हाला Change Drive Letter and Path चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. नवीन विंडोज उघडेल आणि तुम्हाला त्यात Add चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करून जेव्हा तुम्ही My PC वर जाल तेव्हा तुम्हाला microSD कार्ड दिसेल.\nवाचा: Best Plans: 'हा' प्लान आहे जबरदस्त, एकाच रिचार्जवर चालणार घरातील चार जणांचा फोन, सोबत डेटा आणि OTT बेनेफिट्स सुद्धा\nकधी- कधी असे होते की मेमरी कार्ड कम्प्युटर आणि मोबाईलमध्ये प्लग इन केले असलेले तरी दिसत नाही. अशा परिस्थितीत सर्वप्रथम तुमचे कार्ड संगणक किंवा लॅपटॉपमध्ये ठेवा. जर कार्ड दिसत असेल आणि ते काम करत नसेल तर, कर्सर हलवून प्रथम कार्डवर राईट क्लिक करा. येथे तुम्हाला Explore चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला खाली Properties चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला टूल्स नावाचा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा आणि Check Now Error वर क्लिक करा. कार्डमध्ये काही किरकोळ समस्या असल्यास, तुमचा पीसी स्वतःच त्याचे निराकरण करेल. यानंतर तुम्ही कार्डमध्ये उपलब्ध डेटा ऍक्सेस करू शकाल.\nवाचा: नवीन घरी शिफ्ट झाला असाल तर 'असा' करा Aadhaar Card मध्ये Address अपडेट, घर बसल्या होईल काम\nमहत्वाचे लेखSmartphone Tips: Memory Card मधून डिलीट झालेले फोटो 'या' ट्रिक्सच्या मदतीने सहज होतील रिकव्हर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस\nADV- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल तुमच्यासाठी उत्तम किमतीत टीव्ही आणतो; Redmi, OnePlus यांसारख्या ब्रँडवर भरघोस सूट\nसौंदर्य फेस्टिव्ह सीझनमध्ये चमकेल चेहरा, फॉलो करा या टिप्स\nसिनेन्यूज आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की...\nब्युटी सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर\nहेल्थ दारूने वाढतो नपुंसकतेसह १० लैगिंक आजारांचा धोका, हे ७ पदार्थ ठरतील रामबाण उपाय, डॉक्टरही देतील हा सल्ला\nसिनेन्यूज विजय देवरकोंडा आणि रश्मिका लपत-छपत कुठे निघाले Video पाहून नेटकऱ्यांनी लावायचा तो अंदाज लावलाच\nइलेक्ट्रॉनिक्स 8GB रॅम आणि 10,090 mAh बॅटरी पावर असणाऱ्या या Samsung Tabs खरेदी करा आणि मिळवा ₹18000 इतका जबरदस्त डिस्काउंट\nआर्थिक राशीभविष्य आर्थिक राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२२ : जाणून घ्या उद्याचा दिवस कोणासाठी ठरेल धनप्राप्तीचा\nक्रिकेट न्यूज कमजोर पाकिस्तानने रोखला भारतीय संघाचा विजयरथ, आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला हरवलं\nमुंबई शकील, छोटा राजनला माझी सुपारी दिली; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप\nकोल्हापूर एकनाथ शिंदे गर्दी दिसली म्हणून काहीही बोलत सुटले, उद्धव ठाकरेंच्या भाषणालाच प्रतिसाद: अजित पवार\nसिंधुदुर्ग उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे राहणारा आमदार चौकशीच्या फेऱ्यात, कोकणातल्या नेत्याला एसीबीची नोटीस\nमुंबई ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा ते दिघेंच्या मृत्यूचं ठाकरे कनेक्शन, मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/486883", "date_download": "2022-10-07T23:09:32Z", "digest": "sha1:4ZNHKEQINBWTKUJORZCJHQFWKKUVTEWK", "length": 2337, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १८३८ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १८३८ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १८३८ मधील जन्म (संपादन)\n१७:३२, ६ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती\n३३ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n२१:४८, २२ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n१७:३२, ६ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%A8%E0%A5%AA", "date_download": "2022-10-07T21:31:30Z", "digest": "sha1:ANWB2W7COMTG3MGQHWOCRMBGT5D4IIBM", "length": 21238, "nlines": 735, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एप्रिल २४ - विकिपीडिया", "raw_content": "\nएप्रिल २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११४ वा किंवा लीप वर्षात ११५ वा दिवस असतो.\n<< एप्रिल २०२२ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\n१ ठळक घटना आणि घडामोडी\n१.१ इ.स.पू. बारावे शतक\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\n११८४ - शहराबाहेर आणुन ठेवलेल्या प्रचंड लाकडी घोडा (ट्रोजन हॉर्स) ट्रॉयच्या सैन्याने कुतुहलापायी आत घेतला. घोड्यात लपलेले ग्रीक सैनिक रात्री बाहेर पडले व दहा वर्षे चाललेल्या ट्रॉयचा वेढा संपवला.\n१६७४ - भोर-वाई परिसरातील केंजळगड शिवाजी महाराजांनी जिंकला.\n१७१७ - खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.\n१८०० - लायब्ररी ऑफ कॉॅंग्रेसची स्थापना.\n१८६३ - कीझव्हिलची कत्तल - कॅलिफोर्नियातील कीझव्हिल येथे ५३ स्थानिक अमेरिकन व्यक्तिंची हत्त्या.\n१९१४ : पुंज सिद्धांतामधला महत्त्वाचा फ्रॅंक हर्ट्झ प्रयोग जर्मन भौतिक संघटनेसमोर दाखवला गेला.\n१९१५ - आर्मेनियन वंशहत्या - कॉन्स्टेन्टिनोपलमध्ये सुरू झालेली आर्मेनियन वंशीय व्यक्तिंचे हत्याकांड नंतर ओट्टोमन साम्राज्यभर पसरले.\n१९२२ : ब्रिटिश साम्राज्य बिनतारी (रेडिओ) टेलिग्राफने जोडण्याची योजना कार्यान्वित; इंग्लंडमधून कैरोशी संदेशवहन सुरू.\n१९५५ - बांडुंगची सभा समाप्त. २९ देशांच्या या सभेत पंचशील तत्त्वांचा पुरस्कार केला गेला.\n१९६७ - रशियाचे अंतराळयान सोयुझ १ कोसळले. अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह मृत्युमुखी.\n१९६८ - मॉरिशियसला संयुक्त राष्ट्रांचे सभासदत्त्व.\n१९७० - चीनचा पहिला मानवनिर्मित उपग्रह डॉॅंग फॅंग हॉॅंग १चे प्रक्षेपण.\n१९७० - गाम्बिया प्रजासत्ताक झाले.\n१९७० : चीनचा पहिला उपग्रह 'डॉॅंग फॅंग हॉॅंग-१'चे प्रक्षेपण\n१९७५ - स्टॉकहोममध्ये बाडर-माइनहॉफ टोळीने पश्चिम जर्मनीची वकीलात उडवली.\n१९८० - ईराणमध्ये ओलिस असलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना सोडवण्याच्या निष्फळ प्रयासात ८ अमेरिकन सैनिक ठार.\n१९८१ - आय.बी.एम.ने सर्वप्रथम वैयक्तिक संगणक प्रदर्शित केला.\n१९९० - हबल दुर्बीणीचे प्रक्षेपण.\n१९९३ - आय.आर.ए.ने लंडनच्या बिशप्सगेट भागात बॉम्बस्फोट घडवला.\n१९९३: इंडियन एरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.\n२००४ - अमेरिकेने लिब्यावर १८ वर्षांपूर्वी घातलेले आर्थिक निर्बंध दूर केले.\n२००५ - कार्डिनल जोसेफ रॅट्झिंगर पोप बेनेडिक्ट सोळावा या नावाने पोप पदी.\n२००५ : जगातला पहिला क्लोन केलेला कुत्रा जन्माला आला.\n२००६ - नेपाळचा राजा ग्यानेंद्रने ४ वर्षांपूर्वी बरखास्त केलेली संसदीला पुनः मान्यता दिली.\n२००७ - नॉर्वेने युद्ध सुरू नसताना आइसलॅंडचे रक्षण करण्याचे कबूल केले.\n२०१३ - बांगलादेशची राजधानी ढाकाच्या उपनगरातील इमारत कोसळून १,१२७ व्यक्ती ठार. २,५००पेक्षा अधिक जखमी.\n२०१७- छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले .\n१८८९ - सर स्टॅफर्ड क्रिप्स, ब्रिटीश राजकारणी; क्रिप्स मिशनचा नेता.\n१८९६ - रघुनाथ वामन दिघे, मराठी लेखक.\n१८९७ - मनुएल अव्हिला कामाचो, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.\n१९१० - राजा परांजपे, मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते.\n१९२६ - थॉर्ब्यॉम फाल्डिन, स्वीडनचा पंतप्रधान.\n१९२९ - राजकुमार, कन्नड चित्रपट अभिनेता व गायक.\n१९७० - डॅमियन फ्लेमिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.\n१९७३ - सचिन तेंडुलकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१८५२ - व्हासिली झुकोव्स्की, रशियन कवी.\n१९४२: नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर\n१९६०: नामवंत वकील लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर\n१९७२: चित्रकार जामिनी रॉय\n१९७४: देशभक्त तसेच हिंदी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर\n१९९४: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर\n१९९९: चित्रपट कला दिग्दर्शक सुधेंदू रॉय\n२००५ - एझेर वाइझमन, इस्रायेलचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४२ - गायक मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन.\n२०११ - सत्य साईबाबा यांचे निधन\n२०१४: भारतीय राजकारणी शोभा नेगी रेड्डी\nप्रजासत्ताक दिन - गाम्बिया.\nवंशहत्त्या स्मृती दिन - आर्मेनिया.\nकाप्यॉॅंग दिन - ऑस्ट्रेलिया.\nलोकशाही दिन : नेपाळ\nभारतीय पंचायती राज दिन\nबीबीसी न्यूजवर एप्रिल २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nएप्रिल २२ - एप्रिल २३ - एप्रिल २४ - एप्रिल २५ - एप्रिल २६ - (एप्रिल महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑक्टोबर ७, इ.स. २०२२\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०२२ रोजी १४:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/2-tarunansobt-thevt-hoti-sabndh/", "date_download": "2022-10-07T21:12:14Z", "digest": "sha1:B6RHBEHJXCBVEH7NISPJZ6ZEFDUKQMJF", "length": 12051, "nlines": 88, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "बाबो ! तरुणीने अनोळखी समजून दोन तरुणांसोबत ठेवले स'बंध, पण दोघेही तरुण निघाले... - Themaharashtrian", "raw_content": "\n तरुणीने अनोळखी समजून दोन तरुणांसोबत ठेवले स’बंध, पण दोघेही तरुण निघाले…\n तरुणीने अनोळखी समजून दोन तरुणांसोबत ठेवले स’बंध, पण दोघेही तरुण निघाले…\nभारतामध्ये पूर्वीच्या काळी प्रेम सं’बंध ठेवणे हे अतिशय घृ’णास्प’द असे मानले जात होते. मात्र, कालांतराने काळ बदलत गेला आणि प्रेमाच्या व्याख्या देखील बदलत गेल्या. आता प्रेम सं’बंध ठेवणे हे सर्वसामान्य बाब असल्याचे दिसते. अनेक तरुण-तरुणींना मित्र मैत्रिणी असतात. तर काही तरुणींना बॉ’यफ्रें’ड हा आता तर असतोच असतो.\nमात्र, काही तरुणी अशा असतात की ज्यांना एक नाही तर तब्बल दोन ते तीन बॉय फ्रें’ड असतात. अशा तरुणींना काय म्हणावे, हे देखील लोकांना समजत नाही. मात्र, या दोघांसह अनेक जणांना फिरत असतात. यामुळे अनेक तरुणांचे वाटो’ळे होते. तरुणांना देखील आपल्याला एक मुलगी बोलते यामध्ये सुख वाटत असते.\nमात्र, ती मुलगी आणखी कोणाशी बोलते का याबाबत त्यांना माहिती नसते. कारण ती सर्वांना वेगवेगळ्या वेळा देत असते. त्यामुळे अशा प्रकारे ही तरुणी काही जणां’ची फस’व’णूक नक्कीच करत असते. प्रेम करणे काही गैर नाही. मात्र, एक व्यक्ती सोडून अनेकां’सोब’त प्रे’म करणे याला अ’ने’तिक सं’बंध म्हणतात.\nआणि याला सं’बंधाचा नै’तिक आधार नसतो. त्यामुळे ते अनै’तिक असतात. असे सं’बंध कधीतरी चव्हा’ट्यावर येत असतात आणि याचा खु’लासा कधीतरी होतो. त्यानंतर याचा प’रिणाम हा अतिशय वा’ईट असतो. आज आम्ही आपल्याला एका अशा तरुणी बद्दल माहिती देणार आहोत. की तिने एक नाही तब्बल दहा त’रुणांसो’बत प्रे’मप्र’करण ठेवले होते.\nत्यातील सहा ज’णांसोबत शा’रीरिक सं’बंध ठेवले होते. तर दोन त’रुणां’सोबत ती अतिशय नि’र्धास्तपणे राहत होती, असे समोर आले आहे. ही घटना नेमकी उ’घडकीस आली आहे. याबाबत एका तरुणीने सांगितलेले आहे की, मी दोन तरुणांसो’बत प्रे’मसं’बंधत होते. ज्यावेळी दोघेही एकमेकांचे मित्र निघाले, त्यावेळेस माझी गोची झाली, असे तिने सांगितले.\nमी दोन्ही तरुणां’सोबत शा’री’रिक सं’बंध ठेवले होते. यातील एक तरुण हा फुटबॉलपटू होता. त्याच्या सोबत राहणे मला अतिशय सुरक्षित वाटत होते, असे तिने सांगितले. त्याच्यासोबत मी तीन ते चार वेळा शा’रीरिक सं’बंध ठेवले, होते. त्यानंतर त्याने मला सांगितले की, अमुक तरुण माझा मित्र आहे. त्या तरुणासोबत देखील माझे संबं’ध होते.\nत्यामुळे मला काय बोलावे ते कळतच नव्हते. या सोबतच ती तरुणी म्हणाली की, मी जवळपास दहा तरु’णांसो’बत प्रेम सं’बं’धांमध्ये होते, असेही ती म्हणाली. मात्र, यातील केवळ सहा ज’णांसोब’त शा’रीरिक सं’बंध आले होते, असे देखील तिने बि’नधा’स्तपणे सांगितले. मात्र, यातील एकच तरुण असा होता की त्याचे वय 28 वर्षे होते.\nतो दिसायला अतिशय सुंदर होता. त्याच्यासोबत माझा चांगला वेळ गेला. विकेंड मध्ये मी त्याच्यासोबत अतिशय चांगला वेळ घालवला, असे ती म्हणाली. मात्र, ज्या वेळी दोघे मित्र असल्याचे मला समजले, त्यावेळी मी काहीच बोलू शकले नाही, असेही ती म्हणाली. एकूणच काय तर अनेक त’रुणांसो’बत प्रे’म सं’बंध ठेवणे हे धोक्या’चे ठरू शकते.\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\nपती ‘नपुं’सक’ असून देखील पत्नी झाली ‘प्रे’ग्नं’न्ट’, खरे सत्य समोर येताच पतीचेही उडाले होश…\nह’निमू’नच्या पहिल्याच रात्री पत्नीला समजले की पती आहे स’मलैं’गि;क, पहा तरीही पतीने पत्नीसोबत केले…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2021/05/blog-post_241.html", "date_download": "2022-10-07T21:46:53Z", "digest": "sha1:TRYJ2IOHP3X2G6CDM6REDR7BWHDOR5XL", "length": 21106, "nlines": 215, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "शेजारधर्म | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nप्रेषित मुहम्मद (स.) यांनी शेजाऱ्यांशी आदर-सन्मानाचा व्यवहार करण्यास सांगितले आहे. शेजाऱ्याला त्रास देणे हा गंभीर गुन्हा असल्याचे म्हटले आहे. एकदा एका अनुयायाने प्रेषितांना विचारले की कोणता गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे त्यावर प्रेषित म्हणाले की अल्लाहला भागीदार जोडणे आणि आपल्या आपत्यांना ठार करणे, ते तुमच्या सुखसुविधांमध्ये भागीदार होतील या भीतीने. आणि हे की तुम्ही आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी व्यभिचार करावा. प्रेषित पुढे म्हणाले की कुणी दहा स्त्रियांशी व्यभिचार केला तरी तो एखाद्या शेजाऱ्याच्या पत्नीशी व्यभिचार करण्यापेक्षा कमीच आहे. तसेच एखाद्याने दहा घरांमध्यो चोरी केली तरी ती शेजाऱ्याच्या घरी चोरी करण्याच्या तुलनेत कमीच समजली जाईल. प्रेषित पुढे म्हणतात की अशी व्यक्ती मुस्लिम होऊच शकत नाही ज्याचा शेजारी त्याच्या अत्याचाराला बळी पडत असेल. जर एखादी स्त्री आपल्या शेजाऱ्यांना त्रास देत असेल आणि त्याचबरोबर ती नमाज अदा करीत असेल आणि रोजे ठेवत असेल तरीदेखील ती स्वर्गात जाऊ शकत नाही. तसेच एखादी महिला नमाज अदा करते, दानधर्म करते, त्याचबरोबर जर ती शेजाऱ्यांशी सदवर्तन करत असेल तर ती स्वर्गात जाईल. प्रेषितांनी घोषणा केली की आपल्या घराच्या अवतीभवती ४० घरे शेजारी समजले जावेत. एकदा मुस्लिमांच्या माता ह. आयेशा यांनी प्रेषितांना विचारले की माझे दोन शेजारी आहेत. मी कुणाला भेटवस्तू देऊ त्यावर प्रेषित म्हणाले की अल्लाहला भागीदार जोडणे आणि आपल्या आपत्यांना ठार करणे, ते तुमच्या सुखसुविधांमध्ये भागीदार होतील या भीतीने. आणि हे की तुम्ही आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी व्यभिचार करावा. प्रेषित पुढे म्हणाले की कुणी दहा स्त्रियांशी व्यभिचार केला तरी तो एखाद्या शेजाऱ्याच्या पत्नीशी व्यभिचार करण्यापेक्षा कमीच आहे. तसेच एखाद्याने दहा घरांमध्यो चोरी केली तरी ती शेजाऱ्याच्या घरी चोरी करण्याच्या तुलनेत कमीच समजली जाईल. प्रेषित पुढे म्हणतात की अशी व्यक्ती मुस्लिम होऊच शकत नाही ज्याचा शेजारी त्याच्या अत्याचाराला बळी पडत असेल. जर एखादी स्त्री आपल्या शेजाऱ्यांना त्रास देत असेल आणि त्याचबरोबर ती नमाज अदा करीत असेल आणि रोजे ठेवत असेल तरीदेखील ती स्वर्गात जाऊ शकत नाही. तसेच एखादी महिला नमाज अदा करते, दानधर्म करते, त्याचबरोबर जर ती शेजाऱ्यांशी सदवर्तन करत असेल तर ती स्वर्गात जाईल. प्रेषितांनी घोषणा केली की आपल्या घराच्या अवतीभवती ४० घरे शेजारी समजले जावेत. एकदा मुस्लिमांच्या माता ह. आयेशा यांनी प्रेषितांना विचारले की माझे दोन शेजारी आहेत. मी कुणाला भेटवस्तू देऊ प्रेषित म्हणाले, ज्याचे दार तुमच्या दाराजवळ असेल. शेजाऱ्यांचे हक्काधिकार विशद करताना प्रेषित म्हणतात, त्याने तुमची मद मागितली तर त्याला मदत करा. त्याला कर्ज लवे असेल तर कर्ज द्या. तेवढ्यावर भागले नसेल तर पुन्हा द्या. आजारी पडल्यास त्याची विचारपुस करा. त्याला कोणते यश लाभले असेल तर शुभेच्छा द्या. अडचणीत सावडल्यास त्याच्या मदतीला धावून जा. त्याच्या घरात हवा जात नसेल तर आपल्या घराच्या भिंतीची उंची कमी करा. एखादे पक्वान्न केल्यास ते पदार्थ त्याच्या घरी पाठवा. जर फळे आणली असतील तर शेजाऱ्यालाही द्या. देऊ शकत नसाल तर तुमच्या मुलांना फळ घेऊन घराबाहेर पाठवू नका जेणेकरून शेजाऱ्यांच्या मुलांना दुःख होणार नाही.\nपुरुष आणि स्त्री एकमेकांची वस्त्रे आहेत. (पवित्र कुरआन) वत्र् जसे माणसाचे थंडी, उष्णता आणि इतर त्रासांपासून रक्षण करते त्याचप्रमाणे पुरुष आणि महिलेचेही आहे. दोघे एकमेकांच्या सुरक्षेचीी काळजी घेतात. वस्त्र परिधान केल्याने जसे माणसाला सौंदर्य प्राप्त होते, तसेच सौंदर्य स्त्री-पुरुष यांच्या संबंधामुळे दोघांना प्राप्त होते. वस्त्र धारण करण्याने जसे शरीरावरील अवगुण झाकले जातात त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकतात. स्त्री आणि पुरुष या दोघांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. जे जे अधिकार स्त्रीला प्राप्त आहेत तेच अधिकार पुरुषालाही प्राप्त आहेत. पवित्र कुरआनने आई-वडील आणि इतर नातलगांमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांना वाटा दिलेला आहे. स्त्री स्वत:चा व्यापार किंवा कोणताही दुसरा व्यवसाय करू शकते. या व्यवसायातल्या कमाईवर स्त्रीचा पूर्ण अधिकार असेल. जर तिच्याकडे मालमत्ता, शेत-जमीन, घरदार असेल तर कुणालाही न विचारता, कुणाचीही संमती न घेता ती विकू शकते. स्त्रीच्या चालचरित्रावर आरोप लावल्यास भयंकर पाप म्हटले गेले आहे. पवित्र कुरआनात असे म्हटले आहे की, “जे लोक पावित्र्यसंपन्न महिलेवर आरोप लावतात आणि त्यासाठी ४ लोकांची साक्ष आणू शकत नाहीत अशा लोकांना ८० फटके मारून शिक्षा द्या आणि पुढे कोणत्याही प्रकरणात त्यांची साक्ष कबूल करू नका. (कुरआन, सूरह नूर-५)” आपल्या शेवटच्या हजप्रसंगी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जे प्रवचन दिले होते त्यामध्ये असे म्हटले आहे की, “लोकहो, तुमच्यावर तुमच्या पत्नीचे हक्काधिकार आहेत, तसेच त्यांच्यावर तुमचे अधिकार आहेत. तुमच्या पत्नींनी इतर पुरुषांना तुमच्या बिछान्यावर बसू देता कामा नये. ज्यांना तुम्ही पसंत करीत नाही त्यांनी तुमच्या घरी विना परवानगी येऊ नये. आपल्या पत्नीशी सौहार्दाने वागा, अल्लाहचे नाव घेऊन तुम्ही तिचा स्वीकार केला आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करा, कैद्यांप्रमाणे घरी बंदिस्त करून ठेवू नका. पत्नीसंबंधी कुरआनात म्हटले आहे की त्या सदाचारी आहेत अल्लाहच्या आज्ञा पाळतात. पतीच्या गैरहजेरीत त्याच्या हक्काधिकारांचे संरक्षण करतात.”\n- सय्यद इफ्तिखार अहमद\n०४ जून ते १० जून २०२१\nतडफडणारी जनता आणि धडधडणाऱ्या चिता\nकोविडपासून जगाने कोणता बोध घ्यावा\nआरक्षण, मृत्युदंड आणि गंगाजल \nनिर्दोष पॅलेस्टाईन लोकांचे हत्याकांड आणि इस्त्राईल...\nखतांच्या किंमतीत अव्वाच्या सव्वा दरवाढ करून शेतकऱ्...\nसूरह अत् तौबा: ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआपल्या हक्कांसाठीचा संघर्ष की दहशतवाद\nखेडचे माजी नायब तहसीलदार बशीर अमीन मोडक यांचे दुःख...\nसूरह अत् तौबा: ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशाला सेवाभावी समुदायाची गरज\nइतर धर्मियांना मुस्लिमांच्या माहीत नसलेल्या बाबी\n...तर महाराष्ट्राची जनता कदापीही मान्य करणार नाही\nवारसासंबंधी पवित्र कुरआनचे मार्गदर्शक नियम\nमहामारीतील ‘अस्थायी वास्तविकते’च्या कालखंडातील ‘ईद’\n२८ मे ते ०३ जून २०२१\n२१ मे ते २७ मे २०२१\nबंगालमध्ये झालेला पराभव आणि त्याचे परिणाम\nकोरोनाचे विक्राळ रूप भीतीदायक\nगरीबांसाठी ‘राहत’ देणारा अवलिया हरपला\nसूरह अत् तौबा: ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदोन देवदूत - शाहनवाज़ शेख़ आणि प्यारे खान\nपोलिसांची गमावलेली प्रतिष्ठा लोकशाहीसाठी घातक\n१४ मे ते २० मे २०२१\nजमाअत-ए-इस्लामी हिंद ने नागपूर, दिल्लीत उभारले कोव...\nप्रश्न फक्त आरोग्य व्यवस्थेच्या कोसळण्याचा नाही\nरोजा शरीर अन् मनही शुद्ध करते\n(७३) आणि जे सत्याचा इन्कार करणारे आहेत ते एकमेकांच...\nनिवडणूक अधिकाऱ्यांवरच नाही तर सभा घेणाऱ्या दिग्गज ...\nटाळ्या, थाळ्या आणि टीका उत्सव\nसूरह अत् तौबा: ईशवाणी (सुबोध कुरआन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/mahilene-makdache-pillu-ghetle-dattak/", "date_download": "2022-10-07T23:17:35Z", "digest": "sha1:SSKFGTNNXRBJSPUOWBOM4X3TRNFKBTVO", "length": 11889, "nlines": 89, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "महिलेने मा'कडाचे पि'ल्लू घेतले द'त्तक, पण जेव्हा खरे सत्य आले समोर तेव्हा सर्वांचेच उडाले होश.... - Themaharashtrian", "raw_content": "\nमहिलेने मा’कडाचे पि’ल्लू घेतले द’त्तक, पण जेव्हा खरे सत्य आले समोर तेव्हा सर्वांचेच उडाले होश….\nमहिलेने मा’कडाचे पि’ल्लू घेतले द’त्तक, पण जेव्हा खरे सत्य आले समोर तेव्हा सर्वांचेच उडाले होश….\nहे जग खूप मोठे आहे, दररोज येथे काहीतरी नवीन आणि आ’श्चर्यका’रक घडत असते. दररोज एक नवीन घ’टना किंवा च’मत्कार ऐकयला मिळत असतो. अशीच एक विचित्र घ’टना समोर आली आहे. जेथे ग’रो’द’र असलेली आ’ई नि’धन पा’वली पण तिच्या ग’र्भाशया’तून मुलाला ज’न्म देण्यात आला आहे. ही एक अशी घ’टना जी आपल्याला भाव’निक देखील करू शकते. याबद्दल जाणून घेवून तुम्हीही मा’नवते’वर विश्वास ठेवण्यास सुरूवात कराल.\nएका महिलेने या आ’ईच्या मृ’त्यूनं’तर देखील तिच्या मु’लाला ज’न्म दिला आणि मा’नवतेचे नवे उदाहरण ठेवले. खरे तर ही संपूर्ण घ’टना थायलंडमधील नाकोण सावन नावाच्या ठिकाणची आहे. येथे एका महिलेने मृ’त आ’ईच्या मु’लाला वा’चविले आणि मा’नवते’साठी एक नवीन उदाहरण दिले आहे.\nमाणूस आणि प्राण्यामधील ही एक घ’टना आहे. ज्यामध्ये एका म’हिलेने आपली माणु’सकी दाखवत प्रा’ण्यावर द’या केली आणि त्या प्राण्याच्या मृ’त्यूनंतर तिच्या पि’ल्लाला वा’चवले आहे. घटनास्थळी जेव्हा एका गाडीने मा’कडी’नीला जो’रात ध’डक दिली तेव्हा ही संपूर्ण घ’टना घ’डली.\nत्या भीषण ध’डकेत ती रस्त्याच्या कडेला प’डली. तिला बरीच दु’खाप’त झाली होती ती पूर्णपणे ज’खमी होवून रस्त्याकडेला प’डली होती. यानंतर ही मा’कडीण जा’गीच म’रण पा’वली. तिथे उपस्थित पद्मा केडकुर्विरियनोन या म’हिलेने स्वत:च्या डोळ्यांनी संपूर्ण घ’टना पाहिली होती.\nअ’प’घा’त पाहून महिलेला मो’ठा ध’क्का बसला. तिने ता’बडतोब माक’डीणीजवळ जाऊन तिला पाहिले असता मा’कडीण ग’र्भव’ती असल्याचे तिला आढळले. तिच्या पो’टात एक पि’ल्लू जि’वंत होते. महिलेने अजिबात उशीर न करता त्वरित पि’ल्लाला वा’चविण्याचा प्र’यत्न केला.\nतिने कुठल्याही वै’द्यकीय प्रतीक्षणाची वाट न पाहता मृ’त पावलेल्या माक’डीणीचे पोट का’पून पि’ल्लाला वा’चवले. या महिलेने स्वत: च्या हातांनी या पि’ल्लास ज’न्म दिला आणि त्याला हे जीवन दाखवले आहे. हे मा’नवतेचे एक नवीन उदाहरण आहे.\nअसे म्हणतात की ही महिला त्याच ठिकाणी छोटे छोटे घरगुती सामन विकत असे, जेव्हा तिला रस्त्यावरचा अ’प’घा’त दिसला तेव्हा ती स्वत: ला रोखू शकली नाही आणि तिने या पि’ल्लाला नवीन जीवन देऊन आपले मान’वता दर्शविली आहे.\nआता हे पि’ल्लू याच म’हिलेबरोबर राहत आहे. हे पि’ल्लू या म’हिलेच्या हातानेच खाते पिते आणि तिच्याजवळच झोपते. स्थानिक लोकांनी सांगितले की, त्या म’हिलेने असे मोठे कार्य केले ज्यामुळे तिचा आम्ही सत्कार करण्याचे ठरवत आहोत.\nही महिला देखील आपली मुलाप्रमाणेच त्याला वाढवतत आहे आणि सर्व वेळ त्याच्याबरोबर घालवत आहे. ही घ’टना आपल्याला शिकवते की अ’डचणीत आलेल्या प्रत्येकाची आपण माणुसकी दाखवून मदत केली पाहिजे. मग ते प्राणी असो किंवा माणूस पण आपण आपली माणुसकी जपावी.\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\nपती ‘नपुं’सक’ असून देखील पत्नी झाली ‘प्रे’ग्नं’न्ट’, खरे सत्य समोर येताच पतीचेही उडाले होश…\nह’निमू’नच्या पहिल्याच रात्री पत्नीला समजले की पती आहे स’मलैं’गि;क, पहा तरीही पतीने पत्नीसोबत केले…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/samana-editorial-on-maharashtra-day/", "date_download": "2022-10-07T23:01:27Z", "digest": "sha1:LAVQ5JIDPY5NMOJIAR4BVFWJRGPINAQK", "length": 11951, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"देशाला आलेली ग्लानी शिवरायांचा महाराष्ट्र दूर करेल, कोरोना संकटावर मात करून हिमालयाला दिशा दाखवेल\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“देशाला आलेली ग्लानी शिवरायांचा महाराष्ट्र दूर करेल, कोरोना संकटावर मात करून हिमालयाला दिशा दाखवेल”\n“देशाला आलेली ग्लानी शिवरायांचा महाराष्ट्र दूर करेल, कोरोना संकटावर मात करून हिमालयाला दिशा दाखवेल”\nमुंबई | आज 1 मे अर्थात महाराष्ट्रात दिन. महाराष्ट्र आज 61 व्या प्रवेश करतोय. मात्र यंदाच्या महाराष्ट्र दिनाला कोरोनारूपी संकट आपल्या मानगुटीवर बसलं आहे. परंतू देशाला आलेली ग्लानी शिवरायांचा महाराष्ट्र दूर करेल, कोरोना संकटावर मात करून हिमालयाला दिशा दाखवेल, असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त केला आहे.\nसंजय राऊत म्हणततात, “करंटेपणा, नतद्रष्टपणा, अप्पलपोटेपणा व द्वेष-द्रोह यांना डावलून जेथे जेथे माणुसकी उसळून प्रकट होते तेथे तेथे महाराष्ट्र धर्म मूर्तिमंत प्रकट झालेला असतो. हा ‘महाराष्ट्र धर्म’ वाढता वाढतच जाईल. महाराष्ट्रीय आचार-विचारांचा मानदंड हिंदुस्थानात प्रस्थापित होईल. देशाला आलेली ग्लानी शिवरायांचा महाराष्ट्र दूर करेल. हिरक महोत्सवी महाराष्ट्र कोरोनाच्या संकटावर मात करून हिमालयासही दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही”\nमहाराष्ट्राचा हिरक महोत्सव एरव्ही मोठ्या थाटामाटात साजरा झाला असता, पण हा महाराष्ट्र दिन एका वेगळ्याच सावटाखाली उगवला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आज आहे व ते उद्धव ठाकरे आहेत. त्या आनंदास आजच्या महाराष्ट्र दिनी आनंदाचे उधाण आले असते. महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोना संकटाशी लढत असताना महाराष्ट्र दिनाचा 60 वा सूर्य उगवला आहे. सूर्य नेहमीप्रमाणे प्रकाशमान, तेजस्वी आहेच, पण जनता सरकारी आदेशाने कुलूप बंद आहे. शेवटी महाराष्ट्राच्या तेजस्वी लढय़ाच्या या आठवणी अमर राहणारच, असं राऊत यांनी म्हटलं आहे.\nमहाराष्ट्र हा लढवय्या आहे व तो या संकटाला परतवून लावेल. हे लढवय्येपण महाराष्ट्राच्या दुश्मनांबरोबर दाखवता येईल, पण ही लढाई राज्याच्या अस्मितेची, उद्योगधंदे, रोजगार वाचविण्याची आहे. दीड महिन्यापासून राज्यात टाळेबंदी आहे. उद्योग-व्यापारास टाळे आहे व आतापर्यंत तीन लाख कोटींचे नुकसान झाले आहे. हे नुकसान राज्याच्या प्रगतीस खिळ घालणारे आहे. विजयी उन्मादाच्या आरोळय़ा ठोकून, राजकीय कुरघोडय़ा करून हे संकट दूर होणार नाही. शेवटी ‘महाराष्ट्र धर्म’ नावाचा जो मंत्र आहे तो काही जादुटोणा किंवा अंधश्रद्धा नाही. हा मंत्र मराठीजनांच्या घामातून, श्रमातून निर्माण झाला आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\nपुण्यातील ‘या’ भागात तीन दिवसांसाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध; किराणा, भाजीपाला बंद\n“कोरोनावर औषध सापडलं”; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा\nपुण्यात नव्याने 86 कोरोनाबाधित रूग्णाची नोंद; बाधितांचा आकडा पोहचला दीड हजारापार\n“महाराष्ट्र पोलिसांवर हल्ले होतायेत आणि गृहमंत्री विचारतायत विरोधी पक्ष काय करतोय\nअमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; लाखो डॉलर्सची मदत करणार\nपुण्यात नव्याने 86 कोरोनाबाधित रूग्णाची नोंद; बाधितांचा आकडा पोहचला दीड हजारापार\nआपला लढवय्येपणे महाराष्ट्राच्या दुश्मनांबरोबर दाखवता येईल, पण…- संजय राऊत\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A4_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2022-10-07T23:35:33Z", "digest": "sha1:LEI3TJSCN5T47RMTWR5HUYUCBJZ3IJNG", "length": 3541, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:राजपूत वर्गीय विनाशिका - विकिपीडिया", "raw_content": "\n\"राजपूत वर्गीय विनाशिका\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१६ रोजी ११:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00032942-Y0867V0211FT0L.html", "date_download": "2022-10-07T23:07:36Z", "digest": "sha1:LWJFAIQBEB6Q3J5OPGB3ZAVH5WXHGFW6", "length": 14359, "nlines": 300, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "Y0867V0211FT0L | VPG Foil | अॅरे/नेटवर्क प्रतिरोधक | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर Y0867V0211FT0L VPG Foil खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये Y0867V0211FT0L चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. Y0867V0211FT0L साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/gail-recruitment-2022-48-vacancies/", "date_download": "2022-10-07T23:01:34Z", "digest": "sha1:UJJGKS6BE5NM2MD42OTZTG7EBCI2BRZK", "length": 9645, "nlines": 152, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "GAIL Recruitment | गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये 48 जागांची भरती - 2022", "raw_content": "\nGAIL Recruitment | गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये 48 जागांची भरती\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nGAIL (India) Limited | गेल (इंडिया) लिमिटेड तर्फे कार्यकारी प्रशिक्षणार्थी / Executive Trainee पदाच्या एकूण 48 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 15 फेब्रुवारी 2022 ते 16 मार्च 2022 दरम्यान ऑनलाईन अर्ज सदर करू शकता\nपरीक्षेचे नाव / Exam Name : –\nपदाचे नाव व तपशील / Post Details :\nSr. No. पदाचे नाव /\n1 कार्यकारी प्रशिक्षणार्थी (इन्स्ट्रुमेंटेशन) /\n2 कार्यकारी प्रशिक्षणार्थी (मेकॅनिकल) /\n3 कार्यकारी प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल) /\nSr. No. पदाचे नाव /\nName of Post शैक्षणिक पात्रता /\n1 कार्यकारी प्रशिक्षणार्थी (इन्स्ट्रुमेंटेशन) /\n2 कार्यकारी प्रशिक्षणार्थी (मेकॅनिकल) /\n3 कार्यकारी प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल) /\nकार्यकारी प्रशिक्षणार्थी (इन्स्ट्रुमेंटेशन) /\n(SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे, अपंग: 10 वर्षे, सूट)\nकार्यकारी प्रशिक्षणार्थी (मेकॅनिकल) /\n(SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे, अपंग: 10 वर्षे, सूट)\nकार्यकारी प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल) /\n(SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे, अपंग: 10 वर्षे, सूट)\nपरीक्षा शुल्क / Exam Fee\nप्रवर्ग / आरक्षण /\nखुला प्रवर्ग / General Category फी नाही\nइतर मागासवर्गीय / OBC फी नाही\nअनुसूचित जमाती / Schedule Tribe फी नाही\nअनुसूचित जाती / Schedule Caste फी नाही\nमहिला / Women फी नाही\nमाजी सैनिक / Ex- Servicemen फी नाही\nमहत्वाच्या तारखा / Important Dates\nअर्ज सुरु होण्याची तारीख /\nअर्ज करण्याची शेवटची तारीख /\nअधिकृत संकेतस्थळ बघा | Official Website\nऑनलाईन अर्ज करा | Apply Online\nहेल्पलाईन माहिती / Helpline Details :\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nMPSC Group C Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC Subordinate Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022\nAir Force Agnipath Recruitment 2022 | भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022\nMPSC State Service Pre 2022 | महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 161 जागा\nMPSC Recruitment | पशुधन विकास अधिकारी पदाच्या 212 जागांसाठी भरती\nIndian Army Recruitment | भारतीय सेना भारती 90 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://crazymarathi.com/2022/09/05/suhagratri-bandya-bayko-chaddi-kadhto/", "date_download": "2022-10-07T21:57:03Z", "digest": "sha1:ZQNJGTM6XU2AFJSN3HAV6DDPJBVU4NOQ", "length": 11198, "nlines": 97, "source_domain": "crazymarathi.com", "title": "सुहागरात्रीच्या दिवशी नवरा बायकोची चड्डी काढतो… - Crazy Marathi", "raw_content": "\nसुहागरात्रीच्या दिवशी नवरा बायकोची चड्डी काढतो…\nनेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….\nविनोद १ : पावसाळ्यात बायकांनी झोपतांना सर्व कपडे काढून झोपावे….\nबाहेर दोरीवर राहिले तर भिजतील…\nतुमच्या सुंदर सुंदर विचारांना माझा साष्टांग नमस्कार..\nविनोद २ : एका बसमध्ये ड्राइवर अचानक ब्रेक लावतो, बसमधील एक मुलगा एक मुलीवर पडतो आणि त्या मुलीची K*ISS घेतो.\nतू मुलगी भडकून विचारतो “ये काय करतोस रे\nमुलगा म्हणाला T.Y.B.Com आणि तू\nविनोद ३ : नवरा : त माझ्या फि*ल्ममध्ये काम करशील की\nबायको : हो, पण सीन काय आहे\nनवरा : तुला हळू हळू पाण्यात जायचं आहे\nबायको : ठीक आहे पण फि*ल्मच नाव काय आहे\nनवरा : “गयी भै*स पाणी मै”\nविनोद ४ : बायको : अहो आज काम करताना मला कि*स-वीस नका करू…\nलगेच कामवाली बाई बोलली मॅडम, साहेबाना नीट समजून द्या\n“मी तर सांगून सांगून थकून गेलीय आहे”……\nविनोद ५ : मुलगी मुलाला आ*लिंगन देत त्याच्या कानात बोलाली\nमुलगी : असं काहीतरी कर कि माझं हृदययात धड-धड झालं पाहिजे\nमुलगा : मागे तुझा बा*प उभा आहे, अशीच चिपकून राहा नाहीतर पकडले जाऊ\nविनोद ६ : लाजाळू मुलाने सु*हारात्रीच्या वेळी बायकोच्या बॉ*लवर हाथ ठेऊन विचारलं हे काय आहे\nबायको : याच्यामधून दू*ध निघत….\nनवरा : ठीक आहे तू दू*ध का*ढून ठेव मी पार्ले-जी घेऊन येतो…\nविनोद ७ : मुलगा : मी १८ वर्षाचा आहे आणि तू\nमुलगी : मी पण १८ वर्षाची आहे\nमुलगा : अगं चाल न मग, लाजतेस कश्याला\n मुलगा : मतदान करायला ग वेडी….. विचार बदला, देश बदला\nविनोद ८ : झंप्या आपल्या होणारी बायकोला घेऊन पहिल्यांदा बागेत गेला होता. आजूबाजूला कोणी नाही हे बघून त्याने तिला विचारलं,\n“मी तुझे चुं*बन घेऊ शकतो का” मुलगी : नाही ” मुलगी : नाही झंप्या : का ग, असं नाही का म्हणते आहेस\nमुलगी : आईने सांगितलं आहे कि त्याने काहीही विचारलं कि “नाही” उत्तर घ्यायचं\nझंप्या : (विचार करून) ठीक आहे, मग मला सांग, मी तुझे चुं*बन घेतले तर तुझी हरकत नाही ना” मुलगी : नाही…\nविनोद ९- सुहा’ग’रात्रीच्या दुसऱ्या दिवशी पप्पू खूप खुश असतो…\nबायको- काय झालं हो पप्पू- तू दरवाजा लॉक होता चो री झालीच नाही…\nबायको- मे ल्या माझ्या घरात दोन दरवाजे आहे…\nचो री पुढच्या नाही मागच्या दरवाज्याने होत होती…\nविनोद 10- का मवाली-“बा ई, तुमची कमाल आहे कसे काय जमले तुम्हाला कसे काय जमले तुम्हाला” बबली-“म्हणजे\nकामवाली-“मी दहावी शिकले आणि तुम्ही पार पी एच डि केली कसे काय जमले\nबबली-“मला नाही कळले तू काय म्हणतेय ते\nकामवाली-“अहो दहावी होण्यासाठी आमच्या मास्तरने मला ४० वेळा ठो*कले तुमचे काय केले असेल तुमचे काय केले असेल\nविनोद १०- एकदा बंड्याची लग्नाची पहिली रात्र असते…\nबंड्या कपडे काढतो आणि बा बु राव हातात घेतो…\nअचानक बाबुराव मधून 2 थेंब पडतात… बायको- जानू, हे काय झालं रे\nबंड्या जोरात हसायला लागला… बंड्या- अगं शोना काही नाही हे तर आनंदाचे अश्रू आहेत 😂😂😂😂\nविनोद 11- सुह गरात्रीच्या दिवशी नवरा बायकोची चड्डी काढतो….\nनंतर बायकोचे पाय वर करतो… पण बाबुराव काही आत जात नाही…\nनवरा टेन्शन मध्ये बोलतो… नवरा- च्यायला बाबुराव जात का नाहीय\nबायको हसून बोलते… बायको- अहो थोडं तेल टाकून बघा लगेच जाईल बिना तेलाचा बाबुराव जात नाही…\nनवरा बेशुद्ध… ज्याला समजला त्यांनीच हसा…..\nमराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – रात्री 3 ठिकाणी आग लागली आहे. 1- मंदिर 2- शाळा 3- दवाखाना सांगा सर्व प्रथम अँबुलन्स कोणती आग विझवेल\nसुहा’गरात्री बायको दुधाचा ग्लास घेऊन येते…\nताईने केला कार्यक्रमात सुंदर डान्स…\nरात्री चिंटूच्या आयटमने चड्डीत हाथ टाकला…\nसालीने केला भन्नाट डान्स…\nगोट्या सि’टीस्कॅन करण्यासाठी हॉ’स्पिटल मध्ये गेला\nलग्नात बायकांनी केला झकास डान्स…\nसाली बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…\nलग्नात वहिनीनीं केला भारी डान्स…\nसुहा’गरात्री बायकोला जोराची उचकी लागते….\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा वट पिंकी एका बस मध्ये चढली…\nवहिनी ने दिराच्या लग्नात केला सुंदर डान्स…\nचा’वट बाई मेडिकल वर गेली…\nमुलीने सासरी जाताना सर्वांना रडवले\nटकला टी शर्ट घालून आला…\nनवरी ताईचा विडिओ बघून रडू येईल…\nबंड्याच्या बेडरूम मधून बायकोचा आवाज आला…\nलग्नात ताईने केला खुपच सुंदर डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nताईने केला खुपच सुंदर डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/pune/pimpri-chinchwad-mayor-vs-commissioner-clash-over-ews-families-help-mhds-560303.html", "date_download": "2022-10-07T21:59:04Z", "digest": "sha1:P4KUA7Y7H5IQLFSPFWUUIQFX3T7NG3S4", "length": 15576, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पिंपरीत आयुक्त विरुद्ध महापौर रंगला वाद – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /पुणे /\nआयुक्तसाहेब कोणाच्या दबावाखाली गोरगरीबांच्या अन्नात माती कालवताय; पिंपरी महापौरांचा थेट सवाल\nआयुक्तसाहेब कोणाच्या दबावाखाली गोरगरीबांच्या अन्नात माती कालवताय; पिंपरी महापौरांचा थेट सवाल\nसर्वसाधारण सभेने घेतलेल्या या निर्णयाला महापालिका प्रशासनाने खोडा घातल्याने जाहीर केलेली मदत गरजूंपर्यंत अजूनही पोहोचली नसल्याचं सांगत सत्ताधा-यांनी महापालिका प्रशासना विरोधात आता रान उठवलं आहे.\nसर्वसाधारण सभेने घेतलेल्या या निर्णयाला महापालिका प्रशासनाने खोडा घातल्याने जाहीर केलेली मदत गरजूंपर्यंत अजूनही पोहोचली नसल्याचं सांगत सत्ताधा-यांनी महापालिका प्रशासना विरोधात आता रान उठवलं आहे.\nPolice Bharti: 'या' जिल्ह्यातील पोलीस विभागात जॉबची संधी; 23,000 रुपये पगार\n पिंपरीत तब्बल 93 लाखांचा अपहार, मालकाच्या अनुपस्थित खोट्या सह्या अन्\n12वी ते ग्रॅज्यएट उमेदवारांसाठी PCMC मध्ये तब्बल 386 जागांसाठी बंपर ओपनिंग्स\nBitcoin मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 14 लाखांचा गंडा, पिंपरी-चिंचवडमधील घटना\nपिंपरी चिंचवड, 3 जून: लॉकडाऊनच्या काळात पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchvad)मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांची (EWS families) उपासपार होऊ नये म्हणून त्यांना ३ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला होता. मात्र सर्वसाधारण सभेने घेतलेल्या या निर्णयाला महापालिका प्रशासनाने खोडा घातल्याने जाहीर केलेली मदत गरजूंपर्यंत अजूनही पोहोचली नसल्याचं सांगत सत्ताधा-यांनी महापालिका प्रशासना विरोधात आता रान उठवलं आहे. महासभेत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना बंधनकारक आहे. मात्र, असे असतानाही ते जनतेच्या अन्नात माती कालवण्याचे काम का करतायत असा सवाल उपस्थित करत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे यांनी आयुक्तांवर शेलक्या शब्दात ताशेरे ओढले आहेत. “कोरोना महामारी ही मानवावर आलेली आपत्ती आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यात महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी पिंपरी-चिंचवडमध्ये अत्यावश्यक सेवा व उद्योग क्षेत्रात काम करणारे वगळता इतर सर्वांनाच घरी बसावे लागले. हातावर पोट असणाऱ्यांसमोर पोट भरण्यासाठी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला. अशांना आधार नाही तर थोडासा धीर देण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत ३ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आधी स्थायी समिती सभेत नंतर 30 एप्रिल 2021 रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव करण्यात आला. जनतेला अशी मदत देता येते किंवा नाही याबाबत कायदेशीर बाजूंची पडताळणी करूनच सभेत हा ठराव करण्यात आल्याच सांगताना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात (बीपीएमसी अ‍ॅक्ट) प्रकरण 6 मध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांची कर्तव्ये व अधिकार नमूद करताना महानगरपालिकेने शहरातील जनतेसाठी कोणती आवश्यक व स्वेच्छाधीन कर्तव्ये पार पाडावीत हे स्पष्ट केलेले आहे. याच प्रकरण 6 मधील कलम 66 मध्ये महानगरपालिकेला स्वेच्छा निर्णयानुसार कोणकोणत्या बाबींसाठी तरतूद करता येते हे नमूद आहे. या कलमामध्ये 42 प्रकारच्या बाबी नमूद आहेत. त्यातील 39 क्रमांकाची बाब ही शहरातील जनतेवर ओढवलेली कोणतीही आपत्ती दूर करण्यासाठी उपाययोजना करणे असा आहे. पुण्यात कोरोनाच्या भीतीपोटी शेकडो अस्थिकलश स्मशानभूमीतच धुळखात पडून..., असा प्रश्न निर्माण झाला. अशांना आधार नाही तर थोडासा धीर देण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत ३ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आधी स्थायी समिती सभेत नंतर 30 एप्रिल 2021 रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव करण्यात आला. जनतेला अशी मदत देता येते किंवा नाही याबाबत कायदेशीर बाजूंची पडताळणी करूनच सभेत हा ठराव करण्यात आल्याच सांगताना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात (बीपीएमसी अ‍ॅक्ट) प्रकरण 6 मध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांची कर्तव्ये व अधिकार नमूद करताना महानगरपालिकेने शहरातील जनतेसाठी कोणती आवश्यक व स्वेच्छाधीन कर्तव्ये पार पाडावीत हे स्पष्ट केलेले आहे. याच प्रकरण 6 मधील कलम 66 मध्ये महानगरपालिकेला स्वेच्छा निर्णयानुसार कोणकोणत्या बाबींसाठी तरतूद करता येते हे नमूद आहे. या कलमामध्ये 42 प्रकारच्या बाबी नमूद आहेत. त्यातील 39 क्रमांकाची बाब ही शहरातील जनतेवर ओढवलेली कोणतीही आपत्ती दूर करण्यासाठी उपाययोजना करणे असा आहे. पुण्यात कोरोनाच्या भीतीपोटी शेकडो अस्थिकलश स्मशानभूमीतच धुळखात पडून... त्यानुसार कोरोना महामारीची आपत्ती दूर करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील गरीब जनतेला आर्थिक मदत देण्याची उपाययोजना करण्याचा महापालिकेला पूर्णपणे कायदेशीर अधिकार प्राप्त आहेत. त्यानुसार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने शहरातील आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबांना 3 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. सर्वसाधारण सभेने 30 एप्रिल 2021 रोजी घेतलेल्या निर्णयावर आयुक्त राजेश पाटील यांनी तब्बल 11 दिवसांनतर म्हणजे 11 मे 2021 रोजी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून ही मदत देता येईल किंवा कसे याबाबत अभिप्राय मागवला. आज 23 दिवस झाले तरी गोरगरीब कुटुंबांना 3 हजार रुपये देण्याच्या निर्णयावर विभागीय आयुक्तांचा अभिप्राय आलेला नाही. महामारीत लोकं मरत असताना, उपासमार सुरू असताना सुद्धा प्रशासन किती संवेदनाहीन झाले आहे हे यावरून स्पष्ट होत असल्याचही महापौर उषा ढोरे म्हणाल्या. याहून धक्कादायक बाब म्हणजे आपत्तीच्या काळात कायद्यानुसार लोकांना आर्थिक मदत देण्याची तरतूद असतानाही आयुक्त राजेश पाटील केवळ वेळकाढूपणा करण्यासाठी राज्य शासनाऐवजी विभागीय आयुक्तांकडून अभिप्राय मागवला असल्याचा आरोप सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी करत आयुक्त राजेश पाटील यांना अभिप्राय घ्यावयाचाच होता तर त्यांनी राज्य शासनाचा अभिप्राय मागवायला हवा होता. पण त्यांनी चालढकल करण्याच्या उद्देशाने मुद्दामहून विभागीय आयुक्तांकडून अभिप्राय मागवला अस महापौर ढाके म्हणाल्या. महापालिकेतर्फे देण्यात येणारी मदत आयुक्त राजेश पाटील यांना त्यांच्या खिशातून द्यायचे नव्हते तर ते शहरातील जनतेनेच दिलेल्या करातून दिले जाणार असल्याने, आयुक्त राजेश पाटील त्यासाठी का खोडा घालतायत असाही प्रश्न ढाके यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान या प्रकरणी आयुक्त राजेश पाटील यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील गरिबांना 3 हजार रुपये देण्याच्या निर्णया बाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर या घटनेमुळे सत्ताधारी विरुद्ध प्रशासन अशी सुरवात करणारी ठिणगी पडली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%9A/", "date_download": "2022-10-07T23:00:29Z", "digest": "sha1:GMZHTDQZJQ6Q4BCCVON5FMSAFAAUPET6", "length": 12113, "nlines": 88, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "धक्कादायक! आईच्या पोटातच मुलगी झाली ग'र्भव'ती.. डॉक्टरांनी कारण सांगितल्यावर सगळेच झाले सुन्न... - Themaharashtrian", "raw_content": "\n आईच्या पोटातच मुलगी झाली ग’र्भव’ती.. डॉक्टरांनी कारण सांगितल्यावर सगळेच झाले सुन्न…\n आईच्या पोटातच मुलगी झाली ग’र्भव’ती.. डॉक्टरांनी कारण सांगितल्यावर सगळेच झाले सुन्न…\nया जगात अनेक वेग-वेगळ्या घटना घडत असतात. यामधील काही घटना तर सर्वसामान्यांच्या विचार करण्याच्या पलीकडचे असते. असे वि’चित्र प्रकार घडूच कसे शकतात यावर विश्वासच बसत नाही. असाच एक अगदी वि’चित्र प्रकार इस्रायल मधून समोर नुकतंच समोर आला आहे. इस्राईलच्या अशदोद मध्ये हा चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे.\nसमोर आलेल्या या प्रकाराने, चक्क डॉ’क्टरना देखील मोठा ध’क्का दिला आहे. मात्र यात दिलासादायक बाब इतकीच आहे की, या झालेल्या प्रकारामधून डॉक्टरांनी एका न’वजा’त मुलीचे प्रा’ण यशस्वीरीत्या वाचवले आहे. इस्राईलमध्ये समोर आलेल्या या प्रकरणामध्ये, एका न’वजा’त मुलीच्या ग’र्भामध्ये भ्रू’ण आढळून आले.\nही पाच लाखांमधून अत्यंत दुर्मिळ अशी एक घटना आहे. अशदोद येथील असुता मेडिकल सेंटर मधील हा प्रकार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या आईच्या ग’र्भा’तच असताना, या चिमुकलीच्या ग’र्भात भ्रू’ण वाढत होते. तूर्तास मुलीची स’र्जरी करुन त्वरित हे भ्रू’ण काढून टाकण्यात आले.\nदरम्यान डॉ’क्टरांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, या मुलीची आई जेव्हा प्र’सूतीच्या आधीची अल्ट्रा-साऊंड म्हणजेच सो’नोग्रा’फी करण्यासाठी आली होती. त्याचवेळी, मुलीच्या या स्थितीबद्दलची शंका डॉ’क्टरांना आली होती. काही तरी सम’स्या आहे, कारण मुलीचे पो’ट मोठे झालेले आढळून येत होते. डॉक्टरांनी, अत्यंत काळजीपूर्वक त्या न’वजा’त बाळाची पूर्ण तपासणी केली.\nत्यानंतर नवजात मुलीचे अल्ट्रासाउंड आणि एक्स-रे केल्यानंतर समोर आले की, त्या छोट्या चिमुरडीच्या पो’टात भ्रू’ण वाढत आहे. चक्क त्या भ्रू’णचे हाडं आणि हृदय देखील विकसित झाले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीच्या ग’र्भामध्ये एकापेक्षा अधिक भ्रूण विकसित झालेले होते. डॉक्टर ग्लोबस यांनी याबद्दल पूर्ण खुलासा केला.\nकोणत्या परिस्थितीमध्ये असे होऊ शकते याबद्दल माहिती दिली. पाच लाखांमध्ये एखादे वेळेस असा प्रकार घडतो. यामध्ये, सर्वात पहिले आपल्या आईच्या ग’र्भामध्ये हे भ्रू’ण ट्विन्सचा ग’र्भ बनत असतो. त्यानंतर, अचानक एक भ्रू’ण दुसऱ्या भ्रू’णमध्ये जाते. ज्यावेळी, एक भ्रू’ण पूर्णपणे विकसित होते तेव्हा दुसरा भ्रू’ण त्याच्या पो’टात वाढू लागतो.\nमात्र, या विकसित झालेल्या भ्रू’णमध्ये जैविक अंश नसतात. डॉ’क्टरांनी मोठ्या प्रयत्नाने, या छोट्या मुलीच्या पो’टातून भ्रू’ण काढले आहे. या छोट्या मुलीवर ही श’स्त्रक्रि’या यशस्वी झाली आहे. आणि आता, ही छोटी मुलगी आणि तिची आई अगदी ठणठणीत झाल्या असून आपल्या घरी आहेत.\nआता ही मुलगी अगदी निरोगी असून, इतर मुलींप्रमाणे आयुष्य जगणार याची शाश्वती डॉक्टरांनी दिली आहे. घडलेला प्रकार अत्यंत दुर्मिळ आहे, मात्र डॉक्टरांनी आपले कौशल्य वापरुन त्यामधून छोट्या मुलीचे प्रा’ण वा’चवले हे देखील कौतुकास्पद आहे.\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\nपती ‘नपुं’सक’ असून देखील पत्नी झाली ‘प्रे’ग्नं’न्ट’, खरे सत्य समोर येताच पतीचेही उडाले होश…\nह’निमू’नच्या पहिल्याच रात्री पत्नीला समजले की पती आहे स’मलैं’गि;क, पहा तरीही पतीने पत्नीसोबत केले…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/80-varshyat-hi-gheta-yenar/", "date_download": "2022-10-07T21:58:14Z", "digest": "sha1:H7QC3DZI3X6DR2XXYAW5VFLBZDAQCM2U", "length": 12617, "nlines": 89, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "वयाच्या 80 वर्षापर्यंतही घेता येणार स'ळस'ळत्या तरुणाईचा आनंद, जर दुधात टाकून कराल फक्त 'या' एका पदार्थाचे सेवन.. - Themaharashtrian", "raw_content": "\nवयाच्या 80 वर्षापर्यंतही घेता येणार स’ळस’ळत्या तरुणाईचा आनंद, जर दुधात टाकून कराल फक्त ‘या’ एका पदार्थाचे सेवन..\nवयाच्या 80 वर्षापर्यंतही घेता येणार स’ळस’ळत्या तरुणाईचा आनंद, जर दुधात टाकून कराल फक्त ‘या’ एका पदार्थाचे सेवन..\nसध्याच्या युगात फि-ट राहणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. सध्या को-रोना काळ असल्यामुळे अनेक जण आपली प्र-तिकारक्षमता वा-ढवण्याकडे दिसत आहेत. मात्र, असे करूनही अनेकांना अनेक आ-जारांचा सामना करावा लागतो. नियमितपणे व्यायाम केल्यास आपले श-रीर तंदुरुस्त राहते.\nमात्र, असे करणे सर्वांनाच जमत नाही. सध्या अनेकांना कामासाठी घरा बाहेर राहावे लागते. रात्री उशिरा पर्यंत त्यांना काम करावे लागते आणि सकाळी लवकर उठावे लागते. यामुळे सहाजिकच श-रीराला खूप मोठ्या प्रमाणात थ-कवा जाणवतो आणि ऊ-र्जा कमी होते. त्यामुळे ऊ-र्जेचे स्त्रो-त निर्माण करणारा प-दार्थ आपण खायला पाहिजेत.\nमात्र, असे असूनही अनेकांना असे प-दार्थ मिळत नाही. सर्व फळे भाज्या फळे आणि मां-साहारी पदार्थ आपण खाल्ली तर आपल्याला ऊर्जा प्राप्त होऊ शकते. मां- साहारी पदार्थ सर्वांनाच जमत नाही. जे लोक शा-काहारी आहेत त्यांना शा-काहारातून अशी ऊ-र्जा प्राप्त होत नाही. मां-साहारी पदार्थातून मोठी ऊ-र्जा मिळत असते.\nमात्र, शा-काहारी लोकांना हे पदार्थ चालत नाही. त्यामुळे औ-षधी गो-ळ्याच्या माध्यमातून शा-काहारी लोक अशी ऊ-र्जा मिळविण्याचा प्रयत्न करतात. गो-ळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन असते. त्याला उपाय म्हणून आपण सुकामेवा देखील खाऊ शकतो. मात्र, सर्वांनाच असे जमत नाही. आपण जुने लोक पाहिले असतील.\nजुने लोक हे त्यांचे आ-हारावर खूप काळजी घेत असत. त्यामुळे त्यांची श-रीरयष्टी मजबूत असायची आणि शेतात काम करून त्यांचे शरीर मजबूत झाल्याचे आपण पाहिले असेल. मात्र, आजकाल शा-रीरिक क-ष्ट कोणालाही नको वाटत आहेत आणि बैठे जीवन पद्धती मुळे अनेकांना आ- जारांचा सामना करावा लागतो. पूर्वी शा-रीरिक क-ष्ट हे मोठ्या प्रमाणात होते.\nत्यामुळे त्यांना कुठल्याही आ-जारांना सामोरे जावे लागत नव्हते. म्हणूनच फि-ट राहणे हे अतिशय महत्वाचे आहे. जुने लोक हे. पोष्टिक प-दार्थ खाऊन आपले आ-रोग्य टि-कवून ठेवत होते. आज आम्ही आपल्याला अशाच एका प-दार्थ बद्दल सांगणार आहोत. हा प-दार्थ खाल्ल्याने आपण त-रतरीत आणि तजेल दिसाल आणि आपले ता-रुण्य देखील टिकवण्यात मदत होईल.\nहा पदार्थ गावांमध्ये सहज रित्या कुठेही उपलब्ध होतो. मात्र, शहरांमध्ये हा पदार्थ सहजासहजी उपलब्ध होत नाही. दुकानातून जाऊन हा पदार्थ आपल्याला घ्यावा लागतो. आम्ही ज्या पदार्थ बद्दल बोलत आहोत तो पदार्थ म्हणजे डिंक होय. डिंक खाल्ल्याने आपली प्र-तिकार क्ष-मता वाढते. मात्र, आपले आरोग्य देखील टिकून राहते.\nतसेच आपल्याला तजेल आणि ता-रुण्य देखील यामुळे प्राप्त होते आणि आपली वयो मर्यादा वाढवण्यासाठी डिंकाचा उपयोग देखील होऊ शकतो. तसेच यामुळे हा- डे मजबूत होतात. तसेच यामुळे का-मोत्तेजना देखील वाढते. तसेच डिंक खाल्ल्याने आपल्याला चांगली झोप देखील येऊ शकते. आपण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये डिंकाचे लाडू खाऊन देखील आपले ता-रुण्य टिकून ठेवू शकता.\nटीप: ही माहिती ऑनलाइन पध्दतीने मिळवलेली आहे, त्यामुळे काहीही करण्याआधी आपल्या डॉ-क्टरांचा सल्ला घ्या.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-44809983", "date_download": "2022-10-07T23:44:54Z", "digest": "sha1:6KZJOWPSHDWZRT2SYRAVKH77HGF4I4LQ", "length": 19356, "nlines": 122, "source_domain": "www.bbc.com", "title": "IITची परीक्षा दरवर्षी दोनदा घेण्यात अडचण काय? - BBC News मराठी", "raw_content": "\nIITची परीक्षा दरवर्षी दोनदा घेण्यात अडचण काय\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर\nपुढच्या वर्षीपासून IIT JEE Mains परीक्षा दरवर्षी दोनदा घेण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे या परीक्षेचं आयोजन करण्यात येईल.\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. दोनदा परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा संधी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होईल.\nआतापर्यंतच्या संरचनेप्रमाणे विद्यार्थी तीन वर्षात तीन वेळा मेन्सची परीक्षा देऊ शकत होते. दोनवेळा JEE advance परीक्षा देऊ शकतात. पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना सहा वेळा परीक्षा देण्याची संधी मिळू शकते.\nपुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना परीक्षेची पहिली संधी जानेवारीत तर दुसरी एप्रिलमध्ये मिळणार आहे. मात्र JEE Advance परीक्षा वर्षातून एकदाच होणार आहे.\nपरीक्षेसाठी विशिष्ट अशा तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. JEE Mainsची परीक्षा 15 दिवस चालेल. विद्यार्थी आपल्या सोयीनुसार परीक्षा देऊ शकतील.\n'मी 17 वर्षं शिक्षक होतो पण मला लिहिता, वाचता येत नव्हतं'\nविद्यार्थ्यांना कॉपी का करावी लागते मुलांवर एवढा ताण कशाचा\nJEE Mainsची परीक्षा जानेवारी 2019 मध्ये होणार आहे. यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सप्टेंबर 2018 पासून सुरू होणार आहे. परीक्षेचा निकाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील.\nनव्या प्रक्रियेतील अडचणी काय आहेत\nसरकारच्या नव्या घोषणेसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीवर याचा किती परिणाम पडेल\n'वर्षातून दोनदा परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना जास्त संधी मिळणार आहेत. साहजिक त्यांच्यावरचा दबाव कमी होईल कारण वर्ष फुकट जाण्याची भीती उरणार नाही', असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे संचालक विनित जोशी यांनी सांगितलं.\nजानेवारीत IITची परीक्षा होईल आणि त्याच महिन्यात निकालही हाती येतील. जर एखादा विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकला नाही तर पुढच्या महिन्यात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी मानसिकदृष्ट्या तो तयार असेल का\nयाचं उत्तर देताना विनीत जोशी यांनी सांगितलं, 'वर्षातून दोनदा परीक्षा देणं अनिवार्य नाही. मात्र ज्यांना इच्छा आहे ते देऊ शकतात. एखाद्या विषयाचा पेपर चांगला गेला नाही तर पुढच्या परीक्षेत चांगल्या तयारीनिशी नव्याने पेपर देऊ शकतो.\nयाच वर्षी JEE Mains परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रिन्स कुमार हे विनित जोशी यांच्या मताशी सहमत नाही. प्रिन्स यांच्या मते, पहिल्यांदा परीक्षेत नापास झाल्याचं कळल्यावर दुसऱ्यांदा परीक्षेची तयारी करण्याकरता किमान 15 दिवस लागतात. पहिल्यांदा परीक्षेत नापास झाल्यावर विद्यार्थी खचून जातो.\nरोपिन भंडारी यांनी नवा मुद्दा मांडला. ते म्हणाले, 'कोचिंग क्लासवाल्यांचं उखळ पांढरं होणार आहे. सिलॅबस भराभर पूर्ण करण्याची त्यांची घाई उडाली आहे. अख्खं वर्षभर त्यांच्यांकडे विद्यार्थ्यांचे जत्थे येत राहतील'.\nवर्षातून दोनदा JEE Mainsची परीक्षा घेण्यामागे विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करणं हा सरकारचा हेतू आहे. मात्र प्रिन्स आणि रोपिन यांना हा मुद्दा मान्य नाही.\nMPSC परीक्षेचे उमेदवार एवढे का चिडले आहेत\nUPSC : 4 मिनिटांचा उशीर आणि त्याने जीव दिला\nजागा तेवढ्याच राहणार असतील तर विद्यार्थ्यांवरचा दबाव कमी नव्हे तर वाढण्याची शक्यता आहे. परीक्षेसाठीचा कटऑफ वाढेल आणि त्याचवेळी विद्यार्थ्यांमधली स्पर्धा वाढीस लागेल.\nपरीक्षा दोनदा होणार असली तरी जागा तेवढ्याच राहणार आहेत.\nसध्या देशभरातील 23 IIT मिळून 12000 जागा आहेत. दरवर्षी साधारण: 15 लाख विद्यार्थी JEE परीक्षा देतात.\n'सरकारने याप्रकरणी चांगला पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना याचा फायदाच होईल. वर्षातून दोनदा परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगला पर्याय आहे. IIT ब्रँडसाठीही ही चांगली गोष्ट आहे. आता विद्यार्थी अधिक गंभीरतेने परीक्षेची तयारी करतील. अन्य कुणाशी तुलना किंवा स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करतील', असं IIT कानपूरमधील प्राध्यापक धीरज सांगी यांनी सांगितलं.\n'सरकारच्या या निर्णयाने अन्य काही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. परीक्षेच्या प्रश्नांचं सामान्यीकरण कसं होईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एक परीक्षा अनेकदा आयोजित करण्यात आली तर प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी वेगवेगळी राहील', असं प्राध्यापक सांगी यांनी सांगितलं.\nएक पेपर कठीण तर एक सोपा असू शकतो. कठीण पेपरमध्ये कमी गुण मिळालेले विद्यार्थी, सोप्या पेपरात अधिक गुण मिळालेले विद्यार्थी यांना समान समजलं जाईल. याला नॉर्मलायझेशन अर्थात सामान्यीकरण म्हटलं जातं.\nविद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोनदा परीक्षा सोयीची ठरणार आहे.\nजगभरात जिथे जिथे एक परीक्षा अनेकदा आयोजित होते तिथे नॉर्मलायझेशन प्रक्रिया राबवली जाते. आताही IITमध्ये प्रश्नपत्रिकांचे अनेक सेट तयार केले जातात. मात्र CBSE गुणांमध्ये नॉर्मलायझेशन करत नाही.\n'JEE Mains परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा आयोजित करण्यात आली तर नॉर्मलायझेशनचा प्रश्न ऐरणीवर येईलच. यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला अनेक तज्ज्ञांची आवश्यकता भासेल. त्यांची नियुक्ती केव्हा आणि कशी होणार यावर चर्चा होणं गरजेचं आहे', असं प्राध्यापक सांगी यांनी सांगितलं.\nनॅशनल टेस्टिंग एजन्सी या मुद्यांचं निराकरण करण्यात किती यशस्वी होते आहे आणि त्यासाठी काय उपाययोजना हाती घेण्यात येतात यासाठी पुढच्या वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nकाश्मीरचे इंजिनीयर आणि बिहार कनेक्शन\nशिक्षक भरती : 'पकोडे तळायला त्यांनी मला 4 वर्षांपूर्वीच सांगितलं असतं तर...'\nMPSC परीक्षेचे उमेदवार एवढे का चिडले आहेत\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nधनुष्यबाण आणि शिवसेना कुणाची उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस\nनोबेल शांतता पुरस्कार अॅलेस बियालत्स्की यांना जाहीर\n त्याचा तुमच्या-आमच्या ऑनलाईन खरेदीवर काय परिणाम होणार\nउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाबद्दलचे शब्द जाहीरपणे मागे घ्यावेत- फडणवीस\nदसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे का बोलले नाहीत\nएकनाथ शिंदेंनी वि. उद्धव ठाकरे- दसरा मेळाव्यात कुणी कुणावर केली मात\nउद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणातल्या 3 हुकलेल्या संधी आणि 1 चूक\n'स्वतःही खुराड्यात राहिलात आणि आम्हालाही कोंडून ठेवलं' - शहाजी बापू पाटील\nपंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा राजकीय अर्थ काय\nलहान मुलांना कफ सिरप देणं किती सुरक्षित\nठाकरेंना धनुष्यबाणावर दाव्यासाठी उद्यापर्यंतची मुदत | तीन गोष्टी पॉडकास्ट\nगावाकडची गोष्ट : बोगस सातबारा उतारा ओळखण्याचे 3 सोपे उपाय...\nश्रीलंकेतल्या आर्थिक संकटाला सेंद्रिय शेती कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय, कारण...\nशेवटचा अपडेट: 23 मे 2022\nमहागाईच्या काळात या 7 मार्गांनी तुम्ही खाण्यापिण्यावरचा खर्च कमी करू शकता\nशेवटचा अपडेट: 3 ऑगस्ट 2022\nजेवणातून चपाती-भात पूर्णपणे बंद केले तर काय फायदे होतात या पदार्थांना पर्याय काय\nऔरंगजेब पाहताक्षणीच दासीच्या प्रेमात पडला, पण ही प्रेम कहाणी अधुरीच राहिली...\nएअर फ्रायर की मायक्रोवेव्ह ओव्हन, कोणत्या उपकरणातील स्वयंपाक आरोग्यदायी\nशेवटचा अपडेट: 31 जुलै 2022\nकोंबड्यांमुळे सापडलं 20 हजार लोकांसाठी वसवलेलं जमिनीखालचं प्राचीन शहर\nदसऱ्याला 'सोनं' म्हणून आपट्याची पानं का लुटतात या झाडाचं महत्त्व काय\nधनुष्यबाण आणि शिवसेना कुणाची उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस\nहिंदू-मुसलमान जिथं अनेक वर्ष एकत्र राहिले त्या शहरात असं झालंच कसं\nउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाबद्दलचे शब्द जाहीरपणे मागे घ्यावेत- फडणवीस\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82/word", "date_download": "2022-10-07T21:08:10Z", "digest": "sha1:RSHR4J6BGNP4ERODZG4HRZVEMXFM6S46", "length": 13347, "nlines": 170, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पानावर पान घालणें - Dictionary Definition - TransLiteral Foundation", "raw_content": "\nSee also: पानावर पान टाकणें , पानावर पान ठेवणें\nमराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | |\nअपमान इ. वर पांघरुन घालणें\nकांहीं एक न करतां आपला मान राखून घेणें. ‘श्रीमंत तितक्यांतच उमजून, पानावर पान ठेवून, कांहीं स्वारी खर्च दिला तो घेऊन स्वारी पुण्यास आली.’\nपानावर पान घालणें गांठ घालणें गवसणी घालणें घोडें पुढें घालणें मोहरें इरेस घालणें फोडलेलें पान मंत्र घालणें मुखीं बोटें घालणें उंटावर खोगीर घालणें जनीचें पान जन्मा उपर खाल्‍लें पान, थुंकतां थुंकतां गेला प्राण जेवूं घालणें हातो पान करवतीं घालणें तोंडाला पान पुसणें पाखर घालणें चिरा घालणें फिरकंडें घालणें (अपराध) पोटीं घालणें जीभ नरकात घालणें घर पालथे घालणें रुंजी घालणें भर घालणें घोडी घालणें (अन्याय) पोटीं घालणें आगीत उडी घालणें माप पदरीं घालणें (लबाडी इ. चें) तोंड भरुन साखर घालणें बारनिशीवर घालणें (डोळ्यांत) धुरळा घालणें मुळाशीं हात घालणें उखळांत शीर घालणें बिब्ब्यावर घालणें शेव घालणें माप पदरांत घालणें (लबाडी इ. चें) रुजू घालणें आंख घालणें फांसा घालणें वाचा नरकांत घालणें धारा घालणें ज्याचीं बोटें त्याच्याच डोळयांत घालणें वाद घालणें (कामाची) माळ घालणें नंगा नाच घालणें स्नेहांत पाणी घालणें धाड घालणें ज्‍याच्या टांगड्या त्‍याच्याच गळ्यात घालणें घाण्यावर घालणें खो घालणें वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी\nकार्तिक माहात्म्य - अध्याय ३१\nकार्तिक माहात्म्य - अध्याय ३१\nकार्तिक माहात्म्य - अध्याय १८\nकार्तिक माहात्म्य - अध्याय १८\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - चौतिसावे वर्ष\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - चौतिसावे वर्ष\nसंग्रहांत आलेल्या शब्दांचे अर्थ\nसंग्रहांत आलेल्या शब्दांचे अर्थ\nसमासोक्ति अलंकार - लक्षण १९\nसमासोक्ति अलंकार - लक्षण १९\nतृतीयपरिच्छेद - मुलास पाळण्यांत घालणें\nतृतीयपरिच्छेद - मुलास पाळण्यांत घालणें\nसुजित कदम - मेंदूतल्या घरटयात जनमलेली...\nसुजित कदम - मेंदूतल्या घरटयात जनमलेली...\nश्यामची आई - रात्र विसावी\nश्यामची आई - रात्र विसावी\nतृतीयपरिच्छेद - तुलसीग्रहणाचा प्रकार\nतृतीयपरिच्छेद - तुलसीग्रहणाचा प्रकार\nमनीषा निपाणीकर - बाईचं आयुष्य म्हणजे वही क...\nमनीषा निपाणीकर - बाईचं आयुष्य म्हणजे वही क...\nनीरजा - आपण घडवलेल्या दंगली आणि र...\nनीरजा - आपण घडवलेल्या दंगली आणि र...\nपाचवीची गाणी - वाढा रं\nपाचवीची गाणी - वाढा रं\nगज्जलाञ्जलि - किति मैल अन्तर राहिलें अप...\nगज्जलाञ्जलि - किति मैल अन्तर राहिलें अप...\nगर्भिणी स्त्रीचे धर्म सांगतो\nगर्भिणी स्त्रीचे धर्म सांगतो\nश्रीमांगीशमहात्म्य - अध्याय नववा\nश्रीमांगीशमहात्म्य - अध्याय नववा\nश्यामची आई - रात्र अठरावी\nश्यामची आई - रात्र अठरावी\nकार्तिक माहात्म्य - अध्याय ३०\nकार्तिक माहात्म्य - अध्याय ३०\nअक्षरांची लेणी - फुगडीचे गाणे\nअक्षरांची लेणी - फुगडीचे गाणे\nएप्रिल १३ - संत\nएप्रिल १३ - संत\nकुलदैवत ओव्या - ओवी २०\nकुलदैवत ओव्या - ओवी २०\nअंत्येष्टिसंस्कार - अकराव्या दिवशीचे कृत्य\nअंत्येष्टिसंस्कार - अकराव्या दिवशीचे कृत्य\nप्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ८८ वे\nप्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ८८ वे\nआज्ञापत्र - पत्र ७\nआज्ञापत्र - पत्र ७\nस्फुट श्लोक - श्लोक १६ ते १७\nस्फुट श्लोक - श्लोक १६ ते १७\nद्दष्टांतालंकार - लक्षण २\nद्दष्टांतालंकार - लक्षण २\nधर्मसिंधु - गर्भिणी स्त्री धर्म\nधर्मसिंधु - गर्भिणी स्त्री धर्म\nप्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ६८ वे\nप्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ६८ वे\nरेणुकेचें अष्टक - चौदावें\nरेणुकेचें अष्टक - चौदावें\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nप्रसंग सोळावा - मुक्तबद्ध\nप्रसंग सोळावा - मुक्तबद्ध\nसोळा मासिक श्राद्धें कोणती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2019/12/blog-post_9.html", "date_download": "2022-10-07T22:06:01Z", "digest": "sha1:KCOKRCQX5ETPGASZ4W65SJJNRTWODU67", "length": 23278, "nlines": 211, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "‘नागरिकत्व संशोधन विधेयक-२०१९’ लोकशाहीपुढील आव्हान! | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\n‘नागरिकत्व संशोधन विधेयक-२०१९’ लोकशाहीपुढील आव्हान\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘नागरिकत्व संशोधन विधेयक २०१९’ गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांत मांडले आणि ते पारितही झाले. या विधयेकामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश या देशातील मुस्लिम वगळता हिंदू, बौद्ध, जैन, खिश्चन, शीख, पारसी नागरिकांचा भारताचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हा कायदा मुस्लिमविरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम १४चे उल्लंघन करतो. यात शेजारील देशातील केवळ मुस्लिम वगळता अन्य नागरिकांना नागरिकत्व देण्यात येणार असल्याने ते धर्माधर्मांत भेदभाव करणारा ठरतो. सध्याच्या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला किमान ११ वर्षे भारतीय नागरिकत्व घेणे बंधनकारक आहे. या विधेयकात शेजारच्या देशांच्या अल्पसंख्याकांसाठी ही मुदत ११वरून सहा वर्षांपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकत्व कायदा १९५५मध्ये काही दुरुस्त्या केल्या आहेत. जेणेकरून लोकांना नागरिकत्व देण्याचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामध्ये आतापर्यंत १९८६, १९९२, २००३, २००५ आणि २०१५ अशा पाच वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. २०१६मध्ये ते लोकसभेत मंजूर झाले, परंतु राज्यसभेत मंजूर होण्यापूर्वी लोकसभेची मुदत संपल्याने ते रद्द झाले होते. मात्र भारतीय घटनेच्या अनुच्छेद १४मध्ये म्हटले आहे की, धर्माच्या आधारे कोणत्याही नागरिकात भेदभाव केला जाणार नाही. या विधेयकाद्वारे भाजपला हिंदू धर्माचा अजेंडा बळकट करायचा आहे. हिंदू राष्ट्र घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशात आसामच्या नागरिकत्वाचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकार त्यांना नागरिकत्व न देता धर्माच्या आधारावर भेदाभेद करत असल्याने या विधेयकाला विरोध होत आहे. या विधेयकाला आसाम आणि ईशान्येकडील इतर राज्यांत जो विरोध आहे, बंगाल आणि ईशान्येकडील इतर राज्यांमधील बांगलादेशातून आलेल्या बंगाली हिंदूंची संख्यासुद्धा कमी नाही. या विधेयकाच्या माध्यमातून भाजप या सर्व राज्यांमध्ये आपली मतपेढी तयार करू इच्छितो अशी या राज्यांतील प्रादेशिक पक्षांची भीती आहे. भारतीयांच्या मनात ‘मुस्लिमांना’ आम्ही भारतात येण्यापासून कसे रोखले, असे बिंबवण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे. ईशान्येकडील परिस्थिती या विधेयकामुळे अधिकाधिक स्फोटक होण्याची चिन्हे आहेत. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले तर भारतीयत्वाच्या मूळ संकल्पनेलाच मुरड बसणार आहे. त्यामुळे खरे तर या विधेयकावर संसदेच्या दोन्ही सदनांसह, संसदेच्या संयुक्त समितीत आणि देशभरात विविध माध्यमांतून साधकबाधक चर्चा व्हायला हवी होती. भारताचे नागरिकत्व हे कोणत्याही धर्माशी संबंधित नाही आणि राज्यघटना कुणासही धार्मिक पाश्र्वभूमीवरून नागरिकत्व नाकारत नाही. राज्यघटनेतील या मूळ तत्त्वाशी प्रस्तावित विधेयकात प्रताडना करण्यात आली आहे. जगातील बहुतांशी लोकशाही-धर्मनिरपेक्षवादी देशांमध्ये नागरिकत्वाचा मुद्दा धर्माशी जोडलेला नाही. आपल्या देशांत बहुसंख्याक असलेल्या पण शेजारी किव्हा शत्रू देशांत अल्पसंख्याक असलेल्या समुदायातील व्यक्तींना प्राधान्याने नागरिकत्व प्रदान करण्याची पद्धत तर इस्त्राईल वगळता कुणीही स्वीकारलेली नाही. मोदी सरकारने मात्र इस्त्राईल या यहुदी धर्मावर आधारीत राष्ट्राचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत भारतीय नागरिकत्व प्रदान करण्याच्या तत्त्वांमध्ये बदल करण्याचा घाट घातला आहे. या तिन्ही देशांतील हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांचे भारतात स्थलांतर घडण्याची प्रक्रिया प्रचंड क्लेशदायक आणि हिंसकसुद्धा ठरू शकते. महत्त्वाचे म्हणजे, भारताने या प्रकारची घटनादुरुस्ती अंमलात आणली तर या तिन्ही देशांतील अल्पसंख्याकांभोवती संशयाचे प्रचंड वादळ घोंघावू लागेल. प्रस्तावित विधेयकाच्या माध्यमातून भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला बांगलादेशातून आलेल्या मुस्लिमांना आणि ज्यांची भारतीयत्वाची ओळख राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीपत्राच्या प्रक्रियेत फेटाळण्यात आली आहे, अशा मुस्लिमांना (ते बांगला देशातून आलेले नसतीलही) राष्ट्र-राज्य विहीन करायचे आहे. इस्त्राईलने जे फिलीस्तीनी मुस्लिमांसोबत केले, म्यांमारने जे रोहिंग्या मुस्लिमांसोबत केले तशीच प्रक्रिया भाजपाला आसाम, बंगाल व ईशान्येकडील मुस्लिमांसोबत (त्यात बांगलादेशातून आलेले व न आलेले या दोन्ही प्रकारचे मुस्लिम असतील) करायची आहे, हे स्पष्ट होते आहे. भाजप सरकारच्या प्रस्तावित नागरिकत्व (संशोधन) विधेयकाला असलेला विरोध सामान्य लोकांच्या गळी उतरणारा नाही. ही बाब भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे, ज्याचा फायदा घेत येत्या काळात नागरिकत्व (संशोधन) विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीपत्राच्या मुद्द्यांवरून आसाम व ईशान्येकडील राज्यांसह देशभर धार्मिक धृवीकरण घडवले जाईल. सलग दुसऱ्या वेळी मतदारांनी लोकसभेत बहुमत देऊ केलेल्या मोदी सरकारने भारतीय लोकशाही पुढे उभे केलेले हे सर्वांत मोठे आव्हान आहे. आता या देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचे भारतीय नागरिकत्व पुन्हा सिद्ध करावे लागणार आहे. असे सिद्ध केल्याने ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्याची कागदपत्रे नसतील ते साहजिकच या देशात निर्विासत किंवा घुसखोर ठरवले जातील व त्यांना देशाबाहेर काढले जाईल.\nLabels: शाहजहान मगदुम संपादकीय\nस्त्रियांना विक्रीकलेचे साधन आणि स्त्री-शरीराला वस...\n२७ डिसेंबर २०१९ ते ०२ जानेवारी २०२०\nजामिया विद्यापीठातील पोलिसांची कारवाई की सूड\nहिटलरी छळ छावण्रांतून हिंदू राष्ट्राकडे\n‘जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड, जस्टीस हरिड इज जस्...\n‘इतिहास घराचा पत्ता असतो, तो विसरता कामा नये’ –डॉ....\nCAB नव्या दहशतीची चाहुल\nउर्दू साहित्यिक आणि विचारवंतांचा बेशरमपणा\nसबका साथ, एक का अपवाद\nकर्जदाराशी सहिष्णुतेची वर्तणूक : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनागरिकता संशोधन बिल : सहिष्णू भारताची प्रतिमा डागा...\nमुस्लिमांना देशविहीन करण्याच्या दिशेने भाजपाचे पहि...\n‘नागरिकत्व संशोधन विधेयक-२०१९’ लोकशाहीपुढील आव्हान\n२० डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१९\nभांडवलशाही साम्राज्य आणि स्त्रिया\nज्ञानाला हत्यार नव्हे तर विजेरी बनवा\nमहाराष्ट्रातील सत्तांतराचा देशावर परिणाम\n१३ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०१९\nव्यापार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमहाराष्ट्राने खोदली नवपेशवाईची कबर\nबीएचयूमधील वाद लोकशाहीसाठी घातक\n०६ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०१९\nवैध कमाई : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी प्रेषिततत्व अंगीकारायल...\nस्त्री समानतेचे प्रणेते प्रेषित मुहम्मद (सल्ल.)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bhartijahirat.com/tag/master-of-engineering/", "date_download": "2022-10-07T22:35:26Z", "digest": "sha1:W6H2O4XKUL7552MP3ZOAE5FRGRJ362TU", "length": 6974, "nlines": 59, "source_domain": "bhartijahirat.com", "title": "Master of Engineering - Bharti jahirat", "raw_content": "\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nINCOIS Recruitment 2022 | भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात 138 जागांसाठी भरती\nINCOIS Recruitment 2022 भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात विविध पदांच्या एकूण 138 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार...\nNIT Recruitment | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वरंगल येथे 99 जागांसाठी भरती\nNIT Recruitment | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वरंगल येथे विविध पदांच्या एकूण 99 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून...\nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nसर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा \nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\nCentral Bank of India Recruitment 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\nMPSC Technical Services Recruitment 2022 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022\nMPSC ASO Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\nSBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2022 | इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\nECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-56616130", "date_download": "2022-10-07T22:40:28Z", "digest": "sha1:3LDO2RPWDIL6ZLO4NFYXDXYV3IKD2L45", "length": 32937, "nlines": 159, "source_domain": "www.bbc.com", "title": "कोरोना महाराष्ट्रः लॉकडाऊनला विरोध करणारे त्याऐवजी कोणते पर्याय देत आहेत? - BBC News मराठी", "raw_content": "\nकोरोना महाराष्ट्रः लॉकडाऊनला विरोध करणारे त्याऐवजी कोणते पर्याय देत आहेत\n\"लॉकडाऊन हवं की नको, या कात्रीत आपण अडकलो आहोत. एकीकडे जीव वाचवायचा आहे, दुसरीकडे अर्थचक्रही सुरू राहावं, याची काळजी घ्यावी लागणार आहे. लॉकडाऊन नको म्हणून लोक अनेक सल्ले देत आहेत. लॉकडाऊन हा काही शेवटचा पर्याय नाही, असं ते म्हणतात. पण या परिस्थितीवर कोणता पर्याय आहे सध्यातरी मी फक्त लॉकडाऊनचा इशारा देत आहे. पण पुढच्या दोन दिवसांत लॉकडाऊन संदर्भात निर्णय जाहीर करेन. \"\nअसं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (2 एप्रिल) केलं. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना ठाकरे बोलत होते.\nउद्धव ठाकरे यांचं फेसबुक लाईव्ह संपता-संपता राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा अहवालही प्रसिद्ध झाला. त्यानुसार, राज्यात शुक्रवारी एका दिवसात तब्बल 47 हजार 827 रुग्ण आढळून आल्याचं आकडेवारी सांगते.\nहे आकडे नक्कीच काळजीत टाकणारे आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज 35 ते 40 हजार रुग्णांची भर पडत आहे. शुक्रवारी या संख्येने कळस गाठला.\nशुक्रवारी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी 47 हजार 827 रुग्णांची वाढ झाली. ही वाढ आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक वाढ असल्याचं म्हटलं जात आहे.\nया पार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशारा पुन्हा एकदा दिलेला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या बोलण्यातही नेहमी हाच सूर दिसून येतो.\nपूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय, 2 दिवसांत कडक निर्बंध जाहीर करणार - उद्धव ठाकरे\n'वर्षभर जर आम्ही ऑनलाईन शिक्षण घेतलं असेल, तर परीक्षा ऑफलाईन का घेण्यात येतेय\nपुण्यात उद्यापासून काय सुरू, काय बंद राहणार\nशुक्रवारीच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती. यामध्ये पुण्यातील निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. राज्यातील इतर भागातही हीच परिस्थिती आहे.\nमात्र, लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाला काही जणांकडून विरोध होताना दिसून येतं. सरकारने पुन्हा लॉकडाऊन करून राज्यातील जनतेला वेठीस धरू नये, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे.\nलॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नाही, लॉकडाऊन हा काही शेवटचा पर्याय नाही, असं विरोधकांचं मत आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांतील नेत्यांनीही लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.\nएकूणच, एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यानुसार राज्य सरकार सध्या खरंच लॉकडाऊन करावं की नको या कात्रीत सापडलं आहे.\nअशा स्थितीत लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याकडे लॉकडाऊनऐवजी कोणते पर्याय आहेत त्यांच्याकडे लॉकडाऊनऐवजी कोणते पर्याय आहेत याचीही चर्चा होणं महत्त्वाचं ठरतं.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी सुरुवातीला लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता. पण आता त्यांनी सावध भूमिका घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय मान्य असल्याचं म्हटलं आहे.\nदोन दिवसांपूर्वी लॉकडाऊन हे राज्याला परवडणारं नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात यावा अशी आमची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी दिली होती.\nमुख्यमंत्र्यांनीही प्रशासनाला आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना केल्या आहेत. लोकांनी अजून काळजी घेतली पाहिजे. नियम पाळल्यास कोरोना वाढणार नाही, असंही नवाब मलिक म्हणाले.\nपण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लॉकडाऊनला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नसल्याचं स्पष्ट केलं. तिन्ही पक्ष मिळून चर्चा करून निर्णय घेतील, असंही पाटील म्हणाले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही लॉकडाऊनवरून संभ्रमावस्था असल्याचं पाहायला मिळालं.\nयावर बीबीसीने पुन्हा एकदा मलिक यांच्याशी संपर्क साधला. नवाब मलिक यांच्या मते, लॉकडाऊनला पर्याय म्हणून, रेल्वेसेवा बंद करणं, निर्बंध आणखी कठोर करणं, आदी गोष्टी करता येऊ शकतात. पण सर्व नेते, अधिकारी यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, त्यांचा निर्णय सर्वांना मान्य असेल, असं मलिक यांनी म्हटलं आहे.\nलॉकडाऊन केल्यास पाच हजार रुपये भत्ता द्या - चंद्रकांत पाटील\nलॉकडाऊनला भारतीय जनता पक्ष विरोध करणार नाही. पण लॉकडाऊन केल्यास हातावर पोट असणाऱ्या लोकांना सरकारने प्रत्येकी पाच हजार रुपये दिले पाहिजेत, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.\nलॉकडाऊनला पर्याय काय, या प्रश्नाचं उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी मागचं लॉकडाऊन समजावून सांगितलं.\nदिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा\nपाटील म्हणाले, \"लॉकडाऊन करताना सर्वसामान्य माणसाला पॅकेज द्या, असं आमचं म्हणणं आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिक कसा बसा जगला. त्या मागे नरेंद्र मोदींनी दिलेले रेशन पॅकेज, बँक खात्यात पाचशे रुपये अशी मोठी यादी आहे. हे सगळं केंद्राने केलं होतं. पण राज्याने काहीच केलं नाही.\nआता जर राज्याला लॉकडाऊन करायचं असेल तर त्यांनी सर्वप्रथम हे पॅकेज जाहीर करावं. पृथ्वीराज चव्हाण यांनीही अशाच प्रकारची मागणी केली आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिक सर्वाधिक भरडला जातो. त्यांनी जगावं कसं, याचं उत्तर राज्य सरकारने सर्वात आधी दिलं पाहिजे.\nकोरोना रोखण्यासाठी सरकारकडे इतर पर्यायही आहेत. चाचण्या वाढवून रुग्णांची ओळख लवकरात लवकर पटवावी. 85 टक्के रुग्ण सौम्य किंवा विनालक्षणांचे आहेत. अशा रुग्णांनी घरी राहण्यास प्राधान्य दिल्यामुळे कुटुंबंच्या कुटंबं बाधित होत आहेत.\nया रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्यासाठी आपण तिथे आरोग्य सुविधा चांगल्या देणं गरजेचं आहेत. तिथे गैरसोय होते, असं कळल्याने लोक आपल्याला लागण झाल्याचं लपवतात. मग त्यांच्यामार्फत अनेकांना विषाणूची लागण होत जाते. शिवाय, त्या रुग्णात अचानक ऑक्सिजनची पातळी खालावल्यास तो बेडची शोधाशोध करतो, तेव्हा त्याला बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे कोव्हिड सेंटरमधील सोयी-सुविधा प्रशासनाने वाढवल्या पाहिजेत.\nसौम्य लक्षणंवाल्या रुग्णांनीही रुग्णालयात यावं, यासाठी विश्वास निर्माण करायला हवा. हे करण्याऐवजी लॉकडाऊन करणं सोपं आहे, म्हणून सरकार सतत लॉकडाऊनची धमकी देतं. त्यामुळे लॉकडाऊन करायचाच असेल तर सरकारने लोकांना सर्वप्रथम पाच हजार रुपयांचं पॅकेज दिलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.\nशेतकऱ्यांचा सगळा माल विकत घेऊन लॉकडाऊन करा - सदाभाऊ खोत\nलॉकडाऊन करण्याआधी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला सगळा माल आधी विकत घ्यावा, अशी मागणी शेतकरी नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.\nखोत यांच्या मते, कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोनातून पहिला लॉकडाऊन 14 दिवस, 21 दिवस अशा कालावधीत लावण्यात आला होता. या कालावधीत आरोग्यविषयक सोयीसुविधा सुसज्ज करण्याचा सरकारचा उद्देश होता.\nआता एका वर्षानंतर कोरोना देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेला आहे. कोरोना काय आहे, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनची गरज नाही.\nत्याऐवजी, लोकांना मास्कचं वाटप करता येऊ शकेल. साखर कारखान्यांना सॅनिटायझरचं उत्पादन करण्याची सूचना करावी. शासकीय दवाखान्यांची दुर्दशा झाली आहे. तिथली परिस्थिती सर्वप्रथम सुधारावी, अशी सूचना सदाभाऊ खोत यांनी केली आहे.\nसरकारी कार्यालयं 50 टक्के मनुष्यबळाने चालवण्याच्या निर्णयाचाही खोत यांनी विरोध केला. सरकारी कर्मचाऱ्यांना फुकटचा पगार का देण्यात आहे, असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.\nते सांगतात, या सरकारी कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड घरी बसवण्यापेक्षा त्यांना इतर ठिकाणी कामावर पाठवता येईल. आशा वर्कर, ग्रामसेवक, अशा लोकांचा योग्य पद्धतीने नियोजन करून उपयोग करून घ्यावा.\nलॉकडाऊन करायचाच असेल तर सर्वप्रथम सरकारने शेतकऱ्यांचा सगळा माल विकत घ्यावा. त्याच्या तेल-मिठाची सोय करून द्यावी. मग खुशाल लॉकडाऊन करावं, असं मत सदाभाऊ खोत यांनी मांडलं आहे.\nलॉकडाऊनमध्ये जाण्याची लोकांची मानसिकता नाही - संदीप देशपांडे\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही लॉकडाऊनला विरोध आहे. पहिल्या लॉकडाऊनचा किती फायदा झाला, हे आधी सरकारने सांगावं, त्यानंतरच पुन्हा लॉकडाऊन करण्यात यावं, असं वक्तव्य मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केलं.\nलॉकडाऊनचे पर्याय काय असू शकतात, या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात, \"लॉकडाऊनचे पर्याय देण्याची गरज नाही. टेस्टींगमध्येच काहीतरी काळं-बेरं आहे का असा संशय आता येऊ लागला आहे. साधा सर्दी-खोकला असला तरी चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह असल्याचं कळतं.\nचाचणी वाढवल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढते, असं दिसून येतं. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्याही कमी दिसली.\nपण आता पुन्हा चाचण्या वाढवण्यात आल्याने रुग्णसंख्या वाढणं स्वाभाविक आहे. पण ही परिस्थिती माध्यमांमधून वाढवून दाखवली जाते. यामुळे लोकांमध्ये तणाव निर्माण होतो.\nकोरोनाचे 19 स्ट्रेन आहेत. त्यापैकी कोणत्या कोरोनाची लागण झाली, हे नेमकं सांगणं कठीण आहे. साध्या सर्दी-खोकल्याचा बाऊ करण्यात येऊ नये. गेल्या एका वर्षात कोरोना काय आहे, हे आपल्याला कळलं आहे. तो पूर्वीइतका धोकादायकही राहिलेला नाही. मृत्यूदरही कमी झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नाही.\nलॉकडाऊनमुळे जगात कुठेही रुग्णसंख्या आटोक्यात आली, असं कुणी सांगू शकत नाही. पहिल्या लॉकडाऊनदरम्यान कठोर निर्बंध असूनही संसर्गाची साखळी तुटली नाही. त्या लॉकडाऊनचा किती फायदा झालं, हे प्रशासनाने आधी सांगावं.\nपहिल्या लॉकडाऊनमधील अनुभवामुळे आता पुन्हा लॉकडाऊनमध्ये जाण्याची लोकांची मानसिकता नाही. त्यामुळे लॉकडाऊन केल्यास राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे पुढील निर्णय घेईल, असंही देशपांडे म्हणाले.\nअर्धवट निर्बंध उपयोगाचे नाहीत, केल्यास संपूर्ण लॉकडाऊन करा - इम्तियाज जलील\nएकीकडे इतर पक्ष लॉकडाऊनचा विरोध करत असताना AIMIM पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी थोडी वेगळी भूमिका मांडली आहे. अर्धवट निर्बंध उपयोगाचे नसून संपूर्ण लॉकडाऊन करावं, असा सल्ला इम्तियाज जलील यांनी दिला आहे.\n\"लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. औरंगाबादमध्ये 8 तारखेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. पण उद्योग सुरू होणार आहेत. त्यात लाखो कामगार आहेत. मग त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का की केवळ उद्योग लॉबीला खूश करण्यासाठी हा निर्णय घेतला, असा प्रश्न जलील यांनी विचारला.\nकाही दिवसांसाठी, काही वेळासाठी गोष्टी बंद करून काय होणार आहे खरंतर आपल्याला आता कोरोना व्हायरससोबत जगायचं आहे. हा व्हायरस 8 दिवसांत निघून जाईल असं कुणीच म्हणू शकत नाही.\nलॉकडाऊनला पर्याय काय असं विचारल्यावर ते म्हणाले, आता जो वेळ मिळाला आहे, त्यात सरकारनं आपलं वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर दिला पाहिजे. दवाखाने, तेथील कर्मचारी यांच्या मजबुतीकरणावर लक्ष दिलं पाहिजे. जेणेकरून कोरोनामुळो लोकांच्या मनात भीतीचं वातावरण तयार होणार नाही, असं जलील म्हणतात.\nत्यामुळे, सध्या तरी कोरोना आणि लॉकडाऊनच्या मुद्द्यावर वेट अँड वॉच अशी भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या बैठका, तसंच पुढील दोन दिवसांत कोरोना संदर्भात घडणाऱ्या घडामोडी यावर लॉकडाऊनचा निर्णय अवलंबून असल्याचं सध्यातरी दिसतं.\nबेडसाठी आंदोलन करणाऱ्या कोव्हिड रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार कोण\nमहाराष्ट्रात लॉकडाऊनची चर्चा का होत आहे या आठ ग्राफिक्समधून जाणून घ्या\nकोरोना : महाराष्ट्रातील 'या' 8 हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये किती बेड्स उपलब्ध आहेत\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\nधनुष्यबाण आणि शिवसेना कुणाची उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस\nनोबेल शांतता पुरस्कार अॅलेस बियालत्स्की यांना जाहीर\n त्याचा तुमच्या-आमच्या ऑनलाईन खरेदीवर काय परिणाम होणार\nउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाबद्दलचे शब्द जाहीरपणे मागे घ्यावेत- फडणवीस\nदसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे का बोलले नाहीत\nएकनाथ शिंदेंनी वि. उद्धव ठाकरे- दसरा मेळाव्यात कुणी कुणावर केली मात\nउद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणातल्या 3 हुकलेल्या संधी आणि 1 चूक\n'स्वतःही खुराड्यात राहिलात आणि आम्हालाही कोंडून ठेवलं' - शहाजी बापू पाटील\nपंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा राजकीय अर्थ काय\nलहान मुलांना कफ सिरप देणं किती सुरक्षित\nठाकरेंना धनुष्यबाणावर दाव्यासाठी उद्यापर्यंतची मुदत | तीन गोष्टी पॉडकास्ट\nगावाकडची गोष्ट : बोगस सातबारा उतारा ओळखण्याचे 3 सोपे उपाय...\nश्रीलंकेतल्या आर्थिक संकटाला सेंद्रिय शेती कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय, कारण...\nशेवटचा अपडेट: 23 मे 2022\nमहागाईच्या काळात या 7 मार्गांनी तुम्ही खाण्यापिण्यावरचा खर्च कमी करू शकता\nशेवटचा अपडेट: 3 ऑगस्ट 2022\nजेवणातून चपाती-भात पूर्णपणे बंद केले तर काय फायदे होतात या पदार्थांना पर्याय काय\nऔरंगजेब पाहताक्षणीच दासीच्या प्रेमात पडला, पण ही प्रेम कहाणी अधुरीच राहिली...\nएअर फ्रायर की मायक्रोवेव्ह ओव्हन, कोणत्या उपकरणातील स्वयंपाक आरोग्यदायी\nशेवटचा अपडेट: 31 जुलै 2022\nकोंबड्यांमुळे सापडलं 20 हजार लोकांसाठी वसवलेलं जमिनीखालचं प्राचीन शहर\nहिंदू-मुसलमान जिथं अनेक वर्ष एकत्र राहिले त्या शहरात असं झालंच कसं\nधनुष्यबाण आणि शिवसेना कुणाची उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस\nदसऱ्याला 'सोनं' म्हणून आपट्याची पानं का लुटतात या झाडाचं महत्त्व काय\nआर्थिक मंदी काय असते, ती कधी येते, त्यावर उपाय काय\nशेवटचा अपडेट: 5 ऑगस्ट 2022\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai/25000-thousand-cash-prizes-for-eight-tiers-govinda-by-organizers-in-mumbai-zws-70-3079764/", "date_download": "2022-10-07T22:31:00Z", "digest": "sha1:5GGKDUGJ7H6LZVAP73YFKOJRYHZFFNSZ", "length": 23346, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "25000 thousand cash prizes for eight tiers govinda by organizers in mumbai zws 70 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\nदहीहंडीचा उत्साह, बक्षिसांची घागर मात्र उताणी ; आयोजकांकडून पारितोषिकांबाबत हात आखडता, गोविंदा पथकांचा हिरमोड होण्याची चिन्हे\nअनेक गोविंदा पथकांनी गेल्या महिन्याभरात रात्र जागवून मानवी थर रचण्याचा सराव केला.\nWritten by प्रसाद रावकर\nमुंबई : करोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे यंदा निर्बंधमुक्त वातावरणात उत्सव साजरे करण्याची संधी मिळाल्यामुळे उत्सवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. मात्र, आयोजकांनी पारितोषिकांची उधळण करताना हात आखडता घेतला आहे. आठ थरांसाठी २५ हजार रुपये, तर सात थरांसाठी अवघे पाच हजार रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आल्याने गोविंदा पथके बुचकळय़ात पडली आहेत.\n“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला\nShinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\n“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप\nगेली दोन वर्षे करोना संसर्गामुळे लागू कडक निर्बंधांमुळे गोविंदा पथकांना दहीहंडी उत्सव साजरा करता आला नाही. यंदा संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे करोनाविषयक सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा निर्बंधमुक्त वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा करता येणार असल्यामुळे गोविंदांमध्ये उत्साह आहे. अनेक गोविंदा पथकांनी गेल्या महिन्याभरात रात्र जागवून मानवी थर रचण्याचा सराव केला.\nमुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातल्यामुळे राजकारण्यांकडून मोठी आर्थिक मदत मिळेल, लाखमोलाच्या दहीहंडय़ा बांधण्यात येतील अशी गोविंदा पथकांना अपेक्षा होती. मात्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नेमक्या किती प्रभागांमध्ये होणार, प्रभाग आरक्षणाचे काय होणार, कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवायला मिळणार असे अनेक प्रश्न उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांना भेडसावत आहेत. त्यामुळे निवडणूक लढविण्यास इच्छुक मंडळींनी उत्सवांसाठी हात आखडता घेतला आहे. राजकारण्यांकडून आर्थिक रसद मिळण्याची शक्यता नसल्यामुळे गोविंदांचा अपेक्षा भंग झाला आहे. गेली दोन वर्षांमध्ये झालेले नुकसान लक्षात घेता पुरस्कर्ते, देणगीदारांनीही हात आखडता घेतला आहे. त्याचा फटका गोविंदा पथकांना बसला आहे. यंदा शिवसेनेतील बंडखोर, भाजप आणि शिवसेना नेतेमंडळी आणि अन्य आयोजक मंडळी मोठय़ा प्रमाणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करतील असे पथकांना वाटत होते. मात्र मुंबईत फारशा मोठय़ा दहीहंडी बांधण्यात आलेल्या नाहीत. तर मोठय़ा दहीहंडय़ांच्या आयोजकांनी सामायिक रक्कमेतूनच उंच दहीहंडी फोडणाऱ्यांना पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आठ आणि त्यापेक्षा अधिक थर रचणाऱ्यांच्या पदरात पूर्वीप्रमाणे बक्कळ रक्कम पडण्याची शक्यता नाही.\nथर वाढल्याने बक्षिसांत घट\nदहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांनी यंदा आठ थरासाठी २५ हजार रुपये, तर सात थरांसाठी अवघे पाच हजार रुपये पारितोषिक जाहीर केले आहे. मुंबईमधील बहुसंख्य गोविंदा पथके सात थर रचू लागले आहेत. तर अनेक पथके आठ थर रचण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आयोजकांनी पारितोषिकांची रक्कम कमी केली आहे. मात्र सात-आठ थर रचण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गोविंदांची गरज भासते. गोविंदांची संख्या वाढल्यानंतर त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणावर खर्च करावा लागतो. दोन वेळचा नाश्ता, जेवण, टी-शर्ट, हाफ पॅन्ट, वाहनाची व्यवस्था आदींसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते. यापैकी बहुतांश रक्कम दहीहंडी फोडल्यानंतर मिळणाऱ्या पारितोषिकांतून उभी करण्यात येते. परंतु यंदा पारितोषिकांची रक्कम कमी झाल्यामुळे पथके अडचणीत आली आहेत.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमुंबई- गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णत्वास; गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करण्याची बांधकाम मंत्र्यांची ग्वाही\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मेधाली, वैभवला सुवर्ण\nप्रो कबड्डी लीग : दबंग दिल्लीसमोर यू मुम्बाची हाराकिरी\nराष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा -विनोद तोमर\nभारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा\nकाँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका\nधनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण\nमध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०८ ऑक्टोबर २०२२\nपुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\nLow Uric Acid: यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होणे देखील ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ ५ गंभीर आजार\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\nकाँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका\nधनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण\nमध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’\nपुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\nठाकरे यांच्या भाषणात वैचारिक पातळी नव्हती; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका\nधनुष्य-बाण चिन्हाचा वाद : हंगामी आदेशास ठाकरे गटाचा विरोध; दोन्ही गटांच्या कागदपत्रांची सत्यता तपासून अंतिम निर्णय घेण्याची विनंती\nमुख्यमंत्री शिंदे यांच्या बीकेसीतील दसरा मेळाव्याचा खर्चाचा स्रोत काय ; चौकशीच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका\nमुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\n“आगामी निवडणुकीत मुंबईतील २४ हजार कष्टकरी…”, गुणरत्न सदावर्तेंची मुंबईत मोठी घोषणा\nमुंबई : निम्मे शैक्षणिक वर्ष सरत आल्यानंतरही महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी गणवेशापासून वंचित\nठाकरे यांच्या भाषणात वैचारिक पातळी नव्हती; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका\nधनुष्य-बाण चिन्हाचा वाद : हंगामी आदेशास ठाकरे गटाचा विरोध; दोन्ही गटांच्या कागदपत्रांची सत्यता तपासून अंतिम निर्णय घेण्याची विनंती\nमुख्यमंत्री शिंदे यांच्या बीकेसीतील दसरा मेळाव्याचा खर्चाचा स्रोत काय ; चौकशीच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका\nमुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\n“आगामी निवडणुकीत मुंबईतील २४ हजार कष्टकरी…”, गुणरत्न सदावर्तेंची मुंबईत मोठी घोषणा\nमुंबई : निम्मे शैक्षणिक वर्ष सरत आल्यानंतरही महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी गणवेशापासून वंचित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/renault-kiager-car-market-boom-record-sales-on-the-first-day/", "date_download": "2022-10-07T21:42:18Z", "digest": "sha1:NNH2R6VYGZYUGEFWBLW23PG5UFCAEZTD", "length": 9356, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "Renault Kiger गाडीचा बाजारात धुमाकूळ; पहिल्याच दिवशी झाली विक्रमी विक्री", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nRenault Kiger गाडीचा बाजारात धुमाकूळ; पहिल्याच दिवशी झाली विक्रमी विक्री\nRenault Kiger गाडीचा बाजारात धुमाकूळ; पहिल्याच दिवशी झाली विक्रमी विक्री\nमुंबई | भारतात आकर्षक गाड्यांची मोठी क्रेझ असते. तर चारचाकी गाड्यांना भारतात मोठी मागणी देखील आहे. खासकरून तरूण वर्गातून मोठ्या आणि आकर्षक गाड्यांची मागणी असते. तरूण वर्गाची आवड आणि खिशाला परवडेल असेल अशी एक आलिशान कार भारतात विक्रीस आणली आहे. रेनाॅ कायगरचे नवे माॅडेल बाजारात आल्याने ग्राहक वर्ग या गाड्यांकडे उत्सुकतेने पाहत आहे.\nभारतात ऑटो सेक्टरमधली रेनाॅ इंडिया ही एक अग्रगण्य कंपनी आहे. रेनाॅ इंडियानेे सब फोर मीटर एसयूव्ही कायगर मागील महिन्यात म्हणजे 15 फेब्रुवारीला लाँच करण्यात आली होती. काही दिवसांपासून या कारची नोंदणी देखील चालू केली होती.\nकंपनीने म्हटलं आहे की, विक्रीच्या पहिल्याच दिवशी कंपनीने तब्बल 1100 युनिटसची डिलिव्हरी केली आहे. या रेनाॅ कायगरची एक्स किंमत 5.45 लाख रुपयांपासून सुरू झाली असून या प्रकारातील टाॅप वेरियंटची किंमत 9.55 लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.\nदरम्यान, रेनॉ कायगरमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 99 बीएचपी पॉवर आणि 160 एनएम टॉर्क निर्माण करु शकेल. सोबतच 5 स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन स्टँडर्डची सुविधा देखील यामध्ये दिली गेली आहे. एएमटीसह सीवीटी ट्रांसमिशनचा पर्यायही देण्यात आला आहे.\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\nपरदेशातील व्यक्तीलाही दिला सोनू सूदने मदतीचा हात; केलं ‘हे’ कौतुकास्पद काम\n‘या जागी तुमची किंवा माझी बहीण असती तर’; जळगाव वसतीगृहातील घटनेवरून मुनगंटीवार संतापले\n‘सर्व पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असणारे होर्डिंग हटवा’; निवडणूक आयोगाचा आदेश\n“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”\n…अन् लेकीचं शीर कापून तो थेट पोलीस ठाण्याकडे निघाला; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले\nकोरोना पाठोपाठ अमरावतीत ‘या’ आजाराचा शिरकाव\nदेवेंद्र फडणवीसांनंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही दिला ‘मी पुन्हा येईन’चा नारा\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://breakeveryyoke.com/2-%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81-10---%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A8-irv-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2022-10-07T22:41:01Z", "digest": "sha1:H7D67X27SEUBUV26RK36BIMLEQHYAQLO", "length": 13141, "nlines": 259, "source_domain": "breakeveryyoke.com", "title": "2 शमु. 10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी", "raw_content": "\nइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी\nइंडियन रिवाइज्ड वर्जन (IRV) उर्दू - 2019\nइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी\nपरमप्रभु यावे आ लोव़\n1पुढे अम्मोन्याचा राजा नाहाश मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हानून राज्यावर आला.\n2दावीद म्हणाला, हानूनाचा वडील नाहाशचा माझ्यावर लोभ होता याने माझ्यावर दया केली, म्हणून त्याचा मुलगा हानून याच्याशी मी सौजन्याने वागेन. मग दावीदाने हानूनला पितृशोक झाला म्हणून त्याच्या सांत्वनेसाठी आपल्या सेवकांना पाठवले. ते सेवक अम्मोन्यांच्या प्रांतात आले.\n3पण अम्मोनी अधिकारी त्यांचा स्वामी हानून याला म्हणाले, तुमच्या सांत्वनेसाठी माणसे पाठवून दावीद तुमच्या वडीलांचा मान राखतोय असे तुम्हास वाटते का उलट गुप्तपणे तुमच्या प्रांतातील खबर काढायला त्याने या लोकांस पाठवले आहे. त्यांचा तुझ्याविरूद्ध उठाव करायचा बेत आहे.\n4तेव्हा हानूनने दावीदाच्या त्या सेवकांना ताब्यात घेतले, आणि त्यांच्या दाढ्या अर्ध्या छाटल्या त्यांची कंबरेखालची वस्त्रे मध्यभागी फाडून ठेवली. एवढे करून त्यांना त्याने परत पाठवले.\n5लोकांकडून हे दावीदाला कळले तेव्हा त्याने आपल्या या सेवकांची गाठ घेण्यास माणसे पाठवली. हे सेवक खूप लज्जीत झाले होते. दावीदाने त्यांना सांगितले, तुमच्या दाढ्या वाढून पूर्ववत होईपर्यंत यरीहो येथेच राहा मग यरूशलेम येथे या.\n6आपण दावीदाचे शत्रुत्व ओढवले आहे हे अम्मोन्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी बेथ-रहोब आणि सोबा येथील अरामी माणसे मोलाने घेतली. अराम्यांचे पायदळ वीस हजारांचे होते. शिवाय त्यांनी, माका राजाची एक हजार माणसे तसेच तोबाचे बारा हजार सैनिक घेतले.\n7दावीदाने हे ऐकले, तेव्हा आपल्या लढाऊ सैन्यासह यवाबाला पाठवले.\n8तेव्हा अम्मोनी लोक बाहेर पडून युध्दाला सज्ज झाले व नगराच्या वेशीपाशी त्यांनी व्यूह रचला, सोबा आणि रहोब येथील अरामी तसेच माकाचे व तोबाचे सैनिक हे सर्व मिळून स्वतंत्रपणे युद्धासाठी उभे राहिले.\n9अम्मोन्यांनी पुढून तसेच मागून आपल्याला घेरले आहे हे यवाबाने पाहिले तेव्हा त्याने इस्राएलातील उत्तम योद्ध्यांची निवड केली त्यांना अराम्यांच्या विरूद्ध लढायला सज्ज केले.\n10मग आपला भाऊ अबीशय याच्या हवाली आणखी काही मनुष्यांना करून अम्मोन्याचा सामना करायला सांगितले.\n11यवाब अबीशयला म्हणाला, अरामी मला भारी पडत आहेत असे दिसले, तर तू माझ्या मदतीला ये. जर अम्मोनी प्रबल आहेत असे लक्षात आले तर मी तुझ्या मदतीला येईन.\n12हिम्मत बाळग आपल्या लोकांसाठी, देवाच्या नगरांसाठी आपण पराक्रमाची शिकस्त करू. परमेश्वर त्यास योग्य वाटेल तसे करील.\n13यानंतर यवाबाने आपल्या लोकांसह अराम्यांवर चढाई केली. अरामी लोकांनी त्यांच्या समोरून पळ काढला.\n14अराम्यांनी पलायन केलेले पाहताच, अम्मोनीही अबीशय समोरून पळून गेले आणि आपल्या नगरात परतले. अम्मोन्यांबरोबरच्या या लढाई नंतर यवाब यरूशलेमेला परतला.\n15इस्राएलानी आपला पराभव केला हे अराम्यांनी पाहिले. तेव्हा ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी (मोठे सैन्य उभारले)\n16हद्देजरने नदीच्या पलीकडे राहणाऱ्या अराम्यांना एकत्र आणण्यासाठी माणसे पाठवली. हे अरामी हेलाम येथे आले. हद्देजरचा सेनापती शोबख याने त्यांचे नेतृत्व केले.\n17हे दावीदाच्या कानावर आले. तेव्हा त्याने सर्व इस्राएलींना एकत्र आणले. यार्देन नदी पार करून ते हेलाम येथे गेले. तेथे अराम्यांनी सर्व तयारीनिशी हल्ला केला.\n18पण दावीदाने अराम्यांचा पराभव केला. अराम्यांनी इस्राएल लोकां समोरून पळ काढला. दावीदाने सातशे रथांवरील माणसे आणि चाळीस हजार घोडेस्वार यांना ठार केले. अरामी सैन्याचा प्रमुख शोबख यालाही दावीदाने ठार केले.\n19हद्देजरच्या मांडलीक राजांनीही इस्राएलांनी केलेला हा पराभव पाहिला. तेव्हा त्यांनी इस्राएलाशी तह केला व इस्राएलांचे ते चाकर झाले. पुन्हा अम्मोन्यांना मदत करायची अराम्यांनी धास्ती घेतली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://nmk.org.in/pmc-recruitment/", "date_download": "2022-10-07T22:19:03Z", "digest": "sha1:DEHH5H7A25GKKFCAQNUT55324CIZWZEP", "length": 5532, "nlines": 106, "source_domain": "nmk.org.in", "title": "(PMC) पुणे महानगरपालिकेत भरती - NMK.ORG.IN", "raw_content": "\n(PMC) पुणे महानगरपालिकेत भरती\nएकूण पदाच्या 91 जागा\n2 सहयोगी प्राध्यापक 09\n3 सहाय्यक प्राध्यापक 15\n5 सिनियर रेसिडेंट 21\n6 ज्युनियर रेसिडेंट 29\nवयोमर्यादा: 24 सप्टेंबर 2021 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्ष सूट]\n4 ते 6: 38 वर्ष\nफीस: खुला प्रवर्ग: 500/- रु. [मागासवर्गीय 300/- रु.]\nथेट मुलाखत: 29 सप्टेंबर 2021\nअर्ज सादर करण्याचे & मुलाखतीचे ठिकाण: जुना GB हॉल तिसरा मजला पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे\nजाहिरात & अर्ज : पहा\n[expand title=”पुणे महानगरपालिकेत 12 जागा”]\nएकूण पदाच्या 12 जागा\n2 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01\nMSW+HIV विषयक समुपदेशनाचा 03 वर्ष अनुभव.\nB.Sc +DMLT+HIV रक्तचाचणी लॅबोरेटरी मध्ये 03 वर्ष अनुभव.\nवयाची अट: 18 ते 38 वर्ष\nमुलाखत दिनांक: 11 जून 2021\nमुलाखतीसाठी पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी. हॉल), पुणे महानगरपालिका, शिवाजी नगर पुणे – 411005\n[expand title=”पुणे महानगरपालिकेत 400 जागा”]\nएकूण पदाच्या 400 जागा\n1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 50\n2 वैद्यकीय अधिकारी (BAMS) 50\n3 परिचारिका (ANM) 100\n4 परिचारिक/ नर्सिंग ऑर्डली 100\nवयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष [मागासवर्गीय: 05 वर्ष सूट]\nअर्जासाठी पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005.\nअर्जासाठी शेवट तारीख: (सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत)\nजाहिरात & अर्ज: पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune/pune-planning-to-increase-the-number-of-depots-for-pmp-electric-bus-pune-print-news-asj-82-3077886/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-07T21:23:27Z", "digest": "sha1:CLAM3AFSTIHKF6RPKX43DL2FCFQXRYYN", "length": 19324, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pune : Planning to increase the number of depots for PMP electric bus | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nआवर्जून वाचा देश-काल : हा ‘राजकीय तमाशा’ नाही; कारण..\nआवर्जून वाचा सृष्टी-दृष्टी : जनुकांचे आरपार दर्शन\nपुणे : इलेक्ट्रिक डेपोंची संख्या वाढविण्याचे नियोजन\nचऱ्होली येथे डेपोचे काम सुरू झाले असून निगडी येथे सर्वात मोठा डेपो पीएमपीकडून विकसित केला जाणार आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nइलेक्ट्रिक डेपोंची संख्या वाढविण्याचे नियोजन (संग्रहित छायाचित्र)\nपुणे : पीएमपीच्या ताफ्यातील विजेवर धावणाऱ्या (इलेक्ट्रिक बस- ई-बस) गाड्यांची संख्या वाढत असल्याने आता ई-डेपोंची संख्या वाढविण्याचे नियोजन सुरू झाले आहे. त्यानुसार चऱ्होली येथे डेपोचे काम सुरू झाले असून निगडी येथे सर्वात मोठा डेपो पीएमपीकडून विकसित केला जाणार आहे.\nपर्यावरणपूरक आणि सक्षम वाहतुकीसाठी विजेवर धावणाऱ्या गाड्या पीएमपीच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या फेम योजनेतून पाचशे गाड्या घेण्याचे नियोजित आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात तीनशे गाड्या पीएमपीला प्राप्त झाल्या आहेत. पीएमपीकडून सध्या विविध मार्गांवर ३०८ ई-बस च्या माध्यमातून वातानूकुलित सेवा दिली जात आहे. विजेवर धावणाऱ्या गाड्यांसाठी भेकराईनगर, भक्ती-शक्ती, बाणेर, वाघोली आणि पुणे रेल्वे स्थानक येथे आगार सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकी पुणे रेल्वे स्थानक आगाराचे उद्घाटन येत्या काही दिवसांत होणार असून चऱ्होली येथे नव्याने आगार विकसीत करण्यात येत आहेत. या आगारातून ७० गाड्या सोडण्याचे प्रस्तावित असून निगडी येथेही सर्वाधिक मोठे आगार विकसित केले जाणार आहे.\n“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला\nShinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, निवडणूक आयोग म्हणालं “जर तुम्ही…”\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२\n“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप\nविजेवर धावणाऱ्या गाड्यांसाठी या आगारांना सध्या अपुरा वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे बाणेर, वाघोली आणि पुणे रेल्वे स्थानक आगारातून क्षमतेपेक्षा कमी ई-बसचे चार्जिंग होत आहे.\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nपुणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आता स्मार्ट ओळखपत्र\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मेधाली, वैभवला सुवर्ण\nप्रो कबड्डी लीग : दबंग दिल्लीसमोर यू मुम्बाची हाराकिरी\nराष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा -विनोद तोमर\nभारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा\nकाँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका\nधनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण\nमध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०८ ऑक्टोबर २०२२\nपुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद\nLow Uric Acid: यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होणे देखील ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ ५ गंभीर आजार\nरक्ताने माखलेल्या भिंती, मृत शिक्षिकेच्या हातातील बाळ अन्…; २४ चिमुकल्यांनी प्राण गमावलेल्या पाळणाघर हल्ल्याचे हृदयद्रावक फोटो\nPhotos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”\nDiet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील\nDasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी\nएकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\nविश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय\n“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला\nDasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट\n“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nMaharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nVIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं\nPhotos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का\nवंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात\nअन्न प्रक्रिया उद्योगात राज्यात सांगली अव्वल; पुणे दुसऱ्या, तर औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावर\nपुन्हा चार दिवस पाऊस जोमात; मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास यंदाही उशिरा\nपुणे : प्रेमसंबंध तुटल्यानंतर प्रेयसीच्या घरात चोरी ; एकास अटक; १४ लाख ६७ हजारांचा ऐवज जप्त\nपुणे : पैगंबर जयंतीनिमित्त रविवारी वाहतुकीत बदल\nपुणे : खासगी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातील बेकायदा प्रवेशांना मान्यता नाही ; सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांचे स्पष्टीकरण\nपिंपरी : रस्त्यांवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेचे पिंपरी पालिकेत आंदोलन\nडुलकी लागल्याच्या आरोपांवर दिपक केसरकरांचे स्पष्टीकरण; म्हणाले “मी झोपलो नव्हतो, तर….”\nपुणे : मुख्यमंत्र्यांच्या नातवावरील टीकेचे पुण्यातही पडसाद ; ‘एक दुखावलेला दीड वर्षाच्या मुलाचा बाप’ पत्राचे पुण्यात फलक\nपुणे : सिकलसेल ॲनिमिया आजारावर आयुर्वेदिक औषधाची निर्मिती ; विद्यापीठातील डॉ. पूजा दोशी यांचे विद्यार्थ्यांच्या सहाय्याने संशोधन\n‘विघ्नहर’कडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड ; दिवाळीपूर्वी उसाची रक्कम, कामगारांना १२ टक्के बोनस\nअन्न प्रक्रिया उद्योगात राज्यात सांगली अव्वल; पुणे दुसऱ्या, तर औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावर\nपुन्हा चार दिवस पाऊस जोमात; मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास यंदाही उशिरा\nपुणे : प्रेमसंबंध तुटल्यानंतर प्रेयसीच्या घरात चोरी ; एकास अटक; १४ लाख ६७ हजारांचा ऐवज जप्त\nपुणे : पैगंबर जयंतीनिमित्त रविवारी वाहतुकीत बदल\nपुणे : खासगी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातील बेकायदा प्रवेशांना मान्यता नाही ; सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांचे स्पष्टीकरण\nपिंपरी : रस्त्यांवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेचे पिंपरी पालिकेत आंदोलन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2019/11/blog-post_8.html", "date_download": "2022-10-07T22:09:55Z", "digest": "sha1:RMAL6URR2A5KPJJJZ7DDU4DIWDBLLKKJ", "length": 11953, "nlines": 218, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "०८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०१९ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\n०८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०१९\nसत्तेच्या मांडवलीत महाराष्ट्र होरपळतोय\nसरकारी प्रतिष्ठानांच्या विक्रीचा अथ\n२९ नोव्हेंबर ते ०५ डिसेंबर २०१९\n२२ ते २८ नोव्हेंबर २०१९\nभारतरत्न नाकारणारा अवलिया : मौलाना आझाद\nसंयम आणि सौहार्दाचा विजय\nमिलादुन्नबीनिमित्त 3 हजार 178 जणांनी केले रक्तदान\nअमीर (अध्यक्ष) - (भाग 10)\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि आपली जबाबदारी\nइस्लामोफोबिया : कारणे आणि उपाय\n१५ ते २१ नोव्हेंबर २०१९\nइमामत (नमाजचे नेतृत्व) : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसांप्रदायिक तणाव आणि राजकारण\nअयोध्येसंबंधीचा निर्णय सर्वांनी शांतपणे स्विकारावा\nजमाअत - ए - इस्लामीची आवश्यकता का भासली - (भाग-9)\nप्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या शिकवणीचा संक्षिप्त...\n‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’\nसामूहिक नमाज : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nजागतिक दहशतवाद : अमेरिकी पापांचे फलित\nडॉ. ईलाहीपाशा मासुमदार यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट...\nउर्दू सा. दावत, न्यूज पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅपचे विमोचन\nआमचं हे कर्तव्य वाटलं म्हणून आम्ही उभे राहिलो : (भ...\nफेसबुक व धार्मिक भावना\nमुली अन् पत्नी दोहोंच्या सुरक्षेची जबाबदारी पुरूषाची\nराज्यात पुन्हा तेच; विरोधक मात्र मजबूत\nझुंडबळी आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे आकडे गायब\n०८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०१९\nनमाजचे महत्त्व : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nगुन्हे अहवालात ‘मॉब लिंचिग’ गायब\n०१ नोव्हेंबर ते ०७ नोव्हेंबर २०१९\nतुमचं जीवन हेच इस्लामची साक्ष बनली पाहिजे\nइस्लामी राज्य आणि मुस्लिम देश यात काही फरक आहे काय\nआर्थिक मंदी म्हणजे काय\nउत्तरांचा शोध अन् शोधांचे प्रयोग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\nशोधन २३ मार्च २०१८\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.insidemarathibooks.in/index.php/2020/02/15/review-the-subtle-art-of-not-giving-a-f-marathi-book/", "date_download": "2022-10-07T21:46:08Z", "digest": "sha1:SJPRFT6TW2CP7PTKX7YIJ74QVS2RQMNY", "length": 12253, "nlines": 185, "source_domain": "www.insidemarathibooks.in", "title": "द सटल आर्ट ऑफ नॉट गिविंग फ * - The Subtle Art Of Not Giving A F* Marathi Book Review", "raw_content": "\n|| माझिया मराठीची बोलू किती कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके ||\nद सटल आर्ट ऑफ नॉट गिविंग फ *\nby अक्षय सतीश गुधाटे\nलेखक – मार्क मॅन्सन\nअनुवाद – श्रद्धा भोवड\nप्रकाशन – मधुश्री पब्लिकेशन\nमुल्यांकन – ५ | ५\nचोख जगण्याचे ठोक मार्ग, घंटा फरक न पाडून घेण्याची बेमालूम कला… अशा अनेक मसुद्यानी झळकणारे हे पुस्तक जगण्याचा मूलमंत्र आहे हे नक्की. ज्यांनी हे पुस्तक अजून वाचले नाही, माझ्या मते ते एका आयुष्यातील मोठ्या भागाला, स्वतःच्या स्वतःलाच आणि अनेकांच्या खोट्या आणि बनावट भागाला भेट न देताच जगत आहेत. स्वतःला सावरत, आयुष्याची घडी परत बसवायची असेल, निराशेतून आशेच्या वाटेवर यायचं असेल, स्वतःला आणि जगाला गवसणी घालायाची असेल तर यातील मुद्दे नीट विचारात घ्या आणि समजून आमलात आणले तर मला वाटतं आपल्या डोळ्यातील झापड स्वच्छ होतील.\nउम्रभर गालिब…… यही भूल करता रहा,\nधुल चेहरेपे थी, और आयना साफ करता रहा \nया एका उर्दू शेर चा मतितार्थ या पुस्तकातून वाचायला मिळेल. आणि बाकी सगळ्यांपेक्षा स्वतःला सुधारणं, सावरन, स्वतःमध्ये बदल करुनच आपण सुखी होऊ शकतो, या विचाराचे हे पुस्तकं सर्वांच्याच संग्रहात असावे. आणि फक्त असून उपयोग नाही तर ते वरचेवर स्वतःला सावरण्यासाठी वाचत रहावे असेच मला वाटते. पाश्चात्य देशात लिहलेल्या आणि जगभर पसरलेल्या या पुस्तकातील काही ठेवणीतले मुद्दे सर्वच स्तरातून, भाषांमधून, भावनातून माणसाला समृद्ध करतात. आणि हे करत असताना यात लेखकाच्या लेखणीचा खूप मोठा वाटा आहे. त्याची प्रत्येक गोष्ट, त्यातून मिळणारा बोध, उदाहरणादाखल सांगितलेले किस्से मनात घर करतात, आणि अशा वेगळ्या शैलीतून केलेलं हे मार्गदर्शन मेंदूतील प्रत्येक तंतुला तान पडेपर्यंत विचार करायला भाग पाडते. असेच आपल्याशी निगडित घटना आठवून त्यांची जुळवाजुळव करत आपल्या मनालाही विचार समजून घेण्यास मदत करते. प्रत्येक उदाहरण पुस्तकाला अजून समृद्ध करते. मुख्यतः इंग्रजी भाषेत असलेलं हे पुस्तक मराठी भाषेत जसच्या तस, गाभ्यास धक्का न लागू देता मराठी लोकांसाठी लिहण्याचे कठीण काम लेखिकेने अगदी सहज केलं आहे. ही प्रतिसादाची पावतीच सगळ काही सांगून जाते.\nआयुष्याला अनेक उतार चढाव तर असतातच पण यातूनच आयुष्य खुलतं अस म्हणतात, पण फक्त एवढंच खर नाहीये. घडणाऱ्या घटना, त्यांचा प्रभाव, त्यांचा क्रम आणि आपण त्यांना दिलेलं महत्त्व, या साऱ्याच समीकरण लेखकाने अगदी छान मांडलं आहे. मार्क मॅन्सन हे नाव अचानक प्रसिद्धीला येण्याचं कारण म्हणजे त्यांनी या पुस्तकात जगण्याचा अंश मांडला आहे. आपण कशाला महत्त्व द्यावं आणि कशाला नाही, याउपर कशाला दिलं असत तर आपण अजून आनंदी आणि उत्साही जीवन जगू शकतो याचे सिद्धांत लेखक सुंदर तऱ्हेने सांगतो. आपण अडकलेल्या खोट्या जगात, आणि सांभाळणाऱ्या खोट्या मूल्यांच लेखक पितळ उघडं पाडतो. चुकीच्या विचारधारा बेधडक पणे आपल्या चुकातून दाखवून, लोकांना शहाणपण शिकवतो याबद्दल लेखक नक्कीच कौतुकास पात्र आहे.\nमाझ्या आयुष्यात आलेल्या आणि वळण लाऊन सरळ केलेल्या पुस्तकात हे पुस्तक अग्रणी आहे. अनेक मुद्दे आमलात आणल्यामुळे धुरकट वाट स्पष्ट झाली, शंका निवल्या आणि न रेटला जाणारा आयुष्याचा गाडा पुन्हा नव्याने वेग पकडू लागला. नकारातील मौज अजून जाणवतेय…\nऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:\nकिंडल आवृत्ती (इंग्रजी) विकत घ्या\nद रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन\nमराठी पुस्तकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा\nछत्रपती संभाजी – एक चिकित्सा\nसोशल नेटवर्कवर आमच्याशी कनेक्टेड राहा.\nवेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.insidemarathibooks.in/index.php/2020/03/25/everyone-has-a-story-2-book-review-in-marathi/", "date_download": "2022-10-07T23:20:05Z", "digest": "sha1:AH5ROGBQ3OUYWQ3JZO5FHQRG53F7ISRT", "length": 8267, "nlines": 173, "source_domain": "www.insidemarathibooks.in", "title": "कहाणी असते प्रत्येकाकडे - २ - Inside Marathi Books", "raw_content": "\n|| माझिया मराठीची बोलू किती कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके ||\nकहाणी असते प्रत्येकाकडे – २\nलेखिका – सवि शर्मा\nमूल्यांकन – ४ | ५\nपहिल्या भागात लेखिकेने सर्वांची शिगेला पोहोचलेली उत्सुकता अजून टांगून ठेवली आहे आणि या पुस्तकाची सुरुवात अगदी सुंदररित्या केली आहे. विवान, मीरा, निशा आणि कबीर यांच्या आनंदात व्यतीत होणाऱ्या जीवनात, लहान मुलीचा जन्म आणि तिच्या येण्याने झालेला बदल, कहाणीची रुपरेषा बदलते. आणि पुन्हा सर्वजण आपापल्या स्वप्नांच्या पाठलागात व्यस्त होतात.\nमीरा ही आपल्या दुसऱ्या पुस्तकाच्या पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत असते. आणि तिला आपलं पुस्तक प्रकाशित करण्यसाठी एका फेस्ट मधे संधी मिळते. मग ती त्या सोहळ्यासाठी रवना होते. अचानक कबीरच्या कॅफे मध्ये आग लागते. त्यात त्यात कबीर ची दुखापत. निशाला बसलेला धक्का. मिराचा होणारा सतत संपर्क, आणि तिची झालेली धावपळ त्यातून उलगडणारी कथा रहस्याचा खजाना आहे.\nक्षणात होत्याचं नव्हतं झाल्याने आणि परिस्थितीमूळे, प्रत्येक पात्रावर पडलेल्या प्रभावाने एक वेगळाच गोंधळ निर्माण होतो. पैसे, ड्रग्स, कॅफे, हॉस्पिटल आणि घर यात गुंतून गेलेल्या लोकांची ही कहाणी. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचा चाललेला युक्तिवाद, त्यांचा संवाद आणि त्यांचे प्रासंगिक विधानं, तुम्हाला हे पुस्तक वाचायला भाग पाडतील. राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे हे चौघेही पुन्हा उभे राहू शकतील का हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचा. मी खात्री देतो तुम्हाला नक्की आवडेल.\nऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:\nकिंडल आवृत्ती विकत घ्या\nमराठी पुस्तकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा\nछत्रपती संभाजी – एक चिकित्सा\nसोशल नेटवर्कवर आमच्याशी कनेक्टेड राहा.\nवेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.mukundbhalerao.com/blog/2022/01/", "date_download": "2022-10-07T22:12:21Z", "digest": "sha1:67K2233TAFX2M4535OSTIJJW3MPTSZIO", "length": 5989, "nlines": 152, "source_domain": "www.mukundbhalerao.com", "title": "January 2022 – Mukund Bhalerao", "raw_content": "\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\n हवामे, तैरना मुझे आता,\nप्रवीण बुरकुले on जनाचे श्लोक\nS B Joshi on जनाचे श्लोक\nTushar Shardul on अभिराम मुक्त ऐसा, आनंदकंद आहे……..\nमुझे तूम नजरसे गिरा तो रहे हो…..\nमाझी आई माझी माई\nआई माझी आई होती, प्रेमस्वरूप ती माई होती, गेली आता दिव्य पदाशी, सहस्त्र योजने दूर आता ती…. शिक्षण तिचे झाले चार, पण होते तिचे ज्ञान अपार, इंग्रजी कधी शिकली नाही, पण शब्दांचे भव्य अगार …… स्मरण तिचे फारच भारी, इत्थंभूत स्मरणात राही, माहिती अथवा जेवण सारे, स्वयंपाक तिचा खूप भारी…… प्रेम करी गंगे इतके, घरचे […]\nकाला तमका अंधियारा अब, दशोदिशामे छाया है राष्ट्र सुरक्षित करने हेतू, राष्ट प्रथम यह नारा है || १ || संविधानकी गरिमाकोभी, कलंकित क्यो करते है | अपने निजी स्वार्थभावसे, देश विभाजन करते है || २ || अंतस्थलसे द्वेष भावसे, इनकी सारी गतीविधियाँ | देश तोडने दुष्टभावसे, इनका है व्यवहार सदा || ३ || इनको कोई […]\nपूर्वेस रक्तिमेचा, चेहरा उदीत झाला,सार्‍या दिशात विहरत, अवचित गंध आला……ऐसे प्रफुल्ल सगळे, ते सामगान झाले,त्या मुक्त पाखरांचे, आकार चित्र झाले……..पाने चमकती ती, त्या सानुल्या दवानी,वृक्षावरी विहरती, रंगीत पूष्प राशी……….जाता समोरे थोडे, तो पंथ संथ दिसला,स्वच्छंद सूर्यराशी, त्या निर्झरात दिसल्या……आता कुठे निघालो, ऐसा विचार आला,नसता दिशा मनाला, उत्साह तो निमाला…….दिशा मनात नव्हती, नव्हते ठिकाण काही,नगरात कोणत्याही, […]\nनिवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र\nअर्शमे बादलोङ्की बडीभारी भीड है…….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-6-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2022-10-07T23:15:00Z", "digest": "sha1:PILKGVBKXHY42ZBMAJVXBZJSTA6EQDYJ", "length": 13874, "nlines": 101, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "या '6' आजारांकडे दुर्लक्ष कराल तर गळू लागतील डोक्यावरील केस, पहा '3' नंबरच्या आजाराने लवकर व्हाल टकले... - Themaharashtrian", "raw_content": "\nया ‘6’ आजारांकडे दुर्लक्ष कराल तर गळू लागतील डोक्यावरील केस, पहा ‘3’ नंबरच्या आजाराने लवकर व्हाल टकले…\nया ‘6’ आजारांकडे दुर्लक्ष कराल तर गळू लागतील डोक्यावरील केस, पहा ‘3’ नंबरच्या आजाराने लवकर व्हाल टकले…\nजर आपले केस खूप वेगाने झडत असतील तर, त्यामागे अनेक गंभीर कारण असू शकतात. म्हणजे शरीरात वाढणारा कोणताही आजार असू शकतो. अशा आजाराबद्दल जाणून घेऊया, जे शरीरात हळूहळू वाढतात आणि नंतर हानिकारक ठरतात. केस झडणे या रोगांचे प्रारंभिक लक्षण असू शकतात.\nवेगाने झडणारे केस टाळण्यासाठी आपण बरीच सौंदर्य उत्पादने आणि टिप्स वापरतो,परंतु आपणास माहित आहे की केसांची काळजी न घेतल्यामुळेच केस झडत असतात हे अनेक छोट्या मोठ्या आजारांचे लक्षण देखील असू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या 6 आजारांमुळे आपले केस झडणे सुरू होते.\nही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा केस गळतीची बाब येते तेव्हा प्रत्येकाला असे वाटते की त्याचे केस गळत आहेत कारण केस गळणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.\nकेस तज्ञांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीचे दररोज 70 ते 100 केस गळत असेल तर ते घाबरून जाण्यासारखे नाही, परंतु आपल्या केस गळतीचे प्रमाण यापेक्षाही जास्त असेल आणि केस गळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असेल तर आपल्याला फक्त सौंदर्य उत्पादने नाही तर अजून बरेच काही करणे आवश्यक आहे. कारण केस गळणे देखील शरीरात वाढणार्‍या बर्‍याच याआजारांचे लक्षण असू शकते.\nथायरॉईडच्या वाढीमुळे केस पडतात :\nतीव्र आणि दीर्घकाळापर्यंत हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझममुळे केस गळतात, तर थायरॉईड डिसऑर्डरचा योग्य उपचार केवळ आपले केस गळूच शकत नाही तर नवीन केस वाढण्यासही मदत होते. तथापि, या प्रक्रियेस काही महिने लागू शकतात.\nजेव्हा कर्करोगाची शरीरात वाढत होते :\nकेस गळणे ही कर्करोगाच्या रुग्णांमध्ये एक सामान्य समस्या आहे. बर्‍याच वेळा, वेगाने केस गळणे देखील याचे संकेत आहे की शरीरात कर्करोग सारख्या गंभीर आजाराची शक्यता वाढत आहे. काही कर्करोग, जसे हॉजकिनच्या लिम्फोमामुळे केस गळतात, परंतु केमोथेरपीमुळे मुख्यतः केस गळतात.\nब्लडप्रेशर मुळे देखील अधिक प्रमाणात केस गळतात :\nजास्त काळासाठी उच्च रक्तदाब राखणे देखील केस गळतीस कारणीभूत ठरू शकते. कारण अशा परिस्थितीत रक्तवाहिन्यांवरील उच्च रक्तदाब दबाव आणतो, रक्तामध्ये सोडियमची जास्त मात्रा असते आणि त्याचा प्रवाह शरीरात व्यवस्थित वाहू शकत नाही. केस आणि हृदयाच्या आरोग्यासाठी ही स्थिती धोकादायक आहे.\nतरूण मुली आणि मुले बर्‍याचदा स्लिम फिट बॉडीच्या शोधात एनोरेक्सिया आणि बुलिमियासारखे विकाराचे बळी पडतात. या तरुणांपैकी बहुतेक मुली आणि महिला असतात. खाण्याच्या विकारांमुळे आरोग्याच्या इतर समस्यांसह केस गळतीचे एक मोठे कारण समोर येत आहे. यामुळे, आवश्यक पोषक आपल्या शरीरातील पेशींमध्ये पोहचत नाहीत आणि पोषण अभावामुळे केस वेगाने खाली गळण्यास सुरवात होते.\nनै*रा*श्यामुळेही केस गळतात :\nनै*रा*श्यामुळे केसांची गळती देखील होते. एखादी व्यक्ती नै*रा*श्यात अडकण्याआधी दीर्घकाळ चिंता आणि त*णा*वात असते. या परिस्थितीत, शरीरात आवश्यक संप्रेरक उत्पादने नसतात आणि पचनाचा त्रास होतो. तसेच, योग्य प्रकारे आहार न घेतल्यामुळे केसांना आवश्यक पोषण मिळत नाही.\nकेस गळल्यामुळे ल्युपस डिसऑर्डर देखील होतो :\nल्युपस एक स्वयंप्रतिकार रोग आहे. यामध्ये, शरीरात सूज बराच काळ राहते. ज्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर आणि केसांच्या मुळांवर प्रामुख्याने परिणाम होतो. यामुळे डोक्याचे केस वेगाने गळतात, तर काही लोकांच्या भुवया, मिशा वरील केसही गळतात.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\nOne thought on “या ‘6’ आजारांकडे दुर्लक्ष कराल तर गळू लागतील डोक्यावरील केस, पहा ‘3’ नंबरच्या आजाराने लवकर व्हाल टकले…”\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/jaminivr-basun-jevn-kelyane-hotat-he-fayde/", "date_download": "2022-10-07T21:48:27Z", "digest": "sha1:SA7JBLQEWHI2JUK5ESNXNYQHFJM5IUMB", "length": 15739, "nlines": 92, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "जमिनीवर बसून जेवण केल्याने शरीरास होतात 'हे' 10 आरोग्यवर्धक फायदे - Themaharashtrian", "raw_content": "\nजमिनीवर बसून जेवण केल्याने शरीरास होतात ‘हे’ 10 आरोग्यवर्धक फायदे\nजमिनीवर बसून जेवण केल्याने शरीरास होतात ‘हे’ 10 आरोग्यवर्धक फायदे\nआजच्या काळात असे फार कमी लोकं आहे ज्यांना खाली जमिनीवर बसणं आवडतं. बरेच लोकं खुर्ची वर बसून आपले काम करण्यास प्राधान्य देतात आणि जेवण सुद्धा खुर्ची टेबलावर बसूनच करतात. पण आपणांस ठाऊक आहे का की खुर्ची वर बसल्याने आपण आपल्या बऱ्याचशा स्नायूंचा वापर करत नाही अश्या परिस्थितीत आपल्याला जमिनीवर बसल्यावर उठायला त्रास होतो.\nजर आपण देखील त्यापैकी एक आहात, ज्यांना जमिनीवर बसण्यापेक्षा खुर्चीवर बसणं जास्त आवडत, तर एकदा जमिनीवर बसण्याचे फायदे जाणून घ्या, नक्कीच आपण फायदे जाणून घेतल्यावर खुर्ची वर बसणं नेहमीसाठी विसराल.\n1) पचन सुधारते : जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते या सतत होणार्‍या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.\n2) वजन घटवण्यास मदत होते : जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यासही मदत होते. जमिनीवर बसून जेवताना, मेंदू शांत होतो व जेवणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित होते. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे. जमिनीवर बसून जेवताना ‘वेगस नर्व्ह’ (पोटाकडून मेंदूला संकेत देणारी) भूक व जेवणाचे प्रमाण योग्यप्रकारे राखू शकते. टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते.\n3) लवचिकता वाढवते : पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते. परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.\n4) मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते : जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते. प्रख्यात आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांच्यामते, जेवताना त्याचा स्वाद, चव, स्वरूप यावर लक्ष दिल्याने तसेच तुम्ही किती प्रमाणात त्याचे सेवन करत आहात याबाबत सजग राहिल्यास तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता.\n5) कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढते : दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत जरूर आनंद घ्यावा. कारण जमिनीवर बसून जेवल्याने मन शांत व प्रसन्न होते. दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास मदत होते व नकळत कुटूंबातील सदस्यांशी जवळीक वाढते.\n6) शरीराची स्थिती (पॉश्चर) सुधारते : शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. उत्तम शारीरिक स्थितीमुळे काही अपघात टळू शकतात तर शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.\n7) दीर्घायुषी बनवते : ही अतिशयोक्ती नाही. जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते. ‘European Journal of Preventive Cardiology’च्या अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे, असे समजावे. कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे. आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या 6 वर्षात होण्याची शक्यता 6.5 पटीने अधिक असते.\n8) गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात : या पुस्तकाचे लेखक पी.एस. वेंकटेशवरा यांच्यामते, पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते. जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकतादेखील वाढते.\n9) चंचलता कमी होते : मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो. म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील त्रास कमी होतात.\n10) हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो : काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का हो हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पचनही सुधारते.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/basketball-player/", "date_download": "2022-10-07T21:43:13Z", "digest": "sha1:UAGE24FOTKXF3MRG7YSYZTE47TVVSGEN", "length": 7614, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "basketball player Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nबास्केटबॉलपटू सतनामसिंग भामरावर बंदी\nनवी दिल्ली - भारताचा अव्वल बास्केटबॉलपटू सतनामसिंग भामरा याच्यावर राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवनविरोधी समितीने (नाडा) दोन वर्षांची बंदी घातली आहे. ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/by-7-wickets-against-panjab/", "date_download": "2022-10-07T21:24:55Z", "digest": "sha1:ZWQPGPP332MROIVRX7K4WXNODKN7WU3U", "length": 7676, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "by 7 wickets against Panjab Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nIPL2021 : शिखर धवनची अर्धशतकी खेळी; दिल्लीचा पंजाबवर सहज विजय\nअहमदाबाद - शिखर धवनच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्स संघावर ...\nDeepak Kesarkar | “…मात्र उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, दीपक केसरकरांच टीकास्त्र\nBCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘रॉजर बिन्नी’\n#UPI : यूपीआय व्यवहारांची संख्या वाढली; सप्टेंबर महिन्यात झाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे व्यवहार\nVideo : उद्धव ठाकरेंच्या विधानांचा राणेंनी घेतला समाचार, म्हणाले “पंतप्रधान मोदी पाकिस्तानात…”\nShubman Gill | द.आफ्रिका विरुद्ध ३ रनावर OUT होऊनही शुभमन गिलने वनडेमध्ये रचला मोठा विक्रम\n ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंतची मुदत तर शिंदे गटाच्या….\nBritain | हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा ब्रिटनच्या विरोधी पक्षाचा निर्धार\n‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला पुन्हा ईडीचे समन्स\nIndian Army : सरावाच्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद\nWinter Season | हिवाळ्यासाठी Car करा रेडी ‘या’ पाच गोष्टींसह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/famous-news-reporter-rohit-sardana-passed-away-due-to-corona/", "date_download": "2022-10-07T23:02:05Z", "digest": "sha1:6MBH5JSPHFBCWSST4WJPAQI47OWP24EK", "length": 9116, "nlines": 111, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nप्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन\nप्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन\nनवी दिल्ली | आज तक या वृत्तवाहिनीमध्ये वृत्त निवेदनाचं काम करणाऱ्या प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं आज कोरोनामुळे दु:खद निधन झालं आहे.\nसुधीर चौधरी यांनी यासंबंधी ट्विट करत रोहित सरदाना यांच्या निधनाची बातमी समोर आणली आहे. रोहित सरदाना यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. परंतु, नंतर तब्येत खराब झाल्याने त्यांना दिल्लीच्या मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. आज सकाळी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दिल्ली येथे दुर्दैवी मृत्यू झाला.\nकाल रात्री त्यांची तब्येत स्थिर होती पण त्यानंतर सकाळी 4 वाजता अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आणि आज सकाळी त्यांचं हृदयविकाराचा झटका आल्याने दु:खद निधन झालं.\nअब से थोड़ी पहले @capt_ivane का फ़ोन आयाउसने जो कहा सुनकर मेरे हाथ काँपने लगेउसने जो कहा सुनकर मेरे हाथ काँपने लगेहमारे मित्र और सहयोगी रोहित सरदाना की मृत्यु की ख़बर थीहमारे मित्र और सहयोगी रोहित सरदाना की मृत्यु की ख़बर थीये वाइरस हमारे इतने क़रीब से किसी को उठा ले जाएगा ये कल्पना नहीं की थीये वाइरस हमारे इतने क़रीब से किसी को उठा ले जाएगा ये कल्पना नहीं की थीइसके लिए मैं तैयार नहीं थाइसके लिए मैं तैयार नहीं थाये भगवान की नाइंसाफ़ी है..\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी…\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n18 वर्षांवरील लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य\n …अन् चालू मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने केलं पत्नीला किस\n“धोनीनंतर मराठमोळा ऋतुराज गायकवाड होऊ शकतो चेन्नईचा कर्णधार”\n टिव्ही पाहायला गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर तरुणाने केला बलात्कार\nप्रसिद्ध अभिनेत्रीने केली भावाची हत्या, कारण अत्यंत धक्कायदायक\nरणधीर कपूर यांनी ‘या’ कारणाने वडिलोपार्जित घर विकण्याचा घेतला निर्णय, म्हणाले…\nआज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद; महत्वाची घोषणा करण्याची शक्यता\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ…\n‘आदिपुरुष’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शकाला नोटीस\nशाहरुख खानने 11 वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरतेय खरी\n उद्धव ठाकरेंकडे फक्त पुढच्या 21 तासांची मुदत\n“भविष्य कुणी पाहिलेलं नाही, शिंदेंचा नातू भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो”\nनारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा, म्हणाले…\n“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, म्हणतात…\nपरतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; हवामान खात्याकडून अलर्ट\nउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाने केला सर्वात मोठा दावा\n“दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/mumbai-news-state-government-strongly-supports-farmers/", "date_download": "2022-10-07T22:45:13Z", "digest": "sha1:AMKTI6GU5NAQ52GPZO5NPUOO5CSCCQ7T", "length": 9810, "nlines": 43, "source_domain": "mahaupdate.in", "title": "Mumbai news: राज्य शासन शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Maha Update", "raw_content": "\nHome » Mumbai news: राज्य शासन शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMumbai news: राज्य शासन शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nअडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे आहे. आपण सर्वजण मिळून त्यांना मदत करू, असे उपमुख्यमंत्री तथा सभागृह नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.\nविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम २६० अन्वये राज्यातील कृषी क्षेत्र आणि पूरपरिस्थिती यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते.\n२२ ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये सततचा पूर, अतिवृष्टी यामुळे ८१ लाख २ हजार हेक्टर जमीन बाधीत झाली आहे. यामध्ये जिरायती क्षेत्र १७ लाख ५९ हजार ६३३ हेक्टर असून बागायती क्षेत्र २५ हजार ४७६ हेक्टर आहे. फळपिकांमध्ये ३६ हजार २९४ हेक्टर एवढे क्षेत्र बाधित झाले आहे. सुमारे १३८ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये तातडीची मदत केली आहे. २१ हजार व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.\nविदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पूर स्थिती होती. पूरपरिस्थितीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी तत्काळ दौऱ्यावर जावून पूरग्रस्त भागाची पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर संकट आले आहे. एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरपर्यंतच्या मदतीचा निर्णय घेतला आहे.\nनैसर्गिक आपत्तीत यापूर्वी तातडीची मदत पाच हजार रुपये मदत दिली जात असे. आता ही मर्यादा 15 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ६५ मिलीपेक्षा जास्त पाऊस झाला तर भरपाई देण्यात येते. आता एनडीआरएफच्या निर्णयापलीकडे जाऊन ६५ मिलीपेक्षा कमी पाऊस झाला असला आणि ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले तरी मदत केली जाईल.\nमराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये गोगलगाय, येलोमोझाय यासारख्या कीड रोगांच्या प्रादूर्भावामुळे नुकसान झाले. यासंदर्भात एनडीआरएफ किंवा एसडीआरएफच्या निकषात अशी कीड बसत नाही. २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीसाठी विशेष शासन निर्णयाद्वारे मदत देण्यात आली होती. त्याच धर्तीवर विशेष शासन निर्णय निर्गमित करुन मदत देण्यात येईल. २४०० महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्रे लावली आहेत. मात्र, ही केंद्रे अपुरी पडतात. त्यामुळे अतिरिक्त हवामान केंद्रे लावण्याचा निर्णय घेतला आहे.\nनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. पुरवणी मागण्यांमध्ये त्याविषयीची तरतूद करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यापासून या मदतीचे वाटप करण्यात येईल. नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे अनेकदा होत नाहीत. मोबाईल अॅप्लीकेशनच्या माध्यमातून ई – पंचनामा करण्याचा प्रयत्न असेल. आधार लिंक खात्यावर पैसे जमा करणार आहोत. रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापरही येत्या काळात करण्यात येईल.\nनव्याने आपत्ती निवारण क्षेत्राचे मॅपिंग करण्यात येवून पुनर्वसनाचे नवीन धोरण तयार करण्यात येईल. बोगस बियाण्यांचा प्रकार रोखण्यासाठी बियाण्यांचे पॅकिंग घेतल्यानंतर ट्रॅक अँड ट्रेस चा अवलंब करण्यात येईल. बोगस बियाण्यांच्या विक्रीस यामुळे प्रतिबंध लागेल.\nजैविक शेती आणि नैसर्गिक शेती यासंदर्भात काही योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न सुरु आहे. विशेषतः कृषी विद्यापीठामध्ये नवीन तंत्रज्ञान कसे आत्मसात करता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. घोषित केलेली मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.\nयावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुरेश धस, एकनाथ खडसे, प्रसाद लाड, अमरनाथ राजूरकर आदी सदस्यांनी सहभाग घेतला.\nSangli news : खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज\nजिल्ह्यात खरीपसाठी आठ लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्र प्रस्तावित\nMumbai news: सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/video-salman-khan-kept-a-half-full-glass-in-his-pocket-netizens-amazing-comments-on-the-viral-video/", "date_download": "2022-10-07T23:32:29Z", "digest": "sha1:5EA6JWTVY5JOOHN3J4SYMBCD2FTWM6T4", "length": 6462, "nlines": 43, "source_domain": "mahaupdate.in", "title": "#Video : सलमान खानने अर्धा भरलेला ग्लास ठेवला खिशात; व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स - Maha Update", "raw_content": "\nHome » #Video : सलमान खानने अर्धा भरलेला ग्लास ठेवला खिशात; व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स\n#Video : सलमान खानने अर्धा भरलेला ग्लास ठेवला खिशात; व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स\nमुंबई : बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान अनेकदा त्याच्या स्टाईलमुळे चर्चेत राहतो. आता नुकताच तो एका पार्टीत दिसला. यादरम्यान सलमान पुन्हा एकदा एका खास कारणामुळे चर्चेत आला. यावेळी सलमान खान हातातला ग्लास पॅन्टच्या खिशात ठेवताना दिसला, त्यानंतर सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.\nसलमान खान पार्टीत प्रवेश करतानाच्या व्हिडिओमध्ये अर्धा भरलेला ग्लास घेऊन दिसत होता. पापाराझींना पाहून सलमान खान तो ग्लास लपवण्याचा प्रयत्न करतो आणि यादरम्यान तो आपल्या खिशात ग्लास ठेवताना दिसतो, चला तर जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण.\nअलीकडेच सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर होत आहे. ज्यामध्ये सलमान खान कारमधून उतरताना आणि खिशात अर्धा भरलेला ग्लास ठेवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून लोक अंदाज लावत आहेत की सलमानच्या हातात दारू आहे की पाणी कुणी म्हटलं की सलमान भाई पाण्याची जाहिरात करतोय, तर कुणी म्हटलं की सलमान भाई चांगल्या ब्रँडचा व्होडका पितोय. असे अनेक तर्कवितर्क सलमान लावताना दिसत आहे.\nसलमान खान शनिवारी मुराद खेतानीच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचला तेव्हा ही घटना घडली. सलमान गाडीतून खाली उतरला. मग त्याने जीन्सच्या खिशात अर्धा भरलेला ग्लास ठेवला. यानंतर त्याने पार्टीत प्रवेश केला.\nकाचेसह सलमान खानचा मजेदार व्हिडिओ येथे पहा-\nसलमान खानचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या मनात सतत गोंधळ उडत आहे की, भाईजान ग्लासात काय पीत होता की घाईघाईत त्याने ग्लास पॅन्टच्या खिशात ठेवला. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, सलमान कारमधून खाली उतरतो आणि पोलिस त्याच्या समोर येतात आणि यादरम्यान सलमान त्याच्या पॅन्टच्या खिशात एक ग्लास ठेवत आहे जो पूर्णपणे पांढरा आहे. अनेकांनी याला सलमान खानची नवी शैली म्हटले आहे. त्यामुळे अनेकजण त्याच्या या दबंग लूकचे कौतुक करत आहेत.\nरानू मंडल आणि सलमान खानची जुगलबंदी पाहिलीत का; भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\n#Video : बऱ्याच वर्षांनंतर ऐश्वर्याला झाली सलमान खानची आठवण; काय म्हणाली अभिनेत्री पाहा व्हिडीओ\nकरण जोहरच्या नकारानंतर सलमान खान करणार भारती आणि हर्षच्या मुलाला लॉन्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://navrangruperi.com/cinema/marathi-cinema/vishakhakashalkar/", "date_download": "2022-10-07T21:55:28Z", "digest": "sha1:3OPSPQDA7RON7RV7UGIWD4JDEKZKKPYN", "length": 9140, "nlines": 167, "source_domain": "navrangruperi.com", "title": "विशाखाचा अनोखा अंदाज - Navrang Ruperi", "raw_content": "\nमराठी सिनेइंडस्ट्रीत दररोज नवनवीन चेहरे दाखल होत आहेत. नाटकं तसेच हिंदी टीव्ही मालिकांमधील ओळखीचा एक चेहरा आता मराठी चित्रपटात पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. हिंदी मालिका ‘नोंकझोक’ मधून बालकलाकार म्हणून काम केलेली व पुढे मालिका, नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री विशाखा कशाळकर ‘विस्टल ब्लोईंग सूट’ या चित्रपटातील आव्हानात्मक भूमिकेतून मराठी चित्रपटात पदार्पण करीत आहे.\n‘नोंकझोक’, ‘संभव क्या’ या हिंदी तसेच ‘एक वाडा झपाटलेला’, ‘निवडुंग’ या मराठी मालिकांमधून विशाखाने अभिनय केला आहे. ‘राधा’ या मराठी एकपात्री नाटकामध्ये पाच वेगवेगळ्या भूमिका सशक्तपणे पेलत आपल्या अभिनयाची चुणूक विशाखाने दाखविली होती. आता ‘विस्टल ब्लोईंग सूट’ या चित्रपटातही तिच्या अभिनयाचे वेगळे रंग दिसणार आहेत.\nदृकश्राव्य माध्यमाचा सशक्त वापर, भारावून टाकणारे संगीत, कथेचा छाती दडपविणारा आवाका, वैज्ञानिक कसोटीवर खरी उतरणारी अनेक वर्ष रिसर्च करून लिहिलेली संहिता ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये असणार आहेत. वेगळ्या धाटणीची भूमिका करायला मिळाल्याचं समाधान व्यक्त करताना ही भूमिका हा चित्रपट प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप वेगळा अनुभव असेल असा विश्वास विशाखा व्यक्त करते.\nराष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दमदार हजेरी लावायला सज्ज असलेला ‘विस्टल ब्लोईंग सूट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nअभिजित मोहन वारंग दिग्दर्शित चित्रपट 'प्रेम प्रथा धुमशान' २८ ऑक्टोबरला\nजानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार बिगबजेट चित्रपट \"अंकुश\"\nप्रसाद खांडेकरची दिग्दर्शकीय इनिंग, ‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'सहेला रे' चा ट्रेलर प्रदर्शित\n‘तू इथे जवळी राहा’ म्युझिक व्हिडिओत यशोमान आपटे, ज्ञानदा रामतीर्थरकरची जोडी\nजन्मदिन विशेष..जनसामान्यांची करमणुकीची नस सापडलेला फिल्मी दिग्दर्शक.. मनमोहन देसाई\n“मन उनाड उनाड” म्युझिक व्हिडिओत मोनालिसा बागल, अभिजित अमकर\nदिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये..\nराम कदम यांच्या संगीतातील ‘स्वराशा’\n“तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही” …शब्दांचा जादूगार ..गुलजार\nदिवाना मुझसा नही…शम्मी कपूर\nप्रतिभेला आलेला बहार…नृत्यांगना अभिनेत्री वैजयंतीमाला\nअभिजित मोहन वारंग दिग्दर्शित चित्रपट ‘प्रेम प्रथा धुमशान’ २८ ऑक्टोबरला\nजानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार बिगबजेट चित्रपट “अंकुश”\nप्रसाद खांडेकरची दिग्दर्शकीय इनिंग, ‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ चा ट्रेलर प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE55/", "date_download": "2022-10-07T21:09:04Z", "digest": "sha1:EXY3TFVMGN6SPZLYWMOIMKPOJTMHOCNF", "length": 13482, "nlines": 90, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "प्राचीन काळातील राजे महाराजे 'ही' एक गोष्ट खाऊन एकाच वेळी 10 राण्यांना करत होते सं'तुष्ट, पहा एकाच वेळी खेळायचे असा खेळ... - Themaharashtrian", "raw_content": "\nप्राचीन काळातील राजे महाराजे ‘ही’ एक गोष्ट खाऊन एकाच वेळी 10 राण्यांना करत होते सं’तुष्ट, पहा एकाच वेळी खेळायचे असा खेळ…\nप्राचीन काळातील राजे महाराजे ‘ही’ एक गोष्ट खाऊन एकाच वेळी 10 राण्यांना करत होते सं’तुष्ट, पहा एकाच वेळी खेळायचे असा खेळ…\nसध्याच्या धका-धकीचे जीवनात एखाद्या स्त्रीला समाधनी करणे खूप अवघड बनले आहे. पण आपण जर इतिहासात पहिले तर पूर्वीचे राजा एकाच वेळी 10 राण्यांना समाधनी करत होते. आपणास हे देखील जाणून घ्यायचे आहे की असे रहस्य काय होते ज्यामुळे पूर्वीच्या राजांना हे करणे शक्य होत असे. तर चला मग याबद्दल जाणून घेवू.\nपूर्वी राजा महाराजांचे भोजन खूप चांगले प्रतीचे असायचे, ते फक्त नैसर्गिक भोजन खात असत, ज्यात थोडी सुद्धा भेसळ नसायची, पण आताच्या जीवनात शक्य नाही. सध्याच्या पुरुषांची ताकद कमी होण्याचे हे देखील एक महत्त्वपूर्ण कारण आहे.\nचांगल्या अन्नाबरोबरच त्यावेळचे राजा शतावरी आणि चिलगोजा सारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा सर्वाधिक सेवन करीत असत. या दोन्ही गोष्टी लैं’गि’क श’क्ती वाढविण्यात खूप साम’र्थ्यवान मानल्या जातात.\nशतावरी आहे सर्वात उस्ता-हवर्धक:- शतावरी ही भारतभरात सगळीकडे वाढणारी, छोट्या जंगलांमधे, बागांमधे वाढणारी एक औषधी वेल आहे. ही कडू-गोड चवीची, का-टेरी झुपकेदार आरोहिणी वेल, म्हणजेच औषधी वनस्पती मुख्यत: आम्लपित्त दो’षासाठी वापरली जाते. शतावरी वनस्पतीची मुळे आणि पाने उपचारांसाठी वापरली जातात.\nभारतामधे शतावरी वनस्पती ही मुख्यत पुरुषांसाठीची वनस्पती मानली जाते. ह्या वनस्पतीचा प्रामुख्याने स्त्री-यांच्या प्रजोत्पा-दनासाठी उपयोग केला जातो, त्यामुळे शतावरी ह्या शब्दाचा अर्थच शतआवरी म्हणजेच १०० नारी ताब्यात असलेला नर असा होतो.\nशतावरी ही मुख्यत पुरुषांसाठीची वनस्पती असली तरीही स्त्रि-यां ना देखील याचा वेगळ्या तहेने उपयोग होतो. स्त्री’यांमधील प्रजोत्पादन श’क्ती वाढवणे, त्यांना लैं’गि’क आत्मविश्वास देणे, लैं’गि’क इच्छाशक्ती वाढवणे अशी अनेक कामे ही वनस्पती करते. स्त्री-पुरुषसंबंधांमधे शतावरीमुळे एक आत्मविश्वास आणि खेळीमेळीचे वातावरण तयार होते. ह्यामुळे मिलन प्रक्रिया सुलभ होते.\nशतावरीचा वापर ग’र्भपा’त झालेल्या स्त्री’यांच्या उ’पचारांवर, ग’र्भाशया’वर खूप प्रभावी रितीने होतो. रजोनिवृत्तीतून जात असलेल्या स्त्रीयांना, किंवा हि’स्ट्रेक्टो’मी झालेल्या स्त्री’यांना शतावरीची खूपच गरज असते. याने र’क्तशुद्धी’करण तर होतेच शिवाय प्रजोत्पादन अ’वयवां’ना सुद्धा त्याची मदत होते.\nशतावरी हे श’रिरातील सत्त्व वाढवणारे औ’षध आणि सकारात्मक रितीने बरे करणारे औषध म्हणूनही ओळखले जाते. स्त्री-यांच्या स्त’न वृद्धीसाठी शतावरीच्या मुळ्या दुधात वाटून त्या ठिकाणी लावल्या जातात. शतावरीचा अजून उपयोग पोटाचा अल्सर, ताप, वात, पित्त, जुलाब यासाठीतर होतोच. शिवाय कोणताही ताप कमी करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे श’रिरातील द्रव्याचा समतोल राखण्यासाठीही होतो.\nप्र’जननक्षमता वाढवण्यासाठी आहार आणि औ’षधे ह्यांचा महत्वाचा सहभाग असतो. जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार ग’र्भधा’रणेसाठी प्रयत्न करीत असाल तर आपण शतावरीचा नक्की उपयोग केला पाहिजे. शतावरी काढ्याच्या स्वरूपात किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात घेतले जाऊ शकते.\nशतावरी पूर्वीच्या काळापासून भारतामध्ये शेकडो वर्षांपासून वं’ध्यत्वाच्या उ’पचारासाठी वापरले जाते. प्र’जननक्षमता वाढवण्यासाठी शतावरीची मदत होते. शतावरी घेतल्याने प्रतिकार यंत्रणा सुधारते, ता’णाशी सामना करता येतो, ग’र्भाश’याच्या मुखातील चिकट स्त्राव वाढतो आणि त्यामुळे मा’सिक पा’ळी नियमित होण्यास मदत होते.\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\nपती ‘नपुं’सक’ असून देखील पत्नी झाली ‘प्रे’ग्नं’न्ट’, खरे सत्य समोर येताच पतीचेही उडाले होश…\nह’निमू’नच्या पहिल्याच रात्री पत्नीला समजले की पती आहे स’मलैं’गि;क, पहा तरीही पतीने पत्नीसोबत केले…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/corona-virus-vr-arsenikbalumb/", "date_download": "2022-10-07T22:13:42Z", "digest": "sha1:ZCVVOK73PZBWVFJXYMZ4SNFJDVJTTOHZ", "length": 12983, "nlines": 106, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "कोरोनावर ‘आर्सेनिकम अल्बम 30’ खरंच उपयुक्त ठरतंय ? वाचा सविस्तर - Themaharashtrian", "raw_content": "\nकोरोनावर ‘आर्सेनिकम अल्बम 30’ खरंच उपयुक्त ठरतंय \nकोरोनावर ‘आर्सेनिकम अल्बम 30’ खरंच उपयुक्त ठरतंय \nजगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना विषाणूवर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. मात्र, कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी एक आशेचा किरण दिसला आहे. होमिओपॅथिक रोग प्रतिकार शक्ती वर्धक औषध पुढे आलं आहे. सध्या\nमिओपॅथीमधील आर्सेनिकम अल्बम 30 या औषधाची खूप मोठ्या प्रमाणावर सर्वत्र चर्चा सुरु आहे.\nसाबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या होमिओपॅथिक गोळ्या अनेकांना खाण्यास आवडतात. होमिओपॅथिचं एक औषध बऱ्याच आजारांवर काम करू शकतं.\nसध्या आर्सेनिक अल्बम 30 हे औषध चर्चेत आहे. कारण कोरोनाची जी लक्षणं आहेत त्या लक्षणावर प्रभावी असणारं हे औषध आहे. या औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असल्यामुळे या औषधाची मागणी वाढली आहे. आयुष मंत्रालयाने प्रतिबंधात्मक उपचार म्हणून हे औषध घेण्याचा सल्ला दिल्यानंतर या औषधाकाडे लोकांचा कल वाढू लागला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हे औषध घेऊ शकतात.\nअसे तयार होते हे औषध\nशेळीचे दूध, अल्कोहोल आणि सॅक्रीम हे सर्व मिक्स करून याची फर्मासीमध्ये प्रक्रिया पूर्ण करून हे होमिओपॅथिक औषध तयार केलं जातं.\nगोळ्यांचे सेवन कसे करायचे\nहोमिओपॅथिक गोळ्यांना हात न लावता औषधांच्या झाकणात घेऊन सरळ जिभेवर टाकून चोखायचे. कारण होमिओपॅथिक गोळ्यांच्या वरील भागावर त्यांचे अंश असतात त्यामुळे हात न लावता आणि खाली पडू न देता औषधं खावीत.\nया वयोगटासाठी आहे औषध\nसर्व वयोगटातील व्यक्ती या गोळ्यांचे सेवन करू शकतात. एकावेळी लहान मुले दोन गोळ्या तर मोठ्या व्यक्ती चार ते पाच गोल्या खाऊ शकतात. शिवाय इतर कोणत्याही आजारावर या गोळ्या घेता येतात.\nअसा करा गोळ्यांचा वापर\nरोज उपाशीपोटी तीन गोल्या केवळ सलग तीन दिवस घ्याव्यात. त्यानंतर महिनाभरानंतर पुन्हा या गोळ्या तीन दिवस घ्यायच्या आहेत. असे सलग तीन महिने या गोळ्यांचे सेवन करायचे आहे.\nहोमिओपॅथिक उपचार घेताना आहारात तीव्र गंध असलेले पदार्थ टाळणे उत्तम. लसूण, आलं, कच्चा कांदा, कॉफी यासारख्या पदार्थांना तीव्र वास असतो. तीव्र वासामुळे होमिओपॅथिक औषधांचा परिणाम कमी होतो.\nहोमिओपॅथी औषध घेण्याच्या पंधरा मिनिटे आधी आणि पंधरा मिनिटे नंतर काहीही खाणं किंवा पिणं टाळा. आर्सेनिक अल्बम 30 हे औषध होमिओपॅथिक फर्मासी, मेडिकल्स, होमिओपॅथिक डॉक्टर, आयुर्वेदिक शॉप या ठिकाणी उपलब्ध आहेत.\nकोरोना व्हायरसचा श्वसनंस्थेवरती होणारा प्रभाव, तापमानातील या आजाराबाबत वाढलेली भीती विचारात घेतली तर अर्सेनिक अल्बम या औषधाच्या गुणर्धमाची सर्व लक्षणं मिळती जुळती आहेत. म्हणूनच आर्सेनिक अल्बम हे औषध कोरोनावर रोगप्रतिकारकशक्ती वर्धक म्हणून वापरले जाऊ शकते.\nअवघे जग कोरोनाविरोधात लस शोधत आहे. मात्र, अद्यापही कोणत्याही देशाला म्हणावे तसे यश आले नाही. आपल्यातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सध्या होमिओपॅथी औषधांचा वापर केला जात आहे. केवळ रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी या औषधांचा सल्ला दिला जात आहे. पण यामुळे कोरोना बरा होतो असे नाही.\n– डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच होमिओपॅथिक औषधांचा वापर करा\n– होमिओपॅथिक औषधे उघडे ठेवू नका\n– हे औषध घेतल्यानंतर बाटलीचे झाकण बंद करा\n– या औषधांना स्पर्श करू नका\n– औषधांच्या बाटलीच्या झाकणातून सरळ जिभेवर औषध घ्या.\n या ठिकाणी घरातील व्यक्ती मेल्यावर साजरी केली जाते दिवाळी जल्लोषात मृतदेहाची काढली जाते मिरवणूक…\nघटस्फो’टानंतर नागा चैतन्य दुसऱ्या मुलीच्या प्रेमात तर समंथाच्या आयुष्यात आली मोठी आनंदाची बातमी…\nअभिनेत्री रेखाने केले ध’क्कादायक वक्तव्य म्हणाली; से-क्स केल्याशिवाय तुम्ही पुरुषाच्या….\nअनिल कपूरचे शिल्पा शेट्टीबाबत वक्तव्य, म्हणाले; “पै’से टाकले म्हणून राज कुंद्राशी लग्न केलं ” शिल्पाने अशा शब्दात दिले उत्तर..\nलॉकडाऊनचा फायदा घेत ‘ही’ अभिनेत्री झाली होती प्रे’ग्नं’ट को’रो’नामुळे रखडलेल्या लग्नात 1 वर्षाचा मुलगाही राहणार उपस्थित..\nकाजल अग्रवालचा ‘बे’ डरू’म’ मधील है’राण करणारा खुलासा, म्हणाली माझा नवरा ‘मध्यरा’त्री’ उठून मा’झ्या…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.hongkepvcvalve.com/pvc-batterfly-valve/", "date_download": "2022-10-07T21:17:33Z", "digest": "sha1:76QW4ODGNHIOPBLT24F7WTCEVAOEE7UV", "length": 7191, "nlines": 231, "source_domain": "mr.hongkepvcvalve.com", "title": " पीव्हीसी बॅटरफ्लाय व्हॉल्व्ह उत्पादक आणि पुरवठादार - चीन पीव्हीसी बॅटरफ्लाय वाल्व फॅक्टरी", "raw_content": "\n2 पीसी पीव्हीसी बॉल वाल्व मालिका\nपीव्हीसी बॉल वाल्व मार्गदर्शक\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nप्लास्टिक वाल्व, पीव्हीसी बॉल व्हॉल...\nहॉट सेल 1/2″ बॉल वा...\nकॉम्पॅक्ट पीव्हीसी बॉल व्हॉल्व्ह थ्री...\nप्लॅस्टिक टू-पीस बॉल व्हॉल्व्ह\nदक्षिण आफ्रिका Sch80 पीव्हीसी पाईप...\nपीव्हीसी बटरफ्लाय व्हॉल्व्ह विक्रीसाठी सर्व आकार\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n2 तुकडा बॉल वाल्व\nकिचस्पिंग (मिश्रण) टॅप करा\nआग्नेय आशिया जलद मार्गदर्शक\nदक्षिण अमेरिका जलद मार्गदर्शक\nमध्य-पूर्व आफ्रिका द्रुत मार्गदर्शक\nपत्ता:नं. 28, शुगुआंग रोड, जियानशान टाउन, पनआन काउंटी, जिन्हुआ सिटी, झेजियांग प्रांत\nपीव्हीसी शेड्यूल 40 बॉल वाल्व्ह, सिंचन बॉल वाल्व, Abs बेसिन Faucets, पीव्हीसी पाईप फिटिंग्ज, पाईप फिटिंग्ज, बेसिन टॅप,\n© कॉपीराइट - 2010-2021 : सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nपीव्हीसी शेड्यूल 40 बॉल वाल्व्ह, Abs बेसिन Faucets, बेसिन टॅप, सिंचन बॉल वाल्व, पीव्हीसी पाईप फिटिंग्ज, पाईप फिटिंग्ज,\nई - मेल पाठवा\nआमच्याशी गप्पा मारा, powered by LiveChat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://mr.rdflexitank.com/", "date_download": "2022-10-07T21:57:33Z", "digest": "sha1:RXV6MBBLE3O5UXLA4S2TKAANCPTYQZ7L", "length": 7373, "nlines": 178, "source_domain": "mr.rdflexitank.com", "title": "पाणी साठवण टाकी, फिश शेतीची टँक, इंधन तेलाची टाकी - रोंगडा", "raw_content": "आमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये आपले स्वागत आहे\nलवचिक गार्डन वॉटर पूल\nगॅल्वनाइज्ड कॅमिंग फिश टॅंक\nव्यावसायिक पाणी टँक निर्माता\nखाणकाम करण्यासाठी तात्पुरती इंधन साठवण टाकी ...\nइंधन फार्म किंवा मोठ्या स्टोरेज एरिया सेटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात द्रव साठवण्याकरिता संकुचित इंधन साठवण टाक्या हा एक प्रभावी मार्ग आहे. वाहतूक ...\nलवचिक स्टोरेज उशा टाकी\nउशी मूत्राशय किंवा ले-फ्लॅट स्टाईल टाक्या म्हणून सामान्यतः ओळखल्या जातात, या पिशव्या पिण्यायोग्य आणि पावसाचे पाणी, किंवा डिझेल आणि इंधन दोन्ही साठवण्याची किंवा वाहतूक करण्याची एक आर्थिक आणि कधीही लोकप्रिय पद्धत नाही. सहज ...\nनॉन-टॉक्सिक पीव्हीसी टारपॉलिन फिश फार्मिंग टँक\nमत्स्यपालनासाठी पीव्हीसी फिश फार्मिंग टँक, तात्पुरती संस्कृती, फिश ट्रान्सपोर्ट फिश एक्झीबिशन, पीव्हीसी पाईप सपोर्टसह फोल्डिंग डिझाइन. आम्ही गहन रीसायकलिंग ulatingक्वाकल्चर सिस्टम पुरवतो ...\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा आमच्या जाहिराती, सवलत, विक्री आणि विशेष ऑफरसह अद्ययावत रहाण्यासाठी\nलवचिक स्टोरेज उशा टाकी\nपत्ताः शुआंगफेंग रोड आणि वेनहुआ ​​रोड, झिंग'न जिल्हा, अंकियू सिटी, वेफांग सिटी, शेडोंग, चीनच्या छेदनबिंदूपासून पूर्व 380 मीटर\nसोम - शुक्र: सकाळी 10 ते संध्याकाळी 7\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/649/", "date_download": "2022-10-07T23:18:04Z", "digest": "sha1:MBWKPHTR2Z6IROO42IFEFAC3YN25SKF3", "length": 9218, "nlines": 80, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "गद्दार कोण; मी एक शिवसैनिक काय दखल घ्यायची ती पक्ष घेईल- परब - Rayatsakshi", "raw_content": "\nगद्दार कोण; मी एक शिवसैनिक काय दखल घ्यायची ती पक्ष घेईल- परब\nगद्दार कोण; मी एक शिवसैनिक काय दखल घ्यायची ती पक्ष घेईल- परब\nरामदास कदमांच्या आरोपानंतर मंत्री अनिल परबांची प्रतिक्रिया\nरयतसाक्षी: शिवसेनेचे आमदार तथा माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीकास्त्र केले. पत्रकार परिषदेत रामदास कदम म्हणाले की, ‘जे मंत्री हरामखोरी करीत आहेत व शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्या मनसे व राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना संपविण्याचा, रामदास कदमला संपविण्याचा घाट घातला आहे.’\nअशी गंभीर टीका रामदास कदम यांनी अनिल परबांवर केली होती. त्यावर आता अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावर अनिल परब यांनी मात्र बोलणे टाळले आहे. अनिल परब यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, मी याबाबतीत काही बोलू इच्छित नाही. माझ्यावर काहीही आरोप केले तरी मी काही बोलणार नाही. मी एक शिवसैनिक आहे. ते शिवसेना नेते आहेत. याबाबत जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल. असे अनिल परब म्हणाले.\n‘अनिल परबांनी रत्नागिरी जिल्ह्याला वाऱ्यावर सोडले. फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला ते जिल्ह्यात येतात. पण आता आम्हाला संपवण्यासाठी अनिल परब तीन-तीन दिवस जिल्ह्यात येऊन ठाण मांडत आहेत.’ ‘उद्धवजींना तुम्ही मदत करत असाल तर त्याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही दुसऱ्या नेत्याला संपवा असा होत नाही. माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी प्रयत्न केले होते. पण तसे झाले नाही. म्हणून सुडाची भावना ठेवत अनिल परब आता माझ्याविरुद्ध षडयंत्र रचत आहे.’ अशी गंभीर टीका रामदास यांनी केली आहे. पुढे रामदास कदम म्हणाले की, ‘अनिल परबांच्या प्रॉपर्टीबद्दल बोललो म्हणजे मी पक्षाबद्दल बोललो असे होत नाही. मिलींद नार्वेकरांचा बंगला तोडला कारण तो अनधिकृत होता.’ असे देखील रामदास कदम म्हणाले.\n‘गद्दार कोण’ अनिल परब की रामदास कदम मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पक्षासोबत गद्दारी करतात आणि आमच्या मुलाच्या जीवावर उठतात. दापोली आणि मंडणगड येथे योगेश कदम स्थानिक आमदार आहेत. परंतु अनिल परबांनी स्थानिक जिल्हाप्रमुखांना हाताशी घेऊन थेट उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. अनिल परब हा शिवसेनेच्या मुळावर उठलेला आहे. निष्ठावंतांची हकालपट्टी करत बाटग्यांना अनिल परबांनी तिकिटे दिली. आम्ही निष्ठावंत असुनही मिळणाऱ्या वागणुकीचे दुःख होते’ असे म्हणत रामदास कदमांनी अनिल परबांचा मोठा पाढाच वाचला.\n उद्धवजी लक्ष द्या’ -रामदास कदम\nअल्पसंख्याक समूहाने आपल्या अधिकारा प्रति जागरूक असले पाहिजे- प्रा.डॉ वाघमारे\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nबीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध– पालकमंत्री अतुल सावे\nग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/yavatmal-news-dengue-malaria-disease-increased-rds84", "date_download": "2022-10-07T23:03:38Z", "digest": "sha1:XOP3OVTTAA4Y62W3GEP2NHTIEAEDTWI6", "length": 4742, "nlines": 61, "source_domain": "www.saamtv.com", "title": "डेंगू, मलेरियाने केला हाहाकार; लहान मुलांना रूग्णालयात जागा मिळेना", "raw_content": "\nडेंगू, मलेरियाने केला हाहाकार; लहान मुलांना रूग्णालयात जागा मिळेना\nडेंगू, मलेरियाने केला हाहाकार; लहान मुलांना रूग्णालयात जागा मिळेना\nयवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यामध्ये डेंगू, मलेरिया आणि टायफाईडने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. यामुळे उपचारासाठी बेड मिळत नसल्याचे चित्र शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये (Hospital) दिसून येत आहे. (Yavatmal Today News)\nदप्‍तराविना विद्यार्थी जाणार शाळेत; कशी असेल दफ्तरमुक्त शाळा वाचा...\nसध्याचे वातावरण किटकजन्य आजाराला (Yavatmal News) पोषक असल्याने काही दिवसांपासून किटकजन्य सदृश रुग्णांची संख्या वाढली आहे. या रोगराईला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दरवर्षी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. मात्र यावर्षी आरोग्य विभागाने (Health Department) किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम न राबविल्यामुळे लहान मुलांना (Dengue) डेंगू, टायफाईड, मलेरिया या सारखे आजार होत आहे.\nलहान मुलांमध्‍ये जास्‍त लागण\nडेंग्‍यू, मलेरीया या आजाराचे प्रमाण लहान मुलांमध्‍ये अधिक पहावयास मिळत आहे. रुग्णालयात उपचारासाठी लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत असून सरकारीसह खाजगी रूग्णालयात प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/bappas-favorite-food-beneficial-health-know-benefits-eating-modak/", "date_download": "2022-10-07T21:50:05Z", "digest": "sha1:7N76OQOMLWA5UOOZMTDNRO27WFALO7CS", "length": 5825, "nlines": 42, "source_domain": "mahaupdate.in", "title": "बाप्पाच्या आवडीचा पदार्थ जो आरोग्यासाठीही ठरतो फायदेशीर, जाणून घ्या मोदक खाण्याचे फायदे - Maha Update", "raw_content": "\nHome » बाप्पाच्या आवडीचा पदार्थ जो आरोग्यासाठीही ठरतो फायदेशीर, जाणून घ्या मोदक खाण्याचे फायदे\nबाप्पाच्या आवडीचा पदार्थ जो आरोग्यासाठीही ठरतो फायदेशीर, जाणून घ्या मोदक खाण्याचे फायदे\nघरोघरी मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. प्रत्येकजण नैवैद्यासाठी बापाच्या आवडीचे मोदक बनवून गणरायाचे स्वागत करतात. मोदक हे खायला स्वादिष्ट असतात. लोक हे खूप आवडीने खातात.\nअनेकजण फक्त गणेशोत्सवातच नाही तर इतरवेळीही मोदक बनवून खातात. तुम्हाला माहिती आहे का की मोदक खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. मोदक गोड असू शकतो, पण त्याचे कमी सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.\nकारण हे तूप, नारळ, गूळ, सुका मेवा, तांदळाचे पीठ इत्यादीपासून तयार केले जाते. चला तर मग जाणून घेऊ अनेक आरोग्यदायी पदार्थांपासून बनवलेले मोदक खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात.\nमिठाई खाणाऱ्यांना चवीमुळे आवडेल, पण वजन वाढण्याचीही त्यांना चिंता असते. मोदकाचा एक आरोग्य लाभ म्हणजे वजन कमी करण्यास मदत होते. साखरेऐवजी गूळ घालून मोदक तयार केल्यास वजनही कमी करता येते. पोषणतज्ञांच्या मते, ज्या लोकांना साखरेचा त्रास होतो, त्यांनी गुळापासून बनवलेले मोदक खावेत.\nमोदकाच्या सेवनाने थायरॉईडची समस्या कमी होऊ शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते, जे थायरॉईड ग्रंथी निरोगी ठेवतात. एवढेच नाही तर गुळाच्या मोदकाने साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.\nबद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल\nइतर मिठाईंप्रमाणे मोदकही अनेक प्रकारे तयार केला जातो. नारळासोबत मोदक खाल्ल्यास साखरेची तृष्णा दूर होते, तसेच शरीरातील फायबरचे प्रमाण वाढते. फायबर हे असे पोषक तत्व आहे, जे पोटात बद्धकोष्ठतेची समस्या होऊ देत नाही. आरोग्य तज्ञ देखील अशा पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देतात, ज्यामध्ये भरपूर फायबर असते. आरोग्य तज्ञ म्हणतात नारळ असलेले मोदक खा, पण त्याचे प्रमाण मर्यादित ठेवा.\nउकडलेला गहू खाण्याचे ‘हे’ फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, वाचा…\nप्रेग्नेंसीमध्ये करू नका गुळाचे अतिसेवन, अन्यथा आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक\nवांगी खाण्याचे शरीराला मिळणारे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahaupdate.in/icc-odi-rankings-shubman-gills-jalwa-a-big-leap-in-odi-rankings/", "date_download": "2022-10-07T23:24:43Z", "digest": "sha1:MS43WMVO63PNIJI4LIHZYIAGEJNSRMXM", "length": 4860, "nlines": 38, "source_domain": "mahaupdate.in", "title": "ICC ODI Rankings : शुभमन गिलचा जलवा...ODI रँकिंगमध्ये घेतली मोठी झेप - Maha Update", "raw_content": "\nHome » ICC ODI Rankings : शुभमन गिलचा जलवा…ODI रँकिंगमध्ये घेतली मोठी झेप\nICC ODI Rankings : शुभमन गिलचा जलवा…ODI रँकिंगमध्ये घेतली मोठी झेप\nनवी दिल्ली : भारतीय सलामीवीर शुभमन गिल बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत ४५ स्थानांनी झेप घेत ३८व्या स्थानावर पोहोचला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या वनडे मालिकेत या 22 वर्षीय फलंदाजाने चमकदार कामगिरी केली होती. हरारे येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने या फॉरमॅटमधील पहिले शतक (97 चेंडूत 130 धावा) झळकावले.\nदरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ७४४ रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर कायम आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातून त्याला विश्रांती देण्यात आली होती. भारतीय कर्णधार रोहित शर्माही सहाव्या स्थानावर कायम आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातूनही त्याला विश्रांती देण्यात आली होती. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांत १५४ धावा केल्या असूनही अनुभवी सलामीवीर शिखर धवनची १२व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. पहिल्या आणि तिसऱ्या वनडेत त्याने अर्धशतके झळकावली.\nबाबर आझम क्रमवारीत अव्वल स्थानावर\nपाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत एकूण ८९१ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा रसी व्हॅन डर डुसेन आहे, ज्याचे 789 रेटिंग गुण आहेत. गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पहिल्या क्रमांकावर आहे, तर बांगलादेशचा शाकिब अल हसन अष्टपैलूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.\nICC ODI Ranking : ‘गब्बर’कडे टॉप 10 मध्ये स्थान मिळवण्याची उत्तम संधी, जाणून घ्या रोहित-कोहलीची स्थिती\nICC ODI Rankings : ICC क्रमवारीत धवन-अय्यरला झाला फायदा, पहा विराट-रोहितची स्थिती\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पुन्हा नवा कर्णधार; भारतीय वनडे संघ जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2022-10-07T21:13:21Z", "digest": "sha1:4USF3535YZOVMU2YCYZQ3VD3MPONU74P", "length": 3068, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काकवीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख काकवी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजिंजरब्रेड (नाताळ) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/vangi-khanyache-fayde/", "date_download": "2022-10-07T21:22:51Z", "digest": "sha1:KMKIP62VUMMAT7ERS3TXS7CFCSOBLNR5", "length": 9070, "nlines": 85, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "वांग्याची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या - Themaharashtrian", "raw_content": "\nवांग्याची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nवांग्याची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nवांग्याच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. वांग्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. ज्याना वजन कमी करायचे आहे त्यानी आहारामध्ये वांग्याचा समावेश अवश्य करावा. चला तर जाणुन घेउयात वांग्याची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे. वांग्यात व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते.\nवांग्यात असलेले पोटॅशियम, फायबर, जीवनसत्त्वे हृदयाला मजबूत बनवतात. वांग्याच्या भाजीमध्ये हे खनिज पोटॅशियम असते. जे शरीरात इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते. शरीरात रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त असतात.\nवांग्याच्या भाजीमध्ये अगदी कमी प्रमाणात कॅलरी असतात, जे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त असतात . 100 ग्रॅम वांग्यात फक्त 25 ग्रॅम कॅलरी असतात. वांग्यात फायबरचे प्रमाण जास्त असते पण त्यात कार्बोहायड्रेट्स मुळीच नसतात, यामुळे मधुमेहाच्या रूग्णासाठी ते खूप चांगले असते. फायबर रक्तातील साखर नियंत्रित करते जे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास करते.\nवांग्यामध्ये फायबर असते. जे अन्न पचन करण्यास मदत करते. गॅस किंवा संधिवात आहे किंवा ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यां वांग्यापासून दूर रहावं. वांग्यामध्ये असलेले घटक सिगारेट पिण्याच्या सवयीपासून मुक्त होण्यास मदत करतात.\nवांग्याच्या सेवनाने अनिद्रेची समस्या दूर होते. आपल्याला वांग्याची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtrian.com/ya-5-lokani-aalechya-sevan-karu-naye/", "date_download": "2022-10-07T22:40:24Z", "digest": "sha1:JF4QP76WFAZTTEO5CCZKNRG5LH7XHSFR", "length": 10174, "nlines": 87, "source_domain": "themaharashtrian.com", "title": "'या' 5 प्रकारच्या लोकांनी कधीच खाऊ नका 'आल', अन्यथा भोगावे लागतील 'हे' मोठे दुष्परिणाम - Themaharashtrian", "raw_content": "\n‘या’ 5 प्रकारच्या लोकांनी कधीच खाऊ नका ‘आल’, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ मोठे दुष्परिणाम\n‘या’ 5 प्रकारच्या लोकांनी कधीच खाऊ नका ‘आल’, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ मोठे दुष्परिणाम\nआल्याचे नाव ऐकताच अनेकांना आल्याच्या चहाची आठवण येते आणि हिवाळा असेल तर आले असलेली चहा. व्वा आल्याचा चहा घशात होणारा त्रास कमी करतो, बर्‍याच लोकांना अस्वस्थ झाल्यावर बर्‍याचदा आल्याचा चहा आठवतो. तर त्याच वेळी, हिवाळ्याच्या मोसमात आल्यामुळे शरीर उबदार राहते तसेच घश्याचा त्रास आणि हिवाळ्यात बर्‍याच रोगांपासून आपण सुरक्षित राहतो.\nम्हणून हिवाळ्याच्या काळात प्रत्येक घरात आल्याचा वापर केला जातो. प्रत्येकजण म्हणजे लहान मुलांपासून ते अगदी आजोबांपर्यंत, प्रत्येकजण आपल्या रोजच्या चहा मध्ये आलं समाविष्ट करतात. परंतु फारच कमी लोकांना माहिती आहे की आल्याचे सेवन काही लोकांसाठी फायद्याऐवजी धोकादायक ठरू शकते.\nआले या लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक\nरक्त विकार रुग्ण : एखाद्या व्यक्तीला रक्ताची समस्या असल्यास त्या लोकांनी विशेषत: आल्यापासून दूर रहावे. हेमोफिलिया ग्रस्त लोकांनी आले खाणे विसरून जावे. कारण, अदरक आपले रक्त पातळ करण्याचे काम करते.\nमधुमेह आणि उच्च रक्तदाब रुग्ण : ज्यांना सहसा मधुमेह आणि उच्च रक्तदाब समस्यांचा सामना करावा लागतो त्यांनी आल्यापासून दूर रहावे. कारण, हा आजार असलेले लोक औषधे घेतात. जर अदरक त्यांच्याबरोबर मिसळले गेले तर शरीरात एक धोकादायक मिश्रण तयार होण्यास सुरवात होते जे काही वेळा जीवघेणा ठरू शकते.\nगर्भवती स्त्री : गर्भवती महिलांना स्वत: ची विशेष काळजी घ्यावी लागते. आपण वेळोवेळी डॉक्टरांना देखील भेट दिली पाहिजे. परंतु या महिलांनी पहिल्या 3 महिन्यांतच अदरकचे सेवन केले पाहिजे. त्याऐवजी, शेवटच्या 3 महिन्यांत आल्यापासून दूर रहावे. अन्यथा, प्रीमेच्योिर डिलीवरी आणि लेबर होण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात वाढतो.\nकमी वजनाचे लोक : आपण सतत आल्याचे सेवन करत असाल तर त्यामुळे वजन कमी होते. कारण, आल्याचा वापर केवळ वजन कमी करण्यासाठी केला जातो. म्हणून केवळ ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनीच ते सेवन केले पाहिजे.\nविवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…\nपुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, याचे सेवन केल्याने कधीच होणार नाही ‘हे 4’ आजार …\nपूर्वीच्या काळात राजे आपल्या अनेक राण्यांना ‘ही’ एक वस्तू खाऊन करायचे संतुष्ट, पहा एकाच वेळी कित्येक राण्यांना…\n‘किडनी’ निकामी होण्यासपूर्वी शरीराकडून मिळतात हे 5 ‘संकेत’, पहा नंबर 4 चे लक्षण दिसल्यास वेळीच व्हा सावध…\nआयुर्वेदातील ‘ही’ एक वनस्पती ठरतेय पत्नीला नियमित खुश ठेवण्याची गु’रुकि’ल्ली, पहा ‘बेड’मध्ये पत्नीसोबत खेळाल जल्लो’षात खेळ…\n‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर प’रिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर…\n तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…\nमुलाच्या ‘या’ चुकीमुळे सासऱ्याने सुनेला बनवली बायको, खरे कारण समजल्यावर मोठमोठ्याने रडायला लागले गावातील लोक..\nलग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..\nअतिशय सुंदर दिसतात अलका कुबल यांच्या दोन्ही मुली, पहा सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देतात टक्कर..\nमहिला बॉससोबत होते पत्नीचे सं’बंध, म्हणून पतीने उचलले हे ध’क्कदा’यक पाऊल, पहा बॉसच्या घरी…\n 27 वर्षांपासून गावात एकही मर्द माणूस आला नाही, तरी सुद्धा येथील म’हिला होतात प्रे’ग्नं’ट, पण कसे वा’चून तुमचाही ब’सणार नाही वि’श्वास…\nJaved Tadavi on 2 महिन्यांची ग’र्भव’ती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर पतीचेही उडाले होश….\nShivaji Gire on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nNamdev on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\nManoj Dattatraya Kambale on I-A-S मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्रा-णी आहे जो ‘न-र’ असून देखील ‘मा-दी’ बनू शकतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.chimicron-mr.com/product/00000882-A22NN-MGM-NAA-P101-NN.html", "date_download": "2022-10-07T22:32:26Z", "digest": "sha1:DM7GJHNIRRM4FXJ6UV7MYRSWZDLSKL2W", "length": 13422, "nlines": 274, "source_domain": "www.chimicron-mr.com", "title": "A22NN-MGM-NAA-P101-NN | Omron Automation & Safety Services | अवर्गीकृत | Chimicron", "raw_content": "\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nChimicron हे इलेक्ट्रॉनिक घटकांचे स्वतंत्र वितरक आहे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय स्रोत आहेत, फक्त नवीन आणि मूळ उत्पादने विकतात आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी देतात. chimicron.com वर A22NN-MGM-NAA-P101-NN Omron Automation & Safety Services खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये A22NN-MGM-NAA-P101-NN चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. A22NN-MGM-NAA-P101-NN साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nआम्ही रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर पाठवतो.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील कुरिअरवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस\nDHL eCommerce,12-22 व्यावसायिक दिवस\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यवसाय दिवस\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यवसाय दिवस\nशिपिंग दर तुमच्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, UPS, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर परतावा सामान्यतः स्वीकारला जातो, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असावेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह येतात, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरूद्ध 90-दिवसांची वॉरंटी असते.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनातील बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/mumbai-rain-update-mumbai-to-see-heavy-rainfall-in-next-48-hours-very-heavy-rain-at-isolated-places-says-imd-ssk92", "date_download": "2022-10-07T21:19:51Z", "digest": "sha1:5WK6FMB2HN7KBXJM33RY3BV6EET77NXA", "length": 5303, "nlines": 57, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Mumbai Rain | मुंबईत पुढच्या ४८ तासात मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा", "raw_content": "\nMumbai Rain : मुंबईत पुढच्या ४८ तासात मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा\nहवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवसात शहरातील तापमान २५ अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nमुंबई: गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain) पुन्हा सुरूवात केली आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. येत्या ४८ तासात मुंबई आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस(Rain) पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही वर्तवला आहे.\nहवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसात शहरातील तापमान २५ अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.\nAjit Pawar: काही तरी गाजर दाखविल्‍यानेच प्रकल्‍प बाहेर गेला; अजित पवार यांचा आरोप\nIMD ने आजपासून मुंबई आणि ठाण्यासाठी ऑरेंजर अलर्ट जारी केला होता. चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडत आहे, असेही सांगण्यात आले होते.\nपावसामुळे (Rain) बुधवार १४ सप्टेंबर रोजी शहरातील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. मुसळधार पावसामुळे सध्याचे खराब रस्ते आणि खड्डे यामुळे अनेक भागात अडथळे, वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. हाजी अली मार्ग आणि तारदेव मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती, कारण वाहतूक पोलिसांनी केम्प्स कॉर्नर पूल तांत्रिक समस्यांमुळे सुमारे 40 मिनिटे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला होता.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030338280.51/wet/CC-MAIN-20221007210452-20221008000452-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}