{"url": "http://www.dailykesari.com/2020/09/15/why-did-drama-queen-return-without-informing-the-drug-mafia/", "date_download": "2020-09-26T02:03:03Z", "digest": "sha1:5EVKMP7OELHQPOYJR5HSFVKE3G3NL2HY", "length": 9852, "nlines": 171, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "ड्रग माफीयांची माहिती न देताच ‘ड्रामा क्विन’ का परत गेली? - Kesari", "raw_content": "\nघर मुंबई ड्रग माफीयांची माहिती न देताच ‘ड्रामा क्विन’ का परत गेली\nड्रग माफीयांची माहिती न देताच ‘ड्रामा क्विन’ का परत गेली\nमुंबई, (प्रतिनिधी) : मुंबईला वाट्टेल ते बोलणारी अभिनेत्री मुंबईत येण्याआधी फुशारक्या मारत होती. चित्रसृष्टी आणि अंमलीपदार्थांचे विक्रेते यासंदर्भात आपल्याकडे माहिती आहे, असेही सांगत होती. परंतु, कोणतीही माहिती सरकारी यंत्रणांना न देताच परत का गेली, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.कंगनाचा समाचार घेताना सावंत म्हणाले की, या अभिनेत्रीने कसलाही संदर्भ नसताना मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली.\nपूर्वीचा लेखवाहिन्यांचा गलका (अग्रलेख)\nपुढील लेखबिहारमध्ये राजकीय ध्रुवीकरणाची शक्यता\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nरियाच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nबिहार निवडणूक : तीन टप्प्यांत होणार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nबिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली.\nनवनाथ गोरे यांचा खडतर प्रवास होणार सुकर\nभारती विद्यापीठात मिळणार नोकरी\nलोकप्रिय गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले.\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलचा पहिल्याच षटकात पराक्रम\nअतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात\nइशांत शर्मा आणखी दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/ration-shopkeepers-arrested-for-misusing-rice-in-public-distribution-system/", "date_download": "2020-09-26T03:30:01Z", "digest": "sha1:2B6J2D2QRV7FNYMM2LICHBPIM6ZXC6AD", "length": 23007, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "अन्न व नागरी पुरवठा विभाग, रायगड जिल्हा प्रशासन आणि नवी मुंबई पोलिसांची पनवेल येथे धडक कारवाई - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसरकारने शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये,शिवसेनेचा केंद्राला टोला\nराज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत भारत व अमेरिकेतील कोविड योद्ध्यांचा सन्मान\nराज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे मातृशक्तीचा सन्मान\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nअन्न व नागरी पुरवठा विभाग, रायगड जिल्हा प्रशासन आणि नवी मुंबई पोलिसांची पनवेल येथे धडक कारवाई\nसार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदळाचा गैरवापरासंबंधी आराेपी रेशन दुकानदारांना तात्काळ अटक\nअलिबाग : जिल्हयातील पनवेल तहसिलदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल (Panvel) शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या संयुक्त पथकाने दि.३१ जुलै २०२० रोजी टेक केअर- लॉजिस्टीक, पळस्पे, ता.पनवेल येथील पलक रेशन गोडावून येथे छापा टाकून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ११० मे.टन तांदूळ (Rice) जप्त केला आहे. त्यानुषंगाने संबंधितांविरुध्द दि.०१ ऑगस्ट २०२० रोजी पनवेल शहर पोलीस ठाणे, पनवेल, नवी मुंबई येथे गुन्हा नोंद क्र. ०२७४/२०२०, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच भा.द.वि.१२० (ब), ४२०, ४६५, ४६८,४७०,४७१, ३४ व सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) आदेश २०१५ चे कलम १३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nजीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ६अ अन्वये जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे दि.१४ ऑगस्ट व ०४ सप्टेंबर २०२० रोजी सुनावणी घेण्यात आली हाेती. याबाबत पुढील अंतिम सुनावणी दि.१४ सप्टेंबर २०२० रोजी हाेणार आहे.\nनवी मुंबई पोलिसांकडून प्राप्त अहवालानुसार प्रस्तृत गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला तांदूळ भारतीय खाद्य निगमच्या OPEN MARKET SALES SCHEME ( DOMESTIC ) (OMSS) (खुला बाजार विक्री योजना) (देशांतर्गत) मधील ई-लिलावाद्वारे घेतलेला असून निर्यातीवर बंदी असतानाही विविध आफ्रिकन देशात हा तांदूळ निर्यात करण्यात आला आहे. भारतीय खाद्य निगमच्या OPEN MARKET SALES SCHEME ( DOMESTIC ) (OMSS) या योजनेतील तांदळाचा वापर फक्त देशांतर्गत करण्यासच परवानगी असून या तांदळाच्याही निर्यातीस बंदी आहे. या गुन्ह्यातील आरोपींनी हा तांदूळ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी यांच्याकडून खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या होत्या. मात्र ही कंपनी अस्तित्वात नसून सादर केलेल्या पावत्याही बनावट, बोगस असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. .\nकर्नाटक राज्यातील इंडी, विजापूर, जि.विजापूर तसेच हल्लूर, ता.मुदलगी, जि.बेळगाव इत्यादी ठिकाणावरुन सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील हा तांदूळ निर्यातीसाठी आणला असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींच्या कंपन्यांमार्फत दि.१ जानेवारी २०२० पासून आजपर्यंत ३२ हजार ८२७ मे.टन तांदूळ परदेशात निर्यात केल्याचे स्पष्ट झाले आहे.\nया गुन्हयाचा तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त, नवी मुंबई यांनी पनवेल शहर पोलिस ठाणे व नवी मुंबई गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकाऱ्यांचे ‘विशेष तपास पथक’ नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने कर्नाटक राज्यात जाऊन तेथील रेशन दुकानदारांना अटक केली आहे. गुन्हयाच्या तपासात आजपर्यंत एकूण १८ आरोपी निश्चित करण्यात आले असून त्यापैकी १) नवनाथ लोकू राठोड, वय-२५ वर्षे, रा.ठि.इंडी, विजापूर, कर्नाटक, २) सत्तार चांदसाहब सय्यद, वय-२५ वर्षे, रा.ठि. इंडिया, विजापूर, कर्नाटक, ३) कृष्णा दामो पवार, वय-४५ वर्षे, रा.ठि.जगदंबा मंदिराजवळ, हिरेबेनूर तांडा, ता.इंडी, जिल्हा-विजापूर, कर्नाटक या ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.\nया कारवाई अंतर्गत टेक केअर लॉजिस्टीक, पळस्पे, येथील पलक रेशन गोडावून, ता.पनवेल, येथून रु.३३ लाख किंमतीच्या रेशनच्या तांदळाच्या प्रत्येकी ५० कि.लो. वजनाच्या २ हजार २२० गोण्या (११० मे.टन) यामध्ये एशियन राईस लोगो असलेल्या ६५२ पिवळया रंगाच्या व सफेद रंगाच्या २९५ गोण्या त्याचप्रमाणे उर्वरित १ हजार २७३- फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ पंजाब, गव्हर्नमेंट ऑफ हरयाणा असे शिक्के असलेले बारदाना पोती व दोन वजन काटे, 2)झेनिथ इंम्पेक्स कंपनी खालापूर, ता.खालापूर, जि.रायगड येथून फूड कॉपोरेशन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ पंजाब, गव्हर्नमेंट ऑफ हरयाणा असे शिक्के असलेल्या बारदानाच्या रिकाम्या ८०८ गोण्या, 3)जय फूड प्रोडक्शन कंपनी, सावरोली, ता.खालापूर, जि.रायगड. या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ पंजाब, गव्हर्नमेंट ऑफ हरयाणा असे शिक्के असलेल्या बारदानाच्या रिकाम्या ८ गोण्या तर 4) जय आनंद फूड कंपनी, मिरांडे इंडस्ट्रीज, भादाणे गाव, पो.पडे, ता.भिवंडी, जि.ठाणे येथून रु.९९ लक्ष १२ हजार ०४६/- रूपये किंमतीच्या तांदळाची ५ हजार ४०४ व गव्हाची ८६० पोती अशी एकूण ६ हजार २६४ पोती जप्त करण्यात आली आहेत.\nया गुन्हयाच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकामार्फत पुढील अधिक तपास सुरु आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून विशेष तपास पथकाला तपास जलद गतीने पूर्ण करुन गुन्हयात सहभाग असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleरुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर कायम-राजेश टोपे\nNext articleपावसाळी अधिवेशन : असे असणार विधिमंडळाचे कामकाज\nसरकारने शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये,शिवसेनेचा केंद्राला टोला\nराज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत भारत व अमेरिकेतील कोविड योद्ध्यांचा सन्मान\nराज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे मातृशक्तीचा सन्मान\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nसरकारने शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये,शिवसेनेचा केंद्राला टोला\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nसरकारने शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये,शिवसेनेचा केंद्राला टोला\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/amp/mr/goa/articles/cotton", "date_download": "2020-09-26T02:29:27Z", "digest": "sha1:ZRJ4IU2SA7MH3NA7ON7P4K3GUDDHPBGF", "length": 18841, "nlines": 241, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nकापूस पिकातील कोरायनेस्पोरा व अल्टरनेरिया बुरशीजन्य रोग व त्याचे योग्य नियंत्रण\nकपाशीचे पीक हे सध्या बोंडे धारणेच्या तसेच विकासाच्या अवस्थेत आहे, परंतु मागील काही दिवसांपासून सतत पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे.यामुळे...\nव्हिडिओ | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकिमान आधारभूत किंमत कायम राहिल- कृषी मंत्री तोमर\nनवी दिल्ली: केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर विविध माध्यमांद्वारे या शंका दूर करीत आहेत. श्री तोमर हे बिल काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करीत आहेत. अध्यादेशात...\nकृषी वार्ता | कृषक जगत\nकापूसपीक पोषणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकपाशी पिकामध्ये लाल्या विकृतीचे नियंत्रण\nकापूस पीक वाढीच्या सुरूवातीच्या टप्प्यात लाल्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. ही समस्या येऊ नये, यासाठी मॅग्नेशियम सल्फेट @ 10-15 किलो / एकर जमिनीतून द्यावे.\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकापूसपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकपाशीतील बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाय योजना.\nशेतकरी बंधुनो, बोंड सडणे रोग ही समस्या प्रामुख्याने संधिसाधू व कमी प्राणवायू अवस्थेत तग धरणारे रोगकारक जिवाणू आणि काही प्रमाणात अंतर्वनस्पतीय रोगकारक बुरशी यांच्या...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अ‍ॅग्रोवन\nयोजना व अनुदानकापूसडाळिंबभुईमूगप्रगतिशील शेतीमोहरीगहूकृषी ज्ञान\neNAM च्या माध्यमातून मिळावा आपल्या पिकाला सर्वोत्तम बाजारभाव\neNAM च्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पिकाला मिळतो पारदर्शक व्यवहारातून सर्वोत्तम बाजारभाव तसेच याचे पाच फायदे या व्हिडिओ च्या माध्यमातून शेवटपर्यंत पहा\nयोजना व अनुदान | पीआयबी इंडिया\nकापूसपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकापूस पिकातील कोरायनेस्पोरा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव\nशेतकरी बंधूंनो, कपाशीचे पीक हे सध्या ६० ते ७५ दिवसांचे आहे. मागील काही दिवसांपासून सतत पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे कपाशीवर कोरायनेस्पोरा पानावरील ठिपके या नवीन बुरशीजन्य...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अ‍ॅग्रोवन\nकापूसपीक संरक्षणसल्लागार लेखकृषी ज्ञान\nकपाशीतील झाडांची आकस्मिक मर होण्याच्या समस्येचे व्यवस्थापन\nसतत पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण, पाण्याचा निचरा योग्यप्रकारे न होणारी जमीन अशा कारणांमुळे जमिनीत पाणी फार काळ साचून राहते. अशा ठिकाणी काही प्रमाणात झाडे पिवळी व मलूल...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकापूसपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nकापूस पिकातील तुडतुडे किडीचे नियंत्रण\nशेतकऱ्याचे नाव - श्री. रमेश गंभावा राज्य - गुजरात उपाय - फ्लोनिकामिड ५०% डब्ल्यूपी @८ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n काय आहे सापळा पिकाचे महत्व\nएकात्मिक कीड नियंत्रणाचा मार्ग आजच्या काळात महत्त्वाचा झालेला आहे . एकात्मिक कीडनियंत्रणातील महत्त्वाचा घटक म्हणून सापळा पिकाचे महत्व आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. सापळा...\nसल्लागार लेख | कृषी जागरण\nकापूस पिकातील बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी नक्की पहा\nकापूस उत्पादक शेतकरी मित्रांनो, कापसाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी पिकाला निरोगी ठेवणे गरजेचे आहे. सध्या पीक पाते, फुले व बोंडधारणा अवस्थेत आहे. यावस्थेत बोंड अळीच्या...\nव्हिडिओ | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकापूसपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nनिरोगी व आकर्षक कापूस पीक\nशेतकऱ्याचे नाव - श्री. अतुल चिकटे राज्य - मध्यप्रदेश टीप - १३:००:४५ @७५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकापूस, मूग,उडद पिकांसाठी कृषी सल्ला\nपीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात मित्र कीटकांची संख्या भरपूर प्रमाणात असते. परिणामी हानिकारक किडींची संख्या नियंत्रणात राहते. या काळात रासायनिक कीडनाशकांची फवारणी केल्यास...\nसल्लागार लेख | अ‍ॅग्रोवन\nकापूसपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nनिरोगी व आकर्षक कापूस पीक\nशेतकऱ्याचे नाव - श्री. परमार अशोक राज्य - गुजरात उपाय - १३:००:४५ @७५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकापूसपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लावीडियोकृषी ज्ञान\nकापूस पिकातील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन\nकापूस उत्पादन शेतकऱ्यांना कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाची चिंता दिसून येते. खरे तर, कापूस पिकात या अळीसाठी योग्य तो प्रतिबंधात्मक उपाय केला तरच या किडीचा...\nव्हिडिओ | कृषिक जगत\nकापूसपीक पोषणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकापूस पिकात बोंडांची सेटिंग होण्यासाठी उपाययोजना\nसध्या ढगाळ आणि दमट वातावरणामुळे फुलगळ मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे बोन्डाची सेटिंग होत नाही. फुलगळ न होता झाडाला जास्तीत जास्त बोन्ड लागण्यासाठी पिकात चिलेटेड स्वरूपातील...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकापूसपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकापूस पिकातील थ्रिप्स आणि तुडतुडे नियंत्रणासाठी उपाययोजना\nसध्याच्या बदलत्या वातावरणामुळे कापूस पिकात थ्रिप्स आणि तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यावर उपायोजना म्हणून जमिनीत वापसा असताना फिप्रोनील ५ % घटक...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकापूसपीक संरक्षणपीक पोषणवीडियोकृषी ज्ञान\nकापूस पिकातील पाते, फुले व बोंडेगळ समस्येवर उपाययोजना\nकापूस उत्पादक शेतकरी बांधवांना सध्या पिकामध्ये पाते, फुले व बोंडगळ समस्या दिसून येते आहे. हि समस्या उद्भवण्याची विविध कारणे असतात जसे कि, अन्नद्रव्ये कमतरता, कीड व...\nव्हिडिओ | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकमलेश घुमरेची आयडिया, देशी जुगाड करत बनवलं शेतीसाठी बहुपयोगी यंत्र\nशेतकरी मित्रांनो, ही यशोगाथा आहे नाशिकमधील कमलेश घुमरे या प्रयोगशील तरुणाची..शेतीचा कोणताही अनुभव नसलेल्या या तरुणानं नांगरणी, पेरणी, फवारणी अशी वेगवेगळी काम करणारं...\nव्हिडिओ | एबीपी माझा\nकापूसपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nकापूस पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता\nशेतकऱ्याचे नाव:- श्री. विष्णु शिवाजी आढाव राज्य:- महाराष्ट्र टीप:- १९:१९:१९ @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nपावसामुळे पिकाचे होणारे नुकसान आणि त्यासाठीच्या उपाययोजना\nयंदाच्या खरीप हंगामात चांगला पाऊस झाला आणि वेळेवर झाला. त्यामुळे पिकांची पेरणी अगदी वेळेवर झाली व पिकेही जोमाने वाढली आहेत. शेतकरी आंतरमशागतीची कामे करत आहेत, मागील...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/sushant-case-ujjawal-nikam-explians-sushant-singh-rajput-suicide-cbi-investigation-update-senior-lawyer-ujjawal-nikam-speaks-to-dainik-bhaskar-over-sushant-death-case-127594082.html", "date_download": "2020-09-26T02:18:38Z", "digest": "sha1:4DPUM3HQF7KWG67WTDUACS6YYQIUWBZ7", "length": 19066, "nlines": 82, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sushant case, Ujjawal Nikam explains | Sushant Singh Rajput Suicide CBI Investigation Update | Senior Lawyer Ujjawal Nikam Speaks Over Sushant Death Case | सुशांत प्रकरणातील सीबीआय चौकशीचा आदेश कायदेशीर आहे का ? महाराष्ट्र सरकार याविरोधात गेल्यास, लोकांच्या मनात सरकारबद्दल संशय निर्माण होऊ शकतो - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी एक्सप्लेनर:सुशांत प्रकरणातील सीबीआय चौकशीचा आदेश कायदेशीर आहे का महाराष्ट्र सरकार याविरोधात गेल्यास, लोकांच्या मनात सरकारबद्दल संशय निर्माण होऊ शकतो\nमहाराष्ट्र सरकारने सीबीआय चौकशीला आव्हान दिल्यास, ते कोणाला तरी वाचवत असल्याचे वाटेल\nरिया चक्रवर्तीदेखील सीबीआय चौकशीला आव्हान देऊ शकत नाही, कारण तिने स्वतः याची मागणी केली होती\nदिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे आत्महत्या प्रकरण शांत होण्याचे नाव घेत नाहीये. केंद्र सरकारने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावनीदरम्यान सुप्रीम कोर्टात म्हटले की, बिहार सरकारच्या विनंतीनंतर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. याबाबत नोटिफीकेशनही जारी करण्यात आले आहे.\nदरम्यान, या सीबीआय तपासावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देणे, कायदेशीररित्या बरोबर आहे का सीबीआय राज्य सरकारच्या परवानगीशिवाय मुंबईत तपास करू शकते का सीबीआय राज्य सरकारच्या परवानगीशिवाय मुंबईत तपास करू शकते का आता महाराष्ट्र सरकारने काय करावे आता महाराष्ट्र सरकारने काय करावे या सर्व प्रश्नांची उत्तरे जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिले आहेत. जाणून घ्या उज्वल निकम काय म्हणाले \nसुरुवातीला प्रस्थापित कलाकारांवर बोट दाखवण्यात आले\nसुशांतने 13 जून 2020 ला आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येनंतर अनेक बाबी समोर आल्या. बालिवूडमध्ये काम करणाऱ्या काही मोठ्या प्रस्थापित कलाकारांनी अशी परिस्थिती निर्माण केली, ज्यामुळे सुशांतला आत्महत्या करावी लागली. अशा गोष्टी सर्वच स्थरातून बोलल्या जात होत्या.\nपाटण्यात एफआयआर दाखल झाल्यानंतर तपासाला गती मिळाली\nमहाराष्ट्र पोलिसांनी सीआरपीसी सेक्शन 174 अंतर्गत प्रकरणाचा तपास सुरू केला होता. यादरम्यान, काही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. बॉलिवूडमध्ये खान मंडळीचे वर्चस्व आहे, सुशांतच्या मृत्यू मागे खान मंडळीचा हात असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पसरू लागल्या.\nसुशांतच्या मृत्यूच्या 45 दिवसानंतर सुशांतचे वडील कृष्णकुमार सिंह यांनी बिहारची राजधानी पटणामध्ये तक्रार दाखल केली. सुशांतसोबत त्याच्या घरात राहणारी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर संशय व्यक्त केला आणि गंभीर आरोप लावले. एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिस मुंबईत दाखल झाले.\nमहाराष्ट्र पोलिसांच्या भूमिकेवर संशय\nमुंबई पोलिसांच्या वृत्तीवरुन असे वाटत होते, की जणू बिहार पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार नाही. त्यांचे म्हणनेही असेच होते. तर, बिहार पोलिसांनी तपासात मदत करत नसल्याचा आरोप मुंबई पोलिसांवर लावला. यामुळे बिहार पोलिस महासंचालकांनी आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबईला पाठवले. मुंबईत आल्यावर बीएमसीने कोरोना नियमांचे कार सांगून, त्यांना क्वारेंटाइन केले.\nयाला आधार बनवत काही इंग्रजी आणि हिंदी वृत्त वाहिन्यांनी प्रकरणात काहीतरी संशयास्पद आहे, मुंबई पोलिस काहीतरी लपवत आहे, असा भ्रम जनतेच्या मनात बसवला. यावरुन सुशांतने आत्महत्या केली नसून, त्यांना ही करण्यास भाग पाडल्याची चर्चा देशभरात रंगू लागली. काही सोशल मीडिया यूजर्सनी ही आत्महत्या नसून, खून असल्याचे म्हटले.\nदिशा सालियानचे प्रकरणही या प्रकरणाशी जोडले गेले\nयादरम्यान, सुशांत सिंहची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या आत्महत्या प्रकरणाला सुशांतच्या आत्महत्येशी जोडण्यात आले. एका इंग्रजी वाहिनीने काही लोकांना आपल्या चॅनेलवर बोलावून उत्तर मागितले. प्रत्यक्षात जे काम पोलिसांनी करायला हवे, ते काम चॅनेलने केले. सुशांतच्या मित्रांनी कॅमेऱ्यासमोर आपल्या बाजु मांडल्या. सुशांतने म्हटले होते की, दिशाच्या आत्महत्येनंतर ही लोक मला जिवंत सोडणार नाही, असेही त्याच्या मित्राने म्हटले.\nबिहार पोलिस महासंचालकांनी घेतली प्रकरणात उडी\nया सर्व घडामोडीनंतर बिहार पोलिस महासंचालकांनी या प्रकरणात उडी घेतली. त्यांनी हिंदी आणि इंग्रजी चॅनेल्सला मुलाखत देण्याचे सत्र सुरू केले. संशयित आरोपी रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात म्हटले की, सुशांत प्रकरणात तपास करण्याचा अधिकार बिहार पोलिसांना नाही. यानंतर बिहार पोलिस संचालकांनी मुंबई पोलिसांवर टीका केली. मुंबई पोलिस रियाच्या भाषेत बोलत असल्याचा भ्रम त्यांनी उत्पन्न केला. तसेच, मुंबई पोलिस काहीतरी लपवत असल्याचा आरोप त्यांनी लावला. याचा फायदा काही राजकारण्यांनी घेतला.\nकेंद्राने बिहार सरकारची विनंती मान्य केली\nतपासाबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू असताना बिहार सरकारने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची केंद्राला विनंती केली. केंद्राने सुप्रीम कोर्टात शपथ-पत्र देऊन तपास सीबीआयकडे देत असल्याचे सांगितले. केंद्राने तात्काळ नोटिफिकेशन जारी केले.\nदोन्ही राज्यातील शत्रुत्व देशासाठी चांगले नाही\nकायद्याचा विद्यार्थी असल्याने हे प्रकरण काही मुद्दे उपस्थित करतो. महत्त्वाचे म्हणजे बिहार आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये शत्रुत्व प्रस्थापित करण्यात काही लोक यशस्वी झाले. हे शत्रुत्व फक्त राज्यांसाठीच नाही, तर देशासाठीही चांगले नाही. आमचे पोलिस चांगले का तुमचे चांगले, अशी परिस्थिती येणे योग्य नाही. पण, आरोपी कोणीही असो, कुठेही लपलेला असो, आमही त्याला शोधून काढण्यात कोणतीही कसर ठेवणात नाहीत, असे वक्तव्य करणयात बिहार पोलिस महासंचालक मागे हटले नाही.\nक्षेत्राधिकाराबाबत कायदा काय म्हणतो\nकायद्यात असे सांगितले आहे की, ज्या ठिकाणी गुन्हा झाला आहे, त्या ठिकाणच्या न्यायालयालाच खटला चालवण्याचा अधिकार आहे. सुशांतने आत्महत्या मुंबईत केली, यामुळे या प्रकरणाचा खटला चालवण्याचा अधिकार मुंबई पोलिसांनाच आहे. परंतू, या घटनेची पार्श्वभूमी पाटण्यात असल्याचे केके सिंह यांच्या वकिलाचे म्हणने आहे. परंतू, सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचे सांगत, बिहार पोलिसांत तक्रार दिली.\nमहाराष्ट्र पोलिसांनी परिस्थिती स्पष्टपणे न सांगितल्यामुळे प्रकरण चिघळले\nमहाराष्ट्र पोलिसांनी कधीच आपली बाजु स्पष्टपणे मांडली नाही. यामुळे मुंबई पोलिसांवर लोकांचा संशय बळावला आणि बिहार पोलिसांवरील विश्वास वाढला. यानंतर मुंबई पोलिसांची इमेज खराब होईल, असे वक्तव्य येऊ लागले. त्यामुळेच हा वाद लवकर मिटायला हवा होता. पण, बिहार पोलिस महासंचालक वाहिन्यांवर मुलाखती देताना बिहार सरकारचा पाठिंबा त्यांना मिळत होता. यानंतर बिहार सरकार राजकारण करत असल्याचा आरोप महाराष्ट्र पोलिसांनी केला.\nतपासात उशीर झाल्यास पुरावे नष्ट होण्याचा धोका\nसुशांत आणि दिशा, आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली नाही. यामुळे विचित्र तक्र-वितर्क समोर येत आहेत. सुशांत आणि दिशाने स्वतः आत्महत्या केली, का त्यांना यासाठी कोणी प्रवृत्त केले, हे तपासातूनच स्पष्ट होऊ शकतं. न्यायशास्त्रात म्हटले आहे की, तपासात उशीर झाल्यास पुरावे नष्ट होण्याची भीती असते. सुशांतच्या आत्महत्येनंतर तो डिप्रेशनमध्ये होता, असे सर्वत्र सांगण्यात आले. पण, तो डिप्रेशनमध्ये का होता, याचा तपास घेण्यात आला नाही.\nरिया चक्रवर्तीने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, सुशांत प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांना करण्याचा अधिकार नाही. आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे, अशात रियाच्या याचिकेचा कोणताच अर्थ नाही. याचिकेत रियाने सीबीआयकडे प्रकरण गेल्यावरुन कोणतेच प्रश्न उपस्थित केले नाहीत. याउलट तिने देशाच्या गृहमंत्र्यांना प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. वास्तविक, संबंधित राज्याला विचारल्याशिवाय सीबीआय प्रकरणाचा तपास करू शकत नाही. त्यामुळे बिहार पोलिसांच्या मागणीवर सीबीआय चौकशी करणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न आहे. अशात महाराष्ट्र सरकारने कोर्टात याचिका दाखल केल्यास, सरकारवरील संशय वाढला जाऊ शकतो.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/tag/shantikaka-saraf-and-sons-satara-bharti-2019/", "date_download": "2020-09-26T01:49:01Z", "digest": "sha1:3UVT6MP2S3EJMT6BAP3MNPKFRTPMXERS", "length": 3582, "nlines": 70, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nशांतीकाका सराफ अँड सन्स फलटण सातारा भरती २०१९\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nUT प्रशासन दमण आणि दीव येथे विविध पदांची भरती\nमुंबई उपनगर जिल्हा येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची भरती\nICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाची भरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, दिव अंतर्गत विविध पदांची भरती\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांच्या 171 जागांसाठी ऑनलाईन अर्ज…\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती\nRITES लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदांची भरती\nजेईई अॅडव्हान्स्ड: ९८ टक्के विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा केंद्र\nनॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरु\nनाशिक महानगरपालिका भरती पात्र आणि अपात्र यादी\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/at-the-tribunal/articleshow/71158174.cms", "date_download": "2020-09-26T02:23:00Z", "digest": "sha1:RECU5AT2TJSZI2YCJ5YCDVSRZJMNK4UN", "length": 11144, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nम. टा. प्रतिनिधी, पिंपरी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी आणि पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या लोकन्यायालयाला चांगला प्रतिसाद मिळाला. या लोकन्यायालयात ५३ खटले निकाली काढण्यात यश आले असून, पालिका न्यायालयात दंड तसेच विविध करांच्या स्वरूपात लाखो रुपयांचा महसूल जमा झाला आहे. पिंपरी येथील न्यायालयात तसेच आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड पालिकेत या लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खटले निकाली काढले तर, आकुर्डी मनपा न्यायालयात दंड व विविध करांच्या स्वरूपात लाखो रुपयांची वसुली झाली. या कार्यक्रमात मुख्य न्यायाधीश ए. यु. सुपेकर आणि सहन्यायाधीश एन. टी. भोसले, सहन्यायाधीश डी. आर. पठाण, आर. आर. काळे तसेच सहन्यायाधीश आर. एन. मुजावर यांची उपस्थिती होती. आकुर्डी न्यायालयामध्ये एस. बी. देसाई यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सतीश गोरडे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून राजेश पुणेकर, साधना बोरकर होते. पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कडुसकर यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव गोरख कुंभार यांनी केले. रामचंद्र बोराटे यांनी आभार मानले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCovid Care Center: करोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने...\nपुण्याच्या जंबो कोव्हिड सेंटरमधून तरुणी बेपत्ता; रुग्णा...\nMai Dhore: भाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आ...\nवृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ महत्तवाचा लेख\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\n राज्यात रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा; करोनामृत्यूचे तांडव सुरूच\nकोल्हापूरसंभाजीराजेंनी वेळीच ओळखली चाल; 'असा' उधळला डाव\nपुणेडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ही' मागणी\nदेशUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने 'असे' दिलेउत्तर\nसोलापूरपुढचे आंदोलन मातोश्री आणि सिल्व्हर ओकवर; पडळकरांचा इशारा\nपुणेकृषी विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार का; अजित पवार म्हणाले...\nसिनेन्यूजमाझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा\nदेश'चीन, पाकला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद भारतीय हवाई दलात'\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/weighlifting/", "date_download": "2020-09-26T02:03:53Z", "digest": "sha1:VUHVXUE7TJU7Z2HWVJIJ3G74YPC4QIHR", "length": 1515, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Weighlifting Archives | InMarathi", "raw_content": "\nचाळीशी गाठलेल्या, या दोन मुलांच्या आईने वेटलिफ्टिंगमध्ये, चक्क ४ सुवर्णपदक जिंकले आहेत\nमाणसाने ठरवले तर तो कुठल्याही वयात यश मिळवू शकतो. फक्त गरज असते ती स्वतःचा आतला आवाज ऐकून त्या ध्येयासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/5-people-died-daily-in-judicial-and-police-custody-914-deaths-have-been-reported-from-january-to-july-this-year-127620525.html", "date_download": "2020-09-26T02:47:16Z", "digest": "sha1:OHJZIVVTP2FJENKMNXNUR773OIRMUO2R", "length": 13744, "nlines": 77, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "5 People Died Daily In Judicial And Police Custody, 914 Deaths Have Been Reported From January To July This Year | मागील दहा वर्षांपासून न्यायालयीन आणि पोलिस कोठडीत दररोज 5 लोकांचा मृत्यू होत आहे, या वर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत 914 मृत्यू झाले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतुरुंगातील मृत्यूस जबाबदार कोण :मागील दहा वर्षांपासून न्यायालयीन आणि पोलिस कोठडीत दररोज 5 लोकांचा मृत्यू होत आहे, या वर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत 914 मृत्यू झाले\nकोरोना महामारीमुळे देशातील अनेक तुरुंगातील स्थिती बिटक झाली आहे\nराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची आकडेवारी चकीत करणारी आहे. आकडेवारीनुसार मागील एका दशकात 17 हजार 146 जणांचा न्यायालयीन आणि पोलिस कोठडित मृत्यू झाला आहे. या हिशोबाने दररोज सरासरी 5 जणांचा मृत्यू होत आहे. यातील 92 टक्के मृत्यू 60 ते 90 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीदरम्यान झाले आहेत. इतर मृत्यू 24 तासांच्या पोलिस कोठडीत झाले. हा वेळ अनेकवेळा मजिस्ट्रेटच्या आदेशावर 15 दिवस वाढवला जातो. यावर्षी जानेवारी ते जुलैदरम्यान 914 मृत्यू झाले.\nमानवाधिकार आयोगाने अनेकवेळा आपली चिंता व्यक्त केली आहे. परंतू, त्यांच्या सूचना, शिफारसी आणि नाराजी सारखीच आहे आणि कोठडीत होण्याचा मृत्यूचा आलेख सतत वाढत आहे.\nटॉर्चर, मारहाणशिवाय खराब आरोग्यामुळेही मृत्यू झाले\nआयोगाने सांगितल्यानुसार, न्यायालयीन कोठडीत होणारे सर्व मृत्यू फक्त टॉर्चर, मारहाण आणि तुरुंग अधिकाऱ्यांच्या त्रासामुळेच झाले असे नाही, तर यामागे कैद्यांचे आजार, उपचारास उशीर, खराब राहणीमान, मनोवैज्ञानिक समस्या किंवा वृद्धापकाळाने ही होऊ शकतात. दरम्यान, इंडिया स्पेंड वेबसाइटवर मानवाधिकार आयोगाच्या आकडेवारीनुसार प्रकाशीत एका विस्तृत विश्लेषणात सांगितल्यानुसार, 17 हजार 146 मृत्यू, पोलिस आणि जेल व्यवस्थेची माहिती देतात.\nतमिळनाडूमध्ये पिता-पुत्रांचा मृत्यू झाला\nमागच्या महिन्यात तमिळनाडूतील एका तुरुंगात पोलिसांच्या मारहाणीत दलित पिता-पुत्राचा मृत्यू झाला होता. देशभर हे प्रकरण गाजले होते. यात पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी वाढली होती. मद्रास हायकोर्टाने चौकशीचे आदेश दिले आणि राज्य सरकारने प्रकरण सीबीआयला दिले.\nकैद्यांचे मानवी हक्क चिरडले जात आहेत\nमानवाधिकार आयोगाच्या सूचनेनुसार अशा मृत्यूंची 24 तासांच्या आत माहिती द्यावी लागते, पण तसे होत नाही. या अहवालातील दुहेरी बाब म्हणजे अहवाल सादर करण्यात अपयशी ठरल्यास दंड करण्याची तरतूदही नाही. यासोबतच पोलिसांकडे स्वत: चा बचाव करण्यासाठी अनेक युक्तिवाद असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nकमिशनच्या निर्देशात असेही म्हटले आहे की कोठडीत झालेल्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी दोन महिन्यांत पूर्ण केली जावी आणि मृत्यूची परिस्थिती, कार्यपद्धती आणि मृत्यूचे कारण यांचे तपशीलवार वर्णन नोंदवले जावे.\nव्हीआयपी कैद्यांना अनेक सुविधा मिळतात\nकैद्यांनाही मानवी हक्क आहेत, तुरूंग प्रशासन आणि सरकार हे कसे विसरतात. व्हीआयपी कैद्यांना सर्व सोयीसुविधा मिळतात, परंतु सामान्य कैदी आहे तशाच परिस्थितीत आहेत. त्यांच्या अन्नावर, कपडे, अंथरुणावरुन, पिण्याचे, आंघोळीचे, धुण्याचे पाणी, स्वच्छता, उपचार इत्यादींसाठी पुरेसा खर्च न करण्याच्या तक्रारी वारंवार नोंदवल्या गेल्या आहेत.\nकोरोनानंतर तुरुंगाची परिस्थिती अजूनच खराब झाली\nकोठडीतील मृत्यूचे प्रकरण कारागृहातील चिंताजनक परिस्थितीशीही संबंधित आहे. कारागृहात कैद्यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी राहण्याची व आरोग्याची सुविधा कशी आहे हे पहावे लागेल. एक सत्य देखील आहे की कोव्हिडमुळे तुरुंगांची स्थिती खराब झाली आहे आणि यामुळे देशातील बर्‍याच तुरूंगांच्या दुर्दशाकडे नव्याने लक्ष द्यावे लागले. भीमा कोरेगाव प्रकरणात तुरूंगात असलेले 80 वर्षीय तेलुगू कवी वरवर राव यांना कोरोनाची लागण झाली होती.\nकैद्यांमध्ये दलित, मागासवर्गीय, मुस्लिम ज्यास्त\nअटकेची कारवाई, छळ, दुर्लक्ष आणि मृत्यूच्या भीषण आकडेवारीमध्ये दलित, मागासवर्गीय आणि मुस्लिमांची तुरूंगात संख्या सर्वाधिक आहे. जम्मू-काश्मीरसारख्या राज्यातसुद्धा बेपत्ता झालेल्या लोकांचे नातेवाईक अनेक दशकांपासून न्यायासाठी भटकत आहेत.\nयुएन करारावर भारताने स्वाक्षरी केली, परंतु याची पुष्टी केली नाही\nटॉर्चर और क्रूर, अमानवीय व्यवहार किंवा शिक्षेविरोधात संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीत झालेल्या करारावर भारताने ऑक्टोबर 1997 मध्ये सही केली खरी, पण विधि आयोगाच्या सिफारिशनंतरही याची पुष्टी केली नाही.\nया प्रकरणात बर्‍याचदा असा युक्तिवाद केला जातो की पोलिसांवर अनावश्यक दबाव असेल आणि गुन्हेगारांना बळ मिळेल, परंतु हा युक्तिवाद चांगल्या आणि पारदर्शक व्यवस्थेच्या दाव्यात खरा ठरत नाही.\nतज्ज्ञांच्या मते, वैज्ञानिक तपासणीची पद्धत उपलब्ध झाली असती आणि पोलिसांना या कामासाठी विशेष प्रशिक्षण दिले गेले असते तर पोलिस तपास आणि चौकशीची प्रक्रिया इतकी सदोष झाली नसती. प्रभावी फॉरेन्सिक तंत्राचा अभाव देखील एक समस्या आहे.\nपोलिस तंत्रात सुधाराची गरज\nभरतीपासून वेतनातील तफावत, पदोन्नती आणि इतर सुविधांपर्यंतच्या कथित मृत्यूच्या घटनांमध्येही पोलिसांची अंतर्गत व्यवस्था सुधारण्याची गरज आहे.\nपोलिस दलाच्या कमतरतेमुळे पोलिसांच्या कामकाजावरही परिणाम होतो, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी गरीब, दुर्बल आणि निराधार कैद्यांवर आपला राग काढावा.\nतुरूंगातील सुधारणांबाबतचे नियम व कायदे तयार करण्याव्यतिरिक्त, उच्च अधिकारी आणि त्यांच्या अधीनस्थांमध्ये मानवी हक्कांबद्दल संवेदनशीलता आणि जागरूकता असणे देखील महत्वाचे आहे. मानवाधिकार आयोगांनाही अधिक सशक्त व प्रभावी केले पाहिजे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/the-cure-rate-is-82/articleshow/77335878.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-26T01:18:43Z", "digest": "sha1:KSJP7OCEW44OC4FKPF26CVVWPAIOR7X2", "length": 11837, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के\nऔरंगाबाद शहरातील करोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. जुलै महिन्यातील आकडेवारीनुसार रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के इतके झाले असून मृत्युदर देखील कमी झाला असून तो २.२ टक्के खाली आला आहे, असा दावा महापालिकेने केला आहे.\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nऔरंगाबाद शहरातील करोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. जुलै महिन्यातील आकडेवारीनुसार रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के इतके झाले असून मृत्युदर देखील कमी झाला असून तो २.२ टक्के खाली आला आहे, असा दावा महापालिकेने केला आहे.\nपालकमंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वारंवार बैठका घेऊन, उपचाराची पद्धती समजवून सांगितल्यामुळे करोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे, असे महापालिकेने म्हटले आहे. जुलै महिन्यात दहा दिवसांसाठी लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. या काळात चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली. त्यामुळे रुग्ण शोधणे शक्य झाले. आतापर्यंत एक लाख १५ हजार जणांच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी ३४ हजार 'आरटीपीसीआर' चाचण्यांचा समावेश आहे. या चाचण्यांमध्ये रुग्णवाढीचा दर तीस दिवसांवर गेल्याचे लक्षात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के इतके झाले आहे. रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर ६३ टक्के आहे. मृत्युदर २.२ टक्क्यांनी कमी झाला आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून करोनाला रोखण्यासाठी सहकार्य केले आहे, त्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. त्याशिवाय जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून करोनावर नियंत्रण मिळवता आले, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअजिंठा-वेरुळ लेणी पर्यटकांसाठी खुली होणार\nमालेगावच्या मन्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nनारंगी धरणाचे दरवाजे उघडले...\nमराठा आरक्षणासाठी पायी दिंडी...\n‘कोविड सेंटर’मध्ये घुमले अभंगाचे सूर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपालकमंत्री सुभाष देसाई करोना विषाणू औरंगाबाद महापालिका आरोग्य मंत्री राजेश टोपे cure rate increased Aurangabad Municipal Corporation\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nदेशUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने बहिष्कार घालत दिले चोख उत्तर\nविदेश वृत्तचीनला वेसण घालणार जपानच्या पंतप्रधानांची भारताला साद\nमुंबईअनलॉकसाठी आहे 'ही' त्रिसुत्री; CM ठाकरेंनी सांगितले पुढचे धोके\nअर्थवृत्तसोने दरात घसरण सुरूच; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त\nकोल्हापूरसंभाजीराजेंनी वेळीच ओळखली चाल; 'असा' उधळला डाव\nदेशजिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर उपजिल्हाधिकाऱ्यांचे पत्नीसोबत धरणे आंदोलन\nआयपीएलChennai vs Delhi: पृथ्वी सावने केली गोलंदाजाची धुलाई, चेन्नईपुढे मोठे आव्हान\nदेश'चीन, पाकला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद भारतीय हवाई दलात'\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5.-%E0%A5%B2%E0%A4%A1.%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%B5/ZRrOvo.html", "date_download": "2020-09-26T01:14:42Z", "digest": "sha1:XJYIF3WQWTZ7GGTSVPZZGQ65QXNB4PR6", "length": 5622, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "खासदार श्रीनिवास पाटील यांचा स्व. ॲड.रावसाहेब शिंदे पुरस्काराने गौरव - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nखासदार श्रीनिवास पाटील यांचा स्व. ॲड.रावसाहेब शिंदे पुरस्काराने गौरव\nखासदार श्रीनिवास पाटील यांचा स्व. ॲड.रावसाहेब शिंदे पुरस्काराने गौरव\nपुणे - - खासदार श्रीनिवास पाटील यांना महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा (पुणे) यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल स्व. ॲड.रावसाहेब शिंदे पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी पेठ पुणे येथील एस.एम.जोशी सभागृहात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, महात्मा फुले पगडी, उपरणे आणि पुष्पगुच्छ देऊन पाटील यांचा सन्मान करण्यात आला.\nत्यावेळी नामदार बाळासाहेब थोरात यांनी खा.पाटील हे संगमनेर मध्ये प्रांताधिकारी होते तेंव्हा पासून आम्हाला परिचयाचे आहेत त्याना आज सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देताना मला विशेष आनंद होत असल्याचे उद्गार काढले. पुरस्काराला उत्तर देताना पाटील म्हणाले मी आजपर्यंत केलेल्या समाजसेवेची ही पावती आहे. आपण समाजाचे देणे लागतो जेव्हा आपण समाजासाठी काही करतो तेव्हा समाज आपल्यासाठी भरभरून प्रतिसाद देतो. स्व. ॲड रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा मी स्वीकार करतो.\nत्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्टॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष श्री.संदीप वासलेकर, श्रीमती शशिकला रावसाहेब शिंदे, श्री.भगिरथ शिंदे, डॉ.राजीव शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री.मधुकर भावे, यांच्यासह अन्य पुरस्कारविजेते पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे प्रशांत यशवंतराव गडाख, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेचे कार्याध्यक्ष श्री.सचिन इटकर, अध्यक्ष उद्धव कानडे आणि उपाध्यक्ष रविंद्र डोमाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-09-26T01:41:04Z", "digest": "sha1:E4PQIVFDHKGU72KGBU6NAP6G6C73LGZE", "length": 11710, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "साडेतीन वर्षाच्या आजारी मुलासाठी थेट राजस्थानवरुन मुंबईत पाठवले सांडणीचे दूध | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nसाडेतीन वर्षाच्या आजारी मुलासाठी थेट राजस्थानवरुन मुंबईत पाठवले सांडणीचे दूध\nin ठळक बातम्या, राष्ट्रीय\nमुंबई – माझा साडेतीन वर्षाचा मुलगा स्वमग्न (ऑटेस्टीक) या दुर्धर आजाराने ग्रासलेला आहे. त्यामुळे त्याला बकरी, गाय आणि म्हशीचे दूध चालत नाही. त्याला अनेक अन्नपदार्थांची अलर्जी आहे. आम्ही त्याला सांडणीचे दूध आणि मोजकं खायला देतो. जेव्हा लॉकडाउन सुरु झाले तेव्हा आमच्याकडे सांडणीच्या दुधाचा पुरेसा साठा नव्हता. राजस्थानमधील साद्री येथून मला हे सांडणीचे दूध किंवा त्याची पावडर मिळवून देण्यासाठी मदत करा, असे ट्विट मुंबईमधील या महिलेने केले होते. त्यात पंतपप्रधान नरेेंद्र मोदी यांनादेखील टॅग करण्यात आले होते. याची तात्काळ दखल घेत, भारतीय रेल्वे प्रशासनाने थेट राजस्तानमधून सांडणीचे २० लिटर दूध मुंबईत पोहचवले आहे.\nमुंबईतील रेणू कुमारी या महिलेचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या ट्विटवर आपले आपले मत मांडले आणि सल्ले दिले. आयपीएस अधिकारी असणार्‍या बोथरा यांनाही हे ट्विट पाहिल्यावर अ‍ॅडव्हिक फूड्स या कंपनीशी संपर्क साधला. सांडणीचे दूध बनवणारी ही देशातील पहिली कंपनी आहे. या कंपनीने सांडणीच्या दुधाची पावडर देण्यास होकार दिला. मात्र ती मुंबईला कशी पोहचवणार हा मोठा प्रश्न होता. यासंर्भातील चक्र कशी हलली याबद्दल खुद्द जैन यांनीच पीटीआयला माहिती दिली. बोथरा यांचे ट्विट पाहिल्यावर आम्हाला या प्रकरणाबद्दल माहिती मिळाली. मी अजमेर येथील रेल्वेचे अधिकारी महेश चंदा जेवालीया यांच्याशी याबद्दल चर्चा केली. त्यानंतर आम्ही लुधियानाहून वांद्र्याला जाणार्‍या ट्रेन क्रमांक ०००९०२ च्या माध्यमातून हे काम करण्याचे ठरवले. यासाठी आम्ही ही ट्रेन राजस्थानमधील फालना रेल्वे स्थानकात थांबवण्याचे ठरवले. हा या ट्रेनचा अधिकृत थांबा नाही तरी आम्ही हा निर्णय फक्त हे पाकीट कलेक्ट करण्यासाठी घेतला. फालना येथून हे पाकिट ट्रेनमधील व्यक्तीकडे देण्यात आले त्यानंतर ते मुंबईतील महिलेपर्यंत पोहचवण्यात आलं, असं जैन यांनी सांगितलं. रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दुधाची पावडर पुरवणार्‍या कंपनीला नियोजनाची माहिती दिली आणि पावडरचे पाकीट फालना स्थानकामध्ये रेल्वेच्या व्यक्तीकडे देण्यासंदर्भात कळवले. संबंधित प्रकरणाची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्याकडून ट्रेन थांबवण्याची परवानगी घेण्यात आली. नियोजित पद्धतीने हे दूध मुंबईतील गरजू महिलेपर्यंत पोहचवण्यात आले. याबद्दल बोथरा यांनी उत्तर-पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक (सीपीटीएम) असणार्‍या तरुण जैन यांचे आभार मानले आहेत.\nसीमेवर कुरापती काढणार्‍या १५ पाकिस्तानी जवानांसह ८ दहशतवाद्यांचा खात्मा\nमहाराष्ट्राच्या चिंतेत भर: कोरोना बधितांचा आकडा दोन हजारापार\nभारतात कोरोना चाचणीचा नवा विक्रम; एका दिवसात विक्रमी चाचणी\nBIG BREAKING: बिहार निवडणुकीची घोषणा: तीन टप्प्यात होणार मतदान\nमहाराष्ट्राच्या चिंतेत भर: कोरोना बधितांचा आकडा दोन हजारापार\nपुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातील एका नर्सल कोरोना: 30 नर्स क्वारंटाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/bjp-corporater-fine-jailed-for-bribe/", "date_download": "2020-09-26T01:52:53Z", "digest": "sha1:2UADNQM5RACYDFN246BWLDHNBBEOVQ6E", "length": 17653, "nlines": 161, "source_domain": "www.saamana.com", "title": "वा रे.. पार्टी विथ डिफरन्स, भाजपच्या लाचखोर नगरसेविकेला पाच वर्षे कारावास; पाच लाखांचा दंड | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनायरमधील कोरोनामुक्त झालेल्या तीन डॉक्टरांना पुन्हा कोरोनाची लक्षणे\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nवा रे.. पार्टी विथ डिफरन्स, भाजपच्या लाचखोर नगरसेविकेला पाच वर्षे कारावास; पाच लाखांचा दंड\nभाजपच्या ‘पार्टी किथ डिफरन्स’ आणि पारदर्शक कारभाराचा ढोल साफ फुटला आहे. मीरा-भाईंदर येथील लाचखोर भाजप नगरसेविका वर्षा भानुशाली हिला ठाण्याच्या सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिने अधिक कारावासाची शिक्षाही भानुशाली हिला भोगावी लागणार आहे.\nभाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपूतील ओळखली जाणारी वर्षा भानुशाली ही राई-मुर्धा-मोरवा भागातील भाजपची नगरसेविका आहे. 2012 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत ती निवडून आली होती. भाईंदर पूर्व येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या गाळ्याची उंची वाढवली म्हणून तिने गाळे मालकाकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत ही रक्कम 1 लाख 60 हजार रुपये इतकी ठरली. 6 जून 2014 रोजी गाळे मालकाकडून 50 हजारांचा पहिला हप्ता घेताना तिला भाईंदर पश्चिम येथील जानकी हेरिटेज या इमारतीतील घरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपने तिला पुन्हा तिकीट दिले व ती निवडून आली होती. भानुशाली हिच्या लाचखोरीचा खटला ठाणे सत्र न्यायालयात सुरू होता.\nअशाच स्करूपाच्या एका लाच प्रकरणात भाजपचे माजी आमदार तथा तत्कालीन नगरसेकक नरेंद्र मेहता यांना 22 डिसेंबर 2002 रोजी रंगेहाथ पकडण्यात आले होते. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आजही खटला उभा आहे. त्यामुळे नगरसेविका वर्षा भानुशालीचा तर निकाल लागला, आता नरेंद्र मेहता यांचा निकाल कधी लागणार, अशी चर्चा येथे सुरू आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनायरमधील कोरोनामुक्त झालेल्या तीन डॉक्टरांना पुन्हा कोरोनाची लक्षणे\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण पूर्ण\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण...\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nया बातम्या अवश्य वाचा\nनायरमधील कोरोनामुक्त झालेल्या तीन डॉक्टरांना पुन्हा कोरोनाची लक्षणे\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/93094793694092e-90992694d92f94b917-92f94793593293e-92a948920923940", "date_download": "2020-09-26T02:51:00Z", "digest": "sha1:5W76G3JBPLGTOYSCI6MFA5LB4APIZF72", "length": 13832, "nlines": 88, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "रेशीम उद्योग - येवला पैठणी — Vikaspedia", "raw_content": "\nरेशीम उद्योग - येवला पैठणी\nरेशीम उद्योग - येवला पैठणी\nयेवला पैठणी ''पैठणी'' हा शब्द खास करुन अस्सल सोन्या-चांदीच्या जरीमध्ये व विशिष्ठ नक्षीदार विणलेल्या पदराच्या गर्भरेशमी साडीशी निगडीत आहे. पैठणी खास करुन औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे पूर्वी तयार होत असल्याने अशा या विशिष्ठ साडीस पैठणी हे नाव पडले आहे. पैठणीचे उत्पादन स्वातंत्रपूर्व कालापर्यंत राजाश्रयाने चालत आले. राजाश्रय संपल्यानंतर याचे खास कारागीरांना रोजगार नाहीसा झाल्याने तेथून ते विस्कळीत झाले व जुन्या विणकामामध्ये काम मिळेल तेथे समावेश होत गेले. बनारसी पध्दतीचा शालू, साडी व फेटे करु लागले. त्यातील काही कसबी कामगार किंवा कारागीर निजामशाहीच्या हद्दीबाहेरचे गाव येवला येथे येऊन स्थायिक झाले. महाराष्ट्रातील येवला व पैठण येथे तयार होणारी पैठणी जगात प्रसिध्द असून तिला परदेशातून मागणी आहे.\nपैठणी तयार करणे ही पैठण व येवला येथील पारंपारीक कला आहे. सन 1973 मध्ये हिमरु पैठणी मश्रूम प्रदर्शनात मांडली गेली व त्यास चांगली प्रसिध्दी मिळाली. त्यानंतर 75-76 मध्ये येवल्यातील कारागीरांनी पैठणी प्रदर्शनात ठेवली व त्यावेळेस येवल्यात असलेल्या कारागीरांना सुमारे 5 वर्ष पुरेल असे काम मिळाले व 74-75 पासून येवला पैठणी अस्तित्वात आली. 1977 मध्ये पहिले हातमाग प्रदर्शनामध्ये येवला पैठणीने प्रसिध्दी मिळविली. त्यावेळी अवघे 100 माग येवला येथे होते. आज येवला, नागडे, वडगांव, बल्लेगांव, सुकी 1ध्4गणेशपूर1ध्2 या गावामध्ये एकूण 850 कुटुंबे 2200 मागावर आपला व्यवसाय करीत आहेत. यातील काही कारागिरांनी राष्ट्रपती पुरस्कार, राज्य पुरस्कार व इतरही काही पुरस्कार मिळविले आहेत. येवला आणि उपरोक्त परिसरातील कारागीर हे क्षत्रिय खत्री, साळी, कोष्टी, मराठा, नागपूरी समाजातील आहेत. आर्थिक दश्ष्टया उपरोक्त कारागीरांची प्रामुख्याने वर्गीकरण करता येईल.\n1. कोणतेही भांडवल उपलब्ध नसलेले उधारीवर कच्चा माल आणून पैठणी तयार करुन देणारे\n2. कच्चा माल खरेदी करुन पैठणी तयार करुन देणारे\n3. कच्चा माल देऊन पैठणी तयार करवून घेणारे व्यापारी\nइ.डी.पी. अंतर्गत 25 कारागिरांचे सेंट्रल सिल्क बोर्ड यांचे सहकार्याने 1 महिन्याचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यापैकी 2 प्रशिक्षणार्थंींनी आपली प्रगती केली आहे. पैठणीमध्ये प्रामुख्याने सेमी पैठणी, सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर आणि रिच पदर असे पाच प्रकार दिसून येतात. याशिवाय पदराच्या व काठ यांच्या विशिष्ठ नक्षीकामानुसार मुनिया ब्रॉकेट व ब्रॉकेट असे वर्गीकरण करता येते. तसेच विणकाम पध्दतीनुसार एकधोटी व तीन धोटी असेही प्रकार दिसून येतात. सिंगल पदरमध्ये काठ नारळाच्या नक्षीचा काठ व पदरामध्ये तीन मोर जोडीचे नक्षीकाम केलेले असते, डबल पदरामध्ये नारळ काठ व सात मोर जोडीचे नक्षीकाम केलेले असते. यासाठी रेशीम धागा वापरला जातो.\nटिशू पदरामध्ये जर शक्यतो त्रिम वापरली जाते व पदरामध्ये बारा मोर अगर कोयरी तीन ओळीत नक्षीकाम केलेले असते. रिच पदरमध्ये ग्राहकाच्या पसंतीनुसार पदराच्या नक्षीकामाची निवड केली जाते. सिंगल पदर 18-21 इंचाचा तर डबल पदर 28-32 इंचाचा असतो. सिंगल पदर पैठणीस 4 ते 5 दिवस, डबल पदर पैठणीस 7 ते 8 दिवस, टिशू पदर 1 ते दीड महिना व रिच पदर पैठणीस 4-6 महिने विणकामास लागतात. पदराच्या नंतर एक मीटर पर्यंत बुटी 3 इंच अंतरावरती व त्यानंतरच्या 6 इंच अंतरावर असतात. यामुळे 3 इंच अंतरावर असलेल्या दाट बुटयांचा भाग हा पदरानंतर दर्शनी भागावर येतो तर विरळ बुटयांचा भाग हा नि-यांमध्ये जातो त्यामुळे पैठणी उठावदार दिसते.\nमुनिया ब्रॉकेट पैठणीचे वैशिष्ठय म्हणजे काठ लहान व पोपटाची चोच लांब असते यामध्ये सिंगल पदर, डबल पदर आणि रिच पदर येऊ शकतात. ब्रॉकेट पैठणीमध्ये राजहंस, मोर, पोपट, आसावली व कमळ यांचे नक्षीकाम पदरामध्ये ग्राहकांच्या पसंतीने केले जाते. एक धोटीमध्ये सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर, रिच पदर हे प्रकार येतात. तीन धोटीमध्येही सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर, रिच पदर हे प्रकार येतात. यास कडियल किंवा परती असेही म्हणतात. पैठणी साडीची किंमत साधारणपणे रु.2500 पासून 3 लाख रुपयापर्यंत असते. मध्यम व उच्चवर्गीय ग्राहक 5 ते 10 हजारापर्यंतची पैठणी पसंत करतात.\nस्त्रोत : रेशीम संचालनालय, महाराष्ट्र शासन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/225", "date_download": "2020-09-26T03:26:00Z", "digest": "sha1:EPR5XQZURC3JRFBMGUKEREX45KV66XOB", "length": 5575, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/225 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n२१८ भाषाशास्त्र. कूटरचना व ठकबाजीच समजतात. सबब, हे त्यांचे मत अगदीच अप्रशस्त असल्याकारणाने, वाचकास आगाऊ जागे करून त्यांस तसे निक्षन सांगणे आम्हांस केवळ भागच पडते. असो. आमच्या प्राचीन ग्रंथांस अर्वाचीनत्व आणत्यांस अर्वाचीनत्व ण्याचे कित्येक पाश्चात्यांचे काम आणण्याचा पाळ्यात्य इतके अन्यायाने, परंतु राजरोस आणि प्रयत्न. निर्भयपणे चालले आहे , तत्संबंधी त्यांस कोणत्याही प्रकारचा विधिनि ध न वाटतां, ते निःशंकपणे असे म्हणतात की, अमुक एक लेखाला अर्वाचीनत्व येण्यासारखे असेल तरच बरे होईल; अथवा, अमुक लेखाला अर्वाचीन काळांत ढकलतां आलें, तरच आमच्या मनाचे समाधान होईल आणि यासंबंधानेही विशेष आश्चर्य हे की, प्रोफेसर मॉक्समुलर सारखे पंडिताग्रणी म्हणविणारे देखील अशा प्रकारचे अविचाराचे लेख लिहन, ते सर्रास्त जगापुढे मांडतात. ह्या निरर्गल लेखांचे खरे स्वरूप कसे आहे ते समज ण्यासाठी, व त्यांचा शोचनीय परिपाश्चात्य पंडितांचे निरर्गल लेख. णाम आमच्या पुराणतम वाङ्मयावर होऊ नये एतदर्थ, तसेच आमच्या प्रियं| १ मॉक्समुलर म्हणतो,\n P. 356, 1883) ( भारतीय साम्राज्य पु. २ रे पान १०४ ते ११५ पहा.) :\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १३:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/congress-leadership-crisis-analysis-shriram-pawar-337451", "date_download": "2020-09-26T01:52:32Z", "digest": "sha1:LSREFFNQMTGWF2HMULK5DOXVFJ4QVLKY", "length": 48871, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "विश्लेषण : काँग्रेसमधील खदखद | eSakal", "raw_content": "\nविश्लेषण : काँग्रेसमधील खदखद\nराहूल गांधी यांनी त्यांच्या परीनं त्या निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न केला ते एकटेच थेटपेणे नरेंद्र मोदींना आव्हान देत होते. प्रश्नर विचारत होते हेही खंर आहे.\nकाँग्रेसमध्ये काही बिघडलं आहे हे त्या पक्षातील सर्वांनाही समजतं आहे. मात्र, काय बिघडलं आणि ते कशामुळं यात एकवाक्यता 2014च्या पराभवानंतर अजूनही तयार होताना दिसत नाही. याचचं निदर्शक म्हणजे 23 ज्येष्ट नेत्यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पाठवलेंल पत्र. ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून पक्षाला कायमस्वरूपी आणि सहज उपलब्ध असणार्या4 अध्यक्षाची गरज असल्याचं सोनियांना कळवलं. सोनियांच्या काळात पहिल्यांदाच पक्षात सामूहिक नेतृत्वाची कल्पना मांडली गेली. त्याआधी काँग्रेसच्या (Congress- Indian National Congress) हंगामी अध्यक्ष सेनिया गांधींनी बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीत समोर आलेला विसंवाद. त्यात काँग्रेसच्या दुरवस्थेचं खापर युपीए-2च्या (UPA-2) कारभारावर फोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते राहुल गांधी यांचे जवळचे मानले जातात. यातून पक्षातील दोन दशकातील सर्वांत मोठा अंतर्गत संघर्ष समोर आला आहे. तसंच पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेर नेतृत्वासाठी पहायची तयारी निदान काही महत्वाचे नेते दाखवत आहेत. याचा परिणाम केवळ पक्षावरच नव्हे तर, संपूर्ण राष्ट्रीय राजकारणावर होणार आहे.\nकाँग्रेसचं नेतृत्व गांधी घराण्याबाहरेच्या कोणी करावं का हा पक्ष सतत टाळत असलेला प्रश्नच आता स्पष्टपणे पक्षासमोर उभा आहे. यात इतरांना दोष देऊन, भाजपला दूषणं देऊन किंवा इतर पक्षात तरी कुठं लोकशाही मार्गानं निवडी होतात असले तर्क देऊन सुटका नाही. गांधी कुटूंबाला (Gandhi Family) न आवडणारं काही मांडताच येणार नाही प्रश्नतच विचारता येणार नाही, हा काळ मांग पडत असल्याचं हे निदर्शक आहे. म्हणूनच राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या पत्राचा आणि भाजपचा संबध जोडण्याचा कथित प्रयत्न केल्याचं माध्यमांनी सांगताच कपिल सिब्बल यांनी अत्यत धारदार भाषेत ट्विट करुन उत्तर दिलं तेव्हा, असं आपण बोललोच नव्हतो हे, थेट राहुल यांनी सिब्बल यांना सांगितलं. हायकमांडचे (Congress High command) ते ‘कमांडिंग’ दिवस संपल्याचचं यातून दिसतं. तूर्त हे सारं पक्षाला वेदनादायक वाटत असलं तरी, यातून योग्य बोध घेतल्यास पक्षाच्या फेरउभारणीची दिशा सापडू शकते. अर्थात जसं हायकमाडनं पहिले दिवस उरले नाहीत हे समजून घ्यायला हवं, तसंच ते कमकूवत झाल्यानं पत्र लिहिणार्यां नी ते प्रसिध्द होईल, अशी व्यवस्था करणार्या ज्येष्ठांनीही खरचं संघटना उभारणीची आपली कुवत किती हा पक्ष सतत टाळत असलेला प्रश्नच आता स्पष्टपणे पक्षासमोर उभा आहे. यात इतरांना दोष देऊन, भाजपला दूषणं देऊन किंवा इतर पक्षात तरी कुठं लोकशाही मार्गानं निवडी होतात असले तर्क देऊन सुटका नाही. गांधी कुटूंबाला (Gandhi Family) न आवडणारं काही मांडताच येणार नाही प्रश्नतच विचारता येणार नाही, हा काळ मांग पडत असल्याचं हे निदर्शक आहे. म्हणूनच राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या पत्राचा आणि भाजपचा संबध जोडण्याचा कथित प्रयत्न केल्याचं माध्यमांनी सांगताच कपिल सिब्बल यांनी अत्यत धारदार भाषेत ट्विट करुन उत्तर दिलं तेव्हा, असं आपण बोललोच नव्हतो हे, थेट राहुल यांनी सिब्बल यांना सांगितलं. हायकमांडचे (Congress High command) ते ‘कमांडिंग’ दिवस संपल्याचचं यातून दिसतं. तूर्त हे सारं पक्षाला वेदनादायक वाटत असलं तरी, यातून योग्य बोध घेतल्यास पक्षाच्या फेरउभारणीची दिशा सापडू शकते. अर्थात जसं हायकमाडनं पहिले दिवस उरले नाहीत हे समजून घ्यायला हवं, तसंच ते कमकूवत झाल्यानं पत्र लिहिणार्यां नी ते प्रसिध्द होईल, अशी व्यवस्था करणार्या ज्येष्ठांनीही खरचं संघटना उभारणीची आपली कुवत किती याचं आत्मपिरक्षणही करायला हवं. काँग्रेस गांधी घराण्याभोवती फिरायला लागली ती, इंदिरा गांधींच्या काळात तेंव्हापासून संजय गांधींनंतर राजीव गांधी आणि पुढं राहुल गांधी यांच्यासोबतची त्या त्या काळातील तरुण नेत्यांची पिढी इतरांना वळचणीला टाकायचा प्रयत्न करीत आली. राहुल यांच्या प्रभावळीतील नेत्यांना काँग्रेसच्या पतनाची जबाबदारी यूपीए-2च्या कारभारात, मनमोहन सिंग यांच्या कारभारात दिसत असेल आणि पाठोपाठ ज्येष्ठ नेत्यांनी सोनियांना पत्र पाठवून पक्ष कसा चालवावा यावर मल्लिनाथी केली असेल तर, त्यात केवळ जुन्या नव्यांचा संघर्ष नाही. या प्रकारच्या संघर्षातून पक्षाला उर्जीतावस्था येण्याचीही शक्यता नाही. नेतृत्व धोरण आणि संघटन, अशा सर्व स्तरांवर काही नवं उभं करण्याची तयारी आहे का याचं आत्मपिरक्षणही करायला हवं. काँग्रेस गांधी घराण्याभोवती फिरायला लागली ती, इंदिरा गांधींच्या काळात तेंव्हापासून संजय गांधींनंतर राजीव गांधी आणि पुढं राहुल गांधी यांच्यासोबतची त्या त्या काळातील तरुण नेत्यांची पिढी इतरांना वळचणीला टाकायचा प्रयत्न करीत आली. राहुल यांच्या प्रभावळीतील नेत्यांना काँग्रेसच्या पतनाची जबाबदारी यूपीए-2च्या कारभारात, मनमोहन सिंग यांच्या कारभारात दिसत असेल आणि पाठोपाठ ज्येष्ठ नेत्यांनी सोनियांना पत्र पाठवून पक्ष कसा चालवावा यावर मल्लिनाथी केली असेल तर, त्यात केवळ जुन्या नव्यांचा संघर्ष नाही. या प्रकारच्या संघर्षातून पक्षाला उर्जीतावस्था येण्याचीही शक्यता नाही. नेतृत्व धोरण आणि संघटन, अशा सर्व स्तरांवर काही नवं उभं करण्याची तयारी आहे का हा मुद्दा आहे. गांधी निष्ठावंत आणि इतर असा संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. पत्र लिहिणार्यां वर कारवाई करण्यासारखा पवित्रा घेणं म्हणजे पक्षातील जिवंत होऊ पाहणार्यात लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं असेल.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nकाँग्रेसचा 2014चा पराभव अगदीच अनपेक्षित नव्हता मात्र, तो जितक्या दणक्यात झाला त्यानं पक्षापुढं संपूर्ण नव्यानं उभारणीचं आव्हान समोर आणलं. तरीही पक्षाला 10 कोटींहून अधिक मतं मिळाली होती. म्हणजेच पक्षाला लोकांनी सत्तेसाठी झिडकारलं तरी, फेरउभारणीला वाव होता. काँग्रेसला त्या पराभवातून सावरता आलं नाही, त्याच परिणाम म्हणून, कोणतच धड सूत्र नसलेल्या प्रचारासह 2019ची निवडणूक लढण्यात झालं. आणखी एक दणदणीत पराभव वाट्याला आला. इथं काँग्रेसमध्ये सत्तापदांवर जाण्याचं साधन मानणार्यांयची चलबिचल सुरू झाली. ती मध्य प्रदेश, राजस्थानात बंडानं बाहरे पडते आहे. त्याआधी अनेक ठिकाणी पक्षातून गळती सुरू झालीच होती, अशी अस्वस्थता असल्याचाच एक अविष्कार पक्षाच्या बैठकीत आपल्याच आधीच्या सरकारावर खापर फोडणं आणि त्याला ज्येष्ठ नेत्यांनी जाहिरपणे उत्तर देणं यातून समोर आला आहे. अर्थात ही सारी काँग्रेसमध्ये मुरलेल्या दुखण्याची लक्षणं आहेत. चिकित्सा आणि उपायाययोजना मूळ दुखण्यावर होत नाही तोवर राजस्थानात सरकार टिकलं किंवा सद्या समोर आलेला वाद हायकमांडच्या दटावणीनं मागं पडला तरी, पक्ष उभारी घेणार नाही. याचं प्रत्यंतर 23 नेत्यांचं पत्र त्यावर काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीतील सरळ दोन तट दिसणारी चर्चा यातून येतं आहे.\nपक्षाच्या अंतर्गत व्यवस्थेसमोर प्रश्नतचिन्ह\nकाँग्रेस हाच देशात आजतरी भाजपला आव्हान देऊ शकणारा पक्ष आहे. मात्र, हा पक्ष अनेक प्रकारच्या गोंधळानं ग्रासलेला आहे. यातला सगळ्यात ठळक गोंधळ आहे तो नेतृत्वाच्या पातळीवर. पक्षात गांधी घराणं हायकमांड आहे. या घराण्यानं जे ठरवलं ते पक्षात अंतिम मानलं जातं. या व्यवस्थेचा लाभ दीर्घकाळ काँग्रेसला पक्ष चालवताना आणि सत्तेची एक व्यवस्था प्रस्थापित करताना झालं हे खरं आहे. मात्र, बदलत्या काळात या प्रकारचं हायकमांड ही पक्षासाठी अडचणीची बाब बनली आहे. अर्थात हे अधिकृतपणे कोणीच मान्य करणार नाही. काँग्रेसमधील हायकमांड नावाची व्यवस्था ही प्रत्यक्षात सत्तापदाचं वाटप करणारी त्या बदल्यात विनातक्रार गांधी घराण्याचं नेतृत्व मान्य करायला लावणारी आहे. यात गृहीत आहे ते गांधी घराण्यातील कोणीतरी इतकं करिश्मावंत निघावं की, त्याच्या अस्तित्वानं, दर्शनानं, प्रचारानं मतांच्या झोळ्या भराव्यात मग ते नेतृत्व निर्विवादपणे मान्य केलं जाईल. सत्ता असो की नसो गांधी घराण्यातून हा करीश्मा दीर्घकाळ दाखवला गेला. त्याला 2014मध्ये आहोटी लागली. 2019मध्ये इतरांचं सोडाच गांधी घराण्याचे वारसदार म्हणून आपोआप पक्षाचे नेते बनलेले राहुल गांधी स्वतःची जागाही वाचवू शकले नाहीत. राजकाणात जय पराजय होत असतात. मात्र, 2019च्या निकालानं काँग्रेसमधील अंतर्गत व्यवस्थेसमोर प्रश्नडचिन्ह लावलं आहे. ते पक्षाच्या गांधीकेंद्री वाटचालीवरचंही प्रश्नकचिन्ह आहे. यात पक्षांमधलं द्वंद्व असं आहे की, राहुल गांधी मोदींना आव्हानवीर म्हणून उभं राहण्यात सातत्यानं कमी पडताहेत हे तर दिसतं आहे. अन्य कुणी त्यासाठी पुढाकार घ्यावा हे गांधी नेतृत्वपदी असताना शक्य नाही. अन्य कोणाला नेतृत्व द्यावं हे सद्याच्या पक्ष रचनेत जवळपास अशक्य आहे. याचं कारण गांधी कुटुंबाचं नेतृत्व मान्य करण्यात इतरांना मग ते कितीही क्षमतेचे आणि सामर्थ्याचे नेते असोत एका रांगेत बसवणारं असतं. यात आपल्याकडं नेतृत्व नाही आलं तरी, ते दुसर्यायकडं जात नाही याची निश्चिंती असते. नरसिंह राव यांच्यानंतर पुन्हा सोनिया गांधींकडे काँग्रेस वळली यातही हे एक कारण होतचं. एकदा कोणीतरी गांधी पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या मखरात बसवला की, बाकी सारे आपासात साठमार्याय करायला मोकळे. ही पक्षाची रीत बनली. ती आत पक्षाच्या मुळावर उठली आहे. गांधी मतं मिळवून देण्यात अपयशी ठरताहेत. पण, पक्षताल्या इतर कोणाचं नेतृत्व सारे मान्य करण्याची शक्यता जवळपास नाही. याचा परीणाम म्हणजे 2019च्या पराभवानंतर नेतृत्वाच्या नावानं चाललेला पोरखेळ.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nहोयबा संस्कृती सोडावी लागेल\nराहूल गांधी यांनी त्यांच्या परीनं त्या निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न केला ते एकटेच थेटपेणे नरेंद्र मोदींना आव्हान देत होते. प्रश्नर विचारत होते हेही खंर आहे. मात्र, त्याचं व्यक्तिशः मोदींना लक्ष्य करणारं प्रचारतंत्र लाभाचं ठरलं नाही. राफेलला भाजपचं बोफोर्स बनवण्याचा प्रयोगही बालकोटनंतर पुरता उलटला. या सार्यातत पक्षातील बाकी नेते राहुल यांच्या प्रचारासोबत पूर्णतः असल्याचं दिसत नव्हतं. अन्य विरोधी पक्षांची बातच दूर. आता पूर्ण वेळ आणि सक्रीय नेतृत्व असलं पाहिजे, असं सांगणारे आडून सोनिया तसं नेतृत्व देऊ शकत नाहीत आणि अन्य गांधींकडं त्यासाठी अपेक्षेनं पाहता येत नाही असंच सुचवताहेत. सोनिया फरा खुशीनं पुन्हा अध्यक्ष झालेल्या नाहीत राहुल यांनी या पदासाठी नकार आधीच दिला होता. आता जर, पक्षतील ज्येष्ठांना गांधी घाराण्याबाहरेचं नेतृत्व शोधलं पाहिजे अस खरंच वाटत असेल तर असं नेतृत्व कोण हे ठरवणं ही सगळ्यांत मोठी परीक्षा आहे. तिथं सद्याची रुजलेली होयबा संस्कृती सोडून द्यावी लागेल.\nराहुल पदाविना महत्त्वाचे नेते\nकेंद्रात एक पक्ष अत्यंत बलिष्ठ बनतो. तेंव्हा त्याला अव्हान देताना इतरांनी एकत्र येण्याचं सूत्र भारतीय राजकारणात दीर्घकाळ चालवलं गेलं आहे. यात काँग्रेसला रोखताना अत्यंत दुय्यम भूमिका घेणार्याभ भाजपपासून ते विरोधी एकत्रिकरणाचा केंद्रबिंदू बनेलला भाजप तसंच काँग्रेस विरोधातील प्रमुख प्रवाह असणारे डावे समाजवादी ते वळचणीला पडलेले हे घटक असं स्थित्यंतर झालं. आता देशात भाजप हा सत्तेच्या संदर्भात सर्वांत प्रमुख प्रवाह आहे. तेव्हा त्याला रोखताना प्रादेशिक आणि देशाच्या पातळीवर इतरांनी एकत्र येणं हे देशातील राजकीय वाटाचीलीशी सुसंगत. ते योग्य की अयोग्य हा निराळा मुद्दा. मात्र, असं एकत्र येण्यात इतर पक्षांसाठी अडथळा ठरतात ते राहुल गांधी. त्यांचं नेतृत्व मान्य करायची आपापल्या प्रदेशात जमीन धरून असलेल्या प्रादेशिक नेत्यांची तयारी नसते. म्हणजेच राहुल गांधी यांचं नेतृत्व ना काँग्रेसला एका सुत्रात गुंफून भाजपच्या विरोधात एकच एक कार्यक्रम देऊ शकलं, ना विरोधकांना एकत्र आणू शकलं. यातून लोकसभेला पराभव झाल्यानंतर राहुल यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडलं. ही कृतीही योग्य की अयोग्य यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते, मात्र राहुल यांनी किमान जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचचं नाही तर, त्यावर ठाम राहण्याचं धाडस दाखवलं. इथं काँग्रेसमधील अन्य नेत्यांची कसोटी होती ज्यांना राहुल यांच्या नेतृत्वशैलीमूळं पक्षाचं नुकसान होत असल्याचं वाटतं त्यांच्यासाठी पर्याय देण्याची शक्यता तयार झाली होती. मात्र, पक्षानं नेहमीप्रमाणं राहुल निर्णय बदलतील याची दीर्घकाळ वाट पाहिली आणि नंतर पुन्हा एकदा सोनिया यांच्याकडं हंगामी पद दिलं. यातून पक्षापुढंच नेतृत्वाचं संकट केवळ पुढं ढकलण्याचं काम झालं. सोनियांनी पक्षाला पराभवातून बाहेर काढून सत्तेपर्यंत नेताना नेतृत्व दिलं हे खरं आहे मात्र ते दिवस संपले आहेत. हंगामी अध्यक्षपदानं पक्षात जैसे थे स्थितीच कायम राहिली. राहुल पदाविना तितकेच महत्वाचे नेते बनून राहिले. त्यांनी एकांड्या शिलेदाराप्रमाणं मोदी यांच्यावर रोज शरसंधान करणारी मोहीम सुरुच ठेवली आहे. पक्षातील इतर नेते धडपणे त्याला साथही देत नाहीत. धड पर्यायी कार्यक्रम आणत नाहीत. यातून दिसतो तो नेतृत्वाच्या पातळीवरचा गोंधळच. मध्य प्रदेश आणि राजस्थानात झालेल्या पक्षफुटीत हाच गोंधळ अधोरेखीत होतो. त्याचबरोबर ज्या युवा नेत्यांना काँग्रेसच्या पुढच्या पिढीचं नेतृत्व मानलं जात होतं. त्यांची प्राथमिकता पक्षापेक्षा व्यक्तिगत महत्वाकांक्षा असल्याचंही मध्य प्रदेश, राजस्थानातील बंडखोरीनं दाखवलं. राहुल यांच्याएवजी ज्योतिरादित्य शिंदे किंवा सचिन पायलट यांच्याकडं नेतृत्व द्यावं, असा एक सूर होता. या दोन्ही नेत्यांनी वेळ येताच पक्षाच्या मुलभूत भूमिका वैचारीक बांधिलकीपेक्षा सत्ता आणि व्यक्तिगत लाभहानीला अधिक महत्व आहे हे दाखवलं आहे. घराणेदार वारसातून नेतृत्वाची प्रभवाळ तयार करताना विचारांवर आधारीत पक्ष उभारणीकडं झालेलं दुर्लक्ष यातून अधोरेखित होतं. ही घसरण ही देखील हायकमांड संस्कृती बळावण्याचाच एक साईड इफेक्ट आहे.\nपक्षासमोर दुसरं गोंधळलेपण आहे ते कार्यक्रम, भूमिकांचं. मोदी यांच्या उदयानंतर हे आव्हान आणखी मोठ्या प्रमाणत वाढलं आहे. इंदिरा गांधी आणि नंतर संजय, राजीव, सोनिया यांना तुलनेत सशक्त पक्ष वारशानं मिळाला होता. देशातला मुख्य प्रवाहही काँग्रेसच्या मध्यममार्गी भूमिकेशी सुसंगत होता. काँग्रेसनं शेवटचं स्पष्ट बहुमत अनुभवलं त्यांनतरच्या तीन दशकात देशातलं हे वातावरण झपाट्यानं बदलत गेलं. त्याचा नेमका आदमास न आल्यानं सत्ता टिकवण्यासाठीच्या राजकीय वैचारीक तडजोडी करत पक्ष वाटचाल करत राहिला यातून एका एका प्रदेशातील पक्षाचं मध्यवर्ती स्थान धोक्यात येत गेलं. याचकाळात देशात धर्माधारीत ध्रुवीकरण आणि बहुसंख्यांकवादाची लागण स्पष्टपणे दिसायला लागली होती. त्याला तोंड देणारी रणनिती काँग्रेसला सापडली नाही. यात नेमकं काय करायचं याद्दलचं गोंधळेपण राजीव गांधींच्या काळातच सुरू झालं होतं त्याआधी धोरणात धर्मनिरपेक्षता पण व्यक्तिगत पातळीवर धार्मिकता आणि प्रसंगी धर्माकडं झुकलेल्या बुहसंख्याकवादी प्रवाहांनाही सामावून घेण्याच प्रयत्न हे इंदिरा गांधीकालीन धोरण सूत्र होतं. यात सरकाराचं धोरण-कृती प्राधान्यानं धर्मनिरपेक्ष राहील यावर भर होता. राजीव गांधी यांनी शाहाबानो प्रकरणात केलेली चूक पाठेपाठ अयोध्येत शिलान्यासाला अनुमती देऊन संतुलनाचा केलेला प्रयत्न भविष्यात दोन्हीकडून काँग्रेसचा पाठिंबा आटत जाण्यासाठी वाट तयार करणार होता. काँग्रेसमध्ये नाना प्रकारची भूमिका घेणारे डावे-उजवे मध्यममार्गी सारे होते हे खरं मात्र, स्वातंत्र्यासोबत काँग्रेसची वाटचाल प्रामुख्यानं घटनादत्त धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकतेच्या सूत्रानं सुरू होती. भाजपचं बंळ वाढेल तसं आणि ‘गर्व से कहो...’ नारा बुलंद होईल, तसं काँग्रेसच्या जानाधाराचा मोठा वाटा असलेला समूह दुरावत गेला. याच काळात काँग्रेस प्रतिक्रियावादी बनत गेली त्याचा परीणाम पक्षावरील अल्पसंख्यांकांचं लांगूलचालन करत असल्याचे आरोप बळकट होण्यात झाला. राममंदीर आंदोलन आणि मंडलच्या प्रभावानं एक एक समूह पक्षाकडून एकतर प्रादेशिक पक्षांकडं किंवा भाजपकडं सरकत होता. यात पक्षाचा सामजिक वैचारीक अजेंडा ठोसपणे ठरवणं आणि त्याबरहुकूम कार्यकर्ते घडवणं यातलं अपयश पक्षाला टोकाच्या घसरणीकडं घेऊन जाण्यात मोठा वाटा उचलणारं आहे.\nयातून बदलेल्या वातावरणावर नरेंद्र मोदी स्वार झाले. अत्यंत आक्रमक प्रचार आणि स्पष्ट बहुसंख्याकवादी अजेंडा याचा पगडा देशभर पडू लागला. याला तोंड देण्याची क्षमता काँग्रेस नेतृत्वाला दाखवता आली नाही. धोरण कार्यक्रमाच्या पातळीवरचं हे अपयश आहेच. तसं अंमलबजावणीच्या आघाडीवरचंही. निवडणुका हा त्या काळातील जनमताच्या व्यवस्थापनाचा खेळ बनत असताना आणि प्रतिमांची आकलानाची लढाई होत असताना मोदी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांहून कित्येक कोस आघाडीवर राहिले. प्रतिमेच्या लढाईत राहुल गांधी कुठल्या कुठे फेकले गेले. याचं खापर भाजपच्या प्रचारयंत्रणेवर फोडण्यानं पक्षाची कमतरता दूर होत नाही. नेतृत्व धोरण-कार्यक्रम आणि प्रचारयंत्रणा या सर्व आघाड्यांवर काही ठोस लक्षणीय पुढं ठेवणं ही काँग्रेसची गरज आहे. ती नव्या जुन्यांच्या कथित संघर्षानं पुरी होत नाही. त्यातून दिसते ती जाबाबदारी एकमेकांवर ढकलण्याची आगतिकता. काँग्रेसच्या बैठकीत राहुल यांच्या निकटवर्तीयांनी युपीए-2 आणि डॉ. मनमोहन सिंग सरकारवर टिका केली तेंव्हा तत्कालीन मंत्र्यांनी समाजमाध्यमांवर जोरदार प्रतिवाद केला. आत्मपरीक्षण आवश्यक असलं तरी यातून दिसते ती, पक्षातील दरी. हे प्रकरण ताजं असताना ज्येष्ठांच्या लेटरबॉम्बनं गोंधळात भर टाकली. राहुल गांधी आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या काही तक्रारी असू शकतात. मात्र, राहूल हे पक्षाचे निर्विवाद नेत होते, आताही आहेतच तरीही त्यांना हवा तसा पक्ष का उभारता येऊ नये. आता जर, गांधी शीर्षस्थ नेतृत्वातून बाजूला होणारच असतील तर, उरलेल्याकडं काही पर्यायी कार्यक्रम आहे काय\nपक्षाचं नेतृत्व अध्यक्ष म्हणून राहुल गांधी किंवा कोणीही गांधी करणार की नाही, याचा सोक्षमोक्ष पक्षाला लावावा लागेल. हे घोंगडं भिजत राहील तेवढं पक्षाचं नुकसानच असेल. दुसरीकडं ज्या देशात कधीकाळी जाहिरपणे धर्मनिरपेक्ष सर्वासमावेशक असल्याशिवाय मुख्य प्रवाहातलं राजकारणच करता येत नव्हतं. तिथं आता उघडपणे बहुसंख्यांकवाद बळजोर झाला आहे. तो कॉग्रेसच्या मूळ विचारधारेच्या विरोधातला आहे. त्याविरोधात स्पष्टपणे लढायचं की आताचा बलिष्ठ प्रवाह पाहून तडजोडी करायच्या हेही पक्षाला ठरवावं लागेल. यातलं काहीच न करता राहुल यांच्या जवळचे आणि इतर असल्या दरबारी कुरघोड्यातून पक्षाच्या हाती काही लागणारं नाही. सुभेदारांनी असल्या लढाया लढाव्यात आणि नेत्यांन करिश्मा दखवून मतं मिळवावीत हे दिवस कधीच संपले आहेत. कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, भूपिंदर हुड्डा, पृथ्वीराज चव्हाण, शशी थरूर, मनीष तिवारी आदी ज्येष्ठ नेत्यांच्या पत्रानं ते अधोरेखित केलंच आहे. गांधी मतं आणि यश मिळवून देण्याची अंधूकशी शक्यताही असती तर, यातील एकाचीही असं धाडस करायची हिंमत झाली नसती. आता केलीच आहे हिंमत तर, पक्षात निवडणुकीनं लोकशाही मार्गानं नेतृत्व निवडणं आणि निवडणुकीच्या मैदानात प्रभाव टाकू शकेल, असा कार्यक्रम आणि त्यासाठीची यंत्रणा म्हणजेच पक्ष संघटन उभं करण्याचं आव्हानही स्वीकारलं पाहिजे.\n(काँग्रेसमधील संघर्षावरचा आधी प्रसिध्द झालेला लेख बदलत्या संदर्भात संपादित स्वरूपात पुन्हा देत आहोत.)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरत्नागिरीकरांना दिलासा ; बाधितांच्या तुलनेत तिप्पट रुग्ण कोरोनामुक्त\nरत्नागिरी - सात दिवसानंतर जिल्ह्यात चोविस तासात कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार झाला आहे. 116 बाधित सापडल्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा सात हजाराच्या...\nमी ठरवले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधीही भेटू शकतो, पण... ; खासदार संभाजीराजे\nकोल्हापूर - मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि संभाजीराजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारल्याच्या कारणावरून कोल्हापूर महापालिकेची महासभा तहकूब...\nजळगावात कृषी विषयक धोरणांविरोधात महामार्गावर रस्तारोको\nजळगाव ः ‘नही चलेंगी नही चलेंगी, तानाशाही नही चलेंगी’ अशा घोषणा देत आज केंद्र शासनाने बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या कृषी विषयक धोरणाविरोधात...\nशिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, किसान सभेकडून शेतकरी विरोधी कायद्यांची होळी\nअकोले (अहमदनगर) : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला. देशव्यापी आंदोलन करण्याच्या आवाहनानुसार...\nअनाधिकृत नळधारकांना नियमानुसार नियमित करा- महापौर मोहिनी येवनकर\nनांदेड - शहरातील अनाधिकृत नळाबाबत शोध मोहिम राबवून अनाधिकृत नळधारकांना नियमित करावे व शहरवासीयांना दररोज शुद्ध पाणी पुरवठा करावा असे निर्देश...\nभारत बंद - कृषी विधेयकाच्या निषेधार्थ बळीराजासाठी सर्वविरोधी पक्ष एकवटले\nनवी दिल्ली - केंद्र सरकारच्या विविध कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांनी शुक्रवारी भारत बंदची हाक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/argument-ratnagiri-surgeon-post-344044", "date_download": "2020-09-26T01:33:04Z", "digest": "sha1:5ZFJR42B3ZR2MHB35CYMD225SKLDSYRT", "length": 15674, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "रूग्ण वाढत असतानाच रत्नागिरी शल्य चिकित्सकपदाची संगीत खुर्ची | eSakal", "raw_content": "\nरूग्ण वाढत असतानाच रत्नागिरी शल्य चिकित्सकपदाची संगीत खुर्ची\nजिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. बाधित रुग्णांनी आता पाच हजाराचा आकडा ओलांडला आहे.\nरत्नागिरी - कोरोनाचे जिल्ह्यावर मोठे संकट असताना जिल्हा शासकीय रुग्णालयात शल्य चिकित्सकपदी संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे. रजेवर गेलेले शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे हजर झाले; मात्र शल्य चिकित्सकाचा पदभार प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे आहे. खुर्चीतील शल्य चिकित्सक फक्त नामधारी असून प्रभारींकडे सर्व कारभार आहे. जिल्हाधिकार्‍यांचा विरोध असल्याने बोल्डे यांच्याकडे कार्यभार देण्यात आला नाही. संगीत खुर्चीच्या या खेळाला कंटाळून डॉ. बोल्डे पुन्हा रजेवर गेले आहेत.\nजिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. बाधित रुग्णांनी आता पाच हजाराचा आकडा ओलांडला आहे. सुविधांची कमतरता भासत आहे. आरोग्य अधिकारी, कर्मचार्‍यांच्या रिक्त पदाचा प्रश्‍न काही सुटलेला नाही. मनुष्यबळाची गंभीर समस्या आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनापुढे आहे. उपलब्ध मनुष्यबळाचा वापर जास्तीत जास्त रुग्णांच्या उपचारासाठी करण्याची गरज आहे; मात्र जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक पदाच्या खुर्चीचा खेळ सुरू आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांना यापूर्वी सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा विषय चर्चिला जात होता; मात्र त्यांनी त्याचे खंडन करून आपण प्रकृती ठीक नसल्याने आजारी रजेवर जाणार असल्याचे सांगितले होते. दीर्घ आजारी रजेवरून ते दहा- बारा दिवसांपूर्वी हजर झाले. मात्र, त्यांच्याकडे कार्यभार देण्यात आला नाही. जिल्हाधिकारी यांच्या विरोधामुळे डॉ. फुले यांच्याकडे शल्य चिकित्सकपदाचा भार आहे.\nहे पण वाचा - रात्रीस खेळ चाले म्हणत, कोकणात यांनी मांडलाय उच्छाद ; तोंडचा घास घेत आहेत हिरावून\nडॉ. बोल्डे हजर झाले. काही प्रशासकीय बाबींची पूर्तताही त्यांनी केली. मात्र ते नामधारी ठरले. कारण जिल्हाधिकार्‍यांनी पदभार डॉ. फुले यांच्याकडे दिला आहे. त्यांची केबिन पहिल्या मजल्यावर आहे. या खेळाला कंटाळून डॉ. बोल्डे पुन्हा रजेवर गेले आहेत. बोल्डेंना होत असलेल्या विरोधाबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविले असल्याचे आरोग्य संचालक विभागाकडून समजते.\nहे पण वाचा - सबका टाइम आयेगा : नितेश राणेंनी डागली शिवसेनेवर तोफ\nमाझी प्रकृती ठीक नसल्याने मी पुन्हा रजेवर आलो आहे. त्यामुळे शल्य चिकित्सक पदाबाबत काय चालले आहे, हे मला माहित नाही.\n- डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी\nसंपादन - धनाजी सुर्वे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजागतिक आरोग्य संघटनेचा आयोग चीनवर टीका करण्याची शक्यता कमीच\nन्यूयॉर्क - कोरोनाच्या जागतिक साथीप्रकरणी चौकशीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) स्थापन केलेला स्वतंत्र आयोग अद्ययावत माहितीचे पहिले सादरीकरण...\nभ्रष्टाचारामुळे दरवर्षी अब्जावधींचे नुकसान\nन्यूयॉर्क - करचुकवेगिरी, भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहारांमुळे सर्वच देशांचे ५०० अब्ज डॉलरचे नुकसान होत असून हा पैसा जगातील गरीबांसाठी वापरता...\nUN महासभेत भारताने पाकला दाखवली जागा; इमरान खान यांच्या भाषणावेळी केलं वॉकआऊट\nन्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रसंघाच्या 75 वे अधिवेश न सुरु आहे. यामध्ये पाककडून सातत्याने काश्मीर मुद्द्यावरून भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात...\nरत्नागिरीकरांना दिलासा ; बाधितांच्या तुलनेत तिप्पट रुग्ण कोरोनामुक्त\nरत्नागिरी - सात दिवसानंतर जिल्ह्यात चोविस तासात कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार झाला आहे. 116 बाधित सापडल्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा सात हजाराच्या...\nप्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय; अतिरिक्त सहा गाड्या धावणार\nभुसावळ ः रेल्वेत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालविणार आहे. या विशेष गाड्या...\nपोलिस आयुक्‍तांचे नवे आदेश नियम मोडणारे दुकान सात ते चौदा दिवस बंद\nसोलापूर : शहरातील कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातून शहरातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोके वर काढत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/concerns-persistent-holder-season-tuesday-sailors-are-towards-village-339966", "date_download": "2020-09-26T03:18:39Z", "digest": "sha1:4QA336WVSNZHS2JN44DDBEV2QKVBJEEU", "length": 16460, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "पर्ससीननेटधारकांना चिंता, हंगाम मंगळवाऱपासून; पण खलाशी गावाकडेच | eSakal", "raw_content": "\nपर्ससीननेटधारकांना चिंता, हंगाम मंगळवाऱपासून; पण खलाशी गावाकडेच\nयंदा सुरवातीलाच खलाशांना आणण्यासाठी ई-पास काढण्यापासून त्यांना क्‍वारंटाईन करून ठेवण्यापर्यंत सर्व गोष्टी मच्छीमारांना कराव्या लागत आहेत.\nरत्नागिरी : ट्रॉलिंग, गिलनेटपाठोपाठ एक सप्टेंबरपासून पर्ससिननेटद्वारे मासेमारीला सुरवात होणार आहे. कोविडमुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा परिणाम खलाशांच्या आगमनावर होणार आहे. परिणामी काही पर्ससिननेटधारकांना खलाशांअभावी नौका बंदरात उभ्या ठेवण्याची वेळ येणार आहे.\nडॉ. सोमवंशी समितीच्या शिफारशीनुसार 5 फेब्रुवारी 2016 ला पर्ससिन, रिंगसीन (मिनी पर्ससिन) मासेमारीवर प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पर्ससिन परवानाधारक नौकांवर निर्बंध घालण्यात आले होते. 500 मीटर लांब, 40 मीटर उंची, 25 मिलीमीटरपेक्षा कमी नसलेल्या आसाच्या पर्ससिन जाळ्याने मासेमारी करण्यासाठी 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर हा कालावधी निश्‍चित करून दिला आहे. शासनाच्या आदेशानुसार, 1 सप्टेंबरपासून पर्ससिननेट मच्छीमारीला सुरवात होणार आहे. मागील हंगामात अखेरच्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे गणित कोलमडले होते. काही काळ मासेमारी बंद ठेवण्यात आली होती. त्याचा आर्थिक भूर्दंड मच्छीमारांना बसला होता. यंदा सुरवातीलाच खलाशांना आणण्यासाठी ई-पास काढण्यापासून त्यांना क्‍वारंटाईन करून ठेवण्यापर्यंत सर्व गोष्टी मच्छीमारांना कराव्या लागत आहेत. काही नौकांनी ठाणे, पालघर येथून खलाशी आणून ठेवले आहेत. कर्नाटक, ओरिसा, बिहार या राज्यांतून येणाऱ्यांसाठी खटपट सुरू आहे. या गडबडीत 25 ते 30 टक्‍केच पर्ससिननेट नौका समुद्रावर स्वार होतील अशी शक्‍यता आहे.\nजिल्ह्यात परवानाधारक पर्ससिननेट नौकांची संख्या सुमारे पावणेतीनशे आहे. रत्नागिरी, राजापूर तालुक्‍यातच या नौका आहेत. कोरोनाच्या सावटाखाली ही मासेमारी सुरू होणार आहे. कर्नाटकबरोबरच नेपाळमधील अनेकजण बोटींवर काम करण्यासाठी गेल्या काही वर्षात कोकणात येत आहेत. कोरोनामुळे नेपाळमधून भारतात येण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अनेक नेपाळी येऊ शकलेले नसल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्याऐवजी अन्य राज्यातील किंवा ठाणे, पालघर येथील लोकांचा पर्याय मच्छीमारांना अवलंबावा लागणार आहे. 15 सप्टेंबरपर्यंत सगळे चित्र स्पष्ट होईल, असे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. एका बोटीवर 25 ते 30 खलाशी काम करतात. जिल्ह्यात खलाशी म्हणून काम करण्यासाठी सुमारे 8 ते 9 हजार जण मासेमारी हंगामात येतात. महिन्याचा एका खलाशाचा खर्च किमान दहा हजार रुपये इतका आहे.\nमासेमारी हंगाम सुरू झालेला आहे. त्यानुसार अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी बंदरांवर मत्स्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.\n- एन. व्ही. भादुले, सहायक मत्स्य आयुक्‍त\nसंपादन : विजय वेदपाठक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमच्छीमारांना दिलासा ; वादळामुळे थांबलेली मासेमारी झाली सुरू\nहर्णे - गेल्या दीड महिन्यापासून वारंवार येणाऱ्या वादळांमुळे मासेमारीला ब्रेक लागला होता. परंतु, कालपासून(ता.२४) वातावरण निवळल्यामुळे आंजर्ले खाडीत...\nसाखरीनाटे बंदरातून तारली, बांगडा गायब ; शिंगाळा झाला कमी\nराजापूर (रत्नागिरी) : निर्यातीतून वर्षभरामध्ये लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल करणारा तारली मासा तालुक्‍यातील साखरीनाटे बंदरासह रत्नागिरी बंदर...\nवारंवार येणाऱ्या वादळांमुळे मच्छीमारांची फरफट\nहर्णे - पुन्हा एकदा २१ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरपर्यंत वादळामूळे सतर्कतेचा संदेश मिळाल्याने हर्णे बंदरातील नौकांनी आंजर्ले, जयगड, दाभोळ(रत्नागिरी),...\nओव्हरफ्लोमुळे मत्स्यबीज जातेय वाहून, मत्स्य व्यावसायिक चिंतातूर \nटेंभुर्णी (जालना) : जाफराबाद तालुक्यात असलेल्या अकोला देव मध्यम प्रकल्पामध्ये येथील दयानंद बाबा मच्छीमार संस्थेच्या वतीने मत्स्यबीज सोडण्यात आले...\nपंचवीस फूट पाण्यात पाऊणतास शोध घेऊन झाला खुलासा; ग्रामस्थांमध्ये चर्चा\nनाशिक / मालेगाव : अग्निशामक दलाचा जवान शकील अहमद ऊर्फ तैराक याने वीस ते पंचवीस फूट पाण्यात तब्बल पाऊणतास शोध घेऊन हाती जे सापडले त्याने...\nहिप्परगा तलाव पर्यटकांना घालतोय साद ; देशी व विदेशी पक्षांचा अधिवास\nसोलापूर ः शहरालगत असलेला हिप्परगा तलाव देशभरातील पर्यटक व पक्षी निरीक्षकांसाठी महत्वाचे केंद्र बनत आहे. देशभरातील पक्षी निरीक्षकांनी या ठिकाणी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/kokan-people-14-day-quarantine-august-7-deadline-ganesha-festival-327287", "date_download": "2020-09-26T02:12:23Z", "digest": "sha1:XB63WHIFHBHEAKXAS6MU46ZGSIQFFWCM", "length": 15660, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोकणवासीयांचा सवाल : श्रमिक रेल्वे सेवा सुरू केल्याचे श्रेय घेणारे पुढारी गेले तरी कुठे...? | eSakal", "raw_content": "\nकोकणवासीयांचा सवाल : श्रमिक रेल्वे सेवा सुरू केल्याचे श्रेय घेणारे पुढारी गेले तरी कुठे...\nगणेशोत्सव साजरा करण्याचा कालावधी कमी दिवसावर येऊन ठेपला आहे.\nकणकवली (सिंधुदुर्ग) : गेल्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात परप्रांतीयांना श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या गावापर्यंत मोफत प्रवास देण्याचे श्रेय अनेक राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या पदरात पाडून घेतले.म्हणून आता कोकण रेल्वे सुरू करण्याचा विषय पुढे आला तेव्हा हे पुढारी आहे तरी कुठे असा सवाल कोकणवासी विचारू लागले आहेत \nहेही वाचा- वाढीव वीजबिलप्रश्नी मनसे आक्रमक, उचलले टोकाचे पाऊल -\nगणेशोत्सव साजरा करण्याचा कालावधी कमी दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यातच कोरोनाव्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना 14 दिवसाचे विलगीकरण असायला हवे असा दबाव वाढू लागला आहे. त्यामुळे चाकरमान्यांनाकडे ७ ऑगस्ट ही अखेरची डेडलाईन आहे. त्यानंतर चाकरमानी जरी गावात आले तरी त्यांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता येऊ शकतो का असा प्रश्न पुढे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणवासीयांची अपेक्षा आहे. ती ही फार मापक आहे. मुंबई पुण्यातून कोकणाकडे येण्यासाठी कोकण रेल्वे हाच पर्याय आहे. श्रमिक रेल्वे सेवा जेव्हा सुरू झाली, तेव्हा अनेकांनी त्याचे श्रेय लुटले. परप्रांतीयांना मात्र मोफत प्रवास आणि कोकणवासीयांवर प्रतीक्षेची टांगती तलवार, ही खंत आता थेटपणे सोशल मीडियावरून व्यक्त होऊ लागली आहे.\nहेही वाचा- गृहराज्यमंत्र्यांकडून सिंधुदुर्ग पोलिस दलाची प्रशंसा, म्हणाले... -\nयाचे कारण कोकणातील प्रवाशांना रेल्वेने घेऊन जा, आम्हाला मोफत नको वाजवी दरात विशेष गाड्या सोडा ही मागणी आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मुंबई-पुणे व इतर भागातून रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी शेकडोंनी निवेदने रेल्वे मंत्रालयाकडे रवाना करण्यात आली आहेत.पण याचा साधा विचारही झाल्याचे दिसत नाही. राज्यातील विशेषत: कोकणशी संबंधित असलेले बडे नेते शांत झोपत आहेत. अन्यथा आपली आक्रमकता माध्यमांकडे मांडणारी ही मंडळी आता मूग गिळून गप्प का कोकणवासीयांचे देणे -घेणे त्यांना राहिले नाही का कोकणवासीयांचे देणे -घेणे त्यांना राहिले नाही का असा सवालही चाकरमानी विचारू लागले आहेत. केंद्र सरकार आणि त्यांचे सगळे नेते राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात गुंतल्याने त्यांना कोकणच्या प्रवाशांकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ नसावा अशी खंतही मुंबईचे चाकरमानी आता व्यक्त करू लागले आहेत.\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय; अतिरिक्त सहा गाड्या धावणार\nभुसावळ ः रेल्वेत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालविणार आहे. या विशेष गाड्या...\nरेल्वेने जाताना एक तास आधी स्थानकात उपस्थित रहा; प्रशासनाची सुचना\nरत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर तुतारी आणि राजधानी या दोन गाड्या धावणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे. पण या गाड्यातून प्रवास करणाऱ्या...\nआरोग्य विभागाची पुन्हा चूक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढले शुध्दीपत्रक\nसोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी संशयितांचे टेस्टिंग वाढवा, असे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका...\nकोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी\nरत्नागिरी - कोकण रेल्वेच्या मार्गावर पुन्हा तुतारी आणि राजधानी या दोन गाड्या धावणार असल्याची घोषणा झाली आहे. पण या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या...\nपरभणी : शेतकरी व कामगार विरोधी कायद्यांची होळी, विविध संघटना आक्रमक\nपरभणी ः केंद्र सरकारने राज्यसभेत बहूमत नसताना मंजूर केलेले शेतकरी व कामगार विरोधी कायद्याची शुक्रवारी (ता.२५) मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियन (...\nसेल्फीच्या नादात पोलिस धबधब्यात पडला, अजूनही शोध सुरूच\nटाकळी ढोकेश्वर : मांडओहोळ (ता.पारनेर) येथील धरण परिसरात रूईचोंडा धबधब्यात रेल्वे पोलिस गणेश दहिफळे यांचा फोटोसेशनच्या नादात तोल गेल्याने पाण्यात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/seventh-pay-commission-makes-no-difference-teachers-partially-subsidized-schools-318830", "date_download": "2020-09-26T01:37:44Z", "digest": "sha1:XEABYWCVNNO6IWYWBNWDRR6MDC6TRPBL", "length": 14771, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा फरक नाहीच | eSakal", "raw_content": "\nअंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा फरक नाहीच\nशिक्षक आमदारांनी घालावे लक्ष\nपुणे विभागातील अंशतः अनुदानित शाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळाली नाही. या विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी या गोष्टीत लक्ष घालून, त्या शिक्षकांना फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा या शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे.\nसोलापूर ः राज्यात जे शिक्षक अंशतः अनुदानित शाळेवर काम करतात. त्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम पाच समान हप्त्यामध्ये रोखीने देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, पुणे विभागातील अंशतः अनुदानित शाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांना अद्यापही ती रक्कम दिलेली नाही. त्यामुळे या शाळेवर काम शिक्षकांची परवड होत आहे.\nराज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्याना सातवा वेतन आयोग एक जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आला आहे. जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंतची थकबाकी पाच समान हप्त्यामध्ये देण्याबाबत शासनाने मान्य केले आहे. त्याप्रमाणे पहिल्या हप्त्याचे वितरण एप्रिल महिन्यात झाले आहे. \"डीसीपीएस'ची (नवीन पेन्शन योजना) खाते नसणाऱ्या अंशत: अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना ही रक्कम रोखीने अदा करण्याबाबतचे आदेश शासनाने दिले आहेत.\nत्याप्रमाणे राज्यात इतर विभागात या हप्त्याचे वाटप त्या-त्या वेळी करण्यात आले आहे. परंतु, पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यात अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना अद्यापही पहिल्या हप्त्याचे वितरण सोलापूरच्या वेतन पथकाकडून झाले नाही. थकीत हप्त्याची माहिती इतर शाळासोबतच घेतली होती. अनुदानित शाळांची रक्कम मोठी असतानाही त्या रकमेचे वितरण एप्रिल महिन्यात झाले आहे. आधीच कित्येक वर्षे विनावेतन सेवा देणारे कर्मचारी व तुटपुंजा पगार व त्यातच तुटपुंजा असणारा फरकाचा हफ्ता तोही वेळेत मिळत नसल्याने अंशतः अनुदानित शाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांची प्रशासनाकडून परवड सुरु आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवांद्रेनजीकचा समुद्रकिनारा सर्वात दूषित, पाण्यातील 'ई कोलाय' विषाणूचं प्रमाण पाचपट अधिक\nमुंबईतील वांद्रेनजीकचा समुद्र मुंबईतील सर्वाधिक दुषित आहे. शौचालयाच्या पाण्यात आढळणारा ई कोलाय हा विषाणू या परीसरातील पाण्यात निकषापेक्षा तब्बल...\nमाझ्या स्वप्नांनाही तिने दिले पंख\nआईबद्दल किती बोलावं तेवढं थोडंच आहे. माझी आई उषा खूपच साधी. घर, संसार, सासू-सासरे अन् मुलांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करायचा, हेच तिचं विश्व होतं....\nभारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट ही, की बुसान आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी मराठी चित्रपट ‘बिटरस्वीट’ चित्रपटाची निवड झाली आहे. या...\nपोलिस आयुक्‍तांचे नवे आदेश नियम मोडणारे दुकान सात ते चौदा दिवस बंद\nसोलापूर : शहरातील कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातून शहरातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोके वर काढत...\nमी ठरवले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधीही भेटू शकतो, पण... ; खासदार संभाजीराजे\nकोल्हापूर - मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि संभाजीराजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारल्याच्या कारणावरून कोल्हापूर महापालिकेची महासभा तहकूब...\nधर्मवीर संभाजीराजे तलावातील पाणी तपासणी गुजरातच्या कंपनीसाठी मोजले 16 लाख\nसोलापूर : कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या धर्तीवर सोलापुरातील श्री धर्मवीर संभाजीराजे तलावाचे सुशोभिकरण केले जात आहे. त्यासाठी साडेसात कोटींचा खर्च...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/heads-of-bsf-and-pakistan-rangers-to-meet-in-delhi-in-september-1135186/", "date_download": "2020-09-26T03:26:44Z", "digest": "sha1:3HQZGG55WPDQEAI2C27NDN3GSZMMDB6G", "length": 12674, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बीएसएफ-पाकिस्तान रेंजर्सची सप्टेंबरमध्ये दिल्लीत बैठक? | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nबीएसएफ-पाकिस्तान रेंजर्सची सप्टेंबरमध्ये दिल्लीत बैठक\nबीएसएफ-पाकिस्तान रेंजर्सची सप्टेंबरमध्ये दिल्लीत बैठक\nभारत आणि पाकिस्तान यांच्यातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठक रद्द झाल्यानंतर आता पुढील महिन्यांत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची दिल्लीत बैठक होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.\nभारत आणि पाकिस्तान यांच्यातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठक रद्द झाल्यानंतर आता पुढील महिन्यांत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची दिल्लीत बैठक होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाकिस्तानचे रेंजर्स यांच्यात ही बैठक होणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.\nसदर बैठकीची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून दोन्ही देश एकमेकांच्या संपर्कात आहेत, असे वृत्त दी एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिले आहे. सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्यातील ही द्वैवार्षिक बैठक आहे. सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक आणि पाकिस्तान रेंजर्सचे महासंचालक यांच्यात ९ ते १३ सप्टेंबर या कालावधीत बैठक होणार आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या या बैठकीत समन्वय राहावा यासाठी दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींची वाघा सीमेवर मंगळवारी एक बैठक घेण्यात आली. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठक रद्द झाल्यानंतर प्रथमच ही उच्चस्तरीय बैठक होणार आहे.\nजवानांच्या हल्ल्यात दहशतवादी ठार\nश्रीनगर- उत्तर काश्मीरमध्ये उरी भागात सीमारेषेवर दहशतवादी आणि लष्करी जवानांमध्ये झालेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे. सकाळी सात वाजता लष्करी जवान उरी भागात गस्तीवर असताना येथे सशस्त्र दहशतवादी आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या हल्ल्यात ठार झालेला दहशतवादी कुठल्या संघटनेचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोराकडून एके-४७ रायफलही हस्तगत करण्यात आली आहे. अखेरचे वृत्त हाती आले, तेव्हाही जवान आणि दहशतवाद्यांधील गोळीबार सुरूच होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारतीय हद्दीत आलेल्या पाकिस्तानी मुलांची बीएसएफकडून चॉकलेट देऊन सुटका\n‘जेएनयू’मध्ये निमलष्करी दल तैनात; उमर खालिदला शरण येण्याचा सल्ला\nकाश्मीरला निघालेले बीएसएफचे १० जवान ट्रेनमधून बेपत्ता\n पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीद, चार नागरीक ठार, १२ जखमी\nदहशतवाद हा देशाला जडलेला ‘कॅन्सर’; कुस्तीपटू योगेश्वर दत्त भडकला\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 पटेल आरक्षणाला लालूंचा पाठिंबा\n2 चीनच्या अध्यक्षांची अमेरिका भेट रद्द करण्याची मागणी फेटाळली\n3 ‘एलईजे’चे २० दहशतवादी, चार पोलिसांना अटक\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-mail-readers-opinion-on-loksatta-news-1845677/", "date_download": "2020-09-26T02:37:03Z", "digest": "sha1:ECNCSYPDZOGTBPSXTJ2FDFHQ3SUBPYMJ", "length": 48580, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta readers mail readers opinion on loksatta news | ‘शत्रुबुद्धी विनाशाय..’पेक्षा चांगली आदरांजली कोणती? | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n‘शत्रुबुद्धी विनाशाय..’पेक्षा चांगली आदरांजली कोणती\n‘शत्रुबुद्धी विनाशाय..’पेक्षा चांगली आदरांजली कोणती\nइटलीच्या सैन्याला जोरदार प्रतिकार झाला; पंधरा हजार सैनिक ठार झाले.\nजम्मूवरून श्रीनगरकडे सुमारे २८०० सीआरपीएफ जवानांचा ताफा शिरस्त्याप्रमाणे चालला होता. पुलवामा जिल्ह्य़ात ताफ्यातील एका वाहनावर दहशतवादी हल्ला झाला आणि ४० जवान जागीच ठार झाले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया ‘शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही’ अशी होती. या हल्लय़ाला चोख उत्तर देण्यासाठी सरकारने सैन्याला ‘योग्य कृती करण्याचे’ ‘पूर्ण स्वातंत्र्य’ दिल्याची बातमी वाचली.\n‘शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही’ किंवा इंग्रजीत Our boys have not died in vain , असा इशारा देणे हा एक रिवाज बनला आहे. पहिले जागतिक महायुद्ध सुरू झाले आणि १९१५ मध्ये इटलीने ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याविरुद्ध आघाडी उघडली. इटलीच्या सैन्याला जोरदार प्रतिकार झाला; पंधरा हजार सैनिक ठार झाले. तेव्हाही ‘शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही’, असाच इशारा दिला होता. त्यानंतरच्या दोन वर्षांत इटलीने ऑस्ट्रिया-हंगेरी यांच्याविरुद्ध अकरा वेळा युद्ध पुकारले आणि त्यांत इटलीचे एकंदर सात लाख सैनिक कामी आले.\nपुलवामा जिल्ह्य़ातील दहशतवादी हल्लय़ासारखे हल्ले समजा नजरेआड केले तरी, भारत-पाकिस्तानच्या एकूण चार युद्धांमध्ये ‘स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप’ या भारतीय संस्थेच्या आकडेवारीप्रमाणे आठ ते नऊ हजार भारतीय आणि १३-१४ हजार पाकिस्तानी सैनिक ठार झालेले आहेत. या सर्व सैनिकांच्या मृत्यूला स्मरून त्यांना ‘शहीद’ म्हणणे, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणे, त्यांना मरणोत्तर वेगवेगळे सन्मान देणे हे नेहमीप्रमाणे भारत-पाकिस्तान या देशांतही घडले आहे. परंतु सैनिकांच्या मृत्यूमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची हानी शासकीय कृतीमुळे भरून निघत नाही. सर्व देशांतील सैनिक पोटासाठी नोकरी करतात. प्रत्येक सैनिक कुणाचा तरी मुलगा, कुणाचा तरी भाऊ, कुणाचा तरी पती, कुणाचा तरी वडील असतो. मृत्यूने केलेली नात्याची ही हानी कधीच भरून निघत नाही. परंतु सैनिकांना सन्मान देण्याप्रसंगीची वक्तव्ये, गीते, कवने, केलेली आर्थिक मदत, शहीद होण्यासाठी येऊ घातलेल्या सैनिकांची मानसिकता घडवतात, हा मात्र इतिहास आहे.\n‘शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही’, अशा भाषेतून फक्त युद्धज्वर वाढतो. युद्धे पुन्हा पुन्हा होतात. दरवेळी नवे सैनिक हकनाकच शहीद होतात. दोन देशांतील कळीचे प्रश्न सोडविण्यासाठी कौशल्यपूर्ण संवाद हाच हमखास मार्ग आहे; परंतु राजकीय नेत्यांमध्ये हे संवादाचे कौशल्य कमी पडते, किंवा त्यांना सत्तेचा ज्वर चढून वास्तव भासमान वाटू लागते. राजकीय नेते समाजातून निर्माण होत असल्याने संवादाने लहान-सहान ते मोठे प्रश्न सोडविण्याची क्षमता संपूर्ण समाजात (व्यक्ती, कुटुंब, शिक्षण संस्था, .. ते देश अशा प्रत्येक पातळीवर) बाणविण्याचे प्रयत्न सातत्याने केले पाहिजेत. आपण आपल्या परीने मनातील ‘शत्रुबुद्धीचा विनाश’ जाणीवपूर्वक करत राहिले पाहिजे. त्यामुळेच जगातील कुणाही सैनिकाला हकनाक बलिदान करावे लागणार नाही. यापेक्षा दुसरी कोणती चांगली आदरांजली आपण आज मृत सैनिकांना वाहू शकतो\n– प्रकाश बुरटे, पुणे\nशत्रू-देशातल्या कलाकार, खेळाडू आणि नागरिकांच्याही सवलती तात्काळ बंद कराव्यात\n‘जागतिक परिस्थिती लक्षात घेता पाकिस्तानबरोबर जे काही करावयाचे, ते आपणास आपल्याच जबाबदारीवर करावे लागणार.’ – हे म्हणणे (अग्रलेख: भावनाकांडाचे भय, १८ फेब्रु.) पटले. मात्र आपण अगदी संपूर्णपणे आपल्या जबाबदारीवर, आपल्या अखत्यारीत ज्या आणि जेवढय़ा गोष्टी करू शकतो, त्याही आजवर केलेल्या नाहीत, हे खेदाने नमूद करावे लागेल. त्यापैकी काही गोष्टी अशा :\n(१) सध्या पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा मिळवण्याचे वेगवेगळे सुमारे दहा पर्याय / प्रकार उपलब्ध आहेत. पाकिस्तानी नागरिकांना विविध प्रकारचे व्हिसा देण्याचे धोरण ‘भारत पाकिस्तान व्हिसा करार- २०१२’ नुसार (वेळोवेळी केलेल्या सुधारणांसहित) राबवले जाते. यामध्ये व्हिजिटर्स व्हिसा, मेडिकल व्हिसा, स्टुडंट व्हिसा, बिझिनेस व्हिसा, दीर्घ मुदतीचा बिझिनेस व्हिसा, कॉन्फरन्स व्हिसा, असे वेगवेगळे प्रकार आहेत. अशा प्रत्येक व्हिसामध्ये इथल्या वास्तव्याची निश्चित मुदत असते. मात्र दिलेल्या मुदतीनंतर व्हिसाधारक परत गेला की नाही, हे निश्चित करणारी यंत्रणा म्हणावी तशी प्रभावी नाही. याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिसावर ठरावीक मुदतीसाठी आलेले पाकिस्तानी नागरिक त्या विशिष्ट मुदतीनंतर परत गेले की नाही, हे निश्चित करणे अवघड आहे. त्याचप्रमाणे येणारे लोक जरी स्वतच दहशतवादी नसले, तरी- त्यांच्याशी संबंधित, किंवा सहानुभूती बाळगणारे, या ना त्या प्रकारे त्यांना मदत करणारे – असू शकतात. ते तसे नसल्याची शहानिशा करणारी कुठलीही यंत्रणा आपल्याला उपलब्ध नाही. यावर उपाय म्हणजे, सध्यातरी पाकिस्तानी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा व्हिसा देणे पूर्ण बंद करावे. आपले आणि पाकिस्तानचे गेल्या ७० वर्षांचे संबंध लक्षात घेता, कोणीही आपल्यावर पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्याची सक्ती करू शकत नाही. सुरक्षिततेच्या कारणावरून आपण ते निश्चितपणे नाकारू शकतो.\n(२) ‘व्हिजिटर्स व्हिसा’मध्ये पाकिस्तानी कलाकारांना दिले जाणारे परवाने – ज्यांत व्यावसायिक / व्यापारी सादरीकरणाचे (कमर्शिअल परफॉर्मन्स) परवाने देखील येतात. सध्याची पाकिस्तानची एकूण स्थिती लक्षात घेता तिथल्या कलाकारांना भारतीय व्हिसावर इथे येऊन इथे व्यापारी सादरीकरण करणे, हे निश्चितच फायद्याचे आहे, हे उघड आहे. परदेशी कलाकार जेव्हा इथे येऊन काम करतो, किंवा आपली कला सादर करतो, तेव्हा परत मायदेशी गेल्यावर अर्थातच तो त्या उत्पन्नावर कर भरतो. पाकिस्तान सरकारला कररूपाने मिळणारा हा पसा तिथल्या लष्कराला उपलब्ध होतो आणि अर्थात पुढे हा पसा काश्मिरात किंवा अन्यत्र दहशतवाद पुरस्कृत कण्यासाठी वापरला जाऊ शकतो.\n(३) गेल्या अनेक वर्षांची पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांची परंपरा, पाक नागरिकांना मानवतावादी () दृष्टिकोनातून ‘मेडिकल व्हिसा’ देऊन त्यांना इथे वैद्यकीय सुविधा माफक खर्चात उपलब्ध करून देण्याच्या आपल्या धोरणाच्या आड कधीच आलेली नाही) दृष्टिकोनातून ‘मेडिकल व्हिसा’ देऊन त्यांना इथे वैद्यकीय सुविधा माफक खर्चात उपलब्ध करून देण्याच्या आपल्या धोरणाच्या आड कधीच आलेली नाही युरोप वा अमेरिकेच्या तुलनेत भारतात मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा निश्चितच स्वस्त, शिवाय दर्जेदारही असतात. मुंबई, दिल्ली, चेन्नई येथील मोठमोठय़ा रुग्णालयांत हार्ट सर्जरी, यकृत / किडनी प्रत्यारोपण अशा शल्यक्रिया पाकिस्तानी नागरिक मोठय़ा प्रमाणावर करून घेतात. ऑगस्ट २०१६ मध्ये ‘द डॉन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार दिल्लीच्या अपोलोसारख्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या त्यावेळी दरमहा ५०० इतकी होती. जे राष्ट्र गेली अनेक वर्षे आपल्याशी केवळ शत्रुत्वच निभावत आहे, त्या राष्ट्राच्या नागरिकांना अशी ‘मानवता’ दाखवणे खरेच योग्य आहे का, हे तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे.\n(४) क्रीडाक्षेत्रात- विशेषत क्रिकेटमध्ये- भारत वि. पाक सामन्यांचे ‘व्यापारी मूल्य’ इतर कोणत्याही दोन देशांतील सामन्यांपेक्षा अधिक अशा परिस्थितीत जर भारताने (भारतीय खेळाडूंनी) पाक विरुद्ध क्रिकेट सामने खेळणे बंद केले, तर त्याचा आर्थिक फटका पाक खेळाडूंना व पर्यायाने पाकिस्तानला जास्त बसेल. आणि ही बाब तर, सर्वस्वी भारतीय खेळाडूंच्या / भारत सरकारच्या अखत्यारीत आहे. कोणीही आपल्याला आपल्या मर्जीविरुद्ध एखाद्या देशाशी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायला भाग पाडू शकत नाही.\n(५) उदारमतवादी विचारवंतांकडून बरेचदा अशी भूमिका घेतली जाते, की क्रीडा, कला, साहित्य, संस्कृती, ही क्षेत्रे फार वेगळी, ‘उच्च पातळी’()वरची असून, त्यामुळे ती क्षेत्रे राजकीय वादांपासून अलिप्त ठेवावीत. परंतु हे लक्षात घ्यावे लागेल, की खेळाडू, कलाकार, साहित्यिक, कोणीही जरी झाला, तरी तो त्या त्या देशातच राहतो, तेथील शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य, फळे, भाजीपालाच खातो. आणि अर्थात त्या देशाचे सैनिकच देशाचे – म्हणजे पर्यायाने – त्याचे संरक्षण करत असतात. पाकिस्तानकडून आपले सैनिक रोजच्या रोज मारले जात असताना – ‘आम्ही खेळताना समोरचा खेळाडू कोणत्या देशाचा, ते बघत नाही, बघणार नाही’ – ही भूमिका अजिबात पटणारी नाही.\nभारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी जगात कुठेही खेळल्यास तो भारतीय सनिकांच्या हौतात्म्याचा अवमानच ठरेल. त्याचप्रमाणे पाकिस्तानी कलाकारांना कुठल्याही प्रकारे संधी देणारा भारतीय निर्माता, दिग्दर्शक देशाच्या शत्रूला मदत करणारा गद्दारच ठरेल.\n(६) पाकिस्तानातील सामान्य नागरिक भारताशी मित्रत्वाचेच संबंध ठेवू इच्छितो, असेही सांगितले जाते. इथे हे लक्षात घ्यावे लागेल, की पाकिस्तानातील सामान्य नागरिकाला काय वाटते, याला पाक राजकारणात काडीमात्र महत्त्व नाही. पाकिस्तानचे भारतविषयक धोरण हे पूर्णपणे तेथील लष्करच ठरवते, आणि ते गेली सत्तर वर्षे सातत्याने शत्रुत्वाचेच राहिलेले आहे, मग तिथे सरकार कोणत्याही पक्षाचे असो. त्यामुळे पाकिस्तानातील सामान्य नागरिकांच्या तथाकथित भारत प्रेमाचे गोडवे गाणे अप्रस्तुत आहे. पाक नागरिकांविषयी भारतीय लोक दाखवत असलेली मानवता, सौहार्द, मित्रत्व, हे अखेरीस तिथल्या भारतद्वेष्टय़ा सत्ताधीशांना (लष्कराला)च उपयोगी पडून त्याबदल्यात भारताला मात्र मृत जवानांच्या शवपेटय़ाच मिळत आल्या आहेत. थोडक्यात, पाकिस्तान विरुद्ध जे जे करणे पूर्णपणे आपल्या अखत्यारीत आहे, ते तरी निदान ताबडतोब करावे. आपण जगाकडून ‘पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करावे’ ही अपेक्षा करतो. पण आपण स्वत: तरी त्याला ‘दहशतवादी देश’ म्हणून कुठे वागवतो आहोत तो दहशतवादाला पुरस्कृत करणारा, सक्रिय पाठिंबा देणारा शत्रू देश असल्याने त्याला दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी सवलती तात्काळ बंद कराव्यात.\n– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (मुंबई)\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा पुनर्विचार होणे गरजेचे\n‘गाई जेव्हा मतेही खातात..’ हा राजेंद्र सालदार यांचा लेख (२१ फेब्रु.) वाचला. त्यातील सर्वच मुद्दे महत्त्वाचे आहेत. ‘भावनिक निर्णय घेतले जातात, मात्र त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होतात’ या विसंगतीचे मूळ शोधणे आवश्यक आहे.\nसंविधानातील अनुच्छेद ४८च्या दोन भागांतच विसंगती दिसून येते-\nअ) सरकारने आधुनिक व वैज्ञानिक पायावर शेती व पशुसंवर्धन संघटित करण्याचा प्रयत्न करावा. चांगल्या जनावरांच्या पैदाशीची जपणूक व सुधारणा करण्यासाठी (तसेच)\nब) आणि गाई, वासरे, दुभती जनावरे तसेच शेतीकामाची जनावरे यांच्या हत्येला प्रतिबंध करण्यासाठी योग्य ती पावले टाकावीत.\nआधी ‘पैदाशीची जपणूक व सुधारणा’, त्यानंतर ‘हत्येला प्रतिबंध’ या दोन उद्दिष्टांत ‘आणि’ हे उभयान्वयी अव्यय असल्यामुळे ते स्वतंत्र उद्देश होतात. (अ) हा भाग निखळ आधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून पशुसंवर्धन करण्याची योजना मांडतो आणि (ब) हा भाग आधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार न करता हत्येला प्रतिबंध करण्याची ताठर भूमिका घेतो, असा त्या दोन भागांत परस्परविरोध आहे.\nमनमानी करण्याची शासन यंत्रणेस मुभा देणाऱ्या शेवटच्या भागाला महत्त्व देणारे निर्णय संविधानातील अनुच्छेद १४, २५, ५१अ इत्यादी तरतुदींच्या विरोधात आहेत. ५१अ विधिमंडळ, प्रशासन आणि न्यायसंस्था या आधारस्तंभांवरसुद्धा पूर्णपणे बंधनकारक आहेत.\n‘देशातील सर्व भाकड गाई सांभाळायच्या झाल्या, तर सरकारची हजारो कोटींची तरतूदही कमी पडेल’ हे वास्तव बघता, गाईंचा प्रतिपाळ हे ‘स्वयं-पोषक’ असल्याचा भंपकपणा तसेच शेण-गोमूत्र हे रत्नांची आणि पैशाची खाण हे बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट होते.\nपशु-संवर्धन न होता पशु-‘विध्वंस’ होत आहे आणि शेतकऱ्यांचे आणि संपूर्ण राष्ट्राचे आर्थिक स्वास्थ्य संकटात येत आहे, त्यामुळे हत्येला असमंजस आणि अवाजवी प्रतिबंध करण्याच्या अपरिवर्तनीय, ताठर भूमिकेपेक्षा ‘वैज्ञानिक पायावर शेती व पशुसंवर्धन’ या तत्त्वाला महत्त्व मिळण्यासाठी संविधानातील अनुच्छेद ४८ बाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निर्णयांचा पुनर्विचार होणे ही तातडीची गरज आहे.\n– राजीव जोशी, नेरळ\nसौदीचे सारे काही राष्ट्रहितासाठी..\n‘पाकिस्तानचे नाव न घेताच दहशतवादाविरोधात मतैक्य..’ ही बातमी (२१ फेब्रु.) वाचली. यावरून भारत आणि सौदीचे दहशतवादविरोधात एकमत झाले आहे असे जरी गृहीत धरले, तरी त्याच्या एक दिवस आधीबातमी वाचण्यात आली की, सौदी पाकिस्तानमध्ये २० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. मग प्रश्न असा आहे की, सौदी हा भारत आणि पाकिस्तानसोबत संबंधांमध्ये समतोल साधू इच्छितो का तर याचे उत्तर होकारार्थी असेल. कारण त्याला दोन्ही देश महत्त्वाचे आहेत.\n१९९९ मध्ये जेव्हा पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध लादण्यात आले, तेव्हा सौदीने अमेरिकेच्या र्निबधाला थारा न देता पाकिस्तानला मदत केली. दुसरी बाब अशी की, इम्रान खान निवडून आल्यावर म्हणतात की, चीन आणि सौदी हे आमचे जिवलग मित्र आहेत. तिसरी बाब अशी की, दोन्ही देश सुन्नी पंथाचे आहेत. शेवटची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता आणि तो हल्ला पाकपुरस्कृत दहशतवाद्यांकडून करण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तान आणि इराणचे संबंध खूप ताणले गेले. यावरून सौदी हा इराणचा शत्रू आणि पाकसुद्धा इराणचा शत्रू आणि यामुळे पाकिस्तान आणि सौदीला जवळीक साधण्यास अजून एक संधी मिळाली. आता भारत-सौदी नाते बघितल्यास भारत हा सौदीकडून प्रचंड प्रमाणात तेल आयात करतो आणि यामुळे सौदीला भारत महत्त्वाचा आहे. तसेच २.७ दशलक्ष भारतीय सौदीमध्ये राहतात. सौदीच्या अर्थव्यवस्थेत त्यांचे मोठे योगदान आहे. आपल्याकडून तेथे हज यात्रेस १.७५ लाख लोक दर वर्षी जातात आणि या हज यात्रेमुळे सौदीला प्रचंड पैसा मिळतो.\nमग एकीकडे मोहम्मद बिन सलमान इम्रान खानची गळाभेट घेतो, दुसरीकडे मोदींचीही गळाभेट घेतो, कारण आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणीही कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो. कायमचे काही असेल तर ते म्हणजे हित आणि सलमानचे हित दोन्ही देशांमध्ये असल्यामुळे एकीकडे पाकिस्तानशी मैत्री आणि इम्रानला गळाभेट, तर दुसरीकडे इथे येऊन दहशतवादावर टीका. यालाच म्हणतात की खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. कारण सर्व जगाला माहीत आहे दहशतवादाचे मूळ पाकिस्तान आहे आणि हे फक्त सलमानला दिसत नाही. कारण इतकेच की राष्ट्रीय हित.\nमोईन अब्दुल रहेमान शेख, दापचरी (पालघर)\nज्यांचे आमदार जास्त त्याच पक्षाचा मुख्यमंत्री\n‘मुख्यमंत्रिपदावरून युतीत कलगीतुरा’ ही बातमी (२१ फेब्रु.) वाचली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात की, ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, तर पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणतात की, हे पद अडीच-अडीच वर्षे वाटून घेतले जाईल, नाही तर युती तोडण्यात येईल. याअगोदर युतीचे सरकार होते त्या वेळी ज्यांचे आमदार जास्त त्याच पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र ठरले होते. मनोहर जोशी व नंतर नारायण राणे मुख्यमंत्री होते व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते, कारण त्या वेळी शिवसेनेचे आमदार भाजपपेक्षा जास्त होते. कदमांच्या मते अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेतल्यावर निवडून आलेल्या आमदारांमधली पक्षबदलू वृत्ती बदलेल. ज्याची वैचारिक मते पक्की आहेत ती कितीही राजकीय भूकंप झाले तरी स्थिर असतात. जेथे संधिसाधू वृत्ती किंवा वैचारिक मतभिन्नता झालेली असेल तिथेच पक्ष बदलून दुसरीकडे जाण्याचा विचार होऊ शकतो. म्हणून त्यासाठी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद असण्याचे कारण वाटत नाही. कदमांच्या वक्तव्यामुळे निवडून आल्यानंतर लोकांचे हित जपण्यापेक्षा स्वत:चा स्वार्थच जास्त वाटतो.\n– अजित परमानंद शेटय़े, डोंबिवली\n‘मुख्यमंत्रिपदावरून युतीत कलगीतुरा’ ही बातमी वाचली. शिवसेना-भाजप युतीची घोषणा होऊन दोन दिवसही उलटले नाहीत, तोच या दोन पक्षांच्या नेत्यांत वाद सुरू झाले. खरे तर विधानसभेच्या निवडणुकीला अजून आठ महिने बाकी आहेत. आधी लोकसभेची निवडणूक होऊ द्या. आतापासूनच मुख्यमंत्रिपदाचा वाद कशाला हे म्हणजे ‘बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी’ यातला प्रकार आहे. २०१४ सालात लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली होती. नंतर विधानसभेच्या निवडणुका दोघेही स्वतंत्र लढले होते व नंतर सत्तेसाठी एकत्र आले होते, हे पुढारी विसरले असले तरी मतदार विसरलेले नाहीत.\n– अनंत आंगचेकर, भाईंदर\n‘मुख्यमंत्रिपदावरून युतीत कलगीतुरा’ ही बातमी वाचली. हा सारा प्रकारच हास्यास्पद वाटतो. कारण अजून निवडणुका व्हायच्या आहेत, कुणाला किती जागा मिळणार, कोणाचे सरकार येणार हे पण अजून निश्चित नाही, तरीही दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून कलगीतुरा रंगला हे म्हणजे ‘उतावीळ नवरा, गुडघ्याला बाशिंग’ असे झाले आहे. त्यातच शिवसेनेच्या मंत्र्यांना जरा जास्तच मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत. पण एवढा आततायीपणा कशासाठी जनतेमध्ये आपला पक्ष सत्तेसाठीच हपापलेला आहे, असा संदेश जाईल याचे तरी भान या नेत्यांनी ठेवले पाहिजे.\n– राजू केशवराव सावके, तोरनाळा (वाशिम)\n’ हा अन्वयार्थ (२१ फेब्रु.) वाचला. अनिल अंबानी यांची आर्थिक क्षमता व विमाननिर्मितीसारख्या क्षेत्रात योग्य तो अनुभव नसताना यांना राफेल विमानाचे कंत्राट देण्यात आले. अशा अननुभवी कंपनीच्या मदतीने बनवलेली राफेल विमाने आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेच्या योग्यतेची असतील काय, हा मोठा प्रश्न आहे. अंबानीसारख्या उद्योगपतीवर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे प्रकरण गाजत आहे. त्यांच्याकडे पत, विश्वसनीयता, विमाननिर्मितीच्या कामाचा अनुभव नाही. या कारणावरून दसॉने त्यांच्या कंपनीशी केलेला करार मोडीत काढावा.\n– विजय लोखंडे, भांडुप (मुंबई)\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला पेण, पनवेल, अलिबाग, वसई इत्यादी क्षेत्र विकासकामांसाठी देण्यात आले. विकासकामे आली म्हणजे या क्षेत्रातील जागांचे भावही वाढणार. यात मुख्यत्वे बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग तसेच विमानतळ, उद्योगधंदे, मेट्रोच्या नवनव्या प्रकल्पांत वाढ होणार. एमएमआरडीएने जिथे विकासकामात हात घातला आहे तिथे पर्यावरणाचे प्रचंड नुकसानही झाले आहे. मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले. विहिरी, तलाव, डोंगर, टेकडय़ा कशालाही विकासकामाच्या आड येऊ दिले नाही. त्याचेच उदाहरण मुंबईत दिसते आहे. मुंबईकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मेट्रो हे फलक जागोजागी दिसत आहेत आणि आता विकासकामाचे क्षेत्र आणखी वाढले. त्यामुळे विकासकामांबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याकडेही एमएमआरडीएने लक्ष द्यावे.\n– मयूर प्रकाश ढोलम, जोगेश्वरी (मुंबई)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 लाभांश गृहीत धरणे गैर\n2 युती झाली, आता विकासाकडे लक्ष द्या..\n3 नक्षलवाद्यांनी निराळे काय केले आहे\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-in-konkan-2-1746516/", "date_download": "2020-09-26T01:59:41Z", "digest": "sha1:UDZGPH3CB5GTGHGDLWX2PI573ZMZT24M", "length": 19830, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BJP in Konkan | कोकणात भाजपचा भरवसा आयारामांवर! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nकोकणात भाजपचा भरवसा आयारामांवर\nकोकणात भाजपचा भरवसा आयारामांवर\nकोकणात या पक्षाचा भरवसा आयारामांवरच राहील\nलोकसभा निवडणुकांना आता अवघे सात-आठ महिने शिल्लक राहिले असल्याने कोकणात सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी स्वत:च्या पक्षाबरोबरच संभाव्य प्रतिस्पध्र्याची चाचपणी, तालुकावार, विभागवार बैठका, कार्यकर्त्यांची जुळणी इत्यादी गोष्टी सुरू केल्या आहेत. यामध्ये भाजपही यावेळी सक्रिय झाला असला तरी कोकणात या पक्षाचा भरवसा आयारामांवरच राहील, असं सध्याचं चित्र आहे.\nकोकणात रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्य़ाचे गुहागर व दापोली तालुके मिळून रायगड लोकसभा, तर उर्वरित रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा दुसरा लोकसभा मतदारसंघ असे कोकणात दोन मतदारसंघ आहेत. यापैकी रायगड जिल्हा कोकणचा भाग असला तरी या जिल्ह्य़ाचे राजकीय-सामाजिक-आर्थिक चित्र पूर्वीपासूनच वेगळं आहे. त्या तुलनेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एकजिनसी आहेत. मात्र त्यांची राजकीय संस्कृती भिन्न राहिली आहे.\nया मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत भाजप-सेना युतीचे उमेदवार विनायक राऊत काँग्रेस आघाडीचे तत्कालीन खासदार नीलेश राणे यांचा सुमारे दीड लाख मतांनी पराभव करून निवडून आले. पण गेल्या पाच वर्षांत राज्याच्या अन्य भागांप्रमाणे इथलीही राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यातला महत्त्वाचा बदल म्हणजे, २००५ ते २०१७ ही सुमारे बारा र्वष काँगेसच्या सत्तेची उब घेत राहिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसचा त्याग केला आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वळचणीला नेऊन ठेवला. नीलेश आणि नीतेश या दोन चिरंजीवांपैकी नीलेशनी ‘स्वाभिमान’चा झेंडा खांद्यावर घेतला, तर पक्षांतरबंदी कायद्याच्या धाकापायी नीतेश तांत्रिकदृष्टय़ा अजून काँग्रेस पक्षातच राहिले आहेत. राणेंना भाजपाने राज्यसभेवर सामावून घेतलं असलं तरी या दोन ‘छाव्यां’च्या राजकीय भवितव्याची चिंता त्यांना सतावत आहे. म्हणूनच आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर गेल्या महिन्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात राणेंनी तालुका पातळीवर ‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन नीलेशसाठी मतांचा जोगवा मागितला. भाजपने पाठिंबा दिला नाही तर या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची राणेंची ताकद नक्कीच नाही. पण लोकसभेसाठी आवाज टाकत त्यापाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्वत:च्या परंपरागत मालवण मतदारसंघातून नीलेशसाठी जोर लावण्याची रणनीती या मेळाव्यांमधून दिसत आहे.\nमागच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रामध्ये मित्रपक्षांशी आघाडी असली तरी स्वत:ही स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत तशा यशासाठी खूप झगडावं लागेल, असं सध्याचं चित्र आहे. मागील निवडणुकीप्रमाणे याही वेळी शिवसेनेशी युती झाली (तसं होण्याची दाट शक्यता आहे) आणि विद्यमान खासदारांनाच पुन्हा तिकीट देण्याचा निर्णय झाला तर या मतदारसंघापुरता भाजपचा सुटेल. पण या पक्षाचे नेते सध्या डरकाळ्या फोडत आहेत तसा खरंच ‘एकला चलो’चा मार्ग स्वीकारला तर फार काही हाती लागण्याची शक्यता नाही. पक्षाचे या मतदारसंघाचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या कार्यकारिण्यांच्या स्वतंत्र बैठका नुकत्याच घेऊन संयुक्त ‘गाभा समिती’ही स्थापन केली आहे. पण खरंच स्वबळावर लढण्याची वेळ आली तर या दोन जिल्ह्य़ांमध्ये मिळून असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकही आमदार नसलेल्या, जिल्हा परिषदा किंवा नगर परिषदांमध्येही फारशी ताकद नसताना लोकसभेची निवडणूक जिंकण्याचा चमत्कार भाजपचा उमेदवार कसा करू शकेल, या प्रश्नाचं उत्तर लाड यांनी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जिंकलेल्या जागांची आकडेवारी (ज्यावर सर्वच प्रमुख पक्ष हक्क सांगत असतात) पत्रकार परिषदेत तोंडावर फेकत दिलं. या पक्षामध्ये केंद्रीय नेतृत्वापासून असलेलं रेटून बोलण्याचं तंत्र त्यांनी चांगल्या प्रकारे आत्मसात केल्याचं या पत्रकार परिषदेतल्या एकूणच प्रश्नोत्तरांवरून जाणवलं. पण प्रत्यक्ष निवडणुकीचा विचार केला तर ही बेडकी किती फुगणार, याचा अंदाज त्यांच्यासह पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना असावा, अशी अपेक्षा आहे. पक्षाच्या मर्यादांपलीकडे जाऊन स्वत:ची स्वतंत्र प्रतिमा निर्माण केलेले केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना भाजपने इथून उमेदवारी दिली तर चित्र थोडंसं बदलू शकतं. पण ते विजयामध्ये रूपांतर करू शकेल का, याबाबत शंका आहे. त्यामुळे इथे बलवान असलेल्या सेनेला तोंड द्यायचं असेल तर त्यांच्यासह अन्य पक्षातल्या नाराज-असंतुष्टांना ओढण्याशिवाय भाजपला पर्याय नाही. किंबहुना त्यासाठीच लाड यांची प्रभारीपदी नियुक्ती झाली असावी, असं मानण्यास जागा आहे.\nलोकसभा निवडणुकीपुरती का होईना, भाजपा-सेना युती झाली तर सेनेचे विद्यमान खासदार राऊत यांना मागील विजयाची पुनरावृत्ती करणं फार अवघड जाऊ नये. भाजपाने स्वतंत्र उमेदवार दिला तर त्यांना बऱ्यापैकी कष्ट घ्यावे लागतील. पण या मतदारसंघात काँग्रेसचं अस्तित्व औषधापुरतंसुद्धा नाही आणि रत्नागिरी जिल्ह्य़ाचा उत्तर भाग वगळता राष्ट्रवादीही उरलेली नाही. त्यामुळे काँग्रेस आघाडीला उमेदवार मिळण्यापासूनच अडचणी आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला वातावरण अनुकूल असलं तरी दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये आमदारांच्या पातळीवरचा एकोप्याचा अभाव आणि निष्ठावंतांच्या कोंडमाऱ्यावर उपाय करावा लागेल. अन्यथा भाजप गळ टाकून बसलेलाच आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 पाच कोटींचे स्वस्त धान्य अधिकाऱ्यांसह दलालांनी पचविले\n2 चंद्रपूर वीज केंद्राचा १७५ कोटींचा प्रकल्प रखडला\n3 ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ नाही ‘भाजपा वालो से बेटी बचाओ’ : अशोक चव्हाण\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/sushant-singh-rajputs-brother-in-law-announce-nepometer-to-fight-nepotism-mppg-94-2203914/", "date_download": "2020-09-26T03:22:08Z", "digest": "sha1:AGJXBRHYOVMHL5CZAEVR5MQVI7SXODNH", "length": 12133, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sushant Singh Rajputs brother in law announce Nepometer to fight nepotism mppg 94 | सुशांतच्या मेहुण्याचा घराणेशाहीवर ‘नेपोमीटर’ने हल्लाबोल | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nसुशांतच्या मेहुण्याचा घराणेशाहीवर ‘नेपोमीटर’ने हल्लाबोल\nसुशांतच्या मेहुण्याचा घराणेशाहीवर ‘नेपोमीटर’ने हल्लाबोल\nबॉलिवूडमधील कुठला कलाकार कोणाचा नातेवाईक आता 'नेपोमीटर' सांगणार\nअभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात आवाज उठवला जात आहे. स्टार किड्सवर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान सुशांतचा मेहुणा विशाल किर्ती याने या घराणेशाहीविरोधात लढण्यासाठी एक ‘नेपोमीटर’ तयार केल्याची घोषणा केली आहे. हा मीटर घराणेशाहीशी दोन हात करेल असा दावा त्याने केला आहे.\nविशाल किर्तीने ट्विट करुन या नेपोमीटरची माहिती दिली. विशालचा भाऊ मयुरेष कृष्णा याने हा नेपोमीटर तयार केला आहे. हा मीटर एक प्रकारे बॉलिवूड चित्रपटांचे रिव्ह्यू देण्याचे काम करेल. प्रामुख्याने घराणेशाहीच्या आधारावर हा मीटर बॉलिवूड चित्रपटांची रेटिंग ठरवेल. असं विशाल किर्ती याने सांगितलं आहे. सध्या या मीटरवर काम सुरु आहे. येत्या काळात त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.\nसुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला वैतागून आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्साळींची होणार पोलिसांकडून चौकशी\n करिअरमधल्या पहिल्याच चित्रपटाच्या साइन केलेल्या रकमेतून केली मदत\n3 “होय गौरवर्णीय असल्याचा फायदा मिळाला”; वर्णद्वेषाच्या आरोपांवर अभिनेत्रीने सोडलं मौन\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/new-thane-proposal-approved-in-after-huge-uproar-by-ncp-bjp-1792010/", "date_download": "2020-09-26T03:29:54Z", "digest": "sha1:PNOVNYI3J3NPRK6PD4VFSTIYJQMUZXLI", "length": 12835, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "New Thane proposal approved in after huge uproar by ncp bjp | अभूतपूर्व गोंधळात ‘नवे ठाणे’ प्रस्ताव मंजूर | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nअभूतपूर्व गोंधळात ‘नवे ठाणे’ प्रस्ताव मंजूर\nअभूतपूर्व गोंधळात ‘नवे ठाणे’ प्रस्ताव मंजूर\nअभूतपूर्व गोंधळात हा प्रस्ताव मंजूर केल्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.\nठाणे : ठाण्यातील घोडबंदर खाडीपलीकडे असलेल्या भिवंडी तालुक्यातील गावांमध्ये नवे ठाणे वसविण्याच्या प्रस्तावावर चर्चेनंतरच निर्णय घेण्याची मागणी राष्ट्रवादीसह भाजपने सोमवारच्या सर्वसाधारण सभेत केली. मात्र सत्ताधारी शिवसेनेने ती मागणी फेटाळून लावत अभूतपूर्व गोंधळात हा प्रस्ताव मंजूर केल्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.\nघोडबंदरच्या खाडीपल्याड आणि उल्हास नदीच्या किनारी भिवंडी तालुक्यातील गावांचा विशेष नगर नियोजनातून विकास करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. त्यामध्ये खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या गावांचा समावेश आहे. सोमवारी सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर केला किंवा नामंजूर केला तरी या भागाचा विकास होणारच आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेला एकही पैसा खर्च करावा लागणार नसून या योजनेत सहभागी झाल्यास ठाण्याचे नाव होईल, असे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सभागृहात सांगितले. ठाणे शहरामध्ये ८० जागांचा विकास झाला असून आता विकासासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. शासनाची घरे उभारणीची योजनाही भविष्यात राबवावी लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे शहर विकास विभागाचे अधिकारी प्रमोद निंबाळकर यांनी सभागृहात सांगितले. मात्र, त्यानंतरही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी प्रस्तावासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. या भागाचा विकास आराखडा तयार करताना एमएमआरडीएने काही परिसर का वगळला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच सर्व शंका दूर झाल्यानंतर प्रस्तावावर निर्णय घेण्याची मागणी केली. मात्र, सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर करण्याचा आग्रह धरला. विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील आणि भाजपचे गटनेते नारायण पवार, मिलिंद पाटणकर यांनी प्रस्तावावर चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्याची मागणी केली. सभेची वेळ संपत आल्यामुळे हा प्रस्ताव तहकूब करण्याची मागणी केली. त्यावरून सभागृहात निर्माण झालेल्या गोंधळात शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n2 उल्हासनदीच्या पाण्यावर टँकरमाफियांचा डल्ला\n3 ६० रिकाम्या इमारतींवर हातोडा\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/maharashtra-marathi-language-bhagat-singh-koshyari/", "date_download": "2020-09-26T01:10:09Z", "digest": "sha1:KNG7XKTJDFTTV5QRYR2TLI2V2BT5GV6W", "length": 16371, "nlines": 163, "source_domain": "www.saamana.com", "title": "महाराष्ट्रात मराठी यायलाच हवे! राज्यपाल कोश्यारी यांच्या कानपिचक्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोल्हापूर – 84 लाखांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला अटक\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nमहाराष्ट्रात मराठी यायलाच हवे राज्यपाल कोश्यारी यांच्या कानपिचक्या\nइंग्रजी भाषेचा वापर करायला हरकत नाही, मात्र स्थानिक भाषांचा वापर होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. महाराष्ट्रात मराठी यायलाच हवी, अशी स्पष्ट भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मांडली. मराठी भाषेवरून सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी राज्यपालांनी कानपिचक्या दिल्या.\nगुरुवारी २३ व्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल कोश्यारी यांनी मराठीवरून टोला लगावला होता. शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १५वा दीक्षांत\nसमारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी पुन्हा मराठी भाषेचा अग्रही मुद्दा मांडला. या दीक्षांत समारंभात कोणीही मराठीत भाषण केले नाही. यावर राज्यपाल कोश्यारी म्हणाले, मराठीचा अभिमान बाळगा, महाराष्ट्रात मराठी यायलाच हवी.\nपश्चिम बंगालमध्ये गेल्यानंतर एक-दोन वाक्ये जरी बंगाली भाषेत बोलले तरी बंगाली लोक खूश होतात. मी जरी उत्तराखंडमधून आलो असलो तरी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी यायलाच हवी, असे राज्यपाल म्हणाले. विद्यार्थांच्या आयुष्यात पदवी स्वीकारण्याचा क्षण खूप आनंददायी असतो, मात्र पदवी घेणे म्हणजे शिक्षणाचा अंत नाही. यापुढे मोठ्या जोमाने देशाच्या प्रगतीसाठी विद्याथ्र्यांनी काम करावे असे राज्यपालांनी सांगितले. दरम्यान, या दीक्षांत समारंभात ११,४२७ विद्याथ्र्यांना पदवी प्रदान करण्यात आली तर ५४ विद्याथ्र्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.\nमला मराठी बोलता येत नसल्याची खंत\nमातृभाषेचा अभिमान असावा अन् प्रत्येकाने मातृभाषेचा सन्मान करावा. मी महाराष्ट्राचा राज्यपाल झालो हे माझे भाग्य असून मला मराठी भाषा समजते, मात्र बोलता येत नसल्याची खंत आहे. प्रत्येकाला संस्कृत, हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी यासह अन्य भाषाही यायला हव्यात, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.\nभगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडचे आहेत. मात्र ज्यावेळेस त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारली तेव्हापासून त्यांनी मराठी भाषा शिकण्याचा सातत्याने प्रयत्न केला. विधिमंडळाचे अभिभाषणही राज्यपालांनी मराठीतच केले.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nकोल्हापूर – 84 लाखांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला अटक\nया बातम्या अवश्य वाचा\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://atmamaharashtra.org/ManageFunction.aspx", "date_download": "2020-09-26T02:19:33Z", "digest": "sha1:UC3LZ7UO47IOIHCLWRY3PINNC7JEVHWD", "length": 3952, "nlines": 46, "source_domain": "atmamaharashtra.org", "title": "Manage Function", "raw_content": "\nजिल्हा नियामक मंडळ जिल्हा नियामक मंडळ कार्य\nआत्मा व्यवस्थापन समिति आत्मा कार्यकारी समिति कार्य\nआत्मा व्यवस्थापन समितीची कार्ये\nजिल्हातील विविध सामाजिक आर्थिक समुह आणि शेतकरी यांना आसणार्‍या समस्या व अडचणी जाणून घेणे.\nजिल्ह्याचे एकात्मिक संशोधन कृषि विस्तार नियोजन करणे ज्यामध्ये लघु आणि मध्यम स्वरूपाचे तंत्रज्ञान प्रथम प्राधान्याने घेता येईल.\nजिल्हा शेतकरी सल्ला समितीच्या मदतीने वार्षिक कृती आराखडा तयार करणे जो आत्मा नियामक मंडळासमोर आढावा देणेसाठी व आवश्यक बदल करण्यासाठी तथा मंजुरीसाठी ठेवता येईल.\nलेखा परीक्षणासाठी आवश्यक ते प्रकल्प लेखा जतन करणे.\nसहभागी कृषि सलग्न विभाग, प्रादेशिक संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, बिगर सरकारी संघटना, खाजगी संस्था यांच्यात समन्वय ठेऊन वार्षिक कृती आराखडा राबविणे.\nतालुका व गांव पातळीवर शेतकरी माहिती व सल्ला केंद्र स्थापन करणे व त्याद्वारे एकात्मिक कृषि विस्तार व तंत्र ज्ञान प्रसार कार्यक्रम राबविणे.\nनियमित कार्यवाही अहवाल प्रत्यक्ष लक्ष साध्यासह आत्मा नियामक मंडळास पाठविणे जो नंतर कृषि व सहकार मंत्रालयास पाठविला जाईल.\nआत्मा नियामक मंडळाने स्विकारलेली धोरण, गुंतवणुकी संबंधाचे निर्णय व केलेल्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम अंमलबजावणी करणे.\nआत्मा व्यवस्थापन समितीची जिल्ह्यातील विविध तालुक्याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्यात एक आढावा बैठक होणे व सदरील बैठकीचा अहवाल राज्य मुख्यालय कक्षास पाठविणे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mazespandan.com/2019/10/", "date_download": "2020-09-26T02:53:33Z", "digest": "sha1:J64TBENDBQDAMQ6NUKTXVZ7CAG6CJI56", "length": 68399, "nlines": 288, "source_domain": "mazespandan.com", "title": "October | 2019 | स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\n१) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये \nउत्तर: ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.\n२) स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये\nउत्तर: ही सौभाग्य देणारी आहे म्हणून.\n३) देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी\nउत्तर: ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी .\n४) शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी\nउत्तर: शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात .त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून.\n५) एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत \nउत्तर: प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून.\n६) गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये \nउत्तर: हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना बीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून ….\n७) शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत \nउत्तर: शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून ..\n८) निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये \nउत्तर: तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे. म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही. नाहीतर तम तत्व वाढेल. राक्षसी संकटे येतील म्हणून.\n९) देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत \nउत्तर: त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून …\n१०) विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये \nउत्तर: फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून ..\n११) शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये \nउत्तर: शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून…\nसर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनादही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते. सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन…\nदेवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो. शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही. ती हिरण्यगर्भा आहे. ती प्रसूति वैराग्य आहे..\n१२) आपली जपमाळ व आसन कधीही दुस-यास वापरण्यास का देवू नये \nउत्तर: त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते. ते दुस-यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो.\n१३) देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे\nउत्तर: हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत .\nमध्यमा-स्वतः/अनामिका -देव/करंगळी -ऋषी /\nम्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे…\n१४) समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत\nउत्तर: विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून..\n१५) अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये\nउत्तर: पितराना दोष लागतो म्हणून..\n१६) उंब-यावर बसून का शिंकू नये\nउत्तर: उबरा हा मुळात बसण्यासाठी नाही तेथे सर्वतिर्थे बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकुन घडतो म्हणून….. घडल्यास पाणी शिंपडावे……\n१७) निजलेल्या माणसास का ओलांडून जावू नये\nउत्तर: झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून ..\n१८) मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये\nउत्तर: प्रेत प्रेतच राहते म्हजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून ..\n१९) रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुस-यास का देवू नयेत \nउत्तर: याच्यात करणीतत्व आहेत. आकर्षण क्रिया पटकन होते व बळीतत्त्व आहे म्हणून ….\n२०) सायंकाळी केर का काढु नये\nउत्तर: लक्ष्मीला आवडत नाही .\nलक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते…\n२१) रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा.\nउत्तर: शव= शिव म्हणून नमस्कार करावा….\n२२) कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे \nउत्तर: येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते…\n२३) एका हाताने देवाला नमस्कार का करू नये.\nउत्तर: दश इन्द्रियाचा नमस्कार मह्त्वाचा असतो . पंचतत्त्वाचा नाही …\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nThis entry was posted in आध्यात्मिक, कुठेतरी वाचलेले.., जरा हटके and tagged beautiful, blogs, marathi blog katta, marathi blogs katha, marathi blogs list, marathiblogs, whatsapp, आध्यात्मिक, आपली जपमाळ, करंगळी, तेजाच्या लहरी स्पंदने, बासरी, मराठी, मराठी अवांतर वाचन, मराठी कथा, मराठी कविता, मराठी भाषा, मराठी विचार, माझे स्पंदन, रसिक, लेख, लेखन, विषम तत्व, शक्तीस्वरुप, शाळीग्राम, सात्विक लहरी, स्पंदन on October 15, 2019 by mazespandan.\nवयाच्या 44 व्या वर्षी सोशल मीडियामुळे तिची 38 वर्षाच्या त्याच्याशी घट्ट मैत्री झाली. जोडीदार, 2 मुले, सुखी संसार असे समान धागे दोघांत होते तरीदेखील एकमेकांबद्दल अशी ओढ का वाटत होती काही वेळा काहीही कमी नसले तरी काहीतरी का हवं असतं काही वेळा काहीही कमी नसले तरी काहीतरी का हवं असतं मैत्रीच्या पुढे जाऊन त्याने आता तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. तिला खरेतर ते नको वाटत होते. छान मैत्री असेपर्यंत ती बिनधास्त होती पण आता मात्र त्याच्या गोड बोलण्याने तिची द्विधा मनस्थिती होत होती. मनाच्या एका उत्कट क्षणी तिची पावले त्याच्याकडे वळालीच… भर दुपारी 3 वाजता ती त्याला एकांतात भेटायला निघाली… मनातल्या सगळ्या विचारांवर मात करत ती त्याच्याकडे गेलीच… त्याने तिला हळुवार स्पर्श करत हळूच बाहुपाशात ओढली.. आजपर्यंत तिला तिच्या नवऱ्याशिवाय असा स्पर्श कोणीच केला नव्हता… तिने करूनही घेतला नसता.. मग हे ती आज स्वीकारत होती का मैत्रीच्या पुढे जाऊन त्याने आता तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. तिला खरेतर ते नको वाटत होते. छान मैत्री असेपर्यंत ती बिनधास्त होती पण आता मात्र त्याच्या गोड बोलण्याने तिची द्विधा मनस्थिती होत होती. मनाच्या एका उत्कट क्षणी तिची पावले त्याच्याकडे वळालीच… भर दुपारी 3 वाजता ती त्याला एकांतात भेटायला निघाली… मनातल्या सगळ्या विचारांवर मात करत ती त्याच्याकडे गेलीच… त्याने तिला हळुवार स्पर्श करत हळूच बाहुपाशात ओढली.. आजपर्यंत तिला तिच्या नवऱ्याशिवाय असा स्पर्श कोणीच केला नव्हता… तिने करूनही घेतला नसता.. मग हे ती आज स्वीकारत होती का आणि कशासाठी\nतिला आठवला 7 वर्षांपूर्वीचा तो प्रसंग… तिच्या बाळाच्या देखभालीसाठी ठेवलेल्या 20 वर्ष वयाच्या मदतनीस मुलीला आणि आपल्या नवऱ्याला नको त्या अवस्थेत तिने पकडले होते.. खूप उध्वस्त झाली होती ती त्यामुळे.. आपल्यात काय कमी होते म्हणून नवऱ्याने असा अपमान करावा.. ध्यानी मनी नसताना आयुष्याने तिला लाथाडले होते.. नवऱ्याने माफी मागितली, माझा पाय घसरला, परत असे होणार नाही बोलला, त्या मुलीला कामावरून काढले.. परत ती किंवा तशी घटना तिच्या आयुष्यात घडली नाही.. नवरा खूप चांगले वागत होता.. पण तिच्या मनावरचा ओरखडा पुसला गेला नव्हता… काळानुसार थोडा पुसट झाला होता इतकेच… कदाचित यामुळेच कि काय तिची पावले आज या मित्राकडे वळली.. त्याने तिला बेभान होऊन किस करायला सुरुवात केली.. तीही बेधुंद व्हायला लागली.. त्याच्या मिठीत विरघळून जाता जाता कसे कोण जाणे ती एकदम सावध झाली. तिला डोळ्यासमोर सगळे दिसू लागले…. तिचा नवरा, मुले, आई, सासूबाई, बहीण, भाऊ… सगळे काय कुजबुज करत आहेत.. त्याने तिला बेभान होऊन किस करायला सुरुवात केली.. तीही बेधुंद व्हायला लागली.. त्याच्या मिठीत विरघळून जाता जाता कसे कोण जाणे ती एकदम सावध झाली. तिला डोळ्यासमोर सगळे दिसू लागले…. तिचा नवरा, मुले, आई, सासूबाई, बहीण, भाऊ… सगळे काय कुजबुज करत आहेत तिच्याकडे घृणास्पद नजरेने बघत आहेत… आज अण्णा असते तर त्यांनी इकडचा गाल तिकडे केला असता. आणि स्वामी… स्वामी समर्थांपुढे आपण उभे तरी राहू शकू का तिच्याकडे घृणास्पद नजरेने बघत आहेत… आज अण्णा असते तर त्यांनी इकडचा गाल तिकडे केला असता. आणि स्वामी… स्वामी समर्थांपुढे आपण उभे तरी राहू शकू का त्यांच्या नजरेला नजर देऊ शकू का त्यांच्या नजरेला नजर देऊ शकू का खाडकन कानफटात मारल्यासारखी ती भानावर आली.. तिने एकदम त्याचा हात झिडकरला… त्याच्या मिठीतुन स्वतःला सोडवून घेत आपण इथेच थांबूयात म्हणून त्याला विनवूू लागली. तोही तसा धूर्त होता. पहिल्याच प्रत्यक्ष भेटीत थोडे आवरते घेऊ… सगळे एकदम नको म्हणून त्यानेही तिच्या कलाने घेतले. तिने सुटकेचा निश्वास टाकला आणि ती धावत पळत घरी आली. संध्याकाळ होत आली होती. आल्या आल्या ती अंगावरच्या कपड्यानिशी शॉवरच्या थंडगार पाण्याखाली उभी राहिली… कितीतरी वेळ… सगळ्या भावना, लोभ, मोह, इच्छा वाहून जाईपर्यंत… शॉवरच्या पाण्याबरोबर तिचे डोळेही पाझरत होते…. मन आणि शरीर थंडगार होईपर्यंत ती तशीच निथळत होती.\nनंतर शांतपणे आवरून देवघरात आली तो सासूबाईंनी तिला उशीर झाल्यामुळे आधीच दिवा लावला होता आणि तिला तुळशीतला तेवढा लाव ग म्हणाल्या. दिवा घेऊन ती अंगणात तुळशीपाशी आली. पण आज दिवा ठेवताना तिचा हात थरथरत होता. दिवा ठेवताच क्षणी तुळस शहारून आली असे तिला जाणवले आणि ती सुद्धा शहारली. त्याच वेळी तिच्या मनात आले आपल्या नवऱ्याने ‘ती’चूक केली म्हणून आपण हि ‘ती’चूक करायला पात्र आहोत, तो आपला अधिकार आहे असे आपल्याला वाटलेच कसे पण तिच्यावरच्या खोल संस्कारांमुळे तिने हे वाटणे धुडकावून लावले आणि त्याला कधीही न भेटण्याचा तिने निश्चय पक्का केला. घरात येऊन तिने मोबाईलचे नेट ऑन करून त्या मित्राला ब्लॉक करून टाकले… सोशल मीडिया वरून हि आणि मनातूनही…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\n तर सगळ्यात आधी ‘स्वत:वर’ करावं\nहळदीच्या अंगानं कालच उंबरा ओलांडून सासरी आलेली गीता एकीकडे नव्या आयुष्याची गुलाबी स्वप्नं रंगवण्यात दंग तर दुसरीकडे जबाबदारीच्या जाणिवेनं धास्तावलेली. आईबाबांची एकुलती एक लाडकी मुलगी होती. शिक्षणात हुशार, शिवाय खेळ आणि इतर अनेक छंदात चिक्कार गती असलेली. त्यामुळे घरातली कामं, स्वयंपाक याची फारशी सवय नव्हती तिला. हे सगळं शिकायला कधी वेळच नाही मिळाला.\nआता लग्न करून सासरी आल्यावर हे सगळं कसं निभावणार आपल्याच्यानं, याचं चांगलंच टेन्शन आलं होतं तिला. तशी सासरची मंडळी प्रेमळ होती आणि समजूतदारही, पण ताण होताच. शिवाय मुलगी सासरी जायची म्हणून आईनं आणि माहेरच्या जुन्या जाणत्या माणसांनी केलेला खंडीभर उपदेश. सासू-सासर्‍याचं मन जिंकून घे. घरातल्या जबाबदाऱ्या स्वत:हून अंगावर घे. सगळं घर जागं व्हायच्या आधी उठत जा. वगैरे वगैरे.\nआज सकाळी ती जागी झाली ते याच सगळ्याचं ओझं डोक्यावर घेऊन. सगळं घर अजून साखरझोपेत असताना तिनं उठून चहा केला, नास्ता रांधला आणि घर हळूहळू जागं झालं तसतसं सगळ्यांची खातीरदारी करण्यात ती गुंतून गेली. सासूनं तोंड भरून केलेलं कौतुक तिला सुखावून गेलं. नवर्‍याच्या डोळ्यातही तेच कौतुक पाहून तर तिच्या अंगावर मूठभर मास चढलं. अशा रीतीने गीताचा नवा संसार सुरू झाला.\nघरच्या माणसांच्या पसंतीची पावती मिळवण्यासाठी कष्ट करण्यात ती गुंतून गेली. तिचं कौतुक करताना सासूला तर शब्द कमी पडायला लागले. गीताही खुश होतीच; पण तिच्या आवडीच्या गोष्टी करायला मात्र तिला अजिबात वेळ मिळेना.\nअसेच काही महिने गेले. गीताला आता एक उत्तम पगाराची नोकरी लागली. मग एक-दीड वर्षानं तिला बाळ झालं. आता गीताचं आयुष्य खूपच बिझी झालं. शिवाय घरातल्या अनेक जबाबदाऱ्या तिनं अंगावर घेतल्या होत्या. घरच्या माणसांकडून कौतुक करून घेण्याची नशाच होती ती घरातल्या कुणाचं माझ्यावाचून पान हलत नाही, याचा काहीसा गर्वच तिला व्हायला लागला होता. त्यामुळे ती प्रचंड कष्ट ओढायची.\nपण हळूहळू गीता चिडचिडी व्हायला लागली. तिचा राग नवर्‍यावर आणि बाळावर सतत निघायला लागला. ती कधीही आनंदी, उत्साही दिसत नाही म्हणून नवरा वैतागू लागला.\nमग भांडणं सुरू झाली. एक गुण्यागोविंदानं सुरू झालेल्या संसाराची घडी आता अशी उसवायला लागली.\nवाचताना असं वाटलं ना की आपलीच कहाणी.. का होतं हे असं\n“किती काम करतेस रोज आणि सगळं कसं परफेक्ट. ‘यू आर अ सुपरवुमन’ या लोकांनी केलेल्या कौतुकाचं व्यसनच लागतं जणू. आपल्या या सुपरवुमनच्या प्रतिमेत बायका स्वत:च इतक्या अडकतात, की माणूस म्हणून जगायलाच विसरतात. प्रत्येकीला एक उत्तम आई व्हायचं असतं, उत्तम बायको, उत्तम सून, मुलगी आणि शिवाय ऑफिसमध्येही उत्तम नोकरदार आणि सहकारी. ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकातलं एक वाक्य मला फार आवडतं. ‘लग्न झाल्यावर नव्या नवरीनं तेवढंच चांगलं वागावं जितकं आयुष्यभर वागायला जमेल’ किती खरं आहे हे कौतुक करून घेण्यासाठी माणूस एक-दोन दिवस जास्त कष्ट करू शकतो, स्वभाव नसला तरी गोड गोड वागू शकतो.\nआयुष्यभर कसं वागणार असं त्याचा ताण यायला लागतो. शरीरावरही. मनावरही.\nशिवाय बाकीच्या जबाबदाऱ्या वाढतात, वय वाढतं, तशी तब्येत ढासळते (कारण तिच्याकडे लक्ष द्यायला वेळच झालेला नसतो). आपण सगळ्यांसाठी राबराब राबतोय तरी आपल्याला काय आवडतं हे कुणाच्या खिजगणतीतही नाही, असे विचार सतत मनात यायला लागतात. या सगळ्याचं कारण आहे स्वत:साठी वेळ दिला की त्याचा बायकांना येणारा गिल्ट\nस्वत:वर पैसे किंवा वेळ खर्च करणं हा गुन्हा आहे या समजातून आपण बायका कधी बाहेर येणार आहोत जो माणूस आधी स्वत:ला खुश ठेवतो तो आणि तोच दुसऱ्यालाही आनंदात ठेऊ शकतो हे आम्हाला कधी कळणार जो माणूस आधी स्वत:ला खुश ठेवतो तो आणि तोच दुसऱ्यालाही आनंदात ठेऊ शकतो हे आम्हाला कधी कळणार स्वत:चं मन मारून, आवडणाऱ्या गोष्टी सतत स्वत:ला नाकारून, स्वत:च्या आनंदाचे बळी देऊन त्यावर जर आपण दुसर्‍याच्या आनंदाचे इमले बांधत राहिलो तर ते कधी ना कधी ढासळणारच. मग भले ती दुसरी व्यक्ती म्हणजे अगदी तुमच्या पोटचं मूल असेल किंवा तुमचा नवरा.\nस्वत:वर जरासं प्रेम करायला शिकूया मला, माझ्या मनाला, माझ्या शरीराला काय हवंय ते ओळखायला शिकू या मला, माझ्या मनाला, माझ्या शरीराला काय हवंय ते ओळखायला शिकू या स्वत:च्या इच्छा, आकांक्षा, आवाडी-निवडी यांचा जरा आदर करूया स्वत:च्या इच्छा, आकांक्षा, आवाडी-निवडी यांचा जरा आदर करूया तुमचं शरीर जर अलीकडे थकायला लागलंय जरासं तर स्वत:ला आरोग्यपूर्ण ठेवणं ही आधी तुमची जबाबदारी नाही का तुमचं शरीर जर अलीकडे थकायला लागलंय जरासं तर स्वत:ला आरोग्यपूर्ण ठेवणं ही आधी तुमची जबाबदारी नाही का ती जर तुम्हालाच समजली नाही तर इतरांना कशी कळेल ती जर तुम्हालाच समजली नाही तर इतरांना कशी कळेल आणि तुम्ही स्वत:ला जर आरोग्यपूर्ण ठेवलं तर तुम्ही घरातल्या इतर जबाबदाऱ्या जास्त चांगल्या पद्धतीनं आणि आनंदानंही पार पाडू शकाल असं वाटत नाही का\nतर सांगा आता आपल्या या गीतानं आता काय करायला हवं\nतर सगळ्यात आधी ‘सुपरवुमन’ या आपल्या पदवीचा त्याग करायला हवा. आपल्या इतरांनी केलेल्या कौतुकात रमण्यापेक्षा आपल्याला काय हवंय हे आधी समजून घ्यायला हवं. वाढत्या जबाबदार्‍यांमुळे आणि वाढत्या वयामुळे सगळं पूर्वीसारख्या उत्साहानं करायला जमणार नाही हे समजून घ्यायला हवं. शिवाय स्वत:ला आनंदी ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हेही समजून घ्यायला हवं. आधी एक तर हे स्वत: समजून घ्यायला हवं आणि मग घरातल्या मंडळींना हे प्रेमानं पण ठामपणे समजावून सांगायला हवं. आणि मग स्वत:ला रोज थोडातरी वेळ द्यायला हवा. त्या वेळात तिनं काहीही करावं. एखादा छंद जोपासावा, व्यायाम करावा, मैत्रिणींना भेटावं किंवा अगदी डोक्यावरून पांघरूण घेऊन ताणून द्यावी.\nआपल्यापैकी कितीजणी नियमितपणे मैत्रिणींबरोबर वेळ घालवतात त्यांच्याबरोबर एखाद्या सोलो ट्रीपला जाणं वगैरे तर दूरच पण वेळ काढून कितीजणी मैत्रिणींना भेटतात त्यांच्याबरोबर एखाद्या सोलो ट्रीपला जाणं वगैरे तर दूरच पण वेळ काढून कितीजणी मैत्रिणींना भेटतात मुलांच्या परीक्षा, पाहुणे, बाई आली नाही, सासू-सासर्‍यांची आजारपणं, हजार कारणं मधे येतात आणि आपण मैत्निणींना भेटणं टाळत राहातो.\nमध्यंतरी एक छान लेख वाचनात आला. ‘ऑक्सिटोसीन’ हे बायकांमधलं ‘लव्ह हॉर्मोन’ आहे. ते स्त्रवलं की बायकांना मस्त वाटतं, त्या खुश असतात. आणि ते सर्वात जास्त कधी स्त्रवतं माहितीये आपल्या मैत्रिणींच्या सहवासात. मुलाबाळांच्या किंवा प्रियकराच्या सहवासात नाही तर मैत्रिणींच्या सहवासात\nजीवलग मैत्रीणींना भेटून आल्यावर खूप वेळ आपल्याला छान वाटत राहातं, ते शरीरात स्त्रवलेल्या या ‘ऑक्सिटोसीन’मुळे.\nमग इतक्या साध्या गोष्टीनं आपल्याला छान वाटणार असेल आणि आपण खुश राहिल्यानं सगळं घर खुश राहाणार असेल तर असे छोटे छोटे आनंद का नाकारायचे आपण स्वत:ला\nमाझं एक ऐकाल, आजपासून एक पण करा की, ‘मी सुपरवुमन बनायला जाणार नाही. माझ्यावर प्रेम करायला शिकेन. स्वत:ला खुश ठेवायला शिकेन. स्वत:ला वेळ देईन आणि त्याचा गिल्ट येऊ देणार नाही.’\n आणि कुसुमाग्रजांच्या कवितेत थोडा बदल करून म्हणूया,\n तर सगळ्यात आधी ‘स्वत:वर’ करावं\n– डॉ. मृदुला बेळे\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\n, प्रेम कुणावर करावं तर सगळ्यात आधी ‘स्वत:वर’ करावं तर सगळ्यात आधी ‘स्वत:वर’ करावं, प्रेमविवाह, मराठी, मराठी अवांतर वाचन, मराठी विचार, मानसी मंदार पाटील, मी मराठी, यू आर अ सुपरवुमन, रसिक, स्पंदन on October 12, 2019 by mazespandan.\nआठवणीतले पुलं – गणगोत\nपु. ल. देशपांडे यांच्या “गणगोत” मधील बाबासाहेबांवरील लेखाला पुन्हा उजाळा-\nमी त्या वेळी दिल्लीला सरकारी चाकरीत होतो. सुटीत मुंबईला आलो होतो. उत्तरेस कूच करण्यापूर्वी सोबतीला चार मराठी पुस्तके घ्यावीत म्हणून एका पुस्तकाच्या दुकानात शिरलो. केवळ योगायोगाने काउंटरवर पडलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड हाती पडला. साऱ्या महाराष्ट्रातल्या शुभदेवतांना केलेल्या सुरुवातीच्या आवाहनानेच मनावरची धूळ झटकली. “सुदिन सुवेळ मी शिवराजाच्या जन्माचं व्याख्यान मांडलंय-आई, तू ऐकायला ये” ही तुळजाईला घातलेली हाक जिवाला चेतवून गेली. त्या शिवचरित्रातला ‘उदो उदो अंबे’चा जागर म्हणजे महाराष्ट्राचा पाना- दोन पानांत उभारलेला सांस्कृतिक इतिहास आहे. बळवंत मोरेश्वर पुरंदरे नामक कोण्या इतिहासकाराने लिहिलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड वाचत मी काउंटरपाशीच खिळून राहिलो. ते दहाखंडी चरित्र विकत घेऊन मी निघालो. दिल्लीला पोचेपर्यंत अखंड चोवीस तासांच्या सफरीत ते दहाही खंड संपवले. आपण काही तरी अद््भुत अनुभवातून न्हाऊन बाहेर पडल्यासारखे वाटले. महाराष्ट्रात जन्माला आल्याच्या धन्यतेने मी फुलून निघालो होतो.\nजगण्यासाठी महत्त्वाची गोष्ट मिळवावी लागते; ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन. पुरंदऱ्यांना हे प्रयोजन वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षीच गवसले. एका ड्रॉइंग मास्तराच्या बळवंत नावाच्या मुलाला शिवनेरीच्या शिवरायाने झपाटले. त्या झपाटल्या अवस्थेतच त्यांच्या जीवनाचा प्रवास चालू आहे, यापुढेही चालणार आहे. इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे; पण त्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधान करायचे नाहीत, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. उगीचच ‘शिवाजी’ म्हटल्यावर हाताचे आणि जिभेचे पट्टे फिरवणे नाही. त्यांच्या अंतःकरणातला कवी मोहोरबंद, गोंडेदार भाषा लिहितो; पण हातातला इतिहासाचा लगाम सुटत नाही, वर्तमानाच्या रिकिबीतून पाय निसटत नाही की नजर डळमळत नाही.\nपुरंदरे इतिहासात सहजतेने डुबकी घेतात. माशाला पोहायची ऐट मिरवावी लागत नाही, तशी पुरंदऱ्यांना शिवभक्तीचा दर्शनी टिळा लावण्याची आवश्यकता भासत नाही. आणि म्हणून जाणत्या इतिहासकारांनी घालून दिलेले दंडक सांभाळून शिवचरित्र आणि त्या अनुषंगाने इतर इतिहासविषयक लिखाण सामान्यांपर्यंत अत्यंत सचित्र भाषेत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. इतिहास संशोधन हे शास्त्र आहे याची त्यांना पक्की जाणीव आहे आणि म्हणूनच हा तरुण मोकळ्या मनाने सांगतो, की “माझ्या रचनेतल्या चुका दाखवा. पुढल्या आवृत्तीत दुरुस्त करीन. इतिहास ही माझी एकट्याची मिरास नाही. ते साऱ्यांचं धन आहे. त्यात कुठं हीण आलं असेल तर ते पाखडून फेकून द्यायला हवं इथं वैयक्तिक अहंकार गुंतवण्याचं कारण नाही.” त्यांच्या शिवचरित्राच्या खास आवृत्तीच्या प्रकाशनाच्या दिवशी ते म्हणाले होते, “शिवाजीला मी माणूस मानतो, अवतार नव्हे. आजवर ठपका द्यावा, असा ह्या माणसाविरुद्ध सबळ पुरावा आढळला नाही. आढळला तर न लपवता तो शिवचरित्रात घालीन.” आणि म्हणूनच पुरंदरे ऐतिहासिक घटनांविषयी बोलताना कोणत्याही नाटकी अभिनिवेशाने बोलत नाहीत.\nपुरंदऱ्यांची तपशिलांवरची पकड भलतीच कडक आहे. स्मरणशक्ती विलक्षण. त्यांच्याशी बोलताना-म्हणजे ते बोलत असून आपण ऐकत असताना-इतिहास हा वर्तमानापासून तुटला आहे असे वाटतच नाही. अतिशय रंगतदार भाषेत बोलतानादेखील इतिहासकार म्हणून ते एक प्रसन्न अलिप्तपणा सांभाळू सकतात. आज इतकी वर्षे मी त्यांच्या तोंडून शिवचरित्रातले प्रसंग ऐकतो, पण कधी मुसलमान व्यक्तीचा मुसलमान म्हणून त्यांनी तुच्छतापूर्वक उल्लेख केलेला मला स्मरत नाही. परधर्मीयांची कुचेष्टा नाही. अवहेलना नाही. इतिहास ही वस्तू अनेक जण अनेक कारणांनी राबवतात. खुद्द शिवाजी महाराजांचे चित्र दुसऱ्या महायुद्धात रिक्रूटभरतीसाठी राबवले होते. “सोळा रुपये पगार, कपडालत्ता फुकट…शिवाजी न्यायासाठी लढला” हे पोस्टर अजून आठवते. काहींना इतिहासातले नाट्य रुचते. काहींचा रोख आजवर झालेले इतिहास संशोधन चुकीचे होते आणि आपलेच कसे खरे हे अट्टहासाने दाखवण्यावर असतो. इतिहासाचे काही भक्त तर सदा उन्मनी अवस्थेतच असल्यासारखे वागतात. उगीचच ‘रायगड रायगड’ करीत उड्या मारण्याने शिवरायांवरची आपली निष्ठा जाज्वल्य असल्याची लोकांची कल्पना होते, अशी यांची समजूत असावी; पण शिवाजी महाराजांच्यावर प्रेम असायला प्रत्येक किल्ल्याचा चढउतार केलाच पाहिजे, असे मानायचे कारण नाही.\nदरवर्षी रायगडावर जाऊन डोळे गाळायचे ही शिवभक्ती नसून शिवभक्तीची जाहिरात आहे. आणि म्हणूनच गड-कोटांविषयी पुरंदरे बोलायला लागले की शिवाजी महाराजांच्या जीवनाचे मूळ सूत्र जो विवेक न गमावता ते रंगून बोलतात, म्हणून मला त्यांचे कौतुक अधिक वाटते. स्वतःच्या डोळ्यात आधीच लोटीभर पाणी आणून ऐतिहासिक कथा सांगण्याचा देखावा त्यांनी कधी केला नाही-ते करणारही नाहीत. कारण त्यांनी इतिहासाकडे “हरहर गेले ते दिवस’’ असले उसासे टाकीत पाहिले नाही.\nपुष्कळदा वाटते की, त्यांनी शिवचरित्र कसे लिहिले याचा इतिहास एकदा लिहावा. किती निराशा, कसले कसले अपमान, केवढी ओढग्रस्त त्यातून पुरंदऱ्यांचे खानदान मोठे त्यातून पुरंदऱ्यांचे खानदान मोठे वडील भावे स्कुलात ड्राॅइंग मास्तर. पर्वतीच्या पायथ्याशी पुरंदऱ्यांचा वाडाही आहे. भिक्षुकी, मास्तरकी हे व्यवसाय अफाट दैवी संपत्तीचे धनी करणारे. त्या धनातून मंडईतली मेथीची जुडीदेखील येत नसते. महागाईच्या खाईत भारत इतिहास संशोधक मंडळाकडून मिळणारे माहे पाऊणशे रुपये घेऊन पुरंदऱ्यांनी संसार सजवला. रुपयांचा अखंड शेकडा एकजिनसी न पाहिलेले ग. ह. खरे हे पुरंदऱ्यांचे गुरू. ऋषी हा शब्द फारच ढिलेपणाने वापरला जातो; पण ऋषी म्हणावे अशी खऱ्यांसारखी माणसे क्वचित आढळतात. खऱ्यांचे सहायक म्हणून पुरंदऱ्यांनी खूप वर्षे भारत इतिहास संशोधक मंडळात काम केले.\nवर्तमानातून इतिहासात पुरंदरे अगदी सहजतेने डुबकी घेतात. हा माणूस किती शांतपणे माणसांच्या अंगावर रोमांच उभे करतो. कुठेही राणा भीमदेवी थाट नाही, अश्रुपात नाही, मुठी आवळणे नाही. त्या पूर्वदिव्यावर पडलेल्या कालवस्त्राला अलगद दूर करून पुरंदरे इतिहासाचे दर्शन घडवतात. त्यांना वक्तृत्वाची देणगी आहे. शब्दकळा तर अतिशय साजरी आहे. सूक्ष्म विनोदबुद्धी आहे. पण ही सारी लक्षणे मिरवीत येत नाहीत. भाषेच्या अंगातून अलगद ओसंडत असतात. कुठलीही ऐतिहासिक घटना पचवून ते लिहितात किंवा बोलतात. “मला अमुक एक ऐतिहासिक कथा ठाऊक नाही, किंवा निश्चित पुरावा नाही म्हणून मी मत देत नाही” हे सांगायची त्यांनी भीती वाटत नाही.\nइतिहास हा आम्ही हातच्या कागदपत्रांइक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांच्यावर सोपवलेला विषय समजतो. अशा वेळी शिवचरित्राच्या रूपाने त्या इतिहासाचे पाठ लोकमानसात नेऊन सोडणाऱ्या पुरंदऱ्यांचे खूप कौतुक व्हायला हवे होते. त्यांनी इतिहासकाराची पंडिती पगडी चढवली नाही. कुणाही पंडिताने धन्योद््गार काढावेत इतका अभ्यास केला आणि मांडला मात्र गद्यशाहिरासारखा. त्या चरित्राला ते आधारपूर्वक लिहिलेली बखर म्हणतात. इतिहास हा “माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळण्यापर्यंत गेला पाहिजे. इतकंच नव्हे, तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकी-सुना गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,” असे म्हणणारा हा इतिहासकार मला तरी आमच्या आजवरच्या भारतीय इतिहासकारांपेक्षा एक निराळी – लोकशाहीला अत्यंत पोषक भूमिका घेऊन उभा राहिलेला दिसतो.\nवयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षापासून आजतागायत आपल्या सुखाचे, स्वास्थ्याचे नव्हे, तर आयुष्याचे दान देऊन गोळा केलेले हे शिवचरित्राचे हे धन. एका मास्तरचा हा मुलगा शिवरायाचे चरित्र आठवीत आडरानातल्या वडपिंपळाखाली पालापाचोळ्याचे अंथरूण आणि दगडाची उशी करून झोपला. हल्ली रस्त्यारस्त्यातून जिल्हा परिषदेच्या जीपगाड्या धावताना आढळतात.\nशिवाजी महाराजांच्या पावलांच्या खुणा शोधत जाणाऱ्या पुरंदऱ्यांना कोण जीपगाडी देणार पार्लमेंटात हात वर करण्यापुरते जागे असणाऱ्या सभासदांना आसेतुहिमाचल आगगाडीच्या पहिल्या वर्गाचा फुकट पास असतो. पुरंदरे कुठल्याशी गावी कागदपत्रं मिळायची शक्यता आहे, हे कळल्यावर थर्ड क्लासच्या खिडकीपाशी तिकिटासाठी रांग धरून उभे असतात \nनिरनिराळ्या जागा धरून किंवा अडवून ठेवण्याच्या ह्या युगात उदात्त वेडाने झपाटलेली माणसे एकूणच कमी. बाराशे मावळे दीड लाख मोगली फौजेचा धुव्वा उडवीत होते. कारण ते बाराशे मावळे “हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा” ह्या शिवाजीराजाने त्यांच्या कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले होते. कोणत्याही कार्याच्या सिद्धीला असा एखादा मंत्र लागतो; पण सिद्धीपेक्षा प्रसिद्धी मोठी, अशी भावना रुजायला लागते तेव्हा माणसांची बाहुली होतात. पुरंदरे शिवाजीचे चरित्र गाईन हा संकल्प सोडून जगताहेत. इतिहासाच्या त्या धुंदीत वावरणाऱ्या पुरंदऱ्यांना वर्तमान आणि भुताची चित्रे एकदम दिसतात. हे दिसणे भाग्याचे ” ह्या शिवाजीराजाने त्यांच्या कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले होते. कोणत्याही कार्याच्या सिद्धीला असा एखादा मंत्र लागतो; पण सिद्धीपेक्षा प्रसिद्धी मोठी, अशी भावना रुजायला लागते तेव्हा माणसांची बाहुली होतात. पुरंदरे शिवाजीचे चरित्र गाईन हा संकल्प सोडून जगताहेत. इतिहासाच्या त्या धुंदीत वावरणाऱ्या पुरंदऱ्यांना वर्तमान आणि भुताची चित्रे एकदम दिसतात. हे दिसणे भाग्याचे \n– महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nThis entry was posted in Life, प्रेरणादायी and tagged gangot, marathiblogs, mazespandan, popular marathi blogs, pu la deshapande, आसेतुहिमाचल, इतिहासकार, बळवंत मोरेश्वर पुरंदरे, बाबासाहेब पुरंदरे, मराठी अवांतर वाचन, महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे, माझे स्पंदन, मी मराठी, रसिक, रायगड, शिवचरित्र, स्पंदन, हिंदवी स्वराज्य on October 10, 2019 by mazespandan.\nआज घरी ‘ती’ आहे म्हणून..\nघरी निघालो भरभर,डोक्यात चक्र चालू होत म्हणून कदाचित मंडईत शिरायचं राहीलच\nमग कडेच्याच भाजीवल्याकडून सुकलेली वांगी अन नको असलेलं पडवळ घेतलं\nतरी आज उशीर झाला म्हणून खिचडी की मॅगी वर भागवू याचा गोंधळ सुरुच होता, तेवढ्यात आठवल\nकपडे हि धुवायचे राहिलेत कारण आठवडा भर एकच जीन्स रगडवत होतो.\nखांद्यावरची बॅग सावरली, अन दुधाची पिशवी दुसऱ्या हातात घेतली. येताना पानवाल्याकडून आठवणीनं सिगरेटच पाकीट घेतलं, त्याला ब्रँड माहितीच होता, मी म्हणायच्या आत त्यांन ते हातात सोपवलं.\nडबाबलेल्या चेहऱ्यांनी घरी पोहचलो,\nकुलूप काढायच्या आतच दार उघडलेलं बघून थोडासा बावरलो.\nहळूच पाऊल टाकलं तर स्वर्गात आल्या सारखं वाटलं. चुकून दुसऱ्याच घरी शिरलो काय म्हणून हि गडबडलो. पण\nतर दोरीवरच बनियन आपलंच हे ओळखून स्थिरावलो, आता बनियन मध्ये कसली आली ओळख पण चार जागी होल अन विकत घेताना पांढरा असलेला कलर आता पिवळा जाहीर करावा असा त्याचा अवतार यावरून आपलंच असं खुणावत राहिलं.\nदबकत जरा आत गेलो, फ्रीज उघडला तर थंड हवा चेहऱ्यावर पसरली. कोपऱ्यात बसलेलं लोणच खुद्कन दिसलं. निवडलेली मेथी अन कोथिंबीर पण कोवळी हसली.\nसकाळी जागा नसलेला फ्रीज आता सुटसुटीत कसा मग हळूच आणलेली वांगी अन पडवळ यांना जागेवर बसवलं.\nरूमकडे पावलं टाकीत गेलो,तर काहीतरी सुगधं दरवळला.\nआठवडा भर पाणी न भेटलेले देव चमकताना हसले अगरबत्तीचा सुगंध माझ्या पाठी पाठी येताना भासला.\nबॅग अलगद खुर्ची वर ठेवली. साधारण कधी तोंड न दिसणारी सगळ्यांच ओझं वाहणारी ती मोकळी कशी वाटली.\nजाताना बेड वर स्थापलेला टॉवेल खिडकीत हवा खाताना दिसला.\nकपाट उघडलं,तर धस्स झालं अन सगळे घडी वाले कपडे बघून डोळेच दाटून आले.\nरुमालावर रुमाल कसा बसला होता,\nसकाळी सापडत नव्हता तो म्हणून वेगवेगळा घातलेला सॉक्स आता कोपऱ्यात बसून माझ्याकडेच बघत होता.\nलाल पिवळा निळा असे शर्ट हँगर ला अडकलेले दिसले,तेव्हा मागच्या वाढदिवसाला तिनं भेट दिलेला जांभळा\nटी शर्ट हि सापडला.\nहळूच येऊन बसलो टीव्ही समोर तर परवा पासून असलेले चहाचे डाग\nटीपॉय वरून गायब कसे झाले एरवी नाममात्र टीपॉय रद्दीच दुकान आज मोकळा ढाकला हसला.\nधुळीन काबीज केलेली टीव्ही पण चमकत होती कारण माझी बावरलेली नजर त्यात स्पष्ट होत होती.\nदोन मिनिटं गरगरलंच, म्हणून पाणी प्यायला गेलो, तर एरवी नुसत्या लसणाच्या फोडणीवर चाललेलं किचन आज खमंग भजी अन कटाची आमटी यांच्या वासान मंत्र मुग्ध झालेलं.\nभावना आवरून मग बाहेर आलो डोळे मिटून क्षणभर विचार करत बसलो. मग डोळे उघडून चिमटा काढत स्वप्न तर नाही म्हणून स्वतःलाच प्रश्न केला, तेवढ्यात गरम गरम भजी अन वाफाळता चहा कुणीतरी समोर धरला\nगिळला गेला आवंढा, आपसुक अहंकार गळून पडला. एरवी थकून आलो म्हणून दही भातावर भागवणारा मी, आज आयाता आल्याचा कडक चहाचा स्वाद घेत होता.\nन कळत अश्रू पडले दोन गालावर, जरासं सावरलं तेव्हा लक्षात आलं….\nआज घरी “ती” आहे म्हणून…\nजीच्यामुळं जगात समृद्धी अन सौख्य आलं\nबस कुणासाठी तरी ती…\nतेव्हा पटलं मनाला,पठ्ठ्या किती हि मोठा हो पण लक्षात ठेव टायबुटातल्या शहाण्या..\nजगातल्या प्रत्येक “तुला” सावरायला एकतरी “ती” लागतेच\nप्रत्येक घराला घरपण येण्यासाठी घरात एक तरी गृहिणी असावीच लागते…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nडालडा आणि मराठी माणूस\nहनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये :\nथोडे दिवस घरातच बसायचं आहे\nस्त्री समाधानी केव्हा असते \nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nकाही भारी मराठी मीम्स..\nजीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत\nस्त्रीचे ओले केस आणि लोकतंत्र\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://cinenama.in/2020/07/21/pratiksha-munagekar-debut-in-webseries-courtyard-704/", "date_download": "2020-09-26T02:48:54Z", "digest": "sha1:XQYL5BE3ARFQI6ZOFVIJW2E3I3QEYZYR", "length": 8380, "nlines": 113, "source_domain": "cinenama.in", "title": "प्रतीक्षाने केले वेबपदार्पण - Cinenama", "raw_content": "\nHome छोटा पडदा वेबनामा प्रतीक्षाने केले वेबपदार्पण\nमराठी प्रेक्षकांसाठी ‘जेमप्लेक्स’ प्रस्तुत करीत आहे ‘भुताचा नवीन पत्ता’ शोधात असलेल्या नायिकेची कथा व व्यथा मांडणारा शो ‘कोर्टयार्ड ७०४’. याचे लेखन व दिग्दर्शन केले आहे किरण नारायण कांबळी यांनी व निर्मिती केली आहे प्रकाश तिवारी, रोहन तिवारी, सुरेश अंचन, विशालकुमार पाटील, अविषेक मजुमदार, रवींद्र महादेव शेट्ये आणि निखिल विठ्ठल चव्हाण यांनी.\n‘कोर्टयार्ड ७०४’ चे कथानक हे स्त्रीप्रधान असून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे प्रतीक्षा मुणगेकर. प्रतीक्षा प्रेक्षकांना माहीतच आहे कारण ‘घाडगे अँड सून’ मध्ये ती कियारा च्या भूमिकेत दिसली होती. प्रेक्षकांना तिने ‘तू तिथे मी’, पुढचं पाऊल’, ‘छत्रीवाली’, ‘अग्निहोत्र २’, क्राईम पेट्रोल – दस्तक’ (हिंदी) सारख्या मालिकांमधून रिझविले आहे. तिने ‘खैरलांजीच्या माथ्यावर’, ‘बाष्ठ’, ‘विडा, एक संघर्ष’ ‘बाबो’ सारख्या चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका रेखाटल्या. अशी ही प्रतिभासंपन्न अभिनेत्री, प्रतीक्षा मुणगेकर, मराठी वेब सिरीजमध्ये पदार्पण करतेय ‘कोर्टयार्ड ७०४’ मधून.\nआता ममता कुलकर्णीचा बायोपिक\nरेवती आपला पती गौतम भागवत सोबत एका सुंदर अपार्टमेंटमध्ये राहावयास येते. परंतु काही दिवसांतच तिला विचित्र आणि अप्रिय गोष्टींचा प्रत्यय येऊ लागतो. शेजारील वृद्ध जोडपे, रमाकांत आणि मिनाक्षी अधिकारी, अचानक विक्षिप्तपणे वागू लागतात व पोटुशी असलेल्या तिला मीनाक्षीने दिलेले कंठस्नान रुचत नाही. तिच्या मनात प्रसूतीनंतर तिला स्वतःच्या गर्भधारणेबद्दलचे एक कटू सत्य समजते. ते काय किंवा पुढे काय-काय घडते याबाद्दल ‘कोर्टयार्ड ७०४’ पाहणे गरजेचे आहे.\nPrevious articleआता ममता कुलकर्णीचा बायोपिक\nNext articleनाट्यधर्मी निर्माता संघाची स्थापना\n‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन गायब\nनानीच्या ‘व्ही’ चा प्रीमिअर होणार प्राईमवर…\nउद्या होणार ‘रेसिस्ट’ प्रदर्शित…\nप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात...\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\nएअरटेलवर आता झी 5 फ्री\nअनुष्का घेऊन येतेय ‘पाताळ लोक’\nअमॅझॉन प्राईम बघा आता जिओवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+3741+mn.php", "date_download": "2020-09-26T01:45:58Z", "digest": "sha1:QRUEAVDDLQER5QLYTC6WLPG7Z5NCGQDO", "length": 3597, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 3741 / +9763741 / 009763741 / 0119763741, मंगोलिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 3741 हा क्रमांक Orkhon क्षेत्र कोड आहे व Orkhon मंगोलियामध्ये स्थित आहे. जर आपण मंगोलियाबाहेर असाल व आपल्याला Orkhonमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. मंगोलिया देश कोड +976 (00976) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Orkhonमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +976 3741 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनOrkhonमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +976 3741 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00976 3741 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/shah-mahmood-qureshi-admits-jammu-kashmir-is-integral-part-of-india-at-jeneva/articleshow/71065103.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-26T01:19:00Z", "digest": "sha1:I3UZUKJUKMYC5CLG5IPE4TOQKDNYBKSB", "length": 12478, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकाश्मीर भारताचेच; पाकच्या परराष्ट्र मंत्र्याची कबुली\nजम्मू-काश्मीरवरून गळा काढणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्याच परराष्ट्र मंत्र्याने खडेबोल सुनावले आहेत. जम्मू-काश्मीर हे भारताचंच राज्य असल्याची कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी यूएनएचआरसीमध्ये दिली आहे. तब्बल ७२ वर्षानंतर पाकिस्तानने ही कबुली दिली आहे.\nजिनिव्हा: जम्मू-काश्मीरवरून गळा काढणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्याच परराष्ट्र मंत्र्याने खडेबोल सुनावले आहेत. जम्मू-काश्मीर हे भारताचंच राज्य असल्याची कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी यूएनएचआरसीमध्ये दिली आहे. तब्बल ७२ वर्षानंतर पाकिस्तानने ही कबुली दिली आहे.\nजिनिव्हा येथे ७२ वी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (यूएनएचआरसी) सुरू आहे. या परिषदेला संबोधित करताना शाह महमूद कुरैशी यांनी ही कबुली दिली. जम्मू-काश्मीर भारताचं राज्य आहे, असं सांगतानाच कुरैशी यांनी भारतावर टीकाही केली. काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावांचं उल्लंघन होत आहे, असे धांदात खोटे आरोप करतानाच या परिषदेने काश्मीरमधील मानवाधिकाराकडे लक्ष द्यावे. काश्मीरमध्ये होणाऱ्या मानवाधिकाराच्या उल्लंघनासाठी संयुक्त चौकशी समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणीही शाह यांनी केली.\nत्यानंतर शाह यांनी प्रसारमाध्यमांशीही चर्चा केली. जम्मू-काश्मीरमधील जनजीवन सामान्य झाल्याचं जगाला दाखवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. जर असं आहे तर भारत आपल्या जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय मीडिया, एनजीओ आणि सिव्हिल सोसायटींना प्रवेश का देत नाही असा सवालही त्यांनी केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCoronavirus updates करोना साइड इफेक्टसवर भांग गुणकारी\nCoronavirus vaccine करोनावर नाकावाटे देणार लस; भारतात '...\nCoronavirus updatesकाय सांगता.. करोनाविरोधात डेंग्यू ठर...\n ७३ देशांमध्ये करोनाबाधितांमध्ये वाढ; थंडीच्या चा...\nCoronavirus vaccine एकाच डोसमध्ये करोनाचा खात्मा\nपाकिस्तानच्या ‘बॅट’च्या घुसखोरीचा व्हिडिओ प्रसिद्ध महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nअर्थवृत्तराणा कपूरला 'ईडी'चा दणका ; लंडनमधील १२७ कोटींचा फ्लॅट केला जप्त\nअर्थवृत्तसोने दरात घसरण सुरूच; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त\nआयपीएलChennai vs Delhi: पृथ्वी सावने केली गोलंदाजाची धुलाई, चेन्नईपुढे मोठे आव्हान\nकोल्हापूरपोटच्या १० वर्षांच्या मुलाला ५ लाखात तृतीयपंथीयास दिले दत्तक\nदेशUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने बहिष्कार घालत दिले चोख उत्तर\nकोल्हापूरकरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ऑडिट होणार, २२ पथकं तैनात\nपुणेकोविड रुग्णालयांत रुग्णांची लूट; अजित पवारांनी दिला 'हा' इशारा\n राज्यात रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा; करोनामृत्यूचे तांडव सुरूच\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2020/08/social-work-college.html", "date_download": "2020-09-26T01:41:26Z", "digest": "sha1:NZIEQPXN4V4CP6VE6EOCGTQC24VYMYEH", "length": 9153, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "समाजकार्य महाविद्यालयातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर समाजकार्य महाविद्यालयातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत\nसमाजकार्य महाविद्यालयातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत\nनागपूर:-समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या वतीने राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या जनतेला सर्व प्रकारचे सहाय्य करण्याकरिता तसेच या रोगाच्या आपत्ती निवारणासाठी विविध उपाययोजना करण्याकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक योगदानातून मदतनिधी जमा करण्यात आला. माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता जमा केलेली रक्कम ६८२८० रुपये (अडुसष्ट हजार दोनशे ऐंशी रुपये) रकमेचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्या हस्ते तसेच प्राचार्य डॉ. रमेश सोमकुवर यांच्या उपस्थितीत नागपूर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मा.रवींद्र खजांची यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.\nया प्रसंगी डॉ. प्रणाली पाटील, प्रा. उज्ज्वला सुखदेवे, डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, रुबीना अन्सारी, प्रा.ओमप्रकाश कश्यप, प्रा.मनोज होले, डॉ.सविता चिवंडे, प्रा. निशांत माटे,प्रा. शशिकांत डांगे, मनीष मुडे, शिक्षकेतर कर्मचारी सुभाष तिघरे, उज्ज्वला मेश्राम, गजानन कारमोरे, किरण गजभिये, वसंता तांबडे, शशील बोरकर,नीरज वालदे उपस्थित होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (210) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/prasad-jawade-work-in-chhichhore-film/articleshow/71147279.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-26T01:32:03Z", "digest": "sha1:2IXGF7ASLFYPZBJKRLX7JU7WZZIU75DG", "length": 9090, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबॉलिवूडमध्ये झळकला हा मराठी स्टार\nमराठी कलाकारांचं हिंदीत नेहमी कौतुक होत असतं अलीकडेच आलेल्या 'छिछोरे' या चित्रपटात अभिनेता प्रसाद जवादे दिसला...\nमराठी कलाकारांचं हिंदीत नेहमी कौतुक होत असतं. अलीकडेच आलेल्या 'छिछोरे' या चित्रपटात अभिनेता प्रसाद जवादे दिसला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यातल्या त्याच्या एका दृश्याची सध्या चांगली चर्चा आहे. त्याच्या कामाचं कौतुक होतंय.\nटीव्ही मालिकांमध्ये झळकलेला हा चेहरा मोठ्या पडद्यावरही चांगली कामगिरी करत असल्यानं आगामी काळात त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'नच बलिये ९'च्या सेटवर रवीना-मनिषमध्ये वाद महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nसोलापूरपुढचे आंदोलन मातोश्री आणि सिल्व्हर ओकवर; पडळकरांचा इशारा\nआयपीएल २०२०Chennai vs Delhi: दिल्लीने गड राखला, बलाढ्य चेन्नईवर साकारला विजय\nआयपीएलChennai vs Delhi: पृथ्वी सावने केली गोलंदाजाची धुलाई, चेन्नईपुढे मोठे आव्हान\nदेशकृषी विधेयकांवरून PM मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र\n राज्यात रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा; करोनामृत्यूचे तांडव सुरूच\nनागपूरविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोटींचा, प्रस्ताव पाठवला\nविदेश वृत्तचीनला वेसण घालणार जपानच्या पंतप्रधानांची भारताला साद\nसिनेन्यूजमाझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nमोबाइल४.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BF-%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2020-09-26T02:27:23Z", "digest": "sha1:Z7DVWR34DQZN6W56XQGCAZ45DU3JM4A2", "length": 7766, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जि.प.माजी उपाध्यक्षांकडून 400 कुटूंबांना धान्य वाटप | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nजि.प.माजी उपाध्यक्षांकडून 400 कुटूंबांना धान्य वाटप\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nरावेर (प्रतिनिधी) : हातावर पोट असणाऱ्या गरीब जनतेसाठी तांदलवाडीत जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी त्यांच्यासाठी आपले धान्याचे गोडाऊन उघडून गावातील सुमारे चारशे कुटुंबाना त्यांनी धान्य वाटप केले आहे.त्यांच्या या कार्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.\nकोरोना या महामारीमुळे गावा पासुन थेट मेट्रो सिटी पर्यंत संपूर्ण लॉकडाउन असून तांदलवाडी गावात सुध्दा संचारबंदी असून गावातील काही कुटुंब ज्यांच्या हातावर पोट आहे. अश्याच्या घरात धान्य संपल्याची वार्ता जि.प. माजी उपाध्यक्ष नंदकीशोर महाजन यांच्या कानावर जाताच त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले धान्य गावातील गरीब जनतेला प्रत्येकी पाच-ते-सात किलो प्रमाणे वाटप केले. तालुक्यात एखाद्या राजकीय व्यक्ती कडून धान्य वाटपाची ही पहिलीच वेळ आहे.\nमहापौरांच्या सुचनेनंतर मेहरूण परिसर निर्जंतुक\nकोरोनाचा फैलाव वाढताच; महाराष्ट्राची संख्या 215\nभारतात कोरोना चाचणीचा नवा विक्रम; एका दिवसात विक्रमी चाचणी\nBIG BREAKING: बिहार निवडणुकीची घोषणा: तीन टप्प्यात होणार मतदान\nकोरोनाचा फैलाव वाढताच; महाराष्ट्राची संख्या 215\nशिक्षण सभापतींकडून पायी जाणाऱ्या मजुरांची व्यवस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2020/09/Chandrapur-ct-police-station-corona-positive.html", "date_download": "2020-09-26T02:55:21Z", "digest": "sha1:BB4WWRYQOVTS376UTLKXZMMF6XZWAMQ7", "length": 8934, "nlines": 108, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे PCR ला आणलेले दोन आरोपी निघाले कोरोना पॉझिटिव्ह - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे PCR ला आणलेले दोन आरोपी निघाले कोरोना पॉझिटिव्ह\nचंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे PCR ला आणलेले दोन आरोपी निघाले कोरोना पॉझिटिव्ह\nचंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन विविध गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.\nचंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे दोन गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांचा पीसीआर मंजूर करण्यात आला होता यादरम्यान त्यांना जेलमधून शहर पोलीस स्टेशन येथे आणले होते.या पीसीआरच्या प्रोसेस दरम्यान संपूर्ण खबरदारी बाळगत या कैद्यांची कोरोना तपासणी जेलमधून बाहेर येत असताना आणि परत जेलमध्ये जात असताना करावी लगते लागतो.याच दरम्यान त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाले त्यामुळे आता जेल प्रशासन व कैदी आणि शहर पोलीस स्टेशन मध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.\nयाआधी देखील चंद्रपूर येथील कारागृहात पावणे दोनशेच्या जवळपास कैदी तर तीन ते चार अधिकाऱ्यांच्या कोरोणा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर येत आहे .\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (210) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/i'll-ensure-that-no-one-even-touches-a-single-leaf-at-aarey-construction-of-the-car-shed-should-be-stopped-uddhav-thackeray-42458", "date_download": "2020-09-26T03:08:48Z", "digest": "sha1:7JCXCRDHZPR3GSP4X22PYSIEI5DA6LYI", "length": 10922, "nlines": 132, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आरे कारशेडला स्थगिती, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nआरे कारशेडला स्थगिती, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय\nआरे कारशेडला स्थगिती, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nमाझा विकासाला विरोध नाही, पण कुणी विकासाच्या नावाखाली वनसंपदेवर घाला घालत असेल, तर ते मला मान्य नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो ३ च्या आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याचं सांगितलं.\nविधानसभा निवडणुकीआधीपासूनच शिवसेनेने आरेचा मुद्दा उचलून धरला होता. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसोहळ्याला 'आरे वाचवा'च्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावत मुख्यमंत्र्यांकडून हा निर्णय रद्द करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.\nपर्यावरणाबाबत सखोल अवलोकन करून पुढील दिशा ठरवेपर्यंत आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा. (3/3)@OfficeofUT pic.twitter.com/EYaB2jydGr\nउद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री म्हणून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर सायंकाळी विधीमंडळ वार्ताहर संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.\nयावेळी वेगवेगळ्या विषयांसंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी आरेच्या विषयालाही हात घातला. ते म्हणाले,\nविकास हा झालाच पाहिजे. पण वैभव गमावून विकासकामे करणं मला मान्य नाही. त्यामुळे मी आरेतील कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. या कामाचं पुनर्परीक्षण होईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे. मात्र इतर विकासकामे सुरळीतपणे सुरूच राहणार आहेत. मेट्रोच्या कामाला कुठलीही स्थगिती देण्यात आलेली नाही. रातोरात झाडं कापणं मला मंजूर नाही. त्यामुळे आरेतील झाडंच नाही, तर एक पानही कुणाला तोडता येणार नाही.\nफडणवीस सरकारला टोला हाणताना त्यांनी सांगितलं, मी मुख्यमंत्री म्हणून अनपेक्षितपणे आलो आहे. त्यामुळे इथल्या प्रथा, परंपरा ठाऊक नसताना मी हे शिवधनुष्य उचललं आहे. ठाकरे कुटुंबाने स्वत:साठी काहीही केलं नाही, हे सगळ्यांना ठाऊक आहे. ठाकरे कुटुंबाचा आणि पत्रकारांचा जुना ऋणानुबंध आहे. त्यावेळी मार्मिकच्या मुखपृष्ठावर जे चित्र होतं ते राज्यात आजही कायम आहे. आपल्याला महागाई, भ्रष्टाचार, टंचाईचा मिळून सामना करायचा आहे. जनतेच्या एकाही पैशाची उधळपट्टी होणार नाही, याची काळजी सरकार घेईल. पण त्यासाठी पत्रकारांनी सरकारचे कान, नाक आणि डोळे झाले पाहिजे. केवळ चुका सांगण्यापेक्षा चुका कशा सुधाराव्या हे देखील सांगितलं पाहिजे.\nकिमान समान कार्यक्रम ठरला, शेतकऱ्यांना कर्जमाफी, भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण\nउद्धव ठाकरेंचा शपथविधी : १०० आरे कार्यकर्त्यांची कार्यक्रमाला हजेरी\nप्रवाशांच्या तुलनेत लोकल फेऱ्या कमीच; धक्काबुक्की सहन करत करावा लागतोय प्रवास\nड्रग्ज प्रकरणात दिपिका पदुकोनची होणार आज चौकशी\nराज्यात कोरोनाचे १७ हजार ७९४ नवे रुग्ण, ४१६ जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत १८७६ नवे रुग्ण, ४८ जणांचा दिवसभरात मृत्यू\nआता Google Map सांगणार कोरोना हॉटस्पॉट\nमाहुलमधील प्रदूषण नियंत्रीत करा, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे निर्देश\nउपमुख्यमंत्र्यांची 'मोठी' घोषणा, राज्यात कृषी सुधारणा व कामगार विधेयक लागू करणार नाही\nबिहारमध्ये कोरोना संपलाय का संजय राऊत यांचा संतप्त सवाल\n“त्यानंतर मुंबईवरचं प्रेम उफाळून येईल”\nराज्यातील प्रार्थनास्थळं तूर्तास बंदच सरकारी निर्णयातील हस्तक्षेपास हायकोर्टाचा नकार\nघरगुती महिला कामगारांची स्थिती बिकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://entrepreneurshipd.com/importance-industrial-management-marathi/", "date_download": "2020-09-26T02:51:13Z", "digest": "sha1:C2HTKCDPELG3MIWATVYPELFX4W7NR3SZ", "length": 37964, "nlines": 116, "source_domain": "entrepreneurshipd.com", "title": "औद्योगिक व्यवस्थापनाचे महत्त्व | Importance of Industrial Management", "raw_content": "\nऔद्योगिक व्यवस्थापनाचे महत्त्व | Importance of Industrial Management\nऔद्योगिक व्यवस्थापनाचे महत्त्व / Importance of Industrial Management\nऔद्योगिक क्रांतीनंतर उद्योगक्षेत्रामध्ये हळूहळू व्यवस्थापनाचा अवलंब केला जाऊ लागला. याच काळात उद्योगक्षेत्राबरोबर व्यवस्थापनशास्त्राचाही हळूहळू विकास होत होता.\n१८ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते १ ९ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत उद्योग क्षेत्रामध्ये परंपरागत व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला जात होता. १ ९ व्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात रॉबर्ट ओवेन, चार्लस बॅबेज, हेन्री टौने यांसारख्या विचारवंतांनी व्यवस्थापनाबाबत शास्त्रीय विचारांची मांडणी केली. फ्रेडरिक टेलर यांनी सर्वप्रथम व्यवस्थित व विस्तृत स्वरूपात शास्त्रीय व्यवस्थापनाच्या सिद्धांताची मांडणी केली. शास्त्रीय व्यवस्थापनाचे महत्त्व उद्योगजगताला पटल्यामुळे शास्त्रीय व्यवस्थापनाचा उद्योगक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवलंब केला जाऊ लागला.\nजवळजवळ १ ९ ३० – १ ९ ४० पर्यंत उद्योगक्षेत्रावर शास्त्रीय व्यवस्थापनाचा प्रभाव होता. या काळात विविध व्यवस्थापन विचारवंतांनी उद्योगसंस्थेतील मानवी घटकांचे महत्त्व विशद केले. यानंतरच्या काळात उद्योगसंस्थेतील मानवी घटकाचे, मानवी संबंधाचे महत्त्व वाढत गेले. व्यवस्थापनाला मानवी, सामाजिक दृष्टिकोण दिला गेला. १ ९ ६० नंतर जपानी व्यवस्थापन पद्धतीचे महत्त्व वाढत गेले. अनेक विचारवंतांनी व्यवस्थापनाबाबत अनेक आधुनिक विचारांची, संकल्पनांची मांडणी केली. उदा. व्यूहरचनात्मक व्यवस्थापन, झेड सिद्धांत, उद्दिष्टाधिष्ठित व्यवस्थापन, समग्र गुणवत्ता व्यवस्थापन, स्पर्धात्मक लाभ, तणाव व्यवस्थापन इत्यादी २१ व्या शतकामध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया अधिक गतिमान झाल्याने जागतिक पर्यावरणात यशस्वी होण्यासाठी उद्योगसंस्था अतिशय सखोलपणे आधुनिक व्यवस्थापन संकल्पनांचा, तंत्राचा, पद्धतींचा अवलंब करू लागल्या. उद्योगक्षेत्राचे व्यवस्थापन आधुनिक आवश्यक त्या पद्धतींनी, सिद्धांतांनी केले जाऊ लागल्याने उद्योगक्षेत्राचा सर्वोच्च विकास झाला. औद्योगिक व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापन शास्त्राचा उद्योगक्षेत्रामध्ये अवलंब करणे होय. प्रभावी औद्योगिक व्यवस्थापनाचे लाभ, महत्त्व खालील मुद्द्यांच्या आधारे विशद केले जाते.\nऔद्योगिक व्यवस्थापनाचे महत्त्व खालील प्रमाणे आहेत\n१. उत्पादन साधनांचे अचूक संकलन\n२. वस्तू संशोधन व विकास\n५. कर्मचारी – मालक – व्यवस्थापन संबंध दृढ\n६. उत्पादन उद्दिष्टांची साध्यता\n८. संग्रहण व मालसाठा नियंत्रण\n९. माल हाताळणी व अंतर्गत वाहतूक\n१०. वस्तू व सेवांचे वितरण\n१४. व्यवसायाची कार्यक्षमता , उत्पादकता\n१५. व्यवसाय विस्तार व विकास\n१९ . उद्योगसंस्थेच्या पूर्वनिर्धारित उद्देशांची पूर्तता\n२१. बाह्य घटकांचे हितसंवर्धन\nउत्पादन क्रियेला प्रारंभ करण्यापूर्वी उत्पादन साधनसामग्रीचे अचूक संकलन करावे लागते. उदा. विविध प्रकारचा कच्चा माल, यंत्रसामग्री, हत्यारे, उपकरणे, जमीन, इमारत, ऊर्जासाधने इत्यादी. या सर्व घटकांची खरेदी योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य किमतीस, योग्य दर्जात करावी लागते. खरेदी क्रियेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन केल्यास शास्त्रीय खरेदीचे लाभ उद्योग संघटनेस प्राप्त होतात. थोडक्यात, प्रभावी खरेदी व्यवस्थापनामुळे उत्पादन साधनांचे अचूक संकलन करून एकूण उत्पादन खर्चामध्ये बचत करता येते.\n२. वस्तू संशोधन व विकास :\nग्राहकांच्या अपेक्षा, आकांक्षा, आवडीनिवडी सतत बदलत असतात. ग्राहकवर्ग नेहमी नवनचीन वस्तूंकडे आकर्षित होत असतो. बदलत्या फॅशनप्रमाणे ग्राहकांच्या मागणीमध्येही बदल होतो. यामुळे उद्योजकांना वस्तू संशोधन व विकासाची प्रक्रिया अविरत सुरू ठेवावी लागते. वस्तू संशोधनामध्ये पूर्णतः नवीन वस्तूचा शोध घेणे किंवा वस्तूच्या विविध गुणविशेषांपैकी एका किंवा काही गुणविशेषांमध्ये बदल करणे अभिप्रेत आहे, तर वस्तू विकासामध्ये वस्तू संशोधनाला मूर्त स्वरूप देणे व वस्तूची उपयुक्तता वाढविण्यासाठी वस्तूच्या गुणवत्तेमध्ये सतत सुधारणा करणे अभिप्रेत आहे. व्यवस्थापनशास्त्राच्या मदतीने वस्तू संशोधन व विकासकार्य केल्यास या कार्याची अचूकता वाढते.\n३. कर्मचारी नियुक्ती :\nआधुनिक युगात व्यवसायातील मानवी घटकास अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. कर्मचाऱ्यांना व्यवसायाचे एक महत्त्वाचे संसाधन समजले जाते. कर्मचाऱ्यांच्या सहकार्यावर व निष्ठेवर संघटनेचे यश अवलंबून असते, याची सर्व घटकांना जाणीव झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची भरती व निवड अतिशय काळजीपूर्वक व विचारपूर्वक करावी लागते. उद्योजक कर्मचारी भरती व निवडीच्या क्रियेचे अचूक नियोजन, संघटन, निर्देशन व नियंत्रण करून व्यवसाय संस्थेस योग्य व पात्र कर्मचारी प्राप्त करू शकतात.\n४. कर्मचारी विकास :\nकर्मचारी विकासातून व्यवसाय विकास या तत्त्वाचे महत्त्व उद्योजकांना पटले आहे. यामुळे ते व्यवस्थापनाच्या माध्यमातून कर्मचारी विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेले दिसतात. उदा. व्यवस्थापनाच्या व निर्णयाच्या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना सहभाग, सतत कार्यप्रोत्साहन, कर्मचाऱ्यांना विचार व मतस्वातंत्र्य, अधिकार प्रदान, प्रभावी व गतिमान नेतृत्व इत्यादी कर्मचारी घटकाचे प्रभावी व्यवस्थापन केल्यामुळे कर्मचारी विकासास चालना मिळते. कर्मचाऱ्यांना कार्य व मानसिक समाधान लाभल्याने ते संघटनेला पूर्ण सहकार्य व निष्ठा बहाल करतात.\n५. कर्मचारी – मालक – व्यवस्थापन संबंध दृढ :\nकर्मचारी , मालक व व्यवस्थापन हे उद्योगसंस्थेतील तीन प्रमुख मूलभूत घटक आहेत . या तिघांमध्ये विश्वास , सहकार्य व सामंजस्य असेल तर उद्योगसंस्था यशस्वी होते . कर्मचारी व मालक यांच्यात सख्य व सलोखा प्रस्थापित करणे हे व्यवस्थापनाचे एक प्रमुख कार्य आहे . व्यवस्थापनाने आपल्या व्यवस्थापन कौशल्याचा व अनुभवाचा उपयोग करून या दोन घटकांत एकरूपता साधून त्यांची शक्ती संस्थेच्या यशात परावर्तित केली पाहिजे.\n६. उत्पादन उद्दिष्टांची साध्यता :\nउत्पादनाचे उद्दिष्ट किमान साधनांत, प्रयत्नात, खर्चात साध्य करणे हे प्रत्येक उपक्रमाचे अंतिम ध्येय असते. उत्पादन क्रिया कार्यक्षमतेने व परिणामकारकतेने पूर्ण झाल्यास उत्पादनाचे उद्दिष्ट सहज साध्य होते. प्रभावी व शास्त्रशुद्ध उत्पादन व्यवस्थापनामुळे उत्पादन साधनांचे अचूक संकलन, उत्पादन क्रियेचे अचूक नियोजन, उत्पादन उपविभागांमध्ये अचूक समन्वय, उत्पादन समस्यांविरुद्ध अचूक निर्णय, उत्पादन कार्यावर काटेकोर नियंत्रण ठेवणे शक्य होते.\n७. भांडवल उभारणी :\nभांडवल उभारणी हे उद्योगसंस्थेचे एक प्राथमिक व मूलभूत कार्य आहे. उद्योगाचे स्वप्न, कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी पुरेशा भांडवलाची आवश्यकता असते. आवश्यकतेइतकेच भांडवल किमान खर्चात संपादन करण्यासाठी आर्थिक योजना आखावी लागते. भांडवलाचे अचूक व्यवस्थापन केल्यामुळे आर्थिक योजनेला निश्चित यश प्राप्त होते. भांडवली गरजेचा अंदाज, भांडवल उभारणीच्या मार्गाची निवड, भांडवल रचना, भांडवलाचे प्रबंधन ही सर्व कार्ये प्रभावी वित्त व्यवस्थापनामुळे कार्यक्षमतेने पूर्ण होतात.\n८. संग्रहण व मालसाठा नियंत्रण :\nउत्पादन संस्थेचे आर्थिक यश बऱ्याच अंशी कार्यक्षम संग्रहण व मालसाठा नियंत्रणावर आधारित असते. संग्रहण व्यवस्थापनामुळे साधनसामग्रीचे सुरक्षित जतन, मालाची भौतिक मोजणी, अचूक माल हाताळणी, मालाचे वर्गीकरण व सांकेतिकीकरण व मालाचे हिशेब लेखन ही सर्व कार्ये अचूकपणे पार पडतात. तसेच मालसाठा व्यवस्थापनामुळे मालसाठा पर्याप्त पातळीस राखणे, मालसाठ्याचे सुरक्षित जतन व पुरवठा, मालसाठा मोजणी, मालसाठा किंमतनिश्चिती ही सर्व कार्ये कार्यक्षमतेने पूर्ण होतात. थोडक्यात, संग्रहण व मालसाठा कार्याचे अचूक नियोजन, संघटन, निर्देशन व नियंत्रण केल्यामुळे उत्पादन खर्चात बरीच बचत होते.\n९. माल हाताळणी व अंतर्गत वाहतूक :\nउद्योगसंस्थेमध्ये कच्चा माल, हत्यारे व उपकरणांची माल हाताळणी व अंतर्गत वाहतूक नियमित करावी लागते. ही दोन्ही कार्ये कार्यक्षमतेने केल्यास साधनसामग्रीचा अपव्यय, नासधूस होत नाही. अचूक माल हाताळणी व सुरक्षित अंतर्गत वाहतुकीसाठी या दोन्ही कार्यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते.\n१०. वस्तू व सेवांचे वितरण :\nआधुनिक युगात वस्तू व सेवांच्या वितरण क्रियेस उत्पादन क्रियेपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे . वाढत्या स्पर्धेमुळे वितरण सेवेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे . यामुळे वितरण कार्याचे प्रभावी व्यवस्थापन करावे लागते .\nविक्रयवृद्धी , ग्राहकवृद्धी , बाजारपेठ व लाभवृद्धी अशा विविध उद्दिष्टांची साध्यता कार्यक्षम वितरण व्यवस्थापनावर आधारित असते . जाहिरात , प्रत्यक्ष विक्री , विक्रीपश्चात सेवा , बाजारपेठ संशोधन , वाटपमार्ग – मध्यस्थांची निवड , ग्राहक संपर्क इत्यादी कार्ये आधुनिक व्यवस्थापनाच्या तंत्राच्या , शैल्यांच्या साहाय्याने पार पाडल्यास अंतिम वितरण कार्यास कार्यक्षमता प्राप्त होते .\nव्यावसायीन कार्ये कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रे , हत्यारे , उपकरणे , सेवाकेंद्रे , कार्यकेंद्रे इत्यादींची योग्य जागी मांडणी करणे म्हणजे यंत्ररचना होय . योग्य व शास्त्रीय रचनेमुळे कार्यप्रवाहास योग्य दिशा , गती व सातत्य प्राप्त होते . यंत्ररचनेबाबत अचूक पूर्वानुमान व नियोजन केल्यास , अचूक निर्णय घेतल्यास व यंत्ररचनेचे प्रभावी नियंत्रण केल्यास यंत्ररचना आदर्श होते . थोडक्यात , यंत्ररचनेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे .\n१२. आदर्श कार्यवातावरण :\nउत्पादन स्थळावरील कार्यपरिस्थिती व कार्यवातावरण उत्साहवर्धक व आरोग्यदायक असले पाहिजे . कामगारांचे कार्यसमाधान , कार्यक्षमता पर्यायाने संघटनेची कार्यक्षमता योग्य कार्यस्थितीवर अवलंबून असते . व्यवस्थापनाने कार्यपरिस्थितीमधील सर्व घटकांचे अचूक नियोजन , संघटन , समन्वय व नियंत्रण केले पाहिजे . व्यवस्थापनाने कार्यवातावरणातील सर्व घटकांबाबत अचूक निर्णय घेऊन कार्यवातावरण सुरक्षित बनविले पाहिजे .\n१३. गुणवत्ता नियंत्रण :\nआधुनिक युगामध्ये वस्तू व सेवांच्या गुणवत्तेला विशेष स्थान आहे . जागतिक बाजारपेठेमध्ये वस्तूच्या गुणवत्तेला सर्वोच्च महत्त्व दिले जाते . सद्यःस्थितीत गुणवत्ता व्यवस्थापनाची जागा समग्र गुणवत्ता व्यवस्थापनाने घेतलेली आहे . व्यवसायातील सर्व घटकांनी समग्र गुणवत्ता व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत भाग घेतल्यास व्यवसायाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होते . अंतिम वस्तू व सेवांच्या सर्वोच्च गुणवत्तेसाठी समग्र गुणवत्ता व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे .\n१४. व्यवसायाची कार्यक्षमता , उत्पादकता :\nव्यवसायाची कार्यक्षमता व उत्पादकता ही बऱ्याच अंशी आधुनिक व्यवस्थापन पद्धती व तंत्रावर आधारित असते . व्यावसायीन कार्यांचे अचूक नियोजन , संघटन , निर्देशन व नियंत्रण केल्याने अचूक निर्णय प्रक्रियेमुळे , विविध विभागांतील योग्य समन्वयामुळे , जलद संदेशवहनामुळे व गतिमान नेतृत्वामुळे त्यांची कार्यक्षमता , उत्पादकता उंचावते . परिणामतः व्यवसायाची कार्यक्षमता व उत्पादकताही उंचावते.\n१५. व्यवसाय विस्तार व विकास :\nप्रभावी व्यवस्थापन हे व्यवसाय विस्तार व विकासाचे एक मूलभूत साधन आहे . आधुनिक व्यवस्थापन विचारांचा , संकल्पनांचा अवलंब करून उत्पादन साधनांचा कमाल वापर व उत्पादन खर्चात बचत करणे शक्य होते . उदा , व्यूहरचनात्मक व्यवस्थापन , उद्दिष्टाधिष्ठित व्यवस्थापन इत्यादी . थोडक्यात , कुशल व्यवस्थापनामुळे व्यवसायाच्या लाभक्षमतेची वृद्धी होते . पर्यायाने व्यवसायाचा विस्तार व विकास होतो .\n१६. ग्राहक समाधान :\nग्राहक समाधानावर ग्राहकांचा पाठिंबा , सहकार्य व निष्ठा आधारित असते . व्यवसायाने ग्राहकहिताचा विचार केल्यास ग्राहकही व्यवसायहिताचा विचार करतात , ग्राहकांना रास्त किमतीत , दर्जेदार , आवश्यक त्या प्रमाणात वस्तू व सेवांचा पुरवठा केल्यास ग्राहकांना सुखसमाधान प्राप्त होते . उत्पादन व वितरण कार्याच्या अचूक नियोजन व नियंत्रणामुळे वस्तू व सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होऊन उत्पादन खर्चात घट होते . आधुनिक व्यवस्थापन ग्राहकांशी सतत संपर्क साधून त्यांच्या अपेक्षा , इच्छा जाणून घेते व त्यानुसार आपल्या उत्पादन व वितरण धोरणात योग्य ते बदल करते . यामुळे ग्राहक सुखी बनतात .\nआधुनिक व्यवस्थापनाकडे सामाजिक दृष्टिकोण असल्याने ते समाजहिताचा , कल्याणाचा प्राधान्याने विचार करते . नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर , रोजगारवाढीस चालना , यंत्र व श्रमशक्तीचा महत्तम उपयोग , योग्य व्यापारी प्रथांचा अवलंब , औद्योगिक शांतता प्रस्थापनेसाठी प्रयत्न अशा विविध सकारात्मक कृतींमुळे समाजकल्याण , उन्नती शक्य होते . थोडक्यात , आधुनिक व गतिमान व्यवस्थापन व्यवसायाचा कारभार कार्यक्षमतेने चालवून समाजविकासाला चालना देतात.\nदेशातील उद्योगक्षेत्रामध्ये आधुनिक व्यवस्थापन पद्धती , तत्त्वांचा अवलंब केल्यास उद्योगक्षेत्राचा विस्तार व विकास होतो . कुशल व्यवस्थापकांमुळे देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा , मनुष्यबळाचा सुयोग्य व परिपूर्ण वापर होतो . उद्योगक्षेत्राच्या विकासामुळे रोजगारवाढीस चालना मिळते . वस्तू व सेवांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे लोकांच्या राहणीमानांचा स्तर उंचावतो . प्रभावी व्यवस्थापनामुळे उद्योगक्षेत्राचा विकास झाल्याने राष्ट्राच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळते . राष्ट्रीय उत्पादनात व उत्पन्नात वाढ होते .\n१९ . उद्योगसंस्थेच्या पूर्वनिर्धारित उद्देशांची पूर्तता :\nउद्योगसंस्थेचे व्यवस्थापन कुशल व बुद्धिमान व्यवस्थापकांच्या हाती असेल तर ते अचूकपणे कर्मचाऱ्यांच्या कार्यांचे व प्रयत्नांचे नियोजन , संघटन , निर्देशन व नियंत्रण करतात . यामुळे कार्यप्रवाहास योग्य दिशा व गती प्राप्त होऊन कार्यांची कार्यक्षमता उंचावते . उद्योगसंस्थेच्या पूर्वनिर्धारित उद्देशांची पूर्तता होते व तिला आर्थिक स्थैर्य लाभते .\n२०. औद्योगिक शांतता :\nव्यवस्थापनाला मानवी दृष्टिकोण देण्याचे मौलिक कार्य एल्टन मेयो यांनी केले आहे . आधुनिक व्यवस्थापन विचारवंतांनी व्यवसाय संस्थेतील मानवी घटकाचे महत्त्व विविध प्रकारे विशद केले आहे . आधुनिक व्यवस्थापन कर्मचारी समाधानासाठी व विकासासाठी सतत प्रयत्नशील असते . या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या सेवा – सुविधा पुरविल्या जातात . यामुळे कामगार – व्यवस्थापन – मालक यांच्यात स्नेह व सलोखा वृद्धिंगत होतो . कामगारांना पूर्ण कार्य , मानसिक , आर्थिक समाधान लाभते . यामुळे उद्योगक्षेत्रात औद्योगिक शांतता प्रस्थापित होण्यास मदत होते .\n२१. बाह्य घटकांचे हितसंवर्धन :\nउद्योगसंस्थेमध्ये उत्पादन व वितरण या दोन मूलभूत क्रिया पार पाडल्या जातात . परंतु , या क्रिया कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी समाजातील विविध व्यक्ती घटकांची , संस्थांची मदत घ्यावी लागते . उदा . पुरवठादार , आनुषंगिक सेवा पुरविणाऱ्या संस्था , वितरण क्रियेत सहभागी होणारे मध्यस्थ , शासन , स्थानिक स्वराज्य संस्था , सामाजिक संस्था इत्यादी . या संस्थांचे आर्थिक हितसंबंध उद्योगसंस्थेमध्ये गुंतलेले असतात . उद्योगसंस्थेचे कुशल नेतृत्व प्रशिक्षित व्यवस्थापक वर्ग करीत असेल , तर ते सामाजिक हिताचे भान ठेवून योजना व धोरणांची आखणी करतात . यामुळे आपोआप विविध सामाजिक घटकांचे हितसंरक्षण व हितसंवर्धन होते .\nयाशिवाय , उद्योगक्षेत्राचे व्यवस्थापन आधुनिक पद्धतीने , तंत्राने केले जात असेल , तर त्याचे अनेक लाभ संबंधित उद्योगसंस्थेला , उद्योगक्षेत्राला , सामाजिक घटकांना व राष्ट्राला प्राप्त होतात . उदा . व्यवसाय पर्यावरणातील प्रतिकूल घटकांवर यशस्वी मात , तर अनुकूल घटकांचा प्रभावी उपयोग , आधुनिक तंत्रज्ञानाचा सहज अवलंब , जागतिक स्पर्धेवर मात , उत्पादन साधनांमध्ये अचूक समन्वय , जलद राष्ट्रविकास , निर्यातवृद्धी , राष्ट्राच्या संपन्नतेत व समृद्धीत वाढ इत्यादी .\nग्रामीण भागातील व्यवसाय संधी | खेडेगावातील व्यवसाय village business ideas in Marathi\nERP चे अर्थ आणी व्यवसाय संस्थेतील महत्व\nबदलत्या पर्यावरणातील आधुनिक व्यवस्थापनाचे महत्त्व\nERP चे अर्थ आणी व्यवसाय संस्थेतील महत्व\nऔद्योगिक व्यवस्थापनाचे महत्त्व | Importance of Industrial Management\nग्रामीण भागातील व्यवसाय संधी | खेडेगावातील व्यवसाय village Business ideas in Marathi\nIndustrial Management औद्योगिक व्यवस्थापन (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/ddrc-nagpur-bharti-2020/", "date_download": "2020-09-26T01:12:09Z", "digest": "sha1:QRWKG673PEHXU5RI4FIQZ4WJHTLPZ5ST", "length": 7115, "nlines": 95, "source_domain": "mahabharti.in", "title": "DDRC Nagpur Bharti 2020 - Attend the Walk-in Interview", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nDDRC नागपूर भरती २०२०\nDDRC नागपूर भरती २०२०\nजिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, नागपूर येथे विविध पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १८ जानेवारी २०२० आहे.\nपदाचे नाव – क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ, ऑर्थोपेडिकली अपंग ज्येष्ठ प्रोस्थेटिक्स, प्रोस्थेटिक्स ऑर्थोटिक्स तंत्रज्ञ, वरिष्ठ भाषण चिकित्सक / ऑडिओलॉजिस्ट, श्रवण सहायक / कनिष्ठ भाषण चिकित्सक, गतिशीलता प्रशिक्षक, फील्ड व लोक सहाय्यक, अकाउंटंट कम लिपिक कम स्टोअर कीपर, व्यावसायिक सल्लागार कम संगणक, अटेंडंट कम शिपाई कम मेसेंजर\nपद संख्या – ११ जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nनोकरी ठिकाण – नागपूर\nनिवड प्रक्रिया – मुलाखत\nमुलाखतीचा पत्ता – बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१\nमुलाखत तारीख – १८ जानेवारी २०२० आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nPDF जाहिरात अधिकृत वेबसाईट\nमहाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nUT प्रशासन दमण आणि दीव येथे विविध पदांची भरती\nमुंबई उपनगर जिल्हा येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची भरती\nICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाची भरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, दिव अंतर्गत विविध पदांची भरती\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांच्या 171 जागांसाठी ऑनलाईन अर्ज…\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती\nRITES लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदांची भरती\nजेईई अॅडव्हान्स्ड: ९८ टक्के विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा केंद्र\nनॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरु\nनाशिक महानगरपालिका भरती पात्र आणि अपात्र यादी\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/2017/10/08/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE/?shared=email&msg=fail", "date_download": "2020-09-26T01:49:50Z", "digest": "sha1:CBQ5LJGT7VADHKMMFHXC4FLGB7SMWTTI", "length": 4950, "nlines": 97, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "आई बाबा", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nआई तुळशी समोरचा दिवा असते\nबाबा त्याचा मंद प्रकाश असतात\nआई अंगणातील रांगोळी असते\nबाबा त्या रांगोळीतला रंग असतात\nआई देवासमोर लावलेली निरांजन असते\nबाबा त्याची ज्योत असतात\nआई घरभर पसरलेली धूप असते\nबाबा त्यातील सुगंध असतात\nआई मनावरचा संस्कार असते\nबाबा ते घडवणारे असतात\nआई आयुष्याची वाट असते\nबाबा त्या वाटेवर चालवणारे असतात\nआई एक वाक्य असते\nबाबा वाक्यातील शब्द असतात\nआई एक कविता असते\nबाबा त्याचा भाव असतात\nसूर्याचे तेज म्हणजे आई असते\nबाबा त्यांची किरणे असतात\nआई असते आपली माऊली\nत्या माऊलीची साथ बाबा असतात\nजिद्द म्हणजे काय हे आई असते\nमनातला विश्वास म्हणजे बाबा असतात\nआई विना हे जग अधुरे असते\nबाबा हे सारे विश्व असतात\nएक होते लोकमान्य …\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2020-09-26T01:57:30Z", "digest": "sha1:WEL27TF7N3W4N4ZYUTG5NM3LNQKFIE4X", "length": 13048, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "वादग्रस्त पुस्तकावर बंदी घाला | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nवादग्रस्त पुस्तकावर बंदी घाला\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nछत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना अयोग्यच : भुसावळात मराठा समाज संतप्त\nभुसावळ : ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या जय भगवान गोयल लिखीत पुस्तकावर बंदी आणावी तसेच प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भुसावळ शहरासह मुक्ताईनगरात सोमवारी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करण्यात आल्याने भुसावळातील मराठा समाजबांधवांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी निषेध करीत प्रशासनाला निवेदन दिले. या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी प्रसंगी करण्यात आली.\nभुसावळात मराठा समाजबांधव संतप्त\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले आणि हिमालयाच्या उंची एवढे कर्तृत्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी मोदींची तुलना केल्यामुळे संबंध मराठा समाजात नाराजीचे आणि संतापाचे वातावरण तयार झाले असून छत्रपती शिवाजी महाराजांची कुणाशीही तुलना होवू शकत नाही. या पुस्तकाच्या लेखकावर आणि पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी घालून पुस्तकाच्या विक्रीला बंदी घालावी व महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी लेखकाने मागावी अन्यथा महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या रोषास सामोरे जावे लागे, अशी मागणी भुसावळ तालुका सकल मराठा समाजातर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन देउन करण्यात आली. निवेदन देतांना मराठा समाज तालुकाध्यक्ष किरण पाटील, नगरसेवक मुकेश गुंजाळ, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, राहुल बोरसे, ललित मराठे, सुशील बर्गे, प्रमोद पाटील, छावा तालुकाध्यक्ष ईश्वर पवार, वकिल संघ अध्यक्ष तुषार पाटील, संजय कदम, राजेंद्र चौधरी, विजय कलापुरे, वैभव गुंजाळ, राहुल पाटील, सचिन पाटील, योगेश जाधव, गणेश बावडेकर, रजत शिंदे, प्रमोद पाटील, शुभम पाटील, रुपेश पाटील, ज्ञानेश्वर जगदाळे, मुकेश सोनवणे, सागर लापुळकर, अ‍ॅड.मोझे, संजय शिंदे, दीपक जुंबळे, धीरज मराठे, नरेश पाटील आदीची उपस्थिती होती.\nपुस्तकावर बंदी आणा ः राष्ट्रवादीची मागणी\nभुसावळ- ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या जय भगवान गोयल लिखीत पुस्तकावर बंदी आणावी तसेच प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करणे योग्य नाही. निवेदनावर युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, नगरसेवक उल्हास पगारे, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष नितीन धांडे, राजेंद्र चौधरी, राहुल, बोरसे, गणेश कोळी, रवींद्र सोनवणे, योगेश पाटील, जयंत शूरपाटणे, दीपक दीपके, योगेश नरोटे, ज्ञानेश्‍वर पाटील, रंजीत चावरीया, विशाल भंगाळे, अनुप नागपूरे, प्रदीप कोळी, संतोष माळी, समाधान चौधरी, प्रवीण आखाडे, जितेंद्र आव्हाड आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.\nमुक्ताईनगरात मुस्लीम समाजातर्फे निषेध\nमुक्ताईनगर येथेही या पुस्तकाच्या निषेधार्थ मुस्लीम समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी मणियार बिरादरीचे हकीम चौधरी, काँग्रेसचे जिल्हा सचिव आसीफखान इस्माईलखान, मराठा समाज सेवा संघाचे दिनेश कदम, शिवसेना जिल्हा संघटक अफसरखान, गंगाधर बोदडे, आतीकखान, आसीफ शेख उस्मान, रीजवान चौधरी, शेख असगर शेख, सादीक खाटीक, अहेमद ठेकेदार, वसीम कुरेशी, मुख्तार रबाणी आदी उपस्थित होते.\nतान्हाजी चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार \nवरणगाव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ\nभारतात कोरोना चाचणीचा नवा विक्रम; एका दिवसात विक्रमी चाचणी\nBIG BREAKING: बिहार निवडणुकीची घोषणा: तीन टप्प्यात होणार मतदान\nवरणगाव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ\nनंदुरबार न.पा.च्या सभापतींची निवड जाहीर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8568.html", "date_download": "2020-09-26T01:10:10Z", "digest": "sha1:YLDOP5D4YGLPVKBCGP33KOKTORBQPESA", "length": 13881, "nlines": 46, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग १२ - पुढचे पाऊल पुढेच पडेल", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग १२ - पुढचे पाऊल पुढेच पडेल\nशिवाजीराजांनी यावर्षी (दि. २ 3 ते 3 ०एप्रिल १६५७ ) एका अत्यंत अवघड अशा धाडसी राजकारणात हात घातला.मोगलांसारख्या दैत्य बळाच्या सत्तेविरुद्धपहिला हल्ला केला. मोगली ठाणी मारली.\nऔरंगजेबानं सर्व पाताळयंत्री डाव आणि ढोंगबाजी करून दिल्ली कब्जात घेतली. त्याने बापाला आग्ऱ्याला कैदेत ठेवले. तो 'आलमगीर ' बनला. म्हणजे जगाचा सत्ताधीश या त्याच्या आलमगीर पदवीचा शिवाजीराजांवर काय परिणाम झाला या त्याच्या आलमगीर पदवीचा शिवाजीराजांवर काय परिणाम झाला राजांवर दहशत बसली का राजांवर दहशत बसली का छे पण ते खिन्नतेने बहुदा हसले असावेत राजपुतांच्या राजनिष्ठेला.\nपण इराणच्या बादशाहवर मात्र परिणाम झाला. याचे नाव होते शहा अब्बास सानी. त्याला औरंगजेबाचा राग आला. तिरस्कार वाटला आणि कीवही. पण त्याने एक पत्र औरंगजेबाला लिहिले. त्यांत शहा अब्बास लिहितो : ' अरे तू आलमगीर केव्हा झालास तू आलमगीर केव्हा झालास जगाचा सत्ताधीश तो दक्षिणेकडे ( म्हणजे महाराष्ट्रात) असलेला शिवाजी तुला हैराण करतोय. त्याचा बंदोबस्त तुझ्याने होईना आणि तू आलमगीर \nम्हणजे या आणि पुढच्या काळात शिवाजीराजांच्या धुमाकुळाची रणधुमाळी इराणच्या तेहरानराजधानीपर्यंत पोहोचली.\nशिवाजीराजांच्या राज्यकराभारात आणि रणकारभारात एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने दिसून येते. ती म्हणजे स्वावलंबन. कुठेही , कुणाकडेही मदतीच्या-भिक्षेच्या आशाळभूतपणाने ते बघत नाहीत. अन्नधान्य , युद्ध साहित्य , गडकोटांची बांधणी , दारूगोळा आणि आथिर्क खजिना सदैव समृद्धच असला पाहिजे , हा त्यांचा कडक आग्रह होता. स्वराज्याला कधीही आथिर्क कर्ज काढण्याची वेळ आलीच नाही. यात अनेक गोष्टी प्रकर्षानं नजरेत भरतात. आवश्यक तेवढा खर्च ,आवश्यक ती काटकसर , उधळपट्टीला पुरता पायबंद , शिस्त चिरेबंद , भ्रष्टाचारी , गुन्हेगारी पक्की जेरबंद. एकदा का सरकारी सेवकांना लाच खायची सवय लागली की , रयतेची दु:खे आणि तेवढेच शाप राज्यर्कत्याला सोसावे लागतात हे राजांनी पक्कं जाणलं होतं. ' रयतेस आजार देऊ नये. रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये. रयत दु:खी झाली तर म्हणू लागेल की , यापेक्षामोगल बरे मग मराठीयांची इज्जत वाचणार नाही. ' हा महाराजांचा राज्यकारभार. राज्यसंसार. एखाद्या दक्ष पण तेवढ्याच प्रेमळ अशा गृहिणीसारखा राज्यकारभार महाराज करीत होते. न्यायचोख होता. अन्याय करणाऱ्यांना कडक शिक्षा होत होत्या. कामगिरी करणाऱ्यांना ते पोटाशी मायेनं घेऊन कौतुक करीत होते.\nम्हणूनच जुन्या पत्रांत राजांच्याबद्दल शब्द येतात बेलाफुलासारख्या भक्तीचे , तुळशी-दवण्यासारख्या अन् चाफा-बकुळीसारख्या सुगंधांचे. हे बघा ना ' राजश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी ', ' हे श्रींचे राज्य आहे ', ' हे श्रींच्या वरदेचे राज्य आहे. '\nशिवाजी महाराज फार फार प्रेमळ होते. गुणी आणि कष्टाळू परमार्थवंत आणि चारित्र्यवंत संतसज्जनांचे ते नम्र भक्त होते. कोणत्याही धर्माच्या , पंथांच्या वा जातीच्या ईश्वरभक्तापुढे ते हात जोडून होते. पण कोणत्याही राजकारणात वा राज्यकारभारात त्यांनी या संतांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही. त्याही संतांनी फक्त देवभक्ती , लोकजागृती आणि लोकसेवाच केली. यात कोणीही सरकारी संत नव्हताच.\nशिवाजीराजा एक माणूस होता. तो अवतार नव्हता. आपण शिवाजीराजांच्या दैदिप्यमानपराक्रमी कृत्यांनी आणि उदात्त आचरणाने दिपून जातो. आपले डोळे भक्तीभावाने मिटतात. नको ते डोळे उघडण्याची आवश्यकता आहे.\nशिवाजीमहाराजांनी अचूक संधी साधून , आपल्या कर्दनकाळासारख्या महाभयंकर असलेल्या सत्तेवर जुन्नर , नगर , श्रीगोंदे इत्यादी ठाण्यांवर हत्यार चालविले , हे पाहून औरंगजेबाचे डोळे खाडकन उघडले. वटारले गेले. तो या गोष्टीचा बदला नक्कीच घेणार होता. पण दिल्ली ताब्यात आल्यावर स्थिरस्थावर व्हायला वेळ लागणार होता. त्यावेळचाही फायदा घेणार होते. शिवाजीराजे त्यांनी औरंगजेबी सत्तेखालचे कोकणातले उत्तर ठाणे जिल्ह्यातले काही किल्ले घेतलेच. राजांच्यासारखा अचूक संधीसाधू राष्ट्राला नेहमीच हवा असतो.\nयाचवेळी ( इ. स. १६५७ उत्तरार्ध) राजांनी कोकणात आपला घोडा उतरविला. कारण त्यांनासंपूर्ण कोकण समुदासकट स्वराज्याच्या कब्जात हवे होते. राजांनी दादाजी रांझेकर आणि सखो कृष्ण लोहोकरे यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर कल्याण आणि भिवंडी जिंकावयास रवाना केले ,जिंकले. या दोघांनीही एकाच दिवशी कल्याण , भिवंडी काबीज केली. या दिवशी दिवाळीतील वसुबारस होती. (दि. २४ ऑक्टो. १६५७ ) दुर्गाडी किल्ल्यावर झेंडा लागला. इथे भूमीगत धन हंडे भरून राजांना मिळाले. लक्ष्मीपूजन सार्थ झाले. कल्याणच्या खाडीत मराठी आरमाराचा शुभारंभ झाला. आगरी , भंडारी आणि कोळी जवान सागरलाटेसारखे महाराजांच्याकडे धावतआले. आरमार सजू लागले. पैशात किंमतच करता येणार नाही , हिऱ्यामाणकांनी तुळा करावी अशी ही कोकणची जवान आगरी , कोळी , भंडारी माणसं आरमारावर दाखल झाली. कोकणची किनारपट्टी हळूहळू स्वराज्यात येऊ लागली. आंबा पिकत होता , रस गळत होता पण कोकणचा राजा उपाशीपोटीच झोपत होता. आता स्वराज्यात आमराया बहरणार होत्या. नारळी सुपारी चवरीसारख्या डुलणार होत्या. कोकणचा हा उष:काल होता.\nकल्याण भिवंडीपासून दक्षिणेकडे कोकणवर महाराजांची मोहीम सुरू झाली. एकेक ठाणं भगव्याझेंड्याखाली येऊ लागलं.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/drsudam-munde-again-arrested-for-illegal-activities-in-hospital-127691387.html", "date_download": "2020-09-26T01:59:09Z", "digest": "sha1:F44KZJB6CLEPYW2OJL4NR7BPMJ5QAX5Y", "length": 4434, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "DR.Sudam Munde again arrested for illegal activities in hospital | स्त्री भ्रूण हत्येची शिक्षा भोगून आलेल्या सुदाम मुंडेने पुन्हा सुरू केली प्रॅक्टीस, पोलिसांनी घेतले ताब्यात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबीड:स्त्री भ्रूण हत्येची शिक्षा भोगून आलेल्या सुदाम मुंडेने पुन्हा सुरू केली प्रॅक्टीस, पोलिसांनी घेतले ताब्यात\nमहाराष्ट्रासह देशभर गाजलेल्या बीड जिल्ह्यातील परळीमधील स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सुदाम मुंडे याने शिक्षा भोगून आल्यानंतर परत बेकायदेशीरपणे वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने आज(6 सप्टेंबर) पहाटे परळीतील नंदागौळ रोडवर असलेल्या मुंडे हॉस्पिटलवर पोलिसांनी छापा मारुन सुदाम मुंडेला अटक केली आहे.\nस्त्री भ्रूण हत्येप्रकरणी डॉ. सुदाम मुंडेची वैद्यकीय पदवी न्यायालयाने कायमपी रद्द केली आहे. तरीही मुंडेने परत प्रॅक्टिस सुरू केली होती. जिल्ह्यातील काही लोकांनी सुदाम मंडेच्या या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर आज पहाटे पोलिसांनी परळीतील नंदागौळ रोडवर असलेल्या मुंडे हॉस्पिटलवर छापा टाकला आणि त्याला अटक केले. विशेष म्हणजे, मुंडेचा परवाना रद्द झाल्यामुळे त्याने आपल्या मुलीच्या नावे हे हॉस्पीटल सुरू केले होते आणि स्वतः या ठिकाणी प्रॅक्टिस करत होता.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/results-of-teacher-eligibility-test-announced-16-thousand-592-teachers-eligible-for-this-exam-127587337.html", "date_download": "2020-09-26T03:19:41Z", "digest": "sha1:THMOCGHH66RIA44N7N24W5TSJHBJN2VA", "length": 4759, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Results of Teacher Eligibility Test announced, 16 thousand 592 teachers eligible for this exam | शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर, 16 हजार 592 शिक्षक या परीक्षेत पात्र - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपात्रता परीक्षा:शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर, 16 हजार 592 शिक्षक या परीक्षेत पात्र\nऔरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जानेवारी २०२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) चा निकाल बुधवारी ऑनलाइन जाहीर केला. यंदा ३ लाख ४३ हजार पैकी १६ हजार ५९२ शिक्षक या परीक्षेत पात्र ठरले आहेत.२०१९ ची परीक्षा १० जानेवारी २०२० रोजी झाली होती. राज्यभरातून ३ लाख ४३ हजार २४२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. राज्यातील १ हजार ४४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती.\nपरीक्षा परिषदेच्या वतीने गेल्या पाच सहा वर्षांपासून शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येत आहे. शिक्षक म्हणून नोकरीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे . यंदा 'टीईटी'च्या पेपर एक साठी (इयत्ता १ली ते ५वी गट), १ लाख ८८ हजार ६८८ पैकी १० हजार ४८७ जण पात्र झाले आहेत. तर पेपर दोन साठी (इयत्ता ६वी ते ८वी गट) १ लाख ५४ हजार ५९६ परीक्षार्थींपैकी ६ हजार १०५ जण पात्र झाले आहेत. आत्तापर्यंतच्या सहा परीक्षांमध्ये राज्यभरातील ८६ हजार २९८ शिक्षक या परीक्षेत पात्र ठरले आहेत. जानेवारीत परीक्षा झाल्याने निकाल लवकर लागेल अशी अपेक्षा होती परंतु राज्यभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि प्रश्नपत्रिकेतील चुका झाल्याने निकालास उशिर झाल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/balasaheb-thackeray-accident-insurance-scheme-in-the-state-decision-taken-by-the-government-in-the-state-cabinet-meeting-127727077.html", "date_download": "2020-09-26T02:58:39Z", "digest": "sha1:FX2OAZ6QX3IL2SOQMFDVPD7UHFUUZSTD", "length": 6482, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Balasaheb Thackeray Accident Insurance Scheme in the state, decision taken by the government in the state cabinet meeting | राज्यात स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतला निर्णय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअपघात विमा योजना:राज्यात स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतला निर्णय\n74 उपचार पद्धतीतून 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाईल\nराज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीस आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड करण्यात येईल. या योजनेत महाराष्ट्रातील रस्त्यावर झालेल्या अपघातामधील व्यक्तींना याचा लाभ मिळेल.\nही व्यक्ती कोणत्याही राज्य, देशाची असली तरी देखील त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यात येतील. अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल. आजमितीस राज्य महामार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांवर अपघातात दरवर्षी सरासरी ४० हजार व्यक्ती जखमी तर १३ हजार व्यक्ती मरण पावतात. यांना वेळीच उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकले असते. या योजनेत पहिल्या ७२ तासासाठी जवळच्या रुग्णालयांमधून उपचार करण्यात येतील. सुमारे ७४ उपचार पद्धतीतून ३० हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाईल.\nकांदा निर्यात बंदीबाबत केंद्र सरकारला पत्र पाठविणार : कांदा निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.\nराज्यातील सर्व जिल्ह्यांत होणार कृषी महोत्सव\nराज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी महोत्सव आयोजित करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा महोत्सव ५ दिवसांचा असेल कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास या वर्षात राबविण्यात येईल. पुढील वर्षापासून आत्मा नियामक मंडळाच्यामार्फत हे महोत्सव आयोजित केले जातील. शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र यांच्यामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होते तसेच शेतकऱ्यांना ग्राहकांसाठी थेट विक्रीची संधी मिळते. म्हणून या जिल्हा कृषी महोत्सव योजनांचे आयोजन केले जात आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/bollywood/actress-sana-khan-who-was-depression-after-breakup-had-taken-sleeping-pills-20-days-srj/", "date_download": "2020-09-26T02:26:42Z", "digest": "sha1:5EDPE6LYCRSBGHIVJGNGGU6LMWZT45ZL", "length": 30238, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ब्रेकअपनंतर डिप्रेशनमध्ये होती 'ही' अभिनेत्री, 20 दिवस घेतल्या होत्या झोपेच्या गोळ्या - Marathi News | Actress Sana Khan who was in depression after the breakup, had taken sleeping pills for 20 days-SRJ | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २६ सप्टेंबर २०२०\n‘त्या’ ग्रुपची दीपिकाच होती अ‍ॅडमिन\nवेश्याव्यवसाय करणे गुन्हा नाही\nबॅकलॉगच्या परीक्षांचा पहिला दिवस गोंधळाचा\nतळमजल्यावरील अन्य बांधकाम का तोडले\nपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना ‘कोविड क्रुसेडर्र्स २०२०’ पुरस्कार\n 'त्या' ड्रग्स चॅटिंग ग्रुपची अ‍ॅडमिन होती दीपिका पादुकोण, ज्यात लिहिलं होतं माल है क्या\nअर्धांगवायूच्या झटक्यामुळे या अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण, नवऱ्याने मागितली आर्थिक मदत\nश्रद्धा कपूरच्या नावे कारमध्ये सप्लाय व्हायचे ड्रग्ज, करमजीतने साराबद्दलही केला मोठा खुलासा\nएसपी बालासुब्रमण्यम यांना आयुष्यभर वाटत होती या गोष्टीची खंंत, मुलांबाबत केले होते वक्तव्य\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \nनवीन कामगार कायदा नोकऱ्या घालवणार \nराजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेतृत्व की लुटारु, दलालांचे\nकोरोनापश्चात जगाशी जुळवून घेताना...\nचांगल्या आरोग्यासाठी ऋतुंनुसार कसा आहार घ्यायचा जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nडेंग्यू झाल्यानंतर तयार झालेल्या एंटीबॉडी कोरोनाचा सामना करणार; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus : समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका\nआजचे राशीभविष्य -२६ सप्टेंबर २०२०; यश, कीर्ती आणि आनंद लाभेल\nलडाखमध्ये मध्यरात्री 2.14 वाजता 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप\nयुक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 22 शिकाऊ सैनिक ठार\nउल्हासनगर : शहर पूर्वेतील व्हीटीसी रोड शेजारील बाबा प्राईमला लागून असलेल्या फर्निचर कंपनीला भीषण आग. दलाच्या जवानांचा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न.\nठाणे जिल्ह्यात एका हजार 671 रुग्णांसह 32 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.\nदीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न\nदहशतवाद पोसणाऱ्या देशानं आम्हाला मानवाधिकारांचे धडे देऊ नयेत; संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत भारतानं पाकिस्तानला सुनावलं\nCSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल; दिल्लीच्या कर्णधाराला पाठवलं माघारी, Video\nमुंबईत आज दिवसभरात १ हजार ८७६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांची संख्या १ लाख ९४ हजार १७७ वर\nCSK vs DC Latest News : क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग\nIPL 2020 : मला धमकावलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं\nराज्यात आतापर्यंत १३ लाख ७५७ जणांना कोरोनाची लागण; सध्या २ लाख ७२ हजार ७७५ जणांवर उपचार सुरू; ९ लाख ९२ हजार ८०६ जणांना डिस्चार्ज\nराज्यात आज १७ हजार ७९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाखांच्या पुढे\nधारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या\nरेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस/ पनवेल ते गोरखपूर दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.\nआजचे राशीभविष्य -२६ सप्टेंबर २०२०; यश, कीर्ती आणि आनंद लाभेल\nलडाखमध्ये मध्यरात्री 2.14 वाजता 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप\nयुक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 22 शिकाऊ सैनिक ठार\nउल्हासनगर : शहर पूर्वेतील व्हीटीसी रोड शेजारील बाबा प्राईमला लागून असलेल्या फर्निचर कंपनीला भीषण आग. दलाच्या जवानांचा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न.\nठाणे जिल्ह्यात एका हजार 671 रुग्णांसह 32 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.\nदीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न\nदहशतवाद पोसणाऱ्या देशानं आम्हाला मानवाधिकारांचे धडे देऊ नयेत; संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत भारतानं पाकिस्तानला सुनावलं\nCSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल; दिल्लीच्या कर्णधाराला पाठवलं माघारी, Video\nमुंबईत आज दिवसभरात १ हजार ८७६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांची संख्या १ लाख ९४ हजार १७७ वर\nCSK vs DC Latest News : क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग\nIPL 2020 : मला धमकावलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं\nराज्यात आतापर्यंत १३ लाख ७५७ जणांना कोरोनाची लागण; सध्या २ लाख ७२ हजार ७७५ जणांवर उपचार सुरू; ९ लाख ९२ हजार ८०६ जणांना डिस्चार्ज\nराज्यात आज १७ हजार ७९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाखांच्या पुढे\nधारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या\nरेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस/ पनवेल ते गोरखपूर दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nब्रेकअपनंतर डिप्रेशनमध्ये होती 'ही' अभिनेत्री, 20 दिवस घेतल्या होत्या झोपेच्या गोळ्या\nचिटर जे असतात ते सगळे काही विसरून पुढे जाण्याचा विचार करतात. पण, जे कमिटेड असतात त्यांच्यासाठी हे खरंच खूप कठिण असते. त्यासाठी नक्की वेळ लागतो.\nब्रेकअपनंतर डिप्रेशनमध्ये होती 'ही' अभिनेत्री, 20 दिवस घेतल्या होत्या झोपेच्या गोळ्या\nबॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. यात सना खान सध्या कोरियोग्राफर मेल्विन लुइससह झालेल्या ब्रेकमुळे चर्चेत आहे. वर्षभरापासून हे दोघांचे अफेअर सुरू होते. मात्र मेल्विन सनाला चिट करत असल्याचे कळताच तिने मेल्विनसह ब्रेकअप केले. नुकत्याच एका मुलाखतीत तिने बॉयफ्रेंड मेल्विनबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला. ब्रेकअपनंतर साहजिकच माझ्या मनावर मोठा परिणाम झाला आहे. मध्यंतरी डिप्रेशनचाही सामना करावा लागला. 20 दिवस झोपेच्या गोळ्या घेऊन रात्र काढल्या आहेत. दोन दिवसापासून मला आता गोळ्या न घेता शांत झोप येत असून देवाचे आभार मानते की या गोष्टी पचवण्याचे मला बळ दिले.\nसध्या मला अनेकजण सगळ्या गोष्टी विसरून आयुष्याचा पुढे विचार कर असा सल्ला देत आहेत. पण या सगळ्यांना सांगावेसे वाटते की, चिटर जे असतात ते सगळे काही विसरून पुढे जाण्याचा विचार करतात. पण, जे कमिटेड असतात त्यांच्यासाठी हे खरंच खूप कठिण असते. त्यासाठी नक्की वेळ लागतो.\nआम्ही लग्न करणार होतो, यासाठी दोन्ही कुटुंबाच्या भेटीगाठी देखील झाल्या होत्या. एप्रिल 2019 पर्यंत मेल्विन माझ्या बरोबर होता. पण मे मध्ये त्याच्यात मला बदल झाल्याचे जाणवायला लागले. नेहमीच आमच्यात भांडण व्हायला लागली. जेव्हा आम्ही नात्यात होतो तेव्हा मी फक्त आणि फक्त मेल्विनलाच वेळ दिला. त्याच्यासाठी इतरांनाही वेळ दिला नाही. माझे त्याच्यावर खरे प्रेम होते आणि त्याबदल्यात मला काय मिळाले. या गोष्टी माझ्यासाठी खूप त्रासदायक असल्याचे तिने सांगितले.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nमी तोंड उघडले तर... एक्स-बॉयफ्रेन्डच्या आरोपांवर सना खानचे उत्तर\n सना खानच्या एक्स-बॉयफ्रेन्डने शेअर केले कॉल रेकॉर्डिंग\n-आणि स्टेजवर ढसाढसा रडली प्रेमभंग झालेली ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल\nसेमी न्यूड फोटोंनी सर्वांची झोप उडवणाऱ्या सना खानने बॉयफ्रेंडला दिला 'जोर का झटका', 'हे' कारण पडलं त्याला महागात\nब्रेकअपचे दु:ख विसरून सनाने केले हॉट फोटोशूट, क्रेजी झालेत फॅन्स\n‘या’ अभिनेत्रीचे झाले बॉयफ्रेन्डसोबत ब्रेकअप, हे आहे कारण\nमला धमकावलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं\nSushant Singh Rajput Case: \"सुशांत प्रकरणाचा तपास भरकटतोय; दररोज केवळ सेलिब्रिटींची फॅशन परेड सुरू\"\nश्रद्धा कपूरच्या नावे कारमध्ये सप्लाय व्हायचे ड्रग्ज, करमजीतने साराबद्दलही केला मोठा खुलासा\nएसपी बालासुब्रमण्यम यांना आयुष्यभर वाटत होती या गोष्टीची खंंत, मुलांबाबत केले होते वक्तव्य\nएस.पी. बालसुब्रमण्यम यांचा शेवटचा व्हिडीओ, म्हणाले होते - २ दिवसात परत येईल....\nNCBच्या रडारवर आता करण जोहरची 'ती' पार्टी, ड्रग्सचा वापर केल्याचा संशय\nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \nनवीन कामगार कायदा नोकऱ्या घालवणार \nराजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेतृत्व की लुटारु, दलालांचे\nपुण्याच्या अंबिलओढ्याच्या पुराला एक वर्ष पूर्ण | Pune Flood | Pune News\nपुण्यात गणेशोत्सवात कार्यकर्ते ग्रुपने बसल्याने कोरोना रुग्ण वाढले |Ajit Pawar On Corona | Pune News\nराज्यात कृषी विधेयक लागू होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्रांची बैठक | Ajit Pawar | Pune News\nकपलचा होईल खपल चॅलेंज | कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना पुणे पोलिसांच्या सूचना | CoupleChallenge News\nअस्थमा रूग्णांना कोरोना झाल्यास 'ही' घ्या काळजी | Asthma and COVID-19 | Lokmat Oxygen\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\nरश्मी देसाई स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री\n कपल्स चॅलेन्जसाठी केला असा 'देशी' जुगाड; पाहा एकापेक्षा एक व्हायरल मीम्स\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nIPL 2020 : शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर\nदसऱ्याआधी मोदी सरकार करणार सर्वात मोठी घोषणा; जोरदार तयारी सुरू\nमौनी रॉय ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खूप स्टनिंग, पहा तिचे हे ग्लॅमरस फोटो\nजुना फोन बदलून खरेदी करा नवीन आयफोन, २३००० रुपयांपर्यंत मिळेल डिस्काउंट\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\nAdhik Maas २०२०: आपण नैवेद्य दाखवतो, की अर्पण करतो\nआजचे राशीभविष्य -२६ सप्टेंबर २०२०; यश, कीर्ती आणि आनंद लाभेल\nऔषध उद्योगाला चीनचा मोठा दणका\nएकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान.\nबॉलीवूडवर चौकशीचा ‘अमल’, मोठमोठ्या अभिनेत्री अडकल्या जाळ्यात\n‘जंटलमन’ गावसकरांची जीभ घसरली\nआजचे राशीभविष्य -२६ सप्टेंबर २०२०; यश, कीर्ती आणि आनंद लाभेल\n‘त्या’ ग्रुपची दीपिकाच होती अ‍ॅडमिन\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा\nवेश्याव्यवसाय करणे गुन्हा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_494.html", "date_download": "2020-09-26T02:44:11Z", "digest": "sha1:CYLNJLC4H5LBXXDQTL5NUGFFVIJ5ZS5W", "length": 4165, "nlines": 59, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "घसा दुखत असेल तर 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर...", "raw_content": "\nघसा दुखत असेल तर 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर...\nbyMahaupdate.in गुरुवार, जानेवारी १६, २०२०\nअनेकांना ऋतू बदलतो तेव्हाच नाही तर वर्षभरही घसा दुखण्याचा त्रास होतो. अनेकाना घशात खाज सुटते.\nकाहींना घशात गाठ असल्यासारखे वाटते त्यांचा आवाज बसतो. वेळीच काळजी घेतल्यास त्यातून कुठलाही आजार बळावण्याची शक्यता टाळता येऊ शकते.\nअनेकदा घसा दुखण्यामुळे मानेत गाठ येणे, गिळताना किंवा जांभई देताना त्रास होणे ही लक्षणे जाणवतात.\nसर्दी किंवा सायनसमुळे घसा दुखू शकतो, प्रदूषण किंवा धूळ असलेल्या ठिकाणी राहिल्यास, मोठ्याने बोलायची सवय असेल तर घसा दुखण्याची समस्या जाणवते.\nयावर उपाय म्हणून गरम दुधात हळद घालून प्यावे. खडीसाखर किंवा हळद अणि गुळाची गोळी तोंडात ठेवावी. यावर उपाय म्हणजे गरम पाण्याची वाफ घेणे, ज्येष्ठमधाची काडी चघळणे, कोमट पाणी पिणे, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे, हे उपचार करू शकता.\nसर्दीच्या औषधात स्युडो इफिड्रीन नावाचा एक घटक असतो, त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. मधुमेह वाढू शकतो, हृदयविकार होऊ शकतो, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधे घेऊ नये.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/10/blog-post_857.html", "date_download": "2020-09-26T03:17:36Z", "digest": "sha1:MTUEXE3EHVWC7YHNLZ4XQ4GZZU5C2GUN", "length": 68236, "nlines": 179, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): चितळे मास्तर", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nएके काळी आमच्या गावात पोराला एकदा बिगरीत नेऊन बसवले की ते पोर मॅट्रिक पास किंवा नापास होईंपर्यंत आईबाप त्याच्याविषयी फारसा विचार करीत नसत. \"कार्टे चितळे मास्तरांच्या हवाली केलं आहे, ते त्यांच्या हाती सुखरूप आहे.\" अशी ठाम समजूत असे. \"एके काळी असे\" असेच म्हणणे योग्य ठरेल. कारण आता गाव बदलले. वास्तविक गोपाळ कृष्ण गोखल्यांचे स्मारक म्हणून गावकऱ्यांनी शाळा काढली. पण पाळण्यातले नाव सदानंद किंवा असेच काहीतरी असावे आणि व्यवहारात मुलाला बंडू किंवा बापू म्हणून ओळखले जावे तशी आमच्या शाळेची स्थिती आहे. तिला कोणी गोखले हायस्कूल म्हणत नाही. चितळे मास्तरांची शाळा हेच तिचे लौकिक नाव. वास्तविक चितळे मास्तर शाळेचे संस्थापक नव्हेत, किंवा शाळेच्या बोर्डावरदेखील नाहीत. इतकेच काय, पण मी इंग्रजी तिसरीत असताना त्यांना दैववशात म्हणतात तसे प्रिन्सिपॉल व्हावे लागले होते, पण पंधरा दिवसांतच मास्तर त्या खुर्चीला वैतागून पुन्हा आपले 'चितळे मास्तर' झाले. त्यांच्यापेक्षा वयाने बरेच लहान असलेले काळे मास्तर हे प्रिन्सिपॉल झाले आणि अजूनही आहेत.\nडाव्या हातात धोतर, एके काळी निळ्या रंगाचा असावा अशी शंका उत्पन्न करणारा खादीचा डगला, डोक्याला ईशान्य-नैऋत्य दाखवणारी काळी टोपीबाहेर टकलाच्या आसपास टिकून राहीलेले केस आले आहेत, नाक आणि मिश्यांनी ठेवण राम गणेश गडकऱ्यांसारखी, पायांतल्या वहाणा आदल्या दिवशी शाळेत विसरून गेले नसले तर पायांत आहेत, डावा हात धोतराचा सोगा पकडण्यात गुंतलेला असल्यामुळे उजव्या हाताची तर्जनी खांद्याच्या बाजूला आपण एक हा आकडा दाखवताना नाचवतो तशी नाचवीत चितळे मास्तरांनी स्वतःच्या घरापासून शाळेपर्यंतचा तो लांबसडक रस्ता गेली तीस वर्षे तुडवला.\nत्यांनी मला शिकवले, माझ्या काकांना शिकवले, आणी आता माझ्या पुतण्यांना शिकवताहेत. आमच्या गावातल्या शंकराच्या देवळातला धर्मलिंग गुरव आणि चितळे मास्तर यांना एकच वर्णन लागू-- नैनं छिन्दन्ति शस्रणि नैनं दहति पावकः त्यांनी पहिले महायुद्ध पाहिले, दुसरे पाहिले आणि आता कदाचित तिसरेही पाहतील.\nअजूनही गावी गेलो तर मी शंकराच्या देवळात जातो आणि तिथला धर्मलिंग गुरव \"पुर्ष्या, शिंच्या राहणार आहेस चार दिवस की परत पळायची घाई\" असेच माझे स्वागत करतो. मला \"पुर्ष्या\" म्हणणारे दुसरे गृहस्थ म्हणजे चितळे मास्तर\" असेच माझे स्वागत करतो. मला \"पुर्ष्या\" म्हणणारे दुसरे गृहस्थ म्हणजे चितळे मास्तर धर्मलिंगाला नुसते पुर्ष्या म्हणून परवडत नाही. \"पुर्ष्या शिंच्या\" म्हटल्याखेरीज तो मलाच उद्देशून बोलतो आहे हे कदाचित मला कळणार नाही अशी त्याची समजूत असावी. काही वर्षांपूर्वी गावकरी मंडळींनी मी परदेशात जाऊन आलो म्हणून माझा सत्कार केला होता. समारंभ संपल्यावर धर्मलिंग गुरव कंदील वर करीत माझ्यापर्यंत आला आणि म्हणाला, \"पुर्ष्या, शिंच्या इंग्लंडात काय हवाबिवा भरून घेतलीस काय अंगात धर्मलिंगाला नुसते पुर्ष्या म्हणून परवडत नाही. \"पुर्ष्या शिंच्या\" म्हटल्याखेरीज तो मलाच उद्देशून बोलतो आहे हे कदाचित मला कळणार नाही अशी त्याची समजूत असावी. काही वर्षांपूर्वी गावकरी मंडळींनी मी परदेशात जाऊन आलो म्हणून माझा सत्कार केला होता. समारंभ संपल्यावर धर्मलिंग गुरव कंदील वर करीत माझ्यापर्यंत आला आणि म्हणाला, \"पुर्ष्या, शिंच्या इंग्लंडात काय हवाबिवा भरून घेतलीस काय अंगात फुगलायस काय\" धर्मलिंगाच्या या सलगीने गावातली नवी पिढी जरा बिचकली होती. आणि चितळे मास्तर माझी पाठ थोपटून म्हणाले होते, \"पुर्ष्या, नाव राखलंस हो शाळेचं वेस्टमिन्स्टर ब्रिज पहाटेच्या वेळी जाऊन पाह्यलास का रे वेस्टमिन्स्टर ब्रिज पहाटेच्या वेळी जाऊन पाह्यलास का रे वर्डस्वर्थची कविता आठवतेय ना वर्डस्वर्थची कविता आठवतेय ना अर्थ हॅज नॉट एनीथंग टू शो मोअर फेअर--डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय-- ए साइट सो टचिंग इन इटस... अर्थ हॅज नॉट एनीथंग टू शो मोअर फेअर--डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय-- ए साइट सो टचिंग इन इटस...\n\" मी शाळेतल्या जुन्या सवयीला स्मरून म्हणालो.\n\" चितळे मास्तरांची ही सवय अजून टिकून होती. ते वाक्यातला शेवटला शब्द मुलांकडुन वदवीत. मला त्यांचा ईंग्रजीचा वर्ग आठवला.\n\"...टेक हर अप टेंडर्ली, लिफ्ट हर विथ केअर --- फॅशनड सो स्लेंडर्ली यंग ऍंड सो....\n\" सगळी मुले कोरसात ओरडायची.\nइंग्रजी पहिलीत आल्यापासून मॅट्रिकपर्यंत सात वर्षे चितळे मास्तरांनी मला अनेक विषय शिकवले. त्यांच्या मुख्य विषय इंग्रजी. पण ड्रॉइंग आणि ड्रिल सोडुन ते कुठलाही विषय शिकवीत. फक्त तासाची घंटा आणि वेळापत्रक ह्या दोन गोष्टींशी त्यांचे कधीच जमले नाही. प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक ही चैन त्या काळात आमच्या हायस्कूलला परवडण्यासारखी नव्हती. आठदहा शिक्षक सारी शाळा सांभाळायचे. आता शाळा पावसात नदी फुगते तशी फुगले आहे. भली मोठी इमारत, एकेका वर्गाच्या आठ आठ तुकड्या, सकाळची शिफ्ट, दुपारची शिफ्ट, दोन दोन हजार मुले वगैरे प्रकार माझ्या लहानपणी नव्हते. हल्ली मुलांना मास्तरांची नावे ठाऊक नसतात. माझ्या मास्तरांना शाळेतल्या सगळ्या मुलांची संपुर्ण नावे पाठ पायांत चपला घालून येणारा मुलगा हा फक्त गावातल्या मामलेदाराचा किंवा डॉक्टराचा असे पायांत चपला घालून येणारा मुलगा हा फक्त गावातल्या मामलेदाराचा किंवा डॉक्टराचा असे एरवी मॅट्रिकपर्यंत पोंरानी आणि चितळे मास्तरांसारख्या मास्तरांनी देखील शाळेचा रस्ता अनवाणीच तुडवला. शाळेतल्या अधिक हुषार आणि अधिक 'ढ' मुलांना मास्तर घरी बोलावून फुकट शिकवायचे. \"कुमार अशोक हा गणितात योग्य प्रगती दाखवीत नाही, त्याला स्पेशल शिकवणी ठेवावी लागेल.\"\nअसल्या चिठ्या पालकांना येत नसत. पोर नापास होणे हा मास्तरांच्या 'माथ्या आळ लागे' अशी शिक्षकांची भावना होती. 'छ्डी' ही शाळेत फळा आणि खडू यांच्याइतकीच आवश्यक वस्तू होती.\nचितळे मास्तरांनी मात्र आपल्या तीस-बत्तीस वर्षाच्या कारकिर्दीत छ्डी कधीच वापरली नसावी. त्यांच्या जिभेचे वळणच इतके तिरके होते की, तो मार पुष्कळ होई. फार रागावले की आंगठ्याने पोरांचे खांदे दाबत.\nसंध्याकाळी शाळा सुटल्यावर चितळे मास्तरांचा अवतार पाहण्यासारखा असे. फळ्यावरच्या खडूची धूळ उडून उडून पिठाच्या गिरणीत नोकरीला असल्यासारखे दिसत. तरीही शिक्षणकार्य संपलेले नसे. संध्याकाळी त्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'मागासलेल्या जमातीचे' वर्ग चालायचे.\nचितळे मास्तरांचा वर्गात वापरण्याचा शब्दकोश अगदी स्वतंत्र होता. पहिला तास इंग्रजीचा म्हणून आम्ही नेल्सनसाहेबाचे अगर तर्खडकरांचे पुस्तक उघडून तयारीत राहावे तर मास्तर हातात जगाचा नकाशा बंदुकीसारख्या खांद्यावर घेऊन शिरत. मग वर्गात खसखस पिके. मास्तर \"अभ्यंकर, आपटॆ, बागवे, चित्रे\" करीत हजेरी घेऊ लागायचे. तेवढ्यात शाळेच्या घंटेइतकाच जुना असलेला घंटा बडवणारा दामू शिपाई पृथ्वीचा गोल आणून टेबलावर ठेवी. चितळे मास्तर त्याला तो सगळी पृथ्वी हातावर उचलतो म्हणून 'हर्क्यूलस' म्हणत. हजेरी संपली की पुढल्या बाकावरच्या एखाद्या स्कॉलर मुलाला उद्देशून मास्तर विचारीत, \"हं बृहस्पती, गेल्या तासाला कुठं आलो होतो\n\"सर. इंग्लिशचा तास आहे.\"\n मग भूगोलाचा तास केव्हा आहे\n\"मग तिसऱ्या तासाला तर्खडकराचं श्राद्ध करू या. भूगोलाची पुस्तकं काढा\nही पुस्तके तासाला काढण्यात काही अर्थ नसे. कारण चितळे मास्तरांनी पुस्तकाला धरून कधीच काही शिकवले नाही. भूगोल असो, इतिहास असो, इंग्रजी असो वा गणित असो, \"कसला तास आहे\" ह्या प्रश्र्नाला \"चितळे मास्तरांचा\" ह्या प्रश्र्नाला \"चितळे मास्तरांचा\" हेच उत्तर योग्य होते. सर्वानुमते एखाद्या विषय ठरायचा आणी मग मास्तर रंगात यायला लागायचे. आयूष्यभर त्यांनी अनेक विषय शिकवले, पण काही काही गोष्टी मात्र त्यांना अजिबात कधी जमल्या नाहीत. उदाहरणार्थ, हिंदुस्थानचा नकाशा. पाचदहा मिनीटे फळ्यावर खडू इकडून तिकडून ओढल्यानंतर अगदी ओढगस्तीला लागलेला हिंदुस्थानचा नकाशा तयार व्हायचा\n\"हिदुस्तान देश जरासा दक्षिण अमेरिकेसारखा आलाय का रे बुवा\" आपणच मिष्किलपणे विचारायचे. खांद्यावरून आणलेली नकाशाची गुंडाळी क्वचितच सोडीत असत. \"हां, पांडू, जरा निट काढ बघू तुझ्या मातृभूमीचा नकाशा--\"\nमग आमच्या वर्गात ड्रॉइंगमध्ये पटाईत असलेला पांडू घरत चितळे मास्तरांनी काढलेली मातृभूमी पुसून झकास नकाशा काढायचा.\n\"देव बाकी कुणाच्या बोटांत काय ठेवतो पाहा हं. पांडुअण्णा, सांगा आता. मान्सून वारे कुठून येतात\nएकदा जमिनीवरचे वारे आणि समुद्रावरचे वारे शिकवीत होते.\n\"हं, गोदाक्का, सांगा आता वारा कुठल्या दिशेला वाहतोय\nवर्गातल्या मुलींना मिस जोशी, मिस साठे म्हणणारे मास्तर तोपर्यंत शाळेत आले नव्हते. टाय बांधून, मिस जोशीबाशी म्हणणारे देशमुख मास्तर प्रथम शाळेत आले तेव्हा हे साहेबाचे पिल्लू शाळेत कुणी आणून सोडले असे आम्हाला वाटले होते. पायांत पांढरे टेनिसचे शूज घालणारे पिसे काढलेल्या कोंबडीएवढ्या रुंद गळ्याचे देशमुख मास्तर आमच्या शाळेतल्या अपटुडेटपणाची कमाल मर्यादा होते. एरवी बाकीचे सगळे धोतरछाप मास्तर मुलांना बंड्या, बाळ्या, येश्या, पुर्ष्या ह्या नावाने किंवा मुलींना कुस्मे, छबे, शांते, कमळे अशाच नावाने हाका मारीत चितळे मास्तर मात्र 'ढ' मुलांना अत्यंत आदराने पुकारीत. गोदी गुळवणी ही साक्षात 'ढ' होती. गोरी, घाऱ्या डोळ्यांची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चवथीपाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली. शेवटी अण्णा गुळवण्यांनी तिला उजवली. तिच्या लग्नात चितळे मास्तरांनी नव-या मुलाला \"माझी विद्यार्थिनीआहे हो संसार चांगला करील. पण बाजारात मात्र पैसे देऊन खरेदीला पाठवू नका. बारा आणे डझनाच्या भावाचे अर्धा डझन आंबे चौदा आणे देऊन घेऊन येईल--काय गोदाक्का संसार चांगला करील. पण बाजारात मात्र पैसे देऊन खरेदीला पाठवू नका. बारा आणे डझनाच्या भावाचे अर्धा डझन आंबे चौदा आणे देऊन घेऊन येईल--काय गोदाक्का\" असे भर पंगतीत सांगितले. 'ढ' गोदीनेदेखील सासरी जाताना आपल्या वडलांच्या पाया पडल्यावर चितळे मास्तरांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला होता. \"काय जावईबोवा, अष्टपुत्रा म्हणू की इष्टपुत्रा\" असे भर पंगतीत सांगितले. 'ढ' गोदीनेदेखील सासरी जाताना आपल्या वडलांच्या पाया पडल्यावर चितळे मास्तरांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला होता. \"काय जावईबोवा, अष्टपुत्रा म्हणू की इष्टपुत्रा\" चितळे मास्तर गळ्यात दाटलेला आवंढा दडवीत म्हणाले होते. गोदी पडावात चढली तशी त्यांनी हळूच डोळे टिपलेले मी आणि बाळू परांजप्याने पाहिले होते.\n\" बाळू अजागळपणे म्हणाला होता.\n\"चिमण्यांसारखा नाचतात दहाबारा वर्षे ओसरीवर आणि भुर्र्किनी उडून जातात हो--\" चितळे मास्तर गोदीच्या वडलांना सांगत होते. ह्याच गोदीची गोदाक्का म्हणून चितळे मास्तरांनी वर्गात इतकी चेष्टा केली होती की, आजच्या जमान्यात पालकांची प्रिन्सिपॉलसाहेबांना चिठ्ठी आली असती. चिठ्ठी तर सोडाच, पण आमचे पालक तर शाळेत मास्तरांनी आपल्या कुलदिपकाला बदडले हे ऎकल्यावर घरी पुन्हा एकदा उत्तरपुजा बांधीत.\n\"हं, गोदाक्का, सांगा वारा कुठल्या दिशेला वाहतोय\n\"गोदाक्का, वारा वाहतोय कुठल्या दिशेनं\" गोदी आपली शंकू वाण्याच्या\nदुकानातल्या पोत्यासारखी बाकावरच ढुप्प करून बसलेली. \"कार्टे, बूड हलवून उभी राहा की जरा. आश्शी\" अगदी मॅट्रीकपर्येतच्या मुलीलादेखील 'बूड' हलवून उभी राहा असे सांगण्यात काही गैर आहे असे चितळे मास्तरांनाही वाटत नसे\nआणि त्यांच्या पुढल्या शिष्यगणालाही वाटत नसे. मग गोदी खालचा ओठ पुढे काढुन शुंभासारखी उभी राहायची.\n\"हां, सांगा आता, कुठले वारे वाहताहेत\" मास्तरांनाही विचारले, गोदी गप्प.\n\"गोदुताई, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ--डोंगराच्या की समुद्राच्या\nमग गोगट्यांच्या राम्या बिनदिक्कत गोदीला म्हणाला होता, \"ए गोदे, नीट उभी राहा की--\"\n\"मग आम्हाला तिचा पदर नीट दिसणार कसा\n\"तिचा पदर कशाला दिसायला हवा\n\"मग वारा डोंगराकडे की समुद्राकडे कळणार कसं\n\"भोपळ्या, अरे परीक्षेत गोदीला का उभी करणार आहेस\" अरे. दिवसा वाहतात ते लॅंड विंड्स की सी विंड्स\" अरे. दिवसा वाहतात ते लॅंड विंड्स की सी विंड्स\nमग सगळ्या वर्गाकडुन \"दिवसा वाहतात ते--\" ह्या चालीवर पाचपंचवीस वेळा घोकंपट्टी व्हायची. आणी मग \"गोदीच्या पदराचा आणि लॅंड विंड्सचा संबंध.....\n\"तरी आज आपण आलाय हे ठाऊक आहे त्यांना म्हणून कमी आहे. एरवी शाळेचं छप्पर डोक्यावर घेतात__\" चितळे मास्तर शांतपणे त्यांना सांगत होते.\n\"पण जरा शिस्त लावायला हवी\" हसतखेळत संप्रदायाचा पुरस्कार करणाऱ्या इन्सपेक्टरांनी त्यांना गंभीरपणाने बजावले.\nचितळे मास्तरांनी आपल्या साऱ्या आयूष्यात कुणालाही शिस्त नावाची गोष्ट लावायचा प्रयत्न केला नाही. स्वतःला लावली नाही. त्यांनी त्यांच्यापुढे आलेल्या सर्वोच्यावर फक्त प्रेम केले. प्रेमळ शब्द न वापरता प्रेम केले. वर्गात एखाद्या मुलाने उत्तम निबंध लिहीला की दहापैकी आठ मार्क द्यायचे. मुलगा कुरकुरला की विचारायचे, \"का रे बोवा\n\"सर, पण दोन मार्क का कापले\n\"तीन कापायचं जिवावर आलं माझ्या\nइंग्लिश भाषेवर मात्र चितळे मास्तरांचे फार प्रेम होते. उच्चार अत्यंत देशी शिकवण्याची पद्धत अगदी संस्कृत पाठशाळेसारखी.\nपहिली-दुसरीच्या वर्गाबाहेरून जाणाऱ्याला आत इंग्रजी चालले आहे की पोरे 'ज्ञानेश्वरी'तल्या ओव्या म्हणाताहेत ते कळत नसे. अजूनही मला त्यांची ती 'आय' 'गो' ची चाल आठवते. इंग्रजी साभिनय शिकवायचे. \"आय ऍम\" असा प्रश्र्न विचारून हवेतल्या हवेत हाताने भुरका घ्यायचे, की पोरे \"ईटिंग\" म्हणायची. मग तुरूतुरू चालत \"आय ऍम....\" असा प्रश्र्न विचारून हवेतल्या हवेत हाताने भुरका घ्यायचे, की पोरे \"ईटिंग\" म्हणायची. मग तुरूतुरू चालत \"आय ऍम....\" की पोरे \"वॉकिंग\" म्हणून कोकलत. मग खुर्चीवर मान टाकून डोळे मिटून पडत आणि म्हणत, \"आय ऍम...\" की पोरे \"वॉकिंग\" म्हणून कोकलत. मग खुर्चीवर मान टाकून डोळे मिटून पडत आणि म्हणत, \"आय ऍम...\" \"स्लीपिंग\" अशी पोरांची गर्जना झाली की झोपेतून दचकून जागे झाल्यासारखे उठून, \"गाढवांनो, माझी झोप मोडलीत\" \"स्लीपिंग\" अशी पोरांची गर्जना झाली की झोपेतून दचकून जागे झाल्यासारखे उठून, \"गाढवांनो, माझी झोप मोडलीत\" म्हणत आणि पुन्हा तीच पोज घेऊन खालच्या आवाजात म्हणायचे, \"आय ऍम...\" म्हणत आणि पुन्हा तीच पोज घेऊन खालच्या आवाजात म्हणायचे, \"आय ऍम...\" मग सगळी पोरेदेखील दबलेल्या स्वरात \"स्ली~पिंग\" म्हणायची. \"आय ऍम स्लीपिंग\" च्या वेळी खुर्चीवर मान टाकताना हटकून टोपी खुर्चीमागे पडायची. पोरे गुदमरल्यासारखी हसत. चितळे मास्तरांच्या ते लक्षात आले, की \"मुगूट पडला का आमचा\" मग सगळी पोरेदेखील दबलेल्या स्वरात \"स्ली~पिंग\" म्हणायची. \"आय ऍम स्लीपिंग\" च्या वेळी खुर्चीवर मान टाकताना हटकून टोपी खुर्चीमागे पडायची. पोरे गुदमरल्यासारखी हसत. चितळे मास्तरांच्या ते लक्षात आले, की \"मुगूट पडला का आमचा\" म्हणून टोपी उचलून डोक्यावर चेपीत. असे भान हरपून शिकवणारे शिक्षक त्यानंतर मला आढळले नाहीत. \"आय ऍम क्रॉलिंग\" च्या वेळी चक्क वर्गात लहान मुलासारखे गुडघ्यावर चालायचे, किंवा वर्गातल्या एखाद्या पोराला धरून रांगायला लावायचे. चितळे मास्तरांचा तास ज्या वर्गात चालू असे तिथे इतका दंगा चालायचा की पुष्कळ वेळा शेजारच्या वर्गातले मास्तर ह्या वर्गाला कुणी धनी आहे की वर्ग हसताखेळता ठेवावा\" म्हणून टोपी उचलून डोक्यावर चेपीत. असे भान हरपून शिकवणारे शिक्षक त्यानंतर मला आढळले नाहीत. \"आय ऍम क्रॉलिंग\" च्या वेळी चक्क वर्गात लहान मुलासारखे गुडघ्यावर चालायचे, किंवा वर्गातल्या एखाद्या पोराला धरून रांगायला लावायचे. चितळे मास्तरांचा तास ज्या वर्गात चालू असे तिथे इतका दंगा चालायचा की पुष्कळ वेळा शेजारच्या वर्गातले मास्तर ह्या वर्गाला कुणी धनी आहे की वर्ग हसताखेळता ठेवावा त्यांच्या तासाला तास कधी वाजला ते कळत नसे. दुसऱ्या तासाचे मास्तर दारात येऊन ताटकळत उभे असायचे.\nशाळेतल्या सर्व मास्तरांना चितळे मास्तरांची खोड ठाऊक होती. त्यामुळे एक वर्ग संपवून दुसऱ्या वर्गाची पुस्तके किंवा वह्या गोळा करायला चितळे मास्तर कॉमनरुममध्ये जाऊन पोहचेपर्यंत त्या वर्गाची लाइन क्लियर झाली नाही हे ते ओळखीत. चितळे मास्तर अत्यंत विसराळू होते. वर्गात वहाणा विसरून जाणे हा नित्याचा कार्यक्रम. मग विद्यार्थ्यापैकी कोणीतरी त्या पुढल्या वर्गात पोहचवायच्या. \"अरे, भरतानं चौदा वर्षे सांभाळल्या तुम्हाला तासभरदेखील नाही का रे जमत तुम्हाला तासभरदेखील नाही का रे जमत\nजोडीचे शिक्षक त्यांची खूप थट्टा करीत असावे. सहलीच्या वेळी हे लक्षात येई. चितळे मास्तरांना सहलीचा विलक्षण उत्साह. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग वगैरे किल्ले आम्ही त्यांच्याबरोबर पाहिले. पहिलीत गावाबाहेरच्या आमराईपासून सुरवात होई. चितळे मास्तर आमचे स्काउटमास्तरही होते. स्काउटमास्तरांच्या पोषाखात त्यांना जर वेडन पॉवेलने पाहिले असते तर सारी स्काउटची चळवळ आवरती घेतली असती. त्या वेळी स्कॉउटमास्तर हिरवा फेटा बांधायचे. चितळे मास्तरांच्या डोक्यावर तो फेटा दादासाहेब खापड्यांच्या फेट्यासारखा गाठोडे ठेवल्यासारखा दिसे. गावातल्या य्च्चयावत पोरांना त्यांनी पोहायला शिकवले. पोहायला शिकवायची मात्र त्यांची डायरेक्ट मेथड होती. मेहंदळे सावकाराच्या प्रचंड विहिरीत शनिवारी दुपारी ते पोरे पोहायला काढीत. आणि नवशिक्या पोराला चक्क काठावरून ढकलून देत. मागून धोतराचा काचा पकडून आपण उडी मारीत. कधी कधी खांद्यावर पोरगे बसवून उडी घेत. जो नियम मुलांना तोच मुलींना माझ्या लहानपणी गावात न पोहता येणारे पोरगे बहुधा मारवड्याच्या घरातले किंवा मामलेदाराचे असे माझ्या लहानपणी गावात न पोहता येणारे पोरगे बहुधा मारवड्याच्या घरातले किंवा मामलेदाराचे असे साताआठ वेळा नाकातोंडात पाणी गेले की पोरे बॆडकासारखी पोहत. पोहून संपल्यावर डोकी ओली राहीली की ते स्वतः पंच्याने पुसत. आमच्या गावतले सगळे आईबाप, देवाला बोकड सोडतात तशी चितळे मास्तरांना पोरे सोडून निर्धास्त असत. शाळेतच काय पण रस्त्यात किंवा देवळातदेखील पोराचा कान धरायची त्यांना परमिशन होती.\nमॅट्रिकच्या वर्गात पोहचल्यावर निवडक पोरांना वर नंबर काढण्यासाठी चितळे मास्तरांच्या घरी पहाटे पाचला जावे लागे. मास्तर आंघोळबिबोंळ करून खळ्यात मोठ्यामोठ्याने कसले तरी स्तोत्र म्हणत उभे एका जुनाट बंगलीवजा घरात त्यांचे बिऱ्हाड होते. मास्तरीणबाईंना आम्ही मुलेच काय पण स्वतः चितळे मास्तरदेखील 'काकू' म्हणत.\n\"काकू~~ वांदरं आली गो. खर्वस देणार होतीस ना\" असे म्हणत अधून-मधून खाऊ घालीत. आणि मग शिकवणी सुरू व्हायची. ही शिकवणी फुकट असे. आणि शिकवण्याची पद्धतदेखील वर्गापेक्षा निराळी. त्या वेळी आमच्या गावात वीज नव्हती आली. मास्तरांच्या घरातल्या डिटमारचा दिवा आणि आम्ही घरातून नेलेले दोनचार कंदील ह्या प्रकाशात अभ्यास सुरू होई. चितळे मास्तर एक आडवा पंचा लावून उघडेबंब असे भिंतीजवळच्या पेटीवर बसत. ही भेलीमोठी पेटी हे त्यांचे आवडते आसन होते.\nत्या पेटीत खच्चून पुस्तके भरली होती. मास्तरंचा गोपू माझ्या वर्गात होता. वेणू माझ्यापेक्षा मोठी आणि चिंतामणी धाकटा. ही तिन्ही मुले गुणी निघाली. गोपू मॅट्रीकला दहावा आला होता. हल्ली तो दिल्लीला बड्या हुद्यावर आहे. वेणूदेखील बी०ए० झाली. चिंतामणीने मॅट्रिकनंतर शिक्षण सोडले. त्याला मास्तरांनी चिपळूणला सायकलचे दुकान काढुन दिले. त्याला मास्तर एडिसन म्हणत. हे कारटे लहानपणापासून काहीतरी मोडतोड करीत असे. गोपू आमच्याबरोबर शिकायला बसे. एरवी तो मास्तरंना आप्पा म्हणे. शिकायला बसला की आमच्याबरोबर 'सर' म्हणत असे. आम्ही चितळे मास्तरांनी नक्कल करायचे तसा तोदेखील करत असे. त्याचा वर्गात पहिला नंबर असायचा, पण मास्तरांनी पार्शलिटी केली असे चुकुनदेखील आम्हाला वाटले नाही. कारण वर्गात इतर मुलांप्रमाणे त्यालादेखील ते \"गोपाळराव चितळे, उठा. द्या उत्तर .\" असे म्हणायचे . कान धरून उभे करायचे. चारचौघांसारखाच तोही\nपहाटचे त्या अधुंक प्रकाशीत चितळे मास्तरांच्या ओसरीवर कंदिलाच्या प्रकाशात चाललेला तो स्पेशल क्लास अजूनही माझ्या स्वप्नात येतो. तिथे मी 'रघुवंश' शिकलो, टेनिसन, वर्डस्वर्थ ह्यांच्या कविता वाचल्या. वर्गात शिकवताना त्यांच्या आवाज चमत्कारीक वाटे. पण पहाटे घरी ते 'रघुवशं' म्हणायला लागले की गुंगी यायची. आमच्या आधी ह्या वर्गात शिकलेल्या तीनचार मुलांनी 'जगन्नाथ शंकरशेट' मिळवली होती. आमच्यात कुणी तसा निघाला नाही. जरा ओशाळेच होऊन आम्ही त्यांना पास झाल्याचे पेढे द्यायला गेलो होतो.\n\"काकू, कुरुक्षेत्रातले विजयी वीर आले. ओल्या नारळाच्या करंज्या ना केल्या होत्यास एलफिन्स्टन कॉलेजात जायचं बरं का रे एलफिन्स्टन कॉलेजात जायचं बरं का रे तुझ्या बापसाला बोललोय मी तुझ्या बापसाला बोललोय मी उगीच कुठल्या तरी भाकड कॉलेजात जाऊ नकोस. पुण्यासच जाणार असलास तर फर्ग्युसन उगीच कुठल्या तरी भाकड कॉलेजात जाऊ नकोस. पुण्यासच जाणार असलास तर फर्ग्युसन बजावून ठेवतोय. कुठल्या कॉलेजात बजावून ठेवतोय. कुठल्या कॉलेजात\nमग काकू करंज्या पुढे ठेवता ठेवता म्हणाल्या होत्या, \"आहो, मिस्त्रुडं फुटली त्यांना आता स्पेलिंग कसली घालता मुंबईस जायचास की पुण्यास\n\"बघू, बाबा धाडतील तिथं जायचं___\"\nचितळे मास्तरांच्या आणि असंख्य मुलांच्या वाटा इथून अशाच तऱ्हेने वेगळ्या झाल्या आहेत. मग अनेक वर्षात गाठी पडत नाहीत. पण नित्याच्या व्यवहारातदेखील त्यांची आठवण राहीली आहे. \"ओळीत फक्त आठ शब्द लिहायचे\" हा त्यांचा दंडक हातवळणी पडला आहे. \"नववा शब्द आला ओळीत तर काय लिहीलं आहेस ते न वाचता पेपरावर भोपळ्याचं चित्र काढीन.\" ही धमकी ते खरी करून दाखवीत.\nएके दिवशी सकाळी मुंबईला माझ्या दारावरची घंटी वाजली. हातात पिशवी घेऊन दारात चितळे मास्तर उभे तोच कोट, तीच ईशान्य-नैॠत्य टोपी, डाव्या हातात पिशवी आणि उजवा हात तसाच तर्जनी वर करून धरलेला.\n\" मी आश्र्चर्याने विचारले.\n\"धन्य हो तुझी मुंबई\" आत येत येत मास्तर म्हणाले.\n\" हिने त्यांच्या हातातली पिशवी घेत विचारले.\n हां, त्या पिशवीत आंबे आहेत. आदळशील धांदरटासारखी.\"\nमाझी पत्नीदेखील त्यांचीच विद्यार्थिनी आहे. त्यामुळे आम्हा दोघांनाही ते वाटेल ते बोलू शकतात.\n मुंबईनं काय केलं तुमचं\n\"अरे, पूर्वी राहत होतास ती जागा ठाऊक मला. ह्या भागात कधी आलेलोच नाही मी. वरळीला मागं एकदा जांबोरी झाली होती स्काउटची तेव्हा आलो होतो. जंगल होतं सगळं. तुझ्या इमारतीचा कुठं पत्ताच लागेना बंर, तू लोकमान्य टिळकांचा बाप___\"\n म्हणजे जगप्रसिद्ध तू-- मला वाटलं, सगळ्यांना ठाऊक असेल तुझा पत्ता. खालच्या पानवाल्याससुद्धा ठाऊक नाही तू वर राहतोस ते मी म्हटलं, 'अरे नाटकात असतात ते-- विलायतेला जाऊन आले.' तशी चावट माणूस म्हणतो कसा, 'साहेब, हल्ली भंगीदेखील जाऊन येतात.' खंर आहे म्हणा ते. आम्हाला आपलं कौतुक. इतरांस काय होय मी म्हटलं, 'अरे नाटकात असतात ते-- विलायतेला जाऊन आले.' तशी चावट माणूस म्हणतो कसा, 'साहेब, हल्ली भंगीदेखील जाऊन येतात.' खंर आहे म्हणा ते. आम्हाला आपलं कौतुक. इतरांस काय होय निदान तुझी नाटकं तरी फुकटात दाखवून काढ सगळ्यांना म्हणजे विचारणाराला पत्ता तरी सांगतील जरा आदरानं.\"\n\"आज बरोबर दहा दिवस झाले.\"\n वेणीच्या नवऱ्याची बदली झाली नाशकाला. मी आपला जनू पानश्याकडे टाकलाय डेरा\n तुझ्याच ना वर्गात होता...नाही. तो अडतीसच्या बॅचमधला. ढ रांडेचा. बाजीरावाची शेंडी अहमदशहा अबदालीला चिकटवणारा...नाही. तो अडतीसच्या बॅचमधला. ढ रांडेचा. बाजीरावाची शेंडी अहमदशहा अबदालीला चिकटवणारा\nचितळे मास्तर बदलायला तयार नव्हते. हा बाजीरावाची शेंडी अहमदशहा अबदालीला चिकटवण्याचा विनोद त्यांच्या वर्गातल्या ती पिढ्या ऎकत आल्या आहेत.\nखुर्चीवर स्थानापन्न होऊन पाच मिनिटेही झाली नव्हती. तेवढ्यात त्यांची नजर टीपॉयवरच्या सिगारेटच्या पाकिटावर गेली.\nशाळा सोडल्याला आता मला पंचवीसएक वर्षे झाली. पण अजून कधी मी चितळे मास्तरांच्या पुढे सिगरेट ओढली नव्हती.\n\"आमचा गोपूही ओढतो. माझ्यासमोर नाही ओढीत, पण ताडलंय मी. आण बघू रे तुझी सिग्रेट. मी देखील ओढून पाहावी म्हणतो. गावी धैर्य नाही होत.\" साठीच्या घरातले चितळे मास्तर सांगत होते. \"तू जरा आत जा गो.\" हिला म्हणाले.\n\"राहू दे मास्तर-- उगीच ठसका लागेल.\"\n बाकी असल्या चैनीला सवडच नाही झाली हो कधी\n\"बंर, मुंबईला किमर्थ आगमन\n शाळेत ओपन एअर थेटर बांधतोय\n\" मी दचकून म्हणालो.\n नाटकवाला तू-- तुला रे दचकायला काय झालं सरकारकडून निम्मी ग्रांट मिळायची आहे. निम्मे पैसे आम्ही गोळा करणार. गेल्या वर्षी नाट्यस्पर्धेत शाळेचा पहिला नंबर आला जिल्ह्यात सरकारकडून निम्मी ग्रांट मिळायची आहे. निम्मे पैसे आम्ही गोळा करणार. गेल्या वर्षी नाट्यस्पर्धेत शाळेचा पहिला नंबर आला जिल्ह्यात\n\"हो हो, आपल्या शाळेचा 'बेबंदशाही' बसवलं होतं. झिलग्या पावशेकराच्या मुलानं संभाजीचा पार्ट असा फक्कड केला म्हणतोस-- थेटर नुसतं टाळ्यांनी दणाणून सोडलंनीत.\"\nहे सर्व मला नवीनच होते.\n\"आणि ही नाटकंबिटकं तुम्ही करू देता आमच्या गॅदरिंगला नाटक करायचं म्हटल्यावर तुम्ही वर्गाबाहेर उभा केला होतात मला.\"\n\"पुर्ष्या, फुकट हो तू. अरे, टाइम्स हॅव चेंजड हल्ली आपला सकाळचा क्लास बंद. शाळाच मुळी साताला सुरू होते. एक शिफ्ट सकाळी आणि दुसरी दुपारी. गिरण झाली आहे. बावन मास्तर आहेत शाळेत. चंद्रसूर्य___\"\n\"एकाच आकाशात; पण एक उगवला की दुसरा मावळतो.\"\n\"असं असं-- बरं, जेवूनच जा.\"\n\"नाही नाही. नुरू काजीकडे जेवायचं आमंत्रण आहे. आपल्या इस्माईल काजीचा मुलगा. चाळीसच्या बॅचमधला. हुषार पोरगा. सचिवालयात आहे. एज्युकेशन मिनीस्ट्रीत. त्याच्यामुळंच तर ओपन एअर थेटरची ग्रांट मिळाली. ती सगळी सव्यापसव्यं तोच करतो. काय इंग्लिश लिहीतो परवा मजा सांगत होता. दुसरा कुणी तरी हापिसर बदलून आला--त्याची फाइल याच्याकडे आली होती. फाइलवरच्या नोटिंगमध्ये प्रत्येक ओळीत आठ शब्द परवा मजा सांगत होता. दुसरा कुणी तरी हापिसर बदलून आला--त्याची फाइल याच्याकडे आली होती. फाइलवरच्या नोटिंगमध्ये प्रत्येक ओळीत आठ शब्द सहज सुचलं-- फोन केला. ओळख नाही हो ह्याचीन त्याची--फोनवर विचारलं, जोगळेकर का सहज सुचलं-- फोन केला. ओळख नाही हो ह्याचीन त्याची--फोनवर विचारलं, जोगळेकर का तो म्हणाला, हो मी म्हणाला काजी बोलतोय.तो चटकन 'यस सर' म्हणाला. हाताखाली असेल, एरवी 'सर' कशाला म्हणतोय काजी म्हणाला, चितळे मास्तरांचे का हो विद्यार्थी काजी म्हणाला, चितळे मास्तरांचे का हो विद्यार्थी तो जोगळेकर पलीकडे आठ इंच उडाला खुर्चीवर तो जोगळेकर पलीकडे आठ इंच उडाला खुर्चीवर कसं ओळखलंत हो म्हणाला. तशी काजी म्हणाला, फाइलवरच्या नोटींगमध्ये एका ओळीत नववा शब्द आला तो खोडून पुन्हा खालच्या ओळीत तस्सा लिहीलात...आपल्या हरी जोगळेकराचा मुलगा. अठ्ठेचाळीसची बॅच कसं ओळखलंत हो म्हणाला. तशी काजी म्हणाला, फाइलवरच्या नोटींगमध्ये एका ओळीत नववा शब्द आला तो खोडून पुन्हा खालच्या ओळीत तस्सा लिहीलात...आपल्या हरी जोगळेकराचा मुलगा. अठ्ठेचाळीसची बॅच इंग्लिश, मॅथ्स, संस्कृत आणि फिजिक्समध्ये डिस्टिंक्शन बी०ए० ला दुसरा आला होता, तोही आहे सचिवालयात फायनान्समध्ये.\"\n\"मग आता काजीकडे जाणार जेवायला\n\"बजावून सांगितलय--मटणबिटण घालशील खायला, तर तुझ्या शिक्षणमत्र्यांला जाऊन सांगीन तिसरीत भूगोलाच्या पेपराची कॉपी केली होती यानं म्हणून गोष्ट खरी आहे हो. हुषार पोरांनादेखील मोह होतो.\"\n\"बरं, मग आता काय चहा घेणार की कॉफी\n\"तुझी सहधर्मचारिणी देईल ते घेईन. काय देत्येस गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधी---काकू फार आठवण काढत्ये गो तुझी गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधी---काकू फार आठवण काढत्ये गो तुझी\n\"मोतीबिंदू झालाय. बाकी मास्तराच्या घरात बायकोच्या गळ्यात काही मोत्ये पडली नाहीत, डोळ्यांत पडली. गोपू म्हणालाय आपरेशन करायचं म्हणून आपला साने झाला आहे आय स्पेशलिस्ट गेल्या खेपेस भेटलो होता त्याला गेल्या खेपेस भेटलो होता त्याला मोठा गोड मुलगा. हस्ताक्षर काय सुंदर त्याचं...कविता करी--- आता डोळ्याची आप्रेशन करतो.\"\n\"मग आता कुठं कुठं भिक्षांदेही झाली आणि मास्तर, हे नाटकाचं थिएटर शाळेत करायचंय काय आणि मास्तर, हे नाटकाचं थिएटर शाळेत करायचंय काय\n\"शाबास नाटकवाला असून इतका सनातनी अरे, आमचं 'बेबंदशाही' पाहिलं असतंस तर माझी पाठ थोपटली असतीस.\"\n\"म्हणजे डायरेक्टर ना मी\nमी एकेक नवलच ऎकत होतो, \"तुम्ही डायरेक्टर\n\"मग तुला काय वाटलं तूच अशी घोकंपट्टी करून घेतली पोरांकडून--नुसतं आपापलंच नव्हे, सगळ्यांना सगळं नाटक पाठ अशी घोकंपट्टी करून घेतली पोरांकडून--नुसतं आपापलंच नव्हे, सगळ्यांना सगळं नाटक पाठ पहाटे पाचाला जमवीत असे पहाटे पाचाला जमवीत असे कार्ट्याची मजा बघ. साताच्या शाळेला डोळे चोळीत आठापर्यंत उगवतात. नाटकाच्या तालमींना मात्र संभाजीपासून औरंगझेबापर्यंत सगळे पाचाला हजर कार्ट्याची मजा बघ. साताच्या शाळेला डोळे चोळीत आठापर्यंत उगवतात. नाटकाच्या तालमींना मात्र संभाजीपासून औरंगझेबापर्यंत सगळे पाचाला हजर\n\"सगळ्यांकडून कशाला सबंध नाटक पाठ करून घेतलंत\n आयत्या वेळी झाला एखादा आडवा तापानं किंवा सर्दी-खोकल्यानं तर नाटक नसतं का झोपलं पण मुहूर्त पाहून नारळ फोडला होता. माझा नाही विश्र्वास ह्या भाकड गोष्टींवर; पण पोरं म्हणाली, मुहूर्त पाहून नारळ फोडा.बाकी मला ह्या पोरांचं काही कळेनासंच झालंय हो पण मुहूर्त पाहून नारळ फोडला होता. माझा नाही विश्र्वास ह्या भाकड गोष्टींवर; पण पोरं म्हणाली, मुहूर्त पाहून नारळ फोडा.बाकी मला ह्या पोरांचं काही कळेनासंच झालंय हो वर्गात हल्ली एकजण टोपी घालून येत असेल तर शपथ वर्गात हल्ली एकजण टोपी घालून येत असेल तर शपथ खिशात लेखणी नसते, पण फणी आहे. एकेकाच्या भांगाच्या तऱ्हा पाहा. पण शिंचे मुहूर्त पाहतात, हातांत कुठल्या कुठल्या बाबांच्या आंगठ्या घालतात, गळ्यांत लाकिंट घालतात. पोहण्याबिहिण्याचे वर्ग लिक्विडेशनमध्ये निघाले--धिस इज रियली पझलिंग खिशात लेखणी नसते, पण फणी आहे. एकेकाच्या भांगाच्या तऱ्हा पाहा. पण शिंचे मुहूर्त पाहतात, हातांत कुठल्या कुठल्या बाबांच्या आंगठ्या घालतात, गळ्यांत लाकिंट घालतात. पोहण्याबिहिण्याचे वर्ग लिक्विडेशनमध्ये निघाले--धिस इज रियली पझलिंग ह्या दुसऱ्या महायुद्धानंतर म्हण किंवा स्वातंत्र्यानंतर म्हण, बराच काहीतरी गोंधळ झालाय. गावात तुमच्याही वेळी सिनेमा होता, पण तुम्ही काय शाळा चुकवून नाही जायचे. आता निम्मी पोरं त्या थेटरात ह्या दुसऱ्या महायुद्धानंतर म्हण किंवा स्वातंत्र्यानंतर म्हण, बराच काहीतरी गोंधळ झालाय. गावात तुमच्याही वेळी सिनेमा होता, पण तुम्ही काय शाळा चुकवून नाही जायचे. आता निम्मी पोरं त्या थेटरात तुला आश्र्चर्य वाटेल, नवा सिनेमा लागला की मीदिखील जातो.\"\nसाठीशी पोहोचलेले चितळे मास्तर जरासे 'हे' होत चालले आहेत की काय असे मला वाटले. मी 'आ' वासून त्यांच्याकडे पाहू लागलो.\n\"झापड मिटा.\" फार दिवसांनी चितळे मास्तरांचे हे आवडते वाक्य ऎकले. वर्गात पोरांना तोंड उघडून बसायची सवय असते. बावळटासारखे तोंड वासून पोर बसले की मास्तर नेहमी \"झापड मिटा\" म्हणायचे.\n\"पण मास्तर. 'इंटर्वल' बघायला जातो म्हणजे काय कळलं नाही.\"\n अरे, आधी जाऊन काळोखात उभा राहतो. आपल्या शिर्क्याचं थेटर. तिकीट बसत नाही मला. विद्यार्थी तो माझा अगदी सुरूवातीच्या बॅचमधला. त्याच्याकडून इंटर्वलचा फ्री पास मागून घेतलाय. तर सांगत होतो काय, काळोखात उभा राहतो आणि चटकन उजेड पडला की पाहतो प्रेक्षकांत शाळेतली कोकरं किती घुसली आहेत ते एकदाच दिसला तर चिंता नाही. पण त्याच सिनेमास दुसरुंदा रे काय पाहायला आलास एकदाच दिसला तर चिंता नाही. पण त्याच सिनेमास दुसरुंदा रे काय पाहायला आलास\n\"उद्योग झाला म्हणायचा हा\n फ्लॉरेन्स नाइटिंगेलचा जमाना गेला आता. आता म्हणजे मीनाकुमारी, बीना रॉय--- उद्या इतिहासाच्या तासाला ह्यांचीच चरित्रं शिकवायचो. चालायचचं. टाइम्स हॅव चेंच्ड. ते जाऊ दे. माझा मुख्य मुद्दा भिक्षांदेहीचा---त्याचं काय करतोस बोल.\"\n\"तुमचा मुक्काम किती दिवस\n\"पुढल्या आठवड्यात शाळा सुरू होते. परवा तरी निघायला हवं.\"\n\"मग आज रात्री जेवायला या.\"\n\"हल्ली रात्रीचं जेवण बंद\n\"अग, व्रत म्हणून बंद नव्हे. आयूष्यात व्रत एकच केलं---- पोरगं सापडलं तावडीत की त्याला घासूनपुसुन जगात पाठवून देणं. पण रात्री राहायला येईन बापडा इथं.\"\n\"अवश्य या. पण घर सापडेल का रात्रीचं\n\"ते मात्र बरीक कठीणच हो वास्तविक विल्सनचा स्टूडंट हो मी. अरे, पण माझ्या वेळेची चौपाटी म्हणजे चर्नीरोड स्टेशनाच्या पायऱ्या धुऊन जायची. सखूबाईच्या खाणावळीत भोजन आणि मोहन बिल्डिंगमध्ये वास वास्तविक विल्सनचा स्टूडंट हो मी. अरे, पण माझ्या वेळेची चौपाटी म्हणजे चर्नीरोड स्टेशनाच्या पायऱ्या धुऊन जायची. सखूबाईच्या खाणावळीत भोजन आणि मोहन बिल्डिंगमध्ये वास आता दरवर्षी बघतो तर मुबंई बदलत चालली आहे. परवा पाच मिनीटं कॉलेजकडे जाऊन आलो आत हिंडून आता दरवर्षी बघतो तर मुबंई बदलत चालली आहे. परवा पाच मिनीटं कॉलेजकडे जाऊन आलो आत हिंडून आपले दोन विद्यार्थी आहेत विल्सनला... आमच्या वेळी एलफिन्स्टनपेक्षा विल्सन स्वस्त पडे. मॅकेंझी होता प्रिन्सिपॉल आपले दोन विद्यार्थी आहेत विल्सनला... आमच्या वेळी एलफिन्स्टनपेक्षा विल्सन स्वस्त पडे. मॅकेंझी होता प्रिन्सिपॉल डिव्होडेट माणसं त्यांची ती डिव्होशन बघूनच तर ह्या शिक्षकांच्या धद्यांत शिरलो मी. तशी एक महीना कलेक्टर कचेरीत नोकरी केलीय--खिशात 'केसरी' सापडला म्हणून काढून टाकलं होतं मला म्हणून तर ह्या राष्ट्रकार्यात शिरलो मुंबई सोडताना मॅकेंझींना भेटायला गेलो होतो. म्हणाला, आता काय करणार मुंबई सोडताना मॅकेंझींना भेटायला गेलो होतो. म्हणाला, आता काय करणार मी म्हटलं, मास्तरकी मला पाठीवरून हात फिरवून ब्लेसिंग्ज दिली होती त्यांनी. त्या वेळी चौपाटीवर आमचं कॉलेज झक्क उठून दिसे. आता म्हणजे टोलेजंग इमारतींत द्डून गेलंय. समोरच्या समुद्राच्या लाटा तेवढ्या पुर्वीसारख्या राहिल्या आहेत. बाकी एव्हरीथिंग हॅज....\n\" मी आणी ही एकदम म्हणालो. दोघांनाही ती सवय होती.\n\"बरं मग मी न्यायला येतो तुम्हाला. कुठं असाल संध्याकाळी\n\"संध्याकाळी मी जाणार आहे, आपल्या--अरे, तुझ्याच बॅचमधला तो--- मुकुंद पाटणकराकडे.\"\n ही ईज डुइंग व्हेरी वेल मोटर घेतली आहे. गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा खूप हिंडवलनीत. तशा मुंबईत माझ्या पाचसहा मोटारी आहेत...\" चितळे मास्तरांचे ते मिष्कील हसणे कायम होते.\nसंध्याकाळी मी मुकुंदाच्या घरी गेलो. \"मास्तर आले आहेत ना रे\n\"हो, आत आहेत. बेबीला गोष्ट सांगताहेत.\"\nमला एकदम आठवले. मुकुंदाची पाचसहा वर्षाची मुलगी गेले वर्षभर पोलियो होऊन बिछान्यावर पडली होती. मी आत डोकावून पाहिले. मास्तर तिला गोष्ट सांगण्याच्या रंगात आले होते. कुठल्या तरी राजपुत्राची गोष्ट होती. राजपुत्राचे विमान आकाशातून गेले तेव्हा दोन्ही हात पसरून चितळे मास्तर त्या खोलीभर धावले. मी आणि मुकुंदाने एकमेकांकडे पाहिले. मुकंदाच्या डोळ्यांत पाणी तरारले होते.\n\"इथं आल्या दिवसापासून रोज संध्याकाळी बेबीला एक गोष्ट सांगून जातात.\"\nमास्तरांची गोष्ट संपत आली होती.\n\"आणी अशा रीतीनं तो राजपुत्र आणि राजकन्या अत्यंत सुखानं नांदू...\n\" बेबी, मुकुंदा आणि मी एकदम म्हणालो.\nमी आणि मास्तर टॅक्सीत बसलो.\n\"काही नाही. जुनी सेवा---पायांत चप्पल नाही तुमच्या.\"\n\"राहील्या वाटतं वर. राहू दे. उद्या यायचंच आहे.\"\nमी वर गेलो. मुकुंदाच्या दारातल्या चपलांच्या स्टॅडवरून मास्तरांच्या चपला शोधून काढणे अवघड नाही गेले--- कुठल्याच चपलांच्या टाचा इतक्या झिजलेल्या नव्हत्या\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_42.html", "date_download": "2020-09-26T01:39:40Z", "digest": "sha1:KM7YE3FQUDEHGJTDCGV2UIQALYPDTGJ7", "length": 4689, "nlines": 62, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "चांगल्या आरोग्यासाठी मोसंबीचे ज्यूस आहे फायदेशीर...फायदे वाचून थक्क व्हाल !", "raw_content": "\nचांगल्या आरोग्यासाठी मोसंबीचे ज्यूस आहे फायदेशीर...फायदे वाचून थक्क व्हाल \nbyMahaupdate.in मंगळवार, जानेवारी ०७, २०२०\nमोसंबीचा ज्यूस सर्व हवामानांमध्ये प्यायला जातो. मात्र उन्हाळ्यामध्ये हा ज्यूस पिणाऱ्यांची संख्या अधिक असते. कदाचित तुम्हाला मिहिती नसेल की, मोसंबीचा ज्यूस किती फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटामीन सी आणि पोटेशिअम, जिंक, कॅल्शियम, फायबर आढळतो. यासोबत यामध्ये कॉपर आणि आयरनही काही प्रमाणात असतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये कॅलोरी आणि फॅट खुप कमी असते.\nफायबर्स, फ्लेवनॉयड या कारणामुळे मोसंबी पोटाच्या आजारासाठी अधिक फायदेशीर आहे. यामध्ये अधिक प्रमाणात फायबरही असते. जे अपचनाच्या आजारासाठी फायदेशीर ठरते.\nमोसंबीमध्ये विटामिन सी चे प्रमाण अधिक असल्यामुळे हे हिरड्या, त्वचा, केस, डोळे आणि नखांसाठीही अधिक फायदेशीर आहे. सोबतच त्वचा चमकदार करण्याचेही काम करते.\nमोसंबीमध्ये फायबर्स, पॅक्टीन आणि व्हिटामीन सी सोबतच अनेक पोषक तत्वे असतात, जे कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाला कमी करते. ज्याने हृदयरोगाच्या आजाराला आराम मिळतो.\nसांधेदुखीच्या आजारांच्या संबंधीत समस्यामध्ये हे लाभदायक आहे. कारण यामध्ये असलेले व्हिटामीन सी कार्टिलेजचे नुकसान थांबवते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://spsnews.in/2017/06/15/matdaryadi/", "date_download": "2020-09-26T01:46:30Z", "digest": "sha1:IAGOFWUYUWWJ3CI3LJ5MHI75WXL67JHG", "length": 7558, "nlines": 87, "source_domain": "spsnews.in", "title": "२३ जून अखेर मतदार यादीत नवे नोंद करावीत-तहसीलदार चंद्रशेखर सानप – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n२३ जून अखेर मतदार यादीत नवे नोंद करावीत-तहसीलदार चंद्रशेखर सानप\nमलकापूर : ज्या नागरिकांची नावे अद्याप मतदार यादीत नोंदविलेली नाहीत, अशा नागरिकांनी २३ जून पर्यंत आपली नावे मतदार यादीत नोंद करावीत, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, तथा शाहुवाडी चे तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडे १ जुलै २०१७ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असल्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगाने शाहुवाडी तालुक्यातील या निवडणुकीसाठी २३ जून अखेर मतदार यादीत नाव नोंदणी करता येणार आहे. यामुळे ज्यांचे मतदार यादीत नाव नाही, अथवा नव्याने नाव नोंदणी करणाऱ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी केले आहे. तसेच आपले नाव मतदार यादीत नोंद आहे का याची खात्री करावी.ज्यांना मतदार यादीत नाव नोंद करायचे आहे, त्यांनी नमुना क्र. ६ , रहिवासी पुरावा व जन्मतारखेचा पुरावा यांसह आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे २३ जून अखेर सदर करावे, असेही श्री सानप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.\n← ‘मध्यावधी निवडणुकांचा पैसा शेतकऱ्यांना द्या ‘-उद्धव ठाकरे\nशिराळा-कापरी रस्त्यावर बोलेरो-मोटरसायकल अपघातात १ ठार तीन जखमी →\nअनुष्का फौंडेशन चे सचिव श्री.बी.डी.नलवडे व उपसचिव श्री.दिनकर पोतदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n” जिथे घरात असती लहान मुले, कशास हवेत अगणित तारे ” : चला लहानग्यांचा वाढदिवस साजरा करू\nगौतम कांबळे सरांना मातृशोक : जलदान विधी दि.१४ जुलै रोजी\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mahakamgar.maharashtra.gov.in/online-grievances-mr.htm", "date_download": "2020-09-26T01:47:50Z", "digest": "sha1:QAJWTK7X5ZC5CCP3XMPLHZGW5GQZYRNN", "length": 7092, "nlines": 104, "source_domain": "mahakamgar.maharashtra.gov.in", "title": "ऑनलाईन तक्रार / तक्रार निवारण | कामगार विभाग, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमुख्य पान › ऑनलाईन तक्रार / तक्रार निवारण\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडल, मुंबई\nऑनलाईन तक्रार / तक्रार निवारण\nऑनलाईन तक्रार / तक्रार निवारण\nआपल्या तक्रारी येथे नोंदवा\nआपली तक्रारी / समस्या नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आपण नोंदविलेल्या तक्रारी / समस्याचा क्रमांक पाठविण्याकरिता आपला मोबाईल नंबर / ई-मेल आयडी द्यावा.\nनोंद : तक्रारी / समस्यादेना-यांनी आपला नोंदणी क्रमांक, नाव, संपर्क क्रमांक भरावा. सूचना / अभिप्रायांचा पाठपुरावा करण्यासाठी मदत होईल.\nतक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्या\nआपल्या तक्रारीची तक्रारी / समस्या जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.\nआपला तक्रारी / समस्या क्रमांक येथे भर व त्याची सद्यस्थिती जाणून घ्या.\nसर्व तक्रारी / समस्या नेमून दिलेले मुख्य विभागाचे अधिकारी पाहतील.\nत्या नंतर विभाग प्रमुख आपल्या अधिका-यांशी चर्चा करतील.\nतक्रारी / समस्या योग्य आसेल तर त्याचा विचार केला जाईल.\nजर ई-मेल / पत्र व्यवारासाठी पत्ता / संपर्क क्र. दिला आसेल तर, ज्या व्यक्तीने तक्रारी / समस्या दिली आहे त्यांना प्रतिउत्तर दिले जाईल.\nऑनलाईन तक्रार निवारणतुमच्या तक्रारी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा\nबाल मजुरी हेल्पलाईन बालमजुरी तक्रार साठी संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट © 2014 कामगार विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nपानाच्या रोजी अखेरचे अद्यतनितः: 5-9-2018 अभ्यागत: 14976164\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/featured/maharashtra-karnataka-border-fight-to-give-martyrdom-status-to-90-people-of-mumbai-who-sacrificed-their-lives", "date_download": "2020-09-26T02:01:36Z", "digest": "sha1:PK4ZBICQWKMS65SGW2RSTI32IA3C7VYH", "length": 4013, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या मुंबईतील ६९ जणांना शहिदांचा दर्जा द्यावा- मंत्री सुभाष देसाई", "raw_content": "\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या मुंबईतील ६९ जणांना शहिदांचा दर्जा द्यावा- मंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्यात प्राणाची आहुती दिलेल्या मुंबईतील ६९ जणांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी शिवसेनेचे नेते तसेच मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केली.\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी बेळगाव प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनादरम्यान १९६९ मध्ये मुंबईत ६९ जण शहिद झाले होते.\nशासनाने त्यांना शहिदांचा दर्जा द्यावा व त्यांच्या कुटुंबियांना शासकीय सवलती व योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी श्री. देसाई यांनी केली. त्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/topic/tapi-river", "date_download": "2020-09-26T01:11:25Z", "digest": "sha1:2OJP2LGZFRB3OVHUUND2GIFLWUDIITL3", "length": 3910, "nlines": 131, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Tapi river", "raw_content": "\nतापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nतापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनेचा फायदा\nतापी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा\nतापी पुलावरुन वाहन कोसळले\nहतनूर प्रकल्पाचे ३० दरवाजे उघडले\nHatnur dam हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले\nहतनुर धरणाचे २४ दरवाजे पूर्ण उघडले\nतापी नदीत बुडून एकाचा मृत्यू\nमहामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज यांच्याशी संवाद\nतापी नदीवरील खेडी भोकर पुलाचा प्रश्न मार्गी\nहतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले\nवराड येथील तरुणाचा मृतदेह तापी नदीकाठी आढळला\nभुसावळ : तापीच्या पुरात अडकलेल्या दोघांचे प्राण वाचवले\nहतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.dailykesari.com/2020/09/15/the-government-is-not-aware-of-the-death-of-the-workers-in-the-lockdown/", "date_download": "2020-09-26T02:04:40Z", "digest": "sha1:PKAMJRNTJKF24DFY4J56MXXUEWWYMEQO", "length": 10997, "nlines": 171, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "लॉकडाऊनमधील मजुरांच्या मृत्यूची सरकारकडे माहिती नाही! - Kesari", "raw_content": "\nघर देश लॉकडाऊनमधील मजुरांच्या मृत्यूची सरकारकडे माहिती नाही\nलॉकडाऊनमधील मजुरांच्या मृत्यूची सरकारकडे माहिती नाही\nनवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला. हजारो मजुरांनी पायीच घराकडे वाटचाल सुरू केली. यात अनेकांना प्राण गमवावे लागले. मात्र, लॉकडाऊनच्या काळात किती जणांना जीव गमवावा लागला, याची सरकारकडे कोणतीच माहिती नाही. हे धक्कादायक वास्तव सोमवारी समोर आले. लॉकडाऊनच्या काळात किती जणांना जीव गमवावा लागला किती जणांचा रोजगार हिरावला गेला किती जणांचा रोजगार हिरावला गेला याची सरकारला विचारणा करण्यात आली होती.\nलोकसभेत विरोधी पक्षाच्या प्रश्नांची उत्तरे मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी लिखित स्वरूपात दिली. भारतात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन यांनी एक देश म्हणून कोरोनाविरुद्ध युद्ध लढले, असे त्यांनी आपल्या उत्तरात म्हटले. मात्र, गरीब प्रवासी मजुरांच्या मृत्यूच्या आकड्याबद्दल आपल्याकडे माहिती उपलब्ध नसल्याचेे त्यांनी सांगितले. रेशनिंगच्या मुद्द्यावरही मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. राज्यवार आकडा न उपलब्ध होऊ शकल्याचे यात सरकारकडून सांगण्यात आले.\nपूर्वीचा लेखयोशिहिदे सुगा जपानचे नवे पंतप्रधान\nपुढील लेखविना वॉरंट अटकेसाठी विभाग\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nतीन टप्प्यांत होणार बिहार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nसीमेवरील दहशतवाद हीच मोठी समस्या\nअणुशास्त्रज्ञ शेखर बसू यांचे निधन\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nबिहार निवडणूक : तीन टप्प्यांत होणार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nबिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली.\nनवनाथ गोरे यांचा खडतर प्रवास होणार सुकर\nभारती विद्यापीठात मिळणार नोकरी\nलोकप्रिय गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले.\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलचा पहिल्याच षटकात पराक्रम\nअतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात\nइशांत शर्मा आणखी दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.agilechains.com/mr/", "date_download": "2020-09-26T02:10:18Z", "digest": "sha1:JBFRNXSZ53BXUDS5SEH23OOBNCN2GFZN", "length": 8450, "nlines": 179, "source_domain": "www.agilechains.com", "title": "ड्रॅग साखळी, केबल वाहक, ऊर्जा साखळी - Anjie", "raw_content": "\nटन मालिका (5 मिमी पासून * 5 मिमी - 60mm * 300mm)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकेबल साखळी - MTK\nकेबल साखळी - VMTK\nआमच्या दृष्टी त्यामुळे आमच्या वापरकर्त्यांसाठी आमच्या ग्राहकांना खर्च जतन समस्यांचे निराकरण आहे. गुणवत्ता आणि सेवा आमच्या अनंतकाळचे एकाग्रता आहे.\nआम्ही चांगली सेवा लक्ष केंद्रित करा. विक्री सल्ला सेवा आणि विक्री सेवा केल्यानंतर. आम्ही आमच्या ग्राहकांना किंवा अभ्यागतांना सर्व वेळ आणि अचूक माहिती प्रदान करण्याचे आमचे ध्येय.\nगुणवत्ता प्रथम आमच्या कल्पना आहे. आम्ही गुणवत्ता नियंत्रण मध्ये आधी महत्त्व ठेवले. त्याच वेळी आम्ही वाजवी व्याप्ती आत आमच्या किंमत नियंत्रित करण्यासाठी खूपच कठिण प्रयत्न करत आहात.\nआम्ही ड्रॅग साखळी, मार्गदर्शक रेल्वे कव्हर डरकाळी, नायलॉन पन्हळी डरकाळी पाईप आणि संबंधित उत्पादने उत्पादन जास्त 13 वर्षे अनुभव आला.\nशिजीयाझुआंग संशोधन कंपनी आम्ही ड्रॅग साखळी, मार्गदर्शक रेल्वे कव्हर डरकाळी, नायलॉन पन्हळी डरकाळी पाईप आणि संबंधित उत्पादने उत्पादन जास्त 13 वर्षे अनुभव आला 2008 पासून स्थापन केले आहे. आमची उत्पादने reciprocating गती केबल संरक्षण, रेल्वे संरक्षण लक्ष केंद्रित करा.\nआम्ही 100 बद्दल कर्मचारी आला आणि आमच्या कारखान्यात हेबेई प्रांतातील Yanshan कंट्री मध्ये स्थित आहे, आणि 6500 चौरस मीटर उत्पादन क्षेत्र आला. आमच्या कार्यालयात 300 चौरस मीटर 'क्षेत्र शिजीयाझुआंग शहर येथे स्थित आहे. हे स्थान बीजिंग 400 किलो मीटर आहे.\nपरदेशात आणि घरगुती आमच्या ग्राहकांना आधार, आणि उत्पादन गुणवत्ता आणि उत्पादन सेवा सुधारण्यावर ठेवून 13 वर्षे प्रयत्न, आम्ही केबल आणि मार्गदर्शक रेल्वे संरक्षण उद्योगात एक कौशल्य असणे अधिक आणि अधिक मजबूत मिळत आहेत.\nग्राहक केबल वाहक चौकशी. आकारमान व प्रतिष्ठापन संप्रेषण करत आहे ...\nपीटीसी आशिया 2019 शांघाय SNIEC मध्ये प्रदर्शन\n100 पूर्व 307 राष्ट्रीय अधिक रस्ता आणि Tianshan रस्त्यावर, उच्च-टेक झोन, शिजीयाझुआंग दरम्यान जंक्शन मीटर.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात असेल करा\n© कॉपीराईट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nउत्पादने वैशिष्ट्यीकृत - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nविद्युत केबल साखळी, केबल ड्रॅग साखळी , प्लॅस्टिक केबल ड्रॅग साखळी, केबल साखळी, सीएनसी केबल ड्रॅग चेन , Pa6 केबल साखळी,\nई - मेल पाठवा\nबंद शोध किंवा ESC Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.guruthakur.in/niwant/", "date_download": "2020-09-26T02:18:48Z", "digest": "sha1:CMXTFE6JOIZEH6KACI3UBJ55CZZMVAVO", "length": 3366, "nlines": 61, "source_domain": "www.guruthakur.in", "title": "Niwant - www.guruthakur.in", "raw_content": "\nबांधून टाकावं मनाचं टोक\nतू कवितेत वर्णन केलेला निवांतपणा किती वेगळा पण सामान्यांना सहज साध्य न होणारा …. कारण वाळूचा निस्वार्थी अलिप्तपणा भिनायला, मुळात तशी सलगी व्हायला, साधना लागते…\nनाळ कुठे याचा ठाव असेल तर पुढे ती अथांगाशी जोडायचा विचार येईल ….\nवेगवान मनाला काबूत घेऊन वाऱ्याच्या पदराला ते टोक बांधणं काही सोपी गोष्ट नव्हे ….\nआणि परत निर्मनुष्य किनाऱ्यावर चांदण्याचं कोंदण असलेलं आभाळ पांघरून समुद्राची गाज रीचवण ….\nएखादा योगीच असा निवांतपणा अनुभवू शकतो .\nखूप सुंदर आणि हृदयस्पर्शी वर्णन आहे\nअणि वाळूतील चांदणचुरा हातात घेत… \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/actress-monalisa-bagals-entry-in-chala-hawa-yeu-dya-ladies-zindabad-127647297.html", "date_download": "2020-09-26T02:15:57Z", "digest": "sha1:4HEEU6FLL6UE3IZ7SAPYMCMK4HBHCGCU", "length": 5287, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Actress Monalisa Bagal's entry in Chala Hawa Yeu Dya Ladies Zindabad | थुकरटवाडीमध्ये झाली मोनालिसा बागलची एन्ट्री, 'चला हवा येऊ द्या- लेडीज जिंदाबाद'च्या मंचावरून करणार प्रेक्षकांचे मनोरंजन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटीव्ही अपडेट:थुकरटवाडीमध्ये झाली मोनालिसा बागलची एन्ट्री, 'चला हवा येऊ द्या- लेडीज जिंदाबाद'च्या मंचावरून करणार प्रेक्षकांचे मनोरंजन\nआता मोनालिसा एका नवीन मंचावर दिसणार आहे.\nप्रेक्षक म्हणून कलाकाराला नवनव्या माध्यमातून पाहणे जणू ही त्यांच्यासाठी मनोरंजनाची मेजवानीच. कलाकार हा सर्वगुणसंपन्न असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही जॉनरचा अभिनय उत्तम करण्याची कला असते. त्यांच्यासाठी मुख्य ध्येय असतं 'प्रेक्षकांचे मनोरंजन'. हेच ध्येय फॉलो करत, स्वतःकडून कायम कसं बेस्ट दिलं जाईल याकडे लक्ष देणारी अभिनेत्री जिने मराठी सिनेृष्टीत एंट्री घेतल्यावर अनेकांना तिच्या सौंदर्यतेवर, अभिनय कौशल्यावर प्रेम करायला भाग पाडले आणि ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री मोनालिसा बागल.\n'प्रेम संकट', 'झाला बोभाटा', 'परफ्यूम', 'ड्राय डे' या सिनेमांतून मोनालिसाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'टोटल हुबलाक' या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती. आता मोनालिसा एका नवीन मंचावर दिसणार आहे.\n\"कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे' असं हक्काने विचारणाऱ्या थुकरटवाडीत हास्याचा तुफान येणार आहे. कारण झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे नवीन पर्व सुरू झाले आहे, ज्याचे नाव आहे 'लेडीज जिंदाबाद'. या नवीन पर्वात अनेक मराठी अभिनेत्री स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत आणि त्यापैकी एक स्पर्धक मोनालिसा आहे. थुकरटवाडीतील अतरंगी आणि विनोदी कलाकारांच्या सोबतीने संपूर्ण महाराष्ट्रातील जनेतला हसवण्यासाठी ती आता सज्ज झाली आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/parliament-rainy-session-begins-from-14th-september-to-1-october-question-hour-canceled-in-parliament-session-127681056.html", "date_download": "2020-09-26T02:32:15Z", "digest": "sha1:XEY3AIETIN2IXSV2SRUV7YUMV75CHU5W", "length": 5036, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Parliament rainy session begins from 14th September to 1 October; Question Hour canceled in Parliament session | 14 सप्टें. ते 1 ऑक्टोबरपर्यंत संसदेचे पावसाळी अधिवेशन; अधिवेशनात प्रश्नोत्तराचाच तास रद्द, सातही दिवस कामकाज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोना इफेक्ट:14 सप्टें. ते 1 ऑक्टोबरपर्यंत संसदेचे पावसाळी अधिवेशन; अधिवेशनात प्रश्नोत्तराचाच तास रद्द, सातही दिवस कामकाज\nलोकशाही आणि विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठी महामारीचे निमित्त केले जात आहे - शशी थरूर\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. कोरोनामुळे सभागृहाच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे. लोकसभा व राज्यसभा सचिवालय अधिसूचनेनुसार दोन्ही सभागृहांचे कामकाज कोणतीही सुटी न घेता म्हणजे शनिवारी आणि रविवारीही हाेईल. संसदेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होत आहे. तसेच अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास नसेल. याला विरोधकांनी विरोध दर्शवला आहे.\nकाँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, लोकशाही आणि विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठी महामारीचे निमित्त केले जात आहे. संरक्षणमंत्री आणि लोकसभेतील उपनेते राजनाथसिंह यांनी अनेक विरोधी नेत्यांशी चर्चा करत अधिवेशनात खासदारांना आपले म्हणणे आणि प्रश्न मांडता यावेत म्हणून शून्य प्रहराचा समावेश करण्याचे आश्वासन दिले आहे.\n२ टप्प्यांत सभागृह कामकाज\n> राज्यसभा सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत. लोकसभा दुपारी ३ ते सायं. ७ पर्यंत.\n> फक्त १४ सप्टेंबरला पहिल्या दिवशी राज्यसभा दुपारी ३ ते ७ पर्यंत चालेल. लोकसभा कामकाज ९ ते १ राहील. त्यानंतर दुपारी ३ पासून सायंकाळी ७ पर्यंत चालेल.\n> खासगी विधेयक मांडता येणार नाही. शून्य प्रहराचा वेळ एक तासाऐवजी अर्धा तास केला जाऊ शकतो.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/dont-retire-ms-dhoni-lata-mangeshkars-appeal/articleshow/70172007.cms", "date_download": "2020-09-26T02:24:46Z", "digest": "sha1:L7PQCKQLWXHVRKTNHEOVNM3XFOD3FTF3", "length": 11786, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nधोनी निवृत्तीचा विचारही मनात आणू नकोस: लतादीदी\nविश्वचषक सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी धोनीला निवृत्त न होण्याची विनंती केली आहे. निवृत्त होण्याचा विचारही मनात आणू नकोस, असा सल्लाही लतादीदींनी धोनीला दिला आहे.\nमुंबई: विश्वचषक सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी धोनीला निवृत्त न होण्याची विनंती केली आहे. निवृत्त होण्याचा विचारही मनात आणू नकोस, असा सल्लाही लतादीदींनी धोनीला दिला आहे.\nलता दीदींनी एक ट्विट करून धोनीला हा सल्ला देतानाच त्याची भारतीय क्रिकेटला नितांत गरज असल्याचंही म्हटलं आहे. 'धोनी तुम्ही निवृत्त होणार असल्याचं मी ऐकलंय. कृपया करून असा विचार मनात आणू नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही निवृत्त होण्याचा विचार मनातून काढून टाका. माझी ही तुम्हाला व्यक्तिगत विनंती आहे,' असं लतादीदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला असला तरी टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी लतादीदींनी प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचं 'अकाश के उस पार भी' हे गाणं टीम इंडियाला ट्विटद्वारे समर्पित केलं आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nMumbai Local Train: मुंबईत 'या' मार्गावरील लोकल प्रवास ...\nNilesh Rane: 'पवार साहेबांचा राजकीय गेम अजितदादांनीच के...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\n'तो' वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांचे अकाउंट टिकटॉककडून बंद महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\nआयपीएलChennai vs Delhi: पृथ्वी सावने केली गोलंदाजाची धुलाई, चेन्नईपुढे मोठे आव्हान\nदेशUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने बहिष्कार घालत दिले चोख उत्तर\n राज्यात रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा; करोनामृत्यूचे तांडव सुरूच\nकोल्हापूरसंभाजीराजेंनी वेळीच ओळखली चाल; 'असा' उधळला डाव\nसिनेन्यूजमाझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा\nदेश'चीन, पाकला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद भारतीय हवाई दलात'\nदेशकृषी विधेयकांवरून PM मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र\nकोल्हापूरपोटच्या १० वर्षांच्या मुलाला ५ लाखात तृतीयपंथीयास दिले दत्तक\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.atgnews.com/2017/01/itraday.html", "date_download": "2020-09-26T02:58:20Z", "digest": "sha1:5SKXQLH66XZ5GG2O5W5NCOQ3PFZFE67E", "length": 13284, "nlines": 264, "source_domain": "www.atgnews.com", "title": "💥Itraday आणि दीर्घकाळासाठी गुंतवणुक यातील फरक💥 - ATG News", "raw_content": "\nHome post for Startup/udyog 💥Itraday आणि दीर्घकाळासाठी गुंतवणुक यातील फरक💥\n💥Itraday आणि दीर्घकाळासाठी गुंतवणुक यातील फरक💥\n💥Itraday आणि दीर्घकाळासाठी गुंतवणुक यातील फरक💥\n💥) दीर्घकाळ गुतवणुकीत कोणतेही वेळेचे बंधन नाही. आपण आपल्या मुळ मुद्दली एवढ्या रक्कमेचे जर शेअरस् घेतले तर ते आपण कधीही विक्री करु शकतो.\n💥)घेतलेले शेअरस् आपण कधीही विक्री करू शकताे व आपल्या पुढील पीढीच्या. नावावर देखिल न विकता demat मध्ये पाठवु शकतो.\n💥)दिर्घकाळ तसेच ठेवल्याने त्या शेअरस् वर वार्षिक डीवीडंड देखिल आपल्या जमा खात्यात जमा होत राहातो.\n💥)शेअरस् ज्या कंपनिचे विकत आपण घेवु त्या कंपनी ने जास्त फायद्यात असल्यास बोनस दिल्यास गुंतवलेली रक्कम दुप्पट होण्याची ही शक्यता असते. उदा.(infy हा शेअरस् मागिल 20 वर्षात 8 वेळा बोनस दिला . व पुढे ही असाच दीर्घकाळ गुंतवणुक करणार्यास देवु शकतो)\n💥) 365 दिवसाच्या वर जर आपण कोणताही शेअरस् आपल्या demat मध्ये ठेवल्यास त्या रक्कमेचे करोड रुपये दोखिल झाले तरीही त्यावर 1 रु tax लागणार नाही.\n💥)कोणताही शेअरस् थोडे अंतर ठेवुन वर किंवा खाली जातो त्यामुळे वर जातानाचे अंतर देवुन जो फायदा देतो तो देखिल जमा होतो.\n💥) कधीही विक्री करु शकतो त्यामुळे जोखिम ही नाहीच्या बरोबर असते .\nखालील शेअरस् दीर्घकाळालसाठी. कमी जोखिमेचे असतील.\n2)INTRADAY:- INTRADAY करतानाचे फायदे व नुकसान खालील प्रमाणे\n💥) intraday करताना फार जोखिम घेवुन काम करतात कारण रोज कमवा ही संकल्पना डोक्यात बसलेली असते, पण intraday मध्ये काही नियम व जास्तित जास्त अंदाज योग्य असले पाहीजे तरच कमवता येते. त्यासाठी योग्य सराव व योग्य शिकवणारा गुरु असणे गरजेचे असते.\n💥) intraday करताना वेळेचे बंधन असते त्या मुळे त्या दिवशी नफा व नुकसान झेलुन निघावे लागते\n💥)Intraday. करताना फक्त दलाली कमी लागतेपण दलाली ही रोज लागते व वरील tax ही लागतो\n💥 ) intraday करताना खालील नियम पाळावेत\nIntraday मध्ये दोन सत्र असतात. पहीले सत्र 9.30 ते 11.00 व दुसरे सत्र 1.45 ते 2.45 असते. बाकी मधल्या वेळेत market ला mument नसते म्हणुन trade करु नये. कारण मोठे profit होणे कठीण. निव्वळ या वेळेत टाईमपास होतो.\n1) सकाळी 9 ते 9.30 कोणताही trade करु नये.\n(या वेळेत माक्रेट मध्ये चढउतार जास्त असल्यामुळे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त असते.)\n2) जर 9.30 नंतर शेअरने चालु दिवसाचा high तोडला तर तो शेअर खरेदी करावा, व daylow चा थोडा खाली stop loss लावावा. 11.00 वाजायचा अगोदर profit book. करुन घ्यावे.\n3)जर 9.30 नंतर शेअरने day low तोडला तर शेअरला short sell करावा, व dayhigh चा थोडावर stoploss लावावा.11.00 वाजायचा अगोदर profit book करुन घ्यावा.\n4)दर महिन्याच्या पहील्या व दुसर्या मंगळवारी व शुक्रवारी intraday ला मोठी mument असते म्हणुन 11.00 वाजता ते दोन दिवस मोठ्या profit साठी सकाळच्या trade मध्ये 70% ते 80% profit book करुन घ्यावा व बाकीचे शेअर stoploss पुढे सरकवुन ठेवावा. जर बाकीचे शेअर जास्त मोठे profit देत असतील तर book करावे.\n5) ज्या दिवशी stoploss hit होईल त्या दिवशीच दुपारचे सत्रात म्हणजेच 1.45 ते 2.45 trade करावा व झालेला loss. रीकवर करुन intraday चे trading बंद करावे.\nमहत्वाची टीप:- वरील सगळ्या बाबीं intraday साठी असतील व महिन्याच्या सुरवातीच्या 3 आठवड्या साठी लागु असतील अाणि प्रत्येक trade हा stop loss लावुन करावा. शेवटच्या आठवड्यात trade करू नये.\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें यदि आप कार्यालय में काम करने के एक ही उबाऊ और थकाऊ तरीके से बाहर निकलना चाहते हैं\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी जब अमेरिका के ३१ वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wik...\nPMAY List 2020 प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण New List PDF\nudyog aadhar registration: उद्योग आधार - आवश्यकता, महत्व और उपलब्धि प्राप्त करने की प्रक्रिया\nUdyog Aadhar Registration उद्योग आधार - आवश्यकता, महत्व और उपलब्धि प्राप्त करने की प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-09-26T00:54:03Z", "digest": "sha1:WHONZIZQWW25YFTLF3P4DPLEL3TOYTMM", "length": 9645, "nlines": 91, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "एचआयव्हीग्रस्त मुलांना पाच पंचायतींचा आधार ! - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nमुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी एचआयव्हीग्रस्त मुलांना पाच पंचायतींचा आधार \nएचआयव्हीग्रस्त मुलांना पाच पंचायतींचा आधार \nगरीब कुटुंबात एचआयव्ही पॉझिटिव्ह मुले असल्यास त्यांना आधार देणारे कोणीच नसते. मात्र, जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायती अशा मुलांना मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. या ग्रामपंचायतींनी एचआयव्हीग्रस्त मुलांना मासिक आर्थिक मदत देऊ केली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायती राज्यात इतर ग्रामपंचायतींना आदर्श ठरल्या आहेत. 100 ते 500 रुपये प्रमाणे या ग्रामपंचायतींनी ही मदत देऊ केली आहे.\nएचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांना आवश्‍यक पौष्टिक आहार आणि प्रत्येक महिन्याला एआरटी औषध घेणे आवश्‍यक असते. पण, अशा गरीब मुलांना एआरटी औषध मिळविण्यासाठी महिन्याला 150 ते 200 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकदा एआरटी औषध घेण्यास सुरवात केल्यास ते कायम घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. पण गरीब मुलांना अथवा त्यांच्या पालकांना असे उपचार परवडणारे नाहीत. ग्रामीण भागातील जनतेमध्ये ही समस्या अधिक आहे. अशा कुटुंबांना ओळखून ग्रामपंचायतींनी मासिक आर्थिक साहाय्य देण्यास सुरवात केली आहे.\nबेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्‍यातील सोलापूर ग्रामपंचायतीने एचआयव्हीबाधित मुलांना मासिक आर्थिक मदत देण्यास सुरवात केली आहे. यासह अथणी तालुक्‍यातील कोकटनूर ग्रामपंचायत, संकोनट्टी ग्रामपंचायत, शिरगुप्पी ग्रामपंचायत, सौंदत्ती तालुक्‍यातील चचडी (पारसगड) ग्रामपंचायतींनी देखील मासिक आर्थिक मदत देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या व्याप्तीमध्ये येणाऱ्या एचआयव्हीग्रस्त मुलांना उपचारासाठी आधार मिळाला आहे.\nहुक्केरी तालुक्‍यातील सोलापूर ग्रापंचायतीने ऑगस्ट 2010 मध्ये याबाबतच ठराव संमत करून 7 वर्षांच्या एचआयव्हीग्रस्त मुलाला मासिक 300 रुपये आर्थिक मदत देऊ केली आहे. चचडी ग्रामपंचायतीने 9 वर्षीय मुलाला 300 रुपयांची मासिक मदत, तर अथणी तालुक्‍यातील शिरगुप्पी ग्रामपंचायतीने दोघा मुलांना 200 रुपयांची मदत देऊ केली असून ही दोन्ही मुले एकाच मातेची आहेत. कोकटनूर ग्रामपंचायतीने 300 तर संकोनट्टी ग्रामपंचायतीने 500 रुपयांची मदत एचआयव्हीग्रस्त मुलांना देऊ केली आहे.\nएचआयव्ही ग्रस्त मुलांना मिळणाऱ्या मासिक आर्थिक मदतीसाठी या ग्रामपंचायतींनी ठराव संमत केला आहे. पंचायतीच्या सभेत 2/3 बहुमताने हा ठराव स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे सहा महिने या ठरावात कोणालाही कोणताच बदल करता येत नाही. सहा महिन्यांनंतर हा ठराव रद्द करावयाचा असल्यास 2/3 बहुमतानेच ठराव रद्द करावा लागतो. त्यामुळे ठरावानुसार मुलांना आर्थिक निधी दर महिन्याला द्यावाच लागतो. ग्रामपंचायतीच्या निधीतून ही मदत देऊ करण्यात आली आहे.\nसामाजिक सुरक्षा योजनांचा एचआयव्हीच्या रुग्णांवर त्रोटक उपचार\nएचआयव्ही बाधित रुग्णांनी आत्मविश्वासाने जगावे : वळीव\n‘संवाद’ने बदलली १.२५ लाख आयुष्ये\nखासगी लॅबमधील HIV चाचणीचीही माहिती मिळणार\nरेड रिबन एक्स्प्रेस २३ पासून पुण्यात\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2018/12/relations-and-space.html", "date_download": "2020-09-26T00:51:00Z", "digest": "sha1:P7L2KONMRGWSGHQQXQH3CHZIZJU7DOHS", "length": 26070, "nlines": 146, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: नाती आणि ‘स्पेस’", "raw_content": "\nशाळेत कधीतरी ‘मला एक कोटी रुपये मिळाले तर...’ या विषयावर निबंध लिहिल्याचं आठवतंय. त्यावेळी कौन बनेगा करोडपती जोरात सुरु झालं होतं, त्याचा परिणाम असावा. पण विषय चांगलाच रंजक होता. डोक्यात कितीही वेगवेगळ्या कल्पना आल्या तरी शाळेत मार्क मिळवण्यासाठी निबंध लिहितो आहोत ही गोष्ट डोक्यात पक्की असल्याने आपोआप आपण ‘पॉलिटिकली करेक्ट’ गोष्टी लिहित जातो. मग साहजिकच त्या निबंधात गरजूंना मदत करणे, हॉस्पिटल बांधणे, ग्रंथालय उभारणे अशा भरपूर गोष्टींचा भरणा होता. आणि मग निबंधाच्या सगळ्यात शेवटी स्वतःसाठी आणि कुटुंबासाठीही काहीतरी एक छोटी गोष्ट होती. सगळं कसं अगदी आदर्श माझा आणि इतर मुलांचा निबंध फार वेगळा नव्हता. ‘आपल्याकडे असलेले एक कोटी रुपये कसे लोकांना ऐकायला आवडेल अशा गोष्टीत आपण खर्च करू’ याच विचाराने सगळ्यांनी निबंध लिहिल्यावर वेगळं काही असण्याची शक्यता नव्हतीच फार. मर्यादित रिसोर्सेस (स्त्रोत) असतील तर ते कसे वापरावेत याबद्दलची स्वतःची कल्पना लिहिताना, त्याही वयात आमच्यावर, कोणत्याही कारणाने का असेना, एका विशिष्ट प्रतिमेचा पगडा होता. ‘अमुक अमुक पद्धतीनेच करणे म्हणजे योग्य’ अशी ती भूमिका. हे असं प्रतिमेत अडकणं आणि उपलब्ध रिसोर्सेसचा वापर या दोन्ही गोष्टी मला नुकत्याच एकदम आठवल्या त्याचं कारण म्हणजे आमच्या गप्पांच्या कार्यक्रमात ‘स्पेस’ या शब्दावर झालेली चर्चा.\n“अशी व्यक्ती मला जोडीदार म्हणून हवी आहे जी मला आमच्या नात्यांत ‘स्पेस’ देईल,”, ही अपेक्षा अनेक मुला-मुलींकडून येते. नुकतेच एका गप्पांच्या कार्यक्रमात उपस्थित मुला-मुलींशी मी याबद्दल बोलत होतो. ‘स्पेस हवीच’ याबद्दल बहुसंख्य मंडळींचं एकमत होतं. “स्पेस हवी ते बरोबर, पण किती स्पेस द्यायची ते कळत नाही..”, उपस्थितांमध्ये असणारी स्नेहा म्हणाली. स्पेस द्यायची तर किती द्यायची हाही प्रश्न महत्त्वाचा आहे यावरही सगळ्यांनी माना डोलावल्या. मग अनीश म्हणाला की, “इतकी स्पेस द्यावी की दुसऱ्याला आपण कशाततरी येऊन अडकलो आहे असं वाटू नये.”, त्यावर ऋचा म्हणाली,“पण स्पेस देण्याच्या नादात असंही होऊ नये की, कोणी कोणाला आन्सरेबलच (उत्तरदायी) नाही. तसं झालं तर लग्न करण्याचा फायदा काय”. वेगवेगळ्या मतप्रवाहांमुळे मुलंमुली चांगलीच गोंधळात पडू लागली होती. नेमकं कशाला स्पेस म्हणावं इथपासून ते किती स्पेस देणं म्हणजे योग्य अशा प्रश्नांचा शोध घेणं सुरु झालं. ‘नात्यात स्पेस देणे’ याविषयी प्रत्येकाच्या अनेक कल्पना आणि त्याबद्दलचे अनेक आडाखेदेखील. बघितलेल्या किंवा ऐकीव गोष्टींच्या आधारे तयार केलेले अनेक समज-गैरसमज आणि त्यातून तयार झालेल्या ‘स्पेस’ विषयीच्या अनेक प्रतिमा. नात्यातली स्पेस देणं-घेणं म्हणजे नेमकं काय\nजेव्हा दोन व्यक्ती लग्न करतात किंवा कोणतंही नातं निर्माण करतात, तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट घडते. आणि ती म्हणजे, ते एक प्रकारे त्यांच्याकडे असणाऱ्या ‘रिसोर्सेस’चं पुनर्वाटप करतात. म्हणजे काय तर नातं निर्माण होतं तेव्हा, माझ्याकडे असणारा वेळ, पैसा, प्रत्यक्षातली जागा (घर) हे जे रिसोर्सेस माझ्याकडे असतात त्यातला सर्व किंवा काही भाग मी जोडीदाराला देण्याचं मान्य करतो आणि ते प्रत्यक्षातही आणू लागतो. नात्यातल्या दोन्ही व्यक्ती हे करतात.मला असं वाटतं, माझ्या रिसोर्सेसचं वाटप मी कसं करायचं हे ठरवण्याचं मला असणारं स्वातंत्र्य म्हणजे ‘स्पेस’ असणं. आपली गंमत अशी होते, की नात्यात रिसोर्सेसचं वाटप कसं असलं पाहिजे याबद्दलच्या पारंपारिक प्रतिमांच्या चौकटी एवढ्या घट्ट आहेत की हे आपण स्वतः ठरवण्याचं स्वातंत्र्य कुठेतरी बाजूलाच पडतं. आणि मग ‘स्पेस मिळत नाही’ ही तक्रार होऊ लागते.\nस्पेस देणं/घेणं हा मुद्दा मुख्यतः ‘वेळ’ या महत्त्वपूर्ण रिसोर्सशी निगडीत आहे. आणि इतर कशाहीपेक्षा या विषयात संघर्ष लवकर होण्याची शक्यता अधिक. कारण पैसा आजपेक्षा उद्या जास्त मिळू शकतो, आज एक बेडरूमचे घर असेल तर उद्या ते तीन बेडरूम्सचं असू शकतं. पण वेळ आजही २४ तासच हातात आहेत आणि उद्याही. थोडक्यात मर्यादित रिसोर्स असल्याने या वेळेचं वाटप हा फार गंभीर मामला बनतो. इथेच शाळेत निबंध लिहिताना डोक्यात येत असे त्याप्रमाणे, मर्यादित रिसोर्स आणि पारंपारिक कल्पनांमधून तयार झालेल्या प्रतिमा यांची सांगड घालून योग्य काय, अयोग्य काय याच्या अपेक्षा ठरतात. नात्यात असणाऱ्या वा लग्नाला उभ्या व्यक्तींकडून तर हे घडतंच घडतं. आणि मग निबंध लिहावा तसं ‘पॉलिटिकली करेक्ट’ गोष्टींची आश्वासनं दिली जातात. “माझा सगळा वेळ तुझ्याचसाठी असेल”, “आपण सगळ्याच गोष्टी एकत्र करू” इ.इ. गोष्टी ठरवल्या जातात. पण आपलं नातं हा आपल्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा ‘एक’ भाग असला तरी ‘एकमेव’ नसतो. त्यामुळे प्रत्यक्षात आपण अगदी सगळ्या गोष्टी एकत्र करत नाही. दोघं वेगळ्या ठिकाणी कामावर जाणं, आपापल्या आवडीच्या गोष्टी करण्यात स्वतंत्र वेळ घेणं, घरातली कामे वेगळी वाटून घेऊन वेगवेगळी करणं, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एकत्र केल्या जातातच असं नाही. पण तरीही हे अनेकदा सहज चालतं, कारण पारंपारिक प्रतिमेत या गोष्ट बसणाऱ्या आहेत.पण प्रवासाला जाणं, सिनेमाला जाणं, मित्रमैत्रिणींसोबत फिरायला/जेवायला जाणं अशा कित्येक इतर गोष्टी दोघांपैकी कोणाच्याही एकाच्या डोक्यातल्या प्रतिमेत बसणाऱ्या नसतील तर मात्र यावर बंधनं घालण्याचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे प्रयत्न होतो. म्हणजे, दुसऱ्याच्या रिसोर्स वाटपाबाबतच्या निर्णयस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा, म्हणजेच दुसऱ्याची ‘स्पेस’ कमी करण्याचा प्रयत्न होतो.अर्थातच, स्पेस देण्याचा थेट संबंध विश्वास या गोष्टीशी देखील आहे. आपला आपल्या जोडीदारावर, आपल्या नात्यावर विश्वास आहे ना आजही २४ तासच हातात आहेत आणि उद्याही. थोडक्यात मर्यादित रिसोर्स असल्याने या वेळेचं वाटप हा फार गंभीर मामला बनतो. इथेच शाळेत निबंध लिहिताना डोक्यात येत असे त्याप्रमाणे, मर्यादित रिसोर्स आणि पारंपारिक कल्पनांमधून तयार झालेल्या प्रतिमा यांची सांगड घालून योग्य काय, अयोग्य काय याच्या अपेक्षा ठरतात. नात्यात असणाऱ्या वा लग्नाला उभ्या व्यक्तींकडून तर हे घडतंच घडतं. आणि मग निबंध लिहावा तसं ‘पॉलिटिकली करेक्ट’ गोष्टींची आश्वासनं दिली जातात. “माझा सगळा वेळ तुझ्याचसाठी असेल”, “आपण सगळ्याच गोष्टी एकत्र करू” इ.इ. गोष्टी ठरवल्या जातात. पण आपलं नातं हा आपल्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा ‘एक’ भाग असला तरी ‘एकमेव’ नसतो. त्यामुळे प्रत्यक्षात आपण अगदी सगळ्या गोष्टी एकत्र करत नाही. दोघं वेगळ्या ठिकाणी कामावर जाणं, आपापल्या आवडीच्या गोष्टी करण्यात स्वतंत्र वेळ घेणं, घरातली कामे वेगळी वाटून घेऊन वेगवेगळी करणं, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एकत्र केल्या जातातच असं नाही. पण तरीही हे अनेकदा सहज चालतं, कारण पारंपारिक प्रतिमेत या गोष्ट बसणाऱ्या आहेत.पण प्रवासाला जाणं, सिनेमाला जाणं, मित्रमैत्रिणींसोबत फिरायला/जेवायला जाणं अशा कित्येक इतर गोष्टी दोघांपैकी कोणाच्याही एकाच्या डोक्यातल्या प्रतिमेत बसणाऱ्या नसतील तर मात्र यावर बंधनं घालण्याचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे प्रयत्न होतो. म्हणजे, दुसऱ्याच्या रिसोर्स वाटपाबाबतच्या निर्णयस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा, म्हणजेच दुसऱ्याची ‘स्पेस’ कमी करण्याचा प्रयत्न होतो.अर्थातच, स्पेस देण्याचा थेट संबंध विश्वास या गोष्टीशी देखील आहे. आपला आपल्या जोडीदारावर, आपल्या नात्यावर विश्वास आहे ना नसेल तर कदाचित ‘स्पेस’पेक्षाही मोठे प्रश्न तुमच्या नात्यात तुमच्यासमोर आ वासून उभे आहेत\nआता हे टाळण्यासाठी काय बरं करावं चार पायऱ्या माझ्या डोक्यात येत आहेत. एक म्हणजे समोरची व्यक्ती, स्त्री असो किंवा पुरुष, ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, या सत्याचा स्वीकार. “मेरे रंग में रंगने वाली...” वगैरे म्हणत जोडीदार शोधायचे दिवस केव्हाच संपले. ते गाणं येऊनही तीस वर्ष उलटली. अजूनही तुम्ही तिथेच असाल तर कठीणच आहे. आता तुमच्या रंगात रंगणारी व्यक्ती मिळण्याची शक्यता कमी आहे. कदाचित तुम्ही दोघे मिळून नवीन रंग निर्माण कराल किंवा आपापल्या रंगाचं स्वतंत्र अस्तित्व राखत, एक बहुरंगी सहजीवन तयार कराल. यातलं काहीच अयोग्य नाही. दुसरी पायरी आहे प्रतिमांच्याचौकटी मोडीत काढण्याची. ‘नवरा आहे म्हणजे त्याने अमुकच वागलं पाहिजे’, ‘गर्लफ्रेंड आहे म्हणजे याच पद्धतीने मला वेळ दिला पाहिजे’ यासारख्या प्रतिमा फेकून द्याव्या लागतील. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, स्वतंत्र आहे, त्यामुळे प्रत्येक नातं देखील वेगळं आहे, युनिक आहे. ते प्रतिमांच्या चौकटीत बसवायला जाण्यात कसलं आलंय शहाणपण\n‘स्पेस’ला मराठीत शब्द आहे अवकाश. तिसरीपायरी आहे संवादाची. यावरून मला एका जोडप्याचा किस्सा आठवतो. त्यांना आपण मधुरा आणि समीर म्हणूया. लग्न ठरल्यावर एकदा समीरने मधुराला सहजच विचारलं की तुला माझ्याकडून, एक नवरा म्हणून काय काय अपेक्षा आहेत. मधुरा म्हणाली, “मला तुझा रोज एक तास हवाय.”. बस्स, एवढंच समीरला आश्चर्य वाटलं. त्यावर मधुरा म्हणाली, “हा एक तास पूर्णपणे माझा असला पाहिजे. म्हणजे त्यात आपले नातेवाईक, मित्र, सिनेमा, टीव्ही, पुढे मुलं झाली की ती, आपला बेडरूममधला वेळ, मोबाईल, काम यातलं काहीही नसेल. रोजचा एक तास फक्त माझ्यासाठीचा असेल.” मला तुझ्या ‘२४ तासांतला एक तास हवाय’ इतकी स्पष्ट अपेक्षा मधुराने समीरसमोर मांडली. समीरकडे असणाऱ्या रिसोर्सपैकी नेमकं काय हवंय याबाबत मधुराने नेमका संवाद साधला. प्रतिमांच्या चौकटी मोडीत काढल्यावर हा संवादच आपल्याला आपल्या नात्याला आपलं हवं ते रूप द्यायला मदत करेल. नातं निर्माण होतं तेव्हा काही स्पेस ही ओव्हरलॅप होईल, काही मात्र स्वतंत्र राहील याची स्पष्टता आणि मानसिक तयारी आपल्याला लाग्नाच्याच नव्हे तर कोणत्याही नात्यात ठेवावी लागते. त्यासाठीच संवाद महत्त्वाचा आहे. चौथी, शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे लवचिकता. नात्याच्या सुरुवातीच्या काळात कदाचित सगळ्यांना मधुराइतकी स्पष्टता असेलच असं नाही. पण या गोष्टी वारंवार बोलण्याच्या आहेत, केवळ सुरुवातीला नव्हे. अधून मधून सिंहावलोकन करून, आपण आपल्या स्वतःच्या रिसोर्सेसच्या वाटपाबाबत आणि एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षांबाबत काय बोललो आहोत, आत्ताची परिस्थिती काय आहे, आपल्याला काय हवं आहे, कसं हवंय अशा गोष्टींवर संवाद व्हायला हवा. या संवादातून असा निष्कर्ष निघाला की काही गोष्टी बदलण्याची गरज आहे, तर त्याचा स्वीकारही व्हायला हवा. तेवढी लवचिकता आपल्याला दाखवायला हवी. मला वाटतं, या चार पायऱ्या नीट पाळल्या तर आयुष्यातला ‘नात्यातली स्पेस’ या विषयावरचा प्रत्येकाचा निबंध वेगळा आणि मस्त होईल\n‘स्पेस’ला मराठीत शब्द आहे अवकाश. मला हा शब्द आवडतो. यात खुल्या आकाशाचा भास आहे. स्वातंत्र्याची अनुभूती आहे. स्वातंत्र्य माणसाला जबाबदार बनवतं असं सामाजिक क्षेत्रात मानलं जातं. नात्यातल्या निर्णयस्वातंत्र्यातून निर्माण होणारं अवकाश, नात्याला आणि नात्यातल्या व्यक्तींना जबाबदार बनवतं. चुकलो, धडपडलो तरी, प्रगल्भ बनवतं. वर्षभर आपण वेगवेगळ्या विषयांवर इथे चर्चा केली. अगदी नातं म्हणजे काय इथून सुरुवात होत ते तडजोड, नव्याची नवलाई, अहंगंड, लिव्ह इन, सेक्शुअल कम्पॅटिबिलीटी, तुलना, पर्याय, पारदर्शकता अशा अनेक विषयांत मुशाफिरी केली. अर्थातच या विषयांत कसलं गाईडबुक नाही. अमुक अमुक म्हणजेच काहीतरी अंतिम फंडा आहे असंही नाही. उलट स्वतःला पुरेशी ‘स्पेस’ देत (म्हणजे त्यात रिसोर्सेसचं स्वतःसाठी वाटप आलंच) या विषयांवर मुक्त चिंतन करणं, चर्चा करणं; आणि आपली नाती फुलवण्याचा, बहरवण्याचा, प्रगल्भ करण्याचा सतत प्रयत्न करणं यातच शहाणपण आहे. या वाटचालीसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा\n(दि. २२ डिसेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या 'मैफल' या पुरवणीत प्रसिद्ध.)\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (6)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/brinjalborer", "date_download": "2020-09-26T02:24:16Z", "digest": "sha1:WKROG7CNMY2DZHS64CKA5CEJTVUMIZQV", "length": 20733, "nlines": 228, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "वांग्यातील फळ व शेंडे पोखरणारया अळीचे कसे करणार नियंत्रण? – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nवांग्यातील फळ व शेंडे पोखरणारया अळीचे कसे करणार नियंत्रण\nवांग्यातील फळ आणि शेंडा पोखरणारी कीड (Leucinodes orbonalis ल्युसीनोड्स ओर्बोनालीस) सर्वसाधारणपणे ४० टक्के नुकसान करते. जर दुर्लक्ष केले व योग्य वेळी फवारण्या केल्या नाहीत तर हे नुकसान ८० टक्क्या पर्यंत जावू शकते. हि अळी पानांच्या देठात, कोवळ्या शेंड्यांत, फुलांत किंवा फळांत शिरून आतलं गर खाते.\nआपणास कोणती रोपे हवीत\nरोपवाटीकांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nवर्षाकाठी किडीच्या आठ ते दहा पिढ्या पूर्ण होतात. अंड्यातून बाहेर पडणारी अळी पानाच्या मुख्य शिरेतून देठात आणि त्यानंतर शेंड्यात प्रवेश करते. अळीने शेंडा आतून पूर्णपणे पोखरल्याने कीडग्रस्त शेंडे सुकून वाळलेले दिसतात.\nपीक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी कळी पोखरून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले फळ न धरता वाळून, सुकून जमिनीवर गळून पडतात.\nलहान फळामध्ये ही अळी हिरव्या पाकळीच्या आतून फळामध्ये प्रवेश करून, विष्ठेद्वारे प्रवेशद्वार बंद करते. त्यामुळे बाहेरून फळ किडले आहे की नाही, हे कळणे अवघड असते.\nअळी फळात शिरल्यावर आतील गर खाते. विष्ठा आतच सोडते. अशी कीडग्रस्त फळे खाण्यास अयोग्य ठरतात.\nकिडीचे नियंत्रण अगदी सुरवातीच्या काळात करणे गरजेचे आहे. या साठी पिक फुलावर यायच्या अगोदर एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावेत. एमेझोन वर हे सापळे उपलब्ध आहेत इथे क्लिक करून हे सापळे खरेदी करून ठेवा. फ्रीजमध्ये भाजीच्या कप्प्यात नीट ठेवल्यास हे सापळे ३-५ वर्ष टिकून रहातात.\nवरील चित्रात दाखवल्या प्रमाणे हे सापळे शेतात पिकाच्या उंचीच्या वर लावावेत. यातील कामगंध किडीच्या उडणाऱ्या अवस्थेला आकर्षित करून जायबंदी करतो. त्यामुळे त्यांचे ना मिलन होते ना ते अंडी देवू शकतात. प्रजननक्षमता निरस्त्र झाल्याने कीड मोठ्या प्रमाणत नियंत्रणात येते.\nजर आपल्या शेतात पिक अगोदरच फुल-फळ अवस्थेत पोहोचले असेल तर खाली दिलेल्या केंद्रीय कीटकनाशक बोर्डाच्या शिफारसी नुसार कीटकनाशक फवारणी करावी व त्यानंतर वर सांगितलेले सापळे शेतात उभे करावे.\nकीटकनाशकांची निवड करते वेळी प्रकर्षाने कोम्बो कीटकनाशके वापरावीत जेणे करून उत्तम दर्जाचे नियंत्रण मिळेल.\nबीटा सायफ्लूथ्रीन ८.४९ + इमीडाक्लोप्रीड १९.८१ ओडी (सोलोमोन) ५-६ मिली प्रती पंप, तोडणी सूर व्हायच्या ७ दिवस अगोदर वापरू नये\nसायपरमेथ्रीन३% + क़्विनोलफोस २०% इसी (रिले १०१, विराट) ५-८ मिली पर पंप, तोडणी सूर व्हायच्या ७ दिवस अगोदर वापरू नये\nडेल्टामेथ्रीन १% + ट्रायझोफोस ३५ % इसी (टायगर, डेलफोस, अशोका) २-२.५ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये\nपायरीप्रोकझीफेन ५% इसी + फेनप्रोपाथ्रीन १५ % इसी १ ते १.२५ मिली पर लिटर, तोडणी सूर व्हायच्या ७ दिवस अगोदर वापरू नये\nवरील कोम्बो कीटकनाशके उपलब्ध होण्यात अडचणी असल्यास खाली दिलेल्या यादीतील कीटकनाशके आलटून-पालटून फवारावीत जेणेकरून किडीत प्रतिकारक्षमता विकसित होणार नाही.\nअझाडीरेकटीन १% (१०००० पी पी एम) कडूनिंबावर आधारित प्रवाही, २ ते ३ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये\nक्लोरानट्रानिप्लोर १८.५ टक्के (ड्यूपांटचे कोराजेन) ५-६ मिली प्रती १५ लिटर, तोडणी सूर व्हायच्या २२ दिवस अगोदर वापरू नये\nक्लोरपायरीफॉस २० ईसी (डर्सबान, त्रिशुल, रडार, क्लोरगार्ड, क्लोरवीप, फोर्स, ट्रायसेल, क्लोरोसन, क्लासिक, लिथल, क्लोरोसील) १- २ मिली प्रती लिटर\nसायपरमेथ्रीन १० टक्के प्रवाही (सापरमार, स्टार सायप्रीन, रीपकॉर्ड, अंकुश, फेनसान, सायपरमील, उस्ताद) १ ते ४ मिली/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये\nसायपरमेथ्रीन २५ टक्के प्रवाही (बासाथ्रिन, सिबील, रुद्र, सायपरसान, सिंबुश, सापरगार्ड, सूपर फाईटर, कोब्रा, सायरस) ५ ते ६ मिली/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये\nडेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही (डेसिस, डिकामेथ्रीन, डेकागार्ड) १ मिली/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये\nइमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी (प्रोक्लेम, डेरिम, ओेलेक्स, हिलक्लेम, तत्काळ, सफारी) ६ ग्राम प्रती पंप, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये\nफेनव्हलरेट २० टक्के प्रवाही (बीलफेन, सुमिसीडीन, लुफेन, फेनकिल) १० मिली प्रती पंप, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये\nफेनप्रोपाथ्रिन ३० टक्के प्रवाही (मिथोथीन) ५ ते ७ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या १० दिवस अगोदर वापरू नये\nलॅमडा- सीहॅलोथ्रीन ४.९ सीएस-(मिट्रो) ०.५ ते १ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये\nफोसॅलॉन ३५ टक्के प्रवाही -(झोलोन, होल्टोन) ३ मिली प्रती लिटर\nथायक्लोप्रीड २१.७ % एस सी (अलर्ट, अलंटो) १.५ मिली/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये\nथायोडिकार्ब ७५ टक्के पा.वि.भु.(लार्वीन, सर्वीन) १.२ तो २.० ग्राम प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ६ दिवस अगोदर वापरू नये.\nवांगी उत्पादनाचा खर्च कमीत कमी ठेवण्यासाठी आमचा विशेष लेख वाचा. त्यासाठी इथे क्लिक करा\nया पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.\nतंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी\nप्रभावी तणनियंत्रणातून मिळवा ३०-४० % अधिक फायदा\nआपली मृदा किती कसदार आहे आपण किती दर्जेदार व संतुलित...\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजनाच्या या तिसऱ्या व शेवटच्या भागात ४० दिवसा नंतर...\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता...\nपाटील बायोटेक तंत्रज्ञान डाळींबात कमालीचे यशस्वी ठरले आहे. आमच्या तज्ञांच्या अनुभवानुसार डाळींबाच्या...\nअन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखाल\nचांगल्या उत्पन्नासाठी पिकास अन्नद्रव्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. पाटील बायोटेक...\nशेतकऱ्याने यशाचा शोध कुठे घ्यावा\nकिसन ला सर्वदूर यशस्वी शेतकरी दिसत होते. पेपर मध्ये, टीव्हीवर,...\nवेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग पहिला)\nमित्रहो स्मार्ट होण्याची वेळ आली आहे. सर्वकाही स्मार्ट होतय...शाळेतला शिक्षक...\nकेळीच्या या बागेत काय सुरु आहे\nबागेला टेकू नाहीत. ४० किलो चा घड. खर्च आला खाली...\nवांग्यात हि चूक करू शकते मोठे नुकसान\nफळ आणि शेंडा पोखरणारी कीड वांगे उत्पादक शेतकरी बांधवासाठी मोठी...\nBiotehc एक॔द्रीत सर्वच उत्पादने उत्कृष्ट व दर्जेदार आहेत.\nभरगोस उत्पन्न वाढण्यास मोलाचे कार्य.\nखूप छान लेख आहे July 02, 2018\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahakamgar.maharashtra.gov.in/janashree-bima-yojna-mr.htm", "date_download": "2020-09-26T02:04:06Z", "digest": "sha1:EWJNUU7FR7CFTHKTDFBBT62PLG3AU6X4", "length": 11698, "nlines": 88, "source_domain": "mahakamgar.maharashtra.gov.in", "title": "जनश्री बिमा योजना | महाराष्ट्र शासन, कामगार विभाग", "raw_content": "\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमुख्य पान › कार्यक्रम व योजना › जनश्री बिमा योजना\nइमारत व अन्य बांधकाम कामगार साठी कल्याण योजना\nघरगुती कामगारांसाठी कल्याण योजना\nघरगुती कामगारांसाठी कल्याण योजना\nघरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजना\nसदर अधिनियमाच्या कलम 10 अन्वये घरेलू कामगारांसाठी पुढील कल्याणकारी योजनांची तरतूद केलेली आहे.अपघात घडल्यास लाभार्थींना तात्काळ सहाय्य पुरविणे, लाभार्थींच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे, लाभार्थींच्या अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैदयकीय खर्चाची तरतूद करणे, महिला लाभार्थींकरीता प्रसुती लाभाची तरतूद करणे, लाभार्थीचा मृत्यू झाल्यावर कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे.\nमंडळातर्फे देण्यात येणारे लाभ :\nघरेलू कामगारांना जनश्री विमा योजना लागू झालेली आहे. सदर योजनेअंतर्गत खालील प्रमाणे लाभ दिले जातात.\nजनश्री सदस्याचा नैसर्गिक मृत्यु ओढवल्यास त्याच्या वारसदारास रु.30000/- देण्यात येते.\nअपघाती मृत्यु ओढवल्यास त्याच्या वारसदारस रु.75,000/- देण्यात येते.\nअपघातामुळे कायम स्वरुपी संपुर्ण अपंगत्व ओढवल्यास सदस्यास रु.75,000/- देण्यात येते.\nअपघातामुळे कायमस्वरूपी अशत: अपंगत्व आल्यास सभासदास रू.37,500/- देण्यात येते.\nयाशिवाय सदस्यांच्या मुलांना शिक्षणाकरिता शिक्षा सहयोग योजने अंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी करिता तसेच आय.टी.आय. चा कोर्स करीत असल्यास, दरवर्षी उर्त्तीण होत असल्यास, दर तिमाही करिता रु.300/- इतकी रक्कम प्रत्येकी (जास्तीत जास्त दोन मुलांकरिता ) देण्यात येते.\nभारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत एका जनश्री सदस्याचा वारसदारास नैसर्गिक मृत्यूबाबत रू.30000/- रक्कम अदा करण्यात आली आहे.\nमृत घरेलू कामगाराच्या कायदेशिर वारसास अंत्यविधी सहाय्य रु.2,000/- देण्यात येते. त्यानुसार दोन सदस्यांना रक्कम अदा करण्यात आली आहे. मंडळाच्या दि. 07.08.2013 रोजीच्या बैठकीत 12 अर्जांना मान्यता देण्यात आली असुन त्याची एकुण रक्कम रु.24,000/- आहे.\n3. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत घरेलू कामगाराला व त्यांच्या पाल्यांना शिकावू उमेदवार प्रशिक्षण व मॉड्यूलर एम्प्लॉएबल स्किम अंतर्गत प्रशिक्षण देण्याचा ठराव करण्यात आलेला आहे. सदर योजना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणार आहे. तरी संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहार चालू आहे.\nघरेलू कामगार मंडळाच्या दि. 28.09.2012 च्या बैठकीत घरेलू कामगारांना प्रसुतीलाभ देण्याबाबत ठराव करण्यात आला असून त्याअंतर्गत घरेलू कामगारास दोन अपत्यापर्यंत प्रत्येक प्रसुतीकरीता रु.5,000/- इतकी मदत देण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत विदेशी भाषा शिकविण्याचे वर्ग घेतले जातात. नोंदीत घरेलू कामगारांच्या पाल्यांना विदेशी भाषा शिकता यावी यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने त्यांना विदेशी भाषा शिकण्याची संधी देण्यात येणार आहे व यावर होणारा खर्च घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे करण्यात येणार आहे.\nयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठामार्फत पदविका व पदवी अभ्यासक्र\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरेलू कामगारांसाठी घरेलू कामगार पदविका अभ्यासक्रम व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरेलू कामगारांना व त्यांच्या मुला-मुलींना पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पदविका अभ्यासक्रमासाठी मंडळातर्फे रु. 900/- व पूर्वतयारी शिक्षणक्रमासाठी रु. 650/- मंडळातर्फे देण्यात येणार आहे.\nमंडळाच्या दि. 07.08.2013 रोजीच्या बैठकीत दि. 01.08.2013 रोजी 55 वर्षे पूर्ण केलेल्या नोंदित घरेलू कामगारांना सन्मानधन रू. 10,000/- देण्याचा ठराव करण्यात आलेला आहे.\nऑनलाईन तक्रार निवारणतुमच्या तक्रारी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा\nबाल मजुरी हेल्पलाईन बालमजुरी तक्रार साठी संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट © 2014 कामगार विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nपानाच्या रोजी अखेरचे अद्यतनितः: 29-5-2014 अभ्यागत: 14976231\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://cinenama.in/2020/08/29/black-panther-star-chadwick-boseman-dies/", "date_download": "2020-09-26T01:34:35Z", "digest": "sha1:3H3EEBE2XSEBSB3KVXSRGPGRJTQGQKRD", "length": 8381, "nlines": 110, "source_domain": "cinenama.in", "title": "'ब्लॅक पँथर' chadwick bosemanचे निधन", "raw_content": "\nHome चौथी भिंत ‘ब्लॅक पँथर’ चॅडविक बॉसमनचे निधन\n‘ब्लॅक पँथर’ चॅडविक बॉसमनचे निधन\nहॉलिवूड अभिनेता चॅडविक बॉसमन (​chadwick boseman) याचं शुक्रवारी निधन झालं. मार्व्हल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पॅथर’ सिनेमात साकारणारा चॅडविक ४३ वर्षाचा होता आणि गेल्या ४ वर्षांपासून कॅन्सरने पीडित होता. चॅडविक ​(chadwick boseman)हा कोलोन कॅन्सरने पीडित होता. त्याच्या लॉस एंजलिस येथील राहत्या घरी निधन झालं.\nन्यूज एजन्सी एपीच्या रिपोर्टनुसार, चॅडविकच्या प्रतिनिधीने सांगितले की, चॅडविकची पत्नी आणि शेवटच्या क्षणी त्याच्यासोबत होते. चॅडविकला कोलोन कॅन्सर होता. सुपरस्टार चॅडविकच्या परिवाराने एक माहिती जारी केली असून ज्यात सांगितले की, ‘तो एक खरा योद्धा होता. चॅडविक आपल्या संघर्षाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते सगळे सिनेमे पोहोचवले ज्यांना तुम्ही खूप प्रेम दिलं’. परिवाराने सांगितले की, चॅडविकने गेल्या ४ वर्षात अनेक सिनेमांचं शूटींग केलं आणि शूटींग त्याच्या अनेक सर्जरी आणि कीमोथरपीमध्ये होत होतं. ब्लॅक पॅंथरमध्ये सम्राट टि-चालाची भूमिका साकारणं त्याच्यासाठी सन्मानाची बाब होती.\nतापसीचा ‘रश्मी रॉकेट’ लवकरच फ्लोअरवर\nचॅडविकने त्याच्या करिअरमध्ये ‘४२’ आणि ‘Get on Up’ सारख्या सिनेमातून आपली जागा निर्माण केली. २०१८ मध्ये आलेल्या मार्व्हलच्या ब्लॅक पॅंथरमध्ये टि-चालाची भूमिका साकारून तो जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उरतला होता. त्यानंतर तो एव्हेंजर्स इनफिनिटी वॉर आणि एव्हेंजर्स-एंड गेमसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमातही ब्लॅक पॅंथरच्या भूमिकेत दिसला. त्याचा शेवटचा सिनेमा ‘Da 5 Bloods’ याचवर्षी रिलीज झाला होता.\nPrevious articleग्रामीण प्रश्न’वर्तुळ’ आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात…\nNext article‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन गायब\nरंगमंचावर नवा ‘प्रयोग’; ‘थिएटर प्रीमियर लीग २०२०’\nग्रामीण प्रश्न’वर्तुळ’ आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात…\nज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचं निधन\nप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात...\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\n‘F.R.I.E.N.D.S’ चे ‘रियुनिअन’ अजून लांबणार…\nज्येष्ठ नाटककार इब्राहिम अलकाझी यांचे निधन\nनाट्यधर्मी निर्माता संघाची स्थापना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/sanjay-raut-shivaraya-taught-woman-respect-kedar-shinde/", "date_download": "2020-09-26T02:46:04Z", "digest": "sha1:OD5E4I5SESR4WCUONC2JZ5GQNEYF6TIH", "length": 16274, "nlines": 389, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "संजय राऊत, शिवरायांनी स्त्री आदर शिकवला त्यांचा मान - आदर राखा - केदार शिंदे - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली…\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी…\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nसंजय राऊत, शिवरायांनी स्त्री आदर शिकवला त्यांचा मान – आदर राखा – केदार शिंदे\nमुंबई : मुंबईची (Mumbai) तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याबद्दल अभिनेत्री कंगना राणौतबाबत (Kangana Ranaut) शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कंगनाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरला. या वादावर दिग्दर्शक केदार शिंदेंनी संजय राऊत याना आठवण करून दिली आहे – संजय राऊत, शिवरायांनी स्त्री आदर शिकवला त्यांचा मान – आदर राखा.\n#KanganaRanawat मुंबई विषयी जे बोलल्या त्याविषयी #निषेध केला. पण त्याला उत्तर देताना #SanjayRaut यांनी उच्चारलेला शब्द ही निषेधार्थ आहे. शिवरायांनी स्त्री आदर शिकवला. त्यांचा मान आदर राखला गेला पाहिजे.\nकंगनाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या संजय राऊत यांना केदार शिंदेंनी (Kedar Shinde) छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) आठवण करून दिली आहे. त्यांनी ट्विट केले – ‘कंगना राणौत मुंबई विषयी जे बोलल्या त्याविषयी निषेध केला. पण त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी उच्चारलेला शब्दही निषेधार्थ आहे. शिवरायांनी स्त्री आदर शिकवला. त्यांचा मान आदर राखला गेला पाहिजे,’ असं केदार शिंदेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.\nकाय म्हणाले संजय राऊत\nकंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु, तिने मुंबईचा उल्लेख मिनी पाकिस्तान केला आहे. तिच्यात हिंमत असेल तर जे मुंबईबद्दल बोलली तेच अहमदाबादविषयी बोलेल का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यात, संजय राऊत यांनी कंगनाबद्दल एक आक्षेपार्ह शब्द वापरला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleखडसे भाजप सोडणार\nNext articleडोळ्यांची काळजी – आयुर्वेदाच्या नजरेतून भाग -2\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी टिप्पणी विराटच्या प्रैक्टिसवर होती\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nकरोनानंही टेकले यांच्यापुढे हात…\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\nपाकिस्तान आम्हाला जनावरांप्रमाणे वागवतो – सज्जाद राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20946", "date_download": "2020-09-26T03:19:23Z", "digest": "sha1:OUSIJBQDPGRBQ5HYTY56BI4EISBL6JYG", "length": 3887, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सेरेंगेटी आफ्रिका : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेरेंगेटी आफ्रिका\nसेरेंगेटी - अनटेम्ड आफ्रिका, भाग-२\nसेरेंगेटी नॅशनल पार्क म्हणजे एरवी मागास असणार्‍या आफ्रिकेच्या भूमीवरचं अमूल्य जंगलवैभवच. आपल्या नैसर्गिक अधिवासात स्वच्छंदीपणे वावरणारणार्‍या इथल्या जंगली प्राण्यांनी स्थानिकांचं आणि पर्यटकांचं सहअस्तित्व निर्धोकपणे स्वीकारलं आहे. त्यामुळे सेरेंगेटीची सफारी हा एक अस्सल, जातीवंत अनुभव ठरतो.\nRead more about सेरेंगेटी - अनटेम्ड आफ्रिका, भाग-२\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/headlines/punishment-for-cracking-fireworks-during-diwali-in-singapore-48581.html", "date_download": "2020-09-26T02:26:54Z", "digest": "sha1:TKAWZ4AILCWWICZADLI7JINWIKI272ZM", "length": 16034, "nlines": 192, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "पहाटे फटाके फोडल्याने जेलवारी, अडीच लाखाचा दंड", "raw_content": "\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nपहाटे फटाके फोडल्याने जेलवारी, अडीच लाखाचा दंड\nपहाटे फटाके फोडल्याने जेलवारी, अडीच लाखाचा दंड\nसिंगापूर: दिवाळी आल्यानंतर ठिकठिकाणी आतषबाजी केली जाते. पण सिंगापूरमध्ये पाच महिन्यांपूर्वी दिवाळीनिमित्ताने फटाके फोडल्याने एका व्यक्तीला चक्क जेलवारी करावी लागली आहे. त्याशिवाय त्याला 2 लाख 56 हजार रुपये दंडही भरावा लागणार आहे. सिंगापूरमध्ये राहणाऱ्या आणि मूळचे भारतीय असलेल्या जीवन अर्जुन (29) यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. मूळ भारतीय असलेल्या जीवन अर्जुन यांनी सिंगापूरमधील लिटिल …\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसिंगापूर: दिवाळी आल्यानंतर ठिकठिकाणी आतषबाजी केली जाते. पण सिंगापूरमध्ये पाच महिन्यांपूर्वी दिवाळीनिमित्ताने फटाके फोडल्याने एका व्यक्तीला चक्क जेलवारी करावी लागली आहे. त्याशिवाय त्याला 2 लाख 56 हजार रुपये दंडही भरावा लागणार आहे. सिंगापूरमध्ये राहणाऱ्या आणि मूळचे भारतीय असलेल्या जीवन अर्जुन (29) यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nमूळ भारतीय असलेल्या जीवन अर्जुन यांनी सिंगापूरमधील लिटिल इंडिया या दुकानातून 6 नोव्हेंबर 2018 रोजी दिवाळीनिमित्त फटाके खरेदी केले. फटाके खरेदी केल्यानंतर दिवाळीच्या पहाटे 3.30 च्या सुमारास घराजवळ फोडले. जीवन निवासी परिसरात राहतो. त्यांनी एकापाठोपाठ एक अनेक फटाक्यांची आतषबाजी केली. त्यामुळे 5 ते 10 मिनीटांपेक्षा जास्त फटाक्यांचा आवाज येत होता. पण त्यांनी केलेल्या या आतषबाजीत कोणतीही जीवतहानी किंवा कोणाचेही नुकसान झाले नाही.\nमात्र पहाटे 3.30 वाजता अनेकजण झोपेत होते. जीवनने फोडलेल्या फटाक्यांमुळे अनेकांची झोपमोड झाली. त्याशिवाय अनेक वयोवृद्ध व्यक्तींना फटाक्यांचा आवाज आणि धुरामुळे त्रास झाला. त्यामुळे त्यांच्याविरोधात अनेकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.\nगेल्या वर्षभरापासून यावर कोर्टात सुनावणी सुरु होती. अखेर गुरुवारी सिंगापूरच्या न्यायलयाने जीवनला फटाके स्वत: जवळ बाळगणे आणि त्यांची आतषबाजी करणे या गुन्ह्याविरोधात तीन आठवडे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच जीवनला 5000 सिंगापूर डॉलर म्हणजे 2 लाख 55 हजार 599 रुपये दंड भरावा लागणार आहे.\n...म्हणून शाळा इतक्यात सुरु होणार नाहीत : वर्षा गायकवाड\nमहाराष्ट्रात शाळा दिवाळीनंतरच, शालेय शिक्षण मंत्र्यांचा विद्यार्थी-पालकांना दिलासा\nAyodhya Ram Mandir Photos: भूमिपूजनाच्या आधीच अयोध्‍येत दिवाळी, योगींनी फटाके…\nविरारमधील भावांच्या मृत्यू प्रकरणात हलगर्जी, पुण्यातील वरिष्ठ पोलिसाची दोन वर्षे…\nPM Modi in Leh | पंतप्रधान मोदींचा अचानक लेह दौरा,…\nकोणाला कोंबडा बनवलं, कोणाला उठाबशा, जमावबंदी आदेश मोडणाऱ्या टवाळांना पोलिसांकडून…\nजिना चढताना पायाचा आवाज, मुख्याध्यापिकेकडून विद्यार्थिनींना अजब शिक्षा\nदगडाने ठेचण्यापासून ते फाशी, बलात्काराच्या गुन्ह्याला कुठे कोणती शिक्षा \nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमराठा समाजाला 'ओबीसी'त आरक्षण दिल्यास मतदानावर बहिष्कार, ओबीसी समाजाचा इशारा\nअहमदाबाद, चेन्नईकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबली हे तुमचंच अपयश;…\nEknath Shinde Corona | एकनाथ शिंदेंना कोरोना, आदित्य ठाकरेंनी दिला…\nEknath Shinde | पीपीई कि्टस घालून रुग्णालयांची पाहणी, एकनाथ शिंदेंना…\nCovid-19 Vaccine | अमेरिकेतील कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात,…\nपाच वर्षे सुडाचे बळी ठरलो, पण सुडाचे राजकारण करणार नाही…\nनागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावतीत कोरोना रुग्ण वाढले, राजेश टोपेंची कबुली\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nCSK vs DC Live Score Update : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्लीची चेन्नईवर 44 धावांनी मात\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/savarkar-had-said-cow-is-not-our-mother-bjp-accept-it-chhagan-bhujbal/272620?utm_source=relatedarticles&utm_medium=widget&utm_campaign=related", "date_download": "2020-09-26T02:16:28Z", "digest": "sha1:JIHJMHZNHOPX457SMP2TKU7BU2L2P7H7", "length": 11077, "nlines": 83, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " सावरकर म्हणाले होते की, 'गाय आमची माता नाही', भाजप हे स्वीकारेल का?: भुजबळ savarkar had said cow is not our mother bjp accept it chhagan bhujbal", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nसावरकर म्हणाले होते की, 'गाय आमची माता नाही', भाजप हे स्वीकारेल का\nसावरकर म्हणाले होते की, 'गाय आमची माता नाही', भाजप हे स्वीकारेल का\nरोहित गोळे | -\nराहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आता राजकारण चांगलंच तापलं आहे. या सगळ्या प्रकरणात आता छगन भुजबळ यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.\nसावरकर म्हणाले होते की, 'गाय आमची माता नाही', भाजप हे स्वीकारेल का: भुजबळ |  फोटो सौजन्य: ANI\nमुंबई: 'काहीही झालं तरी मी माफी मागणार नाही. माफी मागायला मी काही राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे.' असं वक्तव्य करणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आता भाजपने जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने देखील प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी भाजपकडून काँग्रेससोबतच शिवसेनेवर देखील टीका करण्यात येत आहे. पण आता काँग्रेस आणि शिवसेनेचा बचाव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ हे पुढे सरसावले आहेत.\nछगन भुजबळ असं म्हणाले की, 'जेव्हा मोठ्या व्यक्तींबाबत जेव्हा-जेव्हा चर्चा होते तेव्हा प्रत्येक जण हा त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर सहमत असेल असं अजिबात नाही. सावरकरांबाबत राहुल गांधी यांचे स्वत:चे काही विचार आहेत. सावरकर म्हणाले होते की, गाया आमची माता नाही. पण भाजप म्हणतं की, गाय आमची माता आहे. सावरकरांची विचारसरणी ही विज्ञानवादी होती. पण भाजप त्यांची ही विचारसरणी स्वीकार करेल ते स्वीकारु शकत नाही.'\nदरम्यान, याचबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं की, सावरकरांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीवर काही परिणाम होईल त्यावेळी अजित पवार असं म्हणाले की, 'उद्धव ठाकरे, सोनिया गांधी आणि शरद पवार हे परिपक्व नेते आहेत. ते योग्य ते निर्णय घेतील.'\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसवर नाराज कारण...\nराहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...\nदिल्ली: कॉंग्रेसची आज ‘भारत बचाओ रॅली’, मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न\nदुसरीकडे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यावरुन पलटवार केला आहे. त्यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 'नेहरु-गांधी कुटुंबाच्या ५ पिढ्या देखील सावकरांच्या वारश्याशी बरोबरी करु शकत नाही. एक गोष्ट खरी आहे की, राहुल गांधी हे कधीही राहुल सावरकर होऊ शकत नाही. वीर सावरकर ही एक राष्ट्रीय विभूती आहे. ज्याचा भारताच्या राजकीय व्यवस्थेवर सभ्यतेवर सभ्यपणे प्रभाव आहे. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ते श्रद्धेयच असतील.'\nदिल्लीच्या रामलीला मैदानावर शनिवारी काँग्रेसने भारत बचाओ रॅली आयोजित केली होती. त्यामध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, 'संसदेत शुक्रवारी भाजपचे खासदार म्हणत होते की, मी रेप इन इंडिया या वक्तव्यावर माफी मागावी. मी जे खरं बोललो त्यासाठी ही लोकं मला म्हणत आहेत की, मी माफी मागावी. माझं नाव राहुल सावरकर नाही, माझं नाव राहुल गांधी आहे. मी जे खरं बोललो त्यासाठी मी कधीही माफी मागणार नाही. मी एकवेळ मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेस नेता यासाठी माफी मागणार नाही.'\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\n'पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी', पाहा कोणी केली टीका\nस्कॉर्पियन श्रेणीतील ‘वेला’ पाणबुडीचे जलावरण, चाचणीनंतर नौदलात समावेश\nKirit Somaiya first reaction: पाहा उमेदवारी गमावल्यांनंतर किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले\nआजचे राशी भविष्य २६ सप्टेंबर\nट्रकमध्ये चढत असताना सहायक पडला खाली आणि चाक.....\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ सप्टेंबर २०२०:\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमबद्दल CM ठाकरेंचे मत\nमारुतीची नवीन कार मिळणार मासिक शुल्कावर, पाहा काय आहे प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2017/09/masala-aamboli/", "date_download": "2020-09-26T02:51:11Z", "digest": "sha1:ODK6TXGD2BBRRPJ2C7VDUB6AMDF7NLX2", "length": 13795, "nlines": 212, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Masala Aamboli (मसाला आंबोळी) - Spicy Pan Cake | My Family Recipes", "raw_content": "\nमसाला आंबोळी ही तळकोकणाची स्पेशालिटी आहे. नारळाच्या रसाबरोबर खाल्ली जाणारी आंबोळी हे पक्वान्न म्हणून खातात. हा आंबोळीचा प्रकार नाश्त्याला खातात. कांदा, टोमॅटोची मसालेदार भाजी करून आंबोळीच्या पिठात मिक्स करून त्याच्या आंबोळ्या बनवतात. त्यामुळे हा प्रकार अतिशय चविष्ट लागतो (मसाला उत्तप्यापेक्षा चविष्ट). नक्की करून बघा.\nमासे खात असाल तर ह्या मसाल्यात कोळंबीचे बारीक तुकडे करून घाला. फारच चविष्ट लागतं (माझा नवरा सांगतो – त्याला करून दिली आहे).\nछान जाळीदार आंबोळ्यांसाठी काही टिप्स :\n१. उडीद डाळ जुनी नसावी. जुनी असेल तर पीठ आंबत नाही.\n२. डाळ वाटताना फ्रिज चं थंड पाणी घाला. डाळ वाटताना फार गरम झाली तर पीठ आंबत नाही.\n३. पीठ वाटताना फार पातळ करू नका कारण आंबल्यावर पीठ थोडं पातळ होतं.\nसाहित्य (४ जणांसाठी जेवण म्हणून)\nउडीद डाळ १ कप\nमेथी दाणे २ मोठे चमचे\nपोहे २ मोठे चमचे\nतेल आंबोळ्या बनवताना तव्यावर लावण्यासाठी\nकांदे ४ मध्यम बारीक चिरून\nटोमॅटो ४ मध्यम बारीक चिरून\nताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून\nलाल तिखट पाऊण – एक चमचा (चवीनुसार कमी / जास्त करा)\nगरम मसाला अर्धा – पाऊण चमचा\nचिरलेली कोथिंबीर १ चमचा\nकढीपत्ता ७–८ पानं बारीक चिरून\n१. आंबोळीचं पीठ बनवण्यासाठी उडीद डाळ धुवून पाणी घालून भिजत ठेवा. दुसऱ्या पातेल्यात तांदूळ धुवून त्यात पाणी घाला. तांदुळाच्या पातेल्यात मेथी दाणे आणि पोहे घाला. डाळ व तांदूळ ८ तास भिजवा. उडीद डाळ जुनी नसावी. जुनी असेल तर पीठ आंबत नाही.\n२. ८ तासानंतर डाळ आणि तांदुळाचं पाणी उसपून घ्या.\n३. मिक्सर मध्ये डाळ वेगळी वाटा. डाळ वाटताना फ्रिज चं थंड पाणी घाला. डाळ वाटताना फार गरम झाली तर पीठ आंबत नाही.\n४. तांदूळ, मेथी, पोहे एकत्र वाटून घ्या. ह्यात साधं पाणी घाला. पीठ फार पातळ करू नका कारण आंबल्यावर पीठ थोडं पातळ होतं.\n५. वाटलेली डाळ आणि तांदूळ एकत्र करून जड झाकण ठेवून झाकून ठेवा. थंड हवामानात बंद कपाटात / ओव्हन मध्ये – ओव्हन चालू न करताना ठेवा. ८ तासात पीठ छान आंबेल.\n६. पीठ मिक्स करून चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करा.\n१. एका कढईत तेल गरम करून जिरं, हळद, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी करा.\n२. फोडणीत कांदा आणि चिमूटभर मीठ घाला. ३–४ मिनिटं मंद आचेवर परता.\n३. आता नारळ घाला आणि मिक्स करा. कांदा पारदर्शक होईपर्यंत परता.\n४. टोमॅटो घाला आणि मिक्स करून झाकण ठेवून टोमॅटो शिजेपर्यंत शिजवा. मधे मधे मिश्रण ढवळा.\n५. लाल तिखट, गरम मसाला, आमचूर, मीठ, कोथींबीर घालून नीट ढवळून घ्या.\n६. हा मसाला झणझणीत व्हायला हवा कारण आपण तो आंबोळीच्या पिठात मिक्स करणार आहोत. चवीनुसार लाल तिखट, गरम मसाला घाला.\n७. २ मिनिटांनी गॅस बंद करा. मसाला तयार आहे.\n१. मसाला आंबोळीच्या पिठात मिक्स करा. तुम्हाला सगळं पीठ एकदम वापरायचं नसेल तर हवं तेवढं पीठ काढून घेऊन त्यात लागेल तास मसाला घाला. मसाला जास्त घालून चव मस्त येते.\n२. आंबोळीसाठी तवा गरम करून घ्या. गॅस बारीक करून तव्यावर पाणी शिंपडून कपड्याने पुसून घ्या. दीड मोठा चमचा पीठ तव्यावर घालून नीट पसरा. उत्तप्प्यापेक्षा पातळ पसरा.\n३. झाकण ठेवून एक – दीड मिनिटं भाजा. आता आंबोळी परतून घ्या. आंबोळीवर थोडं तेल सोडा. दोन्ही बाजू छान भाजल्या की गरमागरम सर्व्ह करा.खरपूस भाजलेली आंबोळी लालसर रंगाची दिसते.\n४. गरमागरम आंबोळीचा चटणी / सॉस बरोबर आस्वाद घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF-8/", "date_download": "2020-09-26T01:53:28Z", "digest": "sha1:RM3OLKP35247PDLKSJRIA4JCK5VXLZUH", "length": 8086, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 11 हजारांची मदत | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीला 11 हजारांची मदत\nभुसावळातील एस.टी.महामंडळ आगारातील कर्मचार्‍यांचे सामाजिक दायीत्व\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक दायीत्व म्हणून भुसावळ एस.टी.आगारातील कर्मचार्‍यांनी श्री गुरुदत्त मंदिर सेवा समितीतर्फे कोरोना बाधीतांना सहाय्य करण्यासाठी तहसीलदार दीपक धीवरे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 हजार 111 रुपयांचा धनादेश सोपवला. जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले असून भारत सरकारने त्यावर वेळीच उपाय योजना केल्याने इतर देशांच्या तुलनेत आपण भारतीय कोरोनाशी समर्थपणे लढा देत आहोत. शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व एस.टी.कर्मचारी बांधील असून नागरीकांनी रस्त्यावर गर्दी न करता घरीच थांबावे तसेच काही दिवसातच कोरोनाशी असलेली लढाई आपण नक्कीच जिंकू, असा आत्मविश्‍वास कर्मचार्‍यांनी व्यक्त केला. सदर बाबीसाठी धर्मराज देवकर, किशोर आंबोले, किशोर नेवे, प्रमोद कोल्हे यांनी परीश्रम घेतले.\nखिरवडला अवैध गावठी भट्टीवर कारवाई : दोघांविरुद्ध गुन्हा\nकोरोनाविरुद्ध लढणार्‍या योद्ध्यांचा साई निर्मल फाउंडेशन करणार सन्मान\nभारतात कोरोना चाचणीचा नवा विक्रम; एका दिवसात विक्रमी चाचणी\nBIG BREAKING: बिहार निवडणुकीची घोषणा: तीन टप्प्यात होणार मतदान\nकोरोनाविरुद्ध लढणार्‍या योद्ध्यांचा साई निर्मल फाउंडेशन करणार सन्मान\nमहिलेच्या खूनप्रकरणी नातेवाईकास अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/pm-modi-tweets-on-heavy-rain-in-mumbai-1540593/", "date_download": "2020-09-26T01:13:03Z", "digest": "sha1:ETUC5T7ARL6BMEYHQONKMUZP3AI2NX7T", "length": 11448, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "pm modi tweets on heavy rain in mumbai | Mumbai Rain: महाराष्ट्राला केंद्राकडून सर्वोतोपरी मदत- पंतप्रधान मोदी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nMumbai Rain: महाराष्ट्राला केंद्राकडून सर्वोतोपरी मदत- पंतप्रधान मोदी\nMumbai Rain: महाराष्ट्राला केंद्राकडून सर्वोतोपरी मदत- पंतप्रधान मोदी\nमुंबईतील मुसळधार पावसानंतर मोदींचे ट्विट\nपंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित छायाचित्र)\nमुंबईत दिवसभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरवासियांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मुंबईतील निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून असून यासाठी केंद्राकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे ट्विट मोदींनी केले आहे. मुंबईकरांनी स्वत:ची काळजी घ्यावी आणि सुरक्षित जागी थांबावे, असे आवाहनदेखील मोदींनी केले आहे. आज सकाळपासून मुंबईत प्रचंड पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहेत.\nमुंबईत मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधत शहरातील परिस्थितीची माहिती घेतली आहे. मोदींनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली. मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, अशीही माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. ‘मुंबईकरांनी स्वत:ची काळजी घ्यावी आणि सुरक्षित स्थळी राहावे,’ असे आवाहनदेखील मोदींनी केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना आवाहन\n2 मुंबईकरांनो, पावसात अडकला आहात ‘या’ अपडेट नक्की वाचा\n3 मुंबई पाऊस : गणेश मंडळांनी वीज कनेक्शन बंद करावेत; सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे आवाहन\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/student-dies-of-electric-shock-139605/", "date_download": "2020-09-26T03:30:02Z", "digest": "sha1:YYQLRTWKW3EAHPN33JEU5Y3LUXLRPZIP", "length": 10626, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दिव्यात विजेच्या धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nदिव्यात विजेच्या धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू\nदिव्यात विजेच्या धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू\nरस्त्यावर साचलेल्या पाण्यात वीज वाहिनी पडल्याने, पाण्यात पसरलेल्या वीजेचा शॉक लागून दिवा पूर्व परिसरात राहाणाऱ्या एका १३ वर्षीय शालेय विद्यार्थीनीचा मृत्यू झाला़ त्यामुळे या\nरस्त्यावर साचलेल्या पाण्यात वीज वाहिनी पडल्याने, पाण्यात पसरलेल्या वीजेचा शॉक लागून दिवा पूर्व परिसरात राहाणाऱ्या एका १३ वर्षीय शालेय विद्यार्थीनीचा मृत्यू झाला़ त्यामुळे या परिसरात संतापाचे वातावरण आहे. सिद्धी संतोष आखाडे आपल्या बहिणीसह बुधवारी दुपारी शाळेत निघाली होती. मुंब्रा देवी कॉलनी परिसरात महावितरणची वीज वाहिनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडली होती. त्यामुळे पाण्यात वीजेचा प्रवाह पसरला होता. पाण्यात पाय टाकताच सिद्धीला वीजेचा जबरदस्त धक्का बसला. या अपघातात सिद्धी\nमृत्युमुखी पडली तर तिची मोठी बहीण रिद्धी (१४) गंभीर जखमी झाली आहे.\nदोन दिवसांपूर्वी याच भागात वीजेच्या धक्क्याने दोन श्वानांचा मृत्यू झाल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. या भागातील ट्रान्सफार्मरवर वीजेचा अतिभार आल्याने कंडक्टर तुटला व लघु दाबाची विद्युत वाहिनी तुटून हा अपघात झाला, असे महावितरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितल़े\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nविजेच्या धक्क्याने दाम्पत्याचा मृत्यू\nविजेच्या धक्क्य़ाने कुर्ला येथे एकाचा मृत्यू\nविजेचा धक्का बसून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू\nवीज तारेच्या स्पर्शाने शहापुरात तिघांचा मृत्यू\nविजेच्या धक्क्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 काटईजवळ जलवाहिनी फुटली\n2 आता एकच ‘स्मार्ट कार्ड’\n3 वांद्रय़ाच्या नाल्यात ८० झोपडय़ा \n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/wont-let-jaitapur-become-fukushima-shiv-sena-1095157/", "date_download": "2020-09-26T02:52:21Z", "digest": "sha1:R6DB4RLE3XI7WDYWO3UY5WIRG5YWCNVX", "length": 11185, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘जैतापूरचा फुकुशिमा होऊ देणार नाही’ | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n‘जैतापूरचा फुकुशिमा होऊ देणार नाही’\n‘जैतापूरचा फुकुशिमा होऊ देणार नाही’\nजैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून कोणत्याही परिस्थितीत जैतापूरचा फुकूशिमा होऊ देणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.\nShiv Sena will contest upcoming election separately : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी गुरूवारी मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.\nजैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून कोणत्याही परिस्थितीत जैतापूरचा फुकूशिमा होऊ देणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले. शिवसेनेचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.\nवांद्रे येथील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत विजयी झाल्यानिमित्ताने शिवसेनेने आयोजित केलेल्या विजय मेळाव्यानंतर मंगळवारी रात्री पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी जैतापूर प्रकल्पाबाबत आपली भूमिका मांडली. जैतापूर प्रकल्प प्रतिष्ठेचा बनवू नका. हा प्रकल्प म्हणजे एक राक्षस आहे. हा प्रकल्प आता मागे घेणे शक्य नाही, असे मुख्यमंत्री म्हणत असले तरी त्यावर चर्चा होऊ शकते, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. जर्मनीत जर अणुउर्जा प्रकल्प बंद होऊ शकतात, तर भारतात का होऊ शकत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. मुंबईचा प्रारुप विकास आराखडा विचित्र होता. त्याविरोधात शिवसेनेने प्रथम आवाज उठविला होता, असे सांगून तो रद्द केल्याबद्दल ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग आता आयओएसवरही\n2 अमली पदार्थ तस्कर बेबी पाटणकरला अटक\n3 करोडपती ‘ड्रगमाफिया’ बेबी..\n\"Mr. Gavaskar तुम्हाला वाटत नाही का...\" 'त्या' वक्तव्यावर अनुष्काने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/ten-volumes-of-urdu-ghazals-release-1116300/", "date_download": "2020-09-26T02:53:17Z", "digest": "sha1:G4ONAXX6GLSXU3IJDY2DR6TKTRUK3OVS", "length": 13472, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘अक्षरसंध्या वाचककट्टा’चे उद्घाटन | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nसाहित्याच्या वाचकांची इयत्ता वाढविण्यासाठी या वाचक कट्टय़ाची सुरूवात केली असून वाचकांना समृद्ध करण्यासाठी अशा उपक्रमांची प्रत्येक गावात व शहरात आवश्यकता आहे.\nसाहित्याच्या वाचकांची इयत्ता वाढविण्यासाठी या वाचक कट्टय़ाची सुरूवात केली असून वाचकांना समृद्ध करण्यासाठी अशा उपक्रमांची प्रत्येक गावात व शहरात आवश्यकता आहे. असे मत ग्रंथसखा वाचनालयाचे संचालक श्याम जोशी यांनी व्यक्त केले. ते अक्षरसंध्या या वाचक कट्टय़ाच्या काटदरे सभागृहात झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.\nकाका गोळे फाऊंडेशन व ग्रंथसखा वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या या अक्षरसंध्या वाचक कट्टय़ाच्या उद्घाटन सोहळ्यास काका गोळे फाऊंडेशनचे आशीष गोळे, ग्रंथसखा वाचनालयाचे श्याम जोशी, उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील, उर्दूचे अभ्यासक रमेश अढांगळे, ‘झी-२४ तास’चे कार्यक्रम निर्माते संदीप साखरे, निवेदक भूषण करंदीकर व श्रीराम केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उर्दूचे अभ्यासक रमेश अढांगळे यांनी संकलित केलेल्या उर्दू गझलांच्या दहा खंडांचे प्रकाशन करण्यात आले.\nजोशी पुढे म्हणाले की, वाचन करणाऱ्या प्रत्येकालाच त्याने वाचलेल्या साहित्यावर या वाचक कट्टयाच्या माध्यमातून आम्ही बोलते करणार आहोत. तसेच या कट्टय़ाच्या माध्यमातून वाचकांशी थेट संवादही साधण्यात येणार आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी बदलापूर पूर्वेकडील काका गोळे फाऊंडेशनच्या खुल्या व्यासपीठावर हा कार्यक्रम होणार असून येथे वाचकांनी वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्यात येणार असून प्रत्येक कार्यक्रमाच्या दिवशी एका साहित्यिकावर व त्यांच्या पुस्तकावर चर्चा करण्यात येणार आहे. या साहित्यिकाच्या छायाचित्रांचे व त्यांनी लेखन केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनही येथे मांडण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात चालू घडामोडींवर आधारित विषयावरही चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी ठरलेल्या विषयावर प्राधान्याने वाचकांची मते जाणून घेण्यात येणार आहेत.\nयेत्या १९ जुलै रोजीच्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात साहित्यिक व अभ्यासक नरहर कुरूंदकर यांच्या साहित्यावर चर्चा करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय याविषयावर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी पाच साहित्य प्रेमींनी व काका गोळे फाऊंडेशनचे आशिष गोळे यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. सुप्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर यांनी श्याम जोशी यांची मुलाखत घेतली. तर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीधर पाटील यांनी केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 कुंचल्यातून अमर प्रेमाच्या रंगकथा\n2 पोलीस गस्त बंद, चोऱ्यामाऱ्या सुरू\n3 अनंत गद्रे यांच्या व्यावसायिक कर्जासंबंधी पुस्तकाचे प्रकाशन\n\"Mr. Gavaskar तुम्हाला वाटत नाही का...\" 'त्या' वक्तव्यावर अनुष्काने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/Avoid-loneliness-with-loneliness-in-old-age.html", "date_download": "2020-09-26T03:14:22Z", "digest": "sha1:72RLLSIRO23JOS77SBDOC3ZT62NR3RIQ", "length": 6723, "nlines": 62, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "'अशा' प्रकारे टाळा म्हातारपणात एकटेपणा...", "raw_content": "\n'अशा' प्रकारे टाळा म्हातारपणात एकटेपणा...\nbyMahaupdate.in मंगळवार, फेब्रुवारी ११, २०२०\nएकटेपणापासून बचाव करण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अ‍ॅडव्हान्स प्लॅनिंग .\nतारुण्यावस्थेतच म्हातारपणात एकटेपणा येणार नाही ,यासाठी प्रयत्न करायला हवेत . कारण मोट्या वयात नवे मित्र बनवणं अवघड असतं . म्हातारपणात एकटेपण खायला उठतो . काही प्रमाणात एकटेपणा भासतो .पण याने जर आजारपणच रूप घेतलं तर एकटेपण घातक होऊ शकतं .प्रौढ वयात एकटेपणाची कारण आणि त्यावरच निदान याविषयी तज्ज्ञ म्हणतात, म्हातारपणात अनेक आरोग्याविषयी समस्या डोकं वर काढतात, त्यामध्ये एखाद्या प्रिय व्यक्तीच निधन , जीवनसाथी दुरावण , मुलं लांब जाणं या कारणांचा परिणामही होतो . या सगळ्यामुळे व्यक्तीला नैराश्य आणि ताण येऊ लागतो . नैराश्य ही एकटेपणाची सगळ्यात मोठी समस्या आहे .\nतुम्ही सतत मध्य एकटेपणाबद्दल विचार करून त्रस्त असाल , होत असाल , पहाटे तीन - चार वाजताच तुम्हाला जग येत असेल आणि त्यानंतर जागच राहावं लागत असेल , अंथरुणावर पडल्या पडल्या तुम्ही एकटेपणाचा विचार करता का , तुमच्या मनात मृत्यूचे विचार देतात का , भूक लागत नाही का , गेलेल्या प्रियजनांची आठवण येते का तुमच्या बाबतीत असे घडत असेल , तर तुम्हीसुद्धा एकटेपणाने त्रस्त आहात . लक्षात घ्या तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे .\nएकटेपणापासून बचाव करण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे ऍडव्हान्स प्लॅनिंग , तारुण्यावस्थेच म्हातारपणात एकटेपण येणार नाही यासाठी प्रयत्न करायला हवेत . कारण नोठया वयात नवे मित्र बनवणं अवघड असतं म्हणून सुरुवातीपासूनच तुमची वागणूक सगळ्यांना सामावून घेणारी असावी. नातेवाइकांशी संपर्क आणि आयुष्यभर संबंध जपायला हवेत . जर निवृत्तीनंतर एकदम तुम्ही एकमेकांना भेटायल गेलात , तर ते वेगळं वाटेल .\nअशा जागी जाऊन बसू नका , जिथे तुम्ही कोणाला आणि तुम्हाला कोणी ओळखत नाही . पाश्च्यात संस्कृतीत अशी प्रथा आहे की लोक म्हातारपणात पर्वतावर, हिरवळीच्या ठिकाणी किंवा समुद्र किनारी स्वप्नांच्या महागड्या घरात जाऊन राहतात , पण काही काळानंतर तिथे कुणीच न भेटल्याने एकटेपणाचा कंटाळात आणि यांचं आयुष्य एकाकी , कंटाळवाणं होतं. अशा जागी जाऊन राहाणं त्रासदायक ठरतं.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/Build-quality-roads-in-Maharashtra-Ashokrao-Chavan.html", "date_download": "2020-09-26T01:19:09Z", "digest": "sha1:PH3CXYNXA37CIC2KHDZFKOBUOSJ7QZKL", "length": 7777, "nlines": 57, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "महाराष्ट्रात दर्जेदार रस्ते तयार करणार - ना. अशोकराव चव्हाण", "raw_content": "\nमहाराष्ट्रात दर्जेदार रस्ते तयार करणार - ना. अशोकराव चव्हाण\nbyMahaupdate.in रविवार, फेब्रुवारी १६, २०२०\nनांदेड : राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मिळालेल्या संधीतून राज्याला पुढे नेण्यासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणाप्रमाणेच महाराष्ट्रात दर्जेदार रस्ते तयार करणार असल्याचे ना. अशोकराव चव्हाण यांनी येथे सांगितले.\nसुप्रसिद्ध सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी १४ फेब्रुवारी रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी माजी आ. सौ.अमिता चव्हाण यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी झालेल्या या मुलाखतीच्यावेळी नांदेडकरांनी मोठी गर्दी केली होती. रितेश देशमुख यांचे ना.चव्हाण यांचे बालपणापासून ते आजपर्यंतचे शैक्षणिक, कौटुंबीक, राजकीय, सामाजिक पेलू उलगडून दाखवले. ना. चव्हाणांचे वडील माजी मुख्यमंत्री कै.शंकरराव चव्हाण यांना अशोकरावांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे असे वाटत होते.\nपरंतु अशोकरावांनी व्यवस्थापन क्षेत्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली. यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांवर कोणते करिअर करावे याबाबतचे विचार लादू नयेत. पाल्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्या क्षेत्रात करिअर करु द्यावे असे ना.चव्हाण म्हणाले. कै. शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यानंतर शिक्षणासाठी आपल्या कुटुंबियांनी आमदार निवासातील दोन खोल्यामध्ये दिवस काढले. हे सांगताना ना.चव्हाण गहिवरुन आले. ना. चव्हाण व सौ.अमिता चव्हाण यांचे सुत महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात जुळले. त्यानंतर विभिन्न जातीचे असल्यामुळे या पे्रमविवाहाला घरुन मान्यता मिळेल की नाही याबाबत शंका होती.\nपरंतु कै.शंकरराव चव्हाण यांनी या विवाहाला मान्यता दिली. परंतु प्रेमविवाह करण्याबरोबर तो निभावून नेण्याचा सल्ला त्यांनी दिल्याचे ना. चव्हाणांनी सांगितले. शालेय जीवनात आपण मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहोत हे सांगितले नव्हते. परंतु वृत्तपत्रातून आलेल्या जाहिरातीमुळे ही बाब सर्वांना माहित झाली, असा उलगडा ना. चव्हाणांनी केला. राज्याचा माजी मुख्यमंत्री असताना आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी जे जे करता येईल ते ते केले. आता सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री म्हणून संधी मिळाल्याने राज्याला पुढे नेण्यासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणामधील रस्त्याच्या धर्तीवर राज्यात दर्जेदार रस्ते तयार करण्याचा संकल्प ना.चव्हाण यांनी केला. मराठा आरक्षणाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणे व राज्यातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/nirbhaya-case-actress-kangana-ranaut-panga-press-conference/", "date_download": "2020-09-26T02:59:12Z", "digest": "sha1:MRYRGIT2RDHE4EOMXG32JWEP4XPJ56CX", "length": 18758, "nlines": 166, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘निर्भया’च्या आरोपींना भर चौकात फाशी द्या, कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\n‘निर्भया’च्या आरोपींना भर चौकात फाशी द्या, कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया\nअभिनेत्री कंगना रणौत आपल्या अभिनयासोबतच वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत असते. यावेळी कंगनाने आपला निशाणा दिल्लीतील ‘निर्भया’ सामूहिक बलात्कार आणि खूनाच्या दोषींवर साधला आहे. “या लोकांना सर्वांसमोर फासावर लटकवलं पाहिजे”, अशा भावना कंगनाने व्यक्त केल्या आहेत.\nअभिनेत्री कंगना मुंबईत तिच्या ‘पंगा’ सिनेमाच्या प्रिमिअर दरम्यान झालेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होती. ‘पंगा’ हा सिनेमा 24 जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.\nबलात्कारासारखा गुन्हा करणारे अल्पवयीन कसे\nमुंबईत बुधवारी संध्याकाळी ‘पंगा’ सिनेमाच्या प्रिमिअर दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत कंगना दिल्ली सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या आरोपींवर बोलत होती. दिल्ली सामूहिक बलात्कारातील एक आरोपी अल्पवयीन होता. ‘जो अल्पवयीन मुलगा बलात्कारासारखा गुन्हा करू शकतो, त्याला अल्पवयीन का म्हणता’, असा सवाल करतानाच ‘जी व्यक्ती बलात्कारासारखा गुन्हा करू शकते, ती व्यक्ती अल्पवयीन असूच शकत नाही. अशांना भर चौकात फाशी दिली पाहिजे’, असे मत कंगनाने व्यक्त केले.\nज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी निर्भयाच्या आईला केलेल्या विनंती संदर्भातदेखील कंगनाने आपली भूमिका अगदी कडक शब्दात मांडली आहे. ‘बलात्काऱ्यांना माफी द्या अशी विनंती करणाऱ्या महिलेला देखील या दोषींच्या सोबत तुरुंगात चार दिवस ठेवा. त्यांना तिथेचं ठेवलं पाहिजे, ज्यांना अशा लोकांची दया येते. अशाच महिला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना जन्म देतात’, असं कंगना म्हणाली.\nदिल्ली सामूहिक बलात्कारातील आरोपींना फेब्रुवारीत फाशी\nदिल्ली पतियाळा हाऊस कोर्टाने निर्भया प्रकरणातील चारही आरोपींच्या विरोधात डेथ वाँरंट जारी केले आहे. या आरोपींना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम खान यांची नावे चर्चेत\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे यांचे आदेश\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम...\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nया बातम्या अवश्य वाचा\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sureshbhat.in/node/2530", "date_download": "2020-09-26T02:52:19Z", "digest": "sha1:KADZEPEFKPKYCFSQKFBPNVGQUEUSU2WU", "length": 6787, "nlines": 99, "source_domain": "sureshbhat.in", "title": "तुझा दोष नाही !!! | सुरेशभट.इन", "raw_content": "एक मी निःशब्द किंकाळीच होतो...\nऐकण्यासाठी सुना बाजार होता\nमुखपृष्ठ » तुझा दोष नाही \nतुझ्यासारखे बघ, मलाही सुखाने जगाया न आले, तुझा दोष नाही \nतुझी होत होता, कधीही सख्या मग कुणाची न झाले, तुझा दोष नाही \nपहाटे पहाटे धुके दाटलेल्या सराईत वाटेवरी चालताना....\nउरी ठेचकाळून, त्या वेदनेने उभीशी जळाले, तुझा दोष नाही \nसुखा गोंजराया दहाही दिशांनी लवूनी हजेरी इथे लावलेली,\nखड्या संकटांनी, सगे-सोयरेही निमीषी पळाले, तुझा दोष नाही \nवसंतातल्या कोकिळेची मलाही, कितीदातरी साद घालून झाली,\nतुझ्या आठवांच्या, सुगंधी क्षणांच्या ऋतूंनी नहाले, तुझा दोष नाही \nतुझ्या मागुती चालले रे मुक्याने, नि म्हणशील त्याला मी 'मम' म्हणाले,\nतुझे वागणे अन तुझे ते बहाणे, मला ना कळाले तुझा दोष नाही \n- सुप्रिया (जोशी) जाधव.\nमतला आणि शेवटचा शेर मस्त झाला\nमतला आणि शेवटचा शेर मस्त झाला आहे.\nवाहती गझल झाली आहे.\nवसंतातल्या कोकिळेची मलाही, कितीदातरी साद घालून झाली,\nतुझ्या आठवांच्या, सुगंधी क्षणांच्या ऋतूंनी नहाले, तुझा दोष नाही - हा शेर आवडला.\nतुझ्या मागुती चालले रे मुक्याने, नि म्हणशील त्याला मी 'मम' म्हणाले, - म्हणशील ते सर्व स्वीकारले मी असे केल्यास वृत्तात बसेल.\nतुझे वागणे अन तुझे ते बहाणे, मला ना कळाले तुझा दोष नाही - ही ओळही छान\nतुझ्यासारखे बघ, मलाही सुखाने\nतुझ्यासारखे बघ, मलाही सुखाने जगाया न आले, तुझा दोष नाही \nतुझी होत होता, कधीही सख्या मग कुणाची न झाले, तुझा दोष नाही \nक्या बात है यार्,\nसुखा गोंजराया दहाही दिशांनी लवूनी हजेरी इथे लावलेली,\nखड्या संकटांनी, सगे-सोयरेही निमीषी पळाले, तुझा दोष नाही \nवसंतातल्या कोकिळेची मलाही, कितीदातरी साद घालून झाली,\nतुझ्या आठवांच्या, सुगंधी क्षणांच्या ऋतूंनी नहाले, तुझा दोष नाही \nलिखो तो ,ऐसा लिखो वा वा,\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/OMT5500", "date_download": "2020-09-26T02:50:39Z", "digest": "sha1:NBFJIPBHJU33OCINGURBTNGFNQWIJDAT", "length": 3360, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "OMT5500 साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor OMT5500 चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n००:५४, १३ सप्टेंबर २०१३ फरक इति ०‎ याहू ‎\n१९:१४, ५ जून २०१३ फरक इति +१८‎ न सदस्य:OMT5500 ‎ नवीन पान: {{#Babel:it|mr-0}}\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.akshardhara.com/en/811_rajhans-prakashan", "date_download": "2020-09-26T01:34:28Z", "digest": "sha1:TQNUS4YD23V6PHV3PJHA66OXHELO2TOP", "length": 49886, "nlines": 1021, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Rajhans Prakashan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\n3 झाकिया मॅन्शन मधल्या करीम अली कुटुंबाची आणि मानस खेरची ही गोष्ट.\nतेंडुलकरांशी संबंधित हे ललित लेखन रेखा इनामदार-साने यांनी केले आहे.\n’इस्रो’ मधल्या त्यांच्याच एका जिवलग मित्राने डॉ. कलामांच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा वेध.\nआईविषयी खुप काही सांगता येतं तरिही काही ना काही बाकी राहिल्याचं जाणवून जातं.\n`…. आजच्या ठळक बातम्या’ अर्थात TV Journalism.\nजाणिवेचा लख्ख उजेड नाही, आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही, अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात सोडाव्या लागणार्याल या आंधळ्याच्या गायी…\nAapla Swatantryaladha (आपला स्वातंत्र्यलढा )\nआपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा लढा या पुस्तकात मांडला आहे.\nAaple Budhimana Soyare (आपले बुद्धिमान सोयरे)\nप्राण्यांबद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येकानं वाचायलाच हवं, असं आगळंवेगळं पुस्तक.\nमुलं व्हायचीच आणि ती आपोआप वाढायचीच, अशा समजुतीचा काळ गेला.\nसमलैंगिकता ही माझी अगदी व्यक्तिगत, वयाच्या बराव्या तेराव्या वर्षापासून प्रत्येक क्षणी अनुभवलेली जाणीव.\nसंत तुकारामांच्या अलौकिक जीवनावर आणि त्यांच्या प्रतिभाशाली अभंगसृष्टीवर विपुल साहित्य उपलब्ध आहे. त्या साहित्यामध्ये आपल्या अंगभूत वैशिष्टयांमुळे विशेष उठून दिसेल, असा हा प्रबंध आहे.\nदहावी-बारावीची परीक्षा असो, शिष्यवृत्ती परीक्षा असो वा स्पर्धापरीक्षा – सर्व परीक्षांसाठी हमखास यश देणारी गुरुकिल्ली.\nपालकांनो, शिक्षकांनो, विद्यार्थ्यांनो, करीयरच्या चक्रव्यूहात सापडलेले अभिमन्यू व्हायचे नसेल, तर अचूक दिशा आणि सुयोग्य मार्ग माहीत पाहिजे. असंख्य क्षेत्रे तुमच्या पाल्याच्या कर्तृत्वाला आवाहन करीत आहेत.\nआपल्या पाल्याचा कल प्रामुख्याने विज्ञानेतर विषयाकडे असेल, तर त्याला उपलब्ध होऊ शकणाऱ्या असंख्य अभ्यासक्रमांची माहिती करून घेण्यासाठी अवश्य वाचले पाहिजे, असे पुस्तक...\nACN Nambiar (एसीएन नंबियार)\nस्वातंत्र्यलढ्यातील एक रहस्यमय सत्यकथा\nबेळगावसारख्या छॊट्य़ा गावातल्या मुलाची ऐका हूड मुलगा ते सरखेल एक जीवनप्रवास.\nAdnyat Vivekanand (अज्ञात विवेकानंद)\nस्वामी विवेकानंदांचे नाव आणि ढोबळमानाने त्यांचे चरित्र आपल्याला माहीत असते; पण संन्यास घेतल्यानंतरही स्वामीजींनी संवेदनशीलता जपली होती, जन्मदात्या आईसाठी कौटुंबिक भाऊबंदकीत लक्ष घालणे त्यांना भाग पडले होते, अगदी कोर्टकचे-याही कराव्या लागल्या होत्या... हा असा तपशील मात्र आपल्याला ठाऊक नसतो. त्यांच्या चरित्रातील अशा अज्ञात पैलूंवर प्रकाशझोत टाकणारे हे पुस्तक.\nअवघ्या अडीच वर्षांत ब्रिटीश साम्राज्याला विजेचा तडाखा देणा-या हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा तेजस्वी इतिहास.\n’प्रभात’कालच्या अभिनेत्रीच्या जीवनावरील ही कांदबरी.\nआपलं आयुष्य म्हणजे ईश्वरानं दिलेली देणगी आहे, अशा भावनेनं त्यांची जीवनावर, जीवनमूल्यांवर अम्लान, अव्यभिचारी निष्ठा आहे. त्यामुळेच रोजचा दिवस त्यांना नवी उमेद देतो.\nएका पत्रकार-संपादकाच्या जिंदादिल मुशाफिरीची ही रसाळ, व्यावसायिक आत्मकथा.\nशेषराव मोरेंचे सामाजिक भारतावरील लेखन\nशेषराव मोरे यांच्या कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला या ग्रंथाचा प्रतिवाद.\nउपेक्षित बेरड समाज आणि देवदासींच्या व्यथा वेशीवर टांगणार्‍या जागत्‍या चळवळीची सत्यकथा.\nएस. एस. सी.परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या हतवळणे भावाबहिणींनी स्वतःच्या तयारीसाठी लिहिलेले ८ वी ते १२ वीच्या सर्व विद्दार्थ्यांना उपयुक्त असे उत्कॄष्ट मराठी निबंध.\nएस. एस. सी.परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या हतवळणे भावाबहिणींनी स्वतःच्या तयारीसाठी लिहिलेले ८ वी ते १२ वीच्या सर्व विद्दार्थ्यांना उपयुक्त असे उत्कॄष्ट मराठी निबंध.\nएस. एस. सी.परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या हतवळणे भावाबहिणींनी स्वतःच्या तयारीसाठी लिहिलेले ८ वी ते १२ वीच्या सर्व विद्दार्थ्यांना उपयुक्त असे उत्कॄष्ट मराठी निबंध.\nअंबरीश मिश्र यांच्या कविता\nAlfrade Hichcock (आल्फ्रेड हिचकॉक)\nआल्फ्रेड हिचकॉक...संदेहपटांच्या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट `सस्पेन्स मास्टर' हे त्याला मिळालेलं बिरूद अयोग्य नसलं तरी त्याला पूर्णार्थानं न्याय देण्यास मात्र ते असमर्थ आहे.\nAlipt Drushtikonatoon (अलिप्त दॄष्टिकोनातून)\nचांगले अर्थशास्त्र प्रत्येकासाठीच चांगली कामगिरी करणारे असते.\nजगण्याचे, लढण्याचे, हरण्याचे संदर्भ शोधणारी...कोणताही ’अभिनिवेश’ नसलेली सुंदर कादंबरी.\nरानाडोंगरातून वाचकांचे बोट धरून हिंडतात. कधी त्यांचा कॅमेरा लकेर घेतो, कधी त्यांची लेखणी चित्र काढते आणि अशा आगळयावेगळया भटकंतीतून साकारते एक अनोखी मैफील.\nAndhashraddha (अंधश्रध्दा प्रश्नचिन्ह आणि...\nजटा निर्मूलनाची कथा आणि व्यथा धडक मोहीम\nविज्ञानाच्या झपाट्याने होणार्‍या प्रगतीने दिपून गेलेली मानवजात, विसाव्या शतकात विश्र्वरूपाने भयचकीत झाली.\nनिराश तरूणाईला आशावादी,महत्वाकांक्षी बनवणारा ,प्रत्येकाच्या अम्तरीचा दिवा प्रज्वलित करणारा.\nपत्नीला केंद्रस्थानी ठेवून एका पुरूषाने लिहिलेले हे आत्मचरित्र. पुरूषोत्तम बाळकृष्ण काळे जुन्या जमान्यातले उदयोगपती.\nपूर्व पश्चिमेतील प्रमुख विचारवंतांचा अन त्यांनी मांड्लेल्या विचाधारांचा वेध.\nइतिहासाच्या स्तिमित करणार्या वाट्चालीचा वेध घेणारे पुस्तक.\nApurva Chitraleni (अ-पूर्व चित्रलेणी)\nमाणसाच्या एका प्राचीन स्वप्नाला अर्वाचीन पंख बहाल करणा-या एका अद्भुत यंत्राची चित्तथरारक कथा. वैज्ञानिकांच्या प्रयोगांची, वैमानिकांच्या साहसाची, यशापयशाची, विक्रमांची आणि अपघातांची, सृजनाच्या आनंदाची आणि विनाशाच्या दाहकतेचीही. असंख्य दुर्मीळ चित्रांनी सजलेली, प्रेक्षणीय आणि वाचनीयही...\nआर्मी ऑफिसर नेमके काय करतो वरिष्ठपदाकडे वाटचाल कशी करतो वरिष्ठपदाकडे वाटचाल कशी करतो याबाबत सुटसुटीत, सखोल व सुयोग्य मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते. मुलांना आणि त्यांच्या पालकांना अतिशय उपयुक्त ठरेल, असे हे पुस्तक आहे.\nजी. एं. च्या वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिकांनी वि. गो. वडेर यांना साद घातली. आणि त्यातून ते शोधत गेले - जी. एं. च्या आयुष्यातील व्यक्ती आणि कथांतील पात्रे या प्रयासातून उभ राहिलेले हे पुस्तक\n476 साली भारतात आर्यभट नावाचा महाबुध्दिमान खगोलशास्त्रज्ञ जन्माला आला. 'आर्यभटीय' हा त्याचा ग्रंथ प्राचीन भारतीय खगोलशास्त्राचा अमूल्य ठेवा आहे.\nAryanchya Shodhat (आर्यांच्या शोधात)\nआर्यांचा प्रश्न हा मानवी इतिहासातील सर्वांत जटिल समस्या आहे.\nलोकमान्य टिळकांच्या कानी त्याचा स्वर पडला आणि 'नारायण राजहंस'चा 'बालगंधर्व' झाला.\nप्रियाने कवितेपासून कादंबरी-लेखनापर्यंत लेखनाचे सर्व प्रकार हाताळले. तिच्या निवडक सदर-लेखनाचा हा संग्रह.\nअसावी शहरे आपुली छान\nविल्यम कॅरी यांचे चरित्र\n’अशी होती शिवशाही’ हा रुढार्थाने शिवशाहीचा इतिहास नाही. ’महाराष्ट्र राज्या’ चे संस्थापक,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू त्यांच्याच शब्दात इतिहासाच्या समकालीन अस्सल साधनांवरुन उकलून दाखविण्याचा प्रयत्न येथे केला आहे.\nअनेक प्रश्नांवर, भरपूर उदाहरणांसह सोप्या भाषेत लिहिलेले आणि तुम्हांला श्रीमंत करणारे पुस्तक.\nAt Any Cost (अॅट एनी कॉस्ट)\nकला-साहित्य आणि समाज यांच्या मूल्य-व्यवस्थांमध्ये प्रचंड उलथापालथ करून टाकणाऱ्या छोटया पडद्यामागच्या भयाण वादळाला चित्रित करणारी ही कादंबरी.\nअटलजी कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी.\nआवर्तन भारतीय संगीतातील स्थूलता आणि सूक्ष्मता.\nAyurvedik Aaharmantra (आयुर्वेदिक आहारमंत्र)\nवैद्य सुचित्रा कुलकर्णी यांचे आयुर्वेदविषयक पुस्तक.\nविनायक पांडुरंग करमरकर. कौशल्यपूर्ण शिल्पनिर्मितीचा सातत्यानं उत्कृष्ट अविष्कार त्यांच्या 1928 मधील पुण्याच्या शिवस्मारकानं इतिहास घडवला\n...आकर्षणाच्या, मोहाच्या हकिकती सांगणार्याच या आठ कथा. सूत्र एकच- कक्षेबाहेरची ओढ.\nगाढवू... मांजरू... कोंबडू... वासरू... बछडअ... मगरू...पालू... मोरू... ही आणि अशी भन्नाट बाळं या पुस्तकात आहेत\nकुमार केतकर सव्यसाची संपादक आहेत त्यांचे विचारवर्तुळ पत्रकारितेच्या परिघापलीकडे पसरलेले आहे\nदिलीप कुलकर्णींचे पर्यावरण विषयक लेखन\nदिलीप कुलकर्णींचे पर्यावरण विषयक लेखन\nआपल्या वेगवेगळ्य़ा सोंगातून आजच्या बेगडी आयुष्यावर अन त्यातल्या दांभिक दुट्प्पीपणावर झगझगीत झोत टाकणारा बहुरूपी.\n`बाई’हे एका रंगपर्वाचं चरित्र\nप्राप्तिकर घडवला जात असताना त्याच्या आसपास सांडलेल्या राजकारणाचीही ही रोमांचकारी गाथा आहे.\nही बखर कुण्या एका राजाची वा त्याच्या एखाद्या वीर शिलेदाराची नाही. ही आहे भारतीय शास्त्रज्ञांच्या अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील पराक्रमाची बखर.\nस्वातंत्र्यपूर्व भारतातील महत्वाच्या संस्थानांचा रंजक वेध.\nसर्वांनी वाचावे असे.शिक्षणविषयक जाणीव समृध्द करणारे पुस्तक.\nसोदाहरण शास्त्रोक्त माहितीपासून, नवनवी उपकरणं, बाळंतपणाचे प्रकार, सर्व प्रकारची लक्षणं, धोके, घ्यायच्या काळज्या, समज-गैरसमज,आहार ते योगासनांर्यंत. नावासकट आत सर्व काही असणारं -\nआज तुमच्यासाठी एक फर्मास भेट आणली आहे. दिलीप प्रभावळकर काकांनी लिहिलेल्या नाटिकांच्या आणि एकपात्रिकांच्या पुस्तकाची.\nआपल्या संग्रही ठेवावे आणि वारंवार संदर्भासाठी चाळत राहावे, असे हे पुस्तक ठरले आहे.\nसामान्य स्फोटकं, अण्वस्त्रं, रासायनिक आणि जीवशास्त्रीय अस्त्रं यांचे शोध लावून आणि उपयोग करून माणसानं पृथ्वीच्या या सुंदर क्रीडांगणाचं भयंकर रणांगण केलं आहे\nप्रायोगिक रंगभूमीवरील प्रतिभावंत नाटककाराच्या चिंतनातून साकारलेला नाटकविचार\n‘बेगम बर्वे’ची जन्मकथा सांगितली, तरी नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेचा संगतवार उलगडा मलाही करता येणार नाही. वाटते की, प्रत्यक्ष कलाकृती निर्मितीच्या कहाण्या ह्या हिमनगासारख्या असतात.\nइंग्रजांनी आपली राजकीय उद्दीष्टे साध्य करण्यासाठी न्यायप्रक्रियेचा गैरवापर कसा केला गेला, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा खटला. हे पुस्तक म्हणजे या विषयावरचा आजवर ज्या बाबींकडे पुरेसे लक्ष पुरविले गेले नाही, त्या गोष्टी नजरेस आणू इच्छिते. या खटल्यातील काळी बाजू फारशी कोणास माहित नाही, त्यावर प्रकाश पाडणे हा या पुस्तकाचा उद्देश.\nभारताच्या भवितव्याच्या दृष्टीने आपल्या देशातील धर्मनिरपेक्षता टिकून राहणे अत्यावश्यक आहे. तथापि गेल्या सत्तर वर्षांतील आपली वाटचाल मात्र अत्यंत निराशाजनक आहे. आता तर देश हिंदुराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे वळण अत्यंत धोक्याचे ठरेल, असा गंभीर इशारा देणारे हे पुस्तक आहे.\nपर्यावरण, आर्थिक अन सामाजिक बाबी, पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेले सबळ पुरावे अशा अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून प्रागैतिहासिक काळापासून मांडलेला भारताचा इतिहास म्हणजे भारताची कुळकथा.\nभारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्शा.\nआतापर्यंत आयुष्यात अनेक उद्योग केले. इंजिनिअरींगपासून अभिनयापर्यंत. मनस्वी भटकणं आणि छायाचित्रण हे त्यापैकी एक.\nही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका.\nमाणसाच्या जन्माआधीपासून मृत्यूनंतरही त्याच्या शरीर मनावर,बुध्दी अन वर्तणुकीवर प्रभाव पाडण्याचे सामर्ध्य असणार्या भावी काळातील अचाट शोधांचा वेध.\n तेथील स्त्री- उद्योजक विश्वासाचं निरीक्शण नोंदवायचं हे तिचं काम. ’जायचं अड्लं आहे का\nएक सच्चा, सत्वशील सूर भीमसेन भारतीय जनसंस्कृतीच्या महासागरात विरघळून गेलेला एक सुरेल प्रवाह.\nमाणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग भेद… आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी-विशिष्ट रोगांनी पीडित असणा-यांतले भेद... किती तऱ्हांनी विभागून डोकी ’भिन्न’ करतात.\nभूगोल हा विषय सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असला, तरी बराचसा दुर्लक्षितच राहिला आहे.त्या विषयाशी विशेषत: प्राकृतिक भूगोलाशी संबंधित शेकडो कल्पनांबद्दल व व्यक्तिविशेषांबद्दल सविस्तर सचित्र माहिती आकडेवारी आणि नकाशांसह उपलब्ध करून देणारा हा अत्यंत उपयुक्त कोश.\nउद्ध्वस्त समाजजीवन,सामाजिक रेटे-ही माणसाच्या आशेचे चिवट कोंभ यांच्या धाग्यांतून विणलेली ही कादंबरी\nनरेंद्र दाभोळाकरांचे वैचारिक लेखन.\nदेवभूमी हिमालयात वसलेला आपला नितांतसुंदर शेजारी देश भूतान. पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्त्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक आवर्जून पाहिला जातो, वाहतुकीचे नियम अगदी अभावानेच मोडणार्‍या लोकांचा देश, आपला सगळाच देश जागतिक वारसा आहे, असे मानून मनापासून तसे वागणार्‍यांचा देश, हॉटेलपासून दुकानांपर्यंत महिलांचाच दबदबा असलेला अशा या जगावेगळ्या देशाचा...\nपुणे ते लेह ते श्रीनगर / एका कलंदराचा प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/share-market-news/", "date_download": "2020-09-26T01:00:01Z", "digest": "sha1:QH7VFQ5KRAHR5J5ADDIWM7A65UEIFC5G", "length": 3234, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "share market news Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nअर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात निराशा; सेन्सेक्स कोसळला\nअमेरिका-इराण तणावाचा मोठा फटका; शेअर बाजार कोसळला\nइन्फोसिसला मोठा झटका; ४५ हजार कोटींचे नुकसान\nशेकडो कंपन्यांना अब्जावधींचे शेअर विकावे लागणार\nसलग आठव्या दिवशी निर्देशांकांत झाली घट\nमाहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री\nतोटा झाल्यामुळे येस बॅंकेचे शेअर कोसळले\nशेअर निर्देशांक विक्रमी पातळीवर\nधोनीच्या विजयी षटकाराचा चेंडू सापडला\nलक्षवेधी : केवळ रेटिले बहुमता\nदखल : कांद्याचं रडगाणं\nनिवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांक उसळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Kirchberg+am+Wechsel+at.php", "date_download": "2020-09-26T02:50:15Z", "digest": "sha1:TANA2IBWWTDTTVEWJLYMZKIGRG2YBGGJ", "length": 3555, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Kirchberg am Wechsel", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 2641 हा क्रमांक Kirchberg am Wechsel क्षेत्र कोड आहे व Kirchberg am Wechsel ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Kirchberg am Wechselमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 (0043) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kirchberg am Wechselमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 2641 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनKirchberg am Wechselमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 2641 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 2641 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-26T02:11:58Z", "digest": "sha1:LOT2BJAS7CZNV3H4SOPT2BG3EU44FQOK", "length": 9463, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "तळीरामांना दारुसाठी टोकन पध्दत | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nतळीरामांना दारुसाठी टोकन पध्दत\nin राज्य, ठळक बातम्या\nमुंबई – तळीरामांना दारू हवी असेल, तर त्यांना आधी एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. त्यात नाव, मोबाइल नंबर, कोणत्या ब्रँडची दारू हवी आहे आणि किती हवी आहे, असा सगळा तपशील द्यावा लागणार आहे. उत्पादन शुल्क विभागाचे राज्य आयुक्त कांतीलाल उमाप यांनी यासंबंधीचा आदेश काढला आहे.\nया आदेशात दारू दुकानदारांसाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यानुसार ग्राहकांना उभे करण्यासाठी मार्किंग करावे लागेल व दोन मार्किंगमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असेल. दुकान सुरू करण्यापूर्वीच जे ग्राहक उभे असतील त्यांना त्या मार्किंगच्या ठिकाणी उभे करण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. ग्राहकांना त्यांची ऑर्डर देण्यासाठी एक मागणीपत्राचा नमुना देण्यात येईल. त्यात अनुक्रमांक, ग्राहकाचे नाव, मोबाइल नंबर आणि कुठल्या ब्रॅण्डची दारू हवी आहे व किती हवी आहे हे सगळे ग्राहकाला लिहून द्यावे लागेल. मागणीपत्र ग्राहकाकडून भरून घेतल्यानंतर त्याला टोकन क्रमांक देण्यात येईल. टोकन उपलब्ध नसतील तर कोर्‍या कागदावर दुकानदाराने स्वत:च्या दुकानाचा शिक्का व दूरध्वनी क्रमांक नमूद करून अनुक्रमांक द्यावा. तो अनुक्रमांक व ग्राहकांना दिलेल्या अनुक्रमांक हा सारखा असावा.\nदारू दुकानदाराने दर १५ मिनिटानंतर अथवा गरजेनुसार कोणत्या ग्राहकाच्या टोकन क्रमांकाची सर्व्हिस चालू आहे ते बोर्डवर नमूद करावे. उत्पादनशुल्क विभागाचे उपायुक्त, अधीक्षकांनी सातत्याने दारू दुकानांसमोरील गर्दी नियंत्रणाची व सोशल डिस्टन्सगची पाहणी करावी व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, आदी सुचना देण्यात आल्या आहेत.\nदारूसाठी रांगा लावणार्‍यांचे रेशन कार्ड रद्द करण्याची मागणी\nचीन सोडून भारतात येणार्‍या कंपन्यांसाठी मोदी सरकारचे रेड कार्पेेट\nभारतात कोरोना चाचणीचा नवा विक्रम; एका दिवसात विक्रमी चाचणी\nBIG BREAKING: बिहार निवडणुकीची घोषणा: तीन टप्प्यात होणार मतदान\nचीन सोडून भारतात येणार्‍या कंपन्यांसाठी मोदी सरकारचे रेड कार्पेेट\nहिज्बुलच्या ‘मोस्ट वॉण्डेट’ दहशतवाद्याचा खात्मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/deputy-cm", "date_download": "2020-09-26T02:29:21Z", "digest": "sha1:GAQKA7AJDMVXRULJDR2UM3I2YIYQ2JCF", "length": 10263, "nlines": 179, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Deputy CM Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nघरात न थांबणारे हॉस्पिटलमध्ये, नियम मोडणारे तुरुंगात दिसतील : उपमुख्यमंत्री\n‘कोरोना’ संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, त्याची सुरुवात काल झाली आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. (Ajit Pawar warns Lockdown rule breakers)\nअजित पवार उपमुख्यमंत्री होऊ शकतात : छगन भुजबळ\nमी उपमुख्यमंत्री व्हावं, अशी कार्यकर्त्यांची भावना : अजित पवार\nअजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिल्यास हरकत नाही : छगन भुजबळ\nVIDEO: स्पेशल रिपोर्ट : महाविकासआघाडीत उपमुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच\nउपमुख्यमंत्रिपदाबाबत वाद नाही : छगन भुजबळ\nविधानसभा अध्यक्षपद नको, काँग्रेस उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रही\nExclusive : भाजप बाबत खोदून खोदून विचारु नका- अजित पवार\nअजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा\nमहाराष्ट्रात राजकीय भूकंप, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री\nराष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत मोठा धक्का (NCP leader Ajit Pawar support BJP) देत भाजपसोबत सत्तास्थापना केली आहे.\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nCSK vs DC Live Score Update : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्लीची चेन्नईवर 44 धावांनी मात\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esuper9.com/2020/01/1994-95-81-1913.html", "date_download": "2020-09-26T01:35:30Z", "digest": "sha1:X66IDETZHKGWTDZ44VKQ64UIK647K6XU", "length": 18454, "nlines": 102, "source_domain": "www.esuper9.com", "title": "बॉलिवूडचा मराठी द्वेष - esuper9", "raw_content": "\nHome > खळबळ जनक > राजकारण > बॉलिवूडचा मराठी द्वेष\nJanuary 16, 2020 खळबळ जनक, राजकारण\n1994-95 चा काळ असावा नाना पाटेकर चा तिरंगा चित्रपट हिट ठरला होता त्या चित्रपटातील एका वाक्याला संपूर्ण चित्रपट गृहात टाळ्यांचा कडकडाट पडायचा तो डायलॉग होता मराठा मारता है या मरता है महाराष्ट्राच्या मातीला हा सुखद अनुभव होता कारण बॉलिवूड सुरू झाल्यापासून मराठा या नावाला मोठ्या पडद्यावर येण्यास तब्बल 81 वर्ष वाट पहावी लागली बॉलिवूड ची सुरवात एका मराठी माणसाने केली होती का हा प्रश्न मनाला पडायचा, काल तानाजी चित्रपट पाहत असताना क्षणा क्षणाला पडणाऱ्या टाळ्या, शिट्ट्या व घोषणांनी संपूर्ण चित्रपट गृह रंगून गेले होते शरद केळकर याने रंगविलेले छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा जेंव्हा पडद्यावर यायचे तेंव्हा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा हे सगळं जरी चांगलं वाटत असल तरीही अद्याप पर्यंत शिवाजी महाराज यांच्यावर बॉलिवूड मध्ये चित्रपट का निर्माण केला नाही असा प्रश्न मनाला सतावतो\nसाधारण 1913 साली बॉम्बे फिल्म इंडस्ट्री ला सुरवात झाली दादासाहेब फाळके या मराठी माणसाने चित्रपट सृष्टीची मुहूर्तवेढ रोवली फाळणी नंतर बॉम्बे फिल्म इंडस्ट्री चे बॉलिवूड नामकरण झाले.\nशिवाजी महाराज यांची गणना जगातील सर्वोत्कृष्ट योध्दा म्हणून होते परंतु त्यांच्यावर अद्याप पर्यंत एकही चित्रपट नाही हे कटू वास्तव आहे जगाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट सेनापती म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते लिओनिदास, अलेक्झांडर द ग्रेट, हँणीबल बरका,स्पारटस, ज्युलियस सीझर, अँटीलाद द हून, सलादिन, नेपोलियन बोणापार्ट, सायरस द ग्रेट, यांच्यावर हॉलिवूड मध्ये कित्येक चित्रपट आले ज्युलियस सीझर व अलेक्झांडर द ग्रेट वरती तर चित्रपटांची शृंखलाच आली होती या चित्रपटामुळे या सेनापतींचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला अलेक्झांडर द ग्रेट वरती हॉलिवूड शिवाय प्रत्येक भाषेत चित्रपट निघाली दुर्दैव हे की ज्या सिकंदरचा पराभव भारतात केला गेला त्या हिंदू राजा पुरु किंवा पोरस वरती चित्रपट न काढता 1941 साली सिकंदर या नावाने अलेक्झांडर वर भारतात चित्रपट काढला गेला त्यात पृथ्वीराज कपूर यांनी अलेक्झांडर चा रोल केला होता.\nमुगल साम्राज्यावर आधारित आपल्या बॉलिवूड मधे एक नाही दोन नाही तब्बल 35 चित्रपट आले त्या चित्रपटाच्या नावावरून बॉलिवूड मुघल साम्राज्याच्या प्रेमात किती आकंठ बुडाले होते याचा प्रत्यय येतो सर्व मुघल सम्राटावर चित्रपट निघाले एवढंच नाही तर त्यांच्या दरबारातील कवी, नृत्यांगना,प्रेमिका,शायर, गायक यांच्यावरही चित्रपट निघाले त्यात अनारकली वरती तीन चित्रपट, ताजमहल वर आधारित पाच चित्रपट शिवाय ज्यांच्या नावाने ताजमहल बांधला त्या मुमताज वर चार चित्रपट,ज्याने हा ताजमहल बांधला त्या शहाजहांन वर तब्बल चार चित्रपट तसेच आदिल जहांगीर, अकबर सलीम, बैजू बावरा,एक दिन का सुलतान,जनरल बखत खान, हुमायून, जहाआरा, मुघले आजम, पुकार 1939,तानसेन, वारीस शाह,द ग्रेट मुघल, बाबर, वॉरिए ऑफ एम्पायर,मिर्झा गालिब, उमराव जान, रझिया सुलतान, द स्वाँर्ड ऑफ टिपू सुलतान,पाकिजा,जोधा अकबर,सतरंज के खिलाडी,द लास्ट मुघल अशी मुघल साम्राज्याच्या संस्कृतीवर चित्रपट निघाली या चित्रपटातून मुघल साम्राज्य,त्यांच्या संस्कृतीचे दर्शन मुघलांच्या प्रेम कथा,शौर्य, विरह,आकंठ प्रेमात बुडालेल्या मुघल राजकुमारांचा हिंदी क्लासिकल गाण्यातील रोमान्स पाहूनच भारतातील 4 पिढया वाढल्या सामान्य घरातील युवक युवतीही स्वतःला सलीम अनारकली समजत असा तो काळ आणि याच काळाला बॉलिवूड चा सुवर्णकाळ म्हणून संबोधला जातो आणि हे सर्व होत असताना मराठ्यांच्या संघर्षमय कालखंडा कडे हेतूपुरस्कृत पणे दुर्लक्ष करण्यात आले.\nमराठी चित्रपटात मात्र भालजी पेंढारकरांनी शिवाजी महाराजावर आधारित 14 चित्रपटांची निर्मिती केली परंतु गांधी हत्येत नंतर उसळलेल्या दंगलीत त्यांचा कोल्हापूरातील स्टुडिओ काँग्रेस च्या अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या गांधीवादी कार्यकर्त्यांनी जाळला चित्रीकरण पूर्ण झालेले तीन ऐतिहासिक चित्रपट आगीच्या भक्ष्यस्थानी पडले स्वातंत्र्या नंतर 2015 साला पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तसेच मराठ्यांच्या इतिहासावर बॉलिवूडमध्ये एकही चित्रपट निघाला नाही 2015 साली मात्र सलीम व अनारकलीच्या प्रेमाच्या प्रभावातून बॉलिवूड 70 वर्षांनी बाहेर पडले बाजीराव मस्तानी,पानिपत व तानाजी चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता समाजमन काय आहे याचा चित्रपट निर्मात्याला अंदाज आला आहे .\nपुढील काही वर्षात हिंदीत मराठ्यांच्या इतिहासावर काही चित्रपट येणार आहेत ही चांगली बाब असताना जगाच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट योद्धे म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांवर 2014 पूर्वी चित्रपट का येऊ शकले नाही हा प्रश्न अजूनही मनाला पडतो,निर्मात्यांना प्रोत्साहन व राजाश्रयच मिळाला नाही का \nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esuper9.com/2020/02/shubh-mangal-jyada-savadhan.html", "date_download": "2020-09-26T02:25:57Z", "digest": "sha1:436YQ22AZORIN5KDSH2CRTAWANCYU6FQ", "length": 10351, "nlines": 97, "source_domain": "www.esuper9.com", "title": "डोनाल्ड ट्रम्प यांनी केली ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ची स्तुती - esuper9", "raw_content": "\nHome > लोककला > डोनाल्ड ट्रम्प यांनी केली ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ची स्तुती\nडोनाल्ड ट्रम्प यांनी केली ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ची स्तुती\nअभिनेता आयुषमान खुराना बॉलिवूडमधील अत्यंत प्रयोगशील अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो आपल्या प्रत्येक नव्या चित्रपटात आव्हानात्मक भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो. सध्या त्याचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट जोरदार चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात पुरुषांची समलिंगी लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. या अनोख्या लव्हस्टोरीचे कौतुक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील केले आहे.\nअमेरिकी मानवाधिकार संरक्षक कार्यकर्ता पीटर टचल यांनी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाच्या संकल्पनेची स्तुती केली. “भारतात समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळाली. आता देशातील वैचारिकदृष्ट्या मागस लोकांचं प्रबोधन करण्यासाठी बॉलिवूडचा एक नवा चित्रपट सज्ज झाला आहे. या चित्रपटात समलिंगी लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.” अशा आशयाचं ट्विट पीटर टचल यांनी केलं होतं. हे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ग्रेट’ असं म्हणत रिट्विट केलं आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/north-east-india-against-citizenship-amendment-bill/", "date_download": "2020-09-26T01:39:57Z", "digest": "sha1:F57ZXFJ6YKTTTMWO4YL2PSUVCI4YGF3D", "length": 22702, "nlines": 179, "source_domain": "www.saamana.com", "title": "#CAB ईशान्य हिंदुस्थानात उद्रेक; आसाम, त्रिपुरा पेटले! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण…\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nजीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला; कॅगचे गंभीर ताशेरे, केंद्राकडून राज्यांची 47 हजार…\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\n#CAB ईशान्य हिंदुस्थानात उद्रेक; आसाम, त्रिपुरा पेटले\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत केंद्र सरकारने मंजूर करून घेतले असले तरी ईशान्य हिंदुस्थानात उद्रेक उसळला आहे. आसाममध्ये प्रचंड हिंसाचार भडकला असून जाळपोळ सुरू आहे. गुवाहाटीत संचारबंदी लागू केली आहे. सर्वत्र कडकडीत बंद असून रेल्वे, बस सेवेसह सर्व जनजीवन ठप्प झाले आहे. नागरिकांनी नग्न मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्री सोनोवाल यांना विमानतळावरच अडकून रहावे लागले. पोलिसांनी अनेक ठिकाणी लाठीमार करीत अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. रबरी बुलेटचा गोळीबार केला. त्रिपुरा, मणिपूर, मिझोराममध्येही प्रचंड तणाव आहे. दरम्यान, जम्मू-कश्मीरातील 5 हजार जवान ईशान्येकडील राज्यांमध्ये तैनात करण्यात आले आहेत.\nनागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर या ईशान्य हिंदुस्थानातील राज्यांमध्ये आंदोलन सुरू होते. मंगळवारी विविध विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बुधवारी अक्षरशः उद्रेक झाला आहे.\nआसाममध्ये प्रचंड जाळपोळ, हिंसाचार\n– आसाममध्ये प्रचंड हिंसाचार भडकला असून सर्वत्र जाळपोळ, दगडफेक सुरू आहे. गुवाहाटीतील इंजिनीअरिंग, मेडिकलसह विविध महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांनी सरकारी जाहिरातींचे पोस्टर्स फाडले. विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या.\n– अनेक ठिकाणी दगडफेक करीत वाहनांना आगी लावल्या.\n– गुवाहाटीसह अनेक ठिकाणी पोलिसांनी लाठीहल्ला करीत अश्रुधुरांच्या नळकांडय़ा फोडल्या. रबरी बुलेटचा गोळीबार केला. एक हजारावर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\n– शिवसागर जिल्ह्यातील लाखवा येथे तेलांच्या विहिरी असलेल्या परिसरात नागरिकांनी घुसण्याचा प्रयत्न केला.\n– सर्वत्र कडकडीत बंद असून गुवाहाटीसह आसामच्या 24 जिह्यांत मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.\n– सायंकाळी 6.15पासून गुवाहाटीत संचारबंदी लागू केल्याचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी सांगितले.\n– रेल रोको आंदोलनही सुरू असल्याने रेल्वे सेवा सोमवारपासून ठप्प आहे. अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.\n– गुवाहाटीसह देब्रूगड, लखीमपूर, जोरहाट, गोलाहाट, शिवासागरसह सर्व जिह्यांत बंद, तणाव आहे.\nमुख्यमंत्री सोनोवाल विमानतळावर अडकले\n– नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा देणारे भाजपचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याविरुद्ध जनतेत तीव्र संताप आहे. सोनोवाल हे दिल्लीवरून गुवाहाटी विमानतळावर आले. मात्र नागरिकांनी विमानतळाबाहेर प्रचंड आंदोलन केले. रस्त्यांवर टायर जाळले. यामुळे सोनोवाल काही तास विमानतळावर अडकून राहिले. मोठा पोलीस फौजफाटा असतानाही ते विमानतळाबाहेर पडू शकले नाहीत.\nगुवाहाटीतील राज्य सरकारच्या सचिवालयावर शेकडो विद्यार्थ्यांनी धडक देण्याचा प्रयत्न केला. या वेळी विद्यार्थी आणि सुरक्षा जवानांत जोरदार धुमश्चक्री झाली. अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.\nशिवसागर शहरात ऑल आसाम माटक स्टुडंट युनियन वर्कर्स संघटनेच्या तरुणांनी चक्क नग्न मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध केला. पोलिसांनी मोर्चा अडवला आणि तरुणांना ताब्यात घेतले. दरम्यान, मुख्यमंत्री सोनोवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निषेधाचे पोस्टर्स लावण्यात आले होते.\nपंतप्रधान मोदी-शिंजो आबे यांच्या समीटसाठीचा रॅम्प जाळला\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात 15 डिसेंबरला गुवाहाटी येथे इंडो-जपान समीट होणार आहे. ताज व्हिवांता येथे या समीटसाठी रॅम्प तयार करण्यात आला होता. मात्र आंदोलनकर्त्यांनी हा रॅम्पच मंगळवारी जाळून टाकला आहे. दरम्यान, आसाममध्ये आगडोंब उसळल्यामुळे गुवाहाटीत ही समीट होण्याची शक्यता कमी आहे.\nकश्मीरातील 5 हजार जवानांना ईशान्येकडे हलवले\nजम्मू-कश्मीरात तैनात असलेले सीआरपीएफ, बीएसएफ आणि एसएसएफ जवांनाच्या 50 कंपन्या (5 हजार जवान) ईशान्य हिंदुस्थानात हलवल्या आहेत. यातील 2000 जवान त्रिपुरात राधानगर आणि धलाई जिह्यात तैनात केले आहेत.\nत्रिपुरात सोमवारी अनेक दुकानांना आगी लावण्यात आल्या होत्या. त्रिपुरात बुधवारीही कडकडीत बंद असून तणाव वाढला आहे. मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेशातही नागरिकत्व विधेयकाला विरोध सुरू आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण पूर्ण\nजीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला; कॅगचे गंभीर ताशेरे, केंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण...\nजीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला; कॅगचे गंभीर ताशेरे, केंद्राकडून राज्यांची 47 हजार...\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nसाथिया तुने क्या किया\nया बातम्या अवश्य वाचा\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mpcnews.in/pimpri-news-want-to-apply-online-for-pm-awas-yojana-here-is-the-link-174516/", "date_download": "2020-09-26T01:08:28Z", "digest": "sha1:SLSNVQUJTH35MIG6EXLUSP2SPXQ4KAZ2", "length": 8798, "nlines": 77, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri News: पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचाय? ही आहे त्यासाठीची 'लिंक' Want to apply online for PM Awas Yojana? Here is the link. MPCNEWS", "raw_content": "\nPimpri News: पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचाय ही आहे त्यासाठीची ‘लिंक’\nPimpri News: पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचाय ही आहे त्यासाठीची ‘लिंक’\nएमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत असून 15 ऑगस्टपासून नागरिकांना ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. च-होली, बो-हाडेवस्ती, रावेत येथे 3 हजार 664 घरे उपलब्ध होणार आहेत. या योजनेसाठी पूर्वी अर्ज केलेल्यांनी तसेच नवीन अर्ज करावयाचा आहे त्यांनी http://103.224.247.133:8080/PMAY/#Again-No-back-button ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे.\nयाबाबतची माहिती महापौर उषा ढोरे आणि सभागृहनेते नामदेव ढाके यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली. आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसे गटनेते सचिन चिखले, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, यशवंत भालकर आदी उपस्थित होते.\nकेंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरीबी निर्मूलन मंत्रालयाच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. ’सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाअंतर्गत महापालिका क्षेत्रात पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे.\nमहापालिकेने या संदर्भातील ठराव 20 जून 2017 ला मंजूर केला होता. त्यानंतर च-होली, रावेत आणि बो-हाडेवस्ती येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी घरे बांधण्याचे काम सुरू केले आहे.\nशहरातील दहा ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्ग घरे निर्माण होणार आहेत. त्यातील तीन ठिकाणचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.\nया योजनेत 30 चौरस मीटरचे घरकुल असून प्रत्येक प्रकल्पामध्ये 14 ते 15 मजली इमारत असणार आहे. घरकुलांसाठी लकी ड्रॉ काढण्यासाठी अर्ज प्रक्रिया करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.\nपंतप्रधान आवास योजनेतील घरकुलासाठी केंद्र शासनाकडून दीड लाख आणि राज्य शासनाकडून एक लाखांचे अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया स्वातंत्र्यदिनापासून सुरूवात होणार आहे. यास तीस दिवसांचा कालावधी निश्चित केला असल्याचे महापौर ढोरे यांनी सांगितले.\nऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून नागरी सुविधा केंद्रामध्ये सादर करावी लागणार आहे.\nत्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, वीज बील आणि पाच हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट भरणे आवश्यक असल्याचे सभागृह नेते ढाके यांनी सांगितले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri : खुशिया दस्तके देंगी , मस्तीया फिरसे लौंटेगी; ‘नॉव्हेल’च्या हृदयस्पर्शी व्हिडिओमुळे विद्यार्थी, पालक भावूक\nDehuroad : कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या प्रांगणात रघुवीर शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण\nIPL 2020 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्ली कॅपिटल्सची चेन्नईवर 44 धावांनी मात\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 7 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची नोंद\nPune News : टाटा मोटर्सने बनविलेल्या 51 विंगर रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nPimpri news: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 9 ऑक्टोबरला निवडणूक\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 164 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 87 नवीन रुग्ण\nPune News : लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदी रद्द करा ; भारतीय मजदूर संघांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2020/01/Hundreds-of-teachers-prepare-to-boycott-work.html", "date_download": "2020-09-26T02:10:01Z", "digest": "sha1:ZJ3FHRGVNHP7IZG7ZDJEKSEFDCE6UZPV", "length": 10928, "nlines": 107, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "शेकडो शिक्षक कामावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत - KhabarBat™", "raw_content": "\nHome Unlabelled शेकडो शिक्षक कामावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत\nशेकडो शिक्षक कामावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत\nशिक्षकांना बि.एल.ओ. कामाची सक्ती करू नये\nसी.ई.ओ. व जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर\nजिल्ह्यात बि.एल.ओ. हे मतदार नोंदणी चे काम प्राथमिक शिक्षकांना देण्यात येत आहे ज्यात शिक्षकांचे शारीरिक व मानसिक श्रम खर्च होणार आहे, अनेक शैक्षणिक कार्यदिन वाया जाणार आहे त्यामुळे शिक्षकांना या कामातून मोकळे करावे या मागणीसाठी जिवती, चिमूर, वरोरा, पोम्भूरणा तालुक्यातील शेकडो शिक्षकांच्या सह्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांना पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आले.\nइकडे शिक्षकाकडून विद्यार्थी सर्वांगीण विकासाची अपेक्षा करायची व त्याच्या मागे अनेक अशैक्षणिक कामे लावून द्यायची त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत प्रशासन गंभीर आहे की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे. बि.एल.ओ. चे काम वर्षातून एक किंवा 2 वेळा असतेच त्यातल्या त्यात एका शिक्षकांकडे एकापेक्षा अधिक गावांचे काम असते त्यामुळे शालेय कार्य सांभाळून काम करणे अशक्यच आहे करिता शाळा सोडून काम करावे लागते त्यामुळे शाळेचे मोठे नुकसान होते आणि यावेळी मोबाइल अँप वर काम करायचे आहे मात्र प्रशासन मोबाइल पुरवत नाही त्यांना अश्या कामाची सक्ती करायला. शिक्षकांचे मोबाईल ही राष्ट्रीय संपत्ती आहे का \nयाबाबत राज्यभर शिक्षक घसा कोरडा करून ओरडत आहेत की हे काम आम्हाला आमचे काम प्रामाणिकपणे करण्यास अडसर निर्माण करत आहे करिता देऊ नका मात्र शिक्षक हे शैक्षणिक कामासाठी असतात हे विसरून त्यांना बाबूगिरीचे असे एक ना अनेक कामे जबरीने थोपवले जातात.\nकरिता जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना बि.एल.ओ. च्या कामातून मुक्त करावे अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने हरीश ससनकर, राज्य सरचिटणीस, रवी सोयाम जिल्हा सरचिटणीस, सुनील जाधव जिवती तालुका अध्यक्ष, मनोज बेले सरचिटणीस चंद्रपूर, पंकज उध्दरवार, विपीन धाबेकर, मनोज चव्हाण व बि.एल.ओ. काम दिलेल्या असंख्य शिक्षकांनी निवेदनातून केली आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (210) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2020/08/mla-kishor-jorgewar.html", "date_download": "2020-09-26T02:16:44Z", "digest": "sha1:OPBPCF4HIGIMSKNW7QRHED5LX5OT5VJT", "length": 10812, "nlines": 107, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "सीएसटीपीएस येथे मुक्तसंचार असलेल्या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करा - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर सीएसटीपीएस येथे मुक्तसंचार असलेल्या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करा\nसीएसटीपीएस येथे मुक्तसंचार असलेल्या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करा\nआ. किशोर जोरगेवार यांची वन विभागाच्या प्रधान सचिव यांना मागणी\nअंगणात खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमूकलीला आई समोरच बिबट्याने उचलून नेल्याची घटना काल सीएसटीपीएसच्या वसाहतीत घडली. या घटनेत चिमूकलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसेकर यांची भेट घेतली असून सीएसटीपिएस परिसरात मुक्तसंचार असलेल्या श्वापदांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.\nचंद्रपूर जिल्हा हा वन संपतीने नटलेला जिल्हा आहे. त्यामुळे येथे जंगली प्राण्यांचाही मोठा वावर आहे. परिणामी येथे वन्यजीव व मानवी संघर्ष नेहमीच निर्माण होत असतो. मात्र आता हा संघर्ष हिंसक होत चालला असून हिंसक वन्य प्राण्यांनी मानवी वस्तींकडची वाट धरली आहे. दरम्यान ऊर्जा नगर वसाहतीत वास्तव्यास असलेल्या उमा शंकर दांडेकर यांची ५ वर्षाची मुलगी लावण्या ही अंगणात खेळत असतांना बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला ओढत घेऊन गेला. यावेळी नागरिकांनी आरडाओरडा करत लावण्याचा शोध घेतला असता ती रस्त्यापासुन अंदाजे ५० ते ६० फुटाच्या अंतरावर सापडली. उपचाराकरिता रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. या हृदय विदारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील हिंसक प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केल्या जात आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी मुबंई येथे वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसेकर यांची भेट घेतली असून सीएसटीपीएस आवारात मुक्त संचार असलेल्या जंगली हिसंक प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे. यापुढे अशा घटना न घडतील या बाबतही उपाययोजना करण्यात यावा अशी मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (210) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2020/09/nagpur-center-gov-visit.html", "date_download": "2020-09-26T02:39:07Z", "digest": "sha1:EDMFQDSNDG33J5XOXO5HPRUGI3V6QTTR", "length": 12192, "nlines": 112, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "केंद्रीय पथकाकडून नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी Nagpur center Gov visit - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर केंद्रीय पथकाकडून नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी Nagpur center Gov visit\nकेंद्रीय पथकाकडून नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी Nagpur center Gov visit\nशेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा ; भरीव मदतीची मागणी\nनागपूर दि. 11 : गेल्या महिण्यात पुरामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकाने आज केली. नागपूर जिल्ह्यातील कामठी, पारशिवनी, मौदा या तालुक्यातील गावांमध्ये केंद्रीय पथकाने भेट दिली. शेती, गुरेढोरे, राहते घर व अन्य मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी नागरिकांनी पथकाला सांगितले.\nविभागीय कार्यालयांमध्ये दुपारी बारा वाजता अधिकाऱ्यांकडून झालेल्या पुराच्या आकडेवारी संदर्भातील माहिती घेतल्यानंतर केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्याला प्रथम भेट दिली.\nपुराच्या तडाख्याने शेतकरी व गावकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची व्याप्ती आणि तीव्रता त्यांच्या लक्षात आली. कामठी तालुक्यात सोनेगाव येथे त्यांनी आज भेट दिली. या पथकामध्ये केंद्रीय पथकातील महेंद्र सहारे, एस.एस.मोदी आणि आर. पी. सिंग यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व अधिनस्थ अधिकारी तसेच महसूल विभागाचे या भागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.\nमध्यरात्रीपासून कन्हान नदीला अचानक आलेल्या पुरामुळे मौजे सोनेगाव राजा येथील 155 हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, 354 घरांपैकी तब्बल 114 घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व पायाभूत सुविधायुक्त ठिकाणी सोनेगावचे पुनर्वसन करण्याची मागणी केंद्रीय पथकाकडे केली आहे.\n29 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून नदीचे पाणी गावात आणि शेतीत शिरले होते. 9305, 9560 धानाचे वाण चांगले उत्पादन मिळत होते. मात्र आता उतारा कमी येत असल्याचे शेतकरी गजानन झोड यांनी पथकाला सांगितले.\nकन्हान नदीच्या पुराचे पाणी पात्र सोडून दोन्ही बाजूंनी पाच किलोमीटरपर्यंत पाणी पसरले होते. त्यामुळे नदीकाठावरील घरे, शेती पिके, सोयाबीन, कापसाचे प्रचंड नुकसान झाले. सुरुवातीला धानाचे पऱ्हे निघाले नाहीत. त्यामुळे त्यांची दुबार टाकणी करावी लागली असल्याची माहिती त्यांनी पथकाला दिली.\nस्थानिक प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांची तपासणी करून नामदेव राऊत यांचे संपूर्ण घर पुरात वाहून गेले, तर मधुकर चौधरी यांची गाय वाहून गेल्याचे संबंधितांनी सांगितले. तर अशोक उमाजी महल्ले यांचे पूर्ण पऱ्हाटीसह शेतीचेही मोठे नुकसान झाले असल्याची माहिती श्री. महल्ले यांनी दिली. तसेच नेरीचे शेतकरी गजानन झाडे यांनीही सोयाबिन, कापसाचे नुकसान झाल्याचे सांगितले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (210) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/mumbai/mega-block-tomorrow-western-central-and-harbour-railway/", "date_download": "2020-09-26T03:39:56Z", "digest": "sha1:IHDT24TQ72AZMF4F6MIBSCALGIPF7AQA", "length": 28701, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Mega Block tomorrow on western central and harbour railway | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nमुंबई विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून सराव प्रश्न, वेळापत्रक जाहीर\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nपुणे, उल्हासनगरमधील ८४ टक्के बांधकाम मजूर राहिले वेतनाविना\nडिसेंबरपासून कोकण रेल्वे धावणार विजेवर\nपंतप्रधानांनी गौरविलेल्या फुटबॉलपटूच्या झोपडीवर पडणार महापालिकेचा हातोडा\nअजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल\nड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच पण...\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन\nदुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nवाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nAll post in लाइव न्यूज़\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nप्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nमुंबई : मध्य रेल्वे मार्गावर ठाणे-कल्याण दरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर तर, पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते गोरेगावदरम्यान रविवारी १ मार्च रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी लोकल मार्गात बदल करण्यात आला आहे. तर हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द केल्या जातील. ट्रान्स मार्गावरील ठाणे-वाशी/नेरूळ लोकल सेवा सुरू असेल. सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल सोडल्या जातील.\nमध्य रेल्वे मार्गावरील ठाणे-कल्याण दरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ पर्यंत ब्लॉक असेल. या वेळी धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील. या लोकल मुलुंड ते कल्याण दरम्यान ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण या स्थानकांवर थांबतील.\nहार्बर मार्गावरील पनवेल ते मानखुर्द दरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गांवर ब्लॉक असेल. सीएसएमटीहून पनवेल/बेलापूर/वाशी दिशेकडे सकाळी ११.०६ ते दुपारी ४.३८ पर्यंत ब्लॉक असेल. पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीकडे सकाळी ११.०६ ते दुपारी ४.३८ वाजेपर्यंत तर, सीएसएमटी/वडाळ्याहून वाशी/बेलापूर/पनवेल दिशेकडे सकाळी १०.०३ ते दुपारी ४.०८ पर्यंत एकही लोकल धावणार नाही.\nट्रान्स हार्बर मार्गावरून पनवेलहून ठाणे दिशेकडे जाणाऱ्या लोकल सकाळी १०.१२ ते दुपारी ४.२६ पर्यंत रद्द करण्यात येतील. ठाणेहून पनवेल दिशेकडे जाणाºया लोकल सकाळी ११.१४ ते दुपारी ४ वाजेपर्यंत तर, नेरूळ/बेलापूर ते खारकोपर दोन्ही दिशेकडे जाणाºया लोकल सकाळी ११.०२ ते दुपारी ४.४५ पर्यंत रद्द करण्यात येतील.\nपश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत बोरीवली ते गोरेगाव यादरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nMumbai Train Updatewestern railwaycentral railwayHarbour Railwayमुंबई ट्रेन अपडेटपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वे\n पनवेल स्टेशनवर सापडली बॉम्बसदृष्य वस्तू; लोकल रिकामी केली\nपश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक\nमुंबई सेंट्रल स्थानकाचे नामांतर होणार, समाजसेवक नाना शंकरशेट यांचे नाव देणार\nटिटवाळा येथे आज रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक\nGood News; ३२ हजार स्टेशन मास्तरांना ५४०० ग्रेड पे मिळणार\nमुलुंड ते माटुंगादरम्यान रात्रकालीन ब्लॉक\nमुंबई विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून सराव प्रश्न, वेळापत्रक जाहीर\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nडिसेंबरपासून कोकण रेल्वे धावणार विजेवर\nपंतप्रधानांनी गौरविलेल्या फुटबॉलपटूच्या झोपडीवर पडणार महापालिकेचा हातोडा\nऔषध, ऑक्सिजन वितरणाचे योग्य नियोजन करा\nडॉक्टरांना पुन्हा झालेला कोरोना संसर्ग तीव्र\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \nअभिज्ञा भावेने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो, दिसली रोमँटिक अंदाजात,See Photos\n'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nहिना खानने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो\n या महिलेनं रचला इतिहास; राफेलच्या पहिल्या फायटर पायटल होण्याचा मिळवला मान\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nबिग बॉस 14 : रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आहे 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री नैना सिंग\nIndia China FaceOff: लडाखमध्ये ड्युटी लागताच चिनी सैनिकांना रडू कोसळलं; फोटो व्हायरल\nFact Check: केंद्र सरकारची वैभव लक्ष्मी योजना, व्यवसायासाठी महिलांना देणार ४ लाखांचे कर्ज\nश्रद्धा कपूर, सुशांतसाठी मागवायचे ‘सीबीडी ऑइल’; बॉलीवूडचा चेहरा उघड\nमुंबई विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून सराव प्रश्न, वेळापत्रक जाहीर\nआजचे राशीभविष्य - २४ सप्टेंबर २०२० - कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस\nड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका, सारा, श्रद्धा, रकुल यांचीही आता झाडाझडती\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका, सारा, श्रद्धा, रकुल यांचीही आता झाडाझडती\nCoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी दिलेलं 'ते' उदाहरण पंतप्रधानांना आवडलं; बैठकीच्या शेवटी मोदींकडून खास उल्लेख\nशरद पवार यांना नोटीस देण्याचे निर्देश नाहीत; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट\nपंतप्रधान मोदींची संसदेत एन्ट्री, सदस्यांनी दिल्या 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा\nखडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/devendra-fadnavis-rahul-gandhi-savarkar-gandhi-name-politics-news-marathi-google-batmya/272550?utm_source=relatedarticles&utm_medium=widget&utm_campaign=related", "date_download": "2020-09-26T02:12:37Z", "digest": "sha1:XJZIN2E342KZZ7CLMWPZ2LUOPOA7E6UU", "length": 9835, "nlines": 79, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले... devendra fadnavis rahul gandhi savarkar gandhi name politics news marathi google batmya", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nराहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...\nराहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...\nDevendra Fadnavis on Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केलंय.\nदेवेंद्र फडणवीस (फाईल फोटो) |  फोटो सौजन्य: PTI\nमुंबई: काँग्रेस पक्षातर्फे दिल्लीत शनिवारी 'भारत बचाव रॅली'चं आयोजन केलं. होतं. या रॅलीत भाषण करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं, 'माझं नाव राहुल गांधी आहे राहुल सावरकर नाही. मी सत्याच्याच बाजूने आणि मरेपर्यंत माफी मागणार नाही' असं वक्तव्य केलं. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, \"राहुल गांधी जे बोलले ते अक्षरश: लाजीरवाणं आहे. या देशात सावरकरांनी केवळ कारावास भोगला नाही तर अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा दिली. राहुल गांधी यांनी केलेला सावरकरांचा अपमान हा देश कधीच सहन करणार नाही. राहुल गांधी यांनी समजून घेतलं पाहिजे की केवळ गांधी आडनाव लावून कोणी गांधी होत नाही. महाराष्ट्र आणि देश कधीही राहुल गांधींना माफ करु शकणार नाही\".\nशिवसेनेने कधी नव्हे इतके सौम्य धोरण आता स्वीकारले आहे. राहुल गांधी यांनी आज वीर सावरकर यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य तर अतिशय बेजबाबदारपणाचे आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर भाष्य करत म्हटलं, मला असं वाटतं की, सत्तेसाठी शिवसेना आज अशा लोकांसोबत आहे जे सावरकरांचाही अपमान करतात. आज आलेली शिवसेनेची प्रतिक्रिया किती मवाळ आहे. यापूर्वीच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या आहेत.\nराहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत भाजपवर टीका करताना म्हटलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची घोषणा दिली. पण देशात मेक इन इंडिया नाही तर रेप इन इंडिया दिसत आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन शुक्रवारी संसदेत भाजप महिला खासदारांनी आक्रमक होत राहुल गांधी यांनी महिलांची माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतर शनिवारी राहुल गांधी यांनी दिल्लीतील 'भारत बचाव रॅली'मध्ये भाषण करत म्हटलं, 'माझं नाव राहुल गांधी आहे राहुल सावरकर नाही. मी सत्याच्याच बाजूने आणि मरेपर्यंत माफी मागणार नाही'. त्यानंतर आता यावरुन राजकीय वातावरण तापत असल्याचं दिसत आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\n'पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी', पाहा कोणी केली टीका\nस्कॉर्पियन श्रेणीतील ‘वेला’ पाणबुडीचे जलावरण, चाचणीनंतर नौदलात समावेश\nKirit Somaiya first reaction: पाहा उमेदवारी गमावल्यांनंतर किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले\nआजचे राशी भविष्य २६ सप्टेंबर\nट्रकमध्ये चढत असताना सहायक पडला खाली आणि चाक.....\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ सप्टेंबर २०२०:\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमबद्दल CM ठाकरेंचे मत\nमारुतीची नवीन कार मिळणार मासिक शुल्कावर, पाहा काय आहे प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.diliptiwari.com/2016/12/blog-post_35.html", "date_download": "2020-09-26T03:05:48Z", "digest": "sha1:CM6OTXBXZO7GD45HUYPFKKMMDWML2XBO", "length": 13838, "nlines": 318, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: जि.प. निवडणुकांसाठी गिरीशभाऊंचा बुस्टर डोस ...", "raw_content": "\nजि.प. निवडणुकांसाठी गिरीशभाऊंचा बुस्टर डोस ...\nजळगाव जिल्ह्यात पालिकांच्यानंतर आता ग्रामीण राजकारणाची सत्ताकेंद्रे असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीचा ज्वर चढतो आहे. जिल्ह्यासह राज्यातील नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत क्रमांक १ चा पक्ष म्हणून लौकिक मिळविला आहे. आता ग्रामीणच्या लढाईत पंचायत समित्या जिंकण्यासह जिल्हा परिषदही पुन्हा काबीज करण्याचे भाजपसमोर आव्हान आहे.\nजळगाव जिल्हा भाजप पदाधिकारी व पंचायत समिती गट प्रमुखांची बैठक झाली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मणक्याचे अॉपरेशन असल्यामुळे माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे बैठकीस उपस्थित नव्हते. त्यांच्या सोबत हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे खासदार रक्षाखडसेही अनुपस्थित होत्या. बैठकीपूर्वी मंत्री महाजन यांचे आगमन झाल्यानंतर महाजन व खडसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आढे बढो चे घोषणायुध्द रंगले. अर्थात, मंत्री महाजन याविषयी नाराजी व्यक्त केली.\nजिल्हा परिषद निवडणुकीत भाजप अंतर्गतची गटबाजी उफाळण्याची शक्यता आहे. खडसे आणि महाजन यांच्यातील रस्सीखेच उमेदवारी वाटप करताना कळीची ठरेल. पालिका निवडणुकीत खडसे आणि कुटुंबियांनी जसे रावेर मदार संघात व महाजन यांनी जसे जळगाव मतदार संघात लक्ष घातले तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत होवू शकते. खडसे स्वतः आणि त्यांच्या समर्थकांनी गेले दोन महिने संयम बाळगला आहे. काही प्रसंग सोडता आजही खडसेंचे समर्थक त्यांच्या मंत्रिमंडाळातील वापसीची प्रतिक्षा करीत आहेत.\nदुसरीकडे मंत्री महाजन हे जिल्ह्यातील काही विषयांचा पाठपुरावा करण्यास पुढे सरसावले आहेत. जामनेर एमआयडीसी, निराधारांना घरकुलासाठी जमीन वाटप यासह जळगावसाठी २५ कोटी आणणेसाठी त्यांचे प्रयत्न आहेत. अर्थमंत्र्यांनीही आमदार सुरेश भोळेंना २५ कोटी देणार असे पत्र दिले आहे. अशा वातावरणात भाजपसाठी पूरक वातावरण निर्माण होते आहे. मावळत्या जिल्हा परिषदेत भाजपचे आणि त्यातही खडसे गटाचे वर्चस्व होते. ते यावेळी टीकविणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेत भाजप - शिवसेना युती होती. मात्र, दोन्ही पक्षांनी ऐकमेकांचे विरोधक म्हणूनच नांदले.\nनिवडणुक तयारीच्या पहिल्या टप्प्यात मंत्री महाजन यांनी मार्गदर्शन केले. आगामी काळात बहुधा जि. प. निवडणुकीसाठी खडसे - महाजन याच्या प्रभाव क्षेत्राचे विभाजन होईल. तसे झाले तर पक्ष हमखास जास्त जागा मिळवू शकेल. जिल्हाध्यक्ष वाघ यांनी ६८ पैकी ४० प्लस तर मंत्री महाजन यांनी ५० जागा जिंकायचे टार्गेट दिले आहे. गेल्या ५ वर्षांत भाजपची कारकीर्द फारशी लक्षवेधी राहिली नाही. शिवसेनेची भूमिका टोकाचीच होती. आता आगामी निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना स्वबळाचा नारा देत आहेत. मात्र मंत्री महाजन म्हणताहेत की, जेथे युतीची मागणी असेल तेथे युती करु. राज्यमंत्री गुलाबराव म्हणताहेत की, भाजपवर विश्वास ठेवू नका. मंत्री महाजन व राज्यमंत्री पाटील यांचे गूळपीठ आहे. जि. प. निवडणुकीत दोघेही अंतिम काय भूमिका घेतील हे आज सांगता येत नाही.\nजळगाव जिल्ह्याच्या राजपटावर सध्या जलसंपदामंत्री महाजन यांचे विकास योजनांचे गारुड सुरु आहे. जळगाव मनपाला मुख्यमंत्र्यांकडून विशेष निधी, जामनेरला प्रस्तावित एमआयडीसी उभारणी, गरजुंना घरकुलासाठी जागा, पुढाकारातून कैशलेस गावे अभियान अशा उपक्रमांमुळे मंत्री महाजनांचा बोलबाला आहे.\nजळगावच्या राजकारणातही सर्वपक्षीय नेत्यांसोबतही सलोख्याचे संबधी राखत महाजनांची भूमिका एखाद्या कुशल गारुड्याची आहे. महाजन विकासासाठी सर्व पक्षीयांना एकत्र आणण्यासाठी विकास कामांची पुंगी वाजवत असताना इतर मंडळी माना डोलवू लागलीच आहेत. तीन दिवसांपूर्वी महाजनांनी जामनेर येथे ब्लैककोब्रा हातात नाचवून आपणही खरेखुरे गारुडी असल्याचे दाखवून दिले आहे. सर्पमित्र अतुल कोळीने पकडलेला हा ब्लैककोब्रा महाजनांनी लिलया खेळवला, नंतर त्याची बातमी चैनलवरुनही प्रसारित झाली.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.atgnews.com/2017/01/blog-post_49.html", "date_download": "2020-09-26T01:29:11Z", "digest": "sha1:I4BS23AIDS2J4R4I5OI6AYHARFIRKXM4", "length": 17647, "nlines": 249, "source_domain": "www.atgnews.com", "title": "आईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा उद्योजक, - ATG News", "raw_content": "\nHome post for Startup/udyog आईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा उद्योजक,\nआईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा उद्योजक,\nआईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा उद्योजक,\n[ हा मँसेज सर्व तरुण मुला, मुलीपर्यंत पोहचला पाहीजे चला आधी शेअर करा ]\nघरची प्रचंड गरिबी. बुद्धिमत्ता हेच भांडवल. पेड (ता. तासगाव, जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकाने मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली. \"जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट' हे ब्रीद घेऊन व्यवसायात शिरलेले अशोक खाडे यांच्या \"फॅमिली'चा विस्तार आज साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे साडेपाचशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या \"दास ऑफशोअर' कंपनीत झालाय.\nवडील चर्मकार. आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत...कधी-कधी आम्हा भांवडांनाही कामाला जावं लागायचं.....आयुष्यानं दिलेल्या चटक्‍यांच्या आठवणी अशोक खाडे सांगत होते...\"\"सातवीपर्यंत पेडला शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी तासगावला बोर्डिंगमध्ये राहायला लागलो. मी शिकावं म्हणून वडील व मोठ्या भावाचा जीव तुटायचा. माझ्या शिक्षणासाठी घरचे किती कष्ट घेतायेत, याची जाणीव असल्यानं रात्र-रात्र झोप लागायची नाही. बोर्डिंगला पोटभरीचं जेवण मिळायचं नाही. पण मोठं व्हायचं स्वप्न असल्यानं कोणतीही तक्रार नव्हती. सन 1972 ला चांगल्या गुणांनी अकरावी झालो. त्या वर्षी मोठा दुष्काळ पडला. अंगात घालायला कपडेच नाही, तर पायताण कोठून येणार. आम्हाला शिकविणारे देसाई सर कळवळले. त्यांनी शर्ट व पायजमा घेऊन दिला. अकरावीच्या ऐन परीक्षेला पेनची निफ तुटली. जोशी सरांनी अडचण समजून घेत निफ आणून दिली. साठ टक्के गुण पडले. आज माझ्याकडे हजारो रुपयांचा पेन आहे; परंतु अकरावीतील \"त्या' पेनची किंमत कशालाही नाही. आजही माझ्याकडे तो पेन आहे. वडील बोर्डिंगवर आम्हाला भाकरी घेऊन यायचे आणि म्हणायचे, \"राजांनो, गरिबी आणि दुष्काळ मी आणला नाही. तुम्ही धीर सोडू नका. माळावर जोपर्यंत पळस आहे तोपर्यंत आपल्याकडे गरिबी आहे, असे समजू नका. खूप शिका.' वडिलांचे शब्द काळजाला भिडले,'' खाडे म्हणाले.\nखाडे कुटुंबीयांनी सन 1975 ला मुंबई गाठली. वैद्यकीय शिक्षण घ्यावे अशी माझी इच्छा होती, असे सांगून खाडे म्हणाले, \"\"रोजीरोटीसाठी आम्ही तिघेही भाऊ माझगाव डॉकमध्ये नोकरी करायला लागलो. मी डिझाइन विभागात होतो. मोठ्या भावाच्या आग्रहामुळे इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. नोकरी आणि शिक्षण दोन्ही सुरू झाले. सन 1983 मध्ये कंपनीच्याच कामासाठी जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. नवीन उमेद निर्माण झाली होती. गरिबी तर टोचत होतीच, स्वतःचे काही तरी करायचा ध्यास घेतला. त्यातून सन 1992 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. अन्य भावांनीसुद्धा राजीनामा दिला. तिघेही एकत्र राहत होतो आणि घरात एक प्रकारचे इंजिनिअरिंगचेच वातावरण होते. गरिबीत आयुष्यभर जगण्यापेक्षा थोडेच आयुष्य जगू; परंतु ते चांगले असेल असा ध्यास घेऊन \"दास ऑफशोअर'ची निर्मिती झाली. मराठी माणूस, त्यातही खाडे आडनाव म्हटल्यावर कोण काम देणार, हा प्रश्‍न होताच. त्यामुळे तिघा भावांच्या नावांची आद्याक्षरे घेऊन (दत्तात्रय, अशोक आणि सुरेश) कंपनीला \"दास' नाव दिले. नावसुद्धा \"के. अशोक' असे सांगायचो. पहिले काम माझगाव डॉकमध्येच मिळाले. मुंबईतील पहिला स्कायवॉक बांधला. मग मागे वळून पाहिले नाही.''\n\"दास' कंपनीने ओएनजीसी, ब्रिटिश गॅस अशा नामवंत कंपन्यांसाठी भरसमुद्रात प्रकल्प बांधणीचे काम केलेय. या समूहाच्या इंजिनिअरिंग, डेअरी, ऍग्रो प्रॉडक्‍ट्‌स, रस्ते बांधणी, उड्डाणपूल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत सात कंपन्या (http://www.dasgroup.co.in) आहेत. अबुधाबीचे प्रिन्स शेख महमंद बिन खलिफा बिन झायर अल नयन यांच्याबरोबर व्यावसायिक भागीदारी केल्याचे खाडे अभिमानाने सांगतात.\nवारकरीवृत्तीचे असलेले खाडे यांचा ज्ञानेश्‍वरीवर गाढा विश्‍वास. जमशेठजी टाटा, मदर तेरेसा हे त्यांचे आदर्श. एक रुपयातील एक भाग समाजासाठी, एक भाग देवासाठी, एक भाग कामगारांसाठी आणि उर्वरित भाग स्वतःसाठी अशी त्यांनी उत्पन्नाची वाटणी केलीय. वर्षभर बीएमडब्ल्यूमध्ये फिरणारे खाडे पंढरीची पायी वारी करतात. ज्या चित्रा टॉकीजजवळील झाडाला टेकून वडील गटई काम करत होते, त्या झाडाला समोरून जाताना न चुकता नमस्कार करतात. खाडे यांनी मास्टर इन फिलॉसॉफी पूर्ण केले असून, संत ज्ञानेश्‍वर महाराजांवर पीएचडी करण्याचा विचार आहे.\n\"दुसऱ्यांवर केलेले उपकार तळहातावर लिहिण्यापेक्षा तळपायावर लिही, की जे फक्त मातीच वाचू शकते' हे समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे शब्द खाडे यांनी मनात कोरले आहेत.\nमराठी असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. 'माझ्या कंपनीत चेहऱ्यावर चिंता असलेला एकही कर्मचारी दिसणार नाही. ज्या शेतात माझी आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली आहे. ज्या गावात दगडू चांभाराचा मुलगा अशी ओळख होती, ते गाव आता \"आबा' म्हणून ओळखत आहे. आजही आम्ही भाऊ एकत्र कुटुंब म्हणून राहतो. एकत्र कुटुंबात जी ताकद आहे, ती कशातच नाही. त्या भक्कम आधारामुळेच आम्ही आयुष्यात काही तरी करू शकलो.''\n\"जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट' हे ब्रीद लक्षात ठेवा.\nकष्ट करा. प्रामाणिक कष्टांचे फळ नक्की मिळेल.\nआईवडिलांना, समाजाला कधी विसरू नका.\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें यदि आप कार्यालय में काम करने के एक ही उबाऊ और थकाऊ तरीके से बाहर निकलना चाहते हैं\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी जब अमेरिका के ३१ वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wik...\nPMAY List 2020 प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण New List PDF\nudyog aadhar registration: उद्योग आधार - आवश्यकता, महत्व और उपलब्धि प्राप्त करने की प्रक्रिया\nUdyog Aadhar Registration उद्योग आधार - आवश्यकता, महत्व और उपलब्धि प्राप्त करने की प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.marathicorner.com/tag/nathicha-nakhra", "date_download": "2020-09-26T03:12:08Z", "digest": "sha1:U5AUWSEFA4WOUHS6TC4HYL6VEMLLVGMR", "length": 2042, "nlines": 48, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "nathicha nakhra Archives - मराठी कॉर्नर", "raw_content": "\nनथीचा नखरा Challenge 👰: ‘नथीचा नखरा’ मराठी मध्ये सोशल मीडियात ट्रेंडिंग का\nपुढे वाचा…नथीचा नखरा Challenge 👰: ‘नथीचा नखरा’ मराठी मध्ये सोशल मीडियात ट्रेंडिंग का\nमहाराष्ट्र शासन कृषी योजना 2020 PDF File कृषी यांत्रिकीकरण\nकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\nभारतात X, Y, and Z सुरक्षा म्हणजे काय या स्तराची सुरक्षा केंव्हा दिली जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/waris-pathan-prakash-ambedkar-and-ram-shinde-discussed-about-variouse-issues-in-maharashtra-mahamanthan-14764.html", "date_download": "2020-09-26T03:32:54Z", "digest": "sha1:IZUQK2XCGOUERYUODKLDOWV5XJUDCTLT", "length": 16291, "nlines": 195, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : वारीस पठाण म्हणतात, आज छ. शिवाजी महाराज असते, तर म्हणाले असते....", "raw_content": "\nCSK vs DC Live Score Update : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्लीची चेन्नईवर 44 धावांनी मात\nआशा स्वयंसेविकांनी आणि गटप्रवर्तकांनी प्रस्तावित कामबंद आंदोलन स्थगित करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन\nAkshardham Terror Attack | अक्षरधाम मंदिर दहशतवादी हल्ल्याचा थरार मोठ्या पडद्यावर, लवकर सिनेमा भेटीला\nवारीस पठाण म्हणतात, आज छ. शिवाजी महाराज असते, तर म्हणाले असते….\nवारीस पठाण म्हणतात, आज छ. शिवाजी महाराज असते, तर म्हणाले असते....\nमुंबई : “छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर म्हणाले असते, तुम्ही माझ्या पुतळ्यावर एवढा खर्च का करत आहात त्याऐवजी त्याच पैशातून शाळा, रुग्णालये बांधा”, असे एमआयएमचे आमदार वारीस पठाण म्हणाले. ते ‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीच्या ‘महाराष्ट्र मंथन’ या कार्यक्रमातील ‘महाराष्ट्र MOST’ या सत्रात बोलत होते. या सत्रात वारीस पठाण यांच्यासह जलसंधारण मंत्री राम शिंदे, भारिप बहुजन …\nमुंबई : “छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर म्हणाले असते, तुम्ही माझ्या पुतळ्यावर एवढा खर्च का करत आहात त्याऐवजी त्याच पैशातून शाळा, रुग्णालये बांधा”, असे एमआयएमचे आमदार वारीस पठाण म्हणाले. ते ‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीच्या ‘महाराष्ट्र मंथन’ या कार्यक्रमातील ‘महाराष्ट्र MOST’ या सत्रात बोलत होते. या सत्रात वारीस पठाण यांच्यासह जलसंधारण मंत्री राम शिंदे, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हेही सहभागी झाले होते. कोरेगाव भीमा प्रकरण, संभाजी भिडे, आरक्षण इत्यादी मुद्द्यांवर या सत्रात मान्यवरांनी चर्चा केली.\nकोरेगाव-भीम प्रकरणाबाबत सहभागी मान्यवर काय म्हणाले\nप्रकाश आंबेडकर – कोरेगाव भीमा प्रकरणात जे काही पुरावे सापडले, ते फेक आहेत. पोलिसांनी त्यांचे काम नीट केले नाही.\nराम शिंदे – कोरेगाव भीमा प्रकरणात सरकारने योग्य काम केले. आम्ही संभाजी भिडेंना पाठीशी घालत नाही. गृहखात्याच मला काही माहित नाही. पण हा विषय हा गृहखात्याच्या संदर्भात आहे.\nपाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल\nभंग झालेल्या अपेक्षांचे पडसाद म्हणजे पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल आहेत, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि मोदींवर निशाणा साधला. या टीकेला उत्तर देताना राम शिंदे म्हणाले, “तीन राज्यांच्या निवडणुकीवरुन देशाच चित्र पालटणार नाही” या मुद्द्याचा धागा पकडत आमदार वारीस पठाण म्हणाले, “सबका साथ सबका विकास असे काहीच झाले नाही. 70 वर्षे झाली देशाला स्वतंत्र होऊन, पण काँग्रेस म्हणा किंवा भाजप कोणीही दलितांसाठी आणि मुसलमानांसाठी काही केले नाही.”\nमराठा आरक्षण दिले आहे आणि ते कोर्टात आतापर्यंत टिकलं आहे. धनगर आणि मुसलमांच्या आरक्षणाचा पण प्रश्न लवकर सुटेल, असे आश्वासन यावेळी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिले.\nBihar Election | प्रकाश आंबेडकरांनी रणनीती बदलली; आता 'स्वबळा'ऐवजी 'आघाडी'चं…\nलोकसभेत समर्थन, राज्यसभेत विरोध; शिवसेनेच्या 'गोंधळा'वर निलेश राणेंचा निशाणा\nधनगर आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे, अन्यथा लोक रस्त्यावर फिरु देणार…\nदेशाला रुग्णालयाची गरज, इंदूमिलचं पुन्हा आमंत्रण आलं तरी जाणार नाही,…\nक्रांती होऊन लोक नेत्यांना मारुन टाकतील, मराठा समाज नेत्यांना बेड,…\nइंदूमिलमधील पायाभरणी सोहळा अचानक रद्द, पुण्याहून वाशीपर्यंत पोहोचलेल्या अजितदादांचा यू…\nIndu Mill | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणी अचानक स्थगित\nविठ्ठल मंदिर प्रवेश प्रकरणी प्रकाश आंबेडकरांसह 1200 जणांवर गुन्हे दाखल\nतुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही\nमुंबईकरांनो, अनधिकृत पार्किंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड\nनिलंबित IPS अधिकारी संजीव भट्ट यांना जन्मठेप\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष\nपुण्यात 'तेलगी 2.0', तब्बल 86 लाखांच्या बनवाट स्टॅम्पचा घबाड\nमुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी\nमुख्यमंत्रिपदावरुन भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचा शिवसेनेला जहरी टोला\nआता 'एका युतीची दुसरी गोष्ट' सुरु : उद्धव ठाकरे\nCSK vs DC Live Score Update : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्लीची चेन्नईवर 44 धावांनी मात\nआशा स्वयंसेविकांनी आणि गटप्रवर्तकांनी प्रस्तावित कामबंद आंदोलन स्थगित करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन\nAkshardham Terror Attack | अक्षरधाम मंदिर दहशतवादी हल्ल्याचा थरार मोठ्या पडद्यावर, लवकर सिनेमा भेटीला\nदीपिका पदुकोणची डिलीट केलेली चॅट एनसीबीकडे कशी\nआरोग्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत कोरोनाग्रस्त घुसल्याने तारांबळ, रुग्णालयात दाखल न केल्याचा आरोप\nCSK vs DC Live Score Update : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्लीची चेन्नईवर 44 धावांनी मात\nआशा स्वयंसेविकांनी आणि गटप्रवर्तकांनी प्रस्तावित कामबंद आंदोलन स्थगित करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन\nAkshardham Terror Attack | अक्षरधाम मंदिर दहशतवादी हल्ल्याचा थरार मोठ्या पडद्यावर, लवकर सिनेमा भेटीला\nदीपिका पदुकोणची डिलीट केलेली चॅट एनसीबीकडे कशी\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2020-09-26T03:45:14Z", "digest": "sha1:2ZMZWXDU4JTIYFFOMG2JWPWJDDRDOKLL", "length": 17250, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जीमेल - विकिपीडिया", "raw_content": "\nएप्रिल १, इ.स. २००४\nजीमेल एक विनामूल्य, गुगल द्वारे विकसित जाहिरात-समर्थित ईमेल सेवा आहे. वापरकर्ते वेबवर जीमेल आणि तिसरे-पक्षीय प्रोग्राम्स वापरून जे पीओपी किंवा IMAP प्रोटोकॉलद्वारे ईमेल सामग्री समक्रमित करू शकतात. जीमेल १ एप्रिल २००४ रोजी मर्यादित बीटा रिलिझच्या रूपात प्रारंभ झाला आणि ७ जुलै २००९ रोजी त्याचे चाचणी टप्प्यात संपले.\nप्रारंभी, जीमेलमध्ये प्रति उपयोगकर्ता एक गिगाबाइटचा प्रारंभिक संचयन क्षमता आहे, त्या वेळी दिले जाणाऱ्या प्रतिसादापेक्षा ती एक उच्च रकमेची रक्कम आज, सेवा १५ गीगाबाइट स्टोरेजसह आहे. उपयोजक ५० मेगाबाइट पर्यंतच्या इमेजेस संलग्नकांमधुन मिळवू शकतात, जेव्हा ते २५ मेगाबाइटपर्यंत ईमेल पाठवू शकतात. मोठ्या फायली पाठविण्यासाठी, वापरकर्ते गुगल ड्राइव्हवरून संदेशात फायली समाविष्ट करु शकतात. जीमेल मध्ये इंटरनेट-मार्केप्रमाणे शोध-निर्देशित इंटरफेस आणि एक \"संभाषण दृश्य\" आहे. एजेएक्सच्या सुरुवातीस प्रारंभ करण्यासाठी ही वेबसाइट डेव्हलपर्सच्या अंतर्गत प्रसिद्ध आहे.\nगुगलचे मेल सर्व्हर स्वयंचलित स्पॅम आणि मॉलवेअर फिल्टरसह, एकाधिक हेतूंकरिता ईमेल स्कॅन करतात आणि ईमेलच्या पुढे संदर्भ-संवेदनशील जाहिराती जोडण्यासाठी अमर्यादित डेटा धारणा, विविध पक्षांच्या निरीक्षणामुळे सहजतेने, जीमेल पत्त्यांवर ईमेल पाठवून धोरण मान्य न झाल्यास आणि गुगलला बदलण्याची संभाव्यता यामुळे प्रायव्हसीच्या वकिलांनी या जाहिरात पद्धतीची टीका केली आहे. अन्य गुगल डेटा वापरणासह माहिती एकत्र करून गोपनीयता अधिक कमी करण्यासाठी त्याची धोरणे कंपनी समस्यांशी संबंधित खटल्यांचा विषय आहे. गुगलने असे सुचवले आहे की ईमेल वापरकर्त्यांनी त्यांचे ईमेल स्वयंचलित प्रक्रियेच्या अधीन असण्याची अनिवार्यपणे अपेक्षा करणे आवश्यक आहे आणि दावा करते की सेवा संभाव्य संवेदनशील संदेशांव्यतिरिक्त जाहिराती प्रदर्शित करण्यापासून परावृत्त करते, जसे की वंश, धर्म, लैंगिक अभिमुखता, आरोग्य किंवा आर्थिक उल्लेख स्टेटमेन्ट जून २०१७ मध्ये, गुगलने जाहिरातींच्या उद्देशासाठी संदर्भीत जीमेल सामग्रीचा वापर करण्याच्या आगामी अखेरीस घोषणा केली, त्याऐवजी त्याच्या इतर सेवांच्या उपयोगावरून गोळा केलेल्या डेटावर अवलंबून रहावे.\nजुलै २०१७ मध्ये, जगभरात जीमेल चे १.२ अब्ज सक्रिय वापरकर्ते आहेत, आणि ॲंड्रॉइड डिव्हाइसेसवर एक अब्ज संस्थांना मारण्यासाठी गुगल प्ले स्टोर वर पहिले ॲप्स होते. २०१४ च्या अंदाजानुसार, ६०% मध्य आकाराच्या अमेरिकन कंपन्या आणि ९०.२% प्रारंभी जीमेल वापरत होते.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पण चित्र नसलेली पाने\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑगस्ट २०२० रोजी १९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/okra2", "date_download": "2020-09-26T01:58:53Z", "digest": "sha1:4ZOLEP26D5UYKUIUARJD4SL6TGWXRVHN", "length": 14400, "nlines": 188, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "भेंडी लागवड व पोषण – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nभेंडी लागवड व पोषण\nमित्रहो, जुलैच्या पहिल्या आठवडयात, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात भेंडी लागवड केली जाते. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून त्यात कमीत कमी एकरी २ ते ३ टन शेणखत, तीन किलो हुमणासूर व २० किलो मायक्रोडील ग्रेड वन मिसळावे.\nआपणास कोणती रोपे हवीत\nरोपवाटीकांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nबियाणे निवडते वेळी चागल्या कंपनीचे बियाणे खात्रीशीर ठिकाणाहून घ्यावे. ४० ते ४५ दिवसात तोडणी सुरु होणारे व वायव्हीएमव्ही (यलो व्हेन मोझॅक व्हायरस) तसेच ओएलसीव्ही (ओक्रा लीफ कर्ल व्हायरस) या विषाणूला बळी न पडणारे बियाणे निवडावे. भेंडीची लांबी साधारण १० ते १२ सेमी इतकी असावी व तोडायला सोपी असावी. लागवड दोन फुटावर सरी पाडून, सरीच्या दोघी बाजूस १ फुट x अर्धा फुटावर केल्यास एकरी ६ ते ७ किलो बियाणे लागते. चांगल्या कंपनीचे बियाणे घेतल्यास त्यावर बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेलीच असते, नसल्यास थायरम अथवा कार्बेन्डॅझिम ३ ग्राम प्रती किलो दराने , सुपर जिब व ह्युमोल जेलीत मिश्रित करून प्रक्रिया करावी. थोडे सुकवून लगेच टोकून लागवड करावी. पावसाळ्या व्यतिरिक्त वेळेस भेंडी साठी ठिबक व चंदेरी पेपर मल्च चा उपयोग करणे फायदेशीर ठरते. (मल्च फिल्म स्वस्तात खरेदी करण्याठी इथे क्लिक करा) बी टोकन यंत्राचा वापर केल्यास वेळ व मजुरीचा खर्च वाचतो.\nलागवडीपूर्वी ४५ किलो युरिया, १३० किलो सिंगल सुपर फाँस्पेट व ३४ किलो एम ओ पी द्यावे. लागवडी नंतर ३० दिवसांनी ४५ किलो युरिया परत द्यावा. मात्र माती परीक्षण केलेले असल्यास त्या नुसार खताचे डोस नियंत्रित करावेत.\nअमृतगोल्ड १९-१९-१९ व ००-५२-३४ या विद्राव्य खतांची आलटून-पालटून फवारणी, अमृत ड्रेंचींग कीट ची आळवणी व लोह-मंगल-जस्त-तांबे-मोलाब्द व बोरॉन युक्त मायक्रोडील ग्रेड २ या खताची फवारणी केल्याने पिकाचे संतुलित पोषण होऊन रोग-किडींचा त्रास कमी होतो, पिक लवकर तोडणीवर येते.\nया फवारण्या माफक खर्चात होतात व पिकाच्या वाढीत येणाऱ्या अडचणी जसे “अन्नद्रव्याची कमतरता, अपटेक न होणे, ढगाळ वातावरण व रससोशक किडीमुळे कमी झालेले प्रकाससंश्लेषण” यावर मात करण्यास पिकास मदत करतात.\nया पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.\nतंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी\nपुन्हा भेटू पुढील लेखात तो पर्यंत हि पोष्ट अधिकाधिक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचावी म्हणून फेसबुकवर शेअर करायला विसरू नका.\nभेंडी एक्स्पोर्ट करणार का\nमित्रहो, जुलैच्या पहिल्या आठवडयात, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि जानेवारीच्या तिसऱ्या...\nभेंडीत मावा, फळ व खोड किडा, पांढरी माशी, तुडतुडे, ठिपकेदार बोंड...\nभेंडीतील लाल कोळी नियंत्रण\nभेंडी ची भाजी लहान मुलांना अपार आवडत असल्याने या भाजीला...\n\"क्लोरानट्रानिप्लोर\" युक्त कीटकनाशके व त्यांच्या शिफारसी\nक्लोरानट्रानिप्लोर या घटकाचे दुसरे नाव रीनाक्सपीर असे असून हे ड्यूपोंट...\nभेंडी पिकासाठी सर्वोत्तम कीडनाशकाचा शोध कसा घ्याल\nयापूर्वी आपण भेंडी वरील कीडनियंत्रणा बद्दल आमचे लेख वाचले असतील...\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nसंत्रा, मोसंबी व कागदी लिंबु च्या दर्जेदार उत्पादनातील सर्वांत महत्त्वाचा...\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nशेतात फुलोरा आला कि मन स्वप्न पाहू लागते. मनाच्या आकांक्षा...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/indian-army-career-2020/", "date_download": "2020-09-26T02:59:27Z", "digest": "sha1:IQH7WTNNOAERHP2TWWS4TOEIRMGOQMKI", "length": 6652, "nlines": 101, "source_domain": "mahabharti.in", "title": "Indian Army Career 2020 - Apply Online Mode Here Now", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nभारतीय सेना भरती २०२०\nभारतीय सेना भरती २०२०\nभारतीय सेना येथे JAG प्रवेश योजना २५ वा कोर्स (ऑक्टोबर २०२०) करिता ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२० आहे.\nअभ्यासक्रमाचे नाव – JAG प्रवेश योजना २५ वा कोर्स (ऑक्टोबर २०२०)\nपदसंख्या – ८ पदे\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कायद्याची पदवी असावी.\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nअर्ज सुरु होण्याची तारीख – १५ जानेवारी २०२० आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ फेब्रुवारी २०२० आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nसर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७४\nUT प्रशासन दमण आणि दीव येथे विविध पदांची भरती\nमुंबई उपनगर जिल्हा येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची भरती\nICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाची भरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, दिव अंतर्गत विविध पदांची भरती\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांच्या 171 जागांसाठी ऑनलाईन अर्ज…\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती\nRITES लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदांची भरती\nजेईई अॅडव्हान्स्ड: ९८ टक्के विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा केंद्र\nनॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mahakamgar.maharashtra.gov.in/video-gallery-mr.htm", "date_download": "2020-09-26T02:39:21Z", "digest": "sha1:6M432PCBK5WQ2CNU7R5LLVAVUCSEBDFM", "length": 3655, "nlines": 76, "source_domain": "mahakamgar.maharashtra.gov.in", "title": "व्हिडिओ गॅलरी", "raw_content": "\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमुख्य पान › मीडिया गॅलरी › व्हिडिओ गॅलरी\nप्रति पेज रिकार्ड :\nपेज पर जाएँ :\nसुरक्षितता रॅली-2016 - सहयोगासाठी आमंत्रण\nऑनलाईन तक्रार निवारणतुमच्या तक्रारी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा\nबाल मजुरी हेल्पलाईन बालमजुरी तक्रार साठी संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट © 2014 कामगार विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nपानाच्या रोजी अखेरचे अद्यतनितः: 29-5-2014 अभ्यागत: 14976410\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mpcnews.in/rickshaw-and-two-wheeler-stolen-from-bhosari-area-170321/", "date_download": "2020-09-26T01:56:45Z", "digest": "sha1:RAYVSIT3MA57BOFVEUFZ2H5OIWQ2NQ6O", "length": 6413, "nlines": 76, "source_domain": "mpcnews.in", "title": "Rickshaw and two wheeler stolen from Bhosari area.", "raw_content": "\nBhosari : भोसरीमधून रिक्षा आणि दुचाकी चोरीला\nBhosari : भोसरीमधून रिक्षा आणि दुचाकी चोरीला\nएमपीसी न्यूज – भोसरी परिसरातून रिक्षा आणि दुचाकी चोरीला गेल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 30) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.\nपहिल्या प्रकरणात आफाक साहिल शेख (वय 30, रा. दापोडी) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांच्याकडे 50 हजार रुपये किमतीची एम एच 12 / क्यू आर 4292 ही तीनचाकी रिक्षा आहे. 26 जुलै रोजी रात्री साडेसात वाजता त्यांनी त्यांची रिक्षा दापोडी गावातील बिकनसेठ पार्क समोर पार्क केली.\nरात्री अज्ञात चोरट्यांनी शेख यांची रिक्षा चोरून नेली. 27 जुलै रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.\nदुस-या प्रकरणात श्रीकांत हनुमंत मुडे (वय 20, रा. महादेव नगर, धावडेवस्ती) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुडे यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची एम एच 14 / एच एफ 4997 ही दुचाकी 26 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली.\nरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 27 जुलै रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nTalegaon : मावळ तालुक्यातील दुसरे आयटीआय तळेगावात आणण्यासाठी पाठपुरावा करणार – वैशाली दाभाडे\nPimpri: नगरसेवक जावेद शेख यांची दुसरी कोरोना टेस्ट गुरुवारी निगेटीव्ह आली होती\nIPL 2020 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्ली कॅपिटल्सची चेन्नईवर 44 धावांनी मात\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 7 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची नोंद\nPune News : टाटा मोटर्सने बनविलेल्या 51 विंगर रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nPimpri news: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 9 ऑक्टोबरला निवडणूक\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 164 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 87 नवीन रुग्ण\nPune News : लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदी रद्द करा ; भारतीय मजदूर संघांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.guruthakur.in/prawaas/", "date_download": "2020-09-26T02:28:50Z", "digest": "sha1:ALX662CC3HVICJBLQ7MDBIWK3LABE6RS", "length": 4217, "nlines": 75, "source_domain": "www.guruthakur.in", "title": "Prawaas - www.guruthakur.in", "raw_content": "\nप्रवास (गायक – सोनू निगम)\nकुणा न टळला कुणान कळला\nजगण्याचा हा अवघड घाट\nकुणी न जाणे वळणा नंतर\nकुठे नेमकी सरते वाट …\nप्रवास प्रवास हा प्रवास\nथकले पाउल शिणले डोळे\nजाळणार किती हा कळेना\nकौन हम आये कहांसे है ये कैसा सिलसिला\nअंजानसी इस राह पे हरपल नया है काफिला\nजाने कैसा सोज है\nजो नही हासील उसीपे हर किसीको है गिला\nकौन हम आये कहांसे है ये कैसा सिलसिला\nकल जो छूटा हाथसे\nहै खलिश के आनेवाला\nकल नजर आता नही\nथाम लेना आज को जब जहां जैसे मिला\nजिंदगी किस र तेरा जा रहा है काफिला\nचांदणे होते उन्हाचे झुळुक होती वादळे\nहो स्वत:चा सारथी आभाळ होइल मोकळे\nभेद तू भिंती भयाच्या तोड सारी बंधने\nहार होवो जीत होवो धर्म आहे झुंजणे\nतोच जेता होई ज्याचे ध्येय आहे वेगळे\nहो स्वत:चा सारथी आभाळ होइल मोकळे\nजिंदगीला एकट्याने दे नवे आव्हान तू\nटाकूनी दे कात सारी हो पुन्हा बेभान तू\nराहिल्या हाती दिसांचे होउ दे ना सोहळे\nहो स्वत:चा सारथी आभाळ होइल मोकळे\nप्रवास (गायिका – श्रेया घोषाल)\nवसंत फुलतो जणू शिशीरात\nगोड गुपित हे जगण्यामधले\nसूर ही उमलतो सुखाचा\nहाती हात हलके मिसळता\nजुळून येती नवे तराणे\nरंग नवे भरती जगण्यात\nसदैव जेव्हा असतो ध्यास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://jaalavaani.blogspot.com/2010/08/blog-post_270.html", "date_download": "2020-09-26T03:00:56Z", "digest": "sha1:Y772ODZDEW2RWNU4BM27C4NGMWIK6ERW", "length": 10789, "nlines": 114, "source_domain": "jaalavaani.blogspot.com", "title": "जालवाणी: सैनिकहो, तुमच्यासाठी !", "raw_content": "\nलेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला प्रत्यक्ष लेखकाच्या आवाजात ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०१० रोजी प्रकाशित करत आहोत. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे काहीही ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...\nआपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सतत सीमेवर पहारा देत असलेले सैनिक कोणत्या नैसर्गिक आपत्तीत आणि विपरीत हवामान असलेल्या परिस्थितीत राहतात आणि तरीही त्यांचे मनोधैर्य किती उच्चकोटीचे आहे... ते सगळं तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभवल्यावर रोहन चौधरी काय म्हणतात ते पाहा. त्यांच्या लेखाचं अभिवाचन केलंय कांचन कराई ह्यांनी.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकांचन ताई...खुपच छान लिहल आहेस ग.तेवढच सुंदर अभिवाचनही केल आहेस.तुझ्या आवाजाबाबत काय बोलु ग... कैच्याके भारी वाटला तुझा आवाज....\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी १२:२६ म.पू.\nभारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…\nभारतीय सैनिकांना मनापासून मानाचा मुजरा.....\nसेनापतीच्या लेखणीला कांचनतायच्या सुरेख आवाजाची साथ.\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी १२:३१ म.पू.\nसेनापतीनी लिहल आहे काय...बघ ग कांचन ताई तुझ्या आवाजाची जादु...सेनापतींना विसरुन कमेंटलो...रोहना मस्तच लिहल आहेस रे...\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी १२:३८ म.पू.\nहे डाउनलोड कसं करायचं\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी ५:२७ म.पू.\nसेनापतीच्या लेखणीला कांचनच्या सुरेख आवाजाची साथ.+1\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी ५:४६ म.पू.\nरोहन यांच्या स्फूर्तीदायक आणि सैनिकांना दिलासा देणार्‍या शब्दांना, कांचनच्या सुयोग्य आवाजाची उचित साथ मिळाल्याने हे अभिवाचन, स्वातंत्र्यदिनाची उत्तम भेट ठरले आहे.\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी ६:५९ म.पू.\nअतिशय छान अभिवाचन आहे.. आणि आजच्या अंकाचा मुकुटमणी आहे...\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी ११:४१ म.पू.\nरोहन खूप छान लेखन. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं वाचन आणि लेखन करतो्स हे लिहीण्याच्या पध्दती मध्ये उतरलेलं आहे. कांचन, अभिवाचन ही छान.\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी २:०५ म.उ.\nलैच भारी आवाज आणि वाचन...\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी ३:४० म.उ.\nरोहन आणि कांचन मस्तच....\nकांचन खरचं खूप छान वाटतेय अभिवाचन...\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी ३:४८ म.उ.\nखूप छान लेखन आणि अभिवाचन..\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी ७:१५ म.उ.\nकैच्याकै भारी झालंय कॉम्बो\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी १०:१९ म.उ.\nखूप छान लेखन आणि अभिवाचन..\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी १०:४० म.उ.\nदीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...\nरोहन चौधरी ह्यांचे उत्कृष्ठ लेखन आणि कांचन कराईंचे अति उत्कृष्ट वाचन... खुपच सुंदर..\n१६ ऑगस्ट, २०१० रोजी ५:१२ म.पू.\nSUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...\nभिडणारा आवाज, छान लेखन आणि सुरेख अभिवाचन. पार्श्वसंगीत पण मस्त.\n१७ ऑगस्ट, २०१० रोजी ४:५० म.उ.\n२२ ऑगस्ट, २०१० रोजी १:३६ म.उ.\nकांचन ताई,सीमेवरच्या सैनिकां बरोबरच तुम्हाला सुद्धा आमचा मनापासून मानाचा मुजरा उत्कृष्ट अभिवाचना बद्दल.\n२३ ऑगस्ट, २०१० रोजी ११:१४ म.उ.\n२५ ऑगस्ट, २०१० रोजी १०:४२ म.उ.\nमंडळी... बोटीवर असताना मला हे काही ऐकायला मिळालेले नसल्याने आत्ता २ तासात हॉटेलवर बसून सर्व भाग ऐकतोय... :)\nकांचन ... तू माझ्या लिखाणाला कमालीची उंची दिलीस... एकदम अप्रतिम... :)\n२७ ऑगस्ट, २०१० रोजी ६:३५ म.पू.\n१० सप्टेंबर, २०१० रोजी १२:३५ म.पू.\n२४ मे, २०११ रोजी ६:१० म.उ.\nनिवेदन व लेखन व सादरीकरण ह्या सर्वच पातळीवर उच्च दर्जा दिसून येत आहे.\nह्या गीताची आठवण झाली.\n११ जून, २०१२ रोजी १:५४ म.उ.\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसूर्य संपावर गेला तर\nआणि मी सिगारेट सोडली.\nमोनालिसाला कुठे होत्या भुवया\nअब्राहम लिंकन ह्यांचे हेड मास्तरांना पत्र\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dailykesari.com/2020/09/15/400-km-journey-for-proper-examination/", "date_download": "2020-09-26T01:42:27Z", "digest": "sha1:A2JAJ2DWFOGL4XWQB52HSP7KWIZSZ7UW", "length": 10634, "nlines": 170, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "नीट परीक्षेसाठी ४०० किलोमीटरचा प्रवास - Kesari", "raw_content": "\nघर मुंबई नीट परीक्षेसाठी ४०० किलोमीटरचा प्रवास\nनीट परीक्षेसाठी ४०० किलोमीटरचा प्रवास\nमुंबई : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी देशभरातील 3 हजार 842 परीक्षा केंद्रावर पार पडली. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र गाठण्यासाठी 300 ते 400 किमीचा प्रवास करावा लागला. नंदुरबारमधून मुंबईत परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीला तब्बल 400 किमीचा प्रवास करावा लागला.\nनंदुरबार ते मुंबई असा खासगी वाहनाने प्रवास करण्यासाठी या विद्यार्थिनीला 15 हजार रुपये मोजावे लागले. एंजल गावित असे या 17 वर्षीय विद्यार्थिनीचे नाव आहे.\nएंजल परीक्षेसाठी बहीण आणि मैत्रिणीसोबत शनिवारी रात्री 9 वाजता नंदूरबारमधील नवापूर येथून निघाली. सात तासांचा प्रवास करून रविवारी पहाटे चार वाजता ती ठाण्यातील एका नातेवाइकाकडे पोहोचली. थोडावेळ आराम केल्यानंतर ती ठाण्याहून बोरिवली बसने आणि बोरिवलीहून कांदिवलीसाठी रिक्षा करून परीक्षा केंद्रावर पोहोचली.\nपूर्वीचा लेखसमलिंगी विवाहांना केंद्र सरकारचा विरोध\nपुढील लेखप्रशांत भूषण यांच्याकडून फेरविचार अर्ज दाखल\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nरियाच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nबिहार निवडणूक : तीन टप्प्यांत होणार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nबिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली.\nनवनाथ गोरे यांचा खडतर प्रवास होणार सुकर\nभारती विद्यापीठात मिळणार नोकरी\nलोकप्रिय गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले.\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलचा पहिल्याच षटकात पराक्रम\nअतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात\nइशांत शर्मा आणखी दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/srk-gauri-to-celebrate-25th-wedding-anniversary-with-close-friends/videoshow/55052271.cms", "date_download": "2020-09-26T03:21:38Z", "digest": "sha1:GGOOXXH7TP4FJZDNUTNJCIB7Y5VKKSVX", "length": 8649, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशाहरुख-गौरीने साजरा केला लग्नाचा २५वा वाढदिवस\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिव...\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अ...\nसेक्स करा, आनंदी रहा\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अति...\nपुनम पांडेचे सेक्सी विडीओज...\nमहेश बाबूच्या मुलींच्या तोंडून ऐका अस्सल मराठीत आरती...\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २६ सप्टेंबर २०२०\nन्यूजड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nन्यूजबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\n आज कोण ठरणार सरस\nन्यूजमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nन्यूजबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\nन्यूज'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nन्यूजसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nन्यूजशहीद जवान नरेश बडोलेंना काश्मीरात वीरमरण\nन्यूजकृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचं देशव्यापी आंदोलन\nन्यूजभाजप हा एकसंध आणि एक संघ आहे - विनोद तावडे\nहेल्थफिट राहण्यासाठी या सोप्या आसनांचा करा अभ्यास\nन्यूजराज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिटकून बसणारे सरकार - राम शिंदे\nन्यूज'भारत बंद'ची हाक देणारे शेतकरी विरोधी- राम शिंदे\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २५ सप्टेंबर २०२०\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-09-26T02:06:39Z", "digest": "sha1:T62LOWBKQ3MDEQVU7ZYLKVGYQBALYJ6Y", "length": 5022, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nपालिका प्रयोगशाळेत अत्याधुनिक पद्धतीची अन्नचाचणी यंत्रणा\nमहापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा मानखुर्दमध्ये दणदणीत विजय\nबीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांकडूनच लाखो लीटर पाणीचोरी\nदेवनार डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा मिळेना\nमुंबईकरांना मिळणार आणखी ४४० दशलक्ष लिटर पाणी\nमोकाट जनावरांच्या मालकांना पालिका आकारणार 'इतका' दंड\nनवीन इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक\nमोठ्या सोसायट्यांना बायोगॅस प्रकल्प बंधनकारक\nराणी बागेत वाघ, सिंह, तरस, अस्वलाचं होणार दर्शन\nहलाखीत राहणाऱ्या माजी नगरसेवकांचं पालकत्व पालिकेनं घ्यावं, नगरसेवकांची मागणी\nस्थायी समिती विरुद्ध पालिका प्रशासन वाद पेटणार\nबीएमसीची अनधिकृत पार्किंगवर कारवाई, ३ दिवसात 'इतका' दंड वसूल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/toilet-used-as-a-kitchen-barabanki-swachh-bharat-mission/", "date_download": "2020-09-26T03:25:23Z", "digest": "sha1:HQTVPU7E74GJ6KNGIMJFEHUNEZMASXZ5", "length": 19022, "nlines": 161, "source_domain": "www.saamana.com", "title": "शौचालयातच थाटले स्वयंपाकघर…कारण वाचून व्हाल थक्क … | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nशौचालयातच थाटले स्वयंपाकघर…कारण वाचून व्हाल थक्क …\nगरीबीमुळे आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेकजण खुराड्यासारख्या लहान घरात राहतात. काहीजणांच्या घरात नीट बसायलाही जागा नसते. तर अनेक गावांत वीज नसल्याने छोट्याश्या घरात मुले दिव्याच्या उजेडातच अभ्यास करतात. मात्र, काही संकटे अशी येतात, की माणूस हतबल होतो. उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये एका कुटंबाने चक्क शौचालयातच स्वयंपाकघर थाटले आहे. या वृत्ताने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.\nबाराबंकीजवळील अकनपूर गावात राम प्रकाश यांना ‘स्वच्छ भारत’ योजनेतंर्गत सरकारकडून शौचालय बांधून मिळाले. मात्र, पावसाळ्यात ते राहत असलेल्या झोपडीची दूरवस्था झाली. त्यातच गरीबी आणि हलाखीची परिस्थिती पाठ सोडत नव्हती. त्यामुळे झोपडीची डागडूजी करणेही त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे नाईलाजाने त्यांना शौचालयातच स्वयंपाकघर हलवावे लागले. आमच्याकडे राहण्यायोग्य जागा नव्हती. पावसाळ्यात झोपडीत जेवण बनवणे आणि उभे राहणेशी शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात सिमेंट आणि वीटांपासून बनलेल्या या शौचालयाचा आश्रय आम्हाला घ्यावा लागला. पावसाळा वाढल्यावर झोपडीची आणखी दूरवस्था झाली. त्यामुळे नाईलाजाने आम्ही या शौचालयातच जेवण बनवू लागलो, असे राम प्रकाश यांनी सांगितले. गेल्या वर्षभरापासून आम्ही या शौचालयाचा स्वयंपाकघर म्हणून वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले.\nराम प्रकाश यांच्या झोपडीबाहेरील शौचालयातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. त्यामुळे दुर्घटना झाल्याच्या शक्यतेने त्यांनी प्रशासनाला याबाबत कळवले. त्यानंतर प्रशासनाने केलेल्या चौकशीत राम प्रकास यांच्या कुटुंबियांनी शौचालयातच स्वंयपाकघर बनवल्याची ही बाब समोर आली. त्यानंतर याबाबतचे वृत्त सर्वत्र पसरल्याने प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आणि प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर प्रशासनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. प्रधानमंत्री आवास योजनेत नावे असलेल्या पात्र लाभार्थिंना या योजनेतून घरे देण्यात येतील. ज्यांची नावे या यादीत नसतील आणि घरांसाठी जे पात्र असतील त्यांना मुख्यमंत्री आवास योजनेतून घरे देण्यात येतील असे बाराबंकीचे जिल्हाधिकारी डॉक्टर आदर्श सिंह यांनी सांगितले. घर मिळेल, तेव्हा मिळेल. मात्र, स्वयंपाकघरासाठी योग्य जागा द्यावी, अशी अपेक्षा राम प्रकाश यांनी व्यक्त केली आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\n व्हिसाशिवाय बिनधास्त फिरा या 16 देशात, केंद्र सरकारने दिली ‘फिरस्ती’ लोकांना खुशखबर\n16 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर आरोपीची निर्दोष सुटका\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम...\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nया बातम्या अवश्य वाचा\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/aditya-thackerays-letter-to-prime-minister-narendra-modi-demands-postponement-of-all-examinations-127647361.html", "date_download": "2020-09-26T02:50:04Z", "digest": "sha1:PODZ4SMKSGT6LWUHKOPRFAE32KSVZUQC", "length": 6946, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aditya Thackeray's letter to Prime Minister Narendra Modi, demands postponement of all examinations | आदित्य ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, केली सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपरीक्षा:आदित्य ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, केली सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी\nदेशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जातोय. अशाच विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा मुद्दा गाजताना दिसतोय. आदित्य ठाकरे प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांची बाजू मांडताना दिसत आहेत. सध्या नीट आणि जेईई परीक्षांच्या मुद्द्यावरुनही राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय. अशात युवा सेनेचे नेते व राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.\nकोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. तर काही जणांकडून परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व प्रश्न आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी शैक्षणिक कार्यक्रम पुढे ढकलण्याची तसेच परीक्षाही पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.\nआदित्य ठाकरेंनी या पत्रात लिहिलं की, 'आपल्या नेतृत्वाखाली देश करोनाविरूद्ध लढा देत आहे. या कार्यात नागरिकही प्रामाणिकपणे आपलं योगदान देत आहेत. मात्र मी विद्यार्थ्यांकडे तुमचं लक्ष वळवू इच्छितो आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या काळात अनेक लोक हे घरुनच कामे करत आहे. मात्र अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठ, व्यावसायिक व अव्यासायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेणार असल्याचं म्हणत आहेत. पण आतापर्यंतच्या निरीक्षाणावरुन जगभरात ज्यांनी ज्यांनी शाळा, महाविद्यालये सुरू केली, तिथे कोरोना रुग्ण वाढत असल्याचे दिसतेय. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की, या विषयात हस्तक्षेप करून सर्व शैक्षणिक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावे. त्याचबरोबर आपलं शैक्षणिक वर्ष जून-जुलै 2020 ऐवजी जानेवारी 2021 पासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात यावे. असे केल्यास कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. विविध शाखांच्या परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणात पंतप्रधानांनी स्वत: हस्तक्षेप करावा' असे पत्र लिहित आदित्य ठाकरे हे विद्यार्थ्यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/tag/pune-mahanagar-palika-recruitment-2020/", "date_download": "2020-09-26T00:49:41Z", "digest": "sha1:5JHQVOB46GTGELUK4UDFUFJVP73ONBFF", "length": 3479, "nlines": 70, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nUT प्रशासन दमण आणि दीव येथे विविध पदांची भरती\nमुंबई उपनगर जिल्हा येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची भरती\nICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाची भरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, दिव अंतर्गत विविध पदांची भरती\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांच्या 171 जागांसाठी ऑनलाईन अर्ज…\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती\nRITES लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदांची भरती\nजेईई अॅडव्हान्स्ड: ९८ टक्के विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा केंद्र\nनॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरु\nनाशिक महानगरपालिका भरती पात्र आणि अपात्र यादी\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.marathikhajina.com/tag/love-tips-in-marathi/", "date_download": "2020-09-26T01:28:57Z", "digest": "sha1:4NYEBJVMX33NGNEQTCRXZ76MZCVEOIC2", "length": 2814, "nlines": 40, "source_domain": "www.marathikhajina.com", "title": "love tips in marathi | मराठी खजिना", "raw_content": "\nपालेभाज्यांचे हे आहेत फायदे\nधने-जिरे पूड चे फायदे\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन…\nडेटिंगला जाताना या टिप्स लक्षात ठेवा\nऑनलाईन अफ़ेअरमुळे वैवाहिक नात्यात वितुष्ट येण्याचा धोका\nऑनलाईन चीटिंगचे परिणाम भयंकर आहेत. घटस्फोट तर होतोच शिवाय मानसिक परिणामही होतात. शिवाय अस्वस्थता , चिंता, डिप्रेशन, तीव्र दुःखांचा आवेग, असोशी, बदल्याची भावना असे परिणाम कमी अधिक प्रमाणात दोघांवरही दिसून […]\nप्रेम वगैरे सर्व खोटे; सर्व काही केमिकल लोचा आहे\nएखादी व्यक्ती आपल्याला प्रिय का वाटते शरीरातील टेस्टोस्टेरॉन होर्मोनचा जास्त स्त्राव एखाद्याकडे आपल्याला आकर्षित करतो वा त्याविषयी आपल्याला जास्त आपलेपणा वाटू लागतो अमेरिकेतील प्रेयरी बोल नामक प्रजातीच्या उंदरावर संशोधन करून […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/technology/mobile-phones/article/redmi-k20-pro-will-be-discontinued-this-month-says-xiomis-lu-weibing/280584", "date_download": "2020-09-26T01:40:53Z", "digest": "sha1:HYRUHXF3H2UWUTLM3PJWHBPJMKYKEKEE", "length": 9045, "nlines": 76, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " शाओमीचा रेडमी K20 Pro बंद होणार, काय आहे कारण...", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nशाओमीचा रेडमी K20 Pro बंद होणार, काय आहे कारण...\nशाओमीचा रेडमी K20 Pro बंद होणार, काय आहे कारण...\nशाओमीचा Redmi K20 Pro या फोनचे उत्पादन बंद केले जाणार असल्याची घोषणा शाओमीचे उपाध्यक्ष आणि रेडमी ब्रॅंडचे जनरल मॅनेजर लू विबिंग यांनी केली आहे. या फोनला लॉन्च करून वर्ष उलटत नाही तोवर कंपनीने हा निर्णय घेतला.\nशाओमीचा रेडमी K20 Pro बंद होणार, काय आहे कारण... |  फोटो सौजन्य: Times of India\nकंपनीने केवळ Redmi K30 फोन लॉन्च केला. कारण Redmi K30 फोन लॉन्च होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.\nशाओमीचा Redmi K20 Pro या फोनचे उत्पादन बंद केले जाणार असल्याची घोषणा शाओमीचे उपाध्यक्ष आणि रेडमी ब्रॅंडचे जनरल मॅनेजर लू विबिंग यांनी केली आहे.\nजगभरात Redmi K20 Proचे ५० लाखांहून अधिक जास्त युनिट उपलब्ध करण्यात आलेले आहेत.\nनवी दिल्ली: शाओमीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये धक्कातंत्र वापरल्याने अनेक जण संभ्रामावस्थेत आहेत. कंपनीने केवळ Redmi K30 फोन लॉन्च केला. कारण Redmi K30 फोन लॉन्च होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र कंपनीने एकच फोन लॉन्च केला. त्यामुळे शाओमीचा Redmi K20 Pro या फोनचे उत्पादन बंद केले जाणार असल्याची घोषणा शाओमीचे उपाध्यक्ष आणि रेडमी ब्रॅंडचे जनरल मॅनेजर लू विबिंग यांनी केली आहे. या फोनला लॉन्च करून वर्ष उलटत नाही तोवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.\nलूविबिंग यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे, जगभरात Redmi K20 Proचे ५० लाखांहून अधिक जास्त युनिट उपलब्ध करण्यात आलेले आहेत. मात्र, फेब्रुवारी २०२०मध्ये या फोनचे उत्पादन बंद करण्यात येणार आहे. रेडमी के२० प्रो ला गेल्या वर्षी मे महिन्यात चीनमध्ये लॉन्च करण्यात आले होते. म्हणजेच फोनला वर्ष पूर्ण होण्यास अजून तीन महिने बाकी आहेत. विशेष म्हणजे लू विबिंग यांनी आपल्या पोस्टमध्ये हे स्पष्ट केले नाही की, रेडमी के२० प्रो हा फोन केवळ चीनमधून हटवण्याचा निर्णय घेतला आहे की भारतातूनही हा फोन बाद करण्यात येणार आहे. यासंबंधी शाओमी इंडियाला विचारले असता शाओमीच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, रेडमी के२० सीरिजचे फोन भारतात सध्या तरी विकले जातील. कारण भारतात रेडमीची नंबर वन सीरिज आहे.\nसॅमसंगच्या या भन्नाट फोनच्या किंमतीत जबरदस्त कपात, स्वस्तात मिळणार हा फोन\nजबरदस्त फीचर असलेला अतिशय स्वस्त स्मार्टफोन, रियलमीचा भन्नाट फोन लाँच\nBSNL च्या 'या' प्लानमध्ये ग्राहकांना मिळणार भरघोस लाभ\nरेडमी के२ प्रो चे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला म्हणजे कंपनी लवकरच रेडमी के३० प्रो लॉन्च करण्याच्या तयारीत आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. एका रिपोर्टनुसार, शाओमी आपला रेडमी के३० प्रो ला मार्च महिन्यात लॉन्च करू शकते. गीकबेंच लिस्टिंगच्या माहितीनुसार, रेडमी के३० प्रो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम असणार आहे. रेडमीच्या या फोनमध्ये चार रियर कॅमेरे असणार असून त्यातील एक ६४ मेगापिक्सलचा Sony IMX686 सेन्सर देण्यात येणार आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nआजचे राशी भविष्य २६ सप्टेंबर\nट्रकमध्ये चढत असताना सहायक पडला खाली आणि चाक.....\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ सप्टेंबर २०२०:\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमबद्दल CM ठाकरेंचे मत\nमारुतीची नवीन कार मिळणार मासिक शुल्कावर, पाहा काय आहे प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-26T02:42:58Z", "digest": "sha1:BVB7BZFVRNE6Y3SSMASTGAHBEX26K4I2", "length": 4789, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खवा - विकिपीडिया", "raw_content": "\nम्हशीचे दूध लोखंडाच्या कढईत गरम करून त्यास सतत ढवळत जातात व आटवितात. सततच्या ढवळण्याने दूध, उष्णतेमुळे जळत नाही. हे घट्ट झालेले दूध म्हणजे खवा.तो साधारण किंचीत पिवळसर पांढरा असतो. यात चरबी(फॅट) चे प्रमाण अत्युच्च असते.या पदार्थाचा वापर साखर व रंग घालून मिठाई करण्यासाठी करतात. साधारणतः १ लिटर चांगल्या दुधाचा १२० ते १३० ग्राम खवा बनतो.काही प्रदेशात याला मावा असेही म्हणतात.खव्यापासून पेढे, गुलाबजाम इ. पदार्थ तयार करतात.\nखव्यापासून तयार केलेले गुलाबजाम\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जुलै २०२० रोजी १९:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.cos.youth4work.com/mr/jobs/work-in-nagpur-for-production-technology/6", "date_download": "2020-09-26T03:17:53Z", "digest": "sha1:YTTQOVTBA52OA6PO2QIAHNGU24WGJ6EI", "length": 7176, "nlines": 176, "source_domain": "www.cos.youth4work.com", "title": "Career opportunities for production technology jobs – Salaries, Educational qualification, Current openings", "raw_content": "\nपोस्ट नोकरी - मोफत\nपोस्ट नोकरी - मोफत\nप्रतिभा मागणी आणि पुरवठा\nजॉब vs जॉब साधक - विश्लेषण\nदुपारी 3 ते 7 वर्षे\nसात वर्षांपेक्षा अधिक वरिष्ठ\nnagpur प्रोफेशनलला production technology घेणार्या कंपन्या\nproduction technology मध्ये कौशल्य-संच युवकांना nagpur\nसर्व कार्यकर्ते नोकरी शोधक आणि स्वतंत्ररित्या त्यांचे स्वतःचे प्रतिभा येथे मिळविलेले आहेत आणि त्यांना थेट भरती करता येते.\nProduction Technologywork नोकरी Nagpur मध्ये साठी कोणत्या शैक्षणिक पात्रतांना प्राधान्य दिले जाते\n साठी नियोक्त्यांद्वारे कोणती कौशल्ये आणि कौशल्ये पसंत केल्या जातात\nProduction Technology नोकरी Nagpur मध्ये साठी कोणती सर्वोत्तम कंपन्या कार्यरत आहेत\nProduction Technology नोकर्या Nagpur मध्ये साठी थेट मोल मिळविण्यासाठी शीर्ष प्रतिभाशाली लोक कोण आहेत\nMS Excel साठी Nagpur मध्ये काम\nHTML5 साठी Nagpur मध्ये नोकरी\nyTests - कौशल्य कसोटी\nपोस्ट नोकरी - मोफत\nyAssess - सानुकूल मूल्यांकन\nआमच्या अनुप्रयोग डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://atmamaharashtra.org/GBFunctions.aspx", "date_download": "2020-09-26T02:22:21Z", "digest": "sha1:OH6FS73XMSGV4VENO6C6V6ZNOJSY73ZG", "length": 4806, "nlines": 51, "source_domain": "atmamaharashtra.org", "title": "Function of GB", "raw_content": "\nजिल्हा नियामक मंडळ जिल्हा नियामक मंडळ कार्य\nआत्मा व्यवस्थापन समिति आत्मा कार्यकारी समिति कार्य\nजिल्हा नियामक मंडळ कार्य\nजिल्हा कृषि संशोधन व विस्तार नियोजन याचा आढावा घेणे व विविध सहभागी घटकांनी सादर केलेल्या वार्षिक कृती आराखड्यास मंजूरी देणे.\nजिल्हयाअंतर्गत विविध सहभागी घटकांनी राबविलेल्या कृषि संशोधन व विस्तार कार्याचा अहवाल व आढावा घेणे व गरजेनुसार त्यांना मार्गदर्शन करणे..\nजिल्हयाअंतर्गत कृषि संशोधन व विस्तार आणि इतर कार्यक्रमांतर्गत निधि स्विकारणे व प्रकल्पानुसार वाटप करणे.\nशेतकरी समूह विकास व शेतकरी गट बांधणीसाठी देणे\nशेतकर्यांना निविष्ठा, तांत्रिक सहाय्य, कृषि प्रक्रिया आणि पणन सेवा देण्यासाठी खाजगी क्षेत्रांना व इतर संघटनांचा जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे\nसिमांत शेतकरी, अनुसूचित जाती व जमाती शेतकरी, महिला शेतकरी यांना कृषि पत पुरवठा दार संस्थांनी जास्तीत जास्त मदत देणे संबंधी प्रोत्साहन देणे\nकृषि सलग्न विभाग, कृषि विज्ञान केंद्र आणि प्रादेशिक संशोधन केंद्र यांनी शेतकरी सल्ला समिति स्थापन करून त्यांचे मूल्यमापन करणे संदर्भात मार्गदर्शन करणे व त्याबाबतचे नियोजन संबधित संशोधन विस्तार कार्यक्रमांतर्गत करणे.\nजिल्हातील कृषि विकासास उत्तेजन देणे व सहाय्य करणे व आवश्यक तेथे योग्य करार करणे.\nआत्मा आणि सहभागी घटकांच्या शाश्वत आर्थिक घडीसाठी उपलब्ध स्त्रोतरांची ओळख करून घेणे\nउपलब्ध मनुष्यबळ व आर्थिक तरतुदीचा योग्य ताळमेळ घालून केंद्र शासनाच्या कृषि व सहकार विभागांतर्गत विविध कार्यक्रम व योजना उपयोगात आणणे.\nआत्मा लेखासंबंधी लेखा परीक्षण करणे\nआत्म्याचे नियम आणि उपनियम स्विकारणे व दुरुस्त करणे\nप्रत्येक तीन महिण्यांनी आत्मा नियामक मंडळ बैठकीचे आयोजन करणे\nजिल्हया मध्ये आत्मा प्रभावशाली अंमलबजावणीसाठी आवश्यक ती कार्यावाही करणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/coronavirus-outbreak-india-cases-and-deaths-11-august-2020-news-and-updates-novel-corona-covid-19-death-toll-india-today-127607620.html", "date_download": "2020-09-26T02:50:54Z", "digest": "sha1:LD2FQBXTC53QM5VBYDKPD2GFWDQXXSLF", "length": 6509, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Coronavirus Outbreak India Cases and Deaths 11 August 2020 News and Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today | बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 16 लाख पार, रिकव्हरी रेट 70% वर पोहोचला; देशात आजपर्यंत 22.93 लाख प्रकरणे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदेशात कोरोना:बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 16 लाख पार, रिकव्हरी रेट 70% वर पोहोचला; देशात आजपर्यंत 22.93 लाख प्रकरणे\nदेशात आतापर्यंत 45 हजार 592 रुग्णांचा बळी\nदेशातील कोरोनाबाधितांचा आकडा 22 लाख 93 हजार 265 झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे यामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मंगळवारी 16 लाख पार झाली. आतापर्यंत 16 लाख 2 हजार 693 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 70% झाला आहे. तर देशात कोरोनामुळे 45 हजार 592 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 6 लाख 44 हजार 265 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nया दरम्यान एम्स नवी दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, जर रशियाने विकसित केलेली लस यशस्वी झाली तर आम्ही त्याची चाचणी करू. लसीपासून कोणता धोका आहे का यासाठी आम्ही गांभीर्याने ही चाचणी करू. जर ही लस सुरक्षित आणि प्रभावी ठरल्यास भारतामध्ये मोठ्या प्रमाणात औषध तयार करण्याची क्षमता आहे. परंतु यापूर्वी या लसीची शास्त्रोक्त पद्धतीने तपासणी केली जाईल.\nमध्यप्रदेश काँग्रेस उपाध्यक्षांचा मृत्यू\nमध्यप्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बृजमोहन परिहार (72) यांचे मंगळवारी सकाळी 4.30 वाजता कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी गुडगावच्या मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बृजमोहन यांनी रक्तदाब आणि साखरेचा आजार होता. ते एक महिन्यापासून आजारी होते. पाच दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते.\nदिल्लीत एक तृतीयांश रुग्ण इतर राज्यातील - सत्येंद्र जैन\nदिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, उपचारासाठी शेजारच्या राज्यातून आलेल्या रुग्णांमुळे दिल्लीतील कोरोना संख्येवर परिणाम झाला आहे. ते म्हणाले की, 'दिल्लीत शेजारील राज्यातील लोक मोठ्या संख्येने चाचणी करण्यासाठी येत आहेत. रुग्णालयात दाखल असलेले एक तृतीयांश रुग्ण बाहेरील राज्यातील आहेत. रविवारी दिल्लीबाहेरील 97 आणि 200 स्थानिक रुग्ण रुग्णालयात दाखल झाले.' दिल्लीत मंगळवारी सकाळपर्यंत 1 लाख 46 हजार 134 रुग्ण आहेत. यातील 1 लाख 31 हजार 657 रुग्ण बरे झाले असून सध्या फक्त 10 हजार 346 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/50792", "date_download": "2020-09-26T03:15:47Z", "digest": "sha1:6WRKJGQKW2HCB7D5ZEM2P3L6A7FFAH5Y", "length": 62238, "nlines": 313, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रोगग्रहणशक्ती आणि समांतर चिकित्सा - १ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रोगग्रहणशक्ती आणि समांतर चिकित्सा - १\nरोगग्रहणशक्ती आणि समांतर चिकित्सा - १\nसामान्यपणे आपण सर्वत्र रोगप्रतिकारशक्ती ही संज्ञा ऐकत असतो. परंतु रोगग्रहणशक्ती ही देखील अशीच एक संज्ञा आहे की जी समांतर थेरपी म्हणजे होमिओपॅथी, अयुर्वेद यांच्याकडून वापरली जाते. परवा तो थंड आणि उष्ण हा विषय आला म्हणून त्यावर विचार करून आणि त्यातल्या तज्ज्ञांशी बोलल्यावर ही संज्ञा माझ्या ध्यानात आली.\nप्रथम आपण रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय ते पाहू -\nआपल्या शरीरात अनेक विजातीय घटत कायम येत असतात. अनेक अनावश्यक गोष्टी चयापचय क्रियांमधून साठत असतात, या विजातीय गोष्टी अनेक प्रकारच्या असू शकतात.. बक्टेरिया, किंवा इतर एकपेशीय जीव, विषद्रव्ये जसे की शिसे वगैरे. अगदी शरीरात विनाकारण साठणारी चरबी देखील याच विजातीय द्रव्यांमध्ये येते. शरीरामध्ये नेहमी ही विजातीय द्रव्ये शोधून बाहेर टाकण्याचे काम चालू असते.\nमोडर्न मेडिसिनच्या दृष्टीने रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे रोगजंतूंसोबत लढण्यची शरीराची शक्ती. एक प्रकारे ते बरोबरच आहे. कारण ते देखील एक विजातीय द्रव्यच आहे, आणि शरीर देखील त्याच्याबरोबर लढाच करत असते. आणि त्यामध्ये शरीरातील अनेक यंत्रणा कार्यरत असतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की रोग होतो एव्हढेच मोडर्न मेडिसीन म्हणते.\nआरोग्याच्या समांतर शाखांचा दृष्टीकोन मात्र थोडा वेगळा आहे. होमिओपॅथी मध्ये रोगग्रहणक्षमता (susceptibility - संवेदनशीलता) अशी एक संज्ञा आहे. माझ्यादृष्टीने त्याची व्याख्या म्हणजे रोग वेळेवर ओळखण्यची क्षमता. आपण लहानपणी शिकलो त्याप्रमाणे आजारांचे २ प्रकार असतात. (मॉडर्न मेडिसीनप्रमाणे)\n१. रोग - जो रोगजंतूंमुळे होतो - उदा. न्युमोनिया, टायफॉईड, इ.\n२. विकार - जे शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे होतात.\nसमांतर शास्त्रांमध्ये सारे रोग हे एकाच कारणामुळे होतात - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे. त्यामुळे उपाय पण त्यावरच केला जातो.\nकमिंग बॅक टू रोगग्रहणशक्ती - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे शरीराची विजातीय द्रव्ये योग्यवेळी शोधून बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते, याचाच परिणाम शरीरात रोग निर्माण होण्यात होतो.\nआयुर्वेद म्हणतो अयोग्य आहार-विहारांमुळे शरीरात दोष वाढीस लागतात. हे वाढलेले दोष बाहेर टाकण्यासाऱही स्थिती जर शरीराकडे नसेल - म्हणजे\n१. अशक्तपणा - पोटात अपचन झालेले अन्न आहे, पण जुलाब करून ते बाहेर टाकण्याची शक्ती शरीराकडे नाही.\n२. आत्यंतिक प्रमाणात बिघडलेले राहणीमान - यांमध्ये पहिले दोष बाहेर काढण्यापूर्वीच नवीन पुन्हा शरीरात तयार होतात - जसे की रोज जागरण करणे - जागरणामुळे शरीरात पित्त निर्माण होते. म्हणजेच विजातीय द्रव्ये. ही द्रव्ये शरीरातून बाहेर टाकण्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा जागरण झाले तर मग शरीरात पुन्हा पित्त निर्माण होईल. मग हे पित्त त्याच जुन्या साठ्यात साठवले जाईल.\nकिंवा ईतरही काही कारणे असतील.\nआता गम्मत अशी आहे की केव्हा ना केव्हा तरी शरीराची म्हणजे त्या दोषाच्या शरीरगत स्थानाची(जसे की पित्ताशय) साठवणक्षमता संपणारच. मग अश्यावेळेस शरीरासमोर २ पर्याय शिल्लक राहतात -\n१- तीव्र शाररीक क्रिया - जसे की उलटी द्वारे हे पित्त बाहेर फेकून देणे\n२. - जर पर्याय १ काही कारणाने शक्य नसेल, काही कारणाने उदा. एखादा माणूस माझ्यासारखा उलटी होऊच देत नाही, तेव्हा मग ते शरीरातच कुठेतरी स्थानबद्ध करणे. (पुन्हा एकदा सांगतो - मी आयुर्वेदाच्या दॄष्टीकोनातून पित्त म्हणतोय. त्यामागे कोणती केमिकल असतात ते मला माहीत नाहीत, पण कोणतीतरी असतात हे नक्की)\nशरीर हा दोष स्थानबद्ध करायला निघाले आहे, याचाच अर्थ माझी या दोषाबद्दलची संवेदशीलता आता कमी होत चालली आहे. आता हे साठवायचे कुठे असा प्रश्न आहे - त्याचे उत्तर शरीराच्या बाबतीत सोपे आहे. असा दोष साठवण्याचे २ निकष आहेत\n१. शरीराच्या त्या भागाची तो दोष साठवण्याची क्षमता असली पाहिजे.\n२. शरीराच्या त्या अवयवाकडे त्या दोषाबद्दल कमी संवेदनशीलता असली पाहिजे - म्हणजे शरीराने पुन्हा सांगेपर्यंत त्या अवयवाने तो दोष बाहेर टाकण्याचा प्रयत्न करता नये.\nयाचे उत्तम उदाहरण म्हणजे पोटावर साठवली जाणारी चरबी.\nपरंतु इथेच तर सारी मेख आहे - कारण शरीराच्या कोणत्याही अवयवाची असा दोष साठवण्याची क्षमता अमर्यादित नसते, केव्हातरी त्या स्थानावरचा घडा भरतोच, आणि मग शरीराचा तो अवयव असहकार पुकारतो. उदा. डोकेदुखी - डोके किंवा त्याचे नियंत्रण करणारे स्थान, जिथे हे पित्त साठलेले आहे, ते शरीराला सांगते की माझी क्षमता संपली. एकतर हे पित्त बाहेर टाका, किंवा दुसरीकडे हलवा. शरीर त्याप्रमाणे काहीतरी कृती करते आणि मग डोकेदुखी थांबते.\nम्हणूनच आयुर्वेदाकडे २ प्रकारच्या चिकित्सा आहेत.\n१ शमन - यामध्ये हा तात्कालिक प्रकारचा दोष शांत केला जातो. काही प्रकारची औषधे घेऊन, जसे की पित्ताची मात्रा, हा दोष तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करून शांत केला जातो.\n२. उत्सर्जनः- यामध्ये असा दोष शरीरातून त्याच्या मूळ स्थानी आणून मग उस्तर्जन केला जातो. उदा - पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे.\nमूलतः या उत्सर्जन चिकित्सेमध्ये औषधोपचारांनी विजातीय द्रव्ये बाहेर टाकली जातात. सामान्यपणे अशी अपेक्षा असते की अश्या प्रकारे शरीरेशुद्धी झाल्यावर शरीराची संवेदनशीलता पुन्हा पूर्ववत होईल आणि त्यामुळे शरीराचे काम सुरळीत चालू लागेल. तसे झाले नाही तर बहुधा पुन्हा पंचकर्म चिकित्सा करतात.\nया सर्व विवेचनामध्ये एक गोष्ट अजून आलेली नाही, ती म्हणजे रोगग्रहणशक्ती - रोगग्रहणशक्तीची माझ्यापुरती व्यख्या अशी, की विजातीय द्रव्य तत्काळ बाहेर टाकण्याच्या शरीरात असलेल्या यंत्रणेत झालेला बिघाड.\nआता आपण रोगजंतुजन्य रोगांकडे येउ -\nप्रत्येक रोगजंतुचे आपले असे स्थान असते, तो रोगजंतु फक्त त्याच अवयवाला संसर्ग करू शकतो. मग होते असे, की जर एखादा दोष जर त्या स्थानात अगोदरच ठाण मांडून बसला असेल, तर त्या रोगजंतुला आयतेच निमंत्रण दिल्यासारखे होते. जसे की घश्याला होणारा संसर्ग - वातपित्तकर खाण्यामुळे जर घसा दूषित झाला असेल, तर त्याला व्हायरल इन्फेक्शनसाठी आयतेच निमंत्रण दिल्यासारखे होते.\nम्हणजे असे बघा, पोटात बाहेरून खाण्यापोटातकोणता तरी जीवाणू आला, जर शरीराची संवेदनशीलता चांगली असेल, तर शरीराला जो जीवाणू लगेच कळेल, आणि तत्काळ शरीर कृती करून तो जीवाणू बाहेर फेकेल. पण तसे जर झाले नाही, शरीराची तेव्हाची संवेदनशीलता जर कमी असेल, तर मग तो जीवाणू शरीरात कुठेतरी स्थानबद्ध केला जाईल. स्थानबद्ध केलेला जीवाणू कालांतराने आपली संख्या वाढवून पुन्हा शरीराला अपायकारक होतोच, आणि त्यावेळी तो जास्त संख्येने असल्यामुळे त्याचा प्रतिकार करणे देखील कठीण जाते. आणि मग अश्या वेळेस शमन चिकित्सा करून तो बरा करावा लागतो.\nजसे की - उदाहरण आपण टायफोईड चे घेउ - टायफोईड हा आतड्यांमध्ये वाढणारा जीवाणू आहे. त्याला वाढीसाठी जडान्न, किंवा पोटात दीर्घकाळ साठून राहिलेले अन्न उपयोगी पडते. जेव्हा टायफोईड्चा जंतू शरीरात प्रवेश करतो तेव्हा हर आपण आपण मिताहारी, आणि हलका, सुपाच्य आहार घेत असू, आणि आपली संवेदनशीलता जागृत असेल, तर त्यावर वेळीच उपाय होईल, आणि त्या जंतूंना वाढीस संधी मिळणार नाही.\nपरंतु तसे जर झाले नाही तर,\nजर त्या जंतूंना बाहेर टाकले गेले नाही, तर मग ते त्यांच्या स्थानात, म्हणजे आतड्यात स्थानबद्ध होतात. पोटात त्या जंतूंना वाढीस अनुकूल स्थिती मिळाली, तर मात्र ते जोमाने वाढीस लागतात. अश्या वेळेस शरीरची स्थिती देखील त्या जंतूंना बाहेर टाकण्याला अनुकूल नसते, त्यामुळे शमन चिकित्सा करावी लागते. (याचे उत्तम उदाहरण म्हणजे टायफॉईड चा उलटणारा ताप. ताप बरा होता होता जर काही कुपथ्य झाले, तर मग टायफॉईड चा दुप्पट जोमाने उलटतो, आणि मग त्याला आवर घालणे कठीण होते. )\nआता आयुर्वेदानुसार याची चिकित्सा कशी होते ते पाहू, शरीरातून रोग बाहेर टाकणे शक्य नाही, म्हणजे मग तो शरीरातच संपवला पाहिजे. तो कसा संपवणार आयुर्वेद म्हणतो, की रोग संपवायचा असेल, तर त्याचे शरीरातील स्थान नष्ट करा, म्हणजे आतडी काढून टाकायची की काय आयुर्वेद म्हणतो, की रोग संपवायचा असेल, तर त्याचे शरीरातील स्थान नष्ट करा, म्हणजे आतडी काढून टाकायची की काय Smile तर तसे नव्हे. शरीरात जे त्रिदोषांच्या असमानतेमुळे रोगाला अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे ते पुन्हा समस्थितीत आणून त्या रोगाचे स्थान उद्वस्त करणे. उदा. टायफॉईडच बघू, त्याचे स्थान आहे आतड्यातले न पचलेले अन्न - या परिस्थितीत खालील उपाय संभवतात -\n१. लंघन - शरीराला कमीत कमी - अगदी गरजेपुरतेच अन्न द्यायचे, ते देखील अतिशय हलके, सुपाच्य. त्यालाच पथ्य म्हणतात. प्रत्येक आजाराप्रमाणे त्याचे पथ्य बदलू शकते.\n२. पाचन - शरीरातील न पचलेले अन्न पचन करून ते बाहेर टाकणे,आणि रोगात निर्माण विजातीय द्रव्यांचे शमन करणे यासाठी वेगवेगळी औषधे, काढे वगैरे दिले जातात.\nया दोन उपायांनी शरीरातील रोगाचे स्थानच उध्वस्त झाल्यावर रोग तिथे फार काळ राहू शकत नाही.\nआयुर्वेदाने तापाची चिकित्सा करण्यासाठी एक सोपा मार्ग सांगितला आहे -\nज्वरादौ लंघनं कार्यम्, ज्वरमध्ये तु पाचनं |\nज्वरान्ते दीपनं प्रोक्तं, ज्वरमुक्ते विरेचनं |\nबहुतांश ज्वर या सूत्राने आटोक्यात येतात. तुम्हाला आठवत असेल, की लहानपणी जर ताप आल, तर तुम्हाला सरळ लंघन घातले जायचे, त्याचे मूळ इथे आहे.\nतर ही झाली संवेदनशीलता, रोगग्रहणशक्ती, आणि,आयुर्वेदाची पद्धती/ तत्वज्ञान..\nपुढील भागात होमिऑपॅथी, आणि योगोपचारांकडे आणि इतर बाजूंकडे एक नजर टाकू.\nडिस्क्लेमर - मी काही वैद्यकीय तज्ज्ञ नाही, पण घरात तसे वातावरण असल्यामुळे थोडाफार अभ्यास आहे, त्यामुळे यात त्रुटी नक्कीच राहू शकतात. जाणकारांनी त्या दूर कराव्यात, अशी त्यांना विनंती.\nमी मॉडर्न सायन्सेसचा प्रतिवाद करण्याऐवजी समांतर चिकित्सापद्धती मांडण्याचा मार्ग स्वीकारला आहे, या चिकित्सापद्धतींच्या विश्वासार्हतेबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, पण या चिकित्सापद्धतींचा आधुनिक शाखांमध्ये संशोधनासाठी विचार होत नाही ही एक खंत आहे.\nचु. भु. दे. घे.\nमॉडर्न शास्रातही ससेप्टिबिलिटी ही संकल्पना आहे.\nलगो तुम्ही शास्त्राचे विद्यार्थी की काय\nरोगग्रहण प्रवणता म्हटले पाहिजे.\n एम बी बी एस\n एम बी बी एस शास्त्रात येतं का ते पहायला हवं\nत्या दोषाच्या शरीरगत स्थानाची(जसे की पित्ताशय) साठवणक्षमता\nपित्ताशयात(गॉल ब्लॅडरमध्ये) जमा होणारे \"पित्त\" हा आपल्या शरीरातला 'दोष' आहे, असे आपले म्हणणे आहे काय\nरच्याकने: माझ्याही दुकानाबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. वरील प्रतिसाद फक्त शंकानिरसनासाठी लिहिलेला आहे.\nमाझ्या मंदबुद्धीला पडतील तशा एकेक शंका हळू हळू विचारीन. जमल्यास निरसन करावे ही नम्र विनंती.\nडाक्टर डाक्टर हा खेळ लहान\nडाक्टर डाक्टर हा खेळ लहान मुलांना फार आवडतो.\nटॉप मार्क्स मिळवून दहा वर्षे घासून जे ज्ञान मिळते, त्यानंतर पेशंटला प्रॉब्लेम आला, तर ज्या डॉक्टरची गच्ची धरायची सिस्टीम आपल्या भारतात आहे, त्याच आपल्या देशात, तुमच्यासारख्या \"थोडाफार अभ्यास\"वाल्यांना कन्झ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट लावण्याआधी, वैदूप्रतिबंधक कायद्याखाली तात्काळ गजाआड करायला हवे, असे माझे स्पष्ट मत आहे.\nलेख पटला. पुण्याचे प्रसिद्ध\nलेख पटला. पुण्याचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य पिलाजी लोखंडे हेच म्हणतात, त्यांच्या लेखाची पुरवणी सुकाळ साप्ताहिकात येते ,मी ती वाचतो, आयुर्वेदात हास्योपचाराचे महत्वही वीदीत केले आहे तर\n\"थोडाफार अभ्यास\" वाले तात्काळ\n\"थोडाफार अभ्यास\" वाले तात्काळ गजाआड झाले की जनतेच्या सगळ्या नाड्या टॉप मार्क्स मिळवून दहा वर्षे घासून ज्ञान मिळवून हातोहात फसवणा-यांच्या हातात\nसगळे तसे नसतात हे मान्य पण आजची परिस्थिती पाहता हे दहा वर्षे घासणारे एकत्र जमून हॉस्पिटले काढतात नि जमून जमून लूटतात)\nशेवटी इज समांतर चिकित्सापद्धती थ्रेट टू अॅलोपथी\n(susceptibility - संवेदनशीलता) हे एक आधुनिक शास्त्रात मान्यता पावलेले तत्व आहे. उदा. दमट खोलीत गेल्यावर ज्या माणसाला दमा आहे त्याला लगेच धाप लागते आणि आपल्या सारक्या माणसाला काही त्रास होत नाही. किंवा आपण पाणी पुरी/ झणझणीत मिसळ खाल्ली तर काही होत नाही पण (अति) संवेदनशील माणसाना ताबडतोब लोटा परेड करावी लागते.( काही उष्ण प्रकृती माणसाना नुसत्या विचारानेच बहिर्दिशेची भावना होते.\n\"समांतर शास्त्रांमध्ये सारे रोग हे एकाच कारणामुळे होतात - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे. \"\nनवजात बालकाला/ जन्म न झालेल्या झालेला कर्करोग हा कोणत्या असंतुलनामुळे होतो आईच्या शरीराचे असंतुलन हा एक साधारण घेतलेला बचाव आहे पण आईला क्षयरोग/ कर्करोग असताना हि मुल उत्तम प्रकृतीचे असते हे कसे\nवैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब.\nआपले शरीर संपूर्णपणे संतुलित असेल तर आपल्याला रोग होणारच नाही असे छातीठोकपणे सांगता येईल काय\nअशा संपूर्णपणे संतुलित माणसाला एच आय व्हीचे विषाणू टोचले तर त्याला कालांतराने एड्स होणारच.\nअगदी निरोगी माणूस असेल तरीही जर मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग झाल्यास त्या माणसाला विषमज्वर(टाय फोईड) होणारच.\nतापात लंघन केल्याने कोणताही फायदा होतो असे आढळलेले नाही.( अजीर्णामुळे ताप आला असेल तर गोष्ट वेगळी) उलट तापामुळे आपल्या शरीरात चयापचय रासायनिक क्रिया वाढल्याने( तापमान वाढले कि रासायनिक क्रिया वेगाने होतात हे अगदी बाळबोध रसायन शास्त्रातील तत्व आहे) आणि आपले शरीर गरम ठेवण्यास लागणारी उर्जा शरीरातून गेल्याने उलट अशक्तपणा येतो आणि अशात लंघन केल्यास अशक्तपणा भरून येण्यास जास्तच वेळ लागतो. माझ्या सारख्या बारीक प्रकृतीच्या माणसाना विचारून पहा लहानपणी तापामुळे अशक्तपणा आणि चक्कर कशी येत असे ते. बरेच लोक आपल्याला हा अनुभव सांगतील.\nपित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे.\nपित्ताशय कोणताही तेलकट पदार्थ खाल्ला कि रिकामे होते. मी सोनोग्राफी मध्ये पित्ताशय काम करते कि नाही हे पाहण्यासाठी रुग्णाला दोन सामोसे किंवा बटाटे वाडे खाऊन येण्यास सांगतो आणि एक तासाने परत सोनोग्राफी केल्यावर पित्ताशय( काम करीत असेल तर)रिकामे झालेले दिसते.\nआपले विवेचन हे फारच जनरलायझेशन आहे.\nवैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब. मी गेली ३१ वर्षे शिकतो आहे अजून पलीकडचा काठहि नजरेस आलेला नाही. तेथवर पोहोचणे याच नव्हे तर पुढच्या सात आयुष्यात सुद्धा शक्य होणार नाही.\nडिविनिता उर्फ .. तुमच्या\nतुमच्या लेव्हलच्या इंटेलिजान्ससाठी असले वैदूच हवेत खरं तर. स्वतःच्या जिवाचीही कदर नसेल, तर ऐश करा इतकेच सांगू शकतो. कीव येते खरच तुमच्यासारख्या अती हुश्शार लोकांच्या 'श्रद्धां'पायी किती लोकांची श्राद्धं घालायची वेळ येते, हे तुम्हाला समजत नाही, यातच सगळे आले.\nअन हो, नेक्स्ट टाईम घरात कुणाला कुठलाही आजार झाला, तर अ‍ॅलोपथी औषध घेताना हा प्रतिसाद आठवा, अन श्रद्धेने 'आल्टरनेटिव्ह' मेडिसिन घ्या.\nवैद्यक शास्त्र इतके साधे आणि\nवैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब. मी गेली ३१ वर्षे शिकतो आहे अजून पलीकडचा काठहि नजरेस आलेला नाही. तेथवर पोहोचणे याच नव्हे तर पुढच्या सात आयुष्यात सुद्धा शक्य होणार नाही.\n-- क्या बात है\nखरेसाहेब, समांतर चिकित्सा (रीड होमीयोपथी, आयुर्वेद) यावर आपली मतं काय आहेत\nआधुनिक वैद्यक शास्त्राचा आजिबात उल्लेख न करता आयुर्वेदावर लिहीलेला लेख वाचायला आवडेल.असा लेख लिहीता येईल याविषयी मला शंका वाटत नाही कारण आयुर्वेद आधीपासून अस्तित्वात आहे. त्यातील संज्ञा, संकल्पना without any reference to modern medicine कोणी तज्ज्ञ लिहू शकेल का\nबाकी डॉक्टर खरे यांच्याशी सहमत Immunology इतका गहन विषय आहे.अजूनही आपल्याला आपली immune system कशी काम करते ते पूर्णपणे उलगडलेले नाही.\nधावणारा धागा झालाय का हा,\nधावणारा धागा झालाय का हा, जुने प्रतिसाद हरवलेत\nआधुनिक वैद्यक शास्त्राचा आजिबात उल्लेख न करता आयुर्वेदावर लिहीलेला लेख वाचायला आवडेल.>> जुन्या मायबोलीवर की नवीन (>> जुन्या मायबोलीवर की नवीन () तोषवीनं असे लेख लिहिलेले आहेत... मुळात तिचा आयुर्वेदावर अब्भ्यास आहे. घरामधेय पसरलेले ज्ञानकिरण शोषून घेऊन लिहिलेले लेख नव्हेत.\nआपण एक एक गोष्टींचा विचार करू\nनवजात बालकाला/ जन्म न झालेल्या झालेला कर्करोग हा कोणत्या असंतुलनामुळे होतो\nमाझ्यामते आयुर्वेदामध्ये गर्भाधान + गर्भसंस्कार हा एक संपूर्ण वेगळा विभाग आहे, त्यामध्ये बहुधा यातल्या बर्‍याच गोष्टी असाव्यात. (म्हणजे बाळाला कर्करोग कश्यामुळे होतो असे नव्हे, पण ढोबळमानाने आईच्या आहारविहाराचा बाळावर काय परिणाम होतो वगैरे. )\nबाकी - माणूस जन्माला येताना संतुलित प्रकृती घेऊन येतो असे आयुर्वेद कधीच म्हणत नाही. तसा आपला समज असल्यास कृपया दूर करावा. किंबहुना आयुर्वेदानुसार गर्भधारणेपूर्वीपासून पती पत्नींनी पाळायचे नियम आहेत, म्हणजेच केवळ स्त्रीच नव्हे, तर उत्तम संतती निर्माण होण्यात पुरूषबीजाचा देखील तेव्हढाच वाटा आहे हे आयुर्वेद मान्य करतो.\nअशा संपूर्णपणे संतुलित माणसाला एच आय व्हीचे विषाणू टोचले तर त्याला कालांतराने एड्स होणारच.\nया गोष्टीबद्दल मी आता भष्य करू इच्छित नाही, कारण त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या एव्हढेच म्हणतो ज्या वानरांपासून एडस संक्रमित झाला आहे त्यांच्यामध्ये या रोगासाठी प्रतिकारशक्ती आहे. (मी माकड आणि माणसांना एका पातळीवर आणत नाहिये, पण प्राणिजगतामध्ये एड्स हा अजेय आहे असे नाही. याविषयी सविस्तर मी शिवांबुबद्दल लिहिताना बोलेन.\nतापात लंघन केल्याने कोणताही फायदा होतो असे आढळलेले नाही.\nयामागची भूमिका कळली नाही - लंघन म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे लंघनामध्ये कडकडीत उपास करावा असे मला तरी कुठे ऐकलेले आठवत नाही. आम्हाला लण्घन म्हणजे कण्हेरी/ भाताची पेज देत असत. त्यामागची भूमिका स्पष्ट आहे - तापामुळे इतर सार्‍या शरीरयंत्रणांबरोबर अग्नी पण मंद झालेला असतो. अश्या वेळी जडान्न घेऊन उगीचच त्यवर्‍ आणखी भार टाकणे म्हणजे इतर आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. त्याऐवजी हलका/ सुपाच्य पण पुरेश्या क्यालरीझ देणारा आहार असावा अशी आयुर्वेदाची भूमिका आहे. अर्थात विषमज्वरासारख्या काही आजारांमध्ये मात्र रुग्णाला केवळ पेय पदार्थांवरच ठेवले जाते बहुधा. पण ते मला नक्की माहीत नाही, त्यामुळे त्यावर मतप्रदर्शन टाळतो.\nआणि महत्वाचे म्हणजे, जर तुम्ही प्रतिजैविके घेत असाल, तर तुम्ही लंघन करणे मुळीच अपेक्षित नाही, कारण (१)जड आहारामुळे जे जीवाणुजन्य रोग होऊ शकतात, ते प्रतिजैविके चालू असताना होउ शकत नाहीत. (२)प्रतिजैविकांमुळे जंतूंबरोबर शरीरातील इतर पेशी देखील मरत असतात. त्यामुळे जर तुम्ही काहीच खाल्ले नाही, तर शरीरावर कल्पनातीत लोड येउ शकतो, त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे काही औषधे अशी देखील आहेत की जी केवळ खाल्यावरच घ्यायची असतात.\nपित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे.\nयाबाबतीत मला पुरेसे ज्ञान नाही, मिपावरील जाणकारांच्या प्रतीक्षेत. कदाचित शारीरशास्त्रातील पित्तशय आणि आयुर्वेदानुसार पित्ताशय या दोन वेगळ्या एंटिटी असतील.\nवैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब.\nयाच्यामागचा हेतू समजू शकलो नाही. तसा सूर माझ्या लेखातून ध्वनित होत असल्यास क्षमस्व. एका लेखात डोक्टर होता येईल एव्हढे वैद्यकशास्त्र नक्कीच सोपे नाही, नाहीतर मी नोकरी सोडून मेडिकल प्रॅक्टिसच नसती का सुरू केली\nया लेखामागचा माझा हेतू मॉडर्न मेडिसीन वगळता इतर समांतर चिकित्सापद्धतींची थोडक्यात तोंडओळख करून देणे, त्यांचे पायाभूत तत्वज्ञान (जसे आणि जेव्हढे मला समजले आहे तसे आणि तेव्हढे) लोकांपर्यंत पोचवणे, आणि या सर्व चिकित्सप्रणालींच्या अभ्यास/ संशोधनासाठी शक्य झाल्यास थोडी उत्सुकता निर्माण करणे इतकाच आहे. कोणाला आयुर्वेद शिकवणे, किंवा माझी जाहिरात करणे हा नाही. (कारण मुळात मी डॉक्टरच नाही, आणि ते मी वर स्पष्ट लिहिले आहे.) त्यामुळे तुमची पर्सनल वाक्ये मला लागू होत नाहीत असे समजतो.\nया चिकित्साप्रणालींच्या विश्वासार्हतेबद्दल माझ्या मनात शंका नाही, कारण मला आजपर्यंत झालेले बहुतांश आजार(काही अपवद वगळता) मी याच औषधांच्या सहाय्याने बरे केलेले आहेत. बाकी या क्षेत्रात असणर्‍या समस्यांविषयी पुढे सविस्तर लिहेनच, त्यामुळे आता इथेच थांबतो.\n@राज साहेब साहेब माझा\nसाहेब माझा स्वतःच्या शास्त्राचा अभ्यासच इतका तोकडा आहे कि मी दुसर्या शास्त्रावर काय मत प्रदर्शन करणार. हे म्हणजे चार ग्रंथ वाचलेला भिक्षुक वेदांतावर प्रवचन करण्यासारखे आहे.\nराहिली गोष्ट इतर शास्त्रांची त्यांनी आपली धुणी धुवावीत. (दुसर्या शास्त्रांवर -आधुनिक वैद्यकावर- टीका करण्यापेक्षा). काही वर्षांपूर्वी होमियोपथिचा अभ्यासक्रम पाहिला त्यात एका विषयात १९ गुण शंभर पैकी आधूनिक वैद्यकशास्त्राच्या दुष्परिणामा (साईड इफेक्ट्स) साठी होते. आता आपण आपल्या औषधाच्या परीणामा बद्दल बोलावे कि दुसर्याची धुणी धुवावीत\nउत्साहाच्या भरात आमच्या प्रणालीने कर्करोग एड्स सुद्धा बरे होतात म्हणून दावे करणारे लोकच त्या शास्त्राचे जास्त नुकसान करतात असे माझे स्पष्ट मत आहे.\nसुबोधसरांशी संपूर्ण सहमत. म्हणूनच मी माझ्या लेखात आधुनिक वैद्यक्शास्त्राबद्दल टीका टाळली आहे. परंतु त्याच वेळेस एखादे शास्त्र एखादे तत्वज्ञान घेऊन येते, आणि त्या शास्त्राला जर परिणाम दिसत असतील, तेव्हा त्या शास्त्राला सरळ नाव ठेवण्याऐवजी त्या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा. समजा अभ्यास करायचा नसेल तर किमान अज्ञेयवाद घ्यावा एव्हढेच माझे म्हणणे आहे.\nबाकी @इब्लिस - मी मला झालेला मलेरिया केवळ होमिओपॅथिक औषधांच्या सहाय्याने बरा केलेला आहे. आणि गेली १० वर्षे मी क्रोसिन/ तत्सम गोळी वगळता कोणतीही अ‍ॅलोपॅथिक गोळी घेतलेली नाही. अपवाद एका तापाचा जेव्हा मला घरातील डॉक्टरपर्यंत पोचणे शक्य नव्हते. कावीळीचा सुरतच्या हॉस्पिटलने मरण्यासाठी घरी पाठवलेला रुग्ण होमिओपथीने बरा झालेला मी पाहिलेला आहे. तस्मात तुम्ही दिलेले आव्हान मी बहुधा पाळू शकेन असे वाटते.\nबाकी तुमच्या आणि इतरांच्या व्यक्तीगत टीका मी दुर्लक्षित करतो.\nकांजी घेणे म्हणजे लंघन\nकांजी घेणे म्हणजे लंघन \nअ‍ॅलोपथीही अशा रुग्णाना सॉफ्ट डाएट देते. अ‍ॅडमिट झालेल्या रुग्णाला आमच्या हॉस्पिटलात आहार तज्ञ आहार ठरवतात. प्रत्येक रुग्णाच्या फाइलवर आहाराची नोंद असतेच.\n@ इब्लिस - तुमच्याशी १०००%\n@ इब्लिस - तुमच्याशी १०००% सहमत.\n@ आनंदा - मॉडर्न मेडीसीन आहार विहाराचे पथ्य सांगत नाही असे तुम्हाला कोणी सांगीतले प्रत्येक आजारात काय खावे, खावू नये, काय करावे किंवा करु नये हे सांगितले जाते.\nमलेरिया बिना औषध बरा होत नाही असे कोणी सांगितले तुमचा बरा झाला त्यात विषेश असे काही नाही. पण होमिओपाथीला मलेरिया का झाला हे सांगता येते का\nही समांतर औषध पद्धती फक्त पोट साफ ठेवण्या पुरती उपयोगी आहे.\n@टोचा हो, तसे तर सारेच रोग\nहो, तसे तर सारेच रोग औषधांशिवाय बरे होतात. फक्त तो होमिओपॅथीचे औषध घेतल्यावर २ तासातच कसा कायमचा गेला हे एक कोडेच आहे नाही का\nआणि काविळीवर आपण मत दिलेले नाही तो देखील असाच आपोआप बरा होणारा आजार आहे का तो देखील असाच आपोआप बरा होणारा आजार आहे का ते देखील पेशंट होस्पिटलने नाकारल्यावर\nमॉडर्न मेडीसीन आहार विहाराचे\nमॉडर्न मेडीसीन आहार विहाराचे पथ्य सांगत नाही असे तुम्हाला कोणी सांगीतले\nअसे मी कधी म्हटले मी हा धागा मॉडर्न मेडिसिनवर टीका करण्यासाठी काढलेलाच नाही. पण उठ सूट कोणीही उठावे आणि समांतर चिकित्सापद्धतींना शिव्या घालाव्या हे मला मान्य नाही. त्यांना सुद्धा काहीतरी तत्वज्ञान आहे, आणि त्याला देखील गुण आहेत, त्याची ओळख (जशी मला आहे तशी) इतरांना करून देणे, आणि शक्य झाल्यास मोडर्न मेडिकल सायंन्सचा अ‍ॅप्रोच वापरून या समांतर पद्ध्द्तींमधून काही फलदायी बाहेर पडत आहे का हे पाहण्यासाठी लोकांना प्रव्रुत्त करणे. कारण माझा यातल्या कोणत्याच क्षेत्रात सखोल अभ्यास नाही, तेव्हा सर्व शाखांचा एकत्रित अभ्यास करणे हे त्या क्षेत्रातील तज्ज्ञच करू शकतात.\nझापडे काढून पहा, कळेल.\nनेहमीची होणारी काविळी ही शरीर\nनेहमीची होणारी काविळी ही शरीर च बरे करते. शरीराला मदत करत रहाणे इतकेच करावे लागते. डॉक्टर लोक जास्त माहीती देवू शकतील.\nतसे तर सारेच रोग औषधांशिवाय बरे होतात. >>>>>> हे चुक आहे. बरेसचे रोग शरीरच बरे करते. सर्व नाही.\nतुम्हाला मलेरियाच झाला होता हे कोणी सांगितले\nझापडे काढून पहा, कळेल<<< आला\nझापडे काढून पहा, कळेल<<< आला आला, बीबी लाईनवर आला.\nआपल्यालाच सर्व काही समजते इतरांनी झापडे लावलेली आहेत. सर्व ज्ञान आपल्याचकडे आहे या नोटवर बीबी आला की आपण अ‍ॅक्ट टूचे पुडे मायक्रोवेवमध्ये ठेवावेत.\nहोमिओपाथीला मलेरिया का झाला\nहोमिओपाथीला मलेरिया का झाला हे सांगता येते का>>> हा फार पुढचा प्रश्न आहे, झाला होता तो मलेरिआच होता हे तरी होमिओपथिने कळते का\nत्या काविळीच्या पेसंटचे क्स\nत्या काविळीच्या पेसंटचे क्स पेपर देता का\nयथावकाश देइन, जर त्या\nयथावकाश देइन, जर त्या पेशंटकडे उपलब्ध असले तर.\nखरेसाहेब, तुमची माॅडेस्टी आवडली, जी हल्ली फार दुर्मीळ झालेली आहे.\nआपल्यालाच सर्व काही समजते\nआपल्यालाच सर्व काही समजते इतरांनी झापडे लावलेली आहेत. सर्व ज्ञान आपल्याचकडे आहे या नोटवर बीबी आला की आपण अ‍ॅक्ट टूचे पुडे मायक्रोवेवमध्ये ठेवावेत.>>>>मी तर कालच ठेवले\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.diliptiwari.com/2017/07/blog-post_11.html", "date_download": "2020-09-26T01:47:32Z", "digest": "sha1:77MMC7DC2PN6N4TJGPVADOHEQ4MRUWLE", "length": 18984, "nlines": 314, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: शिवसेनेतील डबल बडवे !", "raw_content": "\nशिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे हे आज (दि. १२ जुलै) खान्देशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना काही गोष्टी कळाव्यात म्हणून हा विशेष ब्लॉग लिहीला आहे. साधारणतः महिनाभरापूर्वी धुळ्यात कार्यकर्त्यांसमोर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, आगामी विधानसभा निवडणुकीत खान्देशातून शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येतील आणि उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होतील. अर्थात, राऊत यांचे असे अनेक राजकिय अंदाज चुकतात. राऊत बोलघेवडे म्हणून प्रसिद्ध आहेत. ते स्वतः कोणतीही सार्वत्रिक निवडणूक लढवून विजयी झालेले नाहीत. नियुक्तीच्या मार्गाने राज्यसभेत पोहचणाऱ्या व्यक्तीला निवडणूक जिंकायला काय करावे लागते हे कसे समजणार असो, मात्र उद्धव ठाकरे यांचा हा दौरा मुख्यमंत्री होण्यासाठीची पाया भरणी असेल तर आज त्यांनी शिवसेनेतील डबल बडवे (दोन्ही बाजुने बडवणारे या अर्थाने) ही टीका समजून घ्यावी.\nनिवडणुका जिंकायच्या असतील तर विरोधकांशी साठेलोटे करुन स्वार्थ कसा साधायचा आणि पद कसे पदरात पाडायचे हे जळगाव जिल्ह्यातील संधी साधू शिवसेना नेत्यांकडून शिकायला हवे. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शिवसेनेशी युती मोडली. ही युती मोडल्याचे जाहीर वक्तव्य भाजप नेत्यांनी केले. त्यानंतर स्वतः उध्दव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यात निवडणूक प्रचाराची जाहीर सभा घेवून युती मोडल्याचे श्रेय घेणाऱ्यांवर वाईट भाषेत टीका केली. भाजपच्या विरोधात शिवसनेनेचे एवढे फाटले की, नंतर व आजही सत्तेत भागिदार असलेली शिवसेना भाजपला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही.\nविधानसभा निवडणुकीनंतर जळगाव जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या. जिल्हा बँक व जिल्हा दूध संघात संचालकपदे मिळविण्यासाठी शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांनी भाजपच्या नेत्यांसोबत हात मिळवणी केली. याला गोंडस नाव सर्व पक्षीय पॅनेल असे होते. हे पॅनेल तयार करताना शिवसेनेतील नकोशा व अडचणीच्या नेत्यांना खड्यांसारखे वगळले. सहकारातील सत्तेची ऊब शिवसेना आमदारांना व इतरांना मिळाली. शिवसेनेचा अवमान व उध्दव ठाकरेंना असलेली विरोधाची खाज ही मंडळी विसरली. चौकशीच्या अनेक फाईल टेबलाखाली असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुने बडवे निवडणुकीतच उतरले नाहीत.\nशिवसेनेत सत्ता आणि पदांची ऊब मिळावी म्हणून अशा प्रकारे डबल ढोल बडवणारे आहेत. जळगाव जिल्हा बँक ही कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थींची यादी जाहीर करीत नाही म्हणून बँकेचे उपाध्यक्ष व आमदार किशोर पाटील यांनी बँकेसमोर ढोल बडवला. बँकेचा उपाध्यक्ष स्वतःच्या नेतृत्वातील संस्थेसमोर अशी बडवेगिरी का करीत आहे बँकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरायचे सोडून हे नेते ढोल बडवताय, कोणाला दाखवायला बँकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरायचे सोडून हे नेते ढोल बडवताय, कोणाला दाखवायला या प्रश्नांची उत्तरे आज उद्धव ठाकरे यांनी खासगीत संबंधितांना विचारावीत. पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर लोटांगण घालायचा नवा पायंडा जळगाव मनपासह आता जिल्हा बँकेतही सुरु होतोय असे दिसते. लढवय्या शिवसेनेच्या उपाध्यक्षाने ढोल बडवायचा की शेतकऱ्यांनी यादी न देणाऱ्या बँक प्रशासनाला बडवायचे या प्रश्नांची उत्तरे आज उद्धव ठाकरे यांनी खासगीत संबंधितांना विचारावीत. पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर लोटांगण घालायचा नवा पायंडा जळगाव मनपासह आता जिल्हा बँकेतही सुरु होतोय असे दिसते. लढवय्या शिवसेनेच्या उपाध्यक्षाने ढोल बडवायचा की शेतकऱ्यांनी यादी न देणाऱ्या बँक प्रशासनाला बडवायचे आणि शेवटी गंमत काय तर त्याच प्रशासनाला नंतर निवेदन दिले.\nजिल्हा बँकेने मुक्ताई खासगी साखर कारखान्यास ५१ कोटी रुपयांचे कर्ज दिले. या विषयावर बँकेचे संचालक व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे टीका केली. त्यावेळी बँकेचे उपाध्यक्ष व आमदार किशोर पाटील हे कारखान्याच्या बचावाला समोर आले. कर्ज देण्याचा निर्णय योग्य आहे असे नियमांवर बोट ठेवून ते सांगत होते. उपाध्यक्ष पाटील तेव्हा शेतकऱ्यांच्या बाजुने होते की एका कारखान्याच्या बाजुने राज्यमंत्री पाटील हे शिवसेनेचे व किशोर पाटीलही शिवसेनेचे. दोघांच्या ढोलचा ताल एकच हवा होता. पण तसे झाले नाही व कधीही होत नाही.\nजिल्हा बँक निवडणुकीत सर्व पक्षीय पॅनेल तयार करताना गुलाबराव पाटील यांना खड्यासारखे बाजुला केले होते. गुलाबराव पाटील यांच्या आक्रमक टीकेचा रोख नेहमी जिल्हा बँकेवर असतो. शेतकरी कर्ज पुनर्गठणाचा विषय गुलाबराव पाटील सातत्याने मांडत आहेत. जिल्हा बँक खासगी साखर कारखान्याला ५१ कोटी रुपये कर्ज का देते हा मुद्दा मंत्रीद्वयी महाजन-पाटील विचारत असताना बँकेचे उपाध्यक्ष किशोर पाटील हे शेतकरी हिताची चर्चा करीत होते. पण, कर्जमाफी जाहीर होवून पात्र लाभार्थींची यादी बँक देत नाही म्हणून त्यांनी बँक विरोधात ढोल वाजवला. कोणाच्या सांगण्यावर किशोर पाटील असा ताल धरत असावेत हा मुद्दा मंत्रीद्वयी महाजन-पाटील विचारत असताना बँकेचे उपाध्यक्ष किशोर पाटील हे शेतकरी हिताची चर्चा करीत होते. पण, कर्जमाफी जाहीर होवून पात्र लाभार्थींची यादी बँक देत नाही म्हणून त्यांनी बँक विरोधात ढोल वाजवला. कोणाच्या सांगण्यावर किशोर पाटील असा ताल धरत असावेत उध्दवांच्या आदेशावरुन की ज्यांनी उपाध्यक्ष होण्याची मेहरबानी केली त्यांच्या संमतीने \nशिवसेनेत असून मात्र भाजपच्या मोहरबानीने सहकारातील सत्तेची डबल ऊब घेणारे भरपूर नेते आहेत. आमदारकी गेली तरी पोराला जिल्हा बँकेत आणणारे आहेत. सहकारात कधी प्रवेश मिळेल की नाही या शंकेत असलेले काही आमदार आहेत. अशा मंडळींच्या भरवशावर खान्देशात शिवसेनेची भगवी लाट येईल आणि उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होतील हे राऊत यांचे स्वप्न दिवास्वप्नच ठरण्याची शक्यता आहे.\nजिल्हा बँकेने साखर कारखान्याला कर्ज देताना नियम पाळले, तशी तरतुद घटनेत आहे वगैरे खुलासा पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी केला. तो बँकेच्या नियमानुसार योग्यच व पटणारा आहे. भाजपच्या नेत्यांची भूमिका त्यांच्या ठायी योग्य आहे. पण एक प्रश्न शिल्लक राहतोच. तो म्हणजे, बँकांच्या नियमांची पोट दुरुस्ती नेमकी कोणासाठी केली जाते अशा पोटनियम दुरुस्तीतून दिलेले कर्ज वसुल का होत नाही अशा पोटनियम दुरुस्तीतून दिलेले कर्ज वसुल का होत नाही त्या विषयी शंका का निर्माण होते \nजिल्हा बँकेत स्व. प्रल्हादराव पाटील अध्यक्ष असताना शेतकऱ्यांची जिल्हा बँक शिक्षण संस्थेला कर्ज देत होती. ते कर्ज वसुल करायला काय-काय घडले हे शेतकरी सभासदांना माहित आहे. नंतर सुरेशदादा जैन बँकेचे अध्यक्ष झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या बँकेचा पैसा कर्ज रुपात जळगाव नपाला दिला. या कर्ज वसुलीची अवस्था जगजाहीर आहे. आता जिल्हा बँक भाजप नेत्यांच्या ताब्यात आहे. खासगी साखर कारखान्यास दिलेल्या कर्जाचा मुद्दा समोर आहे.\nअशावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी कोणत्या बाजुने ढोल बडवायचे याचा गंभीरपणे विचार करायला हवा. जळगाव जिल्हा परिषदेत गेल्यावेळी युती असतानाही भाजपने शिवसनेनेला जी वागणूक दिली ती सुद्धा एकदा आठवावी. आता सहकारातील सत्ता हवी की उध्दवांना मुख्यमंत्री करुन राज्यात सत्ता हवी हे संधीसाधुंनी ठरवावे.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esuper9.com/2020/03/coronavirus-Facebook-giving-Bonuses-and-extra-funds-for-home-based-employees.html", "date_download": "2020-09-26T01:49:03Z", "digest": "sha1:C2O2VVDILXFHDS7P6DKD3QPFJ33R4SYN", "length": 13894, "nlines": 103, "source_domain": "www.esuper9.com", "title": "Coronavirus: फेसबुक देणार घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि अतिरिक्त निधी - esuper9", "raw_content": "\nHome > Corona > Coronavirus: फेसबुक देणार घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि अतिरिक्त निधी\nCoronavirus: फेसबुक देणार घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि अतिरिक्त निधी\nCoronavirus: फेसबुक देणार घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि अतिरिक्त निधी\nकरोना विषाणूचा जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये फैलाव झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरु काम करण्याची मुभा दिली आहे. इतकचं नाही तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिला देणारे अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. फेसबुकचा संस्थापक मार्क झकेरबर्ग याने फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्याचा बोनस आणि अतिरिक्त एक हजार डॉलर देण्याची घोषणा केली आहे.\nफेसबुकमध्ये पूर्णवेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ४५ हजार इतकी आहे. या कर्मचाऱ्यांना सहामाही बोनस देण्यात येणार असल्याचे मार्कने बुधवारी जाहीर केलं. तसेच घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत म्हणून आर्थिक मदत म्हणून एक हजार डॉलर (जवळजवळ ७० हजार रुपये) अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे. सामान्यपणे फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार २०१८ साली दोन लाख २८ हजार ६५१ डॉलर इतका होता. भारतीय चलनामध्ये हा पगार एक कोटी ७० लाखांच्या घरात जातो.\nएकीकडे पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त निधी देण्यात येत आहे तर दुसरीकडे कॉनट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही फेसबुकने विचार केला आहे. कॉनट्रॅक्टवर काम करणाऱ्यांना अतिरिक्त निधी मिळणार नसला तरी त्यांना संपूर्ण पगार देण्यात येणार आहे. कॉनट्रॅक्टवरील कर्मचाऱ्यांनी करोनामुळे घरुन काम केलं नाही तरी त्यांना त्यांचा पूर्ण पगार देण्यात येईल, असं ‘द इनफॉर्मेशन’ने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.\nकंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये मार्क म्हणतो, “आम्हाला कल्पना आहे की अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांची आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. तसेच घरुन काम करताना तुम्हाला काही गोष्टी घ्याव्या लागणार असल्याने त्याचाही खर्च तुम्हाला करावा लागेल याचा आम्हाला अंदाज आहे. त्यामुळेच आम्ही तुम्हा सर्वांना प्रत्येकी एक हजार डॉलरचा अतिरिक्त निधी देत आहोत.”\nजगभरातील एक लाख ९७ हजार जणांना करोनाची लागण झाली असून मरण पावलेल्यांची संख्या सात हजारच्या वर पोहचली आहे. अमेरिकेमध्येही करोनाचा फैलाव झाला आहे. फेसबुकने सर्व कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचे आदेश दिले असून आठवडाभरापासून कंपनीमधील बहुतांश कर्मचारी घरुनच काम करत आहेत.\nकरोनामुळे मोठा फटका बसलेल्या लहान कंपन्यांसाठी फेसबुक १०० मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा कंपनीच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी शेर्ली सॅण्डबर्ग्स यांनी केली आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/international/foreign-hands-in-beirut-blast-26564/", "date_download": "2020-09-26T01:46:12Z", "digest": "sha1:AVSW5E7UJS5LE4CIVLHZMHWEFAW4SBZR", "length": 27621, "nlines": 243, "source_domain": "dainikekmat.com", "title": "बैरूत स्फोटात परकीय हात?", "raw_content": "\nHome आंतरराष्ट्रीय बैरूत स्फोटात परकीय हात\nबैरूत स्फोटात परकीय हात\nबैरूत : लेबनॉनची राजधानी बैरूतमधील बंदरात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या वाढली आहे. स्फोटामुळे बंदर आणि परिसरातील इमारती उद्धवस्त झाल्या आहेत. मातीच्या ढिगाºयातून अनेकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतांची संख्या १५४ वर पोहचली आहे. तर, दुसरीकडे लेबनॉनच्या राष्ट्रपतींनी या स्फोटामागे परकिय शक्तींचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तर, संयुक्त राष्ट्रानेदेखील या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.\nलेबनॉनचे राष्ट्रपती मायकेल आउन यांनी म्हटले की, स्फोटाच्या घटनेची चौकशी सुरू आहे. मात्र, अद्यापही याबाबतचे ठोस कारण समजू शकले नाही. या स्फोटामागे रॉकेट हल्ला, बॉम्बस्फोटासह देशाबाहेरील काही शंिक्तचा हात आहे का, याचीही चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर, दुसरीकडे देशात सरकार तीव्र विरोधालाही सामोरे जावे लागत आहे. बैरूत स्फोटाची घटना ही अक्षम्य दुर्लक्ष आणि भ्रष्टाचारामुळे घडली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे स्थानिक जनतेत मोठा रोष निर्माण झाला आहे.\nसंयुक्त राष्ट्र संघाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्तालयाचे प्रवक्ते रुपर्ट कॉलविले यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला लेबनॉनच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. लेबनॉनवर सामाजिक-आर्थिक संकट, कोविड-१९ आणि अमोनियम नायट्रेटच्या स्फोटामुळे मोठे संकट ओढावले आहे.\nRead More बैरूत स्फोट; मृतांची संख्या १३५\nPrevious articleकोरोनाचा नववा बळी\nNext articleसॅनिटायझरमधील मिथेनॉलचा जिवास धोका\nONGC प्लान्टमधील सलग 3 स्फोटांनी सूरत हादरले; खिडक्यांच्या काचाही फुटल्या\nसूरत : गुजरातच्या सूरतमधील तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन (ONGC) मध्ये बुधवारीरात्री उशिरा अचानक आग लागली. इथे एका पाठोपाठ एक 3 भीषण स्फोट झाले....\nभारत मदतीसाठी धावला : हवाई दलाच्या विमानाने बैरुतला पाठवली मदत\nनवी दिल्ली : लेबनानची राजधानी बैरुत येथे काही दिवसांपुर्वी हजारो टन अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला होता. या स्फोटात संपुर्ण शहर बेचिराख झाला होता. शेकडो...\nपंढरपूर शहरात गॅस टाकीचा स्फोट\nपंढरपूर : दोन गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन एक दुचाकी जळून खाक झाल्याची ही घटना पंढरपूर शहरात घडलेली आहे. महात्मा फुले पुतळा परीसर या अत्यंत...\nरुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...\nजपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...\nदेशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न\nएच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...\nदस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज\nसरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...\nकेंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी\nव्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...\nईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी\nनवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...\nपंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन\nपंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...\nकेंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला\nनवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...\n८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात\nनवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...\nढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’\nमुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...\nरुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...\nजपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...\nदेशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न\nएच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...\nदस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज\nसरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...\nकेंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी\nव्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...\nईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी\nनवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...\nपंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन\nपंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...\nकेंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला\nनवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...\n८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात\nनवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...\nढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’\nमुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nसोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nलातूर एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nलातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 17, 2020 0\nअमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nलातूर एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nपानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 17, 2020 0\nसोलापुर : मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nमनोरंजन एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nसांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://letstalksexuality.com/tag/patriarchy/page/2/", "date_download": "2020-09-26T01:23:41Z", "digest": "sha1:IOAE3ACJ2OL6ZQQGGND76VSI2R5YKY32", "length": 11211, "nlines": 151, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "patriarchy – Page 2 – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nप्रेम करण्यासाठी डोळे नाही स्पर्शच महत्त्वाचा असतो\nपीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी\nप्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २\nलैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार\nलॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……\nपुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट\nजननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १\n‘दंगल’ची उडी उंच पण सुवर्ण पदक दूरच…\nनाट्य आणि वास्तव यांतील उत्तमाचा वेध घेऊ इच्छिणारा दंगल चित्रपट शेवटी अधांतरी लोंबकळत राहतो - तनूल ठाकूर. द वायर मधून साभार... बॉलीवूड चित्रपटांच्या सुरुवातीला येणाऱ्या नामावलीवर नजर टाकली असता, बरं वाटण्याचे प्रसंग क्वचितच येतात. दंगल…\nपुरुषाची मानसिक कोंडी कशी फुटेल \nउल्हासनगर येथे शाळेत शिकणाऱ्या रिंकू पाटीलने लग्नास नकार दिल्यामुळे भर वर्गात हरेश पटेलने तिला जिवंत जाळले. दुसऱ्या दिवशी रेल्वे ट्रॅकपुढे जाऊन त्याने जीव दिला. आय.आय.टी., मुंबई येथे केमिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या…\nपुरुषी मानसिकता आणि बलात्कार_गौरी सुनंदा\nलैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. दररोज किमान एकदातरी आपण बलात्काराच्या घटनेबद्दल ऐकत असतो. दिल्लीच्या निर्भया बलात्काराच्या घटनेनंतर देशभर वादळ उठले. देशभरातून मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवला गेला. मात्र…\nमी काय काम करतो हे मी माझ्या बायकोलाही नाही सांगू शकलो…\nमाझ्या पुरुष मित्रांनो, नमस्कार.. आपला समाज पुरुषप्रधान आहे हे वाक्य आपण खूपदा वाचलं आहे, ऐकलं आहे. पुरुषप्रधान समाजात स्त्रियांचं स्थान दुय्यम असतं तर पुरुष वरचढ ठरतात हे ही आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनुभवतो. पण हीच पितृसत्ता…\nया भावांचं काय करायचं\nस्वतःच्या मर्जीने जातीबाहेर लग्न केलं म्हणून आपल्या सख्ख्या बहिणीला ठार मारणाऱ्या या अगदी तरुण वयातल्या भावांचं काय करायचं अजून किती बहिणींचे जीव जाणार अजून किती बहिणींचे जीव जाणार कधी फॅशनेबल राहते म्हणून, कधी दुसऱ्या जातीतल्या मुलावर प्रेम केलं म्हणून तर कधी सज्ञान…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nमदनमणी,योनीभगोष्ट आणि मदनबिंदू म्हणजे काय ते योनीत कुठे असतात\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nअविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/india-news/case-against-bhim-army-founder-chandrashekhar-azad-in-meerut/articleshow/68552337.cms", "date_download": "2020-09-26T02:37:23Z", "digest": "sha1:KWVNOMYRKWOY2QQFGM7HJ73SXV2PMGIS", "length": 10414, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "चंद्रशेखर आझाद: भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझादविरोधात एफआयआर\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभीम आर्मीच्या चंद्रशेखर आझादविरोधात FIR\nभीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांच्याविरोधात मेरठ पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. चंद्रशेखर यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. चंद्रशेखर यांच्यासह इतर अज्ञात व्यक्तींचीही एफआयआरमध्ये नावं आहेत.\nभीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांच्याविरोधात मेरठ पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. चंद्रशेखर यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. चंद्रशेखर यांच्यासह इतर अज्ञात व्यक्तींचीही एफआयआरमध्ये नावं आहेत.\nपरवानगीशिवाय सभा घेतल्याने आचारसंहिता उल्लंघनाचा आरोप करत पोलिसांनी चंद्रशेखर आझादविरोधात एफआयआर दाखल केली आहे. चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या साथिदारांविरोधात कलम १८८, १७१ सह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nसंरक्षणमंत्र्यांच्या इराण दौऱ्यानंतर गाडी पुन्हा रुळावर...\nCongress 9th list : काँग्रेसचे आणखी ४ उमेदवार जाहीर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\n राज्यात रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा; करोनामृत्यूचे तांडव सुरूच\nदेश'चीन, पाकला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद भारतीय हवाई दलात'\nमुंबईकंगना प्रकरण: हायकोर्टाने BMC कडे मागितले 'या' तीन मुद्द्यांचे स्पष्टीकरण\nकोल्हापूरसंभाजीराजेंनी वेळीच ओळखली चाल; 'असा' उधळला डाव\nमुंबईअनलॉकसाठी आहे 'ही' त्रिसुत्री; CM ठाकरेंनी सांगितले पुढचे धोके\nनागपूरविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोटींचा, प्रस्ताव पाठवला\nमुंबईकरोना: रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यापूर्वी कुटुंबीयांची संमती बंधनकारक\nकोल्हापूरकरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ऑडिट होणार, २२ पथकं तैनात\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/2014/09/29/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-2/", "date_download": "2020-09-26T03:29:10Z", "digest": "sha1:PHIFJHQ234MFJI54TPXEEPY7DHZLHJJO", "length": 5212, "nlines": 88, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "प्रेम मला कधी कळलचं नाही .. !!", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nप्रेम मला कधी कळलचं नाही .. \nप्रेम मला कधी कळलचं नाही. असं होत ना कधी कधी प्रेम अगदी जवळ असत आपल्या पण ते लक्षातचं येत नाही. त्या मनाचा त्या नाजुक भावनेचा कधी शोधच लागत नाही . असं होत ना कधी कधी जणु वाटते ..\n“प्रेम मला कधी कळलचं नाही\nबागेतल्या फुलांकडे कधी वळलच नाही\nमनातल्या कोपर्‍यात कधी कोण दिसलच नाही\nम्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही. .\nतिचं हसणं कधी पाहिलंच नाही\nत्याच रहस्य कधी जाणलंच नाही\nम्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही\nतिचा सहवास कधी जाणलाच नाही\nतिच बोलणं कधी ऐकलच नाही\nम्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही. .\nतिच लाजणं कधी उमगलंच नाही\nमाझी काळजी करणं समजलंच नाही\nम्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही\nतिच्या अश्रूचा अर्थ समजलोच नाही\nव्यक्त केलेलं प्रेम विसरु शकत नाही\nमनातुन तिचा चेहरा हटतच नाही\nम्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही \nOne thought to “प्रेम मला कधी कळलचं नाही .. \nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%86%E0%A4%9C%C2%A0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%C2%A0144-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%C2%A0%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8%C2%A0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE,-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B2%E0%A5%87---%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%89/xaf8XD.html", "date_download": "2020-09-26T01:29:12Z", "digest": "sha1:FBJYAJKWAQJKEBOBOAAVKULBQDCODPWR", "length": 13965, "nlines": 51, "source_domain": "rajsatya.page", "title": "आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nआज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nMarch 22, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nआज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nजीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा\nशासकीय कार्यालयात 5 टक्के कर्मचारी, बँका, वित्तीय संस्था सुरु\nमुंबई : कोरोनाशी मुकाबला करतांना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात पसरण्याच्या आत रोखणे महत्वाचे आहे, सर्वात कठीण काळ आता सुरु झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात 144 कलम लावण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधून केलेल्या लाईव्ह प्रसारणात केली. मात्र यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता निश्चय, संयमाने शासनाच्या बरोबरीने याचा मुकाबला करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.\nरेल्वे मंत्रालयाने आज देशभरातील रेल्वे व उपनगरीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांतून लगेचच राज्यातील जनतेशी संवाद साधला व राज्य शासन पुढील परिस्थिती हाताळण्यास खंबीर आहे, याची ग्वाही दिली.\nअत्यावश्यक सेवेसाठीच बसेसचा वापर\nराज्यात 144 कलम लागू करण्यात येत आहे. रेल्वे , खाजगी आणि एस. टी. बसेस बंद करण्यात येत आहेत, लोकल सेवाही बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना प्रवास करता यावा म्हणून शहरांतर्गत बस सेवा सध्या सुरु राहील. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, औषधी, वीजपुरवठा करणारी केंद्रे सुरुच राहतील, हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, वित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि बँकासारख्या संस्थाही सुरुच राहतील. तसेच शासकीय कार्यालयात आता 25 टक्के उपस्थिती होती. ती आता केवळ 5 टक्के करण्यात येत आहे.\nजीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा\nजीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे, त्याची अजिबात कमतरता नाही. तसेच ही दुकाने किंवा या सेवा बंद राहणार नाहीत. त्यामुळे त्याचा साठा करून ठेऊ नका. अजिबात घाबरून जाऊ नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले. संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर आहे. निश्चय, संयम, जिद्द आणि स्वयंशिस्त या माध्यमातून आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू, असा विश्वास व्यक्त करतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा मनापासून सहकार्य करण्याचे, शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे.\nरोगाचा गुणाकार होऊ देऊ नका\nमुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोरोना विषाणुमुळे आपण शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्यातरी सर्वांच्या परीक्षेचा कठीण काळ आता सुरु झाला आहे. सर्वांनी स्वंयशिस्तीने, सांगितलेले स्वच्छतेचे आणि इतर नियम पाळून वागण्याची नितांत गरज आहे. आतापर्यंत आपण सर्वांनी सहकार्य केले आहे, यापुढे ही ते कायम राहू द्या, असेही ते म्हणाले. यातूनच या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे, त्याचा फैलाव रोखणे शक्य आहे. या प्रादुर्भावाचा गुणाकार आपल्याला समाजात होऊ द्यायचा नाही, तर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून याची वजाबाकी करून त्याला हद्दपार करायचे आहे, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सर्वप्रथम आपल्याला या संकटावर मात करायची आहे. आज जनता कर्फ्यू आहे म्हणून बाहेर पडायचे नाही आणि उद्या कसेही वागायला, फिरायला मोकळे असा त्याचा अर्थ होत नाही. आपण अतिशय संवेदनशील स्थितीमध्ये पोहोचलो आहोत. गेल्या दोन दिवसात राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतांना दिसते आहे. ही संख्या कमी नाही, तर थांबवायची असेल तर आपल्याला गर्दीत जाणे टाळणे, गर्दी न करणे, घराच्या बाहेर आवश्यकता नसेल तर बाहेर न पडणे यासारख्या गोष्टी करणे अत्यावश्यक आहे.\nघराल्या क्वारंटाईन व्यक्तींनी बाहेर फिरू नये\nआजपर्यंत महाराष्ट्रात परदेशातून नागरिक, आपले कुटुंबिय आले आहेत. आता विमानसेवा बंद केल्याने परदेशातून आता कुणी आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे आपल्याला संकटावर मात करण्याची, प्रादुर्भावाची ही साखळी तोडण्याची चांगली संधी आहे. विलगीकरण कक्षात असलेल्या नातेवाईकांची काळजी करण्याची गरज नाही, त्यांची काळजी शासन आणि महापालिका घेत आहे. परंतू परदेशातून ज्या व्यक्तींना घरात क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे, त्यांनी घरात स्वत:ला क्वारंटाईन करून घेणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबियांपासूनही स्वत:ला दूर करण्याची गरज आहे. त्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत. त्यांनी बाहेर समाजात किंवा घरातल्या लोकांमध्ये मिसळून प्रादुर्भाव वाढवू नये. किमान 15 दिवस बाहेर जाऊ नये, आपल्या प्रिय व्यक्तींपासून ही दूर रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.\nज्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, त्यांनी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना भेटावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.यंत्रणेत काम करणारी ही माणसेच आहेत, याची जाणीव करून देतांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेवरचा ताण न वाढवण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. ही शांतता आणि संयम आपल्याला 31 तारखेपर्यंत ठेवायची आहे, असेही त्यांनी सांगितले.\nविषाणू जातपात पाहत नाही\nआपण मंदिरे, धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे बंद केली. कारण हा विषाणू कोणत्याही प्रकारे जातपात, धर्म पहात नाही. कोणताही देश या संकटातून सुटला नाही. म्हणूनच आपण अनेक खाजगी कार्यालये, आस्थापना यांना कामगारांची, कर्मचाऱ्यांची उप‍स्थितीची संख्या कमी करायला सांगितली. वर्क फ्रॉम होम असे सांगितले, पण हाच कर्मचारी आणि कामगारवर्ग आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्यांना जपा, माणुसकी सोडू नका आणि त्यांचे किमान वेतन बंद करू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3...%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1,%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A8-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2,%E0%A5%AC%E0%A5%AE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0,-ICU-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A3-%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AF-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8/pTxh7r.html", "date_download": "2020-09-26T02:12:14Z", "digest": "sha1:WZREJ2KVK7BKYUG6IAWIHRTBX4IHQVPY", "length": 5328, "nlines": 37, "source_domain": "rajsatya.page", "title": "कराड शहरातील वैद्यकीय सुविधा परिपूर्ण...१०० बेड,११२ हॉस्पिटल,६८ व्हेंटिलेटर, ICU ची एकूण १६९ बेडची सुविधा - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nकराड शहरातील वैद्यकीय सुविधा परिपूर्ण...१०० बेड,११२ हॉस्पिटल,६८ व्हेंटिलेटर, ICU ची एकूण १६९ बेडची सुविधा\nMarch 23, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nकराड शहरातील वैद्यकीय सुविधा परिपूर्ण...१०० बेड,११२ हॉस्पिटल,६८ व्हेंटिलेटर, ICU ची एकूण १६९ बेडची सुविधा\nकराड - कराड शहरात असलेले सुसज्ज सौ.वेणूताई उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडची उपलब्धता असून डॉक्टर्स आणि स्टाफ यांची संख्या पूरक आहे. कोरोना संसर्गजन्य रुग्णांकरिता खास ८ बेडचा विशेष कक्ष केलेला आहे. तसेच ज्या हॉस्पिटलमध्ये पेशंट अॅडमिट करायची व्यवस्था आहे. असे ११२ खाजगी हॉस्पिटल आहेत. त्यापैकी १० हॉस्पिटलमध्ये ICU ची एकूण १६९ बेडची सुविधा आहे आणि महत्वाचे म्हणजे कराडमध्ये फक्त ६८ व्हेंटिलेटर सुविधा आहे अशी अधिकृत माहिती सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांनी दिली आहे.\nकोरोना वायरससी आता सर्व जग झुंज देत आहे. कराड शहरामध्ये असलेल्या वैद्यकीय सुविधेबाबत प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारल्यानंतर डॉक्टर प्रकाश शिंदे यांनी माहिती दिली आहे. कोरोनाबाबत कराडमधील वैद्यकीय कामांचा आढावा घेतला असून कोरोना संसर्गजन्य रुग्ण सापडले तर त्यांच्यावर उपचार करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या गेल्या आहेत. अत्यावश्यक सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातही व्यवस्था करण्यात आली आहे. कराड आणि परिसरातील लोकांनी शासकीय आदेशाचे पालन करुन स्वतःचे व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. महत्त्वाचे आणि गरजेचे असेल तर घराबाहेर पडा अन्यथा बाहेर पडू नका घरीच रहा वारंवार हात साफ करा. गर्भवती, वृध्द आणि लहान मुलांची विशेष काळजी व खबरदारी घ्या, हीच कृती कोरोनावर मात देईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6--%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1/rIPAl-.html", "date_download": "2020-09-26T01:23:41Z", "digest": "sha1:TCUL5SXDUGXQRUVGHXEUFMM7MJHP2ZOP", "length": 4296, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द- शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nपहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द- शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड\nMarch 20, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nपहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द- शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड\nमुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. आज या संदर्भात आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.\nप्रा. गायकवाड पुढे म्हणाल्या, बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या राज्यातील परीक्षा यंदा रद्द केल्या असून वर्षभरातील विद्यार्थ्यांचे मापन संकलित करून विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येईल. वर्ग 9 वी आणि 11 वी ची उर्वरित परीक्षा 15 एप्रिल नंतर घेण्यात येईल. वर्ग दहावीचे दोन पेपर जे येत्या शनिवारी आणि सोमवारी आहेत ते वेळापत्रकाप्रमाणे होतील.\nदहावीच्या परीक्षेसंबंधित आवश्यक ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सोडून उर्वरित सर्वांनी घरुन काम करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बालकांनी आणि पालकांनी काळजी घ्यावी. या कालावधीत शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1215", "date_download": "2020-09-26T02:19:18Z", "digest": "sha1:BIE32IRWFL36WIVTOAPZTC6J3RSLNDF7", "length": 3648, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चित्रीकरण : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चित्रीकरण\nहिंदी चित्रपटातील उत्तम रित्या चित्रीत झालेली गाणी\nगाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.\nRead more about हिंदी चित्रपटातील उत्तम रित्या चित्रीत झालेली गाणी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3899", "date_download": "2020-09-26T03:24:10Z", "digest": "sha1:BO4M7WY5B7BBIR22R4OMBZSJKYYPSUAY", "length": 16191, "nlines": 231, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नाशिक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नाशिक\nफ्रॉम नाशिककर, फॉर नाशिककर्स\nतुज हृदयंगम रवे विहंगम-भाट सकाळी आळविती\nतरु तिरिचे तुजवरी वल्ली पल्लवचामर चाळवीती\nतुझ्या प्रवाही कुंकुम वाही बालरवि जणू अरुणकरी\nजय संजीवनी जननी पयोदे श्रीगोदे\nनाशिकविषयी चर्चेसाठी हा धागा\nनाशिक विमानतळ :- (जाणूनबुजून तयार केलेल्या) समस्यांचे तळ\nनाशिक विमानतळ :- (जाणूनबुजून तयार केलेल्या) समस्यांचे तळ\nRead more about नाशिक विमानतळ :- (जाणूनबुजून तयार केलेल्या) समस्यांचे तळ\nआनंद निकेतन शाळा : प्रथम सत्र अहवाल २०१७\nRead more about आनंद निकेतन शाळा : प्रथम सत्र अहवाल २०१७\nगडदुर्गा - धोडंबदेवी, धोडप (६)\nRead more about गडदुर्गा - धोडंबदेवी, धोडप (६)\nरविवारच्या लोकमत मंथन पुरवणी मध्ये प्रयोगशील शाळांबद्दल लेख आला होता. या शाळांच्या कार्यपद्दतीची थोडक्यात चांगली ओळख करून दिली आहे या लेखात. त्यात महाराष्ट्रातल्या काही शाळांची नावं पण आहेत.\nयाच लेखाच्या निमित्ताने नाशिक मधील आनंद निकेतन शाळे बद्दल थोडी माहिती:\nमाझा मुलगा तन्मय आनंद निकेतन, नाशिक या शाळेत इयत्ता पहिलीत आहे. तो खेळवाडी (pre-school) पासूनच या शाळेत आहे. आणि ते तसं असेल तर मुलांसाठी फार चांगलं आहे. का ते पुढे लेखात येईलच.\nRead more about प्रयोगशील शाळा\nबागलाण ,नाशिक प्रांतात शालेय साहित्यांचे वाटप दि .१९-२० जुलै २०१४\nआपण एक स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत असतो . असेच एक सुराज्याचे स्वप्न आई जीजाऊने पहिले 'श्रीमंतयोगी \"शिवरायांच्या रूपाने साकार केले ... या स्वप्न पूर्तीसाठी त्यांना साथ लाभली ती या निष्ठावंत आणि उभ्या सह्याद्रीची …\nपण आज त्यांचे सुवर्ण स्वप्नाची अनास्था आपण उघड्या डोळ्याने पाहत आलो , ज्यांच्या अंगाखांदयावर आपल्या पूर्वजांनी पराक्रमाचे रक्त वाहिले त्यांची अवस्था काय आहे आज त्यांच्या चिरा चीर्यातून मदतीची आर्त आपणास का ऐकू येत नाही \nRead more about बागलाण ,नाशिक प्रांतात शालेय साहित्यांचे वाटप दि .१९-२० जुलै २०१४\nनशिक पेलोटोन २०१४ अर्थात सांघिक सायकलिंग शर्यत\nनाशिक येथिल सायकल प्रेमी मंडळींनी ९ फेब्रुवारी २०१४ ला नाशिक येथे १४० किलोमीटर ग्रुप रेस आयोजित केलेली आहे.\n>> १४० किलोमीटर ग्रुप रेस (३ जणांचा एक संघ)\n>> ५ धरणांच्या सन्निध्यातील नयनरम्य परिसर\n>> आंतरराष्ट्रीय किर्तीच्या सायकलपटुंचा सहभाग\n>> भारताच्या विविध भागातील व्यावसायिक खेळाडुंचा आयोजनात सहभाग\n>> प्रत्येक ३५ किमी नंतर पाणी तसेच अत्यावश्यक गोष्टींची ऊपलब्धता\n>> परगावातील स्पर्धकांसाठी आदल्या दिवशी राह्ण्याची सोय\n>> प्रथम येणार्या ४ संघांना जवळ्पास ५ लाख रुपयांची\nतर वेळेत स्पर्धा पूर्ण करणार्या प्रत्येकास आकर्षक बक्षिसे\nRead more about नशिक पेलोटोन २०१४ अर्थात सांघिक सायकलिंग शर्यत\nबागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी\nबागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी\nमोठ्या कष्टानी फोटो टाकलेले आहेत. काही जर दिसत नसतील तर येथे वाचू शकता.\nबागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा\nगाडी मात्र मुल्हेर च्या दिशेने धावतच होती…\nRead more about बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी\nस्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग दुसरा]\nस्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग दुसरा-नाशिक]\nस्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग पहिला- भगूर]\nहा ११ डिसेंबर २०१२ ला मायबोलीवर प्रकाशित केला होता. त्याची लिंक :-\nRead more about स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग दुसरा]\nस्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग पहिला-भगूर]\nस्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग पहिला-भगूर]\n** ही खूण असलेला परिच्छेद मूळ लेखात नव्याने टाकलेला आहे**\n* ही खूण असलेला परिच्छेद मूळ लेखात नंतर लिहिलेला आहे.\n' अष्टविनायकदर्शन' या नावाचे एक ई-बुक इंटरनेटवरून फ्री-डाऊनलोड करता येते हे कळल्यावर मी ते डाऊनलोड करून घेतले. वाटले होते कि ते असेल गणेशाच्या आठ स्थानांबद्दल पण या पुस्तकातील 'विनायक' आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर\nRead more about स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग पहिला-भगूर]\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7507", "date_download": "2020-09-26T03:15:37Z", "digest": "sha1:L575PY4QAZBMBK3DVGRESXWSGG4GLIZP", "length": 3528, "nlines": 82, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सौंदत्ती : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सौंदत्ती\nउत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)\nया आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:\n१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा\n२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर\n३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )\nRead more about उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.marathikhajina.com/tag/small-simple-habits-for-a-happy-marriage/", "date_download": "2020-09-26T01:10:03Z", "digest": "sha1:4G4HJEHKRGW6GBWCTTAHZ7EXIM6L4S7J", "length": 1960, "nlines": 38, "source_domain": "www.marathikhajina.com", "title": "Small & Simple Habits for a Happy Marriage | मराठी खजिना", "raw_content": "\nपालेभाज्यांचे हे आहेत फायदे\nधने-जिरे पूड चे फायदे\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन…\nडेटिंगला जाताना या टिप्स लक्षात ठेवा\nप्रेमाने करा संसार सुखाचा\nज्यामध्ये दोन व्यक्ती एकमेकांसोबत जीवन जगण्याचा संकल्प घेतात असे बंधन म्हणजे लग्न. हा संकल्प कधीही खोटा घेतला जात नाही. जरी आपण शरीराने एक झाले असाल तरी जोपर्यंत आपले विचार जुळत […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/poems-by-balam-ketkar/articleshow/56539654.cms", "date_download": "2020-09-26T03:19:12Z", "digest": "sha1:YHNQ4TJHISOAN3IY3OW7GEDJBUXO2XKZ", "length": 20147, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजीवन मरणाच्या वाटेवरची विश्रब्ध कविता\n‘विरक्त फुलपाखरे’ या संग्रहातील कवितांमध्ये परस्परांना जोडणारा एक विरळसा धागा आहे, त्याच्या एका बाजूला जगणं आहे आणि दुसऱ्या बाजूला मृत्यू.\nजीवन मरणाच्या वाटेवरची विश्रब्ध कविता\n‘विरक्त फुलपाखरे’ हा बालम केतकर यांचा दुसरा कवितासंग्रह, त्यांच्या पहिल्या ‘तळघरातले हंसध्वनी’ या संग्रहानंतर वीस वर्षांनी आला आहे. या संग्रहातील कवितांमध्ये परस्परांना जोडणारा एक विरळसा धागा आहे, त्याच्या एका बाजूला जगणं आहे आणि दुसऱ्या बाजूला मृत्यू. दोन्ही अपरिहार्य आणि अटळ. खूप आतल्या ओढीने आर्ततेने मृत्यूकडे झेपावण्याची या कवितेतली अंत:प्रवृत्ती आहे. कवितेतली रूपके, प्रतिमा या दोन टोकांवर लोंबकाळताना, जन्म-मृत्यूमधल्या असंख्य भावभावनांचे विभ्रम दाखवतात. यामधला एक स्पष्ट करुणमय भाव म्हणजे स्वत:कडे विकल, विफल मनोभूमिका घेणे आणि मृत्यूकडे पर्यायाने परमेश्वराकडे वाटचाल करताना त्याच्यातील पूर्णत्वाची जाण येणे अपूर्णाकडून पूर्णाकडे असणारी रक्तातली ओढ ही आपल्या सांस्कृतिक परंपरेतूनच आपल्या नेणिवेत झिरपलेली आहे.\nहाक कोण मारते.... इथे कुठे दिशाच ना\nअंध:कार दाटला, प्रकाश दे दयाघना\nपायऱ्या न पाय मंदिरामध्ये चढू कसा\nधाव तू हातावरी.. जमेल ना\nकवीमध्ये एक विनवणी करणारे आर्त आहे. असाह्यता, अस्वस्था, अनिश्चितता यांच्या झोक्यावर आयुष्य वरखाली होते आहे. सरण जवळ येते, पुन्हा दूर जाते, अंत जवळ यावा म्हणून कवी विनवतो आणि शरीराच्या ओझ्यातून सुटकेचा श्वास मिळावा म्हणून करुणा भाकतो. (विवर)\nधुमसून जळलो मी ही परीक्षा विषाची\nतुंजवीण मज आता ओढ नाही कशाची\nतिमिर भरून आला मार्गही सापडेना\nउचलून मज घे ना की मला चालवेना\nविकलांग मन:स्थितीतील ही मन:पूत प्रार्थना एक शोकाला गीत बनवून या संग्रहातील सर्व कवितांना व्यापून उरली आहे. शेवटी माणसाचे आयुष्य वळणे नेतील तसे वळणार आणि कधीतरी मार्ग संपणार. या सत्याचा साक्षात्कार झाल्यावर देहाच्या पलीकडे असलेली मृत्यूची तहान जगणे कासावीस करते. कवितेतून क‌वीला शोधणे हा एका दृष्टीने त्याच्या प्रतिभाविष्कारावर अन्याय होत असला, तरी ज्यांना बालम केतकरांचे दीर्घ आजारी आणि घराशी निबद्ध असलेले एकाकी आयुष्य थोडेफार माहीत आहे, त्यांच्यासाठी या कवितांमधली प्रत्येक ओळ ही त्यांच्या आत्म्यातून आलेली लयबद्ध गान आहे. त्यामुळे कवितेमागचे झुरणारे, रडणारे मन त्या कवितेच्या उत्कटतेला एका आत्मप्रचीतीचा आयाम देते. ही वेदना व्यक्तिगत म्हणून तिचे मूल्यमापन कमी होत नाही. कारण, जन्माला आलेला प्रत्येकजण मर्त्य आहे आणि त्याच्या जाणिवेच्या कक्षांची खोली वाढू लागली की अंताकडे जाण्याची अटळ दिशा त्याला खुणावू लागते.\nमृत्यू ही संकल्पना म्हणजे केवळ शरीराचा अंत नव्हे. मृत्यू शब्दाच्या साहचर्याने येणाऱ्या अनेक प्रतिमांचे विभ्रम या कवितांमधून दृगोच्चर ‌होताना दिसतात. वरवर पाहिले तरी कवितांची शीर्षके या पडझडीची साक्ष देतील. विवर, प्रश्न अनेक, पडून उठणे, भुसा भरलेले भात, कुंपण, कय्यार, निरूपाय, असमीक्षित, एकेक शहर सुसान, दु:ख माझे धन, मृत्यूची तहान, विनाश, मुले तमाची, विरक्त फुलपाखरे अशी बहुसंख्य शीर्षके कवितांची तमाकडे नेणारी दिशा दाखवतात. निराशा, वैफल्य, वार्धक्य, कृष्णविवरे, विरक्ती, ओसाडपणा, सुनसान शहर, आंबलेले दु:ख, कोरड्या विहिरी, उच्छवास, थडगी, कबरीतला चंद्र, मिटलेल्या सावल्या, बुडबुड्यांचा महाल या कवितेतून प्रतीत होणाऱ्या संकल्पना आणि शब्द म्हणजे मृत्यूचीच अलीकडची सौम्य, पण दाहक अर्थांतरे आहेत. या शब्दांच्या पोटात दडलेले जे क्षणभंगुरतेचे ध्वनी आणि अंत:काळची दाट छाया आहे, त्यामुळे कवितेवर पसरलेले दाट काळे रंग अधोरेखित होतात. उत्कट प्रतिमांमुळे त्यातली गहनता सधन होते. प्रपंच हे एक चावी न दिलेले खेळणे आहे. आडात पाणी नाही गाण्यात आनंद नाही, झोपड्यांच्या शहराला वाळवीने वेढा दिला आहे, विटलेली प्रकाशवर्षे काळोखांना आरसे देतात, चौकात सिग्नल पडले आहेत. धूमकेतू विरून विरून आहेत.\nएक पान हलत नाही\nडोकं वर काढत नाही\nपक्षी पक्षी बोलत नाही\nसुतार पक्षी ऐकत नाही\nकवीनं आशावादी असावं, तिमिरातूनी तेजाकडे त्याची दृष्टी असावी, मृत्यूवर मात करत त्यानंत जवीनसन्मुख असावं, विरक्त फुलपाखरातून आसक्ती निर्माण व्हाव, रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल दिसावा अशा काही अपेक्षा कवितेकडून व्यक्त होताना दिसतात. कवितेचा मोठेपणा मोजण्याच्या या काही फूटपट्ट्याही काही समीक्षक वापरताना दिसतात; पण अशी कोणतीही समीक्षकी फूटपट्टी घेऊन केतकरांची कविता मोजता येणार नाही, तिचे पूर्वासूरींशी काही नाते आहे का, हे शोधण्याचेही कारण नाही. कोणतीही कविता जेव्हा कवीच्या असल्याच्या तळापासून निर्माण होते, तेव्हा ती त्याला फाडूनच प्रकट होत असते, तसे तिचे प्रकट होणे त्याच्याही हाती राहत नाही. जगण्यामरण्यातील अपरिहार्यतेचे बीज या ही कवितेते असते, म्हणून कवितेतूनच कवी स्वतःला सापडत जातो. असे स्वतःला सापडणे केतकरांना जमले आहे, म्हणून अबोध असला, तरी सच्चेपणाचा प्रमाणिक गंध त्यांच्या कवितेला आहे.\nपरिकल्पित जे अवघे सरले, संचित झाले प्रारब्ध\nआशय जो मकरंदही तो शब्दात असूनही निःशद्ब\nगाफिल ना बेसावध ना, निद्रेतही आता मी जागा\nहरवून मी भेटलो स्वतःला, शोध बिंदुचा हा अवघा\nहा बिंदूएवढा शोध असला तरी स्वतःला भेटण्याची किमया या कवितांनी केली असल्याने निःशब्दातल्या आशयापर्यंत जाण्याची सुभग वाट सुजाण वाचकांसाठी या कविता संग्रहाने खुली केली आहे.\nकवी : बालम केतकर\nप्रकाशक : सायन पब्लिकेशन्स प्रा. लि., पुणे\nकिंमत : २०० रु.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमराठा आरक्षण : स्थगिती आणि मार्ग...\nलोभस आणि नितांत सुंदर महत्तवाचा लेख\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nआयपीएल २०२०Chennai vs Delhi: दिल्लीने गड राखला, बलाढ्य चेन्नईवर साकारला विजय\nदेशUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने 'असे' दिलेउत्तर\nदेशकृषी विधेयकांवरून PM मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र\nसिनेन्यूजमाझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा\nमुंबईकंगना प्रकरण: हायकोर्टाने BMC कडे मागितले 'या' तीन मुद्द्यांचे स्पष्टीकरण\nमुंबईकरोना: रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यापूर्वी कुटुंबीयांची संमती बंधनकारक\nमुंबईड्रग्ज प्रकरण: NCB चे अधिकारी तुरुंगात जाऊन शौविकचा जबाब घेणार\nनागपूरशहीद पित्याच्या शौर्याला मुलींचा अनोखा सलाम\nकार-बाइकदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी\nविज्ञान-तंत्रज्ञानसॅमसंगने आणले AI पॉवर्ड वॉशिंग मशीन, मोबाइलने करा कंट्रोल\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/tribal-areas-junnar-taluka-obstacles-online-study-due-lack-mobile-network-333798", "date_download": "2020-09-26T01:13:47Z", "digest": "sha1:W4E5Z4HDFKNGKKPT7D4D3T6BPASJ44IT", "length": 15079, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "अभ्यास करायचा की नेटवर्क शोधायचं? रेंजसाठी विद्यार्थ्यांची भटकंती | eSakal", "raw_content": "\nअभ्यास करायचा की नेटवर्क शोधायचं\nआदिवासी गावांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करण्यासाठी अडचणी येत आहेत. ज्या ठिकाणी नेटवर्क असेल ते ठिकाण शोधून त्या ठिकाणी छत्री किंवा इतर सांधनांचा आधार घेऊन भर पावसात उभे राहून अभ्यास करावा लागत आहे.\nओतूर (पुणे) : जुन्नर तालुक्‍याच्या आदिवासी भागातील माळशेज पट्ट्यातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोबाईलला नेटवर्क (रेंज) मिळत नाही. करंजाळे, खुबी व माळशेज पट्ट्यामधील इतर आदिवासी गावांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करण्यासाठी अडचणी येत आहेत. ज्या ठिकाणी नेटवर्क असेल ते ठिकाण शोधून त्या ठिकाणी छत्री किंवा इतर सांधनांचा आधार घेऊन भर पावसात उभे राहून अभ्यास करावा लागत आहे.\nपुण्यात धावणार 100 कोरोनामुक्त रिक्षा\nसध्या कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने शाळा बंद आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचा ऑनलाइन पद्धतीने अभ्यास सुरू आहे. मात्र, मुलांसह पालकांनी ही डोंगरभागात नेटवर्क शोधत फिरावे लागत आहे. या भागात त्वरित नेटवर्क उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करंजाळे येथील नंदकिशोर जगताप, सुभाष जगताप, विक्रम चव्हाण, रभाजी साळवे, शिवाजी जगताप, ताराचंद जगताप, रंजन शिंदे, अरुण शिंदे, पुष्कर पवार, खंडू जगताप, ओम्‌कार जगताप, विकी जगताप, विशाल पवार, अमोल पवार, दत्ता पवार, मच्छिंद्र जगताप, विलास पवार, भरत पवार, उत्तम राक्षे यांनी केली आहे.\nपुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nखासदार कोल्हे यांना निवेदन, पण...\nखुबी, करंजाळे व माळशेज पट्ट्यात मोबाईल नेटवर्क उपलब्ध व्हावे म्हणून जून महिन्यात शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना निवेदन दिले होते. मात्र, त्याबाबत त्यांच्याकडून फक्त फोनवर आश्वासन मिळाले आहे. मात्र अजूनही याबाबत कोणतेही ठोस कारवाई झालेली नाही, असे मनसेचे जुन्नर तालुका पश्‍चिम विभागाचे अध्यक्ष नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.\nया भागातील नेटवर्कचा प्रश्नाची त्वरित मार्गी लावून आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेकडून आदिवासी जनतेला सोबत घेऊन मनसे स्टाइलने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.\n- नंदकिशोर जगताप, अध्यक्ष, मनसे जुन्नर तालुका पश्‍चिम विभाग\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुकुडवाड परिसरात मोबाईल रेंजचे तीन-तेरा; 'असून अडचण, नसून खोळंबा' स्थिती\nकुकुडवाड (जि. सातारा) : माण तालुक्‍यातील कुकुडवाड, वळई, विरळी, जांभुळणी, पाणवन, वडजल आदी गावांत मोबाईल नेटवर्कचे सतत तीन-तेरा वाजत असल्याने...\nनागपूरच्या सलूजा दाम्पत्याने दिला ग्राहकांना अनोखा ऑनलाइन पर्याय\nनागपूर : छोट्या शहरांमध्ये सजावट आणि कॅटरिंगच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळणे कठीण असते. अशा वेळी ग्राहकांना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. ही अडचण...\nOnline Education : विषय शिकविलाच नाही, म्हणे द्या आता परिक्षा \nऔरंगाबाद : जिल्ह्यातील बहुतांश खासगी आणि अनुदानित शाळांमध्ये घटक चाचणी, सराव चाचणी परीक्षा ऑनलाइन सोडवून घेण्याचा धडाकाच सुरू आहे....\nगुगल मॅप आता 'आॅफलाइन\nतुम्हाला एखाद्या नव्या ठिकाणी जायचे असेल आणि तेथे जाण्याचा मार्ग माहिती नसेल, तर तुम्ही साहजिकच गुगल मॅपचा वापर करता. सध्याच्या धावपळीच्या आणि...\nअतिदुर्गम भागात मोबाईलवर शिक्षण घेता यावे म्हणून विद्यार्थी मजुरीच्या शोधात\nअकोले (अहमदनगर) : समाजाला शिक्षणाच्या सोयी, पुरवण्यासाठी राज्य सरकारने अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी नागरिकांचा शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग : 21 सप्टेंबर\nपंचांग - सोमवार - अधिक अश्‍विन शु.5, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तुला, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.31, चंद्रोदय 10.09, चंद्रास्त रा. 9.54, भारतीय...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/order-send-compulsory-leave-employees-st-corporation-320533", "date_download": "2020-09-26T01:48:09Z", "digest": "sha1:AE2XUNATQU54LYBC3U3R3TY74MGSTAEZ", "length": 19190, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "एसटीमधील कर्मचाऱ्यांनाच वेगळा नियम का?; सक्तीच्या रजेबाबत संघटना आक्रमक | eSakal", "raw_content": "\nएसटीमधील कर्मचाऱ्यांनाच वेगळा नियम का; सक्तीच्या रजेबाबत संघटना आक्रमक\nकोरोना व्हायरसमुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सुमारे 90 हजार कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने काढला आहे. राज्यातील सोलापूर, अहमदनगर, मुंबई, पालघर, रायगडे, पुणे आदी जिल्ह्यांमधील विभाग नियंत्रकांना हा आदेश दिला असून याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून हा निर्णय रद्द करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.\nअहमदनगर : कोरोना व्हायरसमुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सुमारे 90 हजार कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने काढला आहे. राज्यातील सोलापूर, अहमदनगर, मुंबई, पालघर, रायगडे, पुणे आदी जिल्ह्यांमधील विभाग नियंत्रकांना हा आदेश दिला असून याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून हा निर्णय रद्द करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.\nमहाराष्ट्रातील कोणत्याही महामंडळात अथवा शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा नाहीत. मग एसटी कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा कशासाठी अशी विचारणा कर्मचारी संघटनाने केली आहे. महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेसचे सरचिटणीस मुकेश तिगोटे म्हणाले, २० दिवसाच्या रजेवर पाठवणे हे चुकीचे आहे. कोरोना महामारी ही फक्त महाराष्ट्रात नाही तर सर्वत्र आहे. मग, एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेगळा नियम का दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ही एसटी महामंडळाचे कर्मचारी काम करत आहेत. परंतु अचानक एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर जाण्यास सांगितल आहे. तसे आदेश देखील देण्यात आले आहेत. या काळात सरकारने कार्मचाऱ्यांना बळ देणे गरजेचे असताना कामगाराचे शोषण केले जात आहे. महामंडळाकडून काही ठिकाणी या आदेशाची अंमलबजावणही सुरु झाली आहे. सध्या राज्यात एसटी महामंडळात तब्बल एक लाख पाच हजार सदस्य आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी महामंडळाला प्रत्येक महिन्याला 249 कोटी द्यावे लागतात. सध्या कर्मचाऱ्यांनी 20 दिवस सक्तीचे रजेवर जावा असे आदेश देण्यात आले आहेत. परंतु शासनाचे आदेश आहेत की, कर्मचाऱ्यांचे पगार कापू नयेत. त्यामुळे एसटी महामंडळाने काढलेल्या आदेशानुसार जरी 20 दिवसांची सक्तीची रजा देण्यात आली असली तरी कर्मचाऱ्यांना पगार द्यावा लागणार आहे.\nदुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सध्या मंदीची परिस्थिती नाही. त्यामुळे मंदीच्या नावाखाली 20 दिवस सक्तीची रजा कर्मचाऱ्यांना देण्याचा एसटी महामंडळाचा अजब फंडा आहे. सध्या कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे 50 टक्के वेतन देण्यात आले आहे. तर जून महिन्याचा पगार अद्याप देण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत 20 दिवसांची अर्जित रजा असताना देखील सक्तीने रजा देण्यात आलेली आहे. जर पैसे द्यावेच लागणार आहेत, तर मग हा निर्णय का घेण्यात आला आहे, असा सवाल कर्मचारी उपस्थित करत आहेत. परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसंदर्भात कामगार करार 1996 -2000 मधील खंड 22-1 (ब) नुसार राज्य परिवहन महामंडळ आणि मान्यता प्राप्त संघटनेमध्ये करार झाला होता. त्यानुसार प्रत्येक वर्षी 40 दिवस पगारी रजा देण्यात येईल, असं ठरलं होतं. मात्र त्यापैकी निम्मी रजा मंदीच्या काळात घ्यावी असं ठरवण्यात आलं होतं. परंतु सध्या मात्र अशी परिस्थिती नाही. देशातील आणि राज्यातील कोणत्याही महामंडळात अथवा शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा देण्यात आलेली नाही. परंतु तरीदेखील एसटी महामंडळात हा निर्णय का लागू करण्यात येतं आहे.\n२९ जूनला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यांनी महाव्यवस्थापकांसह संबंधित अधिकाऱ्यांना एक पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, चालक, वाहक, सहाय्यक, सर्व वाहतुक कर्मचारी आदींच्या सरासरी वेतनावर किंवा अर्जित रजेचा उल्लेख केला आहे. याबाबत काढण्यात आलेल्या परिपत्रकातील मुद्द्यांच्या अंमलबजावणीबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवांद्रेनजीकचा समुद्रकिनारा सर्वात दूषित, पाण्यातील 'ई कोलाय' विषाणूचं प्रमाण पाचपट अधिक\nमुंबईतील वांद्रेनजीकचा समुद्र मुंबईतील सर्वाधिक दुषित आहे. शौचालयाच्या पाण्यात आढळणारा ई कोलाय हा विषाणू या परीसरातील पाण्यात निकषापेक्षा तब्बल...\nमाझ्या स्वप्नांनाही तिने दिले पंख\nआईबद्दल किती बोलावं तेवढं थोडंच आहे. माझी आई उषा खूपच साधी. घर, संसार, सासू-सासरे अन् मुलांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करायचा, हेच तिचं विश्व होतं....\nभारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट ही, की बुसान आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी मराठी चित्रपट ‘बिटरस्वीट’ चित्रपटाची निवड झाली आहे. या...\nपोलिस आयुक्‍तांचे नवे आदेश नियम मोडणारे दुकान सात ते चौदा दिवस बंद\nसोलापूर : शहरातील कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातून शहरातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोके वर काढत...\nमी ठरवले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधीही भेटू शकतो, पण... ; खासदार संभाजीराजे\nकोल्हापूर - मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि संभाजीराजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारल्याच्या कारणावरून कोल्हापूर महापालिकेची महासभा तहकूब...\nधर्मवीर संभाजीराजे तलावातील पाणी तपासणी गुजरातच्या कंपनीसाठी मोजले 16 लाख\nसोलापूर : कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या धर्तीवर सोलापुरातील श्री धर्मवीर संभाजीराजे तलावाचे सुशोभिकरण केले जात आहे. त्यासाठी साडेसात कोटींचा खर्च...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/twelve-patients-admitted-jumbo-hospital-magar-stadium-pimpri-chinchwad-340751", "date_download": "2020-09-26T01:49:17Z", "digest": "sha1:SVWKWR3FVKNAVEM36S537RI4YAWDS2UY", "length": 14243, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "पिंपरी-चिंचवड : मगर स्टेडियम येथील जम्बो रुग्णालयात बारा रुग्ण दाखल | eSakal", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवड : मगर स्टेडियम येथील जम्बो रुग्णालयात बारा रुग्ण दाखल\nनेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या जम्बो फॅसिलिटी रुग्णालयामध्ये रूग्णांना दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे.\nपिंपरी : नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या जम्बो फॅसिलिटी रुग्णालयामध्ये रूग्णांना दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. आज मंगळवारी बारा रूग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. पिंपरी चिंचवड व पुणे महापालिका, पुणे महानगरविकास प्राधिकरण, जिल्हा प्रशासन व राज्य शासनाच्या सहकार्याने हे जम्बो रुग्णालय सुविधा उभारण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nरुग्णालयात ८१६ खाटांची स्वतंत्र व्यवस्था\n२०० आयसीयू खाटांची सुविधा\nरुग्णालयामध्ये अद्ययावत उपकरणे व सुविधा\n३,९०० चौरस मीटर आयसीयू निगेटिव्ह प्रेशर पद्धतीने वातानुकूलित\nरुग्णालयाचे एकूण क्षेत्रफळ ११हजार ८०० चौरस मीटर\n२० हजार चौरस मीटर जमिनीचे विकसन करण्यात आले असून या साठी ४ हजार किलो वॅट विद्युत पुरवठा देण्यात आला आहे.\n२५ हजार लिटर क्षमतेचे लिक्वीड ऑक्सिजन मेडिकल टॅंक आहेत.\nरुग्णालयाचे काम ६ ऑगस्ट २०२० रोजी चालू झाले.\nयेथील आयसीयू महाराष्ट्रातील निगेटिव्ह प्रेशर पद्धतीने वातानुकूलित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे. हे रुग्णालय उभारण्याचा व ६ महिने चालवण्याचा अंदाजे खर्च ८५ कोटी इतका झाला आहे. अग्निशमन, पेसो (पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा )इत्यादी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाचा खर्च ५० टक्के राज्य शासन व ५० टक्के पुण्यातील स्थानिक शासकीय संस्थांमार्फत करण्यात येईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखंडाळ्यात जुन्या महामार्गावर मोटारसायकल-कारचा अपघात; एकाचा मृत्यू\nलोणावळा : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळ्यात मोटारसायकल आणि कारचा अपघात झाला. त्यात मोटारसायकल चालक जागीच ठार झाला. अन्य एक जण गंभीर जखमी झाला...\nपिंपरी : 'राष्ट्रवादीच्या वॉर्डातील निधी महापौरांनी वळवला'\nपिंपरी : निगडीतील भक्ति-शक्ती चौकातील ग्रेडसेपरेटर व उड्डाणपुलाचे सुशोभिकरण केले जाणार आहे. त्यातील 50 लाख रुपयांसह शहरातील विविध कामांतील एक कोटी 26...\nभोसरीनंतर आता पिंपरीत ट्रान्सफॉर्मरचा स्फोट\nपिंपरी : अजमेरा-मासुळकर कॉलनीत ट्रान्सफॉर्मरला ऑइल गळतीमुळे शुक्रवारी (ता. 25) दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागली. आग लागल्याने स्फोट झाला. त्यामुळे...\nरेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्यांनो सावधान; सरकार मुसक्या आवळणार\nपुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी निश्चित दरापेक्षा जादा दर आकारू नये. जादा दर आकारल्यास संबंधित रुग्णालयांवर आणि...\nपिंपरी-चिंचवड : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली\nपिंपरी : पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून...\nपिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो विस्तारीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात\nपिंपरी : पुणे महामेट्रोचे फुगेवाडी ते पिंपरी दरम्यानचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही मेट्रो पिंपरीपासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यास...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/forest-office-aurangabad-payment-after-retirement-issue-notice/", "date_download": "2020-09-26T02:11:01Z", "digest": "sha1:TFX7DJMCSC3J45NO63FPVBV2RPDDZKOK", "length": 18487, "nlines": 165, "source_domain": "www.saamana.com", "title": "निवृत्तीनंतर 8 महिने वेतन घेणाऱ्यास उप वनसंरक्षक अधिकाऱ्याची नोटीस | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे…\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nनिवृत्तीनंतर 8 महिने वेतन घेणाऱ्यास उप वनसंरक्षक अधिकाऱ्याची नोटीस\nसामाजिक वनीकरण विभागातून निवृत्त झाल्यानंतर आठ महिने सेवा करत वेतन घेणाऱ्या वनपाल मोहंमद रफिक शेख बलदार यास उप वनसंरक्षक स. पां. वडस्कर यांनी नोटीस बजावली आहे.\nमोहंमद रफिक शेख बलदार हे वनपाल होते. धारशिव येथील सामाजिक वनीकरण विभागातून बदली झाल्यामुळे त्यांना 18 ऑक्टोबर 2017 रोजी कार्यमुक्त करण्यात आले होते. बलदार हे कार्यमुक्त झाल्यानंतर ते संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर तालुक्यातील वनपरिक्षेत्र बाजारसांवगी येथे 25 ऑक्टोबर 2017 रोजी रुजू झाले होते. या ठिकाणी बलदार यांची पदस्थापना झाल्यानंतर आस्थापना विभागामध्ये तब्बल दीड वर्षानंतर म्हणजे 20 जून 2019 रोजी सेवापुस्तिका प्राप्त झाली. बलदार यांच्या सेवापुस्तिकेवर 20 एप्रिल 1961 जन्मनोंद असल्यामुळे वयोमानाने 30 एप्रिल 2019 रोजी निवृत्त होणे बंधनकारक होते.\nचार महिन्यांनंतर सेवापुस्तिका मिळाली\nसामाजिक वनीकरण विभागात काम करणाऱ्या बलदार रत्नपूर तालुक्यातील बाजारसावंगीमध्ये रुजू झाल्यानंतर आस्थापनातील प्रशासनाला सेवापुस्तिका निवृती तारखेच्या चार महिन्यांनंतर म्हणजे 20 जून 2019 रोजी प्राप्त झाली. आस्थापनातील कार्यालयीन अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना बलदार 8 महिन्यांनंतर निवृत्त झाल्याचे निदर्शनास आले.\nवेतनाच्या बिलातील तफावतीमुळे निवृत्तीचा प्रकार उघडकीस\nआस्थापना विभागाच्या वतीने वेतनाचे बिल काढत असताना जानेवारीमध्ये तफावत येत असल्याचे निदर्शनास आले. तफावत का येते हे आस्थापना विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता 30 एप्रिल 2019 रोजी वनपाल निवृत्त झाला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मोहंमद रफिक शेख बलदार या वनपालास 8 जानेवारी 2020 रोजी सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रशासनाने निवृत्त केले. निवृत्त झाल्यानंतरही आठ महिने वेतन घेत असल्याचे उघडकीस आल्यामुळे उप वनसंरक्षक स.पां. वडस्कर यांनी निवृत्त वनपाल मोहंमद रफिक यास नोटीस बजावली.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे यांचे आदेश\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण...\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nया बातम्या अवश्य वाचा\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B8----", "date_download": "2020-09-26T01:07:47Z", "digest": "sha1:STRWBDHMFV7OOZAJZPAXBFZ2OGHGQDAN", "length": 22366, "nlines": 167, "source_domain": "marathiblogs.in", "title": "साधा माणूस........ | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nतेव्हा शुभदा आपल्या नवीन जागेत राहायला येऊन जेमतेम दोन दिवस झाले होते. तशी कोणाशी ओळखही झाली नव्हती तिची. त्याचं तेवढं तिला काही वाटलही नाही, आणि तसाही वेळ आवरासावर करण्यातच जात होता. मुलगी होतीच अडीच वर्षाची, फुल टाईम कामाला लावणारी. तिचा नवरा नऊ वाजता ऑफिससाठी घर सोडायचा ते सात साडेसात वाजेपर्यंत घरी यायचा. तोवर या दोघीच.एके दिवशी अशीच कामं आवरून शुभदा तिच्या मुलीबरोबर खेळत बसली होती, तेवढ्यात बेल वाजली. आता यावेळी कोण म्हणून तिने पाहिल्यांदा आयहोल मधून पाहिलं. सदरा आणि लेंगा घातलेला माणूस दिसला. हा कोण आता म्हणून आणखी नीट पाहिलं, तसा बघण्यातला वाटला. म्हणून मग सरळ दार उघडलं.मुलगी शुभदाच्या जवळच तिला पकडून होती. तो एकदम ओळखीचं हसून म्हणाला, काय ठिक आहे ना सर्व. नवीन आलात ना तुम्ही. काही प्रोब्लेम नाही ना मुलीचा तर त्याने गालगुच्चाच घेतला. तिला नाहीच पण शुभदाला ही नाही आवडलं.तिने नाराजीने त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, मी वर राहतो, काही लागलं तर आवाज द्यायचा हा.तो निघून गेला, हिने थोडं जोरातच दार लावलं. कोण होता हा मुलीचा तर त्याने गालगुच्चाच घेतला. तिला नाहीच पण शुभदाला ही नाही आवडलं.तिने नाराजीने त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, मी वर राहतो, काही लागलं तर आवाज द्यायचा हा.तो निघून गेला, हिने थोडं जोरातच दार लावलं. कोण होता हा काय माणसं असतात एकेक. जान ना पेहेचान, ह्याला दूरच ठेवलं पाहिजे. संध्याकाळी तिने नवऱ्यालाही सांगितलं, तो म्हणाला; बिल्डिंगमध्येच राहतो ना काय माणसं असतात एकेक. जान ना पेहेचान, ह्याला दूरच ठेवलं पाहिजे. संध्याकाळी तिने नवऱ्यालाही सांगितलं, तो म्हणाला; बिल्डिंगमध्येच राहतो ना मग असेल कोणीतरी एवढा नको विचार करू.दुसऱ्या दिवशी शुभदाकडे तिची मैत्रीण आणि तिचा नवरा आला होता. गप्पा सुरु होत्या. दरवाजा ढकलेला होता फक्त. तो सदरा आणि लेंगेवाला पुन्हा आला आणि दरवाजा सरळ ढकलून त्याने हिच्या मुलीला हाक मारली. ए सोनू, सोनू मग असेल कोणीतरी एवढा नको विचार करू.दुसऱ्या दिवशी शुभदाकडे तिची मैत्रीण आणि तिचा नवरा आला होता. गप्पा सुरु होत्या. दरवाजा ढकलेला होता फक्त. तो सदरा आणि लेंगेवाला पुन्हा आला आणि दरवाजा सरळ ढकलून त्याने हिच्या मुलीला हाक मारली. ए सोनू, सोनूशुभदाची मुलगी म्हणाली, माझं नाव सोनू नाही. दिव्या आहे.तो म्हणाला, माझी सोनूचशुभदाची मुलगी म्हणाली, माझं नाव सोनू नाही. दिव्या आहे.तो म्हणाला, माझी सोनूच मी तुला सोनू म्हणणार.एवढं बोलून तो गेलाही.इकडे सगळे स्तब्ध, मैत्रीण म्हणाली, कोण ग हा. मेन्टलच वाटतोय जरा.शुभदा म्हणली, हो ग मलाही तसच वाटत. उगीच सारखा डोकवतोय कालपासून.शुभदाला त्याचा भयंकर राग येत होता. ब्लॉकमध्ये अशी सिस्टम असते का, उगाच कोणाच्याही घरी डोकावण्याची मी तुला सोनू म्हणणार.एवढं बोलून तो गेलाही.इकडे सगळे स्तब्ध, मैत्रीण म्हणाली, कोण ग हा. मेन्टलच वाटतोय जरा.शुभदा म्हणली, हो ग मलाही तसच वाटत. उगीच सारखा डोकवतोय कालपासून.शुभदाला त्याचा भयंकर राग येत होता. ब्लॉकमध्ये अशी सिस्टम असते का, उगाच कोणाच्याही घरी डोकावण्याचीकाय आहे हे, प्रायव्हसी आहे की नाहीकाय आहे हे, प्रायव्हसी आहे की नाही (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); पुढे दुसऱ्या दिवशीही त्याने खिडकीतून तिच्या मुलीला हाक मारली. काय करते सोनू विचारलं आणि निघून गेला.शुभदाचं घर ग्राऊंड फ्लोअरलाच होत. जाता येता बिल्डिंगमधली सगळी माणसं दिसायची. नंतर तर तो सारखाच खिडकीतून मुलीशी बोलू लागला, आणि मुलगीही त्याच्यासोबत गप्पा मारू लागली. तो दिसला की तिलाही आनंद व्हायचा. पण शुभदा मात्र मनात उगाचच अढी ठेऊनच होती.खिडकीत मुलगी नाही दिसली तर तो बेधडक बेल वाजवून दरवाजा उघडायला लावायचा. किंवा ढकलेला असेल तर उघडून पोरीला बोलवायचा. तिच्याशी दोन शब्द बोलून वर घरी जायचा.शुभदाला हे आवडत जरी नसलं, तरी तिला आतापर्यंत कळलं होतं, की तो खरंच डोक्याने थोडा अधू होता. आणि अपायकारक तर मुळीच नव्हता. कारण एकदा असच तिची मुलगी आत बेडरूममध्ये होती. हा तिला बोलवत होता तर ती येत नाही म्हणून हा बिनधास्त आत बेडरूममध्ये शिरला, आणि मुलीशी दोन शब्द बोलून निघूनही गेला.पण त्यावेळी शुभदाला मनात अगदी धस्स झालं होतं. त्याच्यावर संशयही आला होता, पण तो फार साधा होता. दुनियदारीपासून खूप लांब, त्याच्या डोक्याची समजच नव्हती तेवढी.त्यानंतर एकदा मुलीने खिडकीतून खेळणं बाहेर टाकलं म्हणून ती तिला घरात ठेऊन ते उचलायला गेली. नुसता दरवाजा ओढण्याच्या नादात लॅच लागलं, मुलगी घरात अन् ती बाहेर अडकली.खिडकीला सरकतं ग्रील होत, त्याच कुलूप फोडायला ती दगड मारत होती तेवढयात तो कुठूनतरी आला. काय झालं ते कळल्यावर त्याने त्याच्या घरातून मोठा हातोडा आणला, आणि एका दणक्यात ग्रीलचं कुलूप फोडून आतमध्ये उडी मारून गेला. मुलीला घेऊन पहिल्यांदा त्याने लॅच उघडलं. जणू काही घाई यालाच जास्त होती.तेव्हापासून शुभदाची त्याच्याकडे बघण्याची नजरच बदलली. तीही त्याच्याशी अगदी घरच्या माणसासारख बोलू लागली.आणि ती चांगली बोलते म्हणून हा ही तिच्याशी, तिच्या घरातल्या सगळ्यांशी आपलेपणाने बोलू लागला.मग हळूहळू शुभदाच्या लक्षात येऊ लागलं, अरे हा तर आपला बंडूमामा होता तसाच आहे अगदी.शुभदा लहान असताना, हा बंडूमामा, तिच्या आईच्या आत्याचा मुलगा चार महीन्यातून एकदा तरी त्यांच्याकडे यायचाच. येताना सगळ्या लहान मुलांसाठी आठवणीने गोळ्या आणायचा. तो आला की शुभदाला शाळेत सोडण्या- आणण्याचं काम त्याच्याकडेच असायचं. तिलाही आवडायचा तो येणार म्हटल्यावर. तो कधीही कुठलंही काम करायचा. तो खरंतर सगळ्यांची सगळी काम करण्यासाठीच होता. डोक्याने अधू म्हणून तसा सर्वांकडून दुर्लक्षिलेला. पण मनाने अगदी साधा.मुलांसारखच मन म्हणून तो सगळ्याच मुलांना खूप खूप आवडायचा. आणि हा ही असाच होता. शुभदाला वाटलं, खोट त्याच्या मनात नव्हतीच कधी. आपल्याच मनात होती. तिलाही आता त्याच्याबद्दल तिच्या बंडूमामामुळे ओलावा वाटायला लागला. तो दिसला की तिला बंडू मामाच आठवायचा.त्याच्याशी नीट बोलणारे तसे कमीच होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर छदमी हास्यच यायचं त्याच्याकडे बघून. तो सगळ्यांशी चांगला बोलायचा वागायचा, पण बहुदा सगळे त्याला झिडकारायचेच. तो अजिबात अपायकारक नसताना, फक्त डोक्याने कमी म्हणून. शुभदाला वाटायचं, त्याचा बिचाऱ्याचा काय दोष त्यात (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); पुढे दुसऱ्या दिवशीही त्याने खिडकीतून तिच्या मुलीला हाक मारली. काय करते सोनू विचारलं आणि निघून गेला.शुभदाचं घर ग्राऊंड फ्लोअरलाच होत. जाता येता बिल्डिंगमधली सगळी माणसं दिसायची. नंतर तर तो सारखाच खिडकीतून मुलीशी बोलू लागला, आणि मुलगीही त्याच्यासोबत गप्पा मारू लागली. तो दिसला की तिलाही आनंद व्हायचा. पण शुभदा मात्र मनात उगाचच अढी ठेऊनच होती.खिडकीत मुलगी नाही दिसली तर तो बेधडक बेल वाजवून दरवाजा उघडायला लावायचा. किंवा ढकलेला असेल तर उघडून पोरीला बोलवायचा. तिच्याशी दोन शब्द बोलून वर घरी जायचा.शुभदाला हे आवडत जरी नसलं, तरी तिला आतापर्यंत कळलं होतं, की तो खरंच डोक्याने थोडा अधू होता. आणि अपायकारक तर मुळीच नव्हता. कारण एकदा असच तिची मुलगी आत बेडरूममध्ये होती. हा तिला बोलवत होता तर ती येत नाही म्हणून हा बिनधास्त आत बेडरूममध्ये शिरला, आणि मुलीशी दोन शब्द बोलून निघूनही गेला.पण त्यावेळी शुभदाला मनात अगदी धस्स झालं होतं. त्याच्यावर संशयही आला होता, पण तो फार साधा होता. दुनियदारीपासून खूप लांब, त्याच्या डोक्याची समजच नव्हती तेवढी.त्यानंतर एकदा मुलीने खिडकीतून खेळणं बाहेर टाकलं म्हणून ती तिला घरात ठेऊन ते उचलायला गेली. नुसता दरवाजा ओढण्याच्या नादात लॅच लागलं, मुलगी घरात अन् ती बाहेर अडकली.खिडकीला सरकतं ग्रील होत, त्याच कुलूप फोडायला ती दगड मारत होती तेवढयात तो कुठूनतरी आला. काय झालं ते कळल्यावर त्याने त्याच्या घरातून मोठा हातोडा आणला, आणि एका दणक्यात ग्रीलचं कुलूप फोडून आतमध्ये उडी मारून गेला. मुलीला घेऊन पहिल्यांदा त्याने लॅच उघडलं. जणू काही घाई यालाच जास्त होती.तेव्हापासून शुभदाची त्याच्याकडे बघण्याची नजरच बदलली. तीही त्याच्याशी अगदी घरच्या माणसासारख बोलू लागली.आणि ती चांगली बोलते म्हणून हा ही तिच्याशी, तिच्या घरातल्या सगळ्यांशी आपलेपणाने बोलू लागला.मग हळूहळू शुभदाच्या लक्षात येऊ लागलं, अरे हा तर आपला बंडूमामा होता तसाच आहे अगदी.शुभदा लहान असताना, हा बंडूमामा, तिच्या आईच्या आत्याचा मुलगा चार महीन्यातून एकदा तरी त्यांच्याकडे यायचाच. येताना सगळ्या लहान मुलांसाठी आठवणीने गोळ्या आणायचा. तो आला की शुभदाला शाळेत सोडण्या- आणण्याचं काम त्याच्याकडेच असायचं. तिलाही आवडायचा तो येणार म्हटल्यावर. तो कधीही कुठलंही काम करायचा. तो खरंतर सगळ्यांची सगळी काम करण्यासाठीच होता. डोक्याने अधू म्हणून तसा सर्वांकडून दुर्लक्षिलेला. पण मनाने अगदी साधा.मुलांसारखच मन म्हणून तो सगळ्याच मुलांना खूप खूप आवडायचा. आणि हा ही असाच होता. शुभदाला वाटलं, खोट त्याच्या मनात नव्हतीच कधी. आपल्याच मनात होती. तिलाही आता त्याच्याबद्दल तिच्या बंडूमामामुळे ओलावा वाटायला लागला. तो दिसला की तिला बंडू मामाच आठवायचा.त्याच्याशी नीट बोलणारे तसे कमीच होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर छदमी हास्यच यायचं त्याच्याकडे बघून. तो सगळ्यांशी चांगला बोलायचा वागायचा, पण बहुदा सगळे त्याला झिडकारायचेच. तो अजिबात अपायकारक नसताना, फक्त डोक्याने कमी म्हणून. शुभदाला वाटायचं, त्याचा बिचाऱ्याचा काय दोष त्यात अशांना हवही काय असतं अशांना हवही काय असतं कुणी थोडही चांगलं बोललं की खूष होतात अगदी. पण त्याच्याशी थोडं चांगलं बोलायलाही जीवावर यायचं माणसांना, हे सत्य होतं. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); तो कामानिमित्त सारखा खालीवर करत असायचाच, आणि प्रत्येक वेळी हिच्या घरात आवाज दयायचाच.आता अस झालं होतं की त्याचा आवाज नाही ऐकला तर हिला आणि मुलीला चुकल्यासारखं वाटायला लागायचं.त्याच्या घरी सगळे होते, आणि त्याला व्यवस्थित संभाळूनही होते. लग्न होणं तर दूरच होतं त्याच्यासाठी.आता शुभदालाही तिथे आठ वर्षे झाली होती. आणखीही एक मेम्बर घरात वाढला होता. मुलीला सोनू आणि मुलाला सोन्या त्याची त्यानेच नाव ठेवलेली. हा दोघा पोरांना सारखं जाऊन येऊन विचारत बसायचा.असंच एकदा शुभदाने घराचं रिन्युएशन काढलं होतं. घरात सगळीकडे पसारा होता, काम करणारी माणसं होती. तिला त्यात काहीच सुचत नव्हतं. अस्ताव्यस्त सगळं बघून नुसतं इरिटेट होत होतं. मुलांनाही मैत्रिणीकडे पाठवून दिलं होतं.आणि नेमका नेहमीसारखा खिडकीतून त्याचा आवाज आला. तो पोरांना बाहेरून हाका मारत होता. शुभदा काम करून आणि बाकीच्या आवाजने खूप वैतागलेली होती, तिने त्याला उत्तरच दिलं नाही. उत्तर आलं नाही म्हणून त्याने सरळ दरवाजा ढकलून विचारलं, मुलं कुठायत कुणी थोडही चांगलं बोललं की खूष होतात अगदी. पण त्याच्याशी थोडं चांगलं बोलायलाही जीवावर यायचं माणसांना, हे सत्य होतं. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); तो कामानिमित्त सारखा खालीवर करत असायचाच, आणि प्रत्येक वेळी हिच्या घरात आवाज दयायचाच.आता अस झालं होतं की त्याचा आवाज नाही ऐकला तर हिला आणि मुलीला चुकल्यासारखं वाटायला लागायचं.त्याच्या घरी सगळे होते, आणि त्याला व्यवस्थित संभाळूनही होते. लग्न होणं तर दूरच होतं त्याच्यासाठी.आता शुभदालाही तिथे आठ वर्षे झाली होती. आणखीही एक मेम्बर घरात वाढला होता. मुलीला सोनू आणि मुलाला सोन्या त्याची त्यानेच नाव ठेवलेली. हा दोघा पोरांना सारखं जाऊन येऊन विचारत बसायचा.असंच एकदा शुभदाने घराचं रिन्युएशन काढलं होतं. घरात सगळीकडे पसारा होता, काम करणारी माणसं होती. तिला त्यात काहीच सुचत नव्हतं. अस्ताव्यस्त सगळं बघून नुसतं इरिटेट होत होतं. मुलांनाही मैत्रिणीकडे पाठवून दिलं होतं.आणि नेमका नेहमीसारखा खिडकीतून त्याचा आवाज आला. तो पोरांना बाहेरून हाका मारत होता. शुभदा काम करून आणि बाकीच्या आवाजने खूप वैतागलेली होती, तिने त्याला उत्तरच दिलं नाही. उत्तर आलं नाही म्हणून त्याने सरळ दरवाजा ढकलून विचारलं, मुलं कुठायततिला वाटलं, ह्या पसाऱ्यात ह्याला आत्ताच यायचं होतंतिला वाटलं, ह्या पसाऱ्यात ह्याला आत्ताच यायचं होतं ती जरा त्रासिकतेनेच बोलली, मुलं बाहेर गेलीयेत.मनात काही नव्हतं तिच्या, त्यावेळी कोणीही समोर आलं असत तर कदाचित हिच रिऍक्शन असती तिची. तिला फारसं काही वाटलं ही नाही तेव्हा.दुसऱ्या दिवशी मात्र तो हॉस्पिटलमध्ये असल्याची खबर तिला पोचली, तेव्हा तिला खूपच वाईट वाटलं. लवकर बरं वाटु दे म्हणून देवाला बोललीही ती. आणि तिसऱ्या दिवशी तो डायरेक्ट गेल्याचीच खबर आली. शुभदाला खरंच वाटेना. अरे, परवा तर बोलला ना हा माझ्याशी. चांगला तर होता. हे काय अनपेक्षित ती जरा त्रासिकतेनेच बोलली, मुलं बाहेर गेलीयेत.मनात काही नव्हतं तिच्या, त्यावेळी कोणीही समोर आलं असत तर कदाचित हिच रिऍक्शन असती तिची. तिला फारसं काही वाटलं ही नाही तेव्हा.दुसऱ्या दिवशी मात्र तो हॉस्पिटलमध्ये असल्याची खबर तिला पोचली, तेव्हा तिला खूपच वाईट वाटलं. लवकर बरं वाटु दे म्हणून देवाला बोललीही ती. आणि तिसऱ्या दिवशी तो डायरेक्ट गेल्याचीच खबर आली. शुभदाला खरंच वाटेना. अरे, परवा तर बोलला ना हा माझ्याशी. चांगला तर होता. हे काय अनपेक्षित आणि ती शेवटची आठवण तरी काय असावी, मी वैतागल्याची आणि ती शेवटची आठवण तरी काय असावी, मी वैतागल्याची इतके वर्ष त्याच्याशी चांगले बोललो आपण. तो गेला, आणि हिच्या जीवाला मात्र कायमचा चटका लागला.ती विसरू म्हणताही विसरू शकणार नाही, अशी आठवण तिला देऊन गेला. काय बंध होते कोण जाणे इतके वर्ष त्याच्याशी चांगले बोललो आपण. तो गेला, आणि हिच्या जीवाला मात्र कायमचा चटका लागला.ती विसरू म्हणताही विसरू शकणार नाही, अशी आठवण तिला देऊन गेला. काय बंध होते कोण जाणे एकदा दोनदाच कधी म्हणाला असेल, राग नाही ना येत तुला. मला मोठा भाऊ समज हा. लोकं माझ्यावर सारखी रागवत असतात. ती त्यावेळी मनातच म्हणालेली, मला नाही राग येणार, मी तुझ्यासारखा माणूस पाहिलाय.तो जाऊन चार वर्ष झाली, तरी शुभदाला अजूनही सारखं वाटतं, तो येईल आणि हाक मारेल. तो होता तर बिल्डिंग गजबजलेली वाटायची तिला. तो सारखा इकडे तिकडे करत असायचा.सर्वांना विनाकारण हाका मारून बोलतं करायचा. आता तो नाही तर तसं काही कोणी करत नाही. कारण आता तिथे कोणी डोक्याने अधू नाही ना मनाने त्याच्याइतकं साफ एकदा दोनदाच कधी म्हणाला असेल, राग नाही ना येत तुला. मला मोठा भाऊ समज हा. लोकं माझ्यावर सारखी रागवत असतात. ती त्यावेळी मनातच म्हणालेली, मला नाही राग येणार, मी तुझ्यासारखा माणूस पाहिलाय.तो जाऊन चार वर्ष झाली, तरी शुभदाला अजूनही सारखं वाटतं, तो येईल आणि हाक मारेल. तो होता तर बिल्डिंग गजबजलेली वाटायची तिला. तो सारखा इकडे तिकडे करत असायचा.सर्वांना विनाकारण हाका मारून बोलतं करायचा. आता तो नाही तर तसं काही कोणी करत नाही. कारण आता तिथे कोणी डोक्याने अधू नाही ना मनाने त्याच्याइतकं साफतसा त्याच्याजाण्याने कुणाला काही फरकही नाही, कारण आधीही तो कुणाच्या खिजगणतीतीत नव्हता, आणि आतातर अजिबातच नाही.पण शुभदाच्या घरी मात्र जातानाही आठवणीने कायमची आठवण ठेऊन गेला तो.........कुठल्या हक्काने ते त्याचं त्यालाच माहीत............तसा त्याच्याजाण्याने कुणाला काही फरकही नाही, कारण आधीही तो कुणाच्या खिजगणतीतीत नव्हता, आणि आतातर अजिबातच नाही.पण शुभदाच्या घरी मात्र जातानाही आठवणीने कायमची आठवण ठेऊन गेला तो.........कुठल्या हक्काने ते त्याचं त्यालाच माहीत............©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा, आणि शेअर करताना मात्र नावासकटच करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/flipkart-starts-offering-complete-mobile-protection-at-rs-99-per-mobile/articleshowprint/70783068.cms", "date_download": "2020-09-26T03:25:25Z", "digest": "sha1:TNY35XZKLWUPCPQO2W62NDTJUIP6QZKU", "length": 3383, "nlines": 8, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "बिघडलेला मोबाइल ९९ रुपयांत होणार दुरुस्त", "raw_content": "\nनवी दिल्ली: फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनीने मोबाइल विकत घेणाऱ्या ग्राहकांसाठी सुरक्षा प्लान लाँच केला आहे. या प्लानला 'कम्पलीट मोबाइल प्रोटेक्शन' (cpm) हे नाव देण्यात आले आहे. या प्लानच्या अंतर्गत ग्राहकांना मोफत ब्रँड अधिकृत रिपेअर किंवा बदलून मिळेल. या प्लानची सुरुवातीची किंमत ९९ रुपये असेल. या प्लानमध्ये ब्रेकेज, लिक्विड डॅमेज, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसंबंधित समस्या सोडवल्या जाणार आहे.\nफ्लिपकार्ट कंपनीद्वारे या सर्विसअंतर्गत दुरुस्त केलेल्या स्मार्टफोनची घरपोच डिलिव्हरी केली जाणार आहे. शाओमी, ओप्पो, पोको, रियलमी, स‌ॅमसंग, अॅपल, हॉनर, अॅसुस, इन्फिनिक्स आणि अन्य काही ब्रँडबरोबर हा प्लान मिळणार आहे.\nया क्रमांकावर करा कॉल\nया इन्शुरन्सवर दावा ठोकण्यासाठी १८०० ४२५ ३६५ ३६५ या क्रमांकावर कॉल करून आपली पॉलिसी आयडी शेअर करावी लागणार आहे. आपल्या मोबाइलची स्क्रीन तुटली असेल किंवा लिक्विड डॅमेज असेल, तर आपल्या ई-मेल आयडीवर लिंक पाठवण्यात येईल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ५०० रुपये फी द्यावी लागेल. पहिला 'पिक अप' आणि 'ड्रॉप' मोफत असेल.\n१० दिवसात पुन्हा मिळेल मोबाइल\nफ्लिपकार्ट कंपनीकडून दहा दिवसांच्या आत मोबाइल परत मिळेल. दहा दिवसांच्या आत मोबाइल न मिळाल्यास, फ्लिपकार्टकडून ५०० रुपयांचे गिफ्ट वाउचर मिळेल. या प्लानमध्ये तुम्ही एकदाच बार डॅमेज स्क्रीन आणि लिक्विड डॅमेजचा दावा ठोकू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.diliptiwari.com/2019/08/blog-post.html", "date_download": "2020-09-26T02:50:31Z", "digest": "sha1:6XESWENR754NSTRU3KKLLFKU5ILTQJMP", "length": 16570, "nlines": 312, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: गिरीशभाऊ तुम्हारा चुक्याच !", "raw_content": "\nकोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदत कार्यात स्वतः सहभागी होऊनही मोबाईल सेल्फी आणि व्हीडीओमुळे ना. गिरीशभाऊ महाजन भयंकर टीकेचे धनी ठरले आहेत. ना. भाऊंचे योग्य की अयोग्य अशा द्विधा मनःस्थितीत मी स्वतः होतो. मंत्र्याने पूरस्थितीची पाहाणी करायला हवी, आपदग्रस्तांना भेटायला हवे, मदत कार्यात लक्ष घालायला हवे, या गोष्टी योग्य वाटत होत्या. पण हे करीत असताना सेल्फी व व्हीडीओचा घोळ टाळता आला असता.\nगिरीशभाऊ उत्साही आणि धडाडीने काम करणारे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत. विरोधी पक्षातून फूटून निघणाऱ्यांचे आधारस्तंभ आहेत. उद्भवलेल्या संकटाचे मोचक आहेत. गुजर पाटील या बहुजन समाजाचे नेते आहेत. अशा व्यक्तिमत्वाचा सेल्फी आणि व्हीडीओ उथळपणे सोशल मीडियात प्रसारित होणे हे कडवट प्रतिक्रियांचे कारण नक्कीच आहे.\nगिरीशभाऊ, तुम्ही जामनेरमध्ये बुलेट पळवता, त्याचे आम्हाला कौतुक आहे. तुम्ही टपरीवर उभे राहून पान खाता, ते आम्ही डोळे भरुन पाहतो. रथाच्या किंवा इतर मिरवणुकीत तुम्ही लेझीम खेळतात तेव्हा आमच ऊर भरुन येतो. तुम्ही पक्षाचा विजय झाला की ढोल ताशांवर नाचतात तेव्हा आम्हाला तुमच्या स्वच्छंदीपणाचा हेवा वाटतो. लहान मुलांच्या शाळेत तुम्ही कमरेला पिस्तूल लावून भाषण देता तेव्हा आम्ही डोळे भरुन पिस्तुल पाहतो. तुम्ही हायवेवर बंद पडलेला ट्रक ड्राव्हर म्हणून बाजुला करता तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो. हायवेवर अपघात झालेला पाहून तुम्ही जखमींना उचलून रुग्णवाहिकेत टाकतात तेव्हा आम्हीही संवेदनशिल होतो. तुम्ही हातात पिस्तुल घेऊन बिबट्याला शोधतात तेव्हा आम्ही जाम खूश होतो. आरक्षण, मोर्चे, उपोषण अशा असंतोषाला तुम्ही सामोरे जाता तेव्हा आम्हाला तुम्ही खूप भारी वाटतात. वारीत सहभागी झाल्यानंतर तुमच्या कपाळी अबीर बुक्का शोभतो. महाआरोग्य अभियानात काही गैरसोयी असतानाही शेकडो रुग्णांना दवापाणी करतात तेव्हा आम्हाला समाधान मिळते. हे सारे कर्म पाहाता पुढाकार घेऊन झटपट काम करणे वा उरकणे हा तुमचा स्वभाव गुण आहे.\nकोल्हापूर व सांगली परिसरात आलेला महापूर ही आकस्मिक उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती आहे. चार दिवस पुराचे पाणी गल्लीबोळात थैमान घालते आहे आणि वरून मुसळधार सुरुच आहे, असा अनुभव यापूर्वी फारसा कुठेही नव्हता. महापूराचे पाणी वाढत असताना जवळपास सर्वच राजकीय पक्ष आपापल्या निवडणूकपूर्व यांत्रांमध्ये व्यस्त होते. प्रशासनही बेसावध होते. नंतर मात्र सर्वच मंडळी महापूराकडे धावली. अशा आपत्तीत बचाव कार्य प्रारंभ होण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो दिला गेला. या वेळेत विरोधकांना त्यांच्या काळातील आपत्ती आणि मदत कार्याचे साक्षात्कार होऊ लागले. मुख्यमंत्र्याची जात, पालकमंत्रीची बेफिकरी आणि तुमचा प्रसिध्दी स्टंटपणा असे विषय उफाळून आले. त्यात सेल्फी व व्हीडीओचा नादानपणे केलेला प्रसार हा व्यक्तिशः तुमच्या अंगलगट आला.\nतुम्ही स्वतः लाईफ जैकेट घालून व पुराच्या पाण्यात उतरुन बचाव कार्यात सहभागी होणे आवश्यक नव्हते. तरी तुम्ही तसे केले. कधीकधी लोकप्रतिनिधी इतरांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी थेट कृतीत सहभागी होतात. कारगिल, सियाचीन भागात सिमेवरील सैनिकांना पंतप्रधान वा संरक्षणमंत्र्यांनी भेटायला जाणे हा तसाच नियमित सरावाचा भाग आहे. सन १९९२ मध्ये नौदलाच्या प्रात्यक्षिकवेळी तत्कालिन संरक्षणमंत्री शरद पवार यांनीही दोन जहाजातील क्रेनसारख्या ट्रॉलीचा वापर करुन समुद्री साहस पूर्ण केले होते. तेव्हा पवार यांचे माध्यमांनी प्रचंड कौतुक केले होते. राष्ट्रपती पदाचा काळ संपत असताना प्रतिभाताईंनी सुखोई या लढाऊ विमानातून प्रवास केला होता. वाढत्या वयाचा विचार करता, ताईंचे ते धाडसी होते. तरीही या दोन्ही उदाहरणांची तुलना तुमच्या पुरातील उडीशी करता येणार नाही.\nपुरातील बचाव कार्याचा सेल्फी काढणे आणि व्हीडीओ प्रसारित करणे हा तुमच्या पंटरांचा उतावळेपणा आणि उथळपणा आहेच. माझे व्यक्तिगत मत आहे की, गिरीशभाऊ तुम्हारा चुक्याच पण हे सांगत असताना मला याचेही भान आहे की, तुम्ही राजीनामा वगैरे द्यावा असे मी म्हणणार नाही. कारण, मी जामनेर मतदार संघातील मतदार नाही आणि मी तुम्हाला मत दिलेले नाही. तुम्हाला पायउतार करायचेच असेल तर ते मुख्यमंत्री करतील वा जामनेरचे मतदार करतील. माझ्या टीकेच्या पुंगीला विचारतो कोण पण हे सांगत असताना मला याचेही भान आहे की, तुम्ही राजीनामा वगैरे द्यावा असे मी म्हणणार नाही. कारण, मी जामनेर मतदार संघातील मतदार नाही आणि मी तुम्हाला मत दिलेले नाही. तुम्हाला पायउतार करायचेच असेल तर ते मुख्यमंत्री करतील वा जामनेरचे मतदार करतील. माझ्या टीकेच्या पुंगीला विचारतो कोण काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा माहौल असताना एकाही बुजूर्ग पुढारी वा लेखणी बहाद्दरांना भाजपच्या स्वबळावरील बहुमताचा छाती ठोक अंदाज आला नव्हता, हे शाश्वत सत्य आहे. आपणच निर्माण केलेला प्रपोगंडा सत्य मानून व तेच जनतेचे मत समजून वृत्तांकने करणाऱ्यांना मतदारांनी सणसणीत चपराक दिली आहे. अशा मानसिक पराभवाला इव्हीएम घोटाळ्याचा आरोप करणे हा अंधश्रध्देगत उतारा आहे.\nअशाही स्थितीत, गिरीशभाऊ तुम्हारा चुक्याच हे व्यक्तिशः आणि थेट सांगण्याचे धाडस माझ्यात आहे. बाकी सोशल मीडियात ट्रोल करणारे पंटर किंवा कंपू याचा विचार मी करीत नाही आणि अशांना भीकही घालत नाही हे व्यक्तिशः आणि थेट सांगण्याचे धाडस माझ्यात आहे. बाकी सोशल मीडियात ट्रोल करणारे पंटर किंवा कंपू याचा विचार मी करीत नाही आणि अशांना भीकही घालत नाही यापुढे जाऊन गिरीशभाऊ तुम्ही चंद्रावरुन उडी मारा, पण त्याचा सेल्फी वा व्हीडीओ काढून सोशल मीडियात प्रसारित करताना पंटरगिरी होणार नाही याची काळजी घ्याच यापुढे जाऊन गिरीशभाऊ तुम्ही चंद्रावरुन उडी मारा, पण त्याचा सेल्फी वा व्हीडीओ काढून सोशल मीडियात प्रसारित करताना पंटरगिरी होणार नाही याची काळजी घ्याच ... तुम्हारा चुक्याच असे पुन्हा म्हणायला वेळ हाती नाही \nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://cinenama.in/2020/04/24/ajay-devgan-raid-squeal-announced/", "date_download": "2020-09-26T03:10:55Z", "digest": "sha1:P4F6HDP4NRI7BGSK3B2WDNJKGAYXCC5O", "length": 6901, "nlines": 112, "source_domain": "cinenama.in", "title": "अजय देवगणच्या ‘रेड’ चा सिक्वेल येणार... - Cinenama", "raw_content": "\nHome बातम्या अजय देवगणच्या ‘रेड’ चा सिक्वेल येणार…\nअजय देवगणच्या ‘रेड’ चा सिक्वेल येणार…\n२०१८ मध्ये हिट ठरलेल्या ‘रेड’ या सिनेमाचा सिक्वेल येत असल्याची बातमी बी टाऊन मध्ये जोरदार फिरत आहे. याही सिनेमात मूळ सिनेमा प्रमाणे अजय देवगण मूळ भूमिकेत असणार असून इतर कलाकारांबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही.\nसाध्य या नवीन सिनेमाच्या संहितेवर काम सुरु असल्याच समजतं. मूळ सिनेमाचे निर्माते सामान्य लोकांसारखे नायक सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याच्या फ्रेन्चायाजी बाबत विचार सुरु असल्याचे ही सूत्रांकडून समजते.\n२०१८ सालच्या रेड चे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता याचे होते परंतु या सिक्वेलच्या दिग्दर्शनाबाबत कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. लॉक डाउनच्या आधी अजय देवगण अमित शर्माच्या ‘मैदान’ वर काम करत होता. यावर्षी त्याचे मैदान सह थँक गॉड आणि नीरज पांडेच्या चाणक्य हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतील.\nमहाराष्ट्र दिनी ‘एबी आणि सीडी’ चा डिजिटल प्रीमिअर\nPrevious articleमहाराष्ट्र दिनी ‘एबी आणि सीडी’ चा डिजिटल प्रीमिअर\nNext articleका गाजताहेत एवढी अहिराणी गाणी \nप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन\n‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका\n‘शहीद शिरीषकुमार’ लवकरच रुपेरी पडद्यावर\nप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात...\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\n‘मी का मास्क वापरू\nभारतबाला म्हणताहेत ‘उठेंगे हम’\nशेखरने सुरु केले आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0250+ro.php", "date_download": "2020-09-26T01:38:46Z", "digest": "sha1:ZSHTZFDNK6J5IMKCTQ7RM4ZXSZERPYZ3", "length": 3568, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0250 / +40250 / 0040250 / 01140250, रोमेनिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0250 हा क्रमांक Vâlcea क्षेत्र कोड आहे व Vâlcea रोमेनियामध्ये स्थित आहे. जर आपण रोमेनियाबाहेर असाल व आपल्याला Vâlceaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. रोमेनिया देश कोड +40 (0040) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Vâlceaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +40 250 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनVâlceaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +40 250 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0040 250 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathijag.com/2018/12/apalya-aaila-hostel-vishayi-mahiti.html", "date_download": "2020-09-26T03:12:37Z", "digest": "sha1:KMZOGKXJWZV7OY7273QGJJNJW2UP6KZQ", "length": 8036, "nlines": 76, "source_domain": "www.marathijag.com", "title": "आपल्या हॉस्टेल विषयी माहिती सांगणारे आईला पत्र - मराठी जग", "raw_content": "\nHome अनौपचारिक पत्र आपल्या हॉस्टेल विषयी माहिती सांगणारे आईला पत्र\nआपल्या हॉस्टेल विषयी माहिती सांगणारे आईला पत्र\nडिसेंबर १८, २०१८ अनौपचारिक, पत्र\nआपल्या हॉस्टेल विषयी माहिती सांगणारे आईला पत्र\nमाझा विश्वास आहे की तुम्ही सर्व खुशाल असाल.\nमी येथे उत्तम आहे तुला माझ्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. मी हॉस्टेल आणि विद्यालय यामध्ये गुंतून गेली आहे .मला इथे राहण्यात आता कसलीही अडचण येत नाही.माझी रूम पहिल्या मजल्यावर आहे. माझ्या रूम मध्ये माझ्या सोबत आणखी एक मुलगी राहते. तीच नाव शामला आहे आणि ती नाशिक ची आहे .तीही माझ्या वर्गातलीच आहे. आम्ही आता चांगल्या मैत्रिणी झाल्या आहोत आणि रोज एकत्रच जातो येतो. तिने मला होस्टेलच्या सर्व सवयी अवगत करून दिल्या आहेत.तिच्या आणखी मैत्रिणी पण माझ्या ओळखीच्या झाल्या आहोत. तर मला आता एकटेपण नाही वाटत.\nहॉस्टेलचा पर्यावरण अभ्यासास खूपच उपयुक्त आहे. कारण आम्ही वेळापत्रकानुसार अभ्यास करतो. त्यामुळे आम्हाला अभ्यास आणि खेळण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. माझ्या सर्व मैत्रिणीनं त्यांच्या अभ्यासात खूप रस आहे. म्हणूनच आमच्या अभ्यासाच्या विषयांवर बर्याच वादविवाद होत असतात ज्यामुळे एखाद विषय सहजतेने लक्षात राहते.\nहॉस्टेल मध्ये खूप सारे नियम आहेत ज्यामुळे आम्ही नेहमी अनुशासित राहतो.\nमी एक गोष्ट मान्य करते कि मी आता हि जास्त जेवत नाही. पण आई तुझ्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते. तशी मला आता होस्टेलच्या जेवणाची सवय झाली आहे तरी तू चिंता करु नकोस.\nआई मला तुझी आणि पप्पांची कमी जाणवते.येणाऱ्या उन्हाळी सुट्टीची मी आतुरतेने वाट पाहत आहे ,तेव्हा मी घरी येऊ शकेन\nआपल्या हॉस्टेल विषयी माहिती सांगणारे आईला पत्र Reviewed by Mahitiworld on डिसेंबर १८, २०१८ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nमाझी शाळा यावर निबंध\nबोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र\nअनौपचारिक आरोग्य टीप औपचारिक घरगुती उपाय तंत्रज्ञान निबंध पत्र मराठी महाराष्ट्र माहिती सण GK Privacy Policy\nमाझी शाळा यावर निबंध\nमाझी शाळा यावर निबंध (शाळेतील निबंध) माझी शाळा यावर निबंध - \" नमस्कार माझा ह्या ज्ञानमंदिरा... सत्यम् शिवम् सुंदरा &q...\nशिक्षणावर निबंध 1 (100 शब्द) शिक्षण ही आपल्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल शिकण्याची प्रक्रिया आहे. हे आपल्याला कोणतीही वस्तू ...\nबोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र\nबोनाफाइड प्रमाणपत्र म्हणजे काय बोनाफाइड चा अर्थ असा होतो की प्रमाणित, अस्सल, म्हणजेच जेव्हा कोणाला प्रमाणाची गरज असते तेव्हा तो एखाद्य...\nतुमच्या शाळेची सहलीला जाण्याची परवानगी मागणारे पत्र बाबांना लिहा.\nतुमच्या शाळेची सहलीला जाण्याची परवानगी मागणारे पत्र बाबांना लिहा. Tumchya shalechya sahlila janyachi parvangi magnare patra दिन...\nतुमच्या मित्रास/मैत्रिणीस सुट्टीनिमित्त तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण देणारे पत्र\nतुमच्या मित्रास/मैत्रिणीस सुट्टीनिमित्त तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण देणारे पत्र Tumchya Mitras /Maitranis Suttinimitt Ghri Yenyache Aamtr...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t4550/", "date_download": "2020-09-26T02:59:39Z", "digest": "sha1:34B2AZ5V5R76AOL3SIDWFTABH3BGLM7O", "length": 3177, "nlines": 81, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-आला आला पाऊस आला", "raw_content": "\nआला आला पाऊस आला\nआला आला पाऊस आला\n\"आला आला पाऊस आला\"\nगडगडला तो मेघ काळा\nआला आला पाऊस आला\nसो सो सो सो सुटला वारा\nथेंबे थेंबे तळे साचे\nचिंब चिंब न्हालेली सृष्टी\nउल्हसित होते मन माझे\nकडकड गडगड संगीतात या\nमंत्रमुग्ध होऊनि मन नाचे\nआला आला पाऊस आला\nआला आला पाऊस आला\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+03731+de.php", "date_download": "2020-09-26T02:38:12Z", "digest": "sha1:ZBFBRVH72IA6CSR2TT6TDC6BYTJJRAID", "length": 3596, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 03731 / +493731 / 00493731 / 011493731, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 03731 हा क्रमांक Freiberg Sachs क्षेत्र कोड आहे व Freiberg Sachs जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Freiberg Sachsमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Freiberg Sachsमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 3731 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनFreiberg Sachsमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 3731 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 3731 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.goodknight.in/marathi/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-26T02:13:05Z", "digest": "sha1:RB5WTVGQPBFNTSQJFWLKIYO6LPN44G5S", "length": 11743, "nlines": 110, "source_domain": "www.goodknight.in", "title": "डेंग्यू मच्छरांच प्रजनन कोठे होत?", "raw_content": "\nगुडनाइट गोल्ड फ्लॅश सिस्टम New\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nगुडनाइट गोल्ड फ्लॅश सिस्टम New\nडेंग्यू मच्छरांच प्रजनन कोठे होत\nआपले मुल आनंददायक पावसाच्या दिवसांचा आनंद घेत असेल तर, आपण आपला दिवस आपल्या मुलाला धोकादायक लागण होऊ शकेल याबद्दल सतत चिंता करीत असतो, विशेषत: जेंव्हा ‘डेंग्यू’ च्या धोक्याची सूचना देणारी घंटा वाजायला लागत असते तेंव्हा. एडिस मच्छरांच्या चाव्यामुळे डेंग्यू ताप येतो. त्यांच्या शरीरावरिल काळे आणि पांढर्‍या पट्ट्यामुळे ओळखू येणार्‍या, एडीस मच्छरांना अंडी घालण्यासाठी फक्त एका चमचा पाणी आणि लार्वा पूर्णपणे प्रौढ मच्छरांत विकसित होण्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच, अशा ठिकाणी जेथे स्वच्छ साचलेले पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी ते प्रजननक्षमपणे प्रजनन करू शकतात. परंतु डेंग्यूच्या मच्छरांच्या प्रजननाबद्दल सखोल अंतरदृष्टी मिळवण्यासाठी आपल्याला त्याचे जीवनचक्र प्रथम जाणून घेणे आवश्यक आहे.\nमादी एडीस मच्छर त्यांची अंडी पाण्याच्या कंटेनरच्या आतील ओल्या भिंतींवर घालतात आणि लार्वा पावसामुळे किंवा इतर स्त्रोतांद्वारे अंडी पाण्यामध्ये बुडवून 2 ते 7 दिवसात अंडे उबवतात. 4 दिवसांच्या आत, लार्वा सूक्ष्मजीव आणि कणांचे जैविक पदार्थ खातात आणि त्याचे लार्वापासून कोशवासी किड्या (pupa)मध्ये रुपांतर होते. कोशवासी किडे(Pupae) काही खात नाहीत; ते फक्त दोन दिवसात प्रौढ, उडणार्‍या मच्छरांच्या शरीरात रुपांतरीत होतात. मग, नवजात तयार झालेला प्रौढ त्वचेला(कोशाला) तोडल्यानंतर पाण्यातून बाहेर येतो. एडीस मच्छराचे संपूर्ण जीवन चक्र दीड ते तीन आठवड्यात पूर्ण केले जाऊ शकते. मच्छरांच्या बदलणार्‍या सवयींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा\nडेंग्यू मच्छरांच्या प्रजनन स्थळ (साइट्स)\nम्हणूनच, पूर्णपणे वाढ झालेला प्रौढ मच्छर कोणत्याही कोपर्‍यातील साठलेल्या पाण्यात विकसित होऊ शकतो. भारतातील डेंग्यू मच्छरांच्या आवडत्या प्रजनन स्थळांना ओळखण्यासाठी नुकत्याच झालेल्या संशोधन अभ्यासानुसार डेंग्यू मच्छरांनी टायर्स, बॅरल्स, प्लास्टिक ड्रम आणि जेरी कॅनमध्ये प्रजनन करणे निवडले आहे. पण एडीस मच्छरांकरिता इतर ही विविध घरगुती आणि बाह्य प्रजनन स्थळ(साइट्स) आहेत.\nकिचन रॅक – ज्याच्यावर घासलेली भांडी ठेवतात\nस्वयंपाकघर / स्नानगृहातिल निचरा करणारे तुंबलेले पाईप\nबाथरूममध्ये / पाण्याच्या टाकीमध्ये गळती\nन झाकलेल्या बादल्या / वॉटर कंटेनर्स जी नियमितपणे वापरली जात नाहीत\nसजावटीच्या फुलांच्या फुलदाण्या / पाण्यामधील शोभेच्या वस्तु\nबोन्साय झाडे / इनडोर वनस्पती\nस्त्रोत कमी करणे ज्यात उपरोक्त सर्व स्रोतांमधील पाण्याच्या अनावश्यक संग्रहासह घराभोवती पडलेल्या प्लास्टिकच्या जार, बाटल्या, टायर्स, पक्षांची न्हाणी आणि बादल्या यासारख्या कंटेनरमध्ये एडीस इजिप्ती आपली अंडी घालू शकतात ते काढून टाकू शकता. पाणी साठविण्याचे कंटेनर जाळीने झाकणे सुनिश्चित करा.\nदिवसभर डेंग्यूचे मच्छर सक्रिय असतात, त्यामुळे दिवसा द्रव वेफोरायझर्स, कॉइल्स किंवा कार्ड्ससारख्या मॉस्किटो रिपेलंट चा वापर करणे सुनिश्चित करा. घरामध्‍ये सुरक्षेसाठी, गुडनाइट एक्टिव+ वापरून आपल्या कुटुंबास डेंग्यू विषाणूविरूद्ध सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करा.\nजेंव्हा आपण बाहेर पडता तेव्हा वैयक्तिक मॉस्किटो रिपेलंट लागू करण्याची खात्री करा. आपल्या कपड्यांवर गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑनच्या फक्त 4 ठिपके घेऊन 8 तासांपर्यंत बाहेर सुरक्षित रहा.\nमच्छरांपासून मुक्त कसे व्हावे\nशाळेत जाणार्‍या मुलांसाठी स्वच्छता सुनिश्चित करण्याचे स्मार्ट(चलाख) मार्ग\nसर्वोत्कृष्ट नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंट तेल कसे निवडावे\nआपल्याला डेंग्यूबद्दल माहित असणे आवश्यक आहे ते सर्व\nचिकनगुनिया, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध याबद्दल आपल्याला जे सर्व माहित असणे आवश्यक आहे\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nनॉन इलेक्ट्रिक मॉस्किटो रिपेलंट\nमॉस्किटो पॅचेस फॉर बेबिज\n© गुडनाइट. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/western-clothes/", "date_download": "2020-09-26T02:07:02Z", "digest": "sha1:2VYZCXUYJDZS2EEANRBMYQJSPW4Z5ZPA", "length": 1478, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Western Clothes Archives | InMarathi", "raw_content": "\nभारतातील या ८ ठिकाणी मुलींना आज ही जीन्स घालण्यास “सक्त मनाई आहे”\nभारत देश आज जगातील त्या देशांमध्ये देखील गणला जातो ज्या देशांना आधुनिक म्हटले जाते. मग आधुनिकीकरण हे फक्त तंत्रज्ञानात झालं आहे की काय असा प्रश्न पडतो.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.marathijag.com/2018/11/raigad-fort-information-in-marathi.html", "date_download": "2020-09-26T02:33:27Z", "digest": "sha1:LQB3F3AR4LEKLPCYXVQX2XO7AOPBAXPP", "length": 15137, "nlines": 85, "source_domain": "www.marathijag.com", "title": "रायगड किल्ल्याची माहिती - मराठी जग", "raw_content": "\nHome मराठी माहिती रायगड किल्ल्याची माहिती\nनोव्हेंबर २९, २०१८ मराठी, माहिती\nरायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे स्थित एक किल्ला आहे. रायगड( रायरी) किल्ला जावळीच्या राजे चंद्र रावजी मोरे यांनी बांधला नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला त्यांच्याकडून जिंकला आणि १६७४ मध्ये रायरी चा रायगड म्हणून आपल्या मराठी साम्राज्याची राजधानी प्रस्थापित केली, त्याकाळात मराठी साम्राज्य मध्य आणि पश्चिम भारतात पसरली होती.\nहा किल्ला सध्या भारत सरकारच्या नियंतरणाखाली आहे तरी जनतेसाठी खुला आहे.\nमुगल साम्राज्य (१६८९ -१७०७)\nयुनायटेड किंगडम ईस्ट इंडिया कंपनी (१८१८-१८५७)\nहिरोजी इंदुलकर निर्मित हा किल्ला समुद्राच्या सपाटी पासून ८२० मीटर (२७०० फूट) उंच आहे आणि सह्याद्री पर्वत रांगेत आहे. किल्ल्याकडे जाण्यासाठी सुमारे १७३७ पायऱ्या आहेत. रायगड रोपेवे चा वापर करून 10 मिनिटांत किल्ल्याच्या शिखरावर पोहचण्याची सोय आहे. १८१८ मध्ये इंग्रजांनी कब्जा केल्यानंतर रायगड किल्याचा काही भाग इंग्रजांनी लुटला आणि नष्ट केला आहे.\n१६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकल्या नंतर राजे चन्द्ररावजी मोरे, जावळीच्या राजा आणि चंद्रगुप्त मौर्य कुटुंबाचा वंशज म्हणून राईचा किल्ला म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजींनी हा किल्ला पुन्हा बांधले आणि विस्तारित केले व त्याचे नाव रायगड (राजा किल्ला) असे ठेवले. हे छत्रपती शिवाजी मराठा साम्राज्याचे राजधानी बनले.\nरायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड आणि रायगडवाडी हे गाव आहेत. रायगडमधील मराठ्यांच्या शासनकाळात या दोन गावांना फार महत्वाचे मानले गेले. रायगडाच्या किल्ल्याच्या वरच्या चढावर पाचाडपासून सुरु होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनकाळात, पाचाड गावामध्ये दहा हजार सैनिक नेहमीच असायचे.\nचंद्रराव मोरे पासून राई घेण्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडपासून सुमारे २ मैल अंतरावर अजून एक किल्ला लिंगाना बांधला. कैद्यांना ठेवण्यासाठी लिंगाना किल्ला वापरला जात असे.\n१६८९ मध्ये, झुल्फिकार खानने रायगडावर कब्जा केला आणि औरंगजेबने त्याचे नाव इस्लामगड ठेवले. १७०७ मध्ये सिद्दी फते खान किल्ला ताब्यात घेतला आणि १७३३ पर्यंत ते ठेवले. इ.स. १६५ मध्ये मालवानसह रायगडचा किल्ला सध्या महाराष्ट्रच्या दक्षिणेकडील जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सशस्त्र मोहिमेचा उद्देश होता.१८१८ मध्ये, ब्रिटिशांनी काळकाई टेकडी वरून तोफांनी केलेल्या नाशामुळे ९ मे १८१८ रोजी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ते देण्यात आले.\nरायगड किल्ला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आणि मुख्य आर्किटेक्ट / अभियंता हीरोजी इंदुळकर होते. मुख्य महल लाकडाचा वापर करून बांधला गेला होता, ज्याच्या केवळ बेस खांबच आता दिसतात. मुख्य किल्ल्याच्या खोऱ्यात राणीच्या खोल्या, सहा आराम गृह होते. याव्यतिरिक्त, तीन नाजरदेखे मनोऱ्याचे अवशेष थेट किल्या समोर समोर पाहिले जाऊ शकतात, त्यापैकी केवळ दोन मनोरे आता दिसतात कारण बॉम्बस्फोटात तिसरा भाग नष्ट झाला होता. रायगड किल्ल्यामध्ये बाजारपेठेचे खंड देखील आहेत. किल्यावर कुत्रिम तलाव आहे जे गंगा सागर म्हणून ओळखले जाते.\nकिल्ल्याचा एकमेव मुख्य मार्ग \"महा दरवाजा\" (विशाल दरवाजा) द्वारे जातो. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना महा दरवाजाजवळ दोन मोठे बुरुज आहेत जे उंची ६५-७० फूट आहे. या दरवाजाच्या ठिकाणापासून किल्ल्याची उंची ६०० फूट आहे. किल्ल्याच्यावर एक प्रसिद्ध असे \"हिरकणी बुर्ज\" (हिरकणी बेसेशन) आहे.\nरायगडाच्या किल्ल्याच्या आत असलेला राजाचा दरबारत मूळ सिंहासनाची प्रतिकृती आहे ज्यात नगरखाना नावाचा मुख्य दरवाजा आहे.सिंहासन पासून प्रवेशद्वार पर्यंत आवाज ऐकू जाईल अशी रचना मांडण्यात आली होती . मीना दरवाजा नावाचा एक द्वारका प्रवेशद्वार, हा किल्ला राजवाड्यांच्या खासगी प्रवेशद्वाराचा होता जो राणीच्या चौथ्या स्थानावर होता. राजा आणि राजाच्या दूताने स्वतः पालखी दरवाजाचा उपयोग केला आहे. पालखी दरवाजा उजवीकडे, तीन गडद आणि खोल खोलीची एक पंक्ती आहे. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ते किल्ल्यासाठी ग्रॅनरी होते\nकिल्यावर टकमक टोक नावाचं एक कडा आहे जिथून आरोपी आणि कैद्यांना शिक्षा म्हणून खाली ढकलून दिले जायचे. हा क्षेत्र आता लोखंडी कुंपणाने सुरक्षित केला गेला आहे. मुख्य मार्केट अॅव्हेन्यूच्या खोर्यांच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला आहे.जी वाट पुढे जगदीश्वर मंदिर\nआणि महाराजांच्या समाधी कडे जाते. राजमाता जिजाबाई शहाजी भोसले यांची समाधी, छत्रपती शिवाजीची आई, पाचडच्या मूळ गावात दिसू शकतात. जिजाबाई समाधी किल्ल्याच्या अतिरिक्त प्रसिद्ध आकर्षणांमध्ये खुबलाध बुर्ज, नने दरवाजा आणि हत्ती तालाव (एलिफंट लेक) यांचा समावेश आहे.\nरायगड किल्ल्याची माहिती Reviewed by Mahitiworld on नोव्हेंबर २९, २०१८ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nमाझी शाळा यावर निबंध\nबोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र\nअनौपचारिक आरोग्य टीप औपचारिक घरगुती उपाय तंत्रज्ञान निबंध पत्र मराठी महाराष्ट्र माहिती सण GK Privacy Policy\nमाझी शाळा यावर निबंध\nमाझी शाळा यावर निबंध (शाळेतील निबंध) माझी शाळा यावर निबंध - \" नमस्कार माझा ह्या ज्ञानमंदिरा... सत्यम् शिवम् सुंदरा &q...\nशिक्षणावर निबंध 1 (100 शब्द) शिक्षण ही आपल्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल शिकण्याची प्रक्रिया आहे. हे आपल्याला कोणतीही वस्तू ...\nबोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र\nबोनाफाइड प्रमाणपत्र म्हणजे काय बोनाफाइड चा अर्थ असा होतो की प्रमाणित, अस्सल, म्हणजेच जेव्हा कोणाला प्रमाणाची गरज असते तेव्हा तो एखाद्य...\nतुमच्या शाळेची सहलीला जाण्याची परवानगी मागणारे पत्र बाबांना लिहा.\nतुमच्या शाळेची सहलीला जाण्याची परवानगी मागणारे पत्र बाबांना लिहा. Tumchya shalechya sahlila janyachi parvangi magnare patra दिन...\nतुमच्या मित्रास/मैत्रिणीस सुट्टीनिमित्त तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण देणारे पत्र\nतुमच्या मित्रास/मैत्रिणीस सुट्टीनिमित्त तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण देणारे पत्र Tumchya Mitras /Maitranis Suttinimitt Ghri Yenyache Aamtr...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathijag.com/2019/11/Application-For-Availing-Bus-Service.html", "date_download": "2020-09-26T02:07:52Z", "digest": "sha1:F5H45U7LBSFSRNCF4GV3F5L6XP5ZVRNF", "length": 7904, "nlines": 78, "source_domain": "www.marathijag.com", "title": "‌गावा पर्यंत बस सेवा उपलब्ध करण्या हेतू पत्र / अर्ज - मराठी जग", "raw_content": "\nHome औपचारिक पत्र ‌गावा पर्यंत बस सेवा उपलब्ध करण्या हेतू पत्र / अर्ज\n‌गावा पर्यंत बस सेवा उपलब्ध करण्या हेतू पत्र / अर्ज\nनोव्हेंबर ०७, २०१९ औपचारिक, पत्र\n‌गावा पर्यंत बस सेवा उपलब्ध करण्या हेतू पत्र / अर्ज\nदिनांक :- / / .\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ,\nविषय :- गावा पर्यंत बस सेवा उपलब्ध करण्या हेतू निवेदन पत्र\nमी महाड गावात राहणारा एक रहिवाशी आहे. आमचं गाव हे मुख्य मार्गापासून ६ किलोमीटर अंतरावर आहे,म्हणून आम्हाला दूरवर प्रवास करण्यासाठी नेहमी ६ किमी चालत यावं लागत, नंतर तिथून बस सेवा उपलब्ध होते. गावातून अनेक रहिवाशी तालुक्याला कामाला जातात. कॉलेज सुद्धा तालुक्याला आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासा दरम्यान खूप अडचणी येतात. चांगले आणि मोठे इस्पितळ तालुक्याला असल्या मुळे आजारी रोग्यांना व्यायक्तिक वाहनांन शिवाय पर्याय नाही. या सर्व गोष्टी मुळे गावकरी , विद्यार्थी यांना रोजच खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. खाजगी सेवा देणारे तर खूपच प्रवास शुल्क आकारत असल्या कारणाने त्याचा रोज उपयोग करणे सुध्दा रहिवाश्यांना अशक्य आहे.\nतरी महोदय आपणास विनंती आहे की, आमच्या गावा पर्यंत बस सेवा उपलब्ध करून दिली जावी जेणेकरून रहिवाशांचे जीवन उद्धारेल. मुख्य मार्गापासून आमच्या गावा पर्यंत येणारी सडक पक्की आहे त्यामुळे वाहनांना अगदी सोईस्कर आहे. बस सेवा उपलब्ध झाल्यास नजदीक च्या गावांना सुद्धा त्याचा लाभ होईल. तसेच महामंडळाला नियमित भाडेही मिळेल.\nतरी लवकरात लवकर आपली प्रतिक्रिया कळवावी. आणि बस सेवा सुरू करावी. कळावे.\n‌गावा पर्यंत बस सेवा उपलब्ध करण्या हेतू पत्र / अर्ज Reviewed by Mahitiworld on नोव्हेंबर ०७, २०१९ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nमाझी शाळा यावर निबंध\nबोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र\nअनौपचारिक आरोग्य टीप औपचारिक घरगुती उपाय तंत्रज्ञान निबंध पत्र मराठी महाराष्ट्र माहिती सण GK Privacy Policy\nमाझी शाळा यावर निबंध\nमाझी शाळा यावर निबंध (शाळेतील निबंध) माझी शाळा यावर निबंध - \" नमस्कार माझा ह्या ज्ञानमंदिरा... सत्यम् शिवम् सुंदरा &q...\nशिक्षणावर निबंध 1 (100 शब्द) शिक्षण ही आपल्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल शिकण्याची प्रक्रिया आहे. हे आपल्याला कोणतीही वस्तू ...\nबोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र\nबोनाफाइड प्रमाणपत्र म्हणजे काय बोनाफाइड चा अर्थ असा होतो की प्रमाणित, अस्सल, म्हणजेच जेव्हा कोणाला प्रमाणाची गरज असते तेव्हा तो एखाद्य...\nतुमच्या शाळेची सहलीला जाण्याची परवानगी मागणारे पत्र बाबांना लिहा.\nतुमच्या शाळेची सहलीला जाण्याची परवानगी मागणारे पत्र बाबांना लिहा. Tumchya shalechya sahlila janyachi parvangi magnare patra दिन...\nतुमच्या मित्रास/मैत्रिणीस सुट्टीनिमित्त तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण देणारे पत्र\nतुमच्या मित्रास/मैत्रिणीस सुट्टीनिमित्त तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण देणारे पत्र Tumchya Mitras /Maitranis Suttinimitt Ghri Yenyache Aamtr...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/new-phone-launch", "date_download": "2020-09-26T03:22:04Z", "digest": "sha1:2EW4JHRFCKHB5JMXOHXI6YWMGYS6ROB7", "length": 10377, "nlines": 171, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "new phone launch Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nवडेट्टीवारांकडून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मेटेंचा आरोप\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार\nपॉप-अप सेल्फी कॅमेराचा सर्वात स्वस्त Honor 9X फोन भारतात लाँच, पाहा किंमत\nचीनची स्मार्टफोन कंपनी ऑनरने भारतात आपला X-सीरीजचा नवा स्मार्टफोन Honor 9X लाँच (Honor 9x launch india) केला आहे.\nलवकरच शाओमीचा 64 मेगापिक्सल कॅमेराचा फोन लाँच होणार\nमोबाईल वर्ल्ड काँग्रेस (एमडब्ल्यूसी) 2019 मध्ये शाओमीने एमआयएक्स 3 स्मार्टफोन लाँच केला. हा फोन लाँच केल्यानंतर शाओमी आता MIX 4 लाँच करणार आहे.\nतब्बल 48 मेगापिक्सेल कॅमेरा, रेडमीच्या नव्या फोनचा लाँचिंग मुहूर्त ठरला\nनवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमी भारतात 20 मे रोजी रेडमी नोट 7 एस लाँच करणार आहे, अशी घोषणा कंपनीने केली आहे. यापूर्वी कंपनीने\nतब्बल तीन रिअर कॅमेरे, ओप्पोचा नवा फोन 4 तारखेला भारतात\nमुंबई : ओप्पो भारतात आर सीरिजचा पहिला स्मार्टफोन लाँच करत आहे. येत्या 4 डिसेंबरला कंपनी मुंबईतील एका कार्यक्रमात आर17 फोन लाँच करणार आहे. ओप्पोच्या आर17\nसॅमसंगचा ‘ड्युअल डिस्प्ले’ मोबाईल लाँच\nमुंबई– सध्या टेक्नोलॉजीमध्ये दिवसेंदिवस नव-नवीन गोष्टी घडत आहेत. नुकतेच चीनने निर्माण केलेला बातमी देणारा रोबोट असो, अथवा दुबई पोलिसांनी लाँच केलेली हवेत उडणारी बाईक असो,\nवडेट्टीवारांकडून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मेटेंचा आरोप\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nवडेट्टीवारांकडून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मेटेंचा आरोप\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/sushant-singh-suicide-case-shiv-sena-alone-due-to-silence-of-allied-congress-ncp-bjps-attack-127633391.html", "date_download": "2020-09-26T01:11:57Z", "digest": "sha1:3AVBT5GQS3MD4QKN4DI2KDMRWCQ2QGT4", "length": 8568, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sushant singh suicide case : Shiv Sena alone due to silence of allied Congress-NCP; BJP's attack | मित्रपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मौनामुळे शिवसेना एकाकी; भाजपचा हल्लाबोल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुशांतप्रकरणात 'मातोश्री' बॅकफूटवर:मित्रपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मौनामुळे शिवसेना एकाकी; भाजपचा हल्लाबोल\nअभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केंद्रीय तपास यंत्रणेकडे जाऊ द्यायचा नव्हता. त्यामुळे बुधवारी दुपारी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा राज्य सरकारविरोधात गेल्याने विरोधकांनी हल्ले सुरू केले आहेत, तर राष्ट्रवादी व काँग्रेस हे मित्रपक्ष शांत राहिल्याने शिवसेना एकाकी पडली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शिवसेनेच्या वतीने परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. अॅड. परब म्हणाले, गुन्हा मुंबईत घडला. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची ना हकरत घ्यावी, असे आमचे म्हणणे होते. कारण राज्यघटनेने जे अधिकार दिले आहेत त्यावर गदा येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने बाजू मांडली होती. महाराष्ट्र सरकारने बाजू मांडताना विरोध केला नसल्याचे अॅड. परब म्हणाले.\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांची पाठ थोपटली. ते म्हणाले की, सुशांतसिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केला, असे सर्वोच्च न्यायालयाने निवाडापत्रात म्हटले आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात न्यायालयास कोणताही दोष आढळला नाही. ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी सूचक इशारा दिला. ‘सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासात दिशाभूल करणारे अदृश्य हात सीबीआय तपासात समोर येतील. टाळेबंदीच्या काळात १५ हजारपेक्षा जास्त नागरिकांचा जीव गमवला असताना बेकायदेशीरपणे पार्ट्यांचे आयोजन करणारी पब आणि पार्टी गँग याप्रकरणी तुरुंगात जाईल,’ असे शेलार म्हणाले. भाजप खासदार नारायण राणे म्हणाले, हा भारतीय जनतेच्या मनातील निर्णय आहे. लोकांना हे प्रकरण सीबीआयकडे जावे हे अपेक्षित होते. त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. यामुळे शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक चांगलेच तोंडावर पडले आहेत, अशी टीका राणे यांनी केली.\nशिवसेनेकडून संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ‘महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. न्याय आणि सत्य यासाठी संघर्ष करणारे राज्य आहे. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे एक षड्यंत्र आहे,” असे राऊत म्हणाले.\n> सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेत अस्वस्थता आहे. आदित्य ठाकरे यांची छबी बिघडवण्यात भाजपला यश आल्याचे शिवसेना नेते मान्य करत आहेत.\n> आदित्य यांनी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी स्वत: स्पष्टीकरण करायला नको होते. त्यामुळे सोशल मीडियात भाजपने टाकलेल्या जाळ्यात शिवसेना अलगद सापडल्याचे सेनेत मानले जात आहे.\n> सुशांतसिंहप्रकरणी शिवसेना नेतृत्वाने बिहारी लोकांविषयी काही वक्तव्य करावे असा भाजपचा डाव होता. त्याचा बिहार विधानसभा आणि मुंबई महापालिकेत भाजपला लाभ उठवायचा होता.\n> सुशांतसिंह प्रकरणाचा सीबीआयकडे तपास गेल्याने शिवसेनेत चिंतेचा सूर आहे. आदित्य यांची चौकशी सीबीआयकडून होईल, अशी भीती शिवसेनेत आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80/S0IPEl.html", "date_download": "2020-09-26T02:46:07Z", "digest": "sha1:7Z5WL6WNX6MAOVU4EL3BFJCUD2LOUYMO", "length": 2854, "nlines": 36, "source_domain": "rajsatya.page", "title": "वाहन चालक पदासाठी माजी सैनिकांनी नाव नोंदणी करावी - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nवाहन चालक पदासाठी माजी सैनिकांनी नाव नोंदणी करावी\nApril 6, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nवाहन चालक पदासाठी माजी सैनिकांनी नाव नोंदणी करावी\nसातारा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. याकरिता कोरानाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश्य परिस्थिती निर्माण झालेस ती हाताळण्यासाठी वाहन चालक इच्छुक माजी सैनिकांची आवश्यकता भासू शकते. तरी सातारा जिल्ह्यातील सैन्य सेवेतून चालक पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी त्यांच्या नावांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या zswo_satara@maharashtra.gov.in या ई-मेलवर कळविण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.onthebuzz.in/mh-benefits-of-turmeric/", "date_download": "2020-09-26T02:29:51Z", "digest": "sha1:44EN5UNF7VC5C6NNBJUQ2IA3ZTR37NRE", "length": 9430, "nlines": 111, "source_domain": "www.onthebuzz.in", "title": "हळदीसह नितळ, स्वच्छ आणि चमकणारी त्वचा मिळवण्याचे आश्चर्यकारक मार्ग !!", "raw_content": "\nहळदीसह नितळ, स्वच्छ आणि चमकणारी त्वचा मिळवण्याचे आश्चर्यकारक मार्ग \nआपल्याला घाबरवण्यासाठी आणि हरित सौंदर्य क्रांतीत सामील होण्यासाठी आपल्या सौंदर्यप्रसाधनांच्या पॅकेजवरील घटकांची यादी पुरेशी आहे. अगदी नैसर्गिक नसलेले ब्रॅण्डसुद्धा या प्रवृत्तीमध्ये बदलत आहेत आणि निसर्गाने जन्माला येणा-या घटकांच्या विज्ञान-समर्थित फायद्याचा फायदा घेत आहेत, आणि या हिरव्या सौंदर्य चळवळीतील तार्‍यांपैकी एक हळद, हा मसाला देखील एक औषध आहे जो भारतात वापरला जातो.\nवैज्ञानिकदृष्ट्या कर्क्युमा लॉन्गा म्हणून ओळखले जाणारे हळद हा मसाला प्रामुख्याने थायलंड आणि भारतीयमध्ये वापरला जातो. हा सूर्यास्त-पिवळा मसाला रेसिपीला एक विशिष्ट चव आणि रंग देतो. इतर अनेक आश्चर्यकारक नैसर्गिक घटकांप्रमाणेच हळद देखील त्वचेचे मौल्यवान फायदे देते. हे एक ज्ञात सत्य आहे की शतकानुशतके भारतीय महिला आपल्या दैनंदिन कार्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी हळदी वापरत आहेत.\nसूर्यप्रकाशापासून होणारे नुकसान आणि वृद्धत्वापासून संरक्षण करा\nब्रेकआउट्स प्रतिबंधित करा (आणि सक्रिय कमी करा)\nएक्जिमा आणि सोरायसिसशी लढा\nमुरुमांची डाग कमी करा\nआपला नैसर्गिक प्रकाश बाहेर आणा\n1 चमचा हळद आणि लिंबाचा रस घालून दाट पेस्ट बनवा\nप्रभावित भागास विशेषतः चेहरा, मान, कोपर इ. ला लागू करा\nते 20 ते 30 मिनिटे कोरडे होऊ द्या आणि पाण्याने धुवा\nआवश्यक असल्यास आपण काकडीसह लिंबाचा रस बदलू शकता\nअर्धा चमचा हळद, एक चमचे मधात मिसळा\nआपल्या स्वच्छ प्रभावित भागास वर समान रीतीने तो स्तर लावा\nते 20 मिनिटे कोरडे राहू द्या आणि गरम पाण्याने स्वच्छ धुवा\nखबरदारीची सूचनाः हळद तुमची त्वचा डागळेल, पण एका रात्रीपेक्षा जास्त काळ टिकणार नाही. आपण टाळायचे असल्यास दुध किंवा दहीचे काही थेंब मिसळा.\nहळद इंफ्युज्ड ऑइल – डेव्हिड बाउलीची दाहक-विरोधी हळद तेलेची कृती\n1 कप चूर्ण हळद\n10 चमचे एवोकॅडो तेल\n10 चमचे द्राक्ष बियाणे तेल\n10 चमचे ऑलिव्ह तेल\nतेल आणि हळदीने पाण्याची बाटली भरा. दोन आठवडे बसू द्या. आणि, व्होईला, ते वापरण्यास तयार आहे.\nगडद चट्टे रेसिपीसाठी नारळ तेल आणि हळद मुखवटा\n1 टेस्पून. खोबरेल तेल\nगडद चट्टे रेसिपी निर्देशांसाठी नारळ तेल आणि हळद मुखवटा\nमध्यम भांड्यात नारळ तेल आणि हळद घाला. एकत्र होईपर्यंत साहित्य मिक्स करावे. सर्व चेहर्यावर ठेवा आणि 20 मिनिटे बसू द्या.\nमास्क बसू दिल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा आणि आपला चेहरा हळद पासून पूर्णपणे स्वच्छ झाला आहे याची खात्री करा.\nहळदीचा अवशेष काढून टाकण्यासाठी फेस टोनर जोडा. आपली त्वचा खूप मऊ आणि कोमल असावी.\nहळद, हळदपासून बनवलेल्या पावडर मसाल्याच्या रूपात आणि भारतीय पाककृतीमध्ये मुख्य घटक म्हणून ओळखली जाते.\nहळद पावडर हळद आवश्यक तेलासारखे कॉस्मेटिक आणि उपचारात्मक असे इतर अनेक उपयोग मिळवित आहे.\nअरोमाथेरपी मध्ये वापरल्या जातात, हळद आवश्यक तेलाची उबदार, मातीची, वुडडी गंध शरीराची आणि मनाची उन्नती, शक्ती, आराम आणि बळकट करण्यासाठी मदत करते.\nकॉस्मेटिक मध्ये वापरल्या जातात, हळद आवश्यक तेल त्वचा, केस शुद्ध, पोषण, स्पष्टीकरण, गुळगुळीत, शांत, उत्साह वाढवणे, मजबूत करणे आणि वाढवणे असे मानले जाते.\nमालिशमध्ये वापरले जाते, हळद आवश्यक तेल शरीराच्या नैसर्गिक पुनर्प्राप्ती प्रक्रियेस मदत करते, त्वचेची लवचिकता आणि दृढता वाढवते आणि विशिष्ट अस्वस्थता व्यवस्थापित करण्यास मदत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/aditya-thackeray-waste-recycle-fashion-show/", "date_download": "2020-09-26T00:53:44Z", "digest": "sha1:NSPOD2DT3WHRWRT55M6ZZMS7ROKANATC", "length": 15076, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रत्येकाने 10 फूट जागा कचरामुक्त केल्यास समस्या कायमची सुटेल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा विश्वास | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोल्हापूर – 84 लाखांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला अटक\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nप्रत्येकाने 10 फूट जागा कचरामुक्त केल्यास समस्या कायमची सुटेल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा विश्वास\nराज्यातील लोकसंख्या पाहता प्रत्येकाने दहा फूट जरी जागा कचरामुक्त केली तरी कचऱ्याची समस्या कायमची सुटेल, असा विश्वास शिवसेना नेते, पर्यटन, पर्यावरणमंत्री, युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र, देश आणि जगाला हा उपक्रम आदर्श ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कचरा कुंडीबाहेर दिसलाच नाही पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.\nमुंबई प्लॅस्टिक आणि कचरामुक्त करण्यासाठी पालिकेने वरळीच्या ‘एनएससीआय’ येथे आयोजित केलेल्या ‘स्वच्छता पारितोषिक वितरण समारंभ आणि कचरा पुनर्वापर फॅशन शो’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते विविध विभागांत विजेत्या ठरलेल्या सोसायटय़ा, शाळा, आस्थापने, कार्यालये यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, केवळ मुंबईच नाही तर राज्यातील सर्व पालिकांमध्ये कचरामुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालिका आयुक्तांची बैठक घेऊन सूचना दिल्याचेही ते म्हणाले.\nयावेळी शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, नगरसेवक-आमदार रईस शेख, नगरसेवक आशीष चेंबूरकर, सुजाता पाटेकर, हेमांगी वरळीकर, दत्ता नरवणकर, स्नेहल आंबेकर, चंद्रशेखर वायंगणकार, अभिनेत्री दीपाली सय्यद, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, सचिन अहिर, सुनील शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी कचरा पुनर्वापर फॅशन शोचेही आयोजन करण्यात आले.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nकोल्हापूर – 84 लाखांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला अटक\nया बातम्या अवश्य वाचा\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B6_%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-09-26T02:13:17Z", "digest": "sha1:E5EMR7IE6WJAQLOOB2L7BVRAZUTNIKO2", "length": 8444, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सतीश धवन अंतराळ केंद्र - विकिपीडिया", "raw_content": "सतीश धवन अंतराळ केंद्र\nसतीश धवन अंतराळ केंद्र\nस्थापना १ ऑक्टोबर, इ.स. १९७१\nमुख्यालय श्रीहरीकोटा, नेल्लोर, आंध्र प्रदेश\nसतीश धवन अंतराळ केंद्र\nसतीश धवन अंतराळ केंद्राचे भारताममधील स्थान\nसंकेतस्थळ सतीश धवन अंतराळ केंद्राचे संकेतस्थळ (इस्रो)\nसतीश धवन अंतराळ केंद्र हे आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरीकोटा येथे असलेले इस्रोचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. इ.स. २००२ साली इस्रोचे अध्यक्ष राहिलेले सतीश धवन यांच्या मृत्यूनंतर या प्रक्षेपण केंद्राला त्यांचे नाव देण्यात आले.\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती\nटी.इ.आर.एल.• विक्रम साराभाई अंतराळ केंद्र • इस्रो उपग्रह केंद्र • सतीश धवन अंतराळ केंद्र • लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र• स्पेस ॲप्लिकेशन केंद्र • आय.एस.टी.आर.ए.सी. • मास्टर कंन्ट्रोल फॅसिलीटी • इनर्शियल सिस्टम युनिट • नॅशनल रिमोट सेंन्सिंग एजन्सी • भौतिकी संशोधन कार्यशाळा\nएस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्सॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआरएनएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी\nप्रयोग आणि प्रक्षेपण यान\nएस.एल.वी • ए.एस.एल.वी • जी.एस.एल.वी • पी.एस.एल.व्ही. • स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग • भारतीय चंद्र मोहिम • ह्युमन स्पेस फ्लाईट • गगन • मंगळयान • भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३\nटी.आय.एफ़.आर. • आय.एन.सी.ओ.एस.पी.ए.आर. • रामन संशोधन संस्था • भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था • आय.यु.सी.ए.ए. • डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस • अंतरिक्ष • इस्रो • एरोस्पेस कमांड • डी.आर.डी.ओ.\nविक्रम साराभाई • होमी भाभा • सतीश धवन • राकेश शर्मा • रवीश मल्होत्रा • कृष्णस्वामी कस्तुरीरंगन • जयंत नारळीकर • यु. रामचंद्रराव • एम. अण्णादुराई • आर.व्ही. पेरूमल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०१६ रोजी १२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+08743+de.php", "date_download": "2020-09-26T01:20:26Z", "digest": "sha1:DAMF7FNSDGHBWBO53LWAZTBNTHQ77PPX", "length": 3584, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 08743 / +498743 / 00498743 / 011498743, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 08743 हा क्रमांक Geisenhausen क्षेत्र कोड आहे व Geisenhausen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Geisenhausenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Geisenhausenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 8743 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनGeisenhausenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 8743 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 8743 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathikhajina.com/tag/relation-ship-advice/", "date_download": "2020-09-26T02:54:45Z", "digest": "sha1:ZOYBD4EUQOZVRMVBOG7I5H6KF27ZF44V", "length": 1934, "nlines": 38, "source_domain": "www.marathikhajina.com", "title": "Relation ship advice | मराठी खजिना", "raw_content": "\nपालेभाज्यांचे हे आहेत फायदे\nधने-जिरे पूड चे फायदे\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन…\nडेटिंगला जाताना या टिप्स लक्षात ठेवा\nसंसारात चकमकी घडवणारी ४ कारणं\nपैसा सेक्स वेळ संवाद या ४ विषयांवर कायम वादविवाद होतात पती-पत्नी आणि प्रेम यांची जशी अभिन्न जोशी आहे, तशीच पती-पत्नी व भांडणं यांची युतीही ठरलेली आहे. एकमेकांवर अतिशय प्रेम असलेल्या […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/category/jobs-in-aurangabad/", "date_download": "2020-09-26T02:43:39Z", "digest": "sha1:B3H4LPGHYJEB3SHJDFKKSWZJFRONEYLZ", "length": 3845, "nlines": 73, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nGAD मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती सुरु\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nUT प्रशासन दमण आणि दीव येथे विविध पदांची भरती\nमुंबई उपनगर जिल्हा येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची भरती\nICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाची भरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, दिव अंतर्गत विविध पदांची भरती\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांच्या 171 जागांसाठी ऑनलाईन अर्ज…\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती\nRITES लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदांची भरती\nजेईई अॅडव्हान्स्ड: ९८ टक्के विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा केंद्र\nनॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरु\nनाशिक महानगरपालिका भरती पात्र आणि अपात्र यादी\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/response-to-journalism-social-media-courses", "date_download": "2020-09-26T01:16:06Z", "digest": "sha1:J24GG4HXGNPVD4ZBIG6O2RQXZQDENN66", "length": 5082, "nlines": 73, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Response to journalism, social media courses", "raw_content": "\nपत्रकारिता, सोशल मीडिया अभ्यासक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nअभ्यासक्रमाच्या आता मोजक्याच जागा शिल्लक\n‘देशदूत’ माध्यम समूहातर्फे घेण्यात येणार्‍या पत्रकारितेची तोंडओळख व सोशल मीडिया अभ्यासक्रमाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या अभ्यासक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभ्यासक्रमाच्या आता मोजक्याच जागा शिल्लक आहेत.\nजून महिन्यात घेतलेल्या पहिल्या टप्प्यानंतर वाचक व माध्यमांचे शिक्षण घेऊ इच्छिणार्‍यांकडून केल्या जाणार्‍या मागणीनंतर हा अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात येत आहे.\n‘देशदूत’ने तोंडओळख पत्रकारितेची व सोशल मीडिया या अभ्यासक्रमांची रचना केली आहे. माध्यम क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले ‘देशदूत’ मधील संपादक हा अभ्यासक्रम झूम अ‍ॅपवर ऑनलाईन पद्धतीने शिकवणार आहेत.\nअभ्यासक्रमात पत्रकारिता, बातमीचे लिखाण, लेखन कौशल्य, वृत्त संकलन, ग्रामीण पत्रकारिता, ब्लॉग लिखाण आदी विषय शिकवण्यात येणार आहेत. सोशल मीडिया अभ्यासक्रमात इंटरनेट, सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर, यू-ट्यूब, वेबसाईट, ब्लॉग, सिटीझन जर्नालिस्ट, विविध बिले ऑनलाईन भरणे आदी विषय शिकवण्यात येणार आहेत.\nप्रत्येक अभ्यासक्रमाचे शुल्क एक हजार रुपये आहे. दोन्ही अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास 300 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. प्रवेशप्रक्रियेसंबंधी अधिक माहितीसाठी 9423487920 या क्रमांकावर संपर्क साधावा. अभ्यासक्रमासाठी मोजक्याच जागा असल्याने http://deshdoot.org/course/ या वेबसाईटवर जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/ahmednagar/nagar-district-today-corona-patients-higher-corona-recovered-patients-326946", "date_download": "2020-09-26T02:21:31Z", "digest": "sha1:VIFF5YFT4CHKNR2D6AICOU2L5QFT7Y5P", "length": 13344, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "गुड न्यूज! नगर जिल्ह्यात आज कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त | eSakal", "raw_content": "\n नगर जिल्ह्यात आज कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त\nजिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. आज सकाळच्या अहवालात एकूण 54 जणबाधीत आढळून आलेले आहेत.\nनगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. आज सकाळच्या अहवालात एकूण 54 जणबाधीत आढळून आलेले आहेत. तर आज एकूण 133 जणांना रुग्णलयातून घरी सोडण्यात आले आहेत.\nजिल्ह्यात सोमवारी सांयकाळपासून ते आज (मंगळवार) दुपारी 12 पर्यंतच्या अहवालामध्ये कोरोना बाधीतांध्ये 54 जणांची वाढ झाल्याने जिल्ह्यात 3818 रुग्णांची संख्या झालेली असून त्यातील 2418 जण रुग्णालयातून बरे होऊन घरी परतलेले आहेत. सध्या 1346 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असून 53 जणांचा मृत्यू झालेला आहे.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपरपर्यंत 54 जण बाधित आढळून आले. यामध्ये नेवासे 11, संगमनेर पाच, श्रीगोंदे 10, कोपरगाव सात, पाथर्डी 10, अहमदनगर महापालिका हद्दीत आठ, नगर ग्रामीण एक, पारनेर एक, बीड एकजण बाधीत आढळून आलेले आहेत.\nदरम्यान, आज 133 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील 34, संगमनेर सहा, राहाता आठ, पाथर्डी एक, नगर ग्रामीण 27, श्रीरामपूर दोन, कॅन्टोन्मेंट 26, नेवासे तीन, श्रीगोंदे नऊ , पारनेर दोन, अकोले आठ, राहुरी पाच, शेवगाव एक व कर्जत एक अशा रुग्णांचा समावेश आहे.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nटेलरिंग व्यवसायिकांची गरजांना कात्री :कोरोनामुळे कारागिरांवर मोलमजुरीची वेळ\nकिल्लेमच्छिंद्रगड (जि. सांगली) : कोरोनामुळे शासनाने लग्नसमारंभासाठी पाहुण्यारावळ्यांच्या उपस्थितीस मर्यादा घालून दिल्याने लग्नकार्य साध्या पद्धतीने...\nकामगार विधेयकांविरोधात गडहिंग्लजला सहा संघटनांकडून निदर्शने\nगडहिंग्लज : कामगारांचे हक्क कमजोर करणाऱ्या विधेयकांना विरोध करीत विविध कामगार संघटनांनी आज निदर्शने केली. येथील प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन...\nकोरोनाबळींच्या अंत्यसंस्कारासाठी शुल्क वसुली, नातेवाईकांची ऐनवेळी पैशासाठी धावाधाव\nनागपूर : सुरुवातीला कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कारासाठी कुठलेही शुल्क न घेता उदार झालेली महापालिका आता घाटांवर त्यांच्या शुल्क वसूल करीत आहे. त्यामुळे...\nकोल्हापूर जिल्ह्यातील 529 गावांत कंटेन्मेंट झोन ठरले फेल 6504 कोरोनाग्रस्तांची भर\nकोल्हापूर,: ज्या घरात कोरोना बाधित रुग्ण आढळतो, त्या घराभोवतीच्या 500 मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करून बंदिस्त करण्यात येतो. कोरोनाचा प्रसार या...\nरत्नागिरीकरांना दिलासा ; बाधितांच्या तुलनेत तिप्पट रुग्ण कोरोनामुक्त\nरत्नागिरी - सात दिवसानंतर जिल्ह्यात चोविस तासात कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार झाला आहे. 116 बाधित सापडल्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा सात हजाराच्या...\nप्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय; अतिरिक्त सहा गाड्या धावणार\nभुसावळ ः रेल्वेत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालविणार आहे. या विशेष गाड्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/average-rain-register-konkan-3573-millimeter-and-its-helpful-farming-ratnagiri-district-343908", "date_download": "2020-09-26T02:32:17Z", "digest": "sha1:6IXPZC2BJAAFIDVM2X4BDQCBF6RV3LIJ", "length": 15262, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "यंदाचा पाऊस कोकणासाठी लय भारी ! डोलू लागल्या भाताच्या लोंब्या | eSakal", "raw_content": "\nयंदाचा पाऊस कोकणासाठी लय भारी डोलू लागल्या भाताच्या लोंब्या\nभात पसवणीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.\nमंडणगड : कोकणात यावर्षी पावसाने मुक्कामच ठोकला. जूनच्या प्रारंभी निसर्ग वादळाच्या रुपात सुरू झालेल्या पावसाच्या मान्सून सरी नियमित कोसळल्या. तालुक्‍यात आतापर्यंत ३,५७३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून साडेतीन हजारांची सरासरी पार केली आहे. अश्‍विनचा अधिक महिना लागल्याने व गडगडाट करीत पूर्वा नक्षत्रातच सरींची उतराई झाल्याचे चित्र आहे. भात पसवणीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.\nहेही वाचा - धक्कादायक ; अशी काढली पोस्टमास्तरने मृत व्यक्तींच्या खात्यावरील रक्कम\nजूनच्या पावसाच्या सरींवर भात लावणी आटोपली गेली. सुरू झालेल्या पावसाने उसंतच न घेतल्याने वरकस व पाणथळ लावणीची कामे यावर्षी खोळंबली नाहीत; मात्र पावसाने कोकणाला चांगलेच झोडपून काढले. पाणथळ भागात भात लावणी करताना शेतकऱ्यांना पाण्याचा अडथळा झाला. त्यावर मात करीत लावणीची कामे उरकली गेली. रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्‍लेषा, मघा, पूर्वा ही नक्षत्रे यावेळी तुफान बरसली; मात्र पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारा कमीजास्त पाऊस हे गणित जुळून आले नाही.\nपरिणामी रोपांच्या वाढीवर त्याचा परिणाम जाणवला. काकडी, पडवळ, कारलीसारख्या वेलवर्गीय वनस्पतींना त्याचा मोठा फटका बसला आहे. उत्तरा नक्षत्रात पिके पसवणीला सुरवात होते; मात्र एक अधिकचा महिना लागल्याने पिके पसवण्यास सुरवात झाली आहे. मध्येच उन्हाचा कडाका असल्याने आशा निर्माण झाली आहे. काही हळवी पिके पसवू लागल्याचे चित्र दिसून येते; मात्र रोपांची उंची कमी राहिल्याने दाण्यांची संख्या कमी भरण्याची शक्‍यता आहे.\nहेही वाचा - रत्नागिरीत हे तालुके बनत आहेत कोरोना हॉटस्पॉट\nगरवी पिके अजूनही पसवली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जंगली श्‍वापदांचा शेतात वावर सुरू असल्याने पिके येण्याआधीच त्यांची नासाडी होत आहे. तुलनेत ३७७ मि. मी. पाऊस कमी तालुक्‍यात १ जून ते ७ सप्टेंबरपर्यंत एकूण ३५७३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ३,९५० मि.मी. पाऊस झाला होता. यावर्षी ३७७ मि.मी. पाऊस कमी पडला आहे. तसेच २ सप्टेंबरपासून सहा दिवसांत फक्त ४८ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाल्याने पाऊस परतीच्या वाटेकडे निघाला असल्याचे चित्र आहे.\n- ३,५७३ मि.मी. पावसाची नोंद\n- वेलवर्गीय वनस्पतींना फटका\n- जंगली श्‍वापदांचा वावर, पिकाची नासाडी\nसंपादन - स्नेहल कदम\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्यांना रोखठोक उत्तर देणार : नितेश राणे\nसावंतवाडी : कृषी विधेयकाने शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे दलाल, एजंट, काही राजकीय पक्षांची दुकाने बंद होणार आहेत. शेतकरी उत्पादन कुठेही...\nयेत्या काही दिवसात मुंबईत तापमान वाढणार\nमुंबई,ता.25: मंगळवारपर्यंत मुंबईसह संपुर्ण कोकणात पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे पुन्हा तापमानात वाढ...\nपर्यटकांचा चिपळूणातील विसावा पॉइंटकडे ओढा\nचिपळूण ( रत्नागिरी ) - खवय्यांचे स्वादिष्ट जेवण, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाबरोबरच चिपळूण तालुका निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. परशुराम घाटातील...\nकृषी विधेयक कोकणला उपयुक्त ः शौकत मुकादम\nचिपळूण ( रत्नागिरी) - केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेले कृषी विधेयक हे कोकणच्या फायद्याचे आहे. कोकणात हजारो एकर जागा पडीक आहे. येथील नद्यांना वर्षभर...\nरेल्वेने जाताना एक तास आधी स्थानकात उपस्थित रहा; प्रशासनाची सुचना\nरत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर तुतारी आणि राजधानी या दोन गाड्या धावणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे. पण या गाड्यातून प्रवास करणाऱ्या...\nकोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी\nरत्नागिरी - कोकण रेल्वेच्या मार्गावर पुन्हा तुतारी आणि राजधानी या दोन गाड्या धावणार असल्याची घोषणा झाली आहे. पण या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/another-224-beds-nesco-covid-center-facility-dialysis-inaugurated-today-344670", "date_download": "2020-09-26T02:09:41Z", "digest": "sha1:QCBRM4CVMZTM77O4BV4DJBOHFYK4BEOF", "length": 15147, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "नेस्को कोविड केंद्रात आणखी 224 बेड्स; डायलिसीसची ही सुविधा,आज होणार उद्घाटन | eSakal", "raw_content": "\nनेस्को कोविड केंद्रात आणखी 224 बेड्स; डायलिसीसची ही सुविधा,आज होणार उद्घाटन\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरेगावच्या नेस्कोमध्ये आजपासून 224 खाटांची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. अतिदक्षता विभागापासून ते सिटीस्कॅनपर्यंतच्या सर्व अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात आहेत.\nमुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरेगावच्या नेस्कोमध्ये आजपासून 224 खाटांची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. अतिदक्षता विभागापासून ते सिटीस्कॅनपर्यंतच्या सर्व अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात आहेत.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने अवघ्या 45 दिवसांत हे रूग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात आयसीयू यूनिट, डायलिसीस सेंटर, सिटीस्कॅन, नियंत्रण कक्ष, ऑक्सिजन पुरवठा करणारे यूनिट तसेच हवा शुद्धीकरण केंद्र आहे. नेस्कोमध्ये आधीपासून 500 खाटांचे जम्बो कोरोना सेंटर असून त्यात आता अधिक 224 खाटांची भर पडणार आहे.\nलवकरच हे रूग्णालय लोकांच्या सेवेत समर्पित होईल. या ठिकाणी आलेला रुग्ण हा ठणठणीत बरा होऊनच गेल पाहिजे. यासाठी सर्वांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. या ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून रुग्णांवर 24 तास लक्ष देणे सोयीचे होणार असल्याची माहिती नेस्कोच्या कोविड समर्पित रुग्णालयाच्या डॉ. नीलम अंन्द्राडे यांनी दिली आहे. त्यात, या आयसीयूमध्ये डायलिसीस बेडसची विशेष सुविधा दिली जाणार असुन त्यासाठी 10 बेड्स असणार आहेत.\nआज या कोविड केंद्राचे उद्घाटन केले जाणार आहे. यात 224 आयसीयू बेड्स आणि 10 डायलिसीसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अनेकदा कोविड रुग्ण गंभीर परिस्थितीत केंद्रात दाखल होतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आयसीयूची गरज भासते. कोविड केंद्रात आयसीयूची सुविधा नसल्याने त्यांना कोविड रुग्णालयात पाठवले जाते. पण, आता कोविड रुग्णांना आयसीयूसाठी कुठे ही जावे लागणार नाही. कारण केंद्रातच आयसीयू बेड्स उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. सोबतच, ज्या रुग्णांना डायलिसीसची गरज भासते जसे की किडनीचे आजार असलेले रुग्ण किंवा ज्यांचे क्रियाटीन वाढून ज्यांना डायलिसीसची आवश्यकता असते अशा रुग्णांसाठी 10 बेड्स डायलिसीससाठी दिले जाणार आहेत अशी माहिती नेस्को कोविड केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंन्द्राडे यांनी दिली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआश्रमशाळांचे गतवर्षीचे परिपोषण अनुदान तत्काळ द्या...\nइस्लामपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वित्त विभागाने संगणकप्रणाली बिल पोर्टल बंद केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांचे गतवर्षीचे परिपोषण अनुदान थकित...\nलॉकडाउनमध्ये जिल्ह्यात अपघात घट\nकोल्हापूर ः कोरोनाच्या संकटाने लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये रस्त्यावरील वाहनांचीच संख्या कमी झाली. तसे अपघताचे प्रमाण कमी झाले. जिल्ह्यात या...\nसांगली जिल्ह्यात रिकव्हरी रेट वाढतोय : पालकमंत्री जयंत पाटील\nसांगली : सांगली जिल्ह्यात रिकव्हरी रेट वाढत आहे. \"माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात असून या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात...\nतुकाराम मुंढे जाताच अधिकाऱ्यांवरच धाक संपला; बदल्यांमध्ये मनपाचे ‘फॅमिली प्लॅनिंग'\nनागपूर : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पती-पत्नी एकत्रीकरण कायदा राज्यात लागू आहे. मात्र, महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने त्याही पुढचा निर्णय घेत एकच...\nझेंडूच्या फुलांना पुन्हा कवडी मोल दर\nदानोळी : सध्या अधिक महिन्यामुळे सर्व मुहूर्त अथवा कार्यक्रम नसल्याने झेंडूच्या फुलांना कवडी मोल दर मिळत आहे. बाजारपेठेत ग्राहकच नसल्याने अवघ्या 10 ते...\nचला पाहूया चंद्राला : आज आंतरराष्ट्रीय चंद्र निरीक्षण रात्र\nसांगली : अमेरिकेतील \"नासा' संस्थेच्या वतीने 2010 पासून सप्टेंबर महिन्यात अष्टमीच्या जवळपास \"आंतरराष्ट्रीय चंद्र निरीक्षण रात्र' या सोहळ्याचे आयोजन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/corona-patient-jumping-roof-hospital-vikramgad-mumbai-342712", "date_download": "2020-09-26T02:40:45Z", "digest": "sha1:I2ROZ5AR7JFSXSW64UOCPRQLQFJQRTNF", "length": 13560, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "रुग्णालयाच्या गच्चीवरुन उडी मारुन कोरोना रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nरुग्णालयाच्या गच्चीवरुन उडी मारुन कोरोना रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न\nकर्मचाऱ्यांनी धावाधाव करून त्याला पुन्हा रुग्णालयात आणून तातडीचे उपचार सुरू केले. डोक्‍याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.\nविक्रमगड : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्‍यात राहणाऱ्या एका अत्यवस्थ रुग्णाने विक्रमगडमधील रिव्हेरा समर्पित कोरोना उपचार रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रुग्णाच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.\nनक्की वाचा : 'खाकी'ने दाखवली भूतदया; पोलिसानी दिले अशक्त पक्ष्याला जीवदान\nवाड्यातील एका 38 वर्षीय कोरोना रुग्णावर पोशेरी केंद्रात उपचार सुरू होते; मात्र अत्यवस्थ झाल्याने त्याला शनिवारी रात्री विक्रमगडमधील रिव्हेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी लघुशंकेला जात असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगून तो स्वच्छतागृहाकडे न जाता थेट रुग्णालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गच्चीवर गेला. तिथून त्याने रुग्णालयाच्या मागच्या बाजूला उडी घेतली.\nहे ही वाचा : 'मातोश्री'वर आलेल्या दुबईच्या कॉल बाबत अनिल परब यांचे स्पष्टीकरण; वाचा काय म्हटले\nकर्मचाऱ्यांनी धावाधाव करून त्याला पुन्हा रुग्णालयात आणून तातडीचे उपचार सुरू केले. डोक्‍याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. अधिक उपचारांसाठी त्याला मुंबईत हलविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.\n(संपादन : वैभव गाटे)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसेवा समाप्तीची ऑर्डर दिल्याने परळ डेपोत ST कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन\nमुंबई : मुंबईतील परळ डेपोमधून महत्तवाची येतेय. परळ डेपोमधील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय. यामध्ये चालक आणि वाहक दोघांचा समावेश आहे. परळ...\nसावधान : गोचीडपासून पसरतोय अजून एक आजार; प्राण्यांपासून मानवाला संक्रमण\nशहादा (नंदुरबार) : गुजरात राज्यातील बोताड व कच्छ या जिल्हयांमध्ये क्रिमियन कोंगो हिमोरेजिक फिवर (CCHF) या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये झाल्याचे...\nमुंबईकरांनो संकट टळलेलं नाही; ठाणे, पालघर जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई - मुंबईत मंगळवारी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे जनजीनवन विस्कळीत झाले आहे. त्यानंतरही मुंबई आणि किनारपट्टी परिसरात पुढचे 24 पावसाचा जोर वाढणार...\nपरतीचा पाऊस भातशेतीच्या मुळावर; सलग तिसऱ्या वर्षी भातशेतीचे प्रचंड नुकसान\nमनोर ः गेल्या दोन दिवसांपासून पालघर तालुक्‍यातील मनोर परिसरात परतीचा पाऊस जोरदार बरसत आहे. जोरदार वारा आणि ढगांच्या गडगडाटासह बरसणाऱ्या पावसाने...\nराज्यात पावसाचा जोर ओसरणार\nपुणे - गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसानंतर आता जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज (ता.२३) पालघर जिल्ह्यात काही...\nमुंबई झाली गारेगार, कोकणात जोरदार पावसाचा अंदाज\nमुंबई,ता.22: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज सकाळी मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दिवसभर मुंबईत गारवा जाणवत होता...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/43719", "date_download": "2020-09-26T01:42:08Z", "digest": "sha1:5F76L423FY3DBXVMNEVEH23RZCRYEK5T", "length": 31170, "nlines": 289, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी आहार | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी आहार\nकोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी आहार\nकाल कोलेस्ट्रोल लेवल चेक केली तर ldl कोलेस्ट्रोल जास्त आले आहे.\nतर ते कमी करण्यासाठी आहारात काय घ्यायला हवे आणि काय कमी / बंद करायला हवे याची माहिती हवी आहे.\nबटर, चीज बंद. अंड्यातले पिवळे\nबटर, चीज बंद. अंड्यातले पिवळे बंद, नारळ बंद.\nरोज किमान अर्धा तास brisk\nरोज किमान अर्धा तास brisk walk घ्या.\nजेवणातील कढीपत्ता बाजूला न\nजेवणातील कढीपत्ता बाजूला न काढता तो खायचा. तेलही कमीत कमी वापरायचे. तेलाच्या चपात्यां ऐवजी फुलके करुन खायचे.\nआळशीही भाजून खातात असे म्हणतात पण सगळे करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.\nदोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात. चांगले आणि वाईट.\nचांगले वाढवत जाणे हा एक उत्तम मार्ग आहे. त्याला एईरोबीक व्यायामच लागतो. सांजसकाळ धावणे हा एक सोपा आणि उत्तम व्यायाम आहे.\nकुत्रे चालवणे हा ही. म्हणजे\nकुत्रे चालवणे हा ही. म्हणजे पळावेच लागते न.\nत्याला एईरोबीक व्यायामच लागतो. >>>> +१\nसांजसकाळ धावणे हा एक सोपा आणि उत्तम व्यायाम आहे. >>> सुरुवातीला धावणे जमेलच असे नाही म्हणुनच brisk walk\nडॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या\nडॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या >> हे सगळ्यात महत्वाचे.\nरक्तातल्या कॉलेस्टेरॉलची पातळी अनेक गोष्टींवर अवलंबून असते. थोडा अनुवांशिकतेचा पण भाग असतो.\nआपल्या नियत्रणांत असलेले उपाय खालील प्रमाणे :\nरक्तातले कॉलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आहारातले कॉलेस्टेरॉल कमी करणे हा एक भाग. अंड्यातले पिवळे, होल दूध, कलेजी, कोळंबी, चीझ इत्यादी. कुठल्याही\nकॉलेस्टेरॉलचे बिल्डिंग ब्लॉक्स असलेले स्निग्ध पदार्थ कमी करणे हा अजून एक भाग - खोबरे, खोबरेल तेल, रुम टेम्परेचरला घनरुप होणारे डालडा इत्यादी\nसोल्यूबल फायबर असलेले पदार्थ खाल्ल्याने त्याला लागून रक्तातले अतिरिक्त कॉलेस्टेरॉल अन त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स शरीराबाहेर फेकले जातात. अशा पदार्थाचे आहारात प्रमाण वाढवणे हा तिसरा भाग पालेभाज्या , सालासकट खाल्ली जातील अशी कडधान्ये\nएरोबिक + थोडे तरी वेट लिफ्टिंग / स्ट्रेन्थ ट्रेनिंग व्यायाम करुन एच डी एल कॉलेस्टेरॉल वाढवणे हा चौथा भाग.\nया शिवाय सिगरेट , अतिरिक्त मद्यसेवन, सोडावे , स्ट्रेस मॅनेज करावा, मेडिटेशन करावे .\nआहार, झोप नियमित असावे.\nइथे हजारो पदार्थांचे न्यूट्रिशनल अ‍ॅनलिसिस आहे.\nसोल्यूबल फायबर असलेले पदार्थ\nसोल्यूबल फायबर असलेले पदार्थ खाल्ल्याने >>>>> आमच्या मित्राला इसबगोल ने बराच फायदा झाला होता. आणि त्याची सवय होत नाही / साइड इफेक्ट काही नाहीत असे समजले होते. खाद्यतेल सुध्हा कमीत कमी सॅट्युरेट्स असलेले वापरावे.\nनिवांत, इसबगोलची सवय लागू\nनिवांत, इसबगोलची सवय लागू शकते. ( पुढे पुढे बोवेल मूव्ह्मेंटस होत नाहीत. )\nओट्स हा पण एक चांगला पर्याय आहे. ते नीट शिजवूनच खावेत.\n>> मेधा +१ फक्त LDL जास्त आहे\nफक्त LDL जास्त आहे की triglycerides पण वाढले आहेत आणि HDL कमी झाले आहे\nयामध्ये LDL = वाईट कोलेस्टेरॉल आणि HDL = चांगले कोलेस्टेरॉल असे म्हंटले जाते.\nLDL कमी करण्यासाठी आहारातील बदल सगळ्यांनी वर सुचवलेलेच आहेत. सग़ळे स्निग्ध पदार्थ, तळलेले पदार्थ, पापड, लोणची इ. बंद / हळूहळू कमी करा.\nपालेभाज्या, भिजवलेल्या मेथ्या, फायबरयुक्त पदार्थ वाढवा.\nआपली जीवनशैली कशी आहे ते तपासा. बैठी जीवनशैली असेल तर ट्रायग्लिसराईड्स आणि पर्यायाने Total Chol लवकर वाढू शकते.\nGoal is to decrease LDL and increase HDL [जे चालणे/फिरणे, धावणे, पोहणे इ असे व्यायामाने वाढू शकते]\nतुमची कोलेस्टेरॉल पातळी काय सांगते\nडॉक्टरांना हाळी द्या हो \nडॉक्टरांना हाळी द्या हो \nबाकी ह्या एका धाग्यावर ह्यांची अनुपस्थिती जाणवली सर्वांना \nकुणाची उचकी लागली तर त्याला\nकुणाची उचकी लागली तर त्याला घरगुती इलाज इथे आहेत.\nमळमळीच्या इलाजासाठी वेगळ्या धाग्यावर जावे लागेल. अ‍ॅडमिन यांनी आम्लपित्तासाठी वेगळा धागा काढलेला आहे. 'इनो' हा एक जनरल इलाज आहेच.\n>>कॉलेस्टेरॉलचे बिल्डिंग ब्लॉक्स असलेले स्निग्ध पदार्थ कमी करणे हा अजून एक भाग - खोबरे, खोबरेल तेल<<\nखोबरेल तेल हे कोलेस्टेरॉलचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत हे कुठे साबित झालेय आहे का की एक धारणा आहे\nह्याने नक्की कोलेस्टेरॉल वाढते हे कुठे वाचले व कुठले संशोधन आहे ह्याची लिंक मिळेल का नुसती टोटल कोलेस्टेरॉल ची पातळी बघणं योग्य आहे का\nइथे लिंका दिल्या तर बर्‍या राहतील अश्या माहितीच्या....\nचुकीचे समज पसरवण्यापेक्षा वा एकीव माहिती देण्यापेक्षा मूळ लिंका देणे उचित ठरेल.. कारण सल्ला विचारणा उगीच ह्या माहितीलाच प्रमाण मानून बसायचा.\nमला नक्की ज्ञान नाहीये , पण\nमला नक्की ज्ञान नाहीये , पण कोकोनट ऑयल हे खूप चांगले असते असं मानणार्या खूप लिंक्स मी वाचल्या आहेत. उदा: http://gapsdiet.com/ फॉलो करणारी लोकं.. तिथे रेकमंडेड फुड मध्ये Coconut, fresh or dried (shredded) without any additives, Coconut milk ,Coconut oil हे आहे.\ngaps diet फॉलो करायला आवडेल असं असल्याने मी थोडंफार प्रमाणात कोकनट मिल्क्/ऑयलचा वापर करते.\nअर्थात , आधीच कोलेस्टरॉलचा त्रास असणार्यांना ते चालतं की नाही हे मला खरंच माहीत नाही. मूळ धागाकर्तीला माझ्या पोस्टचा काही उपयोग नसेल कदाचित..\nडॉक्टर काका जरा कॅलेस्ट्रॉल\nडॉक्टर काका जरा कॅलेस्ट्रॉल वर बोलाल \nका फक्त बाकिच्या धाग्यावर पिंका टाकत फिरायच \nमला नक्की ज्ञान नाहीये , पण\nमला नक्की ज्ञान नाहीये , पण कोकोनट ऑयल हे खूप चांगले असते असं मानणार्या>>>>>>>>>> माझी एक मैत्रीण सध्या एक स्पेशल डायट प्रोग्राम फॉलो करतेय. त्यात नारळ आणि नारळ दुध, बदाम आणि साजुक तुप, भाज्या, मांस यांचा मुक्त वापर आहे. तिने ते डाएट सुरु केले तेव्हा मी तिला नारळातील फॅटस वगैरेबद्दल सांगितले. पण तिने तो कार्यक्रम २ महिने राबवला. कालच ती सांगत होती की अलिकडे केलेल्या रक्त वगैरे तपासणीत तिचे कोलेस्टरॉल, आयर्न, व्हिट डी उत्तम आहे.\nनारळ घालुन केलेले पदार्थ मला फार आवडतात. पण २-३ वर्षांपासून नारळ वापरणे बंद/कमी केले. तिचे ऐकुन परत थोडे वापरायला सुरुवात करावी का असे वाटून गेले.\nडॉ सल्ल्याने आहारतज्ञाकडे जा.\nते जास्त चांगली मदत करतील.\nडॉ ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड च्या गोळ्याही लिहुन देतील.\nव्यायामाला मात्र पर्याय नाहीच......\nमेधा आणि मनकवडा उत्तम\nमेधा आणि मनकवडा उत्तम पोस्टस.\nपण नारळाबद्दल वैगेरे अगदी मेडिकल जर्नल्समधून सुद्धा नेहमी उलटसुलट बातम्या येत असतात.त्यामुळे माझे तर मत असे आहे की जर तुम्ही ट्रॅडिशनली नारळ खाणारे असाल तर चालू ठेवा.\nमूळात मर्यादित आहार आणि त्यापेक्षा योग्य व्यायाम यामुळेच कॉलेस्तेरॉल कमी होणार आहे.\nकॉलेस्ट्रॉल सिंथेसिसच्या चक्रातील काही एंझाईमच्या कमतरतेमुळे जेव्हा कॉलेस्टरॉल वाढते तेव्हा मात्र योग्य ते औषधोपचार करावे लागतात. होमोसिस्टीन डेफिशीयंसी हे भारतात आढळणारे याप्रकारातील ठळक उदाहरण.\nविटॅमिन बी च्या कमतरतेमुळे सुद्धा कॉलेस्टरॉल सिंथेसिसवर परिणाम होऊ शकतो.\nमात्र एक आहे कॉलेस्टेरॉल अति कमी करायच्या नादात शरीरात महत्त्वाचे हॉर्मोन तयार होण्याच्या कामात अडथळा येऊ देऊ नये.\nफक्त LDL जास्त आहे की triglycerides पण वाढले आहेत आणि HDL कमी झाले आहे>> हे मी रीपोर्ट बघुन लिहिते. डॉक्टरांना रीपोर्ट दाखवला तेव्ह त्यानि ldl वाईट कॉलेस्टेरॉल आहे अस सान्गितल, म्हणुन ते लक्शात राहील.\nइथे दुसऱ्या धाग्यावर आळशी भाजून त्याची पावडर करून, रोज एक चमचा पावडर भाज्यांमध्ये मिक्स करावी असा वाचलं. मग याचा बाकीच्यांना काही side effect होत नाही ना\nमग हे चालू करेन.\nचांगले कोले. वाढवणार्‍यांमधे कारळाची, जवसाची, काळ्या तिळाची चटणी कमी तिखट मिठ घालून रोज खावी. खरे तर पुर्वीचा आपला जो आहार होता ना भाजी, भाकरी, चटणी, दही, वरण, फळ हा आहार सर्वात उत्तम आहे. ह्यात सर्व काही येत. एक खूप खायच आणि एक कमी खायच ह्यानी पण प्रश्न निर्माण होतात.\nफक्त कोकनट ऑयल चा उल्लेख आलाय म्हणून,\nweb MD वरील माहीती हि किती वेळा अपडेट होते ती तुम्ही प्रमाण म्हणून मानत असाल तर इतरांनी मानावी म्हणून तिथून लिंका उचलून देणे फायदेशीर आहे का ती तुम्ही प्रमाण म्हणून मानत असाल तर इतरांनी मानावी म्हणून तिथून लिंका उचलून देणे फायदेशीर आहे का एक माहीती म्हणून ती लिंक वाचणे ठिक आहे, पण त्या माहितीचा प्रसार करणं कितपत बरोबर आहे\nत्यामुळे ज्यांनी खरोखर कोकोनट ऑयल खाल्ले आहे व फॉलो केलय त्यांनी अनुभव लिहिलेल बरे. तसेही प्रत्येकाची बॉडी हि वेगळी असते. कोणाला कितपत काय चालू शकते वगैरे त्यांचे डॉक सांगितलेलं उत्तम.\nतसेही पहाता, आजकाल टीवी वर कोकोनट ऑयल, दूध वगैरे फायदेशीर सांगतात आणि ते हि अलिकडच्या संशोधनानुसार पण तरीही ते संशोधन शिक्कामोर्तब झालेले एकलेले नाही. त्यामुळे किती अंमलात आणावं हे ज्याच्या त्याच्या डॉक ने सांगितलेल बरं,\nपण नारळाबद्दल वैगेरे अगदी\nपण नारळाबद्दल वैगेरे अगदी मेडिकल जर्नल्समधून सुद्धा नेहमी उलटसुलट बातम्या येत असतात.त्यामुळे माझे तर मत असे आहे की जर तुम्ही ट्रॅडिशनली नारळ खाणारे असाल तर चालू ठेवा.कोकण्यांचे खाद्यपदार्थ नारळयुक्त असतात. काही मासे खोबरेल तेलात तळले जातात.देशावर\nदाण्याचे कूट असते. हे सारे वंगण म्हणून आवश्यक असते.अति सर्वत्र वर्जयेत हे तर आहेच\nयेळेकर अगदी बरोबर. एवढे नारळ\nएवढे नारळ खाऊन आम्हा कोंकण्याना काही होत नाही.;)\nपण एक आहे कुणी म्हणाल मी नारळ घालून फिश करी खाणार त्याबरोबर च बटर चिकन आणि दुसर्‍या दिवशी चमचमीत शेंगदाणे कूट घालून भरली वांगी तर ते चूक.\nएकंदर किती फॅट पोटात जातंय मग ते सॅच्युरेटेड असो की कसं हे पण पाहिलं पाहिजे.\nआजकाल ग्लोबलायजेशनच्या नादात आपण सगळीकडचेच ट्रॅडिशनल पदार्थ दररोजच्या आहरात घ्यायला लागलोय. त्यातही चमचमित जास्त. म्हणजे असं की कोंकणातून आपण कोंबडी वडे उचलणार पण पातोळ्या घेणार नाही. असंच अन्य प्रदेशांबाबत . मग एकंदर फॅट वाढत जातं.\nपण एक आहे कुणी म्हणाल मी नारळ\nपण एक आहे कुणी म्हणाल मी नारळ घालून फिश करी खाणार त्याबरोबर च बटर चिकन आणि दुसर्‍या दिवशी चमचमीत शेंगदाणे कूट घालून भरली वांगी तर ते चूक.\nपण खाऊन पचवायची ताकत ठेवा मग.\nते खाऊन, खांद्यावर वजन धरून ४-४ मैल पायी डोंगर तुडवून, भर पावसात शेतीची कामे करून घरी या. आल्यावर शेणगोठा करा, अन परत हाणा की दुसर्‍या दिवशी तिसर्‍याचं कालवण इथं एसीत बसून बटणं दाबायची असलीत तर मग कठीणेय..\nरक्तातील कॉलेस्ट्रॉलचा मोठा भाग (८०%) स्वता: शरीरच बनवत असते. कॉलेस्ट्रॉल चा अगदी छोटा (२०%)\nभाग खाण्यातुन येत असतो. हा २०% कॉलेस्ट्रॉल चा भाग दररोजच्या खाण्यातील दु ग्ध जन्य पदार्थ, मांस,\nअंडी आणि तेलातुन येते. याचा अर्थ आपल्या खाण्याचा आणि कॉलेस्ट्रॉलचा तसा फारसा संबंध नाही,\nभरपूर व्यायाम, लसुण खाणे,\nभरपूर व्यायाम, लसुण खाणे, वगैरे सुचले. मी करतोही हे (व्यायाम भरपूर करत नसलो तरी बर्‍यापैकी करतो).\nरिपोर्ट मध्ये Cholesterol =\nमाझ्या अळशी च्या प्रश्नाच उत्तर द्याना कुणीतरी.\nमनू, अळशीचा काही साईड इफेक्ट\nमनू, अळशीचा काही साईड इफेक्ट वाईट होत नाही.\nतुम्ही दिलेल्या प्रमाणात घालू शकता कुठल्याही भाजीत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahakamgar.maharashtra.gov.in/inspection-mr.htm", "date_download": "2020-09-26T01:39:12Z", "digest": "sha1:ZJUQ5YNRRQYVEAFKQXDED7K3AOE5YQ5N", "length": 4243, "nlines": 97, "source_domain": "mahakamgar.maharashtra.gov.in", "title": "निरीक्षण", "raw_content": "\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमुख्य पान › निरीक्षण\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडल, मुंबई\nऑनलाईन तक्रार / तक्रार निवारण\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nपानाच्या रोजी अखेरचे अद्यतनितः: 17-6-2016 अभ्यागत: 14976144\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bmc-form-committee-to-find-out-gas-leak-in-part-of-mumbai/articleshow/71235633.cms", "date_download": "2020-09-26T03:07:27Z", "digest": "sha1:V2VVTDNAUWRFR6TDNHGLZXW2GXEM45EG", "length": 15922, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबईत गॅस गळती, पालिकेकडून विशेष समिती स्थापन\nउपनगरातील काही भागात गॅस गळतीमुळे उग्र दर्प येऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आज एका विशेष समितीची स्थापना केली आहे. ही समिती या उग्र वासाचे कारण शोधणार असून भविष्यात या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेणार आहे. या समितीत आयआयटी, नीरी, बीपीसीएल, एचपीसीएल, महानगर गॅस लिमिटेड, मुंबई पोलीस, डिश, आरसीएफ, मुंबई अग्निशमन दल आणि पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागासह विविध संस्थांचा समावेश असेल अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली.\nमुंबई: उपनगरातील काही भागात गॅस गळतीमुळे उग्र दर्प येऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आज एका विशेष समितीची स्थापना केली आहे. ही समिती या उग्र वासाचे कारण शोधणार असून भविष्यात या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेणार आहे. या समितीत आयआयटी, नीरी, बीपीसीएल, एचपीसीएल, महानगर गॅस लिमिटेड, मुंबई पोलीस, डिश, आरसीएफ, मुंबई अग्निशमन दल आणि पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागासह विविध संस्थांचा समावेश असेल अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली.\nमुंबई उपनगर काही परिसरामध्ये वेगळा वास आल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली विविध तेल व गॅस कंपन्यांची बैठक आज पार पडली. यावेळी या घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला पालिका उपायुक्त (पर्यावरण) सुप्रभा मराठे, पोलीस उपायुक्त प्रणय अशोक, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर, महापालिकेच्यात प्रशासकीय विभागांचे सहाय्यक आयुक्त , मुंबई अग्निशमन दल, बी.पी.सी.एल., टाटा पॉवर, एच.पी.सी.एल., बी.ए.आर.सी., आर.सी.एफ., आय.ओ.सी.एल., एन.डी.आर.एफ., एम.पी.सी.बी., एम.जी.एल., ओ.एन.जी.सी., एजिस लॉजिस्टिक आदी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nगुरुवार, दिनांक १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी व रात्री पूर्व आणि पश्चिम उपनगरातील काही परिसरातून; विशेषतः चेंबूर, गोवंडी, पवई, चांदीवली, घाटकोपर, अंधेरी, बोरिवली या भागातून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास व मुंबई अग्निशमन दलास दूरध्वनीवरून प्रत्येकी ३४ तक्रारी आल्या होत्या; तर मुंबई पोलिसांनाही दूरध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळा वास येण्याधच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत मुंबई अग्निशमन दलाच्या ९ पथकांनी विविध भागात भेट देऊन शोध घेण्याधचा प्रयत्न केला. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने देखील विविध तेल व गॅस कंपन्यांना याबाबत अवगत करुन त्यांच्या स्तरावर शोध घेण्याचे निर्देश दिले होते.\nया पार्श्वभूमीवर सर्व कंपन्यांना सतर्क राहण्याचे जोशी यांनी आदेश दिले. तसेच वायू गळतीची कारणमिमांसा करणारा आणि भविष्यात अशा घटना घडल्यास त्यावर उपाययोजना सूचवणारा अहवाल येत्या २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या समितीच्या पुढील बैठकीत देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, वायूगळतीच्या कोणत्याही तक्रारीसाठी १९१६ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nMumbai Local Train: लोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य र...\nSanjay Raut: 'शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना किंमत देत ...\nकंगना राणावत प्रकरण: हायकोर्टाने महापालिकेला सुनावले खड...\nविधानसभा निवडणूकः युती की आघाडी, प्रचाराचे मुद्दे कोणते\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nदेश'चीन, पाकला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद भारतीय हवाई दलात'\nदेशUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने 'असे' दिलेउत्तर\nमुंबईशिवसेना कधीच कन्फ्यूज नव्हती; राऊतांचे फडणवीसांना उत्तर\nमुंबईकरोना: रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यापूर्वी कुटुंबीयांची संमती बंधनकारक\nमुंबईड्रग्ज प्रकरण: NCB चे अधिकारी तुरुंगात जाऊन शौविकचा जबाब घेणार\nदेशकृषी विधेयकांवरून PM मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र\nसिनेन्यूजमाझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा\nकोल्हापूरसंभाजीराजेंनी वेळीच ओळखली चाल; 'असा' उधळला डाव\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nकार-बाइकदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी\nमोबाइल४.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/crime-against-a-youth-carrying-a-knife", "date_download": "2020-09-26T02:43:27Z", "digest": "sha1:46RTZTCT5Q5NPDO3UNHADLVMLPWZVAZN", "length": 4149, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Crime against a youth carrying a knife", "raw_content": "\nचाकू बाळगणार्‍या युवकावर गुन्हा दाखल\nअहमदनगर | प्रतिनिधी | Ahmedanagar\nभिंगार परिसरातील सारसनगर भागात मदरसा समोर विनापरवाना चाकू घेऊन फिरणार्‍या एका युवकाला भिंगार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक चाकू हस्तगत केला असून त्याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार गोपीनाथ गोर्डे यांनी फिर्याद दिली आहे. करण ईश्वर कचरे (वय- 19 रा. सारसनगर, भिंगार) असे या युवकाचे नाव आहे.\nसारसनगर परिसरात एक युवक एका बाजुने धार व एका बाजुने दातरे असलेला मोठा चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक पाटील यांनी सारसनगरमधील मदरसा परिसरात कानडे मळा जाणार्‍या रोडवर करण कचरे या युवकाला ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता एक चाकू मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे. याप्रकरणी कचरे याच्याविरूद्ध भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अजून या युवकाकडे काही हत्यारे आहे का याचा तपास पोलीस हवालदार नगरे करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://aniltikotekar4sme.com/2019/06/08/", "date_download": "2020-09-26T00:55:50Z", "digest": "sha1:DU2GF3634HVII745PCBANAFLFCIA6NJ6", "length": 7698, "nlines": 117, "source_domain": "aniltikotekar4sme.com", "title": "8 Jun 2019 – aniltikotekar4sme.com", "raw_content": "\nआपण आतापर्यंत लघु उद्योजकांना येणाऱ्या अडचणी कोणत्या ––त्यावर कशी मात करायची वगैरे बाबत विचार करत होतो. परंतु करोना मुळे आपण सर्वच जण केवळ अडचणीत आलो आहोत असे नाही तर पुढे काय करायचे हे देखील आपणाला कळेनासे झाले आहे. पण सर्वात महत्वाचे – माझ्या दृष्टीने – आता पुढे व्यवसाय कसा करायचा / व्यवसाय करायच्या पध्दतीत काही बदल करायचा का याचा विचार देखील आपण करणे गरजेचे ठरणार आहे. नवीन काही शिकायचे असेल तर जुने विसरावे लागते –-सर्वच जुने वाईट आहे असे नाही तर जे आता कालबाह्य झाले आहे ते तरी विसरण्याची आपली तयारी आहे का की वर्षानुवर्षे जसा व्यवसाय करत आलो तसाच करायचा याचा देखील वेळीच विचार वेळीच करावा लागणार आहे. मला जे उपयुक्त वाटते ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हीही विचार करा , तुमचे मंत कळवा. पण एक गोष्ट नक्की करा, विचार न करता घाईघाईत व्यवसाय सुरु करू नका—जोपर्यंत तुम्ही समग्र विचार करत नाही तोपर्यंत–\nवास्तवाशी सामना – महाराष्ट्र टाइम्स\nवास्तवाशी सामना देशापुढे निर्माण झालेल्या बेरोजगारी तसेच आर्थिक मंदीच्या आव्हानांचा आढावा घेऊन त्यावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन उच्चस्तरीय कॅबिनेट समित्या स्थापना करण्याची\nदरकपात आणि नंतर.. | लोकसत्ता\nकर्जाचे व्याज दर कमी असणे, हा अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठीच्या आवश्यक घटकांपैकी एक. पण एकमेव नव्हे.. अर्थगती आणि मध्यवर्ती बँका यांचे नाते तसे गुंतागुंतीचेच. अर्थव्यवस्था जेव्हा वेगात\nत्रिभाषा सूत्राचे त्रांगडे – महाराष्ट्र टाइम्स\nत्रिभाषा सूत्राचे त्रांगडे महात्मा गांधी यांनी स्थापलेल्या ‘दक्षिण भारत हिंदी प्रचार सभे’ची गेल्याच वर्षी शताब्दी झाली. गांधीजी १९१८ मध्ये केवळ ही संस्था स्थापून थांबले नव्हते.\n| परि ती राष्ट्रभाषा नसे.. | लोकसत्ता\nकेंद्राने प्रादेशिक भाषांना जास्तीत जास्त उत्तेजन कसे देता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत.. देशात हिंदी भाषक अधिक आहेत हे मान्य. एखादी भाषा शिकण्यास विरोध करणे\nसंयम, सातत्य आणि मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली\n‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत तज्ज्ञांचा सल्ला दहावी-बारावीनंतर महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यात पर्दापण करताना अनेक जण विविध प्रकारचा अभ्यास करून क्षेत्र निवडतात. कोणतेही क्षेत्र निवडले तरी संयम,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/animal-husbandry-dairy-development-minister-involved-in-corruption-in-his-department-transfers/articleshow/70897862.cms", "date_download": "2020-09-26T03:21:47Z", "digest": "sha1:RIOHFMSP4IHXRNO4OSHI2OIXFJAAZFIH", "length": 15561, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपशुवैद्यक बदल्यांमधील भ्रष्टाचारात दुग्धविकास मंत्री\nराज्यात पशुवैद्यकांच्या बदल्यांमध्ये सावळा गोंधळ सुरू असून बदल्यांच्या दलालीचे काहीजण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विश्रामगृहात थांबून दलालीचे पैसे घेतात. यामध्ये पशुवैद्यकीय मंत्री कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी तर गुंतलेले आहेतच. पण यात पशुसंवर्धन सचिव, आयुक्त कायार्लय आणि खुद्द पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री देखील गुंतले असल्याचे ताशेरे वैधानिक दर्जा असलेल्या महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेने आपल्या बैठकीत ओढले आहेत.\nराज्यात पशुवैद्यकांच्या बदल्यांमध्ये सावळा गोंधळ सुरू असून बदल्यांच्या दलालीचे काहीजण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विश्रामगृहात थांबून दलालीचे पैसे घेतात. यामध्ये पशुवैद्यकीय मंत्री कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी तर गुंतलेले आहेतच. पण यात पशुसंवर्धन सचिव, आयुक्त कायार्लय आणि खुद्द पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री देखील गुंतले असल्याचे ताशेरे वैधानिक दर्जा असलेल्या महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेने आपल्या बैठकीत ओढले आहेत. परिषेदेच्या बैठकीचे सविस्तर इतिवृत्तच 'मटा'च्या हाती लागले असून यानिमित्ताने या विभागातील बदल्यांमधील भ्रष्टाचारच चव्हाट्यावर आला आहे.\nमहाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेच्या बैठकीत पशुसंवर्धन विभागातील बदल्यांचा विषयावरून जोरदार खडाजंगी झाली आहे. या परिषदेचे सदस्य डॉ. वाय. डी. वाघमारे यांनी बैठकीत पशुवैद्यकांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचाराला वाचा फोडली. दरवर्षी राज्यातील पशुवैद्यकांच्या बदल्या होतात. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याकडे या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. राज्यात पशुवैद्यकांच्या बदल्यांमध्ये सावळा-गोंधळ सुरू आहे. बदल्यांमध्ये दलाली करणाऱ्या व्यक्ती मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विश्रामगृहात दलालीचे पैसे घेतात. यात या खात्याचे मंत्री, त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी गुंतलेले आहेत. विभागीय स्तरावरून बदल्या होताना संबंधित पशुवैद्यक सोयीनुसार बदल्या करून घेतात. त्यामुळे विषयवार बदल्या होत नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे या गैरव्यवहारात या खात्याचे सचिव, आयुक्तालय पशुसंवर्धन, पुणे येथील अधिकारी आणि खुद्द पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री देखील गुंतले असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्याची माहिती इतिवृत्तामध्ये देण्यात आली आहे.\nसंबंधित भ्रष्टाचारी वृत्तीच्या अधिकाऱ्यांकडून पशुवैद्यकांना नाहक त्रास दिला जात आहे. विभागात नियमानुसार प्रत्येक वर्षी बदल्या होणे आवश्यक असताना ठराविक लोकांच्याच बदल्या होतात. त्यातही पुण्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याकडे या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. या बदल्यांच्या धोरणात पारदर्शक आणण्यासाठी बदल्यांची मानक कार्यप्रणाली तयार व्हायला पाहिजे. यासाठी ऑनलाइन बदल्यांचाही आधार घ्यायला हवा, अशी चर्चा या बैठकीत झाली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nMumbai Local Train: मुंबईत 'या' मार्गावरील लोकल प्रवास ...\nNilesh Rane: 'पवार साहेबांचा राजकीय गेम अजितदादांनीच के...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nमुंबई: सामूहिक बलात्कार पीडितेचा मृत्यू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nन्यूजड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nदेशअकाली दलाच्या एका बॉम्बने PM मोदी हादरले, सुखबीर सिंग बादल यांचा हल्लाबोल\nदेशकृषी विधेयकांवरून PM मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र\nअर्थवृत्तराणा कपूरला 'ईडी'चा दणका ; लंडनमधील १२७ कोटींचा फ्लॅट केला जप्त\n राज्यात रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा; करोनामृत्यूचे तांडव सुरूच\nसिनेन्यूजमाझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा\nअर्थवृत्तसोने दरात घसरण सुरूच; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nधार्मिकमकर राशीत शनी मार्गी : 'या' पाच राशींसाठी खडतर काळ; वाचा\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nकार-बाइकदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी\nमोबाइल४.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/byjus-to-replace-oppo-as-new-brand-name-on-team-india-jersey/articleshow/70377998.cms", "date_download": "2020-09-26T02:47:45Z", "digest": "sha1:XHGYVCYSPG76A2HFKE7VMEG5P336OY5K", "length": 12111, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nटीम इंडियाच्या जर्सीवर 'ओप्पो'ऐवजी Byju's\nभारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर लवकरच नवीन ब्रँडचं नाव दिसणार आहे. जर्सीवर आतापर्यंत चिनी मोबाइल कंपनी ओप्पोचं नाव वापरलं जात होतं. या कंपनीनं मार्च २०१७मध्ये पाच वर्षांसाठी १, ०७९ कोटी रुपयांना यासंबंधीचे हक्क विकत घेतले होते.\nटीम इंडियाच्या जर्सीवर ओप्पोऐवजी बायजू दिसणार\n आज कोण ठरणार सरस\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nभारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर लवकरच नवीन ब्रँडचं नाव दिसणार आहे. जर्सीवर आतापर्यंत ओप्पो या चिनी मोबाइल कंपनीचं नाव वापरलं जात होतं. या कंपनीनं मार्च २०१७मध्ये पाच वर्षांसाठी १, ०७९ कोटी रुपयांना यासंबंधीचे हक्क विकत घेतले होते.\nटीम इंडियाच्या जर्सीवर आता बेंगळुरूच्या बायजू या कंपनीचं नाव दिसणार आहे. मायदेशातील आगामी मालिकेत भारतीय संघातील खेळाडू या नवीन ब्रँडचं नाव असलेली जर्सी घालून मैदानात उतरतील. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध १५ सप्टेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.\nओप्पो कंपनी यासंबंधीचे सर्व हक्क बायजू या कंपनीला देणार आहे. हा करार खूपच खर्चिक असल्यानं कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे. ओप्पो, बायजू आणि बीसीसीआय यांच्यातील करारावर गुरुवारी स्वाक्षऱ्या होतील, असं सूत्रांनी सांगितलं. ओप्पो कंपनीकडून जितके पैसे मिळत होते, तितकेच पैसे बीसीसीआयला मिळणार आहे. त्यात कोणतंही नुकसान होणार नाही. हा करार ३१ मार्च २०२२पर्यंत असणार आहे, अशी माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकिमान समोरुन लढायला तरी शिक; गंभीरने धोनीला फटकारलं...\nधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू ...\nKKR vs MI LIVE, IPL 2020 :मुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विज...\nदिल्ली-पंजाब सामन्याचा निकाल बदलला; सेहवाग म्हणाला, या ...\nधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेट...\nधोनीची काश्मिरात नेमणूक; लष्करात गस्त घालणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n आज कोण ठरणार सरस\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nसिनेन्यूजमाझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा\nपुणेकोविड रुग्णालयांत रुग्णांची लूट; अजित पवारांनी दिला 'हा' इशारा\nसोलापूरपुढचे आंदोलन मातोश्री आणि सिल्व्हर ओकवर; पडळकरांचा इशारा\nपुणेडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ही' मागणी\nपुणेकृषी विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार का; अजित पवार म्हणाले...\nमुंबईड्रग्ज प्रकरण: NCB चे अधिकारी तुरुंगात जाऊन शौविकचा जबाब घेणार\nनागपूरविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोटींचा, प्रस्ताव पाठवला\nमुंबईशिवसेना कधीच कन्फ्यूज नव्हती; राऊतांचे फडणवीसांना उत्तर\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nमोबाइल४.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF-%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B6", "date_download": "2020-09-26T02:14:37Z", "digest": "sha1:3MVJXK735RDJYJ44R3PI6PS7EGE4O2OE", "length": 9820, "nlines": 94, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "जिल्ह्यात आवळला जातोय एड्‌सचा \"पाश' - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nमुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी जिल्ह्यात आवळला जातोय एड्‌सचा \"पाश'\nजिल्ह्यात आवळला जातोय एड्‌सचा \"पाश'\nजिल्ह्यात \"एड्‌स'चा पाश आवळत असून गेल्या आठ वर्षांत दोन हजार पुरुष, तर एक हजार 361 महिलांना एचआयव्ही झाल्याचे स्पष्ट झाले असून हे प्रमाण 6.19 टक्के एवढे आहे. गेल्या वर्षभरात 429 जणांना बाधा झाली असून, त्यापैकी 21 जणांचा एड्‌सने मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंगद चाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nआंतरराष्ट्रीय युवा दिनाची माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी मधुकर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय युवा दिन 12 ऑगस्टला साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य एचआयव्ही बाधित युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र करून युवकांना सक्षम करणे अपेक्षित आहे. एड्‌सविरुद्धचा लढा यशस्वीपणे लढून समाजातील कलंक व भेदभावाची भावना कायमस्वरूपी मिटवून टाकण्यास युवाशक्तीचा उपयोग होईल. ही जाणीव ठेवूनच महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेने या दिनानिमित्त जिल्हा स्तरावर खास युवकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आले आहे. त्यामध्ये प्रभात फेरी, युवकांमध्ये एचआयव्ही चाचणी करण्यासाठी प्रोत्साहनपर कार्यक्रमांचा समावेश आहे, असे जिल्हाधिकारी मधुकर गायकवाड यांनी सांगितले.\nजिल्ह्यातील एड्‌ससंदर्भात माहिती देताना डॉ. चाटे म्हणाले, \"\"जिल्हा रुग्णालयात ऐच्छिक सल्ला व चाचणी केंद्र मे 2002 पासून सुरू झाले. या केंद्रात स्वेच्छेने आलेल्यांची मोफत चाचणी केली जाते. जिल्ह्यात 2 जिल्हा रुग्णालये, 3 उपजिल्हा रुग्णालये व 8 ग्रामीण रुग्णालये असून 1 नगर परिषद दवाखाना आहे. अशा 14 ठिकाणी एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांत मे 2002 ते जुलै 2010 अखेर 54 हजार 292 जणांच्या रक्ताची तपासणी केली. यात 31 हजार 602 पुरुष, तर 22 हजार 690 महिलांचा समावेश आहे. यापैकी 2000 पुरुष आणि 1361 महिला असे एकूण 3 हजार 361 एचआयव्ही बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे प्रमाणे 6.19 टक्के एवढे आहे. जुलै 2009 ते जुलै 2010 अखेर जिल्ह्यातील 7 हजार 66 पुरुषांची तर 6 हजार 616 स्त्रियांची तपासणी झाली. त्यामध्ये 252 पुरुष आणि 173 स्त्रिया अशा 429 जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून गेल्या वर्षात 21 जणांचा एड्‌सने मृत्यू झाला आहे. एचआयव्ही बाधितांमध्ये 25 ते 55 या वयोगटातील महिला, पुरुषांचा समावेश आहे. या रोगाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी तरुण आणि इतरांमध्ये जनजागृती आवश्‍यक आहे. यासाठी युवा दिनी \"सुसंवाद आणि परस्पर सामंजस्य' हे घोषवाक्‍य ठेवून याचा प्रसार केला जात आहे.''\nजुलै 2003 ते जुलै 2010 मध्ये गरोदर मातांची तपासणी\nतपासलेल्या गरोदर महिला 41,139\nनेव्हीरॅपिन गोळ्या दिलेल्या 112\nएचआयव्ही तपासणी बालके 68\nसामाजिक सुरक्षा योजनांचा एचआयव्हीच्या रुग्णांवर त्रोटक उपचार\nएचआयव्ही बाधित रुग्णांनी आत्मविश्वासाने जगावे : वळीव\n‘संवाद’ने बदलली १.२५ लाख आयुष्ये\nखासगी लॅबमधील HIV चाचणीचीही माहिती मिळणार\nरेड रिबन एक्स्प्रेस २३ पासून पुण्यात\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://spsnews.in/2017/05/10/sps/", "date_download": "2020-09-26T02:35:27Z", "digest": "sha1:BCANAWZNNQEFHGW2BQWZACQTKFVRZKEE", "length": 5167, "nlines": 84, "source_domain": "spsnews.in", "title": "एस.पी.एस.न्यूज साठी वार्ताहर,मार्केटिंग प्रतिनिधी पाहिजेत – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nएस.पी.एस.न्यूज साठी वार्ताहर,मार्केटिंग प्रतिनिधी पाहिजेत\nबांबवडे : एसपीएस न्यूज साठी मुंबई (डिलाईल रोड,दहिसर ठाणे,नवी मुंबई )शाहुवाडी,पन्हाळा,शिराळा,हातकणंगले तालुक्यासाठी वार्ताहर, पर्तिनिधी,तसेच मार्केटिंग प्रतिनिधी या पदांसाठी काम करणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे. यामध्ये अनुभवींना प्राधान्य दिले जाईल. तसेच डी.टी.पी. ऑपरेटर ची सुद्धा गरज आहे.\nयोग्य व्यक्तींना योग्य मानधन दिले जाईल.इच्छुक उमेदवारांनी खालील ई-मेल वर संपर्क साधावा.\n← “उदय साखर” च्या चेअरमन पदी “मानसिंगराव गायकवाड” तर व्हा.चेअरमनपदी “पृथ्वीराज खानविलकर”\nतथागत गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन →\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://spsnews.in/2017/06/07/tatya/", "date_download": "2020-09-26T02:08:29Z", "digest": "sha1:LRWCSGPDWW3UPFBN4MK3Z7Q4E6WLCPAI", "length": 9294, "nlines": 90, "source_domain": "spsnews.in", "title": "के. डी. कदम उर्फ ‘तात्या ‘ : एका श्रमजीवी पत्रकाराचा दुर्दैवी अंत – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nके. डी. कदम उर्फ ‘तात्या ‘ : एका श्रमजीवी पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nबांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील जेष्ठ पत्रकार के.डी. कदम उर्फ तात्या यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. शाहुवाडी तालुक्यातील एक उल्लेखनीय पत्रकार आणि श्रमजीवी शेतकरी आज आपल्यातून हरपले आहेत. ते शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सदस्य होते.\nतात्या एक श्रमजीवी शेतकरी यासोबत हाडाचा पत्रकार होते. अशीच त्यांची शाहुवाडी तालुक्यासह जिल्ह्यात ओळख होती. तात्यां नी आपल्या लेखणी च्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली होती. समाजातील अनेक प्रश्न त्यांनी ऐरणीवर मांडले होते. तालुक्यातील पाणी टंचाई, शैक्षणिक उणीवा, आणि विकासात्मक कामांची गरज आदि बाबींवर तात्यांनी नेहमीच सडेतोड लेखन केले. याचबरोबर नागपंचमी हा शिराळा तालुक्यातील भावनात्मक विषय नेहमीच तात्यांच्या लिखाणातील कंगोरा ठरला. तात्यांच्या आवडीचा विषय ‘ कुस्ती ‘ ,यावर त्यांनी नेहमीच स्फूर्तीदायक लेखन केले. आमच्यासारख्यांनी तात्यांकडून कुस्ती च्या लेखनाबद्दल धडे घेतले. शेती हा विषय तात्यांच्या स्वानुभवाचा भाग होता. त्यामुळे या विषयावर ते भरभरून लिहित होते.\nलिखाण करतानाच सूत्रसंचालन हा विषय देखील तात्यांनी मोठ्या खुबीने निभावला,आणि साकारला देखील. त्यांच्या वर्तनातून अनेक सूत्रसंचालक तालुक्याला मिळाले असे म्हटले तर, वावगे ठरू नये. सुत्र्संचालानासोबत काव्य हा विषय देखील तात्यांच्या आवडीचा विषय होता.त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. तात्यांचे सगळ्यांशीच स्नेहाचे ऋणानुबंध राहिले. राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक, प्रशासकीय आणि समाज या सर्वच क्षेत्रात तात्यांनी आपला ठसा उमटवला होता. तात्यांची बाळूमामा देवस्थानावर अपार श्रध्दा होती. कोणत्याही गोष्टीच्या सुरुवातीला आणि शेवटी ‘जय बाळूमामा ‘ हे घोषवाक्य पत्रकारांमध्ये खूपच प्रसिद्ध होते.\nअसेच समाजाच्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करणारे ‘तात्या ‘ लवकर गेले. असे आम्हा पत्रकारांना वाटते. तात्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून असा परिवार आहे.\nतात्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना . तात्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रधांजली .\n← ‘विश्वास ‘ मध्ये वृक्षारोपण\n‘महाजनकी ‘ च्या शेतात आनंदा खुडे यांचे प्रेत →\nबुकिंग असतानाही खासदार शेट्टी यांना न घेताच ‘जेट एअरवेज ‘ चं उड्डाण\nगोगवे चे शहीद जवान श्रावण माने यांना मुस्लीम बांधवांची अनोखी श्रधांजली\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जनसुनावणी\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/ahmednagar/story-tulsabai-mengal-and-rakhmabai-pathve-pimpalgaon-nakvinda-336875", "date_download": "2020-09-26T01:51:40Z", "digest": "sha1:DO2WTB22KLJCJD5P26SUPT67A5IRKCU6", "length": 15737, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोणापुढेही हात न पसरता ‘त्या’ दोघीही विधवा मायलेकी डोंगरावर राहुन हाकतायेत संसाराचा गाडा | eSakal", "raw_content": "\nकोणापुढेही हात न पसरता ‘त्या’ दोघीही विधवा मायलेकी डोंगरावर राहुन हाकतायेत संसाराचा गाडा\nनिळवंडे जलशय परिसरातील पिंपळगाव नाकविंद शिवारात गावकुसाबाहेर डोंगरावर तुळसाबाई मेंगाळ व रखमाबाई पथवे या दोन विधवा मायलेकी चिल्या पिल्याना घेऊन गवताच्या झोपडीत जीवन जगत आहेत.\nअकोले (अहमदनगर) : निळवंडे जलशय परिसरातील पिंपळगाव नाकविंद शिवारात गावकुसाबाहेर डोंगरावर तुळसाबाई मेंगाळ व रखमाबाई पथवे या दोन विधवा मायलेकी चिल्या पिल्याना घेऊन गवताच्या झोपडीत जीवन जगत आहेत. ना घर... ना कोणती सुविधा... पण कोणतीही तक्रार न करता प्रपंचाचा गाडा हाकत आहेत.\nअनेक वर्षे या जंगलात आपली अर्धवट संसाराची गाडगी- मडकी घेऊन प्रवास करीत आहेत. ऊन- वारा- पाऊस याचा सामना करत दोन- चार शेळ्या सांभाळून शेताच्या एका तुकड्यावर या दोन महिला एकमेकीला साथ करत आहेत. गवताच्या झोपडीत त्या राहत आहेत. मात्र सर्वांना घर देणारे सकार अद्याप त्यांच्या दारी पोचले नाही.\nगावात ग्रामपंचायत आहे. पण गवकुसाच्या बाहेर राहणाऱ्या महिलांना घरकुलाचा लाभ अजून मिळाला नाही. घरी त्या झऱ्याचे पाणी आणतात. पावसाळ्यात लवाचे पाणी गोळा करून आपली तहान भागवतात. उज्वला त्यांच्या घरी पोहचलीच नाही. मग लाकूडफाटा तोडून त्यातच आपल्या चुली पेटवून दिवस कंठीत या माय- लेकी महिला येणाऱ्या दिवसाला धीराने सामोरे जाऊन संघर्ष करत आहेत.\nरखमाबाई वृध्द झाल्या आहेत. त्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी येतात. तर तुळसाबाई मेंगाळ यांना सोमा, रामा दोन मुले आहेत. संसारात पती अर्ध्यावर सोडून गेले. मग गावकुसाबाहेर तुळसाबाई आपले झोपडी आपली आई रखमाबाई शेजारी बांधली. डोंगरावर रस्त्याच्या कडेला या दोघी राहतात. गवताची झोपडी पावसाळा सुरू झाल्याने एक शेळी विकून त्याचा प्लास्टिक कागद आणून तो छतावर टाकला.\nपाणी घरात येऊ नये म्हणून या आदिवासी ठाकर समाजाच्या स्वतः ला आधार नसला तरी आपल्या बाळा ना सांभाळत जीवन कंठीत आहेत. मात्र अजून एकही सरकारी अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहचला नाही की साधी विचारपूस केली नाही.\nसरकारी योजना येतात जातात पुढाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या मर्जीतील लोक त्या योजनाचा डबल- टिबल फायदा घेतात. मात्र रंजल्या गांजल्या, निराधारांना आधार देण्यासाठी पुढे कुणी सरसावत नाही. त्यामुळे वर्षनुवर्षे दुर्लक्षित समाज आजही तेच जीवन जगत आहे. उद्याची पहाट कशी उगवेल माहीत नाही. मात्र आलेल्या संकटाशी संघर्ष करत आजचा दिवस जगताना उद्याची पहाट खरचं आपल्या जीवनात बदल करेल. का याचा विचार न करता या झोपडीत माझ्या ये तं तरी सुखे या जाता तरी सूखे जा म्हणत जीवन कंठीत आहे.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n७७ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या 'जीवनोन्नती' वरचं कुऱ्हाड \nऔरंगाबाद : राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती न देता, त्यांचा कार्यभार हस्तांतरीत करण्याचे...\nमुलानेच संपविले जन्मदात्याचे आयुष्य\nअमरावती : रागाच्या भरात मुलाने जन्मदात्याचे जीवन संपविल्याचे घटना अमरावती येथे घडली. कांडलकर प्लॉट येथे ही घटना घडली. मद्य प्राशन केल्यानंतर मुलगा व...\n‘चॅलेंज’ स्वीकारत असाल तर सावधान\nटाकळघाट (नागपूर) : सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या ‘कपल चॅलेंज’ हॅशटॅगने धुमाकूळ घातला आहे. परंतु, ‘चॅलेंज’...\nपोलिस आयुक्‍तांचे नवे आदेश नियम मोडणारे दुकान सात ते चौदा दिवस बंद\nसोलापूर : शहरातील कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातून शहरातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोके वर काढत...\nरोहित पवारांनी कर्जत-जामखेडमधील मुलांना दिले बर्थ डे गिफ्ट\nजामखेड : आमदार रोहित पवार यांचा कोणताही सामाजिक उपक्रम हटकेच असतो. विकासकामांतही त्यांचा हात कोणी धरणार नाही. आमदारकीला एक वर्ष उलटत नाही तोच त्यांनी...\nशेवगावात कृषी विधेयकाची केली होळी\nशेवगाव : केंद्र सरकारने मंजूर केलेले तीनही कृषी विधेयक शेतकरी विरोधी असून या कायद्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/topics/business-news/9", "date_download": "2020-09-26T03:19:46Z", "digest": "sha1:LYRL7HL6FOJHFVJFM6M6TZYM2SZTLVLC", "length": 3061, "nlines": 60, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजाणून घ्या अॅपलच्या नव्या फोनची किंमत\nNBCC घेणार HSCLचा ताबा\nकर्जवसुली लवादाचा विजय मल्ल्यांना दणका\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/dr-babasaheb-ambedkar-serial-emotional-twist-127583881.html", "date_download": "2020-09-26T02:51:44Z", "digest": "sha1:GXUDSSNNXA7M774A2RBQUACUF3BHOBL5", "length": 10459, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dr. Babasaheb Ambedkar Serial emotional twist | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत येणार भावनिक वळण, 'रमाई' यांचं निर्वाण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटीव्ही अपडेट:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत येणार भावनिक वळण, 'रमाई' यांचं निर्वाण\nज्यांच्या त्यागाशिवाय भीमायन पूर्ण होऊ शकत नाही, अशी अथांग त्यागाची मूर्ती माता 'रमाई' यांचं निर्वाण..\nरमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, सत्याग्रह असो वा आंदोलनं रमाबाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपलं कुटुंबही सांभाळलं. महापुरुषाची सहचारणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने पाळलं. बाबासाहेबांसोबत सावलीसारख्या राहिलेल्या रमाबाईंना त्यांच्या तब्येतीने मात्र साथ दिली नाही आणि त्यांचं निधन झालं.\nबाबासाहेबांच्या आयुष्यातली ही अतिशय धक्कादायक आणि हादरवून सोडणारी घटना. बाबासाहेबांनी आपल्या खूप जवळच्या व्यक्तींना याआधीच गमावलं होतं. त्यामुळे रमाबाईँच्या जाण्याने महामानवाला आणखी एका दु:खद घटनेला सामोरं जावं लागलं. बाबासाहेबांच्या आयुष्यातलं हे भावनिक वळण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतही पाहायला मिळणार आहे.\nअभिनेत्री शिवानी रांगोळेने रमाबाईंची भूमिका साकारली. ही भूमिका शिवानीने फक्त साकारली नाही तर ती मालिकेच्या निमित्ताने रमाबाईंचं आयुष्यच जगली. रमाबाईंच्या निधनाने तिची देखिल मालिकेतून एक्झिट होणार आहे. शिवानीसाठी ही एक्झिट नक्कीच हुरहुर लावणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतल्या या भावनिक वळणाविषयी सांगताना शिवानीही भावूक झाली होती. अतिशय इमोशनल वातावरणात हा सीन शूट झाला. सेटवर प्रत्येकालाच अश्रू अनावर होत होते. रमाबाईंच्या या भूमिकेने मला खूप काही दिलं आहे. आयुष्यभर ही भूमिका माझ्या स्मरणात राहिल.\nआयुष्यात अशा संधी खूप कमी वेळा मिळतात की जेव्हा एखादं पात्र तुम्हाला अंतर्बाह्य बदलून टाकतं. रमाबाई या भूमिकेसाठी मला दशमी क्रिएशन्सकडून फोन आला तेव्हा इतर काहीही विचार करायच्या आधी मी भारावून गेले होते. मी जेव्हापासून काम करायला सुरुवात केली तेव्हा पासून एखादी सशक्त, महत्वकांक्षी स्त्री व्यक्तिरेखा, जिला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असेल, अशी करण्याची खूप इच्छा होती, असं ती म्हणाली.\nशिवानी पुढे म्हणते, लूक टेस्टला मला रमाबाई या आंबेडकरांवर रुसल्या आहेत पण त्यांचा रोष लपवत, त्या खोटं हसून बोलत आहेत असा प्रसंग दिला होता. माझ्याकडे वाक्य नव्हती, संदर्भ नव्हता, पण मी पहिल्यांदा नववारी साडी नेसून, कपाळावर लाल कुंकू लावून जेव्हा पाय मुडपून जमिनीवर बसले आणि शेजारी खुद्द आंबेडकर आहेत असा भाव मनात ठेवून बोलू लागले तेव्हा माझी देहबोली आपोआप बदलली. मला सुरुवातीला अगदी चालण्या पासून ते पदराआड हसण्याची सवय लावेपर्यंत सगळ्या गोष्टी हळूहळू शिकाव्या लागल्या. मला या भूमिकेच्या निमित्ताने रमाबाईंच्या आयुष्यावरील अनेक पुस्तकं वाचता आली. यातलं मला आवडलेलं पुस्तकं म्हणे योगीराज बागुल यांचं प्रिय रामू. यात एक फार सुंदर प्रसंग लिहिलेला आहे. रमाबाईंनी आयुष्यभर जितक्या सहजपणे श्वास घ्यावा तितक्या सहजपणे सेवाभाव जपला ,कष्ट सोसले. छोट्याशा खोलीत अनेक माणसांचा संसार सांभाळल्या नंतर एक दिवस आंबेडकर त्यांना एका टुमदार बंगल्या समोर घेऊन येतात आणि सांगतात की. \"हा बंगला आजपासून रमाबाई आंबेडकर यांचा आहे. कसा वाटला रामू\", तेव्हा रमाबाईंच्या तोंडून बाहेर पडलेलं पाहिलं वाक्य होतं , \"केवढं मोठं घर आहे. माणसं नसतील तर ओकंबोक वाटेल\"\", तेव्हा रमाबाईंच्या तोंडून बाहेर पडलेलं पाहिलं वाक्य होतं , \"केवढं मोठं घर आहे. माणसं नसतील तर ओकंबोक वाटेल\" मला वाटतं या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून रमाबाईंनी खूप काही शिकवलं. ताटात गरजे पेक्षा जास्त वाढून घ्यायचं नाही आणि शेजारी दुसऱ्याचं रिकामं ताट असेल तर आपला तोंडचा घास त्याला द्यायचा हे वयाच्या 10-12 व्या वर्षीच अंगी भिनलं होतं.\nरमाबाई साकारायला मिळणं ही एक खूप मोठी जबाबदारी होती. धाकधूक मनात असली तरी. हा प्रवास मला सतत मिळणाऱ्या लोकांच्या प्रेमा मुळे, त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे ह्या जाणीवेतून सुखकर झाला. लोकांनी मला रमाई म्हणणं ही माझ्यासाठी एक पदवीच आहे. त्याबद्दल मी नेहमी ऋणी असेन, असं शिवानी म्हणाली.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Kremmen+de.php", "date_download": "2020-09-26T01:03:23Z", "digest": "sha1:DFFRJNZWANROZFDASDTDH3X5IWZ2AZNT", "length": 3396, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Kremmen", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kremmen\nआधी जोडलेला 033055 हा क्रमांक Kremmen क्षेत्र कोड आहे व Kremmen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Kremmenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kremmenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 33055 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनKremmenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 33055 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 33055 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathikhajina.com/tag/astrology-tips/", "date_download": "2020-09-26T00:59:33Z", "digest": "sha1:7PLZI5RYBQ5SESIWI2LFJ72M6K3UJLU3", "length": 2044, "nlines": 38, "source_domain": "www.marathikhajina.com", "title": "astrology tips | मराठी खजिना", "raw_content": "\nपालेभाज्यांचे हे आहेत फायदे\nधने-जिरे पूड चे फायदे\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन…\nडेटिंगला जाताना या टिप्स लक्षात ठेवा\nविवाह जुळविताना कुंडली गुणमेलन का आवश्यक असते\nहिंदू संस्कृतीमध्ये मुलामुलींचा विवाह करताना येणारया स्थळांचा कुंडलीतील गुण जुळत असतील तरच विचार केला जातो. वधू- वरांच्या कुंडल्या एकमेकांशी किती जुळतात हि बाब फारच महत्त्वाची ठरते. यालाच कुंडली गुणमेलन असे […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/08/blog-post_28.html", "date_download": "2020-09-26T02:46:32Z", "digest": "sha1:VRMIUHSVDDUDC5GTKT5VLNEPQ7V4HUCW", "length": 18453, "nlines": 220, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "अपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि यशामध्ये सोबत येणाऱ्यांना कधीच जवळ करू नका - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आत्मविकास मानसशास्त्र अपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि यशामध्ये सोबत येणाऱ्यांना कधीच जवळ करू नका\nअपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि यशामध्ये सोबत येणाऱ्यांना कधीच जवळ करू नका\nचला उद्योजक घडवूया ७:३० म.उ. आत्मविकास मानसशास्त्र\nखेळ असो किंवा उद्योग, व्यवसाय जो पर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तो पर्यंत तुम्हाला कोणीही विचारत नाही, त्याअगोदर कराव्या लागणाऱ्या आर्थिक परिस्थितीचा सामना हा तुम्हालाच कराव लागतो. तुम्ही संपूर्ण पणे क्रिकेट च्या झोकात हरवून जातात. आणि जेव्हा यशस्वी होतात तेव्हा समाज, सरकार व इतर गुंतवणूकदार जागे होतात व तुम्हाला मदत करायला लागतात. तुमच्या यशावर स्वतःची पोळी भाजून घेतात, देशभक्ती जागी होते. नैराश्य आणि आत्महत्या करण्याचे मुख्य कारण हेच आहे, खेळाडू ह्यांचे आयुष्य काय चार वर्षानंतर येणाऱ्या फक्त 17 दिवसांच्या ऑलम्पिक पुरते नाही आहे, त्यांनाही दररोज जगावे लागते, ती देखील माणसेच आहे. त्यानंतर ती जिवंत आहेत कि मेली आहेत हे कोणीच विचार करत बसणार नाही. असाच प्रकार यशस्वी झालेल्या उद्योजकांसोबतही होतो, जेव्हा यशस्वी होतात तेव्हा त्यांना महत्व दिले जाते, बाकी खेळाडू आणि उद्योजक ह्यांच्या अपयशाच्या कठीण, बिकट परिस्थितीत अक्षरक्ष वाळीत टाकले जाते. घरचे पाठ फिरवतात तर समाजाचे बोलून काय फायदा. अपवाद आहेत आणि तेही फक्त आपवादच आहेत, उन्नीस बीस असले असते तर चालले असते पण फरक इतका आहे कि 0.00१ अशी त्यांची संख्या आहे. आत्मकेंद्रित व्हा, आत्मविकासात मग्न रहा, जे फक्त ह्या ऑलम्पिक च्या दिवसात प्रोत्साहन देतात त्यांच्या पासून चार हात लांब रहा आणि जे 4 वर्षे सतत तुम्हाला प्रोत्साहन देतात अश्यांना जवळ करा, उद्योजकांना सुद्धा हेच आवाहन आहे, अपयशात साथ देणाऱ्यांना कधीच सोडू नका.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nघफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा\nसंधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण करा\nअपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि य...\nमुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस\nदहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी\n1991 च्या आधी भारतीय कंपन्यांना कृत्रिम संरक्षण दे...\nएमबीए तरुणांचा नोकरीला नकार, भरवला आठवडी बाजार \nकसा झाला शाळा सोडलेल्या आकाशाचा स्वयंपाकी ते सॉफ्ट...\nहा कसला तर्क आहे\nजेव्हा एक बिल्डर किंवा उद्योजक हेल्थकेयर उद्योगमध्...\nमशरुमचं उत्पादन घ्या, महिन्याला लाखो कमवा \nकरोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्या...\nकथा सॅमसंगची - चौकटीबाहेर फक्त एकच पाऊल टाका\nदहा,पंधरा वर्षांपुर्वी महाराष्ट्रात माणसं रहायची प...\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग संपत्ती किंवा पैसे कम...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव मराठी आणि परप्रांतीय मधील फरक मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाह...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते\nकल्पना करा कि तुम्ही हिरा आहात. तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले. तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.mpscmantra.com/2019/10/09/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B9/", "date_download": "2020-09-26T00:59:35Z", "digest": "sha1:57YA7HUKW65RPGIAW4NONK2BQBZJFWLE", "length": 34438, "nlines": 432, "source_domain": "www.mpscmantra.com", "title": "आयोगाने विचारलेले घटकनिहाय प्रश्न : १) घटनेची प्रस्तावना - MPSC Mantra", "raw_content": "\nMPSC कोणकोणत्या परीक्षा घेते\nMPSC बद्दल सविस्तर माहिती\nImportant Acts (महत्त्वाचे कायदे pdf स्वरुपात)\nविकास खन्ना यांना एशिया गेमचेंजर पुरस्कार\nचालू घडामोडी – २३ जुलै २०२०\n14 पायांचं झुरळ; इतकं मोठं झुरळ कधी पाहिलंत का\n♻️ तुम्हाला पाठ आहेत का :- महत्वाचे दिन ♻️\nउष्णतेची लाट म्हणजे काय\nजागतिक बँकेतील पदावर अभास झा\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता सर्वांनाच उपचार\nभारतीय क्षेपणास्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये\nप्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY)\nMPSC कोणकोणत्या परीक्षा घेते\nMPSC बद्दल सविस्तर माहिती\nImportant Acts (महत्त्वाचे कायदे pdf स्वरुपात)\nआयोगाने विचारलेले घटकनिहाय प्रश्न : १) घटनेची प्रस्तावना\nआयोगाने विचारलेले घटकनिहाय प्रश्न : १) घटनेची प्रस्तावना\nराज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा\nप्र.1. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली\n१) उद्देशपत्रिका २) मूलभूत अधिकार\n३) मूलभूत कर्तव्ये ४) मार्गदर्शक तत्वे\nप्र.2. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही ……..आहे. (राज्यसेवा मुख्य २०१२)\nअ) राज्यघटनेचे हृदय ब) राज्यघटनेचा आत्मा\nक) राज्यघटनेचे डोके ड) यापैकी नाही\nयोग्य पर्याय निवडा: –\n१) अ व क २) ब व क\n३) फक्त ब ४)फक्त ड\nप्र.3. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली\n१) १९५२ २) १९६६\n३) १९७६ ४) १९८६\nप्र.4. खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले\n३) केसवानंद भारती खटला\n४) बोम्मई विरुध्द भारताचे संघराज्य\nप्र.5. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील ‘सार्वभौम’ या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो\nअ) बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वत:शी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करु शकतो.\nब) संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत.\nक) भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करु शकतो.\nड) भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत.\n१) ब,क,ड २) अ,ब,क\nप्र.6. खालील मुद्यांचा विचार करा.(राज्यसेवा मुख्य २०१४)\nअ) भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरुंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते.\nब) हा ठराव संविधान सभेने २२ जानेवारी १९४८ रोजी स्वीकृत केला.\n१) दोन्ही बरोबर आहेत २) दोन्ही चूक आहेत\n३) ब बरोबर आहे ४) अ बरोबर आहे\nप्र.7.भारतीय राज्यघटनेचे ‘आर्थिक न्याय’ हे उद्दिष्ट ……यातून व्यक्त होते. (राज्यसेवा मुख्य २०१५)\n१) प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार\n२) प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे\n३) मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे\n४) वरीलपैकी एकही नाही\nप्र.8. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची वर्णने व ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळणी करा: (राज्यसेवा मुख्य २०१५)\nअ) ‘घटना कर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली’ i) पंडीत ठाकुरदास भार्गव\nब) ‘राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग’ ii) के.एम.मुन्शी\nक) ‘राजकीय कुंडली’ iii) भारताचे सर न्यायाधीश ‘सिक्री’\nड) ‘अत्यंत महत्वपूर्ण भाग’ iv) बेरुबारी संदर्भ खटला (१९६०)\nप्र.9, फाझल अली कमिशनचे सदस्य…………. होते. (राज्यसेवा मुख्य २०१६)\nअ) के.एम. पण्णीकर ब) हृदयनाथ कुझरू\nक) यशवंतराव चव्हाण ड) अण्णा डांगे\n१) फक्त अ,ब २) फक्त क, ड\n३) फक्त ब, क ४) वरीलपैकी सर्व\nप्र.10. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू (राज्यसेवा मुख्य २०१६)\n१) पं. जवाहरलाल नेहरू यांनी घटनासमितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला.\n२) दिनांक १३ डिसेंबर १९४६ रोजी उद्दिष्टांचा ठराव घटनासमिती समोर ठेवण्यात आला.\n३) उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता.\n४) या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले.\nप्र.11. खालील विधाने विचारात घ्या( राज्यसेवा मुख्य २०१७)\nअ) सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोतही नाही अथवा कायदेमंडळाचा अधिकारांवर बंधनेही घालत नाही.\nब) सर्वोच्च न्यायालयाने बेरूबारी खटल्यात (१९६०) सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले.\nक) केशवानंद भारती खटल्यामध्ये (१९७३) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले.\nड) भारतीय जीवन विमा निगम खटल्यात (१९९५) सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्च प्रतिपादन केले.\nवरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त\nप्र.12. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली.(Asst मुख्य २०१३)\n१) आयर्लंड २) यु.के\n३) यु.एस.ए ४) ऑस्ट्रेलिया\nप्र.13. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश १९७६ च्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला. (Asst मुख्य २०११)\n१) ४४ वी २) ४१ वी\n३) ४२ वी ४) ४६ वी\nप्र.14. भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ……प्रभाव दिसतो. (Asst मुख्य २०१२)\n१) अ व क २) क व ड\n३) फक्त ड ४) फक्त ब\nप्र.15. १९७६ च्या ४२ व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे \nअ) सार्वभौम आणि समाजवादी\nब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष\nक) श्रध्दा, उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा\nड) एकता आणि एकात्मता\nवरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत\n१) फक्त ब २) ब आणि क\n३) क आणि ड ४) ब आणि ड\nप्र.16………….या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले.(Asst मुख्य २०१५)\n१) १३-१-१९७६ २ )३-१-१९७७\n३) ३१-१-१९७८ ४) १-३-१९७७\nप्र.17) ४२ व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देश्यपत्रिकेमध्ये …….आणि …..शब्द जोडण्यात आले. (Asst मुख्य २०१४)\nअ) समाजवादी ब) धर्मनिरपेक्ष\nक) प्रजासत्ताक ड) राष्ट्राची एकता\nप्र.18). आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने “विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि ………… यांचे स्वातंत्र्य दिले आहे. (Asst मुख्य २०१६)\n१) व्यवसाय २) संघटना\n३) पूजा ४) संचार\nप्र.19) भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. (Asst. मुख्य २०१७)\nअ) सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे.\nब) सरनाम्यातील तरतूदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात.\nक) सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्त्रोत म्हणून कार्य करू शकतो.\nवरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत\n१) फक्त अ २) फक्त क\n३) फक्त ब, क ४) अ, ब, क\nप्र.20). भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकानुसार भारतात हे ‘प्रजासत्ताक’ आहे. प्रजासत्ताकाचा अर्थ कोणता\nअ) राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो.\nब) सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते.\nक) शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.\nड) राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.\nखाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा.\n१) अ २) अ, ब, क\n३) वरील सर्व ४) अ, ड\nप्र.21). भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते\nअ) समाजवादी आ)धर्मनिरपेक्ष इ) सार्वभौम\nई)लोकशाही उ) गणराज्य ऊ)न्याय\nए) स्वातंत्र्य ऐ)समानता ओ)बंधुता\nप्र.22). भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ……प्रभाव दिसतो. (PSI मुख्य २०१३)\nअ) उद्देशपत्रिकेत ‘बंधुभाव’ या तत्वाचा समावेश केला.\nब) मूलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे.\nक) हे हक्क वादयोग्य (दाद मागता येणार) आहेत.\nड) गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली आहेत.\nवर दिलेल्या विधानांपैकी कोणते/कोणती बरोबर आहेत \n१) अ २) अ,ब\n३) अ, ब, क ४) सर्व\nप्र.23) ४२ व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे : (PSI मुख्य २०१२)\n१) सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य\n२) सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य\nप्र.24) उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्यांचा’ बरोबर क्रम आहे. (PSI मुख्य २०१३)\n१) अभिव्यक्ती, विचार, श्रध्दा, विश्वास, उपासना\n२) विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना\n३) अभिव्यक्ती, विचार, विश्वास, उपासना, श्रध्दा\n४) विचार, अभिव्यक्ती, उपासना, विश्वास, श्रध्दा\nप्र.25) गटा बाहेरचा ओळखा : (PSI मुख्य २०१४)\nविचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना, सामाजिक\n१) विचार २) श्रध्दा\n३) उपासना ४) सामाजिक\nप्र.26) उद्देशपत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांनी जुळणी करा: (PSI मुख्य २०१४)\nअ) राजकीय कुंडली i) पंडीत ठाकुरदास भार्गव\nअचंबीत करणारी तत्वे ii)एम.व्ही.पायली\nक) उत्कृष्ट गद्य-काव्य iii)के.एम.मुन्शी\nड) अशा प्रकारचा केलेला\nएक सर्वोत्तम मसुदा iv)आचार्य.जे.बी.कृपलानी\nप्र.27) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही\n१) सरनामा न्यायालयाद्वारा अंमलात आणता येत नाही…\n२) राज्यघटनेस प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्ट्ये आहेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात.\n३) सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकाराचे स्त्रोत कोणाकडून प्राप्त केले आहे हे स्पष्ट होते.\n४) आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधूता ती आदर्श तत्वे रशियन राज्यक्रांती (१९१७) कडून घेतली आहेत.\nप्र.28) भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे \n१) स्वातंत्र्य २) समता\n३) बंधुता ४) न्याय\nप्र.29) खालील विधाने विचारात घ्या. (STI मुख्य २०१६)\nअ) सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्ताविक उद्दिष्ट्ये आणि तत्वज्ञान यांचा समावेश आहे.\nब) बेरूबरी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले कर सरनाम्यातून राज्य घटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्य घटनेचा भाग आहे.\nक) केशनावंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरूबरी संघ खटल्यातील घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा\nड) १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात-समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दाचा समावेश करण्यात आला.\nवरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त\n१) अ २) अ, ब, क\nप्र.30) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे\n१) स्वातंत्र्य २) समता\n३) न्याय ४) बंधुभाव\nप्र.31) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे \n१) बेरुबरी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता.\n२) केशवानंद भारतीय खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता.\n३) सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीद्वारे दोन वेळा बदल करण्यात आलेले आहेत.\n४) वरील एकही नाही.\nप्र.32) खालील विधाने लक्षात घ्या : (STI पूर्व २०१४)\nअ) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये ३६८ व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते.\nब) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही.\nक) उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या “मौलिक संरचनेला’’ धक्क न लावता दुरुस्ती\nवरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त\n१) अ २) अ,ब\n३) क ४) अ, क\nप्र.33) भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले\n४) दोन्ही प्रथमपासूनच सम्मिलित होते\nPrevious Previous post: महाराष्ट्राचा भूगोल : महत्त्वाचे मुद्दे\nOne thought on “आयोगाने विचारलेले घटकनिहाय प्रश्न : १) घटनेची प्रस्तावना”\nतुमच्या शंका आम्हाला येथे विचार\nभूगोल : दाब व वारे भाग 1\nभूगोल: दाब व वारे भाग 2\nवेबसाईट वर अपलोड करण्यात येणाऱ्या नवीन माहितीचे नोटिफेकेशन हवे असल्यास खाली दिलेल्या बॉक्स मध्ये आपला इमेल टाका..\n509,374 लोकांनी आम्हाला भेट दिली\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nRoshani rathod on राज्यव्यवस्था टेस्ट : 30 जुलै 2020\nUpendra on काय आहे पॅरिस हवामान करार\nMPSC Mantra हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. MPSC Mantra च्या वेबसाइट बरोबरच Facebook, Telegram, Twitter, YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहोत. अल्पावधीतच रोपटेरूपी MPSC Mantra या व्यासपीठाचा वटवृक्ष झाला आहे. हे केवळ तुमच्यासारख्या विद्यार्थी मित्रांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. त्याबद्दल Team MPSC Mantra आपले शतशः आभारी आहे. आम्ही नेहमीच दर्जेदार व परिक्षाभिमुख माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही आमचा हा प्रयत्न असाच चालू राहील. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी नेहमी आमच्याशी संपर्कात रहा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/jokes-in-marathi/joke-of-the-day/articleshow/71804659.cms", "date_download": "2020-09-26T03:11:19Z", "digest": "sha1:NYD5UGOQYFEFXKEGJZKHIKMRNYW76VC7", "length": 7717, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबोला, काय काय देऊ \nफटाके विक्रेता: बोला, काय काय देऊ \nनंदू: पाऊस सोडून बाकीचं दे काही पण...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nMarathi Joke: रिझल्ट आणि सोशल डिस्टनसिंग...\nMarathi Joke: पाहुण्यांचे सल्ले...\nMarathi Joke: करोना स्पेशल उखाणा...\nMarathi Joke: गाडी पुसायचं फडकं आणि प्रेम...\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहसालेको विनोद मराठी विनोद Joke of the day joke hasaleko\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nशहीद जवान नरेश बडोलेंना काश्मीरात वीरमरण\nकृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचं देशव्यापी आंदोलन\nकोल्हापूरकरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ऑडिट होणार, २२ पथकं तैनात\nन्यूजड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nदेश'चीन, पाकला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद भारतीय हवाई दलात'\nकोल्हापूरपोटच्या १० वर्षांच्या मुलाला ५ लाखात तृतीयपंथीयास दिले दत्तक\nदेशकृषी विधेयकांवरून PM मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र\nदेशUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने बहिष्कार घालत दिले चोख उत्तर\nमुंबईअनलॉकसाठी आहे 'ही' त्रिसुत्री; CM ठाकरेंनी सांगितले पुढचे धोके\nकोल्हापूरसंभाजीराजेंनी वेळीच ओळखली चाल; 'असा' उधळला डाव\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nकार-बाइकदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:PD-India-URAA/en", "date_download": "2020-09-26T03:32:08Z", "digest": "sha1:2NXDVBWDLGRI3HT4UVLZTFLP775ZYOWU", "length": 4469, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:PD-India-URAA/en - विकिपीडिया", "raw_content": "\nनोंद घ्या: कृपया हा साचा थेट वापरू नका हा फक्त भाषांतरासाठी आहे. त्याऐवजी {{PD-India-URAA}} वापरा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मे २०१५ रोजी १२:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-3/", "date_download": "2020-09-26T01:12:23Z", "digest": "sha1:JQWV7RW27AQKXE3LALLYBSEVMARBWB2J", "length": 9530, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळात किरकोळ कारणावरून माय-लेकास मारहाण : सात आरोपींविरुद्ध गुन्हा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nभुसावळात किरकोळ कारणावरून माय-लेकास मारहाण : सात आरोपींविरुद्ध गुन्हा\nin भुसावळ, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या\nजातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप : झाडे तोडल्यावरून उफाळला वाद\nभुसावळ : शहरातील मुक्तानंद कॉलनीत उंबराच्या झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू असताना तक्रारदाराने गल्लीतले लोक झाडाखाली गाड्या लावत असल्याने झाडे तोडायला का लावतात असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी माय-लेकास मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.\nसागर नामदेव रोझतकर (28, मुक्तानंद कॉलनी, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, विलास निंबाळकर, जयदीप विलास निंबाळकर, निखील संतोष झांबरे, प्रसाद पाटील, ललित उर्फ लल्ला पाटील, मुकेश कुमावत (राजस्थानी), प्रतीक देशमुख यांच्याविरुद्ध दंगल व अ‍ॅट्रासिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराच्या घराबाहेर उंबराच्या झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू असल्याने त्यांनी संबंधितास ज्या फांद्या नडत नसतील त्या तोडू नये, असूे सांगितले तसेच संशयीत आरोपींना झाडाखाली गल्लीतील सर्व लोक गाड्या लावत असताना झाडे का तोडायला लावतात अशी विचारणा केल्याचा राग आल्यानंतर आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करीत तक्रारदाराच्या घुसून त्यांच्यासह त्यांच्या आई फुलवंतीबाई (50) यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तपास पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड करीत आहेत. दरम्यान, जखमी माय-लेकांवर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nछळ असह्य झाल्याने भुसावळात विवाहितेची आत्महत्या : पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा\nरावेरातील प्लॅस्टीक फॅक्टरीला आग : सहा लाखांचे नुकसान\nभारतात कोरोना चाचणीचा नवा विक्रम; एका दिवसात विक्रमी चाचणी\nBIG BREAKING: बिहार निवडणुकीची घोषणा: तीन टप्प्यात होणार मतदान\nरावेरातील प्लॅस्टीक फॅक्टरीला आग : सहा लाखांचे नुकसान\nवडगावात वादळी पावसामुळे घरांची पडझड : 35 हेक्टरवरील केळीचे नुकसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2020/09/blog-post_74.html", "date_download": "2020-09-26T02:04:47Z", "digest": "sha1:B4BFBFVU6UTXFPDYXUX3BMO62FEONOMO", "length": 11908, "nlines": 111, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "श्री .प्रफुल्ल काळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर श्री .प्रफुल्ल काळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित\nश्री .प्रफुल्ल काळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित\nश्री .प्रफुल्ल काळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित\nनागपूर / अरूण कराळे ( खबरबात )\nजिल्हा परिषद हायस्कुल डिफेन्स ,वाडी येथील माध्यमिक शिक्षक श्री प्रफुल्ल विश्वासराव काळे यांची २०१९ -२०२० या वर्षाकरिता माध्यमिक विभागातून आदर्श शिक्षक म्हणून निवड करण्यात आली . त्या निमीत्ताने शुक्रवार दि ११ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद हायस्कुलच्या प्रांगणात शिक्षण सभापती सौ .भारतीताई पाटील यांच्या हस्ते नागपूर पंचायत समीती सभापती सौ . रेखाताई वरठी यांच्या अध्यक्षतेखाली , गटविकास अधिकारी श्री . किरण कोवे ,गटशिक्षणाधिकारी श्री .रामराव मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत माध्यमिक शिक्षक प्रफुल्ल काळे यांचा सपत्नीक शाल , श्रीफळ , मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले .\nश्री प्रफुल्ल काळे यांच्या उत्कृष्ठ शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली .\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने शाळा स्तरावर सोहळा आयोजित करण्याचे ठरविले आहे त्यामुळे संबंधित तालुक्यातील अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिक्षक गौरव पुरस्कार आयोजित करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण सभापती सौ . भारतीताई पाटील यांनी दिली .\nज्या शिक्षकांना आजपर्यंत शासनस्तरावर आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला नाही त्यांनी विद्यार्थ्यासाठी नवनवीन उपक्रम राबवून आपले विद्यार्थी हित जोपासून पुढील शैक्षणिक कार्यात अग्रेसर राहून पुरस्काराच्या शर्यतीत राहावे असे मत गटविकास अधिकारी किरण कोवे यांनी प्रकट केले .शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . अलका सोनवाने यांनी सत्कारमूर्ती श्री .प्रफुल्ल काळे यांच्या उत्कृष्ठकार्याची माहिती दिली . प्रत्येक विद्यार्थ्याकडे श्री .काळे सर आवर्जुन लक्ष देत असुन विद्यार्थ्यांना शिस्तीत ठेवण्याचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करीत आहे .असे प्रतिपादन शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष श्री .अनंत भारसाकडे यांनी केले . यावेळी शुभांगी काळे ,लेखाधिकारी श्री .गेडाम, श्री .चव्हाण ,श्री . जीवन येवले , श्री . बंडु लोहारे ,श्री .भोयर,गिरडकर, सौ . रेखा बहुरूपी श्री .सुरेश भोयर , श्री .संदीप गिरडकर ,मेरियन अब्राहम , श्री .शंभरकर प्रामुख्याने उपस्थित होते\nसंचालन श्री राजेश मरस्कोले , आभार प्रदर्शन श्री विनोद मानकर यांनी केले .\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (210) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95", "date_download": "2020-09-26T02:27:30Z", "digest": "sha1:OQUOYF2BPXAHFF5F44L5VEIZ44RYB3DQ", "length": 5208, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nअरुण गवळीची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून कायम\nहलाखीत राहणाऱ्या माजी नगरसेवकांचं पालकत्व पालिकेनं घ्यावं, नगरसेवकांची मागणी\nमानखुर्दमधील अपक्ष उमेदवारावर बलात्काराचा गुन्हा\nकाँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, 'हे' नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश\nऑगस्टपासून नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी\nपोटनिवडणुका जाहीर करण्यास उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती\nभाजप नगरसेवकाचा मनसेच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला\nभटक्या कुत्र्यांनतर आता मांजरांची नसबंदी\nबेकायदेशीर होर्डिंग लावणं नगरसेवकाच्या अंगलट; न्यायालयाकडून २४ लाखांचा दंड\nआॅपरेशनवेळी आवश्यकता नसेल तर दाढी काढू नये, रईस शेख यांचं पालिका आयुक्तांना पत्र\nनगरसेवकांनाही आता बायोमेट्रीक हजेरी\nमुंबईत १० नव्हे, तर २५-३० टक्के पाणीकपात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/In-this-way-bring-back-your-lost-beauty.html", "date_download": "2020-09-26T02:59:06Z", "digest": "sha1:W5YC7HUTGB2OFSKFFH6AM2IUS7OGXOSX", "length": 3934, "nlines": 61, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "'अशा' प्रकारे परत आणा तुमचं हरवलेलं सौंदर्य...", "raw_content": "\n'अशा' प्रकारे परत आणा तुमचं हरवलेलं सौंदर्य...\nbyMahaupdate.in मंगळवार, फेब्रुवारी ११, २०२०\nदररोज क्ंलजिंग, टोनिंग आणि मॉईश्‍चरायझिंग करायला विसरू नका.\nउन्हामुळे त्वचा काळवंडली असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. उगाचच घरगुती उपाय करत बसू नका.\nदही, व्हिनेगर, लिंबाचा रस असे आंबट पदार्थ मुलतानी माती, बेसन किंवा चंदनासवे मिक्स करून घरगुती फेसपॅक तयार करा आणि चेहरा आणि हातापायांना लावा.\nस्कन ट्रिटमेंट घ्यायची असेल तर आधी त्वचेचा पोत जाणून घ्या. टॅन त्वचेवर लेझर टट्रमेंट उपयोगाची नसते. टॅनिंग कमी होईपर्यंत लेझर ट्रिटमेंट घेऊ नका. इतर काही ट्रिटमेंटद्वारे टॅनिंगचा परिणाम कमी करून मगच लेझरकडे वळा.\nपाणी, नारळ पाणी तसेच फळांचे रस अशा द्रवपदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करा. शरीरात ओलावा आणि थंडावा राहील याची काळजी घ्या.\nताजी फळे खाण्यावर भर द्या. यामधून मिळणार्‍या अँटी ऑक्सिडंट्समुळे त्वचेचे नुकसान भरून येण्यास मदत होईल.\nफिरून आल्यावर व्यायाम सुरू करा.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://spsnews.in/2018/05/04/bhedase-niyukti/", "date_download": "2020-09-26T02:58:26Z", "digest": "sha1:BQYTQOMVNIFFASKIQQJ44BT6TJT43E7C", "length": 7797, "nlines": 89, "source_domain": "spsnews.in", "title": "शिवसेनेच्या शिराळा-वाळवा संपर्क प्रमुख पदी श्री.आनंदराव भेडसे यांची नियुक्ती – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nशिवसेनेच्या शिराळा-वाळवा संपर्क प्रमुख पदी श्री.आनंदराव भेडसे यांची नियुक्ती\nमुंबई: सावर्डे बु. ता.शाहुवाडी चे सुपुत्र सध्या मुंबई येथे वास्तव्य असणारे , ज्योतिर्लिंग एन्टरप्राईजेस चे मालक श्री.आनंदराव भेडसे यांची शिवसेनेच्या शिराळा-वाळवा मतदार संघाच्या संपर्क प्रमुख पदी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.\nश्री.आनंदराव भेडसे हे एक कामसू व्यक्तिमत्व आहे. गावाकडून मुंबई मध्ये येणाऱ्या प्रत्येकास ते मदतीचा हात देतात. शिवसेनेतील सामान्य कार्यकर्त्यापासून आपल्या समाजकारणाला सुरुवात करणार हे व्यक्तिमत्व, नेहमीच दुसऱ्याच्या समाधानात स्वतःच समाधान मानत असतं. शाहुवाडीचे शिवसेनेचे आमदार श्री.सत्यजित पाटील यांचे ते खंदे समर्थक आहेत. असे असतानाही त्यांच्याकडे काम घेऊन येणाऱ्यामध्ये ते कधीही भेदभाव करीत नाहीत. योग्य त्या कामांना न्याय देण्याचा ते नेहमीच प्रयत्न करीत असतात.\nअसं हे व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थाने समाजकारणातून राजकारणात प्रवेश करीत आहे. तालुक्यातील या नव्या राजकीय प्रवेशाला तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा . हि निवड सेनेचे प्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसारच करण्यात आली. या निवडीवेळी उद्योगमंत्री श्री.सुभाष देसाई ,वरिष्ठ नेते श्री.गजानन किर्तीकर,श्री.नितीन भानुगडे – पाटील आणि इतर शिवसैनिक उपस्थीत होते.\nश्री.आनंदराव भेडसे यांचे या निवडीबद्दल सा.शाहुवाडी टाईम्स व SPS NEWS च्या वतीने हार्दिक अभिनंदन.\n← उद्रेक लघुपट चे उद्घाटन उत्साहात संपन्न\nपिशवीचे सुपुत्र श्री.पी.एस.पाटील यांची महावितरणच्या मुख्य जनसंपर्क पदी पदोन्नती →\nकाँग्रेस ची सकारात्मक ताकद दाखवा – सत्यजित देशमुख\nसरपंच होण्यासाठी १० वी पास गरजेचे\nभाजप च्या पेट्रोल,डीझेल दरवाढ विरोधात शिराळ्यात कॉंग्रेसचा तिरडी मोर्चा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t5250/", "date_download": "2020-09-26T03:02:17Z", "digest": "sha1:7G2XJZIGJUY6VU2DFY5A5KW7VMPU4VKH", "length": 5501, "nlines": 90, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-एक जुनी गर्लफ्रेंड", "raw_content": "\nपुन्हा आज एकदा हि सुंदर अशी पहाट, नजरेला सुंदर नाही वाटली.\nरात्री तुझ्या तो आठवणीतला प्रत्येक क्षण साक्ष देतोय या लाल सुझलेल्या डोळ्यांची.\nआणि माझ्या हृदयाचा प्रत्येक भाग सांगतोय मनात तू आणि तूच वसल्याची.\nतुझा नाव घेण्याचा तर निम्मित होतं काल मित्राचा,\nपण काय करावा या मनातल्या तुझ्या सुंदरश्या चित्राचा.\nबोल कधी पाऊसात तू भिजताना मला आठवलस,\nनाही तर नेहमीच पाउसाचा पाणी अश्रुंपोटी साठवलस.\nनवीन नवीन प्रेमाचे सुरुवातीचे दिवस काही छान होते,\nनंतर हळू हळू कळला आता त्याच निवडक दिवसांची हृदयात खान होते.\nप्रेम म्हणजे तुझ्या माझ्या मनातला गानं,\nकि तुझा माझ्या नजरेत... आणि माझा तुझ्या नजरेत कायमचा राहणं.\nमाझ्या फुटबॉलच्या गप्पांवर पण तुझा ते माझ्यासोबत बसणं,\nआणि मला शोप्पिंग नाही आवडत सांगून पण माझा तुझ्यासोबत असणं.\nमीच बदललो असतो तर नवल..\nमीच बदललो असतो तर नवल..\nतुझा स्पोर्ट्स चैनेल TV वर शोधणं मला कळत नसणार...\nनाही तर असा म्हणतो,\nकुठे तरी उद्या तो काय बोलेल, याचीच गोष्ट मनात घोळत असणार\nमला जे वाटतंय,ते तुला वाटत असेलही कदाचित,\nअश्रुंसोबत आठवणीत काही रात्री जातीलही कदाचित,\nमी कुठे बोलू पुन्हा, माझा काय चुकलेला..\nहाच प्रश्न घेऊन दोघांचा मन ते रुसलेला...\nविसरणार म्हणून काय प्रेम पुसून जात नसता गं,\nतुझी आठवण पुसायला मित्रांची ती धडपड रोज दिसते गं.\nपुन्हा कधी तरी भेटायची आस ती आजवर आहेच,\nतुझ्याही अडचणींची जाण ती कुठे तरी आहेच,\nआज नाही तर उद्या ती...भेट होईलच ना तशी,\nमाझ्या आठवणीत घर करून बसलेली जुनी गर्लफ्रेंड हि अशी....\nAuthor -- विनय मोरे\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.marathijag.com/2019/11/pani-Hech-jivan.html", "date_download": "2020-09-26T02:36:38Z", "digest": "sha1:KSNTRY7XMKEYGILG45B36WFNMUYOI6IG", "length": 10470, "nlines": 72, "source_domain": "www.marathijag.com", "title": "पाणी- आजचे अमूल्य धन - मराठी जग", "raw_content": "\nHome निबंध पाणी- आजचे अमूल्य धन\nपाणी- आजचे अमूल्य धन\nनोव्हेंबर १४, २०१९ निबंध\nपाणी- आजचे अमूल्य धन\nआपल्या शरीराचा सत्तर टक्के भाग पाण्याचा आहे. पाणी नसेल तर आपण फार काळ जगू शकणारच नाही, सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज असते.मुळात ह्या पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली त्या मागचे मुख्य कारण म्हणजे पाणी होते हेच आहे, म्हणूनच संस्कृतमध्ये पाणी ह्या शब्दाला समानार्थी शब्द ' जीवन ' असा आहे.\nआपल्या पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्यानेच व्यापलेला आहे, शनी, गुरु,मंगळ ह्या ग्रहांवर जीवसृष्टीचा अभाव आहे कारण तिथे पाणीच नाही. चंद्राचेही तेच आहे. जिथे पाणी असते तिथेच जीवसृष्टीला निर्माण होण्यासाठी आवश्यक आसे .तापमान, प्राणवायू, अन्न इत्यादी घटक असतात.म्हणूनच पाणी हे सर्व सजीवांचे अमृत आहे. ते ह्या पृथ्वीवर अनेक रूपांमध्रे मिळते, वायूरूपात, द्रवरूपात, हिमरूपात आपल्याला ते दिसते. विहिरी, तळी,सरोवर, झरे, ओढे, नाले, नद्या, समुद्र आणि महासागर अशी त्यांची अनेक रूप आहेत. हिमालयात ते हिमनदी आणि हिमनगाच्या रूपात आढळते. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील सागरात तर असे कित्येक हिमनग तरंगत आहेत.\nसमुद्र आणि महासागर हे पाण्याचे अतिविशाल साठे असूनही ते खारटअसल्याने आपण त्या पाण्याचा थेट वापर करू शकत नाही. सूर्याच्या उष्णते ने त्या पाण्याची वाफ होऊन ते हवेत वर जाते तेव्हा त्यातील क्षार खालीच राहातात. वर आकाशात तापमान थंड असल्याने वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते आणि ते पावसाच्या रूपाने खाली येते. हे असे जलचक वर्षानुवर्षे चालूच असते.\nस्वच्छता राखण्यासाठी. आंघोळीसाठी, शेतीसाठी ,कारखाने चाल वण्यासाठी अणि जलविद्युत निर्माण करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. त्याशिवाय वाहतुकीसाठीही नद्या आणि समुद्राचा वापर करतो. आपल्या देशातील हजारो गावात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. सतत वाढत जाणारी लोकसंख्या आणि वेगाने होणारे औद्योगीकरण यामुळे पाण्याची गरज वाढते आहे पण दुसरीकडे ते जपून वापरण्याची वृत्ती मात्र नाहीशी होत चालली आहे. पाण्याचे प्रदूषणही वाढत चालले आहे. गंगा यमुनेसारख्या पुरातन आणि प्राचीन नद्याही आज प्रदूषित झाल्या आहेत.\nकेंद्रातील आणि राज्यांतील सरकारांनी मिळून कित्येक पाणीपोजना तयार केल्या ख-या परंतु त्यांची अमलबजावणी चांगली झाली नाही. राजस्थान, गुजरात,ओरिसा भागात गरजेपेक्षा पाऊस खूप कमी पडतो किंवा कधी कधी पडतच नाही.त्यामुळे दुष्काळ पडतो. शेती पिकत नाही जनावरे मरतात. माणसे पाण्यासाठी तडफडतात. शेवटी लोकांना पाण्यासाठी गाव सोडून देशोधडीला लागावे लागते.\nम्हणूनच पावसाचे पाणी साठवून ठेवले पाहिजे त्यासाठी प्राचीन काळातील उपाय अवलंबावे लागणार आहेत. लहान बांधबंधारे, तलाव, विहिरी ह्योची निर्मिती केली पाहिजे. म्हणजे मग पाणी जमिनीत मुरेल आणि जमिनीतल्या पाण्पाची पातळी\nमाणसाने खरोखर निसर्गाचा आदर राखून वागले पाहिजे हेच खरे आहे.\nपाणी- आजचे अमूल्य धन Reviewed by Marathijag on नोव्हेंबर १४, २०१९ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nमाझी शाळा यावर निबंध\nबोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र\nअनौपचारिक आरोग्य टीप औपचारिक घरगुती उपाय तंत्रज्ञान निबंध पत्र मराठी महाराष्ट्र माहिती सण GK Privacy Policy\nमाझी शाळा यावर निबंध\nमाझी शाळा यावर निबंध (शाळेतील निबंध) माझी शाळा यावर निबंध - \" नमस्कार माझा ह्या ज्ञानमंदिरा... सत्यम् शिवम् सुंदरा &q...\nशिक्षणावर निबंध 1 (100 शब्द) शिक्षण ही आपल्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल शिकण्याची प्रक्रिया आहे. हे आपल्याला कोणतीही वस्तू ...\nबोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र\nबोनाफाइड प्रमाणपत्र म्हणजे काय बोनाफाइड चा अर्थ असा होतो की प्रमाणित, अस्सल, म्हणजेच जेव्हा कोणाला प्रमाणाची गरज असते तेव्हा तो एखाद्य...\nतुमच्या शाळेची सहलीला जाण्याची परवानगी मागणारे पत्र बाबांना लिहा.\nतुमच्या शाळेची सहलीला जाण्याची परवानगी मागणारे पत्र बाबांना लिहा. Tumchya shalechya sahlila janyachi parvangi magnare patra दिन...\nतुमच्या मित्रास/मैत्रिणीस सुट्टीनिमित्त तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण देणारे पत्र\nतुमच्या मित्रास/मैत्रिणीस सुट्टीनिमित्त तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण देणारे पत्र Tumchya Mitras /Maitranis Suttinimitt Ghri Yenyache Aamtr...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/mp-sambhaji-raje-bhosale-meet-minister-aaditya-thackeray/", "date_download": "2020-09-26T01:33:28Z", "digest": "sha1:4EU32DDZFQWIUHZXTQB246EWFYL2DLLE", "length": 15612, "nlines": 163, "source_domain": "www.saamana.com", "title": "खासदार संभाजीराजे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांची घेतली भेट | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण…\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nजीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला; कॅगचे गंभीर ताशेरे, केंद्राकडून राज्यांची 47 हजार…\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nखासदार संभाजीराजे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांची घेतली भेट\nखासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या भेटीचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे.\nखासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांनी आज युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/t4DVtHTTxB\nछत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट करून या भेटीबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री, आदित्य ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन, सागरी पर्यटन, धार्मिक पर्यटन याविषयी चर्चा केली, अशी माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवरून दिली आहे.\nआज महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री, श्री आदित्य ठाकरे @AUThackeray यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन, सागरी पर्यटन, धार्मिक पर्यटन याविषयी चर्चा केली. pic.twitter.com/JMKJcN4igd\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण पूर्ण\nजीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला; कॅगचे गंभीर ताशेरे, केंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण...\nजीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला; कॅगचे गंभीर ताशेरे, केंद्राकडून राज्यांची 47 हजार...\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nसाथिया तुने क्या किया\nया बातम्या अवश्य वाचा\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-26T01:22:53Z", "digest": "sha1:WO5PI3FHPCTHWULI3Y7IY6EXDOATNGE5", "length": 11508, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "कामचुकार अधिकाऱ्यांची खा. डाॅ.हीना गावित यांनी केली कान उघडणी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nकामचुकार अधिकाऱ्यांची खा. डाॅ.हीना गावित यांनी केली कान उघडणी\n नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे खासदार डाॅ.हीना गावित यांची नवापूर तालुक्यातील कोरोना विषाणू संदर्भात तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याची आढावा बैठक सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात घेतली. यात कोरोना संदर्भात तालुक्यातील परिस्थिती जणू घेत तक्रारीचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. चांगले काम करणारे अधिकाऱ्यांचे कौतुक केले तर कामचुकार अधिकाऱ्यांची कान उघडणी केली.\nबैठकीला पुरवठा अधिकारी महेश शेलार, तहसीलदार सुनिता ज-हाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, नगर पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी राजेंद्र नयन, विसरवाडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, तालुका वैद्यकीय अधिकारी हरिषचंद्र कोकणी, पालिका कार्यालयीन अधीक्षक अनिल सोनार, आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण, भाजपा सरचिटणीस एजाज शेख, राजू गावित, शहराध्यक्ष प्रणव सोनार आदी उपस्थित होते.\nनवापूर तालुक्यातील रेशन वाटप, आरोग्य विषयक समस्या, शहरातील भाजीपाला मार्केट, किराणा दुकानवरील गर्दी, पंतप्रधान जनधन योजना अंतर्गत शासनाने नागरिकांच्या खात्यात ५०० रुपयांचा पहिला हप्ता जमा होता बॅकेत व बॅंक सुविधा केंद्रावर गर्दी करून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडल्याची तक्रार करण्यात आली. नवापूर तालुक्यात अडीच हजार नागरिकांना होम क्वारंटाईन केले आहे. १२ लोकांना क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले आहे. ३४ मजुरांना नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील इमारतीत ठेवण्यात आले आहे. सुदैवाने नवापूर तालुक्यात अद्याप एकही कोरोना बाधित रूग्ण नाही. असे असले तरी नवापूर तालुक्यातील सीमेवर कडक बंदोबस्तची आवश्यकता आहे. परराज्यातून येणारे काही लोक छुप्या मार्गाने प्रवेश करीत आहे. त्यांचा शोध घेऊन होम क्वारंटाईन करणे प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते आहे.\nप्रत्येक राज्यात असलेले इतर राज्यातून आलेले मजूराना परत न पाठवता त्याचठिकाणी प्राथमिक सुविधा पुरविणे आवश्यक आहे. अशा परिस्थिती गुजरात राज्यात वाढता प्रभाव पाहता गुजरात प्रशासन बहुतेक मजुरांना त्यांचा राज्यात पाठवण्याचे निर्देशनात येत आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्याची डोकेदुखी वाढली आहे.\nनवापूर शहरातील भाजीपाला विक्रेते यांना ओळखपत्र देऊन मास्क आवश्यक आहे. त्याची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात यावी. नवापूर शहर महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असल्याने कोणी जिल्ह्यात घुसखोरी करणार नाही याबाबत पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी अश्या सुचना डाॅ.हीना गावित यांनी दिला.\nसोशल मीडीयावर व्हायरल व्हिडीओची दखल\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nविनाकारण फिरणाऱ्यांना लागणार ब्रेक: पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/ankita-lokhande-slams-shibani-dandekar-in-open-letter-says-stop-looking-down-tv-actors-ssj-93-2272797/", "date_download": "2020-09-26T03:22:37Z", "digest": "sha1:XWX4MJVEEIE5ZWJPVUVNYG4BS2KTCYFR", "length": 17364, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ankita lokhande slams shibani dandekar in open letter says stop looking down tv actors ssj 93 | सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण : ‘आम्हाला कमी समजू नकोस’, अंकिताचं शिबानीला प्रत्युत्तर | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण : ‘आम्हाला कमी समजू नकोस’, अंकिताचं शिबानीला प्रत्युत्तर\nसुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण : ‘आम्हाला कमी समजू नकोस’, अंकिताचं शिबानीला प्रत्युत्तर\nशिबानीच्या टीकेवर अंकिताचं ठणकावून उत्तर, म्हणाली...\nअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. रियाच्या अटकेनंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि शिबानी दांडेकर यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. शिबानी सातत्याने रियाची पाठराखण करत असून यात तिने अंकितावर टीकास्त्र डागलं आहे. अंकिता हे सारं प्रसिद्धीसाठी करत असल्याचं शिबानीने म्हटलं होतं. मात्र आता शिबानीला अंकिताने थेट उत्तर दिलं आहे.\nकाही दिवसांपूर्वी अंकिताने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर केली होती. यात सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तिने अनेक गोष्टींवर भाष्य केलं होतं. तसंच तिने रियाला खडे बोलदेखील सुनावले होते. अंकिताची ही पोस्ट वाचल्यानंतर शिबानीने अंकितावर टीकास्त्र डागत तू रियाचा इतका द्वेष का करतेस हे सारं प्रसिद्धीसाठी सुरु आहे, असं शिबानी म्हणाली होती. त्यावर अंकिताने उत्तर दिलं आहे.\n“२ सेकेंड्स ऑफ फेम, या वाक्यामुळे मला खरंच आज विचार करायला भाग पाडलं आहे. छोट्या पडद्यावरील झी सिने स्टार की खोज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी २०१४ साली कलाविश्वात पदार्पण केलं होतं. हा शो जवळपास ६ वर्ष टीआरपीमध्ये प्रथम क्रमांकावर होता. कालाकारांना मिळणार प्रेम हेच खरं प्रसिद्धीचं माध्यम आहे. त्यामुळे आजही पवित्र रिश्ताची अर्चना लोकांसोबत जोडली गेली आहे. अर्चनासोबत आजही माझी नाळ बांधली गेली आहे”, असं अंकिता म्हणाली.\nपुढे ती म्हणते, “सुदैवाने मला मणिकर्णिका आणि बागी ३मध्ये काम करण्याची संधी मिळाली. गेल्या १७ वर्षांपासून मी छोटा पडदा आणि बॉलिवूडमध्ये एक कालाकार म्हणून काम करत आहे. परंतु, आज माझ्या मित्राला सुशांतला न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न करते तर मी हे सारं प्रसिद्धीसाठी करते असं म्हटलं जातंय. पण हे का तर मी बॉलिवूडच्या तुलनेत छोट्या पडद्यावर जास्त काम केलं आहे म्हणून”.छोट्या पडद्यावरील कलाकारांना कधीच कमी लेखू नकोस. तेथील कलाकारांवर कधीच टीका करु नकोस, कारण बॉलिवूड कलाकार जितकी मेहनत घेतात तितकी मेहनत छोट्या पडद्यावरील कलाकारही घेतात असं अंकिताने शिबानीला ठणकावून सांगितलं आहे.\nवाचा : ‘एका स्त्रीचा शाप महागात पडतो’; अशोक पंडितांचा संजय राऊतांना टोला\nदरम्यान, अंकिताने या पोस्टच्या माध्यमातून शिबानीला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. रियाला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. यात अनेक बॉलिवूड कलाकारांनी रियाची पाठराखण केली आहे. तर काहींनी रियाला खडे बोल सुनावले आहेत. यामध्येच रियाची बाजू मांडत असताना शिबानी दांडेकरने अंकिताला टोला लगावला होता. त्याचं उत्तर अंकिताने रोखठोक शब्दांत दिल्याचं दिसून येत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण: रियाने उघड केलेल्या कलाकारांच्या यादीत सारा अली खान, रकुलप्रीतचा समावेश\nसुशांतच्या मृत्यूचा भाजपाकडून राजकीय ट्रम्प कार्डसारखा वापर-काँग्रेस\nरियाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; दीपिकाही मुंबईसाठी रवाना\n‘रॉबिनहुड बिहार के’; माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावरील गाणं झालं व्हायरल\nरिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीचा आज अखेरचा दिवस\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 रिया, शोविकच्या जामीन अर्जावर आज निर्णय\n2 “जे भगतसिंग यांनी १९२० ला केलं तेच कंगना आता करत आहे”; अभिनेत्याने केली पोस्ट\n3 बॉलिवूड कलाकार रियाला पाठिंबा का देतायत; अनुराग कश्यपने सांगितलं कारण…\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/lalbaug-raja-ganeshotsav-mandal-fined-60-lakh-for-digging-road-bmc-rti-mahesh-vengurlekar-jud-87-1970837/", "date_download": "2020-09-26T01:07:54Z", "digest": "sha1:IEB4YIMAJCFD7QLCBGDXWUQRPSCKOUVL", "length": 11697, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lalbaug raja ganeshotsav mandal fined 60 lakh for digging road bmc rti mahesh vengurlekar | लालबागचा राजा मंडळाला 60 लाखांचा दंड | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nलालबागचा राजा मंडळाला सहा वर्षांमध्ये 60 लाखांचा दंड\nलालबागचा राजा मंडळाला सहा वर्षांमध्ये 60 लाखांचा दंड\nमाहिती अधिकार कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी याबाबत माहिती दिली.\nमुंबई महानगरपालिकेने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला गेल्या सहा वर्षांमध्ये 60 लाखांचा दंड ठोठावला आहे. रस्त्यांवर करण्यात येणाऱ्या सजावटीसाठी खणण्यात आलेले खड्डे न भरल्यामुळे पालिकेने मंडळावर दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.\nस्थानिक माहिती अधिकार कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी याबाबत माहिती दिली. मंडळाने 2018 मध्ये एकूण 953 खड्डे केले होते. तसंच दरवर्षी एवढेच खड्डे खणण्यात येतात. परंतु हे खड्डे पुन्हा भरण्यात येत नाहीत. सध्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने हा दंड भरला नाही, असं वेंगुर्लेकर यांनी सांगितलं. डीएनएने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या नियमांनुसार प्रति खड्डा 2000 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, आतापर्यंतची संपूर्ण रक्कम भरली असल्याचे लालबागचा राजा मंडळाकडून सांगण्यात आलं. परंतु मुंबई महानगरपालिकेने मंडळाचा दावा नाकारला आहे. तसंच मंडळानं दंडाची रक्कम न भरल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एफ साऊथच्या एका अधिकाऱ्याने दिली.\n“पालिकेने आमच्यावर पारलकर मार्ग आणि केईएम रूग्णालयाजवळ खणण्यात आलेल्या खड्ड्यांबाबत दंड ठोठावला आहे. परंतु आम्ही याला आव्हान दिलं असून यासंदर्भात एक पत्रही पाठवलं आहे. मंडळावर ठोठावण्यात आलेला दंड भरण्यात आला असून बिल दाखवून आम्ही ते सिद्ध करू शकतो,” अशी माहिती मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी दिली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी कर्ज मंजुरीची उद्दिष्ट्यपूर्ती\n2 पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शाश्वत पुनर्वसन आराखडा – मुख्यमंत्री\n3 एसआरए अधिका-यांविरोधात खासदार गोपाळ शेट्टी यांचं अनोखं आंदोलन \n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sciit-news/window-curtain-to-be-display-365387/", "date_download": "2020-09-26T03:28:10Z", "digest": "sha1:QKU7HA2CYLXK3OG7W2K2BIGGY2T5WGHL", "length": 12442, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "खिडकीचा पडदाच बनणार डिस्प्ले | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखिडकीचा पडदाच बनणार डिस्प्ले\nखिडकीचा पडदाच बनणार डिस्प्ले\nआपली खिडकी हाच जर आपल्या टीव्हीचा पडदा झाला तर.. हा कुठल्याही निबंधाचा विषय नाही तर अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी व हार्वर्डचा भौतिकशास्त्र विभाग\nआपली खिडकी हाच जर आपल्या टीव्हीचा पडदा झाला तर.. हा कुठल्याही निबंधाचा विषय नाही तर अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी व हार्वर्डचा भौतिकशास्त्र विभाग, तसेच अमेरिकी लष्कराचे एडवूड केमिकल बायॉलॉजिकल सेंटर यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यांनी खिडकीला लावता येईल असा प्लास्टिकचा पारदर्शक पडदा तयार केला व त्यावर हलत्या चालत्या प्रतिमा दिसू शकतात. हा एक प्रकारे टीव्ही किंवा चित्रपटाचा पडदा असून त्यात अगदी नॅनो पार्टिकल वापरले आहेत. हे अतिसूक्ष्म कण निळ्या रंगाच्या प्रकाशाचे रूपांतर द्रव बहुलकात (पॉलिमर) करतात व तो पडदा कुठल्याही खिडकीला वापरता येतो. यात नॅनो पार्टिकल आपल्याला दिसत नाहीत व त्यामुळे पारदर्शकताच राहते, पण निळ्या प्रकाशात प्रतिमा मात्र दिसतात. आम्ही या प्रयोगात नॅनो पार्टिकल चक्क त्या पॉलिमरवर ते घट्ट होण्याअगोदर ओतले असे एमआयटीचे विद्यार्थी शिया वेई सू व हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे. काही हजारांश ग्रॅम इतके नॅनो पार्टिकल हे या पडद्यातील प्रत्येक चौरस सेंटीमीटर भागात ओतले जातात. हे तंत्रज्ञान तुलनेने स्वस्तही आहे. असे असले तरी कुठलेही कण हे एकच रंग परावर्तित करीत असल्याने यातील प्रतिमा सध्या तरी एकाच रंगात दिसतात. यात बहुरंगी प्रतिमा तयार करणे शक्य आहे, पण त्यासाठी आणखी नॅनो पार्टिकल या पडद्यात ओतावे लागतील त्यामुळे पडदा अधिक अपारदर्शक होत जाईल हा धोका त्यात आहे. हा पडदा तुम्ही प्लास्टिकच्या कागदासारखा कुठेही चिकटवून त्यावर कालांतराने चित्रपट किंवा व्हिडीओ बघू शकाल असा विश्वास हू यांनी व्यक्त केला आहे. पारदर्शक पडद्याचे अनेक फायदे असतात एकतर त्याच्या मदतीने काचेवरच तुम्हाला तुम्ही कुठल्या परिसरात आहात याचा नकाशा दिसू शकतो, विमानाच्या कॉकपीटच्या खिडक्यांच्या काचांवर तुम्ही माहिती व इतर काहीही प्रक्षेपित करून बघू शकता. जाहिरातींसाठी आयग्लासेस बनवू शकतात, असेही वैज्ञानिकांचे मत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटायको ब्राहे आणि केप्लर\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 साखरेवर चालणारी बॅटरी\n2 वनस्पतींनाही स्मृती असते\n3 मोटार चालवताना डुलकी लागल्यास जागे करणारे व्हिगो\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/fifa-world-cup-2018-news/fifa-world-cup-2018-final-thai-cave-13-people-fifa-president-gianni-infantino-1711641/", "date_download": "2020-09-26T02:26:38Z", "digest": "sha1:PRRVDSO7X4APBAVKKAI2JBVPXJHODTSV", "length": 13025, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "FIFA World Cup 2018 Final Thai Cave 13 people Fifa President Gianni Infantino | FIFA World Cup 2018 : फिफाच्या अध्यक्षांनी फायनलसाठी दिलेले आमंत्रण ‘या’ १३ जणांनी नाकारले… | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nFIFA World Cup 2018 : फिफाच्या अध्यक्षांनी फायनलसाठी दिलेले आमंत्रण ‘या’ १३ जणांनी नाकारले…\nFIFA World Cup 2018 : फिफाच्या अध्यक्षांनी फायनलसाठी दिलेले आमंत्रण ‘या’ १३ जणांनी नाकारले…\nFIFA World Cup 2018 : फिफाच्या अध्यक्षांकडून विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी अनेकांना आमंत्रण देण्यात आले आहे.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nFIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. आज स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना होणार असून रविवारी स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या अंतिम सामन्यासाठी फ्रान्सच्या संघाने मंगळवारी बेल्जीयमला पराभूत करून आपले स्थान निश्चित केले आहे. तर इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. यातील विजेता संघ फ्रान्सशी भिडणार आहे.\nफिफाच्या अध्यक्षांकडून विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी अनेकांना आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र त्यापैकी गेले काही दिवस चर्चत असलेले १३ जण येऊ शकणार नाहीत. थायलंडमधे एका दुर्गम व सुमारे दहा किमी लांबी असलेल्या गुहेत बारा मुले व त्यांचा फुटबॉलचा प्रशिक्षक अपघाताने २३ जूनपासून अडकले होते. हे १३ जण बेपत्ता झाले होते, मात्र बाहेर त्यांनी केलेल्या पार्क केलेल्या सायकलवरून ते लोक आत अडकल्याचे समजले होते. त्यानंतर हे १३ लोक जिवंत आहेत आणि अचानक आलेल्या नदीच्या पुरामुळे ते गुहेत अडकले आहेत, असे निष्पन्न झाले होते. या १३ जणांची काल सुटका करण्यात आली.\nया १३ जणांना फिफाच्या अध्यक्षांनी अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र अनेक दिवस गुहेत राहिल्याने त्यांना एका प्रकारचा संसर्ग झाला आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.दरम्यान, हे १३ लोक सध्या इतका प्रवास करण्यास सक्षम नाहीत. त्यांना तंदुरुस्त होण्यास आणखी काळ लागेल, अशी माहिती थायलंडच्या फुटबॉल संघटनेकडून देण्यात आले आहे.\nहे १३ लोक ज्यावेळी त्या गुहेमध्ये अडकले होते, तेव्हा या लोकांच्या सुटकेसाठी सर्वत्र प्रार्थना करण्यात येत होती. त्याच वेळी फिफाचे अध्यक्ष यांनी या १३ जणांना विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. सर्वांना त्यांच्या सुटकेची चिंता असताना फिफाचे अध्यक्ष त्यांना सामना पाहण्यासाठी बोलवतात, या गोष्टीवरून त्याच्यावर टीकाही झाली होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n रक्ताळलेल्या पायाने खेळत राहिला सामना\n2 FIFA World Cup 2018 : …तर फायनलमध्ये फ्रान्सविरूद्ध इंग्लडचं पारडं जड\n3 FIFA World Cup 2018 : ‘फ्रान्सचा कालचा विजय थायलंडच्या फुटबॉल संघाला समर्पित’\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/delhi-rape-case-effects-on-ncps-womens-meet-31749/", "date_download": "2020-09-26T03:26:28Z", "digest": "sha1:QX4OWQ6F6SYOVPMFB67BQHHSBSP2TDI4", "length": 15988, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दिल्लीतील घटनेचे राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात पडसाद | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nदिल्लीतील घटनेचे राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात पडसाद\nदिल्लीतील घटनेचे राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात पडसाद\nबलात्काऱ्यांना नपुंसक बनवा - अजित पवार दिल्ली येथील बलात्काराच्या प्रकरणात देशभर आक्रोश सुरू असतानाच येथे आयोजित महिलांच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा बलात्काऱ्यांना\nबलात्काऱ्यांना नपुंसक बनवा – अजित पवार\nदिल्ली येथील बलात्काराच्या प्रकरणात देशभर आक्रोश सुरू असतानाच येथे आयोजित महिलांच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा बलात्काऱ्यांना तर नपुंसक बनवले गेले पाहिजे, असे परखड मत मांडले. महिला मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांनी बलात्काराच्या प्रकरणात फाशीचीच शिक्षा हवी, असा आग्रह धरला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, असे मत व्यक्त केले. नेहरू मैदानावर आयोजित महिला मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्यापासून ते गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यापर्यंत सर्वानीच बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा हवी, असे मत व्यक्त केले, पण अजित पवार यांनी सर्वाना कडी करत बलात्काऱ्यांना नपुंसक बनवले पाहिजे, असे वक्तव्य केले.\nबलात्काऱ्यांना फाशीची शिक्षेसह कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारला कायदा करावा लागणार आहे, पण आपणही आता काही उपाययोजना केल्या पाहिजेत, छेड काढणाऱ्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच धडा शिकवावा, छेडछाडमुक्त गाव, शहर आणि राज्य बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे अजित पवार म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी अत्यंत आक्रमकपणे या विषयावर मत मांडताना सरकारचेही वाभाडे काढले. महिलांना खरोखरच सरकारने न्याय दिला आहे का, असा सवाल त्यांनी केला. पोलीस ठाणे हे महिलांना माहेरघर वाटले पाहिजे, पण, तशी परिस्थिती नाही. महिलांवर अन्याय झाला, तर स्वपक्षाचेही सरकार का असेना रस्त्यावर उतरू, बलात्काऱ्यांना फाशी दिली गेली, तर आनंदच होईल, असे त्या म्हणाल्या.\nलोकप्रतिनिधींना पोलीस संरक्षण कशाला हवे, असा सवाल करीत त्यांच्या संरक्षणासाठी दिले जाणारे पोलीस संरक्षण महिलांसाठी वापरावे, असा सल्ला त्यांनी आर. आर. पाटील यांना दिला. त्यानंतर आर. आर. पाटील यांनीही लोकप्रतिनिधींच्या पोलीस संरक्षणाचा आढावा घेतला जाईल, असे सांगताना महिलांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल, पोलीस यंत्रणेत फेरफार आण् िन्यायव्यवस्थेत गतिमानता आणण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.\nछगन भुजबळ यांनीही आपल्या खास शैलीत महिला पोलिसांच्या हाती दंडुके देण्याची सूचना केली. बलात्काऱ्यांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या हवाली करून तो घरी चालत जाऊ नये, अशी त्याची अवस्था केली पाहिजे, लहानपणी झालेल्या बलात्कारावर म्हातारपणी निकाल हे थांबले पाहिजे, आपल्याकडे लोकशाही देखील अजीर्ण झाली आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. प्रफूल्ल पटेल यांनीही बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा हवी, असे मत मांडले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष विद्या चव्हाण यांची सर्वप्रथम बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा हवी, असे मत मांडले, माजी आमदार सुलभा खोडके यांनीही स्त्री संरक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी, अशी मागणी केली. सर्व वक्त्यांनी या मुद्यावर आपले विचार मांडले. सर्वाचा सूर बलात्काऱ्यांना फाशी हवी हाच होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nअजित पवारांचा गयारामांना टोला : “पदं घेतली अन् तिकडं तडफडली…”\nभाजपाचा पवारांना टोला… “लोका सांगे ब्रह्मज्ञान”; सोशल मीडियावर कार्टून व्हायरल\nमहाभरतीमध्ये भाजपात गेलेले नेते पुन्हा राष्ट्रवादीच्या मार्गावर; प्रवक्त्यांनी दिली माहिती\nआणखी एक मराठी अभिनेत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश\nशरद पवारांची मुलाखत म्हणजे ‘नुरा कुस्ती’, मॅच फिक्सिंग; फडणवीसांचा टोला\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 ई-ऑफिस कार्यप्रणाली आल्याने प्रशासनात पारदर्शकता येईल – पृथ्वीराज चव्हाण\n2 ‘आनंदवन’तर्फे नाशकात स्वरानंदवन मैफल\n3 आदेश बांदेकरच्या उपस्थितीत प्रभाविष्काराचा समारोप\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/jagtaps-hattrick-in-kukadi-sugar-factory-1094953/", "date_download": "2020-09-26T01:41:18Z", "digest": "sha1:BBZUMHLKBODY7AIYPDOSFHJMMR7WYKEF", "length": 12533, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कुकडी कारखान्यात जगताप यांची हॅटट्रिक | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nकुकडी कारखान्यात जगताप यांची हॅटट्रिक\nकुकडी कारखान्यात जगताप यांची हॅटट्रिक\nश्रीगोंदे तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही सत्ताधारी जगताप गटाने विजयाची हॅटट्रिक नोंदवली.\nश्रीगोंदे तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही सत्ताधारी जगताप गटाने विजयाची हॅटट्रिक नोंदवली. कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध करताना आमदार राहुल जगताप यांच्या सहकार मंडळाने सर्व १९ जागा जिंकल्या. बबनराव पाचपुते व घनश्याम शेलार यांच्या कुकडी बचाव पॅनेलला एकही जागा जिकंता आली नाही. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल वीर यांनाही पराभव पत्करावा लागला.\nकारखान्याचे संस्थापक कुंडलिक जगताप व त्यांचे चिरंजीव तथा कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप हे दोघेही विजयी झाले. सहकार मंडळाचे सर्व उमेदवार तीन ते साडेतीन हजारांच्या मतांच्या फरकाने विजयी झाले.\nबुधवारी सकाळी श्रीगोंदे येथील तुळशीदास मंगल कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली. जगताप यांच्यासह त्यांचे सर्व उमेदवार फेरीपासून आघाडीवर होते. प्रत्येक फेरीमध्ये ही आघाडी वाढतच होती. निवडणुकीचा कल लक्षात येताच जगताप समर्थकांनी जल्लोष सुरू केला. ढोलताशाचा गजर व गुलालाची उधळण करीत फटाके फोडून आनंद साजरा केला.\nनिकालानंतर आमदार राहुल जगताप म्हणाले, सहकाराच्या खासगीकरणाचा डाव मतदारांनी ओळखला होता. विरोधकांनी उमेदवार मिळत नव्हते, दावा मात्र विजयाचा करीत होते. आता मतदारांनीच त्यांना यापुढे सहकारच्या निवडणुका लढवू नका असा संदेश दिला आहे. घनश्याम शेलार यांनी हा धनशक्तीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.\nसहकार मंडळाचे विजयी उमेदवार- कुंडलिकराव जगताप (बिनविरोध) पिंपळगाव पिसा गट-\nआमदार राहुल जगताप, अंकुश रोडे, धनाजी शिंदे. हिंगणी गट- बाजीराव मुरकुटे, निवृत्ती वाखारे, सुभाष वाघमारे. राजापूर गट- विवेक पवार, बाळासाहेब भोंडवे, मनोहर वीर. कोळगाव गट- प्रल्हाद इथापे, विनायक लगड. भानगाव गट- सुभाष डांगे, मोहन कुंदाडे. अनुसूचित जाती/जमाती- उत्तम शिंदे. महिला- ललिता उगले, लताबाई बारगुजे. इतर मागासवर्ग- विश्वास थोरात. भटक्या विमुक्त जाती व जमाती- सुखदेव तिखोले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकर्जतला शांततेत ८५ टक्के मतदान\nपाणीप्रश्नावर कर्जतच्या महिलांनी पालकमंत्र्यांना रोखले\nकर्जत येथे स्वच्छता मोहिम\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 अपघाताचा बनाव करून तीन लाख लांबवले\n2 शेक्सपिअरच्या ३७ नाटकांमध्ये ओळी किती\n3 राहुल गांधी बालीश -उमा भारती\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/cm-uddhav-thackeray-visit-ayodhya-after-completion-100-days-maharashtra-government-in-power-said-sanjay-raut-shiv-sena-marathi-news-google-batmya/277795", "date_download": "2020-09-26T02:43:24Z", "digest": "sha1:V34JGIMACN7MVUATP364GUOMRXKOE6V6", "length": 10168, "nlines": 83, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " सरकारला १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री 'या' ठिकाणी भेट देणार cm uddhav thackeray visit ayodhya after completion 100 days maharashtra government in power said sanjay raut shiv sena mar", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nसरकारला १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री 'या' ठिकाणी भेट देणार\nसरकारला १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री 'या' ठिकाणी भेट देणार\nMaharashtra government 100 days: महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या ठाकरे सरकारला १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री एक महतवपूर्ण दौरा करणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.\nसरकारला १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री 'या' ठिकाणी भेट देणार |  फोटो सौजन्य: Twitter\nशिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं ट्वीट\nसरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच\nमुंबई: अयोध्या श्री राम मंदिर निर्माण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचं उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं होतं. तसेच आपण लवकरच पुन्हा एकदा अयोध्येला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्यानंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि मुख्यमंत्रिपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांनी हाती घेतली. आता महाराष्ट्र सरकारला शंभर दिवस होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येचा दौरा करतील अशी माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. अयोध्येला जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे श्रीरामाचे दर्शन घेतली आणि त्यानंतर पुढील कार्याची दिशा ठरवतील असंही संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.\nआपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, \"सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच प्रभू क्षीरामाची कृपा. सरकारला शंबर दिवस पुणर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील\".\nसरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच\nसरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील\nउद्धव ठाकरे यांनी २०१८ मध्ये अयोध्येचा दौरा केला होता. २४ नोव्हेंबर २०१८ रोजी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अयोध्या दौऱ्यात त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे आणि शेकडो शिवसैनिक सुद्धा उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा खूपच चर्चेत राहिला होता.\nशिवसेनेने राज्यात सत्ता स्थापन करताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली. यामुळे शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला ठेवला अशी चर्चा सुरु झाली. त्यानंतर २३ जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदूत्वाचा मुद्दा हाती घेणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्याच दरम्यान आता संजय राऊत यांनी ट्वीट करुन सांगितले की, उद्धव ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. यामुळे शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा अद्याप सोडला नसल्याचं सांगणारा हा एक मेसेज असल्याचं बोललं जात आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\n'पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी', पाहा कोणी केली टीका\nस्कॉर्पियन श्रेणीतील ‘वेला’ पाणबुडीचे जलावरण, चाचणीनंतर नौदलात समावेश\nKirit Somaiya first reaction: पाहा उमेदवारी गमावल्यांनंतर किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले\nआजचे राशी भविष्य २६ सप्टेंबर\nट्रकमध्ये चढत असताना सहायक पडला खाली आणि चाक.....\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ सप्टेंबर २०२०:\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमबद्दल CM ठाकरेंचे मत\nमारुतीची नवीन कार मिळणार मासिक शुल्कावर, पाहा काय आहे प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/38107?page=2", "date_download": "2020-09-26T02:49:36Z", "digest": "sha1:CIQBCCPWJFZJTO544ZJFUZM4WM4RDZUJ", "length": 12709, "nlines": 219, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तों.पा.सू - सुरळीच्या वड्या (खांडवी) - नीलू | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तों.पा.सू - सुरळीच्या वड्या (खांडवी) - नीलू\nतों.पा.सू - सुरळीच्या वड्या (खांडवी) - नीलू\nसाहित्य : क्ले, कागद, मणी\nकृती: एकदम सोप्पी.. क्ले मळून घेतला त्यानंतर ताटलीत लाटण्याने लाटून त्याच्या वड्या काढल्या. वरुन काळे मणी टाकले आणि सफेद - हिरवा कागद कापून शिवरला.\nआधी आलेल्या दोन प्रवेशिकांच्या मानाने मी फारच कमी कष्ट घेतले आहेत\nमंजूबेन फेव्हिकॉलची आयडिया चांगली आहे पण मला तेव्हा सुचली नाही. तेल कुठले वापरु असे विचार करत होते मग म्हटलं जाऊ देत डायेट वड्याच करु\nलाजवाब...मी विचरच करत होते की\nलाजवाब...मी विचरच करत होते की कसल्या परफेक्ट वड्या जमल्यात, तेवढ्यात साहीत्य वाचून उडालेच\nवरच्या सगळ्याच प्रतिक्रियांना +१०००० ... \n अगदी खर्‍या वाटतात .\nनीलू एकदम भन्नाट दिसतायत फक्त\nनीलू एकदम भन्नाट दिसतायत फक्त कमी झाल्या आहेत.\nनिलू, जबरीच बनवल्यात एकदम\nनिलू, जबरीच बनवल्यात एकदम\nमाझ्या खर्‍याखुर्‍या वड्या पण\nमाझ्या खर्‍याखुर्‍या वड्या पण अशा जमत नाहीत खूप खूप खास जमल्या आहेत.\nकिती ख-याखु-या झाल्यात.. एकदम\nकिती ख-याखु-या झाल्यात.. एकदम खाव्याशा वाटतायतं...\nवरच्या सगळ्या प्रतिकियांना अनुमोदन\nयम यम यमी.... तोंपासु\nयम यम यमी.... तोंपासु\nएकदम ज ह ब ह री नीलू, मस्तच\nएकदम ज ह ब ह री\nआता खर्रीखुर्री करून दे\nकिती देखण्या, सुबक आहेत\nकिती देखण्या, सुबक आहेत\nजिप्स्या घरी कधी येतोयस मग खायला\nवॉव.. छान फ्रेश, मऊ मऊ\nवॉव.. छान फ्रेश, मऊ मऊ ,स्वादिष्ट दिस्तायेत..\nनिलु खर्‍या पा.कृती कुणी\nनिलु खर्‍या पा.कृती कुणी खायला गेलं नाहि जास्त तितक्या ह्या वड्या खायला सगळे आले..\nनीलू स्वतःच आर्टिस्ट असल्याने\nनीलू स्वतःच आर्टिस्ट असल्याने तिला यातले सौंदर्य खर्‍यात बदलता आले. नीलू पाहुण्यांसमोर ठेऊ नको गं बाई.:फिदी:\nमाझा स्क्रीन एकदम स्वछ झाला\nमाझा स्क्रीन एकदम स्वछ झाला कसा अहो फोटो चाटून..आणी कशाने\nसही, एकदम खर्‍यासारख्या दिसतायत.\n तोण्डातसुन धब धबो सुरुझालो.\nअगो नीलु , दिवाळी जवळ येताहा . ह्या बघुन खवैय्ये येडॅपिसे होवन ऑर्डर घेवन येतील .\nमतदानात तुम्ही लीडवर आहात.\nमीही तुम्हालाच मत दिले आहे.\nसिंपल आयडिया, अन सुपर्ब एक्झिक्यूशन अशी तुमची कलाकॄती आहे, अन यामुळेच तुम्हाला तोंपासूचे पारितोषिक मिळो ही सदिच्छा\nवॉव नीलू, अगदी हुबेहुब आणि\nवॉव नीलू, अगदी हुबेहुब आणि सुंदर \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/tag/khadse/", "date_download": "2020-09-26T02:59:48Z", "digest": "sha1:NOBJPFQOUNUZHWFU7Y7JU3Z7Z6NYGVPT", "length": 12273, "nlines": 138, "source_domain": "www.saamana.com", "title": "khadse | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nखडसेंसारख्या निष्ठावंतांवर अशी वेळ येणं हे दुर्दैवी\nदानवे-महाजन यांच्यासमोर खडसे समर्थक सुनील नेवे यांना मारहाण\nअविश्वास ठरावाच्या भीतीने महानंदच्या अध्यक्षांचा राजीनामा\nफडणवीस, महाजन भेटले तरीही खडसे घुश्शातच\nफडणवीस, महाजनांनीच तिकीट कापल्याचा खडसेंचा आरोप, भाजपच्या गोटात पुन्हा हादरे\nनाराज खडसेंचे वेट ऍण्ड वॉच, नेतृत्वाच्या कारवाईची वाट पाहणार\nमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खडसेंची फडणवीसांवर टीका\nस्वपक्षीयांनी केली पाडापाडी, एकनाथ खडसेंनी दिले चंद्रकांत पाटील यांना पुरावे\nज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या घरी खलबते, भाजपमधील नाराज आणि ओबीसी नेत्यांची...\nपक्ष नव्हे तर नेते चुकत असतात एकनाथ खडसेंचा भाजप नेत्यांवर थेट...\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम...\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaalavaani.blogspot.com/2010/08/blog-post_14.html", "date_download": "2020-09-26T02:12:22Z", "digest": "sha1:335QDNCD4ERQCRUFJI5SM6JWFZDP42TN", "length": 5529, "nlines": 57, "source_domain": "jaalavaani.blogspot.com", "title": "जालवाणी: गुलाबी संध्याकाळ!", "raw_content": "\nलेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला प्रत्यक्ष लेखकाच्या आवाजात ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०१० रोजी प्रकाशित करत आहोत. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे काहीही ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...\nआपल्या आयुष्यात एकतरी गुलाबी संध्याकाळ यावी असं प्रत्येक प्रेमवेड्या व्यक्तीला वाटत असतं...त्याबद्दल कवीला काय म्हणायचंय ते ऐकूया.\n(आपले बझवरचे मित्र आनंद काळे ह्यांनी कवी आणि अभिवाचक ह्यांच्या संमतीने हे ध्वनीमुद्रित ह्या अंकासाठी पाठवलंय ह्याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nऐकताना मऽस्त वाटलं. आवाज छान आहे, हे मी वेगळं सांगायला नकोच व्यावसायिक कलाकारासारखं कौशल्य जाणवलं. रेकॉर्डींगला कोणतं सॉफ्टवेअर आणि एडीटींग करताना काय केलंत एकोसाठी.\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी १:१० म.उ.\nअतिशय सुंदर म्हंटली आहे कविता. कालच ऐकली.\n१६ ऑगस्ट, २०१० रोजी ११:११ म.पू.\nमराठी चित्रपट मालिका आणि चित्रपटात काम करणारे अभिनेते अविष्कार यांच्या आवाजाची आठवण झाली.\n१६ ऑगस्ट, २०१० रोजी ७:२३ म.उ.\nSUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...\n१७ ऑगस्ट, २०१० रोजी ५:०६ म.उ.\nभारीच रे... :) आवाज मस्तच... :)\n२७ ऑगस्ट, २०१० रोजी ७:२१ म.पू.\n२४ मे, २०११ रोजी ६:१३ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसूर्य संपावर गेला तर\nआणि मी सिगारेट सोडली.\nमोनालिसाला कुठे होत्या भुवया\nअब्राहम लिंकन ह्यांचे हेड मास्तरांना पत्र\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/controversial-life-of-rhea-chakraborty-latest-live-news-and-updates-127600796.html", "date_download": "2020-09-26T02:08:50Z", "digest": "sha1:QIOF4VCEFGA3VZEFAJIY7QLWJM72Y4M7", "length": 11766, "nlines": 75, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Controversial Life Of Rhea Chakraborty Latest Live News And Updates | इंजिनीअरिंग सोडून रिया चित्रपटांत आली, 8 वर्षात सलग 7 फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर मिळवली कोट्यावधींची संपत्ती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअवघड कोड्याप्रमाणे रिया चक्रवर्ती:इंजिनीअरिंग सोडून रिया चित्रपटांत आली, 8 वर्षात सलग 7 फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर मिळवली कोट्यावधींची संपत्ती\n1 जुलै 1992 ला जन्मलेल्या रियाचे वडील बंगाली तर आई कोंकणी आहे\nरिया गेल्या एक वर्षांपासून सुशांत सिंह राजपूतची लिव्ह इन पार्टनर होती\n14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूची बातमी उघडकीस आल्यापासून सर्वत्र फक्त एकच नाव ऐकले गेले आहे आणि ते म्हणजे रिया चक्रवर्ती. रियाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल यापूर्वी जितकी चर्चा झाली नव्हती तेवढी चर्चा आता होत आहे.\nगेल्या एका वर्षापासून रिया सुशांतची लिव्ह-इन पार्टनर होती. तिच्यावर सुशांतच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. सीबीआय या आरोपांची चौकशी करत आहे पण सुशांतच्या संशयास्पद मृत्यूमधील रिया चक्रवर्ती हे सर्वात मोठे लक्ष्य आहे.\nअशावेळी जाणून घेऊया रियाच्या आयुष्य आणि कामासंबंधीत खास गोष्टी -\nहरियाणाच्या अंबाला येथे रियाचे बालपण गेलेय\nरियाचा जन्म बेंगलुरूमध्ये झाला होता. १ जुलै, 1992 रोजी इंद्रजित चक्रवर्ती आणि संध्या चक्रवर्ती यांच्या घरी जन्मलेल्या रियाने अंबाला कँटच्या आर्मी पब्लिक स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. रियाचे वडील बंगाली आणि आई कोंकणी आहेत. रियाचे वडील सैन्यात डॉक्टर आहेत तर आई गृहिणी आहे.\nरियाला एक भाऊ आहे त्याचे नाव शोविक आहे. या चौघांवर सुशांतच्या कुटूंबाने आत्महत्या, गुन्हेगारी कट, चोरी, फसवणूक आणि धमकी दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.\nअभियांत्रिकी सोडून बनली अभिनेत्री\nरियाने एमटीव्हीच्या रिअॅलिटी शो 'टीन दिवा'च्या माध्यमातून ग्लॅमरच्या जगतात पाऊल ठेवले. त्यामध्ये ती फर्स्ट रनर अप ठरली. त्यानंतर तिने दिल्लीतील एमटीव्हीची व्हिडिओ जॉकी होण्यासाठी ऑडिशन दिले आणि तिची निवड झाली.\nरियाने व्हीजे असताना 'एमटीव्ही वास्सअप', 'कॉलेज बीट' आणि 'एमटीव्ही गॉन इन 60 सेकंड्स' होस्ट केले. दरम्यान, अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न जागृत झाले. त्या काळात ती अभियांत्रिकी शिकत होती पण तिला अभियंता होण्यात काही रस नव्हता म्हणून तिने अभियांत्रिकी सोडली आणि अभिनयाकडे वळली.\nचित्रपट कारकीर्द फ्लॉप ठरली\nयशराज फिल्म्सच्या 2010 मध्ये आलेल्या 'बॅंड बाजा बारात'साठी रियाने ऑडिशन दिले होते पण मुख्य भूमिकेसाठी तिला नाकारले गेले होते. या चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. रियाला तिचा पहिला ब्रेक 2012 मध्ये आलेली तेलगू फिल्म 'तुनेगा तुनेगा' च्या माध्यमातून मिळाला होता. या चित्रपटात तिने निधी नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला पण त्यानंतर 2013 मध्ये लवकरच रियाला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळवला. तिला फिल्म 'मेरे डॅडची मारुती' मध्ये जसलीनची भूमिका साकारण्याची संधी मिळाली पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला.\nतीन वर्षे बसून होती रिया\n2014 मध्ये रियाचा आलेला तिसरा चित्रपट सोनाली केबल हा देखील सुपरफ्लॉप ठरला. याचा परिणाम असा झाला की, तिला तीन वर्षे घरात बसून राहावे लागले.\n2017 मध्ये तिला 'हाफ गर्लफ्रेंड' आणि 'दोबारा: सी योर ईविल' सारख्या चित्रपटंमध्ये कॅमियो मिळाला मात्र हे चित्रपटही फ्लॉक ठरले. यानंतर 2017 मध्ये आलेल्या बँक चोर आणि 2018 मध्ये आलेल्या जलेबी मध्ये रियाला मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मात्र यामध्ये ती अयशस्वी ठरली. यानंतर रिया कोणत्याच चित्रपटात दिसलेली नाही.\nरियाने एकूण आयुष्यात 8 चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचे फिल्मी करिअर यशस्वी होऊ शकले नाही. रिया आणि सुशांतसोबत रुमी जाफरी एक चित्रपट बनवण्याचे प्लानिंग करत होते. याची शूटिंग याच वर्षी मे महिन्यात सुरू होणार होती. मात्र लॉकडाऊनमुळे असे होऊ शकले नाही. आता सुशांत गेल्यानंतर हा चित्रपट कधीच बनू शकणार नाही.\n10-15 लाख आहे वार्षिक उत्पन्न\n28 वर्षांची रिया गेल्या दोन वर्षांच्या आयटीआरवर नजर टाकली तर तिचे वार्षिक उत्पन्न 10-15 लाख रुपयांच्या जवळपासर आहे. मात्र तिच्या जवळ मुंबईमध्ये कोट्यावधींची संपत्ती आहे. ही प्रॉपर्टी रियाने कशी बनवली या प्रकरणी ईडी तपास करत आहे. रियावर सुशांतच्या 15 कोटींची हेराफेरी केल्याचा आरोप आहे.\nब्रांड एंडोर्समेंटसाठी मिळतात केवळ 3 लाख ते 5 लाख रुपये\nआम्ही बॉलिवूड ट्रेड एनालिस्टकडून रियाच्या प्रत्येक चित्रपटाची फीसची माहिती विचरण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी सांगितले की, 25-30 लाखांपेक्षा जास्त पैसे तिला दिले गेलेले नसतील. तर अॅड गुरूओनुसार ब्रांड एंडोर्समेंटसाठी रियाला 3 लाख ते 5 लाख रुपये मिळतात.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://cinenama.in/2020/08/21/tapasee-rashmi-rocket-soon-on-shooting-floor/", "date_download": "2020-09-26T01:47:17Z", "digest": "sha1:SBRNZOJ25QCTL3SDJ3AW7JNKNJEKDNLO", "length": 9899, "nlines": 114, "source_domain": "cinenama.in", "title": "तापसीचा 'रश्मी रॉकेट' लवकरच फ्लोअरवर - Cinenama", "raw_content": "\nHome बातम्या तापसीचा ‘रश्मी रॉकेट’ लवकरच फ्लोअरवर\nतापसीचा ‘रश्मी रॉकेट’ लवकरच फ्लोअरवर\nकच्छच्या रणापासून सुरुवात करून, रश्मि रॉकेट एका गावकरी तरुणीची कथा आहे, जिच्याकडे, वेगवान धावण्याची शक्ती आहे. ती एक अविश्वसनीय वेगवान धावपटू आहे आणि त्यामुळे गाववाले तिला ‘रॉकेट’ म्हणूनच ओळखतात. जेव्हा आपल्या प्रतिभेला व्यावसायिक रुपात साकारायची तिला संधी मिळते तेव्हा या संधीला ती वाया जाऊ देत नाही. फिनिश लाइनपर्यंत पोहोचण्याची ही शर्यत अनेक अडथळ्यांची आहे आणि एका एथलेटि प्रमाणेच ही शर्यत देखील तिच्यासाठी सन्मान, आदर आणि इतकेच नव्हे तर स्वतःला सिद्ध करण्याच्या लढाईत परावर्तित होऊन जाते. ​​\nअभिनेत्री तापसी पन्नू अभिनित स्पोर्ट्स ड्रामा ‘रश्मि रॉकेट’च्या चित्रीकरणाला येत्या नोव्हेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. नंदा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लन यांच्याद्वारे लिहिण्यात आलेली असून आकर्ष खुराना यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री तापसीसोबत या चित्रपटात ‘एक्सट्रैक्शन’ फेम प्रियांशु पेंथुली प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.\nचित्रपटाच्या चित्रिकरणाविषयी आणि आपल्या भूमिकेविषयी बोलताना तापसी म्हणाली की “मी या प्रॉजेक्टमध्ये अगदी सुरुवातीपासून सहभागी आहे आणि त्यासाठी हे सर्व माझ्यासाठी खास आहे. कोरोनाच्या अगदी आधी, मी एका स्प्रिंटरच्या व्यक्तिरेखेत उतरण्यासाठी 3 महिन्यांपासून ट्रेनिंग घेत होते. हा एक मोठा ब्रेक झाला आहे मात्र या विषयामुळे पुन्हा एकदा याची सुरुवात करायला उत्सुक आहे ज्याची सुरुवात ट्रेनिंगने होईल.”\nनानीच्या ‘व्ही’ चा प्रीमिअर होणार प्राईमवर…\nदिग्दर्शक आकर्ष खुराना याविषयी बोलताना म्हणाले की, “आम्ही चित्रीकरणाला सुरुवात केली होती तेव्हा कोरोनाला सुरुवात झाली होती. मला आनंद आहे की आम्ही लवकरच चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात करतो आहोत. माझी टीम आणि मी या प्रवासाला सुरुवात करण्याची आतुरतेने वाट पाहतो आहोत. ही एक शानदार कहाणी आहे जिला सांगण्यासाठी मी फार उत्सुक आहे.”\nदेव डी, लुटेरा, क्वीन, केदारनाथ सारख्या चित्रपटांचे संगीतकार अमित त्रिवेदी आता ‘रश्मि रॉकेट’मध्ये आपल्या संगीताने रंग भरणार आहेत. नेहा आनंद आणि प्रांजल खंडाड़िया यांच्यासोबत रॉनी स्क्रूवाला यांची निर्मिती असलेला ‘रश्मि रॉकेट’ 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे.\nPrevious articleनानीच्या ‘व्ही’ चा प्रीमिअर होणार प्राईमवर…\nNext articleग्रामीण प्रश्न’वर्तुळ’ आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात…\nप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन\n‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका\n‘शहीद शिरीषकुमार’ लवकरच रुपेरी पडद्यावर\nप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात...\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\nदिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन\n‘सुरमा भोपाळी’ काळाच्या पडद्याआड\nप्रसिद्ध लेखक – दिग्दर्शक साची यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/sms/", "date_download": "2020-09-26T02:20:29Z", "digest": "sha1:3WAESKLI4ZNQZY2BBKUQ5MNML35D6JMY", "length": 1466, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "SMS Archives | InMarathi", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nक्रांतिकारी शोध लावूनही प्रसिद्धी पासून दूर राहिलेला – फादर ऑफ SMS : मॅटी मॅक्नन\nत्यांना स्वतःला ‘फादर ऑफ एसएमएस’ म्हणवून घेणही पटायचं नाही. जर कोणी त्यांना ‘फादर ऑफ एसएमएस’ म्हटले तर ते अक्षरशः चिडायचे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://aisiakshare.com/node/7809", "date_download": "2020-09-26T03:42:06Z", "digest": "sha1:Q64ORFPLGBKQ2F5NK6EIMLITEFHTSZXW", "length": 89261, "nlines": 227, "source_domain": "aisiakshare.com", "title": " प्रकरण ७: ग्रीन कार्ड सिस्टिममधील वर्णद्वेषामुळे भारतीयांच्या व्यक्तिगत जीवनातील अग्निदिव्ये | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nप्रकरण ७: ग्रीन कार्ड सिस्टिममधील वर्णद्वेषामुळे भारतीयांच्या व्यक्तिगत जीवनातील अग्निदिव्ये\nग्रीन कार्ड हि अडथळ्यांची शर्यंत आहे हे आत्तापर्यंत लक्षात आलेच असेल. ह्यात तुम्ही एकटेच असता तोपर्यंत ठीक आहे, पण काळ थांबत नाही. लग्न, मुले होतात, संसाराचा पसारा वाढत जातो, अनुभव वाढत जातो, तुम्ही जीवनशैलीत स्थिरावत जाता, परंतू ह्या सगळ्याचाच आधार, तुमच्या अमेरिकेतील वास्तव्याचा आधार काही बदलत नाही, मग मर्यादांची जाणीव होते. \"अरे, आधीच वेळेत काही निर्णय घेतले असते; कॅनडाला गेलो असतो किंवा दुसऱ्या देशात शिक्षण/नौकरीसाठी गेलो असतो तर बरं झालं असतं\" वगैरे विचारचक्र सुरु होतात. उद्योग किंवा इतर काही योजना अनुभवातून तयार झालेल्या असतात, पण संधींचा लाभ घेता येत नाही. व्हिसाचक्रात अडकल्यामुळे काहीच करता येत नाही, अशी असंख्य उदाहरणे आहेत. तर आपण त्यातील काहीची या लेखात चर्चा करणार आहोत.\nसमजा तुम्ही अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आलात ते संपल्यानंतर, तुम्हाला साधारण २४ महिन्याचा कालावधी इंडस्ट्रीच्या अनुभवासाठी मिळतो. त्या कालावधीमध्ये, पुढील वास्तव्यासाठी नौकरीचे प्रायोजकत्व (तात्पुरत्या वास्तव्याचा एच - १ व्हिसा) मिळणे गरजेचे आहे.\nपाचव्या प्रकरणात एच १ व्हिसाबद्दल चर्चा केली होती. \"नवीन\"/ अगदी पहिल्यांदा (नवा कोरा) एच - १ व्हिसाचा अर्ज करण्यावर बंधने आहेत. दर वर्षी ८५००० चा एच १ व्हिसाचा कोटा उपलब्ध होतो. ८५००० मध्ये २०,००० अमेरिकेत उच्च- शिक्षण घेतलेल्यांसाठी राखीव आहेत. ६५००० च्या कोट्यामध्ये कुणीही अर्ज करू शकतो. अगदी जगभरातून कुणीही.. भारतातील इन्फोसिस, टी.सी. एस. वगैरे कंपन्या त्यांच्या भारतातील कामगारांचे एच - १ व्हिसाचे अर्ज ह्याच मार्गाने भरतात. सहाव्या प्रकरणात चर्चिल्याप्रमाणे ग्रीन - कार्डाच्या सिस्टिम प्रमाणे, ८५,००० एच - १ व्हिसावर कुठल्याही देशाच्या अर्जदारांची कमाल मर्यादा नाही. त्यामुळे मागणी - पुरवठा तत्वावर आधारित, फर्स्ट कम - फर्स्ट सर्व्ह पद्धतीने व्हिसाचे वाटप होते. ८५,००० च्या प्रति-वर्षीच्या नवीन कोट्यासाठी अमेरिका अर्ज स्वीकारायला १ एप्रिलपासून सुरुवात करते. एकदा ८५,००० व्हिसा भरले की पुढील वर्षापर्यंत \"नवीन\" (नवा कोरा)/ पहिलटकरीण अर्ज स्वीकारणे बंद करते. गेल्या ६-७ वर्षांमध्ये ८५,००० च्या कोट्यासाठी तिप्पट म्हणजे जवळ जवळ अडीच लाखाच्या वर अर्ज भरले गेले आहेत. ह्यावर उपाय म्हणून अमेरिका चक्क लॉटरी सिस्टिम पद्धतीने ८५,००० चा कोटा पूर्ण करते. तुमच्या २ वर्षाच्या (२४ महिन्याच्या) कालावधीत साधारण २ संधी ह्या पहिल्या अग्निदिव्यातून पार पडायला तुम्हाला मिळतात. जर त्यात तुमचा नंबर लागला तर ठीक, नाहीतर लाखो रुपये भरून अमेरिकेत शिक्षणासाठी आल्यानंतर एच - १ व्हिसा न झाल्याने आल्या पावली भारतात परत जायला लागू शकते.. ह्यात शिक्षणासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड ही दोन वर्षात झालेली नसते.\nअमेरिकेत बहुसंख्य कामे कंत्राट पद्धतीवर चालतात. तुमच्या व्हिसाचा कालावधी ज्या कामाच्या जागेसाठी, तुमची निवड केली आहे, त्याचा कालावधी आणि इतर असंख्य माहितीवर अवलंबून असतो. गेल्या ४-५ वर्षात इम्मीग्रेशन डिपार्टमेंट खूपच सजग झाल्याने, जरी एच-१ व्हिसाचा कमाल कालावधी ३ वर्षाचा असला तरी लोकांना ४ महिने, १ वर्ष इतक्या कमी कालावधीचे व्हिसा मिळाले आहेत. म्हणजेच अँप्रुव्हड व्हिसा हातात मिळेपर्यंत, नव्याने व्हिसाचे अँप्लिकेशन टाकणे गरजेचे झाले आहे. व्हिसाच्या नूतनीकरणामध्ये देखील अनेक अडचणी आहेत, कारण प्रत्येक वेळेला कंपनीला त्यांच्याकडे तुमच्यासाठी काम आहे हे सिद्ध करावे लागते, आणि जर तुम्ही कंत्राटदार असाल तर तुम्हाला मिळणारे काम हे कस्टमरवर अवलंबून आहे.\nह्यात अजून एक गम्मत म्हणजे, तुमच्या कस्टमरची गरज असेल त्याप्रमाणे, तुम्हाला त्या कामाच्या ठिकाणी हजर व्हावे लागते. ९ वर्षात १० विविध राज्यात वास्तव्य झालेले एक कुटुंब, माहितीत होते. तुमच्याकडे ग्रीन कार्ड असेल आणि कंत्राट संपले तरी काळजी नसते, परंतू व्हिसावर असताना तुमच्या हातातील काम संपताक्षणीच तुम्ही बेकायदेशीर ठरता. गाशा गुंडाळून तुमच्या देशात परत जाणे अपेक्षित असते.\nएच-१ व्हिसा प्रायोजकाधारित आहे, म्हणजेच तुम्हाला नौकरी स्वतःच्या मर्जीने बदलता येत नाही. जर दुसरी कंपनी, त्याच्याकडील उपलब्ध जागेसाठी तुमचा व्हिसा प्रायोजित करू शकत असेल, तरच तुम्हाला नौकरी बदलता येते. ह्याचाच अर्थ, एच १ व्हिसाधारक त्याच्या कंपनीशी अप्रत्यक्षरित्या बांधील होतो. त्याला त्याच्याच कंपनीच्या एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये मूव्ह करण्यासाठीसुद्धा कंपनीला व्हिसा अमेंडमेंट (दुरुस्ती) करून घ्यावी लागते. जागतिक महामारीच्या काळात बरेचसे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारे लोक घरूनच काम करत आहेत, त्यांचे काम करण्याचे ठिकाण बदलले आहे, कंपन्यांनी अत्यंत काळजीपूर्वक हा बदल सरकारी नियमात बसवून घेतला आहे.\nह्या दुसऱ्या पातळीवरील अग्निदिव्यांशी झुंजत असताना, तुम्ही लग्न वगैरे करता. समजा तुम्ही भारतातील व्यक्तीशी लग्न केले. तर ती व्यक्ती, अमेरिकेत एच- ४ व्हिसा वर (जो एच -१ व्हिसाचा आश्रित व्हिसा आहे), प्रवेश करते. एच - ४ व्हिसावर तुम्ही काम तर सोडाच पण जीवनातील साध्या साध्या गोष्टींसाठीही पात्र ठरत नाही. हेच जर तुम्ही एल - २ (जो एल-१ व्हिसाचा आश्रित व्हिसा आहे), वर आलात तर कामच काय परंतू सगळ्या गोष्टींसाठी पात्र ठरता. हा भेदभाव का त्याला काहीही आधार नाही. जगण्याचे मूलभूत मानवाधिकार देखील एच - ४ व्हिसावरच्या लोकांना नाकारले गेले आहेत. एच - ४ व्हिसावरील लोकांना किती विविध पातळीवर (मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, स्थलांतरण संदर्भात आणि इतर अनेक) संघर्ष करावा लागतो ह्यासाठी Hearts Suspended , एच-४ व्हिसा; एक शाप वगैरे अवॉर्ड विंनिंग शॉर्ट डॉक्युमेंटरी जरूर पहाव्या. एच - ४ हा एच - १ वरील आश्रित व्हिसा असल्याने, गैरफायदा उठवून कौटुंबिक हिंसा आणि इतर अनेक सामाजिक गुन्हेदेखील घडले आहेत. किंवा कित्येकांना हे अस्थैर्य, सततचा दबाव सहन न झाल्याने कौटुंबिक कलहातून डिव्होर्स (घटस्फोटा) पर्यंतही प्रकरणे गेली आहेत.\nजर तुमच्या ग्रीन कार्डाचा अर्ज सरकार दरबारी (धूळ खात) पडून राहिला असेल तर एच - ४ वरील जोडीदाराला काम करण्याचा परवाना मिळतो. परंतू सरकार अत्यंत सजगपणे काम करत असल्याने, ह्या परवान्यांच्या नूतनीकरण वगैरे प्रक्रियांमध्ये विलंबित तालाचा सढळपणे वापर केलेला दिसून येतो. परवान्यासाठी वेळेत अर्ज करूनही सरकार दरबारी झालेल्या विलंबामुळे हातातील नौकऱ्या सोडून अनेकांना घरी बसावे लागले आहे.\nसमजा तुम्ही भारतातच लग्न- मुले झाल्यावर अमेरिकेत एच-१ व्हिसाच्या माध्यमातून आलात, तर तुमची भारतात जन्मलेली मुले एच - ४ व्हिसावर अमेरिकेत येतात. अगदी शिशु - बाल वयात अमेरिकेत आलेली आणि अमेरिकन व्यवस्थेत वाढलेल्या मुलांची वेगळीच ससेहोलपट होते. अमेरिकेत जन्म किंवा एच-१ (कामाच्या परवान्यावर) वास्तव्य नसल्याने त्यांना एस.एस.एन (SSN) मिळत नाही. शाळा - कॉलेजातून बर्याचश्या प्रोजेक्ट (प्रकल्पावर) कार्य करण्यासाठी ही मुले अपात्र ठरतात. तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अमेरिकेतील मुले हमखास छोट्या - मोठ्या नौकऱ्या करून पैसे कमावतात, एच - ४ व्हिसावरील मुले ह्यातले काहीच करू शकत नाहीत. १५० वर्षाच्या ग्रीन - कार्डाच्या कालावधीमुळे, एच - ४ वर जगणारी भारतीय मुले सज्ञान (२१ वर्ष) होईपर्यंत, त्यांना ग्रीन- कार्ड मिळणे केवळ अशक्य आहे. म्हणजे २१ वर्षाची झाल्यावर, त्यांना त्यांच्या पालकाच्या एच - १ व्हिसावर राहता येत नाही. त्यांना स्वतःचा एच - १ व्हिसा किंवा एफ - १ व्हिसा किंवा अन्य कुठला तरी व्हिसा प्राप्त करणे भाग आहे. शिशु - बाल वयापासून अमेरिकन सिस्टिममध्ये वाढलेल्या मुलांना अचानक कुठेतरी त्यांच्या उपरेपणाची जाणीव करून दिली जाते. ह्या सगळ्याचे पर्यवसान मुले आणि पालकांची ताटातुटीत होणे साहजिक आहे. २१ वर्षाची सज्ञान मुले, जी अमेरिकेत वाढली त्यांना अमेरिकेबाहेर - त्यांच्या मायदेशात (ज्या बद्दल त्यांना फार कमी माहिती आहे.) जाण्याशिवाय गत्यंतर उरत नाही.\nसमजा तुमची मुले अमेरिकेत जन्माला आली असतील, तर त्यांना जन्मसिद्ध अमेरिकन नागरिकत्व मिळते. तुम्ही भारतीय नागरिक आणि मुले अमेरिकन नागरिक. दुर्दैवाने जर तुमच्यावर प्राणघातक प्रसंग गुदरला, आणि तुम्ही मृत्युपत्रात मुलांच्या पुढील सोयीबद्दल लिहिले नसेल तर तुमच्या पश्चात, अमेरिकन सरकारला तुमच्या मुलांची सोय बघण्याचा संपूर्ण अधिकार प्राप्त होतो. तुमच्या भारतीय नातेवाईकांचा तुमच्या मुलांवर कुठलाही कायदेशीर अधिकार उरत नाही. अमेरिकन सरकार येथील पद्धतीप्रमाणे लहान मुलांची पुढची सोय लावू शकते.\nतुमच्या एच - १ व्हिसावरच्या वास्तव्यात अमेरिकेबाहेरच्या प्रवासावर अनेक निर्बंध येतात. जर तुम्ही नौकरी बदलली असेल, किंवा अमेरिकेतील वास्तव्यात एच - १ चे नूतनीकरण झाले असेल, तर अमेरिकेत परत येताना तुम्हाला मायदेशातील (भारतातील) अमेरिकन एम्बसीमध्ये जाऊन परवान्यावर मान्यता मिळवणे कायद्याने बंधनकारक आहे, त्याशिवाय परतीचा प्रवास करता येत नाही. गेल्या १० वर्षात, अमेरिकन एम्बसीने काहीतरी कारण देऊन तिथेच (भारतात) अडकवण्याचे उद्योग सुरु केले आहेत. त्यामुळे एच - १ व्हिसाधारक, शक्यतो अमेरिकेबाहेरचा प्रवास टाळत आहेत. अश्याप्रकारे आपल्या अमेरिकेतील कुटुंबाशी ताटातूट झालेले अनेकजण भारतात अडकले आहेत. ह्याचा परिणाम म्हणजे, लोकांना लग्न - मुंजी सारख्या शुभ कार्यासाठीच नव्हे तर आपल्या आप्तेष्टांच्या अंत्यदर्शनासारख्या नाजूक घटनांनाही मुकावे लागले आहे. तुमच्या घरातील प्रिय व्यक्तीच्या अंतिम दर्शनाला आणि कार्यालादेखील केवळ आणि केवळ अमेरिकेतील पुनर्प्रवेशाच्या अनिश्चितीमुळे जाता येऊ शकत नाही, हि कल्पनाच शहारे देऊन जाते.\nहि सगळी अग्निदिव्ये दिवाळीचे बाण/ फटाके वाटावे, किंवा ज्याला चेरी ऑन टॉप म्हणता येईल तो प्रकार आता आपण बघूया. समजा दुर्दैवाने, एच - १ व्हिसा-धारकाचे काही कारणांमुळे निधन झाले, तर आश्रित असलेले एच - ४ व्हिसावरील सगळे कुटुंब त्याक्षणी बेकायदेशीर ठरते. त्यांना १४ दिवसांचा ग्रेस पिरियड मिळतो, परंतू कायद्याच्या दृष्टिकोनातून ते सगळे कुटुंब बेकायदेशीर आहे, त्यांनी देश (अमेरिका) लौकरात लौकर सोडणे अपेक्षित आहे.\nज्या १० लाख भारतीय कुटुंबांची कथा इथे मांडली आहे, ती कुटुंबे सरासरी १० - १२ वर्ष तरी अमेरिकेत वास्तव्य करीत आहेत. कुणी कुटुंब-कबिल्याबरोबर इथे आलाय, तर कुणाचा संसार इथे फुललाय. सामाजिक बंधांबरोबरच, लहान मुलांच्या शिक्षण आणि इतर गोष्टी स्थिरस्थावर झाल्या आहेत. परंतू सगळ्याचा आधारच स्थिर नाही, कुठल्याही क्षणी आपण इथून मुळासकट उखडले जाऊ शकतो ह्या भावनेने जीवन जगत आहेत.\n२०१७ साली कान्सास राज्यात वांशिक द्वेषातून कृष्णा कुचीभोटला ह्या तरुणाच्या हत्येनंतर तेथील लोक-प्रतिनिधींनी तत्परतेने त्याच्या पत्नीला मदत केली नसती तर त्या कुटुंबाची अवस्था फारच कठीण झाली असती. दिवसाआड एखादी तरी घटना एच -१ वरील व्यक्तीच्या निधनाची बातमी सोशल मीडिया आणि अन्य माध्यमातून ऐकायला मिळतेच, कधी हेल्थ कंडिशन, तर कधी अन्य काही कारणामुळे, दुर्दैवी घटना घडते. मग कुटुंबाच्या निकट असलेली एखादी व्यक्ती फंड रेझिंग सुरु करते. फुललेले संसार एका क्षणात उखडले जातात. कुटुंबातील व्यक्तीच्या जोडीदाराचा कामाचा परवानाही मुळ व्यक्तीच्या (एच - १ वरील) निधनामुळे तात्काळ संपुष्टात येतो. ह्या कुटुंबांना जर ग्रीन कार्ड वेळेत मिळाले असते तर त्यांचे कुटुंब सरकारी जाचक निर्बंधातून मुक्त झाल्याने त्यांना निदान त्यांच्या अमेरिकेतील अस्तित्वाची चिंता करायची गरज पडली नसती.\nव्यक्तिगत जीवनातील सगळ्याच आव्हानांचा तपशील खोलात जाऊन लिहिणे शक्य नसले तरी काही वानगीदाखल उदाहरणे इथे लिहिली आहेत. ह्या संदर्भात काम करणाऱ्या संस्थांनी; अमेरिका उच्च - शिक्षित स्थलांतरितांना गुलामांपेक्षा हीन दर्जाची वागणूक देते; अश्या प्रकारची निरीक्षणे नोंदवलेली आहेत.\nव्यक्तिगत जीवनातील ही लढाई लढत असताना, कामाच्या ठिकाणी काय परिस्थिती असते ह्याचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nग्रीन कार्ड हि अडथळ्यांची शर्यंत आहे हे आत्तापर्यंत लक्षात आलेच असेल. ह्यात तुम्ही एकटेच असता तोपर्यंत ठीक आहे, पण काळ थांबत नाही. लग्न, मुले होतात, संसाराचा पसारा वाढत जातो, अनुभव वाढत जातो, तुम्ही जीवनशैलीत स्थिरावत जाता, परंतू ह्या सगळ्याचाच आधार, तुमच्या अमेरिकेतील वास्तव्याचा आधार काही बदलत नाही, मग मर्यादांची जाणीव होते. \"अरे, आधीच वेळेत काही निर्णय घेतले असते; कॅनडाला गेलो असतो किंवा दुसऱ्या देशात शिक्षण/नौकरीसाठी गेलो असतो तर बरं झालं असतं\" वगैरे विचारचक्र सुरु होतात.\nमहाशय, कधी कॅनडाला इमिग्रेट करून पाहिले आहेत काय\nम्हणायला सोपे आहे, परंतु तेथील परिस्थिती - वेगळ्या प्रकारे कदाचित, परंतु - याहूनही भयंकर आहे.\nनाही म्हणजे, कॅनडात इमिग्रेशन मिळविणे हे यूएसएच्या तुलनेत आत्यंतिक सोपे आहे, हे खरे आहे. (ऑस्ट्रेलियाबद्दलसुद्धा थोडेफार असेच ऐकून आहे.) त्यांच्या पॉइंट्स-सिस्टममध्ये पुरेसे पॉइंट्स तुमच्याजवळ असले, आणि इमिग्रेशन फी तथा प्रवासखर्च उचलायची तयारी असली, तर तुलनेने सहज (आणि लवकर) इमिग्रंट व्हिसा मिळून जातो, नि तुम्ही कॅनडात थेट 'लँडेड इमिग्रंट' स्टेटसमध्येच, कायम रहिवासाचा अधिकार हातात घेऊनच उतरता.\nतुमचे पॉइंट्स हे माझ्या त्रोटक माहितीप्रमाणे तीन बाबींवर ठरतात: (१) तुमचा वयोगट: जितके वय अधिक, तितके वयाधारित पॉइंट्स कमी. (२) तुमचे इंग्रजी आणि/किंवा (क्वेबेकमध्ये स्थायिक होऊ इच्छीत असल्यास) फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व, आणि (३) तुमचे एंप्लॉयमेंट पोटेंशियल: प्रामुख्याने तुमचा स्किलसेट आणि त्याची कॅनडात 'ज्या व्यवसायक्षेत्रांत मनुष्यबळाची (सपोज़ेडली) आत्यंतिक निकड आहे', त्यांच्याशी सांगड.\nआल्यावर कनेडियन सरकार तुम्हाला ताबडतोब राहाण्याकरिता तात्पुरती जागा आणि जास्तीत जास्त एका वर्षापर्यंत बेकारीभत्तासुद्धा पुरविते.\nसो फार सो गूड.\nठीक आहे. कॅनडात पोहोचलात. त्यानंतर काय\nत्यानंतर यू आर ऑल ऑन युअर ओन.\nसामान्यत:, आल्याआल्या जे तात्पुरते अकोमोडेशन सरकारकडून पुरविले जाते, ते वायएमसीए/वायडब्ल्यूसीएची हॉस्टेले किंवा तत्सम स्वरूपाचे असते. तितपतच असते. (नक्की खात्री नाही, परंतु बहुधा शेअर्ड बेसिसवर असते.) शिवाय, तुमच्यासारखेच असंख्य जण तेथे डंप केलेले असल्याने, माहौल एकंदरीत डिप्रेसिंगच असतो. (किती काळ तिथे राहू शकता, त्यावरही मला वाटते मर्यादा आहे, परंतु ती किती, याबद्दल खात्री नाही.)\nबेकारीभत्ता जो पुरवितात, तो जेमतेम सस्टेनेबल असतो. त्याच्या जिवावर वर्षभरात काहीतरी नोकरी मिळविणे अपेक्षित असते; अन्यथा, तुम्ही आणि तुमचे नशीब. तेही एक वेळ ठीकच.\nखरी गोची त्यानंतर सुरू होते. हे कॅनडाचे इमिग्रेशन एजंट वगैरे भारतात किंवा अन्यत्र जाहिरातबाजीत जे एक सुखावह चित्र उभे करतात, तितकी काही कॅनडातल्या नोकऱ्यांची स्थिती निश्चितच नाही. ठीक आहे, तुमच्या स्किलसेटप्रमाणे तुम्ही अत्यंत क्वालिफाइड आहात, कनेडियन इमिग्रंट व्हिसा मिळण्याच्या दृष्टीने तुमच्याकडे पुरेसेच नव्हे, तर मुबलक पॉइंट्स आहेत, आणि कॅनडात ज्या व्यवसायांमध्ये मनुष्यबळाची आत्यंतिक निकड आहे, त्यांपैकी तुमचा व्यवसाय आहे. त्या आधारावर तुम्हाला इमिग्रंट व्हिसा तर सहज मिळाला. मात्र, (आत्यंतिक क्वालिफाइड तथा अनुभवी असूनसुद्धा) जॉबसुद्धा तितक्याच सहज किंवा झटपट मिळेल, असे तुम्हाला वाटत असेल, तर तो एक प्रचंड मोठा भ्रम आहे.\nत्यात पुन्हा, अनेक व्यवसायक्षेत्रांत प्रोफेशनल लायसन्स नावाची एक भानगड असते. आणि, तुम्हाला भरपूर अनुभव असला, तरीसुद्धा, पुरेसा कनेडियन अनुभव नाही, म्हणून प्रोफेशनल लायसन्स नाही, म्हणून नोकरी नाही, म्हणून कनेडियन अनुभव नाही, असल्या दुष्टचक्रात तुम्ही सापडता. महिनोन् महिने या परिस्थितीत अडकल्यावर केवळ पोट जाळण्याकरिता म्हणून तुम्ही काय वाटेल ते करायला तयार होता. मग भारतात (किंवा कॅनडाबाहेर अन्यत्र तुम्ही जेथून कोठून आला असाल तेथे) तुम्ही भले डॉक्टर असाल नाहीतर आयआयटी डबल ग्रॅज्युएट इंजिनियर असाल, अनेक वर्षांचा अनुभव तुमच्या गाठीला असेल, परंतु केवळ पापी पोटाकरिता तुम्ही टोराँटोच्या रस्त्यांवर टॅक्सी चालविता, नाहीतर मग अत्यल्प मोबदल्यावर टेलेमार्केटर बनून लोकांना घरच्या भिंतींना फासायचा रंग विकता (आणि, तो विकत असताना, ज्याला फोन मारला त्याच्या मनसोक्त शिव्यासुद्धा खाता). आणि, हे करत असताना, हे केवळ तात्पुरते आहे, असे स्वत:च्याच मनाला अत्यंत डेस्परेटपणे समजावत राहता. अशा वेळी, (१) आपल्या शिक्षणाचा नि अनुभवाचा मग नक्की काय उपयोग झाला, आणि (२) त्यापेक्षा भारतात आपण नक्की काय वाईट होतो, हे विचार मनात प्रामुख्याने घोळू लागतात.\nत्यानंतर मग कधीतरी - सुदैवी असाल, तर होपफुली लवकरच - तुम्हाला तुमच्या क्षेत्रातला एखादा छोटामोठा - छोटामोठाच - ब्रेक मिळाला तर मिळून जातो. तो एकदा मिळाला, तर मग मात्र त्यानंतरचे तुमचे आयुष्य तुलनेने सुरळीत जाते. प्रगतीसुद्धा होऊ शकते. परंतु, तो मिळेपर्यंत हाल असतात.\nआहे, देश प्रचंड मोठा आहे. आणखी भरपूर माणसे सामावण्याइतके क्षेत्रफळ आहे. खरेच आहे. जाहिरात करणारे हे आवर्जून सांगतात. त्या प्रचंड क्षेत्रफळापैकी मानवी वस्तीला साजेसा असा भाग हा थोडाच, प्रामुख्याने केवळ दक्षिणेला, यूएसएच्या सीमेलगतच आहे - उरलेला बहुतांश कॅनडा हा हिवाळ्यात प्रचंड गोठलेला असून तेथे थंडी कडाक्याची आणि मनुष्यवस्ती बहुतकरून अतितुरळक असते - आणि, यूएसएच्या सीमेलगतच्या भागांतसुद्धा, नोकरीच्या बहुतांश संधी या केवळ काही तुरळक मोठ्या शहरांतच आहेत, हे कोणी सांगत नाही.\nतर आहे हे असे आहे.\n(डिस्क्लेमर: हे माझे स्वत:चे अनुभव नाहीत. काही अंशी निरीक्षण आणि काही अंशी बायकोच्या मैत्रिणीचे साधारणत: वीसएक वर्षांपूर्वीचे अनुभव यांच्या आधारावर हे सर्व खरडले आहे.)\nपाचव्या प्रकरणात एच १ व्हिसाबद्दल चर्चा केली होती. \"नवीन\"/ अगदी पहिल्यांदा (नवा कोरा) एच - १ व्हिसाचा अर्ज करण्यावर बंधने आहेत. दर वर्षी ८५००० चा एच १ व्हिसाचा कोटा उपलब्ध होतो. ८५००० मध्ये २०,००० अमेरिकेत उच्च- शिक्षण घेतलेल्यांसाठी राखीव आहेत. ६५००० च्या कोट्यामध्ये कुणीही अर्ज करू शकतो. अगदी जगभरातून कुणीही.. भारतातील इन्फोसिस, टी.सी. एस. वगैरे कंपन्या त्यांच्या भारतातील कामगारांचे एच - १ व्हिसाचे अर्ज ह्याच मार्गाने भरतात. सहाव्या प्रकरणात चर्चिल्याप्रमाणे ग्रीन - कार्डाच्या सिस्टिम प्रमाणे, ८५,००० एच - १ व्हिसावर कुठल्याही देशाच्या अर्जदारांची कमाल मर्यादा नाही. त्यामुळे मागणी - पुरवठा तत्वावर आधारित, फर्स्ट कम - फर्स्ट सर्व्ह पद्धतीने व्हिसाचे वाटप होते. ८५,००० च्या प्रति-वर्षीच्या नवीन कोट्यासाठी अमेरिका अर्ज स्वीकारायला १ एप्रिलपासून सुरुवात करते. एकदा ८५,००० व्हिसा भरले की पुढील वर्षापर्यंत \"नवीन\" (नवा कोरा)/ पहिलटकरीण अर्ज स्वीकारणे बंद करते. गेल्या ६-७ वर्षांमध्ये ८५,००० च्या कोट्यासाठी तिप्पट म्हणजे जवळ जवळ अडीच लाखाच्या वर अर्ज भरले गेले आहेत. ह्यावर उपाय म्हणून अमेरिका चक्क लॉटरी सिस्टिम पद्धतीने ८५,००० चा कोटा पूर्ण करते.\nपण... पण... पण... हा ६५,०००चा कोटा (आणि एकंदरीत ही मोडस ऑपरंडी) तर गेली कित्येक दशके आहे. १९९०च्या दशकाअखेरीपर्यंत हा ६५,०००चा कोटा बहुतांशी पुरेसाही होता. त्यानंतर मग २०००च्या थोड्या अगोदर 'वायटूके'करिता भरपूर अधिक माणसे लागतील, या हिशेबाने तो अनेक वर्षे ११०,०००पर्यंतसुद्धा वाढवून ठेवलेला होता. या वाढीव कोट्यावर 'वायटूके'च्या नावाखाली (प्रामुख्याने हैदराबादेतून) भरपूर प्रमाणात अक्षरश: काय वाटेल ती माणसे आली. भरपूर देशी कंपन्यांनी (आणि प्रोग्रामरांनीसुद्धा) यात हात धुवून घेतले. (एडिसन, न्यू जर्सी या गावाची स्थानिक प्रचलित भाषा ही १९९०च्या दशकाअखेरीपर्यंत गुजराती होती. तेथील चौकात उभे राहून जर मोठ्याने 'ए पटेल' अशी हाक मारली, तर अर्धा गाव मागे वळून पाहात असे, की कोणी बुवा आणि कशासाठी आपल्याला हाक मारली, म्हणून. २०००नंतर हे चित्र बदलले, डेमोग्राफिक्स बदलले. तेव्हापासून तेथील स्थानिक देसी रेडियोवर अचानक तेलुगूतून दुकानांच्या जाहिराती ऐकू येऊ लागल्या. तर ते एक असो.) त्यानंतर मग गरज जसजशी ओसरत गेली, तसतशी ही मर्यादा हळूहळू कमी करत पुन्हा ६५,०००वर आणली गेली. यात नक्की बिघडले कोठे\nमध्यंतरी कंपन्यांची बिझनेस मॉडेलेसुद्धा बदलली. औटसोर्सिंग नावाचा एक नवा प्रकार सुरू झाला. म्हणजे, पूर्वी अमेरिकन कंपन्या या गरजेप्रमाणे बाहेरील लोकांना नोकरीला ठेवत. (किंवा, खरे तर बहुतांशी, भारतातील किंवा अमेरिकास्थित भारतीयांनी चालविलेल्या अमेरिकेतील मध्यस्थ कंपन्यांकडून माणसे उधारीवर घेत. प्रत्यक्ष अमेरिकन कंपनीने थेट नोकर म्हणून परकीयांना कामावर घेण्याचे प्रमाण तेव्हाही अत्यल्प असावे. मायक्रोसॉफ्टसारखे एखाददुसरे अपवाद वगळल्यास. आणि तेसुद्धा मध्यस्थ वापरीतच.) आणि मग, 'तांत्रिक मनुष्यबळाचा तुटवडा' या नावाखाली या अमेरिकन कंपन्या आणि बहुतकरून भारतीय किंवा भारतीयांच्या मालकीच्या अमेरिकन मध्यस्थ कंपन्या एच१-बीवर मनुष्यबळ आयात करीत. (खूप पूर्वी तर भारतातील कंपन्या - अगदी मोठमोठ्या, प्रतिष्ठित कंपन्यासुद्धा - एच१-बी वगैरेच्यासुद्धा भानगडीत न पडता, तात्पुरत्या बिझनेस व्हिसावर (आणि तुटपुंज्या अलावन्सवर१) लोकांना पाठवीत, नि मग बिझनेस व्हिसाची एक्स्टेन्शनांवर एक्स्टेन्शने करत ठेवून घेत. हे खरे तर कायद्यानुसार ग्रे एरियामध्ये होते, परंतु सर्रास चालत असे. शिवाय, भारतातून पाठविताना अशा लोकांकडून 'आम्ही तुम्हाला पाठविण्याकरिता इतका खर्च करून तुमच्यावर उपकार करतो, सबब तुम्ही आम्हाला अमेरिकेत गेल्यावर सोडून गेलात तर तुमच्या आईवडिलांकडून इतकीइतकी नुकसानभरपाई घेऊ' अशा प्रकारचा - कायद्याच्या दृष्टीने न बजावता येण्याजोगा परंतु एंप्लॉयीला घाबरवायला नि त्याच्या घरच्यांना छळायला पुरेसा - बाँड लिहून घेत, तो वेगळाच. एकंदरीत, वेठबिगारी आणि भडवेगिरी यांच्यामधला काहीतरी प्रकार असे. पुढे मग इमिग्रेशनखात्याला जाग आली आणि अशा सर्रास बिझनेस व्हिसा प्रॅक्टिसेसवर दट्ट्या यायला सुरुवात झाली, तेव्हा कोठे भारतीय कंपन्यांनी रीतसरपणे एच१-बी वगैरेवर लोकांना पाठवायला सुरुवात केली. तर ते एक असो.२)\nहं, तर काय म्हणत होतो औटसोर्सिंग. हा प्रकार सुरू झाल्यावर बाहेरून माणसे आयात करून त्यांना कामाला लावण्याऐवजी, कामे बाहेरून करवून आणली जाऊ लागली. अर्थात, एच१-बी व्हिसाची निकड (निदान तत्त्वत: तरी) कमी झाली. अमेरिकेतल्या भारतीयांच्या मालकीच्या ज्या काही अमेरिकास्थित कंपन्या होत्या, त्यांनीदेखील वाऱ्याची दिशा पाहून आपले बिझनेस मॉडेल बदलले; एच१-बीवर माणसे आयात करण्याचा धंदा सोडून, अगोदरच अमेरिकेत असलेल्या किंवा येऊन स्थायिक झालेल्या लोकांना कंत्राटाने देण्याचा धंदा सुरू केला. उलटपक्षी, भारतातील कंपन्यांनीही आपले बिझनेस मॉडेल बदलून, भारतातच अमेरिकेतील कामाची कंत्राटे घेऊन त्यावर लोकांना भारतातच पिळण्याचा धंदा सुरू केला, नि अगदी क्वचित नि मर्यादित काळाकरिता लोकांना अमेरिकेस (बिझनेस व्हिसावर किंवा प्रसंगी एच१-बीवरसुद्धा) धाडू लागले. साहजिकच, एच१-बी व्हिसाची सांख्यिक मर्यादा अधिक वाढविण्याचे काही कारण निदान वरकरणी, तत्त्वत: तरी उरले नाही. (यात अमेरिकन नागरिकांच्या - खास करून पांढऱ्या अमेरिकन नागरिकांच्या - दृष्टीने फरक एवढाच पडला, की पूर्वी ते 'हे साले इंडियन इथे येऊन आमचे जॉब चोरतात' म्हणून बोंबलत, त्याऐवजी आता 'हे साले इंडियन आणि चायनीज आमचे जॉब चोरून त्यांच्या देशांत घेऊन जातात' म्हणून बोंबलू लागले, इतकेच. त्याकडे फारसे लक्ष देण्यात अर्थ नाही.)\nआता, असे असता, आजमितीस एच१-बी व्हिसा इतके कमी का पडतात या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाही. एच१-बी माहौलापासून दूर होऊन मला पुष्कळ वर्षे होऊन गेल्याने सध्याच्या परिस्थितीची आणि ट्रेंड्ज़ची मला तितकीशी कल्पना नाही. यात रेसिझमचा भाग आहे का या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाही. एच१-बी माहौलापासून दूर होऊन मला पुष्कळ वर्षे होऊन गेल्याने सध्याच्या परिस्थितीची आणि ट्रेंड्ज़ची मला तितकीशी कल्पना नाही. यात रेसिझमचा भाग आहे का कोठल्यातरी पॉलिसीमेकिंग पातळीवर असणे अगदीच अशक्य नाही, परंतु त्याबद्दल मी साशंक आहे. (आणि, असलाच, तर रेसिझमपेक्षा झेनोफोबियाचा भाग अधिक असू शकेल. म्हणजे, बाहेरच्या लोकांना इथे जॉब मिळू द्यायला अडवणूक करणे - खास करून इथे जॉब्ज़चा तुटवडा असताना - इतपतच. त्या भूमिकेत तथ्य कितपत आहे, हा भाग वेगळा, परंतु एका विशिष्ट प्रकारच्या मतदाराला ते अपील होऊ शकते, इतकेच. आता, एच१-बी आवेदनकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीयांचा भरणा असल्यास आणि त्यामुळे भारतीयांचा यात मोठ्या प्रमाणावर तोटा होत असल्यास त्याकरिता रेसिझमला जबाबदार धरणे हे कितपत सयुक्तिक ठरेल, याबद्दल मी साशंक आहे.)\nकितीही झाले, तरी अमेरिकेची व्हिसा पॉलिसी ही अमेरिकेच्या गरजांप्रमाणे ठरणार, आवेदनकर्त्यांच्या गरजांप्रमाणे नव्हे. अमेरिकेला आजमितीस इतक्या परकीय कामगारांची गरज नाही, असे जर धोरण ठरविणाऱ्यांना वाटले, तर केवळ गरजू आवेदनकर्ते पुष्कळ आहेत, म्हणून व्हिसामर्यादा वाढविली जाणार नाही. उलटपक्षी, अमेरिकन उद्योगांना जर वाटले की पुरेसे कसबी मनुष्यबळ अमेरिकेत सापडत नाही आणि असे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर आयात करण्याची आत्यंतिक गरज आहे, तर ते स्वत: होऊन धोरण ठरविणाऱ्यांना लॉबी करून ती मर्यादा वाढवून घेतील. (हे पूर्वी घडलेले आहे.) परंतु, औटसोर्स करण्याचा पर्याय उपलब्ध असताना हे कोण नि कशासाठी करेल, हादेखील एक प्रश्नच आहे.\nतेव्हा, उगाच रेसिझमच्या नावाने (आणि अमेरिकेच्या वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, दुष्ष्ष्ट, रेशिष्ट धोरणाच्या नावाने) खडे फोडण्यात फारसे हशील नाही. (त्यात कदाचित अल्पांशाने तथ्य जरी असले, तरीही.) शेवटी एच१-बी ही काही कोणाची एंटायटलमेंट नव्हे, आणि ती अमेरिकेच्या सोयीकरिता (नि सोयीपुरती) आहे, एच१-बी-धारकाच्या नव्हे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.\n(बादवे, भारताची इमिग्रेशन पॉलिशी काय आहे हो\nतुमच्या २ वर्षाच्या (२४ महिन्याच्या) कालावधीत साधारण २ संधी ह्या पहिल्या अग्निदिव्यातून पार पडायला तुम्हाला मिळतात. जर त्यात तुमचा नंबर लागला तर ठीक, नाहीतर लाखो रुपये भरून अमेरिकेत शिक्षणासाठी आल्यानंतर एच - १ व्हिसा न झाल्याने आल्या पावली भारतात परत जायला लागू शकते.. ह्यात शिक्षणासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड ही दोन वर्षात झालेली नसते.\nशिक्षणानंतर नोकरीची हमी आणि/किंवा कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी ही अमेरिकन सरकारने आणि/किंवा संबंधित विद्यापीठाने कधीही उचललेली नाही. ती सर्वस्वी तुमची जबाबदारी, आणि तुमचा हिशेब. तुमच्या सोयी-गैरसोयींनुसार अमेरिकेचे इमिग्रेशन धोरण ठरत नाही. आहे हे असे आहे; घ्यायचे तर घ्या, नाहीतर सोडून द्या.\n१५० वर्षाच्या ग्रीन - कार्डाच्या कालावधीमुळे, एच - ४ वर जगणारी भारतीय मुले सज्ञान (२१ वर्ष) होईपर्यंत, त्यांना ग्रीन- कार्ड मिळणे केवळ अशक्य आहे. म्हणजे २१ वर्षाची झाल्यावर, त्यांना त्यांच्या पालकाच्या एच - १ व्हिसावर राहता येत नाही. त्यांना स्वतःचा एच - १ व्हिसा किंवा एफ - १ व्हिसा किंवा अन्य कुठला तरी व्हिसा प्राप्त करणे भाग आहे. शिशु - बाल वयापासून अमेरिकन सिस्टिममध्ये वाढलेल्या मुलांना अचानक कुठेतरी त्यांच्या उपरेपणाची जाणीव करून दिली जाते.\n ही १५० वर्षे कोठून आली ब्वॉ\n(परंतु, भारतात जन्मलेल्या नि एच-४ व्हिसावर आईवडिलांबरोबर राहात असलेल्या मुलांकरिता ती कायद्याने सज्ञान होण्याच्या आत त्यांच्या आईवडिलांचे ग्रीनकार्ड न झाल्यास असलेली रिस्क ही मात्र आहे खरी\nअमेरिकेत जन्म किंवा एच-१ (कामाच्या परवान्यावर) वास्तव्य नसल्याने त्यांना एस.एस.एन (SSN) मिळत नाही.\nत्याऐवजी पर्याय म्हणून टी.आय.एन. (किंवा तत्सम काही) चालू शकत नाही काय जेथे पगार, स्टायपेंड वगैरे मिळण्याचा संबंध नाही, अशा कोणत्या बाबतीत एस.एस.एन. अनिवार्यरीत्या लागतो जेथे पगार, स्टायपेंड वगैरे मिळण्याचा संबंध नाही, अशा कोणत्या बाबतीत एस.एस.एन. अनिवार्यरीत्या लागतो (मला माहीत नाही म्हणून विचारतोय.)\nअसो. अधिक टंकत बसायचा कंटाळा आला, म्हणून तूर्तास इतकेच.\n(अमेरिकन इमिग्रेशन सिस्टम ही परफेक्ट असण्याचा दावा नाही; किंबहुना, तशी ती नाहीच. परंतु, ती प्रामुख्याने अमेरिकेच्या सोयीसाठी आहे; प्रॉस्पेक्टिव इमिग्रंटच्या सोयीकरिता नव्हे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. हं, ती अधिक ह्यूमेन करता येईल, ही गोष्ट खरी; परंतु म्हणून तिच्या नावे खडे फोडण्यात आणि सरसकट सर्व खापर वर्णद्वेषावर फोडण्यातही हशील नाही, हेही तितकेच खरे. तूर्तास लेखनविराम.)\n१ बिझनेस व्हिसावर अमेरिकेत उत्पन्न मिळविणे हे वस्तुत: व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन होते. परंतु, भारतातील पगाराचेच एक्स्टेन्शन म्हणून अमेरिकेतील राहण्याचा तात्पुरता खर्च सांभाळण्यासाठी डॉलरमध्ये भत्ता ही एक पळवाट असे. (या अरेंजमेंटखाली अमेरिकेत असताना भारतातील (रुपयांतील) पगारसुद्धा चालूच राहात असे, परंतु, अमेरिकेतील खर्च सांभाळण्याच्या दृष्टीने त्याचा काहीही उपयोग नसे.) शिवाय, हा भत्ता हा 'अमेरिकेतील पगार' नसल्याने - किंबहुना, बिझनेस व्हिसावर अमेरिकेत उत्पन्न मिळविणे हेच मुळात बेकायदेशीर असल्याने - अमेरिकेत नोकरीसाठी आणलेल्या परकीय व्यक्तीस त्याच्या व्यवसायातील प्रचलित वेतनदरानुसार काही किमान वेतन देण्यासंबंधी जे कायदे आहेत, ते या भत्त्याला लागू नसत. (एच१-बी-खालील पगार हा 'पगार' असल्याने त्याला हे कायदे लागू असत.) मग काय विचारता फेका तोंडावर तुटपुंजे डॉलर, ठेवा लोकांना कशाही अवस्थेत, आणि पिळून घ्या हवे तसे नि शक्य तितके, म्हशीसारखे\n२ मालक, अमेरिकेच्या इमिग्रेशनबद्दल आणि त्यातल्या रेसिझमबद्दल एवढे तावातावाने बोलताय; एकदा देशी कंपन्यांच्या बिझनेस प्रॅक्टिसेसबद्दलसुद्धा बोला ना कधीतरी फार काही स्वच्छ इतिहास नाही तो\n वेगळ्या 'चार्जेबिलिटी एरिया' भानगडीमुळे भारतीयांना ग्रीनकार्ड मिळविण्याकरिता प्रचंड वेळ लागतो, म्हणून ग्रीनकार्ड सिस्टम वर्णद्वेष्टी आहे म्हणता. ठीक आहे.\nमला एक सांगा. पाकिस्तानी, बांग्लादेशी, श्री लंकन अथवा नेपाळी लोकांचा वर्ण हा भारतीय लोकांच्या वर्णापेक्षा फारसा वेगळा नसावा. (चूभूद्याघ्या.) मात्र, त्यांना ही वेगळ्या 'चार्जेबिलिटी एरिया'ची भानगड लागू पडत नाही; ते सर्वसाधारण 'चार्जेबिलिटी एरिया'खालीच मोडतात, नि त्यांना इतर बहुतांश देशांप्रमाणेच तुलनेने कमी वेळ लागतो.\nमुख्यभूमीवरील चिनी लोकांचा वर्ण हा तैवान, हाँगकाँग किंवा मकाउमधील चिनी लोकांपेक्षा फारसा वेगळा नसावा. (किंवा, सिंगापूरच्या चिनी लोकांहूनही फारसा वेगळा नसावा.) परंतु तरीही, ही वेगळ्या 'चार्जेबिलिटी एरिया'ची भानगड त्यांपैकी फक्त मुख्यभूमीवरीलच चिनी लोकांना लागू होते; तैवान, हाँगकाँग, मकाउ, किंवा सिंगापूरमधील चिनी लोकांना नव्हे.\nफार कशाला, सिंगापूरमध्ये जन्मलेल्या सिंगापुरी तमिळ जनतेला ही वेगळ्या 'चार्जेबिलिटी एरिया'ची भानगड लागू होत नाही.\nमग ही ग्रीनकार्ड सिस्टम वर्णद्वेष्टी कशी म्हणता\nलेखांचा एकंदरीत सूर \"अमेरिकन सरकारने फसवी आश्वासनं देऊन लाखो भारतीयाना ईथे आणलंय आणि काम करून झाल्यावर वाऱ्यावर सोडलंय\" असा आहे. तो कसा हे कळलं नाहीये. विशेषत: गेल्या बारा-पंधरा वर्षात, जेव्हा नेटवरनं कोणीही समग्र माहीती मिळवू शकतोय आणि २००७ च्या जवळपास रीअल ईस्टेटच्या बुडबुड्याने हाहाकार करून अगदी \"कल का बच्चा\" असलेल्यानाही शाश्वत असं काहीही नसतं हे नीट जाणवून दिलंय.\nHearts Suspended तल्या सारख्या बायकांची तगमग नक्कीच समजू शकतो. पण या मंडळींची \"आत्ता H४ वर नाही काम करता येणारे. पण लवकरच EDA गॅरेंटीड मिळेल\" अशी काही समजूत होती का\nवार्षिक ६५,००० व्हिसाच्या कोट्यातला बराचसा भाग भारतीयानी वापरल्यामुळे गेल्या काही वर्षात लाखो भारतीय ईथे आलेत आणि H१ -> ग्रीन कार्ड कन्वर्जन न झाल्यामुळे अडकलेत. यात वर्णद्वेष कुठून आला कंपन्या (वाटल्यास) ग्रीन कार्डसाठी जो काही खर्च लागेल तो करायची ऑफर देतात पण कुठलीही कंपनी H१ देताना ग्रीन कार्डची हमी देत नाही.\n\"बाकीच्या देशांसाठी ग्रीन कार्डची तारीख २०२० आहे पण भारतीयांसाठी २००९ आहे\".\n अहो बाकीच्या कुठल्याही देशातनं ईतक्या मोठ्या प्रमाणावर लोकं आलेली नाहीयेत. देशांप्रमाणे ग्रीन कार्डांची तारीख ॲडजस्ट नाही केली तर बाकीच्या देशातल्या लोकाना १५० काय ५०० वर्ष ग्रीन कार्ड मिळणार नाही\nजगण्याचे मूलभूत मानवाधिकार देखील एच - ४ व्हिसावरच्या लोकांना नाकारले गेले आहेत.\n H४ ची कुठलीही रिस्ट्रीक्शन्स लपवलेली नसतात. याची काही कल्पना नसणं हे २५ वर्षांपूर्वी ठीक होतं - \"मी अमेरिकेत शिकणाऱ्या / H१ वर काम करणाऱ्या मुलाशी लग्न करून अमेरीकेत गेले तर मला काय करता येईल / करता येणार नाही\" याची माहिती मिळणं फार कठीण होतं. पण गेल्या बारा-पंधरा वर्षात खूप काही माहीती भारतात घर बसल्या मिळू शकत होती. \"जाउया तर. काहीतरी करता येईलच नंतर\" अशा विचाराने येतात का लोकं ग्रीन कार्ड मिळणं दुरापास्त आहे म्हणून भारतीय यायचे कमी झालेत असं का होत नाही मग\n९ वर्षात १० विविध राज्यात वास्तव्य झालेले एक कुटुंब, माहितीत होते.\nH१ वर हजारो भारतीय अडकलेत, त्यामुळे त्यांची सोय बघणं अमेरिकेचं कर्तव्य आहे ही अपेक्षा हास्यास्पद आहे. अमेरिका हे भारतीयांविरूद्धच्या वर्णद्वेषापोटी करत्येय हा दावा पटत नाही. या मंडळींची कुचंबणा मी जाणतो. पण तरीही भारतातून येणाऱ्यांची रिघ कमी होत नाही कारण भारतात तितकी वाईट परिस्थिती आहे हे कारण त्यामागे आहे. अंतिम दर्शनाला जाता येत नाही तरीही कोणी \"मरो हा जॉब, मी चाललो परत\" असं म्हणून माघारी जात नाही कारण तिथे भयंकर अवस्था आहे हे कारण त्यामागे आहे. It is really sad. पोटासाठी माणसं काय काय करतात, \"जमेल काहीतरी\" म्हणून येतात आणि वर्षानुवर्ष अडकून पडतात, मुलांचं तरी मार्गी लागेल या आशेवर रहातात सग्गळं सग्गळं मान्य. पण ते अमेरिकेच्या वर्णद्वेषापोटी नाही तर हे सगळं सोसलेलं परवडलं कारण भारतात रहाणं त्याहून जिकिरिचं आहे या परिस्थितीमुळे.\nलिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....\nHearts Suspended तल्या सारख्या बायकांची तगमग नक्कीच समजू शकतो. पण या मंडळींची \"आत्ता H४ वर नाही काम करता येणारे. पण लवकरच EDA गॅरेंटीड मिळेल\" अशी काही समजूत होती का\nत्या बायकांची काय समजूत होती हे मला माहीत नाही. माझी काहीही समजूत नव्हती. मी २०११पासून H४वर आहे; आणि इतक्यात ती परिस्थिती बदलण्याची शक्यताही नाही. मी त्या आशेलाही लागलेले नाही.\n H४ ची कुठलीही रिस्ट्रीक्शन्स लपवलेली नसतात.\nहाच तो सरसकट अज्ञानातून आलेला माजोरी प्रतिसाद गोऱ्या लोकांनाच previlegeबद्दल, लब्धप्रतिष्ठीतपणाबद्दल का नावं ठेवावी\nमाझ्यासोबत काम करणारे अनेक गोरे उलट शिकलेल्या लोकांना दडपणाऱ्या व्यवस्थेविरोधात कळकळीनं बोलतात. गेल्या वर्षी व्हिजाची कागदपत्रं वेळेत आली नाहीत म्हणून मला दोन महिन्यांसाठी नोकरी थांबवावी लागली तेव्हा माझे दोन (गोरे, पुरुष, स्ट्रेट, पोरंबाळं असणारे, धडधाकट शरीराचे, पीएचड्या केलेले) मॅनेजर व्यवस्थेवर संतापले होते, आणि मी त्यांची समजूत काढत होते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nजगण्याचे मूलभूत मानवाधिकार देखील एच - ४ व्हिसावरच्या लोकांना नाकारले गेले आहेत.\nतुम्ही अमेरिकेला जाच ही सक्ती कोणी भारतीयांवर केली होती का देश त्यांचा, कायदा त्यांचा. त्याप्रमाणे ज्या काही तरतुदी असतील तसे नियम ते करतील. ते मान्य नसतील तर तिथे जाऊ नये. सौदी अरेबियामध्ये बायकांना बुरख्याची सक्ती असते म्हणून अनेकांची नोकरी तिकडे असली तरी ते एकटेच तिथे राहतात आणि त्यांच्या बायका भारतात राहतात हे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळेल. त्यांच्यावरही कोणी सौदीला जा अशी सक्ती केली नसेल तर भारतात राहायचा पर्याय त्यांच्याकडे असतो आणि त्याचा वापर ते करतात. पण एकदा तिकडे गेले तर मात्र तिकडच्या कायद्याची आणि नियमांची अंमलबजावणी करायलाच हवी. तीच गोष्ट अमेरिकेबद्दल.\n-- ट्रम्प हत्ती हे निवडणुक चिन्ह वापरतात म्हणून मी ट्रम्पसमर्थक हत्ती. भारतात आम्ही मायावतीसमर्थक तर अमेरिकेत ट्रम्पसमर्थक.\nदेशच नसावेत. कुठल्याच दृश्यादृश्य सीमारेषा नसाव्यात. समस्त मानवजातीचा रंग काहीतरी जेनेटिक उत्परिवर्तन घडवून सरसकट निळा बनवून टाकावा. सर्वांचीच चेहऱ्याची, शरीराची ठेवण एकसारखी करून टाकावी. सगळ्या भाषा विस्मृतीत जाऊन सगळ्यांनी शून्य आणि एक या भाषेत बोलावे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मानवजातीचा सर्व इतिहास कायमचा नष्ट करून टाकावा. बस\nतोपर्यंत यूएस विसा सिस्टिमबद्दल तक्रार करत बसण्यात अर्थ नाही.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : कथाकार, विनोदकार कॅ. गो. गं. लिमये (१८८१), लेखक विलिअम फॉकनर (१८९७), सिनेदिग्दर्शक रॉबर्ट ब्रेसॉं (१९०१), चित्रकार मार्क रॉथ्को (१९०३), संगीतकार दिमित्री शोस्ताकोव्हिच (१९०६), बखर वाङ्मयकार डॉ. र.वि. हेरवाडकर (१९१५), एरोस्पेस संशोधक सतीश धवन (१९२०), सिनेदिग्दर्शक सर्गेई बोन्दारचुक (१९२०), घटनातज्ज्ञ बॅरिस्टर नाथ पै (१९२२), नाटककार बाळ कोल्हटकर (१९२६), लेखक, वृत्तपत्रसंपादक माधव गडकरी (१९२८), सिनेदिग्दर्शक व अभिनेता फिरोझ खान (१९३९), क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी (१९४६), क्रिकेटपटू हॅन्सी क्रोन्ये (१९६९), अभिनेत्री कॅथरीन झीटा-जोन्स (१९६९), अभिनेत्री दिव्या दत्ता (१९७७)\nमृत्यूदिवस : गणितज्ञ योहान लँबर्ट (१७७७), पुरातत्त्वशास्त्रज्ञ लवी लॉरा ग्रॅब्रिएल मॉर्तीये (१८९८), किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर (१९५६), लेखक एरिक मारिया रमार्क (१९७०), नाटयदिग्दर्शक, अभिनेते कमलाकर सारंग (१९९८), 'ओरिएन्टलिझम'साठी ख्यात विचारवंत एडवर्ड सैद (२००३), कवी अरुण कोलटकर (२००४), नोबेल पारितोषिक विजेती पर्यावरणतज्ज्ञ वांगारी मथाई (२०११), लेखक शं. ना. नवरे (२०१३), लेखक अरुण साधू (२०१७)\n१४९३ : कोलंबस अमेरिकेच्या (त्याच्या दृष्टीने भारताच्या) दुसऱ्या सफरीवर निघाला. मरेपर्यंत तो अमेरिकेला भारतच समजत होता.\n१७८९ : अमेरिकन काँग्रेसने आपल्या संविधानात १२ बदल केले. यातल्या पहिल्या दहांना 'नागरिकांचा हक्कनामा' म्हणून ओळखले जाते.\n१५२४ : पोर्तुगीज भारताचा गव्हर्नर म्हणून वास्को-द-गामा भारतात आला. त्याचे इथेच निधन झाल्याने ही त्याची अखेरची भारतयात्रा ठरली.\n१९३० : जंगल सत्याग्रहात पनवेल तालुक्यातले १२ सत्याग्रही हुतात्मा झाले.\n१९१५ : 'होमरुल लीग' स्थापन करण्याचा अ‍ॅनी बेझंट यांचा निर्णय.\n१९१९ : रयत शिक्षण संस्थेची स्थापना.\n१९५६ : इंग्लंड आणि अमेरिका यांना अटलांटिकपार जोडणारी टेलिफोन केबल कार्यान्वित.\n१९६२ : अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.\n१९८१ : सांड्रा डे ओ'कॉनर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.\n१९८४ : सुवर्णमंदिरातील सर्व लष्कर काढून घेण्यात आले.\n१९९६ : तालिबान्यांनी काबूलचा ताबा घेतला.\n२००२ : अक्षरधाम मंदिरात कमांडो कारवाई.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/will-stand-with-india-in-every-crisis-will-not-tolerate-terrorist-acts-from-pakistan-joe-biden-127623210.html", "date_download": "2020-09-26T01:36:25Z", "digest": "sha1:5WS2AE64FFS4MMZGPAN57UGUFJ3NGX23", "length": 6058, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Will stand with India in every crisis, will not tolerate terrorist acts from Pakistan: Joe Biden | प्रत्येक संकटात भारतासोबत उभा राहीन, पाकमधून होणाऱ्या दहशतवादी कारवाया सहन करणार नाही : जो बायडेन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमेरिकी राष्ट्रपती निवडणूक:प्रत्येक संकटात भारतासोबत उभा राहीन, पाकमधून होणाऱ्या दहशतवादी कारवाया सहन करणार नाही : जो बायडेन\nहॅरिसपेक्षा जास्त भारतीय माझ्यासोबत : ट्रम्प\nजर ते जिंकले तर त्यांचे प्रशासन भारतासमोरील प्रत्येक धोका दूर करण्यासाठी त्यांच्यासोबत उभे राहतील, असे सांगत अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाचे डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध आणखी दृढ करण्याचे म्हटले आहे.\nबायडेन यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय-अमेरिका समूहाला सांगितले, मी १५ वर्षांपूर्वी भारतासोबत ऐतिहासिक असैन्य अण्वस्त्र करारास मंजुरी देण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व करत होतो. जर ते जिंकले तर भारत त्यांच्या सीमेत, भागात ज्या धोक्यांचा सामना करत आहे, त्याचा सामना करण्यासाठी ते सोबत राहतील. त्यांनी सांगितले की, मोहिमेचे नेतृत्व आमची लाडकी मैत्रीण (कमला हॅरिस) करतेय. त्या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या भारतीय-अमेरिकी उपराष्ट्रपती असतील. आम्हाला माहीत आहे, त्या हुशार आहेत. मात्र, एक गोष्ट जी कमला यांना एवढी प्रेरणादायी बनवते ती आहे त्यांच्या आईची अमेरिकेत येण्याची गोष्ट, जी भारतात सुरू झाली. त्यांच्या धैर्याने त्यांच्या मुलींना येथपर्यंत पोहोचवले. तसेच डेमोक्रॅट्सच्या धोरणात्मक वक्तव्यात पाककडे इशारा करत म्हटले आहे, सीमेपलीकडच्या दहशतवादी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत.\nहॅरिसपेक्षा जास्त भारतीय माझ्यासोबत : ट्रम्प\nराष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी न्यूयॉर्क पोलिसांच्या कार्यक्रमात सांगितले की, बायडेन जर राष्ट्राध्यक्ष झाले तर ते प्रत्येक पोलिस विभागाला चकवण्यासाठी एक कायदा मंजूर करतील. बहुतेक कमलाही असेच करतील. त्यांची भारतीय पार्श्वभूमी असली तरी माझ्यासोबत त्यांच्यापेक्षा जास्त भारतीय आहेत. विलिमंग्टनमध्ये प्रचारावेळी चर्चा करताना बायडेन आणि हॅरिस.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/astro/maza-adhyatma/prof-rajkunwar-sonawane/spiritual/articleshow/57610898.cms", "date_download": "2020-09-26T00:58:08Z", "digest": "sha1:GLUKRLB5AJR3ONDV6EDTXJBETYPSHBIX", "length": 22843, "nlines": 224, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nस्वातंत्र्यपूर्व काळात देशवासीयांच्या मनात स्वातंत्र्याची भावना चेतवतानाच त्यांच्या प्रबोधनाचे, आध्यात्मिक दिशादर्शनाचे कामही झाले. स्वामी विवेकानंद, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधीजी हे त्यात अग्रेसर होते. तिघे कर्तबगारीने अतिशय थोर. भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचे गाढे अभ्यासकही. मात्र, आपल्या संस्कृतीची थोरवी गाण्यावरच त्यांनी कधीही भर दिला नाही.\nस्वातंत्र्यपूर्व काळात देशवासीयांच्या मनात स्वातंत्र्याची भावना चेतवतानाच त्यांच्या प्रबोधनाचे, आध्यात्मिक दिशादर्शनाचे कामही झाले. स्वामी विवेकानंद, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधीजी हे त्यात अग्रेसर होते. तिघे कर्तबगारीने अतिशय थोर. भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचे गाढे अभ्यासकही. मात्र, आपल्या संस्कृतीची थोरवी गाण्यावरच त्यांनी कधीही भर दिला नाही. मूल्यविवेकाच्या निकषांवर त्यांनी परंपरा स्वीकारल्या, त्याज्य भाग नाकारला, अनिष्ट प्रथांविरुद्ध उभे राहिले आणि मानवतेची, दीनदुबळ्यांची, पीडितांची सेवा केली. धर्माचा खरा अर्थ त्यांनी कृतीद्वारे दाखवून दिला.\nत्यांच्या काळात इंग्रजांची सत्ता ‌स्थिरावली होती. देशात प्रचंड निरक्षरता होती. इंग्रजांनी विद्यापीठांद्वारे आधुनिक शिक्षण सुरू केले असले, तरी ते मूलतः त्यांची गरज भागविण्यासाठीचे होते. शिक्षण, धर्म यांबाबत गोंधळ होता. विवेकानंदांनी तो दूर केला. ते म्हणत, की धर्म म्हणजे माणसातील दैवीशक्तीचा आविष्कार आणि शिक्षण म्हणजे माणसातील पूर्णत्वाचा आविष्कार. अंतर्मनातील आध्यात्मिक शक्ती जागृत झाल्याशिवाय माणसाला पूर्णत्व येत नाही. खऱ्या अर्थाने कोणी कोणाला शिकवू शकत नाही. एखाद्याला रोपट्याचा जसा आपोआप विकास होतो, तसाच बालकाचाही होतो. शिक्षकाचे काम एवढेच की त्याच्या सुप्तशक्तींना जागृत करणे, योग्य वातावरण निर्माण करणे, सुरक्षितता देणे, त्याच्या मार्गातील अडथळे दूर करणे. विवेकानंद जे सांगत, ते आजच्या ज्ञानरचनावादाहून वेगळे नव्हते.\nशिक्षणातून चारित्र्य निर्माण झाले पाहिजे. बंधुत्वाची भावना विकसित झाली पाहिजे. चारित्र्य निर्मितीचा दुसरा भाग म्हणजे प्रेम, इतरांच्या सुखदुःखाबद्दल आत्मीयता. केवळ बौद्धिक विकास म्हणजे शिक्षण नाही. त्यामुळे स्वार्थ व स्पर्धावृत्तीचा विकास होतो, अंतःकरणातील मानवतेचा विकास म्हणजे खरे शिक्षण. टागोर म्हणत, की भौतिक समृद्धीऐवजी आध्यात्मिक प्रकाशाने जीवन उजळून निघते. संपूर्ण जीवनाशी संबंध प्रस्थापित करणारे शिक्षण म्हणजे खरे शिक्षण. शिक्षण म्हणजे आविष्कार. निसर्गातील वस्तू, निसर्गाचे बदलते रूप रंग मुलांनी बघावेत; कारण निसर्गाच्या सहवासात मानवाला आध्यात्मिक सत्याचा परमेश्वराच्या अस्तित्वाचा साक्षात्कार होऊ शकतो. शिक्षणाच्या सर्व अंगावर मौलिक विचार प्रकट करून टागोरांनी शिक्षणविषयक साहित्यात त्यांनी मोठी भर घातली. गुरूकुलाच्या धर्तीवर शांतिनिकेतन स्थापन करून, शाळांमधील कृत्रिम वातावरण नष्ट करून त्यांनी आपल्या संस्कृतीला अनुरूप शाळांची निर्मिती कशी करावी, याचा आदर्श घालून दिला.\nसत्यम्, शिवम् व सुंदरम् ही भारतीय तत्त्वज्ञानाची त्रिसूत्री. गांधीजींचा सत्य आणि शिवम वर भर होता. तर रवींद्रनाथांचे या दोन्ही बरोबरच सुंदरम् या पैलूवर लक्ष होते. भारतीय तत्त्वज्ञानातील अद्वैतावर गांधीजींची श्रद्धा होती. प्रत्येक प्राणी हा ईश्वराचा अंश असल्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त ईश्वराचा शोध घेताच येणार नाही. दुःखी कष्टी लोकांकडे पाठ फिरवून वा त्यांची सेवा न करता मनुष्याचा आध्यात्मिक विकास होऊच शकणार नाही. आत्मा आणि मन यांचा परिपूर्ण विकास आणि बालकामधील सर्वोत्कृष्ट गुणांची अभिव्यक्ती हे शिक्षणाचे ध्येय असावे. खरे बौद्धिक शिक्षण हे हात, पाय, डोळे व नाक आदींच्या वापरातूनच होऊ शकते. त्यासाठी त्यांनी ही कल्पना मांडली. जे शिक्षण जीवनातील निरनिराळया समस्यांना तोंड द्यायला उपयोगी पडू शकत नाही, त्या शिक्षणाचा सामान्य माणसांना उपयोग काय शिक्षणाला पुस्तकी अभ्यासक्रमातून बाहेर काढून त्याला कृतीची आणि व्यावसायिक शिक्षणाची जोड देवून श्रमजीवी आणि बु‌द्धिजीवी वर्गातील अंतर कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ही त्यांनी शिक्षणाला दिलेली अमोल देणगी आहे.\nकालानुरूप शिक्षणात बदल होत जातात हे मान्य आहे; पण शाश्वत मूल्ये बदलत नाहीत. आज शिक्षणाहून आदर्श, परिपूर्ण माणूस घडत नाही, तर कौशल्याधारित, यांत्रिक, एकांगी व भावनाशून्य यंत्रमानव बाहेर पडत आहेत. शाश्वत नैतिक मूल्यांचा विसर पडत चालला आहे. विवेकानंद, टागोर, गांधीजी यांच्या शिक्षणविचाराची कास धरणे म्हणूनच आवश्यक वाटते आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nस्त्री शक्ती आणि समाज...\nस्त्री शक्ती आणि समाज महत्तवाचा लेख\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nकार-बाइकदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nमोबाइल४.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास\nकरिअर न्यूजविद्यापीठाच्या ATKT परीक्षेला तांत्रिक अडचणीचा फटका\nदेश'चीन, पाकला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद भारतीय हवाई दलात'\nमुंबईअनलॉकसाठी आहे 'ही' त्रिसुत्री; CM ठाकरेंनी सांगितले पुढचे धोके\nअर्थवृत्तसोने दरात घसरण सुरूच; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त\nन्यूजड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nआयपीएलChennai vs Delhi: पृथ्वी सावने केली गोलंदाजाची धुलाई, चेन्नईपुढे मोठे आव्हान\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-26T02:29:05Z", "digest": "sha1:TUBLTYBMEPOMNKV7UAT6WH2ZQPLBYLKU", "length": 10298, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जंगली वराहाच्या हल्ल्यात एक युवक ठार, एक जखमी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nजंगली वराहाच्या हल्ल्यात एक युवक ठार, एक जखमी\nपिता-पुत्र सातपुड्यातील जामुन-झिरा येथील.\nजळगाव: सातपुड्यातून पिता व पुत्र घरी येत असताना जंगली वराह तथा डुकराच्या हल्ल्यात जामुनझिरा येथील 16 वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी १२ वाजेच्या सुमारास घडली. तरी या हल्ल्यात मुलाला वाचवितांना वराहासोबत झालेल्या झटापटित वडील सुद्धा जबर जखमी झाले असुन त्यांना त्यास पुढील उपचारार्थ जळगावला रवाना केल्याची माहिती डॉक्टर बारेला यांनी दिली.\nरविवारी दुपारी 11 ते 12 वाजेच्या सुमारास सातपुडा पर्वतातील जामुनझिरा येथील पिता-पुत्र अनुक्रमे साबासिंग रेंजला बारेला (वय 45 ) राजू साबासिंग बारेला (वय 16) हे दोघं मध्यप्रदेशातील गोट्या या गांवाहून जामुनझिरा येथे येत असताना यावल तालुक्यातील आंबापाणी या गावाच्या खाली अंदाजे एक किलोमीटर अंतरावर एका रानटी वराहाने अचानक प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात राजू साबासिंग बारेला (वय 16) हा जागीच ठार झाला, त्यानंतर त्याचे वडील सांबासिंग रेंजला बारेला यांनी जोरदार झुंज देऊन झटापटी करुन रानटी डुकराला जागीच ठार केले, या झटापटीत सभा सिंग बारेला सुद्धा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपस्थित नागरिकांनी यावल ग्रामीण रुग्णालयात तात्काळ आणून औषध उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना केले.\nया घटनेची माहिती मिळताच मोहराळा तालुका यावल येथील पोलीस पाटील युवराज जयसिंग पाटील, दहिगाव येथील माजी सरपंच देविदास धांगो पाटील, श्यामराव अशोक पाटील, लहू रामचंद्र पाटील, गजानन मुरलीधर पाटील, यांच्यासह यावल पश्चिम वनक्षेत्रपाल विशाल कुटे, वनपाल असलम खान,व्ही.के.बोराडे, वनरक्षक किरण गजरे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पुढील मदत कार्य केले, मयताचासह जखमी व घटनेचा पंचनामा यावल पोलिसांनी केला शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयातील डॉ. प्रल्हाद पवार यांनी केले. या घटनेमुळे यावल तालुक्यात तथा सातपुडा वनक्षेत्रातील आदिवासी बांधवांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.\nपाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांचा पगार कोरोनासाठी: मंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा\nमनपा रुग्णालयात नियमीत आरोग्य तपासणी सुरू\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nमनपा रुग्णालयात नियमीत आरोग्य तपासणी सुरू\nडॉ.सागर गरुड आणि सिद्धार्थ लुनिया मित्र परिवारातर्फे किराणा मालाचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/these-three-activities-pune-zp-are-now-statewide-341605", "date_download": "2020-09-26T01:39:00Z", "digest": "sha1:BASMKXYSG34KFXQPVOMGZDSC4M4STLGB", "length": 18829, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुणे झेडपीचे हे तीन उपक्रम आता राज्यभर | eSakal", "raw_content": "\nपुणे झेडपीचे हे तीन उपक्रम आता राज्यभर\nपुणे जिल्हा परिषदेने यंदा प्रथमच राबविलेल्या घर घर गोठा, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेली खासगी कंपनी या तीन उपक्रमांची राज्याच्या ग्रामविकास खात्याने दखल घेतली आहे. हे तीनही उपक्रम केंद्र पुरस्कृत विविध योजनांच्या निधीच्या माध्यमातून अंमलात आणण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे झेडपीचा हाच पॅटर्न राज्यभर लागू करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत.\nपुणे - पुणे जिल्हा परिषदेने यंदा प्रथमच राबविलेल्या घर घर गोठा, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेली खासगी कंपनी या तीन उपक्रमांची राज्याच्या ग्रामविकास खात्याने दखल घेतली आहे. हे तीनही उपक्रम केंद्र पुरस्कृत विविध योजनांच्या निधीच्या माध्यमातून अंमलात आणण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे झेडपीचा हाच पॅटर्न राज्यभर लागू करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nयानुसार या तीनही योजनांची सखोल माहिती घेण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे स्वत: या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचे सादरीकरण पाहणार आहेत. हे सादरीकरण करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांना मंत्रालयात आमंत्रित करण्यात आले आहे. येत्या ९ सप्टेंबरला हे सादरीकरण केले जाणार आहे. यासाठी दरम्यान, यासाठी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, उपसचिव, रोजगार हमी योजना विभागाचे उपसचिव आणि पंचायतराज विभागाच्या उपसचिवांना आमंत्रित करण्यात आले आहे. ९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात हे सादरीकरण होणार असल्याचे मुश्रीफ यांचे खासगी सचिव रवींद्र पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेला बुधवारी (ता.२) पत्राद्वारे कळविले आहे.\nप्रवासी पासला मुदतवाढ देण्याबाबत पीएमपीने घेतला मोठा निर्णय; वाचा सविस्तर\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारांना रोजगार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुभत्या जनावरांसाठी गोठे उपलब्ध करून देणे, अशा दुहेरी उद्देशाने घर घर गोठा हा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. यासाठी केंद्र पुरस्कृत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गोठ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे झाडे लावण्यासही प्रोत्साहन मिळाले आहे.\nVideo : अखेर पुणेकरांची इच्छा झाली पूर्ण; तब्बल पाच महिन्यांनी केला 'पीएमपी'तून प्रवास\nत्यानंतर चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्येकी एक अँब्युलन्स खरेदी करण्यात आली आहे. यामुळे सर्व आरोग्य केंद्रांना हक्काच्या नव्या कोऱ्या अँब्युलन्स मिळालेल्या आहेत. यासाठी प्रती अँब्युलन्स २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.\nयाशिवाय जिल्ह्यातील गावां-गावातील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी पुणे जिल्हा परिषदेने स्वतंत्र खासगी व विश्र्वस्त कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीला परवानगी मागणारा प्रस्ताव नुकताच ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या या तीनही उपक्रमांची प्राथमिक माहिती मुश्रीफ यांनी घेतली आणि त्यानंतर हे उपक्रम राज्यभर राबविण्यात येतील का, याची चाचपणी सुरू केली. यासाठी या विषयावर खास सादरीकरण ठेवण्यात आले आहे.\n- रेल्वेरुळाभोवतीच्या झोपड्या तीन महिन्यांत हटवा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश​\nपुणे जिल्हा परिषदेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु केलेल्या तीन नाविण्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण येत्या ९ सप्टेंबरला करण्याबाबत ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला कळविले आहे. याबाबतच्या पत्रात घरघर गोठे, अँब्युलन्स खरेदी आणि खासगी कंपनी या उपक्रमांचा खास उल्लेख करण्यात आला आहे.\n- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएक गाणं गुणगुणते आहे काही दिवस झाले. अक्षरं आहेत काही जुळून आलेली. तारारी तारारी तारारू एक म्हणणं आहे बऱ्याच दिवसांपासून. छोट्याशा...\nपुणे : ५८ वर्षानंतर झेडपी अध्यक्षांच्या बंगल्याचं झालं 'बारसं'\nपुणे : जिल्हा परिषदेच्या पुण्यातील सरकारी बंगल्याला आता 'शिवाई' हे नाव देण्यात येणार आहे. या नव्या नावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी...\nपुण्यातील रिक्षाचालकांनी घेतला बंदचा पवित्रा; उद्याच्या बैठकीत होणार निर्णय\nपुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे वाहतुकीवर आलेल्या मर्यादेमुळे उत्पन्न अर्ध्यापेक्षा कमी झाले आहे. राज्य सरकार रिक्षाचालकांच्या प्रश्‍...\nबंगल्यासाठी डीएसकेंच्या ६ वर्षीय नातवाची न्यायालयात धाव\nपुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेतून बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके)...\nपिंपरी-चिंचवड शहरात आज 49 जणांचा मृत्यू\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी 856 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 74 हजार 116 झाली आहे. आज 931 जणांना...\nदलालांची दुकाने बंद झाल्याने तीळपापड; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची विरोधकांवर टीका\nउरुळी कांचन (पुणे) : नरेंद्र मोदी सरकारने कृषी विधेयक अंमलात आणून शेतकऱ्यांना दलालांपासून मुक्ती मिळवून दिली आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/earthquake-magnitude-27-occurred-98-km-north-mumbai-342137", "date_download": "2020-09-26T03:21:39Z", "digest": "sha1:5MJ4LQ444P6NGZPWVMBBORHRI46Y34YR", "length": 14775, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुंबईसह पालघरमध्ये भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये घबराट | eSakal", "raw_content": "\nमुंबईसह पालघरमध्ये भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये घबराट\nउत्तर मुंबईत पहाटेच्या सुमारास २.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवल्याचं समजतंय. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईला सौम्य भूकंपाचे धक्के बसले आहेत. पालघरनंतर आता मुंबई आणि नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के बसले.\nमुंबईः उत्तर मुंबईत पहाटेच्या सुमारास २.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवल्याचं समजतंय. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईला सौम्य भूकंपाचे धक्के बसले आहेत. पालघरनंतर आता मुंबई आणि नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के बसले. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पालघरमधील बोर्डी झाई परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एकापाठोपाठ एक दोन भूकंपाचे धक्के जाणवले.\nपहिला भूकंपाचा धक्का ११ वाजून ४२ सेकंदच्या दरम्यान बसला. २८ मिनिटाच्या अंतराने १२ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचा दुसरा मोठा धक्का बसला. या धक्क्याची तीव्रता जबरदस्त असल्यामुळे मध्यरात्री नागरिक घाबरुन होऊन जागे झाले आणि घराबाहेर आले.\nअधिक वाचाः विद्यार्थ्यांनो ही खास बातमी तुमच्यासाठी, स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक जाणून घ्या\nमुंबईत 24 तासांत दोन वेळा भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर मुंबईमध्ये शनिवारी सकाळी 6.36 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. 2.7 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता असल्याची माहिती मिळाली आहे. पालघर जिल्ह्यात येणाऱ्या भूकंपानंतर आता मुंबईतही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. दुसरीकडे भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं आहे.\nहेही वाचाः मुंबईत उन्ह्याच्या झळा; तापमान 34 अंशाजवळ, जाणून घ्या येत्या दोन दिवसात कसं असेल तापमान\nयाआधी गेल्या महिन्यात पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पालघरमध्ये झालेल्या या सौम्य भूकंपामुळे कोणतंही नुकसान झालं नाही. पालघर जिल्ह्यात 2.8 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाली नव्हती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांचा कोविड क्रुसेडर्स 2020 अवॉर्डने गौरव\nमुंबई, ता.25 : इंडो अमेरिका चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा कोविड क्रुसेडर्स अवॉर्ड 2020 या पुरस्काराने...\n1 ऑक्टोबरपासून मुंबई प्रवेश महागणार, मुंबईत प्रवेश करणाऱ्यांवर 'टोल'वाढ\nमुंबई : मुंबईत प्रवेश घेण्यासाठी आता वाहन चालकांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मुंबईत खासगी वाहनाने ये जा करणाऱ्यांना आता १ ऑक्टोबर पासून...\nबळीराजासाठी लालपरी जाणार बांधावर दुसऱ्या टप्प्यात आंतरराज्य सेवा\nसोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा हजार बसचा पसारा सांभाळणारी लालपरी कोरोनाच्या संकटामुळे खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यात मागे पडली आहे....\n10 वाजताच्या परीक्षेची लिंक विद्यार्थ्यांना दुपारी 12 वाजेपर्यंत मिळालीच नाही, विद्यार्थ्यांकडून संताप\nमुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका शुक्रवार ( ता.25) पासून सुरु झालेल्या एटीकेटी परीक्षेला बसलेल्या...\nआश्रमशाळांचे गतवर्षीचे परिपोषण अनुदान तत्काळ द्या...\nइस्लामपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वित्त विभागाने संगणकप्रणाली बिल पोर्टल बंद केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांचे गतवर्षीचे परिपोषण अनुदान थकित...\nलग्नाबाबतचा ट्रेंड बदलतोय ; 76 टक्के मराठी तरुण, तरुणी स्वत:च लग्नाचा निर्णय घेतात\nमुंबई, ता. 25 ; मुला, मुलीसाठी जोडीदाराची निवड पांरपारीक रीतीने आई वडील किंवा घरातील जेष्ठ मंडळी करतात. मात्र अलिकडे हा ट्रेंड बदलत चालला आहे. आता...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/uco-bank-sends-notices-to-kingfisher-1037129/", "date_download": "2020-09-26T03:27:16Z", "digest": "sha1:DLWTI3JSGDCPOGBA24OZDW35U5QGSNAW", "length": 10338, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "किंगफिशरला अखेर यूको बँकेची नोटीस | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nकिंगफिशरला अखेर यूको बँकेची नोटीस\nकिंगफिशरला अखेर यूको बँकेची नोटीस\nकर्जबुडवे (विलफुल डिफॉल्टर) म्हणून जाहीर करण्यासाठी विजय मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला अखेर सार्वजनिक यूको बँकेने नोटीस बजाविली आहे.\nकर्जबुडवे (विलफुल डिफॉल्टर) म्हणून जाहीर करण्यासाठी विजय मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला अखेर सार्वजनिक यूको बँकेने नोटीस बजाविली आहे. किंगफिशरबरोबरच मल्या यांच्या मालकीच्या युनायटेड बेव्हरेजेसलाही कर्जबुडवे का जाहीर करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस पाठविली आहे.\nकिंगफिशरला कर्जबुडवे जाहीर करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत बँकेने गेल्याच आठवडय़ात दिले होते. त्यानुसारच ही नोटीस पाठविल्याचे बँक सूत्रांनी सांगितले. कर्जाच्या बदल्यात मल्या यांनी कंपनी हमी दिली होती, असेही संबंधित बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. मल्या यांना यापूर्वी अशी नोटीस युनायटेड बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक यांनीही पाठविली आहे. तर यूको बँकेचे कंपनीकडे ३०० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nविजय मल्ल्याचा पासपोर्ट रद्द करण्याची ‘ईडी’ची मागणी\nमल्ल्यांनी ‘ईडी’ला तिसऱ्यांदा टाळले, मे महिन्यापर्यंत मुदतीची मागणी\nविजय मल्ल्या फरारी घोषित\n‘ईडी’ची विजय मल्ल्यांविरुद्ध कारवाईला सुरूवात; १४११ कोटींची मालमत्ता जप्त\nअटक वॉरंटसाठी मल्यांविरोधात इंटरपोलने स्पष्टीकरण मागितले\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 अ‍ॅक्सिस बँकेकडून ‘आऊटवर्ड रेमिटन्स’ सुविधा\n2 सेन्सेक्स, निफ्टीचे सर्वोच्च शिखर\n3 बांधकाम क्षेत्राला अपेक्षित ‘धन इंधन’\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/elections-news/caste-politics-by-coalition-government-1883455/", "date_download": "2020-09-26T01:53:12Z", "digest": "sha1:GVMZZV4OBWNHB2U6DIKMRXQXSJ33RI7P", "length": 11883, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Caste politics by coalition government | युती सरकारकडून जाती-पातीचे राजकारण | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nयुती सरकारकडून जाती-पातीचे राजकारण\nयुती सरकारकडून जाती-पातीचे राजकारण\nमोदी आणि शहा या जोडगोळीने संपूर्ण देशाची वाट लावली आहे.\nनाशिक येथे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेली दुचाकी फेरी\nडॉ.अमोल कोल्हे यांची टीका\nमोदी आणि शहा या जोडगोळीने संपूर्ण देशाची वाट लावली आहे. देशाबरोबरच महाराष्ट्रातही जाती-पातीचे राजकारण करून तेढ निर्माण करण्याचे काम युती सरकारने केले असल्याची टीका अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.\nनाशिक लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सकाळी शहर परिसरातून कोल्हे यांच्या उपस्थितीत दुचाकी फेरी काढण्यात आली. जुने सिडकोतील लेखानगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फेरीला सुरुवात झाली. शिवाजी चौक, महाराणा प्रताप चौक, विजय नगर, उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक, कॅनडा कॉर्नर, राजीव गांधी भवन, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजामार्गे जुना आडगाव नाका येथे फेरीचा समारोप झाला. यावेळी कोल्हे यांनी भाजपवर टीका केली. पाच वर्षांत कोणताही विकास या सरकारने केलेला नसल्याने या सरकारने आता शहीद जवानांच्या नावाखाली मत मागण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत सर्वच राजकारण्यांनी जाहीरनामे केले, पण समीर भुजबळ यांनी शपथपत्र सादर केले आहे. शपथ पूर्ण केल्याशिवाय ते राहणार नाहीत, असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.\nया दुचाकी फेरीत समीर भुजबळ, माजी आमदार जयवंत जाधव, डॉ. अपूर्व हिरे, कोंडाजीमामा आव्हाड, शरद आहेर, गजानन शेलार, डॉ. हेमलता पाटील, गुरमीत बग्गा, लक्ष्मण जायभावे आदी सहभागी झाले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटॅग लोकसभा निवडणूक २०१९\nModi 2.0: राष्ट्रपती भवनात आज रोगनजोश, बिर्यानी आणि टिक्का\nरामदास आठवलेंना पंतप्रधान कार्यालयातून फोन, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण\nमोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान \nदुसऱ्यांदा मंत्रिपदामुळे गडकरींकडून अपेक्षा वाढल्या\nशिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे मतदान प्रक्रियेत घोळ\n2 मी उमेदवार : ठाणे\n3 एकाच दिवसात बावीस गावांचा दौरा\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/bcci-to-meet-on-no-pakistan-at-world-cup-stance-icc-watches-on-1845769/", "date_download": "2020-09-26T01:10:27Z", "digest": "sha1:UX7R3AAJGPABMKTWEEYRQMGQTUJAK2FB", "length": 11729, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BCCI to meet on ‘no-Pakistan at World Cup’ stance, ICC watches on | पाकिस्तानला रोखण्यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार नाही | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nपाकिस्तानला रोखण्यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार नाही\nपाकिस्तानला रोखण्यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार नाही\nभारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना न खेळण्याचीही मागणी जोर धरत आहे.\nपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यास बंदी घालावी किंवा भारताने तरी या स्पर्धेतून माघार घ्यावी, अशी मागणी गेल्या काही दिवासांपासून क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांकडून होत आहे. मात्र, वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानवर बंदी घालण्यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) किंवा प्रशासकीय समितीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) कोणतेही पत्र लिहिलेले नाही असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानवर बंदी घालण्याची मागणी भारताने केल्यास ती ‘आयसीसी’ फेटाळू शकेल. भारतीय संघाचा १६ जूनला मँचेस्टर येथे पाकविरुद्ध सामना होणार आहे.\nआयसीसीच्या घटनेनुसार पात्र ठरलेल्या कोणत्याही राष्ट्राला सहभागी होण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना विश्वचषकापासून रोखण्यासाठी कोणताही नियम साह्य ठरणार नाही, असे ‘बीसीसीआय’च्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या नेमबाजांना दिल्ली येथे चालू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी व्हिसा मिळालेला नाही. याचप्रमाणे विश्वचषकामधील पाकिस्तानविरुद्धच्या लढती भारताने खेळू नये, अशी मागणी होत आहे.\nपुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रभाव भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडूंवरही झाला आहे. या हल्ल्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग सारख्या अनेक बड्या खेळाडूंनी पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडण्यात यावे असा पवित्रा घेतला. तसेच भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना न खेळण्याचीही मागणी जोर धरत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 विश्वचषकातून ऑलिम्पिक कोटाच रद्द\n2 मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राचा संघर्षपूर्ण विजय\n3 बॅडमिंटनपटू घडवणारा उत्तुंग ‘मनोरा’\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navneet-news/home-treatment-of-sheep-diseases-210968/", "date_download": "2020-09-26T03:25:34Z", "digest": "sha1:EUPJSUKUJX3UT4LNEEIDDUZA57MM77LI", "length": 25624, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कुतूहल – मेंढय़ांच्या आजारावरील घरगुती उपाय | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nकुतूहल – मेंढय़ांच्या आजारावरील घरगुती उपाय\nकुतूहल – मेंढय़ांच्या आजारावरील घरगुती उपाय\nमेंढपाळाला मेंढय़ांना होणाऱ्या काही सर्वसामान्य आजारांवर घरगुती उपाय माहीत असायला हवेत. हिरवा चारा जास्त खाल्ल्याने किंवा शिळे अन्न खाल्ल्याने पोटफुगी होत असते.\nमेंढपाळाला मेंढय़ांना होणाऱ्या काही सर्वसामान्य आजारांवर घरगुती उपाय माहीत असायला हवेत. हिरवा चारा जास्त खाल्ल्याने किंवा शिळे अन्न खाल्ल्याने पोटफुगी होत असते. अशा मेंढीस गोडेतेल १०० मिली व टर्पेटाइन १ चमचा यांचे मिश्रण किंवा ५० ग्रॅम सुंठ व ३० ग्रॅम खाण्याचा सोडा यांचे मिश्रण पाजावे. यामुळे पोटफुगी कमी होऊन मेंढीस आराम पडतो.\nमेंढय़ांमध्ये परोपजीवी जंतूंचा संसर्ग झाल्याने किंवा दूषित पाणी पिल्याने हगवण होते. अशा वेळी बाधित मेंढय़ांना १० ग्रॅम कात, २० ग्रॅम खडूची भुकटी, ५ ग्रॅम सुंठपूड व पाणी यांचे मिश्रण पाजावे. तसेच अशक्तपणा दूर करण्यासाठी मीठ, साखर, पाणी यांचे मिश्रण दिवसातून चार-पाच वेळा पाजावे आणि चिंचेचा व िलबाचा पाला घालावा.\nमेंढय़ांना सर्दी झाल्यास अथवा त्यांचे नाक वाहत असल्यास निलगिरी तेलाची वाफ द्यावी. डोके व नाक यावर तूप, काळे मिरे व लसूण यांचे मिश्रण लावावे. कापूर, मध व अडुळशाच्या पानाचा रस यांचे समभाग करून एका वेळेस १० ग्रॅम खायला द्यावे. मेंढय़ांना काही कारणाने जखम झाल्यास तंबाखू व खाण्याचा भिजलेला चुना यांचे मिश्रण जखमेवर लावून पट्टी करावी किंवा खाण्याचा चुना, हळद व फुलवलेली तुरटी यांचे मिश्रण जखमेवर लावावे.\nमेंढय़ांना खरूज झाल्यास खरजेच्या खपल्या रक्त येईपर्यंत ब्लेडने खरडवून काढाव्यात. त्यावर कॉपर सल्फेट व करंजी तेल यांचे मिश्रण दर दोन दिवसांच्या अंतराने बरे होईपर्यंत लावावे.\nमेंढय़ांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव आढळल्यास तंबाखूचा अर्क २५ ग्रॅम व ५ टक्के मोरचुदाचे द्रावण तयार करून प्रत्येक मेंढीस ५० मिली पाजावे. मेंढीच्या पायाचे हाड मोडल्यास मोडलेल्या जागी अंडे व विटांची पावडर यांचे मिश्रण लावावे. त्यावर मेंढीच्या लोकरीचे आवरण करून बांबूच्या पट्टय़ांनी १५ दिवस बांधून ठेवावे.\nमेंढय़ांच्या शरीरावर उवा, गोचीड झाल्यास करंज तेल, मीठ यांचे समभाग व पाणी यांचे मिश्रण मेंढीच्या शरीरावर लावावे किंवा तंबाखू पाण्यात उकळून त्याचे द्रावण शरीरावर लावावे. त्यामुळे उवा, गोचीड गळून पडतात.\nजे देखे रवी..- पक्ष आणि प्रतिपक्ष\nया जगात दोन पक्ष आहेत. एक देवावर विश्वास ठेवणारा आणि दुसरा न ठेवणारा त्यातला दुसरा पक्ष मधून मधून ओरडतो पण बहुतांशी गप्प आहे. कारण जनमताचा प्रचंड रेटा पहिल्या पक्षाच्या बाजूचा आहे. श्रद्धा म्हणजे काय आणि अंधश्रद्धा म्हणजे काय याबद्दलही वाद आहे. अंधश्रद्धेमुळे माणूस बळी वगैरे देतो माणसांचेही देतो ते वाईट इथपर्यंत आपण आलो आहोत, पण परवडत नसताना श्रद्धेपोटी (कोठल्याही धर्मात) अवास्तव खर्च करणे आणि मग आपल्या आहार आणि आरोग्यासारख्या मूलभूत गरजांवर मर्यादा आणून निकृष्ट जीवन जगणे हे अयोग्य आहे, असे म्हणण्याची आपली अजून हिंमत नाही. एक तिसराही पक्ष आहे. तो जबाबदारी झटकतो. मला या बाबतीत काही समजत नाही, असे म्हणतो. त्यात दोन डगरीवर उभा राहण्याचा प्रयत्न असतो. याला पळपुटेपणा म्हणायचे की प्रामाणिक कबुली म्हणायचे याबद्दलही वाद आहे. अंधश्रद्धेमुळे माणूस बळी वगैरे देतो माणसांचेही देतो ते वाईट इथपर्यंत आपण आलो आहोत, पण परवडत नसताना श्रद्धेपोटी (कोठल्याही धर्मात) अवास्तव खर्च करणे आणि मग आपल्या आहार आणि आरोग्यासारख्या मूलभूत गरजांवर मर्यादा आणून निकृष्ट जीवन जगणे हे अयोग्य आहे, असे म्हणण्याची आपली अजून हिंमत नाही. एक तिसराही पक्ष आहे. तो जबाबदारी झटकतो. मला या बाबतीत काही समजत नाही, असे म्हणतो. त्यात दोन डगरीवर उभा राहण्याचा प्रयत्न असतो. याला पळपुटेपणा म्हणायचे की प्रामाणिक कबुली म्हणायचे देवाच्या बाबतीत तीन प्रकार असतात. एकात देव व्यक्ती सदृश असतो. तो हे सगळे घडवितो त्याचा व्यवहार सांभाळतो, न्याय-निवाडा करतो, शिक्षा देतो किंवा स्वर्गात पोहोचवितो. या देवाचे सर्वत्र बारीक लक्ष असते. हा देव पृथ्वीचाच नव्हे तर विश्वाचा देव आहे आणि ग्रह-तारेही त्याच्याच राज्यात अंतर्भूत आहेत. दुसरा प्रकार आहे. एका अज्ञात शक्तीचा. या शक्तीने विश्व घडविले त्याचे नियम केले आणि हात झटकले. त्यानंतर काही विशिष्ट नियमांप्रमाणे हे जग चालत आले आहे. तिसरा प्रकार या जगाला विश्वाला किंवा निसर्गातल्या प्रत्येक चीजवस्तूला देव समजण्याचा. निसर्गपूजा किंवा ५५विश्वात्मके देवे७७ हा वाक्प्रचार या तिसऱ्या प्रकारात मोडतात. प्रकार काहीही असो त्याचा कणा देवच असतो. हे तीन देवाचे प्रकार आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून नाही, असा आग्रह अशा तऱ्हेने ही विभागणी होते. याचा अर्थ देव या संकल्पनेच्या अवतीभवती ही चर्चा सुरू राहते. देव आहे की नाही या गृहीतकांच्या पलीकडे जगणे शक्य आहे की नाही देवाच्या बाबतीत तीन प्रकार असतात. एकात देव व्यक्ती सदृश असतो. तो हे सगळे घडवितो त्याचा व्यवहार सांभाळतो, न्याय-निवाडा करतो, शिक्षा देतो किंवा स्वर्गात पोहोचवितो. या देवाचे सर्वत्र बारीक लक्ष असते. हा देव पृथ्वीचाच नव्हे तर विश्वाचा देव आहे आणि ग्रह-तारेही त्याच्याच राज्यात अंतर्भूत आहेत. दुसरा प्रकार आहे. एका अज्ञात शक्तीचा. या शक्तीने विश्व घडविले त्याचे नियम केले आणि हात झटकले. त्यानंतर काही विशिष्ट नियमांप्रमाणे हे जग चालत आले आहे. तिसरा प्रकार या जगाला विश्वाला किंवा निसर्गातल्या प्रत्येक चीजवस्तूला देव समजण्याचा. निसर्गपूजा किंवा ५५विश्वात्मके देवे७७ हा वाक्प्रचार या तिसऱ्या प्रकारात मोडतात. प्रकार काहीही असो त्याचा कणा देवच असतो. हे तीन देवाचे प्रकार आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून नाही, असा आग्रह अशा तऱ्हेने ही विभागणी होते. याचा अर्थ देव या संकल्पनेच्या अवतीभवती ही चर्चा सुरू राहते. देव आहे की नाही या गृहीतकांच्या पलीकडे जगणे शक्य आहे की नाही आहे तसे निसर्गात बागडणे, सुख-दु:खाला सामोरे जाणे दुसऱ्याला त्रास होणार नाही, असे वागणे एकोप्याने राहणे, बुद्धीने निसर्गाचा शोध घेणे, त्यातून संशोधन घडत असेल तर आपले जीवन सुधारण्याचे उपाय लागू करणे. या सगळ्यात देव असणे-नसणे हे विषय जरा बाजूला ठेवले तर मधून मधून डोक्यात येतीलही, पण डोक्यात येणारा प्रत्येक विचार आपण थोडाच अमलात आणतो. असो देव हा विषयच बाजूला ठेवून विचार करण्याची प्रथा खरेतर भारतातली किंवा चीनमधली त्याबद्दल क्रमाक्रमाने.\nवॉर अँड पीस – ब्रेन कॅन्सर-मेंदूचा कर्करोग (भाग-१०)\nएक काळ मानवी जीवन गरीब व श्रीमंतांच्या तुलनेने साधे होते. सकाळी उठावे, आपला दिनक्रम करावा, दोन वा तीन वेळा जेवावे, रात्री लवकर झोपावे. अशी सर्वसाधारण दिनचर्या वीस-पंचवीस वर्षांमागे होती. आताचे फक्त मोठाल्या शहरांतल्यांचेच नव्हे तर खेडोपाडीचेही गरीबगुरिबांचे जीवन खूपच बदलले आहे. लाईफ ‘फास्ट’ झाले आहे. कोणालाच थांबायला, विश्रांतीला वेळ नाही. सगळय़ांकडे वाढत्या उत्पन्नाबरोबर वाढत्या सुखसोयी आल्या आहेत. विलासी जीवन व अधिकाधिक सुखसोयींमागे धावणारी मनोवृत्ती यामुळे मानसिक ताणतणाव वाढत आहे. आधुनिक वैद्यकातील थोर थोर संशोधकांनी मानवी शरीराच्या कणाकणांचा अभ्यास करून, विविध अंगांनी संशोधन करून खूपच ज्ञान मिळविलेले आहे. त्यामुळे तऱ्हेतऱ्हेच्या कष्टसाध्य, असाध्य रोगांवरही मात करता येते. पण भलेभले मानवी शरीर शास्त्रज्ञांना मेंदूच्या संपूर्ण कार्याचे आकलन आजतरी शतांशानेही झालेले नाही. मेंदूचे कार्य अनाकलनीय आहे. तुम्ही हा लेख वाचत असताना तुमचा मेंदू, तुमचे मन कुठे भरकटत आहे, हे तुम्हालाच सांगता येत नाही. तुम्ही एकीकडे लेख वाचताना एक ना अनेक प्रश्नांनी मेंदूवर कमी-अधिक ताण येत असतो. छोटा मेंदू, मोठा मेंदू अशा तपशिलात न जाता तुम्ही-आम्ही खूप विचारचक्रामुळे, चिंतेमुळे, कमी निद्रा व विश्रांतीमुळे मेंदूचा काही भाग अकाली सुकवत असतो व ते फार उशिरा लक्षात येते. आपली स्मरणशक्ती कमी झाली आहे, रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे, चिडचिड वाढली आहे, आपणास चटकन राग येतोय, हातापायांना मुंग्या येत आहे, दृष्टी क्षीण होत आहे असे लक्षात आल्याबरोबर मेंदूचा एमआरआय केला जातो. या तपासणीत मेंदूची अ‍ॅट्रोपी असल्यास ब्राह्मीवटी ६ गोळय़ा, लघुसूतशेखर ३ गोळय़ा दोन वेळा, रात्री निद्राकरवटी याचा उपयोग होतो. रोग खूपच पुढे गेला असल्यास पंचगव्यघृत, सारस्वतरिष्ट दोन वेळा व अणुतेलाचे नस्य यांची मदत घ्यावी. निश्चयाने मेंदूच्या कर्करोगावर मात करता येते.\n– वैद्य प. य. वैद्य खडीवाले\nआजचे महाराष्ट्रसारस्वत – १ ऑक्टोबर\n१९०१- मारवाडी असूनही मराठी साहित्याची अतोनात गोडी असणारे लेखक बुलासा मोदी यांचे वयाच्या ३२ व्या वर्षी निधन. अर्वाचीन मराठी वाङ्मयाची समालोचन करणारी ‘मराठी भाषेची सद्यस्थिती’ ही लेखमाला त्यांनी लिहिली.\n१९०२ – गणितज्ञ आणि या विषयावरील एक सिद्धहस्त लेखक नारायण हरी फडके यांचा जन्म. ‘भारतीय गणिती’ या पुस्तकातून थोर भारतीय गणितज्ञांचा परिचय. तसेच ‘लीलावती’ या संस्कृत गणिती ग्रंथाचे ‘लीलावती पुनर्दर्शन’ हे मराठी भाषांतर आणि विश्वकोशातही गणित व ज्योतिषशास्त्र या विषयावर लेखन केले.\n१९०५- ख्यातनाम मराठी साहित्यिक मालतीताई बेडेकर तथा विभावरी शिरूरकर यांचा जन्म.\n१९१९- महाराष्ट्राचे वाल्मीकी, गीतरामायणकार, कथाकार, उत्तम वक्ते, लेखक, अभिनेते ग. दि. माडगूळकर यांचा जन्म. चित्रपट कथा, पटकथा, संवाद, गीते आदी क्षेत्रांत अमीट ठसा उमटवला. ग. दि. मां.च्या ‘गीतरामायण’ने इतिहास घडवला. व्यक्तिचित्रे, ललितलेख, लघुकथा, दीर्घकथा, प्रवासवर्णन, बालकथा आदी साहित्याच्या सर्व दालनांत त्यांचा मुक्त वावर होता. १४ डिसेंबर १९७७ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.\n१९३१ – नाटय़छटाकार आणि या वाङ्मयप्रकारचे जनक दिवाकर तथा शंकर काशिनाथ गर्गे यांचे निधन. त्यांनी एकूण ४९ नाटय़छटा लिहिल्या.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकुतूहल – विलायती चिंच\nनागर आख्यान : बर्लिनची भिंत\nकुतूहल : परीक्षण-नमुना काढण्याच्या पद्धती\n‘नवनीत’च्या प्रवर्तकांची ‘स्कूलवेअर’मध्ये गुंतवणूक\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 कुतूहल: मेंढय़ांची पैदास\n2 कुतूहल – मेंढय़ांच्या विविध जाती\n3 कुतूहल: शेळ्यांमधील आजार\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/viva-news/importance-of-fitness-in-life-1259455/", "date_download": "2020-09-26T01:47:20Z", "digest": "sha1:P7DUK2DMP4EMYKEWFUVVNHSWAQ5BPCYI", "length": 28601, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जीवनशैलीतच फिटनेस हवा.. | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nशरीराबरोबर मनाचा फिटनेस कसा जपायचा हे तज्ज्ञांकडून समजून घेण्यासाठी हा फिटनेस विशेषांक.\nआजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य, तंदुरुस्ती महत्त्वाची हे सगळ्यांना कळतं. ‘फिटनेस’ हा परवलीचा शब्द झाला असला, तरी त्यासाठी वेळ देणं काही जणांना अवघड जातं. काही जण वेळ देतात, पण माहितीच्या महापुरात चुकीच्या दिशेने वाहवत जातात. किशोरवयातच लठ्ठपणा, थायरॉइडसंबंधी आजार वाढत आहेत आणि ऐन तारुण्यात रक्तदाब, मधुमेहासारखे विकार जडू लागले आहेत. फिटनेससाठी व्यायाम आणि आहार या दोन गोष्टींवर लक्ष द्यायला हवं; पण कसं फिटनेसच्या जगात नेमकं काय सुरू आहे फिटनेसच्या जगात नेमकं काय सुरू आहे डाएटसंदर्भातल्या घोडचुका कोणत्या आणि आहारासंबंधीचे गैरसमज कुठले डाएटसंदर्भातल्या घोडचुका कोणत्या आणि आहारासंबंधीचे गैरसमज कुठले शरीराबरोबर मनाचा फिटनेस कसा जपायचा हे तज्ज्ञांकडून समजून घेण्यासाठी हा फिटनेस विशेषांक ‘व्हिवा’ वर्धापन दिनानिमित्त देत आहोत. ख्यातनाम आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर या अंकाच्या अतिथी संपादक आहेत. ऋजुता सेलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट म्हणून प्रसिद्ध असून करिना कपूर, आलिया भट, रिचा चढ्ढा, शाहीद कपूर, अनिल अंबानी यांच्यासारखे सेलेब्रिटी डाएटचा सल्ला ऋजुता यांच्याकडून घेतात. वेटलॉस आणि डाएटबाबतच्या गैरसमजुतींवर त्यांनी टाकलेला झळझळीत प्रकाशझोत आणि त्यांनी दिलेली फिटनेसची चतुसूत्री..\nफिटनेसविषयी कधी नव्हे एवढी जागरूकता निर्माण होताना दिसते आहे. ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच वेळी तरुणाई मात्र वेगवेगळे लाइफस्टाइल डिसीझ लहानपणापासूनच अंगावर बाळगू लागली आहे. या विरोधाभासाला कारण आहे चुकीच्या माहितीवर आधारित व्यायाम आणि आहारातील बदल. आपले प्राधान्यक्रम बदलले आहेत. पूर्वी फिटनेसचा वेगळा असा विचार करण्याची आवश्यकता नव्हती, कारण जीवनशैलीच आरोग्यपूर्ण होती. आजही व्यायाम आणि सुयोग्य आहार याचा समावेश जीवनशैलीतच करून घ्यायला हवा. ‘व्हिवा’च्या या फिटनेस विशेषांकात प्रामुख्याने तरुणाईच्या फिटनेसविषयीच्या विचारांचा, त्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या सध्याच्या लाइफस्टाइलचा विचार केला आहे.\nतरुण मुला-मुलींवर अभ्यासाचं, करिअरचं, रिलेशनशिपचं नको इतकं प्रेशर आहे. सध्या कुमारवयीन आणि तरुण मुलींमध्ये पाठदुखी, डोकेदुखी, थायरॉइड, पीसीओडी (पॉलिसिस्टीक ओव्हेरिअन डिसीज) हे सगळं वाढतंय. मुलींना नियमित पाळी येण्यात अडचणी येताहेत याचं कारण व्यायामाचा अभाव हेच आहे. साधारण १२-१५ वर्षांनंतर मैदानावरचा खेळ कमी होत जातो. मग अभ्यासाचं प्रेशर. मग करिअरच्या मागे धाव, त्यानंतर रिलेशनशिपसाठी वेळ देणं, मग लग्न.. यामध्ये व्यायामाला महत्त्व असतं ते केवळ ‘फिगर’ चांगली हवी या उद्देशानं. फिटनेसबाबत जागरूक आहोत, असं म्हणणारी तरुणाई फिटनेस आणि डाएटबाबत इतक्या अघोरी प्रचाराला बळी पडतेय की, आजकाल आपण अन्नाला नावानं ओळखणंही बंद केलंय. मी वरणभात जेवले, असं म्हणायच्या ऐवजी – आज फक्त कार्ब्स आणि प्रोटीन्स खाल्लेत.. असं म्हटलं जातंय. आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म म्हटलंय, पण आपण मात्र सतत अन्नातल्या कॅलरीचे हिशोब करतोय.\nनियमित व्यायाम आणि खेळ हे या वयात अगदी महत्त्वाचं असतं. मुलांपेक्षाही मुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक आवर्जून सांगावंसं वाटतं – पुढील आरोग्याच्या दृष्टीने वयाच्या २३ वर्षांपर्यंत मैदानी खेळ खेळणं हे आवश्यक आहे. आपल्याकडे कुमारवयीन मुला-मुलींचे मैदानी खेळ अभ्यासाच्या कारणाखाली कमी केले जातात. आठवी-नववी उत्तीर्ण झाल्यानंतर मुली तर मैदानावर दिसतच नाहीत. मुलांचे क्रिकेट, फुटबॉल आदी काही ना काही खेळ सुरू असतात, पण मुलींच्या फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीज कमी होत जातात. मुलींसाठी खेळ आणि व्यायाम नियमित राहू शकेल असं वातावरण आपण निर्माण करायला हवं. मुलींनाही २३ व्या वर्षांपर्यंत नियमित मैदानी खेळ किंवा व्यायाम याची गरज असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट- या व्यायामात ‘घरकामा’चा यात समावेश होत नाही. आपल्याकडेकेर-लादी, कपडे धुण्यासारखी कामं करणं म्हणजे व्यायाम असं समजलं जातं. ही कामं केली की, वेगळ्या व्यायामाची काहीच आवश्यकता नाही, असंही बरेच लोक म्हणतात, पण हा व्यायाम नाही. याचा शरीराला फायदा होत नाही. जोपर्यंत आपल्या फिटनेसला, स्ट्रेंथला, स्टॅमिन्याला आपण चॅलेंज करत नाही, जोपर्यंत शरीराला अशा प्रकारे आव्हान मिळत नाही, तोपर्यंत आपली मानसिक वाढही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे मुलींसाठी व्यायामाचं वातावरण निर्माण केलं पाहिजे.\nनोकरी सुरू होते तेव्हा..\nपैसा वाढतो तशी फिटनेस लेव्हलही वाढली पाहिजे. सुबत्तेबरोबर स्वास्थ्य हवे. वेल्थ वाढते आणि हेल्थ खराब होत जाते, हे होता कामा नये. सध्या नोकरीची बहुतेक कामं बैठय़ा स्वरूपाची असतात. पाश्चात्त्य देशात कुठल्याही नोकरीच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये व्यायामासाठी वेळ, जागा उपलब्ध करून दिली जाते. तो त्यांच्या वर्क कल्चरचा एक भाग झालाय. आता तेवढी जागरूकता आपल्याकडेही यायला हवी. विशेषत: नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी हे आवश्यक आहे. वर्ल्ड झोन बदलत आहेत. एका शहरात राहूनही तुम्हाला लंडन, हाँगकाँग, अमेरिका अशा तीन देशांत व्यवहार करावा लागतो. त्यामुळे कामाच्या वेळा अनिश्चित असतात. सध्याच्या कामाचं स्वरूप आणि नोकरीच्या तऱ्हा बघता, कुठल्याही वेळेला तुम्हाला कामाला जायला लागू शकतं. सतत फिरतीवर जायला लागणं, शिफ्ट डय़ुटीदेखील या बदलत्या काळात अनिवार्य असू शकतात. व्यायामाच्या बाबतीत या वेळा आड येत नाहीत. कारण व्यायामाची चांगली गोष्ट अशी की, तो कुठल्याही वेळेला केला तरी त्याचा तसाच परिणाम होतो. फक्त व्यायाम नियमित होणं आवश्यक आहे. व्यायामाच्या आधी आणि नंतर आपल्या इतर गरजादेखील पूर्ण झाल्या पाहिजेत.\nआपली झोप पुरेशी झाली असली पाहिजे, खाणं व्यवस्थित असलं पाहिजे. रुटीन व्यवस्थित हवं. मग व्यायाम दुपारी ३ वाजता केला किंवा पहाटे ३ वाजता केला तरी चालतो. तो उपयुक्तच ठरतो.\nनोकरीनंतरचा टप्पा असतो लग्नाचा. लग्न हा महत्त्वाचा टप्पा आहे आयुष्याचा. बदलते लग्न सोहळे हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे; पण पूर्वी मराठी लग्नं खूप साधी असायची. ती एका दिवसात.. खरं तर काही तासांत संपायची. आता मात्र आपण लग्न सोहळ्यांच्या बाबतीत अशा सगळ्या समाजांचा आदर्श ठेवायला लागलोय ज्यांची शारीरिक ठेवण जाड आहे, त्यांची लाइफस्टाइल वेगळी आहे. आपलं आटोपशीर जेवण आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य आहे.\nशाकाहारी लोकांना पुरेसे प्रोटिन्स मिळत नाहीत, हा गैरसमज आहे. असं असतं तर शाकाहारी लोक आतापर्यंत टिकलेच नसते. मांसाहारी लोकांनाही आपण पुरेसे प्रोटिन घेतो म्हणजे सकस आहार घेतो, असं समजण्याचं कारण नाही. सोमवार, गुरुवार वगैरे मांसाहार न करण्याचे दिवस आवर्जून पाळले पाहिजेत. आहारातला हा बदल शरीराला आवश्यक असतो.\nलग्नाचा मुलगा कसा हवा\nलग्न हा मुलीच्या बाबतीत आयुष्य बदलणारा टप्पा. मुलापेक्षा मुलीचं आयुष्य लग्नानंतर बदलण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच मुलगा कसा हवा, याविषयी मुलींना अनेकदा समुपदेशन केलं जातं. मुलींचे स्वत:चे काही विचार असतात. आजच्या जमानातल्या अनेक मुली असंही सांगतात की, ‘मला असा मुलगा हवा – हू विल मेक मी लाफ.’ मला याची फार गंमत वाटते. कपिल शर्मादेखील हसवतो. मग तो सगळ्यांना हवाय का मुलगा कुठे काम करतो, कुठे राहतो, किती कमावतो हे चॉइसेस असतात तसे फिटनेसच्या दृष्टीने आणखीही काही चॉइसेस महत्त्वाचे ठरतात. तुमच्या स्वत:च्या आरोग्यासाठी, फिटनेससाठी असा मुलगा बघा, जो तुमच्यावर प्रेम करेल, जो स्वयंपाक करू शकेल, ज्या मुलाची आई काम करणारी असेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लग्नानंतर जाड, अशक्त किंवा फिट बनवू शकतात. आपल्याकडच्या पद्धती बघता, संपूर्ण कुटुंबात फिटनेसची मेंटॅलिटी असणं महत्त्वाचं आहे. विशेषत: मुलाची मानसिकता महत्त्वाची. कारण वयाने पंचविशी-तिशीचा मुलगा असतो, पण घरात मात्र १५ वर्षांच्या मुलासारख्या सवयी असतात. मुलींना हे सगळं झेपत नाही आणि मग त्यांचा फिटनेस कमी होत जातो. त्या स्वत:ला वेळ देऊ शकत नाहीत. लग्नानंतर एका वर्षांत पाच किलो वजन वाढलं तर इट्स अ बॅड मॅरेज. नोकरी लागल्यानंतर वर्षभरात पाच किलो वजन वाढलं, तर इट्स अ बॅड जॉब मुलगा कुठे काम करतो, कुठे राहतो, किती कमावतो हे चॉइसेस असतात तसे फिटनेसच्या दृष्टीने आणखीही काही चॉइसेस महत्त्वाचे ठरतात. तुमच्या स्वत:च्या आरोग्यासाठी, फिटनेससाठी असा मुलगा बघा, जो तुमच्यावर प्रेम करेल, जो स्वयंपाक करू शकेल, ज्या मुलाची आई काम करणारी असेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लग्नानंतर जाड, अशक्त किंवा फिट बनवू शकतात. आपल्याकडच्या पद्धती बघता, संपूर्ण कुटुंबात फिटनेसची मेंटॅलिटी असणं महत्त्वाचं आहे. विशेषत: मुलाची मानसिकता महत्त्वाची. कारण वयाने पंचविशी-तिशीचा मुलगा असतो, पण घरात मात्र १५ वर्षांच्या मुलासारख्या सवयी असतात. मुलींना हे सगळं झेपत नाही आणि मग त्यांचा फिटनेस कमी होत जातो. त्या स्वत:ला वेळ देऊ शकत नाहीत. लग्नानंतर एका वर्षांत पाच किलो वजन वाढलं तर इट्स अ बॅड मॅरेज. नोकरी लागल्यानंतर वर्षभरात पाच किलो वजन वाढलं, तर इट्स अ बॅड जॉब लग्न किंवा नोकरी आयुष्यात आल्यानंतर तुम्हाला हलकं वाटलं पाहिजे.. मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टीने.. तर ते यशस्वी\nमुलींसाठी मैदानांवर आरक्षण हवं\nमुंबईसारख्या शहरात एक तर खूप कमी मोकळी मैदानं आता शिल्लक आहेत. ज्या काही थोडय़ा फार ‘ओपन स्पेसेस’ आहेत त्या सगळ्या तरुण मुलांनी भरलेल्या असतात. तिथे त्यांचे क्रिकेट किंवा तत्सम खेळ सुरू असतात. खेळांच्या मैदानांवर मुली कधीच दिसत नाहीत. स्त्रियांसाठी आरक्षणाचा मुद्दा असेल, तर पहिलं आरक्षण या ‘ओपन स्पेस’साठी मिळालं पाहिजे. मैदानावर मुलींसाठी ठरावीक वेळी किंवा ठरावीक दिवशी तरी आरक्षण राहिलंच पाहिजे. कदाचित सुरुवातीला असं आरक्षण दिलं जाईल. वर्षभर एकही मुलगी त्या मैदानावर फिरकणार नाही. असं झालं तरी आरक्षण शाबूत राहिलं पाहिजे, कारण शेवटी हे एक प्रकारचं परिवर्तन आहे आणि परिवर्तनाला थोडा वेळ लागणार. हळूहळू मुली बाहेर येतील. हे आपल्यासाठी आहे, इथे खेळणं सुरक्षित आहे कळल्यानंतर त्यांची संख्या वाढेल. मुलींची, त्यांच्या पालकांची मानसिकता बदलायला थोडा वेळ लागणार.\nआपल्याकडे विकास आराखडे तयार होतात, तेव्हा पार्किंगची सोय होते. त्यासाठी मोकळी जागा ठेवली जाते, पण खेळासाठी जागा नसते. ज्या क्षणी शारीरिक हालचाली मंदावतील, खेळणं कमी होईल, त्या क्षणी शरीराच्या तक्रारी सुरू होतील. आपल्या इमारतीत, आपल्या गल्लीत आणि शहरातही अशा खेळण्यासाठीच्या मोकळ्या जागा हव्यातच. पार्किंगची जागा जेवढी महत्त्वाची तेवढीच खेळण्याची जागा महत्त्वाची. सुदृढ तरुणाईसाठी हे अत्यावश्यक आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 प्रिय मला, ..माझ्याकडून\n2 ‘शुगरबॉक्स’चं गोड गुपित\n3 ‘स्पा ट्रीटमेंट’ माझी लाडाची\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://metamorphosis.net.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85/", "date_download": "2020-09-26T00:52:27Z", "digest": "sha1:GJ4L4TCBADFEGHPQ3M3F6BG7V5EZHW43", "length": 9280, "nlines": 114, "source_domain": "metamorphosis.net.in", "title": "साहित्य - भविष्यातील करिअर - METAMORPHOSIS", "raw_content": "\nसाहित्य – भविष्यातील करिअर\nHome > Blogs > साहित्य – भविष्यातील करिअर\nसाहित्य – भविष्यातील करिअर\nसंपूर्ण इतिहासात अभ्यास केले गेले आहेत आणि त्याबद्दल सिद्धांत लिहिले गेले आहेत\nकारकीर्दीचे स्वरूप प्रभावित करणारे घटक. अनेकांनी मोहकपणा आणला आहे\nसामाजिक पार्श्वभूमी, आर्थिक पार्श्वभूमी, प्रदेश इ. सारखे परिणाम अशा एका परिवर्तनावर लक्ष केंद्रित करते ज्याबद्दल कमी बोलले जाते आणि ते साहित्य आहे.\nकरिअरच्या मार्गाचा अवलंब करण्याची मूळ कल्पना प्रेरणा आहे. कोणताही मनुष्य त्यात टिकू शकत नाही प्रेरणा अभाव कोणत्याही कामाचे वातावरण. आपल्यापैकी बहुतेकांना आपली प्रेरणा मिळते\nआम्ही वाचलेल्या साहित्यात. वेगवेगळ्या युगात विविध प्रकारचे साहित्य होते\nमहाकाव्यांपासून कादंब .्या पर्यंत आणि शेवटी आधुनिक महाकाव्यांपर्यंत. लेख देखील बोलतो\nआपल्या आसपास किंवा आपल्या प्रदेशातील परिस्थितीमुळे त्या साहित्यावर कसा परिणाम झाला याबद्दल उत्पादन होते.\nमहाकाव्यांसह प्रारंभ करणे, अत्यंत संकुचित दृश्यास्पद बिंदूमधील नायकाचे एक लांब साहित्य. मध्ये\nमहाकाव्यांचा नायक आपल्याला परिपूर्णतेची भावना देतो आणि त्याच्या कृती त्याच्या समर्थन देतात\nनैतिक कोड. महाकाव्यांपैकी कोणतीही अनुमान लावता येत नाही आणि त्या अर्थाने ते\nबंद किंवा सीमित साहित्य म्हणून पाहिले जाते. महाकाव्ये देखील नायक असण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि त्याच्या कृती त्याने कर्तव्य म्हणून पार पाडल्या पाहिजेत. तर ए मध्ये\nकादंबरी सर्वकाही बदलू अधीन आहे. हे वास्तविकतेवर अधिक लक्ष केंद्रित करते\nजग आणि त्याच्या समस्या. व्यक्तीकडे अंतर्गत आणि बाह्य समस्या आहेत ज्याचे त्याने केले\nसंघर्ष करणे आवश्यक आहे. कादंबरीची कहाणी ही एक मुक्त अंत आहे. कादंबरी सतत टीका करते\nस्वतःच आणि विकसनशील शैली आहे. कारकीर्दीच्या मुद्यावर, त्या काळात\nमहाकाव्य कारकीर्दीला एक उत्कृष्ट काम म्हणून पाहिले गेले होते आणि ते केवळ उच्चभ्रू लोकांसाठी होते प्रत्येकजण नायक नसतो. नंतर कादंबर्‍या उदय झाल्याबरोबर करिअर म्हणून पाहिले गेले\nसर्वोत्तम होण्यासाठी संघर्ष. स्पर्धेत वाढ झाली व्यक्तीवादी दृश्य.\nपण कादंबरी आणि महाकाव्य दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी घडवून आणू शकत नाहीत\nकारकीर्दीवर परिणाम करणारे घटक आणि म्हणून आधुनिक महाग वेगाने वाढला. आधुनिक महाकाव्य नायकाने शोधासाठी प्रवास करावा लागतो अशा प्रवासाच्या कल्पनेला जन्म दिला\nस्वत: ला आणि स्वत: ला जागरूक करा.\nभविष्यात स्वतंत्ररित्या, अर्धवेळ नोकरी इ. खुल्या संपुष्टात येतील\nमार्ग आणि स्वत: ला शोधण्याचा आणि बनण्याचा प्रवास करण्याचा प्रयत्न करण्याची भावना\nPrevPreviousसाहित्य – भविष्य का करियर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://sandeepramdasi.com/2012/11/05/mad-city/", "date_download": "2020-09-26T03:12:49Z", "digest": "sha1:JJ4NVONX377AVVPNK744DYWLH4OF5RKB", "length": 18208, "nlines": 83, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "टीव्ही पत्रकारिता ‘मॅड सिटी’ होऊ नये | रामबाण", "raw_content": "\nटीव्ही पत्रकारिता ‘मॅड सिटी’ होऊ नये\nदूरदर्शनवर रामायण अवतरलं त्यावेळी देशभरात रस्ते ओस पडायचे. रामानं रावणाचा वध केला त्या रविवारी कित्येत घरात टीव्हीवर फुलं उधळली गेली. तोच प्रकार कमीअधिक प्रमाणात महाभारताच्या वेळी. शक्तिमान सुरु होतं तेव्हा स्वत:चा एक हात छातीवर आणि एक हात वर करत स्वत:भोवती गरगर फिरत वरुन खाली झोकून देणाऱ्या कितीतरी लेकरांनी हात पाय मोडून घेतले, काहींना जीवही गमवावा लागला. कौन बनेगा करोडपतीच्या पहिल्या सीझनच्यावेळी स्पर्धकांसोबत रडणारे आणि नवाथे करोडपती बनला तेव्हा ते कोटभर रुपये आपल्याच घरात येणार असा आनंद झालेले कमी नव्हते. टेलिव्हिजनची ताकद, माध्यमाचा प्रभाव अधोरेखित करणाऱ्या घटनांची ती नांदी होती.\nबातम्यांची मक्तेदारी तेव्हा सरकारी दूरदर्शनकडेच होती. लोकांच्या गरजांचा विचार करायचा नाही आणि काळासोबत चालायचं नाही हा अलिखित सरकारी नियम दूरदर्शननेही इमानेइतबारे पाळला. त्यामुळेच, गरज होती म्हणा किंवा एखादा नवा पर्याय मिळाला की लोक स्वीकारतात म्हणा, खाजगी न्यूज चॅनल्स कधी आले, कधी वाढले, कधी पुढं गेले हे कळलंही नाही.\nआज जगात सर्वात जास्त न्यूज चॅनल्स आपल्या देशात आहेत. परखड पत्रकारितेची परंपरा अगदी ब्रिटिशकाळापासूनच आपल्याला लाभलीय असं म्हणतात. काही मोजक्या वृत्तपत्रांनी किंवा वृत्तपत्रातील काही मोजक्यांनी ती टिकवायची धडपड सुरु ठेवलीय. टिव्ही चॅनल्सकडूनही जनसामान्यांनी तशीच अपेक्षा करणं ओघानं आलंच. आजचं देशातलं चित्र पाहता या अपेक्षा पूर्ण करण्यात टीव्ही मीडियाला किती यश आलंय हा वादाचा मुद्दा आहे.\nलोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, देशातलं वातावरण तापू लागलंय. छोट्या पडद्यावर रोज नवनवे गौप्यस्फोट सुरुच आहेत. बाईट वर बाईट देणं आणि घेणं सुरु आहे. येत्या काळात न्यूज चॅनल्सची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळेच छोट्या पडद्याकडे राजकारण्यांचं बारीक लक्ष राहणार आहे.\nगेली काही वर्ष राज्य आणि देशात विरोधी पक्ष संभ्रमित अवस्थेत असताना, ती भूमिका देशातला मीडिया पार पाडतोय असा सर्वसामान्य जनतेचा समज होता. तो भ्रम फार काळ टिकणार नव्हताच. ‘अशोक पर्व’ने भ्रमाच्या भोपळ्याला पहिला तडा दिला आणि जिंदाल – झी न्यूज प्रकरणाने आणखी एक घाव बसला आहे.\nजिंदालचा झी न्यूजला ‘प्रतिडंख’\nप्रकरण वरवर दिसतं तितकं सोपं नक्कीच नाहीय.\nटुजी, कोळसाप्रकरणी मनमोहनसिंह सरकारची लाज जाणं सुरुच होतं. त्यातच वाड्रा डिएलएफ प्रकरणामुळे बोफोर्सनंतर पहिल्यांदाच गांधी घराण्यावर थेट आरोप झाले. या वातावरणाचा फायदा मुख्य विरोधी पक्ष भाजपला होणार हे स्पष्ट होतं पण नितीन गडकरींच्या रुपात सत्ताधाऱ्यांनी नवा बंगारु लक्ष्मण मिळवला. आम्ही चांगले नसलोत तरी तुमच्यासमोर पर्यायही चांगला नाही हा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यात काँग्रेसप्रणित सत्ताधारी यशस्वी झाले. सत्तेतला मुख्य पक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष या दोघांची विश्वासार्हता धोक्यात आल्यावर, न्यूज चॅनल्सची विश्वासार्हता टिकून राहणं त्यांना कसे परवडेल\nप्रसिद्धी मिळतेय म्हणून असेल किंवा उगाच पंगा घेतला तर आपल्या ‘कर्तृत्वाची’ कुंडली बाहेर येईल म्हणून असेल राजकारणी मंडळी मीडियाला कुरवाळत राहायचे. न्यूज चॅनेलचा प्रभाव माहित असल्यानं फार फार तर मीडिया से न दोस्ती अच्छी होती है न दुश्मनी हे तत्व ते पाळायचे पण आता ते बाजूला ठेवून न्यूज चॅनल्सना थेट अंगावर घ्यायला सुरुवात केलीय.\nराजकारणी आणि मीडिया यांचा मधुचंद्र संपू लागला आहे. त्याला अर्थातच न्यूज चॅनल्सही तितकेच जबाबदार आहेत. अंजली दमानियापासून अरविंद केजरीवालपर्यंत कोणीही पत्रकार परिषद घ्यायची, फक्त आरोप करायचे आणि चोवीस तास चॅनल चालवण्याच्या अपरिहार्यतेमुळे त्याची शहानिशा न करता न्यूज चॅनल्सनं त्याची ब्रेकिंग न्यूज करत राहायची, लाईव्हची ही घाई पत्रकारितेला परवडणारी नाहीय.\nजशी सगळीकडेच गळेकापू स्पर्धा आहे, तशी ती मीडियामधेही आहे. देशातलं न्यूज चॅनेल्सचं मार्केट अंदाजे अडीच हजार कोटीं रुपयाचं आहे. त्या जाहीरातींमधील जास्तीत जास्त वाटा आपल्याला कसा मिळेल यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न. त्याचाच साईड इफेक्ट म्हणजे या क्षेत्राचं झालेलं बाजारीकरण आणि चुकलेला प्राधान्य क्रम.\nमोठ्या शहरात दोन चार गाड्या जाळल्या आणि एक दीड लाखाचं नुकसान झालं तर तर ती मोठी बातमी ठरते, दिवसभर कॅमेऱ्यासमोर तज्ञांच्या चर्चा झडतात, अधिकारी पुढारी चिंता व्यक्त करतात. नुकताच वाशिम जिल्ह्यातल्या 12 गावात सोयाबीनला आगी लावण्याच्या घटना वाढल्या. राजकीय हेवेदावे आणि अंधश्रद्धेतून फक्त 10 दिवसात थोडथोडकं नव्हे 45 लाखांचं सोयाबीन भस्मसात झालं. किती चॅनल्सवर तुम्हाला ही बातमी दिसली हे चुकलेल्या प्राधान्यक्रमाचं उदाहरण नाही का\nसर्वसामान्य माणसाच्या मनातून मीडियाची विश्वासार्हता आणखी उतरली तर ते अनेकांना हवंच आहे. कोट्यामधून दोनदोन तीनतीन घरं पदरात पाडून घेणारांकडून किंवा पाकिटापासून ते जाहीरातींपर्यंत अनेक गोष्टींकडे वर्षभर डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्यांकडून तत्वनिष्ठ, परखड वगैरे पत्रकारितेची अपेक्षा करण्यात फार अर्थ नाही. पण जसे सगळे राजकारणी, सगळे पोलिस, सगळी न्याय व्यवस्था किंवा सगळी नोकरशाही भ्रष्ट नाही तसंच प्रसार माध्यमांचं. त्यामुळेच या क्षेत्रात जी काही चांगली लोक उरली आहेत त्यांच्यावर जास्त जबाबदारी येऊन पडते. पुढचा मार्ग खडतर आहे, अखंड सावधान राहून बातमीशी इमान राखावं लागणार आहे. 26 नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्याच्या कवरेजमधे इलेक्ट्रॉनिक माध्यमांची गेलेली पत, आझाद मैदानावरील हिंसाचारावेळी दाखवलेल्या प्रगल्भतेनं काही प्रमाणात परत मिळवली असली तरी त्यात सातत्य आणणं गरजेचं आहे.\nअण्णांच्या जनलोकपाल आंदोलनाविरोधात झाडून सारे राजकीय पक्ष एकत्र आल्याचं चित्र देशाला पाहायला मिळालं. त्याचवेळी इ डिब्बा का कुछ किजीए असा सूर जोर धरु लागला. टीम अण्णाचा व्यवस्थित बंदोबस्त केल्यानंतर राजकारणी आता मीडियाकडे वळले आहेत असं दिसतंय.\n‘चार काम वो हमारे करते है, चार काम हम उनके करते है’ असं गडकरींचं वाक्य सांगत, गडकरीं आणि पवारांचे साटेलोटे असल्याचा आरोप दमानिया बाईंनी केला आणि क्विड प्रो को (Quid Pro Quo) हा खूप छान शब्द देशाला माहिती झाला. ज्याचा डिक्शनरीतला अर्थ आहे, A favor or advantage granted in return for something. राजकारणी आणि पत्रकारांमधल्या QPQ ची जाहीर चर्चा कधी व्हायचीच नाही. ती आता सुरु होईल. मीडियावरचा लोकांचा जो काही विश्वास आहे तो 2014 पर्यंत कमी कमी होत जाईल अशी स्ट्रॅटेजी असली तर नवल वाटायला नको.\nआत्ताचं न्यूज चॅनल्स कव्हरेज पाहिलं की मला साधारण 15 वर्षांपूर्वी आलेला मॅड सिटी सिनेमा आठवतो. One Man will Make a MISTAKE, The Other will Make it a SPECTACLE अशी टॅग लाईन. त्यात न्यूज चॅनल्स बातमीसाठी कुठल्या थराला जाऊ शकतात हे दाखवलंय. डस्टीन हॉफमनमधला रिपोर्टर जॉन ट्रॅवोल्टाच्या अगतिकतेला मीडिया इव्हेंटचं स्वरुप देतो. त्यात तथ्य, भावनांचा बळी ठरलेला. शेवटी ‘WE’ KILLED HIM हे डस्टीनचं वाक्य सगळं काही सांगून जातं.\nआपल्या टीव्ही पत्रकारितेची वाट मॅड सिटीच्या दिशेनं जाऊ नये ही अपेक्षा.\nदिव्य मराठीत छापून आलेल्या या लेखाची ही लिंक\n3 thoughts on “टीव्ही पत्रकारिता ‘मॅड सिटी’ होऊ नये”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/murder-robbery-ransom-gajaad-the-accused-in-the-crime/", "date_download": "2020-09-26T02:53:43Z", "digest": "sha1:ATJ4G5JI3OHDTZE2N3KI2447DGS24W2Y", "length": 7163, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खून, दरोडा, खंडणी गुन्ह्यातील आरोपी गजाआड", "raw_content": "\nखून, दरोडा, खंडणी गुन्ह्यातील आरोपी गजाआड\nस्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले सहा जणांना जेरबंद\nकापूरहोळ- खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि खंडणी अशा गंभीर गुन्ह्यातील सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. आदित्य तानाजी चौधरी (वय 19), संकेत महादेव कुंभार (दोघेही रा. सासवड ता.पुरंदर) अनिकेत महादेव काळे (वय 19), सागर वसंत काळे (दोघेही रा. करमाळा सोनोरी, ता. पुरंदर), अभिजीत विजय भिलारे (रा. भिलारवाडी हातवे बुद्रुक, ता. भोर) व संतोष बाळासाहेब पवार (वय 19, रा. मुकादम वाडी, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.\nपुण्यात सासवड पोलिसांनी आशिष शेंडकर, उद्धव शेंडकर यांना प्राणघातक हल्ला प्रकणी अटक केली आहे. मुख्य आरोपी दिगंबर शेळके, आदित्य कळमकर यासह इतर फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. दिगंबर शेंडकर आणि त्याच्या साथीदारांनी खंडणीसाठी महेश भैरवनाथ कामटे (वय 25) यांना दुचाकीवर बसवून आडरानात नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कामठे यांच्याकडील 2000 रोकड घेऊन पलायन केले होते. चांबळी (ता.पुरंदर) गावच्या हद्दीत सोमवार (दि. 9) सायंकाळी ही घटना घडली होती.\nपंधरा दिवसांपूर्वी राजगडच्या हद्दीत अटक व फरारी आरोपींनी नसरापूर येथील शासन मान्य एका ताडीच्याच्या दुकानावर दरोडा घालून 46 हजारांचा ऐवज चोरून हे सर्व जण दुचाकीवरून पसार झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल मोरे, रामेश्वर धोंडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधवर, श्रीरंग माळी, हवालदार राजू चंदनशीव, सचिन गायकवाड, जगदीश शिरसाट, रवींद्र शिनगारे, अमोल शेडगे, ज्ञानदेव क्षीरसागर, दत्तात्रय तांबे, बाळासाहेब फडके, अक्षय नवले आदींनी ही कामगिरी केली आहे.\nखुनाचा प्रयत्नातील दोन गुन्ह्यातील व दरोडा गुन्ह्यातील आरोपीच्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. या आरोपींविरुद्ध यापूर्वी बरेच गुन्हे दाखल आहेत. आरोपींवर दाखल असणारे गुन्हे यांचा पूर्वइतिहास पडताळून संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करणार आहे.\n– दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, राजगड पोलस स्टेशन\nनिवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांक उसळले\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२६ सप्टेंबर २०२०)\nधोनीच्या विजयी षटकाराचा चेंडू सापडला\nलक्षवेधी : केवळ रेटिले बहुमता\nनिवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांक उसळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/want-sell-online-343282", "date_download": "2020-09-26T02:57:20Z", "digest": "sha1:HKGN6C4DKQ2ORJFJHK27BY2H3GJYRWAB", "length": 29666, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "ऑनलाईन विक्री करायचीय? मग अशी मारा 'सिक्सर'! | eSakal", "raw_content": "\n मग अशी मारा 'सिक्सर'\nकोणत्याही छोट्या व्यवसायासाठी पहिले साधन म्हणजे ज्या ठिकाणी ते त्यांची उत्पादने आणि ब्रँड प्रदर्शित करू शकतील अशी वेबसाइट तयार करणारा प्लॅटफॉर्म.\nविक्स यासाठी एकदम योग्य आहे. विक्स वेबसाइट तयार करण्याची प्रक्रिया एकदम सोपी करून टाकते. एकीकडे ही प्रक्रिया सोपी करताना त्याच वेळी अतिशय एकमेवाद्वितीय सुंदर अशा टेंप्लेट्सचे वैविध्य आणि अशा टेंप्लेट्समध्ये पाहिजे तसे बदल करण्याचे स्वातंत्र्यही ही वेबसाइट उपलब्ध करून देते.\nकोणत्याही छोट्या व्यवसायासाठी पहिले साधन म्हणजे ज्या ठिकाणी ते त्यांची उत्पादने आणि ब्रँड प्रदर्शित करू शकतील अशी वेबसाइट तयार करणारा प्लॅटफॉर्म.\nविक्स यासाठी एकदम योग्य आहे. विक्स वेबसाइट तयार करण्याची प्रक्रिया एकदम सोपी करून टाकते. एकीकडे ही प्रक्रिया सोपी करताना त्याच वेळी अतिशय एकमेवाद्वितीय सुंदर अशा टेंप्लेट्सचे वैविध्य आणि अशा टेंप्लेट्समध्ये पाहिजे तसे बदल करण्याचे स्वातंत्र्यही ही वेबसाइट उपलब्ध करून देते. कोणत्याही वेबसाइटमध्ये फंक्शनल म्हणजे प्रत्यक्ष वापरण्यासाठीच्या सोयी या जितक्या महत्त्वाच्या असतात, तितकेच तिचे सौंदर्यमूल्यही महत्त्वाचे असते, ही गोष्ट विक्सने लक्षात ठेवली आहे. त्यामुळे उद्योजकांना वेबसाइट तयार करताना या दोन्ही गोष्टींचे संतुलन राखता येईल, अशी सोय ते उपलब्ध करून देतात. विक्स दर महिन्याला सर्वसाधारणपणे ८० ते ३२५ रुपये (आकारणी वार्षिक) शुल्क आकारते. मात्र, शक्यतो उद्योजकांनी मासिक १८५ रुपयांची योजना निवडावी अशी आमची शिफारस आहे-कारण त्यात व्हिजिटर ॲनॅलिटिक्स आणि साइट बूस्टर्ससारख्या अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात-ज्यामुळे कोणत्याही बिझनेस साइटची कामगिरी उंचावते.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nविक्रीसाठीचे (ई-कॉमर्स) पोर्टल तयार करणे Shopify (http://shopify.com/)\nएकदा का तुमचा वेबसाइटचा सेटअप पूर्ण झाला, की प्रत्येक उद्योजकाला गरज असते अशा सॉफ्टवेअरची ज्याच्यामुळे तुम्ही तुमची उत्पादने वेबसाइटच्या माध्यमातून विकू शकता. शॉपिफाय हे ऑनलाइन साधन यासाठी अतिशय उपयुक्त.\nशॉपिफाय हे ऑनलाइन स्टोअरफ्रंट्ससाठीच्या व्यवसायातला सोपेपणा वाढवण्यासाठीचे एक ऑनलाइन टूल आहे. तुमची स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट तयार करण्यापासून ते तुमची वेबसाइट समजा आधीपासूनच तयार असेल, तर तिच्यात ‘बाय’ बटन समाविष्ट करण्यापर्यंत वेगवेगळी साधने शॉपिफाय उपलब्ध करून देते. शॉपिफाय तुमचे स्वतःचे ई-कॉमर्स स्टोअर तयार करण्यासाठीचा पर्याय २९ डॉलर (२१४६ रुपये) प्रति महिना या शुल्कात उपलब्ध करून देते. विक्ससाठीच्या शुल्कापेक्षा ही रक्कम किती तरी जास्त आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो विक्सवर तुमची वेबसाइट तयार करा आणि त्यानंतर तुमच्या या वेबसाइटवर शॉपिफायच्या मदतीने ‘बाय’ आणि ‘चेकआऊट’ या सुविधा समाविष्ट करा, म्हणजे स्वस्त पडेल. या सुविधांचा वापर करण्यासाठीचे शॉपिफायचे शुल्क दर महिन्याला ९ डॉलर इतके आहे. विक्सवर वेबसाइट तयार करण्याचे शुल्क हे १२ डॉलर (८८० रुपये) प्रतिमहिना आहे. विक्सद्वारे तयार केलेल्या वेबसाइटसंदर्भात शॉपिफायमध्ये बिल्ट इन इंटिग्रेशन असल्याने या सुविधा समाविष्ट करणे सहज आहे आणि वेबसाइटच्या एकूण कार्यपद्धतीमध्ये कोणता अडथळाही येणार नाही.\nपोस्टर्स, सोशल मीडिया क्रिएटिव्ह जाहिरातविषयक साधने तयार करणे Canva (http://www.canva.com/)\nऑनलाइन माध्यमात यशस्वी व्हायचे असेल, तर कोणत्याही व्यवसायाला ग्राहकांना आपल्या वेबसाइटवर आणण्यासाठी डिजिटल मार्केटिंगच्या चांगल्या पद्धतींची गरज भासेल. कॅनव्हा हे एक ऑनलाइन ‘फ्रीमियम टूल’ आहे ज्याचा वापर करून रजिस्टर्ड युजर्स वेगवेगळ्या प्रकारची लाखो इन्फोग्राफिक्स तयार करू शकतात. कॅनव्हा युजर्सना अनेक रेडिमेड आणि एडिट करता येण्याजोग्या टेंप्लेट्स, शेकडो आयकॉन्स, शेकडो फोटो आणि इतर अनेक गोष्टी विनामूल्य उपलब्ध करून देते. नेत्राकर्षक कंटेंट तयार करण्यासाठी आवश्यक ते सगळेच. त्याच्या पुढे जाऊन कॅनव्हा सोशल मीडिया पोस्ट्ससाठी (उदाहरणार्थ, इन्स्टाग्राम स्टोरी, इन्स्टाग्राम पोस्ट, फेसबुक पोस्ट, फेसबुक कव्हर पेज इत्यादी) रेडीमेड टेंप्लेट्स उपलब्ध करून काम सोपे करते. त्यामुळे उद्योजकांना त्यांच्या ग्राहकांसाठी परफेक्ट कंटेंट तयार करण्यात वेळ आणि कष्ट वाया घालवण्याची गरज भासत नाही. यातल्या शुल्क असलेल्या मॉडेलमध्ये (पेड मॉडेल) विशेष आयकॉन्स/फोटोजसह अतिरिक्त सुविधा समाविष्ट असल्या, तरी डिजिटल मार्केटिंगच्या प्राथमिक टप्प्यासाठी फ्री व्हर्जन पुरेसे आहे.\nसोशल मीडिया/डिजिटल मार्केटिंगबाबत व्यवस्थापन Hootsuite (www.hootsuite.com)\nछोट्या व्यवसायांसाठी सोशल मीडिया मार्केटिंग ही गोष्ट अपरिहार्य असली, तरी त्याची उपयुक्तता अधिक वाढण्यासाठी उद्योजकांना काही साधनाची आवश्यकता भासते. हूटसूट (Hootsuite) हे एक ऑनलाइन साधन आहे- ज्यात एकाच प्लॅटफॉर्मचा वापर करून वेगवेगळ्या सोशल मीडिया पोस्ट्सचे व्यवस्थापन करता येते. प्राथमिक युजर्ससाठी हूटसूट ऑटोमेटेड पोस्ट्स, की परफॉर्मन्स इंडिकेटर रिपोर्टस्, तसेच कस्टम ॲनॅलिटिक्स आणि अहोरात्र सपोर्ट यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मासिक शुल्क हे १,९१५ ते ४५,००० रुपयांपर्यंत (आकारणी वार्षिक) असले, तरी आमची शिफारस मासिक १,९१५ रुपयांचा पर्याय स्वीकारण्याची आहे-कारण त्याच्यात युजरला त्याच्या बिझनेस प्रोफाइलसाठी दहा सोशल प्रोफाइल्सचे व्यवस्थापन करता येते. अर्थात यशस्वी ऑनलाइन व्यवसाय चालवण्यासाठी हूटसूटसारखे साधन अनिवार्य नसले, तरी तुमचे डिजिटल मार्केटिंग स्ट्रक्चर आणि परिणामकारकता वाढवून कोणतीही ऑनलाइन कंपनी यशस्वी होण्याची शक्यता वाढू शकते हे समजणे गरजेचे आहे.\nअकाऊंटिंग सॉफ्टवेअरचा वापर Zoho Books (www.zoho.com)\nतुम्ही जरी खूप ग्राहक मिळवू शकलात किंवा विक्री करू शकलात, तरी रेकॉर्डस्, कर आणि धोरणात्मक गोष्टी आदी गोष्टींच्या अकाऊंटिंगबाबत मदतीसाठीचे साधन प्रत्येक उद्योजकाकडे असणे गरजेचे असते.\nझोहो बुक्स हे एक ऑनलाइन अकाऊंटिंग साधन असून भारतातल्या प्राथमिक टप्प्यातल्या कंपन्यांसाठी ते परफेक्ट आहे. झोहो बुक्स कोणत्याही कंपनीच्या अकाऊटिंगसाठी ऑटोमेटेड ॲप्रोच ठेवते. त्यांच्या बेस अकाऊंटिंगबाबतचे शुल्क मासिक पाचशे रुपये असून, त्यात इन्व्हॉइसिंग, बिलिंग, बँक इंटिग्रेशन, जीएसटी फायलिंग आणि इतर सुविधा समाविष्ट असतात. प्रीमियम अकाऊंटसाठीचे मासिक शुल्क आठ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते आणि त्यात अकाऊंटिंगसाठीच्या आणखी वेगवेगळ्या शक्यता उपलब्ध असतात. झोहो बुक्सद्वारे तुमच्या अकाऊंट्सचे व्यवस्थापन करणे अगदी सोपे आणि स्वस्त होत असल्याने विशेषतः छोट्या व्यावसायिकांना झोहो बुक्ससारखे साधन उपयुक्त ठरू शकते.\nमार्केट रिसर्च आणि ॲनॅलिसिस Google Web Analytics\nतुमच्या ऑनलाइन स्टोअरफ्रंटचा सेटअप पूर्ण झाला, तरी तो कशा प्रकारे काम करतो आहे यावर देखरेख ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते.\nगुगल ॲनॅलिटिक्स हे विनामूल्य उपलब्ध होणारे साधन आहे. वेब ट्रॅफिक (तुमच्या वेबसाइटला किती जणांनी भेट दिली ती संख्या, ऑर्डरची संख्या, किती जणांनी वेबसाइटवर खरेदी केली नाही त्यांची संख्या इत्यादी) ट्रॅक करणे आणि त्याबाबत अहवाल तयार करणे शक्य होते. वेबसाइट चालू असतानाच हे टूल आपोआप अपडेट होते आणि वेगवेगळ्या गोष्टी ट्रॅक करत राहते. शिवाय त्यात थर्ड पार्टी टूल्ससारख्या इंटिग्रेशन टूल्सचे वैविध्यही उपलब्ध असते-ज्याचा वापर करून तुम्ही नंतर तुमच्या स्टार्टअप प्रवासाचा मागोवा घेऊ शकता. गुगल ॲनॅलिटिक्सचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे मार्केटिंग कँपेन्सच्या यशापयशाला एक प्रकारचे जोखीम संरक्षण दिले जाते आणि तुमच्या ग्राहकांमध्ये विभागणी करणेही शक्य होते. गुगल ॲनॅलिटिक्स वेगवेगळी टूल्स आणि डेटा उपलब्ध करून देते ज्यांचा वापर करून कोणताही उद्योजक यशाची पायरी चढू शकतो. तर एकूण कोणत्याही ऑनलाइन व्यवसायासाठी ही सहा साधने आवश्यक आहेत. व्यवसाय किंवा उद्योग अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असणाऱ्या उद्योजकाच्या दृष्टीने खर्च किमान ठेवणे महत्त्वाचे असते-त्यामुळे आम्ही कमीत कमी गुंतवणूक करावी लागेल अशा साधनांचा इथे उल्लेख केला आहे. छोट्या व्यवसायांच्या दृष्टीने ही साधने परफेक्ट आहेत. एकदा का तुमच्या उद्योगाची भरभराट व्हायला लागली, की तुम्ही आणखी अपग्रेड करू शकता.\nलेखात उल्लेख केलेली साधने आंतरराष्ट्रीय स्तरावर माहीत आहेत आणि विश्वासार्ह आहेत. याचा अर्थ ती जगभरात कुठूनही वापरणे शक्य असले, तरी त्यांच्यात एकच त्रुटी आहे ती म्हणजे त्यातल्या प्रत्येक गोष्टी भारतीय बाजारपेठेला लागू होतीलच असे नाही. ऑनलाइन स्टोअरफ्रंट्सना मदत करण्यासाठी भारतातल्या कोणत्या कंपनीकडे एकमेवाद्वितीय किंवा नावीन्यपूर्ण सोल्युशन असेल, तर आम्हाला info@dcfventures.in वर संपर्क साधा. ज्यायोगे आम्ही तुमचे सोल्युशन आणखी व्यापक स्तरावर पोचवायला मदत करू शकू.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 26 सप्टेंबर\nपंचांग शनिवार - अधिक अश्विन शुद्ध 10, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.27, चंद्रोदय दुपारी 2.10, चंद्रास्त रात्री...\nलग्नाबाबतचा ट्रेंड बदलतोय ; 76 टक्के मराठी तरुण, तरुणी स्वत:च लग्नाचा निर्णय घेतात\nमुंबई, ता. 25 ; मुला, मुलीसाठी जोडीदाराची निवड पांरपारीक रीतीने आई वडील किंवा घरातील जेष्ठ मंडळी करतात. मात्र अलिकडे हा ट्रेंड बदलत चालला आहे. आता...\nटेलरिंग व्यवसायिकांची गरजांना कात्री :कोरोनामुळे कारागिरांवर मोलमजुरीची वेळ\nकिल्लेमच्छिंद्रगड (जि. सांगली) : कोरोनामुळे शासनाने लग्नसमारंभासाठी पाहुण्यारावळ्यांच्या उपस्थितीस मर्यादा घालून दिल्याने लग्नकार्य साध्या पद्धतीने...\nकिमान दूध बिल वेळेत हाती पडावे... शेतकऱ्यांची अपेक्षा; कोरोनामुळे विस्कटली घडी\nकिल्लेमच्छिंद्रगड (जि. सांगली) : कोरोना काळात मानवी जीवनाची गाडी काही निट चालेना असेच दिसतंय. वर्षातून एकदा खरीप धान्य, कडधान्यापासून आणि नगदी...\n७७ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या 'जीवनोन्नती' वरचं कुऱ्हाड \nऔरंगाबाद : राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती न देता, त्यांचा कार्यभार हस्तांतरीत करण्याचे...\nपर्यटकांचा चिपळूणातील विसावा पॉइंटकडे ओढा\nचिपळूण ( रत्नागिरी ) - खवय्यांचे स्वादिष्ट जेवण, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाबरोबरच चिपळूण तालुका निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. परशुराम घाटातील...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dailykesari.com/2020/08/13/pune-rain-update-9/", "date_download": "2020-09-26T03:24:37Z", "digest": "sha1:KKJCW2LRYCHTJIKN4E7DEXHBSQSX4Q3Z", "length": 14004, "nlines": 171, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "शहरात संततधार - Kesari", "raw_content": "\nघर केसरी रिपोर्टर शहरात संततधार\nपुणे : शहर आणि परिसरात पावसाचे सातत्य कायम आहे. गुरूवारी सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली. दुपारी पावसाचा वेग वाढल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ग्राहकांची संख्या घटल्याने व्यवहार मंदावले होते. तुळशीबाग, बोहरी आळी, महात्मा फुले मंइई परिसरात शांतता पाहण्यास मिळाली. पावसामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली होती. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत शहरात 7.5 मि.मी. पावसाची नोंद झाली.\nशहरात सकाळीच पावसाला सुरूवात झाल्याने घराबाहेर पडणार्‍यांचे प्रमाण घटले होते. पावसामुळे अनेकांनी नियोजित कामे रद्द केली. कार्यालये, संस्था, दुकानात काम करणार्‍यांना भिजतच निश्चित स्थळी पोहचावे लागले. त्यामुळे सकाळपासूनच मध्य वस्तीतील व्यवहावर परिणाम झाला. नेहमीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, सिंहगड रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यांवर पावसामुळे सकाळी तसेच सायंकाळी काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते.\nदुपारी पावसाचा वेग वाढल्याने वाहन चालकांना वाहने कडेला लावून आश्रयाला थांबावे लागले. पावसामुळे काही रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पावसात वाहन चालविताना खड्डे चुकविण्याची कसरत वाहन चालकांना करावी लागत होती. तर महत्त्वाच्या चौकातील सिग्नल बंद पडल्याने पावसात थांबून वाहतूक पोलिसांना वाहन चालकांना मार्गदर्शन करावे लागले. पावसाच्या सातत्यामुळे अनेकांना गुरूवारी घराबाहेर पडता आले नाही. येत्या बुधवारपर्यंत शहरात रोजच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच घाटमाथा परिसरात जोरदार ते मुसलधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. 1 जूनपासून कालपर्यंत 485.3 मि.मी. पाऊस पडला आहे.\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस\nमागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पाऊस पडत आहे. उद्या (शुक्रवारी) कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि घाट विभागात जोरदार पाऊस पडणार आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील 24 तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी पाऊस पडला.\nपूर्वीचा लेखएसटी सुरू करा; वंचितचे डफली बजाओ आंदोलन\nपुढील लेखआसाममधील पूरस्थितीमुळे चहा महागला\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nबिहार निवडणूक : तीन टप्प्यांत होणार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nबिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली.\nनवनाथ गोरे यांचा खडतर प्रवास होणार सुकर\nभारती विद्यापीठात मिळणार नोकरी\nलोकप्रिय गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले.\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलचा पहिल्याच षटकात पराक्रम\nअतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात\nइशांत शर्मा आणखी दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://cinenama.in/2020/05/25/zee-network-boom-in-lockdown/", "date_download": "2020-09-26T00:59:08Z", "digest": "sha1:GHIA56ZFGT6J2FDVATU3NJZHIKSNBA7S", "length": 14162, "nlines": 113, "source_domain": "cinenama.in", "title": "​लॉकडाऊनमध्ये 'झी​'ने केले ​'​एंटरटेनमेंट’ - Cinenama", "raw_content": "\nHome छोटा पडदा ​लॉकडाऊनमध्ये ‘झी​’ने केले ​’​एंटरटेनमेंट’\n​लॉकडाऊनमध्ये ‘झी​’ने केले ​’​एंटरटेनमेंट’\nप्रसारमाध्यम व करमणूक या क्षेत्रात दिग्गज असलेल्या झी एन्टरटेन्मेंट एंटरप्रायझेस लि. (झी) या कंपनीने सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातही आपल्या ग्राहकांना नवीन सामग्री व कार्यक्रम देण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञानाचा उत्तम प्रकारे उपयोग करून या उद्योगात आपले स्थान बळकट केले आहे. आपल्या वाहिन्या व इतर माध्यमांतून दर्शकांचे मनोरंजन करण्यावर व त्यांना सुयोग्य माहिती पुरवण्यावर या कंपनीने भर दिला आहे. कंपनीने तंत्रज्ञानाचा लाभ उठवित वेगाने व परस्पर सहयोगाने नावीन्यपूर्णतेचा पाया घालून कार्यक्रमांचे सादरीकरण केले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या टाळेबंदीच्या काळात काम करून मोबाईल व व्यावसायिक कॅमेऱ्यांच्या सहाय्याने व्हिडिओ आणि ऑडिओ निर्मिती तंत्रज्ञानाचा वापर केला व प्रसारण, डिजिटल आणि सामाजिक माध्यमांकरीता कार्यक्रम निर्माण केले.\nअनेक प्रादेशिक भाषांचा आधार घेऊन ‘झी’ ने दूरचित्रवाणीसाठी नवीन कार्यक्रम तयार केले. प्रथमतः, ‘झी’ने १० राज्यांमधील संगीत क्षेत्रातील सर्व दिग्गजांना एकत्र आणण्याचे ठरविले. यामध्ये लोकप्रिय कलावंत, संगीत क्षेत्रातील दिग्गज, ‘सारेगमप’ कार्यक्रमातील सर्वोत्कृष्ट गायक व परीक्षक यांना घेऊन ‘सारेगमप’ चे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी विशेष मैफल तैयार केली आहे. ‘एक देश एक राग’ या नावाचा हा तब्बल २५ तासांचा कार्यक्रम गिव्हइंडिया या संस्थेच्या ‘कोविड रिस्पॉन्स फंड’ साठी निधी जमविण्याकरीता आयोजित करण्यात आला आहे. टिव्ही व डिजिटल माध्यम यांचा एकत्रित उपक्रम ‘डिजिटल लाइव्ह-अथॉन’च्या स्वरुपात, त्याचबरोबर ‘मेगा फिनाले टिव्ही कन्सर्ट’ च्या रुपात झी व अन्य वाहिन्यांवर सादर होईल.\nआणि आता मराठी ‘रामायण’\n​​कंपनीने हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल बोलताना, ‘झी’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनित गोएंका म्हणाले, “झी’ ने नेहमीच या उद्योगात नावीन्य आणले आहे. तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे उपयोग करून टाळेबंदीच्या काळातही आमच्या ग्राहकांना मनोरंजनाची सामग्री व्यवस्थित पुरविल्याबद्दल मला आमच्या कर्मचारीवर्गाचा अभिमान आहे. आम्ही आमच्या दर्शकांसाठी नवीन मार्ग शोधून नवनवे, समृद्ध आणि आकर्षक कार्यक्रम निर्माण करण्याचे काम यापुढेही सुरू ठेवू. आमच्या ग्राहकांना सुयोग्य माहिती व मनोरंजनाचा लाभ मिळत राहावा, याकरीता आता या उद्योगाला सर्वसाधारण स्थितीची नव्याने व्याख्या करण्याची वेळ आली आहे.”\nडिजिटल आघाडीवर, ‘झी५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर असामान्य स्वरुपाचे मनोरंजनाचे कार्यक्रम रसिकांसाठी अखंडपणे सादर करण्यात येत आहेत. मे अखेरीपर्यंत यावर आणखी ५ कार्यक्रम / चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यातील काही मुख्य कार्यक्रमांचे चित्रीकरण कलाकारांच्या घरांतून, त्यांच्या सुरक्षिततेचे भान ठेवून करण्यात आले. यामध्ये ‘भल्ला कॉलिंग भल्ला’, ‘नेव्हर किस यूवर बेस्ट फ्रेंड’ (टाळेबंदी विशेष), ‘कालचक्र’ आदींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ‘घूमकेतू’ ‘काली २’ (रहस्यमय) व जून मध्ये ‘कहने को हमसफर है ३’ (प्रणयरम्य नाट्य) आणि ‘द कॅसिनो’ (रहस्यमय) हे दोन्ही कार्यक्रम सादर होतील.\nयावेळी पंडित जसराज, रोनू मजूमदार, सेल्वा गणेस, हिमेश रेशमिया, शान, उदित नारायण आदी कलाकार ‘सारेगमप’चे लोकप्रिय झालेले शीर्षकगीत १० भाषांमध्ये सादर होतील. दर्शकांच्या आवडीनुसार, ‘झी’ने काही घटना-आधारीत कार्यक्रमही आयोजित केले आहेत. यातील ‘लॉकडाऊन डायरीज्’ हा मजेशीर ‘गेम-चॅट शो’ आहे. ‘झी मराठीवर’ही तीन कार्यक्रम येणार आहेत. ‘वेध भविष्याचा’ हा आध्यात्मिक स्वरुपाचा गप्पांचा कार्यक्रम, ‘घरच्या घरी होम मिनिस्टर’ हा ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमावर आधारीत शो, तसेच ‘घरात बसले सारे’ हा रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुल्यांचा विनोदी कार्यक्रम यांचा त्यात समावेश असेल. ‘झी सार्थक’ या वाहिनीतर्फे ‘लॉकडाऊन चॅलेंज’ हा अनोखा कल्पित कार्यक्रम होईल, यामध्ये आघाडीच्या लोकप्रिय व्यक्तींचे टाळेबंदीच्या काळातील आयुष्य दाखविण्यात येईल. ‘झी सार्थक’तर्फे ‘मु तमे लॉकडाऊन’ हा दोन तासांचा एक चित्रपट जून मध्ये दाखविला जाईल. या दोन्ही कार्यक्रमांची सामग्री संबंधित व्यक्तींनी मोबाईलच्या माध्यमातून चित्रीत केली आहे.\nPrevious articleअभिनेते धुमाळ काका यांचे निधन\nNext articleअभिनेते दिग्दर्शक गिरीश साळवे यांचे निधन\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nआता दणक्यात ‘झी वाजवा’\n‘स्वराज्यजननी जिजामाता’ रंजक वळणावर\nप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात...\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\n‘Cannes’ जूनमध्ये घेणार वर्च्युअल फिल्म मार्केट\nसत्यजित ‘अ रे ऑफ जीनीयस’\nइरफान : द वॉरिअर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://letstalksexuality.com/ekada_hatat_jhadu_ghevun/", "date_download": "2020-09-26T02:04:06Z", "digest": "sha1:3ZGYLLEZOCP52374TC3PYHPUDPAMVYGH", "length": 12933, "nlines": 181, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "एकदा हातात झाडू घेऊन… – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nप्रेम करण्यासाठी डोळे नाही स्पर्शच महत्त्वाचा असतो\nपीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी\nप्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २\nलैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार\nलॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……\nपुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट\nजननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १\nएकदा हातात झाडू घेऊन…\nएकदा हातात झाडू घेऊन…\nमुलगा म्हणजे शूरवीर, कर्तबगार, घराबाहेरची कामं करणारा आणि मुलगी म्हणजे दुबळी, नाजूक घरातली कामं करणारी असं जवळपास सगळ्याच मुला-मुलींच्या डोक्यात ‘फिट’ झालेलं असतं. पण खरंच असं आहे का हो खरं तर लहानपणापासून मुला-मुलींना कसं वाढवलं जातं, त्यानुसार त्यांच्यात गुण, विविध कौशल्ये विकसित होण्यास मदत होत असते. म्हणूनच लहानपणापासूनच मुला-मुलींना समान वागणूक देणं महत्वाचं आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही, कोणत्याही वयात आपण वेगवेगळे गुण, कौशल्ये शिकू शकतो. मनानं पक्क ठरवलं तर मुलगा असो वा मुलगी मुला-मुलींमधल्या सामाजिक भेदाच्या चौकटी तुम्ही नक्कीच तोडू शकता…\nत्यासाठी ठरवलेल्या गोष्टी करण्यासाठी तुमच्या मनगटात बळ यावं, तुमच्या प्रयत्नांना यश यावं यासाठी या कवितेतून अनेक शुभेच्छा\nएकदा हातात झाडू घेऊन…\nएकदा हातात झाडू घेऊन पहावा म्हटलं;\nउठलो तेव्हा सारं घर चकाचक दिसलं\nझाडू हातात घेण्याचं काही कारणच नव्हतं उरलं\nदुसऱ्या दिवशी म्हटलं कपडे धुवून पहावं;\nअरे अरे राहू दे, म्हणत कुणीतरी तेवढ्यातच का यावं\nलगेच मेंदूनं फर्मावलं – हातातलं काम सोडून द्यावं\nआता त्यानं ठरवून टाकलं, जेवून झालं की ताट घेऊनच उठायचं\nआपल्यात अशी पद्धत नाही, आता काय करायचं\nप्रत्येक जण अडवणार, त्यांना कसं सांगायचं\nमित्र हसले, शेजारी चिडवू लागले\nपण त्यानं हे सगळे विचार मनातून काढून टाकले\nपोहायला शिकायचं तर कोण काय म्हणेल\nनाही शिकलीस कराटे तर काय गं अडेल\nकाय कपडे, कसे केस अशी कशी ही मुलगी\nकाय करावं हिच्यापुढे आता हद्द झाली\nकोणी हसतं, कोणी बोलतं, कोणी करतं सूचनांचा भडिमार\nखचलेल्या मनाचा गोंधळ कोण सोडवणार\nलोक बोलणार, हसणार आणि चिडवणारसुद्धा;\nनवीन गोष्टींची सवय नाही त्यांनासुद्धा\nथोडं दुर्लक्ष करा, थोडी हिंमत धरा\nमन करा खंबीर म्हणजे मनगटात येईल जोर\nटाका पुढचं पाउल होऊ नका कमजोर\nसंदर्भ – ‘शरीर साक्षरता मुलांसाठी’ – तथापि प्रकाशन\n‘The World before her’ च्या निमित्ताने…. ले. शकुंतला भालेराव\nलैंगिक शिवीगाळ, शेरेबाजी व राजकारण\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nमदनमणी,योनीभगोष्ट आणि मदनबिंदू म्हणजे काय ते योनीत कुठे असतात\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nअविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/can-defeat-them-in-10-days-pm-narendra-modi-on-pakistan/", "date_download": "2020-09-26T02:04:47Z", "digest": "sha1:A4ABMAJYFRWJ4LRWZUKC26JXNWLOGSTA", "length": 15871, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "पाकिस्तानला दहा दिवसांत धूळ चारू | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे…\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nपाकिस्तानला दहा दिवसांत धूळ चारू\nहिंदुस्थानकडून तीन-तीन युद्धे हारलो आहोत हे शेजारी देशाला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे हा शेजारी देश छुपे युद्ध करत आहे. परंतु शेजारी देशाला धूळ चारण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराला फक्त 10 ते 12 दिवस लागतील हे लक्षात ठेवावे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे.\nदिल्लीत ‘एनसीसी’ कॅडेट्सना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी नाव न घेता पाकिस्तानचा उल्लेख ‘शेजारी देश’ असा केला. थेट युद्धात जिंकता येणार नाही, यामुळे शेजारील देश हिंदुस्थानविरोधात छुपे युद्ध करीत आहे. या छुप्या युद्धात आजपर्यंत आपले अनेक जवान शहीद झाले, अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. हिंदुस्थानी लष्कराला शेजारी देशाला धूळ चारण्यासाठी फक्त 10 ते 12 दिवस लागतील हे लक्षात ठेवावे, असे पंतप्रधानांनी सांगितले.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे यांचे आदेश\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण...\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nया बातम्या अवश्य वाचा\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/category/jobs-in-kolhapur/", "date_download": "2020-09-26T02:12:26Z", "digest": "sha1:PYU4PZEJTBGTITXUJEIY4PHKJPKLMI5A", "length": 3848, "nlines": 73, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nNHM कोल्हापूर अंतर्गत विविध पदांची भरती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nUT प्रशासन दमण आणि दीव येथे विविध पदांची भरती\nमुंबई उपनगर जिल्हा येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची भरती\nICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाची भरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, दिव अंतर्गत विविध पदांची भरती\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांच्या 171 जागांसाठी ऑनलाईन अर्ज…\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती\nRITES लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदांची भरती\nजेईई अॅडव्हान्स्ड: ९८ टक्के विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा केंद्र\nनॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरु\nनाशिक महानगरपालिका भरती पात्र आणि अपात्र यादी\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2020-09-26T02:44:48Z", "digest": "sha1:V3VOOFXWX7NPVDWLDOEEICYHL4YCYEMW", "length": 13870, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रशांत दामले - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठी चित्रपट, मराठी रंगभूमी, मराठी दूरचित्रवाणी, हिंदी दूरचित्रवाणी\nइ.स. १९८३ - चालू\nचार दिवस प्रेमाचे, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे\nवाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी\nकाय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन\nलिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स\nअखिल भारतिय नाट्य पारिषद\nप्रशांत पुरुषोत्तम दामले (५ एप्रिल, इ.स. १९६१[१]; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी अभिनेता आहे. त्याने मराठी नाटके, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय व सूत्रसंचालन केले आहे.\n३ पुरस्कार (३२हून अधिक)\nआम्ही सारे खवय्ये झी मराठी\nआज काय स्पेशल कलर्स मराठी\nमराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द इ.स. १९८३मध्ये सुरू झाली. 'टूरटूर' या मराठी नाटकापासून श्री. दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर 'मोरूची मावशी' या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३७ उत्तमोत्तम चित्रपटांत आणि २६ नाटकांत अभिनय केला. यातील चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे ही नाटके आणि वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी हे चित्रपट विशेष प्रसिद्ध झाले. छोटा पडदा अर्थात दूरचित्रवाणीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांत भाग घेतला. यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका आणि झी मराठी या वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये ही पाककृतींविषयीची मालिका फार लोकप्रिय झाली.\nप्रशांत दामले यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.\nप्रशांत दामले यांना रोटरी क्लब ऑफ चिंचवडकडून कलागौरव पुरस्कार प्रदान झाला आहे. (२०-१-२०१६)\nलिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्‌स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे ४ प्रयोग, १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग व १८ जानेवारी २००१ रोजी एकाच दिवशी केलेले तीन नाटकांचे पाच प्रयोग समाविष्ट आहेत.\nप्रशांत दामले यांनी आतापर्यंत (१८ नोव्हेंबर २०१९) एकूण १२,२०० नाट्यप्रयोग केले आहेत. ५ जानेवारी २०१३ रोजी प्रशांत दामले यांनी ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा केलेला प्रयोग अनुक्रमाने १७४६ वा होता.\nप्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. त्यांच्या www.prashantdamle.com या संकेतस्थळाला १ जानेवारी २००५ पर्यंत तब्बल एक लाख लोकांनी भेट दिली आहे. प्रशांत दामले यांनी २७ हून अधिक नायिकांबरोबर काम केले आहे.\nआम्ही दोघं राजा राणी\nकार्टी काळजात घुसली (सहअभिनेत्री तेजश्री प्रधान)\nगेला माधव कुणीकडे (>१७४६ प्रयोग)\nचल काही तरीच काय\nचार दिवस प्रेमाचे (>१०२६ प्रयोग)\nमाझिया भाऊजींना रीत कळेना\nशूsss कुठं बोलायचं नाही\nसंशयकल्लोळ (सहअभिनेता राहुल देशपांडे)\nसाखर खाल्लेला माणूस (सहअभिनेत्री शुभांगी गोखले)\nआम्ही दोघे राजा राणी\nपुण्यात प्रशांत दामले यांची अभिनय शिकवण्याची एक प्रशिक्षण संस्था आहे.\n^ \"प्रशांत दामले याच्या अधिकृत संकेतस्थळावरील प्रोफाइल\".\n\"प्रशांत दामले यांचे संकेतस्थळ\".\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९६१ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०२० रोजी १२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/node/2168", "date_download": "2020-09-26T03:10:25Z", "digest": "sha1:VOUXX7QCJEHYYF6LD5UQD7LAUNZTWEFO", "length": 23948, "nlines": 101, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "विलास शहा - कथा त्र्याऐंशी वर्षांच्या तरुणाची! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nविलास शहा - कथा त्र्याऐंशी वर्षांच्या तरुणाची\nसोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण वाचनालय चळवळीचे अध्वर्यू , कत्तलखान्याला निघालेल्या तब्बल सतरा लाख मुक्या पशूंना त्यांच्या ‘टीम’च्या सहकार्याने जीवनदान देणारे गांधीवादी समाजसेवक, साने गुरुजींच्या सहवासात राहून 'राष्ट्र सेवा दला'चे विचार नसानसात भिनलेला कार्यकर्ता आणि खायच्या अन्नाची व गुंडाळायला कपड्यांची भ्रांत असणा-या देशातील गरिबांची पदोपदी आठवण राहवी म्हणून दररोज एकदाच अन्न घेणारा व वर्षातून केवळ चार पांढ-या बंड्या व पायजमे ही त्यांनी स्वत:ला घालून दिलेली मर्यादा... शिवाय, पदोपदी त्यांच्यातील धावून जाणारा लोकसेवक. शब्द कमी पडतील अशी ही ओळख\nजिल्हा सोलापूर. त्यात माढा नावाचे आटपाट गाव. विलास शिवलाल शहा हे या युवकाचे नाव. वय अवघे त्र्याऐंशी वर्षांचे तुम्ही त्यांच्या वयावर जाऊ नका. कसलाही काठीचा आधार नाही, विश्रांती नाही, कोठली व्याधी नाही की कोठला आजार नाही. तरुणपणाचा तोच ठणठणीतपणा आणि तीच उमेद.\nगोवत्स बारसेला जन्मदिन (२६ ऑक्टोबर १९३२) असणारा हा देवमाणूस गाई-गुरांच्या आयुष्यात जीवनदाता बनून पुढे यावा हा महाराष्ट्रातील समाजसेवेच्या इतिहासातील किती मोठा योगायोग असावा त्यांचा जन्म माढ्यात पण त्याच तालुक्यातील लव्हे हे त्यांचे आजोबा रामचंद शहा यांचे मूळ गाव. लव्ह्याच्या शेकडो एकर जमिनी रामचंदभाईंना पूर्वजांच्या सावकारीतून मिळाल्या होत्या. मात्र विलासभाईंचे वडील शिवलाल यांनी सगळ्या जमिनी गरीब शेतक-यांना परत केल्या त्यांचा जन्म माढ्यात पण त्याच तालुक्यातील लव्हे हे त्यांचे आजोबा रामचंद शहा यांचे मूळ गाव. लव्ह्याच्या शेकडो एकर जमिनी रामचंदभाईंना पूर्वजांच्या सावकारीतून मिळाल्या होत्या. मात्र विलासभाईंचे वडील शिवलाल यांनी सगळ्या जमिनी गरीब शेतक-यांना परत केल्या पुढे, शिवलाल शहा माढ्याला स्थायिक झाले व तेथे १९२८ सालापासून कापडविक्रीचा व्यापार करू लागले. प्रामाणिकपणा व अल्प नफा आकारून, घासाघीस न करता 'एकच भाव' तत्त्वाने व्यवहार सुरू ठेवला. त्यामुळे त्यांना पंचक्रोशीत ‘एकबोले’ या नावाने ओळखले जाऊ लागले. व्यवसायाची तीच प्रामाणिक परंपरा विलासभाई यांचे पुत्र विकास, विशाल व विवेक यांनी पुढे चालू ठेवली आहे.\nविलासभाईंचा जन्म चार बहिणींच्या पाठीवरचा. प्रकृती नाजूक. त्यात आई वालुबाई यांचे विलासभाईंच्या वयाच्या चौदाव्या वर्षी निधन झाले. त्यांची मावशी आवलबाई गांधी यांनी आईच्या मायेने त्यांचा सांभाळ केला. त्या काळातच वडील शिवलाल यांचे समाजसेवेचे संस्कार त्यांच्यावर झाले. बालपणात विलास सर्व जातीजमातींच्या मित्रांत मिसळत. काही जैन कुटुंबांना ती बाब खटकत असायची. काही वेळा, त्या लोकांनी शिवलाल यांना विलासच्या वागण्याला आवर घालण्यास सांगितले. मात्र वडिलांनी विलास यांना कधीच बंधने आणली नाहीत. कोणाला लुबाडायाचे नाही. स्वस्ताई असो - महागाई असो, ठरलेला नफा मिळवायचा. विनाकारण गरिबांना नाडायचे नाही... अशा संस्काराच्या कितीतरी गोष्टी घरात शिकायला मिळाल्या.\nपत्नी म्हणून विलासिनी त्यांच्या आयुष्यात आल्या. भाभींचे ‘विलासिनी’ हे नाव त्यांच्या आईवडिलांनी ठेवलेले; जणू त्यांची लग्नगाठ विलासभाईंशी बांधलेली होती ‘ते नाव काही आम्ही मुळीच ठेवलेलं नाही हो. तो निव्वळ योगायोग आहे’ असे विलासभाई गंमतीने सांगतात. विलास- विलासिनी यांच्या लग्नाची बात काही औरच आहे. विलास यांना आणि त्यांच्याकडील मंडळींना लग्न जमलेल्या त्यांच्या पत्नीला टी. बी. आहे हे समजले. ब-याच जणांनी लग्न मोडण्याचा सल्ला दिला, पण भाईंनी त्या गोष्टीला विरोध केला. ते म्हणाले, \"मी जर हे लग्न मोडले तर तिच्याशी पुन्हा कोण लग्न करणार ‘ते नाव काही आम्ही मुळीच ठेवलेलं नाही हो. तो निव्वळ योगायोग आहे’ असे विलासभाई गंमतीने सांगतात. विलास- विलासिनी यांच्या लग्नाची बात काही औरच आहे. विलास यांना आणि त्यांच्याकडील मंडळींना लग्न जमलेल्या त्यांच्या पत्नीला टी. बी. आहे हे समजले. ब-याच जणांनी लग्न मोडण्याचा सल्ला दिला, पण भाईंनी त्या गोष्टीला विरोध केला. ते म्हणाले, \"मी जर हे लग्न मोडले तर तिच्याशी पुन्हा कोण लग्न करणार\" त्यांचा ते लग्न करण्याचा निर्धार पक्का होता. पुढे, विलासभाईंचे वकील आणि वैद्यकी असा दुहेरी व्याप सांभाळणारे चुलते मोतिचंद रामचंद शहा यांनी आयुर्वेदाच्या उपचारांनी तो रोग पूर्णपणे बरा केला. विलासभाईंना पत्नीची मोठी साथ मिळाली. सोन्याच्या दागिन्यांचा सोस नाही की साड्यांची हौस नाही, भाईंच्या समाजकार्यात भाभींचा सक्रिय सहभाग राहिला. ज्येष्ठ पुत्र विकास यांनी कापड व्यवसाय जबाबदारी अंगावर घेतल्याने विलासभाईंना सामाजिक कार्यासाठी सर्व वेळ देता आला.\nबालवयात समाजसेवेचे लागलेले वेड वयाबरोबर वाढत गेले. त्यातच 'राष्ट्र सेवा दला'चे झालेले संस्कार त्यांना गप्प बसू देत नव्हते. शिकण्याचीही दांडगी हौस. पहिला मुलगा जन्मला तेव्हा ते महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाची बहि:शाल परीक्षा उत्तीर्ण झाले. तर तिसरा मुलगा विवेक जन्मला तेव्हा इंटर परीक्षा उत्तीर्ण झाले. ते वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी जर्न्यालिझम पदवीधारक झाले. संबंधित महाविद्यालयाने या ‘युवा’ विद्यार्थ्याचा गौरव केला.\nविलास शहा यांच्या सामाजिक कार्याची जंत्री अशी -\n* जीवे मारण्याच्या धमक्या, खोट्या कोर्ट केसेस आदी दहशतवादी कृत्याने किंचितही न डगमगता विलासभाईंनी मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर ) येथील महानगरपालिकेचा यांत्रिक कत्तल खाना तब्बल काही महिने बंद केला. त्यासाठी बारा दिवस दहा सहका-यांसह अन्नसत्याग्रह करून कायमचा बंद केला व सोनअंकुर एक्स्पोर्ट प्रा.लि. कंपनीचा शंभर टक्के निर्याताभिमुख कत्तलखाना तसेच, देवदेवींच्या एकशेएकोणनव्वद यात्रांत तर एकोणीस मुस्लिम उरुसांत होणारी पशुबळी प्रथा पूर्णपणे बंद करण्याचे अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे. त्यामुळे बळी देण्यात येणा-या गाई, म्हशी, कोंबडे, बकरे, रेडे अशा तब्बल सतरा लाख मूक पशूंना जीवदान दिले. अहिंसा क्षेत्रातील तो जागतिक विक्रम ठरेल.\n* जळगावचे दाते पशुप्रेमी रतनलालजी बाफना यांनी विलासभाईंना मारुती ओम्नी गाडी भेट दिली. त्यांनी तिचा वापर स्वत:साठी न करता त्यामध्ये फिरता पशुदवाखाना सुरू करण्यास ती देऊन टाकली.\n* त्या गाडीने शाकाहार व व्यसनमुक्ती अभियानाच्या माध्यमातून एक हजार एकोणचाळीस गावांमध्ये शाळा-महाविद्यालयांत ध्वनिफीत, चित्रफीत, पोस्टरप्रदर्शने, व्याख्याने, कलापथक, पत्रके आणि पुस्तककव्हर अशा विविध माध्यमांतून युवकांना मांसाहार बंद व व्यसनमुक्त होण्याचा मंत्र दिला आहे.\n* फिरत्या दवाखान्याने ‘पीपल फॉर अॅनिमल वेल्फेअर’ आणि ‘डोंकीजसांचुरी’ या दोन पशुप्रेमी, करुणाभावी संस्थांच्या सहकार्याने रस्त्यांवरील निराश्रित, जखमी, आजारी, अपघातग्रस्त अशा चार हजार सहाशेशहात्तर गाढवे, कुत्रे, मांजरे आदी प्राण्यांवर उपचार करून त्यांना रोगमुक्त केले.\n* विलासभाई यांना राष्ट्र व राज्य पातळीवर सत्त्याहत्तर पुरस्कार मिळाले आहेत. त्यातून मिळालेल्या लाखो रुपयांची रक्कम त्यांनी समाजातील गरजूंना वाटली आहे. त्यातूनच कार्यकर्त्यांनी व मित्रांनी 'प्राणिमित्र विलास शिवलाल सर्वोदय ट्रस्ट'ची उभारणी केली. ‘व्हाईस फॉर व्हाईसलेस’ हे अत्यंत बोलके व कृतिशील असे त्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.\n* मरणोत्तर देहदान व नेत्रदान यांचा संकल्प सोपस्कार कायदेशीर रीत्या पूर्ण केले आहेत .\n* देहदान व नेत्रदान यासाठी त्यांनी केलेल्या जागृतीमुळे ब्याण्णव व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान केल्यामुळे एकशेचौ-याहत्तर अंधांना दृष्टीलाभ झाला तर चौ-याहत्तर व्यक्तींच्या मरणोत्तर देहदानाने डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास करता आला.\n* दोन हजार पाचशेचौदा गरीब रुग्णांना उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी मदत केली आहे.\n* पाचशेएकोणीस निराधार, विधवा, दलित व गरीब महिलांना आर्थिक आणि आवश्यक ते सहाय्य केले आहे.\n* तीनशेएकवीस गावांत सार्वजनिक वाचनालयांची स्थापना केली आहे.\n* तीन हजार चौ-याऐंशी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, वह्या व शैक्षणिक साहित्याचा लाभ झाला आहे.\n* कर्मवीर भाऊराव पाटील प्रणीत ‘कमवा व शिका’ या योजनेद्वारा आर्थिक दुर्बल घटकांतील एकसष्ट हुशार, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारे सहयोग दिला. त्यांपैकी अनेकजण देशात व परदेशात उच्चपदावर कार्यरत आहेत.\n* त्यांनी त्यांच्या एक्याऐंशीव्या वाढदिवशी त्यांच्या तीन मुलांनी प्रत्येकी एक्याऐंशी हजार याप्रमाणे दिलेल्या दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये देणगीतून मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना रोख आर्थिक मदत घरपोच दिली.\n* माढा येथील शासनमान्य ‘अ’ वर्गातील 'शिवलाल रामचंद तालुका वाचनालया'ला बाबा आमटे, अण्णा हजारे, ग.प्र.प्रधान, एस.एम.जोशी, काकासाहेब गाडगीळ, मामासाहेब देवगिरीकर, नरेंद्र दाभोळकर अशा प्रतिथयश व्यक्तींनी भेट दिलेली आहे.\n* ज्यांच्यामुळे समाजकार्याची प्रेरणा मिळाली आणि सुसंस्कार झाले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या ऋणातून अंशत: मुक्त होण्यासाठी बाबा आमटे व साधनाताई आमटे, ग.प्र. प्रधान, नरेंद्र दाभोळकर, मातोश्री वालुबाई शिवलाल शहा आणि मावशी श्रीमती अवलबाई वालचंद गांधी यांच्या नावाने दरवर्षी पुरस्कार देण्यासाठी 'प्राणिमित्र विलास शिवलाल सर्वोदय ट्रस्ट'तर्फे मुदतठेवीच्या व्याजातून दहा हजार एक्याऐंशी रुपये देण्याची तरतूद विलासभाईंच्या एक्याऐंशीव्या वाढदिवसापासून करून ठेवण्यात आलेली आहे.\n* विलासभाई यांनी त्यांच्या अडुसष्टाव्या वाढदिवशी केलेले मृत्यपत्र आदर्श व प्रेरणादायी आहे. गीतकार प्रवीण दवणे यांनी त्या पत्रावर ‘सकाळ’मधून लिहिलेल्या लेखाला महाराष्ट्रातून तब्बल तेराशे वाचकांनी प्रतिसाद देऊन, प्रेरणा मिळाल्याचे कळवले आहे.\n* पंढरपूर येथील एड्स आधार केंद्र ‘पालवी’ या संस्थेचे संस्थापक – सल्लागार म्हणून योगदान.\n102, रवियेरा अपार्ट्मेंट, रेल्वे लाईन,प्रधान नेत्र हॉसपिटल,\nविलास शहा - कथा त्र्याऐंशी वर्षांच्या तरुणाची\nदीपक कलढोणे यांची संगीत मुशाफिरी\nसंदर्भ: करकंब गाव, गायक\nमाढ्याचे विठ्ठल मंदिर आणि मूळ मूर्तीचा वाद\nसंदर्भ: अभ्‍यास, संशोधन, रा. चिं. ढेरे, विठ्ठल, महाराष्‍ट्रातील मंदिरे, विठ्ठल मंदिर, माढा गाव\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chitrapatmahamandal.com/index.php/about-2/news-updates", "date_download": "2020-09-26T02:12:49Z", "digest": "sha1:N2PRHKY7WNIYFVRILMNXBFQQFKAPXVJT", "length": 10013, "nlines": 317, "source_domain": "chitrapatmahamandal.com", "title": "chitrapatmahamandal - Movie News", "raw_content": "\n९ वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव २०१६\n९ वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव २०१६\nअखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा निर्वाणीचा इशारा\nअखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा निर्वाणीचा इशारा\nमराठी चित्रपट महामंडळ नेमणार भरारी पथक\nमराठी चित्रपट महामंडळ नेमणार भरारी पथक\nअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे आज सांस्कृतिक मंत्री मा.श्री.अमित देशमुख यांना निवेदन देण्यात आले\nअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे आज सांस्कृतिक मंत्री मा.श्री.अमित देशमुख यांना निवेदन देण्यात आले\nराज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याशी कलाकारांच्या कोरोना मुळे उद्भवलेल्या परिस्थिती बाबत चर्चा करताना अध्यक्ष मेघराज राजेभोसले व निर्माते निलेश नवलखा.\nराज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याशी कलाकारांच्या कोरोना मुळे उद्भवलेल्या परिस्थिती बाबत चर्चा करताना अध्यक्ष मेघराज राजेभोसले व निर्माते निलेश नवलखा.\nऔरंगाबाद येथील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ऑफिस आजपासून नवीन जागेत सुरु करण्यात आलेले आहे.\nऔरंगाबाद येथील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ऑफिस आजपासून नवीन जागेत सुरु करण्यात आलेले आहे.\n१९ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल -२०२१ च्या मराठी चित्रपट स्पर्ध्येच्या प्रवेशिका स्विकारण्यास सुरवात झाली आहे\n१९ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल -२०२१ च्या मराठी चित्रपट स्पर्ध्येच्या प्रवेशिका स्विकारण्यास सुरवात झाली आहे\nआज पुणे येथे राज्याचे गृह मंत्री मा. अनिल जी देशमुख यांची भेट मा.अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी घेतली, या भेटीत कलाकारांच्या अडचणी, शासनाच्या कलाकार कल्याण मंडळ ची गरज, कलाकारांना पोलीस मदत, नागपूर ला चित्रपट महामंडळ ऑफिस साठी जागा या संधर्भात सविस्त\nआज पुणे येथे राज्याचे गृह मंत्री मा. अनिल जी देशमुख यांची भेट मा.अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी घेतली, या भेटीत कलाकारांच्या अडचणी, शासनाच्या कलाकार कल्याण मंडळ ची गरज, कलाकारांना पोलीस मदत, नागपूर ला चित्रपट महामंडळ ऑफिस साठी जागा या संधर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.\nमा. शरद पवार साहेब यांच्यासोबत महा कला मंडल च्या शिष्ट मंडळाची नुकतीच पुणे येथे मिटिंग झाली.\nमा. शरद पवार साहेब यांच्यासोबत महा कला मंडल च्या शिष्ट मंडळाची नुकतीच पुणे येथे मिटिंग झाली.\nगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणेशोत्सव २०२०\nगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणेशोत्सव २०२०\nकलाकारांचे प्रश्न \"महा कला मंडल\" शिखर संस्था सोडविणार - मेघराज भैया भोसले\n.कलाकारांचे प्रश्न \"महा कला मंडल\" शिखर संस्था सोडविणार - मेघराज भैया भोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.karmarkarfoundationmumbai.org/karmarkar/html/Kulach6.html", "date_download": "2020-09-26T03:08:16Z", "digest": "sha1:4OUPVFSQP5X7TNXVKTN2E7QMH6RAGKWB", "length": 17444, "nlines": 23, "source_domain": "www.karmarkarfoundationmumbai.org", "title": "Karmarkar Foundation", "raw_content": "\nमाहितीकडे कुलवृतांताकडे घराणी वंशावळी व्यक्ती व्यक्तीच्या सूची नावे व गोत्रे\nकरमकरांची कुलदैवते, कुळधर्म इ.- 1 2 3 4 5 6 7\nपरतुं त्याआधी चालुक्यांनी चिपळुन ही यज्ञभुमी निवडली व यज्ञानंतर विस्तृत असे भुखंड देऊन तेथे या चितीप्रवण पुरोहितीची वसाहत केली हे सिध्द करणारी प्रमाणे सांगितली पाहिजेत. अर्थात त्या काळचे पुरावे म्हणजे ताम्रपट ते पुष्कळसे नष्ट झालेले ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे परंतु सुदैवाने त्या घराण्यातील दुसरा पुलकेशी (सन ६०२ ते ६४२) याने दिलेला ताम्रपट मुद्रित स्वरुपात उपलब्ध ( 'एपिग्राफ़िया इंडिका', खंड ३, पुष्टे ५० ते ५३.) संस्कृत भाषा आणि कानडी लिपी असणारा ताम्रपट दानाविषयक आहे. प्रासिध्द संशोधक भगवानलाल इंद्रजी यांना हा ताम्रपट चिपळुन येथे सन १८८४ मध्ये मिळाला. तापवुन स्वच्छ करण्याच्या खटपटीत त्यातील कालविषयक उल्लेख आधीच नष्ट झाला होता. तरी ही त्याच्या विश्वसनीयतेसंबधी शंका नसल्याने फ़्लीट या इंग्रज विद्वानाने त्याचे एशियाटिक सोसायटी पुढे वाचन केले.\nआपला मामा सेनानंदराज श्रीसेंद्रक याने केलेल्या भुमिदानाला मान्यता देणारा हा ताम्रपट आहे. दानाच्या स्विकार करणा-या महेश्वराच्या निर्दश आत्रिगोत्री चितळे यांचे असुन ते चिती या शब्दावरुन सिध्द होणारे आहे. या ताम्रपटाचा ओझरता उल्लेख भारताचार्य वैद्य आणि डॉ भांडारकर यांच्या ग्रंथात आहे. परंतु इष्टयज्ञ या उपाधीकडे त्यांचे लक्ष न गेल्यामुळे त्याचे व्यापक महत्व त्यांच्या ध्यानी आलेले दिसत नाही. श्रीसेंद्रक म्हणजे शिंदे असा त्यांचा आभिप्राय आहे. परंतु माझ्या मते चिपळुणजवळील कुटरे येथील राजे शिर्के म्हणजे श्रीसेंद्रक होता. मुसलमानी राजवटीत श्रीसेंद्रक यांचा संक्षेप शिर्क (श्रीकेवरुन) व्हावा हे साहजिकच होते. राजे शिर्के यांचे घराणे इंदुर - ग्वाल्हेरपर्यंतच्या प्राचीन आणि सन्माननीय मानले जाते. पाहिल्या पुलकेशीने चिपळुन येथे केलेल्या चितीयुक्त यज्ञाशी संबंधित अशा चितळे आणि शिर्के या घराण्याचा उल्लेख करणारा हा तांम्रपट या संदर्भात अत्यंत महत्त्वपुर्ण आहे.\nउपरोक्त तांम्रपटात सध्याच्या वाशिष्ठी नदीचा निर्दश चारुवेणी असा आहे, आणि तो आतिशय अन्वर्थक आहे. वेणी म्हणजे खाडी आणि ती आजही चारु म्हणजे रम्य दर्शन आहे. वेणी अथवा खाडीवरील आम्रवार हे दिलेले ... म्हणजेच चिपळुन ...पेढांबे (वेण्यांबे). ज्या दुस-या गावाच्या उल्लेख आहे ते आयांचपल्ली म्हणजे त्याच पारिसरातील चिवेली. अशा रितीने ताम्रपटातील ग्रामनामे आणि कुलनामे यांची साक्ष आणि सामक्ष चिपळुणच्या पुरातन यज्ञ प्रासिध्द प्रातिष्टेला अनुकुल आहे.\nचिपळुनच्या यज्ञभुमित्वाच्या इतर खुणा म्हणजे यज्ञपती परशुरामाचे मांदिर, यज्ञात बोलिवलेले चारही वेद जिच्या रुपात पुन्हा समाविष्ट होतात ती वेदवासिनी अथवा विध्यवासिनी हिचे मंदीर आणि यज्ञभुमीचा रक्षणकर्ता अशी ज्याच्यी महती त्या कार्तिकेयाचे मांदिर ही प्रासिध्द मांदिरे होते. यज्ञानंतर यजमान, यजमान-पत्नी आणि यज्ञपुरोहित समारंभपुर्वक स्नान करतात. त्या अवभृथ स्नानाने पावित्र झालेले परशुरामातीर्थ अथवा रामतीर्थ आजही चिपळुणात आहे. चिपळुन नगराचे आजचे विभाग ही आपली यज्ञ संबाधित नावे सांभाळुन आहे: भोगाळे (मृगालय), मार्कडी (मार्कड्याचे स्थान) बेमंडी (ब्रह्मोदन मंडप), मिरजोळई (मर्जालीयम मंडप), पाग (प्राम्वंश मंडप), माप (विटाच्या भटीच्या जागा).वरील विभाग-नावे केवळ चिपळुणातच आढळतात, कोकणात अन्यत्र नाहित हे या संबधी लक्षात घेण्यासारखे आहे. नगराच्या मध्यभागी राष्ट्र्कुटांचे राज चिन्ह गजांत लक्ष्मी अत्यंत उपेक्षित अवस्थतेही आजही विद्यमान आहे.\nपंधराशे वर्षापुर्वी जेव्हा चित्तीसाहित सोमयज्ञ या भुमीत झाले तेव्हा आडनावे प्रचलित नव्हती, या आक्षेपाला धारण करीत. चित्पावनांच्या संबंधात ही कुलनामे यज्ञाविषयक कार्यावरुन रुढ झाली. अशी याज्ञीय कुलनामे युक्त प्रांतात आहेत. (यज्व,वाजपेयी तिवारी दीक्षीत ) तशीच ती आंध्रप्रदेशातही आहेत (उपद्रष्टा). महाराष्ट्रातील चित्पावने तर ज्ञातीतही ती आढळतात. श्रोत्रिय (श्रृति), नवरे ( नवरात्र इष्टी), सप्रे ( सप्तरात्र इष्टी), नवाथे (अन्न: पात्य इष्टी). परंतु खांडल आणि चित्पावन यांच्यात ती मोठ्या प्रमाणावर आहेत. शतकानुशतके टिकवलेली ही आडनावे म्हणजे प्राचीन यज्ञपरंपरेवर प्रकाश टाकणारा आणि संशोधनाला साहाय्य करणारा किरण -समुहच होय.\nखांडल आणि चित्तपावन यांच्या आडनावातील समानता पुढील निर्दशक सुचीवरुन ध्यानात येईल. 'खांडल विप्र महासभा का इतिहास' ( लेखक :श्री.जी पी.सुंदरिया) या ग्रंथाची पृष्टे ४५ ते ४९ पहावीत. सुचीत संस्कृत आधिकारनामे प्रथम व नंतर त्यांचे राजस्थानी व मराठी अपभ्रंश दिले आहेत. मठालय-मठोलिया -माटे ( एकामंडपाचा आधिकारी) सामर-सामला-सामल, सावरकर ( देवाशी संवाद साधणारे) रणोद्वाही -रिण्या -रानडे, राणे (यज्ञरक्षक) बिल्ववान-बीलवाल -बिवलकर ( बेले ,वेलफ़ळे जमाविणारे ) चौल-चोटिया-शेंडे ( केशकर्तनाची व्यवस्था ) सुंदर-सुंदरिया-मनोहर (प्रसाधन व्यवस्था) बठोबा -बठोठिया-बडेबाड (वडाच्या सामिधा) झपनाट्य-झरवाना दिया-कानडे ( यक्षानाट्य ) चरुस्थाली-सुथंला-ताम्हनकर (स्थाली ताह्मन) त्रिवारी -तिवारी -सोवनी (सोमरसाचे त्रिवार सेवन) बिल्व -बिल -भिडे चापेकर (धनुष्य-बाण) गोधुली य-गोधला -गोंधळे कर (संध्याकाळचे स्तवन) डिंडम -डिंडवाणिय -दांडेकर (वाद्य व्यवस्थापक) गोरस-गोरसिया-गोरे, गोडसे (गायीचे दुध पुरविणे) गोवल - गोवल - गोळे (गाईचा संभाळ) घूगोल -दुगोलिया -दुगल ( नक्षत्राचा अभ्यास ) प्रवाल - परवाल -बाळ (मंडपशोभेसाठी पालवी) नवहालक - नवलाह - लागु (हाल-लांगुल, नांगर) हुचर-हुचारिया -गांधारे ( हुचुर नामक गंधर्वाचे आवाहन ) पिप्पल -पीपल वा -पिंपळखरे (पिंपळाच्या सामिधा पिंपळकार) पराशला- परशला-रसाळ (सामिधा जमाविणे) घटवाल-घाटवाल -घाटे, गाडगीळ (गाडगे-वट, जलकुंभ धारन करणारे) टंकहारी-टंकहारा-टकले (टंक-नाणी) निधानीय -नानु, निटाव्या - नातु (एकमंत्र समुह) दर्भशायी-दाभडा - दबके दामले निष्ठर -निठुरा -नित्सुरे (बुकलुन बोकड मारणारा) व्यवहारक-बोहरा-बेहेरे (व्यापारी वस्तु पुरविणारा) भुर्भर -भुभ्रा - बर्व (भराव टाकुन यज्ञभुमीसारखी करणे) विभाजीय - बांटवा - वाटवे, भागणे, भागवत ( दक्षिणावाटणे ) श्रेत्रिय-सोती-काणे (श्रोतु - कान, मुळ अर्थवेद भ्राष्ट्र - भाट विडा - भाटे ( स्वयंपाक व्यवस्था )\nयज्ञातील अनेक विभागांशी संबधित अशी समान कुलनामे खांडलांत आणि चित्पावन असली तरी चिपळुण मधील चित्तीप्राकियेच्या सिध्दीनंतर त्यांनी स्वतंत्रज्ञाति नाम घेणे स्वाभाविक होते. ते म्हणजे चित्पावन - चितीच्या सिध्दीने पावन झालेले, मान्यता पावलेले या यज्ञानंतर त्यांना जे भुवि भाग दक्षिणा आणि दान दिलेल्या भुमीला अग्रहार असे नाव आहे. जे यामुळेच गुहागर, दिवेआगार अशी ग्रामनामे कोकणात आहेत. एका आडनांवाच्या कोकणस्थाचे एकच मुळ गांव असते व तेथे त्यांचे कुलदैवत असते याचे ही कारण वरील प्रकारची कोकणाची वसाहत होय. ओक्कल, औदीच्य, नागर, हविक वगैरे ब्राह्मण ज्ञाती अशाच अनेक प्रदेशांत आणल्या गेल्या व तेथेच स्थायिक झाल्या. ब्राह्मण याचा मुळ अर्थ त्या काळी प्रचलीत होता; तो म्हणजे वेदविद्या आणि यज्ञकर्मातील नैपूण्य. यज्ञ हे ब्रम्हाचे मुर्त स्वरुप आणि त्याचे साधक व उपासक ते यज्ञवेत्ते आणि वेदाभ्यासी ब्राह्मण -ग्रंथ असेच नाव आहे. द्वादशीच्या भोजनाचे भट-भिक्षुक ब्राम्हण हा पुष्कळच नंतरचा प्रकार आहे, अशा वैदिक आणि याज्ञिक ब्राह्मणांनी स्वत: शेती करावी अशी अपेक्षा नसे त्यांच्या कुल वाटे केतकाम करणारे श्रामिक म्हणजे कोकणात ज्यांना कुळवाडी म्हणत ती जमात. अशा पुरोहितांच्या वस्तीवर कसलाही कर आकारला जात नसे .अग्रहाचे रक्षण हे नायर जमातीकडे असे. नायर याचा अर्थ नेते, अनार्य नव्हे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/325-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-26T01:28:48Z", "digest": "sha1:C6ZXCZF3YDGD4KCOW3DIRPPZNCYSJ6HB", "length": 9962, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "325 वर्षांची परंपरा असलेला सिंदखेड्याचा श्रीराम जन्मोत्सव रद्द | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\n325 वर्षांची परंपरा असलेला सिंदखेड्याचा श्रीराम जन्मोत्सव रद्द\nin खान्देश, ठळक बातम्या, नंदुरबार\nशिंदखेडा (प्रतिनिधी) : येथील श्रीराम बालाजी मंदिर संस्थानच्या वतीने सुमारे सव्वातीनशे वर्षापासून तह्यात पणे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम 2 एप्रिल रोजी संपन्न होणार होता सदरचा कार्यक्रम कोरोना covid-19 च्या देशभर लागलेल्या महामारी मुळे रद्द करण्यात आल्याची माहिती श्रीराम बालाजी मंदिर संस्थानचे मठाधिपती हरिभक्त परायण मेघशाम बुवा महाराज यांनी दिली आहे.\nयाबाबत दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की सकळ भाविकांना कळविण्यात येते की सर्वत्र कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना जीवित आणि या रोगामुळे होत आहे संपूर्ण राज्यात युद्धपातळीवर यावर उपाययोजना सुरू आहेत व शासनाने लोकडाऊन केले आहे कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढून नये यासाठी शासनाने यात्रा उत्सव सण यांच्यावर निर्बंध घातले असून शासन प्रशासनाच निर्देश पाळावेत म्हणून वारकरी संप्रदायाच्या श्रीराम जयंतीचा यंदाच्या कार्यक्रम यावर्षी खंडीत होत असून सुमारे सव्वा तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील श्री बालाजी संस्थानच्या श्रीराम जन्मोत्सव हा ऐतिहासिक महत्त्व आहे\nकोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या आवाहनानुसार यावर्षीचा श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम खंडित करीत असल्याची माहिती बालाजी संस्थानाचे मठाअधिपती ह-भ-प मेघशाम महाराज बुवा यांनी दिली आहे चैत्रशुद्ध 9 रोजीचा 2 एप्रिल रोजी ठेवण्यात आलेला कीर्तन महोत्सव व श्रीराम जयंती कार्यक्रम यावर्षी खंडित करण्यात आला आहे तथापि नागरिकांनी व प्रभू श्रीराम भक्तांनी आपापल्या घरोघरी 2 एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव आपल्या आपल्या परीने यथाशक्ती साजरा करावा व प्रभू रामाचे पूजा करावी असे आवाहन संस्थानचे मठाधिपती ह-भ-प मेघशाम महाराज यांनी केले आहे\nमुख्यमंत्र्यांनी आमदार शिरीषकुमार नाईक यांच्याकडून जाणून घेतली परिस्थिती\nखिर्डीतील किराणा दुकानदार घेताय ‘कोरोणा’बाबत काळजी \nभारतात कोरोना चाचणीचा नवा विक्रम; एका दिवसात विक्रमी चाचणी\nBIG BREAKING: बिहार निवडणुकीची घोषणा: तीन टप्प्यात होणार मतदान\nखिर्डीतील किराणा दुकानदार घेताय ‘कोरोणा’बाबत काळजी \nनगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील यांच्यातर्फे फवारणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2017/08/dal-khichadi/", "date_download": "2020-09-26T02:37:29Z", "digest": "sha1:EIA3LK5I2RTUWNKIA4J2YNXPGNOWQNBV", "length": 10187, "nlines": 181, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Dal Khichadi (दाल खिचडी) – Rice Lentil Kedgeree | My Family Recipes", "raw_content": "\nदाल खिचडी – रेस्टॉरंट स्टाईल\nआपण किती विचित्र असतो ना घरी आपल्याला रेस्टॉरंट सारखं जेवण हवं असतं आणि रेस्टॉरंट मध्ये घरगुती जेवण हवं असतं घरी आपल्याला रेस्टॉरंट सारखं जेवण हवं असतं आणि रेस्टॉरंट मध्ये घरगुती जेवण हवं असतं मला वाटतं जे मिळतं त्यात आपण कधीच समाधानी नसतो. तर आज एक रेस्टॉरंट स्टाईल डिश जी तुम्ही सहज घरी करू शकता.\nकधी साधं जेवण हवं असेल किंवा कधी भात, आमटी चा कंटाळा आला असेल तर दाल खिचडी हा उत्तम पर्याय आहे. दाल खिचडी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. मी ही रेसिपी वापरून खिचडी बनवते. आणि माझ्या सुनेच्या भाषेत ती खिचडी awesome होते\nसाहित्य नेहमीचंच आहे – घरी असणारं. फक्त एकच टीप – ही खिचडी साजूक तुपातच करायची; तेलात करून चव बदलेल.\nसाहित्य (५ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)\nतूर डाळ पाऊण कप\nदालचिनी १ इंचाचा तुकडा\nबारीक चिरलेला कांदा अर्धा कप\nबारीक चिरलेला टोमॅटो अर्धा कप\nबारीक चिरलेली लसूण १ टेबलस्पून\nलाल तिखट अर्धा टीस्पून\nचिरलेली कोथिंबीर दीड टेबलस्पून\nसाजूक तूप १ टेबलस्पून\n१. डाळ आणि तांदूळ धुवून घ्या.\n२. डाळीत अडीच कप पाणी, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग आणि तेलाचे २ थेम्ब घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.\n३. तांदुळात २ कप पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.\n४. एका कढईत अर्धा टेबलस्पून साजूक तूप घालून जिरं , हिंगाची फोडणी करा. त्यात अर्धा टेबलस्पून चिरलेली लसूण घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात लवंग, मिरी, दालचिनी, कढीपत्ता, हळद, हिरवी मिरची (उभी मधे चिरून) आणि चिरलेला कांदा घाला. मंद आचेवर २–३ मिनिटं परतून घ्या.\n५. चिरलेला टोमॅटो घाला. मंद आचेवर २–३ मिनिटं परतून घ्या. झाकण ठेवून मंद आचेवर कांदा नरम होईपर्यंत शिजवून घ्या.\n६. शिजलेली डाळ आणि तांदूळ घाला. एकजीव करा. मीठ आणि लाल तिखट घाला. जरुरीप्रमाणे पाणी घाला. खिचडी गार झाल्यावर दाट होते. त्या अंदाजाने पाणी घाला.\n७. मिश्रण एकजीव करून ५–६ मिनिटं शिजवा.\n८. चिरलेली कोथिंबीर घाला.\n९. एका लहान कढल्यात अर्धा टेबलस्पून साजूक तूप घालून गरम करा. त्यात उरलेली लसूण घाला. गुलाबी रंगावर परतून घ्या. लाल मिरच्या घाला आणि ही फोडणी खिचडीवर घाला.\n१०. गरम गरम दाल खिचडी कढी आणि पापडासोबत खायला द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/chinas-release-of-sui-dhaga-movie/", "date_download": "2020-09-26T01:17:59Z", "digest": "sha1:ICDLYVY3DWMS3CJ7HTXXUDMUUELJVDKO", "length": 4998, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "\"सुई धागा'चा चीनमधील रिलीज लांबणीवर", "raw_content": "\n“सुई धागा’चा चीनमधील रिलीज लांबणीवर\nवरुण धवन आणि अनुष्का शर्माचा “सुई धागा- मेड इन इंडिया’ 6 डिसेंबरला चीनमध्ये रिलीज होणार होता. मात्र आता तिथे हा सिनेमा रिलीज होणे लांबणीवर पडले आहे. या सिनेमाच्या चीनमधील रिलीजची नवी तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. हॉलिवूड आणि चीनमधील अनेक बिगबजेट सिनेमे 6 डिसेंबरला रिलीज होणार होते. त्यामुळे यशराज फिल्म्सनी “सुई धागा’चा रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.\nएका मध्यमवर्गीय दाम्पत्याची ही कथा आहे. टेलर आणि एम्ब्रॉयडरी करणाऱ्या दाम्पत्याने मिळून स्वतःचा मोठा उद्योग सुरू करण्याचे स्वप्न बघितलेले असते. त्यांच्या संघर्षाची ही कथा म्हणजे देशातील युवा उद्योजकांच्या प्रयत्नांवर टाकलेला हा प्रकाश आहे. ग्रामीण भागातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न “सुई धागा’मधून करण्यात आला आहे.\nयाच वर्षी जून महिन्यात “बेल्ट ऍन्ड रोड फिल्म वीक’ या शांघाय “इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’साठीही “सुई धागा’ची निवड झाली होती. “सुई धागा’ गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज झाला होता. प्रेक्षकांबरोबर विश्‍लेषकांनीही या सिनेमाचे खूप कौतुक केले होते.\nधोनीच्या विजयी षटकाराचा चेंडू सापडला\nलक्षवेधी : केवळ रेटिले बहुमता\nदखल : कांद्याचं रडगाणं\nनिवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांक उसळले\nमास्कवरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathijag.com/2018/12/vadhtya-jal-pradushanabaddal-tkrar-patra.html", "date_download": "2020-09-26T01:54:43Z", "digest": "sha1:7OW2N7ZL23FVNKPRXIJTY5C3SI3GSEXH", "length": 6580, "nlines": 77, "source_domain": "www.marathijag.com", "title": "वाढत्या जल प्रदूषण बद्दल नियंत्रण विभाग ला पत्र - मराठी जग", "raw_content": "\nHome औपचारिक पत्र वाढत्या जल प्रदूषण बद्दल नियंत्रण विभाग ला पत्र\nवाढत्या जल प्रदूषण बद्दल नियंत्रण विभाग ला पत्र\nडिसेंबर १८, २०१८ औपचारिक, पत्र\nवाढत्या जल प्रदूषण बद्दल नियंत्रण विभाग ला पत्र\nमा. प्रदूषण नियंत्रण विभाग ,\nविषय :- वाढत्या प्रदूषण बद्दल तक्रार\nमी आपणास या पत्राद्वारे कळवू इच्छितो कि, महाड तालुक्यातील औदयोगिक संस्था द्वारे सोडण्यात आलेलं सांडपाणी नदी प्रवाहात सोडण्यात येत आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण होत आहे . हेच पाणी आम्ही स्थानिक पेयजल म्हणून, तसेच शेतीसाठी आणि मासे व्यवसायासाठी वापरतो. पण दूषित पाणी आमचं स्वास्थ खराब करत आहे. गेल्या काही महिन्यात आजारामुळे मृतांचा आकडा वाढला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांजवळ तक्रारी करून काहीच उपयोग झाला नाही.\nतरी आपणास विंनती करतो कि त्या संस्थेला सांडपाणी च योग्य निचरा करण्यास प्रवृत्त करा आणि जल शुद्धीकरन करा\nआशा आहे कि या विषयावर आपण लवकरच महत्वाचे पाऊल उचलाल\nवाढत्या जल प्रदूषण बद्दल नियंत्रण विभाग ला पत्र Reviewed by Mahitiworld on डिसेंबर १८, २०१८ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nमाझी शाळा यावर निबंध\nबोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र\nअनौपचारिक आरोग्य टीप औपचारिक घरगुती उपाय तंत्रज्ञान निबंध पत्र मराठी महाराष्ट्र माहिती सण GK Privacy Policy\nमाझी शाळा यावर निबंध\nमाझी शाळा यावर निबंध (शाळेतील निबंध) माझी शाळा यावर निबंध - \" नमस्कार माझा ह्या ज्ञानमंदिरा... सत्यम् शिवम् सुंदरा &q...\nशिक्षणावर निबंध 1 (100 शब्द) शिक्षण ही आपल्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल शिकण्याची प्रक्रिया आहे. हे आपल्याला कोणतीही वस्तू ...\nबोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र\nबोनाफाइड प्रमाणपत्र म्हणजे काय बोनाफाइड चा अर्थ असा होतो की प्रमाणित, अस्सल, म्हणजेच जेव्हा कोणाला प्रमाणाची गरज असते तेव्हा तो एखाद्य...\nतुमच्या शाळेची सहलीला जाण्याची परवानगी मागणारे पत्र बाबांना लिहा.\nतुमच्या शाळेची सहलीला जाण्याची परवानगी मागणारे पत्र बाबांना लिहा. Tumchya shalechya sahlila janyachi parvangi magnare patra दिन...\nतुमच्या मित्रास/मैत्रिणीस सुट्टीनिमित्त तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण देणारे पत्र\nतुमच्या मित्रास/मैत्रिणीस सुट्टीनिमित्त तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण देणारे पत्र Tumchya Mitras /Maitranis Suttinimitt Ghri Yenyache Aamtr...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/infrastructure", "date_download": "2020-09-26T02:19:35Z", "digest": "sha1:RL6DMTIIDA2Y7KF54JX4RXMWV7DN6MVN", "length": 6354, "nlines": 138, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबई विकास प्रकल्प, नवीन बांधकामे, महानगरपालिका, रिअल इस्टेट आणि शहरी पायाभूत सुविधा बाबतीत बातम्या", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमेट्रो-३ प्रकल्पातील भुयारीकरणाचा ३१ वा टप्पा पार\nमाणकोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला\nसंसदेची नवी इमारत टाटा बांधणार, जिंकलं ८६२ कोटींचं कंत्राट\n'या' कारणास्तव घाटकोपरमधील उद्यान पुन्हा बंद\nमेट्रोच्या 'या' मार्गिकेवर सव्वा किमीचा पादचारी पूल\nReady reckoner rates: रेडीरेकनरच्या दरांत ‘इतकी’ वाढ\nमुंबईतल्या 'इतक्या' बांधकामांना OC प्रमाणपत्र नाही\nडॉ. बाबासाहेब स्मारकाच्या खर्चात इतकी वाढ\nकोस्टल रोडसाठी १५ हेक्टरचा भराव\nकोरोनाच्या काळात मुंबईतल्या मेट्रोचे काम वेगानं सुरू\nपुढच्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता\nवांद्र्यातील शासकीय वसाहतीचा कायापालट करणार- अशोक चव्हाण\nविधानभवन स्थानकाचं ७५.४ टक्के बांधकाम पूर्ण\nनालासोपाऱ्यात इमारत कोसळली, जीवितहानी नाही\nओशिवरा पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव, पालिका १८ महिने पूल करणार बंद\n'मुंबई आय’चं ठिकाण बदलण्याची शक्यता\nठाणे ते दिवा सहाव्या मार्गिकेचं काम पुढच्या पावसाळ्यापर्यंत लांबणार\nधारावी पुनर्विकास प्रकल्प आणखी रखडणार, जुन्या निविदा होणार रद्द\n सिंधुदुर्गात उभं राहणार ताजचं फाईव्हस्टार हाॅटेल\n मुंबईबाहेरील पुनर्विकासाला चालना, MMR साठी वेगळं ‘एसआरए’\nकोरोनाकाळात नुकसान झाल्याने मेट्रोतील हिस्सा रिलायन्स विकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/home-theatre-systems/flow-flash-51-speaker-system-black-price-pkGX09.html", "date_download": "2020-09-26T03:04:01Z", "digest": "sha1:56QKGTR26REBH5GHULPYHMAQTKVOAXAI", "length": 10426, "nlines": 261, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फ्लोव फ्लॅश 5 1 स्पीकर सिस्टिम ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nफ्लोव होमी थेअत्रे सिस्टिम्स\nफ्लोव फ्लॅश 5 1 स्पीकर सिस्टिम ब्लॅक\nफ्लोव फ्लॅश 5 1 स्पीकर सिस्टिम ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफ्लोव फ्लॅश 5 1 स्पीकर सिस्टिम ब्लॅक\nफ्लोव फ्लॅश 5 1 स्पीकर सिस्टिम ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फ्लोव फ्लॅश 5 1 स्पीकर सिस्टिम ब्लॅक किंमत ## आहे.\nफ्लोव फ्लॅश 5 1 स्पीकर सिस्टिम ब्लॅक नवीनतम किंमत Jul 08, 2020वर प्राप्त होते\nफ्लोव फ्लॅश 5 1 स्पीकर सिस्टिम ब्लॅकशोषकलुईस उपलब्ध आहे.\nफ्लोव फ्लॅश 5 1 स्पीकर सिस्टिम ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 3,600)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफ्लोव फ्लॅश 5 1 स्पीकर सिस्टिम ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया फ्लोव फ्लॅश 5 1 स्पीकर सिस्टिम ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफ्लोव फ्लॅश 5 1 स्पीकर सिस्टिम ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफ्लोव फ्लॅश 5 1 स्पीकर सिस्टिम ब्लॅक वैशिष्ट्य\nटोटल पॉवर आउटपुट 40w\nतत्सम होमी थेअत्रे सिस्टिम्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nOther फ्लोव होमी थेअत्रे सिस्टिम्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nView All फ्लोव होमी थेअत्रे सिस्टिम्स\nExplore More होमी थेअत्रे सिस्टिम्स under 3960\n( 68 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nहोमी थेअत्रे सिस्टिम्स Under 3960\nफ्लोव फ्लॅश 5 1 स्पीकर सिस्टिम ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2018/01/blog-post_14.html", "date_download": "2020-09-26T03:21:42Z", "digest": "sha1:KG52VM4GSSUOXZ7KLCN4LEKUCAUGALOR", "length": 8716, "nlines": 143, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: मी आणि पतंग", "raw_content": "\nसंक्रांतीच्या शुभेच्छांसोबत जे काही फोटो, चित्र फॉरवर्ड होतात त्यात हमखास पतंग असतो. संक्रांतीला पतंग उडवण्याची महाराष्ट्रात विशेष पद्धत नाही. गुजरात-राजस्थान बाजूला संक्रांत आणि पतंग यांचं नातं अधिक जवळचं. पण पतंग उडवायला निमित्त थोडीच लागायचं लहानपणी आम्ही शुक्रवार पेठेत राहायचो तेव्हा भरपूर पतंग उडवायचो. आणि या पतंग उडवण्याचा कलेत माझ्या इतका अडाणी प्राणी माझ्यातरी बघण्यात नव्हता. मला आयुष्यात फार कमी वेळा पतंग नीट उडवता आलाय. एक तर आधी पतंग उडायचा नाही. उडालाच तर मला त्याला सांभाळता यायचं नाही. उडायला लागल्यावर आनंदाने मी भरपूर ढील देणार आणि मग पतंग माझं ऐकणं बंद करणार, असं फार वेळा घडायचं. कित्येक पतंग असेच वाया घालवल्यावर माझ्या मोठ्या भावाचा- अमेयचा आणि मित्रांचाही ओरडा खाल्लाय. नंतर मग अमेय मला पतंग हातातच द्यायचा नाही. त्याच्या मागे उभं राहून मांजाला ढील देणं किंवा मांजा गुंडाळून घेणं हेच माझं मुख्य काम बनलं होतं. किंवा पतंगाला मांजा बांधणे, शेपटी लावणे असं काय काय मी करायचो. त्यात मात्र मी तरबेज झालो. हाताची वीत करून मांजा गुंडाळायची पद्धत इतकी अंगात भिनलीए की आता लॅपटॉपची वायर पण तशीच गुंडाळली जाते.\nगच्ची गच्चीत पतंग उडवणाऱ्या पोरांमध्ये स्पर्धा असायची तेव्हा दुसऱ्याचा पतंग कापायचा तर मांजाला धार पाहिजे. म्हणून मग रात्री बसून मांजाला खळ लावणे वगैरे उद्योग केल्याचं चांगलं लक्षात आहे. हे करताना आमचेही हात कापले गेलेत. पण ती त्यावेळी अभिमानाने मिरवण्याची गोष्ट वाटायची.\n'मांज्यामुळे पक्षी जखमी' अशा बातम्या आता वाचायला मिळतात, पण त्यावेळी हे सगळं कुठे माहीत होतं माहीत असतं तरी कळून घेतलं असतंच असं नाही. समोरच्याचा पतंग कसा काटता येईल हेच डोक्यात, बाकी जगाचं काही का नुकसान होईना. आपला समाज पण असाच कधी कधी लहान मुलांसारखा वागतो, नाही माहीत असतं तरी कळून घेतलं असतंच असं नाही. समोरच्याचा पतंग कसा काटता येईल हेच डोक्यात, बाकी जगाचं काही का नुकसान होईना. आपला समाज पण असाच कधी कधी लहान मुलांसारखा वागतो, नाही समाज हा लहान मुलासारखा वागतो म्हणून त्याला सतत कोणीतरी मायबाप सरकार लागतं का समाज हा लहान मुलासारखा वागतो म्हणून त्याला सतत कोणीतरी मायबाप सरकार लागतं का आमच्या गावात आम्हीच सरकार असा अस्सल लोकशाही नारा देत, स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला आणि एक प्रकारे प्रौढ, प्रगल्भ व्हायला घाबरतो का आपण आमच्या गावात आम्हीच सरकार असा अस्सल लोकशाही नारा देत, स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला आणि एक प्रकारे प्रौढ, प्रगल्भ व्हायला घाबरतो का आपण\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (6)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-:-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%87/rAjDbF.html", "date_download": "2020-09-26T01:57:47Z", "digest": "sha1:TS5IJBS5U7MAWJMWNBIC4HM25VF5J5TA", "length": 5879, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "खाजगी डॉक्टरांवर तातडीने कारवाई करावी : सागर साळुंखे - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nखाजगी डॉक्टरांवर तातडीने कारवाई करावी : सागर साळुंखे\nApril 4, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nखाजगी डॉक्टरांवर तातडीने कारवाई करावी : सागर साळुंखे\nकराड - एकीकडे महाराष्ट्रासह देशात किंबहुना जगात न दिसणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे एकच धुमाकूळ घातला असताना राज्यासह देशात सगळीकडे पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी लॉक डाउन करीत शासकीय डॉक्टर, हॉस्पिटल स्टाफ, मेडिकल दुकानदार,पोलीस महासंचालकसह राज्यातील सर्व पोलीस, पत्रकार, किराणा दुकानदार , दूध पुरवठा करणारे कळत नकळत देश सेवा करणारी सर्व मंडळी एकीकडे स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करीत आहेत. कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसताना आपली जबाबदारी चोख पार पाडत आहेत. असे असताना खाजगी डॉक्टर मात्र लपून बसलेले दिसत आहे. असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना छावा क्रांतिवीर सेना कराड तालुका अध्यक्ष सागर भारत साळुंखे यांनी मेल द्वारे पाठवली आहे.\nज्यांना डॉक्टर ही पदवी प्रदान करत असताना रुग्णसेवा ही प्रामाणिक व निष्ठेने करण्याची शपथ दिली जाते. आज तेच डॉक्टर आपापले खाजगी दवाखाने, क्लीनिक बंद करून लपून बसलेत हे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बाबत सर्व खाजगी डॉक्टरांना आपापली क्लीनिक, दवाखाने उघडे ठेवायला सांगितले असताना किंबहुना आवाहन केले असताना मात्र त्यांचा या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.\nफक्त कोरोना व्हायरसचेच रुग्ण नसून इतर आजारांचे व नियमित आजारांची पेशंट आज आपल्या राज्यात व देशात आहेत. त्यांना आज हे खाजगी दवाखाने बंद असल्याने खूप त्रास भोगावा लागत आहे. याला जबाबदार कोण \nखऱ्या अर्थाने आज देशसेवा करण्याची वेळ आली असताना हे डॉक्टर गायब आहेत. याचाच अर्थ त्यांना फक्त स्वार्थी व्यवसाय करायचा आहे. सेवा नाही. त्यांची पदवी का काडून घेऊ नये. हे मायबाप सरकारने ठरवावे. आज ह्या डॉक्टरांची देशाला गरज असताना ते उपलब्ध नाहीत त्यांच्यावर कडक व तातडीने कारवाई सरकारने करावी अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sandeepramdasi.com/2013/10/24/pf-online/", "date_download": "2020-09-26T03:32:53Z", "digest": "sha1:MGJGJVQQUSEHD6VLL3L7HMNPXABFMUZC", "length": 10485, "nlines": 87, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "PF ऑनलाईन कसा बघाल? | रामबाण", "raw_content": "\nPF ऑनलाईन कसा बघाल\nतुमचा PF (प्रॉव्हिडंट फंड) तुम्ही ऑनलाईनही बघु शकता.\nतसंच पीएफ पासबुक डाऊनलोडही करु शकता,\nEPFO (Employees’ Provident Fund Organization) ने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आत्तापर्यंत वर्षातून एकदाच पीएफ स्लिप कंपनीतर्फे दिली जायची, तेव्हाच पीएफ कळायचा. त्यानंतर मोबईलवर SMS मिळणं सुरु झालं, म्हणजे पीएफच्या साईटला जायचं आपला नाव, नंबर टाकायचा की मेसेज यायचा, पण त्यात फक्त रकमेचा एक आकडा कळायचा; तो ही बहुदा मार्च अखेर जमा असलेल्या पीएफचा.. डिटेल्स कळायचेच नाहीत.\nआता मात्र ईपीएफ अकाऊंटचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर मिळतील.\nदर महिन्याला किती पीएफ जमा झाला, त्यात तुमचा वाटा किती, त्यात तुमचा वाटा किती तुमच्या कंपनीचा वाटा किती तुमच्या कंपनीचा वाटा किती तसंच ग्रॅच्युइटी किती जमा झाली हे सगळं रियल टाईममधे आपल्या पासबुकात पाहू शकता, डाऊनलोड करु शकता आणि फुर्सतीत पाहण्यासाठी प्रिंट सुद्धा करु शकता.\nसर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी ना आणखी एक User ID लक्षात ठेवायची कटकट, ना आणखी एक password आठवत बसायची झंझट…\nतुमचा पॅन नंबरही पुरेसा आहे आणि तुमचा पासवर्ड असेल तुमचा मोबाईल. तेवढा मोबाईल आणि पीएफ नंबर जवळ असला की झालं.\nपीएफ ऑनलाईन बघण्यासाठीच्या 10 सोप्या स्टेप्स\n1. आपला पीएफ पाहण्यासाठी पहिल्यांदा ईपीएफच्या वेब पोर्टलवर जा, इथे क्लिक करा\n2. पहिल्यांदा लॉग इन करण्यापुर्वी तुम्हाला REGISTER हे बटन दाबावं लागेल. तिथे दिलेली माहिती म्हणजे मोबाईल नंबर, जन्मतारीख वगैरे भरा.\n3. पॅन कार्ड, वोटर कार्ड, आधार कार्ड, बँक अकाऊंट नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, पासपोर्ट नंबर अगदी रेशन कार्ड नंबर वगैरे पैकी जे ओळखपत्र तुमच्याकडे असेल त्याची माहिती भरा. शक्यतो यापैकी जास्तीत जास्त ओळखपत्रांची नोंदणी केली तर पुढे कधी आठवाआठवी करत बसावं लागणार नाही. अर्थात आता तुम्ही पीएफ पाहण्याच्या घाईत असाल तर हे सगळं नंतर कधीही अपडेट करु शकता.\n4. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पिन नंबर येईल तो तिथं दिलेल्या रकान्यात भरा की तुम्ही तुमच्या होमपेजला जाऊन पोचाल.\n5. तिथे वर काही ऑपशन्स आहेत त्यात DOWNLOAD PASSBOOK सुद्धा आहे त्याला क्लिक करा.\n6. राज्यात महाराष्ट्र क्लिक करा, त्यानंतर\n7. आपल्या पीएफ ऑफिसचा कोड म्हणजे तुम्ही बांद्रा विभागात असाल तर MH- BANDRA क्लिक करा, किंवा नाशिक, औरंगाबाद वगैरे.\n8. मग तुमचा पीएफ नंबर रकान्यात भरा. तुमचा पीएफ नंबर MH/48620/XXXX असेल तर त्यातील 48620 पहिल्या रकान्यात भरा,त्यानंतरचा रकाना ब्लँक सोडा आणि पीएफचे शेवटचे चार अंक शेवटच्या रकान्यात भरा.\n9. त्या खाली दिलेला कोड सोबतच्या रकान्यात भरा. I Agree च्या रकान्यात टिक करा आणि GET PIN क्लिक करा. थोड्या वेळात तुमच्या मोबाईलवर चार आकडी पिन नंबर येईल,\n10. त्याच पेजवर सर्वात खाली Enter Authorization PIN रकाना आहे त्यात तो पिन टाकला की तुमच्या पीएफ फाईलचं पीडीएफ मिळेल ते डाऊनलोड करा, पाहा किती PF जमा झालाय ते. हवं असेल तर सेव्ह करा किंवा ठोकताळ्यासाठी प्रिंट काढून घरी नेऊन निवांत बघा.\nदुसऱ्यांदा कधी पीएफ पाहायचा असेल तर पॅन कार्ड किंवा तुम्ही रजिस्टर केलेल्या ओळखपत्राचा नंबर आणि फोन नंबर टाकून थेट साईन इन करु शकता.\nसमजा तुम्हाला कंपनी, पीएफ ऑफिस, पत्ता, विभागाचा कोड माहिती नसेल तर तो शोधण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. अगदी पिनकोड नंबरवरून सुद्धा पीएफ ऑफिस, ऑफिसरचे डिटेल्स मिळवू शकाल\nसरकारी खातं अशा काही सुविधा ऑनलाईन देतंय, त्या वापरणं इतकं सोपं – user friendly वगैरे आहे, एखाद दिवसाचा अपवाद वगळता साईट व्यवस्थित सुरु आहे असे अनेक आश्चर्यमिश्रित सुखद धक्के पचवायची सवय लावून घ्यायची माझी तयारी आहे.\nतुमच्या खात्यात भरीव पीएफ जमा होत राहो, दरवर्षी त्यात वाढ होत राहो ही सदिच्छा 🙂\n( त्या 2-3 दिवसात एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर सर्वात जास्त शेअर केला गेलेल्या आणि वेबसाईटवरील सर्वाधिक वाचल्या गेलेल्या ब्लॉग पैकी एक या ब्लॉगची लिंक )\n1 thought on “PF ऑनलाईन कसा बघाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/Remember-these-tips-by-Vishwas-Nangare-Patil-for-success.html", "date_download": "2020-09-26T02:06:07Z", "digest": "sha1:VNEYM5VNGK52LIZJU2OUD6HZABTEFI56", "length": 5722, "nlines": 66, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "यश मिळवण्यासाठी विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितलेल्या या टिप्स लक्षात ठेवा", "raw_content": "\nयश मिळवण्यासाठी विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितलेल्या या टिप्स लक्षात ठेवा\nbyMahaupdate.in सोमवार, फेब्रुवारी १७, २०२०\nछत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचाच. त्यातून सतत तुमच्यातील नवचेतना जागेल.\nआयुष्याचे ध्येय वयाच्या पंधराव्या वर्षीच ठरवा.\nजीवन ही एक शर्यत आहे आणि परमेश्वर या शर्यतीचा “रायडर‘ आहे. चटके, फटके, वेदना सहन करा आणि या शर्यतीत जिंकण्याचा वज्रनिर्धार करा.\nस्वतःची बलस्थानं, दुर्बलस्थानं ओळखा आणि संधीसह त्यासमोरील आव्हानांचा सर्वांगीण अभ्यास करा. झपाटून कामाला लागा.\nयोग्य वेळ आणि परफेक्ट प्लॅनिंगच्या जोरावर यशाची लढाई नक्कीच जिंकता येते.\nप्लॅनिंग म्हणजे फार काही वेगळं नसतं. काय, कुठे, कसे आणि केव्हा मिळवायचे, याचे ऍडव्हान्समध्ये नियोजन करा आणि त्याचा ध्यास घ्या.\nशांततेच्या काळात जास्त घाम गाळाल, तर प्रत्यक्ष युद्धात कमी रक्‍त सांडते. महाविद्यालयीन जीवनाच्या शांततेच्या काळात अधिक कष्ट करा. त्यामुळे प्रत्यक्ष करिअरच्या यशोशिखरावर जाताना कमी कष्ट घ्यावे लागतील.\nस्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. प्रसंगी काही नियम तोडा. अपयशाला तर अजिबातच घाबरू नका. पण यशोशिखरावर गेल्यानंतर देशासाठी, समाजासाठीच आपले जीवितकार्य माना.\nकेवळ स्वप्नं पाहणाऱ्यांची रात्र मोठी असते. स्वप्नं प्रत्यक्षात साकारणाऱ्यांचा दिवस मोठा असतो.\nयश शेवटचं नसतं आणि अपयश कधी संपवणारं नसतं. महत्त्वाचा असतो तो आपला आत्मविश्वास.\nजे निवडाल ते स्वतःच्या हिमतीनं निवडा. थांबलात तर मग दुसऱ्या कुणाला जमलं नाही ते “शिळं-पाकं‘ तुमच्या पदरात पडेल.\nकितीही अपयश आलं तरी गांगरून जाऊ नका. पुन्हा पेटून उठा; अन्यथा आयुष्यभर सपाटून मार खाल.\n“प्रेम, मदत आणि सेवा‘ ही त्रिसूत्रीच तुम्हाला कुठल्याही धर्मग्रंथातून मिळेल.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/mumbai-shiv-sena-shiv-bhojan-thali-cm-uddhav-thackeray/", "date_download": "2020-09-26T03:12:59Z", "digest": "sha1:ZN3MGFSYARNPTA743KOOYFC52LW5XJHR", "length": 27089, "nlines": 174, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिवभोजनाच्या ताटातील घास गोड झाला! जेवण आवडलं का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली विचारपूस | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nशिवभोजनाच्या ताटातील घास गोड झाला जेवण आवडलं का मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली विचारपूस\nकाय ताई, काय दादा, जेवायला सुरुवात केली का, जेवणाबाबत समाधानी आहात ना, जेवण ठीक आहे का, चव व्यवस्थित आहे ना, जेवण आवडलं की नाही… अशा आपुलकीने कुटुंबप्रमुखाने विचारपूस करावी आणि ताटातला घास गोड व्हावा असाच अनुभव महाराष्ट्रातील जनतेने आज घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्वत: शिवभोजन वेंâद्रात जेवणासाठी आलेल्या जनतेची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपुलकीने विचारपूस तर केलीच, शिवाय या थाळीबाबत काय सूचना असतील तर अवश्य सांगा, असे आवाहनही केले.\nप्रजासत्ताकदिनी ‘शिवभोजन’ योजनेचा राज्यात शुभारंभ झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर आणि नंदुरबार येथील शिवभोजन केंद्रात जेवणासाठी आलेल्या जनतेशी संवाद साधला. शिवभोजनाचा आस्वाद घेणाऱ्याजनतेला समोर लावलेल्या एलईडीवर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसले. नुसते दिसलेच नाहीत, तर त्यांनी थेट जेवण कसं वाटलं, असं विचारलंसुद्धा. हा या सर्वसामान्य जनतेसाठी एक सुखद अनुभव होता. हमालांसारख्या श्रमिकांपासून ते ऑफिसात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच या शिवभोजन उपक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांची आभार मानले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nआता दहा रुपयांत जेवण होतेय\nनंदुरबार येथील शिवभोजन केंद्रात जेवणासाठी आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल म्हणून काम करणाऱ्या योगेश शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री संवाद साधताहेत पाहून त्यांचे आभार मानले. साहेब, एरवी जेवायला ५० रुपये लागायचे. आता दहा रुपयांत जेवण होतेय… तुम्ही शिवभोजन थाळी सुरू करून आमच्यासाठी खूप चांगली सोय केली बघा, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, केंद्राचे सचिव योगेश अमृतकर यांच्याशीही मुख्यमंत्री बोलले. वेंâद्रातील सुविधा आणि येणारा अनुभव मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून जाणून घेतला. सकाळी कामानिमित्ताने घराबाहेर पडल्यानंतर दुपारची जेवणाची चांगली सोय झाल्याचेही कोल्हापूरकरांनी सांगितले.\nयोजनेची व्याप्ती वाढवावी लागेल – छगन भुजबळ\nशिवभोजन योजनेतील थाळीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून याची मागणी खूप मोठी आहे. त्यामुळे भविष्यात योजनेची व्याप्ती वाढवावी लागेल, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले. गोरगरीब जनतेला याचा खूप लाभ होत असल्याचे सांगताना त्यांनी केंद्रचालक अतिशय आस्थेने आलेल्या प्रत्येकाला जेवण देत असल्याची माहिती दिली. दुपारी १२ वाजताच शिवभोजन केंद्रावर जेवणासाठी रांग लागते, एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी दिली. शिवभोजन अॅपच्या माध्यमातून दररोज प्रत्येक जिल्ह्यातील योजनेचे लाभार्थी आणि इतर माहितीचा आढावा घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.\nसरकार सर्वसामान्यांच्या भल्यासाठी कटिबद्ध – उद्धव ठाकरे\nमहाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्या कल्पनेतील शिवभोजन योजनेचा स्वीकार सहभागी दोन्ही पक्षांनी केला, योजनेचे स्वागत केले त्याचे समाधान आहे. सरकारला आजच म्हणजे २८ तारखेला सत्तेत येऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. या अल्पकाळात सर्वसामान्य जनतेसाठी केलेला हा संकल्प केवळ संकल्प न राहता प्रत्यक्षात आल्याचा आनंद आहे, सरकार सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी कटिबद्ध आहे, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली.\nदररोज एक लाख थाळी शिवभोजन वाटप करणार\nप्रजासत्ताकदिनी राज्यातील 36 जिल्ह्यांत 50 केंद्रांत शिवभोजन योजनेचा दणक्यात शुभारंभ झाला. पहिल्या दोन दिवसांत या वेंâद्रातून २५ हजार लाभाथ्र्यांनी थाळीचा आस्वाद घेतला. पहिल्या दिवशी 11 हजार 400 थाळी गेल्या, तर दुसNया दिवशी 13 हजार 500 हून अधिक थाळी शिवभोजनाचा आस्वाद घेण्यात आला. शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. सध्या 50 केंद्रांवरून 18 हजार थाळी देण्यात असून ही योजना 500 केंद्रांपर्यंत वाढवून दररोज एक लाख थाळी देण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे.\nहॉस्पिटलमधील रुग्ण व नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था झाली\nसाहेब, हा शासनाचा खूप अभिनव उपक्रम आहे. तुमची कल्पना खूप छान आहे. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे, आतापर्यंत दररोज 150 थाळ्या गेल्या, या शब्दांत राजश्री सोलापुरे यांनी यावेळी आपला आनंद व्यक्त केला. केंद्रात 72 लोकांना जेवणास बसण्याची सोय असल्याची माहिती त्यांनी दिली. हॉस्पिटलच्या आवारात हे केंद्र सुरू झाल्याने गोरगरीब जनतेला या थाळीचा लाभ मिळत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.\nगोरगरीब जनतेचे आशीर्वाद घेण्याचे काम तुम्ही करत आहात\nमुख्यमंत्र्यांनी रुद्राक्षी स्वयं महिला बचत गटाच्या अण्णा रेस्टॉरंटच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे यांच्याशी तसेच त्यांनी सुरू केलेल्या शिवभोजन वेंâद्रात आलेल्या लोकांशी संवाद साधला. ही फक्त जेवणाची थाळी नाही; तर सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची भूक भागवून त्यांचे आशीर्वाद घेण्याचे काम तुम्ही करीत आहात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी ‘अन्नदाता सुखी भव’ ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे शिवभोजन योजनेत जेवण देताना स्वच्छता, टापटीपपणा, जेवणाचा दर्जा याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी वेंâद्रचालकांना दिल्या. शिवभोजन योजनेतील केंद्रचालकांची एक बैठक मुंबईत आयोजित करण्याची सूचना त्यांनी विभागाच्या सचिवांना केली.\nसरकारचे वजन वाढले पाहिजे\nरुद्राक्षी स्वयं महिला बचत गटाच्या अण्णा रेस्टॉरंट येथे देण्यात येणाऱ्या पदार्थांचे, चपातीचे वजन हे जास्त असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी देताच, पदार्थांचे वजन किती आहे हे माहीत नाही, पण सरकारचं वजन वाढलं पाहिजे, अशा पद्धतीने काम करा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगताच एकच हंशा उसळला.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम खान यांची नावे चर्चेत\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे यांचे आदेश\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम...\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nया बातम्या अवश्य वाचा\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/maharashtra/statue-of-chattrapati-shivaji-maharaj-removed-in-karnataka-26653/", "date_download": "2020-09-26T02:26:37Z", "digest": "sha1:RVGJ6MJJZKZMSGS3J3JSOSG6UFRXNJYZ", "length": 26303, "nlines": 231, "source_domain": "dainikekmat.com", "title": "कर्नाटकात हटवला शिवरायांचा पुतळा", "raw_content": "\nHome महाराष्ट्र कर्नाटकात हटवला शिवरायांचा पुतळा\nकर्नाटकात हटवला शिवरायांचा पुतळा\nकोल्हापूर : कर्नाटक सरकार सीमा भागातील मराठी माणसांचा किती द्वेष करते, याचे आणखी एक संतापजनक उदाहरण समोर आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील एका गावात तेथील नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारच्या आदेशावरून रातोरात हटवण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मनगुत्ती गावात ही घटना घडली आहे. रात्रीच्या अंधारात पुतळा हटवल्याचा गावक-यांनी तीव्र निषेध केला आहे.\nया घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवभक्त उद्या कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ग्रामपंचायतीच्या परनावगीने मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा हटवण्यात यावा, यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. त्याविरोधात मनगुत्ती येथील नागरिक रस्त्यावर उतरले होते.\nत्यानंतर पोलिसांनी माघार घेतली होती. मात्र, कर्नाटक सरकारने मनमानी करत रातोरात पोलिस बंदोबस्तात हा पुतळा हटवला. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का, असा सवाल शिवप्रेमी जनता विचारत असून, शिवभक्तांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.\nRead More श्रीराम लोखंडेस महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय घेणार दत्तक\nPrevious article‘कोरोना’यण – कोनी आस्सं तर कोनी तस्सं\nNext articleराज्यात रुग्णसंख्या ५ लाखांवर\nआठ दिवसात बेळगावातील शिवरायांचा पुतळा बसवणार\nकोल्हापूर : कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसात पुन्हा बसवण्याचे आश्वासन दिले आहे. कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या संतापजनक प्रकारानंतर...\nरुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...\nजपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...\nदेशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न\nएच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...\nदस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज\nसरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...\nकेंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी\nव्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...\nईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी\nनवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...\nपंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन\nपंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...\nकेंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला\nनवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...\n८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात\nनवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...\nढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’\nमुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...\nरुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...\nजपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...\nदेशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न\nएच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...\nदस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज\nसरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...\nकेंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी\nव्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...\nईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी\nनवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...\nपंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन\nपंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...\nकेंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला\nनवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...\n८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात\nनवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...\nढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’\nमुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nसोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nलातूर एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nलातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 17, 2020 0\nअमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nलातूर एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nपानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 17, 2020 0\nसोलापुर : मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nमनोरंजन एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nसांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/mayuri-deshmukhs-emotional-note-for-her-late-husband-ashutosh-bhakre-127610918.html", "date_download": "2020-09-26T03:18:34Z", "digest": "sha1:LWNVEHCEJKZI45V27LP4YFVDQIPBCRIV", "length": 10671, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mayuri Deshmukh's emotional note for her late Husband Ashutosh Bhakre | मयुरी देशमुखने आपल्या भावनांना मोकळी करुन दिली वाट, म्हणाली - 'इतक्या वेदना होत असतानाही तू माझ्यावर इतकं प्रेम केलंस, मीदेखील तेच करेल' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपतीसाठी एका पत्नीची इमोशनल नोट:मयुरी देशमुखने आपल्या भावनांना मोकळी करुन दिली वाट, म्हणाली - 'इतक्या वेदना होत असतानाही तू माझ्यावर इतकं प्रेम केलंस, मीदेखील तेच करेल'\n11 ऑगस्ट रोजी आशुतोषचा 32 वा वाढदिवस होता.\nअभिनेता आशुतोष भाकरेने 29 जुलै रोजी नांदेड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या काही काळापासून आशुतोष नैराश्येतून जात होता, त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख ही आशुतोषची पत्नी आहे. त्याच्या निधनाच्या 13 दिवसांनी मयुरीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 11 ऑगस्ट रोजी आशुतोषचा 32 वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मयुरीने केकचा एक फोटो शेअर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या.\n“आशुडा, तुझ्या वाढदिवशी सर्वोत्तम केक तयार करता यावा, केवळ यासाठी मी लॉकडाऊनच्या काळात 30 केक तयार केले. त्या सर्व 30 केक्सची पहिली चव तू चाखली होतीस, पण हा… 30 वाढदिवस आधीच साजरे करण्याची ही तुझी पद्धत होती का आपल्या प्रियजनांसाठी तू बरेच प्रश्न अनुत्तरीत सोडले आहेस.\nआम्हाला माहित आहे की, तू उचललेले पाऊल भ्याडपणातून नाही, तर असहाय्यतेमुळेच होते, जे नैराश्यासोबत झालेल्या तुझ्या दीर्घकालीन संघर्षातून आले. पण गुणी बाळ माझं ते, आपण त्याला पराभूत करण्याच्या अगदी जवळ आलो होतो. आपण किती चांगलं काम करत होतो. थोडं आणखी परिश्रम घ्यायची गरज होती. दररोज, प्रत्येक सेकंदाला, थोडासा जास्तीचा संयम, थोडेसे अधिक धैर्य आणि एक दीर्घ, निरोगी, आनंदी आयुष्य वाट पाहत होतं तुझी. आपली. मला अर्ध्या वाटेत सोडल्याबद्दल मी तुझ्यावर चिडावं की जितका वेळ माझ्यासोबत होतास याबद्दल कृतज्ञ असावं पण त्याने काय फरक पडतो\nतुझ्या आत्म्याचा शांततेने प्रवास व्हावा आणि देवदूतांनी तुला योग्य मार्गदर्शन करावे, अशी प्रार्थना आम्ही सतत करत आहोत. देवदूतांचे ऐक. आता नेहमीसारखा हट्टीपणा करु नकोस.\nमी, अभी, मम्मी, पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू आमच्यासोबत असताना आम्ही ते पुरेसे व्यक्त केले असावे, अशी आशा आहे. इतक्या वेदना होत असतानाही तू माझ्यावर इतकं प्रेम केलंस, मीदेखील तेच करेल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nमयुरीसह आशुतोषची आई अनुराधा भाकरे यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आशुतोषसोबत नक्की काय घडलं होतं आणि तो कशाप्रकारे नैराश्येचा समाना करत होता, याकाळात त्याला मयुरी आणि संपूर्ण कुटुंबाची कशी साथ मिळाली हे सांगितले आहे. सोबतच नैराश्य हा खराखुरा अस्सल व त्रासदायक आजार, त्याकडे दुर्लक्ष करु नका. एकमेकांना मदत करा मानसिक आधार द्या, रुग्ण नक्कीच बरा होवू शकतो. ह्या रुग्णांकडे सकारात्मकतेने पहा अशी कळकळीची विनंतीदेखील केली आहे.\nलॉकडाऊनमुळे आशुतोष आणि मयुरी हे दोघे त्यांच्या नांदेडमधील घरीच राहत होते. 29 जुलै रोजी आशुतोषची आई आणि मयुरी गप्पा मारत असतानाच आशुतोष वरच्या खोलीमध्ये होता. बराच वेळ तो खाली न आल्याने घरातील सदस्य त्याला पाहण्यासाठी गेले असता त्याने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास आशुतोषने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. 20 जानेवारी 2016 रोजी मयुरी आणि आशुतोषचे लग्न झाले होते. आशुतोषने ‘इच्यार ठरला पक्का’ आणि ‘भाकर’ या दोन चित्रपटांमध्ये काम केले होते.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.bankonlineexams.com/2016/08/blog-post_87.html", "date_download": "2020-09-26T01:38:03Z", "digest": "sha1:VDCCI4SJKDFC3RAZSL3LYAC5AFOQIGFO", "length": 16610, "nlines": 181, "source_domain": "www.bankonlineexams.com", "title": "Spardha Pariksha.... Flat 40% Off on Kiran Prakashan Pratiyogita Kiran Books: सौदीतील भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरुप परत आणू: सुषमा स्वराज", "raw_content": "\nसौदीतील भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरुप परत आणू: सुषमा स्वराज\nपोटाची खळगी भरण्यासाठी मायदेशातून सौदीला गेलेले हजारो भारतीय सध्या संकटात सापडले आहेत. सौदीमधील भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आल्यानंतर आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. भारतीयांना मायदेशी परतण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकरणाची भारत सरकारने गांभिर्याने दखल घेतली असून सौदीत अडकलेल्या भारतीयांना सुखरुप मायदेशात आणू, असे आश्वासन\nकेंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी राज्यसभेत दिले. सौदीतून भारतीय कर्मचाऱ्यांची सुटाका करण्याच्या मोहिमेअंतर्गत परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंह यांना सौदीला पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुषमा यांनी दिली आहे. सौदीमध्ये अडकलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते. भारतीयांच्या या हाकेला साद देत सुषमा यांनी परदेशातील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी झटपट पाऊले उचलत सर्व प्रथम त्यांच्यासमोरील उपासमारीची समस्या दुर करण्यासाठी तात्काळ धान्य पुरविण्याचे आदेश दिले होते. या भारतीय नागरिकांना अन्न-धान्य पोहचवल्याची माहिती देखील सुषमा यांनी सभागृहात दिली. भारतीय ज्या कंपनीमध्ये काम करत होते, त्या कंपन्या बंद पडल्या असून सौदीतील कायद्यानुसार, कंपनीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय त्यांना मायदेशी परतता येणार नसल्याची तरतुदीमुळे भारतीय कर्मचाऱ्यांना मायदेशी परतण्यात अडचणी येत आहेत. ही समस्या दुर करण्यासाठी भारत सरकार सौदी सरकारशी विशेष करार करणार असून या कराराच्या मदतीने भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात येणार आहे. सौदीमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे वेतन देखील थकित आहे. त्यांच्या हक्काचे वेतन मिळवून देण्यासाठी देखील भारत सरकार प्रयत्नशील असेल, असे स्वराज यांनी सांगितले.\nपं. लच्छू महाराज तबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले , याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या , म्हणजेच लयीच्या साथीश...\nसाइबर फ्राड रोकने की नीति\nजागरण ब्यूरो, नई दिल्ली बैंकों में साइबर अपराध से जुड़ी घटनाओं में तेजी से हो रही बढ़ोतरी और इसे रोकने में बैंकों की नाकामयाबी को देखते ह...\nतबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले, याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या, म्हणजेच लयीच्या साथीशिवाय संगीत पूर्ण होऊ ...\nस्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात\nतयार वस्त्र-प्रावरणाच्या ऑनलाइन विक्रीतील कट्टर स्पर्धक जबाँगला मिंत्राने ताब्यात घेतल्याचे मंगळवारी जाहीर केले. मिंत्राने जबाँगच्या गेल्...\n१ जूनपासून या गोष्टींवर होणार करवाढ नवी दिल्ली : एक जूनपासून आता हॉटेलचे खाणे , मोबाईलवर बोलणे , विमानाने आणि रेल्व...\nSome-Important-General-Awareness- वित्त बिल के लिए किसकी स्वीकृति आवश्यक है उत्तर :- राष्ट्रपति ● स्वतंत्र भारत के प्रथम राष्ट्रपति किस...\nस्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात\nनरसिंगच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात, प्रवीण रा...\nउत्तेजक प्रकरणी रशियाच्या १९ रोइंगपटूंवर बंदी\nबॅस्टिअन श्वाइनस्टायगरची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून ...\nरशियाच्या आठ वेटलिफ्टर्सवर बंदी\nराष्ट्रीय क्रीडापटू पूजा कुमारीचा सेल्फी काढताना म...\nपाटणा पायरेट्स सलग दुसऱयांदा चॅम्पियन\nआशिया खंडातील सर्वाधिक तापमान कुवेतमध्ये, आकडा पाह...\n‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या ...\nभाजपच्या पासवानांची खासदारकी रद्द\nगेको सरडय़ाची दुर्मीळ प्रजाती छत्तीसगडमध्ये सापडली\nकाश्मीरमध्ये पुन्हा संचारबंदी लागू\nभारतीय वंशाची सर्वात कमी वयाची मुलगी डेमोक्रॅटिक प...\nगुगलही रमले मुन्शी प्रेमचंद यांच्या आठवणीत\nपेलेट गनवर बंदी घालण्याची बार असोसिएशनची मागणी\nदारू पिणाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला शिक्षा; दारूबं...\nसौदीतील भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरुप परत आणू: सुषमा...\nपारंपरिक इंधनाचा थेंबही न वापरता सौर विमानाची जगप्...\nजीएसटीवर सर्व राज्यांची सहमती\nडेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन यांना राष्ट्र...\n‘कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नाही’\nभारताच्या टी.एम.कृष्णा आणि बेझवाडा विल्सन यांना मॅ...\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांच्या पूर्णाकृती पुतळ्य...\nबीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची नवी इनिंग; प्र...\nगोव्यात परदेशी नागरिकांना कृषी जमीन खरेदीची अनुमती\nचौदा वर्षांखालील मुलास कामावर ठेवणे गुन्हा\nशरीरात औषधे सोडण्यासाठी विविध आकाराची यंत्रे\nचार ‘पी-८ आय’ विमानांसाठी भारताचा अमेरिकेशी करार\nवस्तू व सेवा कर ; एक पाऊल सहमतीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.diliptiwari.com/2020/04/blog-post_12.html", "date_download": "2020-09-26T02:14:58Z", "digest": "sha1:Y5SUXIIDXEYZ3FH654VR4AUTBFJXFEDF", "length": 16270, "nlines": 314, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: सामुहिक अग्निहोत्रनंतर प्रदुषकांचे प्रमाण कमी", "raw_content": "\nसामुहिक अग्निहोत्रनंतर प्रदुषकांचे प्रमाण कमी\nअक्कलकोट येथील विश्व फाऊंडेशनच्या पुढाकाराने जळगाव येथे दि. १५ मार्चला सामुहिक अग्निहोत्रचा विधी ए. टी. झांबरे विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आला होता. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी अग्निहोत्रचे पारंपरिक आणि विज्ञान विषयक महत्त्व स्पष्ट करताना अग्निहोत्रनंतर हवेतील प्रदुषकांचे प्रमाण कमी होते असा दावा केला होता. या संदर्भात पूर्वी केलेल्या काही प्रयोगांच्या व्हिडिओ क्लिपही माध्यमातून प्रसारित झालेल्या होत्या. त्याप्रमाणे जळगाव येथेही शास्त्रशुद्ध तपासणी करता यावी म्हणून अग्निहोत्र स्थळी मापन यंत्रे लावून अग्निहोत्र पूर्व आणि त्यानंतर हवेतील प्रदुषकांचे मापन केले गेले. मुंबईतील एनव्हायरो केअर लॅब प्रायव्हेट लिमीटेडच्या तज्ञांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने हवेच्या गुणवत्तेचे मापन केले. त्यानंतर हवेतील प्रदुषकांची टक्केवारी कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. विश्व फाऊंडेशन भारतासह जगभरात अग्निहोत्रच्या प्रसाराचे काम करीत असते. आतापर्यंत जवळपास ४५ देशांमध्ये अग्निहोत्रच्या उपयुक्ततेविषयी विविध प्रयोग झालेले आहेत. जळगाव मधील प्रयोगामुळे आणखी विश्वासार्ह आकडेवारी हाती आली आहे.\nझांबरे विद्यालय मैदानावर अग्निहोत्र स्थळी लावलेले यंत्र\nसध्या जगभरात कोरोना व्हायरस (कोवीड १९) साथरोगासह मृत्युंचे थैमान घालत आहे. अशा स्थितीत अग्निहोत्रनंतर हवेतील प्रदुषके कमी होतात हा निष्कर्ष दिलासा देणारा आहे. कोरोनाच्या विषाणुंचा संसर्ग हा काही प्रमाणात हवेतून होतो. घरगुती वातावरणात असा कोणताही संसर्ग टाळायचा असेल तर अग्निहोत्र हा उत्तम पर्याय असल्याचे म्हणता येईल, हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. जळगाव येथील प्रयोगाविषयी संपूर्ण माहिती आयोजकांकडे सध्या उपलब्ध झाली आहे. त्यात कोणत्या प्रकारची यंत्रे वापरली, प्रदुषकांचे प्रमाण कसे कमी झाले वगैरे सर्व माहिती सविस्तरपणे दिलेली आहे. या विषयावर तज्ञ मंडळी साधकबाधक चर्चा करु शकतात.\nहवेत प्राणवायू ऑक्सीजन (O2) आणि नायट्रोजन (NO2) हे सजिवांच्या श्वासोच्छवासासाठी व शरीरासाठी उपयुक्त घटक असतात. या सोबत हवेत काही अती सुक्ष्म कणही असतात. ज्या कणांचा व्यास २.५ मायक्रोमीटर पेक्षा कमी असतो त्याला पीएम (पार्टीकल्स मॉलेक्युल) म्हणतात. हे कण किती सुक्ष्म असतात हे जाणून घेण्यासाठी केसाचे उदाहरण घ्यावे लागते. केसाचा व्यास १०० मायक्रोमीटर गृहीत धरला तर त्यावर पीएम २.५ चे ४० अती सुक्ष्म कण सामावू शकतात. तसेच पीएम १० चे सुद्धा आहे. ज्या सुक्ष्म कणांचा आकार १० मायक्रोमीटर पेक्षा जास्त वा कमी आहे त्यांना पीएम १० म्हणतात. यात धुलीकण वा धुरातील कार्बन कण असतात. आपण श्वासोच्छवास करतो तेव्हा हे अती सुक्ष्म कण फुफ्फुसात जाऊन तेथे रोगांचा संसर्ग निर्माण करतात. शिवाय डोळे व गळ्यातही संसर्गाचा धोका असतो. हवेत या शिवाय इतर ६ प्रदुषके असतात. त्याच्या प्रमाणावरुन हवेची गुणवत्ता (AQI म्हणजे एयर क्वालिटी इंडेक्स) ठरवला जातो.\nहवेतील घटकांचे मापन कसे होते हे सुद्धा समजून घेऊ. १ मीटर चौरस आकारातील हवेत अती सुक्ष्म कण किती मायक्रोग्रॅम आहेत यावर हवेची शुद्धता मापन केली जाते. या मापनासाठी अत्यंत शास्त्रशुद्ध व संवेदनशील यंत्रांची आवश्यकता असते. १ मीटर चौरस आकारात कमीत कमी किती प्रमाणात अती सुक्ष्म घटक हवेत याचे मानक निश्चित केले आहेत. त्याच्याशी तुलना करुन हवेतील प्रदुषणाची आकडेवारी दिली जाते. हवेतील इतर ६ प्रदुषके कोणती असतात हे सुद्धा समजून घेऊ. १ मीटर चौरस आकारातील हवेत अती सुक्ष्म कण किती मायक्रोग्रॅम आहेत यावर हवेची शुद्धता मापन केली जाते. या मापनासाठी अत्यंत शास्त्रशुद्ध व संवेदनशील यंत्रांची आवश्यकता असते. १ मीटर चौरस आकारात कमीत कमी किती प्रमाणात अती सुक्ष्म घटक हवेत याचे मानक निश्चित केले आहेत. त्याच्याशी तुलना करुन हवेतील प्रदुषणाची आकडेवारी दिली जाते. हवेतील इतर ६ प्रदुषके कोणती असतात याची माहिती घ्यावी लागेल. हवेत सल्फर डायोक्साईड, कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, हैड्रोजन फ्लोराइड, ओझोन आणि हायड्रोकार्बन असतात. त्याचेही कमीत कमी प्रमाण निश्चित केलेले असते. एक घन चौरस मीटरमध्ये ऑक्सीजनचे प्रमाण २१ टक्के आणि कार्बनचे प्रमाण ०.०३ टक्के हवे. यात कमी-जास्त व्हायला लागले की हवा प्रदुषित मानली जाते.\nजळगाव येथे झालेल्या सामुहिक अग्निहोत्रानंतर हवेतील सर्वच प्रदुषकांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले आहे. त्याची शास्त्रशुद्ध भाषेतील चौकट सोबत दिलेली आहे. या प्रयोगाचे शास्त्रशुद्ध दाखले विश्व फाउंडेशनकडे उपलब्ध आहेत.\nअग्निहोत्र स्थळी विधी पूर्वी आणि नंतर आढळलेली एअर क्वालिटी\nजळगाव येथे सामुहिक अग्निहोत्र होण्यापूर्वी नेहमी प्रमाणे अग्निहोत्रच्या उपयुक्ततेविषयी आक्षेप नोंदविण्याचा प्रकार झालेला होता. खरे तर अग्निहोत्रचा कोणताही धार्मिक दावा आयोजकांनी केलेला नव्हता. अग्निहोत्र हा विधी कोणाही करु शकतो. पहाटे सूर्योदय होत असताना आणि सायंकाळी सूर्यास्त होत असताना दोन साध्या मंत्रांचा उच्चार करीत अग्निहोत्र प्रज्वलीत करायचा असतो. त्यात गाईच्या शेणाची गोवरी, गाईचे तूप, शुद्ध कापूर याचा उपयोग केला जातो. अग्निहोत्रनंतर निर्माण होणाऱ्या धुरातून हवेतील प्रदुषकांचे प्रमाण कमी होते. त्याचाच शास्त्रशुद्ध अनुभव जळगाव येथे घेता आला. त्यासंदर्भातील आकडेवारी सोबतच्या चौकटीत दिलेली आहे. शिवाय, कोणालाही जर याविषयी अधिक माहिती हवी असेल तर ती श्री. अमर चौधरी यांच्याकडे उपलब्ध आहे.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/news/suresh-rainas-cousin-dies-after-uncle-died-in-robbery-attack-127674361.html", "date_download": "2020-09-26T01:28:07Z", "digest": "sha1:OXS7RHQWO2JKQ2QPQNL7OMGHBECIBOAS", "length": 5720, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "suresh raina's cousin dies after uncle died in robbery attack | दरोडेखोरांच्या हल्ल्यात काकांपाठोपाठ जखमी भावानेही सोडले प्राण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरैनाच्या भावाचा मृत्यू:दरोडेखोरांच्या हल्ल्यात काकांपाठोपाठ जखमी भावानेही सोडले प्राण\nमाजी क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या पंजाबातील कुटुंबीयांवर काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात त्याच्या काकांचा मृत्यू झाला होता तर आत्या, आत्तेभाऊ गंभीर जखमी होते. दरम्यान, उपचार घेत असलेल्या रैनाच्या भावाचेही निधन झाल्याचे समोर आले आहे. स्वतः रैनाने ट्विटरद्वारे माहिती दिली आणि पंजाब पोलिसांना कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nरैनाने ट्विटमध्ये लिहीले की, 'माझ्या कुटुंबासोबत जे झाले ते भयावह होते. माझ्या काकांची निर्घृण हत्या करण्यात आली. माझी आत्या आणि दोघा आत्तेभाऊ गंभीर जखमी झाले. दुर्दैवाने माझ्या आत्तेभावाचेही काल रात्री निधन झाले. माझ्या आत्याची प्रकृती अजूनही खूप गंभीर असून ती लाइफ सपोर्टवर आहे.'\n'त्या रात्री नेमके काय झाले, हे अद्याप आम्हाला समजले नाही. मी पंजाब पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करतो. हे घृणास्पद कृत्य कोणी केले, हे आम्हाला समजले पाहिजे. त्या गुन्हेगारांना सोडता कामा नये.'\nनेमके काय प्रकरण आहे \nपंजाबच्या पठाणकोटमध्ये राहणाऱ्या रैनाच्या आत्याच्या कुटुंबावर 28 ऑगस्टला दरोडेखोरांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात रैनाच्या आत्याचे पती अशोक कुमार यांचा त्याच रात्री मृत्यू झाला होता.तसेच, रैनाची आत्या आशा देवी, तिच्या सासू सत्या देवी, आत्तेभाऊ अपिन आणि कौशल जखमी झाले. पण, रैनाच्या दोन आत्तेभावांपेकी एकाचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.guruthakur.in/to-maza-maharashtra/", "date_download": "2020-09-26T01:05:45Z", "digest": "sha1:CVLRVLRAERQCNIL26DCBLYKVDWFUDDTO", "length": 4663, "nlines": 33, "source_domain": "www.guruthakur.in", "title": "To Maza Maharashtra - www.guruthakur.in", "raw_content": "\nतो रांगडा आहे कणखर आहे अंगभर धगधगत्या इतिहासाच्या त्यागाच्या खुणा मिरवणा-या प्रतापी योद्ध्या सारखा त्याच वेळी हळवा सोशिक कनवाळू ही आहे..तो कधी भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे काठी हाणू माथा म्हणत प्रखर स्वाभिमानी बाप होतो त्याच वेळी विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले म्ह्णणारा कुटंबवत्सल माऊली होतो..गेल्या पन्नास वर्षातली वाढ्ता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा या वेगाने झालेली त्याची प्रगती तमाम विश्वाच्या डोळ्यात भरणारी.त्याच्या या कर्तबगारीला मानाचा मुजरा. तो…माझा महाराष्ट्र\nपण पन्नाशी नंतर काही पथ्य प्रकर्षानं पाळावी लागतात तशी ती त्याने पाळावीत.आपुलकीच्या नात्यानी ईतरांची ओझी खांद्यावर घेताना आपला कणा वाकणार तर नाही ना याची काळजी घ्यावी ,परक्याच्या पोरांसाठी तेलकट तळताना आपलं का॓लेस्ट्रा॓ल वाढुन धमन्या चोंदणार नाहित ना याचा अदमास घ्यावा.किरकोळ जख्मा चिघळुन एखादा अवयव वेगळा करायची वेळ येण्याआधीच त्याची योग्य ती सुश्रुषा काळजी घ्यावी.रक्तात वाढ्णा-या फोफावणा-या भ्रष्टाचाराच्या साखरेवर तातडीची उपाय योजना करावी…खांद्यावर कानामागे बांडगुळासारख्या दिसणा-या गाठी निरुपद्रवी वाटल्या तरी वेळीच छाटाव्यात त्या कधी कर्करोगात बदलतील नेम नाही थोडक्यात जरा कठोर होऊन स्वत:कडे पहावं…कारण उद्या काही बिनसल्यास आम्हाला त्याच्या शिवाय कुणाचाच आधार नाही अन आम्हाला तो हवाय असाच अखंड अभेद्य…तो लेकराची ईतकी कळकळीची विनंती मनावर घेईल ही आशा.\n कित्ती नेमक्या शब्दात परखडपणे आणि योग्य उपमा वापरून विचार मांडले आहेस \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/defence-minister-iaf-chief-will-visit-france-to-receive-first-indian-rafale-fighter-jets-scsg-91-1955373/", "date_download": "2020-09-26T03:28:43Z", "digest": "sha1:WGIAWYOVTJO6CP62IV2DW2UPUH37ZYCW", "length": 13835, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुढील महिन्यात राफेल भारतात येणार, पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढणार | defence minister iaf chief will visit france to receive first indian rafale fighter jets | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nपुढील महिन्यात राफेल भारतात येणार, पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढणार\nपुढील महिन्यात राफेल भारतात येणार, पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढणार\nभारत फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने खरेदी करणार आहे\nभारताने कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रणरेषेवर अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्याला भारतानेही चोख उत्तर दिले आहे. मात्र आता पाकिस्तानच्या अडचणी अधिक वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वाढणाऱ्या अडचणींमागील कारण आहे भारताला २० सप्टेंबर रोजी मिळाणारी राफेल विमाने. २० सप्टेंबर रोजी फ्रान्सकडून ३६ पैकी काही राफेल विमाने भारताच्या ताब्यात देण्यात येणार असून यासाठी केंद्रीय सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह आणि हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ स्वत: फ्रान्सला जाणार आहेत.\nएएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार २० सप्टेंबरला राफेल विमानांच्या पहिली तुकडी भारतीय हवाईदलाला सुपूर्द करण्यात येणार आहे. या विमानांचा ताबा घेण्यासाठी राजनाथ सिंह आणि हवाई दलाचे प्रमुख स्वत: उपस्थित राहणार आहेत. ही विमाने पारंपारिक पद्धतीने भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे. राफेल विमानांना भारताच्या ताब्यात देताना दोन्ही देशांमधील प्रमुख अधिकारी उपस्थित असणार आहे. राफेल विमानांचा भारतीय हवाई दलामध्ये समावेश करुन घेण्यासाठी २४ वैमानिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. राफेल भारतात दाखल झाल्यानंतर त्याचा तत्काळ वापर करता यावा यासाठी हे प्रशिक्षण देण्यास मागील काही महिन्यांपासून सुरुवात झाली आहे. तीन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये हे वैमानिक प्रशिक्षण घेत आहेत. पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत सर्व राफेल विमाने भारतामध्ये दाखल होणार आहेत. तोपर्यंत वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहेत.\nकुठे तैनात करणार ही विमाने\nभारतीय हवाई दल सुरुवातीला या नवीन राफेल लडाऊ विमानांपैकी एक-एक विमान हरियाणा आणि अंबाला येथील एअरबेसवर तैनात करणार आहे. पाकिस्तानच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी येथे ही विमाने तैनात करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील हाशिमारा एअरबेसवर एक राफेल तैनात करण्यात येणार असून चीनच्या सीमेवरील हलचाली लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. आपली पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील सीमावरील शेजारी राष्ट्रांच्या हलचाली लक्षात घेऊन ही विमाने तैनात करण्यात येणार आहे.\nसप्टेंबर २०१६ मध्ये भारत सरकारने फ्रान्सबरोबर ३६ राफेल विमाने खरेदी करण्याबद्दल करार केला होता. या विमानांची किंमत ७.५७ बिलियन युरो इतकी आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 पी. चिदंबरम यांच्या अटकेला कारणीभूत ठरली इंद्राणी मुखर्जीची ‘ती’ साक्ष \n2 INX Media Case : पी चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\n3 VIDEO: १४ वर्षांमध्ये पहिल्यांदाच झालेल्या पहाणीतनंतर ‘टायटॅनिक’बद्दलचा धक्कादायक खुलासा\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/amir-khan-guest-in-express-adda-27284/", "date_download": "2020-09-26T03:29:14Z", "digest": "sha1:LAFLDS3UZ6WCDCKZTJOW6AVF5BHVF7K3", "length": 11334, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आमिर खान ‘एक्सप्रेस अड्डा’चा पाहुणा | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nआमिर खान ‘एक्सप्रेस अड्डा’चा पाहुणा\nआमिर खान ‘एक्सप्रेस अड्डा’चा पाहुणा\n‘मिस्टर परफेक्शनिस्ट’, ‘मॅरेथॉन मॅन’, ‘मार्केटिंग तज्ज्ञ’, ‘मिस्टर बॉक्स ऑफिस’ अशी कितीतरी विशेषणे आमिर खानला चिकटली आहेत. तो एक कलाकार आहे, त्याचबरोबर एक चळवळीतला कार्यकर्ता, विचारी\n‘मिस्टर परफेक्शनिस्ट’, ‘मॅरेथॉन मॅन’, ‘मार्केटिंग तज्ज्ञ’, ‘मिस्टर बॉक्स ऑफिस’ अशी कितीतरी विशेषणे आमिर खानला चिकटली आहेत. तो एक कलाकार आहे, त्याचबरोबर एक चळवळीतला कार्यकर्ता, विचारी नेता आणि मुख्य म्हणजे सामाजिक जाणिवांचे भान असलेला कलाकार म्हणूनही त्याची ख्याती आहे. असा अष्टपैलू कलाकार ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘एक्स्प्रेस अड्डा’ या खास कार्यक्रमात पाहूणा म्हणून येणार आहे.\nगप्पांमधून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अंतरंग उलगडून दाखवणारा ‘एक्स्प्रेस अड्डा’ हा कार्यक्रम गेले वर्षभर दिल्ली आणि मुंबईकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. याच कार्यक्रमांतर्गत बुधवारची संध्याकाळ वांद्रे येथील ऑलिव्ह बार अँड किचनमध्ये आमिरच्या मनमोकळ्या गप्पांनी खुलणार आहे. हे वर्ष अभिनेता म्हणून आमिरसाठी फार यशस्वी ठरले आहे. ‘तलाश’ला मिळालेले यश, सामाजिक विषयांना वाचा फोडणाऱ्या ‘सत्यमेव जयते’सारख्या सामाजिक शोला मिळालेला लोकांचा प्रतिसाद या सगळ्यामुळे आमिरची एक वेगळीच प्रतिमा जनमानसात तयार झाली आहे. चांगल्या विषयावरील एखाद्या चित्रपटाला निर्माता-दिग्दर्शक मिळत नसेल तर असा वेगळा चित्रपट करण्याचे धाडस फक्त आमिर खानकडे आहे, असा त्याचा लौकिक आज बॉलिवूडमध्ये आहे. आमिरच्या गप्पा ऐकण्याची संधी निवडक मुंबईकरांना ‘एक्स्प्रेस अड्डा’च्या निमित्ताने मिळणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 कळवा-ठाणे दरम्यान उद्या रात्री विशेष ब्लॉक\n2 सिंचन क्षेत्राची चौकशी होणार की ‘जलसंपदा’तील गैरव्यवहारांची\n3 शाहीन धाडावरील गुन्हे मागे\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/bank-fraud-cases-in-mumbai-1259691/", "date_download": "2020-09-26T03:16:39Z", "digest": "sha1:FG62AQ53VTKK4YQ3U3ZZU7U325O32DWW", "length": 11576, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बँक एजंट असल्याचे भासवून १.४० लाखांचा गंडा | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nबँक एजंट असल्याचे भासवून १.४० लाखांचा गंडा\nबँक एजंट असल्याचे भासवून १.४० लाखांचा गंडा\nअंधेरीत राहणाऱ्या इम्रान रुपानी यांना जून महिन्याच्या सुरुवातीला आपण बँक ऑफ इंडियातून बोलत आहोत\nकारसाठी कर्ज मिळवून देतो असे सांगत आलेल्या एजंटने १ लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना अंधेरी येथे उघडकीस आली आहे. कर्जासाठी महत्त्वाची कागदपत्रे घेऊन या तथाकथित एजंटने रद्द केलेला धनादेश घेतला होता. मात्र त्यानंतर आपल्या खात्यातून एकाएकी १.४० लाख रुपये गायब झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदाराने डी. एन. नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. हा प्रकार शाई उडून जाणाऱ्या मॅजिक पेनने केल्याची शंका तक्रारदार व्यक्त करत आहे.\nअंधेरीत राहणाऱ्या इम्रान रुपानी यांना जून महिन्याच्या सुरुवातीला आपण बँक ऑफ इंडियातून बोलत आहोत, तुम्हाला सुलभ हप्त्यात कर्ज हवे का, याची विचारणा केली. सुभाष सिंग नाव सांगणाऱ्या या व्यक्तीने तुमच्या गरजेनुसार कर्ज मिळेल असे सांगितले. इम्रान यांना कार घ्यायची असल्याने त्यांनी सिंग यांना भेटण्यास सांगितले. तेव्हा २७ जूनला सुभाष सिंग इम्रान यांना भेटला. त्यांच्याकडून निवासाचा, उत्पन्नाचा दाखला घेऊन त्यांच्याकडून एक रद्द केलेला धनादेशही सिंगने घेतला. लवकरात लवकर तुमचे कर्ज मंजूर होईल असेही त्याने इम्रान यांना सांगितले. मात्र दुसऱ्याच दिवशी इम्रान यांना त्यांच्या खात्यातून १ लाख ४० हजार रुपये काढल्याचे लक्षात आले. त्यांनी बँकेत चौकशी केली असता, धनादेशाच्या साहाय्याने हे पैसे काढण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर इम्रान यांनी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या प्राचार्याविरोधात ‘रिट’ दाखल\n2 युतीची भविष्यातील वाटचाल दोन्ही पक्षांवर अवलंबून; उद्धव ठाकरेंचे सूचक वक्तव्य\n3 वायकरांना मंत्रिमंडळातून काढा, संजय निरुपमांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/research-center-will-start-to-pusegaon-for-potato-strawberry-for-mahabaleshwar-375875/", "date_download": "2020-09-26T02:17:16Z", "digest": "sha1:OGTPIG5OLYKHK2AKA5DMDKG66WTXUD3Z", "length": 12509, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुसेगावला बटाटा, महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू होणार | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nपुसेगावला बटाटा, महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू होणार\nपुसेगावला बटाटा, महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू होणार\nराहुरी कृषी विद्यापीठात फूड व बायोटेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाबरोबरच पुणे येथे अ‍ॅग्री बिझनेसचे महाविद्यालय तर, पुण्यातील बटाटा संशोधन केंद्र पुसेगावला, तसेच महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करण्यात\nराहुरी कृषी विद्यापीठात फूड व बायोटेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाबरोबरच पुणे येथे अ‍ॅग्री बिझनेसचे महाविद्यालय तर, पुण्यातील बटाटा संशोधन केंद्र पुसेगावला, तसेच महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी सांगितले.\nकराड येथे शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे, या पाश्र्वभूमीवर डॉ. मोरे पत्रकारांशी बोलत होते.\nमोरे म्हणाले, की कराडच्या महाविद्यालयाचे काम एक वर्षांत पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. तेथे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विचार करून इमारत बांधण्यात येत आहे. पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या नूतनीकरणासाठी पाच कोटींचा प्रस्ताव असून, त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे.\nराहुरी कृषी विद्यापीठामध्ये फूड व बायोटेक्नॉलॉजीचे महाविद्यालय नाही. मात्र, त्या अभ्यासक्रमाची खासगी सहा महाविद्यालयं आहेत. त्यांच्या प्रश्नपत्रिका काढताना येणा-या अडचणी आणि कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांची सोय व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. राहुरी कृषी विद्यापीठात सांगली आणि सोलापूर जिल्हयात कृषी महाविद्यालय विचाराधीन आहेत. कराड व नंदुरबार येथे ५० वर्षांनंतर प्रथमच राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली. दोन्ही महाविद्यालये सुरू आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nम्हैसाळ, ताकारी, टेंभू सिंचन योजना दोन दिवसांत सुरू\nशाळा प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याने २५ टक्के आरक्षित जागांचा प्रश्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’ची नववर्षांरंभदिनी ‘प्रभात’\nपोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच नव्याने उदयास येणाऱ्या ‘भाईं’ची राडेबाजी सुरूच\nमराठवाडय़ातील कारखान्यांचे गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 पिस्तुलात गोळी अडकल्याने अनर्थ टळणे\n2 ज्वारीचे भाव कोसळल्याने लिलाव बंद पाडले\n3 आगरकरांच्या अनुभवाची मनपात गरज- कावरे\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mpscmantra.com/2018/08/07/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-26T00:51:24Z", "digest": "sha1:ZJUO2ZHPTVK2MLUBKSO47FRM44QKDGQI", "length": 17600, "nlines": 253, "source_domain": "www.mpscmantra.com", "title": "राष्ट्रीय लोकसंख्या धोरण - MPSC Mantra", "raw_content": "\nMPSC कोणकोणत्या परीक्षा घेते\nMPSC बद्दल सविस्तर माहिती\nImportant Acts (महत्त्वाचे कायदे pdf स्वरुपात)\nविकास खन्ना यांना एशिया गेमचेंजर पुरस्कार\nचालू घडामोडी – २३ जुलै २०२०\n14 पायांचं झुरळ; इतकं मोठं झुरळ कधी पाहिलंत का\n♻️ तुम्हाला पाठ आहेत का :- महत्वाचे दिन ♻️\nउष्णतेची लाट म्हणजे काय\nजागतिक बँकेतील पदावर अभास झा\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता सर्वांनाच उपचार\nभारतीय क्षेपणास्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये\nप्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY)\nMPSC कोणकोणत्या परीक्षा घेते\nMPSC बद्दल सविस्तर माहिती\nImportant Acts (महत्त्वाचे कायदे pdf स्वरुपात)\n१९३८ साली राष्ट्रीय नियोजन समितीच्या हाताखाली एक लोकसंख्याविषयक उपसमिती नेमण्यात आली होती. त्या समितीने १९४० साली राज्याने कुटुंब नियोजन व कल्याणकारी धोरणे यावर भर द्यावा, असा ठराव केला होता. कुटुंब नियोजनावर भर देणारा राष्ट्रीय कार्यक्रम चालू करणारा १९५२ मध्ये भारत हा जगातला पहिला देश होता. खर्चाचा १०० टक्के वाटा केंद्र सरकार उचलत असे. १९६६ मध्ये आरोग्य मंत्रालयाअंतर्गत कुटुंब नियोजन विभाग स्थापन करण्यात आला. आरोग्य मंत्रालयाचे नाव बदलून आरोग्य व कुटुंब नियोजन मंत्रालय असे ठेवण्यात आले. कॅबिनेट समिती उभारण्यात आली. जिचे प्रमुख सुरुवातीला पंतप्रधान व नंतर वित्तमंत्री होते.\n१९७६ चे लोकसंख्या धोरण:-\n१९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची घोषणा करण्यात आली. या धोरणाने कुटुंब नियोजनाचा कुटुंब कल्याण असा विस्तार केला. त्यानुसार\nसरकारने विधेयक आणून लग्नाचे वय वाढवण्याचे निश्चित केले (मुलींसाठी १८ तर मुलांसाठी २१)\nराज्यांमधील महिला शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे सरकारने ठरवले.\nकुंटुब नियोजन करणाऱ्या गरीब कुटुंबांना पैशाच्या स्वरूपात मोबदला देण्याचे ठरले.\n२००० चे लोकसंख्या धोरण:-\n२००० साली NDA सरकारने ‘राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २०००’ ची घोषणा केली. त्याचबरोबर तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना करण्यात आली.\nया धोरणाने ही खात्री देण्यात आली की सरकार कुटुंब नियोजन ऐच्छिक व माहितीपूर्ण निवडीवर आधारित ठेवेल. आरोग्यसेवा देताना प्रत्येकवेळी नागरिकांची संमती घेतली जाईल व कोणतीही लक्ष्ये असलेला कार्यक्रम देशावर लादला जाणार नाही.\nअशा प्रकारे या धोरणाने १९७६च्या धोरणामुळे जो संशय निर्माण झाला होता त्यावर मात करायचा प्रयत्न केला. या धोरणाने पुढच दशकासाठी (२०१०पर्यंत) उद्दिष्टे व अगक्रम ठरवण्यावर भर दिला.\nदोन मुल तत्वाचा प्रसार करणे\n२०४५ पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणे.\nया धोरणाने एकाच वेळी बाल संगोपन, मातेचे आरोग्य, निरोधने यांच्यावर भर देताना प्रसारावर भर दिला.\nसर्व एकात्मिक पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सरकार, उद्योग आणि बिगर सरकारी संस्था यांच्या भागीदारीवर भर देण्यात आला.\nचौदा वर्षापर्यंतच्या मुलामुलींसाठी शालेय शिक्षण सक्तीचे व मोफत केले जाईल व त्यांची गळती थांबवण्यावर भर दिला जाईल, असे म्हटले. (गळती २० टक्के च्या खाली आणणे)\nमात करण्याजोग्या रोगांसाठी सर्व बालकांचे लसीकरण करण्याचे ठरले. संसर्गजन्य रोग नियंत्रणाखाली ठेवण्याचे ठरले.\nबालविवाहाला आळा घालणे व मुलींचे लग्नाचे सरासरी वय २० पर्यंत नेण्याचे ठरले.\nजन्म, मृत्यू, विवाह व गर्भधारणा यांची १०० टक्के नोंदणी साध्य करायचे ठरले.\nसार्वजनिक आरोग्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारतीय उपचार पद्धती आयुष (आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, होमिओपथी) यांना सामावून घेण्याचे ठरले.\nबालकांचे जन्म ८० टक्के तरी दवाखान्यात झाले पाहिजेत व सर्व म्हणजे १०० टक्के जन्म प्रशिक्षित व्यक्तीच्या देखरेखीखाली झाले पाहिजेत.\nतसेच २०१० पर्यंत एकूण जनन दर अशा स्तरावर आणायचा की ज्यामुळे लोकसंख्या फक्त भरून निघेल व त्यात नवीन भर पडणार नाही. त्यासाठी लहान कुटुंबाना प्रोत्साहन देणे.\nएड्स या रोगाचा प्रसार थांबवणे व त्यासाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेचे हात बळकट करणे.\nशिशु मृत्युदर ३० पेक्षा कमी करणे.\nमातामृत्युदर 1 पेक्षा कमी करणे.\nसंस्थात्मक प्रसुतींचे (दवाखान्यातील.हॉस्पिटलमधील,वैद्यकीय संस्थामधील) प्रमाण ८०% करणे.\nतुमच्या शंका आम्हाला येथे विचार\nभूगोल : दाब व वारे भाग 1\nभूगोल: दाब व वारे भाग 2\nवेबसाईट वर अपलोड करण्यात येणाऱ्या नवीन माहितीचे नोटिफेकेशन हवे असल्यास खाली दिलेल्या बॉक्स मध्ये आपला इमेल टाका..\n509,374 लोकांनी आम्हाला भेट दिली\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nRoshani rathod on राज्यव्यवस्था टेस्ट : 30 जुलै 2020\nUpendra on काय आहे पॅरिस हवामान करार\nMPSC Mantra हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. MPSC Mantra च्या वेबसाइट बरोबरच Facebook, Telegram, Twitter, YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहोत. अल्पावधीतच रोपटेरूपी MPSC Mantra या व्यासपीठाचा वटवृक्ष झाला आहे. हे केवळ तुमच्यासारख्या विद्यार्थी मित्रांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. त्याबद्दल Team MPSC Mantra आपले शतशः आभारी आहे. आम्ही नेहमीच दर्जेदार व परिक्षाभिमुख माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही आमचा हा प्रयत्न असाच चालू राहील. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी नेहमी आमच्याशी संपर्कात रहा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mahakamgar.maharashtra.gov.in/objectives-mr.htm", "date_download": "2020-09-26T01:04:31Z", "digest": "sha1:2XKBHKEF3TKQAECYP5DRIMFXLIU72JOW", "length": 6311, "nlines": 74, "source_domain": "mahakamgar.maharashtra.gov.in", "title": "उद्दिष्टे", "raw_content": "\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमुख्य पान › आमच्याविषयी › उद्दिष्टे\n(अ) कामगार आयुक्त, माथाडी कामगार व सुरक्षा रक्षक मंडळांसहित, (ब) असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे विकास आयुक्त, (क) संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य (ड) संचालक, बाष्पके (ई) महाराष्ट्र कामगार अभ्यास संस्था (फ) कामगार कल्याण मंडळ, आणि (ग) कामगार व औद्योगिक न्यायालये, या सर्व कार्यालयांमार्फत कामगार कायदे, नियम, व विविध योजना यांची आखणी व अंमलबजावणी करणे.\nऔद्योगिक संबंध सलोख्याचे राहतील, तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये शांतता राहील याकडे लक्ष देणे, त्याचप्रमाणे कामगार कल्याणासाठी आवश्यक त्या योजना राबविणे.\nराज्यातील औद्योगिक क्षेत्र व सेवा क्षेत्रांमध्ये कामगार कायद्यात व इतर कामगारविषयक धोरणांमध्ये सुधारणा व दुरुस्त्या करणे, त्याचप्रमाणे दीर्घकालीन कामगार कल्याण व हित यांकडे लक्ष पुरविणे.\nअसंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना राबविणे, तसेच विविध धोरणे आखणे व त्यांची अंमलबजावणी करणे. असंघटीत क्षेत्रातील घरगुती कामगार, बांधकाम क्षेत्रातील कामगार, सफाई कामगार, शेतमजूर, व यांसारख्या अन्य सर्व कामगारांचा समावेश होईल याकडे लक्ष पुरविणे. एकूण कामगारांपैकी ९०% कामगार हे असंघटीत क्षेत्रामध्ये आहेत.\nराज्य विधिमंडळातील चर्चा व वादविवाद यांकरिता आवश्यक ते सहाय्य पुरविणे तसेच विविध विधीनियमांना मंजुरी देणे.\nऑनलाईन तक्रार निवारणतुमच्या तक्रारी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा\nबाल मजुरी हेल्पलाईन बालमजुरी तक्रार साठी संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट © 2014 कामगार विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nपानाच्या रोजी अखेरचे अद्यतनितः: 29-5-2014 अभ्यागत: 14975965\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_24.html", "date_download": "2020-09-26T02:14:01Z", "digest": "sha1:BQRG4D4DOQVYUQCK6MQ4QPPKPPOUWTLZ", "length": 13269, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग १०२ - गजान्तलक्ष्मीचे कारंजे", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग १०२ - गजान्तलक्ष्मीचे कारंजे\nसुरतेवरच्या दुसऱ्या स्वारीनंतर महाराजांना वाटेतच वणी दिंडोरीला मोगली सरदारांनी अडविले. (दि. १६ ऑक्टोबर १६७० ) या युद्धात महाराजांचा प्रचंड विजय झाला.\nआता महाराजांचे लक्ष गेले , एका कारंज्यावर. हे कारंजे वऱ्हाडात होते. कारंजे हे अपार संपत्तीचे शहर होते. ' लाड 'आडनावांची अनेक घराणी. कारंज्यात होती. म्हणून त्याला लाडाचे कारंजे असे म्हणत. अन् या लाडांना कारंज्याचे लाड म्हणत. कारंज्यात व्यापार फार मोठ्या प्रमाणावर चाले. इंग्रज ,डच आणि अन्य युरोपीय व्यापारी सुरतेहून खानदेशात आणि वऱ्हाडात मुख्यत: कापसाच्या खरेदीसाठी सतत येत. खानदेशातील नंदुरबार हे शहरही असेच प्रख्यात होते. शिवाय धरणगाव आणि बुऱ्हाणपूरही खूप श्रीमंत होते.\nअर्थात सत्ता होती इथं औरंगजेबाची. यावेळी बुऱ्हाणपुरास सुभेदार म्हणून होता जसवंत सिंहराठोड. हा जोधपूरचा सरदार. तो महाराजांचा कडवा शत्रू होता आणि औरंगजेबाचा कडवा सेवक होता. अचलपूर उर्फ इरिचपूर येथेही खान-ए- जाम या नावाचा मोगल सरदार फौजबंदहोता. हा सारा नकाशा महाराजांना उत्तम माहीत होता. महाराजांनी पहिला छापा लाडाच्या कारंजावर घालायचे ठरविले.\nतारीख सापडत नाही पण महाराज फौजेनिशी (बहुधा पुणे- संगमनेर-विंचूर-आदिलाबाद या मार्गाने) एकदम लाडाच्या कारंज्यावर आले. या क्षणी कारंज्यात उडालेल्या गोंधळ अन् पळापळ चक्रीवादळासारखी झाली. एवढ्या मोठ्या व्यापारी शहराच्या संरक्षणाची व्यवस्था काहीच नव्हती. खान जमानबरोबर लष्कराची छावणी होती. पण ती अचलपूरला , जवळजवळ ७० कि. मी. दूर. महाराज कारंज्यात शिरले. त्यावेळी काही इंग्रज व्यापारी आणि दलाल खरेदीसाठी कारंज्यात आले होते. सुरतेतील अनुभवाने शहाणे झालेले हे इंग्रज ताबडतोब मराठी हल्ल्यानेसावध झाले. त्यांनी आपल्या बचावासाठी काय केले त्यांनी स्त्रियांचे कपडे (म्हणजे बहुदा साड्या, ओढण्या , बुरखे इत्यादी असावे) पेहेरले. कारण त्यांना अनुभवाने हे माहीत होते की , हे मराठे स्त्रियांच्या वाटेला कधीही जात नाहीत. त्यांचा अपमानही ते कधी करीत नाहीत. या वेषांतरामुळे इंग्रज बचावले. बाकीची व्यापारपेठ मराठ्यांच्या तडाख्यातून सुटली नाही. मोठी संपत्ती ( नक्की आकडा माहीत नाही) मराठ्यांनी मिळवली.\nया हल्ल्याची बातमी खान जमानला अचलपुरात समजली. तो अजिबात डगमगला नाही. आपली फौज घेऊन कारंज्याकडे अगदी शांत आणि संथपणे तो निघाला. कारण मराठ्यांचापाठलाग करण्याचेही पुण्य मिळवायचे आणि मराठ्यांशी मारामारी करण्याची अवघड भानगडही टाळायची असा त्याचा दूरदशीर् मनसुबा होता. मराठ्यांची गाठच पडणार नाही अशा वेगाने तो येत होता. आला. पण त्यावेळी मराठे घ्यायचे तेवढे घेऊन केव्हाच पसार झाले होते.\nमहाराजांची इच्छा बुऱ्हाणपुरावरही छापा घालण्याची होती. पण जसवंतसिंह तेथे होता. तो कडवा प्रतिकार करील अन् बुऱ्हाणपुरातून त्यामुळे आपल्याला फार काही मिळणार नाही असा व्यापारी हिशेब करून महाराजांनी बुऱ्हाणपुरावर न जाता नजीकच्या बहादुरपुऱ्यावरच फक्त छापा टाकला आणि मिळाले तेवढे घेऊन महाराज परतले. कारण बुऱ्हाणपूर जिंकणे हा काही महाराजांचा हेतू नव्हता.\nमहाराजांना संपत्ती हवी होती. म्हणून ते मोगली श्रीमंत ठाण्यांवर हल्ले चढवीत होते. यावेळी त्यांनी उत्तर खानदेशातील किंवा पश्चिम वऱ्हाडातील एकही किल्ला किंवा मोगली ठाणी जिंकून घेण्याचा प्रयत्न केला नाही.\nहा पैसा त्यांना कशाकरता हवा होता तो हवा होता स्वराज्याच्या सर्वांगीण बळकटीसाठी. भावीआक्रमणांना तोंड देण्यासाठी. युद्धसाहित्यासाठी आणि लष्करासाठी. महाराजांना कोण परत पाठवणार होतं तो हवा होता स्वराज्याच्या सर्वांगीण बळकटीसाठी. भावीआक्रमणांना तोंड देण्यासाठी. युद्धसाहित्यासाठी आणि लष्करासाठी. महाराजांना कोण परत पाठवणार होतं मोठेमोठे व्यापार उभारून स्वराज्यासाठी पैसा मिळवावा तर एवढा वेळ आणिस्वस्थता नव्हती. याच श्रीमंत शहरातील हे श्रीमंत व्यापारी दिल्लीहून बादशाहाने खूण केली तरी सक्तीचे नजराणे पाठवीत होते. मग महाराजांनीही पण असेच सक्तीचे नजराणे स्वराज्यासाठी वसूल केले तर काय हरकत होती. महाराजांनी सुरतेवर स्वारी केली आणि खंडण्याघेतल्या. म्हणून का रागवायचे मोठेमोठे व्यापार उभारून स्वराज्यासाठी पैसा मिळवावा तर एवढा वेळ आणिस्वस्थता नव्हती. याच श्रीमंत शहरातील हे श्रीमंत व्यापारी दिल्लीहून बादशाहाने खूण केली तरी सक्तीचे नजराणे पाठवीत होते. मग महाराजांनीही पण असेच सक्तीचे नजराणे स्वराज्यासाठी वसूल केले तर काय हरकत होती. महाराजांनी सुरतेवर स्वारी केली आणि खंडण्याघेतल्या. म्हणून का रागवायचे हीच सुरत महाराजांच्या आधी पोर्तुगीजांनी लुटली. तेव्हा किंवा नंतरही कोणी काहीही बोलले नाही.\nया लुटीचीही शिस्त आणि कडक नियम महाराजांनी घालून दिलेले होते. गडगंज श्रीमंतांकडूनच ते त्यांच्या संपत्तीच्या प्रमाणात म्हणजे तीन टक्के किंवा पाच टक्के अशा पद्धतीने खंडणी मागत. तीमिळाली की पावत्या देत आणि ग्वाही देत की आम्ही पुन्हा तुमच्याकडे खंडणी मागणार नाही. 'लूट ' या शब्दाचा अनेकांनी जाणूनबुजून बदनामी करण्याकरिता हवा तो अर्थ लावला. मोगली आणि त्यापुढील निरनिराळ्या सुलतानांनी , पोर्तुगीजांनी , हबश्यांनी , आणि पाळीव पेंढाऱ्यांनी महाराष्ट्राची वेळोवेळी अक्षरश: बेचिराख धूळधाण उडवली , त्याबद्दल कोणीही बोलत नाही. खरे म्हणजे या सर्व गोष्टींचे मोल स्वराज्याच्या अर्थकारणात आहे. त्याचा अभ्यास झाला पाहिजे.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/not-by-fadnavis-but-by-the-maratha-association-advocate-general-ashutosh-kumbakoni/", "date_download": "2020-09-26T02:02:07Z", "digest": "sha1:MH53MYULM7Z53DCWAS7JAAOOE47TIOTT", "length": 16603, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "फडणवीस यांनी नाही तर मराठा संघटनेने मागणी केली - महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली…\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी…\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nफडणवीस यांनी नाही तर मराठा संघटनेने मागणी केली – महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी\nमुंबई : “मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मी कोर्टात बाजू मांडू नये, यासाठी मराठा समाजाने (Maratha Community) तत्कालीन फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारकडे मागणी केली होती. त्यामुळे मराठा समाजाच्या मागणीला मान देऊन मी मराठा आरक्षणाच्या सुनावणीपासून दूर राहिलो.” असा गौप्यस्फोट महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी टीव्ही – ९ वृत्तवाहिनीशी बोलताना केला.\nकुंभकोणी म्हणाले – मराठा समाजाला अजूनही असेच वाटत असेल, तर मी यापासून संपूर्णपणे अलिप्त राहीन. मात्र, कोणत्याही वकिलावर अविश्वास दाखवू नका. मराठा आरक्षणाची अंतिम लढाई अजून बाकी आहे. आमच्यावर होणारे आरोप चुकीचे आहेत. यापुढच्या कायदेशीर बाबींवरून लक्ष ढळू देऊ नका, आरक्षणाचा संपूर्ण फायदा संबंधितांना मिळाला पाहिजे. वकिलांवर आरोप करून काहीही साध्य होणार नाही. असे आरोप केल्याने त्याचे विपरीत परिणाम होतील.\nमी कोर्टात बाजू मांडू नये, अशी मागणी मराठा समाजाने केली होती. मात्र तरीही याबाबत आवश्यक ती मेहनत घेतली. त्यानंतर सरकारने तुम्ही बाजू मांडू नका, अशी विनंती मला केली. त्यामुळे फडणवीस सरकारचा मान राखून मी कोर्टात प्रत्यक्ष बाजू मांडली नाही. समाजाचा आणि तत्कालीन सरकारचा मान राखला, असे ते म्हणालेत.\nहायकोर्टात मराठा आरक्षण टिकले याला सर्वांची मेहनत कारणीभूत आहे. मी माझ्या बाजूने सर्व प्रयत्न केलेत. कुठेही यात लक्ष द्यायला कमी पडलो नाही. पण, मराठा समाजाला अजूनही वाटत असेल, तर या प्रकरणापासून मी पूर्णपणे बाजूला व्हायला तयार आहे, असे कुंभकोणी यांनी सांगितले.\nन्यायालयाची अंतिम लढाई अजून बाकी आहे. कोणत्याही वकिलावर वैयक्तिक टीका करू नका. मूळ मुद्दा मराठा आरक्षणाचा आहे. त्यावरून लक्ष विचलित करू नका, अशी विनंतीही त्यांनी मराठा समाजाला केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleखलनायिका बनणाऱ्या नायिका\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी टिप्पणी विराटच्या प्रैक्टिसवर होती\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nकरोनानंही टेकले यांच्यापुढे हात…\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\nपाकिस्तान आम्हाला जनावरांप्रमाणे वागवतो – सज्जाद राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/shevanta-fell-in-love-with-konkan/", "date_download": "2020-09-26T02:23:49Z", "digest": "sha1:FMUSVR2QID6MX2YLW3WGJDX4VJRF4T3F", "length": 21394, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "शेवंता पडली कोकणच्या प्रेमात - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली…\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी…\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nशेवंता पडली कोकणच्या प्रेमात\nएखादी मालिका किंवा व्यक्तिरेखा कलाकाराचे आयुष्य बदलून टाकत असते. प्रत्येक कलाकार त्याच्या अभिनय प्रवासात अशा एका टर्निंग पॉइंट देणाऱ्या भूमिकेची वाटच बघत असतो. अपूर्वा नेमळेकर हिलाही ब्रेक मिळाला तो ‘शेवंता पाटणकर’ (Shevanta Patankar) या भूमिकेने. म्हटलं तर किती साधं सरळ नाव आहे हे पडद्यावरचं; पण शेवंता यापेक्षा अण्णांची शेवंता फारच हिट झाली बुवा. खरं तर मालिका संपण्याच्या वळणावर आहे. त्यात शेवंताच्या आत्महत्येने तिचा रोलही ऑफएअर गेला आहे; पण ‘रात्रीस खेळ चाले’ म्हटलं की शेवंता आठवतेच. जसं प्रेक्षक ही मालिका विसरणार नाहीत तसंच शेवंता म्हणजे अपूर्वालाही कोकणला विसरता येणार नाही. हे तिच्या सोशल मीडिया पेजवरून (Social Media) दिसतंय.\nमालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने कोकणातील आकेरीत तळ ठोकून असलेल्या अपूर्वाचा पाय कोकणातून निघता निघेना. म्हणूनच की काय तिने येवा…कोकण आपलंच आसा असे कॅप्शन देत कोकणातील पावसाळी वातावरणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. एखाद्या शहराच्या पर्यटन ब्रॅंडिंगसाठी सेलिब्रिटींना ऑफर्स देणे आणि कलाकारांनी अशा पर्यटनासाठी शहराचे ब्रँड अँबेसेडर होणं काही नवीन नाही. अगदी महानायक अमिताभ बच्चन यांनी राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशमधील पर्यटनासाठी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या जाहिराती केल्या आहेत.\nशाहरूख खान, अक्षयकुमार यांच्यासह अनेक कलाकार अशा ऑफर्स आनंदाने स्वीकारतात. मराठीतही गायक अवधूत गुप्तेने कोल्हापूरचे ब्रँडिंग केलेय. तर सांगायची गोष्ट काय, पर्यटनवाढीसाठी ब्रँड बनत पैसे कमावणे हे कलाकारांसाठी एक कामच झालंय. पण सध्या कोकणच्या प्रेमात आकंठ बुडालेली आणि कोकणची सफर करत असताना कधी पावसाचे, कधी डोंगरदऱ्यांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करणारी अपूर्वा काही शेवंतामधून बाहेर यायचं नाव काढेना. तिला कुणी कोकण पर्यटनाचे प्रमोशन करण्याची ऑफर्स दिलेली नाही. पण ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या सिक्वेलमध्ये जेव्हा अपूर्वाची शेवंता म्हणून वर्णी लागली तेव्हापासून ती कोकणमध्ये आहे.\nलॉकडाऊन काळात शूटिंग बंद होतं तेव्हाही तिला आकेरी गावाची खूप आठवण यायची. अशा अनेक पोस्ट तिने तिच्या फेसबुकवर लिहिल्या होत्या. गावातील बडं प्रस्थ असलेल्या आणि बाईलवेड्या अण्णा नाईक यांच्या प्रेयसीच्या शेवंताच्या भूमिकेला अपूर्वाने इतके लोकप्रिय केले की अण्णा आणि शेवंता यांच्यावर सोशल मीडियामध्ये असंख्य मीम्स तयार झाले. खरं तर शेवंताची भूमिका ही नाईकांचे घर उद्ध्वस्त करणारी. त्यामुळे माई नाईक या अण्णांच्या बायकोवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठी शेवंता म्हणजे पक्की खलनायिका. तरीही शेवंताचा फॅनक्लब वाढवण्यासाठी अपूर्वाच्या अदाकारी अभिनयाने कमाल केली. आता शेवंताचा रोल संपला, मालिकाही येत्या आठवड्यात संपेल; पण कोकणसोबत जोडलेलं नातं काही संपायचं नाही, असं म्हणत अपूर्वा कोकणप्रेमी झाली आहे.\nकोकणातील लोकांचा आपलेपणा, मदतीची भावना, खायला घालण्याचा आग्रह अपूर्वाला खूपच आवडल्याचं ती सांगते. आता जाता जाता किमान कोकणचे निसर्गसौंदर्य, पावसाळा कॅमेऱ्यात टिपण्यात अपूर्वा दंग झाली आहे. कलाक्षेत्रात येण्यापूर्वी अपूर्वा बँकेत नोकरी करायची. अभिनयाच्या आवडीतून तिने काही मालिका, जाहिराती केल्या. ‘आभास’ या मालिकेत नायिका साकारण्याची तिला संधी मिळाली. त्यानंतर ‘आराधना’ ही मालिका, ‘एकापेक्षा एक डान्स शो’, ‘भाकरवडी’, ‘इश्कवाला लव्ह’ हे सिनेमेही केले. पण ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील वयापेक्षा मोठ्या असलेल्या अण्णांवर फिदा झालेल्या शेवंता या भूमिकेने अपूर्वाला कायमची ओळख दिली.\nही भूमिका स्वीकारणं हे तिच्यासाठी आव्हानच होतं. नायिका म्हणून मालिकेत मिळालेल्या ब्रेकनंतर थेट चार मुलांच्या वयस्कर अण्णा नाईकांच्या प्रेमात वेडी झालेली बाई ही ऑफर स्वीकारणं आणि लोकप्रिय करणं हा अपूर्वासाठी टास्कच होता आणि आता मालिका पडद्याआड जाताना शेवंताला मिस करणार ही प्रेक्षकांची प्रतिक्रियाच खूप मोठी आहे असं तिला वाटतंय. मालिकेत अण्णांवर फिदा झालेली शेवंताच्या रूपातील अपूर्वा आता कोकणवर खूप फिदा आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleजेव्हा आनंद बक्षींनी अमिताभला पहिल्यांदा म्हणायला लावले गाणे\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी टिप्पणी विराटच्या प्रैक्टिसवर होती\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nकरोनानंही टेकले यांच्यापुढे हात…\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\nपाकिस्तान आम्हाला जनावरांप्रमाणे वागवतो – सज्जाद राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/narendra-modi-speaks-to-nepal-prime-minister-kp-sharma-oli-talks-about-cooperation-between-nepal-and-india-127620320.html", "date_download": "2020-09-26T03:21:33Z", "digest": "sha1:CHXAS4O45LBOU4OLN4IYV5NNHLMMWRMG", "length": 8898, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Narendra Modi Speaks To Nepal Prime Minister KP Sharma Oli Talks About Cooperation Between Nepal And India. | नेपाळचे पंतप्रधान ओलींनी मोदींना केला फोन, दोन्ही नेत्यांमध्ये चार महिन्यानंतर बातचित - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबिघडलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न:नेपाळचे पंतप्रधान ओलींनी मोदींना केला फोन, दोन्ही नेत्यांमध्ये चार महिन्यानंतर बातचित\nनेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी खुर्ची वाचवण्यासाठी मागील काही महिन्यांत भारतविरोधी वक्तृत्व केले\nओली यांच्या वक्तव्यावर मोदींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, आता चार महिन्यांनंतर स्वत: ओलींनी पंतप्रधान मोदींना फोन केला\nनेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी काही महिन्यांपासून भारतविरोधी वक्तव्य केले होते. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी रात्री फोन केला. 10 एप्रिलनंतर दोन्ही नेत्यांनी प्रथमच चर्चा केली. ओली यांनी 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मोदी आणि भारतीय जनतेचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर सहकार्याच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली.\nभारत आणि नेपाळ यांच्यात काही महिन्यांपासून सीमा वादावरून तणाव आहे. नेपाळने गेल्या महिन्यात आपला नवीन नकाशा जाहीर केला होता. यामध्ये भारताच्या भागातील कलापाणी आणि लिंपियाधुराला स्वत: चे म्हणून संबोधले होते. ओली यांनी नेपाळमधील खरी अयोध्या असल्याचा दावाही केला होता.\nओलींच्या सल्लागाराने माहिती दिली\nओलीचे परराष्ट्र संबंध सल्लागार रंजन भट्टराई यांनी शनिवारी रात्री माध्यमांना दोन्ही नेत्यांमधील संभाषणाविषयी माहिती दिली. रंजन म्हणाले- आम्ही नेहमीच संवादाच्या बाजूने होतो. पंतप्रधान ओली यांनी म्हणूनच भारताला पंतप्रधानांना फोन केला. दोन्ही देशांमधील संभाषणात कशी प्रगती होते हे पाहणे बाकी आहे. विशेष बाब म्हणजे याविषयी कोणतेही विधान भारताकडून प्रसिद्ध झाले नाही.\nभारत आणि नेपाळ यांच्यात सोमवार, 17 ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण संवाद होणार आहे. नेपाळमध्ये भारताकडून राबविण्यात येत असलेल्या विकास प्रकल्पांवर चर्चा होईल. बहुतेक प्रकल्प थेट लोकहिताशी संबंधित आहेत. ओली यांच्यावर चीनचा दबाव आहे. मात्र, त्यांनी इच्छा असली तरीही ते भारताद्वारे चालवलेल्या प्रकल्पांकडे दुर्लक्ष करण्याच्या स्थितीत नाही. पंतप्रधानपदाच्या भारतविरोधी वक्तव्यासाठी त्यांचा स्वतःचा पक्षच त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे ओलीवर सर्व बाजूंनी दबाव आहे.\nओलींच्या वक्तव्यांना भारताने दिले नाही लक्ष\nभारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दोन महिन्यांपूर्वी कलापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा जोडणार्‍या रस्त्याचे उद्घाटन केले तेव्हा नेपाळने निषेध केला आणि त्यास आपला भाग म्हटले. मागील महिन्यात, हक्काचा दावा करण्यासाठी नेपाळने एक नवीन नकाशा जारी केला. हा भारतात पाठविण्यात आला होता. भारताने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. फक्त सांगितले की वेळ येईल तेव्हा नेपाळशी चर्चा केली जाईल.\nत्यानंतर ओलींनी धार्मिक कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. अयोध्याच्या चितवन जिल्ह्यात रामाचा जन्म झाल्याचा दावा केला. अयोध्यापुरी म्हणून या जिल्ह्याचा विकास करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. तसेच राम मंदिर बांधण्याचे आदेश दिले. 5 ऑगस्टला मोदींनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केले. नेपाळमधील पुजार्‍यांनीही यात हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या घरातही ओलींची ही हालचाल फ्लॉप ठरली.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/eknath-shinde-visit-to-lokbiradari-project/", "date_download": "2020-09-26T01:48:49Z", "digest": "sha1:LEI5XSI2AMJJYQ6TW24FF4CFNJ63PXZP", "length": 15393, "nlines": 378, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "एकनाथ शिंदेंची लोकबिरादरी प्रकल्पाला सदिच्छा भेट; कार्याची घेतली माहिती - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली…\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी…\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nएकनाथ शिंदेंची लोकबिरादरी प्रकल्पाला सदिच्छा भेट; कार्याची घेतली माहिती\nगडचिरोली : सततच्या पावसामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गडचिरोली (Gadchiroli news) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान, शिंदे यांनी मंगळवारी हेमलकसा या अतिदुर्गम भागातील लोकबिरादरी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली.\nबाबा आमटे यांच्या प्रेरणेने प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांनी अपार मेहनतीने उभ्या केलेल्या या प्रकल्पाच्या प्रत्येक अंगाची माहिती यावेळी शिंदे यांनी प्रकाश आमटे यांच्याकडून जाणून घेतली. इतक्या दुर्गम भागात तीन ऑपरेशन थिएटरसह सुसज्ज रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, कृषी संशोधन, वन्यजीव मदत केंद्र आदी अनेक प्रकारच्या कार्यातून आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आमटे परिवार आणि त्यांचे सहकारी करत असलेल्या अद्वितीय कार्याबद्दल शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. तसेच, राज्य शासन सदैव आपल्यासोबत असल्याची ग्वाही दिली.\nवन्यजीवांचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी प्रकाश आमटे यांनी उभ्या केलेल्या रेस्क्यू सेंटरची माहितीही शिंदे यांनी यावेळी घेतली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleपत्रकार रायकर मृत्युप्रकरण : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून चौकशीचे आदेश\nNext article‘ठाकरे’ सरकारने बदल्यांचा धंदा सुरू केला; फडणवीसांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी टिप्पणी विराटच्या प्रैक्टिसवर होती\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nकरोनानंही टेकले यांच्यापुढे हात…\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\nपाकिस्तान आम्हाला जनावरांप्रमाणे वागवतो – सज्जाद राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2020/02/raj-thakre-in-aurangabad.html", "date_download": "2020-09-26T01:28:52Z", "digest": "sha1:YWYHBVKJ26PEIUFHQ7MVUTLYHAM6PCS6", "length": 7117, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "औरंगाबादचं संभाजीनगर करायला काय हरकत आहे? | Gosip4U Digital Wing Of India औरंगाबादचं संभाजीनगर करायला काय हरकत आहे? - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome राजकीय औरंगाबादचं संभाजीनगर करायला काय हरकत आहे\nऔरंगाबादचं संभाजीनगर करायला काय हरकत आहे\nऔरंगाबादचं संभाजीनगर करायला काय हरकत आहे\nराज्यातील राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेनं हिंदुत्वाच्या मुद्द्याकडं मोर्चा वळवला आहे. मागील महिन्यात झालेल्या पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात राज यांनी तसे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतर त्यांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मुंबईत मोर्चाही काढला. त्यातून त्यांची हिंदुत्वावादी अशी नवी ओळख पुढं येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सध्याच्या मराठवाडा दौऱ्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.\nऔरंगाबादच्या राजकारणात हिंदुत्वाचा मुद्दा नेहमीच कळीचा ठरला आहे. विशेषत: औरंगाबादचं नामांतर हा मुद्दाही केंद्रस्थानी असतो. त्याच अनुषंगानं राज ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना नामांतरावर भाष्य केलं. 'औरंगाबदचं नामांतर करण्यास काय हरकत आहे चांगले बदल झालेच पाहिजेत,' असं ते म्हणाले.\nहिंदुत्वाची जाहीर भूमिका घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यात औरंगाबादच्या नामांतरावरून भूमिका स्पष्ट केली. 'औरंगाबादचं नामांतर झालं तर काय हरकत आहे,' असं ते म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळं नामांतराचा मुद्दा पुन्हा तापण्याची चिन्हं आहेत.\nऔरंगाबादचं नामांतर 'संभाजीनगर' असं करण्याची शिवसेनेची मागणी जुनीच आहे. शिवसेनेत पक्ष पातळीवर औरंगाबादचा उल्लेख 'संभाजीनगर' असाच केला जातो. मनसेनं हिंदुत्वाकडं वाटचाल सुरू केल्यानंतर तेथील कार्यकर्तेही औरंगाबादला 'संभाजीनगर' म्हणू लागले आहेत. पक्षाच्या पोस्टर, बॅनरवरही हेच नाव झळकू लागलं आहे. त्यामुळं येत्या काळात मनसे या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेण्याची चिन्हं आहेत.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2019/11/Chandrapur-4-accused-arrested-in-Bibat-hunting.html", "date_download": "2020-09-26T01:49:55Z", "digest": "sha1:G3VFYWWWVD4UVA3W3AJZVXSW4IMYDFKQ", "length": 9743, "nlines": 110, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपूर:बिबट शिकारप्रकरणी 4 आरोपींना अटक - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपूर:बिबट शिकारप्रकरणी 4 आरोपींना अटक\nचंद्रपूर:बिबट शिकारप्रकरणी 4 आरोपींना अटक\nमध्य चांदा वनविभागा अंतर्गत बल्हारशाह परीक्षेत्रातील किन्ही बिटातील मिश्र रोपवन 2018 कक्ष क्रमांक 569 मध्ये दिनांक 13/11/2019 ला फास्याच्या सहाय्याने बिबट्याची शिकार करण्याच्या प्रयत्नामुळे वन्यप्राणी बिबट फास्यात अडकून मृत पावला. सदर फासे लावणे प्रकरणी वनविभागाने आज दिनांक 15/11/2019 रोजी न शिकारीचे साहित्यासह\n1) दामोधर पैकन टेकाम, रा.किन्ही वय 70 वर्ष 2) श्रावण. खटरु आत्राम, रा. किन्ही वय 45 वर्ष . 3) रमेश किसन गेडाम रा. किन्ही वय 35 वर्ष\n4) एकनाथ विठोबा झाडे रा. किन्ही वय 51 वर्ष यांना अटक केली आहे.वनविभागाने वनगुन्हयात वापरलेली अवजारे व जाळे जप्त केले असून आरोपी श्रावण. खटरु आत्राम, रा. किन्ही वय 45 वर्ष .व एकनाथ विठोबा झाडे रा. किन्ही वय 51 वर्ष हे वनविभागाचे रोजंदारी रोपवन चौकीदार आहेत.\nबिबट्याची शिकार झाल्याचे वनविभागाने भाजप पदाधिकार्यांच्या दबावाखाली माध्यमांपासून लपविले असल्याचा आरोप विरोधकांनी सोशल मिडीयावर केला होता, मात्र वनविभागाने २ दिवसात आरोपींना अटक केली.\nयांना अटक करुन वनगुन्हा क्रमांक 257/22 दिनांक 13/11/2019 वन्यजीव (संरक्षण), 1972 चे कलम 2,9,39,51 अन्वये वनगुन्हा नोंद करुन न्यायालयात दाखल करण्यात आले.पुढील तपास गजेंद्र हिरे, उपवसंरक्षक मध्य चांदा वनविभाग,चंद्रपूर व प्रितमसिंग कोडापे, सहा. वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनात संतोष थिपे, वनपरीक्षेत्र अधिकारी बल्हारशाहे हे करीत आहेत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (210) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_188.html", "date_download": "2020-09-26T03:37:53Z", "digest": "sha1:LFUF5FHXGC3TZ4B7QGF5ALPROJZGEAPE", "length": 4566, "nlines": 61, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "जेव्हा तुमचा बाप मान खाली करुन इंग्रजांचे पाय चाटत होते तेव्हा आमचा बाप...", "raw_content": "\nजेव्हा तुमचा बाप मान खाली करुन इंग्रजांचे पाय चाटत होते तेव्हा आमचा बाप...\nbyMahaupdate.in सोमवार, जानेवारी २०, २०२०\nमुंबई - सीएए आणि एनआरसी मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला टीकेचे लक्ष्य केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ठिकठिकाणी निदर्शने आणि आंदोलन केली जात आहेत. अशाच एका कार्यक्रमात नामदार जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर निशाना साधला.\nयावेळी आव्हाड म्हणाले की 'जेव्हा तुमचा बाप मान खाली करुन इंग्रजांचे पाय चाटत होते तेव्हा आमचा बाप फाशीच्या दोरीचं चुंबन घेत इन्कलाब जिंदाबादचे नारे देत होते'.\nपुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा संविधानाच्या विरोधात असून याविरोधात आपण स्वत: ठाणे येथे पहिले आंदोलन केले.\nजोपर्यंत हा कायदा केंद्र मागे घेत नाही, तोपर्यंत जेथे जेथे आंदोलन होईल, तेथेतेथे मी सहभागी होणार आहे. देशात पारधी समाज मोठ्या प्रमाणात असून त्यांच्याकडे नागरिकत्व सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे नाहीत.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_881.html", "date_download": "2020-09-26T03:40:58Z", "digest": "sha1:PI26JTCADY6Q2JVGEZPIZLX7UYPLGADF", "length": 4301, "nlines": 57, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "हळदीचे 'हे' आरोग्यदायी गुणधर्म तुम्हाला माहित असायलाच हवेत !", "raw_content": "\nहळदीचे 'हे' आरोग्यदायी गुणधर्म तुम्हाला माहित असायलाच हवेत \nbyMahaupdate.in शुक्रवार, जानेवारी १७, २०२०\nहळद, हरिद्रा, कांचनी, पीता, अरशीन आदी नावाने ओळखली जाणारी औषधी वनस्पती आपल्या परिचयाची आहे. आयुर्वेदात तर हळदीला अमृत तुल्य औषधी मानण्यात आले आहे.\nउत्तम अ‍ँटीसेप्टिक म्हणूनही हळदीकडे पाहिले जाते. त्वचारोग, अ‍ॅलर्जी आदीमध्ये हळद गुणकारी आहे. हळद वापरल्याशिवाय स्वयंपाक पूर्ण होणे कसे शक्य आहे. कवेळ स्वयंपाकच कशाला, आपल्याकडेलग्नसमारंभातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nअलीकडेच यूसीएलए जॉन्सन कॅन्सर केंद्रात एक नवीन संशोधन समोर आले आहे. हळदीमध्ये कर्कुमिन नावाचे पदार्थ असते. मनुष्याच्या लाळेत आढळणा-या कॅन्सरच्या कोशिकांची वृद्धी करणारे मार्ग कर्कुमिनमुळे बंद होतात. यामुळे नाक आणि गळ्याच्या ठिकाणी कॅन्सरच्या कोशिकांची होणारी वाढ थांबते.\nहळदीचा वापर आपल्या देशात प्राचीन काळापासून होत आला आहे. दुधात हळद मिसळून दूध देण्याचीही आपल्याकडे प्रथा आहे. असे केल्याने जखम भरून यायला मदत होते. हळदीचा लेप दिल्याने वेगाने जखम भरून येते. म्हणूनच हळदीला अमृत तुल्य औषधी म्हटले जाते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/indvsnz-t20-live-blog-cricket12/", "date_download": "2020-09-26T01:07:14Z", "digest": "sha1:VMJLMU4EHA6AZLT5QLZM5SEC5GE5XX6Q", "length": 15239, "nlines": 184, "source_domain": "www.saamana.com", "title": "INDvsNZ T20 हिंदुस्थानचा किवींवर सात गडी राखून विजय | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोल्हापूर – 84 लाखांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला अटक\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nINDvsNZ T20 हिंदुस्थानचा किवींवर सात गडी राखून विजय\nहिंदुस्थानचा न्यूझीलंडवर सात गडी राखून विजय\n133 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी आता फक्त काही धावांची गरज आहे.\nइश सौधीच्या गोलंदाजीवर टिम साऊदीला झेल देत श्रेयस अय्यर बाद\nया सामन्यात सलामीला उतरलेला फलंदाज लोकेश राहुल यांचं अर्धशतक पूर्ण झालं आहे.\nटिम साऊदीच्या गोलंदाजीवर सीफर्टकडे झेल देऊन विराट कोहली बाद\nहिंदुस्थानला दुसरा धक्का बसला असून विराट कोहली झेलबाद झाला आहे.\nदुसऱ्या विकेटसाठी विराट कोहली आणि लोकेश राहुल यांची फलंदाजी\nपहिल्याच षटकात रोहित शर्मा रॉस टेलरकडून झेलबाद\nहिंदुस्थानला पहिला धक्का बसला आहे.\nरोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दोघे सलामीला उतरले आहेत.\nहिंदुस्थानच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे.\nहिंदुस्थानसमोर विजयासाठी आता 133 धावांचं लक्ष्य आहे.\n20 षटकांअखेर न्यूझीलंडचा डाव 5/132 धावांवर आटोपला आहे.\nन्यूझीलंडच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत.\nरॉस टेलर आणि टिम सीफर्ट यांची पाचव्या विकेटसाठी भागीदारी\n14 षटकांनंतर 4 विकेट्सच्या बदल्यात न्यूझीलंडच्या धावफलकावर 90 धावा\n13व्या षटकात जडेजाच्या चेंडुवर युजवेंद्र चहलकडे झेल देऊन केन विल्यमसन बाद\nअकराव्या षटकात रवींद्र जडेजाच्या चेंडूवर ग्रँडहोम बाद\nशिवम दुबेच्या चेंडुवर विराट कोहलीकडे झेल देऊन कॉलिन मुनरो बाद\nनवव्या षटकात 68 धावसंख्येचा टप्पा गाठताना न्यूझीलंडला दुसरा धक्का\nन्यूझीलंडचा धावफलक 50 धावांवर एक बळी\nशार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर मार्टिन गप्टील झेलबाद.\nकॉलिन मुनरो आणि मार्टिन गप्टील हे दोघे सलामीचे फलंदाज म्हणून उतरले आहेत.\nन्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.\nनाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आहे.\nहिंदुस्थान विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nकोल्हापूर – 84 लाखांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला अटक\nया बातम्या अवश्य वाचा\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/mumbai-nightlife-bmc-review-security-aaditya-thackeray/", "date_download": "2020-09-26T01:57:38Z", "digest": "sha1:LOFJC2SQRERH2V4M7YSUM3KROR7ONCGX", "length": 18000, "nlines": 161, "source_domain": "www.saamana.com", "title": "नाइट लाइफसाठी पालिका सुरक्षेचा आढावा घेणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nनायरमधील कोरोनामुक्त झालेल्या तीन डॉक्टरांना पुन्हा कोरोनाची लक्षणे\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nनाइट लाइफसाठी पालिका सुरक्षेचा आढावा घेणार\nमुंबईत 26 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नाइट लाइफसाठी पालिका सुरक्षेचा आढावा घेणार आहे. पोलिसांसोबत होणाऱया या संयुक्त कार्यवाहीत मॉल्स, दुकाने, हॉटेल्स-रेस्टॉरंट अशा ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जाणार आहे.\nपर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कालच मुंबईत 26 जानेवारीपासून नाइट लाइफ सुरू होणार असल्याचे जाहीर केले. प्रायोगिक तत्त्वावर नरीमन पॉइंट, काळा घोडा, बीकेसी आणि मॉल्ससारख्या अनिवासी भागात ही नाइट लाइफ सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांबरोबरच पालिकेलाही संबंधित ठिकाणच्या सुरक्षेचा आढावा घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिसांसोबत पालिकाही सुरक्षेचा आढावा घेणार असल्याचे एका पालिका अधिकाऱयाने सांगितले. यानुसार पालिकेचे विभाग कार्यालय पोलिसांच्या मदतीने सुरक्षेचा आढावा घेऊन त्या परिसरात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत निर्णय घेणार आहे. पहिल्या टप्प्यात अनिवासी क्षेत्रातील काही हॉटेल्स, मॉल्स-मल्टिप्लेक्स रात्रभर खुली राहणार आहेत. अशा ठिकाणांवर कडेकोट लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच चौपाटीसारख्या ठिकाणी खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी असेल. मात्र कायदा-सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असणाऱया ठिकाणी बंधने घालण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.\nनाइट लाइफच्या ठिकाणी संबंधितांना स्वतःचे प्रवेशद्वार, सुरक्षाव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या मॉल्स आणि चित्रपटगृहांसारख्या आस्थापनांमधील दुकाने, उपाहारगृहे 24 तास सुरू ठेवता येणार आहेत. अनिवासी क्षेत्रातील नाइट लाइफची उपयोगिता पाहून ही क्षेत्रे वाढवण्यात येणार असून अग्निसुरक्षा आणि सुरक्षाव्यवस्थेची अटही संबंधितांना घालण्यात येणार आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nनायरमधील कोरोनामुक्त झालेल्या तीन डॉक्टरांना पुन्हा कोरोनाची लक्षणे\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी आपले प्रस्तावित काम बंद आंदोलन स्थगित करावे, मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nउद्योग आणि पर्यावरणाचा समतोल साधून माहुल परिसरातील प्रदूषण नियंत्रण करा – पर्यावरणमंत्री\n‘देहव्यापार करणे कायद्याने गुन्हा नाही, महिलांना त्यांचा व्यवसाय निवडण्याचा अधिकार’, मुंबई उच्च न्यायालय\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत कोकण विभागाचे काम अव्वल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nफसवणूक टाळण्यासाठी स्टेट बँकेने ग्राहकांना दिला हा सल्ला, वाचा ही महत्त्वाची बातमी\nनायरमधील कोरोनामुक्त झालेल्या तीन डॉक्टरांना पुन्हा कोरोनाची लक्षणे\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण...\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nया बातम्या अवश्य वाचा\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nनायरमधील कोरोनामुक्त झालेल्या तीन डॉक्टरांना पुन्हा कोरोनाची लक्षणे\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2010/10/blog-post_24.html", "date_download": "2020-09-26T01:51:38Z", "digest": "sha1:CB45RM2FWDGPXGWRSUOZ5XOYY6X33EY2", "length": 14977, "nlines": 165, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: प्रत्येकाचा उत्सव...!!", "raw_content": "\nप्रत्येक देशात, देशातल्या विविध धर्मीयांमध्ये, त्यातल्या विविध पंथांमध्ये, वेगवेगळ्या घराण्यांमध्ये, वेगवेगळ्या लोकांचे असंख्य असे सण या जगात आहेत. राष्ट्रीय सण धार्मिक सण, कौटुंबिक सण अशी वर्गवारी केली जाते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, गणेशोत्सव, दिवाळी, ईद, ख्रिसमस, लग्नाचा वाढदिवस, सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा, असे विविध उत्सव आपण साजरे करत असतो.... जगभर....\nमाणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे असे म्हणतात...\nएवढे वैविध्य आणि विलक्षण कल्पकतेने निर्मिलेले हे सण उत्सव माणसाच्या जीवनात अढळ स्थानी आहेत. धर्म किंवा राष्ट्रवादाच्या तत्वज्ञानाला विरोध करणारे कम्युनिस्ट लोकही त्यांचे त्यांचे दिवस साजरे करतातच. \"क्रांती दिवस, मुक्ती दिवस\" अशा नावांनी... एकूणच काय...तर कोणी कितीही प्रयत्न केले तरी मानवाच्या जीवनातून सण उत्सव वगळणे शक्य होणार नाही.\nजगातील सर्व देशांमध्ये, सर्व धर्मांमध्ये, पंथांमध्ये, जातींमध्ये, शहरांमध्ये, जंगलांमध्ये, खेड्यांमध्ये साजरा केला जातो असा एकमेव उत्सव म्हणजे \"वाढदिवस\".....\nगेल्या काही वर्षात भोगवादी संस्कृती का काय म्हणतात त्याचा प्रभाव पडून सर्व काही साजरे करायची प्रथा पडली आहे असा काही लोक दावा करतात. त्यांचे म्हणणे काहीही असो, वाढदिवस साजरा करायची प्रथा या भोगवादी वगैरे संस्कृतीमुळे निर्माण झालेली नाही....त्याचे स्वरूप बदलले असेल...नव्हे बदलले आहेच...पण वाढदिवस साजराच केला जात नव्हता असे म्हणणे अडाणीपणाचे लक्षण ठरेल.... वाढदिवशी आईने ओवाळणे पूर्वीही होते...आत्ताही आहे. नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करणारे कार्यकर्ते पूर्वीही होते आताही आहेत. वाढदिवस युरोपात आहे तसा अमेरिकेतही आहे...आणि आशियातही आहे.. तालिबान्यांच्या मध्यपूर्वेतही आहे...\nखरे तर वाढदिवस साजरा करावे असे या दिवसात काहीच नसते. समजा मी २० वर्षांचा झालो तर यात आनंद व्यक्त करावे असे काय आहे कधी कधी विचार करता मला असं वाटतं की वाढदिवस साजरा करण्यामागे माणसाची मूळची नैसर्गिक प्रवृत्ती कारणीभूत असावी. सगळ्याच प्राण्यांमध्ये असणारी \"Survival\" ची प्रवृत्ती. आपण जगामध्ये इतकी वर्षे टिकून आहोत, टिकून राहिलो आहोत याचा आनंद म्हणजे वाढदिवस..... कधी कधी विचार करता मला असं वाटतं की वाढदिवस साजरा करण्यामागे माणसाची मूळची नैसर्गिक प्रवृत्ती कारणीभूत असावी. सगळ्याच प्राण्यांमध्ये असणारी \"Survival\" ची प्रवृत्ती. आपण जगामध्ये इतकी वर्षे टिकून आहोत, टिकून राहिलो आहोत याचा आनंद म्हणजे वाढदिवस..... टिकून राहण्याच्या या आनंदाला आयुष्याच्या उत्तरार्धात ग्रहण लागायला सुरुवात होते. जसजशी पन्नाशी ओलांडली जाते.. हळू हळू आपल्या आयुष्यातले दिवस कमी होत असल्याची भावना वाढते. आणि पुढे पुढे तर वाढदिवस ही एक काहीशी नकोशी बाब होऊन जाते. सुरुवातीला वाटणारे \"टिकून राहिलो\" हे सुख समाधान संपत जाते. आणि पाचवा सत्ता संपादनाचा वाढदिवस साजरा करतानाच पंतप्रधानाला जशी खुर्ची सोडावी लागते तसेच काहीसे आयुष्याच्या उत्तरार्धात होत जाते.\n\"मी टिकून राहिलो\" या प्रवृत्तीतून निर्माण झालेला वाढदिवस हा \"वैयक्तिक उत्सव\" असतो... त्यामध्ये समाजाच्या कोणत्याही घटकाचा संबंध नसतो. त्या व्यक्तीच्या आनंदात सामील होणे हा भाग वेगळा. ते आपण करतोच...नव्हे केलेच पाहिजे... त्यामुळे लोकांचा संबंध नसणे तरीही त्यांचा सहभागी असणे असे काहीसे वाढदिवस या \"व्यक्ती उत्सवाबाबत\" घडते.\nइतका महत्वाचा, प्रत्येकाच्या आयुष्यात दर वर्षी येणारा \"व्यक्ती केंद्रित\" उत्सव कित्येक हजार वर्षांपासून आहे... आणि तरीही व्यक्तीवादाचे तत्वज्ञान आत्ता आत्ताचे आहे, कोणीतरी तयार केलेले आहे असे काही जण म्हणतात हा केवढा विरोधाभास.....\nभारतात प्राण्यांचेही उत्सव साजरे केले जातात. बैल पोळा, वसुबारस, नागपंचमी हे त्यातलेच काही... प्रत्येकाला महत्व मिळावं, जगातल्या प्रत्येक घटकाला काहीतरी किंमत असावी, मान असावा अशा विलक्षण समानतेच्या आणि परस्पर आदराच्या भावनेतून असे सण निर्माण झाले असावेत असं मला वाटतं. प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करणे हा \"प्रत्येक व्यक्तीला महत्व\" द्यायचा दिवस या एका विलक्षण लोकशाही केंद्रित विचारसरणीचा अप्रतिम नमुना...\nमहिन्याला ५०० रुपये मिळवणाऱ्या माणसाचा वाढदिवसही \"एक दिवस\" असतो...आणि ५ कोटी मिळवणाऱ्याचाही वाढदिवस \"एकंच दिवस\" साजरा केला जातो.\nकेवढी मोठी समानता जगातल्या सगळ्या भागात आहे.... माणसामध्ये समानता आणि परस्परांना आदर आणि महत्व द्यायची वृत्ती मुळातच असली पाहिजे. त्याशिवाय वाढदिवस हा वैयक्तिक उत्सव इतके हजारो वर्ष टिकला नसता...\nवाढदिवशी रस्त्यातून चालताना सगळ्यांच्या नजर आपल्याकडे आहेत...आपण अतिशय महत्वाची व्यक्ती आहोत अशा थाटात आपण जात असतो... ते तसे वाटणे किती सुखावह असते... उत्सवमूर्ती बनणे, celebrity बनणे हे सगळ्यांनाच कुठे शक्य असते. पण वाढदिवशी \"celebrity\" म्हणून मिरवण्याचा मान प्रत्येकाला दरवर्षी मिळतो...\nआणि म्हणूनच जगभर साजरा केला जाणारा वाढदिवस हा \"व्यक्तीकेंद्रित उत्सव\" मला अतिशय प्रिय आहे....\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (6)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://cinenama.in/2020/05/02/hundred-years-of-satyajit-ray/", "date_download": "2020-09-26T02:07:06Z", "digest": "sha1:3VH2WJ5KNJJ2QBJWTA3Z6MGRP2U6XXZ3", "length": 26122, "nlines": 149, "source_domain": "cinenama.in", "title": "शंभरीचे Satyajit Ray - Cinenama", "raw_content": "\nHome छोटा पडदा स्पॉटलाईट …आणि रे यांची जन्मशताब्दी\n…आणि रे यांची जन्मशताब्दी\n2 मे 2020 पासून सत्यजित रे (satyajit ray) यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरु होतंय. या निमित्त जर आपण सहज आपल्या आजूबाजूच्या, आपल्या भोवती सातत्याने असणाऱ्या माणसांना ‘सत्यजित रे कोण होते’ असा प्रश्न विचारला तर काय उत्तर येईल ते पाहावं म्हणून काही परिचित, निकटवर्तीय यांना तसा प्रश्न विचारून बघितला.\n‘सत्यजित रे किंवा राय हे एक प्रसिद्ध भारतीय चित्रपटकार/दिग्दर्शक होते. ते बंगाली होते (बहुतेक). त्यांनी पाथेर पांचाली हा सिनेमा केला जो जगप्रसिद्ध आहे, आणि त्यासाठी त्यांना ऑस्कर मिळाला.’ ही मोजून चार वाक्ये क्रम बदलून ऐकता आली. विशेष म्हणजे हे प्रश्न ज्यांना विचारण्यात आले ते सर्वसामान्य रसिक तर होतेच पण सामान्य माणसांपेक्षा अधिक प्रमाणात सिनेमा, जागतिक सिनेमा बघणारे होते. चित्रपटसृष्टीशी निगडीत असणारे सुद्धा होते. आपल्या मातीतल्या उत्तुंग व्यक्तीमत्वांबाबत उदासीनता असणं आपल्याला नवीन नाही. अर्थात रेंच्या बाबत ही फार काही वेगळी स्थिती आपल्याला दिसत नाही. पण त्यांच्याविषयी चित्रपटसृष्टीशी निगडीत असलेल्यांना चार ओळींपेक्षा अधिक काही सांगता येऊ नये याला दुर्दैवच म्हणावं लागेल.\nकलकत्याच्या रवींद्र भवनाच्या मागच्या गल्लीत, बिशप लेफ्रोय रस्त्यावर कधीकाळी वैभवाची साक्ष देत असावी अशा एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रे राहत असत. कलकत्यात मुंबई सारखा किंवा हैद्राबादच्या फिल्मनगर सारखा भाग नाही असं नाही पण रें ना त्याचं आकर्षण कधी जाणवलेलं नव्हतं. जेम्स आयव्हरी, जॉर्ज लुकास ते बीबीसी पासून अनेक आंतरराष्टीय स्तरावरचे प्रतिनिधी त्यांना इथेच भेटायला येत. ‘पथेर पांचाली’ या अगदीच पहिल्या सिनेमापासून ‘लिजेंड’ समजल्या गेलेल्या यां दिग्दर्शकाला इथे भेटणं अगदी कोणालाही सहज शक्य होतं. कलकत्यात रें त्यांच्या नावापेक्षा ‘माणिक दा’ म्हणून जास्त ओळखले जात. रे मूलत: चित्रकार होते. अनेक प्रसिद्ध पुस्तकांची मुखपृष्ठे त्यांनी बनवली आहेत. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर नेहरूंचं ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’. रेंचे वडील ‘संदेश’ नामक एक मासिक चालवत. त्यातून लिहित असत. ते गुणही त्यांना मिळाले होते. रेंना संगीताची उत्तम जाण होती. रे सक्रीय राजकरणात कुठेही नसले तरी त्यांना राजकारणाचीही उत्तम समज होती. पण रेंनी हे सगळं एकत्रितपणे सांभाळलं.\nत्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 36 सिनेमे दिग्दर्शित केले (१९५५ पथेर पांचाली – १९९१ आगंतुक). त्यांनी जवळपास तितक्याच सिनेमांसाठी पटकथा लेखन, संगीत दिग्दर्शन किंवा संकलन सुद्धा केलं. त्यांच्या मृत्युनंतरही त्यांच्या अनेक कथांवर सिनेमे आले. Wes Anderson ने तर २००७ साली केलेल्या “द दार्जीलिंग लिमिटेड’ साठी रेंच्या बऱ्याच सिनेमांच्या पार्श्वसंगीताचा वापर केलाय आणि तसं श्रेयही त्यांना दिलंय. ही कारकीर्द फक्त सिनेमाविषयीची आहे. स्वतंत्र लेखक म्हणून त्यांच्या एकूण १६ कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्यात. वडिलांच्या मृत्युनंतर बंद पडलेलं ‘संदेश’ हे मासिक १९६७-६८ मध्ये पुनर्जीवित करून त्यातून ही त्यांचं विपुल लेखन विशेषतः लघुकथा असं झालेलं आहे.\nमहानगर: काल आणि आज\nरें उत्तम चित्रकार होते. त्यांनी गुरुदेव ठाकुरांच्या ‘शांतीनिकेतन’ मधून त्याचं शिक्षणही घेतलं होतं. त्यांच्या व्यवसायिक कारकिर्दीची सुरुवात ही पुस्तकांसाठी मुखपृष्ठ तयार करणे याच भूमिकेत झाली होती. त्यांनी जवळपास ४०हून अधिक पुस्तकांसाठी मुखपृष्ठे बनवली आहेत. रेंनी भारतातली पहिली फिल्म सोसायटी तयार केली. नंतर व्यावसायिक स्थैर्य आल्यानंतर\nदेशभरात फिल्म सोसायटीज तयार व्हावीत म्हणून प्रयत्नही केले. हे सगळं सांगण्यामागचं लेखकाचं प्रयोजन इतकंच की आपण एका अफाट पटलावर काम केलेल्या माणसाला चार ओळीत बंदिस्त कसे करून टाकले आहे याची जाणीव करून देणे होय.\nरेंच्या रचना अर्थात त्यात चित्रपट, कथा किंवा इतर अनेक निर्मिती साधनं असं सगळंच येतं, त्यांचा आदर करणारा वर्ग मुख्यत: भारतीय नाही हे उघड सत्य आहे. असं का असावं याचं\nउत्तर शोधताना आपली उदासीनता दिसतेच पण त्याहीपेक्षा रेंच्या कामाला असणारी वैश्विक जाणिवेची किनार दिसते. रेंच्या रचना भारतीय मातीत घडणाऱ्या असल्या तरीही त्यांचा आशय जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या कुठल्याही समाजात, संस्कृतीत वाढणाऱ्या माणसाशी नाळ जोडतो. नाहीतर रेंचा प्रभाव जागतिक स्तरावर नावाजलेल्या आणि स्वतंत्र वैचारिक आणि सामाजिक जाणीवा असलेल्या कैक चित्रपटकारांवर दिसण्याची शक्यता राहत नाहीच.\nरचनाकार म्हणून एकतर तुमच्या रचनेचा आशय वैश्विक असतो किंवा मांडण्याची पद्धत वैश्विक असते. रेंच्या बाबत दोन्ही गोष्टी आहेत. त्यांचं जवळपास ९०% काम हे बंगालीसारख्या प्रादेशिक भाषेत असूनही त्यांच्या एकूण कामापैकी ७५% काम हे जागतिक स्तरावर नावाजलं गेलं. मार्टिन स्कोर्सेसीसारखा व्यावसायिकता आणि आशय अशी दोन्हींची सांगड उत्तमरीत्या\nघालू शकलेला दिग्दर्शक, “रेंच्या सिनेमाने कविता आणि चित्रपट यांच्यामधली रेषाच पुसून टाकली.” असं विधान करतो त्याला पार्श्वभूमी हीच आहे.\nसत्यजित रेंच्या आधी किंवा समकाळात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले सिनेमे नव्हते का अर्थातच होते. १९३७च्या ‘संत तुकाराम’ पासून १९५३च्या ‘दो बिघा जमीन’ पर्यंत अशी अनेक उदाहरणं देता येतील. खुद्द बंगाली लिजेंड ऋत्विक घटक आणि मृणाल सेन सुद्धा रेंना समकालीन होते. आपण मुख्य प्रवाहातल्या सिनेमाला इथे बाजूला ठेवू. या दोघांनीही रें इतकंच समांतर सिनेमाला वजन प्राप्त करून दिलं. ते दोघेही शैली आणि कथाकथनाच्या पद्धतीबाबत वेगळे आणि वैशिष्टपूर्ण आहेत. पण तरीही रेंच्या तुलनेत त्यांना वैश्विक प्रसिद्धी नाही. अर्थातच याच्या मागे रेंच्या कामाला असलेली वैश्विकतेची किनार आहेच पण अजून पुढे जाऊन शुद्ध व्यावसयिक दृष्टीही आहे. रेंना सुरुवातीलाच जीन रेन्वार सारख्या उत्तम दृष्टीच्या दिग्दर्शकाबरोबर काम करता आलं. त्यांनी १९४७ साली वृत्तपत्रात लेख लिहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची सुरुवात झाली. पुढे त्यांना जे जे गवसलं ते ते त्यांनी त्यांच्या कलाकृती मधून समोर ठेवलं.\nरेंच्या जागतिक किंवा भारतीय सिनेमावरच्या प्रभावाविषयी अनेकदा बोलून झालेलं आहे. आजही जगाच्या कुठल्या न कुठल्या कोपऱ्यात रेंच्या सिनेमाविषयी आणि त्यामुळे प्रभावित झालेल्या रचना आणि रचनाकारांविषयी चर्चा होत असणार आहेच. जोपर्यंत सिनेमा आहे तोपर्यंत ही चर्चा होत राहील हे ही सत्य आहे. पण पाश्चात्यांची रेंकडे बघण्याची दृष्टी आपल्यापेक्षा अधिक जिज्ञासू आणि व्यापक आहे हे नाकारता येत नाही, येणार नाही. उदाहरण द्यायचं झालं तर युरोपमध्ये असणारं रे म्युजिअम किंवा २०१३ साली ब्रिटीश फिल्म म्युजिअमने भरवलेलं रेंच्या ग्राफिक्सचं प्रदर्शन. एखाद्या रचनाकाराला किती वेगवेगळ्या अंगाने समजून घेता येऊ शकतं याची संधी चिकित्सा किंवा त्याचा विचारही आपल्या मनात आला नसावा यामागे नक्की काय असावं\nरेंची जीवनकथा एका उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ती म्हणजे ऑस्कर होय. मागे मराठीमधल्या एका प्रसिद्ध चित्रपट समीक्षकांनी समाजमाध्यमावर एक प्रश्न विचारला होता की ‘ऑस्कर हा अमेरिकेचा सांस्कृतिक वर्चस्ववाद आहे हे असं वाटतं का’ यावर्षीच्या निकालानंतर कदाचित मत बदलू शकतं. पण अनेक वर्षं हे सत्य होतं. आणि तसंही ऑस्कर मिळणं हे कामाची गुणवत्ता सिद्ध करण्याचं मानक आहे असंही नाही. अर्थात तसं चित्र किंवा आभास तयार करण्यात अमेरिका यशस्वी झाली हे सत्य आहे. मार्टिन स्कोर्सेसीने त्यावर्षी ६९ जणांच्या\nपाठिंब्याची पत्रे अकॅडेमीला दिली नसती तर कदाचित रेंना ऑस्कर कधीच मिळाला नसता. रेंना ऑस्कर मिळाला नसता तर त्यांच्या कामाचं महत्व कमी झालं असतं का किंवा रेंना ऑस्कर मिळाल्यानंतर त्यांच्या कामाचं महत्व वाढलं का किंवा रेंना ऑस्कर मिळाल्यानंतर त्यांच्या कामाचं महत्व वाढलं का असं काही झाल्याचं कुणीही मान्य करणार नाही आणि तसं निदर्शनास ही येणार नाही. म्हणूनच औड्रे हेपबर्न हा पुरस्कार जाहीर करताना म्हणते, “One of the greatest directors at last got his due.” हे वाक्य फार महत्वाचं आहे. तितकंच रेंनी आभार व्यक्त करताना ऑस्कर मिळणं ही best achievement\nआहे असं म्हणणं हे ही. दोन्ही वाक्ये ही रुपकं असून अत्यंत सूचक आहेत.\nलेखाची सांगता करताना सत्यजित रे या माणसाविषयी विविध कालखंडात विविध नामवंतांनी काढलेले उद्गार इथे द्यावेसे वाटतात. अर्थातच हे उद्गार प्रातिनिधिक आहेत. पण त्यातून तत्कालीन समधर्मी लोकांना रे कसे दिसतात हे आपण पाहू शकतो. आज जन्मशताब्दी वर्षात अनेक ठिकाणी रे, त्यांचं काम, त्यांच्या आठवणी यांचे सोहळे केले जातील. पण शताब्दीनंतर परिस्थिती बदलेल का याचं उत्तर कुणाकडे नाही. आज बंगालच्या बाहेरच्या हिंदुस्तानात रेंविषयी आस्था वाढेल का याचंही उत्तर नाही. सध्यातरी या जन्मशताब्दी निमित्त जितकं जमेल तितकं आकलन समोर आणता येईल तेवढं समोर आणणं हे मात्र आपण करू शकतो.\nPrevious articleमहानगर: काल आणि आज\nNext articleसत्यजित ‘अ रे ऑफ जीनीयस’\nआता भेटा आवडत्या सुपरस्टार्सना…\nदिशा गुंतलेय ‘स्क्रिप्ट रिडींग’मध्ये…\nप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात...\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\nपुरानी जीन्स और गिटार… : आठवणी INDIPOP च्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/90693593393e-91594592894d921940", "date_download": "2020-09-26T03:29:36Z", "digest": "sha1:LSBN2PW2XAE2EJLBJ4YWPZG4VG2GFQOF", "length": 7418, "nlines": 82, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "आवळा कॅन्डी — Vikaspedia", "raw_content": "\nआवळा कॅन्डी करताना पूर्ण पिकलेली मोठी किंवा मध्यम आकाराची रसदार फळे निवडावी. फळांना प्रथम उकळत्या पाण्याची प्रकिया ८ ते १० मिनिटे देऊन त्यामधील बिया आणि काप वेगळे करावेत. अर्धवट शिजलेल्या फळांवर बोटाचा दाब दिल्यावर पाकळ्या बियापासून सहजपणे वेगळ्या करता येतात. वेगळे केलेले काप प्रथम ५० डिग्री ब्रिक्स असलेल्या साखरेच्या पाकात २४ तास ठेवावेत. त्यासाठी १ लिटर पाण्यात १ किलो साखर मिसळावी. दुसऱ्या दिवशी पाकातील ब्रिक्सचे प्रमाण साधारणपणे २५ ते ३० एवढे कमी होते. त्यामध्ये ३५० ते ४०० ग्राम साखर मिसळून त्याचा ब्रिक्स ६० करावा. तिसऱ्या दिवशी त्याच पाकात ५०० ते ६०० ग्राम साखर मिसळून ब्रिक्स ७० डिग्री कायम ठेवावा. पाचव्या दिवशी त्याच पाकात १५० ते २०० ग्राम साखर घालावी आणि सातव्या किंवा आठव्या दिवशी पाकात मुरलेल्या पाकळ्या बाहेर काढाव्यात. पाकात पहील्यांदाच २% आल्याचा रस किवा विलायची पूड मिसळल्यास चव चांगली येते. कॅन्डी तयार झाल्यावर पाण्यात झटपट धुवून घ्यावी किंवा कापडाने पुसून घ्यावी आणि ३ ते ४ दिवस सुकवून घ्यावी. सुकलेली कॅन्डी प्लास्टिक पिशवीत भरून हवा बंद करावी.\nस्रोत: कृषी दर्शनी, महत्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%AA", "date_download": "2020-09-26T02:52:15Z", "digest": "sha1:IJSY7BQGLFPOIMLXNPABKYQYQNCGRECJ", "length": 6159, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ३०४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ३ रे शतक - ४ थे शतक - ५ वे शतक\nदशके: २८० चे - २९० चे - ३०० चे - ३१० चे - ३२० चे\nवर्षे: ३०१ - ३०२ - ३०३ - ३०४ - ३०५ - ३०६ - ३०७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nसिचुआनला चीनपासून स्वातंत्र्य मिळाले.\nइ.स.च्या ३०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ४ थ्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ फेब्रुवारी २०२० रोजी ०८:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/hingoli-congress-mp-rajiv-satav-not-contest-lok-sabha-40604.html", "date_download": "2020-09-26T03:00:21Z", "digest": "sha1:LVOTXO4QYZOEF5IV422A7SU2UE7BXPUO", "length": 17148, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "काँग्रेस खासदार राजीव सातव यांची माघार", "raw_content": "\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nकाँग्रेसच्या दोनपैकी एका खासदाराची निवडणुकीतून माघार\nकाँग्रेसच्या दोनपैकी एका खासदाराची निवडणुकीतून माघार\nमुंबई: महाराष्ट्रातील विद्यमान दोनपैकी एका काँग्रेस खासदाराने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव हे यंदाची लोकसभा निवडणूक लढणार नाहीत. राजीव सातव यांच्याकडे गुजरात काँग्रेसची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस हायकमांडने त्यांची ही मागणी मान्य केल्याने आता हिंगोलीत काँग्रेस दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात आहे. लोकसभेच्या 2014 च्या …\nसुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई: महाराष्ट्रातील विद्यमान दोनपैकी एका काँग्रेस खासदाराने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव हे यंदाची लोकसभा निवडणूक लढणार नाहीत. राजीव सातव यांच्याकडे गुजरात काँग्रेसची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस हायकमांडने त्यांची ही मागणी मान्य केल्याने आता हिंगोलीत काँग्रेस दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात आहे.\nलोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यात फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी एक नांदेड आणि दुसरी अत्यंत कमी फरकाने जिंकलेली जागा म्हणजे हिंगोली. पण यावेळी हिंगोलीत काँग्रेसचं चित्र थंड आहे. विद्यमान खासदार राजीव सातव यांच्यावर गुजरातची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचा चेहरा पाहणंही हिंगोलीकरांना दुर्मिळ झालंय. राजीव सातवांनी निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर ढकलला होता.\nराजीव सातव यांनी निवडणूक न लढल्याचा निर्णय घेतल्याने हिंगोलीत उमेदवार कोण असा प्रश्न आहे. कळमनुरीचे काँग्रेस आमदार संतोष टारफे हे काँग्रेसकडून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. शिवाय वकील शिवाजीराव जाधव यांनाही ऐनवेळी काँग्रेसची उमेदवारी मिळू शकते. शिवाजीराव जाधव गेल्या निवडणुकीत भाजपकडून लढणार होते. त्यांनी प्रचारही सुरु केला होता. पण युतीत ही जागा शिवसेनेला गेल्याने त्यांची निराशा झाली.\nशिवसेना आणि भाजप यांच्या युतीत ही जागा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेने हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. 2014 मध्ये शिवसेनेचे -सुभाष वानखेडे यांना 4 लाख 65 हजार 765 इतकी मतं पडली होती. तर काँग्रेसचे विद्यमान खासदार राजीव सातव यांना 4 लाख 67 हजार 397 मतं मिळाली होती. मोदी लाटेत 1632 मतांनी राजीव सातव यांचा विजय झाला. त्या निवडणुकीत मुंदडा गटाकडून राजीव सातव यांना छुप्या पद्धतीने मदत करण्यात आल्याचा आरोप होता. कारण, हिंगोलीत शिवसेनेचे दोन गट होते, ज्याचा फटका उमेदवाराला बसला. सुभाष वानखेडे सध्या भाजपात आहेत. त्यामुळे शिवसेनेने नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली.\nनिवडणुकीच्या तोंडावर भाषा बदलली, अशोक चव्हाणांनी हवा ओळखली\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\n\"ए अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं\"\n'वरिष्ठांचं ऐकावं लागतं', डिलीट केलेल्या ट्विटवर अजित पवारांचं स्पष्टीकरण\nToll Rates | भाजपने टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय…\nआमच्याशिवाय कुणालाच सरकार चालवता येणार नाही हा भाजपचा भ्रम संपला…\nबिहारमध्ये कोरोना संपला का; राऊतांचा भाजपला सवाल\nशरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता, तर जास्त बरं…\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nDhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या…\nMI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा…\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nSanju Samson : परफेक्ट टाईम, धडाकेबाज बॅटिंग, संजू सॅमसनचा झंझावात\nIPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज,…\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रोहित…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mahavikas-aghadi-government-will-collapse-by-september-october-says-narayan-rane/articleshow/77461260.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2020-09-26T03:11:50Z", "digest": "sha1:RCCCDFK44REUHY66K45UPYMHE72X2W72", "length": 16331, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Narayan Rane: ठाकरे सरकार' कधी कोसळणार; राणेंनी सांगितला नेमका मुहूर्त; राणेंनी सांगितला नेमका मुहूर्त\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nNarayan Rane: 'ठाकरे सरकार' कधी कोसळणार; राणेंनी सांगितला नेमका मुहूर्त\nNarayan Rane राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्यावर सातत्याने विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. हे सरकार आपोआप कोसळेल असे दावे भाजपच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत केलेले आहेत.\nमुंबई:भाजप नेते व राज्यसभा सदस्य नारायण राणे हे सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत आहेत. आज पुन्हा एकदा राणे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवतानाच हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा केला. ( Narayan Rane On Mahavikas Aghadi Government )\nनारायण राणे यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर जोरदार शब्दांत प्रहार केला. राज्यात सरकारचं अस्तित्वच जाणवत नाही. सरकार चालतच नाहीय. सगळं काही ठप्प आहे. सरकारमध्ये एकमत नाही. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत. संवाद कुठेच दिसत नाही. अशा स्थितीत सरकार चालणार कसं, हाच कळीचा प्रश्न असल्याचे राणे म्हणाले.\nवाचा: हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन आरोप करा; राऊतांचं भाजपला खुलं आव्हान\nराज्यातलं सरकार अल्पजीवी ठरणार असल्याचा दावा यावेळी राणे यांनी केला. हे सरकार जेमतेम सप्टेंबर -ऑक्टोबरपर्यंतच राहील. आपसातील कुरघोडींतूनच हे सरकार कोसळेल, असे भाकीतही राणे यांनी केले.\nदरम्यान, राज्यातील सरकारच्या स्थैर्यावर नारायण राणे यांनी याआधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. करोना संसर्गाशी मुकाबला करण्यात सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे. सरकारच्या निष्क्रीय कारभाराचा फटका राज्यातील जनतेला बसत आहे. राज्याला मुख्यमंत्री असून नसल्यासारखा आहे. मुख्यमंत्री मातोश्री निवासस्थानाच्या बाहेरच पडत नाहीत. सरकार अधिकारी चालवत आहेत, असे अनेक आरोप करत राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. राणे यांच्या या मागणीला पक्षातून कुणाचंच समर्थन मिळालं नसलं तरी सरकार फार काळ टिकणार नाही, असे मात्र राज्यातील भाजपचे अन्य नेतेही पुन्हा पुन्हा सांगत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हे सरकार अंतर्विरोधातून कोसळेल, असा दावा केला आहे. राज्यात ऑपरेशन लोटसची आवश्यकता नाही. सरकार पाडण्याचा आमचा कोणताही इरादा नाही, ते आपोआपच कोसळेल, असे विधानही फडणवीस यांनी केले होते.\nवाचा: करोनाचा दाखला देत भाजपचे निवेदन हातात घेण्यास नकार\nफडणवीसांना खूप कामे, मी मोकळा आहे\nबेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. कर्नाटकातील भाजप सरकारविरोधात शिवसेना व अन्य पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रश्नी राज्यातील भाजप नेत्यांनाही आव्हान दिले आहे. राज्यातल्या विरोधी पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही बेळगावात आंदोलन करायला तयार आहोत. ते यायला तयार आहेत का, असा सवाल राऊत यांनी विचारला होता. त्याला राणे यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांना राज्यात खूप कामे आहेत. मी मोकळाच आहे, कधी कर्नाटकात जायचं सांगा, असा सवाल राऊत यांनी विचारला होता. त्याला राणे यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांना राज्यात खूप कामे आहेत. मी मोकळाच आहे, कधी कर्नाटकात जायचं सांगा, असा तीरकस सवाल राणे यांनी राऊतांना केला. सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठीच कर्नाटकमधील शिवपुतळ्याचा विषय तापवला जात आहे, असा दावाही राणे यांनी केला. राणे टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.\nवाचा: पार्थ पवारांच्या नव्या भूमिकेमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nMumbai Local Train: लोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य र...\nSanjay Raut: 'शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना किंमत देत ...\nकंगना राणावत प्रकरण: हायकोर्टाने महापालिकेला सुनावले खड...\nsanjay raut : हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन आरोप करा; राऊतांचं भाजपला खुलं आव्हान महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nदेशUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने 'असे' दिलेउत्तर\nपुणेकृषी विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार का; अजित पवार म्हणाले...\nसिनेन्यूजमाझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा\nआयपीएल २०२०Chennai vs Delhi: दिल्लीने गड राखला, बलाढ्य चेन्नईवर साकारला विजय\nLive: राज्यात आतापर्यंत ९ लाख ९२ हजार रुग्ण करोनामुक्त\nनागपूरविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोटींचा, प्रस्ताव पाठवला\nनाशिकराज्यात रुग्ण वाढत असताना नाशिकनं दिली दिलासादायक बातमी\nपुणेडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ही' मागणी\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/in-real-life-the-girl-he-fell-in-love-with-became-ayushmans-partner/", "date_download": "2020-09-26T02:21:52Z", "digest": "sha1:2GGQNHI5SQ4WUKXWA2QLW4UWGDMC6VTW", "length": 20011, "nlines": 384, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "वास्तविक आयुष्यात ज्या मुलीशी प्रेम केले तीच बनली आयुष्मानची जोडीदार - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली…\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी…\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nवास्तविक आयुष्यात ज्या मुलीशी प्रेम केले तीच बनली आयुष्मानची जोडीदार\nआयुष्मान खुराना (Ayushmaan Khurana) ३६ वर्षांचा झाला आहे. चंदीगडमध्ये १४ सप्टेंबर १९८४ रोजी जन्मलेला आयुष्मान खुराना ज्या मुलीशी पहिल प्रेम झालं ती आज त्याची साथीदार आहे. आज आयुष्मानचे लाखो चाहते असले तरी तो स्वत: त्याची पत्नी ताहिराचा (Tahira) सर्वात मोठा चाहता आहे. दोघांची प्रथम वयाच्या १६ व्या वर्षी कोचिंग दरम्यान भेट झाली. पहिल्यांदाच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. आयुष्मान ताहिरा खुराणाला त्याची पहिली आणि शेवटची मैत्रीण मानते.\n११ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी २०११ मध्ये लग्न केले. खुराना सांगतो की अभिनेता झाल्यानंतर सर्व काही कसे व्यवस्थापित होईल हे माहित नव्हते, परंतु सर्व काही आपोआप झाले.\nसांगण्यात येते की, पंजाबच्या चंदीगडमध्ये जन्मलेल्या आयुष्मानने आपले संपूर्ण अभ्यास चंदीगडमध्येच केले. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी आयुष्मानने ५ वर्ष थिएटरमध्ये काम केले आहे. अभिनयात येण्यापूर्वी आयुष्मानने ताहिराला सांगितले की मला (आयुष्मान) अभिनेता व्हायचे आहे.\nआयुष्मान म्हणतो की लग्नाच्या वेळी त्याच्या खात्यात फक्त १० हजार रुपये होते. दोघांचे कुटुंबात चांगले संबंध असल्याने खुरानाच्या आई-वडिलांनी लग्नाला त्वरित सहमती दर्शविली.\nआयुष्मान आणि त्याची पत्नी ताहिराचा व्यवसाय एकमेकांपासून पूर्णपणे वेगळा आहे. परंतु यामुळे, त्यांच्या आयुष्यात कधीही कोणतीही समस्या आली नाही. आयुष्मान आपल्या पत्नीलाच श्रेय देतो.\nआयुष्मान म्हणतो की ताहिरा त्याच्यापेक्षा बरीच हुशार आहे. बर्‍याच दिवसांपर्यंत विभक्त राहील्यानंतर ताहिरा आता मुंबईत आयुष्मानसोबत राहते. ताहिरा लेखक आणि महाविद्यालयात लेक्चरर आहे. या दोघांना २ मुले, मुलगा विराजवीर खुराना (virajveer Khurana) आणि मुलगी वरुष्का (varushka) आहेत.\nआयुष्मानने अँकर आणि रेडिओ जॉकी म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. परंतु २००४ मध्ये त्याने एमटीव्ही रोडीज शोचा दुसरा सीझन जिंकून त्याची ओळख बनवली. पूर्वी तो दिल्लीत बिग एफएम (FM) मध्ये आरजे (RJ) असायचा.\n२०१२ मध्ये त्याने ‘विकी डोनर’ (Vicky Donor) या चित्रपटाद्वारे चित्रपटांमध्ये प्रवेश केला होता. शुक्राणूंच्या (Sperm) देणगीवर आधारित हा चित्रपट चांगलाच पसंत केला गेला. या चित्रपटापूर्वी आयुष्मानने २००४ मध्ये वास्तविक जीवनात शुक्राणूंचे दान केले होते. स्वत: आयुष्मानने याचा खुलासा केला आणि म्हणाले- मी वडिलांना सांगितले. जेव्हा त्याने आपल्या आईला सांगितले तेव्हा आईला समजावणे खूप कठीण होते.\nआयुष्मानची पत्नी ताहिराच्या मते, “विक्की डोनरच्या वेळी मला आयुष्मानला ऑन स्क्रीनवर किस करण्यास त्रास झाला होता.” मी त्यावेळी गर्भवती होते आणि त्यावेळी शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात.\nताहिराच्या म्हणण्यानुसार मला असे वाटते की मी येथे घरी बसले आहे आणि माझा नवरा अभिनेत्रीसोबत रोमांस करतोय. त्यावेळी आम्ही खूप यंग (Young) होतो, मी या ऑनस्क्रीन किस ला समझून घेण्यासाठी माझ्या मनात धीर नव्हते. तो मला फसवत नाही हे मला माहित होतं, पण या प्रकरणात आमच्यात बरेच मतभेद झाले.\nताहिराने सांगितले होते की बर्‍याच वेळा माझ्या हिमतीने उत्तर दिले पण आयुष्मान हरला नाही. यावर त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांनी ते सोडवण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. कालांतराने, आमच्या नात्यात प्रगती झाली आणि कर्करोगाचा टप्प्याने आमच्या नात्याला अधिक मजबूत बनवले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकास बहरले पण पर्यटकांची प्रतीक्षा\nNext articleनियम पाळा अन्यथा : कडक लॉकडाउन ना. जयंत पाटील\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी टिप्पणी विराटच्या प्रैक्टिसवर होती\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nकरोनानंही टेकले यांच्यापुढे हात…\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\nपाकिस्तान आम्हाला जनावरांप्रमाणे वागवतो – सज्जाद राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2018/09/blog-post_24.html", "date_download": "2020-09-26T02:16:17Z", "digest": "sha1:LQOPWBZ2DQPVZ7NYVLOJ67I4R7IEEOJY", "length": 20851, "nlines": 159, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: तडजोडीच्या पुढे जाताना", "raw_content": "\n“आमचा मुलगा एवढे जास्त कमावतो की मुलीला काहीही जॉब वगैरे करण्याची गरजच नाही.”, असं म्हणणारे पालक आजही भेटतात तेव्हा मला, खरंच सांगतो, काय बोलावं ते पटकन कळतच नाही. “आमच्या मुलीचा पगार अमुक अमुक आहे, पण त्यापेक्षा जास्त पगार असणाराच नवरा असावा कारण शेवटी घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावरच आहे.” अशी अपेक्षा ठेवणाऱ्या पालकांबद्दलही मला असंच आश्चर्य वाटतं. त्याही पुढे जाऊन मला आपल्या पालकांना दुजोरा देणाऱ्या मुला-मुलींचं जास्त आश्चर्य वाटतं. शिवाय अशा मंडळींची संख्याही कमी नाही, हे बघून काही प्रमाणात चिंताही वाटते.\nमला कायमच प्रश्न पडत आला आहे की स्त्री-पुरुष समता हे एक जीवनमूल्य म्हणून आपण खरंच स्वीकारलं आहे का की ती केवळ एक तात्पुरती तडजोड आहे. परिस्थितीच्या रेट्यानुसार आलेली गोष्ट आहे की ती केवळ एक तात्पुरती तडजोड आहे. परिस्थितीच्या रेट्यानुसार आलेली गोष्ट आहे असं म्हणलं जातं की तत्वज्ञान, धर्म, समाजकार्य, जनजागृती, राजकारण या सगळ्यापेक्षाही अर्थकारण ही गोष्ट जास्त परिवर्तन घडवून आणते. आज आपल्याकडे मुली शिकत आहेत, नोकरी करत आहेत कारण ती आपली ‘अर्थकारणाची’ गरज बनते आहे. घरात कमावणाऱ्या दोन व्यक्ती असतील तर अधिक चांगलं राहणीमान ठेवता येतंय. गेली काही दशकं मुली धडाडीने पुढे येत कर्तबगारी दाखवत आहेत कारण अर्थकारणाच्या गरजेमुळे त्यांना आता ती संधी मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर आपला देश हा भेदभाव करत नाही, इथल्या सर्व नागरिकांना समान संधी देतो असं चित्र उभं करणं हे देशात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीसाठीदेखील आवश्यक मानलं जातं. त्यामुळे रोजगारासह सगळ्याच बाबतीत लिंगभेद न करणं ही आपली समाजाच्या विचारधारेत झालेल्या बदलांपेक्षाही अर्थकारणाची जास्त गरज आहे. आणि त्यामुळे आपण सोयीस्करपणे, अर्थकारणापुरतं समाज मान्यतांशी, धार्मिक समजुतींशी, पारंपारिक संकल्पनांशी आणि स्वतःच्या मनाशीही काही प्रमाणात नुसतीच तडजोड केली आहे बहुतेक असं मला अनेकदा वाटतं. ‘तडजोड म्हणून असल्याने काय बिघडलं असं म्हणलं जातं की तत्वज्ञान, धर्म, समाजकार्य, जनजागृती, राजकारण या सगळ्यापेक्षाही अर्थकारण ही गोष्ट जास्त परिवर्तन घडवून आणते. आज आपल्याकडे मुली शिकत आहेत, नोकरी करत आहेत कारण ती आपली ‘अर्थकारणाची’ गरज बनते आहे. घरात कमावणाऱ्या दोन व्यक्ती असतील तर अधिक चांगलं राहणीमान ठेवता येतंय. गेली काही दशकं मुली धडाडीने पुढे येत कर्तबगारी दाखवत आहेत कारण अर्थकारणाच्या गरजेमुळे त्यांना आता ती संधी मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर आपला देश हा भेदभाव करत नाही, इथल्या सर्व नागरिकांना समान संधी देतो असं चित्र उभं करणं हे देशात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीसाठीदेखील आवश्यक मानलं जातं. त्यामुळे रोजगारासह सगळ्याच बाबतीत लिंगभेद न करणं ही आपली समाजाच्या विचारधारेत झालेल्या बदलांपेक्षाही अर्थकारणाची जास्त गरज आहे. आणि त्यामुळे आपण सोयीस्करपणे, अर्थकारणापुरतं समाज मान्यतांशी, धार्मिक समजुतींशी, पारंपारिक संकल्पनांशी आणि स्वतःच्या मनाशीही काही प्रमाणात नुसतीच तडजोड केली आहे बहुतेक असं मला अनेकदा वाटतं. ‘तडजोड म्हणून असल्याने काय बिघडलं त्या निमित्ताने निदान ही स्त्री-पुरुष समता अंमलात तरी येते आहे की..’ असा प्रश्न पडू शकतो. तडजोड असली म्हणजे आपण सतत यातून बाहेर पडायचा मार्ग आपल्याही नकळत शोधत राहतो. तडजोड म्हणजे जणू तात्पुरता उपाय. तात्पुरती मलमपट्टी. तडजोड ही भावना मुळातच नकारात्मक आहे. तडजोडीकडून आपल्याला स्वीकाराकडे (Acceptance) जायला हवं. स्वीकाराच्या पुढे येतं ते म्हणजे अनुकूल होणं (Adaptation). आणि अनुकूलनाकडून आपण जातो आत्मसात (Internalization) करण्याकडे. ‘लग्न म्हणजे तडजोड’ असं एक वाक्य नेहमी बोललं जातं. मला ते बिलकुल पटत नाही. सुरुवात तडजोडीने होतही असेल. पण तडजोडीकडून आत्मसात करण्याकडे जाण्याचा हा चार टप्प्यांचा प्रवास हा, केवळ लग्नच नव्हे, तर कोणत्याही सुदृढ नात्याचा पाया आहे. म्हणूनच एखादी गोष्ट आपण तडजोड म्हणून अंमलात आणली आहे की एक जीवनमूल्य म्हणून आपण हे स्वीकारून पुढे जात आत्मसात केलं आहे का हा प्रश्न विचारला गेला पाहिजे.\nहे आठवण्याचं एक कारण म्हणजे लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत लग्नाला उभे मुलगे, मुली आणि त्यांचे पालक, यांच्याकडून ठेवल्या जाणाऱ्या अपेक्षा. अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेत जेव्हा एखाद्या विवाहसंस्थेत किंवा वेबसाईटवर नांव नोंदवलं जातं तेव्हा नोंदणी फॉर्ममध्ये असणाऱ्या अनेक प्रश्नांत ‘जोडीदार कमावता असावा का’ हा प्रश्न विचारलेला असतो. यामध्ये मुलींकडून भरल्या जाणाऱ्या फॉर्ममध्ये ‘असलाच पाहिजे’ हाच पर्यायच निवडलेला असतो. मुलांकडून मात्र ‘काहीही चालेल’ हा पर्याय निवडला जाण्याचं प्रमाण प्रचंड आहे. ‘आर्थिकदृष्ट्या घर चालवण्याची प्राथमिक जबाबदारी ही पुरुषाची आहे, आणि स्त्रीने देखील कमावलं तर अधिक बरे पडेल, हे खरं असलं तरीही ते काय बंधनकारक नाही’ ही विचारधारा अगदी पक्की झाली आहे. मध्यंतरी एक मुलगी मला सांगत होती, “लग्नानंतर काही वर्ष मला आवडतंय तोवर मी जॉब करीन. पण नंतर करीनच असं नाही. मला माझे पेंटिंग वगैरे छंद जोपासायला आवडेल. त्यामुळे मला नवराही असा हवाय जो आत्ताची माझी लाईफस्टाईल तरी निदान टिकवू शकेल एवढे कमावत असेल.” या मुलीचं लग्न जमायला काहीच अडचण नाही आली. पण विचार करा असं एखाद्या मुलाने आपल्या प्रोफाईलमध्ये लिहिलं असतं तर मागे एकदा मला एक मुलगा माहित होता. त्याने आपली खूप पगार असणारी मोठ्या कंपनीतली नोकरी सोडून एका सामाजिक संस्थेत तुटपुंज्या पगारावर काम करायला सुरुवात केली होती. ‘घर चालवण्याची प्राथमिक जबाबदारी घेईल अशा मुलीशी मला लग्न करायचं आहे’ असं तो म्हणाला होता. अरेंज्ड मॅरेजच्या ठरलेल्या पठडीतल्या प्रक्रियेत त्याचं लग्न जमणार तरी कसं मागे एकदा मला एक मुलगा माहित होता. त्याने आपली खूप पगार असणारी मोठ्या कंपनीतली नोकरी सोडून एका सामाजिक संस्थेत तुटपुंज्या पगारावर काम करायला सुरुवात केली होती. ‘घर चालवण्याची प्राथमिक जबाबदारी घेईल अशा मुलीशी मला लग्न करायचं आहे’ असं तो म्हणाला होता. अरेंज्ड मॅरेजच्या ठरलेल्या पठडीतल्या प्रक्रियेत त्याचं लग्न जमणार तरी कसं बरं, हा सगळा पुरुषानेच घर चालवण्याचा आग्रह केवळ मुलींकडून येतो असं नव्हे तर ते आपलंच मुख्य काम आहे अशी बहुसंख्य पुरुषांचीही समजूत आहे. एकुणात मध्ययुगीन मानसिकतेला बढावा देण्याचं काम दोघं मिळून करतात अगदी\nया सगळ्याचा अर्थ, आता उलट परिस्थिती आणावी असा नव्हे. आता स्त्रियांनी प्राथमिक जबाबदारी घ्यावी आणि पुरुषांनी मुख्यतः आपले छंद जोपासावेत, घर-मुलं याकडे बघावं असंही मी सुचवत नाहीये. लग्नाच्या नात्यामध्ये, अरेंज्ड मॅरेज असेल नाहीतर लव्ह मॅरेज, आर्थिकदृष्ट्या घर चालवणं असो किंवा घरकाम-मुलं या दृष्टीने घर चालवणं असो, ती दोघांचीही प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे. म्हणून आपण इथे समता हा शब्द ‘समन्यायी’ या अर्थी वापरत आहोत. समन्यायी व्हायचं, याचा अर्थ असा की, ‘स्त्री आहेस म्हणून तुझं काम हे’ आणि ‘पुरुष आहेस म्हणून तुझं काम ते’ ही विचारधाराच मूळातून काढून टाकावी लागेल. हे होणार नाही तोवर आपल्या समाजाची मानसिकता विषम न्यायाचीच राहिल. का कुणास ठाऊक, अनेक बाबतीत अतिशय मुक्त आणि उदार विचारांची वाटणारी मंडळी अरेंज्ड मॅरेजच्या बाबतीत एकदम मध्ययुगीन बुरसटलेल्या मानसिकतेची बनून जातात असा माझा अनुभव आहे. आपल्या समाजात मुक्त विचार आणि उदारमतवाद हा तडजोडीकडून स्वीकार आणि अनुकूलन यासह आत्मसात करण्याकडे जायला हवा. त्याचं प्रतिबिंब जोडीदार निवडीच्या प्रक्रियेतही दिसायला हवं. जमेल आपल्याला हे\n(दि. २२ सप्टेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध)\nखुप छान विषय मांडला आहेस तन्मय.. खर तर ही मानसिकताच आहे समाजाची.. ती बदलेल अस वाटत नाही.. पण जर एखाद्या मुलीने एरवाया मुलाला म्हणले की माझा पगार भरपूर आहे तू नोकरी केली नाहीस तरी चालेल तर हे एखादा मुलगा मान्य करेल का नाहीच करणार.. याचे कारण मानसिकता.. बायकोच्या पगारावर किंवा शब्दशः म्हणजे बायकोच्या जीवावर बसुन खाणारा नवरा असे समाज म्हणेलं ही भीती... बायकोचा पगार जास्त असेल तर ती तुझ्या वरचढ होईल, डोक्यावर बसेल.असेच मुलांच्या मनावर बिंबवले गेलेय आणि जातय पण... पण यांत खरच बदल व्हायला हवा त्याकरिता प्रामुख्याने मुला मुलींना समुपदेशनाची गरज आहे.. आणि तुझ्यासारख्या तरूण मुलांनी हा विचार मनावर घेतला तर हे शक्य होईल पण... खुपच छान लेख... तुझे प्रत्येक विष्यावरचे लेख ख्या छान असतात... Keep it Up..\n'अनेक बाबतीत अतिशय मुक्त आणि उदार विचारांची वाटणारी मंडळी अरेंज्ड मॅरेजच्या बाबतीत एकदम मध्ययुगीन बुरसटलेल्या मानसिकतेची बनून जातात'हे अगदी खरंच पटलं... मला ही हाच प्रश्न पडतो. लहानपणापासून मोठे होइपर्यन्त झाशीच्या राणीच्या गोष्टी सांगून मोठं करायच आणि लग्नाच्या वेळी थोरा मोठ्यासमोर एक शब्द ही बोलला तर मुलगी फार उद्धट किंवा शिक्षण जास्त झालं म्हणून घमेन्ड आहे अस आज ही बोललं जातं...\nनमस्कार तन्मय. अतिशय उत्तम लेख. माझ्या नात्यातील काही मुलांची लागणे जमवताना ही मानसिकता मी अगदी जवळून अनुभवली आहे.\n‘स्व’च्या ओळखीसाठी नव्या वाटा\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (6)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mpcnews.in/dehuraod-15-new-patients-in-cantonment-today-death-of-one-172713/", "date_download": "2020-09-26T02:08:13Z", "digest": "sha1:FYHU4QESNENTCC6PPSFVYMKZFHWWKNNZ", "length": 7257, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "Dehuraod : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 15 नवे रुग्ण ; एकाचा मृत्यू", "raw_content": "\nDehuraod : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 15 नवे रुग्ण ; एकाचा मृत्यू\nDehuraod : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 15 नवे रुग्ण ; एकाचा मृत्यू\nआजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 483 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. : 15 new patients in cantonment today; Death of one\nएमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील मेन बाजार, बरलोटा नगर (हस्ती बिल्डिंग ), आंबेडकर नगर, मेहता पार्क ( केएम पार्क ), मामुर्डी, श्री विहार, दांगट चाळ, पराग अपार्टमेंट (बीएसएनएल ऑफिस ), झेंडे मळा, चिंचोली, थॉमस कॉलनी शितला नगर न. 1 या परिसरात आज, शनिवारी एका दिवसात 15 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.\nआजपर्यंत हद्दीत एकूण 483 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस दिला आहे.\nत्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 15 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे.\nरुग्णवाढीचे प्रमाण झोपडपट्टी भाग, गृहनिर्माण संस्था आणि बाजारपेठ या भागातील असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.\nआजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 483 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या ४1 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.\n138 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nमहात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 29 रुग्ण उपचार घेत आहे. तर आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 14 इतकी आहे.\nदरम्यान, आज 7 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 261 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी सांगितले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nLonavala News: शिवक्रांती कामगार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी संघटकपदी प्रतीक पाळेकर\nPune Corona News: 1290 नवे रुग्ण, 1961 जणांना डिस्चार्ज तर 50 जणांचा मृत्यू\nIPL 2020 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्ली कॅपिटल्सची चेन्नईवर 44 धावांनी मात\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 7 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची नोंद\nPune News : टाटा मोटर्सने बनविलेल्या 51 विंगर रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nPimpri news: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 9 ऑक्टोबरला निवडणूक\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 164 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 87 नवीन रुग्ण\nPune News : लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदी रद्द करा ; भारतीय मजदूर संघांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-09-26T02:56:39Z", "digest": "sha1:MZWMIWHGX2Q2RBYGKZ5JUJQT4BBKZXAY", "length": 6294, "nlines": 218, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पांढरा - विकिपीडिया", "raw_content": "\nशास्त्रीयदृष्ट्या पांढरा रंग हा रंग नसून इतर सगळ्या रंगांचे मिश्रण आहे. हा रंग शांततेचे प्रतिक मनाला जातो.पांढर्या रंगामुळे स्वच्छ वाटते. खोलीला पांढरा रंग दिल्यास खोली मोठी वाटते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकाळा राखाडी चंदेरी पांढरा लाल किरमिजी जांभळा गुलाबी हिरवा लिंबू रंग ऑलिव्ह पिवळा सोनेरी भगवा निळा गडद निळा टील अ‍ॅक्वा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१८ रोजी १४:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/5_19.html", "date_download": "2020-09-26T01:57:55Z", "digest": "sha1:EIB3O2IDKRXLTFRQAEMYE5QCV5GDOKNB", "length": 6132, "nlines": 79, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "स्मरणशक्ती वाढवण्यासाठी,दररोज खा 'हे' 5 सुपर फूड तणावही दूर राहील!", "raw_content": "\nस्मरणशक्ती वाढवण्यासाठी,दररोज खा 'हे' 5 सुपर फूड तणावही दूर राहील\nbyMahaupdate.in रविवार, जानेवारी १९, २०२०\nधावपळीच्या आयुष्यात आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही, पण आहारात काही खास गोष्टी सामील करून देखील तुम्ही आरोग्याची काळजी घेऊ शकता. या पदार्थांमधून तुम्हाला पोषक तत्त्वे देखील मिळतील.\nयातील घटक : करवंद्यात अँटीऑक्सीडंट. व्हिटॅमिन्स सी आणि फायबर असते.\nफायदा : फायबर कोलेस्टेरॉल आणि शुगर नियंत्रणात ठेवतो. अँटीऑक्सीडंट कॅन्सरचा सामना करण्यासाठी मदतीचा ठरतो.\nकसे खावे : फ्रूट सलाडमध्ये मिसळून तसेच दह्यात मिक्स करून खाऊ शकता.\nकिती खावे : अर्धी वाटी\nयातील घटक : ब्लॅक टी मध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सीडंट असते.\nफायदा : रक्तदाब कमी करण्यात मदत होते.\nकसे खावे : गरम पाण्यात चहा पत्ती तीन मिनिटांपर्यंत उकळावी नंतर गाळून प्यावे.\nकिती प्यावा : दिवसातून दोन ते तीन वेळा.\nयातील घटक : ब्रोक्कलीत व्हिटॅमिन्स सी आणि के असते. तसेच फॉलिक अँसिड, कॅल्शियम आणि फायबर असते.\nफायदा : व्हिटॅमिन के ने रक्त शुद्ध होते. कॅल्शियमने हाडे मजबूत होतात.\nकसे खावे : इतर भाज्यांसोबत मिक्स करून शिजवून खावे. काबुली चण्याच्या चटणीसोबत देखील खाता येईल.\nकिती खावे : भाजीत एक वाटी पुरेसे\nयातील घटक : अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई असते. त्याचप्रमाणे मुबलक प्रमाणात ओमेगा-3 आइल असते.\nफायदा : हृदयासाठी अत्यंत चांगला पदार्थ, शुगर आणि तणाव कमी करण्यात अत्यंत उपयोगी.\nकसे खावे : मिठाई वापरून किंवा तसेच खाता येते.\nकिती खावे : आठवड्यात एक वाटी अक्रोड खाणे फायद्याचे राहते.\nयातील घटक : पालकमध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन असते. सोबतच व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के सुद्धा असते.\nफायदा : हृदय सदृढ होते तसेच वाढत्या वयाने कमी होणारी स्मरणशक्ती देखील वाढवता येते.\nकसे खावे : सलाडमध्ये मिसळून त्याचप्रमाणे याला शिजवून किंवा कच्चे देखील खाता येते.\nकिती खावे : दिवसा कधीही एक वाटी\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/3390?page=1", "date_download": "2020-09-26T03:00:00Z", "digest": "sha1:6SGW6LYXNIYOHBCO3KGUWGE5OZFE2CSQ", "length": 17087, "nlines": 138, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "वारली विवाह संस्कार | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआर्या आशुतोष जोशी 12/07/2019\nवारली समाज हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी या डोंगराळ भागात राहतो. त्यांची बोलीभाषा मराठी आहे. निसर्ग ही त्या जमातीसाठी ‘माता’ असते. ‘निसर्ग माता’ ही त्यांच्या जीवनाची मूलभूत आणि केंद्रस्थानी असलेली संकल्पना आहे.\nवारली जमातीत ‘विवाह’ हा संस्कार महत्त्वाचा आहे. वारली समुदाय पती व पत्नी यांचे नाते आणि त्यांचे सहजीवन यांकडे आस्थेने व आदराने पाहतो. वधू आणि वर यांना परस्पर जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य वारली समुदायात दिले जाते. युवक आणि युवती यांना जोडीदार निवडण्यासाठी महत्त्वाचे माध्यम म्हणजे त्यांचे पारंपरिक नृत्य. त्यात तारपा नावाचे वाद्य वाजवले जाते. युवक आणि युवती तारपाच्या तालावर नृत्य करतात. वृद्ध महिला गीते म्हणून नृत्याला साथ देतात. युवक आणि युवती यांनी एकमेकांची निवड केल्यानंतर त्यांचे पालक एकमेकांना भेटतात. त्यांची सांपत्तिक स्थिती चांगली असेल तर ती दोघे नजीकच्या काळात विवाह करतात. ती विवाहविधी कालांतराने करणार असतील तरीही ती दोघे एकमेकांबरोबर सहजीवन सुरू करू शकतात. त्या सहजीवनात नैतिक मूल्यांचा आदर केला जातो. एकमेकांची फसवणूक केली जात नाही. ज्यावेळी आर्थिक स्थिती अनुकूल निर्माण झाली असेल त्यावेळी विवाह संस्कार केला जातो. त्या पद्धतीमुळे काही वेळा आई-वडील आणि मुले यांचा विवाह एकाच वेळी होतो\nवारली विवाहाचे पौरोहित्य त्यांच्या जमातीतील विधवा स्त्री करते. तिला ‘धवलारी’ असे संबोधले जाते. धवलारी वारली जमातीच्या विशिष्ट बोलीभाषेतील गीते म्हणून विधी पूर्ण करते. वारली समाजातील विवाहाचे पौरोहित्य एक विधवा स्त्री करते याचे महत्त्व विशेष वाटते. विवाहप्रसंगी उपस्थित सर्वांना स्नेहभोजन असते. वारली विवाहात वधू-वर आणि त्यांचे भाऊ - बहीण यांनाच वधूकडून भोजन दिले जाते. वधू-वरांचे पालकही स्वत: त्यांचे भोजन घेऊन येतात. त्यामुळे वधूच्या वडिलांना खर्चाची चिंता कमी असते.\nवारली विवाहविधी असा असतो : विवाहाच्या सुरुवातीला\n२. नारनदेव (जलाची देवता),\n३. ब्रह्मनदेव (निर्मितीची देवता),\n४. वाघोबा (वाघ) यांची प्रार्थना केली जाते.\nहे ही लेख वाचा -\nआदिवासी कातकरी जमातीचे झिंगीनृत्य\nगोंदण : आदिम कलेचा वारसा\nवारली समुदाय त्यांना वारा, पाऊस, सूर्य, चंद्र यांची भीती वाटत असल्याने त्यांचीही उपासना करतो. ‘धवलारी’ विवाहविधी सुरू करताना पारंपरिक लोकगीते म्हणते. वर आणि वधू एकमेकांच्या समोर उभे राहतात आणि परस्परांचे हात हातात धरतात. ‘धवलारी’ त्यांच्या हातात तांदूळ देते. ‘धवलारी’ जी गीते म्हणते त्यामध्ये निसर्गदेवतांनी वधू आणि वर यांना आशीर्वाद द्यावे अशी प्रार्थना केलेली असते. वारली देवता अशा आहेत\n• जुगनाथ = विष्णू, • भर्जा= विष्णूची पत्नी, • ढगशारदेव= ढग, • पावशादेव= पाऊस,\n• वावदीवारन= वादळ, • चंद्रासूर्य= चंद्र आणि सूर्य, • सुकेशारदे= शुक्र, • वरमादेव= नदी,\n• नारनदेव=जलाची देवता, • जऱ्ह्यादेव= झरा, • बत्तीसपोह्या= तलाव.\nत्याखेरीज पांडव, राम, लक्ष्मण, सीता, रावण आणि मंदोदरी यांचीही प्रार्थना केली जाते. जोडीनेच, जमातीला संरक्षण देणारे गावाचे मुख्य, हवालदार आणि सुईण यांना वंदन करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला जातो.\nगीतांनंतर, वर हा वधूच्या गळ्यात काळ्या मण्यांची माळ बांधतो. वधू हिरव्या रंगाची साडी नेसून सासरच्या घरी प्रवेशाला तयार होते. गृहप्रवेशावेळी नववधूला तिच्या नव्या कुटुंबातून विशेष मानाने स्वीकारले जाते. तिला तिच्या नव्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करून दिली जाते. तिला घरातील धान्याची कणगी, उखळ अशा, दैनंदिन वापरातील वस्तूंचा परिचय करून दिला जातो. नववधूला नव्या आयुष्याचा असा वेगळ्या पद्धतीने परिचय त्याच वेळी वराची माता सुंदरसे गीत गाते, त्यामध्ये तिचा मुलगा हा चंद्र असून तिची सून ही जणू मोगऱ्याची कळी आहे असे वर्णन केलेले असते. विवाहात यज्ञ, होमहवन असे विधी नसतात. भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्याची पद्धतही नाही.\nवारली समुदाय हा निसर्ग आणि मानव यांना आदर देणारा आहे. त्या समुदायात निसर्गाइतकाच महिलांनाही आदर देण्यात येतो. त्यांच्या चर्चेमध्ये महिलांचे मत विचारले जाते आणि महिलांच्या मताला महत्त्व दिले जाते.\n- आर्या जोशी 942205979\nवारली या आदिवासी समाजाच्या चालीरीती संबंधी सर्वसाधारणपणे माहीत नसलेली चांगली माहीती आहे. या समाजाला निती-अनीतीच्या नागरी संकल्पना लागु करुन चालणार नाहीत. त्यांची नितीमत्ता आजच्या तथाकथित उच्चभ्रु समाजापेक्षा नक्की उच्च आहे हे या माहीती वरुन कळते.\nडॉ. आर्या आशुतोष जोशी यांनी 'श्राद्धविधीची दान संकल्पना' या विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत विषयात एम ए केले आहे. आर्या यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधे हिंदू धर्म, तत्वज्ञान, संस्कृती, धर्मशास्र अशा विषयांवर सतरा शोधनिबंधांचे सादरीकरण केले आहे. त्यांना धर्मशास्त्र या विषयातील अभ्यासासाठी आणि ज्ञान प्रबोधिनीतील संशोधनासाठी 2010 मध्ये पूर्णकन्या प्रतिष्ठानचा 'कन्यारत्न पुरस्कार' आणि 2011 मध्ये सुलोचना नातू ट्रस्टचा 'स्री शक्ती पुरस्कार' प्राप्त झाला. त्या मराठी विकिपीडियावर दीड वर्षे संपादक म्हणून कार्यरत आहेत.\nलेखक: आर्या आशुतोष जोशी\nसंदर्भ: आदिवासी संस्क़ृती, आदिवासी, आदिवासी नृत्य, महाराष्‍ट्रातील समाज, समाज, बोलीभाषा, डहाणू तालुका\nलेखक: आर्या आशुतोष जोशी\nसंदर्भ: पुस्‍तके, खाद्यपदार्थ, पाककृती\nलेखक: आर्या आशुतोष जोशी\nमहालय - पितृ पंधरवडा\nलेखक: आर्या आशुतोष जोशी\nधर्मविधींसाठी ‘ज्ञानप्रबोधिनी’ पौरोहित्य व्यवस्था\nलेखक: आर्या आशुतोष जोशी\nसंदर्भ: धर्म, देव, प्रशिक्षण, डोंबिवली\nसंदर्भ: आदिवासी संस्क़ृती, आदिवासी\nवाघबारस - आदिवासींचे जीवन होते पावन\nसंदर्भ: वाघ, दिवाळी, आदिवासी, आदिवासी संस्क़ृती, परंपरा, अकोले, अकोले तालुका\nआदिवासी कातकरी जमातीचे झिंगीनृत्य\nसंदर्भ: आदिवासी संस्क़ृती, आदिवासी नृत्य\nसंदर्भ: कोकण, महाराष्‍ट्रातील समाज\nसंदर्भ: रेल्वे, जव्हार तालुका, डहाणू तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/dilip-kumars-second-brother-ehsaan-khan-dies-of-covid-19-127681167.html", "date_download": "2020-09-26T02:41:29Z", "digest": "sha1:JWV2UUF6HNZSP7QYANVRWQOHGNSPOVLU", "length": 10948, "nlines": 72, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dilip Kumar's Second Brother Ehsaan Khan Dies Of COVID 19 | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या दुस-या भावाचेही निधन, 13 दिवसांत दोन भावांची मालवली प्राणज्योत; दोघांनाही झाली होती कोरोनाची लागण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोनाने दोन भाऊ हिरावले:ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या दुस-या भावाचेही निधन, 13 दिवसांत दोन भावांची मालवली प्राणज्योत; दोघांनाही झाली होती कोरोनाची लागण\nदिलीप कुमार यांचे दोन्ही भाऊ असलम आणि अहसान वेगळ्या घरात राहात होते, त्यामुळे दिलीप कुमार आणि सायरा बानो यांना कोरोना संसर्ग झाला नाही.\nदिलीप कुमार यांचे सर्वात लहान भाऊ असलम खान यांचे 21 ऑगस्ट रोजी निधन झाले होते.\nदोन्ही भावांना 15 ऑगस्ट रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nदोन्ही भावांची रॅपिड एंटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nबॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 21 ऑगस्ट रोजी सर्वात लहान भाऊ असलम खान यांचे कोविड 19 ने निधन झाल्यानंतर आता त्यांच्या दुस-या भावाचाही प्राणज्योत मालवली आहे. बुधवारी रात्री 90 वर्षीय अहसान खान यांनी रात्री 11 वाजताच्या सुमारात लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील पारकर यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हॉस्पिटलच्या सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना क्रिटिकल केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले आहे.\nदिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आर्टिफिशिअल ब्रिदिंग सपोर्टवर ठेवण्यात आले. 15 ऑगस्ट रोजी दोघांचेही कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.\nअसलम खान यांचे 13 दिवसांपूर्वी झाले होते निधन\n21 ऑगस्ट रोजी असलम खान यांचे निधन झाले होते. ते 88 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आर्टिफिशियल ब्रिदिंग सपोर्टवर ठेवण्यात आले होते. 15 ऑगस्ट रोजी दोघांचेही कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. श्वास घ्यायला त्रास जाणवू लागल्याने आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे अहसान आणि असलम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. असलम आणि अहसान यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सायरा बानो यांनी वृत्त्ताला अधिकृत दुजोरा दिला होता. डॉक्टर जलील पारकर आणि हृदय रोग तज्ज्ञ नितीन गोखले त्यांच्यावर उपचार करत असल्याचे सायरा बानो यांनी सांगितले होते.\nदोन्ही भाऊ बहिणीसोबत राहत होते\nगेल्या महिन्यात एका न्यूज वेबसाईटशी झालेल्या संभाषणात दिलीप कुमारच्या यांच्या पत्नी सायरा बानो यांनी सांगितले होते ती, अहसान खान आणि असलम खान त्यांची बहीण फरीदा (ज्या पूर्वी अमेरिकेत राहत होत्या) सोबत राहत होते. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत विचारणा करणारे फोन कॉल्स आल्यानंतर सायरा बानो यांनी हा खुलासा केला होता.\nसायरा म्हणाल्या होत्या, \"मी हे यासाठी सांगत आहे, कारण जेव्हापासून अहसान भाई आणि असलम भाई यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले तेव्हापासून लोक दिलीप साहेबांच्या प्रकृतीबद्दल विचारणा करत आहेत. अनेकांना वाटते की, अहसान भाई आणि असलम भाई आमच्याबरोबर राहत होते. पण ते आमच्यासोबत राहात नव्हते. कोरोनाची साथ पसरल्यापासून आम्ही गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही घराबाहेर पडलेलो नाहीत.''\nदोन्ही भावांसोबत होता प्रॉपटीवरुन वाद\nवृत्तानुसार, दिलीप कुमार यांचा आपल्या या दोन्ही भावडांसोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. दिलीप कुमार यांच्या 1600 चौरस फूट मध्ये असलेल्या बंगला नंबर 16 वरुन हा वाद होता. या बंगल्याची किंमत तब्बल 250 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.\n2014 मध्ये दिलीप आणि त्यांची पत्नी सायरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. या मालमत्तेवर अहसान आणि असलम यांचा कोणताही हक्क नाही, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. 2007 च्या कराराअंतर्गत दिलीप कुमार अहसान यांना 1200 चौरस फूट तर असलम यांना 800 चौरस फूट फ्लॅट देणार होते. पण दिलीप साहेबांना जेव्हा या बंगल्याचे नूतनीकरण करायचे होते तेव्हा दोन्ही भावांनी तो रिकामा करण्यास नकार दिला होता.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/kolhapur/news/dispute-over-statue-of-chhatrapati-shivaji-in-karnataka-settled-statues-of-five-great-men-to-be-erected-in-one-place-bhumi-pujan-was-done-by-the-villagers-of-three-villages-127607586.html", "date_download": "2020-09-26T02:25:06Z", "digest": "sha1:ZOCIUCBA4GLBFQIDED5NDC743N3HHACB", "length": 4765, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dispute over statue of Chhatrapati Shivaji in Karnataka settled, statues of five great men to be erected in one place Bhumi Pujan was done by the villagers of three villages | कर्नाटकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भातील वाद निवळला, एकाच ठिकाणी पाच महापुरुषांचे पुतळे उभारणार; तीन गावच्या ग्रामस्थांनी केले भूमीपूजन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवादावर पडदा:कर्नाटकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भातील वाद निवळला, एकाच ठिकाणी पाच महापुरुषांचे पुतळे उभारणार; तीन गावच्या ग्रामस्थांनी केले भूमीपूजन\nकोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर\nमणगुत्ती गावच्या प्रवेशद्वाराशेजारील जागा निश्चित, तीन गावच्या ग्रामस्थांनी घेतला निर्णय\nबेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर सुरू झालेल्या वादावर आज तेथील ग्रामस्थांनीच सांमजस्याने पडदा टाकला. मणगुत्ती, बुळशीनट्टी आणि बेडकोळी या तीनही गावातील ज्येष्ठांनी एकत्र येऊन मणगुत्ती गावच्या प्रवेशद्वाराशेजारील जागेत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, वाल्मिकी ऋषी व श्रीकृष्ण यांचे पुतळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नियोजित ठिकाणी आज सर्व ग्रामस्थांनी मिळून आज भूमिपूजन केले.\nगेल्या दोन चार दिवसांपासून कर्नाटकसह महाराष्ट्रात मणगुत्ती येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून सुरू झालेल्या वादावर यामुळे पडला आहे. ग्रामस्थांनी भूमिपूजनानंतर वाद मिटल्याचे स्पष्ट केले आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/world-photography-day-uddhav-thackeray-considers-photography-to-be-oxygen-for-himself-look-at-some-of-the-photos-taken-from-his-camera-127630172.html", "date_download": "2020-09-26T01:09:45Z", "digest": "sha1:POTVCQEKKJKGROVYZQI25LQK5QDLZ6OW", "length": 5459, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "World Photography day : Uddhav Thackeray Considers Photography To Be Oxygen For Himself, Look At Some Of The Photos Taken From His Camera | फोटोग्राफीच्या आवडीमुळेच 40 वर्षे राजकारणापासून दूर राहिले उद्धव ठाकरे, म्हणाले होते- फोटोग्राफी माझ्यासाठी ऑक्सीजन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएक उत्कृष्ठ फोटोग्राफर:फोटोग्राफीच्या आवडीमुळेच 40 वर्षे राजकारणापासून दूर राहिले उद्धव ठाकरे, म्हणाले होते- फोटोग्राफी माझ्यासाठी ऑक्सीजन\nफोटोग्राफी स्वतःसाठी ऑक्सीजन असल्याचे मानतात उद्धव ठाकरे, पाहा त्यांच्या कॅमेऱ्यातून केली गेलेली काही छायाचित्रे\nआज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख म्हणून आपली भूमिका चोखपणे बजावत आहेत. मात्र व्यंगचित्रकार असलेल्या वडिलांच्या मुलाला राजकारणापेक्षा जास्त फोटोग्राफीची आवड होती. उद्धव ठाकरे हे एक उत्कृष्ठ फोटोग्राफर आहेत.\nउद्धव यांना बालपणापासूनच फोटोग्राफीची आवड राहिली आहे. वाइल्ड लाइफ आणि नेचर फोटोग्राफी त्यांचे आवडते विषय आहेत. उद्धव ठाकरे यांची फोटोग्राफीची आवड एका प्रसंगावरून प्रकर्षाने लक्षात येते. पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले होते, फोटोग्राफी माझ्यासाठी ऑक्सीजन आहे. कुणी काहीही म्हणो, मी फोटोग्राफी सोडू शकत नाही. पाहा त्यांनि टिपलेले काही छायाचित्रे...\nवाइल्ड लाइफ आणि नेचर फोटोग्राफी उद्धव ठाकरेंचे आवडते विषय आहेत. त्यांनी टिपलेले हे वाघाचे छायाचित्र\nउद्धव ठाकरे यांनी इंफ्रारेड टेक्निकचा वापर करून कॅनडाच्या 'हडसन बे' मध्ये सुमारे शून्य तापमानामध्ये पोलर बिअरचा काढलेला फोटो\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंढरपूर वारीचे हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी केली आहे. त्यातील एक रिंगण सोहळ्याचे फोटो\nताडोबा येथे ग्रे हेड फिश ईगल त्याच्या शिकारसह\nउस्ताद जाकिर हुसैन भारतातील सर्वात प्रसिद्ध सबला वादक\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/tag/shree-veershaiv-co-op-bank-ltd-kolhapur-recruitment-2019/", "date_download": "2020-09-26T01:06:16Z", "digest": "sha1:PQXKFKEMUDFLIWKNXBK7O4TGKWRUR7LE", "length": 3548, "nlines": 69, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nUT प्रशासन दमण आणि दीव येथे विविध पदांची भरती\nमुंबई उपनगर जिल्हा येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची भरती\nICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाची भरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, दिव अंतर्गत विविध पदांची भरती\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांच्या 171 जागांसाठी ऑनलाईन अर्ज…\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती\nRITES लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदांची भरती\nजेईई अॅडव्हान्स्ड: ९८ टक्के विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा केंद्र\nनॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरु\nनाशिक महानगरपालिका भरती पात्र आणि अपात्र यादी\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-vaccination-control-diseases-17845?page=1&tid=163", "date_download": "2020-09-26T03:24:01Z", "digest": "sha1:JADWGDIKYHCAX2GMERGHD4OEQ4VJL547", "length": 20412, "nlines": 181, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, Vaccination to control diseases. | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआजारांच्या नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यक\nआजारांच्या नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यक\nगुरुवार, 28 मार्च 2019\nलसीकरण हे लहान मुले, बाळांसाठी आणि आजारी लोकांसाठी असते, अशीच बहुतांशी लोकांचा समज असतो. लहानपणी सगळ्या लसी घेऊन झाल्यात, आता परत मोठेपणी लसीकरण कशाला असा प्रश्नसुद्धा पडू शकतो. लसीकरणासंबंधी समज-गैरसमज दूर करण्यासाठी आपण आज मोठ्यांचे लसीकरण या विषयाची माहिती घेऊ.\nमो ठ्या लोकांचे लसीकरण हा आरोग्यसेवेचा एक दुर्लक्षित भाग राहिलेला आहे. वास्तविक पाहता आजारांचे प्रमाण कमी होण्यासाठी लसीकरण हा सर्वात स्वस्त व खात्रीशीर उपाय आहे.\nलसीकरण हे लहान मुले, बाळांसाठी आणि आजारी लोकांसाठी असते, अशीच बहुतांशी लोकांचा समज असतो. लहानपणी सगळ्या लसी घेऊन झाल्यात, आता परत मोठेपणी लसीकरण कशाला असा प्रश्नसुद्धा पडू शकतो. लसीकरणासंबंधी समज-गैरसमज दूर करण्यासाठी आपण आज मोठ्यांचे लसीकरण या विषयाची माहिती घेऊ.\nमो ठ्या लोकांचे लसीकरण हा आरोग्यसेवेचा एक दुर्लक्षित भाग राहिलेला आहे. वास्तविक पाहता आजारांचे प्रमाण कमी होण्यासाठी लसीकरण हा सर्वात स्वस्त व खात्रीशीर उपाय आहे.\nइन्फ्लुएंजा व स्वाइन फ्लू ( H१N१)\nकाही वर्षांपूर्वी जेव्हा स्वाइन फ्लूची साथ नवीन होती, त्या वेळी मोठ्या प्रमाणात त्याची भीती होती.या लसीलासुद्धा प्रचंड मागणी होती. परंतु आता हा आजार आपल्यामध्ये एवढा रुळला आहे, त्याची एवढी सवय झाली आहे की त्याचे गांभीर्य कमी होते आहे असं वाटतं. वास्तविक पाहता ही लस सर्व गरोदर महिला, ६ महिने ते ५ वर्षे वयोगटातील मुले, ६५ वर्षाच्या पेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येकाने घ्यायला हवी. दम्याचे, फुफ्फुसाचे, हृदयाचे आजार, मेंदूचे आजार, यकृताचे आजार, मधुमेही यांना ही लस आवश्यक आहे. स्वाइन फ्लू (H१N१)लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी ही लस घेणे गरजेचे आहे. ही लस दरवर्षी घ्यायला लागते. या लसीमुळे स्वाइन फ्लूपासून संरक्षण मिळतेच, पण त्याशिवाय नेहमी होणारी सर्दी, खोकल्यापासूनसुद्धा बचाव केला जातो. इंजेक्शन व नाकाद्वारे घ्यावी लागणारी असे दोन प्रमुख प्रकार आहेत. या लसीच्या इंजेक्शनचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यातील कुठले वापरायचे ते आपल्या आजाराप्रमाणे डॉक्टर ठरवतात.\nही एक प्रकारची विषाणूजन्य कावीळ असते. याचा प्रसार रक्ताच्या संक्रमणातून व शरीरातील विविध स्रावांतून होतो. खास करून वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना ही लस घेणे अतिशय आवश्यक आहे. परंतु सर्वांनीच ही लस घेणे अपेक्षित आहे. याची ३ इंजेक्शन्स घ्यावी लागतात.\nहे सर्वांनी घेणे अपेक्षित नाही. काही विशिष्ट आजारांमध्ये, यकृताच्या व किडनीच्या आजारांमध्ये ही लस घेणे अपेक्षित आहे.\nघटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात या आजारांसाठी ही लस घेतली जाते. दर दहा वर्षांनी घेणे अपेक्षित आहे. धनुर्वाताची लस बऱ्याचदा दिली जाते. कित्येकदा याची गरज नसते.\nह्युमन पॅपिलोमा व्हायरस. हा व्हायरस गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यासाठी जबाबदार आहे. यासाठीची वयाच्या नऊ वर्षापासून ते २६ वर्षांपर्यंत घ्यायला हवी. आजाराचा प्रसार रोखण्यासाठी स्त्री व पुरुष या दोघांनाही ही लस घ्यायला हवी.\nहिमोफिलस इन्फ्ल्यूंझा बी आणि नुमोकॉकल लस\nही लस सर्वांनी घेणे अपेक्षित नाही. काही विशिष्ट आजारांमध्ये प्रतिकारशक्ती खूप कमी होते. त्यांनीच फक्त ही लस घेणे अपेक्षित आहे.\nजेव्हा टायफॉइडची साथ येते तेव्हा सर्व लोकांनी ही लस घेणे आवश्यक असते. तसेच ज्यांना टायफॉइड होऊन गेलेला आहे, वारंवार प्रवास करणारे लोक यांना ही लस आवश्यक आहे. अन्यथा एरवी या लसीची गरज नाही. ही लस दर ३ वर्षांनी घ्यावी लागते.\nही लस ज्यांना पूर्वी कांजिण्या झाल्या नाहीत अशा सर्वांना घेण्यास सुचविले आहे.\n६० वर्षांवरील सर्वांसाठी ही लस आवश्यक आहे. पूर्वी नागीण झाली असेल तरी ही लस घेणे आवश्यक आहे.\nया आजाराची साथ असताना, लष्करातील लोक व वसतिगृहात नवीन आलेले विद्यार्थी, काही देशांमध्ये प्रवासाआधी वगैरे ठराविक कारणांसाठी ही लस घ्यावी लागते.\nकुत्रा चावला नसतानासुद्धा रेबीजपासून प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी यासाठी ही लस दिली जाते. ० ,७ व २१ व्या दिवशी अशी तीन इंजेक्शन घ्यावी लागतात.पोलीस, पोस्टमन कुरियर देणारे, शाळकरी मुले, पशू तज्ज्ञ, वन कर्मचारी, आदी लोकांना ही लस घेणे फायदेशीर ठरते. कुत्रा चावल्यानंतरसुद्धा हीच लस वापरली जाते, परंतु त्याचे शेड्युल वेगळे आहे.\n(लेखिका दौंड, जि. पुणे येथे अायसीयू तज्ज्ञ आहेत.)\nमराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार\nपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.\nराज्यात हलक्या पावसाची शक्यता\nपुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर आता उघडीप देण्यास सुरूवात केली आहे.\nनगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळी\nनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी विधेयकांना कडाडून विरोध करून शुक्रवारी (ता\nजालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टी\nऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाचा कमी-अधिक प्रमाणात असलेला\nवऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’ रस्त्यावर\nअकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच शेतकऱ्यांबाबत तीन विधेयके मंजूर केली आहेत.\nबहुगुणी वेलचीवेलची म्हणजेच वेलदोडा. मसाला तसेच मुखशुद्धीकर...\nमहिला बचतगटाचा ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्डभेंडा बुद्रूक (ता. नेवासा,जि.नगर) येथील वीस...\nआरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...\nरोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास चिकन अन्...भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने चिकन...\nआरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...\nथेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...\nपूरक उद्योगातून मिळाली आर्थिक साथपरभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील झाडे...\nआरोग्यदायी फणसवरून काटेरी पण आतून गोड.. असे म्हटले की फणस हे फळ...\nगटामुळे मिळाली शेती, पूरक उद्योगाला... टाकळीमिया (ता. राहुरी, जि. नगर) येथील...\nअजीर्ण, अपचनावर गुणकारी बडीशेपकोणताही सण, समारंभ आणि घरगुती कार्यक्रमाच्या...\nनाचणी प्रक्रियेतून मिळवली आर्थिक समृद्धीकोकणात भातशेतीबरोबर नाचणीची लागवड मोठ्या प्रमाणात...\nगुणकारी कोकमकोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते....\nमहौषधी जिरेस्वयंपाकात, पदार्थात, मसाल्यात उपयुक्त असणारे...\nकिरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...\nआरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....\nकुक्कुटपालन, परसबागेने दिली आर्थिक साथचिंचघरी (ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) येथील अंजली...\nमहिलांमध्ये तयार झाली स्वयंरोजगाराची ‘...ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार...\nआरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...\nशेतीमधील ‘विमेन चॅम्पियन'पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि नाशिक जिल्ह्यातील...\nआरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mazespandan.com/2019/09/15/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2020-09-26T02:32:58Z", "digest": "sha1:GPFPG3MNPJA2GB5LOWYAY7GEYRMTOGUY", "length": 28075, "nlines": 299, "source_domain": "mazespandan.com", "title": "आपडी-थापडी | स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर रेललेले. आजीही त्यांच्यातीलच एक होऊन गेल्या होत्या. मुलांना त्या बहुधा गोष्टी सांगत असाव्यात. गोष्टींना कंटाळलेल्या मुलांनी एकच गिल्ला सुरू केला…\nआजी ऽ आपडी- थापडी खेळू ना गं.\nरस्त्याने चाललेला मी ‘आपडी थापडी’ ऐकताच थबकलो. ही आपडी-थापडी पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी माझ्या बालमुठीतून घरंगळून गेली होती. मधल्या काळात मोठे होणे काय असते, ते पुरेपूर अनुभवले, त्याचे चटके सोसले. हरवलेल्या बालपणासोबत खूप काही हरवले, पण ही ‘आपडी थापडी’ मेंदूच्या कोठल्या तरी कोपऱ्यात तशीच राहिली. मधल्या काळात माझे लग्न झाले. मला मुले झाली, पण त्यांच्याशी मला कोठे खेळता आली ही ‘आपडी-थापडी’\nसारखी अवीट जोडीची ‘खेळगाणी’ मी मला काळाच्या बदलात केवळ ढकलत राहिलो, पुढे पुढे; पण बालपणीचे किती मोठे वैभव, त्या फुलपंखी दिवसांतील गमतीजमती, ते खेळ, ती गाणी, सारे तेथल्या तेथे सोडून आलो.\nत्या ‘आपडी-थापडीच्या’ खेळाने मला माझ्या बालपणात नेऊन सोडले. रस्त्याने जात होतो, पण माझा पाय जागेवरून हलेना. मला त्यांची ‘आपडी-थापडी’ पाहायची होती. बिनपैशांचा तो आनंद माझ्या\nआपल्या आयुष्यातून निघून गेला आहे. मी लहान होऊन तो पकडू पाहत होतो.\nकोणी काय म्हणेल याची पर्वा न करता मी त्या आजी-नातवंडांच्या खेळाकडे बघू लागलो. मुलांनी कोंडाळे केले होते. आजीसमोर प्रत्येकाने त्यांच्या छोट्या छोट्या हातांचे पंजे एकमेकांवर पालथे ठेवले होते अन् सुरू झाली…\nआजी मुलांच्या पालथ्या हातांवर क्रमाक्रमाने उलटापालटा हात थोपटत गाणे म्हणत होती.\n‘धर गं बेबी हाच कान’ म्हणताच त्या छोट्या छोट्या बोटांनी एकमेकांचे कान पकडले, आजीचेही पकडले. कान धरून, ते सारे कोंडाळे झुलू लागले आणि पुढचे गाणे सुरू झाले.\n‘च्याऊ म्याऊ पितळीचं पाणी पिऊ भुर्रर्रर्रकन उडून जाऊ’\nअसे म्हणत सर्वांनी त्यांचे कानांवरील हात सोडून हवेत फडकावले. जसे छोटे छोटे पक्षीच उडाले. मी तल्लीन झालो होतो. माझे मला मी रस्त्यात उभा राहून मुलांच्या खेळात रमलो आहे याचे भानही उरले नव्हते. मला माझे निसटून गेलेले बालपण त्या खेळगाण्यांतून पुन्हा मिळाले होते. माझ्यातील लहान मूल त्या ‘आपडी-थापडी’ने जागवले होते. माझ्या डोळ्यांपुढून माझे खेड्यात गेलेले बालपण सरकू लागले. संध्याकाळी शाळेतून आले, पाटी-दप्तर घरात भिरकावले, की आम्ही खेळायला मोकळे गरिबी सगळ्यांच्याच घरी होती. आजूबाजूचे सगळे मित्रही त्याच परिस्थितीतील. आमचे खेळही खर्चिक नव्हते. सगळे तोंडभांडवल किंवा अंगमेहनत असा व्यायाम घडवणारे.\nओट्यावर बसलेली आजी दोन्ही हातांनी डोळे झाकायची अन् म्हणायची.\nमग सुरू व्हायची त्याच्या लपलेल्या सवंगड्यांची लपाछपी. वाघाच्या पिल्लावर राज्य आलेले. तो मग इकडे तिकडे कानाकोपऱ्यात शोधीत फिरे. पहिल्यांदा जो सापडला त्याच्यावर राज्य. पुन्हा त्याचे डोळे झाकून\nएका खेळाने कंटाळले, की दुसरा खेळ. असेच अन् या सगळ्या खेळांभोवती काही काही गाणी असतच. त्याचे तेव्हा काही वाटत नसे – आज आठवून मोठी गंमत वाटते. आराधरीचा खेळ खेळताना सगळे गडी गोल रिंगण करून जाळी धरत. जाळी धरली, की कोणावर राज्य येणार यासाठी मग…\nगाई गोपी उतरला राजा…\nआणि गंमत अशी, की जो राजा बनून उतरायचा त्याच्यावरच राज्य आलेले असायचे. आराधरीत खूप पळापळ व्हायची. हुलकावण्या देत पळणाऱ्यांपैकी कोणा एकाला पकडलं, की त्याच्यावर राज्य\nमुलींची गाणी आणखी वेगळीच असत-\nम्हणत मुलींचे खेळ रंगत. एरवी भित्र्या, काकूबाई असणाऱ्या मुली खेळताना किती धीट होत\n‘कोरा कागद निळी शाई\nआम्ही कोणाला भीत नाही\nहा दगड-मातीचाही खेळ छानच होता. दगड म्हटले, की मातीवर उभे राहायचे अन माती म्हटले, की दगडावर\nआकाशात विमानाचा घरघर आवाज ऐकू येऊ लागला, की सगळी बच्चेकंपनी विमान पाहायला अंगणात जाई. आभाळात विमानाचा शोध सुरू होई. ते विमान साखळी सोडून लहान मुलांना विमानात बसवून घेते असाही काहीतरी समज होता…\n‘ईमाईन ईमाईन साखळी सोड…’ असेही त्या आकाशात उडणाऱ्या विमानकडे पाहून म्हणत असू. जेव्हा एसटीतही क्वचितच बसायला मिळे त्या काळातील ती कल्पना\nसंध्याकाळी आभाळातून बगळ्यांची माळ हमखास उडताना दिसे, मग आम्ही ‘बगळ्या बगळ्या कवडी दे, धारणगावची नवरी दे’\nअसे नखांवर नखे घासून गाणे म्हणत असू.\nनखांवर तेव्हा तांदळाच्या कणीसारखे काहीतरी डाग असत. अनेक मुलांच्या नखांवर ते असत. त्यालाच आम्ही कवड्या म्हणत असू. बगळे आपले उडत जायचे, पण आम्हाला मात्र कवड्या मिळालेल्या असत, नखांवर…\nपुढे आमच्या मित्राला… प्रकाशला धारणगावची नवरी मिळाली. त्याला दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. लहानपणी कवड्या अन् मोठेपणी धारणगावचीच नवरीही…\nआम्ही त्याची खूप मजा घेतली.\nआकाशात ढग भरून आले,\nकी पावसाचे वातावरण तयार होई.\nअशा वेळी अंगणात गोल गोल फिरत…\nहे पावसाचे गाणे तर त्या पिढ्यांतील प्रत्येकानेच त्या त्या वेळी म्हटले आहे. पाऊस पडून गेल्यानंतर अंगणातील मऊ वाळूचे खोपे तयार करण्याची लगबग सुरू होई. पायाच्या पावलावर पावसाने मऊ झालेली माती थापून आभाळाला वाकुल्या दाखवत वाळूची घरे बनवत असू. घर हळूच पाऊल काढताना अनेकदा पडून जाई, तर कधी कधी खोपा बने. तो आनंद शब्दांपलीकडचा.\nआम्ही नवरात्रात गावाबाहेरच्या वडजाई देवीला जात असू. रस्त्यात आजूबाजूला खळगी होती. त्या खळग्यांमध्ये इंगळ्यांची बिळं असत. आम्ही त्या बिळांतून विषारी इंगळ्या काढून त्यांची झुंज लावण्याचा थरारक जीवघेणा खेळही त्या नकळत्या वयात खेळत असू. इंगळी काढण्याचा आमचा एक मंत्र होता. आम्ही करवडाचा फोक हातात घेऊन तो इंगळीच्या बिळावर घासत असू. काडीने घासताना बिळातून माती-खडे आत पडत.\nआणाजी पाटलाला बोलीती बोलीती\nमंत्र म्हणून पुरा होण्याच्या आतच चवताळलेली इंगळी काडीला डंख देत बाहेर येई. कमरेचा करगोटा तोडून, फास मारून इंगळीची नांगी बांधून तिला दुसऱ्या बिळात सोडण्यात येई. पहिली इंगळी दुसरीला बाहेर काढून बरोबर घेऊन येई. तो थरारक खेळ आठवून अंगावर काटा येतो.\nथोड्याच दिवसांत दिवाळीची नवलाई येई. हातात सुरसुऱ्या घेऊन…\nअसे म्हणत सुरसुऱ्या ओवाळीत दिवाळीचे गाणे म्हटले जाई. दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी सहामाही परीक्षा असे. तिचे ओझे वाटायचे. दिवाळीच्या आनंदापूर्वी केवढा मोठा अडथळा\nशाळा नेहमी खेळण्याच्या आड येते असे वाटायचे. मग शाळा सुटली की कोण आनंद… ‘\nशाळा सुटली पाटी फुटली,\nआई मला भज्यानं मारलं, त्याच्या काय बापाचं खाल्लं’\nआम्ही लहानपणी असे एक रडगाणेही म्हणत असू. घरातील लहान मुले सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या बहिणीभावांकडे असे. तशा वेळी मोठी बहीण आईची जागा घेत असे. ती तिच्या भावंडांना खेळवताना…\n‘इथं इथं नाच रे मोरा\nअशी गाणी म्हटली जात. लहानग्याचे कौतुक करताना, त्याला तीट लावताना…\n‘अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा तीटट् लावू’\nअसे छान गाणे म्हटले जाई. लहान मुलांचे संगोपन करताना अशी अनेक गाणी गात त्यांचे बालपण फुलवले जाई. खेळगाण्यांनी तेव्हाचे आमचे बालपण व्यापून टाकलेले होते.\nती गाणी एका पिढीकडून दुसरीकडे आपोआप हस्तांतरित होत होती. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नव्हते.\nमोठी ताई लहानग्या भावाला खेळवताना उताणी झोपून त्याला पायावर बसवी व पायाला झोका देत, खालीवर करत त्याच्याशी ‘हाट घोडा हाट’ खेळू लागे…\nबाजाराला कोण जातं दादा वहिनी\nअसे खेळता खेळता बहिणी भावांचे मेतकुट जमे. ब-याचदा लहान मुले मुलींमध्येच खेळत. बहिणीच्या मैत्रिणींमध्ये मुलगा खेळू लागला, की\n‘पोरींमध्ये पोरगा.. भाजून खातो कोंबडा…’\nअसे त्याला चिडवले जाई. कधी एकमेकांना पाठीवर घेत ‘वऱ्हाटा का पाटा गोल गोल वाटा’ असा वऱ्हाट्या-पाट्याचा खेळ सुरू होई. मुलींचे अंपल-चंपल, सागरबिट्ट्या, ठिकरा-ठिकरी असे खेळही रंगत. ते खेळ खेळताना म्हटली जाणारी खेळगाणी हीच आमच्या पिढीची बडबडगीतं होती. ती म्हणत आमचे बालपण समृद्ध झाले. पण आम्ही तो वारसा पुढील पिढीकडे पोचवायला कमी पडलो. ती साखळी आमच्या पिढीशी काळाच्या बदलांमध्ये येऊनच तुटली त्याचे दुःख मोठे आहे.\nमला त्या आपडी-थापडीवाल्या आजींचा हेवा वाटला. कौतुकही वाटलं. त्यांनी त्यांचं हरवलेलं बालपण मुलांत मूल होऊन आपडी-थापडी खेळताना पुन्हा जिवंत केले होते. मुलांनी हट्ट धरला तेव्हा त्यांनी गाणे म्हणायला सुरुवात केली.\n‘बगळ्या बगळ्या नाच रे,\nतुझी पिल्लं पाच रे,\nमला छमछम छडी आठवली, चिमुकल्या हातांवरचे ते छडीचे वळ घमघमणाऱ्या विद्येकडे घेऊन गेले. प्रतिकूलतेतून मिळणारा आनंद शोधणारे आमचे बालपण कितीतरी समृद्ध होते बदल होणार आहेतच. मात्र आमच्या पिढीने जे अनुभवले, ते नव्या पिढीला आम्ही नाही देऊ शकलो.\nआम्ही पुढच्या पिढीला भौतिक सुखे मनमुराद देऊ केली. आम्हाला बालपणी जे मिळाले नाही, ते सुख मुलांना पैशाच्या माध्यमातून नको तितके देण्याचा प्रयत्न केला – पण देण्याजोगे बरेच काही न देताच\nत्यातील ती खेळगाणी राहूनच गेली द्यायची.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\n← तुझ्या-माझ्या नात्यातला चैत्रबन.. What does a woman want\nआपके मराठी भाषा को समझने की कोशिश कर रही हूँ पूरा तो नहीं लेकिन थोड़ी सी समझ भी पाऊँगी पूरा तो नहीं लेकिन थोड़ी सी समझ भी पाऊँगी\nबदलणाऱ्या जगाच्या रहाटगाडग्यात लहानपणीच्या या आठवणी काळाच्या पडद्याआड गेल्या होत्या… लेख वाचून खरंच बालपणाची सैर करून आल्यासारखं वाटलं..\nडालडा आणि मराठी माणूस\nहनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये :\nथोडे दिवस घरातच बसायचं आहे\nस्त्री समाधानी केव्हा असते \nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nकाही भारी मराठी मीम्स..\nजीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत\nस्त्रीचे ओले केस आणि लोकतंत्र\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/india-news/if-required-i-will-visit-jk-cji-gogoi-seeks-report-from-hc/articleshow/71148451.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-26T03:26:01Z", "digest": "sha1:WOCCJWDHK7XPCAO2AMCVCQO5I72OJ23O", "length": 12587, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवेळ पडल्यास जम्मू-काश्मीरचा दौरा करेन: सरन्यायाधीश\n'जम्मू-काश्मीरच्या जनतेला न्यायालयात जाता येत नसल्याच्या आरोपांत तथ्य असेल तर ते गंभीर आहे,' अशा शब्दांत चिंता व्यक्त करतानाच, याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी जम्मू-काश्मीर हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींकडून अहवाल मागवला आहे. 'वेळ पडल्यास मी स्वत: जम्मू-काश्मीरचा दौरा करेन,' असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.\nनवी दिल्ली: 'जम्मू-काश्मीरच्या जनतेला न्यायालयात जाता येत नसल्याच्या आरोपांत तथ्य असेल तर ते गंभीर आहे,' अशा शब्दांत चिंता व्यक्त करतानाच, याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी जम्मू-काश्मीर हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींकडून अहवाल मागवला आहे. 'वेळ पडल्यास मी स्वत: जम्मू-काश्मीरचा दौरा करेन,' असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.\nकलम ३७० हटविल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी ओरड सुरू केली आहे. लोकांना न्यायालयात जाता येत नसल्याचीही काहींची तक्रार आहे. बालहक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या एनाक्षी गांगुली व शांता सिन्हा यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली. अॅड. हुजेफा अहमदी यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. त्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. 'उच्च न्यायालयात जाता येत नाही असं तुमचं म्हणणं आहे. कोणी तुम्हाला आडकाठी करतंय का,' असा प्रतिप्रश्न गोगोई यांनी अहमदी यांना केला. 'मी स्वत: याबाबत आज उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींशी बोलेन. वेळ पडल्यास जम्मू-काश्मीरमध्ये जाईन. मात्र, ही तक्रार खोटी असल्यास तुम्हाला परिणाम भोगावे लागतील,' असा इशाराही त्यांनी दिला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nभारत बंद : ट्रॅक्टरवर स्वार होऊन तेजस्वी यादव यांची रॅल...\nभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्...\n, 'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्...\nआंध्राचे माजी विधानसभाध्यक्ष कोडेला राव यांची आत्महत्या महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nदेश'चीन, पाकला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद भारतीय हवाई दलात'\nआयपीएल २०२०Chennai vs Delhi: दिल्लीने गड राखला, बलाढ्य चेन्नईवर साकारला विजय\nमुंबईशिवसेना कधीच कन्फ्यूज नव्हती; राऊतांचे फडणवीसांना उत्तर\nकोल्हापूरपोटच्या १० वर्षांच्या मुलाला ५ लाखात तृतीयपंथीयास दिले दत्तक\nदेशUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने 'असे' दिलेउत्तर\nLive: राज्यात आतापर्यंत ९ लाख ९२ हजार रुग्ण करोनामुक्त\nपुणेकृषी विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार का; अजित पवार म्हणाले...\nसोलापूरपुढचे आंदोलन मातोश्री आणि सिल्व्हर ओकवर; पडळकरांचा इशारा\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nविज्ञान-तंत्रज्ञानसॅमसंगने आणले AI पॉवर्ड वॉशिंग मशीन, मोबाइलने करा कंट्रोल\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/congress-leader-sachin-sawant-slams-bjp-leader-and-union-home-minister-amit-shah-over-article-370-and-jammu-kashmir/articleshow/71243266.cms", "date_download": "2020-09-26T02:38:49Z", "digest": "sha1:EQJDKFGI4A7YEOWBDGJFWCBGBD3A4AW4", "length": 12370, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशहांनी कलम ३७० वर काश्मिरात बोलावं: काँग्रेस\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीने कलम ३७० हटवण्याच्या निर्णयात राजकारण आणलं, अशी टीका करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काँग्रेसनं जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गृहमंत्र्यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर काश्मीरमध्ये जाऊन व्याख्यान द्यावं, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.\nमुंबई: काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कलम ३७० हटवण्याच्या निर्णयात राजकारण आणलं, अशी टीका करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काँग्रेसनं जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गृहमंत्र्यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर काश्मीरमध्ये जाऊन व्याख्यान द्यावं, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.\nमुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सभागृहात अमित शहा यांनी 'कलम ३७०'वर व्याख्यान दिलं. कलम ३७० च्या मुद्द्यावर त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली. सरकारने कलम ३७० रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राजकारण आणलं, अशी टीका शहा यांनी केली. या टीकेला काँग्रेसनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'गृहमंत्र्यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर काश्मीरमध्ये जाऊन व्याख्यान द्यावं. महाराष्ट्रात कलम ३७१ आहे. कलम ३७० नाही,' असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले. महाराष्ट्रात एवढा विकास केला आहे असं दाखवता, तर देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील रथाचे चाक चिखलात का रुतले त्यावर बोलावे, असं आव्हानही त्यांनी दिलं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nMumbai Local Train: लोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य र...\nSanjay Raut: 'शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना किंमत देत ...\nकंगना राणावत प्रकरण: हायकोर्टाने महापालिकेला सुनावले खड...\nशहांचं युतीवर भाष्य नाही, शिवसेनेचा उल्लेखही टाळला\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nLive: राज्यात आतापर्यंत ९ लाख ९२ हजार रुग्ण करोनामुक्त\nआयपीएल २०२०Chennai vs Delhi: दिल्लीने गड राखला, बलाढ्य चेन्नईवर साकारला विजय\nकोल्हापूरकरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ऑडिट होणार, २२ पथकं तैनात\nमुंबईशिवसेना कधीच कन्फ्यूज नव्हती; राऊतांचे फडणवीसांना उत्तर\nपुणेकृषी विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार का; अजित पवार म्हणाले...\nमुंबईड्रग्ज प्रकरण: NCB चे अधिकारी तुरुंगात जाऊन शौविकचा जबाब घेणार\nदेशकृषी विधेयकांवरून PM मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र\nदेश'चीन, पाकला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद भारतीय हवाई दलात'\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nकार-बाइकदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/desa-koda+Ikvetoriyala+gini.php?from=in", "date_download": "2020-09-26T00:52:57Z", "digest": "sha1:QXN6PZQSMYIWFX3OQJSGPP7Y3GFN4AL4", "length": 10024, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड इक्वेटोरीयल गिनी", "raw_content": "\nदेश कोड इक्वेटोरीयल गिनी\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेश कोड इक्वेटोरीयल गिनी\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 01981 1301981 देश कोडसह +240 1981 1301981 बनतो.\nइक्वेटोरीयल गिनी चा क्षेत्र कोड...\nदेश कोड इक्वेटोरीयल गिनी\nइक्वेटोरीयल गिनी येथे कॉल करण्यासाठी देश कोड. (Ikvetoriyala gini): +240\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी इक्वेटोरीयल गिनी या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00240.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक इक्वेटोरीयल गिनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/dharma-guru-dr-shivling-shivacharya-maharaj-ahmedpurkar-died/", "date_download": "2020-09-26T02:00:46Z", "digest": "sha1:4LWR672EVIPH5XM2UH4EBZK7GXK37WKC", "length": 16586, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन, अहमदपुरात अंत्यसंस्कार - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली…\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी…\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nराष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन, अहमदपुरात अंत्यसंस्कार\nनांदेड : लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथील लिंगायत समाजाचे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचं नांदेड येथील एका रुग्णालायात निधन झालं. ते १०४ वर्षांचे होते. अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे पार्थिव नांदेडहून अहमदपूर या ठिकाणच्या भक्तिस्थळावर नेले गेले आहे.\nमहाराज गेल्या चार दिवसांपासून नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. काल (३१ ऑगस्ट) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने आज त्यांचे निधन झाले. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती.\nत्यानंतर हजारो भाविकांनी अहमदपूरजवळ गर्दी केली होती. राष्ट्रसंत अहमदपूरकर महाराज यांनी १९४५ साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते. मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत. वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक येथील त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरलीय. दरम्यान, “वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही शिवाचार्य महाराजांनी धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले.\nविद्वत्ता आणि अमोघ वाणी यामुळे समाजाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून मानाचे स्थान दिले. त्यांनी धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. धर्मप्रसाराबरोबरच त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही काम उभे केले. शिवाचार्य महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह समाजासाठी मार्गदर्शक असेच आहे. ” असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसून श्लोका मेहताने घेतले होते मुकेश अंबानीच्याच शाळेतुन शिक्षण, अशा प्रकारे झाली आकाश अंबानीशी भेट\nNext articleश्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत राहणार बंद\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी टिप्पणी विराटच्या प्रैक्टिसवर होती\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nकरोनानंही टेकले यांच्यापुढे हात…\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\nपाकिस्तान आम्हाला जनावरांप्रमाणे वागवतो – सज्जाद राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/category/marathwada/?filter_by=featured", "date_download": "2020-09-26T01:22:15Z", "digest": "sha1:RAWBM54IW4AKRV3NKTCWQT3XCYVMA4VV", "length": 11615, "nlines": 148, "source_domain": "dainikekmat.com", "title": "मराठवाडा - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nमराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती\nतुळजापुरात साकारणार ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर -आ. राणाजगजीतसिंह पाटील\nकुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर ‘डल्ला’, जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ गुन्हे करण्याचे आदेश \n७०:३० चा कोटा रद्द; अमित देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव\nवैद्यकीय प्रवेशाचे ७०:३० सुत्र रद्द होणार\nजालन्यात जमावाकडून २ सख्ख्या भावाची हत्या\nहिंगोलीत बनावट नोटांच्या कारखान्यावर पोलिसांची धाड; मोठे अटकसत्र\nऔरंगाबाद: ताप आल्यास ‘कोरोना’ चाचणी बंधनकारक\nमहापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली माहिती औरंगाबाद: कोणताही ताप असो, कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी...\nऔरंगाबादेत शिवसेनेची पडझड, निष्ठावंत वळले हिंदुत्ववादी मनसेकडे\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबादमधील शिवसेनेच्या काही निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. राज यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे...\nसफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाच्या निर्मितीचा विचार सुरू-धनंजय मुंडे\nमुंबई - सफाई कामगारांचे विविध प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय...\nमराठा आरक्षणप्रकरणी ठाकरे सरकार बेफिकीर – विनायक मेटे\nमराठा समाजाच्या प्रश्नांकडे शरद पवारांचे नेहमीच दुर्लक्ष नवी दिल्ली : मराठा आरक्षण हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मात्र, या महत्वाच्या विषयाबद्दल ठाकरे सरकार अजिबात गंभीर...\nऔरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकावर 10 जण पॉझिटिव्ह\nऔरंगाबाद, 23 ऑगस्ट : गेल्या 5 महिन्यांपासून बंद असलेली लालपरी अर्थात एसटी वाहतूक राज्यात सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठीकठिकाणी एसटी बसला कमी जास्त...\nऔरंगाबादेत आज कोरोनाचे 395 रुग्ण आढळले\nऔरंगाबाद : औरंगाबादेत आज कोरोनाचे 395 रुग्ण आढळले. तर सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 439 झाली आहे....\nशेतकऱ्यांना यावेळी प्राधान्याने कर्जवाटप करावे-धनंजय मुंडे\nबीड : शेतकऱ्यांना यावेळी प्राधान्याने कर्जवाटप केले जावे. तसेच सूचनांप्रमाणे कर्जवाटप न केल्यास बँकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी...\nबीडचा मंदार पत्की देशात २२ वा\nबीड/लातूर : यूपीएससी परीक्षेत मराठवाड्यातील उमेदवारांनीही यश मिळविले. बीडच्या मंदार पत्कीसह कंधार तालुक्यातील माधव गिते, अंबाजोगाईचा वैभव वाघमारे आणि लातूरच्या निलेश गायकवाडने यशस्वी भरारी...\nनांदेडमध्ये गँगवार; सराईत गुन्हेगार ठार\nनांदेड : लॉकडाउनच्या काळात शांत असलेल्या नांदेडमध्ये आता गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडेगाव रोडवर रविवारी रात्री ९ च्या...\nपीक कर्ज मिळवून देण्यासाठी कारवाई करण्यात येणार- धनंजय मुंडे\nपीक कर्जापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये यासाठी संबंधितांना दिले आदेश बीड : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या पीककर्जाच्या संबंधित एक...\nरुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू\nजपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण\nदेशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न\nदस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज\nकेंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी\nईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी\nपंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन\nकेंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/reserve-bank-of-india-faced-fake-news-problem-related-to-2-thousand-rs-note/articleshow/70755919.cms", "date_download": "2020-09-26T02:54:08Z", "digest": "sha1:QYN3BSYZ4755GQWULO37AXBQL7JKUQUD", "length": 13451, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफेक न्यूजमुळे रिझर्व्ह बँकेची डोकेदुखी वाढली\nसोशल मीडियावर खोट्या किंवा फेक बातम्यांनी अक्षरशः थैमान घातलं आहे. या फेक न्यूजमुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेची डोकेदुखी वाढली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांची सुट्टी अचानक रद्द करण्यात आल्याने काहीतरी मोठा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अखेर रिझर्व्ह बॅंकेला ही पोस्ट खोटी असल्याचं स्पष्ट करावं लागलं आहे.\nमुंबई : सोशल मीडियावर खोट्या किंवा फेक बातम्यांनी अक्षरशः थैमान घातलं आहे. या फेक न्यूजमुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेची डोकेदुखी वाढली आहे. रिझर्व्ह बॅंकेतील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या अचानक रद्द करण्यात आल्याने काहीतरी मोठा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अखेर रिझर्व्ह बॅंकेला ही पोस्ट खोटी असल्याचं स्पष्ट करावं लागलं आहे.\nसोशल मीडियावर अनेक दिवसांपासून ही पोस्ट व्हायरल होत आहे. रिझर्व्ह बॅंकेने सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या अचानकपणे रद्द केल्या आहेत. देशात काहीतरी मोठं घडणार आहे, असं या व्हायरल पोस्टमध्ये म्हटलं आहे. काही यूजर्सने तर याचा संबंध २ हजार रुपयांच्या नोटेशी आणि काश्मीर प्रश्नाशी लावला आहे. काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर २ हजार रुपायांच्या नोटेवरही बंदी घालण्यात येणार असल्याची अफवा सोशल मीडियावरून पसरविण्यात आली आहे.\nकाही व्हायरल पोस्टसोबत एका वृत्तवाहिनीवरील व्हिडिओ क्लिपही शेअर करण्यात आल्यामुळे या खोट्या माहितीवर सहज विश्वास ठेवला जातोय. नेटकऱ्यांनी ही खोटी माहिती मोठ्या प्रमाणावर शेअर केली आहे. काही यूजर्सने तर ही माहिती व्हॉट्सअॅपवरही फॉरवर्ड केल्याने याबाबतची विचारणा रिझर्व्ह बँकेकडे वारंवार होऊ लागली होती. त्यामुळे रिझर्व्ह बँकेची डोकेदुखी वाढली.\nमात्र, ही माहिती खोटी असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने शनिवारी ट्विट करून स्पष्ट केलं. 'रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्याचं सोशल मीडियावर सांगितलं जातंय. ही माहिती पूर्णतः खोटी आहे. रिझर्व्ह बॅंकेने असा कोणताही आदेश जारी केलेला नाही.' असं या ट्विटमध्ये म्हटलंय.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGold Rate Fall खूशखबर ; सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, एक...\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आज...\nमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत...\nTata-Mistry Case मिस्त्री कुटुंब कर्जात बुडाले; टाटा सम...\nGold rate today पडझडीनंतर सोने चांदी सावरले ; जाणून घ्य...\nSBI ग्राहकांसाठी आनंदवार्ता; गृह, वाहनकर्ज स्वस्त महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nपुणेडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ही' मागणी\nमुंबईअनलॉकसाठी आहे 'ही' त्रिसुत्री; CM ठाकरेंनी सांगितले पुढचे धोके\nदेश'चीन, पाकला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद भारतीय हवाई दलात'\nमुंबईशिवसेना कधीच कन्फ्यूज नव्हती; राऊतांचे फडणवीसांना उत्तर\nनागपूरविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोटींचा, प्रस्ताव पाठवला\nदेशकृषी विधेयकांवरून PM मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र\nमुंबईड्रग्ज प्रकरण: NCB चे अधिकारी तुरुंगात जाऊन शौविकचा जबाब घेणार\nपुणेकोविड रुग्णालयांत रुग्णांची लूट; अजित पवारांनी दिला 'हा' इशारा\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nमोबाइल४.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2020/04/wadi.html", "date_download": "2020-09-26T01:12:29Z", "digest": "sha1:QKIJUT7WCLIWIAT3IY2LWCSKF4HFUWII", "length": 10777, "nlines": 108, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "पोटाची आग बुजाविण्यासाठी रनरागीणी आल्या भरउन्हात रस्त्यावर - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर पोटाची आग बुजाविण्यासाठी रनरागीणी आल्या भरउन्हात रस्त्यावर\nपोटाची आग बुजाविण्यासाठी रनरागीणी आल्या भरउन्हात रस्त्यावर\nकोरोना विषाणूमुळे सध्या संचारबंदी कायम असल्याने हाताला काम नाही,हातावर आणून पानावर खाणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या परिवाराच्या घरात अन्नाचा दाणा नाही,लहान मुले भुकेनी व्याकुळ झाली आहे.कुटुंब प्रमुख हतबल झाले आहेत,काय करावे काही सुचत नाही सर्व मर्यादा संपल्याने राशन कार्ड नसलेली अनेक कुटूंबातील जवळपास ५० -६० महीला उन्हा-तान्हाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून मदतीसाठी आक्रोश करीत असल्याचे चित्र वाडी शहरात बुधवार २२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पहावयास मिळाले आहे.\nवाडीतील अनेक सेवाभावी सामाजिक संस्था,लोकप्रतिनिधी,राजकीय,सामाजिक दानशुर नागरीक धान्य,शिजविलेले अन्न वाटप केले परंतु कुटुंबातील सदस्य संख्या पाहता पुरवठा केलेले धान्य कमी पडत आहे.काम बंद नसल्याने जवळ पैसा नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानातून नियमित होणारे कार्ड धारकांना राशन वाटले तर केंद्र सरकारने राशन कार्डधारकांना तीन महिन्यांचे मोफत धान्य आणि डाळी मिळतील अशी घोषणा केली.\nत्यामुळे राशन दुकानदारांकडे मोफत धान्य वाटप करण्याबाबत नागरिकांकडून विचारणा होत आहे.अन्नधान्य वितरण विभागाने मे आणि जून महिन्याचे धान्य १० एप्रिल नंतर देण्यात येईल अशी माहिती येत आहे. वाडी शहरातील विविध भागात २- ३ वर्षांपासून वास्तव्य करीत आहे ज्यांच्याकडे आधार व वोटिंग कार्ड आहे परंतू राशन कार्ड नाही शासनाचे सुचनानुसार कुटुंबातील सदस्यासह स्थानिक प्रशासनाकडे नाव नोंदणी करूनही त्यांना आजूनपर्यंत धान्य मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आल्याने आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी महीला रस्त्यावर उतरून आक्रोश करीत आहे. शासनाने विना राशन कार्ड धारकांचा प्रश्न तातडीने निकाली काढून समस्या सोडविण्याची मागणी जोर पकडत आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (210) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2007?page=9", "date_download": "2020-09-26T02:03:29Z", "digest": "sha1:NZT3HYOSFK6EOVHBFMC7XMKJQVIA2X7T", "length": 6413, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चालू घडामोडी | Page 10 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चालू घडामोडी\nचालू घडामोडींवरचं मायबोलीकरांचं हितगुज\nमाझा 'ऑगस्ट क्रांती'चा प्रवास (भाग-२) लेखनाचा धागा\nआतकवाद की परिभाषां लेखनाचा धागा\nकोल्ड प्ले कॉन्सर्ट लेखनाचा धागा\nकाळवीट आणि सलमान प्रकरण\nपुण्याच्या जंक्शनवर फेरफटका लेखनाचा धागा\nराष्ट्रपती भवन संग्रहालयाला माझी भेट लेखनाचा धागा\nएक्स्पायरी डेट लेखनाचा धागा\nआज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती.- अभिवादन लेखनाचा धागा\nरौप्यमहोत्सवी कर्णावतीचा प्रवास लेखनाचा धागा\nभारतीय परराष्ट्र धोरणाला पूरक - युद्धनौकांची आखातात तैनाती लेखनाचा धागा\nOrlando च्या निमित्ताने ७-१३ लेखनाचा धागा\nAIB ची किड - पुन्हा एकदा - आवरा आता यांना लेखनाचा धागा\nसुखोई-३० एमकेआय + ब्रह्मोस = मस्त समीकरण लेखनाचा धागा\nउत्सव दोन वर्षांचा लेखनाचा धागा\nऐतिहासिक सैनिक समाचार लेखनाचा धागा\nयंदाची पाणी टंचाई एक समस्या - आयपीएलच्या निमित्ताने ... लेखनाचा धागा\nलोकसत्ताने मागे घेतलेला अग्रलेख लेखनाचा धागा\nMar 22 2016 - 6:15am बिपीन चन्द्र हरीश्चन्द्र कामुळकर\nकेंद्रिय अर्थसंकल्प २०१६ लेखनाचा धागा\nआता गर्लफ्रेंडबरोबर फिरा बिनधास्त \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://aisiakshare.com/node/7810", "date_download": "2020-09-26T00:51:02Z", "digest": "sha1:UHIDTCOQY25X56IATQP4GTTJPSAM4KIL", "length": 31312, "nlines": 474, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मारी बिस्किटांचा केक (बिस्किटं शिळी असणं आवश्यक) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nमारी बिस्किटांचा केक (बिस्किटं शिळी असणं आवश्यक)\nपरवा मारीचा पुडा आणला तर मे महिन्यातला निघाला. बिस्किटं मऊ पडलेली. कावळा येतो रोज खिडकीत, पण त्याला तरी किती देणार. मग आयुष्यात प्रथमच केकचा घाट घातला.\nबिस्किटं मिक्सरला बारीक करून घेतली. १० बिस्किटं होती. त्यात एक अंड फोडून घातलं. ३ चमचे तेल घातलं. अर्धा चमचा इनो घातलं. १ चमचा कोको पावडर घातली. २ चमचे पिठीसाखर घातली, आणखी १ चमचा चालली असती असं खाल्ल्यानंतर वाटलं. सगळं फेटून घेतलं. चाटून पाहिलं मस्त लागत होतं त्यामुळे केक फसला/बसला तरी चालणार होतं.\nएकीकडे अलमीनची कढई तापायला ठेवली, त्यात कूकरची खालची जाळी असते ती ठेवली. एका स्टीलच्या वाडग्यात तूप लावून घेऊन कणिक घालून ती पसरवून घेतली, जेणेकरून केक चिकटून बसणार नाही. मिश्रण त्यात ओतलं आणि तो वाडगा कढईत ठेवला. वर एक झाकण ठेवलं, त्याला स्वयंपाकघरातला नॅपकिन गुंडाळला होता म्हणजे झाकणाच्या आतली वाफ केकवर पडणार नाही. माध्यम आचेवर १२ ते १५ मिनिटांत केक तयार झाला होता. मस्त फुगला होता, चवही छान.\nफक्त तो नॅपकिन पातळ असल्याने कढईच्या कडेने, जिथे तो कढईला चिकटलेला होता, तिथून जळाला नि त्याचा गोलाकार तुकडा कापल्यासारखा निघून आला हातात.\nमला तसला जळकट, खरपुडी झालेला केकचा भाग आवडतो.\nआणि एक - देव तारी तिला कोण मारी ... केक\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआवो मारी साथे अने केक खावो\nपाया पडते, माफी मागते, पण गुजरातीत नका बोलू लगेच माझं ठाण्यातलं बालपण आणि मुंबईत न राहणं उघडं पडतं.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nखूपखूप पूर्वी, ब्लॅक-अँड-व्हाइटच्या जमान्यात नि मुंबई दूरदर्शन हे दिल्लीपासून स्वतंत्र असताना (किंबहुना, 'नॅशनल नेटवर्क'चे सावट देशभरातल्या दूरदर्शन केंद्रांवर पडलेले नसताना), मुंबई दूरदर्शन केंद्र (वरळी, बँड १ चॅनेल ४) तथा पुणे सहक्षेपण केंद्र (सिंहगड, बँड ३ चॅनेल ५) यांवर 'आवो मारी साथे' या नावाचा पारशी-गुजरातीतला एक अत्यंत लोकप्रिय असा कॉमेडी कार्यक्रम सादर होत असे. आदी मर्झबान नावाचा एक गृहस्थ तो सादर करीत असे. मला वाटते त्याचा संदर्भ असावा.\nशिवाय संताकुकडी हा अगदी\nशिवाय संताकुकडी हा अगदी ओपनिंग प्रोग्राम.\nबाकी मारी बिस्किटे मऊ हवीत म्हणून ती शिळी करणे हे दमट मुंबईकर, ठाणेकर आणि कोंकणवसियांसाठी समजण्यास अंमळ कठीण आहे.\nपुडा उघडून वीसेक मिनिटे हवेत उघडा ठेवला की ताबडतोब कार्यभाग साध्य होईल.\nहो, तोच संदर्भ आहे. निव्वळ मारी शब्द आहे म्हणून\nनबा म्हणतात त्या काळात साठे बिस्कीट कंपनीदेखील अस्तित्वात होती.\n...ती मारी बिस्किटे बनवीत नसे.\nआणि त्यांच्या ग्लुको बिस्किटांची चव पार्लेच्या बिस्किटांपेक्षा थोडीशी कडवट वाटायची.\nत्यांचे एक अंडाकृती जॅम क्रीम\nत्यांचे एक अंडाकृती जॅम क्रीम बिस्कीट असायचे. वरच्या भागात मध्यभागी खड्डा आणि त्यात लाल जॅम, साखरपेरणी.\nक्रॅकजॅक व मोनॅको मस्त होती.\nक्रॅकजॅक व मोनॅको मस्त होती. त्यातली गोल व खारट कोणती आय थिंक क्रॅकजॅक. त्यांपेक्षा मोनॅको आवडत.\nबाकी थिन क्रीम वेफर्स तर फार आवडायचे.\n...साठ्यांची नव्हेत. ती पार्लेची.\nगोल आणि खारट बोले तो मोनॅको. क्रॅकजॅक बोले तो खारटगोड. (क्रॅकजॅकचा आकार आठवत नाही. मला बिलकुल आवडत नसल्याकारणाने त्याकडे कधी लक्ष दिले नाही.)\nक्रॅकजॅक इतकं वाईट बिस्कीट दुसरं नसेल. खरं तर ग्लुकोजलाही हा मन मिळायला हवाय माझ्या दृष्टीने. एक वेळ काड्यापेटीतली काडी चहात बुडवून खाईन पण ग्लुकोज किंवा क्रॅकजॅक नाही\nदूधात बुडवुन ग्लुकोज मस्त\nदूधात बुडवुन ग्लुकोज मस्त लागतात.\nआपलं भांडण होईल अशानं\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअंडाकृती जॅम क्रीम बिस्कीट\n आता ओरिजिनल नाही मिळत.\nमला तसला जळकट, खरपुडी झालेला केकचा भाग आवडतो.\nआणि एक - देव तारी तिला कोण मारी ... केक\nआणि केकता क्कपूरचे क्काय\n(तीसुद्धा तसलीच जळकट, खरपुडी झालेली आहे, असे म्हणता येईल. (चूभूद्याघ्या.))\nकावळा येतो रोज खिडकीत, पण त्याला तरी किती देणार.\nम्हणजे, ज्याला कावळासुद्धा शिवत नाही... आपले, तोंड लावत नाही, अश्या मारी बिस्किटांचा केक होतो वाटते तुमच्याकडे\nताजी पोळी लागते त्याला, मीच लाडावून ठेवलाय\nकावळ्याइतका रुबाबदार पक्षी दुसरा नसावा.\nहे चित्र, आणि ते चित्र...\nयांच्यातील हा परस्परसंबंध (की कार्यकारणभाव\n'न'बांचं अक्षरही रुबाबदार आहे\n'न'बांचं अक्षरही रुबाबदार आहे हो बाकी, कावळ्यासारखंच\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअगदी माझ्या मनातलं बोललात... ज्याला कावळासुद्धा शिवत नाही... त्याला तुम्ही ...... शिव शिव शिव \nकावळे भयानक चुझी असतात. मी\nकावळे भयानक चुझी असतात. मी मुंबईत एक मस्त लठ्ठ गाभोळी आणली होती. तेव्हा मला कशी करायची माहीत नसल्यान, हळद घालून उकडली. नंतर कळेचना कशी करायची, म्हणुन खिडकीत कावळ्याकरता ठेवली. तर एक कावळा आला पाहून चक्क नाक मुरडून उडून गेला.\n...अत्यंत रुबाबदार, खानदानी पक्षी\n(आणि एक नंबरचा टग्या\nहाहाहा. मला कावळा मनापासून\nहाहाहा. मला कावळा मनापासून आवडतो. अतिशय हुषार व गोंड्स हावभाव असतात. डोक्यावरचे केस फुलतात लाडात आले की. तेच हिरमुसले की इवलेसे होउन जाते डोके, केस चपटे होतात. उजवीकडचा कावळा बघा. फोटोत, आत्ता चांगल्या मूडमध्ये आहे.\nगविंनी एका लेखात त्यांच्या लहानपणची आठवण लिहिली होती. एक बाई त्यांना कायम मारी बिस्किटंच द्यायच्या, चुकून सुद्धा ग्लुकोज बिस्किटे ऑफर करायच्या नाहीत वगैरे वगैरे\nमलाही ती पूर्वीची आरारुट पासून बनवलेली निस्तेज आणि चवहीन मारी आवडायची नाहीत. पुढे ब्रिटानियाला आमची नाराजी कळली असावी. म्हणून त्यांनी मारीगोल्ड ही बऱ्या चवीची बिस्किटं बाजारात आणली. तरीही ग्लुकोज वा नानकटाई पुढे ती नावडतीच राहिली.\nतर नावडतीचा केक तरी आम्हांस का आवडावा वयानुसार, पुन्हा एकदा आमच्या आवडी निवडी तीव्र झाल्या आहेत.\nचा - मारी वेळेला उपयोगी\nचा - मारी वेळेला उपयोगी ठरणारा (all purpose) पर्यााय वाटतो मला.\nसकाळ असेल तर नाश्ता\nदुपार असेल तर मधल्या वेळेचे खाणे\nरात्री उशीरा सप्पर म्हणून सुद्धा चालते.\nही केक ची idea अम्मळ वेगळीच आहे.\nटाळ बोले चिपळीला - नाच माझ्या संग \nदेवाजीच्या दारी आज - रंगला अभंग ॥\n>>>>ती पूर्वीची आरारुट पासून\n>>>>ती पूर्वीची आरारुट पासून बनवलेली निस्तेज आणि चवहीन मारी आवडायची नाहीत.>>>> तो बेचवपणाच खासियत होती. मला भयानक आवडायची.\n>>>>ती पूर्वीची आरारुट पासून\n>>>>ती पूर्वीची आरारुट पासून बनवलेली निस्तेज आणि चवहीन मारी आवडायची नाहीत.>>>> तो बेचवपणाच खासियत होती. मला भयानक आवडायची.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : कथाकार, विनोदकार कॅ. गो. गं. लिमये (१८८१), लेखक विलिअम फॉकनर (१८९७), सिनेदिग्दर्शक रॉबर्ट ब्रेसॉं (१९०१), चित्रकार मार्क रॉथ्को (१९०३), संगीतकार दिमित्री शोस्ताकोव्हिच (१९०६), बखर वाङ्मयकार डॉ. र.वि. हेरवाडकर (१९१५), एरोस्पेस संशोधक सतीश धवन (१९२०), सिनेदिग्दर्शक सर्गेई बोन्दारचुक (१९२०), घटनातज्ज्ञ बॅरिस्टर नाथ पै (१९२२), नाटककार बाळ कोल्हटकर (१९२६), लेखक, वृत्तपत्रसंपादक माधव गडकरी (१९२८), सिनेदिग्दर्शक व अभिनेता फिरोझ खान (१९३९), क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी (१९४६), क्रिकेटपटू हॅन्सी क्रोन्ये (१९६९), अभिनेत्री कॅथरीन झीटा-जोन्स (१९६९), अभिनेत्री दिव्या दत्ता (१९७७)\nमृत्यूदिवस : गणितज्ञ योहान लँबर्ट (१७७७), पुरातत्त्वशास्त्रज्ञ लवी लॉरा ग्रॅब्रिएल मॉर्तीये (१८९८), किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर (१९५६), लेखक एरिक मारिया रमार्क (१९७०), नाटयदिग्दर्शक, अभिनेते कमलाकर सारंग (१९९८), 'ओरिएन्टलिझम'साठी ख्यात विचारवंत एडवर्ड सैद (२००३), कवी अरुण कोलटकर (२००४), नोबेल पारितोषिक विजेती पर्यावरणतज्ज्ञ वांगारी मथाई (२०११), लेखक शं. ना. नवरे (२०१३), लेखक अरुण साधू (२०१७)\n१४९३ : कोलंबस अमेरिकेच्या (त्याच्या दृष्टीने भारताच्या) दुसऱ्या सफरीवर निघाला. मरेपर्यंत तो अमेरिकेला भारतच समजत होता.\n१७८९ : अमेरिकन काँग्रेसने आपल्या संविधानात १२ बदल केले. यातल्या पहिल्या दहांना 'नागरिकांचा हक्कनामा' म्हणून ओळखले जाते.\n१५२४ : पोर्तुगीज भारताचा गव्हर्नर म्हणून वास्को-द-गामा भारतात आला. त्याचे इथेच निधन झाल्याने ही त्याची अखेरची भारतयात्रा ठरली.\n१९३० : जंगल सत्याग्रहात पनवेल तालुक्यातले १२ सत्याग्रही हुतात्मा झाले.\n१९१५ : 'होमरुल लीग' स्थापन करण्याचा अ‍ॅनी बेझंट यांचा निर्णय.\n१९१९ : रयत शिक्षण संस्थेची स्थापना.\n१९५६ : इंग्लंड आणि अमेरिका यांना अटलांटिकपार जोडणारी टेलिफोन केबल कार्यान्वित.\n१९६२ : अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.\n१९८१ : सांड्रा डे ओ'कॉनर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.\n१९८४ : सुवर्णमंदिरातील सर्व लष्कर काढून घेण्यात आले.\n१९९६ : तालिबान्यांनी काबूलचा ताबा घेतला.\n२००२ : अक्षरधाम मंदिरात कमांडो कारवाई.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/cannabis-plants-found-in-umra-shivara-in-hingoli-127711573.html", "date_download": "2020-09-26T01:52:48Z", "digest": "sha1:VWLMTOLRIMAJN27UV7L22BSDX63GOBP6", "length": 10656, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Cannabis plants found in Umra Shivara, in hingoli | मजुरांच्या वेशात आले 9 जणांचे दहशतवादविरोधी पथक; दोन किमी पायपीट करून शोधून काढला तुरीमधील गांजा; चार ठिकाणी छापा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहिंगोली:मजुरांच्या वेशात आले 9 जणांचे दहशतवादविरोधी पथक; दोन किमी पायपीट करून शोधून काढला तुरीमधील गांजा; चार ठिकाणी छापा\nहिंगोली13 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर\nउमरा शिवारात दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यासह गांजाची झाडे.\nतिघांनी गावातील मित्राकडून घेतले होते गांजाचे बी, औंढा नागनाथ तालुक्यात मोठी कारवाई\nऔंढा नागनाथ तालुक्यातील उमरा शिवारात शनिवारी सकाळीच मजुरांच्या वेशात ९ जण फिरत होते. सकाळ असल्याने शिवारात कुणी नव्हते. दोन किलोमीटरची पायपीट केल्यावर त्यांचे लक्ष शेतात लावलेल्या तुरीच्या ओळीत गेले. तिथे त्यांना गांजाची झाडे आढळून आली. ज्याचे शेत होते त्याची माहिती घेत त्याला त्याच्या घरून ताब्यात घेतल्यानंतर शिवारातील आणखी दोन शेतात लावलेला गांजा पकडला. पथकाने दिलेल्या माहितीनुसार उमरा शिवारातून तीन तर नहाद शिवारातून ३० ते ४० किलोचा सुमारे १.२५ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना ताब्यात घेतले आहे.\nआैंढा नागनाथ तालुक्यातील उमरा शिवारातील एका शेतात तुरीच्या ओळीत गांजाची झाडे असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक रामेश्‍वर वैंजने, सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, कुरुंद्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक सविता बोधनकर, जमादार गजानन निर्मले, जमादार रूपेश धाबे, महेश बंडे, अर्जुन पडघन, विजय घुगे यांच्या पथकाने आज पहाटेच मजुरांच्या वेशात तब्बल दोन किलोमीटर पायपीट करून शेतात पाहणी करण्यास सुरुवात केली.\nयामध्ये विष्णू संभाजी बोंगाने यांच्या शेतात तुरीच्या ओळींमध्ये गांजाची झाडे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पहाटेच पोलिसांनी विष्णू यास त्याच्या घरून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने परिसरात आणखी काही शेतात झाडे असल्याने त्याने सांगितले. त्यावरून पोलिसांनी आता उमरा शिवार पिंजून काढला. यामध्ये नरेंद्र सदाशिव राऊत, नवनाथ सोपान बोंगाने यांच्या शेतातील तुरीच्या पिकात गांजाची झाडे दिसून आली. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गावातील एका मित्राकडून बी घेतले असून या वेळी पहिल्यांदाच झाडे लावल्याचे सांगितले.\nदरम्यान, वसमत तालुक्यातील नहाद शिवारात एका शेतात झाडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर एका पथकाने त्या शिवारात शोध घेतला यामध्ये अनंता बबनराव बोरगड याच्या शेतातून गांजाची झाडे जप्त करून त्यास ताब्यात घेतले आहे. या शेतातून जप्त केलेल्या गांजाच्या झाडांचे वजन सुमारे ३० ते ४० किलो असून त्याची किंमत १.२५ लाख रुपये असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात उमरा शिवारातील तिघांवर कुरुंदा तर नहाद शिवारातील एकावर हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे.\nझाडे उपटून पळण्याचा नरेंद्र राऊतचा प्लॅन फसला\nया प्रकरणात पोलिसांनी विष्णू याची चौकशी केल्याची माहिती मिळताच नरेंद्र राऊत याने शेतात जाऊन गांजाची झाडे उपटून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र झाडे उपटत असतानाही पोलिसांच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले अन् त्याचा पळण्याचा प्लॅन फसला.\nतीन दिवसांपासून काढली जात होती गांजाची माहिती\nया परिसरात गांजाची झाडे लावली जात असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सुनील गोपीनवार, जमादार गजानन निर्मले यांनी तीन दिवसांपासून या भागात माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात झाडे असल्याची माहिती मिळाली अन् पोलिसांनी कामगिरी फत्ते केली. विशेष म्हणजे या शेतांमध्ये दुचाकी, चारचाकी वाहनदेखील जात नाही.\nयापूर्वीही झाडे केली होती जप्त\nवसमत तालुक्यातील नहाद शिवारातून दोन वर्षांपूर्वी गांजाची झाडे जप्त करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर पोलिसांनी कुंभारवाडी शिवारातील शेतातून गांजाची झाडे जप्त केली.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mazespandan.com/tag/good-poems/", "date_download": "2020-09-26T00:50:01Z", "digest": "sha1:NLJZTQHN65HJIV7C642FUMOY7RPBHFN3", "length": 33580, "nlines": 310, "source_domain": "mazespandan.com", "title": "good poems | स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमुलींना ओळखणं कठीण असतं…\nमुलींना ओळखणं खरंच कठीण असतं का हो त्यांच्या मनात काय चालू असतं हे एक देवच काय ते जाणे अन् ती मुलगी…😜\nतुम्ही तिची तारीफ केली, तर तिला वाटतं तुम्ही खोटं बोलता आहात..\nतारीफ केली नाही, तर तुम्हाला मुलींशी कसं वागायचं तेच कळत नाही.😮\nतिच्या सगळ्या म्हणण्याला होकार दिला, तर तुम्हाला स्वत:चे विचारच नाहीत\nहोकार नाही दिला, तर तुम्ही तिला समजूनच घेत नाही.😪\nतुम्ही तिला वारंवार भेटलात, तर ते किती बोअर असतं\nतिला वारंवार भेटला नाहीत, तर तुम्ही तिला डबलक्रॉस करताय\nतुम्ही वेलड्रेस आहात, तर तुम्ही नक्कीच प्लेबॉय आहात\nतुम्ही नीट कपडे केले नाहीत, तर तुम्ही किती गबाळे आहात हो\nतुम्ही जेलस होता, किती वाईट आहे हे\nतुम्ही तिच्यासाठी जेलस होत नाही तुमचं तिच्यावर प्रेमच नाही🙃\nतुम्ही तिला किस करता, तर तुम्ही जण्टलमनच नाही\nतुम्ही किस करत नाही, तर तुम्ही मॅनच नाही.🤐\nतुम्ही तिला वारंवार किस केलं, नाही तर तुम्ही किती थंड आहात\nतुम्ही तिला वारंवार किस केलं, तर तुम्ही तिचा गैरफायदा घेत असता.😒\nतुम्ही तिच्याशी प्रेमात येताय तुम्हाला तिचा आदरच वाटत नाही नाहीतर तुम्हाला ती आवडतच नाही.\nतुम्हाला यायला एक मिनिट उशीर झाला, तर वाट पाहणं किती कठीण असतं\nतिला यायला उशीर झाला, तर मुलींना होतो असा उशीर\nतुम्ही कोणाला भेटायला गेलात, तर तुम्ही वेळ फुकट घालवता\nती कोणाला भेटली, तर ते कामासाठी असतं…😔\nरस्ता ओलांडताना तिचा हात धरला नाही, तर तुमच्याकडे एथिक्सच नाहीत\nतुम्ही हात धरला, तर तिला स्पर्श करण्याची संधीच शोधत असता.😬\nतुम्ही दुसऱ्या स्त्रीकडे पाहिलं, तर तुम्ही फ्लर्ट करता\nदुसऱ्या पुरुषाने तिच्याकडे पाहिलं, तर तो तिच्या सौंदर्याचं कौतुक करत असतो.😝😴\nतुम्ही बोलत असाल, तर तुम्ही ऐकावं असं तिला वाटतं\nतुम्ही ऐकत असाल, तर तुम्ही बोलावं असं तिला वाटतं.\nअशा या साध्या, तरीही समजून घ्यायला कठीण अशा मुली. यांना समजून घेणं कठीण असलं, तरी हव्याहव्याशा अशा याच मुली…😍😘\n~ एक अनामिक वाचक आणि लेखक,\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\n: क्या खुब लिखा है किसी ने…\nबक्श देता है खुदा उनको,\nजिनकी किस्मत ख़राब होती है…\nवो हरगिज नहीं बक्शे जाते है,\nजिनकी नियत खराब होती है…\nन मेरा एक होगा,\nन तेरा लाख होगा..\nन तारिफ तेरी होगी,\nन मजाक मेरा होगा…\nगुरुर न कर “शाह-ए-शरीर” का,\nमेरा भी खाक होगा, तेरा भी खाक होगा…\nजिन्दगी भर Branded-Branded करने वालों…\nयाद रखना कफ़न का कोई Brand नहीं होता..\nकोई रो कर दिल बहलाता है…\nऔर कोई हँस कर दर्द छुपाता है..\nक्या करामात है कुदरत की…\nज़िंदा इंसान पानी में डूब जाता है और मुर्दा तैर के दिखाता है..\nमौत को देखा तो नहीं, पर शायद वो बहुत “खूबसूरत” होगी…\n“कम्बख़त” जो भी उस से मिलता है, “जीना छोड़ देता है”…\nग़ज़ब की एकता देखी “लोगों की ज़माने में”…\nज़िन्दों को “गिराने में” और मुर्दों को “उठाने में”…\nज़िन्दगी में ना ज़ाने कौनसी बात “आख़री” होगी…\nना ज़ाने कौनसी रात “आख़री” होगी \nमिलते, जुलते, बातें करते रहो यार एक दूसरे से ना जाने कौनसी “मुलाक़ात” “आख़री होगी”…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nWhatsApp च्या पोतडीतून… भाग १\nहर चीज का नशा अलग होता है\nहर चाँद का दीदार अलग होता है\nकिसी एक कंपनी में जिंदगी\nबरबाद मत करना क्यूं की…\nहर कंपनी का पगार\nअलग होता है.. 😀\nगिरना भी अच्छा है ,\nऔकात का पता चलता है\nबढ़ते हैं जब हाथ उठाने को…\nअपनों का पता चलता है \nजिन्हें गुस्सा आता है\nवो लोग सच्चे होते हैं |\nमैंने झूठों को अक्सर\nमुस्कुराते हुए देखा है.. 🙂\n“ना गुजरना ईद के दिन किसी मस्जिद के पास से,\nकहीं लोग चाँद समझ कर रोजा ना तोड़ दे,\nहोकर खफा खुदा तुमसे कहीं…\nचाँद जैसे चेहरे बनाना ना छोड़ दे” 🙂\nजाता जाता ती मोठ्या रागाने म्हणाली\nमी पण तिला हसत हसत म्हणालो\n“पण माझ्यासारखाच का पाहिजे” 😉\nना वो मिलती है, ना मै रूकता हू, पता नही… रास्ता गलत है या मंजिल..\nजिस दिन तुम्हारा सबसे करीबी साथी तुम पर गुस्सा करना छोड दे\nतब समझ लेना चाहिए कि तुम उस इंसान को खो चुके हो \nये तो अच्छा है मेरे दोस्तों के\nहर ख़्वाब पूरे नहीं होते\nवरना हम किन-किन को\nभाभी जी कहकर बुलाते.. 😀\nखवाहिश नही मुझे मशहुर होने की\nआप मुझे पहचानते हो बस इतना ही काफी है\nअच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा जाना मुझे\nक्यों की जीसकी जीतनी जरुरत थी उसने उतना ही पहचाना मुझे\nज़िन्दगी का फ़लसफ़ा भी कितना अजीब है,\nशामें कटती नहीं, और साल गुज़रते चले जा रहे हैं….\nएक अजीब सी दौड़ है ये ज़िन्दगी,\nजीत जाओ तो कई अपने पीछे छूट जाते हैं,\nऔर हार जाओ तो अपने ही पीछे छोड़ जाते हैं……\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nहृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर सुविचार ..\n★ ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो….\n★ मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ….\n★ मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल….\n★ भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो…..\n★ वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते….\n★ गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम….\n★ बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं….\n★ जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा….\n★ हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे….\n★ तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात….\n★ प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन….\n★ जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”….\n★ आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे….\n★ गरूडइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते….\n★ तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका….\n★ केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो…\n★ तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा…\n★ वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं…\n★ ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय….\n★ “चांगली वस्तु”., “चांगली व्यक्ती”., “चांगले दिवस”.. , यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”..\n★ आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं….\n★ जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल….\n★ “चांगली वस्तु”., “चांगली माणसे”., “चांगले दिवस आले की माणसाने “जुने दिवस विसरू नयेत”….\n★ पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते….\n★ नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल….\n★ जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही….\n★ आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो….\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nमराठी टेक्नॉलॉजी जगत : वसंत पुरुषोत्तम काळे विचार\nमागील काही दिवसापूर्वी वपु चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली. वपुंच्या विचारांवर आधारित नवीन, अत्याधुनिक आणि मोफत Android अप्लिकेशन Google Play वर सादर झाले.\nत्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्द्ल आम्ही अधिक जाणून घेतले असता त्यांनी अप्लिकेशनची ठळक वैशिष्ठे विषद केली,\n★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी\n★ ५०० हून अधिक, दर्जेदार विचार\n★ वपुंचे विचार आणि पुस्तके/कादंबरी यांचे योग्य आणि सोपे वर्गीकरण\n★ प्रत्येक दिवशी नवीन विचार.. अन तोही आपण निश्चित केलेल्या वेळी\n★ डाऊनलोड करा तुमच्या आवडत्या विचारांचे छायाचित्र\n★ वाचा वपुंच्या प्रत्येक पुस्तकाचा सारांश तसेच तुम्हाला हवे त्या पुस्तकामधील विचार वाचणे आता अगदी सोपे..\n★ अँपमधील विचारांमध्ये दुरुस्ती तसेच नवीन विचार सुचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा\n★ तुमच्या आवडत्या विचारांसाठी स्वतंत्र विभाग\n★ शेअर करा वपुंचे विचार WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मिडिया वर…\n★ अजून बरेच काही..\nपुढे बोलताना ते म्हणाले, “अँपमध्ये असणारे प्रत्येक विचार हे व.पु. काळेंच्या लेखणीतुन आलेले आहेत. इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तके/कादंबरी समोर ठेवुन त्यातले निवडक आणि दर्जेदार विचार आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.”\nवपु अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या बद्दल थोडक्या शब्दात सांगायचे झाले तर,\nआपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्यअश्रूंच्या लाटेवर लीलया लोटून देणारे कथाकार वपु काळे. व.पु. काळे यांना ‘सिद्धहस्त’, ‘प्रतिभासंपन्न’ अशी बिरुदे लावली गेली नाहीत. पण त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा फॅन क्लब तुफान होता. गरजा भागल्या तरी माणसाला जो अपुरेपणा जाणवतो, मार्गदर्शकाची जी सतत गरज भासते आणि छोट्या छोट्या माणुसकीच्या प्रत्ययांनी त्याला जो आधार मिळतो, तो वपुंनी मांडला. आपल्या मनातल्या भावना त्यांनी नेमक्या टिपल्या म्हणून वाचक त्यांना धन्यवाद देतात. कॉलेज तरुणांच्या डायऱ्यांची पाने त्यांच्या पुस्तकांतील विचारांनी, विधानांनी भरभरून जातात. मध्यमवर्गीय वाचकाच्या हृदयांवर अधिराज्य गाजवणारा हा लेखक\nवपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहेत. पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्‍या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे, तोरा आहे…” वाचकप्रिय लेखक आणि एका वेगळ्याच संवेदनशील नजरेनं जग पाहणारा मनस्वी माणूस म्हणजे वपु.\n‘वपु विचार‘ या अँपच्या माध्यमातून वपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला आपल्यासर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या “AmeyApps” टीमचे स्पंदनकडून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या सदिच्छा\nअप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.\n(शब्दांकन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nवपुंच्या संदर्भातील आमचा मागील लेख, व.पु.मय होताना..\nडालडा आणि मराठी माणूस\nहनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये :\nथोडे दिवस घरातच बसायचं आहे\nस्त्री समाधानी केव्हा असते \nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nकाही भारी मराठी मीम्स..\nजीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत\nस्त्रीचे ओले केस आणि लोकतंत्र\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/congress-ex-member-visits-shivsena-chief-uddhav-thackeray/102661/", "date_download": "2020-09-26T02:56:42Z", "digest": "sha1:ISM7MSBKQ7K66EUQ4QMWXZE2DICEOM2H", "length": 8489, "nlines": 111, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Congress ex member visits ShivSena chief uddhav thackeray", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र भाजपाच्या विरोधामुळे काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार मातोश्रीवर \nभाजपाच्या विरोधामुळे काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार मातोश्रीवर \nकाँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सत्तार शिवसेनेत प्रवेश करणार की काय अशी चर्चा रंगू लागली. मात्र याबाबत अब्दुल सत्तार यांना विचारले असता सिल्लोडचा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार की भाजपाकडे जाणार हे अजून ठरले नसून, मी आता वाट बघत आहे आणि जर काहीच निर्णय झाला नाही तर मी अपक्ष लढेन अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.\nशिवसेना आणि भाजप पक्षाचे दरवाजे माझ्यासाठी उघडे आहेत त्यामुळे मी या दोघांपैकी कोणत्यातरी एका पक्षात जाणार हे नक्की असून, आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. मात्र सिल्लोड मतदारसंघ शिवसेनेला जातो की भाजपाला जातो हे अजून ठरलेले नसून, सध्या मी काही निर्णय घेतला नाही. तसेच जो पर्यत जागा कुणाला सुटणार हा निर्णय होत नाही तोवर मी निर्णय घेणार नाही असे सत्तार यांनी सांगितले. तसेच विखे पाटील यांचा शिर्डीचा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे पण आता तो भाजपाकडे जाईल त्यामुळे ह्या मतदारसंघाच्या तडजोडी होऊन मला दोन्ही पक्षांपैकी एका कडून तिकीट मिळणार आहे आणि नाही मिळाले तर मी अपक्ष लढेन असे सत्तार यांनी सांगितले.\nभाजपाच्या विरोधामुळे सत्तार मातोश्रीवर\nदरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजपा प्रवेशाला सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे सत्तार यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सिल्लोड नुकत्याच झालेल्या बैठकीत आमदार सत्तार यांना भाजपात प्रवेश देऊ नये अशी मागणी करण्यात आली\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकोलकाता नाईट रायडर्स vs सनरायजर्स हैदराबाद प्रीव्ह्यू\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nPhoto: NCB ड्रग्ज प्रकरणात चौकशी केलेल्या रकुलमध्ये तुम्हाला या गोष्टी माहिती...\nPhoto: ‘MU’च्या विरोधात ‘ABVP’ चे जागरण गोंधळ आंदोलन\nPhoto: काय आहे ”माझे कुटुंब माझी जबाबदारी\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/08/blog-post_39.html", "date_download": "2020-09-26T03:18:29Z", "digest": "sha1:HXMEVQNTPML5FQTV4T6IGIQMKI6QHQ2C", "length": 18341, "nlines": 232, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "दहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आर्थिक विकास लेख दहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी\nदहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी\nचला उद्योजक घडवूया १०:४७ म.उ. आर्थिक विकास लेख\nआज दही हंडी, गोपाळकाला उस्तव आहे. ह्यामध्ये किती उद्योग व्यवसाय आणि आपल्या कंपनी, सेवेची जाहिरात करण्याच्या संधी दडलेल्या आहेत\nह्याचा कोणी विचार केला का\nज्यांचे उद्योग किंवा व्यवसाय आहेत ते आपल्या कंपनीचे टी शर्ट बनवून देवू शकतात. कृपया कपड्याचा आणि प्रिंट चा दर्जा चांगला ठेवा जेणेकरून तरून मुल ती जास्त काळ वापरू शकतील, आणि आपल्या मित्रांना तशीच टी शर्ट घेण्याचा किंवा वापरण्याचा सल्ला देतील. ह्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या उत्पादनाचे किंवा सेवेचे नाव लोकांपर्यंत पोहचत असते.\nबस, ट्रक व इतर लहान मोठी वाहने भाड्याने घेतली जातात.\nत्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली जाते इथे केटरिंग सेवा पुरवनार्यांचा, महिला बचत गटांचा व्यवसाय ह्यांची गरज लागते.\nलहान मोठे खाद्यपदार्थ जागेनुसार जसे वडापाव, भजीपाव, समोसापाव, चायनीज भेळ, मंचुरियन, पोहे, शिरा, उपमा आणि वाईन शॉप जवळ नॉन वेज खाद्य पदार्थ ह्यांचा व्यवसाय चालतो.\nताक,लिंबू शरबत किंवा इतर शरबत ह्यांचाही व्यवसाय उत्तम होतो.\nह्या संधीचे २ फायदे आहेत\n१) कायमस्वरूपी धंदा करणार्यांचे उत्पन्न वाढते\n२) ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे किंवा छंदाचे व्यवसायात रुपांतर करायचे आहेत ते सुरवात करू शकतात, ह्या मध्ये त्यांना त्यांच्या क्षमता, उणीवा ह्याबद्दल समजते, आणि हा १ दिवसाचा अनुभव आयुष्य बदलून टाकतो. सकारात्मक व्यक्ती चुकांपासून शिकून शहाणी होते आणि नकारात्मक व्यक्ती चुकांना घाबरून कायमचे सोडून देते.\nअजून काही नवीन कल्पना, उद्योग, व्यवसाय असेल तर कृपया खाली कमेंट मध्ये पोस्ट कराल.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nघफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा\nसंधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण करा\nअपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि य...\nमुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस\nदहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी\n1991 च्या आधी भारतीय कंपन्यांना कृत्रिम संरक्षण दे...\nएमबीए तरुणांचा नोकरीला नकार, भरवला आठवडी बाजार \nकसा झाला शाळा सोडलेल्या आकाशाचा स्वयंपाकी ते सॉफ्ट...\nहा कसला तर्क आहे\nजेव्हा एक बिल्डर किंवा उद्योजक हेल्थकेयर उद्योगमध्...\nमशरुमचं उत्पादन घ्या, महिन्याला लाखो कमवा \nकरोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्या...\nकथा सॅमसंगची - चौकटीबाहेर फक्त एकच पाऊल टाका\nदहा,पंधरा वर्षांपुर्वी महाराष्ट्रात माणसं रहायची प...\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग संपत्ती किंवा पैसे कम...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव मराठी आणि परप्रांतीय मधील फरक मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाह...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते\nकल्पना करा कि तुम्ही हिरा आहात. तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले. तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/ahmednagar/pits-roads-shevgaon-taluka-due-rain-335047", "date_download": "2020-09-26T02:59:31Z", "digest": "sha1:47C6WC2PH7AYK7PSHJL7QBWEBOLGF7OU", "length": 16626, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "संततधारेमुळे रस्त्याची चाळण; ‘या’ मार्गावरुन जायचे कसे | eSakal", "raw_content": "\nसंततधारेमुळे रस्त्याची चाळण; ‘या’ मार्गावरुन जायचे कसे\nआठवडयाभरापारून सुरु असलेल्या संततधारेमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडून त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.\nशेवगाव (अहमदनगर) : आठवडयाभरापारून सुरु असलेल्या संततधारेमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडून त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खडयातून मार्ग काढतांना वाहन चालकांची चांगलीच धमछाक होत आहे. तसेच पादचाऱ्यांनाही चालणे मुश्कील झाले असून या रस्त्यांची त्वरीत दुरूस्ती करण्याची मागणी नागरीकांतून होत आहे.\nनगर, नेवासे, पाथर्डी, पैठण व गेवराईकडे जाणारे प्रमुख राज्यमार्ग शेवगाव शहरातून जातात. मराठवाडयातून या मार्गाने पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या मोठया वाहनांची संख्या ही जास्त आहे. तालुक्यात यावर्षी सुरुवातीपासून दमदार पावसामुळे सर्वच मार्गावर छोटे मोठे खड्डे पडले होते. मात्र आठवडयापासून सुरु असलेल्या संततधारेमुळे या सर्व राज्यमार्गांची वाट लागली आहे.\nपैठण रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याशेजारील व डॉ. दारकुंडे हॉस्पिटल समोरील रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडून या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अशीच परिस्थिती नेवासे रस्त्यावरील पवार बजाज शोरुम, अजिंक्य हाँटेल समोर, बसस्थानकासमोरील क्रांती चौक, आंबेडकर चौक, पाथर्डी रस्त्यावरील आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविदयालया समोर तसेच मिरी मार्गे रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.\nपैठण रोड, पाथर्डी रस्त्यावरील खड्डे तर खुप मोठमोठाले असून त्यातून गाडी घातल्यास ती तेथेच अडकून पडते. दुचाकी वाहनचालकांचे याठिकाणी अपघात नित्याचेच झाले आहेत. मागील काही महिन्यापूर्वीच या रस्त्याची डागडूजी करुन बीले काढण्यात आली आहेत. मात्र डागडूजी केलेल्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामाबाबत शंका उपस्थित केली जाते.\nया रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशी व नागरीक करत असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरुच असून एखादया प्रवाशाचा जीव गेल्यावर रस्त्याची दुरुस्ती करणार का असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.\nमतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी शेवगावकडे फिरकतच नसल्याने शहरातून जाणाऱ्या रस्त्यांची व शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था त्यांना माहिती नाही. त्यांचे या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष असल्याने संबंधीत विभागाचे अधिकारी निर्ढावले आहेत. त्यांच्यावर कुणाचा अंकुश राहीलेला नाही. येथून पुढे आपल्या प्रश्नांसाठी नागरीकांनीच पेटून उठले पाहीजे.\n- दत्ता फुंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना\nसार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी पडलेल्या खड्ड्यांच्या कामासाठी मोठी बीले काढली. मात्र त्याच ठिकाणी खड्डे पडल्याने त्यांच्या कामाबाबत शंका उपस्थित होत असून याची चौकशी व्हावी.\n- आशुतोष डहाळे, ग्रामस्थ, शेवगाव\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n1 ऑक्टोबरपासून मुंबई प्रवेश महागणार, मुंबईत प्रवेश करणाऱ्यांवर 'टोल'वाढ\nमुंबई : मुंबईत प्रवेश घेण्यासाठी आता वाहन चालकांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मुंबईत खासगी वाहनाने ये जा करणाऱ्यांना आता १ ऑक्टोबर पासून...\nथोरात सहकारी साखर कारखान्याचा मंगळवारी बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ\nसंगमनेर (अहमदनगर) : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 2020- 2021 या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ मंगळवारी (ता. 29) सकाळी...\nइचलकरंजी : येथील शास्त्री सोसायटीतील घरात सुरू असलेल्या कल्याण मटका अड्ड्यावर आज दुपारी शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून 61 हजार 100 रुपयांचा...\nकडेगावात सकल मराठा समाजातर्फे तहसीलसमोर ठिय्या\nकडेगाव : मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या झालेल्या सकल मराठा समाजातर्फे येथील तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनस्थळ...\nबळीराजासाठी लालपरी जाणार बांधावर दुसऱ्या टप्प्यात आंतरराज्य सेवा\nसोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा हजार बसचा पसारा सांभाळणारी लालपरी कोरोनाच्या संकटामुळे खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यात मागे पडली आहे....\nकोल्हापूरचा सरकारी दवाखानाच (सीपीआर) खरा तरणोपाय...\nकोल्हापूर ः छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) म्हणजेच जिल्ह्यातील सामान्य माणसांचे प्रमुख आधारवड. कोरोनाच्या काळातही हाच \"थोरला दवाखाना'...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ayurveda-pool-weak-prevent-flooding-330785", "date_download": "2020-09-26T03:18:12Z", "digest": "sha1:L7M3WWKOR5DEX7QEO3AB7WPR2MSDVPM6", "length": 12187, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "आयुर्विन पूल कमकुवत, पूर पाहायला येणाऱ्यांना रोखा | eSakal", "raw_content": "\nआयुर्विन पूल कमकुवत, पूर पाहायला येणाऱ्यांना रोखा\nकृष्णा नदीतील वाढणारी पाणीपातळी पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढत आहे. कमकुवत झालेला पूल आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाणी पाहायला येणाऱ्या लोकांना अटकाव करण्याची गरज आहे.\nसांगली : कृष्णा नदीतील वाढणारी पाणीपातळी पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढत आहे. कमकुवत झालेला पूल आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाणी पाहायला येणाऱ्या लोकांना अटकाव करण्याची गरज आहे. कोरोना साथीतही चार दिवसांपासून टपऱ्या आणि गाडे सुरू झाल्याने खाऊच्या पदार्थांची विक्री होणार नाही, याची काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित विभागांना आदेश देण्याची गरज आहे.\nकोयना पाणलोट क्षेत्रात आज सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. यामुळे नदीची पातळी झपाट्याने वाढते आहे. सांगलीत दुपारी चारला आयर्विन पुलावरील पाणीपातळी 23.2 फुटांवर पोचली होती. ती आणखी वाढणारच आहे. कृष्णा नदीची पातळी वाढू लागल्यावर नागरिक नेहमीच गर्दी करतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यावर पोलिसांसह सर्व संबंधित विभागांनी तातडीने अटकाव करण्याची गरज आहे.\nकोरोना साथीच्या काळात लोकांना गर्दी करू देणेही यंदासाठी धोक्‍याची घंटा ठरू शकेल. पाणी पाहायला गेल्यावर परिसरात मोठ्या प्रमाणात छोट्या व्यवसायिकांकडून विक्रीसाठी गाडे, टपऱ्या लावल्या जातात. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येथे त्याची काहीच हालचाल न होऊ देणे सर्वांच्या हिताचे ठरणार आहे.\nगेल्या काही वर्षांपासून पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले आहे, त्यात काही त्रुटी नाहीत, मात्र दोन्ही बाजूंना आलेल्या फुटपाथखालील स्लॅब काही ठिकाणी निखळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. फार मोठ्या प्रमाणात नागरिक सदर फुटपाथ व त्या ठिकाणी असलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनवर उभे असतात. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे.''\n- सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच, सांगली\nसंपादन : प्रफुल्ल सुतार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nइचलकरंजीत टंचाईचे संकट टळले, दिवसात पाणी गळती दुरूस्त\nइचलकरंजी : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्याकृष्णा योजनेला लागलेली गळती काढण्याचे काम आज एका दिवसातच युद्ध पातळीवर पूर्ण केले. त्यामुळे कृष्णा नदीतून पाणी...\nम्हैसाळ योजनेतून दुष्काळी भागाला 1.75 टीएमसी पाणी पुरवठा\nसांगली : कृष्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून उचलून योजनेच्या लाभक्षेत्रातील कायम स्वरुपी दुष्काळी 6 तालुक्‍यातील सर्व तलाव व...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahakamgar.maharashtra.gov.in/screen-reader-access-mr.htm", "date_download": "2020-09-26T01:57:11Z", "digest": "sha1:SDWHEVHJX522SRVMHNJWDMSHVX4JS3IT", "length": 6273, "nlines": 104, "source_domain": "mahakamgar.maharashtra.gov.in", "title": "स्क्रीन रीडर प्रवेश | महाराष्ट्र शासन, कामगार विभाग", "raw_content": "\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमुख्य पान › स्क्रीन रीडर प्रवेश\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडल, मुंबई\nऑनलाईन तक्रार / तक्रार निवारण\nऑनलाईन तक्रार निवारणतुमच्या तक्रारी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा\nबाल मजुरी हेल्पलाईन बालमजुरी तक्रार साठी संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट © 2014 कामगार विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nपानाच्या रोजी अखेरचे अद्यतनितः: 24-7-2015 अभ्यागत: 14976205\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://nmkgk.com/NaukriSource/26435964/nmk", "date_download": "2020-09-26T00:50:03Z", "digest": "sha1:VFXU2C2WW7XDOC7YPYQARXFXJ3F5M3BT", "length": 1856, "nlines": 23, "source_domain": "nmkgk.com", "title": "ESIC मुंबई येथे विविध पदांच्या 79 जागा NMK marathi gk", "raw_content": "\nमुखपृष्ठ मराठी जाहिराती हिंदी जाहिराती ताज्या बातम्या प्रवेशपत्र निकाल ऑनलाईन प्रश्न जुन्या परीक्षा घडामोडी सामान्यज्ञान विशेष ☰\nESIC मुंबई येथे विविध पदांच्या 79 जागा\nएकूण जागा : 79 पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता: 1) वरिष्ठ रहिवासी (3) 10शैक्षणिक पात्रता: MBBS सह PG, MD, DNB, संबंधित डिप्लोमा किंवा MBBS+02 वर्षे अनुभव 2) वरिष्ठ रहिवासी (1) 67शैक्षणिक पात्रता: MBBS सह PG, MD, DNB, संबंधित डिप्लोमा किंवा MBBS+02 वर्षे अनुभव 3) पूर्ण वेळ विशेषज्ञ 01शैक्षणिक पात्रता: (i) MBBS सह PG पदवी/PG डिप्लोमा […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka+Tonga.php?from=fr", "date_download": "2020-09-26T02:03:08Z", "digest": "sha1:EGBJXFPHPZW3P3OGU6ZO3JWMJTMT37GC", "length": 10270, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक टोंगा", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक टोंगा\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक टोंगा\nदेशाचे नाव वा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 04016 1374016 देश कोडसह +676 4016 1374016 बनतो.\nटोंगा चा क्षेत्र कोड...\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक टोंगा\nटोंगा येथे कॉल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक. (Tonga): +676\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी टोंगा या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00676.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-26T02:13:22Z", "digest": "sha1:RYNUONJR7QEBH34LZGJMNQINC4B3ZOMC", "length": 8386, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "रावेर तालुक्यात आरोग्य विभागाच्या नऊ पथकांकडून सर्वेक्षण | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nरावेर तालुक्यात आरोग्य विभागाच्या नऊ पथकांकडून सर्वेक्षण\nरावेर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली आहे. कोविड केअर सेंटर व कोविड हेल्थ युनिट उभारण्याच्या कार्यवाहीसह शहरातील प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य विभागाच्या 9 पथकांकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. कोरोनाच्या सावटाखाली संपूर्ण जग असतांना तालुक्यातील आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष देण्यात येत असून संपूर्ण शहराचे कोरोनाच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांनी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, राष्ट्रे बाळ स्वास्थ कार्यक्रमाचे आरोग्यसेविका, फार्मासिस्ट यांची बुधवारी बैठक घेऊन सर्वेक्षणाबाबत सूचना दिल्या. शहरातील सर्व भागातील रहिवाशांचे प्रत्येकाच्या घरी जाऊन आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी 19 कर्मचार्‍यांची 9 पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.\nबोदवडमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शिवभोजन थाळीचे उद्घाटन\nमंदाणे- घोडलेपाडा रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारण्याची मागणी\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nमंदाणे- घोडलेपाडा रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारण्याची मागणी\nअ‍ॅन्टी कोविड फोर्समध्ये सहभागी व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/india-news-international/article/union-minister-nitin-gadkari-announces-temporary-toll-collection-closed-across-the-country/286307", "date_download": "2020-09-26T02:05:30Z", "digest": "sha1:VVVIYTOQ57XYFH3ZMECBDY2NCACGBJ5K", "length": 10559, "nlines": 82, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " कोरोनामुळे देशातल्या सर्व टोलनाक्यावर टोलवसुली बंदी, गडकरींची घोषणा", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nलोकल ते ग्लोबल >\nकोरोनामुळे देशातल्या सर्व टोलनाक्यावर टोलवसुली बंदी, गडकरींची घोषणा\nकोरोनामुळे देशातल्या सर्व टोलनाक्यावर टोलवसुली बंदी, गडकरींची घोषणा\nपूजा विचारे | -\nदेशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात टोलवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे.\nदेशभरात तात्पुरती टोलमाफी, गडकरी यांची मोठी घोषणा |  फोटो सौजन्य: ANI\nनवी दिल्लीः देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात टोलवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. नितिन गडकरी यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात देशभरातील सर्व टोलनाके बंद असतील.\nअत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना विलंब होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनपर्यंत म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत देशात कुठल्याही टोलनाक्यावर टोलवसुली होणार नाही. गडकरी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर टोल घेणं तात्पुरत्या स्वरुपात बंद केलं आहे. यादरम्यान आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत लोकांचा वेळ यामुळं वाचू शकेल, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.\nतातडीच्या सेवा किंवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने अडथळ्याविना जावीत, यासाठी देशभरातली टोलवसुली रद्द करण्यात आली आहे. ‘रस्त्यांची देखभाल आणि टोल नाक्यांवर आपत्कालीन स्रोतांची उपलब्धता नेहमीप्रमाणे सुरु राहील’ असं गडकरींनी स्पष्ट केलं.\nगडकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, रस्त्यांची दुरुस्ती आणि टोल प्लाझांवर आपत्कालीन सुविधा या दरम्यान सुरुच राहतील. कोरोनामुळे सध्या देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान हायवे तसेच राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात केवळ आपत्कालीन सेवांसाठी काम करणाऱ्या वाहनांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणारी वाहनं, अत्यावश्यक सेवांशी संबंधित सरकारी वाहनं आणि अॅम्ब्युलन्स आणि अशा सेवांशी संबंधित वाहनांनाच सध्या प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.\nसंचारबंदी लागू झाल्यामुळे कोणालाही विनाकारण वाहनाने प्रवास करता येत नाही. अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने, वैद्यकीय कारणास्तव होणारी वाहतूक यासाठीच प्रवासाला परवानगी आहे.\nकोरोना रुग्णांसाठी 15 हजार कोटींची मदत\nकेंद्र सरकारनं कोरोना रुग्णांचा उपचारासाठी 15 हजार कोटींची तरतूद केली आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार जोमानं काम करताहेत. तसंच लोकांना असुविधा होऊ नये यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहेत. जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा होईल यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nअल-कायदाच्या ९ जणांना अटक, देशात मोठा घातपात घडविण्यापूर्वीच NIA ने केली कारवाई\n का होतोय याला विरोध\nLACवर भारत ऑन टॉप, चीन झाला फ्लॉप\nचेन्नईतील 'मुळशी पॅटर्न', भर रस्त्यात गँगस्टरची कोयत्याने हत्या\nचीनने LACजवळ आणली शस्त्र, कराराचे उल्लंघन; फोटो Times Nowच्या हाती\nआजचे राशी भविष्य २६ सप्टेंबर\nट्रकमध्ये चढत असताना सहायक पडला खाली आणि चाक.....\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ सप्टेंबर २०२०:\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमबद्दल CM ठाकरेंचे मत\nमारुतीची नवीन कार मिळणार मासिक शुल्कावर, पाहा काय आहे प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sureshbhat.in/node/2550", "date_download": "2020-09-26T01:04:07Z", "digest": "sha1:V44GN3Z56VAEI4SS4PJYMYJ24BEWFSSK", "length": 5278, "nlines": 100, "source_domain": "sureshbhat.in", "title": "भेट ही घेऊ नको | सुरेशभट.इन", "raw_content": "जरी तो चेहरा आता दिसेना,\nमनाचा कापतो पारा कितीदा \nमुखपृष्ठ » भेट ही घेऊ नको\nभेट ही घेऊ नको\nभेट ही घेऊ नको ,आमंत्रणे देऊ नको\nमी कघी येणार नाही वाट तू पाहू नको\nएकटा माणूस आला .एकटा जाणारही\nमाहिती आहे तुला तू सोबती होऊ नको\nशांत मी माझ्या घरी झोपेन त्यावेळी तरी\nसांगते ऐकून घे ,स्वप्नातही येऊ नको\nआपला मोठेपणा सांगावया लोकांपुढे\nतेचते बाजार बसवे शब्द तू चिवडू नको\n\" धूत वस्त्रा सारखे कोणीच नाही या जगी \"\nया विचारांनी पुन्हा बाजी कुठे मारू नको\nएकटी चालेल \"शोभा \" सोबती वाचूनही\nतू तुझा संदेश किंवा सारथी धाडू नको\nआपला मोठेपणा सांगावया लोकांपुढे\nतेचते बाजार बसवे शब्द तू चिवडू नको - छान\n एकटी चालेल \"शोभा \"\nएकटी चालेल \"शोभा \" सोबती वाचूनही\nतू तुझा संदेश किंवा सारथी धाडू नको\nशोभाताई, सर्वच शेर खुप छान\nशोभाताई, सर्वच शेर खुप छान आहेत\nशोभाताई गझल आवडली. स्वागत\nशोभाताई गझल आवडली. स्वागत\nशोभाताई, फार छान ....गझल\nशोभाताई, फार छान ....गझल आवडली.\n\" धूत वस्त्रा सारखे कोणीच नाही या जगी \"\nया विचारांनी पुन्हा बाजी कुठे मारू नको\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/entertainment/tv-bigg-boss-13-family-week-rashmi-desai-brother-kids-in-bb-house-rashmi-siddharth-shukla-friendship/156742/", "date_download": "2020-09-26T00:56:04Z", "digest": "sha1:IT7FBMRDFV5AZQ4QAMWCH252CWQZDAGC", "length": 8981, "nlines": 114, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Tv bigg boss 13 family week rashmi desai brother kids in bb house rashmi siddharth shukla friendship", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Video: चिमुरड्यांमुळे सिद्धार्थ-रश्मीत पुन्हा दोस्ती\nVideo: चिमुरड्यांमुळे सिद्धार्थ-रश्मीत पुन्हा दोस्ती\nVideo: चिमुरड्यांमुळे सिद्धार्थ-रश्मीत पुन्हा दोस्ती\nहिंदी टीव्ही मालिकांमध्ये ‘बिग बॉस १३’ हे टीआरपीच्या स्पर्धेत नंबर एकला आहे. सध्या ‘बिग बॉस १३’ मध्ये फॅमिली वीक सुरू असून सर्व सदस्य भावनिक होताना दिसत आहेत. या फॅमिली वीकमध्ये बिस बॉसमधील सदस्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य भेटायला येत असतात. या फॅमिली वीक मधला सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्लाचा आहे. या व्हिडिओत रश्मीला दोन गोंडस मुलं भेटायला आलेली दिसतं आहेत. या दोन मुलांनी रश्मीला असं काहीतरी सांगितलं की ज्यामुळे सिद्धार्थ शुक्ला देखील भावनिक झाला.\nफॅमिली वीक दरम्यान रश्मी देसाईला आई किंवा भाऊ भेटायला येईल अशी शक्यता असते. मात्र या दोघांपैकी कोणीही न येता भाऊ बुलंद देसाई याची मुलं तिला भेटायला येतात. स्वातिक आणि भव्या असं या दोघांचं नावं आहे. हे दोघं रश्मीचा जीव आहेत. ४ महिन्यानंतर त्यांना भेटल्यामुळे रश्मी खूप भावूक झाली. ही दोन मुलं रश्मीला सोनू असा आवाज देत बिग बॉसच्या घरात आले.\nसिद्धार्थ सोबत मैत्री का तोडली असा प्रश्न या दोघांनी रश्मीला विचारला. तसंच या दोघांनी रश्मीला सिद्धार्थसोबत पुन्हा मैत्री करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रश्मी आणि सिद्धार्थ यांनी पुन्हा मैत्री करून स्वातिक आणि भव्यासोबत खूप मस्ती केली. त्यानंतर ही दोन मुलं घराबाहेर गेल्यानंतर सिद्धार्थ रश्मीची काळजी घेताना दिसला. या दोन मुलांमुळे सिद्धार्थ आणि रश्मीमधल्या दुरावा कमी झाला आहे. या दोघांच्या नात्याला वेगळं वळणं आलं आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस १३’ मध्ये सिद्धार्थ आणि रश्मीची मैत्री पाहायला मिळणार आहे.\nहेही वाचा – फ्रिजपेक्षा जास्त थंड आहे राखीचा हिरो; पाहा व्हायरल व्हिडिओ\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकोलकाता नाईट रायडर्स vs सनरायजर्स हैदराबाद प्रीव्ह्यू\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nPhoto: NCB ड्रग्ज प्रकरणात चौकशी केलेल्या रकुलमध्ये तुम्हाला या गोष्टी माहिती...\nPhoto: ‘MU’च्या विरोधात ‘ABVP’ चे जागरण गोंधळ आंदोलन\nPhoto: काय आहे ”माझे कुटुंब माझी जबाबदारी\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/91594b91592e-92a94d93091594d93093f92f93e-915936940-91593093e935940", "date_download": "2020-09-26T01:46:45Z", "digest": "sha1:2EPDTRQ6RIFDYN37G4274UG2TBW4EWYJ", "length": 10277, "nlines": 89, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "कोकम प्रक्रिया — Vikaspedia", "raw_content": "\nकोकम सोल (आमसूल) -\nकोकमसोल तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली, लाल, ताजी, टणक अशी फळे निवडून घ्यावीत. फळे पाण्याने स्वच्छ धुऊन कापडाने कोरडी करून गर व साली वेगवेगळ्या ठेवाव्यात. बिया आणि गराच्या मिश्रणाचे वजन करून घ्यावे आणि त्यामध्ये दहा टक्के या प्रमाणात (एक किलो गरासाठी 100 ग्रॅम मीठ) मीठ मिसळावे. मीठ आणि गर विरघळून त्याचे द्रावण तयार होईल, ते गाळून त्यातील बिया वेगळ्या कराव्यात. या द्रावणामध्ये कोकमाच्या साली रात्रभर बुडवून नंतर 24 तास उन्हात सुकवाव्यात. याप्रमाणे चार ते पाच वेळा साली रसात बुडवून सुकवाव्यात. शेवटी त्या 50 ते 55 अंश सेल्सिअस तापमानात ड्रायरमध्ये किंवा उन्हामध्ये सुकवाव्या. रात्री या साली उघड्यावर ठेवू नयेत. अशाप्रकारे सुकविलेले कोकम सोल प्लॅस्टिकच्या पिशव्यांत हवाबंद करून कोरड्या आणि थंड जागेत साठवून ठेवावे.\nअमृत कोकम बनविण्यासाठी उत्तम प्रतीची चांगली पक्व झालेली ताजी टणक फळे निवडावीत. फळे स्वच्छ पाण्यामध्ये चांगली धुऊन घ्यावीत. नंतर फळे कापून त्यांचे चार किंवा आठ समान भाग करावेत. बिया बाजूस काढून घ्याव्यात. साखरेचे 1ः2 या प्रमाणात घ्यावे. कोकण साली आणि साखर यांचे एकावर एक थर देऊन काचेच्या बरणीत भरून ठेवावे. पंधरा दिवसांनी तयार झालेले अमृत कोकम निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत भरून ते थंड आणि कोरड्या जागी ठेवावे. अमृत कोकमचा आस्वाद घेण्यापूर्वी त्यात 1ः5 किंवा 1ः6 या प्रमाणात पाणी मिसळावे. चवीसाठी चिमूटभर जिरा पावडर व चिमूटभर मीठ पेयामध्ये (200 मि.लि.) मिसळावे.\nपिकलेल्या कोकम फळांच्या साली व गर आणि मीठ यांच्या मिश्रणापासून तयार करण्यात येणाऱ्या रसास कोकण आगळ असे म्हटले जाते. मिठाचे प्रमाण 16 टक्के या प्रमाणात वापरले असता कोकम आगळ वर्षभर किंवा त्याहून जास्त कालावधीसाठी चांगले राहू शकते. कोकम आगळ तयार करण्यासाठी पिकलेली, लाल ताजी टणक कोकम फळे निवडून घ्यावीत. फळे उभी आणि आडवी कापून त्याचे चार किंवा आठ भाग करावेत. साली किंवा गराचे वजन करून घ्यावे आणि त्यामध्ये 16 ते 20 टक्के (एका किलोस 160 ते 200 ग्रॅम) बारीक मीठ घालावे. कोकम साली + गर + मीठ यांचे मिश्रण चांगले हलवून घ्यावे. रस सुटण्यासाठी ते तीन दिवसांपर्यंत तसेच ठेवून घ्यावे. त्यानंतर मिश्रण गाळून घ्यावे. मिश्रणापासून तयार झालेला रस निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत भरावा. या बाटल्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात.\nउद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली\nमहेंद्र धुमाळ, कणकवली, जि. सिंधुदुर्ग\nमाहिती संदर्भ : अॅग्रोवन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/ferrari-returns-to-india-with-launches-ferrari-california-1135327/", "date_download": "2020-09-26T03:24:15Z", "digest": "sha1:HIEFBGJVHYFCCRTNEDCTOVMWQVQH7PIK", "length": 9869, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "होईल हो फेरारीची सवारी! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nहोईल हो फेरारीची सवारी\nहोईल हो फेरारीची सवारी\nवाहनरसिकांना मोहिनी घालणारी नाममुद्रा असलेल्या फेरारी या आलिशान इटालियन मोटार कंपनीचा भारतीय वाहन बाजारपेठेत पुनर्प्रवेश झाला आहे.\nवाहनरसिकांना मोहिनी घालणारी नाममुद्रा असलेल्या फेरारी या आलिशान इटालियन मोटार कंपनीचा भारतीय वाहन बाजारपेठेत पुनर्प्रवेश झाला आहे. कंपनीने कॅलिफोर्निया टी ही कार बुधवारी मुंबईत सादर केली. नवनीत मोटर्सचे प्रमुख शरद कचालिया हे या वेळी उपस्थित होते.\nकारची किंमत ३.४५ कोटी रुपये आहे. ३.९ लिटर ट्विन टबरे व्ही ८ इंजिन असलेल्या या कारची क्षमता ३,८५५ सीसी आहे. महागडय़ा ५० हून अधिक फेरारी कार सध्या भारतातील रस्त्यावर धावत आहेत.\n२०११ मध्ये श्रेयस समूहाबरोबरच्या भागीदारीमुळे ५०च्या दशकातील फेरारीच्या कार भारतात उपलब्ध झाल्या होत्या. कंपनीने आता नवनीत मोटर्ससह कार विक्री भागीदारी केली आहे. फेरारीचे नवे दालन ऑक्टोबरमध्ये वांद्रे-कुर्ला येथे सुरू होणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 चढ-उताराचे हेलकावे घेत अखेर बाजार सावरला\n2 चिनी बाजारात पडझड सुरूच, दुसऱ्या दिवशीही ८ टक्क्यांपर्यंत घसरण\n3 ऑनलाइन उधारीच्या व्यवहारांसाठी लवकर नियामक चौकट : रिझव्‍‌र्ह बँक\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/amitabh-bachchan-feels-life-should-be-chaotic-1046576/", "date_download": "2020-09-26T02:32:37Z", "digest": "sha1:4DBT4SW7YDOVQ5GYIJK42FMUS7LRRUQS", "length": 11793, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जीवनात थोडा गडबड-गोंधळ हवाच – अमिताभ बच्चन | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nजीवनात थोडा गडबड-गोंधळ हवाच – अमिताभ बच्चन\nजीवनात थोडा गडबड-गोंधळ हवाच – अमिताभ बच्चन\nजीवनात थोड्या प्रमाणात गडबड-गोंधळ हवाच, असे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे मानणे आहे. सध्या अहमादाबाद येथे सुरू असलेल्या सुरजित सिरकरच्या 'पिकू' चित्रपटाच्या चित्रिकरणात\nजीवनात थोड्या प्रमाणात गडबड-गोंधळ हवाच, असे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे मानणे आहे. सध्या अहमदाबाद येथे सुरू असलेल्या सुरजित सिरकर दिग्दर्शित ‘पिकू’ चित्रपटाच्या चित्रीकरणात अमिताभ बच्चन व्यग्र आहेत. चित्रीकरणाच्या ठिकाणी सुरू असलेल्या गोंधळाच्या वातावरणात चित्रपटातील आपल्या संवादाचा सराव करण्यात मजा येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nएकांतात लिहिलेल्या शब्दांनी समर्पक परिणाम साधता येतो. असे असले तरी, वाहतुकीच्या गडबड-गोंधळात लिहिलेले शब्द माझ्यासाठी चांगला परिणाम साधतात – जीवनात थोड्या प्रमाणात गडबड-गोंधळ हवा, मात्र काही प्रमाणात ते नियंत्रितदेखील हवे. बाकीच्यांचे मला माहिती नाही, परंतु, माझ्या मते प्रत्येक वेळी एकांतातच तुमच्यातील प्रतिभा बाहेर येते असे नाही, असा संदेश अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिला आहे.\nब्लॉगमध्ये ते पुढे लिहितात, कधी-कधी आजूबाजूच्या वातावरणात असलेल्या थोड्या-फार प्रमाणातील गडबड-गोंधळाने मदतच होते – खास करून जेव्हा आम्ही कॅमेऱ्यासमोर आमच्या संवादाचा सराव करीत असतो… संवाद म्हणताना आम्ही केलेल्या चुका सेटवरील गडबड-गोंधळात कोणाच्या कानावर पडत नाहीत… म्हणून मला सेटवर गोंधळ सुरू असताना सराव करायला आवडते… फक्त सराव हं… अन्य काही नाही.\n‘पिकू’ चित्रपटात दीपिका पदुकोण आणि इरफान खान यांच्यसुद्धा भूमिका आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n“मला संधी मिळाली तर तिच्यासाठी जगायचंय”; पत्नीसाठी इरफानचे ते खास शब्द\nइरफान… आईची अखेरची इच्छा राहिली अपूर्णच\n‘रामलीला’चा सेट अन् दीप-वीरची केमिस्ट्री; अशी सुरू झाली लव्हस्टोरी\nआई मला घ्यायला आली आहे शेवटच्या क्षणांमध्ये इरफानला येत होती आईची आठवण\n‘या आयुष्यात मी त्यांना भेटले हे माझं नशीब’; अभिनेत्रीची इरफानसाठी भावूक पोस्ट\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n2 एका प्रवासाचं मनोगत\n3 बॉलिवूडचे ‘खान’दान एकत्र\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/sunny-leone-leela-a-laughable-entertainment-1091611/", "date_download": "2020-09-26T02:39:02Z", "digest": "sha1:KBGVO2427JQLVQWXHNHFYRJLTMVVNQKT", "length": 17632, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "फिल्म रिव्ह्यू : हास्यास्पद करमणूक | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nफिल्म रिव्ह्यू : हास्यास्पद करमणूक\nफिल्म रिव्ह्यू : हास्यास्पद करमणूक\nसनी लिओनी हिला ‘हिरोईन’ बनविणारा हा चित्रपट आहे. ‘पोर्नस्टार’ अशी प्रतिमा असल्यामुळे मुख्य भूमिका असूनही चित्रपटकर्त्यांनी सनी लिओनीला ‘पोर्नस्टार’ म्हणूनच चित्रपटात सादर केले आहे.\nहिंदी चित्रपट म्हणजे फॉर्म्यूलेबाज करमणुकीचा उत्तम नमुना ठरतो हे वारंवार सिद्ध करणारे चित्रपट हमखास झळकतात, थोडय़ाफार प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवितात आणि मग विसरले जातात. अशा तद्दन चित्रपटांची यादी भलीमोठीच असते. ‘एक पहेली लीला’ या चित्रपटाचाही असा ठरीव फॉर्म्यूला आहे.\nसनी लिओनी हिला ‘हिरोईन’ बनविणारा हा चित्रपट आहे. ‘पोर्नस्टार’ अशी प्रतिमा असल्यामुळे मुख्य भूमिका असूनही चित्रपटकर्त्यांनी सनी लिओनीला ‘पोर्नस्टार’ म्हणूनच चित्रपटात सादर केले आहे. करमणूक पण हास्यास्पद पटकथा, अभिनयाचा संपूर्ण अभाव आणि निव्वळ अंगप्रदर्शन असा हा चित्रपट आहे. ‘बी ग्रेड’ स्वस्त करमणुकीच्या चित्रपटांची लाट पुन्हा बॉलीवूडमध्ये आणून गल्लापेटीवर डोळा ठेवण्याचा एककलमी कार्यक्रम चित्रपटकर्त्यांनी या चित्रपटाद्वारे राबविला आहे.\nनायिकेची दोन नावे, दोन रूपे यात आहेत. एक आहे ती सुपर मॉडेल मीरा. जी आजच्या काळातील आहे आणि मिलान शहरात राहते. तिचे आई-वडील म्हणजे विमान दुर्घटनेत मरण पावले म्हणून तिला विमान प्रवासाचे प्रचंड भय असते. फॅशनच्या कसल्यातरी ‘फोटो शूटिंग’साठी तिला भारतात यावे लागते. विमान प्रवासाच्या भयामुळे मीराची मैत्रीण राधिका म्हणजेच ‘रॅड्स’ तिला विमानतळ अशी ‘थीम’ असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जातोय असे सांगून भारतात जाणाऱ्या विमानात बसवते आणि मग थेट राजस्थानात घेऊन येते. मीरा आजच्या काळातील तरुणी असून तिचे पूर्वसंचित म्हणून ती राजस्थानात येते. तीनशे वर्षांपूर्वी तिचे नाव लीला असते. राजस्थानमधील राजेशाही ‘हवेली’, संस्थानिक, त्यांचे प्रेम असा सगळा मामला आणि राजस्थानात आल्यावर मीरा तिच्या मनातील येईल तेव्हा नाचत सुटते. त्यामुळे पडदाभर भयंकर गडद रंगांचे समूह नृत्य आणि मीराच्या अंगप्रदर्शनाची ‘क्लोजअप’ दृश्ये याची रेलचेल चित्रपटभर सुरू राहते. फॅशन मॉडेल मीरा असो की ३०० वर्षांपूर्वीची लीला असो नायिकेच्या कपडय़ांमध्ये तसूभरही फरक दाखविलेला नाही. आजची मॉडेल म्हणून कमीत कमी कपडय़ात मीरा वावरते तर प्राचीन काळातील लीला हीसुद्धा ‘बॅकलेस’ चोळीमध्ये वावरताना दाखविली आहे.\nपूर्वजन्मातील लीला आणि श्रवण ३०० वर्षांनंतर करण आणि मीरा म्हणून अवतरतात आणि पूर्वजन्मातील भैरो या खलनायकाला या जन्मातील करण संपवून टाकणार आहे. पण करणला आजच्या काळातील भैरो कोण आहे ते मात्र माहीत नाही. ते रहस्य चित्रपट उलगडतो. पूर्वजन्मात अधुरी राहिलेली प्रेमकहाणी वर्तमानातील या जन्मात पूर्ण होते अशा पद्धतीचे तद्दन हिंदी सिनेमावाल्यांच्या डोक्यातील कल्पना यावर चित्रपट आधारित आहे.\nसनी लिओनीला प्रथमच दोन व्यक्तिरेखा सादर करणाऱ्या नायिकेची प्रमुख भूमिका मिळाली असली तरी तिने अभिनय करावा अशी चित्रपटकर्त्यांचीच अपेक्षा हा चित्रपट करताना नसावी. किंबहुना नायिकाच काय नायिकेकडे आकर्षित होणाऱ्या सर्व पुरुष व्यक्तिरेखांसाठीही दिग्दर्शकाने अतिशय ‘ठोकळे’ नट आणले आहेत. त्यातल्या त्यात करण या भूमिकेतील जय भानुशाली हा मूळचा टीव्ही कलावंत असल्यामुळे बेतास बात अभिनय करतो. सनी लिओनीचे अंगप्रदर्शन, कामसूत्रसदृश हालचालींचे ‘क्लोजअप’ दृश्य यावरच सगळा भर दिल्यामुळे अभिनय येत नसलेल्या कलावंतांनाच काम द्यायचे ही जणू चित्रपटकर्त्यांची पूर्वअट असावी.\n‘केसरीया बालम’ आणि ‘ढोली तारो’ या जुन्या गाजलेल्या गाण्यांवर भिस्त ठेवून संगीतकारांनी राजस्थानी लोकसंगीतातील चालींवर गाणी केली आहेत.\nजुन्या ओळखीच्या चालींवरची गाणी असल्यामुळे ती ऐकायला बरी वाटतात एवढेच काय ते. निव्वळ सनी लिओनीचे अंगप्रदर्शन दाखविणारा हा चित्रपट निव्वळ हास्यास्पद करमणूक न ठरला तरच नवल.\nनिर्माते – भूषण कुमार, क्रिशन कुमार, अहमद खान, शायरा खान\nदिग्दर्शक – बॉबी खान\nछायालेखक – बशालाल सय्यद\nपटकथा – जो जो खान\nसंवाद – बंटी राठोड\nसंगीत – मीट ब्रॉस अंजान, अमाल मलिक, डॉ. झिअस, टोनी कक्कर, उझैर जयस्वाल\nकलावंत – सनी लिओनी, जय भानुशाली, रजनीश दुग्गल, मोहीत अहलावट, राहुल देव, जस अरोरा, शिवानी टांकसाळे, अजय घुवालेवालास, चेतन अग्रवाल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nहैदराबाद पालिकेच्या वेबसाईटवर सनी लिओनीचे नग्न छायाचित्र दिसल्याने खळबळ\nVideo: One Night Stand चित्रपटातील बोल्ड सनीच्या ‘इजाजत’ गाण्याचा व्हिडिओ प्रसिध्द\nबॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज\n११ पालकांनी नाकारलेल्या निशाला सनीने स्वीकारलं\nसनी लिओनीचा अरबाझ खानसोबत रोमान्स\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी शाहिरी जलसा\n2 ‘कोर्ट’वर पारितोषिकांचा वर्षांव\n3 सुपरहिरो चित्रपट मालिकांची निर्मिती अधिक आव्हानात्मक\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/the-making-of-don-by-krishna-gopalan-1037110/", "date_download": "2020-09-26T03:10:55Z", "digest": "sha1:RSTYXHJMNFVFI46642X3XQUFE6PQQIXU", "length": 20208, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डॉनायण! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nअतिउपलब्धतेमुळे वस्तू-सेवेची व्यक्तीलेखी किंमत कमी होते, हा सीमांत उपभोगाचा अर्थशास्त्रीय नियम चित्रपटाच्या आस्वादाबाबतही लागू होतो.\nअतिउपलब्धतेमुळे वस्तू-सेवेची व्यक्तीलेखी किंमत कमी होते, हा सीमांत उपभोगाचा अर्थशास्त्रीय नियम चित्रपटाच्या आस्वादाबाबतही लागू होतो. पिढीगणीक कुण्या एका काळातल्या सिनेमाच्या भक्तीने पछाडलेले भारतीय सिनेरसिक मात्र या नियमाला मुबलकपणे पायदळी तुडवताना दिसतात. महिनाभरानंतर शंभर करोडी गल्लाभरू सिनेमांची नावे आणि ‘सुपरहीट’ गाण्यांचे मुखडे विसरले जाण्याच्या आजच्या काळातच जुने सिनेभक्त मात्र गाणी, चित्रपट, साल, गायक-गायिकांचे किस्से सांगताना उत्साहाचे\n‘चर्वणप्राश’ घेतल्यासारखे बोलू लागतात. जुन्याला कवटाळून बसण्यात वावगे काहीच नसले, तरी यातून नव्याला एकगठ्ठा नाकारणारी दुराग्रही मानसिकता तयार होते. पण या गोष्टीकडे लक्ष न देता हे भक्तगण आपली ‘जुने ते..’ची उगाळणी कायम ठेवतात. ‘द मेकिंग ऑफ डॉन’ हे डॉन चित्रपटाच्या कल्पनाअवस्थेपासून त्याच्या आजच्या रिमेकपर्यंतच्या सूक्ष्म घटकांना सामावण्याचा प्रचंड मोठा आवाका ठेवणारे छोटेखानी पुस्तक प्रथमदर्शनी अशाच दुराग्रही मानसिकतेचे प्रतिबिंब असेल हा आपला भ्रम पानागणीक उतरवत नेते.\nभारतीय चित्रपट त्याच्या प्रेक्षकांनी अगदी अलीकडेपर्यंत दिग्दर्शकांचे उत्पादन मानले नव्हते. सुरुवातीच्या काळापासून लोकांच्या मनदेव्हाऱ्यात अभिनेत्याची पूजा होत असल्याने चित्रपट पाहायला जाताना तो कोणत्या दिग्दर्शकाचा आहे, याऐवजी त्यात कोण अभिनेता/अभिनेत्री आहे, हे महत्त्वाचे असे. प्रेक्षकांना आवडणारा सर्वात महत्त्वाचा घटक नायक आणखी देवपदी बनला, जेव्हा अमिताभ बच्चन यांनी ‘अँग्री यंग मॅन’चा मुखवटा धारण केला. आणीबाणीउत्तर काळ, विद्रोही वातावरण, चळवळ, तरुणांची घुसमट यांचा परिपाक म्हणजे या अभिनेत्याचे स्टारपद होते. त्यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ची उभारणी ज्या चित्रपटांनी पक्की केली त्यात ‘डॉन’ या न- नायकाचा लक्षणीय वाटा आहे. चंद्रा बारोट या नवख्या-अननुभवी आणि मनमौजी दिग्दर्शकाने चार वर्षे स्वत:च्या स्वप्नांचा पाठलाग करीत पूर्ण केलेल्या चित्रपटाची गाथा क्रिश्ना गोपालन यांनी ‘द मेकिंग ऑफ डॉन’ या पुस्तकाद्वारे मांडली आहे. एखाद्या खूप यशस्वी झालेल्या चित्रपटाची काही वर्षांनंतर भलामणयुक्त आठवण काढण्याच्या आजच्या फॅशनहून हे पुस्तक नक्कीच वेगळे आहे.\nगोपालन यांच्या लिखाणाचे खरे वैशिष्टय़ त्यांचे हट्टाग्रही भावूक सिनेभक्त न बनण्यात आहे. ‘डॉन’च्या झळाळत्या यशाचे साक्षीदार असलेल्या गोपालन यांनी शेकडो मुलाखती आणि सांगोवांगीच्या घटनांची मिसळ करून बनविलेला हा पुस्तकी आराखडा कुणाएकाची भलामण करण्याच्या हेतूने नाही. तत्कालीन मुंबईतील समाजजीवन, सामान्य माणसाच्या नजरेतला सिनेमा आणि एकूण वैश्विक साहित्य-चित्रपटांचा चित्रकर्त्यांवरचा परिणाम यांचे सूक्ष्म अवलोकन त्यांनी पुस्तक लिहिताना केले आहे. त्यामुळे मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलच्या अल्प-इतिहासापासून ते संगीत कंपन्यांच्या कामकाजाचा भाग येथे भरपूर माहिती देऊन जातो. मूळ भाग ‘डॉन’च्या निर्मितीवर असला, तरी त्या निर्मितीत असंख्य डोंगर कसे होते, याचा उद्बोधक तपशील यात आला आहे. हिंदूी चित्रपटसृष्टीतील मान्यवर नावांच्या भल्या-बुऱ्या-गमतीशीर किश्श्यांचेही यात दस्तावेजीकरण झाले आहे. छोटय़ा प्रकरणांमधून वेगवान मालिकांसारखी अनुभूती ते वाचताना येत राहते.\nसिनेमॅटोग्राफर नरिमन इराणी यांच्या कर्जफेडीसाठी त्यांच्या शिष्यमित्राने अंधारात घेतलेली दिग्दर्शकीय उडी म्हणजे ‘डॉन’ची निर्मिती होती. कसलाही अनुभव नसताना केवळ आत्मविश्वासाच्या बळावर आणि तेव्हा स्टारपदी नसलेल्या अमिताभ बच्चन व इतर कलाकारांशी असलेल्या खास मैत्रीच्या जोरावर चंद्रा बारोट यांनी ‘डॉन’ बनवायला घेतला, तेव्हा तेव्हाच्या प्रतिष्ठितांनी त्यांची खिल्ली उडविली. त्याच्या तिरपागडय़ा नावापासून अ‍ॅण्टीहीरो पटकथेपर्यंत अनेकांनी भरभरून हसून घेतले. मात्र तरीही त्यांनी अल्प बजेटमध्ये सिनेमा बनविण्याचा विचार सोडला नाही. इतर चित्रपटांची शूटिंग झाल्यानंतर त्यांच्या राहिलेल्या सेट्समध्ये चित्रीकरण उरक, एखाद्या ओळखीच्या कलाकाराचा बंगला, एखाद्या हॉटेलचा परिसर मिळवून त्यात चित्रीकरण संपव, अशा काटकसरींमध्ये त्यांनी सिनेमा पूर्ण केला. त्यातले सहअभिनेते, छोटय़ा भूमिकांमध्ये वावरणारे कलाकार चित्रपटात समाविष्ट कसे झाले आणि आजही श्रवणमूल्य टिकून असलेल्या गाण्यांची निर्मिती कशी झाली याच्या सविस्तर सत्यकथा वाचकाला अडकवून ठेवणाऱ्या आहेत.\nआपल्या चित्रपटसृष्टीची साठ-सत्तरीच्या काळातील मानसिकता, आजूबाजूच्या निर्दयी जगाला विसरायला लावणारे माध्यम म्हणून चित्रपटाकडे पाहणाऱ्या प्रेक्षकांची गरज आणि त्याच वेळी प्रगट होणाऱ्या कलाकृतींना कच्चामाल म्हणून वापरण्याची चंद्रा बारोट यांची कल्पकता यांवर सुरेख दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. बारोट यांच्या या पहिल्याच प्रयत्नाने त्या वर्षांच्या दिग्गज कलाकृतींना मागे टाकत तीन फिल्मफेअरवर नाव नोंदविले होते. पण त्यानंतर त्यांचे चित्रप्रकल्प फसत कसे गेले, त्याचाही लेखाजोगा द्यायला गोपालन विसरले नाहीत.\nचित्रपटाची भलामण करण्यासाठी ‘तेव्हा सगळेच थोरच होते आणि आता सगळेच ‘पोर’खेळयुक्त कसे आहे’, असा सूर कटाक्षाने टाळत गोपालन यांनी वाचकांना विश्वासात घेतले आहे. त्यामुळे दोन नवे ‘डॉन’ चित्रपट अनुभवलेल्या आजच्या पिढीला आपल्याच चित्रपटसृष्टीतील कैक अज्ञात घटकांची ओळख या पुस्तकाने होऊ शकेल. मागील पिढीला या ‘डॉना’यणात रममाण होण्यासाठी कुणीच रोखू शकणार नाही.\nद मेकिंग ऑफ डॉन : क्रिश्ना गोपालन,\nरूपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,\nपाने : १७२, किंमत : १९५ रुपये.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 राजा राव यांच्या साहित्याची पुनर्भेट\n2 डिजिटल संघ-कार्याची गाथा..\n3 सहा दशकांचा खळबळजनक मागोवा\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/demand-for-possession-of-the-ghantali-ground-1761071/", "date_download": "2020-09-26T02:12:54Z", "digest": "sha1:ZQYA52KOQXGV5DLVALJY7BGV7WBFI3PS", "length": 14185, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "demand for possession of the Ghantali Ground | घंटाळी मैदानावरून शिवसेनेची कोंडी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nघंटाळी मैदानावरून शिवसेनेची कोंडी\nघंटाळी मैदानावरून शिवसेनेची कोंडी\nशिवसेनेचे माजी नगरसेवक विलास सामंत यांच्याशी संबंधित असलेल्या संस्थेला पालिकेने ही वास्तू चालविण्यासाठी दिली आहे.\nआर्थिक घोटाळा झाल्याचा भाजपचा आरोप; मैदान ताब्यात घेण्याची मागणी\nठाण्यातील नौपाडा भागातील महापालिकेचे घंटाळी मैदान आणि त्यामधील खुला रंगमंच शिवसेनेच्या माजी नगरसेवकाशी संबंधित संस्थेला चालविण्यासाठी देण्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या नगरसेवकांनी यात आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला. मैदान ताब्यात घेण्याची मागणी करत भाजपने सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या संस्थेने मात्र आरोप फेटाळून लावले आहेत.\nनिविदा प्रक्रियेविनाच ही वास्तु संबंधित संस्थेला चालविण्यासाठी देण्यात आली असून या संस्थेकडून प्रदर्शने आयोजित करून मैदान आणि रंगमंचचा व्यावसायिक वापर होत आहे. या व्यवहारांची कोणतीही नोंद संस्थेकडून ठेवली जात नाही आणि महापालिकेचे भाडेही संस्था भरत नाही, अशी टीका भाजपचे नगरसेवक सुनेश जोशी यांनी केली.\nशिवसेनेचे माजी नगरसेवक विलास सामंत यांच्याशी संबंधित असलेल्या संस्थेला पालिकेने ही वास्तू चालविण्यासाठी दिली आहे. मैदानाच्या करारासंदर्भात जोशी यांनी प्रशासनाला काही प्रश्न विचारले होते. शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत या प्रश्नांची उत्तरे देताना निविदेविनाच मैदान चालविण्यासाठी दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. संस्था भाडेही भरत नाही, व्यवहारांच्या नोंदीही नाहीत. त्यामुळे वास्तु ताब्यात घेण्यात यावी, अशी मागणीही जोशी यांनी केली. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये जुंपल्याचे चित्र होते.\nठाणे येथील पाचपखाडी भागातील भूखंड कौशल्य रुग्णालयाला ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आला आहे. या रुग्णालयासोबत केलेल्या करारामध्ये बाजारभावानुसार भाडे आकारणे, सामजिक आणि कौटुंबिक आरोग्य विषयक कार्यक्रम राबविणे अशा अटींचा समावेश होता. याबाबत नगरसेवक नारायण पवार यांनी प्रश्न विचारले असता, प्रशासनाला त्यांची उत्तरे देता आली नाहीत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी रुग्णालयाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत समिती नेमून चौकशीची मागणी केली. त्यावर नगरसेवकांनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे अटी आणि शर्तीचा भंग झाला आहे की नाही, याचा अहवाल सादर करण्याच्या आदेश महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे हे रुग्णालय चौकशी चक्रात सापडण्याची चिन्हे आहेत.\nपालिकेने २००१ मध्ये शहरातील वास्तु विनानिविदा दिल्या होत्या. त्यामध्ये आम्हाला घंटाळीची वास्तु दिली. आम्ही वेळेवर भाडे भरत असून संस्थेचे तीनदा लेखापरीक्षण झाले आहे. त्यात गैरव्यवहार आढळलेला नाही. करारानुसारच आम्ही काम करतो. संस्थेवर आकसापोटी खोटे आरोप केले जात आहेत.\n– विलास सामंत, अध्यक्ष, घंटाळी प्रबोधनी\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 उल्हासनगर महापौरपदावर आज शिक्कामोर्तब\n3 ‘काळीपत्ती’ पानाला ‘वाहतुकीचा भार’ सोसेना\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://test.mhrdnats.gov.in/mr/students", "date_download": "2020-09-26T03:00:24Z", "digest": "sha1:5RPSQNTPM35ALPNN74CWTHREN5V7WXB2", "length": 6596, "nlines": 76, "source_domain": "test.mhrdnats.gov.in", "title": "Students (विद्यार्थी) | National Apprenticeship Training Scheme - NATS, Ministry of Human Resource Development", "raw_content": "\nराष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना (NATS)\nशिक्षुता प्रशिक्षण/व्‍यावहारिक बोर्ड द्वारा सुरु केलेले\nराष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना (NATS)\nशिक्षुता प्रशिक्षण/व्‍यावहारिक बोर्ड द्वारा सुरु केलेले\nकेंद्रीय शिक्षण मंत्रालय, भारत सरकार\nराष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना (NATS)\nशिक्षुता प्रशिक्षण/व्‍यावहारिक बोर्ड द्वारा सुरु केलेले\nराष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ही विद्यार्थ्यांना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच खाजगी क्षेत्रातील काही नामवंत संस्थांमध्ये प्रशिक्षणा घेण्याची संधी देते. जे विद्यार्थी अभियांत्रिकी उत्तीर्ण झाले आहेत, ज्यांनी अभियांत्रिकीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे किंवा असे विद्यार्थी ज्यांनी +2 नंतर व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण केला आहे असे विद्यार्थी या शिकाऊ उमेदवारीच्या प्रशिक्षणासाठी नॅट्सच्या(NATS) वेब पोर्टलवर आपली नाव नोंदणी करून अर्ज करू शकतात. 126 विषयात पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थ्यांना व 128 विषयात +2 नंतर व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्या जाते. प्रशिक्षणाचा कालावधी हा एका वर्षाचा असतो. प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांना भत्ता(stipend) दिला जातो ज्याच्या 50% भत्ता हा भारत सरकारतर्फे सेवानियोजकास देण्यात येतो. विद्यार्थी शिकाऊ उमेदवारीच्या प्रशिक्षणासाठी नॅट्सच्या वेब पोर्टलद्वारे नाव नोंदणी करू शकतात.\nखालील विद्यार्थ्यांसाठी काही फायदे आहेत\nशिकाऊ उमेदवार प्रशिक्षण लागू करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्नअधिक\nए आय सी टी ई\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nप्रत्यक्ष प्रशिक्षण कायद्यानुसारचा कारभार प्रशिक्षण / मंडळ मंडळे द्वारे प्रदान केलेल्या सामग्रीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/messi-broke-ronaldos-record/", "date_download": "2020-09-26T02:10:32Z", "digest": "sha1:FAHWHSFR6TDC6VH43B6SFBX33IRZ5IDF", "length": 4648, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेस्सीने मोडला रोनाल्डोचा विक्रम", "raw_content": "\nमेस्सीने मोडला रोनाल्डोचा विक्रम\nमाद्रिद: बार्सिलोनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने ला-लीगा फुटबॉल स्पर्धेत रियल मॅलोरका संघाविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदविली. तसेच त्याने ख्रिस्तीयानो रोनाल्डोची 35 हॅट्ट्रिक घेण्याची कामगिरी मागे टाकून विक्रमाची नोंद केली.\nबार्सिलोनाने हा सामना 5-2 अशा फरकाने जिंकला. या सामन्यात मेस्सीने 17 व्या, 41 व्या आणि 83 व्या मिनिटाला गोल केले. तर अँटोनी ग्रिझमन (7 मि.) आणि लुईस सुआरेझ (43 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.\nया विजयासह बार्सिलोनाने गुणतालिकेत 34 गुणांसह अव्वल स्थान मिळवले. गेल्याच आठवड्यात मेस्सीने बॅलन डीओर पुरस्काराने गौरविण्यात आले. रोनाल्डोच्या नावावर ला-लीगामध्ये 34 हॅट्ट्रिकची नोंद आहे.\nमेस्सीच्या या मोसमातील गोल संख्या बारा झाली आहे. बार्सिलोनाकडून वेगवेगळ्या लीगमध्ये खेळताना मेस्सीच्या नावावर आता 431 गोल जमा झाले असून त्याने गोलच्याबाबत देखील रोनाल्डोला मागे टाकले आहे. रोनाल्डोच्या नावावर या स्पर्धेत 426 गोल आहेत.\nधोनीच्या विजयी षटकाराचा चेंडू सापडला\nलक्षवेधी : केवळ रेटिले बहुमता\nदखल : कांद्याचं रडगाणं\nनिवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांक उसळले\nमास्कवरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/governments-tariff-new-private-hospitals-unjust-opposition-ima-only-interests-corporate", "date_download": "2020-09-26T01:42:37Z", "digest": "sha1:LKDDVKG5BS5R2XJ5BJS7CSSAH7I6BUFO", "length": 17407, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "सरकारचे खासगी रुग्णालयांसाठीचे नवे दरपत्रक अन्यायकारक! आयएमएचा विरोध; केवळ काॅर्पोरेट रुग्णालयांचे हित | eSakal", "raw_content": "\nसरकारचे खासगी रुग्णालयांसाठीचे नवे दरपत्रक अन्यायकारक आयएमएचा विरोध; केवळ काॅर्पोरेट रुग्णालयांचे हित\nराज्य सरकारने खासगी रूग्णालयांसाठी जाहीर केलेल्या नव्या दर पत्रकाला इंडियन मेडीकल असोसिएशन, महाराष्ट्रने विरोध केला आहे\nमुंबई : राज्य सरकारने खासगी रूग्णालयांसाठी जाहीर केलेल्या नव्या दर पत्रकाला इंडियन मेडीकल असोसिएशन, महाराष्ट्रने विरोध केला आहे. नवे द पत्रक आयएमएला विचारात न घेता जाहीर करण्यात आले. त्यामुळे छोट्या रूग्णालयांवर अन्याय होणार असल्याचे आयएमएने म्हटले आहे.\nमुंबईच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे यांची नेमणूक; वाचा सविस्तर बातमी\nसार्वजिनक आरोग्य विभागामार्फत राज्य सरकारने अधिसूचना जारी करत खासगी रूग्णालयांच्या दर पत्रकाला मुदतवाढ दिली आहे. यापुर्वी 80 टक्के खाटांवर सरकारचे नियंत्रण होते. नव्या दरपत्रकामध्ये नॉन कोव्हिडच्या खाटांमध्ये सरकारने 50 टक्के सुट दिली आहे. हा निर्णय केवळ मुंबई क्षेत्रातील मोठ्या कॉर्पोरेट रूग्णालयांना फायदेशीर ठरेल, असे आयएमएचे म्हण्णे आहे. नव्या दरपत्रकामुळे एकाच वेळी नॉन कोव्हिड आणि कोव्हिड असे दोन्ही रूग्ण मोठ्या कॉर्पोरेट रूग्णालयांत उपचार घेऊ शकतात. मात्र, लहान आणि मध्यम स्वरूपाच्या रूग्णालयांमध्ये असे वेगळे विलगीकरण शक्य नाही. त्यामुळे 50 टक्के खाटांपर्यंतची दिलेली शिथिलता ही केवळ कॉर्पोरेट रूग्णालयांच्या सोईसाठी करण्यात आल्याचा आरोप आयएमएने केला आहे.\nयेत्या दोन दिवसात अंतिम परीक्षाबाबत निर्णय येणार, उदय सामंत यांची माहिती\nसरकारच्या अधिसुचनेत ऑक्सिजन, पीपीई कीट या बाबींवर रूग्णालयांचा मोठा खर्च होत असल्याचे म्हटले आहे. या सर्व गोष्टींवर चर्चा कऱण्यासाठी आयएमएने सरकारला वारंवार विनंती केली. मात्र, सरकारने कुठलीही चर्चा न करता नवी अधिसूचना काढून एकतर्फी दरपत्रक जाहीर केले, अशी नाराजी आयएमएने व्यक्त केली. नव्या दरपत्रकाचे पालन करणे छोट्या खासगी रूग्णालयांना अशक्य असून या दरांप्रमाणे काम केल्यास खासगी रूग्णालये टिकू शकणार नाहीत, अशी भिती ही आयएमएने व्यक्त केली आहे.\nथोडी लक्षणं दिसली तरी लगेच उपचार करा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन\nपीपीई किट, मास्कचे दर अनियंत्रित\nरूग्णांना अवाजवी भुर्दंड बसू नये यासाठी सरकारने पीपीई कीट ,मास्क यांच्या दरांचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. सरकार कितीही दावे करत असले तरी आज केवळ कागदोपत्री हे दर नियंत्रित असल्याचा, आरोप आयएमएने केला आहे. बाजारात पीपीई कीट आणि मास्कच्या किंमती अनियंत्रित आहेत. त्याऐवजी रूग्णालयांवर बंधन टाकली जात आहेत. मात्र, यासह आॅक्सिजनला लागणारा खर्च छोटी रूग्णालये आणणार कुठून असा प्रश्नही आयएमएने उपस्थित केला आहे.\nराज्य सरकारने येत्या दोन दिवसांत चर्चा कऱण्यासाठी तातडीची बैठक घ्यावी. आम्ही जनतेसाठी उभे आहोत. हे एकतर्फी निर्णय आम्हाला मान्य नाहीत. अशा प्रकारच्या एकतर्फी, अव्यवहार्य नियमांनूसार रूग्णालयांवर सक्ती केल्यास सर्व ड़ॉक्टरांना सोबत घेऊन पुढे काय पावले उचलायची, यावर आयएमए गांभिर्याने विचार करेल.\n- डॉ. अविनाश भोंडवे,\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसांगलीत कोरोना उपचाराच्या ऑडिटसाठी 22 समित्या : डॉ. संजय साळुंखे\nसांगली : कोरोना रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांचे काटेकोर परीक्षण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका क्षेत्रात 12 आणि जिल्ह्यासाठी 10, अशा एकूण 22...\nसिंधुदुर्गात खासगी शाळांतील शिक्षकांची घुसमट\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शाळा दीर्घकाळ बंद असल्यामुळे केवळ विद्यार्थी शुल्कावर चालणाऱ्या खासगी आणि विना अनुदानित शाळांमधील शिक्षक आर्थिक अडचणीत...\nकंत्राटी कामगारांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ\nओरोस (सिंधुदुर्ग) - प्रत्येक गावातील सामान्य कुटुंबांपर्यंत स्वच्छतेची चळवळ पोहोचवण्यामध्ये स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे योगदान...\nकृषी कायद्यांबाबत जागरूकता मोहीम राबवा;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nनवी दिल्ली - ज्यांनी आतापावेतो शेतकऱ्यांना फक्त खोटे बोलून त्यांची दिशाभूल केली तेच आता नव्या कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांच्याच खांद्यावर बंदूक...\nएच-१ बी व्हीसामध्ये १५ कोटी डॉलर गुंतवणार\nवॉशिंग्टन - मध्यम ते उच्च कौशल्य आवश्‍यक असलेल्या एच-१ बी व्हीसा क्षेत्रात प्रशिक्षणासाठी अमेरिका सरकार १५ कोटी डॉलर गुंतवणूक करणार आहे. एच-१ बी...\nपुणे : ५८ वर्षानंतर झेडपी अध्यक्षांच्या बंगल्याचं झालं 'बारसं'\nपुणे : जिल्हा परिषदेच्या पुण्यातील सरकारी बंगल्याला आता 'शिवाई' हे नाव देण्यात येणार आहे. या नव्या नावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/satara/satara-flamingo-right-shelter-suryachiwadi-342046", "date_download": "2020-09-26T03:26:49Z", "digest": "sha1:HJUGPLRA4BINLBQ4NRXHY3UANQFPBI3V", "length": 16105, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "सूर्याचीवाडीत फ्लेमिंगोना मिळाला हक्काचा निवारा | eSakal", "raw_content": "\nसूर्याचीवाडीत फ्लेमिंगोना मिळाला हक्काचा निवारा\nसूर्याचीवाडी (ता. खटाव) तलावात फ्लेमिंगो पक्षी दाखल होत आहेत. सल्याची सर्वप्रथम नोंद सुरवातीपासून दै. \"सकाळ'ने घेतली. दरवर्षी दाखल झालेल्या पक्ष्यांच्या नोंदी ठेवत त्याचे वृत्ताकंन केल्याने जगाच्या नकाशावर \"मायणी पक्षी संवर्धन राखीव' अंतर्गत हा तलाव राखीव केला जाणार आहे.\nकलेढोण (जि. सातारा) : पश्‍चिम महाराष्ट्रात अवघ्या दहा ते 12 एकर क्षेत्रावर असलेल्या सूर्याचीवाडी (ता. खटाव) तलावात फ्लेमिंगो पक्षी दाखल होत असल्याची सर्वप्रथम नोंद सुरवातीपासून दै. \"सकाळ'ने घेतली. दरवर्षी दाखल झालेल्या पक्ष्यांच्या नोंदी ठेवत त्याचे वृत्ताकंन केल्याने जगाच्या नकाशावर \"मायणी पक्षी संवर्धन राखीव' अंतर्गत हा तलाव राखीव केला जाणार आहे.\nपश्‍चिम महाराष्ट्रात पाणपक्षी व विदेशी पक्षी संवर्धनासाठी \"मायणी समूह पक्षी संवर्धन राखीव' ही संकल्पना वन विभागाने आखली आहे. याबाबत मायणीत कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्‍लेमेट बेन यांनी नुकतीच बैठक घेतली. त्यात मायणी, कानकात्रे, येरळवाडी व सूर्याचीवाडी या तलावांचा समावेश करण्यात आला. सूर्याचीवाडी गावाच्या हद्दीत दक्षिण-पूर्व भागात एकूण तीन तलाव आहेत. त्यातील तलाव क्रमांक दोन हा फ्लेमिंगोसाठी प्रसिद्ध आहे. उथळ पाणी, मुबलक खाद्यान्नामुळे हे फ्लेमिंगो (रोहित, अग्नीपंख) यांचे हे आवडते ठिकाण झाले आहे. यावर्षी 20 फेब्रुवारीला तब्बल 80 फ्लेमिंगोंनी तलावावर हजेरी लावली. याबाबत \"सकाळ'ने वृत्तांकन करत त्याला महाराष्ट्रभर प्रसिद्धी दिली होती.\nसुरवातीपासून प्रसिद्धीपासून दुरावलेल्या या तलावाकडे पश्‍चिम महाराष्ट्रातील पक्षिमित्र, निरीक्षक व अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले. याच तलावात फ्लेमिंगोसह चित्रबलाक, नंदीमुख, काळा शराटी, नदीसुरय, चमच्या, चांदवा, चक्रवाक, शेकाट्या आदी स्थानिक पक्ष्यांचा आदिवास आहे. सुमारे 10 ते 12 एकर क्षेत्रावर असलेल्या तलावातील उथळ पाण्यात ओटेलिया, शैवाल, छोटे मासे, कीटक, सूक्ष्मजीवासह पाणवनस्पतींचा समावेश असल्याने तलावात पक्ष्यांचा आदिवास कायम असतो. तलावातील उत्तर-दक्षिण भागात उथळ पाण्यात अन्नाच्या शोधात फ्लेमिंगोंचे थवे पाहताना पक्षिप्रेमींचे मन मोहून जाते. \"सकाळ'ने लक्ष वेधून घेतल्यानंतर हा तलाव वन विभागाच्या मदतीने फ्लेमिंगोंच्या हक्काचा होणार आहे.\nदै. \"सकाळ'ने या तलावाला फ्लेमिंगो तलाव म्हणून नावारूपाला आणले. सांगली, पुणे, कोल्हापूर, मुंबईतून पक्षिमित्र दाखल होत असल्याने युवकांना व्यावसायिक वृद्धीसाठी चांगली संधी मिळाली आहे.\n- तौफिक तांबोळी, हॉटेल व्यावसायिक, सूर्याचीवाडी\nशेताजवळ तलाव असल्याने अनेक पक्षिप्रेमी दरवर्षी दाखल होत असताना पाहावयास मिळतात. आमच्याच परिसरात तलाव असल्याने त्याचा नावलौकिक वाढल्याचे समाधान आहे.\n- गुलाबराव जगदाळे, पोलिस पाटील, सूर्याचीवाडी\nसंपादन ः संजय साळुंखे\nसाताऱ्यात पंधरा दिवसांत चांगले परिणाम दिसतील; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विश्वास\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 26 सप्टेंबर\nपंचांग शनिवार - अधिक अश्विन शुद्ध 10, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.27, चंद्रोदय दुपारी 2.10, चंद्रास्त रात्री...\nVideo : महाबळेश्वरमध्ये दाटली धुक्याची दुलई\nसातारा : महाराष्ट्रातील काश्मीर असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. याच महाबळेश्वरमध्ये सध्या धुक्याची दुलई पहायला मिळत असून येथील वातावरण...\nसौरचक्राचा परिणाम जीवसृष्टीवर होणार\nपुणे : पृथ्वीवरील हवामानात जसे बदल होतात, तसेच सुर्यावरील किंवा अवकाशातील हवामानातही बदल होतात. 25व्या सौरचक्राला डिसेंबर 2019 पासून सुरवात...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 25 सप्टेंबर\nपंचांग - शुक्रवार - अधिक अश्‍विन शु.9, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.28, चंद्रोदय स. 8.04, चंद्रास्त रा. 8.21,...\nअधिक मास म्हणजे नेमकं काय; तो कसा मोजला जातो\nनागपूर - नुकताच पितृपक्ष संपून अधिक मास सुरू झालाय. या काळात अनेकजण धार्मिकतेकडे झुकलेले पाहायला मिळतात. अनेकजण व्रतवैकल्य करताना दिसतात. याला काही...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 24 सप्टेंबर\nपुणे- पंचांग - गुरुवार, अधिक अश्विन शु. 8, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सुर्योदय 6.26, सूर्यास्त 6.29, दुर्गाष्टमी, चंद्रोदय दु 1.14,...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/others/municipality-uncleanness-in-premises/articleshow/72232913.cms", "date_download": "2020-09-26T03:22:13Z", "digest": "sha1:32ZS3NIJG3VP35WXMTFM7RDR7FEZE4SR", "length": 8384, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालय आवारात पाण्याचे कारंजे बंद असून, तेथे दलदल, अस्वच्छता आहे. भंगार गाडी व समान पडून आहे. तरी लवकर सफाई करण्यात यावी.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nवाहतूक नियमांचे उल्लंघन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nसिनेन्यूजमाझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा\nनाशिकराज्यात रुग्ण वाढत असताना नाशिकनं दिली दिलासादायक बातमी\nपुणेडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ही' मागणी\nमुंबईकंगना प्रकरण: हायकोर्टाने BMC कडे मागितले 'या' तीन मुद्द्यांचे स्पष्टीकरण\nआयपीएल २०२०Chennai vs Delhi: दिल्लीने गड राखला, बलाढ्य चेन्नईवर साकारला विजय\nकोल्हापूरपोटच्या १० वर्षांच्या मुलाला ५ लाखात तृतीयपंथीयास दिले दत्तक\nमुंबईड्रग्ज प्रकरण: NCB चे अधिकारी तुरुंगात जाऊन शौविकचा जबाब घेणार\nनागपूरविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोटींचा, प्रस्ताव पाठवला\nविज्ञान-तंत्रज्ञानसॅमसंगने आणले AI पॉवर्ड वॉशिंग मशीन, मोबाइलने करा कंट्रोल\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-26T02:56:57Z", "digest": "sha1:EUHS4YUPZTHGGTNKHKM5AXGS7S5LIAG2", "length": 9843, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळचा जिल्हाधिकार्‍यांसह जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतला आढावा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nभुसावळचा जिल्हाधिकार्‍यांसह जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतला आढावा\nशासकीय विश्रामगृहात अधिकार्‍यांची बैठक : नागरीकांना घरातच राहण्याचे केले आवाहन\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळ : शहरातील समता नगरपाठोपाठ सिंधी कॉलनीत कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शहराला भेट दिली. शासकीय विश्रामगृहात प्रशासनातील अधिकार्‍यांसोबत बैठक घेत उभयंतांनी जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी तसेच समता नगर भागात पाहणी करीत अधिकार्‍यांना उपाययोजनांबाबत काही सूचना केल्या.\nशासकीय विश्रामगृहात अधिकार्‍यांसोबत बैठक\nशहरातील शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. शहरात दोन भाग सील करण्यात आल्याने नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासह आरोग्य विभागाकडून होणार्‍या उपाययोजनांबाबत प्रसंगी माहिती जाणून घेण्यात आली तसेच प्रशासनाला काही सूचनाही करण्या आल्या. प्रसंगी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक धीवरे, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, मुख्याधिकारी करुणा डहाळे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, शहराचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आदींची उपस्थिती होती.\nकंटेटमेंट झोनची केली पाहणी\nसमता नगरासह सिंधी कॉलनीत कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने हा भाग पूर्णपणे सील केला असून अतिअत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही या भागात जाण्या-येण्यास मनाई करण्यात आली आहे. सोमवारी जिल्हाधिकार्‍यांनी या भागाची पाहणी करून अधिकार्‍यांना सूचना केल्या. प्रसंगी आमदार संजय सावकारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.\nलॉकडाउन : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सर्व राज्यांचे कौतुक\nकन्हाळे खुर्दमध्ये जुगाराचा डाव उधळला : सहा आरोपी जाळ्यात\nभारतात कोरोना चाचणीचा नवा विक्रम; एका दिवसात विक्रमी चाचणी\nBIG BREAKING: बिहार निवडणुकीची घोषणा: तीन टप्प्यात होणार मतदान\nकन्हाळे खुर्दमध्ये जुगाराचा डाव उधळला : सहा आरोपी जाळ्यात\nवेल्हाळे शिवारात कुजलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आढळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/art", "date_download": "2020-09-26T01:47:43Z", "digest": "sha1:F65FLDNQCOR33O3AP3ONONXWBNCYGCJH", "length": 6464, "nlines": 143, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईतील विविध कला, शिल्प, पुतळे, विविध पारंपारिक मूर्ती, कलाकार, कलाकृती आणि त्यांच्याशी संबंधित बातम्या", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nयंदा ढोल-ताशांचा आवाज म्यूट\nजागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या शुभेच्छा\n१० वर्षांची भटकंती, चित्रातून साकारला गड-किल्ल्यांचा वैभवशाली इतिहास\nस्वराज्याच्या इतिहासाचं नुकसान ही शोकांतिकाच- बाबासाहेब पुरंदरे\n'काळा घोडा फेस्टिव्हलला' या ५ कारणांसाठी भेट द्या\nकला, संगीत आणि नृत्याचा अविष्कार म्हणजे 'काळा घोडा फेस्टिव्हल २०२०'\nमराठीला पाठदुखीचा त्रास, महेश केळुसकरांचं मराठी साहित्य संमेलन अध्यक्षांना जाहीर पत्र\nधमकी मिळूनही ना.धों. महानोर साहित्य संमेलनाला जाणार\nचीनच्या नावावर असलेला विश्वविक्रम भारतानं मोडला\nमानसिक आजारांवर आधारित मानसशास्त्रीय भय पुस्तक\nसाहित्य संमेलन: ख्रिश्चन व्यक्ती अध्यक्षपदी कशाला फ्रान्सिस दिब्रिटो यांना हटवण्यासाठी धमक्यांचे फोन\nढोल ताशाला चढली 'गेम ऑफ थ्रोन्स'ची झिंग\n१२५ फूट साडीवर साकारला जिजाऊंचा जीवनप्रवास\nवांद्रे स्थानकाच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारे 'हेरिटेज प्रदर्शन'\nसाहित्य संमेलनाचं उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नीच्या हस्ते\nश्रीपाद जोशी यांचा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा\nअरूणा ढेरेंनी संमेलनावर बहिष्कार टाकावा - भालचंद्र मुणगेकर\nनयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही - राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2010/11/blog-post.html", "date_download": "2020-09-26T00:57:56Z", "digest": "sha1:AD32GLIUZ2JT75VL6MBFKFPZ67TQCIHZ", "length": 16402, "nlines": 173, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: बिनडोक महापालिका...", "raw_content": "\nवाहतूक सुधारण्यासाठी रस्ता दुभाजक हा अतिशय महत्वाचा घटक असतो हे फारसे कधी लक्षात घेतले जात नाही.\nरस्ता दुभाजक कशासाठी असतो\n- रस्त्याचे दोन सारखे भाग करणे आणि जायला-यायला गाड्यांना मार्ग ठरवून देणे.\n- कोणत्याही गाडीने अचानक उजव्या बाजूला वळू नये आणि आणि वाहतुकीची शिस्त मोडू नये.\n- कोणताही पादचारी अचानक रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या मध्यात येऊ नये.\n- एकूणच वाहतूक निर्वेधपणे आणि शिस्तबद्ध रितीने सुरु राहावी यासाठी रस्ता दुभाजक अतिशय महत्वाचे असतात.\nरस्ता दुभाजक कसा असावा यावर आजपर्यंत कोणी फार विचार केल्याचे ऐकिवात नाही... वाहतुकीची शिस्त पाळण्यासाठी रस्ता दुभाजकाचे असलेले अनन्यसाधारण महत्व आजवर दुर्लक्षितच राहिले आहे. त्यातच पुणे महापालिकेने ज्या “कलात्मक” पद्धतीने रस्ता दुभाजकांमध्ये वैविध्य ठेवले आहे, ते पाहता रस्ता दुभाजक ही रस्त्याच्या मध्यभागी उभारलेली एक अडगळीची किंवा काही ठिकाणी शोभेची गोष्ट आहे असे वाटते.\nपुणे महापालिकेच्या कामाला निर्बुद्धपणा म्हणावा की निष्काळजीपणा की दोन्ही.. (तीच शक्यता अधिक आहे..\nपुण्यातल्या रस्ता दुभाजकांची काही खास उदाहरणे मी आपल्यासमोर मांडू इच्छितो.\n१) कर्वे रस्ता- खंडुजीबाबा चौक ते एसएनडीटी (पौड फाटा)\nअनेक वर्षांपूर्वी या रस्त्यावर उंच रस्ता दुभाजक होता. उंच आणि अरुंद त्यामुळे रस्ता दुभाजक रस्त्याचा कमी भाग व्यापत. ३-४ फूट उंच अशा या दुभाजकांमुळे समोरून येणाऱ्या गाड्यांचे प्रखर प्रकाश झोत आपल्या डोळ्यात जात नसत. तसेच अशा उंच दुभाजकांमुळेच पादचारीही वाट्टेल तिथून रस्ता ओलांडत नसत. त्याचवेळी एस एन डी टी येथे रस्ता ओलांडण्यासाठी एक उंच पूल उभारण्यात आला. अनेक वर्ष उलटून गेल्यामुळे इथला जुना रस्ता दुभाजक खराब झाला. त्यामुळे या संपूर्ण रस्त्यावर नवा रस्ता दुभाजक टाकण्यात आला. सध्या या दुभाजकाची उंची १-१.५ फूट आहे. कोणताही पादचारी वाट्टेल तिथे सहजपणे पाय टाकून रस्ता ओलांडू शकतो. याच्यावर बसवलेले रिफ्लेक्टर केव्हाच खराब झाले आहेत. रात्रीच्या वेळी समोरच्या वाहनांचा प्रकाश झोत थेट डोळ्यात जातो. एकूणच हा रस्ता दुभाजक अत्यंत निर्बुद्ध पद्धतीने बसवण्यात आल्याचे स्पष्ट होते.\n२) कर्वे रस्ता- कर्वे पुतळा ते शिवाजी पुतळा.\nया रस्त्यावर पक्का रस्ता दुभाजक नाही. सिमेंट चे ठोकळे रस्त्यावरच आडवे टाकण्यात आलेले आहेत. त्यातील काही आपली रांग सोडून बेशिस्त पद्धतीने बाहेरही आलेले आहेत. रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशात या ठोकळ्यांना धडकून पडण्याचे चार चाकी गाड्यांचे नुकसान होण्याचे प्रकार अधून मधून घडत असतात. महापालिकेच्या निर्बुद्ध आणि निष्काळजीपणाची हद्द...\nपौड रोड चे काम गेले अनेक वर्ष सुरूच आहे. तिथे राहणाऱ्यांनाही ते कधीपासून सुरु आहे ते आठवत नसावे नव्यानेच होत असलेल्या किंवा झालेल्या या रस्त्यावर वरीलप्रमाणेच सिमेंट चे ठोकळे रस्ता दुभाजक म्हणून ठेवण्यात आले आहेत. फरक इतकाच की पौड रस्त्यावरचे हे ठोकळे जमिनीत पक्के करण्यात आलेले आहेत. एकूणच कर्वे रस्त्याप्रमाणेच इथेही पादचारी वाट्टेल तिथून रस्ता ओलांडत वाहन चालकांची परीक्षा पाहतात. पहिल्या लेन मधून नेहमीच वाहतुकीचा वेग जास्त असतो. अपघात होऊन एखाद्या नागरिकाला प्राण गमवावा लागल्यावरच महापालिका जागी होणार आहे का\n४) दांडेकर पूल ते पानमळा\nहा रस्ता सिमेंट चा होऊन अनेक वारस उलटली. तेव्हाच हा रस्ता दुभाजक एखाद्या फुटपाथ सारखा का बनवण्यात आला हे खरोखरच न उलगडणारे कोडे आहे. वाट्टेल तेथून रस्ता ओलांडणारे पादचारी, या रस्ता दुभाजकावर खेळणारी लहान मुले, किंवा तेथेच निवांत झोप काढणारे लोक या सगळ्यामुळे येथून गाडी चालवणे मोठे जिकीरीचे काम असते.\n५) औंध रस्ता आणि बाणेर रस्ता\nकाहीच वर्षांपूर्वी नव्याने करण्यात आलेले हे दोन प्रशस्त रस्ते. इथले रस्ता दुभाजक पौड रस्त्याप्रमाणेच करण्यात आले याचे कारण निष्काळजीपणा पेक्षा निर्बुद्धपणाच आहे. इथले रस्ता दुभाजक हे उंच आणि मध्ये झाडे लावता येण्या योग्य असे रुंदही करता आले असते. पण महापालिकेला विचार करायची इछाच नाही की काय असा प्रश्न पडतो.\n\"कॉमन सेन्स\" या सदराखाली मोडणारा विचारही महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक करत नाही याची प्रचीती फक्त रस्ता दुभाजकांकडे बघितल्यावरही येते...\n(मी जेव्हा \"महापालिका\" असे म्हणतो तेव्हा त्यात जसे प्रशासकीय अधिकारी येते तसेच नगरसेवक म्हणजेच लोकप्रतिनिधीही, येतात. कोणत्याही एकाच घटकाला पूर्ण दोष देणे अयोग्य ठरेल.)\nजसे निर्बुद्ध पद्धतीने लावलेले रस्ता दुभाजक आहेत तसेच काही ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे रस्ता दुभाजकही आहेत. त्याची नोंद करणे आवश्यक आहे.\n१) कर्वे रस्ता- पौड फाटा ते कर्वे पुतळा\n२) दांडेकर पूल ते सारसबाग.\n३) औंध- ब्रेमेन चौक ते परिहार चौक.\nअशा प्रकारचे रस्ता दुभाजक सर्वच जागी लावणे आवश्यक आहे. अर्थात योग्य त्या अंतरावर पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडण्याची जागा सोडणे आवश्यक आहे. दांडेकर पूल ते सारसबाग रस्त्यावर अशा जागा सोडण्याचा अतिरेक झाला आहे. दर दहा फुटावर रस्ता ओलांडण्याची जागा. याउलट परिस्थिती कर्वे रस्त्यावर पौड फाटा ते कर्वे पुतळा या भागात होती. रस्ता ओलांडायला जागाच नव्हती. अशा गोष्टी टाळून मध्यम मार्ग स्वीकारत रस्ता दुभाजक उभारले पाहिजेत.\n\"रस्ता दुभाजक\" हे महापालिकेच्या निर्बुद्धपणाचे एक प्रातिनिधिक उदाहरण झाले. अशीच इतर असंख्य उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसतात. अशा प्रकारची इतर उदाहरणे पुढच्या लेखांमधून द्यायचा माझा प्रयत्न असेल.\n\"असल्या फंदात पडू नकोस...\"\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (6)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esuper9.com/2020/07/indurikar-maharaj.html", "date_download": "2020-09-26T01:06:47Z", "digest": "sha1:VJOY2KYPUWCMDGBHWLJBCYX5ANUJVAGV", "length": 12598, "nlines": 100, "source_domain": "www.esuper9.com", "title": "इंदुरीकर महाराजांना कोर्टाचे समन्स, ७ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश - esuper9", "raw_content": "\nHome > खळबळ जनक > इंदुरीकर महाराजांना कोर्टाचे समन्स, ७ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश\nइंदुरीकर महाराजांना कोर्टाचे समन्स, ७ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश\nइंदुरीकर महाराजांना कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यानुसार त्यांना ७ ऑगस्टला कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे. प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या किर्तनात एक दावा केला होता जो त्यांना चांगलाच भोवला आहे. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवर संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला होताच. आता कोर्टाने त्यांना समन्सही बजावलं आहे.\n‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. इंदुरीकर यांच्या किर्तनाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली होती.\n१७ फेब्रुवारी रोजी या संदर्भातली माहिती समोर आली होती. इंदुरीकर महाराजांची एक व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली. ज्यात ते म्हणतात.. “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते” या वक्तव्यावरुन फेब्रुवारी महिन्यात मोठा वाद झाला होता.\nइंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम २२ चं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार अहमदनगर येथील PCPNDT च्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीसही पाठवली होती. त्या नोटीशीला इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडत उत्तर दिलं होतं. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल, असंही म्हटले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आता त्यांना कोर्टाने समन्स बजावलं असून ७ ऑगस्ट रोजी या प्रकरणी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आता कोर्टात इंदुरीकर महाराज नेमकी काय बाजू मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/suspicious-role-of-producer-sandip-singh-in-sushant-singh-rajput-death-case-127640651.html", "date_download": "2020-09-26T01:52:00Z", "digest": "sha1:5HUWDNKIWU6P2ZJ32CKKOMA2G7EEAMNM", "length": 10754, "nlines": 78, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Suspicious Role Of Producer Sandip Singh In Sushant Singh Rajput Death Case | सुशांतचा मृतदेह बघून मुंबई पोलिसांना थम्स अप दाखवणा-या संदीप सिंहचे अखेर सत्य काय? एकेकाळी विकायचा आईस्क्रीम मग बनला निर्माता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंशयाच्या भोव-यात सुशांतचा 'मित्र':सुशांतचा मृतदेह बघून मुंबई पोलिसांना थम्स अप दाखवणा-या संदीप सिंहचे अखेर सत्य काय एकेकाळी विकायचा आईस्क्रीम मग बनला निर्माता\nया प्रकरणात संदीपची भूमिका अत्यंत संशयास्पद मानली जाते.\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा सीबीआयने तपास सुरु केला आहे. याप्रकरणी सर्वप्रथम सुशांतचा कुक नीरजची चौकशी केली गेली. आजही ही चौकशी सुरु आहे. सोबतच आज सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानी यालादेखील चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांनुसार, सीबीआय सुशांतचा मित्र असल्याचा दावा करणा-या संदीप सिंहचीही चौकशी करण्याची तयारी करत आहे. या प्रकरणात संदीपची भूमिका अत्यंत संशयास्पद मानली जाते.\n14 जून रोजी सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वांद्रेच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचलेल्यांपैकी संदीप हा पहिला होता. संदीपचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सुशांतचा मृतदेह बघून मुंबई पोलिसांना थम्स अप दाखवताना दिसतोय. याशिवाय नॅशनल टेलिव्हिजनवर संदीप वारंवार आपले वक्तव्य बदलत आहे. त्यामुळे त्याची भूमिका अधिकच संदिग्ध बनली आहे.\nसंदीपला ओळखत नाही सुशांतचे कुटुंबीय\nसुशांतचे कौटुंबिक वकील विकास सिंह यांनीही म्हटले आहे की, \"संदीपला कुटूंबातील कोणताही सदस्य ओळखत नाही.\" जेव्हा सुशांतच्या मृत्यूची बातमी समोर आली तेव्हा संदीप तिथे पोहोचला.\nसुशांतचा मृतदेह पाहून त्याची बहीण मितू अतिशय खचून गेली होती, तेव्हा संदीप तिला सावरण्यासाठी पुढे आला होता. इतकेच नाही तर त्याला प्रत्येक गोष्टीत पुढे येण्याची संधी मिळाली. संदीपने या संधीचा फायदा घेतला. संदीप पोस्टमॉर्टमपासून ते अंत्यसंस्कारापर्यंत सर्व गोष्टींमध्ये सामील होता.\n14 जून रोजी मितू सिंहसोबत संदीप\nअनेक माध्यमांच्या मुलाखतीत त्याने सुशांतला आपला भाऊ म्हटले. सुशांतच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी तो पाटण्यातही गेला होता आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला.\nसोशल मीडियावरील सुशांतचे चाहतेही सतत संदीपबद्दल संताप व्यक्त करत आहेत, यामुळे संदीपने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरील कमेंट सेक्शन बंद केले आहे.\nएकेकाळी आईस्क्रीम विकायचा, आता बनला निर्माता\nबिहारच्या मुझफ्फरपूर येथे जन्मलेला संदीप लहान वयातच आपल्या कुटूंबासह मुंबईला आला.\nत्याचे सुरुवातीचे शिक्षण मुंबई येथे झाले, परंतु गरिबीमुळे त्याला शिक्षण पूर्ण करता आले नाही. संदीपने ट्यूशन घेऊन रस्त्यावर आईस्क्रीम विकून आपला उदरनिर्वाह चालवला.\nयानंतर 2001 मध्ये संदीपने पत्रकार म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तो एका रेडिओ वाहिनीमध्ये शो प्रोड्युसर बनला. यानंतर त्याला यश मिळू लागले.\nत्यानंतर त्याला रेडिओ मिर्चीचा एंटरटेनमेंट हेड बनवण्यात आले. 2008 मध्ये, 38 वर्षीय संदीपने कलर्स चॅनेलसाठी डान्सिंग क्वीन हा पहिला स्वतंत्र शो केला होता.\nयानंतर संदीप 2011 मध्ये भन्साळी प्रॉडक्शनचा सीईओ झाला.\nभन्साळी प्रॉडक्शनमध्ये राहून संदीपने राउडी राठोड, शिरीन फरहाद की तो निकल पाडी, राम लीला, मेरी कोम आणि सरस्वतीचंद्र (2013) या मालिकेची सहनिर्मिती केली.\n2015 मध्ये निर्माता म्हणून संदीपने अलीगड, सरबजीत, भूमी आणि पीएम नरेंद्र मोदी सारख्या चित्रपटांची निर्मिती केली.\nएकेकाळी संदीप सुशांत-अंकिताचा कॉमन फ्रेंड होता संदीप\nकाही माध्यमांच्या मुलाखतींमध्ये 38 वर्षीय संदीपने असे सांगितले आहे की, ऑक्टोबर, 2019 पासून तो सुशांतच्या संपर्कात नव्हता, परंतु तो त्याच्या जवळच्या व्यक्तींपैकी होता. तो सुशांत आणि त्याची पुर्वाश्रमीची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांचा कॉमन फ्रेंड आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर संदीपने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले ज्यामध्ये तो सुशांत आणि अंकितासोबत दिसला. सुशांत-अंकिता 2016 पर्यंत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यावेळी हा फोटो घेण्यात आला होता.\nसुशांत-अंकिता 2016 पर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते आणि हा तेव्हाचा फोटो आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/first-positive-then-negative-and-again-positive-message-325140", "date_download": "2020-09-26T01:21:03Z", "digest": "sha1:Z5URYBK6D5GEHVNAPC7CR4QY3LSBRVAY", "length": 16411, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "जीवाशी खेळ...आधी पॉझिटिव्ह, मग निगेटिव्ह अन् पुन्हा घडले भलतेच | eSakal", "raw_content": "\nजीवाशी खेळ...आधी पॉझिटिव्ह, मग निगेटिव्ह अन् पुन्हा घडले भलतेच\nआधी पॉझिटिव्ह सांगितले, आता निगेटिव्हचा मॅसेज आला, आम्हांला पॉझिटिव्ह पेशंटसोबत का ठेवले, असा जाब डॉक्टरांना विचारण्यात आला. काही काळ हा गोंधळ सुरू होता. दरम्यान, त्यांना पुन्हा पॉझिटिव्ह असल्याचा मेसेज आला.\nऔरंगाबाद ः अॅन्टीजेन चाचण्यांसंदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम असून, कुठलाही त्रास नसताना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचे आक्षेप वारंवार घेतले जात आहेत. दरम्यान, सातारा, चिकलठाणा परिसरातील काही व्यापाऱ्यांना तपासणीनंतर अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. कोविड केअर सेंटरमध्ये भरतीही करण्यात आले. नंतर मात्र मोबाईलवर एसएमएस निगेटिव्ह असल्याचा देण्यात आल्या. त्यामुळे संबंधितांनी सेंटरमध्येच गोंधळ घालत तेथील डॉक्टरांना जाब विचारला. या गोंधळानंतर पुन्हा पॉझिटिव्ह असल्याचा मेसेज देण्यात आला.\nअॅन्टीजेन चाचणीत काही ठिकाणी प्रत्यक्षात व मेसेजमध्ये तफावत आढळून येत आहे. सातारा परिसरातील तक्षशिलानगर येथील हायकोर्ट कॉलनीतील नागरिक व विक्रेत्यांची २० जुलैला अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यात आली. त्यावेळी आठ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तोंडी सांगण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांची टेस्ट करण्यात आली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. ज्या आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह होते त्यातील सहा जणांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तर दोघांना एमआयटी कॉलेजमधील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले.\nऔरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nतथापि, बुधवारी (ता. २२) त्यांना मोबाईलवर तुम्ही निगेटिव्ह असल्याचा मॅसेज प्राप्त झाला. त्यामुळे धक्का बसलेल्या नागरिकांनी कोविड केअर सेंटरमध्ये गोंधळ घातला. आधी पॉझिटिव्ह सांगितले, आता निगेटिव्हचा मॅसेज आला, आम्हांला पॉझिटिव्ह पेशंटसोबत का ठेवले, असा जाब डॉक्टरांना विचारण्यात आला. काही काळ हा गोंधळ सुरू होता. दरम्यान, त्यांना पुन्हा पॉझिटिव्ह असल्याचा मेसेज आला. मग तर आणखीनच गोंधळ उडाला.\nएकाच मोबाइल नंबरमुळे गडबड\nप्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, चाचणीच्या वेळी काही कुटुंबीयांकडून एकच मोबाइल नंबर दिला जात आहे. त्यामुळे असा प्रकार घडत आहेत. मात्र, पॉझिटिव्ह आलेल्यांना परत मॅसेज पाठविला जात आहे.\nमाजी नगरसेवकाने घातला गोंधळ\nएका माजी नगरसेवकानेही आपल्या भागात असा प्रकार घडल्याचे समोर आल्याने याच कोविड केअर सेंटरमध्ये कार्यकर्ते आणून गोंधळ घातला. तेथील कर्मचाऱ्यांनी आम्ही केवळ उपचार करण्यासाठी येथे आहोत. अहवालाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडचे विचारणा करावी, असे सांगितले. त्यानंतर माजी नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते निघून गेले.\nमराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nचौकशी करण्याची मनसेची मागणी\nहा प्रकार नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा आहे. चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी मनसेचे सुमित खांबेकर यांनी केली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआता घरातील वीज उपकरणे चालू-बंद करा, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून\nऔरंगाबाद : घरातील विविध वीज उपकरणे चालू-बंद करण्यासाठी आता तुम्ही घरी असण्याची गरज नाही. हो अगदी खरे आहे. तुम्ही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून...\nउस्मानाबादेत बारा तासात ४०० रुग्ण झाले कोरोनामुक्त\nउस्मानाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी ४०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच 165 नवीन रुग्णांना कोरोनाची लागन झाली असुन एका कोरोनाबाधिताचा...\nकोरोना योध्दांना अशीही आदरांजली; दळवींचा सायकलीने ४ हजार ‘किमी’चा प्रवास\nजळगाव ः शहीद जवान तसेच कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य बजावताना कोरोनाचे बळी ठरलेले डॉक्टर्स व नर्सेस या कोरोना योद्ध्यांना एक आदरांजली म्हणून अजित...\nCoronavirus : लोहारा तालुक्यात ४० बाधित, दोघांचा मृत्यू\nलोहारा (उस्मानाबाद) : तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील ४८ तासात ४० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून. दोन...\nसमाजाचे तीन आधारस्तंभ हरवले - डॉ. कुमुद पावडे\nनागपूर : मौत तू एक कविता है मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको ही आनंद...\nमराठा आरक्षण : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष नाशिकच्या राज्यव्यापी बैठकीकडे\nनाशिक: (पंचवटी) सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती, त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने युवकांसाठी घेतलेल्या निर्णयाच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/radicalisation-spreading-on-social-media-army-chief-bipin-rawat/", "date_download": "2020-09-26T01:15:59Z", "digest": "sha1:GZJBLAF5MS3FMPNQQZPNCHBNKFNQ2TXB", "length": 13471, "nlines": 156, "source_domain": "www.saamana.com", "title": "सोशल मीडियामुळे दहशतवाद वाढला!: लष्करप्रमुख | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोल्हापूर – 84 लाखांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला अटक\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nसोशल मीडियामुळे दहशतवाद वाढला\nसोशल मीडियामुळे दहशतवाद वाढला, असे मत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे झालेल्या शानदार समारंभात लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते २३ आणि २४ मराठा बटालियनला राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.\nसोशल मीडियाद्वारे अनेकदा दिशाभूल करणारी माहिती वेगाने पसरते. ही माहिती वाचून, पाहून किंवा ऐकून माथी भडकल्याने तरुणांकडून चुका होतात. दहशतवादी कारवाया वाढतात, असे रावत यांनी सांगितले. सैन्य आणि आधुनिक उपकरणे यांचा मेळ साधून दहशतवाद आणि घुसखोरीच्या समस्यांना आळा घालता येऊ शकेल, असे ते म्हणाले. जम्मू-कश्मीरविषयी बोलताना त्यांनी तो देशाचा अविभाज्य भाग आहे आणि हिंदुस्थानचाच राहणार असे सांगितले. डोकलाममध्ये आपले आणि त्यांचे सैन्य आपापल्या हद्दीत असल्याचे ते म्हणाले.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nकोल्हापूर – 84 लाखांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला अटक\nया बातम्या अवश्य वाचा\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/shreehari-on-bjp-govt/", "date_download": "2020-09-26T02:21:22Z", "digest": "sha1:PCXVVEQ6WO7OC6DTXKVLAUWK7FKGZNRW", "length": 17866, "nlines": 159, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘महाराष्ट्र भिकारडे राज्य; विदर्भाचा विकास काय करणार?’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम…\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे…\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\n‘महाराष्ट्र भिकारडे राज्य; विदर्भाचा विकास काय करणार\nमहाराष्ट्र हे भिकारडे राज्य आहे. ते आपल्या विदर्भाचा विकास काय करणार, असा सवाल करत राज्याचे माजी ऍटर्नी जनरल श्रीहरी अणे यांनी फडणवीस सरकारवर आज हल्ला चढवला. ‘हे सरकार तर भिकारडे आहे’ असे जहाल उद्गारही त्यांनी यावेळी काढले.\nस्वतंत्र विदर्भासाठी १ मेपासून विदर्भ राज्य आघाडीने हाती घेतलेल्या रक्ताक्षरी अभियानाचा समारोप आज नागपुरातील संविधान चौकात झाला त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा ३३ हजारांवरून ६६ हजारांवर गेला आहे आणि या भाजप सरकारला ‘बुलेट ट्रेन’ आणण्याची घाई लागली आहे अशा शब्दांत अणे यांनी संताप व्यक्त केला.\nसरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी राज्याच्या उत्पन्नातील ६० टक्के वाटा जातो आहे. उरलेल्या ४० टक्क्यांतील अर्धा पैसा जीएसटीच्या रूपाने केंद्राला जातो आहे असे सांगून ते म्हणाले की, आता सर्व राज्यांना कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. या परिस्थितीमुळेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे भाजपच्या गोटात जाऊन बसले आहेत.\nअच्छे दिन कदापि येणार नाहीत हे जनतेला आता पुरेपूर कळून चुकले आहे. यापुढे भाजपला प्रत्येक निवडणुकीत पराभूत करावे, असे आवाहन अणे यांनी केले. उन्मत्त भाजप कार्यकर्ते आणि त्यांचे पागल झालेले सरकार यांचेच दर्शन जनतेला रोज घडत आहे. गोवंशासाठी माणसे मारली जात आहेत. विरोधी विचारांच्या लोकांनाही संपवले जात आहे. कायद्याविरोधात सगळे घडत आहे.\n– श्रीहरी अणे, माजी ऍटर्नी जनरल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम खान यांची नावे चर्चेत\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे यांचे आदेश\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण...\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nया बातम्या अवश्य वाचा\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम...\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/vidarbha-express-mla-rahul-bendres-wife-purse-has-been-stolen/102270/", "date_download": "2020-09-26T02:02:06Z", "digest": "sha1:26RBP4ORQVFTY7BIUXY5ATRF4SEQC5M7", "length": 13383, "nlines": 124, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Vidarbha express mla rahul bendre's wife purse has been stolen", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई अधिवेशनाला येणाऱ्या आमदारांना चोरीचा फटका; एक्स्प्रेसमधून पत्नीची पर्सच पळवली\nअधिवेशनाला येणाऱ्या आमदारांना चोरीचा फटका; एक्स्प्रेसमधून पत्नीची पर्सच पळवली\nविदर्भ एक्स्प्रेसमध्ये चक्क आमदाराच्या वस्तूंची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांच्या पत्नीची पर्स एक्स्प्रेसमधून चोरीला गेली आहे.\nआमदार राहुल बोंद्रे आणि शिवसेना आमदार संजय रायमुलकर\nविदर्भ एक्स्प्रेसमध्ये चक्क आमदाराच्या वस्तूंची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आमदार राहुल बोंद्रे यांच्या पत्नी पर्स एक्स्प्रेसमधून चोरीला गेली आहे. याबाबतची माहिती पावसाळी अधिवेशनात स्वतः आमदार राहुल बोंद्रे यांनी दिली. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून, ग्रामीण भागातील आमदार मुंबईमध्ये अधिवेशनासाठी आले आहेत. अधिवेशनासाठी एक्स्प्रेसने मुंबईला येणाऱ्या आमदारांच्या बॅगांवर चोरांनी डल्ला मारला. काल, सोमवारी देवगिरी एक्स्प्रेसमध्ये शिवसेनेच्या दोन तर आज मंगळवारी राहुल बोंद्रे यांना चोरांनी लुटले आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nआमदार राहुल बोंद्रे यांनी सांगितला चोरीचा घटनाक्रम\nआमदार राहुल बोंद्रे यांनी सांगितला चोरीचा घटनाक्रम\nराहुल बोंद्रे हे बुलढाण्यातील चिखली मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार आहेत. अधिवेशनासाठी मुंबईला येताना चोरांनी आमदारांच्या सामनाची चोरी केली. त्यानंतर कल्याण स्थानकावरून राहुल बोंद्रे यांच्या पत्नीची पर्स घेऊन चोर पसार झाला. आमदार राहुल बोंद्रे यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोर पळून गेला. पर्समध्ये २६ हजारांची रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि महत्वाची कागदपत्रे होती. सकाळी सहा वाजता विदर्भ एक्स्प्रेस कल्याण स्थानकावर आल्यानंतर ही घटना घडली आहे. राहुल बेंद्रे यांच्या पत्नीने तात्काळ मध्य रेल्वेच्या सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांत याबाबतची तक्रार दिली आहे. अधिवेशनासाठी विशेष असणाऱ्या बोगीमधून चोरी झाल्यामुळे राहुल बोंद्रे, शशिकांत खेडेकर आणि संजय रायमुलकर यांनी सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.\nआम्ही अधिवेशनसाठी विदर्भ एक्स्प्रेस या गाडीने पत्नीसोबत येत असताना गाडी कल्याण स्टेशनवर थांबली असताना आमदारासाठी राखीव असलेल्या बोगीमध्ये एक चोर शिरला. तो माझ्या पत्नीची पर्स चोरून धावू लागला. मी व माझ्यासोबत दोन पोलीस यांनी त्याचा पाठलाग केला. मात्र चोर पळून जाण्यात यशस्वी ठरला. या घटनेबाबत छत्रपती शिवाजी टर्मिनल येथील रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेला २४ तासापेक्षाही जास्त कालावधी झाला आहे. तसेच हा मुद्दा सभागृहातही उपस्थीत केला. पंरतू अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. राज्यात ज्या ठिकाणी आमदार सुरक्षित नाही तेथे सामान्य नागरीक कसा सुरक्षित राहील. युती सरकारचे हेच अच्छे दिन आहेत का चोरांना अच्छे दिन आले की काय असा प्रश्न आहे, ही अतिशय गंभीर घटना आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.\n– राहुल बोंद्रे , आमदार, काँग्रेस\nशिवसेना आमदार संजय रायमुलकर\nशिवसेना आमदार संजय रायमुलकर\nआम्ही २३ जून रोजी देवगीरी एक्सप्रेस या गाडीने जालना ते मुंबई असा प्रवास करत असताना सकाळी ६ ते ६.३० दरम्यान कल्याण-ठाणे दरम्यान आमच्या बोगीमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन माझा मोबाईल, पैसे, शर्ट आणि विधान भवनचे ओळखपत्र याची चोरी केली. ही घटना माझ्यासोबत प्रवास करणारे माझे सहकारी आमदार शशिकांत खेडकर यांनी सांगितली असता त्यांनी त्याच्या पीएची बॅग कापल्याचे सांगितले. या प्रकाराबाबत सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवण्यात आली आहे.\n– संजय रायमुलकर, आमदार, शिवसेना\nदादरमध्ये चक्क भाजी विक्रेत्याने केला ग्राहकाचा खून; विक्रेत्याला अटक\nमीरा रोडमध्ये घरात आढळला मायलेकाचा मृतदेह\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकोलकाता नाईट रायडर्स vs सनरायजर्स हैदराबाद प्रीव्ह्यू\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nPhoto: NCB ड्रग्ज प्रकरणात चौकशी केलेल्या रकुलमध्ये तुम्हाला या गोष्टी माहिती...\nPhoto: ‘MU’च्या विरोधात ‘ABVP’ चे जागरण गोंधळ आंदोलन\nPhoto: काय आहे ”माझे कुटुंब माझी जबाबदारी\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://entrepreneurshipd.com/small-business-ideas-marathi-ladies-women/", "date_download": "2020-09-26T01:13:36Z", "digest": "sha1:GTPCQQVCHNFZ35QGBM6PBE5FRTVMZDG5", "length": 16693, "nlines": 88, "source_domain": "entrepreneurshipd.com", "title": "Small Business Ideas In Marathi For Ladies (महिलांनसाठी / Housewife)", "raw_content": "\nघरगुती स्त्रियांसाठी (Small Business Ideas In Marathi for ladies) बरेच व्यवसाय आहेत जे ते घरून प्रारंभ करू शकतात किंवा बाहेर जाऊ शकतात आणि त्यातून चांगला नफा कमवू शकतात. आपणास घरातून नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर येथे काही उत्तम व्यवसाय कल्पना आहेत ज्यात आपण थोडेसे गुंतवणूक आणि कठोर परिश्रम करून चांगले उत्पन्न मिळवू\nमहिलांसाठी काही व्यवसाय कल्पना खालीलप्रमाणे आहेतः\nआर्ट और क्राफ्ट व्यवसाय कल्पना Art & Craft Business Ideas\nहस्तकलेचे क्षेत्र बरेच मोठे आहे कारण वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रतिभा आहे. यामध्ये एखाद्यास एक सुंदर पर्स किंवा झोळी कशी तयार करावी हे माहित आहे, तर कोणाकडे एक सुंदर टोपली किंवा सुंदर कृत्रिम पुष्पगुच्छ असलेली विविध वस्तू तयार करण्याची कला आहेत आणि कुणाला गुळगुळीत चिकणमातीच्या मदतीने एक सुंदर मूर्ती किंवा खेळणी करण्याची कला आहेत.\nआपण सजावटीशी संबंधित गोष्टी बनविण्यात तज्ञ असल्यास, क्राफ्ट आयटम व्यवसाय हा एक चांगला पर्याय असू शकतो. (Business Ideas For Housewife In Marathi) नंतर आपण आपल्या सर्जनशीलतेसह त्यामध्ये नवीन गोष्टी तयार करू शकता आपण आपल्या आवश्यकतेनुसार सामग्रीच्या घाऊक विक्रेत्याकडून व्यापार सुरू करू शकता.\nहा व्यवसाय सुरू करण्याचा खर्च देखील कमी झाला आहे आणि बाजारात नेहमीच नवीन आणि अनन्य वस्तूंची मागणी असते.\nAffiliated मार्केटिंगमध्ये दुसर्‍या कंपनीचे उत्पादन विक्री करणे आणि त्याचा प्रचार करणे समाविष्ट आहे. एफिलिएट मार्केटिंग महिला कमी खर्चात प्रारंभ करू शकतात.\nAffiliated मार्केटिंगमध्ये आपण कोणत्याही वेबसाइट किंवा कंपनीशी ऑनलाईन कनेक्ट करुन आणि त्यांचे माल विकून चांगले कमिशन मिळवू शकता. बर्‍याच ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्स आहेत ज्या आपल्याला घरी बसून पैसे कमविण्याची चांगली संधी देतात\nजिम/फिटनेस सेंटर बिज़नेस आईडिया Gym Business Ideas\nआजच्या काळात लोक आपल्या शरीर आणि आरोग्याबद्दल खूप जागरूक झाले आहेत, अशा परिस्थितीत लोक व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटरकडे वाढले आहेत.\nतुम्हालाही एखादी व्यायामशाळा सुरू करायची असेल तर प्रथम तुम्ही त्यासाठी चांगली जागा तयार करावी लागेल कारण कोणत्याही व्यवसायासाठी हा महत्त्वाचा भाग आहे तुम्ही कमी बजेटमध्ये जिम किंवा योगा वर्ग सुरू करू शकता आणि चांगले उत्पन्न मिळवू शकता.\nस्वीट बिज़नेस आईडिया Sweet Business Ideas\nमिठाई ही एक चीज आहे जी प्रत्येक हंगामात मागणी असते आणि ती उत्सवांनाही त्याची मागणी वाढते. (Small Business Ideas In Marathi for ladies ) ज्या महिलांना मिठाई बनवण्याची आवड आहे किंवा त्यांना मधुर मिठाई कशी बनवायची माहित असेल तर त्यांनी हा व्यवसाय मोठ्या फायद्याने नफा मिळवू शकतो. मिठाई व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला जास्त भांडवलाची देखील आवश्यकता नाही. महिला घरातून किंवा दुकान सुरू करून मिठाईचा व्यवसाय सुरू करू शकतात.\nकुकिंग या टिफिन सर्विस बिज़नेस Tiffin Service Business Idea\nघरगुती भोजन कोणाला आवडत नाही आपल्याकडे चांगले अन्न शिजवण्याचे कौशल्य असल्यास आपण घरातून टिफिन सेवा सुरू करू शकता किंवा आपण घरी स्वयंपाकाचे वर्ग चालवू शकता.\nया व्यवसायाद्वारे आपण आपल्या छंदसह आपल्या कौशल्यातून चांगले उत्पन्न मिळवू शकता जर मोठ्या आणि लहान शहरांमध्ये टिफिन सर्व्हिसेसला जास्त मागणी असेल तर आपण कमी किंमतीत हा व्यवसाय सुरू करू शकता आणि भरपूर नफा कमवू शकता.\nआपल्या टिफिन सर्व्हिसेसची जाहिरात करण्यासाठी आपण आपल्याभोवती पत्रके मिळवू शकता, जे आपल्या ग्राहकांना वाढवेल आणि नफा वाढवेल.\nयूट्यूब चैनल बिज़नेस आईडिया YouTube Video Business Ideas\nआपण YouTube द्वारे घरी बसून पैसे कमवू शकता. ऑनलाइन करिअरसाठी यूट्यूब वाहिन्यांवर व्हिडिओ ठेवणे हे एक चांगले माध्यम बनले आहे.\nगृहिणींसाठी, YouTube कमाईसाठी एक चांगला पर्याय असू शकतो, ज्यात आपण आपले कौशल्य किंवा ज्ञान व्हिडिओद्वारे सामायिक करू शकता आणि घरून पैसे कमवू शकता.\nक्रेच-चाइल्ड केयर सेंटर बिज़नेस आईडिया Child Care Business Ideas\nआजच्या काळात, क्रेच-चाइल्ड केयर सेंटर किंवा बाल देखभाल केंद्रांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, जर आपण मुलांवर प्रेम केले आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवला तर हा व्यवसाय आपल्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.\nआजच्या या धावपळीच्या आयुष्यात आणि पालकांच्या परिश्रमांमुळे लोक आपल्या मुलांना चांगली देखभाल करू शकतील अशा दिवसाची काळजी शोधत आहेत.\nमहिला आपल्या घरात किंवा कोणत्याही लहान ठिकाणी Child Care Business सुरू करू शकतात जिथे आपण कमी गुंतवणूकीमध्ये आपला व्यवसाय सुरू करण्यास सक्षम असाल आणि याद्वारे आपण खूप चांगले उत्पन्न मिळवू शकता.\nहॉबी क्लासेस बिज़नेस Hobbies Business Ideas\nजेव्हा आपण कमाविण्याचे साधन म्हणून आपला छंद पकडता तेव्हा आपल्यात त्यात यशस्वी होण्याची अधिक शक्यता असते, तसेच आपल्या कामाचा आनंद देखील घेतात जर आपल्याकडे संगीत, नृत्य, चित्र-कला किंवा इतर काही छंद असेल तर आपण त्यास आपला रोजगार देखील बनवू शकता.\nआपण आपला छंद इतरांना शिकवण्या-साठी आणि त्या बदल्यात चांगली रक्कम वसूल करण्यासाठी वापरू शकता छंद वर्ग महिलांसाठी एक चांगली व्यवसाय कल्पना आहे जी बर्‍याच गुंतवणूकीने सुरू केली जाऊ शकते.\nब्यूटी पोर्टर हा महिलांचा सर्वात पसंत व्यवसाय मानला जातो. ज्याची सुरुवात आपण घरूनही करू शकता. आपल्याला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही मोठ्या जागेची देखील आवश्यकता नाही, (Business Ideas For Housewife In Marathi)आपण हा व्यवसाय अगदी लहान जागेतून देखील सुरू करू शकता.\nब्यूटी पार्लर किंवा ब्यूटीशियन व्यवसायाची किंमत आपण ज्या पातळीवर प्रारंभ करू इच्छित आहात त्यावर अवलंबून असते आणि त्याचा फायदा आपल्या गुंतवणूकीवर आणि कठोर परिश्रमांवर अवलंबून असतो.\nबर्‍याच स्त्रियांना पॉर्लर जाण्यासाठी वेळ मिळत नाही, अशा परिस्थितीत ते कॉल करू शकतात जेणेकरून आपण त्यांच्या घरी जाऊन सेवा देऊ शकता, यामुळे आपला नफा वाढेल आपण आपल्या सेवांना ऑनलाईन जाहिरात देखील करू शकता.\nकोचिंग सेंटर बिज़नेस Home Tuition Business\nजर आपल्याकडे अध्यापनाची आवड असेल आणि बाहेर जाऊन नोकरी करायला वेळ नसेल तर हा व्यवसाय आपल्या छंद आणि कमाई या दोहोंचा स्रोत बनू शकतो.\nहोम ट्यूशनद्वारे तुम्ही चांगला नफा कमवू शकता. आपल्याकडे ज्या विषयात चांगली पकड आहे त्यास फेरफटका देऊन आपण पैसे कमावू शकता.\nया कामात आपण कोणत्याही गुंतवणूकीशिवाय थोड्या काळामध्ये चांगला नफा मिळवू शकता, जे सुमारे 15 ते 20 हजार रुपये असू शकते, हे आपल्या अध्यापनाच्या वेळेवर अवलंबून असते आणि आपल्याला हवे असेल तर आपण आपले स्वतःचे कोचिंग सेंटर देखील उघडू शकता.\nग्रामीण भागातील व्यवसाय संधी | खेडेगावातील व्यवसाय village Business ideas in Marathi\nबदलत्या पर्यावरणातील आधुनिक व्यवस्थापनाचे महत्त्व\nERP चे अर्थ आणी व्यवसाय संस्थेतील महत्व\nऔद्योगिक व्यवस्थापनाचे महत्त्व | Importance of Industrial Management\nग्रामीण भागातील व्यवसाय संधी | खेडेगावातील व्यवसाय village Business ideas in Marathi\nIndustrial Management औद्योगिक व्यवस्थापन (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahakamgar.maharashtra.gov.in/hyperlinking-policy-mr.htm", "date_download": "2020-09-26T03:03:57Z", "digest": "sha1:YB6UDGK4VOYDGR3FZF62RJL4O7OON5GF", "length": 5276, "nlines": 91, "source_domain": "mahakamgar.maharashtra.gov.in", "title": "Hyperlinking Policy | Department of Labour, Government of Maharashtra, India", "raw_content": "\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडल, मुंबई\nऑनलाईन तक्रार / तक्रार निवारण\nऑनलाईन तक्रार निवारणतुमच्या तक्रारी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा\nबाल मजुरी हेल्पलाईन बालमजुरी तक्रार साठी संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट © 2014 कामगार विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nपानाच्या रोजी अखेरचे अद्यतनितः: 29-5-2014 अभ्यागत: 14976511\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/woman-duped-of-rs-two-lakh-in-atm-card-theft/articleshow/71190538.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-26T02:15:43Z", "digest": "sha1:G46X6KJOKCL3ES6QZ7MTWIYRCYHJ6O52", "length": 11275, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएटीएममागे पिन लिहिणे भोवले\nएटीएम कार्डच्या मागे पिन नंबर लिहून ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. कारण चोरट्याने या महिलेची पर्स रेल्वेतून लांबविल्यानंतर त्यातील एटीएम कार्डद्वारे जवळपास पावणे दोन लाख रुपये महिलेच्या बँक खात्यामधून काढून घेतले.\nनागपूर: एटीएम कार्डच्या मागे पिन नंबर लिहून ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. कारण चोरट्याने या महिलेची पर्स रेल्वेतून लांबविल्यानंतर त्यातील एटीएम कार्डद्वारे जवळपास पावणे दोन लाख रुपये महिलेच्या बँक खात्यामधून काढून घेतले.\nसीताबर्डी येथे राहणारी ही ६३ वर्षांची महिला १२४४२ बिलासपूर राजधानी एक्स्प्रेसने दिल्ली ते नागपूर असा प्रवास करीत होती. या प्रवास महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने लांबवली. या पर्समध्ये महाराष्ट्र, आयडीबीआय व पंजाब नॅशनल अशा तीन बँकांचे एटीएम कार्ड होते. नागपूरला उतरल्यानंतर महिला घरी गेली, त्यावेळी मोबाइलवर पैसे काढल्याचे मॅसेज आले. त्यावेळी पर्सची चोरी झाल्याचे समजले. महिलेने लक्षात राहावे म्हणून एटीएम कार्डच्या मागेच पिन क्रमांक लिहून ठेवला होता. त्यामुळे चोरट्याने आयडीबीआयमधून ६१ हजार रुपये, पंजाब नॅशनल बँकेतून ९० हजार, तर महाराष्ट्र बँकेतून २४ हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात फिरताहेत; हायकोर्टाने दिले ...\nDevendra Fadnavis: शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष; फडणवीस ब...\nDevendra Fadnavis: 'त्या' प्रकरणात फडणवीसांनी दिला अनिल...\nDevendra Fadnavis: ...तर पवारांना अन्नत्याग करावा लागला...\nथकलो पण, हरलो नाही; गृहमंत्र्यांचं 'हे' विधान पोलिसांना...\nयू- ट्युबवरून घरफोडीचे प्रशिक्षण महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\nमुंबईअनलॉकसाठी आहे 'ही' त्रिसुत्री; CM ठाकरेंनी सांगितले पुढचे धोके\nसिनेन्यूजमाझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा\nपुणेकृषी विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार का; अजित पवार म्हणाले...\nपुणेकोविड रुग्णालयांत रुग्णांची लूट; अजित पवारांनी दिला 'हा' इशारा\nदेशजिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर उपजिल्हाधिकाऱ्यांचे पत्नीसोबत धरणे आंदोलन\nदेशकृषी विधेयकांवरून PM मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र\nमुंबईशिवसेना कधीच कन्फ्यूज नव्हती; राऊतांचे फडणवीसांना उत्तर\nदेश'चीन, पाकला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद भारतीय हवाई दलात'\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/saguna-nirguna-amol-padhya/articleshow/70231307.cms", "date_download": "2020-09-26T02:26:55Z", "digest": "sha1:O5EQ6WJ2I6BBFVSINBLMPL5LVZ2KLWKP", "length": 16832, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसगुण निर्गुण : अमोल पाध्ये\n- अमोल पाध्येमाझ्या आयुष्यातली गुरू म्हणून लाभलेली पहिली व्यक्ती म्हणजे माझी आई तिने मला एका महत्वाच्या गोष्टीची प्रचिती दिली; ...\nमाझ्या आयुष्यातली गुरू म्हणून लाभलेली पहिली व्यक्ती म्हणजे माझी आई तिने मला एका महत्वाच्या गोष्टीची प्रचिती दिली; ती म्हणजे जी व्यक्ती असे म्हणेल की मी गुरू आहे, ती व्यक्ती नक्कीच गुरू नसते. माणूस 'बनण्याच्या' प्रक्रियेत सर्वाधिक महत्त्वाचा घटक म्हणजे गुरू असणे. आपण शिक्षक आणि गुरू यात गल्लत करतो. दोघांमध्ये मूलभूत फरक असतो. शिक्षक शिकवतो पण गुरू न शिकवता शिकवतो. त्यामुळेच कुणीही गुरू असू शकतं. हे कळतं तेव्हाच जेव्हा आपण खऱ्या अर्थाने शिष्य होतो. याबाबतीत मी गुरू नानक यांना खूप मानतो, कारण त्यांनी 'सिक्ख' संप्रदायच बनवला. सिक्ख म्हणजे शिष्य तिने मला एका महत्वाच्या गोष्टीची प्रचिती दिली; ती म्हणजे जी व्यक्ती असे म्हणेल की मी गुरू आहे, ती व्यक्ती नक्कीच गुरू नसते. माणूस 'बनण्याच्या' प्रक्रियेत सर्वाधिक महत्त्वाचा घटक म्हणजे गुरू असणे. आपण शिक्षक आणि गुरू यात गल्लत करतो. दोघांमध्ये मूलभूत फरक असतो. शिक्षक शिकवतो पण गुरू न शिकवता शिकवतो. त्यामुळेच कुणीही गुरू असू शकतं. हे कळतं तेव्हाच जेव्हा आपण खऱ्या अर्थाने शिष्य होतो. याबाबतीत मी गुरू नानक यांना खूप मानतो, कारण त्यांनी 'सिक्ख' संप्रदायच बनवला. सिक्ख म्हणजे शिष्य आपण शिष्य असणे गरजेचे आहे मग गुरू आपोआप प्रकटतोच\nशुक्ल यजुर्वेदाशी संलग्न असलेल्या एकोणीस उपनिषदांपैकी महत्त्वाचे 'अद्वयतारक' उपनिषद. हे नाव खूप सुंदर आहे. अद्वय म्हणजे दोन नसलेले किंवा दुसऱ्याशिवाय आणि तारक म्हणजे तारणारे, मुक्त करणारे. थोडक्यात, एकत्वाकडे नेणारे. हे उपनिषद वाचनात आले आणि उमजले की यात गुरू या विषयावर उहापोह केलेला आहे. गुरू हा मूळचा संस्कृत शब्द 'ग' आणि 'र' या दोन अक्षरांनी बनला आहे. ग हा गमन क्रियेशी संबंधित असून र हे अक्षर क्रिया अंमलात आणते. हेच अद्वयतारक उपनिषद असे म्हणते,\nगु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे घालविणे. गुरू म्हणजे अंधकार घालविणारी ती. मराठीत गुरूत्व व्यक्तिकेंद्रीत नाही. आपले संतवाङ्मय प्राणीमात्रांना प्रसंगयोचित गुरूत्व देतेच. वरील श्लोकात वापरलेला निरोध हा शब्द गुरूच्या विरक्तीचा निदर्शक आहे. गुरू म्हणजे सोबत करून योग्य ठिकाणी पोचवणारा. अनेक ठिकाणी गुरूला नावाड्याची उपमा दिली आहे. अज्ञात डोह पार करून देणारा तो गुरू असे ते म्हणतात.\nयजुर्वेदातील 'श्वेताश्वतरोपनिषद' अनेक परिवर्तनशील गोष्टींवर भाष्य करते. साहजिकच, गुरु हा शब्द त्यात समाविष्ट आहेच.\nयस्य देवे परा भक्तिः यथा देवे तथा गुरौ\nतस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः \nअर्थात, ज्याची देवावर निस्सीम भक्ती असते त्याची जशी देवावर तशीच गुरूवर भक्ती असली, तर ही शिकवण त्यास ज्ञानाने प्रकाशमान करेल.\nमी गुरूला 'मितवा' म्हणतो. मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाड्या असणारी व्यक्तीच आपली गुरू असते नाही का आपल्याला समजून घेणे, ज्ञानाची आस जाणणे, योग्य पर्याय निवडून देणे, निवडलेल्या विषयांची तयारी करून देणे, आपले गुणदोष समजून त्याची व्यवस्था लावणे, मनोशारीरिक परिस्थिती जाणून घेऊन योग्य उपाययोजना करणे, ज्ञान उपलब्ध करून देणे आणि स्व-प्रचिती करून देणे अशा अनेक दिव्यातून आपल्याला तारतो तो गुरू. शिक्षकाला माहीत (knowing) असते तर गुरूला ज्ञात (realisation) असते. गुरूला तो गुरू आहे हे सांगत बसण्याची गरज नसते, कारण स्व-प्रचिती आल्यानंतर अहंकार गायब होतो आणि शुद्धत्व उरते. त्याची जीवनशैली आणि दृष्टिकोन शिष्याला तो शोधायला लावतो. गुरूची ती उपजीविका नसते. गुरू पोटार्थी आणि परीक्षार्थी असा दोन्हीही नसतो. 'अ-गुरू' राहून आणि प्रयोजन-रहित ज्ञान उपलब्ध करून देतो तो गुरू. विचार करून पाहा. शिष्य असतो पण गुरू 'नसतो'. एकदा अहं गेला, की गुरू असणेही विरघळून जाते. राहते ते शुद्ध अस्तित्व. ते अस्तित्व शिष्याला आत्मोपलब्धी घडवून आणते. माणूसपण मिळाल्याचे सार्थक करून देते. आजकाल गुरू म्हणवून घेणारे कसे गुरू नाहीत हे यावरून नक्कीच कळेल. गुरू नाही कारण आताशा शिष्यही नाहीत. शिष्य कोणालाच व्हायचे नसते. बोटभर मिळाले की अंगभर बडबडायचेच दिवस आहेत सध्या. आजच्या गुरूपौर्णिमेला शिष्यत्व पत्करायची तयारी केली तरी सार्थकता झाली म्हणायची\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसंकट ओले, बरसून आले\nवेळेतच ओळखा करोनाची लक्षणे...\nमुतखडा : उपचार आणि प्रतिबंध...\nकरोनाचा सामना करताना काय चुकतंय\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\n; रोहित यांचा केंद्राला 'हा' टोला\nदेशकृषी विधेयकांवरून PM मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र\nआयपीएलसुनील गावस्करांचा पलटवार, अनुष्का शर्माचे असे टोचले कान\nविदेश वृत्तचीनला वेसण घालणार जपानच्या पंतप्रधानांची भारताला साद\nदेशजिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर उपजिल्हाधिकाऱ्यांचे पत्नीसोबत धरणे आंदोलन\nदेशअकाली दलाच्या एका बॉम्बने PM मोदी हादरले, सुखबीर सिंग बादल यांचा हल्लाबोल\nसोलापूरकैकाडी महाराजांचे करोनाने निधन; वारकऱ्यांवर मोठा आघात\nआयपीएलChennai vs Delhi: पृथ्वी सावने केली गोलंदाजाची धुलाई, चेन्नईपुढे मोठे आव्हान\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nधार्मिकमकर राशीत शनी मार्गी : 'या' पाच राशींसाठी खडतर काळ; वाचा\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sureshbhat.in/newtracker?order=name&sort=asc&page=2", "date_download": "2020-09-26T01:51:57Z", "digest": "sha1:TC7MBIFL3RS3AEQK6Z6QYAU4O43AKB5U", "length": 3299, "nlines": 68, "source_domain": "sureshbhat.in", "title": "नवे लेखन | सुरेशभट.इन", "raw_content": "कुठून साधेच लोक आले मला पुन्हा धीर द्यावयाला \nअनोळखी आसवांत माझी मला पुन्हा आसवे मिळाली \nमुखपृष्ठ » नवे लेखन\nगझल माझे प्रेम rupali joshi 1\nगझल ही घडी दे \nगझल राखते तोल मी.....\nगझल ....सारे मला मिळाले \nगझल अतोनात तिटकारा येतो supriya.jadhav7 25\nगझल रात्र झाली फ़ार आता \nगझल मी एकटीच येथे\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2013/01/blog-post.html", "date_download": "2020-09-26T02:02:02Z", "digest": "sha1:4CQNQ2OWKT7DXKBWWLXOM74LDAJYWJHW", "length": 13911, "nlines": 184, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : आता तूच हो सावित्री अन तूच हो जिजाऊ - १२ जानेवारी \"जिजाऊ जन्मदिन विशेष\" !!", "raw_content": "\nआता तूच हो सावित्री अन तूच हो जिजाऊ - १२ जानेवारी \"जिजाऊ जन्मदिन विशेष\" \nस्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची साक्षात भवानी राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि स्त्री शिक्षणाची एक मूळ धुरा आणि आधुनिक युगाची सरस्वती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या मातीच्या या दोन महान लेकींना, मातांना शत - शत प्रणाम महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यांनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं त्या राजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना त्यांच्या जयंती दिनी कोटी कोटी नमन आणि तुम्हा सर्वांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nज्या मातीमध्ये जिजाऊ जन्माला आल्या, ज्या मातीमध्ये सावित्री बाई अखेरपर्यंत झुंजल्या, जिथे राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, ताराराणी लढल्या त्याच माती मध्ये आजहि स्त्रीची रोज रोज विटंबना होतांना दिसते आहे. दिल्ली मध्ये घडलेली पाशवी घटना असो कि कुठे लहान चिमुकल्या मुलींवर होणारे अत्याचार असो किंवा आज हि गावामध्ये उघडी नागडी करून फिरवली जाणारी आमची दलित भगिनी असो, वर्षानुवर्षे या स्त्रीची घोर विटंबनाच चालली आहे. काळ बदलला, राहणीमान बदलले, सभोवतालची परिस्थती बदलली पण स्त्रियांच्या बद्दल असलेली भोगवस्तू किंवा मालकी मानणारी हीन मानसिकता अजूनही कुठे तरी कायम आहे आणि याचाच प्रत्यय रोज येतांना दिसतो आहे . खर तर या विश्वात ईश्वरानंतर निर्माणाचा अधिकार कुणाला प्राप्त आहे तर तो या स्त्री ला स्त्री म्हणजे निर्माती स्वराज्य निर्माणकरते युगपुरुष शिवछत्रपती यांना निर्माण करणारी, घडवणारी माता म्हणजे जिजाऊ. महात्मा फुल्यांना पावलो - पावली साथ देणारी आणि स्त्री शिक्षणाचे बीज ज्यांनी रोवले ती स्त्री म्हणजे सावित्री बाई .\nया सावित्री आणि जिजाऊ च्या लेकी आजही बाटवल्या जात आहेत काळ बदलला आधी रस्त्यावर अत्याचार व्हायचे आता बंद दारामागे रोज रोज स्त्री वर अन्याय, तो हि स्वकियांकडून काळ बदलला आधी रस्त्यावर अत्याचार व्हायचे आता बंद दारामागे रोज रोज स्त्री वर अन्याय, तो हि स्वकियांकडून का आणि किती दिवस \nहा ढोंगी समाज एकीकडे स्त्री ला शक्तीचे स्वरूप मानतो आणि दुसरीकडे तिच्यावरच बळाचा बापर करतो तिच्यावरच वैचारिक, सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरी लादतो तिच्यावरच वैचारिक, सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरी लादतो खर तर या देशातील जाती - धर्म भेद निर्मूलनाचे कार्य याच महिलांनी आपल्या हातामध्ये घेतले पाहिजे, कारण स्त्री हि कुठल्याही जाती धर्माची असो तिची अवस्था फार काही वेगळी नसते. समानता, आदर आणि अस्तित्वाच्या बाबतीत प्रत्येक जाती-धर्माची स्त्री हि कमनशिबीच.\nपण नशिबावर मात करून एक नवनिर्माण करणाऱ्या जिजाऊ सारख्या महान आणि कर्तुत्ववान व्यक्तिमत्वाचा वारसा असणाऱ्या या मातीतील स्त्रियांनी आता स्वतः जागे होण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या आणि एकूणच समाजाच्या रक्षणासाठी परत एकदा उभे राहण्याची आज खरी गरज आहे.\nनवनिर्माण म्हंटले कि ते एका स्त्रीच्या हातून होणे हे ओघाने आलेच. विस्कटलेल्या सामाजिक परिस्थतीतून स्वतःच्या आणि पर्यायाने संपूर्ण समाजाच्या उत्थानाकरिता आता तुलाच हाती तलवार, लेखणी घ्यावी लागणार आहे.\nसमाजनिर्मिती मध्ये, निर्णय प्रक्रिये मध्ये , राजकीय व्यवस्थेमध्ये आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रीला सन्मानाचे स्थान मिळवण्यासाठी आता स्त्री नेच उभे राहिले पाहिजे आणि यासाठी याकामी तिला बळकटी देण्याचे कामही प्रत्येक स्त्रीनेच केले . समाजाच्या दूष प्रवृत्ती विरुद्ध लढणाऱ्या स्त्रियांना बळ देण्याचे कार्य तुमच्या हातून घडले पाहिजे.\nराजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे गुलामगिरी आणि अन्यायावर वर घणाघाती घाव करणारी पहिली ऐतिहासिक स्त्री.\nया राष्ट्रामातेच्या जन्मदिनी - स्वतंत्र आणि स्वाभिमानी समाज व्यवस्था निर्माण होवो आणि हे घडवण्यासाठी कधी हि न न ढळणारी दृढ इच्छाशक्ती सर्वांना मिळो हीच प्रार्थना करू.\nयाच जिजाऊ साहेबांच्या तमाम लेकींना सर्वोपातरी सन्मान मिळवून देण्याचे आणि आणि खंबीर पणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे कार्य प्रत्येक शिव - शंभू प्रेमींकडून व्हावे,जिजाऊ जयंतीच्या जिजाऊ.कॉम कडून पुन्हा हार्दिक शुभेच्छा\nराष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की......... जय\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 8:41 PM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब \nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nया पिढीचं जगणं मेलेले ठरवतायेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nतुम कायको टेन्शन लेते\nआतंकवाद भगवा की हिरवा यात बुडालेले आमचे सत्ताधारी\nराष्ट्राच्या भविष्याचा वेध - माजलेले नेतृत्व, घाबर...\nआता तूच हो सावित्री अन तूच हो जिजाऊ - १२ जानेवारी ...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/tag/german-artist-oskar/", "date_download": "2020-09-26T02:34:43Z", "digest": "sha1:JDJBESMMV6QBLQIHSRHWQY2QLEMLTJMR", "length": 5068, "nlines": 104, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Google tribute to late German painter, sculpture and choreographer Oskar Schlemmer on 130th birth anniversary", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nआजच्या गुगल डुडलमध्ये ही बाहुली का दिसतेय\nख्यातनाम जर्मन चित्रकार, मूर्तीकार आणि कोरिओग्राफर ऑस्कर श्लेमर(Oskar Schlemmer) यांची आज अर्थात ४ सप्टेंबर रोजी १३०वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलने खास त्यांच्याच शैलीतून डुडल बनवून श्रद्धांजली दिली आहे. ‘ट्रायडिश बॅलेट’(Triadisches Ballett) या त्यांच्या नृत्यप्रकारासाठी...\nकोलकाता नाईट रायडर्स vs सनरायजर्स हैदराबाद प्रीव्ह्यू\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nPhoto: NCB ड्रग्ज प्रकरणात चौकशी केलेल्या रकुलमध्ये तुम्हाला या गोष्टी माहिती...\nPhoto: ‘MU’च्या विरोधात ‘ABVP’ चे जागरण गोंधळ आंदोलन\nPhoto: काय आहे ”माझे कुटुंब माझी जबाबदारी\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://lyricskatta.com/manjarachya-galyat-ghanta-marathi-moral-stories-for-kids/", "date_download": "2020-09-26T01:08:11Z", "digest": "sha1:YEFCMQTOEIG2ZQHBUXIQO6F6KAIFLWPW", "length": 7049, "nlines": 85, "source_domain": "lyricskatta.com", "title": "मांजराच्या गळ्यात घंटा | Manjarachya Galyat Ghanta | Marathi Moral Stories For Kids", "raw_content": "\nएका किराणामालाच्या दुकानात खूप उंदीर राहत होते. किराणा मालाचे दुकान असल्यामुळे त्यांना तिथे भरपूर खायला मिळायचे. धान्य, सुका मेवा, बिस्किटे आदी वस्तूंवर ते ताव मारायचे. अशा खादाड उंदारांमुळे दुकानदाराचे खूप नुकसान होत असे. दुकानदारांने विचार केला की या उंदारांचे काहीतरी करायलाच हवे. नाहीतर एक दिवस मला कंगाल होण्याची पाळी येईल.\nहा विचार करत दुकानदाराने एक दिवशी एक मांजर दुकानात आणली. ती आल्यापासून उंदरांना काही आरामशीर फिरता येईना. मांजर आपली रोज उंदीर दिसला की त्यांना पकडून खायची. त्यामुळे उंदरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. उंदीर आता फार काळजीत पडले. त्यांनी मांजरीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी एक सभा बोलवली.\nसभेत याच्यावर वरीच चर्चा झाली. पण मांजराचा बंदोबस्त करायचा कसा हे कुणालाच समजेना. थोड्या वेळात एक हुशार उंदीर म्हणाला, मांजर अगदी हलक्या पायाने व अत्यंत चपळपणे फिरते. त्यामुळे आपल्यापैकी कुणालाच ती आल्याचे कळत नाही व त्यामुळे सतत आपण तिच्या तावडीत सापडले जाण्याची भीती लागलेली असते. तेव्हा एक तरूण उंदीर म्हणाला की काही करून आपण मांजराच्या गळ्यात घंटा बांधली पाहिजे.\nसगळ्या उंदरांना हा उपाय अगदी पटला. एक उंदीर म्हणाला की छान हं मांजर चालायला लागली की घंटा वाजेल आणि आपण सावध होऊन तिच्यापासून दूर पळून जाऊ. सगळे फार खुश झाले आणि उपाय सांगितलेल्या उंदरांला स्वतःच्या हुषारीचा फार अभिमान वाटला.\nतेवढ्यात एक म्हातारा उंदीर बोलला, थांबा हा वेडेपणा आहे. मला एवढेच सांगा मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. तितक्यात मांजर तेथे आली व तिने एका उंदरावर झडप घातली.\nउपदेश : अमलात न येणारा उपाय कुचकामी ठरतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/bollywood-news/video/producer-zoya-akhtar-has-impressed-to-the-deepikas-chaapak-movie-trailerthe-news-in-marathi-google-batmya/272242", "date_download": "2020-09-26T02:27:45Z", "digest": "sha1:UODM3GGR42OBP4UOK7D5AFCS6DJTKLCR", "length": 7927, "nlines": 77, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " [VIDEO] 'छपाक' या सिनेमाचा ट्रेलर पाहून, निर्माता झोया अख्तर झाली प्रभावित producer zoya akhtar has impressed to the deepika's chaapak movie trailer,the news in marathi google batmya", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\n[VIDEO] 'छपाक' या सिनेमाचा ट्रेलर पाहून, निर्माता झोया अख्तर झाली प्रभावित\n[VIDEO] 'छपाक' या सिनेमाचा ट्रेलर पाहून, निर्माता झोया अख्तर झाली प्रभावित\nअभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'छपाक' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. हा ट्रेलर पाहून दीपिकासोबतच, निर्माता झोया अख्तर प्रभावित झाल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे.\nमुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'छपाक' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. त्यामुळे या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. तसंच हा ट्रेलर पाहून अभिनेत्री दीपिका पदुकोण सुद्धा भावूक झाली होती. त्याचप्रमाणे बॉलिवूड निर्माता झोया अख्तरने या सिनेमाबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, निर्माता झोया अख्तरने छपाक या सिनेमाच्या ट्रेलरला पसंती दिली आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे, झोया अख्तर प्रचंड प्रभावित झालेली दिसत आहे. निर्माता झोया अख्तरने सांगितलं की, हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे, आपण लोकांच्या विचारांत आणि देशातील सिस्टीमला बदलू शकतो. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षतेसाठी हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे. तसंच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक मेघना गुलजार या दोघींना छपाक सिनेमासाठी माझ्याकडून भरपूर शुभेच्छा आहेत.\nमेघना गुलजार दिग्दर्शित छपाक या सिनेमात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसंच या दोघांचेही चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत, असं दिसतयं. छपाक हा सिनेमा पुढील वर्षी १० जानेवारी २०२० ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.\n[VIDEO] आमिर खानला 'या' चित्रपटासाठी मागणी\n[VIDEO] पाहा 'या' गायिकेची एव्हरग्रीन टॉप १० गाणी\n[VIDEO] अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'छपाक' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nSSR Case: एक युवा नेता CBIसमोर चौकशीसाठी स्वत: जाण्याची शक्यता, भाजप नेत्याचा दावा\nबी टाऊनच्या कलाकारांनी केले उत्साहात मतदान, इतरांना केले आवाहन\nआजचे राशी भविष्य २६ सप्टेंबर\nट्रकमध्ये चढत असताना सहायक पडला खाली आणि चाक.....\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ सप्टेंबर २०२०:\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमबद्दल CM ठाकरेंचे मत\nमारुतीची नवीन कार मिळणार मासिक शुल्कावर, पाहा काय आहे प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sureshbhat.in/newtracker?order=name&sort=asc&page=3", "date_download": "2020-09-26T03:11:03Z", "digest": "sha1:JJUS7SVUKMUGLSNULVGRXZL7BX7GLCXA", "length": 3513, "nlines": 68, "source_domain": "sureshbhat.in", "title": "नवे लेखन | सुरेशभट.इन", "raw_content": "गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री\nमेल्याविना मढ्याला आता उपाव नाही\nमुखपृष्ठ » नवे लेखन\nगझल राखते तोल मी.....\nगझल ....सारे मला मिळाले \nगझल भेट एकदा अगस्ती 3\nगझल हात तुझा हातात अगस्ती 9\nगझल सफल अगस्ती 9\nगझल स्वप्नांच्या दुनियेत ... अजब 2\nगझल तसा कुणाला... अजब 5\nपृष्ठ बशीर बद्रच्या शेरांचा भावानुवाद अजब 2\nगझल मी खरे बोललो तेव्हा अजब 7\nगझल भान माझे... (अजब) अजब 5\n... (अजब) अजब 7\nगझल वार कुणावर... अजब 21\nगझल जगणे असते... (अजब) अजब 6\nगझल 'गालिब'च्या गजलेचा भावानुवाद अजब 5\nगझल गर्दी... अजब 1\nगझल नशीब माझे... अजब 6\nगझल खोटे असते हळहळणे अजय अनंत जोशी 19\nगझल अंतरे राखूनही ... अजय अनंत जोशी 8\nगझल बोलका अजय अनंत जोशी 3\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathikhajina.com/tag/gun-milan/", "date_download": "2020-09-26T01:22:16Z", "digest": "sha1:6LQNSGXKPGKSOMZM7BPE3CUSJ4RXZWOS", "length": 2034, "nlines": 38, "source_domain": "www.marathikhajina.com", "title": "Gun Milan | मराठी खजिना", "raw_content": "\nपालेभाज्यांचे हे आहेत फायदे\nधने-जिरे पूड चे फायदे\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन…\nडेटिंगला जाताना या टिप्स लक्षात ठेवा\nविवाह जुळविताना कुंडली गुणमेलन का आवश्यक असते\nहिंदू संस्कृतीमध्ये मुलामुलींचा विवाह करताना येणारया स्थळांचा कुंडलीतील गुण जुळत असतील तरच विचार केला जातो. वधू- वरांच्या कुंडल्या एकमेकांशी किती जुळतात हि बाब फारच महत्त्वाची ठरते. यालाच कुंडली गुणमेलन असे […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahakamgar.maharashtra.gov.in/right-to-services-mr.htm", "date_download": "2020-09-26T01:24:11Z", "digest": "sha1:PEZFV6AUTRB7U3IJ3ALHMGVEWDLSMRIO", "length": 4052, "nlines": 75, "source_domain": "mahakamgar.maharashtra.gov.in", "title": "सेवा हमी कायदा", "raw_content": "\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमुख्य पान › कार्यक्रम व योजना › सेवा हमी कायदा\nइमारत व अन्य बांधकाम कामगार साठी कल्याण योजना\nघरगुती कामगारांसाठी कल्याण योजना\nदुकाने व आस्थापनांची नोंदणी\nदुकाने व आस्थापनांच्या नूतनीकरणासाठीचा अर्ज\nपरवाना - कंत्राटी कामगार\nऑनलाईन तक्रार निवारणतुमच्या तक्रारी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा\nबाल मजुरी हेल्पलाईन बालमजुरी तक्रार साठी संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट © 2014 कामगार विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nपानाच्या रोजी अखेरचे अद्यतनितः: 9-12-2015 अभ्यागत: 14976074\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/video/news/15th-finance-commission-to-meet-gst-council-in-goa-on-sept-20/videoshow/71207501.cms", "date_download": "2020-09-26T03:21:33Z", "digest": "sha1:QSWB5DYEXYR536CJDE7ZRRHMGPCY2R7D", "length": 9196, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगोवा: जीएसटी परिषदेची २० सप्टेंबर रोजी बैठक\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न...\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २६ सप्टेंबर २०२०\nन्यूजड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nन्यूजबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\n आज कोण ठरणार सरस\nन्यूजमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nन्यूजबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\nन्यूज'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nन्यूजसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nन्यूजशहीद जवान नरेश बडोलेंना काश्मीरात वीरमरण\nन्यूजकृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचं देशव्यापी आंदोलन\nन्यूजभाजप हा एकसंध आणि एक संघ आहे - विनोद तावडे\nहेल्थफिट राहण्यासाठी या सोप्या आसनांचा करा अभ्यास\nन्यूजराज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिटकून बसणारे सरकार - राम शिंदे\nन्यूज'भारत बंद'ची हाक देणारे शेतकरी विरोधी- राम शिंदे\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २५ सप्टेंबर २०२०\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/union-home-ministry-no-info-about-tukde-tukde-gang-rti/", "date_download": "2020-09-26T01:51:20Z", "digest": "sha1:6SDFPTPH2AMU3TTCPJBMJ6CJ7H7ECRNX", "length": 15097, "nlines": 159, "source_domain": "www.saamana.com", "title": "गृह खात्याचीच कबुली; देशात ‘टुकडे- टुकडे गँग’ नाही | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण…\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nगृह खात्याचीच कबुली; देशात ‘टुकडे- टुकडे गँग’ नाही\nदेशात ‘टुकडे-टुकडे गँग’ नाही अशी कबुली खुद्द केंद्रीय गृह खात्यानेच माहिती अधिकारात दिली आहे. देशातील अशांततेला ‘टुकडे-टुकडे गँग’ जबाबदार आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. त्यावरून सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकारात माहिती विचारली होती.\n26 डिसेंबर 2019 रोजी गोखले यांनी हा अर्ज केला होता. ‘टुकडे-टुकडे गँग’ अस्तित्वात आल्याचा दिनांक, या गँगच्या सदस्यांची नावे तसेच या गँगवर बेकायदा कृत्ये केल्याबद्दल प्रतिबंधक कायद्याखाली बंदी घातली गेली असेल तर त्याची माहिती द्यावी, अशी मागणी गोखले यांनी अर्जात केली होती.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\n व्हिसाशिवाय बिनधास्त फिरा या 16 देशात, केंद्र सरकारने दिली ‘फिरस्ती’ लोकांना खुशखबर\n16 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर आरोपीची निर्दोष सुटका\nप्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण...\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nया बातम्या अवश्य वाचा\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaalavaani.blogspot.com/2010/08/blog-post_4332.html", "date_download": "2020-09-26T02:37:43Z", "digest": "sha1:V5I3GWMTOODKQWGANYXCB3WGFSICDHFQ", "length": 8300, "nlines": 66, "source_domain": "jaalavaani.blogspot.com", "title": "जालवाणी: भारताला गरज भरताची !", "raw_content": "\nलेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला प्रत्यक्ष लेखकाच्या आवाजात ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०१० रोजी प्रकाशित करत आहोत. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे काहीही ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...\nपूर्वापार आपल्याकडे चालत आलेली वंशपरंपरागत पद्धती म्हणजे घराणेशाही...म्हणजे बापानंतर मुलाने राज्य सांभाळणे. आजच्या युगातल्या राजकारणातही आपण हेच पाहतो आहोत...त्यामुळे राज्यव्यवस्था,शासनव्यवस्था डळमळीत झालेली दिसते. अशावेळी त्यावर योजावयाच्या उपायांबाबत ह्या लेखात काही उहापोह केलेला आहे. चला तर ऐकूया.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकाकांचं अभिवाचन म्हणजे काही विचारायलाच नको. लेख सुंदर आहे. दुस-यावर टिका करणा-या लोकांनी स्वत:कडेही त्रयस्थ नजरेतून पाहिलं पाहिजे. बरेचदा लोक दुस-याच्या कर्तव्य आणि जबाबदारींबद्दल बोलताना स्वत:च्या खांद्यावरील जबाबदा-या मात्र सहजपणे झटकून टाकतात. शिवाजी प्रत्येकालाच जन्माला यायला हवा असतो पण तो शेजारच्याच्या घरात जन्माला यावा असंच ब-याच जणांना वाटतं याचं दु:ख आहे.\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी १:४५ म.उ.\nधन्यवाद काका तुमचा आवाज अतिशय उत्तम, एखाद्या देवळातील साधुपुरूषासारखा धीरगंभीर आहे (ही उपमा लता मंगेशकरांनी हेमंतकुमार यांच्या आवाजाला दिली होती). काका आता माझ्या ब्लॊग वरील माझ्या सर्व लेखांच्या अभिवाचनाचे सर्व हक्क तुमचेच झाले. तुमच्या पुढच्या ई-अंकासाठी तुम्हाला आवडेल तो लेख घ्या.\n१६ ऑगस्ट, २०१० रोजी ६:४३ म.उ.\nचेतन सुभाष गुगळे म्हणाले...\n\"दुस-यावर टिका करणा-या लोकांनी स्वत:कडेही त्रयस्थ नजरेतून पाहिलं पाहिजे. बरेचदा लोक दुस-याच्या कर्तव्य आणि जबाबदारींबद्दल बोलताना स्वत:च्या खांद्यावरील जबाबदा-या मात्र सहजपणे झटकून टाकतात. \"\nहे विधान मला उद्देशुन आहे काय\n१६ ऑगस्ट, २०१० रोजी ६:४६ म.उ.\nकाका.. वाचन भारीच.... नव्याने काही सांगायला नकोच.. :)\n२७ ऑगस्ट, २०१० रोजी ६:५३ म.पू.\nसहज, तरीही प्रभावी अभिवाचन आवडल.\nयोगयोगानं तुमचा हा ब्लॉग सापडला.\nअभिवाचनाचा हा उपक्रम interesting वाटला.\nगणेशोत्सव या विषयावर नुकत्याच लिहिलेल्या माझ्या कवितेच, मी स्वत: वाचन करून घरीच recording केल आहे. तुम्हाला ते ऐकवाव अशी इच्छा निर्माण झाली.\nकृपया मला तुमचा मेल ID दिलात तर मी audio-clip पाठवू शकेन. माझी माहिती ------\nआपल्या दोघांमधेल Common Net-friend : कांचन कराई\n..... उल्हास भिडे (बोरिवली)\n१० सप्टेंबर, २०१० रोजी १२:३८ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसूर्य संपावर गेला तर\nआणि मी सिगारेट सोडली.\nमोनालिसाला कुठे होत्या भुवया\nअब्राहम लिंकन ह्यांचे हेड मास्तरांना पत्र\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sureshbhat.in/newtracker?order=name&sort=asc&page=4", "date_download": "2020-09-26T02:03:11Z", "digest": "sha1:W7TBV2MLIA75G674K4MGB6NO62ZEVEQ3", "length": 4035, "nlines": 68, "source_domain": "sureshbhat.in", "title": "नवे लेखन | सुरेशभट.इन", "raw_content": "पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना\nकोणीच विचारत नाही-- \"माणूस कोणता मेला\nमुखपृष्ठ » नवे लेखन\nगझल टाहो... अजय अनंत जोशी 8\nगझल अहं ब्रह्मास्मि अजय अनंत जोशी 8\nगझल सोडले तेंव्हा तुला... अजय अनंत जोशी 11\nगझलचर्चा गझल अणि गझलियत अजय अनंत जोशी 3\nगझल निरर्थक... अजय अनंत जोशी 8\nगझल कुठून जायचे पुढे अजय अनंत जोशी 8\nगझल हात द्या, मात द्या ... अजय अनंत जोशी\nगझल खेळ अजय अनंत जोशी 13\nगझल पुन्हा... अजय अनंत जोशी 3\nगझल कुणी माझ्यासवे यावे अजय अनंत जोशी 4\nगझललेख सुरेश भटांच्या त्या दोन ओळी... अजय अनंत जोशी 15\nगझल जन्म हा अजय अनंत जोशी 6\nगझल समज अजय अनंत जोशी 8\nगझल नको ... अजय अनंत जोशी 7\nगझल स्त्री समीप येते ... अजय अनंत जोशी\nगझल चढलेल्यांना निम्मा करतो अजय अनंत जोशी 8\nगझल ... राहिलो मी अजय अनंत जोशी 1\nगझल टोचले होते.. अजय अनंत जोशी 10\nगझल शब्दार्थ अजय अनंत जोशी 8\nगझल मोगरा अजय अनंत जोशी 10\nगझल प्रेम बर्फासारखे... अजय अनंत जोशी 6\nगझलचर्चा आह को चहिये एक उम्र असर होने तक - अर्थ हवा आहे अजय अनंत जोशी 12\nगझल चालला शब्दांतुनी... अजय अनंत जोशी 17\nगझल तू परतून यावे अजय अनंत जोशी 1\nगझल सीमेवरती... अजय अनंत जोशी 11\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sureshbhat.in/node/2604", "date_download": "2020-09-26T01:31:09Z", "digest": "sha1:BPOCMCZZHUYUT55AWXC22SZM3XQ7JY7K", "length": 3901, "nlines": 70, "source_domain": "sureshbhat.in", "title": "काय आहे तुझ्याकडे माझे | सुरेशभट.इन", "raw_content": "जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती \nसारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती \nमुखपृष्ठ » काय आहे तुझ्याकडे माझे\nकाय आहे तुझ्याकडे माझे\nनेहमीचेच हे रडे माझे\nकाय आहे तुझ्याकडे माझे\nमीच घेतो अता धडे माझे\nरोज पाडून पोपडे माझे\nदोष थोडा असेल वाटेचा\nपाय थोडेच वाकडे माझे\nआठवण काढतो तुझी तेव्हा\nबोल होतात बोबडे माझे\nएक पैसा न लावता म्हणतो\nआज येतील आकडे माझे\nध्येय होते जिवंत असण्याचे...\n... जीवनाहून तोकडे माझे\nसाकडे घातल्याविना खुष हो\nएवढे एक साकडे माझे\nसांग या 'बेफिकीर' काळाला\nप्रस्थ होते कधी बडे माझे\nशेवटचे दोन शेर आवडले. चांगले\nशेवटचे दोन शेर आवडले.\nसाकडे घातल्याविना खुष हो एवढे\nसाकडे घातल्याविना खुष हो\nएवढे एक साकडे माझे\nसांग या 'बेफिकीर' काळाला\nप्रस्थ होते कधी बडे माझे\n>>> हे दोन शेर खुप भावले 'भुषणराव' :स्मितः\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/asha-bhosles-88th-birthday-said-this-whole-month-will-be-special-for-us-call-lata-didi-to-seek-blessings-127697935.html", "date_download": "2020-09-26T02:27:21Z", "digest": "sha1:RNKWYQJPLMT4YUYRD7NOVTEIDWKYOTZU", "length": 7004, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Asha Bhosle's 88th Birthday, Said This Whole Month Will Be Special For Us, Call Lata Didi To Seek Blessings | आशा भोसले यांचे वयाच्या 88 व्या वर्षात पदार्पण, म्हणाल्या - हा संपूर्ण महिना आमच्यासाठी खूप खास, आशीर्वाद घेण्यासाठी लता दीदींना फोन करेल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबर्थडे स्पेशल:आशा भोसले यांचे वयाच्या 88 व्या वर्षात पदार्पण, म्हणाल्या - हा संपूर्ण महिना आमच्यासाठी खूप खास, आशीर्वाद घेण्यासाठी लता दीदींना फोन करेल\nउमेश कुमार उपाध्याय, मुंबई18 दिवसांपूर्वी\nआशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला.\nमेलडी क्वीन आशा भोसले यांनी आज वयाची 87 वर्षे पूर्ण केली आहे. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. या खास दिवसाचे औचित्य साधत दिव्य मराठीने त्यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी आपल्या वाढदिवसाशी संबंधित आठवणी सांगितल्या आहेत.\nआशा भोसले म्हणाल्या, 'वाढदिवशी लोकांचे खूप प्रेम मिळते. वाढदिवस तर असतोच, पण मी यादिवशीही काम करत असते. या वयात चालते-फिरते, काम करते, गाणी गाते, प्रोग्राम करते. या सर्वांसाठी मी देवाचे आभार मानते.'\n'मला लोकांसाठी काही करायचे आहे'\n'लोकांकडून मला खूप प्रेम मिळाले आहे, मला आता त्यांच्यासाठी काही करायचे आहे. जगभरात अशा अनेक मुली, आई आणि पत्नी आहेत, ज्यांना गाण्याची इच्छा आहे. मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचे आहे. मी लोकांना त्यांच्या गाण्यांचे व्हिडिओ मागितले आहे. ज्या दिवशी मी लोकांना विनंती केली, तेव्हा 150 लोकांचे व्हिडिओ आले. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. हे व्हिडिओ ऐकण्यात आणि त्यातील चांगले आवाज शोधून काढण्यात माझी सून मला मदत करतेय.'\n27 सप्टेंबर रोजी आहे फायनल\n'आम्ही या कॅटेगरीत वर्गीकरण करीत आहोत. अंतिम 27 सप्टेंबर रोजी आहे. फायनलिस्टला माझ्याकडून मी एक लाख रुपयांचे बक्षीस देणार आहे.'\nसंपूर्ण महिनाभर सेलिब्रेशन सुरु असते\nआशा भोसले म्हणाल्या, '7 सप्टेंबर ही माझी मोठी बहीण मीना ताईचा वाढदिवस असतो. त्यानंतर 8 तारखेला माझा आणि 28 सप्टेंबरला लता दीदींचा वाढदिवस असतो. अशा प्रकारे हा संपूर्ण महिना आमच्यासाठी खूप खास आहे.'\nदीदीला फोन करुन त्यांचा आशीर्वाद घेईल\nआपल्या वाढदिवसाच्या तयारीसंदर्भात त्या म्हणाले, 'यावेळी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक दिवस अगोदरच माझी नात मला म्हणाली की, आज संध्याकाळपासून तू काहीही करु नको, स्वयंपाक करु नको, छानशी साडी नेस. माझ्या वाढदिवशी ती काय करणार आहे हे मला आता माहित नाही. वाढदिवशी प्रत्येकाचा कॉल येतो. लता दीदींशी बोलणे होतच राहते. त्यांचाही फोन येतो. वाढदिवशी आशीर्वाद घेण्यासाठी दीदींना फोन करेल.'\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/amid-leadership-debate-congress-working-committee-to-meet-on-monday-senior-write-to-sonia-gandhi-calling-for-changes-127643698.html", "date_download": "2020-09-26T02:23:45Z", "digest": "sha1:YA57ZJ6SJ2NHQIN6RJEITO6ASPV6J3XX", "length": 9987, "nlines": 70, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amid Leadership Debate, Congress Working Committee To Meet On Monday, Senior Write To Sonia Gandhi Calling For Changes | 5 माजी मुख्यमंत्र्यांसह 23 नेत्यांची मागणी - काँग्रेसमध्ये बदलाची आवश्यकता; सोनिया गांधींच्या राजीनामाच्या बातम्या चुकीच्या - रणदीप सुरजेवाला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाँग्रेसमध्ये होणार बदल:5 माजी मुख्यमंत्र्यांसह 23 नेत्यांची मागणी - काँग्रेसमध्ये बदलाची आवश्यकता; सोनिया गांधींच्या राजीनामाच्या बातम्या चुकीच्या - रणदीप सुरजेवाला\nसूत्रांनी दावा केला - सोनिया गांधी यांना हंगामी अध्यक्ष म्हणून राहण्याची इच्छा नाही\nदिल्लीत सोमवारी सकाळी 11 वाजता काँग्रेस कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे\nकाँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. याआधीच काही वृत्तांमध्ये पक्षातील सूत्रांच्या हवाल्याने दावा केला जातोय ही सोनिया गांधी अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांना या पदावर राहण्याची इच्छा नाही. मात्र काँग्रेसने या वृत्ताचे खंडन केले आहे. सोनिया गांधींच्या राजीनाम्याच्या बातम्या खोट्या असल्याचे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.\nउद्या, सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. याच बैठकीत नवीन अध्यक्षाबाबत निर्णय होणार असल्याचे मानले जात आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे.\nपक्षाच्या नेत्यांनी एक पत्र लिहून बदल करण्याची मागणी केली\nइंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून वरपासून खालपर्यंत बदल करण्याची मागणी केली आहे. ज्यांनी हे पत्र लिहिले त्यांच्यात 5 माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेस कार्यकारिणी सदस्य, खासदार आणि अनेक माजी केंद्रीय मंत्र्यांचा यांचा समावेश आहे. या मुद्द्यावरून सोमवारी सकाळी 11 वाजता कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली आहे.\nभाजप सातत्याने पुढे जात असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत तरुणांनी नरेंद्र मोदींना जोरदार मतदान केले. काँग्रेसचा बेस कमी असल्यामुळे आणि तरुणांचा आत्मविश्वास तुटत असल्याबद्दल गंभीर चिंता यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की सुमारे 15 दिवसांपूर्वी पाठविलेल्या या पत्राने बदलाचा असा अजेंडा दिला आहे, ज्यांची चर्चा सध्याच्या नेतृत्वाला खुपू शकते.\nया 3 मागण्यांचा उल्लेख\nलीडरशिप फुल टाइम आणि प्रभावी असावी, जी फिल्डमध्ये अॅक्टिव्ह असेल. त्याचा परिणामही दिसावा.\nकाँग्रेस वर्किंग कमिटीची निवडणूक घ्यावी.\nसंस्थात्मक नेतृत्व यंत्रणा तातडीने तयार करावी जेणेकरून पक्षाला नवजीवन मिळण्यासाठी मार्गदर्शन मिळेल.\nअमरिंदर सिंह म्हणाले - गांधी घराण्याच्या नेतृत्वाला आव्हान देणे चुकीचे\nयादरम्यान पक्षाचे नेते सलमान खुर्शीद यांनी रविवारी म्हटले की, अंतर्गत निवडणुकांऐवजी प्रत्येकाची संमती घेतली पाहिजे. राहुल गांधींनी कार्यकर्त्यांचे पूर्ण समर्थन आहे. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत की नाही, याचा काहीच फरक पडत नाही. दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही गांधी घराण्याच्या नेतृत्वाला आव्हान देणार्‍या नेत्यांचा विरोध दर्शविला आहे.\nउद्या काँग्रेस कार्यकारिणीची बैठक\nकाँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या महिन्यात आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करीत आहेत. गेल्या वर्षी राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर सोनिया यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. कॉंग्रेस कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) सोमवारी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक होईल. यात नेतृत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते\nअसे म्हटले जात आहे की, पक्षाच्या एका गटाला पुन्हा राहुल गांधी यांना अध्यक्ष बनवायचे आहे. पक्षाने 2 दिवसांपूर्वी मीडिया ब्रीफिंगमध्ये म्हटले होते की देशभरातील कार्यकर्त्यांना राहुल यांना अध्यक्षपदी बघण्याची इच्छा आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9F;-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80.....%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-/0V0L7s.html", "date_download": "2020-09-26T02:28:03Z", "digest": "sha1:GHJJYVURWD4FP4B7HK3FIIG7KXEASQUE", "length": 5578, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nमुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश\nApril 18, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nमुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश\nमुंबई - राज्यात कोवीड -१९ या विषाणूच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यात आली असून नव्या सुधारणेनुसार, २० एप्रिल २०२० पासून मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून (लॉकडाऊन) सूट देण्यात आली आहे मात्र वृत्तपत्रांचे घरोघर वितरण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्व विभागाच्या आयुक्तालयातील आयुक्तांना तसेच संचालनालयातील संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्यास नव्या सुधारणेनुसार सांगण्यात आले आहे.\nकोरोना अर्थात कोवीड १९ चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ३ मे पर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे. मात्र, जनतेची अडचण लक्षात घेऊन २० एप्रिलपासून काही बाबींना या टाळेबंदीतून सूट देण्यात आली आहे. त्यासंबंधीची एकत्रित मार्गदर्शक सूचना १७ एप्रिल २० रोजी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आज दुरुस्ती करण्यात आली. त्यामध्ये काही बाबींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यासंबंधीचे परिपत्रक आज काढण्यात आले आहे.\nत्यानुसार, राज्यातील प्रिंट मीडियाला टाळेबंदीतून वगळण्यात आले आहे. मात्र, कोवीड १९ च्या प्रसारणाचे प्रमाण पाहता वर्तमानपत्रे व मासिकांचे घरोघरी वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे.\nतसेच मंत्रालयीन सर्व विभागांच्या आयुक्तालयातील आयुक्त, संचालनालयातील संचालक यांनी १० टक्के कर्मचाऱ्यांसह कार्यालयात उपस्थित रहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.diliptiwari.com/2017/08/blog-post_24.html", "date_download": "2020-09-26T02:41:10Z", "digest": "sha1:B4ELIECVQK3ZYIVT4GYOX6LGPLJSK6XQ", "length": 41807, "nlines": 341, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: अब्दुल्ला के तलाक में बेगाने दिवाने ...", "raw_content": "\nअब्दुल्ला के तलाक में बेगाने दिवाने ...\nकौटुंबिक व्यवस्थेत मुस्लिम महिलांचे अस्तित्व आणि पत्नीत्व या स्थानाला स्थैर्य देणारा अंतरिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तोंडी (ट्रिपल) तलाक विरोधात भारतीय संसदेत कायदा बनवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. तोंडी तलाक संदर्भातील एका खटल्याची सुनावणी केल्यानंतर अंतरिम निकाल देताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे. निकालावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाने तलाक–तलाक–तलाक हा प्रकार घटनाबाह्य ठरवला आहे. न्यायालयाने स्वतः पुढाकार घेत, तोंडी तलाक देण्याच्या पद्धतीवर सहा महिन्यांची बंदी घातली आहे. मुस्लिम समाजातील कोणताही विवाहीत पुरूष पुढील सहा महिन्यांत पत्नीला तोंडी तलाक-तलाक-तलाक म्हणत घटस्फोट देवू शकणार नाही.\nतिहेरी तलाक पद्धती संदर्भातील न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मुस्लिमेतर समाजाने उताविळपणे त्याचे स्वागत केले आहे. मात्र, मुस्लिम समाजातील राजकिय, सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांमधील नेत्यांनी त्यावर सावध मत नोंदवले आहे. ढोबळ अर्थ असा की, मुस्लिमांनी सहजासहजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत किंवा समर्थन केलेले नाही. परंतु जे मुस्लिम नाहीत, ज्यांना हा कायदा वापरता येणार नाही, ज्यांचा या कायद्याशी थेट संबंध नाही अशी मंडळी तोंडी तलाक बंदीवर भरभरुन बोलत आहे. मुस्लिम समाजात एक म्हण आहे, “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना” याचा अर्थ, एकाच्या लग्नात दुसराच उताविळ होवून नाचायला लागतो. तोंडी तलाक पद्धतीवर बंदी संदर्भातील अंतरिम निकाल आल्यानंतर मुस्लिम वगळता इतरांच्या प्रतिक्रिया पाहून म्हणावेसे वाटते, “अब्दुल्ला के तलाक में बेगाने दिवाने.”\nसर्वोच्च न्यायालयाने तोंडी तलाकवर आदेश देताना मुस्लिमांच्या बहुपत्नीत्वाचा अधिकार कायम ठेवला आहे. त्यावर भाष्य करण्याचे टाळले आहे. तोंडी तलाक हा मुस्लिम धर्मियांचा मूलभूत हक्क आहे की नाही, हाच विषय न्यायालयाने सुनावणीत ग्राह्य मानला. यासाठीची सुनावणी पाच जणांच्या खंडपीठासमोर झाली. त्यात शिख, ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम व पारशी धर्माचे न्यायाधीश होते. तोंडी तलाक या विषयावर साधक-बाधक तसेच धर्म निरपेक्ष चर्चा होवून निकाल अपेक्षित होता. निकाल देताना पाचही न्यायाधीशांनी वेगवेगळे मत नोंदवले आहे. पण, तोंडी तलाकवर तूर्त सहा महिन्यांची बंदी एकत्रितपणे घातली आहे. ही बाब समाधानकारक आहे.\nहा निकाल येण्यापूर्वी उत्तरप्रदेशची निवडणूक झाली आहे. तेथे भाजपला बहुमत मिळाले. मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यानाथ यांची निवड झाली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तरप्रदेशातील अनेक मुस्लिम महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राख्या पाठवून तोंडी तलाक पद्धत बंद करण्याची मागणी केली होती. प्रचाराच्या सभांमध्ये मोदी यांनी तोंडी तलाक बंद करू असे आश्वासन दिले आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेच तोंडी तलाक संदर्भात सुधारित कायदा करा असे आदेश केंद्र सरकारला दिल्यामुळे मोदी सरकारला मुस्लिम महिलांच्या हिताचा कायदा करुन मुस्लिम महिलांची व्होट बँक मजबूत करण्याची व समान नागरी कायदा करण्याकडे सरकार पुढचे पाऊल टाकत असल्याचे दाखवून देत इतर समाजांची व्होट बँक मजबूत करण्याची संधी आयती चालून आली आहे.\nदेशभरातील मुस्लिम नेत्यांच्या व इतर समाजाच्या नेत्यांच्या तोंडी तलाकसंदर्भात प्रतिक्रिया बारकाव्याने वाचल्या तर लक्षात येते की, सुधारणावादी किंवा विद्रोही विचार असणाऱ्या मूठभर (नव्हे तर दोन, चार जणांनी) या निर्णायाचे स्वागत केले आहे. पण बहुतांश मुस्लिम नेत्यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अधिक्रमण असल्याचे मत नोंदवले आहे. सर्वोच्च न्यायालयात तोंडी तलाकवर सुनावणी सुरू असताना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही तोंडी तलाकच्या पद्धतीत जुजबी बदल करण्याचे संकेत दिले आहेत. एकच दिवशी, एकाचवेळी लागोपाठ तीन वेळा तोंडी तलाक-तलाक-तलाक न म्हणता, तीन महिन्यांत एकेकदा असा तीनदा तलाक म्हटला तर तो तलाक ग्राह्य धरला जाईल. या काळात तलाक म्हणणाऱ्या पुरुषाला पश्चात बुद्धी सूचली तर तो तलाक पासून प्रवृत्त होईल असे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला वाटते. याचा अर्थ अगदी सोप्या भाषेत असा की, तलाक नंतर होणारी अवहेलना संबंधित महिलेने तीन महिने टांगती तलवार सारखी सहन करावी.\nमुस्लिम समाजातील तोंडी तालक पद्धतीमुळे महिलांची कशाप्रकारे अवहेलना व कुचंबणा होते, यावर लिहीण्याची गरज नाही. तोंडी तलाक पद्धती ही अमानविय असल्याबद्दल आता सर्वत्र चर्चा होवू लागली आहे. पती-पत्नीच्या नात्यातील कडवटपणा दूर करण्यासाठी घटस्फोट हा कायदेशीर पर्याय आहे. यासाठी कायदे सुद्धा केलेले आहेत. मात्र, मुस्लिम समाज हा धर्माज्ञा पालनासाठी स्वतःला कर्मठ, कट्टर समजतो. पवित्रग्रंथ कुराण आणि त्यातील आयात (आज्ञा) याला प्रमाण मानून त्यानुसार जीवनपद्धती अवलंबित असल्याचे प्रत्येक मुस्लिम हा सोयीने व गरजेनुसार म्हणत असतो. कुटुंब विभक्त होण्यासंदर्भातही पवित्र कुराणात आज्ञा आहेत. त्यानुसार तोंडी तलाकची प्रथा ही प्राचिन व पवित्र कुराणाने दिलेल्या आज्ञेनुसार आहे, असा दावा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड करीत असते.\nधर्मग्रंथातील देवाज्ञांना आव्हान देण्याचे प्रयत्न आता मुस्लिम समाजातील महिलांची एकजूट करु लागली आहे. भारतीय मुस्लीम महिला आंदोलन या संघटनेने तोंडी तलाक पद्धतीला आव्हान देणारी याचिका केली आहे. संस्थेच्या सह-संस्थापिका झकिया सोमान यांनी या विषयावर देशातील अनेक राज्यांमध्ये मुस्लिम महिलांची स्वाक्षरी मोहीम राबविली. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिसा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, केरळ आणि उत्तरप्रदेश या राज्यांमधील जवळपास ५० हजारावर महिलांनी तोंडी तलाक पद्धत बंद करण्याच्या मागणीवर सह्या केल्या.\nभारतीय मुस्लिम महिला आंदोलनाने तोंडी तलाक बंदी मागणीवर ‘सीकिंग जस्टीस वुईथ इन फॅमिली’ हे सर्व्हेक्षणही केले. त्यात आलेल्या निष्कर्षानुसार ९२.१ टक्के मुस्लिम महिलांनी तोंडी तलाक पद्धतीला विरोध दर्शविला आहे. घरातील लहान-मोठ्या भांडणातून किंवा रागाच्या भरात पती हा पत्नीपुढे तीनदा तलाक शब्द उच्चारतो आणि या एका शब्दाने त्यांचे वैवाहिक नातेसंबंध संपुष्टात येते. या अविवेकी निर्णयातून पत्नी-मुले बेघर होतात आणि नंतर त्या परितक्त्येची अवहेलना व कुचंबणा सुरू होते. हा मुद्दा भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाने समाजासमोर मांडला.\nयाच सर्व्हेक्षणातील दोन निष्कर्ष मुस्लिम महिलांच्या मनातील असंतोष दर्शवतात. तलाक देणाऱ्या पतीला शिक्षा व्हावी, असे ५१.४ टक्के महिलांना वाटते. एकतर्फी तलाक देणाऱ्या पतीला पाठिंबा देणाऱ्या काझींवरही राग व्यक्त करताना तलाकची नोटीस पाठविणाऱ्या या काझींनाही शिक्षा व्हावी असे ८८.५ टक्के महिलांना वाटते.\nतोंडी तलाक पद्धतीवर जेव्हा चर्चा होते तेव्हा दोन गोष्टी प्रामुख्याने मांडल्या जातात. पहिली म्हणजे, या विषयात भारतीय कायद्यांच्यानुसार किंवा राज्यघटनेतील तरतुदीनुसार न्यायालयांनी केलेला हस्तक्षेप हा धर्मपालनावर अधिक्रमण कणारा वाटतो. दुसरा गोष्ट म्हणजे, भारतीय घटनेने देशातील सर्व समाज, जाती, धर्मांसाठी समान नागरी कायदा करण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली आहे. त्यानुसार इतर समाज हे समान नागरी कायदा केला जावा अशी मागणी करतात. तसे केल्याने मुस्लिम समाजातील तोंडी तलाक पद्धतीला प्रतिबंध होवून मुस्लिम समाजातील बहुपत्नीत्वाला लगाम बसून लोकसंख्येवर मर्यादा येतील असा अंदाज बांधला जातो.\nभारताच्या कायदा संहितेतील जवळपास ९० टक्के कायदे आजही सर्वांसाठी समान आहेत. पाच-दहा टक्के कौटुंबिक कायदे हे प्रत्येक धर्मीयांचे वेगळे आहेत. यात वि‍वाह, घटस्फोट, वारसहक्क आणि दत्ताकविधान याविषयी भिन्नता आहे. अशा व्यक्तिगत कौटुंबिक कायद्यामध्ये मुस्लिम व्यक्तिगत कायदा (मुस्लिम पर्सनल लॉ) येतो. इतर धर्मियांच्या व्यक्तिगत कायद्यामध्ये केंद्र सरकारने वेळेनुसार बदल केले मात्र, मुस्लिमांच्या व्यक्तिगत कायद्यात सुधारण करण्याचे धाडस कोणत्याही सरकाराने केलेले नाही. अर्थात, मुस्लिम परंपरवाद्यांनी किंवा कट्टरवादींनी तसे होऊ दिले नाही. हे म्हणत असताना शहाबानो ते शबाना आणि आता सायराबानोची प्रकरणे संदर्भ म्हणून दिसतात.\nमुस्लिम महिलांसाठी विविध प्रकारच्या सुधारणांचा हा लढा आज उभा राहिलेला नाही. त्यालाही आता अर्ध शतकाचा इतिहास आहे. मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई यांनी १९६६ मध्ये अवघ्या सात महिलांचा मोर्चा काढून समान नागरी कायद्याची मागणी केली होती. त्यानंतर आता भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या तोंडी तलाक विरोधी मागणीवर किमान ५० हजार मुस्लिम महिलांच्या सह्या तरी झाल्या आहेत. तोंडी तलाक पद्धतीला विरोध करण्याच्या मागणीवर मुस्लिम राष्ट्रीय मंचने सुद्धा मुस्लिम महिलांच्या सह्या गोळा केल्या आहेत. त्यावर देशभरातील किमान १० लाख मुस्लिमांनी सह्या केल्या आहेत.\nभारतातील मुस्लिम समान नागरी कायद्यास विरोधच कशासाठी करतात हे समजून घेण्यासाठी त्याच्यातील धार्मिक मतप्रवाह समजून घेणे आवश्यक आहे. अनेक मुस्लिम देशात धर्मग्रंथावर आधारित मुस्लिम कायदे बदलून काल सुसंगत कायदे करण्यात आले. जर, तेथील मुस्लिम समाज बदललेले कायदे स्वीकारतो तर भारतातील मुस्लिम कायद्यातील बदल का स्वीकारत नाही हे समजून घेण्यासाठी त्याच्यातील धार्मिक मतप्रवाह समजून घेणे आवश्यक आहे. अनेक मुस्लिम देशात धर्मग्रंथावर आधारित मुस्लिम कायदे बदलून काल सुसंगत कायदे करण्यात आले. जर, तेथील मुस्लिम समाज बदललेले कायदे स्वीकारतो तर भारतातील मुस्लिम कायद्यातील बदल का स्वीकारत नाही असा प्रश्न विचारला तर एक युक्तिवाद असा आहे की, तेथे एकछत्री मुस्लिम राज्यसत्ता आहे. दारूल इस्लाम आहे. म्हणजे, इस्लामी राज्यसत्तेने घेतलेले ते निर्णय आहेत. भारतात दारूल इस्लाम नाही, म्हणून येथे सूचविलेल्या सुधारणा मान्य होत नाहीत. अर्थात, हा युक्तिवाद केवळ निर्बुद्धता दर्शवतो. याचे एक सुस्पष्ट कारण म्हणजे, भारतात दारूल इस्लाम कधीच येणार नाही. दुसरा युक्तीवाद असा आहे की, कुराण हा दैवी ग्रंथ आहे. तो चिरंतन व अपरिवर्तनीय आहे. त्याने दिलेली धर्मज्ञा बदलण्याचा अधिकार कोणत्याच सत्तेला नाही. तिसराही युक्तिवाद आहे. तो असा की, भारतीय संविधानाने मुस्लिमांना अल्पसंख्याक म्हणून खास हक्क दिले आहेत. त्यानुसार भाषा, संस्कृती व धर्मस्वातंत्र्य आहे. या प्रमाणे तीनही युक्तिवादाचा अंतिम निष्कर्ष काय निघतो तर, भारतातील नागरीकांना मुस्लिमांसह कधीही समान नागरी कायदा लागू होणार नाही.\nपवित्र ग्रंथ कुराणच्या रचनेसंदर्भात सांगितले जाते की, कुराण आणि हदीस यांची पृष्ठे उलटत जावीत. त्यातील या उपदेश, मार्गदर्शन आणि आदेशांचे व्यवस्थित अध्ययन करावे. निकाह (विवाह), महर(पतीकडून होणाऱ्या पत्नीस दिली जाणारी रक्कम किंवा वस्तू), नफका(पत्नी व मुलासाठी अन्नवस्त्र), तलाक (पतीने पत्नीला दिलेला घटस्फोट), खुलअ (पत्नीने पतीला दिलेला घटस्फोट), इद्दत (घटस्फोटा आधीची मुदत), विरासत(वारसा), वसीअत (वारसापत्र, मृत्यूपत्र), इला, नसब, वक्फ, हिबा या बाबत कुराण व हदीसमध्ये स्पष्ट चर्चा आहे. म्हणूनच या धर्माज्ञा बदलण्यास मुस्लिम पुरूषांचा विरोध आहे.\nअसाच एक तकलादू युक्तिवाद ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड करीत असते. ते म्हणते की, मुस्लिम समाजाचे वैयक्तिक कायदे हे संसदेत कुठलेही विधेयक आणून बनविण्यात आलेले नाहीत, तर मुस्लिमांचा धर्मग्रंथ असलेल्या 'कुराण'चा आधार घेऊन बनविण्यात आले आहेत. त्यामुळे ते कायदे सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत येत नाहीत. मोहम्मदीन कायदा अर्थात, मुस्लिमांचा वैयक्तिक कायदा हा पवित्र कुराण व प्रेषित मोहम्मद यांनी वेळोवेळी केलेल्या उपदेशांवर आधारलेला आहे. हा कायदा इस्लामी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.\nहा युक्तिवाद धर्माज्ञेच्या नावाखाली मुस्लिम समाजातील कौटुंुंबिक पद्धतीत पुरुषी वर्चस्वाचे अधिकार अबाधित ठेवण्याचा सरळ सरळ प्रयत्न असल्याचे दर्शवतो. मुस्लिम समाजातील शिकलेल्या व घराबाहेर पडून समाजात वावरणाऱ्या महिला हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पुढे सरसावल्याचे आता दिसते आहे. त्याचाच परिपाक म्हणून मुस्लिम महिला हक्कासाठी न्यायालयात जात आहेत.\nया पार्श्वभूमीवर भारतीय समाजातात नेहमी चर्चा ही समान नागरी कायद्याची होते. वास्तविक हा विषय भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमधील ४४ व्या कलमासंदर्भात आहे. तेथे युनिफॉर्म सिव्हिल कोड असा शब्द आहे. त्या‍चे योग्य भाषांतर एकरूप नागरी संहिता असे होऊ शकते. धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रधान भारत देशाची निर्मिती होत असताना पं. जवारहरलाल नेहरू आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समान नागरी कायदा करण्याची सकारात्मकता दाखविली होती. मात्र, फाळणीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांना असुरक्षित वाटू नये म्हणून हा विषय काही काळाकरिता बाजूला ठेवून तो संविधानाच्या चौथ्या भागात समाविष्ट करण्यात आला. देशात योग्य परिस्थिती येताच हा कायदा अस्तित्वात आणण्यासाठी संबंधित राजसत्तेने तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर सहा दशके झाली मात्र कोणत्याही राजसत्तेने समान नागरी कायदा लागू करण्याची तत्परता दाखविली नाही. म्हणून आज जेव्हा तोंडी तलाक पद्धतीला मुस्लिम महिला विरोध करतात तेव्हा इतर समाज तोंडी तलाकच्या विरोधा आडून समान नागरी कायद्याची गरज दर्शवीत असतो.\nसमान नागरी कायद्याला धर्मनिरपेक्ष कौटुंबिक कायदा म्हणावे असाही मतप्रवाह आहे. धर्मनिरपेक्ष कौटुंबिक कायदा तयार करणे म्हणजे एका धर्माने दुसऱ्या धर्मावर कुरघोडी करणे असे नाही. सर्व धर्मांतील पुरूष व महिलांना समान न्याय देण्याचा हा प्रयत्न आहे या अर्थाने त्याकडे बघितले पाहिजे. मात्र तसे होत नाही.\nतोंडी तलाक पद्धतीला विरोध करणाऱ्या इतर समाजातील काही प्रथा व परंपरा याविषयी सुद्धा आक्षेप घेतले जातात. तोंडी तलाक थांबवावा आणि बहुपत्नीत्वाला आळा घालावा हा हेतू जेव्हा मुस्लिमांचे कायदे बदलताना बाळगला जातो तेव्हा सप्तपदी, त्यासोबत घेतल्या जाणाऱ्या शपथा आणि कन्यादान करताना पाळले जाणारे पाय धुण्याचे रिवाज यावरही आक्षेप घेतले जातात. अर्थात, हे रिवाज कोणत्याही धर्मग्रंथात नाहीत. ते समाज जीवनात परंपरेने पाळले जात आहेत. यातही बदलासंदर्भात चर्चा केली जात असते. काही समाजांनी विवाह पद्धतीत अमुलाग्र बदल करताना अशा परंपरा संपुष्टातही आणल्या आहेत. त्यात लेवापाटीदार, लेवा गुजर समाज आणि जैन धर्मियांचा उल्लेख करावा लागेल.\nधर्मग्रंथांतील देवाज्ञांचा जेव्हा जेव्हा विषय चर्चेत येतो तेव्हा त्याविषयी अनुकूल व प्रतिकूल मत सातत्याने मांडले जाते. तोंडी तलाकसंदर्भात सुधारणावादी किंवा परिवर्तनवादी मुस्लिम मंडळी जेव्हा बाजू मांडते तेव्हा त्या विरोधात परंपरा व रुढीवादी किंवा कट्टर धर्मवादी विरोधातासाठी उभे ठाकतात. तोंडी तलाकला मागणीसाठी ५० हजार किंवा १० लाख मुस्लिम महिलांनी विरोध केला असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड दावा करते की, तोंडी तलाक पद्धतीस समर्थन देणाऱ्या मुस्लिम महिलांच्या निवेदनावर साडे तीन कोटी महिलांच्या सह्या आहेत. शरियत आणि तोंडी तलाकचे समर्थन करण्यासाठी देशभरातीन साडे तीन कोटी महिलांनी अर्ज केल्याचा दावा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष डॉ. सय्यद सादिक यांनी यापूर्वी केला आहे. या आकडेवारी समोर तोंडी तलाकला विरोध करणाऱ्यांचा आवाज क्षीण ठरविण्याचा प्रयत्न केला जातो.\nअशा प्रकारच्या मानसिकतेत आज तरी मुस्लिम समाज हा तोंडी तलाक संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल स्वीकारेल अशी स्थिती नाही. त्यामुळे हा निकाल आल्यानंतर इतरांनी हुरळून जाण्याचे काहीच कारण नाही. अन्यथा लेखाचे जे शिर्षक आहे, अब्दुल्ला के तलाक में बेगाने दिवाने, असे म्हणण्याची वेळ येईल.\n३) इंटरनेट - लेख - समान नागरी कायद्याची अनिवार्यता - लेखक - प्रा. शमसुद्दीन तांबोळी - http://www.mpscmantra.com/2016/07/blog-post_21.html\n५) इंटरनेट - लेख - महिलांसाठी समान नागरी कायदा - मुस्लिम सत्यशोधक पत्रिका त्रैमासिक २०१४ - http://www.krantijyoti.org/index.php/2014-05-21-08-06-59/556-2015-08-17-05-50-49\n६) इंटरनेट - लेख - इस्लाम मुस्लिम पर्सनल लॉ - इस्लाम दर्शन - http://www.islamdarshan.org/articles.php\n७) इंटरनेट - बातमी - औरंगाबाद टाईम्स - तोंडी तलाकला मुस्लिम मंचचा विरोध - http://www.aurangabadnews24x7.com/article_view\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t4238/", "date_download": "2020-09-26T01:06:43Z", "digest": "sha1:C456RT5TZYV55UFHBPL2WV3UZ2FJ43PM", "length": 4118, "nlines": 86, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रित फ़ुला रे...", "raw_content": "\nप्रित फ़ुला रे आज अवचित असा अचानक येशील का \nलाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का \nतुझीच वेडी धुंद होऊनी रात्र रात्र मी जागताना\nइंद्रधनुचे सप्तरंग तु स्वप्नी माझ्या भरशील का \nक्षणाक्षणाला कणाकणांमध्ये भास तुझा रे होताना\nआयुष्यात माझ्या तु गंध प्रीतीचा भरशील का \nप्रित फ़ुला रे आज अवचित असा अचानक येशील का \nलाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का \nओढ मला रे तुझी असताना सहवासाने तुझ्या\nमला स्वर्गसुख तू देशील का \nकधी अचानक पाऊस बनुनी चिंब भिजवूनी जाशील का \nस्वप्नामधल्या स्वप्न फ़ुला रे वास्तवात तू येशील का\nप्रित फ़ुला रे आज अवचित असा अचानक येशील का \nलाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का \nतुझ्या वाचुनी जगणे माझे व्यर्थ असे रे असताना\nउगाच \"तिला\" तू पाहशील का \nझुरताना मी तुझ्याचसाठी तु कुणावर भाळशील का \nसाथ मी देईन तुलाच जन्मभर तुही माझाच राहशील का \nप्रित फ़ुला रे आज अवचित असा अचानक येशील का \nलाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का \nRe: प्रित फ़ुला रे...\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2020-09-26T02:44:10Z", "digest": "sha1:KONXTVE5M2GJBED56LVXGDPDE434ZSTI", "length": 7415, "nlines": 86, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "भावनात्मक आणि मानसिक कार्ये सुरळीत पाड पाडण्यासाठी झोप ही अत्यंत महत्त्वाची ठरते - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nमुखपृष्ठ एड्स निदान भावनात्मक आणि मानसिक कार्ये सुरळीत पाड पाडण्यासाठी झोप ही अत्यंत महत्त्वाची ठरते\nभावनात्मक आणि मानसिक कार्ये सुरळीत पाड पाडण्यासाठी झोप ही अत्यंत महत्त्वाची ठरते\nझोपेच्या आभावामुळे एकाग्रता साधली जात नाही. त्याचप्रमाणे जी कामे स्मरणशक्तीवर अवलंबून असतात किंवा आकडेवारीची कामे यांवर परिणाम होत असतो.\nनिद्रानाशाची खूप वर्षांपासूनची समस्या असल्यास वृद्धत्वही लवकर येते. HIV च्या रुग्णाला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर त्याच्या जीवनशैलीवर परिणाम होतो उदाहरणार्थ दिवसभर थकवा जाणवतो व कामाचा दर्जाही खालावत जातो.\nHIV पिडीत व्यक्तींना दिवसाच्या थकव्याशिवाय रात्री झोपेसाठी औषधोपचार करुनही झोप येत नाही. यासाठी योग्य ते निदान आणि योग्य ते औषधोपचार केल्यास रुग्णांमधे प्रगती दिसून येते व जीवनाचा दर्जा सुधारतो. नैराश्य किंवा दुःख यामुळेसुद्धा निद्रानाश संभवतो किंवा अगदी सकाळी जागे होणे, झोप तुटक राहणे अश्या समस्या उद्भवतात. HIV पिडीत रुग्णांमधे निद्रानाशाचा प्रादुर्भाव अधिक संभवतो.\nवैद्यकीय संशोधनातून HIV साठी असलेल्या औषधांमुळे निद्रानाशाचा विकार दिसून येतो. सस्टिव्हा नावाच्या औषधामधे निद्रानाशाचे दुष्परिणाम होत असतात. सुरवातीला हा प्रकार दिसून येतो. पण औषधांच्या मात्रेमधील फरक, सकस आहार व व्यायाम यांमुळे हे दुष्परिणाम कमी होत जातात. तज्ञांकडून आरोग्याची तपासणी औषधोपचार व सकस आहार याची फारच जरुरी भासते.\nHIV नसलेल्या मुलांपेक्षा HIV चा संसर्ग असलेल्या मुलांमधे निद्रानाशाचे प्रमाण अधिक असते (निरिक्षणावरुन). HIV संसर्ग नसलेली मुल अभ्यास करताना झोपेतून लवकर जागे होतात व जास्त वेळ जागे राहू शकतात व त्यांना थकवाही जास्त येतो. अचूक निदान व योग्य झोप यांमुळे जीवनाचा दर्जा उंचावतो त्याचप्रमाणे रोगप्रतिकार शक्ती HIV चा संसर्ग असलेल्या मुलांपेक्षा जास्त असते.\nHIV चा संसर्ग असलेल्या व्यक्तींमधे काही सर्वसाधारण शाररिक लक्षणे दिसून येतात. जसे ताप येणे किंवा वजनात घट. याकडे दुर्लक्ष झाल्यास व्यक्तीगत बदल घडतात व ते अशक्त होत जातात.\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://spsnews.in/2017/05/17/aavliapght/", "date_download": "2020-09-26T01:37:50Z", "digest": "sha1:FG3YU5GWWHXCOVW2YD3USXSQ5WUEGHSS", "length": 7432, "nlines": 107, "source_domain": "spsnews.in", "title": "आवळी इथं टेम्पो व दुचाकींचा अपघात : दोन गंभीर जखमी – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nआवळी इथं टेम्पो व दुचाकींचा अपघात : दोन गंभीर जखमी\nदेवाळे ( प्रतिनिधी ) : कोहापूर-रत्नागिरी महामार्गावर आवळी खिंडीत आज दि.१७ मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पिक-अप टेम्पो ने दोन मोटरसायकल ला जोरदार धडक दिल्याने चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करणात आले आहे.\nघटनास्थळावरून व पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आवळी खिंड येथे पिकअप टेम्पो क्र.एम.एच.०८ -डब्ल्यू-३४३७ ने बांबवडे हून देवाळे कडे येणाऱ्या मोटरसायकल क्र.एम.एच.०९ बी.यु. ८२३७ ,तसेच एम.एच.०९ ए.टी.७५९५ या दोन मोटरसायकल ला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल वरील विक्रम बाळासो सुतार वय २० वर्षे राहणार देवाळे तालुका पन्हाळा ,तर सुहास संभाजी सुतार वय १२ वर्षे राहणार दिंडनेर्ली तालुका करवीर हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला आहे. याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nअधिक तपास स.पो.नी.विकास जाधव ,ए.एस.आय.पोळ करीत आहेत.\n← जुलै मध्ये विधान भवनावर सेनेचा मोर्चा\nमाजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन →\nडंपर चालक ‘ विलीएम केराकेटा ‘ पोलिसांच्या ताब्यात\nपन्हाळा पोलिसांकडून प्रेमी युगुल , बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई\nआंबवडे तील जवानाच्या मृत्युप्रकरणी पत्नी सविता ताब्यात\n3 thoughts on “आवळी इथं टेम्पो व दुचाकींचा अपघात : दोन गंभीर जखमी”\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/on-independence-day-amitabh-bachchan-salutes-covid-warriors-akshay-kumar-appeal-to-help-the-needy-127619941.html", "date_download": "2020-09-26T02:35:33Z", "digest": "sha1:LSLOPVWN4GFBBQHYFSOPRKRVSA42B5MV", "length": 9738, "nlines": 88, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amitabh Bachchan salutes Corona Warriors, Akshay Kumar appeals to hawkers | अमिताभ बच्चन यांचा कोरोना वॉरियर्सला सलाम, अक्षय कुमारने केले फेरीवाल्यांना मदत करण्याचे आवाहन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबॉलिवूड कलाकरांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच:अमिताभ बच्चन यांचा कोरोना वॉरियर्सला सलाम, अक्षय कुमारने केले फेरीवाल्यांना मदत करण्याचे आवाहन\nअमिताभ बच्चन यांनी स्वातंत्र्यावरची एक सुंदर कविता सोशल मीडियावर शेअर केली आहे\nअक्षय कुमारने फेरीवाल्यांना मदतीचे आवाहन करताना लिहिले - त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका\nआज देशभरात 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना आणि देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nबिग बींनी कोरोना वॉरियर्सना केला सलाम\nमहानायक अमिताभ बच्चन यांनी यानिमित्ताने एक कविता शेअर केली आणि कोरोनाविरुद्ध लढणार्‍या लोकांचे आभार मानले. बिग बींनी ट्विटमध्ये लिहिले, ‘कोरोना विरोधात लढा देणाऱ्या जवानांना माझा सलाम आणि आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या या शुभदिनी शांती, समृद्धीच्या शुभेच्छा’, असे त्यांनी म्हटले आहे. बिग बींनी 'आज से आजाद अपना देश फिर से' या शीर्षकाची कविता शेअर केली आहे.\nअक्षयने गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले अक्षय कुमारने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो रस्त्यावरील फेरीवाले, भाजीपाला-चहाची दुकाने, छोट्या-छोट्या विक्रेत्यांना मदत करण्याचे आवाहन करत आहे. ज्यांच्या रोजीरोटीवर कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे परिणाम झाला आहे.\nजिससे जितनी हो सके उतनी मदद कीजिये... बस नज़रअंदाज़ मत कीजिये, share the way YOU care.\nअजय देवगणचा 'तान्हाजी' सलाम\nअभिनेता अजय देवगनने आपल्या शैलीत शूर सैनिकांना सलाम केला आहे. त्याने लिहिले, \"74 व्या स्वातंत्र्य दिनी प्रत्येक वीर आणि अनसंग हीरोंना तान्हाजी सलाम करतो.\"\nलता मंगेशकर यांनी गाणे शेअर केले स्वर कोकिळा लता मंगेशकर यांनी त्यांच्या 'सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा' या गाण्याची यूट्यूब लिंक शेअर करुन देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले, \"नमस्कार, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.\"\nनमस्कार. आप सबको स्वतंत्रता दिवस की बहुत बहुत शुभकामनाएँ. जय हिंद https://t.co/jGbIr0RmsV\nत्याचप्रमाणे अनुपम खेर, विक्की कौशल, स्वरा भास्कर, सुनील ग्रोव्हर यांच्यासह इतरही अनेक सेलिब्रिटींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.\nअनुपम खेर यांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.\n निम्न वर्गीय परिवार से आने के बावजूद मैंने अपने सपनों को हमेशा आसमान के आसपास ही रखाअब एक नया सपनाअब एक नया सपना अपने डिजिटलप् लेटफ़ॉर्म पर मेरे जीवन की कहानी अपने डिजिटलप् लेटफ़ॉर्म पर मेरे जीवन की कहानीज़रूर देखियेगाआपके प्यार ने बहुत शक्ति दी हैधन्यवाद\n— Anupam Kher (@AnupamPKher) June 7, 2020 r /> विक्की कौशलने लिहिले- 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.\nस्वरा भास्करने लिहिले- सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nसुनील ग्रोव्हरने लिहिले- स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्हाला अभिमान आहे की आपण भारतीय आहोत.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.mpscmantra.com/2020/01/24/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-24-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-2020/", "date_download": "2020-09-26T00:53:41Z", "digest": "sha1:YHC5B5EMIQN4XIN3CO6YKD3P275MWKX5", "length": 25127, "nlines": 248, "source_domain": "www.mpscmantra.com", "title": "चालू घडामोडी : 24 जानेवारी 2020 - MPSC Mantra", "raw_content": "\nMPSC कोणकोणत्या परीक्षा घेते\nMPSC बद्दल सविस्तर माहिती\nImportant Acts (महत्त्वाचे कायदे pdf स्वरुपात)\nविकास खन्ना यांना एशिया गेमचेंजर पुरस्कार\nचालू घडामोडी – २३ जुलै २०२०\n14 पायांचं झुरळ; इतकं मोठं झुरळ कधी पाहिलंत का\n♻️ तुम्हाला पाठ आहेत का :- महत्वाचे दिन ♻️\nउष्णतेची लाट म्हणजे काय\nजागतिक बँकेतील पदावर अभास झा\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता सर्वांनाच उपचार\nभारतीय क्षेपणास्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये\nप्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY)\nMPSC कोणकोणत्या परीक्षा घेते\nMPSC बद्दल सविस्तर माहिती\nImportant Acts (महत्त्वाचे कायदे pdf स्वरुपात)\nचालू घडामोडी : 24 जानेवारी 2020\nचालू घडामोडी : 24 जानेवारी 2020\nअमेरिकेत येणाऱ्या गर्भवती महिलांना आता व्हिसा नाही\nअन्य देशातून येणाऱ्या गर्भवती महिलांना आता अमेरिकेचा व्हिसा देण्यात येणार नाही. ट्रम्प प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. अन्य देशातून येणाऱ्या गर्भवती महिलांना टेंपररी व्हिजिटर (बी१-बी२) व्हिजा येणार नाही. अमेरिकेतील ‘बर्थ टूरिझम’ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.\nकंपन्यांच्या ‘सीएसआर’ खर्चात १८ टक्के वाढ\nराष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सूचिबद्ध कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये सामाजिक दायीत्व उपक्रम अर्थात ‘सीएसआर’वर ११,९६१ कोटी रुपये खर्च केले, जे आधीच्या वर्षांच्या तुलनेत १८ टक्के अधिक होते. २०१७-१८ मध्ये याच कंपन्यांनी १०,१७९ कोटी रुपये खर्च केले होते. उल्लेखनीय म्हणजे या रकमेपैकी ४,४४० कोटी रुपये हे शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणावर कंपन्यांकडून खर्च करण्यात आले आहेत.\nएनएसई आणि प्राइम डेटाबेस यांनी संयुक्तपणे स्थापित केलेल्या ‘एनएसई इन्फोबेस डॉट कॉम’ या कंपनीने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, एनएसईवर सूचिबद्ध कंपन्यांकडून मागील पाच वर्षांत, सामाजिक उपक्रमांवरील खर्चात वार्षिक सरासरी १७ टक्के दराने दमदार वाढ होत आली आहे. विविध सामाजिक उपक्रमांवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या अव्वल १० कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, इंडियन ऑइल, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, इन्फोसिस, टाटा स्टील, आयटीसी, एनटीपीसी आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. या १० कंपन्यांचा एकूण खर्चात ३६ टक्के वाटा असल्याचे ‘एनएसई इन्फोबेस’चा अहवाल सांगतो.\nरोहिंग्यांचा वांशिक नरसंहार थांबवण्यासाठी उपाययोजना करा\nम्यानमारमधील रोहिंग्या लोकांचा वांशिक नरसंहार थांबवण्यासाठी शक्य ती सर्व उपाययोजना करावी, असा आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) 23 जानेवारी रोजी त्या देशाला दिला. न्यायालयाच्या ‘ग्रेट हॉल ऑफ जस्टिस’मधील सुमारे तासाभराची सुनावणी संपल्यानंतर, आपल्या आदेशाचे पालन करण्यासाठी काय उपाययोजना केली याबाबत चार महिन्यांत माहिती द्यावी आणि त्यानंतर न्यायालयात हे प्रकरण सुरू असताना दर सहा महिन्यांनी अहवाल सादर करावा, असाही आदेश न्यायाधीशांनी म्यानमारला दिला.\nकेंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या धर्तीवर राज्यात ग्रामविकास विभागामार्फत ‘कै. आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम योजना’ राबविण्यात येणार असून त्यातील तालुकास्तरीय विजेत्या गावांना २० लाख रुपये आणि जिल्हा स्तरावरील ग्रावांना ५० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी 23 जानेवारी रोजी केली.\nजयपूर लिटरेचर फेस्टिव्हल : जगातील सर्वांत मोठा ‘साहित्य कुंभ’ . 23 जानेवारीपासून जयपूर येथे सुरुवात.\nका साजरा होतो प्रजासत्ताक दिन\nभारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यामुळे हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. मात्र १९३० साली २६ जानेवारीला लाहोर येथे काँग्रेसचे जे अधिवेशन झाले, त्यातच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. याच अधिवेशनात तिरंगा ध्वजही फडकावण्यात आला. या दिवसाची आठवण म्हणून याच दिवशी राज्यघटना अंमलात आणण्याचे निश्चित करण्यात आले. स्वातंत्र्यांनंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस सुरू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला. हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्वीकृत करण्यात आले. देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झालं. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.\nप्रजासत्ताक दिनी PM वॉर मेमोरियलवर वाहणार श्रद्धांजली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनी अमर जवान ज्योती येथे जवानांना श्रद्धांजली वाहण्याऐवजी नव्याने निर्मित वॉर मेमोरियल येथे श्रद्धांजली वाहणार आहेत. १९७१ च्या भारत-पाक युद्धातील शहिदांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची इंडिया गेटवर १९७२ साली स्थापना करण्यात आली होती. तीन्ही सेना दलांचे प्रमुख स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी अमर जवान ज्योती येथे आदरांजली वाहतात.\nकेवळ पंतप्रधान मोदीच वॉर मेमोरियल येथे पुष्पचक्र अर्पण करणार आहेत. असं पहिल्यांदाच होणार हे की सैनिकांना मानवंदना अमर जवान ज्योतीऐवजी वॉर मेमोरियल येथे दिली जाणार आहे. यंदा पहिलाच असा प्रजासत्ताक दिन आहे, जेव्हा सीडीएसदेखील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.\n४४ एकर जागेत वॉर मेमोरियलची निर्मिती करण्यात आली आहे. वॉर मेमोरियल अमर चक्र, वीरता चक्र, त्याग चक्र आणि रक्षक चक्र या चार चक्रांनी बनलं आहे. यात २५,९४२ जवानांची नावे ग्रेनाइटवर सुवर्णाक्षरांत कोरली आहेत.\nकर्नाटकातही अंधश्रद्धा विरोधी कायदा\nमहाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकनेही अंधश्रद्धा विरोधी कायदा राज्यात लागू केला आहे. याद्वारे अनिष्ठ चालीरिती, मानवी प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्या परंपरा तसेच अमानवी प्रथांचे पालन करण्याचा दबाव आणणाऱ्यांना दंड व शिक्षेची तरतूद आहे. ‘कर्नाटक अमानवी अनिष्ट प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक व उच्चाटन कायदा, २०१७’ असे या कायद्याचे नाव आहे. ४ जानेवारी, २०२०पासून तो राज्यात अंमलात आल्याचे अध्यादेशात म्हटले आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी कमाल ५० हजार रु.पर्यंत दंड व सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे.\nपहिली ४ वर्षे प्रजासत्ताक दिन राजपथावर नव्हे ‘येथे’ साजरा झाला\nभारताचा प्रजासत्ताक दिन नवी दिल्ली येथे राजपथावर मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. राजपथ म्हणजे रायसीना हिल ते राष्ट्रपती भवन हा मार्ग. येथे पथसंचलन होते. मात्र देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा राजपथावर झाला नव्हता. पहिलाच नव्हे तर १९५० ते १९५४ पर्यंत चार वर्षे प्रजासत्ताक दिन राजधानी दिल्लीतच मात्र विविध ठिकाणी साजरा झाला. देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा तत्कालीन इर्विन स्टेडियम म्हणजेच सध्याच्या नॅशनल स्टेडियमवर साजरा झाला. दुसरा प्रजासत्ताक दिन (१९५२) किंग्जवे येथे तिसरा प्रजासत्ताक दिन (१९५३) लाल किल्ल्यावर तर त्यानंतरच्या प्रजासत्ताक दिन सोहळा (१९५४) रामलीला मैदानात पार पडला होता. त्यानंतर १९५५ पासून प्रजासत्ताक दिन राजपथावर साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून आजतागायत या परंपरेत खंड पडलेला नाही.\n‘ब्रेग्झिट’ संसद मंजुरीचा टप्पा पार\nब्रिटनने युरोपीय महासंघातून (ईयू) बाहेर पडण्यासाठी, अर्थात ‘ब्रेग्झिट’साठी संसदेच्या मंजुरीचा टप्पा पूर्ण झाला असून ३१ जानेवारी रोजी ईयूबाहेर पडण्याच्या दृष्टीने अंतिम प्रक्रिया सुरू झाली आहे. ब्रिटनच्या संसदेने ‘युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याविषयक करार विधेयक’ मंजूर केले असून या विधेयकाला आता राणी एलिझाबेथ-२ यांचीही मंजुरी मिळाली आहे.\nNext Next post: चालू घडामोडी : 25 जानेवारी 2020\nतुमच्या शंका आम्हाला येथे विचार\nभूगोल : दाब व वारे भाग 1\nभूगोल: दाब व वारे भाग 2\nवेबसाईट वर अपलोड करण्यात येणाऱ्या नवीन माहितीचे नोटिफेकेशन हवे असल्यास खाली दिलेल्या बॉक्स मध्ये आपला इमेल टाका..\n509,374 लोकांनी आम्हाला भेट दिली\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nRoshani rathod on राज्यव्यवस्था टेस्ट : 30 जुलै 2020\nUpendra on काय आहे पॅरिस हवामान करार\nMPSC Mantra हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. MPSC Mantra च्या वेबसाइट बरोबरच Facebook, Telegram, Twitter, YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहोत. अल्पावधीतच रोपटेरूपी MPSC Mantra या व्यासपीठाचा वटवृक्ष झाला आहे. हे केवळ तुमच्यासारख्या विद्यार्थी मित्रांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. त्याबद्दल Team MPSC Mantra आपले शतशः आभारी आहे. आम्ही नेहमीच दर्जेदार व परिक्षाभिमुख माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही आमचा हा प्रयत्न असाच चालू राहील. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी नेहमी आमच्याशी संपर्कात रहा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/dont-spread-rumours-about-supreme-court-hearing-about-maratha-reservation-said-vinod-tawde-88953.html", "date_download": "2020-09-26T02:09:43Z", "digest": "sha1:VB4MDQL4F2BCII7VRDAADFTCKQTULSSF", "length": 16225, "nlines": 192, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मराठा आरक्षण : सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीबाबत अफवा पसरवू नका : विनोद तावडे", "raw_content": "\nHarley-Davidson चा भारताला अलविदा, उत्पादन थांबवलं\n‘वरिष्ठांचं ऐकावं लागतं’, डिलीट केलेल्या ट्विटवर अजित पवारांचं स्पष्टीकरण\nमाझ्या कमेंटची मोडतोड, भडकलेल्या अनुष्काला गावस्करांचं उत्तर\nमराठा आरक्षण : सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीबाबत अफवा पसरवू नका : विनोद तावडे\nमराठा आरक्षण : सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीबाबत अफवा पसरवू नका : विनोद तावडे\nमराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीबाबत अनेकजण चुकीची माहिती पसरवत आहेत. सरकारी वकील कटनेश्वर यांनी स्पष्ट केले असतानाही, चुकीची माहिती पसरवली जात आहे, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलंय.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीबाबत अनेकजण चुकीची माहिती पसरवत आहेत. सरकारी वकील कटनेश्वर यांनी स्पष्ट केले असतानाही, चुकीची माहिती पसरवली जात आहे, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलंय.\n“राज्य शासनाने केलेल्या मराठा आरक्षणाच्या कायद्यानुसार 12 टक्के शिक्षणासाठी आरक्षण आणि 13 टक्के नोकरीसाठी आरक्षण देण्यात आले आहे. या निर्णयाला स्थगितीचा आग्रह याचिकाकर्त्यांनी केला होता पण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले की, आम्ही मा. उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत पूर्ण वाचल्याशिवाय त्या निर्णयाला स्थगिती देऊ शकत नाही” असं तावडेंनी सांगितलं.\nमराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने (रेट्रॉस्पेक्टीव्ह) लागू करता येत नाही, असे जे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, त्याचासुध्दा चुकीचा अर्थ काही जणांकडून काढला जात आहे. मराठा आरक्षण रेट्रॉस्पेक्टीव्ह पध्दतीने आपण लागू करत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षणात 12 टक्के आणि नोकऱ्यांमध्ये 13टक्के आरक्षणाचा कायदा केला आहे. त्याप्रमाणेच आरक्षण लागू करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.\nमराठा आरक्षणावर दोन आठवड्यांनतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी होणार आहे, त्यामध्ये याचिकाकर्त्यांची बाजू न्यायालयात मांडण्यात येईल, त्यावर शासनाची भूमिका न्यायालयात मांडण्यात येईल. यासाठी दोन आठवड्यांनतर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. परंतु दोन आठवड्यापर्यंत सर्व आरक्षण थांबवा, असे न्यायालयाने म्हटलेले नाही. मराठा आरक्षणाच्या सुनावणीत राज्य शासनाने जी वकीलांची फौज लावली होती, त्यांनी आतिशय समर्थपणे शासनाची बाजू योग्य पध्दतीने मांडली आहे. महाराष्ट्र शासनाची आणि मागासवर्गीय आयोगाची भूमिका ही न्याय आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आज स्थगिती मिळालेली नाही, हे यामधून स्पष्ट होते. तसेच कुठलीही भरती प्रक्रिया व प्रवेश प्रक्रिया थांबणार नाही, ती तशीच सुरु राहील, असेही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.\nSambhajiraje | संभाजीराजेंचे कोल्हापूर महापालिकेला पत्र, मोदींनी भेट नाकारल्याच्या उल्लेखाने…\nमहाराष्ट्र सरकार मराठा तरुणांच्या आयुष्याशी खेळतंय; विनायक मेटेंचा आरोप\nMaratha Reservation : 'ती' मोदी-फडणवीस यांची घोडचूक : हरीभाऊ राठोड\nमराठा समाजाला 'ओबीसी'त आरक्षण दिल्यास मतदानावर बहिष्कार, ओबीसी समाजाचा इशारा\n...तर मराठा समाज शांत होईल, अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील,…\nड्रग्ज देवाणघेवाणीसाठी सुशांतकडून वापर, रियाचा दावा, जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी\nकुटुंबात गृहिणीचं काम आव्हानात्मक, पण कौतुक नाही, कोर्टाने घेतली 'तिची'…\nMaratha Reservation | मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद, मराठा…\nDhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या…\nMI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा…\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nSanju Samson : परफेक्ट टाईम, धडाकेबाज बॅटिंग, संजू सॅमसनचा झंझावात\nIPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज,…\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रोहित…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nHarley-Davidson चा भारताला अलविदा, उत्पादन थांबवलं\n‘वरिष्ठांचं ऐकावं लागतं’, डिलीट केलेल्या ट्विटवर अजित पवारांचं स्पष्टीकरण\nमाझ्या कमेंटची मोडतोड, भडकलेल्या अनुष्काला गावस्करांचं उत्तर\nकोरोनामुळे दीक्षाभूमीवरील धम्म चक्र प्रवर्तन दिन सोहळा रद्द, स्मारक समितीचा निर्णय\nHarley-Davidson चा भारताला अलविदा, उत्पादन थांबवलं\n‘वरिष्ठांचं ऐकावं लागतं’, डिलीट केलेल्या ट्विटवर अजित पवारांचं स्पष्टीकरण\nमाझ्या कमेंटची मोडतोड, भडकलेल्या अनुष्काला गावस्करांचं उत्तर\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/national/gujarat-announces-new-industrial-policy-26577/", "date_download": "2020-09-26T02:35:51Z", "digest": "sha1:ZAPIYKAJCXOADLIJS53ZKYWRLQMU3ICY", "length": 29090, "nlines": 247, "source_domain": "dainikekmat.com", "title": "गुजरातचे नवे औद्योगिक धोरण जाहीर", "raw_content": "\nHome राष्ट्रीय गुजरातचे नवे औद्योगिक धोरण जाहीर\nगुजरातचे नवे औद्योगिक धोरण जाहीर\nअहमदाबाद: चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या विजय रुपाणी सरकारने विदेशी कंपन्यांना मोठी ऑफर दिली आहे. गुजरात सरकारने नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा केली आहे. एखाद्या विदेशी कंपनीने आचीनमधून पला व्यवसाय भारतात हलवल्यास गुजरात सरकार त्या कंपनीला विशेष मदत करेल, असे गुजरात सरकारने राज्याचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर करताना म्हटले आहे.\nगुजरातचे मुख्यमंत्री म्हणून चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर रुपाणी यांनी माध्यमांशी संवाद साधला. नवीन औद्योगिक धोरणाच्या मदतीने आम्हाला आणखी काही चांगले परिणाम अपेक्षित आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात राज्यात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी, उत्पादन क्षमता विकसित करण्यासाठी आणि आत्मनिर्भरतेकडे जाण्यासाठी आपले सरकार प्रयत्न करत आहे, असं रुपाणी म्हणाले.\nदरवर्षी सुमारे ८ हजार कोटींचा खर्च\nगुजरातच्या नवीन औद्योगिक धोरणात अनेक सवलती आणि मोठे निर्णयही घेण्यात आले आहेत. नवीन धोरणात भांडवली अनुदान आणि औद्योगिक घटकांना कर प्रोत्साहन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. नवीन औद्योगिक धोरणांतर्गत राज्यातील उद्योगांच्या विकासासाठी दरवर्षी ८ हजार कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखली गेली आहे.\nअनेक मोठ्या सवलती देण्याचा निर्णय\nत्याखेरीज औद्योगिक कंपन्यांना बाजारातील दराच्या तुलनेत ६ टक्के दराने ५० वर्षांसाठी जमनी भाड्याने देण्याची योजना देखील तयार केली गेली आहे. त्याबरोबरच उद्योगांना सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करणं, वीज दरामध्ये सवलती देण्याची आणि नवीन व्यवसाय स्थापन करण्यासाठी परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची तरतूद करण्यात आली आहे.\nरोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार\nया धोरणाच्या मदतीने राज्यात रोजगार आणि विकासाच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. आणि त्यासाठी अनेक मोठे निर्णयही घेण्यात आले आहेत. यामुळे कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या संकटाला किंचीत फुंकर घालण्याचे गुजरात सरकारचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे़\nPrevious articleओवेसींविरोधात अवमान याचिका दाखल\nNext articleआठ महिन्यांमध्ये तीने केले ६ लग्न\nकोरोनाच्या आयसीयुमध्ये लागली आग\nवडोदरा : गुजरातमधील वडोदरा शहरातील सर सयाजीराव जनरल रुग्णालयात काल आग लागल्याची घटना समोर आली होती. या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवरही उपचार सुरू होते. धक्कादायक...\nआर्थिक वर्षात विक्रमी 2.19 कोटी नवीन विमा पॉलिसींची केली विक्री\nदेशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 2019-20 या आर्थिक वर्षात विक्रमी 2.19 कोटी नवीन विमा पॉलिसींची विक्री...\nगुजरात : राजकोटमध्ये पाण्यात बस अडकली\nगुजरात : देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे, अशातच उशिरा पण जोरदार बरसणाऱ्या पावसाने देशातील अनेक भागात जनविस्कळीत केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये...\nरुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...\nजपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...\nदेशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न\nएच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...\nदस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज\nसरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...\nकेंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी\nव्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...\nईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी\nनवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...\nपंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन\nपंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...\nकेंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला\nनवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...\n८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात\nनवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...\nढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’\nमुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...\nरुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...\nजपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...\nदेशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न\nएच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...\nदस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज\nसरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...\nकेंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी\nव्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...\nईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी\nनवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...\nपंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन\nपंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...\nकेंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला\nनवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...\n८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात\nनवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...\nढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’\nमुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nसोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nलातूर एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nलातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 17, 2020 0\nअमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nलातूर एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nपानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 17, 2020 0\nसोलापुर : मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nमनोरंजन एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nसांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/akshay-kumar-53th-birthday-latest-news-and-updates-how-actor-become-highest-paid-celebrity-127701574.html", "date_download": "2020-09-26T02:55:23Z", "digest": "sha1:MU3OJO5SUNMAK77TIIRDFSGELNEDFLKP", "length": 6780, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Akshay Kumar 53th Birthday: Latest News And Updates, How Actor Become Highest Paid Celebrity | कमाईच्या बाबतीत जगातील टॉप 100 सेलिब्रिटींमध्ये सामील आहे अक्षय कुमारचे नाव, चित्रपटांमध्ये घेतो 50 टक्क्यांपर्यंत प्रॉफिट शेअरिंग - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअक्षयचा 53 वा वाढदिवस:कमाईच्या बाबतीत जगातील टॉप 100 सेलिब्रिटींमध्ये सामील आहे अक्षय कुमारचे नाव, चित्रपटांमध्ये घेतो 50 टक्क्यांपर्यंत प्रॉफिट शेअरिंग\nअक्षय यंदा आपल्या वाढदिवशी स्कॉटलंडमध्ये 'बेलबॉटम' या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.\nअक्षयचा मागील चित्रपट 'गुड न्यूज' हा होता.\nबॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थातच अभिनेता अक्षय कुमार आज आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. ब-याच संघर्षानंतर अक्षयने चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. याच वर्षीच्या फोर्ब्सच्या जगातील हाइएस्ट पेड -100 सेलिब्रिटींच्या यादीमध्ये भारतातून एकमेव अक्षय कुमारचे नाव होते. तसं पाहता, गेल्या एका वर्षात अक्षयची कमाई 22% घटून 364 कोटी रुपये (4.84 कोटी डॉलर्स) झाली. या यादीमध्ये तो 33 व्या क्रमांकावरुन 52 व्या स्थानावर घसरला. गेल्या वर्षी अक्षयचे उत्पन्न 466 कोटी रुपये होते.\nफोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, अक्षय बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे. अक्षयला भारताच्या सर्वात मोठ्या देणगीदार सेलिब्रिटींमध्येही फोर्ब्सने स्थान दिले आहे. त्याने कोरोना रिलीफ फंडाला 25 कोटी रुपये दिले होते.\nगेल्या वर्षीही अक्षय फोर्ब्सच्या यादीतील एकमेव भारतीय होता\nगेल्या वर्षी सर्वाधिक मानधन घेणा-या सेलिब्रिटींच्या फोर्ब्सच्या यादीत भारतातील एकमेव अक्षय कुमारचे नाव होते. गेल्या वर्षी सलमान खान या यादीतून बाहेर पडला होता. 2017 नंतर शाहरुखला या यादीत स्थान मिळवता आले नाही. 2018 पर्यंत अक्षय एका चित्रपटासाठी 27 कोटी रुपये घ्यायचा. 2019 मध्ये त्याची फी वाढून 54 कोटी इतकी झाली. बर्‍याच चित्रपटांमध्ये तो फी न घेता नफा शेअर करतो. रुस्तम (2016) साठी अक्षयने 50% प्रॉफिट शेअरिंग डीलवर सही केली होती.\n742 कोटींची आहे ब्रँड व्हॅल्यू\nडफ अँड फेल्प्स सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन स्टडी 2019 नुसार, अक्षयची ब्रँड व्हॅल्यू 742 कोटी रुपये आहे. या ब्रँड व्हॅल्यूमध्ये अक्षयच्या प्रिंट, डिजिटल अ‍ॅडव्हर्टायझिंग, ब्रँड अ‍ॅडव्हर्टायझिंग, सोशल मीडिया प्रमोशनल पार्टनरशिपमधून मिळणारी कमाई यांचा समावेश होता. रिपोर्ट्सनुसार, अक्षय ब्रँड अ‍ॅडव्हर्टायझिंगसाठी प्रती दिवस दोन ते तीन कोटी रुपये फी घेतो. सध्या अक्षय जवळपास 30 ब्रँडशी जुळला आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/sushant-singh-rajput-suicide-case-rhea-chakrabortys-itr-details-reveals-shocking-things-about-her-income-and-expenditure-127604240.html", "date_download": "2020-09-26T02:34:35Z", "digest": "sha1:RSJFV7HL7ZDHUZWUXURT32WTE7EQCGBJ", "length": 7264, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sushant Singh Rajput Suicide Case: Rhea Chakraborty's ITR Details Reveals Shocking Things About Her Income And Expenditure | दोन वर्षांत 37 लाख रुपये उत्पन्न, तरीही 76 लाखांचे शेअर खरेदी केले, 1 कोटींहून अधिकची मालमत्ता विकली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरियाच्या आयटीआरमधून धक्कादायक खुलासा:दोन वर्षांत 37 लाख रुपये उत्पन्न, तरीही 76 लाखांचे शेअर खरेदी केले, 1 कोटींहून अधिकची मालमत्ता विकली\nरिया चक्रवर्तीचे उत्पन्न कमी असताना गुंतवणूक अधिक कशी, याचा तपास ईडी करत आहे.\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मनी लाँडरिंगचा आरोप असलेल्या रिया चक्रवर्तीच्या आयटीआर (इनकम टॅक्स रिटर्न्स) च्या तपशीलातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार 2017-18 मध्ये रियाने आपली कमाई 18.85 लाख रुपये दाखविली. तर 2018-19 मध्ये 18.35 लाख रुपये कमाईचा उल्लेख आहे. असे असूनही, या दोन्ही वर्षांत तिने केलेली गुंतवणूक ही कमाईपेक्षा अदिक आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) रियाच्या या अतिरिक्त कमाईचे स्रोत शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.\nरियाच्या गुंतवणूकीत आणि मालमत्तेत वाढ खालीलप्रमाणे आहे.\n2018-19 मध्ये रियाची स्थिर मालमत्ता 9 लाख रुपयांवर पोहोचली, जी आधी फक्त 96 हजार रुपये होती.\n2017-18 मध्ये रियाची कमाई 18.85 लाख रुपये होती. पण तिने 34 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. ते कसे केले ईडी याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.\nरियाचा शेअर होल्डर फंड 2018-19 मध्ये 34 लाखांवरून 42 लाखांवर पोहोचला. दोन वर्षांत रियाने 76 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले.\nरियाच्या एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत असलेल्या ठेवींचीही ईडी चौकशी करीत आहे.\n2017 ते 2019 दरम्यान आयटीआरमध्ये कोणत्याही मोठ्या व्यवहाराची माहिती नाही.\nरियाने दोन वर्षांत एक कोटीची मालमत्ता विकली\nआयटीआरमधून धक्कादायक खुलासा झाला आहे. तो म्हणजे रियाने 2017-18 मध्ये मालमत्ता विकून 45 लाखांची कमाई केली. तर 2018-19 मध्ये तिने 58 लाख रुपयांची मालमत्ता विकली होती. रियाने दोन वर्षांत एकुण एक कोटी तीन लाख रुपयांची मालमत्ता विकली होती. परंतु, दोन वर्षांत तिने केवळ 37.2 लाख रुपये कमावले असताना एवढी मालमत्ता कशी जमवली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ईडीने रियाकडे प्रॉपर्टीची कागदपत्रे मागितली आहेत.\nसुशांतच्या दोन कंपन्यांची चौकशी झाली आहे\nवृत्तानुसार, ईडीने सुशांतच्या दोन कंपन्यांचा तपास पूर्ण केला आहे. त्याच्या एका कंपनीची नोंदणी हरियाणातील पत्त्यावर आहे, याची चौकशी अद्याप बाकी आहे. ईडी रिया, तिचे वडील इंद्रजित आणि भाऊ शोविक चक्रवर्ती यांची चौकशी करत आहे. परंतु अद्याप त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. या प्रकरणात रियाचे सीए रितेश शाह, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी आणि फ्लॅट-मेट सिद्धार्थ पिठानी यांचीही चौकशी केली जात आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/nhm-buldhana-bharti-2020/", "date_download": "2020-09-26T03:47:40Z", "digest": "sha1:WZFQBJFLL5NIEIDCN7QEATMSIWV7AVG2", "length": 9092, "nlines": 137, "source_domain": "mahabharti.in", "title": "NHM Buldhana Bharti 2020 - NHM बुलढाणा मध्ये विविध पदांची भरती", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nNHM Buldhana Bharti 2020 | NHM बुलढाणा येथे योग आणि निसर्गोपचारज्ञ पदांची भरती\nNHM Buldhana Bharti 2020 | NHM बुलढाणा येथे योग आणि निसर्गोपचारज्ञ पदांची भरती\nNHM Buldhana Recruitment 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा येथे योग आणि निसर्गोपचारज्ञ पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2020 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nपदाचे नाव – योग आणि निसर्गोपचारज्ञ\nपद संख्या – 1 जागा\nनोकरी ठिकाण – बुलढाणा\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव जि. ए. आ. व. कु. क. समिती तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बुलढाणा\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2020 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nAddress सदस्य सचिव जि. ए. आ. व. कु. क. समिती तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बुलढाणा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nकोरोना हा रोग होण्याची भीती निर्माण झाली नाही पाहिजे या रोगाचा सामना केला पाहिजे\nजॉब पर्मनंट आहे का\nपर्मनन्ट जॉब आहे का\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nUT प्रशासन दमण आणि दीव येथे विविध पदांची भरती\nमुंबई उपनगर जिल्हा येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची भरती\nICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाची भरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, दिव अंतर्गत विविध पदांची भरती\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांच्या 171 जागांसाठी ऑनलाईन अर्ज…\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती\nRITES लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदांची भरती\nजेईई अॅडव्हान्स्ड: ९८ टक्के विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा केंद्र\nनॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरु\nनाशिक महानगरपालिका भरती पात्र आणि अपात्र यादी\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/video/news/27-quota-for-obcs-in-private-sector-soon/videoshow/50917148.cms", "date_download": "2020-09-26T02:47:07Z", "digest": "sha1:PHDTETE6RXHKBLFALD5JGDRFFTW7RIMJ", "length": 8719, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " - खासगी विभागातही ओबीसीनां मिळणार २७% आरक्षण, Watch news Video | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nखासगी विभागातही ओबीसीनां मिळणार २७% आरक्षण\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न...\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २६ सप्टेंबर २०२०\nन्यूजड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nन्यूजबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\n आज कोण ठरणार सरस\nन्यूजमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nन्यूजबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\nन्यूज'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nन्यूजसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nन्यूजशहीद जवान नरेश बडोलेंना काश्मीरात वीरमरण\nन्यूजकृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचं देशव्यापी आंदोलन\nन्यूजभाजप हा एकसंध आणि एक संघ आहे - विनोद तावडे\nहेल्थफिट राहण्यासाठी या सोप्या आसनांचा करा अभ्यास\nन्यूजराज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिटकून बसणारे सरकार - राम शिंदे\nन्यूज'भारत बंद'ची हाक देणारे शेतकरी विरोधी- राम शिंदे\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २५ सप्टेंबर २०२०\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mazespandan.com/2019/12/04/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-26T01:25:37Z", "digest": "sha1:I5TMRHYJLTQUQ4H7BDRH4Q6LHPQ23QY6", "length": 19184, "nlines": 192, "source_domain": "mazespandan.com", "title": "पंखावरचा विश्वास.. | स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nचिणीचा हंगाम आल्याचं चिमणीच्या लक्षात आलं. तिनं ओलंसुकं गवत गोळा केलं. सुतळीचे तोडेबिडे आणले. घरटं विणलं. कुठूनतरी थोडाफार कापूससुद्धा आणला. घरट्यात मऊशार गादी घातली. चिमणा मदतीला होताच. घरटं पूर्ण झालं. दोघे दमूनभागून घरट्यात विसाव्याला बसले. चोचीला चोच लागली. पंखात पंख अडकले. काही दिवसांत चिमणीने अंडी घातली. अहोरात्र अंड्यांची काळजी घेतली. पंखाखाली घेऊन उब दिली आणि अंड्याचं कवच फोडून पिलं बाहेर आली. चोच उघडून चिवचवाट करत अन्नाची याचना करू लागली.\nचिमणीची एकच धांदल उडाली. अन्नासाठी आक्रोशणाऱ्या पिलांना घरट्यात तशीच सोडून ती किड्या मुंग्यांच्या शोधात बाहेर पडली. शिधा चोचीत घेऊन घरट्यात आली. चिवचिवाट करण्यासाठी पिलांची एकच झुंबड उडाली. त्यांचा आपला एकच आक्रोश, “मला दे, मला दे.’ चिमणीने प्रत्येकाच्या चोचीत घास भरवला. पिलं शांत झाली. चिमणीच्या पंखाखाली आली. गाढ झोपी गेली. चिमणी मात्र विचार करत राहिली. पिलांच्या पंखात बळ आल्याचा विश्‍वास येत नाही तोवर त्यांच्यासाठी रोज चारा आणायलाच हवा. वेळप्रसंगी आपल्या पोटाला कमी पडले तरी चालेल. पण पिलांची भूक भागवायला हवी.\nपिलं मोठी होत होती. त्यांच्या अंगावर पिसांची लव दिसू लागली. बघता बघता अंग पिसांनी भरून गेलं. पिलं तुरुतुरु चालत घरट्याच्या तोंडाशी येऊ लागली. विस्तीर्ण निळं आभाळ पाहून एकमेकांकडे पाहून आनंदाने चिऊचिऊ लागली. एका पिलाची नजर खाली जमिनीवर गेली. बापरे केवढं उंचावर आहे आपलं घर. इथून खाली कसं जायचं. खाली बघून त्याला गरगरायला लागलं. अंग आक्रसून घेत ते घरट्यात गेलं. बाकीची पिलंही त्याच्या सोबत आत गेली. चिमणा चिमणी परत आली. चिमणा घरट्याच्या बाहेर एका फांदीवर बसून पहारा देऊ लागला.\nचिमणी आणलेला चारा पिल्लांना भरवू लागली. एक पिलू जरा घाबरल्यासारखं दिसत होतं. तिने त्याला जवळ घेतलं म्हणाली, काय झालं माझ्या बाळाला ते पिलू काहीच बोलेना. मलूल होऊन गेलं होतं. आणि आईला सांगितलं तर आणि रागावेल सुद्धा कदाचित म्हणून त्याने गप्प बसायचं ठरवलं. चिमणीने खूप चिवचिवाट केला. काय झालं म्हणून बाकीच्या पिलांना विचारलं. तेव्हा त्यातील एक जरा बारीक अंगकाठीचं पिलू पुढे येत म्हणालं, आई आई आज किनई दादा घरट्याच्या दारात गेला होता. मी पण गेले त्याच्यामागे. चिनूसुद्धा आला होता, पण दादा सर्वात पुढे होता. आम्ही आभाळ पाहिलं. खूप मस्त वाटलं. पण तेवढ्यात दादाचं लक्ष खाली गेलं आणि त्याला गरगरायला लागलं.\nचिमणीला मनातून आनंद झाला. तिला लक्षात आलं. आता घाबरलं असेल तरी आपलं हेच पिलू सर्वात आधी आभाळात झेप घेणार. दिवस उलटत होते. पिलांच्या पिसातून डाव्या उजव्या बाजूला पंखाने आकार घेतला. चिमणी चारा आणायला निघाली की पिलंही तिच्या पाठोपाठ घरट्याच्या दाराशी यायची. भुर्रकन पंख फडकावत उडणाऱ्या चिमणीला, बाय बाय करायची. पण चिमणी लगेच परत यायची. घरट्याच्या बाहेर फांदीवर बसून राहायची. तिच्या ओढीने पिलं तिच्याकडे झेपावू पाहायची. जागच्या जागेवर पंख फडकवायची. पिलांना उडता येत नसायचं. पण पंख फडकावणाऱ्या पिलांना पाहून चिमणीला समाधान वाटायचं. चला लवकरच भरारी घेतील माझी पिलं. म्हणत पिलांसाठी ती जास्त खाऊ आणायची.\nएक दिवस चिमणी चारा घेऊन आली. पाहिलं तर एक पिलू बाहेर जवळच्या फांदीवर जाऊन बसलं होतं. चिमणी चारा घेऊन घरट्यात येताच चिमणीच्या पाठोपाठ तेही पंख फडकावत घरट्यात आलं. चिमणीने चारा बाजूला ठेवला. त्या पिलाच्या जवळ जात त्याच्या पिसातून चोच फिरवून त्याला कुरवाळलं आणि म्हणाली, छान, तुला उडता येऊ लागलं आहे, पण मी बाहेर गेल्यावर असं नाही करायचं. खाली पडला असतास तर आणि हो, फार लांबसुद्धा नाही जायचं. दमून जाशील. मग आपल्या या उंचावरच्या घरट्यात येण्यासाठी तुझ्या पंखात बळ नाही उरणार. जमिनीवर चालावं लागेल आणि तिथे तुला कोणीही खाऊन टाकेल. आपल्याला कुणीतरी खाऊ शकेल याची पिलाला जाणीवच नव्हती. सहाजिक आता आपल्या पंखात पुरेसं बळ येत नाही तोवर नको ते धाडस नाही करायचं.\nरोज जागच्या जागी पंख हलवायचे. फार तर या फांदीवरून त्या फांदीवर जाऊन बसायचं. चिमणी आता घरट्याबाहेर फांदीवर येऊन बसू लागली. तिन्ही पिलं तिच्या पाठोपाठ फांदीवर यायची. या फांदीवरून त्या फांदीवर उडायची. शिवणापाणी खेळ खेळायची. चिमणीला आता पिलांच्या पंखात बळ आलेलं जाणवत होतं. आणखी काही दिवस गेले. पुन्हा विणीचा हंगाम आला. आता पिलांच्या पंखावर चिमणीला पूर्ण विश्‍वास वाटू लागला. एक दिवस चिमणाचिमणी आणि पिले सगळेच चाऱ्याच्या शोधात बाहेर पडले. पिलं परत आली पण चिमणा चिमणी काही परत आले नाहीत. चिमणी नवं घरटं विणत होती.\nचिमणीच्या एकामागून एक पिढ्या त्या झाडावर जन्माला येत होत्या. पिलं मोठी झाली आकाशात भरारी घेऊ लागली की आधीचे चिमणाचिमणी निघून जायचे. नवी पिलं त्याच झाडावर नव्यानं घरटं बांधायची. त्या झाडाला लागूनच एक खिडकी होती. चिमणीच्या प्रत्येक पिढीतली पिलं त्या खिडकीतून डोकावून पाहायची. त्या घराच्या गोष्टी पिलांना सांगायची. खिडकीतून एक आई दिसायची. तिचं बाळ दिसायचं. बाळ खेळायचं. भूक लागली की टाहो फोडायचं. मग त्याची आई यायची त्याला पदराखाली घ्यायची. बाळ मोठं होऊ लागलं. कृष्ण होऊन रांगू लागलं. त्या बाळाचे बाबा त्याला बोट धरून चालवायला शिकवायचे. चिवचिव कशी करायची तेही शिकवायचे. घोडा होऊन फिरवायचे.\nबाळ आणखी मोठं झालं. शाळेत जाऊ लागलं. मैदानात खेळायला जाऊ लागलं. एक दिवस बाळ पडलं मैदानात. खरचटलं त्याला. तेव्हा त्याची आई केवढी घाबरीघुबरी झाली होती. मग त्याला किती सूचना दिल्या होत्या. बाळ घरी यायचं. पाढे पाठ करायचं. पुढे कसली कसली क्‍लिष्ट आकडेमोड करायचं. बाळ आणखी मोठं झालं. कॉलेजला जाऊ लागलं. मग नोकरीला लागलं. बाळाचं लग्न झालं. घरात नवी नवरी आली. चिमणीच्या पिलांना वाटलं आता. त्या बाळाचे आई-बाबाही दूर कुठेतरी निघून जातील. पण वर्षामागून वर्षे गेली. त्या बाळाचे आई-बाबा, ते बाळ ती नवी नवरी एकाच घरट्यात सुखाने राहात होते.\nचिमणीच्या एका पिलाने दुसऱ्या पिलाला विचारलं. आपण मोठे झालो की आपले आई-बाबा आपल्याला सोडून जातात. मग या बाळाचे आई-बाबा का नाही त्याला सोडून गेले. त्यावर दुसरं पिलू म्हणालं, माणसांना आपल्यासारखं वागून नाही चालत रे. मुलांच्या पंखात विश्‍वास निर्माण करण्यासाठी आई-बाबा खूप कष्ट करतात. मग आई- बाबांच्या पंखातलं बळ कमी झाल्यास त्या बाळांनीच आई-बाबांच्या पंखांत विश्‍वास भरायला हवा ना.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\n← मराठी माणूस आणि व्यवसाय पोस्टमन →\n2 thoughts on “पंखावरचा विश्वास..”\nडालडा आणि मराठी माणूस\nहनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये :\nथोडे दिवस घरातच बसायचं आहे\nस्त्री समाधानी केव्हा असते \nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nकाही भारी मराठी मीम्स..\nजीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत\nस्त्रीचे ओले केस आणि लोकतंत्र\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/fisheries/91c93291c94093593e93292f", "date_download": "2020-09-26T01:25:22Z", "digest": "sha1:5SNOH4D25CL36RIEI75MT7YLMJFFBS6E", "length": 31937, "nlines": 117, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "जलजीवालय — Vikaspedia", "raw_content": "\nज्या काचेच्या भांड्यात अथवा हौदात हौसेखातर, प्रदर्शनाकरिता अथवा अभ्यासाकरिता जिवंत मासे, इतर जलचर प्राणी व जलीय वनस्पती ठेवतात त्याला जलजीवालय म्हणतात. हल्ली बऱ्याच घरी अशी छोटी जलजीवालये केलेली आढळतात. त्यांना घरगुती जलजीवालये असे म्हणतात. घरगुती जलजीवालयांमुळे करमणूक होते आणि जलजीवांचा अभ्यास करता येतो. काचेचे हौद तयार करणे जास्त खर्चाचे वाटत असल्यास काचेच्या लहान गोलाकार भांड्यातही मासे पाळता येतात. घरगुती जलजीवालयांशिवाय मोठी सार्वजनिक जलजीवालयेही असतात. समुद्रकिनाऱ्यावरील बहुतेक महत्त्वाच्या शहरांत जलजीवालये आहेत. नेपल्स, मोनॅको, प्लिमथ वगैरे ठिकाणची जलजीवालये जगप्रसिद्ध आहेत. भारतात मुंबई व मद्रास येथे जलजीवालये आहेत.\nजलजीवालयांची सुरुवात व्यापारात माशांना असलेल्या महत्त्वामुळे झाली. ज्या माशांचा उपयोग खाण्यासाठी करतात ते मासे पाळून, त्यांची अंडी व पिले यांची जोपासना करून खाण्याच्या माशांचे उत्पादन वाढविता येते हे लक्षात आल्यावर लोकांचे लक्ष या उद्योगाकडे वळले. काही हौशी लोकांनी सुंदर व आकर्षक रंगांचे मासे छोट्या काचेच्या भांड्यात ठेवण्यात सुरुवात केली. ही घरगुती जलजीवालयांची सुरुवात होय.\nमासे पाळण्याची प्रथा निदान ४,००० वर्षांइतकी जुनी आहे. सुमेरियन लोक खाण्याकरिता लागणारे मासे लहान तळ्यात अथवा हौदात पाळीत असत. भारतात मासे पाळण्याची चाल केव्हापासून अस्तित्वात आली, हे सांगणे कठीण आहे. परंतु आशिया खंडात चीनमध्ये सोनेरी मासे हौसेखातर बाळगण्याला इ. स. ९६० च्या सुमारास सुरुवात झाली. चिनी हौशी लोकांनी लहान भांड्यात ठेवता येण्यासारख्या माशांच्या उत्तम जाती तयार करण्यात यश मिळविले. काचेच्या भांड्यात अथवा काचा बसविलेल्या हौदात मासे पाळण्याची पद्धत सु. २०० वर्षांइतकी जुनी आहे.\nप्राचीन काळी रोमन लोकांनी जलजीवालये बांधण्याचे प्रयत्न केले. मोठेमोठे हौद बांधून ते समुद्राला जोडलेले असत; त्यामुळे समुद्रातील पाणी हौदात येऊ शकत असे. या ठिकाणी दुर्मिळ व किमती जलचर ठेवीत असत. आजकाल घरगुती किंवा मोठी सार्वजनिक जलजीवालये म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काचेचे हौद येतात; पण ज्या वेळी जलजीवालयांची सुरुवात झाली त्या वेळी काचेसंबंधी शोध पूर्णत्वाला गेले नव्हते. त्यामुळे दगड, माती, विटा, चुना वगैरे वापरून जलजीवालय बांधीत असत. घरगुती जलजीवालयासाठी मातीची छोटी गोलाकार भांडी वापरीत असत. अठराव्या शतकात पौर्वात्य देशांतील आकर्षक सोनेरी मासे फ्रान्समध्ये नेण्यात आले. हौशी लोक हे सोनेरी मासे मातीच्या भांड्यात पाळू लागले. मातीच्या भांड्यात ठेवल्यामुळे ते बाहेरून दिसत नसत. गोड्या किंवा खाऱ्या पाण्यात ठेवलेले मासे पाण्याची रासायनिक घटना बदलल्यामुळे किंवा योग्य तापमान नसल्यामुळे मरतात. असे होऊ नये म्हणून हल्लीची जलजीवालये या सर्व गोष्टींचा विचार करून बांधलेली असतात. याचबरोबर जलजीवालय सुस्थितीत ठेवण्यासाठी जलचरांचे अन्न, रोग, परजीवी (दुसऱ्या जीवांवर जगणारे) प्राणी या सर्व प्रश्नांचा विचार करावा लागतो. जलजीवालयात योग्य अशी प्रकाशयोजना करणे आवश्यक असते.\nज्या शहरांत पाणी शुद्ध करून पुरविले जाते त्या पाण्यात क्लोरिनाचे प्रमाण जास्त असते. अशा पाण्यात मासे ठेवले तर ते मरतात.\nखाऱ्या पाण्यातील मासे खाऱ्या पाण्याच्या हौदात ठेवावे लागतात व त्यात समुद्राचे पाणी खेळवावे लागते. समुद्राचे खारे पाणी पंपाच्या साहाय्याने हौदात खेचून घेतले जाते. समुद्रात कित्येकदा वादळे होतात व त्यामुळे पाण्याचे रासायनिक संघटन बदलते. नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या ठिकाणच्या पाण्याचेही रासायनिक संघटन वेगळे असते. त्यामुळे असे पाणी जर माशांच्या हौदात खेळविले, तर मासे मरतात. अशा प्रकारच्या पाण्याच्या परिसंचरणाला (फिरण्याला) विवृत (उघडे) परिसंचरण असे म्हणतात. ज्या वेळी विवृत परिसंचरण निरुपयोगी ठरते त्या वेळी संवृत (बंदिस्त) परिसंचरणाचा अवलंब केला जातो. जलजीवालयातील पाणी गाळून, शुद्ध आणि स्वच्छ करून परत तेच पाणी जेव्हा जलजीवालयाला पुरविले जाते तेव्हा त्याला संवृत परिसंचरण म्हणतात.\nमासे श्वसनक्रियेत ऑक्सिजन घेतात व कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकतात त्यामुळे जलजीवालयातील पाण्यात कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण वाढते.\nसंवृत परिसंचरणामध्ये जलजीवालयातील पाणी गुरुत्वामुळे एका गाळणीमधून गाळले जाऊन एका हौदात येते. येथे तापमानात आवश्यक तो बदल करून येथून ते पाणी पंपाच्या साहाय्याने उंच जागी असलेल्या हौदात खेचले जाते. पाण्यात काही रासायनिक बदल करणे आवश्यक असेल, तर तेही येथे केले जातात. कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण वाढल्यामुळे येथे वायुमिश्रण केले जाते व परत हे पाणी नळ्यांच्या साहाय्याने जलजीवालयात पुरविले जाते.\nज्या ठिकाणी खाऱ्या व गोड्या पाण्याची जलजीवालये आहेत त्या ठिकाणी उष्ण, समशीतोष्ण व थंड अशा तीन प्रकारच्या तापमानाचे नियंत्रण करावे लागते. गोड्या पाण्याची अम्लता व क्षारता (अल्कलाइनीटी) जशी असेल त्याप्रमाणे यांचे विभाग पाडावे लागतात.\nपाण्याच्या परिसंचरणासाठी वापरण्यात येणाऱ्या नळ्या काचेच्या, सिमेंटच्या, टणक रबराच्या किंवा एक प्रकारच्या प्लॅस्टिकच्या केलेल्या असतात. धातूंच्या नळ्यांमुळे काही विषारी द्रव्ये उत्पन्न होतात म्हणून धातूच्या नळ्यांचा शक्य तो उपयोग करीत नाहीत.\nकृत्रिम रीत्या समुद्रातील पाण्यासारखे पाणी तयार करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत; परंतु हे पाणी सर्व दृष्टींनी समुद्रातील पाण्यासारखे होऊ शकत नाही. समुद्राच्या पाण्यातील जैव घटक व सूक्ष्म प्राणी हे कृत्रिम रीत्या तयार करणे जवळजवळ अशक्य आहे.\nपरजीवी प्राण्यांचा व रोगजंतूंचा उपद्रव\nमाशांना परजीवी प्राण्यांची व रोगजंतूंची सतत भीती असते. माशांना काही रोग झाला, तर त्यांना काही रसायनांत बुडवितात. या रसायनांचा परिणाम रोगजंतूंवर होतो, पण माशांवर होत नाही. अशी रसायने सुलभ रीत्या तयार करता येत नाहीत म्हणून माशांना आदर्श परिस्थितीत ठेवून रोग न होऊ देण्याची खबरदारी घेणे इष्ट होय.\nजलचरांना उत्तम स्थितीत पकडून योग्य त्या ठिकाणी पाठविणे हा जलजीवालयशास्त्रातील एक महत्त्वाचा भाग आहे. लहान व मोठे जलचर एकत्र ठेवता कामा नये कारण मोठे जलचर लहान जलचरांना खाऊन टाकतात. ज्या पाण्यात जलचर ठेवावयाचे ते व ज्या पाण्यात ते आधी होते ते, असे दोन्ही प्रकारचे पाणी सर्व दृष्टींनी सारखे असले पाहिजे. माशांना ज्या ठिकाणी न्यावयाचे तेथे शक्य तितक्या लवकर नेणे आवश्यक असते, नाही तर मासे व इतर जलचर मरतात.\nघरगुती जलजीवालयातील पाण्याची काळजी\nघरगुती जलजीवालय लहान असल्यामुळे त्यामध्ये कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण वाढते व यासाठी वायुमिश्रण करणे आवश्यक असते. जलचरांच्या उच्छ्‌वासावाटे फक्त कार्बन डाय-ऑक्साइडच बाहेर टाकला जातो असे नाही, तर इतरही काही अपशिष्ट (टाकाऊ) द्रव्ये बाहेर टाकली जातात. यामुळे पाण्याचे रासायनिक संघटन बदलते आणि हे पाणी काही जलजीवांना घातक व काहींना हितकारक ठरते. घरगुती जलजीवालयातील पाणी एकदम बदलू नये. पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी कमी होऊ नये म्हणून जलजीवालयावर झाकण ठेवावे लागते.\nघरगुती जलजीवालयात काही जलवनस्पती ठेवणे आवश्यक असते. जलवनस्पतींमुळे जलजीवालयांचे सौंदर्य तर वाढतेच, पण याशिवाय त्यांचे आणखीही महत्त्वाचे उपयोग आहेत. काही वेळा जलजीवालयातील पाण्यात कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण जास्त झालेले आढळून येते. ज्या वेळी जलवनस्पतींमध्ये ⇨ प्रकाशसंश्लेषण चालू नसते त्या वेळी वनस्पती इतर प्राण्यांप्रमाणे ऑक्सिजन घेऊन कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकतात. अशा वेळी कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण वाढते, ज्या वेळी वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण चालू असते त्या वेळी वनस्पती कार्बन डाय-ऑक्साइड घेतात व ऑक्सिजन बाहेर टाकतात. त्यामुळे ऑक्सिजनाचे व कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण सारखे राहते. अशा रीतीने ज्या जलजीवालयात प्राणी व वनस्पतींमुळे ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड यांचे प्रमाण जवळजवळ सारखे राखले जाते, अशा जलजीवालयाला संतुलित जलजीवालय म्हणतात.\nकाही वेळा असे दिसून येते की, माशांची उत्सर्जित (बाहेर टाकलेली) द्रव्ये ही जलजीवालयातील वनस्पतींना खत म्हणून उपयोगी पडतात. वरील सर्व वर्णनावरून असे दिसून येईल की, हौशी लोकांना घरगुती गोड्या पाण्याचे जलजीवालय ठेवणे अधिक सोपे आहे.\nजलजीवालयातील मासे हे बहुधा सायप्रिनोडोंटिस, पर्कोमॉर्फी, लेबरिंथिसी, ऑस्टेरोफायसी या मत्स्य गणांतील असतात. काही अपवाद सोडले, तर या गणांतील मासे आकर्षक असतात. ते संथ पाण्यात, थोड्या जागेत व कृत्रिम अन्नावर जगू शकतात.\nजलजीवालयातील माशांचा निरनिराळ्या तऱ्हांनी अभ्यास करता येतो. त्यांच्या सवयींचे निरीक्षण करणे मनोरंजक असते. प्रजोत्पादनाच्या काळातील सवयींचा अभ्यास केला असता असे दिसून येईल की, काही सायक्लिड माशांमध्ये समागमानंतर लगेच घरट्यासाठी योग्य जागा शोधून घरटे तयार करून त्यात अंडी घातली जातात. अंड्यांतून पिले बाहेर येऊन आपले भक्ष्य मिळवीपर्यंत नर व मादी पिलांना मदत करतात. काही मासे अंडी तोंडामध्ये ठेवतात आणि त्यांतून पिले बाहेर येईपर्यंत त्यांना आपल्या बरोबर बाळगतात. अर्थातच पिले बाहेर पडेपर्यंत या माशांना उपाशी रहावे लागते. काही मासे मिळेल ते साहित्य गोळा करून त्याचे घरटे बांधतात; काही तोंडातील श्लेष्मल (बुळबुळीत) स्त्रावाने बुडबुडे एकमेकांना जोडून त्याचे घरटे तयार करतात. मादीने अंडी घातल्याबरोबर नर ती अंडी बुडबुड्यांच्या घरट्यात ठेवतो व पिले मोठी होईपर्यंत त्यांच्या रक्षणाचे व त्यांना अन्न पुरविण्याचे काम करतो. स्टिकल्‌बॅक मासा एक प्रकारचा श्लेष्मल पदार्थ स्रवतो. हा पदार्थ वाळल्यावर रेशमाच्या धाग्यासारखा दिसतो आणि कडक होतो. असे धागे एखाद्या जलवनस्पतीच्या फांदीला गुंडाळून तो घरटे तयार करतो. काही वेळा एकावर एक अशी तीन चार घरटी आढळून येतात. मादी या घरट्यांत अंडी घालते व अंड्यांची आणि अंड्यांतून बाहेर येणाऱ्या पिलांची सर्व काळजी नरावर सोपवून निघून जाते. सोअर्डटेल (असिपुच्छ), गपी वगैरे मासे जरायुज (पिलांना जन्म देणारे) आहेत. एका वेळी जवळजवळ २०० पिले जन्माला येतात. ही पिले लहान असल्यापासून आपली काळजी घेण्यास समर्थ असतात.\nआर्चर (तिरंदाज) मासा भक्ष्य दिसल्यावर तोंडातून पाण्याचा जोरदार फवारा भक्ष्याच्या अंगावर सोडतो व त्यामुळे भक्ष्य अर्धमेले होते. हा मासा जवळजवळ तीन मी. पर्यंतचा वेध घेऊ शकतो.\nपेरिऑफ्थॅल्‌मस हा मासा समुद्राजवळील चिखलात राहतो. दिवसातील बराचसा वेळ हा मासा पाण्याबाहेर काढू शकतो. पाण्याबाहेर असलेल्या वनस्पतींची मुळे तो कुरतडून खातो.\nजिम्नोटिडी कुलातील विद्युत् ईल हा मासा इतर माशांप्रमाणे पोहू शकतो व तितक्याच सहजतेने मागे मागे पण पोहू शकतो. हा मासा पाण्याच्या तळातील वाळूखाली झोपतो. याच्या या विचित्र सवयीमुळे घरगुती जलजीवालय ठेवणाऱ्या लोकांचा हा आवडता आहे.\nसयामी लढाऊ मासे, ॲमेझॉनमधील एंजल मासे हे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे आहेत.\nउष्ण कटिबंधातील माशांचे मुख्य खाद्य म्हणजे अगदी लहान लहान कीटक किंवा कीटकांचे डिंभ (अळ्या) हे होय. माशांचा आहार अगदी कमी असतो. हे मासे कृत्रिम खाद्य खाऊ शकतात. जर जास्त खाद्य जलजीवालयात टाकले गेले, तर ते खाद्यकण सडतात व पाणी खराब होते. पाण्याचे तापमान ठराविक मर्यादेच्या खाली गेले व पाणी थंड झाले, तर माशांमध्ये रोगांचा उद्‌भव होतो. प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे देऊन रोग हटविता येतात, पण त्यापेक्षा रोगांचा उद्‌भवच होऊ न देणे हे महत्त्वाचे आहे.\nउष्ण व उपोष्ण कटिबंधांतील सागरी माशांचे रंग सुंदर व आकर्षक असतात, पण हे मासे घरगुती जलजीवालयात ठेवणे अवघड काम असते. वरचेवर समुद्रातील पाणी मिळू शकले, तरच हे मासे जगू शकतात. त्यांना हिंडण्यासाठी मोठी जागा लागते; लहान जागेत रहावे लागले तर हे मासे मरतात. पाण्याच्या रासायनिक संघटनेत थोडा बदल झाला, तरी तो सहन न होऊन हे मासे मरतात.\nभारतात मुंबई येथील तारापोरवाला जलजीवालय व मद्रास येथील जलजीवालय ही महत्त्वाची आणि मोठी जलजीवालये आहेत. दररोज शेकडो लोक ही जलजीवालये पहातात. यांत मासे व इतर वैशिष्ट्यपूर्ण जलचरही आहेत. या जलजीवालयांमुळे मनोरंजन व संशोधन हे दोन्ही हेतू साध्य होतात. (चित्रपत्र).\nजलजीवालयातील विविध दृश्ये व मांडण्या\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-special-mechanical-production-roasted-peanuts-prafulla-phale-26824?tid=127", "date_download": "2020-09-26T01:09:27Z", "digest": "sha1:7DULZJHRTQEF6DBVMDGCGGDSCEG7BRMY", "length": 24010, "nlines": 216, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi special Mechanical production of roasted peanuts by Prafulla Phale | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे शेंगदाणे निर्मिती\nयांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे शेंगदाणे निर्मिती\nबुधवार, 15 जानेवारी 2020\nमासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या युवकाने आपल्या प्रक्रिया उद्योगाची गरज लक्षात घेऊन भुईमूग शेंगा फोडणीचे यंत्र स्वकल्पनेतून तयार करून घेतले आहे. हाताळणीस सोपे, कमी खर्चिक व तासाला एक क्विंटलपर्यंत शेंगा फोडणाऱ्या या यंत्रामुळे वेळ, मजुरी व श्रमात बचत होऊन खारा दाणा निर्मितीचा व्यवसाय सुकर झाला आहे.\nमासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या युवकाची घरची सात एकर शेती असून सुमारे ३५ एकर शेती ते कराराने कसतात. खरिपातील भुईमूग हे त्यांचे प्रमुख पीक आहे. दरवर्षी सुमारे सहा एकरांवर त्याचे क्षेत्र असते.\nमासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या युवकाने आपल्या प्रक्रिया उद्योगाची गरज लक्षात घेऊन भुईमूग शेंगा फोडणीचे यंत्र स्वकल्पनेतून तयार करून घेतले आहे. हाताळणीस सोपे, कमी खर्चिक व तासाला एक क्विंटलपर्यंत शेंगा फोडणाऱ्या या यंत्रामुळे वेळ, मजुरी व श्रमात बचत होऊन खारा दाणा निर्मितीचा व्यवसाय सुकर झाला आहे.\nमासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या युवकाची घरची सात एकर शेती असून सुमारे ३५ एकर शेती ते कराराने कसतात. खरिपातील भुईमूग हे त्यांचे प्रमुख पीक आहे. दरवर्षी सुमारे सहा एकरांवर त्याचे क्षेत्र असते.\nभुईमुगाची विक्री बाजार समितीत केली, तर जेमतेम दरांवर समाधान मानावे लागते. अशावेळी उत्पादन आणि उत्पन्न यात फारसे अंतर नसते. त्यामुळे प्रफुल्लने प्रक्रिया करून खारे शेंगदाणे तयार करायचे ठरवले. कृषी विभाग- आत्माचे तालुका तंत्रज्ञान समन्वयक विजय शेगोकार यांच्या मदतीने याविषयातले प्रशिक्षण घेतले. उत्पादनासह पॅकिंग करण्याबाबतही शिकून घेतले.\nसुरुवातीला शेंगदाणे महिला मजुरांकडून फोडून घेतले जायचे.\nत्यासाठी त्यांना द्यावा लागणारा दर - १० रुपये प्रति किलो\nदिवसभरात प्रति महिला १२ ते १५ किलोपर्यंतच शेंगदाणे फोडायची.\nहाताने काम करताना काही शेंगदाणे फुटायचे. त्यावरील आवरण वेगळे व्हायचे. फूट व्हायची.\nत्रुटी दूर करण्यासाठी यांत्रिक मार्ग शोधला\nहाताने शेंगा फोडणीसाठी वेळ, श्रम, मजूरबळ वाया जात होते. अशावेळी शेंगा फोडणीसाठी यंत्र तयार केले तर अशी कल्पना प्रफुल्ल यांच्या डोक्यात आली. त्यांचा चुलतभाऊ अकोला औद्योगिक वसाहतीत काम करायचा. त्याला वेगवेगळी यंत्रे तयार करण्याचे तंत्र अवगत होते. भावाचीच मदत घ्यायचे ठरवले.\nप्रचलित काम पद्धतीतील त्रुटी सांगून त्यात कोणत्या सुधारणा कशा करता येतील, याबाबत प्रफुल्ल यांनी आपल्या डोक्यातील कल्पना भावाला सांगितल्या.\nतसे यंत्र बनविताना असंख्य अडचणी आल्या. यंत्राचा ढाचा तीन ते चार वेळा मोडून नव्याने करावा लागला. त्यामध्ये खर्चसुद्धा झाला. गावातच काम केल्याने मजुरीचा खर्च मात्र थोडा कमी लागला. सातत्याने प्रयोग करीत अखेर प्रफुल्ल यांच्या डोक्यातील यंत्र सहा ते आठ महिन्यांत तयार झाले.\nअसे आहे सुधारीत तंत्र\nताशी फोडली जाणारी शेंग - एक क्विंटल\nत्यापासून मिळणारे शेंगदाणे - ६५ ते ७० किलो\nवरील हॉपरमधून शेंगा टाकण्यात येतात.\nखालील बाजूस असलेल्या चाळणीतून प्रतवारी होते.\nएक एचपीच्या मोटरची ऊर्जा\nखालील बाजूस फॅन. त्यामुळे फोलपटे वेगळी होतात.\nयंत्रनिर्मितीसाठी आलेला खर्च - २८ हजार रु.\nदाणे फुटण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले\nमानवी श्रमाची मोठी बचत होऊन कामांत वेगही आला.\nदररोज दोन ते तीन तास शेंगफोडणी करणे शक्य होते.\nयंत्राच्या आधारे दाण्यांची प्रतवारी होते. त्यातून जाड दाणे वेगळे होतात.\nदुय्यम दर्जाचे दाणे वेगळे होतात. त्यापासून गूळपट्टी तयार केली जाते.\nगावातील अन्य शेतकऱ्यांनाही शेंगा फोडून दिल्या जातात. त्यापासून अतिरिक्त उत्पन्न मिळते.\nशेती ते प्रक्रिया उद्योग\nभुईमूग शेती - सहा एकर\nएकरी उत्पादन - १० ते १८ क्विंटलपर्यंत\nवाण जाड दाण्याचा. त्यापासून उत्कृष्ट दर्जाचे खारे शेंगदाणे (खारेमुरे) तयार करता येतात.\nमार्चपर्यंत सुमारे ६० ते ७० क्विंटल\nभुईमूग बाजारात विकला असता तर खारे शेंगदाणा विक्रीतून\nक्विंटलला ४००० ते ४५०० रुपये मिळणारा दर २०० रुपये प्रति किलो\nम्हणजे किलोला ४० ते ४५ रुपये दर मिळाला असता.\nपूर्वी दिवसभरात होणारी शेंगाफोडणी आता यंत्राद्वारे तासाला १०० किलो\n१२ ते १५ किलो\nयावर्षी अतिपावसामुळे अन्य भागातील भुईमुगाच्या ओल्या शेंगा अकोला बाजारात विक्रीला आल्या नाहीत. अशा काळात फायदा उठवित फाले कुटूंबाने जवळपास महिनाभर दररोज दोन क्विंटल ओली शेंग बाजारात विक्री केली. त्यास ४५ ते ५० रुपये प्रति किलो दर मिळाला. प्रफुल्ल यांनी भुईमुगात आपली प्रयोगशीलता जपली आहे. यावर्षी राहुरी कृषी विद्यापीठाच्या पूर्व प्रसारीत केडीएस १६० वाणाचे ३० किलो बियाणे लावले. त्यापासून पाच क्विंटल उत्पादन घेतले. बियाणे वृद्धींगत करण्याचे काम सुरू केले आहे.\nखारेमुऱ्यांचे ‘वावर’ या ब्रॅंडनेमखाली पॅकिंग केले आहे. अकोलाशहरातील किराणा शॉपी, हॉटेल्सला त्यांचा नियमित पुरवठा होतो. आपल्यातील कल्पनाशक्तीला वाव देऊन उद्योगाला यंत्राची जोड दिलेल्या प्रफुल्ल यांना विविध संस्था, शासनाचे पुरस्कारही मिळाले आहेत.\nसंपर्क : प्रफुल्ल फाले - ९९७०७११३७०, ८३२९०२८०३०\nयांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे शेंगदाणे निर्मिती\nयांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे शेंगदाणे निर्मिती\nयांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे शेंगदाणे निर्मिती\nऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन\nपाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ साधारणतः आपल्याकडे एकच असतो.\nआता शेतमाल खरेदीचे बोला\nऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप पिकांच्या पेरणीचा अहवाल केंद्रीय कृषीमंत्रालयाने\nनिर्यातीसाठी उष्णगृहामध्ये फळे, भाज्यांची लागवड\nजॉर्जिया येथील ग्लेनबेरीज या थंड फळे आणि भाजीपाला प्रक्रिया व साठवणीसंदर्भात काम करणाऱ्या कंपनीने\nउद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच चुप्पी\nभारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे. सकल घरेलू उत्पादनात शेतीचा वाटा १७ टक्के आहे.\nकुलगुरु निवडीत नको तडजोड\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे (जि.अहमदनगर, महाराष्ट्र) कुलगुरु डॉ.\nनिर्यातीसाठी उष्णगृहामध्ये फळे, ...जॉर्जिया येथील ग्लेनबेरीज या थंड फळे आणि भाजीपाला...\nतापमान, वारे, सापेक्ष आर्द्रता...पिकांच्या वाढीवर प्रामुख्याने हवामान घटकांचा (...\nसीताफळातील गर, बिया वेगळे करण्यासाठी...सीताफळ हे फळ पिकल्यानंतर फार काळ साठवणे शक्य होत...\nदर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...\nआवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...\nवितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...\nअत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...\nदूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...\nप्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...\nहायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...\nचाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...\nअपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...\nस्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...\nसुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...\nपिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...\nयांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...\nविरळणी, तण काढणी करा झोपूनअत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...\nअकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...\nयोग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...\nआले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ganpati-immersion-in-all-over-mumbai/articleshowprint/71100118.cms", "date_download": "2020-09-26T01:56:23Z", "digest": "sha1:X3X6TVX5HPUGQFENSN76UKR5CKGM4CBA", "length": 5522, "nlines": 4, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "मुंबईत बाप्पाचे धूमधडाक्यात विसर्जन; वेगवेगळ्या घटनांमध्ये ४१ जखमी", "raw_content": "\nमुंबई: तब्बल बारा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात... लेझिमच्या तालात... गुलाल उधळत आज राज्यभरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', 'गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला…' असा जयघोष करत पाणावलेल्या डोळ्यांनी संपूर्ण राज्यभरात विघ्नहर्त्या गणरायचं विसर्जन सुरू आहे. यावेळी बाप्पाला निरोप देताना भाविक भावूक झाले होते. तर विसर्जन स्थळे, नदी, तलाव आणि चौपाट्यांवर शक्ती आणि भक्तीचा अनोखा संगम पाह्यला मिळत होता. दरम्यान, गिरगावमध्ये विसर्जनादरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये ४१ जण किरकोळ जखमी झाले असून एकजण फ्रॅक्चर झाला आहे.\nबाप्पाच्या आगमनाची लगबगीने तयारी करणारे भाविक मात्र आज बाप्पाला निरोप देताना भावूक झाले होते. सकाळी बाप्पाची मनोभावे पुजा केल्यानंतर पारंपारिक वेषात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकांमध्ये महिला आणि लहान मुलंही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. ढोलताशाचा दणदणाटात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणा देत या मिरवणुका निघाल्याने मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नगर, नागपूर, अमरावती, रत्नागिरी, नवी मुंबई, रायगडसह संपूर्ण राज्यातील रस्ते फुलून गेले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nविसर्जन मिरवणुकांनी अवघी मुंबापुरी दुमदुमून गेली होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुंबईत ९ हजार बाप्पांना निरोप देण्यात आला होता. त्यात ३८३ सार्वजनिक, ८९१८ घरगुती गणपतींसह ६४ गौरींचाही समावेश होता. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास लालबागचा राजा चिंचपोकळी पुलावरून मार्गस्थ झाला. यावेळी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वर्षा निवास्थानी गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. गणेश विसर्जनावेळी कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. मुंबईत तब्बल ५० हजार पोलीस तैनात ठेवण्यात आले होते. या विसर्जन मिरवणुकांवर ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवण्यात आला होता. दरम्यान, गिरगाव चौपाटीवर विसर्जनावेळी झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ४१ जण किरकोळ जखमी झाले. तर एकजण फ्रॅक्चर झाला.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Bielefeld-Joellenbeck+de.php", "date_download": "2020-09-26T01:50:52Z", "digest": "sha1:WH55SCE2U5CLISS3GIYLQS4YP2LJ5NRI", "length": 3530, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Bielefeld-Jöllenbeck", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 05206 हा क्रमांक Bielefeld-Jöllenbeck क्षेत्र कोड आहे व Bielefeld-Jöllenbeck जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Bielefeld-Jöllenbeckमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Bielefeld-Jöllenbeckमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 5206 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBielefeld-Jöllenbeckमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 5206 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 5206 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/jammu-kashmir-article-370-supreme-court/", "date_download": "2020-09-26T02:03:52Z", "digest": "sha1:DR7JAAYBUGVG2P43OSJMWT52LQGPFOL5", "length": 19150, "nlines": 161, "source_domain": "www.saamana.com", "title": "जम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने याचिकाकर्त्यांना सुनावले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे…\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nजम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने याचिकाकर्त्यांना सुनावले\nअखंड आणि एकसंध हिंदुस्थानसाठी देशाची एकता राखणे महत्वाचे आहे. संघराज्य असलेल्या आपल्या देशात जम्मू कश्मीरला काही काळासाठी स्वायत्तता बहाल करण्यात आली होती.ती हंगामी होती.त्यामुळे 370 कलम पुन्हा आणणे शक्य नाही असे केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांना सुनावले .सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरूच राहणार आहे.\nजम्मू कश्मीरला विशेषाधिकार देणारे 370 कलम रद्द करून घटनेतील अनुच्छेद 3 चा वापर करीत राज्याला केंद्रशासित बनवण्याला आक्षेप घेणारी याचिका काश्मिरी वकील राजीव धवन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर ५ सदस्यीय घटनापीठ सुनावणी करीत आहे.या याचिकेवर मत मांडताना ऍटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी सांगितले ,हिंदुस्थान संघराज्यीय देश आहे. सर्व राज्ये हा अखंड देशाचाच अविभाज्य भाग आहेत. शिवाय जम्मू-कश्मीरला विलीनीकरणावेळी दिलेली स्वायत्तता ही हंगामी होती ,कायम नव्हती.मग या राज्याला विशेषाधिकार देणारे ३७० कलम केंद्र सरकारने भंग केले ,तर ती घटनेची अथवा मानवाधिकाराची पायमल्ली होत नाही.देशाच्या अखंडतेसाठी आणि एकात्मतेसाठी असे कठोर निर्णय सरकारला घ्यावेच लागतात असे वेणुगोपाल म्हणाले.\nफुटीरतावाद्याचे समर्थन करणारी भूमिका राज्य सरकारला मान्य नाही -तुषार मेहता\nजम्मू-कश्मिरात फुटीरतावादी भूमिकेचे समर्थन राज्य सरकार कदापिही करणार नाही. त्यामुळे जम्मू -कश्मिर बार असोसिएशनचे वकील जाफर अहमद शाह यांचे बहुतांश राजकीय हेतूने प्रेरित होते. त्याचा या केसशी संबंध नाही.आम्ही आता राज्याला घातक ठरणाऱ्या चुका सुधारतोय.पुन्हा त्याची पुरावृत्ती नको ,असा युक्तिवाद जम्मू -कश्मीर सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला\n..तर याचिका सुनावणीसाठी मोठ्या खंडपीठाकडे सोपवू -सर्वोच्च न्यायालय\nकाश्मिरातील 370 कलम हटवण्याच्या याचिकेवर 5 सद्वयीय घटनापीठ सध्या सुनावणी करीत आहे.जर या सुनावणीत मोठे मतभेद झाले तर ही याचिका आम्ही पुढील सुनावणीसाठी 6 सदस्यीय मोठ्या पीठाकडे पाठवू ,असे घटनापीठाने स्पष्ट केले आहे .या घटनापीठात न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा,न्या. एस के कौल ,न्या. आर सुभाष रेड्डी ,न्या. बी आर गवई आणि न्या. सूर्यकांत यांचा समावेश आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\n व्हिसाशिवाय बिनधास्त फिरा या 16 देशात, केंद्र सरकारने दिली ‘फिरस्ती’ लोकांना खुशखबर\n16 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर आरोपीची निर्दोष सुटका\nप्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण...\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nया बातम्या अवश्य वाचा\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/ongc", "date_download": "2020-09-26T02:22:30Z", "digest": "sha1:4Q42XJ3GZLZD7AS6ZWSKCXZF6PF5VLCJ", "length": 9859, "nlines": 169, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "ONGC Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nONGC Fire | ओएनजीसीच्या आगीचा मुंबईकरांना फटका, सीएनजीचा तुटवडा होण्याची शक्यता\nउरणच्या ONGCची आग आटोक्यात, धुळ्याच्या कोल्ड स्टोरेजचीही आग नियंत्रणात\nONGC Fire : उरणच्या ONGC प्लांटमधील आग नियंत्रणात, 4 जणांचा होरपळून मृत्यू\nउरणच्या ओएनजीसी प्लांटमध्ये (ONGC Fire) लागलेली भीषण आग तब्बल 5 तासाने आटोक्यात आली आहे.\nमुंबईतील सीएनजी स्टेशनवरील पुरवठा पूर्वपदावर, वाहनांच्या रांगा ओसरल्या\nमुंबईतल्या अनेक पेट्रोल पंपावर CNG भरण्यासाठी वाहनांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या होत्या. मात्र रविवारी सकाळच्या सुमारास पंपांवर फारशी गर्दी पाहायला मिळत नाही.\nONGC गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये बिघाड, CNG च्या तुटवड्याची शक्यता\nउरण येथील ओएनजीसीच्या गॅस (ONGC Gas) प्रोसेसिंग प्लांटमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबईतील सीएनजी गॅस (CNG Gas) पंपावर पुरवठ्यात अडचण निर्माण झाली आहे.\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nCSK vs DC Live Score Update : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्लीची चेन्नईवर 44 धावांनी मात\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dailykesari.com/2020/07/23/pune-rain-prediction/", "date_download": "2020-09-26T02:55:01Z", "digest": "sha1:5YRQI7BSSMPLXV7AJUHKC6OQCIH5Y3EN", "length": 11065, "nlines": 167, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "शहरात शुक्रवारी पावसाचा अंदाज - Kesari", "raw_content": "\nघर केसरी रिपोर्टर शहरात शुक्रवारी पावसाचा अंदाज\nशहरात शुक्रवारी पावसाचा अंदाज\nपुणे : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी शहरात पावसाने हजेरी लावली होती. मात्र पुन्हा गुरूवारी शहर आणि परिसरात पावसाने विश्रांती घेतली. उद्या (शुक्रवारी) मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला. घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.\nशहरात गुरूवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र प्रत्यक्षात दिवसभरात पावसाने हजेरी लावली नाही. उद्या (शुक्रवार) पासून येत्या बुधवारपर्यंत रोजच शहरात पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. मागील 24 तासात शहरात 1.5 मि.मी. पाऊस पडला. तर 1 जूनपासून कालपर्यंत 264.7 मि.मी. पाऊस पडला आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यासह गोव्यात काही ठिकाणी उद्या (शुक्रवारी) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. मागील 24 तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकणातही बर्‍याच ठिकाणी पाऊस पडला.\nपूर्वीचा लेखरेल्वेचे कंत्राटी कामगार करणार आंदोलन\nपुढील लेखपुण्यात जोरदार पाऊस\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nबिहार निवडणूक : तीन टप्प्यांत होणार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nबिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली.\nनवनाथ गोरे यांचा खडतर प्रवास होणार सुकर\nभारती विद्यापीठात मिळणार नोकरी\nलोकप्रिय गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले.\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलचा पहिल्याच षटकात पराक्रम\nअतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात\nइशांत शर्मा आणखी दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/technology/redmi9-launching-on-tomorrow-25861/", "date_download": "2020-09-26T01:57:19Z", "digest": "sha1:AZJBUW6NLCHLPV3MEX7BTDIXISACGPWY", "length": 27858, "nlines": 243, "source_domain": "dainikekmat.com", "title": "रेडमी 9 प्राईम उद्या सादर होणार", "raw_content": "\nHome तंत्रज्ञान रेडमी 9 प्राईम उद्या सादर होणार\nरेडमी 9 प्राईम उद्या सादर होणार\nनवी दिल्ली : शाओमी ब्रँडच्या रेडमी 9 प्राईम चे सादरीकरण उद्या भारतात होणार आहे. हा फोन ६ ऑगस्टपासून अमेझॉन प्राईम डे मध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारतातील शाओमीचे व्यवस्थापकीय संचालक आणि जागतिक उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांनी ट्विटरवरून या फोनची माहिती दिली आहे.\nमागच्या महिन्यात या फोनचे लॉन्चिंग चीनमध्ये झाले. तिथे रेडमी ९ मालिकेतील या फोनमध्ये थोडे सुधारित बदल करून नवीन आवृत्तीत उपलब्ध होणार आहे. या फोनची भारतात १०,००० रुपये किंमत असू शकते. या फोनची रिअलमी सी 11 या फोनशी टक्कर होऊ शकते. ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अमेझॉन या ई-कॉमर्स संकेतस्थळावर ‘रेडमी ९ प्राईम’ या फोनचे लॉन्चिंग होणार आहे.\nशाओमी कंपनीच्या विविध माध्यमातून या फोनचे प्रक्षेपण होणार आहे. तसेच ई-स्टोर आणि दुकानांमध्येही लवकरच हा फोन विक्रीस उपलब्ध होणार आहे. या फोनची स्क्रीन 6. 53 इंच पूर्ण एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच सुविधा असू शकते. याचे रिझोल्युशन १०८०×२३४० पिक्सलमध्ये येऊ शकते.\nया फोनमध्ये MediaTek Helio G80 Soc गेमिंग प्रोसेसर आहे. तर ३ रॅम पर्यायी उपलब्ध आहे. १३ मेगापिक्सेल क्वाड कोर रिअर कॅमेरा सह ८+५+२ मेगापिक्सेल कॅमेरे आहेत.. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेल कॅमेरा असून फोनची बॅटरी 5200 MAh आणि USB Type-C चार्जर तसेच जलद चार्जिंगची सुविधा उपलब्ध आहे.\nRead More पाकिस्तानी न्यूज चॅनेल DAWN हॅक, स्क्रीनवर तिरंगा\nPrevious articleपंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रक्षाबंधनाच्या दिल्या देशवासियांना शुभेच्छा \nNext articleउपचाराअभावी चिमुकल्याचा मृत्यू\n7.3 लाख कोटीच्या मोबाइल फोन निर्यातीसाठी अ‍ॅपल आणि सॅमसंगला मंजुरी\nनवी दिल्‍ली, 7 सप्टेंबर : लडाख सीमेवर झालेल्या तणावानंतर भारताने चीनविरोधातअनेक कडक पावले उचलली आहेत. आता केंद्र सरकारने 7.3 लाख कोटी रुपयांचे (100 Billion...\n मोबाईलवरील बोलणे महागणार; युजर्सच्या खिशाला झळ\nनवी दिल्ली : मोबाईल युझर्ससाठी टेलिकॉम सेवा किमान १० टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता आहे. इंडस्ट्रीच्या अंदाजानुसार पुढील ७ महिन्यांत एअरटेल आणि व्होडाफोनला अजस्ट करण्यात...\n24 मोबाईल कंपन्यात करताहेत भारतात येण्याची तयारी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनमधून आपला व्यवसाय हलवणार्‍या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी भारताने अलीकडे केलेल्या घोषणा काम करताना दिसत आहेत. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स ते ऍपलपर्यंतच्या असेंब्ली...\nरुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...\nजपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...\nदेशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न\nएच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...\nदस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज\nसरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...\nकेंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी\nव्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...\nईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी\nनवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...\nपंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन\nपंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...\nकेंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला\nनवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...\n८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात\nनवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...\nढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’\nमुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...\nरुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...\nजपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...\nदेशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न\nएच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...\nदस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज\nसरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...\nकेंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी\nव्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...\nईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी\nनवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...\nपंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन\nपंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...\nकेंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला\nनवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...\n८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात\nनवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...\nढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’\nमुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nसोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nलातूर एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nलातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 17, 2020 0\nअमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nलातूर एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nपानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 17, 2020 0\nसोलापुर : मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nमनोरंजन एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nसांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/27202", "date_download": "2020-09-26T03:19:33Z", "digest": "sha1:AGLXYLGB4WMZIPMSS6PYAAT45L46ISMC", "length": 3710, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विलगीकरण : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विलगीकरण\nसकारात्मक विचार करणे हे नेहमीच आवश्यक असले तरी नेमकी त्याची सर्वाधिक आवश्यकता असते, तेव्हा बुद्धीच्या त्या धडपडीला मनाच्या आशंकारज्जूने बांधून घ्यावे लागते, हेही खरेच. गेल्या काही काळात माझे नवरोजी आणि मी अशाच काहीशा अवस्थेतून जात होतो. त्यातही नवरोजी अधिक प्रमाणात.. आता एक टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर त्याबद्दल लिहिण्याचं बळ आलंय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5223/", "date_download": "2020-09-26T01:10:02Z", "digest": "sha1:72LFQALU75EVUHUJI7DMGP2IKYBKA6W5", "length": 3251, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-का कुणास ठाऊक", "raw_content": "\nयापूर्वी ओढ ही कुणाची वाटली नाही .\nयापूर्वी आठवण कुणाची आली नाही.\nपण का कुणास ठाऊक....\nतुमच्याशी बोलल्या शिवाय आम्हाला कर्मत नाही.\nयापूर्वी वर्षाचे थेंब जाणवले नाही..\nवारा र्‍याचा गारवा जाणवला नाही\nपण का कुणास ठाऊक...\nतुम्हाला भेटल्या शिवाय जीवन तरनार नाही.\nबंध रेश्माचे कधी तुटले नाही.\nआत्मा शरीर हे कधी वेगळे नाही.\nपण का कुणास ठाऊक...\nदुसरी जरी भेटली तरी मन माज़ जुळणार नाही.\nमनस्थती अशी ठीक नाही.\nसमोर भविष्य ही दिसत नाही.\nपण का कुणास ठाऊक...\nभीती ही तू म्हणशिल का \"नाही\".\nबरेच दिवस ज़ाले कविता आम्ही केली नाही.\nसुप्ता हे गुण कधी उजागर ज़ाले नाही.\nपण का कुणास ठाऊक....\nकविता ही वाचून आमच्य वर तुम्ही हसणार तर नाही.\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mpcnews.in/pimpri-newsonline-application-for-prime-ministers-housing-scheme-from-15th-august-174128/", "date_download": "2020-09-26T01:21:06Z", "digest": "sha1:LAMAWZO22Q7Y7N2WRF73OA6KYCITMWM5", "length": 8289, "nlines": 79, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri News: पंतप्रधान आवास योजनेसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज", "raw_content": "\nPimpri News: पंतप्रधान आवास योजनेसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज\nPimpri News: पंतप्रधान आवास योजनेसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज\nएमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत असून 15 ऑगस्टपासून नागरिकांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. च-होली, बो-हाडेवस्ती, रावेत येथे 3 हजार 664 घरे उपलब्ध होणार आहेत.\nयाबाबतची माहिती महापौर उषा ढोरे आणि सभागृहनेते नामदेव ढाके यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली. आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसे गटनेते सचिन चिखले, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, यशवंत भालकर आदी उपस्थित होते.\nकेंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. ’सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाअंतर्गत महापालिका क्षेत्रात पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे.\nमहापालिकेने या संदर्भातील ठराव 20 जुन 2017 ला मंजूर केला होता. त्यानंतर च-होली, रावेत आणि बो-हाडेवस्ती येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी घरे बांधण्याचे काम सुरू केले आहे.\nशहरातील दहा ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्ग घरे निर्माण होणार आहेत. त्यातील तीन ठिकाणचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.\nया योजनेत 30 चौरस मीटरचे घरकुल असून प्रत्येक प्रकल्पामध्ये 14 ते 15 मजली इमारत असणार आहे. घरकुलांसाठी लकी ड्रॉ काढण्यासाठी अर्ज प्रक्रिया करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.\nपंतप्रधान आवास योजनेतील घरकुलासाठी केंद्र शासनाकडून दीड लाख आणि राज्य शासनाकडून एक लाखांचे अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया स्वातंत्र्यदिनापासून सुरूवात होणार आहे.\nयास तीस दिवसांचा कालावधी निश्चित केला असल्याचे महापौर ढोरे यांनी सांगितले.\nऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून नागरी सुविधा केंद्रामध्ये सादर करावी लागणार आहे.\nत्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, पॅनकार्ड, निवडूणक ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, वीज बील आणि पाच हजार रुपयांचा डीमांड ड्राफ्ट भरणे आवश्यक असल्याचे सभागृह नेते ढाके यांनी सांगितले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nDehuroad : कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत रुग्णवाढीचा वेग मंदावला; आज 3 रुग्णांची नोंद\nPune : पुणे विभागात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण घटले; बधितांचा आकडा दीड लाखांच्या पुढे\nIPL 2020 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्ली कॅपिटल्सची चेन्नईवर 44 धावांनी मात\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 7 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची नोंद\nPune News : टाटा मोटर्सने बनविलेल्या 51 विंगर रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nPimpri news: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 9 ऑक्टोबरला निवडणूक\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 164 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 87 नवीन रुग्ण\nPune News : लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदी रद्द करा ; भारतीय मजदूर संघांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/news/divyamarathi-teachers-online-program-127684394.html", "date_download": "2020-09-26T03:13:52Z", "digest": "sha1:FM5UQGII42ZOWEN3QCCJYU2PR6QQ3CBF", "length": 4765, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "divyamarathi teachers online program | ‘दिव्य मराठी’तर्फे आज कोरोना गुरुवंदना, महामारीच्या संकटातही ज्ञानदीप तेवत ठेवणाऱ्या शिक्षकांचा गौरव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोना गुरुवंदना LIVE:‘दिव्य मराठी’तर्फे आज कोरोना गुरुवंदना, महामारीच्या संकटातही ज्ञानदीप तेवत ठेवणाऱ्या शिक्षकांचा गौरव\nकोरोना महामारीच्या जागतिक संकटात शाळा बंद असताना कुठे ऑनलाइनच्या माध्यमातून, तर कुठे ऑनलाइनचे अडथळे पार करत विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे यशस्वी प्रयोग करणाऱ्या राज्यभरातील ४० शिक्षकांना “दिव्य मराठी’च्या वतीने “कोरोना गुरुवंदना’ या विशेष सोहळ्यात गौरवण्यात आले. हा आॅनलाइन गाैरव सोहळा सुरू आहे. सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील ख्यातकीर्त विचारवंत आणि एमकेसीएल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विवेक सावंत प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पंचपोर, मुख्य व्यवस्थापक डाॅ. रेवती नामजोशी, ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे यांच्यासह मान्यवर सहभागी झाले आहेत.\nराज्यातील शाळा बंद असल्या तरी शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास पोहोचवण्याचे आव्हान राज्यातील शिक्षकांपुढे होते. या पार्श्वभूमीवर अनेक शिक्षकांनी सुरू केलेल्या ऑनलाइन, ऑफलाइन प्रयोगांना यंदाच्या गणेशोत्सव निमित्ताने दिव्य मराठीने “शिक्षणाचा श्रीगणेशा’ या वृत्त मालिकेतून सर्वदूर पोहोचवले. त्यांच्या या प्रयोगांची दखल घेतली जावी, या उद्देशाने शिक्षक दिनाच्या निमित्ताने हा विशेष सोहळा होत आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/coronavirus-outbreak-india-cases-live-updates-7-august-2020-127593893.html", "date_download": "2020-09-26T02:15:27Z", "digest": "sha1:SANPX32DK74VPB7TIH63VQSAZPGUPTPX", "length": 4142, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates 7 August 2020 | देशात आता 20.27 लाख केस, गेल्या 24 तासांमध्ये 62 हजार 170 रुग्णांमध्ये वाढ, 7 दिवसात जगात सर्वात जास्त 3.97 रुग्ण भारतात वाढले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोना देश LIVE:देशात आता 20.27 लाख केस, गेल्या 24 तासांमध्ये 62 हजार 170 रुग्णांमध्ये वाढ, 7 दिवसात जगात सर्वात जास्त 3.97 रुग्ण भारतात वाढले\nदेशात गुरुवात 899 मृत्यू झाले, देशात आतापर्यंत 41 हजार 638 लोकांचा गेला जीव\nमहाराष्ट्रात गुरुवारी सर्वात जास्त 11 हजार 514 आणि आंध्र प्रदेशात 10 हजार 328 संक्रमित आढळले\nदेशात कोरोना संक्रमितांची संख्या 20 लाखांपार गेली आहे. शुक्रवारी सकाळी 20 लाख 27 हजार 746 केस समोर आले आहेत. गुरुवारी एका दिवसात 62 हजार 170 रुग्ण वाढले. हा एका दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे. तर महाराष्ट्रात गुरुवारी सर्वात जास्त 11 हजार 514 आणि आंध्र प्रदेशात 10 हजार 328 संक्रमित सापडले.\nदरम्यान, जगात एक नवीन ट्रेंड समोर आला आहे. भारतात रुग्ण 2.4% च्या दराने वाढत आहेत. गेल्या 7 दिवसात (29 जुलै ते 7 ऑगस्ट) भारतात 3.79 लाख रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याच वेळी, अमेरिकेत 3.76 लाख आणि ब्राझीलमध्ये 3.07 लाख लोक संक्रमित झाले. नवीन रुग्णांच्या वाढीचा दर यूएस मध्ये 1% आणि ब्राझीलमध्ये 1.6% आहे. म्हणजेच या तिन्ही देशांपैकी रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाणही भारतात सर्वाधिक आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Hattersheim+a+Main+de.php", "date_download": "2020-09-26T03:37:46Z", "digest": "sha1:QGXRFOYUA4JXXM7D7FEXDFH2CBSVIZBT", "length": 3500, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Hattersheim a Main", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 06190 हा क्रमांक Hattersheim a Main क्षेत्र कोड आहे व Hattersheim a Main जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Hattersheim a Mainमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Hattersheim a Mainमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 6190 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनHattersheim a Mainमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 6190 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 6190 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://spsnews.in/2017/06/15/vruksharopn-2/", "date_download": "2020-09-26T01:02:28Z", "digest": "sha1:DZLSRZVEYWJTXUKKG7V4BWPLSZSRTZCE", "length": 7948, "nlines": 89, "source_domain": "spsnews.in", "title": "गोकुळ चे१० लाख झाडांच्या वृक्षारोपणाचे उद्दिष्ट -श्री विश्वास पाटील – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nगोकुळ चे१० लाख झाडांच्या वृक्षारोपणाचे उद्दिष्ट -श्री विश्वास पाटील\nबांबवडे : गतवर्षी कोल्हापूर जिल्हा दुध सहकारी संघाने ३ लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून, हेच उद्दिष्ट यंदा १० लाख वृक्षरोपणाचे ठरविले आहे. तेंव्हा गोकुळच्या सर्व शीतकरण केंद्र, दुध उत्पादक संस्था या सर्वांनी उत्स्फुर्तपणे वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन देखील करावे, असे आवाहन गोकुळ चे अध्यक्ष श्री विश्वास पाटील (आबाजी ) यांनी केले आहे.\nआज दि.१५ जून रोजी गोगवे तालुका शाहुवाडी येथील पाटणे रस्त्यावर असलेल्या गोकुळ च्या शीतकरण केंद्रात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी श्री पाटील बोलत होते. शीतकरण केंद्राची कामाची जागा सोडता इतर ठिकाणी फळे,तसेच फुलझाडे लावण्यात आलेली आहेत. गेल्या १० वर्षांपासून या झाडांची निगा या शीतकरण केंद्राकडून राखली जात आहे.\nआज झालेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात अध्यक्षांसह संचालकांच्या हस्तेही झाडे लावण्यात आली. यावेळी आंबा,फणस, आदि झाडांचे रोपण करण्यात आले. विशेष म्हणजे इथं लावण्यात आलेली झाडे सेंद्रिय पद्धतीने जतन करण्यात येत आहेत.\nयावेळी संचालिका सौ.अनुराधा ताई पाटील, संचालक विश्वास जाधव, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर, विराज शिंदे, गोकुळ चे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, गोगवे शीतकरण केंद्र शाखाप्रमुख सुधाकर पाटील, सुभाष जामदार, अधिकारी वर्ग,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.\n← गोकुळ च्या गोगवे शीतकरण केंद्रात पर्यावरणपूरक सोलर प्रकल्प -अध्यक्ष श्री विश्वास पाटील\n‘ गोकुळ ‘ चा उर्जा प्रकल्प आर्थिक फायद्यासोबत पर्यावरण पूरक -विराज शिंदे →\n…हीच खरी सामाजिक बांधिलकी\nशिक्षक मागणीच्या आंदोलनाला उपस्थित रहा- कृष्णात पाटील कानसा-वारणा फौंडेशन\nडॉन दाऊद इब्राहीम च्या संपत्ती चा १४ नोव्हेंबर ला लिलाव : हिंदू महासभेचे चक्रपाणी लिलावात सहभागी\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esuper9.com/2020/01/advocate-Harish-Salve.html", "date_download": "2020-09-26T01:29:13Z", "digest": "sha1:WF5CZ7FH2LMWMRYE7V5SFMCKOWSE2SY5", "length": 13847, "nlines": 109, "source_domain": "www.esuper9.com", "title": "ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे 'क्वीन काऊंसिल' नियुक्ती - esuper9", "raw_content": "\nHome > खळबळ जनक > गप्पा > ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे 'क्वीन काऊंसिल' नियुक्ती\nज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे 'क्वीन काऊंसिल' नियुक्ती\nआंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे 'क्वीन काऊंसिल' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे 'क्वीन काऊंसिल'\nआंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे 'क्वीन काऊंसिल' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने 13 जानेवारी रोजीच नव्या नियुक्त्यांसंदर्भातील यादी प्रसिद्धीस दिली असून, त्यामध्ये साळवे यांच्या नावाचाही समावेश आहे. साळवे यांनी केवळ एक रुपया फी घेऊन कुलभूषण जाधवांची बाजू आंतरराष्ट्रीय कोर्टात मांडली होती.\nबॅरिस्टर हरीश साळवे हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कम करणारं हे नाव. देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये समाविष्ट असलेलं नाव. हरीश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. यांना वकिलीचं बाळकडू घरातूनच मिळालं. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते.\nहरीश साळवे हे वकिली करण्याआधी सीए झाले. पण प्रख्यात वकील नानी पालखीवाला यांच्यामुळे प्रभावित झालेल्या साळवे यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची डिग्री मिळवली.\n1980 मध्ये जे. बी. दादाचंदजी आणि कंपनी यांच्याकडे साळवे यांनी इंटर्नशिप केली.\n1980 ते 1986 दरम्यान साळवे यांनी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबतही काम केलं.\nहरीश साळवे यांनी सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयात अँटी डम्पिंग केस लढली.\nकृष्णा गोदावरी बेसिन गॅस वादाची केसही साळवे यांनीच अंबानींच्या बाजूने लढली होती.\nटाटा ग्रुपच्या अनेक खटल्यांची जबाबदारीही साळवे यांनी पेलली होती.\nभारत सरकारसोबतच्या कराच्या वादातही साळवे यांनी व्होडाफोनची बाजू मांडली.\nसलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातही साळवे यांनी सलमानची केस लढली.\nसाळवे यांच्या एका दिवसाची फी ही तब्बल 30 लाख रुपये असून, अंबानी बंधूंच्या एका खटल्यासाठी त्यांनी 15 कोटी आकारल्याचा दावा आहे.\nत्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाईव्ह स्टार्स हॉटेल्स आणि फर्स्ट क्लास एअर तिकीट्स बुक करावी लागतात अशीही ख्याती आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/sanjay-kakade-will-file-a-defamation-suit-of-rs-100-crore-against-the-complainant-against-me-127583555.html", "date_download": "2020-09-26T02:57:27Z", "digest": "sha1:YJ5ZS22SDPTDSZZ7N6HIQNPQHTGE2VMG", "length": 6235, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sanjay Kakade will file a defamation suit of Rs 100 crore against the complainant against me | माझ्याविरोधात तक्रार करणाऱ्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठाेकणार - संजय काकडे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुणे:माझ्याविरोधात तक्रार करणाऱ्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठाेकणार - संजय काकडे\nगुन्ह्याची चौकशी केली जावी : संजय काकडे\nमाझे मेहुणे उद्योजक युवराज ढमाले यांनी मला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यासंदर्भात अद्यापपर्यंत पोलिसांनी मला कळवलेले नाही. ढमालेने माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत मला बोलावून अथवा माझा जबाब न घेता व कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी हा गुन्हा दाखल केला आहे. हे राजकीय षड‌्यंत्र आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर कुणाचा दबाव होता, यासह या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व जनतेसमोर सर्व सत्य यावे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पुणे शहर पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांना निवेदन देणार आहे. तसेच या आरोपांमुळे मानहानी झाली असून, संबंधितांवर मानहानी झाल्याचा व १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, अशी माहिती माजी खासदार संजय काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nकाकडे म्हणाले, माझा प्रत्यक्ष जबाब नोंदवून घेऊन कायदेशीरपणे गुन्हा नोंदवायला हवा होता. कारण ढमालेने तीन वर्षांपूर्वी मी त्याला दम दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इतक्या वर्षांपूर्वी झालेल्या घटनेबाबत कुणी तक्रार देत असेल तर पोलिसांनी त्याविषयी खात्री करून पुढील कारवाई करणे अपेक्षित होते. चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हा नोंदवण्यापूर्वी आरोपांची साधी खात्रीदेखील करावीशी वाटली नाही. पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्यासाठी कुणाचे फोन आले कुणी त्यांच्यावर दबाव आणला कुणी त्यांच्यावर दबाव आणला याविषयी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी एखादा विशेष तपास अधिकारी नियुक्त करून चौकशी करावी. यामध्ये ढमालेचे तक्रार दाखल केल्याच्या संपूर्ण दोन दिवस अगोदर व पोलिस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्याचे दोन तास अगोदर व नंतरचे फोन कॉल रेकॉर्ड तपासले जावे, असेही काकडे यांनी सांगितले.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/maharashtra-government-announces-rs-25-per-liter-as-the-minimum-rate-of-milk-for-dairy-farmers/articleshow/65058143.cms", "date_download": "2020-09-26T02:25:34Z", "digest": "sha1:3TYYYGZYNKXRSKXEXXJ6T3S3TOWLQYQV", "length": 12127, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदुधाला लीटरमागे २५ रुपये दर; सरकारची घोषणा\nदुधाला प्रतिलीटर २५ रुपये दर देण्याचा निर्णय झाला असून २१ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. याबाबत दूग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत तर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधान परिषदेत निवेदन केले.\nगायीच्या दुधाला प्रतिलीटर २५ रुपये दर देण्याचा निर्णय झाला असून २१ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. याबाबत दूग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत तर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधान परिषदेत निवेदन केले. या निर्णयानुसार सर्व दूधसंघ व संस्था आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलीटर २५ रुपये खरेदीदर देणार आहेत.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रक्रिया संस्थांचे पदाधिकारी, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलीटर २५ रुपये इतका दर देण्यास सर्व संस्थांनी एकमताने सहमती दर्शविली.\nदरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी मात्र अद्याप आंदोलनाबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. दुधाला २५ रुपये दर देण्याबाबतचा निर्णय झाल्यानंतर राजू शेट्टी मुंबईतून तातडीने नागपूरकडे रवाना झाले आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात फिरताहेत; हायकोर्टाने दिले ...\nDevendra Fadnavis: ...तर पवारांना अन्नत्याग करावा लागला...\n​बार लुटणाऱ्यांची अर्धनग्न धिंड, महाराष्ट्र पोलिस जिंदा...\nDevendra Fadnavis: शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष; फडणवीस ब...\nकाश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राल...\nमेगाभरतीत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण: फडणवीस महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nकोल्हापूरसंभाजीराजेंनी वेळीच ओळखली चाल; 'असा' उधळला डाव\nपुणेकृषी विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार का; अजित पवार म्हणाले...\nपुणेडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ही' मागणी\nनागपूरविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोटींचा, प्रस्ताव पाठवला\nसिनेन्यूजमाझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा\nदेशकृषी विधेयकांवरून PM मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र\nआयपीएल २०२०Chennai vs Delhi: दिल्लीने गड राखला, बलाढ्य चेन्नईवर साकारला विजय\nमुंबईकंगना प्रकरण: हायकोर्टाने BMC कडे मागितले 'या' तीन मुद्द्यांचे स्पष्टीकरण\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nकार-बाइकदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/sports/badminton/badminton-national-camp-shuttler-sikki-reddy-and-physiotherapist-kiran-c-test-positive-for-covid-19/articleshow/77541288.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2020-09-26T01:06:18Z", "digest": "sha1:VCIAF6O7EZJNB73CASWEFTZUCY3MQXVU", "length": 13247, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएन.सिक्की रेड्डीला करोना; पी व्ही सिंधुला देखील संसर्गाचा धोका\nगेल्या एका आठवड्यात भारतीय क्रीडा क्षेत्रातील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. हॉकीतील ६ खेळाडू, आयपीएलमधील एक कोच आणि आता बॅडमिंटन खेळाडूसह एकाची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.\nबेंगळुरू: करोना व्हायरसच्या काळात अन्य देशातील काही खेळाडूंना करोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. भारतीय खेळाडूंनी मात्र याबाबत काळजी घेतली होती. पण आता गेल्या दोन दिवसात काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोना झाल्याचे समोर येत आहे.\nगेल्याच आठवड्यात भारतीय हॉकी संघातील ६ खेळाडूंना करोना झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचे फिल्डिंग कोच यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आता हैदराबाद येथे सुरु असलेल्या नॅशनल बॅडमिंटन कॅपमध्ये सहभागी होण्यास आलेल्या एन सिक्की रोड्डीला करोना व्हायरसची लागण झाली आहे. सिक्कीच्या फिजिओथेरेपिस्ट किरण जॉर्ज यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. विशेष म्हणजे या दोघांमध्ये करोनाचे कोणतेही लक्षण दिसले नव्हते. तरी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.\nवाचा- क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अनलकी झिरो; १००ची सरासरी गाठता आली नाही\nएन सिक्की रोड्डी आणि किरण जॉर्ज यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या पीव्ही सिंधूला करोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. सिक्की आणि किरण यांचे रिपोर्ट आल्यानंतर बॅडमिंटन कॅम्पला भारतीय क्रीडा प्राधिकरणाने बंद केले आहे. हा कॅम्प पुलेला गोपीचंद यांची बॅडमिंटन अकादीमी घेत आहे. आता या अकादमीला सॅनिटायझेशन करून बंद करण्यात आले आहे.\nवाचा- सचिनने सांगितले, पहिले शतक आणि वकार युनूसच्या बाउंसर चेंडूचे कनेक्शन\nभारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात साईने दिलेल्या माहितीनुसार, या दोघांना कोरनाची कोणतीही लक्षणे नव्हती. दोघी ही हैदराबादच्या आहेत आणि घरातून थेट कॅम्पमध्ये आल्या होत्या. या दोघी कोणाच्या संपर्कात आल्या होत्या याची माहिती घेतली जात आहे.\nवाचा-क्रिकेटपटूच्या भावी पत्नीने विमानतळावर केला डान्स; सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय\nकॅम्पमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाड, प्रशिक्षक, स्टाफ आणि अधिकाऱ्यांची करोना चाचणी घेण्यात आली होती. यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, असे गोपीचंद म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nगोपीकडून प्रणॉयची ‘अर्जुन’ शिफारस महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nसोलापूरपुढचे आंदोलन मातोश्री आणि सिल्व्हर ओकवर; पडळकरांचा इशारा\nअर्थवृत्तसोने दरात घसरण सुरूच; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त\nन्यूजड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nदेशकृषी विधेयकांवरून PM मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र\nविदेश वृत्तचीनला वेसण घालणार जपानच्या पंतप्रधानांची भारताला साद\nकोल्हापूरकरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ऑडिट होणार, २२ पथकं तैनात\nदेश'चीन, पाकला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद भारतीय हवाई दलात'\nकोल्हापूरपोटच्या १० वर्षांच्या मुलाला ५ लाखात तृतीयपंथीयास दिले दत्तक\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nकार-बाइकदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://amarspeaks.com/smile-and-happiness/", "date_download": "2020-09-26T01:25:06Z", "digest": "sha1:HVBJWXZFC3OA6QZF5U7MBXVWRLOIXN3C", "length": 2090, "nlines": 52, "source_domain": "amarspeaks.com", "title": "हास्य आणि आनद – Amar Dhembare", "raw_content": "\nहास्य आणि आनद यात कमालीचा फरक आहे.\nमाणूस हसतोय म्हणजे तो आनंदी असेलच अस नाही. परंतु प्रत्येक आनंदी माणूस हसेल जरूर.….\nहास्य दर्शविता येऊ शकत परंतु आनद दर्शविण्याची गरज नसते, तो आपोआप चेहऱ्यावर किवां देहबोलीतून व्यक्त होतो.\nहास्याचे अनेक प्रकार असू शकतात, परंतु आनंदाचा कोणताही प्रकार नसावा…. हास्य जस वरवरच असू शकतो तस आनंदच नाही…तो आतूनच असतो….’म्हणूनच आनद हा निरागस असतो….\nआनंद हा आनंद असतो…\nआनद हा मनापासून हसण्याचा एक छंद असतो…\nPrevious Post तुझ्या विरहाचे भयानक प्रसंग\nNext Post कही पे महकता हुआ….\nख्वाब टूट गए तो,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dailykesari.com/2020/09/15/the-youth-need-to-shut-their-phones-and-ask-about-the-economy/", "date_download": "2020-09-26T01:58:38Z", "digest": "sha1:5AWZZSNMZMTZEQ6CWO4B2Q5DNZ6WQHYU", "length": 11813, "nlines": 176, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "चित्रपट सृष्टीतील कोडी सोडवण्यात तरुण दंग - Kesari", "raw_content": "\nघर देश चित्रपट सृष्टीतील कोडी सोडवण्यात तरुण दंग\nचित्रपट सृष्टीतील कोडी सोडवण्यात तरुण दंग\nचेतन भगत यांची खंत\nनवी दिल्ली : कोरोनाच्या आव्हानानंतर देश मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. मात्र, त्याचवेळी देशातील तरुण चित्रसृष्टीतील कोडी सोडवण्यात दंग असल्याची खंत प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी व्यक्त केली आहे.\nनागरिकांनी सतत देशाच्या आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष केले तर देशाची अवस्था दयनीय होईल, असेही भगत म्हणाले. जनतेला अर्थव्यवस्थेची काळजी नाही. तरुण अर्थव्यवस्थेच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून चित्रसृष्टीतील कोडी सोडवण्यात दंग आहेत. कोणतेही सरकार सत्तेत असले जनतेला अर्थव्यवस्थेची फिकीर नसते, हे राजकीय नेते ओळखून आहेत. त्यामुळे ते अर्थव्यवस्थेतील संकटे दूर करण्यासाठी वेळ घालवत नाहीत. लोकांनाच अर्थव्यवस्थेची काळजी नसेल तर राजकीय लोक त्यासाठी काळजी का करतील, असा प्रश्न भगत यांनी केला आहे.\nपुढील वर्षी पदव्या घेऊन बाहेर पडणार्‍या किती तरुणांना रोजगार मिळेल हा प्रश्नच आहे. त्यांना चित्रसृष्टीतील कोडी सोडवत बसावे लागेल किंवा नोकरी मिळवण्याचा विचार करावा लागेल, असेही भगत म्हणाले. लॉकडाउन भारताला परवडणारे नसून त्यामुळे आर्थिक परिस्थिती आणखी बिघडणार असल्याचेही ते म्हणाले.\nदेश संकटात असताना तरुणांनी मोबाईल फोनकडे पाहणे थांबवून अर्थव्यवस्थेबद्दल बोलायला हवे. सध्या भारतीय तरुण सभोवताली घडणार्‍या घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत, असेही भगत म्हणाले.\nपूर्वीचा लेखप्रशांत भूषण यांच्याकडून फेरविचार अर्ज दाखल\nपुढील लेखभारतात कोरोनामुक्त होणार्‍यांचे प्रमाण सर्वाधिक\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nतीन टप्प्यांत होणार बिहार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nसीमेवरील दहशतवाद हीच मोठी समस्या\nअणुशास्त्रज्ञ शेखर बसू यांचे निधन\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nबिहार निवडणूक : तीन टप्प्यांत होणार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nबिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली.\nनवनाथ गोरे यांचा खडतर प्रवास होणार सुकर\nभारती विद्यापीठात मिळणार नोकरी\nलोकप्रिय गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले.\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलचा पहिल्याच षटकात पराक्रम\nअतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात\nइशांत शर्मा आणखी दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/tv/news/after-khesari-lal-yadav-and-nirhua-bhojpuri-star-amrapali-dubey-get-offered-of-bigg-boss-14-wanted-to-marry-salman-khan-127684883.html", "date_download": "2020-09-26T00:59:46Z", "digest": "sha1:MD2OI5DV4OPCZCSOW225ZCBBDJDGLRBY", "length": 8215, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "After Khesari Lal Yadav And Nirhua, Bhojpuri Star Amrapali Dubey Get Offered Of Bigg Boss 14, Wanted To Marry Salman Khan | खेसारी लाल यादव आणि निरहुआ नंतर आता भोजपुरी स्टार आम्रपाली दुबेला मिळाली शोची ऑफर, सलमान खानसोबत करायचे होते हिला लग्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबिग बॉस 14 अपडेट:खेसारी लाल यादव आणि निरहुआ नंतर आता भोजपुरी स्टार आम्रपाली दुबेला मिळाली शोची ऑफर, सलमान खानसोबत करायचे होते हिला लग्न\nआम्रपाली सलमानची मोठी चाहती असल्याने ती या कार्यक्रमाला नकार देणार नसल्याचे सांगितले जात आहे.\nबिग बॉसच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनेक भोजपुरी कलाकारांनी आपल्या माइंड गेमने या शोला रंजक बनवले आहे. रवि किशन, निरहुआ (दिनेश लाल यादव), मनोज तिवारी, संभावना सेठ, मोनालिसा, दीपक ठाकूर आणि गेल्या पर्वातील खेसारी लाल यादव यांच्यासह अनेक भोजपुरी स्टार्स या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. आता या यादीत आणखी एक नाव सामील होत आहे. हे नाव आहे स्वतःला सलमानची सर्वात मोठी चाहती म्हणणारी आणि त्याच्यासोबत लग्नाची इच्छा व्यक्त करणारी अभिनेत्री आम्रपाली दुबे.\nभोजपुरी एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतील या लोकप्रिय अभिनेत्रीला बिग बॉसच्या निर्मात्यांनी शोची ऑफर दिली आहे. आम्रपाली सलमानची मोठी चाहती असल्याने ती या कार्यक्रमाला नकार देणार नसल्याचे सांगितले जात आहे.\nस्पॉटबॉयच्या नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, बिग बॉस 14 च्या निर्मात्यांनी आम्रपाली दुबेसोबत संपर्क साधला आहे. यूपी बिहारमध्ये आम्रपालीची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, ज्याचा चॅनेल आणि या शोला फायदा होऊ शकतो. तथापि, या शोमध्ये येण्यासाठी तिने होकार दिला की नाही याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आम्रपालीने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, ती सलमानची इतकी मोठी फॅन आहे की तिला त्याच्याबरोबर लग्न करायचे आहे.\nआम्रपालीने करिअरची सुरूवात हिंदी टीव्ही कार्यक्रमातून केली\nआम्रपालीने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात हिंदी डेली सोपद्वारे केली. 'रहना हैं तेरी पलकों के छांव में' ही तिची पहिली मालिका होती. याशिवाय 'मायका' आणि 'सात फेरे' या मालिकांमध्येही ती झळकली आहे. टीव्ही इंडस्ट्रीत काम करत असताना तिला भोजपुरी इंडस्ट्रीतून ऑफर आली आणि त्यानंतर तिने आपला मोर्चा तिकडे वळवला. तिने भोजपुरी चित्रपट आणि म्युझिक अल्बममधून 2014 मध्ये करिअरची नवी सुरुवात केली होती.\nयंदाच्या पर्वात 13 सेलिब्रिटी आणि 3 कॉमनर्स बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. कॉमनर्सची डिजिटल ऑडिशनद्वारे निवड केली जाईल. तर घरात स्पर्धक म्हणून सहभागी होणा-या बर्‍याच टीव्ही सेलेब्सची नावे यापूर्वी समोर आली आहेत. नैना सिंह, निया शर्मा, पवित्र पुनिया, आकांक्षा पुरी, आमिर अली आणि शिविन नारंग यांची नावे कन्फर्म समजली जात आहेत. या व्यतिरिक्त सध्या मेकर्स अनु मलिक, राधे मां, साक्षी चोप्रा सारख्या बर्‍याच लोकांशी चर्चा करत आहेत. सध्या शोच्या सेटची दुरुस्ती सुरू आहे, ती पूर्ण झाल्यावर 4 ऑक्टोबरला या कार्यक्रमाचा भव्य प्रीमियर असेल.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/kolhapur/news/four-family-tried-to-commit-suicide-in-front-of-collector-office-police-rescued-them-in-kolhapur-127620042.html", "date_download": "2020-09-26T03:16:12Z", "digest": "sha1:S7HM4AZQSL7A3AJ2XIO56CAQUCKA67EB", "length": 5694, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "four family tried to commit suicide in front of collector office, police rescued them in kolhapur | कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घटना, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्वातंत्रदिनीच चार कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न:कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घटना, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला\nकोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर\nजमिनीच्या वादातून कोल्हापूर जिल्ह्यातील चार कुटुंबांतील सदस्यांनी आज स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महदनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेऊन या चार कुटुंबांनी आपल्या लहान मुलांसह पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली. काहीकाळ याठिकाणी तणाव निर्माण झाला. पण, पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.\nजमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप या कुटुंबीयांनी केला आहे.\nआत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार , पाचगाव रस्त्यावरील डिव्हिजन सर्वे क्रमांक तीन येथे एकाच प्लॉटच्या उताऱ्यावर तिघांची नावे नोंद झाली आहे. यासाठी पाचगाव ग्रामपंचायत, करवीर तहसील, प्रांत ऑफिसकडे याबाबत तक्रार केली आहे. बेकायदेशीर उतारा रद्द करावा, अशी मागणी या चार कुटुंबांतील लोक वारंवार करत आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.\nसध्या या ठिकाणी एका समाजाच्या इमारत बांधण्याचे बांधकाम सुरू आहे. त्याला ग्रामपंचायत आणि तलाठी यांचा आशीर्वाद असल्याचाही आरोपही या कुटुंबीयांनी केला आहे. वारंवार जिल्हा प्रशासनाकडे याबाबत न्याय मागितला असता जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे असे कुटुंबीयातील मारुती भालकर यांनी सांगितले.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/layoff-for-worker-in-bosch-company-at-nashik-unit/articleshow/70846261.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-26T03:23:00Z", "digest": "sha1:G5POWVGPRDISZI2F4R4BFFBJOICIMDFM", "length": 16894, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवाहन उद्योगांवरील मंदीचे सावट गडद होत असून, त्याचा मोठा परिणाम उद्योगांवर होऊ लागला आहे. याची झळ नाशिकलाही बसू लागली आहे. बॉशसारख्या मोठ्या कंपनीने आठ दिवस उत्पादन निर्मिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\n२६ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत ब्रेक\nकायमस्वरूपी १३०० कामगारांना सक्तीची सुटी\nटेम्पररी व कंत्राटी कामगारांची आधीच 'सुटी'\nबॉशबरोबरच इतर औद्योगिक कामगारांमध्ये भीतीचे वातावरण\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nवाहन उद्योगांवरील मंदीचे सावट गडद होत असून, त्याचा मोठा परिणाम उद्योगांवर होऊ लागला आहे. याची झळ नाशिकलाही बसू लागली आहे. बॉशसारख्या मोठ्या कंपनीने आठ दिवस उत्पादन निर्मिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कायमस्वरुपी असलेल्या १३०० कामगारांनाही याचा फटका बसला आहे. त्यांना आठ दिवसांची सक्तीची सुटी देण्यात आली आहे. २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत हा ब्रेक घेण्यात आला आहे. याचबरोबर टेम्पररी व कंत्राटी कामगारांची आधीच 'सुटी' केली आहे. या निर्णयामुळे बॉशबरोबरच इतर औद्योगिक कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.\nवाहन उद्योगात मंदी आल्यामुळे डिझेल गाड्यांमधील पार्ट बनविणाऱ्या नाशिकच्या बॉश कंपनीने आठ दिवस उत्पादन न करण्याचा निर्णय घेतला आहे. याअगोदर कंपनीने जुलै महिन्यात व त्या अगोदरही उत्पादन निर्मिती बंद केली होती. पण, त्यावेळेस तीव्रता जाणवली नाही. पण, आता हा निर्णय घेतल्यामुळे औद्योगिक कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बॉश कंपनीने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच उत्पादन बंद करण्याची माहिती स्टॉक एक्सजेंचला कळवली होती. आता २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत हा ब्रेक घेण्यात आला आहे.\nनाशिकमध्ये वाहन उद्योगाशी निगडीत बॉश व महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या दोन कंपन्या आहेत. या कंपन्यांवर अनेक छोट्या कंपनीचे अर्थकारण अवलंबून आहे. महिंद्रा कंपनीनेसुध्दा वाहन उत्पादन कमी केले आहे. एकूणच या मंदीमुळे कंपन्यांनी ले ऑफ, इन आऊट, बरोबरच कामगारांना मिळणाऱ्या भत्त्यांनासुध्दा कात्री लावली आहे. वाहन मंदीमुळे सीएट, सिप्रा, सुमो ऑटो टेक, अल्प इंजिनीअरिंग, आर्ट रबर, झेटेक्स, असोसिएट, इटॉन, लेयर कॉर्पोरेशन, प्रीमियम टूल्स, लक्ष्मी इंडस्ट्रीज यांसह एक हजारापेक्षा जास्त लघु व मध्यम उद्योगाला फटका बसला आहे.\nदेशात जून महिन्यात २५ टक्के वाहन विक्रीत घट झाली. त्यानंतर हा आकडा खालावतच असल्यामुळे वाहन उद्योगांमध्ये चिंता वाढली आहे. वाहन उद्योगात मंदी येण्याची अनेक कारणे असली तरी त्यात जीएसटी, इंधनाचे दर ही कारणे असल्याचे बोलले जात आहे. त्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीच्या सरकारच्या निर्णयाचा सुध्दा या कंपन्यांवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबरच एकूणच बाजारात मंदीचे कारणही सांगितले जाते.\nबॉश कंपनीत कायमस्वरुपी १३०० कामगार आहेत. त्यात तात्पुरते ९५० आणि ७०० कंत्राटी पध्दतीने कामगार आहेत. त्याचप्रमाणे ३५० अधिकारी आहेत. एकूण ३३०० कामगार कंपनीत असून, त्यात तात्पुरते व कंत्राटी पध्दतीच्या एकूण १६०० ते १७०० कामगारांना यापूर्वीच ब्रेक दिल्याचे युनियनने सांगितले. आता कायमस्वरुपी कामगारांनाही आठ दिवस सक्तीने रजा दिली आहे.\nया सर्व मंदीमुळे बॉश कंपनीत ४० महिन्यांपासून वेतनवाढीचा करारही लांबणीवर पडला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये रोष आहे. हा करार करण्याबाबात अनेक वेळा बैठका झाल्या, पण करार काही झाला नाही.\nवाहन उद्योगातील मंदी व सरकारच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या धोरणामुळे आठ दिवस काम बंद असणार आहे. कंत्राटी व टेम्पररी कामगारांना अगोदर ब्रेक मिळाला आहे. कायमस्वरुपी कामगारांचे अनेक भत्ते मिळणे बंद झाले आहे. वेतनवाढीचा करारही रखडला आहे. सरकारने यात हस्तक्षेप करण्याची अपेक्षा आहे.\n- प्रवीण पाटील, अध्यक्ष, बॉश कामगार युनियन\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n ४८ दिवसांत पार केले पृथ्वी ते...\nमराठा आरक्षण: सांगलीच्या पाटलांचा कोल्हापूरच्या पाटलांन...\nमास्क न घालता पुजाऱ्यानं काढला सेल्फी; गुन्हा दाखल...\nभरवस्तीत अवतरला लाखात एक ‘अल्बिनो’...\n नाशिक सोडताना विश्वास नांगरे-पाटील भा...\nराष्ट्रपती कोविंद ऑक्टोबरमध्ये शहरात\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\nदेशकृषी विधेयकांवरून PM मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र\nआयपीएल २०२०Chennai vs Delhi: दिल्लीने गड राखला, बलाढ्य चेन्नईवर साकारला विजय\nनागपूरशहीद पित्याच्या शौर्याला मुलींचा अनोखा सलाम\nसिनेन्यूजमाझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा\nपुणेकृषी विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार का; अजित पवार म्हणाले...\nमुंबईशिवसेना कधीच कन्फ्यूज नव्हती; राऊतांचे फडणवीसांना उत्तर\nपुणेडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ही' मागणी\nमुंबईकरोना: रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यापूर्वी कुटुंबीयांची संमती बंधनकारक\nविज्ञान-तंत्रज्ञानसॅमसंगने आणले AI पॉवर्ड वॉशिंग मशीन, मोबाइलने करा कंट्रोल\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE/XsoSb8.html", "date_download": "2020-09-26T02:33:48Z", "digest": "sha1:PQ6WHGDBISIP2ZFLDX7INRHNNQAJ4KWO", "length": 11307, "nlines": 61, "source_domain": "rajsatya.page", "title": "ज्येष्ठ नागरिकांनी मधील कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nज्येष्ठ नागरिकांनी मधील कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना\nMarch 31, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nज्येष्ठ नागरिकांनी मधील कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना\nमुंबई : ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असून त्यांच्यामधील या विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या आहेत.\nजगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या विषाणूचा भारतातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊन आणि संचारबंदीसाख्या उपाययोजनांतून कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सोशल मीडियाद्वारे जनतेशी वारंवार संवाद साधून कोरोनाला रोखण्यासाठी घराबाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहन केले आहे.\nकोरोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येकाने सहभागी होऊन शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. वयोमानानुसार कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती हे महत्त्वाचे कारण असले तरी अनेक ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीशी संबंधित आजार, दमा किंवा श्वसनाचे विकार आदी व्याधी असतात. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा ज्येष्ठांना असलेला अधिक धोका टाळण्यासाठी कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर राहावे लागणार आहे. त्यासाठी आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.\nकोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ज्येष्ठ नागरिकांकरिता मार्गदर्शक सूचना-\n■ घरीच रहा. घरी येणाऱ्या कोणत्याही पाहुण्यांच्या किंवा अभ्यागतांच्या भेटी घेणे\nटाळा. भेटणे अगदीच आवश्यक असेल तर बोलताना किमान एक मीटरचे अंतर राखा.\n■ थोड्या-थोड्या वेळाने आपला चेहरा आणि हात साबणाने स्वच्छ धुवा.\n■ खोकताना किंवा शिंकताना आपल्या शर्टची बाही, हातरूमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करून तोंड झाका. खोकून किंवा शिंकून झाल्यांनतर रूमाल किंवा कपडे साबणाने स्वच्छ धुवून घ्या आणि टिश्यू पेपर झाकणबंद असलेल्या कचरा डब्यात टाका.\n■ घरी बनविलेला ताजा आणि पोषक आहार घ्या, या आहारातून आपल्या कुटुंबाला योग्य पोषण मिळेल याची काळजी घ्या. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी वारंवार भरपूर पाणी प्या. शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ताज्या फळांचा रस प्या.\n■ व्यायाम, प्राणायाम करा.\n■ आपल्याला असलेली पथ्ये पाळा. डॉक्टरांनी दररोज घ्यायला सांगितलेली सर्व औषधे नियमितपणे घ्या.\n■ दूर राहत असलेले आपले कुटुंबीय, नातेवाईकांबरोबर कॉल अथवा व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधा, गरज पडल्यास त्यासाठी कुटुंबियांची मदत घ्या.\n■ मोतीबिंदू किंवा गुडघे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया जर आधीच ठरल्या असतील तर त्या शस्त्रक्रिया काही काळासाठी पुढे ढकला.\n■ वारंवार स्पर्श केल्या जाणाऱ्या सर्व ठिकाणांना जंतुनाशकाचा वापर करून पाण्याने नियमित स्वच्छ करा.\n■ स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. जर सर्दी, कोरडा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास यासारखी लक्षणे आढळून आल्यास त्वरित जवळच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दाखवा, त्यांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करा.\nहे करू नका- (DON’Ts)\n■ शिंक किंवा खोकला आल्यास मोकळ्या हातावर किंवा चेहरा न झाकता खोकलू किंवा शिंकू नका.\n■ आपल्याला ताप, खोकला किंवा सर्दी असेल तर कोणाच्याही जवळ जाऊ नका.\n■ आपले डोळे, नाक, जीभ किंवा चेहऱ्याला स्पर्श करू नका.\n■ आजारी किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या अजिबात जवळ जाऊ नका.\n■ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च्या मनाने कोणतेही औषध किंवा गोळ्या घेऊ नका.\n■ कोणाचीही गळाभेट घेऊ नका अथवा हस्तांदोलन सुद्धा करू नका.\n■ सध्याची परिस्थिती पाहता नियमित तपासणी किंवा फॉलोअप असेल तरीही त्यासाठी दवाखान्यात जाऊ नका. अगदीच आवश्यक असल्यास फोनवरुन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे (टेलिकन्सल्टिंग) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\n■ बाजारपेठ, बाग-उद्याने, धार्मिक स्थळे अशा गर्दीच्या ठिकाणी अजिबात जाऊ नका.\n■ खूप अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा अजिबात घराबाहेर पडू नका. घरातच रहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/lok-sabha-debate-on-triple-talaq", "date_download": "2020-09-26T03:28:43Z", "digest": "sha1:2BHYA5HL4R7PM6L6YQA4GJLUNP2DUUI4", "length": 2867, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "lok sabha debate on triple talaq Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nतिहेरी तलाक: फक्त मुसलमानच का, पत्नीला बेदखल करणे हाच गुन्हा असावा\n२०११च्या जनगणनेनुसार वीस लाखांहून अधिक महिला आपल्या पतीपासून विभक्त आहेत, त्यापैकी अनेकजणी परित्यक्त आयुष्य जगत आहेत. कायद्याने केवळ मुस्लिमच नाही तर ...\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\nकेंद्राने जीएसटीबाबत कायद्याचे उल्लंघन केले : कॅग\nमाणुसकीचा ‘व्हॉट्स अॅप कॉल’\nआसाम बोर्ड : नेहरु, मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले\nराफेलः ऑफसेट कराराची पूर्तता नाही\nकोसळणाऱ्या इमारती आणि कोडगे राज्यकर्ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://spsnews.in/2017/06/05/maharashtrband/", "date_download": "2020-09-26T02:36:01Z", "digest": "sha1:SWUV6GVBO57OBMQFDPEUTPR5GJVBVBEA", "length": 7347, "nlines": 88, "source_domain": "spsnews.in", "title": "शेतकऱ्याच्या हाकेला भक्कम प्रतिसाद : बांबवडे,सरूड बाजारपेठ कडकडीत बंद – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nशेतकऱ्याच्या हाकेला भक्कम प्रतिसाद : बांबवडे,सरूड बाजारपेठ कडकडीत बंद\nबांबवडे : शेतकरी संपाला पाठींबा दर्शवण्यासाठी किसान क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती. हाकेला प्रतिसाद देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आवाहन केले होते. याला प्रतिसाद म्हणून आज शाहुवाडी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ बांबवडे, सरूड बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून व्यापारी वर्गाने, शेतकऱ्याला भक्कम पाठींबा दर्शविला आहे.\nबांबवडे ,सरूड येथील व्यापार्यांनी कडकडीत बंद पळाला.दुकाने, हॉटेल्स,बंद ठेवल्याने प्रवाशांना याचा त्रास झाला.परंतु शेतकऱ्यांच्या व्यथांना समजून घेत नागरिकांनीही या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.यावेळी स्वभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गावातून निषेध फेरी काढली. या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषिमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे बांबवडे स्थानका समोर दहन केले. त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या,तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात घोषणाबाजी झाली.\nयावेळी स्वाभिमानी संघटनेचे सुरेश म्हौटकर स्वाभिमानी युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अवधूत जानकर, सुनील पाटील, अजित पाटील, तुकाराम खुटाळे, रायसिंग पाटील व स्वभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.\n← शिराळ्यात दोन मोटरसायकल ची समोरासमोर धडक : १ ठार ,तर २ गंभीर जखमी\nआज कोडोली बंद ठेवून शेतकरी आंदोलनाला पाठींबा →\nसशक्त आरोग्यासाठी योग प्राणायम गरजेचे- योग शिक्षक डॉ.दळवी\nपर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टीक पिशवी ऐवजी कागदी पिशवीचा वापर गरजेचा – शहर कोऑरडीनेटर मेघा स्वामी\n‘ पोलीस रायझिंग डे ‘\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://spsnews.in/2017/11/21/bajaj/", "date_download": "2020-09-26T02:37:14Z", "digest": "sha1:SIIUR4SQDBAEG36FTCMY2HHZCP7RQ5ME", "length": 7160, "nlines": 89, "source_domain": "spsnews.in", "title": "‘ बजाज कंपनी ‘ च्या दुचाकी गाड्यांचे भव्य शोरूम बांबवडे त : श्री राम ऑटोमोबाईल्स ,बांबवडे – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n‘ बजाज कंपनी ‘ च्या दुचाकी गाड्यांचे भव्य शोरूम बांबवडे त : श्री राम ऑटोमोबाईल्स ,बांबवडे\nबांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं ‘ बजाज कंपनी ‘ च्या दुचाकी गाड्यांचे भव्य शोरूम सुरु करण्यात आलं आहे. श्री राम ऑटोमोबाईल्स ,बांबवडे या नावानं मलकापूर रोड ,ग्रामपंचायत बांबवडे समोर, हे शोरूम नव्यानं सुरु करण्यात आलं असून ,या ठिकाणी बजाज च्या अनेक गाड्या विविध मॉडेल्स मध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती मालक रामचंद्र रणवरे यांनी दिली.\nश्री राम ऑटोमोबाईल्स मध्ये बजाज कंपनीच्या CT100 B, CT 100 Spoke, CT 100 ES, PLATINA COMFORTAKE, DISCOVER 125 CC, PULSAR 135 BS 4, PULSAR 150 CC, PULSAR 180 CC, PULSAR NS 160 CC, AVENGER 150 Street, AVENGER 222 cruze, DOMINER 440 CC आदी गाड्या तसेच सर्वांची आवडती प्लॅटीना एलइडी लाईट सह उपलब्ध आहे. श्री राम ऑटोमोबाईल्स मध्ये सर्वच स्तरातील ग्राहकांना वेगवेगळ्या मॉडेल्स च्या दुचाकी गाड्या मिळतील.\nदिवाळी नंतर ग्राहकांसाठी पुन्हा एकदा दिवाळी ऑफर , ‘ शेतकरी राजा योजना’ च्या माध्यमातून ‘ बजाज कंपनी’ ने आणली आहे. त्याचबरोबर ८५ % कर्ज सुविधेसह मासिक, तिमाही, आणि सहामाही हप्त्याची देखील सोय ग्राहकांसाठी करण्यात आली आहे.\nसर्वसामान्यांना परवडेल अशी, द्चाकी आपल्याला इथं मिळेल.\n← शिरशीच्या मंदिरात अनोळखी इसमाचा खून\nचक्र भैरवनाथ मंदिरातील अनोळखी प्रेताच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना →\nशिवसेनेच्यावतीने ‘ एसपीएस न्यूज ‘ चे संपादक मुकुंद पवार यांचा सत्कार\nपैजारवाडी येथे ट्रक पलटी होऊन अपघात : चालक जखमी\nशिवसेनेचा शाहुवाडी तहसील वर शुक्रवारी विराट मोर्चा : आमदार सत्यजित पाटील सरुडकर\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dailykesari.com/2020/09/16/maratha-reservation-issue-at-the-center-again-abhay-deshapande-article/", "date_download": "2020-09-26T02:49:17Z", "digest": "sha1:RYFBTEOHI52WTTN7EVFQ5FSUJ7J7CVBQ", "length": 25519, "nlines": 178, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी! - Kesari", "raw_content": "\nघर संपादकीय मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी\nमराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी\nमुंबई वार्तापत्र : अभय देशपांडे\nमराठा आरक्षणाचा मुद्दा घटनापीठाकडे सोपवण्याची राज्य सरकारची विनंती मान्य करताना सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने मराठा आरक्षणाला स्थगिती देऊन मोठा धक्का दिला आहे. मराठा समाजाचा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गात समावेश करून नौकरी व शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात दिले गेले. मागील अनुभव लक्षात घेता हा विषय घटनापीठाकडे सोपवावा अशी भूमिका सरकारने सर्वोच्च न्यायालयात घेतली होती.\nतामिळनाडूमधील आरक्षणाचा व आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाचा विषयही त्याच स्वरूपाचा असल्याने तो ही घटनापीठाकडे सोपवून एकत्रितपणे निर्णय घेतला जावा अशी विनंती राज्य शासनाने केली होती. कोणताही अंतरिम निर्णय न घेता, म्हणजेच उपरोक्त आरक्षणाप्रमाणेच कोणतीही स्थगिती न देता हा विषय घटनापीठाकडे द्यावा अशी सरकारची अपेक्षा होती. परंतु न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांच्या त्रिसदस्यीय खंठपीठाने मराठा आरक्षण नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी सध्या लागू करता येणार नाही, असा अंतरिम आदेश देऊन प्रकरण घटनापीठाकडे हस्तांतरित केल्याने सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला.\nयाची तीव्र प्रतिक्रिया राज्यात उमटते आहे व ती स्वाभाविकही आहे. प्रवेशाची प्रक्रिया सुरू असताना अचानक ही निर्णय आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. मराठा आरक्षणामुळे या समाजाला 10 टक्के आर्थिक आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरवले गेले व आता मराठा आरक्षण स्थगित झाल्याने ना इकडे, ना तिकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नव्याने प्रवेश प्रक्रिया करावी लागेल. कोरोनाच्या संकटात मराठा समाजात यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता कमी करण्याचे मोठे आव्हान राज्यातील आघाडी सरकारसमोर आहे.\nअन्य प्रकरणे जशीच्या तशी घटनापीठाकडे पाठवणार्‍या सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा दिलेली स्थगिती अनाकलनीय असल्याची स्पष्ट नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही सरकारची ठाम भूमिका आहे व त्यापासून आम्ही तसूभरही मागे हटणार नाही, अशी ग्वाही देताना मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाने संयम ठेवावा असे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही असेच आवाहन केले आहे. आपल्याला जिथपर्यंत कायदा कळतो त्याप्रमाणे मराठा आरक्षणा संदर्भात अध्यादेश आणू शकतो. तसेच फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे पवार यांनी सांगितले . मराठा समाजात प्रक्षोभ वाढावा असं काही लोकांना वाटत असेल; पण आम्हाला राजकारण करायचे नाही. त्यामुळे मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद निर्माण केला जाऊ नये अशी समन्वयाची भूमिका त्यांनी मांडली. मुख्यमंत्र्यांनीही विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करून करून सहकार्याचे आवाहन केले आहे; परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अन्य नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहता सरकारची कोंडी करण्याची त्यांची रणनीती स्पष्ट दिसते आहे. सरकारने चांगले वकिल दिले नाहीत, योग्य बाजू मांडली नाही, सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नाही, असे आरोप सुरू झाले आहेत. 2014 मध्ये आघाडी सरकारने दिलेले आरक्षण फडणवीस सरकारच्या काळात रद्द झाले तेंव्हाही असेच आरोप समोरच्या बाजूने झाले होते. त्यामुळे आता त्याची परतफेड करताना विरोधकांना आनंद वाटणे स्वाभाविक आहे; पण या राजकीय साठमारीमुळे कोरोनासारख्या संकटाच्या काळात तरी असंतोष निर्माण होणार नाही याची जाणीव ठेवली तर राज्याचे भले होईल.\n1992 मध्ये इंदिरा सहानी केसमध्ये निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण ठेवता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल दिला. यामुळे तामिळनाडूमध्ये त्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या 69 टक्के आरक्षणाच्या वैधतेचा प्रश्न निर्माण झाला. हे आरक्षण टिकवण्यासाठी तामिळनाडूने केंद्रावर दबाव आणून परिशिष्ठ 9 अंतर्गत विशेष तरतूद करून घेण्यात यश मिळवले. घटनेच्या परिशिष्ठ 9 अंतर्गत केलेल्या कायद्याची न्यायालयीन समीक्षा होऊ शकत नव्हती. मात्र 2007 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेच अशा कायद्याचीही घटनात्मक वैधता तपासण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यातलं आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तामिळनाडूमध्ये सध्या 79 टक्के आरक्षण असून याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नोकरी व शिक्षणात 10 टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यालाही 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्याने आक्षेप घेण्यात आला. ही दोन्ही प्रकरणं घटनापीठांकडे आहेत. या शिवाय अनेक राज्यांमध्ये 50 टक्क्यांच्यापुढे आरक्षण आहे. त्यामुळे इंदिरा सहानी खटल्यातील निर्णय आता बेंचमार्क राहिलेला नाही. त्यामुळे त्याचा आधार घेतला जाऊ नये, अशी आग्रही मागणी होते आहे. हे बंधन काढून टाकले तर केवळ मराठाच नव्हे, तर वेगवेगळ्या राज्यातील जाट, गुर्जर, पटेल यासारख्या आरक्षणाचे सर्व विषय मार्गी लागतील असे सांगितले जाते आहे. तूर्त तरी मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीवर काय निर्णय होतो हे बघणे महत्वाचे आहे.\nकोरोनाच्या भीषण संकटाचे देश व रस्त्यावरील सावट दिवसोंदिवस अधिक गडद होत चालले आहे. देशात दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा एक लाखाच्या घरात पोचला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबधितांची संख्या 10 लाखांच्या पुढे गेली आहे. येत्या एक-दोन दिवसात महाराष्ट्र रशियाच्याही पुढे म्हणजे जगात चौथ्या स्थानावर पोचेल. जवळपास साडेसात लाख लोक कोरोनामुक्त झाले ही समाधानाची व दिलासा देणारी बाब असली तरी सध्या उपचार सुरू असलेल्या ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडाही अडीच लाखांच्या पुढे गेला आहे. ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग वाढतोच आहे.\nराज्यातील आघाडी सरकार सुशांतसिंह प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणात एक तरुण मंत्री अडकलेला आहे, असे सांगून संशयाचे काहूर उभे करण्यात विरोधकांना चांगले यश आले. काही राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी यासाठी मोठा हातभार लावला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवालाच आहे. त्याबरोबरच अंमलबजावणी महासंचालनालय व ’नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो’कडूनही चौकशी सुरू आहे. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, त्याची कारणं काय होती हे यथावकाश बाहेर येईलच. या मूळ कथानकाला कंगना राणावत व शिवसेनेतील संघर्षामुळे वेगळे वळण मिळाले आहे. कंगनाने शिवसेनेवर टीकेची झोड उठवल्यानंतर त्याचे उट्टे काढण्यासाठी मुंबई महापालिकेने तिच्या कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम पाडले व वादाला अकारण फोडणी दिली. विरोधकांना व टीकाकारांना आयते कोलीत मिळाले. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वादग्रस्त व्यंगचित्र पोस्ट करणार्‍या माजी नौदल अधिकार्‍याला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीने आणखी भर घातली. देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी चीनच्या कुरापतीपेक्षा अधिक गांभीर्याने याची दखल घेतली. एकूणच सगळ्या घडामोडी पहाता शिवसेनेला वेगवेगळ्या मार्गाने घेरून प्रतिक्रियेसाठी उद्युक्त करण्याची भाजपाची रणनीती दिसते आहे. म्हणूनच भविष्यात महाराष्ट्रात करावयाच्या ऑपरेशनची ही पूर्वतयारी तर नाही ना असा संशय व्यक्त होतो आहे.\nपूर्वीचा लेखप्राप्तिकरविषयक नव्या तरतुदी\nपुढील लेखमजुरांना न्याय केव्हा\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nरेल्वेची ‘रंग सफेदी’ (अग्रलेख)\nभारतीय अर्थव्यवस्था 2020 : संकट नव्हे, संधी\nआश्वासनेही वाहून गेली आंबील ओढ्याच्या पुरात\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nबिहार निवडणूक : तीन टप्प्यांत होणार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nबिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली.\nनवनाथ गोरे यांचा खडतर प्रवास होणार सुकर\nभारती विद्यापीठात मिळणार नोकरी\nलोकप्रिय गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले.\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलचा पहिल्याच षटकात पराक्रम\nअतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात\nइशांत शर्मा आणखी दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2012/05/blog-post_13.html", "date_download": "2020-09-26T03:47:14Z", "digest": "sha1:F2OKVKBJJCNZQZ3RGOQOUTAHGXL272QI", "length": 14414, "nlines": 185, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!", "raw_content": "\nछत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा\nछत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा\nज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो .. ज्या युग पुरुषाने स्थापन केलेले स्वराज्य आपल्या खांद्यावर ज्यांनी अगदी लीलया पेलले .. वाढवले .. इतिहासामधील एक अदभूत व्यक्तिमत्व, म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.\nज्या माणसाने ९ वर्षे तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळा सारखा ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला.\nइतिहासामध्ये ज्यांची नोंद एक हि लढाई न हरलेला राजा म्हणून आहे. १२० लढाया एक हि हार नाही, एक हि तह नाही .. एकाच वेळी ३-४ दुष्मनांसोबत निकराची लढाई देणारा राजा म्हणून संभाजी राजांची नोंद इतिहासाने घेतली\nशिवरायांनी आरमाराचे महत्व ओळखले होते, अतिशय दूरदर्शी पणाने त्यांनी सागरी शक्तीचे महत्व ओळखून आरमारही स्थापना केली होती, पुढे याच सागरी आरमाराला चौपटीने वाढवण्याचे काम संभाजी महाराजांनी केले. चंगेखान नावाच्या अरबी सरदार कडून नाव नवीन युद्ध नौका तयार करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले, मराठा आरमार अतिशय प्रबळ आणि प्रभावी बनवले.\nटोपीकर, आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज , निजामशाही, मुगल अशा अनेक शत्रूंची एकाच वेळी लढा देण्याचे काम त्यांनी केले. संभाजी राजे स्वतः रणांगणात उतरत असत. त्यांच्या साडे आठ वर्षाच्या कालावधी मध्ये एक हि बंड झाले नाही . तमाम मराठा समाज त्यांच्या मागे एक दिलाने उभा राहिला. शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य चौपटीने वाढवण्याचे कार्य संभाजी राजांनी केले.\nयाच संभाजी ने वयाच्या चौदाव्या वर्षी एक संस्कृत मधून ग्रंथ लिहिला.. त्याचे नाव \"सात-सतक\" मानवी जीवन मुल्यांवर चर्चा करणारा हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला .. बुध भूषणम् याच संभाजी ने लिहिला पण हे आम्हाला माहित नाही . भाषेचे प्रचंड प्रभुत्व असलेला हा राजा.\nखुद्द औरंजेब दक्खन स्वारीवर आलेला असतांना त्या पापी औरंग्याला तब्बल ८ वर्षे सीमेवर हात चोळीत बसावयास भाग पाडीले, त्याला १ किल्ला सुध्दा जिंकता येऊ नये यातच संभाजी राजांचे राजकारणी, रणधुरंधर व्यक्तीमत्व सिध्द होते.केवळ एका जहागिरीपोटी नाराज झालेल्या गणोजी शिर्के नामक हरामजाद्याने स्वतःच्या बहिणीच्या कुंकुवाचा लिलाव मांडत मोगली सैन्याच्या तोंडात महाराजांच्या रुपाने आयता घास दिला.\nस्वकीयांनीच विश्वास घात करून संभाजी महाराजांना औरांजेबाच्या तावडीत पकडून दिले , आणि आतिशय निर्दयपणे त्यांचा छळ करण्यात आला, त्यांचे डोळे काढले गेले, जीभ खेचून काढण्यार आली, नखे ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंत औरंजेब त्यांच्यावर अत्याचार करताच राहिला, पण हा सह्याद्रीचा छावा जरा हि डगमगला नाही .. थोडा हि बिचकला नाही. खर तर जीवावर बेतल्यावर मानसे कसे स्वाभिमान शून्य होतात याची उदाहरणे बरीच आहेत पण संभाजी राजांनी स्वतः ला हा काळिमा लाऊन घेतला नाही, आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत त्यांनी औरंजेबा पुढे आपली माण झुकवली नाही.\nसंभाजीराजांचा देह औरंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी पडला, पण त्याच बलिदानातून आणि हौतात्म्यातून मराठी राज्य बचावले आणि पुढे याच मराठी माती मधे औरंजेबाचा देह गाडला गेला हे मराठी मनाच्या बांधवांना कधीच विसरता येणार नाही.\nयाच संभाजीचा चारित्र्य हनन करण्याचे काम आमच्याच काही हरामखोर बखरकारांनी आणि इतिहास करांनी केले आहे, खरा संभाजी कधी लोकांसमोर येऊ दिलाच नाही. पण सूर्याचा प्रकाश किती काळ लपवून ठेवणार एक दिवस तरी आमच्या तमाम मराठी लोकांच्या डोक्या मध्ये हा उजेड पडल्याशिवाय राहणार नाही. सूर्य सारख्या तेजस्वी आणि ओजस्वी शिवाजी राजांचा राजांचा पुत्र म्हणजे सिंहाचा छावाच. आणि ज्या जिजाऊ ने शिवबा घडवला त्याच जीजौंच्या संस्कारात वाढलेला शंभू बाळ कसा काय रंगेल ठरवला जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे या स्वराज्यचे संस्थापक तर याच महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती म्हणजेच संभाजी महाराज हे या स्वराज्याचे संरक्षक म्हणून होते.\nउगवणाऱ्या सूर्याचा प्रकाश जसा घर घर पर्यंत पोचतो त्याच प्रमाणे माझ्या या शूर शंभू राजांचा इतिहास आमच्या घर घर पर्यंत पोचावा असे आवाहन आपल्याला जिजाऊ.कॉम परिवार तर्फे करण्यात येत आहे.\nजय जिजाऊ .. जय शिवराय .. जय संभाजी\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 9:43 PM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब \nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nया पिढीचं जगणं मेलेले ठरवतायेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nग्रामीण भागातील शाळांमध्ये हुशार आणि गरजू विद्यर्थ...\nबेगडी चाळवली वाल्यांना विनंती\nप्रत्येकाने पहावा असा एक चित्रपट : डॉ. बाबासाहेब आ...\nविधानसभा : काऊन्ट डाऊन सुरु करा\nछत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_372.html", "date_download": "2020-09-26T02:50:01Z", "digest": "sha1:NLZBMNANJIOJTAHDL7LNJJSGWBNKQM45", "length": 4024, "nlines": 58, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "सावधान ! मोबाईलच्या अत‍ि वापरामुळे होऊ शकतो \"हा\" गंभीर आजार.", "raw_content": "\n मोबाईलच्या अत‍ि वापरामुळे होऊ शकतो \"हा\" गंभीर आजार.\nbyMahaupdate.in शुक्रवार, जानेवारी १७, २०२०\nमोबाईलच्या अत‍ि वापरामुळे ब्रेन कँन्सरचा धोका होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मोबाईलवर संभाषण करताना कानाला लावला जातो.\nत्यामुळे मोबाईलमधून बाहेर पडणार्‍या रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड आपल्या मेंदूत शिरतात आणि आपल्याला मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता असते.\nहा धोका टाळण्यासाठी टेक्सट मेसेज, ईअरफोन असलेल्या हँड्‍स फ्री उपकरणांचा वापर करणे चांगले असल्याचा सल्लाही आरोग्य संघटनेच्या अभ्यासकांनी दिला आहे. फ्रान्समधील लियोन येथील परिषदेत याबाबात माहिती देण्यात आली.\nमोबाईलमधून निघणारे रेडिएशन एक्सरे सारखे नसते. मात्र ते कमी क्षमतेच्या मायक्रोवेव्ह रेडिएशनसारखे असते.\nयाचा अर्थ मोबाइल कानला लावून दीर्घकाळ बोलणे मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ शिजवण्यासारखे असते. त्याचा स्मरणशक्तीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो, असे यावेळी सांगण्यात आले.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/online-shopping", "date_download": "2020-09-26T01:20:17Z", "digest": "sha1:UBDDXNJHXXHDSQLMWOSBCDMITDCRKAL5", "length": 10250, "nlines": 172, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Online Shopping Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nCorona | फक्त जीवनावश्यक वस्तूच ऑनलाईन मिळणार\nफेसबुककडून युजर्ससाठी नवं फीचर लाँच\nदोन वर्षापूर्वी फेसबुकच्या यूजर्स प्रायव्हेसी संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली (Facebook launch new feature) होती.\nफिल्पकार्टवर बंपर डिस्काऊंट, ‘हे’ आठ फोन स्वस्त\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर येत्या 15 मे पासून बिग शॉपिंग डे सेल सुरु होत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन, होम फर्नीचर आणि\nऑनलाईन शॉपिंगवेळी सर्वाधिक डेबिट कार्डचा वापर : रिपोर्ट\nमुंबई : ई-कॉमर्स वेबसाईटवर सर्वाधिक डेबिट कार्डचा वापर केला जातो, अशी माहिती पेमेंट टेक्नॉलॉजी आणि ट्रान्जेक्शन प्रोसेसिंग कंपनी फायनेंशिअर सॉफ्टवेअर अँड सिस्टम्स (FSS) च्या अहवालातून\nमुंबई : सोनाक्षी सिन्हाने हेडफोन मागवले, अमेझॉनवरुन लोखंडी नळ आला\nफ्लिपकार्टचा महासेल सुरु, ‘या’ वस्तूंवर भरघोस सूट\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. फ्लिपकार्टचे बिग शॉपिंग डेज सुरु झाले आहेत. हा महासेल 6 ते 8 डिसेंबर दरम्यान चालणार आहे. या\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nCSK vs DC Live Score Update : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्लीची चेन्नईवर 44 धावांनी मात\nआशा स्वयंसेविकांनी आणि गटप्रवर्तकांनी प्रस्तावित कामबंद आंदोलन स्थगित करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nCSK vs DC Live Score Update : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्लीची चेन्नईवर 44 धावांनी मात\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esuper9.com/2020/03/Coronavirus-corana-related-updates-from-high-court.html", "date_download": "2020-09-26T03:05:50Z", "digest": "sha1:7VPDC4EVIGZXFLWQHHLJMMFAADU3DNXU", "length": 12236, "nlines": 100, "source_domain": "www.esuper9.com", "title": "Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्देश असतानाही अनावश्यक याचिका सादर - esuper9", "raw_content": "\nHome > Corona > Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्देश असतानाही अनावश्यक याचिका सादर\nCoronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्देश असतानाही अनावश्यक याचिका सादर\nCoronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्देश असतानाही अनावश्यक याचिका सादर\nCoronavirus कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात केवळ तातडीच्या याचिकांवर सुनावणी होईल असे स्पष्ट निर्देश असतानाही एका नव्या याचिकेचा उल्लेख केल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एका याचिकादाराला पंधरा हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. तर न्यायालयातील गर्दी वाढू नये म्हणून न्यायमूर्ती ए.के. मेनन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचिका सादर करण्याची अभिनव सूचनाही जारी केली आहे.\nमुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सध्या कोरोनाच्या वातावरणामुळे केवळ दोन तास सुरू आहे. केवळ तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेण्याचे न्यायालयाकडून निश्‍चित केलेले असतानाही न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यापुढे एक न्यायालयाच्या अवमानासंबंधित याचिकेचा उल्लेख करण्यात आला. याबाबत न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी नाराजी व्यक्त केली. वेळ आणि गर्दी वाढू नये, म्हणून नोटीस जारी केली असतानाही अशा प्रकरणांचा उल्लेख का केला जातोय, असा सवाल करत संबंधित याचिकादाराला पंधरा हजार रुपयांचा दंड सुनावला.\nदंडाची ही रक्कम सेंट ज्यूडस इंडिया चाईल्डकेअर सेंटरला देण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. त्याचबरोबर न्यायमूर्ती ए. के. मेनन यांनी कोर्टातील गर्दी कमी करण्यासाठी तूर्तास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तातडीच्या याचिकेचा उल्लेख करण्याची सूचना वकिलांसाठी जारी केली आहे. न्यायालयच्या नव्या इमारतीतील कोर्ट रूम क्रमांक 16 ब मध्ये ही सुविधा सध्या उपलब्ध करून देण्यात आली असून वकिल त्यांच्या घरातून किंवा कार्यालयातूनही याचा लाभ घेऊ शकतात. एका व्हिडीओ सॉफ्टवेअर मार्फत ही सुविधा उपलब्ध असून त्यासाठी पिन क्रमांक, पासवर्ड व त्यासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nCoronavirus | संबंधित बातम्या पाहा\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.diliptiwari.com/2016/04/blog-post_7.html", "date_download": "2020-09-26T00:59:17Z", "digest": "sha1:D7W75TSSDSXPGRKWO5JNTFSORQHGCHN4", "length": 19007, "nlines": 331, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: \"पंच\" रुपातील मंदाताई खडसे !", "raw_content": "\n\"पंच\" रुपातील मंदाताई खडसे \nदुपारी टीव्हीवर \"सिया के राम\" ही रामायणावरची मालिका पाहत होतो. रामाला वनवासातून परत नेण्यासाठी भरत आणि \"रघुवंश\"परिवार चित्रकूट पर्वतावर आलेला असतो. कैकयी रामाला वचनमुक्त करायचे म्हणते. भरत रामाला राजधर्मची आठवण करून देत परत अयोध्देला यायचा आग्रह धरतो. राम मात्र पितृ वचनाचे पालन करण्याच्या निर्णयावर दृढ असतो. अखेर राजर्षि राजा जनकच्या अध्यक्षतेखाली धर्मसभा बसते. भरत युक्तिवाद करतो आणि म्हणतो, रामाने राजधर्म पाळावा. अयोध्देच्या जनतेचे कल्याण करावे. रघुवंश कुटुंबाला आधार द्यावा. जे वचन अधर्मी आहेत, ते रामाने पाळू नये. राम युक्तिवाद करतो आणि म्हणतो, मुलांना पितृऋणातून मुक्त होणे हाच खरा धर्म आहे. मी वनवास हा लोककल्याणासाठी स्वीकारला आहे. माझ्या हातून संपूर्ण वसंधुरेची सेवा होणार आहे. असे म्हणत राम युक्तिवाद पूर्ण करतो. आता निर्णय द्यायची वेळ जनकाची. जावाई राम, प्रिय कन्या सीता वनवासात आलेले. सहृदयी बाप आणि नीतिवान राजा जनक काय निर्णय देणार सारे तणावात. जनक म्हणतो, राजधर्माचे पालन करायचे तर भरत म्हणतो ते खरे आहे. पण, पितृऋणातून मुक्त होणे हे मुलासाठी सर्वांत मोठे कर्तव्य असते. रामाने वनवास पूर्ण करावा हा माझा निर्णय आहे. त्यानंतर भरत रामाच्या पादुका घेवून अयोध्देचा कारभार करायला परततो.\nहा प्रसंग पाहात असताना मुंबईहून मित्राचा व्हाटस् ॲपवर निरोप आला. सहकारी दूध डेअरींच्या शिखर संस्था \"महानंद\" च्या अध्यक्षपदी सौ. मंदाताई एकनाथराव खडसे यांची बिनविरोध निवड झाल्याचा. अर्थात, हे अपेक्षित होते. सौ. मंदाताई या जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष, राज्याचे दुग्ध विकासमंत्री तथा इतर महसूल, कृषी आदी १२ खात्यांचे मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी, खा. रक्षाताई खडसे यांच्या सासू, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा सौ. रोहीणीताई खडसे - खेवलकर यांच्या मातोश्री आहेत. सौ. मंदाताईंची ओळख एक गृहिणीपासून \"महानंद\"च्या अध्यक्ष अशी साधीच आहे.\nजळगाव दूध संघात पहिल्यांदा सौ. मंदाताई या महिला म्हणून अध्यक्ष झाल्या. मंत्री एकनाथराव खडसे यांनी खडसे परिवारातून अध्यक्ष नको असे म्हणत पूर्णवेळ संघाला देवू शकेल अशा व्यक्तीची निवड करू असे जाहीरपणे म्हटले होते. मात्र, दूध संघाचा गाडा सुरळीत करण्यासाठी इतर सर्व संचालकांनी एकत्र येवून सौ. मंदाताई यांनाच अध्यक्षपदावर बसविले. त्यानंतर दूध संघाच्या नुतनिकरणाचा ५० लाखांचा प्रकल्प अहवालही सौ. मंदाताईंनी तयार केले आहे. हा अहवाल दुग्ध मंत्रालयच मंजूर करणार आहे. दरम्यानच्या काळात \"महानंद\" मधील संचालक मंडळही विविध कारणांनी बरखास्त झाले. त्यामुळे \"महानंद\" मध्ये नेतृत्वाची संधी आपसूक सौ. मंदाताईंना चालून आली. \"महानंद\" थेट दुग्ध विकास मंत्रालयाच्या नियंत्रणात येते.\nसौ. मंदाताई यांच्या रुपाने \"महानंद\" च्या अध्यक्षपदाचे नेतृत्व जळगाव जिल्ह्याकडे चालून आले आहे. बहुधा, सौ. मंदाताई संचालक नसत्या तर ही संधी पश्चिम महाराष्ट्राकडे गेली असती. म्हणूनच सौ. मंदाताई यांना बिनविरोध मिळालेल्या अध्यक्षपदाचे कौतुक आहे.\nसौ. मंदाताई म्हणजे सहृदयी पत्नी, आई, सासू, आजी आणि कोथळी दूध सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. याशिवाय त्या मुक्ताई तालुका शिक्षण संस्थेच्या संचालकही आहेत. चि. निखिलच्या निधनानंतर सौ. मंदाताईंनी नातू गुरुनाथ आणि नात क्रिशिका यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. कारण खा. रक्षाताई या संसदीय राजकारणात सतत व्यस्त असतात. त्यामुळे सौ. मंदाताई दोघानात, नातू यांना घेवून मुंबईत राहतात. पती एकनाथराव खडसे यांच्या जेवणावर आणि तब्बेतीवर त्यांचे लक्ष असते. सौ. मंदाताई मुंबई, मुक्ताईनगर किंवा जळगाव कुठेही असल्या तरी \"साहेबांच्या\" जेवणाचा मेनू त्याच फोनवरून ठरवतात.\nसौ. मंदाताई अनेक वर्षांपासून कोथळी दूध सोसायटीच्या चेअरमनपदी आहेत. त्यांचा पिंड शेतात लक्ष घालण्याचा आहे. सौ. मंदाताईंना संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्याने बैलगाडीवर शेतात जाताना अनेकवेळा पाहिले आहे. खडसेंच्या फार्म हाऊसवर सौ. मंदाताईंनी वेगवेगळ्या भाज्या वाढवल्या आहेत. घर, येणारे-जाणारे यांच्यावर त्यांचे लक्ष असते. कौटुंबिक निर्णयात त्यांचाच शब्द अंतिम असतो. सौ. मंदाताई सार्वजनिक कार्यक्रमात फारशा येत नाहीत. मात्र अलिकडे त्या दूध संघ विस्तार आणि विकासावर बोलू लागल्या आहेत.\nसौ. मंदाताई यांचे रुप हे दक्ष पत्नी, जागरुक आई, चौकस सासूबाई, ममताळू आजी आणि सहकारातल्या घरगुती नेत्या अशा पंच प्रकारात आहे. सौ. मंदाताईंचा हा प्रवास निश्चित लक्षवेधी आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा द्यायलाच हव्यात.\nदरम्यान, टीव्ही वरील \"सीया के राम\" मालिकाही संपत आली होती. राजा जनकाने रामाशी असलेले जावाई -सासरे हे नाते, कन्या सीतेविषयी असलेला मोह हे सारे बाजूला सारुन रामाला वनवासात जाण्याचा दिलेला निर्णय मनाला रुखरुख लावून गेला. जर रामाने वचन मोडले असते आणि तो परत राज्य करायला अयोध्देत आला असता तर \"रघुवंश\"ला जाब विचारण्याचे धाडस कोणात होते का मालिकेने घालवलेला मूड सौ. मंदाताईंच्या यशामुळे आनंदून गेला ...\nसावित्रिच्या रुपात सौ. मंदाताई ...\nप्रत्यक्ष यमराजाला युक्तिवादात हरवून पतीचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रिची गोष्ट सर्वांना माहित आहे. या सावित्री सारखाच पत्नी धर्म सौ. मंदाताईंनी निभावला आहे. ना. एकनाथराव खडसे यांना वर्ष-दीड वर्षापूर्वी मूत्रपिंडाचा आजार होता. मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. मूत्रपिंड दान करणे किंवा खरेदी करणे या क्रिया कायदेशीर भाषेत किचकट आहेत. दान करणारेही मिळत नाहीत. हे सारे प्रश्न लक्षात घेवून सौ. मंदाताई यांनीच आपले एक मूत्रपिंड ना. एकनाथराव खडसेंना दान केले. आज ना. खडसे यांची प्रकृती उत्तम असून महसूल, कृषी, दुग्ध, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक, मत्सोत्पादन आदी १२ मंत्रालयांचा कार्यभार ते सांभाळत आहेत.\nLabels: सौ. मंदाताई खडसे\nमा.मंदाताईंचे यश महिलांना प्रेरक ठराव असंच आहे, प्रगतीच्या केवळ गप्पा हाकून महिला सक्षम होणार नाहीत त्यासाठी मंदाताईंचा प्रवास अभ्यासावा लागेल. एक समर्थ व्यक्तिमत्व म्हणजे मंदाताई ...👍\nमा.मंदाताईंचे यश महिलांना प्रेरक ठराव असंच आहे, प्रगतीच्या केवळ गप्पा हाकून महिला सक्षम होणार नाहीत त्यासाठी मंदाताईंचा प्रवास अभ्यासावा लागेल. एक समर्थ व्यक्तिमत्व म्हणजे मंदाताई ...👍\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/solapur/murder-case-against-husband-mother-in-law-by-strangling-a-married-woman-in-madha-26539/", "date_download": "2020-09-26T03:24:59Z", "digest": "sha1:YGL62EFSN6QHE2BEVDWURBIYTHYF3UXR", "length": 28323, "nlines": 244, "source_domain": "dainikekmat.com", "title": "माढ्यात विवाहितेचा गळा दाबून खून नवरा, सासू सास-याविरोधात गुन्हा दाखल", "raw_content": "\nHome क्राइम माढ्यात विवाहितेचा गळा दाबून खून नवरा, सासू सास-याविरोधात गुन्हा दाखल\nमाढ्यात विवाहितेचा गळा दाबून खून नवरा, सासू सास-याविरोधात गुन्हा दाखल\nमाढा : प्लॉट नावावर करुन देण्याच्या मागणीसाठी चारिर्त्यावर संशय घेत विवाहितेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी माढा पोलिसात नवरा व सासू, सासरा अशा तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना माढ्यातील शुक्रवारी पेठेत शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.\nसना इरफान मोमीन (वय २७) असे मयताचे नाव असून इरफान रजाक मोमीन, रजाक मकबूल मोमीन,आसिया रजाक मोमीन अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मयताचे वडील महंमदमुसा गुलामदस्तगीर अन्सारी (वय-52) राहणार शालिमार कॉलनी एम आय डि सी उस्मानाबाद यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार मयत सना इरफान मोमीन (वय -27) रा. मोमिन गल्ली शुक्रवार पेठ माढा हिचे लग्न झाल्यानंतर दोन महिन्यापासून तिला सासरी नवरा इरफान रजाक मोमीन, सासरा रजाक मकबुल मोमिन, सासू आशिया रजाक मोमीन यांनी दोन महिने व्यवस्थित नांदून त्यानंतर तिला तुझ्या आई-वडिलांनी लग्नामध्ये आम्हाला काही दिले नाही.\nमानपान केला नाही म्हणत उस्मानाबाद येथील प्लॉट आमच्या नावावर कर असे म्हणत तिच्या चारिर्त्यावर संशय घेऊन वेळोवेळी मारहाण केली. सतत तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. तिचा नवरा इरफान रजाक मोमिन याने शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तीला गळा दाबून जीवे मारले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे हे करीत आहेत.\nRead More केरळच्या विमान अपघातात महाराष्ट्राचे सुपुत्र वैमानिक कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू\nPrevious articleकोरोना रुग्ण उपचारासाठी खासगी दवाखाने ताब्यात घ्या\nNext articleबार्शीत रामलल्ला भूमिपुजन सोहळ्याचे जल्लोषात स्वागत\n असे विचारले म्हणून रागाच्या भरात डोक्यावर फोडली बिअरची बाटली\nमध्यप्रदेश : मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २० वर्षाची एक मुलगी आपल्या मैत्रीणीच्या घरी रहायला गेली. दुसऱ्या दिवशी मैत्रीणीच्या घरी चिकन-मटण, दारूची...\nशहरात ६८ तर ग्रामीणमध्ये ४३४ कोरोनाबाधीत ; ग्रामीणने केले शहराला ओव्हरटेक\nसोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शुक्रवारी 612 टेस्टिंग अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 68 जण बाधित असल्याचे...\nधक्कादायक : चिमुरड्याचं अपहरण करून 70 हजार विकलं; तीन महिलांसह पाच जणांच्या टोळीला अटक\nउल्हासनगर: अडीच वर्षाच्या चिमुरड्याचं अपहरण करून त्याला 70 हजार रुपयांत विकल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उडकीस आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अंबरनाथ पोलिस स्टेशनपासून हाकेच्या...\nरुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...\nजपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...\nदेशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न\nएच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...\nदस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज\nसरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...\nकेंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी\nव्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...\nईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी\nनवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...\nपंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन\nपंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...\nकेंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला\nनवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...\n८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात\nनवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...\nढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’\nमुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...\nपंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन\nपंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...\n असे विचारले म्हणून रागाच्या भरात डोक्यावर फोडली बिअरची बाटली\nमध्यप्रदेश : मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २० वर्षाची एक मुलगी आपल्या मैत्रीणीच्या घरी रहायला गेली. दुसऱ्या दिवशी मैत्रीणीच्या घरी चिकन-मटण, दारूची...\nशहरात ६८ तर ग्रामीणमध्ये ४३४ कोरोनाबाधीत ; ग्रामीणने केले शहराला ओव्हरटेक\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 25, 2020 0\nसोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शुक्रवारी 612 टेस्टिंग अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 68 जण बाधित असल्याचे...\nधनगर समाजाच्या वतीने ढोल बजावो आंदोलन\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 25, 2020 0\nअकलुज : गेल्या दहा महीन्या पासून महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत कसलेही पाऊल सरकारने उचलले नाही. समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व करण्याची...\nआरक्षणासाठी धनगर बांधवांचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 25, 2020 0\nबार्शी: अनेक वर्षापासून धनगर समाजाची एस.टी प्रवर्गात समावेश करा या मागणीसाठी तहसील कार्यालय बार्शी येथे समाजाच्यावतीने नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी...\nवालवड रास्ता प्रकरण चिघळले\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 25, 2020 0\nबार्शी : बार्शी तालुक्यातील वालवड गावच्या दलित बांधवांना जाण्या-येण्याकारिता रस्ता देण्यात यावा या मागणीसाठी बार्शी तहसिल कार्यालय येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.अधिक माहिती अशी...\nयुवका खून केल्याप्रकरणी श्रीकांत बंदपट्टे यास मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 25, 2020 0\nसोलापूर आण्णासाहेब सुरेश घोडके वय 35 वर्ष याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला श्रीकांत चंद्रकांत बंदपट्टे यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री सी.व्ही.भडंगे यांनी जामीन...\nघेरडी पोलिसांच्या अर्शिवादाने दारु धंदे जोमात.\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 25, 2020 0\nसांगोला (विकास गंगणे) : घेरडी परिसरासह आजूबाजूच्या गावात अवैध दारुची खुले आम विक्री होत असून, पोलिसाकडून मर्जीतल्या दारु विक्रेतेंना अभय असल्याची चर्चा होत आहे....\nअकलूज येथे जनसेवा संघटनेच्या महिलांचे थाळीनाद आंदोलन\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 25, 2020 0\nअकलूज, दि. २५ - मार्च २०२० पासून कोरोना आजाराच्या त्रासदीमुळे आमचे व्यावसाय बंद पडले आहेत. जगणं मुश्किल झालयं. घरात खायला भाकरी नाही. अशी आमची...\nटेंभुर्णी परिसरात अवैध व्यावसाय जोमात, पोलीस प्रशासन कोमात\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 25, 2020 0\nटेंभुर्णी (गणेश चौगुले) :- सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील एक वजनदार असलेल्या टेंभूर्णी पोलीस ठाण्यात कार्यक्षेत्रात जीवघेणा गुटखा व आयुष्यच उध्वस्त करणारा मटका यासह जुगार,...\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nसोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nलातूर एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nलातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 17, 2020 0\nअमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nलातूर एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nपानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 17, 2020 0\nसोलापुर : मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nमनोरंजन एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nसांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/katrina-kaif-scared-of-iulia-vantur/videoshow/56300576.cms", "date_download": "2020-09-26T03:18:40Z", "digest": "sha1:ASSLRQI3APUY2BUD2QZE7M6RU7ADUBZ7", "length": 8549, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " - लुलिया वान्टूरला कटरिना कैफ घाबरते\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलुलिया वान्टूरला कटरिना कैफ घाबरते\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिव...\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अ...\nसेक्स करा, आनंदी रहा\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अति...\nपुनम पांडेचे सेक्सी विडीओज...\nमहेश बाबूच्या मुलींच्या तोंडून ऐका अस्सल मराठीत आरती...\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २६ सप्टेंबर २०२०\nन्यूजड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nन्यूजबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\n आज कोण ठरणार सरस\nन्यूजमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nन्यूजबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\nन्यूज'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nन्यूजसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nन्यूजशहीद जवान नरेश बडोलेंना काश्मीरात वीरमरण\nन्यूजकृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचं देशव्यापी आंदोलन\nन्यूजभाजप हा एकसंध आणि एक संघ आहे - विनोद तावडे\nहेल्थफिट राहण्यासाठी या सोप्या आसनांचा करा अभ्यास\nन्यूजराज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिटकून बसणारे सरकार - राम शिंदे\nन्यूज'भारत बंद'ची हाक देणारे शेतकरी विरोधी- राम शिंदे\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २५ सप्टेंबर २०२०\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2020/05/kanakechi-nankhatai/", "date_download": "2020-09-26T00:59:29Z", "digest": "sha1:523353HXW22647775WHTHIKAKZMMGUQK", "length": 9851, "nlines": 173, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Kanakechi Nankhatai (कणकेची नानखटाई) - Indian Cookies with Whole Wheat Flour | My Family Recipes", "raw_content": "\nकणकेची नानखटाई – खमंग खुसखुशीत बिस्किटं\nनानखटाई साधारणपणे मैदा वापरून करतात. ह्या नानखटाईत मैद्याऐवजी कणिक वापरली आहे. त्यामुळे नेहमीच्या नानखटाई पेक्षा पौष्टिक आहेत. मी साखरेऐवजी गूळ घालून ही नानखटाई करून बघितली. पण ती जरा कडक होतात. त्यामुळे ह्यात साखरच घालावी असं मला वाटतं.\nकाही जण याला नानकटाई असंही म्हणतात. पण नावात काय आहे. पदार्थाची वेगवेगळी नावं असू शकतात नाही का \nसाजूक तुपाची नानखटाई अप्रतिम लागते. तुम्ही त्याऐवजी वनस्पती तूप वापरू शकता. फक्त वापरण्याआधी वनस्पती तुपाचा वास घेऊन बघा. खवट वास असेल तर वापरू नका. बिस्किटांना ही वास येईल आणि कोणी खाऊ शकणार नाहीत.\nमी नानखटाई ओव्हन मध्ये भाजते. तुमच्याकडे ओव्हन नसेल तर कढई / पातेल्यात भाजू शकता. रेसिपीच्या शेवटी त्याची माहिती दिली आहे.\nसाहित्य (४५–४८ नानखटाई साठी) (१ कप = २५० मिली)\nसाजूक तूप दीड कप\nबेकिंग सोडा १ चिमूट\nवेलची पूड पाव टीस्पून\n१. तूप हलकं होईपर्यंत फेटून घ्या.\n२. त्यात पिठीसाखर घालून पुन्हा ५ मिनिटं फेटून घ्या.\n३. त्यात कणिक, बेकिंग सोडा, मीठ घालून चांगलं मळून घ्या.\n४. वेलची पूड घालून मिक्स करा.\n५. पीठ अर्धा तास झाकून ठेवा.\n६. पीठ जरा मळून घ्या. पीठ खूप सुकं असेल आणि गोळे बनवता येत नसतील तर थोडं तूप (१–१ टीस्पून) घालून मिक्स करा.\n७. पिठाचे छोटे गोळे बनवून हव्या त्या आकाराची बिस्किटं बनवा. वर सुका मेवा लावा.\n८. प्रीहिटेड ओव्हन मध्ये २०० डिग्री ला २५–३० मिनिटं बेक करा.\n९. बिस्किटं वरून लालसर होईपर्यंत भाजा.\n१०. नानखटाई हवाबंद डब्यात ठेवा.\n१. ओव्हन चा टायमर तुमच्या ओव्हन च्या सेटिंग प्रमाणे लावा. प्रत्येक ओव्हन चं तापमान वेगवेगळं असतं.\n२. ओव्हन नसेल तर तुम्ही कढईत / पातेल्यात ही बेक करू शकता. त्यासाठी कढईत / पातेल्यात वाळू / मिठाचा थर द्या. त्यावर एक स्टॅन्ड ठेवून ५–१० मिनिटं कढई / पातेलं गरम करून घ्या (प्रीहीट). स्टॅण्डवर बिस्किटांची ताटली ठेवा आणि झाकण लावून मंद आचेवर भाजा. भाजायला ३०–३५ मिनिटं लागतील. मधे मधे चेक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2020/04/Grain-allotment-to-the-needy.html", "date_download": "2020-09-26T03:23:01Z", "digest": "sha1:GSWH6MELEVYZPSO5J4KGI5CIDCWAD4W3", "length": 13958, "nlines": 110, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "रायपूर जिल्हा परिषद क्षेत्रात गरजुंना घरपोच धान्य वाटप:जिल्हा परिषद दिनेश बंग याचा पुढाकार - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर रायपूर जिल्हा परिषद क्षेत्रात गरजुंना घरपोच धान्य वाटप:जिल्हा परिषद दिनेश बंग याचा पुढाकार\nरायपूर जिल्हा परिषद क्षेत्रात गरजुंना घरपोच धान्य वाटप:जिल्हा परिषद दिनेश बंग याचा पुढाकार\nसंकट ग्रस्तांना घरपोच आधार\nनागपूर : अरूण कराळे:\nरायपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील गोर गरीब, हातमजूरी करणारे, वयोवृद्ध व्यक्ती असे कोणीही संचारबंदी दरम्यान उपाशी राहू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद सदस्य दिनेश रमेशचंद्र बंग यांनी पुढाकार घेऊन जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.\nसध्या जगात आणि देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे यावर मात करण्यासाठी सरकारने संपूर्ण टाळेबंदी लागू केली. त्यामुळे अनेक व्यापार व उद्योगधंदे बंद आहे .त्यामुळे मोल मजुरी करून हातावर पोट भरणारा वर्ग मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत. मजुरी अभावी अनेक कुटुंबांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. अश्या संकट काळात माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग हे गोर गरिबांच्या मदतीला धावून आले त्यांनी रायपूर जिल्हा परिषद मतदार संघात रायपूर, किन्ही धानोली, खैरी पन्नासे (नवीन ) खैरी पन्नासे (जुनी )गिरोला, मंगरूळ, नीलडोह (पन्नासे )मांगली, जुनेवानी, उखळी सावंगी, देवळी, आमगाव, सुकळी (घारपुरे )बीड बोरगाव आदी गावात जाऊन तांदूळ,तुरीची डाळ, गव्हाचे पीठ , तेल, तिखट, मीठ, हळद, मसाला इत्यादी रोजच्या उपयोगात येणाऱ्या वस्तूंचे वाटप केले. संकट काळात मिळालेला हा मदतीचा हात गरजू कुटूंबांना मोठा आधार ठरला आहे.\nयावेळी हिंगणा पं . स. सभापती बबनराव अव्हाळे, सरपंच प्रेमलाल भलावी, उपसरपंच दीपावली कोहाड,प्रकाश सोनकुसळे,महेश बंग, सिराज शेटे, जावेद महाजन, रफिक महाजन, मुकेश कथलकर, नंदू इटनकर, सुहास कोहाड, वच्छला मेश्राम, सुनीता नागपुरे, किन्ही येथे पंचायत समिती सदस्य सुनील बोदाडे भारत भोपे, सरपंच बेबीताई तीलपले, उपसरपंच विनोद उमरेडकर, ग्रामसेवक किशोर डाखोळे, खैरी (पन्नासे) येथील सरपंच उषा उमेश पन्नासे, सुधाकर खोडे, प्रवीण पन्नासे, प्रमोद पन्नासे, मनोहर राऊत, उमेश पन्नासे, शोभा मोरे, ललिता लाड, दर्शना पन्नासे, ग्रामसेवक अल्का मोटघरे, सावंगी येथे जि.प. सभापती उज्वला बोढारे, पं.स.सदस्य अनुसया सोनवणे, सरपंच प्रगती गोतमारे, राजू गोतमारे, पुरुषोत्तम गोतमारे, अनिल सिरसागर, आमगाव येथे कवडू भोयर, पिंटू भुयार, सुनील गोमासे, दिनेश फोफरे, सुकली येथे एकनाथ वऱ्हाडकर, राजकुमार निब्रड, देवळी येथील प्रभाकर लेकुरवाळे, प्यारू पठाण, पिंटू माथनकर, नामदेव परसे बोरगाव येथील सूर्यभान कोवे\nगिरोला येथे गोविंदा काकडे, विठ्ठल काकडे, चंद्रभान काकडे, अरुण माने, ज्ञानेश्वर घोडमारे, शेषराव काकडे, शेषराव महाजन, माणिक थोटे, विठ्ठल डाफ, मेटाउमरी येथे अल्केश टिपले, दत्तू बोरकर मंगरूळ येथे सरपंच कविता सोमकुंवर,उपसरपंच ईश्वर काळे,सारिका मेश्राम, सविता उईके, सतीश पवार, विष्णू रोडे, नीलडोह पन्नासे येथे देवराव राऊत, सुनील गोरे, नथ्यू शास्त्रकार, वसंता लांबट, रुमाराव राऊत, मांगली येथे अरविंद भोले, उमेश निघोट विष्णू भोले, जुनेवानी येथील कोठीराम ठाकरे, अरुण येवले, विजय उमाळे, राजू उमाळे, मोतीराम ठाकरे, रामभाऊ उमाळे,संतोष ठाकरे, ज्ञानेश्वर मस्के, उखळी येथे चिंधु मसराम, दौलत खंडाते, बळवंत बाविस्कर, गणेश बाविस्कर, रामदास डडमल आदी उपस्थित होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (210) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/corona-today-the-number-of-patients-in-the-state-is-10-60-308-new-22543/", "date_download": "2020-09-26T01:19:11Z", "digest": "sha1:NVFQ3ANIFFUY63MRW2PF73IKVWA6KR4Z", "length": 14126, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कोरोना : आज राज्यात रुग्णांची संख्या १०, ६०, ३०८, नवे २२,५४३ - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली…\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी…\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nकोरोना : आज राज्यात रुग्णांची संख्या १०, ६०, ३०८, नवे २२,५४३\nमुंबई : महाराष्ट्रात आज कोरोनाच्या रुग्णांची संख्या १०, ६०, ३०८ झाली आहे. गेल्या २४ तासात २२,५४३ नवीन रुग्ण आढळले आहेत. आज ११,५४९ रुग्ण बरे झालेत. आतापर्यंत एकूण ७,४०,०६१ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासात ४१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांचा मृत्यू दर २.७९ टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ६९. ८ आहे. सध्या राज्यात १६,८३,७७० संशयित रुग्ण गृहविलगीकरणात व ३७,२९४ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. ५२,५३,६७६ नमुन्यांपैकी १०,६०,३०८ पॉझेटिव्ह आढळलेत. प्रमाण – २०. १८ टक्के.\nCheck pdf1 :-प्रेस नोट १३ सप्टेंबर २०२०\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसांगलीत कोरोनमुळे आठवडी बाजार बंद\nNext article‘ठाकरे ब्रँड’ कोण जपते, हे जगाला माहीत आहे; शालिनी ठाकरे यांचे राऊतांना उत्तर\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी टिप्पणी विराटच्या प्रैक्टिसवर होती\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nकरोनानंही टेकले यांच्यापुढे हात…\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\nपाकिस्तान आम्हाला जनावरांप्रमाणे वागवतो – सज्जाद राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/shivsena-and-bjp-on-journalist-arnab-goswami-in-vidhansabha/", "date_download": "2020-09-26T02:57:31Z", "digest": "sha1:TNY5YMK7E4PUWSYYWO4TPHVI3QZ73XM5", "length": 15763, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव ; सभागृहात शिवसेना आक्रमक - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली…\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी…\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nपत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव ; सभागृहात शिवसेना आक्रमक\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा एकेरी उल्लेख करणारे टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्याविरोधात शिवसेनेनं हक्कभंगाचा प्रस्ताव आणला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांनी हा प्रस्ताव आणला. हा प्रस्ताव येताच शिवसेनेचे (Shivsena) सदस्य प्रचंड आक्रमक झाले.\nअर्णब गोस्वामी हे सुपारीबाज पत्रकार आहेत, अशा शब्दांत शिवसेनेने टीका केली आहे . विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या व शेवटच्या दिवशी शिवसेनेने गोस्वामी यांच्यावर निशाणा साधला.परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनीही सरनाईक यांचे म्हणणे उचलून धरले. ‘अर्णब गोस्वामी हे स्वत: न्यायाधीश असल्यासारखे वागतात.\nस्वत: खटला चालवतात आणि स्वत: निकाल देतात.’ असा संताप परब यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडताना गोस्वामी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘गोस्वामी हे जाणीवपूर्वक वाईट भाषा वापरून बोलतात. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युप्रकरणाशी कुठल्याही नेत्याचा संबंध नसताना कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांची ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी.’ अशी जोरदार मागणी सरनाईक यांनी यावेळी केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिटची चाहूल\nNext articleपुन्हा शिवसेनेचा बुलंद आवाज; नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी निवड\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी टिप्पणी विराटच्या प्रैक्टिसवर होती\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nकरोनानंही टेकले यांच्यापुढे हात…\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\nपाकिस्तान आम्हाला जनावरांप्रमाणे वागवतो – सज्जाद राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/ahmedpur-six-year-old-girl-sexually-assault/", "date_download": "2020-09-26T02:25:13Z", "digest": "sha1:SDFXFISYFN2XPIBWYEUPUO4WKKZPDQEM", "length": 16130, "nlines": 157, "source_domain": "www.saamana.com", "title": "अहमदपूरमध्ये सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम…\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे…\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nअहमदपूरमध्ये सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार\nफुलेवाडी रोड वैजापूर तालुका येथील एक महिला आपल्या सहा वर्षाच्या मुलीसोबत अहमदपूर येथे आली होती. त्यावेळी शेनकुड गावातील 22 वर्षीय तरुणाने त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याविषयी पीडित मुलीच्या आईने अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.\nपोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, सचिन संजय गिरी (22) याने दि.13 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजल्याच्या सुमारास फिर्यादीच्या मुलीला कुरकुरे, चिप्स, चॉकलेट देऊन मोबाईल वर गेम खेळू असे म्हणून घरात नेले त्यानंतर त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी सचिन विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन.व्ही.जाधव हे करत आहेत.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम खान यांची नावे चर्चेत\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे यांचे आदेश\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण...\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nया बातम्या अवश्य वाचा\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम...\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/mumbai-lawyers-caa-protest/", "date_download": "2020-09-26T03:32:29Z", "digest": "sha1:AOCKMFHDXU6BWYXZ3DMEWQUP5Z2SBSUY", "length": 15097, "nlines": 157, "source_domain": "www.saamana.com", "title": "सीएएविरोधात वकील कोर्टाबाहेर | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nयंदाचा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा रद्द\nगलवान हिंसाचाराबाबत अखेर चीनची कबुली, संघर्षात पीएलएचे पाच सैनिक गमावल्याचा दावा\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nसुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सोमवारी मुंबई हायकोर्टाबाहेर वकिलांनी आंदोलन केले. संविधानाचे वाचन करून वकिलांनी या कायद्याचा निषेध केला. या आंदोलनात सुमारे पन्नासहून अधिक वकील सहभागी झाले होते. यामध्ये ज्येष्ठ वकील नवरोझ सिरवई, ऍड. गायत्री सिंह, ऍड. मिहीर देसाई, ऍड. अश्रफ शेख यांच्यासह इतर वकिलांचा समावेश होता.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nयंदाचा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा रद्द\nगलवान हिंसाचाराबाबत अखेर चीनची कबुली, संघर्षात पीएलएचे पाच सैनिक गमावल्याचा दावा\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम खान यांची नावे चर्चेत\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे यांचे आदेश\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nगलवान हिंसाचाराबाबत अखेर चीनची कबुली, संघर्षात पीएलएचे पाच सैनिक गमावल्याचा दावा\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम...\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nया बातम्या अवश्य वाचा\nयंदाचा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा रद्द\nगलवान हिंसाचाराबाबत अखेर चीनची कबुली, संघर्षात पीएलएचे पाच सैनिक गमावल्याचा दावा\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/dr-raj-thackeray-did-greetings-to-babasaheb-ambedkar/", "date_download": "2020-09-26T02:41:33Z", "digest": "sha1:OQS2ETWJQT5PV7G5M4B7NU2SJFKLD66S", "length": 5450, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज ठाकरेंनी केलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन", "raw_content": "\nराज ठाकरेंनी केलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन\nमुंबई – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63 व्या महापरिनिर्वाणदिन असून त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील त्यांचे अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येते आहेत.\nदरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केले. राज ठाकरेंनी बाबासाहेबांना अभिवादन करताना आपल्या धिकृत ट्विटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.\n“स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचं अभेद्य कवच दिलं. आज भारतीय लोकशाहीचा कसोटीचा काळ आहे, ह्या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आग्रही राहणं हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल”. असं राज ठाकरेंनी म्हंटलं आहे.\nस्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचं अभेद्य कवच दिलं. आज भारतीय लोकशाहीचा कसोटीचा काळ आहे, ह्या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आग्रही राहणं हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल. #महामानव pic.twitter.com/FdLAEAYQIg\nधोनीच्या विजयी षटकाराचा चेंडू सापडला\nलक्षवेधी : केवळ रेटिले बहुमता\nदखल : कांद्याचं रडगाणं\nनिवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांक उसळले\nरस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारचा ‘मेगा प्लॅन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2019/08/Meeting-of-all-Ganesh-Mandal-office-bearers-of-Chandrapur-at-police-station-on-Monday.html", "date_download": "2020-09-26T02:07:55Z", "digest": "sha1:XTSJCMAHYUVYHNGJN764B2YH75MYLMNS", "length": 7960, "nlines": 114, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "सोमवारी चंद्रपूरच्या सर्व गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात बैठक - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर सोमवारी चंद्रपूरच्या सर्व गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात बैठक\nसोमवारी चंद्रपूरच्या सर्व गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात बैठक\nसाजरा करण्यासंदर्भात चंद्रपुर शहर पोलिस निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सोमवार ला दि१९-०८-२०१९ रोजी आढावा बैठक होत आहे तरी आपण सर्व गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी उपस्थित रहावे हि विनंती..\nव इतरही मंडळाच्या सदस्यांना कळवावे व इतर गृप वर पाठवावे.\nस्थळ - चंद्रपुर शहर पोलीस स्टेशन चंद्रपुर\n*वेळ दुपारी ०४:३० वाजता*\nचंद्रपुर शहर पोलीस चंद्रपुर\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (210) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2019/10/Blood-camp-mahanirmiti-koradi.html", "date_download": "2020-09-26T02:15:48Z", "digest": "sha1:ZRNDH37OJCKCFHJFAE7MS77XW4QFJ36N", "length": 12321, "nlines": 111, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "१३६ पिशव्या रक्तदान करून कोराडी वीज केंद्राने जोपासली सामाजिक बांधिलकी - KhabarBat™", "raw_content": "\nHome mahanirmiti १३६ पिशव्या रक्तदान करून कोराडी वीज केंद्राने जोपासली सामाजिक बांधिलकी\n१३६ पिशव्या रक्तदान करून कोराडी वीज केंद्राने जोपासली सामाजिक बांधिलकी\nसमाजाप्रती आपले काही देणे लागते, या जाणीवेतून कोराडी वीज केंद्रातर्फे नियमित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच विद्युत विहार वसाहत दवाखाना येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले व दिवसभरात तब्बल १३६ पिशव्या रक्तदान करून यापूर्वीचा १०४ पिशव्या रक्तदानाचा रेकॉर्ड मोडून नवा उच्चांक प्रस्थापित करण्यात आला.\nरक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य अभियंता राजेश पाटील, उप मुख्य अभियंते गिरीश कुमरवार, सुनील सोनपेठकर, हेडगेवार रक्तपेढीचे डॉ.अनसिंगकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मुकेश गजभिये, वर्धापन दिन सचिव गजानन सुपे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.\nयाप्रसंगी मुख्य अभियंता राजेश पाटील म्हणाले की, एका व्यक्तीच्या रक्तदानाने तीन रुग्णांचे प्राण वाचतात, त्यामुळे रक्तदान हे “महादान” आहे. कोराडी औष्णिक विद्युत केंद्राशी निगडीत जास्तीत जास्त व्यक्तींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे मत त्यांनी व्यक्त केले तर डॉ.हेडगेवार रक्तपेढीचे डॉ.अनसिंगकर यांनी रक्तदानाचे फायदे, शरीरातील लोहप्रमाण संतुलन याविषयी मार्गदर्शन केले. रक्त संकलनाचे काम डॉ.हेडगेवार रक्तपेढीच्या तज्ज्ञ वैद्यकीय चमूने केले व त्यास कोराडी वीज केंद्र दवाखाना चमूचे मोलाचे सहकार्य लाभले.\nमहानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचारी, कुटुंबिय, संघटना प्रतींनिधी, प्रशिक्षणार्थी, कंत्राटदार, कंत्राटी कामगार यांनी रक्तदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे महिला प्रतींनिधींनी रक्तदानात हिरीरीने सहभाग घेतला त्यामध्ये प्रणोती झाडे, रीना पांडे, शकुंतला धुर्वे, पल्लवी मानवटकर आणि स्वाती काळे यांचा समावेश आहे.\nशिबिराला मुख्य अभियंते राजकुमार तासकर, दिलीप धकाते, अधीक्षक अभियंते विराज चौधरी, विलास मोटघरे, नारायण राठोड,कन्हैयलाल माटे, डॉ.भूषण शिंदे, उप महाव्यवस्थापक(मानव संसाधन) डॉ.प्रकाश प्रभावत, कल्याण अधिकारी प्रसाद निकम प्रामुख्याने उपस्थित होते.\nउद्घाटन सत्राचे सूत्र संचालन मिलिंद रहाटगावकर यांनी तर उपस्थितांचे आभार डॉक्टर मुकेश गजभिये यांनी मानले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी रक्तदान शिबीर समितीतील सर्व पदाधिकार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यात गजानन सुपे, राजेश गोरले, विलास भालेराव, मुकुंद भोकरधनकर, लक्ष्मण बावनकुळे, प्रवीण बुटे तसेच दवाखाना चमूचा विशेषत्वाने समावेश होता.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (210) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/topics/gold-and-silver-price", "date_download": "2020-09-26T03:21:20Z", "digest": "sha1:HKYQSYZEXL7TEH6B73K64VEPJPSARCQB", "length": 4565, "nlines": 71, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअरे बाप रे; सोन्याची पन्नाशी तर चांदी पोहोचली साठीत\nसोन्याचा रेकॉर्ड : तरीही सराफा बाजारावर नफावसुलीचा दबाव\nसोने झाले स्वस्त : सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण\nसोन्याचा भाव उतरला ; जाणून घ्या आजचा दर\nसोन्यातील तेजी कायम ; जाणून घ्या आजचा सोन्याचा दर\nकरोनाची दुसरी लाट ; सोन्याची विक्रमी स्तराकडे वाटचाल\nसोन्यातील तेजीला ब्रेक ; आज पुन्हा सोने दरात घसरण\nसराफा तेजीत ; सलग तिसऱ्या दिवशी सोने महागले\nसोने झळाळी कायम ; जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव\nसोने-चांदी तेजीत ; प्रमुख शहरात हा आहे आजचा दर\nनवनवे उच्चांक:ऐन मंदीत सोन्याची 'चांदी'\nतेजीला ब्रेक; सोनं-चांदी झाले स्वस्त\nसोन्याचे भाव आणखी काही दिवस चढेच राहणार; गुंतवणूक वाढली\nसोने, चांदी पुन्हा वरच्या पातळीवर\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/video/news/supreme-court-dismisses-curative-petition-of-two-death-row-convicts-in-nirbhaya-case/videoshow/73246789.cms", "date_download": "2020-09-26T02:30:32Z", "digest": "sha1:NEZU2P52NNLWQTGXVRCGMKPPXQYZMIFZ", "length": 9719, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनिर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीच; सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळली\nनवी दिल्ली: निर्भया बलात्कार प्रकरणात सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांनी दाखल केलेली क्युरेटिव्ह (पुनर्विचार) याचिका सुप्रीम कोर्टानं आज फेटाळली. त्यामुळं निर्भयाच्या दोषींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर २२ जानेवारीला अंमलबजावणी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न...\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २६ सप्टेंबर २०२०\nन्यूजड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nन्यूजबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\n आज कोण ठरणार सरस\nन्यूजमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nन्यूजबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\nन्यूज'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nन्यूजसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nन्यूजशहीद जवान नरेश बडोलेंना काश्मीरात वीरमरण\nन्यूजकृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचं देशव्यापी आंदोलन\nन्यूजभाजप हा एकसंध आणि एक संघ आहे - विनोद तावडे\nहेल्थफिट राहण्यासाठी या सोप्या आसनांचा करा अभ्यास\nन्यूजराज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिटकून बसणारे सरकार - राम शिंदे\nन्यूज'भारत बंद'ची हाक देणारे शेतकरी विरोधी- राम शिंदे\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २५ सप्टेंबर २०२०\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2020-09-26T00:50:37Z", "digest": "sha1:3DTLIJBQ42E34OHD55Z46FLFB6DIH6T7", "length": 8455, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पोलीस अधिकाऱ्यांनी केले पत्रकारांचे थर्मल स्कॕनिंग | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nपोलीस अधिकाऱ्यांनी केले पत्रकारांचे थर्मल स्कॕनिंग\n कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे.संचारबंदी दरम्यान वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी करत पत्रकारांचे थर्मल स्कॕनिंग केले.\nकोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे.भारतात त्याचा प्रसार रोखण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. पत्रकार महत्वाची भूमिका बजावतात, यासाठी दररोज वार्तांकनासाठी त्यांना घराबाहेर पडावे लागते. जिल्ह्यात सुदैवाने कोरोनाची लागण नसली तरी काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. दररोज वार्तांकनासाठी घराबाहेर पडणाऱ्या पत्रकारांची थर्मल स्कॕनिंग पोलीस उपअधिक्षक पुंडलिक सपकाळे यांनी केली. यात स्कॕनिंग केलेल्या सर्व पत्रकारांचे शरीराचे तापमान समतोल असल्याने आपण सर्व पत्रकार सुरक्षित असल्याचे सपकाळे यांनी सांगून स्वतःची काळजी घेत आवश्यक असल्यास घराबाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी केले.\nपहुर येथे शिवसेना शहर शाखेच्यावतीने 51 कुटुंबांना अन्नदान वाटप\nतळोद्यात जुगार अड्डयावर धाड; ५ लाख ५० हजाराची रोकड जप्त\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nतळोद्यात जुगार अड्डयावर धाड; ५ लाख ५० हजाराची रोकड जप्त\nकोरोनापासुन संरक्षणसाठी नागरिकांना खासदार रक्षा खडसे यांनी केले मास्कचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.guruthakur.in/Agadbam/", "date_download": "2020-09-26T03:02:50Z", "digest": "sha1:P3WAXJMNDSACQCMVH4NKW2VB3XGEX2X4", "length": 8673, "nlines": 151, "source_domain": "www.guruthakur.in", "title": "Agadbam - www.guruthakur.in", "raw_content": "\nअगडबम ब बम बम ब बम बम ब बम अगडबम ब बम\nसरगम ही छेडून यव्वन जाई … सूर हा नवा\nभासांचे छेडी धुंद तराणे वेडी हवा\nस्वप्नांचे चे पैजण बाई होऊ बेभान पुन्हा\nअगडबम ब बम बम ब बम बम ब बम अगडबम ब बम\nश्वासही नवे भासही नवे\nनेमके किती मावतील या\nधाकात राहुनी चिंब सरींच्या गाउया\nअगडबम ब बम बम ब बम बम ब बम अगडबम ब बम\nपाव इन तारोंको झुमे पाकर आसमां…\nचलो चुराते है भवरोंसे गुन गुन ती कर ये हवा\nक्यू निला है आसमा\nक्यू है गरजती बता दे जरा\nअगडबम ब बम बम ब बम बम ब बम अगडबम ब बम\nढुंडे हम जोश हा वेडा\nहसू जारासे बेभान आम्ही\nये दम है नया\nचिंता जगाची कशाला करा\nअगडबम ब बम बम ब बम बम ब बम अगडबम ब बम\nये दिली कोंबड्याने बांग\nतवा काय झाल सांग\nरात चांदण्यात कुठवर न्हाली\nउगा लाजू नको अाता\nसारं सांग भसा भसा\nकाय रातीच्याला धाम धुम झाली\nये बाबो बाबो बाबो\nथोडी धाक धुक उरी\nत्यात कार कुर करी\nजुन्या पाटलाने केला हो राडा\nकशी गाडी न्यावी पुढा\nयाचा आर्ध्यात आडला घोडा\nम्हणे करु तरी काय\nसुरू घाल मेल काळजात झाली\nउगा लाजू नको अाता\nसारं सांग भसा भसा\nकाय रातीच्याला धाम धुम झाली\nये बाबो बाबो बाबो\nकाल रातीच्याला काय झाला बाबो\nपानी पानी काळजाचा झाला बाबो\nमन कुठवर हारवला बाबो\nआता हालकीस शहारला बाबो\nवट वट मधी फुटलाका बाबो\nकिती उरा मधे गटापला बाबो\nगडी झाला उतावळा जीव जळ कोळा कोळा\nमन आता मला सोसवत नाही\nतिचा धरू जरा हात\nगेला धाडकान खाटल्याच्या काहली\nगडी झाला उतावळा जीव जळ कोळा कोळा\nमन आता मला सोसवत नाही\nतिचा धरू जरा हात\nगेला धाडकान खाटल्याच्या काहली\nअसा चांद गोरा गोरा\nसुरू काकणाची किण किण झाली\nउगा लाजू नको अाता\nसारं सांग भसा भसा\nकाय रातीच्याला धाम धुम झाली\nये बाबो बाबो बाबो\nतवा काय झाल सांग\nरात चांदण्यात कुठवर न्हाली\nउगा लाजू नको अाता\nसारं सांग भसा भसा\nकाय रातीच्याला धाम धुम झाली\nये बाबो बाबो बाबो\nकुठल्या इंद्राची रंभा तू उमजना\nकुठल्या रानी चा तोरा तुझा\nनखरा माझा हा असाच लय भारी\nफुक्का तू होशी येडा पिसा\nधिकारी धिकाट वाजतय उर्रात\nउडतया काळीज दना दना\nघे हात हातात येऊन रंगात\nतुझ्या या रुपान पिसाटल रान\nतुझ्या र नादान झाले मी बेभान\nसुटलाया भान जरा जरा\nकी कशाला झिंग सांग आली मला\nधुंद धुंद प्रितीची ही जाईल नशा\nझालाय भर्रात शिंगार डोळयात\nकरतोया एकांत खाणा खुणा\nदे हात हातात येऊन रंगात\nतुझ्या या डोळ्याच्या गुललाबी जाल्यात\nसुचना रुचना डोस्कच चालेना\nओळख पटेना माझी मला\nका ग मी तुझी ग आज राणी आदा\nसैरा भैर आसमंत झाला फिदा\nबोलून लाड्डात मधाच तू बोट\nकशाला लाविशी पुन्हा पुन्हा\nघे हात हातात येऊन रंगात\nकुठल्या इंद्राची रंभा तू उमजना\nकुठल्या राणीचा तोरा तुझा\nधिकारी धिकाट वाजताया उर्रात\nउडताया काळीज दना दना\nघे हात हातात येऊन रंगात\nअसे फाटले आभाळ त्याला ठिगळ पुरेना\nपिळ काळजाचा जणू सोडवेना सोसवेना\nसुख दे सावल्यांची साथ\nपिळ काळजाचा जणू सोडवेना सोसवेना\nसैरा वैरा पिसापरी जळे…\nपिळ काळजाचा जणू सोडवेना सोसवेना\nअसे फाटले आभाळ त्याला ठिगळ पुरेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/devendra-fadnavis-on-maratha-reservation-supreme-court/", "date_download": "2020-09-26T03:02:17Z", "digest": "sha1:PICVGBLHY3LMVZ3X55WHGMMNDJKBYJ3H", "length": 21029, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "माझी जात ब्राह्मण असल्यामुळं मला टीकेचा धनी करा ; मात्र... - देवेंद्र फडणवीस - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली…\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी…\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nमाझी जात ब्राह्मण असल्यामुळं मला टीकेचा धनी करा ; मात्र… – देवेंद्र फडणवीस\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) मराठा आरक्षणाला (Maratha reservation) अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापू लागलेले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या मुद्द्यावर ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बिनधास्त उत्तरे दिली. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय हा धक्कादायक आहे.\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मलाही आवडलेला नाही. पण न्यायालयानं त्यांचा निर्णय दिला आहे. या निर्णयावर आपल्याला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काही लोक राजकीय हेतूनं कसं केंद्राकडे बोट दाखवता येईल याचा प्रयत्न करत आहेत. राज्याचा कायदा असल्यानं केंद्राचा त्याच्याशी संबंध नाही. काही लोकांना असं वाटतंय की माझी जात ब्राह्मण आहे. त्यामुळं मला टीकेचा धनी करा. मात्र मराठा समाजाला सर्व माहीत आहे की मी यासाठी किती प्रयत्न केले, असं फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत मी जबाबदारीने वक्तव्य करणार. सत्ताधाऱ्यांनी संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य करणे टाळावे. काही लोक राजकीय हेतूनं कसं केंद्राकडे बोट दाखवता येईल हे बघत आहेत. राज्याचा कायदा असल्यानं केंद्राचा संबंध नाही. केंद्राला पक्षकार करणं याचिकाकर्त्यांच्या हातात. केंद्राला पक्षकार करून काही उपयोगही नाही. केंद्राकडं बोट दाखवणं ही पळवाट आहे, असं फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले की, आरक्षणासंदर्भात आपण सगळे निकष पूर्ण केलेत का हे आपल्याला न्यायालयाला पटवून द्यायचे आहे. सगळ्यांची एकत्र सुनावणी होत असताना आम्हाला वेगळा न्याय का हे आपल्याला न्यायालयाला पटवून द्यायचे आहे. सगळ्यांची एकत्र सुनावणी होत असताना आम्हाला वेगळा न्याय का हा मुद्दा आपण आता मांडायला हवा.\nइतर राज्यांप्रमाणे आपलाही कायदा टिकायला हवा. राज्य सरकार आपल्या अंगावर काहीही घेण्यास तयार नाही. स्थगिती हटवण्यासाठी राज्य सरकारला प्रयत्न करावे लागतील. अध्यादेशाबाबत विधितज्ज्ञांसोबत चर्चा केली जाऊ शकते, असंही फडणवीस म्हणाले. कुंभकोणीऐवजी थोरातांकडे केस द्यावी, त्यांनी उच्च न्यायालयात केस जिंकली होती, असंदेखील ते म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कुणी करावं याबाबत फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, दोन्ही छत्रपती आमच्यासाठी आदरणीय आहेत. छत्रपतींच्या घराण्यात कुणीही फूट पाडू नये. नेतृत्व दोघांनीही करावं. दोघांमध्ये नेतृत्वासाठी वाद नाही. त्यामुळं कुणी तसा वाद लावू नये. छत्रपती संभाजीराजे यांच्या भरतीसंदर्भातील वक्तव्यात वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत सरकारनं भरतीचा निर्णय घेऊ नये. अशा प्रकारचा निर्णय घेताना सर्व घटकांशी चर्चा करण्याची गरज आहे. राज्याची स्थिती गंभीर असताना असे निर्णय घेताना विचार करावा.\nभरती करावी, मात्र आता घाई नाही. आपण ही स्थगिती हटवू शकतो का यावर विचार केला जावा. एक महिना उशीर झाल्याने कुठलाही फरक पडणार नाही. याबाबत चर्चा तरी करावी. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना आता भरतीचा निर्णय योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले. मराठा समाजात प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित अशी एक लढाई आहे. मराठा समाजातील एक मोठा घटक गरीब आहे, वंचित आहे. मराठा समाजातला एक वर्ग राज्यकर्ता आहे. तो समृद्ध आहे. मात्र दुसरा वर्ग उपेक्षित आहे, त्यांच्या मनात विस्थापित असल्याची भावना आहे.\nमात्र यासाठी मराठा आमदारांवर खापर फोडणं अगदी चुकीचं आहे. कांद्यावर ज्या क्षणी निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला त्या क्षणी मी केंद्रीय मंत्री गोयल यांना फोन केला. निर्यातबंदीसाठी ही वेळ बरोबर नाही. याबाबत केंद्रानं एक मेकॅनिझम तयार केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना निर्यातबंदी लावणं चूक आहे. मी याबाबत केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. यातून काही तरी योग्य निर्णय घेतला जाईल, असं फडणवीस म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nNext articleराज्यात कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर- आशिष शेलार\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी टिप्पणी विराटच्या प्रैक्टिसवर होती\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nकरोनानंही टेकले यांच्यापुढे हात…\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\nपाकिस्तान आम्हाला जनावरांप्रमाणे वागवतो – सज्जाद राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/and-mp-sambhaji-raje-jumped-into-chhatrapati-marli-river/", "date_download": "2020-09-26T02:06:22Z", "digest": "sha1:FV3W72PXCUKEKUKVAC36INAQRQ6D3FDA", "length": 5545, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अन्‌ खासदार संभाजी राजे छत्रपती मारली नदीत उडी", "raw_content": "\nअन्‌ खासदार संभाजी राजे छत्रपती मारली नदीत उडी\nकोल्हापूर – सध्या उन्हाळ्याचा ज्वर चांगलाच चढला आहे. त्यामुळे प्रचंड उष्म्याने सगळ्याच्याच अंगाची लाही-लाही होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती हे चंदगड दौऱ्यावर आहेत.\nसंभाजीराजे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून ते शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार दौऱ्यात आहेत. प्रचारादरम्यान वाटेत ढोलगरवाडी हंझोल नदीवरील बंधाऱ्यावर ढोलगरवाडी व पंचक्रोशीतील तरुण व बालचमू नदीत पोहण्याचा आनंद लुटत होते. राजेंच्या वाहनांचा ताफा याच बंधाऱ्यावरून जात होता.\nपोहणारी मुले पाहून राजेंनाही आपले बालपण आठवले. त्यांनी आपली गाडी थांबवली. पोहण्याची इच्छा व्यक्त केली, पण सुरक्षा रक्षकांनी पोहण्याची मनाई केली. इतर मुलांचा आनंद पाहून त्यांना काही केल्या आपला मोह आवरेना. यानंतर त्यांनी कपडे काढले आणि नदीत धाडकन उडी ठोकली.\nखुद्द राजेंनीच पोहण्यासाठी उडी ठोकल्याने मुलांनी जोर जोरात जल्लोष केला. राजेंच्या बरोबर पोहण्याचा आनंद साऱ्यांनीच लुटला. संभाजीराजेही कडक उन्हाने सांगलेच हैराण झाले होते. रोज-रोज तीच तीच कामे करून कंटाळलेल्या संभाजीराजेंनी नदीत पोहून चांगलाच आनंद लुटला आणि आपल्या बालपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला.\nkolhapurkolhapur newsकोल्हापूरखासदार संभाजीराजे छत्रपती\nधोनीच्या विजयी षटकाराचा चेंडू सापडला\nलक्षवेधी : केवळ रेटिले बहुमता\nदखल : कांद्याचं रडगाणं\nनिवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांक उसळले\nमास्कवरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63675?page=2", "date_download": "2020-09-26T02:37:16Z", "digest": "sha1:UNDL6XVU3R3Y4P5UV2XWZ2J2IMYWJHUM", "length": 20731, "nlines": 239, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नवीन मालिका \"तुझं माझं ब्रेकअप\" | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नवीन मालिका \"तुझं माझं ब्रेकअप\"\nनवीन मालिका \"तुझं माझं ब्रेकअप\"\nझी मराठी वर 18 सप्टेंबर पासून रात्री 8.30 वाजता तुझं माझं ब्रेकअप ही नवीन मालिका सुरू होते आहे.\nSainkeet Kamat (राखेचामधील अभिराम)and Ketaki Chitale हे मुख्य पात्र आहेत.\nउपग्रह वाहिनी - मराठी\nते आलं लक्षात.. मला विचारायचं\nते आलं लक्षात.. मला विचारायचं होतं की खरंच असं cold war आहे का पार्लेकर आणि डोंबिवलीकरांमध्ये\ncold war पेक्षा पार्लेकर खरंच स्वतःला भारी समजतात का डोंबिवलीकरांपेक्षा\nरियली डोन्ट नो, पार्लेकर\nरियली डोन्ट नो, पार्लेकर सांगू शकतील.\nमला माहिती असलेली काही माणसे पार्ल्यातून डोंबिवलीत सेटल्ड होऊन रमलेली आहेत आणि डोंबिवलीला नावं न ठेवता एकरूप झालेली आहेत, अर्थात मी किती बोटावर मोजक्या माणसांबद्दल सांगतेय. पण एक ओळखीची त्यातली तिची सख्खी बहीण ऍड, मुवि क्षेत्रात आहे आणि पूर्वी सिरियल्स पण केल्यात.\nमला मात्र कौतुक आहे\nमला मात्र कौतुक आहे पार्ल्याचं. मुंबईत आपली वेगळी ओळख टीकवून आहे ते शहर. बरीच मोठी माणसं दीली आहेत ह्या शहराने.\nबरी वाटतिये मालिका. हिरो आणि\nबरी वाटतिये मालिका. हिरो आणि हिरविणीचे कपडे आवडले. नाही तर इतर मालिकांमधे सुरवातीपासुन शेवटापर्यंत एकाच प्रकारचे कपडे घालतात.\nइथे चान सलवार-कमिज, गोव्यात शॉर्ट्स किंवा वनपीस, नाईटी. आवडलं हे.\nछान आहे सीरिअल , मीरा चे\nछान आहे सीरिअल , मीरा चे ड्रेस मस्त आहेत . एकंदर सर्वांचे कपडे छान आहेत .\nसतत ची भांडणे जरा बोर होतात पण त्यावर तर सीरिअल आहे .\nएक दोन बघितले सिरियलचे. मला\nएक दोन बघितले सिरियलचे. मला वाटल हि नायिका झीमच्या इतर नायिकान्पेक्षा वेगळी असेल. पण कसल काय अतीचान्गली, अतीगोड वै वै आहे हि सुद्दा. मला समुद्र खुप आवडतो, नातेवाईकामध्ये राहण्यातच खरी मजा आहे. ई. तेच ते ग्गोड नायिकेचे टिपिकल बोलणे.\nसमीरच्या आत्याचे कपडे आणि\nसमीरच्या आत्याचे कपडे आणि ईमिटेशन ज्वीलरीपण छान असते. हिरविणीच्या बहिणीला कुठेतरी बघितलंय कदाचित नाटकात. हिरविणीला सरकारी नोकरी आणि नव-्या्यापेक्षा जास्त पगार असतो मग समीरची आई कशाच्या जोरावर ब्लॅंक चेक वगैरे देऊन येते. खूप माणसं आहेत मालिकेत, कुणाची कोण काही कळत नाही, त्या जाडूबाई मालिकेसारखी.\nदोन कुटुंब आहेत. समीरच्या\nदोन कुटुंब आहेत. समीरच्या घरात त्याचे आई, बाबा, आत्या आणि काका. मीरच्या घरात तिचे आई, बाबा, बहिण, काका, काकू आणि त्यांचा मुलगा.\nमीराचा काका --- गुड अॅक्टिंग\nमीराचा काका --- गुड अॅक्टिंग\nभिकार आहे सिरियल. जी काही\nभिकार आहे सिरियल. जी काही चुकून डोळ्यावर पडते त्याने ही अत्याचार होतात. पहात तर नाहिच. पण चुकून सुद्धा चॅनल सर्फ करताना या सिरियलचा एखादा बरा सिन डोळ्यांना दिसत नाही. सतत फक्त आणि फक्त नॉन्सेन्स.\nत्यातल्या त्यात ती उदय टिकेकर ची आई पहायला बरी वाटते, दिसते ही छान आणि तिच्या साड्या सुंदर आहेत.\nउदय टिकेकर ची आई नाही ती..\nउदय टिकेकर ची आई नाही ती...बायको ए\nआणि सिरीयल बरी चाललीय.....म्हणजे नाकपुड्या फुलवून पुन्हा नाकात बोलणार्‍या नायिकेला पहण्याचा पेशंस तुमच्यात असेल तर हिरो ठीके. ती अगदीच बुटकी, सतत सानुनासिक बोलणारी वतीदात वेडेवाकडे असणारी आहे. त्यापेक्षा तिची सासूच स्मार्ट आणि मस्त वाटते.\nउदय टिकेकरची आई हो अगदीच काहीतरी दिसते पण ईथे काही लोकांना राग येतो असं बोलल्यावर म्हणून नाही बोलले. हिरवीणीची बहिण छान दिसते पण ती बंडखोर वाटते आणि अशा हिरवीणी नाही चालत झीला. मीराची काकू म्हणते चांगला चेक मिळत होता तर परत पॅचअप करायला निघालीये. घरातल्या घरात एवढं राजकारण. असं या लेवलचं असतं का कधी. विजय निकम पहिल्यांदा निगेटीव्ह भूमिकेत दिसताहेत.\nआयला मी पण काय ग्रेट आहे,\nआयला मी पण काय ग्रेट आहे, बायको ऐवजी आई लिहून बसले, सॉरी..::फिदी:\nअरे पण ज्यांचा ब्रेकप होतोय\nअरे पण ज्यांचा ब्रेकप होतोय ते दोघं तर मी १-२ वेळा एकमेकांशी फोन वर गुलूगुलू बोलताना पाहिले की.. मग माशी नक्की कुठे शिंकलिये\nएक सिन पाहिला त्यात तो लहान भाऊ हिरविनिला जोक सान्गत अस्तो ती कुठेतरी निराळीकडे घुसून माझ्याशी नोर्मल बोला, नोर्म ल बोला म्हणत होती.. इतका नकली अभिनय अरारा\nहिरवीणीची बहिण झाल्ये ती\nहिरवीणीची बहिण झाल्ये ती जुयेरेगा मधल्या आदित्यच्या बहिणी सारखी दिसते जरा. तिचं लग्न झालं आहे की नाही ह्या मालिकेत \nतिचं लग्न झालं आहे की नाही\nतिचं लग्न झालं आहे की नाही ह्या मालिकेत >> हो आणि ती सुद्धा नवर्‍याला सोडून माहेरी रहायला आली आहे.\nअरे पण ज्यांचा ब्रेकप होतोय ते दोघं तर मी १-२ वेळा एकमेकांशी फोन वर गुलूगुलू बोलताना पाहिले की.. मग माशी नक्की कुठे शिंकलिये>> अश्यावेळी नेमके घरातले कोणीतरी विरुद्ध पार्टीच्या घरी जाऊन भांडून येतो असे दाखविले आहे. त्यातून आता सोडचिट्ठीतून हिला मिळणार्‍या पोटगीतून मुलाचे शिक्षण करायचा काका-काकूचा मनसुबा आहे.\nएक सिन पाहिला त्यात तो लहान\nएक सिन पाहिला त्यात तो लहान भाऊ हिरविनिला जोक सान्गत अस्तो ती कुठेतरी निराळीकडे घुसून माझ्याशी नोर्मल बोला, नोर्म ल बोला म्हणत होती.. इतका नकली अभिनय अरारा>>+१ तो भाऊ नॉर्मलपणे विनोदच सांगत असतो ना\nती हिरवीण जी (वेडीवाकडी)\nती हिरवीण जी (वेडीवाकडी) तोंडं करते ते बघवत नाही.\nती हिरवीण जी (वेडीवाकडी)\nती हिरवीण जी (वेडीवाकडी) तोंडं करते ते बघवत नाही.>>>+१ हो.\nरोज पडका आणि रडका चेहरा दाखवायचा आहे तर गोड/सुंदर नायिका घ्यायला हवी होती.\nती हिरवीण जी (वेडीवाकडी)\nती हिरवीण जी (वेडीवाकडी) तोंडं करते ते बघवत नाही.>>>>>> +१\nगोड चेहऱ्याची नायिका का\nगोड चेहऱ्याची नायिका का घेतली नाही ती हिरवीण अगदीच वाईट आहे .\nमी अर्थात बघत नाहीच . मला ती हिरवीण अजिब्बात आवडत नाही\nअंजली बै किती गोड दिसतात\nअंजली बै किती गोड दिसतात हिच्या मानाने... नाही का क्लोज अप्स मधे तर अंजली फारच सुंदर दिसते...\nअंजली चे दुधाचे दात पडलेच\nअंजली चे दुधाचे दात पडलेच नाहीत असे वाटते ....साधीच छान दिसते ...glamorous look मध्ये इतकी चांगली दिसत नाही ...\nअंजली खरोखरी सुम्दर दिसते. अ\nअंजली खरोखरी सुम्दर दिसते. अ‍ॅक्चुली सुंदर नाही पण रेखिव आहे ती.\nत्या ढेरपोट्या सुयश मध्ये हिने काय पाहिले देव जाणे\nहो..मलाही नाही आवडत तो..डोळे\nहो..मलाही नाही आवडत तो..डोळे नेहमी लालच असतात ..चेहऱ्यावर खोटं स्माइल....त्याच्या पेक्षा उंच असेल अंजली\nअरे इथे अंजली बाईंबद्दल कावून\nअरे इथे अंजली बाईंबद्दल कावून बोलून राह्यलात\nरो.ह.ची एंट्री होणारे. शोभत\nरो.ह.ची एंट्री होणारे. शोभत नाहीये तिला तो modern लुक.\nमी एक दोन भाग बघूनच सोडून\nमी एक दोन भाग बघूनच सोडून दिली. डायलॉग्स मधे तोचतोचपणा आहे. एकाच अर्थाचं रटाळ गोल गोल बोलत रहातात.\nत्यापेक्षा जाडुबाई जोरात मधे जरा चांगल्या शाब्दिक कोटया असतात...त्यातही अतिशयोक्ती होते कधीतरी पण बरी आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी - मराठी\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/Before-the-onset-of-a-heart-attack-we-get-some-signals-from-the-body.html", "date_download": "2020-09-26T01:30:02Z", "digest": "sha1:O2DBJ3GWCLFXVRA2H5UPJNGVHPTY2LWP", "length": 8057, "nlines": 75, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "हार्ट अटैक येण्याच्या अगोदर आपल्याला शरीराकडून काही संकेत मिळतात", "raw_content": "\nहार्ट अटैक येण्याच्या अगोदर आपल्याला शरीराकडून काही संकेत मिळतात\nbyMahaupdate.in सोमवार, फेब्रुवारी १७, २०२०\nहार्ट अटैक बद्दलच्या बातम्या नेहमीच आपल्याला मिळत असतात. कधी न्यूज चैनलवर एखाद्या सिलेब्रेटी हार्ट अटैक आल्याने मृत्यू झाल्याची हि बातमी असते तर कधी आपला एखादा नातेवाईक किंवा मित्र असतो. त्यातही आता तरुण लोकांचाही हार्ट अटैकने मृत्यू होत असल्याने आपल्याला आश्चर्य वाटते.\nपण हा हार्ट अटैक येण्याच्या अगोदर आपले शरीर आपल्याला काही संकेत देत असतात. ज्यांना वेळीच ओळखले गेल्यास आपण सावधानी घेऊ शकतो. चला पाहू कोणते संकेत शरीर हार्ट अटैक येण्या अगोदर देतो. परंतु त्यापूर्वी आपण हार्ट अटैक येण्यासाठी कोणती कारणे कारणीभूत ठरतात ते पाहू.\nहार्ट अटैक येण्याची 5 मुख्य कारणे आहेत.\nफ्रुट्स आणि वेजिटेबल कमी खाणे\nहाई बीपी किंवा डायबीटीज\nपण लक्षात ठेवा हार्ट अटैक अचानक येत नाही. हार्ट अटैक येण्या अगोदर बॉडी काही संकेत देते. जर तुम्हाला या संकेतांची माहिती असेल तर तुम्ही वेळीच उपाय करू शकता. तुमच्या माहितीसाठी हार्ट अटैक येण्याच्या एक महिना अगोदर पासून बॉडी काही महत्वाचे संकेत देते. हार्ट अटैक येण्याच्या एक महिना अगोदर पासून तुम्हाला यांची जाणीव होण्यास सुरुवात होते पण अत्यंत कमी लोक यांच्याकडे लक्ष देतात.\nहार्ट अटैक येण्याच्या अगोदर हे संकेत मिळतात\nजर तुम्हाला असामान्य थकवा जाणवत असेल तर सावध राहा. हे हार्ट अटैक येण्याचा एक महत्वाचा लक्षण आहे. बहुतेक महिलांमध्ये हे लक्षण पाहण्यात येते. असामान्य थकवा म्हणजे अगदी लहान काम केल्याने देखील थकवा येणे जसे अंथरून व्यवस्थित केल्यावर किंवा अगदी अंघोळ केल्यावर देखील थकवा जाणवणे.\nतसे पाहता पोटदुखी हि एक सामान्य समस्या आहे पण जर तुम्हाला नेहमी पोटदुखी, सुजणे, पोट खराब होणे इत्यादी समस्या होत असेल तर त्यास हलक्या मध्ये घेऊ नका. हे लक्षण महिला आणि पुरुष दोघांमध्ये सारख्याच प्रमाणत दिसून येते.\nश्वासात कमी मुळे हार्ट अटैक होऊ शकतो. जर तुम्हाला दीर्घकाळा पासून असे वाटत आहे कि तुम्हाला आवश्यक प्रमाणात हवा मिळत नाही आहे, चक्कर येते आणि श्वास घेताना त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांच्या सोबत चर्चा करा.\nअनिद्रा देखील हृदयरोगाचा झटका येण्याची शक्यता वाढवतो. हे लक्षण महिलांमध्ये जास्त पाहण्यात येते.\nकेस गळणे हृद्य रोगाची मोठी जोखीम मानली जाते. साधारणपणे हे लक्षण 50 टक्के पेक्षा जास्त पुरुषात दिसतात पण काही महिलांमध्ये देखील पाहण्यात येतात.\nछाती मध्ये वेदना फक्त हार्ट अटैक आल्यावरच होतात असे नाही. वेगवेगळ्या तीव्रतेने आणि रूपाने छाती दुखते. पण हे लक्षण जर पुरुषा मध्ये दिसले तर हे हार्ट अटैक सोबत संबंधित असू शकतात. फक्त 30 टक्के महिला या लक्षणामुळे प्रभावित होतात.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/If-you-have-a-problem-with-Mus-read-this.html", "date_download": "2020-09-26T02:59:49Z", "digest": "sha1:QNAKBWQGQKF36P3HALL2VPS6S3OQRZ3W", "length": 6158, "nlines": 70, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "मसची समस्या असेल तर 'हे' नक्की वाचा", "raw_content": "\nमसची समस्या असेल तर 'हे' नक्की वाचा\nbyMahaupdate.in मंगळवार, मार्च ०३, २०२०\nमस हे शरीराच्या कोणत्याही भागावर असेल तर चेह-याची सुंदरता कमी करते. मस होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पेपीलोमा व्हायरस असते.\nत्वचेवर पेपीलोमा वायरस आल्यावर लहान तीळ हे मोठे होते. याला आपण मस म्हणतो. जर तुम्हालासुध्दा मसची समस्या असेल तर तुम्ही हे पारंपारिक उपाय करुन पाहू शकता.\n1. बेकिंग सोडा आणि एरंडीचे तेल समान प्रमाणात मिसळून वापरल्याने मसची समस्या दूर होईल.\n2. वडाच्या पानांचा रस मस दूर करण्यासाठी खुप फायदेशीर असतो. याचा रस स्किनवर लावल्याने त्वचा सौम्य होते आणि मस आपोआप निघून जातात.\n3. बटाटे सोलून त्याचा तुकडा मसवर घासल्याने मस दूर होतात.\n4. कोंथिबीरला बारीक करुन त्याची पेस्ट बनवा आणि नियमित मसवर लावा. मस काही दिवसांनंतर निघून जाईल.\n5. ताजे अंजीर बारीक करुन हे थोड्या प्रमाणात मसवर लावा. 30 मिनिट तसेच लावून ठेवा. यानंतर कोमट पाण्याने धुवन घ्या. मस निघून जाईल.\n6. आंबट सफरचंदाचा ज्यूस काढा. हा ज्यूस दिवसातून कमीत-कमी तीन वेळा मसवर लावा. मस हळु-हळू निघून जाईल.\n7. चेहरा चांगल्या प्रकारे धुवून घ्या आणि कॉटन व्हिनेगरमध्ये भिजवून तिळ-मसवर लावा. 10 मिनिटांनंतर गरम पाण्याने चेहरा धुवून घ्या. काही दिवसातच मस गायब होतील.\n8. मस लवकर दूर करण्यासाठी तम्ही एलोवेरा जेलचा उपायोग करु शकता.\n9. कच्चा लसुन मसवर लावून त्यावर पट्टी बांधा, हे एक आठवडा तसेच राहू द्या. एका आठवड्यानंतर मस निघून जाईल.\n10. मसवर नियमित कांदा चोळल्यानेसुध्दा मस हळु-हळू दूर होते.\n11. एरंडीचे तेल नियमित मसवर लावा. असे केल्याने मस नरम पडतील आणि हळु-हळू दूर होतील.\n12. एरंडीच्या तेलाऐवजी तुम्ही कापूरच्या तेलाचा वापरसुध्दा करु शकता.\n13. एका कांद्याचा रस काढा. हा रस नियमित मसवर लावा. तुमची मसची समस्या दूर होईल.\n14. ताज्या मोसंबीचा रस मसवर लावा. असे दिवसातून 3-4 वेळा केल्याने मस दूर होईल.\n15. केळ्याची साल आतील बाजूने मसवर ठेवा आणि पट्टी बांधून घ्या. असे दिवसातून दोन वेळा करा. जोपर्यंत मस निघत नाही तोपर्यंत असेच करत राहा.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/tag/rtmnu-nagpur-jobs-2020/", "date_download": "2020-09-26T00:59:46Z", "digest": "sha1:JRUBBNGDWBM455NEXBCYUKYPODLNTQSM", "length": 3479, "nlines": 70, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nUT प्रशासन दमण आणि दीव येथे विविध पदांची भरती\nमुंबई उपनगर जिल्हा येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची भरती\nICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाची भरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, दिव अंतर्गत विविध पदांची भरती\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांच्या 171 जागांसाठी ऑनलाईन अर्ज…\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती\nRITES लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदांची भरती\nजेईई अॅडव्हान्स्ड: ९८ टक्के विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा केंद्र\nनॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरु\nनाशिक महानगरपालिका भरती पात्र आणि अपात्र यादी\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/passenger-capacity-of-thane-station-will-increase/articleshowprint/70076961.cms", "date_download": "2020-09-26T01:46:59Z", "digest": "sha1:VQCRWXXY6UZPJM3PHYT255HN5HB6WCWF", "length": 7034, "nlines": 11, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "ठाण्याची प्रवासी क्षमता वाढणार!", "raw_content": "\n- मध्य रेल्वेवर पहिल्यांदाच स्थानकांत प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी सरकते दरवाजे\n- प्रवाशांना उभे राहण्यासाठी पूर्व आणि पश्चिमेला मोकळ्या जागा उभारणार\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nरोजच्या जीवघेण्या गर्दीतून प्रवास करणाऱ्या तब्बल अडीच लाख प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने ठाणे स्थानकात प्रवाशांना उभे राहण्यासाठी दोन अतिरिक्त जागा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थानकात प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी सरकते दरवाजे (स्लायडिंग डोअर) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nस्थानकातील भिखारी, गुर्दुल्ले यांच्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी आणि प्रवासी सुरक्षेसाठी ठाणे स्थानकातील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर सरकते दरवाजे बसविण्यात येणार आहे. रात्री शेवटची लोकल गेल्यानंतर हे दरवाजे बंद करण्यात येतील. तसेच सकाळी पहिली लोकल सुरू होण्याआधी हे दरवाजे उघडण्यात येतील. गर्दी नियंत्रणासाठी देखील हे दरवाजे उपयोगी राहणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.\nसद्यस्थितीत एकूण चार ठिकाणी सरकते दरवाजे बसविण्याचे नियोजन आहे. तसेच रुळ ओलांडणीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रुळांशेजारी असलेल्या अनधिकृत प्रवेशद्वारावर भिंत उभारून ते कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहेत. रेल्वे मंडळाने प्रवासी सुरक्षेसाठी सर्व झोनल रेल्वेला उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात सर्व प्रथम ही योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.\nठाणे स्थानकात एकूण सहा पूल आहेत. यापैकी ठाणे पूर्वेकडील \\Bमध्य\\B पुलाच्या उतरणीजवळील तिकीट आरक्षण कार्यालयाजवळ प्रवाशांना उभे राहण्यासाठी मोकळी जागा (होल्डिंग एरिया) निर्माण करण्यात येईल. या जागेतून स्थानकात प्रवेश आणि स्थानकाबाहेर पडण्यासाठी दोन मार्ग राहणार आहेत. पश्चिमेकडील स्टेशनमास्तरच्या कार्यालयाच्या बाजूला प्रवाशांना उभे राहण्यासाठी मोकळी जागा उभारण्यात येणार आहे. ठाणे स्थानकातील प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.\nमध्य रेल्वेवरील सर्वाधिक प्रवासी वर्दळीचे स्थानक, अशी ओळख ठाणे स्थानकाची आहे. गेल्या काही दिवसांत पावसामुळे ठाणे स्थानकात जीवघेणी गर्दी उसळली होती. यामुळे ठाणे स्थानकाची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष नियोजन केले आहे. या नियोजनात रेल्वे सुरक्षा बलाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. या नियोजनाला रेल्वे पोलिसांनी देखील सहमती दर्शवली आहे.\nमध्य रेल्वेवरील ठाणे हे महत्त्वाचे जंक्शन आहे. यामुळे लोकलसह मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांची वाहतूक स्थानकातून मोठ्या प्रमाणात होते. सन २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये ठाणे स्थानकातील सरासरी प्रवासी संख्येत ६.३५ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. सद्यस्थिती ठाणे स्थानकातून सुमारे दोन लाख ८७ हजार ७९७ प्रवासी रोज प्रवास करतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/t5991/", "date_download": "2020-09-26T02:17:03Z", "digest": "sha1:CRSFY5KVKHEY2Y7FECUGVOHNRUNVMJPS", "length": 5203, "nlines": 115, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-मी अण्णा हजारे", "raw_content": "\nमला कविता शिकयाचीय ...\nआण्णांच उपोषण चालू आहे आणि त्याच्या समर्थनार्थ प्रत्येक जण काहीना काही करतोय. पण तरी खरच हे समर्थन आहे का\nकोणाच्या हि भावना न दुखवता मला वाटले ते टीकात्मक पद्धतीनी लिहितोय.\nकृपया कोणीही ह्याचा अर्थ मला अण्णांन बद्दल आदर नाही असा करू नये.\nकलियुगी पहा चमत्कार झाला\nमाणसा माणसातला भेद संपला\nघालून टोपी प्रत्येक ओरडला\nमी अण्णा, मी अण्णा.\nवेशात जरी तयांच्या विविधता\nडोक्यावरी मात्र मुकुट सारखा\nत्यावरी लिहिला एकची नारा\nमी अण्णा, मी अण्णा.\nकरा चहा, नाश्ता, जेवण चोपून\nटीव्ही वरी बघा अनशन सतत\nम्हणा पडून बेडवर, होऊन सुस्त\nमी अण्णा, मी अण्णा.\nलावती नारा तेच स्वछ\nसामील न होती ते भ्रष्ट\nम्हणून ओरडा जोर करून\nमी अण्णा, मी अण्णा.\nसंसदे वरी लोकपाल बसवा\nपंत प्रधानाही ठरवा चोरटा\nसर्व श्रेष्ठ आता कोण, म्हणा\nमी अण्णा, मी अण्णा.\nदहा दिवसांत किती खचला\nमरो तिथे ते, तुम्ही ओरडा\nमी अण्णा, मी अण्णा.\nनकाच सोडू उपोषण आता\nव्हाल जरी शहीद अण्णा\nआहोत इथे आम्ही ओरडण्या\nमी अण्णा, मी अण्णा.\nअजून न नमले सरकार जरा\nमरता अण्णा बसवणार कोणा\nवाचवण्या म्हणून त्यांना ओरडा\nमी अण्णा, मी अण्णा.\nनमले न सरकार, करा चर्चा\nकारण न दुसरा कोणी बसवण्या\nआम्ही फक्त करणारे ओरडा\nमी अण्णा, मी अण्णा.\nकरा चर्चा, काढा तोडगा\nअसा उपोषणी न गमवा\nजाता अण्णा कसे ओरडू\nमी अण्णा, मी अण्णा.\nसंपले उपोषण, संपली मजा\nलोकपाल झाला इतिहास जमा\nमजा मात्र ओरडण्यात आला\nमी अण्णा, मी अण्णा.\nRe: मी अण्णा हजारे\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mpcnews.in/wakad-five-in-laws-charged-in-marital-harassment-case-174362/", "date_download": "2020-09-26T02:45:31Z", "digest": "sha1:E4HLFZ2L5XJDVC5ON46NKXEUZJIDKX6F", "length": 6108, "nlines": 75, "source_domain": "mpcnews.in", "title": "Wakad : विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल", "raw_content": "\nWakad : विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल\nWakad : विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल\nहा प्रकार 22 फेब्रुवारी 2016 पासून 13 जानेवारी 2019 या कालावधीत सनशाईन नगर, काळेवाडी येथे घडला. : Five in-laws charged in marital harassment case\nएमपीसी न्यूज – माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याबाबत सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 22 फेब्रुवारी 2016 पासून 13 जानेवारी 2019 या कालावधीत सनशाईन नगर, काळेवाडी येथे घडला.\nयाप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. पती अजय शंकरराव रापतवार (वय 35), सासरे शंकरराव किशनराव रापतवार, सासू अरुणा शंकरराव रापतवार, अक्षदा शंकरराव रापतवार, अभय शंकरराव रापतवार (सर्व रा. सनशाईन नगर, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून काहीही कारण नसताना विवाहितेसोबत वारंवार भांडण केले. तसेच माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली.\nयावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला.\nयाबाबत विवाहितेने नांदेड जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 9 जुलै 2020 रोजी पती, सासू, सासरे, नणंद आणि दीर यांच्या विरोधात फिर्याद दिली.\nशिवाजीनगर पोलीस ठाण्यातून गुरुवारी (दि. 13) वाकड पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला.\nवाकड पोलीस तपास करीत आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune News : धनगर समाजाला एसटी आरक्षण देऊनच सरकारने मेगा भरती करावी\nChinchwad : चिखली, हिंजवडीमधून कार, बुलेट आणि मोपेडची चोरी\nIPL 2020 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्ली कॅपिटल्सची चेन्नईवर 44 धावांनी मात\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 7 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची नोंद\nPune News : टाटा मोटर्सने बनविलेल्या 51 विंगर रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nPimpri news: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 9 ऑक्टोबरला निवडणूक\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 164 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 87 नवीन रुग्ण\nPune News : लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदी रद्द करा ; भारतीय मजदूर संघांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/sujat-ambedkar-attacks-sharad-pawar-shiv-sena-bjp-rss-116925.html", "date_download": "2020-09-26T02:46:43Z", "digest": "sha1:4WZUPW2GWEGGGKID35S2MEPQJSOKXYFN", "length": 21562, "nlines": 216, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "त्या दिवशी जाणते राजे घरी पळून गेले, सुजात आंबेडकरांची शरद पवारांवर घणाघाती टीका | Sujat Ambedkar attacks Sharad Pawar", "raw_content": "\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nNagpur Corona | महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी\nत्या दिवशी जाणते राजे घरी पळून गेले, सुजात आंबेडकरांची शरद पवारांवर घणाघाती टीका\nत्या दिवशी जाणते राजे घरी पळून गेले, सुजात आंबेडकरांची शरद पवारांवर घणाघाती टीका\nवंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar on Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली.\nदत्ता कनवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद\nऔरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar on Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. वंचित आघाडीचा युवा संवाद मेळावा औरंगाबादमध्ये झाला, या मेळाव्यात सुजात आंबेडकर यांनी विविध मुद्द्याला स्पर्श केला.\nसुजात आंबेडकर म्हणाले, “संसदेत गदारोळ सुरु आहे, UAPA कायदा आणला. अनेक दलितविरोधी कायदे आणले, त्यावेळी जाणते राजे गप्प का होते उलट ज्या दिवशी हे कायदे संसदेत आले होते, त्या दिवशी हे जाणते राजे घरी पळून गेले होते. जाणत्या राजाला ईडीची नोटीस आली, मला वाटलं हे राज्यभर बंद पाळतील, पण यांनी फक्त बारामतीत बंद पळाला”\nवाचा : UAPA Bill : राज्यसभेत मंजूर झालेल्या UAPA विधेयकाची इतकी धास्ती का\nदेशातील दुर्घटनांना मोदी जबाबदार\n“देशातल्या सगळ्या दुर्घटनांना फक्त नरेंद्र मोदी कारणीभूत आहेत. ज्या राष्ट्रीय बँका बंद पडत आहेत त्याला नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. या सरकारच्या कार्यकाळात इतकी कर्ज बुडवली गेली आहेत की लोकांना आता स्वतःचे पैसे फक्त महिन्याकाठी हजार रुपये देत आहेत. खुल्या दिवसातली ही लूटमार आहे”, असा हल्लाबोल सुजात आंबेडकर यांनी केला.\nपाकिस्तानचा जीडीपी भारतापेक्षा जास्त\nभारताचा जीडीपी फक्त पाच टक्क्यांवर आहे. आज बांगलादेश, पाकिस्तानचा जीडीपी भारतापेक्षा जास्त आहे. इतकं या सरकारने आपल्याला डुबवलं आहे, असं सुजात आंबेडकर म्हणाले.\nसंघाने काय त्याग केला\nस्वातंत्र्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने देशासाठी केलेले त्याग सांगावा, मग देशाला त्याग शिकवा. देशात आलेल्या आर्थिक मंदिवरुन हे सरकार आपली दिशाभूल करत आहे, असं सुजातने नमूद केलं.\nमहाजनादेश यात्रा निघाली, गाव गल्ली शहरात गेली. काश्मीर, पुलवामा हल्ल्यावर बोलले, पण इथले पाणी, रस्ते, आणि पुलांवर बोलत नाहीत. ज्या पाकिस्तानला हे लोक शिव्या घालतात, त्याच पाकिस्तानकडून आपल्याला कांदा विकत घ्यावा लागतो, इतकी वाईट वेळ या लोकांनी आपल्यावर आणली आहे. हे सरकार दौरे, यात्रा काढतात, पण इथल्या मूलभूत प्रश्नावर बोलत नाहीत. हे फक्त धार्मिक आणि भारताबाहेरचे मुद्दे काढत आहेत. महाराष्ट्राचे लोक त्रस्त आहेत, वैतागले आहेत, असं सुजात आंबेडकर म्हणाले.\nनरेंद्र मोदी यांनी आपली लोकशाही धोक्यात टाकली आहे. जो कोणी आपलं मत मांडत आहेत, त्यांना दाबलं जात आहे. गौरी लंकेश यांचा खून करण्यात आला. आरएसएस- भाजपने त्यांना मारून टाकलं. तेच कलबुर्गी, पानसरे आणि दाभोळकर यांच्यासोबत घडलं आहे, असं सुजात आंबेडकरांनी नमूद केलं.\nभाजपला फक्त वंचित हरवेल\nआपण काय खायचं, काय बोलायचे, काय कपडे घालायचे, कुणाला मत द्यायचं, हे सर्व हे लोक ठरवायला लागतील आणि मग आपण देशाचे नागरिक आहोत की नाही हे अमित शहा ठरवतील. पुन्हा आपण या देशात राहायचे की नाही हे मोहन भागवत ठरवतील. हे सरकार अनेक लोकांना ईडी सीबी च्या नोटीस लावत आहे अशा परिस्थितीत भाजपाला फक्त एकच पक्ष हरवू शकतो तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी, असा विश्वास सुजात आंबेडकरने व्यक्त केला.\nमोहन भागवतांना जेलमध्ये टाकू\nत्यासाठीच बाळासाहेब सांगतात, की या RSS ला येणाऱ्या पैशांवर टॅक्स लावू आणि ते वापरत असलेल्या शस्त्रांची चौकशी करु. मोहन भागवत यांना मोक्का लावून जेलमध्ये टाकू, हे बाळासाहेब सांगत असतात, असं सुजात आंबेडकरांनी नमूद केलं.\nपुरात ईव्हीएम ट्रान्सपोर्टसाठी वाहने\nजेव्हा राज्यात पूर होता, तेव्हा भाजपचे लोक आपली वाहने पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी न वापरता ईव्हीएम ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरत होते, असा आरोप सुजातने केला.\nया सरकारच्या काळात दलित आणि अल्पसंख्याक समाजावर अत्याचार वाढले आहेत. भाजपने विद्यार्थ्यांवर क्रूर हल्ला केला आहे. गुंडाची टोळी असलेल्या एबीव्हीपीने वेगवेगळ्या विद्यापीठात विद्यार्थ्यांवर हल्ले केले आहेत, असं सुजातने सांगितलं.\nशिवसेना वाले म्हणतात अयोध्येत जाऊन मंदिर बनवू. अरे बाबा तुम्ही औरंगबादचा कचरा साफ केला नाही, तुम्ही काय घं XX मंदिर बांधणार असा सवाल करत सुजात आंबेडकर यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली.\nUAPA Bill : राज्यसभेत मंजूर झालेल्या UAPA विधेयकाची इतकी धास्ती का\n… म्हणून मी विधानसभा निवडणूक लढणार नाही: सुजात आंबेडकर\nआदित्य ठाकरे विरुद्ध सुजात आंबेडकर, वरळीतील व्हॉट्सअप ग्रुपवर एकच चर्चा\nBihar Election | प्रकाश आंबेडकरांनी रणनीती बदलली; आता 'स्वबळा'ऐवजी 'आघाडी'चं…\nलोकसभेत समर्थन, राज्यसभेत विरोध; शिवसेनेच्या 'गोंधळा'वर निलेश राणेंचा निशाणा\nदेशाला रुग्णालयाची गरज, इंदूमिलचं पुन्हा आमंत्रण आलं तरी जाणार नाही,…\nक्रांती होऊन लोक नेत्यांना मारुन टाकतील, मराठा समाज नेत्यांना बेड,…\nइंदूमिलमधील पायाभरणी सोहळा अचानक रद्द, पुण्याहून वाशीपर्यंत पोहोचलेल्या अजितदादांचा यू…\nIndu Mill | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणी अचानक स्थगित\nएल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत : अ‍ॅड.…\nविठ्ठल मंदिर प्रवेश प्रकरणी प्रकाश आंबेडकरांसह 1200 जणांवर गुन्हे दाखल\nMI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा…\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nSanju Samson : परफेक्ट टाईम, धडाकेबाज बॅटिंग, संजू सॅमसनचा झंझावात\nIPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज,…\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रोहित…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nसुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nNagpur Corona | महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nNagpur Corona | महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/videos/rajnath-singh-worship-rafale-fighter-plane-in-paris", "date_download": "2020-09-26T02:30:53Z", "digest": "sha1:GMECAAAJJURDSZMAB3BKWX2VB5UDNDXE", "length": 8297, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "VIDEO: पॅरिसमध्ये राजनाथ सिंहांच्या हस्ते राफेलची पूजा | Rajnath Singh worship Rafale fighter plane in Paris", "raw_content": "\nमुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nVIDEO: पॅरिसमध्ये राजनाथ सिंहांच्या हस्ते राफेलची पूजा\nVIDEO: पॅरिसमध्ये राजनाथ सिंहांच्या हस्ते राफेलची पूजा\nमुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nमुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esuper9.com/2020/03/JantacurfewMarch22-ncp-rohit-pawar-bjp.html", "date_download": "2020-09-26T01:51:40Z", "digest": "sha1:AFJPNLWMTGTULH24JINI3NOEBHPSUKFZ", "length": 12617, "nlines": 103, "source_domain": "www.esuper9.com", "title": "JantacurfewMarch22 | “तुमचं राजकारण होम क्वारंटाईन करा” - रोहित पवार - esuper9", "raw_content": "\nHome > राजकारण > JantacurfewMarch22 | “तुमचं राजकारण होम क्वारंटाईन करा” - रोहित पवार\nJantacurfewMarch22 | “तुमचं राजकारण होम क्वारंटाईन करा” - रोहित पवार\nJantacurfewMarch22 | “तुमचं राजकारण होम क्वारंटाईन करा” - रोहित पवार\nसध्या महाराष्ट्रासमोर करोनाचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान आहे. यासाठी राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येऊन काम करण्याचं आवाहनदेखील केलं आहे. मात्र भाजपा नेते निरंजन डावखरे यांनी उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करताना महाराष्ट्राला सध्या देवेंद्र फडणवीसांची गरज आहे असं म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी समाचार घेत खडे बोल सुनावले आहेत. संकटाच्या काळात तरी तुमचं राजकारण ‘होम क्वारंटाईन’ करा असा सल्ला चरोहित पवारांनी दिला आहे.\nनिरंजन डावखरे यांनी काय म्हटलं \nनिरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. सध्या राज्यात करोनाने थैमान घातलं असताना निरंजन डावखरे यांनी महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर देवेंद्र फडणवीसांची गरज आहे असं म्हटलं होतं. ट्विट करत त्यांनी लिहिलं होतं की, “सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे”.\nरोहित पवारांचं उत्तर –\nनिरंजन डावखरे यांच्या टीकेचा रोहित पवारांनी समाचार घेत खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी म्हटलं की, “राजकारण आम्हालाही करता येतं, पण आज ती वेळ नाहीय. संकटाच्या काळात तरी तुमचं राजकारण ‘होम क्वारंटाईन’ करा. तुमचा एवढा ‘अभ्यास’ व अनुभव असेल तर मदत करायला तुम्हाला अडवलं कुणी\nरम्यान राज्यात आणखी तीन नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून असून रुग्णांचा आकडा ५२ वर पोहोचला आहे. पुणे, मुंबई आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एकाला करोनाचा संसर्ग झाला असल्याचं निष्पन्न झालं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2020-09-26T03:26:03Z", "digest": "sha1:D775XQDUBEP3WKTOXBRGDIAL2TPZKNGQ", "length": 4060, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एल्बाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख एल्बा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमार्च १ ‎ (← दुवे | संपादन)\nमे ४ ‎ (← दुवे | संपादन)\nमे ३० ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/मार्च ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८१५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८१४ ‎ (← दुवे | संपादन)\nनेपोलियन बोनापार्ट ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/मार्च १ ‎ (← दुवे | संपादन)\nएप्रिल ६ ‎ (← दुवे | संपादन)\nवॉटर्लूची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:इतिहास/दिनविशेष/मार्च ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:इतिहास/दिनविशेष/मार्च/१ ‎ (← दुवे | संपादन)\nबास्तिया ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/bmc-eligible-hawkers-mumbai/", "date_download": "2020-09-26T03:18:37Z", "digest": "sha1:7VXC5J3PKTJZ32PLWG6B2JSLVUM6BW3L", "length": 17749, "nlines": 166, "source_domain": "www.saamana.com", "title": "फेबुवारीअखेरपर्यंत पंधरा हजार फेरीवाल्यांना जागा द्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nफेबुवारीअखेरपर्यंत पंधरा हजार फेरीवाल्यांना जागा द्या\nमुंबईत फेरीवाल्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या 85 हजार जागांपैकी आतापर्यंत पात्र ठरलेल्या 15 हजार फेरीवाल्यांना फेब्रुवारीअखेरपर्यंत जागा वितरित कराव्यात असे निर्देश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी संबंधित पालिका अधिकाऱयांना दिले आहेत. अन्यथा संबंधित अधिकाऱयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.\nपालिकेने 2014 मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये सवा लाख अर्ज वितरित करण्यात आले होते. यात 99,435 फेरीवाल्यांनी पालिकेकडे जागेसाठी अर्ज भरले होते. या फेरीवाल्यांकडून प्रशासनाने अधिवासाच्या प्रमाणपत्रासह कागदपत्रे मागवली होती. यामध्ये पालिकेकडे अर्ज केलेल्यांपैकी आतापर्यंत सर्वेक्षणात केवळ 15 हजार 120 फेरीवाले पात्र ठरले आहेत. मात्र पालिकेने फेरीवाल्यांसाठी एपूण 85 हजार जागा निश्चित केल्या आहेत. त्यामुळे पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांना जागा वितरित करा, असे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत.\nफेरीवाला क्षेत्र असणारे एकूण रस्ते -1366\nफेरीवाल्यांच्या एपूण जागा – 85,891\nदाखल झालेले एपूण अर्ज – 99,435\nपात्र फेरीवाले – 15,120\nफेरीवाला पात्रतेसाठी पालिकेने घातलेल्या अटींमुळे 51,785 फेरीवाल्यांनीच आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. या अटींमध्ये परवाने देण्यासाठी फेरीवाल्याचे वय 14 पेक्षा जास्त असावे, 1 मे 2014 पूर्वीपासून फेरीवाल्याचा व्यवसाय असावा, संबंधित व्यक्ती हिंदुस्थानचा नागरिक असावा आणि त्याच्याकडे महाराष्ट्रातील अधिवासाचा दाखला असावा अशा अटी घालण्यात आल्या होत्या.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम खान यांची नावे चर्चेत\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे यांचे आदेश\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम...\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nया बातम्या अवश्य वाचा\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2013/03/blog-post.html", "date_download": "2020-09-26T02:06:18Z", "digest": "sha1:OSGNXZUL3WVB6M5AJKW7LOGXCW4PRJJ7", "length": 27417, "nlines": 157, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: लोकसहभाग आणि मोहल्ला कमिट्या", "raw_content": "\nलोकसहभाग आणि मोहल्ला कमिट्या\nलोकशाहीत शासन व्यवस्थेतला, गव्हर्नन्स मधला, लोकांचा सहभाग वाढला पाहिजे याबाबत कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. पण हा सहभाग वाढवावा कसा यासाठी काही व्यासपीठे आहेत काय यासाठी काही व्यासपीठे आहेत काय आम्हाला सहभागी व्हायचे आहे पण कसे सहभागी होऊ असे विचारणाऱ्या नागरिकांना द्यायला काही उत्तर आहे काय\n उत्तर आहे- मोहल्ला कमिटी\nपुणे महापालिकेची १५ क्षेत्रीय कार्यालये (ward offices) आहेत. नागरिकांची सामान्य कामे त्यांच्या त्यांच्या भागातच व्हावीत, त्यांना महापालिकेच्या मुख्य बिल्डींगपर्यंत यायचे कष्ट पडू नयेत आणि विकेंद्रित पद्धतीने शासनव्यवस्था उभी राहावी यासाठी या क्षेत्रीय कार्यालयांची उभारणी झाली आहे. कोथरूड, वारजे-कर्वेनगर, घोले रोड, कसबा, भवानी पेठ, सहकारनगर, बिबवेवाडी, धनकवडी, कोंढवा, हडपसर, येरवडा, ढोले पाटील रोड, औंध, टिळक रोड आणि नगर रोड अशी ही क्षेत्रीय कार्यालये पुण्यात आहेत.\nपुण्यातील नैशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज (NSCC) या अतिशय जुन्या, जाणत्या आणि प्रभावी सामाजिक संस्थेच्या मागणीवरून दि. २६ ऑक्टोबर २००५ रोजी पुणे महापालिका आयुक्तांनी एक आदेश काढला आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मोहल्ला कमिटीच्या बैठका सुरु करण्याचे त्यात नमूद केले. नागरिकांच्या दृष्टीने ही फारच मोठी गोष्ट होती. मोहल्ला कमिटीच्या बैठका म्हणजे काय तर नागरिकांनी एकत्र यावे त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करावी आणि समस्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांपुढे मांडाव्यात. यातून सरकार-नागरिक असा सुसंवाद वाढेल. नागरिकांच्या समस्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना समजतील आणि एकूणच सुशासनाच्या दिशेने वाटचाल होईल या आशेवर सुरु केलेल्या बैठका. या बैठकांना कोणताही नागरिक उपस्थित राहू शकतो. तसेच क्षेत्रीय अधिकारी आणि त्याच्या हाताखालचे कर्मचारी या बैठकांना उपस्थित असतात. गेल्या ७-८ वर्षात नागरिकांनी अशा प्रकारे या उपक्रमात सहभागी होत कित्येक समस्यांचे निराकरण करून घेतलेही आहे. या बाबतच्या चिकाटीचे आणि हा उपक्रम जिवंत ठेवण्याचे सर्व श्रेय हे NSCC च्या सदस्यांना जाते आणि त्यांचे करावे तितके कौतुक थोडेच. ज्या सातत्यपूर्ण पद्धतीने हे झाले ते निश्चितच कौतुकास्पद होते.\nपण तरीही दिवसेंदिवस शहराची परिस्थिती का बिघडते आहे लोकसहभाग वाढण्याच्या ऐवजी कमी कमी का होत चालला आहे लोकसहभाग वाढण्याच्या ऐवजी कमी कमी का होत चालला आहे माझ्या दृष्टीला दिसणारी मूलभूत कारणे दोन. त्यातल्या पहिल्या आणि महत्वाच्या कारणाचा समाचार घेऊया.\nया मोहल्ला समितीच्या बैठका गुरुवारी घेण्यात येतात.(तसे आयुक्ताच्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.) म्हणजेच बहुसंख्य नोकरदार वर्गाचा कामाचा दिवस. साहजिकच इच्छा असूनही त्यांना सहभागी होता येत नाही. लोकांना सुट्टी कधी असते असा विचार करता पिंपरी चिंचवडचा औद्योगिक भाग वगळता, बहुसंख्य लोकांना शनिवार-रविवार सुट्टी असते असेच आपल्या लक्षात येईल. खरे तर या बैठका रविवारीच व्हाव्यात. कारण शनिवारपेक्षाही रविवारी सुट्टी असणाऱ्यांची संख्या अधिक. पण सरकारी कामे रविवारी कशी होणार तेव्हा तडजोड म्हणून शनिवारी व्हाव्यात तेव्हा तडजोड म्हणून शनिवारी व्हाव्यात म्हणजे अनेक विद्यार्थी, नवमध्यमवर्गातील अनेक लोकांना येणे शक्य होईल. शनिवारी मोहल्ला कमिटीच्या बैठका ठेवल्या तरी लगेच लोकांचा त्याला भरपूर प्रतिसाद मिळू लागेल आणि परिवर्तन होईल असा माझा दावा नाही. किंबहुना असे कोणाला वाटत असेल तर त्याच्या अकलेची तारीफच करायला हवी. पण निदान लोकसहभागाचे दरवाजे अधिकाधिक उघडण्याकडे आपला कल असला पाहिजे. गुरुवारी बैठका घेऊन दरवाजे बंद करून काय साध्य होणार म्हणजे अनेक विद्यार्थी, नवमध्यमवर्गातील अनेक लोकांना येणे शक्य होईल. शनिवारी मोहल्ला कमिटीच्या बैठका ठेवल्या तरी लगेच लोकांचा त्याला भरपूर प्रतिसाद मिळू लागेल आणि परिवर्तन होईल असा माझा दावा नाही. किंबहुना असे कोणाला वाटत असेल तर त्याच्या अकलेची तारीफच करायला हवी. पण निदान लोकसहभागाचे दरवाजे अधिकाधिक उघडण्याकडे आपला कल असला पाहिजे. गुरुवारी बैठका घेऊन दरवाजे बंद करून काय साध्य होणार अशाने मोहल्ला कमिट्या या निव्वळ फार्स बनतील. मोहल्ला कमिटीच्या बैठका अधिकाधिक खुल्या आणि सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न व्हायला नको काय अशाने मोहल्ला कमिट्या या निव्वळ फार्स बनतील. मोहल्ला कमिटीच्या बैठका अधिकाधिक खुल्या आणि सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न व्हायला नको काय सध्या या बैठकांना सरासरी १० ते १२ नागरिक हजार असतात. उपस्थित नागरिकांचे सरासरी वय ५५-६० असे असते. जगातील सर्वात तरुण देश असे आपल्या देशाला म्हणले जात असताना त्यांच्या सोयीचा विचार या बैठकांचा दिवस ठरवताना होऊ नये हे शुद्ध बिनडोकपणाचे लक्षण आहे. सुरुवात गुरुवारी झाली म्हणून ते बदलू नये हे म्हणणे म्हणजे पहिले सरकार कॉंग्रेसचे होते तर आताही कॉंग्रेसच सत्तेवर असावे असे म्हणण्यासारखे आहे. निःपक्षपाती निवडणुका होऊन ज्याचे सरकार यायचे ते येवो. मुद्दा हा की सुरुवात काही झाली तरी आता ती पद्धत बदलू नये या बोलण्याला कुठलाही तर्कसंगत आधार नाही.\nनैशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज (NSCC) या संस्थेची बैठक शनिवारी महापालिका भवनात असते (एका सामाजिक संस्थेची बैठक महापालिका भवनात होणे कायदेशीर आहे काय याबाबत मला शंका आहे. पण सध्या ते जाऊ द्या) आणि म्हणून क्षेत्रीय कार्यालयात होणाऱ्या बैठका शनिवारी घेण्यात येऊ नयेत अशी भूमिका २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या प्रत्यक्ष भेटीत त्यांनी मांडली आहे. मात्र ही भूमिका स्वीकारार्ह नाही. कारण क्षेत्रीय कार्यालयातील बैठका या कोणा एका संस्थेसाठी नसून नागरिकांसाठी खुल्या आहेत. त्याची सुरुवात या संस्थेने केली आहे याबद्दल आदरच आहे. पण सुरुवात केली त्यांनी म्हणून नागरिकांसाठी असलेला उपक्रम त्यांच्या सोयीने व्हावा हे हास्यास्पद आहे. तसेच त्यांचे असेही म्हणणे आहे की “नागरिकांच्या कमिट्या वेगळ्या आणि क्षेत्रीय कार्यालयात होणाऱ्या बैठका वेगळ्या. तुम्ही नागरिकांना एकत्र करून नागरिकांची कमिटी तयार करा आणि त्यात होणाऱ्या गोष्टी जे लोक गुरुवारी क्षेत्रीय कार्यालयातल्या बैठकांना जातात त्यांच्याकडे द्या. तुम्ही सर्वांनीच तिकडे जाण्याची काय गरज.” पण त्यांचे हे म्हणणेही मान्य करता येत नाही कारण जर हा उपक्रम नागरिकांसाठी खुला असेल त्यांनी परत स्वतंत्रपणे स्वतःला सोयीच्या वेळी एक कमिटी स्थापन करून नंतर गुरुवारी जाणाऱ्या मंडळींबरोबर समन्वय साधायचा, त्यांना आपला मुद्दा पटवून द्यायचा, त्यांनी तो मुद्दा गुरुवारी मांडला का याकडे लक्ष द्यायचे) आणि म्हणून क्षेत्रीय कार्यालयात होणाऱ्या बैठका शनिवारी घेण्यात येऊ नयेत अशी भूमिका २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या प्रत्यक्ष भेटीत त्यांनी मांडली आहे. मात्र ही भूमिका स्वीकारार्ह नाही. कारण क्षेत्रीय कार्यालयातील बैठका या कोणा एका संस्थेसाठी नसून नागरिकांसाठी खुल्या आहेत. त्याची सुरुवात या संस्थेने केली आहे याबद्दल आदरच आहे. पण सुरुवात केली त्यांनी म्हणून नागरिकांसाठी असलेला उपक्रम त्यांच्या सोयीने व्हावा हे हास्यास्पद आहे. तसेच त्यांचे असेही म्हणणे आहे की “नागरिकांच्या कमिट्या वेगळ्या आणि क्षेत्रीय कार्यालयात होणाऱ्या बैठका वेगळ्या. तुम्ही नागरिकांना एकत्र करून नागरिकांची कमिटी तयार करा आणि त्यात होणाऱ्या गोष्टी जे लोक गुरुवारी क्षेत्रीय कार्यालयातल्या बैठकांना जातात त्यांच्याकडे द्या. तुम्ही सर्वांनीच तिकडे जाण्याची काय गरज.” पण त्यांचे हे म्हणणेही मान्य करता येत नाही कारण जर हा उपक्रम नागरिकांसाठी खुला असेल त्यांनी परत स्वतंत्रपणे स्वतःला सोयीच्या वेळी एक कमिटी स्थापन करून नंतर गुरुवारी जाणाऱ्या मंडळींबरोबर समन्वय साधायचा, त्यांना आपला मुद्दा पटवून द्यायचा, त्यांनी तो मुद्दा गुरुवारी मांडला का याकडे लक्ष द्यायचे या सगळ्या गोष्टी जर नवख्या नागरिकाला सांगायच्या ठरवल्या तर तो वैतागून जाणार आणि परत कधीही इकडे फिरकणार नाही. अधिकाधिक नागरिकांना आपल्याला सहभागी करून घ्यायचे असल्यास त्यांची सोय बघावी हे कोणताही मार्केटिंगमधला माणूस सांगेल. गोष्टी सोप्या करा, लोक तुमच्याकडे येतील. लोकांनी सुट्टी काढून, स्वतःची अडचण करून, काय वाट्टेल झाले तरी जमवून यावे ही पारंपारिक पुणेरी मानसिकता सोडली पाहिजे. (पुणेरी अशासाठी की, ‘आम्ही आमच्या पद्धतीने वेळ ठेवणार दुकानाची. गिऱ्हाईकाला यावे वाटले तर तो येईल’ अशी पुण्यातल्या दुकानदारांची खास पद्धत आपल्या ओळखीची आहेच या सगळ्या गोष्टी जर नवख्या नागरिकाला सांगायच्या ठरवल्या तर तो वैतागून जाणार आणि परत कधीही इकडे फिरकणार नाही. अधिकाधिक नागरिकांना आपल्याला सहभागी करून घ्यायचे असल्यास त्यांची सोय बघावी हे कोणताही मार्केटिंगमधला माणूस सांगेल. गोष्टी सोप्या करा, लोक तुमच्याकडे येतील. लोकांनी सुट्टी काढून, स्वतःची अडचण करून, काय वाट्टेल झाले तरी जमवून यावे ही पारंपारिक पुणेरी मानसिकता सोडली पाहिजे. (पुणेरी अशासाठी की, ‘आम्ही आमच्या पद्धतीने वेळ ठेवणार दुकानाची. गिऱ्हाईकाला यावे वाटले तर तो येईल’ अशी पुण्यातल्या दुकानदारांची खास पद्धत आपल्या ओळखीची आहेच\nशिवाय गुरुवारच्या बैठकीला जे औपचारिक रूप आहे ते नागरिकांना एकत्र आणून नुसत्या तयार केलेल्या समित्यांना कसे काय येऊ शकेल अधिकृत आदेशाद्वारे सुरु झालेल्या या क्षेत्रीय कार्यालयातील बैठकांना काहीएक महत्व आहे. आणि म्हणूनच बहुसंख्य नागरिकांना सोयीचा पडेल असेल असाच दिवस अधिकृत अशा क्षेत्रीय कार्यालयातील बैठकांसाठी निवडणे योग्य होईल. अन्यथा नागरिकांऐवजी एका संस्थेला झुकते माप देण्याचा प्रकार घडतो आहे असे आपल्याला खेदाने म्हणावे लागेल. ज्याला व्यक्तीशः माझा प्रखर विरोध असेल.\nसध्याच्या मोहल्ला कमिट्या आवश्यकतेपेक्षा कमी प्रभावी असण्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे मोहल्ला कमिट्यांना आलेले तक्रार निवारण केंद्राचे स्वरूप. नागरिक त्यांच्या भागातल्या रस्ता नीट नाही, रस्त्यावरचे दिवे नाहीत, फुटपाथ वाईट आहे, कचरा उचलला जात नाही अशा विविध समस्या बैठकांत मांडतात. त्या समस्या क्षेत्रीय अधिकारी तत्परतेने लिहून घेतो. हाताखालच्या अधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक ती कार्यवाही करायचे आदेश देतो. याशिवाय मागच्या महिन्याच्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीत काय झाले, त्यावेळी आलेल्या तक्रारींवर प्रशासनाने काय कार्यवाही केली याचेही तपशील उपस्थितांना दिले जातात.\nपण मुद्दा असा आहे की, महापालिकेची एखादी सेवा नीट मिळत नसेल (उदा. रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन इ.), तर त्याबाबत तक्रार करण्यासाठी कोणत्याही नागरिकास मोहल्ला कमिटीच्या बैठकीची वाट बघण्याची गरज नसते. तो कोणत्याही दिवशी जाऊन ही तक्रार करू शकतो. त्या तक्रारीवर काहीही कार्यवाही झाली नाही तर त्याबाबत जाब विचारायची जागा म्हणजे मोहल्ला कमिटी, तक्रारी करण्याची नव्हे मोहल्ला कमिटीच्या बैठकीत धोरणात्मक चर्चा व्हायला हवी. मोहल्ला कमिटीच्या बैठकीत क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत जी जी कामे केली असतील त्याचे हिशोब तपासावेत. मोहल्ला कमिटीने एखाद्या प्रश्नाबाबत मूलभूत चर्चा करून भूमिका मांडावी. मोहल्ला कमिटीने वर्क ऑर्डर्स, टेंडर्स याबाबतीत कोठे काही भ्रष्टाचार तर होत नाहीये ना याकडे लक्ष द्यावे. मोहल्ला कमिटीने नागरिकांच्या तक्रारींची योग्य दखल घेतली जात आहे ना याकडे लक्ष द्यावे, मोहल्ला कमिटीने नगरसेवकांच्या बनलेल्या प्रभाग समित्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवावे, मोहल्ला कमिटीने वॉर्डस्तरीय निधी वापराकडे लक्ष द्यावे, त्यात काही गैर तर होत नाहीये ना याकडे लक्ष द्यावे, मोहल्ला कमिटीने शहराच्या धोरण विषयक बाबतीत मत मांडावे, ठराव मांडावेत, पाठींबा द्यावा, निषेध करावा, आवाहने करावीत.... खऱ्या अर्थाने नागरिकांचे व्यासपीठ बनायची संधी मोहल्ला कमिटी या उपक्रमाला आहे...\nया उपक्रमात अचानक लोक सहभागी होणार नाहीत. आत्ता असलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी आपल्याला अथक प्रयत्न करावे लागतील. या उपक्रमातून लोकशक्तीचा परिणामकारक प्रत्यय द्यायला लागेल. तसा आशावाद निर्माण करावा लागेल. पण ज्याक्षणी मनातली मरगळ टाकून लोक काम करायला तयार होतील त्या क्षणी त्यांच्यासाठी व्यासपीठ तयार असले पाहिजे. लोक आले तर मग त्यांची सोय बघू असे म्हणता येणार नाही. नाहीतर मग त्यांच्यात आलेला उत्साह विरून जाईल किंवा गैरमार्गाला लागेल. लोकांच्या परिवर्तनाच्या इच्छेला योग्य दिशेला नेण्यासाठी, त्यातून विधायक काही घडवण्यासाठी मोहल्ला कमिटी हा प्रभावी मार्ग ठरू शकेल याबद्दल माझ्या मनात संदेह नाही. गरज आहे ती हा उपक्रम अधिकाधिक नागरिक केंद्रित करण्याची, त्याचे स्वरूप तक्रार करण्याचे ठिकाण असे न ठेवता निर्णय घेण्यात सहभाग घेणारी यंत्रणा असे करण्याची. मूलभूत, दीर्घकालीन आणि व्यापक स्वरूपाचे परिवर्तन घडवायचे तर, व्यक्ती, संस्था, नोकरशाहीची सोय यापलीकडे जाऊन सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी आणावे लागेल...\nमाझ्या या विचारांशी काहीजण सहमत नसण्याची दाट शक्यता आहे. पण नीट समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास माझी भूमिका नक्कीच पटेल. तरी काही जणांना पटली नाही तर माझा नाईलाज असेल. शेवटी काय हो, झोपलेल्याला जागं करता येतं... झोपेचं सोंग घेणाऱ्याला कोण आणि कसं जागं करणार\nलोकसहभाग आणि मोहल्ला कमिट्या\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (6)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://spsnews.in/2017/06/28/sondoliaarogykendr/", "date_download": "2020-09-26T02:54:31Z", "digest": "sha1:YF5IECYDRC5LQ6AAJ2VR7GUVXNIXGZLN", "length": 9169, "nlines": 91, "source_domain": "spsnews.in", "title": "सोंडोली इथं प्रथमिक आरोग्य उपकेंद्र मंजुरीसाठी प्रयत्न करणार.—– सर्जेराव पाटील पेरीडकर. – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nसोंडोली इथं प्रथमिक आरोग्य उपकेंद्र मंजुरीसाठी प्रयत्न करणार.—– सर्जेराव पाटील पेरीडकर.\nग्रामिण भागातील जनतेला सुलभ व तत्काळ आरोग्य सेवा मिळावी, यासाठी वारणा व कानसा खो-यातील मध्य ठिकाण असलेल्या सोंडोली येथे लवकरात लवकर आरोग्य उपकेद्रांच्या उभारणीसाठी व मंजूरीसाठी प्रयन्त करणार आसल्याचे, प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परीषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी केले. ते सोंडोली ता.शाहूवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराच्या उद्धघाटन कार्यक्रमात बोलत होते.अध्यक्ष स्थानी ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील होते.\nया कार्यक्रमात पुढे बोलतानाश्री पाटील म्हाणाले की, जिल्हा परीषद प्रथमिक शाळांचा दर्जा सुधारला पाहीजे, यासाठी प्रयन्त चालू असून पहिलीच्या वर्गाला सेमी इंग्लीश चालू केले असून, शित्तूर वारुण मतदारसंघांतील सर्वच शाळांना भेटी देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले .\nया कार्यक्रमात ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील म्हाणाले की, सध्या पावसाळा सुरु असून ग्रामिण भागात येणारे साथीचे अजार, त्यासाठी मार्गदर्शन मिळावे, व आपल्या गावत योग्य उपचार मिळावा, यासाठी जिल्हा परिषद व राजाराम बापू साखर कारखान्याच्या वतीने हे शिबीराचे आयोजन केले आहे.\nसोंडोली सारख्या गावात आरोग्य उपकेंद्र झाल्यास, वारणा व कानसा खो-यातील दहा ते पंधरा गावातील लोकांची सोय होणार आहे, तरी आरोग्य आरोग्य सभापतींनी प्रयत्न करावा, अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी केली आहे.\n,या कार्यक्रमासाठी प्रकाश म्हाळूंगेकर मेडीकल ऑफिसर, राजाराम बापू कारखाना डॉ यू .जी. कुभांर , अति. जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूर , , डॉ . बी.के. काबंळे तालुका आरोग्य अधिकारी शाहूवाडी, .डॉ. नरेंद्र माळी भेडसगाव, डॉ .अभिजीत पाटील ,.माजी सरपंच प्रकाश पाटील, आण्णासो पाटील, दिलीप पाटील, मुख्यध्यपक संजय पाटील, विश्वास पाटील, आनंदा सावंत, ग्रामसेवक बी.जी.पाटील, व परीसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचलन भगवान सावंत यांनी केले .\n← कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस : अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ\n१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी ‘मुस्तफा डोसा ‘ याचा मृत्यू →\nवारुळात ‘ दारूबंदी ‘ नंतर जल्लोष\n‘ जय महाराष्ट्र ‘ च्या बस वरील चालक व वाहकावर बेळगावात राजद्रोहाचा गुन्हा\nस्वाभिमानी संघटनेच्या शाहुवाडी तालुका सरचिटणीस पदी तानाजी रवंदे\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://cinenama.in/2020/07/17/revisit-cinema-is-becoming-popular/", "date_download": "2020-09-26T02:18:24Z", "digest": "sha1:2UPMQJFXLK2IPX36WGPZK2LSUNDU7TE6", "length": 9073, "nlines": 111, "source_domain": "cinenama.in", "title": "प्रेक्षक करताहेत 'रिव्हिझिट सिनेमा' - Cinenama", "raw_content": "\nHome छोटा पडदा वेबनामा प्रेक्षक करताहेत ‘रिव्हिझिट सिनेमा’\nप्रेक्षक करताहेत ‘रिव्हिझिट सिनेमा’\nकोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन च्या काळात बराचसा प्रेक्षक वर्ग ओटीटी प्लॅटफॉर्म, वेबसिरीज तर अगदी जागतिक चित्रपटांकडेही वळला. अशावेळी आपला प्रेक्षकवर्ग मराठी दर्जेदार चित्रपटांकडे कसा वळेल या अनुषंगाने ‘रॉ फिल्म्स’तर्फे तेजस साठे, मयुरेश भोर आणि टीम यांचा ‘रिव्हिजिट सिनेमा’ हा वेब शो सिनेप्रेमींकरिता एक पर्वणीच ठरला.\nआशयघन आणि चौकटी बाहेरचे विषय घेऊन या वेब शो मार्फत आजतागायत चार चित्रपटांच्या प्रवासाची नव्याने ओळख करून दिली. आणि या नव्या ओळखीने तर जणू दमदार अशी रिव्हिजिट या चित्रपटांना मिळाली. प्रेक्षकांचा भरभरून असा प्रतिसाद ‘रिव्हिजिट सिनेमा’ मार्फत प्रसारित केलेल्या सर्वच चित्रपटांना मिळाला. नुकत्याच झालेल्या दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘न्यूड’ या चित्रपटाच्या प्रवासाने तर एक नवा कोरा विषय प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला. अगदी प्रेक्षकही दिग्दर्शकांच्या नजरेतून या चित्रपटांना नव्याने पाहू लागले. ‘धुडगूस’, ‘रेगे’, ‘टिंग्या’ आणि ‘न्यूड’ या चार चित्रपटांना ‘रिव्हिजिट सिनेमा’ या वेब शो मार्फत प्रेक्षकांपर्यंत रिव्हिजिट करण्यात यश मिळाल असून प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.\nरविवारी उघडणार ‘नागराजचा पिटारा’\n‘रिव्हिजिट सिनेमा’ या वेब शोच्या यशामागे या वेब शोचा अँकर कपिल रेडेकरचा महत्वाचा वाटा आहे. या वेब शो मध्ये कपिलचे सादरीकरण अर्थात वाखाणण्याजोगे आहे. खरंच कपिलचे सादरीकरण कौशल्य आणि या वेब शो ने निवडलेल्या कंटेंटची बांधणी प्रेक्षकांना लुभावणारी आहे. कपिल रेडेकर म्हणतो की, ‘रिव्हिजिट सिनेमा’ मार्फ़त आता पुढील आठवड्यात प्रेक्षकांकरिता एक अचंबित करणारा असा नवा कोरा विषय प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात अँकर कपिल रेडेकर कोणत्या चित्रपटाचा प्रवास दाखवणार याकडे सर्वच प्रेक्षक वर्गाचे लक्ष लागले आहे.\nPrevious articleरविवारी उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nNext article‘डॉक्टर डॉक्टर’चे चित्रीकरण पूर्ण\n‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन गायब\nनानीच्या ‘व्ही’ चा प्रीमिअर होणार प्राईमवर…\nउद्या होणार ‘रेसिस्ट’ प्रदर्शित…\nप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात...\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\n‘शंकुतला देवी’चाही आता ‘प्राइम’शो\n…आणि आता ‘फॉर मोअर शॉट्स प्‍लीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/nashik-local-news/complete-the-work-time/articleshow/69605640.cms", "date_download": "2020-09-26T03:06:57Z", "digest": "sha1:BZ2YHOB5KNIY7FO4CL7TBYIH5X36HY3L", "length": 8316, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकाम वेळेत पूर्ण करा\nनाशिक मुंबई आग्रा हायवे वरील के के वाघ काॅलेजपासून ते आडगाव पय॔त उड्डाणपूलाचे काम चालू आहे. त्या कामाला जलत गतीने देऊन काम पुणॅ करून वाहतुक कोंडीस अडचण निर्माण होणारी नाहीअरविंद सूर्यवंशी, अमृतधाम\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nझाडांची छाटणी कधी करणार\nसावध रहा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nदेशUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने 'असे' दिलेउत्तर\nआयपीएल २०२०Chennai vs Delhi: दिल्लीने गड राखला, बलाढ्य चेन्नईवर साकारला विजय\nमुंबईकंगना प्रकरण: हायकोर्टाने BMC कडे मागितले 'या' तीन मुद्द्यांचे स्पष्टीकरण\nमुंबईशिवसेना कधीच कन्फ्यूज नव्हती; राऊतांचे फडणवीसांना उत्तर\nमुंबईड्रग्ज प्रकरण: NCB चे अधिकारी तुरुंगात जाऊन शौविकचा जबाब घेणार\nकोल्हापूरकरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ऑडिट होणार, २२ पथकं तैनात\nकोल्हापूरसंभाजीराजेंनी वेळीच ओळखली चाल; 'असा' उधळला डाव\nमुंबईकरोना: रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यापूर्वी कुटुंबीयांची संमती बंधनकारक\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/page/229", "date_download": "2020-09-26T02:37:29Z", "digest": "sha1:2CNW7KGQKBZNB6SE4CSZ55SKCG62OT3K", "length": 8793, "nlines": 105, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "द वायर मराठी: Latest Marathi News | The Wire News In Marathi | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi News | Marathi Samachar| Marathi.thewire.in", "raw_content": "\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\nकेंद्राने जीएसटीबाबत कायद्याचे उल्लंघन केले : कॅग\nफेसबुक – भाजप यांचं साटंलोटं\nभाजपच्या मदतीने निवडणुकांमध्ये आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केल्यानंतर, फेसबुक आता इतर पक्षांनाही आपला प्रभाव विकू इच्छित असेल. समाज माध्यमांच्या खेळ ...\nसंगणक: क्रांती, उत्क्रांती आणि माणूस - गेल्या वीस वर्षांच्या काळात जगण्याचे वेगाने होत जाणारे संगणकीकरण, त्याचा अफाट वेग यांच्याशी जुळवून घेताना ज्येष ...\nअब्जावधी डॉलरची संपत्ती असलेले अझीम प्रेमजी विदेशात गेल्यानंतर कोणत्याही हॉटेलमध्ये न राहता कंपनीच्या गेस्ट हाउसमध्ये राहतात. एअरपोर्टला टॅक्सी किंवा ...\nपृथ्वीवर सर्वात बुद्धिवान असलेल्या मानवाने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जे पाहिजे ते अक्षरशः ओरबाडून घेऊन आपला विकास साधून घेतला. पण त ...\nमहिलांना मोफत सार्वजनिक वाहतूक प्रवास करण्यास मुभा दिल्यास त्या घराबाहेर पडतील व काम करतील असे केजरीवाल यांचे गृहितक आहे. ...\nगर्भपातबंदी कायदा : उलटा प्रवास सुरू\nअमेरिकेत अलाबामा, जॉर्जिया, अर्कान्सस, केंटुकी, ल्युईझियाना, मिसिसिपी, मिसोरी, नॉर्थ डॅकोटा आणि ओहायो या राज्यांनी गर्भपातावर बंदी आणणारे कायदे अलीकडे ...\nपेटंट मुक्तता : मोन्सॅटोने टेसलाकडून काय शिकायला हवे\nटेसलाप्रमाणेच, बी-बियाणे क्षेत्रातील प्रमुख अमेरिकन कंपनी मोन्सॅटोने जीएम उत्पादनांकडून अधिक शाश्वत तंत्रज्ञानांकडे वळले पाहिजे, आणि अभिनवतेला प्रोत्स ...\nएच-वन बी व्हिसामध्ये १० % नी घट\nएच-वन बी व्हिसा मंजूर करण्याची टक्केवारी खाली येण्याचा अर्थ असा की, परदेशातून अमेरिकेत येणारा कुशल रोजगार आता टप्प्या टप्प्याने कमी होत असून हे ट्रम्प ...\nआपल्या नीतीकथांत विश्वासघातकी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये अशा आशयाच्या अनेक कथा आहेत. जर नितीश कुमार लालूंशी-काँग्रेसशी विश्वासघात करत असतील तर ते भविष ...\nएका पाकिस्तानी पत्रकाराचे भारतातील मित्राला पत्र\nगेल्या वर्षी तू एक व्हिडिओ शेअर केला होतास. या व्हिडिओत भारत व पाकिस्तानातल्या दोन मुली स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एकमेकांचे राष्ट्रगीत गात होत्या. हा ...\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\nकेंद्राने जीएसटीबाबत कायद्याचे उल्लंघन केले : कॅग\nमाणुसकीचा ‘व्हॉट्स अॅप कॉल’\nआसाम बोर्ड : नेहरु, मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले\nराफेलः ऑफसेट कराराची पूर्तता नाही\nकोसळणाऱ्या इमारती आणि कोडगे राज्यकर्ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/dr-v-b-deshpande/", "date_download": "2020-09-26T03:29:48Z", "digest": "sha1:NUZXGGJ5LWQDN7Y73UXOKJKFFVDBQP2V", "length": 21310, "nlines": 155, "source_domain": "www.saamana.com", "title": "डॉ. वि. भा. देशपांडे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगलवान हिंसाचाराबाबत अखेर चीनची कबुली, संघर्षात पीएलएचे पाच सैनिक गमावल्याचा दावा\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nडॉ. वि. भा. देशपांडे\nमहाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात नाटकांचे मोलाचे योगदान आहे. ना’ट्यविश्वातील विविध भूमिकांचा, टप्प्यांचा अभ्यास करून जे जे नाटकाविषयी दिसले ते ते लिखाणातून अभ्यासपूर्ण पद्धतीने रसिक, वाचक, अभ्यासकांसमोर डॉ. विश्वनाथ भालचंद्र देशपांडे यांनी मांडले. नाटय़सृष्टीसाठी आणि वाचकांसाठी ते ‘विभा’च होते. नाटकांनी समाजजीवनातील मोठा भाग व्यापला आहे. समाजातील चळवळी, परिवर्तन अशा अनेक अंगांनी नाटकाचा इतिहास समृद्ध झाला आहे. या कलेचा आस्वाद केवळ दृश्य माध्यमांपुरता न राहता त्याचे विविध पैलू जनतेसमोर आणण्याचे काम विभांनी प्रामाणिकपणे केले. १९३८ मध्ये जन्मलेल्या विभा यांनी मॉडर्न महाविद्यालय तसेच पुणे विद्यापीठात मराठी आणि नाट्यशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यामुळे मराठी नाटकांचे विश्व अनेक अंगांनी उलगडणे त्यांच्यासाठी सोयीचे झाले. नोकरीत मिळालेला छंद जोपासण्याचा आनंद त्यांच्या लिखाणातून जाणवतो. डॉ. विश्वनाथ भालचंद्र देशपांडे हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी होते. आपल्या लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर टाकली. अनेकांमध्ये संवादाचा धागा होत विभांनी नाटकाविषयी जे हाती सापडेल ते अभ्यासपूर्ण पद्धतीने साहित्यात मांडले. ज्यामध्ये नाट्य समीक्षा, नाट्य कलावंतांची मुलाखत, रंगभूमीवरचा प्रवास आलेख, स्तंभलेखन, नाट्यशास्त्राचे पाठ, सभासंमेलनातील नाटकाविषयीचे व्याख्यान अशा अनेक प्रांतांतून त्यांनी नाटकाची सेवा केली. उमेदीच्या काळात के. नारायण यांचा सहवास त्यांना लाभला आणि विभांना नाटकाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी प्राप्त झाली. भालबा केळकर यांच्या पीडीए या प्रायोगिक नाट्यसंस्थेत काही वर्षे रंगकर्मी म्हणूनही त्यांनी काम केले. विभांनी विष्णुदास भावे ते तेंडुलकरांपर्यंतच्या नाटककारांच्या संहितांचा अभ्यास करून तीन खंडांचे प्रकाशन केले. मराठी नाट्यकोश हा १२०० पानांचा मौल्यवान ठेवा त्यांनी साहित्यसृष्टीला दिला. आचार्य अत्रे प्रतिमा आणि प्रतिभा, कालचक्र- एक अभ्यास, नटसम्राट- एक आकलन, नाटककार खानोलकर, नाट्यभ्रमणगाथा, नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती) अशा कितीतरी पुस्तकांची नावे घेता येतील ज्यात विभांचा ठसा स्पष्ट जाणवतो. अभ्यासकांसाठी हा ठेवा मार्गदर्शक आहे. नाट्य व्यक्तिरेखाटन, पौराणिक, ऐतिहासिक, नाट्यसंवाद रचना कौशल्य, नाट्यस्पंदने (नाटय़विषयक लेख), निवडक नाट्य मनोगते, मराठी नाटक पहिले शतक, मराठी रंगभूमी- स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ- रंगभूमीचा इतिहास (दोन खंड), माझा नाट्य लेखन-दिग्दर्शनाचा प्रवास, यक्षगान, लोकनाटक, रायगडाला जेव्हा जाग येते- एक सिंहावलोकन अशी सुमारे एकूण २५नाट्यविषयक लेखनाची पुस्तके त्यांनी सहजसोप्या भाषेत रसिकांसह वाचकांना दिली आहेत. त्यांचे पस्तीसहून अधिक संपादनात्मक लेखन प्रसिद्ध आहे. गौरव ग्रंथांचे संपादनही मोठ्या तन्मयतेने त्यांनी केलेले दिसते. कोणत्याही नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला उपस्थिती लावणारे विभा हे नाट्य कलावंतांचे आणि रसिकांचे जवळचे मित्र. त्यामुळेच त्यांच्या लिखाणावर मनस्वी प्रेम करणारे वाचक त्यांनी मिळवले. कुठलेही नाटक आवडले नाही तरी त्या नाटकावर विभांनी कधीही टोकाची टीका केली नाही. यातील संबंधितांना अगदी प्रेमळ शब्दांत आपल्या चुका दाखवून देणे पसंत केले. विभांकडून समीक्षा करून घेणे हे अनेकांना मोठेपणाचे वाटत असे. विभांच्या या कार्याची दखल घेत अनेकांनी त्यांना मोठे पुरस्कार, मानसन्मान देऊन गौरविले. दक्षिणेकडील संपन्न नाट्यपरंपराही त्यांनी अभ्यासली होती. नवनवीन विषय हाताळून नाट्यसृष्टीत चैतन्य कसे निर्माण होईल याकडेच त्यांचा कायम कल राहिला. मात्र विभांच्या निधनाने नाट्य क्षेत्रातील ही उर्मीच लुप्त झाली आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nठसा – मामासाहेब घुमरे\nमुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nलेख – विस्तारवादी चीनमुळे जगाचा विकास थांबला\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम...\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nया बातम्या अवश्य वाचा\nगलवान हिंसाचाराबाबत अखेर चीनची कबुली, संघर्षात पीएलएचे पाच सैनिक गमावल्याचा दावा\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2020-09-26T03:19:13Z", "digest": "sha1:FV7TUWWM2E6IELFBYNTWV2QZVRLEFDMB", "length": 9423, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एस.एस. भोसले - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nप्रा. डॉ. एस. एस. भोसले यांचे पूर्ण नाव संभाजी सावळाराम भोसले आहे. त्‍यांचा जन्‍म कोल्हापूर जिह्यातील कागल येथे झाला. कोल्हापूर येथील वास्तव्याच्या काळात त्यांना ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक ‘झोंबी’कार डॉ. आनंदी यादव वर्गमित्र लाभले. महाविद्यालयीन वाटचालीच्या उंबरठय़ावर असतानाच डॉ. भोसले यांना प्रख्यात साहित्यिक ज्ञानपीठ विजेते लेखक वि. स. खांडेकर यांचा लेखनकामाच्या निमित्ताने प्रदीर्घ सहवास लाभला. खांडेकर ओघवत्या भाषेत एखादी कथा, कादंबरी सांगायचे आणि सुवाच्य अक्षरात लिहिण्याचे कार्य डॉ. भोसले करायचे. या प्रदीर्घ सहवासामुळे त्यांच्याशी खांडेकरांचा स्नेह जमला. कोल्हापूरच्या वास्तव्यात प्राध्यापक म्हणून कार्य करताना त्यांना ‘पानिपत’कार विश्वास पाटीलसारखा साहित्य क्षेत्रातील जाणकार विद्यार्थी लाभला. १९७९च्या सुमारास डॉ. भोसले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून रुजू झाले. पुढे त्‍यांनी १९९३ ते १९९५ या काळात विभागप्रमुख म्‍हणूनही कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.चे अनेक विद्यार्थी पुढील काळात नावारूपाला आले. राज्य साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ यांचे सदस्य राहिलेल्या भोसले यांच्या नावावर १८ स्वलिखित आणि २२ संपादित पुस्तके जमा आहेत. [http://www.saamana.com/dr-s-s-bhosale/ १]\nखांडेकर : व्यक्ती आणि साहित्य\nसूर्ययुगाची सुरूवात : प्रेरणा आणि निर्मिती\nप्र.के. अत्रे साहित्य आणि समीक्षा\nराजर्षी शाहू : संदर्भ आणि भूमिका\nसंदर्भ चुका असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१८ रोजी २०:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-09-26T01:02:36Z", "digest": "sha1:MW6GPTJA33IZG5QUJJP5RWSYCFPJGWGN", "length": 3301, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ललितपूर जिल्हाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:ललितपूर जिल्हाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:ललितपूर जिल्हा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:ललितपुर जिल्हा (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sandeepramdasi.com/2011/06/03/thank-you-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-26T00:49:26Z", "digest": "sha1:BQMPGVG77GWBEIDT3LKFRCGOGM7N3ZJJ", "length": 10272, "nlines": 74, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "THANK YOU शेतकरी दादा! | रामबाण", "raw_content": "\nTHANK YOU शेतकरी दादा\nकाही वर्षांपूर्वी नेटवर असंच भटकत असताना Thank a farmer (TAF) बद्दल वाचनात आलं होतं. अमेरिकेतला एक शेतकरी १५५ लोकांची भूक भागेल एवढं अन्न पिकवतो म्हणे; त्या शेतकऱ्यांचे मोठे ऋण आपल्यावर आहे, त्यांचे आभार मानायलाच हवे असं अगदी लहानपणापासून तिथे बिंबवलं जातं. यासाठी thank a farmer day सारख्या संकल्पना तिथं पुढं येतात. त्याला शाळेपासून ते कार्पोरेट जगतापर्यंत, समाजाच्या प्रत्येक घटकाचा चांगला प्रतिसादही मिळतो. Have u thanked a farmer today असं तिथं विचारलं जातं. आता राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनीही शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली दरी दूर करण्यासाठी KNOW YOUR FARMER, KNOW YOUR FOOD (KYF2) ही योजना सुरु केलीय.\nआपल्याकडेही शेतकरी आणि ग्राहक यांच्यात फार मोठी दरी आहे. फक्त कांद्याचे किंवा दूध- साखरेचे भाव थोडेसे वाढले की शेतकरीनामक कोण्या खलनायकाचं हे काम आहे असं शहरीग्राहकांना ठामपणे वाटत असतं. यापलिकडे शेतकऱ्याचा आणि आपला काही संबंध आहे हे आपण मानायलाच तयार नसतो.\nआपण जे खातो ते मॉलमधून येतं किंवा आपल्या घरी दूध येतं ते भैय्यामुळेच; असं बऱ्याच शहरी मुलांना आजही वाटतं. मॉलच्या चकाचक रॅकवर दिसणारा गहू-तांदूळ-दूध-भाजीपाला आपोआप येत नाही, यासाठी ऊन-वारा-पावसाची तमा न करता, अनंत अडचणींशी सामना करत, शेतकरी नावाचा उपेक्षित जीव कुठेतरी दोन-चारशे किलोमीटरवर शेतात राबत असतो हे त्यांना कळणार कसं इथेच आपण प्रत्येकजण महत्वाचा रोल निभावू शकतो. शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवून ती नव्या पिढीपर्यंत पोचेल याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी.\nबियाणं वेळेवर मिळत नाही, खतं वेळेवर मिळत नाही, मजूरांची समस्या वेगळीच, कुठुन तरी कर्ज मिळवायचं शेतात काहीतरी पेरायचं, पाऊस त्याच्या लहरीप्रमाणेच पडतो, निसर्ग साथ देईल अशी प्रार्थना करायची, दिवस रात्र मेहनत करायची, शेवटपर्यंत पीकाची काळजी घ्यायची, चांगलं उत्पादन मिळालं तर बाजारभाव चांगला मिळेल- व्यापाऱ्यांची मेहेरनजर राहिल अशी अपेक्षा करायची. अशा आणि आणखी अनंत अडचणींवर मात करत शेतकरी जगत असतो. त्याच्या आत्महत्येच्या-मरणाच्या बातम्या आपल्यापर्यंत अधनंमधनं पोचतात पण तो जगतो कसा ते पोचतंच नाही, आपणही कधी ते जाणून घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न करत नाही. अशा प्रतिकुल परिस्थितीत जो शेतकरी आपल्यासाठी अन्न पिकवतो त्याच्याबद्दल आपण कधीतरी विचार करतो का\nज्याच्यामुळे आपल्याला दोन वेळचं अन्न मिळतं त्या शेतकऱ्याचे आभार मानायचे… ही कल्पना मला त्यामुळेच खूप आवडली.\nतशी Thank a farmer (TAF) ही संकल्पना आपल्यासाठी नवी नाहीय, ‘अन्नदाता सुखी भव’ असं म्हणत आपल्या पूर्वजांनी शेतकऱ्यांचे आभारच मानले आहेत, फक्त आपल्याला त्याचा थोडासा विसर पडत गेला इतकंच. पाश्चात्यांचं अनुकरण करायची आपल्याला सवय आहेच, आता तिकडे TAF सुरु आहे म्हटल्यावर आपल्यालाही ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणजेच ASB चं महत्व कळेल अशी आशा करायला काय हरकत आहे.\nशहरीकरणाच्या-आधुनिकतेच्या झगमगाटात आपण ग्रामीणभागापासून- शेतकऱ्यापासून मनानं दूर गेलो आहोत. TAF म्हणा, ASB म्हणा यानं किती फरक पडेल किंवा शेतकरी-ग्राहकामधली दरी किती मिटेल माहित नाही, पण शेतकऱ्याच्या कामाबाबत थोडी माहिती, थोडा आदर जरी तरुण पिढीच्या मनात निर्माण झाला तरी एका मोठ्या बदलाची ती सुरुवात असेल.\nमग आज माननार शेतकऱयाचे आभार म्हणणार THANK YOU शेतकरी दादा\nदेशात चौधरी चरणसिंग यांच्या स्मृतीदिनी २३ डिसेंबरला किसान दिवस म्हणून घोषित केलं आहे.\nतर महाराष्ट्रात वसंतराव नाईकांच्या जयंतीला १ जुलै ली कृषी दिन साजरा केला जातो.\nपण या एका डे पलिकडे काहीतरी आपल्याला करता येईल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/herbicidemistake", "date_download": "2020-09-26T02:31:01Z", "digest": "sha1:OE4DPLT762BTFLVMG53JKD74FAMKN63Z", "length": 14469, "nlines": 189, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "कोणत्याही पिकावर चुकून तणनाशकाची फवारणी झाली तर काय करणार? – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nकोणत्याही पिकावर चुकून तणनाशकाची फवारणी झाली तर काय करणार\nअनेक वेळा शेजारच्या शेतात तणनाशकाची फवारणी होते, तर कधी कधी आपण तणनाशकाच्या पंपाने कीटक नाशक फवारतो व उभ्या पिकावर त्याचा वाईट परिणाम होतो. अश्या वेळी काय करावे\nकापसावर टू फोर डी या तणनाशकाचा परिणाम दिसतो आहे.\nसर्वप्रथम हे तपासा कि तणनाशक कोणत्या प्रकारातील आहे. जर हे स्पर्शजन्य असेल तर सुरवातीला नुसत्या पाण्याची भरपूर फवारणी करा जेणेकरून पृष्ठभागावर पडलेले तणनाशक वाहून जाईल. पण जर आपण फवारलेले तणनाशक अंतप्रवाही असेल तर पाण्याच्या फवारणीचा फायदा होणार नाही. एव्हाना अशा वेळी नुसत्या पाण्याची फवारणी टाळावी.\nजेव्हा उभ्या पिकावर चुकून तणनाशकाची फवारणी होते तेव्हा हि तण नाशके चय-अपचय प्रक्रिया मंदावतात व पिकाला इजा व्हायला सुरुवात होते. अश्या विपरीत परिस्थितीतून जेव्हा आपण पिकाला सावरायचा प्रत्यत्न करतो व त्यास पाणी व खते उपलब्ध करून देतो त्यावेळी विकरे तयार व्हायला वेळ जात असल्याने पिकाची वाढ पूर्ववत व्हायला वेळ लागतो. अशा वेळी आपण जर फॉलीबिओन ची फवारणी केली फायदा होतो कारण फॉलीबिओन मध्ये अमिनो एसिड आहेत ज्या पासून विकरे बनवली जातात. हा एक शॉटकट आहे. विकरे अपेक्षेपेक्षा अधिक लवकर बनल्याने पिकाच्या वाढीचा वेग पूर्ववत व्हायला मदत होते व पिक लवकर सावरते.\nविपरीत परिस्थितीमुळे मागे पडलेले पिक फॉलीबिओन च्या मदतीने वेळ व सत्व भरून काढते ज्या मुळे उत्पादनावर होणारे दुष्परिणाम टाळले जातात.\nफॉलीबिओन चे डोसेस काय आहेत पिकाचे वय व वाढ लक्षात घेवून फवारणी चे डोसेस निवडावे. लहान पिकात १ मिली प्रती लिटर, फुलावर यायच्या वळेस २ मिली प्रती लिटर, फळावर यायच्या अगोदर ३ मिली प्रती लिटर. विपरीत परिस्थिती किंवा व्हायरस लागण झाल्यावर सुधारणे साठी १ ते २ मिली प्रती लिटर. ड्रीप ने देण्यासाठी ५०० मिली प्रती एकर, रोपांच्या पुनरलागवड करते वेळी रूट डीपिंग साठी ५ ते १० मिली प्रती लिटर.\nतणनाशकाचा परिणाम खूप जास्त प्रमाणात असेल तर फॉलीबिओनच्या वर सांगितलेल्या डोसेस सोबत प्रती लिटर 3 ग्राम गुळ व ३ ग्राम डीएपी वापरावे.\nअश्या अवस्थेत चुकुनही पोटाश युक्त खताची फवारणी करू नये.\nआजच फोलीबिओन खरेदी करून ठेवा.\nफोटोवर क्लिक करून हे पुस्तक खरेदी करा व कीटकनाशक, तणनाशक व बुरशीनाशकावर खर्च होणारे हजारो रुपये वाचवा.\nवरील पुस्तकाच्या लेखकाचा अल्पपरिचय खालील प्रमाणे आहे.\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग २ नुकताच एक लेख वाचला. वाढत्या लठ्ठ लोकांच्या संख्येला...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग ३ रा \"भित्यापाठी ब्रम्हराक्षस\", आजकालच अन्नधान्य काही बर नाही,...\nसुतकृमींचे नियंत्रण करण्यापेक्षा प्रतिबंध करणे अधिक फायदेशीर\nसुतकृमींना (निमॅटोड) नेहमिच्या जीवनात जंतु असे संबोधले जाते. परपोशी असल्याने,...\nएकात्मिक नियंत्रणाकडे वळायचे सहा टप्पे\nपिक व्यवस्थापनाच्या बाबतीत अनेक शेतकरी बांधवांच्या मनात पराकोटीचा गोंधळ दिसून...\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nव्यापारी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठा चढ-उतार होत असतो. अशा आर्थिक...\nप्रत्येक पिकावरील निवडक तणनाशकाचे बाजारपेठेतील नावे सांगा\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dailykesari.com/2020/09/10/pune-heavy-rain-today/", "date_download": "2020-09-26T02:11:40Z", "digest": "sha1:YIVAIU43EQNEYMIXAFTTABVYLXZCJ2VC", "length": 15071, "nlines": 175, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "पुण्यात मुसळधार... - Kesari", "raw_content": "\nघर पुणे पुण्यात मुसळधार…\nरस्ते जलमय; सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी\nपुणे : मागील काही दिवसांपासून शहरात रोजच पाऊस पडत आहे. बुधवारी पुन्हा एकदा जोरदार पावसामुळे पुणे जलमय झाले. रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले, तर अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. तसेच काही वसाहतीतील घरांतही पाणी शिरले. अतिपावसामुळे काही भागात झाडे आणि झाडांच्या फांद्या तुटल्याच्याही घटना घडल्या. रात्री रस्त्यांवरील वाहत्या पाण्यामुळे वाहन चालकांना गाडी चालविणे अशक्य झाले. शहरातील बहुतांश महत्त्वाच्या चौकांत पाणीच पाणी झाले होते. वाहत्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेकांना पाऊस थांबेपर्यंत आहे त्या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागली.\nमेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात सायंकाळी जोरदार पावसाला सुरूवात झाली. सुमारे तासभर पाऊस पडल्यानंतर रात्री जोरदार पावसाचे रूपांतर मुसळधार पावसात झाले. पावसामुळे समोरचे काहीच दिसत नसल्याने वाहन चालकांना वाहने कडेला लावावी लागली. अवघ्या काही मिनिटातच अनेक रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे रस्त्याने पायी चालणेही अशक्य होत होते. रात्री उशिरापर्यंत पावसाचे सातत्य कायम होते. अतिपावसामुळे मध्यवस्तीतील बहुतांश रस्त्यांवरील वाहनांची ये-जा थांबली होती. पावसामुळे महत्त्वाच्या चौकातील सिग्नल यंत्रणा बंद पडली होती.\nशहरात रोजच कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. काल दुपारी अचानक जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे विविध कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. तर पावसामुळे दुचाकी चालकांनाही वाहने कडेला लावून आडोशाला थांबावे लागले. तर चारचाकी चालकांनाही वाहन चालविताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती. सुमारे आर्धा तास पाऊस पडला. पाऊस थांबल्यानंतर मात्र वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळाले. विशेषत: दुपारी कर्वेनगर, कोथरूड, चांदणी चौक, वारजे-माळवाडी, शिवणे, उत्तमनगर, सनसिटी, कात्रज, सिंहगड रस्ता, वडगाव, धायरी, शिवाजीनगर, आंबेगाव परिसरात पाऊस पडला.\nराज्यात मान्सून पुन्हा सक्रिय\nअरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा प्रभाव राज्यावर असल्याने कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडत आहे. राज्यात अद्याप मान्सून सक्रिय आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पावसाची हजेरी कायम असणार आहे. मान्सून सक्रिय असल्याने अद्याप तरी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nशहरात पावसाची हजेरी कायम आहे. आज (गुरुवारी) मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. तसेच, जिल्ह्यातील घाटमाथा विभागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, येत्या 15 सप्टेंबरपर्यंत शहर आणि परिसरात रोजच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 2 मि.मी. पावसाची नोंद झाली, तर 1 जूनपासून 642.7 मि.मी. पाऊस पडला आहे.\nपूर्वीचा लेख‘जम्बो’त इतर आजारांवरील उपचाराची वानवा\nपुढील लेखसंरक्षण क्षेत्रात एफडीआय मर्यादा ७४ टक्क्यांवर\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nउदयनराजेंनी ओबीसींना न्याय मिळवून द्यावा : हेमंत पाटील\nकाँग्रेस गावपातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार\nमहापालिकेचे कारभारी रंगले मेजवानीत\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nबिहार निवडणूक : तीन टप्प्यांत होणार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nबिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली.\nनवनाथ गोरे यांचा खडतर प्रवास होणार सुकर\nभारती विद्यापीठात मिळणार नोकरी\nलोकप्रिय गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले.\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलचा पहिल्याच षटकात पराक्रम\nअतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात\nइशांत शर्मा आणखी दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/rishi-kapoor-will-return-to-india-for-his-67th-birthday/articleshowprint/69799315.cms", "date_download": "2020-09-26T01:55:09Z", "digest": "sha1:7442I47UA5DD6M5XEBKKLTIFWAEXQUDW", "length": 3108, "nlines": 5, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "ऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजरा", "raw_content": "\nकॅन्सरसारख्या आजारावर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये गेलेले बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्यांचा ६७वा वाढदिवस ते भारतात साजरा करू शकतात.\n'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार ऋषी कपूर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मायदेशी येण्याचा प्रयत्न करत आहेत. येत्या ४ डिसेंबरला ऋषी कपूर यांचा ६७वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस त्यांना मायदेशी कुटुंबीय आणि मित्र परिवारासोबत साजरा करायची इच्छा आहे. परंतू डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ते निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 'मी भारतात येईल तेव्हा १००% बरा झालेला असेन असंही ऋषी कपूर यांनी सांगितलं.\n२०१८ सालच्या सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्कला गेलेले ऋषी कपूर उपचार संपवून भारतात केव्हा पतरणार, याची चर्चा बॉलिवूडमध्ये चांगलीच जोर धरून होती. गेल्या महिन्यातच त्यांचा मुलगा, अभिनेता रणवीर कपूर, याने 'त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. ते दोन महिन्यात परत येतील', असं ट्विट केल्याने लवकरच ऋषी कपूर परत येतील, असा कयास बांधला जात होता. आता उपचार संपवून तब्बल एका वर्षाने म्हणजेच येत्या सप्टेंबर महिन्यात, ऋषी कपूर भारतात परत येणार आहेत. ते परतण्याची बातमी त्यांच्या चाहत्यांना नक्कीच दिलासा देणारी ठरेल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/ncp-leader-balasaheb-mali-joins-mns/", "date_download": "2020-09-26T02:33:25Z", "digest": "sha1:N5CXD62C77HS5RLAV76ZME4U72WYWNKX", "length": 15950, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मनसेत इनकमिंग सुरु, राष्ट्रवादीच्या मोठया नेत्याचा मनसेत प्रवेश - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली…\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी…\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nमनसेत इनकमिंग सुरु, राष्ट्रवादीच्या मोठया नेत्याचा मनसेत प्रवेश\nअहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण (MNS) सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पाणी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्यापासून पक्षात इनकमिंग सुरू झाले आहे. सोमवारी अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी (Balasaheb Mali) यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मनसेत प्रवेश केला. शिर्डी येथे मनसेचे नेते मंत्री बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पारनेरच्या व जिल्हाच्या राजकारणात बाळासाहेब माळी सक्रिय होते. परंतु आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला आहे.\nपोलीस विभागातून निवृत्त झाल्यानंतर बाळासाहेब माळी हे सक्रीय राजकारणात उतरले होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक वर्षे संचालकपदही भूषवले आहे. राजकारणाबरोबरच एकलव्य फाउंडेशन व जाणता राजा प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी तालुकाभर मोठा जनसंपर्क तयार केला आहे. २०१९ मध्ये संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून पक्षातील गटबाजीला कंटाळून अखेर त्यांनी मनसेत प्रवेश केला.\nदरम्यान, आगामी काळात तालुक्याच्या प्रत्येक गावात मनसेची शाखा उघडून पक्ष संघटना अधिक बळकट करणार असल्याचे माळी यांनी सांगितले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleआयपीएल आयोजक युएईमध्ये नियमीत होतात महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा\nNext articleकोल्हापुरातील पहिले कसोटीपटू एस. आर. पाटील यांचे निधन\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी टिप्पणी विराटच्या प्रैक्टिसवर होती\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nकरोनानंही टेकले यांच्यापुढे हात…\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\nपाकिस्तान आम्हाला जनावरांप्रमाणे वागवतो – सज्जाद राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.esuper9.com/2020/01/saibaba-paithan-news.html", "date_download": "2020-09-26T03:23:10Z", "digest": "sha1:PGCOCFHLDPXILUB7SNOEGHLKG5RWK7F6", "length": 12146, "nlines": 102, "source_domain": "www.esuper9.com", "title": "साईबाबा पैठणच्या धुपखेड्यामध्ये प्रकटले - esuper9", "raw_content": "\nHome > खळबळ जनक > फोकस > राजकारण > साईबाबा पैठणच्या धुपखेड्यामध्ये प्रकटले\nसाईबाबा पैठणच्या धुपखेड्यामध्ये प्रकटले\nJanuary 23, 2020 खळबळ जनक, फोकस, राजकारण\nसाईबाबा पैठणच्या धुपखेड्यामध्ये प्रकटले\nसाईबाबा जन्मस्थळाचा वाद पेटला असतानाच आता आता साईबाबांचे आणखी एक प्रकट ठिकाण समोर येत आहे. साईबाबा पैठण तालुक्यातील धुपखेडा येथेच प्रकट झाले. येथूनच ते शिर्डीला गेल्याचा दावा धुपखेडा येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष पांडूरंग वाघचौरे यांनी केला आहे. त्यामुळे साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादात आणखीच भर पडली आहे.\nसाईबाबांच्या जन्मस्थळाविषयी माहिती देताना धुपखेडा येथील संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग वाघचौरे यांनी सांगितले की, साईबाबा हे धुपखेडा येथे प्रगट झाले होते. त्यांनी येथील लिंबाच्या झाडाखाली अनेक दिवस मुक्काम केला व ते येथील पोलिस पाटील चांदभाई पटेल यांच्याकडे काही काळ राहिले. चांदभाई पटेल यांच्या भाच्याच्या लग्नाच्या वरातीत ते शिर्डी येथे गेले होते. धुपखेड्याला असा इतिहास असताना या प्रकटभूमीकडे शासनाने लक्ष दिले नाही, असे ग्रामस्थांनी या वेळी सांगितले. विशेष म्हणजे तसा ठराव सोमवारी ग्रामस्थांनी घेतला आणि हीच साईबाबांची प्रकटभूमी असल्याचे सांगितले. साईबाबांच्या सच्चरित्राच्या पाचव्या आवृत्तीत पैठणच्या धुपखेड्याचा उल्लेख आहे. साई संस्थाने हे साईचरित्र प्रकाशित केले असून त्याच्या पाचव्या आवृत्तीमध्ये पैठणच्या धुपखेड्याचाही उल्लेख आहे. दरम्यान, हा वाददेखील आणखी वाढण्याची शक्यता आहे.\nलिंबाचा पाला गोड लागतो\nधुपखेडा येथील साईबाबा मंदिराच्या लगत लिंबाचे झाड असून या ठिकाणी साईबाबा यांनी ध्यान केले होते. आजही या लिंबाचा पाला गोड लागतो, असा दावाही पांडुरंग वाघचौरे यांनी केला आहे.\nसाईबाबा हे धुपखेडा येथे प्रगट झाले होते. ते येथूनच शिर्डीला गेले. मात्र ही भूमी विकासापासून वंचित आहे. आम्ही ग्रामस्थांचा ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. संजय वाघचौरे, माजी आमदार.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esuper9.com/2020/02/ranjit-chautala.html", "date_download": "2020-09-26T01:27:03Z", "digest": "sha1:O7VWGGFK57MCAED67525O25KDD26SZUV", "length": 11306, "nlines": 99, "source_domain": "www.esuper9.com", "title": "दंगली तर होतच राहतात, तो जीवनाचा एक भाग आहे - मंत्री रणजीतसिंह चौटाला - esuper9", "raw_content": "\nHome > राजकारण > दंगली तर होतच राहतात, तो जीवनाचा एक भाग आहे - मंत्री रणजीतसिंह चौटाला\nदंगली तर होतच राहतात, तो जीवनाचा एक भाग आहे - मंत्री रणजीतसिंह चौटाला\nदिल्लीत झालेल्या हिंसाचारावर हरयाणाचे मंत्री रणजीतसिंह चौटाला यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. “दंगली तर होतच राहतात, तो जीवनाचा एक भाग आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे. चौटाला यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nहरयाणा विधानसभेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना चौटाला म्हणाले, “दंगली तर होत राहतात यापूर्वीही झाल्या आहेत. जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा देखील संपूर्ण दिल्ली जळत होती. हा तर आता जीवनाचा एक भाग झाला आहे.”\nरणजीतसिंह चौटाला हे हरयाणा सरकारमध्ये ऊर्जा मंत्री आहेत. ते अपक्ष निवडणूक लढवून विधानसभेत पोहोचले आहेत. त्यांनीच सर्वप्रथम सरकार स्थापनेसाठी भाजपाला आपलं समर्थन दिलं होतं. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी देवीलाल यांचे ते पुत्र आहेत तर ओमप्रकाश चौटाला यांचे छोटे भाऊ आहेत.\nदरम्यान, दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याचे (सीएए) समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये शनिवारी हिंसेची ठिणगी पडली त्यानंतर हा हिंसाचार वाढतच गेला. तब्बल चार दिवस ईशान्य दिल्लीच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर जोळपोळ करण्यात आली. यामध्ये आजवर ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर २५० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. या हिंसाचारावर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने दिल्ली पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2020/03/infinix-hot-9.html", "date_download": "2020-09-26T01:37:03Z", "digest": "sha1:ZNJROTWQJRGG7C7PSONY53QXGROLI4BK", "length": 7404, "nlines": 72, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "infinix hot 9 | ‘स्वस्त’ स्मार्टफोन, ‘ढासू’ फीचर्स आणि दमदार बॅटरीही | Gosip4U Digital Wing Of India infinix hot 9 | ‘स्वस्त’ स्मार्टफोन, ‘ढासू’ फीचर्स आणि दमदार बॅटरीही - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome तंत्रज्ञान infinix hot 9 | ‘स्वस्त’ स्मार्टफोन, ‘ढासू’ फीचर्स आणि दमदार बॅटरीही\ninfinix hot 9 | ‘स्वस्त’ स्मार्टफोन, ‘ढासू’ फीचर्स आणि दमदार बॅटरीही\ninfinix hot 9 | ‘स्वस्त’ स्मार्टफोन, ‘ढासू’ फीचर्स आणि दमदार बॅटरीही\nबजेट स्मार्टफोन बनवणारी कंपनी इन्फिनिक्सने (Infinix) आपला अजून एक स्वस्त स्मार्टफोन लाँच केलाय. कंपनीने इन्फिनिक्स हॉट 9 (infinix hot 9) हा नवीन फोन आणला असून हा फोन म्हणजे गेल्या वर्षी आलेल्या इन्फिनिक्ल हॉट 8 या स्मार्टफोनची पुढील आवृत्ती आहे. कमी किंमतीत ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि दमदार बॅटरी ही फोनची खासियत आहे. सेल्फी कॅमेऱ्यासह एकूण चार कॅमेरे या फोनमध्ये आहेत. पंच होल डिस्प्ले असलेल्या या फोनची डिझाइनही एखाद्या महागड्या फोनप्रमाणे आहे.\nहा फोन XOS 6.0 वर आधारित Android 10 वर कार्यरत असेल. फोनवरती डाव्याबाजूला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच या फोनमध्ये 16MP क्षमतेचा प्रायमरी सेंसर कॅमेऱ्यासह 2MP मॅक्रो लेंस आहे. याशिवाय 2MP क्षमतेचा लो-लाइट सेंसरही फोनमध्ये आहे. या फोनमध्ये फेस अनलॉक, AR Emoji, AR स्टिकर यांसारखे फीचर्स असून ड्युअल सिम सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे.\nया फोनमध्ये 6.6 इंच IPS LCD डिस्प्ले असून फोनमध्ये Helio A25 1.8GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आले आहे. पण, इंडोनेशियाच्या काही पब्लिकेशन्सकडून या फोनमध्ये Helio P35 प्रोसेसर असल्याचंही सांगण्यात आलं आहे. सध्या हा फोन केवळ इंडोनेशियामध्येच विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. पण लवकरच हा फोन भारतातही विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. मात्र, नेमका कधी हा फोन भारतात उपलब्ध होईल याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/take-action-on-ajit-pawar-first/155910/", "date_download": "2020-09-26T01:21:47Z", "digest": "sha1:ETJERUOUJLBQUQXKQRLWNOJWGJN7NVVP", "length": 8613, "nlines": 112, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Take action on Ajit Pawar first", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई आधी अजित पवारांवर कारवाई करा\nआधी अजित पवारांवर कारवाई करा\nमोहिते-पाटील यांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर\nअजित पवार आणि जयसिंह मोहिते पाटील\nसोलापूर जिल्हा परिषदेतील जयसिंह मोहिते-पाटील गटाच्या राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये जयसिंह मोहिते-पाटील कुटुंबातील दोन सदस्यांसह सहा जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. यावरून मोहिते पाटील गट चांगलाच आक्रमक झाला आहे. आधी अजित पवारांवर कारवाई करा, मगच आमच्या सदस्यांना निलंबित करा, अशी टीका जयसिंह मोहिते पाटलांनी केली आहे.\nपक्षाच्या विरोधी भूमिका घेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार्‍या अजित पवारांवर कोणती कारवाई केली. अडीच वर्षांपूर्वी संजय शिंदे भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्ष ज्यांनी दगाबाजी केली, त्यांच्यावर कोणती कारवाई केली. दिपक साळुंखे यांचा विधान परिषद निवडणुकीत कोणी मतदान केलं नाही, राष्ट्रवादीच्या सदस्यांवर कोणती कारवाई केली, असे अनेक प्रश्नही जयसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केले आहे. याबाबत आधी पक्षाने उत्तरे द्यावीत. तसेच आम्हाला अद्याप कोणत्याही कारवाईचे लेखी पत्र मिळालेले नाही, असेही मोहिते पाटील म्हणाले.\nसोलापूर जिल्हा परिषदेसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी 31 डिसेंबरला मतदान झाले होते. यात पुरेसे संख्याबळ असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 6 सदस्यांनी विरोधी गटाला मतदान केले होते. सहा सदस्यांनी विरोधी गटाला मतदान केल्याने राष्ट्रवादी आणि महाविकासआघाडीचा प्रयत्न फसला.\nजिल्हा परिषदेतील मतदानात या सहा सदस्यांनी भाजप आणि महाविकासआघाडीच्या उमेदवाराला मतदान केले. निलंबित केलेले सर्व सहा सदस्य हे माळशिरस तालुक्यातील असून स्वरूपाराणी मोहिते, शीतलदेवी धैर्यशील मोहिते, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले, अरुण तोडकर, गणेश पाटील या सदस्यांचा यात समावेश आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकोलकाता नाईट रायडर्स vs सनरायजर्स हैदराबाद प्रीव्ह्यू\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nPhoto: NCB ड्रग्ज प्रकरणात चौकशी केलेल्या रकुलमध्ये तुम्हाला या गोष्टी माहिती...\nPhoto: ‘MU’च्या विरोधात ‘ABVP’ चे जागरण गोंधळ आंदोलन\nPhoto: काय आहे ”माझे कुटुंब माझी जबाबदारी\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/08/blog-post_30.html", "date_download": "2020-09-26T02:20:23Z", "digest": "sha1:HA2XSKW47AN6UCM4Q6XZXXPXRCALFMDX", "length": 17206, "nlines": 227, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "संधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण करा - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आर्थिक विकास गर्भसंस्कार मानसशास्त्र संधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण करा\nसंधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण करा\nचला उद्योजक घडवूया ८:०० म.उ. आर्थिक विकास गर्भसंस्कार मानसशास्त्र\n\"संधीची वाट बघत बसू नका,\nअम्बानिसारखी संधी निर्माण करा.\"\nअतिशय सुंदर एका गरीब घरच्या मुलावर आधारित लघुकथा, ज्याचे वडील दारुडे असतात, त्या वातावरणातून मिळालेल्या संधीचे तो कसे सोने करतो, एका नफ्यातून मिळालेल्या पैशांचा दिवसभरात, शाळेला दांडी न मारता एका मध्ये गुंतवणूक करून ४ व्यवसाय नफ्याचे करून, त्या प्रत्येक व्यवसायामध्ये अगोदरच्या व्यवसायातून मिळालेल्या पैशांना गुंतवत त्याला जोड म्हणून भेटणाऱ्या बोनस हि पुढच्या व्यवसायात गुंतवत ते रात्री झोपेपर्यंत चा हिशोब हा प्रवास दाखवला आहे.\nएका दिवसाचा उद्योजकीय मानसिकतेची, किंवा आर्थिक साक्षर लोक वापर कसा करतात हेही उत्तम रित्या दाखविले आहे.\nज्याचा अगोदरपासून उद्योग व्यवसाय आहे किंवा जे आर्थिक दृष्ट्या साक्षर आहेत त्यांना आशय लगेच समजून येईल. त्याच्या वडिलांमुळे समजून येईल कि माणसाचा स्वभाव घातक असतो ना कि व्यसन. स्वभावाला औषध नाही कारण तो जन्मजात असतो.\nत्यासाठी खालील लघुकथा पूर्ण बघा.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nघफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा\nसंधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण करा\nअपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि य...\nमुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस\nदहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी\n1991 च्या आधी भारतीय कंपन्यांना कृत्रिम संरक्षण दे...\nएमबीए तरुणांचा नोकरीला नकार, भरवला आठवडी बाजार \nकसा झाला शाळा सोडलेल्या आकाशाचा स्वयंपाकी ते सॉफ्ट...\nहा कसला तर्क आहे\nजेव्हा एक बिल्डर किंवा उद्योजक हेल्थकेयर उद्योगमध्...\nमशरुमचं उत्पादन घ्या, महिन्याला लाखो कमवा \nकरोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्या...\nकथा सॅमसंगची - चौकटीबाहेर फक्त एकच पाऊल टाका\nदहा,पंधरा वर्षांपुर्वी महाराष्ट्रात माणसं रहायची प...\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग संपत्ती किंवा पैसे कम...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव मराठी आणि परप्रांतीय मधील फरक मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाह...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते\nकल्पना करा कि तुम्ही हिरा आहात. तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले. तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-09-26T03:09:31Z", "digest": "sha1:DU22BWOLKBL6I77PCNLQCRUZYO5AE5UR", "length": 3461, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भाषाविज्ञान Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nप्रमाणभूत भाषिक धारणांचे पुनर्मूल्यांकन गरजेचे – भाग १\n‘द वायर मराठी’मध्ये १७ मे २०२० रोजी डॉ. दिलीप चव्हाण यांचा ‘मराठी ‘दुर्मीळ’ होऊ नये यासाठी…’ हा लेख प्रकाशित झाला होता. त्या लेखावर चिन्मय धारूरकर यां ...\nशुद्धलेखन आणि स्पृश्यास्पृश्यता यांचा संबंध काय \n‘द वायर मराठी’मध्ये १७ मे २०२० रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. दिलीप चव्हाण यांचा ‘मराठी ‘दुर्मीळ’ होऊ नये य ...\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\nकेंद्राने जीएसटीबाबत कायद्याचे उल्लंघन केले : कॅग\nमाणुसकीचा ‘व्हॉट्स अॅप कॉल’\nआसाम बोर्ड : नेहरु, मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले\nराफेलः ऑफसेट कराराची पूर्तता नाही\nकोसळणाऱ्या इमारती आणि कोडगे राज्यकर्ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/pmp-falling-into-the-metro-pit/", "date_download": "2020-09-26T03:15:03Z", "digest": "sha1:FPFQDQCTRAHH7QJ646ZHTDZWDLXJOBH6", "length": 5850, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पीएमपी मेट्रोच्या खड्ड्यात पडता पडता वाचली", "raw_content": "\nपीएमपी मेट्रोच्या खड्ड्यात पडता पडता वाचली\nबसचे ब्रेक फेल : 15 प्रवाशांचे वाचले प्राण\nबावधन – मेट्रोच्या चाललेल्या कामामुळे वाहतुकीसाठी अतिशय गजबजलेला रस्ता म्हणजे पौड रस्ता. याच गर्दीच्या रस्त्यावर गुरुवारी (दि. 16) पीएमपी बसचे ब्रेक फेल झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेतली. परंतु, त्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू होते. त्याच मेट्रोच्या खड्ड्याच्या एका बाजूला लागून बस अलगद तरंगत राहिली. त्यामुळे बस पत्राच्या सुरक्षित भिंतीमुळे जागेवरच थांबली अन्‌ बस मधील 15 प्रवाशांचे प्राण वाचले.\nपौड रस्ता कायमच गजबजलेला असतो त्यात या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने जो-तो जीव मुठीत घेऊन रस्ता पार करीत असतो. दरम्यान, मेट्रोच्या कामासाठी साधारण 15 ते 20 फुटी मोठमोठे खड्डे घेतले असून त्या खड्ड्याच्या बाजूने सुरक्षित पत्र्यांची भिंत बांधण्यात आली आहे. अशातच मंगळवारी (दि. 16) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पौड रस्त्याने वाट काढत निघालेली पीएमची बस क्रमांक 94 कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन ही शास्त्रीनगरच्या कोथरूड पोलीस ठाण्याच्या समोर आली असता बसचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यावेळी बसमध्ये साधारण 15च्या आसपास प्रवासी होते. बसचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्यावर कोणत्याही परिस्थितीत मोठा अपघात होऊ नये म्हणून बस एका बाजूला घेतली. त्यावेळी संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या पत्र्याला धडकली व चालकाकडील चाक त्या मेट्रोच्या खड्ड्यात अलगद तरंगत थांबल्याने प्रवाशांची सुटकेचा निश्‍वास सोडला.\nनिवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांक उसळले\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२६ सप्टेंबर २०२०)\nलक्षवेधी : केवळ रेटिले बहुमता\nदखल : कांद्याचं रडगाणं\nशाळा क्रमांक 3 अग्रेसर, इतर शाळांचे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dailykesari.com/2020/09/15/you-didnt-count-so-no-one-died-rahul-gandhi-taunts-pm-over-migrants/", "date_download": "2020-09-26T03:22:15Z", "digest": "sha1:DABOANOT5KXT3L3GPU3THT4PNRCLWAFJ", "length": 12531, "nlines": 181, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "मात्र मोदी सरकारला ते नाही कळले - Kesari", "raw_content": "\nघर देश मात्र मोदी सरकारला ते नाही कळले\nमात्र मोदी सरकारला ते नाही कळले\nकाँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. लॉक डाउन दरम्यान प्रवासी मजुरांच्या झालेल्या मृत्यूच्या संख्येची नोंद आपल्याकडे नसल्याचे सरकारने म्हटले होते. यावरून राहुल गांधींनी केंद्रावर हल्लाबोल केला.पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडे लॉकडाउनमध्ये प्रवासी मजुरांच्या झालेल्या मृत्यूच्या संख्येची नोंद नसल्याचे लेखी उत्तराद्वारे सांगितले होते.\n“लॉकडाउनमध्ये किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला आणि किती जणांची नोकरी गेली याची माहिती मोदी सरकारला नाही. तुम्ही मोजले नाही म्हणून मजुरांचे मृत्यू झाले नाही का परंतु सरकारवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यांचे मरण सर्वांनी पाहिले. परंतु एक मोदी सरकार ज्यांना त्याची माहितीही मिळाली नाही,” असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी ट्विटरवरून सरकारवर ताशेरे ओढले. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीं यांची प्रकृती ठिक नसल्याने त्या उपचारासाठी परदेशात गेल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी हे देखील परदेशात गेले आहेत.\nलॉकडाउनच्या कालावधीत आपापल्या राज्यांमध्ये किती प्रवासी मजुर गेले असा सवाल सरकारला करण्यात आला होता. तसंच या कालावधीत किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला होता आणि त्याची नोंद सरकारकडे आहे का असे ही विरोधकांकडून विचारले होते. यावर केंद्रीय श्रममंत्री संतोष कुमार गंगवार यांनी सरकारकडे अशी नोंद नसल्याची नसल्याचे लेखी उत्तराद्वारे सांगितले.\nमोदी सरकार नहीं जानती कि लॉकडाउन में कितने प्रवासी मज़दूर मरे और कितनी नौकरियाँ गयीं\nतुमने ना गिना तो क्या मौत ना हुई\nहाँ मगर दुख है सरकार पे असर ना हुई,\nउनका मरना देखा ज़माने ने,\nएक मोदी सरकार है जिसे ख़बर ना हुई\nपूर्वीचा लेखतब्बल २५ खासदारांना कोरोना\nपुढील लेखएसटीची आजपासून आंतरराज्य प्रवासी वाहतूक\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nतीन टप्प्यांत होणार बिहार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nसीमेवरील दहशतवाद हीच मोठी समस्या\nअणुशास्त्रज्ञ शेखर बसू यांचे निधन\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nबिहार निवडणूक : तीन टप्प्यांत होणार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nबिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली.\nनवनाथ गोरे यांचा खडतर प्रवास होणार सुकर\nभारती विद्यापीठात मिळणार नोकरी\nलोकप्रिय गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले.\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलचा पहिल्याच षटकात पराक्रम\nअतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात\nइशांत शर्मा आणखी दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/maharashtra-ganesha-festival-in-edmonton-canada-127661015.html", "date_download": "2020-09-26T01:18:34Z", "digest": "sha1:ACCETDY4VN3KBWOYOUBGANBBID37RO6Z", "length": 7848, "nlines": 69, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra Ganesha Festival in Edmonton, Canada | कॅनडाच्या एडमंटनमध्ये मराठमाेळा गणेशाेत्सव; सातासमुद्रापार नेटाने जपली गणेशोत्सवाची परंपरा, सामाजिक उपक्रमांवर भर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविदेशातील गणपती:कॅनडाच्या एडमंटनमध्ये मराठमाेळा गणेशाेत्सव; सातासमुद्रापार नेटाने जपली गणेशोत्सवाची परंपरा, सामाजिक उपक्रमांवर भर\nमंडळाचे कार्यकर्तेच तयार करतात गणरायाची मूर्ती\nदेशभरात सध्या गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. परदेशातही या उत्सवाचा उत्साह काही कमी नाही. कॅनडातील एडमंटन या दहा लाख लाेकसंख्या असलेल्या शहरात ४०० मराठी कुटुुंबाच्या वतीने सण साजरा केला जात अाहे. तिथे स्थायिक झालेले मूळचे सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथील सचिन पाटील आणि त्यांचे इतर सहकारी अगदी उल्हासाने सातासमुद्रापारदेखील गणेशोत्सवाची परंपरा नेटाने जपत आहेत.\nसंपूर्ण कॅनडात टोरंटो आणि एडमंटन या दोन शहरातच गणपतीची मंदिरे आहेत. येथील गणेशोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे “श्रीं’ची मूर्ती मंडळाचे कार्यकर्तेच तयार करतात. गणेशोत्सवाच्या आधी काही दिवस गणेशमूर्ती बनवण्याचे मोफत वर्ग चालतात. गणेशोत्सव काळात येथील मंदिरात मराठी लाेकांकडून अन्नदान केले जाते. तसेच जेवणात महाराष्ट्रीय पद्धतीचा मेनू आणि मोदकांचादेखील आवर्जून समावेश असतो.\nमहाराष्ट्र दिन, पाडवा, मकर संक्रांती अन् पायी वारीही काढली जाते\nएडमंटन शहरात मराठी कुटुंबांच्या वतीने सर्व मराठी सण साजरे केले जातात. जानेवारी महिन्यात संक्रांतीसह १ मे महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, दिवाळी, दसरा, वारी अादी सण उत्साहात साजरे केले जातात.\nकाही मंदिरांमध्ये हा उत्सव जल्लाेषात साजरे हाेतात. गणेशाेत्सवाची मिरवणूक शहरात अंदाजे २ ते अडीच तास चालत असते. यंदा मात्र मिरवणूक काढता अाली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.\nएडमंटनची मराठमोळ्या वेशातील गणेश विसर्जन मिरवणूक प्रसिद्ध\nफिल्मी गाणी न वाजवता ढाेल-ताशा या पारंपरिक मराठमाेळ्या वाद्यासह शिस्तबद्ध लेझीम पथक हे येथील गणपती मिरवणुकीचे वैशिष्ट्य अाहे.\nमंगलमय वातावरणात निघणारी ही मिरवणूक पाहण्यास गर्दीही खूप होते आणि भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप दिला जातो.\nया वर्षी मात्र काेराेनाचा प्रसार वाढत असल्याने मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे.\nदरवेळी नवीन उपक्रम; घरगुती गणपती बसवण्यावर भर\nएडमंटनमध्ये अनेक वर्षांपासून गणेशाेत्सव साजरा केला जात अाहे. दरवेळी काही तरी नवीन उपक्रम राबवण्यात येताे. सामाजिक उपक्रमांवर अधिक भर दिला जाताे. यंदा काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मंडळांचा गणपती बसवण्याएेवजी घरगुती गणपती बसवण्याकडे कल अधिक हाेता, अशी माहिती पाटील यांनी दिली. साऊथ एडमंटनमध्ये मराठी कुटुंबे अधिक राहतात. त्यामुळे येथेच जास्त उत्साह असताे.\nदरवर्षी कॅनडातील एडमंटनमध्ये मिरवणूक काढून जल्लोषात उत्सव साजरा केला जातो. पण यंदा कोरोनाचे सावट असल्याने अगदी साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/page/12/", "date_download": "2020-09-26T01:48:45Z", "digest": "sha1:NMZKLZUSMDWQRBAAQAFE674H5EYXNDQ2", "length": 3483, "nlines": 66, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "कविता", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nमन माझे आजही तुझेच गीत गाते\nकधी त्या नजरेतून तुलाच पाहत राहाते\nशोधते कधी मखमली स्पर्शात\nमन वेडे आजही तुझीच वाट पाहते\nआपलं नात अबोल नसावं\nगुळात मिळालेला गोडवा असावं\nतिळगुळ खाऊन मस्त असावं\nफक्त गोड शब्दांचे मोती असावं\nअबोल राहून खूप काही बोलताना\nतिच्याकडे फक्त बघतच रहावं\nडोळ्यात फक्त साठवून घ्यावं\nनसावी कसली भीती तिला\nतिच्यासारखं आपणही बिंधास्त रहावं\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/here-is-how-late-sushant-singh-rajput-was-became-ms-dhoni-127620645.html", "date_download": "2020-09-26T03:04:22Z", "digest": "sha1:YNV4TU6VZCTTK5LOL45L6RBUOLPLECGA", "length": 7785, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Here Is How Late Sushant Singh Rajput Was Became MS Dhoni | महेंद्रसिंग धोनी होण्यासाठी सुशांतने 13 महिने घेतले होते ट्रेनिंग, स्वत: सांगितले होते धोनीसोबतचे साम्य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुशांतचे धोनी कनेक्शन:महेंद्रसिंग धोनी होण्यासाठी सुशांतने 13 महिने घेतले होते ट्रेनिंग, स्वत: सांगितले होते धोनीसोबतचे साम्य\nचार वर्षांपूर्वी सुशांतने पडद्यावर एम.एस. धोनीचे पात्र साकारले होते.\n2016 चा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता 'एम.एस. धोनी '\nकॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. तथापि, तो आयपीएल खेळत राहणार आहे. चार वर्षांपूर्वी, पडद्यावर अभिनेता सुशांत सिंह राजपूत धोनीचे आयुष्य जगला होता. यासाठी त्याला कठोर परिश्रम घ्यावे लागले होता. एका मुलाखतीत स्वतः सुशांतने सांगितले होते की, त्याने धोनी होण्यासाठी 13 महिन्यांचे प्रशिक्षण घेतले होते. इतकेच नव्हे तर त्याचे पात्र पडद्यावर हुबेहुब वठवण्यासाठी त्याने याकाळात तीनदा धोनीची भेट घेतली होती.\nसुशांतने लाइव्ह मिंटला दिलेल्या या मुलाखतीतील महत्त्वाचा भाग...\nमी एक उदाहरण देतो. मी लहान होतो तेव्हा दुपारी अभ्यास करावा लागायचा आणि संध्याकाळी 4:00-5: 30 चा वेळ खेळायचा असायचा. संपूर्ण दिवस यावेळेच्या अवतीभोवती फिरायचा. आम्ही कबड्डी, क्रिकेट, काहीही खेळायचो. तो दीड तास आमच्यासाठी 5 मिनिटांसारखा असायचा. धोनी आणि मी आमच्या आयुष्यातील 4:00–5: 30 वेळ असेच जगलो आहोत. यामुळे मला ओळख मिळाली.\nअनेक तास धोनीकडे बघत राहिलो\nक्रिकेट कौशल्यावर काम सुरू करण्यापूर्वी मी त्याला अनेक तास फक्त बघत राहिलो. माझा हेतू त्याच्या गोष्टी पिकअप करण्याचा होता. शूटच्या वेळी मला त्यांच्याबद्दल विचार करायचा नव्हता. मी 12 महिन्यांच्या तयारीत त्याला तीनदा भेटलो. पहिल्यांदा मी त्याला माझी कहाणी ऐकवली. दुस-यांदा माझ्याजवळ त्याला विचारण्यासाठी 250 हायपोथेटिकल मल्टिपल चॉईस प्रश्न होते. तिस-यांदा मी त्याला स्क्रिप्टबद्दल प्रश्न विचारले. जसे आपण आत्ता काय विचार करीत आहात मी योग्य दिशेने जात आहे की नाही मी योग्य दिशेने जात आहे की नाही हे मी त्याला विचारले.\nकिरण मोरे यांच्याकडे 13 महिन्यांचे प्रशिक्षण घेतले\nमी किरण मोरे (माजी भारतीय विकेटकीपर) आणि व्हिडिओ विश्लेषक यांच्याकडून 13 महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. मी 6 फ्रेममध्ये हेलिकॉप्टर शॉटचा सराव केला. ते (व्हिडिओ विश्लेषक) बॉलिंग मशीन एका जागी ठेवत असे आणि मी दिवसातून 300 वेळा हा शॉट खेळत असे. शॉट परिपूर्ण होईपर्यंत हा क्रम चालू राहायचा.\n2016 चा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता 'धोनी'\n'एम. एस. धोनीः द अनटोल्ड स्टोरी ' हा चित्रपट 30 सप्टेंबर 2016 रोजी प्रदर्शित झाला होता. त्यावर्षीचा हा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. नीरज पांडे दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 133 कोटींची कमाई केली होती. अनुपम खेर, दिशा पाटनी आणि कियारा अडवाणी यांनीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/tag/sex-racket/", "date_download": "2020-09-26T01:58:48Z", "digest": "sha1:4NH6JW3HRTCNWQOXCEOOZURHEFV323WK", "length": 12363, "nlines": 138, "source_domain": "www.saamana.com", "title": "sex racket | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे…\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nओटीटीवर झळकण्याच्या नादात मॉडेल्सचे बोल्ड व्हिडीओ पॉर्नसाईटवर, मोठं रॅकेट उघड\nभाजप आमदाराच्या भावाच्या हॉलमध्ये सेक्स रॅकेट; पोलिसांचा छापा\nदेहविक्रीची तिने कंपनीच उघडली होती, वाचा क्रूर सोनू पंजाबनची भयंकर कहाणी\nपुणे पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मुख्य आरोपी निघाला बँक मॅनेजर\nतब्बल एक हजार मुलींच्या साथीने व्हॉट्सअ‍ॅपवर चालवत होता सेक्स रॅकेट, पोलिसांकडून...\nबंद शटरमागे सुरू होता नंगानाच, पोलिसांनी छापा टाकताच नको ते दृश्य...\nमुंबई पोलिसांची धडक कारवाई, 2 अभिनेत्रींनंतर दिग्दर्शकाला सेक्स रॅकेटप्रकरणी अटक\nमुंबईत सेक्स रॅकेटमध्ये पकडलेल्या अभिनेत्रीचा बिग बॉस स्पर्धकावर गंभीर आरोप\nमुंबईत हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींना अटक\nसेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालांना दणका, समाजसेवा शाखेची कारवाई\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण...\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-26T03:16:03Z", "digest": "sha1:RZR5ZJAU4G2JD6FLLPCVSYZ6Q72C367W", "length": 3696, "nlines": 61, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वर्ग:मराठी कथा - विकिस्रोत", "raw_content": "\nमराठी विकिस्रोतसाठी ह्या लेख पान/विभागाची विकिस्रोत उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिस्रोत चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिस्रोत सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.\nकारण कृपया चर्चापान पहा\nकृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.\n[[वर्ग:मे साचा:देवनागरी मध्ये वगळावयाचे लेख | साचा:देवनागरी]]\nया वर्गात अद्याप एकही लेख किंवा माध्यमे नाहीत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मे २०२० रोजी १४:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/shiv-sainik-pays-tribute-to-balasaheb-thackeray-shivtirth/", "date_download": "2020-09-26T02:52:14Z", "digest": "sha1:4USORIN7F6JDVRZLS5JJ3SUKEZHP7L7K", "length": 16147, "nlines": 166, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक व नेत्यांची गर्दी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nशिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक व नेत्यांची गर्दी\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 93 व्या जन्मदिनी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी व नेतेमंडळींना बाळासाहेबांना अभिवादन केले\nशिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले\nमाहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ\nमाजी मंत्री विनोद तावडे\nराज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला मानवंदना देत अभिवादन केले\nबाळासाहेबांचा भगवा झेंडा व त्यांचा फोटो हातात घेऊन या चिमुकलीने देखील त्यांना अभिवादन केले\nदिव्यांग शिवसैनिक देखील बाळासाहेबांसमोर नतमस्तक झाला.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम खान यांची नावे चर्चेत\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे यांचे आदेश\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम...\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nया बातम्या अवश्य वाचा\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.vereeke.com/marathi-sad-status/", "date_download": "2020-09-26T01:14:16Z", "digest": "sha1:LSQVVIDZ4H3MAFIB54YFRTB3UNVMXT6A", "length": 14749, "nlines": 167, "source_domain": "www.vereeke.com", "title": "Best of Marathi Sad Status, Lines, Quotes and Shayaris - Vereeke", "raw_content": "\nआज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाय\nका कळत नाही तुला माझंही एक मन आहे जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे\nकसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर.\nएक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही, पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही,\nनाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस..\nहवा आमची पण आहे आम्ही दाखवत नाय रक्त आम्ही सुद्धा पाहिलय पण आम्ही गावं गोंधळ करत नाय \nप्रेमाच्या या प्रेमळ हृदयात आज अचानक धडधड झाली, डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी आठवण आली \nआयुष्य खुपच सुंदर आहे फकत unlikers ना घोडा लावला पाहिजे \nभगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा \n# attitude दाखवणारी पोरगी पाटवायची म्हणजे चिखलात बसलेली म्हैस हाकालण्यासारखे आहे……\nते शाळेतील दिवस, पाऊस आल्यानंतर शाळेत जाताना उडालेली ती धांदल, मधल्या सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा, घरी जाताना मुद्दाम हळुवार चालत जाणे, रम्य ते बालपण म्हणतात ते खरेच..\nजर खर ‪#‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…..आवडलाच तर ते खर #प्रेम नाही..\nआपल्या Dp सारखीच आपली Life पन अंधारात गेली आहे, या अंधाऱ्या आयुष्यात कधी काय घडत असत समजतच नाय…\nमी ‪#‎confused‬ झालोय ‪#‎आंबा‬ जास्त गोड का तीची ‪#‎kiss‬ ….\nती म्हणाली ♡‪#‎वेडा‬♡ आहेस तू., मी म्हणालो हो गं ♡‪#‎फक्त_तुझ्यासाठी‬♡\nपाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात…\nकिती सुंदर आहे ना आपल नात,ना तु कधी जोडलस… ना मी कधी तोडल…\nआधी तुझी आठवण आली कि हसायचो मी… आणि आता आठवण आली कि रडु येत गं\nजगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने… आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे…\nयेवुन मिठीत आज म्हणाली, तुझ्या शिवाय काही सुचत नाही, तूच हवास जवळ सारखा, मनाला दुसरं काही रुचत नाही.\nमैत्रीच्या सहवासात, श्रम सारे विसरता येतात, पण खऱ्या मैत्रिणी मिळवण्यासाठी, काहीदा कितीतरी पावसाळे जातात.\nआज मला खूप रडावसं वाटतंय, स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय, भरलेल्या डोळ्याने, आरश्या समोर बसावसं वाटतंय, अन आपलं कोणीच नाही म्हणून, स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय.\nरेमाचं सारं कर्ज फेडलंय मी.. हिशोब उरलाय तो फक्त, तू दिलेल्या जखमांचा.\nमोठं होण्यासाठी कधीतरी, लहान होऊन जगावं लागतं, सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहावं लागतं, मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो, कारण ते ‘वेड’ समजून घेण्यासाठी, कधीतरी मनापासून ‘प्रेम’ करावं लागतं…\nप्रेम करायचं म्हणाल तर, कुणाशीही जमत नाही.. मनासारख्या जोडीदारा शिवाय, संसारात मन रमत नाही…\nआई बाबांचे आयुष्य जाते, मुलाचे आयुष्य घडवण्यात.. आणि मुलगा स्टेटस ठेवतोय, “माय वाइफ इज माय लाईफ”\nरक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसताना ही जी बंधंन जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.\nखुप प्रेम केल मी तुझ्यावर, मन माझ तुला कधी कळलंच नाही, जीवाला जीव लागेल अस नात आपल कधी जुळलंच नाही.\nदुःख या गोष्टीच वाटत नाही कि काही व्यक्ती गरजेपुरते नात जोडतात, दुःख तर या गोष्टीच वाटत आपल्याच स्पेशल व्यक्ती आपल्याला इग्नोर करतात..\nवाटलं‪ ‎तिच्यावरती ‬प्रेम करुन, नक्की कुठेतरी मी ‪‎चुकलो ‬होतो\nतू कोणाच्या भरवश्या वर मला एकट 🙁 सोडून गेलीस, एव्हड्या भरलेल्या जगात पोरक करुण गेलीस, इथ तर लोक फक्त मतलबा 🙁 पुरत जवळ येतात, या अश्या दुनियेत एकट 🙁 सोडून गेलीस..\nडोळ्यातून अश्रु ओघळला की तोही आपला राहत नाही वाईट याचंच वाटतं की दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही\nवेडा झालो तुझ्यासाठी सांभाळून मला घेशिल का. #प्रेम करीन तुझ्यावर सात मला देशिल का…\nतु नाते तोडले तरी मी ते तोडले नाही… दोघांनी लावलेल्या प्रेमाच्या रोपाला मी अजूनही पाणी देणे सोडले नाही…\nमुलगा: मला तुझावर खूप प्रेम आहे…चल ना कुठेतरी जाऊया.. मुलगी: इथून लवकर पळ नाहीतर इतकी जोरात लाथ मारेल कि सारसबागेत पोचशील डायरेक्ट मुलगा: थोडी कमी जोरात मार न, टिळक रोडवर काम आहे एक… मुलगा: थोडी कमी जोरात मार न, टिळक रोडवर काम आहे एक…\nकाच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत ….. कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती .. :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://letstalksexuality.com/tag/physical-intimacy/", "date_download": "2020-09-26T00:59:05Z", "digest": "sha1:C52EQF3WRILEMUQS32KUB23J4NBR5CQ5", "length": 9009, "nlines": 145, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "physical intimacy – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nप्रेम करण्यासाठी डोळे नाही स्पर्शच महत्त्वाचा असतो\nपीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी\nप्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २\nलैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार\nलॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……\nपुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट\nजननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १\nFAQ - प्रश्न मनातले\nFAQ – प्रश्न मनातले\nलैंगिक क्रिया लैंगिक भावनेशी संबंधित आहे. आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा काही जणांकडे आकर्षित होतो. या भावना आपल्याला व्यक्त कराव्याशा वाटतात. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आकर्षण वाटत असतं, त्या व्यक्तीबरोबर असताना किंवा तिचा/त्याचा विचार करत…\nFAQ - प्रश्न मनातले\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nमदनमणी,योनीभगोष्ट आणि मदनबिंदू म्हणजे काय ते योनीत कुठे असतात\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nअविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/6-new-made-in-india-smarttv-launches-price-begins-at-rs-11990/articleshow/77371126.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2020-09-26T01:53:21Z", "digest": "sha1:W6DA4SFQJ342CWPVV5IGUNPYMBVBOR6L", "length": 14524, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n६ नवीन मेड इन इंडिया Smart TV लाँच, किंमत ११,९९० पासून सुरू\nमेड इन चायना उत्पादनाला भारतात बहिष्कार टाकला जात आहे. त्यामुळे मेड इन इंडियाच्या प्रोडक्टची मागणी वाढली आहे. देशात आता मेड इन इंडिया मोबाईल आणि टीव्ही लाँच केले जात आहे. आता टीव्ही मेकर कंपनी Hisense ने भारतात ६ नवीन मेड इन इंडिया टीव्ही लाँच केले आहेत.\nनवी दिल्लीः टीव्ही मेकर कंपनी Hisense ने भारतात ६ नवीन मेड इन इंडिया टीव्ही लाँच केले आहेत. याची किंमत ११ हजार ९९० रुपयांपासून ते ३३ हजार ९९० रुपयांपर्यत आहे. ग्राहकांना हे टीव्ही अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, TataCliq, आणि रिलायन्स डिजिटल वरून खरेदी करता येवू शकते. याची विक्री ६ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. या ६ अल्ट्रा एचडी आणि अँड्रॉयड टीव्ही शिवाय कंपनी तीन आणखी मॉडल घेऊन येण्याची शक्यता आहे. कंपनी ६ ते ९ ऑगस्ट दरम्यान आपल्या टीव्हीवर ५ वर्षाची वॉरंटी देत आहे.\nवाचाः 7000mAh बॅटरीच्या सॅमसंगच्या या फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग\nकंपनीने Hisense A71F सीरीज अंतर्गत तीन ४के डिस्प्ले आणि Hisense A56E सीरीज अंतर्गत तीन फुल एचडी डिस्प्लेचे टीव्ही लाँच केले आहेत. ३२ इंचाच्या फुल एचडी टीव्हीची किंमत ११ हजार ९९० रुपये, ४० इंचाचा फुल एचडी डिस्प्लेच्या टीव्हीची किंमत १८ हजार ९९० रुपये आणि ४३ इंचाच्या मॉडलची किंमत २० हजार ९९० रुपये आहे. तर ४के सीरीजमध्ये ४३ इंचाच्या मॉडलची किंमत २४ हजार ९९० रुपये, ५० इंचाच्या मॉडलची किंमत २९ हजार ९९० रुपये आणि ५५ इंचाच्या मॉडलची किंमत ३३ हजार ९९० रुपये आहे.\nवाचाः सॅमसंगच्या जबरदस्त टीव्हीवर EMI चा पर्याय आणि १० हजारांचा स्पेशल डिस्काउंट\nHisense 4K TV पॅनल्स मध्ये डॉल्बी एचडीआर टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे जबरदस्त पिक्चर क्वॉलिटी मिळते. जबरदस्त साउंडसाठी यात डॉल्बी एटमॉसचा सपोर्ट मिळतो. वेगवान कनेक्टिविटीसाठी यात ड्यूल बँड वायफाय सपोर्ट देण्यात आला आहे. सर्व टीव्ही अँड्रॉयड टीव्ही ९.० वर काम करतात. गुगल असिस्टेंट व गुगल प्ले स्टोरसोबत येतात.\nवाचाः शाओमी घेऊन येतेय रिमूव्हेबल डिस्प्लेचा स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nयात बिल्ट इन क्रोमकास्ट आणि व्हाईस वर काम करणारा रिमोट देण्यात आला आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही ब्लूटूथ हेडफोन सुद्धा कनेक्ट करू शकता. ४के टीव्ही रेंड मध्ये बेजल लेस डिझाइन दिली आहे. तसेच हे अल्ट्रा डिमिंग टेक्नोलॉजी सोबत येते. ३२ इंचाचा मॉडलमध्ये २० वॉट स्पीकर्स, ४३ इंचाच्या मॉडलमद्ये २४ वॉट स्पीकर्स, ५० इंच आणि त्यापेक्षा मोठ्या मॉडलमध्ये ३० वॉट साउंड आउटपूट मिळणार आहे.\nवाचाः गुगलचा स्वस्त फोन Pixel 4a लाँच, फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या\nवाचाः ६ ऑगस्टपासून सेल; फोनवर ४० टक्के तर TVवर ५० टक्के सूट\nवाचाः e-SIM फ्रॉडमध्ये लुटले २१ लाख रुपये, तुम्ही अशी काळजी घ्या\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे...\nजबरदस्त फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनसह Vivo Watch झाली ला...\nगुगलचे पद्मश्री आरती साहा यांच्या जयंतीनिमित्त खास डूडल...\nफ्लिपकार्टवर सेलः टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीनवर ७५ ...\n तापमान मोजतोय टचलेस स्कॅनर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nकार-बाइकदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी\nमोबाइल४.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास\nकरिअर न्यूजविद्यापीठाच्या ATKT परीक्षेला तांत्रिक अडचणीचा फटका\nदेश'चीन, पाकला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद भारतीय हवाई दलात'\nअर्थवृत्तसोने दरात घसरण सुरूच; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त\nदेशUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने बहिष्कार घालत दिले चोख उत्तर\nआयपीएलChennai vs Delhi: पृथ्वी सावने केली गोलंदाजाची धुलाई, चेन्नईपुढे मोठे आव्हान\nविदेश वृत्तचीनला वेसण घालणार जपानच्या पंतप्रधानांची भारताला साद\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/photogallery/lifestyle/this-food-dont-eat-on-emty-stomac-in-morning/photoshow/70932210.cms", "date_download": "2020-09-26T02:51:37Z", "digest": "sha1:VRT6RD3PHACOWRTOO2T3A4THROHRRBOE", "length": 8376, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउपाशीपोटी हे पदार्थ खाणे टाळणेच बरे\nउपाशीपोटी हे पदार्थ खाणे धोकादायक\nअसे म्हणतात की, सकाळची सुरुवात योग्य असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. हीच गोष्ट पोटाला देखील लागू होते. जर तुम्ही सकाळी योग्य पदार्थ खाल्ले तर दिवसभर एनर्जी मिळते. परंतु, जर तुम्ही उपाशीपोटी काही पदार्थ खाल्ल्यास तुम्हाला दिवसभर आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. पाहुयात, असे पदार्थ जे उपाशीपोटी खाल्ल्यास ठरू शकतात त्रासदायक...\n​दही किंवा आंबलेल्या दुधाचे पदार्थ\nदही किंवा आंबलेल्या दुधाचे पदार्थ उपाशी पोटी खाल्याने आतड्यात हायड्रोक्लोरिक ऑसिड तयार होते. तसेच पोटात असलेल्या लॅक्टिक अॅसिडही नष्ट करते. यामुळे अॅसिडिटीच्या समस्या उद्भवतात आणि पोटात जळजळ, वेदना होतात.\nबरेच लोक उपाशी पोटी केळी खातात. परंतु, हे करणे चुकीचे आहे. केळ्यात मॅग्नेशियम आणि पोटॉशियम अधिक प्रमाणात असते. रक्तामध्ये हा घटक अगोदरच असल्याने उपाशी पोटी केळं खाल्ल्याने अस्वस्थता, उलट्या आणि अतिसारासारख्या समस्या उद्भवू शकतात.\nटमॅटोमध्ये व्हिटॅमिन सीसह अनेक पोषक तत्त्वे असतात. परंतु उपाशी पोटी टोमॅटो खाणे टाळले पाहिजे. टोमॅटोमुळे पोटातील टॅनिक अॅसिडचे प्रमाण वाढवते. असे झाल्याने पोटात वायू पकडतो.\nपेर या फळात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फिनोलिक कंपाउंड, फोलेट, फायबर, तांबे आणि मॅंगनीज असते. परंतु हे फळ उपाशी पोटी खाण्याने शरीराला अंतर्गत नुकसान होऊ शकते. तसेच कोरड्या त्वचेला सुरक्षित ठेवणाऱ्या म्युकस मेम्ब्रेनलाही हानी पोहचवते.\nसंत्री, मोसंबी, लिंबू यांसारख्या फळात आम्ल असते. म्हणूनच उपाशी पोटी या फळांचे सेवन केल्याने छातीत जळजळ आणि जठरासंबंधी समस्या उद्भवू शकतात.\nसलॅडमुळे आपल्या पोटात फायबरचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पोटावर जोर येऊन टॉरशन, गॅस, छातीत जळजळ यांसारख्या समस्या सुरू होते. एवढेच नाही तर उपाशी पोटी सलॅड खाल्ल्याने अस्वस्थता आणि उलट्या देखील होऊ शकतात.\nबरेच लोक सकाळी चहा किंवा कॉफीचे सेवन करतात, परंतु हे पेय उपाशी पोटी घेणे शरीरासाठी चांगले नसते. उपाशी पोटी कॉफी किंवा चहा प्यायल्याने जठरासंबंधी आणि पचनासंबंधी समस्या उद्भवतात.ज्यामुळे अ‍ॅसिड आणि गॅस तयार होतात. ही समस्या औषधे घेतल्याशिवाय बरे होत नाही.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपावसाळ्यातही चढेल प्रणयाचा रंगपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/video/news/karnataka-elections-congress-will-win-alone-wont-need-to-ally-with-jds-says-siddaramaiah/videoshow/64027989.cms", "date_download": "2020-09-26T03:20:26Z", "digest": "sha1:PZS633KSDSUW2EQZDUHZ2PGB6M4ECC75", "length": 9011, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकाँग्रेस बहुमताने निवडून येईल, सिद्धारामय्यांचा दावा\nकाँग्रेस बहुमताने निवडून येईल, असा दावा मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी केला आहे.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न...\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २६ सप्टेंबर २०२०\nन्यूजड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nन्यूजबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\n आज कोण ठरणार सरस\nन्यूजमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nन्यूजबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\nन्यूज'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nन्यूजसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nन्यूजशहीद जवान नरेश बडोलेंना काश्मीरात वीरमरण\nन्यूजकृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचं देशव्यापी आंदोलन\nन्यूजभाजप हा एकसंध आणि एक संघ आहे - विनोद तावडे\nहेल्थफिट राहण्यासाठी या सोप्या आसनांचा करा अभ्यास\nन्यूजराज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिटकून बसणारे सरकार - राम शिंदे\nन्यूज'भारत बंद'ची हाक देणारे शेतकरी विरोधी- राम शिंदे\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २५ सप्टेंबर २०२०\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5", "date_download": "2020-09-26T02:39:54Z", "digest": "sha1:EGJZEYVFPDAJLEYR67OO62WVQYKGBYD5", "length": 8854, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिव्ह रिडले कासव - विकिपीडिया", "raw_content": "\nऑलिव्ह रिडले कासव (इंग्लिश:Olive Ridley Turtle; शास्त्रीय नाव:Lepidochelys olivacea) हा एक भूपृष्ठवंशीय प्राणी आहे.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nकोठे आढळतात- जगभरातील उष्णकटिबंधीय किनारे,भारतात सुंदरबन (दलदलीच्या प्रदेशानजीक)आढळते.\nप्राकृतिक अधिवास- उष्ण कटिबंध व उपोष्ण कटिबंध\nआकार- फारसे खडबडीत नसलेले, पसरट व तंबूच्या आकाराचे. पार्श्वकांच्या 5 किंवा जास्त जोड्या.\nअधरत्वर्म (Plastron) - पिवळसर व दोन्ही बाजूला छिद्र असलेले.\nडोक्याचा आकार- मोठे, त्रिकोणी आकाराचे, वरचा जबडा अंकुशाकार\nपाय- पाय वल्ह्यासारखे व पुढील प्रत्येक पायावर एक नख\nखाद्य- मृदुकाय प्राणी, जेली फिश इ.\nवीणीचा काळ- ह्या कासवांचा वीणीचा काळ वर्षभर प्रामुख्याने नोव्हेंबर ते मार्च असा असतो. साधारणतः रात्रीच्या वेळी मादी अंडी घालते. एका वीणीच्या हंगामात 1ते3 वेळा साधारणतः 20 ते 28 दिवसांच्या अंतराने अंडी घातली जातात. एका वेळी 100 ते 200 अंडी घातली जातात. दोन वीण हंगामातील अंतर 1 ते 2 वर्षे एवढे असते.45 ते 55 दिवसांत अंडी नैसर्गिक रित्या उबतात.\nसद्यस्थिती - कातडी व तेल काढण्यासाठी प्रौढ कासवांची हत्या केली जाते. अंड्यांचा खाद्य म्हणून उपयोग केला जातो.अंडी घालण्याच्या किनाऱ्यावरील जागांचा विनाश यामुळे ही जात संकटात आहे. भारतीय वन्य जीव (संरक्षण) कायदा 1972 मधील अनुसूची -1 अन्वये संरक्षित या प्राण्याचा अधिवास पाण्यात असला तरी तो श्वाशोच्छवास नाकानेच करतो.त्यासाठी त्याला वरचेवर जलपृष्ठावर यावे लागतो.फुप्फुसांची हवा साठवणूकक्षमता अधिक असल्यामुळे दोन श्वासातील अंतर अधिक असते. त्यामुळे तो उभयचर वर्गात मोडत नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑक्टोबर २०१९ रोजी १९:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-grants-leave-seeks-bribe-issue-bill-junior-assistant-bdo-remanded-judicial-custody", "date_download": "2020-09-26T02:41:46Z", "digest": "sha1:BVBF52GLV745M3OL4BJXQDZDGJI366KW", "length": 13685, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "सुटी मंजुर करुन बिल काढण्यासाठी मागितली लाच, बीडीओसह कनिष्ठ सहाय्यकाला न्यायालयीन कोठडी | eSakal", "raw_content": "\nसुटी मंजुर करुन बिल काढण्यासाठी मागितली लाच, बीडीओसह कनिष्ठ सहाय्यकाला न्यायालयीन कोठडी\nपंचायत समिती बार्शीटाकळीत प्रभारी गट विकास अधिकारी (बीडीओ) पदी कार्यरत गोपाल राजाराम बोंडे (वय ५६) व पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक अनंत तुळशीराम राठोड (वय ३९) यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी (ता. १०) अटक करण्यात आली होती. सदर दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.\nअकोला : पंचायत समिती बार्शीटाकळीत प्रभारी गट विकास अधिकारी (बीडीओ) पदी कार्यरत गोपाल राजाराम बोंडे (वय ५६) व पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक अनंत तुळशीराम राठोड (वय ३९) यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी (ता. १०) अटक करण्यात आली होती. सदर दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.\nबार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये कार्यरत तक्रारदार यांच्या रजेच्या कालावधीमधील रजा मंजूर करुन बिल मंजूर करण्याकरिता बार्शीटाकळीचे प्रभारी बीडीओ आरोपी गोपाल बोंडे व कनिष्ठ सहाय्यक अनंत राठोड यांनी तक्रारदाराला १५ हजार रुपयांची मागणी केली होती.\nत्यामुळे तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली असता आरोपी कनिष्ठ सहाय्यक अनंत तुळशीराम राठोड याला लाच घेताना अटक केली होती. सदर दोन्ही आरोपींना शुक्रवारी (ता. ११) न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदलालांची दुकाने बंद झाल्याने तीळपापड; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची विरोधकांवर टीका\nउरुळी कांचन (पुणे) : नरेंद्र मोदी सरकारने कृषी विधेयक अंमलात आणून शेतकऱ्यांना दलालांपासून मुक्ती मिळवून दिली आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना...\n\"तो कर्मचारी अधिकाऱ्यांना पैसे पुरवितो का' सोलापूर \"झेडपी'त प्रशासनावर हल्लाबोल\nसोलापूर ः जिल्हा परिषदेमध्ये शासनाच्या नियमानुसार एक कर्मचारी एका टेबलवर तीन वर्ष व एका विभागात पाच वर्ष राहू शकतो. असे असतानाही अर्थ विभागात एक...\nऔशातील अवैध धंद्यांना अभय तरुणाई झाली कंगाल, पालकमंत्री अमित देशमुख देणार का लक्ष\nऔसा (जि.लातूर) : हप्तेखोरीच्या विरोधात आक्रमक असलेले तत्कालीन विरोधी पक्षातील आमदार म्हणून आमदार अमित देशमुख यांनी जिल्ह्यात वाळु, मटका, गुटखा...\nचाकूर पंचायत समितीत प्रभारीराज, नागरिकांनी जायचे कुठे\nचाकूर (जि.लातूर) : तालूक्याचा कारभार हाकणाऱ्या पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यापासून गटशिक्षणाधिकारी, पशुधनविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास...\nसांगोला तालुक्‍यातील पशुवैद्यकीय विभागात 21 पदे रिक्त साथीच्या रोगाने पशूंचे आरोग्यच धोक्‍यात\nसांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यात पशुवैद्यकीय विभागात 65 पदे मंजूर असून, 44 पदे भरली आहेत तर 21 पदे रिक्त आहेत. तालुक्‍यात लाखोच्या संख्येने...\nसहा महिन्यांपासून निधी न मिळाल्याने भंडारा जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांचे स्वप्न अधुरेच\nसिहोरा (जि. भंडारा) : तुमसर पंचायत समितीअंतर्गत ९७ ग्रामपंचायतींमधील रमाई आवास योजनेच्या दोन हजारांहून अधिक घरकुलांचे हप्ते सहा महिन्यांपासून रखडले...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/sharad-pawar-solapur-sunday-review-corona-322606", "date_download": "2020-09-26T02:00:53Z", "digest": "sha1:EAKJXNDHFY7CEND4JF4C73U5EQKWEBX5", "length": 16625, "nlines": 299, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार रविवारी सोलापुरात | eSakal", "raw_content": "\nकोरोनाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार रविवारी सोलापुरात\nखासदार शरद पवार यांचा रविवारचा सविस्तर सोलापूर दौरा अद्याप आलेला नाही. खासदार पवार यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. कोरोनाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह अथवा नियोजन भवन या ठिकाणी होण्याची शक्‍यता आहे.\n- बळिराम साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, सोलापूर\nसोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोलापूर शहर व परिसरातील काही गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सोलापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार रविवारी (ता. 19) सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत.\nसोलापूर जिल्हा आणि शरद पवार यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे नाते आहे. दुष्काळ असो की इतर कोणतेही संकट सोलापूरकरांच्या मदतीला शरद पवार धावून येत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. सोलापूर जिल्ह्यात विशेषतः: सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सोलापुरातील कोरोना स्थितीचा व कोरोना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार पवार रविवारी सोलापुरात येत आहेत.\nजिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील कोरोना रोखण्यासाठी खासदार शरद पवार जिल्हा प्रशासनाला काय सूचना देतात राज्याच्या मदतीसोबतच केंद्र सरकारची काही मदत सोलापूरला देण्यासाठी खासदार पवार काही निर्णय घेतात का राज्याच्या मदतीसोबतच केंद्र सरकारची काही मदत सोलापूरला देण्यासाठी खासदार पवार काही निर्णय घेतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आतापर्यंत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरचा दौरा केला आहे. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे आठवड्यातून एकदा सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत.\nपालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केली होती विनंती\nखासदार पवार यांनी सोलापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी सोलापूरचा दौरा करावा अशी विनंती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केली होती. त्यानुसार हा दौरा होत आहे. सोलापूरच्या लॉकडाऊनबाबतही पालकमंत्री भरणे यांनी खासदार पवार यांना कल्पना दिली होती. सोलापूरच्या लॉकडाऊनबाबत जाब विचारल्याच्या सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट चुकीच्या आहेत.\n- संतोष पवार, कार्याध्यक्ष, सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nधर्मवीर संभाजीराजे तलावातील पाणी तपासणी गुजरातच्या कंपनीसाठी मोजले 16 लाख\nसोलापूर : कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या धर्तीवर सोलापुरातील श्री धर्मवीर संभाजीराजे तलावाचे सुशोभिकरण केले जात आहे. त्यासाठी साडेसात कोटींचा खर्च...\nधर्मवीर संभाजीराजे तलावातील पाणी तपासणी गुजरातच्या कंपनीसाठी मोजले 16 लाख\nसोलापूर : कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या धर्तीवर सोलापुरातील श्री धर्मवीर संभाजीराजे तलावाचे सुशोभिकरण केले जात आहे. त्यासाठी साडेसात कोटींचा खर्च...\nचाळीसगाव तहसील कार्यालयात लाच घेणाऱया लिपीकाला एसीबीने केली अटक\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव): बहिणीच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या उताऱ्यावरील वारसाचे नाव कमी करण्याच्या मोबदल्यात सुमारे 11 हजार रूपयांची लाच...\nसकाळ इम्पॅक्ट : अखेर निफाडला अँटीजेन चाचणी सुरु; जिल्हा परिषद अध्यक्षांकडून दखल\nनाशिक/ निफाड : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता तालुक्यात कोरोना अँटीजेन चाचणी सुरू करण्यात आल्या आहेत. तालुक्यात १७ सप्टेंबर पासून...\nकोरोना योध्दांना अशीही आदरांजली; दळवींचा सायकलीने ४ हजार ‘किमी’चा प्रवास\nजळगाव ः शहीद जवान तसेच कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य बजावताना कोरोनाचे बळी ठरलेले डॉक्टर्स व नर्सेस या कोरोना योद्ध्यांना एक आदरांजली म्हणून अजित...\nमराठा आरक्षण : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष नाशिकच्या राज्यव्यापी बैठकीकडे\nनाशिक: (पंचवटी) सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती, त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने युवकांसाठी घेतलेल्या निर्णयाच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/woman-asked-for-a-divorce-as-her-husband-was-not-arguing-abn-97-2251861/", "date_download": "2020-09-26T03:24:06Z", "digest": "sha1:GVACSCJKCKLM3545VUD64X7ZPDWLHY72", "length": 13371, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "woman asked for a divorce as her husband was not arguing abn 97 | अरेच्चा, हे काय! पती भांडणच करत नाही म्हणून महिलेनं मागितला घटस्फोट | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n पती भांडणच करत नाही म्हणून महिलेनं मागितला घटस्फोट\n पती भांडणच करत नाही म्हणून महिलेनं मागितला घटस्फोट\nमाझ्या नवऱ्याचे इतकं प्रेम मी सहन करू शकत नाही असं या महिलेने सांगितले आहे.\nघर म्हटलं की भांड्याला भांडं लागतच. त्यातून नवरा बायकोच्या कुरबुरी तर नित्याच्याच. कधी कधी तर दोघांमधील वाद टोकाला जाऊन, संसारही मोडल्याचं अनेकवेळा ऐकायला मिळत. पण, पती भांडणच करत नाही म्हणून घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं कधी ऐकलंय का पण हे घडलं आहे. उत्तर प्रदेशातील एका महिलेनं पती भांडणच करत नाही, अशी तक्रार करत एका महिलेनं घटस्फोट मागितला आहे. विशेष म्हणजे तिच्या लग्नाला केवळ १८ महिनेच झाले आहेत.\nउत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या महिलेने घटस्फोटासाठी शरिया कोर्टात अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल केल्यानंतर शरिया कोर्टानं घटस्फोटचं कारण जाणून घेतलं. घटस्फोट घेण्याचं कारण ऐकून मौलवीही चक्रावून गेले. त्यानंतर मौलवींनी महिलेची मागणी निर्थरक असल्याचं सांगत अर्ज फेटाळून लावला. दैनिक जागरणने या संदर्भात वृत्त दिले आहे.\nआणखी वाचा- नाकाबंदीत पोलिसांनी मागितलं ID, एका फोनवर त्याने परिसराचा वीजपुरवठाच खंडित केला\nजेव्हा मौलवीने या याचिकेवर निर्णय घेण्यास नकार दिला, तेव्हा हे प्रकरण स्थानिक पंचायतीकडे गेले. त्यांनीही या प्रकरणावर निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली. “माझ्या नवऱ्याचे इतकं प्रेम आपण सहन करू शकत नाही. कधीही माझ्यावर ओरडत नाही. कोणत्याही गोष्टीसाठी मला नकार देत नाही. कधी कधी माझ्यासाठी जेवण ही बनवतो आणि घरकामात मदत देखील करतो. माझ्याशी भांडण करत नाही”, अशी तक्रार या महिलेन शरिया कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केली होती.\nआणखी वाचा- रागाचा कडेलोट घरगुती भांडणातून पत्नी आणि सासूची हत्या करत गच्चीवरुन फेकलं खाली\nमहिलेनं सांगितले की, ‘माझ्य़ाकडून कोणतीही चूक झाली तरी माझ्यावर ओरडत नाही. पती नेहमी मला माफ करुन टाकतो. मला त्याच्याशी भांडण करायचं असतं. त्यामुळे मला असे आयुष्य नकोय की जिथे पती प्रत्येक गोष्टीसाठी सहमत असेल,” अशी तक्रार महिलेनं केली आहे. दरम्यान, पत्नीला नेहमी आनंदी ठेवण्याची इच्छा आहे असे महिलेच्या पतीने सांगितले. कोर्टातून घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्याची त्याने विनंती केली आहे. कोर्टाने आता दोघांना परस्पर सहमतीनं हा प्रश्न सोडवायला सांगितले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 Coronavirus Vaccine: पहिला मान योद्ध्यांचा; सैन्याला पहिले ५० लाख डोस देण्याचा मोदी सरकारचा विचार\n2 करोनाबाधितांची संख्या २९ लाखांच्या पुढे; चोवीस तासात आढळले ६८,८९८ नवे रुग्ण\n3 नोकरी गमावलेल्यांना ९० दिवसांचा अर्धा पगार मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/chief-selector-msk-prasad-ms-dhoni-1539984/", "date_download": "2020-09-26T03:24:30Z", "digest": "sha1:FWCVCKKG63AE5W6AT6ESR4SZN6IHLZN3", "length": 14638, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chief selector MSK Prasad MS Dhoni | धोनीच्या जिद्दीचे एमएसके प्रसाद यांच्याकडून कौतुक | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nधोनीच्या जिद्दीचे एमएसके प्रसाद यांच्याकडून कौतुक\nधोनीच्या जिद्दीचे एमएसके प्रसाद यांच्याकडून कौतुक\nगेल्या वर्षी आशिया चषकात भारताचा क्रिकेटचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होता.\nगेल्या वर्षी आशिया चषकात भारताचा क्रिकेटचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होता. पण त्यावेळी असलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी दुखापतग्रस्त होता. व्यायामशाळेत वजन उचलताना तो पडला. नशिबाने वजन त्याच्या अंगावर पडले नाही. त्यानंतर त्याला चालताही येत नव्हते. दुखापत गंभीर होती. त्यामुळे तो या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत साशंकता होती. त्याचा पर्याय म्हणून बदली यष्टीरक्षक खेळवण्याचा विचार निवड समिती सदस्यांच्या मनात होता. त्यांनी आपला विचार धोनीला सांगितला. पण धोनीने ठामपणे सांगितले, ‘माझा एक पाय दुखावला असेल, पण काहीही झाले तरी मी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणारच.’ या सामन्यात तो खेळला आणि फक्त खेळला नाही तर आपल्या नेतृत्वाखाली भारताला पाकिस्तावर विजयही मिळवून दिला. त्याच्या या जिद्दीचे कौतुक निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी एका कार्यक्रमात केले.\nरविवारी रात्री तामिळनाडूच्या क्रीडा पत्रकार संघटनेने वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रसाद यांना आमंत्रित केले होते. यावेळी प्रसाद यांनी या आठवणीला उजाळा दिला. ढाका येथे फेब्रुवारी २०१६मध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध सामना खेळवण्यात आला होता.\n‘पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे तू खेळू शकत नसशील तर आम्ही पर्यायी व्यवस्था करू शकतो, असे आम्ही धोनीला सुचवले होते. त्यावर धोनी म्हणाला की, माझा एक पाय दुखावला असला तरी मी या सामन्यात नक्कीच खेळणार आणि माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. धोनीचे हे वाक्य ऐकल्यावर आम्ही सारी जबाबदारी त्याच्यावर सोपवली आणि त्यानेही आमच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. पूर्णपणे व्यावसायिकपणे त्याने या सामन्यात खेळ केला आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने विजय मिळवला,’ असे प्रसाद म्हणाले.\nया दुखापतीबद्दल प्रसाद यांनी सांगितले की, ‘धोनी सामन्याच्या दोन दिवसांपूर्वी व्यायामशाळेत सराव करत होता. त्यावेळी वजनाचा भार त्याला पेलवला नाही आणि तो अचानक वजनासहित जमिनीवर कोसळला. त्याचे नशीब बलवत्तर म्हणून ते वजन त्याच्या अंगावर पडले नाही. पण या प्रकारानंतर त्याला चालताही येत नव्हते. तो रांगत होता. त्यावेळी त्याच्यासाठी ‘स्ट्रेचर’ बोलवावे लागले होते. त्यानंतर मी त्याच्या हॉटेलमधील खोलीमध्ये गेलो. त्याला दुखापतीबद्दल विचारणा केली. त्यावर धोनीने मी तंदुरुस्त असल्याचे सांगितले.’\nधोनीच्या जागी पार्थिव पटेलला स्थान देण्याचा विचार निवड समिती करत होती. हे बहुदा धोनीला समजले आणि त्याने प्रसाद यांना भेटीसाठी बोलावले. या भेटीमध्ये धोनी प्रसाद यांना म्हणाला की, ‘तुम्ही माझी एवढी काळजी का करता मी तंदुरुस्त आहे. माझा एक पाय दुखावला असेलही, पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ड्रेसिंगरूममध्ये बसणार नाही. मी पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत खेळणार.’\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 ‘बिंदगीहाळ पॅटर्न’मुळे आता ‘चक दे लातूर’\n2 अखेरच्या क्षणी हातून सामना निसटला\n3 ला लिगा स्पर्धेत औस्मन डेम्बेले ठरला नेमारनंतर सर्वात महागडा खेळाडू\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-won-the-opening-in-saff-football-championship-1178171/", "date_download": "2020-09-26T02:49:56Z", "digest": "sha1:T2ZTDXOLYCSO3VKX3TGDYMZRPO2ZTRB5", "length": 10825, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भारताची विजयी सलामी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nभारतीय संघाने दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (सॅफ) अजिंक्यपद स्पर्धेत विजयाने सुरुवात केली.\nचेंडूवर ताबा मिळवून श्रीलंकेच्या खेळाडूंना रॉबीन सिंगने दिलेला चकवा\nसॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा\nभारतीय संघाने दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (सॅफ) अजिंक्यपद स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. रॉबिन सिंगच्या दोन गोलच्या जोरावर भारताने त्रिवंद्रूम आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या लढतीत श्रीलंकेवर २-० असा सोपा विजय मिळवला.\nफिफा २०१८च्या फुटबॉल विश्वचषक स्पध्रेच्या पात्रता फेरीतील निराशाजनक कामगिरीनंतर येथे दाखल झालेल्या भारतासाठी हा विजय प्रोत्साहन देणारा आहे. सहा वेळा सॅफ स्पध्रेचे जेतेपद पटकावणारा भारतीय संघ पुढील लढतीत याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी आतुर आहे. पहिले सत्र गोलशून्य राहिल्यानंतर दोन्ही संघांनी आकर्षक खेळ केला. २५ वर्षीय रॉबिनने दुसऱ्या सत्रात ५१व्या मिनिटाला सुनील छेत्रीच्या पासवर भारतासाठी पहिला गोल केला. या गोलनंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारताने दमदार खेळ केला. ७३व्या मिनिटाला छेत्रीने हेडरद्वारे टोलावलेला चेंडू पुन्हा एकदा रॉबिनने अचूकपणे गोलजाळीत टाकून भारताची आघाडी दुप्पट केली. तत्पूर्वी, संजू प्रधान आणि जेजे लॅल्पेखलुआ यांना मिळालेल्या संधीवर गोल करण्यात अपयश आल्याने भारताला २-० अशा विजयावरच समाधान मानावे लागले. रविवारी भारतासमोर नेपाळचे आव्हान असणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 दिल्ली विश्वचषक लढतींचे आयोजन गमावणार\n2 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर\n3 भारतीय संघ जुलैत वेस्ट इंडिज दौऱ्यावर\n\"Mr. Gavaskar तुम्हाला वाटत नाही का...\" 'त्या' वक्तव्यावर अनुष्काने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/nmmc-palika-election-akp-94-2063044/", "date_download": "2020-09-26T02:20:39Z", "digest": "sha1:L5JJ62WSSEW3QOYNTGHVA6JJVL5QNKTZ", "length": 14426, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "NMMC Palika Election akp 94 | संक्रांतीच्या मुहूर्तावर पालिका निवडणूक प्रचाराचा नारळ | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nसंक्रांतीच्या मुहूर्तावर पालिका निवडणूक प्रचाराचा नारळ\nसंक्रांतीच्या मुहूर्तावर पालिका निवडणूक प्रचाराचा नारळ\nआचारसंहिता लागण्यापूर्वी प्रभागातील नागरी कामांची माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.\nतिळगुळासोबत कामांच्या पत्रकांचेही घरोघरी वाटप\nनवी मुंबई : पालिकेची निवडणूक तीन महिन्यावर येऊन ठेपल्याने विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर प्रचाराला सुरुवात केली आहे. यात हळदी-कुंकू समारंभापासून ते घरोघरी तिळगूळ वाटपाच्या कार्यक्रमाचा समावेश आहे. नेरूळमधील एका नगरसेवकाने तिळगुळाच्या पाकिटासोबत मागील पाच वर्षांत केलेल्या कामाचे पत्रकही प्रभागातील घराघरांत वाटप केले आहे. हे वाटप आजूबाजूच्या तीन प्रभागांत करून त्यात प्रभाव पाडण्याचा प्रयत्नही यातून साहित्यांच्या वाटपातून केला आहे.\nनवी मुंबई पालिकेची एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात सहावी निवडणूक होत आहे. एकूण १११ प्रभाग संख्या असलेल्या या नवी मुंबईतील या प्रभागांचे डिसेंबर महिन्यात होणारे आरक्षण राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढे ढकललेले आहे. त्यामुळे स्थागित करण्यात आलेले प्रभाग व उमेदवार आरक्षण सोडत जानेवारी अखेरीस होण्याची शक्यता आहे.\nप्रभाग आरक्षणाचा अंदाज बांधून अनेक विद्यमान नगरसेवकांनी प्रचाराचे नारळ वाढविले आहेत तर इच्छुकांनी सध्या समाजमाध्यमांवर धुरळा उडविला आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रभागातील नागरी कामांची माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. आचारसंहितेनंतर प्रभागातील उद्घाटनांचा बार उडविता येणार नसल्याने अनेक नगरसेवकांनी प्रभागातील पदपथ, रस्ते, दिवाबत्ती, गटार दुरुस्ती, उद्यान, खेळाचे साहित्य, हायमास्ट यांसारख्या नागरिकांच्या सुविधांची पूर्तता करण्यास घेतली आहे.\nया कामांच्या शुभारंभप्रसंगी प्रचाराचा नारळ वाढविले जात आहे. काम पूर्ण झाल्यास भाषणबाजीला जोर येत आहे. सध्या प्रत्येक प्रभागात नागरी कामांचे फलक लागल्याचे चित्र आहे.\nनेरूळमधील एक विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकाने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून प्रत्येक घरात दोन तिळाचे लाडू कागदी पाकिटात टाकून त्यासोबत नागरी कामांविषयीचे रंगीत पत्रकही वाटले आहे. या प्रचारासह आता महिलांच्या हळदीकुंकूच्या कार्यक्रमांचा अक्षरश: धूमधडाका सुरू झाला आहे. प्रभाग तेथे हळदीकुंकू असे चित्र आहे.\nप्रभाग पातळीवर सुरू असलेला हा प्रचार राजकीय पक्षांच्या पातळीवरही सुरू आहे. आमदार गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांनी विधानसभा मतदारसंघात सराव परीक्षा आणि महोत्सवांचे आयोजन केले आहे.परीक्षा दरवर्षी घेतली जाते, मात्र यंदा त्याचे आयोजन लवकर करण्यात आले आहे. बेलापूरच्या आमदार म्हात्रे यांनीही दरवर्षीप्रमाणे बेलापूरमध्ये महोत्सवाचे आयोजन केले आहे. या दोन नेत्यांचे मतदारसंघांतील तिकीट वाटपावरून कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. मनसेने पण यंदा पालिका निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून नागरी समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 शहराच्या हवेचं काही खरं नाही\n2 पनवेल पालिकेचा कारभार गतिमान होण्याच्या आशा पल्लवित\n3 पावसाळा लांबल्याने ज्वारीची दरवाढ\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/aap-glamorous-gandhi-topi-again-373386/", "date_download": "2020-09-26T03:29:06Z", "digest": "sha1:X7VBCMXQRNR5ILHMDXPDTB4VLLC5MD2Q", "length": 14746, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘आप’मुळे गांधी टोपीला पुन्हा सुगीचे दिवस | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n‘आप’मुळे गांधी टोपीला पुन्हा सुगीचे दिवस\n‘आप’मुळे गांधी टोपीला पुन्हा सुगीचे दिवस\nकाळाच्या ओघात हद्दपार होत चाललेल्या गांधी टोपीला आम आदमी पक्षामुळे पुन्हा चांगले दिवस आले आहेत.\nकाळाच्या ओघात हद्दपार होत चाललेल्या गांधी टोपीला आम आदमी पक्षामुळे पुन्हा चांगले दिवस आले आहेत. विदर्भात आम आदमी पक्षाकडे कार्यकर्त्यांचा वाढता ओघ बघता टोपीची मागणी वाढली आहे. त्यांनी पांढऱ्या रंगाच्या लाखो टोप्यांची मागणी विक्रेत्यांकडे नोंदविली आहे.\nभारतीय स्वातंत्र्य लढय़ात गांधी टोपीला फारच महत्त्व होते. अगदी अलीकडे प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मुले व शिक्षकही गांधी टोपी परिधान करीत होते. गांधी टोपी घालणे म्हणजे सुसंस्कृत व चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षण मानले जात असे. स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक वर्षे गांधी टोपीचा प्रभाव होता. खादीपासून बनवली जात असल्यामुळे तिला खादी टोपीही म्हटले जाते. बदलत्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या कापडापासून टोप्या बनवल्या जाऊ लागल्या. टेरिकोट, नायलॉन व कॉटन आदीचा त्यात समावेश आहे. चंदू टोपी, मिनिस्टर टोपी, उंच दिवाल, लहान दिवाल व अहिराऊ आदी टोप्याचे विविध प्रकार बाजारात विक्रीस होते. लहानांपासून थोरांपर्यत सर्वजण टोपीचा वापर करीत होते. काळानुरूप फॅशनचे युग आले आणि या गांधी टोप्यांचा वापरही कमी झाला. ग्रामीण भागात वयोवृध्दांच्या डोक्यावर दिसणारी टोपी गेल्या काही दिवसात लग्नसराईतही क्वचितच दिसत असे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे आणि त्यानंतर आम आदमी पक्षामुळे टोपीचा वापर वाढला असून आता अनेकांच्या डोक्यावर पुन्हा गांधी टोपी दिसू लागली आहे.\nविशेषत: दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर या पक्षाकडे कार्यकर्त्यांचा ओघ वाढत आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातही मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते या पक्षाशी जुळत असताना प्रत्येकाचे स्वागत ही टोपी घालून केले जात आहे. पक्षामध्ये पदाधिकाऱ्यांपासून सामान्य कार्यकत्यार्ंच्या डोक्यावर टोपी असली की हा आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. पक्षामध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांला टोपी घालणे आवश्यक केल्यामुळे टोप्यांची मागणी वाढली आहे. आम आदमी पक्षाने एका कंत्राटदाराला लाखो टोप्या तयार करण्याचे कंत्राट दिल्याची माहिती आहे. येणाऱ्या दिवसात लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका असल्यामुळे प्रत्येक मतदारांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी आपचे सदस्य टोप्यांचे वाटप करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘मै हू आम आदमी’ असे लिहिण्यात आलेली टोपी ही पक्षाची अधिकृत टोपी समजली जाते. एखाद्या पांढऱ्या टोपीवर काही लिहिले नाही तर तो आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता नसल्याचे समजले जाते. आम आदमी पक्ष स्थापन होण्यापूर्वी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात टोप्यांची जणू फॅशन आली होती. जो तो टोपी घालून अण्णांच्या आंदोलनात सहभागी होत असे. मधल्या काळात प्रमाण कमी झाले असले तरी आता आम आदमी पक्षामुळे ते पुन्हा वाढल्यामुळे येणाऱ्या काळात ही टोपी राज्यात आणि केंद्रात काय बदल घडविते हे येणारा काळच ठरवेल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 विदर्भात भाडय़ाने सायकली देण्याच्या व्यवसायाला घरघर\n2 शिक्षणरूपी पंखात स्वप्नांना वास्तव्यात उतरवण्याची ताकद \n3 दारू दुकाने हटवण्यासाठी प्रथमच मतदान\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/new-zealand-vs-team-india-second-match-t20/", "date_download": "2020-09-26T01:13:08Z", "digest": "sha1:UVHVL4DCYDE5GOYLI43VTNZ2BOJDEUGH", "length": 15726, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "टीम इंडियाचा बढे चलोचा निर्धार, न्यूझीलंड विरुद्धची दुसरी टी-20 आज | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोल्हापूर – 84 लाखांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला अटक\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nटीम इंडियाचा बढे चलोचा निर्धार, न्यूझीलंड विरुद्धची दुसरी टी-20 आज\nहिंदुस्थान-न्यूझीलंड हे दोन तुल्यबळ संघ दुसऱया टी-20 क्रिकेट सामन्यात रविवारी पुन्हा ऑकलण्डमधील ईडन पार्कवरच भिडणार आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या ‘टीम इंडिया’ने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विराट सेनेने विजयी सलामी दिली असली तरी उद्याच्या लढतीत गोलंदाजीमध्ये एखादा बदल होण्याची शक्यता आहे. ‘टीम इंडिया’ सलग दुसऱया विजयासह आघाडी वाढविण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल, तर यजमान न्यूझीलंड फिट्टमफाटसाठी सर्वस्व पणाला लावतील यात शंकाच नाही.\nईडन पार्कच्या छोटय़ा मैदानावर सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. दोन्ही संघांमध्ये केवळ जसप्रीत बुमराह यानेच आठहून कमी सरासरीने धावा दिल्या. मोहम्मद शमीने 4 षटकांत 53, तर शार्दुल ठाकूरने 3 षटकांत 44 धावा दिल्या. त्यामुळे ठाकूरला बाकावर बसवून नवदीप सैनी किंवा कुलदीप यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाजाकडून अधिक धावा जाण्याची अधिक शक्यता असल्याने सैनीऐवजी कुलदीपला संधी मिळू शकते. सलामीच्या लढतीत युझवेंद्र चहल व रवींद्र जाडेजा या फिरकीच्या जोडगोळीने धावगती रोखली होती. त्यामुळे तिसरा फिरकीपटू कुलदीपला अंतिम अकरामध्ये खेळविण्याचा विचार होऊ शकतो.\nनव्या दमाच्या खेळाडूंवर भिस्त\nलोकेश राहुल व श्रेयस अय्यर या नव्या दमाच्या खेळाडूंनी सलामीच्या लढतीत ‘टीम इंडिया’ला सहज विजय मिळवून दिला. या दोघांनंतर मनीष पांडे व शिवम दुबे यांनीही विजय हातातून निसटणार नाही याची काळजी घेतल्याने कर्णधार विराट कोहली जाम खुश झाला आहे. खोलवर फलंदाजी ही हिंदुस्थानची ताकद असून, युवा शिलेदारांवरच संघाची खरी भिस्त आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट होतोय भयंकर ट्रोल\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग, सचिनला मागे सोडलं\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप पुन्हा पुढे ढकलणार\nIPL 2020 – बंगळुरूचा 97 धावांनी दारुण पराभव, पंजाबने विजयाचे खाते उघडले\nIPL 2020 – चेन्नई सुपर किंग्जला जबरदस्त धक्का, अंबाती रायडूला गंभीर दुखापत\nऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू, कोच आणि समालोचक डीन जोन्स यांचे मुंबईत निधन\nIPL 2020 – सोशल मीडियावर उडतेय पांड्याची खिल्ली, ‘हे’ 10 खेळाडूही झालेत ‘हिटविकेट’\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nकोल्हापूर – 84 लाखांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला अटक\nया बातम्या अवश्य वाचा\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/independent-candidate-object-to-sushilkumar-shinde-name-dagadu-in-loksabha-2019-42163.html", "date_download": "2020-09-26T02:20:45Z", "digest": "sha1:6KBLKGPFBJR3H2RRTFTKKLXFF547VGUC", "length": 17303, "nlines": 192, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सुशीलकुमारांच्या ‘दगडू’ तर जयसिद्धेश्वरांच्या ‘नुरन्दय्या’ नावाला अपक्ष उमेदवाराचा आक्षेप", "raw_content": "\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nकृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nसुशीलकुमारांच्या ‘दगडू’ तर जयसिद्धेश्वरांच्या ‘नुरन्दय्या’ नावाला अपक्ष उमेदवाराचा आक्षेप\nमहाराष्ट्र राजकारण लोकसभा निवडणूक 2019 हेडलाईन्स\nसुशीलकुमारांच्या ‘दगडू’ तर जयसिद्धेश्वरांच्या ‘नुरन्दय्या’ नावाला अपक्ष उमेदवाराचा आक्षेप\nसोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या अर्ज छाननीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘दगडू’ नावाला आणि भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या ‘नुरन्दय्या’ नावाला आक्षेप घेतला आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली असून छाननीमध्ये काँग्रेस, भाजप आणि बुहजन …\nरोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर\nसोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या अर्ज छाननीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘दगडू’ नावाला आणि भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या ‘नुरन्दय्या’ नावाला आक्षेप घेतला आहे.\nउमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली असून छाननीमध्ये काँग्रेस, भाजप आणि बुहजन वंचित आघाडीच्या तिन्हीही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, तर बहुजन वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात उतरले आहेत.\nसुशीलकुमार शिंदे यांचे खरे नाव दगडू शंभू शिंदे आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सुशीलकुमार संभाजीराव शिंदे असा उल्लेख केल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. शिंदे यांचे वय 79 नमूद केल्याचाही आक्षेप घेण्यात आला होता. भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीचा दाखला आणि नावाबाबतही आक्षेप घेण्यात आला होता. शिवाचार्यांचे मूळ नाव नुरन्दय्या गुरुबसव्वा हिरेमठ असे आहे. त्यासाठी त्यांनी शाळेचा दाखलाही सादर केला होता. उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यावर निर्णय देत आक्षेप घेतलेले दोन्हीही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले आहेत. सुशीलकुमार शिंदेंनी नावात बदल केलेले गॅझेट जोडले आहे. शिवाय वयाच्या अडचणीबाबत सध्याच्या क्षणी अडचण येत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.\nदुसरीकडे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे बेडा जंगम नसून हिंदू लिंगायत आहे, असा दावा करण्यात आला. मात्र, सिद्धेश्वर यांनी जातीचा पुरावा जोडल्यामुळे त्यांचाही अर्ज वैध ठरवण्यात आला. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.\nBihar Election | प्रकाश आंबेडकरांनी रणनीती बदलली; आता 'स्वबळा'ऐवजी 'आघाडी'चं…\nअदानी आणि अंबानी पंतप्रधान कार्यालय चालवत आहेत का\n...तर मराठा समाज शांत होईल, अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील,…\n'केवळ प्रचाराने सत्य लपवता येणार नाही, लोकांच्या विचारशक्तीवर माझा विश्वास',…\nअहमदाबाद, चेन्नईकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबली हे तुमचंच अपयश;…\nएनसीबीकडून 59 ग्रॅम गांजाचा गाजावाजा, पण भाजप कार्यकर्त्याकडील 1200 किलो…\nपाच वर्षे सुडाचे बळी ठरलो, पण सुडाचे राजकारण करणार नाही…\nमुंबई तुंबल्यावर बोंबा मारणारे नागपूर, अहमदाबाद जलमय झाल्यावर गप्प का\nबॉलिवूडच्या प्रमुख अभिनेत्री ड्रग्ज प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात, आगामी चित्रपटांमधील कोट्यावधींची…\nड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका कशी अडकली व्हॉट्सअ‍ॅप चॅट ते जया साहाचा…\nबळीराजाचा रोष दाबण्यासाठीच एनसीबीने दीपिकाला आंदोलनाच्या दिवशी चौकशीला बोलावलं :…\nरुग्णांसाठी कमी दरात प्लाझ्मा उपलब्ध होणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा, प्रति बॅग…\nभिवंडीतील बचाव कार्य चौथ्या दिवशी संपलं, एकूण 41 जणांचा मृत्यू,…\n'केवळ प्रचाराने सत्य लपवता येणार नाही, लोकांच्या विचारशक्तीवर माझा विश्वास',…\nएनसीबीकडून 59 ग्रॅम गांजाचा गाजावाजा, पण भाजप कार्यकर्त्याकडील 1200 किलो…\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा :…\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nकृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nK L Rahul | के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम\nगुप्तेश्वर पांडे DGP होते, मात्र भाजप नेत्यासारखे बोलायचे, अनिल देशमुखांचा हल्लाबोल\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nकृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nK L Rahul | के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/42850", "date_download": "2020-09-26T02:48:37Z", "digest": "sha1:BFVMDZEFRS5ZT7G2JLOU7TBX7P5OOYY7", "length": 7499, "nlines": 168, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मूठ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /चिन्नु यांचे रंगीबेरंगी पान /मूठ\nतू पाठ फिरवून जाशीलही..\nमग मी मला कसं आणि कुठंवर गोळा करू\nतुटल्या जीवाचे तार तार झाले..\nभिनलेत सूर, कसे वजा करू\nसख्य नुरले वेड्या आसवांशी..\nकसे आरश्याशी दगा करू\nखोल मूठ एकदाच ह्या जीवाची\nकुठंवर श्वासांची निगा करू\nबोल मना तुला काय सजा करू\nचिन्नु यांचे रंगीबेरंगी पान\nअस्तित्वाचा जीण्याशी झगडा बोल\nबोल मना तुला काय सजा करू\nशैलजाताई आणि श्री धन्यवाद\nशैलजाताई आणि श्री धन्यवाद\n तुम भी कविता अ‍ॅन ऑल\n तुम भी कविता अ‍ॅन ऑल \n आधीच्या कविता आहेत की\n आधीच्या कविता आहेत की रंगीबेरंगी पानावर. हो, धूळ साचलीये बर्‍याच दिवसांतून..\nफार सुंदर कविता. आवडली.\nओकेओके... मी नाही वाचलंय अजून\nओकेओके... मी नाही वाचलंय अजून तुझं रंगीबेरंगी पान..\nमग वाच धन्यवाद मुटेजी.\nमस्त लिहीलंय. फक्त 'तुटल्या\nमस्त लिहीलंय. फक्त 'तुटल्या जीवाचे तार तार झाल'' यातील 'तार तार' जरा खटकलं. ते 'टार टार' सारखे वाटतंय. बाकी खुपच छान\nचिन्नु, ये राज तो हमे पता नही\nचिन्नु, ये राज तो हमे पता नही था.\nछान लिहीलय... लिहित जा..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5305", "date_download": "2020-09-26T01:50:22Z", "digest": "sha1:MWOYEBC5N2QVK4OLW5LUAIW42KDGYSB7", "length": 4248, "nlines": 77, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आळूपोटळं तरकारी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आळूपोटळं तरकारी\nओरिसा: आळूपोटळं तरकारी (फोटोसहीत)\nमी रेसिपी टाकतेय म्हणजे धक्का बसला का कारण खरतर टाकायची या विचारानेच मला धडधडत होतं हे काही माझं क्षेत्र नव्हे. पण काही दिवसापूर्वी जपान बीबी वर मी 'परवर' म्हणाले तर सायो, आडो आणि मंजिरीला बहुतेक ते पडवळ वाटले. म्हणून मग ही रेसिपी नवऱ्याला करायला लावून साग्रसंगीत लिहून घेतली इथे टाकण्यासाठी. मध्ये मध्ये फोटो सुद्धा काढले.\nलेक विचारत होती कि तू फोटो कशाला काढतेस, इंटरनेट वर टाकणार का\nतर ही आळूपोटळं तरकारी\nपोटळं - परवर (फोटो खाली बघा)\nमाहीत नाही. (विचारुन सांगू का\nRead more about ओरिसा: आळूपोटळं तरकारी (फोटोसहीत)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://sureshbhat.in/newtracker?page=6&order=type&sort=asc", "date_download": "2020-09-26T02:29:19Z", "digest": "sha1:BG4X25GSVEJDWJJSJHR7OU4WMIX6MLKQ", "length": 4042, "nlines": 69, "source_domain": "sureshbhat.in", "title": "नवे लेखन | सुरेशभट.इन", "raw_content": "चार शब्दांनीच आले का तुझ्या डोळ्यांत पाणी \nसोड त्याचे बोलणे... तो एक वेडापीर होता \nमुखपृष्ठ » नवे लेखन\nगझल भग्न : मधुघट मधुघट 3\nगझल सोडले तेंव्हा तुला... अजय अनंत जोशी 11\nगझल मनात माझ्या कुठून येते बरेच काही विजय दि. पाटील 12\nगझल वेढुनी आवेग माझा रोज गाभुळतेस तू बेफिकीर 8\nगझल तुला पाहतो... मधुघट 9\nगझल कविता म्हणू प्रियेला.. गंगाधर मुटे 10\nगझल मी कुठे शोधू अता ती ओळखीची माणसे शाम\nगझल श्वास झालो अनिल रत्नाकर 7\nगझल मोजले का तू कधी \nगझल श्वास प्रसाद लिमये 9\nगझल वायदे बाजार अनिरुद्ध अभ्यंकर 7\nगझल थांबवा हे जग जयन्ता५२ 4\nगझल आज फुलांची भाषा..... मानस६ 3\nगझल हमी मी अभिजीत 3\nगझल कविता पुलस्ति 8\nगझल बंडखोरी क्रान्ति 3\nगझल प्रश्न... नचिकेत 14\nगझल तसा मी कधीपासुनी तोच होतो भूषण कटककर 7\nगझल सांजवेळी आठवांचा मेघ हा दाटे पुन्हा.. शाम 3\nगझल गझल : मी तुझ्या प्रेमात आहे, तू मला ही प्रेम कर...... खलिश\nगझल सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे\nगझल खुल्या मनाने केदार पाटणकर 3\nगझल सुखास आता तुझे नाव आहे जयन्ता५२ 7\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/loss-of-students-if-there-is-no-harmony-in-between-private-universities-and-state-government-uday-samant-127704493.html", "date_download": "2020-09-26T02:43:41Z", "digest": "sha1:4WILUC6V52Q3AJCGXOCA2WLZU4IZCTTC", "length": 8598, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "loss of students if there is no harmony in between private universities and State government, : Uday Samant | राज्य सरकार, खासगी विद्यापीठांमध्ये सुसंवाद नसल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान, खासगी विद्यापीठांची शासनाबरोबर चालण्याची भूमिका असावी : उदय सामंत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशैक्षणिक:राज्य सरकार, खासगी विद्यापीठांमध्ये सुसंवाद नसल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान, खासगी विद्यापीठांची शासनाबरोबर चालण्याची भूमिका असावी : उदय सामंत\nविद्यार्थिकेंद्रित धोरण ठेवूनच सरकार आणि शिक्षण संस्थांनी कार्य करावे लागणार - सामंत\nसरकार आणि खासगी विद्यापीठ यांच्यात सुसंवाद नसल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. विद्यार्थिकेंद्रित धोरण ठेवूनच सरकार आणि शिक्षण संस्थांनी कार्य करावे लागणार आहे. नवीन शिक्षण धोरण राबवताना खासगी विद्यापीठाच्या प्रतिनिधींच्या नियुक्त्या समितीत करण्याचा आमचा मानस आहे. शासन नेहमीच खासगी विद्यापीठांशी संवाद ठेवून काम करेल, असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.\n“पेरा’ (प्रिमिन्यंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) या खासगी विद्यापीठांच्या संघटनेकडून बुधवारी व्हर्च्युअल एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी पेरा संघटनेचे अध्यक्ष आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, उपाध्यक्ष भरत अग्रवाल, डॉ. स्वाती मुजूमदार, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. संदीप झा, एन. टी राव, डॉ. आश्विनकुमार शर्मा, डॉ. व्ही. ए. रायकर, डॉ. एकनाथ खेडकर आदी उपस्थित होते.\nसामंत म्हणाले, राज्यात खासगी विद्यापीठांची २०१४ मध्ये स्थापना झाली. यानंतर या विद्यापीठांनी स्वत:ची ताकद वापरून देशातील शैक्षणिक क्षेत्रात एक भरीव कामगिरी केली आहे. कोरोना संकट सगळीकडे असून त्यावर मात करत महाराष्ट्रातील विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ झाले पाहिजेत. त्यांना चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन मिळाले पाहिजे. पेरा संघटनेकडून आयोजित एज्युकेशन फेअर महाराष्ट्राच्या जडणघडणीला वेगळी दिशा देणारे ठरेल. कोरोनाच्या संकटकाळात खासगी विद्यापीठांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना विविध बाबींचा माहिती द्यावी. जगातील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करावा.\nसरकार आणि संघटनांनी हातात हात घालून काम करावे लागणार आहे. खासगी विद्यापीठांच्या अनेक अडचणी आहेत. भविष्यात आत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देत असताना संस्थाचालकांना चांगल्या वातावरणामध्ये संस्था चालवली पाहिजे, असेही ते म्हणाले.\nराज्यात लवकरच व्हर्टिकल युनिव्हर्सिटीची संकल्पना\nराज्यात शासकीय वा खासगी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागा हवी ही महत्त्वाची अट असते. राज्य सरकारने त्याचा नव्याने विचार करण्याचे ठरवले आहे. राज्यात व्हर्टिकल युनिव्हर्सिटी ही संकल्पना राबवण्याचा विचार असून त्यात जागेची अट असणार नाही त्यामुळे नव्या विद्यापीठांच्या स्थापनेचा मार्ग सुलभ होणार असल्याचे ते म्हणाले. प्रा.कराड म्हणाले, महाराष्ट्राचे देशात उच्च शिक्षणात वेगळे स्थान आहे. राज्याने देशाला उच्च शिक्षणातील मॉडेल दिले आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार काही परदेशी विद्यापीठांना भारतात येण्याची परवानगी दिली आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/38017/by-subject/1/168", "date_download": "2020-09-26T03:18:00Z", "digest": "sha1:E3BK35RW7BJEHFF7LV6GH6JR74YHXXUW", "length": 3256, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अवांतर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१२ /मायबोली गणेशोत्सव २०१२ विषयवार यादी /विषय /अवांतर\n'हे गोपाळराव...हे गणपतराव..' - आशूडी लेखनाचा धागा संयोजक 30 Jan 14 2017 - 7:55pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/india-news-international/article/an-mba-student-allegedly-abducted-and-gangraped-by-four-men-in-up/281266", "date_download": "2020-09-26T01:49:27Z", "digest": "sha1:G7QYRRZQ6UHOALGPVRIE5EONI3SIL65I", "length": 11102, "nlines": 82, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " एमबीए विद्यार्थिनीचे अपहरण आणि बलात्कार, चेहऱ्यावर केला रॉडने वार", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nलोकल ते ग्लोबल >\nएमबीए विद्यार्थिनीचे अपहरण आणि बलात्कार, चेहऱ्यावर केला रॉडने वार\nएमबीए विद्यार्थिनीचे अपहरण आणि बलात्कार, चेहऱ्यावर केला रॉडने वार\nउत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनी तिच्या घरी परतत असताना तिचे अपहरण करण्यात आले.\nउत्तरप्रदेशात एमबीए विद्यार्थिनीचे अपहरण आणि बलात्कार, चेहऱ्यावर केला रॉडने वार |  फोटो सौजन्य: BCCL\nउत्तरप्रदेशात महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही.\nबुलंदशहरमध्ये एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.\nविद्यार्थिनी तिच्या घरी परतत असताना तिचे अपहरण करण्यात आले.\nउत्तरप्रदेश: उत्तरप्रदेशात महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत उत्तरप्रदेशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनी तिच्या घरी परतत असताना तिचे अपहरण करण्यात आले.\nबुलंदशहरमधील स्याना येथून एमबीए शिकत असलेली पीडित विद्यार्थिनी घरी परतत होती. त्याचवेळी काही जणांनी तिचे अपहरण केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या पीडित तरूणीने विरोध केला असता आरोपींनी तिच्या चेहऱ्यावर गंभीर वार केले. लोखंडी रॉडने त्यांनी तिच्या चेहऱ्यावर जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. सामूहिक बलात्कार केल्यानंतर पीडित मुलगी बेशुद्ध झाली. बेशुद्ध अवस्थेत तिला निर्जनस्थळी सोडून हे आरोपी तिथून पसार झाले.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका एमबीए विद्यार्थिनीचे चार जणांनी अपहरण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बुलंदशहरमधील स्याना या ठिकाणाहून पोलिसांनी पीडित मुलीला वाचवले आहे. तसेच चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, सध्या पीडित मुलीला मेरठमधील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nपीडित मुलगी ही गढमुक्तेश्वर येथील रहिवासी आहे. गुरूवारी ही तरूणी मेरठमधील कॉलेज संपवून बसने आपल्या घरी निघाली होती. संध्याकाळी बराच वेळ झाल्यामुळे कुटुंबियांनी त्यांच्या मुलीविषयी शोधाशोध करण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर ती बेपत्ता असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिचे मोबाइल लोकेशन पाहिले असता ते स्याना या ठिकाणी मिळाले. पोलीस तिथे पोहोचले असता ती त्यांना बेशुद्धावस्थेत सापडली.\nही विद्यार्थिनी बसने घरी जात असताना वाटेत बस बंद पडली. त्यादरम्यानच तिची ओळख चार कारमध्ये असलेल्या व्यक्तींशी झाली. त्यांनी तिला घरी जाण्यास लिफ्ट दिली. त्यानंतर या चौघांनी तिला निर्जनस्थळी नेत वारंवार सामूहिक बलात्कार केला.\nउत्तरप्रदेशात अशाप्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी फिरोजाबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर गोळ्या घालून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात तीन पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली आहे. त्यांनी या प्रकरणात दिरंगाई केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nअल-कायदाच्या ९ जणांना अटक, देशात मोठा घातपात घडविण्यापूर्वीच NIA ने केली कारवाई\n का होतोय याला विरोध\nLACवर भारत ऑन टॉप, चीन झाला फ्लॉप\nचेन्नईतील 'मुळशी पॅटर्न', भर रस्त्यात गँगस्टरची कोयत्याने हत्या\nचीनने LACजवळ आणली शस्त्र, कराराचे उल्लंघन; फोटो Times Nowच्या हाती\nआजचे राशी भविष्य २६ सप्टेंबर\nट्रकमध्ये चढत असताना सहायक पडला खाली आणि चाक.....\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ सप्टेंबर २०२०:\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमबद्दल CM ठाकरेंचे मत\nमारुतीची नवीन कार मिळणार मासिक शुल्कावर, पाहा काय आहे प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/nhm-parbhani-recruitment-2020/", "date_download": "2020-09-26T03:41:41Z", "digest": "sha1:YEQ45FS4M7JNQ2VENCI6PIVVSFUWD4QR", "length": 6341, "nlines": 103, "source_domain": "mahabharti.in", "title": "NHM Parbhani Recruitment 2020 - २५ पदांकरिता अर्ज", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nNHM परभणी भरती २०२०\nNHM परभणी भरती २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २६ & २८ मे २०२० आहे.\nपदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी\nपद संख्या – २५ जागा\nशैक्षणिक पात्रता – MBBS/BAMS\nनोकरी ठिकाण – परभणी\nनिवड प्रक्रिया – मुलाखत\nमुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद परभणी\nमुलाखतीची तारीख – २६ & २८ मे २०२० आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nUT प्रशासन दमण आणि दीव येथे विविध पदांची भरती\nमुंबई उपनगर जिल्हा येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची भरती\nICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाची भरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, दिव अंतर्गत विविध पदांची भरती\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांच्या 171 जागांसाठी ऑनलाईन अर्ज…\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती\nRITES लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदांची भरती\nजेईई अॅडव्हान्स्ड: ९८ टक्के विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा केंद्र\nनॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरु\nनाशिक महानगरपालिका भरती पात्र आणि अपात्र यादी\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/92a94d93094c922-93094793694092e-91594091f915-93890291794b92a92893e93893e920940-92b93e902926940-92a92694d927924-92b93e92f92694d92f93e91a940", "date_download": "2020-09-26T02:42:43Z", "digest": "sha1:SH2CW3KJVZ4S4R7NUS4OELMGPITYPRNJ", "length": 14371, "nlines": 104, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "प्रौढ रेशीम कीटक संगोपनासाठी फांदी पद्धत फायद्याची... — Vikaspedia", "raw_content": "\nप्रौढ रेशीम कीटक संगोपनासाठी फांदी पद्धत फायद्याची...\nप्रौढ रेशीम कीटक संगोपनासाठी फांदी पद्धत फायद्याची...\nरेशीम कीटकांना फांदीसह पाला दिला जात असल्याने, पाने सुकण्याचा वेग कमी होतो. बेडवरील कीटकांना तुती पाला खाण्यासाठी जास्त वेळ उपलब्ध होतो. कीटक निरोगी राहण्यास मदत होऊन कोषोत्पादन वाढण्यास मदत होते.\nप्रौढावस्थेतील रेशीम कीटकांना एकूण संगोपनाच्या जवळपास 94 टक्के तुती पाला लागतो. या अवस्थेतील कीटकांची निरोगी वाढ होण्यासाठी योग्य प्रतिच्या व योग्य प्रमाणात तुती खाद्याची आवश्‍यकता असते.\n1) चॉकी कीटकांच्या तुलनेत प्रौढावस्थेतील कीटकांना जास्तीत जास्त प्रथिनयुक्त पानांची आवश्‍यकता असते. त्याचबरोबर तुती पाल्यातील ओलाव्याचे प्रमाण (70-73 टक्के)कमी असावे लागते. यासाठी 55 ते 65 दिवसांच्या वयाच्या तुती फांद्या योग्य ठरतात. या वयाच्या तुती फांदीवरील 75 ते 80 टक्के पाला जून आणि 20 ते 25 टक्के पाला कोवळा असतो.\n2) आपण फांदी फिडिंग पद्धत वापरत असल्याने फिडिंगच्या वेळी तुती फांदी बेडवर एका आड एक उलट-सुलट दिशेने देत असल्याने बेडवरील सर्व कीटकांना समान प्रतिचा (कोवळा आणि जून) पाला खाण्यास उपलब्ध होतो. परिणामी रेशीम कीटक एकाच वेळी कातीवर बसणे-उठणे, एकाच वेळी कोष बांधण्यासाठी परिपक्व होणे, इ. क्रिया वेळेत होतात.\n3) प्रौढावस्थेतील रेशीम कीटकांचे फांदी पद्धतीने संगोपन केले जात असल्याने तुती बागेतून सकाळी आणि संध्याकाळच्या थंड वेळेतच पाच फूट उंचीच्या तुती फांद्या बुड्यातून कापाव्यात. 20 ते 25 किलो वजनाचे फांद्यांचे बंडल बांधून वाहतूक करावी.\n4) तुती बाग ते कीटकसंगोपनगृह यातील अंतर अर्ध्या तासापेक्षा जास्त असल्यास फांद्यांचे बंडल ओल्या गोणपाटाने गुंडाळून वाहतूक करावी. यामुळे पाला सुकणार नाही, गुणवत्ता टिकून राहील.\n5) कापून आणलेल्या तुती फांद्यांची साठवणूक कमी तापमान, जास्त आर्द्रता, निरोगी व स्वच्छ खोलीत करावी. पाला साठवण्याच्या खोलीत जास्त प्रमाणात हवा खेळती असणार नाही याची दक्षता घ्यावी; अन्यथा पाला सुकण्याची शक्‍यता असते.\n6) पाला साठवणूक करतेवेळी तुती फांद्यांचे बंडल उभे ठेवून ओल्या गोणपाटाने झाकावेत.\n7) सुकलेली, पिवळी, धूळयुक्त, रोगीष्ट, शिळी तुती पाने रेशीम कीटकांना खाऊ घालू नये.\n1) फांदी पद्धतीला \"शूट रिअरिंग' असे म्हणतात. यामध्ये तुती पाने न तोडता संपूर्ण तुती फांदी कीटकांना खाद्य म्हणून दिली जाते. ही पद्धत रेशीम शेती उद्योगात प्रगत समजल्या जाणाऱ्या चीन, जपान, रशिया, ब्राझील इ. राष्ट्रांमध्ये वर्षभर वापरली जाते. आपल्या राज्यातील रेशीम शेतकरी या पद्धतीने रेशीम कीटकसंगोपन करीत आहेत. त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यास अधिकाधिक उत्पन्न मिळत आहे.\n2) संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की, या पद्धतीचा वापर केल्याने चौथ्या अवस्थेचा कालावधी 7.95 टक्‍यांनी कमी होतो.\n3) रेशीम कीटकांना खाद्य देण्याच्या वेळेत 60 टक्‍क्‍यांनी बचत होते, कीटकसंगोपन साहित्याच्या खर्चात 12.4 टक्‍क्‍यांनी बचत होते. तुती बागेची छाटणी, पाला तोडणे, पाला खाद्य देणे इ. कामांमध्ये 60 टक्‍क्‍यांनी मजूर कमी लागतात.\n4) या पद्धतीत संपूर्ण तुती फांदीचा वापर होत असल्याने 15ते 20 टक्के तुती पाला खाद्यामध्ये बचत होऊन एकरी 15ते 20 टक्के जास्त अंडीपुंजांचे संगोपन होते.\n5) फांदीसह पाला दिला जात असल्याने, पाने फांदीलाच असतात त्यामुळे पाने सुकण्याचा वेग कमी होतो परिणामी बेडवरील कीटकांना तुती पाला खाण्यासाठी जास्त वेळ उपलब्ध होतो. त्यामुळे कीटकांची भूक भागण्यास मदत होते.\n6) कीटकांना कमी प्रमाणात हाताळले जात असल्याने तसेच कीटक विष्ठेच्या सान्निध्यात येत नसल्याने कीटक निरोगी राहण्यास मदत होऊन कोषोत्पादन वाढण्यास मदत होते.\n7) कोषोत्पादनाच्या खर्चात बचत झाल्याने एकरी 40ते 50 टक्के नफ्यात वाढ होते.\n8) कीटकशय्येवर कीटकांना त्रिमितीय जागा उपलब्ध होत असल्याने बेडमध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते. त्यामुळे बेड, कीटकांची विष्ठा सुकण्यास मदत होते.\n9) फांदी पद्धतीचा अवलंब केल्याने तुती बागेतील आंतरमशागतीची कामे सहजासहजी करता येतात.\nफांदी पद्धतीचे काही तोटे\n1) या पद्धतीने कीटकसंगोपन करण्यासाठी जास्त जागा लागते.\n2) या पद्धतीच्या वापरामुळे नव्याने लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना अपेक्षित वयाचे तुती बेणे उपलब्ध होत नाही.\nसंपर्क - संयज फुले 9823048440\n(लेखक जिल्हा रेशीम कार्यालय, पुणे येथे कार्यरत आहेत.)\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2139", "date_download": "2020-09-26T03:14:46Z", "digest": "sha1:GYHKMABBF4ZQIYWH4T3EPOX5HABAPWYO", "length": 10358, "nlines": 155, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुलं : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुलं\nमुलं - काही नोंदी\nमुलं - काही नोंदी\nगेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे.\nमुलांना घरातील कामाचे पैसे...\nसगळ्या मैत्रींणी जमलो होतो. मुलांवरुन बोलताना एकजण म्हणाली,\n\"मी मुलांना प्रत्येक कामाचे पैसे देते. थोड्या पैशात किती कामं होतात.\"\n\"म्हणजे किती आणि कोणती कामं\" माझं कुतुहुल जागृत झालं.\n\"डिशवॉशरमधली भांडी लावली की ५० सेंट, केर नेऊन टाकला की २५ सेंट, स्वत:ची खोली आवरली की ७५सेंट अशी छोटी छोटी किती कामं असतात घरात.\"\nRead more about मुलांना घरातील कामाचे पैसे...\n४-१० वर्षाच्या मुलांचे कॉमन आजार, दुखणी आणि त्यावर उपाय\n४-१० वर्षाच्या लहान मुलांची कॉमन बारिकसारीक आजारपण, दुखणी, जखमा इ इ बाबत अनुभव आणि त्यावर सहज उपलब्ध असलेले घरगुती उपचार -\nRead more about ४-१० वर्षाच्या मुलांचे कॉमन आजार, दुखणी आणि त्यावर उपाय\nथांबला न सूर्य कधी....थांबली न धारा - २\n९ ऑक्टोबर २०११ रोजी या लेखाचा पहिला भाग मायबोली वर प्रकाशित केला होता.....\nRead more about थांबला न सूर्य कधी....थांबली न धारा - २\nसाहिलच्या चेहर्‍याकडे पाहून त्याच्या आईला गलबलून आलं. पुन्हा तेच. काय केलं की हे थांबेल हेच समजत नव्हतं. गेला महिनाभर सातवीतला साहिल शाळेतून आला की त्याचा अस्वस्थणा, चिडचिड, आदळआपट यातून त्याला बाहेर कसं काढायचं ते पालकांना उमजत नव्हतं. आजूबाजूला घडणार्‍या, वर्तमानपत्र, दूरदर्शनवर पाहिल्या जाणार्‍या आणि भारतीयांच्या बाबतीत असं काही घडत नाही असा समज असणार्‍या या गोष्टी आता त्यांच्याही घरात शिरल्या होत्या. मुल चिडवतात, गे, फॅगेट, स्टुपिड इंडियन, गो बॅक टू इराक, गळा आवळू आम्ही तुझा, लांब राहा आमच्यापासून, विचित्रच आहेस असं एक कुणीतरी म्हणतं आणि बाकिचे त्याला साथ देतात.\nमुलांचे प्रश्न आणि त्यांचे कुतुहल\nमुलं बोलायला लागली एक दिड वर्षाची झाली.. की त्यांची बड्बड..सुरू होते. आपल्या अवती भोवती पाहिलेल्या.. ऐकलेल्या गोष्टींबद्दल त्यांना कुतुहल वाटायला लागतं. आणि मग आपोआपच त्यांचे प्रश्न सुरु होतात. आपण आपल्या परीने... ह्या छोट्या दोन पाच वर्षाच्या बाळांना उत्तरे देतोही. काही वेळा त्यांना ती पटतात तर काही वेळा.. आपल्या उत्तरांमधून नवे प्रश्ण निर्माण होतात. मुलांना खरंही सांगितलं पाहिजे..आणि त्याना पट्लंही पाहिजे.. मग असे करताना अनेकदा गमती होतात्...तर काही वेळा मुलं आपल्याला प्रश्न विचारून भंडावून सोडतात.\nपिल्लू : आई गणपती बाप्पा शर्ट का घालत नाहीत \nमी : ते अंगावर शेला घेतात म्हणून.\nRead more about मुलांचे प्रश्न आणि त्यांचे कुतुहल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/okraprotection", "date_download": "2020-09-26T03:35:36Z", "digest": "sha1:3IRU4SZX6O4XIBAWISXWF767JQDQJCRF", "length": 21214, "nlines": 207, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "भेंडीतील कीडनियंत्रण – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nभेंडीत मावा, फळ व खोड किडा, पांढरी माशी, तुडतुडे, ठिपकेदार बोंड अळी, फुलकिडे, लालकोळी या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सर्वसाधारण कीटकनाशक वापरल्यास किडीच्या प्रतिकारशक्ती मुळे फारसा फायदा होत नाही. किडींचा प्रदुर्भाव वाढल्यास त्याच्या माध्यमातून विषाणूचा प्रसार होऊ शकतो. विविध किडीसाठी खालीलप्रमाणे कीटकनाशक भेंडीत वापरले जावू शकतात.\nभेंडीतील मावा नियंत्रणासाठी इमीडाक्लोप्रीड १७.८ टक्के ३ ते ५ मिली प्रती पंप, एसीटामीप्रीड २० टक्के ३ ते ५ टक्के प्रती पंप किंवा डायमेथोएट ३० टक्के ३५-४० मिली प्रती पंप फवारावे. इमीडाक्लोप्रीड १७.८ टक्के व एसीटामीप्रीड २० टक्के फवारणी नंतर तीन दिवस तोडणी टाळावी.\nपांढरी माशी नियंत्रणासाठी अझाडिरेक्टिन ३०० पी पी एम ५० ते ७५ मिली प्रती पंप किंवा फेन्प्रोपॅथ्रीन ५ ते ६ मिली प्रती पंप फवारावे. फवारणी नंतर सात दिवसांपर्यंत या औषधीचे अवशेष भेंडीत येवू शकतात त्यामुळे सात दिवसापर्यंत तोडणी करू नये.\nखोड व फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन २.८ टक्के १५ ते २० मिली प्रती पंप किंवा फेनप्रोपाथ्रीन ३० टक्के ५ ते ७ मिली प्रती पंप वापरावे. डेल्टामेथ्रीन फवारल्यावर १ दिवस व फेनप्रोपाथ्रीन फवारल्यास ७ दिवस तोडणी टाळावी.\nभेंडीतील फळ पोखरणारी अळी म्हणजेच बहुभक्षी हेलीकोव्हर्पा अर्मिजेरा नावाची कापसाची बोंडअळी. नियंत्रणासाठी अझाडिरेक्टिन ३०० पी पी एम ५० ते ७५ मिली प्रती पंप (सात दिवस तोडणी टाळावी) किंवा क्लोरांट्रालीनीप्रोल ४ ते ५ मिली प्रती पंप (पाच दिवस तोडणी टाळावी) किंवा क्विनोल्फोस२५ टक्के १५ ते २५ मिली प्रती पंप वापरावे.\nजर भेंडीत लाल कोळी आलेला असेल व तोडणी सुरु व्हायला १५ दिवस अवकाश असेल तर डीकोफोल 18.५ टक्के ४० ते ५० मिली प्रती पंप वापरावे पण जर फक्त ७ दिवस शिल्लक असतील तर फेनाझाक्विन १० टक्के ४० मिली प्रती पंप किंवा फेनप्रोपाथ्रीन ३० टक्के ५ ते ७ मिली प्रती पंप वापरावे. जर तोडणी सुरु असेल तर क्विनोल्फोस २५ टक्के १५ ते २५ मिली प्रती पंप वापरावे. स्पीरोमीसीफेन २२.९% एस सी किंवा स्पीरोटेट्रामॅट ११.०१ + इमिडाक्लोप्रीड ११.०१% एस सी हे कोम्बो कीटकनाशक १ मिली प्रती लिटर च्या दराने तोडणीच्या तीन दिवस अगोदर पर्यंत फवारणी करू शकता.\nफुलकिडीच्या नियंत्रणासाठी इमीडाक्लोप्रीड १७.८ टक्के ३ ते ५ मिली प्रती पंप फवारावे, तोडणीसाठी तीन दिवस वाट पहावी\nतुडतुडे नियंत्रणासाठी अझाडिरेक्टिन ३०० पी पी एम ५० ते ७५ मिली प्रती पंप फवारावे पण जर तोडनी सुरु असेल तर डायमेथोएट ३० टक्के ३५-४० मिली प्रती पंप फवारावे किंवा क्विनोल्फोस २५ टक्के १५ ते २५ मिली प्रती पंप वापरावे.\nकीटकनाशकच्या वापरातून अनेकवेळा कीडनियंत्रण होत नाही याचा अनुभव आपणास असेलच. कीटकनाशकाचा दुय्यम दर्जा, बनावटपणा व कीड़ीत निर्माण झालेली रोगप्रतिकार क्षमता यामुऴे असे घडते. अनेक वेळा दुर्लक्ष झाल्याने शेतातील कीड़ीचे प्रमाण हाताबाहेर गेले की उशिरा लक्षात येते. लागवडीच्या दिवसापासून काढणी पर्यंत चिकट सापळे व कामगंध सापळे वापरल्यास किडींची लवकर ओळख होते. प्रत्येक आठवड्यात शेतात चौफेर फिरून एकरी कमीत कमी शंभर झाडांचा अभ्यास करायला हवा. जर ९५ टक्के झाडे किडीपासून मुक्त असली तर भेंडीची निर्यात होऊ शकते. त्यामुळे किडींवर बारीक नजर ठेवणे जास्त सोयीचे आहे. त्यासाठी आपण पाटील बायोटेक चे पिवळे व निळे चिकट सापळे ३:२ प्रमाणात, एकरी १० ते १२ लावावेत, पिक जसेजसे वाढेल तसे सापळ्याची उंची वाढवत रहावी. निरीक्षण करत राहिल्यास आपल्या शेतात कोणती कीड आहे व किती प्रमाणात आहे याचा आपण अभ्यास करू शकता. जर आपण २० ते २५ सापळे लावले तर कीडनियंत्रण देखील चांगल्या प्रमाणात होते. किडीचे प्रमाण वाढतच असल्यास आपण कीटकनाशकाची फवारणी करू शकता. पाटील बायोटेक चे अरेना चॉकलेट पिकात लीग्निफिकेशन ची प्रक्रिया सुरु करते. या प्रक्रियेत पिकातील मऊपणा कमी होऊन काठीण्य वाढते. पाने, देठ व फांद्याचा पृष्ठभाग कडक झाल्याने रससोषक किडींच्या जबड्याला इजा होते, ते रसपान करू न शकल्याने त्यांचे प्रजनन कमी होते व कीड वाढू शकत नाही. किडीच्या माध्यमातून पसरणाऱ्या व्हायरसला देखील याच्या मुळे चाप बसतो. १५ लिटर च्या पंपासाठी छोटे व २०० लिटर च्या पंपासाठी मोठे चॉकलेट उपलब्ध आहे.\nभेंडीत बुरशीजन्य रोगांची देखील लागण होत असते. मर रोगात खोड व मूळ काळपट पडून रोपे कोलमडून पडतात. फिर फेरपालट केली नसल्यास किंवा पाण्याचा निचरा नीट नसला तर हि समस्या उदभवू शकते. हुमणासूर वापरल्याने बचाव होतो.\nढगाळ वातावरणात भुरी या रोगाची लागवड होऊ शकते. त्यामुळे अशा दिवसात रीलीजर प्लस २२ ते ४० ग्राम प्रती पंप चांगले वस्त्रगाळ करून फवारावे. वस्त्रगाळणीत अडकलेले “सल्फर” देखील प्युअरच असते ते कुठल्याही खतात मिसळले तरी चालते.\nजर पिकाची वाढ खुंटली असेल तर रोप उपटून मूळावर गाठी आहेत का हे बघावे. हुमणासूर वापरल्याने बचाव होतो.\nया पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.\nतंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी\nपुन्हा भेटू पुढील लेखात तो पर्यंत हि पोष्ट अधिकाधिक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचावी म्हणून फेसबुकवर शेअर करायला विसरू नका.\nभेंडीतील लाल कोळी नियंत्रण\nभेंडी ची भाजी लहान मुलांना अपार आवडत असल्याने या भाजीला...\n\"क्लोरानट्रानिप्लोर\" युक्त कीटकनाशके व त्यांच्या शिफारसी\nक्लोरानट्रानिप्लोर या घटकाचे दुसरे नाव रीनाक्सपीर असे असून हे ड्यूपोंट...\nरस शोषण करणाऱ्या किडींचे नियंत्रण करा पूर्व नियोजनातून\n. प्रत्येक पिकावर कोणती न कोणती रस सोषक कीड येतेच....\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nकोणत्याही पिकातील कीड व रोग नियंत्रण करते वेळी पिकाचा दर्जा...\nभेंडी एक्स्पोर्ट करणार का\nमित्रहो, जुलैच्या पहिल्या आठवडयात, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि जानेवारीच्या तिसऱ्या...\nमहाराष्ट्रातील सर्व भागात वांगी लागवड वर्षभर होत. या फळभाजी पिकाला...\nभेंडी पिकासाठी सर्वोत्तम कीडनाशकाचा शोध कसा घ्याल\nयापूर्वी आपण भेंडी वरील कीडनियंत्रणा बद्दल आमचे लेख वाचले असतील...\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nवांगी विषयी माहिती पाठवावि\nअतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. परंतु खेडे गावातील सर्वच शेतकरी मोबाईल फोन वरून नेट चा वापर करून माहिती घेऊ शकत नाही, त्यामुळे विशिष्ट हेल्पलाईन नंबर सुरू करुन शेतकर्‍यांना माहिती मिळाली आणि औषधांची उपलब्धता कोठे व कशी होईल हे समजले तर फारच उत्तम होईल.\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.transliteral.org/pages/i090723012206/view", "date_download": "2020-09-26T01:18:15Z", "digest": "sha1:2YR5PLCZQUULICS4EFSIOR4737LTHOHE", "length": 8800, "nlines": 119, "source_domain": "www.transliteral.org", "title": "निरंजन माधव", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|निरंजन माधव|\nनिरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.\nनिरंजन माधव - काव्य स्तोत्र\nनिरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.\nनिरंजन माधव - आत्मचरित्र\nनिरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.\nनिरंजन माधव - श्रीरामकर्णामृत\nनिरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.\nनिरंजन माधव - श्री ज्ञानेश्वरविजय\nनिरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.\nनिरंजन माधव - चिद्बोधरामायण\nनिरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.\nनिरंजन माधव - सुभद्राचंपू\nनिरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.\nनिरंजन माधव - प्राकृत गद्याचा नमुना\nनिरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.\nनिरंजन माधव - श्री भार्गवरामजन्मचरित्र\nनिरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.\nनिरंजन माधव - अद्वैतबोध\nनिरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.\nनिरंजन माधव - यतिनृपतिसंवाद\nनिरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.\nनिरंजन माधव - श्रीअद्वैतभावनापंचदशी\nनिरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.\nनिरंजन माधव - वशिष्टसुशर्मासंवाद\nनिरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.\nनिरंजन माधव - चरित्र व कवित्व\nनिरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.\nनिरंजन माधव - प्रस्तावना\nनिरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.\nप्रकाशक - लक्षमण रामचंद्र पांगारकर\nप्रकाशन स्थळ - पुणे घर नं. २४, बुधवार पेठ\nप्रकाशन काळ - आगस्ट सन १९१९\nदेव्हार्‍यात कोणत्या दिशेला दिव्याची वात असावी, त्याचे फायदे तोटे काय\nवामनपुराण - अध्याय ३३ वा\nवामनपुराण - अध्याय ३२ वा\nवामनपुराण - अध्याय ३१ वा\nवामनपुराण - अध्याय ३० वा\nवामनपुराण - अध्याय २९ वा\nवामनपुराण - अध्याय २८ वा\nवामनपुराण - अध्याय २७ वा\nवामनपुराण - अध्याय २६ वा\nवामनपुराण - अध्याय २५ वा\nवामनपुराण - अध्याय २४ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A4%B2/pptct-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2020-09-26T02:47:40Z", "digest": "sha1:NDYTOPHSDSYSMLKKV542BSCXSLIPBGCT", "length": 7949, "nlines": 98, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "PPTCT उपक्रमांतर्गत राबवलेले काही कार्यक्रम - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nमुखपृष्ठ एड्स शासनाने एड्स बाबत घेतलेली दखल PPTCT उपक्रमांतर्गत राबवलेले काही कार्यक्रम\nPPTCT उपक्रमांतर्गत राबवलेले काही कार्यक्रम\nवैद्यकीय विद्यालयासाठी (PPTCT) आढावा घेणारे पहिले भेटसत्र २६ एप्रिल २००२ मधे हॉटेल नगिना, भायखळा येथे घेण्यात आले.\nवैद्यकीय विद्यालयासाठी (PPTCT) आढावा घेणारे दुसरे भेटसत्र ७ ऑगस्ट २००२ मधे घेण्यात आले.\nवैद्यकीय विद्यालयासाठी (PPTCT) आढाव घेणारे तिसरे भेटसत्र २० आणि २१ मार्च २००३ मधे हॉटेल अरोरा टॉवर्स, पुणे येथे घेण्यात आले.\nजिल्हा पातळीवरील रुग्णालयांच्या गटनेत्यांचे (PPTCT) पहिले भेटसत्र ८ मे २००३ रोजी घेण्यात आले.\n(PPTCT) वैद्यकीय विद्यालयातील प्रयोगशाळेच्या तज्ञांसाठी प्रशिक्षणात्मक कार्यक्रम नारी येथे २६ ते ३० मे २००३ या कालावधीत घेण्यात आले.\nसमुपदेशन या विषयांवर (PPTCT) कार्यक्रमांतर्गत निवासी डॉक्टरांचे प्रशिक्षण २४ ते २७ जुन या कालावधीत राबवण्यात आले.\n२८ जुलै ते २ ऑगस्ट २००३ मधे नव्याने नियुक्ती केलेल्या समुपदेशकांसाठी प्रशिक्षणात्मक कार्यक्रम घेण्यात आले.\n१४ ते १७ ऑगस्ट २००३ या कालावधीत निवासी डॉक्टरांसाठी प्रशिक्षणात्मक कार्यक्रम घेण्यात आले.\nचौथी राज्यस्तरीय आढावा बैठक २ सप्टेंबर २००३ रोजी घेण्यात आली.\nजिल्हास्तरीय रुग्णालयांची राष्ट्रीय बैठक ८ व ९ ऑक्टोंबर २००३ मधे घेण्यात आली.\n१३ ते १७ ऑक्टोंबर २००३ मधे प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांसाठी प्रशिक्षण राबवण्यात आले.\n३० नोव्हेंबर २००३ रोजी कोल्हापुर येथे व १५ जानेवारी २००४ रोजी सांगली येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली.\n१२ आणि १३ फेब्रुवारी २००४ या कालावधीत अमरावती येथे वैद्यकीय अधिकारी आणि अकोला रुग्णालयातील PHNS स्त्रीयांसाठी समुपदेशनावर आधारित प्रशिक्षण देण्यात आले.\nसमुपदेशकांसाठी, गटनेत्यांसाठी व सुक्ष्मजीवतज्ञांचे पाचवे राज्यस्तरीय आढावा घेणारे भेटसत्र २५ व २७ मार्च २००४ रोजी आयोजित करण्यात आले.\nसमुपदेशकांसाठी, गटनेत्यांसाठी व पॅथेलॉजिस्ट यांचे जिल्हास्तरीय भेटसत्र ६ ते ८ मे २००४ या कालावधीत घेण्यात आले.\nवैद्यकीय अधिकार्‍यांसाठी व PHNS स्त्रीयांसाठी (PPTCT) वर आधारित समुपदेशन प्रशिक्षण लातुर येथे २९ आणि ३० जुन २००४ या कालावधीत घेण्यात आले.\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nराष्ट्रीय एड्स नियंत्रणात्मक उपक्रम\nराष्ट्रीय एड्स नियंत्रणाची उद्दिष्ट्ये\nPPTCT उपक्रमांतर्गत राबवलेले काही कार्यक्रम\nएड्स प्रतिबंधन शैक्षणिक कार्यक्रम\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/india-news/bihar-ak-47-rifle-recovered-from-the-residence-of-independent-mla-from-mokama/articleshow/70706082.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-26T03:04:19Z", "digest": "sha1:LXUEPNSH3IYERTLS6C5D7TD7ZVJY5A7W", "length": 11412, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबिहारः आमदाराच्या घरात सापडली 'एके-४७'\nबिहारमधील मोकामा मतदारसंघातील अपक्ष आमदार अनंत कुमार सिंह यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत पोलिसांना एके-४७ रायफल सापडली आहे. आमदाराच्या घरांची पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे.\nपटणाः बिहारमधील मोकामा मतदारसंघातील अपक्ष आमदार अनंत कुमार सिंह यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत पोलिसांना एके-४७ रायफल सापडली आहे. आमदाराच्या घरांची पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे.\nपटणा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी या छापेमारीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आमदाराच्या घराची झाडाझडती घेतली त्यावेळी पोलिसांना एके-४७ सापडली आहे. तसेच घरात बॉम्ब मिळाल्याचीही चर्चा आहे. पटणा पोलिसांनी त्यामुळे बॉम्बनिरोधक पथकांना बोलावले होते, अशी चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी सकाळी मोकामाचे अपक्ष आमदार अनंत सिंह यांच्या घरावर पोलिसांची छापा मारला आहे. पोलिसांनी ही छापेमारी आमदाराच्या लदमा गावातील घरावर केली. विशेष म्हणजे, अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी यांनी मुंगेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.\nज्या घरी मी गेल्या १४ वर्षापासून गेलो नाही. जे घर बंद आहे. जेथे मी गेलोच नाही. त्या ठिकाणी एके-४७ रायफल आली कुठून, हे सर्व मला अडकवण्यासाठी केले जात आहे, असा आरोप आमदार अनंत सिंह यांनी वृत्तवाहिनींशी बोलताना केला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nभारत बंद : ट्रॅक्टरवर स्वार होऊन तेजस्वी यादव यांची रॅल...\nभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्...\n, 'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्...\nCTET च्या परीक्षेची घोषणा; 'या' दिवशी होणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nमुंबईकंगना प्रकरण: हायकोर्टाने BMC कडे मागितले 'या' तीन मुद्द्यांचे स्पष्टीकरण\nसिनेन्यूजमाझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा\nनागपूरशहीद पित्याच्या शौर्याला मुलींचा अनोखा सलाम\nदेशUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने 'असे' दिलेउत्तर\nकोल्हापूरकरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ऑडिट होणार, २२ पथकं तैनात\nसोलापूरपुढचे आंदोलन मातोश्री आणि सिल्व्हर ओकवर; पडळकरांचा इशारा\nनागपूरविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोटींचा, प्रस्ताव पाठवला\nमुंबईअनलॉकसाठी आहे 'ही' त्रिसुत्री; CM ठाकरेंनी सांगितले पुढचे धोके\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/52159", "date_download": "2020-09-26T03:14:35Z", "digest": "sha1:35A2TNSVJWTHZSKBQJQOX7TMROASMJZX", "length": 5641, "nlines": 105, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ज्योतिष | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ज्योतिष\n१९ जुलै २०१४ पासून गुरु ग्रह कर्क या गुरुच्या उच्चराशीत आहे. उच्चराशीतील गुरुग्रह हा यश किर्ती , सुख समाधान व बुद्धिमत्ता प्रदान करतो असा उल्लेख ज्योतिषविषयक ग्रंथात मिळतो. या नियमाचा संशोधनात्मक अभ्यास करण्याची गरज आहे, त्यासाठि कर्क राशीत गुरु असणा-या पत्रिका संग्रहात असणे नितांत गरजेचे आहे. ज्योतिषातील ग्रहयोगांचा संशोधनपर अभ्यास करण्यासाठि १९ जुलै २०१४ ते ३१-१२-२०१४ या काळात जन्म झालेल्या बाळांची पत्रिका विनामुल्य करुन देण्यात येईल.\nजन्मपत्रिकेची pdf file इमेल द्वारे पाठवण्यात येईल.\n>>उच्चराशीतील गुरुग्रह हा यश\n>>उच्चराशीतील गुरुग्रह हा यश किर्ती , सुख समाधान व बुद्धिमत्ता प्रदान करतो असा उल्लेख ज्योतिषविषयक ग्रंथात मिळतो.>>>\n--या एका वर्षात जन्मलेल्या सर्वांचे भले होईल काय\nहोइल फक्त तो केंद्र स्थानी\nहोइल फक्त तो केंद्र स्थानी किंवा कोन स्थानी कींवा\nलाभ स्थानात असला पाहिजे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/tips-and-tricks-to-improve-android-and-iphone-smartphone-battery-life/articleshow/77427268.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2020-09-26T01:44:12Z", "digest": "sha1:HQA75OLSNXMY45BRE7FLXGK5LJNNUNAB", "length": 14627, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "android phone battery life: स्मार्टफोनच्या बॅटरी लाइफनं त्रस्त आहात\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्मार्टफोनच्या बॅटरी लाइफनं त्रस्त आहात, या ट्रिक्स वापरा\nमहागडा स्मार्टफोन खरेदी करा किंवा महागडा आयफोन खरेदी करा. मोबाइलचा वापर वाढल्याने फोनच्या बॅटरीचा इश्यू अनेकांना येत आहे. त्यामुळे फोनमधील काही ट्रिक्सचा वापर केल्यास बॅटरी लाइफने त्रस्त असलेल्या फोन युजर्संना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.\nनवी दिल्लीः सध्या स्मार्टफोन मेकर कंपन्या कॅमेऱ्यासोबत बॅटरीवर सुद्धा जास्त फोकस करीत आहेत. 5000mAh बॅटरी आता कोणत्याही मोबाइलमध्ये मिळतेय. खूप साऱ्या अँड्रॉयड आणि आयफोन युजर्संना बॅटरीची चिंता सतावते आहे. बॅटरी लवकर उतरत असल्याने अनेक जण त्रस्त आहेत. परंतु, काही ट्रिक्सच्या मदतीने फोनची बॅटरी लाइफ बऱ्यापैकी सुधारता येवू शकते. जाणून घ्या या ट्रिक्सविषयी.\nवाचाः सर्वात स्वस्त पोको फोन खरेदीची आज संधी, ऑफर्सही मिळणार\nसर्वात आधी स्मार्टफोनला चार्ज करण्याची कोणती पद्धत चांगली आहे. ते जाणून घ्या. बरेच जण फोनची बॅटरी संपल्यानंतर त्याला चार्ज करतात. तर काही लोक रात्रभर फोन चार्जिंगला लावून झोपी जातात. या दोन्ही सवयी आपल्याला बदलाव्या लागतील. फोनची बॅटरी ५० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतर त्या फोनला चार्जिंग करणे चांगले आहे. तसेच फोन १०० टक्क्यांपर्यंत चार्ज करू नका.\nवाचाः रियलमी Narzo 10 फोनचा आज सेल, ऑफर्स मिळणार\nअँड्रॉयड मध्ये हे फीचर बॅटरी सेव्हिंग मोड आणि आयफोन मध्ये लो पॉवर मोड या नावाने येते. हे ऑप्शन बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या अॅप्सला बंद करण्याचे काम करते. त्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी वाचते. बॅटरी सेव्हिंग मोडचा वापर अशावेळी करा. ज्यावेळी तुमच्या फोनची बॅटरी १५ ते २० टक्के राहिली आहे. तसेच चार्जिंगची कोणतीही व्यवस्था नसल्यास याचा वापर करा.\nवाचाः WhatsAppच्या या नवीन फीचर्समुळे चॅटिंगची मजा दुप्पट होणार\nहे फीचर बंद ठेवा\nबॅटरी लाईफ वाढवण्यासाठी ऑटो ब्राइटनेस सेटिंगला ऑन करा. तसेच फोनचा वाय फाय आणि लोकेशनचा वापर होत नसेल तर त्याला ऑफ करा. नेटवर्क सर्च करण्यासाठी हे फीचर बॅटरी खर्च करतात. तसेच बॅकग्राऊंडला सुरु असलेले अॅप्स सुद्धा बंद करा.\nवाचाः HTCचा नवा E2 स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स\nडार्क मोडचा वापर करा\nबऱ्याच स्मार्टफोन आणि अॅप्समध्ये डार्क मोड फीचर आले आहे. या मोडचा वापर केल्यास बॅटरी कमी खर्च होऊ शकते. कमीत कमी व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम यासारख्या जास्त वापरल्या जाणाऱ्या अॅप्सवर डार्क मोड फीचर ऑन करा.\nवाचाः इंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nवाचाः जिओचे सर्वात फायद्याचे प्लान, वर्षभराची वैधता, ७३० GB डेटा\nवाचाः सेलः नॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000...\nजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या ...\nरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्...\nसॅमसंगचा स्वस्त 5G फोन Galaxy A42 5G, खास प्रोसेसर मिळण...\nरेडमीच्या या स्मार्टफोनचा आज सेल, स्वस्त किंमतीत मस्त ऑ...\nअॅमेझॉनवर फ्रीडम सेल, जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काउंट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nशहीद जवान नरेश बडोलेंना काश्मीरात वीरमरण\nकृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचं देशव्यापी आंदोलन\nभाजप हा एकसंध आणि एक संघ आहे - विनोद तावडे\nराज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिटकून बसणारे सरकार - राम शिंदे\n'भारत बंद'ची हाक देणारे शेतकरी विरोधी- राम शिंदे\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nकार-बाइकदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी\nमोबाइल४.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास\nकरिअर न्यूजविद्यापीठाच्या ATKT परीक्षेला तांत्रिक अडचणीचा फटका\nन्यूजड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nविदेश वृत्तचीनला वेसण घालणार जपानच्या पंतप्रधानांची भारताला साद\nनागपूरविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोटींचा, प्रस्ताव पाठवला\nकोल्हापूरकरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ऑडिट होणार, २२ पथकं तैनात\nअर्थवृत्तराणा कपूरला 'ईडी'चा दणका ; लंडनमधील १२७ कोटींचा फ्लॅट केला जप्त\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%9F", "date_download": "2020-09-26T03:08:23Z", "digest": "sha1:TVL4KY3UBKXE7FQ4ZPMHQ4ZF3RRCLC77", "length": 3326, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आंबट - विकिपीडिया", "raw_content": "\nही एक चव आहे.\nचिंच, कैरी, डोंगरी आवळा, न पिकलेली द्राक्षे यांची चव आंबट असते.\nगोड • कडू •आंबट • खारट • तुरट • तिखट • सपक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मे २०१२ रोजी २२:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/anurag-kashyap/", "date_download": "2020-09-26T03:00:07Z", "digest": "sha1:U7VOOVMX5EGTVAUFFKPJKSN7UDYUFJCI", "length": 3633, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "anurag kashyap Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nअनुराग कश्‍यपवर बलात्काराचा गुन्हा दाखल\n…ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामीच – निलेश राणे\nरवी किशन यांनी दिलं अनुरागला सणसणीत उत्तर, “मी गांजाचे झुरके मारायचो पण…”\n“रवी किशन दिवसाची सुरवातच गांजाचे झुरके मारून करायचे” – अनुराग कश्यप\nकुणाल कामरानं काय चूक केली – अनुराग कश्यप\n“चित्रपटासाठी अनुदान दिले नाही म्हणून अनुराग कश्‍यपकडून विरोध”\nकोटामधील १०० बालकांचा मृत्यूवर अनुराग कश्यपचा संताप, म्हटले…\nउत्तर प्रदेश हिंसेप्रकरणी बॉलिवूडकर एकवटले; न्यायालयीन चौकशीची मागणी\n‘एमी अवार्ड्स २०१९’: ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘लस्ट स्टोरीज’ला…\n‘अनुराग कश्यप’ने ट्विटरला ठोकला राम राम…\nनिवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांक उसळले\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२६ सप्टेंबर २०२०)\nलक्षवेधी : केवळ रेटिले बहुमता\nदखल : कांद्याचं रडगाणं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://cinenama.in/category/tv/", "date_download": "2020-09-26T01:30:40Z", "digest": "sha1:2BPTT4OLGHTWIEUR3RJMLP5TLYTQWTCT", "length": 10540, "nlines": 123, "source_domain": "cinenama.in", "title": "छोटा पडदा - Cinenama", "raw_content": "\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nआता दणक्यात ‘झी वाजवा’\nमुंबई :झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेडच्यावतीने एका नवीन मराठी संगीत वाहिनी – ‘झी वाजवा’ची नुकतीच घोषणा केली. या नवीन वाहिनीच्या लोगोचे अनावरण सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी आणि मराठी...\nआता भेटा आवडत्या सुपरस्टार्सना…\nमुंबई :ट्रूफॅन (#TrueFan) हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे जो ए-लिस्ट सेलिब्रेटींसाठी बिझनेस मॉडेल घेऊन आला आहे, यासारखे दुसरे बिझनेस मॉडेल सध्या बाजारपेठेत उपलब्ध नाही.सर्वात मोठा एकमेव, फॅन्सवर आधारित...\nदिशा गुंतलेय ‘स्क्रिप्ट रिडींग’मध्ये…\nकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनने मनोरंजन उद्योगासहित सर्वांच्या आयुष्याला एक ब्रेक लागलेला आहे. त्याचवेळी, अभिनेत्री दिशा पटानीने (Disha patani) कामासोबत जोडले राहणे आणि या वेळेचा...\n‘स्वराज्यजननी जिजामाता’ रंजक वळणावर\nराजमाता जिजाऊ म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्वाची मूर्ती ‘हळवी आई’ आणि ‘कणखर राज्यकर्ती’ अशा दोन्ही बाजू मालिकेच्या माध्यमातून पोहचवण्यात यशस्वी ठरलेली सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेने...\n‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन गायब\nभारतातील कुप्रसिद्ध शक्तिशाली भांडवलदारांच्या भ्रष्टाचारांचा आढावा घेणारा माहितीपट (वेबसीरिज) नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मने तयार केला असून येत्या २ सप्टेंबर रोजी तो प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी...\nनानीच्या ‘व्ही’ चा प्रीमिअर होणार प्राईमवर…\nअमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या आगामी तेलुगु एक्शन थ्रिलर 'वी'च्या वर्ल्ड प्रीमियरची घोषणा केली आहे. या चित्रपटात सुपरस्टार स्टार ’नानी' मुख्य भूमिकेत असून सोबत अदिति राव हैदरी,...\nउद्या होणार ‘रेसिस्ट’ प्रदर्शित…\nसहिष्णुता आणि अत्याचाराविरुद्ध लढ़ा देणाऱ्या महिलांचे चित्रण करणारा 'रेसिस्ट' हा कोंकणी लघुपट, १५ ऑगस्ट रोजी यूट्यूबवर प्रदर्शित होत आहे. कुणाल आणि हर्षला पाटिल बोरकर ह्यांच्या कुंहर्ष प्रोडक्शनने या लघुपटाची...\n‘झी’वर साजरी होणार प्रभावळकरांची पंच्याहत्तरी\nआपल्या अष्टपैलू अभिनयातून मराठी व हिंदी सिनेसृष्टीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे मराठी अभिनेते अनेक आहेत. पण एखाद्या भूमिकेत स्वतःला सहज सामावून घेणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांची...\nमी न धावताच दमून गेलो…\nआयुष्यात मला दोन कलाकारांसोबत काम करण्‍याची इच्‍छा होती, ते म्‍हणजे शाहरूख खान आणि नसीरूद्दीन सर. ''नसीरूद्दीन शाह यांच्‍यासोबत काम करण्‍याचे माझे स्‍वप्‍न अखेर या मालिकेच्या माध्यमातून पूर्ण झाले. त्‍यांच्‍याकडून भरपूर...\nमित्र आपल्या जीवनात खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. ते आपल्याला प्रोत्साहित करतात, ते आपल्याला प्रेम करतात, आपल्याला सहन करतात आणि बिनशर्त स्वीकारतात. मूलभूतपणे, मित्र आम्ही निवडलेले कुटुंब असतात. आपण...\nप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात...\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/if-the-scientists-claim-is-true-the-corona-is-now-on-the-verge-of-extinction-127633335.html", "date_download": "2020-09-26T02:51:18Z", "digest": "sha1:E4FY7IU7I27XSGPB5MOIPWWIUPP4P727", "length": 9236, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "If the scientists' claim is true, the corona is now on the verge of extinction | वैज्ञानिकांचा दावा खरा ठरला तर कोरोना आता संपण्याच्या मार्गावर; 50% वा त्यापेक्षा कमी लोकसंख्येस संसर्ग होऊनही येऊ शकते हर्ड इम्युनिटी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n:वैज्ञानिकांचा दावा खरा ठरला तर कोरोना आता संपण्याच्या मार्गावर; 50% वा त्यापेक्षा कमी लोकसंख्येस संसर्ग होऊनही येऊ शकते हर्ड इम्युनिटी\nमुंबई-अहमदाबादमध्ये सिरो सर्व्हेत अर्धी लोकसंख्या संक्रमित आढळली होती, आता नवे रुग्ण घटले\nकाेराेनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीसोबतच हर्ड इम्युनिटीही उपयुक्त ठरते, असे वैज्ञानिक सांगत आहेत. हर्ड इम्युनिटी म्हणजे विषाणूला अशी माणसे मिळणे बंद होणे, जे संसर्ग करून तो सतत पसरत राहील. वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार, ७०% लोकांत विषाणूरोधक क्षमता निर्माण झाल्यावरच एखाद्या क्षेत्रात हर्ड इम्युनिटी विकसित होईल. ही क्षमता लसीकरण किंवा संसर्ग बरा झाल्यानंतर येऊ शकते. एखादी संक्रमित व्यक्ती आणखी किती लोकांपर्यंत विषाणूचा संसर्ग पसरवत आहे या आधारावर हर्ड इम्युनिटी पाहिली जाते. अर्थात, काही संशोधक नवी आशा जागवणाऱ्या शक्यता शोधत आहेत.\nन्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत १२ पेक्षा जास्त वैज्ञानिकांनी म्हटले की, हर्ड इम्युनिटीची सीमा ५०% किंवा त्यापेक्षा कमी होऊ शकते. वैज्ञानिक आणि गणितज्ञ जटिल सांख्यिकी माॅडेलिंगच्या आधारावर हा अंदाज लावत आहेत. त्यांच्यानुसार, न्यूयॉर्क, लंडन आणि मुंबईच्या काही भागांत विषाणूविरोधात भक्कम इम्युनिटी निर्माण झाली आहे. हार्वर्ड टीएच चान स्कूल अाॅफ पब्लिक हेल्थमधील महामारीतज्ञ बिल हनैग म्हणाले- न्यूयाॅर्क आणि लंडनच्या काही पॉकेट्समध्ये भक्कम इम्युनिटी आहे. स्टॉकहोम विद्यापीठातील गणितज्ञ टॉम ब्रिटन म्हणतात की, ४३ % लोकांना संसर्ग झाल्यावर हर्ड इम्युनिटी येऊ शकते. म्हणजे एखाद्या लोकसंख्येत एवढ्या लोकांना संसर्ग झाल्यावर किंवा ते बरे झाल्यावर विषाणू अनियंत्रित पद्धतीने पसरणार नाही. अर्थात, हर्ड इम्युनिटीची ही एक मोठी किंमत आहे. ४३% लोक संक्रमित होणे म्हणजे बरेच लोक आजारी पडतील. मृत्यूही होतील.\nन्यूयाॅर्कच्या काही क्लिनिकमध्ये आलेल्या ८०% लोकांत अँटिबॉडी आढळल्या. पण कोलंबिया विद्यापीठाचे महामारीतज्ञ वान यांग यांच्या मते क्लिनिकमध्ये येणारे सिम्प्टोमॅटिक असतात. ते संक्रमित मिळण्याची शक्यता जास्त आहे.\nया उदाहरणांवरून समजून घेऊ... मुंबई-अहमदाबादमध्ये सिरो सर्व्हेत अर्धी लोकसंख्या संक्रमित आढळली होती, आता नवे रुग्ण घटले\nस्वस्थ लोकसंख्येच्या सिरो सर्व्हेत अँटिबॉडी टेस्टद्वारे हे पाहिले जाते की, शरीरात अँटिबॉडी विकसित झाली की नाही. ती विकसित होण्याचा अर्थ व्यक्ती कोरोनाद्वारे संक्रमित होऊन बरीही झाली आहे.\n> दिल्ली, मुंबईत एकाच वेळ सिरो सर्व्हे झाले. फरक असा होता की, दिल्लीच्या सर्व जिल्ह्यांत, तर मुंबईच्या ३ वॉर्डात हा सर्व्हे झाला. दिल्लीच्या सर्व्हेचा निकाल असे सांगतो की, २३% लोकसंख्या संक्रमित होऊन बरी झाली होती. दिल्ली, मुंबईत आता नवे रुग्ण कमी आहेत.\n> मुंबईच्या झोपड्यांत ५७%आणि पॉश भागांत १६% लोकांत अँटिबॉडी मिळाल्या. असे मानले जाते की, मुंबईची ३३% लोकसंख्या संक्रमित होऊन बरी झाली आहे. धारावीमध्ये नवे रुग्ण घटण्यामागेही हर्ड इम्युनिटी असू शकते.\n> अहमदाबादेत मे महिन्यात ४९% लोकांत अँटिबॉडी आढळल्या. तेथे रुग्णांत सतत घट.\n> पुण्यातील सर्वेक्षणात ५१.५% लोकांत अँटिबॉडी आढळल्या. पुणे देशातील सर्वात संक्रमित शहर आहे. मुंबई-अहमदाबाद उदाहरण म्हणून घेतले तर आगामी काळात पुण्यातही रुग्ण घटू शकतील.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/yuva-katta/beauty-care-tips-hot-water-or-cold-water-which-is-better-for-hair-wash-in-marathi/articleshow/77353844.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article19", "date_download": "2020-09-26T02:51:37Z", "digest": "sha1:PC7XDT5ZPIOHIRQSAGDF27MJV4SHRIQL", "length": 17893, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nHair Care थंड की गरम केस धुण्यासाठी कोणते पाणी ठरेल लाभदायक\nगरम पाण्याने आंघोळ केल्यानं केसांसह त्वचेचंही भरपूर प्रमाणात नुकसान होतं. गरम पाण्याऐवजी थंड पाण्याने पाण्याने केस धुवावे. थंड पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा आणि केसांना प्रचंड फायदे मिळतात.\nकेस चांगले असताना आपण त्यांची योग्य ती देखभाल करत नाही. केसांशी संबंधित समस्या उद्भवल्यानंतरच त्यांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाला जाग येते. केसगळती रोखण्यासाठी लोक नको-नको ते उपाय करून पाहतात. केस घनदाट, लांबसडक, काळेशार आणि मजबूत व्हावे, यासाठी हेअर स्पापासून ते महागड्या शॅम्पू, कंडिशनरचा वापर केला जातो. केस (Hair Care) निरोगी असतील तर आपल्या सौंदर्यामध्येही भर पडते.\nकेसांचे नुकसान टाळण्यासाठी तेल मसाजसह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. केस खराब झाल्यानंतर काळजी घेण्याऐवजी केस खराब होऊ नये म्हणून आधीपासूनच काळजी घ्या. दरम्यान, काही जणांना केस धुण्याची योग्य पद्धत देखील माहिती नसते. उदाहरणार्थ केस धुण्यासाठी गरम पाणी की थंड वापरावे हा प्रश्न प्रत्येक महिलेच्या मनात असावा.\n(Hair Oil केसगळतीपासून सुटका हवीय वापरुन पाहा ५ आयुर्वेदिक तेल)\n​गरम की थंड पाणी\nगरम पाण्याने आंघोळ केल्यानं शरीराला आराम मिळतो, ही बाब खरी आहे. पण केस धुण्यासाठी गरम की थंड पाणी वापरावे यावरून तुमचाही गोंधळ होत आहे का. याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती.\nगरम पाण्याचा वापर टाळावा, कारण..\nसर्व प्रथम आपण समजून घेतले पाहिजे की आपल्या शरीरासाठी गरम पाणी कशा पद्धतीनं काम करते. गरम पाण्यामुळे आपल्या रोमछिद्रांमधील दुर्गंध स्वच्छ होते तसंच टाळूची त्वचा देखील स्वच्छ होते. पण यामुळे नैसर्गिक तेल कमी होऊन केस कोरडे होऊ लागतात.\n(Hair Growth Tips या ८ गोष्टींमुळे तुमची केसगळतीची समस्या होईल दूर)\nयाव्यतिरिक्त टाळूच्या त्वचेवरील पोअर्स मोकळी झाल्याने केसांच्या मुळांवर वाईट परिणाम होतो. यामुळे केस कमकुवत होतात. परिणामी केस गळणे, तुटणे, केस कोरडे तसंच निर्जीव होणे इत्यादी समस्या निर्माण होतात. हे नुकसान टाळण्यासाठी केस धुताना अति गरम पाण्याचा वापर करणं टाळावे.\n(चेहरा व केसांच्या सौंदर्यासाठी संजीवनी ठरेल हे घरगुती आयुर्वेदिक तेल)\nकोमट पाण्यानेही केसांना तितकेसे फायदे मिळत नाहीत. कोमट पाण्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेलावर परिणाम होतात. केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊन ते कोरडे होतात. थंड पाण्याने आंघोळ करणं शक्य होत नसल्यास हलक्या गरम पाण्याचा वापर करावा. केसांच्या आरोग्यावर कोणतेही परिणाम होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेणे आवश्यक आहे.\n(Hair Loss सर्व उपाय करूनही केसगळती सुरूच आहे तर वेळीच व्हा अलर्ट)\nकेसांना कंडिशन लावल्यानंतरही गरम पाण्याने आंघोळ करण्याची चूक करू नका. गरम पाण्याने आंघोळ केल्यास केसांवर कंडिशनर लावल्याचा कोणताही सकारात्मक परिणाम होत नाही. उलट केसांचे नुकसानच अधिक होते. यामुळे केसगळतीची समस्या उद्भवते.\n(Hair Care Tips स्ट्रेसमुळे ३ प्रकारे होतो केसगळतीचा त्रास, जाणून घ्या लक्षणे)\n​केस धुण्याची योग्य पद्धत\nआपल्या हातांवर शॅम्पू घ्या आणि यानंतर केसांवर शॅम्पू लावून हलक्या हातानं केसांचा मसाज करा. केस रगडून धुण्याची सवय वेळीच बंद करावी. हातांनी जोर देऊन केस धुतल्यास ते तुटतात तसंच गळतात. आपल्या त्वचेप्रमाणेच केसांचीही काळजी घ्यावी.\n(कोरियन तरुणी महागडे प्रोडक्ट वापरुन नव्हे तर अशा पद्धतीनं करतात केसांची देखभाल)\n​थंड पाण्याने केस धुण्याचे फायदे\nथंड पाण्यामुळे टाळूच्या त्वचेवरील रोमछिंद्र बंद होतात. शिवाय केसांमधील ओलावा देखील टिकून राहतो. टाळूची त्वचा निरोगी राहते. यामुळे कोंड्याची समस्या उद्भवत नाही. थंड पाण्यामुळे रक्त प्रवाह सुद्धा वाढतो. रक्त प्रवाह वाढल्याने केसांचे आरोग्य सुधारते. केस मजबूत, चमकदार आणि घनदाट होतात.\n(आठवड्यातून एकदा मेथी पॅक केस आणि त्वचेवर लावा, मिळतील जबरदस्त फायदे)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nHair Care Tips आंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची ...\nAloe Vera Benefits कोरफड जेल रात्रभर चेहऱ्यावर लावून ठे...\nSteaming Benefits चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेणे योग्य...\nHair Care Tips केस रोज धुण्याची आहे सवय\nNatural Hair Care दही आणि केळ्यापासून घरामध्ये कशी तयार...\nSkin Care Tips तिशीनंतरही तरुण दिसण्यासाठी पुरुषांनी अशी घ्यावी चेहऱ्याची काळजी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nभाजप हा एकसंध आणि एक संघ आहे - विनोद तावडे\nराज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिटकून बसणारे सरकार - राम शिंदे\n'भारत बंद'ची हाक देणारे शेतकरी विरोधी- राम शिंदे\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nकार-बाइकदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nकरिअर न्यूजविद्यापीठाच्या ATKT परीक्षेला तांत्रिक अडचणीचा फटका\nमोबाइल४.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nपुणेडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ही' मागणी\nदेशUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने 'असे' दिलेउत्तर\nमुंबईअनलॉकसाठी आहे 'ही' त्रिसुत्री; CM ठाकरेंनी सांगितले पुढचे धोके\nसिनेन्यूजमाझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा\nमुंबईकंगना प्रकरण: हायकोर्टाने BMC कडे मागितले 'या' तीन मुद्द्यांचे स्पष्टीकरण\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-26T02:23:52Z", "digest": "sha1:ZBUV6LRDP3I4DCAVWUYLQI4ITQSF5NDO", "length": 5337, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संस्था - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंस्था म्हणजे सामान्यपणे एका उद्देशाने तयार करण्यात आलेली एक सामाजिक व्यवस्था जी स्वतःची एकत्रित उद्दीष्ट्ये पाळते व स्वतःच्या कामावर नियंत्रण ठेवते.संस्थेने निर्मित वातावरणाशी त्यांची एक सीमारेषापण आखण्यात आलेली असते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जानेवारी २०१८ रोजी १५:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/when-rhea-chakraborty-denies-relationship-with-sushant-singh-rajput-127619992.html", "date_download": "2020-09-26T02:28:41Z", "digest": "sha1:M5WPO7HN5YWD5H4ONB3HNUS6DHZM6KVA", "length": 7765, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "When Rhea Chakraborty Denies Relationship With Sushant Singh Rajput | आता स्वत:ला सुशांतची गर्लफ्रेंड सांगतेय रिया चक्रवर्ती, त्याच्या मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वी अफेअरच्या बातम्यांचे केले होते खंडन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुशांत आत्महत्या प्रकरण:आता स्वत:ला सुशांतची गर्लफ्रेंड सांगतेय रिया चक्रवर्ती, त्याच्या मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वी अफेअरच्या बातम्यांचे केले होते खंडन\nएप्रिल महिन्यात रियाने सुशांतला डेट करत नसल्याचे सांगितले होते.\nअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती स्वत:ला त्याची गर्लफ्रेंड असल्याचे सांगतेय. सोबत त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याचा दावादेखील ती करतेय. पण सुशांतच्या मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वी म्हणजे एप्रिलमध्ये तिने त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. सुशांतला डेट करत आहे का असा प्रश्न तिला विचारला गेला होता, त्याचे उत्तर देताना नाही, हे चुकीचे आहे असे ती म्हणाली होती.\nरिया म्हणाली- सुशांत आणि मी फक्त चांगले मित्र आहोत\nरिया म्हणाली होती- मी किंवा सुशांतने कधीही हे स्वीकारले नाही. कारण, ते बरोबर नाही. सुशांत आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. मी त्याला आठ वर्षांपासून ओळखत. यशराज फिल्म्समध्ये आम्ही एकत्र होतो आणि बर्‍याच काळापासून आमची मॅनेजरही एकच होती. एवढ्या वर्षांत आमची मैत्री वाढली. मी माझ्या सर्व मित्रांवर खूप प्रेम करते आणि ते मी लपवत नाही.\nमी माझ्या आयुष्यात असलेल्या लोकांवरील माझ्या प्रेमाबद्दल खूप सार्वजनिक आहे. मग ती मुलगी असो किंवा मुलगा. राहिला प्रश्न सुशांतचा तर, मी ज्या लोकांना ओळखते त्यापैकी तो सर्वात चांगला आणि कुल व्यक्ती आहे. मला त्याच्याबद्दल आणखी काही माहिती नाही. पण तो माझ्यासाठी अत्यंत गोंडस आणि आकर्षक आहे. तो माझ्याबद्दल काय विचार करतो हे मला ठाऊक नाही, असे रिया म्हणाली होती.\nसुशांतची ती सवय, जी रियाला पसंत नव्हती\nरियाला यावेळी विचारले गेले होते की, सुशांतची अशी कुठली सवय आहे का जी तुला आवडत नाही याचे उत्तर देताना ती म्हणाली होती, \"सुशांत खूप हुशार आहे. त्याला सर्व गोष्टींची खूप जास्त माहित आहेत. ही सवय नाही, तो तसाच आहे. सुशांतशी बोलल्यानंतर आपल्याला पुन्हा स्वतःबद्दल विचार करावा लागतो.\"\nसुशांतला रियाशी लग्न करायचे होते\nसुशांतला रियासोबत लग्न करायचे आहे, अशी बातमी ऑगस्ट 2019 मध्ये आली होती. पण रियाला अजून काही वेळ हवा होता. एका मुलाखतीत सुशांत रियाबरोबरच्या त्याच्या नात्याबद्दल बोलला होता.\nतो म्हणाला होता की, \"याक्षणी काही बोलणे योग्य नाही. नुकत्याच सुरु झालेल्या नात्याविषयी लोकांनी बोलणे योग्य नाही. जर तुम्ही माझ्याबद्दल प्रश्न विचारले तर मी उत्तर देऊ शकतो. जर तुम्ही दुस-या व्यक्तीविषयी प्रश्न विचाराल तर मला त्याला विचारावे लागेल.\" रियाच्या आधी सुशांतचे नाव अंकिता लोखंडे, कृती सेनॉन आणि सारा अली खान यांच्याशी जोडले गेले होते.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/2020/09/01/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-26T01:50:59Z", "digest": "sha1:OL2W7I37WPYG2PHHFPLO7PJV6GPFV4GI", "length": 8296, "nlines": 84, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "बाप्पा निघाले गावाला !!", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nबाप्पाच्या आगमना वेळी खरतर बाप्पा पुन्हा जाऊच नये अस नेहमी वाटत राहतं. पण अनंत चतुर्थी येते आणि वरद विनायकाची जायची वेळ येते. मनातल्या भावनांना आवरत गजाननाची निरोपाची तयारी करावी लागते. हो पण बाप्पाच्या विसर्जनाला मस्त मिरवणूक काढली जाते. ढोल ताशा, लेझिम, कुठे डिजे , कुठे भक्तिपर गाणी यांनी हा आसमंत दुमदुमून जातो. “पुढच्या वर्षी लवकर या” ही बाप्पाला दिलेली साद वक्रतुंड नक्की ऐकतो. आणि सुरू होते बाप्पाला निरोपाची वेळ. मनात एक सल असते, पण तिथेच एक पुन्हा लवकर येण्याची ओढ असते. या द्विधा मनस्थितीत बाप्पा आपल्या पुढच्या प्रवासाला जात. जिथे पुढच्या वर्षी लवकर त्याला पुन्हा परतून यायचं आहे.\nबाप्पाला निरोप देताना खरतर लहान मुलांपासून ते ज्येष्ठा पर्यंत सर्व लोकांची अवस्था एकच असते. कोणाच्या डोळ्यात पाणी येते तर कोणी अलगद आपले टिपूस गाळतो. अगदी कोणी पाहणार नाही याची दक्षता घेत. आणि ज्या उत्साहात बाप्पाला घरी आणले होते त्याच उत्साहात त्याला निरोप दिला जातो. जाता जाता बाप्पा खूप काही सांगून जातो. पुढच्या वर्षी येई पर्यंत त्याची आठवण रहावी असे करून जातो. आणि जाताना गणाधीश भक्ताला सांगतो की,\nमी पुन्हा येईपर्यंत तू नक्कीच आपल्या चांगल्या सवयी वाढवण्याचा प्रयत्न करशील.\nतुझ्या प्रत्येक आठवणीत माझ्या आठवणी तू जपशील.\nकधीच वाईट मार्गाने जाण्याचा प्रयत्न तू करणार नाही.\nसत्कर्म ही मला दिलेली खूप मोठी भेट असेल, तेव्हा पुढच्या वेळी येईल तेव्हा नक्कीच तू मला अशा खूप सुंदर गोष्टी देशील.\nमाणूस हा कर्म करतो आणि त्याच फळ त्याला नेहमी भेटतं हे कधी विसरु नकोस.\nमी जरी परत चाललो असेल, तरी माझे लंबकर्न तुझी प्रत्येक साद नक्कीच ऐकणार हे लक्षात ठेव.\nतुझ्या सोबत मी नेहमीच सावली बनून तुझा विघ्नहर्ता म्हणून राहील.\nमनोभावे केलेली माझी पूजा तुला नक्कीच इच्छित फळ देईल.\nपुढच्या वर्षी मी लवकर येईल \nआणि तुम्हा सर्व भक्तांच्या भेटीची ओढ मलाही राहिलं \nअस जणू सांगून बाप्पा आता निघाले आपल्या गावाला, त्यांच्या येण्याची वाट नक्कीच पाहत राहू, पण त्यांनी सांगितलेले मार्ग यावर नक्की चालू. आणि वर्षभर तिथेच त्या आठवणीत बाप्पाला जपू.\n पुढच्या वर्षी लवकर या \n पुढच्या वर्षी लवकर या \nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_6206.html", "date_download": "2020-09-26T02:30:45Z", "digest": "sha1:MTJYAQDPWR5DVMSMW6NIK5XWP2RRHF5W", "length": 3901, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ५१ ते ६०", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ५१ ते ६०\nशिवचरित्रमाला - भाग ५१ - पुरंदरचा दख्खन दरवाजा\nशिवचरित्रमाला - भाग ५२ - दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक\nशिवचरित्रमाला - भाग ५३ - एक दिव्य, तेवढेच दाहक तेज...\nशिवचरित्रमाला - भाग ५४ - राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला - भाग ५५ - पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला - भाग ५६ - राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला - भाग ५७ - एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला - भाग ५८ - दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला - भाग ५९ - आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला - भाग ६० - कारस्थाने घुमू लागली...\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/Learn-These-are-some-special-tips-from-the-kitchen.html", "date_download": "2020-09-26T03:15:02Z", "digest": "sha1:O3CNW5ET3IJICTL3RQ2Z7P53L4BYW4Z2", "length": 5232, "nlines": 72, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "जाणून घ्या ! किचन मधल्या ह्या काही खास टिप्स...", "raw_content": "\n किचन मधल्या ह्या काही खास टिप्स...\nbyMahaupdate.in मंगळवार, फेब्रुवारी ११, २०२०\n१. भेंडीची भाजी करताना त्यात दही घातल्याने भाजी चिकट होत नाही\n२. जास्त लिंबाच्या रसासाठी पाच ते दहा मिनिटं लिंबू कोमट पाण्यात भिजवावं.\n३. सुकं खोबरं तुरडाळीत ठेवलं तर खराब होत नाही\n४. फळभाज्या मऊ किंवा शिळ्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवल्याने टवटवीत होतात.\n५. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात मीठ टाकल्याने साल लवकर निघतात.\n६. साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात चार ते पाच लवंग ठेवाव्यात.\n७. भजीच्या पीठामध्ये मक्याचं पीठ घातल्याने भजी कुरकुरीत होतात.\n८. कच्ची केळी ठंड पाण्यात ठेवल्याने आठवडाभर टवटवीत राहतात.\n९. तांदूळ पाण्यात भिजवून ठेवला तर तांदळाचा दाणा मोकळा आणि मोठा होतो.\n१०. भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतलं मीठ टिकून राहतं.\n११. तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा वास टिकून राहतो.\n१२. डाळ किंवा तांदळामध्ये कडूनिंब घातल्यास त्याला किड लागत नाही.\n१३. चिमटीभर हळद बटाट्यांमध्ये घातल्यास ते लवकर उकडतात.\n१४. पुऱ्यांच्या कणकेत साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात.\n१५. लिंबाच्या रसाचे डाग घालवण्यासाठी त्यावर आल्याचा तुकडा घासावा.\n१६. पालेभाज्या सुकल्यावर पाण्यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्यास भाज्या ताज्या होतात.\n१७. कोफ्टा किंवा इतर पदार्थ तेलात तळताना थोडं मिठ घालावं. जेणे करून तेल त्या पदार्थात सोसलं जात नाही.\n१८. कडुनिंब शिल्लक असल्यास तो तळून डब्यात भरून ठेवल्याने जास्त काळ टिकतो.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-8-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE....%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE---%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1/a25nAr.html", "date_download": "2020-09-26T00:57:45Z", "digest": "sha1:GXYRNNGZ5SN6IM4GI3HYXEBXD7GCVMYP", "length": 6546, "nlines": 41, "source_domain": "rajsatya.page", "title": "राज्यात 8 ठिकाणी शुल्क नियामक समित्या....एक पुनरीक्षण समिती स्थापण्यास मान्यता - प्रा. वर्षा गायकवाड - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nराज्यात 8 ठिकाणी शुल्क नियामक समित्या....एक पुनरीक्षण समिती स्थापण्यास मान्यता - प्रा. वर्षा गायकवाड\nFebruary 24, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nराज्यात 8 ठिकाणी शुल्क नियामक समित्या....एक पुनरीक्षण समिती स्थापण्यास मान्यता - प्रा. वर्षा गायकवाड\nमुंबई - राज्यातील सर्व पालकांच्या व खाजगी शिक्षण संस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शुल्क नियामक समित्या 8 विभागीय ठिकाणी व एका पुनरीक्षण समितीच्या स्थापनेस शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी तातडीने मान्यता दिली.\nराज्यातील खाजगी शिक्षण संस्थामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये व संबधित शिक्षण संस्थामध्ये शाळेच्या शुल्कावरून वारंवार वाद निर्माण होत असतात. पालक संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांच्याकडे दाद मागत मात्र ही प्रकरणे निकाली निघण्यास विलंब लागत असे. यावर कायदेशीर पद्धतीने व विनाविलंब तोडगा काढण्यासाठी व दोन्ही पक्षांना न्याय देण्यासाठी सक्षम व कायदेशीर यंत्रणेची अत्यंत आवश्यकता होती. यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, 2011 पारित केला आहे.\nया अधिनियमान्वये राज्यातील 8 शैक्षणिक विभागांसाठी 8 विभागीय समित्या व राज्य स्तरावर एक पुनरीक्षण समिती स्थापन करण्याची तरतूद आहे. त्यानुसार या समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nया विभागीय समित्या सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली काम करतील. या समितीचे पदसिद्ध सचिव प्रादेशिक शिक्षण उपसंचालक असतील, तर पुनरीक्षण समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश असतील तर शिक्षण संचालक(माध्यमिक व उच्च माध्यमिक) हे पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतील.\nखाजगी शाळेतील शुल्काबाबत त्या त्या विभागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संबंधित विभागीय समितीकडे दाद मागता येईल.त्यामुळे राज्यातील पालक व शिक्षण संस्था यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nसद्यस्थितीत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली पुनरीक्षण समितीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुनरीक्षण समिती व प्रत्येक शैक्षणिक विभागासाठी एक याप्रमाणे आठ विभागीय शुल्क नियामक समित्या आपले कामकाज लवकरच सुरू करणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bankonlineexams.com/2016/08/blog-post_40.html", "date_download": "2020-09-26T02:51:36Z", "digest": "sha1:A6PVOPMP6CG5UKXP2EJOXJAXYNB5KOV2", "length": 18258, "nlines": 191, "source_domain": "www.bankonlineexams.com", "title": "Spardha Pariksha.... Flat 40% Off on Kiran Prakashan Pratiyogita Kiran Books: पारंपरिक इंधनाचा थेंबही न वापरता सौर विमानाची जगप्रदक्षिणा पूर्ण", "raw_content": "\nपारंपरिक इंधनाचा थेंबही न वापरता सौर विमानाची जगप्रदक्षिणा पूर्ण\nसोलर इम्पल्स २ या सौर विमानाने इंधनाचा थेंबही खर्च न करता जगप्रदक्षिणा पूर्ण केली असून त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सौर विमानाचा हा प्रवास ऐतिहासिक मानला जात आहे. सोलर इम्पल्स हे विमान गेल्या वर्षी नऊ मार्चला जगप्रवासासाठी निघाले होते ते शेवटच्या टप्प्यात कैरोहून ४८ तासात अबुधाबीला पोहोचले. हे विमान येथे पोहोचल्यानंतर अल बटीन एक्झिक्युटिव्ह\nविमानतळावर उपस्थित लोकांनी टाळयांचा कडकडाट केला. स्वित्र्झलडचे संशोधक व प्रकल्प संचालक बर्टाड पिकार्ड यांनी हे विमान चालवले. कैरो ते अबुधाबी अंतर २७६३ किलोमीटरचे आहे. तांबडा समुद्र व सौदी वाळवंट पार करून विमान येथे पोहोचले. या विमानाने जगप्रवासात ४२ हजार किलोमीटरचा प्रवास केला असून त्याने चार खंड, दोन महासागर व तीन सागर पार केले. सोलर इम्पल्स विमानाने कैरो येथून रविवारी अखेरच्या टप्प्यातील उड्डाण केले. विमानाने आधी आशिया, उत्तर अमेरिका, युरोप, उत्तर आफ्रिका येथील प्रवास पूर्ण केला आहे. पिकार्ड विमानातून बाहेर आले तेव्हा त्यांनी ऊर्जा भवितव्य स्वच्छ आहे व उद्याची वाट पाहण्याची गरज नाही; जे काही आहे ते आतापासूनच पुढे नेले पाहिजे. ऊर्जेच्या इतिहासात सोलर इम्पल्स या सौर विमानाने मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे. इंधन समस्येवर उत्तरे आहेत, ती तंत्रज्ञानाच्या रूपात आहेत. प्रदूषित जग आपण स्वीकारता कामा नये कारण लोक नेहमी वेगळा विचार करायला घाबरत असतात. सोलर इम्पल्स २ विमानाला पेपर प्लेन असेही म्हटले गेले होते. पिकार्ड व त्यांचे सहकारी आँद्रे बोर्शबर्ग यांनी या एक आसनी विमानाचा ताबा घेऊन आळीपाळीने ते चालवले. बोर्शबर्ग यांनी अखंडपणे ८९२४ किलोमीटर पर्यंत विमान चालवले. त्यात त्यांनी जपानमधील नागोया ते हवाई हे अंतर ११८ तासात पूर्ण केले होते. तेरा वर्षांपूर्वी हे साहस सुरू झाले होते असे त्यांनी सांगितले. हे विमान मोटारीपेक्षा जास्त जड नसून त्याचे पंख मात्र बोईंग ७४७ विमानाएवढे आहेत. त्याला चार इंजिने असून त्याच्या पंखात १७००० सौर घट बसवलेले आहेत.\nताशी ८० किलोमीटर वेगाने हे विमान जाते. त्यात वैमानिक श्वसनासाठी ऑक्सिजन टाकीचा वापर करतात. त्यांचा पोशाख हा वेगळा आहे. कॉकपिटमध्ये ते उणे २० अंश सेल्सियस ते अधिक ३५ अंश सेल्सियस तापमानाला बसू शकतात. पिकार्ड यांनी सांगितले की, २००३ मध्ये हा प्रकल्प आम्ही सुरू केला तेव्हा असाध्य ते साध्य करण्याचा ध्यास होता, तो आता पूर्ण झाला आहे.\nपं. लच्छू महाराज तबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले , याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या , म्हणजेच लयीच्या साथीश...\nसाइबर फ्राड रोकने की नीति\nजागरण ब्यूरो, नई दिल्ली बैंकों में साइबर अपराध से जुड़ी घटनाओं में तेजी से हो रही बढ़ोतरी और इसे रोकने में बैंकों की नाकामयाबी को देखते ह...\nतबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले, याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या, म्हणजेच लयीच्या साथीशिवाय संगीत पूर्ण होऊ ...\nस्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात\nतयार वस्त्र-प्रावरणाच्या ऑनलाइन विक्रीतील कट्टर स्पर्धक जबाँगला मिंत्राने ताब्यात घेतल्याचे मंगळवारी जाहीर केले. मिंत्राने जबाँगच्या गेल्...\n१ जूनपासून या गोष्टींवर होणार करवाढ नवी दिल्ली : एक जूनपासून आता हॉटेलचे खाणे , मोबाईलवर बोलणे , विमानाने आणि रेल्व...\nSome-Important-General-Awareness- वित्त बिल के लिए किसकी स्वीकृति आवश्यक है उत्तर :- राष्ट्रपति ● स्वतंत्र भारत के प्रथम राष्ट्रपति किस...\nस्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात\nनरसिंगच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात, प्रवीण रा...\nउत्तेजक प्रकरणी रशियाच्या १९ रोइंगपटूंवर बंदी\nबॅस्टिअन श्वाइनस्टायगरची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून ...\nरशियाच्या आठ वेटलिफ्टर्सवर बंदी\nराष्ट्रीय क्रीडापटू पूजा कुमारीचा सेल्फी काढताना म...\nपाटणा पायरेट्स सलग दुसऱयांदा चॅम्पियन\nआशिया खंडातील सर्वाधिक तापमान कुवेतमध्ये, आकडा पाह...\n‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या ...\nभाजपच्या पासवानांची खासदारकी रद्द\nगेको सरडय़ाची दुर्मीळ प्रजाती छत्तीसगडमध्ये सापडली\nकाश्मीरमध्ये पुन्हा संचारबंदी लागू\nभारतीय वंशाची सर्वात कमी वयाची मुलगी डेमोक्रॅटिक प...\nगुगलही रमले मुन्शी प्रेमचंद यांच्या आठवणीत\nपेलेट गनवर बंदी घालण्याची बार असोसिएशनची मागणी\nदारू पिणाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला शिक्षा; दारूबं...\nसौदीतील भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरुप परत आणू: सुषमा...\nपारंपरिक इंधनाचा थेंबही न वापरता सौर विमानाची जगप्...\nजीएसटीवर सर्व राज्यांची सहमती\nडेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन यांना राष्ट्र...\n‘कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नाही’\nभारताच्या टी.एम.कृष्णा आणि बेझवाडा विल्सन यांना मॅ...\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांच्या पूर्णाकृती पुतळ्य...\nबीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची नवी इनिंग; प्र...\nगोव्यात परदेशी नागरिकांना कृषी जमीन खरेदीची अनुमती\nचौदा वर्षांखालील मुलास कामावर ठेवणे गुन्हा\nशरीरात औषधे सोडण्यासाठी विविध आकाराची यंत्रे\nचार ‘पी-८ आय’ विमानांसाठी भारताचा अमेरिकेशी करार\nवस्तू व सेवा कर ; एक पाऊल सहमतीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://new.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%A9", "date_download": "2020-09-26T02:41:59Z", "digest": "sha1:DTP2SPJOLSZ6R6R7PPWRY5VUETDHPYUX", "length": 10979, "nlines": 304, "source_domain": "new.wikipedia.org", "title": "ज्यानुवरी ३ - Wikipedia", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\n१४३१ - जोन अफ आर्क बिशप पियरे काशोयागु ल्हाते लात.\n१४९६ - लियोनार्डो दा विन्सी नं ब्वैगु यन्त्रयागु छगु असफल प्रयोग यानादिल\n१५२१ - पोप लियो झिम्हनं मार्टिन लुथरयागु नामे फतवा जारी\n१७७७ - प्रिन्सटनयागु ल्वापु - जर्ज वासिंटन नं चार्ल्स क‍र्नवालिसयात बुकादिल.\n१८१५ - अस्ट्रिया, बेलायत व फ्रान्सनं छगु गुप्त सन्धि रसिया व प्रसिया विरूद्ध\n१८२३ - स्टीवन अस्टिननं मेक्सिको सरकार नाप टेक्सासयागु बुं काल.\n१८३३ - ब्रिटननं फल्कल्यान्ड द्वीप कब्जा यात.\n१८५५ - हवाईय् चीनी नागरिकतेगु प्रथम आगमन.\n१८६१ - अमेरिकन गृह युद्ध - डेलावेरनं युनियनिस्ट स्वया पिने वनिगु निर्णय यात.\n१८६८ - जपानय् शोगन सत्ता सिधल. मैजी वंश हानं राज्यकर्ता.\n१९२१ - तुर्कस्ताननं आर्मेनियानाप सन्धि यात.\n१९२५ - बेनितो मुसोलिनीनं इटलीयागु तानाशाही पद काल.\n१९५९ - अलास्का अमेरिकायागु ४९गु राज्य जुल.\n१९६१ - अमेरिका नं क्युबानाप संबंध सिधेकल.\n१९६२ - पोप जोह्न पल २ फिदेल कास्त्रोनापलात.\n१९९० - पनामायागु मनुएल नोरिगानं अमेरिकी सैन्यनाप आत्मसमर्पण यात.\n१९९४ - रसियात ईर्खुट्स्क येथून निघालेले एरोफ्लोतचे टी.यू.१५४ प्रकारचे विमान कोसळले. जमिनीवरील एकासह १२५ ठार.\n२००४ - ईजिप्तच्या फ्लॅश एरलाईन्स फ्लाईट ६०४ हे बोईंग ७३७ प्रकारचे विमान लाल समुद्रात कोसळले. १४८ ठार.\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nविकिमिडिया मंका य् थ्व विषय नाप स्वापु दुगु मिडिया दु: 3 January\nथ्व IPया निंतिं खँल्हाबल्हा\nथ्व च्वसुयागु लिधँसा (Cite) कयादिसँ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C/", "date_download": "2020-09-26T02:00:15Z", "digest": "sha1:JJDSRDAKQXQZNDU5CKIKPJ2KNOQEGWNM", "length": 8878, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "नंदुरबारमधील दोघांची गुजरातमध्ये भाजीपाल्याच्या गाडीतून दारूची वाहतूक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nनंदुरबारमधील दोघांची गुजरातमध्ये भाजीपाल्याच्या गाडीतून दारूची वाहतूक\nin खान्देश, ठळक बातम्या, नंदुरबार\nनंदुरबार : भाजीपाल्याच्या गाडीत दारुची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या नंदुरबार येथील दोन जणांना गुजरात राज्यातील तापी जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडून कारवाई केली. नंदुरबार येथून एका बोलेरो गाडीत भाजीपाला भरून तो गुजरातला नेला जात होता. त्यात विदेशी दारू देखील होती. याची खबर तापी जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक डी. एस. लाड यांना मिळताच त्यांनी सोनगड येथे चेक पोस्ट वर पथकाचा सापळा रचला. यावेळी संबंधीत गाडी येताच तिची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यात भाजीपाला बरोबरच बेकायदेशीर विदेशी दारूचा साठा देखील आढळून आला. या प्रकरणी मनोजभाई भगवानभाई माळी आणि क्लिनर चंद्रशेखर प्रतापभाऊ माळी यांना पोलिसांनी एम एच-39 एडी -0385 बोलेरो पिकअप वाहनसह ताब्यात घेतले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनां नुसार तापीचे पोलिस अधीक्षक एन.एन. चौधरी आणि पोलिस उपअधीक्षक व्यारा यांनी संपूर्ण जिल्ह्यात तपासणी सुरू केली आहे. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली.\nलॉकडाउन वाढवणे अर्थव्यवस्थेसाठी घातक : आनंद महिंद्रा\nलॉकडाऊनमध्ये मोहाडीच्या शेतात ओली पार्टी ; भाजप नगरसेवकासह पोलीस कर्मचार्‍याविरोधात गुन्हा दाखल\nभारतात कोरोना चाचणीचा नवा विक्रम; एका दिवसात विक्रमी चाचणी\nBIG BREAKING: बिहार निवडणुकीची घोषणा: तीन टप्प्यात होणार मतदान\nलॉकडाऊनमध्ये मोहाडीच्या शेतात ओली पार्टी ; भाजप नगरसेवकासह पोलीस कर्मचार्‍याविरोधात गुन्हा दाखल\nफडणवीस, चंद्रकांत पाटीलांनी आमची फसवणूक केली: खडसेंची नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2020/07/mseb-nagpur_6.html", "date_download": "2020-09-26T01:33:50Z", "digest": "sha1:Z4ISYURTQV5MEYRIPMNVXADSZYUDZNUG", "length": 14482, "nlines": 111, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "ऊर्जामंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद,नागपूर परिमंडलातील ४ लाख ४० हजार ग्राहकांनी भरले १४३ कोटीचे वीजबिल - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर ऊर्जामंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद,नागपूर परिमंडलातील ४ लाख ४० हजार ग्राहकांनी भरले १४३ कोटीचे वीजबिल\nऊर्जामंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद,नागपूर परिमंडलातील ४ लाख ४० हजार ग्राहकांनी भरले १४३ कोटीचे वीजबिल\nबिल भरण्यास ८ जुलै पर्यंत मुदतवाढ\nलॉकडाऊनंतर मीटर रीडिंगप्रमाणे दिलेले तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिलाबाबत ग्राहकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले होते.त्यानुसार नागपूर परिमंडलात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. परिणामी ग्राहकांचे समाधान झाल्यामुळे बिल भरण्याच्या उर्जामंत्रांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत नागपूर परिमंडलात ३० जूनपर्यंत सुमारे ०४ लाख ४० हजारापेक्षा जास्त ग्राहकांनी त्यांच्या १४३ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला आहे. त्यापैकी सुमारे २ लाख ८७ हजार ग्राहकांनी मागील १५ जून ते ३० जून या पंधरा दिवसात वीज बिल भरणा केला आहे.दरम्यान ज्या ग्राहकांची वीज बिल भरण्याची अंतिम मुदत संपली आहे, ती मुदत ८ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे.\nग्राहकांच्या मनातील बिलाबाबतची शंका दूर करण्यासाठी नागपूर परिमंडलात मागील पंधरा दिवसांपासून सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक मदत कक्ष स्थापन करून ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येत आहे. या शिवाय ग्राहक शिबिरे, वेबिनारचे आयोजन करून वीजबिल समजून सांगण्यात येत आहे. तसेच ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संपर्क, 'एसएमएस', व्हॉटस अप मेसेज पाठवून बिलासंदर्भात माहिती देण्यात येत आहे.\nमहावितरणच्या या जनजागृती मोहिमेला प्रतिसाद देत ३० जून अखेरपर्यंत नागपूर परिमंडलातील सुमारे ४ लाख ४४ हजार ३९४ ग्राहकांनी १४३ कोटी २८ लाख ७६ हजार ४९७ रुपयांचे वीजबिल भरले आहे.यात नागपूर शहर मंडलातील सुमारे २ लाख ९३ हजार ५६७,नागपूर ग्रामीण मंडलातील सुमारे ७८ हजार २९४ तर वर्धा मंडलातील ६८ हजार ५३३ ग्राहकांचा समावेश आहे.\nऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार, महावितरणने जून किंवा जुलै २० मध्ये एकत्रित आलेल्या वीज देयकांची रक्कम (थकबाकीसहित) एकरकमी भरल्यास एकत्रित आलेल्या एकूण रकमेच्या २% सूट ही पुढच्या महिन्याच्या देयकात समायोजित करून मिळणार आहे.ज्या ग्राहकांनी देयकाची रक्कम भरलेली आहे त्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे,तसेच ज्या ग्राहकांच्या देय तिथी निघून गेल्या आहेत त्यांच्या देय तिथी म्हणजेच वीज देयक भरण्याची मुदत ०८ जुलै पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे.तसेच जे ग्राहक ऑनलाईन पद्धतीने वीज देयकांचा भरणा करतील त्यांना ०.२५% डिजिटल पेमेंट भरणा सूट ही वेगळी मिळणार आहे. (याबाबतची अधिक माहिती ग्राहकांच्या वीज देयकांवर दिलेली आहे)तसेच जे ग्राहक एकरकमी वीज देयकाची रक्कम भरू शकत नसतील त्यांचेसाठी सुलभ ३ हफ्ते पाडून देण्यात आलेले आहेत.जून किंवा जुलै ची जी एकत्रित देयकाची रक्कम असेल त्याचे ३ समान मासिक हफ्ते करून ग्राहक ऑनलाईन किंवा वीज देयक भरणा केंद्रावर रक्कम भरू शकतील.\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असून तक्रारी घेऊन कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांचे समाधान करण्यासाठी महावितरणकडून पुरेपुर काळजी घेतल्या जात आहे.कोरोनाचे भय संपले नसल्याने वीजबिलाची तक्रार घेऊन येण्यापुर्वी ग्राहकानी महावितरणच्या https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ लिंकवर जाऊन एकदा आपल्या वीजबिलाची पडताळणी करावी, असे आवाहनही नागपूर परिमंडलाकडून करण्यात येत आहे.तसेच उर्वरित ग्राहकांनीही आपले वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता (प्रभारी) दिलीप दोडके यांनी केले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (210) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/maths-tricks-90260/", "date_download": "2020-09-26T02:18:00Z", "digest": "sha1:6OSQKOKCD3GLEZBVCDVBVW4ZHNA4YTVY", "length": 9382, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डोकॅलिटी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nबालमित्रांनो, खालील आकृतीतील पिवळ्या गोलांमधील A, B, C, D या अक्षरांच्या किमती तुम्हाला काढायच्या आहेत. लागा तर मग कामाला\nबालमित्रांनो, खालील आकृतीतील पिवळ्या गोलांमधील A, B, C, D या अक्षरांच्या किमती तुम्हाला काढायच्या आहेत. लागा तर मग कामाला\nह्ण उदाहरण म्हणून पिवळ्या गोलातील २४ ही संख्या बघा. या पिवळ्या गोलाला १३ व १५ हे निळे गोल जोडलेले आहेत. खालीलप्रमाणे निळ्या गोलातील अंकांची बेरीज करून घेऊ. या दोन बेरजांचा गुणाकार म्हणजे पिवळ्या गोलातील संख्या.\n१३ह्ण १+३ = ४\nआणि ४ x ६ = २४ (पिवळ्या गोलातील संख्या)\nहीच रीत वापरून कुठल्याही पिवळ्या गोलातील संख्या काढता येईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘नोटाच मोजल्या नाहीत, मग ३ लाख कोटी मिळाल्याचा दावा पंतप्रधान कसा करतात’\nरस्त्यावर नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी घालायचा अधिकार मला नाही- योगी आदित्यनाथ\n‘लोकांकिका’ची आज ठाण्यात पहिली घंटा\nसात वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार – सुरेश प्रभू\nसमाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या ‘त्या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरव\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 साळुंकी आणि गवतफुले\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/sc-rejects-srinivasans-plea-to-be-reinstated-as-bcci-chief-549952/", "date_download": "2020-09-26T01:28:39Z", "digest": "sha1:LJLZGGT65ABCN4TB5WVWCL47RAPKQLX5", "length": 11305, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "श्रीनिवासनविरुद्ध वर्माची आयसीसीकडे धाव | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nश्रीनिवासनविरुद्ध वर्माची आयसीसीकडे धाव\nश्रीनिवासनविरुद्ध वर्माची आयसीसीकडे धाव\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नीतिमूल्यांसंबंधी असलेल्या नियमावलींचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप करीत बिहार\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नीतिमूल्यांसंबंधी असलेल्या नियमावलींचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप करीत बिहार क्रिकेट संघटनेचे चिटणीस आदित्य वर्मा यांनी आयसीसीकडे धाव घेतली आहे.\nशर्मा यांनी आयसीसीच्या कायदा समितीचे प्रमुख इयान हिगिन्स यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी श्रीनिवासन यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकता आहे.\nश्रीनिवासन यांनी अनेक वेळा आयसीसीच्या नियमावलींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे परिषदेची प्रतिष्ठा मलिन होत आहे. मुदगल समितीने सट्टेबाजी व मॅचफिक्सिंगबाबत दिलेल्या अहवालात श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन यांच्यावर ठपका ठेवला आहे.\nन्यायालयानेही श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाच्या कामापासून दूर राहावे असा आदेश दिला असूनही मंडळाचा कारभार श्रीनिवासन यांच्या आदेशानुसारच होत आहे. श्रीनिवासन यांच्याकडून झालेल्या नियमांच्या उल्लंघनाबाबत आयसीसीने स्वतंत्र समिती नियुक्त करून चौकशी करण्याची आवश्यकता आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nएम. एस. के. प्रसादांचा वारसदार ठरला सुनिल जोशी नवे निवड-समिती प्रमुख\nBCCI निवड समितीसाठी चार नावं निश्चीत; माजी मराठमोळा खेळाडूही शर्यतीत\nलोकांची आयुष्यं पणाला लागलेली असताना भारतात क्रिकेट नाही – सौरव गांगुली\nबीसीसीआयच्या समालोचकांच्या यादीतून संजय मांजरेकर ‘क्लीन बोल्ड’\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 मेरी कोमला वगळले\n2 जीवनची घोडदौड संपुष्टात\n3 मुंबई इंडियन्सची दिल्लीवर १५ धावांनी मात; ‘अंतिम चार’मधील स्थानासाठी आशा कायम\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/assistant-commissioner-appointment-for-solid-waste-management-1243616/", "date_download": "2020-09-26T03:05:17Z", "digest": "sha1:WLVMCHQOOI7EKRISSZIX4GDXR2WFLS7C", "length": 12681, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "घनकचरा व्यवस्थापनाला सहाय्यक आयुक्त मिळणार | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nघनकचरा व्यवस्थापनाला सहाय्यक आयुक्त मिळणार\nघनकचरा व्यवस्थापनाला सहाय्यक आयुक्त मिळणार\nदेवनार करचाभूमीतील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.\nकचऱ्यातून वेचकांना विक्रीयोग्य वस्तूच मिळत नसल्याचे समोर आले आहे.\nदेवनार कचराभूमीतील आगीनंतर पालिकेचा निर्णय\nदेवनार कचराभूमीतील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग टीकेचे लक्ष्य झाला होता. त्यामुळे आता स्वतंत्र सहाय्यक आयुक्ताची नेमणूक करुन हा विभाग अधिक सक्षम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे कामाची विभागणी होऊन कचऱ्याच्या व्यवस्थापनावर बारकाईने लक्ष ठेवण्यात पालिकेला यश येईल.\nदेवनार करचाभूमीतील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. तसेच धुमसणाऱ्या कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे पर्यावरण आणि आसपासच्या नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग अधिक सक्षम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा भार उपायुक्त आणि प्रमुख अभियंता यांच्यावर आहे. त्यामुळे या विभागासाठी स्वतंत्र सहाय्यक आयुक्त पद निर्माण करुन कामाची विभागणी करीत हा विभाग अधिक कार्यक्षम करण्यावर प्रशासनाचा कल आहे.\nपालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये आणि अन्य काही विभागांमध्ये असे मिळून एकूण ३० सहाय्यक आयुक्त पालिकेत कार्यरत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयुगाच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्तांची पदे भरण्यात येतात. आता घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी सहाय्यक आयुक्त पद निर्माण करण्यात येणार आहे.\nघनकचरा व्यवस्थापन विभागातील सहाय्यक आयुक्तांकडे प्रशासकीय व अन्य काही जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. उपायुक्त, प्रमुख अभियंता आणि मुख्य पर्यवेक्षक यांच्यामधील मुख्य दुवा म्हणून सहाय्यक आयुक्ताला भूमिका पार पाडावी लागणार आहे. या पदावर व्यक्तीची नियुक्ती होईपर्यंत सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन, शहर) हे पद सहाय्यक आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन विभाग)मध्ये रुपांतरित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफटाके विक्रेत्यांकडून महापालिकेला लाखो रुपयांचा महसूल\nघनकचऱ्याच्या नावाने ठेकेदारांचे उखळ पांढरे\nमुलुंडच्या नाल्यात कचऱ्याची गाडी रिती\nठाण्याच्या कचऱ्याला आता भूमीलाभ\n.. धूर की ऊर्जा\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 उत्तम करिअरसाठी ‘मार्ग यशाचा’\n2 फॅशनबाजार : मनगटावरची सुबक, देखणी टिकटिक..\n3 खाऊखुशाल : बर्फाच्या गोळ्याचा बादशाही थाट\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/pune-sagar-festival-celebrated-on-second-day-of-diwali-jud-87-2003989/", "date_download": "2020-09-26T03:28:19Z", "digest": "sha1:COZSWN7W5QDA6RI45YEOPSXMTY7SYGAJ", "length": 9682, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "pune sagar festival celebrated on second day of diwali | VIDEO : पुण्यात परंपरागत सगर उत्सवाचं आयोजन | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nVIDEO : पुण्यात परंपरागत सगर उत्सवाचं आयोजन\nVIDEO : पुण्यात परंपरागत सगर उत्सवाचं आयोजन\nगेल्या ७० वर्षांपासून गवळी समाजातील बांधवांनी आपली परंपरा जपली आहे.\nपुण्यात भाऊबीजेच्या निमित्ताने गणेश पेठेत पुणे शहर आणि जिल्हा दुग्धव्यवसायिक संघाच्यावतीने सगर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सगर म्हणजे गवळी समाज बांधव आपल्या जनावरांचं दिवाळी पाडव्याच्या दिवशी पूजन करतात. तसंच त्या सणाच्या दुसऱ्या दिवशी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढतात.\nगेल्या ७० वर्षांपासून गवळी बांधवांनी आपली परंपरा जपली आहे. तर आज या सगरमध्ये पुणे जिल्हयातील १०० हून अधिक रेडे आणि म्हशी यांची मिरवणूक वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रेड्याच्या मालकाचा विशेष सत्कार म्हणून फेटा बांधून पितळी तोडा देऊन सन्मान केला जातो.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 कोथरूडमधील विजयानंतर चंद्रकांत पाटील एक लाख बहिणींना वाटणार साड्या\n बहुप्रतिक्षित विमानसेवेला अखेर सुरूवात, नाशिक-पुणेकरांना दिलासा\n3 पुण्यातील दिवाळी फराळाची परदेशामध्ये गोडी\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/61569", "date_download": "2020-09-26T02:50:04Z", "digest": "sha1:OJWE2JEJVV3U7QSRVU3KPRCMO56Q3LXL", "length": 23572, "nlines": 248, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बागकाम - अमेरीका २०१७ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बागकाम - अमेरीका २०१७\nबागकाम - अमेरीका २०१७\nबघता बघता जानेवारी संपत आला. २०१७ च्या बागकामाच्या नियोजनासाठी , सल्ल्याच्या देवघेवीसाठी आणि कौतुकाने बागेचे फोटो शेअर करण्यासाठी हा धागा.\nपरागिभवनात मदत करणार्‍या विविध किटकांसाठी आणि पक्षांसाठी म्हणून यावर्षी काही झाडे लावणार असाल तर त्यासाठी मार्गदर्शक पुस्तीका उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या भागात रहाता त्या भागासाठी खास तयार केलेल्या या मोफत पुस्तीका आहेत.\nफिलाडेल्फिया फ्लॉवर शो येऊ\nफिलाडेल्फिया फ्लॉवर शो येऊ घातला आहे . यंदाची थीम HOLLAND: Flowering the World अशी आहे.\nहॉर्टिकल्चर सोसायटीचे आणि मास्टर गार्डनर्स प्रोगॅमचे स्वयं सेवक बागकामाविषयी शंका निरसन करायला हजर असतात.\nसध्या थंड हवेमुळे अनंत, जाई,\nसध्या थंड हवेमुळे अनंत, जाई, मोगरा, तुळस ही झाडे घरात आहेत. प्रॉब्लेम असा आहे की आमचा बोका त्यांत जाउन बसतो आणी नासधुस करतो. कधीकधी सुसुही करतो. खुप जड आहेत काही कुंड्या त्यामुळे उंचावर ठेवणे शक्य नाही आणि तसाही तो चढु शकतो कुहीही. एखादे रिपेलंट औषध आहे का किंवा घरगुती रेपेलंट जे झाडांना हार्म करणार नाही.\nरीपेलंट माहिती नाही पण लहान\nरीपेलंट माहिती नाही पण लहान मुलांसाठी सेफ्टी गेट / प्ले एरिया एन्क्लोजर असे काही ठेवून बोक्याला मज्जाव करता येईल\nथंडी जवळजवळ गायब झाल्याने\nथंडी जवळजवळ गायब झाल्याने सगळ्या बल्ब्जना पान फुटली आहेत. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच फुलं येणार असं वाटतं आहे.\nकॉस्कोत स्प्रिंग बल्ब्ज पण मस्त आले आहेत. ते एलिफंट इअर (आळूच्या पानांसारखे दिसतात) ते घ्यावे का असं वाटतंं आहे.\nराया, घरात अगदी लहान मुले\nराया, घरात अगदी लहान मुले नसतील तर गुलाबाच्या काटक्या कुंड्यांमध्ये खोचून, पसरून पहा. मला हा उपाय सश्यांना दूर ठेवायला उपयोगी पडला होता. माती बदलताना, खत घालताना हातमोजे वापरा.\nगुलाबाच्या काट्यांचा पर्याय चांगला आहे. करुन पाहते.\nकुंड्यांची माती कोरडी भुसभुशीत झाली आहे का रोज सकाळी पाणी स्प्रे करा, ओल्या मातीत नाही शू करणार. काटे लावण्याचा उपाय नंतर करा , हा चालला नाही तर.\nमला तुळस लावायची आहे - भारतीय\nमी न्यू जर्सीत रहातो.\nमला तुळस लावायची आहे - भारतीय किराणा मालाच्या दुकानात मिळणार्‍री रोपटी लावून पहिली, कधी ती तुळसच नसते तर कधी लवकर मरते.\nतसेच portulaca नावाची फुले लावायची आहेत. व इतर फुलझाडे लावायची आहेत. यांना पॉटिंग सॉइलच लागते की साधी माती चालेल\nबाहेर चांगल्यापैकी गुलाब व इतर पेरेनियल झाडे लावायची आहेत. मार्गदर्शन करावे, धन्यवाद.\nतुलशीचे बी लावल्यास छान रोपं तयार होतात. तुम्ही न्यूजर्सीत आहात तर ओळखीत कुणाकडे बी आहे का ते विचारा किंवा http://www.seedsofindia.com/ इथे विचारा. नाहीच मिळाले तर माझ्याकडे बी आहे. नाव,पत्ता दिल्यास मी पाठविन. साधारण मदर्सडे नंतर कुंडीत बी पेरा आणि पाणी घाला. कुंडी अर्धवट ऊन मिळेल अशा ठिकाणी बाहेर ठेवा. भरपूर रोपं तयार होतील.\nफुलझाडे कुंडीत लावणार असाल तर निम्मी टॉप सॉइल आणि निम्मी पॉटिंग सॉईल एकत्र करुन त्यात लावा. portulaca आणि इतर अ‍ॅन्युअल्सची तयार रोप त्यात लावता येतील.\nगुलाब आणि पेरेनियल्स जमिनीत लावण्याआधी सॉइल टेस्ट करुन घ्या. तुम्ही बागेत जिथे झाडे लावणार आहात तिथे ऊन किती येते त्यावर झाडांची निवड करा.\nhttps://njaes.rutgers.edu/mastergardeners/ ही तुमच्या भागातील मास्टर गार्डनर्स ची साईट आहे. मास्टर गार्डनर्स मंडळी लॅन्ड ग्रांट युनिवर्सिटीचा कोर्स पूर्ण करुन वॉलेंटिअर म्हणून काम करतात. बागकासाठी तुमच्या भागाला योग्य असे मार्गदर्शन त्यांच्याकडे मिळेल.\nआवडत असतील तर गुलबाक्षीची\nआवडत असतील तर गुलबाक्षीची झाडे पण लावू शकता. फारशी देखभाल करावी लागत नाही आणि पेरेनियल आहेत.\nबाहेर चांगल्यापैकी गुलाब >>\nबाहेर चांगल्यापैकी गुलाब >> नॉक आउट रोझेस नावाचे हायब्रिड मिळतात गार्डन सेंटर मधे. रंग एक - दोनच मिळतात. पण एकदम हार्डी, फारशी देखभाला करावी लागत नाही.\nबाकी गुलाबांच्या झाडांची फार काळजी घ्यावी लागते - हरणे , जपानी बीट्लस, ग्राउंंड हॉग असे पेस्ट्स, ब्लॅक स्पॉट्स इन्फेक्षन, उन कमी पडणे , पाणी पुरेसं न मिळणे, माती चांगली नसणे असे अनेक व्याप.\nतरिही लावायचेच असतील तर १२-१८ इंच माती खणून काढून त्या जागी चांगली टॉप सॉइल + ऑर्गॅनिक मॅटर असे मिक्स घाला आधी. दिवसाचे ६-८ तास प्रखर उन मिळेल, ऑगस्ट महिन्यात पाणी द्यायला होज पोचेल अशी जागा निवडा.\nफुले येणारी पेरेनियल हवी असतील तर\nफोरसिथिया / लायलॅक ही एप्रिल मधे फुलतील\nब्लॅक आय सुझन, कोन फ्लावर्स ही लेट स्प्रिंग / ऑल समर फुलतील\nरोझ ऑफ शॅरन लेट समर,\nवरती स्नेहाने लिहिलेले एकदम\nवरती स्नेहाने लिहिलेले एकदम बरोबर आहे. मी दोन वर्षापासून गुलबक्षी लावत आहे. ससे वगैरे अज्जिब्बात तोंड लावत नाही. ज्यांच्याकडे हरिण , सशांचा उपद्रव आहे त्यांनी जरूर ट्राय करा. फक्त गुलबक्षी सगळीकडे पेरिनिअल नाही. ९/१० सोडून अ‍ॅन्युअल आहे . पण बिया पडतात आणि पुढच्या वर्षी परत रोपे उगवून येतात . आपल्या झेंडू सारखी.\nआणखी एक म्हणजे अमेरिकेत रहाणार्‍यानी लक्षात घ्यायला पाहिजे कि फुल उमलायला साधारण ८ नंतर सुरुवात होते. कारण आपल्याकडे उशीरा सुर्य मावळतो. पण त्याही पेक्षा तापमान जर ९५ च्या वर असेल तर फुल रात्री १०/११ शिवाय उमलत नाहीत. पण कळ्याही झुपकेदार छान दिसतात. भारतात ६ नंतर गुलबकावली फुलते त्यामूळ आपल्याला जरा वेगळ वाटत. वारा सुटला कि संध्याकाळी कळ्या उलगडाताना बघायला मस्त वाटायच.\nअर्थात सशांचा त्रास नसेल तर मी गुलबकावली नक्कीच प्रेफर करणार नाही.\nगुलबाक्षीला इंग्लिश नाव सांगा\nगुलबाक्षीला इंग्लिश नाव सांगा बरे पटकन.\nगुलबाक्षीला इंग्लिश नाव सांगा\nगुलबाक्षीला इंग्लिश नाव सांगा बरे पटकन.>> Mirabilis jalapa, four o'clock flower\nधन्यवाद मेधा. marvel of Peru कसले नाव आहे\nmarvel of Peru म्हणजे गुलबक्षीच ना\nmarvel of Peru म्हणजे गुलबक्षीच ना >> हो म्हणून \nमी भेंडी आणि वाल पेरलेली\nमी भेंडी आणि वाल पेरलेली गेल्या आठवड्यात पण सगळ्या बीया खारुड्या किंवा मोल्स ने खाऊन टाकल्या मी बीया पेरल्यावर वरुन तारांची चिकन वायर पण टाकलेली तरी खाल्ल्या. मेथी ठेवलीये अजून पण पानं आल्यावर किती राहील माहीत नाही.\nअमेझॉनवरून मोगरा मागवला आहे.\nअमेझॉनवरून मोगरा मागवला आहे. एकदम पिल्लु रोपं आहेत. मला मोठी रोपं असती तर बरं वाटलं असतं. आमच्याकडे थंडी पाहता एकंदरित घरातच रुजवावी असा विचार आहे. काही टिप्स\nगुलबक्षीला पेरिनिअल सोडून एकदम अनुमोदन. काहीही काळजी करावी लागत नाही. आणि चिक्कार म्हणजे चिक्कार फुलं येतात.\nभरपूर उन / उजेड मिळेल अशा\nभरपूर उन / उजेड मिळेल अशा जागी ठेवा मोगरा. ड्राफ्ट पासून दूर ठेवा. पाण्याचा नीट निचरा होईल अशी माती हवी- जास्त क्ले असलेली नको. एप्रिल पासून ऑ़क्टोबर पर्यंत दर १५ दिवसांनी थोडे मिरॅकल ग्रो पाण्यात मिसळून देत जा. ( पाकीटावर प्रमाण लिहिलेले असते ) कुंडीतली माती पूर्ण कोरडी होऊ देऊ नका.\nवेका अमेझॉन वर $७.९९ ला आहे ४\nवेका अमेझॉन वर $७.९९ ला आहे ४'' ते का(लिंक पेस्ट करता येत नाहीये इथे) मागच्या वर्षी मी होम डेपो मधुन घेतल होत पण टिकल नाही.\nभरपुर गुलबकावली च्या बीया\nभरपुर गुलबक्षीच्या बीया ज्यांना लावायच्या आहेत त्यांच्यासाठी:\nअ‍ॅमेझॉनवर अतिशय स्वस्त आहे. मी तिथुन मागविल्या. मोठ पॅकेट येत.\nयावेळी सीड्स ऑफ ईंडिया वरून मुळ्याच्या शेंगाच्या बीया मिळाल्या. बघू उगवून येतात का .\nइकडे ओर्नॅमेन्टल पेअर आणि\nइकडे ओर्नॅमेन्टल पेअर आणि प्लम वगैरेच्या बहराची यावेळी वाट लागली गेल्या स्नो मुळे.\nबहुतेक कळ्या झडल्यावर आता सीझन भर कसं होणार या झाडांचं खराटेच राहणार का की पुन्हा येतात कळ्या \nगुलबकावली चे इंग्लिश नाव काय\nगुलबकावली चे इंग्लिश नाव काय आहे \n>> गुलबाक्षीला इंग्लिश नाव\n>> गुलबाक्षीला इंग्लिश नाव सांगा बरे पटकन.>> Mirabilis jalapa, four o'clock flower\nगुलबाक्षी आणि गुलबकावली ही\nगुलबाक्षी आणि गुलबकावली ही एकाच फुलाची नावे आहेत. हे माहीत नव्हते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5808", "date_download": "2020-09-26T03:08:17Z", "digest": "sha1:OICB7WNTCMSGSORBCRIZ77MSI3MGLETY", "length": 7855, "nlines": 117, "source_domain": "www.maayboli.com", "title": "छत्रपती : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /छत्रपती\nराजे माफ कराल, पण तुम्हाला भेटायच राहूनच गेल... अहो तिथ शिवभक्तीचा माज दाखवायच्या नादात असलेल्या त्या गर्दीत, तुम्ही कुठ दिसलेच नाही.\nआमची शिवभक्ती नाही गाठू शकली त्या सीमा, ज्या तानाजी, बाजीने, स्वतःच्या रक्ताने तयार केलत्या, स्वतःच्या रक्ताने इतिहास लिहिला होता आम्ही फक्त तो पुस्तकात वाचतो\n“डोक्यावर चंद्रकोर लावून राजे, कुणी शिवभक्त होत असत का\nराजे तुमचा एक वीर हत्तीला हरवत होता, एक मावळा हजार यमनांना पुरून उरत होता, इथं गर्जना करून घसा आणि नाचून नाचून अंग दुखायला लागलंय.\nहोता बाहुबली विराट जगती राजा शिवाजी असा,\nज्याने गाजविला विशाल भगवा राष्ट्रात चोहीकडे....\nसीमापार कुठे टपून बसले होते फ़िरंगी जरी,\nकोणाचीच नसे बिशाद बघण्या एकत्र राज्याकडे....\nजातीभेद मुळी पसंत नव्हता कोणासही थोडका,\nगावोगाव सुखी तमाम जनता नांदायची चांगली..\nमो्ठी आक्रमणे करुन जितले साम्राज्य जे जे नवे,\nकिल्लेकोट तळी नवीन सगळी त्यांनी तिथे बांधली.....\nकोळी चर्मकरी सुतार कुणबी युद्धावरी धावले,\nन्हावी ब्राम्हण आणखी मरहटे सारे उभे ठाकले......\nझाले कैक लढे जिथे यवनही हारविला फ़ारदा,\nयोद्धे वीर असे तुटून पडता शत्रू रडू लागले.....\nतानाजी तगडा मुरार खपला शेलार बाजी प्रभू ,\nRead more about छत्रपती (शार्दुलविक्रिडित)\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला याबाबत फारसे कुठे स्पष्टपणे वाचायला मिळत नाही. इंग्रज, पोर्तुगीज आणि भारतीय अशा तीन्ही इतिहासकारानी वेगळीवेगळी कारणे दिली आहेत.\n२. आतड्याचा अ‍ॅन्थ्रॅक्स.. यात आतड्याला इन्फेक्शन होऊन रक्त्युक्त उलटी जुलाब होतात.\n३. महाराजांवर त्यांच्याच एका पत्नीने विषप्रयोग केला.\nमहाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला\nRead more about श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2018/07/blog-post_14.html", "date_download": "2020-09-26T01:50:31Z", "digest": "sha1:NRCC5VSJ2ACRODQDOOQ7UDA2NH46TFD4", "length": 20652, "nlines": 145, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: नव्याची नवलाई", "raw_content": "\nमध्यंतरी मी नेटफ्लिक्सवर ‘न्यूनेस’ नावाचा एक सिनेमा बघितला. आयुष्यात नाविन्य शोधू पाहणाऱ्या एका तरुण जोडप्याची ती प्रेमकथा. नाविन्याची सवय असणारे दोघं नात्यांत स्थैर्य आल्यावर अस्वस्थ होतात आणि वेगळे होतात वगैरे कथा आहे त्याची. सिनेमा तसा सामान्यच वाटला मला. पण यात जो मुद्दा मांडला गेला होता, तो कुठेतरी माझ्या रोजच्या अनुभवांशी जोडला जाईल असा होता. आमच्या एका गप्पांच्या कार्यक्रमात बोलताना वरुण म्हणाला, “लग्नानंतर आयुष्यभर एकाच व्यक्तीबरोबर राहायचं ही कल्पनाही मला अजून पचली नाहीये. किती कंटाळा येईल ना काही वर्षांनी”. वरुण हे जे म्हणाला ते अनेकदा अनेक मुला-मुलींनी वेगवेगळ्या गप्पांमध्ये मांडलं आहे. ‘कंटाळा येण्याच्या’ शक्यतेची भीती व्यक्त केली आहे.\nया निमित्ताने मनात आलेला प्रश्न म्हणजे, आज लग्नाला उभी\nअसण्याच्या वयातली मिलेनियल जनरेशन म्हणजे माझी पिढी सतत नाविन्याचा ध्यास असणारी पिढी आहे का ‘युज अँड थ्रो’ हे आज परवलीचे शब्द आहेत. “अमुक अमुक गोष्ट मी गेले चाळीस वर्ष वापरत्ये” असं सांगणारी आपली एखादी आजी असते. आपण असं काही सांगू शकू का कधी हा प्रश्न मनात येतोच येतो. एकुणात बदललेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत आणि रोज होत जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या बदलांमुळे आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू तर वेगाने बदलत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानामुळे वस्तूंच्या अपग्रेडेड व्हर्जन्स म्हणजेच सुधारित आवृत्त्या बाजारात येताना दिसतात, त्यांची किंमतही परवडेल अशी असते. आणि बघता बघता आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टी पटापट बदलत जातात. उदाहरणादाखल आयुष्यात आजवर मोबाईलचे किती हँडसेट्स आपण वापरले हे आठवलं तरी जाणवेल जास्तीत जास्त दर दोन-तीन वर्षांत आपण नवीन फोन घेतला आहे. हा आधीच्या आणि आत्ताच्या पिढीच्या आयुष्यात पडलेला फरक चांगला किंवा वाईट याची चर्चा आपण इथे करत नाही आहोत. तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल. मुद्दा हा आहे की, आपलं सगळं आयुष्य हळूहळू नाविन्याशी आणि नाविन्याच्या इच्छेशी जोडलं गेलं आहे. एखाद्या कंपनीची वर्षानुवर्षे तीच जाहिरात टीव्हीवर दिसत असेल तर उपयोग होत नाही. आता अक्षरश: दर महिन्या-दोन महिन्याला नवनवीन जाहिराती आणल्या जाताना दिसतात. दर काही वर्षांनी नवीन नोकरी शोधणारे आज असंख्य आहेत. ‘फेसबुक’शिवाय पान हलत नाही अशी आज तरुण पिढीची परिस्थिती असूनही, नाविन्याच्या शोधात लोक दुसर्‍या कुठल्या जागी जाऊ नयेत म्हणून फेसबुकला सुद्धा सातत्याने धडपड करावी लागते. फेसबुकवर सतत नवनवीन फीचर्स, सोयी-सुविधा आणल्या जातात. हे नाविन्य न राखल्यास एक दिवस फेसबुक संपेल. कोणतंही क्षेत्र घ्या. तिथे हे लागू पडतंच.\nकदाचित सतत नाविन्याची मागणी करणाऱ्या या नव्या व्यवस्थेमुळे असेल, पण मिलेनियल जनरेशनचं आयुष्य आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत अधिक अस्थिर आहे असं मला वाटतं. त्याची एक भीतीही या पिढीत आहे. असुरक्षितता निर्माण झाली आहे. तसं नसतं तर रोज नवनवीन खोट्या बातम्या सोशल मिडियामधून वेड्यासारख्या पसरल्या नसत्या. नाना पाटेकर नाही तर विश्वास नांगरे पाटील यांचे नाव वापरत काहीतरी थातूरमातूर मेसेजेस पुढे ढकलून देणं घडलं नसतं. या गोष्टी आपल्या मनातल्या असुरक्षिततेच्या भावनेवर पोसल्या जातात. नुसतीच नवी माध्यमं हाताशी आली म्हणून ते घडलेलं नाही. हे घडण्या मागची ऊर्जा आपल्या मनातल्या असुरक्षित, अस्थिर वाटण्याच्या भावनेमधून आली असणार. यातून अर्थातच नातेसंबंध, लग्न या विषयांत देखील एक प्रकारची अस्थिरता शिरकाव करते. आणि त्यातून यापासून दूर पळण्याची वृत्तीही बळावते. आपण आहोत तो कम्फर्ट झोन सोडून नवीन कोणत्या तरी असुरक्षित गोष्टीत कशासाठी पडायचं असा एक विचार अनेकांच्या मनात डोकावतो आणि मग त्यातून लग्न किंवा जवळच्या नातेसंबंधांची भीती वाटू लागते. इंग्रजीत ज्याला कमिटमेंट फोबिया म्हणतात तो हा प्रकार. खरी गंमत अजून पुढेच आहे. माझ्या मते, अस्थिरतेतून निर्माण होणार्‍या या भीतीची आपल्याला इतकी सवय झाली आहे की ही सवय आणि दुसर्‍या बाजूला असणारी नाविन्याची ओढ यामुळे कुठेतरी आपल्याला स्थैर्याचीही भीती वाटू लागली आहे रणबीर कपूर पण आपल्या ये जवानी है दीवानी या सिनेमात काय म्हणतो बघा, “मैं उड़ना चाहता हूँ, दौड़ना चाहता हूँ, गिरना भी चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता |”. आपल्या पिढीने हेच जणू स्वीकारलंय. हेच त्या ‘न्युनेस’ नामक सिनेमात यांनी मांडायचा प्रयत्न केलाय. लग्न झालं की एकमेकांना अधिक ओळखण्याचा, एकमेकांबरोबर मजा करण्याचा असा सुरुवातीचा एक कालखंड संपला की नवीन काही फार उरतच नाही आणि एक रुटीन सुरू होतं. अगदी मजेचं सुद्धा ‘रिच्युअल’ तयार होतं. उदाहरणार्थ दर रविवारी एक सिनेमा बघणे, दर शनिवारी मित्रांसोबत जेवण करणे वगैरे वगैरे. एकदा गोष्टी अशा ठरून गेल्या की स्थैर्य येतं. नाविन्य संपतं किंवा कमी होतं. अरेंज्ड मॅरेज मध्ये तर जोडीदार शोधताना आवडी निवडी जुळतात का यालाही आवर्जून प्राधान्य दिलं जातं. म्हणजेच तिथेही नाविन्य उरत नाही. गंमत अशी की हे असं सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. स्वाभाविकही असतं ते. पण असं सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिल्यावर या चित्राचीच अनेकांना भीती वाटते. ‘बस रुकना नहीं चाहता’ म्हणता म्हणता उलट सगळं स्थिर झालं तर, याचीच भीती वाटू लागते. “आयुष्यभर एकाच व्यक्तीबरोबर राहायचं हे केवढं अवघड आहे रणबीर कपूर पण आपल्या ये जवानी है दीवानी या सिनेमात काय म्हणतो बघा, “मैं उड़ना चाहता हूँ, दौड़ना चाहता हूँ, गिरना भी चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता |”. आपल्या पिढीने हेच जणू स्वीकारलंय. हेच त्या ‘न्युनेस’ नामक सिनेमात यांनी मांडायचा प्रयत्न केलाय. लग्न झालं की एकमेकांना अधिक ओळखण्याचा, एकमेकांबरोबर मजा करण्याचा असा सुरुवातीचा एक कालखंड संपला की नवीन काही फार उरतच नाही आणि एक रुटीन सुरू होतं. अगदी मजेचं सुद्धा ‘रिच्युअल’ तयार होतं. उदाहरणार्थ दर रविवारी एक सिनेमा बघणे, दर शनिवारी मित्रांसोबत जेवण करणे वगैरे वगैरे. एकदा गोष्टी अशा ठरून गेल्या की स्थैर्य येतं. नाविन्य संपतं किंवा कमी होतं. अरेंज्ड मॅरेज मध्ये तर जोडीदार शोधताना आवडी निवडी जुळतात का यालाही आवर्जून प्राधान्य दिलं जातं. म्हणजेच तिथेही नाविन्य उरत नाही. गंमत अशी की हे असं सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. स्वाभाविकही असतं ते. पण असं सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिल्यावर या चित्राचीच अनेकांना भीती वाटते. ‘बस रुकना नहीं चाहता’ म्हणता म्हणता उलट सगळं स्थिर झालं तर, याचीच भीती वाटू लागते. “आयुष्यभर एकाच व्यक्तीबरोबर राहायचं हे केवढं अवघड आहे”, असं आज मिलेनियल जनरेशन मधली मुलं-मुली म्हणतात तेव्हा ते एकाच व्यक्तीबरोबर राहायचं म्हणजे ‘आता आयुष्यात काही नाविन्य उरणारच नाही’ अशा निष्कर्षाच्या दिशेला जातात. एकाच वेळी, लग्नाच्या आधी अस्थिरतेतून वाटणारी असुरक्षितता आणि लग्नानंतर येणार्‍या स्थैर्याचीही भीती अशी काहीशी ही कोंडी आहे.\nखरं तर थेट या ‘आता काही नाविन्यच उरणार नाही’ अशा निष्कर्षाला जाण्याची गरज नसते. कोणत्याही नात्यांत नाविन्य निर्माण करता येऊ शकतं. अनेक जोडपी असा प्रयत्न करताना दिसतातही. एकत्र एखादी नवीन गोष्ट शिकणं इथपासून ते लग्नानंतरही एकट्यानेच फिरायला जाणे- ‘सोलो ट्रीप’ला जाणे इथपर्यंत अनेक गोष्टी अनेक जोडपी नात्यांतलं नाविन्य टिकवण्यासाठी करतात. शिवाय अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की माणूस बदलतो. आपल्याला येणार्‍या अनुभवांमुळे, वयामुळे आपल्यात अनेक बदल होतच असतात. नात्यांतल्या नाविन्याचाच हा भाग आहे. त्या बदलांचा किंवा नाविन्य येण्याचा वेग कदाचित कमी असल्याने, पटकन लक्षात येत नाही. पण असे छोटे-मोठे बदल माणसांत नसते झाले तर खरंच कंटाळवाणं होईल पण एकमेकांसोबत राहताना हे होत जाणारे बदल अनुभवणं, त्याचीही मजा घेणं यामुळे नातं अधिक घट्ट आणि प्रगल्भ व्हायला मदत होते. त्यामुळे लग्नाआधीच, लग्नानंतर नाविन्य जाईल आणि आयुष्य एकदम स्थिर होऊन जाईल किंवा प्रवाही राहणार नाही याची भीती बाळगण्याची गरज नसते. आणि पुढचा मुद्दा असा की सतत नात्यांत नाविन्य असलंच पाहिजे आणि ते नसणारं आयुष्य कंटाळवाणंच असेल असं गृहीत धरून आपणच उगीच एका गोष्टीचं, “बाप रे केवढं भयानक असेल ते” असं म्हणत ‘भयानकीकरण’ करतो. नाविन्य आणत नातं फुलवणं आणि स्थैर्यामध्ये असणारी शांत सुरक्षितताही एकत्र अनुभवणं या दोन्ही गोष्टींचा मेळ साधत पुढे जाण्यात शहाणपण आहे. नाही तर आपण सतत कसल्या तरी शोधात नाखूष राहू. ‘नाविन्य’ या साधनालाच साध्य मानून पुढे गेलं तर गडबड होते. ‘नाविन्य हवं’ म्हणून काहीतरी करण्यापेक्षा जे करायचं आहे, हवं आहे त्यासाठी नवीन काहीतरी करू, ही विचारांची दिशा ठेवली तर डोक्यातला गोंधळ कमी होईल, हे नक्की.\n(दि. १४ जुलै २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध)\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (6)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/india-news-international/article/whole-day-news-june-11-2019-big-headline-jabardast-5-news-day-expansion-of-maharashtra-state-cabinet-shivsena-bjp-aaditya-thackeray-modi-govt-shikhar/253340", "date_download": "2020-09-26T01:35:15Z", "digest": "sha1:R64OYW3V5AMO66LFI4DFUYU5G37WWEIB", "length": 10072, "nlines": 76, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ जून २०१९: मंत्रिमंडळ विस्तार ते मोदी सरकारची मोठी घोषणा whole day news june 11 2019 big headline jabardast 5 news day expansion of maharashtra state cabinet shivsena bjp aaditya thackeray modi govt shikhar dhawan", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nलोकल ते ग्लोबल >\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ जून २०१९: मंत्रिमंडळ विस्तार ते मोदी सरकारची मोठी घोषणा\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ जून २०१९: मंत्रिमंडळ विस्तार ते मोदी सरकारची मोठी घोषणा\nHeadlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ जून २०१९ |  फोटो सौजन्य: Times Now\nमुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे १४ जूनला राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. दुसरी बातमी म्हणजे २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून मिळणार असल्याचा दावा युवासेनेच्या नेत्याने केला आहे. तर तिसरी बातमी म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुक लढवण्यात बाबतच्या चर्चेने जोर धरला आहे. तर चौथी मोठी बातमी म्हणजे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारनं मोठी घोषणा केली आहे. तर पाचवी बातमी म्हणजे शिखर धवन हा दुखापतग्रस्त असला तरीही विश्वचषकातून बाहेर जाणार नाही. या सगळ्या बातम्या सविस्तर जाणून घ्या...\nविधानसभा डोळ्यासमोर ठेऊन मंत्रिमंडळाचा 'या' तारखेला विस्तार: राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ तारखेला असून त्यापूर्वी म्हणजे १४ तारखेला राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.\n'भाजप-शिवसेनेला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद', पाहा कोणी केला खुलासा: एक नवी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं जाणार असल्याची. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.\nVIDEO: आदित्य ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, निवडणूक लढण्याचा निर्णय पक्का: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ही आगामी विधानसभा निवडणूक लढणार का: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ही आगामी विधानसभा निवडणूक लढणार का या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.\nदेशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा: अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारनं मोठी घोषणा केली आहे. या समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारनं स्कॉलरशिपची योजना आणली आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.\n'धवन विश्वचषक स्पर्धेतून बाहेर नाही', पाहा आताच आलेली ही नवी बातमी: विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी एक चांगली बातमी आहे. सलामीवीर शिखर धवन हा विश्वचषक स्पर्धेतून बाहेर जाणार अशी बातमी समोर आली होती पण आज संध्याकाळी शिखर धवनच्या दुखापतीवर फायनल रिपोर्ट समोर आला आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nअल-कायदाच्या ९ जणांना अटक, देशात मोठा घातपात घडविण्यापूर्वीच NIA ने केली कारवाई\n का होतोय याला विरोध\nLACवर भारत ऑन टॉप, चीन झाला फ्लॉप\nचेन्नईतील 'मुळशी पॅटर्न', भर रस्त्यात गँगस्टरची कोयत्याने हत्या\nचीनने LACजवळ आणली शस्त्र, कराराचे उल्लंघन; फोटो Times Nowच्या हाती\nआजचे राशी भविष्य २६ सप्टेंबर\nट्रकमध्ये चढत असताना सहायक पडला खाली आणि चाक.....\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ सप्टेंबर २०२०:\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमबद्दल CM ठाकरेंचे मत\nमारुतीची नवीन कार मिळणार मासिक शुल्कावर, पाहा काय आहे प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%82_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2020-09-26T02:15:56Z", "digest": "sha1:S4TUZHZ4NNJE3SYUEG7UVP5PRT5YZ5OE", "length": 3565, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सेलू तालुक्यातील गावे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"सेलू तालुक्यातील गावे\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जानेवारी २०१८ रोजी १२:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/icc-cricket-world-cup-2019-ind-vs-nz-ms-dhoni-batting-steve-waugh-reaction-vjb-91-1930296/", "date_download": "2020-09-26T01:30:36Z", "digest": "sha1:PEBVEJWX4FOBPXBUCV4WHNPJ2S2IIF3K", "length": 12485, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "icc cricket world cup 2019 ind vs nz ms dhoni batting steve waugh reaction vjb 91 | WC 2019 : स्टीव्ह वॉ म्हणतो, त्या सामन्यात धोनी नसता तर… | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nक्रिकेट वर्ल्ड कप 2019 »\nWC 2019 : स्टीव्ह वॉ म्हणतो, त्या सामन्यात धोनी नसता तर…\nWC 2019 : स्टीव्ह वॉ म्हणतो, त्या सामन्यात धोनी नसता तर…\n\"तुम्ही प्रत्येकच सामना जिंकू शकत नाही\"\nविश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या संघाकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला. फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फटका भारताला बसला आणि भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. २४० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २२१ धावांवरच आटोपला. रवींद्र जाडेजा आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनी सामना भारताच्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. यानंतर पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांना उधाण आले. याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने महत्वाचे विधान केले आहे.\nन्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची अवस्था सुरुवातीला अत्यंत बिकट झाली. त्या सामन्यात धोनी भारतीय संघात नसता, तर चाहत्यांना भारत जिंकेल अशी जराही आशा वाटली नसती. धोनी संघात होता, म्हणून चाहत्यांनी सामना शेवटपर्यंत पाहिला. पण धोनी नसता, तर भारताला सामना जिंकण्याची संधीही उपलब्ध झाली नसती, असे मत स्टीव्ह वॉ याने व्यक्त केले.\nपुढे बोलताना तो म्हणाला की तुम्ही प्रत्येकच सामना जिंकू शकत नाही. धोनी सामना जिंकवू शकला असता, पण त्या एका सामान्यपुरता धाव घेताना तो धावबाद झाला. त्याची बॅट क्रीजपासून काही इंच कमी राहिली. आव्हानाचा पाठलाग करताना धावा काढणे किती अवघड असते, ते मला माहिती आहे. त्यात तो एकदिवसीय सामना असेल तर त्याचे दडपण अधिक असते. पण तरीदेखील क्रिकेटच्या इतिहासात धोनीने इतर कोणत्याही फलंदाजापेक्षा जास्त चांगली कामगिरी केली.\n‘…म्हणून धोनीला ७व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं\nदरम्यान, धोनीला उपांत्य फेरीच्या सामन्यात ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. भारतीय संघाची परिस्थिती बिकट असतानाही त्याने अर्धशतकी खेळी केली. पण दुर्दैवाने धोनी धावचीत झाला आणि भारताचे विश्वचषकाचे स्वप्न भंगले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 ‘…म्हणून धोनीला ७व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं\n2 रोहित शर्माला वन-डे संघाचा कर्णधार बनवा माजी भारतीय खेळाडूने सुचवली कल्पना\n3 World Cup 2019 : धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा तरी का करायची जावेद अख्तर धोनीच्या पाठीशी\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-73-1259581/", "date_download": "2020-09-26T02:16:34Z", "digest": "sha1:FIZLOTBPM4NDP46XIXDDL5Z2FYOVQF6I", "length": 52485, "nlines": 227, "source_domain": "www.loksatta.com", "title": "टोकाची टीका नको | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nमागच्या आठवडय़ात पंतप्रधान आणीबाणीवर घसरले, तर बुधवारी सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष पं. नेहरूंवर घसरले.\nमागच्या आठवडय़ात पंतप्रधान आणीबाणीवर घसरले, तर बुधवारी सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष पं. नेहरूंवर घसरले. मला असे वाटते की शीर्षस्थ नेत्यांनी बोलताना अतीव संयम बाळगायला हवा. आजच्या परिस्थितीशी तुलना करून गतकाळच्या घटनांसंबंधी अशी विधाने करणे कोणत्या शिष्टाचारात बसते त्यावेळची संपूर्ण स्थिती, ताण-तणाव, दबाव व घेतलेला निर्णय यांची साद्यंत माहिती पाहावी. ते निर्णय आता जरी चूक वाटले तरी तेव्हा त्याविना पर्याय नसेल. दुसरे म्हणजे आता आम्ही घेत असलेले निर्णय त्रिकालाबाधित सत्य असल्यासारखे बोलणे कितपत सयुक्तिक आहे त्यावेळची संपूर्ण स्थिती, ताण-तणाव, दबाव व घेतलेला निर्णय यांची साद्यंत माहिती पाहावी. ते निर्णय आता जरी चूक वाटले तरी तेव्हा त्याविना पर्याय नसेल. दुसरे म्हणजे आता आम्ही घेत असलेले निर्णय त्रिकालाबाधित सत्य असल्यासारखे बोलणे कितपत सयुक्तिक आहे आपल्या वाटय़ाला आलेला डाव प्रामाणिकपणे खेळावा. भविष्य कल्पितापेक्षा वेगळे असते. तेव्हा पूर्वसुरींबद्दल आदर दाखवता न आला तरी किमानपक्षी टोकाची टीका टाळावी.\n– रामचंद्र महाडिक, सातारा\n‘सरोगसी’ने मुलगेच कसे होतात\nअविवाहित असूनही पिता झालेला तुषार हा पहिला भारतीय अभिनेता. नैसर्गिकरीत्या पालक होता येत नसेल तर दत्तक घेऊन आपली इच्छा पूर्ण करण्याचा परंपरागत मार्ग आजही उपलब्ध आहे. मात्र अलीकडे टेस्ट टूब बेबी आणि सरोगसी या पद्धतींचा अवलंब करण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. यामध्ये अभिनेत्री सुश्मिता सेनचे वेगळेपण उठून दिसणारे आहे. सेन यांनी दोन मुलींना दत्तक घेऊन एकेरी पालकत्वाची अनोखी जबाबदरी पार पाडली आहे. कोणी कशा पद्धतीने पालक व्हावे हा ज्याचा-तिचा व्यक्तिगत मामला आहे. त्याविषयी आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण या सर्व सरोगसी प्रकरणांत एक गोष्ट मात्र समान आहे.\nती म्हणजे यातून मुलगेच जन्माला आलेले आहेत. एकही मुलगी जन्माला आल्याची बातमी नाही. ही बाब नक्कीच विचारात घेण्यासारखी आहे. हा निव्वळ योगायोग म्हणावा का यातून सरोगसी हा पुत्रप्राप्तीचा हमखास मार्ग असल्याचा संदेश कळत-नकळत समाजात जात आहे. असे होणे सामाजिक स्वास्थ्यासाठी कमालीचे हानिकारक आहे.\nआपल्या देशात सरोगसीच्या मार्गाने पालक होण्यासाठीचा खर्च हा सर्वसामान्यांना परवडणारा नाही. यामुळे याचा लाभ घेण्याचे प्रमाण अर्थातच श्रीमंतांमध्ये अधिक आहे. आर्थिकदृष्टय़ा संपन्न असलेल्या समाजाची अपत्यप्राप्तीविषयीची रोगट मानसिकता यातून स्पष्ट होते. या वर्गात आजही पुत्रप्राप्तीची अभिलाषा प्रचंड असल्याचे हे निदर्शक आहे. सरोगसी या तंत्राने केवळ मुलगेच का जन्माला आले आहेत, हा कळीचा मुद्दा आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या जाणकारांनी यावर खुलासा करावा.\n– प्रा. प्रवीण घोडेस्वार, नाशिक\nमातेविना राहण्याची बाळावर सक्ती कशाला\nतुषार कपूरच्या ‘सिंगल फादर’ बनल्याच्या बातम्या हरतऱ्हेच्या प्रसारमाध्यमांतून चालू असताना, तुषारसोबत त्याचे मातापिता जितेंद्र-शोभा यांनी त्याला कसा मानसिक पाठिंबा दिला याचेही चर्वितचर्वण होत होते. या पूर्ण घटनेत दोन अत्यंत महत्त्वाचे विरोधाभास दिसून येतात.\n(१) यातील समाविष्ट सर्व पात्रांनी म्हणजे जसलोकचे डॉक्टर्स, महान सिंगल फादर तुषार कपूर आणि त्याला मानसिक आधार देणारे त्याचे अतिमहान माता-पिता यांनी जल्लोष साजरा केला, त्यांनी विनामातेचे राहण्यासाठी त्या बाळाची संमती घेतली होती का अशा प्रकारे या जगात आलेल्या त्या लहानग्याचे काय अशा प्रकारे या जगात आलेल्या त्या लहानग्याचे काय मातेविना संगोपन होईल, पण जसजसे ते मूल मोठे होईल, शाळेत जाईल, समाजात मिसळेल, तेव्हा त्याच्या बालमित्रांनी तुझी आई कुठे आहे, असे विचारल्यावर काय सांगायचे इथपासून कपूर खानदानाला या मुलाला कदाचित जे खरे नाही ते बोलायला शिकवायला लागेल. हा त्या जीवावर भावनिक आणि मानसिक अत्याचार नसेल का मातेविना संगोपन होईल, पण जसजसे ते मूल मोठे होईल, शाळेत जाईल, समाजात मिसळेल, तेव्हा त्याच्या बालमित्रांनी तुझी आई कुठे आहे, असे विचारल्यावर काय सांगायचे इथपासून कपूर खानदानाला या मुलाला कदाचित जे खरे नाही ते बोलायला शिकवायला लागेल. हा त्या जीवावर भावनिक आणि मानसिक अत्याचार नसेल का पैशाच्या जोरावर गर्भाशय भाडय़ाने घेतले, पण माता कशी विकत घेणार\n(२) दुसरा विरोधाभास म्हणजे आयव्हीएफ आणि सरोगसी हे तंत्रज्ञान निपुत्रिक जोडप्यांसाठी प्रगत करण्यात आले आहे, सिंगल फादर आणि मदर होण्यासाठी याचा वापर व्हावा याचा अर्थच समजत नाही, स्वत:ची वाहवा करून घेण्यासाठी एका चिमुकल्यावर मातेविना किंवा पित्याविना राहण्याची जबरदस्ती करणे म्हणजे गंभीर सामाजिक अत्याचारच समजला जावा.\nतेव्हा, एखादे खानदान आनंदी असले तरी एका लहान जीवाला दु:खी करण्याचा त्यांना अधिकार नाही.\n– राजीव नागरे, ठाणे.\n‘(वे)तनमाजोरी’ ( ३० जून) या अग्रलेखात, ‘वेतन दुप्पट झाले’ हे विधान अज्ञानदर्शक आहेम्. मूळ पगारा मधे महागाईभत्ता मिळविल्या मुळे पगार दुप्पट झाला असा समज करून घेऊन रान उठवण्याचा हा प्रकार आहे. परंतु वाढ २३ टक्के आहे. दहा वर्षांत २३ टक्के हे लक्षात घेतलेले आहे का केंद्रातील कर्मचारी, जे कामच करत नाहीत असे जे या अग्रलेखाचे म्हणणे आहे, त्यापैकी ३० टक्के संरक्षण दलाचे आहेत. बाकी रेल्वे व टपाल हे सगळ्यात जास्त संख्येने कर्मचारी आसलेले विभाग. केंद्रातील कित्येक खाती तुटपुंजा कर्मचारी वर्ग असून सुद्धा चालू आहेत. आणि कदाचित त्यामुळे कंटाळून लोक स्वेच्छा निवृत्ती घेत आहेत. सरकारी कामामधील नियम/ प्रक्रिया इतक्या जाचक आहेत की प्रत्येक नियम पाळावयाचे ठरविल्यास कोणतेच काम होणार नाही. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात नागरिकांचाही अडथळा असतो.\n– राम लेले, पुणे\nजातिव्यवस्थेबद्दल हे ‘संशोधन’ आले कोठून\n’ हा शेषराव मोरे यांचा ‘संस्कृतिसंवाद’ (२१ जून) वाचला. आपल्या आद्यपूर्वजांकडून आंतर्विवाह गटाचा वारसा म्हणून जातिव्यवस्था आली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रामुख्याने बेटीबंदीवर भर देताना त्यांनी, ‘जात म्हणजे विस्तारित कुटुंब’ ही कालवश इरावती कर्वे यांची व्याख्या प्रमाण मानली आहे. अर्थात, नामवंत विद्वानांनी वर्षांनुवर्षे अभ्यास करून व अनेक ग्रंथ लिहूनही जातिव्यवस्थेच्या उगमाबाबत एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे वृत्तपत्र लेखाच्या मर्यादेत जातिव्यवस्थेचा उगम शोधण्याचा प्रयत्न हा कितीही स्तुत्य व धाडसी असला तरी तो यशस्वी होण्याची सुतराम शक्यता नाही.\nजातिव्यवस्थेची लक्षणे सांगताना लेखकाने ‘जातवार वस्त्या’ हे महत्त्वाचे लक्षण वगळले आहे. त्याचप्रमाणे, ‘जातिव्यवस्थेबरोबर ग्रामव्यवस्थाही तयार झाली’, असे एक अनैतिहासिक विधान लेखात आहे. मुळात लोखंड मुबलक प्रमाणावर उपलब्ध होईपर्यंत ‘लोहार’ ही जात तयार होणे असंभव आहे. त्याचप्रमाणे कापसाची उपलब्धता वाढल्याशिवाय विणकर, कोष्टी वा साळी ही जात निर्माण होऊ शकत नाही. लोहार जात निर्माण होताना तिच्यात समाजातील अनेक व्यक्ती स्वखुशीने समाविष्ट झाल्या असतील अथवा काही व्यक्तींना तत्कालीन दंडसत्तेने लोहार बनविले असेल. कोष्टी तसेच इतर समाजांबाबतही असेच काहीसे झाले असावे. त्यामुळे जातिव्यवस्था ही ग्रामव्यवस्थेनंतरच निर्माण झाली असावी, असे चित्र ढोबळमानाने उभे राहाते. अशा परिस्थितीत जातिव्यवस्थेच्या उगमाशी ग्रामव्यवस्था जोडण्यात लेखकाचे कोणते हितसंबंध आहेत, याचा शोध घेणे आवश्यक वाटते.\nलेखकाने नमूद केलेले ‘बेटीबंदी’ हे लक्षणसुद्धा एकाएकी अवतीर्ण झालेले नाही. ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या प्रमाणभूत ग्रंथात कालवश इतिहासाचार्य राजवाडे यांनी बेटीबंदी धुडकावणारी कित्येक उदाहरणे दिली आहेत. सवरेत्कृष्ट म्हणून गणल्या जाणाऱ्या ‘मृच्छकटिक’ या संस्कृत नाटकात चारुदत्त हा ब्राह्मण वसंतसेना या गणिकेशी विवाहबद्ध होताना दाखविले आहे. म्हणजे, निदान शूद्रकाच्या काळापर्यंत म्हणजे अंदाजे दुसऱ्या शतकापर्यंत तरी बेटीबंदी हे लक्षण प्रचलित नव्हते, असे अनुमान निघू शकते. दक्षिणेकडील महान संत बसवेश्वर यांनी अस्पृश्य-ब्राह्मण विवाह लावल्याचे सर्वश्रुत आहे. ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ लिहिताना, तंत्रामध्ये वर्ण-जात, वय यांचा विचार केला जात नसे, असे कालवश महामहोपाध्याय पां. वा. काणे आवर्जून सांगतात. समाजातील अनेक प्रतिष्ठित हे तंत्रमार्गी असल्याचेही ते नमूद करतात. केरळामध्ये हल्लीहल्लीपर्यंत प्रचलित असलेल्या नंबुद्री ब्राह्मण व नायर स्त्रिया यांच्या ‘संबंधम’मधून निर्माण होणाऱ्या ‘क्षत्रिय’ संततीची प्रथासुद्धा ‘बेटीबंदी’ झुगारून लावते. ही ‘अनित्यता’ विचारात घेतली नाही, तर ‘बेटीबंदी’ अनादिकालापासून ‘नित्य’ असल्याचा अनैतिहासिक निष्कर्ष निघतो. अशा परिस्थितीत जातिव्यवस्थेच्या उगमाचा ‘कार्यकारणभाव’ कसा समजणार सामाजिक विकासक्रमाची एक गती असते, काही नियम असतात. त्यांच्या आकलनाच्या साहय़ाने जातिव्यवस्थेसारख्या (आज कालबाहय़) संस्थेच्या उगमाबाबत काही अनुमाने काढता येऊ शकतात. लेखक अशा विकासक्रमाच्या गतिनियमांबाबत परिचित असल्याचे कुठे जाणवत नाही. म्हणूनच ते नंतर आलेल्या जातिव्यवस्थेशी आधी तयार झालेल्या ग्रामव्यवस्थेच्या उगमाचा संबंध जोडून मोकळे होतात. तसेच जातिव्यवस्थेची लक्षणे क्रमाक्रमाने विकसित झाली असावीत, या नैसर्गिक नियमापासूनही फारकत घेतात. सामाजिक विकासक्रम मान्य नसणे हे मूलत: स्थितिवादी असल्याचे लक्षण आहे. लेखकाच्या हितसंबंधांचे उत्तर हे असे आहे\n‘पुरोहितवर्गवर्चस्व व भारताचा सामाजिक इतिहास’ या अप्रतिम ग्रंथाच्या प्रस्तावनेत कालवश तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, ‘‘..शारीरिक परिश्रमांवर व विद्यांवर आधारलेले बौद्धिक व्यवसाय हे शूद्रांचे व्यवसाय हिंदू धर्मशास्त्राने मानले. उदा. सोनार, धातुशोधक व धातूंचे ओतकाम करणारे, कासार, तांबट, कोष्टी, रंगारी, चितारी, सुतार, मणिकार,.. .. .. मूर्तिकार, पाथरवट, तांबोळी, अत्तरे व तेले तयार करणारे, सुगंधी द्रव्ये तयार करणारे, कलाबूत तयार करणारे, नक्षी व भरतकाम करणारे.. .. राजदरबारात व ग्रामीण समाजात नाच, तमाशा इत्यादी प्रकारची करमणूक करून लोकरंजन करणारे, पोवाडे व लावण्या रचून गाणारे शाहीर, घोंगडय़ा, शाली इत्यादी लोकरीचे विणकाम करणारे शूद्र व अतिशूद्र म्हणून समाजाच्या खालच्या थरात दडपून टाकले. त्यांच्यावर व्याजाचा दर त्रवर्णिकांपेक्षा दुप्पट, तिप्पट किंवा चौपट कायद्याने लादला गेला. त्यामुळे अथरेत्पादनावर फार वाईट परिणाम झाला. या जाती व वर्ग कायम खचत राहिले..’’\nअशा तऱ्हेने भारताच्या आजच्या मागासलेपणाचे कारण हे जातिव्यवस्थेत आहे व तिच्या निर्मूलनातूनच हे मागासलेपण दूर होऊ शकते. या पाश्र्वभूमीवर, देशातील शूद्रादिशूद्र समाजाची शेकडो वर्षांची ही ‘कर्मकथा’ समजून घेण्यासाठी समाजविकासक्रमाच्या गतिनियमांसह नितळ दृष्टीदेखील पाहिजे, हे स्पष्ट होते. आपल्या स्थितिवादी लेखकाकडे या दोन्ही गोष्टींचा अभाव असल्याने त्यांना जातिव्यवस्थेचा उगम सापडू शकत नाहीच, शिवाय शूद्रादिशूद्रांची दैन्यावस्थाही बेचैन करू शकत नाही. वस्तुत:, कोणाही स्थितिवादी व्यक्तीने कोणतेही ‘संशोधन’() केल्यास त्याचा ऐतिहासिक तथ्यांशी ताळमेळ बसूच शकणार नाही. भारतीय संदर्भात विशेषत:, जातिव्यवस्थेच्या संशोधनाला तर ते अधिक प्रकर्षांने लागू आहे. जातीय हितसंबंधांशी इमान राखताना अनेक तथ्यांची मोडतोड होणे अपरिहार्य आहे. यामुळेच तर जातिव्यवस्थेच्या समर्थकांची विश्वासार्हता कल्पनातीत वेगाने ढासळत आहे. याची अटळ परिणती जातिसंस्थेच्या विनाशाचा वेग वाढण्यात होणार आहे. या प्रक्रियेला हातभार लावल्याबद्दल लेखकाचे आभार मानायला हवेत\n– शुद्धोदन आहेर, मुंबई.\nपुणे येथे नुकताच शनिवारवाडय़ापाशी ४५मीटर उंचीचा राष्ट्रध्वज बसविला, आता कात्रज तलावालगत म्हणे ७२मीटर उंचीचा ध्वज बसविणार, त्याचा खर्च दीड कोटी रुपये. याची पुणे मनपा ला खरेच गरज आहे का हे लोण अन्य शहरांत पसरेल आणि पैशांचा नाहक चुराडा होत राहील. तीच रक्कम गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरावी . केवळ देखाव्याची कामे कशासाठी\n– अमोल करकरे, पनवेल\nपुरुषकेंद्री धर्म सोडूनच दिले तर\n‘स्त्रियांसाठी कट्टरतावाद घातक’ हा रुबीना पटेल यांच्या ‘संघर्षसंवाद’ सदरातील लेख (२७ जून) आणि त्यावर ‘स्थानिक प्रयत्नांना बळ हवे’ हे पत्र (लोकमानस, २८ जून) वाचले. ते वाचत असताना काही विचार मनात आले.\nत्याच जुनाट पौरुषाची जळमटे घेऊन स्त्रियांनी आपली वेगळी प्रार्थनास्थळे बांधून त्यात कसली नवी प्रार्थना होणार आजवर अनेक स्त्रियांच्या मनात हज्जार वेळा आलेला एक टोकाचा विचार माझ्याही मनात येतो, की धर्म सोडूनच दिला तर आजवर अनेक स्त्रियांच्या मनात हज्जार वेळा आलेला एक टोकाचा विचार माझ्याही मनात येतो, की धर्म सोडूनच दिला तर सर्व धर्माचा समभाव खरे तर एकच सर्व धर्माचा समभाव खरे तर एकच तो म्हणजे ‘कट्टर स्त्री विरोध’- हे एकच कारण पुरेसे आहे धर्मत्यागासाठी.\nमुळात सर्वच धर्म स्त्रियांच्या मुळावर उठलेले होते आणि आजही ते बहुतांशी जसेच्या तसेच आहेत.\nसारवासारव कितीही करा.. आमच्या धर्मात गार्गी, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती वगैरे होत्या, आहेत.. आमच्या कुराणात शरियत, हदीसमध्ये सर्वत्र स्त्रीगौरव सांगितला आहे. आमच्या धर्मात इतर कोणत्याही धर्मापेक्षा स्त्रियांना अधिक स्वातंत्र्य दिले गेले आहे (भाषा बघा : दिले गेले आहे (भाषा बघा : दिले गेले आहे\nप्रत्यक्षात तसे काहीही नाही हे साक्षात अनुभवाने जेव्हा बाईला समजते तेव्हा तिच्या मनात असे येत असणार, की जे निखालस खोटे आहे ते सत्य का मानायचे जो अन्याय आहे तोच न्याय का मानायचा जो अन्याय आहे तोच न्याय का मानायचा शिवाय तो पवित्रही आहे शिवाय तो पवित्रही आहे धर्माधिष्ठित अन्याय, अत्याचाराबद्दल बहुसंख्य स्त्रियांना चीड, संताप येत नसेल का धर्माधिष्ठित अन्याय, अत्याचाराबद्दल बहुसंख्य स्त्रियांना चीड, संताप येत नसेल का काहींना धर्मातल्या परंपरा, चालीरीतींचे भयदेखील वाटत असणार. अनेकदा सतीसारख्या प्रथांच्या रूपाने धर्म बाईच्या जिवावरदेखील उठले आहेत (अर्थात काही स्त्रिया फितूर असतीलही. धार्मिक समाजातील त्या जणू ँल्ल१ं१८ ें’ी२- मानद पुरुष असतात. धर्मातल्या उघड पुरुषप्रधानतेची त्या मूर्खासारखी भलामण करत असतात त्या अपवाद.).आपल्याला आपल्या केवळ स्त्रीत्वामुळे, स्त्री शरीरामुळे समाजात, कुटुंबात आणि परमेश्वराच्या दारीदेखील कसलेही बरोबरीचे, सन्मानाचे स्थान देणे सोडाच, पदोपदी आपला घोर अपमानच होत असतो हे काय तिला कळत नसेल का काहींना धर्मातल्या परंपरा, चालीरीतींचे भयदेखील वाटत असणार. अनेकदा सतीसारख्या प्रथांच्या रूपाने धर्म बाईच्या जिवावरदेखील उठले आहेत (अर्थात काही स्त्रिया फितूर असतीलही. धार्मिक समाजातील त्या जणू ँल्ल१ं१८ ें’ी२- मानद पुरुष असतात. धर्मातल्या उघड पुरुषप्रधानतेची त्या मूर्खासारखी भलामण करत असतात त्या अपवाद.).आपल्याला आपल्या केवळ स्त्रीत्वामुळे, स्त्री शरीरामुळे समाजात, कुटुंबात आणि परमेश्वराच्या दारीदेखील कसलेही बरोबरीचे, सन्मानाचे स्थान देणे सोडाच, पदोपदी आपला घोर अपमानच होत असतो हे काय तिला कळत नसेल का धर्माशिवाय जगता येते. उलट अधिक छान जगता येते. त्यासाठी संविधान आहे, पण तोही धर्मग्रंथ नाही. तो ग्रंथ अपौरुषेयही नाही. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बदलत्या काळानुसार त्यात बदल घडवून आणता येतात.\nबायांनी त्यांचा त्यांचा प्रचलित पुरुषकेंद्री जुनाट धर्म सोडून दिला तर पुरुषांनाही धर्मात राहण्यात काडीचा रस राहाणार नाही.\n– डॉ. मोहन देस, पुणे.\n’ (३० जून) या संपादकीयातील उत्तरदायित्वाची निश्चिती व कार्यक्षमतेच्या मूल्यमापनासह वेतन आयोगाचे स्वागत’ हे मत म्हणजे नागरिकांच्या मताचे प्रतिबिंबच म्हणावे लागेल . देशाची अर्थव्यवस्था हेलकावे खात असताना , दोन टक्के लोकांचे लाड करावयाचे की ‘देशाच्या भवितव्यास प्राधान्य’ द्यावयाचे याचा निर्णय देशाचे विद्यमान एकमात्र तारणहार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच करणे क्रमप्राप्त दिसते . जवळपास ६५ / ३५ ( राज्य / केंद्र) टक्के खर्च कर्मचाऱ्यांवर करूनही सरकारी शिक्षण व्यवस्था, सरकारी आरोग्य व्यवस्था. जे जे सरकारी ते ते दर्जाहीन असे लोकांना का वाटते, याचे उत्तर सरकारने शोधायला हवे.\nउदार अंतकरणाने वेतन आयोग जाहीर करणारे सरकार दुसरीकडे मात्र जगण्यासाठी प्रतिदिन ३५ रुपये पुरेसे असल्याचे कसे काय म्हणते लोकशाहीतील आर्थिक विषमतेला सरकार स्वत:च खतपाणी घालते हे देशातील उर्वरित ९८ टक्के लोकांचे दुर्दैव ठरते. ‘ना खाउंगा , न खाने दूंगा’ असे ठणकावणाऱ्या मोदींनी ‘ना ‘जादा’ खिलाऊंगा’ हा मंत्र जपणे सुद्धा गरजेचे वाटते. वेतन आयोगाचा मी स्वत: लाभार्थी असूनही आजूबाजूची परिस्थिती पाहिली की, नेते आणि नोकरशहा यांचे लाड जास्तच होताना दिसतात हे मत मांडणे आवश्यक वाटले म्हणून हा पत्रप्रपंच .\n– सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर (नवी मुंबई)\nउपग्रह प्रतिमांतील दिशा वेगळी कशी\nइंटरनेटवरून उपग्रहाद्वारे दिसणाऱ्या प्रतिमांतील भारतावरील ढगांची हालचाल पहाताना एक आश्चर्यकारक परिस्थिती दिसते. ढग हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतात. वास्तविक पाहता भौगोलिक द्रष्टय़ा नैऋत्येहून येणारे वारे हे पावसाळ्यात ढग घेऊन येतात. असे असताना सांप्रत ढगांची ही हालचाल विपरीतच नाही काय कोणी जाणकार ह्यचा खुलासा करतील काय. सामान्य पावसाळा कधी सुरू होईल\n– रघुनंदन चुरी, बदलापूर.\nअशैक्षणिक मसुद्याभोवतीचे अशैक्षणिक वातावरण..\n‘अशैक्षणिक मसुदा’ या संपादकीय (२९ जून २०१६) लेखामधून येऊ घातलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल काही गंभीर बाबींबद्दल मिळालेली माहिती अत्यंत महत्त्वाची वाटली. स्वातंत्र्योत्तर काळात अभ्यासकांनी आणि समित्यांनी वारंवार सांगूनही, आरोग्य सेवांप्रमाणेच शिक्षण या मूलभूत बाबीवरील सरकारी गुंतवणूक आणि प्राधान्य नेहमीच कमी दर्जाचे ठरले आहे. त्याचीच परिणती म्हणून खालावत चाललेला नव्हे, तर तळाला पोहोचलेला दर्जा सध्याच्या अकुशल शिक्षित तरुणांच्या रूपाने समोर येताना दिसत आहे. कदाचित याच कारणाने बोटावर मोजता येण्यापेक्षा जास्त भारतीय शैक्षणिक संस्थांचे स्थान जागतिक क्रमवारीत कुठेही दिसत नाही. ही परिस्थिती उच्चशिक्षणाची आहेच, पण त्यात सुधारणा करण्याची संधी ही प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात आमूलाग्र बदल आणि गुंतवणूक यातूनच शक्य आहे.\nअग्रलेखातील ‘शिक्षक भरतीतील मोठय़ा प्रमाणावरील भ्रष्टाचार’ हा मुद्दा खासगी शिकवण्याच्या वाढलेल्या प्रमाणासाठीदेखील कारणीभूत आहे असे मला वाटते. कुशल आणि प्रामाणिक शिक्षकांना या शिकवण्या चालवाव्या लागतात किंवा काही बडय़ा चालकांकडे- इच्छा असो वा नसो- वेठबिगारी करावी लागते, हे शोषणच होय. विद्यार्थी आणि पालक हेही खासगी शिकवणी वर्गाच्या समांतर व्यवस्थेला शरण जातात. या परिस्थितीचा गैरफायदा कुचकामी आणि शक्यतो भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेचा फायदा घेऊन नोकऱ्या पदरात पडून घेतलेले शिक्षक उचलतात. स्वत: ते क्लासेस चालवून दुप्पट कमाईचा लोभही करताना दिसतात. मात्र खासगी संस्थाचालक कोणत्याही शिक्षकांकडून हप्तेही घेण्यास आणि त्यांच्या पगारावर ताव मारायला कमी पडत नसतील. अग्रलेखातही, ‘खासगी क्लासचे वाढत चाललेले वर्चस्व हे शाळेतील शिक्षकांच्या दर्जाहीनतेचे प्रकट रूप आहे’ या वाक्यात व्यवस्थेचा गैरफायदा घेऊन शिक्षक बनून बसलेल्यांना संबोधले आहे असे वाटते आणि हेच महानग बहुधा ‘शिक्षकांचा सरकारी कामासाठी होणारा वापर’ या नावाखाली कामचुकारपणात अग्रेसर असावेत.\nवाईट याचे वाटते आहे की, प्रामाणिकपणे शिकवण्याची इच्छा असणाऱ्या शिक्षकांचीच कमतरता तरी आहे किंवा ते व्यवस्थेचा भाग तरी नाहीत. परिणामी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला खीळ बसताना दिसतेच; शिवाय या शिक्षकांच्या (जे पैसे भरून नोकऱ्या पटकावू शकत नाहीत.) कारकीर्दीचीही वाट लागते. याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्रात तयार झालेल्या डीएड आणि बीएड शिक्षकरूपी सुशिक्षित बेकारांची फौज आहे.\n‘देशातील शिक्षणाचा दर्जा वाढवायचा असेल तर त्यासाठी उत्तम सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी खासगी संस्थांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे’ या विधानावरून मात्र, दर्जेदार शिक्षण हे खासगी व्यवस्थेतून आणि खासगी शाळेतूनच मिळेल या मताशी अग्रलेखही सहमत आहे असे भासते. हे मत कदाचित सरकारच्या उदासीनतेमुळेही असेल; पण हा खासगी संस्थांचा पर्याय हा वादग्रस्त आहे. सध्याच्या शिक्षण प्रगतीत त्यांचे योगदान आहे; पण जी बिकट परिस्थिती आहे ती तशी करण्यातील त्यांचे योगदान हे गंभीर नुकसान करणारे आहे. इतकेच नव्हे तर शिक्षणव्यवस्थेची वाट लावण्यातही यांची भूमिका महत्त्वाची मानावी लागेल. खासगी क्षेत्राचा हेतू हा नेहमीच ‘नफा’ या हेतूने कार्यान्वित असतो; शैक्षणिक क्षेत्रही याला अपवाद नाही. याच कारणाने खासगी शाळा असोत किंवा शिकवण्या असोत, या शहरांभोवती किंवा नवीन उदयास येऊ पाहणाऱ्या शहरांभोवती गर्दी करताना दिसतात, जिथे त्यांना त्यांचे ग्राहक मिळण्याची जास्त आशा असते.\nअर्थातच यामुळे ग्रामीण भागात राहणारे आणि शहरातील गरीब लोक या तथाकथित दर्जेदार शिक्षण संस्थांपासून आणि पर्यायाने शिक्षणापासूनही दूर राहतात. यातून काही लोक प्रवेश घेण्यात यशस्वी होतातही; पण बहुतांश लोकांसाठी ही कवाडे बंदच असतात. यातही सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असणाऱ्यांसाठी हे ‘दर्जेदार शिक्षण’ दिवास्वप्नच राहते, कारण या घटकांना याचा लाभ घेता यावा यासाठी ‘आरटीई’च्या नावाने दरवर्षी चाललेला गोंधळ, संस्थाचालकांचा नकार किंवा ‘अनौपचारिक’ फी आणि पालकांची लूट सर्वश्रुत आहे. दर्जेदार शिक्षण हे कोण्या एका वर्गाची मक्तेदारी नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थ्यांचा हक्क म्हणून बघितले गेले पाहिजे आणि याची जाणीव शिक्षण क्षेत्राच्या प्रत्येक भागधारकाला असणे व त्याप्रमाणे कृती करणे ही या नव्या शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने काळाची गरज आहे, याबद्दल दुमत असण्याची संभावना नाही.\n– डॉ. मिलिंद बनसोडे\n[संशोधक, टाटा सामाजिक विज्ञान संस्थान] मुंबई\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 बेगडी ‘राष्ट्रप्रेमीं’ना सत्ताधाऱ्यांचीही साथ\n2 प्रयत्न आणि इच्छाशक्ती यांचा अभाव\n3 ‘शत प्रतिशत’ डावलणे\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/enforcement-of-law-for-home-servants-still-pending-1155252/", "date_download": "2020-09-26T03:27:40Z", "digest": "sha1:BONI3F5P6ZHP53PK2W6X24D2L5RHQWPE", "length": 13038, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "घरकामगारांसाठी कायदा केला, पण अंमलबजावणी कोठे? | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nघरकामगारांसाठी कायदा केला, पण अंमलबजावणी कोठे\nघरकामगारांसाठी कायदा केला, पण अंमलबजावणी कोठे\nमाझा नवरा ८ वर्षांपूर्वी वारला, मी घरकाम करून माझ्या दोन मुलांना वाढवतेय\nमाझा नवरा ८ वर्षांपूर्वी वारला, मी घरकाम करून माझ्या दोन मुलांना वाढवतेय; परंतु महाराष्ट राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाने मातृत्व अनुदान नाकारलं.. माझी आई घरकामगार होती. तिचा मृत्यू झाल्यानंतर मंडळाने ३० हजारांची रक्कम देणे बांधील होते, पण मंडळाने रक्कम देण्यास नकार दिला.. माझ्या वयाची ५५ वर्षे पूर्ण झाली तरी मला वर्षांला मिळणारे सन्मानधन मंडळाकडून नाकारले जाते.. अशा एक ना अनेक प्रश्नांचा ऊहापोह मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या घरकामगारांच्या जनसुनावणीत करण्यात आला.\nराज्य सरकारने २००८मध्ये घरकामगारांच्या कल्याणासाठी ‘राज्य घरेलु कामगार कल्याण मंडळ अधिनियम’ संमत केला. यानुसार राज्यातील सर्व घरकामगारांची नोंदणी करण्यात आली. नोंदणी केलेल्या सदस्यांना मंडळाचे फायदे मिळणार असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच झाले नसल्याचे उपस्थित घरकामगारांनी स्पष्ट केले. याउलट मंडळाने आम्हाला नेहमीच डावलले, अशी तक्रारही सदस्यांनी केली. या जनसुनावणीसाठी ५०० हून अधिक घरकामगार उपस्थित होते. शिक्षण नाही, कुठलाच आधार नसलेल्या स्त्रिया घरकाम करून स्वत:चे व आपल्या कुटुंबाचे पोट भरतात.\nअशा वेळी शासनाने अशा असंघटित कामगारांना संघटित करून त्यांना सुरक्षा देऊ केली. पण त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. शासनाने घरकामगारांना त्यांचा हक्क दिला नाही तर १ लाखांचा घरकामगारांचा मोर्चा घेऊन आम्ही मंत्रालयासमोर उपोषणाला बसू, असे आवाहन संस्थेचे सहसमन्वयक ज्ञानेश पाटील यांनी केले.\nया जनसुनावणीत पटलावरील सदस्यांमध्ये ज्येष्ठ युनियन नेते एम. ए. पाटील, माजी सहाय्यक मुख्य महानगर दंडाधिकारी डी. के. सोनावणे, सामाजिक कार्यकर्त्यां अ‍ॅड्. इंदवी तुळपुळे, घरेलू कामगार कल्याण मंडळाचे माजी सदस्य उदय भट उपस्थित होते.\nकामाच्या ठिकाणी अत्याचाराला बळी पडलेल्या घरकामगारांनी पोलिसात तक्रार दाखल केली तरी तुमचीच चूक असल्याचे सांगत त्याच्यांवर विश्वास ठेवला जात नाही. अशा वेळी महिला घरकामगारांना मदत मिळावी व त्यांचे प्रतिनिधित्व व्हावे यासाठी दक्षता समिती स्थापन करण्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 ..तर ग्राहक न्यायालयाचे सर्व खटले सहकार न्यायालयाकडे वर्ग करू\n2 उपाहारगृहांना सुधारित मार्गदर्शक तत्त्वे\n3 आता चित्रपट दिग्दर्शकांकडून ‘पुरस्कारवापसी’\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/toll-zone-close-state-govt-raj-thackeray-372182/", "date_download": "2020-09-26T02:42:09Z", "digest": "sha1:I2RVNYABMMSKGYIQGOCEVR6KLISYPLZN", "length": 14176, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सोलापूर जिल्ह्य़ातील चार टोलनाके बंद होणार | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nसोलापूर जिल्ह्य़ातील चार टोलनाके बंद होणार\nसोलापूर जिल्ह्य़ातील चार टोलनाके बंद होणार\n१० कोटींपेक्षा कमी खर्चाच्या रस्त्यांसाठी जे टोलनाके उभारण्यात आले आहेत, ते टोलनाके बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे.\nराज्यात टोलविरोधात जनतेत वाढलेला असंतोष, त्यातच राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने छेडलेले आंदोलन आणि तोंडावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अखेर राज्य शासनाने १० कोटींपेक्षा कमी खर्चाचे टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोलापूर जिल्ह्य़ातील चार टोलनाके बंद होणार आहेत. त्याबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त होत असले तरी शहरातील खराब रस्त्यांसाठी सुरू असलेले टोलनाकेही बंद व्हावेत, अशी मागणी केली जात आहे.\n१० कोटींपेक्षा कमी खर्चाच्या रस्त्यांसाठी जे टोलनाके उभारण्यात आले आहेत, ते टोलनाके बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्य़ातील चार टोलनाके बंद होणार असल्याचे मानले जात आहे. यात अक्कलकोट- दुधनी रस्त्यावरील मैंदर्गी येथील टोलनाका, करमाळा-नगर रस्त्यावरील मांगी बाह्य़वळणावरील टोलनाका, पंढरपूर तालुक्यातील टाकळी-कासेगाव रस्त्यावरील टोलनाका व सोलापूर-बार्शी रस्त्यावरील भोगावती नदीच्या पुलावरील टोलनाका याप्रमाणे चार टोलनाके बंद होण्याची अपेक्षा आहे. अक्कलकोट-दुधनी रस्त्यासाठी चार कोटी ९५ लाख खर्च झाले असून त्यासाठी डी.बी. कन्स्ट्रक्शन कंपनीकडून टोलवसुली होत आहे. तर करमाळा-मांगी बाह्य़वळणावरील रस्त्याचा खर्च सहा कोटी ७५ लाख एवढा झाला असून त्यापोटी एनकेटी टोल रोड कंपनीमार्फत टोलवसुली होते. टाकळी-कासेगाव रस्त्याचा खर्च सहा कोटी ३० लाखांचा असून त्यापोटीची टोलवसुली बिल्डकॉन कंपनी करते. तर सोलापूर-बार्शी रस्त्यावर भोगावती नदीवर तीन कोटी ६२ लाख खर्च करून बांधलेल्या पुलासाठी सोलापूरच्या गणेश बिल्डर्स कंपनीकडून होते.\nया चारही टोलनाके असलेल्या रस्त्यांचा खर्च यापूर्वीच टोलच्या माध्यमातून वसूल झाला असताना अद्याप ही टोलधाड सुरूच असल्याचे बोलले जाते. अखेर आंदोलनानंतर का असेना, हे टोलनाके बंद होणार असल्याचे समाधान सार्वत्रिक स्वरूपात व्यक्त होत असताना इकडे सोलापूर शहरात राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुमारे ७८ कोटी खर्च करून बांधलेल्या ३७ किलो मीटर अंतराच्या रस्त्यांची गुणवत्ता राखली गेली नसताना त्यावर टोलवसुली केली जात आहे. गेल्या सात वर्षांपासून ही टोलधाड सोलापूरकर निमूटपणे सहन करीत आहेत. या टोलधाडीत सर्वपक्षीय हितसंबंध गुंतल्यामुळे कोणीही त्याविरोधात आवाज उठवित नाहीत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराज ठाकरे यांच्या ५० व्या ‘बर्थ डे’ च्या निमित्ताने जाणून घ्या त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी\nराज ठाकरे ‘बर्थ डे स्पेशल’, दुचाकीस्वारांना दिली अनोखी भेट\nVIDEO : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण येथे पाहा\nराज ठाकरे करणार भाजपाशी युती आशिष शेलार यांच्या भेटीने पुन्हा चर्चांना उधाण\nVideo : राज ठाकरे यांचं खणखणीत भाषण येथे पाहा\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 ‘डीकेटीई’च्या स्नेहमेळय़ात ग्रामीण संस्कृतीचे दर्शन\n2 व्यसनातून तयार झाली दरोडेखोरांची टोळी\n3 काष्टी ते केडगाव चौफुला सर्वेक्षण नगर-पुणे रेल्वेमार्गासाठी आशेचा किरण\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/watermelonbuyer", "date_download": "2020-09-26T02:31:42Z", "digest": "sha1:OYEKDYZJOK2XAF6MGCUMBP4EB52PED6O", "length": 12732, "nlines": 198, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "टरबूज खरेदी करणाऱ्या व्यापारी बांधवांशी संपर्क साधा – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nटरबूज खरेदी करणाऱ्या व्यापारी बांधवांशी संपर्क साधा\nव्हाटसअप फोरवर्ड च्या माध्यमातून टरबूज खरेदी करणाऱ्या व्यापारी बांधवांची एक यादी प्राप्त झाली आहे. ती खाली देत आहे. इथे दिलेल्या फोन नंबरची खातरजमा आम्ही केलेली नाही तेव्हा आपण खात्री केल्यावरच बोलणी करावी. यातील फोन नंबर चुकीचे वाटल्यास किंवा इतर काही शंका वाटल्यास कॉमेंट मध्ये तसे लिहावे.\nटरबूज खरेदी करणाऱ्या व्यापारी बांधवांची एक यादी\nपिंटू कदम – ९८६७७८१००२ – वाशी मार्केट\nकिरण पोखरकर – ९०९६८३१८६५,\nशिवमोहन सच्चन – ९९६७६५०७३६. नगर विभाग\nप्रकाश भुजबळ – ७०३८४२४४४४. नारायणगाव विभाग\nमहेंद्र गडगे – ८३२९८४०९२४ . आळेफाटा विभाग\nगट्टू शेठ – ९२८४८४७६०४. कराड\nगुंजाळ शेठ – ९७६३६९१३९९. पुणे\nसुहास पाटील – ९७३०७९३५०७. कराड .\nअमोल शेठ काळे – ८१०८९८८९८८\nजयंत शेठ – ७८७५६८०९०७. गुलटेकडी , मार्केट यार्ड पुणे .\nअजय यादव – ९९२०४२१२९४ , वाशी मार्केट .\nसचिन फुलसुंदर – ९६६५०२३४४३ , कोतूळ , संगमनेर . नाशिक .\nचंद्रकांत घाटकर – ९९२१४२२५८४. गणेगाव . नगर . संदिप थोरात - 9284847604 कराड .\nअख्तर भाई - 9850121929 कराड\nश्रीकांत गवळी 9970358955. इस्लामपूर\nनागेश गवळी 9890656645 इस्लामपूर .\nनिरजंन सोनवणे 9730712366 इस्लामपूर .\nमित्रहो आपण कोणत्याही पिकाचे उत्पादन घ्या पण त्याच्या मार्केटिंगचा विचार पहिले करावा.\nपाटील बायोटेक यामध्ये आपली मदत करू शकते.\nआपले कृषीउत्पादन कधी विक्रीसाठी तयार होईल व इच्छुक खरीददार आपणास कोणत्या मोइबाइल नंबरवर संपर्क करू शकतो हे आपण आम्हाला सांगावे. हि माहिती आमच्या फार्म एक्चेंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येईल. यात आमचे कोणतेही कमिशन नसेल.\nआपण यात विशेष सहकार्य करू शकता.\nपाटील बायोटेकच्या पोष्ट आपण नित्याने शेअर करा जेणेकरून त्या व्हायरल होतील व शेतकरी बांधवांचा नंबर अधिकाअधिक खरीददारांपर्यंत पोहोचेल.\nअधिक माहितीसाठी इथे क्लिक करा\nशेतात फुलोरा आला कि मन स्वप्न पाहू लागते. मनाच्या आकांक्षा...\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nउन्हाळा येतो आहे. अनुभवी शेतकरी बांधवांनी टरबूजाचा हंगाम घ्यायचे ठरवले...\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nकोणत्याही पिकातील कीड व रोग नियंत्रण करते वेळी पिकाचा दर्जा...\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nकोणतेही पिक विचारात घ्या, शेतकरी बांधवास लागोपाठ तीन वर्ष \"हवातसा\"...\n जानेवारी च्या शेवटी कार्यरत होणारी बॅक्‍ट्रोसेरा जातीची हि...\nकाकडी - टरबूज ची तयारी सुरु केली का\nहिवाळा जोरात आहे पण आपल्याला पुढील सिझनची तयारी करायला हवी....\nटरबूज काढणीपूर्वी त्यात इंजेक्शनने लाल रंग सोडावा का\nआपल्या शेतात येणारे उत्पादन चांगल्या दराने खपावे असे कोणत्या शेतकरी...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/chief-minister-of-fadnavis-80-hours-to-save-40-thousand-crores/148201/", "date_download": "2020-09-26T03:05:57Z", "digest": "sha1:TJB7MTZXBFXK2MXIYANY7FWBRBYT6WFV", "length": 11277, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Chief Minister of Fadnavis 80 hours to save 40 thousand crores", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई ४० हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री\n४० हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री\nभाजप खासदार हेगडेंचा दावा, फडणवीसांचा इन्कार\n8 केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी बहुमत नसतानाही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले, असा दावा कर्नाटकातील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा गरम झाले असून हेगडे यांच्या दाव्यात तथ्य नाही. व्हॉटस्अ‍ॅपवरील मेसेजवर विश्वास ठेऊ नका, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. कर्नाटकमधील एका कार्यक्रमात बोलताना हेगडे म्हणाले की, महाराष्ट्रात आमचा माणूस फक्त 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाला होता, हे सर्वांनाच माहीत आहे. नंतर त्यांनी राजीनामाही दिला.\nहे सगळे नाटक त्यांनी का केले आपल्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहीत होते. तरीही फडणवीस मुख्यमंत्री का झाले, असा प्रश्न सगळे करताहेत. तर त्याचे उत्तर आहे, 40 हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात त्यावेळी केंद्र सरकारचे 40 हजार कोटी रुपये होते. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार तिथे आल्यास त्या पैशांचा दुरुपयोग केला जाईल. विकासासाठी ती रक्कम वापरली जाणार नाही, हे त्यांना माहीत होते. त्यासाठीच हे सगळे नाट्य घडवून आणले गेले. हा प्लान खूप आधीच ठरला होता. त्यानुसारच फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अवघ्या 15 तासांत केंद्राचे 40 हजार कोटी परत केले गेले, असेही हेगडे म्हणाले.\nबुलेट ट्रेनसाठी पैसे आलेच नाहीत -फडणवीस\nहेगडे यांचा दावा मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साफ फेटाळून लावला आहे. हेगडे काय म्हणाले मला माहीत नाही. मला मीडियातूनच ही माहिती मिळाली. मात्र, त्यात काहीही तथ्य नाही. पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मी शेतकर्‍यांच्या मदतीच्या निर्णयाशिवाय कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुळात बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारकडून कुठलाही निधी मिळालेला नाही. त्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीत एक कंपनी सुरू करण्यात आली आहे. त्या प्रकल्पासाठी निधी आलाच तर तो थेट संबंधित कंपनीकडे जाणार आहे. महाराष्ट्र सरकारकडे येणार नाही. राज्य सरकारकडे केवळ भूसंपादनाची जबाबदारी आहे. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपवर फॉर्वर्ड होणार्‍या माहितीवर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nभाजप खासदार हेगडेंच्या दावामुळे राज्यातील राजकारण मात्र चांगलेच तापले आहे. महाराष्ट्राचा विकास निधी केंद्राकडे परत केला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. त्यात तथ्य आढळले तर देवेंद्र फडणवीस यांना त्याचे उत्तर द्यावे लागेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. तर ही महाराष्ट्राशी बेईमानी आहे. त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा अधिकार नाही. याबाबत मुख्यमंत्री खुलासा करतील. त्यात काहीतरी काळंबेरं नक्कीच आहे. सत्य समोर येईल. हे सत्य असेल फडणवीस यांचा निषेध केला जाईल, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकोलकाता नाईट रायडर्स vs सनरायजर्स हैदराबाद प्रीव्ह्यू\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nPhoto: NCB ड्रग्ज प्रकरणात चौकशी केलेल्या रकुलमध्ये तुम्हाला या गोष्टी माहिती...\nPhoto: ‘MU’च्या विरोधात ‘ABVP’ चे जागरण गोंधळ आंदोलन\nPhoto: काय आहे ”माझे कुटुंब माझी जबाबदारी\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A5%AA%E0%A5%A6-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-26T01:43:37Z", "digest": "sha1:KTMJ2SEJDJ3CCDQMGBVCB663IJM6MFKO", "length": 8289, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मध्यप्रदेशमधील ४० युवक नवापूर पोलिसांच्या निगराणीत | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमध्यप्रदेशमधील ४० युवक नवापूर पोलिसांच्या निगराणीत\nनवापूर: कोरोना महाविषाणुचा पार्श्वभूमीवर शहरातील प्रवेशद्वारावर पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. याठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान सोलापूर येथुन नवापूर शहरात येणाऱ्या १२ जणांना प्रवेशद्वाराजवळ बीडीओ नंदकुमार वाळेकर यांनी पोलीस विभाग व आरोग्य विभागाचा मदतीने होमक्वारंटाइन केले होते. आजही\nनवापूर पोलिसांनी मध्यप्रदेशमधील ४० युवकांना ताब्यात घेतले आहे.\nनवापूर शहरातील जुना आरटीओ तपासणी नाक्याजवळ गुजरात राज्यातील किम गावातून पायी चालत आलेल्या ४० युवकांना नवापूर पोलिसांनी निगराणीत ठेवले आहे. पोलीस प्रशासनाकडून त्यांची सोय केली जात आहे. या युवकांची आरोग्य तपासणी करून त्यांना क्वारंटाइन करण्याची आवश्यकता होती. परंतु उघड्यावर बसलेल्या ह्या युवकांची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासने गंभीर दखल घेऊन हलगर्जी करु नये अशी अपैक्षा व्यक्त होत आहे.या युवकांची आरोग्य तपासणी करुन आवश्यकता असल्यास होमक्वारंटाइन करण्याची गरज आहे.\nसुधर्मातर्फे गोरगरिबांना लॉक डाउनच्या काळात मोलाची मदत\nनवापूर आरोग्य यंत्रणेला पीपीई किट पुरवठा नाही:\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nनवापूर आरोग्य यंत्रणेला पीपीई किट पुरवठा नाही:\nलॉकडाऊनमध्येही अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसीलदारांनी पकडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://vastavsangharsh.in/?cat=32", "date_download": "2020-09-26T03:02:12Z", "digest": "sha1:F3K5Z5BPLRMCF2YQ7I5CX3DHJ6KMIOLF", "length": 14725, "nlines": 108, "source_domain": "vastavsangharsh.in", "title": "माझं पिंपरी -चिंचवड Archives | वास्तव संघर्ष", "raw_content": "\nराष्ट्रवादी व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन\nदापोडीतील हॅरीस पुल वाहतुकीसाठी खुला ;महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण\nजातीवाचक शिवीगाळ करीत तरूणीवर बलात्कार ;सहा जणांविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nसाडेसहा लाख किंमतीचा गांजा विक्री करणाऱ्या एका तरूणाला हिजवडीत सापळा रचून पोलिसांनी केली अटक\nपिंपरी महापालिकेच्या आयुक्तांचा शासनास दिशाभुल करणारा अहवाल;महापौर माई ढोरे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पञ\nबातम्या माझं पिंपरी -चिंचवड\nराष्ट्रवादी व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन\nपिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांचे आज शुक्रवार (दि.25) साडेबाराच्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन\nबातम्या माझं पिंपरी -चिंचवड\nदापोडीतील हॅरीस पुल वाहतुकीसाठी खुला ;महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण\nपिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला जोडणाऱ्या मुंबई – पुणे महामार्गावरील दापोडी येथे मुळा नदीवरील अस्तित्वात असलेल्या जुन्या हॅरिस\nक्राईम बातम्या माझं पिंपरी -चिंचवड\nजातीवाचक शिवीगाळ करीत तरूणीवर बलात्कार ;सहा जणांविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nपिंपरी(वास्तव संघर्ष) :लग्नाचे अमिश दाखवून वारंवार तरुणीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला दिघी पोलिसांनी अटक केली .तसेच मी तुझ्याशी लग्न करणार नाही\nक्राईम बातम्या माझं पिंपरी -चिंचवड\nसाडेसहा लाख किंमतीचा गांजा विक्री करणाऱ्या एका तरूणाला हिजवडीत सापळा रचून पोलिसांनी केली अटक\nपिंपरी (वास्तव संघर्ष) :हिंजवडी आयटी पार्क फेज – 2 बोडकेवाडी येथे हायकल कंपनीजवळ एका तरूणाला गांजा विक्रीसाठी बाजारात आणले असता\nबातम्या माझं पिंपरी -चिंचवड\nपिंपरी महापालिकेच्या आयुक्तांचा शासनास दिशाभुल करणारा अहवाल;महापौर माई ढोरे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पञ\nपिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समिती सभेत सभापती यांनी दिलेल्या निर्णयावर मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शासनास दिशाभुल\nबातम्या माझं पिंपरी -चिंचवड\nदहावीला 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणा-या विद्यार्थ्याला मिळणार 1 लाख रुपयांचे बक्षीस\nपिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता दहावीमध्ये 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण संपादन\nक्राईम बातम्या माझं पिंपरी -चिंचवड\n‘गाडी बाजुला घे ‘असे म्हणत पिंपरीतील सिग्नलवर महिलेचा विनयभंग ;पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nपिंपरी (वास्तव संघर्ष) – ” मला तुझ्याशी लग्न करायचे आहे , तुझ्याशी बोलायचे आहे , मोटार सायकल बाजुला घे ”\nक्राईम बातम्या माझं पिंपरी -चिंचवड\nसराईत वाहनचोर ‘बुलेटराजा’ला अटक करणा-या पोलिसांना कोरोनाची लागण\nपिंपरी (वास्तव संघर्ष) नाशिक येथील सराईत वाहनचोर ‘बुलेटराजा’ला काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती. बुलेटराजाला कोरोनाची लागण झाल्याने\nक्राईम बातम्या माझं पिंपरी -चिंचवड\nदेहूरोड येथील कुप्रसिद्ध गुन्हेगार जोएल पलानी याची येरवडा कारागृहात रवानगी\nपिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवड शहरातील देहूरोड हद्दीतील कुप्रसिद्ध गुन्हेगार जोएल पलानी याच्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा\nबातम्या माझं पिंपरी -चिंचवड\nआकुर्डी रेल्वे स्थानकालगतच्या सुशोभिकरणासाठी नगरसेविका शर्मिला बाबर यांचा पाठपुरावा\nप्रशासकीय पातळीवरील तांत्रिक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न पिंपरी (प्रतिनिधी) – आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील मोकळ्या जागेचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सुशोभिकरण करून\nराष्ट्रवादी व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन\nदापोडीतील हॅरीस पुल वाहतुकीसाठी खुला ;महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण\nजातीवाचक शिवीगाळ करीत तरूणीवर बलात्कार ;सहा जणांविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nसाडेसहा लाख किंमतीचा गांजा विक्री करणाऱ्या एका तरूणाला हिजवडीत सापळा रचून पोलिसांनी केली अटक\nपिंपरी महापालिकेच्या आयुक्तांचा शासनास दिशाभुल करणारा अहवाल;महापौर माई ढोरे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पञ\nदहावीला 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणा-या विद्यार्थ्याला मिळणार 1 लाख रुपयांचे बक्षीस\n‘गाडी बाजुला घे ‘असे म्हणत पिंपरीतील सिग्नलवर महिलेचा विनयभंग ;पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nसराईत वाहनचोर ‘बुलेटराजा’ला अटक करणा-या पोलिसांना कोरोनाची लागण\nमहापौर माई ढोरे यांच्या हस्ते प्रश्नसंच वाटप;मुलांची प्रगती तपासण्यासाठी प्रश्नसंचची होणार मदत\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळे निधन\nवास्तव संघर्ष युट्युब वर\n\"वास्तव संघर्ष\" हे निर्भिड आणि सडेतोड मत मांडणारे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह मराठी ‘न्यूज पोर्टल’ आहे. पिंपरी चिंचवड, पुणे राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे .वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचकांनी वास्तव संघर्ष वर भरभरून प्रेम दिले म्हणूनच आम्ही न दगमगता बातमीचा सुगावा घेत 'वास्तविक' बातमी जगासमोर आणत आहोत. पोर्टलवरही प्रेम करालच अशी आशा आम्ही बाळगतो.\n- वास्तव संघर्ष वृत्तपत्र\n- वास्तव संघर्ष युटुब न्यूज चैनल आणि\n- वास्तव संघर्ष न्यूज पोर्टल\n- संपादक, वास्तव संघर्ष\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathicorner.com/1-june-birthday-wishes-in-marathi.html", "date_download": "2020-09-26T01:59:25Z", "digest": "sha1:CQAEY6BQ3F6QJCSGQOHY4FBH6KGR7H7Z", "length": 14479, "nlines": 96, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "१ जून वाढदिवसानिम्मित हार्दिक शुभेच्छा | 1 June Birthday Wishes in Marathi -", "raw_content": "\n१ जून वाढदिवसानिम्मित हार्दिक शुभेच्छा | 1 June Birthday Wishes in Marathi\n1 June Birthday Wishes in Marathi If you like १ जून Birthday Wishes in Marathi then this is the right place for you. 1 जून बर्थ डे शुभेच्छा मराठीत तुम्हाला मराठीत आवडत असेल तर तुमच्यासाठी ही योग्य जागा आहे. आज आपल्या जवळच्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठविणे ही एक दर वर्षी परंपरा बनली आहे. बर्‍याच पर्यायांसह खास वाढदिवसाच्या आज आपले पप्पा, मम्मी, (आई, वडील), सिस्टर, ब्रदर, ताई तसेच काका मावशी या सर्वांना आज आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही देऊ शकता.\n१ जून वाढदिवसानिम्मित हार्दिक शुभेच्छा\n‘१ जून Birthday Wishes in Marathi’:- कधी कधी जेव्हा आपल्या जवळचे आणि आपल्या प्रिय व्यक्तीचे वय होते तेव्हा आपला दिवस अतिरिक्त संस्मरणीय बनविण्यासाठी आपण सर्व काही करत असाल. आपण वाढदिवसाची पार्टी, कॉकटेल पार्टी, मोठे स्वागत, अश्या बऱ्याच गोष्टी करत असाल किंवा आपल्या आई, वडिलांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये डिनरची योजना करत असाल, तर वाढदिवसाच्या शुभेच्छा अगोदर आपण आपल्या मोबाईलवर देतो कारण आताच्या काळात या युगात हि परंपरा झाली आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश देखील त्यांना पाठवायला हवेत तर खाली ते दिले आहेत नक्की त्यांना पाठवा.\n1 June Birthday Wishes in Marathi खाली असेच काही वाढदिवसाचे wishes आपण आपल्या father साठी वाढदिवसाच्या कार्डमध्ये छान भरून शुभेच्छा पपाठवा. खाली दिल्या आहेत:-\n“फादर तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुम्ही आजपासून जे काही मला मागाल ते तुम्हाला मिळेल, आणि तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मिळेल, हि इच्छा तुमच्या वाढदिवशी आणि सदैव पूर्ण होईल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n“आणखी एक साहसी भरले वर्ष आपली प्रतीक्षा करीत आहे. आपला वाढदिवस भव्य आणि वैभवाने साजरे करुन त्याचे स्वागत करा. माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मजा\n“तुम्ही दिलेला असा आनंद या दिवशी परत मिळेल. पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा सीट बेल्ट घालून प्रवास करत जा मला खूप आवडता तुम्ही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फादर सीट बेल्ट घालून प्रवास करत जा मला खूप आवडता तुम्ही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फादर\n“या वाढदिवसाच्या, मी तुम्हाला विपुल आनंद आणि प्रेम इच्छितो. आपली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी मला माहित असलेल्या गोड लोकांपैकी सर्वात आवडते तुम्ही आहात बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ”Happy Birthday Father\n“आयुष्यातील सर्वात मोठे आनंद आणि कधीही न संपणारे आनंद आई तुम्हाला मिळतील. तथापि, आपण स्वत: पृथ्वीसाठी एक देणगी आहात, जेणेकरून आपण सर्वोत्कृष्ट आहात. माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” Happy Birthday Mother\n“मेणबत्त्या मोजू नका… त्यातील प्रकाश बघा. वर्षे जगू नका, तर तुम्ही जगता त्याचे जीवन मोजा. मम्मी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”\n“भुतकाळ विसरा; भविष्याबद्दल उत्सुकता बाळगा, कारण सर्वोत्तम गोष्टी अद्याप येणार नाहीत. ”Happy Birthday Mother\n“हसत राहून आणि मनात अश्रू धरुन तुम्ही माझे आयुष्य बनवले. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा\n“बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मला आशा आहे की तुमच्या वाढदिवसाच्या सर्व शुभेच्छा आणि स्वप्ने सत्यात उतरतील. ”Happy Birthday Mother\n१ जून वाढदिवसानिम्मित हार्दिक शुभेच्छा\n“तुम्हाला हा दिवस आनंद भरेल आणि एक रोशनी तुमच्या आयुष्यात आणेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n“आपल्या खास दिवसाच्या प्रत्येक क्षणाबद्दल आपल्याला स्मितहास्य पाठवत आहे … खूप छान वेळ आणि वाढदिवसाचा आनंद घ्या\n“आशा आहे की तुमचा खास दिवस तुम्हाला हव्या त्या सर्व गोष्टी देईल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n“तुमच्या वाढदिवशी आम्ही तुमच्यासाठी शुभेच्छा देतो की तुम्हाला आयुष्यात ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुमच्या कल्पनेनुसार किंवा त्याहून अधिक चांगल्याप्रकारे मिळोत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n“आपल्या मार्गावर आनंदाचा गुलदस्ता पाठवत आहे … वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा\n“आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि कायमचे आनंदासह एक सुंदर दिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n“हे माझ्याकडून एक स्मित हास्य आहे … आपण माझ्याकडे आणता त्याच प्रकारचे आनंद आणि आनंद मिळवून देणारा दिवस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n“या अद्भुत दिवशी, मी तुम्हाला आयुष्यासाठी सर्वात चांगले काही देऊ इच्छितो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकतो\n“तुमची तुमची सर्व इच्छा पूर्ण व्हावी अशी माझी इच्छा आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n“बऱ्याच वर्षांपूर्वी या दिवशी, देवाने पृथ्वीवर एक देवदूत पाठविण्याचा निर्णय घेतला. देवदूत आयुष्यांना स्पर्श करण्याचा होता आणि ते घडले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या गोड परी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या गोड परी\n“माझ्या सर्व प्रेमासह लपेटून तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवित आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nNote: आपल्या जवळ 1 June Birthday Wishes in Marathi चे अधिक माहिती असेल किंवा दिलेल्या wishes किंवा माहिती मध्ये काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची June Birthday Wishes हा लेख आवडला असेल तर अवश्य Facbook आणि Whatsapp वर Share करायला विसरू नका.\n✥ आमचे फेसबुक पेज लाइक करा – मराठी कॉर्नेर ✥\nआशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.\nआपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.\nमहाराष्ट्र शासन कृषी योजना 2020 PDF File कृषी यांत्रिकीकरण\nकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\nभारतात X, Y, and Z सुरक्षा म्हणजे काय या स्तराची सुरक्षा केंव्हा दिली जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vastavsangharsh.in/?cat=33", "date_download": "2020-09-26T01:24:38Z", "digest": "sha1:6THLZMTY6BK5JE63VMP4GLR3IF55RI7B", "length": 13355, "nlines": 108, "source_domain": "vastavsangharsh.in", "title": "लेख-कविता Archives | वास्तव संघर्ष", "raw_content": "\nराष्ट्रवादी व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन\nदापोडीतील हॅरीस पुल वाहतुकीसाठी खुला ;महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण\nजातीवाचक शिवीगाळ करीत तरूणीवर बलात्कार ;सहा जणांविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nसाडेसहा लाख किंमतीचा गांजा विक्री करणाऱ्या एका तरूणाला हिजवडीत सापळा रचून पोलिसांनी केली अटक\nपिंपरी महापालिकेच्या आयुक्तांचा शासनास दिशाभुल करणारा अहवाल;महापौर माई ढोरे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पञ\n74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने वडील या पुस्तकाचे शाळेत मोफत वाटप\nसुर्यकांत मुळे यांच्या वडील या पुस्तकाचे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळेत शिक्षका मार्फत वितरण करण्यात आले. यामध्ये वडीलांच्या जन्मापासुन ते मृत्यू पर्यंतचा\nआणि फुलनदेवी या सर्वासमोर जयभीम म्हणाल्या… स्मृतीशेष क्रान्तिकारी फुलन देवी – रामचंद्र आचलकर\nफुलनदेवीचा जन्म उत्तर प्रदेशातील गोरहा पुर्व येथे एका दलीत कुटुंबात झाला आई वडील एक भाउ व तीन बहीणी असा त्यांचा\nदिपक साबळे :समाजभान जपणारा पिंपरीतील लढवय्या पञकार\nसंकलन :संपादक – प्रकाश जमाले..साप्ताहिक.. क्रांती प्रकाश पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असंख्य गोरगरिबांना लाॅकडाऊनच्या काळात उपाशी पोटी राहू\nदेश नही बिकने दुगा” म्हणणाऱ्यांनी देश विकायला काढलाय …\nगेल्या 2014 लोकसभेत मोदींनी अनेक आश्वासने देऊन, जाहिरातबाजी करून नरेंद्र मोदी सत्तेत आले. हळू हळू देशातील अनेक मीडिया संस्थाने ताब्यात\nश्री शिवाजी साहुजी बोबडे दि ३१ मे २०२० रोजी सेवानिवृत्त होताहेत; त्यानिमित्ताने\nशंकर विद्यालय राहाटी (बु) ता जि नांदेड चे सेवक श्री शिवाजी साहुजी बोबडे हे नियत वयोमानानुसार दि ३१ मे २०२०\nजयंती विशेष :दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्यां:अहिल्याबाई होळकर\nएक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासुर्याची ऊर्जाशक्ती : माता रमाई\nडॉ.बाबासाहेब रमाई बद्दल म्हणतात,”रामू तू मला सोडून गेली, तुला मी काहीही सुख दिले नाही.तू माझ्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या.रमा खरी धनवान\n जागतिक मातृदिनानिमित्त विशेष लेख\nमाझ्या वयाच्या बाराव्या वर्षापासून मी माझ्या आईचा खूप तिरस्कार करत होतो..त्याला कारणही तसेच होते..एकतर माझी आई दिसायला रंगाने खूप काळी\nबाळंतपणानंतर दुधासाठी रडतोय कान्हा… आईला फुटतोय पान्हा ;महिला कर्मचा-यांकडे सरकारचे नाही लक्ष\n पिंपरी (वास्तव संघर्ष) : गरोदरपणात सगळ्याच महिलांना स्वतःपेक्षा जास्त त्यांच्या रक्तामासात वाढत असलेल्या बाळाची जास्त काळजी असते. फक्त\nपुस्तकांसाठी घर बांधणारे – पुस्तकप्रेमी ग्रंथप्रेमी बाबासाहेब-अॅड. राज जाधव\nजागतिक पुस्तक दिनानिमित्त विशेष लेख … विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, “अडाणी आई बापाच्या पोटी जन्म घेऊन जर आपण पदवीधर\nराष्ट्रवादी व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन\nदापोडीतील हॅरीस पुल वाहतुकीसाठी खुला ;महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण\nजातीवाचक शिवीगाळ करीत तरूणीवर बलात्कार ;सहा जणांविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nसाडेसहा लाख किंमतीचा गांजा विक्री करणाऱ्या एका तरूणाला हिजवडीत सापळा रचून पोलिसांनी केली अटक\nपिंपरी महापालिकेच्या आयुक्तांचा शासनास दिशाभुल करणारा अहवाल;महापौर माई ढोरे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पञ\nदहावीला 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणा-या विद्यार्थ्याला मिळणार 1 लाख रुपयांचे बक्षीस\n‘गाडी बाजुला घे ‘असे म्हणत पिंपरीतील सिग्नलवर महिलेचा विनयभंग ;पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nसराईत वाहनचोर ‘बुलेटराजा’ला अटक करणा-या पोलिसांना कोरोनाची लागण\nमहापौर माई ढोरे यांच्या हस्ते प्रश्नसंच वाटप;मुलांची प्रगती तपासण्यासाठी प्रश्नसंचची होणार मदत\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळे निधन\nवास्तव संघर्ष युट्युब वर\n\"वास्तव संघर्ष\" हे निर्भिड आणि सडेतोड मत मांडणारे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह मराठी ‘न्यूज पोर्टल’ आहे. पिंपरी चिंचवड, पुणे राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे .वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचकांनी वास्तव संघर्ष वर भरभरून प्रेम दिले म्हणूनच आम्ही न दगमगता बातमीचा सुगावा घेत 'वास्तविक' बातमी जगासमोर आणत आहोत. पोर्टलवरही प्रेम करालच अशी आशा आम्ही बाळगतो.\n- वास्तव संघर्ष वृत्तपत्र\n- वास्तव संघर्ष युटुब न्यूज चैनल आणि\n- वास्तव संघर्ष न्यूज पोर्टल\n- संपादक, वास्तव संघर्ष\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/silver-expensive-2417-in-one-day-silver-rose-to-a-record-high-of-rs-73617-127593837.html", "date_download": "2020-09-26T01:58:28Z", "digest": "sha1:QGPWM5QPRNN5TREH7RA4WUDCQU63ZJYH", "length": 6489, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "silver expensive 2,417 in one day. Silver rose to a record high of Rs 73,617 | एका दिवसात 2,417 रु. चांदी महाग, 73,617 रु.च्या विक्रमी पातळीवर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसोन्याच्या मार्गावर चांदी:एका दिवसात 2,417 रु. चांदी महाग, 73,617 रु.च्या विक्रमी पातळीवर\nएमसीएक्समध्ये 76,300 रु. प्रतिकिलोच्या उंचीवर\nसोन्याप्रमाणेच चांदीमध्येही तेजीचा कल कायम आहे. मुंबईच्या सराफा बाजारात गुरुवारी चांदी २,४१७ रु. महाग झाली आणि याची किंमत वाढून ७३,६१७ रु. प्रति किलोच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. बुधवारी याची किंमत ७१,२०० रु. प्रति किलो होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए)च्या आकड्यांतून ही माहिती समोर आली. दुसरीकडे, जयपूरमध्ये चांदीने सव्वानऊ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. याची किंमत ७४,२०० रु. प्रति किलोवर पोहोचली. याआधी २९ एप्रिल, २०११ रोजी जयपूरमध्ये ही ७२,००० रु. किलोने विकत होती. या वर्षी १७ मार्चनंतर जयपूरमध्ये १४२ दिवसांत चांदी ७६,३०० रु. प्रति किलोच्या उंचीला स्पर्श केला. एमसीएक्सवर सव्वानऊ वर्षांपूर्वी चांदी ७६,६०० रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती. जयपूरच्या सराफा ट्रेडर्स कमिटीचे अध्यक्ष कैलाश मित्तल म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीसाठी मागणी आणि उत्पादनात घट आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सात वर्षांची उंची २८.५४ डॉलर प्रति औंसवर पोहोचल्याने हजर बाजारात चांदीने नवीन विक्रम स्थापन केला. या वर्षी १ जानेवारी रोजी चांदी ४७,५०० रु. प्रति किलो होती. या हिशेबाने २०२० मध्ये आतापर्यंत चांदी २६,११७ रु.(५५%) प्रति किलो महाग झाली आहे.\n> सप्टें. २०१६ नंतर चांदी प्रथम २८ डॉलर प्रति औंसने निघाली\n> लॉकडाऊन उघडल्याने औद्योगिक मागणी आणखी वाढण्याची आशा\n> सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी\n> कोरोनामुळे जगात २७५ खाणींवर परिणाम\n> चांदीची पुरवठा साखळी खंडित होण्याची शक्यता\nकिमती वाढल्याने हजर व्यवसायावर परिणाम\nकोरोना संसर्गामुळे जागतिक अर्थव्यवस्था सुधारणेची शक्यता कमी झाल्याने चांदी आंतरराष्ट्रीय बाजारात २०१२ नंतर सर्वात उंच पातळीवर पोहोचली आहे. सध्या यामध्ये घट येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत चांदीचा हजर व्यवसाय घटण्याची शक्यता आहे. बाजारातून खरेदीदार गायब झाले आहेत. - मातादीन सोनी, महामंत्री, सराफा ट्रेडर्स कमिटी, जयपूर\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/page/230", "date_download": "2020-09-26T02:25:25Z", "digest": "sha1:3KUJSDPKVQLH7ZOFZYTB6Q2JBB6RIP5Y", "length": 8722, "nlines": 105, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "द वायर मराठी: Latest Marathi News | The Wire News In Marathi | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi News | Marathi Samachar| Marathi.thewire.in", "raw_content": "\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\nकेंद्राने जीएसटीबाबत कायद्याचे उल्लंघन केले : कॅग\nडेझर्ट क्वीन हरीशचा मृत्यू\nआपली कला जगवली पाहिजे व आपणच त्याचे पाईक आहोत, असा हरीश कुमारचा आग्रह होता. अनेक सार्वजनिक ठिकाणी स्‍त्री-वेषधारी नृत्याविष्कार का करतात असा खोचक प्रश ...\nमनष फिराक भट्टाचार्य 0 June 6, 2019 11:30 pm\nगांधीवादी अर्थ घेतला तर विश्वास म्हणजे लोक आणि समुदाय यांच्या दरम्यानचा स्नेह आणि शांती. त्या उलट मोदींची विश्वासाची संकल्पना सरकारी आहे, जिथे विश्वास ...\nमायावतींचे पुन्हा एकला चलो रे…\nसपा-बसपा या दोघांमध्ये स्वार्थ होता, आता स्वार्थ संपला व युती फुटली, उद्या कदाचित भांडणेही सुरू होतील. हे सर्व पुन्हा पूर्वीसारखे सुरू राहिल्यास भाजपस ...\nघरगुती प्रदूषणाचे बळी सर्वाधिक\nदेशातील सुमारे १६ कोटी कुटुंबांकडून आजही लाकूड, कोळशावर स्वयंपाक केला जात असल्याची माहिती हाती आली आहे. पण यामुळे ८०% नागरिकांचा म्हणजे सुमारे ८ लाख न ...\n‘जलयुक्त शिवार योजने’चा फज्जा\nफेब्रुवारी २०१९ रोजी राज्य सरकारने ३५८ तालुक्यांपैकी १५१ तालुके हे अवर्षणप्रवण, दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. या १५१ तालुक्यातील २८,५२४ खेडी ही संप ...\nतियानमेन चौक… ३० वर्षांनी पुन्हा\n१९८९मध्ये, लोकशाहीसाठी चाललेल्या निदर्शनांमध्ये 'कामगार' विद्यार्थ्यांच्या बरोबर सामील झाले होते. आता जगण्याची परिस्थिती सुधारावी याकरिता संघर्ष करणाऱ ...\nसंसदेत 'विरोधी पक्षनेता' हे पद असावे, हा संसदेचाच कायदा आहे; हे पद वैधानिक आहे. सध्याच्या नव्या लोकसभेत काँग्रेसचे ५२ खासदार निवडून आले आहेत आणि हा पक ...\nकलम ३५(अ): जुना राग आळवणे सुरू\nजम्मू व काश्मीर संदर्भातील कलम ३५(अ) प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असतानाही, भाजपने या कलमाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याची वाट न पाहता, ...\nपायल तर गेली, तिची स्वप्ने आणि तिने मेहनतीने मिळवलेली पदवीही तिच्यासोबत गेली. तिची सल नक्की काय होती हे ही आपल्याला कदाचित पूर्णपणे कळणार नाही. थेट ना ...\nतीव्र रक्तक्षयाच्या प्रमाणामध्ये घट\nभारताच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (Health Management Information System of India - HMIS) मधील डेटाच्या आधारे केलेल्या एका नवीन अभ्यासात मागच् ...\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\nकेंद्राने जीएसटीबाबत कायद्याचे उल्लंघन केले : कॅग\nमाणुसकीचा ‘व्हॉट्स अॅप कॉल’\nआसाम बोर्ड : नेहरु, मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले\nराफेलः ऑफसेट कराराची पूर्तता नाही\nकोसळणाऱ्या इमारती आणि कोडगे राज्यकर्ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5", "date_download": "2020-09-26T03:20:37Z", "digest": "sha1:SDSI6AZ4OUABWVYHCP3OMDUIAO4NXTQL", "length": 6754, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खामगांव - विकिपीडिया", "raw_content": "\nलोकसंख्या ८८,६८७ ([[इ.स. [१] 2011|[२] 2011]])\nभाषा मराठी आणि हिंदी\nखामगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.\nखामगांव शहर हे कापसाची फार जुनी बाजारपेठ मानली जाते. येथील चांदी फार प्रसिद्ध आहे. गावातील घाटपुरी संस्थानाचे देवीचे मंदीर फार प्राचीन आहे. मंदिरात कोजागरी पौर्णिमेपासून १० दिवस जगदंबा उत्सव साजरा होतो. खामगांवातल्या राणा व्यायाम मंडळाची गणेश मूर्ती ही जागृत मानली जाते. तसेच या शहरात अनेक ठिकाणी गणेश मंदिरे सुद्धा आहेत त्यात लाकडी गणपती मंदिर आय्याची कोठी, सिद्धिवनायक गणेश मंदिर शिवाजी वेश, चिंतामणी गणेश मंदिर महाकाल चौक आणि श्री वरद विनायक गणपती मंदिर गोपाळ नगर महादेव मंदिराच्या जवळ अशी ही गणेश मंदिरे आहेत. तसेच घाटपुरी येथील जगदंबा माता मंदिर, तुळजा भवानी मंदिर आणि सुटाला येथील माहादेव मंदिर प्रसिद्ध आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nखामगांव | चिखली | संग्रामपूर | सिंदखेडराजा | देउळगांव राजा | नांदुरा | बुलढाणा तालुका | मेहकर | मोताळा | मलकापूर | लोणार | जळगाव जामोद | शेगांव\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२० रोजी ०९:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_4691.html", "date_download": "2020-09-26T01:16:36Z", "digest": "sha1:RS6P7DYJBGMNAEEHR7K3O55WOVLO6FHH", "length": 14088, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ८० - जंजिऱ्याचा सिद्दी", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ८० - जंजिऱ्याचा सिद्दी\nयाच काळात (इ.स. १६६९ ) महाराजांनी जंजिऱ्याच्या सिद्दीकडे नजर टाकली. खरं म्हणजे त्यांची क्रुद्ध नजर सिद्दीवर प्रारंभापासूनच वटारलेली होती. हे जंजिऱ्याचे सिद्दी म्हणजे मूळचे आफ्रिकेतील अॅबिसेनियन. यांनाच हबशी म्हणत. वास्तविक हे भारतात आले नाहीत. गुलाम म्हणून व्यापारी लोकांनी त्यांना आणले. गुलामांचा व्यापार हा त्याकाळी सगळीकडेच तेजीत होता. या हबशी गुलामांची शरीरप्रकृती लोखंडासारखी भक्कम होती. त्यांचा रंग काळाभोर होता. महाराज आणि मराठीमाणसं या हबश्यांना श्यामल म्हणत. हे सिद्दी केवळ गुलामगिरी करीत जगले नाहीत , तर युद्धातही जबर पराक्रम गाजविण्याची आपली शक्ती आणि कुशलता त्यांनी दाखवून दिली.दक्षिणेतल्या बहामनी , आदिलशाही कुतुबशाही , निजामशाही आणि दिल्लीच्या मोगलशाही सुलतानांच्या पदरी या हबश्यांनी लष्करात कामगिऱ्या करून दाखविल्या.\nअहमदनगरच्या निजामशाही राज्यात एक जबरदस्त सिद्दी व्यादाचा फजीर् झालेला आपल्याला ठाऊक आहे. तो म्हणजे मलिक अंबर सिद्दी. हा प्रारंभी असाच गुलाम पोरगा होता. पण आपल्याकर्तृत्त्वाने तो निजामशाहीचा केवळ वजीरच नव्हे , केवळ सेनापतीच नव्हे , केवळ राज्यकारभारी प्रशासकही नव्हे तर नगरचा सवेर्सर्वा ठरला. महाराष्ट्राचा गनिमी कावा पुन्हा एकदा उजळूनकाढला तो या मलिकने. दिल्ली सल्तनतीला म्हणजेच जहागीरच्या फौजांना जबर तडाखे देऊन निजामशाही टिकविणारा हा मलिक अंबर गनिमी काव्याचा प्राचार्य वाटतो. शहाजीराजे भोसले हे एक उत्कृष्ट सेनापती म्हणून ( इ. १६१० पासून पुढे) गाजू लागले , ते याच मलिक अंबरच्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्रातून तरबेज होऊनच. भातवडीची लढाई (इ. १६२४ ऑक्टोबर) शहाजी राजांनी शर्थ करून जिंकली. जहांगिरी आणि आदिलशाही यांच्या प्रचंड जोडफौजेचा एकाच युद्धात शहाजीराजांनी फडशा उडविला. यावेळी रणांगणावर मलिक अंबरने स्वत: भाग घेतला नव्हता. सर्व जोखीम त्याने शहाजीराजांवर टाकली होती. प्रचंड जय मिळाला. कोणाला खरं म्हणजे शहाजीराजांना. मराठ्यांना. पण श्रेय मिळाले मलिक अंबरला. मिळेना काखरं म्हणजे शहाजीराजांना. मराठ्यांना. पण श्रेय मिळाले मलिक अंबरला. मिळेना का तो वजीरच होता ना. पण शहाजीराजे , म्हणजेच एक मराठा , एवढ्या झपाट्याने अस्मानात झळाळू लागल्याचे सहन होईना याच मलिक अंबरला. भोसल्यांचा मत्सर करू लागला. निजामशाहीतील आपल्याच हाताखालील मराठी सरदारांत भेद पाडू लागला.\nपुढे या साऱ्या सुलतानी आणि हबशी राजकारणातून अचूक बोध घेतला , उगवत्या शिवाजीराजांनी अगदी इ.स. १६४७ पासून महाराजांनी आपली पावलं अगदी अचूक टाकली ती आधीच्या इतिहासातून बोध घेऊन. एक निष्कर्ष महाराजांचा नक्कीच होता की , हे सिद्दीबेभरवशाचे आहेत.\nमुरुडच्या सागरी किनाऱ्याजवळ बेटावर असलेला जंजिरा अशाच सिद्दी हबश्यांच्या पूर्ण स्वतंत्र सत्तेखाली होता. हे हबशी कामापुरते स्वत:ला निजामशाहीचे किंवा जरूर तेव्हा दिल्ली बादशहाचेही सेवक म्हणवून घेत. पण जंजिऱ्याच्या सिद्दींची प्रवृत्ती पूर्णपणे सार्वभौम महत्त्वाकांक्षेची होती. एका बेटावरती असलेलं तळहाताएवढं हे हबशी राज्य विलक्षण चिकाटीने आणि क्रूर जरबेने त्यांनी सांभाळलं होतं. सध्याच्या रायगड जिल्ह्याच्या किनारी भूमीवर आपल्याहबशी राज्याचा अंमल बसविण्याचा , म्हणजेच उगवत्या हिंदवी स्वराज्याला कोकणात कडवा विरोध सतत करण्याचा सिद्दीचा अखंड उद्योग चालू होता.\nमहाराज या ' श्यामला ' च्या दंगेखोरीमुळे कायमचे अस्वस्थ झालेले होते.\n' हा जंजिऱ्याचा सिद्दी म्हणजे आमच्या (मराठी) दौलतीस लागलेला पाण्यातील उंदीर आहे 'असे ते म्हणत.\nअगदी इ.स. १६५७ पासून सतत पुढे या हबश्यांच्या विरुद्ध महाराज लढाया करीत राहिले. पणआपल्या जंजिरा किल्ल्याच्या आणि आरमाराच्या बळावर सिद्दी कायमचाच झुंजत राहिला. बेटावरील हा किल्ला बळकट आहे. याचे बळ केवळ तटाबुरुजांच्या बलाढ्य बांधणीत नाही ; तर ते भोवती पसरलेल्या अथांग समुदामुळे आहे , हे महाराजांच्या केव्हाच लक्षात आलेले होते. पण हा पाण्यात डुंबत असलेला पाणकोट जंजिरा जिंकणे हे खरोखर जिकीरीचे काम होते. स्पेन ,फ्रान्स किंवा अन्यही युरोपियन राष्ट्रांना अगदी थेट नेपोलियनपर्यंत जसे ब्रिटिश बेटांचे विरुद्ध विजय मिळविता आले नाहीत , अगदी तसेच या मुरुड जंजिऱ्याच्या बेटांविरुद्ध महाराजांना आणिपुढे शंभू छत्रपतींनाही यश मिळू शकले नाही.\nकेवळ समुद हीच या मुरुड जंजिऱ्याची ताकद होती काय त्याहीपेक्षा जबरदस्त ताकद या मुरुडजंजिऱ्यात असलेल्या हबशी लोकांच्या अतूट ऐक्यात होती. हे त्यांचे आपसातील ऐक्य आणि आपल्या नेत्यावरील त्यांची निष्ठा एवढी जबरदस्त होती की , या किल्ल्यात मराठ्यांचा कधीही चंचूप्रवेशही होऊ शकला नाही.\nपुढच्याच काळातील एक गोष्ट सांगता येईल. इ.स. १७ 3 ७ मध्ये चिमाजीअप्पा पेशवे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांची जंजिऱ्याविरुद्ध मोहिम सुरू झाली. उरण येथे फार मोठी लढाई झाली. त्यात मराठ्यांनी जंजिऱ्याचा मुख्य नेता (सुलतान म्हटले तरी चालेल) सिद्दी सात याला युद्धात ठार मारले. नेता पडला. पण पाण्यातला जंजिरा तसाच झुंजत राहिला. हे एकीचे , शिस्तीचे आणि अनुशासनाचे बळ आहे.\nमहाराज जंजिऱ्यावरील मोहीम आताही मांडीत होते. (इ. १६६९ ) जंजिऱ्याचे तीन सिद्दी एकवटून प्रतिकारास उभे होते. सिद्दी कासम , सिद्दी खैरत आणि सिद्दी संबूळ ही त्यांची नावे.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66838?page=3", "date_download": "2020-09-26T02:10:23Z", "digest": "sha1:UXE4HV4RXB3BKTNTB7AZEQYKOSO3LC5M", "length": 43468, "nlines": 260, "source_domain": "www.maayboli.com", "title": "राझी - उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /राझी - उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता\nराझी - उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता\nबहुतेक भारतीयांना भगवद्गीतेबद्दल महिती असते - कुणाला ती तोंडपाठ असते, कुणी नीत्यनेमाने वाचतात तर कुणी त्यावर चर्चा करतात. पण फार थोड्या जणांना गीता खर्‍या अर्थाने समजलेली असते. गीता जऊद्या, ते खूप मोठे प्रकरण आहे (खरं तर गीतेत अनेक प्रकरणे (अध्याय) आहेत) पण ती ज्या प्रसंगात सांगितली गेली तसा प्रसंग आपल्यापैकी खूप कमी जणांच्या आयुष्यात येतो. कारण सोपं आहे - आपण पळपुटे असतो युद्ध आणि आपण यांची सांगड प्रत्यक्ष आयुष्यात तर दूरच, आपण स्वप्नात देखील घालत नही. आपण ज्या काही तथाकथीत लढाया लढतो त्या स्वहीत आणि त्यानंतर आपल्या कुटुंबाचे भले येवढ्याच मर्यादीत हेतूने केलेल्या असतात. आता युद्धच करायचे नाही म्हटल्यावर आपल्या प्रियजनांशी युद्ध करायचा प्रश्नच उद्भवत नाही. मग जर का कोणी आपल्याला सांगितले की आधी प्रेमाची नाती तयार करा अणि मग त्या जीवलगांशी युद्ध करा तर \n मी काय कोळी वाटलो का आधी जाळे विणायला आणि मग त्यात न अडकायला आधी जाळे विणायला आणि मग त्यात न अडकायला अरे इथे गणपती गेल्यानंतर आरास काढायला जीवावर येते. इतक्या चटकन् निर्जीव गोष्टीत जीव अडकतो माझा आणि म्हणे जीवलगांशी युद्ध अरे इथे गणपती गेल्यानंतर आरास काढायला जीवावर येते. इतक्या चटकन् निर्जीव गोष्टीत जीव अडकतो माझा आणि म्हणे जीवलगांशी युद्ध\nपण काही जण हे करू शकतात आणि त्यातलीच एक म्हणजे सेहमत - आपल्या सिनेमाची नायिका नाही नाही ती कोणी लष्करातली अधिकारी नाहीये ना कोणी प्रशिक्षीत हेर. ती एक कॉलेजात शिकणारी साधी मुलगी आहे. एक तुरुतुरु पळणारी खार एका गाडीखाली येणार असते आणि तिला आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवताना सेहमत पहिल्यांदा भेटते आपल्याला. आपल्या मनातही येत नाही की हा प्रसंग सिनेमात पुढे खूप महत्वाचा ठरणार आहे.\nतर अशी ही सेहमत भारतासाठी हेरगीरी करायला तयार होते ते केवळ आपल्या वडलांच्या शब्दाखातर. देशाबद्दल प्रेम प्रत्येकालाच असते. पण त्याकरता प्राण द्यायला फार कमी जण तयार असतात आणि केवळ वडलांचा इच्छेखातर देशासाठी प्राण द्यायला तयार होणारे अगदीच विरळा. पण सेहमत तयार होते - राझी होते.\nसेहमतच्या वडलांना पकिस्तान भारताविरुद्ध काहीतरी कारस्थान रचतोय आणि नजीकच्या काळात काही तरी घडणार आहे याची कुणकुण लागते. ते भारतासाठी हेरगीरी करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून पकिस्तानी सैन्यातल्या अधिकार्‍यांच्या घरी त्यांची उठबस असते. कारस्थानाची माहिती काढणे त्यांना शक्य असते पण त्यांच्याकडे वेळ आणि शक्ती दोन्ही नसते. त्यांचे अफेअर सुरू असते - कॅन्सरशी आणि त्यापासून अलिप्त राहणे त्यांना आता अशक्य असते. दुसर्‍या कोणाला त्यांची जागा घेता आली असती पण इतक्या कमी वेळात विश्वास संपादून इतक्या आतल्या गोटात पोहचणे निव्वळ अशक्य असते. त्यांचा डोक्यात एक अतर्क्य प्लॅन तयार होतो - आपल्या पोटच्या मुलीला पाकिस्तानी अधिकार्‍याची सून करून पुढची माहिती काढायची. तो प्लॅन अतर्क्य आपल्याकरता असतो पण त्यांच्याकरता तो अगदी सहज असतो कारण त्यांची हेरगीरीची कारकिर्द सुरू झाली असते अशाच एका शब्दाखातर आणि त्यापासून अलिप्त राहणे त्यांना आता अशक्य असते. दुसर्‍या कोणाला त्यांची जागा घेता आली असती पण इतक्या कमी वेळात विश्वास संपादून इतक्या आतल्या गोटात पोहचणे निव्वळ अशक्य असते. त्यांचा डोक्यात एक अतर्क्य प्लॅन तयार होतो - आपल्या पोटच्या मुलीला पाकिस्तानी अधिकार्‍याची सून करून पुढची माहिती काढायची. तो प्लॅन अतर्क्य आपल्याकरता असतो पण त्यांच्याकरता तो अगदी सहज असतो कारण त्यांची हेरगीरीची कारकिर्द सुरू झाली असते अशाच एका शब्दाखातर सेहमतच्या कानावर ते आपला प्लॅन घालतात आणि ती वेडी तयार होते.\nसेहमत राझी होते पण ती कशाला तयार झाली आहे ते ना तिला कळत ना आपल्याला. तिचे हेरगीरीचे प्रशिक्षण सुरू होते आणि आपण हेरगीरीवरचा सिनेमा आहे असे समजून सिनेमा पहायला लागतो. सिनेमाच्या प्रोमोजमध्ये पण तेच सांगितले होते. आपणही तेच ग्राह्य धरतो.\nट्रेनींग सुरु होते आणि आपल्याला भेटतो मीर - सेहमतचा प्रशिक्षक आणि तिच्या वडलांचा सुहृद तिच्याविषयी वाटणारे कौतुक आणि माया तो कडक शिस्तीच्या बुरख्यात लपवून ठेवतो. तिला कसलीही उसंत न देता, 'छोटीशी चूकही तुझ्या जिवावर उठू शकते' हे तिच्या मनावर बिंबवत तो तिचे ट्रेनींग पूर्ण करतो. पूर्ण करतो म्हणण्यापेक्षा जेवढे शक्य असते तेवढे तो तिला शिकवतो. सेहमत पुरती तयार झाली नाहिये हे त्याला माहित असते पण नाईलाज असतो, सगळे यथासांग करण्याइतका वेळ नसतो. तो एक मात्र करतो - परक्या मुलखात सेहमतसाठी अनेक पळवाटा बनवून ठेवतो.\nमग वेळ येते ती बिदाईची आणि पडद्यावर येते ते एक अप्रतिम गाणे - दिलबरो. लग्न, आपला जोडीदार याबद्दल कधी फारसा विचारच केलेला नाहीये, ज्याला भेटणे तर दूरच कधी पाहिले पण नाहीये अशा शत्रू देशातल्या माणसाबरोबर लग्न झालय, वडलांना परत कधीच भेटू शकणार नाही हे पण कळलंय आणि मग घराचाच नाही तर देशाचाच उंबरठा ओलांडायची वेळ येते. सेहमतची मनस्थीती ते गाणे अगदी तंतोतंत मांडते. गाणी हा आपल्या सिनेमाचा अविभाज्य भाग आहे आणि मी हिंदी सिनेसंगीताचा प्रचंड चाहता आहे. पण बर्‍याचदा हे गाणे आत्ता का आहे हा प्रश्न मला पडतोच. प्रसंगाला अनुसरूनच नाही तर तो प्रसंग अधीक गहीरा करणारी गाणी आपल्या सिनेमात फार कमी असतील. दिलबरो त्यातलेच एक. गाणे सुरू झाल्यावर अंगावर काटा आला होता माझ्या. गाणं ऐकताना हे पण जाणवलं की समोर चालू आहे ती हेरकथा नाहीये, एक वेगळंच रसायन आहे. खूप वेगळं आणि गहीरं\nलग्नाबरोबर सेहमतच्या आयुष्यात इक्बाल येतो. \"आपलं लग्न केवळ आपल्या वडलांच्या निर्णयावरून झालेय पण आपण मात्र एकमेकांना अनोळखीच आहोत.\" पहिल्या दिवशीच इतका समजूतदारपणा दाखवणार्‍या नवर्‍याच्या प्रेमात न पडणे कठीण आहे पण तरीही सेहमत स्वतःला सावरते. पण ते सावरणे तात्पुरते ठरते. त्याच्या समजुतदारपणापुढे आणि प्रेमापुढे ती हतबल होते. आत्तापर्यंत मला तीन उमदे माहित होते - पहिला उमदा हा एक व वनस्पती तूपाचा ब्रँड होता, दुसरा गोष्टीतला राजकुमार (राजा किंवा इतर पुरुष कधीच उमदे नसायचे) आणि तिसरा उमदा म्हणजे घोडा. राझीत चौथा आणि खराखुरा उमदा बघायला मिळाला - इक्बाल.\nघरात सगळ्यांना तिचे कौतुक असते - फक्त अब्दुल सोडून. त्याला तिच्यावर कायम संशय असतो. हळूहळू ती नविन घरात रुळू लागते आणि कामातही. पण ती काही सराईत हेर नसते, हातून लहान सहान चुका होतच असतात. आणि अशीच एक चूक अब्दुलच्या लक्षात येते. काही पर्यायच उरत नाही तिच्यापुढे. एके काळी गाडीखाली येणार्‍या खारीला वाचवणारी सेहमत आता....\nप्रवास पुढे चालूच राहतो - यशाच्या दिशेने. पण त्या वाटेवरचे प्रत्येक पाउल तिला उध्वस्त करत जाते. योद्ध्याला युद्धात विजय मिळाला तर तो काही अंशी तरी उपभोगता येतो. पण इथे सेहमतला विजय मिळूनही ती सर्व काही हरते. सिनेमा संपतो तेंव्हा रेहमत एका अतिशय साध्या (पडक्या म्हणाव्या अशाच) घरात एकटी असते. घरी लाडाकोडात वाढलेली, सासरीही ऐश्वर्य उपभोगलेली ती, आता अर्थ शोधत असते विजय, नाती, आयुष्य यांचा. त्यांच्यापुढे ऐश्वर्याची काय किंमत त्या सीनमध्ये तिच्या बाजूला एक माठ दाखवला आहे. तिचे आयुष्यही आता त्या माठातल्या पाण्यासारखे आहे - शांत, थंड त्या सीनमध्ये तिच्या बाजूला एक माठ दाखवला आहे. तिचे आयुष्यही आता त्या माठातल्या पाण्यासारखे आहे - शांत, थंड पण एके काळी त्या पाण्याने त्सुनामी आणली होती.\nआणि या सगळ्याला सुरुवात झालेली असते - तिच्या राझी होण्यापासून\nआलिया - काय लिहू तिच्याबद्दल आजच्या घडीला तिच्यासारखी हरहुन्नरी अभिनेत्री दुसरी नसावी. सेहमत तीने अगदी सहज उभी केलीये आणि ही सहजता खूप गरजेची होती. हेरगीरीचे बेअरींग थोडे जरी जास्त झाले असते तरी सिनेमाचे गणित साफ कोसळले असते.\nविकी कौशल - प्रत्येक चित्रामध्ये बॅकग्राऊंडला खूप महत्व असते. कुठल्याही सिनेमाचेही अगदी तसेच असते. महत्वाची भूमीका खुलून दिसण्याकरता बाकीच्या अभिनेत्यांची साथ खूप महत्वाची असते. इक्बालच्या भूमीकेत अभिनयाला फारसा वाव नव्हता पण त्याने त्याचे काम अगदी चोख केलय.\nरजीत कपूर - बाप आणि सच्चा देशभक्त यांच्यातले द्वंद्व खूप सुरेख दाखवलय. व्योमकेश बक्षीनंतर तो पहिल्यांदाच इतका लक्षात राहिला.\nमेघना गुलझार - सिनेमात फक्त आणि फक्त सेहमतची कामगीरी दाखवली आहे. आणि शेवटचा एक सीन, जो अनेक वर्षांनी घडतो. पण त्या एका सीनच्या जोरावर मेघना हेरकथेचे रुप पूर्ण पालटून टाकते. आणि मग ती होते सेहमतची कथा, तिच्या विजयाची, तिच्या अपरीमीत दु:खाची गुलझारचे अनेक चित्रपट पडद्यावर अडीच तासात संपतात पण मनात मात्र वर्षानुवर्ष चालूच असतात. हा सिनेमा अगदी त्याच पठडीतला आहे. मेघना असली तरी शेवटी ती गुलझार पण आहेच.\nहा हायजेनबर्ग आता स्वतःच्या\nहा हायजेनबर्ग आता स्वतःच्या हिरॉईन कडून असलेल्या अपेक्षा घुसडतो आहे मध्येच. >> अग मी डिरेक्टर/ स्क्रीप्ट रायटर असतो तर स्ट्राँग कॅरॅक्टरला डीवॅल्यू करणारं असं मुळीच काही लिहिलं नसतं स्टोरीमध्ये.\nमाबोकर कीस पाडायला लागले\nमाबोकर कीस पाडायला लागले म्हणजे नक्की उत्तम पिक्चर आहे ओळखावे.\nसशल subtitles ऑन करून बघा\nसशल subtitles ऑन करून बघा\nपरत काही दिवसांनीं तिसर्‍यांदा आणखी लक्ष देऊन आणि सब-टायटल्स ऑन करून बघेन आणि उरलेला कीस पाडेन\nलैच कन्फुजन झालं. राझी बघून\nलैच कन्फुजन झालं. राझी बघून बरेच दिवस झालेत. आता कुठला प्रसंग कधी घडला याच्यासाठी परत एकदा प्राईमवर बघावा लागणार\nअजून एक खुसपट काढायचं राहून\nअजून एक खुसपट काढायचं राहून गेलं.\nसोनी राझदान चं कॅरॅक्टर फिकं किंवा मिस्फिट वाटतं. तीनेही त्या रोलमध्ये काही जान आणली आहे असं वाटलं नाही.\nपुन्हा पाहायचाय मला हा सिनेमा\nपुन्हा पाहायचाय मला हा सिनेमा, वरचा कीस जास्त चांगला रिलेट होईल आणि नवीन कीसाचं मट्रेल सापडेल\nमला राझी आवडण्याचं आणखी एक\nमला राझी आवडण्याचं आणखी एक सॉलिड कारण म्हणजे हा चित्रपट तमाम \"मेन्नू तेन्नू, मुंडी कुडा सॉरी कुडी मुंडा, विच्च नाल, पैंदा पैंदा इत्यादींपासूनचा pleasant relief आहे.\nराझी मधलं अजून एक खुस्पट\nराझी मधलं अजून एक खुस्पट म्हणजे टायटल्सचा फॉण्ट चांगला नव्हता. फॉण्ट कलर्स सुद्धा बॅकग्राउंडला मॅच होत नव्हते.\nती दिराला मारण्यासाठी जात असते तेव्हां तिने घेतलेला हिजाब साडेतीन अंशातून तिरका होता.\nअरिफ झकेरिया च्या चेह-यावरचे संशयाचे भाव पावशेर जास्त हवे होते. तो संशय घेतोय की किचन मधे त्याला इनसिक्युअर वाटले हे समजत नाही.\nती दिराला मारते तेव्हा त्या\nती दिराला मारते तेव्हा त्या छत्रीच्या टोकाला विष असत ते त्याच्या अंगात जाण्याईतक काही ते टोक टोकदार दाखवलं नाही.\nअजुन एक म्हणजे ज्या खोलीमधे सेहमत ती पिशवी ठेवते त्याच खोली मधे तिचा दिर काहीतरी शोधतोय आणि ती येउन त्याच्याशी बोलतेय अस दाखवल आहे. त्यामुळे तिचे घुंगरु तिथे सापडणं हे तिनेच पिशवी ठेवली आहे ह्याच प्रुफ कस होउ शकतं दिराबरोबर बोलत असतांना पडलेत अस ही ती म्हणु शकली असती.\nअरे बस करा.. उगाच भारी वाटत\nअरे बस करा.. उगाच भारी वाटत होता, आता लयच पांचट वाटायला लागलाय राझी ☺️\nफुल प्रुफ नाही... पण अगर\nफुल प्रुफ नाही... पण अगर तुम्हे लगे ब्ला ब्ला ब्ला.. तो समझो राज खुल चुका है.\nती त्या लपलपत्या स्टुलावरुन उतरताना धडपडणार आणि भांडा फोड... ही जाम भिती वाटत होती, पण सुराग छोडकर गई. हा तरी आंघोळीला जाताना तो सुराग असा उघड्यावर कशाला टाकतो. आणि सुराग मिळाल्यावर आंघोळ का करतात हे प्रश्न विचारु नये.\nआंघोळ नसतो करत, हार्ट ब्रेक\nआंघोळ नसतो करत, हार्ट ब्रेक होतो ना, रडत असतो बिचारा. तोंडावर पाणी मारतो फक्त.\nतो बिचारा बाथरुममध्ये जाऊन रडत असतो. मग तोंडावर पाणी मारून (रडल्याचे प्रूफ नाहीसे करून) बाहेर येतो.\n>> अरे बस करा.. उगाच भारी\n>> अरे बस करा.. उगाच भारी वाटत होता, आता लयच पांचट वाटायला लागलाय राझी ☺️\nअहो असं काय करता\nती दिराला मारते तेव्हा त्या\nती दिराला मारते तेव्हा त्या छत्रीच्या टोकाला विष असत ते त्याच्या अंगात जाण्याईतक काही ते टोक टोकदार दाखवलं नाही.>>> त्या टोपणाच्या आत बारीक सुई असू शकते प्रिक करणारी. त्या सुईनेच विष सोडलं असेल. घरी शुगर टेस्ट करायचं मशीन असतं त्यात नाही का बारिकसा खटका दाबला की आत लपलेली सुई क्षणात बाहेर येवून बोटाला प्रिक करून आत जाते\nती छत्री स्पेशल असते ना\nती छत्री स्पेशल असते ना मुद्दाम ती कन्व्हिनिअन्टली ती छत्री विकत घेते ड्रायव्हर च्या ऑब्जेक्शन ला धुडकावून.\nते सगळे त्यांचेच पंटरलोक्स\nते सगळे त्यांचेच पंटरलोक्स असतात... छत्री विकणारा सुद्धा...\nकदचित मी हा सिनेमा पाहिलाही नसता, आता आवर्जून पाहणार\nआणि आलिया चा तर मी डिअर झिंदगीपासून फॅन आहे, तिच्यासाठी तर नक्कीच \nआंघोळ नसतो करत, हार्ट ब्रेक\nआंघोळ नसतो करत, हार्ट ब्रेक होतो ना, रडत असतो बिचारा. तोंडावर पाणी मारतो फक्त. >>> कथेची डिमांड होती अंघोळीचा सॉन दाखवण्याची. आता शंका उपस्थित झाल्या न अंघोळच करत होता की पाणी मारत होता की पाणीच नव्हतं आलेलं तीन दिवसांपासून अंघोळच करत होता की पाणी मारत होता की पाणीच नव्हतं आलेलं तीन दिवसांपासून \nपिक्चर आवडला. पण सेहमत च्या\nपिक्चर आवडला. पण सेहमत च्या आईला एकही शॉट नाहीये. मुलीच्या आयुष्यात इतके सगळे भयंकर घडत असताना आईची त्यावर काहीच प्रतिक्रीया कशी नाही. सुरवातीला नवर्‍याखातर गप्प बसेल. पण तिचे वडील गेल्यावर सेहमत जेव्हा माहेरी येते तेव्हा देखिल तीची आई तीची काहीच विचारपूस करताना दाखवली नाही. सेहमत पण आईशी काही बोलताना , आईजवळ रडाताना दाखवली नाही. नंतर पण आईला कधीही संपर्क करताना दिसली नाही.\nशेवटी सुद्धा परत आल्यावर आईचे आणि तिचे बोलणे तोकडेच वाटते. आई कुठेही तिला धीर देताना किन्वा समजून घेताना दिसत नाही. दोघींच्यात फारसा कनेक्ट जाणवतच नाही. जे बर्‍यापैकी खटकले.\nराझी सिनेमा पाहिला रे पाहिला\nराझी सिनेमा पाहिला रे पाहिला की एकदम ’वॉव’ वाटतं, त्यात पाकिस्तान हा एक फॅक्टर आहे आणि आलिया हा दुसरा.\nपण जरा विचार करता, अनेक लूपहोल्स सापडतात. उदा. तो घुंगरू. अब्दुलच्या खोलीत तो सापडणं त्यावरून ती थेट गद्दार आहे हे सिद्ध होत नाही. त्यापेक्षा तो अब्दुलला ज्या जीपने मारलं त्या जीपमध्ये सापडला असता तर ते कन्क्लुजिव प्रूफ असतं.\nतिचं गच्चीवरचं रेडिओ नेटवर्क सेट-अप- अगदीच बालीश.\nगाणा-या लहान मुलांची यादी- त्या आधी ती कधीही शाळेत गेलेली नाही. तिनं नेमकीच पोरं कशी शोधून काढली\nअसो. हा दोष मेघना गुलजारचा आहे. ’तलवार’चं दिग्दर्शन कसलं जबरदस्त होतं. तोच तोच सीन अनेक ऍन्गल्समधून, पण एकही चूक नाही. इथे मात्र अनेक चुका.\nख-या सेहमतचं चरित्र प्रकाशित झालेलं आहे. फार बेटर दॅन द मूव्ही- असं परिक्षण आलं होतं. शिवाय त्यात तिच्या मुलाला तिनं कसं वाढवलं याहीबद्दल लिहिलं आहे. सिनेमातला रडणारा ’सुरी’ तिचा मुलगा असतो का त्याबद्दल उगाच का ऍम्बिग्विटी ठेवली आहे कोणास ठाऊक\nपण सिनेमा भारी आहे\nशीर्षकामुळे मला या धाग्यात\nशीर्षकामुळे मला या धाग्यात अजिबात रस नाही. सतत... उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता, उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता, उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता, उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता, उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता, उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता, उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता, उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता... वाचून वाचून डिप्रेशन यायची वेळ आली आहे. मायबोलीवर नवीन धाग्यांचे वाचन बंद करणे किंवा चित्रपट ग्रुप मधून बाहेर पडणे हे दोनच पर्याय आहेत का माझ्यासमोर\nडॉक्टरकडे जाऊ शकता की. एक\nडॉक्टरकडे जाऊ शकता की. एक वृद्ध आणि सणकी डॉक्टर लगेच उपलब्ध होतील. पण त्यांच्या इलाजाने बरं वाटायच्या ऐवजी तुम्ही इथले धागे उसवून टाकू लागला तर जबाबदारी माझी नाही.\n-या लहान मुलांची यादी- त्या\n-या लहान मुलांची यादी- त्या आधी ती कधीही शाळेत गेलेली नाही. तिनं नेमकीच पोरं कशी शोधून काढली तीही चांगलं गाणारी\nमी या पॉईंट पर्यंत पहिला सिनेमा,\nती वजनदार अधिकार्यांची मुले निवडते, रजिस्टर मध्ये पूर्ण नावे लिहिलेली असतात,\nबेग च्या मुलाला गाता येत नाही कळल्यावर त्याला घरी जाऊन शिकवायची तयारी दाखवते, करण पुढच्या बैठका बेग च्या घरी होणारर असतात\nअब्दुलच्या खोलीत घुंगरू सापडणे हे बरेच काही सांगून जाते.\nआपली शहरी पिढी फ्लॅट सिस्टीममध्ये वाढली आहे. आजच्या काळात नोकराकरता वेगळी खोली ही कन्सेप्ट आपल्याला नक्की आकलन होत नाही. पण ज्यांची स्वतःची घरे असतात आणि नोकराकरता वेगळी खोली असते तेंव्हा आजही मालक नोकराच्या खोलीत सहसा जात नाही, मालकीण तर नाहीच नाही.\nआणि त्या काळात तर सेहमतने सहज म्हणून नोकराच्या खोलीत जाणे निव्वळ अशक्य होते.\nकाही ठिकणी सुरक्षा कमी वाटली पण सुरक्षाच दाखवत बसले असते तर चित्रपटाची लांबी वाढली असती आणि त्याहून महत्वाचे म्हणजे मग तो एक हेरगीरीवरचा चित्रपट झाला असता.\nमुळात आर्मी ओफिसरचे बंगले\nमुळात आर्मी ओफिसरचे बंगले आर्मी एरियात असतात. त्या एरियाच्या बाहेरूनच सिकक्युरिटी लेयर्स असतात. त्याला एरिया डोमिनेटेड सिक्युरिटी म्हणतात. त्यामुळे बाहेरच्या वर्तुळातूनच आत जायला स्केनिंग होते. घरात/घराबाहेर सिक्युरिटी फोर्सचा वेढा द्यायचा म्हणजे त्यांना काही वैयक्तिक प्रायव्हसी आहे की नाही. आजू बाजूला सतत सिक्युरिटी चे लोक वावरताहेत असे नसते.\nकदाचित बाहेरून हला करायचा असेल तर हे कवच भेदून पोचावे लागते. अर्थात आतलेच सुरक्षा कर्मचारी फितूर झाले तर व्ही आय पी ला देवही वाचवू शकत नाही . तो आपल्याइतकाच व्हल्णेरेबल असतो. इंदिरा गांधी व बर्‍याच व्ही आय पी च्या बाबतीत हे घडले आहे.\nएकूण मायबोलीवर उत्तम दिग्दर्शकाचे पोटेंशियल असलेले बरेच लोक आहेत हे पाहून बरेच बरे वाटले\nबाका, >>मायबोलीवर उत्तम दिग्दर्शकाचे पोटेंशियल असलेले बरेच लोक आहेत हे पाहून बरेच बरे वाटले>> उत्तम दिग्दर्शकच नव्हे तर मयबोलीवर भारताचे पंतप्रधान व्हायचं पोटेन्शियल असलेलीही बरीच मंडळी आहेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/Remember-to-do-these-things-to-reduce-fat.html", "date_download": "2020-09-26T02:57:36Z", "digest": "sha1:3ZPVVELBZC76VH6HBGUGOSPSMZ4BQGYU", "length": 8749, "nlines": 71, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "फॅट कमी करण्यासाटी लक्षात ठेवा 'या' गोष्टी करा", "raw_content": "\nफॅट कमी करण्यासाटी लक्षात ठेवा 'या' गोष्टी करा\nbyMahaupdate.in बुधवार, मार्च ०४, २०२०\nतज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात रनिंग किंवा जॉगिंग करणे उष्ण वातावरणाच्या तुलनेत जास्त चांगले असते. यादरम्यान शरीर अधिक उष्णता निर्माण करते, त्यामुळे हिवाळ्यात व्यायाम करणे हानिकारक ठरत नाही.\nमेद (फॅट) कमी करण्यासाठी हिवाळा हा सर्वात अनुकूल काळ आहे. हिवाळ्यात व्यायामाचे वेळापत्रक कसे पाळायचे आणि जॉगिंग करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nलक्ष्य निश्चित करा -\nतज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जॉगिंग किंवा रनिंगचे वेळापत्रक पाळणे कठीण असले तरी लक्ष्य निश्चित केल्यास तुम्ही रुटीन कायम ठेवू शकता. महिनाभर तुम्ही व्यायामाचे वेळापत्रक पाळले वा नाही, याची डायरीत नोंद करून ठेवावी. जर तुम्ही यशस्वी झाला तर स्वत:च पाठ थोपटून घ्यावी.\nरस्त्याची योग्य निवड -\nजॉगिंगसाठी नेहमी सपाट रस्त्याचीच निवड करावी. तज्ज्ञांच्या मते चढउतार असलेल्या रस्त्यावरून धावल्यास मसल्स इंज्युरी होते म्हणजेच स्नायूंमध्ये आकस निर्माण होणे किंवा चमक निघण्याची शक्यता असते. सपाट रस्त्यावरून धावणे कधीही सोईचे ठरेल.\nजॉगिंग करताना हिवाळ्यात घालण्यात येणार्‍या कपड्यांकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हिवाळ्यात लोकरी वा उष्ण कपडे घालूनच व्यायाम करणे योग्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे; परंतु ते चुकीचे आहे. तज्ज्ञांच्या मते नेहमी हलके व सैल कपडे घालावेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी हातमोजे व कानपट्टी घालू शकता. तसेच पायात सुती मोजे व फीट बूट घालू नये.\nहिवाळ्यामध्ये हळूहळू मात्र जास्त वॉर्मअप करावा. तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात दिवसांमध्ये स्नायू वॉर्मअप होण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे जॉगिंग करण्याच्या 10-15 मिनिटे आधी चांगला वॉर्मअप करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्नायू लवचीक होतात.\nपाणी कमी पडू देऊ नये -\nउन्हाळ्यासारखेच हिवाळ्यातही शरीरातील पाणी कमी होत असते. तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात भलेही जास्त घाम येत नसेल; परंतु शरीरात पुरेसे पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. जॉगिंगला जाताना कोमट पाण्याने भरलेली बाटली सोबत ठेवावी. जर तुम्ही 45 मिनिटांची जॉगिंग करीत असाल तर तुम्हाला एक बॉटल पाणी प्यायला हवे.\nइतर उपक्रमात सहभाग -\nजेव्हा तुमचे सकाळच्या जॉगिंगचे वेळापत्रक कोलमडते तेव्हा तुम्हाला कंटाळा आल्यासारखे वाटते. यासाठी इतर उपक्रमांमध्ये सहभागी होणे हा सर्वांत चांगला पर्याय आहे. वैविध्यामुळे तुम्ही कोणतेही काम आनंदाने करू शकाल. अशा वेळी हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी मैदानी खेळ हा सवरेत्तम पर्याय आहे.\nहेही लक्षात ठेवा -\nसकाळी जॉगिंगला जाण्यापूर्वी हात, ओठ, नाक व कानांना पेट्रोलियम जेली लावावी. कारण त्वचेचा हा उघड्यावरील भाग हवेच्या संपर्कात आल्याने त्वचा कोरडी होते.\nमित्रांनाही सोबत घ्यावे -\nजॉगिंग करताना मित्रमंडळी वा जीवनसाथी सोबत असल्यास तुम्हाला ताजेतवाने असल्यासारखे वाटेल. तज्ज्ञांच्या मते अशा पद्धतीने तुम्ही तंदुरुस्त राहण्याबरोबरच विविध विषयांवर चर्चाही करू शकता. त्यामुळे तुमचे वेळापत्रकही कायम राहील.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/ncb-set-up-20-member-team-to-investigate-to-explore-drugs-network-in-bollywood-127657676.html", "date_download": "2020-09-26T02:59:24Z", "digest": "sha1:YHEUV6RBYG4WXETSLI2CWMYHGGI63RHY", "length": 10311, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "NCB Set Up 20 member Team To Investigate, To Explore Drugs Network In Bollywood | नार्कोटिक्स ब्युरोने चौकशीसाठी 20 सदस्यांची टीम गठीत केली, दिल्लीहून मुंबईत आलेले अधिकारी बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा करणार तपास - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुशांत प्रकरणात अमली पदार्थांचा अँगल:नार्कोटिक्स ब्युरोने चौकशीसाठी 20 सदस्यांची टीम गठीत केली, दिल्लीहून मुंबईत आलेले अधिकारी बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा करणार तपास\nएनसीबीने बुधवारी रियासह पाच जणांवर एनडीपीएसए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.\nरिया आणि इतर काही जणांचे चॅट रेकॉर्ड बाहेर आल्यानंतर या प्रकरणात एनसीबीची एंट्री झाली आहे.\nअभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात आता अमली पदार्थांचा अँगल समोर आला आहे. त्यामुळे सीबीआय आणि ईडीनंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी ) ने आपला तपास सुरु केला आहे. ही टीम मुंबईत (विशेषत: बॉलिवूड) ड्रग्ज नेटवर्कची चौकशी करणार आहे.\nएनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी गुरुवारी सांगितले की, सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या चौकशीसाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. हे 20 अधिकारी दिल्लीहून मुंबईला पोहोचले आहेत. या टीमचे प्रमुख उपसंचालक (एनसीबी) केपीएस मल्होत्रा ​​आहेत.'\nबुधवारी रियासह पाच जणांविरोधात गुन्हे दाखल झाले\nयापूर्वी एनसीबीने बुधवारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, जया साहा आणि आणखी एका व्यक्तीविरूद्ध एनसीबीच्या कलम 27 सह नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) अधिनियम 1985 च्या विविध कलम अन्वये गुन्हा दाखल केला. रियाचे ड्रग्जसंदर्भातील काही व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.\nरियाच्या चॅटमधून ड्रग्ज कनेक्शन झाले उघड\nरियाचे जे चॅट्स समोर आले आहेत, ते सर्व रिट्रीव चॅट्स असून तिने ते यापूर्वी आपल्या फोनमधून डिलीट केले होते. पहिला चॅट रिया आणि गौरव आर्य नावाच्या व्यक्तीतील आहे. गौरव हा ड्रग्ज डीलर असल्याचे सांगितले जात आहे. रिया आणि सुशांत सिंह राजपूत हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे सर्वप्रथम एप्रिल 2019 मध्ये समोर आले होते. तेव्हापासून ती सुशांतसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. 8 जून रोजी तिने अचानक सुशांतचे घर सोडले आणि 14 जून रोजी सुशांत त्याच्या वांद्रेस्थित फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता.\nपहिला चॅट: (रियाने गौरवला केला होता) 8 मार्च 2017 रोजी गौरवला पाठविलेल्या या चॅटमध्ये रियाने लिहिले की, 'जर आपण हार्ड ड्रग्जविषयी बोलत असून तर मी त्या ड्रग्जचा जास्त वापर केलेला नाही'. हे रिया आणि गौरवचे रिट्रीव वॉट्स अ‍ॅप चॅट्स आहेत. त्यांच्यात ही बातचीत 2017 मध्ये झाली होती.\nदुसरा चॅट: (रियाने गौरवला केला होता) यामध्ये रिया गौरवला विचारते, 'तुझ्याजवळ एमडी आहे का' येथे एमडीचा अर्थ 'मिथिलीन डायऑक्सी मेथाम्फेटामाइन' असा आहे, हा एक ड्रग्जचा प्रकार आहे. या चॅटमध्ये रियाने ड्रग्ज घेतल्याचे कबुल केले आहे.\nतिसरा चॅट : 8 मार्च 2017 रोजी या चॅटमध्ये रिया गौरवला म्हणाली, \"जास्त नशा असलेल्या ड्रग्जविषयी बोलायचे झाल्यात तर मी ते जास्त घेतलेले नाही. एकदा एमडीएमए घेतले होते.' रियाने ड्रग्ज घेतल्याचे या चॅटमधून स्पष्ट झाले आहे. यानंतर ती गौरवला विचारते, \"तुझ्याजवळ एमडी आहे का\" या चॅटमध्ये मिरांडाने स्टफ (ड्रग्ज) संपल्याचे रियाला सांगितले आहे.\nचौथे चॅट: (हा चॅट सॅम्युअल मिरांडा आणि रिया यांच्यातील आहे) : 17 एप्रिल 2020 च्या या चॅटमध्ये सॅम्युअल मिरांडा म्हणतो, \"हाय रिया, स्टाफ जवळजवळ संपला आहे.\" \"मग मिरांडा रियाला विचारतो, \"आपण हे शोविकच्या मित्राकडून घेऊ शकतो का, पण त्याच्याकडे फक्त 'हॅश' आणि 'बड' आहे.' हे दोन्ही सामान्य ड्रग्ज मानले जातात. या चॅटमधून ड्रग्जविषयी रियाच्या भावाला माहित असल्याचे समोर आले आहे. कारण या चॅटमध्ये रियाचा धाकटा भाऊ शोविकच्या नावाचा उल्लेख आहे.\n2017 पासून अमली पदार्थांचे सेवन करतेय रिया\nया चार चॅटवरुन रिया 2017 पासून अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे. ताज्या चॅटमध्ये मात्र रिया स्वतःसाठी ड्रग्ज मागवतेय की दुस-या कुणासाठी हे स्पष्ट झालेले नाही.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/page/231", "date_download": "2020-09-26T02:41:13Z", "digest": "sha1:XC2G7ITYO2TY337F3UEUBCFK6OPN72DE", "length": 8810, "nlines": 105, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "द वायर मराठी: Latest Marathi News | The Wire News In Marathi | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi News | Marathi Samachar| Marathi.thewire.in", "raw_content": "\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\nकेंद्राने जीएसटीबाबत कायद्याचे उल्लंघन केले : कॅग\nफेअरनेस क्रीमची जाहिरात करणार नाही\nसौंदर्याबाबत चुकीच्या कल्पना तयार होण्यामध्ये फेअरनेस क्रीम कसे कारणीभूत ठरते याबाबत सार्वजनिकरित्या प्रश्न विचारणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या गटात पल् ...\nग्रामीण मतदाराचा बदलता कौल\nगावाकडच्या मतदारांना राजकारणातलं फारसं काही कळत नाही असं आता कुणी म्हणू शकणार नाही हे जरी खरे असले तरी तो देखील शहरी मतदारांसारखा लाटेत वाहून जाऊ शकतो ...\nलोकांचा मूड ओळखण्यात उदारमतवादींचे अपयश\nमतदाराच्या इच्छा-आकांक्षा, त्याची गाऱ्हाणी यावर मतदान अवलंबून असते. देशातल्या बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार मतदार आपल्या पुढील उमेदवाराबद्दल एक मत बन ...\n५०० दशलक्ष डॉलर्स एवढी किंमत मोजायला अमेरिकेतील आघाडीच्या लॉबीसुद्धा बरीच वर्षे घेतात. भारतातील बेनामी कंपन्यांनी मात्र केवळ दोन महिन्यांत एवढ्या किंम ...\nमध्य प्रदेशमधील विजय रा.स्व.संघामुळे\nरा.स्व.संघाच्या नेत्यांनी भाजपच्या प्रचार मोहिमेपेक्षा स्वतंत्र धोरण आखलेले होते. भाजप ज्या ज्या मतदारसंघात कमजोर होता, त्या मतदारसंघांची त्यांनी यादी ...\nनेहरूंविना भारताचे काय झाले असते\nनेहरूंचे भारताच्या इतिहासातले स्थान पुसून टाकणे कठीण आहे कारण ते आधुनिक भारताच्या डीएनएचा भाग आहेत. नेहरूंना काढून टाकले तर भारत भारतच राहत नाही. ...\nइन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस संस्था या संस्थेने काश्मीरमध्ये केलेल्या अभ्यासानुसार विशेषतः पेलेट-पीडित विद्यार्थ्यांमध्ये अंधत्वासोब ...\nवंचितांची काँग्रेस आणि काँग्रेसमधले वंचित\nराष्ट्रपती-पंतप्रधान-केंद्रीय मंत्री-मुख्यमंत्री-राज्यमंत्री-विरोधी पक्षनेता-गटनेता-प्रभारी- सचिव इथपासून ते स्थानिक स्वराज संस्थांमध्ये अल्पसंख्यांक, ...\nकिमान उत्पन्न हमीपेक्षा रोजगाराचा अधिकार महत्त्वाचा\nवाढत्या बेकारी विरुध्द अनेक उपाय सुचवले जात आहेत, पण ते कष्टकऱ्यांच्या गरजांना अनुरूप आहेत का\n‘हिंदू मन’ हॅक केले जात आहे\nमोदींच्या केदारनाथ यात्रेसारखी तद्दन उथळ गोष्ट धार्मिक मोहीम म्हणून खपून जाऊ शकते इतके हिंदू मन आध्यात्मिक बाबतीत पोकळ झाले आहे का\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\nकेंद्राने जीएसटीबाबत कायद्याचे उल्लंघन केले : कॅग\nमाणुसकीचा ‘व्हॉट्स अॅप कॉल’\nआसाम बोर्ड : नेहरु, मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले\nराफेलः ऑफसेट कराराची पूर्तता नाही\nकोसळणाऱ्या इमारती आणि कोडगे राज्यकर्ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mpcnews.in/pune-news-leopard-dies-in-unidentified-vehicle-collision-near-katraj-tunnel-174239/", "date_download": "2020-09-26T01:44:29Z", "digest": "sha1:UGMZAZTKUO37TQXUWCO4TCDWMPRY2XM6", "length": 5556, "nlines": 72, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune News: कात्रज बोगद्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू - MPCNEWS", "raw_content": "\nPune News: कात्रज बोगद्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू\nPune News: कात्रज बोगद्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू\nPune News: Leopard dies in unidentified vehicle collision near Katraj tunnel बिबट्याच्या डोक्याला वाहनाची जोरात धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.\nएमपीसी न्यूज- कात्रज बोगद्याजवळ गुरुवारी (दि.13) मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रात्रीच्या वेळी भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या या बिबट्याला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.\nअज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले झाले होते. परंतु, बिबट्याच्या डोक्याला वाहनाची जोरात धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.\nगेल्या काही दिवसांपासून महामार्गावरील बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे अपघात होउन बिबट्या मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri News: पवना धरणात 58.83 टक्के पाणीसाठा; पावसाचा जोर कायम\nGaneshotsav 2020: संजीव हुंबरे यांनी जोपासला सुपारीतून गणेशमूर्ती साकारण्याचा छंद\nIPL 2020 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्ली कॅपिटल्सची चेन्नईवर 44 धावांनी मात\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 7 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची नोंद\nPune News : टाटा मोटर्सने बनविलेल्या 51 विंगर रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nPimpri news: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 9 ऑक्टोबरला निवडणूक\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 164 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 87 नवीन रुग्ण\nPune News : लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदी रद्द करा ; भारतीय मजदूर संघांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF/e-Htpm.html", "date_download": "2020-09-26T01:04:47Z", "digest": "sha1:VFNPPY2ZXVYIPJVMFFX2JJ2HPALZMEXN", "length": 5855, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "कोयना धरणात पाच टीएमसी मृतसाठा गृहीत धरला जातोय - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nकोयना धरणात पाच टीएमसी मृतसाठा गृहीत धरला जातोय\nMarch 23, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nकोयना धरणात पाच टीएमसी मृतसाठा गृहीत धरला जातोय\nकराड - कोयना धरणाचा पाणलोट क्षेत्र 64 किलोमीटरचा असल्यामुळे डोंगरदऱ्यातून वाहून येणारे पाणी कोयना धरणात अडविण्यात आलेले आहे. धरणातील पाणी वीजनिर्मिती व सिंचनासाठी वापरले जाते. दरम्यान धरणातील पाणी व पावसाळ्यात धरणामध्ये येणाऱ्या पाण्यातून मोठ्या प्रमाणात गाळ येत असतो. यामुळे कोयना धरणात पाच टीएमसी मृतसाठा गृहीत धरला जातो.\nकोयना धरणाची 105 टीएमसी पाणीसाठा क्षमता आहे. पावसाच्या दिवसात अतिरिक्त पाणी धरणातून सोडले जाते. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणात पाणी भरत असताना डोंगरदऱ्यातील येणारा गाळ धरणात येत असतो. दरम्यान कोयना धरणातील एकूण पाणीसाठा, पावसाळ्यात वाहत्या पाण्यासोबत धरणात वाढणारा गाळ याबाबत केवळ मृतसाठा पाच टीएमसी एवढ्याच वर्षानुवर्षाच्या ठोकळ आकडेवारीचा आधार घेतला जातो.\nवास्तविक किमान दर पाच वर्षांनी याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. 2002 साली मेरी इन्टीट्युट (नाशिक) या संस्थेने किरणांद्वारे गाळाची तपासणी करून माहिती दिली होती. त्यानंतर गेल्या अठरा वर्षांत याबाबतची कोणतीही तपासणी झाली नाही. दरम्यान या काळात किती प्रमाणात गाळ वाढला याचे मोजमाप झालेले नाही. २००२ साली या धरणात काही प्रमाणात जास्त गाळ असल्याचे सांगण्यात आले आहे. मग मधल्या काळात त्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना झाल्या किंवा नाहीत याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.\nसॅटेलाईट, संगणक क्रांती, अत्याधुनिक प्रयोगशाळा असे तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या तीन राज्यांचे पाण्याबाबत भवितव्य ठरविणार्‍या कोयना धरणाची तांत्रिक यंत्रणा अद्यापही जुनीच आहे. बहुतांश ठिकाणी जुनेच फॉर्मुले वापरण्यात येत असल्याने तांत्रिक आकडेवारीचा मेळ बसत नाही. केवळ ठोकळ माहिती व त्या आधारावर व्यवस्थापन करणेसाठी प्रशासनही हतबल आहे. दरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणेची आता आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.atgnews.com/2015/12/maths-formulae-class-10.html", "date_download": "2020-09-26T01:17:06Z", "digest": "sha1:TNJXKVJ2ACHKZBB4P6OM3CIGYLBYNLZS", "length": 16450, "nlines": 309, "source_domain": "www.atgnews.com", "title": "maths formulae for class 10 - ATG News", "raw_content": "\nत्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्याे रेशखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.\nवर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.\nवर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.\nजीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्याा रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.\nव्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.\nवर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.\nवर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.\nवर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D\nअर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7\nअर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36\nवर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)\nवर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22\nवर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30\nअर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2\nअर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36\nदोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.\nदोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.\nइष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)\nकाटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची\nगोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)\nगोलाचे पृष्ठफळ = 4π×r2\nघनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3\nघनचितीची बाजू = ∛घनफळ\nघनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते.\nघनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2 वृत्तचितीचे (दंडगोलाचे)\nवृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2\nवृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h\nसमांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची\nसमभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार\nसुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2\nवर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2\nवर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πrघनाकृतीच्या सर्व\nपृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2\nदंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh\nअर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2\nअर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3\nत्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )\nशंकूचे घनफळ = 1/3 πr3h\nसमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2\nदंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h)\nअर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2\nशंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r(r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी\nn बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते.\nसुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात.\nबहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते.\nn बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते.\nसुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप\nबहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2\nतास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर\nघडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर\nघड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते\nदर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो.\nदर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो\nतास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेचमिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात.\nवय व संख्या :\nदोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक)÷2\nलहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक)÷2\nवय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो.\nएकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस\nमहाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.\nटिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात.\nएकूण नाणी = एकूण रक्कम × 100 / दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज\nएकूण नोटा = पुडक्यातील शेवटच्या नोटचा क्रमांक – पहिल्या नोटेचा क्रमांक + 1\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें यदि आप कार्यालय में काम करने के एक ही उबाऊ और थकाऊ तरीके से बाहर निकलना चाहते हैं\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी जब अमेरिका के ३१ वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wik...\nPMAY List 2020 प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण New List PDF\nudyog aadhar registration: उद्योग आधार - आवश्यकता, महत्व और उपलब्धि प्राप्त करने की प्रक्रिया\nUdyog Aadhar Registration उद्योग आधार - आवश्यकता, महत्व और उपलब्धि प्राप्त करने की प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/", "date_download": "2020-09-26T02:58:43Z", "digest": "sha1:ZPYDCBZMMWDBKS3LCWXAFXPCSVGR2DCT", "length": 12975, "nlines": 138, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Home | InMarathi", "raw_content": "\n २६ लाख जणांनी #CoupleChallenge मध्ये भाग घेतला काय आहे हे\nएकंदरच आर्थिक गणित आणि लोकांची एंगेजमेंट्स ह्यावर ही चॅलेंजेस व्हायरल होतात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात.\nनोकरी सांभाळून गरजू लोकांसाठी जीवाचं रान करणाऱ्या “ह्या” तरुणीची कहाणी वाचा\nलडाखच्या कडाक्याच्या थंडीत निरंतर वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या या डॉक्टरांची चिकाटी पाहून उर भरून येतो\nजॉन सिना आणि अंडरटेकरचा शो म्हणून आपण ज्याला ओळखतो त्या WWE बद्दल आश्चर्यकारक गोष्टी\nसमुद्रघोडा : एक अद्भूतातील अद्भुत जलचर\n २६ लाख जणांनी #CoupleChallenge मध्ये भाग घेतला काय आहे हे\nनोकरी सांभाळून गरजू लोकांसाठी जीवाचं रान करणाऱ्या “ह्या” तरुणीची कहाणी वाचा\nलडाखच्या कडाक्याच्या थंडीत निरंतर वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या या डॉक्टरांची चिकाटी पाहून उर भरून येतो\nसमुद्रघोडा : एक अद्भूतातील अद्भुत जलचर\n याचे गंभीर दुष्परिणाम देखील जाणून घ्या\nगुगल बद्दलच्या ‘ह्या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nBusiness बीट्स यशस्वी भव\nरोनाल्डोकडून एक खेळाडू म्हणूनच नव्हे तर बिझनेसमन म्हणूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे\nशब्दांतून नव्हे तर “कृतीतून” मातृभुमीबद्दलंच प्रेम व्यक्त करणा-या NRI ची कहाणी\nवजन कमी करण्यासाठी हे पदार्थ खाताय मग त्यांचे विपरीत परिणाम होणार नाहीत याची खात्री करून घ्या \nजर तुम्ही कॅण्डी आणि साखरेने बनलेले फ्रोजन योगर्टचे सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चुकीचे आहे.\nरोज गळणाऱ्या केसांचं कारण आहेत तुमच्याच या १० सवयी, आजपासूनच बदला\nकाहीतरी नको असलेला बदल आपल्या शरीरात होतोय म्हणून आपले केस गळत आहेत याची जाणीव ठेवायला हवी आणि केसांची काळजी घ्यायला हवी.\nभेगा घालवून, पाय सुंदर, मऊ करण्याचे १० सोप्पे घरगुती उपाय ट्राय करा\nसौंदर्य फक्त सुंदर रेखीव चेहाऱ्यापर्यंत सीमित नसून तुमच्या पायाच्या मऊ, तजेलदार त्वचेवर देखील अवलंबून असतं, पाय निरोगी ठेवण्याचे १० उपाय\nसर्वांगसुंदर, निरोगी शरीरासाठी, रोज झोपण्यापूर्वी लावून घ्या या साध्या-सोप्या सवयी\nदिसण्यापेक्षा स्वभाव महत्त्वाचा, तरीही आपलं लक्ष, पहिल्यांदा बाह्यरुपाकडेच जातं, म्हणूनच व्यवस्थित प्रेझेंटेबल दिसण्यासाठी सोप्प्या टिप्स\nही १२ लक्षणे असू शकतात मधुमेहाची सुरुवात, नक्की वाचा आणि मात करा\nयांपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, दुर्लक्ष न करता आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यांच्या सल्ल्यानुसार आपली मधुमेहाची चाचणी करून घ्या.\nजुलाब-अतिसाराचा त्रास असतांना हे ८ पदार्थ खाणे कटाक्षाने टाळायला पाहिजे\nऔषधोपचार घेत असतानाच जर वरीलपैकी पदार्थ तुम्ही पूर्णपणे टाळले तर अतिसारातून सुरक्षित बाहेर पडणे सोपे होते.\nजगातील ११ अदभूत जागा – ज्या “खऱ्या” वाटतच नाहीत\nएक नैसर्गिक आरसा पसरलेली जमीन.\nराखेतून उठून स्वर्ग निर्माण करणाऱ्या “ह्या” शहराचा इतिहास तुम्ही वाचायलाच हवा\nसुट्टी “फुल एन्जॉय” करायची आहे, कोकणातील या “दहा” जागांपैकी कुठेही जा…\nह्या देशात रस्त्यांवर गाडी चालवताना मिळतं एक “सुरेल” सरप्राईज\n‘शिपायांचा उठाव’ आणि तात्या टोपेंचं धाडसी ‘ऑपरेशन रेड लोटस’\nपुस्तकात युद्धाचं वर्णन खूप खिळवून ठेवणारं आणि वाचकाच्या आत आत शिरत जाणारं आहे.\nखुब जमेगा “रंग”, जब मिल बैठेंगे यार; १९४२ साली जन्मलेल्या कंपनीची यशोगाथा\nफिटनेससाठी ट्रेडमिलचा वापर करणाऱ्या अनेकांना या यंत्राचा “हा” इतिहास माहितीच नसतो…\nगंभीर जखमी असतांना ३ दिवस झाडावर जीवन-संघर्ष करणारी गुप्तहेर; वाचा शौर्यगाथा\nउपद्रवी बाबांची पोलखोल का आणखीन काही – ह्या “आश्रम” मध्ये नेमकं आहे तरी काय\nपु.ल. , कुमार गंधर्व आणि अविस्मरणीय भूपाली\nस्क्रीनचा वापर – मुलांना वाढवण्याबाबत “गोंधळलेल्या” पालकांनी हे वाचायलाच हवं\nबस्स ही एकच गोष्ट करा : डिप्रेशन आसपासही फिरकणार नाही\nफलंदाज, कर्णधार – या लोकप्रिय प्रतिमेत हरवलेला “खरा धोनी”…\nलातूर म्हणजे फक्त भूकंप आणि दुष्काळ तुम्हाला खरं लातूर माहितीच नाहीये\n“मै शपथ लेता हू..” : मोदींच्या आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीबद्दल १० खास गोष्टी\nमहाकाय रोमन साम्राज्याच्या अस्ताची ही ६ प्रमुख कारणं भारताने समजून घ्यायला हवीत, अन्यथा…\n“…म्हणून मी अर्णब गोस्वामीचं रिपब्लिक चॅनल सोडलं” : धक्कादायक वास्तव उघडकीस आणणारा लेख\n“झाड तोडू नये” : शरद पवारांच्या चातुर्याची एक अजब कथा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/417", "date_download": "2020-09-26T03:08:47Z", "digest": "sha1:74HF4KTKMLNGU6GP4X6NEKBP265MAIKP", "length": 8923, "nlines": 124, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वाचू आनंदे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वाचू आनंदे\nसु. शि. : एक अनुभव\nसु. शि अर्थात सुहास शिरवळकर ह्यान्च्या साहित्याचे रसग्रहण करण्यासाठी हा धागा\nहॅरी पॉटर - भाग सहा\nजेम्स आणि लिलीची हत्या झाली तेव्हा पीटरने विश्वासघात केला ही गोष्ट सिरियसच्या लक्षात आली . जेम्सवर त्याचं भावापेक्षाही अधिक प्रेम होतं . तो संतप्त अवस्थेत पीटरला ठार मारण्याच्या हेतूने त्याच्यामागे गेला . त्यांची गाठ अनेक मगल लोक असलेल्या रस्त्यावर पडली . मात्र सिरियसपेक्षा पीटर चपळ ठरला . \" तू लिली आणि जेम्सचा विश्वासघात केलास \" असं मोठ्याने ओरडून पीटरने एक मोठा जादुई स्फोट घडवून आणला , या स्फोटात 12 मगल लोक मृत्युमुखी पडले . याचवेळी आपलं एक बोट पीटरने कापलं आणि क्षणार्धात उंदराच्या रुपात परिवर्तीत होऊन तिथून पळून गेला .\nRead more about हॅरी पॉटर - भाग सहा\nहॅरी पॉटर - भाग चार\nहॉगवार्ट्सच्या संस्थापकानंतर महत्वाची पात्रं पुढीलप्रमाणे -\n१ - एल्बस डम्बलडोर\nएल्बस डम्बलडोर हे हॉगवॉर्ट्सचे वर्तमान मुख्याध्यापक . त्यांच्या काळातील सर्वात शक्तिमान जादूगार म्हणून हे प्रसिद्ध आहेत . शालेय जीवनात , हॉगवॉर्ट्स मध्ये विद्यार्थी असताना सातही वर्षे त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेची चमक दाखवली , संशोधने करून जादुई जगताला उपयोगी ठरतील असे अनेक शोध लावले ...\nदूरदर्शीपणा , माणसं ओळखण्याचं कसब , लोकांच्या मनात आधाराची विश्वासाची भावना निर्माण करेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे ..\nRead more about हॅरी पॉटर - भाग चार\nरसग्रहण स्पर्धा - अकथीत सावरकर - लेखक मदन पाटील\nप्रकाशक - जिजाऊ प्रकाशन\nमुल्य - ३०० रू\nप्रथमावृत्ती - २३ मार्च २०११\nखरेतर लेखक आणि प्रकाशनाचे नाव पाहून मी पुस्तक विकत घेणार नव्हतो कारण दोहोंवरून त्याची दिशा नक्की झाली होती, केवळ ब्राह्मणांचा तिरस्कार करणारे लेखन. तरी धीर धरून हे पुस्तक घेतले, म्हणलं सावरकरांबद्दल जे आधी कळाले नाही ते वाचायला मिळेल.\nRead more about रसग्रहण स्पर्धा - अकथीत सावरकर - लेखक मदन पाटील\nदुर्लक्षित/उपेक्षित झालेली उत्तम मराठी पुस्तकं आणि लेखक\nजुनी मासिकं, दिवाळी अंक, काही निवडक ब्लाँग्स वाचताना काही पुस्तकांची, लेखकांची नावं वाचायला मिळातात जी पुर्वी कधी वाचलेली नसतात. थोडा शोध घेतला की कळतं ते पुस्तकं खरचं खूप छान आहे पण ते इतके दुर्लक्षित का झाले\nRead more about दुर्लक्षित/उपेक्षित झालेली उत्तम मराठी पुस्तकं आणि लेखक\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mpscmantra.com/tag/gs3/", "date_download": "2020-09-26T02:18:47Z", "digest": "sha1:NCVVVJKVV72SDG3K4YJ3N7OQQGH3534M", "length": 11095, "nlines": 215, "source_domain": "www.mpscmantra.com", "title": "GS3 Archives - MPSC Mantra", "raw_content": "\nMPSC कोणकोणत्या परीक्षा घेते\nMPSC बद्दल सविस्तर माहिती\nImportant Acts (महत्त्वाचे कायदे pdf स्वरुपात)\nविकास खन्ना यांना एशिया गेमचेंजर पुरस्कार\nचालू घडामोडी – २३ जुलै २०२०\n14 पायांचं झुरळ; इतकं मोठं झुरळ कधी पाहिलंत का\n♻️ तुम्हाला पाठ आहेत का :- महत्वाचे दिन ♻️\nउष्णतेची लाट म्हणजे काय\nजागतिक बँकेतील पदावर अभास झा\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता सर्वांनाच उपचार\nभारतीय क्षेपणास्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये\nप्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY)\nMPSC कोणकोणत्या परीक्षा घेते\nMPSC बद्दल सविस्तर माहिती\nImportant Acts (महत्त्वाचे कायदे pdf स्वरुपात)\nपार्श्वभूमी :- १९३८ साली राष्ट्रीय नियोजन समितीच्या हाताखाली एक लोकसंख्याविषयक उपसमिती नेमण्यात आली होती. त्या समितीने १९४० साली राज्याने कुटुंब नियोजन व कल्याणकारी धोरणे यावर भर द्यावा, असा ठराव केला होता. कुटुंब नियोजनावर भर देणारा […]\n२०११ ची गणना सलग १५ वी आणि स्वातंत्र्‍यानंतरची सातवी. पहिली जनगणना १८७२ मध्ये लॉर्ड मेयोने केली. १८८१ पासून नियमितपणे जागणना. भोर समितीच्या सूचनेनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी केंद्राने घेतली. जनगणना कायदा १९४८. जनगणना आयुक्त गृहमंत्रालयाअंतर्गत जनगणनेचे […]\nमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र (Universal Declaration of Human Rights)\nमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र (Universal Declaration of Human Rights (UDHR)) हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १० डिसेंबर १९४८ रोजी पॅरिस येथे स्वीकारलेले घोषणापत्र आहे. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अनुसार हा जगातील सर्वाधिक भाषांतरित दस्तऐवज आहे. हे […]\nतुमच्या शंका आम्हाला येथे विचार\nभूगोल : दाब व वारे भाग 1\nभूगोल: दाब व वारे भाग 2\nवेबसाईट वर अपलोड करण्यात येणाऱ्या नवीन माहितीचे नोटिफेकेशन हवे असल्यास खाली दिलेल्या बॉक्स मध्ये आपला इमेल टाका..\n509,379 लोकांनी आम्हाला भेट दिली\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nRoshani rathod on राज्यव्यवस्था टेस्ट : 30 जुलै 2020\nUpendra on काय आहे पॅरिस हवामान करार\nMPSC Mantra हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. MPSC Mantra च्या वेबसाइट बरोबरच Facebook, Telegram, Twitter, YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहोत. अल्पावधीतच रोपटेरूपी MPSC Mantra या व्यासपीठाचा वटवृक्ष झाला आहे. हे केवळ तुमच्यासारख्या विद्यार्थी मित्रांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. त्याबद्दल Team MPSC Mantra आपले शतशः आभारी आहे. आम्ही नेहमीच दर्जेदार व परिक्षाभिमुख माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही आमचा हा प्रयत्न असाच चालू राहील. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी नेहमी आमच्याशी संपर्कात रहा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/devinder-singh-gets-15-days-remand/", "date_download": "2020-09-26T02:22:03Z", "digest": "sha1:II3J4LAFRZMLSMBOC3KIVZ5XIDZCAS4I", "length": 16756, "nlines": 157, "source_domain": "www.saamana.com", "title": "रहस्यभेद होणार , देविंदर सिंहला 15 दिवसांचा रिमांड | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम…\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे…\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nरहस्यभेद होणार , देविंदर सिंहला 15 दिवसांचा रिमांड\nकश्मीर खोऱ्यातील धाडीत हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांसोबत पकडला गेलेला माजी उप पोलीस अधीक्षक देविंदर सिंहसह तिघांना एनआयए न्यायालयाने 15 दिवसांचा रिमांड दिला आहे.या काळात गुप्तचर अधिकाऱ्यांकडून देविंदर याची कसून चौकशी होणार असल्याने त्याच्या भूमिकेबाबत रहस्यभेद होणार आहे. 11 जानेवारीला हिजबुलच्या टोळीसोबत अटक झालेल्या देविंदरची त्याच्या पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे.\nश्रीनगरचा माजी उप पोलीस अधीक्षक देविंदर याच्यावर लाखो रुपयांची लाच घेऊन हिजबुलच्या दहशतवाद्यांना स्फोटकांसह दिल्लीला जाण्यासाठी मदत करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कारण जम्मू पोलिसांनी देविंदरसह चौघांना स्फोटके आणि शस्त्रे भरलेल्या कारसह ताब्यात घेतले होते. त्यानंतर एनआयएने देविंदरच्या श्रीनगरमधील निवासस्थानी घातलेल्या छाप्यात 7.5 लाख रुपये ,संशयित नकाशे आणि काही संवेदनशील कागदपत्रे हस्तगत केली होती. 2001 च्या संसद हल्ल्यात देविंदरचा हात आहे का याचाही तपास एनआयए करीत आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम खान यांची नावे चर्चेत\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे यांचे आदेश\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण...\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nया बातम्या अवश्य वाचा\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम...\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t2798/", "date_download": "2020-09-26T01:39:09Z", "digest": "sha1:NBVFVZHP5NGE3RU24CSZTI2L4FUN62TO", "length": 11668, "nlines": 139, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-एक संध्याकाळ", "raw_content": "\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nघराचा दिवाणखाना. घरमालक एका खुर्चीत बसले आहेत. त्यांचा कोट दुसऱ्या खुर्चीच्या पाठीवर आहे. बूट काढून त्यांनी पाय सपातात सरकवले आहेत. थोडक्यात, दिवसभर काम करून साहेब घरी परतले आहेत. त्यांच्या मागचा स्वयंपाकघराचा दरवाजा थोडासा उघडा आहे. बाईसाहेबांचं आत काम चालू असावं, कारण आतून अधूनमधून भांडी वाजत आहेत.)\nती : ‘‘हरमन्, हरमन्..’’\nतो : ‘‘हां, बोल.’’\nती : ‘‘काय करतो आहेस\nतो : ‘‘काही नाही.’’\nती : ‘‘काही नाही म्हणजे काय\nतो : ‘‘मी काही करत नाहीये.’’\nती : ‘‘अजिबात काही नाही\nती : ‘‘(थोडय़ा वेळाने) काही म्हणजे काही करत नाहीयेस तू\nतो : ‘‘नाही. इथे बसलोय.’’\nती : ‘‘तू नुसताच तिथे बसलाहेस\nती : ‘‘तू कसलातरी विचार करतोयस् का\nतो : ‘‘खास असं काही नाही.’’\nती : ‘‘खास काही करत नसलास तर एखाद्वेळी फिरून, पाय मोकळे करून आलास तर काही बिघडणार नाही.’’\nतो : ‘‘नाही बिघडणार.’’\nती : ‘‘मी तुला तुझा ओव्हरकोट आणून देते.’’\nतो : ‘‘नको. धन्यवाद. मी ठीक आहे.’’\nती : ‘‘पण ओव्हरकोट न घालता बाहेर गेलास तर थंडी बाधेल तुला. मग सर्दीनं हैराण झालास, की मलाच सगळं निस्तरावं लागेल.’’\nतो : ‘‘ठीक. बाहेर जाताना मी ओव्हरकोटाशिवाय नाही जाणार.’’\nती : ‘‘मग तुझा तू घेशील का ओव्हरकोट\nतो : ‘‘मी मुळी बाहेर फिरायला जातच नाहीये.’’\nती : ‘‘स्वत: कोट घ्यायला लागला, की बाहेर जातच नाहीये. सगळी कामं मीच करायची.’’\nतो : ‘‘मला मुळातच बाहेर जायचं नव्हतं.’’\nती : ‘‘आत्ताच तर म्हणालास, ओव्हरकोट घालून जाईन म्हणून.’’\nतो : ‘‘मी नाही. तूच म्हणालीस की मी बाहेर फिरायला जावं.’’\n मला काडीचाही फरक पडत नाही- तू फिरायला जा किंवा जाऊ नको. कर मनमानी तुझी.’’\nतो : ‘‘छान, छान\nती : ‘‘मला फक्त एवढंच सुचवायचं होतं, की कधीतरी जर तू नुसता बसून राहण्याऐवजी बाहेर पडलास नि फिरून आलास तर तुझं काही नुकसान व्हायचं नाही.’’\nतो : ‘‘खरंय, नाही नुकसान होणार.’’\nती : ‘‘म्हणजे तुला मान्य आहे तर\nतो : ‘‘हो, ते खरंच आहे.’’\nती : ‘‘म्हणजे तुला फिरायला जायचंय.’’\nतो : ‘‘नाही. मला इथे बसायचं आहे.’’\nती : ‘‘तुला फिरायला जायचं होतं. फक्त ओव्हरकोट घ्यायचा आळस. तो मी आणून द्यायचा. तो नाही दिला तर म्हणे फिरायला जायचं नाहीय. मग काय करायचंय\nतो : ‘‘मला इथे बसायचं आहे.’’\nती : ‘‘मघापासून नुसता धोशा लावला आहेस- मला इथे बसायचं आहे म्हणून. झालं काय तुला अचानक\nतो : ‘‘अचानक काही नाही. मला सतत असंच वाटत होतं, की इथे बसून राहावं नि शांतपणे आराम करून थकवा दूर करावा.’’\nती : ‘‘तुला जर शांतपणे बसायचं होतं, तर एवढा वेळ बडबड बडबड का करत होतास\nतो : ‘‘आता मात्र मी काही बोलणार नाही.’’\nती : ‘‘(थोडय़ा वेळानं) आता मात्र तुझ्याकडे निश्चित वेळ आहे, असं काहीतरी करायला की ज्यात तुला खूप मजा येईल.’’\nती : ‘‘तू काही वाचतोयस् का\nतो : ‘‘आत्ता तरी नाही.’’\nती : ‘‘मग वाच की काहीतरी.’’\nतो : ‘‘नंतर. नंतर वाचेन कदाचित..’’\nती : ‘‘तुला मी एखादं मासिक आणून देऊ का वाचायला\nतो : ‘‘आधी मला नुसतं इथे थोडा वेळ बसायचं आहे.’’\nती : ‘‘नंतर वाचणार आहेस ना\nतो : ‘‘कदाचित. माहीत नाही.’’\nती : ‘‘मला ठाऊक आहे, तू काही आपलं आपण मासिक घेणार नाहीस. तुला वाचायचं असेल तरी मी मासिक आणून द्यायची वाट बघणार तू. ठीक आहे. तू वाचणार असशील तर देते आणून मासिक. इतर काही हुकूम माझ्यासाठी\nतो : ‘‘काही नाही.’’\nती : ‘‘मी सगळा दिवस इथे राबत असते. तू स्वत: जरा जागेवरून हललास नि तुला वाचण्यासाठी मासिक जर तुझं तू घेतलंस तर चालेल की\nतो : ‘‘मला मुळी वाचायचंच नाहीये.’’\nती : ‘‘अशी डोक्यात राख घालून घ्यायची मग. बायकोनं मासिक नाही दिलं आणून कधीतरी, तर वाचायचंच नाही. का का असा विचित्र वागतोस तू का असा विचित्र वागतोस तू का छळतोस असा\nतो : ‘‘(अजूनही गप्पच).’’\nती : ‘‘कान फुटले का\nतो : ‘‘नाही. ऐकतोय.’’\nती : ‘‘तुला जरा मजा येईल असं कध्धी काही करत नाहीस. त्याऐवजी नुसता तिथे बसून राहतोस.’’\nतो : ‘‘मी इथे बसतो, कारण मला त्यात मजा येते.’’\nती : ‘‘मी इथे काम करतेय. तू कर मजा.’’\nतो : ‘‘करेन, अजून मजा करेन.’’\nती : ‘‘एवढं रागावून, अंगावर ओरडायची काही गरज नाहीये. राबतेच मी दिवसभर तुझ्यासाठी.’’\nतो : ‘‘मी मुळीच तुझ्यावर ओरडलो नाहीय.’’\nती : ‘‘मघापासून ओरडतोयस्. का का\nतो : ‘‘(आता मात्र ओरडून) मी.. मुळीच.. तुझ्यावर.. ओरडत.. नाहीये\nमूळ जर्मन लेखक- लोरिओ\nस्वैर रूपांतर- नितीन जोगळेकर\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2019/11/ramchandratarlekar.html", "date_download": "2020-09-26T01:29:36Z", "digest": "sha1:FQ3V2KNOQM2KYHT235FI6ZHRHX5ZOZPR", "length": 9804, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "मायणी येथील प्रसिद्ध कापड व्यापारी रामचंद्र तारळेकर (आप्पा) यांचे निधन - KhabarBat™", "raw_content": "\nHome सातारा मायणी येथील प्रसिद्ध कापड व्यापारी रामचंद्र तारळेकर (आप्पा) यांचे निधन\nमायणी येथील प्रसिद्ध कापड व्यापारी रामचंद्र तारळेकर (आप्पा) यांचे निधन\nमायणी, ता.खटाव जि. सातारा (सतीश डोंगरे)\nकै. रामचंद बनाप्पा तळेकर मायणी तालुका खटाव येथील जुन्या पिढीतील प्रसिद्ध कापड व्यापारी रामचंद्र बनाप्पा तारळेकर यांचे मुंबई येथे गुरुवार दिनांक 21 11 2019 रोजी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटाच्या दरम्यान वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले ते मुंबई नेरूळ येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर संजय तारळेकर यांचे वडील आहेत तर पत्रकार पांडुरंग तळेकर यांचे चुलते आहेत त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी बहुसंख्येने आप्तेष्ट व मान्यवर उपस्थित होते कै. रामचंद्र तारळेकर यांना आप्पा म्हणून सर्वजण ओळखत होते आप्पा स्वभावाने अत्यंत स्वाभिमानी व मनमिळावू होते त्यांनी आपला मुलगा डॉक्टर संजय तारळेकर व दत्तात्रय तारळेकर त्यांच्यावर चांगले संस्कार केले त्यामुळे डॉक्टर संजय तारळेकर नेरूळ मुंबई परिसरात एक नामांकित हृदयरोगतज्ज्ञ म्हणून नावारूपास आले त्यांच्या सूनबाई डॉक्टर अनिता संजय तारळेकर याही हृदयरोगतज्ञ आहेत त्यांनी मायणी व चितळी येथे कापड व्यवसाय केला त्यांचा मित्रपरिवार म्हणून खूप मोठा आहे त्यांच्या जाण्याने मायणी परिसरातून तसेच नेरुळ मुंबई परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या मागे पत्नी दोन मुले दोन मुली सुना नातवंडे दोन जावई असा परिवार आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (210) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vastavsangharsh.in/?cat=36", "date_download": "2020-09-26T02:56:06Z", "digest": "sha1:DPHWHW3LFJHYMJERQUBNGG2WGWI5526T", "length": 7157, "nlines": 53, "source_domain": "vastavsangharsh.in", "title": "ई-पेपर Archives | वास्तव संघर्ष", "raw_content": "\nराष्ट्रवादी व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन\nदापोडीतील हॅरीस पुल वाहतुकीसाठी खुला ;महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण\nजातीवाचक शिवीगाळ करीत तरूणीवर बलात्कार ;सहा जणांविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nसाडेसहा लाख किंमतीचा गांजा विक्री करणाऱ्या एका तरूणाला हिजवडीत सापळा रचून पोलिसांनी केली अटक\nपिंपरी महापालिकेच्या आयुक्तांचा शासनास दिशाभुल करणारा अहवाल;महापौर माई ढोरे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पञ\nई पेपर – वास्तव संघर्ष ( साप्ताहिक: २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०१८ )\nई पेपर – वास्तव संघर्ष ( साप्ताहिक: २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०१८ ) संपादक – दिपक साबळे वाचा: ई पेपर\nराष्ट्रवादी व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन\nदापोडीतील हॅरीस पुल वाहतुकीसाठी खुला ;महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण\nजातीवाचक शिवीगाळ करीत तरूणीवर बलात्कार ;सहा जणांविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nसाडेसहा लाख किंमतीचा गांजा विक्री करणाऱ्या एका तरूणाला हिजवडीत सापळा रचून पोलिसांनी केली अटक\nपिंपरी महापालिकेच्या आयुक्तांचा शासनास दिशाभुल करणारा अहवाल;महापौर माई ढोरे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पञ\nदहावीला 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणा-या विद्यार्थ्याला मिळणार 1 लाख रुपयांचे बक्षीस\n‘गाडी बाजुला घे ‘असे म्हणत पिंपरीतील सिग्नलवर महिलेचा विनयभंग ;पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nसराईत वाहनचोर ‘बुलेटराजा’ला अटक करणा-या पोलिसांना कोरोनाची लागण\nमहापौर माई ढोरे यांच्या हस्ते प्रश्नसंच वाटप;मुलांची प्रगती तपासण्यासाठी प्रश्नसंचची होणार मदत\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळे निधन\nवास्तव संघर्ष युट्युब वर\n\"वास्तव संघर्ष\" हे निर्भिड आणि सडेतोड मत मांडणारे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह मराठी ‘न्यूज पोर्टल’ आहे. पिंपरी चिंचवड, पुणे राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे .वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचकांनी वास्तव संघर्ष वर भरभरून प्रेम दिले म्हणूनच आम्ही न दगमगता बातमीचा सुगावा घेत 'वास्तविक' बातमी जगासमोर आणत आहोत. पोर्टलवरही प्रेम करालच अशी आशा आम्ही बाळगतो.\n- वास्तव संघर्ष वृत्तपत्र\n- वास्तव संघर्ष युटुब न्यूज चैनल आणि\n- वास्तव संघर्ष न्यूज पोर्टल\n- संपादक, वास्तव संघर्ष\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2020-09-26T01:51:58Z", "digest": "sha1:QZVWDRIZNTO4JTA36GSP5PUWIPIZ44J5", "length": 4242, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माल्टा क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\nकसोटीतील गुणवत्ता क्रमांक - - -\nएकदिवसीय गुणवत्ता क्रमांक - - -\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathicorner.com/tukaram-mundhe-biography-wiki-salary-transfer-list-current-position-history.html", "date_download": "2020-09-26T03:15:12Z", "digest": "sha1:LCVXWU3A4ZUNL7OVEGYU4YTPTZG5YRKY", "length": 12984, "nlines": 137, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "Tukaram Mundhe Biography | Wiki, Salary, Transfer List | Current Position, History - Biography", "raw_content": "\nया लेख मध्ये काय आहे\nWho is Tukaram Mundhe – तुकाराम मुंढे जन्म -June जून, १९७५ हे ताडसोना गाव (भारत) येथील २००५ बॅचचे भारतीय प्रशासकीय अधिकारी (आय.ए..एस) Indian Administrative Officer (IAS) आहेत. खरं तर, ते एक प्रामाणिक अधिकारी आहेत. सध्या ते नागपूर चे आयुक्त\nम्हणून काम पाहत आहेत.\nतुकाराम मुंढे यांच्याबद्दल थोडक्यात\nTukaram Mundhe Current Position 2020 – तुकाराम मुंढे यांची सध्या परत पोस्टिंग हि नागपूर मध्ये झाली आहे आणि त्यांनी लगेच action घ्यायला स्टार्ट केले आहे.\nतुकाराम मुंढे यांच्याबद्दल थोडक्यात\nआम्ही तुकाराम मुंढे ट्रान्स्फर लिस्ट, तुकाराम मुंढे वेतन, तुकाराम मुंढे विकिपीडिया प्रदान करीत आहोत, तर तुकाराम मुंढे कुटुंब इतिहास, तुकाराम मुंढे यांची आत्ताची पोस्ट, प्रदान करीत आहेत.\nपूर्ण जन्म नाव – तुकाराम मुंढे.\nव्यवसाय – १. २००५ बॅचचे आयएएस अधिकारी.\nतथापि, सर्व राजकीय पक्ष त्याच्या विरोधात एकत्र येतात. त्याला महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित IAS अधिकारी म्हणून ओळखले जाते. शिवाय, ते भ्रष्टाचाराशी संबंधित मुद्द्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. नागपूरकर भ्रष्टाचार आणि निधीच्या समस्येने त्रस्त आहेत.\nSalary – ५६१०० रुपये च्या पुढे\nवय (2020 पर्यंत) – पंचेचाळीस (45) वर्षे वयाचे\nजन्म तारीख (DOB)- 3 जून 1975 चा वाढदिवस.\nNMMC आयुक्त म्हणून काम करण्यासाठी प्रसिद्ध.\nजन्मस्थळ – ताडसोना गाव, बीड जिल्हा (महाराष्ट्र, भारत).\nराशि चिन्ह – मिथुन.\nधर्म – हिंदू धर्म.\nत्यांनी दर रविवारी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी “वॉक विथ कमिशनर(Walk with Commissioner)” हा कार्यक्रम सुरू आहे. त्याशिवाय तुकाराम हे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पसंतीस उतरले आहेत. आपल्या 11 वर्षांच्या नोकरीत त्याने 12 वेळा बदली केली आहे.\nवजन किलोग्राम: 68 कि.ग्रा.\nबाइसेप्सचा आकार 13 इंच.\nशरीराचे मापन (छाती-कमर-कूल्हे): 38-36-35.\nजोडा आकार (यूएस): 6.\nटॅटू तपशील: काहीही नाही.\nशिवाय, त्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले. ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी औरंगाबादला गेले. श्री. मुंढे यांनी २००५ मध्ये UPSC परीक्षेला सुरुवात केली आणि आपलेच स्वताचे राज्य मिळवले.\nशिवाय, तुकारामांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांसाठी खूप काम केले आहे. तथापि, आमची यंत्रणा प्रामाणिक अधिकार्‍यांना योग्य प्रकारे काम करण्यास समर्थन देत नाही. त्यांनी त्याच्या कौटुंबिक मधल्या मुलीशी लग्न केले आहे. आता, तुकाराम यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.\nआई: माहिती नाही ( माहित असल्यास आम्हला comment मध्ये सांगा )\nभावंड भाऊ: माहिती नाही ( माहित असल्यास आम्हला comment मध्ये सांगा )\nबहीण: माहिती नाही ( माहित असल्यास आम्हला comment मध्ये सांगा )\nनातेवाईक:माहिती नाही ( माहित असल्यास आम्हला comment मध्ये सांगा )\nतुकाराम दहा वर्षाहून अधिक काळ त्यांच्या सेवेत आहेत.\nत्या काळात त्यांच्या पदावर एक वर्षापेक्षा जास्त काळ काम करता आले नाही.\nआता ते NMMC आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.\nमात्र, कॉंग्रेस, भाजपसह शिवसेनेने त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला आहे.\nते नाशिक महानगरपालिकेचे (मनपा) आयुक्त होते.\nआता त्यांना मंत्रालय, राज्य सरकारचे मुख्यालय येथे नियोजन समितीचे अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nऑगस्ट २०१८ मध्ये, तुकाराम मुंढे म्हणाले होते, “जर माझी बदली नाशिकच्या समस्यांचे निराकरण करते, तर तसे करावे माझे काही नाही. मला वारंवार बदली केल्याबद्दल वाईट वाटते, पण काय करणार राज्य प्रशासनाचा हा आदेश आहे तो मी नाही फेटाळू शकत.\nत्याची कारकीर्द मधील पुढील सर्व राइड आहेत.\nएका शक्तिशाली राजकारणीच्या मालकीच्या छाप्यावरील अवैध बार.\nअनेक बेकायदेशीर मेडिकल आणि मद्य दुकानांची नासधूस केली.\nDPAP (दुष्काळग्रस्त भागाचा कार्यक्रम) वापरून पाण्याच्या संकटाचे निराकरण केले.\nवाळू आणि भूमाफियाविरूद्ध कारवाई.\nकेरोसीन व इतर नागरी पुरवठ्यांची तुटलेली यंत्रणा सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत निश्चित केली.\nइंदिरा आवास योजना घोटाळा सापडला.\nखादी व ग्रामोद्योग आयोगाच्या नुकसानीपासून ते नफ्यापर्यंत\nविक्रीकर विभागात बदली झाली आणि वर्षभरात 143 कोटी वरून 500 कोटींवर विक्री कर संकलन केले.\nTukaram Mundhe Current Position 2020 – तुकाराम मुंढे यांची सध्या परत पोस्टिंग हि नागपूर मध्ये झाली आहे आणि त्यांनी लगेच action घ्यायला स्टार्ट केले आहे.\nमहाराष्ट्र शासन कृषी योजना 2020 PDF File कृषी यांत्रिकीकरण\nकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\nभारतात X, Y, and Z सुरक्षा म्हणजे काय या स्तराची सुरक्षा केंव्हा दिली जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mpscmantra.com/2018/08/17/current-afaairs-17-august-2018/", "date_download": "2020-09-26T02:03:08Z", "digest": "sha1:DUBXR7NH5IDKJFDE4XFIBPVI4KIEKP3C", "length": 15770, "nlines": 299, "source_domain": "www.mpscmantra.com", "title": "Current afaairs : 17 August 2018 - MPSC Mantra", "raw_content": "\nMPSC कोणकोणत्या परीक्षा घेते\nMPSC बद्दल सविस्तर माहिती\nImportant Acts (महत्त्वाचे कायदे pdf स्वरुपात)\nविकास खन्ना यांना एशिया गेमचेंजर पुरस्कार\nचालू घडामोडी – २३ जुलै २०२०\n14 पायांचं झुरळ; इतकं मोठं झुरळ कधी पाहिलंत का\n♻️ तुम्हाला पाठ आहेत का :- महत्वाचे दिन ♻️\nउष्णतेची लाट म्हणजे काय\nजागतिक बँकेतील पदावर अभास झा\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता सर्वांनाच उपचार\nभारतीय क्षेपणास्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये\nप्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY)\nMPSC कोणकोणत्या परीक्षा घेते\nMPSC बद्दल सविस्तर माहिती\nImportant Acts (महत्त्वाचे कायदे pdf स्वरुपात)\n» भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) विंग्ज ही VOIP वर आधारित फोन सेवा सुरू केली आहे.\n» यामध्ये कोणत्याही प्रकारचे सिमकार्ड किंवा वायर जोडलेली असणार नाही.\n» यामध्ये VOIP सेवा अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पुरविण्यात येते.\n» विंग्ज या सेवेमध्ये एका वर्षापर्यंत अमर्यादित व्हॉईस व व्हिडिओ कॉल मोफत देण्यात येणार आहेत.\n» VOIP म्हणजे व्हॉईस ऑन इंटरनेट प्रोटोकॉल होय. यामध्ये इंटरनेटद्वारा कॉल करण्याची सुविधा असते.\nविशेष चित्रपट महोत्सव: –\n» ‘स्वातंत्र्य संग्राम आणि स्वातंत्र्य सेनानी’ (Freedom Struggle & Freedom Fighters) या संकल्पनेवर आधारित विशेष चित्रपट महोत्सवाचे मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते.\n» ठिकाण :- मुंबई\n» कालावधी :- 14 ऑगस्ट 2018 (72 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने)\n» आयोजक :- फिल्म्स डिविजन ऑफ इंडिया\n» उद्घाटक :- राम खंडवला (स्वातंत्र्य सेनानी आणि इंडियन नॅशनल आर्मी (आयएनए) सेवेतील व्यक्ति)\nएसबीआय :- देशातील सर्वाधिक स्वदेशाभिमानी (India’s most patriotic brand) ब्रॅंड\n» भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ही देशातील सर्वाधिक स्वदेशाभिमानी ब्रॅंड असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.\n» यूकेस्थित ऑनलाइन मार्केट संशोधक आणि माहिती विश्लेषक कंपनी YouGov ने हे सर्वेक्षण केले.\n» सर्वाधिक स्वदेशाभिमानी ब्रॅंड :-\n1) भारतीय स्टेट बँक\n» ठिकाण :- बीजिंग (चीन)\n» आवृत्ती :- 24 वी\n» कालावधी :- 13 ते 20 ऑगस्ट 2018\n» संकल्पना :- लर्निंग टु बी ह्युमन\nInternational Nitrogen Initiative (INI) च्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.\nया पदावर नेमणूक होणारे ते पहिले भारतीय तसेच पहिले आशियाई व्यक्ति ठरले आहेत.\nNext Next post: अमृता रामचंद्र घोळवे (सहायक राज्यकर आयुक्त)\nतुमच्या शंका आम्हाला येथे विचार\nभूगोल : दाब व वारे भाग 1\nभूगोल: दाब व वारे भाग 2\nवेबसाईट वर अपलोड करण्यात येणाऱ्या नवीन माहितीचे नोटिफेकेशन हवे असल्यास खाली दिलेल्या बॉक्स मध्ये आपला इमेल टाका..\n509,377 लोकांनी आम्हाला भेट दिली\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nRoshani rathod on राज्यव्यवस्था टेस्ट : 30 जुलै 2020\nUpendra on काय आहे पॅरिस हवामान करार\nMPSC Mantra हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. MPSC Mantra च्या वेबसाइट बरोबरच Facebook, Telegram, Twitter, YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहोत. अल्पावधीतच रोपटेरूपी MPSC Mantra या व्यासपीठाचा वटवृक्ष झाला आहे. हे केवळ तुमच्यासारख्या विद्यार्थी मित्रांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. त्याबद्दल Team MPSC Mantra आपले शतशः आभारी आहे. आम्ही नेहमीच दर्जेदार व परिक्षाभिमुख माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही आमचा हा प्रयत्न असाच चालू राहील. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी नेहमी आमच्याशी संपर्कात रहा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/videos", "date_download": "2020-09-26T03:11:01Z", "digest": "sha1:4IOHJ7VGFQMWQVN4LWQD3QR3CK3RU7WM", "length": 6514, "nlines": 94, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Marathi News Videos : Latest News Videos,Entertainment News Videos, व्हिडिओ, ताजे व्हिडिओ, एन्टरटेन्मेंट व्हिडिओ, स्पोर्ट्स व्हिडिओ, राजकीय व्हिडिओ, फनी व्हिडिओ । Times Now Marathi", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nदीपिका 'त्या' व्हाट्सअॅप ग्रुपची अ‍ॅडमिन होती: NCB सूत्र\nसुशांत प्रकरणात वकील विकास सिंह यांचा धक्कादायक दावा\n'चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे'\nमुंबापुरी झाली तुंबापुरी, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत\nसुशांतने मृत्यूच्या ५ दिवसआधी घरच्यांना पाठवला होता हा मेसेज\nअजून बरेच व्हिडिओ >>\nअजून बरेच काही >>\nदीपिका 'त्या' व्हाट्सअॅप ग्रुपची अ‍ॅडमिन होती: NCB सूत्र\nसुशांत प्रकरणात वकील विकास सिंह यांचा धक्कादायक दावा\n'चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे'\nसुशांतने मृत्यूच्या ५ दिवसआधी घरच्यांना पाठवला होता हा मेसेज\nड्रग्स चॅटमध्ये दीपिका पदुकोणचे नाव\nएनसीबीने रियाला विचारले 'हे' ५५ प्रश्न\nRhea Chakraborty ने एनसीबीला नाही सांगितले सर्व सत्य\nअजून बरेच काही >>\nमुंबापुरी झाली तुंबापुरी, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत\n'सरकारला का दोष देता आम्हाला विचारुन तर हल्ला केला नाही ना'\nमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी\nव्हॉट्सअॅप फॉरवर्ड,शिवसैनिकांची माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण\nरियाची कबुली, अंमली पदार्थ खरेदी केले\nशौविक, सॅम्युअलला ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी\nSSR Case:एक युवानेता CBIसमोर चौकशीसाठी स्वत: जाण्याची शक्यता\nअजून बरेच काही >>\nदेशात घातपात घडविण्यापूर्वीच NIAची मोठी कारवाई, ९ जणांना अटक\nकाय आहे कृषी विधेयक का होतोय याला विरोध\nLACवर भारत ऑन टॉप, चीन झाला फ्लॉप\nचेन्नईतील 'मुळशी पॅटर्न', भर रस्त्यात गँगस्टरची हत्या\nचीनने LACजवळ आणली शस्त्र,फोटो Times Nowच्या हाती\n१४ वर्षीय मुलीसोबत छेडछाड करुन बनवला व्हिडिओ\nभारताने हुसकावून लावले चिनी रणगाडे आणि सैनिक\nअजून बरेच काही >>\nVIDEO : कोरोना टाळण्यासाठी हात धुण्याची योग्य पद्धत\nFit Test - कशी वाढवाल शरीराची लवचिकता - पाहा Video\nFit Test - सेल्फ डिफेन्स टेक्निक्स ( स्वसंरक्षणाचे धडे) पाहा\nFit Test - सेल्फ डिफेन्स (स्वसंरक्षण) पाहा Video\nFit Test - शारीरिक शक्ती कशी वाढवाल - पाहा व्हिडिओ\nFit Test - स्टॅमिना (तग धरणे) कसा वाढवाल, पाहा Video\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://newstide.in/news/marathi/marathi.webdunia.com/14-sep-2020", "date_download": "2020-09-26T01:17:53Z", "digest": "sha1:G6CQ67FZGVGE2HF6TMSM2ISHMAJI2EHH", "length": 8039, "nlines": 74, "source_domain": "newstide.in", "title": "https://marathi.webdunia.com/", "raw_content": "\n2020-09-14 17:11:01 : इम्तियाज जलील मुलाखत: MIM हिंदुत्वाचं राजकारण करणार का यावर जलील काय म्हणाले\n2020-09-14 16:56:16 : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह 10 हजार भारतीय व्यक्तींवर चीनची पाळत\n2020-09-14 16:56:16 : दिल्ली दंगल प्रकरण : उमर खालिदला 'सूत्रधार' म्हणून अटक\n2020-09-14 16:56:16 : आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन : कोरोना लशीची भीती दूर करण्यासाठी पहिला डोस मीच घेईन\n2020-09-14 16:56:16 : सायन रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल, आधी डॉक्टर आणि दोन कर्मचारी निलंबित\n2020-09-14 16:56:16 : अपु-या मनुष्यबळामुळे कोविड केअर सेंटर खासगी संस्था चालवणार, दहा कोटीचा खर्च अपेक्षित\n2020-09-14 16:11:16 : Reliance Jio च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये 1 GB डेटा फक्त 3.5 रुपयांमध्ये\n2020-09-14 16:11:16 : काय, आपल्या घरात देखील नळातून पाणी गळतं तर नकारात्मक प्रभाव जाणून घ्या\n2020-09-14 16:11:16 : आठ वर्षांपासून नवरा-बायको म्हणून वावरत होते दोन पुरुष\n2020-09-14 15:33:25 : अनुष्का शर्माने शेअर केला बेबी बंप फ्लॉन्ट करताना फोटो, करीना कपूरने म्हटलं...\n2020-09-14 15:33:25 : Ayushmann Khurrana Birthday : आयुष्मानने पहिल्या चित्रपटाला मानले शाप, त्यानंतर हिटट्रिक हिट\n2020-09-14 14:37:52 : कोरोना व्हायरसमुळे Bigg Boss मध्ये मोठा बदल\n2020-09-14 13:55:53 : भारत - चीन सीमावाद : युद्ध जिंकूनही चीनने अरुणाचल प्रदेशातून माघार का घेतली होती\n2020-09-14 12:33:03 : Covid -19 : कोरोनापासून संरक्षणासाठी दररोज आपला बिछाना स्वच्छ करा\n2020-09-14 12:33:03 : दुधासोबत हे 7 पदार्थ चुकून खाऊ नये, आरोग्यासाठी हानिकारक\n2020-09-14 12:33:03 : NHM Recruitment 2020: बंपर जागा, थेट मुलाखत पद्धतीने होणार निवड\n2020-09-14 12:33:03 : आयुर्वेदानुसार खाण्यापिण्याचा या सवयींमुळे शरीर आणि मन निरोगी राहतं\n2020-09-14 12:33:03 : Coronavirus : आपल्या आयुष्यात या 10 गोष्टींना समाविष्ट करा आणि कोरोनाला पळवून लावा\n2020-09-14 12:10:56 : स्टेट बँकेने ठेवीवरील व्याजदर कमी केले\n2020-09-14 12:10:56 : अधिकमास माहात्म्य अध्याय पंधरावा\n2020-09-14 12:10:56 : अधिकमास माहात्म्य अध्याय सोळावा\n2020-09-14 12:10:56 : सरकारी नौकरी मिळविण्याची सुवर्ण संधी, कोणतीही लेखी परीक्षा न घेता थेट भरती होणार\n2020-09-14 12:10:56 : अधिकमास माहात्म्य अध्याय सतरावा\n2020-09-14 12:10:56 : राज ठाकरे हेच महाराष्ट्राचे फायरब्रँड\n2020-09-14 12:10:56 : मान्सूनच्या परतीला होणार यंदा विलंब\n2020-09-14 12:10:56 : सर्वपितृ मोक्ष अमावस्या 2020: श्राद्ध करण्याची वेळ आणि पद्धत जाणून घ्या\n2020-09-14 12:10:56 : प्रतिकारक शक्तीच नव्हे, तर अन्नाची चव देखील वाढवते ही तुळशीची चटणी\n2020-09-14 12:10:56 : भाजपा आ. देवयानी फरांदे यांच्या भाषणावर आक्षेप, भाषण पाडले बंद, आता फरांदे कोरोना पॉझिटिव्ह\n2020-09-14 12:10:56 : राज्यात 22 हजार 543 नव्या कोरोना रुग्णांची वाढ\n2020-09-14 12:10:56 : कोरोना प्रतिबंधक उपायांचं काटेकोर पालन करत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून होणार सुरुवात\n2020-09-14 12:10:56 : पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊन होणार की नाही, वाचा पूर्ण सत्य\n2020-09-14 09:33:00 : सर्व पितृमोक्ष अमावस्या - काय आहे या अमावस्येचे महत्व आणि मिळणारे फायदे जाणून घ्या\n2020-09-14 08:55:13 : मराठा आरक्षण प्रकरणी स्थगिती रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार\n2020-09-14 08:55:13 : चिराग पासवान यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांचे खुले पत्र..काय म्हणाले आमदार रोहीत\n2020-09-14 08:55:13 : भाग्यवान असतात या राशीचे लोक, कमी वयात होतात श्रीमंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/desa-koda+Reyuniyom.php?from=in", "date_download": "2020-09-26T03:32:01Z", "digest": "sha1:KDYWXTATZLHOBKAAEFG4XBGALCCO4JP7", "length": 9775, "nlines": 24, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड रेयूनियों", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 05600 1715600 देश कोडसह +262 5600 1715600 बनतो.\nरेयूनियों येथे कॉल करण्यासाठी देश कोड. (Reyuniyom): +262\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी रेयूनियों या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00262.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक रेयूनियों\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.marathicorner.com/aaple-sarkar-maha-dbt-portal-login-2020.html", "date_download": "2020-09-26T01:54:23Z", "digest": "sha1:ZPWDDQOERF5QMF5TEKM445ZGOETMXRA7", "length": 6715, "nlines": 101, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "Aaple Sarkar Maha DBT Portal Login 2020 - CSC", "raw_content": "\nचरण 1: – प्रथम लॉगिन पृष्ठावर जा – महा डी.बी.टी\nचरण 2: – आपले नोंदणीकृत वापरकर्ता नाव प्रविष्ट करा.\nचरण 3: – आपला संकेत शब्द प्रविष्ट करा.\nचरण 4: – प्रतिमेमध्ये दर्शविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा.\nचरण 5: – लॉगिन संकेत शब्द व सुरक्षितता मजकूर कन्फर्म केल्यावर लॉगिनसाठी लॉगिन येथे क्लिक करा.\nचरण 6: – विसरलेला संकेतशब्द वर क्लिक करा, जर आपण नोंदणी करताना आपला संकेतशब्द प्रविष्ट केलेला विसरला असेल तर\nचरण 7: – विसरलेले वापरकर्ता नाव वर क्लिक करा, आपण\nनोंदणी करताना आपले वापरकर्ता नाव प्रविष्ट केलेले विसरल्यास.\nआपल सरकार डीबीटी प्रवेशासाठी लॉग इन करण्यासाठी अर्जदारास त्याच्यासोबतची प्रगती करणे आवश्यक आहे. सोबतच्या निवडींमधून वापरकर्ता प्रकार निवडा:\nनोंदणीकृत अष्टपैलू क्रमांक किंवा ईमेल आणि पत्ता कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ओटीपी मिळविण्यासाठी सबमिट कॅचवर स्नॅप करा.\nस्टेज 2: ओटीपी सत्यापित करा.\nAnswer: महा डीबीटी – आपल सरकार डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) किंवा महाडबीटी ही महाराष्ट्र सरकारची एक प्रसिद्ध ऑनलाइन अनुदान प्रवेशमार्ग आहे. … हा लेख आपल्याला महाडबेट प्रवेशमार्गाची माहिती, त्यावरील प्रवेशजोगी अनुदान आणि त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया करण्याची पद्धत देते.\nमहाराष्ट्र शासन कृषी योजना 2020 PDF File कृषी यांत्रिकीकरण\nकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\nभारतात X, Y, and Z सुरक्षा म्हणजे काय या स्तराची सुरक्षा केंव्हा दिली जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/08/blog-post_26.html", "date_download": "2020-09-26T01:21:39Z", "digest": "sha1:XT7JXQEOHIJETT4N4YSYJAPG3C5P6U2U", "length": 21555, "nlines": 230, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "चायवाला सॉफ्टवेअर इंजीनिअर - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आर्थिक विकास लेख चायवाला सॉफ्टवेअर इंजीनिअर\nचला उद्योजक घडवूया ८:३० म.उ. आर्थिक विकास लेख\nधंदा तोच चहाचा, पण त्याला जेव्हा सॉफ्टवेअर इंजिनिअर किंवा नवं विचारांचा तरुण करतो तेव्हा चमत्कार घडतो. एकतर काळानुसार तुम्ही स्वतः मध्ये बदल करत जा नाहीतर दुसरा काळानुसार बदललेला माणूस त्या उद्योग धंद्यामधील नफा कमी वेळेत घेऊन जाईल. जो काळानुसार बदलतो तोच जीवनात राहतो हा उत्क्रांतीचा अटळ नियम आहे.\nज्यांना खऱ्या अर्थाने \"स्टार्टअप इंडिया‘ समजलाय, अशा तरुणांनी उत्तुंग भरारी घेण्यासाठी पंख पसरविले आहेत. अगदी किराणा मालापासून ते लाखो रुपयांची उत्पादने आज ऑनलाइन मागविता येतात. विदेशातला पिझ्झा ऑनलाइन खपू शकतो, तर आपला चहा का नाही, असं म्हणत भुवनेश्‍वरमधल्या एका तरुणाने थेट \"एककप.इन‘ची स्थापना केली. ऑनलाइन चहाचे दुकान ही संकल्पना जरी विचित्र वाटत असली, तरी अवघ्या चार महिन्यांत तो त्यात चांगलाच यशस्वी झाल्याचं दिसतंय...\nसॉफ्टवेअर इंजिनिअर असल्यामुळे रात्री अपरात्री काम करावे लागे, डोकं बधीर झालं, की चहाची तलफ येई; पण एवढ्या रात्री चहा पिण्यासाठी लांबचे कट्टे, नाके गाठावे लागत. कधी कधी प्रवासातच जीव दमून जाई आणि मग कामाचा बट्ट्याबोळ होई. दुसऱ्यांच्या वेबसाइट्‌स आणि सॉफ्टवेअर्स डेव्हलप करत असताना भुवनेश्‍वरमधल्या सुकल्याण दासला चहाच्या ऑनलाइन विक्रीची कल्पना सुचली आणि \"एककप.इन‘चा जन्म झाला. त्याच्याचसारख्या \"आउट ऑफ बॉक्‍स‘ विचार करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांनीदेखील ही अफलातून अशी संकल्पना उचलून धरली आणि आज संपूर्ण भुवनेश्‍वरमध्ये त्यांचा चहा अनेकांची \"तलफ‘ भागवत आहे.\nतुमचा मित्र किंवा मैत्रीण सुटीच्या दिवशी ऑफिसमध्ये एकटीच काम करत असेल किंवा तुम्हाला तुमच्या चहावेड्या प्रियजनांना सरप्राइज द्यायचे असेल, तर तुम्ही \"शेअर अ कप‘च्या माध्यमातून त्या माणसाचा पत्ता देऊन ऑनलाइन ऑर्डर प्लेस करू शकता. सध्या त्यांच्याकडे दोन डिलिव्हरी बॉईज असून, ते केवळ 30 मिनिटांच्या आत भुवनेश्‍वरच्या कानाकोपऱ्यात चहा पोचवित आहेत. सध्या त्यांची सेवा सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी पाच या वेळेतच उपलब्ध असली, तरी दिवसाला सुमारे 500 कप चहा जात असल्याने त्यांचा बिझनेस तोट्यात तरी चाललेला नाही.\nकमी भांडवलात मोठा फायदा\nस्वत:ची सॉफ्टवेअर फर्म चालविणारा सुकल्याण सांगतो, की मला या व्यवसायाची सुरवात करताना कसलाच त्रास झाला नाही. त्या मानाने कमी भांडवल आणि उपलब्ध मनुष्यबळावर होणारे काम असल्याने जानेवारीमध्ये आम्ही प्रायोगिक तत्त्वावर ओळखीच्याच लोकांसाठी \"एककप‘ सुरू केला. परंतु कंपन्यात आणि अन्य ठिकाणी माझ्याच काही माजी सहकाऱ्यांपुढे \"चायवाला‘ म्हणून उभे राहणे सुरवातीला अवघड गेले, पण त्यांनीही प्रोत्साहन दिल्याने आमचा आत्मविश्‍वास वाढला.\nसध्या आम्ही इंडियन मिल्क टी, लेमन टी, मसाला टी, ग्रीन टी आणि मटका टी अशा पाच प्रकारांतील चहा लोकांना पुरवित आहोत. साध्या चहाची किंमत 7 रुपये असून, मटका आणि स्पेशल मलाई मारके मटका चहाची किंमत 10 रुपये आहे. आमच्या चहाची वेगळी चव, आमचे मसाले आणि किंमत यामुळे सध्या ग्राहकवर्ग आमच्या \"एककप‘मुळे खूश असल्याचेही सुकल्याण आवर्जून नमूद करतो.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nघफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा\nसंधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण करा\nअपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि य...\nमुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस\nदहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी\n1991 च्या आधी भारतीय कंपन्यांना कृत्रिम संरक्षण दे...\nएमबीए तरुणांचा नोकरीला नकार, भरवला आठवडी बाजार \nकसा झाला शाळा सोडलेल्या आकाशाचा स्वयंपाकी ते सॉफ्ट...\nहा कसला तर्क आहे\nजेव्हा एक बिल्डर किंवा उद्योजक हेल्थकेयर उद्योगमध्...\nमशरुमचं उत्पादन घ्या, महिन्याला लाखो कमवा \nकरोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्या...\nकथा सॅमसंगची - चौकटीबाहेर फक्त एकच पाऊल टाका\nदहा,पंधरा वर्षांपुर्वी महाराष्ट्रात माणसं रहायची प...\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग संपत्ती किंवा पैसे कम...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव मराठी आणि परप्रांतीय मधील फरक मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाह...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते\nकल्पना करा कि तुम्ही हिरा आहात. तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले. तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esuper9.com/2020/02/BoycottTakht-takhta-moview.html", "date_download": "2020-09-26T02:25:06Z", "digest": "sha1:XAMFWIJKBOHMLTRZU4DHX5VJQEQ7DAHL", "length": 10153, "nlines": 96, "source_domain": "www.esuper9.com", "title": "#BoycottTakht करण जौहरचा ‘तख्त’ वादात - esuper9", "raw_content": "\nHome > लोककला > #BoycottTakht करण जौहरचा ‘तख्त’ वादात\n#BoycottTakht करण जौहरचा ‘तख्त’ वादात\nकरण जौहरच्या ‘तख्त’ या चित्रपटाचं लेखन हुसैन हैदरी या लेखकाने केले आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ‘हिंदू दहशतवादी’ असे ट्विट केले होते. हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत, ते वापरा… असं म्हणत त्याने ‘हिंदू दहशतवादी’ हा शब्द ११ वेळा लिहिला होता. हे ट्विट काही तासांत व्हायरल झाले आणि नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर हुसैनच्या आगामी चित्रपटाची माहिती मिळताच नेटकऱ्यांच्या संतापाचा रोख करण जौहरच्या दिशेने वळला आणि त्यांनी ‘तख्त’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. बॉलिवूड निर्माता करण जौहर आपला नवाकोरा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘तख्त’ असे आहे. मात्र चित्रीकरणापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाच्या लेखकाने आपल्या ट्विटमध्ये ‘हिंदू दहशतवादी’ असा उल्लेख केला होता. परिणामी नेटकरी संतापले आहेत. त्यांनी #BoycottTakht असा हॅशटॅग व्हायरल करुन ‘तख्त’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/69623?page=1", "date_download": "2020-09-26T03:00:08Z", "digest": "sha1:2UPV7MLXZIX6BMT6VNTLSGQRQMVF2LLO", "length": 22121, "nlines": 176, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कलंक चित्रपट | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कलंक चित्रपट\nकाल कलंक बघितला. बडा घर पोकळ वासा असा आहे चित्रपट. भव्य दिव्य सेट, झगमगीत कपडेपट, नाचगाणी पण कुठेही मनाला भिडत नाही. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम सुंदर दिसण्याची दक्षता घेतली आहे. अगदी भन्सालीच्या वरताण दिवे, झुंबरं, पाण्याचे कालवे आहेत. पण चित्रपट पाहून झाल्यावर आठवणीत राहील असं काहीच नाहीये. चित्रपटाची कथा देत नाही पण एव्हाना सगळ्यांना ती माहीत झाली असेल.\nअलिया भटचे प्रथम दर्शनच त्या १९४० काळाशी विसंगत आहे. त्यावेळी कोणी राजस्थानी तरूणी highlighted/ conditioned केस एकदम मोकळे सोडून, revealing घागरा चोळी घालून गल्ल्यागल्ल्यांतून गाणी म्हणत उनाडेल हे पटत नाही. कियारा अडवाणी आणि कृती सनोनचे आयटेम साँग तर अगदी खुपते त्या काळात\nजिथे ही कथा घडते ते हुस्नाबाद शहर तर विनोदीच आहे, मोठ्या मोठ्या हवेल्या, राजस्थानी गल्ल्या, घाट, व्हेनिसला लाजवतील असे gondola आणि कालवे, नद्या, बर्फाच्छादित पर्वत, खोल दर्‍या सगळं एका ठिकाणी मै प्रेम की दीवानी हू मधल्या सुंदरनगरची आठवण आली, तिथेही समुद्र, पर्वत, हिमवर्षाव सगळं एकाच शहरात होतं आणि ते बुलफायटिंग महान विनोदी आहे. तो सगळा प्रकार एका कड्याच्या टोकावर घडतो,बाजूला खोल दरी, बुलने धडक दिली की माणूस जाऊन सरळ दरीतच पडतो, मधे काही कुंपण, संरक्षक कठडे वगैरे प्रकारच नाही\nसंजय दत्त कायम अवघडलेला वाटतो. वरुण आणि आलिया एरवी आवडतात पण या चित्रपटात नाही फारसे भावले. माधुरीचे नृत्य सुंदर आहे आणि दिसलेय छान पण बाकी भूमिकेला काही विशेष कंगोरे नाहीत. आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी चक्क आवडले. सहायक भूमिकेमधे कुणाल खेमू छाप सोडतो.\nतुमचेही या चित्रपटाविषयीचे मत प्रतिसादात जरूर लिहा. चित्रपटात एक वाक्य आहे 'गाना अच्छा है लेकिन नमक कम है'. चित्रपटाविषयीही असेच म्हणावेसे वाटते.\nसोनाक्षी सिन्हाला कॅन्सर. डॉक्तरांनी ती जगणार नाही हे सांगणे. कुणाचं काय तर कुणाचं काय हिचं आपलं नव-याला मूल हवं म्हणून दुसरी कुणीतरी ही जिवंत असतानाच मिळावी म्हणून तगमग. कसली धीराची बाई ती. इथं बायका मी मेले तरी भूत होऊन बघायला येईल अशी धमकी देतात नव-याला. तिला आलिया भट्ट सापडते. ती म्हणते लग्न केलं तर येईन. ही जरा व्यवहारी वाटते. तर सोनाक्षीचा नवरा विबासंच्या बाबतीत अत्यंत खेडवळ, बुरसटलेल्या विचारांचा आणि महान आदर्शवादी निघतो. हा ठोंब्या म्हणतो बायकोचा दर्जा तर देऊ शकेन पण प्रेम नाही देऊ शकणार. एक तर हा टोकाचा आदर्शवादी असला पाहीजे नाहीतर अत्यंत प्रॅक्टीकल. मरणा-या बायकोला नाराजही नाही करायचे आणि दुस-या बायकोच्या अपेक्षाही वाढवून नाही ठेवायच्या.\nही असली पात्रं आमच्या मराठी लेखकांना का सुचत नाहीत \n-> मराठी चित्रपट - झाकोळ - डॉ. श्रीराम लागमातोंडकर, सरला येवलेकर व उर्मिला मातोंडकर\n-> हिंदी चित्रपट - वुई आर फॅमिली - अर्जून रामपाल, करीना कपूर.\nअर्थात थोडा बदल आहे. यात मूल ऑलरेडी आहे. त्याला सावत्र आईचा जाच नको म्हणून आपल्या बहिणीलाच आपली सवत बनवायची तयारी असा प्लॉट आहे.\nवारिस नावाचा तर अजून एक\nवारिस नावाचा तर अजून एक सिनेमा वेगळाच अँगल देतो. नवरा आपल्याला मूल होण्याआधीच मारला गेला आणि सासरा आधीच विधूर त्यामुळे घराण्याला वारस हवा म्हणून म्हातार्‍या सासर्‍याचं आपल्या धाकट्या बहिणीशी लग्न लावून देणारी नायिका त्यात आहे. पुढे बहिणीला सासर्‍यापासून मूल होतं तेव्हा त्या मुलाला स्वतःचा भाचा, दीर असं संबोधतानाच पुन्हा आप तो हमारे वो है असंही नायिका जेव्हा म्हणते तेव्हा मला त्याचा अर्थच कळला नाही किंवा खरं तर कळत असलेला अर्थ वळला नाही.\nमला श्रीदेवीची उणिव भासली.\nमला श्रीदेवीची उणिव भासली. पूर्वी तिलाच घेतले होते. पण ती एकाएकी गेली मग तिच्या ऐवजी माधुरीला घेतले. पन माधुरी अभिनयात कमीचं आहे\nआणि पाकिस्तानाचे उर्दु कुणालाच जमले नाही.\n#Kalank. हे मस्त आहे\nCancer ने आजारी बाई\nCancer ने आजारी बाई नवऱ्यासाठी दुसरी बायको शोधते ही स्टोरच असेल तर मराठीत रेखा (कामत) यांची दुहेरी भूमिका असलेलग चित्रपट अशाच कथेवर होता. नखव ग्रुहदेवता.\nसांग धावत्या जळा - हे गाणं होतं त्यात.\nमृणाल कुलकर्णी आणि सचिन\nमृणाल कुलकर्णी आणि सचिन खेडेकरचा आहे असा चित्रपट, महा रटाळ. ती दुसरी बायको सुलेखा तळवलकर आहे.\nअरे स्तोरी सान्गून ताका आम्ही\nअरे स्तोरी सान्गून ताका आम्ही सिनेमा बघ्नार नैय्ये\nकाल बघितला , कसा वाटला तेच\nकाल बघितला , कसा वाटला तेच कळले नाही\nपण आलिया, वरून, आदित्य अन टायटल सॉंग आवडले मला , बाकी दुसरे काहीच नाही\nमला ते गाणं आवडल, परदेसिया\nमला ते गाणं आवडल, परदेसिया\nथोडक्यात स्टोरी म्हणजे एक\nथोडक्यात स्टोरी म्हणजे एक लाहोरच्या जवळ हुस्नाबाद नावाचं गाव, जिथे पर्वत, हिमाच्छादित कडे, दर्‍या, नद्या, घाट, कालवे, ब्रिटिशकालीन हवेल्या, राजस्थानी गल्ल्या एकत्र सुखाने नांदतात. तर तिथे संजय दत्त बडी असामी, न्युजपेपरचा मालक. त्याचा मुलगा आदित्य आणि सून सोनाक्षी. हे तिघेच महालासारख्या हवेलीत राहातात. साधारण दोन डझन लोक बसतील अशा जेवणाच्या टेबलावर संजय दत्त एका टोकाला, आदित्य दुसर्‍या टोकाला तर सोनाक्षी मधोमध असे बसून जेवतात. तर ती मरणपंथाला लागलेली. मरण्यापूर्वी नवर्‍याला सुख लाभावं म्हणून ती आलियाला त्याची भावी पत्नी म्हणून घरी राहायला यायचं आमंत्रण देते. त्यानिमित्ताने त्यांची ओळख होईल एवढं लांब जेवायचं टेबल आहे तर एक अजून आरामात बसू शकेल आणि आपण गेल्यावर ते लग्न करतील असा तिचा बेत. पण आलिया practical असल्याने मी त्या घरची सून म्हणूनच येईअ, नाहीतर तू गेल्यावर तो मला घराबाहेरही काढेल मग मला कोणाचाच आधार राहाणार नाही असे निक्षून सांगते. मग त्यांचे लग्न होते पण आदित्य तिला मी तुझा आदर करीन पण तुला प्रेम नाही देऊ शकणार वगैरे सांगतो. मग आलियासमोर आता आपण करायचे काय असा प्रश्न पडतो. ती त्या हवेलीत भयानक bore होते पण मग कधीतरी तिच्या कानावर गाण्याचे आलाप पडतात. ते असतात गावातल्या हिरा मंडी या बदनाम एरियातील माधुरी म्हणजे बहार बेगम या तवायफचे. आलिया सरळ तिच्याकडे गाणं शिकायला जाते, तिथे सगळ्या गावात कोणी दुसरा गायन शिकवणारा गुरु नसतोच. त्या हिरामंडीत लोहारांच्या वस्तीत वरूण धवन हा अनाथ तरूण राहात असतो. मग तो आणि आलिया प्रेमात पडतात. मग बरीच गाणी नाच होतात. मग मधेच सोनाक्षी मरते, मरणाच्या वेळीही मेकअप, केशभूषा, वेशभूषा एकदम लग्नाला निघाल्यासारखी असते. मग आदित्यला आलिया आवडायला लागते. पुन्हा गाणी, नाच होतात. मग संजय दत्त आणि माधुरीचे संबंध असतात आणि वरुण त्यांची प्यार कि निशानी असतो, पण मग संजय दत्त माधुरीला सोडून देतो आणि माधुरीही वरुणला दूर ढकलते. त्यामुळे वरूण सूडाने पेटलेला असतो आणि आलियाकरवी संजय दत्तच्या खानदानाची बदनामी करणार असतो, हे already प्रेक्षकांनी guess केलेले रहस्य उघड होते. पण आलियाचे सच्चे प्रेम बघून त्याचे मन बदलते. या सगळ्यातच हिंदू मुस्लीम दंगे सुरु होतात, फाळणी होते, संजय दत्त भारतात निघून जातो. आदित्यलाही खरा प्रकार कळतो मग तो आलियाला जी ले अपनी जिंदगी म्हणतो. मग वरुणही तिला जी ले अपनी जिंदगी म्हणतो. आलियाचा नक्की निर्णय होत नाही, ते भारतात जायला ट्रेनमधे चढतात तेव्हा ती दोघांचाही हात धरते. पण मग वरूणला त्याचा एक दोस्त कम दुश्मन मारतो आणि आलिया आणि आदित्य भारतात येतात. संजय आणि माधुरीचं काय होतं कळत नाही. मधेच वरुण आणि सोनाक्षीची भुते येतात आणि रोमान्स करतात त्यामुळे आदित्य आणि आलियाही जिवंत असतात की मरतात ते कळत नाही. एकूण चित्रपटातल्या बर्‍याच गोष्टी कळत नाहीत. आपण हा चित्रपट तीन तास कसा सहन केला तेही कळत नाही\nमग बरीच गाणी नाच होतात\nमग बरीच गाणी नाच होतात\nचीकू धन्यवाद, संपूर्ण कथानक\nचीकू धन्यवाद, संपूर्ण कथानक दिल्याबद्दल.\nआता कोण कोण कलंकित होणार , त्यांनी हात वर करा लवकर.\n( मी सिनेमा पाहिला नाही. ट्रेलवरवरूनच लिहीले होते, कुणीतरी कथा लिहीलच म्हणून )\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esuper9.com/2020/03/maharashtra-budget-2020-ajit-pawar.html", "date_download": "2020-09-26T00:58:07Z", "digest": "sha1:VVMIV5DCJP5PWRRYG3MXUPAYJQVM5HQR", "length": 15779, "nlines": 99, "source_domain": "www.esuper9.com", "title": "पवारांनी सांगितला पहिल्यांदा बजेट मांडताना घडलेला किस्सा - esuper9", "raw_content": "\nHome > राजकारण > पवारांनी सांगितला पहिल्यांदा बजेट मांडताना घडलेला किस्सा\nपवारांनी सांगितला पहिल्यांदा बजेट मांडताना घडलेला किस्सा\nमहाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार सकाळी ११ वाजता विधानसभेत हा अर्थसंकल्प मांडतील. ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असला तरी अजित पवार दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दोनच दिवसापूर्वी पार पडलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या देवेंद्र फडणवीस लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अजित पवारांनी पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर करताना घडलेला एक किस्सा सांगितला होता.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी मुंबईमध्ये झाले. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनीही भाषण केलं. फडणवीसांबरोबर भाजपाच्या नेत्यांची पवारांनी आपल्या खास शैलीत फिरकी घेतली. यावेळेस त्यांनी एक जुनी आठवणही सांगितली. “पुस्तक योग्य वेळी उपलब्ध होतयं याचा आनंद आहे. या पुस्तकाचा उपयोग सर्वांना होणार आहे. सामान्य माणसासाठी सोप्या भाषेत अर्थसंकल्प कळावा म्हणून हे पुस्तक लिहिलयं. सहा तारखेला (राज्याच्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे त्या दिवशी) सामान्य माणसातल्या अर्थमंत्र्याला हे पुस्तक खूप उपयोगी पडणार आहे. हे पुस्तक सोप्या भाषेत असल्याने फडणवीस यांचं अभिनंदही सोप्या भाषेत करण्याचा माझा प्रयत्न आहे,” अशा शब्दांमध्ये पवारांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.\nदेवेंद्रजी अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी भाषा सोपी करुन चालणार नाही. तर अर्थसंकल्प मांडण्याऱ्या अर्थमंत्र्यांचं ध्येय आणि दिशा स्पष्ट असावी लागते. त्याचा प्रधान्य क्रमही स्पष्ट असावा लागतो. मन देखील साफ आणि स्वच्छ असावं लागतं. महत्वाचं म्हणजे अर्थमंत्री आणि अर्थसंकल्प लोकांच्या गरजांशी, भावनांशी एकरुप होऊन तयार होणं गरजेचं असतं असं मला वाटतं. अलिकडच्या मागील १५-२० वर्षांच्या कालावधीमध्ये जयंतराव पाटील, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा आम्ही सर्वांनी वीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक अर्थसंकल्प राज्यामध्ये सादर केले. हे सगळं होत असताना मला एका गोष्टीची आठवण येते. अर्थमंत्री विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधी सदस्यांनी सभागृहामध्ये गोंधळ न घालता तो शांततेत ऐकून घेतला पाहिजे अशी टीप टाकली आहे,” असं पवारांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.\nअर्थसंकल्प मांडता सभागृहात होणाऱ्या गोंधळावरुन पवारांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प मांडतानाची आठवण सांगितली. “मला आठवतय बरोबर सहा वर्षापूर्वी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सभागृहामध्ये मी माझा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना सगळे विरोधीपक्षाचे आमदार गोंधळ घालत होते. अर्थसंकल्प कुणालाही ऐकू जात नव्हता. त्या गोंधळातही माझ्यासमोरच्या विरोधी बाकावरील एक सदस्य गोंधळ न घालता कानाला इयरफोन लावून डोकं बाकावर ठेऊन अर्थसंकल्प ऐकण्याचा, समजून घेण्याचा त्याच्यातील बारकावे लिहून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होते. ते सदस्य म्हणजे देवेंद्रजी फडणवीस. माझ्या मनाला इतकं वाईट वाटतं होतं की हे इतकं बारकाईने ऐकतायत थोडसं यांना मुनगंटीवारांना समजून सांगायला काय हरकत आहे. फडणवीस अतीशय शांतपणे ऐकत होते. तर मुनगंटीवार अगदी जोरजोरात घोषणा देत होते. गिरिष महाजन तर विचारुच नका. त्यांना काय माहिती की पुढं हाच बाबा मुख्यमंत्री होणार आहे. पुढं याच्याच हाताखाली काम करायचं आहे,” अशी टीप्पणी अजित पवारांनी केली. यानंतर सभागृहामधील सर्वच नेते हसू लागले.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/sports/other-sports/changed-tactics-suggested-by-coaches-during-olympic-qualifier-bout-says-vinesh-phogat/articleshow/71207050.cms", "date_download": "2020-09-26T03:20:41Z", "digest": "sha1:X4435XB2MPHPYMO6F3KWWUNNKNZERLTS", "length": 16186, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रशिक्षकाचा सल्ला नव्हे, स्वतःच्या हुशारीने जिंकले: विनेश\nऑलिम्पिक पात्रता फेरीच्या लढतीत भारताची कुस्तीगीर विनेश फोगट हिने प्रशिक्षकांनी सांगितलेले डावपेच ऐनवेळी बदलले. त्याचा फायदा झाल्यानेच यश मिळाल्याचे तिने सांगितले. विनेशने जागतिक कुस्ती स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले.\nनूर-सुल्तान (कझाकस्तान): ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या लढतीत भारताची कुस्तीगीर विनेश फोगट हिने प्रशिक्षकांनी सांगितलेले डावपेच ऐनवेळी बदलले. त्याचा फायदा झाल्यानेच यश मिळाल्याचे तिने सांगितले. विनेशने जागतिक कुस्ती स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले. त्याचबरोबर २०२० टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवेशही निश्चित केला. ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या लढतीत प्रशिक्षक वॉलर अकोस यांनी तिला प्रतिस्पर्धी सारा अॅन हिल्देब्रँडपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. त्याचबरोबर तिचा उजवा हात 'ब्लॉक' करायचा आणि स्वत:च्या पायाची पकड होऊ द्यायची नाही, असे सांगितले होते.\nयाबाबत विनेश म्हणाली, 'प्रशिक्षकांनी मला वेगळेच काही सांगितले होते. पण, मॅटवर मला लढतीदरम्यान वेगळेच काही वाटले आणि ऐनवेळी मी डावपेचात बदल केला. त्या वेळी मला वाटत होते की ती माझ्यावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, मी गुण गमावत नव्हते. त्यामुळे तिची चांगलीच दमछाक होत होती. तेव्हा मी ठरविले की तिला पायांची पकड करण्यासाठी प्रलोभन द्यायचे. मात्र, त्याचबरोबर आपला बचाव कमकुवत होणार नाही, याची काळजी घ्यायची. जेणेकरून तिची आणखी दमछाक होईल. ही योजना कामी आली. कारण, माझ्यापेक्षा तिची ताकद निश्चितच जास्त होती.' अमेरिकेची अव्वल कुस्तीगीर साराने रिपिचेजच्या दुसऱ्या फेरीत पाच वेळा विनेशच्या उजव्या पायाची पकड करण्यात यश मिळवले होते. मात्र, या डावपेचात तिला एकही गुण मिळवता आला नाही. विनेश म्हणाली, 'त्या वेळी तिला काही गुण मिळाले जरी असते, तरी तिची चांगलीच दमछाक झाली असती. कारण, त्यासाठी तिला तिची सर्व ताकद वापरावी लागली असती.'\nलग्न न करण्याचा सल्ला होता\n२५ वर्षीय विनेश म्हणाली, 'काही जणांनी मला लग्न करू नको, असा सल्ला दिला होता. कारण, लग्नानंतर मी पूर्वीसारखी कुस्ती करू शकणार नाही, असे त्यांना वाटत होते. मात्र, मी त्यांना या ब्राँझपदकाने चुकीचे ठरविले.' तिचा पती सोमवीर राठी हादेखील कुस्तीगीर आहे. त्याने अद्याप पदक मिळवले नसले, तरी तो कुस्तीत तरबेज आहे. कारण, माझ्या परदेशी प्रशिक्षकांनी ज्या सूचना केल्या होत्या, त्या त्यानेही आधीच केल्या होत्या, असेही विनेश म्हणाली. रिओ ऑलिम्पिकदरम्यान झालेली दुखापत विनेश अद्याप विसरलेली नाही. विनेश म्हणाली, 'त्या दुखापतीनंतर मला काही आठवडे व्हिलचेअरवर बसावे लागले होते. दुखापतीतून सावरल्यानंतर आईने तर माझ्या लढती बघणेच बंद केले होते. कारण, तिला भीती होती, की मी पुन्हा पाय मोडून घरी येईल. आता टीव्हीवर एखादी लढत बघितली तरी ती मोठ्याने ओरडते. माझ्या मुलीचा पाय सोड. तिचा पाय मोडेल.'\nविनेश म्हणाली, 'ही माझी पहिलीच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा आणि पहिलीच जागतिक स्पर्धा होती. या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडू चांगल्या तयारीनीशी मॅटवर उतरतो. अशा स्थितीत या स्पर्धेतून पदक मिळवणे, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. टोकियो ऑलिम्पिकला प्रवेश मिळाल्याने मी निश्चिंत झाले आहे. आता टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मला मिळणार आहे. आशा आहे, या ब्राँझपदकाचे रुपांतर सुवर्णपदकात करू शकेल.'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n'उद्धव ठाकरे सरकारला वाटत असेल, पण कंगना घाबरणारी नाही'...\nवाढदिवसाचा जल्लोष महागात पडला; सर्वात वेगवान धावपटू उसे...\nखेलरत्न पुरस्कारामधून राजीव गांधी यांचे नाव बदला, बबिता...\nअपंगत्वावर मात करत सुयश जाधवने पटकावला अर्जुन पुरस्कार...\nमहाराष्ट्रात लोकशाहीची हत्या, कंगनाप्रकरणात बबिताची ठाक...\nबजरंग पुनिया, रवी कुमार ऑलिम्पिकसाठी पात्र महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n आज कोण ठरणार सरस\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nनाशिकराज्यात रुग्ण वाढत असताना नाशिकनं दिली दिलासादायक बातमी\nकोल्हापूरसंभाजीराजेंनी वेळीच ओळखली चाल; 'असा' उधळला डाव\nLive: राज्यात आतापर्यंत ९ लाख ९२ हजार रुग्ण करोनामुक्त\nकोल्हापूरकरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ऑडिट होणार, २२ पथकं तैनात\nनागपूरविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोटींचा, प्रस्ताव पाठवला\nमुंबईशिवसेना कधीच कन्फ्यूज नव्हती; राऊतांचे फडणवीसांना उत्तर\nपुणेकृषी विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार का; अजित पवार म्हणाले...\nदेशUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने 'असे' दिलेउत्तर\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nविज्ञान-तंत्रज्ञानसॅमसंगने आणले AI पॉवर्ड वॉशिंग मशीन, मोबाइलने करा कंट्रोल\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nकार-बाइकदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/91593094d92893e91f91593e924-93694792494092e93e93293e91a940-91192893293e907928-916930947926940-93593f91594d930940", "date_download": "2020-09-26T00:55:57Z", "digest": "sha1:5B5ISWUVBRI35TN34ZNOW67YBY3ZBXHL", "length": 9477, "nlines": 85, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "शेतीमाल ऑनलाइन खरेदी-विक्री — Vikaspedia", "raw_content": "\nबंगळूर - ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांना कर्नाटकात कोठूनही शेतीमालाची खरेदी-विक्री करता येणार असून, अॉनलाइन सुविधा पुरविणारे कर्नाटक हे पहिलेच राज्य आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. येथे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या अॉनलाइन खरेदी-विक्री सेवेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, \"आमचे सरकार शेतकऱ्यांना सक्षम करू इच्छीते ज्यामुळे, ते आपल्या मालाच्या किमती ठरवू शकतील.''\n'ऑनलाइन मार्केट' हे या दृष्टीनेच उचललेले एक पाऊल आहे. परवानाधारक व्यापारी कृषी मालाची कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाइन बोली लावू शकतात. समाधानकारक दर न मिळाल्यास नकार देण्याचा अधिकार या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना आहे. अशा प्रकारची व्यवस्था सुरू करणारे कर्नाटक हे 'भारत' देशातील पहिले राज्य आहे. कृषी उत्पादनांची किंमत शास्त्रीय पद्धतीने निश्‍चित करण्यासाठी नुकत्याच सुरू केलेल्या कृषी विपणन योजनेशी संलग्न अशी ही ऑनलाइन विक्री व्यवस्था आहे. त्याचबरोबर राज्याचा कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत.\nऑनलाइन विक्री बाजारपेठेच्या उद्घाटनानंतर दहा मिनिटांतच 10 व्यापाऱ्यांनी सुक्‍या खोबऱ्यासाठी, तर 53 व्यापाऱ्यांनी हळदीसाठी बोली लावली. ही कृषी मालाच्या विक्रीतील क्रांतीची नुसती सुरवात आहे. या व्यवस्थेमधून शेतकऱ्यांना कृषी मालाची योग्य किंमत मिळेल, असे जाणकारांनी सांगितले. या एकात्मिक दृष्य ऑनलाइन विक्री बाजारपेठेद्वारा शेतकरी ऑनलाइन माल विकू शकतात, तसेच त्यांना पेमेंटही ऑनलाइन मिळणार आहे. सहकार मंत्री एच. एस. महादेव प्रसाद आणि कृषी विपणन मंत्री शामानुर शिवशंकराप्पा, मुख्य सचिव कौशिक मुखर्जी या वेळी उपस्थित होते.\nया विनियमित बाजारपेठेत शेतकऱ्यांनी प्रवेश करताच कृषी मालाचे तपशील घेऊन त्यांना युनिक आयडेंटीफिकेशन नंबर दिला जाईल. आडत्यांचे वाटा आणि बाजारपेठ शुल्कदेखील व्यापाऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीनेच भरले जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाइन विक्री झालेल्या मालाचे सर्व तपशील त्यांच्या मोबाईलवर कळवले जातील.\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Rockpeterson", "date_download": "2020-09-26T02:20:06Z", "digest": "sha1:MKIJHAQWS6X5QRPS573XQIVUBKRJKRDR", "length": 7277, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Rockpeterson - विकिपीडिया", "raw_content": "\nवैभव पल्हाडे या लेखातील सर्व डेटा Google शोध वरून सत्यापित केला गेला आहे. आणि ती व्यक्ती Google वर सर्व संदर्भांसह ज्ञात आहे. हा लेख राजेश्वरी खरात या लेखा सारखा बनविन्यात आला आहे,जर आपण या वैभव पल्हाडे लेखास योग्य समजत नसाल तर ती एक चुकीची बाब आहे.याला गुगल वरूण केलेल्या तपासणी च्या संदर्भात तयार केला गेला आहे. i.e Vaibhav Palhade.आपण हा लेख परिपूर्ण बनविण्यात मदत करू शकता. हा लेख हटविणे google डेटा वरून सत्यापित केलेल्या व्यक्तीसाठी ठीक ठरणार नाही. हा लेख मराठी विकीपीडियावर ठेवण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे.आपल्याकडून मदतीची आशा आहे.\nतयार केलेल्या पृष्ठांमध्ये प्रदान केलेली माहिती पुरेशी नसणेबाबत[संपादन]\nपुरेशी माहिती नसताना लेख तयार करणे विकिसंकेतात बसत नसल्यास आपण कृपया सदर पाने वगळावीत ही नम्र विनंती.--अभय होतू (चर्चा) २१:०१, २ जुलै २०२० (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जुलै २०२० रोजी १०:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/corona-positive-62-chiplun-12-rajapur-ratnagiri-marathi-news-344071", "date_download": "2020-09-26T02:13:40Z", "digest": "sha1:4H73LPQNCOFETFO2CMMR33CJMA4OW34O", "length": 15896, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "सावधान ! चिपळूणात 62 तर, राजापुरात 12 नवे रुग्ण | eSakal", "raw_content": "\n चिपळूणात 62 तर, राजापुरात 12 नवे रुग्ण\nकोरोना रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून बाधित रुग्ण शोधण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी शहरात व्यापाऱ्यांची अँटीजेन टेस्ट केली जात आहे.\nचिपळूण ( रत्नागिरी ) - शहरासह तालुक्‍यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. तालुक्‍यात मंगळवारपर्यंत 24 तासांत 62 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये खेर्डी आणि मांडकी येथे सर्वाधिक जास्त रुग्ण आढळून आले.\nचिपळुणात दिवसात 62 बाधित \nकोरोना रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून बाधित रुग्ण शोधण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी शहरात व्यापाऱ्यांची अँटीजेन टेस्ट केली जात आहे. तालुक्‍यात मंगळवारी आलेल्या अहवालात वालोपे- 2, पाग गोपाळकृष्णवाडी- 1, खेर्डी विकासवाडी- 1, खेर्डी माळेवाडी- 4, खेर्डी वरचीवाडी- 1, खेर्डी कातळवाडी- 1, खेर्डी- 8, दळवटणे रामवाडी- 1, पागमळा- 2, नांदिवसे लोगडेवाडी- 1, चिपळूण सिव्हिल कोर्टजवळ- 1, मार्कंडी- 1, मार्कंडी शिवानंद अपार्टमेंट- 4, पिंपळी तीनवड- 1, इंद्रायणी अपार्टमेंट डीबीजेजवळ- 1, पाग कृष्णेश्वरनगर- 1, कोंढे मधलीवाडी- 1, काविळतळी लॅन्डस्टोन पार्क- 1, रामकृष्ण प्लाझा गणपती मंदिराजवळ- 1, खडपोली तांबटवाडी- 1, कोळकेवाडी- 1, कुंभार्ली लांबेवाडी- 1, डेरवण हॉस्पिटल कॅम्पस्‌विना बिल्डिंग- 1, फुरुस- 1, शिरगांव- 1, नायशी- 1, मांडकी- 11, कापसाळ- 1, कात्रोळी- 1, शिवाजीनगर चिपळूण- 3, करंबवणे- 1, सावर्डे- 1, नवा भैरी जवळ चिपळूण- 1, मार्गताम्हाणे बाजारपेठ- 1, खेंड चौकी- 1 असे एकूण 62 बाधित रुग्ण आढळून आले आहेत.\nराजापुरात 12 पॉझिटिव्ह रुग्ण \nराजापूर - गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासामध्ये तब्बल बारा पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.\nपॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मिठगवाणे-चिरेखाण, कोदवली-बौद्धवाडी, ओझर-साबळेवाडी, पाचल-विद्यानगर, धोपेश्‍वर-खांबलवाडी, पंचायत समिती चव्हाण चाळ, पंचायत समिती कार्यालय येथील प्रत्येकी एका रुग्णासह वाल्ये पश्‍चिमवाडी येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमध्ये तालुक्‍यातील रुग्णांची संख्या 161 झाली आहे.\nमिठगवाणे चिरेखाण आणि कोदवली बौद्धवाडी येथे आढळलेले रुग्ण स्थानिक असून सर्दी, ताप आल्याने त्यांचे स्वॅब घेतले होते. मंगळवारी घेतलेल्या 32 जणांच्या स्वॅब तपासणीपैकी आज आलेल्या अहवालामध्ये नऊ अहवाल पॉझिटिव्ह आले. ओझर-साबळेवाडी येथील व्यक्तीची ऍटीजेन टेस्ट घेतली होती. स्वतःहून क्वारंटाईन झालेला पाचल गाव काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाला होता. मात्र, त्या ठिकाणी पुन्हा नव्याने एक रुग्ण आढळला आहे.\n123 रुग्ण झाले बरे\nपॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. आजपर्यंत तालुक्‍यातील 161 पैकी तब्बल 123 रुग्ण बरे झाले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपर्यटकांचा चिपळूणातील विसावा पॉइंटकडे ओढा\nचिपळूण ( रत्नागिरी ) - खवय्यांचे स्वादिष्ट जेवण, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाबरोबरच चिपळूण तालुका निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. परशुराम घाटातील...\nकृषी विधेयक कोकणला उपयुक्त ः शौकत मुकादम\nचिपळूण ( रत्नागिरी) - केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेले कृषी विधेयक हे कोकणच्या फायद्याचे आहे. कोकणात हजारो एकर जागा पडीक आहे. येथील नद्यांना वर्षभर...\nरत्नागिरीकरांना दिलासा ; कोरोना रूग्ण संखेत घट\nरत्नागिरी - कोरोना बाधित सापडण्याचा वेग मंदावला असून मागील चोविस तासात अवघे 51 रुग्ण बाधित सापडले. हा रत्नागिरीकरांसाठी दिलासा असला तरी गेल्या दोन...\nचिपळूकरांनो रेमडेसिवीर इंजेक्शन हवे आहे, येथे साधा संपर्क\nचिपळूण : चिपळूणातील कोरोनाग्रस्त रूग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवण्यासाठी मुंबई, पुण्यातील अनेक डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार...\nचिपळूणात हायटेक बसस्थानक केव्हा होणार \nचिपळूण ( रत्नागिरी ) - मोठा गाजावाजा करीत चिपळूण हायटेक बसस्थानकाचे वर्षापूर्वी भूमिपूजन झाले. अद्ययावत बसस्थानक उभारणीसाठी खोदाई झाली. काही ठिकाणी...\nभारतीय कबड्डी संघात खेळणार कोकणचा शुभम शिंदे\nचिपळूण : तालुक्‍यातील दसपटी येथील कोळकेवाडी वाघजाई क्रीडा मंडळाचा खेळाडू शुभम शिंदे याची भारतीय कबड्डी संघात निवड झाली आहे. यामुळे चिपळूणच्या क्रीडा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/farmer-rescued-oxen-floodwaters-konkan-sindhudurg-331170", "date_download": "2020-09-26T02:14:19Z", "digest": "sha1:QDUVZI4FUIA4EYRAO25KUHBNBAJFGYQV", "length": 16793, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "सलाम या बळीराजाला! बैलांसाठी जीव धोक्‍यात, अनोख्या नात्याचे दर्शन | eSakal", "raw_content": "\n बैलांसाठी जीव धोक्‍यात, अनोख्या नात्याचे दर्शन\nएकीकडे माणूस माणसाला परका होत असताना त्या शेतकऱ्याने आपल्या बैलांसाठी जीव धोक्‍यात घातल्याची घटना अभूतपूर्वच म्हणावी लागेल.\nदोडामार्ग (सिंधुदुर्ग) - महापुराचे रौद्ररुप घेवून आलेल्या अस्मानी संकटातही वायंगणतड येथे माणूस आणि प्राणी यांच्या अनोख्या नात्याचे दर्शन बुधवारी घडले. महापुराच्या भीतीने वायंगणतड येथील एका शेतकऱ्याने गोठ्यातील बैलांना जीव धोक्‍यात घालून सुरक्षितस्थळी हलवले खरे; पण तिथल्या लोकांनी त्या बैलांना आसरा देण्यास नकार दिल्याने पुन्हा एकदा जीव धोक्‍यात घालत पुराच्या पाण्याखाली गेलेले दोन पूल पार करत त्यांनी बैलांना घरी आणले. एकीकडे माणूस माणसाला परका होत असताना त्या शेतकऱ्याने आपल्या बैलांसाठी जीव धोक्‍यात घातल्याची घटना अभूतपूर्वच म्हणावी लागेल.\nवाचा - रत्नागिरीतील 'या' तालूक्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला\nमाणसांच्या आयुष्यात मुक्‍या प्राण्यांचे स्थान आजही माणसाएवढेच किंबहुना त्यापेक्षा अधिक आहे हेच त्यातून दिसले. वायंगणतड येथील यशवंत परब यांची ही गोष्ट. दोडामार्ग तिलारी मार्गालगत त्यांचे घर. एका बाजूला तिलारी नदी तर दुसऱ्या बाजूला वेळपई नाला. मंगळवारपासून (ता.4) कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बुधवारी (ता.5) सकाळीच सगळीकडे पुराचे पाणी घुसले. साटेली वायंगणतड मार्गावरील वेळपई आणि आवाडे येथील पूल पाण्याखाली गेले.\nतिलारी आणि वेळपईचे पाणी पात्राबाहेर येत शेती बागायतीतून रस्ताभर झाले. अनेक घरांना पाण्याने वेढा दिला. त्यात परब यांचे घर आणि गोठाही होता. गेल्यावर्षी याच तारखेला असाच पूर आला होता. त्यांचे अर्धे अधिक घर पाण्यात होते. यावर्षीही सकाळपासून पुराचे पाणी वाढत होते. गोठ्यातील दोन बैलांची चिंता त्यांना सतावू लागली.\nहेही वाचा - रत्नागिरीत कोरोना स्वॅब टेस्टिंग मशिन बंद पडल्याने तपासणी रखडली\nसाटेलीत कुणाच्या तरी गोठ्यात बैलांना नेऊन बांधावे म्हणून ते पुराच्या पाण्यातून पलिकडे गेले; पण त्यांच्या बैलांना गोठ्यात बांधून घेण्यास कुणी तयार होईना, म्हणून मग ते तसेच हताश होऊन मागे फिरले. तोपर्यंत मधल्या वाटेवरचे आवाडे आणि वेळपई येथील दोन्ही पूल पाण्याखाली गेले होते. बैलांसकट त्यांनी स्वतःला पाण्यात झोकून दिले. पुलावर खूप पाणी होते. त्यांचा ठाव लागेना. तरीही पोहत त्यांनी पैलतीर गाठले आणि घरापर्यंत आले. त्यांच्या गोठ्यात आणि घरातही पाणी होते. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस अविरत सुरु होता.\nबैलांबद्दलची काळजी त्यांना अस्वस्थ करत होती. त्यामुळे पाणी भरलेल्या गोठ्यात बैलांना न बांधता ते बैलांसाठी वायंगणतड येथील सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात विस्तारलेल्या गावात बैलांसाठी सुरक्षित आसरा शोधण्यासाठी पुन्हा मार्गस्थ झाले. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचे बैलांबद्दल असलेले प्रेम आणि काळजी ठळकपणे दिसत होती. महापुराचे रौद्ररुप घेवून आलेल्या त्या अस्मानी संकटातही माणूस आणि प्राण्यांच्या नव्या नात्याचे दर्शन त्यातून घडले. शिवाय संत ज्ञानेश्‍वरांचे पसायदान ग्रामीण भागातील एका गावात अनुभवायलाही मिळाले.\nसंपादन - राहुल पाटील\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचे ई-मेल अकौंट हॅक\nओरोस : सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचा executivedirector4182gmail.com हा ई-मेल आयडी हॅक करण्यात आला. त्यावरून खोटे मेल विविध...\nशेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्यांना रोखठोक उत्तर देणार : नितेश राणे\nसावंतवाडी : कृषी विधेयकाने शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे दलाल, एजंट, काही राजकीय पक्षांची दुकाने बंद होणार आहेत. शेतकरी उत्पादन कुठेही...\nनिकोपता जपण्यासाठी पुरस्कार रद्द ः नाईक\nओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे देवगड वगळता अन्य तालुक्‍यांतून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रत्येकी दोनच प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यातच काही...\nसिंधुदुर्गात खासगी शाळांतील शिक्षकांची घुसमट\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शाळा दीर्घकाळ बंद असल्यामुळे केवळ विद्यार्थी शुल्कावर चालणाऱ्या खासगी आणि विना अनुदानित शाळांमधील शिक्षक आर्थिक अडचणीत...\nनिकृष्ट कामाचा नमुना; महामार्गावरच साचले तळे\nतळेरे (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे; मात्र अपूर्ण कामे मंद गतीने सुरू असल्याने त्याचा नाहक फटका या...\nकंत्राटी कामगारांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ\nओरोस (सिंधुदुर्ग) - प्रत्येक गावातील सामान्य कुटुंबांपर्यंत स्वच्छतेची चळवळ पोहोचवण्यामध्ये स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे योगदान...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://spsnews.in/2017/12/19/vidnyanpradarshan/", "date_download": "2020-09-26T02:13:38Z", "digest": "sha1:5NCAL6A2LC2Q35OS6F77WJXFOOUULDSS", "length": 7287, "nlines": 89, "source_domain": "spsnews.in", "title": "शिराळा मध्ये दि.२० ते २२ डिसेंबर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nशिराळा मध्ये दि.२० ते २२ डिसेंबर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन\nशिराळा : :येथील कन्या शाळेत तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन बुधवार दि.२० शुक्रवार दि. २२ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे.\n२० डिसेंबर ला सकाळी विज्ञान दिंडी काढण्यात येणार आहे . सकाळी ११वाजता प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष सुधाकर हसबनीस तर प्रमुख पाहुणे माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, सभापती सौ. मायावती कांबळे, उपसभापती सम्राटसिंग नाईक, नगराध्यक्षा सौ.सुनंदा सोनटक्के, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे आहेत .\n२१ डिसेंबरला गुरुवारी सर्व गटातील उपकरणांचे परिक्षण करण्यात येणार असून, प्रदर्शन पहाण्यासाठी खुले असणार आहे. शुक्रवारी २२ डिसेंबरला सकाळी नऊ ते आकरा पर्यंत फेर परिक्षण होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ ११ वाजता होणार आहे. या वेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत वैजनाथ महाजन तर प्रमुख पाहुणे रणधीर नाईक, अभिजित नाईक, द. रा. महाजन, महेश चोथे, ब. ची.दिगवडेकर, दिपक शिंदे आहेत.\nया प्रदर्शनात सहभागी व्हावे असे मुख्याध्यापक सौ. एम एम कुंभोजे , विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड व बी आर पाटील यांनी केले आहे.\n← श्रीमती लीलावती शिंदे यांचे निधन\nशित्तूर तर्फ मलकापूर च्या पोलीस पाटील पदी सौ.उज्वला गिरी →\nउन्नत महाराष्ट्र अभियान मध्ये कोरे महाविद्यालयाचा समावेश\nमा.एस.बी.पाटील यांच्या यशात आणखी एक मानाचा तुरा\nदहावी च्या विद्यार्थ्यांना कला क्रीडाचे २५ ऐवजी कमाल १५ गुणच मिळणार\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mt-fact-check/vehicle-fuel-tank-will-be-explosion-in-summer-fake-viral-message/articleshow/68772311.cms", "date_download": "2020-09-26T03:24:02Z", "digest": "sha1:2566PKPLABP62ENY5GAP3MMUJN7FBYET", "length": 14415, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "इंडियन ऑइलच्या: फॅक्ट चेक : उन्हाळ्यात वाहनातील फ्यूल टँक पूर्ण भरल्यास स्फोट\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nFact Check: उन्हाळ्यात वाहनातील फ्यूल टँक पूर्ण भरल्यास स्फोट\nसध्या इंडियन ऑइलच्या हवाल्याने इशारा देणारा एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजनुसार, उन्हाळ्यात वाहनातील इंधनाची टाकी पूर्ण भरू नये. इंधनाची टाकी पूर्ण भरल्यास स्फोट होण्याची शक्यता आहे. उन्हाळा सुरू असल्यामुळे अनेकजण हा मेसेज व्हायरल करत आहेत.\nसध्या इंडियन ऑइलच्या हवाल्याने इशारा देणारा एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजनुसार, उन्हाळ्यात वाहनातील इंधनाची टाकी पूर्ण भरू नये. इंधनाची टाकी पूर्ण भरल्यास टाकीचा स्फोट होण्याची शक्यता आहे. उन्हाळा सुरू असल्यामुळे अनेकजण हा मेसेज व्हायरल करत आहेत.\nइशारा देणाऱ्या मेसेजपैकी एका मेसेजमध्ये एक पोस्टर असून त्यात इंडियन ऑइलचा लोगो दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, वाहनात असणारी इंधनाची टाकी पूर्ण क्षमतेने भरू नये. उन्हाळ्यात गाडीच्या स्फोटाचे ते एक कारण बनू शकते. त्याशिवाय दिवसातून किमान एकदा तरी टाकीचे झाकण उघडावे जेणेकरुन त्यातील गॅस बाहेर पडेल असेही यात नमूद करण्यात आले आहे. गंमत म्हणजे हा मेसेज दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतो.\nइंडियन ऑइल कंपनीने मागील वर्षी १० जून २०१८ रोजी ट्विट करुन हा दावा खोटा असल्याचे सांगितले होते. इंडियन ऑइलने सांगितले की, सोशल मीडियावर कंपनीच्या नावे अफवा पसरवण्यात येत आहे. कंपनीने असा कोणताही इशारा दिला नाही. इंडियन ऑइल आणि व्हायरल मेसेजचा कोणताही संबंध नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले. ऑटोमोबाइल कंपनी प्रत्येक गोष्ट लक्षात घेऊन वाहनांची निर्मिती करतात. यामध्ये सुरक्षेबाबत सर्व उपाययोजना असतात. यात गाडीतील इंधनाच्या टाकीचाही भाग असतो. ट्विवरवर '@IndianOilCl: rumour' असे सर्च केल्यानंतर इंडियन ऑइलचे स्पष्टीकरण देणारे ट्विट दिसते.\nपेट्रोल किंवा डिझेल स्वत:हून पेट घेऊ लागतात किंवा त्यांचे रुपांपर गॅसमध्ये होऊन बाष्पीभवन सुरू होते त्यावेळी किमान तापमान अनुक्रमे २४६ अंश सेल्सियस आणि २१० अंश सेल्सियस इतके असावे लागते. आता देशभरातील कोणत्याही ठिकाणी इतके तापमान नाही. त्यामुळे टॅंकमध्ये आग लागणे, स्फोट होणे असले दावे असत्य आहेत.\nहे पोस्टर व्हायरल होत आहे\nगाडीतील इंधन टाकीत प्रेशर सेंसर असते. हा सेंसर इव्हापोरेटिव इमिसन सिस्टीमचा (EVAP) भाग असतो. यामुळे इंधनाची टाकीत दबाव आणि बाष्पीकरण, लीकेज होणे आदीसारख्या समस्या उद्भवल्यास त्याची माहिती समजते.\nइंडियन ऑइलने अशी कोणतीही सूचना जारी केली नाही. उन्हाळ्यात इंधनाची टाकी पूर्ण भरल्यास स्फोट होऊ शकतो ही सूचना वजा इशाऱ्याचा मेसेज फेक आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nFake Alert: २०१३ च्या फोटोला आता कृषि विधेयकाशी जोडून क...\nfake alert: मुस्लिम महिलांबद्दल सीएम योगी यांनी हे वादग...\nfake alert: उर्मिला मातोंडकरावरील अमूलचे २५ वर्ष जुने क...\nFAKE ALERT: जम्मूमध्ये एका-एका रोहिंग्या दाम्पत्याला १०...\nfake alert: CM शिवराज यांच्या रॅलीत कमलनाथ यांच्या समर्...\nFact Check: हेमा मालिनी खरंच हेलिकॉप्टरमधून गव्हाच्या शेतात आल्या का\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nविज्ञान-तंत्रज्ञानसॅमसंगने आणले AI पॉवर्ड वॉशिंग मशीन, मोबाइलने करा कंट्रोल\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nकार-बाइकदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nकरिअर न्यूजविद्यापीठाच्या ATKT परीक्षेला तांत्रिक अडचणीचा फटका\nमुंबईकरोना: रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यापूर्वी कुटुंबीयांची संमती बंधनकारक\nमुंबईअनलॉकसाठी आहे 'ही' त्रिसुत्री; CM ठाकरेंनी सांगितले पुढचे धोके\nसिनेन्यूजमाझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा\nकोल्हापूरपोटच्या १० वर्षांच्या मुलाला ५ लाखात तृतीयपंथीयास दिले दत्तक\nपुणेकृषी विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार का; अजित पवार म्हणाले...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2532?page=3", "date_download": "2020-09-26T01:28:35Z", "digest": "sha1:JQJUULRYODI3AHS45KWA2RBQTLTFHW27", "length": 14689, "nlines": 212, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रकाशचित्रण : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /प्रकाशचित्रण\nनॉर्थ इस्ट सोलो भटकंती\nएकेकाची नावं डोक्यात येतायत, पण सारी लिहू कशी\nनॉर्थ इस्ट इंडिया सोलो प्रवास\n\"आशा नाम मनुष्याणाम काचिद् आश्चर्य शृंखला,\nयया बद्धा प्रधावन्ति मुक्तास्तीष्ठाती पंगुवत\"\nएखाद स्वप्नं बघणं, त्या स्वप्नासाठी झुरण, तळमळण, आणि ते स्वप्नं कधी ना कधी पूर्ण होईल या एका आशेवर वेड्या सारख त्या गोष्टीच्या मागे लागण, त्या साठी धडपडण, आणि शेवटी त्या गोष्टीला यश मिळण, अत्यंत सुखदायक असतं. लहानपणापासून आयुष्याच्या या प्रवासात कोणती ना कोणती गोष्ट असामान्य घडत गेली किंवा घडवली गेली. आणि या सगळ्यातूनच आपल्यातल असामान्य व्यक्तिमत्त्व विकसित होत असतं अस मला वाटतं.\nदिगंतराचे प्रवासी... (रोजनिशी २०२०)\nRead more about दिगंतराचे प्रवासी... (रोजनिशी २०२०)\nहैराँ हूं मेरे दिल में समाए हो किस तरह...\nमला पहाटे चार वाजता उठायची सवय असली तरी कामाला मात्र मी दहा-साडेदहापर्यंत हात लावत नाही. पण परवा सासवडला अत्यंत निकडीचे काम निघाले आणि दहा वाजेपर्यंत पुण्यातही असणे गरजेचे होते. त्यामुळे कधी नव्हे तो माझा पहाटेचा नियम बाजूला ठेवून मला सहा वाजता घर सोडने भाग होते. इतक्या लवकर निघण्याचा हेतू हा होता की सासवड परिसर पक्षिनिरीक्षकांचा आवडता भाग आहे, कदाचित आपल्यालाही काही फोटो मिळतील व अकरापर्यंत पुण्यात येता येईल. रात्री गुगल काढून शोध घेतला आणि एवढ्याशा सासवडमधे कुठे कुठे जायचे याची यादी वाढतच चालली. सासवडजवळील काही भागात रॅप्टर्स पहायला मिळतात. गरुड, ससाणे वगैरे.\nRead more about हैराँ हूं मेरे दिल में समाए हो किस तरह...\nमी : मम्मी मला पेट हवं\nमी : आई आता तर माझी बारावी पण झाली..\nआता तरी एक पेट घेऊया ना ग..\nआई : काही गरज नाही..\nस्वतःच्या पायावर उभी रहा आणि मग घे..\nअशा प्रकारे कितीवेळा तरी पेट साठी आईकडून नकारघंटा मिळाल्यानंतर माझ्या आयुष्यात ती आली..\nमार्च मध्ये तिने पहिल्यांदा घरात पाऊल ठेवलं..\nआणि पेट पाळण्याचं स्वप्न चांगलच पूर्ण झालं.\nRead more about मांजरप्रेमी\nपक्ष्यांच्या वर्गिकरणाविषयी थोडी माहिती\nवाढ आणि रचना ह्यांमधील मूलभूत फरकावर आधारित अशा २७ गणांमधे (Order) पक्षीवर्गाचे वर्गीकरण केले जाते. उदा. कुलिंग गणातील पक्षी (Order Passeriformes) म्हणजे झाडावर राहणारे पक्षी, आणि हेच पक्षी आपल्या जास्त परिचयाचे असण्याचा संभव असतो. पाण्याजवळ आपले जीवन व्यतीत करणारे बगळ्यासारखे पक्षी बक गणात (Order Ciconiiformes) अंतर्भूत होतात तर बदके, हंस ह्यांसारख्या पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांचा वर्ग म्हणजे हंस गण (Order Anseriformes)\nRead more about दिगंतराचे प्रवासी...\nचक्राताचे संस्मरणीय अनुभव- भाग १\nगेली दोन वर्षे मी आजूबाजूचे पक्षी उत्सुकतेने बघायला लागले आहे. पक्ष्यांचे फोटो काढायलाही मला आवडतात. पण एक रंगनथिट्टू सोडलं तर खास पक्षीनिरीक्षणासाठी असं कुठे लांबवर जायला जमलं नव्हतं. मायबोलीवर साक्षीने लिहिलेलं चक्राताचं प्रवासवर्णन मला खूप आवडलं होतं. तोपर्यंत मी चक्राता हे नावही ऐकलं नव्हतं. पण साक्षीचे लेख वाचून चक्राताला जावंसं तीव्रतेने वाटायला लागलं. त्यामुळे किकांच्या ऑक्टोबरमधल्या चक्राता कॅम्पबद्दल समजताच, काहीतरी करून हे जमवूयाच असं ठरवलं. माझ्या एका आतेबहिणीचंही माझ्याबरोबर यायचं ठरलं.\nRead more about चक्राताचे संस्मरणीय अनुभव- भाग १\nथरार - पेंच व्याघ्र अभयारण्य\nगेले वर्षभर पेंच अभयारण्यातल्या वाघांचे फोटो सोशल मिडियावर रोज कोण ना कोण पोस्ट करतच होते. ते बघून मे महिन्यात पेंच वारी करायचीच हा निश्चय झाला होता. फेब्रुवारीमध्येच सफारी आणि हॉटेल बुकिंग करुन ठेवलं. लगेचच मुंबई-नागपूर-मुंबई प्रवासाचंही बुकिंग केलं.\nRead more about थरार - पेंच व्याघ्र अभयारण्य\nअलीकडेच कोकणात मालवण तारकर्ली परिसरात फिरून आलो, कोकण म्हणजे भारावून टाकणारा\nआणि खोलवर आठवणी देणारा अनुभव आहे. त्यातले हे काही आठवणीचे तुकडे\nRead more about मालवण-तारकर्ली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/india-news/veterinary-doctor-swallows-rs-2000-note-to-foil-acb-trap/articleshow/63343046.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-26T03:24:18Z", "digest": "sha1:OX2IUWIZKOP3EEDLMFDB2VVIPGTSS5IE", "length": 12207, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलाचखोर डॉक्टराने गिळली दोन हजाराची नोट\nलाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची कुणकूण लागताच एका पशुवैद्यकीय डॉक्टरने दोन हजार रुपयांची नोट गिळल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. दोन हजाराची नोट गिळणाऱ्या या डॉक्टरला दवाखान्यात नेण्यात आले असून ही नोट मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nअहमदाबाद : लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची कुणकूण लागताच एका पशुवैद्यकीय डॉक्टरने दोन हजार रुपयांची नोट गिळल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. दोन हजाराची नोट गिळणाऱ्या या डॉक्टरला दवाखान्यात नेण्यात आले असून ही नोट मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nपाटण येथील एका पशुवैद्यकीय डॉक्टरने एका व्यक्तीकडे दोन हजाराची लाच मागितली होती. या व्यक्तीने त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) माहिती दिली. त्यानुसार एसीबीने शुक्रवारी सापळा रचला. संबंधित व्यक्तीने या डॉक्टरला लाच म्हणून दोन हजार रुपये दिले आणि तिथून निघून गेला. मात्र यात काही तरी काळंबेरं असावं असा संशय या डॉक्टरला आला आणि एसीबीचे अधिकारी येण्याआधीच त्याने ही दोन हजाराची नोट गिळून टाकली.\nदरम्यान, एसीबीने त्याला ताब्यात घेतले असून रुग्णालयात दाखल केले आहे. 'भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लाच म्हणून दिलेली रक्कम अत्यंत महत्त्वाची असते. कारण आरोपी लाच म्हणून ज्या नोटा घेतो, त्याचा नंबर आमच्याकडे आधीच नोंदलेला असतो. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी आरोपी नेहमीच खटपट करतात. त्यामुळे हे काही पहिलेच उदाहरण नाही, मात्र ही घटना अनोखी आहे,' असं एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nसंरक्षणमंत्र्यांच्या इराण दौऱ्यानंतर गाडी पुन्हा रुळावर...\nदेशात फूट पाडण्याचा प्रयत्न: राहुल गांधी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nLive: राज्यात आतापर्यंत ९ लाख ९२ हजार रुग्ण करोनामुक्त\nमुंबईअनलॉकसाठी आहे 'ही' त्रिसुत्री; CM ठाकरेंनी सांगितले पुढचे धोके\nनागपूरशहीद पित्याच्या शौर्याला मुलींचा अनोखा सलाम\nपुणेकृषी विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार का; अजित पवार म्हणाले...\nआयपीएल २०२०Chennai vs Delhi: दिल्लीने गड राखला, बलाढ्य चेन्नईवर साकारला विजय\nनाशिकराज्यात रुग्ण वाढत असताना नाशिकनं दिली दिलासादायक बातमी\nमुंबईड्रग्ज प्रकरण: NCB चे अधिकारी तुरुंगात जाऊन शौविकचा जबाब घेणार\nपुणेडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ही' मागणी\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nविज्ञान-तंत्रज्ञानसॅमसंगने आणले AI पॉवर्ड वॉशिंग मशीन, मोबाइलने करा कंट्रोल\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/bananabalancefertilizers", "date_download": "2020-09-26T01:18:54Z", "digest": "sha1:NUTJ22Z3W66V6K22AEYYAJO6YGKVSTKP", "length": 18013, "nlines": 192, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "संतुलित खत मात्रेची क्लिष्टता – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nसंतुलित खत मात्रेची क्लिष्टता\nपिकाचे संतुलित पोषण करावे असे नेहमी म्हटले जाते पण \"याचा नेमका अर्थ काय\" हे शेतकरी बांधवांना ठावूक नसते. अशा अवस्थेत ते \"जो जे सांगेल ते व तो जे म्हणेल त्या प्रमाणात\" पिकास देतात. यातून संतुलित पोषण होते कि नाही याचा कुणीही विचार करीत नाही. अर्थात यातून खर्च तर नक्की वाढतोच\nआपल्या देशात विचित्र तज्ञांची देखील काही कमी नाही कुणी सांगते शेतात यज्ञ करा, कुणी म्हणते फक्त शेणखत वापरा कुणी सांगते शेतात यज्ञ करा, कुणी म्हणते फक्त शेणखत वापरा खर्चच करायचा नाही, शेती नैसर्गिक पद्धतीने करायची असे सांगणारे आहेत खर्चच करायचा नाही, शेती नैसर्गिक पद्धतीने करायची असे सांगणारे आहेत खता ऐवजी मीठ टाकायला सांगणारे महाभाग देखील आहेत खता ऐवजी मीठ टाकायला सांगणारे महाभाग देखील आहेत अशा तज्ञापासून आपण सावध असायला हवे.\nमित्रहो \"संतुलित पोषण\" हि काही मोघम संकल्पना नाही. नत्र, स्पुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक/सल्फर, लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरान व मोलाब्द हि पिक पोषणासाठी आवश्यक मूलद्रव्ये आहेत. हि पोषक तत्वे विविध पदार्थाच्या रुपात पिकास प्राप्त होतात. हि सर्व तत्वे सारख्या प्रमाणात लागत नाहीत. यांच्या गरजेच्या मात्रा प्रमुख्याने तीन प्रकारात मोडतात.\nप्रार्थमिक, द्वितीय व सूक्ष्म\nप्रार्थमिक प्रकारात नत्र, स्पुरद व पालाश यांचा समावेश होतो व हे मोठ्या प्रमाणात लागतात.\nद्वितीय प्रकारात कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक/सल्फर यांचा समावेश होतो व हे थोड्या प्रमाणात लागतात तर\nसूक्ष्म या प्रकारात लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरान व मोलाब्द यांचा अंतर्भाव होतो व ते अतिशय कमी प्रमाणात लागतात. भाजीत मीठ किती लागते तशी यांची गरज असते.\nजरी काही घटक जास्त, काही मध्यम व काही सूक्ष्म प्रमाणात लागत असली तरी यापैकी एकाचीहि कमतरता झाली तर पिकाचे कुपोषण होऊन उत्पादनात मोठी कमी येवू शकते. या उलट जर आपण एखादा घटक गरजेपेक्षा जास्त पुरवला तर त्याचे दुष्परिणाम होऊनहि उत्पादनात मोठी घट येवू शकते. उदाहरण द्याचे झाले तर लोहाच्या कमतरते मुळे पाने पिवळी पडतात. अशा वेळी नत्र कमी झाला आहे असा विचार करून आपण नत्र दिले तर रससोषक किडीचे प्रमाण वाढू शकते\nएकूणच पिक पोषण हे वाटते तितके सोपे व अनाकलनीय असावे इतके कठीण नाही. कोणत्याहि पिकासाठी खत मात्रा ठरवते वेळी अनेक घटकांचा विचार करावा लागतो. जसे मृदेचा प्रकार, स्थिती, पूर्वीचे पिक, सद्य पिकाची जात, वाढीची स्थिती, वातावरणातील बदल.\nकोणताही एक पोषण घटक नेमका कुठल्या स्वरुपात दिल्याने फायदा होईल याचा देखील विचार करणे आवश्यक असते. जसे \"नत्र\" हा घटक \"अमोनिकल\", \"नायट्रेट\" व \"सेंद्रिय\" या तीन स्वरुपात देणे शक्य आहे. युरीयातील नत्र हे \"अमोनिकल\" स्वरूपातील असते. \"अमोनियम नायट्रेट\" मध्ये ते दोन स्वरुपात उपलब्ध असते. अमिनो-एसिड मधील नत्र सेंद्रिय स्वरुपात असते मुळातून लागू होण्यासाठी त्याला प्रथम अमोनिकल स्वरुपात यावे लागते व नंतर नायट्रेट स्वरुपात आले कि ते पिकास प्राप्त होऊ शकते आपल्या पिकातील वाफसा स्थिती, पिकाची स्थिती, पावसाचा अंदाज यावरून कोणत्या स्वरूपातील नत्र द्यावे व किती याचा विचार करावा लागतो.\nमित्रहो, वरील माहितीवरून हे अगदी स्पष्ट आहे कि याविषयी आपण सखोल माहिती मिळवायला हवी. पाटील बायोटेक हि माहिती छोट्या छोट्या लेखांच्या स्वरुपात पोहोचवणार आहे. त्यासाठी आपण आमची वेबसाईट चाळू शकता. काही प्रश्न असतील तर कॉमेंट मध्ये विचारू शकता. संतुलित खत मात्रेची क्लिष्टता कमी करण्यासाठी काय करावे हे सांगू पुढील भागात.\nआमचे नियमित प्रसारित होणारे लेख वाचता यावेत म्हणून आमच फेसबुक पेज लाईक करा.\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमित्रहो हरभरा हे पिक डाळवर्गीय पिकातील सर्वाधिक परवडणारे व चविष्ट असे...\nसूर्यफुलाचे वाण व वैशिष्ट्ये\nसूर्यफुलाचे पिक तीनही हंगामात घेता येते. सर्वसाधारणपणे जुलैच्या पूर्वाधात, ऑक्टोबर...\n\"कांद्याने सरकारे हलवली आहेत\" हे एक वाक्य या पिकाचे महत्व...\nएसिफेटचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्यापूर्वी नक्की वाचा\nकीटकनाशकांचा वापर करते वेळी अपुऱ्या ज्ञानामुळे आर्थिक, मानसिक व शारीरिक...\nपूर्वीच्या हंगामात तुमच्या परिसरात नागअळी (लीफमायनर) चा त्रास होता का\nजर आपल्या परिसरात मागील हंगामात नागअळीचा प्रादुर्भाव होता तर मग...\nपिकाचे संतुलित पोषण म्हणजे काय\nपिकाचे संतुलित पोषण करावे असे तज्ञ मंडळी नियमितपणे सांगत असतात...\nटोमाटोतील विनाशकारी नागअळी आणि नियंत्रण\nटोमाटोतील नागअळी (टूटा एब्सोल्युटा) अतिशय नुकसानकारक कीड आहे. हि कीड वांगी,...\nहायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा निर्मिती\nप्रत्येक चांगला शेतकरी पशुपालन करतोच कारण दुध उत्पादन हा एक उत्कृष्ठ जोडधंदा आहे....\nद्वितीय खतांसाठी आपण पाटील बायोटेक ची अमृत प्लस कीट वापरावी. त्याव्यतिरिक्त मृदेच्या व पिकाच्या गरजे नुसार आपण ह्युमॅग, कॅलनेट व रिलीजर यांचा समावेश करावा.\nसूक्ष्मअन्नद्रव्य देण्यासाठी मृदेची तयारी करते वेळी मायक्रोडील ग्रेड १ हे खते एकरी १० किलो द्यावे व पिक वाढीत असतांना गरजेनुसार मायक्रोडील सुपर मिक्स या खताची ०.५ ग्राम प्रती लिटर दराने फवारणी करावी. अधिक महितीसाठी फोनवर संपर्क करावा ९७६४३३६३३३ . व्हाटसअप वर चाटिंगसाठी ९४२२६००६४६ वर संपर्क करावा.\nमला द्वितीय व सूक्ष्म खते पाहिजे. कोणतं घेऊ, ते सुचवा.\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://spsnews.in/2017/05/18/dnyaneshvr/", "date_download": "2020-09-26T02:06:51Z", "digest": "sha1:MMONWCQYNLV5BPO6B27BFHFXQJ3DN54G", "length": 6609, "nlines": 87, "source_domain": "spsnews.in", "title": "१९ ते २५ मे सदगुरु बाळूमामा ट्रस्ट शिवारे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n१९ ते २५ मे सदगुरु बाळूमामा ट्रस्ट शिवारे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा\nबांबवडे ( प्रतिनिधी ): सद् गुरु बाळूमामा ट्रस्ट शिवारे-वारणा कपाशी तालुका शाहुवाडी जि.कोल्हापूर इथं दि.१९ मे ते २५ मे २०१७ पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे सामुदायिक पारायण व अखंड हरीनाम साप्ताह सोहळा संपन्न होणार आहे. तरी परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.\nया सोहळ्य निमित्त १९ मे रोजी सायंकाळी ६ ते ७ किटे महाराज, २० मे ला गणपती परीट महाराज तळपवाडी , २१ मे हणमंत महाराज कोतोली, २२ मे अंकुश महाराज शिरगाव ,२३ मे तुळशीदास महाराज शिंपे , २४ व २५ मे गणपती परीट महाराज तळपवाडी, यांचे प्रवचन व कीर्तन होणार आहे. तसेच ज्यांना पारायणा करिता संत पंगत, तसेच नाष्टा द्यावयाचा असेल त्यांनी संयोजकांशी संपर्क साधावा,असे आवाहनही संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.\n← मराठी भाषा सक्तीची करा – साहित्य महामंडळाचे अध्यक्ष\nबौद्ध विकास मंडळ मुंबई, परखंदळे चा २० व २१ मे रोजी जयंती सोहळा →\n…’ दादांचा ‘ दरारा म्हणजे ” शब्द ” : मा. श्री. मानसिंगराव गायकवाड यांचा वाढदिवस\nकोल्हापूर च्या शिवाजी पुलावरून मिनी बस नदीत कोसळून भीषण अपघात : १३ जणांचा मृत्यू\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/thinking-of-getting-a-personal-loan-find-out-which-bank-is-paying-the-loan-at-how-much-interest-127620578.html", "date_download": "2020-09-26T02:32:40Z", "digest": "sha1:FEI6VESWWTVOPOINBQCESJHJYUVEDFFI", "length": 4696, "nlines": 69, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Thinking of getting a personal loan? Find out which bank is paying the loan at how much interest | पर्सनल लोन घेण्याच्या विचारात आहात ? जाणून घ्या कोणती बँक किती व्याज दराने देत आहे कर्ज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबँकेतून कर्ज घेताना लक्षात ठेवा या गोष्टी:पर्सनल लोन घेण्याच्या विचारात आहात जाणून घ्या कोणती बँक किती व्याज दराने देत आहे कर्ज\nकोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी अनेकजण पर्सनल लोन घेत आहेत. जर तुम्ही पर्सनल लोन घेण्याच्या विचारात असाल, तर मग जाणून घ्या कोणती बँक किती व्याजाने पैसे देत आहे. कर्जाची रक्कम तुमची कमाई, कर्ज, री-पेमेंट क्षमता यांसारख्या बाबींवर अवलंबून आहे.\nहे आहेत पर्सनल लोनचे व्याज दर\nबँक व्याज दर (%) ईएमआय (रु.) प्रोसेसिंग फी (टॅक्ससह)\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया 8.35-10.20 2044-2135 500 रुपयेपर्यंत+टॅक्स\nकॅनरा बँक 8.50-13.90 2052-2322 कर्ज रकमेच्या 1 टक्के +GST\nपंजाब नॅशनल बँक 8.60-11.65 2066-2207 कर्ज रकमेच्या 1 टक्के+GST\nआयडीबीआई बैंक 8.90-13.59 2071-2306 कर्ज रकमेच्या 1 टक्के+टॅक्स\nइंडियन बँक 9.20-13.65 2086-2309 निश्चित नाही\nयूनियन बँक ऑफ इंडिया 9.30-13.40 2090-2296 कर्ज रकमेच्या 0.50 टक्के+GST\nइंडियन ओवरसीज बँक 9.60-12.05 2105-2227 कर्ज रकमेच्या 0.75 टक्के\nस्टेट बँक ऑफ इंडिया 9.60-15.65 2105-2413 कर्ज रकमेच्या 1 टक्के\nबँक ऑफ बड़ौदा 10.10-15.10 2130-2384 कर्ज रकमेच्या 2 टक्के\nबँक ऑफ इंडिया 10.35-12.35 2142-2242 कर्ज रकमेच्या 2 टक्के\nयूको बँक 10.50-10.75 2149-2162 कर्ज रकमेच्या 1 टक्के+GST\nनोट: लोन अमाउंट- 1 लाख रुपये, कालावधी- 5 वर्षे\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/chinas-tech-company-is-monitoring-over-1400-indian-businesses-including-wipro-to-reliance-127720947.html", "date_download": "2020-09-26T02:48:04Z", "digest": "sha1:FXHXTXMITJCRFKKSTOZ5MPMY32TRQFT7", "length": 8579, "nlines": 85, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "China's Tech Company Is Monitoring Over 1400 Indian Businesses Including Wipro To Reliance | मुकेश अंबानी आणि अझीम प्रेमजी यांच्या कंपन्यांपासून बिन्नी बन्सलपर्यंत उद्योजकांची हेरगिरी, चिनी सरकारशी संबंधित कंपनी ठेवतीये नजर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारतीय अर्थव्यवस्थेवर चीनची पाळत:मुकेश अंबानी आणि अझीम प्रेमजी यांच्या कंपन्यांपासून बिन्नी बन्सलपर्यंत उद्योजकांची हेरगिरी, चिनी सरकारशी संबंधित कंपनी ठेवतीये नजर\nचीनच्या झेन्हुआ माहिती तंत्रज्ञानाच्या डेटाबेसमध्ये भारतीय कंपन्यांशी संबंधित 1400 नोंदी आढळल्या\nपंतप्रधान मोदींसह 10 हजार भारतीयांवर नजर ठेवली जात असल्याचे एका दिवसापूर्वीच उघड झाले\nसीमेवर धोका देणारा चीन भारताच्या अर्थव्यवस्थेवर देखील पाळत ठेवत आहे. चीन सरकारशी संबंधित झेन्हुआ डेटा माहिती तंत्रज्ञान कंपनी भारताच्या टेक स्टॅम्पपासून पेमेंट्स आणि हेल्थकेअर अ‍ॅप्सपर्यंत, छोट्या ते मोठ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवून आहे.\nझेन्हुआ डेटाबेसमध्ये अशा प्रकारच्या 1400 नोंदी आढळल्या आहेत. ज्यामध्ये अजीम प्रेमजींच्या कंपनीपासून मुकेश अंबानी पर्यंतच्या कंपन्या समाविष्ट आहेत. फ्लिपकार्टचे को-फाउंडर बिन्नी बंसल यांच्यवरही पाळत ठेवली जात आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने आपल्या तपासणीच्या दुसऱ्या भागात हा खुलासा केला आहे.\nया मोठ्या लोकांची ट्रॅकिंग केली जात आहे\nटीके कुरियन, मुख्य गुंतवणूक अधिकारी, प्रेमजी इन्व्हेस्टमेंट\nअनिश शाह, महिंद्रा ग्रुपचे ग्रुप सीएफओ\nपीके एक्स थॉमस, सीटीओ, रिलायन्स ब्रँड\nब्रायन बेड, सीईओ, रिलायन्स रिटेल\nइन्व्हेस्टिगेशन पार्ट -२ च्या मते, रेल्वेमध्ये इंटर्नशिप करणार्‍या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या कंपन्यांच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी झेन्हुआच्या नजरेत आहेत. या यादीमध्ये उद्यम भांडवलदार, देवदूत गुंतवणूकदार, देशातील उदयोन्मुख स्टार्टअप्स, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी यांचा देखील समावेश आहे.\nनवीन काळातील उद्योजकांवरही नजर\nबिन्नी बंसल, फ्लिपकार्टचे को-फाउंडर\nदीपेंदर गोयल, झोमॅटोचे फाउंडर\nनंदन रेड्डी, स्विग्गीचे को-फाउंडर\nफाल्गुनी नायर, न्याकाची को-फाउंडर\nनमीत पोन्टिस, पेयूचे बिजनेस हेड\nडिजिटल आरोग्य आणि डिजिटल शिक्षण क्षेत्राचे अधिक निरीक्षण\nनोटाबंदीनंतर मोदी सरकार डिजिटल पेमेंट्स वाढवण्यावर सातत्याने भर देत आहे. परंतु, चिनी कंपनी केवळ डिजिटल पेमेंट अ‍ॅप्सच नव्हे तर डिजिटल आरोग्य आणि डिजिटल शिक्षण क्षेत्राला ट्रॅक करत आहे. शैक्षणिक क्षेत्रात ओलिव्ह बोर्डपासून बायजू अॅपपर्यंत लक्ष ठेवले जात आहे\nया पेमेंट, डिलिव्हरी अॅप्सची देखील ट्रॅकिंग\nझोमॅटो, स्विग्गी, फूड पांडा\nमोदींसह 10 हजार मोठ्या लोकांची आणि संस्थांची हेरगिरी\nझेन्हुआ माहिती तंत्रज्ञान कंपनी 10 भारतीय लोक आणि संस्थांवर पाळत ठेवत असल्याचा खुलासा सोमवारी झाला होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचा परिवार, अनेक कॅबिनेट मंत्री आणि उद्धव ठाकरेंसह अनेक मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/buldhana-pwd-bharti-result-selection-list/", "date_download": "2020-09-26T03:45:56Z", "digest": "sha1:LOCBLDDKGYJ7GBECDDGCKANEGTDPZJBE", "length": 5580, "nlines": 88, "source_domain": "mahabharti.in", "title": "Buldhana PWD Bharti Result Selection List - Check Here", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nबुलढाणा PWD भरती निकाल पात्र आणि अपात्रता यादी\nबुलढाणा PWD भरती निकाल पात्र आणि अपात्रता यादी\nसार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा नि शिपाई पदभरती परीक्षेचा निकाल जाहीर केलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nसर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७४\nUT प्रशासन दमण आणि दीव येथे विविध पदांची भरती\nमुंबई उपनगर जिल्हा येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची भरती\nICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाची भरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, दिव अंतर्गत विविध पदांची भरती\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांच्या 171 जागांसाठी ऑनलाईन अर्ज…\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती\nRITES लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदांची भरती\nजेईई अॅडव्हान्स्ड: ९८ टक्के विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा केंद्र\nनॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mpcnews.in/dehuroad-13-positive-patients-within-the-cantonment-area-two-deaths-171290/", "date_download": "2020-09-26T01:58:37Z", "digest": "sha1:HZOUHVGPJRIUJJQ6TP4NKZAGRG546QNW", "length": 7483, "nlines": 81, "source_domain": "mpcnews.in", "title": "Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत 13 पॉझिटिव्ह रुग्ण; दोन मृत्यू", "raw_content": "\nDehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत 13 पॉझिटिव्ह रुग्ण; दोन मृत्यू\nDehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत 13 पॉझिटिव्ह रुग्ण; दोन मृत्यू\nआजपर्यंत हद्दीत एकूण 397 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले. 13 positive patients within the cantonment area ; Two deaths\nएमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील थॉमस कॉलनी, बरलोटा नगर, गांधीनगर, एल्लोरा कॉम्प्लेक्स, शितला नगर नं 2, झेंडे मळा, आंबेडकरनगर, शेलारवाडी या परिसरात आज, सोमवारी एका दिवसात 13 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, कोरोनामुळे दोन जेष्ठांचा आज मृत्यू झाला.\nआजपर्यंत हद्दीत एकूण 397 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस दिला आहे.\nत्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 13 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. रुग्णवाढीचे प्रमाण झोपडपट्टी परिसरासह गावठाण भागात वाढत आहे.\nत्याचबरोबर गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही रुग्ण आढळून येत असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.\nआजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 397 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 51 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.\n137 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nमहात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 48 रुग्ण उपचार घेत आहे. लक्ष्मी पुरम येथील 78 वर्षीय पुरुष आणि शगुन बिल्डिंग येथील 80 वर्षीय महिला अशा दोघं कोरोनाबाधितांचा आज मृत्यू झाला.\nत्यामुळे हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 13 झाली आहे.\nदरम्यान, 15 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. तर आजपर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 148 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी सांगितले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nDehuroad : साखर बनविण्याच्या मशीनचे पार्ट आणि साहित्य कंपनीतून चोरीला\nPune: आयुष्यात आलेल्या अडचणी स्वतःवर काम करण्यासाठी एक उत्तम संधी असते- शंतनु जोशी\nIPL 2020 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्ली कॅपिटल्सची चेन्नईवर 44 धावांनी मात\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 7 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची नोंद\nPune News : टाटा मोटर्सने बनविलेल्या 51 विंगर रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nPimpri news: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 9 ऑक्टोबरला निवडणूक\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 164 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 87 नवीन रुग्ण\nPune News : लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदी रद्द करा ; भारतीय मजदूर संघांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/government-guidelines-for-parlours-and-hairdressers-zws-70-2203477/", "date_download": "2020-09-26T03:25:58Z", "digest": "sha1:XA6535F6BXPRA7JFBUZTUUMAINVXEZBX", "length": 12089, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "government guidelines for parlours and Hairdressers zws 70 | पार्लर, केशकर्तनालयांसाठी शासकीय नियमावली | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nपार्लर, केशकर्तनालयांसाठी शासकीय नियमावली\nपार्लर, केशकर्तनालयांसाठी शासकीय नियमावली\nवेळ घेऊनच प्रवेश देण्याचे बंधन\nवेळ घेऊनच प्रवेश देण्याचे बंधन\nमुंबई : राज्य सरकारने सलून आणि पार्लर सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर तीन दिवसांनी मुंबई महापालिके ने शहरासाठीची नियमावली जाहीर करत प्रत्येक ग्राहकाला यापुढे वेळ घेऊनच प्रवेश देण्याचे बंधन घातले आहे. तसेच संपूर्णत: बंदिस्त आणि वातानुकूलित अशी व्यवस्था पार्लर आणि सलूनमध्ये असू नये असेही यात म्हटले आहे.\nमहापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच सुधारीत नियमावली जाहीर केली आहे. त्यात पार्लर, सलूनधारकांनी कोणकोणती काळजी घ्यावी, कसे सामाजिक अंतर राखावे, ग्राहकांना कोणत्या सेवा द्याव्यात याविषयी सूचना केल्या आहेत. पार्लर, सलून सुरू होऊन तीन दिवस झाले आहेत. व्यावसायिकांनी राज्य सरकारचे नियम पाळून सेवा सुरू केल्या आहेत. त्यानंतर आता पालिकेने आपली नियमावली जाहीर केली आहे.\n’ केश कर्तनालये, ब्यूटी पार्लर इत्यादी ठिकाणी पूर्व निर्धारित वेळ घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देता येईल.\n’ या प्रकारच्या सर्व आस्थापनांमध्ये हवा खेळती राहील अशा प्रकारची व्यवस्था असणे बंधनकारक आहे. फक्त वातानुकूलन यंत्रणा असलेले बंदीस्त ठिकाण नसावे.\n’ केवळ केस कापणे, केसांना रंग लावणे, वॅक्सींग, थ्रेडींग इत्यादी बाबींनाच परवानगी असेल. तसेच त्वचेशी संबंधित कोणत्याही सेवेस परवानगी देण्यात आलेली नाही. याबद्दलची माहिती आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे लावणे बंधनकारक आहे.\n’ कर्मचाऱ्यांनी हातमोजे, अ‍ॅप्रन, मुखपट्टी वापरणे बंधनकारक आहे.\n’ प्रत्येक व्यक्तीला सेवा दिल्यानंतर खुर्ची / ठिकाण हे प्रत्येक सेवेनंतर निर्जंतुक करावे. तसेच दुकानातील फरशी / जमीन या बाबी दर दोन तासांनी निर्जंतुक करणेही बंधनकारक आहे.\n’ प्रत्येक ग्राहकासाठी एकदा वापरून टाकून देता येईल असे स्वतंत्र रुमाल वापरणे आवश्यक आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 लांबपल्ल्याच्या गाडय़ा सुरू करा\n2 विकृती, समाजमाध्यमांवरील के विलवाण्या स्पर्धेतून अफवांचे पीक\n3 परवाना शुल्काबाबत हॉटेलमालकांना मुभा देणार का\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/shiv-sena-bjp-no-alliance-no-discussion-1046443/", "date_download": "2020-09-26T02:55:39Z", "digest": "sha1:QTCARCKUQEWXDSTBK7VBA7A3P6JJT2U6", "length": 15941, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सेना-भाजपमधील चर्चा थांबली | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nशिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी फारसे उत्सुक नसलेल्या भाजपने चर्चा तूर्तास थांबविली असून, शिवसेना विरोधी पक्षातच राहणार आहे.\nशिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी फारसे उत्सुक नसलेल्या भाजपने चर्चा तूर्तास थांबविली असून, शिवसेना विरोधी पक्षातच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पािठबा घेऊन अल्पमतातील सरकार चालविण्याचे भाजपने ठरविले आहे. त्याचबरोबर शिवसेनेसह अन्य पक्षांचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असून त्यांनी राजीनामे देऊन पक्षात प्रवेश केला आणि पोटनिवडणुकांमध्ये भाजपच्या तिकिटावर ते विजयी झाले, तर सरकार स्थिर होईल, हा पर्यायही अजमावून पाहण्याचा भाजप विचार करीत आहे.\nशिवसेनेने उपमुख्यमंत्रिपद, गृह खात्यासह १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात भाजपकडे असलेली खाती मागितली आहेत. उपमुख्यमंत्रिपद आणि गृह खात्यावर तडजोड केली तर महसूलसारखी महत्त्वाची खाती शिवसेनेला हवी आहेत. तर शिवसेनेच्या अटींवर सरकारमध्ये सहभागी करून न घेण्याचे भाजपने ठरविले आहे. शिवसेनेच्या मागण्या लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री व भाजप नेते धर्मेद्र प्रधान यांनी अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली आणि शिवसेनेशी पुढील चर्चा न करता मुंबईतून ते रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार होते, पण त्यांनी ते टाळले. आता शिवसेनेच्या मागण्या मान्य करायच्या की अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पािठबा घ्यायचा, हे भाजपने ठरवावे. शिवसेना विरोधी पक्ष म्हणून काम करीतच असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.\nभाजप शिवसेनेची फसवणूक करीत असून त्यांची शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याची इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस करीत आहेत, पण त्यांनी सहभागाचा कोणताही ठोस प्रस्ताव दिलेला नाही. शिवसेनेच्या विरोधाची धार बोथट करण्यासाठी झुलवत ठेवण्याची व सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी भाजप खेळत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे मानसिक सतुलन बिघडले असून सरकार पाडण्याचे प्रयत्न ते करीत असल्याचा आरोपही कदम यांनी केला आहे.\nशिवसेनेला बरोबर घ्यावेच लागेल, पण..\nशिवसेनेशी चर्चा सुरूच असल्याचा दावा भाजप नेते करीत असून उपमुख्यमंत्रिपद व गृहमंत्रिपदाचा आग्रह त्यांनी सोडला आहे. भाजप देईल त्या खात्यांवर शिवसेना समाधान मानेल, कारण त्यांच्यावरही दबाव असून सत्तेत सहभागी न झाल्यास पक्ष फुटण्याची भीती आहे. भाजपलाही राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिवसेनेला बरोबर घेण्याची इच्छा अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण अजून केंद्रीय नेतृत्वाने कोणती खाती व किती मंत्रिपदे शिवसेनेला द्यायची याचा निर्णय घेतलेला नसल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले.\nस्थानिक स्वराज्य संस्थांमधील युतीचे काय\nशिवसेनेला झुलवीत ठेवण्यासाठी आणि चच्रेत खोडा घालण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युतीचे भवितव्य काय आणि संबंध कसे राहतील, याचे व्यापक धोरण ठरविण्याचा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ही भूमिका मांडली. पण मंत्रिपदे व खात्यांचा निर्णयच भाजपने अजून घेतला नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील युतीचे धोरण आधी ठरविण्यात शिवसेनेला स्वारस्य नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.\nभाजपच्या राजकीय खेळ्यांना शिवसेना बळी पडणार नाही, त्यांनी आधी शिवसेनेच्या अटींनुसार सत्तेत वाटा देत असल्याचे जाहीर करावे, असे शिवसेनेतील नेत्यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 उद्यान लोकार्पणात शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली\n2 राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\n3 दहा वर्षांनंतर झोपु प्राधिकरणाची बैठक\n\"Mr. Gavaskar तुम्हाला वाटत नाही का...\" 'त्या' वक्तव्यावर अनुष्काने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/water-scarcity-in-dombivli-2-615015/", "date_download": "2020-09-26T02:07:36Z", "digest": "sha1:PCALBK2UN5PMJATHE4PF7DQOCW24GAZW", "length": 13133, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डोंबिवलीत टंचाई आणि कोपरमध्ये पाणी वाया | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nडोंबिवलीत टंचाई आणि कोपरमध्ये पाणी वाया\nडोंबिवलीत टंचाई आणि कोपरमध्ये पाणी वाया\nडोंबिवली पश्चिमेतील काही भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असताना, कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळून पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून घेण्यात आलेल्या एका जलवाहिनीच्या सांध्यांवरून\nडोंबिवली पश्चिमेतील काही भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असताना, कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळून पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून घेण्यात आलेल्या एका जलवाहिनीच्या सांध्यांवरून गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात पाणी फुकट जात आहे. अशाच प्रकारचे पाणी कल्याणमधील आधारवाडी जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमधून वाहून जात आहे. कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळून नेण्यात आलेली ही जलवाहिनी अधिकृत आहे की अनधिकृत असे प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहेत. ही जलवाहिनी कोपर, भोपर, आयरे परिसरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत चाळींना पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आल्याची चर्चा या भागात सुरू आहे. घाईने टाकण्यात आलेली ही तीन ते चार इंचाची जलवाहिनी तीन ते चार ठिकाणी फुटली आहे.\nमुख्य जलवाहिनीवरून पाणी सुरू झाले की या जलवाहिनींच्या सांध्यांमधून पाण्याचे उंच फवारे गेल्या काही दिवसांपासून उडत आहेत. मात्र स्थानिक रहिवासी, पालिका अधिकारी या विषयाकडे दुर्लक्ष करीत आहेत. लोकलमधील प्रवासी मात्र ये-जा करताना पालिकेच्या जलवाहिनीवरील या उडत्या कारंज्यांचा लाभ घेत आहेत.\nकोपर पूर्व, आयरे गाव, भोपर गाव परिसरात रेल्वे मार्गाजवळ भूमाफियांनी अनधिकृत चाळी उभारल्या आहेत. या चाळींना पाणीपुरवठा झाल्याशिवाय रहिवासी राहण्यास येत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या मुख्य जलवाहिनींवरून या भागाला पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न भूमाफियांकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे.\nकल्याण पश्चिमेतील आधारवाडी, उंबर्डे भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी २५ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला आहे. या जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या व जलकुंभातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही मोठय़ा जलवाहिन्या फुटलेल्या असल्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी फुकट जात आहे. आधारवाडी परिसराला गेले कित्येक दिवस कमी दाबाने, अनेक भागात पाणीच नाही अशी परिस्थिती आहे. तरीही या जलकुंभातून होणाऱ्या पाण्याच्या नासाडीकडे पालिका अधिकारी लक्ष देत नसल्याने रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nउपनगरी रेल्वे वाहतुकीचा बोऱ्या\nवाचक वार्ताहर : दुर्गाडी किल्ल्याच्या संरक्षक भिंतीची डागडुजी आवश्यक\nठाणे हत्याकांड : हत्याकांडाच्या चित्रीकरणादरम्यान कॅमेरामनचा आकस्मिक मृत्यू\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 आता पोहणे महाग होणार\n2 साक्षीदारांची ‘दृक्श्राव्य’ नोंद अद्याप कागदावरच..\n3 डोंबिवली पश्चिमेत विजेचा लपंडाव\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sureshbhat.in/newtracker?order=type&sort=asc&page=78", "date_download": "2020-09-26T01:28:42Z", "digest": "sha1:Q3LKTB3O7XVV64I4MCXQPFFB7ROEKCJ4", "length": 2563, "nlines": 48, "source_domain": "sureshbhat.in", "title": "नवे लेखन | सुरेशभट.इन", "raw_content": "सोसली मी एकतर्फी येथली नाती...\nती न होती माणसे, जी वाटली माझी\nमुखपृष्ठ » नवे लेखन\nPhoto पोर्ट्रेट ४ विश्वस्त\nPhoto कविवर्य सुशीलकुमार शिंदे, उल्हास पवार ह्यांच्यासोबत हास्यविनोद करताना विश्वस्त\nPhoto कविवर्य सुरेश भट देवकी पंडित ह्यांच्यासोबत बोलताना विश्वस्त\nPhoto धोरण (हझल) विश्वस्त\nPhoto पोर्ट्रेट ७ विश्वस्त\nPhoto पोर्ट्रेट १ विश्वस्त\nPhoto गायक सुरेश वाडकर, कविवर्य सुरेश भट, संगीतकार रवी दाते विश्वस्त\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-drama/in-the-role-of-boy/articleshow/71063052.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-26T02:50:50Z", "digest": "sha1:DFUMP3XBSHGLBJBBXAE2FDD4GZ52C476", "length": 10719, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई टाइम्स टीम 'हिमालयाची सावली' हे १९७२ साली आलेलं नाटक नव्या संचात लवकरच रंगभूमीवर येतंय...\n'हिमालयाची सावली' हे १९७२ साली आलेलं नाटक नव्या संचात लवकरच रंगभूमीवर येतंय. या नाटकामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शांता जोग यांच्या अभिनयानं सजलेली 'बयो' ही व्यक्तिरेखा अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई साकारणार आहे. तिच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे या नाटकात नानासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या या नाटकाच्या जोरदार तालमी सुरू असून महिनाअखेरीस हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येतंय.\nनाटक, मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी शृजानं या भूमिकेचं आव्हान स्वीकारलं आहे. याबद्दल ती सांगते, की 'अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी ही भूमिका खूप आव्हानात्मक आहे. या व्यक्तिरेखेतून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळताहेत. माझ्या वयापेक्षा अधिक वयाची भूमिका असल्यानं त्यासाठी आवश्यक भाव, देहबोली या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ही भूमिका करायची होती. मी स्वतः कोकणातली असल्यामुळे 'बयो'ची भाषा आणि लकबी पकडणं मला काहीसं सोपं होतं.' जयंत घाटे, विघ्नेश जोशी, कपिल रेडकर, ओमकार कर्वे, कृष्णा राजशेखर, प्रकाश साबळे, मकरंद नवघरे, वासंतिका वाळके, पंकज खामकर यांच्या नाटकात भूमिका असून, नाटकाचे दिग्दर्शन राजेश देशपांडेनं केलंय.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nनगर: मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर; रंगकर्मीचा हो...\nLiladhar Kambli 'वात्रट मेले'तले 'पेडणेकर मामा' हरपले; ...\nलॉकडाउनपुरता मर्यादित नाही; ऑनलाइन नाटक हे भविष्य आहे: ...\nअदलाबदलीचा ‘प्रयोग’ महत्तवाचा लेख\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nमुंबईअनलॉकसाठी आहे 'ही' त्रिसुत्री; CM ठाकरेंनी सांगितले पुढचे धोके\nकोल्हापूरकरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ऑडिट होणार, २२ पथकं तैनात\nदेशUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने 'असे' दिलेउत्तर\nपुणेकृषी विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार का; अजित पवार म्हणाले...\nदेश'चीन, पाकला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद भारतीय हवाई दलात'\nकोल्हापूरसंभाजीराजेंनी वेळीच ओळखली चाल; 'असा' उधळला डाव\nआयपीएल २०२०Chennai vs Delhi: दिल्लीने गड राखला, बलाढ्य चेन्नईवर साकारला विजय\nदेशकृषी विधेयकांवरून PM मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/actress-sejal-sharma-suicide-but-people-and-few-media-tribute-another-actress/", "date_download": "2020-09-26T02:51:27Z", "digest": "sha1:CFE6K6B5CWXS2CPRRAGV56P3244XL5TJ", "length": 17543, "nlines": 162, "source_domain": "www.saamana.com", "title": "एका अभिनेत्रीने केली आत्महत्या, लोकांनी श्रद्धांजली वाहिली भलतीलाच | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nएका अभिनेत्रीने केली आत्महत्या, लोकांनी श्रद्धांजली वाहिली भलतीलाच\nदोन दिवसांपूर्वी ‘दिल तो हॅप्पी है जी’ या मालिकेतील अभिनेत्री सेजल शर्मा हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सेजल शर्माच्या आत्महत्येच्या बातम्या सर्व प्रसारमाध्यमांमध्ये दाखविल्या गेल्या. मात्र यातील काही प्रसारमाध्यमांनी ज्या सेजल शर्माने आत्महत्या केली तिच्या ऐवजी अभिनेत्री Sezal sharma (सेझल) चे फोटो वापरले. त्यामुळे अनेकांनी आत्महत्या केलेल्या सेजलच्या ऐवजी सेझलला श्रद्धांजली वाहिली. यामुळे सेझल संतापली असून तिने ट्विट करत मी आत्महत्या केला नसल्याचा खुलासा केला आहे.\nसेझल शर्मा हिला तिच्या सोशल अकाऊंटवरून श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच तिच्या कुटुंबीयांना तसे संदेशही येत आहे. त्यामुळे सेझलने सोशल मीडियावरून ती जिवंत असल्याचे सांगत प्रसारमाध्यमांना फटकारले आहे. “माझ्या सर्व मित्रांना व चाहत्यांना सांगू इच्छिते की, मी जिवंत आहे. मी अभिनेत्री सेजल शर्माच्या आत्महत्येमुळे दु:खी आहे. मात्र माध्यमांनी माझ्या फोटोचा वापर करणे हे अत्यंत बेजबाबदार पणाचे आहे. यामुळे माझ्या नातेवाईकांमध्ये भीती पसरली होती.” असे ट्विट तिने केले होते.\nएकाच महिन्यात सेजल शर्मा व कुशल पंजाबी या दोन कलाकारांनी आत्महत्या केल्याने टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. काम मिळत नसल्यानेच या दोघांनीही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दिल तो हॅप्पी है जी या मालिकेत सेजलने मुख्य अभिनेता अंशच्या दत्तक बहिणीची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त तिने व्हिवो फोनच्या जाहिरातीत आमीर खानसोबत व उषा फॅनच्या जाहिरातीत रोहित शर्माा व हार्दिक पांड्यासोबत काम केले होते. तिने आजाद परिंदे नावच्या एका वेबसिरीजमध्येही काम केले आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\nअभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर केले लैंगिक शोषणाचे आरोप\nअनुराग कश्यपवर शरीर संबंधासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप, प्रसिद्ध अभिनेत्रीने मागितली पीएम मोदींकडे मदत\nबिग बॉसच्या घरातही पाळावी लागणार सोशल डिस्टिंन्सग\n‘द डिसायपल’, ‘बिटरस्वीट’ बुसान चित्रपट महोत्सवात\nज्येष्ठ अभिनेत्री आशू यांचे निधन\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम...\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nया बातम्या अवश्य वाचा\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaalavaani.blogspot.com/2010/08/blog-post_12.html", "date_download": "2020-09-26T03:40:22Z", "digest": "sha1:MIKTQMTLFJJRDSHJHCDCNZEVXUUUQSRS", "length": 5069, "nlines": 52, "source_domain": "jaalavaani.blogspot.com", "title": "जालवाणी: ओढ !", "raw_content": "\nलेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला प्रत्यक्ष लेखकाच्या आवाजात ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०१० रोजी प्रकाशित करत आहोत. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे काहीही ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...\nऋतूमानातील बदल हा तर निसर्गाचा नियम आहे.\nहा बदल हसत मुखाने स्वीकारायला ही वसुधा म्हणजेच पृथ्वी सदैव तयार असते.\nवसंत ऋतूला तर पृथ्वीने सखाच मानले आहे. त्याच्या भेटीसाठी ती आतुरली आहे. तिची ही ‘ओढ‘ काव्यातून व्यक्त केली आहे कवी विशाल कुलकर्णी ह्यांनी आणि कवितेचं अभिवाचन केलंय मीनल गद्रे ह्यांनी.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nविशालदादाची कविता जितकी सुंदर आहे तेवढंच तुझं वाचन सुंदर झालंय, मीनलताई. मी तर तुझी फ्यान झाले.\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी ५:४९ म.उ.\nखूप छान कल्पना आहे ही..\nआणि मीनलने खूप छान म्हंटली आहे. तिन चार लोकांचे वाचन मला आवडले होते, त्यात मीनल चा नंबर एकदम पैल्या तिन मधे\n१६ ऑगस्ट, २०१० रोजी ११:२६ म.पू.\nSUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...\nअप्रतिम. केवळ अप्रतिम. पार्श्वसंगीतहि छान.\n१७ ऑगस्ट, २०१० रोजी ५:३६ म.उ.\nविशाल... मस्त कविता आणि मीनल उत्तम केले आहेस अभिवाचन...\n२७ ऑगस्ट, २०१० रोजी ८:०४ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसूर्य संपावर गेला तर\nआणि मी सिगारेट सोडली.\nमोनालिसाला कुठे होत्या भुवया\nअब्राहम लिंकन ह्यांचे हेड मास्तरांना पत्र\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://sureshbhat.in/node/2623", "date_download": "2020-09-26T02:18:29Z", "digest": "sha1:ASL6BIVIZJX2EZ52H7ARLLWTHSWDX75W", "length": 8342, "nlines": 117, "source_domain": "sureshbhat.in", "title": "य़ा जगण्याचे... | सुरेशभट.इन", "raw_content": "सोसली मी एकतर्फी येथली नाती...\nती न होती माणसे, जी वाटली माझी\nमुखपृष्ठ » य़ा जगण्याचे...\nय़ा जगण्याचे आता मजला कौतुक वाटत नाही\nचंद्रही तसा पूर्वीइतका सुंदर भासत नाही\nकसली किंमत करता तुम्ही माझ्या त्या नात्याची\nऐपत नाही घेण्याची, देण्याची दानत नाही\nछोट्यामोठ्या दु:खांचे संचार भोगतो आहे\nएकहि आदिम तेजस्वी पण दु:ख झपाटत नाही\nरोज विचारु नका तुम्ही मज तिच्या उत्तराबद्दल\nइच्छा मजला उरली नाही, तुमची संपत नाही\nबोलत असतो केवळ आम्ही, नाते अबोल अमुचे\n(कारण आम्हा त्याची भाषा बहुधा समजत नाही)\nजे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने\nजगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही\nगमावण्याचे भय सरता माणूस बेफ़िकिर होतो\nजे आहे त्याचीही किंमत बहुधा राहत नाही\nअजूनही त्या पत्रांमधली थरथर तशीच आहे\n(कविता सुचण्यासाठी बाकी काही लागत नाही)\nआनंदयात्री, गझल एकंदर चांगलीच\nआनंदयात्री, गझल एकंदर चांगलीच झाली आहे.\nजे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने\nजगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही\nचंद्रही तसा पूर्वीइतका सुंदर भासत नाही\nचंद्र तसाही पूर्वीइतका सुंदर भासत नाही\nकसली किंमत करता तुम्ही माझ्या त्या नात्याची\nऐपत नाही घेण्याची, देण्याची दानत नाही\nवरच्या ओळीतले तुम्हीऐवजी दुसरे काही हवे होते असे वाटून गेले\nबोलत असतो केवळ आम्ही, नाते अबोल अमुचे\n(कारण आम्हा त्याची भाषा बहुधा समजत नाही)\nत्याची भाषा म्हणजे कुणाची\nय़ा जगण्याचे आता मजला कौतुक\nय़ा जगण्याचे आता मजला कौतुक वाटत नाही\nचंद्रही तसा पूर्वीइतका सुंदर भासत नाही.....\nनुसता चंद्रच नाही तर जीवनातल्या इतर गोष्टी सुध्दा पुर्वी सारख्या नाहीत असे\n'चंद्रही तसा' हेच योग्य ठरते.\nजे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने\nजगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही...\nआपण पान लिहून झाल्यावर पलटतो की उलटतो..मलाही संभ्रम आहे.\nअजूनही त्या पत्रांमधली थरथर तशीच आहे\n(कविता सुचण्यासाठी बाकी काही लागत नाही)...ये$$$ बात\nचित्तजी, त्याची म्हणजे नात्याची...\nचंद्रही तसा लिहिण्याचे स्पष्टीकरण शाम यांनी दिलेलेच आहे, मी ही तसाच विचार केला होता..\nशाम आणि आनंदयात्री, चंद्रही\nचंद्रही अयोग्य आहे असे सुचवायचे नव्हतेच. का वापरला आहे ते स्पष्ट होतेच/आहेच. 'चंद्र तसाही' असे मला अधिक अपील झाले. लहजा, अर्थ आणि फोनेटिक्सच्या दृष्टीने.\nअच्छा. 'त्याची' मुळे थोडा रसभंग झाला. 'तुम्ही' आणि 'त्या' ह्या जोडगोळीमुळेह.\nजे सुचते ते लिहून जातो, उलटत\nजे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने\nजगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dailykesari.com/2020/09/16/one-thousand-691-new-corona-patients-in-pune/", "date_download": "2020-09-26T03:23:41Z", "digest": "sha1:DLOKWR7ENTMH623U3MDMSN3DALRXVT4B", "length": 11173, "nlines": 171, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "पुण्यात एक हजार ६९१ नवे रुग्ण - Kesari", "raw_content": "\nघर पुणे पुण्यात एक हजार ६९१ नवे रुग्ण\nपुण्यात एक हजार ६९१ नवे रुग्ण\nपुणे : पुण्यात बाधितांची संख्येबरोबर मृत्यूंची संख्यादेखील कायम आहे. तर कोरोनावर मात करण्याची संख्यादेखील वाढत असल्याने एकीकडे दिलासा मिळत आहे.\nमंगळवारी दिवसभरात 1 हजार 691 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील चोवीस तासांत 53 रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी 13 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.\nपुण्यात अत्यवस्थ रूग्ण आणि मृत्यूंची संख्या कमी करणे हे प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे. शहरात काल स्वॅब व अँटिजेन चाचणीसाठी 5 हजार 494 संशयितांचे नमुने घेण्यात आले. यातील 1 हजार 691 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1 लाख 22 हजार 448 वर पोहोचली आहे. शहर परिसरातील विविध रुग्णालयांत 17 हजार 478 रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 929 रुग्ण अत्यवस्थ आहेत, तर 473 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 456 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. कोरोनामुळे मृत्यूू झालेल्यांची संख्या 2 हजार 875 वर पोहोचली आहे. आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 2 हजार 95 झाली आहे.\nपूर्वीचा लेखऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड मालिकेत प्रेक्षकांना मिळणार मैदानात परवानगी\nपुढील लेखशहरातील २४ कोविड केअर सेंटर बंद\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nउदयनराजेंनी ओबीसींना न्याय मिळवून द्यावा : हेमंत पाटील\nकाँग्रेस गावपातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार\nमहापालिकेचे कारभारी रंगले मेजवानीत\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nबिहार निवडणूक : तीन टप्प्यांत होणार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nबिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली.\nनवनाथ गोरे यांचा खडतर प्रवास होणार सुकर\nभारती विद्यापीठात मिळणार नोकरी\nलोकप्रिय गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले.\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलचा पहिल्याच षटकात पराक्रम\nअतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात\nइशांत शर्मा आणखी दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/education", "date_download": "2020-09-26T02:29:22Z", "digest": "sha1:SWJNEFTW66USGXRMKJSZLBEUHDOXMNDD", "length": 6664, "nlines": 137, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईतील शैक्षणिक विकास, शाळा, महाविद्यालयीन शिक्षण याबाबतीत बातम्या", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nप्राध्यापक, कर्मचाऱ्यांना दिलासा, १०० टक्के उपस्थिती बंधनकारक नाही\nकला संचालनालय प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर\nFinal Year Exams: एटीकेटीच्या परीक्षा २५ सप्टेंबरपासून\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षेचा अर्ज भरण्यास 'इतकी' मुदतवाढ\nमुदतवाढीचा फायदा, ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी केली सीईटीसाठी नोंदणी\nसप्टेंबर अखेरपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता कमी : वर्षा गायकवाड\n३ ऑक्टोबरपासून होणार ‘आयडॉल’ची अंतिम वर्षांची परीक्षा\nप्रथम वर्ष पदवीचे प्रवेश रद्द, नव्याने प्रक्रिया राबवण्याचे निर्देश\nJEE चा निकाल जाहीर, २४ विद्यार्थ्यांना १०० टक्के पर्सेंटाइल\nअकरावीच्या प्रवेशांना 'या' कारणामुळे स्थगिती\nऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार एमबीए, एमएमएस प्रवेश प्रक्रिया\nएमएचटी-सीईटी परिक्षेच्या 'ह्या' आहेत नवीन तारखा\nMumbai university exam मुंबई विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पॅटर्न जाहीर\n२१ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा केंद्राचा निर्णय\nऑनलाईन शिक्षणावर शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा\nMPSC परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर\nवैद्यकीयच्या परीक्षांना स्थगिती नाहीच, हायकोर्टाने पुन्हा फेटाळली 'त्या' विद्यार्थ्यांची याचिका\nसीईटी अर्ज प्रक्रियेला २ दिवसांची मुदतवाढ\nमुंबईतील शिक्षिकेचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव\nअंतिम वर्षाच्या परीक्षांचा आराखडा ७ सप्टेंबरपर्यंत सादर करा, सरकारचे विद्यापीठांना निर्देश\n११वी प्रवेशासाठी एक दिवसाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mpcnews.in/lonavala-fasting-from-monday-if-ventilator-bed-facility-is-not-available166-172648/", "date_download": "2020-09-26T02:22:35Z", "digest": "sha1:2XN5OCH4CT7KRUPM5OJAR2SLUNRVUYWP", "length": 6870, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala : व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध न झाल्यास सोमवारपासून उपोषण", "raw_content": "\nLonavala News : व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध न झाल्यास सोमवारपासून उपोषण\nLonavala News : व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध न झाल्यास सोमवारपासून उपोषण\nएमपीसीन्यूज : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि लोणावळा शहरातील लोकसंख्या तसेच येथील वाढती रुग्णसंख्या बघता याठिकाणी रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बेडची सुविधा गरजेची आहे. त्यासाठी येत्या सोमवारपर्यंत व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध न झाल्यास उपोषण आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस नगरसेवक व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कवीश्वर यांनी दिला आहे.\nलोणावळा शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी आँक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नसल्याने शहरातील रुग्णांना तळेगाव येथे जावे लागते.\nतेथेही अनेकदा बेड उपलब्ध होत नाही, बेड उपलब्ध झाले तरी आवश्यक औषध, इंजेक्शन त्याठिकाणी मिळत नसल्याने रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे खूप हाल होत आहेत.\nलोणावळा शहर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्या ही एक लाखाहून अधिक आहे. त्यामुळे लोणावळा शहरात कोविड केअर सेंटर मध्ये व्हेंटिलेटर सुविधा असणे अत्यावश्यक आहे.\nनगरपरिषदेने जिल्हाधिकारी व पुणे जिल्हा आरोग्य विभाग यांच्याकडून व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता याठिकाणी करून घ्यावी; अन्यथा येत्या सोमवारनंतर उपोषणाला बसण्याचा इशारा नगरसेवक कवीश्वर यांनी लोणावळा प्रशासनाला दिला आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMumbai News: ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या मागील व चालू वर्षीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार शैक्षणिक फी व निर्वाहभत्ता\nLonavala News : खंडाळा येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nIPL 2020 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्ली कॅपिटल्सची चेन्नईवर 44 धावांनी मात\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 7 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची नोंद\nPune News : टाटा मोटर्सने बनविलेल्या 51 विंगर रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nPimpri news: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 9 ऑक्टोबरला निवडणूक\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 164 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 87 नवीन रुग्ण\nPune News : लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदी रद्द करा ; भारतीय मजदूर संघांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/crimes/", "date_download": "2020-09-26T01:18:22Z", "digest": "sha1:EXSCF5EMQJOKOI3WLPQDAJYPO4BXBEKO", "length": 1588, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Crimes Archives | InMarathi", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nटीव्हीवर दाखवले जाणारे ‘क्राईम शो’ आणि वाढत्या गुन्ह्यांचे अदृश्य कनेक्शन आहे का\nकोणतीही सामाजिक बांधीलकी न जपता सरळसोट पैसे कमावण्यासाठी कशीही दृश्ये चित्रित करून ती प्रेक्षकांच्या माथी मारली जातात त्याच्या परिणामांचा विचार न करता.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/all-party-mps-should-meet-pm-modi-on-maratha-reservation-issue-letter-from-sambhaji-raje/", "date_download": "2020-09-26T02:14:30Z", "digest": "sha1:4ATUKYTRBWKQENLM7MO7DOHDIMNRDWQH", "length": 17767, "nlines": 386, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी ; संभाजीराजेंचे पत्र - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली…\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी…\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी ; संभाजीराजेंचे पत्र\nमुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर सर्वपक्षीय खासदारांनी मतभेद विसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घ्यावी यासाठी सर्व खासदारांना राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पत्र लिहिले आहे.\nसंभाजीराजेंचे खासदारांना लिहिलेले पत्र :\nआपण सर्व जण मराठा आरक्षण प्रश्नांविषयी जाणताच. महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने मराठा आरक्षण मंजूर केले. ते राज्यात लागू सुद्धा झाले. त्यानंतर काही लोकांनी न्यायालयात धाव घेऊन आरक्षणाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर प्रश्न उपस्थित करून ते पुढील निर्णयाकरिता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले आहे.’\n‘न्यायालयाने शैक्षणिक आणि नोकर भरती मध्ये स्थगिती दिली आहे. दुसऱ्या राज्यातील 50 टक्के पेक्षा जास्त असलेल्या आरक्षणाला अशा प्रकारे स्थगिती दिली गेली नसल्याचे दिसून येते. उदा. तामिळनाडू मधील आरक्षण प्रश्नांचा सुद्धा अजून निकाल लागला नाही, तरी तेथील राज्याने दिलेले आरक्षण चालू आहे.’ असे संभाजीराजेंनी या पत्रात म्हटले आहे.\n‘केंद्राने आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाला 10% आरक्षण दिले आहे. ते देखील न्यायालयात आले आहे. परंतु, केंद्र सरकारच्या शैक्षणिक आणि नोकर भरतीला स्थगिती देण्यात आलेली नाही. म्हणून मराठा आरक्षणाला न्यायालयाने जी स्थगिती दिली आहे, ती उठवण्यात आली पाहिजे.’ अशी मागणी संभाजीराजेंनी केली.\nतसंच, ‘आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. जवळपास 33 टक्केच्या वर असलेला हा समाज पूर्णतः दुखावला गेला आहे. मराठा समाजाची आजपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केवळ दिशाभूल केली आहे, असा समज समाजात पसरत आहे. मला असे वाटते की, हा समज दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू’ अशी विनंती संभाजीराजे यांनी केली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleनियम पाळा अन्यथा : कडक लॉकडाउन ना. जयंत पाटील\nNext articleकोकणातील सौंदर्य पर्यटकांना खुणावतेय\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी टिप्पणी विराटच्या प्रैक्टिसवर होती\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nकरोनानंही टेकले यांच्यापुढे हात…\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\nपाकिस्तान आम्हाला जनावरांप्रमाणे वागवतो – सज्जाद राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/pranav-mistry-dashaphal.asp", "date_download": "2020-09-26T03:35:42Z", "digest": "sha1:IVASU2WDZSMQEVK7WOC2JP6ZBIAVTACP", "length": 17351, "nlines": 136, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "प्रणव मिस्त्री दशा विश्लेषण | प्रणव मिस्त्री जीवनाचा अंदाज Literature, Computer Scientist", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » प्रणव मिस्त्री दशा फल\nप्रणव मिस्त्री दशा फल जन्मपत्रिका\nरेखांश: 72 E 29\nज्योतिष अक्षांश: 24 N 12\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nप्रणव मिस्त्री व्यवसाय जन्मपत्रिका\nप्रणव मिस्त्री जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nप्रणव मिस्त्री 2020 जन्मपत्रिका\nप्रणव मिस्त्री फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nप्रणव मिस्त्री दशा फल जन्मपत्रिका\nप्रणव मिस्त्री च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर April 15, 1982 पर्यंत\nस्वत:ला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा अनुकूल समय आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित बदल घडण्याची शक्यता आणि हे बदल तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. वरिष्ठ आणि अधिकारी वर्गाची कृपादृष्टी राहील. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता. या कालावधीत तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि तुमची इच्छापूर्ती निश्चित होईल.\nप्रणव मिस्त्री च्या भविष्याचा अंदाज April 15, 1982 पासून तर April 15, 1992 पर्यंत\nहा तुमच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. तुमच्या विचारांबाबत तुम्हाला विश्वास असेल आणि बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. अचानक प्रवास संभवतो आणि हा प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. भावंडांकडून आणि जोडीदाराकडून आनंद मिळेल. तुमच्या भावांसाठीसुद्धा हा अनुकूल काळ आहे. जागा किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार टाळा.\nप्रणव मिस्त्री च्या भविष्याचा अंदाज April 15, 1992 पासून तर April 15, 1999 पर्यंत\nपरीक्षेत यश, बढती, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडेल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्य़ात वाढ होईल. तुमच्यापासून लांब राहणाऱ्या आणि परदेशी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. तुम्हाला नवीन काम मिळेल आणि ते अत्यंत फायदेशीर असेल. कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्याला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.\nप्रणव मिस्त्री च्या भविष्याचा अंदाज April 15, 1999 पासून तर April 15, 2017 पर्यंत\nएखाद्या नवीन क्षेत्रात तुम्ही प्रयत्न करायचे ठरवले तरी त्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे कारण खर्च वाढेल आणि त्या खर्चाचे रूपांतर नंतर उत्पन्नात होण्याची शक्यता नाही. शत्रू समस्या निर्माण करतील आणि कायदेशीर संकटात सापडू शकाल. तुम्ही तुमच्या कामातच व्यस्त राहाल, तुमच्या बाह्यरूपातही स्थैर्य असाल. लघु मुदतीसाठी आर्थिक लाभ होऊ शकेल. मध्यम आणि दीर्घकालीन प्रकल्प सुरू करावेत. डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवतील. विरुद्ध लिंगी व्यक्तीसोबतची मैत्री फार सलोख्याची नसेल. झटपट पैसा कमविण्याच्या मार्गांची शहानिशा करणे गरजेचे आहे. तुमच्या प्रियकर अथवी प्रेयसीच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात.\nप्रणव मिस्त्री च्या भविष्याचा अंदाज April 15, 2017 पासून तर April 15, 2033 पर्यंत\nतुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इतरांची मदत मिळेल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमच्या लायकीनुसार तुम्हाला सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ओळख मिळेल. तुमचा मैत्रीपूर्ण स्वभाव आहे आणि विविध प्रकारचे सामाजिक भान असलेल्या माणसांचा सहवास तुम्हाला आवडतो. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला थोडासा मनस्ताप होईल. बाह्यरूपातील बदलापेक्षा व्यक्तिमत्वातील परिवर्तन अधिक महत्त्वाचे असते.\nप्रणव मिस्त्री च्या भविष्याचा अंदाज April 15, 2033 पासून तर April 15, 2052 पर्यंत\nनशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत सगेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.\nप्रणव मिस्त्री च्या भविष्याचा अंदाज April 15, 2052 पासून तर April 15, 2069 पर्यंत\nउत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.\nप्रणव मिस्त्री च्या भविष्याचा अंदाज April 15, 2069 पासून तर April 15, 2076 पर्यंत\nहा तुमच्यासाठी संमिश्र घटनांचा काळ असेल. या काळात तुम्हाला मानसिक त्रास आणि तणाव जाणवेल. व्यावसायिक भागिदारांमुळे तुमच्यासमोर समस्या उभ्या राहतील. आर्थिक दृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी फार बरा नाही. प्रवास फार फलदायी ठरणार नाही. धोका पत्करू नका. तुमच्या जवळच्या माणसांशी वाद होतील, त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणार नाही, याची काळजी घ्या. प्रेमाच्या संदर्भातही हा काळ फारसा अनुकूल नाही. नात्यांसंबंधात अत्यंत काळजी घ्या. तसे न केल्यास तुम्ही आदर गमावून बसाल.\nप्रणव मिस्त्री च्या भविष्याचा अंदाज April 15, 2076 पासून तर April 15, 2096 पर्यंत\nया काळात तुम्हाला चहुबाजूंनी यश मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही अशी उंची गाठाल, ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगली नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य आहे. तुम्ही सोन्याची किंवा हिऱ्याची खरेदी कराल. एकूणातच तुम्ही तुमचे मित्र/सहकारी आणि विविध पातळ्यांवरील व्यक्तींची चांगले संबंध राखाल.\nप्रणव मिस्त्री पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/e-pan-card-online-process-system/", "date_download": "2020-09-26T01:28:52Z", "digest": "sha1:4AU6EXDSXOGAZ75HUDRJ7ZWZ4TAGJPWJ", "length": 13744, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "आता मिळणार ऑनलाईन पॅनकार्ड, वाचा कशी असेल प्रक्रिया | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोल्हापूर – 84 लाखांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला अटक\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nआता मिळणार ऑनलाईन पॅनकार्ड, वाचा कशी असेल प्रक्रिया\nमहत्त्वाच्या डॉक्युमेंट्सपैकी एक असलेले पॅनकार्ड आता काही तासात बनवून मिळमार आहे. आयकर विभागाने त्वरित पॅनकार्ड बनवून देणारी प्रणाली विकसित केली असून पुढील काही दिवसात ती वापरात येणार आहे.\nटाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रणालीची कार्यपद्धती आधारशी संलग्न असणार आहे. आधार कार्डाव्यतिरिक्त कोणत्याही वैयक्तिक ओळखपत्राची गरज भासणार नाही. आधार कार्डावरील प्राथमिक माहितीच्या आधारे पॅन कार्डावर माहिती भरली जाईल. त्यानंतर आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवून माहितीची खातरजमा केली जाईल. त्यानंतर काही वेळातच ई-पॅनकार्ड तयार होईल.\nपॅन क्रमांक तयार झाल्यानंतर अर्ज करणाऱ्या व्यक्तिला डिजिटल स्वाक्षरी असलेला क्यूआर कोड देण्यात येईल. क्यूआर कोड ही अर्जदात्याच्या माहितीचं सांकेतिक रूप असेल. त्यामुळे पॅन कार्डची नक्कल करून होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी हा क्युआर कोड मदत करेल. पॅन कार्ड हरवलं तर काही प्रक्रिया पार पाडल्यानंतर याच समान क्युआर कोडवरून नवीन पॅन कार्ड जारी केले जाईल.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nसाथिया तुने क्या किया\nकोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nकोल्हापूर – 84 लाखांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला अटक\nया बातम्या अवश्य वाचा\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/owaisi-mayawati-akhilesh-yadav-accept-appeal-amit-shah-caa-debate/", "date_download": "2020-09-26T02:12:01Z", "digest": "sha1:GTA455QFSHDBZLBLIPJVCWV5T3YFQQM4", "length": 17753, "nlines": 165, "source_domain": "www.saamana.com", "title": "अमित शहांकडून CAA वर चर्चेचे आवाहन; ओवेसी, मायावती, अखिलेश यादवकडून स्विकार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे…\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nअमित शहांकडून CAA वर चर्चेचे आवाहन; ओवेसी, मायावती, अखिलेश यादवकडून स्विकार\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावर चर्चेचे आवाहन केले होते. त्यावर एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असादुद्दीन ओवेसी, बसप अध्यक्ष मायावती आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शहा यांचे आवाहन स्विकारले असून चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले आहे.\nनागरिकत्व कायद्यावरून देशभरात गदारोळ सुरू आहे. हा कायदा मागे घ्यावा म्हणून विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली आहेत. असे असले तरी हा कायदा मागे घेणार नाही अशी ठाम भुमिका गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली आहे. तसेच या कायद्यावर चर्चा करण्यासाठी शहा यांनी विरोधी पक्षातील राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांना आवाहन केले होते.\nयावर ओवेसी यांनी टीका करत आमच्याशी चर्चा करा असे म्हणत हे आवाहन स्विकारले आहे. तसेच बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी ट्विट करून म्हटले की, लखनऊमध्ये CAA विरोधात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात सरकारने नागरिकत्व कायद्यावर चर्चा करू असे मायावतींनी म्हटले आहे.\nआति-विवादित CAA/NRC/NPR के खिलाफ पूरे देश में खासकर युवा व महिलाओं के संगठित होकर संघर्ष व आन्दोलित हो जाने से परेशान केन्द्र सरकार द्वारा लखनऊ की रैली में विपक्ष को इस मुद्दे पर बहस करने की चुनौती को BSP किसी भी मंच पर व कहीं भी स्वीकार करने को तैयार है\nसमाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनीही हे आवाहन स्विकारले आहे. तसेच सरकारने फक्त नागरिकत्व कायदा आणि विकासावर चर्चा झाली पाहिजे असेही यादव म्हणाले.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे यांचे आदेश\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण...\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nया बातम्या अवश्य वाचा\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dailykesari.com/2020/09/09/maratha-reservation-no-maratha-quota-for-admissions-and-government-jobs-this-year-says-supreme-court/", "date_download": "2020-09-26T02:33:49Z", "digest": "sha1:BAEPWWYAHUH73NXF4TZYLQ5O44RBJQWV", "length": 13097, "nlines": 177, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "मराठा समाजाला २०२०-२१ मध्ये आरक्षण नाही - Kesari", "raw_content": "\nघर महाराष्ट्र मराठा समाजाला २०२०-२१ मध्ये आरक्षण नाही\nमराठा समाजाला २०२०-२१ मध्ये आरक्षण नाही\nसर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश\nनवी दिल्ली : सन २०२०-२०२१ या वर्षात मराठा समाजाला नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या पीठाने विचारार्थ मोठ्या पीठाकडे पाठवले आहे. यावेळी पदव्युत्तर प्रवेशाबाबतच्या नियमांत बदल करता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. या प्रकरणावर विचार करण्यासाठी मोठ्या खंडपीठाची निर्मिती केली जाईल, असे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी म्हटले आहे.\nमराठा समाजाला महाराष्ट्रात शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाबाबतचा अधिनियम, २०१८ लागू करण्यात आला होता. या नुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये एकूण १६ टक्के आरक्षण दिले होते. मात्र ते उचित नसल्याचे म्हणत कोर्टाते मराठा समाजाला १२ टक्के आणि १३ टक्के कोटा प्रदान केला होता.\nया अध्यादेशामुळे इंदिरा साहनी प्रकरणात निर्धारित तत्वांचे उल्लंघन होत असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हानही देण्यात आले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के इतकी ठरवून दिली होती.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूर्वीच १५ सप्टेंबरपर्यंत नवी भरती न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ऑगस्ट महिन्यातच न्यायालयाला दिली होती. ३० नोव्हेंबर २०१८ ला महाराष्ट्र सरकारने विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक मंजूर केले होते. या अंतर्गत मराठा समाजाला राज्यातील शासकीय नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये १६ टक्के इतक्या आरक्षणाची तरतूद केली होती.राज्य सरकारच्या या निर्णयाच्या वैधतेबाबत मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले होते.\nपूर्वीचा लेखबेपत्ता तरुण चीनमध्ये\nपुढील लेखतेल्या रोगामुळे डाळिंबाचे नुकसान\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nदहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा जवान हुतात्मा\nगोव्याला जाताना सातारा महामार्गाचा वापर करा\nराज्यात २१ हजार नवे रुग्ण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nबिहार निवडणूक : तीन टप्प्यांत होणार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nबिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली.\nनवनाथ गोरे यांचा खडतर प्रवास होणार सुकर\nभारती विद्यापीठात मिळणार नोकरी\nलोकप्रिय गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले.\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलचा पहिल्याच षटकात पराक्रम\nअतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात\nइशांत शर्मा आणखी दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/governor-should-order-cabinet-meeting-to-be-held-at-raigad-every-year-mp-sambhaji-raje-requests-governor-127620724.html", "date_download": "2020-09-26T03:14:16Z", "digest": "sha1:CWRZUI5I5NCSDM3WWZPM3E2EEEOBUCPE", "length": 4831, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Governor should order Cabinet meeting to be held at Raigad every year; MP Sambhaji Raje requests Governor | दरवर्षी मंत्रीमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश राज्यपालांनी द्यावेत-खा. संभाजीराजे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकॅबिनेट बैठक:दरवर्षी मंत्रीमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश राज्यपालांनी द्यावेत-खा. संभाजीराजे\nकोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर\nदरवर्षी मंत्रीमंडळ कॅबिनेट ची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश द्यावेत. अशी विनंती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटर द्वारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली. जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या धेयवादाने रायगड वर राज्याभिषेक करवून घेतला, तो राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लक्षात येईल स्वराज्याला सुराज्यात रूपांतरित करून प्रशासनासाठी उत्तम राज्यकारभार नेमका कसा करावा याची प्रेरणा मिळेल असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.\nराज्यपाल महोदयांना माझी अजून एक विनंती असेल, जी मी अनेक वर्षांपासून मागणी करत आहे. दरवर्षी कॅबिनेट ची एक बैठक रायगड वर घेण्याचे आदेश आपण द्यावेत. जेणेकरून महाराजांनी ज्या धेयवादाने रायगड वर राज्याभिषेक करवून घेतला, तो राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लक्षात येईल.\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वयाच्या 79 वर्षी किल्ले शिवनेरी 'पायी' सर केला. ही आमच्या सारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी समाधान देणारी गोष्ट आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांनी जे प्रत्येक मंत्र्याने एकेक किल्ला दत्तक घेण्याचे आवाहन केले त्याचे मी मनापासून स्वागत करतो असेही ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/rahul-angry-at-leaders-demanding-change-of-leadership-riots-over-alleged-alliance-with-bjp-sonia-gandhi-interim-president-for-another-6-months-127650235.html", "date_download": "2020-09-26T03:21:14Z", "digest": "sha1:QVGLLOSDLNCWF4LERPWUDIWK7CYEHQGF", "length": 8264, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rahul angry at leaders demanding change of leadership, riots over alleged alliance with BJP; Sonia Gandhi interim president for another 6 months | नेतृत्व बदलाची मागणी करणाऱ्या नेत्यांवर राहुल संतापले, भाजपशी संधानाच्या कथित आराेपावरून गदारोळ; साेनिया गांधी आणखी 6 महिने हंगामी अध्यक्ष - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाँग्रेस ‘कलह’ समिती:नेतृत्व बदलाची मागणी करणाऱ्या नेत्यांवर राहुल संतापले, भाजपशी संधानाच्या कथित आराेपावरून गदारोळ; साेनिया गांधी आणखी 6 महिने हंगामी अध्यक्ष\nमुकेश काैशिक | नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी\nसाेनिया गांधींचा पद सोडण्याचा प्रस्ताव, मनमाेहन यांचा पदावर राहण्याचा आग्रह\nनेतृत्व बदलाच्या मागणीवरून सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक तणावपूर्ण वातावरणात झाली. बैठक सुरू होताच हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी नेतृत्वात बदलासंबंधी २३ ज्येष्ठ नेत्यांच्या पत्राचा हवाला देत पद सोडण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, ७ तासांच्या मंथनानंतर त्या आणखी ६ महिने हंगामी अध्यक्ष राहण्यास तयार झाल्या. बैठकीत पत्र लिहिणाऱ्या नेत्यांच्या भाजपशी हातमिळवणीचा आरोप गाजला. सूत्रांनुसार, पत्राच्या वेळेबाबत प्रश्न उपस्थित करून राहुल म्हणाले की, भाजपशी हातमिळ‌वणी करून पत्र लिहिले आहे. त्यावर बैठकीत व बैठकीबाहेर वातावरण तापले. पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी गुलाम नबी आझाद यांनी भाजपशी हातमिळ‌वणी केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेऊ, असे म्हटले. कपिल सिब्बल यांनी ट्वीट करत आक्षेप घेतला. मात्र, राहुल यांनी भाजपशी हातमिळ‌वणीबाबत कुठली टिप्पणी केली नाही, असा दावा काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला.\nआई रुग्णालयात होती तेव्हाच पत्र का लिहिले : राहुल\nसूत्रांनुसार, राहुल यांनी विचारले की, आई रुग्णालयात होती, तेव्हाच का पत्र लिहिले राजस्थान सरकार संकटात होते तेव्हा पत्र लिहिले. पत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्यांची चर्चा कार्यकारिणीत व्हावी, माधमांत नव्हे. हे पत्र भाजपशी हातमिळवणी करून लिहिलेय.\nबैठकीत २० वर नेते बोलले, सर्वांनी राहुल यांना अध्यक्ष करण्याची मागणी केली\nकार्यकारिणीच्या बैठकीत २० पेक्षा जास्त नेते बोलले. सर्वांनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्याची मागणी केली. बहुतांश नेत्यांनी पत्र लिहिणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. पण, सोनिया गांधींनी संपूर्ण काँग्रेस परिवारात एकजूट कायम ठेवण्यावर भर दिला.\n३० वर्षांत भाजपच्या समर्थनार्थ वक्तव्य केले नाही : सिब्बल\nराहुल यांच्या टिप्पणीनंतर सिब्बल यांनी ट्वीट केले-‘आम्ही भाजपशी संधान साधले आहे, असे राहुल म्हणतात. मी राजस्थान हायकोर्टात पक्षाची बाजू यशस्वीपणे मांडली. मी ३० वर्षांपासून भाजपच्या बाजूने वक्तव्य केले नाही.’ मात्र, राहुल यांच्या फोननंतर सिब्बल यांनी ट्वीट डिलीट केले.\nराहुल नव्हे, इतरांच्या टिप्पणीवर राजीनाम्याचा प्रस्ताव : आझाद\nगुलाम नबी आझाद म्हणाले, भाजपसोबतची हातमिळवणी सिद्ध करा असे मी बैठकीत म्हटले नाही. भाजपच्या सांगण्यावरून पत्र लिहिले, असे राहुलही म्हणाले नाहीत. आम्ही भाजपच्या सांगण्यावरून पत्र लिहिले, असे काल काही जण म्हणाले होते, एवढेच मी म्हणालो. मी त्यासंदर्भात टिप्पणी केली होती.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mpcnews.in/t20-world-cup-2021-will-be-in-india-172663/", "date_download": "2020-09-26T03:19:59Z", "digest": "sha1:TS7O7QKB4D65RK7UTRTQAZVOXAIXSQIV", "length": 6807, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "2021 मधील T-20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे : T-20 World Cup 2021 will be held in India MPCNEWS", "raw_content": "\nT-20 World Cup News: 2021 मधील T-20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे\nT-20 World Cup News: 2021 मधील T-20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे\nएमपीसी न्यूज – 2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धचे यजमानपद भारताकडेच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील दोन वर्षांत होणाऱ्या दोन T20 विश्वचषक स्पर्धाच्या आयोजना विषयीचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कार्यकारी मंडळाची शुक्रवारी बैठक झाली. व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत 2021-22 T20 विश्वचषकाच्या यजमानपदाबद्दल निर्णय घेण्यात आला.\nत्यानुसार 2021 चा T20 विश्वचषक भारतातच होणार असून 2022 चा T20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त टाईम्सनाऊने दिले आहे. याशिवाय २०२१मध्ये न्यूझीलंडमध्ये होणारा महिला वन डे विश्वचषकदेखील पुढे ढकलण्यात आला आहे.\nमहिलांचा 2021 एकदिवसीय विश्वचषक तसेच पुरुषांचे पुढील दोन T20 विश्वचषक यांच्या आयोजनाविषयी या बैठकीत चर्चा झाली. ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये होणारा T20 विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया 2021 च्या यजमानपदासाठी आग्रही होते. त्यामुळे भारताला 2021 ऐवजी 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळू शकेल, असे बोलले जात होते.\nअखेर 2021 च्या T20 विश्वचषकाचे यजमानपद भारताकडेच कायम असून 2022 चा T20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहे.\nवन डे विश्वचषकांबद्दलदेखील या बैठकीत निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.\n2021 चा महिला वन डे विश्वचषक आता 6 फेब्रुवारी ते 7 मार्च 2022 मध्ये न्यूझीलंडला आयोजित केला जाणार आहे. तर 2023 मध्ये होणारा पुरूषांचा एकदिवसीय विश्वचषक पूर्वनियोजित योजनेनुसार भारतात होणार आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMaharashtra Corona News : दिवसभरात उच्चांकी 12,822 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 5 लाखांवर\nMPC News Headlines 8th August 2020: एमपीसी न्यूज आजच्या हेडलाईन्स\nIPL 2020 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्ली कॅपिटल्सची चेन्नईवर 44 धावांनी मात\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 7 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची नोंद\nPune News : टाटा मोटर्सने बनविलेल्या 51 विंगर रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nPimpri news: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 9 ऑक्टोबरला निवडणूक\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 164 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 87 नवीन रुग्ण\nPune News : लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदी रद्द करा ; भारतीय मजदूर संघांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/ashok-kumar/", "date_download": "2020-09-26T01:49:05Z", "digest": "sha1:CNW63ZEKL5QCMHIQZ4IHVH27U2GLSX6Y", "length": 9241, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विविधा:अशोककुमार", "raw_content": "\nहिंदी चित्रपटसृष्टीत “दादामुनी’ म्हणून ओळखले जाणारे, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, अशोककुमार यांचे आज पुण्यस्मरण. अशोककुमार यांचा जन्म बंगालमधील भागलपूर येथे 13 ऑक्‍टोबर 1911 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव कुमुदलाल कुंजलाल गांगुली असे होते. त्यांना अभिनेते अनुपकुमार (कल्याण) प्रसिद्ध गायक व अभिनेते किशोरकुमार (आभास कुमार ) हे दोन भाऊ व सतीदेवी ही बहीण होती. कोलकाता विद्यापीठाच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. तथापि, चित्रपटसृष्टीत जादा रस असल्याने ते या क्षेत्रात आले.\nत्यांना तंत्रज्ञ व्हायचे होते. त्यांची बहीण सतीदेवीचे लग्न मुंबईत वास्तव्य करणारे आणि चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करणारे सशधर मुखर्जी यांच्याशी झाले होते. त्यामुळे कुमुदलाल चित्रपट निर्मितीच्या तांत्रिक बाबींमध्ये (अभिनयाची नव्हे तर) काही प्रमाणात रस घेण्यास कारणीभूत ठरले. ते कायद्याच्या परीक्षेत नापास झाले आणि परीक्षा पुन्हा होईपर्यंत काही महिने आपल्या बहिणीबरोबर राहण्यास मुंबईला आले. अर्थप्राप्ती करण्यासाठी त्यांनी आपल्या मेहुण्याला नोकरी शोधण्याची विनंती केली. सशधर मुखर्जी बॉम्बे टॉकीजच्या तांत्रिक विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत होते. त्यांच्या मेहुण्याने बॉम्बे टॉकीजमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम मिळवून दिले. तेथे त्यांचा चांगला जम बसला व वडिलांना त्यांनी वकिलीऐवजी येथे चांगले काम करू असे पटवून दिले. ते प्रयोगशाळेतील सहाय्यक म्हणून आनंदाने काम करत होते. तेथे त्यांनी 5 वर्षे काम केले. काम करत असताना वर्ष 1936 मध्ये बॉम्बे टॉकीजच्या “जीवन नैया’वर चित्रीकरण चालू होते. यात कुमुदलाल यांना अपघातानेच अभिनयाचे काम दिले. याच वेळी कुमुदलाल ऐवजी अशोककुमार हे नाव देण्यात आले व तेच पुढे रूढ झाले.\nदेविकारानीबरोबर त्यांचे अनेक चित्रपट झाले व ती एक पडद्यावरची जोडी जमून गेली. त्या दोघांची भूमिका असलेला “अछूत कन्या’ हा चित्रपटही खूप गाजला. “किस्मत’ या वर्ष 1943 मधील चित्रपटात त्यांनी प्रथमच पाकीटमारची नकारात्मक भूमिका केली. वर्ष 1953-53 मध्ये बॉम्बे टॉकीजपासून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वत:ची अशोककुमार प्रॉडक्‍शन कंपनी सुरू केली तसेच ज्युपिटर थिएटरही विकत घेतले.\nअशोककुमार प्रॉडक्‍शनच्या बॅनरखाली त्यांनी “समाज’ या चित्रपटाची निर्मिती केली पण बॉक्‍स ऑफिसवर हा चित्रपट फारसा चालला नाही. चित्रपटनिर्मिती क्षेत्रात मात्र त्यांना तोटा सहन करावा लागला व त्यामुळे त्यांनी आपली चित्रपटनिर्मिती कंपनी बंद केली. वर्ष 1951 मध्ये “अफसाना’ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. त्यांनी सुमारे 304 चित्रपटातून नायक तसे चरित्र अभिनेते म्हणून आपला ठसा उमटविला.सहज नैसर्गिक अभिनय हे त्यांचे कसब होते.त्यांच्या नजरेतूनच भाव उमटायचे. त्यांनी विनोदी भूमिकाही साकारल्या.\nफिल्मफेअरचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले. वर्ष 1999 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 10 डिसेंबर 2001 रोजी त्यांचे निधन झाले.\nधोनीच्या विजयी षटकाराचा चेंडू सापडला\nलक्षवेधी : केवळ रेटिले बहुमता\nदखल : कांद्याचं रडगाणं\nनिवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांक उसळले\nमास्कवरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.guruthakur.in/barayan/", "date_download": "2020-09-26T02:39:02Z", "digest": "sha1:CDD656DKU5LWCWX45NEFMIVMMMBDBZ7T", "length": 1417, "nlines": 24, "source_domain": "www.guruthakur.in", "title": "Barayan - www.guruthakur.in", "raw_content": "\nज्याची कीर्ती कानी येता\nअशी फुलून येते छाती\nज्याचे ओठांवरती नाव उमटता होतो ताठ कणा\nतो राजा होता रयतेचा ज्याने दिला मराठी बाणा\nजय जय जय शिवराय म्हणा\nज्याचे निशाण मिरवत राही\nत्या पराक्रमाची गाथा आम्हीं गाऊ पुन्हापुन्हा\nतो राजा होता रयतेचा ज्याने दिला मराठी बाणा\nजय जय जय शिवराय म्हणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60680", "date_download": "2020-09-26T02:19:57Z", "digest": "sha1:LXIOOJZJTUMY4UX3J3ISVHH6LXC4JSLK", "length": 21740, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आईचा आशीर्वाद ! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आईचा आशीर्वाद \nगेले काही दिवस आपण धोनी, कोहली आणि रहाणे या तीन क्रिकेटपटूंची जाहीरात पाहिली असेल ज्यात त्यांनी आपल्या आईचे नाव टीशर्टवर लिहिलेले दाखवले आहे.\nआज याच उपक्रमा अंतर्गत नरकचतुर्दशीच्या मुहुर्तावर सर्वच भारतीय खेळाडूंनी आपल्या आईचे नाव टीशर्टवर लिहित मैदानावर उतरायचे ठरवले.\nआणि काय तो चमत्कार, 2-2 अश्या बरोबरीत चाललेल्या मालिकेत आज अखेरच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला फक्त 79 धावांत गुंडाळत तब्बल 190 धावांनी एक विक्रमी विजय मिळवला आणि सर्वच आयांची पोरे चमकली.\nआता याला श्रद्धा म्हणा किंवा एक सकारात्मक उर्जा, किंवा निव्वळ योगायोग...\nपण भारतीय संघाचे या विजयाबद्दल आणि त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन \nएक फील गूड बातमी म्हणून शेअर करावेसे वाटले. छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी पावले, मानसिकता हळूहळू बदलायला मदत करू शकतात हा विश्वास असल्याने\nबघ बर आपल्या मराठी माणसाची\nबघ बर आपल्या मराठी माणसाची दुरदृष्टी , ' आईचा आशिर्वाद ' लिहिण्याची पद्धत आपणच सुरु केली की.\nआशीर्वाद असं कर ना.\nआशीर्वाद असं कर ना.\nदेवकी करतो, पण नक्की आशिर्वाद\nदेवकी करतो, पण नक्की आशिर्वाद असे नसून आशीर्वाद असा शब्द आहे का आपल्यावर अविश्वास दाखवायचा हेतू नाही, पण अजून एकाने कन्फर्म केले की बदल करतो.\nबादवे, ईंग्लिश स्पेलिंग नेटवर कुठेही कशीही सहज कन्फर्म करता येते पण मराठी र्हस्व दिर्ध शुद्धलेखन तपासायला कोणती साईट आहे का\nआशीर्वाद असं कर ना. >> मी पण\nआशीर्वाद असं कर ना. >> मी पण हेच म्हणणार होते .\nदेवकी करतो, पण नक्की आशिर्वाद\nदेवकी करतो, पण नक्की आशिर्वाद असे नसून आशीर्वाद असा शब्द आहे का आपल्यावर अविश्वास दाखवायचा हेतू नाही, पण अजून एकाने कन्फर्म केले की बदल करतो. >>>>> हो.\nबादवे, ईंग्लिश स्पेलिंग नेटवर कुठेही कशीही सहज कन्फर्म करता येते पण मराठी र्हस्व दिर्ध शुद्धलेखन तपासायला कोणती साईट आहे का\nबादवे, ईंग्लिश स्पेलिंग नेटवर\nबादवे, ईंग्लिश स्पेलिंग नेटवर कुठेही कशीही सहज कन्फर्म करता येते पण मराठी र्हस्व दिर्ध शुद्धलेखन तपासायला कोणती साईट आहे का >>>> र्‍हस्व दीर्घ लिहा 10 वेळा\nआपल्यावर अविश्वास दाखवायचा हेतू नाही, >>>>>>>> माझ्यावर अविश्वास् दाखवलास, नाही दाखवलास तरी चालेल.शब्दाचे शुध्द रुप, आशीर्वाद हेच आहे.\nरच्याकने, मराठी भाषेचे व्याकरणअशाच नावाचे दामल्यांचे एक जाडजूड पुस्तक आहे ते वाच.ते कष्ट घ्यायचे नसतील तर ,प्राचीने सांगितल्याप्रमाणे करच.\nप्राची, >> मायबोली >> हो ते\nप्राची, >> मायबोली >> हो ते तर आहेच. जरा कान पिरगाळतात पण सुधरवतात\n-हस्व दीर्घ मला लिहितानाच शंका आलेली की ईथेही पचका होणार.\nदेवकी जाडजूड पुस्तकांचे कौतुक तुम्ही एका ईंजिनीअरला सांगू नका. अशी कैक पुस्तके उशी म्हणून घेऊन झोपलोय\nत्यापेक्षा आपल्या आशीर्वादानेच सुधारेल हळूहळू मराठी\nपुस्तक उशाला घेऊन झोपायचं\nपुस्तक उशाला घेऊन झोपायचं असतं का रे अशानेच भारतीय माणुस मागे पडतो .\nऋ, बदलायला किती वेळ घेतलास\nऋ, बदलायला किती वेळ घेतलास \nपण ठीकच आहे. तुम्ही तरुण मुलं मराठीत लिहिताय हेच खूप आहे .\nऑनलाईन आलो तसे बदलले. मला\nऑनलाईन आलो तसे बदलले.\nमला आशिका या आयडी नावासारखे आशिर्वाद बरोबर वाटत होते म्हणून जरा कन्फ्यूज होतो. आणि मला रिवर्क करायचे नसल्याने कन्फर्म होईपर्यंत थांबलो ईतकेच\nश्री, ती प्राचीन टेक्नोलॉजी\nश्री, ती प्राचीन टेक्नोलॉजी आहे. यज्ञात दिलेली आहुती देवतांपर्यंत पोहोचते तशी. बिरबलाने आपल्या खिचडीतही वापरलेली. उशाशी पुस्तक घेऊन झोपल्याने त्यातील ज्ञान थेट डोक्यात शिरते. माझी ईंजिनीअरींग अशीच निघाली\nआणि भारतीय वृत्तीला टोमणे मारायला चीनचा धागा काढलाय ना. ईथेही परत तेच का\nदामल्यांच्या पुस्तकाचा मी धसका घेतला होता रे,म्हणून तुला भिती घातली.जाऊ दे,सुधारणा केलीस हे महत्वाचे.\n<< छोट्या छोट्या गोष्टी, छोटी\n<< छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी पावले, मानसिकता हळूहळू बदलायला मदत करू शकतात हा विश्वास असल्याने >> सहमत.\nपण तुमची आई तुम्हाला आशीर्वाद\nपण तुमची आई तुम्हाला आशीर्वाद देते हे सगळ्याना सांगत कशाला फिरायचं \nगमभन वापरा, शुद्धी चिकित्सेला, किंवा मनोगत.कॉम\nमनोगत या साईट चा शुद्धी चिकित्सक बेस्ट आहे.\nअनू, धन्यवाद. शोधतो पुढच्या\nअनू, धन्यवाद. शोधतो पुढच्या विकांताला. हा आठवडा तांत्रिक कारणाने टूजी मोबाईलवर काम चालवावे लागणार आहे.\nअनिल, आपल्यासारख्याच एका प्रतिसादाची हा धागा वाट बघत होता. जरा ईलॅबोरेट कराल तर मजा येईल\nउशाशी पुस्तक घेऊन झोपल्याने\nउशाशी पुस्तक घेऊन झोपल्याने त्यातील ज्ञान थेट डोक्यात शिरते. माझी ईंजिनीअरींग अशीच निघाली >>> अरेरे हे ज्ञान आधी कुठे मिळालं असतंच तर मीपण झाले असते की इंजिनियर. छया .\nऋ ते अनिलचेंबुर असं लिही रे.\nऋ ते अनिलचेंबुर असं लिही रे.\nउशाशी ठेवलेल्या पुस्तकाचा आणि\nउशाशी ठेवलेल्या पुस्तकाचा आणि डोक्यातील विचारांचा थेट संबंध असतोच. लहानपणी मला भूतांची स्वप्ने पडायची. आताही पडतात. पण ती भूतांची नसतात. तर ते एक असो. पण तेव्हा माझ्या आज्जीने एक पुस्तक उशाशी ठेवायला दिले होते. आणि खरेच मला तशी स्वप्ने पडायची बंद झाली होती. याला आज्जीचा आशीर्वादही म्हणू शकता\nऋ ते अनिलचेंबुर असं लिही\nऋ ते अनिलचेंबुर असं लिही रे.\nमाझ्याकडून वाचताना ते चेंबूरचे चेंबर असेच वाचले जात होते बहुधा. आधी कुठे मी तुमचे नाव लिहिलेले का आणि कसे बघायला हवे. ईंग्लिश फॉन्ट किंवा जोडून लिहिल्याने झाले असावे. बदलतो लगेच\nजरा ईलॅबोरेट कराल तर मजा येईल\nजरा ईलॅबोरेट कराल तर मजा येईल >> तुझा कोणी ह्या वाक्याने पचका केलाय का रे सध्या दोन तीन बाफांवर हे वापरलेले दिसले\nअरेरे हे ज्ञान आधी कुठे मिळालं असतंच तर मीपण झाले असते की इंजिनियर >> त्याने कुठेही तो इंजिनियर झाल्याचे नमूद केलेले नाहिये.\nअसामी, @ ईलॅबोरेट, माझी\n@ ईलॅबोरेट, माझी गर्लफ्रेंडही हेच म्हणते की मला एखादा नवीन ईंग्लिश शब्द मिळाला की बघावा तेव्हा तोच जिथे तिथे वापरत असतो. सध्या याची चलती आहे असे समजा\n@ ईंजिनीअर, अहो मी जॉबपाण्याला लागलोय की आता. म्हणजे झालोच असणार. तसेही कुठे ईतर धाग्यांवर नमूद केले असेलच हे.\nतरी जर हे सर्वांना माहीत नसेल तर एक धागा तो बनता है बॉस.. \"मी ईंजिनीअर कसा झालो\nधागा कशाला ऋ त्यासाठी , तू\nधागा कशाला ऋ त्यासाठी ;), तू लिहिलं आहेस कुठेतरी इंजिनियर आहेस असं. मी वाचलंय.\nए नको रे बाबा, आम्हाला\nए नको रे बाबा, आम्हाला माहितीये इंजिनीयरिन्गची रेसिपी.\nमाझी गर्लफ्रेंडही हेच म्हणते\nमाझी गर्लफ्रेंडही हेच म्हणते की >> एव्हढी स्मार्ट पोरगी असूनही ...\nसिंडरेला, प्रत्येक ईंजिनीअरची एक वेगळीच कहाणी असते. निदान प्रत्येकाला ती तशी वाटते तरी. चार दिन की जिंदगी है असे म्हणायची पद्धत ईंजिनीअरींगच्या चार वर्षांवरूनच पडलीय. आईचा आशीर्वाद आणि बाबांची पुण्याई असल्याशिवाय ही पुर्ण होत नाही. बघू आता कधी योग येतोय लिहायचा.\nपण तुमची आई तुम्हाला आशीर्वाद\nपण तुमची आई तुम्हाला आशीर्वाद देते हे सगळ्याना सांगत कशाला फिरायचं \n>>> ट्रक, टेंपोच्या मागे पण लिहीलेले असते की, \"आई, तुझा आशीर्वाद\".\nआईचा आशीर्वाद तीन प्रवाश्यांसाठी फक्त.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mpcnews.in/pune-15-thousand-849-patients-corona-free-in-10-days-2663-173233/", "date_download": "2020-09-26T03:11:42Z", "digest": "sha1:6POJUCSXBT7H4DRUUKJT2MGW75EYQ55J", "length": 6980, "nlines": 76, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : 10 दिवसांत 15 हजार 849 रुग्ण कोरोनामुक्त", "raw_content": "\nPune Corona News : 10 दिवसांत 15 हजार 849 रुग्ण कोरोनामुक्त\nPune Corona News : 10 दिवसांत 15 हजार 849 रुग्ण कोरोनामुक्त\nपुणे शहरात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ; 15 thousand 849 patients corona free in 10 days\nएमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ऑगस्ट महिन्यातील 10 दिवसांत तब्बल 15 हजार 849 रुग्ण कोरोनाच्या आजारातून बरे झाले आहेत.\nपुणे शहरात सध्या कोरोनाचे 738 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 444 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे शहरात एकूण 66 हजार 727 रुग्ण झाले आहेत. 50 हजार 113 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.\nआतापर्यंत या कोरोनामुळे 1 हजार 571 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 15 हजार 43 ॲ क्टिव्ह रुग्ण आहेत. या महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांत शहरात कोरोनाचे 10 हजार रुग्ण वाढले.\nजुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या ऑगस्टमध्ये नियंत्रित असल्याचे दिसून येत आहे.\nकोरोना आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पुणे शहरातील सर्वच व्यवहार दररोज सुरू करण्यास पुणे महापालिकेतर्फे परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे.\nया पार्श्वभूमीवर मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायजरचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. चार महिन्यांपेक्षा जास्त दिवस बंद राहिलेले मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्सही सुरू झाले आहेत.\nआगामी गणेशोत्सवात खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nChinchwad News : दहीहंडीच्या कार्यक्रमांना पोलिसांकडून परवानगी नाही; शहरात टाळेबंदीची होणार कठोर अंमलबजावणी\nIPL 2020 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्ली कॅपिटल्सची चेन्नईवर 44 धावांनी मात\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 7 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची नोंद\nPune News : टाटा मोटर्सने बनविलेल्या 51 विंगर रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nPimpri news: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 9 ऑक्टोबरला निवडणूक\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 164 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 87 नवीन रुग्ण\nPune News : लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदी रद्द करा ; भारतीय मजदूर संघांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/mgm/", "date_download": "2020-09-26T03:26:47Z", "digest": "sha1:GQG6I6VTO2ERMVS3VE3KSWUXZMWJYOPR", "length": 1490, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "MGM Archives | InMarathi", "raw_content": "\nटॉम अॅण्ड जेरी ने शेवटच्या एपिसोडमध्ये खरंच आत्महत्या केली होती\nटॉम अॅण्ड जेरी ही सिरीज जरी संपली असली तरी त्याला बघण्याची मजा आजही तशीच आहे. टॉम अॅण्ड जेरीने ९० च्या दशकातील मुलांचे बालपण विस्मरणीय केले आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://sandeepramdasi.com/2011/06/18/munnabhai_mbbs/", "date_download": "2020-09-26T01:13:56Z", "digest": "sha1:NJSZ25JZSUHZLFN4JYRHRCIEPYBYJTSO", "length": 17607, "nlines": 106, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "मुन्नाभाईईईईई यॅग्रिकल्चर | रामबाण", "raw_content": "\nमुन्नाभाई एमबीबीएस हा सिनेमा मला प्रचंड आवडला. त्यानंतर मुन्नाभाई अॅग्रिकल्चर असाच सिक्वल येईल असं वाटत होतं, त्यात शेती शिक्षणातील उणीवांवर हसत हसत बोट ठेवलं जाईल आणि हा उपेक्षित विषय मेन स्ट्रिममध्ये येईल असं स्वप्न पाहात होतो.\nतसं वाटायला एक छोटंसं कारण होतं…\nया सिनेमात मेडिकल कॉलेज म्हणून जी भव्य वास्तू दाखवलीय ना\n छे, हे तर शेती कॉलेज\nते आहे शंभर वर्षाची परंपरा असलेलं; महात्मा फुल्यांच्या प्रयत्नातून सुरु झालेलं पुण्याचं कृषी महाविद्यालय. मुन्नाभाई चित्रपटातील बऱ्याच महत्वाच्या प्रसंगांचं शुटिंग इथं झालं. राजू हिरानी म्हणा किंवा विधू विनोद चोप्रा म्हणा, त्यांना शुटिंगच्या निमित्तानं काही काळ तरी या शेती कॉलेजच्या कॅम्पसवर घालायला मिळालाय. त्यांनी इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असेल, शेती आणि शेतकऱ्याबद्दल त्यांच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल, शेतीचं शिक्षण कसं दिलं जातं, त्याचा कसा, कुणाला, किती फायदा होतोय याचा थोडाफार अंदाज त्यांना आला असेल, या कृषिप्रधान भारत देशासाठी या दमदार विषयाला प्रचंड स्कोप आहे हे लक्षात यायला त्यांना वेळ लागला नसेल आणि म्हणूनच एमबीबीएसनंतर मुन्नाभाई यॅग्रिकल्चर चा प्लॅन त्यांनी फिस्क केला असेल असं मला वाटत होतं,\nपण तसं झालं नाही…\nआता वरचा फोटो पुन्हा पाहा\nत्यांना शेतकऱ्याऐवजी गांधीगिरीनं भूरळ घातली आणि त्यांनी लगे रहो बनवला, त्यानंतर त्यांनी इंजिनिअरींग विषय घेत ३ इडियट्स बनवला. शेती इथेही दुर्लक्षित राहिली, त्यांना जास्त दोष दिला नाही. बेटा, मोठेपणी कोण होणार हा सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न आणि डॉक्तल नायतल इंजिनियल हे सर्वाधिक दिलं जाणारं उत्तर त्यांनीही ऐकलं असणारच की, त्याचा प्रभाव लवकर जातो थोडाच. असो.\nशाळेत असताना कधीतरी ऑस्ट्रेलियन शिक्षण पद्धतीबद्दल ऐकलं-वाचलं होतं, त्यामुळेही असेल कदाचित पण मला आपली शिक्षण पद्धती कधीच आवडली नाही. आपण जे शिकतोय त्याचा आयुष्यात काय उपयोग होणार असा प्रश्न पडायचा; आणि उपयोग होणार नसेल तर या चारभिंतीत आपण आयुष्याची २०-२३ वर्ष वाया तर घालवत नाहीयत ना अशी भिती वाटायची. पुढे ती मोठ्ठ्या प्रमाणात खरी ठरली. (त्याचं बरंच श्रेय आपल्या शिक्षण पद्धतीला द्यायलाच हवं). मी कधीच हुशार वगैरे विद्यार्थी नव्हतो पण जे काही शाळा-कॉलेजात शिकवलं किंवा पास होण्याच्या धाकानं मी शिकलो; त्यातलं (काही बेसिक सोडलं) फार कमी मला व्यावहारिक जगात कामाला आलं किंवा येतंय.\nशिक्षण पद्धतीबद्दल माझ्या मतात काडीचाही फरक पडणार नाही याची काळजी शेती महाविद्यालयानंही घेतली. नाही म्हणायला चौथ्यावर्षी रावे (Rural Agriculture Work Experience) नावाचा प्रकार होता. तो माझा फेव्हरेट काळ, खरं शिक्षण मला रावेच्या त्या ६ महिन्याच्या काळातच मिळालं, बाकी काळ्या आईची सेवा काळ्या फळ्यावर करण्यातच ४–६ वर्ष गेली, तशीच हजारो विद्यार्थ्यांची जातायत, अजूनही… थोडाफार फरक जरुर पडला असेल पण तो या सिस्टीमला नजर लागू नये इतकाच. गेल्या ३० दिवसात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, देशाच्या कृषीमंत्र्यांनी शेतीशिक्षण-संशोधन-विस्तारावर चिंता व्यक्त केली होती हे विशेष.\nया ४ वर्षाचा आणि ग्रामीण भागातून आलेल्या, महाराष्ट्राच्या मातीचा रंग-गंध माहिती असलेल्या त्या मुलांचा फार चांगला वापर शेती विकासाच्या कामात करुन घेता येणं सहज शक्य आहे.\nवर्गामधली-ब्लॅकबोर्डवरची, प्रयोगशाळेतली, पुस्तकातली शेती आणि वास्तवातली शेती यात जमीन-आस्मानचं अंतर नसेल कदाचित; पण फक्त विचार करणे आणि actual कृती करणे यांत जितकं अंतर आहे तेवढं अंतर निश्चित आहे. आपलं शेती शिक्षण गेली अनेक वर्ष विचारच करत आहे. देशातली शेती आणि शेतकऱ्याचं भविष्य कोमात जाण्याआधी; शेती शिक्षणाला विचार करण्याच्या अवस्थेतून बाहेर काढून कामाला लावायला हवं. हे काम एखाद्या मुन्नाभाईनंही केलं तर आपली हरकत नाही बुवा. बोले तो शेतीला एक जादू की झप्पी मिळेल, क्या बोलताय मामू\nउशीरा का होईना हिरानी-चोप्रांचे (किंवा एखाद्या मराठी निर्मात्याचे) डोळे उघडतील आणि मुन्नाभाऊ शेतकरी आपल्या भेटीला येईल अशी आशा. त्याने प्रश्न सुटतील का तर नाही… पण त्यानिमित्तानं मूळात काही प्रश्न आहेत हे तरी समोर येईल.\n8 thoughts on “मुन्नाभाईईईईई यॅग्रिकल्चर”\nसंदीपजी खूप छान विषय मांडलात आपण, गरज आहे त्याची.\nआजही जपान तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतका पुढारलेला असतानाही तिथे शेतीला अग्रक्रम दिला जातो.\nमी ज्या जापनीस कंपनी मध्ये काम करतो त्या कंपनीचे management ची लोक स्वतः शेती करतात व स्वतापुर्ते का होईना धान्य पिकवतात. पण ते हे का करू शकतात, तर त्यांच्याकडे त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आहे. म्हणजेच बर्याच कमी वेळात ते हे सर्व करू शकतात. आपण जर हे सर्व करायला गेलो तर मला वाटतंय नोकरी सोडूनच करावे लागेल.\nआपल्याकडे शेती हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. फक्त नारेबाजी केली कि झालं…….\nfirst of all लेख खरंच चांगला आहे.. विचारही चांगला आहे…\nमहत्त्वाचं (निशिकांत भालेरावांचं म्हणणंही अगदी बरोबर आहे)\nसर्वात प्रभावी माध्यम आपल्या हातात आहे.. त्याचा वापर करून आपण बदलाला सुरूवात करू शकतो.. (तसे प्रयत्न होतायतही.. पण तेवढे पुरेसे आणि प्रभावीपणे नाही.. )\nएकंदर तरूणांची शेतीबद्दली माणसिकता बदलणं, आणि शेतीच्या पद्घती बदलणं ही प्राथमिक गरज आहे… अर्थात याला वेळ लागेल.. पण हे बदल घडवण्यासाठी आपण माध्यमांच्या सहाय्यानं सिंहाचा वाटा उचलू शकतो… बाकी बदलाची रणणिती तुम्हीच माझ्यापेक्षा जास्त प्रभावीपणे ठरवू शकाल..\nनाही, कंटाळा नाही आलाय सर, अजून भरपूर पेशन्स आहेत (म्हणजे असं मी समजतो). शेतीमधल्या चार चांगल्या गोष्टी जनसामान्यांपर्यंत पोचत राहिल्या पाहिजेत; माध्यम कुठलं का असेना. आपण तर करत आहोतच मोठ्या पडद्यानं-मुन्ना किंवा आणखी कुणी वाटा उचलला तर चांगभलं.\nअहो, ज्यांनी शेतीविषयात लक्ष घालायला हवे त्यांचेच घोडे वांगे खाताहेत.\nमग बिच्चार्‍या मुन्नाभाईकडून तरी कशाला अपेक्षा करायची\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nधन्यवाद. जसं यंगस्टर्समध्ये-९० नंतरच्या पिढीमध्ये ‘लगे रहो’नं गांधीजींबद्दल कुतूहल निर्माण केलं तसं काहीकाळासाठी का असेना मुन्नाभाईमूळं शेतकऱ्याबद्दल झालं तर शेतीतले खरे प्रश्न, शेतकरी घेत असलेल्या कष्टाबद्दलची माहिती, शेतकऱ्यांबद्दलच्या २ चांगल्या गोष्टी तरुणांपर्यंत पोचतील.\nबाकी तुम्ही म्हणताय तसं कोणाकडनं फार काही अपेक्षा करण्यात खरंच अर्थ नाहीय हेच खरं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/foreign-parliamentary-committee-appreciated-indian-army-1528819/", "date_download": "2020-09-26T02:29:44Z", "digest": "sha1:OWBSUEUG2FLLSV6RJEHWCEXP37BBINFX", "length": 16865, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Foreign parliamentary committee appreciated Indian Army | लक्ष्यभेदी कारवाईने परिपक्वतेचे दर्शन | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nलक्ष्यभेदी कारवाईने परिपक्वतेचे दर्शन\nलक्ष्यभेदी कारवाईने परिपक्वतेचे दर्शन\nपरराष्ट्रविषयक संसदीय समितीची सरकार व लष्कराच्या पाठीवर कौतुकाची थाप\nपरराष्ट्रविषयक संसदीय समितीची सरकार व लष्कराच्या पाठीवर कौतुकाची थाप\nउरी हल्ल्यानंतर भारताने सीमा ओलांडून केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईवर (सर्जिकल स्ट्राइक) काँग्रेससह विरोधी पक्षांनी जाहीर शंका घेतल्या असल्या तरी विरोधकांच्या वर्चस्व असलेल्या परराष्ट्रविषयक संसदेच्या समितीने मात्र त्या कारवाईला परिपक्व प्रत्युत्तर आणि लष्करी क्षमतेचे प्रदर्शन अशा शब्दांत गौरविले.\n‘‘२९ सप्टेंबर २०१६ रोजी लष्कराने केलेली लक्ष्यभेदी कारवाई ही भारतीय संयमाचे आणि परिपक्व प्रतिक्रियेचे प्रदर्शन होती. जगातील बहुतेक देशांनी भारताची भूमिका आणि या कारवाईचे समर्थन केल्याने समिती समाधानी आहे,’’ असे काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने म्हटले आहे. राहुल गांधी, डॉ. करण सिंह, सत्यव्रत चतुर्वेदी, राज बब्बर, कनिमोळी, सुप्रिया सुळे अशी विरोधी पक्षांतील बडी मंडळी सदस्य असतानाही समितीने लक्ष्यभेदी कारवाईचे केलेल्या मनमोकळ्या कौतुकाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारवाईबद्दल एकाही सदस्याने शंका घेतली नाही.\n‘‘हवी तेव्हा सीमा ओलांडून हवे तसे हल्ले करण्याचे अमर्यादित स्वातंत्र्य तुम्हाला नाही. हल्ले केल्यानंतर पुन्हा स्वत:च्या सीमेत पळून जाऊन सुरक्षित राहण्याचेही स्वातंत्र्य तुम्हाला नाही. तसेच स्वत:च्या सीमेत गेलो म्हणजे आपल्याला कुणी हात लावणार नसल्याचा अहंकार चुकीचा आहे.. हे संदेश आम्हाला पाकला, त्यांनी पाळलेल्या दहशतवाद्यांना द्यायचे होते. तुम्ही नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी कारवाया केल्या तर आम्ही यापूर्वी बसलो तसे गप्प राहणार नाही. आमच्यासमोर पर्याय आहेत आणि वेळ पडलीच तर आम्ही त्यांचा बेधडक वापर करू शकतो, हे ही आम्हाला पाकला दाखवून द्यायचे होते,’’ अशी भूमिका परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी समितीपुढे मांडली होती. समितीने तिच्यावर संमतीची मोहोर लावली.\nसीमा ओलांडून केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईने ‘धोरणात्मक संयम’ बाजूला ठेवून ‘धोरणात्मक आक्रमकता’ स्वीकारल्याचा अर्थ काढावयाचा का, असा सवाल जयशंकर यांना समिती सदस्यांनी केला होता. त्यावर जयशंकर म्हणाले, ‘‘ही लक्ष्यभेदी कारवाई म्हणजे धोरणात्मक संयमाचा अंत असे मानू नका. खरोखरच ही कारवाई अत्यंत संयमित होती. आम्ही फक्त दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यापलीकडे शक्य असूनही गेलो नाही. पण हा धोरणात्मक संयम पूर्वीसारखा नाही, एवढेच आम्हाला दाखवून द्यायचे होते. तरीही कारवाई एकूणच संयमित होती.’’ जयशंकर यांचे स्पष्टीकरण समितीने समाधान व्यक्त केले आणि यापुढेही धोरणात्मक संयमाचे धोरण चालू ठेवण्याची शिफारस केली.\n‘पाकव्याप्त काश्मीरच्या ताब्यासाठी पावले टाका’\nपाकिस्तानबरोबरील अधिकृत चर्चा थांबविण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा निर्णय समजण्याजोगा असला तरी पाकिस्तान आणि संबंधित सर्व घटकांशी चर्चा, संवादांशिवाय अजिबात पर्याय नसल्याची स्पष्ट शिफारस संसदेच्या परराष्ट्र धोरणविषयक समितीने शुक्रवारी केली. मात्र, त्याचवेळी संवादाची भाषा पाकला कळणार नसेल तर गिलगिट- बाल्टिस्तानसह पाकव्याप्त काश्मीरचा ताबा घेण्यासाठी ठोस पावले टाकण्याचीही शिफारस समितीने केली. शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला अहवाल शुRवारी लोकसभा व राज्यसभेत सादर केला. पाकबरोबरील चर्चेमध्ये दहशतवादाबरोबरच पाकव्याप्त काश्मीरवरील भारताच्या न्याय्य हक्काच्या मुद्दय़ाला प्राधान्य दिले पाहिजे. पाकला जर संवादाची भाषा कळणार नसेल तर मग त्यांनी बळकाविलेला पाकव्याप्त काश्मीर आणि चीनला परस्पर दिलेला अक्साई चीनचा भूभाग ताब्यात घेण्यासाठी सरकारने ठोस पावले टाकली पाहिजेत.\nभारत व पाकिस्तान हे दोघेही दहशतवादाचे बळी असल्याचा समज आपल्याला पहिल्यांदा दूर करायला पाहिजे. आपल्यावर पाकने दहशतवाद लादलाय आणि भारताला रक्तबंबाळ करण्यासाठी स्वत:च्या देशात ते दहशतवादाला जन्म देत आहेत. – एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव (समितीपुढे दिलेल्या साक्षीमध्ये)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 राज्यसभेत अधिक कामकाज\n2 भारत-चीन सीमा प्रश्न चिघळणार भारताकडून सीमेवर आणखी सैनिक तैनात\n3 इजिप्तमध्ये दोन रेल्वेगाड्यांची टक्कर, ३६ प्रवासी ठार\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/narendra-modi-reaches-out-to-northeast-says-nido-taniams-death-a-national-shame-366158/", "date_download": "2020-09-26T02:43:48Z", "digest": "sha1:HW7O4ES6GTASGQG3KMDW7LDTJCONDIDW", "length": 11543, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "निडो तनीमचा मृत्यू देशासाठी लाजिरवाणी बाब | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nनिडो तनीमचा मृत्यू देशासाठी लाजिरवाणी बाब\nनिडो तनीमचा मृत्यू देशासाठी लाजिरवाणी बाब\nईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी कॉंग्रेसकडे कोणतीही ठोस योजना नाही, असे सांगून मोदी यांनी नीडोची हत्या म्हणजे राष्ट्रासाठी लाजीरवाणी घटना असल्याचे म्हटले आहे\nईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी कॉंग्रेसकडे कोणतीही ठोस योजना नाही, असे सांगून मोदी यांनी नीडोची हत्या म्हणजे राष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब असल्याचे म्हटले आहे. ईशान्य भारताच्या दुर्दशेला केंद्र सरकारच जबाबदार असल्याची घणाघाती टीका करत नरेंद्र मोदींनी ईशान्य भारतामध्ये निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली.\nइंफाळ येथे रॅलीला संबोधित करताना मोदींनी नीडोसाठी प्रार्थना केली. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या योजना सगळ्या अपयशी ठरल्या असून राज्यकर्त्यांनी केवळ जनतेला लुटले आहे. तसेच वीज व पाण्यासारख्या व रोजगाराच्या समस्या न सोडवणा-या केंद्र सरकारने फोडा व राज्य करा असे धोरण राबवत त्याला ईशान्य भारत बळी पडल्याचे ते म्हणाले.\nईशान्य भारतातल्या आठ राज्यातल्या सगळ्या सरकारांना आपण सांगितले की दोन वर्षांसाठी प्रत्येकी २०० महिला पोलीस गुजरातमध्ये पाठवा. इंग्रजी बोलणा-या या पोलीस महिला विदेशी पर्यटकांच्या सहाय्यासाठी आम्हाला उपयोगी होतील आणि या पोलिसांच्या परिचयातून हजारो गुजराती पर्यटक ईशान्य भारतात येतील असे सांगतानाच या सगळ्या पोलिसांचा सगळा खर्च आपण करू असेही मोदी यावेळी म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n१०५ जागा मिळूनही महाराष्ट्रात भाजपाची सत्ता का नाही\nदेवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक पुस्तक : काय आहे पुस्तकात\nमोदींच्या वाढदिवशी राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करणं खेदजनक-रोहित पवार\n२१ व्या शतकातल्या भारताची वाटचाल ‘नॉलेज इकॉनॉमी’च्या दिशेने-मोदी\nचीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 केजरीवालांची आता राज्यपालांशीच ‘जंग’\n2 हैदराबाद ‘केंद्रशासित’ नाही\n3 ईशान्येकडील जनतेच्या तक्रार निवारणासाठी समिती\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/posters-by-banned-maoist-organization-on-shahid-day-in-pune-90344/", "date_download": "2020-09-26T02:54:14Z", "digest": "sha1:RLYI3BG2AQZYJCKB4BEU6FWMPWZUDPLH", "length": 15337, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बंदी घातलेल्या माओवादी संघटनेकडून शहीद दिनी पुण्यात विविध ठिकाणी पोस्टर्स | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nबंदी घातलेल्या माओवादी संघटनेकडून शहीद दिनी पुण्यात विविध ठिकाणी पोस्टर्स\nबंदी घातलेल्या माओवादी संघटनेकडून शहीद दिनी पुण्यात विविध ठिकाणी पोस्टर्स\nनक्षलवादी कारवायांसाठी बंदी घालण्यात आलेल्या ‘भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)’ या संघटनेतर्फे शहीद दिनी (२३ मार्च) शहरात विविध ठिकाणी पोस्टर लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्रकार\n* पत्रकार संघाच्या सीसीटीव्हीत तिघे कैद\nनक्षलवादी कारवायांसाठी बंदी घालण्यात आलेल्या ‘भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)’ या संघटनेतर्फे शहीद दिनी (२३ मार्च) शहरात विविध ठिकाणी पोस्टर लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्रकार भवन येथे रात्री अकरा वाजता मोटारसायकलवरून येऊन पत्रके लावणारे तिघे जण तेथील सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसत आहेत. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा नक्षलवाद्यांचे स्लीपर सेल कार्यरत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीसुद्धा याच वेळेला शहरात काही ठिकाणी ही पोस्टर लागली होती.\nपुण्यात पत्रकार भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गरवारे महाविद्यालय, एसपी महाविद्यालय, नेहरू मेमोरियल हॉल, बालगंधर्व, शनिवारवाडा, शिवाजीनगर न्यायालय अशा ठिकाणी बंदी घातलेल्या भाकप (माओवादी) या संघटनेची पोस्टर लावली आहेत. या पोस्टरमध्ये शहीद भगतसिंग यांच्या शहीद दिनाच्या निमित्ताने संघर्ष सप्ताह पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याच बरोबर त्याद्वारे ‘सर्व क्रांतिकारकांना राजनैतिक बंदीचा दर्जा द्या, बंदीना भेटताना गुप्ततेने भेटण्याचे अधिकार द्या, क्रांतिकारकांना दिल्या जाणाऱ्या साहित्यावरील प्रतिबंध हटवा,’ आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. शहरात गेल्या वर्षी साधारण याच वेळी महत्त्वाच्या ठिकाणी पोस्टर लावली होती.\nया घटनेच्या अगोदर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून मे २०११ मध्ये पुणे व ठाणे येथून सात जणांस अटक केली होती. त्यात भाकप-एमच्या गोल्डन कॉरीडॉर कमिटीची सचिव अ‍ॅन्जेलो सोनटक्के उर्फ श्रद्धा ऊर्फ राही, उर्फ इशराका (वय ४२), कबीर कला मंच कार्यकर्ता दीपक ढेगळे यांच्यासह इतरांचा समावेश होता. या प्रकरणी मिलिंद तेलतुंबडे आणि कबीर कला मंचचे सहा जण फरार आहेत. पुणे पोलिसांकडे नक्षलवाद विरोधी स्वतंत्र सेल आहे. मात्र, एका वर्षांनंतर पुन्हा शहरात भाकप (माओवादी) या संघटनेची पोस्टर लागल्याने पुण्यात नक्षलवाद्याचे स्लिपरसेल कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nएटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी जंगल भागात आपले वर्चस्व निर्माण केल्यानंतर याचा प्रसार व प्रचार राज्याचा शहरी व इतर ग्रामीण भागात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टिकोनातून भाकप (माओवादी) च्या गोल्डन कॉरीडॉर कमिटीकडे पुणे, मुंबई, ठाणे, अहमदाबाद, नाशिक येथील ग्रामीण भागातील तरुणांना नक्षलवादी चळवळीकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कमिटीची सचिव असलेली अ‍ॅन्जेलो ही पुणे, मुंबई परिसरात राहून तरुणांना आकर्षित करत होती. यामध्ये तिला पुण्यातील कबीर कला मंचच्या सदस्यांना नक्षलवादी विचारांकडे आकर्षिक करण्यात यश आले. यातील काही जाणांस एटीएसने अटक केली असली तरी या मंचाचे सहा तरुण गायब असून हे सर्व जण नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय झाल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n’कलाकारांच्या राजकारणात येण्यामुळेच तामिळनाडू भ्रष्ट राज्यांच्या यादीत\n…वेळ पडल्यास उदयनराजेंना अटक करू-नांगरे पाटील\nज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस का सोडली राहुल गांधींनी सांगितलं ‘हे’ खरं कारण\nबक्कळ पैशांवर भाजपचे फुटकळ राजकारण : शिवसेना\nघटस्थापनेला जोरदार धक्का देणार: नारायण राणे\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 अनुदानित सिलिंडरच्या परस्पर चोरीची भीती\n3 लक्ष्मण माने फरार, संस्थेचेही आरोपांबाबत मौन\n\"Mr. Gavaskar तुम्हाला वाटत नाही का...\" 'त्या' वक्तव्यावर अनुष्काने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/star-pravah-celebrities-new-promo-song-for-vithumauli-serial-1543650/", "date_download": "2020-09-26T02:27:17Z", "digest": "sha1:IVAVFZSPNR7Z63YMIJB2H4KPQX4ZZI7W", "length": 12691, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Star pravah celebrities new promo song for Vithumauli serial | VIDEO : ..म्हणून सेलिब्रिटी रंगले विठू नामाच्या गजरात | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nVIDEO : ..म्हणून सेलिब्रिटी रंगले विठू नामाच्या गजरात\nVIDEO : ..म्हणून सेलिब्रिटी रंगले विठू नामाच्या गजरात\nया सेलिब्रेटींनी एकत्र येऊन केलेल्या विठुमाऊलीच्या आरतीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.\n'विठूमाऊली' ही नवी मालिका स्टार प्रवाह लवकरच सुरु होणार आहे.\nसध्या घरोघरी गणपतीबाप्पा विराजमान झाले आहेत. घरचे सर्व एकत्र येऊन बाप्पांची उत्साहाने आरती करत आहेत. स्टार प्रवाह परिवारातील सेलिब्रेटी सदस्यांनी एकत्र येऊन नुकतीच एक आरती नव्या ढंगात सादर केली. या सेलिब्रेटींनी एकत्र येऊन केलेल्या विठुमाऊलीच्या आरतीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निमित्त आहे आगामी ‘विठुमाऊली’ या नव्या मालिकेचं\n‘विठूमाऊली’ ही नवी मालिका स्टार प्रवाह लवकरच सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहिनीतर्फे नुकताच विठुमाऊलीच्या आरतीचा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करण्यात आला. यात समीर परांजपे, रुपल नंद, उपेंद्र लिमये, प्रसिद्धी किशोर, हर्षदा खानविलकर, सुपर्णा श्याम, संकेत पाठक, नेहा पवार, रश्मी अनपट, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, सायली देवधर, प्रसाद जवादे, संग्राम साळवी या कलाकारांनी एकत्र येत विठूमाऊलीची आरती केली आहे. कोठारे व्हिजनचे महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे याचा सुद्धा यात सहभाग होता.\nवाचा : माहेरचा गणपती ‘हातावरील टॅटूमुळे तो नेहमीच माझ्या सोबत असतो’\n‘येई हो विठ्ठले माझे माऊली ये’ ही पारंपरिक आरती नव्या ढंगात सादर करण्यात आली आहे. संगीतकार सुयोग चुरी यांनी ही आरती संगीतबद्ध केली आहे. राजेश बिडवे यांनी नृत्यदिग्दर्शन, विनायक जाधव यांनी छायांकन, आलाप मोहिले यांनी सह दिग्दर्शन आणि शिल्पेश कोठारे यांनी दिग्दर्शन केलं आहे. गौरव बुरसे, करण कागळे, पल्लवी केळकर आणि मीरा भालेराव यांना ही आरती गायली आहे.\nवाचा : जाणून घ्या, अजयच्या ‘बादशाहो’ची पहिल्या दिवसाची कमाई\nसध्या ही आरती घराघरात आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गाजत आहे. सोशल मीडियावर ही आरती पोस्ट केल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत या व्हिडिओला ११ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अवघ्या महाराष्ट्रात ‘विठुमाऊली’ या मालिकेविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचं या प्रतिसादावरून दिसून येतं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 ‘प्रसिद्धीसाठी हृतिकच्या नावाची गरज नाही’\n2 ‘अरे, मी जिवंत आहे’\n3 VIDEO : काळवीट शिकार प्रकरणी चौकशीदरम्यानचा सलमानचा हा व्हिडिओ पाहिला का\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/congress-workers-confused-to-understand-rahul-gandhi-american-methods-of-candidate-selection-376209/", "date_download": "2020-09-26T03:23:43Z", "digest": "sha1:CM3QR4IWDRL5GRC35VWR2KA723GZYGT6", "length": 14348, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राहुल गांधींची अमेरिकन पद्धती : उमेदवार निवड पद्धतीवरून कार्यकर्ते संभ्रमात | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nराहुल गांधींची अमेरिकन पद्धती : उमेदवार निवड पद्धतीवरून कार्यकर्ते संभ्रमात\nराहुल गांधींची अमेरिकन पद्धती : उमेदवार निवड पद्धतीवरून कार्यकर्ते संभ्रमात\nकाँग्रेस पक्षाचे उमेदवार अमेरिकन पद्धतीनुसार निवडण्यासाठी राहुल गांधी यांनी राज्यातील औरंगाबाद आणि यवतमाळ या दोन मतदारसंघांची निवड केली असली तरी या दोन्ही मतदारसंघांतील कार्यकर्ते मात्र\nकाँग्रेस पक्षाचे उमेदवार अमेरिकन पद्धतीनुसार निवडण्यासाठी राहुल गांधी यांनी राज्यातील औरंगाबाद आणि यवतमाळ या दोन मतदारसंघांची निवड केली असली तरी या दोन्ही मतदारसंघांतील कार्यकर्ते मात्र गोंधळात पडले आहेत. यापूर्वी वरून उमेदवारी आणणारेच आता कार्यकर्त्यांमधून निवडले जातील एवढाच फरक असेल, असे बोलले जाऊ लागले आहे.\nराहुल गांधी यांनी उमेदवार निवडीसाठी १९ निकष ठरवून दिले आहेत. पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी, केंद्र व राज्य पातळीवरील पक्षाचे प्रतिनिधी यांना मतदानाचा अधिकार राहणार आहे. उमेदवार निवडीसाठी त्यांनी निवडलेल्या देशातील १५ मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. राहुल गांधी यांनी उमेदवार निवडीसाठी जी पद्धत अवलंबिली आहे. त्याबाबत पक्षात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी आधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मिनतवारी करावी लागेल, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.\nऔरंगाबाद आणि यवतमाळ मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांमधून उमेदवार निवडीकरिता काहीच प्रक्रिया सुरू झालेली नाही. नुसती मतदारसंघांची नावे झळकत आहेत, पण नक्की काहीच कळत नाही, असा दोन्ही जिल्ह्य़ांमधील कार्यकर्त्यांचा सूर आहे.\nयवतमाळ-वाशिम हा मतदारसंघ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा जिल्हा. यवतमाळमध्ये माणिकराव ठरवतील तोच उमेदवार राहिल, असे कार्यकर्ते उघडपणे बोलतात. जिल्ह्य़ात ठाकरे यांच्या विरोधात एक गट सक्रिय असला तरी जिल्ह्य़ातील पक्षसंघटनेवर त्यांचाच वरचष्मा आहे. आपल्या मुलाला उमेदवारी देण्याची माणिकरावांची योजना आहे. भाजपमधून निवडून आलेले, पण अणु कराराच्या वेळी काँग्रेसला मदत केलेले माजी खासदार हरिभाऊ राठोड हे सुद्धा इच्छुक आहेत. गेल्या वेळी त्यांचा पराभव झाला होता. यवतमाळमध्ये गटबाजीचा पक्षाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत जिल्ह्य़ातील एका नेत्याने व्यक्त केले.\nऔरंगाबाद मतदारसंघ १९८९ पासून १९९८चा एकच अपवाद वगळता कायम शिवसेनेने सर केला आहे. यंदाही औरंगाबादमध्ये यश मिळण्याबाबत स्थानिक नेते साशंकच आहेत. औरंगाबाद काँग्रेसमध्ये तर कमालीची गटबाजी आहे. जालन्याचे माजी खासदार उत्तमसिंह पवार हे पुन्हा एकदा इच्छुक आहेत. आमदार डॉ. कल्याण काळे लढण्यास इच्छूक नाहीत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n”जामियामध्ये गोळीबार करणाऱ्याला कोणी पुरवला पैसा\nतुम्ही काय खाता हे कुणीही विचारलेले नाही\nदेश मोदी निर्मित संकटांच्या चक्रव्युहात अडकलाय-राहुल गांधी\n“राजस्थानमध्ये उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार”\nकरोना काळात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं चुकीचं -राहुल गांधी\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 मंगेश पाडगावकर यांच्या स्वरांत कुसुमाग्रजांच्या कविता \n2 गुप्तचर यंत्रणांमध्ये समन्वयास प्राधान्य देणार – हिमांशू रॉय\n3 महायुतीत माढाचा तिढा कायम\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/loksattas-lokankika-competition-2-1046450/", "date_download": "2020-09-26T02:20:00Z", "digest": "sha1:PN3IJNPKEQJPZTW4DGAY2EN6O3CINIAZ", "length": 23424, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला सुरुवात | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला सुरुवात\n‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला सुरुवात\nराज्यभरातील आठ केंद्रांवर ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा होत आहे.\nराज्यभरातील आठ केंद्रांवर ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा होत आहे. या स्पर्धेची सुरुवात रविवारी पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीपासून झाली. या फेरीसाठी प्रसन्नकुमार अकलुजकर, सुषमा जोग-सावरकर, अश्विनी परांजपे आणि प्रवीण तरडे या दिग्गजांनी परीक्षण केले. यावेळी या स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर असलेल्या आयरिस प्रॉडक्शन्सचे विद्याधर पाथरे आणि प्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी या युवा रंगकर्मीची पारख करण्यासाठी उपस्थित होत्या. ‘अस्तित्व’ संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिके’साठी इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक म्हणून ‘झी मराठी’ ची साथ मिळाली आहे. त्याचप्रमाणे केसरी ट्रॅव्हल्स, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ऑईल यांचाही स्पर्धेच्या आयोजनात मोठा वाटा आहे.\nपुणे शहराबरोबरच सोलापूर, इस्लामपूर, बारामती या ठिकाणांहून महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी झाली होती. १२ महाविद्यालयांच्या संघानी या स्पर्धेत आपला आविष्कार सादर केला. सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनीच लिहिलेल्या संहिता हे या स्पर्धेचे वैशिष्टय़ ठरले. डोंबाऱ्याचा खेळ, गुन्हेगारांकडे पाहण्याची सामाजिक मानसिकता, जादूचे प्रयोग करणाऱ्यामागे दडलेला माणूस, दुभंग व्यक्तिमत्त्व यांसारख्या विषयांची मांडणी एकांकिकांमधून करण्यात आली. भारताची प्रतिज्ञा नेमकी लिहिली कुणी या विषयावर प्रकाशझोत टाकणाऱ्या एकांकिकेसह आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी एका चाहत्याने केलेली गंमत अशा अगदी आसपास दिसणाऱ्या घटनांतील नाटय़ हेरून विद्यार्थ्यांनी त्याचे सादरीकरण केले. व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथेतील ‘चिट्टी’ने स्पर्धेत धमाल उडवून दिली. सहभागी झालेल्या बारा संघांमधून पाच संघांची निवड ७ डिसेंबर रोजी भरत नाटय़मंदिर येथे होणाऱ्या विभागीय अंतिम फेरीसाठी करण्यात आली. महाराष्ट्रातील आठ केंद्रांवरून निवडलेल्या उत्कृष्ट आठ एकांकिकांमधून सवरेत्कृष्ट एकांकिका, म्हणजेच महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ निवडण्यात येणार आहे.\n*छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये दडलेले नाटय़\n*लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या माध्यमातून पुणे विभागातील तरूणाईने समोर आणले.\n*अनेक नवे प्रयोग विद्यार्थ्यांनी त्यांच्या\nसादरीकरणात केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून त्यांची मेहनतही दिसून येत होती. फक्त एकांकिकेसाठी म्हणून काही नवे शिकण्याची जिगर या विद्यार्थ्यांमध्ये होती.\n’ एकांकिकेत करायचे आहे म्हणून चक्क\nडोंबाऱ्यांबरोबर फिरून त्यांचे खेळ शिकणारे किंवा जादूचे प्रयोग शिकणारे नाटय़वेडे या स्पर्धेच्या माध्यमातून समोर आले.\n१ स्पर्धेच्या ठिकाणी अभिनेते सुनील बर्वे यांनी हजेरी लावली आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर पडली.\n२ उत्साह, काही महिन्यांची तयारी, स्पर्धेचा ताण.. याचा गोड शेवट विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या संघांनी अनुभवला.\n३ यावेळी सुषमा जोग सावरकर, प्रतिमा कुलकर्णी, विद्याधर पाथरे, सुनील बर्वे, अश्विनी परांजपे, प्रवीण तरडे, प्रसन्नकुमार अकलुजकर उपस्थित होते.\nयेत्या २० डिसेंबर रोजी मुंबई येथे महाअंतिम फेरी होणार आहे. या महाअंतिम फेरीचे प्रक्षेपण झी मराठीवरील ‘नक्षत्र’ या कार्यक्रमातही पाहता येणार आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची संपूर्ण माहिती आणि पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीचा निकाल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nसादरीकरणातील कल्पकतेतून त्यांनी खुलवल्या एकांकिका\nलहान खोलीत सादरीकरण करताना आयत्या वेळी बरेच बदल करावे लागले. ‘ब्लॅकआऊट’च्या जागाही बदलाव्या लागल्या. या बदलांचे थोडेसे दडपण होते, तरीही प्रयोग चांगला झाला. आमच्या एकांकिकेचा विषयच आमचा ‘हीरो’ आहे. त्यामुळे हा विषयच अधिक खुलून यावा यासाठी आणखी प्रयत्न करणार आहोत.\n– नितीश पाटणकर (गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, एकांकिका- ‘रुह हमारी’)\nप्रत्येक नाटकाची ‘थीम’ ही नाटकाची जान असतेच पण त्याबरोबरच अभिनय आणि सादरीकरणातील लहान गोष्टींवर आम्हाला भर द्यायचा आहे. आम्ही आमच्या नाटकात गरीब वस्तीचा माहोल उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. ते चित्रण अधिक खरे वाटावे यासाठी मेहनत घेणार आहोत.\n– अभिप्राय कामठे (मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, एकांकिका- ‘फोटू’)\nआमचे नाटक ‘जादू’ याच संकल्पनेवर आधारित असल्यामुळे नेपथ्यावर बरेसचे अवलंबून होते. त्यामुळे कमी जागेत काम करण्याचा अनुभव वेगळा होता. जादू आणि जादूगाराचा अभिनय आमच्या एकांकिकेसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे जादू करण्याच्या सरावावर अधिक भर देणार आहोत.\n– निनाद गोरे (स.प. महाविद्यालय, एकांकिका- ‘विल ऑफ द विशस’)\nप्राथमिक फेरीत प्रकाशयोजना आणि विशेष नेपथ्य वापरायचे नाही हे कळल्यावर नेपथ्यातील बऱ्याच गोष्टी आम्हाला बाजूला काढाव्या लागल्या. पण ते न वापरताही सादरीकरणाचा अनुभव चांगला होता. – अपूर्वा भिलारे (आयएलएस लॉ कॉलेज, ‘चिट्टी’)\nगुन्हेगारांना समाज कसा स्वीकारत नाही या वास्तवावर आम्हाला आमच्या एकांकिकेतून प्रेक्षकांना विचार करायला लावायचे होते. तो हेतू साध्य झाला .- पंकज नागपुरे (मॉडर्न कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स, ‘मोटिव्ह’)\nआम्ही यापूर्वी नाटय़स्पर्धाचा अनुभव घेतला होता. पण कमी साधनांमध्ये काम करण्याचा अनुभव वेगळा वाटला. आमच्या एकांकिकेतील सचिन तेंडुलकरचा ‘डाय हार्ड फॅन’ असलेला ‘सुधीरकुमार गौतम’ उभा करणे आव्हानच होते. कमी गर्दी वापरून आम्हाला क्रिकेटच्या स्टेडियमचा अनुभव प्रेक्षकांना द्यायचा होता. आम्ही पूर्णत: नवीन संघ वापरून हे सादरीकरण केले.\n– सम्राट धुमाळ (केईएस राजारामबापू इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी (इस्लामपूर), ‘बाऊंड्रीच्या पलीकडे’)\nआमच्या एकांकिकेला खूप नेपथ्य लागते. हे नेपथ्य न वापरता आम्ही कुठेच सादरीकरण केले नव्हते. ‘लोकांकिका’त प्रथमच तसे सादरीकरण करायला मिळाले. हा अनुभव खूप चांगला होता. पुन्हा सहभागी व्हायला नक्की आवडेल.\n– अमेय आचार्य (सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स, ‘चीनची भिंत’)\nप्रत्येक एकांकिका स्पर्धेत स्पर्धकांनी वेगळे काहीतरी सादर करणे अपेक्षित असते. आम्ही मूकन्याटय़ सादर केले. आमची एकांकिका नवीन होतीच पण लेखकाला ती सुचतानाच मूकनाटय़ म्हणूनच सुचली. एकांकिकेनंतर आम्हाला परीक्षकांशी संवाद साधून सादरीकरणाविषयी ‘टिप्स’ घेण्याची संधी मिळाली. सर्व नाटय़स्पर्धाना अशी संधी मिळतेच असे नाही.\n– स्वप्नील कानसे (महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट\nऑफ टेक्नोलॉजी, ‘अंतर- डिस्कनेक्ट’)\nआमच्या संघातील बहुतेक सर्व जणींचा हा एकांकिकेचा पहिलाच अनुभव होता. नाटय़स्पर्धा कशा होतात हे माहीत नसल्यामुळे जराशी भीतीही वाटत होती. पण तरी आम्ही आत्मविश्वासाने प्रयोग केला. आमच्या एकांकिकेच्या गोष्टीचा शेवट काय हे आम्ही प्रेक्षकांवर सोडले आहे. ती आमच्या संहितेतील वेगळी गोष्ट होती.\nसोनम देशमुख (शारदाबाई पवार महिला महाविद्यालय (बारामती), ‘एका अंताची सुरुवात’)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 सळसळत्या तरुणाईचा नावीन्यपूर्ण आविष्कार\n2 ९ डिसेंबरला ‘बिनकामाचे संवाद’\n3 ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला पुण्यातून सुरुवात\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/tag/ropak-service/", "date_download": "2020-09-26T02:16:21Z", "digest": "sha1:HISZ4XQ5ZS2TOWDNPTZOBRQBP3SCIWFW", "length": 10608, "nlines": 128, "source_domain": "www.saamana.com", "title": "ropak-service | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे…\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nऑफिसला चला ‘रो पॅक्स’ने; लोकलची गर्दी, ट्रफिक जाममधून होणार सुटका\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण...\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/the-eight-member-sit-is-led-by-rachakonda-police-commissioner-mahesh-m-bhagwat/", "date_download": "2020-09-26T01:22:42Z", "digest": "sha1:ENMI7NY5KP53XM5C4SOWMVNOGTA6SUEJ", "length": 7385, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हैद्राबाद एन्काऊंटर प्रकरण : विशेष टीम स्थापन, 'या' मराठी अधिकाऱ्याकडे नेतृत्व", "raw_content": "\nहैद्राबाद एन्काऊंटर प्रकरण : विशेष टीम स्थापन, ‘या’ मराठी अधिकाऱ्याकडे नेतृत्व\nहैद्राबाद – तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार आरोपींचा ६ डिसेंबरला पहाटे पोलिसांनी एन्काऊंटर केला. या प्रकरणाच्या तपासासाठी तेलंगणा सरकारने विशेष पथकाची (एसआयटी) नेमणूक केली आहे. ८ सदस्यांच्या या पथकाचे नेतृत्व मराठमोळे पोलीस अधिकारी महेश भागवत यांच्यावर सोपवण्यात आले आहे. भागवत हे रचाकोंडाच्या पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहेत. भागवत यांच्या नेतृत्वात हे पथक सायबराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटर प्रकरणाचा तपास करुन सविस्तर अहवाल सादर करणार आहे.\nमहेश भागवत यांनी रच्चाकोंडा या नवीन आयुक्तालयाचा २०१६ मध्ये ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी she teams च्या प्रभावी अंमलबजावणीस सुरुवात केली. मुली, महिलांना सुरक्षा मिळावी म्हणून त्यांनी उल्लेखनीय उपक्रम सुरू केला आहे. त्या माध्यमातून महिला सुरक्षेसाठी त्यांचे पोलीस पथक काम करते. महेश भागवत यांचे मानव तस्करी विरोधातही मोठे कार्य आहे. तसेच त्यांनी बाल मजुरीविरोधातही कारवाया करत अनेक बाल कामगारांची सुटका केली आहे. त्यानंतर आता त्यांच्या नेतृत्वात एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी होणार आहे.\nआज तेलंगाणा उच्च न्यायालयात या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी होणार आहे. दरम्यान, एन्काऊंटरनंतर ४ ही आरोपींचे मृतदेह तेलंगाणा उच्च न्यायालयाने ९ डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सुनावणी होईपर्यंत हे मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.\nराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) पथकाने बलात्कार झालेले ठिकाण आणि एन्काऊंटर झालेल्या स्थळाचीही शनिवारी पाहणी केली. तर तेलंगाना पोलिसांनी त्या चारही आरोपींविरोधात चौकशी करताना पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.\nदरम्यान, या एन्काऊंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआईटीचे सदस्य या प्रकरणाशी संबंधीत साक्षीदारांच्या साक्ष घेतील. तसेच एन्काऊंटरमध्ये सहभागी पोलिसांचीही चौकशीही करेल.\nधोनीच्या विजयी षटकाराचा चेंडू सापडला\nलक्षवेधी : केवळ रेटिले बहुमता\nदखल : कांद्याचं रडगाणं\nनिवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांक उसळले\nमास्कवरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Rosbach-Rodheim+de.php", "date_download": "2020-09-26T02:12:33Z", "digest": "sha1:SP2IAJQTJJZ6IRMDAGIXCMMXG7BGI5AV", "length": 3470, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Rosbach-Rodheim", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Rosbach-Rodheim\nआधी जोडलेला 06007 हा क्रमांक Rosbach-Rodheim क्षेत्र कोड आहे व Rosbach-Rodheim जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Rosbach-Rodheimमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Rosbach-Rodheimमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 6007 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनRosbach-Rodheimमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 6007 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 6007 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/93894b932930-91f928947932-92194d93093e92f93092c93e92c924-92e93e93993f924940-92694d92f93e935940", "date_download": "2020-09-26T02:54:49Z", "digest": "sha1:WXYCSLXYKFS3IZBV2ZQIKVDKMY4YPTPU", "length": 8187, "nlines": 92, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "सोलर टनेल ड्रायरबाबत — Vikaspedia", "raw_content": "\nसोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कॅंडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळविता येतो. या यंत्राची वाळवण्याची क्षमता 100 किलो एवढी आहे.\n1) सोलर टनेल ड्रायर अर्धदंडगोलाकार, 3 x 6 मीटर आकाराचा आहे. याची उंची दोन मीटर आहे.\n2) 25 मि.मी. आकाराचे लोखंडी पाइप अर्धगोलाकार आकारात वाकवून सोलर टनेल ड्रायर तयार केला आहे.\n3) टनेल ड्रायरचा जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट कॉंक्रीटचा बनविलेला आहे, त्यावर काळा रंग दिलेला आहे. काळा रंग सूर्यकिरणातील जास्त उष्णता शोषून घेतो, तसेच उत्तर दिशेला आतून नॉर्थ वॉल बसविलेली आहे.\n4) अर्धगोलाकार पाइपवर अल्ट्रा व्हायोलेट पॉलिथिलीन फिल्म (200 मायक्रॉन जाडी) झाकलेली आहे.\n5) सोलर टनेल ड्रायरमध्ये दिवसा \"ग्रीन हाऊस इफेक्‍ट'मुळे आतील तापमानात बरीच वाढ होते. आतील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा 15 ते 20 अंश सेल्सिअस अधिक राहते. भर दुपारी ते 60 ते 65 अंश सेल्सिअसपर्यंत पोचते.\n6) वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य/ भाजीपाला/ फळे वाळविण्याकरिता करण्यात येतो.\n7) ड्रायरमधील गरम हवा व सूर्याची किरणे या दोन्हीद्वारा पदार्थाची आर्द्रता लवकरात लवकर कमी होते, पदार्थ सुकण्यास मदत होते.\n8) या ड्रायरमध्ये अतिनील किरणे आत शिरत नसल्यामुळे पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता टिकून राहते. बाहेरपेक्षा कमी कालावधीत पदार्थ सुकल्यामुळे उच्च गुणवत्तेचे पदार्थ प्राप्त होतात.\nडॉ. सुरेंद्र काळबांडे - 7588763787\nअखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, अपारंपरिक ऊर्जास्रोत योजना,\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/sunflowerdeficiency", "date_download": "2020-09-26T02:55:26Z", "digest": "sha1:6UCFUHCCWZ7QVLBHA5RAHDHWK55ZYLGF", "length": 16203, "nlines": 189, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "सुर्याफुलातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nसुर्याफुलातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे\nसूर्यफुलाच्या सुधारित व संकरित वाणात उच्चतम उत्पादन क्षमता एकरी ८०० किलो इतकी झाली आहे. पूर्वी फार फार तर ३०० किलो प्रती एकर असे उत्पादन येत असे. कमी जागेत, कमी वेळेत, कमी रोगराई व जवळपास अडीच पट उत्पादकता असेल तर पिकास अन्नद्रव्यांची भूक देखील असणार आहे. जर आपण पिकाच्या पोषणात कमी पडतो तर उत्पादनात घट तर येईलच शिवाय रोगराई चा देखील फेरा पडेल.\nशेतात फिरता फिरता काही लक्षणांचा अभ्यास करून कमतरतेची लक्षणे जाणून घेवून योग्य त्या अन्नद्रव्याचा पुरवठा करता येतो. प्रार्थमिक अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आढळून आल्यास अमृत एन पी के खते फवारणी किंवा ठिबक ने देता येतील. जर दुय्यम अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आढळून आल्यास कॅल्शियमसाठी कॅलनेट, मॅग्नेशियम साठी ह्युमॅग न सल्फर साठी रीलीजर फवारणी किंवा ठिबक ने देता येईल. जर सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आढळून आल्यास मातीत मायक्रोडील ग्रेड १ मिसळावे व सोबत मायक्रोडील ग्रेड २ ची फवारणी करावी.\nप्रार्थमिक अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे\nनत्र: नत्राची कमतरता झाल्यास पिकाची वाढ खुंटत जाते. पाने पिवळे पडतात. जुन्या पानांवर जास्त परिणाम होतो. पानगळ लवकर होते. नवीन झाडे लाल पडतात.\nस्पुरद: पाने खालच्या बाजूने गर्द हिरवे, जांभळे, निळे किंवा लाल होतात. काही वाणात शिरा व खोडे पिवळी पडतात. फुले तयार होत नाहीत.\nपालाश: झाड आजारी दिसू लागते. फुल व बियांचा आकार लहान रहातो. पानांचे काठ व शिरांच्या मधला भाग पिवळा पडतो. पिवळे पणा पहिले जुन्या पानांवर दिसतो व वरच्या बाजूला सरकू लागतो. पाने सुरकतात, तपकिरी होतात व वरच्या बाजूला वळतात. फुलोरा एकसमान नसतो व थोडासाच असतो. उष्णता,थंडी व रोगाला लवकर बळी पडते.\nदुय्यम अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे\nगंधक: झाड खालून वर पिवळे पडू लागते. वाढ खुंटते. फुलाचा आकार छोटाच रहातो. फुल उघडत नाही, उमलायला वेळ लागतो.\nकॅल्शियम: नवीन पाने छोटे, वाकडे तिकडे असतात, टोक वळतात. खोड बुटके रहाते व वरून खालच्या बाजूला जळू लागते. मूळ वाढत नाही. टोकावरील पाने गोळा होतात, काळी पडतात.\nबोरान: बोरान च्या कमतरतेची लक्षणे अचानक दिसू लागतात. नवीन व मधली पाने जळकी दिसतात. दळ प्रमाणापेक्षा जास्त मोठी होतात व अंकुराचे टोक वेडेवाकडे व फुगीर होते. नंतर नव्या पानावरील पिवळे डाग अधिक स्पष्ट व तांबडे दिसतात. कालांतराने सर्वच पाने पिवळे दिसू लागतात. जर बोरान ची कमतरता झाडे मोठी झाल्यावरनिर्माण झाली तर फुलांच्या मधोमधल्या बिया नीट तयार होत नाहीत. मायक्रोडील बी २० ची फवारणी करावी.\nलोह: नवीन पालवी फिकट होऊन शिरांमधील भाग पिवळी पडतो. शिरा हिरव्या रहातात. मायक्रोडील एफ ई १२ ची फवारणी अतिशय प्रभावी आहे. यातील लोह पूर्णपणे चिलेटेड असल्याने लवकर लागू होते.\nझिंक: पानांच्या कडांवर व शिरावर पिवळे चट्टे उमटतात. तीव्र कमतरता झाल्यास शिरा पिवळ्या पडतात. टोकाकडील वाढ थांबते. जुन्या पानांवरदेखील चट्टे उमटतात. मायक्रोडील झेड एन १२ ची फवारणी अतिशय प्रभावी आहे.\nप्रत्येक भारतीयाने वाचावे असे पुस्तक\nपुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा\nया पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.\nतंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी\nलोहाची कमतरता करा दूर\nपिकाच्या सुधृड वाढीसाठी लोहाची गरज महत्वाची असते. प्रकाशसंश्लेषणात व विकरांच्या...\nकॅल्शियम बद्दल रहा जागरूक\nचमत्कार दाखवल्या शिवाय लोक नमस्कार घालत नाहीत हे जीवनातील एक...\nअन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखाल\nचांगल्या उत्पन्नासाठी पिकास अन्नद्रव्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. पाटील बायोटेक...\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\nअलीकडील काळात विकसित झालेल्या मिरची वाणात भरपूर फळधारण क्षमता असल्याने...\nटमाट्यातील (टोमॅटो) अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आहेत थोडी वेगळी\nअलीकडील काळात विकसित झालेल्या टमाट्याच्या वाणात भरपूर फळधारण क्षमता असल्याने...\nबटाट्यातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे\nबटाट्यात स्टार्च व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात प्रथिने व मिनरल्स असतात....\nसूर्यफुलाचे वाण व वैशिष्ट्ये\nसूर्यफुलाचे पिक तीनही हंगामात घेता येते. सर्वसाधारणपणे जुलैच्या पूर्वाधात, ऑक्टोबर...\nकेळीच्या या बागेत काय सुरु आहे\nबागेला टेकू नाहीत. ४० किलो चा घड. खर्च आला खाली...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://afrikhepri.org/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-26T02:21:58Z", "digest": "sha1:TMOAFXULUO4PMN7TGB7NCFEIENG2JSTM", "length": 7142, "nlines": 110, "source_domain": "afrikhepri.org", "title": "कौशल्य विकास अभिलेखागार - आफ्रिफेरी फाउंडेशन", "raw_content": "\nएक लेख पोस्ट करा\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nस्वागतार्ह टॅग कौशल्यांचा विकास\nअनौपचारिक क्षेत्र, एक समावेशी विकास इंजिन आफ्रिकन अर्थव्यवस्थेला अनुकूल.\nअनौपचारिक क्रियाकलाप केवळ अस्तित्व धोरणापुरती मर्यादीत नसून आफ्रिकन लोकांच्या मुक्त आणि जागरूक निवडीपर्यंत मर्यादित असतात. असंख्य आहेत ...\nतुम्हाला आमचे पेज आवडले का\nएक श्रेणी शोधा एक श्रेणी निवडा हटविणे AFRIKHEPRI-टीव्ही सौंदर्य आणि फॅशन इबॉक्स लायब्ररी सेटलमेंट आफ्रिकन सूझिन ब्लॅक लीडरचा भाषण ENTERTAINMENT माहितीपट मुले पर्यावरण गुलामगिरी सांस्कृतिक कार्यक्रम व्यवसाय तथ्ये आफ्रिकन महिला पाहण्यासाठी चित्रपट इतिहास लपविला आणि विसरला आफ्रिकन इन्टरियन्स नोंदणी / लॉग इन करा काळा गुंतवणूकदार आणि बचत प्रकारची कामाचा आवाज दुकानात लाइव्ह टीव्ही खरेदी करण्यासाठी पुस्तक ऑडिओ बुक पीडीएफ बुक संगीत बातम्या, बातम्या पॅराडिग कमिट कामात विचार आफ्रिकन विचारक आणि SAGES फिलासोफी आणि सायकोलॉजी तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र आरोग्य आणि औषधे प्लेलिस्ट कविता PSYCHART थेरपी आफ्रिका किंगडम आरोग्य आणि औषधे विज्ञान आणि रहस्य शॉपींग आध्यात्मिकता आणि धर्म क्रीडा मॅथिएयू ग्रॅबलीचे मजकूर अजिबात / बातम्या व्हिडिओ वेब-टीव्ही\nकॉपीराइट © २०१ Af आफरीखेरी\nखाली आपल्या खात्यात लॉगिन करा\nमॉट दी पेस्स oublié\nनवीन खाते तयार करा\nनोंदणी करण्यासाठी खालील फॉर्म भरा\n*आमच्या वेबसाइटवर नोंदणी करून, आपण अटी व शर्तींशी सहमत आहात आणि गोपनीयता धोरण.\nसर्व रखाणे गरजेचे आहेत. लॉग इन\nआपला पासवर्ड पुनर्प्राप्त करा\nकृपया आपला पासवर्ड रीसेट करण्यासाठी आपले वापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\n- दृश्यमानता निवडा -सार्वजनिकखाजगी\nही साइट कुकीज वापरते. ब्राउझ करणे सुरू ठेवून, आपण तृतीय-पक्षाच्या कुकीज ठेव स्वीकारता. अधिक जाणून घ्या कुकी धोरण.\nआपली खात्री आहे की हे पोस्ट अनलॉक करू इच्छिता\nडावीकडे अनलॉक करा: 0\nआपली खात्री आहे की सदस्यता रद्द करू इच्छिता\nहे एका मित्राला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/if-there-is-talk-of-haramkhori-it-will-go-away-shelars-attack-on-shiv-sena/", "date_download": "2020-09-26T02:20:54Z", "digest": "sha1:YVRXKFKFXQKHFYWJEBBPL3VEG2Z4BCUT", "length": 22848, "nlines": 411, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "'बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी...' शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली…\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी…\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\n‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी…’ शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nमुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कंगना विरुद्ध शिवसेना (Shiv Sena) असे द्वंद्व युद्ध सुरू आहे. त्यातच कंगनाच्या पाठीशी भाजप (BJP) ठामपणे उभा असल्याने शिवसेनेने आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधत महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतील.\nमुंबई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील, असं शिवसेनेनं भाजपला अप्रत्यक्षरीत्या म्हटलं होतं. यावर भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बात ‘हरामखोरी’ची निघाली तर मग ‘डांबरा’ने लिहिले जाईल, असे मुंबईकरांना बरेच आठवेल १०६ हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस (Congress) सोबतच सत्तेत बसलात ना १०६ हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस (Congress) सोबतच सत्तेत बसलात ना मुंबई मातेचा अपमान कोण करतेय मुंबई मातेचा अपमान कोण करतेय बेइमानी नेमकी कोण करतेय बेइमानी नेमकी कोण करतेय हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना एवढे तपासून पहा, असे ट्विट करून आशिष शेलार यांनी शिवसेनेला सुनावले आहे. एकापाठोपाठ एक ट्विट करत शेलार यांनी शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.\nबात “हरामखोरीची”निघाली तर मग “डांबराने” लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल\n106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय\nबेईमानी नेमकी कोण करतेय\nहुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना\nमुंबई साखळी बॉम्बस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहीमच्या घरात, ऑफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवली होती का पण रस्त्यावरच्या खड्ड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरात आणि कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना पण रस्त्यावरच्या खड्ड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरात आणि कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना असा प्रश्नही शेलार यांनी सेनेला केला आहे.\nमुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आँफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का \nपण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना रौनातच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना\nभारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना असा प्रश्नही आशिष शेलारांनी शिवसेनेला विचारला आहे. त्याचसोबत कर्तबगार मुंबई पोलिसांवर (Mumbai Police), मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला ‘बिर्याणी’ घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची ‘बिर्याणी’ खाताय ना असा प्रश्नही आशिष शेलारांनी शिवसेनेला विचारला आहे. त्याचसोबत कर्तबगार मुंबई पोलिसांवर (Mumbai Police), मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला ‘बिर्याणी’ घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची ‘बिर्याणी’ खाताय ना याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना बेइमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना बेइमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना ‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी’ अशा शब्दांत शेलारांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.\nभारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना\nगेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या\nदेशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना\nत्याचसोबत कर्तबगार मुंबई पोलिसांवर (Mumbai Police), मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला “बिर्याणी” घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची “बिर्याणी” खाताय ना याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी अशा शब्दात शेलारांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.\nकर्तबगार मुंबई पोलीसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला “बिर्याणी” घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची “बिर्याणी” खाताय ना याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना\nबेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना\n“बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी” 4/4\nकर्तबगार मुंबई पोलीसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला “बिर्याणी” घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची “बिर्याणी” खाताय ना याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना\nबेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना\n“बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी” 4/4\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकंगनाच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा\nNext articleबाबर लक्षात ठेव .. ती फक्त इमारत नाही तर राम मंदिर आहे ; कार्यालयावर हातोडा पडताच कंगनाचे ट्विट\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी टिप्पणी विराटच्या प्रैक्टिसवर होती\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nकरोनानंही टेकले यांच्यापुढे हात…\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\nपाकिस्तान आम्हाला जनावरांप्रमाणे वागवतो – सज्जाद राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+06305+de.php", "date_download": "2020-09-26T01:12:15Z", "digest": "sha1:QNSN2UJ5CYX3E5KY6BMAUBCTPJXRXG3V", "length": 3572, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 06305 / +496305 / 00496305 / 011496305, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 06305 हा क्रमांक Hochspeyer क्षेत्र कोड आहे व Hochspeyer जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Hochspeyerमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Hochspeyerमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 6305 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनHochspeyerमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 6305 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 6305 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/sanjay-raut-on-congress-changing-his-mask-and-party-president/", "date_download": "2020-09-26T03:27:21Z", "digest": "sha1:KG3757UWB2CMGUQYDRNON2EGVYI66SYK", "length": 33820, "nlines": 393, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मुखवटा बदलून जनाधार लुटणारी राष्ट्रवादी हे काँग्रेसचेच अपत्य - संजय राऊत - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसरकारने शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये,शिवसेनेचा केंद्राला टोला\nराज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत भारत व अमेरिकेतील कोविड योद्ध्यांचा सन्मान\nराज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे मातृशक्तीचा सन्मान\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nमुखवटा बदलून जनाधार लुटणारी राष्ट्रवादी हे काँग्रेसचेच अपत्य – संजय राऊत\nमुंबई : मोदी सरकार (Modi Govt) अनेक उद्योगपतींना नियमबाह्य पद्धतीने लाभ पोहोचवत असल्याचा आरोप राहुल गांधी हे सातत्याने करत असतात. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या ‘कॉर्पोरेट’ (Corporate) लॉबीने काँग्रेस पक्ष गांधीमुक्त करण्याचा विडा उचलल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay raut) यांनी केला. दैनिक ‘सामना’तील रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी काँग्रेसमधील २३ ज्येष्ठ नेत्यांच्या पत्रप्रपंचाविषयी भाष्य केले आहे.\nममता बॅनर्जी (Mamata Banerjee), जगनमोहन रेड्डी, शरद पवार (Sharad pawar), नवीन पटनायक, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव हे सर्व मुख्यमंत्री मूळचे काँग्रेसवाले आहेत व त्या त्या राज्यांतील काँग्रेसचाच (Congress) जनाधार त्यांनी लुटला आहे. महाराष्ट्रात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे मूळ काँग्रेसचेच अपत्य आहे. राज्याराज्यांत काँग्रेस आहे, फक्त मूळ चेहऱ्य़ावरचे मुखवटे बदलले आहेत. या सगळय़ांनी मुखवटे काढून फेकले तरी देशात काँग्रेस एक प्रबळ पक्ष म्हणून उभारी घेईल. तरुण वर्गाला आज काँग्रेसचे आकर्षण का वाटत नाही याचे मंथन सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहिणाऱ्य़ा 23 नेत्यांनी करायलाच हवे. काँग्रेस पक्ष ही कधीही न मरणारी म्हातारी आहे, असे वर्णन एकदा बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी केले होते. म्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधींनीच ठरवायला हवे असा सल्लाही राऊत यांनी दिला आहे.\nकाँग्रेसमधील २३ ज्येष्ठांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्राने फक्त धुरळा उडाला इतकेच झाले. राजकारणात असे पत्रव्यवहार नेहमीच होत असतात. काँग्रेसला सक्रिय, पूर्णवेळ अध्यक्ष नेमा ही ज्येष्ठांची मागणी योग्यच आहे, पण अध्यक्ष करायचे कोणाला सक्रिय होण्यास कोणी कोणास थांबवले आहे सक्रिय होण्यास कोणी कोणास थांबवले आहे राहुल गांधींना रोखायचे ही सक्रियता मात्र काँग्रेसचे अस्तित्वच नष्ट करणारी ठरेल राहुल गांधींना रोखायचे ही सक्रियता मात्र काँग्रेसचे अस्तित्वच नष्ट करणारी ठरेल, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.\nदेशाच्या राजकारणात सध्या फार काही घडत नाही. तरीही राजकीयदृष्ट्या क्षीण झालेल्या काँग्रेसमध्ये एक वादळ आले आणि गेले. अशा अनेक वादळांतून आणि पडझडीतून काँग्रेस पुन्हा उभी राहिली. आज राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची स्थिती अशी आहे की, वादळ आले तर पडझड होईल इतकीही काँग्रेस कुठे दिसत नाही. काँग्रेस पक्षातील 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले. काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या नाजूक अवस्थेविषयी चिंता व्यक्त केली. काँग्रेस पक्षाविषयी अस्थिरता, शंका यांना पूर्णविराम देण्यासाठी पक्षाला कायमस्वरूपी सक्रिय नेतृत्व मिळावे, अशी मागणी या 23 नेत्यांनी केली. गुलाम नबी आझाद, वीरप्पा मोईली, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी असे हे सर्व नेते. यापैकी अनेकांना मोठा जनाधार नाही. पण काँग्रेस पक्षात व सत्तेत त्यांनी अनेक वर्षे मोठी पदे भोगली आहेत. आज देश पातळीवर विचार केला तर अनेक राज्यांत काँग्रेस संपलीच आहे. काँग्रेसचा जनाधार रसातळाला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ताकदीने उभे राहील असे नेतृत्व काँग्रेस पक्षात दूरदूरपर्यंत दिसत नाही. स्वतः राहुल गांधी हे अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभूत झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची धुळधाण उडाली व सलग दोन निवडणुकांत लोकसभा विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतकाही खासदारांचा आकडा काँग्रेस गाठू शकली नाही. 2019 च्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत.\nकाँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा अशी मागणी करण्यात चुकीचे काय, हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण ही मागणी सहज नव्हती व त्यामागे भाजप पुरस्कृत राजकारण होते, असा आरोप काँग्रेस कार्यकारिणीतच करण्यात आला. राहुल गांधी यांनी कुणाचेही व्यक्तिगत नाव बैठकीत घेतले नाही. पण त्यांनी तळमळीने मुद्दे मांडले. सोनिया गांधी आजारी असताना, इस्पितळात असतानाच नेतृत्वाबाबत पत्र लिहायची घाई नेत्यांनी का करावी, हा त्यांचा सवाल आहे. यावर एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याचे म्हणणे असे की, ज्यांनी पत्रावर सहय़ा केल्या त्यापैकी बहुतेकांनी सोनियांबरोबर काम केले आहे व त्यांच्या कामाची पद्धत त्यांना माहिती आहे. सोनिया गांधी इस्पितळात असताना फक्त पत्र पाठवूनच हे ‘23’ जण थांबले नाहीत, तर त्यानंतर आमच्या पत्रावर काय कार्यवाही केली अशी विचारणा करणारी दोन ‘रिमाइंडर्स’ म्हणजे स्मरणपत्रे पाठवली. हे जरा अतिच झाले. या पत्रांमुळे सोनिया गांधी वैतागून काँग्रेसचे अध्यक्षपद सोडतील व आता तुम्हीच काँग्रेस सांभाळा असे सांगतील असा या ‘पत्रलेखक’ नेत्यांचा डाव होता. तो राहुल गांधी यांनी उधळून लावला आहे. सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपद सोडतील व त्यानंतर सामुदायिक नेतृत्व म्हणून हे ‘पत्रलेखक’ काँग्रेसवर ताबा मिळवतील हे सर्व भाजपला हवेच होते. पंतप्रधान मोदी यांचे मूळ स्वप्न देश काँग्रेसमुक्त करण्याचेच होते. ते पूर्ण झाले नाही. तेव्हा काँग्रेस गांधी परिवारमुक्त करण्यासाठी काँग्रेसच्याच काही नेत्यांना भाजप आणि कॉर्पोरेट उद्योगपतींनी हाताशी धरले. राहुल गांधी हे सतत सरकारच्या व्यवहारांवर टीका करीत आहेत. अनेक उद्योगपतींना मोदींचे सरकार नियमबाहय़ पद्धतीने लाभ पोहोचवीत असल्याचे आरोप ते करीत आहेत. यामुळे अस्वस्थ झालेल्या ‘कॉर्पोरेट’ लॉबीनेच काँग्रेस गांधीमुक्त करण्याचा विडा उचलला. सोनिया, प्रियांका, राहुल यांनी काँग्रेसच्या सक्रिय कार्यातून दूर व्हावे व ‘मार्गदर्शक’ मंडळाचे सभासद म्हणून काम करावे असे या सर्व मंडळींचे डावपेच होते. ते सफल झाले नाहीत, असे काँग्रेसमधील मोठ्या गटाचे म्हणणे आहे.\nगांधी घराण्याबाहेरची व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी यावी हा विचार चांगला आहे. पण त्या लायकीची आणि ताकदीची व्यक्ती काँग्रेस पक्षात आज उरली आहे ज्या 23 काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले त्यातील एकही नेता काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवू शकेल अशा कुवतीचा नाही. अशोक गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारायला तयार होतील काय ज्या 23 काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले त्यातील एकही नेता काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवू शकेल अशा कुवतीचा नाही. अशोक गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारायला तयार होतील काय याचे उत्तर ‘अजिबात नाही’ असेच आहे. प्रत्येकाला स्वतःची खुर्ची हवी आहे. पक्षासाठी त्याग करायला कोणीच तयार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुतेक सर्व काँग्रेस अध्यक्ष हे ‘नेहरू परिवारा’बाहेरचेच होते. जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान मोठेच होते. त्या योगदानामुळेच नेहरू पिता-पुत्रांना तेव्हा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवता आले. स्वातंत्र्यानंतरही नेहरू परिवाराबाहेरचेच लोक अध्यक्षपदी होते. कामराज हे अध्यक्ष असताना सर्वप्रथम काँग्रेस फुटली व पुढे आणीबाणीनंतर इंदिरा गांधी फुटून बाहेर पडल्या. तीच इंदिरा काँग्रेस आज आहे. या काँग्रेससाठी गांधी परिवाराने रक्ताचे सिंचन केलेच आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंह राव हे पंतप्रधान व काँग्रेसचे अध्यक्षही झाले. सीताराम केसरी हेसुद्धा गांधी परिवाराबाहेरचेच अध्यक्ष होते. संघटना त्यांच्या काळात रसातळाला गेली. सोनिया गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यावर पुन्हा काँग्रेसने उभारी घेतली. मनमोहन सिंग यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले ते त्यामुळेच. परदेशी सोनिया गांधींना काय कळते याचे उत्तर ‘अजिबात नाही’ असेच आहे. प्रत्येकाला स्वतःची खुर्ची हवी आहे. पक्षासाठी त्याग करायला कोणीच तयार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुतेक सर्व काँग्रेस अध्यक्ष हे ‘नेहरू परिवारा’बाहेरचेच होते. जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान मोठेच होते. त्या योगदानामुळेच नेहरू पिता-पुत्रांना तेव्हा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवता आले. स्वातंत्र्यानंतरही नेहरू परिवाराबाहेरचेच लोक अध्यक्षपदी होते. कामराज हे अध्यक्ष असताना सर्वप्रथम काँग्रेस फुटली व पुढे आणीबाणीनंतर इंदिरा गांधी फुटून बाहेर पडल्या. तीच इंदिरा काँग्रेस आज आहे. या काँग्रेससाठी गांधी परिवाराने रक्ताचे सिंचन केलेच आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंह राव हे पंतप्रधान व काँग्रेसचे अध्यक्षही झाले. सीताराम केसरी हेसुद्धा गांधी परिवाराबाहेरचेच अध्यक्ष होते. संघटना त्यांच्या काळात रसातळाला गेली. सोनिया गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यावर पुन्हा काँग्रेसने उभारी घेतली. मनमोहन सिंग यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले ते त्यामुळेच. परदेशी सोनिया गांधींना काय कळते त्या काय करू शकतील त्या काय करू शकतील असे प्रश्न तेव्हा सगळय़ांनाच पडले होते. ते सर्व प्रश्न नंतर निकाली निघाले.\nकाँग्रेस पक्ष आज दिशाहीन आणि नेतृत्वहीन झाला. त्यास जबाबदार कोणी असले तरी ज्वलंत हिंदुत्वाने बेगडी धर्मनिरपेक्षतेवर केलेली मात हेच त्यामागचे खरे कारण आहे. देशातील बहुसंख्य समाजाच्या भावना सतत डावलून, अल्पसंख्याक म्हणून फक्त मुसलमानांचेच लांगूलचालन करणे हे धोरण काँग्रेसच्या मुळावर आले. पुन्हा उत्तरेतील मुसलमान आणि दलितही काँग्रेसकडे राहिले नाहीत. ते मुलायमसिंग यादव आणि मायावतांच्या मागेमागे गेले. हैदराबादचे ‘ओवेसी’ हेसुद्धा मुसलमानांची मते खेचत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारांना दलितांचे मतदान मोठ्या प्रमाणात होत असते. एकेकाळी दलित, मुस्लिमांची एकगठ्ठा 22 टक्के मते काँग्रेसला पडत होती. काँग्रेस उमेदवारांची मते मोजणे 22 टक्क्यांपासून सुरू होत असे. तो काळ आता निघून गेला. भाजप, मुलायम, मायावती, शिवसेना यांनी जशी स्वतःची व्होट बँक निर्माण केली आहे तशी ती आज काँग्रेसकडे राहिलेली नाही व फक्त नरेंद्र मोदी, संघ परिवार यावर हल्ले करूनही मतांचा टक्का वाढणार नाही. राजकारणातून धर्मनिरपेक्षतेचे त्रांगडे संपले आहे व भाजप-शिवसेनेसारख्या पक्षांना मुसलमान मतदान करत आहेत हे समजून घेतले पाहिजे. मोदी यांना आज सगळय़ाच जातीधर्मांचे मतदान होते. महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी आहे याची खदखद काही काँग्रेसजनांच्या मनात आहे. शिवसेनेसोबत गेल्याने काँग्रेसच्या ‘आयडॉलॉजी’चे काय, असा प्रश्न जे आजही उपस्थित करतात त्यांना काँग्रेसला नवसंजीवनी द्यायची नाही व नवे नेतृत्व निर्माण होऊ द्यायचे नाही. काँग्रेस पक्ष आजही संपूर्ण देशाला माहीत असलेला व प्रत्येक गावात कार्यकर्ता असलेला पक्ष आहे. असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.\nह्या बातम्या पण वाचा :\n‘कोरोना’ विरोधकांचा राजकीय अजेंडा नाही, शिवसेनेचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल\nदूध दरवाढीवरून शरद पवारांसोबत चर्चा; पण मुख्यमंत्री ‘मातोश्री’बाहेरही पडत नाहीत : शेट्टी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकोकण किनारपट्टीवर पुन्हा ऑरेंज अलर्ट\nNext articleएकाच षटकात ६ षटकार ठोकणारे असे ७ धाकड फलंदाज\nसरकारने शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये,शिवसेनेचा केंद्राला टोला\nराज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत भारत व अमेरिकेतील कोविड योद्ध्यांचा सन्मान\nराज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे मातृशक्तीचा सन्मान\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी टिप्पणी विराटच्या प्रैक्टिसवर होती\nसरकारने शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये,शिवसेनेचा केंद्राला टोला\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nसरकारने शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये,शिवसेनेचा केंद्राला टोला\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esuper9.com/2020/03/maharashtra-schools-colleges-remains-shuts-till-31st-march.html", "date_download": "2020-09-26T03:01:33Z", "digest": "sha1:IGOLIPBIODUZITCTBQK46T5L2INMERPG", "length": 12981, "nlines": 104, "source_domain": "www.esuper9.com", "title": "#coronaVirus:राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद - esuper9", "raw_content": "\nHome > Corona > खळबळ जनक > फोकस > #coronaVirus:राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद\n#coronaVirus:राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद\nकोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती\nराज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्च पर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात परीक्षा सुरू राहतील. ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरू राहतील. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. दरम्यान, राज्यात कोरोनाचे 26 रुग्ण आढळून आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nयासंदर्भात निवेदन करतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने वेळीच हा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू असून राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस प्रशासन यांना राज्य शासनाने सूचना निर्गमीत केल्या आहेत.\nराज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याकाळात मंडळ परिक्षा सुरू राहतील, असे स्पष्ट करताना परिक्षांच्या काळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत याची खबरदारी पालक आणि शाळांनी घ्यायची आहे.\nराज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायीक, यात्रा, धार्मीक, क्रिडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.\nदरम्यान, राज्यात आतापर्यंत 26 रुग्ण आढळून आले असून पुणे येथे 10, मुंबई 5, रायगड 1, कल्याण 1, अहमदनगर 1, नागपूर 4, ठाणे 1, यवतमाळ 2, कल्याण 1 रुग्ण आढळून आले आहेत.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://cinenama.in/2020/04/12/f-r-i-e-n-d-s-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC/", "date_download": "2020-09-26T02:10:09Z", "digest": "sha1:VPEG44Y37WLPDCSH7NE7NJCCNRI6ILWF", "length": 7707, "nlines": 109, "source_domain": "cinenama.in", "title": "‘F.R.I.E.N.D.S' चे 'रियुनिअन' अजून लांबणार… - Cinenama", "raw_content": "\nHome चौथी भिंत ‘F.R.I.E.N.D.S’ चे ‘रियुनिअन’ अजून लांबणार…\n‘F.R.I.E.N.D.S’ चे ‘रियुनिअन’ अजून लांबणार…\nजगभरात करोडे चाहते असणाऱ्या आणि शेवटचा भाग प्रसारित होऊन १६ वर्षं होऊन गेल्यानंतर सुद्धा दिवसेंदिवस प्रसिद्धी वाढत असणाऱ्या F.R.I.E.N.D.S या अमेरिकन सिटकॉमचे ‘रियुनिअन स्पेशल’ वर्जन यावर्षी मे मध्ये प्रदर्शित होणार होते. वॉर्नर ब्रदर्स या निर्मिती आणि वितरण क्षेत्रातली बलाढ्य संस्थेच्या सहायाने मे महिन्यात लॉंच होणाऱ्या HBOmax या OTT प्लॅटफॉर्मसाठी विशेष म्हणून या भागांची निर्मिती केली जाणार होती. या बातमीमुळे जगभरातील F.R.I.E.N.D.S चे चाहते आनंदात होते.\nपरंतु कोरोनामुळे उद्भवलेल्या एकूण परिस्थितीमुळे या भागांची निर्मिती प्रक्रिया थांबली असून ही मालिका आता पूर्वनियोजित तारखेला प्रदर्शित होणार नाही असे संबंधित व्यक्तींनी या आठवड्यात (शुक्रवार) स्पष्ट केले.\n२२ सप्टेंबर, १९९४ ते ६ मे, २००४ या काळात एकूण १० सिजन्स मध्ये ही सिटकॉम प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. यामुळेच जेनिफर अनिस्तन (Jennifer Aniston) कर्तनी कॉक्स (Courteney Cox), मॅथ्यु पेरी ( Matthew Perry) लिसा कुड्रो ( Lisa Kudrow), मॅट लीब्लांक (Matt LeBlanc) आणि डेविड श्विमर ( David Schwimmer) हे चेहरे प्रत्येक घरात पोचले. आज शेवटचा भाग येऊन १६ वर्षं झाली असली तरीही इंटरनेटच्या माध्यमातून या सिरीजचे भाग पाहणाऱ्यांची संख्या काही करोडमध्ये आहे हे विशेष आहे.\nPrevious articleचैतन्य ताम्हाणेचा नवा सिनेमा लवकरच…\nNext articleअलू अर्जुनच्या ‘पुष्पा’चे पोस्टर प्रदर्शित\nरंगमंचावर नवा ‘प्रयोग’; ‘थिएटर प्रीमियर लीग २०२०’\n‘ब्लॅक पँथर’ चॅडविक बॉसमनचे निधन\nग्रामीण प्रश्न’वर्तुळ’ आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात…\nप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात...\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\nलॉकडाऊन लव्ह : देशातील पहिले वर्च्युअल नाटक\nनाट्यधर्मी निर्माता संघाची स्थापना\nज्येष्ठ नाटककार इब्राहिम अलकाझी यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://halfpricebooks.in/products/marmabhed-by-shashi-bhagwat", "date_download": "2020-09-26T02:44:39Z", "digest": "sha1:S2CFUGPKB6YPCXYBB3HT5TI5GN7JNVWB", "length": 4427, "nlines": 85, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Marmabhed (मर्मभेद) By: Shashi Bhagwat Marmabhed (मर्मभेद) By: Shashi Bhagwat – Half Price Books India", "raw_content": "\nसम्राट चन्द्रकेतु महाराज,वीरभद्र आदी सर्व लोकांच्या नेत्रात कमालीची उत्सुकता दिसू लागली. तेजस्विनीचे हृदय धडधडले. तिचे चित्त कावरेबावरे झाले. आपला प्रियकर कोण असावा याबद्दल ती नेहमी घोटाळ्यात पडत असे. आज आता तो क्षण आला होता. नेत्रात प्राण आणून तेजस्विनी त्या योध्याकडे पाहू लागली, त्या योध्याने शांतपणे आपल्या मुखावरील पातळ दूर केले. त्या मुखपटला आड लपलेला त्याचा तेजस्वी आणि सुंदर चेहरा दृष्टीस पडला; मात्र.... अचानक विद्युतपात होऊन त्याच्या प्रखर तेजाने स्थळकाळाची शुद्ध हरपावी तसा प्रकार तेथे घडला. स्वतः कृष्णांत पावलाखालील धरित्री अचानक फाटावी तसा दचकून मागे धडपडला. \"युवराज कुणाल\" कृष्णांत अविश्वाने ओरडला. \"युवराज कुणाल....\" सम्राट महाराजांना तो धक्का अनपेक्षित होता. आनंदातिशयाने क्षणभर त्यांना मूर्च्छा आली. \"युवराज..\" तेजास्वीनीचे मुख क्षणभर निस्तेज बनले. तथापि, दुसरयाच क्षणी तिच्या सुंदर चेहऱ्यावर लज्जेने रक्तिमा फुलविला. वीरभद्राच्या नेत्रात अश्रू दाटून आले. \"होय; युवराज कुणाल\" कृष्णांत अविश्वाने ओरडला. \"युवराज कुणाल....\" सम्राट महाराजांना तो धक्का अनपेक्षित होता. आनंदातिशयाने क्षणभर त्यांना मूर्च्छा आली. \"युवराज..\" तेजास्वीनीचे मुख क्षणभर निस्तेज बनले. तथापि, दुसरयाच क्षणी तिच्या सुंदर चेहऱ्यावर लज्जेने रक्तिमा फुलविला. वीरभद्राच्या नेत्रात अश्रू दाटून आले. \"होय; युवराज कुणाल\" तो योध्दा शांतपणे म्हणाला. \"परंतु निर्बल, बुद्धिहीन आणि निस्तेज युवराज नव्हे.\" \"अशक्य... अशक्य...\" कृष्णांताचा अद्यापही विश्वास बसत नव्हता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/psychotherapy-stress-of-result/", "date_download": "2020-09-26T02:42:47Z", "digest": "sha1:JWCGVZUQHSXE5DJLHSNEQU3ZKPSIGLAO", "length": 12269, "nlines": 93, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मानसोपचार : निकालाचा ताण...", "raw_content": "\nमानसोपचार : निकालाचा ताण…\n“कौ स्तुभ अरे उठ 4.00 वाजले बघ. गजर बंद कर आणि ऊठ लवकर. फ्रेश हो मी गरम गरम चहा देते तो घे आणि बस अभ्यासाला. चल ऊठ पटकन.” आई कौस्तुभला उठवत होती. “”आई झोपू देना गं रोज रोज उठतोच ना. आज झोपू दे. प्लीज गं.’ “मुळीच नाही ऊठ पटकन. बाबा चिडतील हं परत.’\nकौस्तुभ 12वी मध्ये होता. त्यामुळे रोज पहाटे 4.00 वाजता त्यांच्या घरी हे संवाद घडायचे. आई-बाबा काही झालं तरी त्याला पहाटे 4.00 वाजता उठायलाच लावायचे. बिचारा कौस्तुभ या 12 वीला अगदी कंटाळून गेला होता, पण त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. वडिलांचा स्वभाव खूपच कडक असल्याने तो बिचारा ते सांगतील तसंच सगळं करायचा. वडिलांनी त्याचं खेळण, टी.व्ही. पाहणं, पुस्तक वाचणं, सगळं-सगळं बंद करून टाकलं होतं. फक्त अभ्यास एके अभ्यास. कौस्तुभ अगदी कंटाळून गेला होता. त्याने हे 12 वीचं वर्ष कसं-बसं पूर्ण केलं आणि परीक्षा दिली. त्याला सगळे पेपर छान गेले. कारण तो मुळातच खूप हुशार होता. निकालाची तारीख कळली आणि कौस्तुभ बेचैन झाला.\nनिकालाच्या आदल्या दिवशीच आई-बाबा उठले तेव्हा त्यांनी पाहिलं की, कौस्तुभने स्वतःचं आयुष्य संपवून टाकलं होतं. त्या रात्री त्याने “आत्महत्या’ केली होती. आई-बाबांसाठी हा खूप मोठा धक्काच होता. “निकालाची भीती वाटून मी आत्महत्या करतोय,’ अशा आशयाचं पत्र त्याने मृत्युपूर्वी लिहून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी निकाल लागला तेव्हा कळलं की कौस्तुभला सगळ्याच विषयात अतिशय उत्तम गुण मिळाले होते. पण दुर्दैवाने ते पहायला कौस्तुभ नव्हता.\nपालक मित्र-मैत्रिणींनो, अशा अनेक आत्महत्यांबाबत तुम्ही वृत्तपत्रात वाचलं असेल. हो ना अशा अनेक मुलांनी केवळ मार्कांचा ताण घेऊन आत्महत्या केल्या आहेत. अजूनही करत आहेत. काय असेल कौस्तुभच्या आत्महत्या करण्यामागचं कारण अशा अनेक मुलांनी केवळ मार्कांचा ताण घेऊन आत्महत्या केल्या आहेत. अजूनही करत आहेत. काय असेल कौस्तुभच्या आत्महत्या करण्यामागचं कारण काय चाललं असेल त्याच्या मनात काय चाललं असेल त्याच्या मनात कौस्तुभच्या आत्महत्येमागे तशी बरीच कारणं आहेत. पण मुख्य कारण म्हणजे त्याच्यावर लादला गेलेला अती ताण.\nअपेक्षांचं, अभ्यासाचं लादलं गेलेलं अती ओझं, ज्याने त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. खरं तर कौस्तुभ हुशार होता, पण तरीही त्याच्यावर 12वी, परीक्षा, निकाल याचं अती ओझं घरच्यांकडून लादलं गेलं. इतकं की त्याचं खेळ, वाचन सगळंच बंद केलं गेलं. ज्यातून त्याला नैराश्‍य येत गेलं. आणि याच नैराश्‍यात त्यानं आत्महत्या केली. कारण मार्क कमी मिळाले तर आई-बाबा चिडतील ही भीती त्याच्या मनावर नकळत बिंबवली गेली. त्यामुळे त्याचा आत्मविश्‍वास डळमळीत होत गेला.\nएक पालक, एक समुपदेशक म्हणून असं विचारावंसं वाटतं की, पालक मित्रांनो, 10वी, 12वी म्हणजे आयुष्यातली शेवटची परीक्षा का मान्य आहे की मार्कांवर कॉलेज, शाखानिवड हे अवलंबून असतं. पण ते आपल्या मुलाच्या जीवापेक्षा मोठं असतं मान्य आहे की मार्कांवर कॉलेज, शाखानिवड हे अवलंबून असतं. पण ते आपल्या मुलाच्या जीवापेक्षा मोठं असतं\nतरीही खुपदा असं पाहायला मिळतं की मुलं 10वी, 12वी मध्ये गेली की घरातलं वातावरण बदलतं. घरात एक प्रकारचं गंभीर, भीतीदायक वातावरण निर्माण होतं. यातला निम्म्याहून अधिक ताण पालकांचाच असतो. या ताणातून मुलांवर नको तितकी बंधनं घातली जातात. सतत अभ्यास, अभ्यास आणि फक्त अभ्यासच असं काहीसं पालकांकडून वागलं जातं आणि मग मुलं या सगळ्यात भरडली जातात. त्यातूनच एखादा कौस्तुभसारखा मुलगा आपलं आयुष्य कायमचं संपवतो.\nपालकहो, हे नक्की मान्य आहे की, सध्याचं युग स्पर्धेचं आहे. त्यात टिकायचं असेल तर कष्टांना पर्याय नाही. पण म्हणून…\nमुलांवर खरंच इतका ताण द्यायची गरज आहे\nया परीक्षतले गुण म्हणजेच तुमच्या मुलाची बुद्धिमत्ता का\nमार्क म्हणजेच तुमचं मूल का\nनाही फक्त हे मार्क म्हणजेच आयुष्य नाही. तुमच्या मुलांना देखील स्वतःचे विचार, मतं, इच्छा, स्वप्नं आहेत. त्याबद्दल तुम्ही कधी त्यांच्याशी मोकळेपणाने बोललात का त्याला भविष्यात काय करायचंय हे एक सुजाण पालक म्हणून जाणून घेतलंय का त्याला भविष्यात काय करायचंय हे एक सुजाण पालक म्हणून जाणून घेतलंय का की फक्त आपल्या इच्छा, अपेक्षा त्यांच्यावर लादल्या जातायत. याचा विचार करायलाच हवा. त्यांचे मित्र-मैत्रिण बनून हे जाणून घ्यायला हवं.\nपालक हो, तुमच्या मुलांची स्वप्न त्यांना पाहू दे, ती पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रयत्न करू देत. तुम्ही त्यांचे मदतगार व्हा. हुकूमशहा नाही. त्यांची स्वप्नं पूर्ण करायला मदत केलीत तर ते नक्कीच खुलतील त्यासाठी धडपड करतील आणि त्यांची ती स्वप्नं पूर्ण करतील. स्वप्नं पूर्ण झाल्याचं समाधान त्यांनाही मिळेल आणि तुम्हालाही. जर आपण हुकूमशहा झालो तर न जाणो आपला मुलगाही कौस्तुभसारखं पाऊल उचलेल. त्यापेक्षा त्यांचे मित्र होऊन त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्यास काय हरकत आहे\nधोनीच्या विजयी षटकाराचा चेंडू सापडला\nलक्षवेधी : केवळ रेटिले बहुमता\nदखल : कांद्याचं रडगाणं\nनिवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांक उसळले\nमास्कवरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/350th-death-anniversary-tanaji-malusare-umarath/", "date_download": "2020-09-26T02:14:39Z", "digest": "sha1:BF3TA45CAAMBD32ORNJ7XNSN3U6BZHZO", "length": 20593, "nlines": 161, "source_domain": "www.saamana.com", "title": "350व्या पुण्यतिथीनिमित्त तान्हाजी मालुसरे यांच्या समाधीला मिळतेय झळाळी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे…\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\n350व्या पुण्यतिथीनिमित्त तान्हाजी मालुसरे यांच्या समाधीला मिळतेय झळाळी\nपोलादपूर तालुक्यातील उमरठ गावचे सुपुत्र नरवीर तान्हाजी मालुसरे यांची 350 वी पुण्यतिथी 17 फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यानिमित्ताने नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळाच्या सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून भविष्यात याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा भित्तिचित्रातून साकारण्याचा मानस आहे. 17 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या 350 व्या पुण्यतिथीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणण्याचा मानस असल्याचे नरवीर तान्हाजी मालुसरे उत्सव समितीचे रामदास कळंबे यांनी सांगितले.\nउमरठ गाव हे नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे जन्मस्थळ आणि समाधीस्थळ आहे. त्यामुळे उमरठ गावाला ऐतिहासिक वारसा असून मोठ्या संख्येने पर्यटक गावाला भेट देत आहेत. नरवीर तान्हाजी मालुसरे हे कोंढाणा किल्ला सर केल्यानंतर युद्धात धारातीर्थी पडले. तान्हाजी मालुसरे यांचा मृतदेह कोंढाणा किल्ल्यावरून मडेघाट मार्गे पालखीने उमरठ येथे आणण्यात आला. त्यानंतर उमरठ येथे त्यांची समाधी बांधण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्ते या समाधीचे बांधकाम करण्यात आले. नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या समाधी शेजारी शेलार मामा यांचीही समाधी आहे. या समाधीस्थळाच्या सुशोभीकरणाचे काम जोरात सुरू आहे. नरवीर तान्हाजी मालुसरे धारातीर्थी पडलेल्या सिंहगडावरून उमरठ येथे ज्या मार्गाने त्यांचा मृतदेह आणला त्याच मार्गाने पुण्यतिथी निमित्त पालखी आणणार असल्याचे कळंब यांनी सांगितले.\nपर्यटन विकास, जिल्हा परिषद आणि सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या निधीतून 50 लाखाचे सुशोभीकरण काम सुरू करण्यात आलेले आहे. समाधी साठी कोल्हापूर येथून दगड आणून कोल्हापूरचे कारागीर कामासाठी आणले आहेत. 17 फेब्रुवारी रोजी नरवीर तान्हाजी मालुसरे यांची 350 वी पुण्यतिथी साजरी होत असून त्याआधी काम पूर्ण होणार आहे. तसेच समाधी परिसरात केल्यासारखी तटबंदी करून छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास साकार करण्यात येणार आहे. यामध्ये भित्तिचित्र, शिवसृष्टी, साकारण्यात येणार आहे, अशी माहिती रामदास कळंबे यांनी दिली.\nछत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास पुढच्या पिढीला ज्ञात व्हावा तसेच उमरठमध्ये पर्यटन वाढावे हा उद्देश यामागचा असल्याचेही कळंबे यांनी सांगितले. तान्हाजी मालुसरे यांच्या 350व्या पुण्यतिथीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणण्याचा ग्रामस्थांचा मानस असल्याचेही कळंबे यांनी सांगितले. ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ सिनेमाचे दिगदर्शक ओम राऊत यांना नरवीर तान्हाजी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून चित्रपटातील अजय देवगण, काजोल, देवदत्त नागे, शरद केळकर आणि इतर कलाकार पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे कळंबे यांनी सांगितले.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे यांचे आदेश\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nकृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर मुक्काम\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण...\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nया बातम्या अवश्य वाचा\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-26T02:46:50Z", "digest": "sha1:ARRNSSSBNGVRNKVIXZXET4XJZBYYJQ6Y", "length": 8541, "nlines": 148, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अजित पवारांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nअजित पवारांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी\nin ठळक बातम्या, पुणे\nपुणे:- जिल्ह्यासह ग्रामीण भागात ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घराची पडझड झाली आहे. त्यात मृत्यू पावलेल्या खेड तालुक्यातील वाहागाव येथील मृत मायलेकाच्या वारसांना पालकमंत्री अजित पवार यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला. पवार यांनी या भागातील नुकसानग्रस्त भागाचा दौराही केला.\nपुण्याच्या खेड तालुक्यातील वाहगाव येथे ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा जोर जास्त होता. पाऊस आणि वादळाचा येथील घरांना तडाखा बसला असून घराची भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अवघ्या गावावर शोककळा पसरली होती.\nदरम्यान, परिस्थतीचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदतीचा धनादेश मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सुपूर्द केला. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील, खेडचे उप विभागीय अधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल आदी अधिकारी उपस्थित होते.\nअवैध रेती वाहतुकीमुळे तासभर रुग्णवाहिका अडकली\nथेरगावातील महिलांकडून आदर्श वटपूजा\nभारतात कोरोना चाचणीचा नवा विक्रम; एका दिवसात विक्रमी चाचणी\nBIG BREAKING: बिहार निवडणुकीची घोषणा: तीन टप्प्यात होणार मतदान\nथेरगावातील महिलांकडून आदर्श वटपूजा\nओमनी कारची दुचाकीला धडक ; दोन बांधकाम मजुर गंभीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/sunny-pawar-mumbai-won-best-child-actor-award-in-new-york-indian-film-festival-2019-61057.html", "date_download": "2020-09-26T01:37:36Z", "digest": "sha1:23GJS4ZVKB3RQT4DUBX4ZDWICATUU4BQ", "length": 18730, "nlines": 200, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मुंबईकर सनीचा न्यूयॉर्कमध्ये डंका, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरव", "raw_content": "\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nNagpur Corona | महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी\nमुंबईकर सनीचा न्यूयॉर्कमध्ये डंका, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरव\nमुंबईकर सनीचा न्यूयॉर्कमध्ये डंका, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरव\nमुंबई : मुंबईतील सांताक्रुझमधील कलिना झोपडपट्टीत राहणाऱ्या सनी पवार या अकरा वर्षीय मुलाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवण्यात आलं. ‘चिप्पा’ या हॉलिवूड चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. कलिना येथील कुर्वे नगर झोपडपट्टीत सनी राहतो. सनी हा अत्यंत गुणी कलाकार आहे. सनीने अमेरिकेतील न्युयॉर्क येथील 19 व्या New York Indian film …\nटीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम\nमुंबई : मुंबईतील सांताक्रुझमधील कलिना झोपडपट्टीत राहणाऱ्या सनी पवार या अकरा वर्षीय मुलाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवण्यात आलं. ‘चिप्पा’ या हॉलिवूड चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे.\nकलिना येथील कुर्वे नगर झोपडपट्टीत सनी राहतो. सनी हा अत्यंत गुणी कलाकार आहे. सनीने अमेरिकेतील न्युयॉर्क येथील 19 व्या New York Indian film festival 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवण्यात आले. ‘चिप्पा’ या हॉलिवूड चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. स्त्यावर राहणाऱ्या एका लहान मुलाच्या इच्छा-आकांक्षांची कथा ‘चिप्पा’मध्ये आहे. कोलकात्याच्या रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलाची रंजक गोष्ट या चित्रपटात आहे.\n”मला माझ्या आई वडिलांसाठी अलिशान घर घ्यायचं आहे. माझे सिनेसृष्टीत जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांनी फार कष्ट घेतले आहेत. म्हणूनच मला त्यांची सर्व स्वप्न पूर्ण करायची आहेत”, अशा शब्दात आईवडिलांबाबत सनीने प्रतिक्रिया दिली.\nसर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाल्याने मी खूपच खूश आहे. याचे सर्व श्रेय माझ्या पालकांना जाते. मला रजनीकांत यांच्याप्रमाणे मोठा कलाकार व्हायचं आहे. माझ्या पालकांना माझा अभिमान वाटेल अशीच कामगिरी भविष्यातही करायची आहे. माझी बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्हींमध्ये काम करायची इच्छा आहे, असेही सनीने यावेळी म्हटलं.\nसनी पवार हा मुंबईतील सांताक्रूझच्या कलीना परिसरातील कुर्वे नगर झोपडपट्टीत राहतो. त्याचे वडील मुंबई महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या २०१६मधील ‘लायन’ या हॉलिवूडपटातही काम केले आहे. ‘लायन’ या हॉलिवूड चित्रपटाच्या देव पटेलच्या बालपणाची व्यक्तीरेखा साकारली सनीने आहे.\nसनीला एएसीटीए पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट अभिनेता, आशिया-पॅसिफिक स्क्रीन पुरस्कारांतर्गत विशेष नामोल्लेख ग्रॅण्ड ज्युरी पुरस्कार आणि बालकलाकार पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. लायन’ सिनेमासाठी सनीला समीक्षक निवड (स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड) पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट बालकलाकार श्रेणीतही नामांकन मिळाले होते.\nसध्या जगभर गाजत असलेल्या सनीच्या ‘चिप्पा’ सिनेमात त्याच्यासोबत चंदन रॉय सन्याल, मसूद अख्तर, सुमीत ठाकूर आणि माला मुखर्जी यांनी प्रमुख सहाय्यक भूमिका वठवल्या आहेत.\nभिवंडीतील बचाव कार्य चौथ्या दिवशी संपलं, एकूण 41 जणांचा मृत्यू,…\nBollywood Drug Connection | सारा अली खान गोव्याहून मुंबईला परतली,…\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा :…\n'शिवसेनेनं करुन दाखवलं', 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली…\nवरळीत घराघरात गुडघाभर पाणी, केम छो वरळी, संदीप देशपांडेंनी सेनेला…\nMumbai Rains | नायर हॉस्पिटलमध्ये गुडघाभर पाणी, ओपीडीत पाणी शिरल्याने…\nPHOTO | मुसळधार पावसाने मुंबई पुन्हा जलमय, तुंबलेल्या शहराचे 15…\nमुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करा; भाजप खासदार मनोज कोटक…\nमराठा समाजाला 'ओबीसी'त आरक्षण दिल्यास मतदानावर बहिष्कार, ओबीसी समाजाचा इशारा\nअहमदाबाद, चेन्नईकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबली हे तुमचंच अपयश;…\nEknath Shinde Corona | एकनाथ शिंदेंना कोरोना, आदित्य ठाकरेंनी दिला…\nEknath Shinde | पीपीई कि्टस घालून रुग्णालयांची पाहणी, एकनाथ शिंदेंना…\nCovid-19 Vaccine | अमेरिकेतील कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात,…\nपाच वर्षे सुडाचे बळी ठरलो, पण सुडाचे राजकारण करणार नाही…\nनागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावतीत कोरोना रुग्ण वाढले, राजेश टोपेंची कबुली\nपुलवामापेक्षा जास्त नागरिक तुम्ही भिवंडीत मारले, कंगनाचा ठाकरेंवर पुन्हा हल्ला\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nNagpur Corona | महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nNagpur Corona | महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2012/11/blog-post_24.html", "date_download": "2020-09-26T03:24:47Z", "digest": "sha1:YDV2CY7ARYYS5FIYJN5HEGEPZUYEBAUP", "length": 6493, "nlines": 180, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: शाप", "raw_content": "\nहा केवळ भास आहे.\nलांबचाही मग खास आहे.\nज्योतिषी मला काय सांगणार\nजे मी मनापासून ठरवणार.\nदुःखाला माझ्या, सुखाला माझ्या\nचुकांना माझ्या, कर्तृत्वाला माझ्या\nलोक म्हणतात बघा न परिस्थिती अशी,\nपण ही परिस्थिती आली तरी कशी\nतुमचे आयुष्य म्हणल्यावर केवळ तुमचाच निर्णय असतो.\nनिर्णय घेणे वा न घेणे हा सुद्धा एक प्रकारचा निर्णय असतो.\nनिर्णयापासून माझ्या मी वेगळे कसे होऊ शकतो\nसावलीपासून माझ्या मी वेगळे कसे होऊ शकतो\nप्रामाणिक होणे वाटते तितके सोपे नसते,\nस्वच्छंदी होणे वाटते तितके कठीण नसते.\nभूत भविष्याची भीती सोडली की सुख अपार बरसते आहे.\nपण ते जमत नाही, तिथेच घोडे सगळे अडते आहे.\nस्वच्छंदी जिप्सी मी होऊ पाहतो,\nपण साला भविष्याच्या भीतीचा मला शाप आहे.\nवाटेतला चकवा मी टाळू पाहतो,\nपण साला भूतकाळातल्या दुःखांचा मला शाप आहे.\nवर्तमान आनंदात जगू नये हा शाप मला आहे.\nजिप्सीला शाप असतील इतर कितीही\nपण आला क्षण मस्त जगण्याचे मात्र\nत्याला खरे वरदान आहे.\n‘बस डे’ झाला... पुढे काय\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (6)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.marathicorner.com/tag/aaplesarkarmahaonline", "date_download": "2020-09-26T02:05:12Z", "digest": "sha1:UYYC3QPNTBE2FHZ4C2TC2IXJGJYDBSBD", "length": 1968, "nlines": 48, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "aaplesarkarmahaonline Archives - मराठी कॉर्नर", "raw_content": "\n(रजिस्ट्रेशन) आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी २०२०\nAaple Sarkar Seva Kendra Nonadani Online Process If you like आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी then we are providing Aaple sarkar maha online registration Nonadani in Marathi आपण या लेखा मध्ये आपले सरकार सेवा केंद्र साठी नोंदणी महाराष्ट्र मध्ये ऑनलाइन कशी करायची हे जाणून घेणार …\nपुढे वाचा…(रजिस्ट्रेशन) आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी २०२०\nमहाराष्ट्र शासन कृषी योजना 2020 PDF File कृषी यांत्रिकीकरण\nकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\nभारतात X, Y, and Z सुरक्षा म्हणजे काय या स्तराची सुरक्षा केंव्हा दिली जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.esuper9.com/2020/05/coronavirus-world-update.html", "date_download": "2020-09-26T01:54:18Z", "digest": "sha1:SONC335HAAUUV7FR3E5SN7VPJHW4SUH6", "length": 13690, "nlines": 113, "source_domain": "www.esuper9.com", "title": "जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 44 लाखांवर - esuper9", "raw_content": "\nHome > Corona > जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 44 लाखांवर\nजगभरात कोरोनाबाधितांची संख्या 44 लाखांवर\nजगभरात कोरोनाबाधितांची संख्या 44 लाखांवर\nजगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 44 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. तर कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या दोन लाख 97 हजारांवर गेली आहे. मागील 24 तासात 88,202 नवीन कोरोना केसेस समोर आल्या असून 24 तासात 5314 लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 97 हजार 765 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 16 लाख 57 हजार 716 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 32 लाखांजवळ कोरोना रुग्ण आहेत.\nवर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात बाराव्या स्थानावर आहे. भारतात आत्ता कोविडचे 78,055 रुग्ण आहेत. तर भारतात कोरोनामुळं 2551 बळी गेले आहेत.\nजगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,430,348 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 85,197 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 33,186 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 229,705 इतकी आहे. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,104 लोकांचा मृत्यू झालाय. 271,095 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 31,106 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 222,104 इतका आहे.\nअमेरिका: कोरोनाबाधित - 1,430,348, मृत्यू- 85,197\nस्पेन: कोरोनाबाधित - 271,095, मृत्यू- 27,104\nरशिया: कोरोनाबाधित - 242,271, मृत्यू- 2,212\nयूके: कोरोनाबाधित - 229,705, मृत्यू- 33,186\nइटली: कोरोनाबाधित - 222,104, मृत्यू- 31,106\nब्राझिल: कोरोनाबाधित - 189,157, मृत्यू- 13,158\nफ्रांस: कोरोनाबाधित - 178,060, मृत्यू- 27,074\nजर्मनी: कोरोनाबाधित - 174,098, मृत्यू- 7,861\nटर्की: कोरोनाबाधित - 143,114, मृत्यू- 3,952\nइरान: कोरोनाबाधित - 112,725, मृत्यू- 6,783\nचीन: कोरोनाबाधित - 82,926, मृत्यू- 4,633\n10 देशांमध्ये प्रत्येकी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित\nजर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 85 हजारांवर गेला आहे.\nजॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौदाव्या स्थानावर भारतात आत्ता कोविडचे 67 हजार 161 रुग्ण तर 2212 बळी कोरोनामुळं गेले आहेत.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahakamgar.maharashtra.gov.in/press-releases-mr.htm", "date_download": "2020-09-26T02:55:46Z", "digest": "sha1:2HHAEIBZWQRPUNY56JJPMSLZP7DWYATZ", "length": 5240, "nlines": 97, "source_domain": "mahakamgar.maharashtra.gov.in", "title": "प्रेस विज्ञप्ति | महाराष्ट्र शासन, कामगार विभाग", "raw_content": "\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमुख्य पान › प्रेस विज्ञप्ति\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडल, मुंबई\nऑनलाईन तक्रार / तक्रार निवारण\nसभी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nकोई समाचार नहीं मिला\nऑनलाईन तक्रार निवारणतुमच्या तक्रारी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा\nबाल मजुरी हेल्पलाईन बालमजुरी तक्रार साठी संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट © 2014 कामगार विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nपानाच्या रोजी अखेरचे अद्यतनितः: 14-5-2014 अभ्यागत: 14976479\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/pawar-vikhe-patil-to-come-together-setting-aside-old-political/", "date_download": "2020-09-26T01:55:58Z", "digest": "sha1:ERISPA75YF6DYTQUBPPVZX33RVU4EYAN", "length": 18604, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "राजकीय वैर बाजूला ठेवत रोहित पवार- सुजय विखे एकत्र येणार? - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली…\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी…\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nराजकीय वैर बाजूला ठेवत रोहित पवार- सुजय विखे एकत्र येणार\nअहमदनगर : राज्याच्या राजकारणात विखे आणि पवार कुटुंबातील असलेले राजकीय वैर सर्वांनाच माहिती आहे. त्यांची तिसरी पिढी मात्र राजकीय वैर बाजूला ठेवत एका कामासाठी एकत्र येणार आहे. तशी इच्छा भाजपचे (BJP) खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी बोलून दाखवली आहे. तर राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याबाबतची आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र ते नक्कीच एकत्र येतील अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.\nकर्जत शहरातील बायपास रस्त्याचा प्रश्न सध्या चांगलाच गाजत आहे. कर्जत-बारामती रस्त्याच्या रुंदीकरणाच काम सध्या सुरू आहे. यासाठी कर्जत शहरातील काही गाळे पाडावे लागणार आहेत. त्यामुळे तसे न करता शहराला सुमारे ४० किलोमीटरचा बायपास करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी विखे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडाही तयार केला आहे. यातून गाळेधारकांना दिलासा मिळणार असला तरी अन्य व्यापारी आणि ज्यांच्या शेतातून बायपास जाणार आहे, त्यांच्याकडून विरोध करण्यास सुरूवात झाली आहे. शेत जमीन जाणार आणि बायपास झाल्यावर शहरातील बाजारपेठ ओस पडणार असे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे धाव घेतली आहे. पवार लवकरच कर्जतला येऊन यासंबंधी बैठक घेणार आहेत.\nतत्पुपूर्वी डॉ. विखे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये बोलताना त्यांनी सामोपचाराची भूमिका घेत रोहित पवारांना सोबत घेऊन हे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ. विखे म्हणाले, ‘विखे-पवारांच्या राजकीय भांडणात अनेकांनी आपले घर बांधले आहेत. आम्ही कधीच एकत्र येत नाहीत असे आतापर्यंतचे राजकारण सांगते. ते राज्याने पाहिले आहेच. पण असाच संघर्ष कर्जतच्या बायपाससंबंधी झाला तर गाळेधारक संकटात येतील. तसे होऊ नये यासाठी मी आणि आमदार रोहित पवार एकत्र येऊ. एकत्र बसून सर्वांच्या हिताचा निर्णय घेऊ. आम्हा दोघांनाही लोकांनी विकासासाठी निवडून दिले आहे. अशा परिस्थिती चुकीचे निर्णय घेऊन कोणाचे संसार उद्ध्वस्त झाले तर लोक आम्हालाच जबाबदार धरून प्रश्न विचारतील. हाच का तुमचा विकास, असा सवाल करतील. त्यामुळे एकत्र येऊन योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.’\nआता विखे यांनी घेतलेल्या निर्णयावर रोहित पवार सकारात्मक भूमिका का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीही या दोघांनी एकत्र येण्याचा विचार बोलून दाखविला आहे. प्रत्यक्षात मात्र, अद्याप तरी तसे घडलेले नाही. आता या कामाच्या निमित्ताने आपले राजकीय वैर बाजूला ठेवत प्रश्न सोडविला जातो की ताणला जातो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleशिवसेनेकडून शहिदाच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, कुटुंबासोबत असल्याची ग्वाही\nNext articleमलायका अरोराने सांगितले तिच्या फिटनेसचे रहस्य, तिच्या आहारात काय खास आहे जाणून घ्या\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी टिप्पणी विराटच्या प्रैक्टिसवर होती\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nकरोनानंही टेकले यांच्यापुढे हात…\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\nपाकिस्तान आम्हाला जनावरांप्रमाणे वागवतो – सज्जाद राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_792.html", "date_download": "2020-09-26T02:24:35Z", "digest": "sha1:WQEMNY4B3ET7LMIXC3DYEQG4USOZATZJ", "length": 4086, "nlines": 63, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "पोटाशी निगडित समस्या दुर करण्यासाठी, \"ह्या\" आठ गोष्टींपासून नेहमी दुर रहा !", "raw_content": "\nपोटाशी निगडित समस्या दुर करण्यासाठी, \"ह्या\" आठ गोष्टींपासून नेहमी दुर रहा \nbyMahaupdate.in शनिवार, जानेवारी २५, २०२०\nशरीर स्वस्थ ठेवणे आजच्या धकाधकीच्या जीवनात खुप महत्वाचे आहे. कुठलाही आजार हा जर तुमचे पोट (पचनक्रिया) साफ नसेल तर उद्भवू शकतो. आयुर्वेदानुसार पोटासंदर्भातील छोट्या-मोठ्या तक्रारी एखाद्या आजाराचे मुळ असु शकते.\nपोटाशी निगडित समस्या दुर करण्यासाठी पुढे दिलेल्या आठ गोष्टींपासून नेहमी दुर रहावे.\nअवेळी जेवण करणे. नेहमी एका ठरवलेल्या वेळेवर जेवण करावे.\nकडकडून भुक लागल्यावरच जेवण करावे. जर वेळेवर भुक लागत नसेल तर त्याववेळेससचे जेवण करू नये.\nजेवणापूर्वी अथवा जेवणानंतर एक-दोन घोटांपेक्षा जास्ती पाणी पिऊ नये.\nजेवणानंतर लगेच झोपु नये.\nसंध्याकाळचे जेवण झोपण्यापूर्वी कमीत कमी तीनतास आगोदर करावे.\nशिळे, मैद्याचे अथवा तेलाचे पदार्थ खाऊ नये.\nचहा, कॉफीचे सेवन जेवणा अगोदर किंवा नंतर करू नये यामुळे पचन क्रिया व्यवस्थित होत नाही.\nपुरेशी झोप न घेतल्याने देखील पोटाच्या समस्या होऊ शकतात.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://cinenama.in/2020/05/03/satyajit-a-ray-of-genius/", "date_download": "2020-09-26T01:01:50Z", "digest": "sha1:A6J2YDZVWTVIYRKW7ZWCVDNSGUG5S7KL", "length": 8902, "nlines": 114, "source_domain": "cinenama.in", "title": "सत्यजित 'अ रे ऑफ जीनीयस' - Cinenama", "raw_content": "\nHome बातम्या सत्यजित ‘अ रे ऑफ जीनीयस’\nसत्यजित ‘अ रे ऑफ जीनीयस’\nकेंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वस्तुसंग्रहालय आणि सांस्कृतिक स्थळ जतन विभागाने ‘अ रे ऑफ जीनीयस’ या लघुपटाच्या प्रदर्शनाद्वारे आज प्रख्यात सिनेनिर्माता सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याची सुरुवात केली.\nहा लघुपट रे यांच्या चित्रपट निर्मिती कलेतील प्रविण्याला अधोरेखित करतो तसेच कोलकाता आणि मुंबई इथल्या साहित्य, कला, संगीत आणि रचना इत्यादी क्षेत्रातील व्यावसायिकांमध्ये त्यांचे निर्विवाद श्रेष्ठत्व सिध्द करतो असे उद्गार वस्तुसंग्रहालय आणि सांस्कृतिक स्थळ जतन विभागाचे अध्यक्ष राघवेंद्र सिंग यांनी या लघुपटाचे ऑनलाईन प्रसारण करताना काढले. संदीप रे तसेच सोसायटी फॉर द प्रिझर्वेशन ऑफ सत्यजित रे अर्काईव्हज या संस्थेच्या मदतीने पारितोषिक विजेते दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी आणि संपादक अर्घ्य कमाल मित्र यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात रे यांच्यासोबत तीस वर्ष काम करणारे आणि त्यांच्या ऐतिहासिक कारकीर्दीचे साक्षीदार असलेले नेमई घोष यांची दिल्ली आर्ट गॅलरीच्या संग्रहातून मिळालेली काही उत्तम छायाचित्रे देखील पाहायला मिळतात अशी माहिती त्यांनी दिली.\nपाथेर पांचाली, चारुलता, तीन कन्या, सोनार केल्ला तसेच अपु मालिकेतील तीन चित्रपट अशा अनेक अविस्मरणीय चित्रपटांमुळे सत्यजित रे यांनी चित्रपट रसिकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे, “अ रे ऑफ जीनीयस” या लघुपटाचे प्रसारण ही सांस्कृतिक मंत्रालयाच्या वस्तुसंग्रहालय आणि सांस्कृतिक स्थळ जतन विभागाने सत्यजित रे यांच्या दिग्दर्शक, लेखक आणि चित्रकार म्हणून अष्टपैलू व्यक्तिमत्वाला वाहिलेली आदरांजली आहे असे सिंग यांनी सांगितले. या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबतच सत्यजित रे यांच्या जन्म शताब्दी वर्ष सोहोळ्याला आज सुरुवात झाली असे सिंग यांनी जाहीर केले.\nPrevious article…आणि रे यांची जन्मशताब्दी\nNext articleएअरटेलवर आता झी 5 फ्री\nप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन\n‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका\n‘शहीद शिरीषकुमार’ लवकरच रुपेरी पडद्यावर\nप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात...\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\nज्येष्ठ नाटककार इब्राहिम अलकाझी यांचे निधन\n‘त्याचे सिनेमे पाहा, मग आपण बोलू’\n‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/bhojpuri-actress-anupama-pathak-commit-suicide-after-facebook-live-127593986.html", "date_download": "2020-09-26T02:59:02Z", "digest": "sha1:NFECPOBAI2RB4QTFWHNDKD6MZ37KID5Q", "length": 8136, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bhojpuri Actress Anupama Pathak Commit Suicide After Facebook Live | भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकने केली आत्महत्या, मृत्यूपूर्वी फेसबुक लाइव्ह येऊन रडत आत्महत्या करण्याचे दिले होते संकेत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत आणखी एक आत्महत्या:भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकने केली आत्महत्या, मृत्यूपूर्वी फेसबुक लाइव्ह येऊन रडत आत्महत्या करण्याचे दिले होते संकेत\nअनुपमा पाठकने लाइव्ह व्हिडिओमध्ये म्हटले की, जर तिचा मृत्यू झाला तर कोणालाही तिच्या मृत्यूसाठी जबाबदार धरू नये.\nएखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्याविषयी सहानुभूती दाखवणा-या लोकांना अनुपमाने फटकारले.\nटीव्ही अभिनेता समीर शर्मानंतर भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 40 वर्षीय अनुपमाने 2 ऑगस्ट रोजी मुंबईतील दहिसर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, समीर शर्माच्या निधनानंतर ही बातमी माध्यमांसमोर आली.\nअनुपमाने मृत्यूला कवटाळण्यापूर्वी फेसबुकवर लाइव्ह करत चाहत्यांशी संवाददेखील साधला होता. यावेळी तिने आत्महत्येचे संकेत दिले होते. यानंतर सुमारे 26 मिनिटांनी तिने फेसबुकवर शेवटची पोस्ट टाकली, ज्यामध्ये तिने लिहिले होते, \"बाय बाय गुड नाईट.\"\nमृत्यूनंतर सहानुभूती दाखवणा-यांना फटकारले\n1 ऑगस्ट रोजी रात्री 11:54 वाजता अनुपमा फेसबुकवर 10 मिनिटे 4 सेकंदासाठी लाइव्ह आली होती. यावेळी ती रडत होती आणि मृत्यूनंतर सहानुभूती दाखवणा-यांना तिने फटकारले. अनुपमा म्हणाली, नमस्कार. मी माझ्या गोष्टी फेसबुकवर शेअर करायला आले आहे. एखाद्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या जवळचे लोक, मित्र परिवार म्हणतात, की आम्हाला आधी का सांगितले नाही, आम्ही मदत केली असती. परंतु, या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात कोणीच मदत करत नाही. काही जण उगाच आत्महत्या करत नाहीत. त्यामागे काही कारणं असतात.\nकुणीही कुणाच्या समस्या सोडवत नाही. मी फार जवळून अनुभव घेतला आहे. लोक तुमच्या बोलण्याचा कधीच सरळ विचार करत नाहीत. ते कायम चुकीचा अर्थ काढतात. जर तुम्ही कोणाला सांगितलं की मी आत्महत्या करणार आहे., तर काही जणांची पहिली प्रतिक्रिया असते.. हे आम्हाला नको सांगू उगाच आमचं नाव या प्रकरणात येईल. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवू नका. सगळे खोटारडे आणि स्वार्थी असतात. कोणीच कोणाच्या मदतीसाठी येत नाही.\nआपल्या समस्या कोणालाही सांगू नका. कोणालाही आपला मित्र मानू नका. कोणीही कोणाचा मित्र नाही. ही खोट्याची दुनिया आहे. आपल्या शब्दांची चेष्टा केली जाते, असे अनुपमाने आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये म्हटले.\nअनुपमाने सुसाइड नोटही सोडली\nअनुपमाने आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोटही लिहिली होती. पोलिसांना घटनास्थळावरुन ही सुसाइड नोट मिळाली आहे. त्यानुसार तिने आर्थिक अडचणींमुळे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजते. सोबतच तिने मनीष झा नावाच्या व्यक्तीलाही आत्महत्येस जबाबदार ठरवले आहे. अनुपमाने आरोप लावला की, या व्यक्तीने मे महिन्यात तिची दुचाकी घेतली होती, मात्र नंतर ती परत देण्यास नकार दिला होता.\nअनुपमा ही भोजपुरी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होती.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/permission-for-inter-district-st-travel-citizens-will-be-able-to-travel-from-one-district-to-another-127630358.html", "date_download": "2020-09-26T03:03:57Z", "digest": "sha1:FDONJFIQXGRC4YAESFVWYJBJCAWWSN3Z", "length": 6317, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Permission for inter-district ST travel; Citizens will be able to travel from one district to another | उद्यापासून एसटीची आंतरजिल्हा बससेवा सुरू होणार; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएसटी सेवा:उद्यापासून एसटीची आंतरजिल्हा बससेवा सुरू होणार; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती\nसाधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा मूळ तिकीट दरात सुरू होणार\nकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या (दि. २०) ऑगस्ट पासून सुरु होत असून, त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल. अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली.\nते पुढे म्हणाले, उद्यापासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्याटप्याने सुरु होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी इ - पासची आवश्यकता नसून प्रवासात प्रवाशांनी शासनाने घालून दिलेल्या कोविड - १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.\n२३ मार्चपासून कोरोना महामारीमुळे मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद होती. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रीयन विध्यार्थाना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविणे, कोल्हापूर - सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे. २२ मे पासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली आहे. त्याद्वारे दररोज सुमारे १३०० बसेसमधून सरासरी ७२८७ फेऱ्यातून अंदाजे दीड लाख प्रवाशांना सुरक्षित प्रवाशी सेवा एसटीने पुरविली आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या आंतरजिल्हा बससेवेचा कोविड - १९ च्या काळातील शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी केले आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://halfpricebooks.in/products/arthat-by-achyut-godbole", "date_download": "2020-09-26T02:06:05Z", "digest": "sha1:P4WE5NXRW5AOFNLXFH2GRJT6ZNH4GRQ7", "length": 6347, "nlines": 92, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Arthat By Achyut Godbole Arthat By Achyut Godbole – Half Price Books India", "raw_content": "\nहे पुस्तक म्हणजे वास्तविक पाहता तीन पुस्तकांचा ऐवज होय. अर्थशास्त्राचा इतिहास, सिद्धांत, ते सिद्धांत प्रस्थापित करणारे अर्थतज्ज्ञ आणि हे सारे अर्थशास्त्रीय सिद्धांत ज्या सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय परिस्थितीच्या विशाल पार्श्वभूमीवर समूर्त झाले, ती पार्श्वभूमी साद्यंत कथन करणे याला तीन स्वतंत्र ग्रंथांचा अवकाशच हवा. हा सारा अवकाश एकाच पुस्तकात सामावण्यास प्रचंड आत्मविश्वास हवा. लेखकाच्या ठायी तो पुरेपूर आहे. अर्थशास्त्रासारख्या किचकट, रुक्ष, बोजड, अक्राळविक्राळ समजला जाणारा विषय विलक्षण रंजकपणे सर्वसामान्यांच्या आकलन कक्षेत आणून बसविणे, ही आर्थिक साक्षरतेची गरज आज वाढत्या प्रमाणात जाणवत असताना मोठी उपकारक गोष्ट ठरते.\n\"अर्थशास्त्राच्या सिध्दांतांचा आणि धोरणांचा अत्युत्कृष्ट, चित्तवेधक इतिहास आणि अर्थशास्त्रज्ञांची रंजक चरित्रं म्हणजेच 'अर्थात' अतिशय अचूकपणे आणि रसाळ शैलीत लिहिलेलं हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचकांना अतिशय उपयोगी ठरेल.\"\n-- डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, माजी सदस्य, प्लॅनिंग कमिशन, भारत सरकार\n\"अर्थशास्त्राच्या उगमापासून सद्य:स्थितीपर्यंतचा विषय मांडणारं 'अर्थात' एक इनसाइटफुल पुस्तक. मराठीत अशा पुस्तकाची अत्यंत गरज असताना हे पुस्तक मराठीत यावं, ही फारच चांगली गोष्ट आहे. लेखकाची शैली प्रवाही, खिळवून टाकणारी आहे. अवघड कल्पना सोप्या उदाहरणांतून सांगण्याची हातोटी लाभली आहे. विद्यार्थी आणि संशोधक दोघांनीही जरूर वाचावे.\"\n-- डॉ. डी. एम. नाचणे, डायरेक्टर, इंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च, मुंबइ\n\"सर्वसमावेशी, बहुआयामी आकलनातून अर्थशास्त्राकडे पाहणारं हे पुस्तक. यात संकल्पना, तात्त्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वच बाबींची सखोल मीमांसा आहे. अच्युत गोडबोल्यांची जादुई लेखणी एका रुक्ष विषयाचं आणि एका 'कंटाळवाण्या' भकास शास्त्राचं मजेदार आनंदी साहसयात्रेत रूपांतर करून टाकते\n-- डॉ. अभय पेठे, डायरेक्टर आणि चेअर प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग, माजी डीन, फॅकल्टी ऑफ आर्ट्स, मुंबई विद्यापीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://halfpricebooks.in/products/sushilecha-dev-by-v-s-khandekar", "date_download": "2020-09-26T02:08:27Z", "digest": "sha1:ZTAE5DX6PRKQSK2YEACAAS2QYMF356JV", "length": 5222, "nlines": 85, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Sushilecha Dev by V S Khandekar Sushilecha Dev by V S Khandekar – Half Price Books India", "raw_content": "\nआधुनिक महाराष्ट्राच्या जीवनातला आणि इंग्रजी शिक्षणाबरोबर जी नवी स्री भारतात निर्माण होऊ लागली, तिच्या विकासातला एक महत्त्वाचा टप्पा या कादंबरीत फार चांगल्या रीतीने प्रतिबिंबित झाला आहे. या दृष्टीने ही कादंबरी एका विशिष्ट कालखंडाची प्रतिनिधी आहे. तो काळ म्हणजे एकोणिसाव्या शतकाची अगदी शेवटची वर्षे आणि विसाव्या शतकाची पहिली दोन तीन दशके हा होय. या कालखंडात मध्यम वर्गातल्या सुशिक्षितांच्या आचारविचारात आणि भावभावनात झपाट्याने जे बदल होत गेले त्यांचे चित्रण करायला वामनराव जोश्यांइतका अधिकारी लेखक क्वचितच मिळाला असता. एक तर वामनराव या काळातच लहानाचे मोठे झाले होते. प्रत्येक चांगल्या कादंबरीत, बीजरूपाने का होईना, लेखकांचे आत्मचरित्र दृष्टीला पडते, असे काही टीकाकार म्हणतात. त्यांचे हे विधान एकांगी असले तरी अर्थपूर्ण आहे. वामनराव जोशी हे मराठीतले एक थोर कादंबरीकार आहे. वैचारिकता हाच त्यांच्या प्रतिभेचा विशेष होय. त्यामुळे साहजिकच निरनिराळ्या व्यक्ती आणि प्रसंग व त्यांच्या विविध पात्रांवर होणाऱ्या प्रतिक्रिया यांचे वर्णन करताना वामनराव स्वत:च्या उत्कट अनुभवांचा आश्रय घेतात. ‘नवा समाज’, ‘नवा मानव’, ‘नव्या श्रद्धा’, ‘नवी मूल्ये’ हे शब्द आज आपल्या भोवतालच्या वातावरणांत सारखे घुमत आहेत. अशा वेळी ‘सुशीलेचा देव’ ही विचारप्रेरक कादंबरी महाराष्ट्रांत घरोघर वाचली गेली पाहिजे. तिच्यातल्या ज्योतीवर आपल्या मनातल्या स्नेहपूर्ण वाती लावून घेतल्या पाहिजेत. तसे करताना भोवतालचा अंधकार उजळविण्याचा मार्ग त्यांना नि:संशय दिसू लागेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mahakamgar.maharashtra.gov.in/terms-and-conditions-mr.htm", "date_download": "2020-09-26T01:29:57Z", "digest": "sha1:6OOSSM4LAIAAW377TVYFDMFOXQ4PQIXU", "length": 4700, "nlines": 90, "source_domain": "mahakamgar.maharashtra.gov.in", "title": "अटी आणि नियम", "raw_content": "\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमुख्य पान › अटी आणि नियम\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडल, मुंबई\nऑनलाईन तक्रार / तक्रार निवारण\nऑनलाईन तक्रार निवारणतुमच्या तक्रारी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा\nबाल मजुरी हेल्पलाईन बालमजुरी तक्रार साठी संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट © 2014 कामगार विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nपानाच्या रोजी अखेरचे अद्यतनितः: 30-5-2014 अभ्यागत: 14976098\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/155817/moog-dal-kanda/", "date_download": "2020-09-26T02:14:53Z", "digest": "sha1:QHSKVCPUS6XRUZTJLCLKY7A2ZZ535OR4", "length": 16750, "nlines": 375, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Moog dal kanda recipe by Swapnal swapna p in Marathi at BetterButter", "raw_content": "\nपाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर\nकृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा\nमुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाच्या डाळीचा डाळ कांदा\nमुगाच्या डाळीचा डाळ कांदा\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nमुगाच्या डाळीचा डाळ कांदा कृती बद्दल\nभाजीला काय नसेल तसे डाळ कांदा केला तर छान जेवण होते\nकढईत तेल गरम करा नंतर त्यात ठेचलेला लसूण घाला\nलसूण गुलाबी रंग झाला की त्यात बारीक चिरलेला कांदा घाला\nकांदा छान परतला गेला पारदर्शक झाला की त्यात हळद धना पावडर आणि मीठ घाला\nव ते मिश्रण छान परता\nनंतर त्यात भिजवलेले मूग डाळ घाला\nलाल तिखट घालून छान परता\nझाकण ठेवून एक वाफ काढली की खाण्यासाठी तयार आहे मूग डाळ कांदा\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nलसुनी मूग डाळ मेथीची भाजी\nमुगाच्या डाळीचा डाळ कांदा\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nमुगाच्या डाळीचा डाळ कांदा\nकढईत तेल गरम करा नंतर त्यात ठेचलेला लसूण घाला\nलसूण गुलाबी रंग झाला की त्यात बारीक चिरलेला कांदा घाला\nकांदा छान परतला गेला पारदर्शक झाला की त्यात हळद धना पावडर आणि मीठ घाला\nव ते मिश्रण छान परता\nनंतर त्यात भिजवलेले मूग डाळ घाला\nलाल तिखट घालून छान परता\nझाकण ठेवून एक वाफ काढली की खाण्यासाठी तयार आहे मूग डाळ कांदा\nमुगाच्या डाळीचा डाळ कांदा - रिव्यूज\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%AB%E0%A5%AB-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-26T01:52:29Z", "digest": "sha1:B4UVNODPWG47YYQVUN3N3OFOSTWBNVJL", "length": 8066, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "तळोदा शहरात ५५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nतळोदा शहरात ५५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप\nin खान्देश, ठळक बातम्या, नंदुरबार\n कोरोना विषाणुचा वाढता प्रादूर्भाव याकरिता प्रशासनाचा आदेशाने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट भरण्यासाठी आलेले बाहेर जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील गरीब नागरिकांच्या उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या संकल्पनेने व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दानशूर व्यक्तीचा लोकवर्गणीतून व नंदुरबार जिल्हा पोलीस कर्मचारी यांच्या रिवाडमधून तळोदा शहरात ५५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटण्यात करण्यात आले. यावेळी तळोदा न.प. नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलीस उपनिरिक्षक योगेश राऊत, अनिल गोसावी , हेड कॉन्स्टेबल योगेश सोनवणे, मुकेश तावडे,पोलीस नाईक युवराज चव्हाण, सुनील पाडवी,पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र ठाकूर, सतिष गुले तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबारचे कर्मचारी उपस्थित होते.\nडांभूर्णीतील दहावीच्या विद्यार्थ्याचा खून\nराज्यात कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ: आजची संख्या पाचशेच्या घरात\nभारतात कोरोना चाचणीचा नवा विक्रम; एका दिवसात विक्रमी चाचणी\nBIG BREAKING: बिहार निवडणुकीची घोषणा: तीन टप्प्यात होणार मतदान\nराज्यात कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ: आजची संख्या पाचशेच्या घरात\nजिल्ह्यात विनाकारण फिरणारी 142 वाहने पोलीसांकडून जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://sureshbhat.in/node/2081", "date_download": "2020-09-26T03:09:50Z", "digest": "sha1:ZSFUEININXSZXMPBPFJJ7GTUFEP57IRK", "length": 15865, "nlines": 232, "source_domain": "sureshbhat.in", "title": "पांडुरंगा | सुरेशभट.इन", "raw_content": "सोसले होते जरी मी दुःख माझे संयमाने\nएकदा डोळ्यांत माझ्या आसवे आलीच होती \nका भक्त आज सलतो भगतास पांडुरंगा \nका देव आज दिसतो धनिकास पांडुरंगा \nअधिकार श्रेष्ठ ज्यांचा अध्यात्म सांगण्याचा\nतो का सुखात ठेवी दु:खास पांडुरंगा \nही सावली मठांची ढोंगी पुन्हा निघाली\nना किर्तनासी यावे तूर्तास पांडुरंगा \nपाण्यात कोरडी ही आतून चंद्र्भागा\nअभिषेक आसवांचा चरणास पांडुरंगा \nजो तो लाबाड हसतो संतास पांडुरंगा \nआता युगायुगांची चर्चा कशास व्हावी\nप्रत्येक क्षण तुझा मज आभास पांडुरंगा \nजो तो लाबाड(लबाड) हसतो संतास पांडुरंगा \nहा एक शेर आवडला\nही सावली मठांची ढोंगी पुन्हा\nही सावली मठांची ढोंगी पुन्हा निघाली\nना किर्तनासी यावे तूर्तास पांडुरंगा \nआता युगायुगांची चर्चा कशास\nआता युगायुगांची चर्चा कशास व्हावी\nप्रत्येक क्षण तुझा मज आभास पांडुरंगा \n'ना किर्तनासी' ऐवजी 'ना कीर्तनास' हवे आहे असे वाटते.\nही सावली मठांची ढोंगी पुन्हा\nही सावली मठांची ढोंगी पुन्हा निघाली\nना किर्तनासी यावे तूर्तास पांडुरंगा \nपाण्यात कोरडी ही आतून चंद्र्भागा\nअभिषेक आसवांचा चरणास पांडुरंगा \nजो तो लाबाड हसतो संतास पांडुरंगा \nया द्विपदी विशेष आवडल्या.\nप्रतिसादा बद्दल व सुचनां बद्दल आभार,\nह बा ,ज्ञानेशजी,अजय अनंत जोशी\nह बा ,ज्ञानेशजी,अजय अनंत जोशी जी,क्रान्ति\nप्रतिसादा बद्दल, सुचनां बद्दल धन्यवाद\nनावीन्यपुर्ण अंत्ययमक व समर्थपणे सांभाळलेलेही\nका भक्त आज सलतो भगतास\nका भक्त आज सलतो भगतास पांडुरंगा \nआमच्या जुन्या घरासमोरील महादेव मंदीरातील भगत अत्यंत तिरसट व उद्दाम असल्याने काही ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन त्याला एक दिवस खूप झापला. त्यानंतर तो सरळ झाला.\nहा शेर त्या घटनेशी एकदम आयडेंटिफाय होणारा वाटला मला.\nका भक्त आज सलतो भगतास पांडुरंगा \nका देव आज दिसतो धनिकास पांडुरंगा \nअधिकार श्रेष्ठ ज्यांचा अध्यात्म सांगण्याचा\nतो का सुखात ठेवी दु:खास पांडुरंगा \nही सावली मठांची ढोंगी पुन्हा निघाली\nना किर्तनासी यावे तूर्तास पांडुरंगा \nपाण्यात कोरडी ही आतून चंद्र्भागा\nअभिषेक आसवांचा चरणास पांडुरंगा \nजो तो लाबाड हसतो संतास पांडुरंगा \nआता युगायुगांची चर्चा कशास व्हावी\nप्रत्येक क्षण तुझा मज आभास पांडुरंगा \nगझल एकंदर छान. 'कीर्तनास'\nगझल एकंदर छान. 'कीर्तनास' हवे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.\nचक्रपाणि,बेफिकीर ,कैलास ,दशरथयादव ,चित्तरंजन भट\nप्रतिसादा बद्दल व सुचनां बद्दल आभार,\nमस्त गझल... एक शंका - अधिकार\nअधिकार श्रेष्ठ ज्यांचा अध्यात्म सांगण्याचा\nतो का सुखात ठेवी दु:खास पांडुरंगा \nया शेयाचा मी लावलेला अन्वय असा -\nज्यांचा अध्यात्म सांगण्याचा अधिकार श्रेष्ठ आहे, तो दु:खास सुखात का ठेवतो\nहा असाच अर्थ आणि अन्वय अपेक्षित होता का\nकारण मला मूळ कल्पनेतच शंका आहे... जर अध्यात्म सांगण्याचा अधिकार मोठा असेल, तर दु:खालाही सुखात ठेवणे (सहज) जमेल... त्यात प्रश्नार्थक असे काय आहे\nआणि जर मी अर्थ लावायला चुकत असेन, तर कृपया स्पष्ट करावे...\nएक शंका - अधिकार श्रेष्ठ\nअधिकार श्रेष्ठ ज्यांचा अध्यात्म सांगण्याचा\nतो का सुखात ठेवी दु:खास पांडुरंगा \nया शेयाचा मी लावलेला अन्वय असा -\nज्यांचा अध्यात्म सांगण्याचा अधिकार श्रेष्ठ आहे, तो दु:खास सुखात का ठेवतो\nहा असाच अर्थ आणि अन्वय अपेक्षित होता का\nकारण मला मूळ कल्पनेतच शंका आहे... जर अध्यात्म सांगण्याचा अधिकार मोठा असेल, तर दु:खालाही सुखात ठेवणे (सहज) जमेल... त्यात प्रश्नार्थक असे काय आहे\nदु:खाला सुखात ठेवणे म्हणजे म्हणजे दु:ख 'कायम' राहील हे 'एनशुअर' करणे असा अर्थ मी घेतला.\nएक शंका - अधिकार श्रेष्ठ\nअधिकार श्रेष्ठ ज्यांचा अध्यात्म सांगण्याचा\nतो का सुखात ठेवी दु:खास पांडुरंगा \nया शेयाचा मी लावलेला अन्वय असा -\nज्यांचा अध्यात्म सांगण्याचा अधिकार श्रेष्ठ आहे, तो दु:खास सुखात का ठेवतो\nहा असाच अर्थ आणि अन्वय अपेक्षित होता का\nकारण मला मूळ कल्पनेतच शंका आहे... जर अध्यात्म सांगण्याचा अधिकार मोठा असेल, तर दु:खालाही सुखात ठेवणे (सहज) जमेल... त्यात प्रश्नार्थक असे काय आहे\nदु:खाला सुखात ठेवणे म्हणजे म्हणजे दु:ख 'कायम' राहील हे 'एनशुअर' करणे असा अर्थ मी घेतला.\nअधिकार श्रेष्ठ ...हे आपण उपरोधनेही घेऊ शकतो,जे आपला संतापेक्षाही अधिकार श्रेष्ठ आहेत असे मानतात (त्या त्या काळातील प्रस्थपित), ते आपल्या दु:खाच्या बाबतीत लहान होतात,दु:खाचे भांडवल करतात \nही सावली मठांची ढोंगी पुन्हा निघाली\nना किर्तनासी यावे तूर्तास पांडुरंगा \nपाण्यात कोरडी ही आतून चंद्र्भागा\nअभिषेक आसवांचा चरणास पांडुरंगा \nजो तो लाबाड हसतो संतास पांडुरंगा \nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dailykesari.com/2020/09/15/oxygen-bed-hospital-started/", "date_download": "2020-09-26T01:30:40Z", "digest": "sha1:JA4E33UCNO23ZAGJ73DZDY5YS23JXYSZ", "length": 11252, "nlines": 170, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले रुग्णालय सुरु - Kesari", "raw_content": "\nघर महाराष्ट्र ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले रुग्णालय सुरु\nऑक्सिजन बेडची सुविधा असलेले रुग्णालय सुरु\nसातारा, (प्रतिनिधी) : पोलिसांसाठी व जिल्ह्यावासियांसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही सर्व प्रयत्न करत असून नागरिकांनी घाबरुन जावू नये, सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस व खासगी लोकांसाठी सुरु केलेले ऑक्सिजनयुक्त कोविड हॉस्पिटल राज्यात आदर्शवत आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.\nपोलीस दलासाठी उभारण्यात आलेल्या पहिल्याच कोविड केंद्राचा लोकार्पण सोहळा रविवारी सायंकाळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.\nया हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर, हाय फ्लो ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड, साधारण बेड, एक्स-रे मशिन, ईसीजी मशिन, कार्डीयाक अ‍ॅम्ब्युलन्स (24 तास उपलब्ध) इत्यादी सुविधा असणार आहेत.\nपूर्वीचा लेखअमेरिकेतील कोरोना नियंत्रणाच्या कामाचे मोदींकडून कौतुक\nपुढील लेखकोरोनाचे शहरात ८२१ नवे रुग्ण; २३ जणांचा मृत्यू\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nदहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा जवान हुतात्मा\nगोव्याला जाताना सातारा महामार्गाचा वापर करा\nराज्यात २१ हजार नवे रुग्ण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nबिहार निवडणूक : तीन टप्प्यांत होणार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nबिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली.\nनवनाथ गोरे यांचा खडतर प्रवास होणार सुकर\nभारती विद्यापीठात मिळणार नोकरी\nलोकप्रिय गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले.\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलचा पहिल्याच षटकात पराक्रम\nअतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात\nइशांत शर्मा आणखी दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/supreme-court-the-rush-of-work-during-the-corona-period-hearing-15628-settlement-4350-127643557.html", "date_download": "2020-09-26T02:17:44Z", "digest": "sha1:4V5HBNQYYITT4UC2YA5T6OXQIPEAIEHQ", "length": 8581, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "supreme court The rush of work during the Corona period; Hearing: 15,628, Settlement: 4350 | कोरोना काळात कामकाजाचा झपाटा; सुनावणी : 15,628, निपटारा : 4350 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुप्रीम कोर्ट:कोरोना काळात कामकाजाचा झपाटा; सुनावणी : 15,628, निपटारा : 4350\nनवी दिल्ली / पवनकुमारएका महिन्यापूर्वी\nव्हिडिआे कॉन्फरन्सिंगने कामकाज,अमेरिकेत केवळ 74, ब्रिटनमध्ये 18\nकाेराेना काळात कामकाजाची पद्धत बदलली. त्याचा परिणाम जगभरातील न्यायालयांवरही झाला. भारताच्या सर्वाेच्च न्यायालयाने काेराेना काळात १०० दिवसांत १५६२८ प्रकरणांची व्हिडिआे काॅन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करण्यात आली. अमेरिकेतील सर्वाेच्च न्यायालयात याच काळातील सुनावणीच्या २११ पट व ब्रिटनपेक्षा ८६८ पटीने भारतात सुनावणींचे प्रमाण जास्त आहे. अमेरिकेत सर्वाेच्च न्यायालयाने व्हिडिआे काॅन्फरन्सिंगच्या साहाय्याने ७४ व ब्रिटनमध्ये १८ खटल्यांची सुनावणी झाली. भारतात सर्वाेच्च न्यायालयाने ४ हजार ३५० प्रकरणांचा निपटाराही झाला. भारतात २२ मार्चपासून देशव्यापी लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. या पार्श्वभूमीवर सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस.ए. बाेबडे यांनी जनतेसाठी डिजिटल माेडवर कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय ६ एप्रिलला घेतला हाेता. सर्वाेच्च न्यायालयाच्या आकडेवारीनुसार २३ मार्च ते २० आॅगस्टपर्यंत १०२२ पीठ आसनस्थ झाले. या पीठांनी १०७६४ मुख्य प्रकरणे व यासंबंधी ३ हजार ४३८ अर्जांवर सुनावणी केली. रजिस्ट्रार काेर्टाने १४२६ प्रकरणांत सुनावणी केली. या सर्व प्रकरणांच्या सुनावणीसाठी ६५ हजार व्हिडिआे काॅन्फरन्सिंग करण्यात आल्या.\nप्रक्रिया : कोर्टाच्या वेबसाइटने ई-फायलिंग, ई-मेल, फोनने केस लिस्टिंगची माहिती\nसर्वोच्च न्यायालयाचे वकील सुमीत वर्मा म्हणाले, कोरोना काळाने न्यायालयीन प्रक्रियेला वकिलांसाठी अतिशय सुलभ बनवले आहे. आता न्यायालयाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून केसची ई-फायलिंग करता येेते. सर्व दस्तएेवज ऑनलाइन जमा केले जातात. ई-फायलिंगनंतर रजिस्ट्री संबंधित वकिल व पक्षकारास ई-मेल, फोनवर संदेश पाठवून केस दाखल झाल्याची माहिती किंवा त्रुटी दूर करण्याचे निर्देश देते. केस लिस्टेड झाल्यावर रजिस्ट्री संबंधित वकिलांना इ-मेल, फोनवर एक लिंक, मीटिंग कोड, पासवर्डने सुनावणीची वेळ कळवतात. नियोजित वेळेत वकील लिंकवर क्लिक करून कोर्टासमोर हजर होतात. जज वकिलास अनम्यूट करतात. तेव्हा वकील सामान्यपणे कोर्टासमक्ष होणाऱ्या सुनावणीसारखा युक्तिवाद सुरू करतात.\nव्यवस्था : कोर्ट परिसरात वकील, थेट प्रक्षेपण\nन्यायालय परिसरात १२ विशेष कक्ष तयार आहेत. येथून वकील व माध्यम प्रतिनिधी सुनावणीचे डिजिटल थेट प्रक्षेपण पाहू शकतात. एका वेळी ३० जणांना त्यासाठी परवानगी आहे. व्हिडिआे कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमक्ष स्वत: उपस्थित राहू शकत नाहीत, अशा वकील व पक्षकार यांच्यासाठी ७ विशेष कक्षही आहेत.\nखटले : ३० टक्के काेराेनाशी संबंधित, इतर चकमकीचे\nसुमारे ३० टक्के केसेस काेराेना संकटाशी संबंधित हाेत्या. त्यात लाॅकडाऊनमध्ये पाेलिसांचा अत्याचार, जमावाकडून हिंसाचार, परिवहन, परदेशात अडकलेले, आराेग्य कर्मचाऱ्यांचे वेतन, मजुरांचे वेतन-भाेजन इत्यादी प्रकरणांत सुनावणी झाली. काेर्टाचा अवमान, दिवाणी खटले, हैदराबाद पाेलिसांचे एन्काउंटर, हाउसिंग साेसायटी व जामीन इत्यादीचा त्यात समावेश हाेता.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathikhajina.com/tag/love-tips-video/", "date_download": "2020-09-26T01:17:34Z", "digest": "sha1:3L4JNAGQDVAYPFPPF7G5RPEF64L3UE4K", "length": 2109, "nlines": 38, "source_domain": "www.marathikhajina.com", "title": "love tips video | मराठी खजिना", "raw_content": "\nपालेभाज्यांचे हे आहेत फायदे\nधने-जिरे पूड चे फायदे\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन…\nडेटिंगला जाताना या टिप्स लक्षात ठेवा\nप्रेम वगैरे सर्व खोटे; सर्व काही केमिकल लोचा आहे\nएखादी व्यक्ती आपल्याला प्रिय का वाटते शरीरातील टेस्टोस्टेरॉन होर्मोनचा जास्त स्त्राव एखाद्याकडे आपल्याला आकर्षित करतो वा त्याविषयी आपल्याला जास्त आपलेपणा वाटू लागतो अमेरिकेतील प्रेयरी बोल नामक प्रजातीच्या उंदरावर संशोधन करून […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mpscmantra.com/2019/08/21/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-26T01:36:32Z", "digest": "sha1:DOJ2DI6YMTYDQPPVAQYOQKIH3M7MGMBI", "length": 13891, "nlines": 293, "source_domain": "www.mpscmantra.com", "title": "भारताचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2018-19 - MPSC Mantra", "raw_content": "\nMPSC कोणकोणत्या परीक्षा घेते\nMPSC बद्दल सविस्तर माहिती\nImportant Acts (महत्त्वाचे कायदे pdf स्वरुपात)\nविकास खन्ना यांना एशिया गेमचेंजर पुरस्कार\nचालू घडामोडी – २३ जुलै २०२०\n14 पायांचं झुरळ; इतकं मोठं झुरळ कधी पाहिलंत का\n♻️ तुम्हाला पाठ आहेत का :- महत्वाचे दिन ♻️\nउष्णतेची लाट म्हणजे काय\nजागतिक बँकेतील पदावर अभास झा\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता सर्वांनाच उपचार\nभारतीय क्षेपणास्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये\nप्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY)\nMPSC कोणकोणत्या परीक्षा घेते\nMPSC बद्दल सविस्तर माहिती\nImportant Acts (महत्त्वाचे कायदे pdf स्वरुपात)\nभारताचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2018-19\nभारताचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2018-19\nसंदर्भ : सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १२ वा\nवित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 4 जुलै 2019 रोजी 2018-19 चा आर्थिक\nपाहणी अहवाल जाहीर केला.\nनवीन मुख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्रमण्यम यांचा हा पहिलाच आर्थिक\n1950-51 मध्ये पहिला आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला.\nपुढील पाच वर्षांमध्ये (2024-25) 5 लाख कोटी अर्थव्यवस्थेसाठी 8%\nविकास दर 6.8% वरून 7% वर जाईल\nमहसुली तुट 3.3% पर्यंत मर्यादित ठेवण्याचे लक्ष्य\n2024-25 पर्यंत केंद्राच्या कर्जाचे प्रमाण सकाळ राष्ट्रीय उत्पादनाच्या 40%\n2018-19 मध्ये कृषी क्षेत्र (2.9%), उद्योग क्षेत्र (6.9%) आणि सेवा क्षेत्र\nग्राहक किंमत निर्देशांकवर (CPI) आधारित भाववाढ : 2017-18 (3.6%),\nघाऊक किंमत निर्देशांकवर आधारित भाववाढ : 2017-18 (3.0%), 2018-19\nचालू खात्यावरील तुट आणि वित्तीय तुट :-\nभारताची चालू खात्यावरील तुट (CAD) : 2017-18 (GDP च्या 1.9%),\nएप्रिल-डिसेंबर 2018 (GDP च्या 2.6%)\nआंतरराष्ट्रीय कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याने ही वाढ झाली आहे.\nप्राथमिक तूट म्हणजे व्याज देयके वगळता वित्तीय तूट\nउत्पादन क्षेत्राचा वृद्दीदर : 6.9% (2018-19)\nरोजगारातील वाटा : 34%\nवित्तीय तुट (GDP च्या %) :-\nपरकीय चलन साठा (अमेरिकन डॉलर्समध्ये) :-\nPrevious Previous post: महत्त्वाचे वन लायनर्स\nNext Next post: महत्त्वाच्या उपाधी\n2 thoughts on “भारताचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2018-19”\nतुमच्या शंका आम्हाला येथे विचार\nभूगोल : दाब व वारे भाग 1\nभूगोल: दाब व वारे भाग 2\nवेबसाईट वर अपलोड करण्यात येणाऱ्या नवीन माहितीचे नोटिफेकेशन हवे असल्यास खाली दिलेल्या बॉक्स मध्ये आपला इमेल टाका..\n509,375 लोकांनी आम्हाला भेट दिली\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nRoshani rathod on राज्यव्यवस्था टेस्ट : 30 जुलै 2020\nUpendra on काय आहे पॅरिस हवामान करार\nMPSC Mantra हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. MPSC Mantra च्या वेबसाइट बरोबरच Facebook, Telegram, Twitter, YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहोत. अल्पावधीतच रोपटेरूपी MPSC Mantra या व्यासपीठाचा वटवृक्ष झाला आहे. हे केवळ तुमच्यासारख्या विद्यार्थी मित्रांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. त्याबद्दल Team MPSC Mantra आपले शतशः आभारी आहे. आम्ही नेहमीच दर्जेदार व परिक्षाभिमुख माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही आमचा हा प्रयत्न असाच चालू राहील. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी नेहमी आमच्याशी संपर्कात रहा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/bjp-change-jalgaon-lok-sabha-constituency-candidate-unmesh-patil-replace-smita-wagh-44946.html", "date_download": "2020-09-26T01:50:38Z", "digest": "sha1:ZQOQP7NQTLPCO4B2HWIRA44D7DVV444P", "length": 16620, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "भाजपमध्येही कलह, जळगावचा उमेदवार ऐनवेळी बदलला", "raw_content": "\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nभाजपमध्येही कलह, जळगावचा उमेदवार ऐनवेळी बदलला\nभाजपमध्येही कलह, जळगावचा उमेदवार ऐनवेळी बदलला\nजळगाव : काँग्रेस पाठोपाठ आता भाजपनेही आपला उमेदवार बदलला आहे. भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी आता आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर असताना, त्यांना डावलून त्यांच्या जागी भाजपने उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. महत्त्वाचं म्हणजे भाजपने विद्यमान खासदार ए टी पाटील यांचं तिकीट …\nअनिल केऱ्हाळे, टीव्ही 9 मराठी, जळगाव\nजळगाव : काँग्रेस पाठोपाठ आता भाजपनेही आपला उमेदवार बदलला आहे. भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी आता आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर असताना, त्यांना डावलून त्यांच्या जागी भाजपने उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. महत्त्वाचं म्हणजे भाजपने विद्यमान खासदार ए टी पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता स्मिता वाघ यांच्याही तिकीटावर खाट मारुन, उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.\nजिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या अंतर्गत कलहामुळे उमेदवारी कापल्याचं सांगण्यात येत आहे.\nजळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जळगावात आता उन्मेष पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर यांच्यात लढत होणार आहे.\nविद्यमान खासदार ए.टी.पाटील यांच्या बंडांचा फटका बसण्याची शक्यता, तसंच राष्ट्रवादीचे उमेदवार माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या तुलनेत स्मिता वाघ कमकुवत ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांच्या ऐवजी चाळीसगावचे भाजप आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.\nभाजपला जाहीर केलेला उमेदवार बदलावा लागल्याची ही पहिलीच घटना ठरली.आधी गिरीश महाजन यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा सुरु होती. पण आता उन्मेष पाटलांचे नाव निश्चित झाल्याने, जळगावमधील राजकीय वातावरण बदलून गेलं आहे.\nकाही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी विद्यमान खासदार ए टी पाटील यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला होता. ‘गिरीश महाजन यांनी माझा घात केला’, असा आरोप त्यांच्याच पक्षातील जळगावचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांनी केला होता. यानंतर महाजनांनी ए.टी. पाटील यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला. “मी बोललो तर त्यांची पंचाईत होईल”, असा दम महाजनांनी ए.टी. पाटलांना दिला होता. ही सर्व परिस्थिती पाहता स्मिता वाघ यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय भाजपने घेतला.\nए. टी. पाटील गप्प राहा, मी बोललो तर पंचाईत होईल : गिरीश महाजन\n\"ए अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं\"\n'वरिष्ठांचं ऐकावं लागतं', डिलीट केलेल्या ट्विटवर अजित पवारांचं स्पष्टीकरण\nToll Rates | भाजपने टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय…\nआमच्याशिवाय कुणालाच सरकार चालवता येणार नाही हा भाजपचा भ्रम संपला…\nबिहारमध्ये कोरोना संपला का; राऊतांचा भाजपला सवाल\nशरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता, तर जास्त बरं…\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nNagpur Corona | महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी\nDhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या…\nMI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा…\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nSanju Samson : परफेक्ट टाईम, धडाकेबाज बॅटिंग, संजू सॅमसनचा झंझावात\nIPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज,…\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रोहित…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nCSK vs DC Live Score Update : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्लीची चेन्नईवर 44 धावांनी मात\nआशा स्वयंसेविकांनी आणि गटप्रवर्तकांनी प्रस्तावित कामबंद आंदोलन स्थगित करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nCSK vs DC Live Score Update : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्लीची चेन्नईवर 44 धावांनी मात\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/rhea-chakraborty-reached-ed-office-to-record-statement-brother-shouvik-seen-protecting-her-from-media-127594030.html", "date_download": "2020-09-26T03:07:58Z", "digest": "sha1:FX4DHXRQQ2XAQY2J4K56OADBDCPWG63X", "length": 6201, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rhea Chakraborty Reached ED Office To Record Statement, Brother Shouvik Seen Protecting Her From Media | जबाब नोंदवण्यासाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचली रिया चक्रवर्ती, मीडियापासून बहिणीचा बचाव करताना दिसला भाऊ शोविक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफोटो स्टोरी:जबाब नोंदवण्यासाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचली रिया चक्रवर्ती, मीडियापासून बहिणीचा बचाव करताना दिसला भाऊ शोविक\nरियावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे.\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती आज सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबईस्थित ईडी कार्यालयात पोहोचली आहे. रियावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप करण्यात आला असून त्या प्रकरणी तिची चौकशी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियाने आपल्या वकिलांमार्फत केली होती. परंतु ईडीने ही विनंती फेटाळली. त्यामुळे रियाला चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर व्हावे लागले आहे. रिया आपला भाऊ शोविक चक्रवर्तीसोबत येथे पोहोचली.\nयापूर्वी मुंबई पोलिसांनी नऊ तास रियाची चौकशी केली होती. त्यानंतर आता रिया पहिल्यांदा आपला जबाब नोंदवण्यासाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचली आहे.\nसर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरूअसेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियाने आपल्या वकिलांमार्फत केली होती. परंतु ईडीने ही विनंती फेटाळली. त्यामुळे रिया चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचली.\nसुशांतच्या खात्यामधून 15 कोटी रुपये काढल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केला आहे. त्यामुळे याच प्रकरणी रियाला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. कमी उत्पन्न असूनदेखील रियाने मुंबईत दोन मोठ्या प्रॉपर्टी खरेदी केल्याचे म्हटले जाते.\nरियाव्यतिरिक्त तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या, भाऊ शोविक, तिचा बिझनेस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा, पर्सनल मॅनेजर श्रुती मोदी आणि अन्य लोकांचीही पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. सुशांतचा हाऊस किपिंग मॅनेजर सॅम्युएल मिरांडाचा गुरुवाची ईडीने जबाब नोंदवला आहे.\n(फोटो क्रेडिट- एएनआय, विरल भयानी, मानव मंगलानी)\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/high-court-permission-to-re-shooting-of-actors-above-65-years-127593965.html", "date_download": "2020-09-26T02:40:08Z", "digest": "sha1:USCYKLPFKA6PMBUQVN5E6SQUKZYAZ6V4", "length": 4310, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "High Court Permission to re-shooting of actors above 65 years | 65 वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, न्यायालयाची ठाकरे सरकारला चपराक, दोन्ही पत्रके बेकायदा ठरवून रद्द - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजेेष्ठ कलाकार करु शकणार शूटिंग:65 वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, न्यायालयाची ठाकरे सरकारला चपराक, दोन्ही पत्रके बेकायदा ठरवून रद्द\n65 वर्षांवरील कलाकारांना चित्रिकरणात भाग घेण्यावर राज्य सरकारकडून निर्बंध लादण्यात आले होते. आता मुंबई उच्च न्यायालयाने ते निर्बंध उठवत ठाकरे सरकारला चपराक दिली आहे.कोर्टाने ज्येष्ठ कलाकारांना निर्बंध घालणारी सरकारची दोन्ही पत्रके बेकायदा ठरवून रद्द केली आहेत. यानंतर आता ज्येष्ठ कलाकारांना चित्रिकरणात भाग घेता येणार आहे.\nकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात 65 वर्षांवरील चित्रपट, टीव्ही कलाकार आणि क्रू मेंबर्सना स्टुडिओ किंवा आऊटडोअर सेटवर काम करण्यास राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आली होती. चित्रपट व टीव्ही कलाकार प्रमोद पांडे (70) आणि इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशनच्या वतीने वकील अशोक सरोगी यांनी याविरोधात याचिका दाखल केली होती. या दाखल केलेल्या दोन याचिकांवर खंडपीठाने निर्णय दिला. यानंतर सरकारने जारी केलेले दोन ठराव आता मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-(%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%B9)%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0---%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B7/BWjbTV.html", "date_download": "2020-09-26T03:01:51Z", "digest": "sha1:IK6RUDSPMQ3U77JG4ZQZB3GI3SGFZNQC", "length": 5995, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "पुढील वर्ष कौटुंबिक न्यायालयीन वाद (कलह)निवारण वर्ष म्हणून राबवणार - कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nपुढील वर्ष कौटुंबिक न्यायालयीन वाद (कलह)निवारण वर्ष म्हणून राबवणार - कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी\nMarch 17, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nपुढील वर्ष कौटुंबिक न्यायालयीन वाद (कलह)निवारण वर्ष म्हणून राबवणार - कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी\nमुंबई‌ : अलीकडच्या काळामध्ये कौटुंबिक कलहाच्या वाद प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशा वादामध्ये संपूर्ण कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मानसिक स्वास्थावर परिणाम होतो आहे. त्यामुळे असे कौटुंबिक वाद सामोपचाराने लवकरात लवकर मिटविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. त्याकरिता एप्रिल 2020 ते मार्च 2020 हे वर्ष कौटुंबिक न्यायालयीन वाद (कलह) निवारण वर्ष म्हणून राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी केले.\nमहाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व मुख्य मध्यस्थी केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राज्यस्तरीय मध्यस्थी व विधी सेवा परिषद ही महाराष्ट्र न्यायिक अकादमी, मुंबई येथे नुकतीच झाली. या परिषदेचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. या परिषदेला न्यायमूर्ती ए. ए. सय्यद, न्यायमूर्ती एस. एस. शिंदे, न्यायमूर्ती के.के.तातेड, न्यायमूर्ती आर.डी.धानुका, न्यायमूर्ती एस.बी.शुक्रे, न्यायमूर्ती एम. एस. सोनक आदी उपस्थित होते.\nमुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी म्हणाले की, अनुभवांची देवाण-घेवाण करुन विचारमंथन करण्यासाठी व वैचारिक समृद्धीसाठी अशा परिषदा भरविणे ही काळाजी गरज आहे. मध्यस्थी प्रक्रिया हा एक महत्वाचा घटक असून वकील, न्यायाधीश व मध्यस्थ हे लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे. आपल्या देशातील लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी मध्यस्थी चळवळ जोमाने पुढे नेली पाहिजे.\nमहाराष्ट्र राज्यातील महिला न्यायिक अधिकाऱ्यांची वाढलेली संख्या हे महिला सबलीकरणाचे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://cinenama.in/2020/08/30/swarajanani-jijamata-serial-on-interesting-mode/", "date_download": "2020-09-26T03:16:00Z", "digest": "sha1:QZINWBVPH52S2O4CODZHSPSY6AEWJTGV", "length": 9127, "nlines": 112, "source_domain": "cinenama.in", "title": "‘स्वराज्यजननी जिजामाता’ रंजक वळणावर - Cinenama", "raw_content": "\nHome छोटा पडदा ‘स्वराज्यजननी जिजामाता’ रंजक वळणावर\n‘स्वराज्यजननी जिजामाता’ रंजक वळणावर\nराजमाता जिजाऊ म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्वाची मूर्ती ‘हळवी आई’ आणि ‘कणखर राज्यकर्ती’ अशा दोन्ही बाजू मालिकेच्या माध्यमातून पोहचवण्यात यशस्वी ठरलेली सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठता कायम राखली आहे. दरम्यान, मालिका आता एका वेगळ्या उंचीवर आली असून, कधानक पुढे सरत जाईल तसतशी मालिका नव्या वळणावर येणार आहे.\nजिजाऊंचे पुण्यातलं आगमन हे स्वराज्य स्थापनेतील महत्त्वाचं पाऊल. शहाजीराजांनी जिजाऊंच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. महत्त्वाच्या घडामोडींच केंद्र ठरलेल्या पुण्यातील या घटनांचे चित्रण आता ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतून पहायला मिळणार आहेत. पुण्याच्या वेशीवर पहार उखडणे, सोन्याच्या नांगराने नांगरलेली जमीन, पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना, लालमहालाची बांधणी यातलं नेमकं काय बघायला मिळणार याबाबतची उत्सुकता आगामी येणाऱ्या काही भागातून उलगडली जाणार आहे. या मालिकेतील दादोजी कोंडदेव यांचे पात्र कशा प्रकारे रंगविले जाईल याबाबतची उत्सुकता आगामी येणाऱ्या काही भागातून उलगडली जाणार आहे. या मालिकेतील दादोजी कोंडदेव यांचे पात्र कशा प्रकारे रंगविले जाईल याची उत्सुकता देखील आहेच याबद्दल बोलताना निर्माते सांगतात की इतिहासाला अनुसरूनच हे पात्र असणार आहे. जिजाऊंच्या पुण्यात घडणाऱ्या घडामोडींवरील हे विशेष भाग शुक्रवार २८ ऑगस्टपासून सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळतील.\n‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन गायब\nजिजाऊंनी निर्धार, अफाट प्रज्ञा, अपूर्व धाडस आणि विजीगिषू वृतीने सर्व संकटांवर मात केली. आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण व त्याचे वेगवेगळे पदर याचा रंजक तितकाच गौरवशाली इतिहास येत्या काही दिवसात ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत पहायला मिळणार आहे.\nPrevious article‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन गायब\nNext articleदिशा गुंतलेय ‘स्क्रिप्ट रिडींग’मध्ये…\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nआता दणक्यात ‘झी वाजवा’\n‘झी’वर साजरी होणार प्रभावळकरांची पंच्याहत्तरी\nप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात...\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\n‘Cannes’ जूनमध्ये घेणार वर्च्युअल फिल्म मार्केट\nमी न धावताच दमून गेलो…\nझी-५ चा लहान मुलांसाठी #नॉनस्टॉप बचफन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/sarpanch-husband/articleshow/68952693.cms", "date_download": "2020-09-26T03:25:19Z", "digest": "sha1:66LVGX5LFZCFPNQ6NXXHV4MMSFFPAR3O", "length": 25135, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारतीय राजकारणात महिलांचे नक्की स्थान काय आरक्षण मिळाल्यावर ग्रामपंचायतीत सरपंचपदापासून सगळीकडे महिला दिसायला लागल्या असल्या, तरी बहुतांश ...\nभारतीय राजकारणात महिलांचे नक्की स्थान काय आरक्षण मिळाल्यावर ग्रामपंचायतीत सरपंचपदापासून सगळीकडे महिला दिसायला लागल्या असल्या, तरी बहुतांश महिलांचे पतीच कारभार करतात, असे इतरांना वाटत असते. महिलांचा राजकारणात सहभाग वाढणे ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीचे सध्याची परिस्थिती नक्की काय आहे, या विषयावर एक दृष्टीक्षेप.\n'भारतीय राजकारणातील महिलांचा सहभाग,' या विषयाचा अभ्यास करत असताना मी मुंबई महानगरपालिकेत एक सर्वेक्षण केले. तेथे काही महिला नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. त्या आधारावर 'सरपंच पती' किंवा 'प्रॉक्सी सरपंच'या विषयीची काही निरीक्षणे मी माझ्या अभ्यासात मांडली आहेत. भारतीय स्थानिक राजकारणामध्ये महिला नेत्यांची प्रमुख भूमिका होती, आहे आणि नेहमी राहील. १९९३पासून संविधानाने महिलांसाठी दिलेल्या कोट्यामुळे ग्रामपंचायतीतील एक तृतीयांश जागांवर स्त्रिया निवडून येत आहेत. काही राज्यांमध्ये (उदाहरणार्थ महाराष्ट्र) महिला आरक्षण ५० टक्के आहे. महिला सबलीकरणाबद्दल किंवा त्यांच्या राजकीय बांधिलकीबद्दल बोलताना संख्यात्मकदृष्ट्या महिला नेत्यांची भूमिका मोठी आहे, ही गोष्ट नाकारता येणार नाही. जगातील इतर देशांमधील महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वापेक्षा हे आकडे खूप जास्त आहेत.\nहाती असलेल्या माहितीनुसार भारतात महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचे मोठे परिणाम झाले आहेत. असे परिणाम होणे म्हणजे राजकारणातील महिलांच्या वाढलेल्या उपस्थितीमुळे सामाजिक समानतेत सकारात्मक परिणाम दिसणे होय. या मुद्द्याच्या आधारासाठी संशोधकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि भारतीय शासनाने सर्वेक्षण केले आहे. पश्चिम बंगालमधील अभ्यासामध्ये चटोपाध्याय आणि डुफ्लो (२००४) यांनी असे दाखवले आहे, की महिला नेत्या महिलांशी संबंधित धोरणांच्या अंमलबजावणीस प्राधान्य देतात. इयर एट अल (२०१२) यांच्या दुसऱ्या एका संशोधनामध्ये असे दिसते, की जेव्हा महिला नेता ग्राम पंचायतीमध्ये असते, तेव्हा महिलांवर होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराच्या तक्रारी नोंदविल्या जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे, लैंगिक हिंसाचारात वाढ होते असे नाही, तर महिला सरपंच असल्यास महिलांना तक्रार करण्यास संकोच वाटत नाही. रिखिल भवनानी (२००९) यांनी म्हटले आहे, की मुंबईत जर एखादी जागा आधी महिलांसाठी राखीव असेल, तर पुढच्या निवडणुकीत त्या प्रभागातून महिला निवडून येण्याची शक्यता वाढते. राजकारणातील महिलांच्या वाढलेल्या उपस्थितीमुळे सामाजिक समानतेत सकारात्मक परिणाम दिसतो, तो हाच होय.\nतरीदेखील जाहीर सभांमध्ये जे बोलले जाते, ते क्वचितच वास्तवाला धरून असते. बऱ्याच लोकांचे असे मत आहे, की आरक्षणामुळे लगेच महिलांचे राजकीय सबलीकरण होणार नाही. बऱ्याच वेळा आरक्षित जागेवरील निर्वाचित महिला प्रतिनिधीकडून तिचा पती, पुरुष नातेवाइक किंवा कोणी स्थानिक प्रभावी व्यक्ती तिची राजकीय सत्ता आपल्या हातात घेते, असे कारण सांगितले जाते. अशा व्यक्तींना लोक 'सरपंच पती' किंवा 'प्रॉक्सी' म्हणतात, म्हणजे राजकारणात किंवा तेथील सत्ताकारणात त्या सरपंचाच्या पतीचा खरा प्रभाव असतो.\nएका बाजूला आरक्षणाच्या प्रभावाबद्दल व्यक्त होणारा संशय बरोबर आहे. अलीकडे मुंबई महानगरपालिकेमधील अभ्यासात 'प्रॉक्सी' नेत्यांची वेगवेगळी रूपे मी पाहिली. कधी कधी ती तिच्या नवऱ्याच्या नावावर निवडणुकीला उभी राहिली किंवा तिच्याऐवजी तिचा भाऊ बैठकीत जाऊन बसला. बऱ्याचदा नगरसेविकांना त्यांच्या कामामध्ये नवऱ्याची मदत मिळत होती. 'तुम्ही निवडणुकीला उभे राहण्याचे का ठरविले,' असा प्रश्न मी एका नगरसेविकेला विचारला. त्यावर त्यांनी उत्तर दिले, 'ही जागा महिला आरक्षित होण्यापूर्वी माझ्या भावाची होती. त्याने माझे नाव पुढे केले. भावाच्या आधाराशिवाय मी कधीच उभी राहिले नसते.'\nहे जरी एका बाजूचे चित्र असले, तरी राजकारणातील महिलांच्या 'प्रॉक्सी'विषयीची आपली माहिती किंवा जाण मर्यादित आहे, हेदेखील तितकेच खरे आहे. याविषयी लोक फक्त प्रासंगिक उदाहरणांवरून मत व्यक्त करतात आणि महिलांच्या नेतृत्व करण्याच्या अक्षमतेचे सामान्यीकरण करतात. उदाहरणार्थ, एखाद्या सामाजिक कार्यक्रमात महिला सरपंचासमवेत तिचा पती एखाद्या वेळेस जरी दिसला, तरी लोक तिला 'सरपंच पती' ठरवून मोकळे होतात. तेच उदाहरण घेऊन बाकीच्या साऱ्याही अशाच असतात, असे म्हणायला लागतात. अशा सामान्यीकरणाविषयीचे त्यांचे स्पष्टीकरण 'स्त्री' हा एकसंध गट आहे, हे असते. म्हणजे, सगळ्या महिला सारख्याच असतात. लोक महिला महिलांमधील फरक विसरून, फक्त पुरुष आणि महिलांमधील फरकासंदर्भात बोलतात. महिला महिलांमध्ये फरक असतो आणि त्यांच्याविषयी चर्चा करताना आपण हे लक्षात ठेवले पहिजे. खरेतर, राजकारणातील महिलांबद्दल विचार करताना आपण 'इंटरसेक्शनल' दृष्टीने पाहायला हवे. 'इंटरसेक्शनॅलिटी' (महिलांवरील अन्यायाबाबत वर्ग, वंश, धर्म आदींच्या वर्गीकरणाऐवजी समुच्चयाने पाहण्याबाबतची संकल्पना) ही स्त्रीवादी संकल्पना किंबर्ली क्रेनशॉ यांनी मांडली आहे. महिलांना अनेक प्रकारच्या अस्मिता असतात; मात्र 'महिला' म्हणून त्यांची अशी एकच ओळख समाजात असते. या दृष्टीने कुठल्या महिला 'प्रॉक्सी' आहेत, कुठल्या महिला स्वतंत्रपणे प्रभावी आहेत आणि हे फरक का आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे.\nआपण 'प्रॉक्सी' या शब्दाच्या वापराबाबतच प्रश्न उपस्थित करायला हवा, ही दुसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट. या शब्दामागे दोन अर्थ येतात. एकतर जेव्हा तिला तिचे काम करण्यासाठी मदत मिळते, तेव्हा तिला स्वातंत्र्य नाही किंवा तिचा स्वतंत्र प्रभाव नाही, असे मानले जाणे. दुसऱ्या शब्दात सांगायचे, तर तिला कोणी थोडीशी मदत केली, तरी ती 'प्रॉक्सी' आहे असे समजणे. दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या मनात नेत्याची एक संकुचित प्रतिमा आहे. या प्रतिमेनुसार नेता एकटा, स्वतंत्रपणे निर्णय घेणारा आणि आक्रमक असतो. हा दृष्टिकोन चुकीचा आहे; कारण जगातील अनेक पुढारी त्यांच्या सहकाऱ्यांची मते विचारात घेऊन एकत्रीतपणे चांगले काम करतात. ते खूप प्रभावी आणि यशस्वी असतात. विशेषतः आजच्या युगात, जेथे लैंगिक भूमिका आणि परिस्थिती, सतत विचारात घेतल्या जात आहेत, तेथे आपण नेत्यांविषयी असलेल्या संकुचित प्रतिमेबद्दल प्रश्न उपस्थित करायला हवेत. आपण आपली दृष्टी अजून व्यापक करायला हवी.\nअसे असतानाही, निकटवर्तीय आणि सत्तेत असणारे पुरुष अजूनही आरक्षित जागांवर निवडून आलेल्या महिलांचीच निवड करतात, हे सत्य नाकारता येणार नाही. यामुळे नक्कीच आरक्षणाच्या धोरणाचा प्रभाव कमी होतो. प्रत्येक स्त्रीने कायद्याने तिला दिलेली पूर्ण निर्णय घेण्याची क्षमता दाखवली नाही, तरीसुद्धा प्रत्येक स्त्री संपूर्णपणे 'प्रॉक्सी' होत नाही. एकूण परिस्थितीचे चित्र या दोन धृवांच्यामध्ये कुठेतरी अस्तित्वात आहे.\nमहिला सबलीकरण हे आरक्षणाच्या माध्यमातून समजण्यासाठी भारतीय स्थानिक राजकारणातील 'प्रॉक्सीझम'चे वास्तव समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी अधिक माहिती गोळा करण्याची गरज आहे. ही माहिती गोळा करण्यासाठी लिंगभेद ओळखण्याची गरज आहे. हे केल्यानंतरच महिला नेत्यांच्या गरजांना न्याय देणारे धोरण असेल, अशी आपण आशा करू शकतो.\n(लेखिका अमेरिकी नागरिक असून 'भारतीय राजकारणातील महिलांचा सहभाग' या विषयावर संशोधन करत आहेत. त्यासाठी त्यांना फुलब्राइट स्कॉलरशिप मिळाली आहे. संशोधनाची गरज म्हणून त्या 'अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज' येथे मराठी भाषा शिकल्या आहेत.)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nनवऱ्याने दिलेल्या धोक्याचा बदला घ्यायला पूनम ढिल्लनने व...\nमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर ...\nछोट्या पडद्यावरील ‘या’ अभिनेत्रींचे वैवाहिक आयुष्य इतर ...\nअक्षय कुमार व ट्विंकल खन्नाच्या संसारातील 'हे' मजेशीर क...\nदीपिका ते शिल्पासारख्या अनेक अभिनेत्रींनी प्रेमात मिळाल...\nमाहीत असणं म्हणजे... महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nविज्ञान-तंत्रज्ञानसॅमसंगने आणले AI पॉवर्ड वॉशिंग मशीन, मोबाइलने करा कंट्रोल\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nकार-बाइकदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nकरिअर न्यूजविद्यापीठाच्या ATKT परीक्षेला तांत्रिक अडचणीचा फटका\nदेशUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने 'असे' दिलेउत्तर\nमुंबईकरोना: रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यापूर्वी कुटुंबीयांची संमती बंधनकारक\nकोल्हापूरपोटच्या १० वर्षांच्या मुलाला ५ लाखात तृतीयपंथीयास दिले दत्तक\nनाशिकराज्यात रुग्ण वाढत असताना नाशिकनं दिली दिलासादायक बातमी\nपुणेडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ही' मागणी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/election-commission-administration-prepare-for-voting-at-raver-and-jalgoan-loksabha-seat-tomorrow/articleshow/68981780.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-26T03:21:12Z", "digest": "sha1:CVS3E6IXRSXRVVIM52YPMU2222S7A5YD", "length": 15507, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमतदानासाठी प्रशासनाकडून मतदान यंत्रणा सज्ज\nदेशाच्या लोकसभा निवडणुकीचा राज्यात प्रचाराचा तिसरा टप्पा संपला असून, उद्या (दि. २३) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव हे दोन्ही मतदारसंघ असून, प्रशासनाकडून मतदान यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. या वेळी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील एकूण ३४ लाख ३१ हजार ४८५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी रविवारी (दि. २१) दुपारी पत्रकार परिषदेत दिली.\nरावेर जळगावसाठी उद्या मतदान; जिल्ह्यात ३४ लाख मतदार बजावणार हक्क\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nदेशाच्या लोकसभा निवडणुकीचा राज्यात प्रचाराचा तिसरा टप्पा संपला असून, उद्या (दि. २३) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव हे दोन्ही मतदारसंघ असून, प्रशासनाकडून मतदान यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. या वेळी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील एकूण ३४ लाख ३१ हजार ४८५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी रविवारी (दि. २१) दुपारी पत्रकार परिषदेत दिली.\nजळगाव जिल्ह्यातील ३ हजार ६१७ मतदान केंद्रांवर उद्या (दि. २३) सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या वेळी १७ लाख ९१ हजार ६६० पुरुष तर १६ लाख ३९ हजार ७३२ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी आपले कर्तव्य बजावण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज (दि. २२) सकाळी ८ वाजता विधानसभा क्षेत्रावर बोलावण्यात आले आहे. त्याठिकाणी संबंधित विधानसभा मतदारसंघनिहाय त्या-त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे साहित्य वाटप होणार आहे. यानंतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत, अशी माहितीही डॉ. ढाकणे यांनी या वेळी बोलताना दिली.\nजिल्ह्यात ३६ मतदान केंद्रे संवेदनशील\nजळगाव जिल्ह्यात एकूण ३६ मतदान केंद्रे संवेदनशील असून, त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघातील दहा तर रावेर लोकसभा मतदारसंघातील २६ मतदान केंद्रांचा समावेश आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त असणार आहे. यामध्ये एक पोलिस अधीक्षक, दोन अपर पोलिस अधीक्षक, ११ उपविभागीय पोलिस अधिकारी, २७ पोलिस निरीक्षक, १६४ सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच पोलिस उपनिरीक्षक, ४ हजार ४९४ पोलिस शिपाई आणि १ हजार ३९२ गृहरक्षक दलाचे कर्मचारी बंदोबस्ताची धुरा सांभाळणार आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या ३, मध्य प्रदेश राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन तर रेल्वे पोलिस दलाची एक तुकडी मदतीला असणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान यंत्रात काही बिघाड झाला तर अवघ्या अर्धा तासाच्या आत पर्यायी व्यवस्था करणारे पथक नेमण्यात आले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. या पथकात अधिकारी व कर्मचारी स्वतंत्रपणे नियुक्त केले असून, वाहनेदेखील वेगळी असणार आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nUjjwal Nikam: 'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का\nखडसे म्हणतात, राष्ट्रवादीकडून ऑफर नाही; पण चर्चा काही थ...\nCoronavirus: एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदे...\n'Smart helmets: करोनाला रोखण्यासाठी 'स्मार्ट हेल्मेट'; ...\nमहाराष्ट्रातील 'हा' जिल्हा सावरतोय; रुग्ण बरे होण्याचे ...\nप्रचारतोफा आज थंडावणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nकोल्हापूरकरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ऑडिट होणार, २२ पथकं तैनात\nदेश'चीन, पाकला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद भारतीय हवाई दलात'\nमुंबईशिवसेना कधीच कन्फ्यूज नव्हती; राऊतांचे फडणवीसांना उत्तर\nदेशकृषी विधेयकांवरून PM मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र\nपुणेकृषी विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार का; अजित पवार म्हणाले...\nपुणेडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ही' मागणी\nमुंबईअनलॉकसाठी आहे 'ही' त्रिसुत्री; CM ठाकरेंनी सांगितले पुढचे धोके\nमुंबईकरोना: रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यापूर्वी कुटुंबीयांची संमती बंधनकारक\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nकार-बाइकदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी\nविज्ञान-तंत्रज्ञानसॅमसंगने आणले AI पॉवर्ड वॉशिंग मशीन, मोबाइलने करा कंट्रोल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%3F", "date_download": "2020-09-26T02:15:59Z", "digest": "sha1:EGRJNXSXPFMZRK6O4SIKSUA5GLHNUWAN", "length": 3288, "nlines": 52, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"आम्ही कोण?\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख आम्ही कोण या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसतारीचे बोल ‎ (← दुवे | संपादन)\nसाहित्यिक:केशवसुत ‎ (← दुवे | संपादन)\nकणा ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/SkSXL-.html", "date_download": "2020-09-26T02:42:11Z", "digest": "sha1:R6MZSZBDYCFALGA7CVFQXAMFPFSKU44M", "length": 3981, "nlines": 37, "source_domain": "rajsatya.page", "title": "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील बंद्यांद्वारे मास्कची निर्मिती - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील बंद्यांद्वारे मास्कची निर्मिती\nMarch 18, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील बंद्यांद्वारे मास्कची निर्मिती\nमुंबई : कोरोना विषाणूच्या फैलावाच्या अनुषंगाने राज्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातून बाजारात मास्कचा तुटवडाही निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेनुसार राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहांमध्ये बंद्यांद्वारे मास्कनिर्मिती करण्यात येत आहे.\nअचानक मागणी वाढल्यामुळे राज्यात मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कारागृह बंद्यांद्वारे मास्कनिर्मिती केल्यास पुरवठ्याचे प्रमाण वाढविता येणे शक्य आहे. याबाबत श्री. देशमुख यांनी मास्कनिर्मितीची कल्पना मांडली. त्याला तुरुंग प्रशासनानेही उत्तम प्रतिसाद देत तात्काळ मास्कनिर्मितीला प्रारंभ केला. हे मास्क बनवून ते स्वतःही तसेच तुरुंग प्रशासनही वापरत आहे. तसेच बाजारातील तुटवडा पाहता विक्रीसाठी पुरवठादारांना देण्यात येत आहेत. बंद्यांनाही त्याचा मोबदला त्यांच्या नावावर जमा केला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2---%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/BycYLe.html", "date_download": "2020-09-26T03:42:25Z", "digest": "sha1:NCS2KUXJMT5EELCHS5JUEST2VOIRCROK", "length": 7491, "nlines": 41, "source_domain": "rajsatya.page", "title": "चांगले काम करणाऱ्या पतसंस्थाच्या पाठीमागे शासन खंबीरपणे उभे राहिल - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nचांगले काम करणाऱ्या पतसंस्थाच्या पाठीमागे शासन खंबीरपणे उभे राहिल - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील\nFebruary 22, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nचांगले काम करणाऱ्या पतसंस्थाच्या पाठीमागे शासन खंबीरपणे उभे राहिल- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील\nसातारा (राजसत्य) महाराष्ट्राच्या विकासात सहकार चळवळीचा मोठा सहभाग आहे. सहकार चळवळीमुळेच शेतकऱ्यांमध्ये आर्थिक परिवर्तन झाले आहे. ज्या सहकारी पतसंस्था चांगल्या काम करत आहेत, अशा पसंस्थांच्या पाठीमागे शासन खंबीरपणे उभे राहिल, असे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.\nसातारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशनच्या रौप्य महोत्सवी निमित्त पतसंस्थांसाठी एकदिवशीय अधिवेनाचे आयोजन आज येथील शाहू कलामंदिर मध्ये करण्यात आले होते. याचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. या उद्घाटनप्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील, रौप्य महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल जाधव, मानद सचिव अंजली पवार, संचालक विनोद कुलकर्णी, नेरेंद्र पाटील, शिरीष चिटणीस यांच्यासह फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.\nया फेडरेशनला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत, याचा अभिमान असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, आज राज्यामध्ये अनेक पतसंस्थांचे चांगल्या पद्धतीने काम सुरु आहे. या संस्था समाजातील प्रत्येक घटकांसाठी काम करीत आहेत. अशा संस्थांमुळेच खासगी सावकारीला आळा बसलेला आहे. राज्यात सहकारी संस्था मोठ्या प्रमाणात असून यांच्या उन्नतीसाठी शासन नेहमीच पाठीशी राहिल, असे आश्वासनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी शेवटी दिले.\nपतसंस्थांनी आर्थिक शिस्त लावण्याबरोबर होणाऱ्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवले तर संस्थां कधीही अडचणीत येणार नाही. प्रत्येक कर्ज प्रकरणाची काटेकोरपणे तपासणी केली पाहिजे. आपले व्यवहार हे आपल्या कार्यक्षेत्रापुरते मर्यादित ठेवून जास्तीत जास्त छोटे छोट कर्ज वितरणाबरोबर स्वनिधी वाढविण्यावर भर द्यावा. पतसंस्थांचे भविष्य चांगले असून ग्राहकांना जास्ती जास्त सेवा व सुविधा पुरवाव्यात, असे जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी या एक दिवसीय अधिवेशनात सांगितले.\nयावेळी उत्कृष्ठ काम करणाऱ्या पतसंस्थांचा पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच यशवंत या स्मरणिकेची प्रकाशनही यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी विनोद कुलकर्णी, प्रकाश पाटील, सुनिल जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन शिरीष चिटणीस यांनी केले. या अधिवनेशनास जिल्ह्यातील पतसंस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.satara.gov.in/service/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2020-09-26T00:54:01Z", "digest": "sha1:BEERTJRAPUP3WU5WETM56DDMTR7GMZJE", "length": 6803, "nlines": 105, "source_domain": "www.satara.gov.in", "title": "सेवा हमी | District Satara, Government of Maharashtra, India | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा सातारा District Satara\nसामाजिक व आर्थिक समालोचन\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nपीककर्ज मागणीसाठी भरावयाचा अर्ज २०२०-२१ (जिल्हा सातारा )\nमान्सून पूर्वतयारी आढावा बैठक\nडॉ . पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ( वसतिगृह प्रवेश अर्ज )\nपाचगणी गिरिस्थान नगरपरिषद भारतातील पश्चिम विभागात स्वच्छतेत प्रथम\nमहाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतीकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५. या कायदयान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली.\nया कायद्यांतर्गत कोणत्या सेवा नागरिकांना प्राप्त करून घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे, ही माहिती आपण आर.टी.एस. महाराष्ट्र या मोबाईल अॅप वर किंवा आपले सरकार वेब पोर्टल वर पाहू शकता व सेवा प्राप्त करण्याकरिता ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता. सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसताना सेवा नामंजूर करण्यात आली तर नागरिक प्रथम अपील, द्वितीय अपील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व तिसरे आणि शेवटचे अपील आयोगाकडे दाखल करू शकतात.\nआयोगाचा कार्यालयीन पत्ता राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय निर्मल इमारत, दुसरा मजला, नरिमन पॉईंट मुंबई ४०००२१.\nस्थान : जिल्हाधिकारी कार्यालय, | शहर : सातारा, महाराष्ट्र | पिन कोड : 415001\nसंकेतस्थळ मालकी हक्क - जिल्हा प्रशासन सातारा.\n© जिल्हा प्रशासन सातारा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 22, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/in-love-with-uniform/articleshow/69205629.cms", "date_download": "2020-09-26T03:18:51Z", "digest": "sha1:GRP6UYUTDZQYYS6TRICFTOVUFOPCXURA", "length": 16263, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहिंदी सिनेमे आणि 'खाकी वर्दी' हे समीकरण नवीन नाही पण, बॉलिवूड स्टार्सना सध्या पुन्हा एकदा पोलिसी गणवेशाची भुरळ पडली आहे...\nहिंदी सिनेमे आणि 'खाकी वर्दी' हे समीकरण नवीन नाही. पण, बॉलिवूड स्टार्सना सध्या पुन्हा एकदा पोलिसी गणवेशाची भुरळ पडली आहे. येत्या काळात अनेक हिरो-हिरॉइन्स आपला स्टायलिश आणि ग्लॅमरस लुक सोडून पोलीस अधिकाऱ्याच्या कडक भूमिकेत दिसणार आहेत.\nहोमी अदजानिया यांच्या आगामी 'अंग्रेजी मीडियम' सिनेमात करिना पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या १५ मेपासून सिनेमाचं मुंबईमध्ये चित्रीकरण सुरू होतंय. करीना पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तिच्या लुकविषयी बीटाऊनमध्ये चर्चा रंगली आहे.\n१९८२मध्ये प्रदर्शित झालेल्या मुंद्रु मुरगम सिनेमात रजनीकांत यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. हा सिनेमा रजनीकांत यांच्या अभिनय कारकिर्दीतला एक महत्त्वाचा सिनेमा ठरला. आता पुन्हा त्याच रुपात ए.आर. मुरुगादास यांच्या 'दरबार' सिनेमात रजनीकांत पोलिसाच्या रुपात दिसणार आहेत. सध्या सिनेमाचं मुंबईत शूटिंग सुरू आहे. यापूर्वी 'राम रॉबर्टो रहीम' आणि 'गिरफ्तार' या सिनेमांतही रजनीकांत यांनी पोलिसाची भूमिका केली होती.\n'बागी २'मध्ये एसीपी लोहा सिंग धुल यांची भूमिका बजावणारा रणदीप पुन्हा एकदा खाकी गणवेशात दिसणार आहे. संजय लीला भन्याळी यांच्या आगामी सिनेमात प्रमुख भूमिकेत असेल. एका छोट्या शहरातल्या पोलीस अधिकाऱ्यावर हा चित्रपटबेतलेला आहे.\nरोहित शेट्टीच्या सिनेमात अजय देवगण आणि रणवीर सिंग पोलीस अधिकारी बनले आहेत. रोहितच्याच आगामी 'सूर्यवंशी' या सिनेमात अक्षय रुबाबदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असेल. अक्षयच्या सिनेमामधल्या खास लुकची चर्चा 'सिम्बा'च्या प्रदर्शनापासूनच सुरू झाली होती. एटीएस प्रमुख वीर सूर्यवंशी असं अक्षयच्या भूमिकेचं नाव आहे. सिनेमात अक्षय सोबत कतरीना कैफसुद्धा दिसणार आहे.\n'विकी डोनर', 'बधाई हो', 'अंधाधून' या चित्रपटांतून अनोख्या ढंगात प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आयुषमान खुराना भूमिकात नवीन प्रयोग करतोय. यावेळी तो अनुभव सिन्हा यांच्या 'आर्टिकल १५' सिनेमात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. लखनऊमध्ये सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे.\nप्रेक्षकांचा लाडका चुलबुल पांडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 'दबंग ३' सिनेमाचं निम्म्याहून अधिक चित्रीकरण सलमाननं पूर्ण केलं आहे. यावेळी सलमानच्या समोर कन्नड अभिनेता सुदीप खलनायक म्हणून दिसेल. सिनेमाचा दिग्दर्शक प्रभू देवा यावेळी 'दबंग ३'मध्ये कोणता फंडा वापरतोय याची चाहत्यांना उत्सुकता असेल.\n'परमाणू', 'सत्यमेव जयते' आणि 'रोमियो अकबर वॉल्टर' सारख्या देशभक्तीपर सिनेमांमध्ये यापूर्वी जॉन दिसला आहे. आता पुन्हा निखिल अडवाणींच्या 'बाटला हाऊस'मध्ये खाकी गणवेशात जॉन दिसणार आहे. सिनेमाची कथा २००८मध्ये दिल्लीत घडलेल्या बाटला हाऊस चकमकीवर आधारित आहे. यात जॉन एसीपी संजीव कुमार यादव यांची भूमिका साकारतोय.\n'दबंग ३'मध्ये सलमान खानबरोबर अरबाज खानसुद्धा पोलीस म्हणून दिसेल. पण सलमानच्या तुलनेत त्याला कितपत वाव मिळेल हे पाहणं उत्सुकतेचं असेल.\n'अर्जुन पटियाला' हा सिनेमा दिलजीत दोसांझसाठी कमबॅक करणारा सिनेमा ठरणार आहे. या सिनेमात त्यानं एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. यापूर्वी अभिषेक चौबेच्या 'उडता पंजाब'मध्ये तो खाकी गणवेशात भूमिका साकारली होती.\n'मर्दानी २' सिनेमाचं चित्रीकरण सध्या सुरू असून अभिनेत्री राणी मुखर्जीचा खाकी गणवेशातला हा रुबाबदार लुक सध्या चर्चेत आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n... म्हणून अलका कुबल यांनीच केले आशालता वाबगावकर यांच्य...\nजया साहाची कबुली, श्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ...\nड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्यानंतर दीपिका पादुकोणने या दोन ल...\nसुरांचा बादशाह काळाच्या पडद्याआड; एसपी बालसुब्रमण्यम या...\nअभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना करोनाची लागण...\nअॅव्हेंजर्स एन्डगेम: ३०० कोटींचा आकडा पार महत्तवाचा लेख\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nनागपूरशहीद पित्याच्या शौर्याला मुलींचा अनोखा सलाम\nमुंबईशिवसेना कधीच कन्फ्यूज नव्हती; राऊतांचे फडणवीसांना उत्तर\nकोल्हापूरपोटच्या १० वर्षांच्या मुलाला ५ लाखात तृतीयपंथीयास दिले दत्तक\nआयपीएल २०२०Chennai vs Delhi: दिल्लीने गड राखला, बलाढ्य चेन्नईवर साकारला विजय\nपुणेकृषी विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार का; अजित पवार म्हणाले...\nकोल्हापूरसंभाजीराजेंनी वेळीच ओळखली चाल; 'असा' उधळला डाव\nपुणेडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ही' मागणी\nसोलापूरपुढचे आंदोलन मातोश्री आणि सिल्व्हर ओकवर; पडळकरांचा इशारा\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://letstalksexuality.com/its-not-a-competition/", "date_download": "2020-09-26T01:46:24Z", "digest": "sha1:6AENZ4EUOSPTNEVXC7OPCFFWCNG5WV4X", "length": 10413, "nlines": 175, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "IT’S NOT A COMPETITION ! – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nप्रेम करण्यासाठी डोळे नाही स्पर्शच महत्त्वाचा असतो\nपीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी\nप्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २\nलैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार\nलॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……\nपुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट\nजननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १\nखाली काही लिंक सहज वाचण्यासाठी ….\nस्त्रियांची कामेच्छा पुरुषांपेक्षा कमी असते की अधिक\nजोडीदाराची विवेकी निवड आणि लैंगिकता\n‘शुभ मंगल सावधान’ चित्रपटाच्या निमित्ताने_निहार सप्रे\nआह से आहा तक – लैंगिक पूर्ती म्हणजेच ऑरगॅझम\nआह से आहा तक – लैंगिक पूर्ती म्हणजेच ऑरगॅझम\nमी एक २४ वर्षाचा मुलगा आहे आणि माझ्या मामाच्या मुलीचं वय ११ आहे मला तिच्या बरोबर लैंगिक संबंध करायचे आहेत तर करू शकतो का\nतुला असं करता नाही येणार. हे फार चुकीचे व गंभीर आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण या कायद्यानुसार १८ वर्षांखालील कोणत्याही बालकाशी केलेले लैंगिक वर्तन हा कायद्याने गुन्हा आहे.\nजरी त्या मुलीची यासाठी परवानगी असली तरीसुद्धा.\nमित्रा लवकरात लवकर डॉक्टरांना भेट व त्यांची मदत घे.\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nमदनमणी,योनीभगोष्ट आणि मदनबिंदू म्हणजे काय ते योनीत कुठे असतात\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nअविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://zeenews.india.com/marathi/spirituality/horoscope-11-aug-2020-today-is-special-day/530483", "date_download": "2020-09-26T03:29:08Z", "digest": "sha1:JIMEWQUWXR3M2G2Q4PUKG25KMJ5EIT7K", "length": 17288, "nlines": 124, "source_domain": "zeenews.india.com", "title": "राशीभविष्य : आज 'या' राशीच्या व्यक्तींसाठी दिवस चांगला horoscope 11 AUG 2020 today is special day", "raw_content": "\nराशीभविष्य : आज 'या' राशीच्या व्यक्तींसाठी दिवस चांगला\nपाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस\nमेष - जर तुम्हाला काही हवं असेल तर ती गोष्ट आज मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी आहात ती गोष्ट तुम्हाला सहज मिळेल. प्रत्येक कमांसाठी वरिष्ठांचा सल्ला घ्या.\nवृषभ - तुम्ही दिलेले सल्ले इतरांना प्रभावीत करतील. अडचणीत असलेल्या काम पूर्ण कण्यास यश मिळेल. विचार करण्याचा मार्ग बदला. मित्रांकडून मदत मिळेल. दिवस चांगला जाईल\nमिथुन - नेहमीची काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आपल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष ठेवा. सकारात्मक विचार करा. आरोग्याची काळजी घ्या.\nकर्क - प्रेम संबंधात गैरसमज वाढतील. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका.विचार केलेली कामे पूर्ण करण्यात वे लागेल. पण यश अटळ आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.\nसिंह - आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. पैसे कमवण्यामध्ये यश मिळेल. अधिकच्या कामांमध्ये इतरांची मदत मिळण्याची शक्यता आहे. इतरांची बाजू समजण्यास प्रयत्न करा. तुम्हाला चांगल्या बातमी प्रतिक्षा आहे.\nकन्या - दिवस चांगला आहे स्वतःच्या भवनांवर संयंम ठेवा. नव्या गोष्टी शिकाल. जोडीदाराशी संबध अधिक मधूर होतील. डोक्यात गोंधळ असेल पण तुम्हाला याचा फायदा मिळेल. नोकरीत स्वत:च्या कामावर लक्ष दिलात तर बरं होईल.\nतूळ : महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील. पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल. नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील. ज्या तुम्ही आनंदाने स्वीकारलात तर दिवस चांगला राहील. काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील.\nवृश्चिक : तुमच्या आयुष्यात कोणतातरी मोठा बदल होऊ शकतो. अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या मनात जे काही चाललं आहे त्यावर विचार केलात तर फायदा होईल. घर-परिवारासोबत जास्त वेळ घालवाल.\nधनु : वायफळ काम करण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करुन आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. विवाहास योग्य व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव मिळतील. नोकरी किंवा व्यवसायांवर बोलणाऱ्यांसाठी चांगली वेळ आहे.\nमकर : नोकरदार वर्गाने थोडा संयम बाळगावा. सहकार्यांकडून मदत मिळेल. जोडीदाराकडूनही मदत मिळेल. अविवाहितांसाठी पुढचे काही दिवस चांगले येणार आहेत. व्यावसायिकांसाठी ही सुवर्ण संधी.\nकुंभ : आज केलेल्या प्रत्येक कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे. काही महत्त्वाचे निर्णय तातडीने घ्यावे लागतील त्यासाठी तयार राहा. आरोग्याकडे लक्ष द्या.\nमीन : नोकरी किंवा व्यवसायासंदर्भात काही नव्या योजना आखू शकता. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल. व्यवसायात यश आणण्यासाठी तुम्हाला जोर देऊन काम करण्याची गरज आहे.\nराशीभविष्य : आज 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार नशिबाची साथ\nराशीभविष्य:'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस च...\nकेईएम रुग्णालयात आजपासून कोव्हिशिल्ड लशीच्या चाचणीला सुरुवा...\nमाझ्याविषयी खोटी माहिती पसरवली तर कायदेशीर कारवाईला तयार रा...\nव्होडाफोनने जिंकला खटला, भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी...\nकेंद्राचे नवे कृषीकायदे राज्यात लागू होणार नाही, महाविकास आ...\nधोनीसह चेन्नई संघाकडून चूक, पृथ्वी शॉची शानदार खेळी\nवाहतूक कोंडीमुळे कल्याण-डोंबिवलीकरांचे हाल\nअभिनेता राहुल सुधीरला करोनाची लागण\n राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राह...\nसुशांतसिंह मृत्यूप्रकरण : सीबीआय तपासावर कुटुंबीय नाराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/t2463/", "date_download": "2020-09-26T01:44:05Z", "digest": "sha1:64DHWTM4PUZIPFGZH27TBDQATIPROG7Q", "length": 5662, "nlines": 152, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-लव्ह लेटर - विडंबन-1", "raw_content": "\nलव्ह लेटर - विडंबन\nलव्ह लेटर - विडंबन\nनुकतीच संदीप खरे यांची \"लव्ह लेटर\" हि कविता वाचण्यात आली . त्यावरून इन्स्पायर होऊन हि कविता मी केली आहे, हे कुठल्याही प्रकारचे विडंबन नसून निव्वळ करमणूक हाच त्या मागचा उद्देश आहे.\nआपल्या प्रतिसादांचे स्वागत आहे\nबॉस म्हणजे बॉस म्हणजे बॉस असतो\nसदासर्वकाळ डोक्याला तो \"शॉट\" असतो\nचांगल्या कामात चुका सदैव तो शोधत असतो\nफायर करायला मात्र नेहमी तो तत्पर असतो\nबॉस म्हणजे बॉस म्हणजे बॉस असतो\n\"दिमाख का दही \" करण्यात तो मास्टर असतो\n\"अप्रिसिअशन\" करण्यात तो कंजूष असतो\nब्लेम करण्यात सगळ्यात पुढे असतो\n\"डिसिप्लीन\" बद्दल स्वतः तो बेफिकीर असतो\nआपल्या बाबतीत मात्र तो कायदेमूर्ती असतो\n\"सबोर्डीनेत \" वर उगाच रुबाब झाडीत असतो\nस्वताच्या खोट्या स्तुती वर खुश मात्र तो होत असतो\nकसाही असला तरी शेवटी तो बॉस असतो\nत्याच्या छत्रछायेखाली आपण मात्र सुरक्षित असतो\nलव्ह लेटर - विडंबन\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: लव्ह लेटर - विडंबन\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: लव्ह लेटर - विडंबन\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: लव्ह लेटर - विडंबन\nRe: लव्ह लेटर - विडंबन\nRe: लव्ह लेटर - विडंबन\nRe: लव्ह लेटर - विडंबन\nRe: लव्ह लेटर - विडंबन\nRe: लव्ह लेटर - विडंबन\nRe: लव्ह लेटर - विडंबन\nलव्ह लेटर - विडंबन\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/how-did-new-york-become-the-safest-city-people-dont-go-out-in-unlock-mask-distancing-and-cycle-became-culture-127603841.html", "date_download": "2020-09-26T02:07:07Z", "digest": "sha1:AYD5DU3KT6OB7YU2PMMDQML27IYCH6HC", "length": 7428, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "How did New York become the safest city? People don’t go out in unlock; mask-distancing and cycle became culture | न्यूयॉर्क कसे सर्वात सुरक्षित शहर झाले? मास्क-डिस्टन्सिंग, सायकल संस्कृती, अनलॉकमध्ये लोक बाहेर पडत नाहीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशिकवण:न्यूयॉर्क कसे सर्वात सुरक्षित शहर झाले मास्क-डिस्टन्सिंग, सायकल संस्कृती, अनलॉकमध्ये लोक बाहेर पडत नाहीत\nन्यूयॉर्कहून ‘दिव्य मराठी’साठी मोहंमद अली2 महिन्यांपूर्वी\nघरामागील अंगणात होत आहेत लहान पार्ट्या, क्वॉरंटाइनचे नियम मोडल्यावर 7.5 लाख रु. दंड\nजगातील सर्वात संक्रमित शहर राहिलेले न्यूयॉर्क आता अमेरिकेतील सर्वात सुरक्षित स्थळ आहे. तेथील २ कोटी लोकांच्या स्वयंशिस्तीमुळे संसर्गाला हार मानावी लागली आहे. बुधवारी ७० हजार चाचण्यांत फक्त ६३६ रुग्ण आढळले म्हणजे ०.८७% टक्केच नवीन प्रकरणे. म्हणजे संसर्ग फैलावण्याचा दर १% पेक्षा कमी आहे. आठवड्यात अनेक दिवस तर कोरोनामुळे एकही मृत्यू होत नाही. गव्हर्नर अँड्ऱ्यू क्युमो म्हणाले, ‘लोकांचा हा विजय आहे. त्यांनी जीवनशैलीत मोठे बदल केले आहेत.’ या शहराने दोन महिने दररोज सरासरी ७०० पेक्षा जास्त मृत्यू पाहिले आहेत. रुग्णालयांची व्यवस्था कोलमडली होती. स्मशानभूमीतही जागा कमी पडली होती.\nन्यूयॉर्कच्या लोकांनी सायकल व ई-स्कूटरचा अंगीकार केला. महामारीदरम्यान ७ लाखांपेक्षा जास्त सायकल सहली केल्या. शहरात सायकलची टंचाई आहे. काहींनी दुप्पट किंमत (४०० ऐवजी ८०० डॉलर) देऊन सायकल खरेदी केली. ब्रुकलिन सायकल कंपनीने सांगितले की, आमच्या शोरूममध्ये सध्या सायकल शिल्लक नाही. त्यांची विक्री हॉट केकप्रमाणे झाली.\nफिजिकल डिस्टन्सिंग-मास्क बनली संस्कृती\nन्यूयॉर्कने मास्क आणि अंतर ठेवणे ही संस्कृती अंगीकारली. लोक विनाकारण बाहेर निघत नाहीत. संक्रमिताच्या संपर्कात येणाऱ्या ९२ % लोकांना ट्रेस करून चाचण्या केल्या आहेत. ३ पैकी एकाची चाचणी झाली आहे. शाळा उघडण्याची योजना आहे.\nघरामागील अंगणात होत आहेत लहान पार्ट्या\nभेटीगाठींसाठी, लहान पार्ट्यांसाठी लोकांनी हॉटेल किंवा पार्कमध्ये जाण्याऐवजी आपल्या घरामागील अंगणासच प्राधान्य दिले आहे. जेथे फिजकल डिस्टन्सिंगचे पालन करणे कठीण आहे अशा ठिकाणी ते गेलेच नाहीत.\nतिकिटासाठी रांगा नकोेत म्हणून मोफत प्रवास\nन्यूयॉर्कचा वाहतूक विभाग काही तासांतच मेट्रो-बस सॅनिटाइझ करत आहे. तिकिटासाठी रांगा लागू नयेत म्हणून सर्वांना मोफत बस प्रवासाची सुविधा सुरू झाली. अर्थात संसर्गाच्या भीतीने लोकांनी मेट्रो आणि बसने प्रवास खूपच कमी केला आहे.\nप्रत्येक ठिकाणी चाचणी केंद्र, ७.५ लाख रु. दंड\nशहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी होत आहे. १४ दिवसांचे क्वॉरंटाइन अनिवार्य आहे. बस, टॅक्सी, विमानतळ या प्रत्येक ठिकाणी चाचणी सुविधा आहे. क्वॉरंटाइनचे नियम मोडल्यावर ७.५ लाख रु. दंड होत आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/cricket/news/ms-dhoni-saqlain-mushtaq-pakistan-cricket-board-pcb-slammed-spinner-saqlain-mushtaq-for-praising-ms-dhoni-on-his-youtube-channel-127654127.html", "date_download": "2020-09-26T03:07:11Z", "digest": "sha1:RNU4HCXZYGRAY3PI2CY5D37BBODHUXSK", "length": 6982, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "MS Dhoni Saqlain Mushtaq | Pakistan Cricket Board (PCB) Slammed Spinner Saqlain Mushtaq For Praising MS Dhoni On His Youtube Channel | माहीचे कौतुक करणाऱ्या सकलैन मुश्ताकवर भडकला पीसीबी; म्हणे, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे सदस्य आहात, अटींचे उल्लंघन कराल तर कारवाई - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nधोनीच्या कौतुकावर तीळ-पापड:माहीचे कौतुक करणाऱ्या सकलैन मुश्ताकवर भडकला पीसीबी; म्हणे, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे सदस्य आहात, अटींचे उल्लंघन कराल तर कारवाई\nधोनीला खरा राजदूत म्हणत सकलैनने युट्यूब चॅनलवर केले होते कौतुक\nनुकतेच रिटायरमेंटची घोषणा करणाऱ्या कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीची जगभरात चर्चा आहे. त्याच्या कारकीर्दीचे कौतुक केवळ भारतातच नव्हे, तर पाकिस्तानातही केले जाते. पाकिस्तानचा प्रसिद्ध माजी क्रिकेटर सकलैन मुश्ताकने सुद्धा त्याचे तोंडभर कौतुक केले. परंतु, पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा यावर तीळ-पापड झाला आहे. सकलैन मुश्ताक यांनी युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर करून माहीचे कौतुक केले होते. त्यावर पीसीबीने त्यांना फटकारले आहे. तुम्ही पीसीबीचे सदस्य आहात. एक युट्यूब चॅनल चालवू नये अशी तंबी सुद्धा पीसीबीकडून देण्यात आली आहे. सकलैन मुश्ताक पीसीबीच्या हाय परफॉर्मंस सेंटरमध्ये इंटरनॅशनल प्लेअर डेव्हलपमेंट विंग हेड आहे.\nधोनीचे कौतुक करताना बीसीसीआयवर केली होती टीका\nधोनीसारख्या एका मोठ्या खेळाडूसोबत बीसीसीआयचे वर्तन योग्य नाही. त्याला मैदानावर शेवटचा निरोप द्यायला हवा होता. हा एक प्रकारे बीसीसीआयचा पराभव आहे असे सकलैनने म्हटले होते. सकलैन मुश्ताकच्या याच विधानांवरून पीसीबीने नाराजी व्यक्त केली. धोनी खरा राजदूत होता असेही सकलैनने म्हटले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेटमध्ये सकलैनचे डोकावणे सुद्धा पीसीबीला फारसे आवडले नाही.\nपीसीबीने सर्वच कोचना दिली तंबी\nपीसीबीने केवळ सकलैन मुश्ताक नव्हे, तर इतर प्रशिक्षकांना सुद्धा तंबी दिली आहे. पीसीबीच्या सेवा शर्तींचे उल्लंघन करू नका. अन्यथा कारवाई होईल असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. सकलैनपूर्वी माजी क्रिकेटर बासित अली, फैसल इकबाल, मुहंमद वसीम आणि अब्दुल रज्जाक यांनी सुद्धा युट्यूबवर चॅनल सुरू केले आहेत. तुम्ही बोर्डाचे सदस्य आहात असे म्हणत त्यांना पीसीबीने फटकारले.\nकोचला माध्यमांशी बोलण्यास मज्जाव\nपीसीबीने आपल्या कोचना मीडियाशी बोलण्यास बंदी घातली आहे. आता बोर्डाची मंजुरी घेतल्याशिवाय कोच मीडियाशी बोलू शकणार नाहीत. यापूर्वी सुद्धा बोर्डाने भारत पाकिस्तान संबंधांवर आणि खेळाडूंवर बोलणे टाळण्याचा सल्ला दिला होता.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaalavaani.blogspot.com/2010/08/blog-post_09.html", "date_download": "2020-09-26T03:22:19Z", "digest": "sha1:4OM3BW4W3QKLGZT5PWPDTILEKW2FOEWR", "length": 7519, "nlines": 55, "source_domain": "jaalavaani.blogspot.com", "title": "जालवाणी: आणि मी सिगारेट सोडली.", "raw_content": "\nलेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला प्रत्यक्ष लेखकाच्या आवाजात ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०१० रोजी प्रकाशित करत आहोत. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे काहीही ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...\nआणि मी सिगारेट सोडली.\nव्यसन सुटणं किंवा सोडवणं किती कठीण असतं हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच. पण व्यसन सोडायचंच असा जर त्यात गुरफटलेल्या व्यक्तीचा, मनाचा निर्धार असेल तर ते सोडणं/सोडवणं शक्यही असतं....सुधीर काळेसाहेब त्यांचे स्वत:चे अनुभव सांगताहेत....ऐकूया त्यांच्याच आवाजात.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसिगारेट पिणा-यांसोबत सिगारेट न पिणा-यांनाही धुराचा विनाकारण त्रास होतो व आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. सिगारेट आरोग्याला हानिकारक आहे हे माहित असूनही ब-याच व्यक्ती सिगारेटचा अट्टहास सोडत नाही. मात्र सिगरेट सोडणे अशक्य नाही हेच तुमच्या अनुभाववरून सिद्ध होते.\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी १:२५ म.उ.\nमी पण एकेकाळी सिगरेट ओढत असे. आणि माझ्याही बाबतीत जवळपास ( म्हणजे ९० टक्के ) असेच घडले होते. मी आता सिगरेट सोडून २० वर्ष झाली आहेत. पण सुरुवातीला जेंव्हा ओढत असे, तेंव्हा दिवसाला तिन ते चार पाकिटं व्हायची.\n१६ ऑगस्ट, २०१० रोजी ११:१० म.पू.\nआपले खरेखुरे दैदिप्यमान अनुभव नोंदवून ठेवून, आणि आज त्याचे अभिवाचनही उपलब्ध करवून देऊन आपण व्यसनमुक्ती चाहणार्‍या अनेक लोकांच्या विचारांना प्रवाही केले आहे.\nत्याखातर आपले हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक धन्यवाद.\nडॉ.ऑर्निशेस प्रोग्राम फॉर रिव्हर्सिंग हार्ट डिसिज या पुस्तकात व्यसनमुक्ती या विषयावर लिहीलेल्या विचारांच्या, मी केलेल्या स्वैर अनुवादाचा दुवा खाली देत आहे. आशा आहे की व्यसनमुक्ती चाहणार्‍यांना तोही उपयुक्त ठरेल.\n१६ ऑगस्ट, २०१० रोजी ५:४६ म.उ.\nआपला अनुभव ऐकून लगेच कितीजण तो अमलात आणतील ते सांगू नाही शकत पण विचार मात्र नक्कीच करतील,नव्हे त्यांचे त्या दिशेने पडलेले ते पहिले पाउल असणार आहे आणि हेच तुमच्या अभिवाचनाचे फलित असणार आहे.धन्यवाद.\n२५ ऑगस्ट, २०१० रोजी ४:१२ म.उ.\nमी 'नववी'मध्ये असताना पहिली सिगारेट ओढली होती... :) पण नंतर कधीच ओढली नाही. वाटलेच नाही कधी परत ओढवेसे... :)\n२७ ऑगस्ट, २०१० रोजी ७:११ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसूर्य संपावर गेला तर\nआणि मी सिगारेट सोडली.\nमोनालिसाला कुठे होत्या भुवया\nअब्राहम लिंकन ह्यांचे हेड मास्तरांना पत्र\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/topics/pakistan-india", "date_download": "2020-09-26T03:17:39Z", "digest": "sha1:S4IGVG5D6Z6VUE3NWWY3WKFRESGPO4OX", "length": 4019, "nlines": 66, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nExplainer इस्रायल-युएई मैत्रीपर्व; भारताला होणार 'असा' फायदा\nपाकिस्तान कोर्टाची भारताविरोधात शेरेबाजी\nभारताच्या बदनामीसाठी इम्रान खान यांनी शेअर केले फेक व्हिडिओ\nदक्षिण आशिया क्रीडा स्पर्धा: भारताची पदकतालिकेत आघाडी\nकलम ३७०ः अजमेर दर्गा प्रमुखांचा मोदींना पाठिंबा\nकाश्मीरप्रश्नी आम्ही कमी पडलो: पाक\nकलम ३७०: अणुबॉम्बनं नष्ट करून टाकू; मियाँदादचा तोल गेला\n..म्हणून गांगुली जखमी झाल्यानंतरही त्याच्याकडे गेलो नाही: शोएब\nप्रिय भारत-पाक, युद्ध नकोच: बिला​वल भुत्तो\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/fisheries/93593e91f93e", "date_download": "2020-09-26T02:30:59Z", "digest": "sha1:GWZEK5Q6IUOZWEGKUTDX6ORWYRGNFBO6", "length": 7207, "nlines": 83, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "वाटा — Vikaspedia", "raw_content": "\nवाटा मासा : हा मासा घोडा मासा व नळी मासा यांचा जवळचा आप्त आहे. याचा समावेश सिंन्ग्नॅथिडी कुलात होत असून सिन्ग्नॅथस इंटरमिडियस (ट्रॅकिर्हॅंफस इंटरमिडियस ) असे याचे शास्त्रीय नाव आहे. याचा प्रसार भारताच्या दोन्ही किनाऱ्यांलगतच्या सागरांत व शैलभित्तीत आहे. या जातीखेरीज सिंन्ग्नॅथिडी कुलातील आणखी चार जाती भारतात आढळतात. घोडा माशाप्रमाणे याची शेपटी प्रतिकर्षी (वळविता येणारी) नसते व पाठीवरील पर सामान्यतः असतो. याचा रंग करडसर व पट्टेरी असतो. पाठीवरील परावर ठिपके असतात. हा पर मध्यम उंचीचा असतो व तो शरीराच्या तिसऱ्या वलयापासून सुरू होतो. शेपटीच्या पराची लांबी मुस्काटाच्या निम्मी असते. एकूण शरीर सडपातळ व खूप लांब असते. याची सरासरी लांबी १५–२० सेमी. असून सर्वांत लहान मासा दोन सेंमी. पेक्षा कमी व मोठ्यात मोठा मासा ५५ सेंमी. लांब असतो.\nवाटा मासा कवचधारी प्राणी, इतर जलचरांची पिले व लहान मासे खाऊन जगतो. आपले भक्ष्य तो तोंडात ओढून घेतो. प्रजोत्पादनाच्या काळातील याच्या सवयी घोडा माशासारख्या असतात. नर पोटाखाली असलेल्या पिशवीमध्ये मादीने घातलेली अंडी घेऊन हिंडतो.\nलेखक: जमदाडे -ज. वि.\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/ahmednagar/today-21-corona-affected-found-nagar-district-318797", "date_download": "2020-09-26T02:50:04Z", "digest": "sha1:4P53KGCVJTW345KM7C7WAZYTUJW67K3L", "length": 17419, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "नगर जिल्ह्यात आज आढळले २१ कोरोनाबाधित | eSakal", "raw_content": "\nनगर जिल्ह्यात आज आढळले २१ कोरोनाबाधित\nअहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण दिवसांदिवस वाढत आहेत. गुरुवारी (ता. ९) येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर ग्रामीणमध्ये : ६, नगर मनपा : ३, श्रीरामपूर तालुका : २, नेवासा तालुका : २, अकोले तालुका : १, संगमनेर : १, श्रीगोंदा तालुका : १, राहुरी तालुका : १, जामखेड तालुका : २, भिंगार : १ आणि कर्जत तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.\nअहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण दिवसांदिवस वाढत आहेत. गुरुवारी (ता. ९) येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर ग्रामीणमध्ये : ६, नगर मनपा : ३, श्रीरामपूर तालुका : २, नेवासा तालुका : २, अकोले तालुका : १, संगमनेर : १, श्रीगोंदा तालुका : १, राहुरी तालुका : १, जामखेड तालुका : २, भिंगार : १ आणि कर्जत तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.\n४३ जणांचे स्वॉब तपासण्यासाठी\nकर्जत : तालुक्यातील जळगाव (माही) येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील एक व्यक्ती युवती कोरोना पॉझिटिव्ह निघाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली. त्यामुळे कर्जत तालुक्यातील रुग्णाची संख्या आता १३ झाली आहे. प्रशासन या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत असून कर्जत तालुक्यातील (माहि) जळगाव व पाटेगाव येथील दोन दिवसापूर्वी सापडलेल्या दोन कोरोना पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील ४२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील 36 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. तर सहा रुग्णांचे रिपोर्ट येणे बाकी होते. यातील एका युवतीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली असून लोकांनी स्वयंशिस्त पाळत शासनाचे नियम पाळावेत व खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच सादर कोरोना पॉझिटिव्ह हा महावितरणचा खासगी कर्मचारी असून त्याच्या घरून शाखा अभियंत्याल जेवणाची मेस होती ती माहिती समोर आली आहे.या बाबत प्रशासन अधिक माहिती घेत आहे.\nमाहिजळगाव आणि पाटेगाव एक एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला होता. प्रशासनाकडून त्यांच्या संपर्कात आलेल्या 42 व्यक्तींचे स्वॉब तपासणी करीता पाठविण्यात आले होते. ते अहवाल प्राप्त झाला असून त्यात माहिजळगाव येथील १६ पैकी १३ आणि पाटेगाव येथील २६ पैकी २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली आहे. यामुळे काळजीत असलेली ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला असून अजून सहा जणांच्या अहवालाची प्रतीक्षा कायम असून धाकधूक वाढली आहे.\nराशीन, सिद्धटेक येथे रुग्ण बाहेरून आल्याची हिस्ट्री होती. मात्र माहिजळगाव व पाटेगावातील कोरोनाबाधित रुग्णांनी आम्ही बाहेर गेलोच नाहीत, असे सांगित आहेत. त्यामुळे प्रशासन व ग्राम समिती चक्रावून जात सतर्क झाली होती. हे दोन्ही रुग्ण गावातील काही डॉक्टरांच्या व पॅथॉलॉजीकल लॅबच्या संपर्कात आल्याने त्यात अजून भर पडली होती. यामुळे दोन्ही गावातील जनजीवन विस्कळीत होत कोरोना ग्राम समितीच्या वतीने तीन दिवस कडकडीत बंद ठेवत जनता कर्फ्यु पाळण्यात आला होता. संबंधित रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर सील करण्यात आला होता. मात्र हे अहवाल निगेटिव्ह आल्याने दोन्ही गावातील गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n1 ऑक्टोबरपासून मुंबई प्रवेश महागणार, मुंबईत प्रवेश करणाऱ्यांवर 'टोल'वाढ\nमुंबई : मुंबईत प्रवेश घेण्यासाठी आता वाहन चालकांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मुंबईत खासगी वाहनाने ये जा करणाऱ्यांना आता १ ऑक्टोबर पासून...\nथोरात सहकारी साखर कारखान्याचा मंगळवारी बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ\nसंगमनेर (अहमदनगर) : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 2020- 2021 या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ मंगळवारी (ता. 29) सकाळी...\nइचलकरंजी : येथील शास्त्री सोसायटीतील घरात सुरू असलेल्या कल्याण मटका अड्ड्यावर आज दुपारी शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून 61 हजार 100 रुपयांचा...\nकडेगावात सकल मराठा समाजातर्फे तहसीलसमोर ठिय्या\nकडेगाव : मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या झालेल्या सकल मराठा समाजातर्फे येथील तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनस्थळ...\nबळीराजासाठी लालपरी जाणार बांधावर दुसऱ्या टप्प्यात आंतरराज्य सेवा\nसोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा हजार बसचा पसारा सांभाळणारी लालपरी कोरोनाच्या संकटामुळे खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यात मागे पडली आहे....\nकोल्हापूरचा सरकारी दवाखानाच (सीपीआर) खरा तरणोपाय...\nकोल्हापूर ः छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) म्हणजेच जिल्ह्यातील सामान्य माणसांचे प्रमुख आधारवड. कोरोनाच्या काळातही हाच \"थोरला दवाखाना'...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/farukh-abdula-criticize-pakistan-comment-gupkar-339941", "date_download": "2020-09-26T03:20:01Z", "digest": "sha1:SLGPCRPL2J6D3D25E4FWITDZSUPZZ3VK", "length": 15238, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "आम्ही कोणाच्या हातातील बाहुले नाहीत; पाकिस्तानच्या कौतुकानंतर फारुख अब्दुलांनी फटकारले | eSakal", "raw_content": "\nआम्ही कोणाच्या हातातील बाहुले नाहीत; पाकिस्तानच्या कौतुकानंतर फारुख अब्दुलांनी फटकारले\nजम्मू-काश्‍मीरमधील सहा राजकीय पक्षांनी २२ ऑगस्टला श्रीनगर येथे फारुख अब्दुल्ला यांच्या गुपकार रस्त्यावरील निवासस्थानी एकत्र येत कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात ठराव केला.\nनवी दिल्ली- कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात जम्मू-काश्‍मीरमधील राजकीय पक्षांनी केलेल्या गुपकार ठरावाचे पाकिस्तानने कौतुक केल्यावरून नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला फटकारले आहे. आम्ही कोणाच्याही हातातील बाहुले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nजम्मू-काश्‍मीरमधील सहा राजकीय पक्षांनी २२ ऑगस्टला श्रीनगर येथे फारुख अब्दुल्ला यांच्या गुपकार रस्त्यावरील निवासस्थानी एकत्र येत कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात ठराव केला. या ठरावाचे पाकिस्तानने नुकतेच कौतुक केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, पाकिस्तानने कायमच जम्मू-काश्‍मीरमधील प्रमुख राजकीय पक्षांचा अवमान केला आहे. आता त्यांना अचानक आमच्याबद्दल प्रेम वाटत आहे. मात्र, आम्ही कोणाच्याही हातातील बाहुले नाहीत, दिल्लीच्याही नाही आणि सीमेपलीकडील सरकारच्याही हातातील नाही, हे स्पष्ट करतो.\nप्रणव मुखर्जी अद्याप कोमातच; लष्करी रुग्णालयाने प्रकृतीबाबत दिली माहिती\nआम्ही फक्त जम्मू-काश्‍मीरमधील जनतेला उत्तरदायी असून फक्त त्यांच्यासाठीच काम करतो. नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, काँग्रेस आणि इतर तीन पक्षांनी मिळून मंजूर केलेला गुपकार ठराव ही महत्त्वाची घडामोड असल्याची टिपण्णी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केली होती.\nआम्हाला रक्तपात नको आहे\nपाकिस्तानने काश्‍मीरमध्ये सशस्त्र लोकांना पाठवणे बंद करावे, असे आवाहन फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तान सरकारला केले. ‘आम्हाला पाकिस्तानमधील रक्तपात थांबवायचा असून येथील सर्व राजकीय पक्षांना शांततेनेच सर्व प्रश्‍न सोडविण्याची इच्छा आहे. गेल्या वर्षी पाच ऑगस्टला आमच्याकडून जे हिसकावून घेतले गेले, तेही आम्ही शांततेच्याच मार्गाने मिळवू,’ असे अब्दुल्ला म्हणाले. भारत आणि पाकिस्तानने चर्चा सुरू करावी, असे आवाहनही त्यांनी केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजेईई ॲडव्हान्सच्या विद्यार्थ्यांना पसंतीची केंद्रे;येत्या रविवारी परीक्षा\nनवी दिल्ली - येत्या २७ सप्टेंबर रोजी जेईई ॲडव्हान्स परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ९८ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीतीच परीक्षा...\nIPL 2020 : दिल्लीकरांनी वाजवला डंका; धोनी मैदानात येऊनही चेन्नईचा पराभव\nIPL 2020 : CSKvsDC : दुबई : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपीटलने चेन्नई सुपर किंग्जचा 44 धावांनी पराभव करुन यंदाच्या आयपीएलमधला...\nमुंबई पोलिसांनी केलेली फिर्याद न्यायालयाने केली रद्दबातल, तबलिघीमधील आठजण आरोपमुक्त\nमुंबई, ता. 25 : कोरोनाचा संसर्ग पसरविण्यासाठी कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवलेल्या आठ परदेशी नागरिकांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. नवी...\nVideo: बिहारमध्ये निवडणुकीची घोषणा होताच जोरदार राडा\nपाटना: बिहार विधानसभा निवडणुकींच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर काही तासांमध्येच भारतीय जनता पक्ष आणि पप्पू यादव यांच्या जन अधिकार पार्टीच्या...\nशाहिनबागच्या 'प्रभावशाली' आंदोलनकर्त्या बिलकीस दादी म्हणतात, 'मोदी माझ्या मुलासारखेच\nनवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शाहिन बागमध्ये आंदोलन झालं होतं. भारतात या कायद्याला जोरदार विरोध झाला होता. मात्र,...\nGold Silver Price : सोने-चांदी दरात चढ-उतार; आजचा दर काय\nGold Silver Price : कोरोना व्हायरसमुळं जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. भारताबरोबरच जगभरात बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-chalisgaon-mp-unmesh-patil-enquiry-home-minister-deshmukh-346399", "date_download": "2020-09-26T01:57:23Z", "digest": "sha1:6MHUONLYZMV3LWTIRSIIOU7SLFPEHLUN", "length": 16942, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "माजी सैनिकाला मारहाण प्रकरणी खासदार पाटलांची होणार चौकशी; गृहमंत्र्यांनी काढले आदेश | eSakal", "raw_content": "\nमाजी सैनिकाला मारहाण प्रकरणी खासदार पाटलांची होणार चौकशी; गृहमंत्र्यांनी काढले आदेश\nचाळीसगाव येथील एका माजी सैनिकाला मारहाण केल्‍याचे प्रकरण घडले होते. जळगाव लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी २०१६ मध्ये चाळीसगाव येथे एका कार्यक्रमाप्रसंगी झालेल्या वादात उडी घेत सैनिकाला मारहाण केल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. तेव्हा ते आमदार होते. त्‍यावेळी राज्‍यात भाजपचे सरकार असल्‍याने प्रकरण दडपण्यात आल्याचे आरोपही झाले.\nजळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांच्यावर चाळीसगाव तालुक्यातील माजी सैनिकाला मारहाण केल्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. सण २०१६ मध्ये उन्मेश पाटील आमदार असताना हे प्रकरण घडले होते.\nचाळीसगाव येथील एका माजी सैनिकाला मारहाण केल्‍याचे प्रकरण घडले होते. जळगाव लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी २०१६ मध्ये चाळीसगाव येथे एका कार्यक्रमाप्रसंगी झालेल्या वादात उडी घेत सैनिकाला मारहाण केल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. तेव्हा ते आमदार होते. त्‍यावेळी राज्‍यात भाजपचे सरकार असल्‍याने प्रकरण दडपण्यात आल्याचे आरोपही झाले. तक्रार करूनही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. जळगावचे पोलिस अधीक्षक यांना यासंदर्भात आदेश देण्यात आले असून चौकशी करुन गृह विभागाला अहवाल सादर करण्यासंबंधी आदेशात म्हटले आहे.\nकुटूंबियांनी घेतली होती न्यायालयात धाव\nराज्‍यात भाजपचे सरकार असताना म्‍हणजे २०१६ मध्ये सध्याचे खासदार असलेले उन्मेश पाटील हे चाळीसगाव मतदार संघातील आमदार होते. त्‍यांनी माजी सैनिक सोनू महाजन यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप महाजन कुटुंबीयांनी केला होता. त्यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, मात्र भाजप सरकारच्या काळात गुन्हा दाखल झाला नाही. शेवटी महाजन कुटुंबीयांनी न्यायलयात धाव घेतली होती.\nआता शिवसैनिकांचे प्रकरण म्‍हणून...\nराज्‍याचे मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांच्यावर नौदलाचे माजी सैनिक मदन शर्मा यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली होती. या कारणावरून शिवसैनिकांकडून शर्मा यांना मारहाण केल्‍याची घटना ताजी आहे. यावरून शिवसेनेवर टीका होत असून, मग २०१६ मध्ये भाजपच्या आमदाराने माजी सैनिकाला केलेल्‍या मारहाणीचे प्रकरण काढण्यात आले. यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी लागलीच चौकशीचे आदेश काढले आहेत.\n२०१६मध्ये घडलेल्या कथित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश गृहविभागाने काढले असतील, तर मी त्याचे स्वागत करतो. माझा कायदा व न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास आहे. माझा संबंध नसलेल्या प्रकरणात माझे नाव गोवण्यात आले असून चौकशीतून सत्य बाहेर येईल. सैनिकांप्रती मला आदर आहे, आणि यापुढेही राहील.\n- उन्मेश पाटील, खासदार, जळगाव\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय; अतिरिक्त सहा गाड्या धावणार\nभुसावळ ः रेल्वेत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालविणार आहे. या विशेष गाड्या...\nदिलासादायक : जळगाव जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱयांची संख्या जास्त\nजळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या नव्या बाधितांपेक्षा अधिक नोंदली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी...\nअतिवृष्टीने उत्तर महाराष्ट्रात ७९ हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान; पंचनाम्याची कामे सुरु\nनाशिक रोड : उत्तर महाराष्ट्रातील ५४ तालुक्यापैकी ३२ तालुक्यांत ७९ हजार ७८० हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्राची प्राथमिक माहीती पुढे...\nचाळीसगाव तहसील कार्यालयात लाच घेणाऱया लिपीकाला एसीबीने केली अटक\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव): बहिणीच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या उताऱ्यावरील वारसाचे नाव कमी करण्याच्या मोबदल्यात सुमारे 11 हजार रूपयांची लाच...\nकोरोना योध्दांना अशीही आदरांजली; दळवींचा सायकलीने ४ हजार ‘किमी’चा प्रवास\nजळगाव ः शहीद जवान तसेच कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य बजावताना कोरोनाचे बळी ठरलेले डॉक्टर्स व नर्सेस या कोरोना योद्ध्यांना एक आदरांजली म्हणून अजित...\nजळगावात कृषी विषयक धोरणांविरोधात महामार्गावर रस्तारोको\nजळगाव ः ‘नही चलेंगी नही चलेंगी, तानाशाही नही चलेंगी’ अशा घोषणा देत आज केंद्र शासनाने बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या कृषी विषयक धोरणाविरोधात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra-akola/fourth-place-akola-state-corona-vijaya-first-gondia-state-second-bhandara-326512", "date_download": "2020-09-26T02:28:58Z", "digest": "sha1:5UBOGBWBN7BDIDZQSJDSQE2PZYGEGOX2", "length": 15787, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोना विजयामध्ये अकोला राज्यात चौथ्या स्थानी!, गोंदिया राज्यात प्रथम, भंडारा द्वितीय | eSakal", "raw_content": "\nकोरोना विजयामध्ये अकोला राज्यात चौथ्या स्थानी, गोंदिया राज्यात प्रथम, भंडारा द्वितीय\nकोरोना विषाणूने राज्यभर थैमान घातले आहे. राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या व मृतकांचा आकडा वाढत आहे. असे असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा अधिक आहे.\nअकोला ः कोरोना विषाणूने राज्यभर थैमान घातले आहे. राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या व मृतकांचा आकडा वाढत आहे. असे असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा अधिक आहे.\nराज्याच्या स्थितीचा विचार करता कोविड-19 रोगावर मात करण्यामध्ये (रिकव्हरी रेट) अकोला चौथ्या स्थानी आहे, तर गोंदिया, भंडारा व सिंधुदूर्ग अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानी आहे.\nकोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर आता राज्यात मिशन बिगिन अगेन सुरू करण्यात आले आहे. या काळात प्रत्येक दिवशी लाखोंच्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे संसर्गाने होणाऱ्या कोरोना विषाणूचा फैलाव सुद्धा वाढत आहे.\nपरिणामी कोरोनाबाधितांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी कोरोनाला हरवणाऱ्यांची संख्या सुद्धा अधिक आहे. राज्यात दररोज हजारो रुग्ण बाधित आढळत असले तरी त्यावर मात करणाऱ्यांची संख्यासुद्धा हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट चांगला असल्याचे दिसून येत आहे.\nचांगला रिकव्हरे रेट असलेले जिल्हे\nगोंदिया जिल्ह्यात 24 जुलैपर्यंत 233 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे गोंदियाचा रुग्ण रिकव्हरी रेट 90.13 टक्के आहे. भंडारा जिल्ह्यात 200 रुग्ण आढळले असून 170 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 85 टक्के आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात 306 रुग्ण आढळले असून 247 रुग्ण बरे झाले आहेत. या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 80.72 टक्के आहे. रिकव्हरी रेटमध्ये अकोला राज्यात चौथ्या स्थानी आहे. अकोल्यात 2 हजार 289 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1 हजार 726 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे रिकव्हरी रेट 75.40 टक्के, तर मुंबईचा रिकव्हरी रेट 73.15 टक्के आहे. मुंबई राज्यात पाचव्या स्थानी आहे.\nवाईट रिकव्हरे रेट असलेले जिल्हे\nविदर्भातील वर्धा जिल्ह्यात 24 जुलैपर्यंत 104 रुग्ण आढळले. त्यापैकी 45 बरे झाले. या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 43.27 टक्के आहे. बीडमध्ये 178 रुग्ण आढळले असून 189 रुग्ण बरे झाल्याने रिकव्हरी रेट 39.54, पुणे येथे 69 हजार 919 रुग्ण आढळले असून, 24 हजार 415 बरे झाल्याने 34.32, कोल्हापूर 31.37 व बुलढाण्यात 905 रुग्ण आढळले असून 247 बरे झाल्याने या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 27.29 टक्के म्हणजे राज्यात सर्वात कमी आहे.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनदीच्या पूरातील थरारक प्रसंग: चिमुकल्याला वाचवण्यासाठी बापाची यशस्वी झुंज\nअकोला: घटना आहे दोन दिवसांपूर्वीची.. कारंजा लाड येथील नासिरखान हे आपल्या पत्नीसह तीन वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन कारंजा वरुन अकोलाकडे निघाले.......\nमृतदेहावरील पिपीई किट उघड्यावर, आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा\nवाशीम : कोरोनाने सर्व जग कवेत घेतले आहे. दररोज शंभरावर रुग्णवाढ होत असताना वाशीम येथील मोक्षधाम स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृत व्यक्तींचे...\nजीर्ण दस्तावेजात शोधावा लागतो भवितव्याचा आधार\nनांदुरा (जि.बुलडाणा) : जिल्हा परिषद शाळेत असणारे जुने दस्तावेज जीर्ण झाली आहेत. कुठे-कुठे या जुन्या दस्तावेजाना वाळवी लागली आहे. ही...\nVideo :आजपासून पाच दिवस जनता कर्फ्यू, अकोलेकर कन्फ्युज\nअकोला : कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता विदर्भ चेंबर ऑफ कामर्स व इतर सर्व व्यापारी संघटनांनी एकत्र येत शुक्रवार, ता. २५ सप्टेंबरपासून पाच दिवस जनता...\nरॅपिड ॲन्टीजनच्या 201 चाचण्या, 18 पॉझिटिव्ह\nअकोला : कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात गुरुवारी (ता. २४) दिवसभरात २०१...\nकोरोनाचे थैमान सुरूच, 90 नवे पॉझिटिव्ह, दोघांचा बळी\nअकोला : कोरोना विषाणू संसर्ग तपासणीचे गुरुवारी (ता. २४) ४२६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३३६ अहवाल निगेटिव्ह, तर ९० अहवाल पॉझिटिव्ह आले....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/maharashtra-vidhan-sabha-2019-election-narayan-kuche-final-result-ncp-rohit-pawar-won", "date_download": "2020-09-26T02:08:56Z", "digest": "sha1:ZDAKM43MYHB44X67JW6AI7ZDFKFTIJGY", "length": 15068, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "बदनापूर-अंबड (जि. जालना) - नारायण कुचेंनी गढ राखला | Election Results 2019 | eSakal", "raw_content": "\nबदनापूर-अंबड (जि. जालना) - नारायण कुचेंनी गढ राखला | Election Results 2019\nबदनापूर (जिल्हा जालना) - बदनापूर-अंबड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांचा 18 हजार 612 मतांनी पराभव केला.\nया मतदार संघात बबलू चौधरी सलग तिसऱ्यांदा पराभूत झाले आहेत. नारायण कुचे यांना 1 लाख 5 हजार 312 तर बबलू चौधरी यांना 86 हजार 700 मते पडली. तर वंचित बहुजन आघाडी व मनसेचे फॅक्टर निष्प्रभ ठरले.\nवंचित आघाडीचे उमेदवार राजन मगरे यांना 9 हजार 869 मते मिळाली. तर मनसेचे राजेंद्र भोसले यांना केवळ 1643 मते मिळाली.\nबदनापूर (जिल्हा जालना) - बदनापूर-अंबड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांचा 18 हजार 612 मतांनी पराभव केला.\nया मतदार संघात बबलू चौधरी सलग तिसऱ्यांदा पराभूत झाले आहेत. नारायण कुचे यांना 1 लाख 5 हजार 312 तर बबलू चौधरी यांना 86 हजार 700 मते पडली. तर वंचित बहुजन आघाडी व मनसेचे फॅक्टर निष्प्रभ ठरले.\nवंचित आघाडीचे उमेदवार राजन मगरे यांना 9 हजार 869 मते मिळाली. तर मनसेचे राजेंद्र भोसले यांना केवळ 1643 मते मिळाली.\nबदनापूर विधानसभा मतदार संघ भाजप - शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र राज्यात निवडणुकी दरम्यान निर्माण झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची लाट व बबलू चौधरी यांचा यापूर्वी दोनदा झालेल्या पराभवाची सहानुभूती त्यांना विजयाचा उंबरठा ओलांडण्यास सहाय्यभूत ठरेल.\nअसे वाटत असताना महायुतीचे उमेदवार नारायण कुचे प्रचारा दरम्यान विकासाच्या मुद्यावर जोर दिला होता. अखेर मतदारांनी भावनिक राजकारणाला नाकारत विकासाला मत देत नारायण कुचे यांना विजयी केले. दरम्यान, मतमोजणीत नारायण कुचे यांनी टपाली मतदानापासून आघाडी घेतली होती. ही आघाडी बबलू चौधरी अखेरपर्यंत तोडू शकले नाही. नारायण कुचे यांनी निर्णायक आघाडी घेताच भाजप - शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअग्रलेख : बिहारी बिगूल\nबिहारचे राज्य कॉंग्रेसने गमावले, त्यास यंदा 30 वर्षे पूर्ण होत असतानाच, कोरोनाच्या सावटाखाली होत असलेल्या निवडणुकीत तेथील जनता पुन्हा आपले राज्यकर्ते...\nशेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्यांना रोखठोक उत्तर देणार : नितेश राणे\nसावंतवाडी : कृषी विधेयकाने शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे दलाल, एजंट, काही राजकीय पक्षांची दुकाने बंद होणार आहेत. शेतकरी उत्पादन कुठेही...\nकृषी कायद्यांबाबत जागरूकता मोहीम राबवा;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nनवी दिल्ली - ज्यांनी आतापावेतो शेतकऱ्यांना फक्त खोटे बोलून त्यांची दिशाभूल केली तेच आता नव्या कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांच्याच खांद्यावर बंदूक...\nअतिवृष्टीमुळे शिरपूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करा\nशिरपूर : तालुक्यात वादळ आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला मदतीसाठी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर...\nव्होडाफोनने जिंकला भारत सरकार विरोधातला 22 हजार कोटी रुपयांचा खटला\nनवी दिल्ली - दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या व्होडाफोन समूहाने आंतरराष्ट्रीय लवादामध्ये भारत सरकारविरुद्ध २२ हजार कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला जिंकला...\nबोंडारवाडी धरणप्रश्‍नी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही : शिवेंद्रसिंहराजे\nसातारा : जावली तालुक्‍यातील केळघर, मेढा विभागातील 54 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्पाचे काम मार्गी लागणे आवश्‍...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/rain-was-delayed-by-fifteen-days/", "date_download": "2020-09-26T01:26:57Z", "digest": "sha1:BBRIO5PBE3PPKWMZ2SZKVY44OQTKZE6J", "length": 14797, "nlines": 376, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पावसाचा परतीचा प्रवास पंधरा दिवसांनी लांबला - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली…\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी…\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nपावसाचा परतीचा प्रवास पंधरा दिवसांनी लांबला\nपुणे : सध्याची स्थिती पाहता मान्सूनचा प्रवास (Monsoon) लांबण्याचीच शक्यता अधिक आहे. गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा कार्यरत असून, त्याचा प्रभाव कायम आहे.\nयावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास ल पंधरा दिवसांनी लांबणार आहे. यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याऐवजी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात मुक्काम ठोकून नंतरच तो परतीच्या प्रवासाला निघेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.\nराज्यात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. हा पाऊस पुढील आठ दिवस कायम राहणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राजस्थानच्या दक्षिण भागापासून मान्सून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. सरासरी तारखांनुसार मान्सून दरवर्षी 1 सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू करतो. मात्र, यावर्षी हवामानशास्त्र विभागाने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख 17 सप्टेंबर सांगितली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमदन शर्मांना मारहाण करणारे शिवसैनिक पुन्हा जामिनावर मोकळे\nNext articleसर्वांपर्यंत ही लस पोहचण्यासाठी पाच वर्षे लागणार : अदर पूनावाला\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी टिप्पणी विराटच्या प्रैक्टिसवर होती\nचालू सामन्यात धोनीकडून इतकी मोठी चूक कशी का झाली\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nकरोनानंही टेकले यांच्यापुढे हात…\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\nपाकिस्तान आम्हाला जनावरांप्रमाणे वागवतो – सज्जाद राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_9470.html", "date_download": "2020-09-26T03:43:59Z", "digest": "sha1:SZ4KG6KWDGODWJXIZO3CGF6WX2SBV6K6", "length": 18644, "nlines": 51, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ६० - कारस्थाने घुमू लागली...", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ६० - कारस्थाने घुमू लागली...\nआग्र्याच्या दरबारात एकामागोमाग होत गेलेले अपमान आणि त्यातल्यात्यात आपल्या सामनेसामने एका पराभूत जसवंतसिंहाचा केलेला सन्मान पाहून महाराजांना आपला अपमान अतिशय असह्य वाटला. ते रागाने लाल झाले. रामसिंगला त्यांनी तिथल्यातिथेच दरडावून विचारले , ' हा सारा कसला प्रकार चालविला आहे अपमान याच्यापेक्षा मृत्यू परवडला. मी मराठा आहे.\nहे मी सहन करणार नाही ' आणि महाराजांनी एकदम दरबाराकडे पाठ फिरविली. शंभूराजांसह ते झपझपझप आपल्या जागेवरून वळले आणि शाही सरदारांच्या मागच्या बाजूस गेले. संतापामुळे त्यांना जरा चक्कर आली. ते जमिनीवरच बसले. दरबारात एकच खळबळ उडाली. खळबळ म्हणजे कुजबुज. अत्यंत अदबीने बादशाहाची आदब सांभाळीत आणि महाराजांच्याबेगुमान , उद्धट , रानटी वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करीत ही कुजबुज उर्फ खळबळ चालू होती. ज्या दरबारात शिंक आली तर ती सुद्धा अत्यंत अदबीने शिंकायची , तिथे शिवाजीराजे वाघासारखे चवताळून मोठमोठ्याने या अपमानांचा निषेध करीत असलेले पाहून हे सगळे शाही सरदार अत्यंत बेचैन झाले होते.\nबादशाह मात्र शांतपणे समोरचा आरडाओरडा ऐकत होता आणि असे जणू काही भासवीत होता की , आपण उत्तर ध्रुवावर असून , ही मराठी खळबळ दक्षिण ध्रुवावर कुठेतरी चालू आहे. त्यानेअकिलखानास संथपणे फर्मावले , ' अकील , वह देखो , सीवाकी त्यौंरीयाँ क्यू चढ गयी है 'अकीलखान पुढच्या रांगेतून निघून महाराजांपाशी थोड्या अंतरावर पोहोचला. तेव्हा त्यालामहाराजांचे शब्द कानी पडले , ' मला दरबारात उभं करता 'अकीलखान पुढच्या रांगेतून निघून महाराजांपाशी थोड्या अंतरावर पोहोचला. तेव्हा त्यालामहाराजांचे शब्द कानी पडले , ' मला दरबारात उभं करता मी काय तुमचा नोकर आहे मी काय तुमचा नोकर आहे मी तुमचा पाहुणा. मला साधी खिलतही दिली जात नाही मी तुमचा पाहुणा. मला साधी खिलतही दिली जात नाही \nरामसिंग तरी काय बोलणार तोही अखेर शाही गुलामच. तो एवढंच म्हणाला. ' महाराज ,बादशाहांची प्रतिष्ठा बिघडते आहे. आपण रागावू नका , आपल्या जागेवर परत चला. '\nमहाराजांनी हे साफ नाकारले. रामसिंग म्हणाला , ' महाराज याचे दुष्परिणाम होतील. बादशाह नाराज होतील. '\nहे सर्व बोलणे हिंदीतून चालले होते. अकीलने परत जाऊन बादशाहास म्हटले की , ' खिलत नदिल्यामुळे शिवाजीराजे नाराज झाले आहेत. ' तेव्हा बादशाहाने अकीलबरोबरच नवीन खिलतीचे ताट महाराजांकडे पाठविले. अकीलने ताट पुढे करताच महाराज कडाडले , ' मी तुमच्या बादशाहाची खिलत झिडकारतो. '\nखरं म्हणजे महाराजांचे सगळे बोलणे बादशाहाला नक्कीच ऐकू जात होते. तो काय समजायचे ते समजून गेला होता. मराठी रक्त लाव्हारसासारखे उसळलेले सारा दरबारच पहात होता. मराठी रक्ताला मान खाली घालून अपमान सहन करण्याची सवयच नाही. ( नव्हती)\nरानटी जनावराप्रमाणे राजे संतापले आहेत , असे अकीलने बादशाहास सांगितले. तेव्हा त्याने रामसिंगला समोर बोलावले आणि आज्ञा दिली , ' रामसिंग , शिवाजीराजांवर गुलाबपाणी शिंपडा आणि त्यांना मुक्कामावर घेऊन जा. '\nगुलाबपाणी शिंपडून महाराष्ट्राचा संताप आणि अपमान शांत होणार होता काय रामसिंगने महाराजांना संभाजीराजांसह दरबारातून नेले. महाराजांनीही बादशाहाकडे वळूनसुद्धा पाहिले नाही. भेटून जाणे तर दूरच.\nकालपासून घडत असलेल्या या सर्व अपमानकारक घटनांचा परिणाम अगदी स्पष्ट आत्ताच दिसत होता. तो म्हणजे ज्या हेतूने मिर्झाराजांनी हे शिव- औरंगजेब भेटीचे महाकठीण राजकारणजुळवून आणले त्याला औरंगजेबाने सुरुंगच लावला. दरबारातून मुक्कामावर पोहोचेपर्यंत महाराज वा रामसिंग काहीच बोलले नाहीत. पोहोचल्यावर रामसिंग एवढेच म्हणाला की , 'महाराज , आपण एवढं रागवावयास नको होतं ' तेव्हा महाराज एकदम म्हणाले , ' तुमच्याबादशाहास काही रीतरिवाज समजतात का , पाहुण्याशी कसं वागायचं ते \nमग रामसिंग आपल्या वाड्यात निघून गेला. त्याच्या वाड्याच्या विशाल प्रांगणातच अनेक तंबू ठोकून महाराजांसह सर्वांची राहण्याची व्यवस्था या छावणीत करण्यात आली होती. महाराजांचा खास शामियाना स्वतंत्र होता. म्हणजेच त्यांची राहण्याची व्यवस्था इमारतीत नव्हती , तर ती या छावणीत होती.\nआपण फार अडचणीत येऊन पडलो आहोत , आता याचा परिणाम काय होणार हे त्यांना नेमके जाणवत नव्हते. झालेला प्रकार वाईट होता. पण तो सर्वस्वी औरंगजेबानेच मुद्दाम घडवून आणला होता. खरेतर औरंगजेबाचेच यांत नुकसान होणार होते. अशा विक्षिप्त राजकारणाला आणि गजकर्णाला औषध नसते. फक्त असते खाज आणि आग.\nहा पहिला दिवस. १२ मे १६६६ . तो दिवस व रात्र नंतर शांतच गेली. पण सर्वांचीच मने अशांत होती. दुसऱ्या दिवशी महाराज आपल्या सर्व सैन्यानिशी म्हणजे सुमारे तीनशेमावळ्यांनिशी आग्रा शहरात फेरफटका मारावयास निघाले. एका हत्तीवर ते आरुढ झाले होते. पुढच्या एका हत्तीवर भगवा झेंडा फडकत होता. शंभूराजे बरोबर होते. ऐन शहरातून महाराजफेरफटका मारून आले. बहुदा ते देवदर्शनासही यावेळी गेले असावेत. पण तशी नोंद नाही. ताजमहाल बघायला गेल्याचीही नोंद नाही. महाराजांच्या तोंडी ताजमहालचा कुठे उल्लेख आल्याचीही नोंद नाही.\nमहाराज आग्ऱ्यात प्रथम प्रवेशले तेव्हा ते आणि युवराज शंभूराजे कसे तेजस्वी आणि अस्सलराजपुतांसारखे दिसत होते याचे वर्णन परकालदास नावाच्या रामसिंगच्या एका सेवकाने एका पत्रात लिहिले आहे. हे पत्र अप्रतिम आहे. त्यात महाराजांचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट उमटले आहे. १ 3मे रोजी मधूनमधून रामसिंग आपल्या प्रांगणातल्या शामियान्यात महाराजांना भेटून गेला. औरंगजेबाचे काही काही सरदार असेच भेटून गेले. हे सर्व औपचारिक पण सुसंस्कृतपणे घडतहोते. महाराजही त्यांच्याशी शांतपणे बोलत होते. पण एक गोष्ट महाराजांना स्पष्ट लक्षात आली होती की , आपल्यावर बादशाहाची सक्त नजर आहे. येथून एकदम निसटून पसार होणे आत्ता शक्य नाही. पण प्रत्यक्ष आघात करून महाराजांना बेड्या घालणे किंवा ठार मारणे असे धाडस औरंगजेबाला करणे अवघडच होते.\nसमजा तसे काही त्याने केले असते , तर तर रामसिंग आणि काही थोडे राजपूत चिडले असते का तर रामसिंग आणि काही थोडे राजपूत चिडले असते का तशी भीती तरी बादशाहाला नक्कीच वाटत होती. कारण रामसिंग हा आपल्या बापाइतकाच तुळशीबेलाच्या शपथेला बांधील होता. राजपुताचा शब्द म्हणजे ' प्राण जाय पर वचन न जाय 'असा लौकीक सर्वत्र होता. त्याची धास्ती त्याला होती. म्हणून तो भडकलेला पण वर्तनात शांत असा राहिला होता. शाही कुटुंबातील त्याची बहीण जहाँआरा , मामी , मावशी , इतर नातलग आणि अनेक सरदार ' तो ' दरबार संपल्यापासून औरंगजेबाला आग्रह करकरून म्हणत होते की 'सीवाने भयंकर वर्तन करून आपला अपमान केला आहे. आपण त्याला ठारच मारा. ' पण बादशाह कोणताही अभिप्राय व्यक्त न करता त्याला ठार कसे मारता येईल याचा विचार करीत होता. बादशाहाला आणखी एका प्रकारची भीती वाटत होती , असे वाटते.\nती म्हणजे शुजाची. बादशाहाने आपल्या भावांचा काटा काढला होता. दारा व मुराद यांना ठार केले होते , पण शुजा हा भाऊ भूमिगत झाला होता. तो सापडत नव्हता. वेळोवेळी चोरट्याबातम्या उठत की , शुजा गुप्तरितीने बंडाची तयारी करीत आहे. तो एक दिवस दिल्लीवर चालून येणार. या जरी ऐकीव अफवा होत्या तरी औरंगजेबाला त्याची धास्ती होतीच. शिवाजीराजाचेनिमित्त घडून जर राजपूत सरदार या शुजाला सामील झाले तर ते फारच महागात पडेल असे स्पष्ट दिसत होते. बादशाह या संबंधात बोलत नव्हता पण तशी भीती त्याला नक्कीच वाटत होती.म्हणून शिवाजीराजाला वेगळ्या पद्धतीने खलास करण्याची कारस्थाने त्याच्या डोक्यात घुमत होती. चारच दिवसानंतर म्हणजे दि. १६ मे १६६६ या दिवशी बादशाहाने शिवाजीराजांना ठारमारण्यासाठी शुजातखानाच्या नावाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/49595/what-are-internet-cookies-why-they-appear/", "date_download": "2020-09-26T02:22:42Z", "digest": "sha1:7Y22HRHPPRVZXUZV3FFQTYTZPFSTAOQD", "length": 14002, "nlines": 93, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'इंटरनेटमुळे निर्माण होणाऱ्या \"कुकी\" फाइल्समुळे नेमकं काय होतं? जाणून घ्या!", "raw_content": "\nइंटरनेटमुळे निर्माण होणाऱ्या “कुकी” फाइल्समुळे नेमकं काय होतं\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |\nभारतात आता अनेक जण इंटरनेटचा वापर करतात. पूर्वी वयस्क लोकांना इंटरनेट वापरताना त्रास व्हायचा. पण आताची पिढी मात्र इंटरनेटशी परिचित आहे.\nआता इंटरनेट केवळ काम करणार्‍यांचं माध्यम राहिलं नसून वेळ घालवण्याचं आणि मनोरंजनाचं माध्यम सुद्धा झालं आहे.\n“शस्त्र पाप ना स्वयेंचि, शस्त्र पुण्य ना स्वयें”, याप्रमाणे इंटरनेट सुद्धा ते कोण वापरतंय यावर त्याचे चांगले वाईट गुण ठरतात.\nआता लोक केवळ इंटरनेटचा वापर करत नसून त्या बाबतीत अधिकाधिक माहिती सुद्धा मिळवत आहेत.\nलोकांना वेगवेगळी माहिती वाचायला आवडते. इंटनेटची व्याप्ती खूप मोठी आहे.\nह्या व्याप्तीत अनेक अज्ञात गोष्टी देखील आहेत, ज्या आपल्या इंटरनेटच्या वापरात दिसत, कळत नाहीत – पण आपला इंटरनेट वरील वावर कसा असेल हे ठरवत असतात.\nतुम्ही इंटरनेट वापरता, मग तुम्ही कुकीज फाईल्स पाहिल्या असतीलच.\nपण कुकीज म्हणजे नेमकं काय त्याचे काय फायदे किंवा तोटे आहेत, हे माहिती आहे का तुम्हाला त्याचे काय फायदे किंवा तोटे आहेत, हे माहिती आहे का तुम्हाला तुम्ही हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का\nचला तर मग…आपण कुकीजबद्दल जाणून घेऊया.\nआपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये अनेक फाईल्स असतात. त्यात कुकीज फाईल्स सुद्धा असतात. आपल्या कंप्युटरच्या हार्ड ड्राईव्हमध्ये एक सामान्य टेक्स्ट फाईल्स म्हणजे कुकीज फाईल्स.\nया फाईल्स इंटरनेटद्वारे आपोआप सेव्ह होतात. जेव्हा जेव्हा आपण एखादी वेबसाईट ओपन करतो, तेव्हा त्याबद्दलची सर्व माहिती सेव्ह होते.\nजेव्हा आपण पुन्हा वेबसाईट ओपन करतो तेव्हा त्या संबंधित कोणतेही पेज ओपन करताना सुलभता होते आणि म्हणून कमी वेळ खर्च होतो व डेटा सुद्धा शिल्लक राहतो.\nहे एकप्रकारे आयडंटीफिकेशन कार्डप्रमाणे काम करते, जे ऍडव्हर्टायजिंग साइज आणि ई-कॉमर्स वेबसाईटसाठी अत्यंत गरजेचे आहे.\nकारण त्यांच्या संबंधित सर्व प्रकारचे ऍड दाखवण्यासाठी हे प्रभावी ठरते.\n४. एचटीटीपी ऑनली कुकीज\nजेव्हा आपण इंटरनेटचा वापर करतो तेव्हा ज्या कुकीज सेव्ह होतात. या सेव्ह झालेल्या कुकीजमुळे सर्वरला कळतं की तुम्हाला काय आवडतं\nतेव्हा तुम्ही काही सर्च करत असाल तर त्याच प्रकारचे रिजल्ट तुम्हाला दिसतील.\nम्हणून तुमच्यासाठी जे उत्तम आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचेल यामुळे तुमचा वेळ आणि डेटा वाचतो.\nसमजा तुम्ही Amazon वर सर्च करता आहात. मग तुम्हाला एखाद्या विषयावरील पुस्तक विकत घ्यायचे आहे.\nतुम्ही तुमच्या आवडीच्या विषयांवरील पुस्तके सर्च करत आहात आणि अचानक तुम्हाला लॅपटॉप बंद करुन दुसरीकडे जावं लागतं.\nमग जेव्हा पुन्हा तुम्ही Amazon वेबसाईटवर जाता तेव्हा Amazon तुम्हाला तुमच्या पसंतीचे पुस्तक आधी दाखवेल.\nएवढंच नाही तर –\nतुम्ही इतर वेबसाईटवर जात असाल तर गुगल ऍडसेंसचे जे ऍड्स असतात, त्यातही तुम्हाला पुस्तकांसंबधी जाहिराती दाखवल्या जातील. कारण ब्राऊझर तुमच्या प्रत्येक क्रियेची व वेबसाईटवर होणार्‍या क्लिकची नोंद करत असतो.\nतर अश्याप्रकारे इंटरनेट कुकीज आपल्या आपल्या पसंतीच्या गोष्टी शोधायला मदत करते.\nआणि हो – तुम्हाला कल्पना नसेल पण – कुकीजमुळे आपल्याला बराच फायदा होत असतो…\nजसे की आपला वेळ आणि डेटा वाचतो.\nजेव्हा आपले ब्राऊजर अचानक बंद होते, तेव्हा दुसरे ब्राऊजर ओपन करण्यासाठी त्याच पेजला रिस्टोर केले जाते.\nजे उत्पाद आपल्याला हवे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवते.\nएखाद्या वेबसाईटवर आपण लॉग इन करत असाल तर त्याचे युजर आयडी सेव्ह करुन ठेवते. जेणेकरुन आपल्याला प्रत्येक वेळी युजर आयडी टाईप करण्याची गरज लागणार नाही.\nकुकीज फाईल्सची साईज सुद्धा ४ केबीपेक्षा कमी असल्यामुळे जास्त स्पेस घेत नाही.\nथोडक्यात – कुकीजचे फायदे जास्त आहेत आणि नुकसान कमी.\nजर तुमचे युजर आयडी आणि पासवर्ड सेव्ह असेल आणि याबद्दलची माहिती लीक झाली तर तुमची वेबसाईट हॅक होऊ शकते.\nजर तुम्ही शॉपिंग करताना आपल्या डेबिट कार्डचा आयडी व पासवर्ड सेव्ह करुन ठेवला असेल तर हॅकर्स तुमचे पैसे याद्वारे खर्च करु शकतात.\nज्यांच्या कंप्युटरमध्ये खुपच कमी स्पेस असेल तर त्यांचा कंप्युटर हळू चालू शकतो. आता तुम्ही इंटरनेट कशाप्रकारे वापरता यावर सगळं अवलंबून आहे.\nअश्या परिस्थितीत तुम्ही कुकीज ब्लॉक करु शकता.\nत्यासाठी पुढील स्टेप्स वापरा :\nब्राऊझर ओपन करा. सर्वात आधी तुम्ही उजव्या हाताला वर असलेल्या मेन्यूवर क्लिक करा. त्यानंतर सेटिंग्स वर क्लिक करा. ते ओपन झाल्यावर ऍडव्हान्सवर क्लिक करा.\nऍडव्हान्समध्ये कंटेंट सेटिंगवर क्लिक करा. कंटेंट सेटिंगमध्ये कुकीजवर क्लिक करा.\nकुकीजमध्ये तुम्हाला तीन ऑप्शन्स दिसतील, ते तुम्ही ऑन किंवा ऑफ करु शकता. ऑन केल्यावर कुकीजची नोंद होईल आणि ऑफ केल्यावर नोंद होणार नाही.\nजर तुम्हाला कुकीज क्लियर करायची असेल तर Ctrl=H दाबून पेज ओपन होईल आणि तिथे तुम्हाला उजव्या हाताला Clear browsing data हा ऑप्शन दिले.\nत्यावर क्लिक करा व ब्राऊजिंग डेटावर क्लिक करुन तुम्ही सर्व history, cookies, cache सर्व काही clear करु शकता.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← ‘इच्छाशक्तीच्या’ बळावर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणारा एक ‘ऑलिम्पिकवीर’\nभारतीय सेनेत जातीनिहाय ‘आरक्षणाला’ थारा नाही – कारण वाचून ‘अभिमान’ वाटेल\nप्रमोशनल स्टंट की सत्य जाणून घ्या १४० / ४० क्रमांकावरून येणाऱ्या फोन कॉलमागचं रहस्य\nसिनेस्टार्स खाजगी उदघाटने करायला का येतात या मागचं ‘गणित’ समजून घ्या\nकरोना व्हायरस चीनने मुद्दाम तयार केलाय, हे खरं की खोटं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/even-after-three-years-the-anti-social-exclusion-law-is-ineffective-despite-the-law-the-draft-rules-have-not-yet-been-approved-127626517.html", "date_download": "2020-09-26T01:32:37Z", "digest": "sha1:CMM57Q5FX3RNNGVBAN56C4Z2XSRB3FOS", "length": 9765, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Even after three years, the anti-social exclusion law is ineffective; Despite the law, the draft rules have not yet been approved | तीन वर्षांनंतरही सामाजिक बहिष्कारविराेधी कायदा कुचकामी; कायदा होऊनही अद्याप नियमांचा मसुदा मंजूर नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:तीन वर्षांनंतरही सामाजिक बहिष्कारविराेधी कायदा कुचकामी; कायदा होऊनही अद्याप नियमांचा मसुदा मंजूर नाही\nपुणेएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश फल्ले\nमुक्ता दाभोलकर (फाइल फोटो)\nराज्यभरात या कायद्यान्वये 70 ते 80 गुन्हे आतापर्यंत दाखल, मात्र एकाही प्रकरणात आराेपींना शिक्षा नाही\nआंतरजातीय विवाह, काैमार्य चाचणी, सामाजिक बहिष्कार, जातपंचायतीच्या जाचक अटी, पंचांची मनमानी अशा प्रकारांवर वचक निर्माण करण्याकरिता आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी जुलै २०१७ मध्ये राज्यात सामाजिक बहिष्कारविराेधी कायदा मंजूर करण्यात आला. काेराेना काळात रुग्ण, डाॅक्टर, कर्मचारी, काेराेना याेद्धे यांच्यावर सामाजिक बहिष्काराचे प्रकार ठिकठिकाणी घडत आहेत. मात्र, तीन वर्षे होऊनही या कायद्याच्या नियमांचा मसुदा राज्य शासनाने मंजूर केलेला नाही. पाेलिसांत कायद्याबाबत संभ्रम आहे. राज्यभरात या कायद्यान्वये ७० ते ८० गुन्हे आतापर्यंत दाखल हाेऊनही एकाही प्रकरणात आराेपींना शिक्षा झालेली नाही.\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत कार्याध्यक्ष डाॅ.नरेंद्र दाभाेलकर यांनी अंनिसच्या माध्यमातून ‘जातपंचायतीस मूठमाती’ हे अभियान राज्यभरात राबवले. कायदा हाेण्याच्या दृष्टीने पाेषक वातावरण निर्माण केले. अखेर जुलै २०१७ मध्ये कायद्यास मंजुरी मिळाली व अंमलबजावणी सुरू झाली. या कायद्यांतर्गत बाधितांना संरक्षण आणि नुकसान भरपाई देण्यासाेबतच दाेषींना तीन वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड अशी तरतूद आहे. प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत या कायद्यान्वये एकाही बाधितास नुकसान भरपाई, पुनर्वसन अथवा संरक्षण मिळालेले नाही. जातपंचायतीसंदर्भात राज्यात सर्वाधिक तक्रारी पुणे परिसरात दाखल आहेत. पुण्यात यासंदर्भात काम करणाऱ्या अंनिसच्या नंदिनी जाधव यांनी सांगितले की, सामाजिक बहिष्कार कायदा मंजूर झाला असला तरी कायद्याच्या नियमांचा मसुदा अद्याप प्रत्यक्षात न आल्याने त्रुटींचा आधार घेत पळवाटा शाेधल्या जात आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम असल्याने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जाते अथवा अदखलपात्र गुन्हा दाखल करून बाेळवण करण्यात येते. यासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे.\nसामाजिक बहिष्कार बंदी अधिकाऱ्यांची नेमणूक नाही : मुक्ता दाभोलकर\nमुक्ता दाभाेलकर यांनी याबाबत सांगितले की, या कायद्यान्वये राज्य सरकारने सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी नेमणूक करणे आवश्यक आहे. परंतु अद्याप त्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. सामाजिक बहिष्काराबाबत विविध अपराधांचा शाेध घेऊन त्याबाबतचा अहवाल जिल्हा दंडाधिकारी यांना देण्याबाबत त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या कायद्यातील १४ व्या कलमानुसार एखादी जात पंचायत भरवली जात असेल तर ती राेखण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे आणि तशा प्रकारे जमावबंदी आदेश ते देऊ शकतात. परंतु याबाबतचे स्पष्ट निर्देश अद्याप शासनाकडून देण्यात आलेले नाहीत. पाेलिसांकडे एखादी तक्रार आल्यानंतर ती आपसात मिटवून घेण्यासाठीचे सल्ले दिले जातात. नियमात जबाबदारी निश्चित हाेणे महत्त्वाचे आहे.\n१७ जातपंचायती रद्द केल्या\nसामाजिक बहिष्कारविराेधी कायदा येण्यापूर्वीच जातपंचायतीविराेधात अंनिसने भूमिका घेतल्याने वेगवेगळ्या जातपंचायतींशी बाेलणी करत १७ जातपंचायती रद्द केल्या. तर, कायदा झाल्यानंतर नगर येथील तिरुमली नंदीवाले समाजाची जातपंचायत बरखास्त करण्यात आली. छुप्या पद्धतीने काही जागी पंचायती सुरू असून त्यासंदर्भात तक्रारी येत आहेत,असे अंनिस कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/marriage-innovation-during-the-corona-period-the-conversion-of-trucks-into-wedding-halls-127603827.html", "date_download": "2020-09-26T02:20:27Z", "digest": "sha1:TXG37TZ5XAG7W2MNLD3R6EAIVAXDE2VO", "length": 5499, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marriage innovation during the Corona period, the conversion of trucks into wedding halls | एका फोनवर वधू-वराच्या घरी पोहोचतो मोबाइल मॅरेज हॉल, 25 हजारांत घरातच केला विवाह - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतामिळनाडू:एका फोनवर वधू-वराच्या घरी पोहोचतो मोबाइल मॅरेज हॉल, 25 हजारांत घरातच केला विवाह\nशिवानी चतुर्वेदी | चेन्नई2 महिन्यांपूर्वी\nहा लग्नाचा ट्रक कुठेही बोलावला जाऊ शकतो. हकीमच्या या चमूत सहा लोक काम करत आहेत.\nकोरोना काळात मॅरेज इनोव्हेेशन, ट्रकचे रूपांतर वेडिंग हॉलमध्ये\nकोरोना संसर्गामुळे संपूर्ण तामिळनाडूत वेडिंग हॉल बंद आहे. त्यामुळे कल्याणम (विवाह) होऊ शकत नाहीत. या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी तिरुपूर जिल्ह्याच्या उडुमलपेटमध्ये राहणारे कला दिग्दर्शक अब्दुल हकीम यांनी मोबाइल वेडिंग हॉलची संकल्पना मांडली. लहान ट्रकवर बनवलेला हा वेडिंग हॉल लग्नास इच्छुक कुटुंबाच्या एका फोनवर निश्चित स्थळी पोहोचतो. एकदा या स्थळी पोहोचल्यानंतर कारागीर २ तासांत ट्रकच्या सजावटीचे काम पूर्ण करतात. मंचावर चढण्या-उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. मल्टी लाइट सिस्टी, कार्पेट आणि साउंड सिस्टिमही या मोबाइल वेडिंग हॉलमध्ये लावली आहे. पाहुण्यांना स्टेजवर चढण्याआधी सॅनिटायझर आणि मास्क उपलब्ध करून दिला जातो. हकीम सांगतात की, आम्ही एक महिन्याआधी या संकल्पनेवर काम सुरू केले होते. आतापर्यंत दोन विवाह झाले आहेत. पुढील महिन्यापर्यंत ४ बुकिंग आहेत. २०० पेक्षा जास्त लोकांनी चौकशी केली आहे. मोबाइल वेडिंग हॉलसाठी २५ हजार रुपये आकारले जातात. केटरिंगसाठी २ लाख रुपये घेतात, त्यात ५०-५० पाहुण्यांसाठी दोन वेळचे जेवण तयार केले जाते. हकीम सध्या उडुमलपेटच्या आसपास ५० ते १०० किमीच्या परिसरातच सेवा देत आहेत. त्यांची संकल्पना शेजारील आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातही पसंत पडत आहे. हकीम सांगतात की, या राज्यांतून लोक आपले ट्रक पाठवत आहेत. आम्ही त्यांचे वेडिंग हॉलप्रमाणे डिझाइन करून पाठवत आहोत.\nदिल्ली कॅपिटल्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा 44 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Dhofar++Al+Wusta+om.php", "date_download": "2020-09-26T01:22:56Z", "digest": "sha1:3KPN7WVX2D6TDGIIDMBRNZXQ46SRJOAF", "length": 3449, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Dhofar, Al Wusta", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Dhofar, Al Wusta\nआधी जोडलेला 23 हा क्रमांक Dhofar, Al Wusta क्षेत्र कोड आहे व Dhofar, Al Wusta ओमानमध्ये स्थित आहे. जर आपण ओमानबाहेर असाल व आपल्याला Dhofar, Al Wustaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ओमान देश कोड +968 (00968) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Dhofar, Al Wustaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +968 23 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनDhofar, Al Wustaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +968 23 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00968 23 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Sontra+de.php", "date_download": "2020-09-26T01:17:48Z", "digest": "sha1:CTNYY65FBRHMJ7ZELK3OU7SXABMZM5H7", "length": 3380, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Sontra", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Sontra\nआधी जोडलेला 05653 हा क्रमांक Sontra क्षेत्र कोड आहे व Sontra जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Sontraमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Sontraमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 5653 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSontraमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 5653 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 5653 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2019/05/SNDL-review-from-Dinesh-Chandra-Sabu-Director-Circulation-of-MSEDCL.html", "date_download": "2020-09-26T02:35:41Z", "digest": "sha1:JV2C6NE6GEX5EGCDZ4F3ORDSFPAATYAK", "length": 13079, "nlines": 111, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "महावितरणचे संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू यांचेकडून SNDL चा आढावा - KhabarBat™", "raw_content": "\nHome MSEB महावितरणचे संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू यांचेकडून SNDL चा आढावा\nमहावितरणचे संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू यांचेकडून SNDL चा आढावा\nशाश्वत वीजपुरवठ्यासाठी कृती आराखडा सादर करण्याच्या सुचना\nमे. एसएनडीएल क्षेत्रातील ग्राहकांना शाश्वत, अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा यासाठी येत्या 15 दिवसांत कृती आराखडा सादर करण्याच्या सुचना महावितरणचे संचालक (संचलन) श्री दिनेशचंद्र साबू यांनी शुक्रवार (दि. 10 मे) रोजी घेतलेल्या आढावा बैठकीप्रसंगी दिल्या. यावेळी श्री साबू यांनी मे. एसएनडीएल क्षेत्रात सुरु असलेल्या विविध विकासकार्यांची प्रत्यक्ष पाहणी आणि आढावाही घेतला.\nमे. एसएनडीएल क्षेत्रातील वीज ग्राहकांच्या तक्रारी आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रत्येक 15 दिवसांत महावितरण आणि मे. एसएनडीएलच्या वरिष्ठ अधिका-यांची संयुक्त बैठक घेण्याच्या सुचना करतांनाच श्री साबू यांनी वर्षभरातील देखभाल व दुरुस्तीच्या कामांचे नियोजन करण्यात यावे, आयपीडीएस, कॅपेक्स, जिल्हा नियोजन योजनेंतर्गत मंजूर कामांची विस्तृत माहिती घेतली. अपघात प्रवण क्षेत्रातील अपघातांचे प्रमाण कमी होण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना त्वरीत करण्यात याव्यात.\nवीज यंत्रणा देखभाल व दुरुस्तीसाठी प्रस्तावित वीज खंडित करण्याची (आऊटेज) पुर्वसुचना ग्राहकांना देण्यात यावी, सोबतच एका वाहिनीवर एका महिन्यात केवळ एकदाच आऊटेज घेण्यात यावा, या भागातील ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठयाला प्राधान्य देण्यात यावे यासाठी उपकेंद्रांना वीजपुरवठ्याचा अतिरिक्त स्त्रोताची उपलब्धता करून देण्यात यावे, सर्व उपकेंद्रे एकमेकांशी जोडण्याचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे, उपकेंद्रातील अति भारीत वीज रोहीत्राच्या ठिकाणी वाढिव क्षमतेची वीज रोहीत्रे तात्काळ बसविण्यात यावी, सोबतच प्रलंबित वीज जोडण्या त्वरीत देणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणा-या भागातील बिघाडांचे विश्लेषण करून ते टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचनाही श्री साबू यांनी यावेळी केल्या.\nयावेळी सोनल खुराणा यांनी मे. एसएनडीएलच्या कामाबाबत विस्तृत सादरीकरणामार्फ़त कंपनीच्या एकूणच कामकाजाबाबतची माहिती उपस्थितांना दिली. उपकेंद्रांवरील भार कमी व्हावा यासाठी सुरु असलेल्या उपाययोजना, कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांची तपासणी, वीजचोरीचे आणि वीज अपघातांचे प्रमाण अधिक असलेल्या भागात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.\nया बैठकीला महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री दिलीप घुगल, अधिक्षक अभियंते सर्वश्री उमेश शहारे, दिलीप दोडके, नारायण आमझरे, मे. एसएनडीएलतर्फ़े राजेश तुरकर, दिपक लाबडे, शेषराव कुबडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीपश्चात श्री साबू यांनी मे. एसएनडीएलचे सेमिनेरी हिल्स उपकेंद्र, जयहिंद उपकेंद्र, ग्राहक सुविधा केंद्र, कॉल सेंटर या ठिकाणी भेट देत तेथील कामांची पाहणीही केली.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (210) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/%E0%A5%AC%E0%A5%AE", "date_download": "2020-09-26T01:16:40Z", "digest": "sha1:WY4IQDKTESZ4KLST626DWEMFT5Q7N3YG", "length": 3425, "nlines": 50, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"पान:ज्योतिर्विलास.pdf/६८\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"पान:ज्योतिर्विलास.pdf/६८\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पान:ज्योतिर्विलास.pdf/६८ या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअनुक्रमणिका:ज्योतिर्विलास.pdf (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-26T02:51:37Z", "digest": "sha1:NSMPDNSHZVNI5P4QVYQ4P5PN2MPUFLWY", "length": 9305, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "किसान विद्या प्रसारक संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी साडे अकरा लाखाचा धनादेश | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nकिसान विद्या प्रसारक संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी साडे अकरा लाखाचा धनादेश\nजिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे सुपूर्द\nशिरपूर:तालुक्यातील किसान विद्या प्रसारक संस्थेतर्फे धुळे जिल्हाधिकारी संजय यादव हे शिरपूर दौऱ्यावर आले असता मुख्यमंत्री सहायता निधीत ११ लाख ५१ हजार रुपयांची आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.\nसध्या कोरोनाची महामारी राज्यासह देशात सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन संकटात सापडले आहे. यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी मदतीचे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्थेचे स्वातंत्र्यसैनिक कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांच्या विचारसरणीने रंधे परिवार व किसान विद्या प्रसारक संस्थेने मदत करण्याचे ठरविले आणि त्यातून जमा झालेले ११ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांनी शिरपूर-वरवाडे नगरपालिका कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे सुपूर्द केला.\nयावेळी प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन, डीवायएसपी अनिल माने, गटविकास अधिकारी वाय. डी.शिंदे आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे,कोषाध्यक्ष आशाताई रंधे,विश्वस्त राहुल रंधे,नगरसेवक रोहित रंधे यांनी निधीची तरदूत केली.यासाठी कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले.\nधक्कादायक: शिरपूरला दहा जणांना कोरोनाची लागण\nदीड वर्षाच्या बालकावरील शस्त्रक्रिया यशस्वी: अन्न नलिकेत अडकलेली पिन काढण्यात यश\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदीड वर्षाच्या बालकावरील शस्त्रक्रिया यशस्वी: अन्न नलिकेत अडकलेली पिन काढण्यात यश\nवीस वर्ष देशसेवा करून हेमंत कासार स्वगृही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-26T00:55:02Z", "digest": "sha1:QKRGLIGOCUOCBY767XM52MNAI63C4P3D", "length": 8289, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "नाशिकहून आलेल्या नंदुरबारकरांची स्वयंसेवी संस्थाकडून जेवणाची व्यवस्था | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nनाशिकहून आलेल्या नंदुरबारकरांची स्वयंसेवी संस्थाकडून जेवणाची व्यवस्था\n नाशिकहुन आलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील लोकांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार स्वयंसेवी संस्थांच्या वतीने जेवण देण्यात आले. जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील सुमारे 90 लोक नवापूर चौफुली येथे नाशिकहुन पायी किंवा खाजगी टेम्पोमध्ये आल्याचे आज आढळून आले.\nत्यातील बरेचसे उपाशी असल्यामुळे त्यांची जेवणाची व्यवस्था स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत करण्यात आली, त्यानंतर वैद्यकीय तपासणीअंती त्यांना त्यांच्या गावाकडे जाण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तसेच पोलीस निरीक्षक सुनील नांदवळकर आपल्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत लॉक डाऊन करण्यात आले आहे, त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक लोक बाहेर गावी अडकून पडले आहेत, काही लोक पायी किंवा मिळेल त्या वाहनाने कसे बसे आपले गाव गाठत आहेत,\nBREAKING: भाजपचे सर्व खासदार, आमदार एका महिन्याचे वेतन देणार कोरोनासाठी\nएरंडोल तालुक्यात विदेशातून आलेल्या १५ व्यक्तींना विलगीकरणाचा सल्ला\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएरंडोल तालुक्यात विदेशातून आलेल्या १५ व्यक्तींना विलगीकरणाचा सल्ला\nमंगल कार्यालय, मॅरेज हॉल अधिग्रहित करण्याचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dailykesari.com/2020/09/15/india-has-the-highest-number-of-corona-free/", "date_download": "2020-09-26T02:58:33Z", "digest": "sha1:EQN3T4OX5ZQTKBIPIXVOBSIIOBYKW3YE", "length": 10924, "nlines": 172, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "भारतात कोरोनामुक्त होणार्‍यांचे प्रमाण सर्वाधिक - Kesari", "raw_content": "\nघर देश भारतात कोरोनामुक्त होणार्‍यांचे प्रमाण सर्वाधिक\nभारतात कोरोनामुक्त होणार्‍यांचे प्रमाण सर्वाधिक\nनवी दिल्ली : कोरोना रुग्णसंख्येत भारताने ब्राझीलला मागे टाकून जगात दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. मात्र, कोरोनामुक्त होणार्‍यांमध्ये भारत जगात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती जॉन हापकिन्स विद्यापीठाने एका अहवालाद्वारे दिली आहे.\nआतापर्यंत जगभरातील एक कोटी 96 लाख 25 हजार 959 जणांनी कोरोनावर मात केल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे जगभरात कोरोनाबाधितांची संख्या तीन कोटीच्या आसपास पोहोचली आहे. तर जगभरातील नऊ लाख 24 हजार 105 जणांचा मृत्यू झाला आहे.\nजॉन हापकिन्स विद्यापीठाने जगभरातील आकडेवारी एकत्र करून त्याचा अहवाल तयार केला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होणारांचे प्रमाणही अधिक असल्याचे नुकतेच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. 24 तासांत 77 हजार 512 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आल्याचेही केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.\nपूर्वीचा लेखचित्रपट सृष्टीतील कोडी सोडवण्यात तरुण दंग\nपुढील लेखअमेरिकेतील कोरोना नियंत्रणाच्या कामाचे मोदींकडून कौतुक\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nतीन टप्प्यांत होणार बिहार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nसीमेवरील दहशतवाद हीच मोठी समस्या\nअणुशास्त्रज्ञ शेखर बसू यांचे निधन\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nबिहार निवडणूक : तीन टप्प्यांत होणार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nबिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली.\nनवनाथ गोरे यांचा खडतर प्रवास होणार सुकर\nभारती विद्यापीठात मिळणार नोकरी\nलोकप्रिय गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले.\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलचा पहिल्याच षटकात पराक्रम\nअतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात\nइशांत शर्मा आणखी दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/roger-federer-horoscope.asp", "date_download": "2020-09-26T03:37:27Z", "digest": "sha1:KCE5LO472TDFC26CO2NCZPCLI6FTN3DG", "length": 8239, "nlines": 135, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "रॉजर फेडरर जन्म तारखेची कुंडली | रॉजर फेडरर 2020 ची कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » रॉजर फेडरर जन्मपत्रिका\nवर्णमाला द्वारे ब्राउझ करा:\nरेखांश: 7 E 35\nज्योतिष अक्षांश: 47 N 33\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nरॉजर फेडरर प्रेम जन्मपत्रिका\nरॉजर फेडरर व्यवसाय जन्मपत्रिका\nरॉजर फेडरर जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nरॉजर फेडरर 2020 जन्मपत्रिका\nरॉजर फेडरर ज्योतिष अहवाल\nरॉजर फेडरर फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nरॉजर फेडररच्या कुंडली बद्दल अधिक वाचा\nरॉजर फेडरर 2020 जन्मपत्रिका\nतुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थानाच्या बाबतीत चढ-उतार संभवतात. आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूंची नीट काळजी घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण जवळचे सहकारी आणि नातेवाईक यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या आऱोग्याकडेही लक्ष द्या कारण त्या बाबातीत आजारपण संभवते.\nपुढे वाचा रॉजर फेडरर 2020 जन्मपत्रिका\nरॉजर फेडरर जन्म आलेख/ कुंडली/ जन्म कुंडली\nजन्माच्या वेळी (कुंडली, जन्म कुंडली म्हणून ओळखले जाणारे) जन्मभ्रंश हे स्वर्गाचा नकाशा आहे. रॉजर फेडरर चा जन्म नकाशा आपल्याला रॉजर फेडरर चे ग्रहस्थाने, दास, राशी नकाशा आणि राशि चिन्ह दर्शवेल. यामुळे आपल्याला 'अॅस्ट्रोसेज क्लाउडमध्ये' मध्ये रॉजर फेडरर चे तपशीलवार संशोधन आणि विश्लेषण करून कुंडली उघडण्यास अनुमती मिळेल.\nपुढे वाचा रॉजर फेडरर जन्म आलेख\nरॉजर फेडरर साठी ज्योतिष अहवाल पहा -\nरॉजर फेडरर मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nरॉजर फेडरर शनि साडेसाती अहवाल\nरॉजर फेडरर दशा फल अहवाल\nरॉजर फेडरर पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://hingoli.nic.in/mr/notice/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C/", "date_download": "2020-09-26T02:16:23Z", "digest": "sha1:ZATB33UJLV55BQOD3LXLWZORV3INQEO4", "length": 4621, "nlines": 101, "source_domain": "hingoli.nic.in", "title": "शरीरशास्त्र आणि शरीरविज्ञान मॉडेल उपकरणे दरपत्रक जिल्हा सामान्य रुग्नालय हिंगोली | हिंगोली, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा हिंगोली District Hingoli\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nबोंडअ‍ळीग्रस्त शेतकरी अनुदान वाटप\nशरीरशास्त्र आणि शरीरविज्ञान मॉडेल उपकरणे दरपत्रक जिल्हा सामान्य रुग्नालय हिंगोली\nशरीरशास्त्र आणि शरीरविज्ञान मॉडेल उपकरणे दरपत्रक जिल्हा सामान्य रुग्नालय हिंगोली\nशरीरशास्त्र आणि शरीरविज्ञान मॉडेल उपकरणे दरपत्रक जिल्हा सामान्य रुग्नालय हिंगोली\nशरीरशास्त्र आणि शरीरविज्ञान मॉडेल उपकरणे दरपत्रक जिल्हा सामान्य रुग्नालय हिंगोली\nशरीरविज्ञान मॉडेल उपकरणे दरपत्रक जिल्हा सामान्य रुग्नालय हिंगोली\nजिल्हा प्रशासन मालकीची सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा हिंगोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.diliptiwari.com/2016/11/blog-post_14.html", "date_download": "2020-09-26T02:42:58Z", "digest": "sha1:EILIQKDVYZX4PFHB6J25KOHMIWMRHLEK", "length": 36310, "nlines": 334, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: बनावट नोटा ... दहशतवाद आणि पाकिस्तान", "raw_content": "\nबनावट नोटा ... दहशतवाद आणि पाकिस्तान\n(कृपया लेख जरुर वाचा. मात्र संपूर्ण लेख कॉपीपेस्ट करु नका. इतरांना लेखाची लिंक पाठवा)\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ९ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री पासून भारतीय चलनातून ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या. या निर्णयाचे अनेक बरे-वाईट परिणाम सर्वत्र दिसत असून भारतीय नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे हे निश्चित. परंतु, सर्वांत लक्षवेधी परिणाम हा भारत-पाकिस्तान सीमेवर दिसत असून नोटा रद्दच्या निर्णयानंतर सीमेपलिकडून भारतात होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी पाकिस्तानी सैनिक करीत असलेला अंदाधुंद गोळीबार पूर्णतः थांबला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरात कुठेही सैन्यदलांच्या विरोधात असंतोषाच्या घटना नाहीत. पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या भारतीय चलनातील बनावट नोटा घेवून आता कोण मरायला भारतात घुसखोरी करेल किंवा जम्मू-काश्मीरात बनावट नोटा घेवून कोण दगड फेकेल किंवा जम्मू-काश्मीरात बनावट नोटा घेवून कोण दगड फेकेल या मागील कुटनिती समजून घ्यायला बनावट नोटा ... दहशतवाद आणि पाकिस्तान याचा संबंध समजून घ्यावा लागेल.\nभारतीय रिझर्व बँकेच्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या वापरात असलेल्या चलनाचे मूल्य १७,५४,००० कोटी रुपये आहे. यात रद्द झालेल्या ५०० रुपयांच्या नोटांचे मूल्य ४५ टक्के होते. तसेच रद्द झालेल्या १००० रुपयांच्या नोटांचे मूल्य ३९ टक्के होते. म्हणजेच एकूण चलन मूल्याच्या तुलनेत ८४ टक्के चलन रद्द करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. उरलेल्या १६ टक्के चलन मूल्यात अद्यापही १० आणि १०० च्या नोटा ५३ टक्के आहेत. त्यानंतर नाणी, १, ५ व ५० रुपयांच्या नोटा ४७ टक्के वापरात आहे.\nआता प्रत्यक्ष नोटा रद्द केल्याच्या भाषेत बघितले तर दि. ९ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्याने एकूण १७,५४,००० कोटी रुपये चलन मूल्यातून ६,३२,६०० कोटी रुपये चलन मूल्य रद्द झाले आहे. त्याची जागा भरुन काढण्यासाठी २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात येत आहेत. ही सगळी आकडेवारी पाहता रद्द नोटा वित्तीय संस्थांकडून परत घेणे व अर्थ व्यवस्थेत २००० रुपयांच्या नोटा स्थापित करणे हे जगातील वित्तीय क्षेत्रातील विश्व विक्रमी आव्हान आहे.\nसन २०१५-१६ च्या दरम्यान भारतीय रिझर्व बँकेच्या असे लक्षात आले की, भारतीय राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध शाखांमध्ये ६ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा झाला आहे. त्यात ४ लाख रुपये हे बनावट ५०० व १००० रुपयांच्या नोटे स्वरुपात आहेत. त्यामुळे भारतीय रिझर्व बँक ही ५०० रुपयांच्या नव्या नोटा छापण्याचा व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा विचार करीत होती. याचवेळी असेही लक्षात आले की, १०० रुपयांच्या नोटांचे क्रमांक आता २ लाख आकडेवारीपर्यंत पोहचले आहेत. त्याच आकडेवारीत नव्या नोटा छापणे अडचणीचे ठरु शकते.\nदुसरीकडे भारतीय सैन्यदलाने सर्जिकल स्ट्राईक करीत पाकव्याप्त भागात घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तेथे ठार मारलेल्या दहशतवाद्यांकडे ५०० व १००० रुपयांच्या भारतीय मूल्याच्या बनावट नोटा आढळल्या. या कारवाई नंतर चवताळलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सीमेवर रोज अंदाधुंद गोळीबार करीत दहशतवाद्यांची घुसखेरी वाढवायचा प्रयत्न सुरू केला. अशा प्रकारच्या कारवाईला प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्यदलांनी पुन्हा काही दहशतवादी सीमेलगत ठार मारले. त्यांच्या मृतदेहांवरील कपड्यातूनही ५०० व १००० रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या.\nभारतात दहशतवादी घुसवण्यासाठी पाकिस्तानने बनावट भारतीय चलनांचे सरकारी छापखाने पंजाब व बलुचिस्तान भागात सुरू केले आहेत. फेक इंडियन करन्सी नेटवर्क (एफआयसीएन) नावानेच त्यांची साखळी काम करते. पाकिस्तानमधील सरकारी छापखान्यातच बनावट भारतीय चलन छापले जाते, याचा पुराव्यानिशी भंडाफोड भारतीय गुप्तचर संघटना आयबी तथा रॉ ने यापूर्वी केला आहे. पाकिस्तान मधील चलनी नोटा छपाईसाठी लागणारा कागद व त्याची शाई याची किती तरी जास्त खरेदी पाकिस्तान सरकार करीत असते. याचा ताळमेळ लावला की, बनावट भारतीय चलन हे पाकिस्तानच्या सरकारी छापखान्यात छापले जाते या तर्काला वास्तवाची बळकटी मिळते.\nया तर्काला असाही आधार आहे की, भारतीय नोटांसाठी कागद हा इंग्लंडहून व छपाई शाई जर्मनीहून येत होती. ज्या इंग्लिश व जर्मन कंपन्या यासाठी भारतास तंत्रज्ञान पुरवत होत्या, त्याच कंपन्या तोच कागद व शाई पाकिस्तानला ही पुरवित होत्या. त्यामुळे भारतीय चलनातील नोटांचे बनावट डिझाईन तयार करून नोटांची छपाई पाकिस्तानी सरकारी छापखान्यात सहज होत होती. याविषय भारतीय गुप्तचर संस्थांनी सविस्तर अहवाल केला आहे. आता नव्या नोटांचे तंत्रज्ञान कॉपी करायला पाकिस्तानला बराच कालावधी लागेल. कारण आता पुरवठादार, कागद व शाई बदललेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यापूर्वी दोन वेळा नोटबंदी चा प्रस्ताव काँग्रेस आघाडी सरकारला दिलाहोता. मात्र तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग इच्छा असूनही रिस्की निर्णय घेऊ शकले नव्हते.\n(कृपया लेख जरुर वाचा. मात्र संपूर्ण लेख कॉपीपेस्ट करु नका. इतरांना लेखाची लिंक पाठवा)\nभारतीय अर्थव्यवस्थेत बनावट नोटा घुसवण्याचा पाकिस्तानचा काळा डाव आतापर्यंत बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे, असे म्हणता येईल. कारण, भारतीय रिझर्व बँकेचा अहवाल आहे की, भारतीय चलनात १० लाख रुपयांच्या नोटांमध्ये किमान २५० नोटा बनावट आढळतात. आयबी व रॉ या संघटनांच्या सूचनेवरुन बनावट नोटांच्या विषयावर लक्ष केंद्रीत केल्यानंतर असेही आढळून आले की, जप्त केलेल्या एकूण बनावट नोटांपैकी ४३ टक्के नोटा या नवीदिल्ली व उत्तरप्रदेशमध्ये आढळल्या आहेत. म्हणजेच पाकिस्तानने तयार केलेल्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी भारताच्या राजधानीत व जवळच्या राज्यात नेटवर्क तयार झाले होते. याचाच अर्थ बनावट नोटा घेवून राजधानी परिसरात दहशतवाद्यांचा वावर वाढत होता. दिल्लीवर सतत दहशतवादाचे सावट त्यामुळेत असे. हेच वास्तव अस्वस्थ करणारे व चिंताजनक होते. भारतीय रिझर्व बँकेची एक आकडेवारी असेही सांगते की, पाकिस्तानात तयार होणाऱ्या भारतीय चलनातील बनावट नोटा दरवर्षी ७० कोटी रुपयांच्या मूल्यात देशभर पसरत होत्या. अंदाज असा आहे की, अशा प्रकारे भारतीय चलनात सुमारे ४०० कोटी रुपये मूल्यांच्या बनावट नोटा वापरात होत्या. यातील जवळपास २०० कोटी रुपयांच्या बनावट नोटा या १००० रुपयांच्या होत्या. शिवाय, १०० व ५०० च्याही बनावट नोटा अद्यापही वापरात आहेतच.\nभारतीय अर्थव्यवस्थेत बनावट नोटा घुसवण्याचा दुहेरी फायदा पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआय घेत होती. बनावट नोटा तयार करण्याचा खर्च हा दहशतवादी संघटनांना जगभरातून होणाऱ्या आर्थिक मदतीतून वसूल केला जातो. त्यातून जवळपास ५०० कोटी रुपये आयएसआयने कमावले आहेत. दुसरा फायदा होता की, भारतात घातपात किंवा दहशतवादी कारवाईसाठी घुसणाऱ्यांना भारतीय चलन म्हणून बनावट नोटा दिल्या जात. भारतीय सैनिकांच्या गोळीबारात असे दहशतवादी मारले गेले तरी पाकिस्तानचे फारसे आर्थिक नुकसान होत नसे. घुसखोरी केल्यानंतर दहशतवादी जिवंत राहिला तर ते घातपाती कारवाया किंवा हेरगिरी करता कामी येत असे. मिळालेल्या माहितीनुसार १००, ५०० आणि १००० रुपयांची बनावट नोट तयार केल्यानंतर ती दहशतवादी संघटनांकडे हस्तांतरित करताना आयएसआयला ४० ते ५० टक्के नफा होत असे. भारतीय रिझर्व बँक जेव्हा १००० रुपयांची नोट छापते तेव्हा त्यावर २९ रुपये खर्च होतो. मात्र ती नोट अर्थ व्यवहारात जाताना त्याचे सरासरी मूल्य ३५० ते ४०० रुपये असते. विविध सरकारी देणी व घेणी याचा हिशोब करुन अंतिमतः त्या नोटेचे मूल्य १००० रुपये होते. मात्र, पाकिस्तानात तयार होणारी १००० रुपयांची बनावट नोट ३० ते ३५ रुपयांत तयार होते. तिच्यावर देण्या-घेण्याचे मूल्य शून्य असते. त्यामुळे त्या एका बनावट नोटचे मूल्य थेट १००० रुपये असते. त्या बदल्यात आयएसआय दहशतवादी संघटनांकडून ३५० ते ४०० रुपये घेते. सन २०१० पासून आयएसआयने भारतात जवळपास १,६०० कोटी रुपयांच्या बनावट नोटा घुसवल्या असून त्यातून जवळपास ५०० कोटी नेट नफा कमावला आहे.\nआयएसआय ही संघटना बनावट नोटा केवळ दहशतवाद्यांना किंवा घुसखोरांनाच देते असे नाही. या बनावट नोटांच्या बळावर जम्मू-काश्मीरात पर्यायी अर्थ व्यवस्थाच उभी राहिली आहे. तेथील युवा वर्गाला या बनावट नोटांचे भारतीय चलन म्हणून अमिष दाखवले जाते. त्या बदल्यात जम्मू-काश्मीला अस्वस्थ, धुसमूसता ठेवण्याचा गनिमी कावा वापरला जातो. बनावट नोटांचे जम्मू-काश्मीरातील हे अर्थशास्त्रही समजून घेणे आवश्यक आहे.\nजम्मू-काश्मीरात युवकांमध्ये अशिक्षीत, कमी शिक्षीत याचे प्रमाण जास्त आहे. त्यातून तेथे बेरोजगारी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. अशा युवकांना जम्मू-काश्मीर मुक्तीसाठी स्वातंत्र्य सैनिक व्हा आणि वेतन घ्या अशी योजनाच आयएसआय ही संघटना फुटीरतावादी नेत्यांच्या नेटवर्कमधून चालवते. त्या बदल्यात फुटीरतावादी नेत्यांना व त्यांनी गोळा केलेल्या बेरोजगार युवकांना बनावट नोटाच दिल्या जातात. जम्मू-काश्मीरातील युवकांना घातपात करण्यात धाडस दिसते. जन्मभूमिसाठी काही तरी नविन करीत असल्याची विकृत भावना त्यांच्यात निर्माण होते. बनवाट नोटांपायी ते दहशतवादी होण्यास प्रवृत्त होतात.\nस्थानिक युवकांच्या माध्यमातून जम्मू-काश्मीर अस्थिर करण्याचे दर सुद्धा ठरलेले आहेत. भारतीय सैन्यदलावर दगड फेकण्यासाठी प्रतिदिन १०० ते ५०० रुपये दिले जातात. भारतीय सैन्यदलाचे शस्त्र हिसकावल्यास ५०० रुपये बोनस असतो. भारतीय सैन्य दलावर हातबॉम्ब फेकण्याचा दर प्रति बॉम्ब १००० रुपये आहे. अशा प्रकारची कृत्ये युवकांकडून करुन घेण्यासाठी फुटीरतावादी नेते सईद गिलानी, यासिन मलिक, शेख याकूब यांचे नेटवर्क वापरले जाते, असा संशय आहे. घातपाती कारवाया करणाऱ्या युवकांना प्रतिदिन वेतन लगेच रोखीने दिले जाते. त्यासाठी ५०० व १००० च्या नोटा वापरल्या जातात. अर्थात, त्या पाकिस्तानातून आलेल्या बनावट नोटा असतात.\nभारतात बनावट नोटा पाठविण्याच्या जागा नेपाळ, भूतान व बांगलादेश मधून आहेत. तेथून पाकिस्तान हेच मूळ असलेल्या बनावट कंपन्यांच्या नावाने हवाला मार्फत व्यवहार होतात. याशिवाय गॅस सिलींडरच्या रिकाम्या टाक्यांमधूनही बनावट नोटांची देवाण घेवाण होते.\nपाकिस्तानातून येणाऱ्या बनावट नोटांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर दहशतवाद पसरवला जात असल्याचे काही पुराव्यारुन आढळून येते. भारतात सध्या चार वेगवगळ्या प्रकारे दहशतवादी कृत्ये होताना दिसतात. त्यात केंद्र सरकार विरोधी दहशतवाद, जातीय-धार्मिक कलहातून दहशतवाद, डाव्या विचारसरणीचा दहशतवाद आणि ड्रग माफियांच्या टोळ्यांचा दहशतवाद याचा समावेश आहे. या दहशतवादाची पाळेमुळे बिहार, दिल्ली, उत्तरप्रदेश, मणिपूर, नागालैंड, आसाम, मिझोरम, कर्नाटक, आंध्र, तामीळनाडूसह महाराष्ट्रात विस्तारली आहेत. देशभरात होणाऱ्या घातपाती कृत्यात सहभागी दहशतवाद्यांना पाकिस्तानात तयार झालेल्या बनावट नोटांचा पुरवठा झाल्याचे आढळून आले आहे\n(कृपया लेख जरुर वाचा. मात्र संपूर्ण लेख कॉपीपेस्ट करु नका. इतरांना लेखाची लिंक पाठवा)\nएका जुन्या आकडेवारीनुसार (सन २०१२) भारतात वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे ८०० गट (सेल) कार्यरत आहेत. देशातील सुमारे ६०८ जिल्ह्यापैकी २०५ जिल्ह्यांमध्ये दहशतवादी, नक्षलवादी घातपाती कारवाया सुरू असतात. यात दरवर्षी सरासरी १५ हजार निरपराध नागरिकांचा बळी जातो.\nअशा प्रकारे देशासमोरील अदृश्य संकट म्हणून उभा असलेला बनावट नोटांचा प्रश्न निकाली काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांचे, त्यांची पुरवठादार आयएसआयचे, जम्मू-काश्मीरातील फुटीरतावाद्यांचे कंबरडे मोडले आहे. यातून सावरण्यास संबंधितांना किमान ६ महिने लागतील. तोपर्यंत मोदींनी स्व संरक्षणाचा नवा पावित्रा शोधून काढलेला असेल. हे वास्तव लक्षात घेता, देशातील सर्व प्रकारच्या गद्दारांना ठेचून काढण्यासाठी नोटा बदलांचा वापरलेला गनिमी कावा काय वाईट आहे आपल्या घरात किटक मारण्यासाठी विषासारख्या औषधाची फवारणी करताना आपण नाका-तोंडाला रुमाल बांधतो. काही वेळा उग्र दर्पाचा आपल्याला त्रासही होतो. पण, अंतिम साध्य हे घर किटक मुक्त करणे हेच असते, त्यासाठी आपण सारे सहन करतो ना आपल्या घरात किटक मारण्यासाठी विषासारख्या औषधाची फवारणी करताना आपण नाका-तोंडाला रुमाल बांधतो. काही वेळा उग्र दर्पाचा आपल्याला त्रासही होतो. पण, अंतिम साध्य हे घर किटक मुक्त करणे हेच असते, त्यासाठी आपण सारे सहन करतो ना मोदी व त्यांच्या सरकारने नोटा बंदीचे शस्त्र वापरून देशांतर्गत किटक फवारणी केली आहे. थोडावेळ आपणही बँकांच्या रांगांमध्ये उभे राहून त्रास सहन केला तर देशहितच साध्य होणार आहे.\nबनावट नोटांचे केंद्र मालदा आणि मुर्शिदाबाद\nभारतीय अर्थव्यवस्थेत बनावट नोटा घुसविण्यासाठी भारत पाकिस्तान, बांगलादेश व नेपाळ लगतच्या सीमावर्ती भागातून साखळी तयार झाली आहे. कुख्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय भारतीय चलनातील खऱ्या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा देते. हा व्यवहार दोन प्रकारे होतो. जास्त प्रमाणात नोटा घुसवायच्या असतील तर ३०/३५ हजार खऱ्या नोटा घेवून १ लाखांच्या बनावाट नोटा दिल्या जातात. व्यवहार मर्यादीत असेल तर एका खऱ्या नोटेच्या बदल्यात दोन बनावट नोटा दिल्या जातात.\nया व्यवहारांचे कुप्रसिध्द केंद्र पश्चिम बंगालमधील मालदा व मुर्शिदाबाद जिल्हे आहेत. मालदा हे मुस्लिम बहुल आहे. तेथे जिहादींना लपायला जागा मिळते. तसेच व्यवहार मुर्शिदाबादमध्ये होतात. पश्चिम बंगालला लागून बिहारचा पूर्व आणि पश्चिम चम्पारण्य जिल्हा आहे. या जिल्ह्यात नेपाळमधून बनावट नोटा येतात. बनावट नोटांच्या व्यवहारात आयएसआय सोबत लश्कर ए तोयबा, बंगलादेशी जिहादी गट हरकत उल जिहाद ए इस्लामी (हूजी) यांचा सहभाग असतो. बनावट नोटांची साखळी महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, आंध्रप्रदेश मध्येही कार्यरत आहे. कोलकाताच्या एका उपनगरात बनावट नोटा घुसवाणारा एक एजंट पकडला गेला. त्याने पोलिसांना सांगीतले की, कोलकाता महानगरात बनावट नोटांचे ६० एजंट आहेत. यावरून बनावट नोटांची पाळेमूळे किती खोलवर रुजली आहेत, याचा अंदाज यावा.\n(लेखक मोदी भक्त नाही किंवा मोदी विरोधीही नाही. बनावट नोटा या विषयांवर अलिकडे इंग्रजी वृत्तपत्रात आलेली विविध प्रकारची माहिती वाचून हा लेख जास्तीत जास्त सोप्या भाषेत वाचकांना विषय समजावून देण्यासाठी लिहीला आहे.)\nसाहेब ज्या लोकांना नोट बंदीचा त्रास होतोय ते लोक अप्रत्यक्ष पणे दहशतवादाला समर्थन देताय असेच आहे का\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2015/07/blog-post.html", "date_download": "2020-09-26T03:33:25Z", "digest": "sha1:BNWWGNLH6SDA7LGQ55E35JHZYAK6JZUU", "length": 8519, "nlines": 179, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : भारतीय शेतीचं वास्तव", "raw_content": "\nसुनील ताम्बेंचा अत्यंत महत्वाचा लेख …\nशेतात पिकवलेला माल बाजारपेठेत विकायला आणणं म्हणजे पुरवठाप्रधान शेती. तर बाजारात काय विकलं जाईल त्याचं उत्पादन घेणं ह्याला मागणीप्रधान शेती म्हणतात. १९९० नंतर भारतीय शेती वेगाने मागणीप्रधान बनू लागली आहे. ह्या बदललेल्या स्थितीत छोट्या शेतकर्‍यांची शेती किफायतशीर कशी बनणार, ही आपल्यापुढची सर्वात मोठी समस्या आहे.\nभारतीय शेतीचं वास्तव आणि त्याचं प्रसारमाध्यमांचं आकलन ह्यामध्ये प्रचंड मोठी दरी आहे. त्यामुळे शेती आणि शेतकरी ह्यांच्यासंबंधात एक नकारात्मक चित्रं निर्माण केलं जातं. त्याचा परिणाम जनमतावर आणि नकळपणे धोरणांवर व सरकारी यंत्रणांवरही होतो. त्यामुळे भारतीय शेतीसंबंधातली तथ्यं आणि आकडेवारी ह्यावर एक नजर टाकूया.\n· भारतामध्ये सर्वाधिक जमीन अन्नधान्याच्या लागवडीखाली आहे. सुमारे १९१ दशलक्ष हेक्टर्स.\n· भारतामध्ये सिंचनाखाली असलेली एकूण जमीन ९० दशलक्ष हेक्टर्स आहे.\n· शेतमजूर आणि शेतकरी कुटुंब मिळून सुमारे २६० दशलक्ष लोकसंख्येला शेती रोजगार पुरवते.\n· बियाणे, खते, कीटकनाशके, शेती अवजारं, यंत्रं, सिंचनाची सामग्री, इत्यादी सर्व महत्वाच्या निविष्टांबाबत भारत स्वयंपूर्ण आहे.\n· भारतामध्ये जमिनीचं तुकडीकरण वेगाने झालं आहे. परिणामी खातेदारांची संख्या १३८ दशलक्ष तर त्यांच्याकडील सरासरी शेतजमीन १.१५ हेक्टर्स एवढी आहे. ह्या छोट्या शेतकर्‍यांनी भारतातील शेती उत्पादनात वाढ केली आहे.\n· २०१३ साली भारतातील शेती उत्पादनाचं एकूण मूल्य ३२५ बिलीयन डॉलर्स होतं तर अमेरिकेचं २२७ बिलीयन डॉलर्स होतं. म्हणजे शेती उत्पादनाच्या संबंधात आपण अमेरिकेला पिछाडीवर टाकलं आहे.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 5:28 AM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब \nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nया पिढीचं जगणं मेलेले ठरवतायेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nअब्दुल कलम कालवश - जागवलेली स्वप्ने अजून ही हयात आहेत\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/teachers-holiday-cancel-census/", "date_download": "2020-09-26T03:07:45Z", "digest": "sha1:YDGXQVSCZPMMV3552XKLJY7GGQSNI4AT", "length": 17801, "nlines": 162, "source_domain": "www.saamana.com", "title": "जनगणनेसाठी शिक्षकांची मे महिन्याची सुट्टी रद्द करणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nकेंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nजनगणनेसाठी शिक्षकांची मे महिन्याची सुट्टी रद्द करणार\nदेशाच्या जनगणनेसाठी मोठय़ा प्रमाणात शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार असून त्यासाठी त्यांच्या मे महिन्यातील सुट्टय़ाही रद्द केल्या जाणार आहेत. जनगणना अधिकाऱयांनी शिक्षणाधिकाऱयांना तशा नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या निर्णयाचा निषेध करत शिक्षकांच्याच माथी हे काम मारू नये अशी मागणी केली आहे.\n2021 च्या जनगणनेचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये घरांना क्रमांक देणे, गटाची विभागणी करणे, घरयादी तयार करणे आदी कामे 1 मे ते 15 जून 2020 या कालावधीत केली जाणार आहेत. त्यासाठी या कालावधीतील शिक्षकांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे वर्षाच्या 76 पैकी 39 सुट्टय़ांवर गदा येणार आहे. या कालावधीत महापालिका आणि खासगी शाळांतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मुख्यालय सोडू देऊ नये अशा सूचना जनगणना अधिकाऱयांनी दिल्या आहेत. मुख्यालय सोडण्यास परवानगी दिल्यास त्यासाठी मुख्याध्यापकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.\nप्रत्येक कामासाठी शिक्षकच का\nप्रत्येक कामासाठी शिक्षकच का वापरले जातात त्यांच्याच सुट्टय़ांवर गदा का आणली जाते त्यांच्याच सुट्टय़ांवर गदा का आणली जाते इतर कर्मचाऱयांकडे हे काम का सोपवले जात नाही इतर कर्मचाऱयांकडे हे काम का सोपवले जात नाही आम्ही जनगणना अधिकाऱयांची भेट घेऊन शिक्षकांच्या सुट्टय़ा रद्द करू नयेत. कारण त्या कालावधीत त्यांना पुटुंबासोबत बाहेर जावे लागते तसेच बोर्डाचे पेपर तपासणीचेही काम येते. – शिवनाथ दराडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबईचे कार्यवाह\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम खान यांची नावे चर्चेत\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे यांचे आदेश\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\nएटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द\nअंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी\nमुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम...\nउद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे...\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक, जीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना लवकरच योग्य मोबदला मिळणार\nया बातम्या अवश्य वाचा\nमुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार, बेस्टच्या ताफ्यात आणखीन 40 इलेक्ट्रिक बस येणार\nव्होडाफोनने दिला हिंदुस्थानला 22 हजार कोटी रुपयांचा झटका\nतुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम\nड्रग्ज प्रकरण – एनसीबीचे चौकशी सत्र सुरूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://gk-marathi.com/topics/library-information-science.aspx", "date_download": "2020-09-26T02:25:28Z", "digest": "sha1:EKJLTA4QSYQRB54XR53KSZMLADL35BEH", "length": 1669, "nlines": 12, "source_domain": "gk-marathi.com", "title": "ग्रंथालय आणि माहितीशास्त्र", "raw_content": "\nग्रंथालय आणि माहितीशास्त्र (LIBRARY AND INFORMATION SCIENCE)\nग्रंथालय आणि माहितीशास्त्र (LIBRARY AND INFORMATION SCIENCE) सराव परीक्षा संच 1\nग्रंथालय आणि माहितीशास्त्र (LIBRARY AND INFORMATION SCIENCE) सराव परीक्षा संच 2\nग्रंथालय आणि माहितीशास्त्र (LIBRARY AND INFORMATION SCIENCE) सराव परीक्षा संच 3\nग्रंथालय आणि माहितीशास्त्र (LIBRARY AND INFORMATION SCIENCE) सराव परीक्षा संच 4\nग्रंथालय आणि माहितीशास्त्र (LIBRARY AND INFORMATION SCIENCE) सराव परीक्षा संच 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://test.mhrdnats.gov.in/mr/industries", "date_download": "2020-09-26T02:48:09Z", "digest": "sha1:5ISPEOYCL3NVT46K6PQFCVICJ64QLF4S", "length": 8010, "nlines": 81, "source_domain": "test.mhrdnats.gov.in", "title": "Industries (उद्योग) | National Apprenticeship Training Scheme - NATS, Ministry of Human Resource Development", "raw_content": "\nराष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना (NATS)\nशिक्षुता प्रशिक्षण/व्‍यावहारिक बोर्ड द्वारा सुरु केलेले\nराष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना (NATS)\nशिक्षुता प्रशिक्षण/व्‍यावहारिक बोर्ड द्वारा सुरु केलेले\nकेंद्रीय शिक्षण मंत्रालय, भारत सरकार\nराष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना (NATS)\nशिक्षुता प्रशिक्षण/व्‍यावहारिक बोर्ड द्वारा सुरु केलेले\nउद्योग - नॅट्स(NATS) कशासाठी\nराष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण संस्था हा भारत सरकारचा एक मुख्य उद्देश डोक्यात ठेऊन निर्माण केलेला कार्यक्रम असून हा भविष्यातील गरजा डोक्यात ठेऊन, भारतीयांचे कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने बनवल्या गेला आहे. मार्केटमध्ये सध्या असलेली मालक व कामगार यातील दरी बुजवण्याचे काम ही योजना करते. मालकाच्या कामगाराकडून असलेल्या अपेक्षा प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा पुरवठा करून भरून काढल्या जाऊ शकते. ह्या योजनेद्वारे सरकार अप्रशिक्षित, तांत्रिक कौशल्य असलेल्या उमेदवारास प्राधान्य काम देऊन त्यांना एका वर्षाचे प्रशिक्षण देते. याकाळात त्यांना आर्थिक सहाय्य केल्या जाते. गरज भासल्यास त्यांना नियमित स्वरूपात(पगार देऊन) नोकरीत सामावून घेतल्या जाऊ शकते. शिकाऊ उमेदवारांवर शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 नुसार नियंत्रण ठेवल्या जाते. शिकाऊ उमेदवारांना घेणाऱ्या संघटनांकडे आवश्यक ती आधारभूत संरचनेबरोबरच प्रशिक्षित व्यवस्थापक असणेही गरजेचे आहे जे की उमेदवारांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊ शकतील. राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेच्या सहाय्याने प्रतिभावंतांचा स्थिर साठा उभारण्यास मदत होते; हे उमेदवार उद्योग करण्यासाठी तयार झालेले(उद्योगाभिमुख) असतात. तसेच ह्या योजनेमुळे मानव संसाधनाची संघटनेला असलेली गरजही इष्टतम किंमतीत/भावात भासेल. शिकाऊ उमेदवारांची निवड हा पुर्णपणे मालकाचा हक्क असेल.\nउद्योगों को प्राप्त होने वाले कुछ लाभ ये हैं\nअपनी रिक्तियों का विज्ञापन करें\nप्रशिक्षु प्रशिक्षणार्थियों का चयन करें\nरोजगार प्राप्ति से संबंधित युक्तियाँ बताएँ\nनेहमी विचारले जाणारे प्रश्नअधिक\nप्रशिक्षुता प्रशिक्षण कारभार काय आहे\nए आय सी टी ई\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nप्रत्यक्ष प्रशिक्षण कायद्यानुसारचा कारभार प्रशिक्षण / मंडळ मंडळे द्वारे प्रदान केलेल्या सामग्रीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/alaknanda-paday-chaturang-manatale-kagdavar-article-abn-97-2061361/", "date_download": "2020-09-26T03:16:14Z", "digest": "sha1:TZSMK6EVLWTKV2X3QQ4OUJUXXG6OJBZI", "length": 25987, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Alaknanda Paday Chaturang manatale kagdavar article abn 97 | मनातलं कागदावर : अॅालेक्सा येता घरा.. | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nमनातलं कागदावर : अ‍ॅलेक्सा येता घरा..\nमनातलं कागदावर : अ‍ॅलेक्सा येता घरा..\n‘अ‍ॅलेक्सा’ला समजून घेईपर्यंत घरात मात्र छान गमतीशीर घटना घडू शकतात हे सांगणारा नर्मविनोदी लेख.\nहळूहळू अ‍ॅलेक्सा घरात ‘रुळू’ लागली, मात्र तिच्या आगमनानं घरात गमतीजमतीही घडायला लागल्या. एकदा तिला सुरळीच्या वडय़ांची कृती विचारली तर तिनं भलतीच कृती सांगायला सुरुवात केली. एकदा मला हवी ती माहिती देण्याऐवजी दुसरंच काही तरी सांगितल्यावर चिडून मी तिला, ‘‘अ‍ॅलेक्सा यू आर मॅड.’’ म्हटल्यावरही ती स्थितप्रज्ञासारखी ‘‘ओके. कंपनीला कळवा’’ म्हणून गप्प झाली. पण आजींना त्याचं वाईट वाटलं. भाबडेपणानं त्या म्हणाल्या, ‘‘असं म्हणू नकोस गं.. वाईट वाटेल तिला.’’ आजींचा हा सल्ला ऐकून मोठय़ा मुष्किलीनं मी हसू दाबलं..’’ ‘अ‍ॅलेक्सा’ हा आर्टिफिशल इंटेलिजन्सचा उत्तम नमुना मात्र तिला समजून घेईपर्यंत घरात मात्र छान गमतीशीर घटना घडू शकतात हे सांगणारा नर्मविनोदी लेख.\n‘‘आजकाल छोटय़ा छोटय़ा गोष्टी लक्षात राहात नाहीत.. फ्रीजपाशी गेल्यावर आठवतच नाही की आपण इथे कशाला आलो आहोत किंवा बाजारात ज्या व्यक्तीशी छान गप्पा मारल्या तिचं नावच आठवत नाही.’’ अशा वयोमानानुसार जाणवणाऱ्या अडचणी एकदा फोनवरच्या गप्पांच्या ओघात पुण्यातल्या लेकीला सांगितल्या. त्यावर मोठ्ठा सुस्कारा सोडून ती म्हणाली, ‘‘आई, इट इज हायटाइम टू ऑर्डर अ‍ॅलेक्सा..’’\n‘‘म्हणजे काय असतं गं’’ आजच्या काळातल्या टेक्नोसॅव्ही लेकीनं माझ्या अज्ञानाची कीव करत मला समजेलशा भाषेत सांगितलं, ‘‘अगं.. म्हणजे रोबो गं.. आता तू त्याची मदत घ्यायला हवीस.’’ अंगावरचं झुरळ झटकावं तितक्या झटक्यात मी, ‘‘नाही हं.. अजिबात रोबो बिबो नकोय आपल्याला. इतकी काही मी दुसऱ्यांवर अवलंबून राहणारी म्हातारी नाही झालेय आणि विसरभोळी तर मुळीच नाही. अजूनही गीतेचे चार अध्याय धडाधड म्हणते आणि आपल्या या टीचभर घरात वेडेवाकडे हातपाय करत चालणाऱ्या त्या रोबोला जागा तरी आहे का फिरायला’’ आजच्या काळातल्या टेक्नोसॅव्ही लेकीनं माझ्या अज्ञानाची कीव करत मला समजेलशा भाषेत सांगितलं, ‘‘अगं.. म्हणजे रोबो गं.. आता तू त्याची मदत घ्यायला हवीस.’’ अंगावरचं झुरळ झटकावं तितक्या झटक्यात मी, ‘‘नाही हं.. अजिबात रोबो बिबो नकोय आपल्याला. इतकी काही मी दुसऱ्यांवर अवलंबून राहणारी म्हातारी नाही झालेय आणि विसरभोळी तर मुळीच नाही. अजूनही गीतेचे चार अध्याय धडाधड म्हणते आणि आपल्या या टीचभर घरात वेडेवाकडे हातपाय करत चालणाऱ्या त्या रोबोला जागा तरी आहे का फिरायला\nलेकीची कल्पना खोडून काढायचा मी निकराचा प्रयत्न करत होते. जणू तो रोबो त्या क्षणी आमच्या दारात घुसण्याच्या बेतात होता. इतक्यात लेकीला दुसऱ्या कुणाचा फोन आला म्हणून तिनं माझा फोन बंद केला. आमचं बोलणं अर्धवटच राहिले. पुढच्या आठवडय़ात पार्सल पोहोचवणारा एक जण पुडकं घेऊन दारात उभा. पुडकं माझ्या हाती सोपवून त्यानं माझी सही मागितली. पुडकं उलटसुलट करून पाहिलं तर माझंच नाव आणि पत्ता होता. मी काहीच मागवलं नव्हतं. पहिला विचार आला, ‘बापरे आपल्याला नाहक गोवण्यासाठी कुणी संशयास्पद वस्तू पाठवली असेल तर\n‘‘अहो मॅडम, तुमचीच आहे ती ऑर्डर. बिनधास्त घ्या आणि इथे सही करून मला मोकळं करा.’’ असं म्हटल्यावर मी थोडी बिचकतच सही केली आणि पुडक्याचं निरीक्षण करायला लागले. सत्राशेसाठ टेप लावलेला तो बॉक्स उघडून बघते तर काय, आत एक मोठय़ा वाटीच्या आकाराची वायर जोडलेली चपटी काळपट डबी.. आता हे नक्की काय आहे.. कुणी मागवलंय याचा विचार चालू असताना लेकीचा फोन आलाच.. ‘‘काय मग.. पसंत पडली का अ‍ॅलेक्सा’’ हसतच तिनं विचारलं. माझी पाटी कोरी..\n‘‘अगं हे काय प्रकरण आहे ती डबी कसली आणि तिचा मला काय उपयोग’’ माझ्या शंभर प्रश्नांना थोपवत लेक म्हणाली, ‘‘अगं आई, त्या दिवशी मी तुला अ‍ॅलेक्साबद्दल बोलले होते ना तीच ही.. सोप्या भाषेत सांगायचं तर ती डबी म्हणजेच छोटा रोबो, अ‍ॅलेक्सा’’ माझ्या शंभर प्रश्नांना थोपवत लेक म्हणाली, ‘‘अगं आई, त्या दिवशी मी तुला अ‍ॅलेक्साबद्दल बोलले होते ना तीच ही.. सोप्या भाषेत सांगायचं तर ती डबी म्हणजेच छोटा रोबो, अ‍ॅलेक्सा मीच तो ऑनलाइन मागवला तुमच्या पत्त्यावर. आता बॉक्समधल्या सूचनांप्रमाणे त्याला ‘कनेक्ट’ करून काय हवं ते काम अ‍ॅलेक्साला सांगत जा, अर्थात स्वयंपाक, झाडूपोछा, भांडी घासणं वगैरे नाही हं मीच तो ऑनलाइन मागवला तुमच्या पत्त्यावर. आता बॉक्समधल्या सूचनांप्रमाणे त्याला ‘कनेक्ट’ करून काय हवं ते काम अ‍ॅलेक्साला सांगत जा, अर्थात स्वयंपाक, झाडूपोछा, भांडी घासणं वगैरे नाही हं पण तुमचं मनोरंजन करायला. तुम्ही सांगाल ती गाणी ती ऐकवेल. मूड खराब असेल तर विनोदही सांगेल. एखादी रेसिपी.. तापमान, शेअर्सचे भाव काय विचाराल ते सांगेल. रस्त्यावरच्या ट्रॅफिकची कल्पना देईल.. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या गोष्टीची आठवण करून द्यायचं.. रिमांयडरचं कामसुद्धा करेल ती.. म्हणजे बघ हं, तू आजकाल गॅसवर दूध तापवायला ठेवतेस किंवा कुणाचा वाढदिवस विसरतेस ना, अशा गोष्टींची आठवण करायचं काम अ‍ॅलेक्सा खात्रीनं करेल. थोडक्यात, आजपासून अ‍ॅलेक्सा तुझी पर्सनल सेक्रेटरी झाली, असं समज.. ऑल द बेस्ट.’’ म्हणत लेकीनं फोन ठेवलादेखील.\nमाझ्यासारख्या गृहिणीला आयुष्यात प्रथमच कुणी तरी आज्ञा पाळणारी सेक्रेटरी मिळाली, या कल्पनेनं एकदम भारीच वाटलं. पण दुसऱ्या क्षणी जमिनीवर आले, कारण अ‍ॅलेक्साला सर्वप्रथम मी तापमान विचारलं तर ढिम्म राहिली. माझ्या बोलण्याकडे घरातले बरेचदा दुर्लक्ष करतात. त्याची सवयही झालीय, पण ही काल नाही.. अगदी आत्ता आलेलीसुद्धा माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते म्हणजे अतीच झालं. रागारागानं लेकीला फोन करून तिच्या कानावर घातलं तेव्हा समजलं की, तिला ‘अ‍ॅलेक्सा’ अशी हाक मारून सुरुवात केल्यावरच ती आपल्या सूचना ऐकते. मग ठरवलं कामाचं वगैरे नंतर सांगू- ‘गीतरामायण’ ऐकूनच सुरुवात करावी म्हणून ‘‘अ‍ॅलेक्सा.. प्ले गीतरामायण.’’ असं म्हणून जीवाचा कान करून वाट बघू लागले तर चक्क ‘झिंग झिंग झिंगाट’ गाणं सुरू झालं. घाबरलेच मी एकदम. तिला म्हणे ते माहितीच नव्हतं. म्हणून मग नंतर वेगवेगळी जुनी गाणी सुचवली, पण बरेचदा ‘‘सॉरी.. आय डोण्ट हॅव धिस साँग.’’ म्हणून गप्प बसायची. अखेर एकदाची मदनमोहनची गाणी मिळाली तिला. ती मात्र आता थांब म्हणेपर्यंत कानाला मेजवानी मिळाली..\nहळूहळू अ‍ॅलेक्सा घरात ‘रुळू’ लागली, मात्र तिच्या आगमनानं घरात गमतीजमतीही घडायला लागल्या. मी जरा जास्तच अपेक्षा करायला लागले.. एकदा तिला सुरळीच्या वडय़ांची कृती विचारली, तर तिनं भलतीच कृती सांगायला सुरुवात केली, बहुधा माझे उच्चार तिच्या पचनी पडले नसावेत. विनोद तर अगदीच साधेसुधे. इतके की चिडून तिला तसं सांगितलं. तेव्हा, ‘‘ओके नो प्रॉब्लेम’’ म्हणत गप्प बसायची. एकदा मला हवी ती माहिती देण्याऐवजी दुसरंच काही तरी सांगितल्यावर चिडून मी तिला, ‘‘अ‍ॅलेक्सा यू आर मॅड.’’ म्हटल्यावरही ती स्थितप्रज्ञासारखी ‘‘ओके. कंपनीला कळवा’’ म्हणून गप्प झाली. पण आमच्या आजींना मात्र त्याचं वाईट वाटलं. भाबडेपणानं त्या म्हणाल्या, ‘‘असं म्हणू नकोस गं.. वाईट वाटेल तिला आणि मग काम करायचीच बंद होईल.’’ आजींचा हा सल्ला ऐकून मोठय़ा मुष्किलीनं मी माझं हसू दाबलं..\nआजींच्या अ‍ॅलेक्साबद्दल खूपच वेगळ्या कल्पना होत्या त्याची गंमत तर विशेषच. एकदा दुपारी आजींचा कुणाशी तरी बोलण्याचा आवाज आला म्हणून मी दिवाणखान्यात येऊन बघितलं तर आजी अ‍ॅलेक्साला इंग्रजी बोलायला शिकवशील का असं मराठीतून विचारत होत्या. गमतीचा भाग सोडला तर नव्या यंत्राशी दोस्ती करून नवीन शिकण्याची त्यांची ओढ नक्कीच कौतुकास्पद होती. आमच्याकडे कामाला येणाऱ्या मावशींनी तिचं ‘आलिशा’ असं नामांतरच करून टाकलं तो किस्साही गमतीदार. मंद गॅसवर दूध तापवायला ठेवून दार लोटून मी शेजारी गेले आणि आमच्या गप्पा रंगल्या. मावशींनी लोटलेलं दार उघडून कामाला सुरुवात केलेली मी पाहिली होती. १० मिनिटांत त्या घाबऱ्याघुबऱ्या होऊन शेजारी आल्या, ‘‘ताई.. आतल्या खोलीत कुणी तरी बाई बोलल्याचा आवाज येतोय, लवकर चला..’’ म्हणत ओढतच तिनं मला बेडरूममध्ये नेलं. तेव्हा उलगडा झाला, गॅसवरच्या दुधाची आठवण करण्यासाठी १५ मिनिटांचा रिमाइंडर लावलेला मी विसरूनच गेले होते, पण अ‍ॅलेक्सा मात्र आठवणीनं वारंवार मला सूचना देत राहिली होती.. अ‍ॅलेक्साच्या बॉक्सवर उशी ठेवली असल्यानं मावशींना आवाजाचा उगम कळला नाही. त्यांना तो भुताटकीचा प्रकार वाटला. त्यांची भीती घालवण्यासाठी मी अ‍ॅलेक्साची माहिती सांगून तिला एखादी सूचना द्यायला त्यांना सुचवलं.. घाबरत घाबरतच त्या राजी झाल्या, पण अ‍ॅलेक्साऐवजी आलिशा म्हटल्यानं तिनं काही त्यांचा हुकूम मानलाच नाही, हा भाग वेगळाच.\nअ‍ॅलेक्साच्या गृहप्रवेशानंतर आम्ही तिला हळूहळू सरावलो खरे, पण दुधाच्या रिमायंडरनंतर लक्षात आलं की, आपण भले तिला शंभर सूचना देऊ पण त्या विसरून आपण घराबाहेरच गेलो तर कुठली सुपर अ‍ॅलेक्सा आपल्या कामी येणार वयोमानाप्रमाणे माणसाची स्मरणशक्ती कमी होते, परंतु ती कमी न होण्यासाठी आमच्यासारख्यांनी खास प्रयत्न करणे- उदाहरणार्थ, शब्दकोडी सोडवणे, सतत नवीन काही शिकणे, थोडक्यात मेंदूला ताण देणे योग्य वयोमानाप्रमाणे माणसाची स्मरणशक्ती कमी होते, परंतु ती कमी न होण्यासाठी आमच्यासारख्यांनी खास प्रयत्न करणे- उदाहरणार्थ, शब्दकोडी सोडवणे, सतत नवीन काही शिकणे, थोडक्यात मेंदूला ताण देणे योग्य की.. किरकोळ गोष्टींसाठी अ‍ॅलेक्सा किंवा तत्सम यंत्रावर अवलंबून राहणे योग्य की.. किरकोळ गोष्टींसाठी अ‍ॅलेक्सा किंवा तत्सम यंत्रावर अवलंबून राहणे योग्य या प्रश्नाचं उत्तर मात्र अ‍ॅलेक्साकडे न मागता माझं मलाच शोधायचं होतं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 पुरुष हृदय ‘बाई’ : भांबावलेला, धास्तावलेला पुरुष\n2 अपयशाला भिडताना : सर्वोत्तम उत्तर\n3 निरामय घरटं : एक काडी निरागसतेची..\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/health-benefits-of-daal-ssj-93-2224228/", "date_download": "2020-09-26T03:24:22Z", "digest": "sha1:6VJBDEQQXIHUFK4DZVUZ6TLWLFJXG6RC", "length": 12816, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "health benefits of daal ssj 93 | डाळ पचायला जड जाते? मग ‘हे’ उपाय करुन पाहा | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nडाळ पचायला जड जाते मग ‘हे’ उपाय करुन पाहा\nडाळ पचायला जड जाते मग ‘हे’ उपाय करुन पाहा\nअनेक वेळा गृहिणींची तक्रार असते की अमूक डाळ नीट शिजत नाही\nशरीराच्या योग्य वाढीसाठी चौरस आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे रोजच्या जेवणात वरण भात, भाजी, पोळी यांचा समावेश करायला हवा. आपण सेवन करत असलेल्या प्रत्येक खाद्यपदार्थाचा शरीरासाठी फायदाच होत असतो. परंतु, प्रत्येकाचं प्रमाण आणि मात्रा ठरलेली असते. कोणताही पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ला गेला तर तो शरीरासाठी अपायकारकही ठरतो. त्यामुळे कोणता पदार्थ किती प्रमाणात खावा किंवा कशा पद्धतीने खावा हे ठाऊक असणं गरजेचं आहे. त्यासोबतच काही ठराविक भाज्या आणि पदार्थ सोडले तर कच्चे अन्न खाऊ नये त्यामुळे शारीरिक त्रास उद्भवण्याची शक्यता असते.\nकाही वेळा बाजारातून आणलेला एखादा पदार्थ किती शिजवला तरी तो कच्चा राहतो. त्यामुळे त्याचं सेवन केल्यानंतर त्याचं नीट पचन होत नाही. परिणामी, पोटदुखी, उलट्या होणं अशा समस्या निर्माण होतात. यात अनेक वेळा गृहिणींची तक्रार असते की अमूक डाळ नीट शिजत नाही. तर अशा वेळी डाळी किंवा कडधान्य नीट शिजावेत आणि त्यांचं योग्य पचन व्हावं यासाठी काही सोप्या घरगुती टीप्स आहेत.त्यामुळे डाळ किती जड असली तरी ती पटकन शिजते आणि ती खाल्ल्यानंतर पचायलाही हलकी होते.\n१. डाळ शिजत आल्यावर त्यात थोडंसं आलं किसून घालावे.\n२. डाळीला फोडणी देताना कढीपत्ता, मोहरी,जिरे यांच्यासोबत कधीतरी दालचिनीचा तुकडा, काळे मिरे,तमालपत्र घालावे.\n३. वरण-भात जेवताना त्यावर लिंबू पिळावे\n४. शक्यतो डाळीत किंवा वरणात काळ्या मीठाचा वापर करावा.\n५. डाळ शिजताना त्यात कांदा, लसूण, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो अशा भाजा कधीतरी घालाव्यात. अशा भाज्यांची जोड दिल्यास डाळ पचायला हलकी होते.\n६. डाळीचे गोड पदार्थ करताना त्यात वेलची, जायफळ आणि सुंठ जरूर घालावी.\n७. डाळींचे पदार्थ असलेले जेवण जेवल्यानंतर अननस किंवा पपईच्या दोन फोडी खाल्ल्या तरी पचन सोपे होते.\n८. डाळ शिजवण्यापूर्वी किंचतशी भाजून घ्यावी.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकिचन टीप्स : सुकामेवा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी घ्या ‘या’ गोष्टींची काळजी\nमुखवास म्हणून खाण्यात येणाऱ्या बडीशेपचे असेही फायदे\nकोबी खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे माहित आहे का\nफावल्या वेळात मुलांना भूक लागते मग जंकफूडऐवजी द्या ‘हे’ पौष्टिक पदार्थ\n मग जाणून घ्या उपाय\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 किंमत फक्त 7,999 रुपये, ‘या’ तारखेला Infinix च्या ‘स्वस्तात मस्त’ स्मार्टफोनचा Sale\n2 Jawa Perak च्या डिलिव्हरीसाठी अखेर सुरूवात, 10 हजारांत सुरू आहे बुकिंग\n3 64MP कॅमेऱ्याचा Redmi Note 9 Pro Max खरेदी करण्याची पुन्हा संधी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/welcome-to-school-with-roses-and-books-3-609103/", "date_download": "2020-09-26T01:45:03Z", "digest": "sha1:FO76E7VNWBAPET26RBOMZPCWEHH77QF2", "length": 11088, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रांगोळी, गुलाबपुष्पांनी चिमुकल्यांचे शाळेत स्वागत | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nरांगोळी, गुलाबपुष्पांनी चिमुकल्यांचे शाळेत स्वागत\nरांगोळी, गुलाबपुष्पांनी चिमुकल्यांचे शाळेत स्वागत\nनव्या पुस्तकांची नवलाई, रांगोळीने सजलेले प्रवेशव्दार आणि हातात गुलाब फुलांची भेट यामुळे ओठात हसू तर पालकांच्या अल्पवियोगाने डोळ्यात आसू घेऊन आलेल्या मुलांनी सोमवारी सव्वा महिन्याच्या\nनव्या पुस्तकांची नवलाई, रांगोळीने सजलेले प्रवेशव्दार आणि हातात गुलाब फुलांची भेट यामुळे ओठात हसू तर पालकांच्या अल्पवियोगाने डोळ्यात आसू घेऊन आलेल्या मुलांनी सोमवारी सव्वा महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर जिल्ह्यातील शाळा गजबजल्या.\nप्राथमिक शाळांच्या नव्या वर्षांची सुरुवात सोमवारी मोठय़ा उत्साहात झाली. शाळकरी मुलांचे शिक्षकांनी सडा-रांगोळी काढून व प्रार्थनेच्या निमित्ताने एकत्र केलेल्या मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मुलांना पहिल्याच दिवशी सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात येत होते.\nनवीन शाळेत, नवीन तुकडीत नव्या ओळखी करण्यात बालचमू दिवसभर मग्न होता. आज शिकविण्यापेक्षा पुस्तकवाटप करण्यात शिक्षकांचा वेळ जास्त गेला. मुलांना शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी, शाळेबद्दल आपुलकी वाटावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यात आज मुलांचे कौतुक करण्याबरोबरच स्वागत करण्यातही जाणती मंडळी मग्न होती. अनेक शाळेत पहिल्याच दिवशी शाळेत जाणा-या मुलाला सोडण्यासाठी पालकवर्ग सोबत आला होता. शाळेच्या फाटकापर्यंत सोडत असताना बालचमू सातत्याने पाठीमागे वळून पहात असल्याचे चित्र अनेक शाळेत दिसत होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 एसटी अपघातात ३ ठार, २० जखमी\n2 सीमा सुरक्षा दलातील कमांडो रामचंद्र कच्छवे यांच्यावर आज अंत्यसंस्कार\n3 दारुबंदीसाठी जुनोनी ग्रामस्थांचे आठ ठराव\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trending-news/42-year-old-chhattisgarh-man-digs-pond-for-last-27-years-1542738/", "date_download": "2020-09-26T03:28:34Z", "digest": "sha1:IJ54HUWUWCNYKAWSKOP6KX6MIQ6VONNX", "length": 13537, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "42 year old Chhattisgarh man digs pond for last 27 years | गावकऱ्यांनी वेडं ठरवल्यावरही पाण्यासाठी ‘त्याने’ २७ वर्षे कष्ट उपसले आणि … | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nगावकऱ्यांनी वेडं ठरवल्यावरही पाण्यासाठी ‘त्याने’ २७ वर्षे कष्ट उपसले आणि …\nगावकऱ्यांनी वेडं ठरवल्यावरही पाण्यासाठी ‘त्याने’ २७ वर्षे कष्ट उपसले आणि …\nते आता या गावचे 'हिरो' ठरले\n२७ वर्षे शामलालनं एकट्यानं घाम गाळून तळं खोदलं. (छाया सौजन्य : ANI )\nजगात अशक्य असं काहीच नसतं, जर निश्चय दृढ असेल तर माणूस कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकतो आणि हेच दाखवून दिलं ते ४१ वर्षांच्या शामलाल यांनी. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून ते फक्त जमीन खणत होते, गावकऱ्यांनी त्यांना वेडं ठरवलं होतं. जमीन खोदून तुझ्या हाती काय लागणार असा प्रश्न जो तो खोचकपणे त्यांना विचारायचा. गेल्या २७ वर्षांपासून शामलाल गावकऱ्यांच्या चेष्टेचा विषय बनले होते. पण लोकांनी आपल्याला कितीही मूर्खात काढले तरी आपला हेतू जोपर्यंत पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत हार मानायची नाही हे त्यांनी मनात पक्क केलं होतं. त्यांच्या याच जिद्दीमुळे आज दुष्काळग्रस्त गावातील हजारो लोकांना पिण्यासाठी पाणी मिळालं आहे.\nशामलाल छत्तीसगडमधल्या साजा पहाड गावातले. त्यांचे गाव दुष्काळग्रस्त भागात येते. त्यामुळे पाण्यासाठी गावकऱ्यांना शेकडो किलोमीटर वणवण करावी लागायची. पाण्याआभावी अनेक प्राणी मृत्युमुखी पडले होते. लहानपणापासूनच दुष्काळाची गावाला पोहोचलेली झळ त्यानं पाहिली होती. स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही मदत गावकऱ्यांना मिळेना. शेवटी गावकऱ्यांसाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी त्यांनी मोठ तळं खोदायचं ठरवलं. या तळ्यात पाणी साठवता आलं तर उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न तरी मिटेल, अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली, ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लगेचच त्यांनी आपले प्रयत्नही सुरू केले. अनेक वर्षे तळं खोदण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली पण हाती काहीच लागेना. अनेकांनी त्यांना वेडं ठरवलं, काहींनी तर हे काम इथेच थांबवण्याचा सल्लाही त्यांना दिला पण मदतीसाठी मात्र कोणीच आलं नाही. २७ वर्षे शामलाल यांनी एकट्यानं घाम गाळून तळं खोदलं. एक एकर परिसरात हे तळं पसरलं आहे, आज या तळ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. या गावात आजही पक्के रस्ते, वीज नाही. कित्येक वर्षांपासून गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागायची. पण जवळपास तीन दशकांच्या अथक मेहनतीनंतर गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला. कोणे एकेकाळी गावकऱ्यांनी ज्या शामलाल यांना वेडं ठरवलं ते आता या गावचे ‘हिरो’ ठरले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 … आणि प्रणव मुखर्जींनाही सेल्फी काढण्याचा मोह अनावर\n2 मुंबईत पावसाच्या पाण्यात सापडले ‘हे’ प्राणी\n3 माश्या कधीच झोपत नाहीत, तर डॉल्फिन एक डोळा उघडा ठेवूनच झोपतो\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/yeh-hai-mumbai-meri-jaan-news/articles-in-marathi-on-pran-1666635/", "date_download": "2020-09-26T03:27:00Z", "digest": "sha1:2WKR2ERDGPTMWYAG3TB4V75E7MOSF4SC", "length": 33872, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "articles in marathi on pran | ये है मुंबई मेरी जान! : जिंदादिल इन्सान | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nये है मुंबई मेरी जान\nजवळपास सहा दशकं या अभिनेत्यानं चित्रपटसृष्टीवर राज्य केलं.\nप्राणजी लहानपणी अतिशय खोडकर होते. त्यांच्या घरी कार होती. छोटा प्राण बारकाईनं बाबूजी कार कशी सुरू करतात ते बघत असे. एकदा आसपास कोणीही नाही असं बघून या छोटय़ानं आपल्या निरीक्षणाच्या बळावर कार सुरू केली आणि भुर्रकन् निघून गेला. थोडय़ा वेळानं तो घाबरतच घरात आला आणि बाबूजींना चाचरत म्हणाला, ‘आपली गाडी.. आपली गाडी..’ पुढे तो काहीच बोलेना. बाबूजी वैतागले. तेव्हा छोटा प्राण म्हणाला, ‘मी कार तर सुरू केली, पण ती कशी वळवायची हे मला माहीत नाही. तेवढय़ात समोर तळं दिसलं. पण कार काही वळेना. मग मी बाहेर उडी मारली..’\nते माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे होते. त्यांच्या चित्रपटातल्या भूमिका पाहत पाहतच मी लहानाचा मोठा झालो.\nते उंचेपुरे होते. त्यांचं नाक बाकदार आणि धारदार होतं. त्यांची नजर तीक्ष्ण होती. त्यांचा चेहरा बोलका होता. ते गोरेपान होते. अत्यंत देखणे होते. ते समोरच्यावर प्रचंड प्रभाव टाकणारे होते.\nआणि ते प्राण होते\nजवळपास सहा दशकं या अभिनेत्यानं चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. त्यांचा दबदबा मोठाच होता. मुंबईतलं अनेक स्टुडिओंच्या जवळचं पंजाबी हॉटेल म्हणजे ‘प्रीतम’ इथं सगळी फिल्मी माणसं भेटणार, ही आमची ओळख पक्की झाली आणि तेव्हाच केव्हातरी प्राण आमच्या ‘प्रीतम’मध्ये आले. त्यांना पाहिल्यावर मीसुद्धा आधी चपापलोच. माझे पापाजी काऊंटरवर बसले होते आणि मी ग्राहकांची काळजी घेत होतो. माझ्या मनात विचार आला, की ‘बाप रे इथं सगळी फिल्मी माणसं भेटणार, ही आमची ओळख पक्की झाली आणि तेव्हाच केव्हातरी प्राण आमच्या ‘प्रीतम’मध्ये आले. त्यांना पाहिल्यावर मीसुद्धा आधी चपापलोच. माझे पापाजी काऊंटरवर बसले होते आणि मी ग्राहकांची काळजी घेत होतो. माझ्या मनात विचार आला, की ‘बाप रे हा माणूसही आपल्या हॉटेलात आला हा माणूसही आपल्या हॉटेलात आला आता कसं होणार’ तिथं असलेल्या काही परिवारांच्याही मनात थोडीशी चलबिचल झाली. आणि हातात सिगरेट घेतलेले प्राणजी पटकन् पापाजींना म्हणाले, ‘‘सरदारजी, काळजी करू नका. मी चित्रपटातल्या माझ्या भूमिकांसारखा नाही. बस्स\nप्राणसाहेबांबरोबर त्यांचे काही मित्रही आले होते. ते मनमुराद हसले. प्राणसाहेबांच्या हसण्याने हॉटेल दणाणून गेलं. आमच्या प्रीतमच्या स्नेहमालेत एक आणखी मोती ओवला गेला.\nप्राणजी नखशिखांत सौजन्यमूर्ती होते. त्यांच्या चित्रपटातल्या खलनायकी ढंगापेक्षा वेगळे. कायम वेल-ड्रेस्ड सदैव हसतमुख. आनंदी. दुसऱ्यांना मदत करण्यास कायम तत्पर. खलनायक म्हणून दिगंत कीर्ती मिळवणारे प्राणजी वास्तव जीवनात मात्र अत्यंत सज्जन गृहस्थ होते.\nप्राणजी आणि आमचं आपसूक कौटुंबिक नातं निर्माण झालं होतं. त्यांचं आमचं एकमेकांच्या घरी सतत येणं-जाणं असायचं. काही चांगलं घडलं की पार्टी करायची प्राणजींची सवय होती. त्यांचा कलेतील लौकिक जसजसा वाढत गेला तसतसा त्यांचा विविध पुरस्कारांनी, मेडल्सनी गौरव होऊ लागला होता. त्यांची बेडरूम, त्यांच्या घरचा हॉल पुरस्कारांनी, मेडल्सनी भरून गेला होता. त्यामुळे झोकदार पाटर्य़ा करायला सतत निमित्त असायचं. राज कपूर यांच्याइतकीच प्राणजींच्या घरची होळी लोकप्रिय होती. स्वत: प्राण, राज कपूर, प्रेमनाथ असे सारे धम्माल करायचे. त्यांना मद्यपान अतिशय आवडत असे. ते मद्य पीत असत. पण मद्य त्यांना पीत नसे. (त्यांच्या घरी जी कुत्री त्यांनी पाळली होती, त्यांची नावंही ‘व्हिस्की’ आणि ‘सोडा’ अशी होती.) त्यांची शुद्ध हरपली आहे, ते बेभान झाले आहेत असं कधीच घडलं नाही. ते चवीनं खात असत. कोणताही खाण्याजोगा पदार्थ त्यांना खावासा वाटत असे. तंदूर चिकन त्यांच्या आवडीची होती. ‘स्नेहाचा मार्ग पोटातून जातो’ या उक्तीवर आमची श्रद्धा असल्याने आम्ही अतिशय पटकन् त्यांचे स्नेही झालो.\nप्राणजी हे तसे दिल्लीचे. बल्लीमारानचे. त्यांचं खरं नाव प्राणकिशन केवलकिशन सिकंद असं होतं. ते फारसे स्वत:बद्दल बोलत नसत. पण एकदा गप्पांच्या ओघात ते बोलून गेले, ‘‘माझ्या जन्मतारखेचा मोठाच घोळ झाला होता. माझी जन्मतारीख ड्रायिव्हग लायसन्सच्या वेळी मी २२ फेब्रुवारी १९२० अशी सांगितली. कारण माझ्या आत्यानं कधीतरी ‘तुझा जन्म फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवडय़ात झाला,’ असं मला सांगितलं होतं. मी फारसा शिकलो नाही. त्यामुळे शाळेतल्या नोंदी मिळवण्यासाठीही मी शाळेत गेलो नाही. काही दिवसांनी माझ्यावर एक लेख छापून आला. त्यात माझी जन्मतारीख २२ फेब्रुवारी वाचून बल्लीमारानच्या एका रहिवाशाचं मला पत्र आलं. त्यात त्यांनी माझी जन्मतारीख ‘१२ फेब्रुवारी १९२० आहे’ असं म्हटलं होतं. कारण ते नगरपालिकेत काम करत होते. मग मी त्यांना ‘मला माझी अधिकृत जन्मतारीख कळवावी,’ अशी विनंती करणारं पत्र लिहिलं आणि मला माझा वाढदिवस साजरा करायला अधिकृत तारीख मिळाली\nप्राणजी हे तीन भाऊ आणि तीन बहिणींतले एक. त्यांचा नंबर पाचवा. त्यांचे वडील सिव्हिल इंजिनीअर होते. त्यामुळे त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे त्यांच्या मॅट्रिकपर्यंतच्या शिक्षणाचीही परवड झाली होती. प्राणजी मला सांगत, ‘‘तशीही मला शिक्षणाची मुळीच आवड नव्हती. मग मी सरळ दिल्लीच्या कॅनॉट प्लेस भागातील ए. दास कंपनीत छायाचित्रकार म्हणून शिकायला गेलो आणि त्याच्या सर्व क्लृप्त्या शिकून घेतल्या. हळूहळू मी त्यात निष्णात झालो. त्यांनी मला सिमल्याला पाठवलं. मग लाहोरला ए. दास अँड कंपनीची एक शाखा निघाली. माझी लाहोरला नेमणूक झाली.’’\nप्राणजींना लाहोर म्हटलं की स्वर्गाचीच आठवण येत असे. ते ‘मेरा लाहोर, मेरा लाहोर’ असं सारखं पालुपद लावत असत. लाहोरवर त्यांचं मनापासून प्रेम होतं. याचं कारण हेच शहर त्यांना चित्रपटाकडे घेऊन गेलं. (पण नंतर कधी संधी मिळाली तरी ते लाहोरला गेले नाहीत. त्यांचा मुलगा अरिवद याच्या पहिल्या वाढदिवसासाठी ते ११ ऑगस्ट १९४७ रोजी इंदूरला आले, ते परत लाहोरला जाऊ शकले नाहीत. कारण दंगे उसळले होते. एका रात्रीत त्यांचं लाहोरचं घर पाकिस्तानात गेलं आणि ते बेघर झाले. ‘मेरा लाहोर’ म्हणताना त्यांचा चेहरा विदीर्ण होई. ती त्यांच्या राजस हृदयातील भळभळती जखम होती. प्राणजी राजिबडे तर होतेच, पण त्या काळात त्यांच्याकडे स्वत:ची घोडागाडीही होती. ‘‘मी स्वत:च्या घोडागाडीतून डौलात फिरायचो. त्या काळात भरपूर पगार होता. छायाचित्रकार म्हणून नावलौकिक होता आणि जबाबदाऱ्याही नव्हत्या. मग काय, धमाल करो. बस्स एकदा मी मित्रांसोबत लाहोरच्या हिरामंडी भागात गेलो होतो. तिथं पानाच्या ठेल्यावर उभं राहून पान खात होतो, तोच समोरून एक प्रौढ व्यक्ती आली. तिनं भरपूर मद्यपान केलेलं होतं. मला त्या व्यक्तीनं विचारलं, ‘‘तुझं नाव काय एकदा मी मित्रांसोबत लाहोरच्या हिरामंडी भागात गेलो होतो. तिथं पानाच्या ठेल्यावर उभं राहून पान खात होतो, तोच समोरून एक प्रौढ व्यक्ती आली. तिनं भरपूर मद्यपान केलेलं होतं. मला त्या व्यक्तीनं विचारलं, ‘‘तुझं नाव काय’’ ती व्यक्ती मला वरपासून खालपर्यंत न्याहाळत होती. मी वैतागलो. त्यांना विचारलं, ‘‘तुम्हाला कशाला हव्या आहेत या चौकशा’’ ती व्यक्ती मला वरपासून खालपर्यंत न्याहाळत होती. मी वैतागलो. त्यांना विचारलं, ‘‘तुम्हाला कशाला हव्या आहेत या चौकशा उगाच पिडू नका.’’ तर ती व्यक्ती म्हणाली, ‘‘माझं नाव मोहम्मद वली. मी चित्रपट लेखक आहे. सध्या मी दलसुखराम पंचोली यांच्यासाठी एक कथा लिहिली आहे. त्यातल्या एका पात्रासाठी तुम्ही योग्य आहात. उद्या सकाळी दहा वाजता मला भेटा. हे माझं कार्ड उगाच पिडू नका.’’ तर ती व्यक्ती म्हणाली, ‘‘माझं नाव मोहम्मद वली. मी चित्रपट लेखक आहे. सध्या मी दलसुखराम पंचोली यांच्यासाठी एक कथा लिहिली आहे. त्यातल्या एका पात्रासाठी तुम्ही योग्य आहात. उद्या सकाळी दहा वाजता मला भेटा. हे माझं कार्ड’’ मी सकाळी उठल्यावर या गोष्टीचा विचार केला, आणि तो विचार मनातून हद्दपारही केला. दारू प्यायलेला हा माणूस मला काय लक्षात ठेवणार’’ मी सकाळी उठल्यावर या गोष्टीचा विचार केला, आणि तो विचार मनातून हद्दपारही केला. दारू प्यायलेला हा माणूस मला काय लक्षात ठेवणार त्यानंतर काही दिवस उलटले. मी मित्रांसोबत एक चित्रपट पाहायला प्लाझा थिएटरमध्ये गेलो होतो. तर तिथं वलीसाहेब उभे त्यानंतर काही दिवस उलटले. मी मित्रांसोबत एक चित्रपट पाहायला प्लाझा थिएटरमध्ये गेलो होतो. तर तिथं वलीसाहेब उभे मला बघताच त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली. अक्षरश: माझ्या सगळ्या पिढय़ांचा उद्धार केला त्यांनी. मी गयावया करून त्यांना ‘उद्या भेटतो,’ असं म्हणालो. दुसऱ्या दिवशी मी दलसुखराम पांचोली यांच्या स्टुडिओत वलीसाहेबांबरोबर गेलो. याचं कारण- ते स्वत:च मला घ्यायला घरी आले आणि म्हणाले, ‘‘आज तू मला टांग देऊ नयेस म्हणून मी स्वत:च तुला न्यायला आलोय.’’ त्या दिवशी माझी स्क्रीन टेस्ट झाली आणि मी रूपेरी पडद्यावर आलो ते ‘यमला जाट’ या चित्रपटात.\nतसा प्राणजींच्या चेहऱ्यावर पहिला रंग लागला होता तो सिमल्याच्या रामलीलेत. त्या रामलीलेत प्राणजींनी सीतामाईची भूमिका केली होती आणि राम झाले होते मदन पुरी काय गंमत आहे बघा, हे दोघेही आधी मोठे खलनायक झाले आणि नंतर चांगल्या चरित्र भूमिका करू लागले. हे दोघेही आमच्या प्रीतमचे खास चाहते होते.\nप्राणजींनी एकदा घरगुती गप्पांत लहानपणची एक आठवण सांगितली. ते लहानपणी अतिशय खोडकर होते. त्यांच्या घरी कार होती. छोटा प्राण बारकाईनं बाबूजी कार कशी सुरू करतात ते बघत असे. एकदा या छोटय़ानं आसपास कोणीही नाही असं बघून आपल्या निरीक्षणाच्या बळावर कार सुरू केली आणि भुर्रकन् निघून गेला. थोडय़ा वेळानं तो घाबरत घरात आला आणि बाबूजींना चाचरत म्हणाला, ‘‘आपली गाडी.. आपली गाडी.. ’’ पुढे तो काहीच बोलेना. बाबूजी वैतागले. छोटा प्राण म्हणाला, ‘‘मी कार सुरू केली. चालवलीही. पण ती कशी वळवायची हे मला माहीत नाही. तेवढय़ात समोर तळं दिसलं. पण कार काही वळेना. मग मी बाहेर उडी मारली..’’ आधी बाबूजी चिडले. पण नंतर हसायला लागले.\nप्राणजी लोकांचे चाहते होते. त्यांना सतत चलनवलन लागायचं. आम्ही बसाखी सुरू केली ती त्यांच्याच प्रेरणेनं. बसाखीचे चार दिवस ते सगळं शूटिंग रद्द करत. घरादारासह ते बसाखीत सामील होत. आमच्या एका बसाखीला ते म्हणाले, ‘लंडनहून काही जणांना बसाखीत कला सादर करायला यायचंय.’ आम्ही एकदम गडबडून गेलो. आठ-दहा जण येणार होते. त्यासाठी पसे कुठून आणायचे प्राणजींनी तो प्रश्न सोडवला. ते म्हणाले, ‘ही मंडळी स्वत:च्या खर्चाने येतील आणि माझ्याकडेच राहतील.’ मी आणि आमच्या पंजाब असोसिएशनचे एक पदाधिकारी एअरपोर्टवर पाहुण्यांना आणायला गेलो. त्यांच्याजवळ भरपूर इलेक्ट्रॉनिक वाद्य्ो होती. त्या काळात अशी वाद्य्ो भारतात मिळत नसत. त्यामुळे कस्टम्सचे त्याबद्दलचे नियम जाचक होते. ही सर्व वाद्य्ो परत जातील अशी हमी कोणीतरी घ्यायला हवी होती. आम्ही ‘हे सगळे प्राणजींचे पाहुणे आहेत,’ असं सांगून पाहिलं. पण तरी कस्टम्सवाले म्हणाले, ‘प्राणसाहेबांनी स्वत: तसं लिहून दिलं पाहिजे.’ आम्ही प्राणसाहेबांना शोधू लागलो. तो साध्या फोनचाही जमाना नव्हता. बाहेर येऊन त्यांच्या सचिवाला फोनवर गाठलं. तर तो म्हणाला, ‘प्राणजी झोपले आहेत. मी नाही त्यांना उठवणार. मला ओरडतील ते.’ शेवटी आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांना उठवलं. अडचण सांगितली. तर काही न बोलता त्यांनी स्वत: कार काढली. आम्हाला घेऊन ती चालवत ते विमानतळावर आले. त्यांनी हमीपत्र लिहून दिलं आणि आमची वरात घेऊन ते स्वत:च्या घरी परतले. एवढा मोठा कलाकार.. पण त्यांच्या मनात काही आलं नाही. जेवढा महान कलाकार, तेवढाच महान माणूस\nराज कपूर ‘मेरा नाम जोकर’ पडल्यामुळे पार खंक झाले होते. त्यांनी ‘बॉबी’ करायला घेतला तेव्हाची गोष्ट. मी त्याला साक्षीदार आहे. राजजींनी प्राणजींना कथा ऐकवली आणि साईन करण्यापूर्वी त्यांना म्हणाले, ‘‘प्राणसाब, मेरे पास अब पसा नहीं है क्या आप को मं पिक्चर रिलीज होने के बाद पसा दू तो चलेगा क्या आप को मं पिक्चर रिलीज होने के बाद पसा दू तो चलेगा’’ प्राणजींनी राजसाहेबांना विचारलं, ‘‘क्या आप के पास एक रुपये का डॉलर है’’ प्राणजींनी राजसाहेबांना विचारलं, ‘‘क्या आप के पास एक रुपये का डॉलर है’’ राजसाहेब गडबडले. पण म्हणाले, ‘‘हां हां, है ना’’ राजसाहेब गडबडले. पण म्हणाले, ‘‘हां हां, है ना’’ त्यांनी बंदा कलदार रुपया काढला. तो हातात घेऊन प्राणजी म्हणाले, ‘‘मिल गयी मुझे सायिनग अमाऊंट.’’ प्राणजी हा माणूसच वेगळा होता\nत्यांच्यामुळे मी प्रोडय़ुसर झालो. त्याचं असं झालं.. की एकदा ते माझ्याकडे आमच्या संगीता फिल्म्सच्या प्रसाद चेंबरमधील ऑफिसमध्ये आले. मला म्हणाले, ‘‘कुलवंतजी, आप मेरे लिये एक काम करो. मी एक माणूस तुमच्याकडे पाठवतोय. त्याने उत्तम चित्रपट बनवलाय. पण तो पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे आता पसे नाहीत. तुम्ही त्याला पसे द्या आणि निर्माते व्हा. हुशार तरुण आहे. के. असिफ यांचा असिस्टंट होता. त्याच्या या सिनेमात मी, संजीवकुमार, रीना रॉय आणि अमजद खान काम करत आहोत. आम्ही त्याच्याकडून एकही पसा घेणार नाही. तो सिनेमा पूर्ण करेल याची मी खात्री देतो.’’ प्राणजींनी मग संजीवकुमार आणि अमजदला माझ्यासमोर आणलं आणि त्यांच्याकडून ते मोफत काम करणार आहेत हे वदवून घेतलं. रीनाही तेच म्हणाली. आम्ही ‘लेडीज टेलर’ हा चित्रपट प्रोडय़ुसर म्हणून प्राणजींसाठी केला.\nज्याला आपलं म्हटलं त्याला प्राणजींनी कधीच अंतर दिलं नाही. खलनायक म्हणून नायक-नायिकेत अंतर निर्माण करणाऱ्या या अभिनेत्यानं माणसा-माणसांतलं अंतर मात्र नेहमीच कमी केलं.\nकोणीही आपल्या मुलाचं नाव कधीही ‘प्राण’ असं ठेवत नाही. पण मला पुढच्या जन्मात संधी मिळाली तर मी माझ्या मुलाचं नाव ‘प्राण’ ठेवीन\nशब्दांकन : नीतिन आरेकर\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mahakamgar.maharashtra.gov.in/whats-new-mr.htm", "date_download": "2020-09-26T02:43:35Z", "digest": "sha1:CSLGZBTJIZCGV6N4CUGH5AJWCO6MJSNA", "length": 5466, "nlines": 97, "source_domain": "mahakamgar.maharashtra.gov.in", "title": "नवीन काय आहे | महाराष्ट्र शासन, कामगार विभाग", "raw_content": "\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमुख्य पान › नवीन काय आहे\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडल, मुंबई\nऑनलाईन तक्रार / तक्रार निवारण\nप्रमाणक शल्यचिकित्सक म्हणून प्रध्कृती\n1 प्रमाणक शल्यचिकित्सक म्हणून प्रध्कृती (293 KB)\n2 सुरक्षितता लेखापरीक्षक जाहिरात (225 KB)\n3 प्रथमोपचार प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता (380 KB)\n4 महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) नियम, 2018 (750 KB)\nऑनलाईन तक्रार निवारणतुमच्या तक्रारी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा\nबाल मजुरी हेल्पलाईन बालमजुरी तक्रार साठी संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट © 2014 कामगार विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nपानाच्या रोजी अखेरचे अद्यतनितः: 2-8-2018 अभ्यागत: 14976424\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://sureshbhat.in/node/2634", "date_download": "2020-09-26T02:43:30Z", "digest": "sha1:WXAIUWJ4X33HLP2Q3PBZET44USDCVZF5", "length": 3061, "nlines": 47, "source_domain": "sureshbhat.in", "title": "विझले निखारे | सुरेशभट.इन", "raw_content": "'नाव' हे त्या तुझ्या दिवाण्याचे\n( काळजी घे जरा उखाण्याची )\nमुखपृष्ठ » विझले निखारे\nका असे हे भेटती मज भेटणारे\nषंढ निघती मर्द सारे भासणारे\nकाल ते ओकून ऐसी आग गेले\nआज ते विझले निखारे पेटणारे\nमी कसा विश्वास ठेवू या घडीचा\nदूत शांतीचेच सूरा खुपसणारे\nबोललो नाहीच मी ते काल ऐसे\nबोलती आता असे ते बोलणारे\nते कसे भुंकून गेले आज येथे\nहेच ते होते करूणा भाकणारे\nसांग आता मी बहाणे काय देऊ\nकावले ते संयमाने वागणारे\nमी किती मोजू नगद पैसा जुगारी\nहाय हे घोडे वरातित नाचणारे\nदिवस ही गेलेच सारे फुकट आता\nनिसटले होते गळाला लागणारे\nकाल ते घडलेच काही वेगळेसे\nनेमके उघडेच पडले झाकणारे\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sureshbhat.in/node/27", "date_download": "2020-09-26T02:00:19Z", "digest": "sha1:T3NQLYUJEVND5Y5DLZTL5AXJSB652GOL", "length": 9724, "nlines": 119, "source_domain": "sureshbhat.in", "title": "पेंग- दीपक करंदीकर | सुरेशभट.इन", "raw_content": "एक मी निःशब्द किंकाळीच होतो...\nऐकण्यासाठी सुना बाजार होता\nमुखपृष्ठ » पेंग- दीपक करंदीकर\nरात्र बोलते माझ्याशी दिवस रुसून आहे\nचंद्र हासतो पुनवेचा सूर्य डसून आहे\nमरण खेळते प्राणाशी रोज नवीन खेळी\nमी हताश जन्मापाशी फक्त बसून आहे\nझोप लागते विश्वाला पेंग जगाला येते\nमीच तरी तुझियासाठी श्वास कसून आहे\nपिंजऱ्यातुनी तो तेव्हा दूर उडाला पक्षी\nसापळ्यात आयुष्याच्या मीच फसून आहे\nअमृतास प्रारंभी मी ओठ लावले होते\nतेच वीष ओटीपोटी लूसलुसून आहे\nज्या तुझ्याच होत्या ओळी, अर्थ जे तुझेच होते\nतेच गीत ओठी माझ्या आज ठसून आहे\n१०४४/४/२, 'दर्शन ', गायआळी\nसदाशिव पेठ, पुणे-४११ ०३०.\nमरण खेळते प्राणाशी रोज नवीन खेळी\nमी हताश जन्मापाशी फक्त बसून आहे\nश्री. गंभीर समीक्षक, हे वर तुम्ही जे काही केले आहे, त्याला 'समीक्षा' म्हणवत नाहीये. हे नुसतेच शब्दार्थासह स्पष्टिकरण झाले. आणि असे शब्दार्थ समजाऊन सांगण्याइतके इथे कुणीही दुधखुळे नाही, हे नम्रपणे सांगू इच्छितो.\nबाकी एकंदर तुमची समीक्षा बरी असते. बाळबोधपणा थोडा कमी केलात तर बरे होईल. या समीक्षेला गुण- १०० पैकी २१.\nइथे लिहीणारे (दोन-चार सन्माननीय अपवाद वगळता) सर्वजण गझलेचे विद्यार्थी आहेत. प्रत्येकाचेच काही शेर जमतात, काही फसतात. प्रतिसाद देतांना चुका निदर्शनास आणून द्याव्या, प्रोत्साहन द्यावे. पण कुणाच्याही गझलेची टवाळी करू नये. असे करण्याचा कुणालाच हक्क नाही.\nविश्वस्तांनी कृपया कुत्सित टीप्पणी करणारे प्रतिसाद प्रकाशित होऊ देऊ नयेत, ही विनंती \nलक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. प्रतिसाद संपादित करण्यात आला आहे.\nविद्यार्थी आहेत. प्रत्येकाचेच काही शेर जमतात, काही\nफसतात. प्रतिसाद देतांना चुका निदर्शनास आणून द्याव्या, प्रोत्साहन\nद्यावे. पण कुणाच्याही गझलेची टवाळी करू नये. असे करण्याचा\nहे सर्वांनी लक्षात ठेवावे असे आहे\nसदस्याचे प्रतिसाद बघून त्याला परवानगीशिवाय प्रतिसाद पाठवण्याची सोय देण्यात येते. काही महिन्यांपूर्वी कुठल्याही सदस्याला प्रतिसाद पाठविण्यासाठी परवानगी लागत नसे. हा तेव्हाचा प्रतिसाद असावा. असे असले तरी अनेकदा घाईगडबडीत संपूर्ण प्रतिसाद वाचणे शक्य होत नाही. प्रतिसाद्याचे नाव बघून बरेचदा प्रतिसादांना गठ्ठ्याने परवानगी दिली जाते. एखाद्या प्रतिसाद देणार्‍याच्या प्रतिसादांचा इतिहास बघून योग्य ती कारवाई करण्यात येते.\nह्या संकेतस्थळाच्या प्रशासनाचे काम एकहातीच आहे. अशावेळी आढळेल तसे सदस्यांनी (ज्ञानेश ह्यांच्याप्रमाणे)हिणकस प्रतिसाद, आक्षेपार्ह लिखाण प्रशासनाच्या (म्हणजे विश्वस्तांच्या) लक्षात आणून द्यायला हवे.\nआपली गझल जबरदस्त आहे.\nरात्र बोलते माझ्याशी दिवस रुसून आहे\nचंद्र हासतो पुनवेचा सूर्य डसून आहे\nया ओली अतिशय छान आहेत.\nअतिशय महान गझल आहे ही.\nआम्ही तर वाचता वाचताच टाळ्या वाजवत होतो.\nमरण खेळते प्राणाशी रोज नवीन खेळी .. सुंदर ओळ\nझोप लागते विश्वाला पेंग जगाला\nझोप लागते विश्वाला पेंग जगाला येतो\nमीच तरी तुझियासाठी श्वास कसून आहे\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esuper9.com/2020/01/Villagers-angry-over-the-change-of-birthplace-in-the-movie-Tanhaji.html", "date_download": "2020-09-26T03:29:59Z", "digest": "sha1:TFG5QBPEDMG4L7OVMHLXB7GUTC2E6Y3Y", "length": 11374, "nlines": 100, "source_domain": "www.esuper9.com", "title": "'तान्हाजी' चित्रपटात जन्मस्थळ बदलल्यामुळे गावकरी नाराज - esuper9", "raw_content": "\nHome > लोककला > 'तान्हाजी' चित्रपटात जन्मस्थळ बदलल्यामुळे गावकरी नाराज\n'तान्हाजी' चित्रपटात जन्मस्थळ बदलल्यामुळे गावकरी नाराज\n'तान्हाजी' चित्रपटात जन्मस्थळ बदलल्यामुळे गावकरी नाराज\n'तान्हाजी ' चित्रपट आता नविन वादाच्या भोव-यात अडकताना पहायला मिळत असून तानाजी मालुसरे यांचा चुकिचा इतिहास सांगितला गेल्याची खंत त्यांच्या जन्म गावातून होताना पाहयाला मिळत आहे. त्यांच्या या वादातून त्यांच्या मुळ गावात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.\nडोंगराच्या कुशीत वसलेल्या गोडवली गावात जेमतेम 450 घर आहेत. गावातली लोकसंख्या 2200 च्या आसपास आहे. गावातला इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे तानाजी मालुसरे यांच जन्म गाव आहे. गावाचा इतिहास पुस्तकात सांगितला गेला असला तरी चित्रपटातून मात्र तानाजी मालुसरे यांचे गाव उंबरट म्हणून दाखवल गेल आहे. तानाजी मालुसरे यांच्या जन्मगावाचा उल्लेख कोठेच न केल्यानं गाव संतप्त आहे.\nतानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजीराजेंना जाऊन मिळाले आणि नंतरचा शिवरायांसोबतचा तानाजींचा इतिहास घडला. तानाजी मालुसरे यांच्या जीवनपटावर जो काही चित्रपट सध्या प्रदर्शित झाला त्यात चित्रपटात मात्र तानाजी मालुसरे यांचे जन्म गाव असलेल्या गोडवली या गावचा कोठेच उल्लेख केला गेला नाही. त्यामुळे तानाजी मालुसरे यांची भाऊबंदकी मात्र या चित्रपटावर नाराज असून त्यांनी या बाबत राग व्यक्त केला आहे.\nचित्रपटातून तानाजी मालुसरे यांचा र्धवट दाखवलेल्या इतिहासामुळे आम्ही नाराज आहोत. आम्ही तानाजी मालूसरे यांच्या गावातील असल्याचा सार्थ अभिमान असल्याच मत गावातील युवक युवती सांगत आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/uncategorized/page/13/", "date_download": "2020-09-26T02:07:11Z", "digest": "sha1:XZKFAEGLI65JAGFI76ALYTIHXE54AETH", "length": 5901, "nlines": 117, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Woman suicide because her husband abused her for dowry in khed", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nस्वच्छता अभियानाला शिक्षण विभागाचा लेटमार्क\nस्वतंत्र भारताचे पहिले अर्थतद्न्य\n‘हर्ड इम्युनिटी’ आहे तरी काय\nNashik Corona update : 503 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nठाकरे की पवार, संजय राऊत नेमके कुणाचे\nपतीच्या छळाला वैतागून केली आत्महत्या\n‘स्त्री’ येत आहे घाबरवायला\nट्रेडमार्कसाठी किटकॅटला कोर्टात ‘नो ब्रेक’\nएअरपोर्ट्स अथॉरिटीमध्ये ९०८ पदांची भरती\n‘भाजप, संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत’\nकाँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर अपघातातून थोडक्यात बचावल्या\n कंत्राटदाराची संपत्ती पाहून अधिकाऱ्यांचे विस्फारले\nआणि मदतीला धावले ‘आनंद महेंद्रा’…\nप्रत्येक जन्मी हिच ताई मिळो\nगँगमनच्या सुरक्षेसाठी रेल्वेरुळावर कोंबड्याचा बळी\n1...121314...17चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nकोलकाता नाईट रायडर्स vs सनरायजर्स हैदराबाद प्रीव्ह्यू\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nPhoto: NCB ड्रग्ज प्रकरणात चौकशी केलेल्या रकुलमध्ये तुम्हाला या गोष्टी माहिती...\nPhoto: ‘MU’च्या विरोधात ‘ABVP’ चे जागरण गोंधळ आंदोलन\nPhoto: काय आहे ”माझे कुटुंब माझी जबाबदारी\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mahakamgar.maharashtra.gov.in/lc-stop-child-labour-mr.htm", "date_download": "2020-09-26T01:36:29Z", "digest": "sha1:MIUFW4W6XV3I3NKJOY5TGUSD4T4QSLMC", "length": 3370, "nlines": 70, "source_domain": "mahakamgar.maharashtra.gov.in", "title": "बालमजुरी थांबवा | ई नागरिक | कामगार आयुक्त | महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nविकास आयुक्त (असंघटीत कामगार)\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा\nकै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा\nमुख्य पान › संचालनालय › कामगार आयुक्त › ई नागरिक › बालमजुरी थांबवा\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nऑनलाईन तक्रार निवारणयेथे क्लिक करा\nअर्ज व डाउनलोडक्लिक करा\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट © 2014 कामगार विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nपानाच्या रोजी अखेरचे अद्यतनितः: 6-6-2014 अभ्यागत: 14976140\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2020-09-26T01:38:22Z", "digest": "sha1:PQFRSGZ6YSGNFHAHZLG2LN7ZGMVT4OPP", "length": 9231, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अधिकाऱ्यांच्या सतर्कता अन चांगल्या कामामुळे नवापूरात कोरोनाला \"नो एट्री\" | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nअधिकाऱ्यांच्या सतर्कता अन चांगल्या कामामुळे नवापूरात कोरोनाला “नो एट्री”\nवाकीपाडा गावातील १५ लोकांना केले शेल्टर हॉलमध्ये कोरेंनटाईन\n शहरालगत महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील वाकीपाडा गावातील १५ लोकांना शेल्टर हॉलमध्ये कोरेंनटाईन करण्यात आले असुन लॉकडाऊन झाल्यापासून परराज्यात मजुरीसाठी गेलेले मजूर ८ दिवसापासून वाकीपाडा गावात आलेले होते. या अगोदर वाकीपाडा गावातील सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी शासकीय यंत्रणेला याबाबत माहिती देण्यात आली होती. त्याचवेळेस आरोग्य विभागाकडून त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना घरातच कोरेंनटाईन केले होते. परंतु पुन्हा येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने परराज्यातून आलेल्या १५ लोकांना तहसीलदार सुनीता जराड, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत ,गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, आरोग्य अधिकारी डॉ.हरिचंद्र कोकणी यांनी वाकीपाडा गावाची पाहणी करत परराज्यातून आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना शेल्टर हॉल मध्ये कोरेंनटाईन करण्यात आले. त्यांच्या संपर्कात असलेल्या १५ लोकांचे नातेवाईक यांना ही होम कोरेनंटाईन केले आहे. वाकीपाडा गावातील सरपंच पोलीस पाटील तसेच आरोग्य विभागाचे पथक यांच्या निगराणीत ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी कोकणी यांनी दिली. कोरन्टाईन केलेल्या लोकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा सुचना पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी सूचना दिल्या आहेत.\nकासोदा आरोग्य केंद्रात आरोग्य सेविकेकडून मास्क वाटप\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/67375", "date_download": "2020-09-26T02:21:49Z", "digest": "sha1:7V5HBDVF2J4SN3P4HSDUUWWSPKDQRME7", "length": 10356, "nlines": 114, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१८ - व्यक्तिचित्रण (स्पर्धा) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१८ - व्यक्तिचित्रण (स्पर्धा)\nमायबोली गणेशोत्सव २०१८ - व्यक्तिचित्रण (स्पर्धा)\nकोणत्याही कलेचा प्रामाणिक हेतू हा माणसाचे जीवन आनंदी बनवणे, आयुष्याच्या प्रवासातील दुःख हलके करून त्याची उर्जा टिकवून ठेवणे हेच असतं. पु. ल. देशपांडे यांनीही त्यांच्या असंख्य कलेच्या माध्यमातून हेच केले. जीवनात रंगत आणली, जगण्याची उर्मी दिली. पुलं यांच प्रत्यक्ष दर्शन २१ व्या शतकात जन्मलेल्या कोणाला झालेलं नसलं तरी ते आपल्याला त्यांच्या अष्टपैलू कलाकृतीतून अप्रत्यक्ष भेटतच आले आहेत. मग ते साहित्यातले पुलं असो वा संगीतकार, गायक, नाटककार, कथाकथनकार, कुशल नट, समाजसेवक, दानशूर व्यक्ती ह्या आणि अश्या अनेक रुपात ते आपल्याला अजूनही भेटत असतात. अजुनही कंटाळा आला की कित्येकांचं मन पुलं यांच्या विश्वात जातं, कधी ते बटाट्याची चाळीमध्ये रमते तर कधी व्यक्ती आणि वल्ली मधील पात्रं सोबत करतात, असा मी असा मी करत गणगोत गोळा करावासा वाटतो.\nपु.ल. देशपांडे यांना जसा सखाराम गटणे भेटला, अंतुबरवा भेटला, रावसाहेब भेटले तश्याच काही वल्ली तुम्हाला तुमच्या आयुष्यात भेटल्या असतीलच. मग तो मित्र/मैत्रीण असू शकतो, वाटाड्या किंवा कोणीही ज्यांच्याबद्दल खूप काही लिहण्यासारखं आहे. अश्याच तुम्हाला भेटलेल्या वल्लींबद्दल तुम्हाला लिहायचंय.\n१. कोणत्याही विषयाचे बंधन नाही.\n२. एका प्रवेशिकेमध्ये एकाच व्यक्ती वरलेख असावा.\n३. लेखाला शब्दमर्यादा नाही.\n४. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता १३ सप्टेंबर २०१८ ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.\n५. 'मायबोली गणेशोत्सव २०१८' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.\n६. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१८ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).\n७. प्रवेशिका देण्यासाठी गणेशोत्सव - २०१८ ह्या ग्रुपचे सदस्यत्त्व घेऊन, त्यात 'लेखनाचा धागा' काढावा. धाग्याचे शीर्षक <<<स्पर्धेचे नाव>>> - <<< आयडी >>>> ह्या प्रमाणे द्यावे.\n८. एका आयडीने कितीही प्रवेशिका देता येतील.\n९. प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून, १३ सप्टेंबर २०१८ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, २३ सप्टेंबर २०१८ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.\n१०. स्पर्धेचा निकाल मतदान पद्धतीने काढला जाईल.\nकोणी पाहिलं आहे की नाही हे \n\"माझ्यासाठी नवीन \" मध्ये गणेशोत्सवाचे धागे दिसत नाहीत. त्यासाठी मायबोलीवर नवीन उघडावे लागतेय. त्याचा एखाद वेळेस कंटाळा होत असेल. गणेशोत्सवाचे धागे सगळयांना by default दिसतील अस काही करता येईल का \nहो मलाही दिसत नाहीत.\nहो मलाही दिसत नाहीत.\nचांगले काहीतरी वाचायला मिळेल अशी अपेक्षा.\nछान उपक्रम आहेत यंदा\nछान उपक्रम आहेत यंदा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/lifeline-needs-strict-action/", "date_download": "2020-09-26T03:19:53Z", "digest": "sha1:P6LWO5NOS6ZCRWVYQSXOWUPZO644WHHN", "length": 20817, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "लाइफलाइनवर कडक कारवाई हवी... - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत भारत व अमेरिकेतील कोविड योद्ध्यांचा सन्मान\nराज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे मातृशक्तीचा सन्मान\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा…\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली…\nलाइफलाइनवर कडक कारवाई हवी…\nकरोना (Corona) रुग्णांची वाढती संख्या आणि प्रशासनाला रोगाला आळा घालण्यात येत असले अपयश, या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्वोच्च पातळीवरून लक्ष घालण्यात आलंय. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेऊन यंत्रणेची झाडाझडती घेतलीय. त्याबरोबरच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही पश्चिम महाराष्ट्रातल्या करोना स्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतलीय.\nसरकारी प्रसिदिधीपत्रकानुसार मास्क घालणं आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलंय आणि घरबाहेर पडताना नागरिक मास्क वापरतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना जावडेकर यांनी केल्याचे सरकारी प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलंय. खासदार शरद पवार यांनी सूटना केलीय आणि निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा करोनाची साथ नियंत्रणात आणायला आणि विविध उपाययोजनांसाठी करून घ्यायला हवा, अशी सूचना केलीय.\nसरकारी प्रसिद्धीपत्रक नजरेखालून घातले तर या आणि अशा सर्व बैठकांमधून अधिकाऱ्यांना काही मार्गदर्शन खरोखर होते का, हा मिलियन डॉलर प्रश्न ठरावा. दुसरीकडे पुण्यात आठशे खाटांच्या जम्बो कोविड सेंटरच्या उद्घाटनानंतर तेथे झालेले एका पत्रकाराची हेळसांड, त्यातून त्याचा उद्भवलेला मृत्यू, त्यावर माध्यमांनी उठवलेला सामूहिक आवाज यातून अखेर हे जम्बो कोविड सेंटर लाइफलाइन नावाच्या एजन्सीकडून काढून घेण्यात आलंय आणि प्रशासनानं त्याचा ताबा घेतलाय.\nविभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या जम्बो सेंटरवर एका दिवसात तज्ज्ञ डॉक्टरस्सह निमवैद्यकीय कर्मचारी, कार्यालय कर्मचारी यासह दोनशे जणांची टीम नेमली आहे. लाइफलाइन ही एजन्सी जम्बो कोविड सेंटर चालवण्यासाठी सक्षम नसल्याचं आढळून आलंय. त्यामुळे जम्बो सेंटरच्या उद्घाटनानंतर रुग्णांचे हाल झाल्याचेही लक्षात आले आहे. याच कोविड सेंटरमधे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू ओढवला होता.\nवास्तविक, पत्रकाराचा मृत्यू ओढवल्यानंतर त्याबद्दल मोठ्या प्रमाणावर जनआक्रोश बघायला मिळाला. त्यामुळे किमान या जम्बो सेंटरचा ताबा संबंधित लाइफलाईन एजन्सीकडून प्रशासनानं घेतला आहे. पण त्या काळात उपचाराला सामोरे जावे लागले, त्या सर्व रुग्णांच्या नातेवाइकांना, रुग्णांना ज्या यातनांना सामोरे जावे, यालागले त्याची भरपाई प्रशासन किंवा सरकार कसं करणार आहे, हा प्रश्न अनत्तरितच आहे.\nपत्रकार रायकर यांना न्याय मिळाला नाही तर आठ दिवसांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा पुणे श्रमिक पत्रकार संघानं दिला आहे. आता लाइफलाइन एजन्सीला दूर करण्यात आलं आहे. पण त्यांच्यावर किंवा पत्रकार रायकर यांच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण हा प्रश्न इतर अनेक प्रकरणांसारखाच गूढ ठरू शकेल कारण कोणतेही प्रकरण धसास लावण्याचा आपला इतिहास नाही. त्यामुळे किमान पांडुरंग यांचा मृत्यू कारणी लागून आरोग्य व्यवस्शेत जम्बो कोविड सेंटरच्या कामात फरक पडेल, हे डोळ्यात तेल घालून पत्रकारांनी बघायला हवं. तसं झालं तरच पत्रकार रायकर यांच्या मृत्यूची काही प्रमाणात का होईना भरपाई होऊ शकेल.\nजमबो सेंटरचा ताबा प्रशासनाने घेतला आहे पण लाफलाइन एजन्सी कोणाची आहे, त्यांना निविदा भरल्यानंतर जम्बो सेंटर चालवण्याचे काम देण्यात आले पण ते सक्षम नसल्याचे आता सिद्ध झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध काय कारवाई केली जाणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्याचा फॉलो अपही सर्व पत्रकारांनी करायला हवा आणि या एजन्सीच्या चालकांना कडक शिक्षा होईल, हेही बघायला हवे.\nDisclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleआदर्श शिक्षक पुरस्कार; नारायण मंगलाराम आणि संगीता सोमाणी मानकरी\nNext articleकोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा\nराज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत भारत व अमेरिकेतील कोविड योद्ध्यांचा सन्मान\nराज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे मातृशक्तीचा सन्मान\nIPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला\nधोनी एकचं मन कितीदा जिंकणार आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच\nगावस्कर यांनी अनुष्काला दिलेलं उत्तर, म्हणाले- काहीही चुकीचं बोललं नाही, माझी टिप्पणी विराटच्या प्रैक्टिसवर होती\nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार\nअजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची...\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nवैज्ञानिकांनी शोधला कोरोना विषाणूचा नाश करणारा प्रतिपिंड\nज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते \nकृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका\nमंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा\nआता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा...\nकुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला...\nचीनने शिनजियांगमध्ये तीन वर्षात पाडल्या हजारो मशिदी\nपाकिस्तान आम्हाला जनावरांप्रमाणे वागवतो – सज्जाद राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://amarspeaks.com/manat-khup-asal-tari/", "date_download": "2020-09-26T03:28:28Z", "digest": "sha1:EBVAEBO7BDYKW3ET2GOGWD6E667BOP4C", "length": 2801, "nlines": 52, "source_domain": "amarspeaks.com", "title": "मनात खूप काही असलं तरी…. – Amar Dhembare", "raw_content": "\nमनात खूप काही असलं तरी….\nमनात खूप काही असलं तरी सारच बोलता येत नाही…कारण बऱ्याच वेळा सर्वच भावना व्यक्त करण्याच्या नादात समोरच्याचं मन दुखावलं जाऊ शकत…\nएक मात्र खर कोणी आपलं मन दुखावलं तरी चालेल….\nआपण मात्र पुरेपूर प्रयत्न करायचा समोरच्याच मन न दुखावण्याचा….\nखरतर कोणामुळे आपल मन दुखवल जातंय तर जाऊदेत…परंतु आपल्यामुळे कोणाच मन दुखावता कामा नये…\nप्रत्येकाला मनाप्रमाणे जगण्याचा हक्क आहेच…. आपण तो कधीही हिरावू नये…ज्यावेळी तुमचा अधिकार हिरावला जातो त्यावेळीच तुम्हाला त्याची जाणीव होते…\nमनात वादळे सामावून हसण्याची कला शिकायलाच हवी…. म्हणजेच, आतून कितीही ओलावा असला तरी वरून दगडाप्रमाणे राहता यायला हव…आणि समजा तेही नाहीच जमलं, तर शांतपणे निघून जाताही यायला हवं….\nबहुधा अस असायला हव की नाही हे माहित नाही…. परंतु अनुभव तर हेच सांगतो…\nPrevious Post कही पे महकता हुआ….\nख्वाब टूट गए तो,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dailykesari.com/2020/09/15/in-pune-four-out-of-ten-people-tested-positive/", "date_download": "2020-09-26T01:22:57Z", "digest": "sha1:57KPNJT3HVPS6MOWJZQKWGGNM2HQZHPB", "length": 11073, "nlines": 173, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "पुण्यात चाचण्यांमध्ये दहा व्यक्तींमागे चारजण पॉझिटिव्ह - Kesari", "raw_content": "\nघर पुणे पुण्यात चाचण्यांमध्ये दहा व्यक्तींमागे चारजण पॉझिटिव्ह\nपुण्यात चाचण्यांमध्ये दहा व्यक्तींमागे चारजण पॉझिटिव्ह\nपुणे : पुण्यात बाधितांची संख्या आणि परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती टक्केवारी प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. गेल्या चोवीस तासांत करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 39 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.\nसुमारे 2 हजार 807 जणांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी अकराशे नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. दरम्यान, काल 1 हजार 456 जण बरे होऊन घरी परतले; तर 60 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यातील 21 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.\nपुण्यात अत्यवस्थ रुग्ण आणि मृत्यूंची संख्या कमी करणे हे प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 757 वर पोहोचली आहे.\nशहर परिसरात विविध रुग्णालयांत 17 हजार 393 रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 928 रुग्ण अत्यवस्थ, तर 479 रुग्ण व्हेंटिलेटरवर आणि 449 रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. बळींची संख्या 2 हजार 832 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1 लाख 532 जणांनी कोरोनावर मात केली आहे.\nपूर्वीचा लेखविना वॉरंट अटकेसाठी विभाग\nपुढील लेखराष्ट्रपती, पंतप्रधानांसह उच्चपदस्थ व्यक्तींवर चीनची पाळत\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nउदयनराजेंनी ओबीसींना न्याय मिळवून द्यावा : हेमंत पाटील\nकाँग्रेस गावपातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार\nमहापालिकेचे कारभारी रंगले मेजवानीत\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nबिहार निवडणूक : तीन टप्प्यांत होणार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nबिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली.\nनवनाथ गोरे यांचा खडतर प्रवास होणार सुकर\nभारती विद्यापीठात मिळणार नोकरी\nलोकप्रिय गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले.\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलचा पहिल्याच षटकात पराक्रम\nअतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात\nइशांत शर्मा आणखी दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/desa-koda+Phero+dvipasamuha.php?from=in", "date_download": "2020-09-26T02:31:03Z", "digest": "sha1:OLH447BBC6PSPM6B6TJXI5NAAFQPIFWT", "length": 9887, "nlines": 24, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड फेरो द्वीपसमूह", "raw_content": "\nदेश कोड फेरो द्वीपसमूह\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेश कोड फेरो द्वीपसमूह\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 05541 1995541 देश कोडसह +298 5541 1995541 बनतो.\nदेश कोड फेरो द्वीपसमूह\nफेरो द्वीपसमूह येथे कॉल करण्यासाठी देश कोड. (Phero dvipasamuha): +298\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी फेरो द्वीपसमूह या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00298.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक फेरो द्वीपसमूह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Traralgon++Bairnsdale+au.php", "date_download": "2020-09-26T01:15:08Z", "digest": "sha1:EMLNHNM5T2NIXXYMEVJWQ6MBM33EKIYW", "length": 3598, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Traralgon, Bairnsdale", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0351 हा क्रमांक Traralgon, Bairnsdale क्षेत्र कोड आहे व Traralgon, Bairnsdale ऑस्ट्रेलियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रेलियाबाहेर असाल व आपल्याला Traralgon, Bairnsdaleमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया देश कोड +61 (0061) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Traralgon, Bairnsdaleमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +61 351 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनTraralgon, Bairnsdaleमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +61 351 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0061 351 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/throwfailuer", "date_download": "2020-09-26T03:31:58Z", "digest": "sha1:364Y4ENRA6X7DXOBGLXIF7LLPZOTFOH5", "length": 17458, "nlines": 185, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "अपयशाचे घोंगडे फेकून द्या कारण \"यश\" फक्त तुमची वाट पाहते आहे! – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nअपयशाचे घोंगडे फेकून द्या कारण \"यश\" फक्त तुमची वाट पाहते आहे\nममताचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. सुमित, तिचा नवरा, रात्री उशिरा पार डुलत डुलत घरी आला. व्यापारी, सरकार व यंत्रणेविषयी तो शिवराळ भाषेत बोलत होता. ममताने त्याला धरायला हात पुढे केला तेव्हा तो हातही त्याने झटकून टाकला. तोडातल्या तोंंडात काही पुटपुटत, अगोदरच तयार करून ठेवलेल्या बिझान्यात तो झोपी गेला. त्याला घरी सोडायला आलेली माणसे देखील डोलतच होती. स्वतच्या मजेसाठी हि माणसे इतरांना फूस लावतात, यांच्या कडून कसलीही अपेक्षा करणे चुकीचे असते, हे तिला चांगलेच ठावूक होते. ममता समोर त्यांची फारशी बिशाद नव्हती. तिच्या नजरेत नजर मिळवायची कुणाचीही हिम्मत नसल्याने माना खाली घालून त्यांनी पळ काढला. आता त्याचे, सुमितचे, डोके व शरीर ठिकाणावर नसतांना त्याला जेवणाविषयी बोलायचे तिने टाळले. \"एव्हडा उमदा माणूस एक रात्र भुकेला झोपला तरी काय बिघडत नाही आणि कदाचीत पिता पिता त्याने काही खाल्लेलंच असेल.\" तिने मनोमनी विचार केला.\nवीज गेल्यावर चार तास प्रकाशमान रहाणारा बल्ब\nसकाळी ममताला जाग आल्यावर कालचा विषय काढायचा नाही हे तिने अगोदरच ठरवले. निरुपयोगी विषयांना महत्व दिल्याने तो तिच्यापासून दूर जाईल हे तिला चांगलेच माहित होते. सुमित ने शेतावर शेडनेट, तळे अशी कामे हाती घेतल्याने त्याचा हात थोडा तंगीत होता. अवकाळी वातावरणामुळे उत्पन्न हवे तसे नव्हते. परिस्थिती बदलेल याची त्याला खात्री होती पण प्रत्येक प्रयत्नवादि माणसाला थोडीतरी अपयशाची भीती असतेच त्याच्या मनातील \"अपयशाची भीती\" काही बांडगुळांनी ओळखली होती. तो धागा पकडून हि मांडळी त्याला सायंकाळी घेरत. मद्यपानाचा बेत आखत, गप्पा मारत आणि मनाला बळ देण्याऐवजी नकारात्मक विचार मांडत.\nममताचे एकच लक्ष होते \"इतरांनी टाकलेले, नवऱ्याच्या डोक्यातले, अपयशाचे घोंगडे काढून फेकायचे. यापूर्वी त्याने अपार कष्ट व जिद्दीने कसा संसाराचा गाडा व्यवस्थित ठेवला आहे एव्हडे पटवून द्यायचे. संकटकाळी हिम्मत टिकवली तर भविष्यात \"यश\" त्याच्या सारख्या हुन्नरी माणसांचीच वाट पहात असते हे त्याच्या मनात ठासून द्यायचे\". ती मनाची पक्की होती\nसुमितला जाग आली तेव्हा सूर्यप्रकाश पूर्ण प्रखरतेने पसरलेला होता. रात्रीच्या नशा-पाण्यामुळे त्याचे डोके दुखत होते. मनातील अपयशाची धग अजून कमी झालेली नव्हती. तो खूप नशेबाज नव्हता म्हणूनच कि काय त्याला ममताच्या सामोरे जायची हिम्मत होत नव्हती. तो उगाचच बिछान्यात, घोंगडे ओढून, तोंड लपवत, पडला होता. आता परत झोप लागणार नव्हतीच त्यामुळे तो सारखी चूळबुळ करीत होता.\nममताने हि गोष्ट ताडली. स्वत:च्या हाताने बनवलेल्या व सुमितला आवडणारया चहाचे दोन कप घेवून त्याच्या पुढ्यात येवून बसली. कपाच्या आवाजाने, चहा च्या सुगंधाने आणि तिच्या हातातल्या बांगड्यांच्या किणकिणीतुन सुमितला जे समजायचे ते तो समजला. ममता आपल्याला हतबल होऊच देणार नाही, आपला आत्मविश्वास डगमगू देणार नाही, हे त्याला चांगलेच ठावूक होते. तो उठून बसला. चहाच्या झुरक्या घेता घेता, दोघी मनातल्या मनात हसत होते. लग्नाला एव्हडी वर्ष होऊनही \"ममताच्या टपोऱ्या डोळ्यांचे व हसऱ्या चेहेऱ्याचे\" त्याचे वेड कसूभरही कमी झालेले नव्हते. \"असे काय पहाताय माझ्याकडे\" ती लाजतच म्हणाली. तो गालातल्या गालात हसला. \"तुमच्या आवडीच्या आळूच्या वड्या तळल्या आहेत\" ती लाजतच म्हणाली. तो गालातल्या गालात हसला. \"तुमच्या आवडीच्या आळूच्या वड्या तळल्या आहेत\" कपबशा आवरत ती एव्हढेच बोलली आणि स्वयंपाकखोलीकडे निघाली. सुमितने उठता उठता बिछान्यावरचे घोंगडे \"गुंढाळून\" ठेवले व अंघोळीसाठी स्नान गृहात गेला कारण त्याला लगबगीने मार्गस्थ व्हायचे होते...यशाच्या वाटेवर\n\"दुष्काळातील संधी: हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती\" हा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग २ नुकताच एक लेख वाचला. वाढत्या लठ्ठ लोकांच्या संख्येला...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग ३ रा \"भित्यापाठी ब्रम्हराक्षस\", आजकालच अन्नधान्य काही बर नाही,...\nसुतकृमींचे नियंत्रण करण्यापेक्षा प्रतिबंध करणे अधिक फायदेशीर\nसुतकृमींना (निमॅटोड) नेहमिच्या जीवनात जंतु असे संबोधले जाते. परपोशी असल्याने,...\nएकात्मिक नियंत्रणाकडे वळायचे सहा टप्पे\nपिक व्यवस्थापनाच्या बाबतीत अनेक शेतकरी बांधवांच्या मनात पराकोटीचा गोंधळ दिसून...\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nव्यापारी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठा चढ-उतार होत असतो. अशा आर्थिक...\nPositive विचाराने चालत ममता नक्कीच नवरयाला यातून लवकर बाहेर काढेल.खूपच छान लिहलिय कथा.\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saamana.com/shirdi-sai-biography-goes-missing-pathri-proven-facts/", "date_download": "2020-09-26T01:35:46Z", "digest": "sha1:BUTKFKBHNHICYOWV42C6UQLLYBF5LLHS", "length": 15242, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिर्डी संस्थानचा ग्रंथच गायब; पाथरीवासीयांनी दिले 29 पुरावे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण…\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nजीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला; कॅगचे गंभीर ताशेरे, केंद्राकडून राज्यांची 47 हजार…\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nनाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..\n लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ…\nसंशोधकांचा निष्कर्ष, कोरोनाची दुसरी लाट आणखी भयंकर\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nसुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया\nIPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट…\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nचिनी हेरगिरी, जशास तसे वागा\nवेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट\nठसा – आशालता वाबगावकर\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nकिचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खातायआरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय…\nHealth tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10…\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nशिर्डी संस्थानचा ग्रंथच गायब; पाथरीवासीयांनी दिले 29 पुरावे\nसाईबाबा जन्मभूमी पाथरी हेच असल्याचे 29 पुरावे आज पाथरी साई संस्थानच्या विश्वस्तांनी जाहीर केले. विशेष म्हणजे साईबाबांचा जन्म पाथरी येथे झाला होता असे शिर्डी संस्थानने प्रकाशित केलेल्या ‘श्री साई चरित’ या ग्रंथातच म्हटलेले होते, मात्र आता हा ग्रंथच गायब झाल्याचे सांगितले जात आहे.\nपाथरी येथील संस्थानच्या विश्वस्तांनी साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी असल्याचे 29 संदर्भ पुरावे जाहीर केले. त्यानुसार विविध संशोधन ग्रंथांत 29 ठिकाणी साईबाबांचा जन्म पाथरी येथे झाल्याचा संदर्भ आढळतो.\nश्री साई चरित ‘द वंडरफुल लाइफ ऍण्ड टीचिंग्स ऑफ श्री साईबाबा’ या इंग्रजी ग्रंथाची हिंदी आवृत्ती साई संस्थानने 1994 मध्ये प्रकाशित केली आहे, मात्र सध्या हा ग्रंथ शिर्डी संस्थानमधून गायब करण्यात आल्याचे सांगितले जाते. हा मूळ ग्रंथ गोविंदराव रघुनाथ दाभोळकर (हेमाडपंत) यांनी लिहिला असून त्याचा हिंदी अनुवाद शिवराम ठाकूर यांनी केला आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण पूर्ण\nजीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला; कॅगचे गंभीर ताशेरे, केंद्राकडून राज्यांची 47 हजार 272 कोटींची फसवणूक\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\nकोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण...\nजीएसटीचा निधी बेकायदेशीररित्या वापरला; कॅगचे गंभीर ताशेरे, केंद्राकडून राज्यांची 47 हजार...\nराज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण\nफ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर\nसामना अग्रलेख – सरकार ऐकत का नाही\nराणा कपूरच्या लंडन येथील घरावर ईडीची कारवाई\nकोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल\nकेंद्राच्या कृषीविधेयकांच्या अंमलबजावणीस राज्याचा विरोध\nसाथिया तुने क्या किया\nया बातम्या अवश्य वाचा\nहोमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा\nगावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…\nसुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nअनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dailykesari.com/2020/09/15/pune-trak-tax/", "date_download": "2020-09-26T02:02:11Z", "digest": "sha1:ERNKC4LOZQZRTCRNMWDWAKDHOSP2BDF3", "length": 10997, "nlines": 167, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "वाहनांच्या वार्षिक करात 50 टक्के सवलत - Kesari", "raw_content": "\nघर केसरी रिपोर्टर वाहनांच्या वार्षिक करात 50 टक्के सवलत\nवाहनांच्या वार्षिक करात 50 टक्के सवलत\nपुणे : लॉकडाऊनमुळे अर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील प्रवासी व मालवाहू वाहनधारकांना वार्षिंक करात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मालवाहू, प्रवासी, शालेय वाहतूक करणार्‍या वाहनांना याचा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे वाहन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने मार्चअखेरपासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात प्रवासी वाहतूक पुर्णतः बंद होती. तर, केवळ अत्यावश्यक कारणासाठी मालवाहतूक सुरु होती. व्यवसाय ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठा तोटा सहन करावा लागला. यामुळे परिवहन विभागाने वाहनधारकांना वाहन करात सुट द्यावी, अशी मागणी वाहन संघटनांनी केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वाहतूकदारांना दिलासा दिला आहे. 50 टक्के वार्षिक कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या वाहन मालकाने मागील वर्षाचा वार्षिक कर 31 मार्च पुर्वी भरणा केला असेल, अशाच वाहनधारकांना 50 टक्के करमाफीचा लाभ घेता येणार आहे, ्असे आदेशात म्हटले आहे.\nपूर्वीचा लेखशहरात पावसाची विश्रांती कायम\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nबिहार निवडणूक : तीन टप्प्यांत होणार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nबिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली.\nनवनाथ गोरे यांचा खडतर प्रवास होणार सुकर\nभारती विद्यापीठात मिळणार नोकरी\nलोकप्रिय गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले.\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलचा पहिल्याच षटकात पराक्रम\nअतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात\nइशांत शर्मा आणखी दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t4736/", "date_download": "2020-09-26T01:36:34Z", "digest": "sha1:JOAMP22LQFIHULI63M77JERTACQKEYCQ", "length": 4018, "nlines": 97, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-कशी फुलेल आपली प्रित?", "raw_content": "\nकशी फुलेल आपली प्रित\nAuthor Topic: कशी फुलेल आपली प्रित\nकशी फुलेल आपली प्रित\nखुप् दुःखी होतो आपण\nअसही ठरवल होत आपण\nअश्रूंना मोकळी वाट करुन\nखुप रडलो होतो आपण\nरडायच नाही असे ठरवत\nउगाचच खोट खोट हसलो होतो\nनात टिकवायच ठरवलय आपण\nमाझाच राहशील का सख्या\nपण मध्येच येते भिंत\nदुसरयाशी लग्न करावे लागेल\nमाझ्या सव॔स्व असणारया तुला\nदुःखवू शकत नाही मी तुला\nम्हणून मरणाचा विचार करेल\nपण् तुझा विचार करता क्षणी\nजगण्यापेक्षा रोज तिळ तिळ मरेन\nतरीही असेल ओढ मनात\nवाट पाहत असतील डोळे\nमाझ्या प्रेमाची हार की जित\nसांग सख्या खरच सांग\nकशी फुलेल आपली प्रित\nकशी फुलेल आपली प्रित\nकशी फुलेल आपली प्रित\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/coronavirus-vidarbha/akola-even-lockdown-citizens-refused-shivbhojan-despite-low-price-sales-fell", "date_download": "2020-09-26T01:27:28Z", "digest": "sha1:ECPARNV55X3C4MWC6AQ2VHQLCW6YKM5B", "length": 16768, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "लॉकडाउनमध्येही नागरिकांनी नाकारले शिवभोजन, किंमत कमी असूनही घटली विक्री | eSakal", "raw_content": "\nलॉकडाउनमध्येही नागरिकांनी नाकारले शिवभोजन, किंमत कमी असूनही घटली विक्री\nशिवभोजन पॅकेट्सकडे गरजूच पाठ फिरवत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे निश्‍चित उद्दिष्टापैकी कमीच थाळ्यांची विक्री होत आहे. परिणामी प्रतिदिवशी ८००-९०० थाळ्यांची विक्री होत नसल्याचे दिसून येत आहे.\nअकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन कामकाजावरच अवलंबून असणाऱ्यांचा रोजगार बुडत आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच अनेकांना जेवण मिळण्यात अडचणी येत आहे, अशा मंडळींना सहज जेवळ उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने जिल्ह्यासाठी शिवभोजन थाळींची (पॅकेट्स) संख्या तीन हजार केली होती.\nपरंतु शिवभोजन पॅकेट्सकडे गरजूच पाठ फिरवत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे निश्‍चित उद्दिष्टापैकी कमीच थाळ्यांची विक्री होत आहे. परिणामी प्रतिदिवशी ८००-९०० थाळ्यांची विक्री होत नसल्याचे दिसून येत आहे.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nराज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होण्यायेवजी वाढत जात आहेत. संसर्गातून होणाऱ्या या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी शासन स्तरावरुन विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. परंतु या काळात पोटावर हात असलेल्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यासोबतच बाहेरगावावरुन आलेल्या नागरिकांना सुद्धा उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाने गरिब नागरिकांसाठी सुरु केलेल्या शिवभोजन थाळींचे लक्षांक प्रतिदिवशी ६०० वरुन तीन हजार केले आहे. वाढलेला इष्टांक पाहता महानगरासह तालुक्यांत नव्याने शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यासोबतच थाळीची किंमत सुद्धा पाच रुपये करण्यात आली आहे. त्यानंतर सुद्धा गरजू नागरिक शिवभोजनकडे पाठ फिरवत आहेत.\nविक्री केंद्रांवर शुक्रवारी झालेली विक्री\nहिरो होंडा शोरूम समोर बार्शीटाकळी (५१ थाळी), पोलिस स्टेशन समोर बार्शीटकाळी (६६ थाळी), मंगरूळपीर रोड खोलेश्‍वर रोड बार्शीटाकळी (८४ थाळी), शासकीय विश्रामगृहासमोर तेल्हारा (२६० थाळी), बस स्थानकाजवळ अकोट (१८१ थाळी), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला (८५९ थाळी), कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला (४२१ थाळी), लेडी हार्डींग अकोला (७० थाळी), बस स्थानकाजवळ बाळापूर (१४० थाळी), जुने बस स्थानकाजवळ पातूर (२२ थाळी) या ठिकाणी शिवभोजन थाळींची विक्री करण्यात येत आहे.\nकोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून प्रतिदिवस तीन हजार शिवभोजन थाळींची (पॅकेट्स) विक्री करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. परंतु सदर विक्री एकाच ठिकाणी न करता फिरत्या स्वरुपात करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्याचा किंचीत परिणाम थाळी विक्रीवर होत आहे.\n- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजागतिक आरोग्य संघटनेचा आयोग चीनवर टीका करण्याची शक्यता कमीच\nन्यूयॉर्क - कोरोनाच्या जागतिक साथीप्रकरणी चौकशीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) स्थापन केलेला स्वतंत्र आयोग अद्ययावत माहितीचे पहिले सादरीकरण...\nभ्रष्टाचारामुळे दरवर्षी अब्जावधींचे नुकसान\nन्यूयॉर्क - करचुकवेगिरी, भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहारांमुळे सर्वच देशांचे ५०० अब्ज डॉलरचे नुकसान होत असून हा पैसा जगातील गरीबांसाठी वापरता...\nUN महासभेत भारताने पाकला दाखवली जागा; इमरान खान यांच्या भाषणावेळी केलं वॉकआऊट\nन्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रसंघाच्या 75 वे अधिवेश न सुरु आहे. यामध्ये पाककडून सातत्याने काश्मीर मुद्द्यावरून भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात...\nरत्नागिरीकरांना दिलासा ; बाधितांच्या तुलनेत तिप्पट रुग्ण कोरोनामुक्त\nरत्नागिरी - सात दिवसानंतर जिल्ह्यात चोविस तासात कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार झाला आहे. 116 बाधित सापडल्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा सात हजाराच्या...\nप्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय; अतिरिक्त सहा गाड्या धावणार\nभुसावळ ः रेल्वेत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालविणार आहे. या विशेष गाड्या...\nपोलिस आयुक्‍तांचे नवे आदेश नियम मोडणारे दुकान सात ते चौदा दिवस बंद\nसोलापूर : शहरातील कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातून शहरातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोके वर काढत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/seven-fishermen-survive-ratnagiri-boat-destroyed-sea-342864", "date_download": "2020-09-26T02:33:46Z", "digest": "sha1:UEUMOZRZLJO42H6W6ZVIYLDKXRWH5BJT", "length": 14610, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "काळ आला होता पण वेळ आली नव्हती ; नौका बुडाली मात्र सातजण वाचले | eSakal", "raw_content": "\nकाळ आला होता पण वेळ आली नव्हती ; नौका बुडाली मात्र सातजण वाचले\nवादळामुळे भरकटू लागल्यावर या बोटीवरील 7 खलाशांना इतर बोटींवरील खलाशांनी आपल्या बोटीवर घेऊन त्यांचा जीव वाचवला.\nदाभोळ : आज पहाटे 3 ते 3.30 वाजण्याच्या सुमारास सुटलेल्या वाऱ्यामुळे आणि अचानक आलेल्या वादळी पावसामुळे दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात उभी असलेल्या 'परमेश्वरी' या मासेमारी बोटीच्या समुद्रात सोडलेल्या नांगराची दोरी तुटून ही बोट वादळात भरकटली. नांगर लागल्याने बोटीला भगदाड पडले आणि पाणी शिरून या बोटीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.\nहेही वाचा - पार्थिव दफन प्रकरणाचा चेंडू प्रांताधिकाऱ्यांच्या कोर्टात, लवकरच निर्णय शक्य\nया बाबत माहिती देताना पाजपंढरी येथील मच्छीमार नेते पांडुरंग पावसे म्हणाले की, महेश रघुवीर यांच्या मालकीची 6 सिलेंडर असलेली परमेश्वरी ही मासेमारी बोट आज पहाटे मच्छीमारीसाठी समुद्रात जाणार होती. त्यासाठी बोटीवर डिझेल, बर्फ, पाणी, अन्नधान्य भरून ठेवण्यात आले होते. सर्व तयारी करून पहाटे मासेमारीला जायचे म्हणून बोटीवरील 7 खलाशी झोपी गेले. पहाटे 3 ते 3.30 वाजण्याच्या दरम्यान सोसाट्याचा वारा सुटला आणि वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यात परमेश्वरी बोटीचा नांगराला बांधलेला दोर तूटला आणि ही बोट वाऱ्याच्या वेगामुळे भरकटली. यातच या बोटीला पाण्यात असलेला नांगर लागल्यामुळे बोटीला भगदाड पडले व बोटीत पाणी शिरले. पाणी शिरल्यामुळे बोटीतील सर्व साधनसामग्री भिजून गेली आहे. या बोटीची किंमत 50 लाख रुपये आहे.\nहेही वाचा - ब्रिटीशकालीन काम अन् आताच्या कामाची होतेय तुलना, कारण...\nयापूर्वी निसर्ग वादळ आले तेव्हा प्रशासनाने त्याची कल्पना मच्छीमार बांधवाना दिली होती. मात्र कालच्या वादळाची माहिती अगोदर मिळाली नाही. त्यातच हर्णे येथील बंदर सुरक्षित नसल्याने बोटी उभ्या करण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने केवळ नशिबावर विश्वास ठेवून मासेमारी करावी लागत आहे. दरम्यान ही मासेमारी बोट वादळामुळे भरकटू लागल्यावर या बोटीवरील 7 खलाशांना इतर बोटींवरील खलाशांनी आपल्या बोटीवर घेऊन त्यांचा जीव वाचवला.\nसंपादन - स्नेहल कदम\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमच्छीमारांना दिलासा ; वादळामुळे थांबलेली मासेमारी झाली सुरू\nहर्णे - गेल्या दीड महिन्यापासून वारंवार येणाऱ्या वादळांमुळे मासेमारीला ब्रेक लागला होता. परंतु, कालपासून(ता.२४) वातावरण निवळल्यामुळे आंजर्ले खाडीत...\nसाखरीनाटे बंदरातून तारली, बांगडा गायब ; शिंगाळा झाला कमी\nराजापूर (रत्नागिरी) : निर्यातीतून वर्षभरामध्ये लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल करणारा तारली मासा तालुक्‍यातील साखरीनाटे बंदरासह रत्नागिरी बंदर...\nवारंवार येणाऱ्या वादळांमुळे मच्छीमारांची फरफट\nहर्णे - पुन्हा एकदा २१ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरपर्यंत वादळामूळे सतर्कतेचा संदेश मिळाल्याने हर्णे बंदरातील नौकांनी आंजर्ले, जयगड, दाभोळ(रत्नागिरी),...\nओव्हरफ्लोमुळे मत्स्यबीज जातेय वाहून, मत्स्य व्यावसायिक चिंतातूर \nटेंभुर्णी (जालना) : जाफराबाद तालुक्यात असलेल्या अकोला देव मध्यम प्रकल्पामध्ये येथील दयानंद बाबा मच्छीमार संस्थेच्या वतीने मत्स्यबीज सोडण्यात आले...\nपंचवीस फूट पाण्यात पाऊणतास शोध घेऊन झाला खुलासा; ग्रामस्थांमध्ये चर्चा\nनाशिक / मालेगाव : अग्निशामक दलाचा जवान शकील अहमद ऊर्फ तैराक याने वीस ते पंचवीस फूट पाण्यात तब्बल पाऊणतास शोध घेऊन हाती जे सापडले त्याने...\nहिप्परगा तलाव पर्यटकांना घालतोय साद ; देशी व विदेशी पक्षांचा अधिवास\nसोलापूर ः शहरालगत असलेला हिप्परगा तलाव देशभरातील पर्यटक व पक्षी निरीक्षकांसाठी महत्वाचे केंद्र बनत आहे. देशभरातील पक्षी निरीक्षकांनी या ठिकाणी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/exams-first-week-october-students-home-exams-exam-decision-tomorrow-340327", "date_download": "2020-09-26T02:52:01Z", "digest": "sha1:FHK4TGNVUO7X6B3C7HKJSY3I2DOWN7BZ", "length": 14974, "nlines": 257, "source_domain": "www.esakal.com", "title": "ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा; विद्यार्थ्यांची घरातूनच परीक्षा? : परीक्षेचा निर्णय उद्या | eSakal", "raw_content": "\nऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा; विद्यार्थ्यांची घरातूनच परीक्षा : परीक्षेचा निर्णय उद्या\nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता यावी, अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत राज्यातील कुलगुरूंचेही एकमत झाले आहे. त्यानुसार परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात येणार आहे.\nमुंबई : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता यावी, अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत राज्यातील कुलगुरूंचेही एकमत झाले आहे. त्यानुसार परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात येणार आहे. या परीक्षा ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येतील. परीक्षा कोणत्या पद्धतीने होतील, याचा निर्णय बुधवारी (ता.2) जाहीर होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.\nपालघर साधू हत्या प्रकरणी, ठाकरे सरकारची मोठी कारवाई; 17 पोलिस अधिकाऱ्यांना दणका\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरू सोबत झूमच्या माध्यमातून ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत परीक्षा किती तारखेपर्यंत घेऊ शकतो, परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन, परीक्षेची तारीख किती असावी, निकालाची तारीख किती असावी, परीक्षा पद्धत कशी असेल, अशा विविध विषयांवर कुलगुरू यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. अमरावती व यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने परीक्षा सुरू करून निकालाची वेळ नोव्हेंबरपर्यंत असावी, अशी भूमिका मांडली आहे. तर उर्वरित 11 विद्यापीठांनी परीक्षा घेण्यासाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. विद्यापीठांना वेळापत्रक निश्‍चित करण्यासाठी आणखी एक दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर परीक्षा पद्धतीसंदर्भात गठीत केलेल्या समितीची बैठक बुधवारी (ता.2) सकाळी होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक घेउन परीक्षे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. हा निर्णय युजीसीला कळविण्यात येणार असल्याचे, सामंत म्हणाले.\nविद्यार्थांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी काळजी करू नये. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. ऑक्‍टोबर महिन्यात युजीसीच्या सूचनांनुसार सर्व विद्यापीठ परीक्षेचे आयोजन करून निकाल जाहीर करतील असेही सामंत यांनी सांगितले.\nअतिधोकादायक इमारतींबाबत भिवंडी महापालिकेचा 'मोठा' निर्णय; नागरिकांना केले महत्त्वाचे आवाहन...\n31 ऑक्‍टोबरपर्यंत विद्यापीठांनी अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात निकालासह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या विद्यापीठांना स्थानिक पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा तांत्रिक अडचणी आल्यास त्यांनी आपली निकालाची प्रक्रिया जास्तीत जास्त 10 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावी अशा सूचना सामंत यांनी यावेळी केल्या.\n- 31 ऑक्‍टोबर 2020 पर्यंत परीक्षा आणि निकालासह संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार\n- अडचणी असणाऱ्या विद्यापीठांना 10 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार\n- राज्यातील 7 लाख 92 हजार 385 विद्यार्थी देणार परीक्षा\n- परीक्षेचा पर्याय निवडण्याचे अधिकार कुलगुरूंना\nएटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णयही लवकरच\nएटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता विधी व न्याय विभाग आणि ऍडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. यानंतर या परीक्षांचा निर्णयही लवकरच जाहीर करण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-how-cut-throat-sweet-words-angry-reaction-affected-farmers-nanded-news-339877", "date_download": "2020-09-26T01:50:21Z", "digest": "sha1:XDQTF5RQTK5GWS4DYNNKRODTBV3P2OUZ", "length": 17566, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "नांदेड : कसा गोड बोलून गळा कापियला, मावेजासाठी बाधीत शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया | eSakal", "raw_content": "\nनांदेड : कसा गोड बोलून गळा कापियला, मावेजासाठी बाधीत शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया\nवळण रस्त्यासाठी ओलिताखील जमिनीसाठी चौपट मावेजा तर एकाच गटातील रेल्वेसाठी मात्र कोरडवाहूसाठी मावेजा देण्यात आल्यामुळे शेतक-यातून संताप व्यक्त केला जात आहे\nअर्धापूर (जिल्हा नांदेड): अर्धापूरातील एकाच शिवारातील वळण रस्त्यासाठी ओलिताखील जमिनीसाठी चौपट मावेजा तर एकाच गटातील रेल्वेसाठी मात्र कोरडवाहूसाठी मावेजा देण्यात आल्यामुळे शेतक-यातून संताप व्यक्त केला जात आहे.शेतक-यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण,जिल्हाधिकारी ,भूसंपादन अधिकारी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला.वेळोवेळी गोड बोलून वेळी मारून नेली.प्रत्यक्षात मात्र जेव्हा मावेजा घोषित झाला तेंव्हा प्रशासनाने गोड बोलून गळा कापला आशा संतप्त भावना व्यक्त केल्या.\nअर्धापूर तालुक्यातून 361 हा राष्ट्रीय महामार्ग जात असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.अर्धापूर शिवारातील संपादित करण्यात येणा-या जमिणीसाठी जादा मावेजा मिळाण्यासाठी शेतक-यांचा पालकमंत्री अशोक चव्हाण व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला .यात यश आले असून ओलीताच्या दुप्पट भाव मिळणार आहे.पण त्याच वेळेस मात्र रेल्वेसाठी संपादित करण्यात येणा-या जमिणीसाठी कोरडवाहू प्रमाणे मावेजा मिळणार आसल्यामुळे शेतक-यांत खुप मोठा असंतोष निर्माण झाला आहे.\nहेही वाचा - नांदेड : लोकमान्य टिळक निर्माल्य स्वच्छता अभियानात कृतीयुक्त सहभाग नोंदवा- मिलिंद देशमुख -\nएकाच गटातील व ओलिताखाली आसलेल्या जमिनीसाठी दोन नियम\nअर्धापूर तालुक्यातून नांदेड यवतमाळ वर्धा हा रेल्वे मार्ग जात आहे.या मार्गासाठी तालुक्यातील जमीन संपादित करण्यात आली असून अर्धापूर शिवारातील जमिण संपादित करून मावेजा देण्याची अंतिम प्रक्रिया सुरू झाली आहे.या रेल्वेच्या मार्गासाठी शेतक-यांना कोरडवाहू शेती प्रमाणे मावेजा मिळणार आसल्यामुळे शेतक-यातून तिव्र प्रतीक्रीया व्यक्त केल्या जात आहेत.एकाच शिवारातील,एकाच गटातील व ओलिताखाली आसलेल्या जमिनीसाठी दोन नियम कसे लागू होतात आसा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आमची प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी गोड बोलून फसवणूक केली आहे आशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे\nअधिकाऱ्यांनी करायचे तेच केले\nपालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला रेल्वेसाठी देण्यात येणा-या मावेजाकडे लक्ष देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिका-यांना दिला होत्या.अधिका-यांनी नेहमीप्रमाणे मान हालवून होय सर , लक्ष घालतो, मला भेटा असे ठेवणीतील उत्तरे देवून वेळ मारून नेली. पण करायचे तेच केले.\nयेथे क्लिक करा - नांदेड : वर्षावासानिमित्त महाविहार बावरीनगर येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबीर\nराष्ट्रीय महामार्ग व रेल्वे हे केंद्र शासनाच्या आखातारितील विभाग आहेत.या दोन्ही विभागासाठी आमची जमीन संपादित करण्यात आली आहे.एकाच गटातील जमिनीला रस्तासाठी जादा भाव तर रेल्वेसाठी कमी भाव आसे चुकीचे काम भूसंपादन अधिका-यांनी केले आहे.आम्ही पाठपुरावा केला .पण गोड बोलून आमची फसवणूक करण्यात आली आहे.माझ्या जमिला दोन भाव मिळत आहेत.या फसवणुकीकडे पालकमंत्र्यानी लक्ष घालावे आशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय; अतिरिक्त सहा गाड्या धावणार\nभुसावळ ः रेल्वेत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालविणार आहे. या विशेष गाड्या...\nरेल्वेने जाताना एक तास आधी स्थानकात उपस्थित रहा; प्रशासनाची सुचना\nरत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर तुतारी आणि राजधानी या दोन गाड्या धावणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे. पण या गाड्यातून प्रवास करणाऱ्या...\nआरोग्य विभागाची पुन्हा चूक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढले शुध्दीपत्रक\nसोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी संशयितांचे टेस्टिंग वाढवा, असे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका...\nकोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी\nरत्नागिरी - कोकण रेल्वेच्या मार्गावर पुन्हा तुतारी आणि राजधानी या दोन गाड्या धावणार असल्याची घोषणा झाली आहे. पण या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या...\nपरभणी : शेतकरी व कामगार विरोधी कायद्यांची होळी, विविध संघटना आक्रमक\nपरभणी ः केंद्र सरकारने राज्यसभेत बहूमत नसताना मंजूर केलेले शेतकरी व कामगार विरोधी कायद्याची शुक्रवारी (ता.२५) मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियन (...\nसेल्फीच्या नादात पोलिस धबधब्यात पडला, अजूनही शोध सुरूच\nटाकळी ढोकेश्वर : मांडओहोळ (ता.पारनेर) येथील धरण परिसरात रूईचोंडा धबधब्यात रेल्वे पोलिस गणेश दहिफळे यांचा फोटोसेशनच्या नादात तोल गेल्याने पाण्यात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/refusal-enter-couples-separation-room-wardha-319677", "date_download": "2020-09-26T03:09:18Z", "digest": "sha1:CWY2MFSQLCXYGRWSMNMHT6NS6DN2GGGM", "length": 16992, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "आम्हाला इतर कुठे नाही तर घरीच पाठवा; दाम्पत्याचा आयसोलेशन वॉर्डात धिंगाणा | eSakal", "raw_content": "\nआम्हाला इतर कुठे नाही तर घरीच पाठवा; दाम्पत्याचा आयसोलेशन वॉर्डात धिंगाणा\nदाम्पत्याला समजविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य आशिकारी डॉ. अजय डवले, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांनी रुग्णालय गाठले. परंतु, हे दाम्पत्य ऐकण्यास तयार नसल्याने सामान्य रुग्णालायात बराच काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.\nवर्धा : हाय रिक्‍स भागातून आयसोलेशन वॉर्डात आणण्यात आलेल्या दाम्पत्याला विलगीकरणात ठेवण्यासाठी सेवाग्राम येथील यात्री निवासात पाठविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. परंतु, या दाम्पत्याने \"आम्हाला इतर कुठे नाही तर घरीच पाठवा' असे म्हणून शुक्रावारी (ता. 10) रात्रीच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयातीळ आयसोलेशन वॉर्डात ठिय्या मांडला. यानंतर पुढील घटनाक्रम घडला...\nमहिला गर्भवती असल्याने त्यांना उत्तम सुविधा असलेल्या सेवग्राम येथील यात्री निवासात जाण्याचा सला देण्यात आला होता. एवढेच नाही तर त्यांना निवडण्यात आलेल्या काही हॉटेलात जाण्याचे सांगण्यात आले. मात्र, हे दाम्पत्य कुणाचेही ऐकण्यास तयार नसल्याने साऱ्याची पंचाईत झाली. दाम्पत्याकडून आम्हाला घरीच जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. परंतु, हे दाम्पत्य हाय रिस्क भागातून आल्याने त्यांना घरी पाठविणे धोक्‍याचे आल्याने आरोग्य विभाग त्याला नकार देत असल्याचे चित्र रात्री उशिरापर्यंत कायम होते.\nहेही वाचा - बीफार्म पदवीधर युवकाने केली कोरफडीची शेती अन् झाला लघुउद्योगाचा मालक...बेरोजगारांना दिला रोजगार\nदाम्पत्याला समजविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य आशिकारी डॉ. अजय डवले, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांनी रुग्णालय गाठले. परंतु, हे दाम्पत्य ऐकण्यास तयार नसल्याने सामान्य रुग्णालायात बराच काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यात अधिकारी घरी पण पोलिसांची मात्र येथे ड्युटी लागल्याने पंचाईत झाली.\nअधिकारी घरी, पोलिस रुग्णालयात\nदाम्पत्याला समजावून सर्वच अधिकारी थकले. यानंतर त्यांनी घराचा रस्ता धरला. पण, पोलिस प्रशासन मात्र सुरक्षेच्या दृष्टीने येथे कायम होते. यामुळे दाम्पत्याच्या अडचणींवर मार्ग काढावा अशी मागणी त्यांच्याकडून होत होती.\nअधिक माहितीसाठी - महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा\nअखेर गाठले यात्री निवास\nया दाम्पत्याने चांगलाच धिंगाणा घातला. यामुळे सर्वांची पंचाईत झाली. अधिकारी त्यांना समजावून थकले. मात्र, ते कुणाचे काहीही ऐकण्यास तयार होते. अथक प्रयत्नानंतर ते तयार झाले. शेवटी त्यांना सेवाग्राम येथील यात्री निवासात पाठविण्यात आले आणि नाट्यमय घडामोटींवर पर्दा पडला.\nकुणाचेच ऐकण्यास तयार नव्हते\nआयसोलेशन वॉर्डात असलेले दाम्पत्य हाय रिस्क एरियातून आलेले आहे. महिला गर्भवती असल्याने तिच्या सुरक्षेसाठी सेवग्राम येथील विलगीकरण केंद्रात पाठविण्याचा निर्णय घेतला. पण, ते आम्ही कुठेही जाण्यास तयार नाही, आम्हाला घरी पाठवा असे म्हणत कुणाचेच ऐकण्यास तयार नव्हते. यामुळे अडचण निर्माण झाली होती.\nसंपादन - नीलेश डाखोरे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखासगी कोविड हॉस्पिटल गाशा गुंडाळण्याच्या स्थितीत\nजळगाव : कोरोनाग्रस्तांवरील उपचारावर अवाजवी शुल्क आकारण्याला चाप लावताना शासनाने खासगी कोविड हॉस्पिटलसाठी विविध प्रकारचे दर निश्‍चित करून दिले आहेत....\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 26 सप्टेंबर\nपंचांग शनिवार - अधिक अश्विन शुद्ध 10, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.27, चंद्रोदय दुपारी 2.10, चंद्रास्त रात्री...\nबामणोली आरोग्य केंद्राच्या मदतीला धावला 'भैरवनाथ'\nकास (जि. सातारा) : कोरोना रोगाची पाळेमुळे ग्रामीण भागात घट्ट होऊ लागली आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांना मोठ्या प्रमाणात विविध साधनांची कमतरता...\nपलूस तालुक्‍याला 1 हजार 168 कोरोनामुक्त\nपलूस : पलूस तालुक्‍यातील एकूण 1 हजार 694 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 1 हजार 168 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ही पलूस तालुक्‍यासाठी दिलासादायक बाब...\nकोल्हापूरचा सरकारी दवाखानाच (सीपीआर) खरा तरणोपाय...\nकोल्हापूर ः छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) म्हणजेच जिल्ह्यातील सामान्य माणसांचे प्रमुख आधारवड. कोरोनाच्या काळातही हाच \"थोरला दवाखाना'...\nज्येष्ठांना इशारा ः कोरोनाबाधितांच्या मृत्यूंमध्ये 90 टक्के वयोवृद्ध\nकोल्हापूर ः कोरोनाबाधितांच्या मृत्यूची वाढती संख्या धडधाकट व्यक्तीलाही धडकी भरवत आहे. अशा स्थितीत बाधित व्यक्तींमध्ये मृत्यू झालेल्या 85 टक्के...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://letstalksexuality.com/tag/lets-talk-sexuality/page/2/", "date_download": "2020-09-26T01:41:42Z", "digest": "sha1:NPJK5JF6MZA3RTZHGHYNGW3W2OXS2FFD", "length": 13811, "nlines": 171, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "Lets talk sexuality – Page 2 – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nप्रेम करण्यासाठी डोळे नाही स्पर्शच महत्त्वाचा असतो\nपीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी\nप्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २\nलैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार\nलॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……\nपुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट\nजननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १\nमाझा स्वत:ला शोधण्याचा प्रवास\nकाही वर्षांपूर्वी एका गोंधळलेल्या मन:स्थितीत मी ‘समपथिक ट्रस्ट' मध्ये पाऊल टाकले होते. कामाच्या निमित्ताने पुण्यात राहत होतो, त्यावेळी तिथल्या सायकिअॅट्रिस्ट मॅडमना जेव्हा सगळं सांगितलं तेव्हा त्यांचे उत्तर फार गमतीशीर आणि सहज…\nलेखांक ३ : पॅराफीलियाचे / मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार\nमागील लेखात पॅराफीलियाचे / मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार समजून घेतले. या लेखात आपण त्याचे आणखी काही प्रकार जाणून घेऊया. विरूद्धलिंगी व्यक्तीचा पोशाख घालणे (Transvestic disorder) ट्रान्सव्हेस्टिक डिसऑर्डर या मनोलैंगिक…\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २\nलैंगिक उपकरणांची माहिती घेताना मागील भागात लैंगिक शिक्षणासाठी वापरली जाणारी, वैद्यकीयदृष्ट्या वापरली जाणारी व लैंगिक सुखासाठी वापरली जाणारी लैंगिक उपकरणे यांची माहिती घेतली. या भागात लैंगिक उपकरणांबाबत समज – गैरसमज, विकत घेताना…\nहस्तमैथुनाबाबत आपल्या समाजात केवढा गोंधळ महिला अन हस्तमैथुन हा विषय तर त्यापेक्षा जास्त गैरसमजाने गुरफटलेला, चला घ्या जाणून याबाबत .... हस्तमैथुना बाबत आपल्या वेबसाईटवरील काही दुवे :…\nलैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १\n“सेक्ससाठी रबराची बाहुली मिळते असं मी ऐकलं आहे, आपल्याकडे इथे ती मिळते का' किंवा ''कृत्रिम लिंग कुठे मिळेल' किंवा ''कृत्रिम लिंग कुठे मिळेल'' अशा प्रकारचे प्रश्न अनेक वेळा विचारले जातात. लैंगिक सुख देणा-या खेळण्यांची (Sex Toys) आपल्या देशात (इतर देशांसारखीच)…\nजागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनूसार भारताच्या 135 कोटी लोकसंख्येपैकी अंदाजे दहा कोटी (म्हणजे 7.5 %) लोक हे कोणत्या ना कोणत्या मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत. काहींच्या आजाराचे स्वरुप सामान्य तर काहींच्या अतिशय गंभीरही आहे. एकूण मानसिक…\nआनंदाने जगायला शिकवणारी ग़ोंड/कोया (माणूस) आदिवासींची सहज सामाजिक शाळा “गोटूल”\nमध्य भारतातील सर्वात मोठा आदिवासी समूह आज गोंड नावाने ओळखला जातो. ही जनजाती पूर्व विदर्भ, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, पश्चिम ओरीसा व उत्तर आंध्रप्रदेश एवढ्या विस्तीर्ण भूप्रदेशात पसरलेली आहे. गोंड हे त्यांना बाहेरच्या लोकांनी दिलेले नाव, पण आज…\nलेखांक २ : पॅराफीलियाचे / मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार\nमागील भागांमध्ये आपण पॅराफिलीया / मनोलैंगिक विकार : स्वरूप आणि ओळख याविषयी माहिती घेतली. या पाच भागांच्या लेखमालेत आपण पॅराफिलीया या मनोलैंगिक विकाराविषयी माहिती घेत आहोत. या लेखमालेच्या दुस-या लेखांकामध्ये पॅराफीलियाचे / मनोलैंगिक…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nमदनमणी,योनीभगोष्ट आणि मदनबिंदू म्हणजे काय ते योनीत कुठे असतात\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nअविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://jaalavaani.blogspot.com/2010/08/blog-post_6047.html", "date_download": "2020-09-26T02:44:08Z", "digest": "sha1:3ADBGCKSYK5LNGU6YQDPGI6T4HMJGZBG", "length": 10437, "nlines": 69, "source_domain": "jaalavaani.blogspot.com", "title": "जालवाणी: ओठातले,मनातले !", "raw_content": "\nलेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला प्रत्यक्ष लेखकाच्या आवाजात ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०१० रोजी प्रकाशित करत आहोत. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे काहीही ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...\nपुरुषांना...तेही लग्न झालेल्या पुरुषांना आपल्या बायकोची भाषा कधीच कळत नाही....असं म्हणतात की बायका जे बोलतात त्याच्या नेमका उलटा अर्थ त्यांना अभिप्रेत असतो. बहुतेकवेळा हो चा अर्थ नाही आणि नाही चा अर्थ हो असतो...आणि त्यामुळे नेहमीच घोळ होतात....\nह्या लेखाचे अभिवाचन आम्ही मुद्दामच दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून स्वतंत्रपणे करून घेतलंय.. एक स्त्री आणि पुरुष अशी योजना केलेय. ऐका आणि मजा लुटा अभिवाचनातून\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nखरे तर प्रत्येकाला एक एक प्रतिक्रिया द्यायला हवी..पण सध्या येथेच देतो..कांचन कराईचा आवाज खूपच छान आहे. व बोलण्यातील बारकावेपण त्यांना उत्कृष्ट टिपता येतात.खूप छान वाटले ऐकताना. विद्याधर भिसेचा आवाजही चांगला आहे...पण चढ उतार थोडे कमी वाटले कदाचित लगेचच्या लगेच दोन ओदिओ ऐकल्याने पुरुषावर अन्याय होत असेल माझ्याकडून...माहित नाही...प्रमोदजी तुम्ही खूप मोठे काम करताय..कदाचीत तुम्हाला याची कल्पना नसेल पण येणाऱ्या पिढ्या तुम्हाला लाख लाख धनयवाद देतील.\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी ९:४५ म.पू.\nविद्याधर, जर तू याआधी तू कधी जर अभिवाचन केलेलं नसशील तर हे अभिवाचन तू खूप चांगलं केलं आहेस. आवाजातील चढ उतार थोडे कमी आहेत पण चढ उतार म्हणजे काय हे तुला माहित आहे आणि पुढे कधी जर अभिवाचन केलंस तर त्यात तू आणखी मोकळं होऊन आवाज द्यावास असं मी सांगेन. स्त्रीच्या पहिल्या वाक्यात (\"नको, मी खिचडी लावते.\") आणि शेवट्च्या प्रसंगात (\"अहो, अहो मला कुणाचा तरी आवाज...) तू जी काही मजा केली आहेस ना... भन्नाट दुसरा शब्द नाही. तुझा आवाज अभिवाचनासाठी अत्यंत योग्य आहे. तुला जर आवड असेल तर अभिवाचन करत रहा आणि कुणालाही ऐकवण्या आधी स्वत: ऐक. तुला आपोआपच चूक बरोबर समजत जाईल. हे अभिवाचन करताना मी सुद्धा काही चुका केल्या आहेत. पण माझ्याकडे वेळ कमी होता, त्यामुळे मी फार एडीटींग करू शकले नाही. तुझ्या अभिवाचनात तू पार्श्वसंगीत न वापरल्याने आवाज एकदम व्यवस्थित पोहोचतो आहे. मला तुझं अभिवाचन आवडलं.\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी १:०६ म.उ.\nहौसला अफज़ाईसाठी खूप खूप आभार गं\nअगं तुझं एकदमच प्रोफेशनल अभिवाचन आहे. एकदम छान. तुझ्या वाचनात ठहराव आहे, त्यामुळे ऐकायला मस्त वाटतं.\nमी हौशी नमुना आहे ;) मी ह्यापूर्वी शब्दबंधच्या वेळी केलं होतं अभिवाचन. बाकी, चढ उताराचं म्हणशील तर मी केला होता प्रयत्न. पण कदाचित मी अविवाहित असल्याने, विवाहित माणसाचे अनुभव वाचताना थोडासा बावचळून गेलो... ;)\nतू सांगतेस तसं पुढच्या वेळेस नक्की अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करेन.\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी १०:०१ म.उ.\nकांचन तर अभिवाचनात तरबेज आहेच पण मला विद्याधर तुझे हि वाचन आवडले. मी पण अभिवाचन प्रकारात नवखी आहे. मी काय अजून सांगणार\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी १०:५० म.उ.\nदोघांचंही अतिशय उत्कृष्ट झालंय अभिवाचन. धन्यवाद.\n१६ ऑगस्ट, २०१० रोजी ११:१३ म.पू.\nSUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...\nकांचन कराईंचा ’मातकट’ हा आणि 'छान आहे हं तुमची आवड’ झकास. पार्श्वसंगीत मस्त.\n१७ ऑगस्ट, २०१० रोजी ५:२० म.उ.\nदादा.. तुझ्या अनुभवाचा मला खूपच उपयोग होतो रे. :) थांकू.. थांकू.. :D\nकांचनचा तर मी मोठा पंखा आहे.\nगरगर.. फिरणारा ४ पात्यांचा... :D\n२७ ऑगस्ट, २०१० रोजी ७:३० म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसूर्य संपावर गेला तर\nआणि मी सिगारेट सोडली.\nमोनालिसाला कुठे होत्या भुवया\nअब्राहम लिंकन ह्यांचे हेड मास्तरांना पत्र\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/deployed-16-ndrf-teams-across-the-state", "date_download": "2020-09-26T02:03:27Z", "digest": "sha1:LRUDUWFRAPQU6HQHFHALOUNVHEDJQGLN", "length": 3409, "nlines": 71, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Deployed 16 NDRF teams across the state", "raw_content": "\nराज्यभरात NDRF च्या १६ टीम तैनात\nमुंबई, कोकणासह राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर टीम तैनात\nमुंबईत मुसळधार; मोडला ४६ वर्षांचा विक्रम\nगेल्या दोन दिवसापासून मुंबई, कोकणासह राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १६ टीम राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.\nमुंबईत ५, कोल्हापूर ४, सांगली २, सातारा १, ठाणे १, पालघर १, नागपूर १ व रायगड १ अशा एकूण १६ राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या टीम राज्यातील विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/topic/belapur", "date_download": "2020-09-26T02:04:20Z", "digest": "sha1:OOITBKMZDYYYV34V2SOZWLPCLCNDCC3T", "length": 3132, "nlines": 101, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "belapur", "raw_content": "\nबेलापुरात नवले समर्थकांमध्ये तुफान हाणामारी\nलोकसेवा आयोग परीक्षेत बेलापूरचा अभिषेक दुधाळ देशात 637 वा\nबेलापुरात एकाच कुटुंबातील नऊ जणांना करोनाची बाधा\nबेलापुरात करोनाचा शिरकाव ; श्रीरामपूर शहरात आणखी एक रुग्ण\nबेलापूर येथे देशी दारूचे दुकान फोडले\nनियम मोडणार्‍यांवर बेलापुरात आता दंडात्मक कारवाई\nबेलापुरात दोन मृतदेह आढळले ; एकाची आत्महत्या\nअयोध्येतील राममंदिर समितीवर राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/08/gamatidar-marathi-ukhane-for-bride.html", "date_download": "2020-09-26T03:03:37Z", "digest": "sha1:QKHR7Y4SEIKTKRATKM5E5KWIQP6NMSAC", "length": 13420, "nlines": 138, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): गमतीदार मराठी उखाणे - Gamatidar Marathi Ukhane For Bride / Groom / Var / Vadhu /", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nचांदीच्या ताटात मुठभर गहू\nलग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ\nश्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,\n.... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.\nधनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,\n..... च्या जीवावर करते मी मजा.\n******रावान्च्या नाकावर एवढा मोठा टेम्बु\nसासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,\nपोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.\nदुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,\nताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा\nअत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड\n***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्\nपुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,\n.... आहेत आमचे फार नाजुक.\nपुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' ,\n........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.\nजीवन आहे एक अनमोल ठेवा,\n...... आणतात नेहमी सुकामेवा.\nसावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,\n..... ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.\nमुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,\n-- हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर\nकॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,\n...... आहेत फार निस्वार्थी\nसन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून,\n.....रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून्\nचान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,\nमी आहे म्हैस तर तो आहे रेडा\nमितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,\nवर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी\nगच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,\n... माझी बायको आहे मोठी लुच्ची\nइवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,\n... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय\nऍश्वर्या-अभिषेक यांची छान जमली जोडी,ईशा देओलने मारली यांच्याही पुढे उडी,\nईशा देओल उडी मारत पडल खड़्यात,ऍश-अभी अडकले नवरा-बायकोच्या नात्यात,\nभल्या पहाटे करावी देवाची पुजा ,\n...च्या जीवावर करते मी मजा\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/minister-technical-education-uday-samant-online-press-coneforence-ratnagir-326449", "date_download": "2020-09-26T02:02:36Z", "digest": "sha1:2A3JQ46DHXKOKNIDRCHXEW6MRQ5YJFGX", "length": 14473, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "मला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत जिल्हावासीयांच्या आशीर्वादाने मी ठणठणीत : उदय सामंत | eSakal", "raw_content": "\nमला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत जिल्हावासीयांच्या आशीर्वादाने मी ठणठणीत : उदय सामंत\n१४ दिवस सेल्फ क्वारंटाईन झालो आहे. आता १० दिवस झाले. तोवर\nरत्नागिरी : सिंधुदुर्गात बैठक झाल्यानंतर आमचे सहकारी, आमदार वैभव नाईक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. म्हणून मी १४ दिवस सेल्फ क्वारंटाईन झालो आहे. आता १० दिवस झाले. तोवर काही हितचिंतकांनी मला कोरोना झाल्याचे जाहीर केले; मात्र मला काही झालेलं नाही, कोणतीही लक्षणे नाहीत. जिल्हावासीयांच्या आशीर्वादाने मी ठणठणीत आहे, असे स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत\nहेही वाचा- ...तर बळजबरीने जमिने घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू कुणी दिलाय इशारा\nऑनलाइन झालेल्या आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘गेल्या आठवड्यात माझा सिंधुदुर्ग दौरा झाला. तेव्हा वैभव नाईक यांच्यासह अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर नाईक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तसेच माझ्या सिंधुदुर्गच्या पी.ए.चा अहवाल पॉझिटिव्ह आला. म्हणून मी १४ दिवस सेल्फ क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला; मात्र काही झाले नसताना माझ्या काही हितचिंतकांनी मला कोरोना झाल्याचे जाहीर केले. मला कोणतीही लक्षणे नाहीत. पुढच्या आठवड्यात मी येणार आहे.’’\nहेही वाचा- मत्स्य विभागाकडून आदेश ; मच्छीमारी नौकांवर आता याची आहे नजर.... -\n‘निसर्ग’ चक्रीवादळ आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुमारे साडेसहा हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांना जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून ७७ लाख रुपये वाटप केले जातील. ‘निसर्ग’मध्ये २६९ लोकांना प्रत्येकी ४ हजार या प्रमाणे निधी दिला जाईल; तर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दापोली, मंडणगड ९१२, लांजा ४१३, गुहागर ४८१, रत्नागिरी ९०० यांना दोन हजार ५०० प्रमाणे मदत दिली जाईल. पहिल्या टप्प्यातील ही मदत आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित तालुक्‍याला मदत दिली जाईल, असे सामंत म्हणाले.\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचे ई-मेल अकौंट हॅक\nओरोस : सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचा executivedirector4182gmail.com हा ई-मेल आयडी हॅक करण्यात आला. त्यावरून खोटे मेल विविध...\nशेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्यांना रोखठोक उत्तर देणार : नितेश राणे\nसावंतवाडी : कृषी विधेयकाने शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे दलाल, एजंट, काही राजकीय पक्षांची दुकाने बंद होणार आहेत. शेतकरी उत्पादन कुठेही...\nनिकोपता जपण्यासाठी पुरस्कार रद्द ः नाईक\nओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे देवगड वगळता अन्य तालुक्‍यांतून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रत्येकी दोनच प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यातच काही...\nसिंधुदुर्गात खासगी शाळांतील शिक्षकांची घुसमट\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शाळा दीर्घकाळ बंद असल्यामुळे केवळ विद्यार्थी शुल्कावर चालणाऱ्या खासगी आणि विना अनुदानित शाळांमधील शिक्षक आर्थिक अडचणीत...\nनिकृष्ट कामाचा नमुना; महामार्गावरच साचले तळे\nतळेरे (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे; मात्र अपूर्ण कामे मंद गतीने सुरू असल्याने त्याचा नाहक फटका या...\nकंत्राटी कामगारांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ\nओरोस (सिंधुदुर्ग) - प्रत्येक गावातील सामान्य कुटुंबांपर्यंत स्वच्छतेची चळवळ पोहोचवण्यामध्ये स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे योगदान...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/more-4-corona-patient-found-sindhudurg-number-corona-infected-283-324409", "date_download": "2020-09-26T02:08:17Z", "digest": "sha1:POFQN34HMIVGGCG64O7O5AGFU6U3S6UN", "length": 11953, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "सिंधुदुर्गात बुधवारची सकाळ चार कोरोना बाधित रुग्णांनी... | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्गात बुधवारची सकाळ चार कोरोना बाधित रुग्णांनी...\n3 नमुने फेर तपासणीसाठी पाठवले आहेत. तर 2 पेंडिंग आहेत.\nओरोस (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गात आणखी चार जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी हे अहवाल प्राप्त झाले.\nहेही वाचा-शिक्षकांच्या बदल्या निश्चित, सिंधुदुर्गातील संख्या अशी... -\nजिल्ह्यातील आणखी 4 व्यक्तिंचे कोरोना तपासणी अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत. एकूण तपासण्यात आलेल्या 73 नमुन्यांपैकी 4 पॉजिटिव्ह आणि 64 निगेटीव्ह आले आहेत. 3 नमुने फेर तपासणीसाठी पाठवले आहेत. तर 2 पेंडिंग आहेत.\nहेही वाचा- शिवसैनिकांनो, काॅरंटाईन व्हा असे का म्हणाले कणकवलीचे नगराध्यक्ष असे का म्हणाले कणकवलीचे नगराध्यक्ष\nसिंधुदुर्गनगरीत कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या २८३ झाली आहे. नव्याने दोन व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना घरी सोडण्यात आले. परिणामी जिल्ह्यात आजपर्यंत २४० बाधित बरे होऊन घरी परतले आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचे ई-मेल अकौंट हॅक\nओरोस : सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचा executivedirector4182gmail.com हा ई-मेल आयडी हॅक करण्यात आला. त्यावरून खोटे मेल विविध...\nशेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्यांना रोखठोक उत्तर देणार : नितेश राणे\nसावंतवाडी : कृषी विधेयकाने शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे दलाल, एजंट, काही राजकीय पक्षांची दुकाने बंद होणार आहेत. शेतकरी उत्पादन कुठेही...\nनिकोपता जपण्यासाठी पुरस्कार रद्द ः नाईक\nओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे देवगड वगळता अन्य तालुक्‍यांतून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रत्येकी दोनच प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यातच काही...\nसिंधुदुर्गात खासगी शाळांतील शिक्षकांची घुसमट\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शाळा दीर्घकाळ बंद असल्यामुळे केवळ विद्यार्थी शुल्कावर चालणाऱ्या खासगी आणि विना अनुदानित शाळांमधील शिक्षक आर्थिक अडचणीत...\nनिकृष्ट कामाचा नमुना; महामार्गावरच साचले तळे\nतळेरे (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे; मात्र अपूर्ण कामे मंद गतीने सुरू असल्याने त्याचा नाहक फटका या...\nकंत्राटी कामगारांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ\nओरोस (सिंधुदुर्ग) - प्रत्येक गावातील सामान्य कुटुंबांपर्यंत स्वच्छतेची चळवळ पोहोचवण्यामध्ये स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे योगदान...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/kharip-season-maharashtra-state-rain-agriculture-341119", "date_download": "2020-09-26T01:40:15Z", "digest": "sha1:65LZONJHGBUFX755K4MDFEOFBDZS525L", "length": 15674, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "यंदा राज्यात धनधान्यांची बरकत राहील | eSakal", "raw_content": "\nयंदा राज्यात धनधान्यांची बरकत राहील\nकोविड १९ च्या महासंकटावर मात करीत बळीराजाने केलेल्या कष्टाळू नियोजनाला वरूणराजाची चांगली साथ मिळत असल्याने यंदाचा खरीप दणकेबाज ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा राज्यात धनधान्यांची बरकत राहील, असा आशादायक सूर कृषी क्षेत्रातून व्यक्त होतो आहे.\nपुणे - कोविड १९ च्या महासंकटावर मात करीत बळीराजाने केलेल्या कष्टाळू नियोजनाला वरूणराजाची चांगली साथ मिळत असल्याने यंदाचा खरीप दणकेबाज ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा राज्यात धनधान्यांची बरकत राहील, असा आशादायक सूर कृषी क्षेत्रातून व्यक्त होतो आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n‘राज्यात यंदा आतापर्यंतची खरीप पिकांची स्थिती अतिशय आशादायक आहे. हंगाम चांगला झाल्यास बाजार समित्यांमध्ये दरवर्षी होणारी अंदाजे ४५ ते ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल या खरीपामध्ये ५५ हजार कोटींच्या पुढे पोहचू शकते. तथापि, काढणीपर्यंत निसर्गाने साथ देणे अपेक्षित आहे,’असे मत पणन विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केले.\nरोहित पवारांच्या नावाने संघटना, कार्यकर्त्यांना म्हणाले, हे अयोग्य\nराज्यात ऑगस्टच्या मध्यापर्यंत २२७ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. ९४ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांच्या पुढे, तर २८ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांच्या पुढे पाऊस आहे. म्हणजेच ३५५ पैकी ३४९ तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस असल्याने पिकांची स्थिती चांगली आहे.\nशेतकऱ्यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत सरासरी १४१ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पिके घेतली आहेत.\nराज्यात कोरोनाकाळात वाढलं गुन्ह्यांचं प्रमाण; जाणून घ्या आकडेवारी\n२०२० च्या खरिपात २४ ऑगस्टपर्यंत पेरा १४० लाख हेक्टरच्या पुढे गेल्याचे दिसून येते. मागील हंगामात याच कालावधीपर्यंत पेरा अवघा १३५ लाख हेक्टर होता. म्हणजेच यंदा पाच लाख हेक्टरचा पेरा लवकर झाल्याचे स्पष्ट होते.\nराज्यभर आतापर्यंतचा मॉन्सून आणि पिकपेरा उत्साह वाढविणारा आहे. कोविड संकटातही शेतकऱ्यांनी केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. पुढे पावसाचा एकदम खंड किंवा अतिपाऊस न झाल्यास यंदाचे उत्पादन भरघोस राहील.\n- उमेशचंद्र सरंगी, कृषी अर्थतज्ज्ञ व माजी अध्यक्ष, नाबार्ड\nविदर्भासह मराठवाड्यात समाधानकारक पाऊस आहे. बहुतांश पिकांची अवस्था चांगली आहे. कोविड १९ चे सावट असतानाही शेतकऱ्यांनी खरीप नियोजनाच कमतरता येऊ दिलेली नाही. त्यामुळे सध्या विक्रमी अन्नधान्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.\n- डॉ.अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअतिवृष्टीमुळे शिरपूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करा\nशिरपूर : तालुक्यात वादळ आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला मदतीसाठी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर...\nमसूरला पावसामुळे पीक काढणीस व्यत्यय; शेतकरीवर्ग चिंतेत\nमसूर (जि. सातारा) : विभागात खरीप हंगामातील कडधान्याची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. भुईमूग, सोयाबीन पिकाच्या काढणी, मळणीस प्रारंभ झाला आहे. सोयाबीन...\nअकरा तलाव तुडुंब, अकरा तलावांनी गाठली पन्नाशी\nउमरगा (उस्मानाबाद) : गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे बऱ्याच तलावातील पाणी साठ्यात वाढ झाली असून उमरगा-लोहारा तालुक्यातील अकरा...\nकोणी फुकटात चारा घेता का शेतकऱयाने सोशल मीडियावर लढविली शक्‍कल\nकापडणे : यावर्षी आठ जूनपासून सतत पाऊस पडत आहे. शेती शिवारातील बांधासह पडीक गायरानावर गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बाजरी आणि मक्याची...\nकांदा महागला, बियाण्याचेही भाव दुप्पट; शेतकऱ्यांच्या दुकानासमोर रांगा\nनगर तालुका ः गेल्या वर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे पुरेशा क्षमतेने कांदा बीजोत्पादन झाले नाही. परिणामी, यंदा गावरान कांदा बियाण्याचा तुटवडा...\nशेतकरी गुडघाभर पाण्यातून पीक वाचवतोय, तर प्रशासन कागदी घोडे नाचवतंय \nमळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील उपळे, नारी, गौडगाव, पानगाव मंडल क्षेत्रात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, कांदा, ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/initiative-dr-metan-foundation-national-level-bird-sanctuary-and", "date_download": "2020-09-26T01:58:17Z", "digest": "sha1:X5TNQ6DELKA74P4B2RQPXPD2OUVERHE7", "length": 22865, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "कुरनूर धरणावर पक्षी धाम अन्‌ निरीक्षण केंद्रासाठी प्रयत्न; \"सकाळ'चा पुढाकार, डॉ. मेतन फाउंडेशनचे सहकार्य (Video) | eSakal", "raw_content": "\nकुरनूर धरणावर पक्षी धाम अन्‌ निरीक्षण केंद्रासाठी प्रयत्न; \"सकाळ'चा पुढाकार, डॉ. मेतन फाउंडेशनचे सहकार्य (Video)\nकुरनूर धरण खऱ्या अर्थाने जिल्ह्याला एक देणगी असून या परिसरातील वन्यजीवांचे रक्षण-संरक्षण करून एक उत्तम पक्षी निरीक्षण केंद्र आणि पर्यटन स्थळ व्हावे, अशी पक्षी पर्यटकांची मनापासून इच्छा आहे. यामुळे धरण परिसरात भेट देऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी, मेतन फाउंडेशनचे डॉ. व्यंकटेश मेतन, विमानतळ प्राधिकरणाचे सज्जन निचळ, सेवानिवृत्त अभियंता प्रल्हाद कांबळे, \"सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, रियाज पटेल, नागनाथ उदंडे, प्रा. अमोगसिद्ध चेंडके आदींनी पाहणी केली.\nअक्कलकोट (सोलापूर) : कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील नैसर्गिकरीत्या सुंदर असलेल्या बोरी धरण परिसरात राष्ट्रीय पक्षी धाम तसेच पक्षी निरीक्षण केंद्र होणे गरजेचे आहे. याचे महत्त्व ओळखून \"सकाळ'ने यासाठी पुढाकार घेतला आहे. सोलापूरच्या डॉ. मेतन फाउंडेशनचे डॉ. व्यंकटेश मेतन हे यासाठी एक अहवाल तयार करीत आहेत. लवकरच पुढील कार्यवाहीसाठी शासन स्तरावर हा प्रकल्प पाठविला जाणार आहे. याचा योग्य पाठपुरावा होऊन जर हा सुंदर प्रकल्प मार्गी लागला, तर अक्कलकोट तालुक्‍यात धार्मिक पर्यटनाबरोबरच हे पक्षी निरीक्षण केंद्रसुद्धा महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून पुढे येईल, यात संदेह नाही.\nकुरनूर धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा खऱ्या अर्थाने पक्षी वन्यजीव यांचं नंदनवन ठरत आहे. मागील अनेक वर्षांपासून अनेक पक्षीप्रेमी या धरण परिसरात पक्षी आणि वन्यजीवांचे निरीक्षण करीत असून, या परिसरात मोठ्या प्रमाणात पक्षी आणि वन्यजीव आनंदानं नांदताना दिसत असतात, सोलापूरकरांना ही अभिमानाची गोष्ट आहे. या परिसरात दरवर्षी अनेक परदेशी पक्षी स्थलांतर करीत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने कैकर, पट्टकदंब, नॉर्दन पिंटेल, टील, रेड हेडेड पोचर्ड, रुडी शेलडक, कोम्बडक अशा अनेक पक्ष्यांचा समावेश होतो.\nवर्षभर या नदीच्या पात्रात आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक जातींचे पक्षी आणि प्राणी आनंदाने राहत असताना आढळतात. यामध्ये प्रामुख्याने स्पोट बिल्लेड डक, स्पून बिल्स, पेंटेड स्टॉर्क, व्हाइट नेकड रिवर टर्न, हेरोंस, किंगफिशर, मूरहेन आदींसह 140 ते 150 विविध प्रकारच्या पक्ष्यांचा समावेश होतो. हे धरण खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्ह्याला एक देणगी असून या परिसरातील वन्यजीवांचे रक्षण-संरक्षण करून एक उत्तम पक्षी निरीक्षण केंद्र आणि पर्यटन स्थळ व्हावे, अशी पक्षी पर्यटकांची मनापासून इच्छा आहे. यामुळे धरण परिसरात भेट देऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी, मेतन फाउंडेशनचे डॉ. व्यंकटेश मेतन, विमानतळ प्राधिकरणाचे सज्जन निचळ, सेवानिवृत्त अभियंता प्रल्हाद कांबळे, \"सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, रियाज पटेल, नागनाथ उदंडे, प्रा. अमोगसिद्ध चेंडके आदींनी पाहणी केली.\nपरदेशी पक्ष्यांसाठी उत्तम अधिवास\nकुरनूर धरण परिसरात हिवाळ्याच्या मोसमात तीन ते चार महिने युरोप व सायबेरिया या भागातून सुमारे तीन हजार मैलांचे अंतर कापून मुबलक प्रमाणात या ठिकाणी पक्षी वास्तव्यास येत असतात. कारण हा परिसर नैसर्गिकरीत्या अतिशय सुंदर असून पक्षी वर्गास सुरक्षित अशी जागा आहे. आणि त्यांना या धरण किनारी असलेल्या पाण्याने हिरवळ (अल्गी) तसेच झुडुपांत राहणारे छोटे पक्षी तसेच मासे आदी अन्न त्यांना मुबलक प्रमाणात मिळते. म्हणून या ठिकाणी परदेशी पक्षी वर्गाचे वास्तव्य मोठे असते आणि इथले वेगवेगळे परदेशी पक्षी पाहिल्यास या ठिकाणी निश्‍चित राष्ट्रीय पक्षी निरीक्षण केंद्र होणे हिताचे ठरणार आहे.\nकुरनूर धरणात सतत पाणी आणि पक्षी खाद्य उपलब्ध होऊ शकते. या ठिकाणी 150 पेक्षा जास्त देश-विदेशातील पक्षी येत असतात. याचा योग्य लाभ उठवीत या ठिकाणी पक्षी निरीक्षण केंद्र झाल्यास पक्षीप्रेमी आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्यांची पर्यटन सोय होऊन त्यांच्या आनंदात भर पडणार आहे.\nयाबाबत पक्षी निरीक्षक डॉ. व्यंकटेश मेतन म्हणतात, मेतन फाउंडेशनचे म्हणजे माझे एक स्वप्न आहे, की कुरनूर धरण परिसरात एक पक्षी धाम व राष्ट्रीय पक्षी निरीक्षण केंद्र व्हावे आणि त्यासाठी मी एक प्रकल्प तयार करीत आहे. त्याचा पाठपुरावा सतत करीत राहणार आहे. कुरनूर धरण परिसर हे नैसर्गिक वातावरणात असून या कामासाठी विशेष असे कोणतेही खर्च करावे लागणार नाही. सर्व लोकांचा यासाठी सकारात्मक सहभाग घेऊन याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला जाणार आहे.\nआमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, डॉ. व्यंकटेश मेतन यांनी या पक्षी निरीक्षण केंद्रासाठी जो पुढाकार घेतला आहे तो या परिसराचा कायापालट करण्यासाठी आणि विकासासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. पक्षी निरीक्षण केंद्र हे पर्यटकांना चांगली संधी उपलब्ध असणार आहे. हे केंद्र मंजूर होण्यासाठी माझ्यापरीने जे काही मदत किंवा सहकार्य लागेल ते मी करणार आहे. इथले पक्षी वास्तव्य हे अतिशय सुखद व आनंददायी आहे.\nचपळगावचे नागरिक रियाज पटेल म्हणाले, कुरनूर धरण परिसर हे अतिशय निसर्गरम्य परिसर असून या ठिकाणी शेकडो पक्षी येत असतात. यासाठी येथे पक्षी निरीक्षण केंद्र होणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. या परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्णत्वास जाणार आहे.\nअक्कलकोटचे पक्षी निरीक्षक समीर मनियार म्हणाले, मी गेल्या दहा वर्षांपासून अनेक ठिकाणी पक्षी निरीक्षण केले आहे, पण कुरनूर येथे येणारे पक्षी हे अनोखे आहेत. इथल्या परिसराची आणखी सुधारणा केल्यास सौंदर्य आणखी खुलेल आणि महाराष्ट्रभरातून पक्षी प्रेमी पर्यटनाचा आनंद घेतील आणि याचबरोबर या परिसराचा विकास देखील होण्यास मदत होणार आहे. कुरनूर धरण परिसरात मी अनेक वेळा छायाचित्रे काढण्याचा आनंद घेतला आहे.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nथकबाकीदार शेतकऱ्यांना दुसरीकडे कर्जही मिळेना\nझरे : शेतकऱ्यांना युती सरकारने व महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी केली. परंतु अनेक नवीन नवीन नियम अटी घातल्याने अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित...\nकामगार विधेयकांविरोधात गडहिंग्लजला सहा संघटनांकडून निदर्शने\nगडहिंग्लज : कामगारांचे हक्क कमजोर करणाऱ्या विधेयकांना विरोध करीत विविध कामगार संघटनांनी आज निदर्शने केली. येथील प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन...\nवांद्रेनजीकचा समुद्रकिनारा सर्वात दूषित, पाण्यातील 'ई कोलाय' विषाणूचं प्रमाण पाचपट अधिक\nमुंबईतील वांद्रेनजीकचा समुद्र मुंबईतील सर्वाधिक दुषित आहे. शौचालयाच्या पाण्यात आढळणारा ई कोलाय हा विषाणू या परीसरातील पाण्यात निकषापेक्षा तब्बल...\nमाझ्या स्वप्नांनाही तिने दिले पंख\nआईबद्दल किती बोलावं तेवढं थोडंच आहे. माझी आई उषा खूपच साधी. घर, संसार, सासू-सासरे अन् मुलांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करायचा, हेच तिचं विश्व होतं....\nभारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट ही, की बुसान आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी मराठी चित्रपट ‘बिटरस्वीट’ चित्रपटाची निवड झाली आहे. या...\nपोलिस आयुक्‍तांचे नवे आदेश नियम मोडणारे दुकान सात ते चौदा दिवस बंद\nसोलापूर : शहरातील कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातून शहरातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोके वर काढत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-shock-37-positive-savali-shelter-three-kudale-plot-two-miraj-disrupted", "date_download": "2020-09-26T03:22:06Z", "digest": "sha1:BV24OILCKPBS2O2CHQDVMSCRFXNMCQXW", "length": 15224, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "सांगलीत धक्का...सावली बेघर निवारा केंद्रात 37 जण पॉझिटिव्ह; कुदळे प्लॉटमध्ये तीन, मिरजेत दोन, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी बाधित; एकुण 43 रुग्ण | eSakal", "raw_content": "\nसांगलीत धक्का...सावली बेघर निवारा केंद्रात 37 जण पॉझिटिव्ह; कुदळे प्लॉटमध्ये तीन, मिरजेत दोन, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी बाधित; एकुण 43 रुग्ण\nजिल्ह्यात एकुण 747 रुग्णसंख्या झाली असून महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या 167 झाली आहे.\nसांगली ः येथील सावली बेघर निवारा केंद्रातील 37 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यासह शहरातील कुदळे प्लॉट येथे तीन रुग्ण, तर मिरजेतील मंगळवार पेठ आणि कमानवेस येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे. तसेच एका वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला. बारा तासात शहरात 43 नवे रुग्ण झाल्या महापालिका क्षेत्र हादरले आहे. जिल्ह्यात एकुण 747 रुग्णसंख्या झाली असून महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या 167 झाली आहे.\nगेल्या आठवड्यापासून महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी सावली निवारा केंद्रातील एकास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर केंद्र सील करण्यात आली. तेथील 57 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आली. त्यातील 37 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला. महापालिकेच्यावतीने हे केंद्र चालविले जाते. शहरात फिरणाऱ्या बेघरांना याठिकाणी निवारा दिला जातो. एकाच ठिकाणी 37 जणांना लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. तेथील पॉझिटिव्ह लोकांना तातडीने कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सारा परिसरात औषध फवारणी करण्यात आली असून कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे व त्यांचे पथकाने परिसरास भेट दिली.\nयासह शहरातील कुदळे प्लॉट येथे एकाच कुटुंबातील तिघांना लागण झाली. तसेच मिरजेतील कमानवेस आणि मंगळवार पेठ याठिकाणीही रुग्ण मिळून आले. यासह एका वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यास कोरोनाची लागण झाली आहे. दिवागणीक रुग्णसंख्येत वाढ होत असून खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nआजअखेरचे एकूण रुग्ण- 747\nउपचार घेत असलेलेरुग्ण- 349\nआजअखेर बरे झालेले रुग्ण- 375\nआजअखेर मृत झालेले रुग्ण- 23\nमहापालिका क्षेत्र बाधित- 167\nसंपादन ः शैलेश पेटकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांचा कोविड क्रुसेडर्स 2020 अवॉर्डने गौरव\nमुंबई, ता.25 : इंडो अमेरिका चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा कोविड क्रुसेडर्स अवॉर्ड 2020 या पुरस्काराने...\nउपमुख्यमंत्र्यांनी सोडवला कोथरूडमधील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न; दीड हजार घरे वाचणार\nपुणे : कोथरूड येथील सर्व्हे नंबर 44 मधील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रकल्पासाठी बालभारती ते पौड फाटा हा नियोजित विकास आराखड्यातील रस्ता आणि एचसीएमटीआर...\nआंबिल ओढ्याची डागडुजी करूनही धोका कायमच\nपुणे - जागा मिळेल, तिथे थाटलेली बांधकामे. राडरोड्याचे ढीग आणि देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आंबिलओढा आक्रसला. पण त्यानंतर वर्ष-दोन वर्षांनी...\nमिरजेत भाजी मंडईचे काम रखडले; खंदकात पुन्हा भरले पाणी\nमिरज (जि. सांगली) : वर्षभरापूर्वी डामडौलात सुरू झालेले येथील नव्या भाजीमंडईचे काम नेहमीप्रमाणे रखडले आहे. साहजिकच शहरातील भाजी विक्रेते आणि...\nकोल्हापुरात फिल्मीस्टाईलने मोटारीचा पाठलाग करून दोन किलो गांजा जप्त\nकोल्हापूर : फिल्मीस्टाईलने मोटारीचा पाठलाग करून पोलिसांनी शुक्रवारी दोन किलोग्रॅमचा गांजा पकडला. या प्रकरणी तिघांना जुना राजवाडा...\nपार्सलसेवेसाठी हॉटेल व रेस्टॉरंट सातनंतरही राहणार खुले\nपुणे - ऑर्डरची संख्या वाढण्याच्या वेळीच हॉटेल बंद करावे लागत असल्याने हॉटेल चालकांचे होणारे नुकसान आता थांबणार आहे. तसेच खाद्यपदार्थांचे पार्सल...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/national/delhi-violence-total-7-deaths-were-reported-1-police-personnel-and-6-civilians-lost-their-lives/", "date_download": "2020-09-26T02:05:06Z", "digest": "sha1:PBX7LP3DDLZLQONIP6BOYBPSUQWZ3DN7", "length": 36291, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Delhi Violence News : A Total Of 7 Deaths Were Reported | दिल्लीतील हिंसाचाराची आग थांबेना, मृतांचा आकडा पोहोचला सातवर | Lokmat.com", "raw_content": "शनिवार २६ सप्टेंबर २०२०\n‘त्या’ ग्रुपची दीपिकाच होती अ‍ॅडमिन\nवेश्याव्यवसाय करणे गुन्हा नाही\nबॅकलॉगच्या परीक्षांचा पहिला दिवस गोंधळाचा\nतळमजल्यावरील अन्य बांधकाम का तोडले\nपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना ‘कोविड क्रुसेडर्र्स २०२०’ पुरस्कार\n 'त्या' ड्रग्स चॅटिंग ग्रुपची अ‍ॅडमिन होती दीपिका पादुकोण, ज्यात लिहिलं होतं माल है क्या\nअर्धांगवायूच्या झटक्यामुळे या अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण, नवऱ्याने मागितली आर्थिक मदत\nश्रद्धा कपूरच्या नावे कारमध्ये सप्लाय व्हायचे ड्रग्ज, करमजीतने साराबद्दलही केला मोठा खुलासा\nएसपी बालासुब्रमण्यम यांना आयुष्यभर वाटत होती या गोष्टीची खंंत, मुलांबाबत केले होते वक्तव्य\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \nनवीन कामगार कायदा नोकऱ्या घालवणार \nराजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेतृत्व की लुटारु, दलालांचे\nकोरोनापश्चात जगाशी जुळवून घेताना...\nचांगल्या आरोग्यासाठी ऋतुंनुसार कसा आहार घ्यायचा जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nडेंग्यू झाल्यानंतर तयार झालेल्या एंटीबॉडी कोरोनाचा सामना करणार; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus : समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका\nआजचे राशीभविष्य -२६ सप्टेंबर २०२०; यश, कीर्ती आणि आनंद लाभेल\nलडाखमध्ये मध्यरात्री 2.14 वाजता 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप\nयुक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 22 शिकाऊ सैनिक ठार\nउल्हासनगर : शहर पूर्वेतील व्हीटीसी रोड शेजारील बाबा प्राईमला लागून असलेल्या फर्निचर कंपनीला भीषण आग. दलाच्या जवानांचा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न.\nठाणे जिल्ह्यात एका हजार 671 रुग्णांसह 32 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.\nदीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न\nदहशतवाद पोसणाऱ्या देशानं आम्हाला मानवाधिकारांचे धडे देऊ नयेत; संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत भारतानं पाकिस्तानला सुनावलं\nCSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल; दिल्लीच्या कर्णधाराला पाठवलं माघारी, Video\nमुंबईत आज दिवसभरात १ हजार ८७६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांची संख्या १ लाख ९४ हजार १७७ वर\nCSK vs DC Latest News : क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग\nIPL 2020 : मला धमकावलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं\nराज्यात आतापर्यंत १३ लाख ७५७ जणांना कोरोनाची लागण; सध्या २ लाख ७२ हजार ७७५ जणांवर उपचार सुरू; ९ लाख ९२ हजार ८०६ जणांना डिस्चार्ज\nराज्यात आज १७ हजार ७९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाखांच्या पुढे\nधारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या\nरेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस/ पनवेल ते गोरखपूर दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.\nआजचे राशीभविष्य -२६ सप्टेंबर २०२०; यश, कीर्ती आणि आनंद लाभेल\nलडाखमध्ये मध्यरात्री 2.14 वाजता 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप\nयुक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 22 शिकाऊ सैनिक ठार\nउल्हासनगर : शहर पूर्वेतील व्हीटीसी रोड शेजारील बाबा प्राईमला लागून असलेल्या फर्निचर कंपनीला भीषण आग. दलाच्या जवानांचा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न.\nठाणे जिल्ह्यात एका हजार 671 रुग्णांसह 32 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.\nदीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न\nदहशतवाद पोसणाऱ्या देशानं आम्हाला मानवाधिकारांचे धडे देऊ नयेत; संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत भारतानं पाकिस्तानला सुनावलं\nCSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल; दिल्लीच्या कर्णधाराला पाठवलं माघारी, Video\nमुंबईत आज दिवसभरात १ हजार ८७६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांची संख्या १ लाख ९४ हजार १७७ वर\nCSK vs DC Latest News : क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग\nIPL 2020 : मला धमकावलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं\nराज्यात आतापर्यंत १३ लाख ७५७ जणांना कोरोनाची लागण; सध्या २ लाख ७२ हजार ७७५ जणांवर उपचार सुरू; ९ लाख ९२ हजार ८०६ जणांना डिस्चार्ज\nराज्यात आज १७ हजार ७९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाखांच्या पुढे\nधारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या\nरेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस/ पनवेल ते गोरखपूर दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nDelhi Violence : दिल्लीतील हिंसाचाराची आग थांबेना, मृतांचा आकडा पोहोचला सातवर\nDelhi Violence News : मंगळवारी अनेक आंदोलक हे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. आंदोलकांकडून पाच दुचाकी पेटवून देण्यात आल्या व दगडफेक देखील करण्यात आली आहे.\nDelhi Violence : दिल्लीतील हिंसाचाराची आग थांबेना, मृतांचा आकडा पोहोचला सातवर\nठळक मुद्देदिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा सातवर पोहचला आहे. मंगळवारी अनेक आंदोलक हे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले.आंदोलकांकडून पाच दुचाकी पेटवून देण्यात आल्या व दगडफेक देखील करण्यात आली.\nनवी दिल्ली - दिल्लीतील सीएए विरोधी आंदोलनाला सोमवारी (24 फेब्रुवारी) हिंसक वळण लागलं आहे. या आंदोलनात पुन्हा एकदा दगडफेक करण्यात आली. तसेच दिल्लीतील गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतील काही भागांमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात सोमवारी तब्बल 37 पोलीस गंभीर जखमी झाले होते. तर पाच जणांचा मृत्यू झाला होता. मात्र मंगळवारी मृतांचा आकडा सातवर पोहचला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी देखील अनेक आंदोलक हे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. आंदोलकांकडून पाच दुचाकी पेटवून देण्यात आल्या व दगडफेक देखील करण्यात आली आहे. भजनपुरा, मौजपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा यामध्ये मृत्यू झाला. तर डीसीपी अमित शर्मा हे जखमी झालेत. जखमी पोलिसांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधावरुन दिल्लीत सोमवारी (24 फेब्रुवारी) तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक करण्यात आली असून यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. पेट्रोल पंप आणि काही गाड्या पेटवण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणासाठी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. दिल्लीतील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निमलष्करी दलाच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. पोलिसांची संख्या अपूर्ण असल्याने निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात करण्यात येणार आहे.\nसीएएविरोधातील आंदोलनातून दिल्लीत हिंसाचार पेटला आहे. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये परिस्थिी नियंत्रणाबाहेर गेली असून लोकांना तुम्ही हिंदू आहे की मुस्लीम असा प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे. धार्मिक आधारावर मारहाण, हिंसाचार पेटवला जात आहे. असाच धक्कादायक प्रकार दिल्लीतील हिंसाचारादरम्यान घडला. टाइम्स ऑफ इंडियाचा फोटोग्राफर ज्यावेळी मौजपूर मेट्रो स्टेशनला पोहचला, त्यावेळी एक हिंदू सेनेचा सदस्य त्यांच्याजवळ येऊन फोटोग्राफरच्या कपाळावर टिळा लावला. आता तुमचं काम सोप्प होईल, तुम्ही हिंदू आहात मग याने काय नुकसान होणार असं त्या व्यक्तीने फोटोग्राफरला सांगितले. जवळपास १५ मिनिटानंतर परिसरात दोन गटांमध्ये दगडफेकीला सुरुवात झाली. यादरम्यान काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. फोटोग्राफर आग लागलेल्या ठिकाणी जायला लागला त्यावेळी त्याला काही लोकांनी शिवमंदिराजवळ थांबवलं. मी फोटो घेण्यास जात आहे असं सांगितल्यानंतरही त्यांनी परवानगी दिली नाही. त्यावेळी तुम्ही हिंदू आहात, कशाला पुढे जाताय असा प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे. धार्मिक आधारावर मारहाण, हिंसाचार पेटवला जात आहे. असाच धक्कादायक प्रकार दिल्लीतील हिंसाचारादरम्यान घडला. टाइम्स ऑफ इंडियाचा फोटोग्राफर ज्यावेळी मौजपूर मेट्रो स्टेशनला पोहचला, त्यावेळी एक हिंदू सेनेचा सदस्य त्यांच्याजवळ येऊन फोटोग्राफरच्या कपाळावर टिळा लावला. आता तुमचं काम सोप्प होईल, तुम्ही हिंदू आहात मग याने काय नुकसान होणार असं त्या व्यक्तीने फोटोग्राफरला सांगितले. जवळपास १५ मिनिटानंतर परिसरात दोन गटांमध्ये दगडफेकीला सुरुवात झाली. यादरम्यान काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. फोटोग्राफर आग लागलेल्या ठिकाणी जायला लागला त्यावेळी त्याला काही लोकांनी शिवमंदिराजवळ थांबवलं. मी फोटो घेण्यास जात आहे असं सांगितल्यानंतरही त्यांनी परवानगी दिली नाही. त्यावेळी तुम्ही हिंदू आहात, कशाला पुढे जाताय\nतू हिंदू आहेस की मुसलमान; दिल्ली हिंसाचारात पत्रकाराला विचारला प्रश्न, मग... #DelhiViolence#DelhiRiotshttps://t.co/O8r54zDHLn\nआंदोलकांनी नेमौजपूर भागात दोन घरेही पेटवली आहेत. पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आहेत. सीएएच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केल्याने तणाव निर्माण झाला आहे. रविवारी देखील सीएए विरोधी आंदोलनात दगडफेक झाली होती. सीएएच्या निषेधार्थ जाफराबादमध्ये मोठ्या संख्येने महिला जमा झाल्या होत्या. मात्र कायद्याच्या समर्थनार्थ भाजपा नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्वात मौजपूर चौकाजवळ लोक जमा झाले. त्याचवेळी मौजपूरमधील कबीर नगर मेट्रो स्थानकाजवळ सीएएच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये दगडफेक झाली. दगडफेकीमुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला होता.\nDelhi Violence: बंदुकधारी तरुण भाजपा समर्थक नाहीच, जाणून घ्या सत्य\nDelhi Violence: तू हिंदू आहेस की मुसलमान; दिल्ली हिंसाचारात पत्रकाराला विचारला प्रश्न, मग...\nदंगेखोरांनी छातीवर रोखली पिस्तूल, तरीही मागे हटला नाही पोलीस कॉन्स्टेबल\n'राजधानी को बचाना ही होगा', हिंसाचारानंतर दिल्लीत शाळा बंद अन् परीक्षाही रद्द\nकिस्सा कुर्सी का; व्यासपीठावराच्या दोन खुर्च्यांमधून मोदींनी दिला मोठा संदेश\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nCoronavirus : अफवा पसरविणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात\ncorona virus : खोडसाळपणे मित्राला कोरोना झाल्याचे स्टेट्स अपडेट केले; दोघांवर गुन्हा दाखल\nNirbhaya Case : दोषींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे केली इच्छामृत्यूची मागणी\nतरुणीच्या अपहरणाच्या संशयातून शेजारील युवकाची हत्या; घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता\n...जेव्हा कॅबिनेट मंत्र्याचा भाचाच म्हणतो, “ठाकरे सरकारला जाग येणार का\nजालन्यात रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू\nपरस्परविरोधी दाव्यांमुळे संभ्रम; शेतीसाठी क्रांतिकारी की खाजगीकरणाचा डाव\nकृषी विधेयकावरून शेतकरी रस्त्यावर\nबिहारचे बिगुल वाजले, हातमोजे घालून होणार मतदान\nजीएसटी भरपाई निधी अन्यत्र वापरला; कॅगचा केंद्रावर ठपका\nचिनी सैनिक आमच्या पोस्टवर आले तर गोळी चालवायला मागे-पुढे पाहणार नाही, भारताचा इशारा\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \nनवीन कामगार कायदा नोकऱ्या घालवणार \nराजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेतृत्व की लुटारु, दलालांचे\nपुण्याच्या अंबिलओढ्याच्या पुराला एक वर्ष पूर्ण | Pune Flood | Pune News\nपुण्यात गणेशोत्सवात कार्यकर्ते ग्रुपने बसल्याने कोरोना रुग्ण वाढले |Ajit Pawar On Corona | Pune News\nराज्यात कृषी विधेयक लागू होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्रांची बैठक | Ajit Pawar | Pune News\nकपलचा होईल खपल चॅलेंज | कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना पुणे पोलिसांच्या सूचना | CoupleChallenge News\nअस्थमा रूग्णांना कोरोना झाल्यास 'ही' घ्या काळजी | Asthma and COVID-19 | Lokmat Oxygen\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\nरश्मी देसाई स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री\n कपल्स चॅलेन्जसाठी केला असा 'देशी' जुगाड; पाहा एकापेक्षा एक व्हायरल मीम्स\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nIPL 2020 : शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर\nदसऱ्याआधी मोदी सरकार करणार सर्वात मोठी घोषणा; जोरदार तयारी सुरू\nमौनी रॉय ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खूप स्टनिंग, पहा तिचे हे ग्लॅमरस फोटो\nजुना फोन बदलून खरेदी करा नवीन आयफोन, २३००० रुपयांपर्यंत मिळेल डिस्काउंट\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका\n‘जंटलमन’ गावसकरांची जीभ घसरली\nबॉलीवूडवर चौकशीचा ‘अमल’, मोठमोठ्या अभिनेत्री अडकल्या जाळ्यात\n‘त्या’ ग्रुपची दीपिकाच होती अ‍ॅडमिन\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा\nवेश्याव्यवसाय करणे गुन्हा नाही\nबॉलीवूडवर चौकशीचा ‘अमल’, मोठमोठ्या अभिनेत्री अडकल्या जाळ्यात\n‘जंटलमन’ गावसकरांची जीभ घसरली\n‘त्या’ ग्रुपची दीपिकाच होती अ‍ॅडमिन\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा\nवेश्याव्यवसाय करणे गुन्हा नाही\nतळमजल्यावरील अन्य बांधकाम का तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/11136", "date_download": "2020-09-26T01:51:24Z", "digest": "sha1:OQ6ZPDJQRC6RE6H77HYJOMULP4NICFIS", "length": 40053, "nlines": 222, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जोगवा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जोगवा\nकालपर्यंत रस्त्यावर देवीचा मुखवटा हातात घेऊन भंडारा लावून घ्या म्हणून येणार्‍या बायकांबद्दल तसं काहीच वाटत नव्हतं. कधी भंडारा लावून घेतला नाही म्हणून एखादी / एखादा शिव्याशाप द्यायचा त्याकडेही दुर्लक्षच केलं होतं. आज मात्र यापुढे तसं करु शकेन का असा प्रश्न पडला तो 'जोगवा' हा नवा सिनेमा पाहील्यामुळे. सिनेमा जोगत्या आणि जोगतीणींबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल जी माहीती देतो ती अर्थातच धक्कादायक आहे. याआधी असं काही असेल असा विचारही केला नव्हता.\nचित्रपटाची कथा तायप्पा आणि सुलीची कथा आहे. या दोघांना एकाच दिवशी देवीला सोडलं (कसा शब्द आहे हा... एका माणसाला देवीला सोडलं.. ) जातं. या दोघांचं देवीशी लग्न लागतं ते वेगवेगळ्या कारणाने. अर्थातच दोघांनाही हे स्वीकारणं जड जातं. मग त्यांची या नविन पंथामधे मिसळून जाण्याचा प्रयत्न करताना होणारी ससेहोलपट, त्यातही नाच गाण्याच्या मेळ्यात कधी रमणं, शेवटी ह्या जगण्याला अर्थ नाही हे कळल्यावर बंड करुन उठणं हे सगळंच एक प्रेक्षक म्हणून आपल्याला खिळवून ठेवतं. चित्रपटाचा शेवट हॅपीज एंडीग्ज आहे पण खरं म्हणजे तो मनाला पटत नाही. \"गड्या हे काय खरं नाही\" असं मनात आल्याशिवाय रहात नाही..\n१. सर्वच कलाकारांचा अभिनय. उपेंद्र लिमये जोगत्या झाल्यावर स्वतःच्याच घरी जोगवा मागायला जातो हा प्रसंग उत्कृष्ट.\n२. कॅमेराचा वेळोवेळी केलेला वापर सुंदर आहे.\n३. अजय - अतुलचं संगीत सुंदर.\n१. सुलीच्या डोक्यात जट निघते आणि तीला जोगतीण केलं जातं या प्रवासात तिचे आईवडील कोसळत नाहीत आपण आपल्या लेकराला लहानाचं मोठं केलं. डोक्यात जट सापडल्यावर तीच्यावर जोगतीण बनण्याचं संकट येईल हे माहीत असेल तर एखादी आई जट सापडली हे लपवायचाच प्रयत्न करेल असं वाटलं. किंवा जरी तीने हे सांगायचं ठरवलं तरी तीचा जीव पिळवटून नाही का निघणार.. आपण आपल्या लेकराला लहानाचं मोठं केलं. डोक्यात जट सापडल्यावर तीच्यावर जोगतीण बनण्याचं संकट येईल हे माहीत असेल तर एखादी आई जट सापडली हे लपवायचाच प्रयत्न करेल असं वाटलं. किंवा जरी तीने हे सांगायचं ठरवलं तरी तीचा जीव पिळवटून नाही का निघणार.. सिनेमात आईवडील असे काही कोसळले नाहीत. तेच तायप्पाच्या आईवडीलांबाबतही..\n२. चित्रपटाचा शेवट जरी आशादायी आहे तरी तो प्रत्यक्षात उतरवता येईल असं वाटलं नाही. तायप्पा आणि सुलीने बंड करणं आणि एकमेकांशी लग्न करायचा निर्णय घेणं. पण खरंच असा एकादोघांना बंड करुन यश मिळवता येईल यावर विश्वास ठेवणं अवघड जातं.\nरच्याकने: काल कुठुन अवदसा आठवली आणि प्रभात मधे हा सिनेमा पहायला गेले. चित्रपट संपला तेव्हा शिजून बाहेर आले. भयंकर प्रकार आहे प्रभातला सिनेमा पहाणं हा.\nअश्विनी, माझं गाव आणि आजूबाजूची गावं मी लहानपणापासून बघत आलो आहे. पण लोकांच्या तेव्हाच्या आणि आताच्या मानसिकतेत काही फरक पडला आहे असं मला वाटत नाही.\nसिनेमासाठी खालील पुस्तके संदर्भ म्हणून वापरली आहेत.\nअजून एका लेखकाची \"दर्शन\" ही कथा. मला वाटतं \"चारुता सागर\" (श्री. भोसले.) हे नाव होतं लेखकाचं. आधी लेखिकेचं वाटलं आत्ताच गुगलमधे कळलं की ते लेखक आहेत. टायटल फार भरभर सरकली त्यामुळे नाव वाचून लक्षात ठेवता आली नाही. अजून एका पुस्तकाचाही उल्लेख आहे बहुधा टायटलमधे.\nराम, अजूनही जोगतीणी होतात का तेवढ्याच प्रमाणात हो होतात मी यल्लम्माच्या यात्रेत पाहिले आहे.\nमीनु, एका वेगल्या विषयावर चर्चा सुरू केल्याबद्दल धन्यवाद.\nअश्विनी, मला नाही वाटत प्रमाण कमी झाल असेल, कारण मागे सौंदती देवीला (कर्नाटकात) जाण्याचा योग आला होता तिकडे अजून भरपुर जोगते जोगीणी दिसत होत्या.\nएखाद्या मुलीला जोगतीण बनवले म्हणजे बाकीच्या कुटुंबाला देवीचा आशिर्वाद मिळतो असे मानले जायचे>> अगदि आणि त्यामुळेच आईचा जीव पिळवटून नाही निघणार.\nसौंदती देवी म्हणजेच यल्लम्मा का\nह्म्म्म्म्म. सगळ्याच जोगती जोगतीणीची मानसिक अवस्था कुचंबणेची होते की काही जण्/णी आहे त्या स्थितीत खुष देखिल असतात\nसद्दा, सौदंत्ती म्हणजेच यल्लम्मा देवीचे स्थान.\nमिनू, डोक्यात भुंगा सोडलायस गं \nसौंदती देवी म्हणजेच यल्लम्मा का >> सौंदत्ती हे गावाचं नाव. तिथे असलेल्या डोंगरावर येल्लम्मा देवीचे देऊळ आहे. याची कथा खूप इंटरेस्टींग आहे. येल्लम्मा म्हणजे रेणुका. जमदग्नींची पत्नी आणि परशुरामाची आई.\nजमदग्नींनी रेणुकामातेचा वध करायची आज्ञा आपल्या पुत्रांना दिली. पहील्या चार मुलांनी नकार दिल्यावर धाकट्या परशुरामाने आईचं मुंडकं (हो हाच शब्द वापरलाय खूप ठीकाणी) उडवलं. त्यानंतर तीच्या एका मुंडक्याची हजारो मुंडकी होऊन सर्व दिशांना पसरली. हे जोगते आणि जोगतिणी म्हणजे तीच असा समज आहे. जट सापडणं म्हणजे देवीचा कौल मिळाला की ही ती देवी आहे. मग ती बाई / पुरुष देवीशी लग्न लावून देवीचा मुखवटा / मुंडकं घेऊन दारोदारी भंडारा लावत फिरतात आणि जोगवा मागतात. जोगवा मागून ते स्वत:च उदरभरण करतात. पुरुष जोगत्यांना देवीचा अवतार असल्याने साडी नेसून बाईप्रमाणे रहायचं असतं.\nनंदू सिनेमा पाहून असं वाटलं की सुरुवातीला प्रत्येकाची अवस्था कुचंबणेची, संतापाची असते. कालांतराने सामाजिक दबावाला बळी पडून ते लोक परीस्थितीचा स्विकार करायचा प्रयत्न करतात. काही यशस्वी होतात आणि काही अयशस्वी. अयशस्वी होतात ते आत्महत्या करुन यातून सुटका करुन घेतात. परीस्थितीचा स्विकार करण्यासाठी व्यसनांचा आधार घेतला जातो. दारु पिऊन धुंद व्हायचं दु:खाचा विसर पाडायला अशापैकी. (माझं सगळं ज्ञान 'जोगवा' सिनेमावर आधारीत.)\nपण मिनू, जट सापडणे आणि जोगती होणे याच्या संबंधाबद्दल पण काही आख्यायिका आहे का ही जट वेगळ्याप्रकारची असते की नेहमीसारखीच असते ही जट वेगळ्याप्रकारची असते की नेहमीसारखीच असते जर जोगती जोगतीणी म्हणजे देवी आहे असे मानले जाते तर त्यांना प्रचंड आदराने वागवले गेले पाहिजे नेहमीच, ते तर नाही होत \nलोकांना कळलं पाहिजे की हे जोगती/जोगतीणी ज्याअर्थी फ्रस्ट्रेट होतात, दारु पितात त्याअर्थी हे लोक्स देवी नाहीत. देवी काय दारु पिईल\nअगं साधीच जट वेगळं कसलं काय. केसांना तेलपाणी न केल्याने होणारी साधी जट. पण एकदा का ती सापडली की ते ती पक्की करतात केसांना कंगवा न लावून. वडाचा चीक आणि भंडारा (हळद असावी) लावून.\nजर जोगती जोगतीणी म्हणजे देवी आहे असे मानले जाते तर त्यांना प्रचंड आदराने वागवले गेले पाहिजे नेहमीच, ते तर नाही होत >>हो हा प्रश्नही सिनेमात उपस्थित केलेला आहेच. त्यांना आदराने वागवलं जात नाहीच त्यांचा फक्त उपभोग घेतला जातो.\nपण एकदा का ती सापडली की >>>> अगं जट तर बायकांच्या डोक्यात नेहमीच होतात व आपण रोजच त्या विंचरुन केस नीट राखतो. मग तिथल्या सगळ्याच बायकांच्या डोक्यात पण नेहमीच होत असतील नॉर्मल जटा. मग फक्त काहीच जणांच्या जटेचा एवढा बाऊ का केला जातो वर कुणीसं म्हटल्याप्रमाणे गरीबीमुळे मुलांना निदान जोगती/णी बनवून दोनवेळचं खायला मिळावं म्हणून तर असं केलं जात नसेल वर कुणीसं म्हटल्याप्रमाणे गरीबीमुळे मुलांना निदान जोगती/णी बनवून दोनवेळचं खायला मिळावं म्हणून तर असं केलं जात नसेल तिथल्या श्रीमंतांच्या घरात कुणी जोगती /ण होतात का\nमाझ्यातर रोजच होतात केसात जटा\nमाझ्याही होतात. कुरळे केस असल्यावर अजून काय होणार...\nमीनू, खरंच डोक्याला भुंगा लावालाहेस तू... शांतपणे पहायला हवा सिनेमा.\nमी सध्या सुभाष भेण्डेंचं 'होमकुंड' वाचते आहे. त्यातही गोव्यातल्या कलावंतिणींचा, सेवेकरी भाविणींचा असाच अस्वस्थ करणारा उल्लेख आहे. बरं झालं निदान ह्या प्रथा तरी बंद झाल्या.\nमीनू- तुझा रिव्ह्यु वाचून पाहावसा वाटतोय चित्रपट.\nजट तर बायकांच्या डोक्यात नेहमीच होतात >>> अरे केसाचा गुंता होणं आणि जट यात फरक आहे जट वेगळी दिसते, मुळापासून खालपर्यन्त घट्ट गुंतलेली बट म्हणा हवं तर्.ती बहुधा अस्वच्छता अन केसांची निगा न राखणे यामुळेच होते. अर्थात बहुधा हे सुखवस्तू श्रीमन्त घरात घडत नसणार\nएकदा अशी जट आली की मग चीक अन भंडारा वगैरे अन कधी न धुणे यामुळे सगळेच केस खराब होउन अजून अनेक जटा किंवा पूर्ण केसांचीच एकत्र एक जट तयार होते घाणेमुळे ती भयंकर जड होते, इतकी की बर्‍याच जोगतीणींना पाठीचे वगैरे विकार सुरु होतात त्यामुळे, शिवाय घाणीमुळे केसात उवा, किडे, अळ्या, जखमा, इ. इ. आणखी त्रास वाढतातच. अवचटांनी जट सोडवण्याचे कार्य करणार्या काही कार्यकर्त्यांच्या मुलाखती पण घेतल्यात \"धार्मिक\" पुस्तकात. त्यात हे डीटेल वर्णन आहे. इतकं सुन्न व्हायला होतं हे वाचून\nया दशहतीचा मला आलेला अनुभव बघा.\nज्यावेळी झुलवा नाटक नविन आले त्यावेळी त्यात सुकन्या कुलकर्णी, सयाजी शिंदे,\nप्रतिभा अमृते, गौरी केंद्रे भुमिका करत असत. या नाटकाचा शेवट फ़ारच प्रभावी होता.\nयात नायिका, देवीचे मुखवटे भिरकावून देते, हळद उधळते, पिसारा चुरगळते, व\nस्वत:च्या लेकीला, यातून मुक्त करुन, शिकवण्याचा निर्धार करते. सुकन्या हा प्रसंग\nअतिशय सुंदररित्या सादर करत असे.\nहे नाटक संपल्यावर, नाटकातले कलाकार पदर पसरुन मदत मागत असत. जिथे\nप्रबोधनाची गरज आहे, तिथे या नाटकाचे प्रयोग करता यावेत, म्हणुन हि मदत\nमागत असत. त्यावेळी, माझी आई, सुकन्याला म्हणाली होती, असे देवीचे\nमुखवटे भिरकावणे बरे नाही ( प्रत्यक्ष नाटकात, नायिकेची आई, हे बघून नदीत\nपुढे जन्मगाठ, नावाच्या नाटकात, सुकन्या घेरी येऊन धाडकन पडते, असा प्रसंग\nहोता. या नाटकातील नमूआजीच्या भुमिकेतील लालन सारंग, आपला हात झटकन\nतिच्या मानेखाली धरत. पण एका प्रयोगात, लालन सारंगच्या ऐवजी दीपा श्रीराम\nभुमिका करत होत्या. त्याना हात द्यायला जरा उशीर झाला, आणि सुकन्याच्या\nअंगावर नाटकाचा सेटच कोसळला. पुढे बरेच दिवस, तिला उपचार घ्यावे लागले.\nहि बातमी वाचून, मला आईने, त्या नाटकाची आठवण करुन दिली होती.\nअनेकदा जोगतीणी पाहील्या पण कधी विचार नाही केला ह्या विषयावर , खरच बघायला हवा हा सिनेमा.\nदिनेश माझ्या ओळखीत एक काकू होत्या. त्यांनी नीना कुळकर्णीची एल आय सीची जाहीरात पाहीली त्यात ती विधवा दाखवली होती. पुढे तीचा नवरा गेला तेव्हा त्या म्हणल्या की तीने तशी जाहीरात केली म्हणून तीचा नवरा गेला. मी अवाक. असो याचा इथे काही संबंध नाही वरच्या तुम्ही सांगीतलेल्या प्रसंगावरुन आठवलं इतकंच.\nमी पाह्यला जोगवा. या संदर्भाने बरंच वाचलं होतं आधीच. अनिल अवचटांचा तो मोठ्ठा लेखही वाचला होता त्यामुळे माहीती होती. पण मला सिनेमा त्या दृष्टीने भडक आणि वरवरचा वाटला. बाकी तपशीलात काही लिहीत नाही.\nमी एकलेल्या जुन्या जाणत्या म्हतार्‍या लोकांकडून एकले की नुसती जट झाली म्हणूनच नाही देवीला सोडत. गरीब घरात बर्‍याच मुली पैदा झाल्या तर देवीचा कोप वगैरे अंधविश्वास मग देवीला वहाली की चम्तकार होइल असा समज. खरे तर ती वाहीलेली मुलीकडून पैसे मिळतात ना. प्रथेच्या नावाखाली एक शरीर धंदाच असतो. जट अस्वच्छतेचेच कारण आहे.\nह्यांचे देवी अंगात येणे वगैरे नाच बघून एकदा मी टरकले होते पुर्ण. काय भितीदायक नाचतात. डोक्यावर लाल कुंकू फासलेले,हातात कधी दिवे इथून तिथे पळणे,ओरडणे... भयानक सर्व.\nबर्‍यापैकी आतील भागात अजुनही चालते वाटते कर्नाटकात,गोव्यात वगैरे. हे नुसते एकुन आहे मी तेव्हा उगीच वाद नकोत.\nमीनू, हे तु 'गप्पांचं पान' केलं आहेस का आधीच्या पोस्ट्स वाहून गेल्यात. चांगली चर्चा अन मुद्दे होते त्यात अनेकांचे.\nडोक्यात जट सापडणे म्हणून हिच्यामध्ये देवी आहे अशी अंधश्रद्धा लोकामध्ये अजूनही आहे. (फार लांब कशाला मुंबईच्या ट्रेनमधे या जोगतीणी फिरताना दिसतात.)\nजट होणे म्हणजे केसाचा एक घट्ट (कंगव्याने न सोडवता येणारा) गुंता असतो. बर्‍याचदा केसाम्धे तेल धूळ घाम हे सर्व एकत्र येऊन जट तयार होते. एकदा ही जट सापडली की ती \"जातेय\" का हे बघितले जाते (तेव्हा बहुतेक केस विंचरत नाहीत) आणि मग नंतर ती मुलगी देवीला सोडली जाते. कधीकधी \"नवस\" म्हणूनदेखील मुलाला/मुलीला देवाला सोडले जाते तेव्हा जट तयार होण्यासाठी डोक्यात उंबराचा चिक घालतात. नवस म्हणून बायका फक्त लिंबाची पाने घालून देवी दर्शनाला देखील जातात\nमुलगे जोगते असल्यावर साडी नेसत नाहीत मात्र र्त्याना \"देवीला\" सोडले असएल तर त्याचे लिंग कापून त्याना स्त्रीसारखे वागावे लागते (चुभूदेघे)\nब्राह्मणेतर जातीमधे या अंधश्रद्धेचा जास्त पगडा आहे. माझ्या आईच्या घरची कुलदेवता यल्लम्मा आहे पण आमच्याकडे ही प्रथा नाही तसेच, आम्ही जोगतीणीना देवीचा अवतार मानत नाही (माझ्या आजीने एका यात्रेत जाताना मला सांगितले होते)\nप्रथेच्या नावाखाली एक शरीर धंदाच असतो.>> जोगतीणी शरीर धंदा करत नाहीत. किंबहुना त्याच्या त्या भल्यामोठ्या जटेमुळे त्याना रोजची दैनंदिन कामे करणे देखील शक्य नसते. जोगतीणीचा आर्थिक कमाई हे \"जोगवा\" मागूनचे होत असते.\nआधीचा धागा चुकुन गप्पांचं पान\nआधीचा धागा चुकुन गप्पांचं पान झालं होतं म्हणून हा नवा धागा उघडला.\nमी कालच पाहिला हा चित्रपट....\nमी कालच पाहिला हा चित्रपट.... अप्रतिम आहे.\nशेवट पटला नाही.....इतक्या सहजा सहजी ते लोक त्यांना सोडून देतात हे पटले नाही.\nआणखी एक... अदिती देशपांडे जोगतीण असते... पण तीने केसाचा साधा अंबाडा बांधलेला असतो. तिच्या केसात जट वगैरे दिसत नाही.\nमिनू, चित्रपट पहायचा राहून\nमिनू, चित्रपट पहायचा राहून गेला होता. तुम्ही लिहिलं आहेत त्यावरून वाटतंय की पहायलाच हवा. ठाण्यातही एक प्रभात नावाचं थिएटर होतं. तिथे नेहमी मराठी चित्रपटच लागायचे. मी काल दादर प्लाझाला 'गैर' पाहिला. आवडला. थिएटरची अवस्था बरी आहे. चांगली म्हणता येणार नाही. शिजून निघाले नाही, हेच नशीब.\nजोगवा पाहिला. खुप सुंदर\nजोगवा पाहिला. खुप सुंदर अभिनय. जोगत्या आणि जोगतीणींच्या आयुष्याचे चित्रण बघुन खुप अस्वस्थ झाले. उपेंद्र लिमये आणि मुक्ता बर्वे दोघांचा अभिनय उत्तम\n१. सुलीच्या डोक्यात जट निघते आणि तीला जोगतीण केलं जातं या प्रवासात तिचे आईवडील कोसळत नाहीत आपण आपल्या लेकराला लहानाचं मोठं केलं. डोक्यात जट सापडल्यावर तीच्यावर जोगतीण बनण्याचं संकट येईल हे माहीत असेल तर एखादी आई जट सापडली हे लपवायचाच प्रयत्न करेल असं वाटलं. किंवा जरी तीने हे सांगायचं ठरवलं तरी तीचा जीव पिळवटून नाही का निघणार.. आपण आपल्या लेकराला लहानाचं मोठं केलं. डोक्यात जट सापडल्यावर तीच्यावर जोगतीण बनण्याचं संकट येईल हे माहीत असेल तर एखादी आई जट सापडली हे लपवायचाच प्रयत्न करेल असं वाटलं. किंवा जरी तीने हे सांगायचं ठरवलं तरी तीचा जीव पिळवटून नाही का निघणार..\nआईवडील असे काही कोसळले नाहीत. तेच तायप्पाच्या आईवडीलांबाबतही..\n----> मला वाटतं हा चित्रपटाचा मुख्य उद्देश जोगत्या आणि जोगतीणींच्या आयुष्याबद्दल आहे, त्यांच्या घरच्यांबद्दल नाही. कुठेतरी जोगता किंव्हा जोगतीणी होणं हे चांगलं आहे असं त्या दोघांच्याही आई-वडिलांची ठाम समजुत असते.\nमीनु, तुम्हाला दुखवायचा हेतु नाही. माझं फक्त मत मांडलं मी इथे.\nहुम्म्म . काय ते त्या\nहुम्म्म . काय ते त्या चित्रपटाचं कौतुक. हल्ली काय, कोणत्याही चित्रपटाला कोणतीही पारितोषिकं मिळतात.....\nसुलीच्या डोक्यात जट निघते आणि\nसुलीच्या डोक्यात जट निघते आणि तीला जोगतीण केलं जातं या प्रवासात तिचे आईवडील कोसळत नाहीत आपण आपल्या लेकराला लहानाचं मोठं केलं. डोक्यात जट सापडल्यावर तीच्यावर जोगतीण बनण्याचं संकट येईल हे माहीत असेल तर एखादी आई जट सापडली हे लपवायचाच प्रयत्न करेल असं वाटलं. किंवा जरी तीने हे सांगायचं ठरवलं तरी तीचा जीव पिळवटून नाही का निघणार.. आपण आपल्या लेकराला लहानाचं मोठं केलं. डोक्यात जट सापडल्यावर तीच्यावर जोगतीण बनण्याचं संकट येईल हे माहीत असेल तर एखादी आई जट सापडली हे लपवायचाच प्रयत्न करेल असं वाटलं. किंवा जरी तीने हे सांगायचं ठरवलं तरी तीचा जीव पिळवटून नाही का निघणार.. सिनेमात आईवडील असे काही कोसळले नाहीत.\n>> मला वाटतं - तसं केलं नाही तर देवीचा प्रकोप होईल अशी ही समजुत असते काही लोकांची. अज्ञान आणि दारिद्र्य\nबापरे, वरच वर्णन वाचूनही भयानक वाटतंय\nमी छोटी असताना कुठल्यातरी मासिकात एक कथा वाचलेली ज्यात एका मुलीला असं सोडलं जातं. I was so scared. आईला कळल्यावर ती म्हणालेली \"आपल्यात असलं काही करत नाहित.\" आणि मग ती अंधश्रद्धानिर्मुलन समिती आणि त्यांच काम ह्या विषयावरही बोलली.\nमग जरा हुश्श झालं- (तरी त्या मुलीकरता वाईट वाटलच)\nपण जोगवा काही फक्त देवाला सोडलेले लोकच जोगवा मागतात असं नाही. काही जण नवस बोललेले असतात - काही जणांच्यात वर्षाच्या ठराविक काळात देवासाठी म्हणून जोगवा मागतात - आणि फक्त मिळेल त्यातूनच खातात त्या काळापुरतं. अगदी सधन कुटुंबातली, वेगवेगळ्या जातीतली लोकंही हे करतात.\nअर्थात हा चित्रपटाचा विषय नाहीये, पण त्या अनुषंगानं आलं म्हणून सांगितलं.\nपरवाच जोगवा पाहिला आणि खूप\nपरवाच जोगवा पाहिला आणि खूप अस्वस्थ झाले. देवीच्या नावाखाली काय काय भयंकर प्रकार चालतात.\nया चित्रपटाचा शेवट आशादायक\nया चित्रपटाचा शेवट आशादायक म्हण्जे नक्की काय दाखवला आहे म्हणजे ते दोघे जोगत्यांचा पंथ सोडून देऊन लग्न करतात असं दाखवलंय का\nहो मैत्रेयी. ते दोघं\nहो मैत्रेयी. ते दोघं सगळ्यांना विरोध करुन लग्न करतात.\nएकाच विषयावर दोन धागे झाले\nएकाच विषयावर दोन धागे झाले आहेत. या चित्रपटाच्या चर्चेसाठी खालील दुवा वापरा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/18320", "date_download": "2020-09-26T02:33:33Z", "digest": "sha1:6PHVINAGZFYUTK6RI4RSRU3DDKAP2GJU", "length": 3575, "nlines": 76, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डाएटिंग : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डाएटिंग\nजनरल मोटर्स डाएट प्लॅन\nजनरल मोटर्स डाएट प्लॅन कुणी वापरला आहे का \nयात सात दिवसाचा प्प्लान असतो. प्रत्येक दिवशी ठराविक पदार्हच अलाउड असतात.\nयात एक कोबी सूपही असते. ते कुणी केले आहे का \nजनरल मोटर्स डाएट प्लान\nRead more about जनरल मोटर्स डाएट प्लॅन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/tagresults/rahul-gandhi/15834", "date_download": "2020-09-26T01:14:22Z", "digest": "sha1:OMC56QLMQYC6WEFKAQE7YLJZUNIPAZGV", "length": 6058, "nlines": 88, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " राहुल गांधी : राहुल गांधीसंबंधी ताज्या बातम्या, राहुल गांधी संबंधी मराठी बातम्या - Times Now", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\n'आपला जीव स्वत:च वाचवा, कारण PM मोरासोबत बिझी आहेत'\nसोनिया गांधी, राहुल गांधींची पावसाळी अधिवेशनाला बुट्टी\n'मन की बात'वरून राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा\nबंडाच्या मार्गावर आहेत का कपिल सिब्बल\nCWC Meeting: काँग्रेसच्या बैठकीत जोरदार घमासान\nमोदींचे 20 लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ\n'माझं रक्त खवळतंय कारण...', राहुल गांधी मोदी सरकारवर संतापले\nराजस्थानच्या आमदारांची टूरटूर सुरू, पायलटची समजूत काढणार\nहार्दिकने प्रदेशाध्यक्ष झाल्यावर केलेले ट्वीट केले डीलीट\nसंसदेत चर्चा करुया, अमित शहांचे राहुल गांधींना उत्तर\nराहुल गांधींचे पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह ट्वीट\nकॉंग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी,चव्हाणांचा फोटो बॅनर वरून गायब\nजवानांजवळ शस्त्र होते पण,परराष्ट्रमंत्र्यांचं गांधींना उत्तर\n'पीएम गप्प का आहेत', शहीद सैनिकांवरुन राहुल गांधींचा सवाल\nसुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर राहुल गांधींची प्रतिक्रिया\nआजचे राशी भविष्य २६ सप्टेंबर\nट्रकमध्ये चढत असताना सहायक पडला खाली आणि चाक.....\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ सप्टेंबर २०२०:\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमबद्दल CM ठाकरेंचे मत\nमारुतीची नवीन कार मिळणार मासिक शुल्कावर, पाहा काय आहे प्लॅन\nड्रग्स प्रकरणातील मोठा खुलासा, दीपिका पदुकोण 'त्या' व्हाट्सअॅप ग्रुपची अ‍ॅडमिन होती: सूत्र\nधक्कादायक दावा : आत्महत्या नाही, गळा दाबून केली गेली सुशांत सिंह राजपूतची हत्या\nशिवसेनेचा आरोप- सुशांत सिंह प्रकरणी चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे\nमुंबापुरी झाली तुंबापुरी, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत, सुट्टी जाहीर\nसुशांतने मृत्यूच्या ५ दिवसआधी घरच्यांना पाठवला होता SOS मेसेज, धक्कादायक माहिती आली समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaalavaani.blogspot.com/2010/08/blog-post_8784.html", "date_download": "2020-09-26T02:06:04Z", "digest": "sha1:Y7JHC3JAT6A5TA2F6TVWJUEUT7TFMG22", "length": 10989, "nlines": 106, "source_domain": "jaalavaani.blogspot.com", "title": "जालवाणी: मोनालिसाला कुठे होत्या भुवया?", "raw_content": "\nलेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला प्रत्यक्ष लेखकाच्या आवाजात ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०१० रोजी प्रकाशित करत आहोत. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे काहीही ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...\nमोनालिसाला कुठे होत्या भुवया\nएखादी सामान्य अशी व्यक्ती दिसायला यथातथा आणि शारिरीक/मानसिक काही वैगुण्य असलेली असेल तर, आपण तिच्याशी कसे वागतो पण तशाच तर्‍हेचे वैगुण्य असणारी पण काही कारणाने खूपच सुप्रसिद्ध असलेली व्यक्ती.....तिच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन ह्यात किती जमीन-अस्मानाचा फरक असतो हे दाखवणारी ही कथा.\nलेखन आणि अभिवाचन कांचन कराई ह्यांनी केलंय.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकांचनजी,तुम्ही खूप सुंदर लिहिता आणि तितक्याच सुंदरतेने वाचताही. तुम्ही खरं तर टीव्ही सिरियल मधे काम करायला हवं. आवाजाचा इतका सुंदर वापर पूर्वी म्हणे कुणी नीलमताई करायच्या असे मझी आई म्हणाली. तिलाही तुमचं वाचन खूप आवडलं.\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी ६:२१ म.उ.\n१५ ऑगस्ट, २०१० रोजी ७:२४ म.उ.\nमस्त लेखन आणि वाचन ही.\nमेसेज तर आहेच यात \n१६ ऑगस्ट, २०१० रोजी ५:०२ म.पू.\nकांचनचा आवाज् तर सुरेख आहेच पण लेख ही खूप मनःस्पर्शी आहे. ब्लॉग वरचं वाचन आणि इथलं ऐकणं यात खूप फरक पडतो... म्हणजे चांगल्या अर्थाने, इथे ऐकायला मस्त वाटलं डाउन लोड करून घेतलाय.\n१६ ऑगस्ट, २०१० रोजी ११:२८ म.पू.\nअतिशय हृद्य आणि स्फुर्तीदायक किस्सा. लेखन आणि पेशकश, दोन्हीही. अभिवाचन आवडले.\nइथे मला केशवसुतांची ’दुर्मुखलेला’ ही एक कविताच आठवते आहे.\n[वर्गात एका शिक्षकाने मला ’दुर्मुखलेला’ म्हटले, त्यावरून माझ्या मनात आले ..]\nमाझे शुष्क खरेच हे मुख गुरो\nजाती प्रेक्षक सर्वही विरस ते,\nहे सर्वा उघडे असूनि, वदुनी\nका ते तुम्ही दाविले\nतेणे भूषण कोणते मग तुम्हा\n\"याचे तोंड कुरूप हे विधिवशात\nतेणे सर्वही डोलतील जन हे\nविद्यासंस्कृत त्या तुझ्या क्षणभरी\nयेता नम्र विचार हा, तुज भला\nहोता किती तो तरी\nजे मुंग्या म्हणुनी मनी समजशी\nते पक्षी उडतील होउनि गुरो\nव्योमी, न जाणो वरी,\nराखेची ढिपळे म्हणोनि दिसती\nजी, ती उद्या या जगा\nभस्मीसात्‌ करणार नाहित अशी\nतुम्ही हमी द्याल का\nमधुनि या चालावयाचा पुढे\nआहे सुंदर तो सदा\nतुम्ही नाहि तरी सुतादि तुमचे\n’कवि तो होता कसा आननी\n१६ ऑगस्ट, २०१० रोजी ९:४३ म.उ.\nSUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...\nअभिवाचन छान. मागच्या बांकावरील मुलींचा आवाज मस्तच.\nन्यूनगंड नसावाच. तरी एखाद्यानें वा एखादीनें प्रसाधनांचा (योग्य तेवढा, भडक नव्हे) वापर करून आपलें व्यक्तिमत्व जास्त उठावदार करायलाच पहिजे. माझ्या केसांचा रंग उडाला कीं कार्यालयांतील समस्त स्त्रीवर्ग मला तंबी देत असे, उद्यां केस काळे केले नाहींत तर दंड पडेल म्हणून. कैक वेळां मीं दंड भरलाहि आहे. दंड असे कांहीं तरी खादाडी. माझ्यासारख्या सरकारी संपर्क व्यावसायिकांच्या (Govt. Liasoning) बाबतींत तें योग्यच आहे असें आप्तस्वकीयांचें म्हणणें आहे. मला तसा अनुभवहि गेल्या ३५ वर्षांत आला. काळे केस, कंठलंगोट वगैरे कडक वेषभूषा केली कीं कठीण कामेंहि सहजगत्या होत.\n१७ ऑगस्ट, २०१० रोजी ६:०१ म.उ.\nलेखन आणि वाचन दोन्ही अप्रतिम.\n२१ ऑगस्ट, २०१० रोजी ७:५८ म.उ.\nकांचन, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच खूप आवडली कथा आणि अभिवाचन दोन्ही.\n२२ ऑगस्ट, २०१० रोजी १:३४ म.उ.\nहे ऐकताना नाटकाची सुरवात होत आहे असे वाटतंय... :)\nअजून पडदा पडलाय आणि नाटक सुरु व्हायचं असं वाचन झाले आहे... मस्तच.. :)\n२७ ऑगस्ट, २०१० रोजी ८:१९ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसूर्य संपावर गेला तर\nआणि मी सिगारेट सोडली.\nमोनालिसाला कुठे होत्या भुवया\nअब्राहम लिंकन ह्यांचे हेड मास्तरांना पत्र\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/fisheries/93694b92d93f935902924-92e93e938947", "date_download": "2020-09-26T02:39:10Z", "digest": "sha1:XXYDPDYGXEQAS4JOZH5ZOX2O24XOXQMN", "length": 10363, "nlines": 98, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "शोभिवंत मासे — Vikaspedia", "raw_content": "\nआजकाल आर्थिक स्थिती चांगली असणारया मॉडर्न घरात इतर सर्व प्रकारच्या अद्ययावत उपकारणबरोबरच शोभिवंत माशाच्या मत्स्यालायाचे काचेचे घर ( फिश पॉट ) हे असतेच. त्यामुळे शोभिवंत माशांच्या पालनाला अलीकडे चांगले दिवस येऊ पाहताहेत. शोभिवंत माशाचे प्रजनन, पालन आणि विक्री हा व्यवसाय जम धरू लागला आहे.\nमत्स्यपालन करताना मुलभूत बाबीं\nसायप्रीनीड कुटुंबातील बार्ब आणि लोचेस जातीचे मासे प्रामुख्याने शोभिवंत मत्स्यपालनाकरता उपयोगात आणले जातात. याचबरोबर खाऱ्या पाण्यातील शोभिवंत मत्स्यपालन करताना मुलभूत बाबींची माहिती असणे फार महत्वाचे आहे.\n१) काचेच्या मात्स्यालायाचा आकार ५० x३० x३० सें.मी अगर ६०x४५x३० सें. मी एवढा असावा.\n२) मात्स्यालायाकरिता पावसाचे पाणी,वितळलेल्या बर्फाचे पाणी, डीस्टील वाटर वापरावे.\n३) मात्सालायातील पाण्याचे तापमान २० ते ३० सें. एवढे असावे.\n४) पाण्याची पारदर्शकता, पुरेसा प्रकाश, माशांची योग्य संख्या आणि पाणवनस्पती यांच्या वापरामुळे जे शेवाळ बनते ते कमी करण्यासाठी पाणी बदलावे लागते.\n५) पाण्यात आलेले ढगाळपण घालवण्यासाठी ३ ते ४ शिंपले ठेवावेत.\n६) मात्स्यालायला घरात ८-१० तास प्रकाश आणि ३-४ तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावे. अगर प्रकाशासाठी ट्युबलाईट बसवावी.\n७) खाडीयुक्त वाळू वापरावी. हि खडीवजा वाळू चांगल्या प्रकारे धुऊन वापरावी.\n८) पाणवनस्पती ठेवावी. त्यामुळे मासे शोभिवंत दिसतात. प्राणवायूचे प्रमाण वाढते. पानवनस्पती अॅमेझॉन स्वोर्ड प्लान्ट, इंडिअन फर्न, बनाना प्लान्ट, वाटरलिली, हायद्रीला. इ. रकर आहेत ते वापरावे.\n९) बुडबुडे सोडण्यासाठी एअर रेटर मशीनचा मत्स्यालयात वापर करावा.\n१०) साधारणत: पाण्याच्या निम्मी घनमीटर हवा मत्स्यालयात असावी. याशिवाय मत्स्यालयात पाणी शुद्धीकरणासाठी फिल्टर बसवावा.\n११) थंडीच्या दिवसात मात्स्यालायाचे तापमान नियंत्रित करण्यासाठी हिटर बसवावे.\n१२) मासा जेवढा भुकेला राहतो तेवढा तो चांगला राहतो.थंडीत आठवड्यातन २-३ वेळा खाद्य द्यावे. खाद्याशिवाय डफ निया, मोईना, वर्म्स इत्यादी जिवंत खाद्यही द्याव.हे खाद्य पाण्यावर पसरून द्यावे.\n१३) महत्वाचे म्हणजे मत्स्यालयात गप्पी,गोराफिश, गोल्डफिश,एंजल, टेट्रा,कोई, प्लटी,इ. शोभिवंत मासे पाळावेत. त्यांच्या बाबतीतली सर्वतोपरी माहिती आणि सवयी माहित करून त्यांचे पालन करावे.\nहा व्यवसाय म्हणून करताना त्यांचे प्रजनन, मात्यालय आणि त्यांचे पालनपोषण इ. ची माहिती आणि प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरु केल्यास निश्चितपणे चांगले अर्थार्जन करता येईल.\nस्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/egotist", "date_download": "2020-09-26T03:37:44Z", "digest": "sha1:KO3VLORG4SDWPGSZ2GEUPRXJ4GH73JYU", "length": 2350, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "egotist Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\nकेंद्राने जीएसटीबाबत कायद्याचे उल्लंघन केले : कॅग\nमाणुसकीचा ‘व्हॉट्स अॅप कॉल’\nआसाम बोर्ड : नेहरु, मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले\nराफेलः ऑफसेट कराराची पूर्तता नाही\nकोसळणाऱ्या इमारती आणि कोडगे राज्यकर्ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-26T01:30:39Z", "digest": "sha1:Z4VT7B67EI6LAXYCUUCMSJUUF3A6KWY6", "length": 10081, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आमदार निधीतून मिळणाऱ्या ५० लाखाचा खर्च करा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nआमदार निधीतून मिळणाऱ्या ५० लाखाचा खर्च करा\nजिल्हाधिकाऱ्यांना आ. शिरीषकुमार नाईक यांचे पत्र\n विधानसभेच्या नवापूर मतदार संघात कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाला आवश्यक साधन सामग्री खरेदी करून मिळावी, असे पत्र जिल्हाधिकारी यांना आमदार शिरीषकुमार नाईक यांनी दिले. यासाठी आमदार निधीतून मिळणाऱ्या ५० लाखाचा खर्च करावा.\nदेशात कोरोना विषाणूचा दिवसेंदिवस प्रादूर्भाव वाढत आहे. राज्यातील स्थिती पाहता मुख्यमंत्री यांनी दिलेल्या अधिकारानुसार आमदार निधीमधून ५० लाखाचे वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी अनुमती दिली आहे. त्याअनुषंगाने नवापूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक यांनी आपल्या आमदार निधीमधून ५० लाखाचे वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य सार्वजनिक आरोग्य विभाग यांना देणार आहे\nराज्यात कोविड -१९ विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र covid-१९ उपाययोजना नियम २०२० प्रमाणे तातडीच्या उपाय योजना निश्चित केले आहेत. त्या अनुषंगाने विषाणूविरुद्ध जिल्हा पातळीवर करण्यात येत असलेल्या कार्याला बळ देण्यासाठी विशेष बाब म्हणून आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत प्रतिबंध उपाय करण्यासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी अनुमती आमदार शिरीषकुमार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.\nजिल्हा नियोजन व विकास समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी यांना आमदार शिरीषकुमार नाईक यांनी आवश्यक आरोग्य यंत्र सामुग्रीची मागणी केली आहे.\nशंभर इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर, मशीन पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटच्या एक हजार किटस, दोन व्हेेंटिलेटर, कोरोना टेस्टिंगच्या ५० किटस, फेस मास्क थ्री लेअर ग्लोव्हज १० हजार नग, सॅनिटायजर पाच हजार नग. असे पन्नास लाखाचे साहित्य खरेदी करून नवापूर तालुका आरोग्य विभागात तात्काळ देण्याची शिफारस केली आहे.\nनंदुरबार एलसीबीतर्फे गरजू कुटुंबांना अन्न धान्याचे वाटप\nलॉकडाऊनमुळे छायाचित्रकार आर्थिक अडचणीत\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nलॉकडाऊनमुळे छायाचित्रकार आर्थिक अडचणीत\nनगरसेवक संतोष (दाढी) चौधरी यांच्याकडून जीवनावश्यक किराणा वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_635.html", "date_download": "2020-09-26T03:42:06Z", "digest": "sha1:FI47M5FJVJ4B2LXPYBKD3LCRJCBLYHXQ", "length": 4033, "nlines": 59, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "निरोगी जीवन जगण्यासाठी \"या\" सवयी नक्की लावून घ्या !", "raw_content": "\nनिरोगी जीवन जगण्यासाठी \"या\" सवयी नक्की लावून घ्या \nbyMahaupdate.in बुधवार, जानेवारी १५, २०२०\nनिरोगी काया म्हणजे पहिले सुख मानले जाते. यासाठी फार काही नाही, तर केवळ या सवयी तुम्ही लावून घेतल्या तर निरोगी जीवन मिळते.\nरोज हजार पावले चाला. यामुळे वजन नियंत्रित राहते. हृदयरोग, उच्च रक्तदाब व टाईप - २ डायबिटीसचा धोका कमी होतो.\nरोज ८ तासांची गाढ झोप घ्या. अशी झोप घेण्याने मेंदू शरीराला आजारा विरुद्ध विरुद्ध लढणाच्या हार्मोन्सची निर्मिती करण्याचा आदेश देतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते व स्मरणशक्तीही सुधारते.\nरोज ७ ग्लास पाणी प्या. ही सवय मेंदूला तल्लख बनविते. त्वचेतील ओलावा कायम राहतो. शरीराची अंतर्गत स्वच्छता सुधारते व रोग प्रतिकारशक्तीही वाढते.\nरोज ६ मिनिटे ध्यानधारणा करा, ध्यानाचे शारीरिक तसेच मानसिक लाभ होतात. ध्यान केल्याने तणाव, नैराश्य कमी होते व एकाग्रताही वाढते.\n५ वेळा फळे व भाज्या यांचे सेवन करा. त्यातील भरपूर व्हिटॅमिन व खनिजे तुम्हाला निरोगी ठेवतील व दिवसभर फ्रेशही ठेवतील.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/managementskill", "date_download": "2020-09-26T03:00:55Z", "digest": "sha1:FCY2H7VSUH5NKXGOR3QJ22WWF6ZWYJ6V", "length": 14020, "nlines": 204, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "महाउद्योजक शेतकऱ्याचे स्व-मुल्यांकन – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nअनिश्चिततेच्या खेळात सर्वात पुढे असलेला खिलाडी म्हणजे शेतकरी. राखरांगोळीतून पुनःपुन्हा भरारी घेणारा फिनिक्स पक्षी म्हणजे शेतकरी. कुठलीही शाश्वती नसतांना, घरदार गहाण ठेवून, इतरांना रोजगार व अन्नधान्य देणारा, स्वत:ला काय मिळेल याचा विचार न करता उद्योग करणारा महाउद्योजक म्हणजे शेतकरी.\nशेतकरी मित्रहो, तुमचे हे गुणगान तुम्हाला ओंजारू-गांजारू शकते पण यशस्वी शेतकरी बनवू शकत नाही. सरकारी मदत, माध्यमातील सांत्वन कुठल्याही शेतकरी बांधवास उपयोगी सिद्ध होत नाही.\nज्या प्रमाणे यशस्वी उद्योजक स्वत:चे मुल्यांकन करून घेतात त्याप्रमाणे शेतकरी देखील स्वमुल्यांकन करून घेवू शकतात.\nयथे एक तक्ता देत असून, प्रत्येक हंगामानंतर त्याचा अभ्यास करावा. कधीच नाही साठी १ मार्क, कधी कधी साठी २ मार्क, काही वेळा साठी ३ मार्क व नेहमी साठी चार मार्क द्यावे. स्वत:, कुटुंबातील सदस्यांकडून व जवळच्या मित्राकडून हा तक्ता भरून घ्यावा. स्वत:च्या नजरेतून व इतरांच्या नजरेतून स्वत:चे मुल्यांकन लक्षात घ्यावे. तुमचे मुल्यांकन किती झाले हे बघून खुश किंवा नाराज होण्या ऐवजी पुढच्या वेळेस ते कसे सुधारेल यासाठी प्रयत्नशील रहावे.\nशेतकऱ्याच्या व्यवस्थापन कौशल्याचे मुल्यांकन\nमी/आम्ही कधीच नाही कधी कधी काही वेळा नेहमी\nशेतीच्या बाबतीत लहान व मोठी लक्ष्य ठरवतो\nहि लक्ष्य नोंदवून ठेवतो\nखते व औषधी च्या किमतीची व वापराची लिखापढ ठेवतो\nदर महिन्याच्या आर्थिक उलाढालीचे नियोजन व पालन करतो\nशेतातील प्रत्येक कामाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्चाची किंमत जाणतो\nकर्ज सहज फेडू शकतो\nखर्चाचे निर्णय व्यावहारिकदृष्ट्या चांगले घेतो\nकृषीयंत्र सामुग्री, बांधकाम व इतर मालमत्ता जपतो\nशेतीच्या सर्व कामांची वेळ ठरवतो व वेळेत पूर्ण करतो\nकामाच्या गरजेनुसार मजूर उपलब्ध करून घेतो\nशेतावरील कर्मचारी नेमणे, प्रशिक्षित करणे, कमी करणे याबाबत हय गय करीत नाही\nजोखीम कमी करण्यासाठी काटेकोर नियोजन करतो (विविध पिके घेतो, वेगवेगळ्या बाजारात विकतो, पिक विमा काढतो)\nशेतीचा कस टिकून राहील, जमिनीची धूप होणार नाही हे बघतो\nशेतात तण वाढू देत नाही, दिवसेंदिवस तण कमी होते आहे\nशेत पहाण्यासारखे ठेवतो व आवर्जून दाखवतो\nनियमित वाचन करतो, नवीन काय ते शोधतो, विविध कार्यक्रमात भाग घेतो\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग २ नुकताच एक लेख वाचला. वाढत्या लठ्ठ लोकांच्या संख्येला...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग ३ रा \"भित्यापाठी ब्रम्हराक्षस\", आजकालच अन्नधान्य काही बर नाही,...\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nव्यापारी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठा चढ-उतार होत असतो. अशा आर्थिक...\nरस शोषण करणाऱ्या किडींचे नियंत्रण करा पूर्व नियोजनातून\n. प्रत्येक पिकावर कोणती न कोणती रस सोषक कीड येतेच....\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजनाच्या या तिसऱ्या व शेवटच्या भागात ४० दिवसा नंतर...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2020-09-26T01:32:20Z", "digest": "sha1:2WSJMU6AXRHNXQAAOZY5EO37B3S7LOOY", "length": 10667, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पाळधीला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की ; अरेरावी, शिविगाळ करत कपडेही फाडले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nपाळधीला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की ; अरेरावी, शिविगाळ करत कपडेही फाडले\nपाळधीला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की ; अरेरावी, शिविगाळ करत कपडेही फाडले\nin जळगाव, main news, खान्देश, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या\nपाळधी : गावातील ग्रामपंचायतीजवळ सॅनिटायझर पॉइंटवर नियुक्त कामगाराला दुचाकीची धडक दिली. याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाला दुचाकीस्वारासह त्याच्या भावाने अरेरावी तसे शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व गणवेश फाडल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता पाळधीत घडली. या प्रकरणी दोघा भावांविरुद्ध शासकीय कामात अडथळासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.\nपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गावांमध्ये सॅनिटायझर वाईल्ड करण्यात आलेला आहे या ठिकाणी भाईदास माळी या कामगारांची नियुक्ती आहे . शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास माळी या ठिकाणी कामावर असताना गावातीलच राहुल गुलाब फुलझाडे हा तरुण विना क्रमांकाच्या दुचाकीवरून भरधाव आला. या दरम्याने मारियांना दुचाकीची धडक दिली यात माळी जमिनीवर कोसळले. त्यानंतर दुचाकी सॅनिटायझर पॉइंटच्या शिडीवर धडकली. संबंधित प्रकाराबाबत पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एल गायकवाड यांना माहिती मिळाली. संबंधित प्रकाराबाबत गायकवाड यांनी अपघातात जबाबदार राहुल फुलझाडे यास जाब विचारला असता त्याने गायकवाड यांना अरेरावी करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली . यानंतर घटनास्थळी राहुलचा भाऊ सचिन गुलाब फुलझाडे हाही धावुन आला. गायकवाड यांच्या अंगावर धावून जात त्याने शर्टाची कॉलर पकडली यानंतर धक्काबुक्की करत गणवेशावरच नंबर प्लेट तोडुन गणवेश फाडला .\nतरुणाने लोखंडी गेटवर डोके आपटुन स्वत:ला जखमी करुन घेतले\nया प्रकारानंतर राहुल फुलझाडे याने पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या जिन्याच्या लोखंडी गेटला डोके तसेच हात आपटुन स्वतःला जखमी करून घेतले . यानंतर पोलिसांना बघून घेऊ अशी धमकी देत दोघेही घटनास्थळावरून पसार झाले . याप्रकरणी राहुल गुलाब फुलझाडे व सचिन गुलाब फुलझाडे या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .\nभुसावळातील समता नगरवासीयांना पोलिसांनी घरातच थांबण्याचे केले आवाहन\n‘त्या’ पोलीस निरिक्षकासह कर्मचार्‍यांवर निलंबनानंतर बडतर्फची कुर्‍हाड\nभारतात कोरोना चाचणीचा नवा विक्रम; एका दिवसात विक्रमी चाचणी\nBIG BREAKING: बिहार निवडणुकीची घोषणा: तीन टप्प्यात होणार मतदान\n‘त्या’ पोलीस निरिक्षकासह कर्मचार्‍यांवर निलंबनानंतर बडतर्फची कुर्‍हाड\nलॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/40147", "date_download": "2020-09-26T02:58:14Z", "digest": "sha1:SEHSGG7XLZAIF2V6OTKCPLPGG2ZAALBI", "length": 7002, "nlines": 166, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हाफ मून बे ( कॅलिफोर्निया ) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /rmd यांचे रंगीबेरंगी पान /हाफ मून बे ( कॅलिफोर्निया )\nहाफ मून बे ( कॅलिफोर्निया )\nrmd यांचे रंगीबेरंगी पान\nछान फोटोज प्रत्येक वेळी\nप्रत्येक वेळी Roopa Dharap पाण्यात सूर मारताना दिसतेय. तिला थोडं कोपर्‍यात सराव करायला सांग.\nमॅक्स... गुन्हा कबूल. पण\nमॅक्स... गुन्हा कबूल. पण फेसबुकवर माझ्या फोटोजची चोरी झाल्यापासून हा उपाय करायला लागले. Roopa Dharap ला कोपर्‍यात टाकलं तर ते एडीट करून मग फोटो ढापतात लोक्स.\nहवे... ते शीर्षक या\nहवे... ते शीर्षक या अमेरिकनांनी दिलंय गं बाई\nनं५ आणि नं७ सुंदर आहेत फोटो,\nनं५ आणि नं७ सुंदर आहेत फोटो, रमड \nनंद्या.... माझेही ते फेवरिट आहेत अगदी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.dailykesari.com/tag/rafale/", "date_download": "2020-09-26T01:32:25Z", "digest": "sha1:JST2DQJWXX6BJC4PPPVXUCPNXZOT7NVS", "length": 7761, "nlines": 135, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "rafale Archives - Kesari", "raw_content": "\nफ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह\n‘राफेल’च्या पहिल्या महिला वैमानिक नवी दिल्ली : ‘राफेल’ या अत्याधुनिक लढाऊ विमानांचा नुकताच भारतीय हवाई दलात समावेश करण्यात...\nकचऱ्याच्या ढिगामुळे ‘राफेल’ विमानांच्या सुरक्षेला धोका\nअंबाला : या विमानतळाच्या परिसरात जमा होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भारतीय हवाई दलाने हरयाणा सरकारला तात्काळ उपायोजना करण्याची विनंती केली. या...\nबिहार निवडणूक : तीन टप्प्यांत होणार निवडणूक : निवडणूक आयुक्त\nबिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली.\nनवनाथ गोरे यांचा खडतर प्रवास होणार सुकर\nभारती विद्यापीठात मिळणार नोकरी\nलोकप्रिय गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले.\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलचा पहिल्याच षटकात पराक्रम\nअतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात\nइशांत शर्मा आणखी दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nरत्नाकर चांदेकर यांचे निधन\nपुण्यात शुक्रवारी दिवभरात 62 जणांचा मृत्यू\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/online-business", "date_download": "2020-09-26T01:12:28Z", "digest": "sha1:GNMPH6QX7LIRX2S6BRKQGYD3NYKYA7MM", "length": 9676, "nlines": 165, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Online Business Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nनोकरी सोडा आणि आमच्यासोबत काम करा, अमेझॉनकडून सुवर्ण संधी\nमुंबई : ग्राहकाने ऑर्डर केलेली वस्तू लवकरात लवकर त्याच्या घरी पोहचावी यासाठी अमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना एक नवीन प्रस्ताव दिला आहे. नोकरी सोडा आणि आमच्यासोबत काम\n‘हे’ अॅप इंस्टॉल करु नका, खातं रिकामं होईल, आरबीआयचा सल्ला\nमुंबई : जग हे आधुनिकतेच्या दिशेने वेगाने धावत आहे. आज आपल्याला हवं ते मोबाईलच्या एका क्लीकवर आपल्यापर्यंत पोहोचतं. कुणाला पैसे पाठवायचे असेल किंवा घ्यायचे असतील\n‘अॅमेझॉन’च्या वापरकर्त्यांची माहिती लीक, कंपनीकडून दिलगिरी व्यक्त\nमुंबई : ‘अॅमेझॉन’ या ई-कॉमर्स वेबसाईटवरील काही ग्राहकांची माहिती लीक झाली आहे. कंपनीने तांत्रिक कारण देत दिलगिरी व्यक्त केली. पण यामुळे ऑनलाईन बाजार पूर्णपणे सुरक्षित\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nCSK vs DC Live Score Update : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्लीची चेन्नईवर 44 धावांनी मात\nआशा स्वयंसेविकांनी आणि गटप्रवर्तकांनी प्रस्तावित कामबंद आंदोलन स्थगित करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन\nमोदी सरकारकडून जीएसटीच्या सेसचा गैरवापर, कायद्याचं उल्लंघन, कॅगच्या अहवालात ठपका\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले…\nNarendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण\nCSK vs DC Live Score Update : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्लीची चेन्नईवर 44 धावांनी मात\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/astro/maza-adhyatma/purushottam-berde/sagun-nirgun/articleshow/55214457.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-26T01:39:26Z", "digest": "sha1:EHYYQLXG6JZIZHLJJOX2FYVSUQTTFLNN", "length": 22810, "nlines": 224, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\n>> पुरुषोत्तम बेर्डे‘हास्या’प्रमाणे स्मृती आणि विस्मृती ही सुद्धा माणसाला एक देणगीच आहे. या स्मृतीच्या जोरावर मनुष्य धर्म कितीतरी प्रगत झाला आहे. जन्माला आल्यापासून सुरुवातीला काही वर्षे आपण काय असतो, काय करतो, काय पहातो, काय जाणवून घेतो, याचे कोणालाच काही स्मरत नाही. हा काल साधारण पहिल्या अडीच तीन वर्षांचा असतो. त्यानंतरचे अंधुकसे आणि ४ ते ५ वर्षानंतरचे मात्र स्पष्टपणे आठवू लागते. नंतर ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे या स्मृतींचा संचय होत असतो.\n‘हास्या’प्रमाणे स्मृती आणि विस्मृती ही सुद्धा माणसाला एक देणगीच आहे. या स्मृतीच्या जोरावर मनुष्य धर्म कितीतरी प्रगत झाला आहे. जन्माला आल्यापासून सुरुवातीला काही वर्षे आपण काय असतो, काय करतो, काय पहातो, काय जाणवून घेतो, याचे कोणालाच काही स्मरत नाही. हा काल साधारण पहिल्या अडीच तीन वर्षांचा असतो. त्यानंतरचे अंधुकसे आणि ४ ते ५ वर्षानंतरचे मात्र स्पष्टपणे आठवू लागते. नंतर ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे या स्मृतींचा संचय होत असतो.\nया स्मृतीचं गणित नीट जमले नाही तर वेड लागायची पाळी येऊ शकते, म्हणून त्याला धरूनच परमेश्वराने विस्मृतीची देणगीही दिली आहे. इथे प्रश्न मनाचा येतो. यात मनाचा योग्य निचरा झाला नाही आणि जुन्या गोष्टी साठून राहिल्या तर मात्र जगणे अशक्य होईल. मन आणि बुद्धीला स्मृतीची जोड मिळाली की इतिहासाला पुष्टी मिळते. लिपीची निर्मिती होण्याआधी मनात साठवलेल्या स्मृती, बुद्धीचा वापर करून चित्राद्वारे स्मृतीबद्ध झाल्या आणि पुढच्या पिढीला त्या इतिहास म्हणून सापडल्या. अशाप्रकारे हळूहळू ज्ञानही स्मृतीमध्ये साठवले गेले आणि ते विविध माध्यमांद्वारे केवळ मनात न रहाता चित्रबद्ध किंवा लिपीबद्ध झाले. ज्ञान आणि विज्ञान या दोहोंना मन आणि स्मृती यांचा कमालीचा फायदा झाला. मनाच्या वेगाला जसा बुद्धीच्या सद्सद्विविवेक बुद्धीने आवर घालण्यात येतो तसे मनात स्मृतींचा अतिरेक झाला की विस्मतीचे अस्त्र उपयोगी पडते. आज कॉम्प्युटरचे शोध लागले आणि प्रतिमानव म्हणून ते काम करू लागले असले तरी स्मृती म्हणजे ‘मेमरी’चे गणित या मशीनमध्ये नीट सोडवावे लागते. मध्ये मध्ये अनेक मेमरीज, म्हणजे ‘स्मृती’ दुसऱ्या कार्डावर उतरवून अथवा ‘डिलीट’ करून कॉम्प्युटर कार्यान्वित ठेवावा लागतो, अन्यथा मेमरी फुल झाल्यामुळे तो त्रास देऊन बंद पडतो, तद्वतच माणसाच्या मेंदूत अशा प्रकारे त्याने जास्तीत जास्त १० ते १२ वर्षापर्यंच्या स्मृती शिल्लक ठेवाव्यात अशी आध्यात्मात शिकवण दिली जाते. अन्यथा वैचारिक पातळीवर स्मृतींचा अतिरेक होऊन मानिसक रोग जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपोआपच काही स्मृती विस्मृतीत जातात व जीवन सुकर होऊन जाते. त्या गेल्या नाहीत तर मनोरुग्णावस्था येऊ शकते.\nस्मृती इतकी नसली, तरी विस्मृती हेही वरदानच आहे, कसे तर पारमार्थिक जीवनात, संसारात किंवा एकूणच जगण्यात माणसाला अनेक संकाटाना सामोरे जावे लागते, अनेकदा दु:खाचे डोंगर अंगावर कोसळतात, अत्यंत जवळची माणसे हे जग सोडून जातात, व्यावसायिक अपयश, नातेसंबंधातील चढ उतार, विविध प्रकारची दुखणी यातून जो त्रास उद्भवतो, त्याचा परिणाम या सर्व घटना जसजशा विस्मृतीत जातात तसतशी त्याची तीव्रता कमी होते व कालांतराने त्या विस्मृतीत जाऊन त्याचा इतिहास होतो व त्याबरोबर दु:ख व इतर अनेक संवेदना ह्या नष्ट होतात व आपण त्याकडे त्रयस्थासारखे पाहून काही नवीन शिकू शकतो. स्मृती आणि विस्मृतीचा हा खेळ मनाच्या विविधध अवस्था बदलून टाकण्याचे सामर्थ्य ठेवून असतो, मन थोडावेळ एकाग्र केल्यास मनातले कित्येक स्मृतीपटल उघडून त्यात स्वैर संचार करता येतो. असे असले तरी या खेळात जास्त रमू नये असे ‘आध्यात्म’ सांगते. स्मृतीची क्षमता वाढविण्यासाठी योग्य तो ‘आहार’ घ्यावा व स्मृतींचा साठा वाढवावा. चांगल्या व ज्ञान संवर्धक गोष्टींचा कितीही साठा केला तरी त्यात तोटा नाही, परंतु अनावश्यक गोष्टी किंवा दु:खे याना फार काळ स्मृतीत थारा असू नये असेही ‘आध्यात्म’ सांगते. जुन्या निरर्थक स्मृतींना सतत उजाळा देत बसल्यास ती व्यक्ती\nइतरांना त्रासदायक होऊ शकते. तमो, रज आणि सात्विक गुणांच्या प्रमाणावर सुद्धा स्मृतीचे अस्तित्व मानवी मेंदूत किती आहे हे अवलंबून असते. तमोगुण व रजोगुण, अपराधी वृत्तीकडे जास्त वळतात आणि त्यांच्यातील स्मृती क्षीण होत जाऊन विनाशास कारणीभूत ठरते. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागून विनाशाकडे वाटचाल होते. अशावेळी ‘आध्यात्म’ सात्विकतेकडे नेऊ शकते, नामस्मरणाने आत्मिक शक्ती वाढवून ‘स्मृती’ मध्ये चांगल्या, सात्विक आणि निर्मळ भक्तीभाव निर्माण करून शरीरास वठणीवर आणू शकते.\n‘स्मृती’ च्या माध्यमातून वषार्नुवर्षे ज्ञानार्जनासारखे ‘दिव्य’ कार्य केवळ मानव जातीला जमले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nमोबाइलगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nहेल्थपेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का\nमोबाइलरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nआजचं भविष्यशनी-चंद्र योग : 'या' ८ राशींना कसा असेल दिवस\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nकरिअर न्यूजविद्यापीठाच्या ATKT परीक्षेला तांत्रिक अडचणीचा फटका\nकार-बाइकदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी\nमोबाइल४.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास\nसोलापूरपुढचे आंदोलन मातोश्री आणि सिल्व्हर ओकवर; पडळकरांचा इशारा\nकोल्हापूरपोटच्या १० वर्षांच्या मुलाला ५ लाखात तृतीयपंथीयास दिले दत्तक\nसिनेन्यूजमाझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा\nअर्थवृत्तराणा कपूरला 'ईडी'चा दणका ; लंडनमधील १२७ कोटींचा फ्लॅट केला जप्त\nआयपीएल २०२०Chennai vs Delhi: दिल्लीने गड राखला, बलाढ्य चेन्नईवर साकारला विजय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/13538/understanding-national-herald-case-in-10-points/", "date_download": "2020-09-26T02:05:33Z", "digest": "sha1:ARNY44CA4762SORSNKKWKIKBUZZKDSRI", "length": 9944, "nlines": 73, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'नॅशनल हेराल्ड प्रकरण समजून घ्या - १० पॉईंट्स मध्ये!", "raw_content": "\nनॅशनल हेराल्ड प्रकरण समजून घ्या – १० पॉईंट्स मध्ये\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nकाँग्रेस पक्षाचा गाजलेला घोटाळा म्हणजे नॅशनल हेराल्ड प्रकरण. भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी २०१६ च्या जूनमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्या कंपन्यातील अन्य अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला. त्यांचा आरोप असा होता की गांधी कुटुंब हेराल्डच्या संपत्तीचा गैरवापर करत आहे.\nहा खटला अजूनही न्यायालयात प्रलंबित असला तरी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे भवितव्य या खटल्याच्या निकालावर अवलंबून आहे.\nनॅशनल हेराल्ड हे प्रकरण नेमके काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी काही महत्वाच्या गोष्टी समजावून घेऊयात.\nकाँग्रेस हा पक्ष गांधी परिवाराच्या मालकीचा नाही. सोनिया गांधी अध्यक्षा आहेत, मालकीण नाही. म्हणजेच काँग्रेस पक्षाची मालमत्ता ही गांधी परिवाराची नाही.\nत्या मालमत्तेतून आलेलं उत्पन्न मग ते भाडेतत्वावर आलेलं असेल अथवा विक्रीतून, त्यावर काँग्रेस पक्षाचा अधिकार असेल, काँगेस अध्यक्षांचा नव्हे.\n१) Associate Journal Limited (AJL) ही कंपनी नॅशनल हेराल्ड नावाच्या दैनिकाची मालक आहे.\n२) दैनिकाला दैनंदिन कामासाठी काँग्रेस पक्षाने ९० कोटींचे कर्ज दिले होते.\n३) दैनिक चालत नसल्या कारणाने AJL म्हणजेच नॅशनल हेराल्डला हे कर्ज चुकवता आले नाही.\n4) म्हणजे एक दैनिक ज्याला काँग्रेस सरकार मध्ये असताना देशातील अतिशय उच्चभ्रू आणि महागड्या जागांवर ऑफिस जागा देण्यात आली. जसं की मुंबई, दिल्ली अशा ठिकाणी ज्या जागांचे भाडे तर दैनिकाला म्हणजे AJL मिळतेच, ह्या शिवाय ह्या जागांचे एकूण मूल्य 2000 कोटीच्या घरात असू शकते.\n5) जर तुमच्यावर 90 कोटींचं कर्ज आहे, पण तुमच्याकडे 2000 कोटींची मालमत्ता आहे, अश्या परिस्थितीत तुम्ही काय केलं असतं सोपे आहे, थोडीशी मालमत्ता विकली असती आणि कर्ज परतफेड केली असती.\n6) सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्याशी प्रामाणिक असलेल्या गटाने यंग इंडिया नावाची एक कंपनी स्थापन केली आणि ते त्याचे मालक झाले.\n7) काँग्रेस ज्याला आपले 90 कोटी हवे होते, त्याला ह्या यंग इंडिया कंपनी ने 50 लाख दिले आणि त्याबदल्यात AJL (नॅशनल हेराल्डचे मालक) हिचा 100% ताबा मिळवला.\n8) यंग इंडिया कंपनी जी कुठलाही व्यवसाय करीत नाही, जी बनवताना फक्त 5 लाखच भांडवल होतं. ती कंपनी आता 50 लाखाच्या मोबदल्यात 2000 कोटींची मालक झाली असून आणि त्यातून येणाऱ्या भाडेउत्पन्न तिलाच मिळणार आहे.\n9) नुकसान झालं ते AJL च्या आधीच्या शरेहोल्डर्सच आणि काँग्रेस पक्षाचं ज्याला आपल्या 90 कोटी मधल्या फक्त 50 लाखात समाधान मानावे लागेल.\n10) फायदा झाला, मग भलेही तो कागदावरच असेल तो झाला यंग इंडियाच्या मालकांना\n50 लाखात 2000 कोटी – वॉरेन बुफ्फेट्ट ला जमली नाही अशा परताव्याची गुंतवणूक यंग इंडिया च्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल वोरा आणि ऑस्कर फर्नांडिस ह्यांनी केलीये.\nही केस सध्या कोर्टात आहे. पाहुयात पुढे काय होतंय ते\nआणि हो – जो पर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत गांधी परिवार innocent आहे हे विसरून चालणार नाही.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “लोकसत्ता” चा चुकीचा अग्रलेख – आर्थिक वर्ष बदलण्याच्या निर्णयाची कारणमीमांसा\nजस्टिन बिबरच्या लिप सिंक चे गुन्हेगार आपणच\nकाश्मीर विषयावर पाकिस्तान्यांचा लंडनमध्ये धुडगूस, त्यावर भारतियांचे “स्वच्छता मिशन” उत्तर\nनरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा एकदा PM बनू शकतील\nगणतंत्राची “विसरलेली” व्याख्या समजून घ्या\nOne thought on “नॅशनल हेराल्ड प्रकरण समजून घ्या – १० पॉईंट्स मध्ये\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/discovery-sport-channel-1401567/", "date_download": "2020-09-26T03:08:30Z", "digest": "sha1:6EIBAOVDBUXMBKUM5MDQCOTL5Z556WWT", "length": 11021, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Discovery sport Channel | ‘डिस्कव्हरी’चा नवीन क्रीडा वाहिनीसह भारतात विस्तार | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n‘डिस्कव्हरी’चा नवीन क्रीडा वाहिनीसह भारतात विस्तार\n‘डिस्कव्हरी’चा नवीन क्रीडा वाहिनीसह भारतात विस्तार\n‘डीस्पोर्ट’च्या अनावरणाची सोमवारी घोषणा केली.\nभारतभरातील क्रीडाप्रेमींसाठी जगभरातील सर्वात मोठय़ा व सर्वोत्तम खेळविषयक घटनांच्या प्रक्षेपणाच्या कटिबद्धतेतून डिस्कव्हरी कम्युनिकेशन्सने भारतात नवीन क्रीडा वाहिनी ‘डीस्पोर्ट’च्या अनावरणाची सोमवारी घोषणा केली. गत १० वर्षांत कोणत्याही माध्यम कंपनीने भारतीय बाजारपेठेत दाखल केलेली ही पहिलीच क्रीडा वाहिनी आहे.\nनवीन वाहिनीतून गत २० वर्षांपासून भारतातील डिस्कव्हरीचे योगदान आणखी विस्तारेल असा दावा डिस्कव्हरी नेटवर्क्‍स एशिया पॅसिफिकचे वरिष्ठ उपाध्यक्ष व महाव्यवस्थापक करण बजाज यांनी केला. दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून वैशिष्टय़पूर्ण अशा वाहिन्यांच्या समृद्ध दालनासह डिस्कव्हरी भारतीय प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. डीस्पोर्टच्या शुभारंभासह आपल्या वाढत्या विस्तारामध्ये आणखी एका नाममुद्रेला जोडताना अतिशय समाधानाची जाणीव होत असल्याचे त्यांनी सांगितले. डीस्पोर्टद्वारे देशभरातील प्रेक्षकांना दररोज १० तासांपेक्षा जास्त थेट खेळ स्पर्धाचे कार्यक्रम बघायला मिळतील. वाहिनीसाठी कंटेंट मिळविण्यासाठी ईएसपीएन-स्टारचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि डिश टीव्ही इंडियाचे माजी मुख्याधिकारी आर. सी. व्यंकटेश डीस्पोर्टच्या सेवेत सामील झाले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 डेबिट कार्डधारकांसाठी खूशखबर; व्यवहारांवरील शुल्क होणार कमी\n2 बँक खात्यातून कितीही पैसे काढा; १३ मार्चपासून निर्बंध उठवणार\n3 RBI monetary policy: RBI कडून रेपो दरात बदल नाही, कर्जावरील व्याजदर कायम राहणार\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/corrupt-directors-banned-from-elections-for-10-years-abn-97-2272512/", "date_download": "2020-09-26T03:17:35Z", "digest": "sha1:LVRQPXYJSKLW2XNF67T5YJKJH4DTMT3U", "length": 15196, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Corrupt directors banned from elections for 10 years abn 97 | भ्रष्ट संचालकांना १० वर्षे निवडणूक बंदी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nभ्रष्ट संचालकांना १० वर्षे निवडणूक बंदी\nभ्रष्ट संचालकांना १० वर्षे निवडणूक बंदी\nराज्य बँकेच्या माजी संचालकांना मात्र अभय\nमनमानी कारभार आणि आर्थिक अनियमितता यामुळे सहकारी बँका अडचणीत आणणाऱ्या संचालकांना यापुढे १० वर्षे सहकारी बँकांची निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार यापुढे ज्या बँके चे संचालक मंडळ बरखास्त होईल, त्या बँके तील संचालकांना सहकारी बँकांची निवडणूक लढविता येणार नाही. विधिमंडळात यासंदर्भातील विधेयक नुकतेच संमत करण्यात आले आहे. मात्र या कायद्यातील पूर्वलक्षी प्रभावाची तरतूद वगळण्यात आल्याने राज्य सहकारी बँके च्या माजी संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपाने मात्र सरकारच्या या निर्णयास विरोध के ला असून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.\nभाजप-शिवेसेना युती सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची सहकारातील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आणि या सहकारी संस्थांवर कब्जा करण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले होते. याचाच एक भाग अनियमिततेचा ठपका ठेवून रिझव्‍‌र्ह बँके ने संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई के लेल्या संचालक मंडळास पुढील १० वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालणारा कायदा जानेवारी २०१६मध्ये करण्यात आला होता. मात्र हा कायदा करताना राज्य सहकारी बँके तील तत्कालीन संचालकांना कायमचे घरी बसविण्याच्या उद्देशाने सहकार विभागाचा विरोध डावलून या कायद्याची पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच १० वर्षे मागे जाऊन अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार राज्य बँकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बहुतांश तत्कालीन संचालकांना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या.\nमात्र या कायद्याची पूर्वलक्षी अंमलबजावणी करण्याच्या विरोधात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह काहींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेली चार वर्षे हे प्रकरण न्यायालयातच अडकू न पडले आहे. मात्र या कायद्याची टांगती तलवार ही सरकारमधील अनेक मंत्र्यांसाठी अडचणीची ठरली होती. त्यानुसार या कायद्यातील पूर्वीलक्षी प्रभावाने अंमलबजावणीची अट रद्द करण्यात आली आहे. सरकारने सुरुवातीस अध्यादेशाच्या माध्यमातून हा निर्णय अमलात आणण्याचा प्रयत्न के ला. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने सरकारने मंगळवारी विधिमंडळात यासंदर्भातील विधेयक संमत करून घेतले. त्यानुसार ज्या जिल्हा आणि नागरी सहकारी बँकांवर संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई होईल, त्या संचालकांना पुढील १० वर्षे राज्यातील कोणत्याही सहकारी बँकेची निवडणूक लढविण्यास बंदी असेल.\nविधानसभेत भाजपने या कायद्यास जोरदार विरोध करीत सरकार भ्रष्ट संचालकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप के ला. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून त्यावर कोणतीही स्थगिती नाही. पूर्वलक्षी प्रभावाने याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय योग्य होता असा दावा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी के ला. तसेच या कायद्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला. तर कोणताही कायदा पूर्वलक्ष्यी प्रभावाने राबविता येत नाही. न्यायालयाने कोणताही आदेश दिलेला नाही. त्यामुळे सरकारचा निर्णय योग्य असल्याचा दावा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 गरिबांच्या आरोग्य योजनेचे श्रीमंतच अधिक लाभार्थी\n2 मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगारासाठी सवलती द्या – पाटील\n3 वाहिन्यांच्या वृत्तांकनावर राज्य सरकारचे नियंत्रण का नाही\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/how-can-canceled-fyjc-admission-process-1543293/", "date_download": "2020-09-26T01:43:48Z", "digest": "sha1:OXUCCT25W2TCFBFWGYVCXVPFUQ2YZ5IL", "length": 16508, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "How Can Canceled FYJC admission process | अकरावीचे प्रवेश रद्द करण्यासाठी नियमावली | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nअकरावीचे प्रवेश रद्द करण्यासाठी नियमावली\nअकरावीचे प्रवेश रद्द करण्यासाठी नियमावली\n४ सप्टेंबरपासून दुसरी खास फेरी\nप्रवेश रद्द केल्यास पुन्हा प्रवेश नाही; ४ सप्टेंबरपासून दुसरी खास फेरी\nअकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांनी इथून पुढे प्रवेश रद्द केले तर त्यांना केंद्रीय प्रवेश प्रकियेतून बाद करण्यात येईल आणि मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याही महाविद्यालयांमध्ये पुन्हा प्रवेश मिळणार नाही, असे आदेश शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शुक्रवारी काढले. बेटरमेंटसाठी आधी घेतलेले प्रवेश रद्द करणे आणि नवीन फेरीमध्ये सहभागी होणे ही पळवाट बंद करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने हा बडगा उगारला आहे.\nदरम्यान, अकरावीच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वानुसार राबविण्यात येणाऱ्या फेरीनंतर आता दुसऱ्या खास फेरीचे आयोजन येत्या ४ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. जुलै महिन्यात झालेल्या दहावीच्या फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले सुमारे ५ हजार विद्यार्थी आणि आत्तापर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश निश्चित करू न शकलेले विद्यार्थी यांच्यासाठी या प्रवेशफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.\nअकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील चार प्रवेश फेऱ्या व एक खास फेरी राबविल्यानंतरही प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वानुसार प्रवेश प्रक्रिया घेण्यात आली. परंतु या फेरीमध्येही अनेक विद्यार्थी प्रवेश निश्चित करू शकलेले नाहीत. तसेच जुलै महिन्यात झालेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकालही नुकताच जाहीर झाला आहे. मुंबई महानगर प्रदेशातून ५४०७ विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. येत्या ४ ते ७ सप्टेंबर या काळात प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उर्वरित विद्यार्थ्यांसाठी दुसरी खास फेरी आयोजित केली आहे.\nमहाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्याबाबतच्या वारंवार सूचना देऊनही बरेच विद्यार्थी केवळ बेटरमेंटसाठी महाविद्यालयातील प्रवेश रद्द करुन नवीन प्रवेश देण्याची मागणी करत आहेत. तेव्हा दुसऱ्या खास फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी आधी घेतलेले प्रवेश रद्द करून सहभागी होऊ नये यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रवेश रद्द करणाऱ्यासाठी नियमावलीच जाहीर केली आहे. मुंबई महानगर क्षेत्र वगळून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आणि अकरावीऐवजी आयटीआय, डिप्लोमा आदी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाच केवळ प्रवेश रद्द करण्याची मुभा असणार आहे.\nविद्यार्थ्यांनी महाविद्यालयात निश्चित केलेले प्रवेश रद्द केल्यास त्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी होता येणार नाही. तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करायचा असेल तर प्रवेश रद्द करण्याचे कारण नमूद असलेले हमीपत्र आणि लेखी अर्ज देणे बंधनकारक असणार आहे. तसेच कनिष्ठ महविद्यालयातून प्रवेश रद्दची संगणीकृत पावती जोपर्यंत विद्यार्थ्यांना मिळणार नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द झाला असे समजण्यात येणार नाही. तेव्हा कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश रद्द केल्याची संगणीकृत पावती देणे बंधनकारक असणार आहे.\nअकरावीचे प्रवेश रद्द करण्याबाबत सूचना\nमुंबई महानगर क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी किंवा इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी मिळालेला प्रवेश रद्द करण्याची अनुमती देण्यात येईल.\nमहाविद्यालयात निश्चित केलेले प्रवेश रद्द केल्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी होता येणार नाही.\nप्रवेश रद्द करण्याचे कारण नमूद असलेले हमीपत्र आणि लेखी अर्ज देणे बंधनकारक\nमहाविद्यालयांनी प्रवेश रद्द केल्याची संगणीकृत पावती देणे बंधनकारक\nदुसऱ्या खास फेरीचे वेळापत्रक\n२ सप्टेंबर – रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध\n४ ते ७ सप्टेंबर – ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग १ व २ भरणे\n८ सप्टेंबर – दुसऱ्या खास फेरीची जागा वाटप यादी जाहीर\n८ ते ११ सप्टेंबर – महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 जागर स्त्रीशक्तीचा, ‘शोध नवदुर्गाचा’\n2 ‘न्यू भेंडीबाजारा’त १७ उत्तुंग टॉवर, मॉल\n3 बोरिवलीकरांची गाळाने गाळण\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/the-supreme-court-should-decide-the-procedure-for-appointing-judges-says-former-sc-judge-vikas-sirpurkar-1660488/", "date_download": "2020-09-26T02:57:32Z", "digest": "sha1:GPT5QAPQUU6ID67XKEOXTUNBEPFRPAOS", "length": 13878, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The Supreme Court should decide the procedure for appointing judges says former SC judge Vikas Sirpurkar | न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाने कार्यपद्धती ठरवायला हवी होती – न्या. सिरपूरकर | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nन्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाने कार्यपद्धती ठरवायला हवी होती – न्या. सिरपूरकर\nन्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाने कार्यपद्धती ठरवायला हवी होती – न्या. सिरपूरकर\n‘नॅशनल ज्युडिशियल अपॉईंटमेंट कमिशन’ (एनजेएसी) प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आहे\nमुलाखतीमध्ये बोलताना न्या. विकास सिरपूरकर\n‘नॅशनल ज्युडिशियल अपॉईंटमेंट कमिशन’ (एनजेएसी) प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आहे. मात्र, त्यावेळी न्यायालयाने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या नियुक्तीसंदर्भात कार्यपद्धती ठरवायला हवी होती. ती जर असती तर आज न्यायाधीशांच्या नियुक्तीसंदर्भात निर्माण झालेला घोळ निस्तारता आला असता, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. विकास सिरपूरकर यांनी केले.\nनागपूर हायकोर्ट बार असोसिएशनच्या (एचसीबीए) वतीने न्या. सिरपूरकर यांच्या मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी उच्च न्यायालयातील सभागृहात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. वकिली व्यवसायात येण्याकरिता आई-वडील आपले प्रेरणास्थान आहेत. स्वच्छेने व आवडीने आपण या व्यवसायात आलो. जीवनात लढलो होतो. मात्र, त्यानंतर यशाचे एकेक शिखर पादाक्रांत करीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपद गाठले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना केवळ आठ हजार रुपये वेतन मिळायचे. वकिलीच्या तुलनेत ते फार कमी होते. मात्र, त्याचे कधी दु:ख वाटून घेतले नाही. न्यायाधीश म्हणून काम करताना तुम्हाला देश व संविधानाची सेवा करायला मिळते, हा आनंद सर्वोच्च होता. कोणत्याही न्यायालयात वकिली करण्यासाठी तुम्हाला प्रकरण व कायदा या दोन्हीचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.\nन्यायपालिकेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप हा स्वतंत्र न्यायपालिकेसाठी धोका आहे. स्वतंत्र न्यायपालिका असेल तरच संविधानाचे रक्षण होईल. गेल्या काही दिवसांपासून देशात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या नियुक्तीचा पेच निर्माण झाला आहे.\nमात्र, एनजेएसीची याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांची नियुक्तीची कार्यपद्धती निश्चित करायला हवी होती. तसे झाले असते तर आज न्यायाधीशांच्या नियुक्तीचा पेच निर्माण झाला नसता, असे परखड मतही न्या. सिरपूरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती प्रामुख्याने उपस्थित होते. न्या. सिरपूरकर यांची मुलाखत त्यांचे मित्र वरिष्ठ अधिवक्ता अविनाश गोरडे यांनी घेतली. यावेळी एचसीबीएच्या उपाध्यक्ष अ‍ॅड. गौरी व्यंकटरमन, अ‍ॅड. पी.बी. पाटील उपस्थित होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 सुरक्षा रक्षकाकडून सहा वर्षीय मुलीवर अत्याचार\n2 राज्य सरकारच क्षमतेनुसार काम करू देत नसल्याचा अधिकाऱ्यांचा आरोप\n3 मुलीसोबत सेल्फी काढण्यासाठी बारमध्ये गोळीबार\n\"Mr. Gavaskar तुम्हाला वाटत नाही का...\" 'त्या' वक्तव्यावर अनुष्काने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/women-ragpicker-found-43-live-cartridges-found-chinchwad-1794183/", "date_download": "2020-09-26T02:32:04Z", "digest": "sha1:TTTQCXKYOUJAT2AYK6XNZEPP5GTCBE5U", "length": 10811, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Women ragpicker found 43 live cartridges found chinchwad | पिंपरी-चिंचवडमध्ये सापडली ४३ जिवंत काडतुसे | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nपिंपरी-चिंचवडमध्ये सापडली ४३ जिवंत काडतुसे\nपिंपरी-चिंचवडमध्ये सापडली ४३ जिवंत काडतुसे\nगुरुवारी रात्री सातच्या सुमारास ५८ वर्षीय कचरा वेचक महिला एम्पायर इस्टेटमधील ब्रिजखाली रेल्वे रुळालगत कचरा गोळा करत होती.\nमहिलेला लाल रंगाच्या कापडी पिशवीमध्ये तब्बल ४३ जिवंत काडतुसे सापडली.\nपुण्यातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच पिंपरी- चिंचवडमध्ये एम्पायर इस्टेट येथे लाल रंगाच्या कापडी पिशवीत ४३ जिवंत काडतुसे सापडली आहेत. कचरा वेचक महिलेला ही काडतुसे सापडली असून या प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.\nगुरुवारी रात्री सातच्या सुमारास ५८ वर्षीय कचरा वेचक महिला एम्पायर इस्टेटमधील ब्रिजखाली रेल्वे रुळालगत कचरा गोळा करत होती. महिलेला लाल रंगाच्या कापडी पिशवीमध्ये तब्बल ४३ जिवंत काडतुसे सापडली. महिलेने ही माहिती तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पिशवी ताब्यात घेतली. पिशवीमध्ये एकूण ३०३ रायफलची २६ जिवंत काडतुसे, १० चंदेरी रंगाचे बाराबोर २.२ चे आणि ०७ नग लाल रंगाचे बाराबोर अशी एकूण ४३ जिवंत काडतुसे सापडली.\nदरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलायाच्या गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळेच पुरावा नष्ट करण्यासाठी जिवंत काडतुसे रेल्वे रुळालगत फेकली असावीत, संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 पुलंना हसवू शकलो याचा मला आनंद\n2 बेशिस्त वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्याचे प्रमाण नगण्य\n3 जाहिरात फलकांबाबतचा पालिकेचा दावा खोटा\n\"...त्यानंतर मुंबईवरचे प्रेम उफाळून येईल, तोपर्यंत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trending-news/shaheed-bhagat-singh-birth-anniversary-4-facts-1761392/", "date_download": "2020-09-26T03:06:10Z", "digest": "sha1:FSCT6PXUEU6XP4TZILR2Z6MADSFTHU2Q", "length": 13680, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shaheed Bhagat Singh birth anniversary 4 Facts | | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n#ShaheedBhagatSingh : शहीद- ए- आझम भगतसिंग यांच्याविषयी या गोष्टी माहित आहेत का\n#ShaheedBhagatSingh : शहीद- ए- आझम भगतसिंग यांच्याविषयी या गोष्टी माहित आहेत का\nस्वत:वरील खटल्याचा वापर क्रांतीच्या प्रसारासाठी करणारा मुत्सद्दीपणाही त्यांच्या अंगी होता.\nभगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करुन ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन. पी. सॅण्डर्सची हत्या केल्याप्रकरणी २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती.\nक्रांतिकार्यात बलिदानासाठी सर्वात पुढे असणारा असा नेता, निधड्या छातीने हौतात्म्याला सामोरा जाणारा ‘देशभक्त’, ‘प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी’, ‘जहाल क्रांतिकारक’ अशी भगत सिंग यांची ओळख आजही आपल्या मनात कायम आहे. भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करुन ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन. पी. सॅण्डर्सची हत्या केल्याप्रकरणी २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती. या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीयांचं रक्त आणखी पेटून उटलं त्यांच्या बलिदानानंतर स्वांतत्र्यांची चळवळ अधिक प्रखर झाली. शहीद भगत सिंग यांची आज जयंती आहे तेव्हा शहीद भगत सिंग जयंतीनिमित्त फार क्वचित ऐकलेल्या त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.\n– तरुण वयातच आपल्या कार्याची दिशा त्यांना पक्की ठाऊक होती, ते बंडखोर होतेच पण जगातल्या सगळ्या दु:ख-दैन्याबाबत त्यांच्या मनात करुणाही होती म्हणूनच त्यांची ओळख क्रांतीकारी शहीद भगत सिंग बरोबरच एक उत्तम द्रष्टा, करुणा बाळगणारा मानवतावादी अशीही केली जाते. स्वत:वरील खटल्याचा वापर क्रांतीच्या प्रसारासाठी करणारा मुत्सद्दीपणाही त्यांच्या अंगी होता. वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी देशासाठी त्यांनी हसत हसत बलिदान दिलं.\n– भगत सिंग यांची वाचनाची आवड इतकी प्रचंड होती की त्यांना फाशी देण्याआधी त्यांचे वकील प्राण नाथ मेहता यांनी आणलेलं पुस्तक त्यांनी भरभर वाचायला सुरूवात केली. त्यांच्या या पुस्तकवेडानं प्राण नाथ मेहताही अचंबित झाले होते.\n– पुस्तक वाचनातून त्यांना ज्या काही गोष्टींची नव्यानं माहिती मिळत, समजत होती त्याची ते टिप्पणी तयार करत. तुरुंगात असताना त्यांनी काही पुस्तकं लिहिली होती. ‘द हिस्ट्री ऑफ द रिव्होल्युशनरी मूव्हमेंट ऑफ इंडिया’, ‘द आयडियल ऑफ सोशॅलिझम’, ‘ऑटोबायोग्राफी’ आणि ‘अ‍ॅट द डोअर ऑफ डेथ’ ही चार पुस्तकं लिहिली होती.\n– दिल्ली असेंब्लीत बॉम्ब टाकण्यासाठी जाताना भगतसिंहांना माहीत होते की, आपण आता परत येणार नाही. तेव्हा त्यांनी आपले नवे बूट भेट म्हणून आपले सहकारी जयदेव कपूर दिले होते आणि त्याची जुनी पादत्राणे स्वत: घातली होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 Video : शाळेत पोहोचण्यासाठी अ‍ॅल्युमिनिअमच्या भांड्यातून चिमुकल्यांचा जीवघेणा प्रवास\n2 प्रिंटसाठी पैसे नसल्याने तरुणाने हातानेच लिहीला नोकरीचा अर्ज\n3 भारतीय मसाले वाहून नेणारं जहाज ४०० वर्षांनंतर सापडलं\n\"भेदभाव करण्याचा प्रश्नच कुठे येतो,\" विराट-अनुष्कावरील 'त्या' वक्तव्यावर गावसकरांनी दिलं स्पष्टीकरणX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/protest-by-students-in-front-of-mgm-376568/", "date_download": "2020-09-26T02:50:25Z", "digest": "sha1:GHAHCGKPG3CEHP4KEX5LD5FJXL6WF2SN", "length": 12664, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘एमजीएम’समोर विद्यार्थ्यांचे धरणे | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nएमजीएम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील ३ हजार ७०० विद्यार्थ्यांनी सोमवारी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला. गुरुवारी दीपाली दुबे या विद्यार्थिनीच्या डोक्यात पंखा पडल्याच्या घटनेनंतर\nएमजीएम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील ३ हजार ७०० विद्यार्थ्यांनी सोमवारी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला. गुरुवारी दीपाली दुबे या विद्यार्थिनीच्या डोक्यात पंखा पडल्याच्या घटनेनंतर महाविद्यालयातील पंख्यांचे गज चार दिवसांमध्ये बदलण्याचे काम करून घेतो, असे आश्वासन विद्यार्थ्यांना एमजीएम महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने दिले होते. मात्र महाविद्यालय मागण्यांबाबत गंभीर नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारासमोर बसून निषेध केला\n‘आम्ही भावी अभियंते आहोत. आम्हाला आमच्या शिक्षणाचे महत्त्व माहीत आहे, मात्र गेल्या वर्षभरापासून आम्ही आमच्या मागण्या मांडतोय. मात्र प्राचार्य आणि व्यवस्थापन या मागण्यांकडे दुर्लक्ष का करताहेत किमान यापुढे नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांवर हीच वेळ येऊ नये, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. माजी आरोग्यमंत्री कमलकिशोर कदम हे महात्मा गांधी मिशन (एमजीएम) महाविद्यालयाच्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. एमजीएम महाविद्यालयात वर्ग सुरू असताना तीन वेळा विद्यार्थ्यांच्या अंगावर पंखा कोसळल्याने विद्यार्थी जखमी झाले. वेळोवेळी एमजीएमच्या व्यवस्थापनाकडून दुरुस्ती करू, पिण्याची पाण्याची सोय करू, ग्रंथालय, प्रयोगशाळा अद्ययावत करू अशा अनेक आश्वासनांची खैरात होते. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी काहीच नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोमवारी विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी आलेल्या एमजीएमचे टस्ट्री कमलकिशोर कदम यांच्यासमोर प्राचार्य हटावचा नारा दिला. एनएसआययूचे मयरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सोमवारी सुरू होते. याबाबत कदम म्हणाले की, इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. येत्या पंधरा दिवसांत सर्व काम झाल्याचे चित्र पाहायला मिळेल. निवडणुका जवळ आल्याने विद्यार्थ्यांच्या संघटनेतील राजकीय प्रवृत्तींनी आंदोलनाचा देखावा केला असल्याचा दावाही त्यांनी केला. शिक्षणात राजकारण आणू नये असेही ते म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nमुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या\nराज्यात नवे कृषी कायदे नकोच\nकरोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा\nठाणे जिल्ह्यत आणखी १,६७१ रुग्ण\nइंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव\nदेहविक्रय हा गुन्हा नाही\nबिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच\nदेशातील बाधित ५८ लाखांहून अधिक\nपालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी अभियंत्यांच्या फेरनियुक्तीचा घाट\nराज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी\n1 नवी मुंबई पालिकेचा शिलकी अर्थसंकल्प\n2 पनवेलमध्ये आरोग्याचा धंदा तेजीत\n3 रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू\n\"Mr. Gavaskar तुम्हाला वाटत नाही का...\" 'त्या' वक्तव्यावर अनुष्काने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/15654", "date_download": "2020-09-26T02:56:20Z", "digest": "sha1:UDPTW2EMVJKWK7IUVVUKYBNSU4QTBRN5", "length": 3975, "nlines": 99, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जाड पोहे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जाड पोहे\nRead more about शेवग्याच्या पानांचे थालीपीठ\nRead more about शेवग्याच्या पानांचे थालीपीठ\nRead more about थालीपीठाची भाजणी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_389.html", "date_download": "2020-09-26T02:37:42Z", "digest": "sha1:RAZTPVHQQEV6CDUZEOCIW6MKY6S2PRO7", "length": 5386, "nlines": 57, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "रक्तातील साखरेचे प्रमाण समतोल राखण्यासाठी ह्या काही खास टिप्स.", "raw_content": "\nरक्तातील साखरेचे प्रमाण समतोल राखण्यासाठी ह्या काही खास टिप्स.\nbyMahaupdate.in बुधवार, जानेवारी १५, २०२०\nआजारपण : दुर्दैवाने आजारपण येणे ही नक्कीच वाईट परिस्थिती आहे आणि ती कोणाच्याही हातात नसते. पण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वरखाली होऊ शकते. फ्लू सारख्या आजारात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी खालावते. एवढेच नाही तर आजारपणावर औषध म्हणून अँटीबायोटिक गोळ्या घेतल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वरखाली होते. त्यामुळेच आजारपणाच्या काळात अधिकाधिक पाणी किंवा पेय पदार्थाचा समावेश असावा. पण त्यात साखर किंवा काचे प्रमाण कमीच असावे.\nताण - तणाव : आपल्याला कामाचे किंवा वैयक्क्तिक आयुष्याशी निगडीत कोणत्याही गोष्टीचा ताण आपल्यावर आल्यास शरीर नैसर्गिकरित्या ताणाशी निगडीत हार्मोन्स सवण्यास सुरुवात होते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.\nत्यावर उपाय म्हणून रिलॅक्सेशन टेक्नीक म्हणजे ताणमुक्तीचे तंत्र शिकून घेणे गरजेचे आहे. दीर्घ श्वास घेणे आणि मेडिटेशन यांच्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळी पुन्हा योग्य पातळीवर स्थिरावते. अशा प्रकारे रक्तातील साखरेची पातळी समतोल ठेवण्यासाठी काही युक्त्या आपण करु शकतो.\nशारीरिक हालचाली : बरेच जण नियमित पणे जिममध्ये जाऊन व्यायाम करतातच पण त्याशिवाय घरातील काही कामे नियमितपणे केल्यास शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. घरातील केरवारे करणे, बागेत काम करणे, साफसफाई करणे आदी कामांमुळे शारीरिक हालचाल होत असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि कमी होण्यास मदत करते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/blog-post_49.html", "date_download": "2020-09-26T03:24:29Z", "digest": "sha1:CNEA3HAHLUDGHCC52NITWGTWXLFCZOFD", "length": 5548, "nlines": 56, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "मद्य अनुज्ञप्ती व नियमावलीसंदर्भात मागणी व सूचनांचा अभ्यास करु - राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती", "raw_content": "\nमद्य अनुज्ञप्ती व नियमावलीसंदर्भात मागणी व सूचनांचा अभ्यास करु - राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती\nbyMahaupdate.in बुधवार, फेब्रुवारी ०५, २०२०\nमद्य अनुज्ञप्ती व नियमावलीसंदर्भात मागणी व सूचनांचा अभ्यास करु - राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती\nमुंबई : अनुज्ञप्ती तसेच अन्य नियमावलीसंदर्भात मागणी आणि सूचना यांचा अभ्यास करुन निर्णय घेतले जातील, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. चेंबर ऑफ कॉमर्सच्या, आयएमसी इमारत येथे झालेल्या बैठकीत चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आशिष वैद्य, पूर्व अध्यक्ष मानिक रूपानी, महासंचालक अजित मंगरूळकर आदी उद्योजक सदस्य उपस्थित होते.\nयावेळी उद्योजकांच्या मागणीवजा प्रश्नांना उत्तर देताना वळसे पाटील म्हणाले, खाजगी जागेत मद्य सेवनाकरिता कोणत्याही अनुज्ञप्तीची आवश्यकता नाही. खाजगी जागेत होणाऱ्या समारंभांना अनुज्ञप्ती आवश्यक नसली तरी सार्वजनिक जागेत होणाऱ्या समारंभाना ती आवश्यक आहे. खाजगी परवाना मिळण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. मात्र, खाजगिरीत्या मद्यसेवन करण्यासाठी खाजगी वापर परवाना घेणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. मद्य सेवन करणाऱ्या प्रत्येकाकडे ते असणे आवश्यक ठरते. मद्य सेवनाबद्दल असणाऱ्या अटी घरात असलेल्या लोकांच्या संख्येवर अवलंबून नसून मद्य साठा करण्यासाठी त्या बंधनकारक आहेत. तसेच, मद्य साठा तपासणी करताना कोणासही वैयक्तिकरित्या हानी पोहोचवली जाऊ नये यासाठी योग्य ती काळजी व सतर्कता घेण्याची सूचना विभागाला दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Buedesheim+Eifel+de.php", "date_download": "2020-09-26T03:25:35Z", "digest": "sha1:AKIL365NRSHJCXJMQRVA2GDMPTUT27NR", "length": 3480, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Büdesheim Eifel", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Büdesheim Eifel\nआधी जोडलेला 06558 हा क्रमांक Büdesheim Eifel क्षेत्र कोड आहे व Büdesheim Eifel जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Büdesheim Eifelमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Büdesheim Eifelमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 6558 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBüdesheim Eifelमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 6558 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 6558 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_984.html", "date_download": "2020-09-26T02:45:58Z", "digest": "sha1:AIO2F7EZVWAKJ6Z2RAC5OVH4KYDJ2YSU", "length": 3889, "nlines": 52, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ओजस्वी लेखणीतून प्रकटलेली शिवचरित्रमाला ...\nशिवचरित्रमाला - भाग १ ते १०\nशिवचरित्रमाला - भाग ११ ते २०\nशिवचरित्रमाला - भाग २१ ते ३०\nशिवचरित्रमाला - भाग ३१ ते ४०\nशिवचरित्रमाला - भाग ४१ ते ५०\nशिवचरित्रमाला - भाग ५१ ते ६०\nशिवचरित्रमाला - भाग ६१ ते ७०\nशिवचरित्रमाला - भाग ७१ ते ८०\nशिवचरित्रमाला - भाग ८१ ते ९०\nशिवचरित्रमाला - भाग ९१ ते १००\nशिवचरित्रमाला - भाग १०१ ते ११०\nशिवचरित्रमाला - भाग १११ ते १२०\nशिवचरित्रमाला - भाग १२१ ते १३०\nशिवचरित्रमाला - भाग १३१ ते १४०\nशिवचरित्रमाला - भाग १४१ ते १५०\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400232211.54/wet/CC-MAIN-20200926004805-20200926034805-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}